SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

27    C
... ...View News by News Source

युवा भारताचे स्वप्न अधुरे!

१३ वर्षांनंतर पाकची जेतेपदावर मोहोरदुबई : १९ वर्षांखालील आशिया कप २०२५ स्पर्धेतील अंतिम सामना रविवारी झाला. या सामन्यात पाकिस्तानने भारतासमोर ३४८ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले आहे. मात्र भारताची सुरुवात फारशी चांगली झालेली नाही. भारतीय संघाकडून ३४८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी वैभव सूर्यवंशी आणि कर्णधार आयुष म्हात्रे सलामीला फलंदाजीला उतरले. वैभवने पहिल्याच षटकात दोन षटकार आणि चौकारासह १८ धावा चोपल्या. एका बाजूने वैभव आक्रमक खेळत असताना आयुष म्हात्रे मात्र तिसऱ्या षटकात फरहान युसूफच्या हातून अली रझाच्या गोलंदाजीवर बाद झाला. तो २ धावांवर बाद झाला. त्यानंतरही फलंदाजीला आलेल्या ऍरॉन जॉर्जने आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यान चौथ्या षटकात तीन चौकार मारले, मात्र त्यानंतर त्यालाही मोहम्मद सय्यमने चौथ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर बाद केले. तो ९ चेंडूंत १६ धावा करून बाद झाला.तो बाद झाल्यानंतर पुढच्याच चेंडूवर अली रधाने वैभव सूर्यवंशीलाही बाद करत भारताला धक्का दिला. वैभवचा झेल हामझा झहुरने घेतला. वैभवने १० चेंडूंत १ चौकार आणि ३ षटकारांसह २६ धावांवर बाद झाला.इतकेच नाही, तर उपकर्णधार विहान मल्होत्राही ७ धावांवर बाद झाला. त्यामुळे आक्रमक सुरुवातीनंतर भारताने ५९ धावांवरच ४ विकेट्स गमावल्या. भारतासमोर मोठे लक्ष्य असताना आता हे लक्ष्य पार करण्याची जबाबदारी मधल्या आणि तळातल्या फलंदाजांवर आहे.तत्पूर्वी, पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात ८ बाद ३४७ धावा केल्या. पाकिस्तानकडून समीर मिन्हासने ११३ चेंडूंत १७२ धावा केल्या. अहमन हुसैनने ७२ चेंडूंत ५६ धावांची खेळी केली. उस्मान खानने ३५ धावांची खेळी केली. भारताकडून दीपेश देवेंद्रनने ३ विकेट्स घेतल्या.

फीड फीडबर्नर 22 Dec 2025 12:30 pm

महागाई आटोक्यात, गरिबी कायम

महेश देशपांडेएव्हाना जगाबरोबरच भारतालाही नव्या वर्षाचे वेध लागले आहेत. अर्थनगरी या नव्या वर्षातले नवे अर्थसंकेत जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचाच एक सांगावा म्हणजे पुढच्या वर्षीही महागाई कमी राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, कोल्हापुरी चपलेचा सातासमुद्रापार जाण्याचा प्रवास अलीकडेच स्पष्ट झाला. त्याच वेळी जीडीपी वाढाला, पण गरिबी कायम का आणि कशी राहिली याची चर्चा विस्ताराने ऐकायला मिळाली.जीएसटी दरांमध्ये बदल झाल्यामुळे सप्टेंबर-नोव्हेंबरमध्ये किरकोळ महागाई सुमारे २५ बेसिस पॉइंट्सने कमी झाली आहे. त्यामुळे आता पुढच्या काळात महागाई कमी होणार की वाढणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ‘स्टेट बँक रिसर्च’च्या अहवालानुसार येणारे वर्ष काही प्रमाणात दिलासा देणारे ठरण्याची शक्यता आहे. २०२६ मध्ये देशातील किरकोळ महागाई ३५ बेसिस पॉइंटपर्यंत कमी होऊ शकते. ‘स्टेट बँक रिसर्च’च्या अहवालानुसार, देशातील महागाई पुढील वर्षी कमी होईल. त्यात जीएसटी सुधारणा महत्त्वाची भूमिका बजावतील. अहवालात म्हटले आहे, की या परिणामात ई-कॉमर्स विक्रीवरील सवलतींचा समावेश नाही. जीएसटीमध्ये कपात केल्यामुळे ती आणखी वाढू शकते. या सुधारणांमुळे २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी ‘सीपीआय’मध्ये अंदाजे ३५‘बीपीएस’ची घट होऊ शकते. नोव्हेंबरमध्ये केरळमध्ये महागाई ८.२७ टक्के होती, ग्रामीण भागात ९.३४ टक्के तर शहरी भागात ६.३३ टक्के होती.अहवालात म्हटले आहे, की राज्यात मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या सोने, चांदी आणि तेल आणि चरबीच्या किमतीत झालेली तीव्र वाढ हे यामागील एक प्रमुख कारण असू शकते. अहवालानुसार, भारताच्या ‘सीपीआय’ चलनवाढीच्या मार्गात थोडासा बदल झाला आहे. ऑक्टोबर २०२५ मध्ये ०.२५ टक्के होता, तो नोव्हेंबर २०२५ मध्ये ०.७१ टक्क्यापर्यंत वाढला आहे. मार्च २०२५ पर्यंत तो २.७ टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. रुपयाचे अवमूल्यन पाहता, भारतात महागाई आणखी वाढण्याची शक्यता आहे. आर्थिक वर्ष २०२५-२०२६च्या अखेरच्या टप्प्यामध्ये महागाई १.८ टक्के तर आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये ३.४ टक्के राहण्याचा अंदाज आहे. अहवालात नमूद केले आहे, की रिझर्व्ह बँक फेब्रुवारीच्या पतधोरण बैठकीपर्यंत व्याजदराच्या भूमिकेत बदल करण्याची शक्यता नाही. ‘स्टँडर्ड चार्टर्ड ग्लोबल रिसर्च’ने पूर्वी अंदाज लावला होता, की जीएसटी दरांमध्ये कपात केल्याने भारताच्या अर्थव्यवस्थेला (जीडीपी) ०.१ ते ०.१६ टक्के वाढ मिळू शकते आणि वार्षिक महागाई ४० ते ६० ‘बीपीएस’ने कमी होऊ शकते. ‘स्टँडर्ड चार्टर्ड’ने ताज्या अहवालात म्हटले आहे, की जीएसटी कपातीमुळे सरकारी महसुलात होणारे नुकसान मर्यादित असेल. त्यामुळे सरकारी खर्च आणि महसुलाबद्दलच्या चिंता कमी होतील. अहवालात असेही म्हटले आहे, की एकत्रित राजकोषीय तूट दबावाखाली राहील. ती जीडीपीच्या सुमारे ०.१५ ते ०.२०टक्के असेल. आता वळू या एका लक्षवेधी अर्थवार्तेकडे. जगप्रसिद्ध प्राडा कंपनीसह लिडकॉम आणि लिडकार यांच्यामध्ये मुंबईत कोल्हापुरी चप्पलसाठी सामंजस्य करार झाला. परिणामी २६ फेब्रुवारीनंतर प्राडाच्या ४०विक्री केंद्रांवर आता कोल्हापुरी चप्पलदेखील ग्राहकांसाठी दिमाखात उपलब्ध असणार आहे. भारताच्या पारंपारिक चर्मकला वारशाचा लौकिक सातासमुद्रापार पोहोचवण्यासाठी प्राडा हा आंतरराष्ट्रीय लक्झरी ब्रँड, महाराष्ट्र शासनाचा उपक्रम लिडकॉम (संत रोहिदास चर्मउद्योग आणि चर्मकार विकास महामंडळ) आणि कर्नाटक सरकारच्या लिडकार (डॉ. बाबू जगजीवनराम चर्मउद्योग विकास महामंडळ) यांच्यात एक महत्त्वपूर्ण सामंजस्य करार झाला.या उपक्रमाद्वारे पारंपारिक कोल्हापुरी चप्पलनिर्मिती आणि प्राडाचे आधुनिक, समकालीन डिझाइन्स यांचा संगम घडवून आणला जाणार आहे. दरम्यान, ‘लिडकॉम’च्या व्यवस्थापकीय संचालक प्रेरणा देशभ्रतार यांनी म्हटले आहे, की हा प्रकल्प सततच्या संवादाचा आणि पारंपरिक कलाकृतीचे जतन करणाऱ्या कारागिरांच्या पिढ्यांचा सन्मान करण्यासाठीच्या सामायिक वचनबद्धतेचा परिणाम आहे. ‘प्राडा’सोबतचे सहकार्य नैतिक भागीदारीचे प्रतिबिंबित करते. येथे एक जागतिक ब्रँड महाराष्ट्र आणि कर्नाटकातील कारागिरांशी थेट काम करतो. त्यांच्या कौशल्याची ओळख करून देतो आणि त्यांना पूर्ण श्रेय देतो.‘लिडकार’च्या व्यवस्थापकीय संचालक डॉ. के.ए म. वसुंधरा यांनी या विषयी बोलताना जाहीर केले, की कोल्हापुरी चप्पलांचा वारसा हा कर्नाटक आणि महाराष्ट्रातील कारागिरांच्या पिढ्यांमधून शतकानुशतके चालत आलेला कुशल कारागिरीचा वारसा आहे. या जीआय-टॅग केलेल्या कलाकृतीचे जतन करणे आणि आमच्या कारागिरांचे कौतुक करणे हे या सांस्कृतिक, पारंपरिक आणि आर्थिक वारशाचे रक्षण करण्यासाठी महत्त्वाचे आहे. प्राडासोबतचे आमचे सहकार्य कर्नाटकच्या कारागिरांसाठी लिडकारच्या माध्यमातून नवी जागतिक संधी निर्माण करते, परंपरेचे रक्षण करते आणि प्रशिक्षण, नोकरीच्या संधी आणि शाश्वत उपजीविकेद्वारे समुदायांना सक्षम बनवते. भारतीय कारागिरीला जागतिक व्यासपीठावर नेण्यासाठी प्राडासोबत हातमिळवणी करताना आम्हाला अभिमान वाटत आहे. हा उपक्रम ‘मेड इन’ प्रकल्पातील एक नवीन अध्याय आहे, जो ‘प्राडा’ यांनी दशकापूर्वी जागतिक स्तरावर कारागीर उत्कृष्टतेचा उत्सव साजरा करण्यासाठी सुरू केला होता. भौगोलिक सीमा ओलांडून गुणवत्तेचा एक अतुलनीय मानक असलेल्या समकालीन, नावीन्यपूर्ण डिझाइनवर मास्टर कारागिरांना ओळखणे आणि त्यांच्याशी सहयोग करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. २०१९ मध्ये, कोल्हापुरी चपलांना भौगोलिक संकेत (जीआय) टॅग देण्यात आला. त्यातून प्रामाणिकता जपली गेली आणि त्यांचे सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित झाले.आता चर्चा अर्थक्षेत्रातील एका विचित्र समीकरणाची. देशातील जीडीपीचा दर वाढूनही गरिबी किंवा गरिबांची संख्या कमी झालेली नाही. भारतातील गरिबीसंदर्भात समोर आलेल्या एका अहवालाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. कोलंबिया विद्यापीठाचे प्राध्यापक आणि सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष अरविंद पनगढीया आणि अर्थशास्रज्ञ विशाल मोरे यांच्या अभ्यासानुसार भारताने गेल्या बारा वर्षांमध्ये गरिबी कमी करण्यात ऐतिहासिक यश मिळवले आहे. अहवालानुसार भारतात २०११-१२ ते २०२३-२४ या काळात अति दारिद्र्य जवळपास संपुष्टात आणले. हिंदू आणि मुस्लीम समुदायांच्या गरिबीचे आकडे पाहिले तर त्यातील दरी दूर झाल्याचे दिसते. हा अहवाल पनगढीया आणि मोरे यांनी तयार केला आहे. अहवालानुसार हिंदू आणि मुसलमान दोन्ही धार्मिक समुदायांमध्ये अतिगरिबीचे अंतर जवळपास संपले आहे आणि अनेक राज्यांमध्ये मुसलमानांच्या गरिबीचे प्रमाण हिंदूंपेक्षा कमी आढळले आहे. अहवालानुसार २०२२-२३ मध्ये मुसलमानांमध्ये अतिगरिबीचा दर चार टक्के होता. हिंदूमध्ये तो ४.८ टक्के होता. २०२३-२४ मध्ये मुसलमानांचा अत्यंत गरिबीचा दर घटून १.५ टक्के आणि हिंदूंमध्ये २.३ टक्के टक्के झाला.जागतिक बँकेच्या मते अत्यंत गरिबीचा अर्थ कोणाही व्यक्तीला रोज तीन डॉलर (पीपीपी आधारावर) उत्पन्नावर जगावे लागणे. मोरे आणि अरविंद पनगढीया यांच्या विश्लेषणानुसार ही सीमा भारताच्या ‘तेंडुलकर गरीबी रेखा’च्या बरोबर आहे. ती भारतातील गरीबी मोजण्यासाठी आधारभूत मानली जाते. डेटा जमा करण्यासाठी दोन मानकांचा वापर केला गेला. त्यात ‘तेंडुलकर पॉवर्टी लाईन’ आणि ‘एचसीएफ ‘एचसीईएस‘ सर्व्हेसारख्या मानकांचा वापर केला गेला. तेंडुलकर गरिबी रेखा या मानकाआधारे कोणत्याही व्यक्तीच्या कुटुंबाचा खर्च दारिद्र्यरेषेच्या वर आहे की खाली हे पाहिले जाते. भारतात याचा अधिकृतपणे वापर केला जातो. ‘एचसीईएस’ म्हणजे घरगुती वापर खर्च सर्वेक्षणामध्ये घरोघरी जाऊन लोकांच्या खर्चाशी संबंधित माहिती गोळा केली जाते. पनगढीया आणि मोरे यांच्या या रिपोर्टनुसार २०२२-२३ मध्ये मुसलमानांमध्ये अति दारिद्र्य चार टक्के होते, ते २०२३-२४ घटून दीड टक्का राहिले. हिंदूंमध्ये २०२२-२३ मध्ये हा दर ४.८ टक्के होता. तो २०२३-२४ मध्ये घटून २.३ टक्के झाला दोन्ही सुमदायांमध्ये गरिबी वेगाने घटली आहे आणि दोन्हीमधील फरक जवळपास समाप्त झाला आहे. अभ्यासानुसार २०११-१२ ते २०२३-२४ दरम्यान भारताने गरीबी कमी करण्यात ऐतिहासिक प्रगती केली आहे. गरिबीमध्ये केवळ घसरणीचा वेग जास्त राहिलाच, शिवाय प्रत्येक क्षेत्रात ती समान रितीने कमी झाली आहे.

फीड फीडबर्नर 22 Dec 2025 12:30 pm

एपस्टाईन फाइल्सच्या डेटाबेसमध्ये पुन्हा अपलोड केला ट्रम्पचा ‘तो’फोटो ; कोणी केला हा दावा?, वाचा

Jeffrey Epstein Files। अमेरिकेतील कुप्रसिद्ध जेफ्री एपस्टाईन लैंगिक शोषण प्रकरणातील सोळा फायली सापडल्या आहेत आणि एका वेबसाइटवर अपलोड करण्यात आल्या आहेत. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एपस्टाईन फाइल्समधील या १६ फायली गायब झाल्याने वादळ निर्माण झाले होते. त्यानंतर हा वाद शांत करण्यासाठी, अमेरिकेच्या न्याय विभागाने (DOJ) त्या गायब होण्याचे कारण स्पष्ट करून त्या प्रसिद्ध केल्या आहेत. अमेरिकेच्या […] The post एपस्टाईन फाइल्सच्या डेटाबेसमध्ये पुन्हा अपलोड केला ट्रम्पचा ‘तो’ फोटो ; कोणी केला हा दावा?, वाचा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Dec 2025 12:19 pm

माणिकराव कोकाटेंना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा! आमदारकी कायम राहणार…

Manikrao Kokate | शासकीय कोट्यातील सदनिका गैरव्यवहार प्रकरणात नाशिक सत्र न्यायालयाने माजी क्रीडा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे आमदार माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली होती. मात्र या प्रकरणी माणिकराव कोकाटे यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. कोकाटे यांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली असून, त्यामुळे त्यांची आमदारकी कायम राहणार […] The post माणिकराव कोकाटेंना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा! आमदारकी कायम राहणार… appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Dec 2025 12:17 pm

जव्हार नगर परिषद निवडणुकीत भाजपच्या पूजा उदावंत विजयी

जव्हार : जव्हार नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ मध्ये भारतीय जनता पार्टीने स्पष्ट बहुमत मिळवत नगर परिषदेवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. जनतेने दिलेल्या कौलाचा सन्मान राखत आणि लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यासाठी भाजपच्या वतीने जव्हारमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात विजयाची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत भाजपचे विजयी उमेदवार, पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी पालघर लोकसभा खासदार डॉ. हेमंत विष्णू सवरा, विक्रमगड विधानसभा आमदार हरिश्चंद्र भोये, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते प्रकाश निकम, तसेच नवनिर्वाचित नगराध्यक्ष पूजा उदावंत उपस्थित होते.भारतीय जनता पार्टी ही सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन जव्हारचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी कटिबद्ध आहे. पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, रोजगार आणि नागरी सुविधा या क्षेत्रांमध्ये ठोस विकासकामे हाती घेतली जातील. केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा प्रभावी लाभ प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देण्यात येईल.भारतीय जनता पार्टीचे विजयी उमेदवारजव्हार नगर परिषद निवडणूक २०२५ मध्ये भारतीय जनता पार्टीचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे : प्रभाग क्र. १ – नकुल पटेकर, प्रभाग क्र. २ – हितेश जाधव, पूजा खोरगडे, प्रभाग क्र. ३ – आफरीन शेख, प्रभाग क्र. ४ – कुणाल उदावंत, प्रभाग क्र. ६ – स्वप्निल औसरकर, स्नेहा घाटाळ, प्रभाग क्र. ७ – अनंता गरेल, प्रभाग क्र. ८ – सचिन सटणेकर, मनीषा वड, प्रभाग क्र. ९ – संगीता मुकणे, सुशील सहाने, प्रभाग क्र. १० – दर्शन तामोरे, रुचिता वाजे या निकालात भाजपच्या पूजा उदावंत यांची नगराध्यक्षपदी निवड झाली.तसेच इतर पक्षांचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे: प्रभाग क्र. १ – पद्मा रजपूत (शिवसेना), प्रभाग क्र. ३ – अमोल बर्वे (राष्ट्रवादी काँग्रेस), प्रभाग क्र. ४ – अश्विनी चव्हाण (मविआ), प्रभाग क्र. ५ – कमल कुवरे, इमरान मेमन (राष्ट्रवादी काँग्रेस), प्रभाग क्र. ७ – नसीमा मेमन (शिवसेना गट)

फीड फीडबर्नर 22 Dec 2025 12:10 pm

सोन्याचांदीत 'ऐतिहासिक'वाढ! सोने १३५००० पार चांदी २२०००० जवळ का सर्वोच्च स्तरावर वाचा!

मोहित सोमण: सकाळी सोने व चांदीत विक्रमी वाढ झाली आहे. जगभरातील नव्या ट्रिगरचा लाभ सोन्याचांदीच्या दरात होत असल्याने सोन्याचांदीत ऐतिहासिक वाढ झाली आहे. 'गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ११० रूपयांनी, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात १०० रुपयांनी, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ८२ रूपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे प्रति तोळा किंमत २४ कॅरेटसाठी १३५२७, २२ कॅरेटसाठी १२४००, १८ कॅरेटसाठी १०१४६ रूपयांवर पोहोचली आहे. तोळ्याबाबत दर २४ कॅरेटमागे ११०० रूपयांनी, २२ कॅरेटमागे १००० रूपयांनी, १८ कॅरेटमागे ८२० रूपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे प्रति तोळा दर २४ कॅरेटसाठी १३५२८०, २२ कॅरेटसाठी १२४०००, १८ कॅरेटसाठी १०१४६० रूपयांवर पोहोचले आहेत. भारतीय कमोडिटी बाजारातील एमसी+एक्समध्ये सोन्याचा निर्देशांकात तब्बल १.१६% वाढ झाल्याने दरपातळी १३५७५१ रूपयांवर पोहोचली आहे. तर मुंबईसह भारतातील प्रमुख शहरातील सोन्याचे प्रति ग्रॅम सरासरी दर २४ कॅरेटसाठी १३५२८, २२ कॅरेटसाठी १२४००, १८ कॅरेटसाठी १०१४६ रूपयांवर पोहोचले आहेत. गेल्या १० दिवसात सरासरी प्रति ग्रॅम दर २४ कॅरेटसाठी ३०० रूपयाने, २२ कॅरेटसाठी २५० रुपयांनी वाढले आहेत.संपूर्ण डिसेंबर महिन्याचा विचार केल्यास सोने ४% उसळले असून आज सोन्याने १३५००० पातळीही पार केली. तर जागतिक स्तरावर पाहिल्यास गोल्ड फ्युचर निर्देशांकात १.१८% वाढ झाली असून जागतिक मानक असलेल्या युएस गोल्ड स्पॉट दरात १.४८% वाढ झाली आहे. त्यामुळे प्रति डॉलर दर आज ४४०३.१८ औंसवर गेला आहे.आज मोठ्या प्रमाणात सोने वाढण्याचे महत्वाचे ट्रिगर कुठले?१) आज प्रामुख्याने डॉलर निर्देशांकातील दबाव घसरला ज्यामध्ये डॉलर निर्देशांकात घसरण झाल्याने गुंतवणूक म्हणून सोन्यातील दबाव वाढला२) भूराजकीय स्थितीत स्थिरतेकडून पुन्हा एकदा अस्थिरतेकडे वाटचाल,आशिया खंडात इस्त्राईल इराण यांच्यातील युद्ध सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने सोन्यातील पुरवठ्यात दबाव वाढला.३) युएस फेडरल रिझर्व्ह व्याजदरावर पुन्हा एकदा कपातीचे संकेत मिळाल्यावर सकारात्मक भावनेत वाढ४) युएस आणि व्हेनेझुएला यांच्यातील संभाव्य संघर्षामुळे सुरक्षित गुंतवणूकीची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली दरम्यान पुरवठा मर्यादित राहिला आहे.५) सोने एक सुरक्षित गुंतवणूक साधन म्हणून वाढलेला गोल्ड स्पॉट व्यवहार६) ईटीएफ (Exchange Traded Fund ETF) झालेली वाढ७) आरबीआयकडून वाढलेले हेजिंग८) अस्थिरतेत सुरक्षित गुंतवणूक म्हणून भारतीय गुंतवणूकदारांनी वाढवलेली सोन्यातील गुंतवणूकया एकत्रित कारणांमुळे आज सोन्यात भारत व संपूर्ण आशियाई बाजारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दरम्यान चीनने ही आपला व्याजदर कायम ठेवल्याचा निर्णय घेतल्याने मोठ्या प्रमाणात आज सोन्याच्या मागणीत आणखी वाढ झाली होती. वाढलेल्या मागणीचा परिणाम म्हणून या वर्षी आतापर्यंत सोन्याच्या भावात ६७% वाढ झाली आहे. ज्यामुळे अनेक विक्रम मोडीत निघाले आहेत आणि प्रति डॉलर ३००० औंसवर वाढ झाली असून आणि ४००० डॉलरचे टप्पा प्रथमच ओलांडला गेला आहे ज्यामुळे तज्ञांच्या मते १९७९ नंतरच्या सर्वात मोठ्या वार्षिक वाढीसाठी सोने सज्ज होत आहे.चांदीच्या दरातही मोठी वाढ !चांदीच्या दरातही आज प्रचंड वाढ झाली आहे. युएस फेड दरातील व्याजदरातील कपात वर्तवली जात आहे. तसेच वाढलेल्या औद्योगिक मागणीसह वाढलेली सिल्वर स्पॉट फ्युचर बेटिंगमध्ये झालेल्या वाढीमुळे चांदीला कमोडिटी म्हणून मागणीत वाढ झालेलीच आहे परंतु युएसने मौल्यवान धातूत चांदीचा समावेश वाढल्याने सोन्याहून किंबहुना अधिक पातळीवर दिवसेंदिवस चांदीचे आकर्षण व मागणी वाढत आहे. याचाच परिणाम म्हणून युएस आणि व्हेनेझुएला अस्थिरतेचे निमित्त साधल्याने चांदीने आज ऐतिहासिक पातळी गाठली आहे.'गुड रिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, चांदीच्या प्रति ग्रॅम दरात आज ५ रूपयांनी, प्रति किलो दरात ५००० रुपयांनी वाढ झाली आहे त्यामुळे प्रति ग्रॅम दर २१९ रूपयांवर व प्रति किलो दर २१९००० रूपयांवर पोहोचले आहेत. भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये चांदीच्या निर्देशांकात १.९५% वाढ झाल्याने चांदी २१२५०० रूपयांवर पोहोचली आहे. तर मुंबईसह भारतातील प्रमुख शहरातील चांदीचे प्रति १० ग्रॅम सरासरी दर आज २१९० रूपयांवर, प्रति किलो दर २१९००० रूपयांवर पोहोचले आहेत. तर जागतिक स्तरावरील चांदीच्या सिल्वर फ्युचर निर्देशांकात २.१७% वाढ झाली आहे.चांदीत आणखी वाढ का होत आहे?१) चांदीच्या साठ्यांची कमतरता२)मजबूत औद्योगिक मागणी३) अमेरिकेच्या महत्त्वपूर्ण खनिजांच्या यादीत समावेश यामुळे चांदीच्या किमतीत मोठी वाढ झाली आणि ती २.३९% वाढून २०८,४३९ वर स्थिरावली.४) ईटीएफमधील मोठ्या प्रमाणातील गुंतवणूक आणि सातत्यपूर्ण किरकोळ खरेदीमुळे याला आणखी गती ज्यामुळे आगामी वर्षांमध्ये पुरवठ्यात संरचनात्मक तूट निर्माण होण्याच्या अपेक्षांना बळकटी मिळाली आहे असे तज्ञांचे मत आहे.५) सौर पॅनेल, इलेक्ट्रिक वाहने आणि डेटा-सेंटर पायाभूत सुविधांमधील औद्योगिक वापर वाढतच आहे.६) चांदीच्या दरात पुढे काय अपेक्षित- जागतिक खाण उत्पादन आणि इतर कार्यात चांदीचा पुनर्वापर गेल्या दशकाहून अधिक काळ मोठ्या प्रमाणात स्थिर राहिला. परिणामी, चांदीचे बाजार सलग पाचव्या वार्षिक तुटीच्या दिशेने वाटचाल करत आहे. तज्ञांचे मत आहे की, एकूण तूट येणाऱ्या काळात ८०० दशलक्ष औंसच्या जवळ पोहोणार आहे.एकाच आठवड्यात चांदी प्रति किलो २०००० हून अधिक पातळीवर उसळली आहे. त्यामुळेच स्पॉट चांदीच्या दरात ३% पेक्षा जास्त वाढ होऊन तो प्रति औंस ६९.४५४५ डॉलर पातळीच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचला, तर चांदी फ्युचर्सने प्रति औंस ६९.५१५ डॉलरचा उच्चांक गाठला आहे. आर्थिक वर्ष २०२६ मध्ये अमेरिकेच्या व्याजदरात आणखी कपात होण्याची शक्यता वाढल्याने भौतिक मालमत्तेच्या मागणीलाही चालना मिळाली आहे.

फीड फीडबर्नर 22 Dec 2025 12:10 pm

Priyanka Nick: प्रियंका चोप्रासोबत बॉलिवूड गाण्यावर थिरकले निक जोनस, चाहत्यांनी म्हटलं…जीजू, प्लेलिस्ट शेअर करा

Priyanka Nick: हॉलीवूड गायक निक जोनस आणि त्यांचे भाऊ गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडच्या गाण्यांवर धमाल करताना दिसत आहेत. कधी ऋतिक रोशन–कियारा अडवाणीच्या गाण्यावर, तर कधी इतर लोकप्रिय हिंदी गाण्यांवर ते कॉन्सर्टपूर्वी मजा करत असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आता या मजेत स्वतः प्रियंका चोप्राही सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं आहे. निक जोनसने इंस्टाग्रामवर एक […] The post Priyanka Nick: प्रियंका चोप्रासोबत बॉलिवूड गाण्यावर थिरकले निक जोनस, चाहत्यांनी म्हटलं… जीजू, प्लेलिस्ट शेअर करा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Dec 2025 11:55 am

“महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी ठामपणे उभा”; भाजप आणि महायुतीच्या यशानंतर PM मोदींनी मराठीतून मानले आभार

PM Narendra Modi | महाराष्ट्रातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींचा निकाल जाहीर झाला आहे. महाराष्ट्रात विविध कारणांमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही वर्षांपासून प्रलंबित होत्या. अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 2017 नंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी झाली. या स्‍थानिक निवडणूकीतही महायुतीने विरोधकांचा धुव्वा उडवत दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि […] The post “महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी ठामपणे उभा”; भाजप आणि महायुतीच्या यशानंतर PM मोदींनी मराठीतून मानले आभार appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Dec 2025 11:54 am

निवडणूक रोखे रद्द करूनही भाजपचा मालामाल ; वर्षभरात काँग्रेसपेक्षाही १२ पट जास्त मिळाल्या देणग्या, वाचा देणगी देणाऱ्यांची संपूर्ण यादी

Donation Report Card। सर्वोच्च न्यायालयाने फेब्रुवारी २०२४ मध्ये निवडणूक बाँड योजना रद्द केली आहे. मात्र याचा राजकीय पक्षांना मिळणाऱ्या देणग्यांवर कोणताही परिणाम झाला नसल्याचे दिसत आहे. नाही. कारण बाँड योजना रद्द केल्यानंतर एका वर्षानंतर, २०२४-२५ मध्ये भाजपचा सर्वात श्रीमंत पक्ष ठरला आहे. भाजपच्या २०२४-२५ च्या योगदान अहवालानुसार, या काळात पक्षाला ₹६,०८८ कोटी देणग्या मिळाल्या. लोकसभा […] The post निवडणूक रोखे रद्द करूनही भाजपचा मालामाल ; वर्षभरात काँग्रेसपेक्षाही १२ पट जास्त मिळाल्या देणग्या, वाचा देणगी देणाऱ्यांची संपूर्ण यादी appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Dec 2025 11:53 am

पालघरमध्ये नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजप, शिवसेनेला कौल

तीन ठिकाणी नगराध्यक्षाच्या पक्षालाच बहुमतपालघर : पालघर जिल्ह्यात पार पडलेल्या तीन नगर परिषद आणि एका नगरपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल रविवारी जाहीर करण्यात आला. पालघर आणि डहाणू या दोन नगर परिषदेवर नगराध्यक्षपदी शिवसेना शिंदे गटाने आपला झेंडा फडकविला आहे. जव्हार नगर परिषद आणि वाडा नगरपंचायत भाजपने काबीज केली आहे. पालघर नगराध्यक्षपदी शिवसेनेचे उत्तम घरत, डहाणू नगराध्यक्षपदी शिवसेनेचे राजेंद्र माछी, तर वाडा नगरपंचायत अध्यक्ष म्हणून भाजपच्या रिमा गंधे आणि जव्हार नगराध्यक्षपदी भाजपच्या पूजा उदावंत निवडून आल्या आहेत. विशेष म्हणजे पालघर, जव्हार आणि वाडा या तीन ठिकाणी थेट जनतेतून निवडून आलेल्या नगराध्यक्षाच्या पक्षालाच मतदारांनी पालिकेतसुद्धा स्पष्ट बहुमत दिले आहे. डहाणू येथे मात्र चित्र वेगळे आहे. या ठिकाणी मतदारांनी नगर परिषदेतील बहुमत भाजपच्या पारड्यात टाकले असून, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मात्र शिवसेनेचे निवडून दिले आहेत.पालघर नगर परिषदेच्या ३० सदस्य पदासह नगराध्यक्ष पदासाठी जाहीर करण्यात आलेल्या निकालात, शिवसेना शिंदे गटानेच बाजी मारली आहे. एकूण ३० जागांपैकी १९ जागी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. भाजपचे ८ आणि शिवसेना उबाठाचे ३ नगरसेवक येथे निवडून आले आहेत. डहाणू येथील २७ जागांपैकी शिवसेना शिंदे गटाला केवळ २ जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादी गटाचे ८ नगरसेवक निवडून आले आहेत, तर भाजपच्या १७ सदस्यांना डहाणू वासियांनी पालिकेच्या सभागृहात पाठविले आहे. जव्हार नगरपरिषदेच्या २० जागांपैकी १४ जागांवर भाजपने बाजी मारली आहे. या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाला केवळ २ जागांवर समाधान मानावे लागले. राष्ट्रवादी गटाचे ३ नगरसेवक निवडून आले असून, एका नगरसेवकाचा रूपाने राष्ट्रवादी गटाचे खाते सुद्धा उघडले आहे.वाडा नगरपंचायतीच्या १७ जागांपैकी ११ जागांवर भाजपचे नगरसेवक निवडून आले आहेत. ३ जागा शिवसेना शिंदे गटाला मिळाल्या असून, शिवसेना उबाठा , काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट या तिन्ही राजकीय पक्षांना प्रत्येकी एक जागा मिळाली आहे. दरम्यान, पालघर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे उत्तम मोरेश्वर घरत यांना एकूण १६,५८० मते मिळाली असून, त्यांनी भाजपचे उमेदवार कैलाश म्हात्रे यांचा ५,१५३ मतांनी पराभव केला आहे. म्हात्रे यांना एकूण ११,४२७ मते मिळाली. शिवसेना उबाठाचे उमेदवार उत्तम पिंपळे हे ४,०९२ मते घेऊन तिसऱ्या क्रमांकावर राहिले आहेत. काँग्रेसच्या प्रीतम राऊत यांना ३,५४७ मते मिळाली. जव्हार नगर परिषद निवडणुकीत भाजप उमेदवार पूजा उदावंत यांना ३,८६५ मते मिळाली असून त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवार रश्मीन मणियार यांचा १,६५३ मतांनी पराभव केला आहे. मणियार यांना एकूण २,२१२ मते मिळाली आहेत. तसेच शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार पद्मा राजपूत यांना १,४७९ मते मिळाली आहेत.डहाणू येथे दोन उमेदवारांमध्ये झालेल्या लढतीत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राजेंद्र माच्छी यांनी भाजप उमेदवार भरत राजपूत यांचा ४,०५५ मतांनी पराभव केला आहे. माच्छी यांना एकूण १४,८१५ मते मिळाली असून, राजपूत यांना १०,७६० मते मिळाली आहेत. वाडा नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपच्या रिमा हर्षद गंधे यांनी बाजी मारली असून, त्यांना ३,९६७ मते मिळाली आहेत. शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार हेमांगी पाटील यांना २,९९५ तर शिवसेना उबाठा गटाच्या उमेदवार निकिता गंधे यांना २,४८७ मते मिळाली आहेत. डहाणूत मात्र नगराध्यक्ष सेनेचा, बहुमत भाजपला पालघर नगर परिषदेतील नवे नगरसेवक१)प्रियंका म्हात्रे, २)आरिफ कलाडिया, ३)मीना मिश्रा, ४) भारती धोत्रे, ५) महेश कोटी, ६)कृपा मोरे, ७) आनंद राऊत, ८) प्रीती मोरे, ९) राजेंद्र पाटील, १०) पुष्पा जैन, ११) प्रगती म्हात्रे, १२) रईस खान, १३)ज्योती जाधव, १४) मुनाफ मेमन, १५) राधा मनकामे, १६) राहुल पाटील, १७) मेघा आघाव, १८)अमोल पाटील, १९) विभूती चंपानेलकर, २०) नीलम कुमार संख्ये, २१)सोनाली शिंदे, २२) भावनंद संख्ये, २३) अनिश पिंपळे, २४) उज्वला काळे, २५) चंद्रशेखर वडे, २६) शिल्पा वाजपेयी, २७) दिनेश घरत, २८) गीतांजली माने, २९) माधुरी सपाटे, ३०) जस्विन घरत.डहाणू नगर परिषदेतील नवे नगरसेवक१) अश्विनी पटेल २) रमेश काकड ३) प्रतीक्षा सुरती ४) विक्रम नायक ५) प्रदीप चाफेकर ६) अभिलाश जाहीवाला ७) दीप्ती शेलारे ८) जगदीश राजपूत ९) माधुरी धोडी १०) दिनेश माच्छी ११) आर्या गोहेल १२) मनीषा वावरे १३) शैलेश रखमुठा १४) आशा पाठक १५) वरुण पारेख १६) शुभांगी पाटील १७) युगाली पाटील १८) चंद्रकांत खुताडे १९ )रेखा माळी २०) कीर्ती मेहता २१) समीउउद्दीन पिरा २२) विशाल नांदस्कर २३) स्नेहा मार्डे २४) बिजली माच्छी २५) तन्मय बारी २६) भारती पाटील २७) दीपक जयस्वाल.

फीड फीडबर्नर 22 Dec 2025 11:30 am

खासदारांची ‘फिल्डिंग’ होम ग्राउंडवर यशस्वी!

वाडा पालिकेत स्पष्ट बहुमतासह नगराध्यक्षही भाजपचागणेश पाटील पालघर : जिल्ह्यात निवडणूक झालेल्या तीन नगर परिषदांपैकी दोन नगर परिषदेमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे, तर वाडा नगरपंचायतीमध्ये सुद्धा भाजपने स्वबळावर नगराध्यक्ष आणि पालिकेतील बहुमत मिळवले आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपने पालघर, वाडा, जव्हार आणि डहाणू या चारही ठिकाणी चांगलीच मुसंडी मारली आहे. तसेच पालघर जिल्ह्याचे खासदार डॉ. हेमंत विष्णू सवरा हे राहत असलेल्या वाडा नगरपंचायतवर सुद्धा भाजपचा झेंडा फडकला आहे. त्यामुळे महायुतीच्या वादात अडकलेल्या या निवडणुकीत खासदारांनी योग्य ‘फिल्डिंग’ लावून वाडा हे आपले ‘होम ग्राउंड’ चांगल्या पद्धतीने सांभाळले आहे.वाडा नगर पंचायतीची ही दुसरी सार्वत्रिक निवडणूक होती. २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत खासदारांच्या भगिनी निशा सवरा या भाजपच्या उमेदवार म्हणून नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पराभूत झाल्या होत्या. १७ सदस्यीय असलेल्या या नगरपंचायतीत २०१७ मध्ये भाजप ६, शिवसेना ६, काँग्रेस २, राष्ट्रवादी, बहुजन विकास आघाडी आणि आरपीआयचा प्रत्येकी एक नगरसेवक होता. त्यावेळी शिवसेनेच्या गीतांजली कोल्हेकर नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या होत्या. दरम्यान, यावेळी घेण्यात आलेल्या नगर परिषद, नगरपंचायतीच्या निवडणुकामध्ये सुद्धा नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडण्यात आले आहेत. तथापि, राज्यात महायुतीचे घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार यांच्यासोबत नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीमध्ये जिल्ह्यात फारकत घेण्यात आली होती. अशा परिस्थितीत केवळ स्वबळावर निवडणूक लढवून भाजपला तीन ठिकाणी स्पष्ट बहुमत मिळवून देणे कठीण बाब होती.मात्र खासदार डॉ. सवरा यांनी या निवडणुकीच्या पूर्वीच काही ठिकाणी इतर राजकीय पक्षातील पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा प्रवेश भाजपमध्ये करून घेतला. वाडा या ठिकाणी गेल्यावेळी नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या रिमा हर्षद गंधे यांना नगराध्यक्ष पदाच्या निवडणूक रिंगणात उतरविले. त्याचप्रमाणे राजकारण आणि समाजकारणात असलेल्या चेहऱ्यांना नगरसेवक पदाची निवडणूक लढण्याची संधी दिली.इतर तीन ठिकाणचा प्रचार, नेत्यांच्या सभा, आणि पक्षाच्या बैठका, सांभाळून वाडा नगरपंचायत निवडणुकीकडे विशेष लक्ष दिले. त्यामुळेच या ठिकाणी १७ पैकी ११ जागा भाजपने जिंकल्या आहेत. त्याचप्रमाणे नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत सुद्धा भाजपच्या उमेदवाराने बाजी मारली आहे. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत सहापैकी पाच जागा महायुतीच्या निवडून आल्या होत्या. आता नगर परिषद, नगरपंचायत निवडणुकीमध्ये भाजपने चांगले काम केले आहे. परिणामी आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या बाबतीत भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढलेला आहे.

फीड फीडबर्नर 22 Dec 2025 11:30 am

फुकुशिमा दुर्घटनेनंतर जपान जगातील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प पुन्हा सुरू करणार

Japan Nuclear Restart। जपानच्या निगाता प्रदेशातील जगातील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प पुन्हा सुरू करण्याच्या निर्णयाला आज मंजुरी मिळण्याची अपेक्षा आहे. २०११ च्या फुकुशिमा दुर्घटनेनंतर जपान अणुऊर्जेकडे परतण्याच्या दिशेने हा एक महत्त्वपूर्ण निर्णय मनाला जात आहे. टोकियोच्या वायव्येस सुमारे २२० किलोमीटर अंतरावर असलेला काशीवाझाकी-कारीवा प्रकल्प हा फुकुशिमा दाईची प्रकल्पातील भूकंप आणि त्सुनामीनंतर बंद पडलेल्या ५४ अणुभट्ट्यांपैकी […] The post फुकुशिमा दुर्घटनेनंतर जपान जगातील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प पुन्हा सुरू करणार appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Dec 2025 11:26 am

Indian Films Trending on Pakistani Netflix: पाकिस्तानी नेटफ्लिक्सवर नंबर 1 वर ट्रेंड होतेय भारतीय चित्रपट, टॉप 10 मध्ये आणखी 4 भारतीय फिल्म्स

Indian Films Trending on Pakistani Netflix : ओटीटी प्लॅटफॉर्मवर सतत नवे चित्रपट आणि वेब सीरिज येत असतात. भारतीय चित्रपटांना भारताबाहेरही मोठी पसंती मिळत असून पाकिस्तानमध्येही ते आवडीने पाहिले जात आहेत. सध्या पाकिस्तानी नेटफ्लिक्सवर एक भारतीय चित्रपट नंबर 1 वर ट्रेंड करत आहे. २१ डिसेंबर रोजी पाकिस्तानमध्ये नेटफ्लिक्सवर पहिल्या क्रमांकावर असलेला भारतीय चित्रपट म्हणजे तेलुगू भाषेतील […] The post Indian Films Trending on Pakistani Netflix: पाकिस्तानी नेटफ्लिक्सवर नंबर 1 वर ट्रेंड होतेय भारतीय चित्रपट, टॉप 10 मध्ये आणखी 4 भारतीय फिल्म्स appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Dec 2025 11:12 am

“पक्षाने माझी शक्ती कमी केली”; चंद्रपुरातील भाजपच्या पराभवानंतर मुनगंटीवारांकडून नाराजी व्यक्त, फडणविसांनी दिले ‘हे’आश्वासन

Chandrapur News | चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेसने भाजपला मोठा धक्का दिला आहे. ११ पैकी ७ ठिकाणी काँग्रेसने बाजी मारली. तर भाजपला केवळ दोन ठिकाणी समाधान मानावे लागले. एक जागा शिंदेसेनेने तर एक भाजप बंडखोर अपक्षाने जिंकली. या पराभवानंतर पक्षाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी थेट पक्षाच्या नेतृत्वावर टीका केली. पक्षाने माझी शक्ती कमी केली, असे म्हणत मुनगंटीवार […] The post “पक्षाने माझी शक्ती कमी केली”; चंद्रपुरातील भाजपच्या पराभवानंतर मुनगंटीवारांकडून नाराजी व्यक्त, फडणविसांनी दिले ‘हे’ आश्वासन appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Dec 2025 11:12 am

ओंबळी येथे आपत्ती निवारा शेड उभारणार

पोलादपूर : तालुक्यातील ओंबळी गावात आपत्ती निवारा शेडच्या कामाचा भूमिपूजन व शुभारंभ मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. याप्रसंगी मंत्री भरतशेठ गोगावले, जिल्हा सहसंपर्कप्रमुख चंद्रकांत कळंबे, उद्योजक रामदास कळंबे, तालुका प्रमुख निलेश अहिरे पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी ओंबळीतील मुंबई, पुणे व ठाणे येथील चाकरमानी मंडळी तसेच स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या आपत्ती निवारा शेडमुळे ओंबळी गावासह परिसरातील ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळणार आहे. या भागात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने अतिवृष्टीच्या काळात व संभाव्य दुर्घटनांच्या वेळी नागरिकांना सुरक्षित आश्रय मिळावा, या उद्देशाने ही महत्त्वाची सुविधा उभारण्यात येत आहे. या कामांसाठी कोट्यवधी रुपये अंदाजित खर्च होणार आहे. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मंत्री भरतशेठ गोगावले यांनी, ग्रामस्थांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देऊन हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. आपत्तीच्या काळात नागरिकांचे जिवित तसेच मालमत्तेची हानी टाळण्यासाठी अशा निवारा शेडची नितांत गरज असून, हा प्रकल्प आपत्तीकाळात लोकहितासाठी महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.

फीड फीडबर्नर 22 Dec 2025 11:10 am

Mumbai Local Horror : क्रूरतेचा कळस! लेडीज डब्यात घुसखोरी करणाऱ्या नराधमाची मुजोरी, १८ वर्षीय विद्यार्थिनीला ५० वर्षीय प्रवाशाने धावत्या लोकलमधून ढकललं

नवी मुंबई : महिलांच्या डब्यात बेकायदेशीरपणे घुसणाऱ्या एका ५० वर्षीय व्यक्तीला हटकणे एका १८ वर्षीय तरुणीच्या जिवावर बेतल्याची धक्कादायक घटना गुरुवारी घडली. पनवेल ते खांदेश्वर स्थानकांदरम्यान हार्बर लोकलमध्ये हा संतापजनक प्रकार घडला. महिलांच्या डब्यात शिरलेल्या या इसमाला तेथील प्रवाशांनी जाब विचारला असता, त्याने क्रूरतेचा कळस गाठत एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीला धावत्या लोकलमधून बाहेर ढकलून दिले.नक्की काय घडली घटना?

फीड फीडबर्नर 22 Dec 2025 11:10 am

रोहा नगर परिषदेवर पुन्हा राष्ट्रवादी

रोहा : स्वराज्य स्थानिक निवडणुकीमध्ये २ डिसेंबर रोजी रोहा नगर परिषदेच्या हद्दीत मतदान घेण्यात आले. त्याची मतमोजणी २१ डिसेंबर रोजी शांततामय वातावरणात रोह्याच्या ज्येष्ठ नागरिक सभागृहात पार पडली. या मतमोजणीत राष्ट्रवादीने बाजी मारली असून, नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या वनश्री समीर शेडगे या निवडून आल्या. नगराध्यक्षपदी निवडून आलेल्या वनश्री समीर शेडगे यांनी प्रतिस्पर्धी शिवसेनेच्या उमेदवार शिल्पा अशोक धोत्रे यांना यांचा ४,६९५ मतांनी पराभव केला. वनश्री शेडगे यांना एकूण ८,५८६ मतदान झाले, तर शिवसेनेच्या उमेदवार शिल्पा धोत्रे यांना ३,८९१ मते मिळाली. २० जागांपैकी १८ जागांवर राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार निवडून आले असून, रोशन चाफेकर हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून आले. शिवसेना शिंदे गटाच्या सुप्रिया जाधव याही निवडून आल्या. प्रभाग क्र. १ मध्ये प्रशांत कडू आणि नीता हजारे, प्रभाग क्र २ मध्ये फराह पानसरे व राजेंद्र जैन हे बिनविरोध निवडून आले. प्रभाग क्र.३ मध्ये अफरीन रोगे व अरबाज मनेर, प्रभाग क्र.४ मध्ये नेहा शिरीष अंबरे व हसन दर्जी, तर प्रभाग क्र ५ मध्ये अल्मास मुमेरे व महेंद्र गुजर, प्रभाग क्र.६ मध्ये गौरी बारटक्के व महेंद्र दिवेकर, प्रभाग क्र ७ मध्ये प्रियंका धनावडे व रवींद्र सुधीर चालके, प्रभाग क्र.८ मध्ये संजना शिंदे व महेश कोलाटकर, प्रभाग क्र ९मध्ये सुप्रिया जाधव (शिवसेना) व रोशन चाफेकर (भाजप), प्रभाग क्र १० मध्ये पूर्वा मोहिते व अजित जनार्दन मोरे हे उमेदवार निवडून आले आहेत. प्रभाग क्र ९ वगळता सर्व प्रभागांमध्ये रा. पक्षाचे उमेदवार निवडून आले.

फीड फीडबर्नर 22 Dec 2025 11:10 am

“युनुस यांनी भारताविरुद्ध…” ; शेख हसीना यांची बांगलादेश सरकारवर टीका

Sheikh Hasina Slams Mohammad Yunus। अलिकडच्या हिंसाचार आणि निदर्शनांनंतर बांगलादेशची राजधानी ढाका येथील परिस्थिती शांत होत असली तरी, राजकीय वर्तुळात तणाव कायम आहे. माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी सध्याच्या परिस्थितीसाठी थेट अंतरिम सरकार आणि त्यांचे प्रमुख मुहम्मद युनूस यांना जबाबदार धरले आहे. एका मुलाखतीत त्यांनी असा दावा केला की, ज्या अराजकतेमुळे त्यांचे सरकार उलथून पडले […] The post “युनुस यांनी भारताविरुद्ध…” ; शेख हसीना यांची बांगलादेश सरकारवर टीका appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Dec 2025 10:54 am

इमराम हाश्मी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान जखमी; शस्त्रक्रियेनंतरही पुन्हा शूटिंग केले सुरू

Emraan Hashmi | बॉलिवूड अभिनेता म्हणजे इमराम हाश्मी सध्या ‘आवारापन 2’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. मात्र शूटिंग दरम्यान एक ॲक्शन सीन करताना त्याला मोठी दुखापत झाली. त्याच्यावर शस्त्रक्रिया देखील करण्यात आली. आवारापन-२ च्या सेटवर अभिनेता इमरान हाश्मी गंभीर जखमी झाला आहे. पोटातील टिश्यू फुटल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करावं लागलं आणि अभिनेत्यावर मोठी शस्त्रक्रिया करावी लागली. विशेष […] The post इमराम हाश्मी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान जखमी; शस्त्रक्रियेनंतरही पुन्हा शूटिंग केले सुरू appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Dec 2025 10:34 am

कर्जतमध्ये परिवर्तन विकास आघाडी राष्ट्रवादीच्या पुष्पा दगडे

कर्जत : कर्जत नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, उबाठा गट, स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी आणि इतर मित्र पक्षांच्या संयुक्त विद्यमाने स्थापन करण्यात आलेल्या कर्जत परिवर्तन विकास आघाडीच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार पुष्पा दगडे ४४७० मतांनी विजयी झाल्या. त्यांनी भाजपच्या डॉ. स्वाती लाड यांचा पराभव केला. विशेष म्हणजे दगडे यांनी पहिल्या फेरीपासून आघाडी घेतली ती शेवटपर्यंत टिकवून ठेवली. तसेच परिवर्तन विकास आघाडीचे १३ उमेदवार निवडून आल्याने त्यांची निर्विवाद सत्ता कर्जत नगरपरिषदेत आली. यामध्ये कर्जत परिवर्तन विकास आघाडीच्या राष्ट्रवादी-८, उबाठा गट - ४, अपक्ष - १ असे १३ उमेदवार निवडून आले. तर महायुतीमध्ये शिंदे गट - ७, भाजप - १ असे आठ उमेदवार निवडून आले आहेत.दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. रायगडचे अप्पर पोलीस अधिक्षक अभिजीत शिवथरे यांनीही मतमोजणी ठिकाणी भेट दिली.निवडणुकी अगोदर गौरी जोशी, बिनिता घुमरे, रॉली पाल आणि प्रसाद डेरवणकर या उमेदवारांनी पक्ष बदलले ते सर्व या निवडणुकीत पराभूत झाले. एकदा नगराध्यक्ष झाल्यावर पुन्हा नगरसेवक म्हणून निवडून येत नाही. असा कर्जतचा इतिहास आहे. मात्र माजी नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी तो इतिहास खोडून टाकला व त्या १३९७ मताधिक्य घेऊन विजयी झाल्या. या निवडणुकीत महेंद्र चंदन हे सर्वात जास्त म्हणजे १०६७ मताधिक्य घेऊन विजयी झाले. तसेच कर्जत नगर परिषद स्थापन झाल्यापासून प्रत्येक वेळी लाड आणि ओसवाल नावाचे नगरसेवक होते.

फीड फीडबर्नर 22 Dec 2025 10:30 am

शिवसेना-भाजप युतीची एकहाती सत्ता

चंद्रकांत चौधरी नगराध्यक्ष पदावर विजयीमाथेरान : सात वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पार पडलेल्या माथेरान नगर परिषद निवडणुकीच्या निकालाने शहरात आनंद उत्सव सुरू झाला. मतमोजणीची प्रक्रिया सुरू असताना प्रत्येक टप्प्यात चुरस जाणवत होती. एकूण मतदान ३४४५ इतके पार पडले. नगराध्यक्ष पदाच्या लढतीत शिवसेना शिंदे गटाचे चंद्रकांत चौधरी यांना २२५७ मते मिळाली. १०६९ मतांनी विजय मिळवत नगराध्यक्षपद पटकावले. प्रतिस्पर्धी शिवराष्ट्र पॅनेलचे उमेदवार अजय सावंत यांना ११८८ मते मिळाली. यंदाची निवडणूक अत्यंत महत्त्वाची ठरली. कारण ही निवडणूक शिवसेना-भाजप युतीचे आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वाखाली लढविण्यात आली होती. दुसरीकडे सुधाकर घारे आणि सुनील तटकरे यांनी शिवराष्ट्र पॅनल उभे करून मोठे राजकीय आव्हान उभे केले होते.या दोन्ही पॅनेलमध्ये चुरस पाहायला मिळाल्याने संपूर्ण तालुक्याचे लक्ष या निवडणुकीकडे वेधले गेले होते. तथापि, निकालाने सर्व तर्कवितर्कांना पूर्णविराम देत शिवसेना–भाजप युतीने नगरपरिषदेत एकहाती सत्ता मिळवली आहे. प्रभागवार ताकद आजमावत शिंदे गट व भाजपच्या उमेदवारांनी बहुतेक जागांवर बाजी मारत स्पष्ट वर्चस्व निर्माण केले.

फीड फीडबर्नर 22 Dec 2025 10:30 am

अमेरिका पुढील ३ वर्षात ३.५ अब्ज डॉलरची गुंतवणूक भारतीय मॉल्समध्ये करणार

ॲनारॉकने दिलेल्या अहवालात स्पष्टप्रतिनिधी: जगभरात मागणी विक्रीत संतुलनात नवी मर्यादा आल्याचे आपण यापूर्वी पाहिले होते. याच रिटेल विक्रीतील संकटाचा सामना पाश्चात्य देशातील मॉल्सला होत असल्याचे दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर विख्यात रिअल इस्टेट कंपनी ॲनारॉकने (Anarrock) आपल्या नव्या अहवालात स्पष्ट केले आहे.अहवालातील माहितीनुसार, पाश्चात्य देशांमधील मॉल्स अस्तित्वाच्या संकटाचा सामना करत असताना, जागतिक भांडवल एका अशा बाजाराकडे वळत आहे जो प्रत्येक जागतिक किरकोळ विक्रीच्या ट्रेंडला आव्हान देत असल्याचे दिसते तो म्हणजे भारत आहे असे रिअल इस्टेट सल्लागार कंपनी अनारॉकने म्हटले आहे.आर्थिक वर्ष २०२० पासून अमेरिकेत जवळपास १२०० मॉलमधील दुकाने बंद झाली आहेत, आणि वाढत्या रिक्त जागांमुळे जवळपास ४०% रिकाम्या मॉल्सना झोनिंग अथवा इतर वापरासाठी करावा लागत आहे असे अहवालात म्हटले आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत भारतात मात्र वाढती मजबूत ग्राहक मागणी आणि वाढत्या संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या आत्मविश्वासाच्या जोरावर किरकोळ विक्री क्षेत्रात पुनरुज्जीवन होत आहे, असे अनारॉकने या आठवड्यात सांगितले.अनारॉक ग्रुपचे रिटेल लीजिंग आणि इंडस्ट्रियल अँड लॉजिस्टिक्सचे सीईओ अनुज केजरीवाल यांच्या मते पुढील ३ वर्षांत भारतीय मॉल्समध्ये ३.५ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त भांडवली गुंतवणूक होण्याची शक्यता आहे. त्यातील निरिक्षणानुसार ८८ हून अधिक परदेशी ब्रँड्सनी भारतीय किरकोळ बाजारात प्रवेश केला आहे आणि ते आक्रमकपणे विस्तार करण्याचा प्रयत्न करत आहेत. आणखी अनेक जागतिक ब्रँड्स प्रतीक्षेत आहेत आणि सध्या उपलब्ध असलेल्या अत्यंत मर्यादित 'ग्रेड-ए' मालमत्तांमध्ये जागा शोधत आहेत' असेही अनुज केजरीवाल यांनी पुढे आपली प्रतिक्रिया देताना सांगितले आहे.तसेच अहवालातील आणखी माहितीनुसार, पाश्चात्य देशांच्या बाजारांच्या अगदी उलट, भारतातील तरुण ग्राहक वर्गाची प्रचंड अद्याप पूर्ण न झालेली मागणी आणि संघटित किरकोळ विक्री मर्यादित स्पर्धा, व्यवसायासाठी थेट परकीय गुंतवणूक धोरणांचा सरकारी पाठिंबा या गोष्टीच परदेशी ब्रँड्स आणि गुंतवणूकदारांना भारतात आकर्षित केले जात आहे.जागतिक गुंतवणूकदारांसाठी सर्वात आकर्षक बाबींपैकी एक म्हणजे भारतीय मॉल्सनी ई-कॉमर्ससमोर अद्याप हार मानलेली नाही. उलट त्यांना त्याचा फायदाच होत आहे असे ॲनारॉकने म्हटले आहे. चीन आणि अमेरिकेत दिसणाऱ्या २०% पेक्षा अधिक पातळीच्या तुलनेत, भारतातील ई-कॉमर्सचा प्रसार सुमारे ८% आहे, असेही त्यात नमूद केले आहे.अनारॉकच्या मते, देशात दर्जेदार किरकोळ विक्रीच्या जागेचा अत्यंत तुटवडा हे आत्मविश्वासाचे एक प्रमुख कारण आहे. अमेरिका आणि चीनच्या तुलनेत भारतातील दरडोई किरकोळ विक्रीची जागा जगातील सर्वात कमी आहे. ही तफावत आणि गेल्या दशकात भारतातील दरडोई उत्पन्न जवळपास दुप्पट झाल्यामुळे जागतिक किरकोळ विक्री क्षेत्रात क्वचितच दिसून येणारी मागणी-पुरवठ्यातील मोठी तफावत निर्माण झाली आहे असेही केजरीवाल यांनी सांगितले आहे.आपल्या अहवालात स्पष्ट करताना,'ग्रेड-ए मॉल्स जवळपास पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत, महत्त्वाच्या जागांसाठी लांब प्रतीक्षा यादीसह ९५-१००% जागा भरल्याचे दिसून येत आहे.भाड्याची वाढ सातत्याने महामारीपूर्व पातळीपेक्षा जास्त झाली आहे आणि आता विकासकांना असे दिसून येत आहे की भाडेपट्टीची वाढ बांधकाम सायकलपेक्षाही वेगाने पुढे जात आहेत.जगामध्ये कुठेही एक दुर्मिळ गोष्ट आहे असे अहवालात नोंदवण्यात आले आहे. त्यातील निरिक्षणानुसार, लोकसंख्याशास्त्रीय मागणीच्या घटकांच्या या दुर्मिळ संयोजनामुळे अथवा व्यवस्थापनेमुळे भारताची ग्राहक उपभोग (Consumer Consumption) नवीन मागणी तयार करत आहे.पुढे अनारॉकने म्हटले आहे की, २०३० पर्यंत देश ६ ट्रिलियन डॉलर्सची उपभोग अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर आहे.पाश्चात्य देशांमधील मॉल्सच्या विपरीत भारतीय मॉल्स मात्र मनोरंजन, भोजन आणि सामाजिक अनुभवांवर आधारित जीवनशैलीची ठिकाणे आहेत. प्रमुख मॉल्समधील दैनंदिन पादचारी गर्दी आठवड्याच्या दिवसांमध्ये नियमितपणे २०००० पेक्षा जास्त असते आणि आठवड्याच्या शेवटी ४०००० पेक्षा जास्त होते. खाद्य आणि पेय (फूड अँड बेव्हरेज) आणि मनोरंजन क्षेत्राचा आता एकूण गर्दीमध्ये ३०-३५ % वाटा वाढला आहे.

फीड फीडबर्नर 22 Dec 2025 10:30 am

शेअर बाजाराची तेजीत ओपनिंग ! सेन्सेक्स ४६९ अंकांनी वधारला ; निफ्टीने २६,१२० अंकांचा टप्पा ओलांडला

Stock Market Today। भारतीय शेअर बाजाराची सुरुवात आज आठवड्याच्या पहिल्या ट्रेडिंग सत्रात सकारात्मक झाली. प्रमुख बेंचमार्क निर्देशांक, बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी ५०, हिरव्या रंगात उघडले. ३० शेअर्सचा बीएसई सेन्सेक्स निर्देशांक २१६.५४ अंकांनी म्हणजेच ०.२५ टक्क्यांनी वाढून ८५,१४५.९० वर पोहोचला, तर एनएसई निफ्टी ५० ८९.४५ अंकांनी म्हणजेच ०.३४ टक्क्यांनी वाढून २६,०५५.८५ वर उघडला. सकाळी ९:२० […] The post शेअर बाजाराची तेजीत ओपनिंग ! सेन्सेक्स ४६९ अंकांनी वधारला ; निफ्टीने २६,१२० अंकांचा टप्पा ओलांडला appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Dec 2025 10:22 am

ज्या बांगलादेशला भारताने घडवले, तोच सर्वात मोठे आव्हान:पाक-चीनसोबत काय कट रचत आहे; सरकारने कसे हाताळावे

1971 मध्ये भारतामुळे जो देश अस्तित्वात आला, तोच आता सर्वात मोठे सामरिक संकट बनला आहे. ऑगस्ट 2024 पासून दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये सुरू असलेली उलथापालथ गेल्या 4-5 दिवसांपासून अधिकच बिघडली आहे. परराष्ट्र व्यवहार संसदीय समितीनेही इशारा दिला आहे की, भारताला लवकरच काहीतरी करावे लागेल, अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाईल. बांगलादेश कोणत्या कारणांमुळे भारतासाठी गंभीर धोका बनू शकतो आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी सरकारने काय केले पाहिजे; मंडे मेगा स्टोरीमध्ये संपूर्ण कथा… **** ग्राफिक्स: द्रगचंद्र भुर्जी, अजित सिंग आणि अंकुर बन्सल

दिव्यमराठी भास्कर 22 Dec 2025 10:17 am

अलिबाग नगरपालिकेवर शेकाप-काँग्रेसचे वर्चस्व

अलिबाग : अलिबाग नगरपालिकेच्या २ डिसेंबरला झालेल्या चुरशीच्या निवडणुकीनंतर आज रविवारी २१ डिसेंबरला झालेल्या मतमोजणीत अपेक्षेप्रमाणे अलिबाग नगरपालिकेवर शेकाप-काँग्रेसने आपले वर्चस्व प्रस्थापित केले. या मतमोजणीत शेकाप-काँग्रेसला १७, उबाठा २, तर भाजपचे अंकित बंगेरा यांच्या रूपाने एक जागा मिळाली. या निवडणुकीत उबाठा आणि भाजपाने अलिबाग नगरपालिकेत यानिमित्ताने शिरकाव केला असून, नगराध्यक्ष पदाच्या थेट निवडणुकीत शेकापच्या उमेदवार अक्षया प्रशांत नाईक विजयी झाल्या.शेकापच्या उमेदवार अक्षया नाईक यांनी महायुतीच्या भाजपा उमेदवार तनुजा पेरेकर यांचा सहा हजार ६४९ मतांनी पराभव केला. शेकापच्या उमेदवार अक्षया प्रशांत नाईक यांना ८ हजार ९७४, तर प्रतिस्पर्धी महायुतीच्या भाजपा उमेदवार तनुजा पेरेकर यांना अवघी २ हजार ३३४ मते मिळाली. नोटाला १९० मते मिळाली. प्रभाग एकमधून संतोष मधुकर गुरव (शेकाप), संध्या शैलेश पालवणकर (शेकाप), प्रभाग दोनमधून सुषमा नित्यानंद पाटील (शेकाप), प्रभाग तीनमधून डॉ. साक्षी गौतम पाटील (शेकाप), आनंद अशोक पाटील (शेकाप), प्रभाग चारमधून श्वेता संदीप पालकर (पाटील-उबाठा), संदीप जनार्दन पालकर (उबाठा), प्रभाग पाचमधून एडव्होकेट निवेदिता राजेंद्र वाघमारे (शेकाप), समीर मधुकर (हुनी) ठाकूर (काँग्रेस), प्रभाग सहामधून एडव्होकेट ऋषिकेश रमेश माळी (शेकाप), एडव्होकेट अश्विनी ऋषिकेश ठोसर (शेकाप), प्रभाग सातमधून एडव्होकेट मानसी म्हात्रे (शेकाप), एडव्होकेट अंकीत बंगेरा (भाजप), प्रभाग आठमधून एडव्होकेट निलम किशोर हजारे (शेकाप), अनिल रमेश चोपडा (शेकाप), प्रभाग नऊमधून योजना प्रदीप पाटील (शेकाप), सागर शिवनाथ भगत (शेकाप), प्रभाग दहामधून शैला शेषनाथ भगत (शेकाप), वृशाली महेश भगत (शेकाप) विजयी झाले.अलिबाग शहरातील जनरल अरुणकुमार वैद्य हायस्कुलमध्ये आज सकाळी १० वाजता निवडणूक निर्णय अधिकारी तसेच अलिबागचे तहसीलदार विक्रम पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मतमोजणीला सुरुवात झाली. अलिबाग नगरपालिकेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे, नायब तहसीलदार अजित टोळकर यांनी त्यांना साह्य केले. मतमोजणी केंद्राकडे जाणारे रस्ते अलिबाग पोलिसांनी बंद केले होते. याशिवाय मतमोजणी केंद्रालाही पोलिसांचा वेढा पडल्याचे दिसून आले. निकालानंतर शेकाप-काँग्रेस, उबाठातर्फे विजयी मिरवणुका काढण्यात आल्या होत्या.शेकाप -काँग्रेस १७, उबाठा २, भाजप १ जागानगराध्यक्षपदी शेकापच्या अक्षया नाईकअलिबाग नगरपालिकेच्या थेट नगराध्यक्षपदी मी निवडून आल्याने मला खूप आनंद झाला असून, अलिबाग नगरीच्या विकासासाठी यापूर्वी शेकापच्या माध्यमातून अनेक प्रयत्न झाले आहेत. आता मी नगराध्यक्षपदी निवडून आल्याने माझ्या अन्य सहकाऱ्यांसह उर्वरित विकासकामे मार्गी लावण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे.-अक्षया प्रशांत नाईक(नवनिर्वाचित नगराध्यक्षा, अलिबाग नगरपालिका)

फीड फीडबर्नर 22 Dec 2025 10:10 am

पेण नगरपालिकेवर सलग तिसऱ्यांदा भाजपचे कमळ फुलले

नगराध्यक्षा प्रीतम पाटील ५ हजार ८६० मतंपेण : भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रितम पाटील या ५ हजार ८६० मतांनी निवडून आल्या. यामध्ये भाजपचे १२, राष्ट्रीय अजित पवार गट ५, नगरविकास आघाडी ३, आम्ही पेणकर विकास आघाडी २, शिवसेना शिंदे गट १ तर उबाठाचा १ उमेदवार विजयी झाला. त्यामुळे पेण नगरपालिकेवर पुन्हा भाजपचा झेंडा फडकला आहे.पेण नगरपालिकेत १२ प्रभागांमध्ये २४ नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष असे एकूण २५ सदस्य निवडून आले असून या निवडणुकीत सहा नगरसेवक आगोदरच बिनविरोध निवडून आले होते. त्यामुळे आज १८ नगरसेवक व नगराध्यक्ष पदाच्या मतमोजणीत नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार असणाऱ्या भाजपच्या प्रीतम पाटील यांना एकूण १४ हजार २७३ एकूण मत तर त्यांच्या प्रतिस्पर्धी असणाऱ्या आम्ही पेणकर विकास आघाडीच्या रिया धारकर यांना ८ हजार ४१२ मत आणि काँग्रेसच्या नंदा म्हात्रे यांना ६८७ मत मिळाली असल्याने प्रितम पाटील या ५ हजार ८६० मतांनी निवडून आल्या असल्याने त्यांनी नगराध्यक्ष पदासाठी हॅट्रिक साधली आहे. तर प्रभाग १ (अ) मध्ये भाजप उमेदवार कलावती पाटील, (ब) नगरविकास आघाडी संतोष श्रृंगारपुरे, २ (अ) भाजप पल्लवी कालेकर, (ब) आम्ही पेणकर विकास आघाडी प्रवीण पाटील, ३ (अ) नगर विकास आघाडी सुजाता डाकी, (ब) संजय म्हात्रे, ४ (अ) उबाठा गट अरुणा पाटील , (ब) शिवसेना शिंदे गट भूषण कडू, ५ (अ) भाजप अंजली जोगळेकर, ६ (अ ) संगीता लाड, (ब) आनंद जाधव, ७ (अ) आफ्रीन अखवारे, (ब) आम्ही पेणकर विकास आघाडी कृष्णा भोईर, ८ (अ ) भाजप जास्विन पाटील, (ब ) अनिरुद्ध र पाटील, ९ (अ ) राष्ट्रवादी काँग्रेस निवृत्ती पाटील, १० (अ) भाजप सुनीता जोशी, (ब) नीळकंठ म्हात्रे असे एकूण १८ नगरसेवक पदाचे उमेदवार आणि एक नगराध्यक्षा असे निवडून आले. या अगोदरच बिनविरोध झालेले उमेदवार प्रभाग ५ (ब) राष्ट्रवादी काँग्रेस दीपक गुरव, ९ ( अ) वसुधा पाटील, ११ (अ ) भाजप मालती म्हात्रे, (ब) स्मिता माळी, १२ (अ) राष्ट्रवादी काँग्रेस सुशीला ठाकूर, (ब ) भाजप अभिराज कडू असे मिळून एकूण भाजपचे १२, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट ५, नगरविकास आघाडी ३,आम्ही पेणकर विकास आघाडी २, शिवसेना शिंदे गट १ आणि शिवसेना ठाकरे गट १ उमेदवार विजयी झाल्याने त्यामुळेच पुन्हा पेण नगरपालिकेवर भाजपचीच सत्ता स्थापन होत आहे. तर यावेळी निकाल जाहीर होताच आमदार रवी पाटील यांच्यासह नगराध्यक्षा प्रीतम पाटील तसेच निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांची संपूर्ण पेण शहरातून गुलाल, भंडारा उधळत तसेच फटाक्यांच्या आतषबाजीत मिरवणूक काढण्यात आली.कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस उपअधीक्षक जालिंदर नालकुल, पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यातआला होता.

फीड फीडबर्नर 22 Dec 2025 10:10 am

खोपोलीत शिवसेना शिंदे गटाचे कुलदीपक शेंडे

खोपोली : खोपोली नगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गट, भाजप, आरपीआय महायुतीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार कुलदीपक शेंडे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील पाटील यांच्यात दुरंगी लढत झाली. अटीतटीच्या लढाईत कुलदीपक शेंडे (एकूण मते २०४६९ मते) तर सुनील पाटील यांना १९३५१ मते मिळाली असून फक्त १११८ मतांनी निसटता पराभव झाला. एकूण १५ प्रभागात शिंदे गट १४, अजित पवार राष्ट्रवादी ७, अपक्ष १, भाजप ४, शेकापक्ष ४, शरद पवार - १ असे उमेदवार निवडून आले. अजित पवार पक्षाचे नेते माजी नगराध्यक्ष माजी नगराध्यक्ष दत्ताजी मसुरकर, माजी नगरसेवक किशोर पानसरे, शिंदे गटाचे माजी नगरसेविका माधवी रिठे, माजी उपगराध्यक्ष बेबीशेठ सॅम्युअल यांचा मुलगा बेबी सॅमुअल आणि सुनबाई माजी नगरसेविका जिनी सॅमुअल, भाजपचे माजी नगरसेवक इंदरमल खंडेलवाल, शेकापचे माजी नगरसेवक अरुण पुरी, माजी उपनगराध्यक्ष रमेश जाधव यांचे चिरंजीव यश जाधव, माजी नगरसेवक दिलीप जाधव, माजी नगरसेवक राजू डूमने, माजी नगरसेविका मेघा वाडकर, माजी नगरसेवक संतोष मालकर, माजी नगरसेविका शिल्पा मालकर पतीपत्नी तसेच माजी नगरसेविका प्रमिला सुर्वे यांचा पराभव झाल्याने मोठा धक्का बसला आहे.

फीड फीडबर्नर 22 Dec 2025 10:10 am

Stock Market Update: सकाळच्या सत्रात शेअर बाजारात दणक्यात वाढ,सेन्सेक्स ५०० व निफ्टी १५१ अंकाने उसळला

मोहित सोमण: आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सकाळच्या सत्रात चांगली वाढ झाली आहे. शेअर बाजारातील ही वाढ प्रामुख्याने सकारात्मक बँक निर्देशांकासह मिडकॅप, आयटी, टेलिकॉम शेअर्समध्ये झालेल्या वाढीमुळे झाली आहे. ब्लू चिप्स कंपनीच्या स्क्रिपमध्येही वाढ झाली असून बाजारात आठवड्याच्या सुरुवातीला 'फिल गुड' वातावरण निर्मिती दिसत आहे. बाजारातील परिस्थिती मजबूत असताना नवा ट्रिगर नसला तरी मात्र जगभरातील स्थिरता व चीनच्या फेडरल बँकेने ठेवलेले स्थिर व्याजदर यामुळे बाजारात आज चांगली रॅली वॅगन्स आहे. सेन्सेक्स ५०० अंकाने व निफ्टी १५१ अंकाने उसळल्याचे सकाळी पहायला मिळत असून अस्थिरता निर्देशांक (VIX Volatility Index) १.७८ अंकांने उसळला असून परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या खरेदी विक्रीवर अखेरच्या सत्रातील गणिते अवलंबून असणार आहेत.सकाळच्या सत्रातील सुरुवातीच्या कलात ज्युपिटर वॅगन्स (९.६६%), जीई व्हर्नोवा (८.५०%),केसीबी (४.७९%), केईसी इंटरनॅशनल (३.८९%), फोर्स मोटर्स (३.७६%), सेल (३.१६%), शिंडलर इलेक्ट्रॉनिक्स (२.८२%), हिंदुस्थान कॉपर (२.८०%) समभागात सर्वाधिक वाढ झाली असून सर्वाधिक घसरण सिमेन्स इंजिनिअरिंग इंडस्ट्रीज (५.५७%), रिलायन्स पॉवर (४.०५%), हेक्सावेअर टेक्नॉलॉजी (२.७३%), चोलामंडलम फायनान्स (२.५४%), वोडाफोन आयडिया (२.०१%), इंटलेक्ट डिझाईन (१.६९%), साई लाईफ (१.५४%), टीबीओ टेक (१.५५%) समभागात झाली आहे.

फीड फीडबर्नर 22 Dec 2025 10:10 am

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आराधना दांडेकर विजयी

मुरुड : मुरुड नगर परिषदेची निवडणूक अपेक्षेप्रमाणे झाली. थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आराधना दांडेकर यांचा २४६ मतांनी विजय झाला. शिवसेनेच्या माजी नगराध्यक्षा कल्पना पाटील यांचा त्यांनी पराभव केला. आराधना दांडेकर यांना ४ हजार १९४ मते तर कल्पना पाटील याना ३९४९ मते पडली. २४६ मतांनी आराधना विजयी झाल्या. या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे सर्वाधिक १२ नगरसेवक निवडून आले तर उबाठाचे चार व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे चार नगरसेवक निवडून आले.नगराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांना प्राप्त झाल्याने मुरुड नगरपरिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस व उबाठाचे वर्चस्व निर्माण झाले.नगर परिषद राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुरुड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन मनोज भगत यांची बहीण प्रीता चौलकर, प्रमिला माळी, तमिम ढाकम व प्रांजली मकू या विजयी झाल्या.

फीड फीडबर्नर 22 Dec 2025 10:10 am

Nagarparishad-Nagarpanchayat Election Result 2025 Nagarsevak Winner List : कोकण ते विदर्भ अन् पश्चिम महाराष्ट्र ते मराठवाडा; संपूर्ण महाराष्ट्रात महायुतीचाच डंका, विजयी नगरसेवकांची संपूर्ण यादी!

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही महायुतीने विजयाची परंपरा कायम राखली आहे. राज्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या निकालात भारतीय जनता पक्षाने अभूतपूर्व यश संपादन केले आहे. एकूण २८८ नगराध्यक्षपदांपैकी एकट्या भाजपने ११७ जागांवर विजय मिळवत राज्याच्या राजकारणात आपले वर्चस्व अधोरेखित केले आहे. नगराध्यक्षपदाच्या ११७ जागा जिंकून भाजप राज्यात प्रथम क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. राज्यातील ३४ पैकी ३२ जिल्ह्यांमध्ये भाजपचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत, केवळ नंदुरबार आणि हिंगोलीमध्ये भाजपला खाते उघडता आले नाही. ५३ नगराध्यक्ष निवडून आणत शिंदे यांची शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर राहिली आहे. अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीने ३७ जागांवर यश मिळवले आहे. विधानसभा निवडणुकीप्रमाणेच या स्थानिक निवडणुकीतही महाविकास आघाडीला (MVA) मोठा धक्का बसला आहे. मविआतील तिन्ही पक्षांना मिळून ५० चा आकडाही गाठता आलेला नाही. एकूण ४४ जागांवर मविआचे उमेदवार विजयी झाले, ज्यात काँग्रेस २८, शिवसेना (ठाकरे गट) ९ आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) ७ अशा जागांचा समावेश आहे. विशेषतः ग्रामीण आणि शहरी दोन्ही पट्ट्यांमध्ये मविआचा जनाधार घटल्याचे या निकालांवरून स्पष्ट होत आहे. राज्यातील ३.५ कोटींहून अधिक मतदारांनी विकासाच्या मुद्द्यावर महायुतीला पसंती दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या लाडकी बहीण योजनेचा आणि केंद्राच्या योजनांचा प्रभाव या निवडणुकांमध्येही दिसून आला. या विजयामुळे आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी महायुतीचा आत्मविश्वास द्विगुणित झाला असून, विरोधकांना मात्र आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे.राज्यातील नगपरिषद आणि नगरपंचायतींमधील विजयी नगरसेवकांची यादी-वेंगुर्ले नगरपरिषद-१. लीना समीर म्हापणकर, शिंदे सेना२. रवींद्र रमाकांत शिरसाट, भाजप३. गौरी माईनकर, भाजप४. प्रीतम सावंत, भाजप५. विनायक गवंडकर, भाजप६. गौरी मराठे, भाजप७. आकांक्षा परब, भाजप८. तातोबा पालयेकर, भाजपसावंतवाडी नगरपरिषद-१. दिपाली भालेकर, भाजप२. तौकीर शेख, काँग्रेस३. सुधीर आडीवरेकर, भाजप४. दुलारी रांगणेकर, भाजप५. आनंद नेवगी, भाजप६. सायली दुभाषी, शिंदे सेना७. देवेंद्र टेमकर, उभाठा८. सुनिता पेडणेकर, भाजप९. खेमराज कुडतरकर, शिंदे सेना१० मोहिनी मडगावकर, भाजपमालवण नगरपरिषद-मंदार केणी (भाजप)दर्शना कासावकर (भाजप)दीपक पाटकर (शिवसेना)ललित चव्हाण (भाजप)अनिता गिरकर (शिवसेना उबाठा)सिद्धार्थ जाधव (शिवसेना)पूनम चव्हाण (शिवसेना)निना मुंबरकर (शिवसेना)महानंदा खानोलकर (भाजप)अहेंद्र म्हाडगुत (शिवसेना उबाठा)शर्वरी पाटकर (शिवसेना)मंदार ओरसकर (शिवसेना उबाठा)तपस्वी मयेकर (शिवसेना उबाठा)नांदेडमधील नगरपरिषदा:१. लोहा - राष्ट्रवादी ( अजितदादा )२. कंधार - ( काँग्रेस )३. मुखेड - शिंदे शिवसेना४. मुदखेड - भाजप ( आघाडी५. कुंडलवाडी - भाजप ( आघाडी )६. बिलोली - मराठवाडा जनहित पार्टी७. धर्माबाद - मराठवाडा जनहित पार्टी ( आघाडी )८. उमरी - राष्ट्रवादी ( अजितदादा )९. भोकर - भाजप ( आघाडी )१०. हदगाव - सेना शिंदे ( आघाडी )११. देगलूर - राष्ट्रवादी ( अजितदादा आघाडीवर )१२. किनवट - भाजप ( विजयी )रोहा नगरपालिका-नगराध्यक्ष - वनश्री समीर शेडगे विजयी ( राष्ट्रवादी अजित पवार गट )प्रभाग क्रमांक १अराष्ट्रवादी विजयी - नीता महेश हजारे (नगरसेवक)प्रभाग क्रमांक १बराष्ट्रवादी विजयी - प्रशांत कडू (नगरसेवक)प्रभाग क्रमांक २ अराष्ट्रवादी विजयी - फराह पानसरे (नगरसेवक)प्रभाग क्रमांक २ ब बिनविरोधराष्ट्रवादी विजयी- राजेंद्र जैन बिनविरोध (नगरसेवक)रायगड. रोहाप्रभाग क्रमांक ३ अराष्ट्रवादी विजयी - अफ्रिन रोगे (नगरसेवक)प्रभाग क्रमांक ३ बराष्ट्रवादी विजयी - अरबाज मणेर (नगरसेवक)प्रभाग क्रमांक ४ अराष्ट्रवादी विजयी - स्नेहा अंबरे (नगरसेवक)प्रभाग क्रमांक ४ बराष्ट्रवादी विजयी- अहमद दर्जी (नगरसेवक)रायगड. रोहाप्रभाग क्रमांक ५ अराष्ट्रवादी विजयी - आलमास मुमेर (नगरसेवक)प्रभाग क्रमांक ५ बराष्ट्रवादी विजयी - महेंद्र गुजर (नगरसेवक)प्रभाग क्रमांक ६ अराष्ट्रवादी विजयी - गौरी बारटक्के (नगरसेवक)प्रभाग क्रमांक ६ बराष्ट्रवादी विजयी- महेंद्र गुजर (नगरसेवक)प्रभाग क्रमांक ७ अराष्ट्रवादी विजयी - प्रियांका धनावडे (नगरसेवक)प्रभाग क्रमांक ७ बराष्ट्रवादी विजयी - रवींद्र चाळके (नगरसेवक)प्रभाग क्रमांक ८ अराष्ट्रवादी विजयी- संजना शिंदे (नगरसेवक)प्रभाग क्रमांक ८ बराष्ट्रवादी विजयी- महेश कोलटकर (नगरसेवक)प्रभाग क्रमांक ९ अशिवसेना -सुप्रिया जाधव (नगरसेवक)प्रभाग क्रमांक ९ बभाजपा विजयी - रोशन चाफेकर ( नगरसेवक)प्रभाग क्रमांक १० अराष्ट्रवादी विजयी- पूर्वा मोहिते (नगरसेवक)प्रभाग क्रमांक १० बराष्ट्रवादी विजयी- अजित मोरे ( नगरसेवक)माथेरान नगरपरिषद-प्रभाग क्रमांक १केतन रामने : शिवसेना शिंदे गट : विजयीअनुसया ढेबे : राष्ट्रवादी अजित पवार गट : विजयीप्रभाग क्रमांक २सिताराम कुंभार : राष्ट्रवादी अजित पवार गट : विजयीलता ढेबें : शिवसेना शिंदे गट : विजयीप्रभाग क्रमांक ३रिजवाना शेख : शिवसेना शिंदे गट :विजयीशिवाजी शिंदे : शिवसेना शिंदे गट : विजयीप्रभाग क्र ४गौरंग वाघेला : शिवसेना शिंदे गट : विजयीसौ.प्रतिभा घावरे : भाजपा : विजयीप्रभाग क्र ५सचिन दाभेकर : शिवसेना ठाकरे गट विजयीकमल गायकवाड : शिवसेना शिंदे गट विजयीप्रभाग क्र ६सोहेल महापुळे : शिवसेना शिंदे गट विजयीसौ सुरेखा साळुंखे : शिवसेना शिंदे गट विजयीप्रभाग क्र ७संतोष शेलार : शिवसेना शिंदे गट विजयीअनिता रांजाणे : राष्ट्रवादी अजित पवार गट विजयीप्रभाग क्रमांक ८किरण पेमारे : राष्ट्रवादी अजित पवार गट विजयीसौ. अर्चना भिल्लारे : शिवसेना शिंदे गट विजयीप्रभाग क्र.९ऐश्वर्या तोरणेसुनील शिंदेपालघर जिल्हा- पालघर नगरपरिषदउत्तम घरत, नगराध्यक्ष, शिवसेना विजयीविजयी नगरसेवक- ३० जागाभाजप- ०८शिवसेना- १९उबाठा- ०३डहाणू नगरपरिषदराजेंद्र माच्छी, नगराध्यक्ष विजयी उमेदवार, शिवसेनानगरसेवक २७ जागा-भाजपा-१७राष्ट्रवादी- ८शिवसेना- २जव्हार नगरपरिषद-पूजा उदावंत, नगराध्यक्ष विजयी उमेदवार, भाजपानगरसेवक जागा-२०भाजपा- १४शिवसेना- ०२राष्ट्रवादी अजित पवार- ०३राष्ट्रवादी शरद पवार- ०१वाडा नगरपंचायत-रीमा गंधे, नगराध्यक्ष विजयी उमेदवार भाजपानगरसेवक जागा- १७भाजपा- १०शिवसेना- ०३उबाठा- ०१राष्ट्रवादी अजित पवार- ०१राष्ट्रवादी शरद पवार- ०१काँग्रेस- ०१अंबरनाथ नगरपरिषद विजयी उमेदवार-एकूण नगरसेवक- ५९भाजपा- १४ विजयी- स्वप्नना गायकवाड- मीना वाळेकर- ⁠भाजप उमेदवार विजयी- ⁠रंजना कोतेकर- ⁠मनीष गुंजाळ- ⁠अभिजीत करंजुले- ⁠जयश्री थर्टी- ⁠अनिता भोईर- ⁠सुजाता भोईर- ⁠सचिन गुंजाळ- ⁠सुप्रिया आतिष पाटील-मिनू सिंग-पवन वाळेकर-पूनम पाटीलशिवसेना-२२ विजयी- विजयी शिंदे- ⁠रेश्मा गुडेकर- ⁠राहुल सोमेश्वर- ⁠निखिल चौधरी- ⁠ज्योत्सना भोईर- ⁠कुणाल भोईर- ⁠अपर्णा भोईर- पल्लवी लकडे- विकास सोमेश्वर- स्वप्निल बागुल- पुरुषोत्तम उगले- संदीप भराडे- कल्पना गोरे- रोहिणी भोईर- संदीप तेलंगे- अजय मोहिरीकर- सचिन मंचेकर- रेश्मा सुर्वे- सुनिता बागुल- रवींद्र करंजुले- दीपक गायकवाड- रवी पाटीलअजित पवार गट- ४ विजयीसदाशिव पाटीलमीरा शेलारसचिन पाटीलसुनिता पाटीलकाँग्रेस-१२दर्शना पाटीलअर्चना पाटीलहर्षदा पाटीलतेजस्विनी पाटीलप्रदीप पाटीलविपुल पाटीलकबीर गायकवाडमनीष म्हात्रेधनलक्ष्मी जयशंकरसंजवणी देवडेदिनेश गायकवाडकिरण राठोडकन्नड नगरपालिका- पक्ष निहाय विजयी नगरसेवकराष्ट्रवादी काँग्रेस (अ.प)-१२१) गायकवाड सोनम अनिल२) असलम इब्राहिम शेख.३) विद्या प्रवीण काशीनंद४) युवराज बनकर५) वर्षा ताठे६)मनिषा सुरेश डोळस (चिठी काढून विजयी)७) रंजना रविंद्र राठोड८) संतोष कचरु निकम९) राहुल अशोक वाघ१०) शेख आरिफ अशीद११) अलका भारत जाधव१२) शिवकुमार जैस्वालभारतीय जनता पक्ष : ३१) बैनाडे सोनाली प्रेमसिंग२) कचरु आव्हाले३) सोनाली सुनील पवारकाँग्रेस :६१) शेख आलिया अजीज२) अयाज मकबूल शाह३) शेख कमरुनिसा अब्दुल रऊफ४) शेख मुमताज बी फैजमहब्बत५) अब्दुल जावेद वाहेद६) शेख नफीसबेगम अब्दुलशिवसेना (शिंदे गट) ३१) बेबीबाई सुर२)प्रकाश अग्रवाल३) शितल घोंगटेअपक्ष१) शेख अनिस मकबूलखोपोली नगरपालिका निवडणूक निकाल-नगराध्यक्ष, कुलदीपक शेंडे (शिंदे सेना)शिंदे गट - १अजित पवार राष्ट्रवादी -०७अपक्ष -०१भाजप - ०४शेकापक्ष - ०४शरद पवार पक्ष - ०१रत्नागिरी जिल्ह्यातील नगरपरिषदेचा निकालरत्नागिरी नगर परिषद शिल्पा सुर्वे शिवसेना( विजयी)रत्नागिरी नगरपरिषद -नगरसेवक जागा ३२--- ६ भाजप, ३ उद्धव ठाकरे सेना, २३ शिवसेनाखेड नगरपरिषद माधवी बुटाला शिवसेना विजयीखेड नगरपरिषद - नगरसेवक २१ जागा- (१८ शिवसेना ३ भाजप)चिपळूण नगरपरिषद शिवसेना उमेश सकपाळ विजयीचिपळूण नगरपरिषद-नगरसेवक २८ जागा- ( शिवसेना९ , भाजप ८, उद्धव ठाकरे सेना ५, काॅग्रेस आय ३, राष्ट्रवादी अजित पवार २, राष्ट्रवादी शरद पवार १)राजापूर नगरपरिषद काँग्रेसच्या हुस्नबानू खलिपेराजापूर नगरपरिषद -नगरसेवक - २०जागा( काॅग्रेस ७, उद्धव ठाकरे सेना ३, शिवसेना ९ भाजप १)लांजा नगरपंचायत शिवसेना सावली कुरुपलांजा नगरपंचायतीसाठी नगरसेवक १७ जागा -- ( शिवसेना १०, भाजप १, अपक्ष ५ उद्धव ठाकरे सेना १)गुहागर नगरपंचायत भाजप निता मालप विजयीगुहागर नगरपंचायतीसाठी नगरसेवक१७ जागा( शिवसेना ८, भाजप 5, राष्ट्रवादी अजित पवार गट १, उद्धव ठाकरे सेना २, मनसे १)देवरुख नगरपंचायत भाजपा मृणाल शेट्येदेवरुख नगरपंचायतीसाठी नगरसेवक १७ जागा- ( भाजप ३, शिवसेना ३, अजित पवार राष्ट्रवादी ४, अपक्ष ४, उद्धव ठाकरे सेना ३)उत्तर पुणे अंतिम निकाल-तळेगाव नगरपरिषद - अंतिम निकालनगराध्यक्ष : संतोष दाभाडे (कमळ - भाजप+अजित पवार राष्ट्रवादी)नगरसेवक बलाबलअजित पवार राष्ट्रवादी - १७भाजप - १०अपक्ष - १एकूण नगरसेवक - २८ + १ नगराध्यक्षवडगांव मावळ नगरपंचायत - अंतिम निकालनगराध्यक्ष : अबोली ढोरे - अजित पवार राष्ट्रवादीनगरसेवक बलाबलअजित पवार राष्ट्रवादी -९भाजप -६अपक्ष - २एकूण नगरसेवक -१७ +१ नगराध्यक्षलोणावळा नगरपरिषद - अंतिम निकालनगराध्यक्ष : राजेंद्र सोनवणे - अजित पवार राष्ट्रवादीनगरसेवक बलाबलअजित पवार राष्ट्रवादी - १६भाजप -०४अपक्ष - ०३ठाकरे सेना -- ०१काँग्रेस - ०३एकूण नगरसेवक -२७ +१ नगराध्यक्षसातारा जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायत निकाल-म्हसवड पालिका नगरसेवक २० जागा १ नगराध्यक्षनगराध्यक्षा -पूजा सचिन विरकर(भाजपा)- ०१भाजप -20राष्ट्रवादी अजित दादा - 0राष्ट्रवादी शरद पवार -0रासप -0शिवसेना एकनाथ शिंदे-0अपक्ष -0म्हसवड मध्ये मंत्री जयकुमार गोरे यांचा करिष्मा, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या उमेदवारांचा सुपडा साप..वाई नगरपालिका - २२ जागा १ नगराध्यक्ष..नगराध्यक्ष - अनिल सावंत (भाजपा)- ०१भाजप -०९शिंदे - शिवसेना - ०अपक्ष -१राष्ट्रवादी अजित दादा - १२वाई मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार पक्षाचे मंत्री मकरंद पाटील यांना धक्का, मंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपा चिन्हावर उभा केलेला नगराध्यक्ष पदाचा उमेदवार विजयी..मलकापूर नगरपालिका अंतिम निकाल२२ जागा १ नगराध्यक्षनगराध्यक्ष तेजस सोनावले विजयी भाजप- 01भाजपा नगरसेवक 18राष्ट्रवादी अजित पवार 2शिवसेना उबाठ 1अपक्ष 1भाजपच्या जिल्हाध्यक्ष आमदार अतुल भोसले त्यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्ष पदाचा भाजपचा उमेदवार विजयी.. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री मकरंद पाटील यांना मलकापूर मध्ये धक्का..सातारा नगरपालिका - ५० जागा १ नगराध्यक्ष..नगराध्यक्ष-अमोल मोहिते (भाजपा)- 01भाजप -40शिंदे - शिवसेना - 1अपक्ष - 9राष्ट्रवादी -0काँग्रेस - 0उबाठा - 0शप - 0सातारा नगरपालिकेमध्ये खासदार उदयनराजे मंत्री शिवेंद्रराजेंचा जलवा कायम*राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांना धक्का*मंत्री शंभूराजे देसाई यांच्या शिवसेनेने सातार नगरपालिकेमध्ये खाते खोलले5) रहिमतपूर नगरपालिका - 20 जागा 1 नगराध्यक्ष..नगराध्यक्ष -वैशाली निलेश माने (भाजपा)- 01भाजप -09शिंदे - शिवसेना - 02अपक्ष -राष्ट्रवादी अजित दादा - 09रहिमतपूर नगरपालिकेत मंत्री जयकुमार गोरे यांचा करिष्मा, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुनील माने यांच्या पत्नीचा पराभव केला..6) महाबळेश्वर नगरपालिका - 20 जागा 1 नगराध्यक्ष..नगराध्यक्ष -सुनील शिंदे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार)- 01भाजप -01अपक्ष (शिंदेंची शिवसेना पुरस्कृत)-05राष्ट्रवादी अजित दादा - 13अपक्ष - 01महाबळेश्वर येथे अजित पवार गटाच्या मकरंद पाटलांचा जलवा, शिवसेनेचे पुरस्कृत उमेदवार यांचा पराभव7) मेढा नगरपंचायत - 17 जागा 1 नगराध्यक्ष-नगराध्यक्ष -रूपाली संतोष वारागडे (भाजप)- 01भाजप -11शिंदेंची शिवसेना-05राष्ट्रवादी अजित दादा -00अपक्ष - 00राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष - 01मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचा नगरपंचायत येथे करिष्मा, मंत्री शंभूराज देसाई यांच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराचा दारुण पराभव..8) फलटण नगरपालिका - 27 जागा 1 नगराध्यक्ष..नगराध्यक्ष - समशेरसिंह नाईक निंबाळकर (भाजपा)- 01भाजप- 12 + भाजप पुरस्कृत अपक्ष- 02 (12+2 =14)शिंदे -शिवसेना 07+शिवसेना पुरस्कृत अपक्ष - 01 (07+01)=08काँग्रेस - 01राष्ट्रवादी अजित दादा - 04माजी खासदार रजसिंह नाईक निंबाळकर यांचे बंधू समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी माझी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे पुत्र अनिकेत राजे निंबाळकर यांचा दारुण पराभव केला9) पाचगणी नगरपालिका - 20 जागा 1 नगराध्यक्ष-नगराध्यक्ष -दिलीप बगाडे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार पुरस्कृत)- 01भाजप -00राष्ट्रवादी अजित दादा - 12अपक्ष - 08 (भाजप पुरस्कृत)राष्ट्रवादी अजित दादा पक्षाचे उमेदवारचा पाचगणी करिष्मा10) कराड नगरपालिका 31जागा 1 नगराध्यक्षपद-नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजेंद्रसिंह यादव (शिवसेना शिंदे गट)- 01शरदचंद्र पवार राष्ट्रवादी (माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांची लोकशाही आघाडी)--13शिंदे शिवसेना (यशवंत विकास आघाडी)--7भाजप---10अपक्ष---01मंत्री शंभूराजे देसाई शिवसेना पुरस्कृत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजेंद्रसिंह यादव यांनी भाजप आमदार अतुल भोसले यांच्या नगराध्यक्ष पदाचा मोठ्या फरकाने पराभव करत शिवसेनेचा झेंडा कराडचा नगरपालिकेवर फडकवला.मराठावाडा निकाल-छत्रपती संभाजीनगर एकूण 7 नगराध्यक्षभाजप : 1शिवसेना : 2राष्ट्रवादी अप : 1उद्धव शिवसेना : 1काँग्रेस : 2राष्ट्रवादी शप : 0बुलढाणा-पक्षीय बलाबलसह अंतिम निकाल-(Buldhana Nagarparishad Result 2025)1) मेहकरनगराध्यक्ष - किशोर गारोळे, उद्धव सेना .नगरसेवक, एकूण २६ जागा ..काँग्रेस पक्ष - 11शिवसेना शिंदे गट - 09शिवसेना उबाठा - 06२) बुलढाणानगराध्यक्ष, पूजा गायकवाड, शिंदे सेना .नगरसेवक - 30शिंदे सेना 22राष्ट्रवादी शरद पवार 2काँग्रेस 2अपक्ष 2भाजपा 2३) मलकापूरनगरधायक्ष - आतिक जवारीवाले, काँग्रेसनगरसेवक - एकूण 30काँग्रेस 14बीजेपी 6राष्ट्रवादी अजित पवार 4वंचित 3ठाकरे सेना 1अपक्ष 2४)नांदुरानगराध्यक्ष - मंगला मुरेकर, भाजपा .नगरसेवक, एकूण - 25भाजपा 11अकोट विकास आघाडी 8राष्ट्रवादी अजित पवार 2शिंदे सेना 2अपक्ष 2५) खामगावनगराध्यक्ष - अपर्णा फुंडकर , भाजपा .नगरसेवक ,एकूण - ३५भाजपा २९राष्ट्रवादी अजित पवार ३काँग्रेस ३६) जळगाव जामोदनगराध्यक्ष - गणेश दांडगे, भाजपा .नगरसेवक , एकूण - 21भाजपा 9काँग्रेस 5राष्ट्रवादी शरद पवार 2Mim 2राष्ट्रवादी अजित पवार 1वंचित 1समाजवादी पार्टी 1७) शेगावनगराध्यक्ष - प्रकाश शेगोकर , काँग्रेस .नगरसेवक , एकूण - 30भाजपा 17काँग्रेस 6ठाकरे गट 1Mim 4वंचित 2८) चिखली.नगराध्यक्ष, पंडितराव देशमुख, भाजपा .नगरसेवक, एकूण - 28भाजपा 13शिवसेना शिंदे 1काँग्रेस 12राष्ट्रवादी शरद पवार 1राष्ट्रवादी अजित पवार 1९) लोणारनगराध्यक्ष, मीरा मापारी, काँग्रेस.नगरसेवक , एकुण 20काँग्रेस 8शिवसेना शिंदे 5भाजपा 1Mim 1अपक्ष 5१०) सिंदखेड राजानगराध्यक्ष , सौरभ तायडे, राष्ट्रवादी, शरद पवार .नगरसेवक , एकूण - 20शिवसेना शिंदे 5राष्ट्रवादी शरद पवार 8राष्ट्रवादी अजित पवार 6भाजपा 1११) देऊळगाव राजानगराध्यक्ष, माधुरी शिपणे , राष्ट्रवादी अजित पवारनगरसेवक, एकूण 21भाजपा 3नगर विकास आघाडी 7राष्ट्रवादी अजित पवार 9ठाकरे गट 2सोलापूर जिल्हा अंतिम निकाल-सांगोला नगरपरिषद - अंतिम निकालनगराध्यक्ष : आनंदा माने (शिवसेना शिंदे गट)नगरसेवक बलाबलशिवसेना शिंदे गट - 15भाजप - 4शेकाप 3दीपक साळुंखे गट - 1एकूण नगरसेवक - 23 + 1 नगराध्यक्षकुर्डूवाडी नगरपरिषद - अंतिम निकालनगराध्यक्ष : जयश्री भिसे - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेअजित पवार राष्ट्रवादी -13उभाठा -5शिवसेना शिंदे 1अपक्ष - 1एकूण नगरसेवक -20+1 नगराध्यक्षअकलूज नगरपरिषद - अंतिम निकालनगराध्यक्ष : रेशमा अडगळे - शरद पवार राष्ट्रवादीअजित पवार राष्ट्रवादी - 22भाजप -04एकूण नगरसेवक -26+1 नगराध्यक्षधाराशिव - पक्षनिहायभाजप - 4 ( 3 विजयी 1 जागेचा निकाल येणे बाकी)शिवसेना शिंदे - 3स्थानिक आघाडी - 1 ( शिवसेना - तानाजी सावंत समर्थक )शिवसेना उबठा - 0काँग्रेस - 0राष्ट्रवादि काँग्रेस अजित पवार - 0राष्ट्रवादि काँग्रेस शरद पवार - 0तुळजापूर - विनोद पिटू गंगणे भाजप १७७० मतांनी विजयकळंब - सुनंदा शिवाजी कापसे २२५४ मतांनी विजयीधाराशिव - नेहा राहुल काकडे, भाजपा आघाडी निकाल येणे बाकीनळदुर्ग - बसवराज धरणे भाजप 563 मतांनी विजयीमुरूम - बापूराव पाटील भाजपा ४०१९ मतांनी विजयीउमरगा - किरण गायकवाड शिवसेना ६२४२ मतांनी विजयीभूम - संयोगिता संजय गाढवे, 198 आलम प्रभू शहर विकास आघाडी ( शिवसेना - तानाजी सावंत समर्थक )परांडा - झाकीर सौदागर, शिवसेना 189 मतांनी विजयीपरभणी जिल्हा निकाल, ७ नगर परिषदपाथरी- एकनाथ शिंदे शिवसेना नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आसेफ खान विजयीसोनपेठ- परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार परमेश्वर कदम यांचा विजयसेलू- भाजपचे मिलिंद सावन यांचा विजयजिंतूर- भाजपचे प्रताप देशमुख यांचा विजयमानवत- राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या सौ राणी अंकुश लाड विजयीगंगाखेड:- राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या उर्मिला केंद्रे विजयीजालना : एकूण जागा 3राष्ट्रवादी SP 01भाजप 02भोकरदन -राष्ट्रवादी SP मिरझा समरीन विजयी..(भाजपने ती माझी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि त्यांचे पुत्र आमदार संतोष दानवे यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची निवडणूक आहे)परतूर : भाजपच्या प्रियंका राक्षे विजयीअंबड : भाजपच्या देवयानी कुलकर्णी विजयीहिंगोली जिल्हा-हिंगोली नगरपालिका रेखा श्रीराम बांगर शिंदे शिवसेनाकळमनुरी नगरपालिका आश्लेषा चौधरी शिंदे शिवसेनावसमत सुनीता बाहेती राष्ट्रवादी अजित पवाररहिमतपूर-प्रभाग क्रमांक 1 ते प्रभाग क्रमांक 5 मध्ये 7 राष्ट्रवादी अजितदादा गट उमेदवार विजयी3 भाजप उमेदवार विजयीमुरगुड नगरपरिषद-शिवसेना शिंदे गटाचे 16 नगरसेवक विजयीतर राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ 4 जागांवर मिळाला विजयकरमाळा-करमाळा शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मोहिनी संजय सावंत विजयीशिराळा नगरपंचायत-भाजपा, शिवसेनेचे चार उमेदवार विजयीदोन्ही राष्ट्रवादी आघाडी केवळ एका जागेवर विजयीमैंदर्गी नगरपरिषद-भाजपचे 8 नगरसेवक तर स्थानिक गटाचे 2 नगरसेवक विजयीबार्शी नगरपरिषद-भाजपाचे 5 नगरसेवक विजयी, तर शिवसेना (उबाटा) गटाचे 3 नगरसेवक विजयी.औसा नगरपरिषद-राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा औसा नगरपरिषदेवर ताबा२३ जागे पैकी 17 जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा विजय,6 जागेवर भाजपाचा विजय, काँग्रेसला भोपळाही फोडता आला नाही,गेल्या वेळेस दोन वरून यावेळी शून्यावर काँग्रेस,नगराध्यक्ष पदाचे उमेदवार परवीन नवाबुद्दीन शेख साडेचारशे मतांनी विजयhttps://marathi.abplive.com/आटपाडी नगरपंचायत-भाजपा सहा जागावर विजयी, तर शिंदेंची शिवसेना सात जागांवर विजयी, राष्ट्रवादी एका जागेवर विजयीजेजुरी नगरपरिषद-भाजपा गटाचे दोन उमेदवार विजयी, तानाजी खोमणे अपक्ष उमेदवार विजयीखेड नगरपरिषद-२१ पैकी २१ जागांवर विजयी, ३ भाजपा आणि १८ शिवसेनामाधवी बुटाला शिवसेनेच्या नगराध्यक्ष विजयीमाळेगाव नगरपंचायत-ईश्वर चिट्टीमधून पक्ष उमेदवार विजयीगायत्री राहुल तावरे आणि जयश्री बाळासाहेब तावरे या दोन्ही उमेदवारांना 616 मत अशी समान पडल्याने ईश्वर चिट्ठी काढण्यात आली. यामध्ये अपक्ष उमेदवार जयश्री बाळासाहेब तावरे या विजयी झाल्या आहेत.बुलढाणा-सिंदखेड राजा - शरद पवार गट - सौरभ तायडे - विजयी.लोणार - काँग्रेस - मीराताई भूषण मापारी - विजयीखामगाव - भाजपा - अपर्णा फुंडकर - विजयी.देऊळगाव राजा - अजित पवार गट - माधुरी शिंपने - विजयी.दूधनी नगरपरिषदेत-शिंदे गटाचे 14 नगरसेवक विजयीसांगोला नगरपरिषद-17 जागांवर शहाजी बापू पाटील यांचा एक हाता विजयदोन आधीच बिनविरोध आल्या होत्या.राहाता नगरपालीका-भाजपचे _ स्वाधीन गाडेकर_ बहुमताने विजयी..20 पैकी 19 जागेवर भाजप सेनेचा विजय...विरोधकांना मिळाली अवघी एक जागा...देवळाली प्रवरा नगरपालीका-माजी आमदार चंद्रशेखर कदम यांनी सत्ता राखली..भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार _ सत्यजित कदम _ विजयी..जनतेने दुसर्‍यांदा दिली नगराध्यक्ष पदाची संधी...14 जागेवर भाजपचे नगरसेवक विजयी...काॅग्रेसचा चार जागांवर विजय...नेवासा नगरपालीका-माजी आमदार शंकरराव गडाख यांचा गड आला पण सिंह गेला..17 पैकी 10 जागेवर गडाखांचे उमेदवार विजयी..मात्र नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या उमेदवाराचा विजय..6 जागेवर महायुतीचे उमेदवार विजयी..1 जागेवर आम आदमी पार्टीचा विजय...धाराशिव नगरपरिषद- (Dharashiv Nagarparishad Result 2025)भाजपा- 4 ( 3 विजयी 1 जागेचा निकाल येणे बाकी)शिवसेना शिंदे - 3स्थानिक आघाडी - 1 ( शिवसेना - तानाजी सावंत समर्थक )शिवसेना उबठा - 0काँग्रेस - 0राष्ट्रवादि काँग्रेस अजित पवार - 0राष्ट्रवादि काँग्रेस शरद पवार - 0बदलापूर नगरपरिषद-बदलापूर नगरपरिषद नगराध्यक्ष भाजप उमेदवार रुचिता घोरपडे विजयीभाजपा - 23 नगरसेवक विजयीशिंदे शिवसेना - 23 नगरसेवक विजयीराष्ट्रवादी अजित पवार गट - 3 नगरसेवक विजयीhttps://marathi.abplive.com/सोलापूरमधील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणूक नगराध्यक्षपदाचा निकाल-अक्कलकोटनगराध्यक्ष - भाजप, मिलन कल्याणशेट्टीनगरसेवकएकूण - 25भाजपा - 22शिंदे सेना - 1काँग्रेस - 2दुधनी नगरपरिषदनगराध्यक्ष - शिवसेना शिंदे गट, प्रथमेश म्हेत्रेनगरसेवकएकूण - 20शिंदेसेना - 20भाजपा - 00मैंदर्गी नगरपरिषदनगराध्यक्ष - भाजप, अंजली बाजारमठनगरसेवकएकूण - 20भाजपा - 18स्थानिक आघाडी - 2मोहोळ नगरपरिषदनगराध्यक्ष - शिवसेना शिंदे गट, सिद्धी वस्त्रेनगरसेवकएकूण - 20शिंदेगट - 08भाजपा - 11शिवसेना ( UBT ) - 1बार्शी नगरपरिषदनगराध्यक्ष : भाजप, तेजस्विनी कथलेनगरसेवकएकूण - 42भाजप - 23ठाकरे गट - 19लातूर-विभाग - मराठवाडाजिल्हा - लातूरएकूण नगर परिषद - ०४एकूण नगर पंचायत - ०१नगर परिषद - औसाएकूण जागा – २३नगरसेवक कल/निकालभाजप - ०६शिंदेंची शिवसेना -अजित पवार राष्ट्रवादी - १७काँग्रेस -ठाकरेंची शिवसेना -शरद पवार राष्ट्रवादी -इतर –नगर परिषद - उदगीरएकूण जागा – ४०नगरसेवक कल/निकालभाजप - १३शिंदेंची शिवसेना -अजित पवार राष्ट्रवादी - २०काँग्रेस - ०५ठाकरेंची शिवसेना -शरद पवार राष्ट्रवादी -इतर – ०२नगर परिषद - निलंगाएकूण जागा – २३नगरसेवक कल/निकालभाजप - १५शिंदेंची शिवसेना -अजित पवार राष्ट्रवादी -काँग्रेस - ०८ठाकरेंची शिवसेना -शरद पवार राष्ट्रवादी -इतर –नगर परिषद - अहमदपूरएकूण जागा – २५नगरसेवक कल/निकालभाजप - ०३शिंदेंची शिवसेना -अजित पवार राष्ट्रवादी - १६काँग्रेस -ठाकरेंची शिवसेना - ०३शरद पवार राष्ट्रवादी - ०३इतर –नगर पंचायत - रेणापूरएकूण जागा – १७नगरसेवक कल/निकालभाजप - १०शिंदेंची शिवसेना -अजित पवार राष्ट्रवादी -काँग्रेस - ०५ठाकरेंची शिवसेना -शरद पवार राष्ट्रवादी - ०१इतर – ०१जिल्हा - लातूरजिल्ह्यातील एकूण नगराध्यक्षपदं – ०५भाजप - ०४शिंदेंची शिवसेना -अजित पवार राष्ट्रवादी - ०१काँग्रेस -ठाकरेंची शिवसेना -शरद पवार राष्ट्रवादी -इतर –नाशिक जिल्हा नगरपरिषद पक्षनिहाय सविस्तर माहितीनगरपरिषद - भगूरएकूण जागा - २०+१नगराध्यक्ष - प्रेरणा बलकवडे ( अजित पवारांची राष्ट्रवादी )भाजप - ५शिंदेंची शिवसेना - ८अजित पवार राष्ट्रवादी - ४काँग्रेस - ०ठाकरेंची शिवसेना - २शरद पवार राष्ट्रवादी - ०इतर - १नगरपरिषद - इगतपुरीएकूण जागा - २१+१नगराध्यक्ष - शालिनी खातळे ( शिंदेंची शिवसेना )भाजप - २शिंदेंची शिवसेना - ५अजित पवार राष्ट्रवादी - १३काँग्रेस - ०ठाकरेंची शिवसेना - १शरद पवार राष्ट्रवादी - ०इतर - ०नगरपरिषद - त्र्यंबकेश्वरएकूण जागा - २०+१नगराध्यक्ष - त्रिवेणी तुंगार ( शिंदेंची शिवसेना )भाजप - ६शिंदेंची शिवसेना - ५अजित पवार राष्ट्रवादी - ७काँग्रेस - ०ठाकरेंची शिवसेना - ०शरद पवार राष्ट्रवादी - ०इतर - २नगरपरिषद - सिन्नरएकूण जागा - ३०+१नगराध्यक्ष - विठ्ठलराजे उगले ( अजित पवारांची राष्ट्रवादी )भाजप - २शिंदेंची शिवसेना - १अजित पवार राष्ट्रवादी - १३काँग्रेस - ०ठाकरेंची शिवसेना - १४शरद पवार राष्ट्रवादी - ०इतर - ०नगरपरिषद - ओझरएकूण जागा - २७+१नगराध्यक्ष - अनिता घेगडमल ( भाजप )भाजप - १६शिंदेंची शिवसेना - ०अजित पवार राष्ट्रवादी - ६काँग्रेस - ०ठाकरेंची शिवसेना - ५शरद पवार राष्ट्रवादी - ०इतर - ०नगरपरिषद - पिंपळगाव बसवंतएकूण जागा - २५+१नगराध्यक्ष - डॉ. मनोज बर्डे ( भाजप )भाजप - ८शिंदेंची शिवसेना - १०अजित पवार राष्ट्रवादी - ७काँग्रेस - ०ठाकरेंची शिवसेना - ०शरद पवार राष्ट्रवादी - ०इतर - ०नगरपरिषद - सटाणाएकूण जागा - २४+१नगराध्यक्ष - हर्षदा पाटील ( शिंदेंची शिवसेना )भाजप - १५शिंदेंची शिवसेना - ४अजित पवार राष्ट्रवादी - १काँग्रेस - ०ठाकरेंची शिवसेना -शरद पवार राष्ट्रवादी - ०इतर - ४नगरपरिषद - चांदवडएकूण जागा - २०+१नगराध्यक्ष - वैभव बागुल ( भाजप )भाजप - ११शिंदेंची शिवसेना - २अजित पवार राष्ट्रवादी -काँग्रेस - ०ठाकरेंची शिवसेना - १शरद पवार राष्ट्रवादी - १इतर - ५नगरपरिषद - येवलाएकूण जागा - २६+१नगराध्यक्ष - राजेंद्र लोणारी ( अजित पवारांची राष्ट्रवादी )भाजप - ३शिंदेंची शिवसेना - १०अजित पवार राष्ट्रवादी - ११काँग्रेस - ०ठाकरेंची शिवसेना -शरद पवार राष्ट्रवादी - २इतर - ०नगरपरिषद - नांदगावएकूण जागा - २०+१नगराध्यक्ष - सागर हिरे ( शिंदेंची शिवसेना )भाजप - ०इशिंदेंची शिवसेना - १९अजित पवार राष्ट्रवादी - ०काँग्रेस - ०ठाकरेंची शिवसेना -शरद पवार राष्ट्रवादी - ०इतर - १११) नगरपरिषद - मनमाडएकूण जागा - ३३+१नगराध्यक्ष - योगेश पाटील ( शिंदेंची शिवसेना )भाजप - १शिंदेंची शिवसेना - २१अजित पवार राष्ट्रवादी - १काँग्रेस - १ठाकरेंची शिवसेना - ४शरद पवार राष्ट्रवादी - ०इतर - ३वाशिम नगरपालिका-भाजप -१४शिवसेना उबाठा : १२काँग्रेस ०२एम आय एम ०३अपक्ष ०१राष्ट्रवादी काँग्रेस (अप) :००राष्ट्रवादी काँग्रेस (शप):-००शिंदे शिवसेना: ००

फीड फीडबर्नर 22 Dec 2025 10:10 am

रिक्षावाली झाली नगरसेविका

माथेरान : प्रवाशांना ई रिक्षातून वाहतुकीची सेवा देत असताना इथल्या जनतेची सेवा करण्यासाठी श्रमिक रिक्षा संघटनेच्या सदस्या अनिता रांजाणे यांनी नुकताच पार पडलेल्या नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत सहभाग घेऊन प्रभाग क्र.७ मधून अनुसूचित जमातीकरिता उमेदवारी जाहीर करून आपल्या कर्तृत्वावर या निवडणुकीत विजय संपादन केला. अत्यंत अटीतटीच्या लढतीत त्यांनी विजय मिळवला.

फीड फीडबर्नर 22 Dec 2025 10:10 am

“मग हे जिंकले कसे?”उबाटाच्या सवालापासून ते वैभव मांगलेच्या छोट्या पडद्यावरील एन्ट्रीपर्यंतच्या टॉप १० बातम्या वाचा एका क्लिकवर

मग हे जिंकले कसे? नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या निकालामध्ये महायुतीने मुसंडी मारली तर महाविकास आघाडीची घसरगुंडी झाली. या निवडणुकीमध्ये महायुतीने विक्रम केला असून राज्यभर जल्लोष केला जात आहे. याच विजयावर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मुखपत्र आलेल्या सामनामधून टीका करण्यात आलीय. सामनाच्या अग्रलेखामध्ये महायुतीच्या विजयावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. त्यात, ‘भाजपने महाराष्ट्रात असे काय […] The post “मग हे जिंकले कसे?” उबाटाच्या सवालापासून ते वैभव मांगलेच्या छोट्या पडद्यावरील एन्ट्रीपर्यंतच्या टॉप १० बातम्या वाचा एका क्लिकवर appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Dec 2025 9:42 am

अंबरनाथमध्ये नगराध्यक्ष भाजपचाच

भाजपच्या तेजश्री करंजुले विजयी; शिंदे गटाच्या मनिषा वाळेकर पराभूतअंबरनाथ : अंबरनाथ नगर परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून, नगराध्यक्षपदावर भाजपने बाजी मारली आहे. भाजपच्या तेजश्री करंजुळे पाटील या नगराध्यक्ष म्हणून विजयी झाल्या. मात्र, नगरसेवक संख्येत शिवसेना (शिंदे गट) आघाडीवर राहिली असून, पक्षाचे सर्वाधिक २३ नगरसेवक निवडून आले आहेत. या निवडणुकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि शिवसेना शिंदे गटाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या मनिषा वाळेकर आणि भाजपच्या तेजश्री करंजुळे पाटील यांच्यात चुरशीची लढत झाली. अखेरीस भाजपने नगराध्यक्षपद पटकावत सत्ता मिळवली. नगराध्यक्ष भाजपचा असला, तरी नगरसेवक संख्येत शिंदेसेनेची आघाडी कायम राहिल्याने अंबरनाथमधील सत्तासमीकरणे संतुलित असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.विजयी नगरसेवकांची यादी :भाजप (१०): स्वप्ना गायकवाड, मीना वाळेकर, रंजना कोतेकर, मनीष गुंजाळ, अभिजीत करंजुळे, जयश्री थर्टी, अनिता भोईर, सुजाता भोईर, सचिन गुंजाळ, सुप्रिया आतिष पाटील.शिवसेना (शिंदे गट) (२३): संगीता गायकर, रेश्मा गुडेकर, राहुल सोमेश्वर, निखिल चौधरी, ज्योत्सना भोईर, कुणाल भोईर, अपर्णा भोईर, पल्लवी लकडे, विकास सोमेश्वर, स्वप्निल बागुल, पुरुषोत्तम उगले, संदीप भराडे, कल्पना गोरे, रोहिणी भोईर, संदीप तेलंगे, अजय मोहिरीकर, सचिन मंचेकर, रेश्मा सुर्वे, सुनीता बागुल, रवींद्र करंजुळे, दीपक गायकवाड, रवी पाटील, राजेंद्र वाळेकर.राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) (४): सदाशिव पाटील, सचिन पाटील, मीरा शेलार, सुनीता पाटील.काँग्रेस (१२): तेजस्विनी पाटील, प्रदीप पाटील, विपुल पाटील, कबीर गायकवाड, मनीष म्हात्रे, धनलक्ष्मी जयशंकर, संजवणी देवडे, दिनेश गायकवाड, किरण राठोड .५९ नगरसेवक पदांसाठी झालेल्या निवडणुकीत निकाल पुढीलप्रमाणे लागलाशिवसेना (शिंदे गट) : २३ जागाकाँग्रेस : १२ जागाभाजप : १० जागाराष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) : ४ जागा

फीड फीडबर्नर 22 Dec 2025 9:30 am

बदलापूरमध्ये फुलले 'कमळ'

नगराध्यक्षपदी रुचिता घोरपडे, नगरसेवक संख्येत बरोबरीबदलापूर : कुळगाव–बदलापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपने शिवसेना (शिंदे गट) यांना मोठा धक्का दिला आहे. भाजपच्या रुचिता राजेंद्र घोरपडे यांनी नगराध्यक्षपदाची निवडणूक ७ हजार ६३४ मतांच्या फरकाने जिंकत शिवसेनेचा बालेकिल्ला हादरवला. घोरपडे यांना ६४ हजार ६०४ तर शिवसेनेच्या वीणा वामन म्हात्रे यांना ५६ हजार ९७० मते मिळाली. नगराध्यक्षपद भाजपकडे गेले असले, तरी नगरसेवकांच्या संख्येत मात्र भाजप आणि शिवसेना समान पातळीवर राहिली.पालिकेतील कथित भ्रष्टाचार, शिवसेनेतील घराणेशाहीचे आरोप (एकाच कुटुंबातील सहा उमेदवार), तसेच भाजपचा आक्रमक व नियोजनबद्ध प्रचार यामुळे भाजपचा विजय सोप्पा झाल्याचे बोलले जाते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली जंगी सभा आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दिलेले बळही निर्णायक ठरले. ही निवडणूक शिवसेनेचे शहरप्रमुख वामन म्हात्रे आणि भाजपचे आमदार किसन कथोरे यांच्यातील संघर्षाचे प्रतिबिंब मानली जात होती. विधानसभा निवडणुकीपासून सुरू असलेला हा संघर्ष नगरपरिषद निवडणुकीत अधिक तीव्र झाला. भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियासोबत केलेली रणनितीही भाजपच्या बाजूने गेली.दरम्यान, प्रचारादरम्यान समाजमाध्यमांवरील आरोप-प्रत्यारोप, रावळगाव फॅक्टरीचा मुद्दा आणि घराणेशाहीची चर्चा भाजपच्या प्रचाराला पूरक ठरल्याचे मानले जाते. निवडणुकीदरम्यान उघडपणे पैसे वाटपाच्या घटना घडल्या.

फीड फीडबर्नर 22 Dec 2025 9:30 am

मीरा-भाईंदर महापालिकेवर महायुतीचाच झेंडा फडकेल

पदाधिकारी निर्धार मेळाव्यात एकनाथ शिंदे यांच विश्वासभाईंदर : मीरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेतर्फे मीरा रोड येथील शिवार गार्डन मैदानात पदाधिकारी निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना “आम्हाला खुर्चीचा लोभ नाही, शहराचा सर्वांगीण विकास हेच आमचे अंतिम ध्येय आहे,” असे स्पष्ट केले. ''येत्या निवडणुकीत महापालिकेवर महायुतीचाच झेंडा फडकेल'', असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.शिंदे म्हणाले की, मागील १०–१२ वर्षांत मीरा-भाईंदरमध्ये अभूतपूर्व बदल झाले असून विकासाचा हा प्रवास अधिक वेगाने पुढे नेण्यासाठी एकजूट आवश्यक आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शहराच्या विकासासाठी प्रभावी काम केले असून, विकासाबरोबरच शिवसेनेची संघटनात्मक ताकदही वाढवली असल्याचे त्यांनी नमूद केले.“शिवसेना हा सामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. जो निष्ठेने काम करतो तोच राजकारणात पुढे जातो,” असे सांगत प्रताप सरनाईक हे त्याचे जिवंत उदाहरण असल्याचे शिंदे यांनी सांगितले. सर्व शिवसैनिकांनी एकदिलाने त्यांच्या पाठीशी उभे राहून महापालिकेवर भगवा फडकवावा आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करावे, असे आवाहन त्यांनी केले. मीरा-भाईंदरमध्ये महायुती म्हणूनच निवडणूक लढवण्याचा निर्णय होईल, असा संकेत देत याबाबतचा अंतिम निर्णय लवकरच वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. मात्र, प्रत्येक कार्यकर्त्याने आतापासूनच कामाला लागावे, असे आवाहन त्यांनी केले. या निर्धार मेळाव्यात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला मीरा-भाईंदर जिल्हाध्यक्ष राजू भोईर, विक्रम प्रताप सिंह, निशा नार्वेकर, रिया म्हात्रे, पूजा आमगावकर, पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

फीड फीडबर्नर 22 Dec 2025 9:30 am

उरणमध्ये भावना घाणेकर यांचा विजय

उरण : 'उरण नगरपालिकेत नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भावना घाणेकरांचा विजय कार्यकर्त्यांना नवचैतन्य देणारा आहे. ज्या वेळी नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराबाबत प्राथमिक चर्चा सुरू होती, भावना घाणेकर टक्कर देणाऱ्या आणि जिंकणाऱ्या उमेदवार आहेत. त्या राजकारणात सक्रिय आहेत, त्या लढाऊ आहेत. त्यामुळे भावना घाणेकरच उमेदवार हव्यात, या निर्णयावर आम्ही ठाम राहिलो. आज तो निर्णय भावना घाणेकरांच्या विजयाने सार्थ ठरला, याचा मला मनस्वी आनंद आहे, असे महेंद्र घरत म्हणाले. त्यामुळे भावना घाणेकर यांचा दणदणीत विजय 'ए तो झाकी, बहोत कुछ बाकी है'. जे म्हणत होते, भावना घाणेकर यांचे डिपॉझिट जप्त होईल. त्यांना भावना घाणेकरांच्या दणदणीत विजयाने 'एकही मारा लेकीन सॉलिड मारा', अशी अवस्था करून ठेवली आहे.उरणमध्ये सर्वच कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी खूप मेहनत घेतली. अनेक नेत्यांनी प्रचाराच्या अंतिम टप्प्यात महत्त्वाची भूमिका निभावली. त्यामुळे उरणमध्ये यश मिळाले, या निवडणुकीत मी चाणक्य नीतीचा वापर केला, असे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत म्हणाले.विजयाच्या आनंदाने महेंद्र घरत यांचा चेहरा फुलला होता. यावेळी त्यांनी बाळ्या मामा यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधून विजयाबद्दल अभिनंदन केले. यावेळी महेंद्र घरत म्हणाले, उरणबाबत आपण घेतलेली रोखठोक भूमिका मतदारांना आवडली. आपण मतदानाच्या दिवशी स्वतः येऊन कार्यकर्त्यांना प्रोत्साहन दिलेत, ठामपणे मागे राहिलात याचा निश्चितच फायदा उरण नगरपालिका निवडणुकीत झाल्याचे सांगताना . त्यांनी त्याबद्दल अभिनंदन आणि आभार व्यक्त केले.

फीड फीडबर्नर 22 Dec 2025 9:30 am

Jejuri Bhandara Fire : जेजुरीत विजयोत्सवाचे रूपांतर दुर्घटनेत! विजयाच्या गुलालात आगीचा गोळा; फटाक्यांच्या ठिणगीमुळे नगरसेवकांसह १६ जण भाजले

जेजुरी : राज्यभरात सध्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या निकालांची धामधूम सुरू असून, विजयी उमेदवारांकडून जल्लोष साजरा केला जात आहे. मात्र, पुण्याच्या जेजुरीमध्ये या जल्लोषाला गालबोट लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जेजुरी गडाच्या पायथ्याशी विजयाचा आनंद साजरा करत असताना भंडाऱ्याचा भीषण भडका उडाला, ज्यामध्ये काही कार्यकर्ते आणि भाविक भाजले गेल्याची माहिती समोर आली आहे. जेजुरीत स्थानिक निवडणुकांची मतमोजणी पार पडल्यानंतर निकाल जाहीर झाले. विजयाचा आनंद व्यक्त करण्यासाठी कार्यकर्ते गडाच्या पहिल्या पायरीजवळ एकत्र आले होते. कुलदैवत खंडेरायाला भंडारा अर्पण करून आणि आशीर्वाद घेऊन गुलाल-भंडारा उधळला जात होता. त्याच वेळी मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतिशबाजीही सुरू होती. दुर्दैवाने, हवेत उधळल्या जाणाऱ्या कोरड्या भंडाऱ्याचा संपर्क तिथे वाजत असलेल्या फटाक्यांच्या ठिणग्यांशी आला. सूक्ष्म कणांमुळे भंडाऱ्याने अचानक पेट घेतला आणि क्षणार्धात आगीचा भडका उडाला. या अनपेक्षित आगीमुळे तिथे उपस्थित असलेले काही जण भाजले गेले आहेत. या घटनेमुळे जल्लोषाच्या वातावरणात एकच खळबळ उडाली आणि जखमींना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सुदैवाने, जीवितहानी टळली असली तरी या घटनेने उत्सवाच्या वेळी फटाके वाजवताना घ्यावयाच्या काळजीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.भंडाऱ्याच्या भडक्यात १६ जण होरपळलेविजयाचा जल्लोष सुरू असताना गडाच्या पहिल्या पायरीजवळ भंडाऱ्याचा मोठा भडका उडाला. या भीषण आगीत सुमारे १६ जण गंभीररीत्या भाजले असून, यामध्ये आत्ताच विजयी झालेल्या काही नवनिर्वाचित नगरसेवकांचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना काल दुपारी घडली घटनेत भाजलेल्या जखमींना खाजगी व सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पुन्हा एकदा भेसळी युक्त भंडाऱ्याचा प्रश्न जेजुरीमध्ये ऐरणीवर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मतमोजणीनंतर निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांनी समर्थकांसह खंडोबा गडाच्या पायथ्याशी धाव घेतली. तिथे देवाच्या नावाने 'यळकोट यळकोट'चा जयघोष करत भंडारा उधळला जात होता आणि त्याच वेळी मोठ्या प्रमाणावर फटाके वाजवले जात होते. फटाक्यांच्या ठिणग्या हवेत उधळलेल्या भंडाऱ्याच्या संपर्कात आल्या आणि क्षणार्धात आगीचा मोठा गोळा तयार झाला. या दुर्घटनेत जखमी झालेल्या १६ जणांना तातडीने स्थानिक सरकारी आणि खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. नवनिर्वाचित लोकप्रतिनिधीच या अपघातात जखमी झाल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे जेजुरीत विक्री होणाऱ्या भंडाऱ्याच्या शुद्धतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.https://prahaar.in/2025/12/22/marriage-is-not-just-a-means-of-physical-satisfaction/मिळालेल्या माहितीनुसार, यामध्ये आताच निवडून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका मोनिका राहुल घाडगे व त्यांचे पती राहुल घाडगे यांचा तसेच प्रभाग क्र.५ मधून निवडून आलेल्या राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित नगरसेविका कु.स्वरूपा खोमणे आदींचा समावेश आहे. मल्हार नाट्यगृह येथे मतमोजणी व निकाल जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादीचे विजयी उमेदवार व कार्यकर्ते खंडोबा गडाच्या पहिल्या पायरीजवळ भंडारा अर्पण करण्यासाठी गेले होते. या ठिकाणी कार्यकर्त्यांनी उधळण केलेल्या भंडाऱ्याने अचानक पेट घेतला व स्फोटही झाला या मध्ये सुमारे १६ जण भाजले असून यात महिलांचा समावेश आहे.जखमींची नावे१)रुपाली खोमणे २)विलास बारभाई , ३)सानिका गाढवे , ४) संस्कार गलांगे , ५)देवल बारभाई , ६)मनीषा चव्हाण ,७)रजनी बारभाई , ८)स्वप्नील लाखे , ९)अनिल बारभाई , १०)गणेश चव्हाण ११)निशा दादा भालेराव १२)लक्ष्मी माऊली खोमणे १३) मोनिका राहुल घाडगे ( नवनिर्वाचित नगरसेविका )१४)राहुल कृष्णा घाडगे ,१५ )कु.स्वरूपा जालिंदर खोमणे (नवनिर्वाचित नगरसेविका ) १६)उमेश भंडलकर

फीड फीडबर्नर 22 Dec 2025 9:30 am

विजयाचा भंडारा उधळताच उडाला आगीचा भडका; दुर्घटनेस जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्याची सुप्रिया सुळेंची मागणी

Supriya Sule | जेजुरीत मतमोजणी पार पडून निकाल जाहीर झाल्यानंतर गडाच्या पहिल्या पायरीजवळ खंडेरायाचरणी भंडारा अर्पण करून आशीर्वाद घेताना फटाके वाजत होते. सोबतच भंडाऱ्याची उधळणही सुरू होती. त्याचदरम्यान, भंडारा उधळल्यानंतर आगीचा भडका उडाला आणि त्यामध्ये 18 जण भाजले गेले. जखमींमध्ये निवडून आलेल्या काही नगरसेवकांचा समावेश आहे. भेसळयुक्त भंडाऱ्यामुळे आगीचा भडका उडाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला […] The post विजयाचा भंडारा उधळताच उडाला आगीचा भडका; दुर्घटनेस जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्याची सुप्रिया सुळेंची मागणी appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Dec 2025 9:21 am

माजी अग्निवीरांना सीमा सुरक्षा दलातील भरतीत ५० टक्के कोटा

मोदी सरकारचा मोठा निर्णयनवी दिल्ली : माजी अग्निवीरांना आता सीमा सुरक्षा दलात (बीएसएफ) ५० टक्के कोटा निश्चित करण्यात आला आहे. यामुळे नवीन वर्षाच्या आधी सरकारने अग्निवीरांना एक मोठी भेट दिली आहे. एवढेच नाहीतर लवकरच इतर केंद्रीय पोलीस दलांनाही असाच कोटा मिळण्याची अपेक्षा आहे. यामुळे सैन्यातून बाहेर पडल्यानंतर भविष्याबद्दल चिंताग्रस्त असलेल्या ७५ टक्के अग्निवीरांना हा मोठा दिलासा आहे.सीमा सुरक्षा दलाने माजी अग्निवीरांसाठी पद आरक्षण वाढवले आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने सीमा सुरक्षा दलामध्ये कॉन्स्टेबल भरतीसाठी माजी अग्निवीरांसाठीचा कोटा १० टक्क्यांवरून ५० टक्के केला आहे. अधिसूचनेत, गृह मंत्रालयाने बीएसएफ जनरल ड्यूटी कॅडर (अराजपत्रित) भरती नियम, २०१५ मध्ये सुधारणा केली आहे. १८ ते २३ वयोगटातील उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. माजी अग्निवीरांच्या पहिल्या बॅचमधील उमेदवारांसाठी उच्च वयोमर्यादा पाच वर्षांपर्यंत आणि त्यानंतरच्या बॅचमधील उमेदवारांसाठी तीन वर्षांपर्यंत शिथिल केली जाणार आहे. नियमांनुसार, प्रत्येक भरती वर्षात सीमा सुरक्षा दलामधील ५० टक्के रिक्त पदे माजी अग्निवीरांसाठी, १० टक्के माजी सैनिकांसाठी आणि वार्षिक रिक्त पदांपैकी ३ टक्क्यांपर्यंत थेट भरतीसाठी राखीव असतील. पहिल्या टप्प्यात, नोडल फोर्स माजी अग्निवीरांसाठी राखीव असलेल्या ५० टक्के रिक्त पदांसाठी भरती करेल. दुसऱ्या टप्प्यात, स्टाफ सिलेक्शन कमिशन उर्वरित ४७ टक्के (ज्यामध्ये १० टक्के माजी सैनिकांचा समावेश आहे) माजी अग्निवीरांव्यतिरिक्त इतर उमेदवारांसाठी भरती करेल.

फीड फीडबर्नर 22 Dec 2025 9:10 am

मढ-वर्सोवा केबल पूल लवकरच सुरू होणार

मुंबई : मुंबईतील रस्ते वाहतुकीवरचा ताण कमी करण्यासाठी आणि पश्चिम उपनगरातील प्रवाशांचा प्रवास सुखकर करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने एक मोठे पाऊल उचलले आहे. मढ आणि वर्सोवा या दोन महत्त्वाच्या परिसरांना जोडणाऱ्या खाडीवरील पुलाच्या बांधकामाची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक असलेले प्राथमिक सर्वेक्षण आणि जमिनीचे माती परीक्षण सुरू झाले असून, येत्या दोन महिन्यांत प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होणार आहे.सुमारे २.३९५ कोटी रुपये खर्चुन बांधल्या जाणाऱ्या या पुलाला केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाकडून मंजुरी मिळाली आहे. त्यानंतर प्रकल्पाच्या ठिकाणी प्राथमिक सर्वेक्षण आणि माती परीक्षणाचे काम सुरू करण्यात आले आहे. हा मार्ग मढ जेट्टी रोडपासून सुरू होऊन वर्सोवा येथील फिशरीज युनिव्हर्सिटी रोडजवळ जोडला जाईल.दहिसर-भाईंदर कोस्टल रोडला जोडणारा एक अतिरिक्त मार्ग देखील प्रस्तावित आहे. बीएमसी अधिका-यांच्या मते, वन विभागाकडून अंतिम मंजुरी आणि उच्ब न्यायालयाची परवानगी मिळाल्यानंतर पूर्ण प्रमाणात काम सुरू होईल, हा प्रकल्प ३१ मार्च २०२९ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. हा प्रकल्प ३१ मार्च २०२९ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. तर दुसरीकडे मुंबई-पुणे एक्सप्रेसवे अधिकृतपणे यशवंतराव चव्हाण एक्सप्रेसवे हा भारतातील पहिला ६-लेन रुंद काँक्रीट, प्रवेश-नियंत्रित टोल एक्सप्रेसवे आहे. हे ९४.५ किमी अंतर कापते. मुंबई-पुणे एक नवीन द्रुतगती महामार्ग आता मार्गी लागला आहे. केंद्र सरकारने ₹१.५ लाख कोटी किमतीच्या प्रकल्पांना मंजुरी दिल्याने, प्रवास आणि गतिशीलता वाढविण्यासाठी महाराष्ट्रातील रस्ते पायाभूत सुविधांमध्ये अभूतपूर्व सुधारणा होणार आहेत.मेट्रो स्थानकाची थेट समुद्रकिनाऱ्याला जोडणीभुयारी मेट्रो ३ च्या स्थानकाची थेट समुद्रकिनाऱ्याला जोडणी मिळणार आहे. यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एमएमआरसीएल) ५३१ कोटी रुपये खर्चून भूमिगत पादचारी मार्ग बांधणार आहे. मेट्रो ३ ही देशातील सर्वाधिक लांबीची भुयारी मेट्रो आरे जेव्हीएलआर ते कफ परेड अशी ३३ किमी आणि २७ स्थानकांदरम्यान पूर्ण रूपात सुरू झाली आहे. याच मार्गिकेतील विज्ञान केंद्र स्थानक हे वरळी भागात असून तेथील समुद्रकिनाऱ्यापासून जवळपास दीड ते दोन किमी अंतरावर आहे. मात्र या स्थानकातून वरळी समुद्रकिनारी पोहोचायचे असल्यास पाच किमी दूरचा फेरा मारावा लागतो. तो टाळण्यासाठीच एमएमआरसीएलने भूमिगत पादचारी मार्गाचे नियोजन केले आहे. हा मार्ग एकूण १५१८ मीटर लांबीचा असेल. यासाठी ५३१ कोटी ३३ लाख ५० हजार रुपये खर्च होणार आहे.दीड तासांचा प्रवास फक्त १० मिनिटांतनदीच्या वेळेत, हा प्रवास एक ते दीड तासांचा असतो. प्रस्तावित पूल बांधल्यानंतर, अंतर अंदाजे ५८ ते २० किलोमीटरने कमी होईल आणि प्रवासाचा वेळ फक्त १० मिनिटे राहील, याचा पेट फायदा हवाई दल क्षेत्र आयएनएस हमला, मधू, मार्वे, मालाड आणि कांदिवली येथे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना होणार आहे.

फीड फीडबर्नर 22 Dec 2025 9:10 am

वांद्रे पश्चिम रेल्वे स्थानक परिसरातील वाहतूक कोंडी फुटणार

एमएमआरडीए उभारणार नवा पादचारी पूलमुंबई : वांद्रे पश्चिम रेल्वे स्थानक आणि लकी हॉटेल जंक्शन परिसरातील तीव्र वाहतूक कोंडीतून प्रवाशांची सुटका करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.मेट्रो लाईन २बी च्या कामासाठी पाडलेल्या जुन्या स्कायवॉकच्या जागी आता २७८ मीटर लांबीचा आधुनिक पादचारी पूल उभारला जाणार आहे. या प्रकल्पासाठी ४१.४४ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून पुढील १८ महिन्यांत हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.हा नवीन पूल एस. व्ही. रोडवरून वांद्रे मेट्रो स्थानकाला थेट पश्चिम रेल्वे स्थानकाशी जोडणार आहे. यामुळे रेल्वेतून उतरून मेट्रोकडे जाणाऱ्या किंवा उलट प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना रस्त्यावरील गर्दीत न उतरता सुरक्षित प्रवास करता येईल. विशेषतः लकी हॉटेल जंक्शनवरील सिग्नल आणि वाहनांच्या गर्दीतून प्रवाशांची सुटका होणार आहे.स्थानिकांचा विरोध आणि नियोजनावर प्रश्नचिन्हनव्या पुलाच्या नियोजनाबाबत स्थानिक रहिवासी आणि लोकप्रतिनिधींची नाराजी आहे. प्रकल्प आखताना स्थानिक एस. व्ही. रोड रहिवासी संघाशी कोणतीही चर्चा करण्यात आलेली नाही. जुना स्कायवॉक अपग्रेड करण्याऐवजी पुन्हा तोच प्रयोग करणे म्हणजे नियोजनातील त्रुटी आहे, असे स्थानिकांनी सांगितले. नवीन प्रकल्पही जुन्या स्कायवॉकसारखाच 'पांढरा हत्ती' ठरू नये, अशी भीती आहे.

फीड फीडबर्नर 22 Dec 2025 9:10 am

Shraddha Kapoor: अमिताभ बच्चनसोबत कॉफी पिण्याची श्रद्धा कपूरची इच्छा, म्हणाली…मी तुमची सगळ्यात मोठी फॅन आहे!

Shraddha Kapoor: बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर तिच्या साध्या आणि गोड स्वभावामुळे नेहमीच चाहत्यांच्या चर्चेत असते. अलीकडेच कोण बनेगा करोडपती या लोकप्रिय कार्यक्रमात तिचा उल्लेख झाला आणि त्यानंतर श्रद्धाने अमिताभ बच्चन यांच्याविषयी आपले प्रेम आणि आदर व्यक्त केला. कार्यक्रमात एका स्पर्धकाने अमिताभ बच्चन यांना सांगितले की तो श्रद्धा कपूरचा मोठा चाहता आहे आणि तिला एकदा डेटवर […] The post Shraddha Kapoor: अमिताभ बच्चनसोबत कॉफी पिण्याची श्रद्धा कपूरची इच्छा, म्हणाली… मी तुमची सगळ्यात मोठी फॅन आहे! appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Dec 2025 8:41 am

“सत्तेचा माज, पैशांची उधळण आणि…”; निकालानंतर हर्षवर्धन सपकाळ यांची पोस्ट

Harshvardhan Sapkal | राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांच्या निकालाची घोषणा झाली आहे. महायुतीतील पक्षांनी यात शानदार विजय मिळवला आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या महायुतीने नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीत पूर्णपणे वर्चस्व गाजवलं. महायुतीमध्ये भाजपचे सर्वाधिक 117 नगराध्यक्ष आणि 3,300 नगरसेवक निवडून आले. त्यानुसार भाजप हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. […] The post “सत्तेचा माज, पैशांची उधळण आणि…”; निकालानंतर हर्षवर्धन सपकाळ यांची पोस्ट appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Dec 2025 8:33 am

रेल्वे प्रवासभाड्यात वाढ

२६ डिसेंबरपासून अंमलबजावणीनवी दिल्ली : भारतीय रेल्वेने रेल्वे प्रवास भाड्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला असून नव्या दरांची अंमलबजावणी येत्या २६ डिसेंबरपासून करण्यात येणार असल्याचे रेल्वे मंत्रालयाने रविवारी स्पष्ट केले. रेल्वेचा खर्च आणि प्रवाशांवरील खर्चाचा भार याचे संतुलन साधण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.उपनगरीय सेवा आणि मासिक सिझन तिकिटाच्या दरात वाढ केलेली नाही. याशिवाय ऑर्डिनरी क्लास म्हणजेच जनरल तिकीटावर प्रवास करणाऱ्यांसाठी २१५ किमीपर्यंत कोणतेही दर वाढवण्यात आलेले नाहीत. मात्र, जनरल तिकिटाचे दर २१५ किमीपासून पुढील अंतरासाठी प्रति किलोमीटर १ पैसा, तर मेल आणि एक्सप्रेस नॉ एसीसाठी २ पैसे प्रति किमीची वाढ करण्यात आली आहे. वातानुकुलित डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रति किमी २ पैसे अधिक मोजावे लागतील.रेल्वेने प्रवास भाडेवाढ करताना आर्थिक स्थितीसमोर मांडली असून, प्रवास भाडे वाढवल्याने रेल्वेला या वर्षात ६०० कोटी रुपये मिळणार आहेत. ५०० किलोमीटरपर्यंतच्या अंतरात नॉन एसी कोचमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना १० रुपये अधिक द्यावे लागतील.गेल्या १० वर्षांत रेल्वेने नेटवर्क आणि पायाभूत सुविधा वढवल्या आहेत. चांगल्या प्रकारची सेवा देण्यासाठी आणि सुरक्षा वाढवण्यासाठी मनुष्यबळ वाढवण्याची गरज आहे. मनुष्यबळात वाढ केल्याने खर्च १,१५,००० कोटी रुपयांनी वाढला आहे. पेन्शनवरील खर्च देखील ६० हजार कोटींनी वाढला आहे. २०२४-२५ मधील रेल्वे चालवण्याचा खर्च २६,३०००कोटी रुपये झाला आहे.भारतीय रेल्वेने २०२५ मध्ये दुसऱ्यांदा प्रवास भाडे वाढवले आहे. यापूर्वी जून महिन्यात रेल्वेने प्रवासभाडे वाढवण्याचा निर्णय घेतला होता. १ जुलै २०२५ पासून रेल्वे प्रवास भाडे वाढवण्यात आले होते. त्यानंतर आता पाच महिन्यातच रेल्वेने प्रवास भाडे वाढवण्याचा निर्णय घेतला.

फीड फीडबर्नर 22 Dec 2025 8:30 am

काँग्रेसने भाजपची बी-टीम म्हणून काम केले!

आमदार रोहित पवार यांचा गंभीर आरोपमुंबई : नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीत काँग्रेसने भाजपची बी-टीम म्हणून काम केले, असा गंभीर आरोप शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. विशेषतः अहिल्यानगर जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांवर त्यांचा रोष आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकीत पानिपत झाल्यानंतर रोहित पवार यांनी उद्विग्न प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, जनतेने दोनदा मतांचे दान भरभरुन पदरात टाकले, त्यांच्या मी कायम ऋणात राहीन. पण कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले आणि उमेदवारांनीही पूर्ण ताकदीने निवडणूक लढवली तरी आज लागलेला हा निकाल अत्यंत निराशाजनक आणि काम करणाऱ्याला नाऊमेद करणारा आहे. जनतेवर आक्षेप नाही पण सगळीकडे पैसाच चालत असेल तर बचत गट चालक, शेतकरी, दुकानदार आणि इतर अशा राजकीय दृष्टिकोनातून दुर्लक्षित आणि सामान्य कुटुंबातील उमेदवारांना आम्ही सत्तेच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करत होतो, त्यांना न्याय कधी मिळणार, हा प्रश्नच आहे.आज तत्त्व आणि विकासावर चालणारे स्वच्छ राजकारण कमी आणि पैशांनी गढूळ झालेलेच अधिक दिसते. म्हणूनच आमच्या विरोधात निवडून आलेल्या काही लोकांचे कारनामे आणि धंदे बघितले, तर चारचौघात त्या धंद्यांचे नाव घेण्याचीही लाज वाटते. मग अशा परिस्थितीत डोक्यात विचारांचे काहूर उठल्याशिवाय राहत नाही, असे रोहित पवार म्हणाले.काँग्रेसवर व्यक्त केला रोषरोहित पवार म्हणाले, महत्त्वाचे म्हणजे काही अपक्षांनी, तसेच धर्मनिरपेक्ष आणि समतेचा जप करणाऱ्या काँग्रेसने भाजपच्या उमेदवाराला स्वतःच्या तिकिटावर उभे करून भाजपची बी-टीम म्हणून काम करत जातीयवादी पक्षाच्या विजयाला हातभार लावला आणि लोकही त्यांच्या या तिरक्या चालीला बळी पडले.

फीड फीडबर्नर 22 Dec 2025 8:30 am

दक्षिण आफ्रिकेत गोळीबारात १० जण ठार

जोहान्सबर्ग : ऑस्ट्रेलियामध्ये बाँडी बीचवर बेछूट गोळीबार करण्याची घटना ताजी असतानाच आता दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथील बेकरसडल टाऊनशीपमध्ये बेछूट गोळीबार करण्याची घटना घडली. या गोळीबारात १० जण ठार झाले तर अन्य १० लोक जखमी झाले. या महिन्यातील दक्षिण आफ्रिकेतील ही दुसरी मास शुटिंगची घटना आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जोहान्सबर्ग येथून नैऋत्य दिशेला ४० किमी अंतरावर असलेल्या बेकरसडल टाऊनशीपमध्ये रविवारी सकाळी गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यामागचा हेतू अद्याप स्पष्ट झालेला नाही. पोलिसांच्या निवेदनात म्हटले आहे की, काही लोक रस्त्यावर उभे असताना त्यांच्यावर अज्ञात इसमाने अचानक गोळीबार केला. या महिन्यातील दक्षिण आफ्रिकेतील ही दुसरी मास शुटिंगची घटना आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जोहान्सबर्ग येथून नैऋत्य दिशेला ४० किमी अंतरावर असलेल्या बेकरसडल टाऊनशीपमध्ये रविवारी सकाळी गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यामागचा हेतू अद्याप स्पष्ट झालेला नाही. पोलिसांच्या निवेदनात म्हटले आहे की, काही लोक रस्त्यावर उभे असताना त्यांच्यावर अज्ञात इसमाने अचानक गोळीबार केला.

फीड फीडबर्नर 22 Dec 2025 8:30 am

महायुतीवरच विश्वास

मुंबई : राज्यातील २८८ नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत भाजपने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुतीने राज्यभरात घवघवीत यश मिळवले असून, भाजप हा क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे. तीन ते चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पार पडलेल्या या निवडणुकीत जनतेने विकासाच्या मुद्द्यांना प्राधान्य देत महायुतीला कौल दिला. महाविकास आघाडीला मात्र मोठा धक्का बसला असून, त्यांचा प्रभाव नाममात्र राहिला.राज्यातील एकूण २८८ नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीचे निकाल रविवारी (२१ डिसेंबर २०२५) जाहीर झाले. मतमोजणी सकाळी १० वाजता सुरू झाली आणि संध्याकाळपर्यंत बहुतांश निकाल स्पष्ट झाले. महायुतीला सुमारे २१४ हून अधिक जागांवर विजय मिळाला, तर महाविकास आघाडीला केवळ ४९ जागा आणि स्थानिक आघाड्या तथा अपक्षांना २५ जागा मिळाल्या. विशेष म्हणजे, एकट्या भाजपचे १२९, नगराध्यक्ष आणि ३ हजार ३२५ नगरसेवक निवडून आले. उबाठा आणि शरद पवार गटाला दोन आकडी संख्या देखील गाठता आलेली नाही.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारादरम्यान २० तारखेला दिवसभर कमळाची काळजी तुम्ही करा, त्यानंतर पुढची पाच वर्षे तुमची काळजी देवाभाऊ घेईल, असे आवाहन केले होते. ते जनतेला भावले. या निवडणुकीत भाजपने १२९ नगराध्यक्षपदे मिळवली, तर महायुतीचे घटकपक्ष शिवसेना ५१ आणि राष्ट्रवादी काँग्रेसने ३५ जागा जिंकल्या.कोणाच्या किती जागा?पक्ष नगराध्यक्ष सदस्यभाजप १२९ ३३२५शिवसेना (शिंदे) ५१ ६९५राष्ट्रवादी (अजित पवार) ३३ ११काँग्रेस ३५ १३१उबाठा ९ ३७८शरद पवार गट ७ १५३महाराष्ट्रातील जनतेने नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीत भाजप आणि महायुतीला दिलेल्या भरघोस पाठिंब्याबद्दल त्यांचे आभार मानतो. या निवडणुकीत मिळणारे यश हे विकासाच्या दृष्टिकोनावरील विश्वास अधोरेखित करतो. महाराष्ट्रातील जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत. तळागाळातील भाजप आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांनी कठोर परिश्रमांचे हे यश आहे.- नरेंद्र मोदी, पंतप्रधानमागील नगराध्यक्ष संख्याभाजप : ९४शिवसेना : ३६काँग्रेस : ५१राष्ट्रवादी : २९इतर : २८अपक्ष : २सिंधुदुर्गात महायुतीची बाजीसिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, वेंगुर्ला व मालवण नगर परिषद तसेच कणकवली नगरपंचायत निवडणुकीत वेंगुर्ला, सावंतवाडीत भाजपने आपली सत्ता कायम राखतानाच मोठा विजय संपादीत केला. सावंतवाडीत श्रद्धाराजे भोसले ५ हजार ७८८ मते मिळवत मोठ्या फरकाने विजय मिळविला. तर वेंगुर्लेत दिलीप गिरप यांनी २ हजार ५४९ मतांनी विजयाचा गुलाल उधळला. तर मालवणमध्ये शिवसेनेने वर्चस्व राखत नवा इतिहास घडवला. ममता वराडकर येथे १ हजार मताधिक्क्याने विजयी झाल्या. कणकवली नगरपंचायतीत मात्र भाजप आणि शहर विकास आघाडीत अटीतटीची लढत झाली. शेवटच्या फेरीपर्यंत नगराध्यक्षपदासाठी संदेश पारकर आणि समीर नलावडे यांच्यात कडवी लढत होती. या लढतीत संदेश पारकर यांनी १४५ मतांनी विजय मिळवला. पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली सावंतवाडी आणी वेंगुर्लेत भाजपने दमदार कामगिरी केली. तर मालवण आणि कणकवलीत आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वातील उमेदवार विजयी झाले. या चारही शहरात भाजपचे तब्बल ४० नगरसेवक विजयी झाले. तर शिवसेनेचे १८ तर उ. बा. ठा. ५, काँग्रेसचे १ नगरसेवक विजयी झाले.- भाजपची निर्विवाद आघाडी- शिवसेना, राष्ट्रवादीलाही पसंती- आघाडीत काँग्रेसचेच अस्तित्व - उबाठा, शरद पवार गटाची अवस्था दयनीय भागनिहाय निकालविदर्भ (१०० जागा) : भाजप ५८, शिवसेना ८, राष्ट्रवादी ७, काँग्रेस २३, उबाठा ०, शरद पवार ०, इतर ४. मराठवाडा (५२ जागा): भाजप २५, शिवसेना ८, राष्ट्रवादी ६, काँग्रेस ४, उबाठा ४, शरद पवार २, इतर ३. उत्तर महाराष्ट्र (४९ जागा): भाजप १८, शिवसेना ११, राष्ट्रवादी ७, काँग्रेस ५, उबाठा २, शरद पवार १, इतर ५. पश्चिम महाराष्ट्र (६० जागा) : भाजप १९, शिवसेना १४, राष्ट्रवादी १४, काँग्रेस ३, उबाठा १, शरद पवार ३, इतर ६. कोकण (२७ जागा): भाजप ९, शिवसेना १०, राष्ट्रवादी १, काँग्रेस ०, उबाठा २, शरद पवार १, इतर ४.भाजप क्रमांक एकचा पक्ष असल्याचे पुन्हा अधोरेखितमहाराष्ट्राच्या जनतेने भाजप आणि महायुतीला प्रचंड मोठे समर्थन दिल्याबद्दल त्यांचे आभार मानतो. एकूण निवडून येणाऱ्या नगराध्यक्षांपैकी ७५ टक्के नगराध्यक्ष हे महायुतीचे असतील, असे भाकीत मी यापूर्वीच वर्तवले होते. जनतेने तसाच कौल दिला असून, भाजप हाच पहिल्या क्रमांकाचा पक्ष असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहेत. भाजपचे १२९ नगराध्यक्ष निवडून आले आहेत. महायुतीचे ७५ टक्के नगराध्यक्ष निवडून आले आहेत. नगरसेवकांच्या पदांमध्ये भाजपने एक नवीन रेकॉर्ड तयार केला आहे. २०१७ साली आमचे १ हजार ६०२ नगरसेवक होते आणि आता त्याच्या दुपटीपेक्षा जास्त ३ हजार ३२५ नगरसेवक निवडून आले आहेत. एकूण नगरसेवकांच्या संख्येपैकी ४८ टक्के एकट्या भाजपचे नगरसेवक निवडून आले असून आम्हाला प्रचंड मोठे जनसमर्थन निवडून आले आहेत. आमचे सहयोगी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याही पक्षांनी चांगली कामगिरी केली असून त्यांचे अभिनंदन करतो.- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्रीआगामी महापालिका निवडणुकीत असेच यश मिळेलजसे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळाले, त्याचप्रकारे नगरपालिका आणि नगर पंचाययतींच्या निवडणुकीत मिळाले आहे. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही अभिनंदन करतो. भाजपलाही चांगले यश मिळाले आहे. भाजप नंबर एकचा पक्ष बनला आहे. भाजपने सेंच्युरी मारली, तर शिवसेनेने हाफ सेंच्युरी मारली आहे. असेच यश आगामी महापालिका निवडणुकीत मिळेल, असे संकेत आजच्या निकालातून मिळत आहेत. - एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्रीलोकहिताला प्राधान्य देणाऱ्या राजकारणाची प्रचितीलोकशाहीच्या या उत्सवात नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत मतदारराजानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आणि आमच्या कार्यक्षम, विकासाभिमुख उमेदवारांवर जो ठाम विश्वास दाखवला आहे, तो आमच्यासाठी अत्यंत अभिमानाचा आणि जबाबदारीचा क्षण आहे. ही निवडणूक केवळ विजयाची नाही, तर जनतेच्या विश्वासाची, विकासाच्या दिशेनं घेतलेल्या वाटचालीची आणि लोकहिताला प्राधान्य देणाऱ्या राजकारणाची पावती आहे. प्रत्येक मतदार बंधू-भगिनींनी दिलेलं प्रेम, आशीर्वाद आणि पाठिंबा हा आमच्या कामाची खरी ऊर्जा आहे. या ऐतिहासिक यशासाठी सर्व मतदारराजांचे मनापासून कोटिशः आभार!- अजित पवार, उपमुख्यमंत्रीजनता आता भूलथापांना बळी पडणार नाहीविरोधकांनी फेक नरेटिव्ह पसरवण्याचा कितीही प्रयत्न केला, तरीही जनता आता भूलथापांना बळी पडणार नाही. महानगरपालिका निवडणुकांमध्येही भाजप-महायुतीच विजयाचा विक्रम रचेल. ३ हजारांहून अधिक नगरसेवक एकट्या भाजपचे निवडून आले आहेत. उद्धव ठाकरे म्हणाले की, जनतेला देण्यासारखे त्यांच्याकडे काहीच नाही. म्हणून जनतेनेदेखील ठरवले की, त्यांना देण्यासारखे काहीच नाही. त्यामुळे दोन अंकी संख्यादेखील ते गाठू शकले नाहीत.- रवींद्र चव्हाण, भाजप प्रदेशाध्यक्षविकास हाच केंद्रबिंदू मानून सिंधुदुर्गात सर्वांना न्यायलोकशाहीमध्ये जनतेने दिलेल्या मताचा आदर ठेवावा लागतो. त्यामुळे जनतेने दिलेला निकाल आम्ही स्वीकारतो. जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून या शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून उमेदवाऱ्यांच्या मागण्या आणि अपेक्षा नियोजन स्वरूपात माझ्याकडे आल्यास कोणताही पक्षपात न करता शंभर टक्के न्याय देऊ. विकास हाच केंद्रबिंदू मानून सरकारच्या वतीने जी मदत लागेल ती उभी करणे ही माझी जबाबदारी असेल.- नितेश राणे, सिंधुदुर्ग पालकमंत्रीशून्य अधिक शून्य बेरीज शून्यचहिंदुत्व सोडून बाकी काँग्रेसच्या बुडत्या जहाजात जे गेले ते जवळपास काँग्रेससह बुडाल्यात जमा आहेत. अजूनही मोठे पराभव बाकीच आहेत, म्हणून पुन्हा एकदा सांगतो शुन्य अधिकशुन्य बेरीज शुन्यच.”- आशीष शेलार, कॅबिनेट मंत्री

फीड फीडबर्नर 22 Dec 2025 8:10 am

मुलींनी हिजाब घालावा-अखंड बंगाल बनावा, कसे होते उस्मानचे राजकारण?:बांगलादेश सरकारसाठी ठरला डोकेदुखी, खुनामुळे कोणाला फायदा?

‘बांगलादेशमध्ये सत्तापालटापूर्वी गेल्या 2-3 वर्षांपासून भारताच्या विरोधातील राजकारण उघडपणे जोर धरत होते. यामुळेच उस्मान हादी प्रसिद्ध झाले. ते मुघलकालीन अखंड बांगलादेशाबद्दल बोलत होते. ते म्हणायचे की, जर आपण पुन्हा तसा देश बनवला, तर समृद्धी येईल. हादीचे संगोपन मदरशात झाले होते. अशा प्रशिक्षणात भारताविषयी चांगले विचार ठेवण्याचे कारण उरत नाही.’ बांगलादेशचे पत्रकार अमानुर रहमान विद्यार्थी नेता उस्मान हादी यांच्या राजकारणाबद्दल स्पष्टीकरण देताना हे सांगतात. इंकिलाब मंचचे नेते, 32 वर्षीय शरीफ उस्मान बिन हादी यांच्या हत्येनंतर बांगलादेशात हिंसाचार भडकला होता. हादीचे समर्थक हत्येमागे भारताचा हात असल्याचे सांगत आहेत. याचे कारण असे की ते भारताच्या विरोधात बोलत होते. मात्र, अमानुर याबद्दल दुसरी बाजूही सांगतात. ते म्हणतात, ‘हादी हे माजी पंतप्रधान शेख हसीना, विद्यार्थ्यांचा पक्ष एनसीपी (NCP) यांच्याव्यतिरिक्त प्रत्येक नेता-मंत्र्याबद्दल बोलत होते. याच कारणामुळे हादीचे राजकारण त्यांना कधीच आवडले नाही.’ दिव्य मराठीने बांगलादेशातील सध्याची परिस्थिती, उस्मान हादी यांच्या राजकारणावर त्यांच्या मित्र आणि पत्रकारांशी संवाद साधला. त्यांना विचारले की हादी बांगलादेशच्या राजकारणातील इतके मोठे व्यक्तिमत्व कसे बनले. वाचा संपूर्ण अहवाल… मदरशामध्ये शिक्षण, विद्यापीठात कट्टरतेकडे कल दिसला1994 मध्ये झालोकाठी जिल्ह्यातील मुस्लिम कुटुंबात जन्मलेल्या उस्मान हादी यांचे सुरुवातीचे शिक्षण मदरसामध्ये झाले. ढाका विद्यापीठातून त्यांनी राज्यशास्त्राचे शिक्षण घेतले. पुढे ते विद्यापीठात शिकवू लागले. कट्टर इस्लामिक राजकारणामुळे ते विद्यार्थ्यांमध्ये प्रसिद्ध झाले. त्यांचे मित्र सांगतात की, विद्यापीठात शिकत असतानाच उस्मान हादीचा कट्टर इस्लामकडे कल दिसू लागला होता. विद्यापीठात मुले पॅन्ट-शर्ट घालून येत असत. मुली साड्या आणि सलवार कमीज किंवा ट्रेंडिंग फॅशनचे वेस्टर्न कपडे घालून येत असत. तर, हादी मदरशातील विद्यार्थ्याप्रमाणे टोपी आणि पायजमा घालून येत असे. मोहम्मद महीन सरकार उस्मान हादीचे कनिष्ठ होते आणि त्यांना मोठा भाऊ मानतात. ते म्हणतात, ‘हादी भाई आणि मी एकाच विभागात होतो. ते मुलींनी हिजाब घालण्याच्या परंपरेचे समर्थन करत होते. बांगलादेशच्या धर्मनिरपेक्ष राजकारणात स्वतःला इस्लामिक हक्कांसाठी लढणारा म्हणून सादर करत होते.’ ‘माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या काळात सुरू झालेल्या विद्यार्थी आंदोलनात उस्मान हादी एक मोठे व्यक्तिमत्व होते. विद्यापीठातील एक ओळखीचे नाव, धर्मनिरपेक्ष राजकारण आणि शेख हसीनांचे कट्टर विरोधक असल्यामुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली.’ ‘हादीची भाषा खराब होती, पण यामुळेच त्याला ओळख मिळाली’ बांगलादेशमध्ये फेब्रुवारी 2026 मध्ये निवडणुका आहेत. हादी ढाका-8 जागेवरून अपक्ष निवडणूक लढवणार होता. दिल्लीत नवी दिल्ली जागा जितकी महत्त्वाची आहे, तितकीच बांगलादेशात ढाका-8 जागा महत्त्वाची आहे. याच जागेत संसद भवन आणि ढाका विद्यापीठ येते. याच ढाका विद्यापीठात हादीला इतकी ओळख मिळाली की तो संसदेत जाण्याची तयारी करू लागला. बांगलादेशी पत्रकार अमानुर रहमान सांगतात, हादी जे विचार करत होते, ते ते मोकळेपणाने बोलू शकत होते. हादीचे टीकाकार म्हणत होते की त्यांची भाषा खराब होती, पण हीच भाषा त्यांना प्रसिद्धही करत होती. बांगलादेशच्या स्वातंत्र्यानंतर जमात-ए-इस्लामी व्यतिरिक्त कोणत्याही पक्षाने धार्मिक ओळखीचे राजकारण केले नाही. 2013 मध्ये शाहबाग आंदोलनादरम्यान हादी इस्लामिक टोपी नक्कीच घालत होते. विद्यापीठात शिक्षक आणि विद्यार्थी त्यांना ‘हिफाजत’ असे संबोधत होते. हा शब्द इस्लामिक कट्टरपंथी गट हिफाजत-ए-इस्लामसाठी वापरला जातो. अमानुर रहमान सांगतात, ‘बांगलादेशच्या स्वातंत्र्याच्या वेळी जमात-ए-इस्लामी आणि त्यासारख्या कट्टरपंथी संघटनांना युद्ध गुन्हेगार म्हणून पाहिले गेले. असे मानले जात होते की टोपी घालणारे, दाढी ठेवणारे बांगलादेशविरोधी आहेत. उस्मान हादी दाढी-टोपीसह ढाका विद्यापीठात पोहोचले, तेव्हा त्यांचा विरोध होत होता. याच टीकेतून उस्मान हादी यांनी आपले स्थान निर्माण केले.’ ‘ढाका विद्यापीठात शिक्षण घेत असतानाच भारतविरोधी राजकारण सुरू केले होते. ते आपल्या भाषणांमध्ये म्हणायचे की भारत अत्याचार करत आहे आणि बांगलादेशवर कब्जा करू इच्छितो. शेख हसीना बांगलादेश विकत आहेत. हे सर्व 2-3 वर्षांपासून सुरू होते. भारतविरोधी राजकारण हादीला मजबूत करत होते, म्हणून त्यांनी त्याला प्रोत्साहन देणे सुरू केले.’ उस्मान हादी सर्वांच्या विरोधात कसे गेले 1. धर्मनिरपेक्ष राजकारण उस्मान हादीचा मित्र मोहम्मद महीन सरकार म्हणतो, ‘हसीना सरकारच्या विरोधात जूनपासूनच ढाका विद्यापीठात विद्यार्थी एकत्र येऊ लागले होते. उस्मान हादीने जिया उल-हसन, अफरोजा तूली यांसारख्या इतर विद्यार्थी नेत्यांसोबत मिळून इंकलाब कल्चरल सेंटर आणि इंकलाब मंच नावाच्या संघटना स्थापन केल्या. या संघटनेच्या माध्यमातून हादीने धर्मनिरपेक्षता विरोधी राजकारण सुरू केले. ‘तो शेख हसीना यांच्या 16 वर्षांच्या सरकारला सांस्कृतिक फॅसिझम म्हणत असे. तो म्हणायचा की भारत हसीना सरकारच्या माध्यमातून सांस्कृतिक फॅसिझम आणत आहे. हादी आपल्या भाषणांमध्ये म्हणायचा की बांगलादेशची खरी घोषणा जय बांगला नसून, ‘नारा-ए-तकबीर’ आहे. त्याचे राजकारण उजव्या विचारसरणीकडे झुकलेले होते.’ ‘बांगलादेशात सत्तापालटानंतर विद्यार्थ्यांमध्ये आपापल्या राजकारणासाठी रस्सीखेच सुरू झाली. एक गट, ज्यात महफूज आलम, नाहिद इस्लाम, सजीब भूयान होते, त्याने डॉ. युनूस यांच्यासोबत सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. दुसरा गट, ज्याने विद्यार्थ्यांनी स्थापन केलेल्या NCP पक्षाच्या संघटनेवर काम करण्याची इच्छा व्यक्त केली.’ ‘उस्मान हादीने तिसरा मार्ग निवडला. त्यांना अशा लोकांची साथ मिळाली जे भारताच्या दक्षिण आशियातील हस्तक्षेपावर उघडपणे बोलत होते. उस्मान हादी बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीपासून ते विद्यार्थ्यांच्या नॅशनल सिटिजन पार्टीपर्यंत सर्वच पक्षांवर टीका करत होते. दुसरीकडे, कोणताही पक्ष उस्मान हादीच्या राजकारणाला विरोध करू शकत नव्हता.’ उस्मान हादीचा एक मित्र आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे. तो म्हणतो की राजकीय पक्षाला स्वतःच्या मर्यादा असतात, पण एक कार्यकर्ता म्हणून उस्मान काहीही बोलू शकत होता. हादी भारतीय वर्चस्वाविषयी उघडपणे बोलत असे. आपल्या भाषणांमध्ये तो वारंवार सांगत असे की अवामी लीगच्या माध्यमातून भारत बांगलादेशात आपले राज्य चालवत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसही अवामी लीगप्रमाणे राजकारण करत आहे. त्यामुळे त्याने राष्ट्रवादी काँग्रेस सोडून आपला मार्ग निवडला. 2. अवामी लीग अवामी लीगच्या नेतृत्वाखाली बांगलादेशला स्वातंत्र्य मिळाले. पुढील 50 वर्षे हा पक्ष स्वातंत्र्याच्या वारशाचा सर्वात मोठा दावेदार राहिला. उस्मान हादी यांनी 1971 च्या स्वातंत्र्ययुद्धाला फसवणूक म्हणायला सुरुवात केली. ते जमात-ए-इस्लामीच्या विचारसरणीनुसार बांगलादेशच्या स्वातंत्र्ययुद्धाला आणि त्याच्या महत्त्वाचा इन्कार करत राहिले. विद्यार्थ्यांच्या कोटा आंदोलनापासून ते शेख हसीना यांच्या विरोधातील आंदोलनापर्यंत, उस्मान हादी यांच्या विचारांनीच आंदोलनाची दिशा ठरवली. हसीना सरकारच्या विरोधात सामान्य लोकांना एकत्र आणण्यासाठी हादी यांनी खूप मेहनत घेतली आणि आंदोलनाचे नेतृत्व केले. 3. बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीबांगलादेशातील सर्वात मोठ्या विरोधी पक्ष बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी म्हणजेच BNP ने कधीही स्वातंत्र्याच्या लढ्याला नाकारल्याबद्दल उस्मान हादी किंवा जमातचे समर्थन केले नाही. पार्टी या इतिहासाचा आदर करत आली आहे. हादीने घोषणा केली होती की ते 25 डिसेंबर रोजी बांगलादेशात परतणाऱ्या BNP चे कार्यवाहक अध्यक्ष तारिक रहमान यांचा विरोध करतील. तारिक रहमान 18 वर्षांचा वनवास (निर्वासन) संपवून बांगलादेशात परत येत आहेत. BNP ने रहमान यांच्या परत येण्याच्या तयारीसाठी पूर्ण ताकद लावली आहे. इकडे, उस्मान हादीने विमानतळावर रहमान यांचा विरोध करण्याची घोषणा केली होती. जर रहमान देशात परतल्यावर अशा प्रकारचा विरोध झाला असता, तर यामुळे BNP ची नकारात्मक प्रतिमा निर्माण झाली असती. पत्रकार अमानुर रहमान सांगतात की हादी उघडपणे म्हणायचे की तारिक रहमान बांगलादेशसाठी योग्य नाहीत. 4. डॉ. युनूस यांचे अंतरिम सरकार उस्मान हादी यांच्यासोबत आंदोलन केलेल्या एका विद्यार्थी नेत्याचा दावा आहे की, त्यांचा प्रभाव इतका वाढला होता की बांगलादेशचे अंतरिम सरकार त्यांच्या मतांकडे दुर्लक्ष करून कोणताही निर्णय घेऊ शकत नव्हते. निवडणुकीच्या घोषणेपूर्वी अवामी लीगला निवडणूक लढवू देण्याबाबत चर्चा झाली, तेव्हा विद्यार्थ्यांच्या NCP पक्षाचा एक गट सर्व पक्षांना निवडणूक लढवू देण्याची वकिली करत होता. उस्मान हादी यांच्या विरोधामुळे अंतरिम सरकारला अवामी लीगवर बंदी घालण्याचा निर्णय घ्यावा लागला. सरकारमध्ये नसतानाही हादी सरकारचे निर्णय प्रभावित करू लागले होते. सरकारमध्ये असलेल्या विद्यार्थी नेत्यांनाही ही गोष्ट खटकू लागली होती. उस्मान हादी यांनी अनेकदा सांगितले की, अंतरिम सरकारमधील लोक आता जनतेला जबाबदार राहिलेले नाहीत. उस्मानच्या राजकारणाचाच परिणाम होता की, एनसीपी (NCP) आपला आधार गमावू लागली. उस्मान हादी बांगलादेश सरकारमधील लोकांसाठी डोळ्यांत खुपणाऱ्या काट्यासारखे झाले होते, जे निवडणुका जवळ आल्याने अधिकच खुपू लागले होते. ते बांगलादेशातील कट्टरपंथी इस्लामिक गट हिफाजत-ए-इस्लामबद्दलही उघडपणे बोलत होते. ग्रेटर बांगलादेशचा नकाशा जारी केला, ज्यात भारताची राज्येही समाविष्ट होतीदक्षिण आशियामध्ये भारताच्या वर्चस्वाच्या गोष्टींच्या पलीकडे जाऊन हादी यांनी ग्रेटर बांगलादेशला प्रोत्साहन दिले. उस्मान हादी यांचे मत होते की, बांगलादेशचा इतिहास 1971 पासूनचा नसून, त्यापूर्वी खूप जुना आहे. त्यांनी ग्रेटर बांगलादेशचा एक नकाशाही जारी केला होता. यात पश्चिम बंगाल, आसाम आणि ईशान्येकडील राज्यांचा काही भागही समाविष्ट केला होता. तज्ज्ञांचे मत- हादीने पक्षांना विरोध करून नवीन दृष्टिकोन मांडलाजिंदल विद्यापीठाच्या प्राध्यापिका आणि दक्षिण आशियाई घडामोडींच्या तज्ज्ञ श्रीराधा दत्ता म्हणतात की, हादीची विचारधारा भारताच्या टीकेने भरलेली होती, पण त्याने आपले राजकारण लोकशाही पद्धतीने केले. मला असे वाटते की बांगलादेशात काही असे घटक होते, जे राजकारण हिंसक बनवू इच्छित होते. हे घटक निवडणुका वेळेवर होऊ देऊ इच्छित नव्हते. प्रशासनाने अशा घटकांविरुद्ध सक्रिय राहायला हवे होते. हादीच्या राजकारणावर प्राध्यापिका दत्ता म्हणतात, ‘ते आपली मदरशाची ओळख उघडपणे समोर ठेवत होते. नवीन बांगलादेशाबद्दल आपले विचार मांडत होते. मी कधी ऐकले नाही की त्यांनी उघडपणे बांगलादेशला इस्लामिक राष्ट्र बनवण्याबद्दल सांगितले असेल.’

दिव्यमराठी भास्कर 22 Dec 2025 8:02 am

पुणेकरांनी पुन्हा करून दाखवलं! पुस्तक महोत्सवात ‘त्या’एका शपथेने मोडला जागतिक विक्रम; वाचा सविस्तर

प्रभात वृत्तसेवा पुणे – पुणे पुस्तक महोत्सवाचा रविवारी अभूतपूर्व उत्साहात समारोप झाला. महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी तिसरा विश्वविक्रम प्रस्थापित करून पुणेकरांनी वाचन संस्कृतीसोबतच पर्यावरण संवर्धनाचा नवा आदर्श जगासमोर ठेवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या पंचप्रण संकल्पनेला अनुसरून हजारो नागरिकांनी वसुंधरा संरक्षणाची शपथ घेतली आणि या उपक्रमाची अधिकृत नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली. राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या […] The post पुणेकरांनी पुन्हा करून दाखवलं! पुस्तक महोत्सवात ‘त्या’ एका शपथेने मोडला जागतिक विक्रम; वाचा सविस्तर appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Dec 2025 8:00 am

आजचे एक्सप्लेनर:8वा वेतन आयोग 10 दिवसांनी लागू होईल, जानेवारीचा पगार-पेन्शन वाढून येईल का; तुमचे किती रुपये वाढतील; 7 प्रश्नांमध्ये सर्व काही

7व्या वेतन आयोगाचा कार्यकाळ 31 डिसेंबर 2025 रोजी संपेल. 1 जानेवारी 2026 पासून 8वा वेतन आयोग लागू होऊ शकतो. तज्ज्ञांच्या मते, यावेळी केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या पगारात 35% पर्यंत वाढ होऊ शकते. कोणत्या पे लेव्हलवर पगारात किती वाढ, DA आणि HRA मध्ये काय बदल, पेन्शनधारकांना किती फायदा, अशा 7 महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे आजच्या एक्सप्लेनरमध्ये जाणून घेऊया… प्रश्न-1: 8वा वेतन आयोग कधी लागू होईल?उत्तर: केंद्र सरकार दर 10 वर्षांनी नवीन वेतन आयोग आणते. सध्या 2016 पासून 7वा वेतन आयोग सुरू आहे. अशी अपेक्षा आहे की 1 जानेवारी 2026 पासून 8वा वेतन आयोग लागू होईल. सरकारने 8व्या वेतन आयोगाला अधिसूचित केले आहे. अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी संसदेत एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले होते की, 3 नोव्हेंबर 2025 रोजी आयोगाच्या विचारार्थ विषय म्हणजेच त्याचे टर्म्स ऑफ रेफरन्सदेखील अधिसूचित करण्यात आले आहेत. 3 नोव्हेंबर रोजी अर्थ मंत्रालयाने 8व्या वेतन आयोगाला आपला अहवाल सादर करण्यासाठी 18 महिन्यांचा कालावधी दिला होता. याचा अर्थ असा की, नवीन शिफारसी 2027 च्या मध्यापर्यंत तयार होऊ शकतील. मागील ट्रेंडनुसार, अहवाल सादर झाल्यानंतर सरकार सहसा शिफारसींची तपासणी करून नंतर अधिसूचना जारी करण्यासाठी 3-6 महिन्यांचा कालावधी घेते. याचा अर्थ असा की, 8वा वेतन आयोग 2027 च्या शेवटी किंवा 2028 च्या सुरुवातीला लागू होऊ शकतो. आतापर्यंत कोणतीही अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही, परंतु अनेक तज्ञांनी 2028 ची अंतिम मुदत नमूद केली आहे. 7व्या वेतन आयोगाच्या स्थापनेनंतरही तो लागू होण्यासाठी सुमारे 2 वर्षांचा कालावधी लागला होता. फेब्रुवारी 2014 मध्ये 7वा वेतन आयोग स्थापन झाला आणि मार्च 2014 पर्यंत 'टर्म्स ऑफ रेफरन्स' निश्चित झाले. नोव्हेंबर 2015 मध्ये त्याचा अहवाल सरकारला सादर करण्यात आला. जून 2016 मध्ये सरकारने त्याला मंजुरी दिली आणि 1 जानेवारी 2016 पासून शिफारसी लागू झाल्या. वेतन आयोग ही भारत सरकारद्वारे स्थापन केलेली एक समिती आहे, जी केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या वेतन, महागाई भत्ता (DA), घरभाडे भत्ता (HRA), पेन्शन आणि इतर लाभांमध्ये बदल किंवा सुधारणांची शिफारस करते. महागाई, राहणीमानाचा खर्च, कर्मचाऱ्यांच्या गरजा आणि सरकारची परवडण्याची क्षमता यांसारख्या घटकांचा विचार करून कर्मचाऱ्यांच्या उत्पन्नाला अद्ययावत करणे हा त्याचा उद्देश आहे. प्रश्न-2: 8वा वेतन आयोग लागू झाल्याने पगार किती वाढेल?उत्तर: सहाव्या वेतन आयोगानंतर सरासरी पगारात सुमारे 40% वाढ झाली होती. सातव्या वेतन आयोगात यापेक्षा थोडी कमी म्हणजे सुमारे 23-25% वाढ होती, त्यावेळी फिटमेंट फॅक्टर 2.57 होता. तसेच अंदाजानुसार, आठव्या वेतन आयोगांतर्गत पगार 20% ते 35% पर्यंत वाढू शकतो. त्याचबरोबर मूळ वेतनात किती वाढ होईल, हे फिटमेंट फॅक्टर आणि डीएवर अवलंबून असते. फिटमेंट फॅक्टर हा एक मल्टीप्लायर नंबर आहे, ज्याला सध्याच्या मूळ वेतनासोबत गुणाकार करून नवीन मूळ वेतन काढले जाते. 7व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 2.57 होता. 8व्या वेतन आयोगात तो 2.46 असू शकतो. वेतन आयोग महागाई आणि राहणीमानाचा खर्च लक्षात घेऊन ते निश्चित करतो. प्रत्येक वेतन आयोगात डीए शून्यापासून सुरू होतो. असे यासाठी, कारण नवीन मूळ वेतन आधीच महागाई लक्षात घेऊन वाढवला जातो. जुना डीए जुन्या वेतनात विलीन होतो आणि त्यानंतर डीए पुन्हा हळूहळू वाढतो. सध्या डीए मूळ वेतनाच्या 58% आहे. डीए हटल्याने एकूण वेतन म्हणजे मूळ वेतन + डीए + एचआरए मध्ये वाढ थोडी कमी दिसू शकते, कारण 58% डीएचा भाग हटवला जाईल. प्रश्न-3: वाढलेला पगार कधीपासून मिळणार?उत्तर: कर्मा मॅनेजमेंट ग्लोबल कन्सल्टिंग सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक प्रतीक वैद्य म्हणतात की 8व्या वेतन आयोगाला 1 जानेवारीपासून पगार सुधारण्याचे काम सोपवण्यात आले आहे. मात्र, मागील अनुभवांवरून असे दिसून येते की प्रभावी तारखेपासून पहिला वाढलेला पगार येण्यामध्ये अनेक महिन्यांचा कालावधी असतो. वैद्य सांगतात की 7वा वेतन आयोग 1 जानेवारी 2016 रोजी लागू करण्यात आला होता, परंतु मंत्रिमंडळाची मंजुरी जून 2016 मध्ये मिळाली आणि त्यानंतरच्या महिन्यांमध्ये पगार येण्यास सुरुवात झाली. वैद्य म्हणतात, 'कर्मचाऱ्यांना 2026-27 या आर्थिक वर्षापासून भत्ते जोडून वाढलेला पगार मिळेल. मात्र, भत्ते जानेवारी 2026 पासूनच जोडले जातील.' प्रश्न-4: नवीन पगारासोबत DA, HRA सारखे भत्ते आणि नवीन एरियर किती मिळेल?उत्तर: जर वाढलेला मूळ पगार जानेवारी 2028 पासून मिळण्यास सुरुवात झाली, तरीही पगारात वाढ 8वे वेतन आयोग लागू होण्याच्या प्रभावी तारखेपासून म्हणजेच 1 जानेवारी 2026 पासूनच जोडली जाते. ते एरियर म्हणून स्वतंत्रपणे दिले जाते. समजा, लेव्हल 1 च्या एखाद्या कर्मचाऱ्याच्या मूळ पगारात 10 हजार रुपये वाढ झाली आहे, तर 2026 ते 2028 पर्यंतच्या 24 महिन्यांचे 2.4 लाख रुपये एरियर म्हणून दिले जातील. शिवाय, या 24 महिन्यांत DA मूळ पगाराच्या जुन्या टक्केवारीनुसार म्हणजेच 58% नुसारच जोडले जाईल आणि ज्याप्रमाणे आतापर्यंत दर महिन्याच्या पगारात जोडून सामान्यतः मिळत आले आहे, त्याचप्रमाणे मिळत राहील. या दरम्यान दर 6 महिन्यांनी अंदाजे 3 ते 4% पर्यंत त्यात वाढ देखील होत राहील, परंतु DA चे एरियर स्वतंत्रपणे दिले जात नाही, कारण DA विलीन करूनच जुना मूळ पगार वाढून नवीन मूळ पगार बनतो. या पगारातील फरक तुम्हाला एरियरमध्ये आधीच मिळाला आहे. जेव्हा जानेवारी 2028 मध्ये वाढीव पगार मिळण्यास सुरुवात होईल, तेव्हा त्यात जो DA दिला जाईल, तो नवीन वाढलेल्या मूळ पगारावर मिळेल. त्याचप्रमाणे HRA देखील तेव्हापासूनच लागू होईल, जेव्हा नवीन वाढीव पगार मिळण्यास सुरुवात होईल. HRA वर देखील कोणतेही एरियर दिले जाणार नाही. प्रश्न-5: नवीन वेतन आयोग लागू झाल्याने पेन्शनधारकांना किती फायदा होईल?उत्तर: सरकारने 1 एप्रिल 2025 पासून युनिफाइड पेन्शन स्कीम लागू केली आहे. या अंतर्गत पूर्ण पेन्शन (गेल्या 12 महिन्यांच्या मूळ पगाराच्या सरासरीच्या 50% रक्कम + महागाई भत्ता म्हणजेच DR) त्यांना मिळेल, ज्यांची नोकरीची 25 वर्षे पूर्ण होतील. UPS अंतर्गत अशा कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे जे वर्ष 2004 मध्ये NPS म्हणजेच न्यू पेन्शन स्कीम लागू झाल्यानंतर सेवेत आहेत. या हिशोबाने UPS अंतर्गत पूर्ण 50% पेन्शन त्यांनाच मिळेल, जे किमान 2029 पर्यंत नोकरीत राहतील. वर्ष 2004 पासून मोजल्यास, नोकरीत 25 वर्षे पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांची पहिली तुकडी 2029 मध्ये निवृत्त होईल. आता समजा 8वे वेतन आयोग लागू झाल्यानंतर लेव्हल-1 च्या एका कर्मचाऱ्याचा मूळ पगार 34,560 रुपये झाला आहे, तर त्याची 50% रक्कम 17,280 रुपये होते. या हिशोबाने कर्मचाऱ्याला 17,280 रुपये + DR ची रक्कम पेन्शन म्हणून मिळेल. मात्र, असे प्रसंग क्वचितच पाहायला मिळतील की एखादा कर्मचारी लेव्हल-1 वर नोकरीत रुजू झाल्यानंतर निवृत्तीपर्यंत त्याच लेव्हलवर राहील. पदोन्नती आणि इतर नियमांनुसार वेळोवेळी या लेव्हलमध्ये वाढ होत राहते. त्यामुळे कर्मचाऱ्याला यापेक्षा खूप जास्त रक्कम पेन्शन म्हणून मिळेल. शिवाय, लेव्हल-18 च्या कर्मचाऱ्यांचा मूळ पगार 4.80 लाख रुपये असेल. त्याच्या 50% म्हणजे एकूण 2.40 लाख रुपये + DR ची रक्कम पेन्शन म्हणून मिळेल. प्रश्न-6: नवीन वेतन आयोग लागू झाल्याने आणखी काय बदलेल?उत्तर: वेतन आयोग केवळ पगार आणि महागाई भत्त्यात सुधारणा करत नाही, याशिवाय अनेक बदलांची शिफारस करतो... वाहतूक भत्ता म्हणजेच TA ची गणना देखील नवीन मूळ वेतनावर केली जाईल. विशेषतः मेट्रो शहरांमध्ये त्याचे दर वाढू शकतात. याशिवाय पेन्शनधारकांसाठी महागाई सवलत म्हणजेच DR वाढवली जाऊ शकते. यामुळे पेन्शनधारकांना फायदा होईल. सध्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी ग्रॅच्युइटीची वरची मर्यादा 25 लाख रुपये आहे. वेतन आयोग यातही बदल किंवा वाढीची शिफारस करू शकतो. चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्स (CEA), लीव्ह ट्रॅव्हल कन्सेशन (LTC), मेडिकल बेनिफिट्स, रिस्क/हार्डशिप अलाउन्स यांसारख्या जुन्या भत्त्यांचीही पुनर्रचना केली जाऊ शकते. याव्यतिरिक्त परफॉर्मन्स-लिंक्ड इन्सेंटिव्ह आणि पे मॅट्रिक्समध्येही बदल केले जाऊ शकतात. प्रश्न-7: यामुळे किती लोकांना फायदा होईल, राज्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी आयोग कधी स्थापन होईल?उत्तर: नवीन वेतन आयोगांतर्गत केंद्रीय सरकारी कर्मचारी, संरक्षण कर्मचारी, रेल्वे कर्मचारी, केंद्रीय संस्थांमधील शिक्षक, 100% सरकारी मालकीच्या PSU चे कर्मचारी आणि पेन्शनधारकांना फायदा मिळतो. सध्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांची संख्या सुमारे 50.14 लाख आणि पेन्शनधारकांची संख्या सुमारे 69 लाख आहे. तसेच राज्य सरकारी कर्मचारी, सार्वजनिक क्षेत्रातील बँकेचे कर्मचारी, RBI आणि इतर नियामक संस्थांचे कर्मचारी आणि बँक पेन्शनधारकांना याचा फायदा मिळत नाही. राज्ये केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारसी मानण्यास बांधील नाहीत, कारण वेतनाचे पुनरावलोकन करणे हा राज्य सूचीतील विषय आहे. राज्ये स्वतःच्या स्वतंत्र वेतन आयोगाची स्थापना करतात, परंतु बहुतेक राज्ये काही बदलांसह किंवा पूर्णपणे केंद्रीय आयोगाच्या सर्व शिफारसी स्वीकारतात. दुसरीकडे, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या कर्मचाऱ्यांना वेतन आयोगाचा लाभ मिळत नाही कारण ते भारतीय बँक संघ (IBA) सोबतच्या द्विपक्षीय करारांवर अवलंबून असतात.

दिव्यमराठी भास्कर 22 Dec 2025 7:48 am

Cyber Crime Pune: शहरात सायबर गुन्हेगारांचा सुळसुळाट! पोलिसांच्या तपासात धक्कादायक आकडेवारी समोर..पहा

प्रभात वृत्तसेवा पुणे – शेअर मार्केट, टास्क फ्रॉड, संशयास्पद लिंक, तसेच मनी लाँड्रिंगच्या नावाखाली सायबर चोरट्यांकडून पुणेकरांची फसवणूक करण्याचे प्रकार सातत्याने सुरू आहेत. विविध पोलिस ठाण्यांत दाखल झालेल्या १३ वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये सायबर चोरांनी एकूण १ कोटी ६१ लाख ९८ हजार ९५२ रुपये उकळले.आंबेगाव बुद्रुकला ३५ वर्षीय महिलेला लिंक पाठवून सायबर चोरांनी ५ लाख ३९ हजार […] The post Cyber Crime Pune: शहरात सायबर गुन्हेगारांचा सुळसुळाट! पोलिसांच्या तपासात धक्कादायक आकडेवारी समोर..पहा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Dec 2025 7:45 am

शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त लांबला? मविआच्या ‘त्या’निर्णयामुळे ठाकरेंच्या शिवसेनेसमोर नवा पेच

प्रभात वृत्तसेवा पुणे – उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ आली तरी महाविकास आघाडीत जागा वाटपावर चर्चा सुरू आहे. अंतीम यादीस आणखीन दोन दिवस जातील, असे आघाडीतील सुत्रांनी सांगितले. ही यादी वरिष्ठांकडे जाणार, अंतीम होणार. त्यानंतर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यातील जागवाटपाची बैठक होईल. त्यामुळे आघाडीत कोणाला किती जागा मिळणार ? जागावाटप […] The post शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त लांबला? मविआच्या ‘त्या’ निर्णयामुळे ठाकरेंच्या शिवसेनेसमोर नवा पेच appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Dec 2025 7:30 am

Ramdas Athawale: ‘भागीदार वाढवू नका, आता बास झालं!’; रामदास आठवलेंनी भरसभेत महायुतीचे कान टोचले

प्रभात वृत्तसेवा पुणे – रिपब्लिकन पक्ष भाजपचा सच्चा साथीदार आणि महायुतीतील भागीदार आहे.महायुती परिपूर्ण असून यापुढे भागीदार वाढवू नका, असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय नेते व केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केले.महापालिका निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला १२ जागा मिळाव्या अशी मागणीही त्यांनी केली. पक्षाने नाना पेठेतील डॉ. बाबासाहेब आंबंडकर महाविद्यालयाच्या मैदानावर केलेल्या संकल्प मेळाव्यात […] The post Ramdas Athawale: ‘भागीदार वाढवू नका, आता बास झालं!’; रामदास आठवलेंनी भरसभेत महायुतीचे कान टोचले appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Dec 2025 7:20 am

Ajit Pawar: दोन्ही ‘राष्ट्रवादी’एक होणार? अजितदादांनी पालिका निवडणुकीबाबत केला मोठा खुलासा; म्हणाले..

प्रभात वृत्तसेवा पुणे – समविचारी पक्षांच्या मताची विभागणी झाल्यानंतर उमेदवार निवडून येण्यास अडचण येते. जर मताची विभागणी झाली नाही, तर निवडून यायला सोपे जाते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हे पक्ष एकत्र पालिका निवडणूक लढविण्याबाबत तेथील शहराध्यक्ष निर्णय घेतील, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी […] The post Ajit Pawar: दोन्ही ‘राष्ट्रवादी’ एक होणार? अजितदादांनी पालिका निवडणुकीबाबत केला मोठा खुलासा; म्हणाले.. appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Dec 2025 7:15 am

लढाई मनपाची, मुद्दा नागरिकांचा:संभाजीनगरच्या इंदिरानगरमध्ये 1984 पासून ड्रेनेजलाइन बदलली नाही; 80 टक्के विकासाचा दावा हवेतच, स्थानिकांचा आरोप

दिव्य मराठीने सुरू केलेल्या 'लढाई मनपाची, मुद्दा नागरिकांचा' या मालिकेत रोज नवीन समस्येला तोंड फुटत आहे. सत्ताधारी राहिलेले नेते म्हणतात की, 'आमच्याकडे ८०% काम झाले आहे.' मात्र, नागरिकांनी हा दावा खोडून काढला. इंदिरानगरमध्ये 1984 पासून ड्रेनेज लाइन बदलली नसल्याचा आरोपही त्यांनी केला. हा सविस्तर वृत्तांत जाणून घेऊयात या स्पेशल रिपोर्टमधून... ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर इंदिरा नगरमध्ये राहणाऱ्या रहिवासी दिव्य मराठी ॲपशी बोलताना म्हणाले की, '१९८४ मध्ये ही वस्ती निर्माण झाली होती. तेव्हापासून आमच्याकडे ड्रेनेजलाइन बदलेली नाही. त्यावेळेस लोकांची संख्या कमी होती. मात्र आता ती वाढली असून ड्रेनेजचे पाणी गल्ल्यागल्ल्यामध्ये रस्त्यावर पाहायला मिळत. त्याचा वास आणि दुर्गंधीमुळे आम्हाला त्याचा त्रास भोगावा लागतोय.' वॉर्डात रस्ताही नाही याच भागात राहणारे नवाब इहमद पटेल म्हणाले की, 'आमच्या प्रभागात आमचा वार्ड सोडला तर इतर सगळ्या ठिकाणी सुविधा पोहोचल्या आहेत. मात्र, आमच्या इंदिरानगरमध्ये येण्यासाठी रस्ता देखील नाही. ड्रेनेजलाइनसाठी आम्ही अनेकदा तक्रार केली आहे. मात्र, ते लोक आम्हाला दादच देत नाहीत. त्यामुळे यावेळी तरी आमचा अपेक्षा भंग होऊ नये असे वाटते.' कचरा गाडी पुढे, आम्ही मागे प्रभागात राहणाऱ्या महिला दिव्य मराठी ॲपशी बोलताना म्हणाल्या की, 'आमच्याकडे पाणी वगैरे व्यवस्थित येते. मात्र कचऱ्याची समस्या खूप मोठी आहे. कचरा गाडीवाला आमच्या दारातून जातो, पण थांबत नाही. त्यामुळे तो पुढे आणि आम्ही त्याच्या मागे मागे अशी अवस्था आहे. माझे घर रस्त्यावर आहे. त्यामुळे समोरच कचऱ्याचा ढिगारा आहे. याचा परिणाम आमच्या आरोग्यावर होतो.' मोकाट कुत्र्यांचे राज्य प्रभागातील लोकांनी मोकाट कुत्र्यांचा मुद्दा उचलून धरला. एका नागरिकाने सांगितले की, 'आमच्या प्रभागात ग्राउंडवर रात्री लाइट नसते. त्यामुळे इथे कुत्र्यांचे राज्य सुरू होते. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त अनेकदा तक्रार करूनही झालेला नाही. त्यामुळे आमची येणाऱ्या नगरसेवकांकडून हीच अपेक्षा आहे की या प्रश्नावरती उत्तर शोधावे.' प्रभागाची व्याप्ती काय? प्रभाग नंबर 21 मध्ये विष्णुनगर, सिधी कॉलनी भागश, लिमये वाडी,अरिहंत नगर, जवाहर कॉलनी, सारंग हाऊसिंग सोसायटी, भानुदास नगर, न्यू शांतीनिकेतन कॉलनी, शास्त्रीनगर भगवती कॉलनी, उल्कानगरी भागशः, कडा कार्यालय, शिवनेरी कॉलनी, कॉलनी, रामकृष्ण नगर, काबरा नगर, मोरेश्वर सोसायटी भागश, प्राइड इनिग्मा, लोकमित्रलक्ष्मी नगर भागशः, इंदिरानगर काबरा नगर, हनुमान नगर, सहयोग नगर, खिवंसरा, आदित्य नगर, वेलकम नगर, मित्र नगर, उत्तम नगर भागशः, स्नेहवर्धिनी कॉलनी, समर्थ हाउसिंग सोसायटी, अशोक नगर, आदित्य नगर, श्रीनगर, विजयनगर भागशः असे अनेक भाग या प्रभागात येतात. या प्रभागाची लोकसंख्या ही 41452 हजार इतकी आहे.

दिव्यमराठी भास्कर 22 Dec 2025 7:00 am

Shubhanshu Shukla: अंतराळात शरीराचे काय हाल होतात? शुभांशू शुक्लांनी उलगडले ‘झिरो ग्रॅव्हिटी’चे गुपित

प्रभात वृत्तसेवा पुणे – आकाश ही कधीच मर्यादा नव्हती आणि नसेल! भारत २०४० मध्ये चंद्रावर उतरण्याची तयारी करत आहे आणि तिथे पडणारे पहिले पाऊल तुमच्यापैकी कोणाचे तरी असू शकते. सातत्यपूर्ण प्रयत्न, चिकाटी आणि कठोर परिश्रमातून हे स्वप्न सत्यात उतरवा, अशा शब्दांत प्रसिद्ध अंतराळवीर आणि भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांनी युवा पुणेकरांच्या स्वप्नांना […] The post Shubhanshu Shukla: अंतराळात शरीराचे काय हाल होतात? शुभांशू शुक्लांनी उलगडले ‘झिरो ग्रॅव्हिटी’चे गुपित appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Dec 2025 7:00 am

अग्रलेख : नगरांचा कौल

महाराष्ट्रातील नागरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या नगर परिषदा आणि नगरपंचायत यांच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कौल सत्ताधारी महायुतीच्या बाजूनेच गेल्याचे समोर येत आहे. या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील महायुतीचे घटक पक्ष असलेले भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी अनेक ठिकाणी स्वतंत्रपणे लढत असले तरी राज्यातील नागरी भागातील मतदारांनी या तीन पक्षांवर विश्वास दाखवला आहे असेच दिसते. राज्यातील एकूण 288 नगरपंचायती […] The post अग्रलेख : नगरांचा कौल appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Dec 2025 6:55 am

NGT Order: महापालिकेला ‘एनजीटी’चा दणका! बांधकाम प्रदूषणाचे एकसमान नियम लागू करण्याचे आदेश

प्रभात वृत्तसेवा पुणे – राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (एनजीटी) पुणे महापालिकेला शहरात बांधकाम कामांमुळे होणारे वायू आणि ध्वनिप्रदूषण नियंत्रित करण्यासाठी एक प्रमाणित कार्यप्रणाली (स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोटोकॉल) तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याच वेळी बाणेर भागातील संबंधित प्रकल्पाचे काम सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे.न्यायमूर्ती दिनेश कुमार सिंह आणि डॉ. सुजित कुमार बाजपेयी यांच्या पश्चिम विभागीय खंडपीठाने हा […] The post NGT Order: महापालिकेला ‘एनजीटी’चा दणका! बांधकाम प्रदूषणाचे एकसमान नियम लागू करण्याचे आदेश appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Dec 2025 6:50 am

Pune Weather: हवेलीत पारा ६.६ अंशांवर! कडाक्याच्या थंडीने शहरासह उपनगरांना भरली हुडहुडी

प्रभात वृत्तसेवा पुणे – शहरासह जिल्ह्यातील थंडीचा पारा दिवसेंदिवस घटत असून, रविवारी (दि. २१) किमान तापमानात अर्धा ते एक अंशाने घट झाली. परिणामी जिल्ह्यात थंडीची लाट अधिक वाढली असून, हवेली परिसरात कडाक्याच्या थंडीने नागरिक गारठले आहेत. आज हवेली येथे सर्वांत कमी ६.६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.सलग पाचव्या दिवशी शहरासह उपनगरांतील किमान तापमानात घट […] The post Pune Weather: हवेलीत पारा ६.६ अंशांवर! कडाक्याच्या थंडीने शहरासह उपनगरांना भरली हुडहुडी appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Dec 2025 6:40 am

Pune News: दस्त नोंदणीत ‘आय सरिता’पोर्टलवर नवी सोय; खरेदीदार आणि महापालिका दोघांचाही होणार फायदा

प्रभात वृत्तसेवा पुणे – महापालिका क्षेत्रांमध्ये जुनी सदनिका घेताना त्यावरील महापालिकेची मालमत्ता कराची (प्रॉपर्टी टॅक्स) थकबाकी असल्यास दस्त नोंदणी करताना त्याची माहिती आता मिळणार आहे. त्यामुळे खरेदीदाराची होणारी संभाव्य फसवणूक कळणार आहे. थकबाकी दस्त नोंदणी करतानाच या कराची थकबाकी भरण्यास महापालिकांनाही विनासायास थकबाकीची रक्कम मिळणार आहे. नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने राज्यातील पुणे, पिंपरी-चिंचवड पालिकेसह […] The post Pune News: दस्त नोंदणीत ‘आय सरिता’ पोर्टलवर नवी सोय; खरेदीदार आणि महापालिका दोघांचाही होणार फायदा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Dec 2025 6:30 am

आयारामांमुळे भाजप निष्ठावंत नाराज! संपर्क कार्यालये गुंडाळली; प्रचारासाठी आणलेले साहित्यही फेकले

प्रभात वृत्तसेवा पुणे – शनिवारचा दिवस भाजप निष्ठावंतांसाठी निराशेचा ठरला. आपल्यालाच तिकीट मिळेल, अशी ठाम खात्री बाळगून अनेकांनी देव पाण्यात ठेवले होते. जय्यत तयारीही केली. मात्र, अर्ज दाखल करायच्या तीनच दिवस आधी अन्य पक्षांतून आयारामांना आणल्याने त्यांनी निराश होऊन संपर्क कार्यालये बंद केली. याशिवाय मतदारांना वाटण्यासाठी बनवलेल्या गोष्टी चक्क फेकून दिल्या. वारजेमध्ये हा प्रकार घडला. […] The post आयारामांमुळे भाजप निष्ठावंत नाराज! संपर्क कार्यालये गुंडाळली; प्रचारासाठी आणलेले साहित्यही फेकले appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Dec 2025 6:20 am

Pune Metro: ‘नळस्टॉप’आणि ‘आयडियल कॉलनी’विसरा! मेट्रोने बदलली तीन स्टेशन्सची नावे..जाणून घ्या

प्रभात वृत्तसेवा पुणे – महामेट्रोने मंडई, नळस्टॉप आणि आयडीयल कॉलनी मेट्रो स्थानकांची नावे बदलण्याचा निर्णय घेतला आहे.आता मंडई मेट्रो स्थानकाचे नाव महात्मा फुले मंडई स्थानक, नळस्टॉप स्थानकाचे नाव एसएनडीटी महाविद्यालय, आणि आयडियल कॉलनी मेट्रो स्थानकाचे नाव पौड फाटा मेट्रो स्थानक असे केले आहे. आता पुढील काही दिवसांत स्थानकांच्या फलकांमध्येही बदल केला जाईल. मंडई मेट्रो स्थानकाचे […] The post Pune Metro: ‘नळस्टॉप’ आणि ‘आयडियल कॉलनी’ विसरा! मेट्रोने बदलली तीन स्टेशन्सची नावे..जाणून घ्या appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Dec 2025 6:10 am

Jejuri News: विजयाचा जल्लोष करताना भंडाऱ्याचा भडका, नवनिर्वाचित नगरसेवकांसह १६ जण भाजले

प्रभात वृत्तसेवा जेजुरी – जेजुरी नगरपरिषदेचा मतमोजणीचा निकाल जाहीर झाल्यानंतर गडाच्या पहिल्या पायरीजवळ खंडेरायाचरणी भंडारा अर्पण करून आशीर्वाद घेताना भंडाऱ्याचा भडका उडाल्याने १६ जण प्रचंड भाजले. यामध्ये निवडून आलेल्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका मोनिका राहुल घाडगे व त्यांचे पती राहुल घाडगे यांच्यासह राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित नगरसेविका स्वरूपा खोमणे आदींचा समावेश आहे. ही घटना (दि.२१) दुपारी घडली. जखमींना तातडीने […] The post Jejuri News: विजयाचा जल्लोष करताना भंडाऱ्याचा भडका, नवनिर्वाचित नगरसेवकांसह १६ जण भाजले appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Dec 2025 5:50 am

अकलूजमध्ये पुन्हा एकदा मोहिते-पाटील पॅटर्न! विरोधकांचा ‘सुपडा साफ’, २७ पैकी तब्बल २३ जागांवर विजय

प्रभात वृत्तसेवा अकलूज – अकलूज नगरपरिषदेच्या पहिल्याच निवडणुकीत मोहिते-पाटील गटाने विरोधकांना चारीमुंड्या चित करत घवघवीत विजय मिळवला असून, नगरपरिषदेच्या सत्तेच्या चाव्या पुन्हा एकदा मोहिते-पाटील यांच्या हातात गेल्या आहेत. एकूण 27 पैकी 23 जागा जिंकत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) व मित्रपक्षांनी अकलूजवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या […] The post अकलूजमध्ये पुन्हा एकदा मोहिते-पाटील पॅटर्न! विरोधकांचा ‘सुपडा साफ’, २७ पैकी तब्बल २३ जागांवर विजय appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Dec 2025 5:45 am

Saswad Election Result: सासवडमध्ये भाजपचे कमळ फुलले! १३ जागांसह नगराध्यक्षपद भाजपकडे

प्रभात वृत्तसेवा सासवड – पुरंदर तालुक्यातील सासवड नगरपरिषद निवडणूक यंदा प्रतिष्ठेची ठरली. थेट भाजप विरुद्ध उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दुरंगी लढत झाली. आमदार विजय शिवतारे यांनी संपूर्ण प्रतिष्ठा पणाला लावत सर्व जागा शिवसेनेच्या चिन्हावर लढवण्याचा निर्णय घेतला होता. दुसरीकडे काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले माजी आमदार संजय जगताप यांनी सासवडमध्ये भाजपचे कमळ फुलवण्याचा निर्धार केला होता. […] The post Saswad Election Result: सासवडमध्ये भाजपचे कमळ फुलले! १३ जागांसह नगराध्यक्षपद भाजपकडे appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Dec 2025 5:30 am

माळेगावात ‘दादां’चीच हवा! पहिल्याच निवडणुकीत राष्ट्रवादीने फडकवला विजयाचा झेंडा

प्रभात वृत्तसेवा माळेगाव – माळेगाव (ता. बारामती) येथील नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व जनमत विकास आघाडी यांच्या युतीने स्पष्ट बहुमत सिद्ध करून नगरपंचायतीवर वर्चस्व प्रस्थापित केले. नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुयोग सातपुते यांनी ११ हजार मतांच्या आघाडीने दणदणीत विजय मिळविला. निवडणुकीत एकूण १४ हजार ४५८ मतदान झाले होते. त्यानुसार नगराध्यक्ष पदासह […] The post माळेगावात ‘दादां’चीच हवा! पहिल्याच निवडणुकीत राष्ट्रवादीने फडकवला विजयाचा झेंडा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Dec 2025 5:15 am

दौंडमध्ये ‘कुल’पॅटर्न फेल? अजितदादांच्या रणनीतीने प्रेमसुख कटारियांच्या सत्तेला लावला सुरुंग

प्रभात वृत्तसेवा दौंड – दौंड नगरपरिषदेची पंचवार्षिक निवडणूक अतिशय चुरशीची झाली असून मतदारांनी संमिश्र कौल दिला आहे. निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार दुर्गादेवी जगदाळे विजयी झाल्या असून नगरसेवक पदासाठी भाजप पुरस्कृत नागरी हित संरक्षण मंडळाचे १७ उमेदवार विजयी झाले आहेत. दौंड नगरपरिषदेत राष्ट्रवादीने बाजी मारल्याने माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया, आमदार राहुल कुल यांना हा […] The post दौंडमध्ये ‘कुल’ पॅटर्न फेल? अजितदादांच्या रणनीतीने प्रेमसुख कटारियांच्या सत्तेला लावला सुरुंग appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Dec 2025 5:00 am

Akkalkot News: नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टींचा अमोलराजे भोसले यांच्या हस्ते सत्कार; स्वामी भक्तांची मोठी गर्दी

प्रभात वृत्तसेवा वालचंदनगर – श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली अक्कलकोट नगरपरिषदेचे नुतन नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी यांच्यासह श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीचे अध्यक्ष व ज्येष्ठ नगरसेवक महेश इंगळे, नुतन नगरसेवक अविनाश मडीखांबे यांच्यासह सागर कल्याणशेट्टी, प्रथमेश इंगळे, मनोज कल्याणशेट्टी, शिवराज […] The post Akkalkot News: नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टींचा अमोलराजे भोसले यांच्या हस्ते सत्कार; स्वामी भक्तांची मोठी गर्दी appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Dec 2025 4:45 am

Baramati Election Result: बारामतीत भाजप, शिवसेनेच्या पदरी निराशा; हायकंमाडकडून रसद कमी पडल्याची चर्चा

प्रभात वृत्तसेवा बारामती – बारामती नगरपरिषद निवडणुकीमध्ये भाजप व शिंदे शिवसेनेला पराभवाचा सामना करावा लागला. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या विरोधात लढणाऱ्या बसप, रासप तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटाने प्रत्येकी एक जागेवर विजय मिळवत आपले अस्तित्व टिकवले. भाजप व शिवसेनेचा मात्र दारूण पराभव झाला आहे. भाजप, शिवसेनेच्या हायकमांडकडून बारामतीत बळ कमी पडल्याचे निकालातून स्पष्ट झाले आहे. […] The post Baramati Election Result: बारामतीत भाजप, शिवसेनेच्या पदरी निराशा; हायकंमाडकडून रसद कमी पडल्याची चर्चा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Dec 2025 4:30 am

मंचरमध्ये ‘कही खुशी कही गम’; नगराध्यक्ष शिवसेनेचा, पण चाव्या राष्ट्रवादीच्या हातात? वाचा सविस्तर निकाल

प्रभात वृत्तसेवा मंचर – मंचर नगरपंचायतीच्या चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत शिवसेना पक्षाच्या वतीने नगराध्यक्षपदाच्या राजश्री दत्ता गांजाळे या सुमारे २१० मतांनी निवडून आल्या असून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार मोनिका सुनील बाणखेले यांना पराभूत केले. एकंदर १७ जागांपैकी नगरसेवक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नऊ,शिवसेना पक्षाचे तीन,उद्धव ठाकरे पक्षाचे एक,शरदचंद्र पवार पक्षाचे एक आणि अपक्ष तीन उमेदवार […] The post मंचरमध्ये ‘कही खुशी कही गम’; नगराध्यक्ष शिवसेनेचा, पण चाव्या राष्ट्रवादीच्या हातात? वाचा सविस्तर निकाल appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Dec 2025 4:15 am

Manchar News: गायरान जमिनीवर सौर प्रकल्प उभारण्यास तीव्र विरोध; चांडोली खुर्दच्या ग्रामस्थांची आदेश दुरुस्तीची मागणी

प्रभात वृत्तसेवा मंचर – मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत सौर प्रकल्पासाठी चांडोली खुर्द (ता.आंबेगाव) येथील गायरान गट क्रमांक ४८१/१/अ मधील १२ हे.०८ आर क्षेत्र देण्यात येऊ नये, अशी मागणी ग्रामपंचायत चांडोली खुर्द व ग्रामस्थांनी केली आहे. गायरान जमिनीवर सौर प्रकल्पास ग्रामस्थांचा तीव्र विरोध असून या संदर्भात संबंधित प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे. पुणे जिल्हाधिकारी यांना […] The post Manchar News: गायरान जमिनीवर सौर प्रकल्प उभारण्यास तीव्र विरोध; चांडोली खुर्दच्या ग्रामस्थांची आदेश दुरुस्तीची मागणी appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Dec 2025 3:45 am

शिक्रापुरात भीषण अपघात! ओव्हरटेक करण्याच्या नादात ट्रकने कारला चिरडले, एकाचा मृत्यू

प्रभात वृत्तसेवा शिक्रापूर – शिक्रापूर-चाकण रस्त्यावरील केवटे मळा येथे शनिशिंगणापूरहून देवदर्शन करून परतणाऱ्या युवकांच्या कारला भंगार वाहून नेणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात कारचा चक्काचूर झाला असून, सागर दत्तात्रय थोरात या २८ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. कारमधील अन्य तिघे मित्र गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेली माहिती […] The post शिक्रापुरात भीषण अपघात! ओव्हरटेक करण्याच्या नादात ट्रकने कारला चिरडले, एकाचा मृत्यू appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Dec 2025 3:30 am

PCMC Election: माजी महापौरांच्या प्रवेशाने भाजपमध्ये अंतर्गत वाद; संदीप वाघेरे पक्ष सोडण्याच्या तयारीत ?

प्रभात वृत्तसेवा पिंपरी – महापालिकेची निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तशा मोठ्या घडामोडी घडत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख व माजी महापौर संजोग वाघेरे यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. त्यांच्या प्रवेशाने प्रभाग क्रमांक २१ मधील भाजपचे माजी नगरसेवक पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. यासाठी त्यांनी नुकतीच बैठक घेत स्थानिकांशी संवाद […] The post PCMC Election: माजी महापौरांच्या प्रवेशाने भाजपमध्ये अंतर्गत वाद; संदीप वाघेरे पक्ष सोडण्याच्या तयारीत ? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Dec 2025 3:15 am

Alandi Election Result: आळंदीत ‘कमळ’फुललं! २१ पैकी १५ जागांवर दणदणीत विजय

प्रभात वृत्तसेवा पिंपरी – श्री क्षेत्र आळंदी नगरपरिषदेत भाजपाने जोरदार मुसंडी मारत २१ पैकी १५ जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे. तसेच नगराध्यक्षपदी प्रशांत पोपट कुऱ्हाडे यांनी बहुमताने विजय मिळवला, हा भाजपासाठी ऐतिहासिक टप्पा मानला जात आहे.राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये भाजपाने दिमाखदार यश संपादन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे नेते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […] The post Alandi Election Result: आळंदीत ‘कमळ’ फुललं! २१ पैकी १५ जागांवर दणदणीत विजय appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Dec 2025 3:00 am

संसार की व्यवहार? लग्नानंतर पतीने पत्नीलाच लावला १ कोटी ४० लाखांचा चुना; वाचा नेमकं प्रकरण

प्रभात वृत्तसेवा पिंपरी – लग्नानंतर पत्नीच्या पगाराचे पैसे स्वतःच्या व्यवसायासाठी वापरून आणि तिच्या नावावर कोट्यवधींचे कर्ज काढून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना जून २०२३ ते २० डिसेंबर २०२५ या कालावधीत पिंपळे निलख येथे घडली.सतिशकुमार गणाला (४०, पिंपळे निलख) असे गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी त्याच्या ३४ वर्षीय महिलेने सांगवी पोलीस […] The post संसार की व्यवहार? लग्नानंतर पतीने पत्नीलाच लावला १ कोटी ४० लाखांचा चुना; वाचा नेमकं प्रकरण appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Dec 2025 2:45 am

PCMC Election: देवेंद्र फडणवीसांनी पिंपरी-चिंचवड अजितदादांसाठी ‘सोडले’? राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा

प्रभात वृत्तसेवा पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक १५ जानेवारीला होत आहे. राज्यामध्ये महायुतीमध्ये एकत्र असलेल्या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेवर सत्ता मिळविण्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. शहरात भाजपाचे चार आमदार असल्याने २०१७ प्रमाणेच यंदाही पालिकेवर एकहाती सत्ता मिळविण्यासाठी पक्षाने फर्मान सोडले आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचा आणि दस्तुरखुद्द अजित पवार यांचा बालेकिल्ला […] The post PCMC Election: देवेंद्र फडणवीसांनी पिंपरी-चिंचवड अजितदादांसाठी ‘सोडले’? राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Dec 2025 2:30 am

Kamshet News: नवीन पाईपलाईन की जुन्याचाच जुगाड? कामशेतमध्ये लाखो लिटर पाणी वाया, तरीही प्रशासन सुस्त

प्रभात वृत्तसेवा कामशेत – कामशेत परिसरात सध्या पाणीपुरवठ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, एकीकडे अशुद्ध व गढूळ पाणी नळाद्वारे पुरवले जात असताना दुसरीकडे पाईपलाईनमधील गळतीमुळे दररोज हजारो लिटर पाणी वाया जात असल्याचे चित्र आहे. ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, आरोग्याच्या समस्यांची भीतीही वाढत आहे. कामशेत हे सुमारे वीस ते पंचवीस हजार लोकसंख्येचे […] The post Kamshet News: नवीन पाईपलाईन की जुन्याचाच जुगाड? कामशेतमध्ये लाखो लिटर पाणी वाया, तरीही प्रशासन सुस्त appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Dec 2025 2:15 am

PCMC Election: तुम्हालाही हवीये तुमच्या प्रभागाची मतदार यादी? मग ‘या’८ ठिकाणी जा, पालिकेने केलीय खास सोय

प्रभात वृत्तसेवा पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी विक्रीसाठी उपलब्ध करून दिली आहे. आतापर्यंत छापील १३० मतदार यादीची विक्री झाली असून त्यातून पालिकेला १ लाख ७ हजार ९९२ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. महापालिकेने १ ते ३२ प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी १५ डिसेंबर रोजी प्रसिद्ध केली आहे. महापालिका निवडणुकीची आचारसंहिता देखील लागली आहे. महापालिकेने […] The post PCMC Election: तुम्हालाही हवीये तुमच्या प्रभागाची मतदार यादी? मग ‘या’ ८ ठिकाणी जा, पालिकेने केलीय खास सोय appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Dec 2025 2:00 am

Aditya Thackeray: उमेदवारी कोणाला मिळणार? तिकीट वाटपाचे गणित आदित्य ठाकरेंनी केले स्पष्ट, म्हणाले…

प्रभात वृत्तसेवा पिंपरी – शिवसेने पक्षाकडून ज्यांना जास्त प्रेम, आशिर्वाद मिळाले, ते आता पक्ष सोडून जात आहेत. मात्र, हे जेव्हा आरशात पाहतात तेव्हा त्यांना काय वाटत असेल? स्वतः च्या परिवाराला हे काय उत्तर देत असतील असा माझा प्रश्‍न आहे. सत्तेची चटक लागलेले पळून गेले. मात्र, सत्ता ज्यांच्याकडे आहे, त्यांच्या मागे पळण्यापेक्षा जी जनता सत्ता देते, […] The post Aditya Thackeray: उमेदवारी कोणाला मिळणार? तिकीट वाटपाचे गणित आदित्य ठाकरेंनी केले स्पष्ट, म्हणाले… appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Dec 2025 1:30 am

Maval News: इंदोरी गणात शेतकरी मेळावा संपन्न; सुनील भोंगाडे यांच्या पुढाकाराने शेतकऱ्यांना मार्गदर्शन

प्रभात वृत्तसेवा वडगाव मावळ – आमदार सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली इंदोरी पंचायत समिती गणातील शेतकरी बांधवांसाठी सुनील भोंगाडे यांच्या वतीने शेतकरी मेळावा शुक्रवारी (दि. १९) उत्साहात पार पडला.इंदोरी गणामध्ये सुनील भोंगाडे हे गेल्या अनेक वर्षांपासून स्वतः शेतकरी म्हणून कार्यरत असून, त्यांनी शेतकरी हितासाठी विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले आहेत. शेतकऱ्यांना भरीव मार्गदर्शन मिळावे आणि त्यांच्या शेती […] The post Maval News: इंदोरी गणात शेतकरी मेळावा संपन्न; सुनील भोंगाडे यांच्या पुढाकाराने शेतकऱ्यांना मार्गदर्शन appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Dec 2025 1:15 am

Junnar Crime: गुटखा वाहतुक करणाऱ्या टोळीचा पर्दापाश! खिरेश्वरमध्ये कंटेनर पकडला; ४८ लाखांचा मुद्देमाल जप्त

प्रभात वृत्तसेवा उदापूर- खिरेश्वर ता. जुन्नर गावच्या हद्दीत कंटेनर मधील गुटखा पिकअप गाडीमध्ये भरला जाणार असल्याची माहिती गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार ओतूर पोलीस कर्मचारी तसेच खिरेश्वर गावचे पोलीस पाटील अभिजीत भौरले, खुबी गावचे पोलीस पाटील अविनाश सुपे, ग्रामस्थ निलेश भौरले, दिपक मेमाणे यांनी माहिती मिळाले ठिकाणी जावुन खात्री केली. रविवारी दि. २१ रोजी रात्री २ […] The post Junnar Crime: गुटखा वाहतुक करणाऱ्या टोळीचा पर्दापाश! खिरेश्वरमध्ये कंटेनर पकडला; ४८ लाखांचा मुद्देमाल जप्त appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Dec 2025 1:01 am

Satara Crime: डॉक्टर तरुणीची आत्महत्या की…? खाकी वर्दीच संशयाच्या भोवऱ्यात; वर्षा देशपांडेंनी घेतली हायकोर्टात धाव

प्रभात वृत्तसेवा सातारा – फलटणच्या महिला वैद्यकीय अधिकाऱ्याच्या मृत्यू प्रकरणात आरोपी पोलीस अधिकारी असल्याने तपास योग्य पद्धतीने व्हावा म्हणून त्रयस्थ आणि स्वतंत्र अधिकाऱ्याची नेमणूक करावी. पोलीस यंत्रणे शिवाय स्वतंत्र यंत्रणेकडे या गुन्ह्याचा तपास व्हावा, अशी मागणी आपण उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाकडे फौजदारी याचिकेद्वारे केली असल्याची माहिती लेक लाडकी अभियानाच्या प्रवर्तक अ‍ॅड. वर्षा देशपांडे यांनी दिली. […] The post Satara Crime: डॉक्टर तरुणीची आत्महत्या की…? खाकी वर्दीच संशयाच्या भोवऱ्यात; वर्षा देशपांडेंनी घेतली हायकोर्टात धाव appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Dec 2025 1:00 am

Medha Election Result: फक्त ४६ मतं आणि मेढ्याचा ‘गेम’फिरला! रूपाली वारागडेंच्या विजयामागे नक्की काय घडलं?

प्रभात वृत्तसेवा मेढा : जावळी तालुक्याचे मुख्यालय असलेल्या मेढा नगरपंचायतीची निवडणुक अटीतटीची होवून यामध्ये फक्त 46 मतांनी कमळ फुलले असून यामध्ये भाजपच्या रूपाली संतोष वारागडे विजयी झाल्या आहेत. शिवसेनेचे पाच उमेदवार विजयी झाले असून एक ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार विजयी झाले आहेत. यापूर्वी भाजपचे दोन उमेदवार बिनविरोध झाले असून हे दोन बिनविरोध व […] The post Medha Election Result: फक्त ४६ मतं आणि मेढ्याचा ‘गेम’ फिरला! रूपाली वारागडेंच्या विजयामागे नक्की काय घडलं? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Dec 2025 12:45 am

रहिमतपूरमध्ये मोठा भूकंप! २५ वर्षांची सत्ता ढासळली,नगरपालिकेवर भाजपने रोवला विजयाचा झेंडा

प्रभात वृत्तसेवा रहिमतपूर – जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या, अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या, भाजप महाराष्ट्र प्रदेश महिला उपाध्यक्षा सौ. चित्रलेखा माने – कदम यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या रहिमतपूर नगरपालिका पंचवार्षिक निवडणूकीत भाजपने बाजी मारली असून रहिमतपूर शहरात कमळ फुलले आहे. या निवडणूकीत भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ. वैशाली निलेश माने या 55 मतांनी विजयी झाल्या आहेत. त्यांना एकूण […] The post रहिमतपूरमध्ये मोठा भूकंप! २५ वर्षांची सत्ता ढासळली,नगरपालिकेवर भाजपने रोवला विजयाचा झेंडा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Dec 2025 12:30 am

Mahabaleshwar Election Result: निकाल जाहीर! महाबळेश्वरचा ‘कारभारी’कोण? पहा कोणत्या प्रभागात कोणाचा विजय?

प्रभात वृत्तसेवा महाबळेश्वर – महाबळेश्वर नगरपरिषद स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकिचा निकाल जाहीर झाला असून नगराध्यक्ष पदा साठी सुनील शिंदे यांनी १,४५८ मताधिक्याने बाजी मारली असून राष्ट्रवादीच्या सर्वाधिक १३ जागांवरती आपली दावेदारी स्थापित केली आहे. महाबळेश्वर येथील एकूण १२७०४ मतदान पैकी १०५७६ इतके मतदान झाले असून प्रभागातील बऱ्याच जागांवरती चुरशीची लढत पहावयास मिळाली येथील गिरीस्थान विद्यालयाच्या […] The post Mahabaleshwar Election Result: निकाल जाहीर! महाबळेश्वरचा ‘कारभारी’ कोण? पहा कोणत्या प्रभागात कोणाचा विजय? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Dec 2025 12:15 am

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, २२ डिसेंबर २०२५

पंचांगआज मिती पौष शुद्ध द्वितीया शके १९४७.चंद्र नक्षत्र उत्तराषाढा. योग ध्रुव.चंद्र राशी धनु १०.०७ पर्यंत नंतर मकर. भारतीय सौर ०१ पौष शके १९४७. सोमवार दिनांक २२ डिसेंबर २०२५. मुंबईचा सूर्योदय ०७.०७ मुंबईचा सूर्यास्त ०६.०६ मुंबईचा चंद्रोदय ०८.५६, मुंबईचा चंद्रास्त ०८.०६ राहू काळ ०८.२९ ते ०९.५२, श्री नृसिंह सरस्वति जयंती, मुस्लिम रज्जब मासारंभ, शुभदिवसदैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)मेष : कोणावरही जास्त विश्वास नको.वृषभ : मित्रमंडळींना मदत कराल.मिथुन : मनोरंजनात दिवस मजेत जाईल.कर्क : अति धाडस नुकसानकारक ठरू शकते.सिंह : नशिबाची साथ मिळेल.कन्या : आत्मविश्वासाची कमी जाणवेल.तूळ : संबंधित व्यक्तीशी आपुलकीने वागा.वृश्चिक : धाडसी निर्णय घेऊ शकाल.धनू : जुन्या गुंतवणुकी भरघोस फायदा देतील.मकर : गैरसमज होऊ देऊ नका योग्य मार्गाने पुढे जा.कुंभ : धार्मिक किंवा सामाजिक कार्यासाठी सक्रिय योगदान द्याल.मीन : आज दिवसभरात चांगले लोक संपर्कात येतील.

फीड फीडबर्नर 22 Dec 2025 12:10 am

मुंबई महापालिकेत काँग्रेस अन् वंचित बहुजन आघाडीची युती होणार?

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या एका शिष्टमंडळाने रविवारी वंचित बहुजन आघाडीचे (वंचित बहुजन आघाडी) प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली, असे काँग्रेसच्या एका नेत्याने सांगितले. या शिष्टमंडळाचे नेतृत्व अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे मुंबई प्रभारी यू.बी. व्यंकटेश यांनी केले. या बैठकीत नागरी प्रशासन, प्रमुख शहरी आव्हाने आणि मुंबईच्या जनतेची खऱ्या अर्थाने सेवा करणाऱ्या […] The post मुंबई महापालिकेत काँग्रेस अन् वंचित बहुजन आघाडीची युती होणार? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 21 Dec 2025 10:45 pm

IND W vs SL W : भारताचा श्रीलंकेवर एकतर्फी विजय; जेमिमाचे वादळी अर्धशतक, स्मृतीने रचला इतिहास!

IND W vs SL W 1st T20I India beat Sri Lanka : भारत आणि श्रीलंका महिला संघातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेला विशाखापट्टणम येथे सुरुवात झाली. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने श्रीलंकेवर ८ गडी राखून एकतर्फी विजय मिळवला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने १२१ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात भारताने जेमिमा रॉड्रिग्जच्या नाबाद ६९ धावांच्या जोरावर […] The post IND W vs SL W : भारताचा श्रीलंकेवर एकतर्फी विजय; जेमिमाचे वादळी अर्धशतक, स्मृतीने रचला इतिहास! appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 21 Dec 2025 10:45 pm

आयुष्यभर संघर्ष..! अखेर ७७व्या वर्षी विजय मिळवला; नगरसेवक होताच जनाबाईंना अश्रू अनावर

जळगाव : महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत महायुतीने मोठा विजय मिळवला आहे. भाजपने एकट्यानेच सुमारे १२९ नगराध्यक्ष पदे आणि ३३०० हून अधिक नगरसेवक जागा जिंकल्या आहेत. शिंदे गटाच्या शिवसेने आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीनेही चांगली कामगिरी करत महायुतीला ७५ टक्के हून अधिक नगराध्यक्ष पदे मिळवून दिली आहेत. या निवडणुकीत वयाच्या दोन्ही टोकांना विक्रम घडले. जळगाव […] The post आयुष्यभर संघर्ष..! अखेर ७७व्या वर्षी विजय मिळवला; नगरसेवक होताच जनाबाईंना अश्रू अनावर appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 21 Dec 2025 10:31 pm

उधमपूरमधील घरातून दहशतवाद्यांनी नेले अन्न! पोलीस, जवानांकडून शोधमोहीम सुरु

जम्मू : दहशतवाद्यांनी एका घरात घुसून अन्न नेल्याची घटना जम्मू-काश्‍मीरच्या उधमपूर जिल्ह्यात घडली. त्यानंतर नजीकच्या जंगलात पलायन केलेल्या दहशतवाद्यांच्या शोधासाठी पोलीस आणि जवानांनी तातडीने मोहीम हाती घेतली. उधमपूरमधील एका गावात राहणाऱ्या मंगतू राम यांच्या घरात दहशतवाद्यांनी शनिवारी सायंकाळी जबरदस्तीने शिरकाव केला. तिथून त्यांनी खाद्यपदार्थ, धान्य नेल्याची माहिती गुप्तचरांपर्यंत पोहचली. गुप्तचरांनी सुरक्षा दलांना सतर्क केले. त्यापाठोपाठ […] The post उधमपूरमधील घरातून दहशतवाद्यांनी नेले अन्न! पोलीस, जवानांकडून शोधमोहीम सुरु appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 21 Dec 2025 10:25 pm