Donald Trump : ट्रम्पच्या हुकूमशाहीवर सर्वोच्च न्यायालयाची चपराक; टॅरिफचा निर्णय ठरवला बेकायदेशीर
अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी (२० फेब्रुवारी) राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेला व्यापक जागतिक टॅरिफच्या निर्णयाला बेकायदेशीर ठरवले आहे. कोर्टाने ६-३ बहुमताने दिलेल्या निर्णयात सांगितले की, ट्रम्प यांनी आपत्कालीन कायद्याचा चुकीचा वापर केला आणि आपल्या अधिकारापेक्षा पुढे जाऊन टॅरिफ लादले. अमेरिकेतील १२ राज्ये आणि कंपन्यांनी ट्रम्प यांच्या टॅरिफला आव्हान दिले होते. याप्रकरणी खालच्या कोर्टाने ट्रम्पचा टॅरिफ बेकायदेशीर ठरवला होता. तो निर्णय अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाने कायम ठेवला आहे.अमेरिकन संविधानानुसार कर (टॅक्स) आणि टॅरिफ लादण्याचा अधिकार काँग्रेसकडे आहे, राष्ट्रपतीकडे नाही. मात्र ट्रम्प यांनी काँग्रेसच्या मंजुरीशिवाय एका विशेष कायद्याचा आधार घेऊन हे टॅरिफ लागू केले होते. अमेरिकेत १९७७ मध्ये तयार झालेल्या इंटरनॅशनल इमर्जन्सी इकोनॉमिक पॉवर्स अॅक्टचा (IEEPA) ट्रम्प यांनी वापर केला होता. हा कायदा राष्ट्रीय आपत्कालीन परिस्थितीत व्यापार नियंत्रित करण्याची परवानगी देतो. तथापि, या कायद्यात ‘टॅरिफ’ शब्दाचा थेट उल्लेख नाही. ट्रम्प हे पहिले राष्ट्रपती ठरले जे IEEPA अंतर्गत टॅरिफ लादले. याआधी हा कायदा फक्त शत्रू देशांवर आर्थिक प्रतिबंध लादण्यासाठी किंवा त्यांच्या मालमत्तेवर निर्बंध ठेवण्यासाठी वापरला जात असे. ट्रम्प प्रशासनाचे म्हणणे होते की IEEPA राष्ट्रपतीला आयात ‘नियंत्रित’ करण्याची परवानगी देते आणि त्या आधारावर टॅरिफ लादले गेले. पण सुप्रीम कोर्टाने हा युक्तीवाद फेटाळून लावला.अर्थतज्ज्ञांच्या मते, IEEPA अंतर्गत लादलेल्या टॅरिफमुळे आतापर्यंत १७५ अब्ज डॉलरपेक्षा जास्त वसुली झाली आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर ही रक्कम परत करावी लागण्याची शक्यता आहे. काँग्रेस बजेट ऑफिसच्या अंदाजानुसार, जर सर्व विद्यमान टॅरिफ पुढील १० वर्षे कायम राहिले असते, तर दरवर्षी सुमारे ३०० अब्ज डॉलर उत्पन्न होऊ शकले असते. आर्थिक वर्ष २०२५ मध्ये अमेरिकेच्या एकूण कस्टम ड्यूटीतून १९५ अब्ज डॉलर इतके विक्रमी उत्पन्न झाले आहे. सरकारने १४ डिसेंबर नंतर टॅरिफ वसुलीचा अधिकृत डेटा जाहीर केला नाही.ट्रम्प यांनी हे टॅरिफ अमेरिकेच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी आवश्यक असल्याचे सांगितले होते. त्यांचे म्हणणे होते की टॅरिफ न लादल्यास अमेरिका कमजोर होईल आणि इतर देश त्याचा फायदा घेतील. त्यांनी विशेषतः चीनचे नाव घेतले होते.ट्रम्प यांनी २ एप्रिल २०२५ रोजी ‘लिबरेशन डे’ म्हणून बहुतेक व्यापारी भागीदार देशांवर ‘रिसिप्रोकल’ म्हणजे प्रत्युत्तरात्मक टॅरिफ लादण्याची घोषणा केली होती. त्यापूर्वी फेब्रुवारी आणि मार्च २०२५ मध्ये त्यांनी चीन, कॅनडा आणि मेक्सिकोवर टॅरिफ लादले होते. त्यांनी यास फेंटानिल आणि इतर नशीली पदार्थांची तस्करीशी संबंधित राष्ट्रीय आपत्काल म्हटले होते. ट्रम्प यांनी टॅरिफचा वापर इतर देशांवर दबाव आणण्यासाठी देखील केला. यात ब्राझीलमध्ये माजी राष्ट्राध्यक्ष जायर बोल्सोनारोवर खटला, भारताकडून रशियन तेल खरेदी, आणि कॅनडा च्या ओंटारियो प्रांतातील अँटी-टॅरिफ जाहिरात यासारखी घटना समाविष्ट होती.सुप्रीम कोर्टातील सुनावणीनंतर ट्रम्प म्हणाले की जर निर्णय त्यांच्याविरुद्ध आला, तर ते ‘प्लॅन बी’ म्हणजे दुसरा मार्ग स्वीकारतील. ट्रेजरी सेक्रेटरी स्कॉट बेसेंट यांनीही सांगितले की प्रशासन इतर कायदेशीर तरतुदींचा वापर करून जास्तीत जास्त टॅरिफ कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल.यामध्ये राष्ट्रीय सुरक्षेच्या नावाखाली टॅरिफ लादण्याचा कायदा आणि अमेरिकन व्यापार प्रतिनिधीद्वारे अनुचित व्यापार प्रथांविरुद्ध प्रत्युत्तरात्मक कारवाई करण्याची तरतूद समाविष्ट आहे. परंतु, तज्ज्ञांच्या मते हे पर्याय IEEPA इतकी व्यापक आणि तत्काळ लागू होणारी शक्ती देणार नाहीत.
भाजपा आमदाराची धडक कारवाई! पान टपऱ्यांवर धाडी, अमली पदार्थांची जप्ती
- मुंबईच्या चारकोपमध्ये पान टपऱ्यांवर धाडी, अमली पदार्थांची जप्तीमुंबई : भाजपा आमदाराकडून चारकोप परिसरात मोठी कारवाई करण्यात आली आहे. चारकोप विधानसभेचे भाजप आमदार योगेश सागर यांनी आपल्या विधानसभा क्षेत्रामध्ये पान शॉप च्या नावाखाली चाललेल्या अमली पदार्थाच्या विक्रीचा गैरप्रकार पोलिसांसमोर आणला आहे. पान टपरीवर धाड टाकून त्यांनी त्या दुकानातील साहित्य जप्त केले.गेल्या अनेक दिवसांपासून कांदिवली महावीर नगर सहा या परिसरात टपरीवर पान, सिगारेटच्या नावाखाली अनेक वेगवेगळ्या प्रकारचे अमली पदार्थ विकले जात आहेत अशी माहिती आमदार योगेश यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी स्थानिक पोलिसांची मदत घेऊन टपरीवर धाड टाकली.
गडचिरोलीत नक्षलवाद्यांची स्मारके उद्ध्वस्त...
वार्तापत्र : विदर्भगडचिरोली जिल्ह्यात केंद्रीय राखीव पोलीस दल आणि गडचिरोली जिल्हा पोलीस यांच्या संयुक्त कारवाईत ४४ माओवादी स्मारके उद्ध्वस्त करण्यात आलेली आहेत. यात ८०० जवानांनी भाग घेतला आणि ही कारवाई पार पाडली आहे. त्यामुळे आता या जिल्ह्यातला नक्षलवाद शेवटचे आचके देतो आहे, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. इथला नक्षलवाद समूळ संपला, तर तिथे विकासाची नवी पहाट होईल यात कोणती शंका नाही.महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या वतीने बारावीची परीक्षा १० फेब्रुवारी, तर दहावीची परीक्षा २० फेब्रुवारीपासून राज्यात सुरू झाली आहे. या परीक्षा पुणे, मुंबई, अमरावती, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, लातूर, कोल्हापूर व कोकण अशा ९ विभागीय मंडळांच्या मदतीने घेत असतात. बारावीच्या परीक्षेत आतापर्यंत १०९ गैरप्रकार झाले असून कोकण विभागीय मंडळामध्ये एकही गैरप्रकार झालेला नाही. तेव्हा परीक्षा मंडळाने अधिक दक्ष राहणे आवश्यक आहे. दोन्ही परीक्षा मुलांच्या करिअरच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या आहेत. पालकांनी मुलांच्या तणावाच्या लक्षणाकडे बारकाईने लक्ष द्यायला हवे. म्हणजे त्यांना परीक्षाकाळात तणावमुक्त परीक्षा देता येईल. त्यासाठी पालकांनी परीक्षेच्या कार्यकाळात परीक्षा सुरू असताना मुलांची काळजी घेणे आवश्यक आहे.परीक्षेचे वेळापत्रक जसजसे जवळ येते तसतसे मुलांचा ताण वाढण्याला मदत होत असते. जी मुले नियमित अभ्यास करतात त्यांना कोणत्याही प्रकारचा ताण जाणवत नाही. तेव्हा आई-वडिलांनी मुलांची केवळ परीक्षेपुरती काळजी न घेता नियमितपणे काळजी घेतली पाहिजे. बऱ्याच वेळा परीक्षा जवळ आली की मुलांची डोकेदुखी, पोटदुखी, अंगदुखी, झोप न येणे, मूल चिडचिडे होणे असे दिसून येते. अशा वेळी पालकांनी मुलांना विश्वासात घेऊन सकारात्मक दृष्टिकोन मुलांबरोबर ठेवावा. याचा परिणाम म्हणून त्यांना प्रोत्साहन मिळून ती अधिक जोमाने अभ्यास करून तणावमुक्त होऊन परीक्षेला आनंदाने सामोरे जातील. पालकांनी आपली मुले परीक्षेत यशवंत होण्यासाठी परीक्षेच्या कालावधीत मुलांच्या मनात तणाव वाढणार नाही याची काळजी घ्यावी. तेव्हा मुलांच्या अभ्यासातील प्रगतीचा भूतकाळ कसा होता किंवा त्यांनी काय केले याची उजळणी न करता त्यांच्या भविष्याचा विचार करून त्यांच्याशी सुसंवाद साधावा. मुलांच्या परीक्षेविषयी त्यांच्या मनातील भीती दूर करावी. त्यांना आनंदित ठेवावे. पालकांनी अभ्यासासाठी जास्त सक्ती करू नये. मुलांनासुद्धा आपल्या परीने अभ्यास करू द्यावा. तेव्हा आपल्यावरती आता धाक नाही असे मुलांनी न समजता अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नये. यात आपलेच नुकसान होणार आहे, याची मुलांनी दक्षता घ्यावी. यासाठी मुलांनी आज्ञाधारक राहिले पाहिजे.महत्त्वाची बाब म्हणजे, आपले मूल परीक्षेच्या काळात पुरेसे जेवण करीत आहे का? याकडे सुद्धा पालकांनी लक्ष द्यायला हवे. मुलांची बौद्धिक क्षमता वाढण्यासाठी त्यांचे आरोग्य चांगले असावे लागते. त्यासाठी त्यांना संतुलित आहार नियमित मिळणे आवश्यक आहे. म्हणजे त्यांची ऊर्जा टिकून राहते. परीक्षा काळात मुलांच्या जेवणात बदल करू नये. तसेच त्यांना पुरेशी झोप घेण्यास सहकार्य करावे. मुलांना पुरेशी झोप मिळाल्यामुळे ते अधिक एकाग्रतेने अभ्यास करू शकतात. त्यात टीव्ही पाहणे आणि आरोग्यासाठी व्यायाम अतिशय महत्त्वाचा असतो. काही पालक रात्रभर अभ्यास करा असे मुलांना सांगत असतात किंवा अभ्यासिकेत पाठविले जाते. अशा वेळी पालकांनी सुद्धा मुलांचा कल लक्षात घेणे गरजेचे असते. कारण इतरांपेक्षा आपल्या मुलांच्या आवडीनिवडी पालकांना जास्त माहिती असतात. अभ्यासाबरोबर आरामाचीसुद्धा मुलांना नितांत आवश्यकता असते. याकडे सुद्धा पालकांनी अधिक लक्ष द्यायला हवे. याचा जास्त फायदा आपल्या मुलांना होत असतो. याची कल्पना पालकांना असायला हवी. अभ्यासाबरोबर घराचीसुद्धा स्वच्छता जास्त महत्त्वाची असते. त्याचबरोबर पालकांनी स्वत: शांत राहणे महत्त्वाचे असते. परीक्षा काय दररोज होत नाहीत. मात्र परीक्षेचा काळ मुलांप्रमाणे पालकांसाठीही महत्त्वाचा असतो. या कार्यकाळात मुलांना तणावमुक्त होण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन अतिशय महत्त्वाचे असते, मात्र यात जास्त वेळ घालवू नये. मुलांच्या अभ्यासासाठी कशी मदत होईल त्या दृष्टीने प्रयत्न करावा. यात जास्त वेळ घालवू नये. परीक्षेच्या काळात मुलांचा ताण वाढल्यास मुलांनी त्याचा सामना कसा करावा याचा योग्य सल्ला घ्यावा. या काळात मुलांना अभ्यास करताना व्यत्यय येणार नाही याची पालकांनी काळजी घ्यावी. आरामात अभ्यास करेल अशा जागेत त्याला अभ्यास करण्यासाठी बसवावे. परीक्षा सुरू असल्याने आपल्या मुलांना प्रेरित करण्यासाठी प्रोत्साहित करावे. विद्यार्थी आणि परीक्षा यांचा कसा सबंध असतो. परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यावर आपले ध्येय सहज पार करू शकतो याची आठवण मुलांना करून द्यावी. काही वेळा परीक्षा काळात मुलांना चिंताग्रस्त होणे साहजिकच आहे. मात्र सकारात्मक दृष्टिकोन मुलांनी ठेवायला पाहिजे. ही नैसर्गिक प्रतिक्रिया असून त्यावर सहज मात करता आली पाहिजे. यासाठी वर्षभरात झालेला अभ्यास दरदिवशी करणे आवश्यक आहे. अभ्यास झाला असेल तर त्याकडे दुर्लक्ष न करता अधूनमधून अभ्यासाचे वेळापत्रक तयार करून अभ्यास करावा. म्हणजे त्या अभ्यासक्रमाची उजळणी होऊन मुलांच्या मनात तणाव निर्माण होत नाही. यात अभ्यासात चुकारपणा मुलांनी करू नये. अभ्यासासाठी मुलांवर दबाव वाढवू नये तर मुलांच्या समस्या सुद्धा पालकांनी समजून घेणे गरजेचे असते. परीक्षा झाल्यावर पेपरमध्ये कठीण प्रश्न कोणते होते? किती लिहिलाय? पेपर पूर्ण लिहिलाय काय? असे अनेक प्रश्न विचारत बसण्यापेक्षा आता पुढील परीक्षा कोणत्या विषयाची आहे. त्या विषयावर लक्ष केंद्रित करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. परीक्षेला घरातून जाताना मुलांना आधार दिला पाहिजे. तसेच त्यांना धीर द्यावा म्हणजे मुले परीक्षेच्या काळात तणावमुक्त परीक्षा देऊ शकतात. तेव्हा मुले परीक्षेच्या काळात तणावमुक्त होण्यासाठी पालकांनी प्रोत्साहन द्यावे.
मुलांच्या करिअरच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या अशा बारावी-दहावी परीक्षा राज्यात सुरू झाल्या आहेत. या परीक्षेच्या कार्यकाळात मुलं अभ्यासाच्या तणावातून जात असतात. तेव्हा पालकांनी मुलांच्या आरोग्याकडे बारकाईने लक्ष द्यावयास हवे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या वतीने बारावीची परीक्षा १० फेब्रुवारी, तर दहावीची परीक्षा २० फेब्रुवारीपासून राज्यात सुरू झाली आहे. या परीक्षा पुणे, मुंबई, अमरावती, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, लातूर, कोल्हापूर व कोकण अशा ९ विभागीय मंडळांच्या मदतीने घेत असतात. बारावीच्या परीक्षेत आतापर्यंत १०९ गैरप्रकार झाले असून कोकण विभागीय मंडळामध्ये एकही गैरप्रकार झालेला नाही. तेव्हा परीक्षा मंडळाने अधिक दक्ष राहणे आवश्यक आहे. दोन्ही परीक्षा मुलांच्या करिअरच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या आहेत. पालकांनी मुलांच्या तणावाच्या लक्षणाकडे बारकाईने लक्ष द्यायला हवे. म्हणजे त्यांना परीक्षाकाळात तणावमुक्त परीक्षा देता येईल. त्यासाठी पालकांनी परीक्षेच्या कार्यकाळात परीक्षा सुरू असताना मुलांची काळजी घेणे आवश्यक आहे.परीक्षेचे वेळापत्रक जसजसे जवळ येते तसतसे मुलांचा ताण वाढण्याला मदत होत असते. जी मुले नियमित अभ्यास करतात त्यांना कोणत्याही प्रकारचा ताण जाणवत नाही. तेव्हा आई-वडिलांनी मुलांची केवळ परीक्षेपुरती काळजी न घेता नियमितपणे काळजी घेतली पाहिजे. बऱ्याच वेळा परीक्षा जवळ आली की मुलांची डोकेदुखी, पोटदुखी, अंगदुखी, झोप न येणे, मूल चिडचिडे होणे असे दिसून येते. अशा वेळी पालकांनी मुलांना विश्वासात घेऊन सकारात्मक दृष्टिकोन मुलांबरोबर ठेवावा. याचा परिणाम म्हणून त्यांना प्रोत्साहन मिळून ती अधिक जोमाने अभ्यास करून तणावमुक्त होऊन परीक्षेला आनंदाने सामोरे जातील. पालकांनी आपली मुले परीक्षेत यशवंत होण्यासाठी परीक्षेच्या कालावधीत मुलांच्या मनात तणाव वाढणार नाही याची काळजी घ्यावी. तेव्हा मुलांच्या अभ्यासातील प्रगतीचा भूतकाळ कसा होता किंवा त्यांनी काय केले याची उजळणी न करता त्यांच्या भविष्याचा विचार करून त्यांच्याशी सुसंवाद साधावा. मुलांच्या परीक्षेविषयी त्यांच्या मनातील भीती दूर करावी. त्यांना आनंदित ठेवावे. पालकांनी अभ्यासासाठी जास्त सक्ती करू नये. मुलांनासुद्धा आपल्या परीने अभ्यास करू द्यावा. तेव्हा आपल्यावरती आता धाक नाही असे मुलांनी न समजता अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नये. यात आपलेच नुकसान होणार आहे, याची मुलांनी दक्षता घ्यावी. यासाठी मुलांनी आज्ञाधारक राहिले पाहिजे.महत्त्वाची बाब म्हणजे, आपले मूल परीक्षेच्या काळात पुरेसे जेवण करीत आहे का? याकडे सुद्धा पालकांनी लक्ष द्यायला हवे. मुलांची बौद्धिक क्षमता वाढण्यासाठी त्यांचे आरोग्य चांगले असावे लागते. त्यासाठी त्यांना संतुलित आहार नियमित मिळणे आवश्यक आहे. म्हणजे त्यांची ऊर्जा टिकून राहते. परीक्षा काळात मुलांच्या जेवणात बदल करू नये. तसेच त्यांना पुरेशी झोप घेण्यास सहकार्य करावे. मुलांना पुरेशी झोप मिळाल्यामुळे ते अधिक एकाग्रतेने अभ्यास करू शकतात. त्यात टीव्ही पाहणे आणि आरोग्यासाठी व्यायाम अतिशय महत्त्वाचा असतो. काही पालक रात्रभर अभ्यास करा असे मुलांना सांगत असतात किंवा अभ्यासिकेत पाठविले जाते. अशा वेळी पालकांनी सुद्धा मुलांचा कल लक्षात घेणे गरजेचे असते. कारण इतरांपेक्षा आपल्या मुलांच्या आवडीनिवडी पालकांना जास्त माहिती असतात. अभ्यासाबरोबर आरामाचीसुद्धा मुलांना नितांत आवश्यकता असते. याकडे सुद्धा पालकांनी अधिक लक्ष द्यायला हवे. याचा जास्त फायदा आपल्या मुलांना होत असतो. याची कल्पना पालकांना असायला हवी. अभ्यासाबरोबर घराचीसुद्धा स्वच्छता जास्त महत्त्वाची असते. त्याचबरोबर पालकांनी स्वत: शांत राहणे महत्त्वाचे असते. परीक्षा काय दररोज होत नाहीत. मात्र परीक्षेचा काळ मुलांप्रमाणे पालकांसाठीही महत्त्वाचा असतो. या कार्यकाळात मुलांना तणावमुक्त होण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन अतिशय महत्त्वाचे असते, मात्र यात जास्त वेळ घालवू नये. मुलांच्या अभ्यासासाठी कशी मदत होईल त्या दृष्टीने प्रयत्न करावा. यात जास्त वेळ घालवू नये. परीक्षेच्या काळात मुलांचा ताण वाढल्यास मुलांनी त्याचा सामना कसा करावा याचा योग्य सल्ला घ्यावा. या काळात मुलांना अभ्यास करताना व्यत्यय येणार नाही याची पालकांनी काळजी घ्यावी. आरामात अभ्यास करेल अशा जागेत त्याला अभ्यास करण्यासाठी बसवावे. परीक्षा सुरू असल्याने आपल्या मुलांना प्रेरित करण्यासाठी प्रोत्साहित करावे. विद्यार्थी आणि परीक्षा यांचा कसा सबंध असतो. परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यावर आपले ध्येय सहज पार करू शकतो याची आठवण मुलांना करून द्यावी. काही वेळा परीक्षा काळात मुलांना चिंताग्रस्त होणे साहजिकच आहे. मात्र सकारात्मक दृष्टिकोन मुलांनी ठेवायला पाहिजे. ही नैसर्गिक प्रतिक्रिया असून त्यावर सहज मात करता आली पाहिजे. यासाठी वर्षभरात झालेला अभ्यास दरदिवशी करणे आवश्यक आहे. अभ्यास झाला असेल तर त्याकडे दुर्लक्ष न करता अधूनमधून अभ्यासाचे वेळापत्रक तयार करून अभ्यास करावा. म्हणजे त्या अभ्यासक्रमाची उजळणी होऊन मुलांच्या मनात तणाव निर्माण होत नाही. यात अभ्यासात चुकारपणा मुलांनी करू नये. अभ्यासासाठी मुलांवर दबाव वाढवू नये तर मुलांच्या समस्या सुद्धा पालकांनी समजून घेणे गरजेचे असते. परीक्षा झाल्यावर पेपरमध्ये कठीण प्रश्न कोणते होते? किती लिहिलाय? पेपर पूर्ण लिहिलाय काय? असे अनेक प्रश्न विचारत बसण्यापेक्षा आता पुढील परीक्षा कोणत्या विषयाची आहे. त्या विषयावर लक्ष केंद्रित करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. परीक्षेला घरातून जाताना मुलांना आधार दिला पाहिजे. तसेच त्यांना धीर द्यावा म्हणजे मुले परीक्षेच्या काळात तणावमुक्त परीक्षा देऊ शकतात. तेव्हा मुले परीक्षेच्या काळात तणावमुक्त होण्यासाठी पालकांनी प्रोत्साहन द्यावे.रवींद्र तांबे
राजरंग : राज चिंचणकरमराठी नाट्यसृष्टीत अनेक नाट्यकृती तर सादर होतातच; परंतु या क्षेत्राशी संबंधित अनेक उपक्रम त्या सोबतीने विविध पातळीवर सुरू असतात. असाच एक उपक्रम गेली १४ वर्षे नाट्यसृष्टीच्या सोबतीने चालत आला आहे. हा उपक्रम राबवला जातो, तो ‘मराठी नाटक समूह’ या ग्रूपच्या माध्यमातून...! या समूहात नाट्यसृष्टीशी संबंधित अनेक मंडळी आहेत आणि त्यांच्या सहकार्याने मराठी नाटक समूह गेली १४ वर्षे विविध गोष्टींच्या माध्यमातून महत्त्वाचे योगदान देत आला आहे. आता १४ वर्षे होत असताना मराठी नाटक समूहाने ‘नाट्य निरंतर’ असा आगळावेगळा उपक्रम हाती घेतला आहे. ‘संकल्पना ते सादरीकरण : एक निरंतर प्रक्रिया’ असे या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे स्वरूप असून, ‘मराठी नाटक समूह’ आणि ‘अभिषेक थिएटर्स’ यांनी मिळून या उपक्रमाची पायाभरणी केली आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद या उपक्रमाला सहकार्य करत आहे. २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून या उपक्रमाचा पडदा उघडत आहे. माहीम-माटुंगा येथील यशवंत नाट्यसंकुलात असलेल्या साळगांवकर प्रायोगिक रंगमंचावर या उपक्रमाचा शुभारंभ होत आहे.एखादे नाटक म्हणजे संकल्पना ते सादरीकरण असा निरंतर प्रवास असतो. याच प्रवासाशी निगडित घटकांचा म्हणजे नव्या-जुन्या नाटकांची ओळख, स्वगते, कथा, कविता, नाट्य अभिवाचन, एकल प्रयोग, प्रहसन, गप्पा, चर्चा, मुलाखती, मार्गदर्शन अशा प्रकारच्या नाटकाशी व साहित्याशी संबंधित गोष्टींचा समावेश या ‘नाट्य निरंतन’मध्ये करण्यात आला आहे. गेल्या १४ वर्षांच्या काळात मराठी नाटक समूहाने ‘प्रायोगिक नाट्य महोत्सव’, ‘नाट्यलेखन स्पर्धा’, ‘पत्रलेखन स्पर्धा’, ‘विक्रमादित्य दामले’, ‘चंद्रकांत कुलकर्णी सादर करीत आहे’; असे विविध कार्यक्रम व उपक्रम यशस्वीपणे राबवले आहेत. इतकेच नव्हे; तर कोरोना प्रादुर्भावाच्या काळात मराठी नाटक समूहाने, पडद्यामागच्या कलाकारांना आर्थिक सहाय्य देण्यात मोठा पुढाकार घेतला होता. मागच्या वर्षी ‘चंद्रकांत कुलकर्णी सादर करीत आहे’ या कार्यक्रमानंतर मराठी नाटक समूहाचा कुठलाच कार्यक्रम सादर झाला नाही. मात्र आता ‘नाट्य निरंतन’च्या माध्यमातून मराठी नाटक समूह नव्याने ठसा उमटवण्यासाठी सज्ज झाला आहे.या एकूणच नावीन्यपूर्ण उपक्रमाच्या बाबतीत मराठी नाटक समूहातर्फे भूमिका मांडताना रंगकर्मी आशीर्वाद मराठे सांगतात, आमचा हा ‘नाट्य निरंतर’ उपक्रम ‘मराठी नाटक समूह’ व ‘अभिषेक थिएटर्स’ मिळून, अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या सहकार्याने सुरू करत आहोत. नावीन्य हा या उपक्रमाचा महत्त्वाचा भाग असेल. इतर ठिकाणी आधीच सादर झालेल्या गोष्टी इथे कटाक्षाने टाळण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. या उपक्रमाच्या निमित्ताने अधिकाधिक नवीन प्रयोग केले जातील.२७ फेब्रुवारी रोजी असलेल्या मराठी भाषा गौरव दिनाचा मुहूर्त साधत आम्ही हा उपक्रम सुरू करत आहोत. सध्या वर्षभर तरी दर महिन्याला हा उप्रक्रम करण्याचा आमचा मानस आहे. पहिल्या प्रयोगानंतर मिळणाऱ्या प्रतिसादावर पुढच्या योजना ठरवण्यात येतील. नाट्य आणि साहित्य यांचा संगम या निमित्ताने करण्यात येणार आहे. नवीन काही सादर करण्याच्या दृष्टीने यात चर्चाही होतील आणि नवीन संकल्पनांना या उपक्रमाच्या माध्यमातून उजाळा मिळेल, असा यामागचा आमचा उद्देश आहे.
राजरंग : राज चिंचणकरतमाम नाट्यरसिक आणि नाट्यसृष्टीशी संबंधित मंडळी ज्या पुरस्काराची आतुरतेने वाट पाहत असतात, तो 'माझा पुरस्कार' आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. नाट्यसृष्टीतले 'शुभ्र व्यक्तिमत्त्व' म्हणजेच ज्येष्ठ रंगकर्मी व नाट्यव्यवस्थापक अशोक मुळ्ये यांचा हा पुरस्कार कायम चर्चेत असतो. याचे कारण म्हणजे केवळ 'त्यांना वाट्टेल त्यांनाच' ते हा पुरस्कार बहाल करत असतात. तर यंदाचा त्यांचा 'माझा पुरस्कार' सोहळा त२४ फेब्रुवारी रोजी रंगणार आहे. त्यांचा स्वघोषित असा हा 'माझा पुरस्कार' नाट्यसृष्टीत दबदबा राखून आहे. सालाबादप्रमाणे यंदाही या पुरस्कार सोहळ्याचा घाट त्यांनी 'त्यांच्या पद्धतीने' घातला आहे. या पुरस्काराचे हे विसावे वर्षं असल्याचे समजते आणि तो देणारे अशोक मुळ्ये यांनी वयाची ऐंशी पार केली आहे. पण त्यांच्या उत्साहात काडीमात्रही फरक पडलेला नाही.हा पुरस्कार मी देतो म्हणून तो माझा पुरस्कार, हे अशोक मुळ्ये यांचे ब्रीदवाक्य आहे. त्यांच्या शुभ्र पेहरावाप्रमाणेच त्यांच्या या पुरस्काराची ट्रॉफी सुद्धा पांढरी शुभ्र असते. त्यांना वाट्टेल त्यांनाच ते हा पुरस्कार देतात आणि त्यांनी त्यांच्या स्वभावाधर्मानुसार यंदाचे पुरस्कार जाहीर करून टाकले आहेत. अर्थात, फक्त आणि फक्त अशोक मुळ्ये यांच्या दृष्टिकोनातूनच, नाट्यसृष्टीत यंदा ज्यांनी भरीव कार्य केले आहे, त्यांनाच ते हा पुरस्कार देत असतात आणि यात विशेष काही नसल्याचे त्यांना पूर्ण ओळखून असलेल्यांना माहीत आहे. साहजिकच, या निमित्ताने ते आता कुणावर बरसणार आणि कुणाला स्वतःच्या खिशात घालणार हे पाहणे औत्सुक्याचे आहे.
शकीराची १९ वर्षांनंतर भारतात एन्ट्री!
मुंबई-दिल्लीत रंगणार सुरांची मैफलजागतिक संगीत क्षेत्रातील दिग्गज नाव आणि आपल्या मनमोहक डान्स मूव्हसने लाखो चाहत्यांना भुरळ घालणारी पॉप स्टार शकीरा तब्बल १९ वर्षांनंतर पुन्हा एकदा भारतीय रंगमंचावर अवतरणार आहे. विशेष म्हणजे, या ऐतिहासिक दौऱ्यात शकीरा केवळ एका नव्हे, तर मुंबई आणि दिल्ली अशा दोन प्रमुख शहरांमध्ये तिचे धमाकेदार कॉन्सर्ट सादर करणार आहे. या बातमीमुळे भारतीय संगीत प्रेमींमध्ये आनंदाचे उधाण आले असून सोशल मीडियावर या दौऱ्याचीच चर्चा रंगली आहे.शकीराचा पहिला परफॉर्मन्स १० एप्रिल रोजी मुंबईत पार पडणार असून त्यानंतर १५ एप्रिल रोजी दिल्लीत ती आपल्या आवाजाची जादू दाखविणार आहे. शकीराचा भारत दौरा दोन शहरांमध्ये आयोजित होण्याची ही पहिलीच वेळ आहे. शकीरा आणि भारताचे नाते जुने आहे. तिने शेवटचा परफॉर्मन्स २००७ मध्ये मुंबईत तिच्या ‘ओरल फिक्सेशन टूर’ दरम्यान दिला होता. त्यानंतर आता तब्बल १९ वर्षांनी ती भारतात परतत आहे. या पुनरागमनाबद्दल शकीरा स्वतः अत्यंत उत्साही आणि भावुक आहे. ती म्हणते की, “भारतात परफॉर्म करणे माझ्यासाठी नेहमीच खास राहिले आहे. मुंबई आणि दिल्लीतील चाहत्यांशी पुन्हा एकदा जोडले जाणे हा माझ्यासाठी एक अविस्मरणीय अनुभव असेल.” विशेष म्हणजे, हा ‘फीडिंग इंडिया कॉन्सर्ट’ असून या माध्यमातून ती मुलांचे पोषण आणि उज्ज्वल भविष्याचा संदेश देणार आहे.शकीराची संगीत कारकीर्द तीन दशकांहून अधिक काळ गाजलेली आहे. ९० च्या दशकात तिने आपल्या प्रवासाला सुरुवात केली आणि अल्पावधीतच ती जगातील सर्वात लोकप्रिय पॉप सिंगर्सच्या यादीत अग्रस्थानी पोहोचली. तिचे ‘हिप्स डोन्ट लाय’, ‘व्हेनएव्हर, व्हेरएव्हर’, ‘वाका वाका’ (फिफा वर्ल्ड कप अँथम), ‘शी वुल्फ’ आणि ‘ला टोर्टुरा’ यांसारख्या गाण्यांनी तिला जागतिक स्तरावर एक वेगळी ओळख मिळवून दिली आहे. शकीराची ऊर्जा, तिची खास बेली डान्स शैली आणि स्टेजवरील उपस्थिती भारतीय प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार आहे.
टर्निंग पॉइंट : युवराज अवसरमलहरिश दुधाडेने मनोरंजनाच्या क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केली आहे. ‘क्रांती ज्योती विद्यालयं-मराठी माध्यम’ या चित्रपटातील त्याची भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहते. नुकतेच या चित्रपटाने थिएटरमध्ये रिलीज पन्नास दिवस साजरे केले आहेत.हरिशचे शालेय शिक्षण अहमदनगरच्या श्री समर्थ विद्यामंदिर प्रशालामध्ये झाले. शाळेमध्ये श्लोक पठण केल्याने त्याची वाचा शुद्ध झाली. बोलण्यामध्ये स्पष्टपणा आला. चित्रकला, गाण्याच्या स्पर्धेत, नाटकामध्ये त्याने भाग घेतला होता. त्याच्या जडणघडण्यामध्ये शाळेचा सिंहाचा वाटा होता. त्यानंतर त्याने कॉलेजमध्ये एकांकिकेचे दिग्दर्शन केले. काही एकांकिकेमध्ये काम केले. कॉलेजमध्ये वर्गापेक्षा जास्त तो एकांकिकेच्या तालमीच्या ठिकाणी असायचा. त्यावेळी त्याला कॉलेजच्या शिक्षकांकडून भरपूर पाठिंबा मिळाला. त्यानंतर त्याने मुंबई गाठली.एम. बी. ए. झाल्यावर मुंबईमध्ये दोन महिने त्याला काम मिळाले नाही. दोन महिन्यांनंतर त्याला एका मराठी चॅनेल वरील 'कन्यादान' ही पहिली मालिका मिळाली.तिथून त्याचे या क्षेत्रात पदार्पण झाले. हा त्याच्या जीवनातील मोठा टर्निंग पॉइंट होता.‘तुमची मुलगी काय करते’ या मालिकेत त्याने साकारलेला पोलीस अधिकारी प्रेक्षकांच्या चांगलाच लक्षात राहिलेला आहे. ‘फत्तेशिकस्त’ चित्रपटात त्याने बहिर्जी नाईकची भूमिका साकारली होती. आतापर्यंत साकारलेल्या भूमिकांपैकी बहिर्जी नाईकची भूमिका त्याची आवडती भूमिका होती. ‘वीर मुरारबाजी’ या आगामी चित्रपटात देखील त्याने बहिर्जी नाईकची भूमिका साकारली आहे.हरिश दुधाडे व हेमंत ढोमे फार जुने मित्र आहेत. लेखक व दिग्दर्शक हेमंतला नेहमी कथेनुसार हरिशसोबत काम करण्याची इच्छा असते. ‘फर्स्ट क्लास दाभाडे’ या चित्रपटांमध्ये ते होते. आता ‘क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’ या चित्रपटात ते एकत्र आहेत. या चित्रपटामध्ये मराठी भाषेतील शाळेबद्दल भाष्य केले आहे. मराठी भाषेच्या शाळांची पटसंख्या कमी झाली, तर शाळा बंद होण्याचा मोठा धोका आहे, जो मराठी भाषेच्या अस्तित्वाला धोका आहे. मोठ्या संख्येने मुले इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जात आहेत. त्यामुळे मराठी शाळेच्या अस्तित्वाला धोका निर्माण होत आहे; परंतु मराठी आपली मातृभाषा आहे. ती टिकवून ठेवणे खूप गरजेचे आहे. मातृभाषेतून शिक्षण घेतले तर तुम्ही इतर भाषा लवकर शिकू शकतात. मराठी भाषेला इतिहास आहे, आपली मराठी भाषा आपली आई आहे तिला वाचविणे आवश्यक आहे, या चित्रपटात तुझी कोणती भूमिका आहे असे विचारल्यावर तो म्हणाला की राकेश घरत नावाची व्यक्तिरेख मी साकारीत आहे. तो मराठी माणूस आहे, त्याचे शिक्षण मराठी माध्यमातून झालेले आहे. आंब्याचा व्यापारी आहे. त्याला दोन मुली आहेत, त्यांचे शिक्षण मराठी माध्यमातून झालेले असते; परंतु त्या शिवाय त्यांचे काही अडले नाही. इंग्रजी बोलता येणे ही एक कला आहे. लेखक व दिग्दर्शक हेमंत ढोमे सोबत व इतर कलावंतांसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता असे विचारल्यावर तो म्हणाला की, हेमंत तर माझा मित्र आहे, त्याच्यासोबत व क्षितीसोबत माझे ट्युनिंग चांगले आहे. हेमंतच्या मनामध्ये काय चालले आहे हे मी ओळखतो व त्याला जे अपेक्षित आहे, ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी केला आहे. हेमंत एक गुणी लेखक व दिग्दर्शक आहे, प्रत्येक वेळी नवीन काही तरी आणण्याचा प्रयत्न तो करीत असतो, त्यामुळे त्याच्या सोबत काम करायला मिळणे ही पर्वणीच असते. सचिन खेडेकरांसोबत या अगोदर मी ‘इन्स्पेक्टर झेंडे’ या चित्रपटामध्ये काम केले होते. त्यांच्याकडून आजदेखील भरपूर गोष्टी आम्ही शिकत आहोत. ज्येष्ठ लेखक व कवी रत्नाकर मतकरी यांनी ‘स्वर्गात आकाशगंगा’ हे गाणे लिहिलेले आहे, जे खूप लोकप्रिय झालेले आहे. हेमंत ढोमेच्या कर्जतच्या अभिनव विद्यालयामध्ये या गाण्याचे लॉन्चिंग करण्यात आले. हा चित्रपट प्रेक्षकांना आवडतोय असे मत त्याने व्यक्त केले.
भारत-ऑस्ट्रेलियात आज निर्णायक लढत
कांगारूंच्या भूमीत तिरंगा फडकवण्याची महिला संघाला संधीॲडलेड : भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघामधील टी-२० मालिका सध्या १-१ अशा बरोबरीत असून, शनिवारी होणारा तिसरा आणि शेवटचा सामना दोन्ही संघांसाठी 'करो या मरो' असा असेल. ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर प्रथमच द्विपक्षीय टी-२० मालिका जिंकून इतिहास रचण्याची सुवर्णसंधी भारतीय महिलांकडे आहे.मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने डकवर्थ लुईस नियमानुसार २१ धावांनी विजय मिळवत जोरदार सुरुवात केली होती. मात्र, दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पलटवार करत १९ धावांनी विजय मिळवला आणि मालिकेत बरोबरी साधली. दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या जॉर्जिया वोलने (८८ धावा) आणि बेथ मुनीने दिलेल्या १२८ धावांच्या सलामीमुळे भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता.मागील सामन्यात भारताची मधली फळी गडगडल्याने विजयाची संधी हुकली होती. त्यामुळे उद्याच्या निर्णायक सामन्यात स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा यांच्याकडून आक्रमक सलामीची अपेक्षा आहे. तसेच कर्णधार हरमनप्रीत कौर आणि जेमिमा रॉड्रिग्स यांना मोठी खेळी करावी लागेल. गोलंदाजीत रेणुका सिंग आणि अरुंधती रेड्डी यांच्यावर सुरुवातीचे धक्के देण्याची जबाबदारी असेल.विक्रमी हरमनप्रीतवर सर्वांच्या नजरा : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक ३५६ सामने खेळण्याचा विश्वविक्रम नोंदवणाऱ्या हरमनप्रीत कौरसाठी हा सामना वैयक्तिकरीत्या खूप महत्त्वाचा आहे. आपल्या शिरपेचात मानाचा तुरा खोवण्यासाठी ती मालिका विजयासाठी जीवाचे रान करेल, यात शंका नाही.सामन्याचा तपशील :सामना : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (तिसरी टी-२०)भारतीय वेळ : दुपारी १. ४५.स्थळ : ॲडलेड ओव्हल, ऑस्ट्रेलिया
जाएंट किलर संघ भारताच्या वाट्याला...
अहमदाबाद : टी-२० विश्वचषकाच्या साखळी फेरीनंतर आता क्रिकेट चाहत्यांची नजर 'सुपर-८' फेरीकडे लागली आहे. भारतीय संघाने साखळी फेरीत आपले सर्व सामने जिंकून अजेय राहण्याचा मान मिळवला असला, तरी टीम इंडियाला मोठी कसरत करावी लागली आहे. आता खऱ्या परीक्षेची वेळ आली आहे. २१ फेब्रुवारीपासून सुपर ८ च्या सामन्यांना सुरुवात होणार असून भारताचा पहिला मोठा सामना २२ फेब्रुवारी रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रंगणार आहे. जरी भारत अजेय असला, तरी पाकिस्तानचा सामना वगळता इतर सामन्यांत भारताची 'दमछाक' झाली होती. विशेषतः नेदरलँडने भारताने उभारलेल्या धावसंख्येचा पाठलाग करताना जबरदस्त टफ फाईट दिली. यावरून स्पष्ट होते की, सुपर-८ मध्ये दक्षिण आफ्रिका किंवा वेस्ट इंडिजसारख्या संघांविरुद्ध भारताला गाफील राहून चालणार नाही.ग्रुप १ : भारताचा मार्ग खडतर?सुपर-८ साठी दोन गट पाडण्यात आले असून भारताचा समावेश 'ग्रुप १' मध्ये आहे. या गटात भारतासोबत खालील संघांचा समावेश आहे:१. दक्षिण आफ्रिका : भारतासाठी सर्वात मोठे आव्हान.२. वेस्ट इंडिज : टी-२० मधील स्फोटक संघ.३. झिम्बाब्वे : ऑस्ट्रेलियाला बाहेरचा रस्ता दाखवणारा 'जायंट किलर'.संजू सॅमसनला मिळणार संधी?अभिषेकच्या जागी अनुभवी संजू सॅमसनला संधी मिळण्याची चिन्हे आहेत. सॅमसनने नामिबियाविरुद्धच्या सामन्यात २२ धावांची छोटी पण आक्रमक खेळी केली होती. अभिषेकच्या तुलनेत सॅमसनचा फॉर्म आणि अनुभव लक्षात घेता, कर्णधार सूर्यकुमार यादव आणि प्रशिक्षक त्याला प्राधान्य देऊ शकतात.ग्रुप २ : पाकिस्तानची 'धुळधाण' होणार?दुसरीकडे 'ग्रुप २' मध्ये इंग्लंड, श्रीलंका, न्यूझीलंड आणि पाकिस्तान या संघांचा समावेश आहे. या गटात पाकिस्तानची स्थिती नाजूक दिसत आहे. तज्ज्ञांच्या मते, इंग्लंड आणि न्यूझीलंड तर पाकिस्तानला जड जातीलच, पण श्रीलंका देखील पाकिस्तानची 'धुळधाण' उडवण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाकिस्तानला उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.उपांत्य फेरीचे समीकरण :प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील.उपांत्य फेरीचे सामने ४ आणि ५ मार्च रोजी खेळवले जातील.भारत आणि पाकिस्तान वेगवेगळ्या गटात असल्याने, आता त्यांचा सामना थेट सेमीफायनल किंवा फायनलमध्ये होण्याची शक्यता धूसर वाटत आहे.भारतीय संघाला घरच्या मैदानाचा आणि प्रेक्षकांच्या पाठिंब्याचा नक्कीच फायदा मिळेल, मात्र फलंदाजी आणि गोलंदाजीतील त्रुटी सुधारून मैदानात उतरणे हेच जेतेपदासाठी महत्त्वाचे ठरेल.अभिषेक शर्माचा 'बॅड पॅच'आपली पहिली टी-२० विश्वचषक स्पर्धा खेळणाऱ्या अभिषेक शर्मासाठी गट फेरी एखाद्या भयानक स्वप्नासारखी ठरली आहे. सलामीला संधी मिळूनही अभिषेकला तीनही सामन्यांत आपले खाते उघडता आले नाही. सलग तीनवेळा शून्यावर बाद झाल्यामुळे त्याच्या निवडीवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. 'करो या मरो'च्या या टप्प्यावर संघ व्यवस्थापन कोणताही धोका पत्करण्यास तयार नसल्याचे समजत आहे.भारत विरुद्ध द. आफ्रिका : आकडेवारी काय सांगते?टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताचे पारडे जड राहिले आहे. आतापर्यंत झालेल्या ३५ सामन्यांपैकी भारताने २१, तर दक्षिण आफ्रिकेने १३ सामने जिंकले आहेत. विशेष म्हणजे, टी-२० विश्वचषकातही भारताने ५ वेळा द. आफिकेला धूळ चारली असून २ सामने गमावले आहेत. २०२४ च्या फायनलमध्ये भारताने आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव करून दुसऱ्यांदा विजेतेपदावर आपले नाव कोरले होते.
सभागृहात शिवसेनेच्या नगरसेवकांची जागा ठरली
गटनेत्यांनी सर्व नगरसेवकांना सभागृहात बसवून जागा केली निश्चितमुंबई : मुंबई महापालिकेच्या सभागृहामध्ये निवडून आलेल्या नगरसेवकांच्या आसनांवरून गोंधळ उडालेला असतानाच शुक्रवारी शिवसेनेच्या नगरसेवकांची आसन व्यवस्था पक्षाचे गटनेते अमेय घोले यांनी ठरवून दिली.कोणत्या नगरसेवकांनी कुठे बसावे याची आसन व्यवस्था नगरसेवकांना ठरवून दिल्यामुळे आता शिवसेनेच्या नगरसेवकांची तरी सभागृहात बसताना अडचण होणार नाही.मुंबई महापालिका सभागृहात २२७ अधिक ५ अशाप्रकारे तसेच अतिरिक्त नगरसेवकांची आसन व्यवस्था असूनही पहिल्याच दिवशी काँग्रेसच्या नगरसेवकांना बसण्यास जागा शिल्लक नव्हती. त्यामुळे काँग्रेसच्या नगरसेवकांना सभागृहात उभे राहण्याची वेळ आली होती. त्यानंतर दुसऱ्या सभागृहातही हाच घोळ झाल्यानंतर शिवसेनेच्या नेत्या माजी नगरसेविका शितल म्हात्रे, गटनेते अमेय घोले, ज्येष्ठ नगरसेविका तृष्णा विश्वासराव तसेच यामिनी जाधव यांनी पुढाकार घेत आपल्या नगरसेवकांना सभागृहात कुठे आणि कसे बसावे याचे प्रत्यक्ष आसनांवर बसवून त्यांच्या जागा निश्चित करून दिल्या.शिवसेनेच्या २९ नगरसेवकांची जागा निश्चित झाल्यानंतर त्या निश्चित जागेतील आसनांवर ज्येष्ठ आणि अनुभवी नगरसेवकांच्या क्रमवारीनुसार नगरसेवकांची आसनांची व्यवस्था निश्चित करून दिली. तसेच त्या त्या जागांवर यासर्व नगरसेवकांना बसायला लावून यापुढे या निश्चित केलेल्या आसनांवरच नगरसेवकांनी बसावे अशाप्रकारच्या सूचना शुक्रवारी प्रत्यक्षात सभागृहातील आसनांवर बसवून त्याचे प्रात्यक्षिक दाखवले. त्यामुळे शिवसेनेने आपल्या सर्व नगरसेवकांकडून कोणत्याही प्रकारची सभागृहात बेशिस्तपणा होणार नाही तसेच त्यांना उभे राहता येवू नये याची काळजी स्वत: पक्षाचे गटनेते अमेय घोले यांनी घेतल्याचे दिसून आले. तत्पूर्वी पक्षाच्या सर्व नगरसेवकांची बैठक घेवून त्यांना पक्षाच्यावतीने सूचना करण्यात आल्या. यामध्ये पक्षाच्या नेत्या शितल म्हात्रे यांनी नगरसेवकांना मार्गदर्शन केले.
मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प येत्या बुधवारी २५ फेब्रुवारीला
मुंबई :मुंबई महापालिकेचा सन २०२६-२७चा अर्थसंकल्प ४ फेब्रुवारी रोजी पर्यंत मांडला न गेल्याने आता स्थायी समिती अध्यक्षांची निवड होताच येत्या २५ फेब्रुवारी रोजी मांडला जाणार आहे. शिक्षण समितीमध्ये शिक्षणासंदर्भातील अर्थसंकल्प मांडल्यानंतर दुपारी स्थायी समिती अध्यक्षांना महापालिका आयुक्त डॉ भूषण गगराणी हे महापालिकेचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. नियोजित वेळेत अर्थसंकल्प मांडला न गेल्यामुळे आता स्थायी समिती आणि महापालिका सभागृहामध्ये अर्थसंकल्प मंजूर करण्याची मुदत कलावधी नसेल. त्यामुळे स्थायी समिती आणि सभागृहामध्ये अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी महापालिका सदस्यांना मोठी संधी मिळणार आहे.मुंबई महापालिकेचा मुंबई महापालिकेचा सन २०२६-२७चा अर्थसंकल्प यंदा ३ ते ४ फेब्रुवारी रोजी मांडला जाणे अपेक्षित होते. परंतु महापालिका स्थापन न झाल्यामुळे तसेच महापालिका अधिनियमाचा आधार घेत अर्थसंकल्प पुढे ढकलला होता. त्यामुळे नियोजित वेळेत अर्थसंकल्प मांडला न गेल्यामुळे आता प्रशासनाने बनवलेल्या अर्थसंकल्पाची अंमलबजावणी १ एप्रिलपासून केली जाणार आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाच्यावतीने आता केवळ सन २०२६-२७ चा अर्थसंकल्प मांडला गेला तरी त्याला केवळ मान्यतेची औपचारिकता असेल. त्यामुळे २८ ते २९ फेब्रुवारीपर्यंत स्थायी समितीत मंजूर करण्याचे आणि महापालिका सभागृहात १० मार्च पूर्वी स्थायी समिती अध्यक्षांनी अर्थसंकल्प मांडण्याचे कोणतेही निर्बंध नसणार आहे. त्यामुळे स्थायी समितीमध्ये अनौपचारिकत चर्चेसह अर्थसंकल्पीय चर्चेला नवनिर्वाचित अध्यक्ष प्रभाकर शिंदे हे अधिक वेळ घेवू शकतात, तसेच मुदत कालावधी निश्चित नसल्यामुळे सभागृहातही या मुदत कालावधीचे निर्बंध नसतील. त्यामुळे सभागृहात महापौर रितू तावडे या अधिक काळ अर्थसंकल्पावर चर्चा घडवून आणत प्रशासनाला एप्रिलमध्येही सुधारीत अर्थसंकल्प मंजूर करुन देवू शकतात.मुंबई महापालिकेचा सन २०२५-२६चा ७४ हजार ४२७ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प यापूर्वी प्रशासक डॉ भूषण गगराणी यांनी मांडला होता. परंतु अता प्रशासक जावून महापालिका स्थापन होत शुक्रवारी महापालिका स्थायी समिती अध्यक्षपदी प्रभाकर शिंदे यांची निवड करण्यात आली. त्यामुळे येत्या बुधवारी २५ फेब्रुवारी रोजी स्थायी समितीच्या बैठकीत दुपारी दोन वाजता महापालिका आयुक्त डॉ भूषण गगराणी हे सन २०२६-२७चा अर्थसंकल्प नवनिर्वाचित स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांना सादर करतील.एकाच दिवशी अर्थसंकल्प आणि सभागृहहीयेत्या २५ फेब्रुवारी रोजी महापालिका अर्थसंकल्प मांडला जाणार असून त्याच दिवशी महापालिका सभागृहही आहे. त्यामुळे स्थायी समितीत अर्थसंकल्प दुपारी मांडल्यानंतर महापालिका आयुक्तांचे भाषण संध्याकाळी चार ते साडेचार वाजता संपते. त्यामुळे त्यानंतर महापालिका सभागृहाचे कामकाज करण्यात येणार आहे. त्यामुळे एकाच दिवशी अर्थसंकल्प आणि सभागृह असल्यामुळे नगरसेवक आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची त्रेधातिरपीट उडणार आहे.
महाराष्ट्रातील स्टार्टअपच्या कामगिरीची मंत्री नितेश राणे यांच्याकडून प्रशंसा
इंडिया एआय इम्पॅक्ट समिट २०२६ मध्ये मंत्री नितेश राणे यांची उपस्थिती, जागतिक एआय रोडमॅपचा घेतला सखोल आढावानवी दिल्ली : नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे आयोजित ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट २०२६’ या जागतिक दर्जाच्या शिखर परिषदेत राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी उपस्थित राहून एआय क्षेत्रातील जागतिक घडामोडी, विविध देशांची धोरणे आणि भविष्यातील एआय रोडमॅप यांचा सखोल आढावा घेतला. सोमवारपासून सुरू झालेल्या या सहादिवसीय परिषदेचे उद्घाटन माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. २० हून अधिक देशांचे प्रतिनिधी, ५०० पेक्षा अधिक जागतिक एआय तज्ज्ञ, तंत्रज्ञान उद्योजक आणि धोरणकर्ते या परिषदेत सहभागी झाले असून ही परिषद भारताच्या डिजिटल क्षमतेचे आणि नेतृत्वाचे प्रतीक ठरत आहे.मंत्री नितेश राणे यांनी परिषदेदरम्यान महाराष्ट्र स्टॉलला भेट देऊन राज्यातील स्टार्टअप्स, संशोधन प्रकल्प आणि डिजिटल उपक्रमांची माहिती घेतली. महाराष्ट्रातील तरुण उद्योजक आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील नवकल्पनांचा त्यांनी यावेळी विशेष गौरव केला.राज्याच्या सर्वांगीण विकासात एआयचा प्रभावी वापर करण्यासाठी उद्योग, आरोग्य, शेती, मत्स्यव्यवसाय आणि प्रशासन क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.गुगलच्या ‘हेल्थ एआय’ सादरीकरणाला भेटपरिषदेत गुगलच्या बूथला भेट देत मंत्री राणे यांनी ‘हेल्थ एआय’ मॉडेल्सचे सादरीकरण पाहिले. महाराष्ट्रस्थित स्टार्टअप @DimensionNXG यांच्या भागीदारीत विकसित करण्यात आलेल्या या मॉडेल्समुळे AIIMS सारख्या सरकारी रुग्णालयांमध्ये आरोग्यसेवा अधिक वेगवान, अचूक आणि परिणामकारक होऊ शकते, असे त्यांनी नमूद केले. मंत्री राणे यांनी ‘एक्स’ पोस्ट करत म्हटले आहे की, ‘एआयमुळे सरकारी आरोग्य व्यवस्थेत मोठी क्रांती घडू शकते.जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञान निर्मितीत महाराष्ट्रातील स्टार्टअप्स आघाडीवर असल्याचे पाहून अभिमान वाटतो. ही परिषद भारताच्या डिजिटल भविष्याला नवी दिशा देणारी ठरणार आहे’, असे मंत्री नितेश राणे म्हणाले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही परिषदेस उपस्थितीइंडिया एआय इम्पॅक्ट समिट २०२६ या शिखर परिषदेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सहभाग घेतला. आपल्या भाषणात त्यांनी ‘डिजिटल इंडिया’ आणि ‘मेक इन इंडिया’ उपक्रमांमुळे भारताने तंत्रज्ञान क्षेत्रात भक्कम पायाभरणी केली असल्याचे सांगितले. ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट २०२६’ ही परिषद भारताला जागतिक एआय हब बनविण्याच्या दिशेने एक ऐतिहासिक टप्पा ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्रात एप्रिलपासून मतदार याद्यांचे सखोल पुनरावलोकन
निवडणूक आयोगाचे २२ राज्यांच्या निवडणूक अधिकाऱ्यांना लेखी निर्देशनवी दिल्ली : भारतीय निवडणूक आयोगाने देशव्यापी मतदार याद्यांचे सखोल पुनरावलोकन (एसआयआर) जाहीर केले आहे. मतदार यादीचे सखोल पुनरावलोकन प्रक्रिया १२ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये सुरू आहे. आता एसआयआर उर्वरित २३ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये राबविली जाईल. या २३ राज्यांमध्ये महाराष्ट्राचाही समावेश आहे. निवडणूक आयोगाने सर्व २३ राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र लिहून एसआयआरची तयारी सुरू करण्यास सांगितले आहे. एसआयआर १ एप्रिल २०२६ पासून सुरू होऊ शकते.एसआयआरआधीच बिहारमध्ये राबविण्यात आला आहे. देशातील अंदमान व निकोबार, छत्तीसगड, गोवा, गुजरात, केरळ, लक्षद्वीप, मध्य प्रदेश, पुद्दुचेरी, राजस्थान, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये सध्या एसआयआर सुरू आहे. भारतीय निवडणूक आयोगाने १९५१ ते २००४ दरम्यान देशभरात आठ वेळा एसआयआर केले. आता २१ वर्षांनंतर एसआयआर केले जात आहे.एसआयआर का केले जाते? मतदार यादीचे विशेष पुनरावलोकन ही प्रक्रिया केंद्रीय निवडणूक आयोग राबवते. यात प्रत्येक मतदाराची ओळख, वय, पत्ता आणि पात्रता पुन्हा तपासली जाते. बूथ लेव्हल ऑफिसर घरोघरी जाऊन माहिती पडताळतात आणि मतदारांकडून माहितीपत्रक भरून घेतात. पडताळणीनंतर मृत, स्थलांतरित किंवा दुबार नोंदी वगळल्या जातात तसेच नवीन पात्र नागरिकांची नावे समाविष्ट केली जातात. याचा उद्देश मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि पारदर्शक ठेवणे हा असतो.
शेकडो फायटर जेट्स, 2 विमानवाहू जहाजांसह 14 युद्धनौका, पाणबुड्या आणि हजारो किलोमीटर दूरच्या लक्ष्यावर हल्ला करण्यास सक्षम असलेली घातक क्षेपणास्त्रे. 23 वर्षांनंतर मध्यपूर्वेत अमेरिकेचा हा सर्वात मोठा लष्करी जमाव आहे. अमेरिकन मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमेरिकेची तयारी पूर्ण झाली आहे. ट्रम्प यांच्या मंजुरीनंतर पुढील 48 तासांत इराणवर हल्ला होऊ शकतो. तथापि, संकेतानुसार इराणवर 10 दिवसांनंतर 1 मार्च रोजी हल्ला होऊ शकतो. 1 मार्चपर्यंत इराणवर हल्ला का होऊ शकतो? अमेरिकेची संपूर्ण योजना काय आहे? आणि इराण कसा बदला घेईल? आजच्या एक्सप्लेनरमध्ये जाणून घेऊया... प्रश्न 1: अमेरिकन सैन्य इराणला कसे वेढत आहे?उत्तर: सॅटेलाइट इमेजेस, नेव्हल मॉनिटरिंग वेबसाइट्स आणि विविध मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमेरिकन नौदलाने इराणला पाच बाजूंनी वेढले आहे.. पॉइंट-1: अमेरिकेचे नौदलाचे विमानवाहू जहाज USS अब्राहम लिंकन अरबी समुद्रात इराणच्या दिशेने पुढे सरकत आहे. त्याच्यासोबत टोमाहॉक क्षेपणास्त्रांनी सुसज्ज तीन आर्ली बर्क-क्लास डिस्ट्रॉयर आहेत, जे 2500 किलोमीटरपर्यंतच्या लक्ष्यावर हल्ला करण्यास सक्षम आहेत. यूएसएस अब्राहम लिंकन 90 विमाने घेऊन जाते, ज्यात F-35C आणि F/A-18E सुपर हॉर्नेट फायटर जेट्स आणि 5,680 सैनिक तैनात आहेत. हे स्ट्राइक ग्रुप इराणपासून फक्त 700 किलोमीटर आणि ओमानच्या किनाऱ्यापासून 240 किलोमीटर दूर आढळले आहे. पॉइंट-2 : इराणजवळ सर्वात संवेदनशील सागरी व्यापार मार्ग 'हॉर्मुझ स्ट्रेट' जवळ अमेरिकेचे दोन डिस्ट्रॉयर - यूएसएस मिट्सर, यूएसएस मायकल मर्फी आणि एक कॉम्बॅट शिप यूएसएस सांता बार्बरा तैनात आहेत. पॉइंट- 3: इराणजवळ पर्शियन आखातात अमेरिकेची दोन कॉम्बॅट जहाजे USS टुलसा आणि USS कॅनबेरा ठामपणे उभी आहेत. अमेरिकेच्या नौदलाची ही तैनाती इराणची राजधानी तेहरानपासून फक्त 931 किमी दूर आहे. पॉइंट - 4: जगातील सर्वात मोठे विमानवाहू जहाज USS गेराल्ड आर. फोर्ड देखील मध्यपूर्वेकडे पुढे सरकत आहे. त्यासोबत तीन गाईडेड मिसाईल डिस्ट्रॉयर देखील आहेत. USS अब्राहम लिंकनप्रमाणेच हे विमानवाहू जहाज देखील F-35 आणि सुपर हॉर्नेट्ससह सुमारे 90 विमाने आणि सुमारे 4,500 सैनिकांना घेऊन जाते. 19 फेब्रुवारी रोजी हा स्ट्राइक ग्रुप स्पेन आणि मोरोक्को दरम्यान जिब्राल्टरच्या सामुद्रधुनीमध्ये होता. 22 फेब्रुवारीच्या सकाळपर्यंत ते इस्रायलजवळ तैनात होईल.मात्र, अमेरिकेच्या नौदलाने USS गेराल्ड आर. फोर्डवर देखभालीची मागणी केली आहे. ते सलग आठ महिन्यांपासून सागरी ऑपरेशनमध्ये सक्रिय आहे. पॉइंट- 5: यूएस नेव्ही डिस्ट्रॉयर यूएसएस डेल्बर्ट डी. ब्लॅक लाल समुद्रात तैनात आहे. याव्यतिरिक्त, या भागात अनेक अणु पाणबुड्या देखील फिरत आहेत, त्यांची ठिकाणे गुप्त ठेवण्यात आली आहेत. तिसरे विमानवाहू जहाज यूएसएस जॉर्ज एच.डब्ल्यू. बुश, मध्य पूर्वेत पाठवण्याची तयारी सुरू आहे. त्यासोबत किमान दोन गाईडेड मिसाईल डिस्ट्रॉयर असतील. जर हा स्ट्राइक ग्रुप देखील तैनात केला गेला, तर अमेरिकन नेव्हीच्या ताफ्याचा एक चतुर्थांश भाग मध्य पूर्वेत उपस्थित दिसेल. हवाई तैनाती: मिडल ईस्टमध्ये अतिरिक्त फायटर जेट्स, ड्रोन आणि AWACS पोहोचले अमेरिकन वृत्तपत्र वॉल स्ट्रीट जर्नलनुसार, अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही लष्करी तैनाती इराणला काही तासांत झालेल्या 'मिडनाईट हॅमर' ऑपरेशनऐवजी आठवडेभर सतत हल्ले करू शकेल. 22 जून 2025 रोजी अमेरिकेने 'मिडनाईट हॅमर' ऑपरेशन केले आणि तीन इराणी अणु ठिकाणांवर बॉम्ब हल्ला केला. मध्य पूर्वेत अमेरिकेची ही मोठी हवाई जमवाजमव 23 वर्षांनंतर झाली आहे. 2003 मध्ये अमेरिकेने 'इराकी फ्रीडम' ऑपरेशनसाठी मध्य पूर्वेत 863 विमाने तैनात केली होती. यापूर्वी 1991 मध्ये 'डेझर्ट स्टॉर्म' ऑपरेशनमध्ये यूएस एअरफोर्स, नेव्ही आणि मरीन कॉर्प्सची 1,300 विमाने तैनात करण्यात आली होती. ही माहिती एअर अँड स्पेस फोर्सेस मॅगझिनची आहे. प्रश्न 2: इराणवर हल्ला करण्याची अमेरिकेची काय योजना आहे?उत्तर: 18 फेब्रुवारी रोजी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ वर लिहिले, जर इराणने कोणताही करार केला नाही, तर अमेरिकेच्या डिएगो गार्सिया आणि फेअरफोर्ड येथील एअरफिल्डचा वापर करणे आवश्यक होऊ शकते. जेणेकरून धोकादायक सरकारच्या हल्ल्यांना रोखता येईल. हिंदी महासागरातील डिएगो गार्सिया आणि इंग्लंडमधील आरएएफ फेअरफोर्ड एअरबेस ब्रिटन नियंत्रित करते. अमेरिका देखील त्याचा वापर करते. दशकांपासून अमेरिका मध्य पूर्वेवर लक्ष ठेवून आहे आणि येथून लष्करी कारवाई करते. तरीही, ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी अमेरिकेला इराणवर हल्ला करण्यासाठी डिएगो गार्सिया आणि फेअरफोर्डचा वापर करण्याची परवानगी देण्यास नकार दिला आहे. सौदी अरेबिया, यूएई आणि जॉर्डननेही सांगितले आहे की ते इराणवर हल्ल्यासाठी त्यांची जमीन आणि हवाई क्षेत्र वापरण्याची परवानगी देणार नाहीत.अशा परिस्थितीत अमेरिका मध्य पूर्व आणि युरोपातील हवाई तळांवरून आपल्या नौदलाच्या ताफ्याचा वापर करून इराणवर हल्ला करण्याची योजना बनवू शकते. प्रश्न 3: जेव्हा अमेरिकेच्या हल्ल्याची तयारी पूर्ण आहे, तर 1 मार्चची चर्चा कुठून आली? उत्तर: 19 फेब्रुवारी रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा बोर्ड ऑफ पीसच्या बैठकीत म्हटले होते की, पुढील 10 दिवसांत काय होणार आहे हे तुम्हाला कळेल. एकतर आम्ही करार करू, नाहीतर त्यांच्यासाठी ते खूप वाईट असेल. ट्रम्प यांच्या विधानाचा अर्थ असा आहे की इराणसोबतच्या अणुकराराबाबतचा निर्णय 10 दिवसांत घेतला जाईल. जर कोणताही करार झाला नाही, तर त्याचे परिणाम भयंकर असतील. त्यानुसार, इराणला दिलेली अंतिम मुदत 1 मार्च आहे. ट्रम्प म्हणाले की इराण कोणत्याही परिस्थितीत अणुशस्त्रे विकसित करू शकणार नाही. त्याने या प्रदेशातील शांततेला धोका निर्माण करणे थांबवले पाहिजे. द न्यूयॉर्क टाइम्सने अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाचा हवाला देत इराणवर लवकरच संभाव्य हल्ल्याचा दावा केला होता. वृत्तपत्राने म्हटले होते की, मध्य पूर्वेत अमेरिकेची लष्करी तैनाती इतकी वाढली आहे की राष्ट्राध्यक्ष ट्रम्प या आठवड्याच्या अखेरीस म्हणजेच शनिवारपर्यंत हल्ला करण्याचा विचार करू शकतात. दरम्यान, अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो 28 फेब्रुवारी रोजी इस्रायलच्या दौऱ्यावर जाणार आहेत. अमेरिकन वृत्तसंस्था सीएनएनने अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या अधिकाऱ्याचा हवाला देत अहवाल दिला आहे की, रुबियो इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांची भेट घेतील आणि इराणसोबतच्या वाटाघाटींबाबत माहिती देतील. अशा अटकळी आहेत की अमेरिका लवकरच इराणविरुद्ध लष्करी कारवाई सुरू करू शकते. ट्रम्प यांनी याबाबत अद्याप अंतिम निर्णय घेतलेला नाही. दरम्यान, मध्यपूर्वेत अमेरिकेची लष्करी तैनातीही सातत्याने वाढत आहे. प्रश्न 4: अमेरिकेचा सामना करण्यासाठी इराणने काय तयारी केली आहे? उत्तर: अमेरिकेच्या प्रचंड लष्करी जमावामध्ये इराणनेही पुरेशी तयारी केली आहे... प्रश्न 5: अमेरिका आणि इराण यांच्यातील वाद काय आहे?उत्तर: अमेरिका आणि इराण यांच्यातील चार दशकांपासून चाललेल्या खोल शत्रुत्वात विचारधारा आणि सत्तेचे राजकारण यांचा समावेश आहे. या संघर्षाची पाच मुख्य कारणे आहेत... 2. अमेरिकेचे आर्थिक निर्बंध 3. प्रॉक्सी वॉर 4. इस्रायलची सुरक्षा 5. कटुता
दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, २१ फेब्रुवारी २०२६
पंचांगआज मिती फाल्गुन शुक्ल चतुर्थी ०१.०३ पर्यंत नंतर पंचमी शके १९४७.चंद्र नक्षत्र रेवती. योग शुभ.चंद्र राशी मीन ०७.०७ पर्यंत नंतर मेष.भारतीय सौर २ फाल्गुन शक १९४७ शनिवार दिनांक २१ फेब्रुवारी २०२६ मुंबईचा सूर्योदय ०७.०३ मुंबईचा सूर्यास्त ०६.४१ मुंबईचा चंद्रोदय ०९.२४ मुंबईचा चंद्रास्त १०.२२ राहू काळ ०९.५८ ते ११.४५,विनायक चतुर्थी,१३ नंतर चांगलादैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)
टॅरिफ बेकायदा, डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा दणका
न्यूयॉर्क : अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दुसऱ्या देशांवर लादण्यात येत असलेले टॅरिफ बेकायदेशीर ठरवण्यात आले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी विविध देशांवर टॅरिफ लादताना त्यांच्या अधिकारांच्या मर्यादांचे उल्लंघन केल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. या निर्णयातील माहितीनुसार राष्ट्रीय आपत्कालीन स्थितीत लागू करण्यात येणाऱ्या कायद्याचा वापर करत ट्रम्प यांनी टॅरिफ लादले.अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे जागतिक कर (टॅरिफ) बेकायदेशीर घोषित करत रद्द केले. सर्वोच्च न्यायालयाने ६-३ बहुमताने दिलेल्या निर्णयात असे म्हटले आहे की, संविधानानुसार, टॅक्स आणि टॅरिफ लादण्याचा अधिकार राष्ट्राध्यक्षांना नाही, तर फक्त काँग्रेसला आहे. ट्रम्प यांनी शुल्क सुनावणीदरम्यान म्हटले होते की, जर ते केस हरले तर देश उद्ध्वस्त होईल. ट्रम्प यांनी टॅरिफला एक आर्थिक आणि विदेशी धोरणासाठी ढाल म्हणून वापरले. ट्रम्प यांनी हे निर्णय अमेरिकेच्या आर्थिक सुरक्षेसाठी महत्त्वाचे असल्याचे म्हटले होते. न्यायालयाचा हा निर्णय ट्रम्प यांच्या आर्थिक धोरणांना मोठा धक्का मानला जात आहे.एप्रिल २०२५ मध्ये, राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव ट्रम्प यांनी अनेक देशांमधून आयात केलेल्या वस्तूंवर मोठे कर लादले. टॅरिफ म्हणजे असा कर जो एखाद्या विशिष्ट देशातून आयात केलेल्या वस्तूंवर जास्त कर लादतो, ज्यामुळे ते अधिक महाग होतात आणि देशांतर्गत कंपन्यांना फायदा होतो. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सर्वोच्च न्यायालयाने ट्रम्प सरकारच्या शुल्क (टॅरिफ) लावण्याच्या कायदेशीर आधारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यावेळी न्यायाधीशांनी विचारले होते की, राष्ट्राध्यक्षांना अशा प्रकारचे जागतिक शुल्क (टॅरिफ) लावण्याचा अधिकार आहे का. न्यायालयाने या प्रकरणी दीर्घकाळ सुनावणी केली. न्यायालयाने सांगितले की, ट्रम्प १५० दिवसांपर्यंत १५% शुल्क (टॅरिफ) लावू शकतात, परंतु यासाठी ठोस कारणे आवश्यक आहेत. या निर्णयात म्हटले आहे की, ‘इपा’मध्ये ‘टॅरिफ’ या शब्दाचा कुठेही उल्लेख नाही आणि राष्ट्राध्यक्षांच्या अधिकारांवर कोणतीही स्पष्ट मर्यादा निश्चित केलेली नाही.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा परिणामट्रम्प यांचे शुल्क उठवले जाईल.अमेरिकेला कंपन्यांना पैसे परत करावे लागू शकतात.जगभरातील देशांना अमेरिकेला वस्तू विकण्यात दिलासा मिळेल.भारत, चीन आणि युरोपमधील निर्यातदारांना फायदा होईल.बऱ्याच वस्तू स्वस्त होऊ शकतात.शेअर बाजार वाढू शकतात.जागतिक व्यापार अधिक स्थिर होऊ शकतो.ट्रम्प यांनी ४९ वर्षांपूर्वीच्या कायद्याचा वापर केला.ट्रम्प यांच्या विरोधात १२ राज्यांचा खटलाट्रम्प यांनी गेल्या वर्षी एप्रिलमध्ये या शुल्कांची घोषणा केली होती. या शुल्कांविरोधात अमेरिकेतील अनेक लहान व्यावसायिक आणि १२ राज्यांनी खटला दाखल केला आहे. त्यांचे म्हणणे आहे की, अध्यक्षांनी आपल्या अधिकारांच्या बाहेर जाऊन आयात होणाऱ्या वस्तूंवर नवीन शुल्क लावले. अरिझोना, कोलोरॅडो, कनेक्टिकट, डेलावेअर, इलिनॉय, मेन, मिनेसोटा, नेवाडा, न्यू मेक्सिको, न्यूयॉर्क, ओरेगन आणि व्हरमाँट या राज्यांनी लहान व्यावसायिकांसोबत मिळून ट्रम्प सरकारविरोधात हा खटला दाखल केला आहे.
शिक्षण समिती अध्यक्ष होताच राजेश्री शिरवडकर यांच्या टेबलावर पुष्पगुच्छा ऐवजी वह्या,पेन्सिलचा खच
मुंबई (विशेष प्रतिनिधी) :मुंबई महापालिकेच्या शिक्षण समिती अध्यक्षपदी भाजप नगरसेविका राजेश्री शिरवडकर यांची निवड करण्यात आली आहे. प्रतिस्पर्धी पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरण्यात न आल्यामुळे शुक्रवारी निवडणुकीची औपचारिता पार पाडत निवडणूक पिठासीन अधिकारी महापौर रितू तावडे यांनी शिक्षण समिती अध्यक्षपदी राजेश्री शिरवडकर यांच्या नावाची घोषणा केली. शिक्षण समिती अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर शुभेच्छा देण्यासाठी पुष्पगुच्छ किंवा भेटवस्तू न आणता लाँगबूक आणण्याचे आवाहन त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना तसेच हिंतचिंतकांना केले होते. त्यानुसार कार्यकर्त्यांनी त्यांना शुभेच्छा देताना चक्क पुष्पगुच्छ ऐवजी वह्यांची पेन्सिल भेट दिल्या. त्यामुळे नवनिर्वाचित अध्यक्षांच्या टेबलवर चक्क वह्या आणि पेन्सिलचा खच जमा झाला होता.शिक्षण समितीवर बऱ्याच कालखंडानंतर भाजपचा नगरसेवक विराजमान झाला असून भाजपच्या हाती तिजोरीच्य चावीसोबतची शिक्षण व्यवस्थेचीही गुरुकिल्ली आली आहे. पिठासीन अधिकारी महापौर रितू तावडे यांनी नवनिर्वाचित शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांना पुष्पगुच्छ देत त्यांना अध्यक्षपदावर स्थानापन्न केले. शिक्षण समिती अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आपल्या भाषणात राजेश्री शिरवडकर यांनी महानगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांना नव्या शैक्षणिक आव्हानांसाठी सज्ज करण्याकरिता प्रत्येक शाळेत आर्टिफिशियल इंटेलिजन्स लॅबची सुविधा उपलब्ध करण्याच्यादृष्टीने मी व्यक्तिशः लक्ष देऊन प्रशासनाकडे पाठपुरावा करीन असे आश्वासन दिले.तसेच विद्यार्थ्यांमधील विविध कला कौशल्याला वाव देण्यासाठी तसेच त्यांना कौशल्याची माहिती होण्यासाठी महानगरपालिकेने २२० कौशल्य विकास केंद्रे सुरु केली आहेत. आता विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात ही कौशल्य विकास केंद्रे वाढविण्याच्याही सूचना त्यांनी प्रशासनाला केल्या. शिक्षण खात्यातर्फे बालवाडी ते इयत्ता १०वी च्या विद्यार्थ्यांच्या सुदृढ शारिरीक वाढीसाठी पुरक पोषण आहार दिला जातो. यापुढेही विद्यार्थ्यांना दर्जात्मक पोषण आहार मिळेल,याची मी दक्षता घेईन असे नमुद करत विद्यार्थ्यांना देण्यात येणा-या मोफत २७ शालोपयोगी वस्तू शाळेच्या पहिल्या दिवशीच एकत्रितपणे मिळतील अशाप्रकारे नियोजन करण्याच्याही सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. तसेच इयत्ता ५वी ते ८वी च्या विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणविषयक जागरुकता विकसित होण्यासाठी सन २०२६-२०२७ मध्ये प्रशानामार्फत राबविण्यात येणारा 'इको वॉरियर्स' हा उपक्रम स्तुत्य असून त्याचा मी स्वतः पाठपुरावा करीन,असेही नमुद केले.महानगरपालिकेच्या तरतुदीनुसार माध्यमिक शाळांमधील विद्यार्थीनींना साधारणतः नेहमी वापरात असलेले सॅनिटरी नॅपकीन पुरविले जात असून त्याऐवजी पर्यावरणपूरक आणि जैवविघटन होणारे नॅपकीन पुरविण्याबाबत पाठपुरावा करीन. अनुदानित व विनाअनुदानित तत्वावर चालविण्यात येणा-या खाजगी शाळांना मान्यता तथा मुदतवाढ व अनुदानाकरिता विविध समस्यांना तोंड दयावे लागते यामध्ये सुधारणा तथा सुसुत्रता करण्याचा मी प्रयत्न करीन अशीही ग्वाही दिली.हार - पुष्पगुच्छ नकोत; विद्यार्थ्यांसाठी वही - पेन द्याशिक्षण समिती अध्यक्षपदाच्या शुभेच्छा देताना कोणीही हार, पुष्पगुच्छ अथवा अन्य भेटवस्तू आणू नयेत. त्याऐवजी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या उपयोगी ठरणारी पुस्तके, वह्या, लेखन साहित्य किंवा अन्य शैक्षणिक वस्तू शुभेच्छा किंवा भेट म्हणून आणाव्यात, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण समितीच्या अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांनी केले आहे. हार - पुष्पगुच्छ क्षणिक सन्मानाचे प्रतीक असले, तरी विद्यार्थ्यांसाठी दिलेले शैक्षणिक साहित्य त्यांच्या शिक्षण व भविष्यासाठी अधिक उपयुक्त ठरते. या उपक्रमामुळे महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना थेट शैक्षणिक मदत मिळून आवश्यक मूलभूत साधनांची पूर्तता होणार आहे. औपचारिक शुभेच्छांऐवजी शिक्षणात गुंतवणूक करण्याचा हा सकारात्मक व सामाजिकदृष्ट्या उपयुक्त संदेश असल्याचे शिरवडकर यांनी स्पष्ट केले आहे.
मुंबई महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी प्रभाकर शिंदे
ट्रीपल इंजिनाच्या साथीने मुंबईतील विकासकामांना गती देण्याची दिली ग्वाहीमुंबई (विशेष प्रतिनिधी) :मुंबई महानगरपालिका स्थायी समिती अध्यक्षपदी भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक प्रभाकर शिंदे यांची शुक्रवारी २० फेब्रुवारी २०२६रोजी बिनविरोध निवड झाली. या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षाच्यावतीने उमेदवारी अर्ज भरण्यात न आल्याने या एकमेव अर्जाच्या आधारे पीठासीन अधिकारी महापौर रितू तावडे यांनी प्रभाकर शिंदे यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले. घोषणा केली.मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ पार पडल्यानंतर सोमवार, १६ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या महानगरपालिका विशेष सभेत स्थायी समितीवर २६ महानगरपालिका सदस्यांची नामनिर्देशानुसार नियुक्ती करण्यात आली. तर शिक्षण समिती अध्यक्ष हे स्थायी समितीचे पदसिद्ध सदस्य असतात. स्थायी समिती या वैधानिक समितीच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्याकरिता शुक्रवारी २० फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी २.०० वाजता विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. स्थायी समिती अध्यक्षपदासाठी प्रभाकर शिंदे यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे पीठासीन अधिकारी महापौर रितू तावडे यांनी जाहीर केले. त्यानंतर पिठासीन अधिकारी यांनी त्यांना पुष्पगुच्छ देत पुढील वाटचालीस शुभेच्छा देताना स्थायी समिती अध्यक्षपदाच्या खुर्चीवर स्थानापन्न केले.यावेळी आपल्या भाषणामध्ये नवनिर्वाचित स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्र आणि मुंबई महापालिकेत महायुती अशा ट्रीपल इंजिनाच्या साथीने मुंबईतील विकासकामांना गती मिळेल याची ग्वाही देत नागरी कामांकरता केवळ अर्थसंकल्पात तरतूद करणे पुरेसे नसते तर केलेल्या तरतुदींचा उचित आणि विहित वेळेत विनियोग करणे ही बाब प्रशासकीय कामकाजाशी निगडीत आहे. याबबत स्थायी समितीतील माझे सहकारी नगरसेवक यांच्याशी सल्लामसलत करून ही कामे मार्गी लावण्यासाठी मी प्रयत्न करेन अशी ग्वाही दिली.करनिर्धारणातील विविध प्रकारच्या गैरव्यवहारांना आळा घालणारकरपात्र मुल्याविरुध्द घेण्यात आलेल्या आक्षेपांचे निराकरण तातडीने केले जात नाही व त्यामुळे विलंब होतो, अशी सर्व कामे तत्परतेने व्हावी यासाठी कर्मचाऱ्यांना पुरेसे प्रशिक्षण देण्याची गरज आहे,असे मत व्यक्त करत करनिर्धारणासाठी मालमत्तेच्या प्रत्यक्ष क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्र विचारात घेतले जाते तर कधी करनिर्धारणाची तारीख पुढे ढकलून त्या वर्षाची कराची रक्कम वाचवली जाते. अशा करनिर्धारणातील विविध प्रकारच्या गैरव्यवहारांन आळा घालण्यासाठी प्रशासनातील दक्षता विभागाने व महापालिकेचे लेखा परिक्षक यांनीही करनिर्धारणाची छाननी काटेकोरपणे करावी अशाप्रकारची सूचनाही शिंदे यांनी आपल्या भाषणात केली.अनुसूचीमध्ये नामांकित कंपन्यांची अत्याधुनिक औषधे समाविष्ठरुग्णांना तत्पर आणि योग्य औषधोपचार मिळावा याकरता आपल्या औषधांच्या अनुसूचीमध्ये सुप्रसिध्द व नामांकित कंपन्यांची अत्याधुनिक औषधे समाविष्ठ करण्यात यावी अशाप्रकारचीही सूचना त्यांनी प्रशासनाला केली आहे. शहरातील स्थानिक प्रजातींचे वृक्ष तसेच पाणथळ भागातील जलपर्णी इत्यादींचे संरक्षण करण्यासाठी दिर्घकालीन धोरण राबवयाचीही सूचना त्यांनी केली.अग्निशमन दलाने नव्याने उपाययोजना आखाव्यातसेच उत्तुंग इमारती आणि निमुळत्या रस्त्यांमधून मार्ग काढत लागलेल्या आगीवर शक्य तितक्या जलदगतीने नियंत्रण ठेवता यावे याकरता अग्निशमन दलाने नवीन उपाययोजना अमलात आणाव्यात अशाप्रकारच्या सूचना त्यांनी यामाध्यमातून केली.
इंडिया AI इम्पॅक्ट समिट २०२६ मध्ये 'कुंभदूत'एजेंटिक AI संकल्पनेचे सादरीकरण
सिंहस्थ २०२७ पूर्वी टप्प्याटप्प्याने तंत्रज्ञानाचा उपयोगनवी दिल्ली / नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज नवी दिल्ली येथे आयोजित ‘इंडिया AI इम्पॅक्ट समिट २०२६’मध्ये 'कुंभदूत' या एजेंटिक AI आधारित संकल्पनेचे सादरीकरण करण्यात आले. नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांना अधिक सोयीस्कर मार्गदर्शन व सहाय्य मिळावे या उद्देशाने ही संकल्पना सादर करण्यात आली असून, पुढील काळात या प्रणालीचा टप्प्याटप्प्याने 'कुंभदूत' तंत्रज्ञानात उपयोग करण्यात येणार आहे.या कार्यक्रमाला माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार, बंदरे विकास व मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, माहिती तंत्रज्ञान विभागाचे सचिव वीरेंद्र सिंह, नाशिक विभागीय आयुक्त तसेच नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण प्रमुख डॉ. प्रवीण गेडाम आणि कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह यांच्यासह वरिष्ठ अधिकारी व तंत्रज्ञान तज्ज्ञ उपस्थित होते.ही संकल्पना “एजेंटिक कुंभ” या मॉडेलवर आधारित आहे. सोप्या शब्दांत सांगायचे झाले तर, सिंहस्थ २०२७ मध्ये नोंदणीकृत प्रत्येक भाविकाला एक वैयक्तिक एआय सहाय्यक मिळणार आहे. या सहाय्यकाचे नाव “कुंभदूत” असेल. हा कुंभदूत भाविकाला प्रवास, निवास, घाटांची माहिती, आपत्कालीन मदत, पेमेंट, भाषांतर आदी बाबतीत मार्गदर्शन करेल.“एजेंटिक” म्हणजे काय?एजेंटिक म्हणजे असा तंत्रज्ञानाधारित प्रणालीचा वापर, ज्यामध्ये प्रत्येक व्यक्तीचा स्वतःचा डिजिटल सहाय्यक (एआय एजंट) त्याच्या वतीने काम करतो. हा सहाय्यक शासन, आरोग्य सेवा, वाहतूक व्यवस्था किंवा स्थानिक विक्रेते यांच्याशी समन्वय साधतो. मात्र, हे सर्व काम भाविकाच्या परवानगीने आणि गोपनीयता जपून केले जाते. कोणताही केंद्रीकृत डेटाबेस तयार केला जाणार नाही.कुंभदूत एआय सहाय्यक २० पेक्षा अधिक भारतीय भाषांमध्ये कार्य करू शकणार आहे. स्मार्टफोन असो वा साधा फीचर फोन, अगदी कॉल करूनही (IVR प्रणालीद्वारे) भाविक या सेवांचा लाभ घेऊ शकतील. डिजिटल साक्षरता नसलेल्या किंवा वयोवृद्ध भाविकांनाही सोप्या आवाजाच्या माध्यमातून माहिती मिळेल.या प्रणालीमध्ये ‘कुंभ पास’ ही संकल्पना देखील प्रस्तावित आहे. हा पास ऐच्छिक असेल आणि तो डिजीलॉकरमध्ये सुरक्षित स्वरूपात ठेवला जाईल. यामुळे प्रवेश प्रक्रिया, सेवा मिळविणे आणि आपत्कालीन परिस्थितीत मदत करणे अधिक सुलभ होईल.ही संपूर्ण यंत्रणा भारताच्या डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चरवर आधारित असेल. यूपीआयद्वारे पेमेंट, आरोग्य नोंदीसाठी, व्यापाऱ्यांसाठी, तसेच डिजीलॉकर यांचा समन्वय या प्रणालीत असेल. मात्र, भाविकांची वैयक्तिक माहिती केंद्रीकृत स्वरूपात साठवली जाणार नाही. सर्व माहिती ही मर्यादित कालावधीसाठी आणि भाविकाच्या संमतीनेच वापरली जाईल.ही प्रणाली सिंहस्थ काळात १ कोटीपर्यंत भाविकांना आणि लाखो डिजिटल एजंट्सना हाताळण्यास सक्षम असेल. सिंहस्थ २०२७ पूर्वी नाशिकमधील महाविद्यालयांमध्ये १०,००० सहभागींसह पायलट प्रकल्प राबविण्यात येणार आहे .यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, “सिंहस्थ २०२७ हे श्रद्धा आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा संगम ठरणार आहे. एजेंटिक कुंभ ही संकल्पना महाराष्ट्राला जबाबदार आणि नैतिक एआय वापराच्या क्षेत्रात आघाडीवर नेईल.”नाशिक विभागीय आयुक्त तथा कुंभमेळा प्राधिकरण अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम म्हणाले, “सिंहस्थ हा जगातील सर्वात मोठ्या शांततापूर्ण धार्मिक मेळाव्यांपैकी एक आहे. अशा विशाल सोहळ्याचे नियोजन करताना दूरदृष्टी आणि समन्वय आवश्यक असतो. एजेंटिक कुंभ संकल्पनेमुळे गोपनीयता जपत एकत्रित मागणी संकेतांच्या आधारे अधिक अचूक नियोजन करता येईल. यामुळे विविध विभागांमधील समन्वय आणि सेवा वितरण अधिक प्रभावी होईल. ही प्रणाली पारदर्शक आणि समतोल स्वरूपाची असून कोणत्याही कंपनीला विशेष लाभ देणारी नाही.”नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह म्हणाले, “एजेंटिक कुंभमुळे प्रत्येक भाविकाला वैयक्तिक सहाय्य मिळेल. भाषेची अडचण, माहितीचा अभाव किंवा गर्दीतील गोंधळ यामुळे भाविकांना होणारा त्रास कमी होईल. ही प्रणाली नियंत्रणासाठी नव्हे, तर समन्वयासाठी आहे.”‘कुंभदूत' एजेंटिक AI संकल्पनेची प्रमुख वैशिष्ट्ये* प्रत्येक नोंदणीकृत भाविकासाठी वैयक्तिक एआय सहाय्यक* २० पेक्षा अधिक भारतीय भाषांमध्ये आवाजावर आधारित सेवा* स्मार्टफोन, फीचर फोन (कॉल) आणि किऑस्कद्वारे उपलब्धता* ऐच्छिक ‘कुंभ पास’ – डिजीलॉकरमध्ये सुरक्षित साठवण* यूपीआयद्वारे सोपी डिजिटल पेमेंट सुविधा* प्रवास, निवास, घाट, आरोग्य व आपत्कालीन मदत मार्गदर्शन* शासन विभाग, आरोग्य सेवा व व्यापाऱ्यांशी डिजिटल समन्वय* गोपनीयता जपणारी, संमतीवर आधारित प्रणाली* सिंहस्थपूर्व १०,००० जणांसह पायलट प्रकल्प
ती पुन्हा येतेय! मुंबईत नवीन अद्ययावत मोनोरेल लवकरच पुन्हा धावणार...
मुंबई : आधुनिकीकरण करण्यासाठी मुंबईतली मोनोरेलची सेवा सप्टेंबर २०२५ मध्ये बंद करण्यात आली. ही सेवा मे २०२६ किंवा त्याआधी नव्याने सुरू करण्याची घोषणा त्याचवेळी करण्यात आली होती. आता एमएमआरडीएने सोशल मिडिया पोस्ट करून मोनोरेल लवकरच सुरू होणार असल्याचे जाहीर केले आहे. मोनोरेलचे आधुनिकीकरण झाले आहे. तसेच मोनोरेलने आपल्या नवीन रोलिंग स्टॉक आणि CBTC-आधारित सिग्नलिंग प्रणालीसाठी आवश्यक सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त केले आहे. स्वतंत्र सुरक्षा मूल्यांकनकर्ता ही भूमिका पार पाडणाऱ्या 'ब्युरो व्हेरिटास' या जागतिक स्तरावरील चाचणी आणि तपासणी प्रमाणीकरण क्षेत्रातील अग्रगण्य संस्थेने मोनोरेलला सुरक्षा प्रमाणपत्र दिले आहे. हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण टप्पा असून, सुधारित मोनोरेल सार्वजनिक सेवेसाठी सुरू करण्याच्या दिशेने आपण आणखी एक पाऊल पुढे पडले आहे.ती पुन्हा येतेय! नवीन अद्ययावत मोनोरेल लवकरच पुन्हा धावणार...मुंबईकरांनो, आता प्रतीक्षा संपली. नवीन, अधिक सुरक्षित, अधिक स्मार्ट आणि वेगवान मोनोरेल लवकरच आपल्या सेवेत पुन्हा रुजू होणार आहे.आम्हाला सांगताना अभिमान वाटतो की, मोनोरेलने आपल्या नवीन रोलिंग स्टॉक आणि CBTC-आधारित… pic.twitter.com/U3lUbKTuvI— MMRDA (@MMRDAOfficial) February 20, 2026आता पुढील टप्प्यात संपूर्ण १९.५४ किमी मोनोरेल कॉरिडॉरच्या सर्वसमावेशक तपासणीसाठी आणि प्रवासी सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी अंतिम वैधानिक मंजुरी मिळावी, याकरिता सेवानिवृत्त मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांची नियुक्ती केली जाईल. ही प्रक्रिया देखील लवकरच पूर्ण होण्याची अपेक्षा असून, त्यानंतर नवीन आणि सुधारित अद्ययावत मोनोरेल पुन्हा मुंबईकरांच्या सेवेत दाखल होईल.ISA प्रमाणपत्र खालील महत्त्वाच्या टप्प्यांची यशस्वी पूर्तता झाल्यानंतर प्रदान करण्यात आले:उत्पादन सुविधेत नवीन रोलिंग स्टॉकची सविस्तर तपासणीपरिचालन सज्जतेचे मूल्यांकन करण्यासाठी मोनोरेल कॉरिडॉरच्या विविध भागांवर दोन महिने कठोर चाचण्याडिझाइन तपशील आणि सर्वोच्च सुरक्षा मानकांचे पूर्ण पालन सुनिश्चित करण्यासाठी विस्तृत स्टॅटिक आणि डायनॅमिक चाचणीऑसिलेशन चाचण्यांची पूर्तताप्रगत CBTC-आधारित सिग्नलिंग प्रणालीची स्थापना आणि इंटरफेस-स्तरीय चाचणीनवीन 'मेड इन इंडिया' मोनोरेल रेक्सनवीन २१ 'मेड इन इंडिया' मोनोरेल रेक्स हे आधुनिक सुधारणांसह आले आहेत. प्रत्येक ट्रेनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, दिव्यांगांसाठी अनुकूल आसनव्यवस्था, मोबाईल आणि लॅपटॉप चार्जिंग पॉइंट्स, डायनॅमिक मार्ग नकाशे, अधिक सुरळीत प्रवासासाठी सुधारित सस्पेन्शन, अग्निसुरक्षा मानकांचे कठोर पालन करणारे डिझाइन, आधुनिक मेट्रो-शैलीतील अंतर्गत सजावट आणि रिअल-टाईम मॉनिटरिंग व सर्व्हेलन्स प्रणाली आदी सोयीसुविधा आहेत. मुंबईकरांना लवकरच अधिक सुरक्षित, अधिक स्मार्ट आणि अधिक विश्वासार्ह मोनोरेल सेवा उपलब्ध होणार आहे, अशी माहिती एमएमआरडीएने दिली आहे.
पश्चिम रेल्वेवर शनिवार-रविवारच्या मध्यरात्री 'जंबो ब्लॉक'
बोरीवली-दहिसरमध्ये गर्डर लॉन्चिंगमुळे गाड्यांच्या वेळापत्रकात बदलमुंबई (प्रतिनिधी): पश्चिम रेल्वेच्या वसई रोड, विरार आणि बोरीवली उपनगरीय विभागात रेल्वे रूळ, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीसाठी शनिवार आणि रविवार (२१/२२ फेब्रुवारी) च्या मध्यरात्री विशेष जंबो ब्लॉक घेण्यात येणार आहे. यासोबतच बोरीवली आणि दहिसर स्थानकांदरम्यान नवीन पादचारी पुलाचा गर्डर टाकण्याचे कामही केले जाणार असल्याने मेल-एक्सप्रेस आणि स्थानिक गाड्यांवर त्याचा परिणाम होणार आहे.ब्लॉकचा तपशील आणि वेळ:१. वसई रोड - विरार (धीमी मार्गिका): मध्यरात्री ००.१५ ते पहाटे ०४.१५ पर्यंत (४ तास). या काळात धीम्या गतीच्या सर्व गाड्या जलद मार्गावरून चालवल्या जातील.२. बोरीवली - दहिसर (सर्व मार्गिका): मध्यरात्री ०२.१० ते पहाटे ०४.१० पर्यंत (२ तास). नवीन पादचारी पुलाचा गर्डर टाकण्यासाठी हा ब्लॉक असेल.मेल-एक्सप्रेस गाड्यांवर होणारा परिणाम:ब्लॉकमुळे खालील गाड्या विरार, भाईंदर आणि सूरत दरम्यान रोखून धरल्या जातील:बरौनी–वांद्रे टर्मिनस अवध एक्सप्रेस (१९०३८): १ तास उशिराने धावेल.ओखा–मुंबई सेंट्रल सौराष्ट्र मेल (२२९४६): ४५ मिनिटे उशिराने धावेल.भुज–वांद्रे टर्मिनस एसी सुपरफास्ट (२२९०४): २० मिनिटे उशिराने धावेल.प्रवाशांसाठी दिलासा: पश्चिम रेल्वेने स्पष्ट केले आहे की, शनिवारी आणि रविवारी मध्यरात्री हे काम पूर्ण होणार असल्यामुळे रविवार, २२ फेब्रुवारी २०२६ रोजी दिवसा कोणताही मेगाब्लॉक नसेल. त्यामुळे प्रवाशांना रविवारचा दिवसाचा प्रवास विनाअडथळा करता येईल.रात्री वसई रोड आणि विरार दरम्यान रात्रीचा ब्लॉकट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीचे काम करण्यासाठी, शनिवार रात्री वसई रोड आणि विरार स्थानकादरम्यान अप आणि डाउन धीम्या मार्गांवर चार तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे . याव्यतिरिक्त, नवीन पादचारी पुलाचा गर्डर टाकण्यासाठी बोरिवली आणि दहिसर स्थानकांदरम्यानच्या सर्व मार्गांवर रात्री २.१० ते ०४.१०पर्यंत मोठा ब्लॉक घेण्यात येईल. या ब्लॉक कालावधीत, सर्व धीम्या मार्गावरील उपनगरीय गाड्या वसई रोड आणि विरार स्थानकादरम्यान जलद मार्गावर चालवल्या जातील. बोरिवली आणि दहिसर दरम्यान पुलाच्या लॉन्चिंग ब्लॉकमुळे, काही उपनगरीय आणि मेल/एक्सप्रेस गाड्यांवरही परिणाम होईल.१) ट्रेन क्रमांक १९०३८ बरौनी - वांद्रे टर्मिनस अवध एक्सप्रेस विरार आणि भाईंदर स्थानकांदरम्यान १ तास थांबवण्यात येईल .२) ट्रेन क्रमांक २२९४६ ओखा - मुंबई सेंट्रल सौराष्ट्र मेल विरार आणि भाईंदर स्थानकांदरम्यान ४५ मिनिटे थांबवण्यात येईल .३) ट्रेन क्रमांक २२९०४ भुज - वांद्रे टर्मिनस एसी सुपरफास्ट एक्सप्रेस सुरत आणि विरार स्थानकांदरम्यान २० मिनिट थांबवण्यात येईल .४) ट्रेन क्रमांक ९०००६ विरार - चर्चगेट लोकल विरारहून ३:२५ व ३. ४० वाजता निघणारी लोकल विरार येथून १५ मिनिटे उशिराने सुटतील . या ब्लॉक दरम्यान काही उपनगरीय गाड्या रद्द राहतील. या ब्लॉकमुळे रविवार, २२ फेब्रुवारी रोजी पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय विभागात दिवसाच्या वेळेत कोणताही ब्लॉक राहणार नाही.
कोकणच्या लाल मातीला लागली शिमगोत्सवाची चाहूल
ग्रामदैवतांच्या पालख्या, पारंपरिक नृत्यप्रकार, दशावतारी नाट्यप्रयोगांची तयारी अंतिम टप्प्यातरत्नागिरी : कोकणात शिमगोत्सवाची चाहूल लागली असून गावागावांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. पारंपरिक ढोल-ताशांच्या निनादात आणि रंगीबेरंगी मिरवणुकांच्या तयारीत संपूर्ण परिसर दुमदुमू लागला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यांमध्ये शिमगोत्सवाला विशेष महत्त्व आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यांतील गावांमध्ये ग्रामदैवतांच्या पालख्या, पारंपरिक नृत्यप्रकार, तसेच दशावतारी नाट्यप्रयोगांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. कोकणातील शिमगोत्सव हा केवळ धार्मिक नव्हे तर सांस्कृतिक एकात्मतेचा सोहळा मानला जातो. गावांमध्ये होळीकुंडासाठी लाकूडफाटा जमा करण्याची लगबग सुरू झाली आहे. तरुणाईत विशेष उत्साह दिसून येत असून पारंपरिक वेशभूषा, मुखवटे आणि रंगोत्सवासाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदी वाढली आहे. अनेक ठिकाणी भजन, कीर्तन आणि जगराचीही आखणी करण्यात येत आहे. स्थानिक प्रशासनाने सण शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस बंदोबस्त व स्वच्छतेची विशेष तयारी केली जाणार आहे. पर्यटकांचीही कोकणाकडे ओढ वाढण्याची शक्यता असल्याने पर्यटन व्यावसायालाही चालना मिळणार आहे.कोकणवासी चाकरमान्यांच्या सेवेसाठी लालपरीही सज्जकोकणातील शिमगोत्सव हा लोकपरंपरा, श्रद्धा आणि आनंदाचा संगम असून या सणाच्या निमित्ताने गावागावांत बंधुभाव आणि एकोपा अधिक दृढ होताना दिसत आहे. लाखो कोकणी मुंबई, पुणेकर कोकणात येणार असल्याने लालपरीही सज्ज झाली आहे. कोकणात येण्यासाठी सुमारे १९८ जादा फेऱ्या सोडण्याचे नियोजन एसटी महामंडळ करत आहे. होळीच्या काळात प्रवाशांचा प्रवास सुरक्षित, वेगवान, स्वस्त व्हावा यासाठी एसटी महामंडळाने वाढीव फेऱ्या सोडण्याचे नियोजन केले आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या विभागांतून तब्बल १९८ जादा फेऱ्या सोडण्यात येणार आहेत. होळीनिमित्त हजारो प्रवाशांचा प्रवास सुरक्षित, सुलभ व्हावा यादृष्टीने प्रयत्न सुरू असून, या विशेष मोहिमेत सर्वाधिक फेऱ्यांचे नियोजन ठाणे आणि मुंबई विभागांतून करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.कोकण रेल्वे मार्गावर जादा फेऱ्याकोकणासाठी ठाण्यातून ७९ फेऱ्यांचे नियोजन असून, मुंबई विभागातून ६२ फेऱ्या नियोजित आहेत. २५ फेऱ्या गट आरक्षणासाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. पालघर विभागातून २४ फेऱ्या पूर्णपणे गट आरक्षणाच्या माध्यमातून चालवण्यात येणार आहेत. रायगड विभागातून ३३ फेऱ्या होणार असून, त्या सर्व आरक्षित प्रवाशांसाठी उपलब्ध आहेत. या विशेष मोहिमेतील सर्वाधिक गर्दी २८ फेब्रुवारी आणि १ मार्च या दोन दिवशी अपेक्षित आहे. २८ फेब्रुवारी रोजी तब्बल ९१ फेऱ्या, तर १ मार्च रोजी ५९ फेऱ्या नियोजित करण्यात आले आहे. कोकण रेल्वे ही चाकरमानी पुणे व मुंबईकरांसाठी सज्ज झाली आहे. रेल्वेच्या जादा फेऱ्या कोकण रेल्वे मार्गावर सोडण्यात येणार आहे.
शेवट गोड झाला, ऑस्ट्रेलियाचा ओमान विरूद्धच्या शेवटच्या साखळी सामन्यात मोठा विजय
पल्लेकेले : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकप स्पर्धेतील शेवटच्या साखळी सामन्यात ऑस्ट्रेलियाने ओमानचा पराभव केला. या सामन्याचा निकाल ऑस्ट्रेलियाच्या बाजूने लागला तरी त्यांचे वर्ल्डकपमधील आव्हान आधीच संपले आहे, त्यात बदल होणार नाही. ओमान विरुद्धचा सामना नऊ विकेट राखून जिंकत ऑस्ट्रेलियाने यंदाच्या वर्ल्डकपमधील त्यांच्या प्रवासाचा गोड शेवट केला. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकली आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गोलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने ओमानला १६.२ षटकांत गुंडाळले. ओमानने फक्त १०४ धावा केल्या. धावांचा पाठलाग करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने ९.४ षटकांत एक बाद १०८ धावा केल्या. ओमानच्या चार फलंदाजांना बाद करणारा ऑस्ट्रेलियाचा अॅडम झंपा सामनावीर झाला. त्याने ३.२ षटकांत २१ धावा देत चार बळी घेतले. झंपाने हम्माद मिर्झा (१६ धावा), मोहम्मद नदीम (२ धावा), शकील अहमद (३ धावा), शफीक जान (शून्य धावा) या चौघांना बाद केले.ओमानची फलंदाजीप्रथम फलंदाजीसाठी आलेल्या ओमानकडून आमिर कलीमने शून्य, जतिंदर सिंगने १७, करण सोनावलेने १२, हम्माद मिर्झाने १६, वसीम अलीने ३२, मोहम्मद नदीमने २, विनायक शुक्लाने ९, जितेन रामानंदीने १, शकील अहमदने ३, जय ओडेद्राने नाबाद ४, शफीक जॉनने शून्य धावांचे योगदान दिले. ऑस्ट्रेलियाकडून झंपाने ४ तर ग्लेन मॅक्सवेल आणि झेवियर बार्टलेटने प्रत्येकी २, नॅथन एलिस आणि मार्कस स्टोइनिसने प्रत्येकी १ विकेट घेतली.ऑस्ट्रेलियाची फलंदाजीधावांचा पाठलाग करणाऱ्या ऑस्ट्रेलियाकडून सलामीला आलेल्या कर्णधार मिचेल मार्शने ३३ चेंडूत ४ षटकार आणि ७ चौकार मारत नाबाद ६४ धावा केल्या. ट्रॅव्हिस हेडने १९ चेंडूत ६ चौकार मारत ३२ धावा केल्या. त्याला शकील अहमदने स्वतःच्या चेंडूवर स्वतःच झेलबाद केले. जोश इंगलिसने ६ चेंडूत २ चौकार मारत नाबाद १२ धावा केल्या.
Assam Election: प्रियांका गांधींकडून आसाम सरकारविरोधी 20 कलमी ‘जनतेचे आरोपपत्र’प्रसिद्ध
Assam Election: आसाम विधानसभेचा कार्यकाळ २० मे २०२६ रोजी संपत आहे, त्यामुळे त्यापूर्वी नवीन सरकार निवडण्यासाठी निवडणुका होणे अपेक्षित आहे.
Nitesh Kumar Singh : LJP चे नितेश सिंह यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल
लोकजनशक्ती (राम विलास) पक्षाचे कसबा येथील आमदार नितेश सिंह आणि त्यांच्या चार सहकाऱ्यांविरुद्ध पूर्णियामध्ये जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल आणि त्रास दिल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात पुन्हा खळबळ? आता आणखी एक मंत्री राजीनामा देणार?
Maharashtra Politics : मंत्री नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयातील क्लर्कला ५० हजारांची लाच घेताना पकडल्यानंतर आता झिरवळांच्या राजीनाम्याची चर्चा रंगली आहे.
Diabetes : तुम्हाला वारंवार भूक लागते का? सावध व्हा.. मधुमेह असू शकतो, डॉक्टर काय सांगतात?
हे शरीरात मधुमेह किंवा प्री-डायबिटीज सुरू होण्याचे लक्षण आहे. बरेच लोक ही एक सामान्य समस्या मानतात, परंतु त्याकडे दुर्लक्ष करू नये.
Abhishek Sharma : भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मॉर्केल यांनी अभिषेकच्या कामगिरीवर संघात कोणतीही नकारात्मक चर्चा नसल्याचे स्पष्ट केले आहे.
US Supreme Court:
Maharashtra IAS Transfer : राज्यातील बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पहा कोणाची कुठे बदली..
Maharashtra IAS Transfer : महाराष्ट्र शासनाने दोन वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.
आता गुपचूप लग्न शक्य नाही? गुजरातमध्ये विवाह नोंदणीसाठी नवा प्रस्ताव
अहमदाबाद : गुजरातमध्ये विवाहाच्या नोंदणीत काही बदल करण्यात आले आहेत. सध्याच्या नियमांनुसार, विवाहाची नोंदणी करण्यापूर्वी संबंधित जोडप्याने आपल्या आई-वडिलांना माहिती दिली असल्याची नोंद करणे अनिवार्य ठरणार आहे. या निर्णयामुळे कुटुंबीयांच्या नकळत लग्न करण्याच्या घटनांवर आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.गुजरात सरकारने विवाह नोंदणी कायद्यात दुरुस्तीचा प्रस्ताव सादर केला आहे. विशेषतः नियम ४४ मध्ये बदल सुचवण्यात आला असून, हा बदल जनहिताचा असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे. प्रस्तावानुसार विवाह नोंदणी अर्ज करताना आई-वडिलांची सविस्तर माहिती देणे आवश्यक राहील.पालकांना अधिकृत सूचनानव्या प्रक्रियेनुसार, अर्जदार जोडप्याला एक औपचारिक घोषणापत्र सादर करावे लागेल. त्यामध्ये पालकांना विवाहाबाबत माहिती दिल्याचा स्पष्ट उल्लेख करणे आवश्यक असेल. त्याचबरोबर आई-वडिलांचे ओळखपत्र, कायमचा पत्ता आणि मोबाईल क्रमांक नमूद करावा लागेल. कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर सहाय्यक निबंधकांकडून संबंधित पालकांना दहा कामकाजाच्या दिवसांत इलेक्ट्रॉनिक किंवा लेखी स्वरूपात सूचना पाठवली जाणार आहे.ऑनलाइन प्रणाली आणि प्रतीक्षा कालावधीविवाह नोंदणीची संपूर्ण प्रक्रिया राज्याच्या केंद्रीकृत ऑनलाइन पोर्टलवर हलवण्याचा प्रस्ताव आहे. अर्ज सादर केल्यानंतर तत्काळ प्रमाणपत्र देण्याऐवजी ३० दिवसांचा अनिवार्य प्रतीक्षा कालावधी ठेवण्यात येणार आहे. या कालावधीनंतरच नोंदणी प्रमाणपत्र जारी केले जाईल.सरकारने या प्रस्तावावर नागरिकांकडून सूचना आणि हरकती मागवण्यासाठी ३० दिवसांची मुदत दिली आहे. या बदलांमुळे प्रक्रिया अधिक पारदर्शक होणार आहे.
Iran-US tensions: अमेरिका-इराण युद्धाच्या शक्यतेनेच भाराताला मोठा आर्थिक फटका, युद्ध झाल्यास तर….
Iran-US tensions: आंतरराष्ट्रीय बाजारात 'बेंचमार्क ब्रेंट क्रूड'चे दर प्रति बॅरल ७१ डॉलरच्या पार गेले असून, अवघ्या महिनाभरात यात १२ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.
मुंबई : स्वतःला नव्या रूपात सादर करणे, तीव्रता आणि बॉक्स ऑफिसवरील दबदबा याबाबत बोलायचे झाल्यास रणवीर सिंह यांनी वारंवार सिद्ध केले आहे की ते स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे कलाकार आहेत. धुरंधर: द रिव्हेंज च्या प्रदर्शनाची तयारी सुरू असताना पुन्हा एकदा सर्वांच्या नजरा त्या दमदार अभिनेत्याकडे लागल्या आहेत, ज्यांनी पहिल्या भागाला एक मोठी घटना बनवले होते. आणि इंडस्ट्रीतील सुरुवातीच्या चर्चांवर विश्वास ठेवला, तर यावेळी इतिहास आणखी मोठ्या प्रमाणात पुन्हा घडण्याची चिन्हे आहेत. एका प्रकाशनाने दिलेल्या विशेष उद्धरणानुसार, रणवीरच्या पुनरागमनाबाबतचा उत्साह दुर्लक्ष करण्यासारखा नाही.सूत्राने सांगितले, “रणवीर सिंह नक्कीच ट्रेलरचा मुख्य आकर्षण आहे. ‘ल्यारी किंग’च्या भूमिकेसाठी त्यांची स्क्रीन प्रेझेन्स आणि शारीरिक बदल याची अंतर्गत वर्तुळात जोरदार चर्चा आहे. ते एक अशी गंभीरता आणि वजन घेऊन येतात, जे या सिक्वेलला पूर्णपणे नव्या स्तरावर नेईल.”हा दावा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून चाहत्यांमध्ये दिसून येणाऱ्या उत्साहालाच अधिक बळ देणारा आहे. ‘ल्यारी किंग’च्या भूमिकेत रणवीर यांचे सादरीकरण केवळ एक पात्र नसून एक प्रभावी व्यक्तिमत्त्व ठरले आहे. त्यांची दमदार स्क्रीन प्रेझेन्स, तीव्र ऊर्जा आणि लक्षणीय शारीरिक रूपांतरामुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. फॅन थिअरीजपासून ट्रेंडिंग हॅशटॅगपर्यंत सर्वत्र रणवीरच चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत.पहिल्या भागासह रणवीर यांनी केवळ एक हिट चित्रपट दिला नाही, तर एक सांस्कृतिक क्षण निर्माण केला. चित्रपटाने विक्रम मोडले, बॉक्स ऑफिसवर वर्चस्व गाजवले आणि नव्या पिढीसाठी मास एंटरटेनमेंटची नवी व्याख्या तयार केली. त्यांच्या अभिनयाला कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरींपैकी एक मानले गेले, ज्यात कच्ची आक्रमकता आणि भावनिक खोली यांचा उत्कृष्ट मिलाफ होता. संवाद व्हायरल ट्रेंड झाले, अॅक्शन दृश्यांचे फ्रेम-बाय-फ्रेम विश्लेषण झाले आणि त्यांच्या पात्राने ‘कल्ट’ दर्जा मिळवला.आता दुसऱ्या भागासोबत दांव अधिक मोठा आहे आणि मांडणीही भव्य आहे. पहिल्या भागाने त्यांचे वर्चस्व सिद्ध केले असेल, तर सिक्वेल ते कायमस्वरूपी अधोरेखित करण्यासाठी सज्ज असल्याचे दिसते. इंडस्ट्रीतील जाणकारांचे मत आहे की रणवीर यांची गंभीरता आणि परिपक्व अभिनय अपेक्षांवर केवळ खरे उतरणार नाहीत, तर त्या अपेक्षांनाही मागे टाकतील.रणवीर यांना वेगळे ठरवते ती म्हणजे भूमिकेत पूर्णपणे समरस होण्याची त्यांची क्षमता. ‘ल्यारी किंग’साठी त्यांनी केवळ उल्लेखनीय शारीरिक बदल केला नाही, तर अधिकार आणि धोक्याची जाणीव करून देणारे व्यक्तिमत्त्व साकारले. त्यांच्या डोळ्यांतील तीव्रता, संवादफेकीतील नियंत्रित आक्रमकता आणि प्रत्येक फ्रेममधील प्रभाव सूचित करतो की हा सिक्वेल त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात मोठ्या मास ब्लॉकबस्टर टप्प्यापैकी एक म्हणून ओळखला जाईल.पहिल्या भागासह विक्रम मोडल्यानंतर रणवीर आता एका अशा टप्प्यावर उभे आहेत, जिथे ते निर्विवाद स्थान मिळवण्याच्या उंबरठ्यावर आहेत. अभूतपूर्व हायप, चाहत्यांचा प्रचंड उत्साह आणि इंडस्ट्रीचा ठाम विश्वास—या सर्वांच्या जोरावर धुरंधर: द रिव्हेंज हा चित्रपट त्यांच्या पिढीतील सर्वात प्रभावशाली बॉक्स ऑफिस स्टार म्हणून त्यांची ओळख पक्की करणारा ठरू शकतो.
बांग्लादेशींचा शोध महापालिकेच्या प्रकल्प कामांपासूनमुंबई :मुंबई महापालिकेत भाजपची सत्ता आल्यापासून बांग्लादेशी मुस्लिमांविरोधातील मोहिम तीव्र करण्याच्या हालचाली तीव्र करण्यात आल्यानंतर आता भाजपने आपला मोर्चा महापालिकेच्या कामांमधील कंत्राटदार नियुक्त कामगारांकडे वळवला. भाजपच्या गोरेगाव येथील नगरसेविका प्रिती सातम यांनी,मुंबई महापालिकेच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या रस्ते सिमेंट काँक्रिटीकरणसह विविध नागरी सेवा आणि पायाभूत प्रकल्प कामातील कामगारांची ओळख पटवण्यासाठी कागदपत्रांची पडताळणी करण्याची मागणी मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि महापालिका आयुक्त डॉ भुषण गगराणी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. त्यामुळे महापालिकेच्या घरापासून आता भाजपने बांग्लादेशींचा शोध घेण्याचा प्रयत्न सरु केला आहे.मुंबई महापालिकेच्या विविध नागरी सेवा आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये जी कंत्राट कामे देण्यात आली आहेत. त्या कामांमध्ये कंत्राटदार नियुक्त कामगार हा बांगलादेशी मुस्लिम तर नाही ना? हे शोधून काढण्यासाठी प्रत्येक कंत्राटदाराने नियुक्त केलेल्या कामगाराची ओळख पटवण्याचा दृष्टिकोनातून त्या कामगारांच्या कागदपत्राची पडताळणी करणे आवश्यक आहे.त्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्व रस्त्याच्या कंत्राटदारांकडे काम करीत असलेल्या सर्व कामगारांची ओळख व तपासणी करण्यात यावी. यात पश्चिम बंगालमधील मालदा, मुर्शिदाबाद, दिनजापूर उत्तर दक्षिण या तिन जिल्ह्यामधून वितरीत केलेल्या आधार कार्ड धारक कामगारांची सखोल चौकशी करण्यात यावी. आणि ते बांगलादेशी मुस्लीम आहेत की नाही याची चाचपणी तथा पडताळणी करावी अशी त्यांनी निवेदनाद्वारे महापौर आणि आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.अशाप्रकारच्या मोहिमेमुळे महापालिकेच्या प्रकल्प कामांमधील कामगार हे कुठल्या राज्यातून आलेले आहेत? याची माहिती विभागीय स्तरावर महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह स्थानिक नगरसेवक आणि लोकप्रतिनिधींनाही करून देणे शक्य होईल. तरी आपण या तक्रारीच्या अनुषंगाने महापालिका प्रशासनाला आणि पर्यायाने पोलिस प्रशासनाला निर्देश द्यावेत अशी विनंती केली आहे.याबाबत माध्यमांशी बोलतांना प्रिती सातम यांनी माझ्या प्रभाग क्रमांक ५२ मधील साई मार्ग रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण सुरू आहे. या रस्ते कामामध्ये नियुक्त करण्यात आलेल्या कामगारांकडून येणाऱ्या जाणाऱ्या महिलांशी गैरवर्तन केले जात असल्याच्या तक्रारी मला प्राप्त झाल्या होत्या. या अनुषंगाने,मी या रस्त्याच्या कामाची पाहणी करताना, संबंधित कंत्राटदाराला अशा नियुक्त कामगारांची नावे आणि त्यांचे कागदपत्रे मागण्याचा प्रयत्न केला. परंतु ते उपलब्ध होऊ शकले नाहीत. याच रस्ते कामात एक सलीम नावाचा कामगार होता. आणि तीच व्यक्ती महिलांशी गैरवर्तन करत होती, असे माझ्या निदर्शनास आले. या घटनेकडे पाहिल्यानंतर ही समस्या केवळ गोरेगाव पूर्व गोकुळधाम मधील साई मार्ग रस्त्याच्या कंत्राट कामापुरती मर्यादित नसून संपूर्ण मुंबईमध्ये अशा प्रकारे रस्ते कंत्राट आणि विविध नागरी सेवा तसेच पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या कामांमध्ये कंत्राटदार नियुक्त कामगारांच्या बाबतीत आहे, असे मला स्पष्ट जाणवले. त्या अनुषंगाने महापौर आणि आयुक्तांकडे ही मागणी केली आहे. या निवेदनाद्वारे मुंबईतील महापालिकेच्या विविध कंत्राट कामांमध्ये मालदा, मुर्शिदाबाद, दिनजापूर उत्तर -दक्षिण या तिन जिल्ह्यातील बांगलादेशी मुस्लिम मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे या बांगलादेशी मुस्लिम कामगारांच्या शोध घेणे, त्यांना हुडकून काढणे हे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे असल्याने कंत्राट नियुक्त कामगारांच्या कागदपत्रांची तपासणी करून त्यांची ओळख पटवण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Muslim Reservation : रद्द करण्यात आलेल्या मुस्लिम आरक्षणाविरोधात मोठी अपडेट
Muslim Reservation : महाराष्ट्र सरकारने मुस्लिम आरक्षणासंदर्भातील SBC जात प्रमाणपत्रे रद्द केल्यानंतर या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.
कोकणातील आंबा बागायतदारांना शासन मोठ्या प्रमाणात मदत करेल.मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा पिकास नोव्हेंबर महिन्यात सुरुवातीला पाऊस असल्याने त्यास मोहर येण्यास उशीर झाला. त्यानंतर डिसेंबर पासून जिल्ह्यात असणारे सातत्याने कमी तापमान व थंड वातावरणामुळे त्यावर चांगला मोहोर आलेला दिसून आला. त्याचप्रमाणे आता तिसरा मोहोर आल्यानंतर त्यातून किती उत्पन्न आंबा उत्पादक शेतकऱ्यांना मिळेल, याचा भरवसा नाही. त्यामुळे कृषी विभागाने योग्य अहवाल तयार करून तो शासनाकडे तात्काळ सादर करावा, असे निर्देश मत्स्यव्यवसाय, बंदरे तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंब्यावर आलेल्या रोगामुळे झालेल्या नुकसानीबाबत तातडीने उपाययोजना करण्याबाबत पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीस सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे, डॉ.बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे उपकुलगुरू संजय भावे, फलोत्पादन संचालक अंकुश माने, डॉ.बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीचे संशोधन संचालक डॉ.वी.यु.शहारे, वनस्पतीरोग शास्त्रज्ञ विभागाच्या विभागप्रमुख डॉ.पुष्पा पाटील, किटकशास्त्रचे विभागप्रमुख डॉ.विजय देसाई, कृषी विभागाचे अवर सचिव ललितकुमार धायगुडे तसेच आंबा व इतर फळ बागायती शेतकरी संघ, आंबा बागायदार व व्यापारी संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.कोकणातील आंबा पिकांवर मोहोर आला नसल्याने आंबा उत्पादकांचे मोठे नुकसान होणार आहे. त्याचबरोबर, पुढील काळात जर पाऊस आला किंवा उष्णता मोठ्या प्रमाणात वाढली तर आंबा उत्पादकांच्या हाती काहीही पडणार नाही. त्यामुळे आंबा उत्पादकांना ही नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित करून कोकणातील आंबा बागायतदारांना शासन मोठ्या प्रमाणात मदत करेल, असा विश्वास त्यांना आंबा बागायतदारांना दिला.दरम्यान, नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून प्रति आंबा झाड ५ हजार रुपये, यानुसार हेक्टरी सुमारे ५ लाख रुपये इतकी मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तसेच सध्याची पीक कर्ज मर्यादा ३ लाख रुपयांवरून ६ लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात यावी अशी देखील मागणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या सूचना ऐकून त्यावर सकारात्मक तोडगा काढण्याचे आदेश संबंधितांना दिले.कोकणातील आंबा उत्पादकांचे असे नुकसान आजपर्यंत कधीही झाले नाही तसेच कोकणातील शेतकरी कधी आक्रमक झाला नाही असे सांगून पालकमंत्री राणे यांनी कोकणातील आंबा उत्पादकांना शासन सर्वतोपरी मदत करणार असल्याची ग्वाही दिली. त्याचप्रमाणे आंबा पिकांवर वेगवेगळी किटकनाशके फवारणी केल्याने उत्पादनात घट होते. यासाठी धोरण ठरविण्याचीही गरज पालकमंत्री राणे यांनी व्यक्त केली. कोकणातील कृषी विद्यापीठे सक्षम करण्यावर अधिक भर देण्यात येण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. कोकणातील आंब्यांच्या उत्पादनात अधिक प्रमाणात वाढावे यासाठीही परदेशी शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन घेण्याबाबत त्यांनी सकारात्मकता दाखविली.
महाराष्ट्र हळहळला..! ट्रकच्या धडकेत बाप-लेक ठार, मायलेक गंभीर जखमी
Dhule News : धुळे जिल्ह्यातील अवधान गावाजवळ मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात झाला आहे.
Rahul Chahar Divorce : राहुल चाहर आणि त्याची पत्नी ईशानी जोहरचा अधिकृतपणे घटस्फोट झाला असून त्यांच्या ४ वर्षांच्या संसाराला पूर्णविराम मिळाला आहे.
Maharashtra Politics : भाजपमध्ये उभी फूट; काँग्रेसच्या खेळीने महायुतीसह ठाकरे गटाला जबर हादरा
Maharashtra Politics : भिवंडी महापालिकेत मोठा राजकीय भूकंप! भाजपमध्ये उभी फूट पडली असून बंडखोर नगरसेवक नारायण चौधरी यांनी काँग्रेसच्या मदतीने महापौरपद काबीज केले आहे.
संतोष जुवेकरचा मोठा हिंदी प्रोजेक्ट; विकी कौशलनंतर झळकणार 'या'दिग्गज हिंदी कलाकारासोबत
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेला अभिनेता संतोष जुवेकर आता हिंदी चित्रपटसृष्टीतही आपली छाप पाडताना दिसत आहे. विकी कौशलसोबत काम केल्यानंतर आता तो थेट एका मोठ्या दिग्गज कलाकारासोबत स्क्रीन शेअर करणार असल्याने त्याच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.संतोष जुवेकर गेली अनेक वर्षे मालिका, नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मराठीबरोबरच त्याने हिंदी प्रकल्पांमध्येही काम केले आहे. नुकताच तो छावा या हिंदी चित्रपटात झळकला होता. या चित्रपटात त्याने विकी कौशल सोबत काम केले. त्याच्या भूमिकेचे प्रेक्षक आणि समीक्षकांकडून कौतुक झाले, जरी काही सोशल माध्यमांवर त्याला ट्रोलिंगलाही सामोरे जावे लागले.आता संतोष ‘बंदर’ या नव्या हिंदी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तो बॉबी देओल सोबत महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झाला आहे.
नेवासे तालुक्यात अल्पावधीतच सर्वसामान्यांचा आमदार म्हणून ख्याती मिळवणारे विठ्ठलराव लंघे-पाटील यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. हात दाखवा आणि गाडी थांबवा अशी त्यांची स्वतःची खास शैली असून, गोरगरीबांपासून ते सर्वसामान्य नागरिकांपर्यंत थेट रस्त्यावर त्यांच्या समस्या ऐकून घेण्याचा त्यांचा दृष्टिकोन आहे.
Prime Minister’s Residence: यापूर्वी २९ ऑक्टोबर २०२५ रोजी देखील प्रशासनाने पुनर्वसनाची नोटीस बजावली होती. मात्र, रहिवाशांनी या निर्णयाला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले. नोव्हेंबर २०२५ मध्ये न्यायालयाने स्थगिती देताना म्हटले होते की, योग्य कायदेशीर प्रक्रिया पाळल्याशिवाय रहिवाशांना हटवू नये.
या उपक्रमामुळे हिमालयीन सीमेवरील दुर्गम भागात भगवान बुद्धांचे आशीर्वाद पोहोचतील.
Rohit Sharma : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा किताब भारताने गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली जिंकला असला तरी, रोहितने या विजयाचे श्रेय माजी प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या काळात सुरू झालेल्या 'प्रक्रियेला' (Process) दिले आहे.
Jamkhed News : शहरातील आरोळे वस्तीवरील अतिक्रमण नियमित करण्यासाठी सभापतींनी घेतला पुढाकार
जामखेड शहरातील (Jamkhed News) प्रभाग क्रमांक ११ आणि १२ मध्ये गेल्या ५० ते ६० वर्षांपासून वास्तव्य करणाऱ्या शेकडो मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना आजही आपल्याच घरात 'अतिक्रमणदार' म्हणून जगावे लागत आहे.
किया सेल्टोसने ६ लाख युनिट्स विक्रीचा टप्पा गाठला
मुंबई :किया इंडिया या देशातील आघाडीच्या मास-प्रीमियम ऑटोमेकरने जाहीर केले की, सेल्टोसने २०१९ मध्ये लाँच झाल्यापासून भारतात एकूण ६ लाख युनिट्स विक्रीचा टप्पा पार केला आहे. या महत्त्वपूर्ण टप्प्यामधून व्हेरिएण्ट्सप्रती ग्राहकांची, तसेच बाजारपेठांमध्ये शाश्वत स्वीकृती दिसून येते, ज्यासह हे मॉडेल मिड-एसयूव्ही श्रेणीमध्ये सर्वाधिक सातत्यपूर्ण परफॉर्मर ठरले आहे.सुरूवातीपासून सेल्टोसने स्पष्ट उत्पादन तत्त्वासह बाजारपेठेत प्रवेश केला. या वेईकलमध्ये विशिष्ट जागतिक डिझाइन, विविध पॉवरट्रेन पर्याय, तसेच पेट्रोल व डिझेल पर्याय, इंधन प्रकारांमध्ये ऑटोमॅटिक ट्रान्समिशन्स, मोठ्या स्वरूपातील इन्फोटेन्मेंट असलेली वैशिष्ट्य-संपन्न केबिन, कनेक्टेड कार तंत्रज्ञान आणि प्रीमियम इंटीरिअर फिनिशेस् आहेत. श्रेणीमध्ये मोठ्या प्रमाणात उपयुक्ततेला प्राधान्य दिले जात असताना सेल्टोसने केबिनमधील उत्सावहर्धक अनुभव, तंत्रज्ञान एकीकरण आणि व्हिज्युअल आकर्षकता यांवर मुख्यत्वे लक्ष केंद्रित केले.सुरक्षितता आणि तंत्रज्ञानाने स्वीकृतीला चालना देण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. यशस्वी अपडेट्ससह मॉडेलने आपल्या ऑफरिंग वाढवत अॅडवान्स्ड ड्रायव्हर असिस्टण्स सिस्टम्स (एडीएएस), सुधारित कनेक्टीव्हीटी सोल्यूशन्स आणि व्यापक सेफ्टी पॅकेजची भर केली. टॉप ट्रिम्सकडून सतत देण्यात आलेल्या २९ टक्के योगदानामधून निदर्शनास येते की, ग्राहक मोठ्या प्रमाणात उच्च स्तरीय सुरक्षितता, आरामदायीपणा व डिजिटल एकीकरणाचा अवलंब करत आहेत. तसेच एण्ट्री व मिड व्हेरिएण्ट्सप्रती स्थिर मागणीमधून मॉडेलचे संतुलित मूल्य तत्त्व दिसून येते.सेल्टोसने विशेषत: उच्च श्रेणींमध्ये असलेली वैशिष्ट्ये अपल्या किमतीच्या मर्यादेत उपलब्ध करून देत ग्राहकांच्या अपेक्षा वाढवल्या. यामुळे ग्राहकांना हॅचबॅक्स, सेदान्स व कॉम्पॅक्ट एसयूव्हींवरून अपग्रेड करत अधिक प्रीमियम मालकीहक्क अनुभवाचा आनंद घेता आला, ज्यासाठी त्यांना मोठ्या श्रेणीतील वेईकल खरेदी करण्याची गरज भासली नाही. सेल्टोसच्या व्यापक व्हेरिएण्ट ट्रिम्समुळे मूल्याला व वैशिष्ट्यांना महत्त्व देणाऱ्या ग्राहकांसाठी ही वेईकल अनुकूल ठरली.या महत्त्वपूर्ण टप्प्याबाबत मत व्यक्त करत किया इंडियाचे चीफ सेल्स ऑफिसर सनहॅक पार्क म्हणाले , ''६ लाख युनिट्स विक्रीचा टप्पा गाठण्यामधून डिझाइन, सुरक्षितता, तंत्रज्ञान व कार्यक्षमतेमध्ये प्रबळ तत्त्वे देणाऱ्या उत्पादनासाठी ग्राहकांची स्थिर पसंती दिसून येते. सेल्टोसने लाँचच्या वेळी उपलब्ध नसलेली वैशिष्ट्ये व कॉन्फिग्युरेशन्स देत मिड-एसयूव्ही श्रेणीमध्ये अपेक्षा वाढवल्या. व्हेरिएण्ट्समध्ये सतत सुधारणा, तसेच टॉप ट्रिम्ससाठी प्रबळ मागणीमधून प्रगत सुरक्षा यंत्रणा व कनेक्टेड तंत्रज्ञानांमध्ये ग्राहकांचा वाढता आत्मविश्वास दिसून येतो.''नेक्स्ट-जनरेशन सेल्टोस प्रबळ वारसा आणि ग्राहक विश्वासाला अधिक दृढ करते, तसेच कियाचे मुलभूत उत्पादन आधारस्तंभ मोठी उपस्थिती, आकर्षक डिझाइन आणि प्रगतीशील सुरक्षितता व तंत्रज्ञानाला अधिक प्रगत करते. श्रेणीमधील आघडीची ४,४६० मिमी लांबी, १,८३० मिमी रूंदी आणि २,६९० मिमी लांब व्हीलबेससह ही वेईकल आतील बाजूस एैसपैस जागा आणि रस्त्यावर लक्षवेधक उपस्थिती देते. नवीन सेल्टोसमध्ये अद्वितीय आरामदायीपणा, विस्तारित डिजिटल इंटरफेस, अपग्रेडेड एडीएएस सूट आणि सुधारित सेफ्टी आर्किटेक्चर आहे. केबिनमध्ये सुधारणा आणि एकीकृत करण्यात आलेली वैशिष्ट्ये वेईकलच्या दैनंदिन उपयुक्ततेला अधिक वाढवतात, तसेच ग्राहक महत्त्व देणाऱ्या विविध पॉवरट्रेन व ट्रान्समिशन संयोजनांना कायम ठेवण्यात आले आहे.किया इंडिया विकासाच्या भावी टप्प्याच्या दिशेने वाटचाल करत असताना सेल्टोस सुस्पष्ट, सर्वांगीण मूल्य तत्त्व देत कंपनीच्या मिड-एसयूव्ही धोरणाला दिशा देत आहे. ६ लाख युनिट्स विक्रीच्या टप्प्यामधून वेईकलप्रती शाश्वत स्वीकृती दिसून येते. यासह अपग्रेडेड मॉडेल विमान ग्राहकांमध्ये, तसेच व्यावहारिकता व महत्त्वाकांक्षी एसयूव्हीचा शोध घेत असलेल्या नवीन ग्राहकांमध्ये देखील नवीन मागणीला चालना देण्यास सज्ज आहे.
Iran-US tensions: पश्चिम आशियात युद्धाचे ढग! भारत सरकार सतर्क; भारतीयांना मायदेशी परतण्याचे आवाहन
Iran-US tensions:
प्रशासकीय राजवटीतील कामांची श्वेतपत्रिका काढा सर्वपक्षीय नगरसेवकांची मागणी
तत्कालीन आयुक्त, अतिरिक्त आयुक्तांवर टीकेची झोड पिंपरी, दि. २० (प्रतिनिधी) – प्रशासकीय राजवट असताना अधिकारी मस्तवालपणे काम करत होते. तत्कालीन आयुक्त शेखर सिंह आणि अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी मोठ्या प्रमाणावर चुकीची कामे केली. त्यांच्यामुळे महापालिकेचे दायित्व वाढले असून पालिकेची अवस्था दयनीय झाली. भ्रष्टाचार करत ठेकेदारांना काम केलेले नसताना देखील बिले देण्यात आली. शंभर […]
AI Summit 2026 : एआय समिटमध्ये युवक काँग्रेसकडून आंदोलन; 10 जणांना घेतलं ताब्यात
राजधानीतील प्रगती मैदान येथील भारत मंडपम मध्ये सुरू असलेल्या जागतिक एआय इम्पॅक्ट समिटमध्ये (AI Summit 2026) शुक्रवारी दुपारी मोठा गोंधळ पाहायला मिळाला.
२२ आणि २३ फेब्रुवारी रोजी होणार मुंबईत एआय फॉर अॅग्री २०२६ जागतिक परिषदमुंबई : “कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकऱ्याला जागतिक तंत्रज्ञानाची माहिती व्हावी,नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर शेतीमध्ये व्हावा. ‘महाराष्ट्र कृषी-कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण २०२५-२०२९’ धोरणातंर्गत ‘जागतिक कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद आणि गुंतवणूकदार शिखर संमेलन’(एआय फॉर ॲग्री २०२६) ही परिषद येत्या २२ आणि २३ फेब्रुवारी रोजी मुंबईत जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित करण्यात आली आहे. कृषि क्षेत्रातील जागतिक तज्ज्ञ, कृषी आणि संलग्न क्षेत्रातील नवे स्टार्टअप, गुंतवणूकदार,वित्तीय संस्था यामध्ये सहभागी होणार आहेत अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.एआय फार ॲग्री २०२६ ही परिषद वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम,एफएओ,युएनडीपी,आयएफएडी, वर्ल्ड बँक समूह, आशियाई विकास बँक (ADB), इंटरनॅशनल क्रॉप्स रिसर्च इन्सिटीट्यूट फॉर इी सेमी ॲरीड ट्रापीक्स(ICRISAT), भारतीय विज्ञान संस्था (IISc), एम. एस. स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशन (MSSRF) जागतिक व राष्ट्रीय भागीदारांच्या सहकार्याने आयोजित करण्यात येत आहे.दिनांक २२ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.०० ते १० या वेळेत नोंदणी करण्यात येईल.सकाळी १० ते ११.२० या वेळेत कृषि प्रदर्शनाचे उदघाटन होईल. जस्मीन हॉल येथे कृषि क्षेत्रात जबाबदार एआयचा वापर करून लिंग आधारित डिजिटल दरी भरून काढणे मिटींग रुम २०४ मध्ये ‘कृषी उत्पादनासाठी सार्वजनिक पायाभूत सुविधा (DPI): लोकसंख्येच्या प्रमाणात अंमलबजावणी “ आणि मिटींग रूम २०२ मध्ये ‘संस्थात्मक वित्तपुरवठा माध्यमातून संरचनात्मक आराखडा तयार करूनएआय फॉर ॲग्रीला गती देणे “या तीन विषयावर एकाच वेळी चर्चासत्र होतील.सकाळी ११.२० ते ११.३० या वेळेत कृषि प्रदर्शनाचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते होईल.सकाळी ११.३० ते १ वाजून ५ या वेळेत इन्फोसिस आणि आधार कार्डचे जनक सह-संस्थापक नंदन निलेकणी, केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री पियुष गोयल, केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय सचिव देवेश चतुर्वेदी, मुख्य सचिव. राजेश अग्रवाल, जागतिक बँकेचे कार्यकारी संचालक परमेश्वरन अय्यर , डिजीटल एफएओचे मुख्य जनसंपर्क अधिकारी देजान जाकोवेजिक, सीफोरआयर इंडिया वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे मुख्य सल्लागार जे. सत्यनारायण , आयएफएडीच्या आयसीटीच्या तांत्रिक कायदेशीर सल्लागार बेंड्रा गुंडे,युनडीपीच्या निवासी सल्लागार डॉ.ॲजेला लुसिगी यांची व्याख्यान होणार आहेत.दुपारी २ ते २.५० या वेळेत एच. टी. पारेख फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक एस. पारेख,केंद्रीय कृषी आणि कुटुंब कल्याण मंत्रालय महासंचालक, आयसीएआर आणि सचिव (डीएआरई) डॉ. मांगी लाल जाट, इंडिया अल मिशन, अतिरिक्त मिशन संचालक आणि सीईओ अभिषेक सिंह,एडीबी इंडिया रेसिडेंट मिशन श्रीमती मियो ओका कंट्री डायरेक्टर, कंट्री संचालक मिया ओका,यूएन वुमनच्या कंट्री रिप्रेझेंटेटिव्ह इंडिया श्रीमती कांता सिंह यांची व्याख्यान होतील.कार्यक्रमाचे उद्घाटन दुपारी ३ ते ४.१० या वेळेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे डॉ. जितेंद्र सिंह,कृषि मंत्री दत्तात्रय भरणे,इंडिया एआय मिशनचे अतिरिक्त सचिव व मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक सिंह,अपर मुख्य सचिव (कृषी) विकास चंद्र रस्तोगी यांच्या उपस्थितीत होणार आहे. महाएजिक्स , भिली आदिवासी भाषा मोठ्या भाषा मॉडेल (LLM) चे लाँचिंग इव्हेंट, महाविस्तार व्हॉइस टेलिफोनी , वनस्पतींचे कीटक व रोग ओळख या विषयी सामन्जस्य करार होणारदुपारी ५ ते ५.३० या वेळेत जस्मीन हॉल येथे मूल्य साखळी ओलांडून : समावेशकता, शाश्वतता आणि कार्यक्षमता वाढवणे , मिटींग रूम २०४ येथे एफॉर ॲरन साठी सामायिक डिजिटल पाया निधीची तरतूद करणे, मिटींग रूम २०२ येथे “स्टॉर्टअप साठी नव्या संधी “ या विषयावर व्याख्यान होतील.दुपारी ५.३० ते ७.३० या वेळेत “महाराष्ट्र कृषी डेटा एक्सचेंज : सुरक्षित, कृषी नवोपक्रमाला गती देणे, “एफपीओ शेतीमधील स्टार्टअप्ससाठी प्रवेशद्वार”या विषयावर मिटीम रूम २०४ येथे व्याख्यान होतील. एआय कन्व्हर्जन्स मार्ग: उदयोन्मुख तंत्रज्ञान या विषयावर मिटींग रूम २०२ मध्ये व्याख्यान होतील.संध्याकाळी ७.३० ते ९.०० वाजता सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.दिनांक २३ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० ते ११.३० या वेळेत सकाळी १०.३० ते ११.३० या वेळेत जॅस्मिन हॉल येथे “कृषी क्षेत्रातील डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि डिजिटल सार्वजनिक यांची जागतिक स्थिती” या विषयावर त्याचवेळी मीटिंग रूम २०४ मध्ये “डिजिटल कृषी वित्तीय मॉडेल्सचा विस्तार” या विषयावर तर मीटिंग रूम २०२ मध्ये “ “समानतेसाठी कोडिंग : लिंग-आधारित कृषी-एआय परिसंस्थेसाठी धोरणात्मक उपाय” या विषयावर चर्चा होणार आहे.दुपारी १२ ते १ या वेळेत जॅस्मिन १ सभागृहात “कृषी-एआय भविष्यकालीन गुंतवणूक : गुंतवणूक, बाजारपेठ व विस्तारक्षम नवकल्पना” या विषयावर ,मीटिंग रूम २०४ मध्ये “सुरक्षा, पारदर्शकता व जोखीम व्यवस्थापन यंत्रणा” या विषयावर, तर मीटिंग रूम 202 मध्ये “दूरसंवेदन व स्थानिक बुद्धिमत्तेद्वारे मोठ्या प्रमाणावर कृषी परिवर्तन” या विषयावर चर्चा होणार आहेत.दुपारी २.०० ते ३.०० या वेळेत जॅस्मिन 1 सभागृहात “जागतिक एआय-सक्षम कृषी संशोधन नेटवर्कची उभारणी”या विषयावर,. मीटिंग रूम २०४ मध्ये “‘तिच्यासाठी सह-रचना’ : भारत व जागतिक स्तरावर महिला शेतकऱ्यांसाठी समावेशक एआय उपाय” या विषयावर. तर मीटिंग रूम 202 मध्ये “कृषी क्षेत्रातील जनरेटिव्ह एआय” या विषयावर चर्चा सत्र होणार आहेत. दुपारी ३.३० ते ५.०० या वेळेत ‘गुंतवणूक चर्चा’,सायंकाळी ५.०० ते ५.३० या वेळेत समारोप सत्र, एआयफॉर अॅग्री २०२७ परिषदेच्या थीमची घोषणा करण्यात येणार आहे.
प्रतिष्ठेचा ‘इंका अवॉर्ड्स’ १५ व १६ एप्रिल रोजी मुंबईत
मुंबई : इंडियन नॅशनल सिने अकॅडमी अवॉर्ड्स (INCA Awards) यांच्या पहिल्या पर्वाची अधिकृत घोषणा करण्यात आली असून, हा भव्य सोहळा १५ आणि १६ एप्रिल रोजी मुंबईत संपन्न होणार आहे.भारतामधील १२ प्रमुख चित्रपट उद्योगांना एका समान व्यासपीठावर आणणारा ‘इंका’ हा देशातील पहिला राष्ट्रीय चित्रपट अकॅडमी मंच आहे. भाषाभेद, प्रांतिक सीमारेषेच्या चौकटी ओलांडून, भारतीय सिनेमाची व्यापकता, वैविध्य आणि जागतिक स्तरावरील महत्त्व यांचा एकत्रित व समतोल सन्मान करण्याचा हा दूरदृष्टीपूर्ण स्तुत्य उपक्रम आहे. भारतीय चित्रपटसृष्टीच्या सांस्कृतिक एकात्मतेला संस्थात्मक स्वरूप देणारा हा उपक्रम अतिशय महत्वपूर्ण टप्पा ठरणार आहे.‘इंका’ची संकल्पना सेलिब्रिटी क्रिकेट लीग (CCL) आणि साउथ इंडियन इंटरनॅशनल मूव्ही अवॉर्ड्स (SIIMA) संबंधित उपक्रमांचे संस्थापक व मार्गदर्शक यांच्या संकल्पनेतून साकारली असून, या उपक्रमाचे नेतृत्व विष्णू वर्धन इंदुरी करत आहेत. प्रोड्यूसर्स गिल्ड ऑफ इंडिया (Producers Guild of India) हे या उपक्रमाचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे ‘इंका’ला संस्थात्मक विश्वासार्हता, व्यापक दृष्टी आणि जागतिक स्तरावरील अकॅडमींच्या तोडीचा दर्जा प्राप्त झाला आहे. पहिल्या ‘इंका अवॉर्ड्स’चे प्रस्तुत प्रायोजक म्हणून कल्याण ज्वेलर्स सहभागी झाले आहेत. उत्कृष्टता, परंपरा आणि विश्वास या समान मूल्यांवर आधारित ही भागीदारी ‘इंका’च्या भव्यतेला अधिक बळ देणारी ठरणार आहे.‘इंका’ची रचना अकॅडमी-शैलीतील सन्मान प्रणालीवर आधारित असून, पारदर्शकता, तज्ज्ञांकडून मान्यता आणि विश्वसनीयता हा याचा गाभा आहे. १२ भारतीय भाषांतील प्रत्येक चित्रपट उद्योगासाठी सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या प्रमुख पुरस्कारांचा समावेश असेल. तसेच दिग्दर्शन, अभिनय, संगीत, तांत्रिक कौशल्य आणि पदार्पण अशा विविध राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारांद्वारे प्रांतिक अभिमान आणि राष्ट्रीय उत्कृष्टतेचा सन्मान केला जाईल.२०२५ वर्षात प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटांसाठी ‘इंका’तर्फे निर्माते आणि दिग्दर्शकांना अधिकृत प्रवेशिका सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.•पात्रता: १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ दरम्यान प्रदर्शित मराठी चित्रपट•अंतिम दिनांक: १ मार्च २०२६•नोंदणी संकेतस्थळ: www.INCA.in‘इंका’ हा केवळ पुरस्कार सोहळा नाही; तो भारतीय चित्रपटसृष्टीच्या एकात्मिक सांस्कृतिक अभिव्यक्तीचा राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वपूर्ण उपक्रम आहे.
DA Hike: होळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी! पगार वाढणार; जाणून घ्या संपूर्ण गणित
DA Hike: रकार पुढच्या आठवड्यात महागाई भत्त्यात २ टक्क्यांची वाढ जाहीर करण्याची शक्यता आहे. यामुळे कर्मचाऱ्यांचा एकूण महागाई भत्ता ५८ टक्क्यांवरून ६० टक्क्यांवर पोहोचेल.
MP Ricky AJ Singkon : धक्कादायक! मैदानात फुटबॉल खेळताना अचानक खासदारच निधन; लोकनेत्याचा करुण अंत
MP Ricky AJ Singkon : १९ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी डॉ. रिकी सिंग्कोन हे मावलाई मावियोंग येथील मैदानावर मित्रांसोबत फुटबॉल खेळत होते. खेळाचा आनंद लुटत असताना अचानक ते जमिनीवर कोसळले.
काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी वाड्रा (Priyanka Gandhi) यांनी शुक्रवारी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी कथित पाकिस्तान संबंधांवरून गौरव गोगोईंवर हल्ला केल्याबद्दल टीका केली आणि त्यांच्या कुटुंबाला आणि मुलांना त्यात ओढणे हे चुकीचे राजकारण आहे, असे प्रतिपादन केले.
Stock Market: सेन्सेक्स 317 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 1.73 लाख कोटींची वाढ
Stock Market: या तेजीमुळे अवघ्या एका दिवसात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत १.७३ लाख कोटी रुपयांची भर पडली असून, बीएसईवरील कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल ४६६.९५ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
Jharkhand Assembly : झारखंड विधानसभेत एसआयआरवरून वाद; सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये राडा
झारखंड विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विशेष सघन सुधारणा मुद्द्यावरून (एसआयआर) सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये जोरदार वाद झाला.
अहिल्यानगर हादरलं! अल्पवयीन मुलीला उचलून जंगलात नेलं आणि सलग ५ दिवस...
अहिल्यानगर : राज्यातील अहिल्यानगर जिल्ह्यातून एक लव्ह जिहादचं धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. राहुरी तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचं अपहरण तिला जंगलात नेण्यात आलं. सलग पाच दिवस जंगलात तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले.नेमकं घडलं काय ?मुलगी कॉलेजला जाते असं सांगून १३ फेब्रुवारी रोजी घराबाहेर पडली ती घरी परतलीच नाही. पालकांनी तात्काळ आपली मुलगी हरवल्याचे राहुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. आणि काही दिवसातच पोलिसांनी तांत्रिक गोष्टींच्या आधाराने मुलीची सुटका केली.जंगल परिसरातून पोलिसांची सुटका राहुरी परिसरातून गायब झालेली मुलगी नाशिक सुरत रोड लगत असणाऱ्या रामशेज किल्ला परिसरातील जंगलात सापडली. सतत ५ दिवस ३ नराधमांनी केलेल्या अत्याचारामुळे मुलीची परिस्थिती अगदीच खराब झाली होती. तांत्रिक विश्लेषण, मोबाईल लोकेशन ट्रॅकिंग आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी जंगलातून मुलीची सुटका केली.आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी या प्रकरणात मुख्य आरोपी मुफ्तार हैदर पठाण, कौसर हैदर पठाण, आकाश शरद संसारे यांना पोलिसांनी अटक केली आहे. पीडितेच्या जबाबानुसार पोक्सो आणि लैंगिक अत्याचाराची कलमे लावण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
‘भूत बंगला’मध्ये अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेअर करणार मिथिला पालकर; कोणती भूमिका साकारणार?
मिथिला पालकर साकारणार अक्षय कुमारची बहीण; ‘भूत बंगला’मध्ये खास भूमिकामुंबई : ‘भूत बंगला’ हा 2026 मधील सर्वाधिक प्रतिक्षित चित्रपटांपैकी एक मानला जात आहे. यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे बॉलिवूडची ‘ओजी’ जोडी — अक्षय कुमार आणि प्रियदर्शन — यांची तब्बल १६ वर्षांनंतर होणारी दमदार पुनरागमन. बालाजी मोशन पिचर्सच्या बॅनरखाली तयार होत असलेल्या या चित्रपटाने या जोडीच्या आयकॉनिक कॉमेडी चित्रपटांवर वाढलेल्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केली आहे. त्यांच्या खास विनोदशैलीचा आणि खळखळून हसवणाऱ्या जादूचा अनुभव पुन्हा मोठ्या पडद्यावर घेण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत.या प्रतिक्षेत आणखी भर घालत अक्षय कुमार यांनी नुकतेच चित्रपटाच्या कलाकारांमध्ये एका नव्या नावाची भर घातली आहे — मिथीला पालकर . अक्षय यांनी सांगितले की, मिथिला या चित्रपटात त्यांच्या बहिणीची भूमिका साकारणार आहेत. या फ्रेश कास्टिंगमुळे कथेत एक नवा ट्विस्ट आला असून, आता चाहत्यांना या दोघांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री पाहण्याची उत्सुकता लागली आहे.https://www.instagram.com/p/DU8WkVyiLj_/?igsh=MWZnN3lseXI1ZHMyMw==अक्षय कुमार म्हणाले, “मिथिलाने तिचा प्रवास इंटरनेटपासून सुरू केला आणि आज ती अनेक चित्रपटांमध्ये काम करत आहे. आणि लवकरच ती एका अशा अभिनेत्यासोबत दिसणार आहे ज्याला मी खूप चांगले ओळखतो — ओळखा पाहू कोण? मी स्वतः! ‘भूत बंगला’मध्ये मिथिला ‘भूत’ नाही, तर माझ्या बहिणीची भूमिका साकारणार आहे.”चाहत्यांमध्ये ‘भूत बंगला’बद्दल प्रचंड उत्साह आहे. हा चित्रपट केवळ अक्षय आणि प्रियदर्शन यांच्या जोडीचे पुनरागमनच नाही, तर एक परिपूर्ण फॅमिली एंटरटेनर ठरणार आहे. यात भरपूर विनोद, मजेशीर गोंधळ आणि भावनिक क्षणांचा संगम पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांना अक्षय कुमार त्यांचा जुना अंदाज आणि जबरदस्त कॉमिक टायमिंगसह पाहण्याची अपेक्षा आहे, तर प्रियदर्शन यांचा खास देसी टच पुन्हा अनुभवायला मिळणार आहे.बालाजी मोशन पिचर्स आणि केप ऑफ गुड फिल्म्स यांच्या बॅनरखाली तयार होत असलेल्या या चित्रपटात अक्षय कुमार यांच्यासोबत वामिका , परेश रावल , तब्बू आणि राजपाल यादव यांसारखे दिग्गज कलाकारही झळकणार आहेत. या चित्रपटाचे निर्माते अक्षय कुमार, शोभा कपूर आणि एकता कपूर आहेत. तयार राहा — ‘भूत बंगला’ १० एप्रिल २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला सिनेमागृहांत येणार आहे!
वेस्ट बँकेमध्ये इस्रालींकडून 19 वर्षीय पॅलेस्टिनी युवकाची हत्या
वेस्ट बँकेमध्ये इस्रायली स्थानिकांकडून १९ वर्षीय पॅलेस्टिनी-अमेरिकन युवकाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. वेस्ट बँकेतल्या एका गावावर केलेल्या हल्ल्यादरम्यान इस्रायली स्थानिक आणि गावकऱ्यांमध्ये संघर्ष झाल्यावर या युवकाला गोळ्या घालून मारण्यात आले
मुळा धरणाच्या लाभक्षेत्रातील मुळा उजव्या कालव्या वरील शेतकऱ्यांची पाण्याची मागणी लक्षात घेवून रब्बी हंगाम दोन साठी २३ फेब्रुवारी २०२६ पासून आवर्तन सुरू करण्याच्या सूचना जलसंपदा तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
ऐतिहासिक पाऊल! छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘या’किल्ल्यांवर संशोधन होणार; सरकारकडून ५० लाखांची तरतूद
Sindhudurg Fort : शिवजयंती निमित्त राज्य सरकारने मालवणमध्ये ४ ऐतिहासिक सागरी किल्ल्यांच्या अभ्यासासाठी स्वतंत्र संशोधन केंद्र स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे.
जम्मू-काश्मीरच्या फलोत्पादन उद्योगाचे रक्षण करण्यासाठी अमेरिकन सफरचंदांवर किमान ५० टक्के आयात शुल्क लागू करावे.
कानिफनाथ यात्रेत वादाची ठिणगी; मुस्लिम व्यावसायिकांची दुकाने करणार बंद
अहिल्यानगर : राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि भटक्यांची पंढरी म्हणेजच श्री क्षेत्र मढीची कानिफनाथ यात्रा. याच यात्रेवरून आता हिंदू- मुस्लिम ही वादाची ठिणगी पेटली आहे. देवाची यात्रा म्हटल्यावर बरीच दुकाने या यात्रेत लावली जातात. लहानमुलांच्या खेळण्यापासून ते कपड्यांपर्यंतची दुकाने या यात्रेत लावलेली असतात. परंतु मढी ग्रामपंचायत मुस्लिमांना दुकाने लावू देणार नाही. या आपल्या जुन्या भूमिकेवर ग्रामपंचायत ठाम राहिली आहे. यात्रेपूर्वीच ही भूमिका जाहीर केल्याने यात्रेपूर्वीच हा वाद रंगला आहे.नेमकं घडलं काय ? दरवर्षीच रंगपंचमीच्या मुहूर्तावर मढी येथे मोठी कानिफनाथ महाराजांची मोठी यात्रा भरते. मात्र गेल्या काही वर्षापासून या वादाला हिंदू मुस्लिम या भेदभावाची कीड लागली आहे.त्याचवेळी ग्रामपंचायतीने मुस्लिम व्यासायिकांसोबत यात्रेत व्यवसाय करण्यास मनाई करणारा निर्णय मंजूर केला होता. यात्रेत मुसलमांना दुकान लावू देणारच नाही असा निर्धार हिंदू गावकऱ्यांनी केला आहे. या निर्णयामुळे इतका मोठा गदारोळ झाला की वाद थेट न्यायालयाच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचला आहे. न्यायालयाने अद्याप यावर कोणताही अंतिम निकाल दिलेला नसला तरी गावकरी आपल्या मतावर ठाम असल्याची माहिती आहे.सरपंचाची आक्रमक भूमिका सरपंचानी स्पष्ट केले आहे की, ग्रामपंचायत आपल्या निर्णयावर ठाम असून यंदाही मुस्लिम व्यावसायिकांना यात्रेत जागा दिली जाणार नाही.कानिफनाथ महाराजांच्या दर्शनाला अनेक भाविक हे राज्यभरातून येत असतात. भली मोठी यात्रा आणि त्यात होणारा हा हिंदू मुस्लिम वाद यामुळे सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि पोलीस दल सतर्क झाले आहे
मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आटोपटाचा रिपब्लिकन पक्षाने (आठवले गट) मुंबईतील आपल्या संघटनात्मक रचनेत मोठे फेरबदल करण्याचे संकेत दिले आहेत. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार मुंबईतील सर्व तालुका आणि वॉर्ड कमिट्या तातडीने बरखास्त करण्यात आल्या आहेत. येत्या ५ एप्रिलपर्यंत या सर्व स्तरांवर निवडणुका घेऊन नवीन कार्यकारिणी जाहीर करण्याचे आदेश आठवले यांनी दिले असल्याची माहिती पक्षाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ कासारे यांनी शुक्रवारी दिली.आझाद मैदानातील पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत कासारे बोलत होते. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे यांच्यासह मुंबई प्रदेशातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. मुंबईतील पक्षसंघटनेत नवचैतन्य निर्माण करण्यासाठी आणि तरुण रक्ताला संधी देण्यासाठी हा व्यापक निर्णय घेण्यात आल्याचे कासारे यांनी स्पष्ट केले.पक्षाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील सर्व वॉर्ड आणि तालुका अध्यक्षांची निवड लोकशाही मार्गाने म्हणजेच निवडणुकांद्वारे केली जाणार आहे. त्यासाठी येत्या २५ फेब्रुवारीपासून संपूर्ण मुंबईत विशेष पक्षसदस्य नोंदणी मोहीम राबवण्यात येईल. या मोहिमेत नोंदणी केलेल्या क्रियाशील सदस्यांनाच वॉर्ड आणि तालुका कमिटीच्या निवडणुकीत सहभागी होता येणार आहे. ५ एप्रिल ही या प्रक्रियेची अंतिम मुदत ठरवण्यात आली आहे.
Mohammad Amir Prediction : पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर सध्या आपल्या वादग्रस्त विधानांमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीबाबत भाकीत करताना आमिरने चक्क भारतीय संघाला बाहेर ठेवून सर्वांना धक्का दिला आहे.
Shirur News : सेंट जोसेफ इंटरनॅशनल स्कूलचा डान्स स्पर्धेत दुहेरी जलवा, दोन स्पर्धांत प्रथम क्रमांक
शिरूर शहरातील (Shirur News) सेंट जोसेफ इंटरनॅशनल स्कूल ने सांस्कृतिक क्षेत्रात आपली दणदणीत छाप उमटवत सलग दोन प्रतिष्ठित डान्स स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक पटकावून मानाचा तुरा रोवला आहे.
Milk Price Hike : गोकूळ महासंघाकडून दूध दरात वाढ; ग्राहकांना झटका, प्रतिलिटर किती वाढले दर?
Milk Price Hike : कोल्हापूरच्या गोकूळ दूध महासंघाने दूध दरात मोठी वाढ जाहीर केली आहे.
Dhule News : धुळे हादरलं ! एका शुल्लक कारणावरून तिघांची निर्घृणपणे हत्या
साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे एका लग्न समारंभात झालेल्या वादातून तीन तरुणांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, लग्नपत्रिकेत नाव का टाकले नाही आणि समाजात वर्चस्व कोणाचे, या अत्यंत किरकोळ कारणावरून हे हत्याकांड घडले.
Tejashwi Yadav : नितीश भाजपच्या हातातील कठपुतळी; तेजस्वी यादव यांचा घणाघाती आरोप
बिहार विधानसभेचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार आणि एनडीए सरकारवर जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्री हे भाजपच्या हातातील कठपुतळी बनले असून बिहारमध्ये गुन्हेगार निर्भयपणे फिरत आहेत, असा आरोप त्यांनी शुक्रवारी केला.
VIRAL VIDEO : सावधान! देवभूमीचा ट्रिप प्लॅन करताय? हा थरारक व्हिडिओ पाहून तुमचेही पाय लटपटतील!
देहराडून : उत्तराखंडमधील प्रसिद्ध सिद्धपीठ माता धारी देवी मंदिराजवळ नदीपात्रात दोन बोटींची समोरासमोर भीषण धडक झाल्याची घटना घडली आहे. या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पर्यटकांच्या सुरक्षेबाबत मोठी खळबळ उडाली आहे. सुदैवाने, अपघाताच्या वेळी दोन्ही बोटींमध्ये केवळ चालकच उपस्थित होते, त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या घटनेने प्रशासनाच्या सुरक्षेच्या दाव्यांची पोलखोल केली आहे. ऋषिकेश आणि बीर बिलिंगसारख्या पर्यटनस्थळांवर रिव्हर राफ्टिंग आणि पॅराग्लाइडिंगसाठी येणाऱ्या पर्यटकांची मोठी गर्दी असते. जर या अपघातावेळी बोटी पर्यटकांनी भरलेल्या असत्या, तर मोठी भीषण दुर्घटना घडली असती, अशी भीती स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत. या घटनेमुळे धारी देवी मंदिर परिसरात चालणाऱ्या जलपर्यटनासाठी कठोर नियमावली आणि कडक सुरक्षेची मागणी आता जोर धरू लागली आहे.https://prahaar.in/2026/02/20/action-will-be-taken-against-those-involved-in-rebellion-in-bhiwandi-municipality-ravindra-chavan/साहसी खेळांच्या नावाखाली पर्यटकांच्या जिवाशी खेळ
Priyanka Gandhi : जुने पाढे वाचण्यापेक्षा विकासाचे बोला; प्रियांका गांधी यांची भाजपवर टीका
मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी १० वर्षे जुन्या राजकीय आठवणींना उजाळा देऊन जनतेची दिशाभूल करण्यापेक्षा आगामी ५ वर्षांच्या विकासाचा आराखडा मांडावा, अशा शब्दांत काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांनी जोरदार निशाणा साधला.
Rain Alert : हवामान विभागाच्या अंदाजानुसार (IMD) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुढील काही दिवस ढगाळ हवामानासह पावसाच्या सरी कोसळू शकतात.
Pakistan Players Banned : भारत आणि पाकिस्तानमधील तणावपूर्ण राजकीय संबंधांच्या पार्श्वभूमीवर, हे भारतीय मालक आपल्या संघात पाकिस्तानी खेळाडूंना स्थान देण्यास इच्छुक नाहीत.
कलयुग..! ‘कारल्याच्या भाजी’साठी मुलाने आईला संपवलं
Son Killed Mother : जेवणात कारल्याची भाजी का बनवली, या क्षुल्लक कारणावरून ३५ वर्षीय मुलाने आपल्या ६५ वर्षीय आईची मारहाण करून हत्या केली आहे
नवी दिल्ली : कृषी क्षेत्रात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या सहाय्याने अन्न सुरक्षितता, वातावरणातील बदलाला सामोरे जाण्याची क्षमता, महिला सक्षमीकरणासह सर्वांगीण समृध्दी आणण्यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्न करीत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.आर्टीफिशीअल इंटेलिजन्सचा वापर ही बाब केवळ प्रदर्शने आणि चर्चेपुरती मर्यादीत न राहता ती मोठ्या संख्येने लोकांपर्यंत पोहोचण्याची गरजही मुख्यमंत्र्यांनी प्रतिपादित केली.नवी दिल्लीतील भारत मंडपम् येथे सुरू असलेल्या इंडिया एआय इम्पँक्ट समिट -2026 (India AI Impact Summit 2026) मधील 'एआय इन अँग्रिकल्चर' या विषयावरील चर्चासत्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी मंत्री ॲड. आशिष शेलार, मंत्री नितेश राणे यांची उपस्थिती होती.या चर्चासत्रात मुख्य सचिव राजेशकुमार अगरवाल,केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाचे सचिव देवेशचतुर्वेदी, कृषि सचिव विकासचंद्र रस्तोगी, एम. एस. स्वामीनाथन रिसर्च फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सौम्या स्वामीनाथन, जागतिक बँकेच्या दक्षिण आशिया विभागाचे उपाध्यक्ष जोहॅन्स झुट, एकस्टेप फाउंडेशनचे सह-संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी शंकर मरुवाडा सहभागी झाले होते. नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडवण्यासाठीभारत सरकार, जागतिक संशोधन संस्था, गुंतवणूकदार यांच्याशी महाराष्ट्र सरकार सहकार्य करण्यासाठी तयार असल्याचेमुख्यमंत्र्यांनी सांगितले.https://prahaar.in/2026/02/20/minister-nitesh-rane-participates-in-the-india-ai-impact-summit-in-new-delhi/सध्या जगभरात शेतीसमोर अनेक आव्हाने आहेत. त्यामुळेअन्न सुरक्षिततेवर ताण आला आहे.अनिश्चित वातावरण, घसरणारी पाणी पातळी, जमिनीचा खालावणारा दर्जा, पुरवठा साखळीतील अडथळे आणि जागतिक मार्केटमधील अनिश्चितता यांचा या आव्हानांमध्ये समावेश आहे. अशा परिस्थितीत आर्टीफिशीअल इंटेलिजन्स महत्वाची भूमिका पार पाडू शकते, असे सांगून श्री. फडणवीस म्हणाले, जगातील अनेक देशांसाठी कृषी विषय केवळआर्थिक विषयाशी नि्गडीत नाही. कृषी विषय अन्न सुरक्षितता, सामाजिक सुरक्षितता, आर्थिक स्वातंत्र्य आणि राष्ट्रीय सुरक्षेचा विषय आहे. यामुळे भारताने याबाबत फार पूर्वीच विचार केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या इंडिया एआय मिशनमध्ये कृषी क्षेत्राचा प्रामुख्याने विचार केला आहे. यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर , सेवापुरवठा, समावेशकता यांचा विचार केला गेला आहे.श्री. फडणवीस यांनी सांगितले की, भारतातील सुमारे निम्मी लोकसंख्या प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या कृषी क्षेत्राशी निगडीत आहे. पण यापैकी फार कमी लोकांना बदलते हवामान, शेतीसाठी आवश्यक असणारे निविष्ठाचे दर, शेतमालाचे बाजारभाव, वित्तपुरवठा याबाबतमाहिती उपलब्ध आहे. सध्याच्या व्यवस्थेला गतीने माहिती पुरवण्यात आणि आवश्यक माहिती देण्यात काही मर्यादा आहेत. यावर आर्टीफिशीअल इंटेलिजन्सच्या सहाय्याने मात करू शकतो. आर्टीफिशीअलइंटेलिजन्स शेतीसाठी आवश्यक असणारी बँकवर्ड आणि फाँरवर्ड लिंकेजची माहिती देऊ शकते. यामध्ये वातावरणातील बदल, जलसिंचन, खतपुरवठा, बाजारभावातील फेरबदल आणि पुरवठा साखळी याबाबत माहिती देऊ शकते. आर्टीफिशीअल इंटेलिजन्स जादूची कांडी नाही हे आपण लक्षात घेतले पाहिजे, असे स्पष्ट करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांनी एआय माडेल विश्वासार्ह डेटा, सुशासन आणि लोकांशी असलेले उत्तरदायित्व यावर आधारित असायला हवे. विश्वासाशिवाय शेतीशी निगडीत विविध सेवा आपण देऊ शकणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.शेतीतील आर्टीफिशीअल इंटेलिजन्सचा वापर ही बाब केवळ प्रदर्शने आणि चर्चेपुरती मर्यादीत न राहता ती लाखो लोकांपर्यंत पोहोचायला हवे, असे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, यासाठी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र शासनाने महाॲग्री एआय धोरण स्वीकारले आहे. हे धोरण सर्वांसाठी खुले आणि परस्पर समन्वय साधणारे आहे. या धोरणावर आधारित विकसित केलेला मोबाईल प्लँटफाँर्म बहुभाषांमध्ये वैयक्तिक सल्ला देतो, बाजारपेठेतील घडामोडींची माहिती देतो, वातावरणातील बदलाबाबत सूचना देतो आणि अनेक शासकीय योजनांबाबत सल्ला देतो. या सेवेला शेतकऱ्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे, ही बाब शेतकरी आर्टिफिशीअल इंटेलिजन्ससाठी सज्ज आहेत, स्पष्ट करते. आर्टीफिशीअल इंटेलिजन्सवर आधारित टेस्ट, इंटीग्रेशन आणि क्राँप सँप विकसित करणे आमचे ध्येय आहे. शेतीशी निगडीत सर्व डेटाचे एकत्रीकरण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. या डेटाच्याआधारे शेती आणि शेतकऱ्यांचा विकासासाठी काम झाले पाहिजे.श्री. देवेश चतुर्वेदी यांनी महाराष्ट्राचे या एआय क्षेत्रातील योगदानासाठी आणि टेक्नॉलॉजीच्या वापरासाठी कौतुक केले. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा या क्षेत्रासाठीचा पुढाकार आणि विशेषतः कृषि विभागाने राबविलेल्या फार्मर आयडी आणि डीजिटल क्रॉप सर्व्हेसाठी त्यांनी प्रशंसोद्गार काढले. ते म्हणाले की, महाराष्ट्राने भारत विस्तारमध्ये आपले असे महाविस्तार प्लॅटफॉर्मद्वारे एआय आधारित सेवा देण्यास प्रारंभ केला आहे. भारत विस्तारमध्ये शेतकऱ्यांना हवामान, बियाणांपासून, पिकांची काळजी, खते, सिंचन ते बाजारपेठेची माहिती उपलब्ध करून देण्यात येत आहे. आता इंग्रजी आणि हिंदी भाषेत पण पुढे जाऊन सर्व भाषांमधून मार्गदर्शन, माहिती उपलब्ध करून दिली जाणार.श्रीमती सौम्या स्वामिनाथन यांनी तंत्रज्ञानाच्या वापराबाबत सजगता यावी यावर भर दिला. तंत्रज्ञानाच्या अंगाने, कृषि क्षेत्रातील बदलाच्या परिस्थितीत स्त्रियांचे स्थान महत्वाचे आहे. त्यांचा विसर पडता कामा नये याचा उल्लेख करून स्वामिनाथन म्हणाल्या की, तंत्रज्ञान हे चांगले किंवा वाईट नसते. ते कसे वापरले जाते, यावर त्याचे यश अवलंबून असते. डॉ. स्वामिनाथन यांनीही याच गोष्टीवर भर दिला होता. ते म्हणत असत की हरित क्रांती ही केवळ बियाण्याच्या संदर्भात नाही. उत्पादनासाठी बियाणे महत्वाचे आहेतच. पण ही क्रांती ही संपूर्ण अशा इकोसिस्टिम्स आणि त्याअंतर्गत काम करणाऱ्या संस्थांशीही निगडीत असते. यात कृषि विज्ञान केंद्रांपासून ते सिंचन, खते आणि शिक्षण-प्रशिक्षण आणि शेतकऱ्यांपर्यंतच्या सर्व घटकांचा समावेश होता. अंतिमतः शेतकऱ्यांनी या सगळ्या गोष्टींचा स्वीकार केल्यानेच यश मिळाले. यामुळेच या क्षेत्रातील बदलात महिला शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आपल्याकडे महिला शेतकऱी या त्याअर्थाने अल्पसंख्य आहेत. कारण त्यांच्या नावावर जमीनीची नोंद आजही खूप कमी प्रमाणात आहे. अलिकडे ही परिस्थिती सुधारते आहे. म्हणूनच या तंत्रज्ञानाच्या सुरवातीच्या टप्प्यातच महिलांबाबतच्या माहितीचा कसा योग्यरित्या केला जाणे महत्वाचे आहे.कृषि सचिव विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी या सत्राचे सूत्रसंचालन केले. तसेच महाराष्ट्र शासन कृषि विभागात राबवित असलेल्या डिजिटल तसेच एआय संबंधित विविध प्रकल्पांची त्यांनी माहिती दिली.
Ravindra Chavan : भिवंडी पालिकेत बंडखोरी करणाऱ्यांवर कारवाई करणार : रवींद्र चव्हाण
काँग्रेसच्या सहकार्याने भाजपचे बंडखोर महापौर पदीमुंबई : भिवंडी महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत शुक्रवारी राजकीय नाट्य पाहायला मिळाले. भाजपचे बंडखोर नारायण चौधरी यांनी काँग्रेसच्या पाठिंब्यावर महापौरपद मिळवले. या निवडणुकीत भाजपचे सहा नगरसेवक फुटल्याचे स्पष्ट झाले असून, या बंडखोरांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिले आहेत..https://prahaar.in/2026/02/20/maharashtras-sting-in-ai-summit-mahaagri-ai-will-be-a-game-changer-for-agricultural-development-chief-minister/भिवंडीत महापौर निवडीच्या प्रक्रियेत सुरुवातीपासूनच चुरस निर्माण झाली होती. भाजपने सुरुवातीला नारायण चौधरी यांच्या नावाचा विचार केला होता, मात्र प्रदेश पातळीवरील चर्चेनंतर आणि बदललेल्या राजकीय समीकरणांनंतर स्नेहा पाटील यांना अधिकृत उमेदवारी देण्याचा निर्णय झाला. मात्र, चौधरी यांनी बंडखोरी करीत काँग्रेस आणि शरद पवार गटाचा पाठिंबा मिळवला. महापौर पदाच्या निवडणुकीत त्यांना ४८ मते मिळाली. तर, भाजपच्या अधिकृत उमेदवार स्नेहा पाटील यांना केवळ १६ मतांवर समाधान मानावे लागले. दुसरीकडे कोणार्क आघाडीच्या विलास पाटील यांनी २५ मते मिळवली.या सर्व घडामोडींवर प्रतिक्रिया देताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, महापौरपदाच्या उमेदवारीबाबत पक्षात चर्चा सुरू होती. स्नेहा पाटील यांचे नाव निश्चित झाल्यानंतर नारायण चौधरी आणि त्यांच्यासोबत असलेल्या नगरसेवकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. बंडखोरी केल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांना दिला होता. त्यांनी बंडखोरी करणार नाही असे आश्वासन दिले होते, मात्र निकालातून त्यांनी बंडखोरी केल्याचे स्पष्ट झाले आहे, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.पक्षांतर्गत कारवाईचा बडगामहापालिकेत सत्ता मिळवण्यासाठी थेट वैचारिक प्रतिस्पर्धी असलेल्या काँग्रेसशी हातमिळवणी केल्याने भाजप नेतृत्वाने हे प्रकरण गंभीरपणे घेतले आहे. ज्यांनी-ज्यांनी पक्षाच्या ध्येयधोरणांविरुद्ध जाऊन आणि आदेश धाब्यावर बसवून काम केले आहे, त्या सर्वांवर पक्ष नियमानुसार कडक कारवाई करेल, असा इशारा चव्हाण यांनी यावेळी दिला.
America Iran War : करार करा, अन्यथा परिणाम गंभीर होतील; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला स्पष्ट धमकी
अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव सतत वाढत चालला आहे. अमेरिकेची विमानवाहू नौका इराणच्या दिशेने सरकत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला करार करावाच लागेल. अन्यथा परिणाम गंभीर होतील असा इराणला थेट इशारा दिला आहे.इराण संपूर्ण प्रदेशाच्या स्थैर्याला धोका निर्माण करू शकत नाही:‘बोर्ड ऑफ पीस’ कार्यक्रमात बोलताना ट्रम्प म्हणाले की, “इराणने आता आमच्यासोबत आम्ही तयार करत असलेल्या मार्गावर यावे. त्यांनी साथ दिली तर उत्तमच; पण साथ दिली नाही तरीही आम्ही पुढे जाऊ. मात्र तो मार्ग पूर्णपणे वेगळा असेल.” त्यांनी पुढे सांगितले की, इराण संपूर्ण प्रदेशाच्या स्थैर्याला धोका निर्माण करू शकत नाही. “त्यांना करार करावाच लागेल. अन्यथा परिणाम गंभीर असतील,” असा इशाराही त्यांनी दिला.पुढील दहा दिवसांत परिस्थिती स्पष्ट होईल:गुरुवारी तेहरानवर टीका करताना ट्रम्प म्हणाले, “आपल्याला कदाचित हे एक पाऊल पुढे न्यायला लागेल, किंवा कदाचित नाही. कदाचित आपण कराराच्या दिशेने जात आहोत. पुढील दहा दिवसांत परिस्थिती स्पष्ट होईल.” ट्रम्प यांनी पुन्हा एकदा ठामपणे सांगितले की, इराणकडे अण्वस्त्रे असू नयेत. “इराणकडे अण्वस्त्रे असतील तर मध्यपूर्वेत शांतता प्रस्थापित होऊ शकत नाही,” असे त्यांनी नमूद केले.
Nitesh Rane : नवी दिल्लीतील ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट’मध्ये मंत्री नितेश राणे यांचा सहभाग
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील 'डिजिटल इंडिया'ला आता कृत्रिम बुद्धिमत्तेची (एआय) जोड देऊन भारताला जागतिक महासत्ता बनवण्यासाठी केंद्राने कंबर कसली आहे. नवी दिल्लीतील भव्य 'भारत मंडपम' येथे आयोजित 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट २०२६' मध्ये शुक्रवारी राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी सक्रिय सहभाग नोंदवत या तंत्रज्ञान क्रांतीचा आढावा घेतला. तंत्रज्ञानाच्या या नव्या युगात महाराष्ट्र आणि पर्यायाने भारत जागतिक नकाशावर कसा आघाडीवर राहील, यावर या समिटमध्ये विशेष मंथन करण्यात आले.https://prahaar.in/2026/02/20/sanjay-rauts-move-to-cut-off-priyanka-chaturvedis-address-for-pawar-bjps-media-department-head-navnath-baner-criticizes/या शिखर परिषदेविषयी बोलताना मंत्री नितेश राणे यांनी मोदी सरकारच्या दूरदृष्टीचे कौतुक केले. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत आज तंत्रज्ञान क्षेत्रात जगाचे नेतृत्व करण्यास सज्ज झाला आहे. ही समिट म्हणजे केवळ एक चर्चासत्र नसून, भविष्यातील भारताचा तांत्रिक नकाशा (रोडमॅप) आहे. एआयच्या माध्यमातून सामान्य माणसाचे जीवन सुसह्य करणे आणि भारताला जागतिक एआय हब बनवणे, हेच आमचे उद्दिष्ट आहे.या परिषदेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही संबोधित केले. डिजिटल इंडिया आणि मेक इन इंडियाच्या माध्यमातून भारताने आधीच मजबूत पाया तयार केला आहे. आता 'इंडिया एआय समिट'च्या माध्यमातून आपण जगाला दिशा देण्याचे काम करत आहोत, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. या समिटमध्ये तंत्रज्ञानासोबतच एआयच्या नैतिक वापरासावरही सखोल चर्चा झाली. डेटा सुरक्षा, सायबर सुरक्षितता आणि तरुणांच्या कौशल्य विकासासाठी एआयचा वापर कसा करता येईल, यावर विविध देशांच्या प्रतिनिधींनी आपले विचार मांडले. मंत्री नितेश राणे यांनी यावेळी विविध देशांच्या तांत्रिक धोरणांचा आणि भविष्यातील संधींचा सखोल आढावा घेतला.
भारतीय संघाने टी-२० वर्ल्ड कपच्या गट टप्प्यात अपराजित राहून सुपर-८ मध्ये प्रवेश केला आहे. भारतीय संघ सध्या उत्कृष्ट लयीत असून त्याला विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानले जात आहे. यादरम्यान भारतीय संघाचा माजी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन याने सांगितले की, भारतीय संघ सर्वोत्तम फॉर्ममध्ये नसला तरी त्याची एकूण ताकद इतकी भक्कम आहे की साधारण दिवसातही त्याला पराभूत करणे कोणत्याही संघासाठी सोपे नाही.रविचंद्रन अश्विन याने एका यूट्यूब शोमध्ये सूर्या ब्रिगेडच्या सातत्यपूर्ण कामगिरीचे कौतुक केले. मात्र नेदरलँड्सविरुद्धचा फलंदाजीतील खेळ अपेक्षेइतका प्रभावी नसल्याचेही मान्य केले. अश्विन म्हणाला की सूर्यकुमार यादवने संयमाने डाव पुढे नेला, तर शिवम दुबे , हार्दिक पांड्या आणि रिंकू सिंग यांनी योग्य वेळी रन्स वाढवले तर भारतीय संघ सर्वोत्तम फॉर्ममध्ये नसला तरी त्याची एकूण ताकद इतकी भक्कम आहे की साधारण दिवसातही त्याला पराभूत करणे कोणत्याही संघासाठी सोपे नाही, असे अश्विनने नमूद केले.अश्विन पुढे म्हणाला की; “सूर्याने उत्कृष्ट खेळी केली. रन्स करायची वेळ आली तेव्हा दुबे, हार्दिक आणि रिंकू तयार होते. त्यांना रनरेट कसा वाढवायचा हे चांगले ठाऊक आहे. मात्र नेदरलँड्सविरुद्ध भारतीय संघाची फलंदाजी दमदार नव्हती. वरुण चक्रवर्तीने उत्कृष्ट गोलंदाजी केली.या दरम्यान अश्विनने तिलक वर्माच्या टी-२० क्रिकेटमधील विचारसरणीवरही भाष्य केलं. टी-२० मध्ये यश केवळ जोरदार फटके मारण्यावर अवलंबून नसते; योग्य टाइमिंग आणि बॅटच्या मध्यभागी चेंडू लागणे अधिक महत्त्वाचे असते, असे आर अश्विनने सांगितले. “तुम्ही वैभव सूर्यवंशीसारखे खेळू शकता, पण तिलकसारखेही खेळू शकता, जो उत्कृष्ट टाइमिंगसह गॅप शोधू शकतो.रविवारी (२२ फेब्रुवारी) भारतीय संघ अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध महत्वाचा सामना खेळणार आहे. त्यानंतर २६ फेब्रुवारीला झिम्बाब्वेविरुद्ध भारताचा सामना होईल. तर १ मार्च रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध सुपर-८ फेरीतील अखेरचा सामना खेळला जाईल.
Pune Accident News : कात्रज डेअरी चौकात भीषण अपघात; डंपरच्या चाकाखाली चिरडून महिलेचा जागीच मृत्यू
Pune Accident News : पुण्यातील कात्रज डेअरी चौकात हायवा डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे.
मुंबई : मराठीचा मुद्दा उपस्थित करून प्रियांका चतुर्वेदी यांचा राज्यसभा निवडणुकीत पत्ता कट करण्याची संजय राऊत यांची चाल आहे असा घणाघात भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी शुक्रवारी केला. मुंबई कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत श्री. बन बोलत होते. यावेळी प्रदेश प्रवक्ते ओमप्रकाश चौहान उपस्थित होते. राज्यसभेचे गणित मांडताना उबाठाला वजा करून शरद पवारांचा मार्ग सुकर करण्याची धडपड संजय राऊत करीत आहेत. उबाठाच्या कोट्यात एक जागा असताना आत्ता प्रियांका चतुर्वेदी राज्यसभेवर गेल्या तर टर्म संपल्यानंतर राऊतांचा पत्ता कट होणार हे माहित असल्याने राऊतांचा हा डाव असल्याचा घणाघात त्यांनी केला.यावेळी श्री. बन म्हणाले की, रोटेशनचा मुद्दा पुढे करत यावेळी राज्यसभेवर शिवसेनेचा खासदार असेल असे विधान आदित्य ठाकरे करत असले तरी राऊतांची तशी इच्छा अजिबात नाही. राज्यसभेच्या खासदारकी वरून आधी कधीही मराठी कार्ड न टाकणा-या राऊतांनी अचानक यावेळी मराठी कार्ड खेळले आहे. प्रियांका ह्या अमराठी असल्याने राऊतांचा हा डाव असून यावेळी राज्यसभेवर उबाठा ला संधीच मिळू नये हीच मनोमन इच्छा राऊतांची असल्याची टीका त्यांनी केली.शिंदे- राज भेट आणि उद्धव, राऊतांचा जळफळाटउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची भेट झाली मात्र जळफळाट झाला तो राऊत आणि उद्धव ठाकरे यांचा असा टोमणा श्री. बन यांनी मारला. महापालिका निवडणुकीमध्ये उद्धव यांनी राज यांचा केसाने गळा कापल्यानंतर राज यापुढे उबाठा ची साथ देतील का हा प्रश्न आपण उपस्थित केला होता याची आठवण श्री. बन यांनी करून देत येणा-या काळात नवे समीकरण समोर येईल असे म्हंटले.मतदारांचे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तबउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे शत्रू आहेत का मित्र आहेत यावर मतदारांनी शिक्कामोर्तब केले आहे असे श्री. बन म्हणाले. श्री. शिंदे हे वंदनीय हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेण्याचे काम करत आहेत, बाळासाहेबांची शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधण्यापासून वाचवण्याचे काम करत आहेत आणि महाराष्ट्राच्या हिताचे कार्य करत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचे खरे शत्रू बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली देणारे उद्धव ठाकरे, राऊत आहेत असा हल्लाबोल श्री. बन यांनी केला.महाराष्ट्रातील निवडणुकीची धामधूम संपल्यानंतर एसआयआर चे काम सुरू होत आहे, या निर्णयाचे श्री. बन यांनी स्वागत केले. बोगस बांगलादेशी घुसखोर यांची हकालपट्टी या एसआयआरच्या माध्यमातून होईल आणि मतदार यादीचे शुद्धीकरण होईल. मतदार यादी सुधारण्याचा आग्रह उच्चरवात करणा-या उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांनी या अभियानाचे स्वागत करायला हवे असा टोला श्री. बन यांनी लगावला. फक्त मराठी दुबार नावे उद्धव, राज यांच्या डोळ्यात खुपत होती असे म्हणत श्री. बन यांनी दोघांवर शरसंधान साधले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने ड्रगमुक्त मुंबई करण्याचे भाजपा आणि महायुतीचे स्वप्न आहे ते लवकरच पूर्ण होईल असा विश्वास श्री. बन यांनी व्यक्त केला. यवतमाळमधील ड्रग तस्करी दुर्दैवी आहे. त्यावर गृह विभागाने योग्य कारवाई केली असल्याचे ते म्हणाले. तसेच महाराष्ट्रामध्ये दहशतवादी कारवाया खपवून घेतल्या जाणार नाहीत, त्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली.
Election Commission Nationwide SIR: भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) देशभरात विशेष सघन सुधारणा (SIR) जाहीर केली आहे. SIR प्रक्रिया १२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सुरू आहे.
Election Commission Nationwide SIR: भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) देशभरात विशेष सघन सुधारणा (SIR) जाहीर केली आहे. SIR प्रक्रिया १२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सुरू आहे.
Rajya Sabha Election : राज्यसभेत ६ जागांवर महायुतीचा विजय पक्का - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
- सातव्या जागेबाबत विरोधकांनी निर्णय घ्यावामुंबई : राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण तापले असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातपैकी सहा जागांवर महायुतीचे उमेदवार निश्चितपणे निवडून येतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. तसेच सातव्या जागेबाबत निर्णय विरोधकांनी घ्यावा, असे सूचक विधान देखील त्यांनी केले आहे.'एआय समीट'नंतर नवी दिल्ली येथे माध्यमांशी संवाद साधताना फडणवीस म्हणाले की, भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महायुतीकडे आवश्यक संख्याबळ असून सातपैकी सहा उमेदवारांचा विजय पक्का आहे. उर्वरित एक जागा महाविकास आघाडीला मिळू शकते; मात्र ती जागा कोणाला द्यायची हे त्यांनी ठरवायचे आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने डिजिटल पायाभूत सुविधा आणि जबाबदार एआय विकासाच्या केंद्रस्थानी ठेवले असल्याचे सांगताना त्यांनी ‘इंडिया एआय मिशन’चा उल्लेख केला. तंत्रज्ञानाच्या मदतीने पारदर्शकता, सर्वसमावेशकता आणि व्यापक परिणाम साधणे हे या मिशनचे उद्दिष्ट असून कृषी क्षेत्राला त्यात मध्यवर्ती स्थान देणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी मांडले.फडणवीस यांनी कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) भूमिकेवर सविस्तर भाष्य केले. ‘एआय फॉर ॲग्रीकल्चर : स्केलिंग इंटेलिजन्स फॉर फूड अँड क्लायमेट रेझिलियन्स’ या विषयावरील सत्रात त्यांनी जागतिक अन्नसाखळीवरील वाढता ताण, हवामान बदलाचे परिणाम, घटती भूजल पातळी आणि मातीच्या गुणवत्तेतील हानी या पार्श्वभूमीवर AIची भूमिका निर्णायक ठरत असल्याचे सांगितले. ग्लोबल साऊथमधील देशांसाठी शेती ही केवळ अर्थकारण नसून सामाजिक स्थैर्य आणि राष्ट्रीय सुरक्षेचा आधार असल्याचे त्यांनी नमूद केले.एआयचा शेतकऱ्यांना काय फायदा होणार?- भारतामध्ये अर्ध्या अब्जाहून अधिक लोकांचा उदरनिर्वाह थेट किंवा अप्रत्यक्षपणे शेतीवर अवलंबून आहे. मात्र लहान भूधारकांना मर्यादित माहिती, वाढते इनपुट खर्च, हवामानातील अनिश्चितता आणि बाजारपेठेपर्यंत अपुरी पोहोच यांसारख्या अडचणींना सामोरे जावे लागते. पारंपरिक कृषी विस्तार व्यवस्था समर्पित असली तरी तिची गती आणि व्याप्ती आजच्या गरजांनुसार अपुरी पडते. एआयच्या साहाय्याने अतिसूक्ष्म हवामान अंदाज, कीड प्रादुर्भावावरील आगाऊ सूचना, अचूक सिंचन व खत सल्ला, पीकआधारित कर्ज मूल्यमापन, पारदर्शक पुरवठा साखळी आणि तत्काळ बाजार मार्गदर्शन शक्य होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.- एआयचा पाया विश्वासार्ह डेटावर आणि नैतिक प्रशासनावर असला पाहिजे, असे सांगताना फडणवीस यांनी विश्वास, नैतिक शासन आणि सार्वजनिक जबाबदारीशिवाय तंत्रज्ञानाचा व्यापक स्वीकार होणार नाही, असे अधोरेखित केले. राज्य सरकारने विकसित केलेल्या एआय-सक्षम बहुभाषिक मोबाईल प्लॅटफॉर्मद्वारे शेतकऱ्यांना वैयक्तिक सल्ला, बाजारभाव माहिती आणि शासकीय योजनांपर्यंत सुलभ प्रवेश उपलब्ध होत असल्याचे त्यांनी सांगितले. कापूस उत्पादकांसाठी जिओस्पेशल विश्लेषणाच्या माध्यमातून अळीच्या प्रादुर्भावाचा पूर्वइशारा देणारी प्रणाली विकसित करण्यात आली असून त्यातून नुकसान कमी करण्यात यश मिळाले आहे.महाराष्ट्रात एआय आधारित कृषी परिवर्तनाची क्षमता:राज्यात ‘महा कृषी एआय धोरण (२०२५-२९)’ राबविण्यात येत असून ‘ऍग्रीकल्चर डेटा एक्सचेंज’ आणि डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर उभारणीचे काम सुरू आहे. १५० लाख हेक्टर शेतीक्षेत्र, अग्रगण्य कृषी विद्यापीठे आणि सक्षम स्टार्टअप परिसंस्था यामुळे महाराष्ट्रात एआय आधारित कृषी परिवर्तनाची मोठी क्षमता असल्याचे त्यांनी नमूद केले. अन्नसुरक्षा, हवामान सक्षमता, महिला सक्षमीकरण आणि सामायिक समृद्धीसाठी एआय निर्णायक ठरेल, असा विश्वास व्यक्त करत राज्य सरकार केंद्र, जागतिक संस्था, संशोधक, गुंतवणूकदार आणि शेतकरी संघटनांसोबत सहकार्याने या परिवर्तनाला गती देईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
Relationship: गैरसमज, अहंकार आणि संवादाचा अभाव; वर्तनदोषाने नातं तुटायच्या उंबरठ्यावर!
Relationship शेवटी दोघांनी मनापासून एकमेकांची माफी मागितली आणि पुन्हा एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दोन्ही कुटुंबांमध्ये पुन्हा आनंदाचं वातावरण निर्माण झालं.
Sergio Gor: “भारत तेलासाठी पर्याय शोधतोय …” ; सर्जियो गोर यांचे मोठे विधान
Sergio Gor:भारत अमेरिकेच्या नेतृत्वाखालील धोरणात्मक युती पॅक्स सिलिका मध्ये आज सहभागी झाला आहे. या बैठकीदरम्यान, भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्जियो गोर यांनी व्यापार करार आणि रशियन तेलाबाबत विधान केले.
AI Authenticity Label : एआय-निर्मित डिजिटल कंटेंटसाठी ‘ऑथेंटिसिटी लेबल’ आजपासून अनिवार्य
केंद्र सरकारने एआयच्या मदतीने तयार होणाऱ्या डिजिटल कंटेंटबाबत कडक मार्गदर्शक तत्त्वे लागू केली आहेत. १० फेब्रुवारी २०२६ रोजी अधिसूचना जारी झाल्यानंतर हे नियम आजपासून म्हणजेच शुक्रवार २० फेब्रुवारी पासून अमलात आले आहेत.त्यामुळे आता एखादा फोटो, व्हिडिओ किंवा ऑडिओ आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (AI) मदतीने तयार केला असेल, तर त्यावर स्पष्टपणे लेबल लावणे बंधनकारक असेल. तसेच कोणत्याही आक्षेपार्ह किंवा बेकायदेशीर सामग्रीबाबत तक्रार आल्यास सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला ती केवळ ३ तासांच्या आत हटवावी लागेल. यापूर्वी ही मर्यादा ३६ तासांची होती.डिजिटल कंटेंटसाठी ‘ऑथेंटिसिटी लेबल’ची गरज:नियम लागू होण्याच्या एक दिवस आधी, १९ फेब्रुवारीला आयोजित एआय शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल कंटेंटसाठी ‘ऑथेंटिसिटी लेबल’ची गरज अधोरेखित केली होती. त्यांनी उदाहरण देताना सांगितले की जसे अन्नपदार्थांवर ‘न्यूट्रिशन लेबल’ असते, तसेच डिजिटल सामग्रीवरही ती खरी आहे की एआयने तयार केलेली आहे याची स्पष्ट माहिती असावी. यामुळे लोकांना खऱ्या आणि बनावट सामग्रीतील फरक ओळखणे सोपे जाईल. आता प्रत्येक एआय-निर्मित कंटेंटच्या कोपऱ्यात “एआय जनरेटेड” किंवा तत्सम लेबल स्पष्टपणे दाखवणे अनिवार्य असेल. उदाहरणार्थ, एखाद्या नेत्याचा एआयच्या मदतीने तयार केलेला भाषणाचा व्हिडिओ अपलोड करताना तो लेबलशिवाय पोस्ट करता येणार नाही.मेटाडेटा फाईलचा ‘डिजिटल डीएनए’:नवीन नियमांनुसार आता मेटाडेटाला एखाद्या फाईलचा ‘डिजिटल डीएनए’ म्हणता येईल. ते स्क्रीनवर दिसत नाही, मात्र फाईलमध्ये अंतर्भूत असते. त्यामध्ये कंटेंट कधी तयार झाला, कोणत्या एआय टूलद्वारे तयार करण्यात आला आणि सर्वप्रथम कोणत्या प्लॅटफॉर्मवर अपलोड करण्यात आला याची माहिती नोंदवलेली असेल. एआयच्या माध्यमातून गुन्हा केल्यास तपास यंत्रणा या तांत्रिक चिन्हांच्या आधारे मूळ स्रोतापर्यंत पोहोचू शकतील.एआय कंटेंटवरील वॉटरमार्क काढणं बेकायदेशीर:पूर्वी काही जण एआय कंटेंटवरील वॉटरमार्क काढून टाकत असत. आता असे करणे बेकायदेशीर ठरणार आहे. सरकारने प्लॅटफॉर्मना अशा तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे निर्देश दिले आहेत, ज्यामुळे लेबल किंवा मेटाडेटाशी छेडछाड करण्याचा प्रयत्न झाल्यास संबंधित फोटो किंवा व्हिडीओ आपोआप हटवली जाईल किंवा रोखली जाईल.सोशल मीडिया कंपन्यांची जबाबदारी अधिक वाढली:एआयचा वापर करून बालकांशी संबंधित अश्लील फोटो - व्हिडीओ तयार करणे, फसवणूक करणे, शस्त्रांशी संबंधित माहिती पसरवणे किंवा एखाद्या व्यक्तीची हुबेहुब नक्कल करणे हे गंभीर गुन्हे मानले जातील. अशा प्रकरणांमध्ये कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असे सरकारने स्पष्ट केले आहे. आयटी नियमांमध्ये दुरुस्ती केल्यानंतर आता सोशल मीडिया कंपन्यांना तक्रार मिळाल्यानंतर ३ तासांच्या आत आक्षेपार्ह कंटेंट हटवावा लागेल. पूर्वी त्यांना ३६ तासांची मुदत होती. या बदलामुळे कंपन्यांची जबाबदारी अधिक वाढली आहे.आता कोणताही वापरकर्ता कंटेंट अपलोड करताना ती सामग्री एआयने तयार केली आहे की नाही याची घोषणा करणे आवश्यक असेल. प्लॅटफॉर्मना वापरकर्त्याच्या दाव्याची पडताळणी करण्यासाठी योग्य साधने वापरावी लागतील. जर एआय-निर्मित सामग्री उघड न करता प्रकाशित झाली, तर त्यासाठी संबंधित कंपनीलाही जबाबदार धरले जाईल. माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या मते, या नियमांचा उद्देश “मुक्त, सुरक्षित, विश्वासार्ह आणि जबाबदार इंटरनेट” निर्माण करणे हा आहे. सरकारचे म्हणणे आहे की यामुळे जनरेटिव्ह एआयच्या माध्यमातून पसरवली जाणारी दिशाभूल करणारी माहिती, ओळख चोरी आणि निवडणुकांमधील हस्तक्षेप यांसारख्या आव्हानांवर नियंत्रण मिळवता येईल.डीपफेक तंत्रज्ञानामध्ये एआय टूल्सच्या मदतीने एखाद्या वास्तविक व्यक्तीचा चेहरा किंवा आवाज दुसऱ्या व्हिडिओ किंवा ऑडिओमध्ये इतक्या सफाईने जोडला जातो की तो पूर्णपणे खरा वाटतो. याच कारणामुळे या तंत्रज्ञानाबाबत सरकारने अधिक कठोर पावले उचलली आहेत.
Beed: बीडमधील संतापजनक प्रकार; दहावीच्या विद्यार्थ्यांचा पेपर चक्क मंडपात
बीड: राज्यात इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेला आजपासून सुरू झाली आहे. याच दरम्यान बीड जिल्ह्यामध्ये शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ समोर आला आहे. बीड तालुक्यातील कुर्ला येथील परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना चक्क मंडपात बसून पेपर द्यावा लागणार आहे. वाढत्या तापमानामुळे हैराण झालेल्या विद्यार्थ्यांना आता या मंडपातील उकाड्यात बसून दहावीची परीक्षा द्यावी लागणार आहे.या प्रकारावर पालकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.नेमका प्रकार काय?बीड जिल्ह्यातील कुर्ला येथे दहावीचे परीक्षा केंद्र देण्यात आले आहे. पण या केंद्रावर उपलब्ध असलेल्या खोल्यांच्या तुलनेत परीक्षार्थी विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचे सांगितलं जातं आहे. या वाढीव संख्येला सामावून घेण्यासाठी प्रशासनाने खोल्यांची पर्यायी व्यवस्था करण्याऐवजी चक्क शाळेच्या मैदानात कापडी मंडप उभारला. या मंडपातच बाकडे टाकून विद्यार्थ्यांसाठी बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.फेब्रुवारी महिना संपत आला असून मार्चच्या सुरुवातीलाच बीडमध्ये उन्हाचा पारा चढू लागला आहे. अशा रणरणत्या उन्हात कापडी मंडपाखाली बसून तीन तास पेपर लिहिणे विद्यार्थ्यांसाठी अत्यंत कठीण जाणार आहे. उकाड्यामुळे विद्यार्थ्यांच्या एकाग्रतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे, एखादा विद्यार्थी उष्माघातामुळे आजारी पडल्यास त्याला जबाबदार कोण? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.बारावीची परीक्षा झाल्यानंतर दहावीची परीक्षा कॉपीमुक्त आणि सुरळीत पार पडावी यासाठी शिक्षण विभाग प्रयत्नशील असल्याचा दावा प्रशासन करत आहे. दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या मूलभूत सुविधांकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचे चित्र कुर्ला केंद्रावर पाहायला मिळत आहे. विद्यार्थ्यांसाठी योग्य व्यवस्था का करण्यात आली नाही? यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
Khawaja Asif on Asim Munir: पाकिस्तान लष्कराच्या इशाऱ्यावर काम करणाऱ्या सरकारसाठी जगभरात कुप्रसिद्ध आहे. पाकिस्तानातील सध्याच्या राजकीय परिस्थितीचा विचार करता, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सरकारमध्ये फील्ड मार्शलचा हस्तक्षेप खूप तीव्र झाला.

32 C