भारतातील समाजसुधारणा अचानक झाली नाही. त्यासाठी अनेक सुधारकांनी आपले योगदान दिले. पण त्यानंतरही इतिहासाने काही मोजक्याच लोकांची दखल घेतली आणि अनेकांकडे कथितपणे हेतुपुरस्सर असे दुर्लक्ष केले. अशाच व्यक्तींमध्ये गोपाळबाबा वलंगकर यांचा समावेश होतो. वलंगकरांनी अस्पृश्यता, अंधश्रद्धा व सामाजिक अन्यायाविरोधात एक मोठा संघर्ष उभा केला. प्रसंगी समाजाला 'विटाळलेले भांडे जाळले की शुद्ध होते, मग माणूस विटाळला तर त्यालाही भाजायचे का?' असा अंतर्मुख करणारा प्रश्न विचारत समाजाच्या डोक्यात झिणझिण्याही आणल्या. त्यामुळेच त्यांना आंबेडकरी चळवळीचा आधारवड मानले जाते. चला तर मग आज 'धुरंधर'मध्ये प्रकाश टाकूया गोपाळबाबा वलंगरकर यांच्या जीवनपटावर... सर्वप्रथम वलंगकरांची कौटुंबिक माहिती गोपाळबाबा वलंगकर यांचा जन्म 1840 साली रावढूळ गावात झाला. त्यांचे पूर्ण नाव गोपाळनाक विठ्ठलनाक साळवी असे होते. त्यांचे मूळ गाव वलंग होते. हे गाव महाड-मंडणगड रस्त्याने रावढूळला जाताना सोनघरपासून दक्षिणेस 3 किमी अंतरावर आहे. रावढूळ येथील जाधव हे गोसावी घराणे विठ्ठलनाक साळवी यांचे आजोळ व सासूरवाडी होते. त्यामुळे विठ्ठलनाक रावढूळला स्थायिक झाले. कोकणातील 52 गावाच्या महार जातपंचायतीचे न्यायाधीश असले्लया गेणू बुवा जाधवांचे नातेवाईक असल्यामुळे विठ्ठलनाक यांचे साळवी हे आडनाव मागे पडून लोक त्यांना आदराने वलंगकर म्हणत असत. गोपाळबाबा यांच्या पूर्वजांनी छत्रपतींच्या स्वराज्यात चाकरी केली. रायगडासह अनेक किल्ल्यांवर पहारेदारी केली. एवढेच नाही तर शिवरायांच्या गुप्तहेर खात्याचा प्रमुख असलेल्या बहिर्जी नाईकांच्या पथकातही जाधव कुटुंबातील काही लोक गोसावी होते. ते गावोगाव फिरून शत्रूची खबर घेऊन माहिती पुरवत असत. कौटुंबिक माहितीनंतर पुढे... गोपाळबाबा वलंगरांचे शिक्षण इंग्रजी आमदनीत झाले. त्यातून त्यांची दृष्टी विकसित झाली. बुद्धी चौकस आणि तर्कनिष्ठ बनली. इंग्रजी पलटणीतील नोकरीमुळे त्यांच्या अंगात शिस्त व स्वभावात बंडखोरपणा आला. विशेषतः योग्यवेळी महात्मा जोतिबा फुले यांच्या संपर्कात आल्यामुळे त्यांच्यात धर्मग्रंथांची चिकित्सा करून त्यांच्यातील फोलपणा उघड करण्याची बुद्धिप्रामाण्यवादी विचारसरणी वाढीस लागली. त्यांनी फुल्यासारखेच भारतीय समाजव्यवस्थेकडे एका वेगळ्या नजरेने पाहिले. त्यामुळेच बुद्ध, कबीर, बसवेश्वर, चक्रधर, नामदेव, चोखोबा, तुकोबा व फुले यांनी ज्या विषमतावादी विचारसरणीच्या विद्रोह केला, त्याच विद्रोहाचे वारसदार म्हणून वलंगकरांकडे पाहिले जाते. एवढेच नाही, तर 20 व्या शतकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात निर्माण झालेल्या, वाढलेल्या आणि रुजलेल्या मानवमुक्तीच्या लढ्याची पायाभरणी करण्याचे श्रेयही महात्मा फुले यांच्या सोबतीने वलंगकरांना जाते. त्यामुळे वलंगकर हेआंबेडकरी चळवळीचे आधारवड ठरतात. पण त्यानंतरही त्यांची म्हणावी तशी दखल इतिहासाने घेतली नाही. अस्पृश्यांच्या चळवळीचा आरंभबिंदू डॉक्टर प्रेम हनवते यांनी आपल्या गोपाळबाबा वलंगकर या पुस्तकात वलंगकरबाबांची जडणघडण विषद केली आहे. ते म्हणतात, गोपाळ बाबा वलंगकर यांचा कालखंड हा अस्पृश्यांच्या चळवळीचा आरंभबिंदू असून, आंबेडकरपूर्व कालखंड आहे. साधारणतः 1850 ते 1900 असा हा कालखंड आहे. या कालखंडाच्या खांद्यावरूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची दैदिप्यमान चळवळ पुढे गेली. या काळात अस्पृश्यांची सामाजिक, राजकीय, आर्थिक परिस्थिती कशी होती? याचा अंदाज आपल्याला येतो. कोरेगाव भीमा लढाई झाली तेव्हा ब्रिटिश राजवटीत अस्पृश्य तरुणांना मिलिटरीमध्ये सेवा करण्याची संधी उपलब्ध होती. त्यामुळे कोकणातील अस्पृश्य तरुणांचे मिलिट्रीत जाण्याचे प्रमाण बऱ्यापैकी होते. गोपाळबाबा 1886 साली सैन्यातून निवृत्त होऊन रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथे स्थायिक झाले. त्यानंतर त्यांनी तिथेच सामाजिक हक्क मिळवण्याची चळवळ सुरू केली. नेमक्या याच काळात जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा डंका सर्वत्र वाजत होता. त्यांच्या सामाजिक न्यायाच्या विचारांचा समाजावर मोठा प्रभाव पडला होता. बाबांनी त्यांच्यापासून प्रेरणा घेतली. शिक्षण हाच मानवी उत्थानाचा मार्ग आहे हे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी अस्पृश्य मुलांना शिक्षण मिळावे म्हणून केलेला संघर्ष अत्यंत रोमांचक आहे. अस्पृश्यांवरील शेकडो वर्षांची शिक्षणबंदी उठवली वलंगकरांचा इतिहास सांगताना डॉक्टर हनवते पुढे सांगतात, क्रांतिबा फुले, गोपाळबाबा वलंगकरांमुळे याच कालखंडात अस्पृश्य समाजावरील शेकडो वर्षांची शिक्षणबंदी उठवली गेली. फुल्यांनी अस्पृश्यांसाठी 1851 साली देशातील पहिली शाळा काढली आणि शेकडो वर्षांची मनुस्मृती पुरस्कृत अस्पृश्यांवरील शिक्षणबंदी उद्ध्वस्त झाली. यामुळे वलंगकर व त्यांच्या सहकाऱ्यांना वाटू लागले की, ब्रिटिश राजवटीतच आपल्याला मानवी हक्क प्राप्त होऊ शकतात. ब्रिटिश सरकार दयाळू आहे, ते मानवी अंतःकरणाने विचार करते. त्यांच्यामुळे अस्पृश्यांना न्याय मिळेल असा आशावाद निर्माण झाला होता. हिंदू धर्मात हस्तक्षेप न करण्याचे ब्रिटिशांचे धोरण होते. ते केवळ हिंदुस्तानात शांततेने राज्य करता यावे म्हणून हे धोरण ब्रिटिश पार्लमेंटने ठरवले होते. पण नेमके हेच धोरण अस्पृश्यांवर अन्याय करणारे होते. कारण हिंदू व्यवस्थेत विषमतापूर्ण जातिव्यवस्था होती. कालबाह्य रूढी, अंधश्रद्धा होत्या. अन्याय सामाजिक व्यवस्था होती. या संदर्भात अस्पृश्यांना वाटत होते की, ब्रिटिश सरकारने हस्तक्षेप करून हा अन्याय दूर करावा. गोपाळबाबा व त्यांच्या सहकाऱ्यांनी याविषयी ब्रिटिश सरकारकडे अपील केले. एवढेच नव्हे तर छत्रपती भोसले यांच्या आश्रयाने जगणारे व नावलौकिक सांगणारे पेशवे कटकारस्थाने करणारे आहेत. त्यांनी छत्रपतींशी बेईमानी केल्याचा इतिहास सांगितला. यावरून वलंगकर किती मुत्सद्दी होते हे लक्षात येते. गोपाळबाबा वलंगकर आद्य पत्रकार वलंगकरांना समाज उद्धाराचे कार्य करताना टोकाच्या टीकेचा सामना करावा लागला. वृत्तपत्रातून त्यांच्यावर टीका झाली. पण ते डगमगले नाही. विरोधकांना त्यांनी अत्यंत संयमाने आणि स्पष्ट शब्दांत प्रत्यु्त्तर दिले. त्यांनी स्थापन केलेल्या अनार्य दोष परिहारक मंडळ या कार्यावर दिनबंधू मधून कुणीतरी साळूबाई या टोपण नावाने लेखन करून टीका केली. तेव्हा वलंगकरांनी अस्पृश्यांवर करण्यात येणाऱ्या जुलमाचा मार्मिक शब्दांत आढावा घेतला. दलितांवर होणारे अन्याय, अत्याचार चव्हाट्यावर मांडणारे, दलितांच्या ाबजूने वृत्तपत्रातून भूमिका घेणारे वलंगकर हे आद्य पत्रकार होते. वलंगकरांनी वेगवेगळ्या वर्तमानपत्रांतून पंडित कोंडीराम हे टोपण नाव धारण करून काव्यरचना केली. आपल्या काव्यातून अस्पृश्यांवरील अन्यायाला वाचा फोडली. ते केवळ आपल्या सांसारिक जीवनात गुरफटून राहिले नाही, तर आयुष्यभर अस्पृश्यता, दारिद्र्य व ज्ञान या विरोधात संघर्ष करत राहिले. कोकण व कोकणाबाहेरील जनतेच्या भेटी घेऊन जनजागृतीचे काम केले. महाड शहरात कापड विकत घेणाऱ्यांना दुकानदार लांबूनच कापड दाखवत. तसेच एकदा अंगावर टाकलेला कपडा परत घेत नसत. वलंगकरांच्या प्रयत्नांमुळे अस्पृश्यांना कपडे पारखून घेता येऊ लागले. अस्पृश्यांना धर्मशाळेत प्रवेश मिळत नव्हता. पण वलंकरांच्या प्रयत्नामुळे त्यांना ओसरीत राहता येऊ लागले. सवर्णांनी रोखल्या होत्या प्रगतीच्या वाटा ब्रिटिश कालखंडात अस्पृश्यांना उन्नतीचे मार्ग उपलब्ध होऊ लागले होते. भारताची सामाजिक जडणघडण सुरू झाली होती. रस्ते, रेल्वेमार्ग, कापडगिरण्या, जहाज बांधणी व सैन्यात अस्पृश्यांना नोकऱ्या मिळू लागल्या. नेमक्या याच टप्प्यावर भारतातील उच्चवर्णीय हिंदूंनी अस्पृश्यांच्या प्रगतीच्या वाटा कशा रोखल्या, त्यांच्या कावेबाजपणावर डॉक्टर हनवते यांनी प्रखरपणे लिहिले आहे. ते लिहितात, 1857 च्या बंडानंतर ब्रिटिशांनी भारतातील लष्कराची पुनर्चना करण्याचे ठरवले. तेव्हा भारतातील या बंडाच्या कारणाचा शोध घेण्यात आला. अर्थात ब्रिटिशांना सल्ला देणारे उच्चभ्रू हिंदू लष्करातील अधिकारी होते. त्याप्रमाणे ब्रिटिशांना सल्ला देण्यात आला की, सैन्यात अस्पृश्यांना भरती केल्याने सैन्यातील उच्चभ्रू हिंदू सैनिकांच्या स्थानाला धक्का बसतो. अस्पृश्य समाजातील सुभेदार मेजर, जमादार यांच्या हाताखाली काम कणे कमीपणाचे वाटते. त्यातून पुढील काळात असंतोष निर्माण होऊ शकतो व त्यातून पुन्हा बंड होऊ शकते अशी भीती व्यक्त केली. त्यामुळे ब्रिटिशांनी अस्पृश्यांची सैन्यातील भरतीच बंद केली. 'मार्शल रेस थिअरी'चा कांगावा हिंदू अधिकाऱ्यांनी आणखी एक शक्कल लढवली. ती म्हणजे मार्शल रेस थिअरी. भारतातील ब्रिटिश सैन्यात मार्शल रेस थिअरी आणली गेली. मार्शल रेस म्हणजे लढाऊ जाती व नॉन मार्शल रेस म्हणजे बिगरलढाऊ जाती अशी वर्गवारी करण्यात आली. अस्पृश्य समाजाला नॉनमार्शल म्हणजे बिगर लढाऊ ठरवण्यात आले. अशा प्रकारचा मनुवादी डाव ब्रिटिश सैन्यातील हिंदू अधिकाऱ्यांनी खेळला. अस्पृश्यांनी आपल्यापेक्षा मोठ्या पदावर जाऊ नये हा त्यामागचा डाव होता. खरे तर अस्पृश्यांनी ब्रिटिशांसाठी अनेक लढाया गाजवल्या होत्या. 1 जानेवारी 1818 कोरेगाव भीमाच्या लढाईचा इतिहास ताजा असताना अस्पृश्यांना नॉनमार्शल कसे ठरवण्यात आले? उच्चभ्रू हिंदू अधिकाऱ्यांचे सल्ले ऐकून ब्रिटिश सरकारने अस्पृश्यातील 8 सुभेदार मेजर, 62 सुभेदार, 34 जमादार व हजारो अस्पृश्य सैनिकांना निवृत्त केले. या अन्यायाविरोधात गोपाळबाबा वलंगकर, शिवराम वाईकर, सुभेदार मेजर रामनाक मालनाक (रामजी आंबेडकर) यांनी न्यायमूर्ती रानडे यांच्या मदतीने आवाज उठवला. 1894 मध्ये मुंबई सरकारकडे अस्पृश्यांच्या सैन्य भरतीवरील बंदी उठवण्याची मागणी केली. सरकारकडे केलेल्या या अपिलात महार कसे शूरवीर आहेत, इमानदार आहेत हे सांगण्यासाठी कोरेगाव भीमाच्या लढाईतील पराक्रमाची आठवण करून दिली. त्यानंतर ब्रिटिशांनी पुन्हा अस्पृश्यांसाठी लष्कराची कवाडे उघडी केली. पाण्याला विटाळ होतो म्हणजे नेमके काय? गोपाळबाबा एखाद्या संतांप्रमाणे राहायचे. कीर्तन करायचे. समाजाला डोळस करायचे. त्यामुळे लोक त्यांना बाबा, बुवा, अथवा सद्गुरू असे आदराने म्हणायचे. 'महाडमधील लोक चळवळी' या पुस्तकात साहित्यिक प्रभाकर भुस्कुटे सांगतात, वलंगकर बाबा कीर्तनाला उभे राहिले, म्हणजे लोकांची प्रचंड गर्दी होत असे. अंधश्रद्धा, दुष्ट चालिरीती, अनिष्ठ रूढी परंपरा यावर ते परखडपणे भाष्य करत. माणूस माणसाला शिवला म्हणजे विटाळ होतो, म्हणजे नेमके काय होते? ते कर्मठ मंडळींना विचारीत. अस्पृश्य माणूस दगडाला शिवला म्हणजे दगडाचा देव वाटतो, म्हणजे काय वाटते? अस्पृश्यांच्या सावलीचा विटाळ, मातीवर उमटलेल्या पाऊलांचा विटाळ... अहो, विटाळ म्हणजे काय? माणसाला माणसाचा विटाळ होतो म्हणजे दोघांपैकी नेमके कोणाला शिंगे फुटतात? पाण्याला विटाळ होतो म्हणजे नेमके काय? पाणी नाहीसे होते का? भांड्याला विटाळ होतो म्हणजे नेमके काय होते? पाणी नाहीसे होते का? भांड्याला विटाळ होतो म्हणजे नेमके काय होते? भांडे बोलू लागते की हलायला लागते? या प्रश्नांची उत्तरे धर्मरुढीजवळ नाही. पाणी विटाळले की, गोमूीत्र टाकून शुद्ध होते. भांडे विटाळले म्हणजे ते जाळले की शुद्ध होते. मग माणूस अस्पृश्यांच्या स्पर्शाने विटाळला तर त्याला भाजायचे का? एखादा पवित्र हिंदू डॉक्टर मेलेल्या, सडलेल्या माणसाच्या प्रेताचे शव विच्छेदन करतो तेव्हा तो अपवित्र होत नाही. मात्र, अस्पृश्य रोग्याची नाडी तपासताना तो तसा बरे अपवित्र होतो? असे अनेक प्रश्न गोपाळबाबा कीर्तनातून लोकांना विचारायचे आणि त्यांच्या मेंदूला गदा गदा हलवायचे. वलंगकरांच्या खंडाळ्यातील कीर्तनाचा किस्सा तत्कालीन समाजसुधारक सर नारायणराव चंदावरकर 1894 साली एका व्याख्यानात वलंगकरांच्या खंडाळा येथे झालेल्या कीर्तनाविषयी सांगतात की, हा आपला देश जातिबंधनांनी अगदी बद्ध झालेला आहे, तरीसुद्धा अगदी खालच्या वर्गाचे म्हणून ज्यांना मानले जाते, त्या महारात सुद्धा अशी माणसे आढळतात, की ज्यांचा भाव, त्यांची भक्ती आपल्या अंतःकरणास अगदी तल्लीन सोडतात. भक्तांच्या व साधूंच्या पद्यांचे अगदी साध्या रीतीने त्यांनी केलेले निरुपण ऐकून मनाला फार समाधान वाटते. काही वर्षांपूर्वी खंडाळ्यास एका महारबुवाने हरिकीर्तन केले. त्यावेळी साधुसंतांची आठवण करताना त्याने अगदी कळवळ्याने म्हटले, अहो संत हो. आपण आमच्यावर फार उपकार केले आहेत. ज्यावेळी वेदांनी आम्हाला टाकले, ब्राह्मणांनी झिडकारले व लोकांनी आम्हास बहिष्कृ. केले, त्यावेळी आम्ही जे अगदी पतन पावलेले, सर्वात तिरस्करणीय वाटणारे महार त्यांना आपण जवळ केले. आपण आम्हाला आमच्या उद्धाराचा मार्ग दाखवला व आमच्या ठिकाणी आशा उत्पन्न केली. त्या आपले आम्ही उतराई कसे होणार? वलंगकर होते बाबासाहेबांचे प्रेरणास्थान बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यात गोपाळबाबांना फार आदराचे स्थान होते. ते गोपाळबाबांना आपले प्रेरणास्थान मानत. अस्पृश्यांच्या चळवळीचे आरंभबिंदू असलेल्या वलंगकराविषयीचा आदर त्यांनी वेळोवेळी व्यक्त केला. मुंबई असेंब्लीच्या 1937 च्या निवडणुकीत स्वतंत्र मजूर पक्षातर्फे कुलाबा मतदारसंघात उभे असलेले आपले सहकारी सुभेदार विश्राम सवादकर यांच्या निवडणूक प्रचार मोहिमेचा शुभारंभ करण्यासाठी आंबेडकर रावढूळ येथे आले होते. तेव्हा त्यांनी गोपाळबाबांच्या अभिवादन केले होते. फुले व वलंगरांच्या सत्यशोधक चळवळीचे आम्ही वारसदार आहोत हे मोठ्या अभिमानाने ते सांगत. ते एका टीकाकाराला उत्तर देताना म्हणतात, आम्ही सत्यशोधकी आहोत. त्याबद्दल आम्हास कोणत्याही तऱ्हेचा विशाद न वाटता आनंदच वाटतो. सत्यशोधकी चळवळ म्हणजे समानतेची व सद्धर्माची चळवळ असे आमचे ठाम मत आहे. आमच्या मित्रास आमची सूचना आहे की, त्यांनी सत्यशोधक व्हावे व आपल्या जातभाईसाठी सत्यशोधक बनवण्याचा प्रयत्न करावा. गोपाळबाबा वलंगकरांचा संघर्ष आजही आपल्याला अन्यायाच्या विरोधात ठामपणे उभे राहणे, अंधश्रद्धा व रूढींना प्रश्न विचारणे, प्रत्येक माणसाच्या हक्कांसाठी आवाज उठवणे किती महत्त्वाचे आहे हे शिकवतो. त्यामुळे वलंगकरांचे जीवन फक्त इतिहासातील एक घटना नाही; तर ते एक प्रेरणास्थान आहे. ही प्रेरणा समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येकाला मार्गदर्शन करते. आज आपल्याला सामाजिक समतेचे जे काही हक्क मिळाले आहेत, त्यामागे वलंगकरांसारख्या धुरंधरांची मेहनत आहे. त्यांच्या चळवळीची किरणे अजूनही आपल्याला प्रकाश देत आहेत. त्यामुळे आपण त्यांच्याविषयी नेहमीच कृतज्ञ राहिले पाहिजे. धुरंधर मालिकेतील खालील स्टोरीज वाचा… धुरंधर-66; मुक्ता साळवे:वेद आपले 'धर्मपुस्तक' नाही असे ठणकावून सांगणाऱ्या गावकुसाबाहेरील दलित महिलेचा पहिला विद्रोही हुंकार धुरंधर-65; भाऊ दाजी लाड:भारताच्या प्राचीन वारशाचा शोध घेत कुष्ठरोगावर औषध शोधून पाश्चात्यांना जबर धक्का देणाऱ्या जिद्दी तरुणाची गोष्ट धुरंधर-64; दुर्गाबाई देशमुख:राष्ट्रसेवेची अखंड ज्योत असणाऱ्या फ्रॉकवाल्या छोट्या शिक्षिकेची निष्ठा अन् निडरपणाची गोष्ट धुरंधर-63; वासुदेव सीताराम बेंद्रे:शिवजयंतीची तारीख निश्चित करणारा अन् शंभूराजांचे ऐतिहासिक पुनर्वसन करणारे मराठ्यांच्या इतिहासाचे भीष्माचार्य धुरंधर-62; गुरुवर्य केळूसकर:'दादोजी कोंडदेव अन् रामदास स्वामी शिवरायांचे गुरू नाहीत' असे ठामपणे सांगणारा महाराष्ट्राचा उपेक्षित वाङ्मयमहर्षी धुरंधर-61; सी. व्ही. रामन:आकाशाचा अन् समुद्राच्या पाण्याचा रंग निळाच का? या प्रश्नाचे उत्तर प्रकाशाच्या गुणधर्मातून देणारा भौतिकशास्त्रज्ञ धुरंधर-60; अलेक्झांडर कनिंगहॅम:काशी लगत स्वर्गात जाणाऱ्या पायऱ्यांचा शोध लावणारा अन् बुद्धांचा भारत शोधणारा इंग्रजी लष्करी अधिकारी धुरंधर-59; संत बंका:देव आमचाही असेल तर मंदिर का नाही? असा प्रश्न करणारे मोठ्या ग्रंथांचे नव्हे, तर मोठ्या प्रश्नांचे संत! धुरंधर-58; अँटोनियो ग्राम्शी:तुरुंगाच्या 4 भिंतीत जग बदलण्याची शक्ती शोधणारा अन् वैचारिक क्रांती शस्त्रांपेक्षा वरचढ असल्याचे सांगणारा विचारवंत धुरंधर-57; डॉ. श्रीराम लागू:'देवाचे अस्तित्व हीच मोठी अंधश्रद्धा' असल्याचे ठणकावून सांगत समाजाला अस्वस्थ करणारा बुद्धिवादी माणूस धुरंधर-56; राणी गाइदिन्ल्यू:झाशीच्या राणीची गोष्ट माहिती असणाऱ्यांना इंग्रजांना आव्हान देणाऱ्या आदिवासी कन्येची गोष्ट माहिती आहे का? धुरंधर-55; पां. म. बापट:सशस्त्र क्रांतिकारक ते अहिंसक सत्याग्रहाचा सेनापती अन् अखेर झाडू उचलून ग्राम स्वच्छता करणारा सुधारक धुरंधर-54; नाना पाटील:म्हार, मांगांना लांब का ठेवता? ते घान कामं करत्यात म्हणून? तुमचा डावा हातही तेच करतो, असे सांगणारा क्रांतिसिंह धुरंधर-53; नेल्सन मंडेला:भारताला दुसरे घर मानणाऱ्या आफ्रिकन गांधींची कहाणी; 27 वर्षे कैद भोगूनही मनात कटूता न ठेवणारा मदिबा धुरंधर-52; शकुंतला देवी:शाळेचे तोंड न पाहता संगणकाची परीक्षा पाहणाऱ्या अन् गणिताला खेळ मानणाऱ्या कानडी महिलेची जादूई कहाणी धुरंधर-51; केशवराव जेधे:ब्राह्मणेतर चळवळीचा प्रमुख चेहरा अन् सामाजिक न्यायासाठी झगडणारा ठसकेबाज दृढनिश्चयी मराठी लढवय्या धुरंधर-50; डॉक्टर सलीम अली:पक्ष्यांच्या जगाचे रहस्य उलगडून मानवाला निसर्गाच्या दिशेने जाण्यास प्रेरित करणारा पक्ष्यांचा 'चालता फिरता विश्वकोश' धुरंधर-49; सर रोनाल्ड रॉस:'साला एक मच्छर'! मलेरिया अन् डास यांच्यातील परस्पर संबंध शोधून मानवतेची सेवा करणारा थोर वैज्ञानिक धुरंधर-48; होमी जहांगीर भाभा:दगडधोंड्यांच्या भारतात अणुज्योत पेटवून अज्ञानाचा अंधःकार दूर करणारा श्रीमंत घरातला बंडखोर तरुण धुरंधर-47; बिंदेश्वरी प्रसाद मंडल:ओबीसींच्या सामाजिक न्यायाच्या इमारतीचा सर्वात मजबूत पाया रचणाऱ्या बिहारच्या जमीनदाराची कथा धुरंधर-46; कार्ल बुशबी:ना ट्रेन ना प्लेन ना बाईक, तब्बल 27 वर्षांच्या अन् 58 हजार किलोमीटरच्या पदयात्रेची अनोखी कथा जी आजही सुरूय धुरंधर-45; जाईबाई चौधरी:स्त्री जीवन फुलवणारी अन् दलित महिलांना शैक्षणिक, सांस्कृतिक संजीवणी देणारी विदर्भातील थोर सेविका धुरंधर-44; ओशो रजनीश:पापाला पुण्याचे अन् हिंसेला अहिंसेचे कपडे घालावे लागतात असे सांगत ईश्वरापूर्वी स्वतःला शोधण्याचा सल्ला देणारा थोर दार्शनिक धुरंधर-43; अमृता प्रीतम:मैं तेनु फिर मिलांगी, कित्थे? किस तरह? पता नहीं; प्रेम, वेदना अन् स्वातंत्र्याचा सूर छेडत बाईचे जगणे मांडणारी लेखिका धुरंधर-42; दगडाबाई शेळके:स्वतःच्या नवऱ्याचे दुसरे लग्न लावून मराठवाडा मुक्तिसंग्रामात स्वतःला झोकून देणारी जालन्याची 'झाशीची राणी' धुरंधर-41; यशवंत घाडगे:दुसऱ्या महायुद्धात मर्दुमकी दाखवत ब्रिटिशांकडून इटलीच्या सैनिकांना कंठस्नान घालणारा मराठी सैनिक धुरंधर-40; शाहीर अमर शेख:धग, रग, आग, धुंदी अन् बेहोशीची जिवंत बेरीज असणारा तथा 'बर्फ पेटला हिमालयाला विझवायला चला' म्हणणारा शाहीर धुरंधर-39; टी. एन. शेषन:'नेत्यांना नाश्त्यात खाणारे' तथा EC ला अभूतपूर्व ताकद अन् प्रतिष्ठा मिळवून देणारे भारताचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त धुरंधर-38; डॉ. एम एस स्वामीनाथन:उपासमारीच्या सावटाखाली झुरणाऱ्या भारताला स्वावलंबनाचे स्वप्न दाखवून ते सत्यात उतरवणारा शास्त्रज्ञ धुरंधर-37; मेजर शैतान सिंह:1962 च्या भारत - चीन युद्धात 120 जवानांच्या जोरावर शत्रूचा फडशा पाडणारा अन् पोट फाटले तरी मैदान न सोडणारा बहाद्दर धुरंधर-36; राणी वेलू नाचियार:महिलांची फौज तयार करून ईस्ट इंडिया कंपनीच्या सैनिकांना पहिल्यांदा धूळ चारणारी शिवगंगाची 'वीर मंगई' धुरंधर-35; अय्यनकाली:महिलांना छाती झाकण्याची परवानगी मिळवून देणारा अन् दलितांनी पिकवलेले धान्य चालते, मग ते का चालत नाहीत? असा प्रश्न करणारा सुधारक धुरंधर-34; जगन्नाथ शंकरशेठ:लोकांचा विश्वास जिंकणारी श्रीमंती गरिबांवर उधळणारा अन् परकियांनाही आपला वाटणारा मुंबईचा खरा शिल्पकार धुरंधर-33; अण्णाभाऊ साठे:दीड दिवस शाळेत जाऊन साहित्याचा सूर्य झालेला लोकशाहीर; जात, धन अन् धर्मदांडग्यांना आव्हान देणारा अण्णा धुरंधर-32; धीरूभाई अंबानी:गरिबीवर मात करत कोट्यवधी भारतीयांना मोठी स्वप्ने पाहण्याची प्रेरणा देणारे भारताचे एक अप्रतिम उद्योग रत्न धुरंधर-31; राजर्षी शाहू महाराज:अस्पृश्याला मानाचे पान अन् नांगरासाठी तोफा वितळवून लोखंड देणारे शाहू महाराज ग्रेट का होते? धुरंधर-30; चे गेव्हारा:अन्यायाविरोधात लढण्याची जिद्द जागवून अवघ्या जगातील क्रांतीचा चेहरा बनलेला तुमच्या 'T शर्ट'वरील क्रांतिदूत धुरंधर-29; संत कबीर:पैशांच्या मागे पळणाऱ्यांचा देव कसा? असा परखड सवाल करत समस्त मानवतेला साधेपणाचा संदेश देणारा महानायक धुरंधर-28; राणी चेन्नम्मा:स्वकियांची फंदफितुरी जमिनीत गाडून 1857 च्या सशस्त्र उठावापूर्वी इंग्रजांना धूळ चारणारी 'कर्नाटकची लक्ष्मीबाई' धुरंधर-27; अहिल्याबाई होळकर:न्यायबुद्धीने स्वतःच्या नवऱ्याला धारेवर धरत चोराच्याही पोटाचा प्रश्न सोडवणाऱ्या दूरदृष्टीच्या शासक धुरंधर-26; डॉ. जयंत नारळीकर:ब्रह्मास्त्र होते तर रामाच्या राज्यात वीज होती का? असा झोंबणारा प्रश्न करणारा भारताचा मराठमोळा शास्त्रज्ञ धुरंधर-25; मुथुलक्ष्मी रेड्डी:महिला हक्क अन् आईचे 'देवदासी'पण पाहून त्याविरोधात लढा पुकारणाऱ्या भारताच्या पहिल्या महिला आमदार धुरंधर-24; कुलदीपसिंग चांदपुरी:पाकच्या 2000 हून अधिक सैनिकांना 120 जवानांच्या बळावर धूळ चारणारा लढवय्या; '1971' ची अमर गाथा धुरंधर-23; चंद्रप्रभा सैकियानी:पडदा प्रथेवर लाथ घालून महिलांना आभाळ खुले करणारी आसामची हिरकणी; कुमारी माता झाली तरी डगमगली नाही धुरंधर-22; कर्मवीर भाऊराव पायगौंडा पाटील:महाराष्ट्राच्या मातीत शिक्षणाचा सूर्य पेरून उपेक्षितांच्या झोपडीत ज्ञानाचे पीक काढणारा खरा 'धुरंधर' धुरंधर-21; प्रबोधनकार ठाकरे:मराठी समाज मनात मोक्याच्या ठिकाणी पक्क्या गाठी मारून जातिभेदांच्या जखमांचा खोलवर शोध घेणारा बहुजन हिंदुत्त्ववादी धुरंधर-20; भीमराव रामजी आंबेडकर:चवदार तळ्याला ताळ्यावर आणणारा दलितोद्धारक अन् सामाजिक समरसतेचा खरा विवेकी शिल्पकार धुरंधर-19; जिगर मुरादाबादी:'शराब पीने दे मस्जिद में बैठ कर, या वो जगह बता जहाँ खुदा नहीं,' असे म्हणत मौलवींकडून टाळ्या पिटवून घेणारा सूफी शायर धुरंधर-18; आनंदीबाई जोशी:'पृथ्वीच्या पाठीवर हिंदुस्तान इतका दुसरा रानटी देश नाही', असे ठणकावून सांगणाऱ्या भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर धुरंधर-17; भगतसिंग:'बॉम्ब अन् पिस्तुले क्रांती आणत नाहीत, क्रांती लोकांच्या मनात जन्मते', असे ठामपणे सांगणारा 'शहीद ए आझम' धुरंधर-16; शहाजीराजे भोसले:छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याच्या संकल्पनेचे प्रेरणास्थान अन् बृहन्महाराष्ट्राची स्थापना करणारा धोरणी राजा धुरंधर-15; ई. व्ही. रामासामी:देव आहे हे सिद्ध करण्याचे आव्हान देत तर्कशुद्ध अन् निर्भय मतांद्वारे समाजात क्रांती घडवणारा भारताचा 'पेरियार' धुरंधर-14; कार्नेलिया सोराबजी:रूढी परंपरांना आव्हान देत शिक्षण, समानता अन् मानवी हक्कांसाठी अथक झगडणारी भारताची पहिली महिला बॅरिस्टर धुरंधर-13; खासेराव जाधव:बहुजन समाजाच्या खांद्यावरील निरक्षरतेचे 'जू' काढून त्यांना उच्च शिक्षणाच्या गंगेचे पाणी पाजणारा अवलिया धुरंधर-12; तंट्या भिल्ल:आदिवासींमध्ये राष्ट्रीयत्व जागवणारा 'रॉबिनहूड', थोर स्वातंत्र्यसैनिक; वाचा स्वातंत्र्य लढ्यातील संघर्षाचे सोनेरी पान धुरंधर-11; विठ्ठल सखाराम पागे:उकिरड्याला खरकटे माहिती नसल्याच्या काळात 'भूकबळी'वर नामी उपाय शोधणारा राजकारणी धुरंधर-10; मोहन हिराबाई हिरालाल:विनोबा भावेंचे 'सर्वायतन' नक्षलग्रस्त गडचिरोलीत रुजवणारा अन् गरिबांना लक्ष्मीदर्शन घडवणारा अवलिया धुरंधर-9; फातिमा शेख:सावित्रीमाईंची मैत्रीण अन् भारताची पहिली मुस्लिम शिक्षिका; फातिमा एक काल्पनिक पात्र होत्या का? तुम्हीच ठरवा धुरंधर-8; एकनाथ दगडू आवाड:बापाचा बुचडा कापून 'पोतराज' प्रथेवर घाव घालणारा पोरगा; कथित गुन्हेगारीने बदनाम झालेल्या बीडचा थोर माणूस धुरंधर-7; स्वामी विवेकानंद:मानवतेचा उत्कृष्ट प्रेमी, महान निधर्मी तत्ववेत्ता; नरेंद्रनाथ दत्त यांचे अखेरचे काही तास कसे होते? धुरंधर-6; कंदुकुरी वीरेशलिंगम पंथुलु:अंधश्रद्धेवर लाथ घालून विधवा पुनर्विवाह अन् ज्ञानाची वात पेटवणारा आंध्रचा 'लेखणी'सम्राट धुरंधर-5; भाऊराव कृष्णराव गायकवाड ऊर्फ दादासाहेब गायकवाड:दोन वेळा वाचवले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्राण धुरंधर-4; डॉ. विश्राम रामजी घोले:महिला उत्थानासाठी पेटून उठलेला सुधारक, ज्यांची 'बाहुली' ठरली स्त्री शिक्षणाची पहिली बळी धुरंधर-3; पार्वतीबाई आठवले:वैधव्य अन् परावलंबन दैवी भोग मानणारी, पण पोटच्या गोळ्याच्या काळजीने असामान्य झालेली एक निरक्षर स्त्री धुरंधर-2; बसव प्रेमानंद:अंधश्रद्धेच्या खाटेवर आजारी पडलेल्या समाजाला विज्ञानाचे औषध देऊन चमत्कारांची पुरती हवा काढणारा थोर दार्शनिक धुरंधर-1; नरहर अंबादास कुरुंदकर:विचारांची श्रीमंती वाढवणारा अन् आजच्या किर्र वैचारिक काळोखात प्रकाशवाट दाखवणारा थोर विचारवंत
Pune News : ७०० ग्रॅम ते १ किलो वजनाचा दुर्मिळ मासा पाहण्यासाठी गर्दी; निर्यात सुरू होईपर्यंत पुणेकर चाखणार परदेशी चव.
Khopoli News : नगररचना विभागाच्या चौकशीत २०२२-२३ मधील बनावट पावती घोटाळा उघड; बांधकाम परवानग्या तातडीने रद्द.
Pune News : फॅशनसाठी नव्हे, पॅशनसाठी काम करा! शेफ हेमंत ओबेरॉय यांचा विद्यार्थ्यांना मोलाचा सल्ला
Pune News : टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा ४४ वा पदवीदान समारंभ संपन्न; मुख्यमंत्री प्रमोद सावंत, शेफ हेमंत ओबेरॉय आणि ए. महेशकुमार रेड्डी यांना 'डी.लिट' पदवीने सन्मानित.
भुकेलेल्यांना अन्न न दिल्यास...
महाभारतातील मोतीकण ; भालचंद्र ठोंबरेपद्म पुराणातील एका कथेनुसार, वनवासात असताना प्रभू श्रीराम एकदा अगस्ती ऋषींच्या आश्रमात आले. अगस्ती ऋषींनी त्यांचे आनंदाने स्वागत केले व एक अनमोल हार श्रीरामांना भेट देऊ केला. तेव्हा श्रीरामांनी ब्राह्मणाकडून क्षत्रियांनी घेतलेले दान योग्य ठरेल का? असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर बराच विचारविनिमय होऊन अखेर श्रीरामांनी तो हार स्वीकारला. तो हार अत्यंत बहुमोल होता. आवळ्या-एवढ्या हिऱ्यांच्या त्या हारात, मेघ, पुष्पराज, आदी अनेक रत्ने चकाकत होती. त्या हाराचे कौतुक करून श्रीरामांनी ऋषींना आपणास हा हार कसा प्राप्त झाला याबाबत विचारणा केली.तेव्हा अगस्ती ऋषी म्हणाले, “हे रामा,! त्रेता युगातीलच ही घटना आहे. मी एका अरण्यात तपश्चर्येच्या उद्देशाने गेलो होतो. त्या अरण्यात हिंस्त्र पशू नव्हते. एके दिवशी मी त्या अरण्यात फिरताना एका सरोवराजवळ गेलो. त्या ठिकाणी मला एक शव दिसले. वाघ, सिंह नसलेल्या या अरण्यात हे शव कसे व कोठून आले याचा मी विचार करीतच होतो. तोच हंसाने युक्त एक विमान आकाशमार्गे येताना दिसले. त्या विमानात गंधर्व अप्सरा नृत्य, गायन व वादन करीत होत्या. थोड्या कालांतराने विमानातून एक पुरुष उतरला. त्याने सरोवरात स्नान केले व नंतर शवाजवळ जाऊन तो शवाचे मांस खाऊ लागला. मांस भक्षण झाल्यानंतर त्याने पुन्हा सरोवरात स्नान केले व विमानात बसून ते सर्वजण गेले.हीच घटना पुन्हा एकदा दिसली त्यावेळेस मी त्या पुरुषाला या घटनेबाबत विचारले व आपण सुस्थितीत असतानाही आपला आहार असा निंद्य प्रकारचा का असावा याची विचारणा केली. तेव्हा तो पुरुष म्हणाला, “मी विदर्भातील वसुदेव नावाच्या राजाचा पुत्र होतो. मला सुरथ नावाचा लहान भाऊ होता. पित्याच्या मृत्यूनंतर माझा राज्याभिषेक झाला. मी योग्य प्रकारे प्रजेचे पालन केले. पुढे अचानक मला विरक्ती आल्याने मी लहान भावाकडे राज्यकारभार सोपवून वनात गेलो. अनेक वर्षे तपश्चर्या केली. या तपश्चर्येमुळे मला ब्रह्मलोकाची प्राप्ती झाली. पण ब्रह्मलोकात असूनही मी तहान-भुकेने व्याकुळ होत असे. त्यामुळे मी एक दिवस याचे कारण ब्रह्मदेवांना विचारले. तेव्हा पितामह म्हणाले, तू भुतलावर राज्य करीत असताना एकदा तुझ्याकडे आलेल्या भुकेलेल्या भिकाऱ्याला अन्न न देता स्वतःचेच उदरभरण करण्याची चूक तुझ्या हातून घडली व त्यामुळे तुला ही भुकेची जाणीव होत असते.यावर उपाय काय म्हणून विचारले असता, तुला तुझ्याच शवाचे मांस भक्षण करावे लागेल, असे सांगितले. तेव्हा राजा म्हणाला, देवा आता माझ्या देहाचा अस्थिपंजर झाला असेल; परंतु ब्रह्मदेव म्हणाले नाही मी तुझ्या शवाला अक्षय बनविले आहे. त्यामुळे ते कधीच समाप्त होणार नाही. रोज तुझे शव पुष्टच मिळेल. यातून माझी सुटका कधी व केव्हा होणार असा मी ब्रह्मदेवांना प्रश्न केला असता ते म्हणाले, जेव्हा तुझी व अगस्त्यी मुनींची भेट होईल. त्याच वेळेस तुझी या कृत्यातून सुटका होईल. तेव्हापासून मी त्या ऋषींचीच वाट पाहत आहे व चिंतन करीत असतो.यावर मी म्हणालो, मीच तो अगस्ती मुनी आहे. तेव्हा त्या शापित राजाने त्यांना साष्टांग नमस्कार करून या निंदनीय कृत्यापासून आपला उद्धार करण्याची विनंती केली. अगस्ती ऋषींनी त्याचा उद्धार केला. त्यावेळेस तो राजा शापमुक्त होऊन त्याचा मानवी देह नष्ट होऊन तो ब्रह्मलोकी गेला. जाण्यापूर्वी त्याने सर्व इच्छापूर्ती करणारा हा हार मला दिला.तात्पर्य - तेव्हा भुकेलेल्यांना अन्न न देण्यासारखे कर्म स्वतःकडून झाल्यास शवाचे मांस भक्षण करण्यासारख्या निंदनीय कृत्याला सामोरे जावे लागू लागते. असा बोध पद्मपुराणातील या कथेवरून होतो.
Maval News : सिलेंडरसाठी २० दिवस वेटिंग? मावळच्या शेतकऱ्यांनी शोधला जालीम उपाय; जाणून घ्या काय आहे?
Maval News : घरगुती गॅस सिलेंडरसाठी लांबच लांब रांगा आणि वाढत्या खर्चामुळे ग्रामीण भागातील नागरिक पर्यायी ऊर्जास्रोतांचा शोध घेत आहेत.
आनंदी पालकत्व ; डाॅ. स्वाती गानूटीनएजर्स मुलांना संयम कसा शिकवाल?संयम हा एक चांगला गुण आहे, मात्र तो जन्मतःच नसतो. तो विकसित करावा लागतो. आजच्या वेगवान आणि ताबडतोब सगळं मिळणाऱ्या जगात टीनएजर्सना संयम ठेवणे कठीण जाते. अनेक मुलांना खूप वेळ रिझल्ट्सची वाट पाहणे, निराशा सहन करणे किंवा आपली पाळी येईपर्यंत थांबणे अवघड वाटते. पण ‘संयम’ खूप महत्त्वाचे जीवनकौशल्य आहे. संयम मुलाचं भावनिक आरोग्य टिकवायला, चांगले निर्णय घ्यायला आणि निरोगी नातेसंबंध ठेवायलामदत करतो.पालक म्हणतात, माझी मुलगी उतावळी आहे. माझा मुलगा फार हायपर आहे. जे हवे ते त्यांना ताबडतोब हवं असतं आणि हवंंच असतं. जरा म्हणून ऐकून घ्यायला, थांबायला तयार नसतात ही मुलं. कधी कधी तर वाटतं की हे उतावळेपण त्यांच्यामध्ये वारशातूनच आलंय अशी विधानेही पालकांकडून ऐकायला मिळत असतात.पालकांनो, मुलांना वेळेत संयम शिकवायला हवा. खरं म्हणजे मुलांकडे संयम नसतो असं नाही, मात्र अलीकडच्या काळात घरात एकुलतं एक मुल असल्याने मुलांना ओव्हर प्रोटेक्ट केलं जातं त्यांचं मन खूप जपलं जातं. मुलांच्या आवडीनिवडी लक्षात ठेवून पुरवल्या जातात. प्राधान्याने त्याच्यावर काम केलं जातं. त्यांना हव्या असलेल्या वस्तू मागणी होताच त्वरित घेऊन दिल्या जातात. त्यामुळे एखाद्या गोष्टीसाठी थांबायचं असतं, त्या वस्तूची मागणी करताना खरंच आपल्याला त्या वस्तूची गरज आहे का? आई-बाबा तेवढे पैसे खर्च करू शकतात का? किंवा मी थांबू शकतो का? हा सगळा सारासार विचार करणे यासाठी जो संयम हवा, तो खरोखरच मुलांना शिकवायला हवा.मुलांना हे सांगू या, की संयम म्हणजे काय असतो, तर शांतपणे वाट पाहायला शिकणं असतं. न चिडता, न रागावता, गिव्हअप न करता.मुलांनो तुम्ही संयमाने का वागायचं कारण जर तुम्हाला चांगल्या गोष्टी आयुष्यात मिळाव्या असं वाटत असेल, तर चांगल्या गोष्टींसाठी वेळ द्यावा लागतो. जसं आपण बी पेरलं, की एका रात्रीत रोप उगवत नाही. त्याला फुलं येत नाहीत किंवा फळं येत नाहीत आणि त्याचं झाड बहरून येत नाही. तसंच संयम म्हणजे बीचे फूल होऊ देण्यासाठी, वाढ होऊ देण्यासाठी थांबणं. मुलांना सांगावं लागेल, की संयमातून तुम्ही शिकता, की तुमची टर्न येणार आहे. तुमचा नंबर येणार आहे तोपर्यंत थांबायला हवं. संयम ठेवलात, की तुम्हाला तुमच्या स्वप्नांपर्यंत पोहोचायला मदत होते. संयम असला की तुम्ही शांत डोक्याने विचार करू शकता. तुमची सारासार विचार बुद्धी तुम्हाला वागताना, निर्णय घेताना मदत करते. कधी-कधी मुलांना गोष्टी ताबडतोब व्हाव्या असं वाटतं पण ते नॉर्मलच असतं. मात्र जेव्हा तुम्ही संयम ठेवायला शिकता, शांतपणे वेळ देऊन काम करता तेव्हा तुमचं हृदय मजबूत होतं आणि तुमचं मन शहाणपणाने विचार करतं.पालकांनो मुलांना संयम कसा शिकवता येईल ते पाहूया :१. स्वतः संयम दाखवामुलं मोठ्यांकडून पाहून खूप काही शिकतात. तुम्हाला तुमच्या मुलाने संयम शिकावा असे वाटत असेल, तर तुम्ही स्वतः तो पाळा. रांगेत थांबताना, एखादी अडचण आली तर किंवा ताण आला तरी शांत राहण्याचा प्रयत्न करा. तुमचं वागणं त्यांच्यासाठी उदाहरण असते. जेव्हा तुमचा संयम आजमावला जातो, तेव्हा त्याबद्दल मोकळेपणाने बोला. तुम्हाला कसं वाटतं आणि तुम्ही शांतपणे परिस्थिती कशी हाताळता हे सांगा. उदा. ट्रॅफिकमध्ये अडकला, उशीर झाला तरी शांतपणाने परिस्थिती हाताळता येते. न रागावता न चिडता थांबता येते.२. मुलांना सब्र का फल मीठा होता है! काही गोष्टी उशिरा मिळण्याची सवय लावा.पी हळद आणि हो गोरी असं एखाद्या गोष्टीबद्दल ताबडतोब फळ मिळेल अशी अपेक्षा करणं योग्य नाही. तर कष्ट केले तरी काही वेळाने फळ मिळेल हा विचार, दृष्टिकोन, संयमाशी जोडलेले आहे आणि आयुष्यात यश मिळवण्यासाठी महत्त्वाचे आहे. राग किंवा चुळबूळ करावीशी वाटत असेल, तर हळूहळू दीर्घ श्वास घ्या हेही सांगता येईल.उदा. एखादी खास वस्तू घेण्यासाठी पैसे साठवणे, बाग लावून तिची काळजी घेणे किंवा एखाद्या कौशल्यासाठी सातत्याने सराव करणे.३. शांत राहण्याचा सराव (माइंडफुलनेस)माइंडफुलनेस म्हणजे सध्याच्या क्षणावर लक्ष देणे. त्यामुळे घाईघाईने प्रतिक्रिया देणे कमी होते आणि भावना नियंत्रणात राहतात.मुलांना खोल श्वास घेणे, ध्यान करणे किंवा योगा करायला प्रोत्साहित करा. यामुळे प्रतिक्रिया देण्याआधी थांबून विचारकरण्याची सवय लागते.४. वास्तव ध्येय ठरवायला मदत कराध्येय ठरवणे आणि त्यासाठी मेहनत करणे यामुळे संयम शिकता येतो. पण ध्येय लहान टप्प्यांत विभागलेले असावे.मुलांसोबत लहान आणि मोठी ध्येये ठरवा. प्रत्येक छोट्या यशाचा आनंद साजरा करा. त्यामुळे त्यांना समजेल, की हळूहळू प्रगती करणे महत्त्वाचे आहे.५. थांबण्याच्या संधी द्याआजकाल सर्व काही लगेच मिळते, त्यामुळे मुलांना वाट पाहण्याची सवय नसते. त्यांना थोडा वेळ थांबावे लागेल अशा गोष्टी करा.उदाहरणे:कोडी सोडवायला लावा पण त्यात संयमाची गरज असते.स्वयंपाक-पदार्थ बनवताना त्या पदार्थासाठी सुरुवातीला लागणारी सगळी तयारी करणे संयम शिकवते. तसंच चिरणे, वाफवणे, या गोष्टींसाठी संयम ठेवावा लागतो.छंद-वाद्य वाजवणे, चित्रकला किंवा हस्तकला यासाठी सराव आणि वेळ लागतो.६. समस्या सोडवण्याची कौशल्ये शिकवाकाही वेळा गोष्टी मनासारख्या होत नाहीत म्हणून अधीरता येते. समस्या सोडवण्याची पद्धत शिकवल्यास मुलं शांत राहायला शिकतात.समस्या सोडवण्याची पद्धत :समस्या ओळखा - काय त्रास देत आहे ते स्पष्ट करा. उपाय सुचवा-वेगवेगळे मार्ग विचारात घ्या. पर्याय तपासा-प्रत्येक उपायाचे फायदे-तोटे पाहा. कृती करा-एक उपाय निवडून प्रयत्न करा. विचार करा-काय चांगले झाले, काय नाही ते बघा.७. संयमाचे कौतुक करामुलांनी संयम दाखवला, तर त्यांचे कौतुक करा. आधी लगेच प्रतिक्रिया देणारे मूल शांत राहिले तर त्याची दखल घ्या. मला माहीत आहे शांत राहणे वाट बघणं कठीण असतं, पण तू ते करून दाखवलंस असे मुलाला म्हणा. त्यांच्या भावना समजून घ्या. मुलांनी संयम दाखवल्यास त्यांना बक्षीसही देता येईल. बक्षीस मोठे असण्याची गरज नाही. कौतुकाचे शब्द किंवा छोटी विशेष परवानगीही पुरेशी असते. त्यामुळे त्यांना संयमाचे महत्त्व कळते.संयम हा जन्मजात गुण नसून सरावाने विकसित होणारे कौशल्य आहे. योग्य मार्गदर्शन आणि आधार दिल्यास किशोरवयीन मुले हळूहळू संयम शिकू शकतात. यामुळे ते आयुष्यातील आव्हानांना शांतपणे आणि विचारपूर्वक सामोरे जाऊ शकतात.किशोरवयीन मुलांना संयम शिकवण्यासाठी तुम्ही स्वतः शांत राहून उदाहरण द्या, त्यांना शांत राहण्याच्या सोप्या पद्धती शिकवा आणि थोडा वेळ थांबायला लावा. कंटाळा आला तर छंद लावायला सांगा, कामांसाठी टाइमर वापरायला सांगा आणि “मला आता राग येतोय” किंवा “मला अधीर वाटतंय” अशा भावना ओळखायला मदत करा.तुम्ही संयमाने वागलात, तर तुम्हाला जाणवतं की तुम्ही कणखर होऊ लागताय. जी मुलं संयमाने विचार करतात ते हिंमतवाले असतात आणि शहाणे असतात. संयम ठेवला तर तुम्ही राग आणि दुःखापासून लांब राहाल. आनंदी राहण्याची गुरुकिल्ली काय आहे तर संयम. त्यामुळे तुम्ही खूश राहाल, यशस्वी व्हाल. थांबणं म्हणजे वेळ फुकट घालवणं नाही, तर संयम म्हणजे जगण्यावर विश्वास ठेवणं असतं. हे मुलांना आवर्जून सांगा.
‘रूक जा रात, ठहर जा रे चंदा...’
नॉस्टॅल्जिया ; श्रीनिवास बेलसरेपूर्वी अनेक सिनेमा असे निघाले की त्यांनी प्रेक्षकांना ढसढसा रडवले होते. त्याची दोन कारणे होती. त्याकाळी लोक कथेत रंगून जात, कथेतील पात्रांच्या जीवनाशी समरस होत आणि बहुतेकदा कथानक लोकांच्या भावविश्वाशी जुळणारेच असायचे. हल्लीसारखे मोठमोठे गँगस्टर्स, दक्षिण भारतातील सिनेमासारखे राजकारणातील कुटील गुंड, त्यांचे उद्योग, कोणतेही नितीमुल्ये न मानणारे नवे स्वच्छंदी जग आणि त्यातल्या बेधुंद तरुणतरुणी, पोलीस-कम-गुन्हेगार, मनोविकृत खुनशी, हिंसक व्यक्ती यांचे जीवन दाखवून त्यांचे उदात्तीकरण करणाऱ्या कथा लोकप्रिय होण्याचा तो काळ नव्हता.दुसरी गोष्ट म्हणजे निर्मातेसुद्धा केवळ दोन घडीचे मनोरंजन हे एकमेव उद्दिष्ट ठेवून कलानिर्मिती करण्यासाठी अगतिक झालेले नव्हते. सिनेमा चालेल की नाही? ही भीती नसल्याने आदर्शवादी कथानक असलेल्या सिनेमासाठीसुद्धा निर्माते मिळायचे आणि प्रेक्षकही मिळायचे. त्यामुळे कवी, संगीतकार, लेखक, समाजसुधारक, बेकार तरुण, गरीब शेतकरी, तत्त्वनिष्ठ जेलर, ध्येयवादी शिक्षक असेही लोक कथेचे नायक होऊ शकत.आज ज्या क्षेत्रात कोणतेच नैतिक मूल्य न पाळता केवळ पैसा हेच दैवत मानले जाते, त्या वैद्यकीय व्यवसायातही केवळ रुग्णांची सेवा हेच कर्तव्य मानून आयुष्य वेचणारे डॉक्टरही कथानायक होऊ शकत. असाच नायक असलेला ‘दिल एक मंदीर.’ आला १९६३ ला. राजकुमार (राम), राजेंद्रकुमार (डॉ. धर्मेश) आणि मीनाकुमारी (सीता) यांच्याबरोबर शुभा खोटे, अचला सचदेव, कुट्टी पद्मिनी आणि मेहमूद हे कलाकार होते. दिल एक मंदिरची कथा हा एक प्रेमाचा त्रिकोण होता. सी. व्ही. श्रीधर यांनी त्यांच्याच ‘नेंजील ओर आलयम’ या १९६२ सालच्या तमिळ नाटकावर बेतलेला हा सिनेमा केवळ २७ दिवसांत पूर्ण झाल्याने एक विक्रमच निर्माण करून गेला. मीना कुमारी खास या सिनेमासाठी सितार वाजवायला शिकली.शंकर-जयकिशन यांचे संगीत असलेली सर्व गाणी अत्यंत लोकप्रिय झाली. हसरत जयपुरींचे ‘दिल एक मंदिर हैं’ हे जोगिया रागात बसवलेले गाणे, तर वार्षिक बिनाका गीतमालात दुसऱ्या क्रमांकावर गाजले. ‘रूक जा रात ठहर जा रे चंदा’ हे शैलेंद्रचे गीतही वर्षभरात वाजलेल्या १९२ हिट गाण्यात २१व्या क्रमांकावर वाजले. सिनेमाने एकूण ८ फिल्मफेयर पुरस्कारांसाठी नामांकन आणि राजकुमारला ‘सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्याचे’ तर अर्जुनदेव रष्क यांना ‘सर्वश्रेष्ठ संवादलेखनाचे’ फिल्मफेयर पारितोषिक मिळवून दिले.स्व. इंदिराजींनी राजेंद्रकुमार, कुट्टी पद्मिनी आणि मीनाकुमारीचा त्यांच्या निवासस्थानी बोलावून सत्कार केला होता. सिनेमा भारतीय सिनेसृष्टीने इतका पसंत केला की अगदी अलीकडे जसे त्याचे रिमेक ‘आयी तेरी याद’(१९८०), ‘अरमान’(२००३) आले तसेच पूर्वी ‘मनसे मंदिरम’ (तेलगू १९६६), ‘कुकुंम रक्षी’ (कन्नड १९७७), हृदयम ओरू क्षेत्रम (मल्याळम १९७८) या दक्षिण भारतीय भाषांतही निघाले होते.डॉ.धर्मेश (राजेंद्रकुमार) एक सेवाभावी डॉक्टर आहे. त्याचे सीतावर (मीनाकुमारी) निस्सीम प्रेम आहे; परंतु तिचा विवाह रामशी (राजकुमार) होतो. रामला कर्करोग झाल्याने तो उपचार घेण्यासाठी योगायोगाने डॉ. धर्मेश यांच्या दवाखान्यात दाखल होतो. जवळजवळ सगळी कथा या दवाखान्यातच घडते.डॉ. धर्मेश त्याच्या इतर डॉक्टर मित्रांशी रामाच्या केसबद्दल चर्चा करतो. रामचा कर्करोग खूप खोलवर गेलेला असल्याने शस्त्रक्रिया अटळ असते. त्यावेळी सीताला तिच्या धर्मेशशी असलेल्या पूर्वीच्या प्रेमाच्या पार्श्वभूमीमुळे अनेक अभद्र शंका येऊ लागतात, मात्र धर्मेश तिला ‘मी रामला वाचवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करेन’ असे आश्वासन देतो. तो ते पाळतोही; परंतु त्या केसवर खूप अभ्यास केल्याने शस्त्रक्रियेच्या दिवसापर्यंत तो प्रचंड थकून गेलेला असतो.रामवरची शस्त्रक्रिया यशस्वी होते. तो आनंदाने ही बातमी सीताला सांगतो आणि परत जात असताना मध्येच कोसळतो. अतिश्रमाने त्याला हृद्यविकाराच्या झटका आलेला असतो. त्यातच त्याचा मृत्यू होतो अशी ही टोकाची शोकांतिका!शस्त्रक्रियेपूर्वीच्या एका भावुक प्रसंगाच्या वेळी रामला आपण या भयंकर रोगातून जिवंत वाचू अशी अजिबात खात्री वाटत नसते. आता आपले आयुष्य संपणार. सीताबरोबरचे सहजीवनही संपुष्टात येणार असे मनाला उद्विग्न करणारे विचार मनात फेर धरू लागलेले असतानाच तो परिस्थितीला धीरोदात्तपणे सामोरे जायचा निर्णय घेतो. एका भावुक क्षणी तो तिला विनंती करतो. ‘मी यातून वाचेन आणि आपली पुन्हा भेट होईल की नाही हे मला माहीत नाही. पण आज तू आपल्या लग्नाच्या दिवशी केला होतास तसा वेश करून माझ्याजवळ थोडा वेळ बस.’ त्याने त्याच आठवणीसह जग सोडून जायची मनाची तयारी केलेली असल्याने त्याची ही भाबडी विनंती असते.त्या अत्यंत करुण प्रसंगासाठी शैलेंद्र या मनस्वी कवीने लिहिलेल्या गाण्याने प्रेक्षकांच्या अनेक पिढ्यांना अक्षरश: ढसढसा रडवले. कुणालाही भावुक करणारे शैलेंद्रचे ते शब्द होते-“रूक जा रात ठहर जा रे चंदा,बीते ना मिलनकी बेला.आज चांदनीकी नगरीमे,अरमानोंका मेला.रूक जा रात...”जसे रामला वाटते की, ही आपल्या जीवनाची शेवटची रात्र आहे. तशीच भयानक शंका सीतालाही भेडसावते आहे. पण तिच्या मनात अंधुक अशा आशाही दाटलेल्या आहेत. काहीतरी चमत्कार होईल आणि आपले सौभाग्य सुरक्षित राहील असेही तिला वाटते. मनातून ती त्या भयानक रात्रीला, जणू कालचक्रालाच विनंती करते, की तू कृपा करून थांब. माझ्या जीवलगाबरोबरच्या सहवासाची ही रात्र अखेरची ठरू देऊ नकोस.’रामने सांगितल्याप्रमाणे त्यांच्या मिलनाच्या वेळच्या पहिल्या रात्रीचा वेश करून, मीनाकुमारी इच्छेविरुद्ध सजून आलेली आहे. तिच्याही मनात हातातून निघून चाललेल्या आयुष्याच्या आठवणी दाटल्या आहेत. आपल्या पतीशी मिलनाची ती पहिली रात्रच परत आलेली आहे असा तिला भास होतो. त्याच रात्रीच्या चांदण्या आज पुन्हा आपल्याप्रेमाच्या कथा सांगत आहेत असे तिला वाटते-“पहले मिलनकी यादे लेकर,आयी हैं यह रात सुहानी.दोहराते हैं फिर यह सितारे,मेरी तुम्हारी प्रेम कहानी.रूक जा रात ठहर जा रे चंदा...”कितीही आशा धरली तरी सीताच्या मनातून पतीच्या मृत्यूची भीती जात नाही. ती पतीलाही पुन्हापुन्हा आश्वासन देऊन सांगू इच्छिते, ‘जरी शरीरे दोन असली तरी आपली मने एकच आहेत. जीवलगा, मी सतत तुझ्याबरोबर असणार आहे. केवळ या जीवनात नाही तर मृत्यूनंतरही मी तुझ्याबरोबर असेन.’“कलका डर ना कलकी चिंता,दो तन हैं मन एक हमारे.जीवन सीमाके आगे भीआऊंगी मैं संग तुम्हारे...”मनस्वी प्रेमाच्या अशा जुन्या कथा संवेदनशील मनांना नक्कीच अस्वस्थ करतात. हे गाणे आणि तो प्रसंग इतका करुण आहे की प्रेक्षक दोघांच्याही भावनांशी अगदी समरस होऊन जातात. डोळ्यांत अश्रू दाटल्याशिवाय राहत नाहीत.मास कम्युनिकेशनमधील ‘कॅथार्सिस थियरी’ (मानवी भावनांच्या विरेचनाची गरज) लक्षात घेता मनाच्या निकोप वाढीसाठी अशा कथानकांचीसुद्धा एक गरज असतेच.
संवाद ; गुरुनाथ तेंडुलकरअलीकडेच मी एक व्हिडीओ पुन्हा एकदा नव्याने पाहिला. जगद्विख्यात गायिका आशा भोसले यांच्या नव्वदाव्या वाढदिवसाचं औचित्य साधून दुबईत एक भव्य कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमाचा व्हिडीओ..... यूट्यूबवर हा व्हिडीओ उपलब्ध आहे. तुम्ही देखील तो व्हिडीओ आवर्जून पाहा. त्या कार्यक्रमात आशाताईंनी अनेक नवी-जुनी गाणी स्वतः गाऊन उपस्थितांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला आहे. अगदी ‘दम मारो दम’पासून ते ‘पिया तू अब तो आजा’पर्यंत आणि ‘हंगामा हो गया’पासून ते ‘कभी अलविदा ना कहना’ पर्यंत अनेक गाणी त्या पूर्ण जोमात आणि जोशात गायल्या आहेत.हा कार्यक्रम पाहताना आशाताईंच्या चेहऱ्यावरचे भाव, गाताना त्यांनी धरलेला पायाचा ठेका आणि हालचालीतली सहजता पाहून यांचं वय नव्वद झालं हे सांगून देखील खरं वाटलं नाही. आशाताईंचा हा नव्वदीचा कार्यक्रम पाहताना माझ्या मनात एक विचार आला. केवळ वय वाढलं म्हणून माणसाला म्हातारपण येत नाही. केवळ वय वाढलं म्हणून माणसाचं तारुण्य सरत नाही. तारुण्य आणि वृद्धत्व ही केवळ मनाची अवस्था असते.कुठं असतं हे तारुण्य?तारुण्य तिथं असतं जिथे प्रगल्भता आणि अवखळपणा दोन्हीही एकत्र नांदतात. तारुण्य तिथं असतं जिथे जोम, जोश आणि उत्साह असतो. तारुण्य तिथं असतं जिथे धमन्यांतून वाहणारं रक्त कायम गरम असतं. तारुण्य तिथं असतं जिथं फुलं पाहून ओठावर हास्य उमलतं आणि मोरपिसाच्या स्पर्शानं अंग रोमांचित होतं. तारुण्य तिथं असतं जिथं अन्याय पाहिला की हाताच्या मुठी वळतात आणि ओठ दाताखाली मुडपला जातो. तारुण्य तिथं असतं जिथं डोक्यात व्यवहाराची गणितं असतात, पण मनात मात्र कविता फुललेली असते. तारुण्य तिथं असतं जिथं मंदिरातली आरती ऐकून हात टाळ्या पिटतात आणि लेझीम-ढोलाचा नाद कानात घुमला की पाय त्या ठेक्यावर ताल धरतात. तारुण्य तिथं असतं जिथं डोळ्यांत भावुक स्वप्नं असतात आणि गात्रांत थरात असतो.तारुण्य तिथं असतं जिथं चित्तात शुभसंकल्प धारण केले जातात आणि ते सिद्धीस नेण्याची जिद्द असते. तारुण्य तिथं असतं जिथं भूतकाळाचं ओझं न बाळगता भविष्यकाळाचं स्वागत करण्याची वृत्ती असते.माणसाचं तारुण्य हे त्याच्या वयावर कधीही अवलंबून नसतं. ती मनाची एक अवस्था असते. ती एक वृत्ती असते. वय काय ते तर वाढतच असतं. दररोज सकाळी उगवलेला सूर्य संध्याकाळी मावळतो. कॅलेंडरवरची तारीख बदलते. वर्ष सरलं की कॅलेंडरसुद्धा बदलते. सरलेल्या प्रत्येक दिवसागणिक आपलं वय वाढतच जातं. ते वाढणारच असतं. पण वय वाढलं तरी वय होऊ न देणं मात्र आपल्या हातात असतं. ‘वय वाढणं.’ आणि ‘वय होणं.’ या दोन्ही गोष्टी सर्वस्वी भिन्न आहेत. मनाची योग्य जोपासना केली की माणूस अखेरच्या श्वासापर्यंत तरुण राहू शकतो. त्यासाठी जीवनाकडे पाहण्याचा निकोप आणि आशादायक दृष्टिकोन ठेवायला हवा. सौंदर्यग्राही वृत्ती तसंच उत्कट भावनाशीलतादेखील जपायला हवी.याच चिरतारुण्यावर आधारित सुप्रसिद्ध आत्माराम रावजी देशपांडे उर्फ कवी अनिल यांची चिरयौवन... ही कविता मला एस.एस.सी.च्या मराठी क्रमिक पुस्तकात होती. प्रत्येकवेळी ही कविता वाचताना मनाला एक वेगळाच आनंद लाभतो. अनिलांची ही कविता म्हणजे मराठी कवितेच्या विश्वातील एक चिरतरुण कविता मानली जाते.चिरयौवनफिरून वर्षचक्र हे पुढे पुढेच जातसेविशी तिशी नि चाळिशीहि लोटली जरी दिसेअसे तरीहि गोठली न जीवनातली उषातशाच रंगसंगतीत वृत्ती गुंतती तशाअजून ऊन रक्त हे भरे नसानासातुनीतसाच रोमहर्ष आणि अंग ये थरारूनीविरक्ति ? छे.... सदानुरुक्ति... भक्ति प्रेमभक्त मीतरंगऊर्मि प्रीतिच्या अजून यौवनात मीअजून यौवनात मी नि दंग जीवनात याप्रसादही प्रमादही प्रमोद आणखी दयाविचार आणखी विकार भावनांत पाझरेमधू न त्यातला सरे म्हणे न मीहि त्या पुरेअरे कशास जीवना विचार आणसी मनाउदंड पाज आजची उद्यचि तीही आण नापुरे भरावयास पात्र हे नको करू कमीतिथे सदा अतृप्त मी अजून यौवनात मीअजून यौवनात मी मुले फुले सभोवतीविकासती विलासती हसून हासवीत तीप्रलोभनात प्रीतिच्या कुणी हसे झुरे तिथेतिथे सखे नि सोबती कुणी इथे कुणी तिथेप्रसन्न चित्त हासते बघुनिया मजेस त्यामुलात मूल होत मी फुलांत भृंग होत त्याभरीत रंग बैठकीत स्नेह सोबतीत मीप्रियेस प्रेम होत मी अजून यौवनात मीअजून यौवनात मी जगात जागत्या अशाजगावयास गावया पहावया उषा निशाइथे निसर्गचारुता इथे प्रयत्न मानवीउचंबळोनि वृत्ती ये उमेद घेऊनी नवीविवर्त भ्रांति भास हा अशा जगा म्हणो कुणीमला इथेच सत्य ते दिसे पटे क्षणोक्षणीविकासलेच ब्रह्म है, न जीवबंधनात मीनसे मुमुक्षु, मुक्त मी अजून यौवनात मीकवी : अनिलकवितासंग्रह पेर्ते व्हा
Mulshi News : मुळशीत शेतकरी आक्रमक! मोकाट जनावरांचा बंदोबस्त करा, अन्यथा मुळा नदीत घेणार ‘जलसमाधी’
Mulshi News : रात्रीच्या वेळी शेतात शिरणाऱ्या हिंस्त्र वळूंच्या हल्ल्याची भीती; जीव मुठीत धरून शेतकरी राखताहेत आपली पिके.
Ambegaon Crime : वनविभागाच्या पथकाकडून गोहे खुर्द आणि महाळुंगे परिसरातून अवैध लाकूड साठा जप्त; तपासात धक्कादायक माहिती समोर.
Ranjangaon MIDC : सहाय्यक कामगार आयुक्तांच्या उपस्थितीत औद्योगिक पट्ट्यात तपासणी; कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासनाचे पाऊल.
स्मृतिपटल; अनिल तोरणेकोणत्याही गोष्टीचा कैफ प्रमाणाबाहेर चढणे केव्हाही अनिष्टच ठरते. गतकाळातील एका प्रतिभावान संगीत दिग्दर्शकाच्या बाबतीत असेच काहीसे घडले होते. मद्यपान ही त्या संगीतकाराची कमकुवत बाजू होती. दारूच्या नशेत असतानाही त्यांचे संगीत श्रवणीयच असे; पण त्यांचा आपल्या जिभेवर अजिबात ताबा राहात नसे आणि अगदी शिवीगाळ करण्यापर्यंत त्यांची मजल जात असे. त्यांचे संगीत लाभलेल्या एका चित्रपटातील एक गीत गाण्यासाठी त्यांनी एका नवोदित; परंतु अत्यंत स्वाभिमानी पार्श्वगायिकेला बोलाविले आणि...ही घटना १९४९ सालातील आहे. त्यावर्षी प्रदर्शित झालेल्या ‘लाहोर’ या चित्रपटातील “बहारें फिर भी आएंगी मगर हम तुम जुदा होंगे...” हे गीत गाण्यासाठी त्या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक श्याम सुंदर यांनी नवोदित लता मंगेशकर यांना पाचारण केले. लता मंगेशकर गीताची रंगीत तालीम करू लागल्या आणि इकडे श्याम सुंदर यांनी मद्यपान सुरू केले. रंगीत तालमीच्या वेळी लता मंगेशकर यांच्याकडून झालेल्या किरकोळ चुकीवर ते म्हणायचे, श्याम सुंदरचे गीत गाणे म्हणजे पोरखेळ नव्हे ! असे म्हणत असतानाच नको ते अपशब्दही ते वापरत असत. दारूची गुंगी चढली की त्यांचा स्वत:वर ताबा राहात नसे आणि शिवीगाळीची भाषा त्यांच्या तोंडी येई आणि हा सगळा प्रकार गीताला चाल लावताना, गीत शिकविताना व गीताच्या ध्वनिमुद्रणाच्या वेळीही होत असे. लता मंगेशकर नव्या होत्या तरी त्या स्वाभिमानी असल्यामुळे श्याम सुंदर यांची भाषा ऐकून त्या रंगीत तालीम सोडून निघून गेल्या; परंतु श्याम सुंदर यांना पक्के ठाऊक होते की त्यांच्या गीताला केवळ लता मंगेशकरच न्याय देऊ शकत होत्या. म्हणून त्यांनी लता मंगेशकर यांना बोलाविणे पाठविले. पण श्याम सुंदर यांनी वारंवार बोलावणे पाठवूनही लता मंगेशकर आल्याच नाहीत.लता मंगेशकर न आल्याने काही लोकांनी श्याम सुंदर यांना ते गीत अन्य पार्श्वगायिकेकडून गाऊन घ्यावे, असे सुचविले; परंतु मद्यपान करणे ही श्याम सुंदर यांची जशी कमकुवत बाजू होती त्याचप्रमाणे संगीताच्या बाबतीत कसलीही तडजोड न करण्यावरही ते तितकेच ठाम होते. त्यामुळे अन्य पार्श्वगायिकेकडून गीत गाऊन घेण्याचा सल्ला देणाऱ्याना ते म्हणाले, जर लता मंगेशकर हे गीत गाणार नसतील तर ते कोणीच गाणार नाही! मी हे गीत चित्रपटातूनच काढून टाकेन.श्याम सुंदर यांनी असे म्हटल्यावर त्या चित्रपटाच्या निर्मात्याची द्विधा अवस्था झाली. ते लता मंगेशकर यांच्या निवासस्थानी गेले आणि त्यांची समजूत घालण्यासाठी त्यांना म्हणाले, दारूच्या नशेत उच्चारल्या गेलेल्या शब्दांकडे काणाडोळा करा आणि येऊन ते गीत गा. निर्मात्याचे म्हणणे ऐकून घेऊन लता मंगेशकर त्यांना म्हणाल्या, माझ्या गीतगायनातील त्रुटी जर कोणी दाखविल्या तर त्याला माझी काहीच हरकत नाही. गीत ध्वनिमुद्रित झाल्यावरही जर गरज भासली, तर मी शंभर वेळा येऊन गीत पुन्हा ध्वनिमुद्रित करेन पण अशा प्रकारची वागणूक मिळाली तर माझ्यासाठी चूक सुधारणेही कठीण होऊन बसते आणि मी हा अपमान का सहन करावा? ते मोठे संगीतकार आहेत आणि मी त्यांच्यापुढे काहीच नाही. मी गीत गाऊ इच्छिते पण आपण त्यांची शिवीगाळ बंद करावी. लता मंगेशकर यांचे म्हणणे ऐकल्यावर निर्मात्याने त्यांना हमी दिली आणि ते गीत ध्वनिमुद्रित झाले.या घटनेनंतर काही कालावधी लोटला आणि लता मंगेशकर यांनी काही कारणाने श्याम सुंदर यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली गीत गाणे पुन्हा एकदा बंद केले. त्यांनी असे करताच श्याम सुंदर यांनीही त्याच क्षणी मनाशी पक्के ठरवून टाकले की, मी लता मंगेशकर यांच्याशिवाय माझी गीते लोकप्रिय करून दाखवेन; परंतु त्यांनी ज्या दोन चित्रपटांना संगीत दिले होते ते चालले नाहीत आणि त्यांचे संगीतही लोकप्रिय झाले नाही.त्यानंतर श्याम सुंदर ‘अलिफ लैला’ या चित्रपटाला संगीत देत होते. गीतांच्या ध्वनिमुद्रणाच्या वेळी श्याम सुंदर मद्याच्या नशेत असत आणि त्यामुळे ध्वनिमुद्रणात अडथळे निर्माण होऊ लागले. ही बाब त्या चित्रपटाच्या निर्मात्याच्या कानावर गेली. श्याम सुंदर आपल्या चित्रपटाचे संगीतकार असल्याने लता मंगेशकर यांचे गीत आपल्या चित्रपटात असणार नाही, हे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे श्याम सुंदर यांना बदलून अन्य संगीत दिग्दर्शकाला करारबद्ध करावे असा विचार निर्मात्याच्या मनात आला.लता मंगेशकर यांना जेव्हा हे समजले तेव्हा त्यांना वाईट वाटले. त्यांनी निर्मात्याला अशी अट घातली की, मी तुमच्या चित्रपटासाठी गीत गाईन पण श्याम सुंदरच संगीतकार हवेत ! मात्र तोपर्यंत श्याम सुंदर यांनी केवळ चित्रपटसृष्टीच नव्हे तर मुंबईही सोडली होती ! लता मंगेशकर निर्मात्याला म्हणाल्या, दिलेल्या वचनानुसार मी गीत अवश्य गाईन पण श्याम सुंदर यांना पुन्हा बोलाविण्याची व्यवस्था केली जावी. अखेर लता मंगेशकर यांनी जसे सांगितले होते तसेच घडले. श्याम सुंदर यांच्याशी झालेला वाद विसरून त्यांनी गीताचे ध्वनिमुद्रण केले.
Bus Fire News : पुण्याहून नागपूरकडे जाणाऱ्या बसचे भीषण अग्निकांड; बघ्यांच्या गर्दीमुळे दोन तास महामार्गाची वाहतूक विस्कळीत.
सुरक्षित उत्पादने, आश्वस्त ग्राहक
ग्राहक दिन ; स्नेहल नाडकर्णीमाणसाचं समाधान वाढण्याऐवजी अपेक्षा वाढतात तेव्हा तो अधिक भौतिक सुखं मिळवण्याच्या मागे लागतो. अर्थात माणसाने असमाधानी राहण्यात कंपन्यांचा फायदाच असतो. कंपन्या सातत्याने जाहिरातबाजी करतात अन् सामान्य माणूस त्याला बळी पडतो. सुखाच्या मागे धावता धावता मानसिक असुरक्षितता, फसवणूक मात्र वाट्याला येते. तेव्हा ग्राहक हिताची पायमल्ली झाल्याची जाणीव माणसाला होते. अशा वेळी माणूस ग्राहक संरक्षण कायद्याचा आधार शोधतो.अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांनी १५ मार्च १९६२ रोजी अमेरिकन काँग्रेसमध्ये ग्राहकांच्या हक्कांवर ऐतिहासिक भाषण केले आणि ग्राहक हक्कांना अधिकृत मान्यता देणारे ते पहिले जागतिक नेते ठरले. त्यानुसार जगभरात सर्वप्रथम अमेरिकेतील नागरिकांना ग्राहक हक्क लाभले. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन १९८३ मध्ये पहिला जागतिक ग्राहक दिन साजरा करण्यात आला. तेव्हापासून दरवर्षी १५ मार्च रोजी जगभरात जागतिक ग्राहक दिन साजरा केला जातो.‘आंतरराष्ट्रीय ग्राहक संघटने’च्या (कन्झ्युमर इंटरनॅशनल) चळवळीमुळे १९८५ मध्ये संयुक्त राष्ट्राची ग्राहक संरक्षण मार्गदर्शक तत्त्वे अस्तित्वात आली. त्या आधारे २४ डिसेंबर १९८६ मध्ये भारतात ग्राहक संरक्षण कायदा अस्तित्वात आला. ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत भारतीय ग्राहकांना पुढील ६ अधिकार देण्यात आले आहेत.१. माहितीचा अधिकारप्रत्येक ग्राहकाला कोणत्याही उत्पादनाची किंवा सेवेची शुद्धता, किंमत आणि गुणवत्ता याबाबत माहिती विचारण्याचा पूर्ण अधिकार आहे.२. निवडीचा अधिकारग्राहकाला आपल्या इच्छेनुसार कोणतीही वस्तू किंवा सेवा निवडण्याचा अधिकार आहे. दुकानदार कोणत्याही ग्राहकाला एखादे विशिष्ट उत्पादन घेण्यास भाग पाडू शकत नाही.३. सुरक्षिततेचा अधिकारग्राहकांना सुरक्षित उत्पादने आणि सेवा मिळणे, हा त्यांचा अधिकार आहे.४. ग्राहक शिक्षणाचा अधिकारग्राहकांना त्यांच्या हक्कांविषयी जागरूक करण्यासाठी सरकारने वेळोवेळी ‘जागो ग्राहक जागो’ सारख्या उपयुक्त मोहिमा राबवाव्यात.५. मत ऐकले जाण्याचा अधिकारजर कोणत्याही ग्राहकासोबत अन्याय झाला असेल तर ग्राहकाला त्याविरुद्ध आवाज उठवण्याचा पूर्ण अधिकार आहे.६. निवारण मिळविण्याचा अधिकारग्राहक न्यायालयामध्ये आपली बाजू मांडून न्याय मिळविण्याचा अधिकार ग्राहकाला आहे.भारतात अधिक ग्राहकाभिमुख आणि विस्तारीत ग्राहक संरक्षण कायदा २०१९ लागू करण्यात आला आहे. ‘उत्पादन दायित्वा’चे प्रकरण समाविष्ट करून या कायद्यांतर्गत ग्राहकांना अधिक संरक्षण देण्यासाठी दोषपूर्ण उत्पादने किंवा सेवांमुळे ग्राहकांना होणारे नुकसान, वैयक्तिक दुखापत किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्यास उत्पादक, विक्रेते आणि सेवा प्रदाते भरपाई देण्यास जबाबदार असतात.सुरक्षित उत्पादनांसाठी, बाजारपेठेतील गैरव्यवहार आणि ग्राहकांच्या हक्कांचे उल्लंघन करणाऱ्या सामाजिक अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी जागतिक आणि स्थानिक पातळीवरून काय केले पाहिजे याचे मार्गदर्शन करण्यासाठी ‘कन्झ्युमर इंटरनॅशनल’ ही ग्राहक शिखर संघटना काम करत असते. या संघटनेचे जवळपास १०० देश आणि २०० ग्राहक संघटना सभासद आहेत. ही संघटना ग्राहक हितरक्षणार्थ वेगवेगळे विषय विचारात घेऊन प्रत्येक वर्षाची विशिष्ट संकल्पना जाहीर करते. यामुळे ग्राहकांचे लक्ष महत्त्वाच्या मुद्द्यांकडे जाऊन त्यांच्यात जागरूकता निर्माण होते. जागतिक डिजिटल बाजारपेठेत, ग्राहकांचा विश्वास आणि जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारी उत्पादन सुरक्षा ही वेगाने निर्माण होणारी एक गंभीर समस्या आहे. यावर्षी १५ मार्च २०२६ रोजी होणाऱ्या जागतिक ग्राहक दिनानिमित्त ‘Safe products Confident Consumer’ किंवा ‘सुरक्षित उत्पादने, आश्वस्त ग्राहक’ ही थीम जाहीर करण्यात आली आहे. सामान्य ग्राहक अनेकदा त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाबाबत अनभिद्य असतात. त्यांचा आवाज दडपला जाऊ नये यादृष्टीने हा दिवस महत्त्वाचा ठरतो.आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ जाहिरात करून ग्राहक टिकवता येत नाही, तर व्यवसायवृद्धीच्या दृष्टीने उत्पादनाचा दर्जा आणि सुरक्षितता सर्वोच्च असणे उत्पादकाची नैतिक जबाबदारी आहे. अन्नापासून ते औषधांपर्यंत आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांपासून ते डिजीटल उत्पादनांपर्यंत हजारो उत्पादने तसेच बँक, विमा इत्यादी विविध सेवा बाजारपेठेत उपलब्ध आहेत. त्या उत्पादनात व सेवेत जेवढी पारदर्शकता आणि सुरक्षितता असेल, तेवढा ग्राहक अधिक आश्वस्त राहील.ग्राहकांची सुरक्षितता विविध प्रकारची असते. अन्नपदार्थ भेसळमुक्त आणि पोषक असणे यासाठी भारतीय अन्नसुरक्षा आणि मानके प्राधिकरण (FSSAI) अन्नाच्या गुणवत्तेवर नियंत्रण ठेवते. तसेच भारतीय मानक ब्युरो (BIS)द्वारे पडताळणी करून संबंधित उत्पादने ‘ISI’, ‘CRS’, ‘Hallmark’ने प्रमाणित केली जातात. म्हणूनच खाद्यपदार्थांवर ‘FSSAI’ किंवा ‘Agmark’, औद्योगिक व इलेक्ट्रॉनिक उत्पादनांवर ‘ISI’ किंवा ‘CRS’ मार्क, सोन्यावर ‘Hallmark’ असणे म्हणजे उत्पादनांच्या गुणवत्तेची आणि सुरक्षिततेची हमी.वापरकर्त्याच्या गोपनीयतेचे आणि डेटाचे रक्षण करणे. गोळा केलेला कोणता डेटा कसा वापरला जातो, याची स्पष्ट माहिती ‘नियम व अटी’मध्ये असणे. वापरकर्त्याची संवेदनशील माहिती स्टोअर करताना आणि पाठवताना ती एनक्रिप्टेड असणे. सायबर धोक्यांपासून संरक्षण करण्यासाठी सॉफ्टवेअर सतत अपडेट करणे. फसवणूक झाल्यास चॅटबॉटद्वारे तत्काळ डिजिटल प्रतिसाद व स्थानिक भाषेत हेल्पलाईन उपलब्ध असणे म्हणजे वापरकर्त्याच्या दृष्टीने ते ‘सुरक्षित डिजिटल उत्पादन’ ठरू शकते. ह्याची जाणीव असणे ग्राहक हिताय ठरते.उत्पादकांनी सुरक्षिततेची कास धरल्यास आणि ग्राहकांनी जागरूकतेचा वसा घेतल्यास एक सुदृढ समाज घडू शकतो. थोडक्यात, “सुरक्षित उत्पादन, ग्राहकाची शान; ग्राहक हक्कांचा ठेवा मान!”mgpshikshan@gmail.com
Shirur News : युद्धजन्य स्थितीच्या अफवा आणि पॅनिक बुकिंग टाळा; तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी घेतला इंधन साठ्याचा आढावा.
Gas Shortage : पुणे-सातारा महामार्गावर पुन्हा पेटल्या ‘चुली’! गॅस टंचाईमुळे हॉटेल चालकांची मोठी कसरत
Gas Shortage : जागतिक युद्धाच्या सावटाखाली पुणे-सातारा हायवेचा हॉटेल व्यवसाय कोलमडला; व्यावसायिक सिलिंडरअभावी चुलीचा आधार घेण्याची वेळ.
Vitthalrao Langhe : चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचे स्वागत करू आणि चुकीचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची मात्र येथून थेट उचलबांगडी करू, असा इशारा आ. विठ्ठलराव लंघे पाटील यांनी दिला.
Satara Crime : माण तालुक्यातील पळशीत धक्कादायक प्रकार; ५० रुपये चोरीच्या खोट्या आळामुळे १३ वर्षांच्या बालकाला लाकडी काठीने अमानुष मारहाण.
गोष्ट लहान, मोठा अर्थ : शिल्पा अष्टमकरमनुष्याच्या आयुष्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे त्याची स्वयंप्रतिमा. स्वयंप्रतिमा म्हणजे व्यक्तीने स्वतःबद्दल मनात तयार केलेले चित्र. आपण कसे आहोत, आपल्यात कोणत्या क्षमता आहेत, आपण काय करू शकतो किंवा करू शकत नाही. याबद्दलची आपली जी धारणा असते, तीच आपली आत्मप्रतिमा (स्वयंप्रतिमा) असते.एखाद्या व्यक्तीची प्रगती, आत्मविश्वास आणि यश हे मोठ्या प्रमाणावर त्याच्या आत्मप्रतिमेवर अवलंबून असते. जर एखाद्या व्यक्तीची स्वतःबद्दलची भावना सकारात्मक असेल, तर तो कोणत्याही अडचणीला धैर्याने सामोरे जातो. उलट स्वतःबद्दल नकारात्मक विचार असतील, तर माणूस आपल्या क्षमतांचा उपयोगच करू शकत नाही.आत्मप्रतिमा कशी घडते?आत्मप्रतिमा एका दिवसात तयार होत नाही. ती अनेक गोष्टींमुळे तयार होत असते. बालपणीचे संस्कार, पालक, शिक्षक आणि समाजाकडून मिळणारे प्रोत्साहन,यश आणि अपयशाचे अनुभव, स्वतःबद्दल केलेले विचार आणि आत्मसंवाद, जर लहानपणापासून मुलांना प्रोत्साहन, विश्वास आणि प्रेम मिळाले, तर त्यांची आत्मप्रतिमामजबूत होते.सकारात्मक आत्मप्रतिमेचे महत्त्वसकारात्मक आत्मप्रतिमा असलेली व्यक्ती आत्मविश्वासाने निर्णय घेते, अपयशातून शिकते, नवीन गोष्टी करण्याची तयारी ठेवते, इतरांशी आदराने वागते, समाजात आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणून उभी राहते , अशा व्यक्तीला यश मिळवण्यासाठी बाहेरील परिस्थितीपेक्षा स्वतःवरील विश्वास अधिक मदत करतो.आत्मप्रतिमा सुधारण्यासाठी काय करावे?आत्मप्रतिमा सुधारण्यासाठी काही गोष्टींचा अवलंब करणे आवश्यक आहे -१. स्वतःच्या गुणांची जाणीव ठेवावी.२. नकारात्मक विचारांऐवजी सकारात्मक विचार करावेत.३. छोट्या यशाचेही कौतुक करावे.४. सतत शिकण्याची आणि स्वतःला सुधारण्याची वृत्ती ठेवावी.५. स्वतःची तुलना इतरांशी न करता स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष द्यावे.स्वयंप्रतिमा म्हणजे आपल्या आयुष्याचा पाया आहे. जशी आत्मप्रतिमा तशी व्यक्तीची वाटचाल. म्हणून प्रत्येकाने स्वतःकडे सकारात्मक दृष्टीनेपाहणे आणि स्वतःवर विश्वास ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.“ज्याची आत्मप्रतिमा मजबूत असते, त्याच्यासाठी अशक्यही शक्य होते.”शाळा, महाविद्यालयातून विद्यार्थ्यांना पुस्तकी शिक्षण दिले जाते. वेगवेगळे विषय शिकविले जातात. जीवनात यशस्वी होण्यासाठी शिक्षण देणे गरजेचे आहे. आपल्यामध्ये गुणांची वृद्धी व्हावी, बेरीज व्हावी व दोषांची वजाबाकी व्हावी. आपले जीवन यशस्वी होण्यासाठी आत्मप्रतिमा चांगली असली पाहिजे.आपल्या आवडी-निवडी, क्षमता, अभियोग्यता, अभिव्यक्ती यांच्या आधारे स्वतःची योग्यता-अयोग्यता तपासून मनात स्वतःचे एक मानसिक चित्र तयार होते त्यालाच स्वयंप्रतिमा किंवा आत्मप्रतिमा असे म्हणतात. आपले व्यक्तिमत्त्व कसे आहे याचा शोध स्वयंप्रतिमेत घेता येतो. आपण कसे आहोत व कसे असायला पाहिजे यामधील अंतर हे वास्तव स्वयंप्रतिमा व आदर्श स्वयंप्रतिमा यामधील अंतराइतके असते. यामधील अंतर कमी करण्याइतपत जर विकास घडला तरच ध्येयापर्यंत पोहोचता येते व इच्छा-आकांक्षा पूर्ण होतात.जर आपल्याला स्वतःबद्दल विश्वास वाटत असेल, आपल्याबद्दल खात्री वाटत असेल, जगाच्या पाठीवरील सर्व प्रकारची सुखाची साधने उपभोगण्याची पात्रता आपल्यात आहे असे वाटत असेल तरच आपली स्वयंप्रतिमा सकारात्मक असते. आपल्यातील याच प्रकारची स्पंदने बाहेर पडतात. ती विश्वातील याच प्रकारची स्पंदने आपल्याकडे आकर्षितात व आपल्या वाट्याला सर्वप्रकारची सुखाची साधने प्राप्त होतात. आपली स्वयंप्रतिमा नकारात्मक असेल, विश्वातील चांगल्या गोष्टींचा उपभोग घ्यायला आपण पात्र नाही असे वाटत असेल, तर खालावलेली परिस्थिती आपल्या वाट्याला येते म्हणून रामदास स्वामी म्हणतात,“मना त्वाचि रे पूर्व संचित केले।तयासारखे भोगणे प्राप्त झाले ।”आपण गरीब असलो, ग्रामीण भागातील असलो, बाह्य व्यक्तिमत्त्व फारसे आकर्षक नसले तरी आपली मानसिकता सकारात्मक असली पाहिजे. ऐष आरामाचे जीवन आपल्यासाठी नाही. आमच्या नशिबी कुठले सुख, भाग्य आमच्या वाट्याला येणार नाही, उच्चस्तरीय गोष्टी आपल्याला जमणार नाहीत. आपला प्रभाव इतरांवर पडणार नाही या विचारांमुळे स्वयंप्रतिमा दूषित होते. या प्रकारची वैचारिक स्पंदने बाहेर पडतात व त्याच प्रकारची परिस्थिती आपल्या वाट्याला येते.स्वयंप्रतिमा जितकी स्वच्छ, सुस्पष्ट व निकोप असेल तेवढ्या प्रमाणात विकास प्रक्रियांची सुसंगती घडून आणता येते. नवीन अनुभवांचे संस्कार प्रभावीपणे करता येतात.आत्मप्रतिमा बदलली, तर संपूर्ण व्यक्तिमत्त्वात बदल होऊ शकतो. बालपणीच्या संस्काराचा आत्मप्रतिमा तयार होण्यात सिंहाचा वाटा असतो. ज्यांना बालपणात खूप भीती दाखविली जाते त्या व्यक्ती भित्र्या बनतात. रागीट व्यक्ती वातावरण बिघडवितात.लोक ऊणे-दुणे काढतात, चिकित्सक सारखी चौकशी करत असतात. प्रेमळ लोक अंत:करणाला पाझर फोडतात. आत्मप्रतिमेवर उमटणारे ठसे स्वभाववैशिष्ट्ये बनतात.आपल्या आयुष्याची किंमत कुमारवयात कळणे आवश्यक आहे. या वयातच आत्मप्रतिमा बदलल्यास आयुष्याचे मोल वाढते. यासाठी मनाच्या विशिष्ट अवस्थेत जाऊन (अल्फा अवस्था) अंतर्मनाला सूचना देता येतात. माझ्यामध्ये दररोज आत्मविश्वास वाढत आहे. प्रत्येक बाबतीत प्रत्येक दिवशी मी जास्तीत जास्त चांगला होत आहे. जगामधील सर्व सुखाची साधने उपभोगण्यास मी पात्र आहे. मी जगप्रवास करणार आहे. माझ्या आयुष्यात मला सुख-शांती व समाधान मिळणार आहे. मी जनसेवा करणार आहे. मी भरपूर कष्ट व मेहनत करणार आहे. अशा सूचना अंतर्मनाला देऊन आत्मप्रतिमा बदलता येते.आपल्या देशातील सर्व मुला-मुलींच्या आत्मप्रतिमा निकोप ठेवणे, आत्मप्रतिमा विस्कळीत असल्यास अंतर्मनाला सूचना देऊन त्यामध्ये इच्छित बदल घडविणे या दृष्टीने प्रयत्न केल्यास व्यक्तिमत्त्वात बदल होऊन ते मनुष्यबळ देशाला उपयोगी पडेल व देशाचा विकास होईल.
प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफसोशल मीडियावर एक बातमी वाचली. त्या बातमीतील घटना खूप अस्वस्थ करून गेली. त्या घटनेचा सारांश देते. साधारण चाळिशीचे जोडपे. दिसायला खूप सुंदर. अगदी चार-पाच वर्षे एकमेकांना जाणून घेऊन प्रेमविवाह केलेले!एके दिवशी एक घटना घडली आणि त्या दुर्दैवी घटनेची नोंद सीसीटीव्हीने घेतलेली होती. रात्री १२ च्या सुमारास हे चाळिशीचे जोडपे बराच वेळ रेल्वे क्रॉसिंग गेटजवळ उभे होते. त्यांना दूरवरून एक एक्स्प्रेस गाडी येताना दिसली आणि ते शांतपणे एकमेकांचा हात घट्ट हातात धरून रेल्वे रुळावर जाऊन उभे राहिले. याच सीसीटीव्हीने त्यांच्या शरीराच्या कुठे आणि कशा ठिकऱ्या उडाल्या याचीही व्यवस्थित नोंद घेतली. त्यानंतर जेव्हा या दोघांनी केलेल्या आत्महत्येचा तपास केला गेला तेव्हा लक्षात आले की, त्यांना मूलबाळ होत नसल्यामुळे त्यांनी आत्महत्या केली. बाकी बातमीत त्या दोघांची नावे, ते कोणत्या गेटजवळ उभे होते, कोणत्या गाडीने त्यांना उडवले वगैरे माहिती आहेच, जी या लेखात देणे मला जरूरी वाटली नाही.माणसाचा मृत्यू कदाचित मला कमी अस्वस्थ करतो; परंतु ‘आत्महत्या’ ही गोष्ट मला खरंच खूप जास्त अस्वस्थ करते. ‘मूलबाळ न होणे’ ही समस्या आहे का? किंवा अगदी ठरवून काही जोडपी ‘मूलबाळ होऊ देत नाहीत’ हीसुद्धा समस्या आहे का? जगात अगणित समस्या आहेत. त्या सर्व समस्यांपेक्षा आपली समस्या कमी महत्त्वाची आहे, असे का मानले जात नाही? असा का विचार केला जात नाही?आजच्या काळात असंख्य अनाथाश्रम आहेत तिथून एखादे मूल दत्तक घेऊन त्यांनी वाढवले असते, तर चालले नसते का? एका जीवाला कुटुंब मिळालं असतं आणि एका कुटुंबाला कदाचित जीवदान...!जेव्हा कोणता तरी टोकाचा निर्णय घ्यायचा असतो आणि ती गोष्ट आपल्याला ती चुकीची की बरोबर, हे जाणून घेण्यासाठी कदाचित घरात वयस्कर माणसे नसतील, कदाचित नातेवाईक आणि शेजारीपाजारी सुद्धा जवळचे वाटत नसतील तरीसुद्धा अनेक मानसोपचार तज्ज्ञ आहेत, त्यांच्याकडे हे का जात नाहीत?अत्यंत सुदृढ, उच्चशिक्षित, समाजात नावलौकिक असणारी, आर्थिक सुबत्ता असणारी माणसेसुद्धा मानसिक रुग्ण होतात याचे वाईट वाटते. आपण एखाद्या समस्येला तोंड देऊ शकत नाही, त्याचा आपल्याला त्रास होतोय हे सुरुवातीला तरी आपल्याला कळत असते तेव्हाच स्वतःहून मानसोपचार तज्ज्ञाकडे जाण्याची गरज असते. आजकाल मनाला उपचार होऊ शकेल अशी अतिशय उत्तम औषधोपचार पद्धती असल्याचे अनुभव डॉक्टरांकडून आणि ज्यांनी अशा तऱ्हेचे उपचार घेतले आहेत त्यांच्याकडूनही ऐकले आहेत.दात दुखायला लागल्यावर आपण दंतवैद्याकडे जातो, ताप आल्यावर आपल्या फॅमिली डॉक्टरकडे जातो, हात तुटल्यावर हाड वैद्यांकडे जातो आणि तो जोडून घेतो तसे सहजपणे मानसिक समस्या निर्माण झाल्यावर आपण मानसोपचार तज्ज्ञाकडे का जात नाही? तिथे जाणे कमीपणाचे वाटते का? किंवा डॉक्टर काही औषध, गोळ्या देईल; परंतु आपली समस्या काही मिटवू शकणार नाही असे त्यांना वाटते का? काही कळत नाही. अशा दुर्दैवी घटना घडून गेल्यानंतर त्याच्या बातम्या मिळतात.असो. माझ्या ओळखीच्या एका कुटुंबाने एक मुलगी दत्तक घेतली आणि तिला शिकवून त्यांनी डॉक्टर केले. तिला त्यांनी दत्तक घेतले तेव्हा ती दीड वर्षांची होती पण ती जेव्हा पाचवीत गेली तेव्हा त्या दांपत्याने तिला समोर बसवून तू आमची ‘दत्तक’ मुलगी आहेस हे समजावून सांगितले. इतकेच नव्हे तर तिला त्या अनाथाश्रमात घेऊन गेले जिथून त्यांनी तिला दत्तक घेतले होते. तीन-चार तास त्या अनाथाश्रमात घालवल्यावर तिला स्वतःचे कुटुंब असल्याचे महत्त्व लक्षात आले. तिच्या आई-वडिलांचे प्रेम लक्षात आले. इथपर्यंतची ही घटना सामान्य आहे पण त्या पुढची घटना मात्र आपल्याला विचार करायला लावणारी आहे. मुलगी पंचवीस वर्षांची झाली आणि तिच्या आई-वडिलांना या मुलीच्या लग्नाचे वेध लागले; परंतु मुलीने आई-वडिलांना अशी अट घातली की, जो मुलगा माझ्याशी लग्न करेल तो लग्नानंतर लगेचच अनाथ बालकाचे पालकत्व स्वीकारण्याची जबाबदारी माझ्या सोबतीने आनंदाने उचलेल त्याच्याशीच मी लग्न करणार!या लेखाच्या शेवटी जाता जाता मला हेही सांगायला आवडेल की, समाजात चांगल्या विचारांची माणसे खूप असतात. तिला योग्य जोडीदार मिळाला आणि आज ती दोन मुलांची आई आहे आणि त्यातील एक मूल हे दत्तक आहे!pratibha.saraph@ gmail.com
मनस्विनी : पूर्णिमा शिंदेनात्याचं आयुष्यातील महत्त्व अनन्यसाधारण. मानलं तर खूप काही. मानलं नाही तर काहीच नाही. नात्यांची बँक अशी साठवण आहे की, ज्यात जीवाभावाची माणसं समाविष्ट होतात. नाती म्हणजे केवळ रक्ताचीच नाहीत, तर मनाचीही मानलेली. ही खोलवर काळजात, हृदयात असतात. ती मनापासून जपलेली. नात्यांना कोणत्याही नावाची, लेबलची लिपी नसते. गरज नसते. मनात वसते, भासते ते असते नाते. खूप काही देऊन जाते. भावभावनांना श्रीमंती देते. काही नाही दिले तरी चालेल पण आपुलकी, आपलेपणा, अपारमाया, जिव्हाळा देते. जीवापाड जीव लावणे म्हणजे नातं. खरी परीक्षा नात्यांची ती असते जेव्हा अडचणीच्या वेळी कोणी आपल्या पाठीशी उभं राहतं. सांत्वनासाठी कोणी तर दुःखात कोण येतं की केवळ मतलबासाठीच येतात. त्यावरून स्वार्थ नि:स्वार्थ. कठीण प्रसंगच असतो तो.समर्थ रामदास म्हणतात, ‘कठीण समय येता कोण कामास येतो?’ खरेच आहे. प्रसंगाला सामोरे जातो ना तेव्हा नात्यांची खरी परीक्षा किंवा कसोटी असते. ही माणसाला श्रीमंत बनवत असते. जिव्हाळा, आपुलकी देते. रोज बोलणं होत नाही... चालेल! रोज भेटणं होत नाही... चालेल! पण एक अशी खात्री असावी, विश्वास असावा की नात्याची गॅरंटी असावी. आपला माणूस आपल्याला सोडून कुठे जाणार नाही. ती एक खात्री. शब्दाचे मोल स्वरात किंवा सुरात कळले पाहिजे. एकमेकांना जपले पाहिजे, ओळखले पाहिजे, एकमेकांचे झाले पाहिजे. आदरभाव, सन्मान, काळजी, प्रेम यांना नात्यात जागा असते. द्वेष, मत्सर, कपट यांना कधीच नात्यात जागा नसते. शब्दाला किंमत दिली जाते. शब्द हातावर ओंजळीमध्ये घेतले, झेलले जातात, अाशा तिथेच पूर्ण होतात. नाती टिकावीत म्हणून संवादाचा गोडवा असावा. प्रेमळ साथ असावी. अडचणीच्या वेळेस सोबत असावी. संवेदनशीलता असावी.जो माणूस संवेदना किंवा भावनाशून्य असतो तो माणूस कसला? एखादा जीवाभावाचे नातं टिकवायचं तर तिथे मायेचा ओलावा असला पाहिजे! हे एक हक्काचं, विश्वासाचं प्रतीक असलं पाहिजे आणि ती मनाला खात्री असली पाहिजे. समजूत घालण्यापेक्षा एकमेकांना समजून घेणं जास्त चांगलं. स्वतःपेक्षा जेव्हा व्यक्ती दुसऱ्या प्रेम करते तेव्हा त्या व्यक्तीच्या अपेक्षाही नि:स्वार्थ असतात. प्रत्येकाने गुणदोषासहित आपल्या माणसाला, प्रियजनांना आयुष्यभरासाठी स्वीकारावे आणि जपावे. मग ते नातं कोणतंही असो. नातं हे विश्वासावरच फुलतं, सजतं, डोलतं आणि बहरतं.काही नाती बाजारू, व्यवहारी असतात. वेगळी असतात, खोटी स्वार्थाने बरबटलेली. निखळ मैत्री, निर्मळ मन, निरपेक्ष साथ ही भावभावनांची असावी. शरीराचे आकर्षण म्हणजे प्रेम नसतं. ते तर नातं कधीच होऊ शकत नाही. प्रेमाच्या नावावर नात्यात मनाचे बांध फुटतात. एखाद्या प्रेमात विरह झालेल्या तरुण-तरुणीला विचारा मनाची अवस्था काय होत असते. ते आहे आकर्षण! विरोधाभास!! लबाडीने केलेली कोणतीच गोष्ट आयुष्यात कधीच पुरत नाही. त्याला डाग लागतो. अविस्मरणीय पण खऱ्या प्रेमाला कसलाच पुरावा, पैसा, प्रलोभन्यांची गरज नसते. आकर्षण, चैन, हव्यास याने बरबटलेली नाती बेगडी असतात. सहज तुटतात. संवाद संपला तर वादसुरू होतो.मी पणा, अहंकार सारे बाजूला सारून समोरच्याचा मनाचा प्रेमाचा विचार आणि स्वीकार करावा. यासाठी समोरच्याने देखील संवेदनशील सौजन्य जपावे. आठवण झाली की, हक्काने झटकन बोलता यावी अशी मोकळीक नात्यात असते. नातं जपावं. मन जपावं. लोक म्हणतात नातं टिकवायला हिम्मत लागते पण माझ्या मते नातं टिकवायला हिम्मत नाही समोरच्याच्या मनात आपली किंमत लागते. कधी कधी होतं काय आपण चंदन असूनही समोरचा आपल्याला लाकूड समजून बसतो. खऱ्या हिऱ्याची किंमत ती व्यक्ती हातातून निसटल्याशिवाय कळत नसते. आयुष्यात ज्याने गमावलेय त्याला विचारा नात्याची किंमत आणि मनाची अवस्था.जीवापाड जीव लावणारा माणूस हरवणाऱ्याला विचारा! त्या प्रामाणिक प्रेमाला जुमानणारी माणसं सुद्धा असतात जगात. रंगलेल्या गालांचे मुके घेणारी दुनिया बेलगाम आहे. आभासी झगमगीत आहे. येथे खऱ्यांना, भल्यांना प्रत्यय आला की सबक मिळतो. भावनांशी खेळणारी माणसे हृदय तोडून जातात. त्यांना धडा मिळाल्याशिवाय कळत नाही. आपलं कोण आणि परक कोण? मग ती उदासीनता, बैचेनी, खिन्नता आणि उजाडलेलं जग यामुळे जगण्यातील सुंदरता नष्ट होते. यावर अनुभवास मिळते ती नात्यातील सुंदरता! जाग वेळीच येणं गरजेचं असतं. मग ती झोपेतून असो वा जागेपणी. असो. खरं खोटं तपासून बघा. पारखून बघा. चकाकतं ते सोनं नसतंच ते खोटंही असू शकतं. खऱ्या बावनकशी सोन्याची निवड, तो खरेपणा भाग्यात असायला लागतो. नात्याला मोजमाप नाही पण माफ करणं असतं. नात्यात गोत्र नाही पण पात्रता असावी. हा खरेपण ज्याला कळला तो खरा जिंकला. नात्याकडे व्यवहार म्हणून पाहू नका. तरच नातं चमकेल आणि चेहराही! त्याचबरोबर आयुष्यही उजळेल आणि जीवनही. नातं म्हणजे आयुष्याचा उत्सव! नातं म्हणजे निभावलं तर जिवंतपणे स्वर्ग; नाहीतर जिवंतपणे मरणयातना! नातं हे दोन्ही बाजूने मनाने विश्वासाने जिंकायचे असतं.यातच आयुष्याचा उत्सव साजरा करता येतो. जीवनही सजतं हीच खरी नात्याची सुंदरता.
Traffic Update : मुंबई-बेंगळुरू महामार्गावर बॅरिकेडिंग आणि ट्रॅफिक वॉर्डन तैनात; प्रवाशांनी सहकार्य करण्याचे पोलीस उपआयुक्त विवेक पाटील यांचे आवाहन.
Wall Collapse Accident : ळवडे येथील ज्योतिबा नगरमध्ये वॉल कंपाऊंड कोसळून भीषण अपघात; चाकणमधील राठोड दाम्पत्याचा जागीच मृत्यू, एक मजूर जखमी.
कथा : रमेश तांबेसुरज एक शाळकरी मुलगा होता. हातात पिशवी नाही की खिशात पैसे नाहीत. बाबांच्या टोचून बोलण्याचा त्याला प्रचंड राग आला होता. त्यामुळे रागारागात तो रेल्वेत बसला आणि निघाला दूर कुठेतरी. एका मागून एक स्टेशन्स मागे पडत होती. त्याला झोप लागली अगदी गाढ. कुणीतरी तिकीट तिकीट असं ओरडलं तेव्हा तो जागा झाला. त्याने डोळे उघडले तर समोर काळ्या कोटातला टी.सी. उभा. सुरजने तिकीट नाही असं म्हणताच टी.सी. म्हणाला, “पाचशे रुपये” दंड भरावा लागेल. पण सुरजकडे पाचशे रुपये काय पाच पैसेदेखील नव्हते.पुढचे स्टेशन येताच टी.सी.ने सुरजला स्टेशन मास्तरांच्या कार्यालयात नेले. तेव्हा साहेब म्हणाले, “काय रे कुठून पकडून आणलेस या मुलाला.” साहेब या मुलांना फुकट फिरायची सवय असते. याला योग्य ती शिक्षा मिळालीच पाहिजे. साहेबाने मुलाकडे पाहिले. त्याच्या चेहऱ्यावरचे करूण भाव बघून त्यांच्या हृदयात कालवाकालव झाली. या मुलाचं काय करायचं ते तुम्हीच ठरवा साहेब असं म्हणून टी.सीं.नी त्यांचा निरोप घेतला. इतका वेळ सुरज मान खाली घालून उभा होता. आता साहेब जागेवरून उठले आणि सुरजला एका बाकड्यावर बसवून ते स्वतः त्याच्या शेजारी बसले. डोक्यावर हात फिरवत त्याच्या डोळ्यांत पाहत म्हणाले, “काय रे मुला तुझं नाव काय? एकटाच कुठे निघालास? कुठून आलास?” साहेबांच्या प्रश्नांची मालिका काही संपत नव्हती.“काका माझं नाव सुरज महादेव सुर्वे. वय १५, राहणार मुंबई. काल बाबांचं आणि माझं खूप भांडण झालं. मला त्यांनी मारलं. नको नको ते बोलले. आईसुद्धा गप्पच होती. मग ठरवलं घर सोडून निघून जायचं. वाट मिळेल तिथं.” साहेब म्हणाले, “अरे सुरज, असा राग नाही घालून घ्यायचा डोक्यात. तू मला तुझा पत्ता सांग, मी तुला परत पाठवण्याची व्यवस्था करतो.” सुरज म्हणाला, “पण काका मला नाही जायचं घरी. माझं बाबांशी भांडण झालंय.” “अरे, पण मग काय झालं. ते तुझे बाबा आहेत. ते नक्कीच तुला माफ करतील. शिवाय तुझी आई रडून रडून थकली असेल रे बाळा” मग सुरज सांगू लागला, “पण घरी जाऊन करू तरी काय. बाबांनी स्वतःच मला शाळेतून काढून टाकलंय. खरं तर मला खूप शिकायचंय पण बाबा म्हणतात शिकून काय करायचं. त्यापेक्षा काम कर!”साहेबांच्या लक्षात आलं. पोराला शाळेत जायचंय, शिकून मोठं व्हायचंय. बाबांनी शाळेत जायचं नाही असं म्हटल्यामुळेच हा रागावलाय बाबांवर. ते म्हणाले, “घाबरू नकोस. मी तुझ्या शिक्षणाची जबाबदारी घेतो. तुझा सर्व खर्च मी करीन. मग तर झालं.” या एका अटीवर सुरज घरी जायला तयार झाला. मग साहेब दुसऱ्या दिवशी स्वतः सुरजला घेऊन त्याच्या घरी गेले. सुरजला पाहताच बाबांच्या डोळ्यांत पाणी आलं, आई त्याला कुशीत घेऊन रडू लागली. साहेब म्हणाले, “बघा, सुरज हा खूप गुणी मुलगा आहे. त्याला शिकू द्या. तुम्हाला शक्य नसेल तर मी त्याच्या शिक्षणाचा सर्व खर्च करेन.” हे सांगताच सुरजचे आई-बाबा हमसून हमसून रडू लागले. साहेब जाता जाता म्हणाले, “पोराला सांभाळा. मी माझ्या मुलाला तीस वर्षांपूर्वी असंच गमावलंय.” असं म्हणत त्यांनी खिशातल्या रुमालाने आपले अश्रूंनी डबडबलेले डोळे पुसले अन् तेथून निघाले.
Pimpri Chinchwad Police : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान करण्यासाठी आयुक्तांचे मोठे पाऊल; तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या.
कथा : प्रा. देवबा पाटीलउद्या सीता व नीताची मावशी तिच्या गावाला जाणार होती. म्हणून त्या थोड्याशा नाराजच होत्या. त्यांच्या नाराज चेहऱ्यांकडे बघून मावशीने विचारले, “काय गं सोनुल्यांनो, आज अशा नाराज का आहात तुम्ही?”“मावशी तुम्ही उद्या तुमच्या घरी जाणार आहात ना?” सीताने विचारले.“त्यामुळे आमचे काही लक्ष लागत नाही मावशी.” नीताने उत्तर दिले.“म्हणून नाराज आहेत काय माझ्या सोनुल्या. अगं त्यामुळे असे नाराज थोडेच व्हायचे असते. मी पुन्हा उन्हाळ्याच्या सुट्टीत तुमच्याकडे येणारच आहे,” मावशी म्हणाली, “चला बरं. घ्या, ती सतरंजी नि चला गच्चीवर. नेहमीसारख्या आपण गच्चीवर जाऊन मनसोक्त गप्पा करू.”“मावशी आज तुमच्याकडून आम्हाला रोज दिसणाऱ्या आकाशाच्या विविध रंगांबद्दलची व इतरही बरीच छानशी उपयोगी वैज्ञानिक माहिती मिळाली,” सीता म्हणाली.“पण मावशी? तुम्हाला इतकी माहिती कोठून समजली?” नीताने विचारलेच.मावशीने स्पष्टीकरण दिले, “अगं मी भौतिकशास्त्राची प्राध्यापिका असून दररोज नित्यनेमाने वाचन करते. वेगवेगळ्या प्रकारची, विविध विषयांची खूप खूप पुस्तके वाचते. जे वाचन करते त्यावर विचार करते, त्याचे चिंतन करते, त्यातील चांगले, कामाचे पक्के लक्षात ठेवते. आवश्यकता भासल्यास लिहूनसुद्धा ठेवते की जे वेळोवेळी मला मार्गदर्शक ठरते, उपयोगी पडते.”“अन्न जसे शरीराचे पोषण करतात तसेच वाचन मनाचे पोषण करतात. जसे, जेवण हे सावकाश, नेमस्तपणे व नियमाने असेच केले असता अंगी लागून शरीरास हितावह होते. त्याचप्रमाणे वाचावयाची पुस्तके जर पूर्ण लक्ष देऊन, मननपूर्वक असे हळूहळू वाचले तरच त्यापासून ज्ञानाचा लाभ होऊन आपल्या निरनिराळ्या मानसिक शक्ती वृद्धिंगत होतात. आपली स्मरणशक्ती वाढते. बुद्धीचा विकास होतो आणि हे ज्ञान आपणास अडचणीत उपाय सुचविते. संकटकाळी मार्ग दाखविते, आपले धैर्य वाढविते. आपणास योग्य निर्णय घेण्याची शक्ती देऊन आपले खूप भले करते. त्यासाठी तुम्हीसुद्धा रोज कमीतकमी अर्धा तास तरी चांगली, बोधप्रद कवितांची पुस्तकं, संस्कारक्षम गोष्टी, विज्ञानाची माहिती देणारे लेख वाचीत जा. त्यातील तुमच्या उपयोगी माहिती, सुवचने लक्षात ठेवून तुमचा ज्ञानसंग्रह वाढवून बुद्धीच्या कक्षा वाढवत जाव्यात. मग कराल ना रोज थोडं थोडं प्रबोधनात्मक ज्ञानवर्धक वाचन?”“होय मावशी, आम्ही दररोज नियमितपणे तुम्ही सांगितल्यानुसार वाचन करू,” नीता म्हणाली. “मावशी आम्ही आपल्या खूप आभारी आहोत,” दोघीही म्हणाल्या. “यात आभार कसले आले गं! आभार तर परक्यांचे मानायचे असतात, आपल्या माणसांचे नव्हे. माझ्या लाडक्या मुलींनो! विद्यार्थ्यांना शिकविणे, त्यांच्या अडचणी सोडविणे, त्यांचे शंका-समाधान करणे, त्यांना सुयोग्य मार्गदर्शन करणे हे माझे आद्यकर्तव्य आहे. तुम्ही तर माझ्या मुली आहात. माझ्या मुलींना सांगणे तर माझेच काम आहे. मी नाही सांगणार तर दुसरे कोण येणार आहे त्यांना सांगायला? उलट तुम्ही इतक्या शंका विचारल्यात आणि मी सांगितलेले कान टवकारून, जीव ओतून ऐकून घेतले यावरून मला तुमच्या औत्सुक्याची, ज्ञान ग्रहण करण्याच्या आवडीची प्रचिती आली. हे बघून तसेच तुमच्या अभ्यासाव्यतिरिक्तच्या अवांतर वाचनाच्या सुयोग्य वाटचालीबद्दल मला आनंदही झाला” मावशी बोलली.“बरं मावशी, पण पुढील वेळी तुम्ही आम्हास दुसरी नवीन वैज्ञानिक माहिती जरूर सांगावी अशी आमची विनंती आहे.” दोघींनीही मावशीला अशा प्रकारच्या शब्दांत विनंती केली. “ठीक आहे माझ्या छकुल्यांनो. आता मी तुम्हाला आकाशाच्या विविध रंगांबद्दल माहिती सांगितली. पुढच्या वेळी मी तुमच्यासाठी प्रा. देवबा शिवाजी पाटील यांचा ‘नभ नवलाई’ हा सुरेखसा बालकाव्यसंग्रह आणेल व त्यातून तुम्हाला आकाशातील विविध घटना-प्रक्रियांची माहिती सांगेल,” मावशीने असे सांगितल्यांने दोघींनाही अत्यानंद झाला. एवढ्यात “स्वयंपाक झाला आहे. आता तिघीही जेवायला खाली या,”असा आईने आवाज दिला. त्यांनी सतरंजी उचलली, घडी केली व तिघीही गच्चीवरून खाली येण्यासाठी घराच्या जिन्याच्या पायया उतरू लागल्या.
Lung Transplant : ठाणे-पुणे ग्रीन कॉरिडॉरचा थरार! अवघ्या २ तास २५ मिनिटांत फुफ्फुस पुण्यात दाखल
Lung Transplant : डॉक्टर, आरटीओ आणि पोलीस दलाच्या अचूक नियोजनामुळे ५० वे हृदय-फुफ्फुस प्रत्यारोपण यशस्वी; गंभीर रुग्णासाठी ठरले जीवनदायी.
LPG Crisis Satara : जागतिक युद्धाचे सावट आता साताऱ्याच्या बाजारपेठेवर; व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या तुटवड्यामुळे हॉटेल आणि केटरिंग उद्योग संकटात.
Jamkhed News : महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ आणि NCCF च्या संयुक्त विद्यमाने जामखेड बाजार समितीत तूर व हरभरा खरेदी केंद्राचे उद्घाटन.
साप्ताहिक भविष्य, १५ ते २१ मार्च २०२६
साप्ताहिक भविष्य, १५ ते २१ मार्च २०२६इच्छा पूर्ण होतीलमेष : मागील काही काळ जाणवणारी आर्थिक ओढाताण संपुष्टात येईल. पैशाअभावी रखडलेली कामे मार्गी लागतील. नोकरी-व्यवसायात आर्थिक फायदा चांगला होऊन बरेच दिवस मनात घोळत असलेली एखादी इच्छा पूर्ण होईल. नोकरीत वेतन वृद्धी, पदोन्नती संभवते. कामाच्या स्वरूपातील बदलाचे व नवीन जबाबदाऱ्यांचे स्वागत करा. नवीन आव्हाने स्वीकारा त्यामुळे कर्तृत्वास नवीन झळाळी मिळेल. आत्मविश्वासात भर पडून पुढील कार्य करण्यासाठी कार्यमग्न राहा. जुन्या गुंतवणुका भरघोस आर्थिक फायदा करून देतील. नवीन गुंतवणूक करताना तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन घेणे हिताचे ठरेल. कुसंगतीमुळे त्रास होऊन नुकसानीचे भय. असंगाशी संग नको. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळवण्यासाठी अधिक परिश्रम घेणे आवश्यकरखडलेले व्यवहार गतीमान होतीलवृषभ : व्यवसाय-धंद्यावर सरकारी धोरणांचा सम-विषम परिणाम होण्याची शक्यता. नोकरीत सहकारी, वरिष्ठांबरोबर मत-मतांतरे होऊ शकतात. वाद- विवाद घडू नये यासाठी विविध प्रयत्न करावे लागतील. कुटुंबातील सदस्यांच्या मतास उचित प्राधान्य द्या. एकूण सर्वच क्षेत्रांतील कार्य हातावेगळी करू शकाल. नोकरी-व्यवसायात कायदेशीर बाबी सांभाळल्या पाहिजेत. महत्त्वाची कार्य पूर्ण करू शकाल. जमीन-जुमला, स्थावर मिळकत याविषयीचे थांबलेले अथवा रखडलेले व्यवहार गतीमान होतील. वडिलोपार्जित मालमत्तेसंबंधी असलेले वाद-विवाद संपुष्टात येतील. घरातील मौल्यवान वस्तू कडे लक्ष ठेवा.यश व प्रसिद्धी मिळेलमिथुन : अनुकूल ग्रहमान लाभल्यामुळे उत्साही व आनंदी राहाल. थोड्या प्रयत्नांनी हातात घेतलेली कामे पूर्ण होण्याचा अनुभव घेताना आश्चर्य वाटेल. कुटुंब परिवारातील विवाहयोग्य तरुण-तरुणींचे विवाह निश्चित होतील. काहींचे परिचयोत्तर विवाह होतील. प्रेमात यश. व्यवसाय-नोकरीत एखाद्या स्त्रीपासून फायदा होऊ शकतो. व्यावसायिक नवे करार-मदार होऊ शकतात. विशेषतः परदेशी व्यापार वृद्धी योग, त्याचप्रमाणे परदेशगमनाचे योग. कुटुंबातील मुला-मुलींकडून त्यांच्या विद्या अभ्यासातील प्रगतीच्या बातम्या मिळाल्यामुळे आनंदी राहाल. नवपरिणितांना अपत्य योग. व्यवसायामध्ये प्रतिष्ठा वाढेल.तडजोड फायद्याची ठरेलकर्क : सध्याच्या कालावधीमध्ये अति महत्वकांशा न बाळगता वाटचाल करणे फायदेशीर ठरणार आहे तडजोड फायद्याची ठरेल कुटुंब परिवारामध्ये अथवा मित्रमंडळींच्या वर्तुळात छोट्या छोट्या कारणांवरू न वादविवादाची शक्यता नाती दुरावण्याची शक्यता वाद विवाद टाळून ना त्यांना महत्त्व देणे फायद्याचे ठरेल नोकरीत अनपेक्षित घटनांना सामोरे जावे लागण्याची शक्यता स्वतःच्या बोलण्यावर तसेच वर्तणुकीवर नियंत्रण आवश्यक भांडण टाळा व्यवसाय धंद्यात स्पर्धेला तोंड द्यावे लागेल कामाच्या पद्धतीत बदल करावा लागेल नोकरीत बदलीची शक्यता काही वेळेस मनाविरुद्ध निर्णय स्वीकारावे लागण्याची तयारी ठेवा कोर्ट प्रकरणातून मनस्ताप उद्भवू शकतो आपले प्रयत्न चालू ठेवणे गरजेचे राहील प्रयत्न सफल होतील जुनी नोकरी सोडण्याचा विचार स्थगित करणे हिताचे ठरेल.भरघोस फळे मिळतीलसिंह : विशेषतः तरुण-तरुणींना भरघोस फळे मिळतील आपले शिक्षण पूर्ण करून जे जातक नोकरीच्या शोधार्थ असतील अशा जातकांचा नोकरी विषयक शोध संपुष्टात येऊ शकतो चालू नोकरीतही चांगली फळे मिळतील पदोन्नती वेतन वृद्धि सारख्या घटना घटित होतील मात्र बदलीची शक्यता व्यावसायिक आघाडीवर ती संपादित करा व्यवसायिक परिस्थिती सुधारेल कर्जातून मुक्तता व्यवसायातील नियोजन सफल होईल विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेशी जाण्याची संधी शिष्यवृत्तीसह मिळू शकते मात्र भागीदारी व्यवसाय असल्यास भागीदार बरोबर येण्याचा संभोग वाद-विवाद टाळा कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडू शकाल आत्मविश्वास वाढल्यामुळे आपल्या समोरील कार्य झपाट्याने पूर्ण कराल जमीन स्थावर मिळकतीच्या व्यवहाराला चालना मिळेलगौरवास्पद कामगिरीकन्या : आपण पूर्वी केलेल्या कार्याचा गौरव होऊन आपणास त्याची बक्षिसी मिळेल व्यक्तिगत फायदा होऊन मानसन्मानस पात्र ठराल. नोकरीत अचानक एखादी चांगली घटना आपला उत्साह वाढवेल पदोन्नती वेतन वृद्धीचे योग संभवतात आत्मविश्वासाने पुढील कार्य पार पाडाल आपल्या व्यक्तिमत्त्वाची छाप इतरांवर पडेल मात्र गोड बोलून आपला कार्यभाग साधा आपल्या वागण्याने अथवा बोलण्याने इतरांना दुखवू नका नात्यांना जपा कलाकार खेळाडूंना सरकार दरबारी मान मिळू शकतो आपल्या गुणांना वाव मिळून कौतुक होईल व्यवसायिक परिस्थिती समाधानकारक राहील कुटुंबात जरा सबुरीने घेण्याची आवश्यकता आहे आपली मते इतरांना पटतीलच असे नाही चांगल्या नात्यात अडचणी उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही परंतु भावंडांची प्रगती आणि उत्कर्ष होईल तसेच कुटुंब परिवारात शुभ घटना घटित होतील शुभवार्ता मिळतील सहकुटुंब सहपरिवार तीर्थयात्रे निमित्त प्रवास करू शकाल.जुनी येणी वसूल होतीलतूळ : सुरुवातीला खर्चात वाढ झाल्यासारखे वाटेल त्यात काही अनपेक्षित खर्च ही समाविष्ट असण्याची शक्यता आहे कुटुंबातील सदस्यांच्या मागण्या वाढू शकतात तसेच मुला-मुलींच्या साठी खर्च संभवतो त्यांच्या शैक्षणिक बाबी खर्चीक ठरतील राहत्या घरातील सुख सुविधा वाढविण्याकरता खर्च करावा लागेल एखादी नवीन खरेदी होईल तर घरगुती खर्च संबोधतात त्याप्रमाणे वाहनाच्या देखभालीवर खर्च करावा लागेल परंतु खर्चाच्या बाबी आपण सण करू शकाल कारण आपला आर्थिक स्त्रोतही वाढेल व्यवसायातील जुनी येणी वसूल होतील उधारी उसनवारी वसूल होईल कुटुंब परिवारातील तरुण-तरुणींच्या बाबत समस्या उद्भवू शकतात त्यांचे प्रश्न सतावू शकतील कुटुंबातील वडिलांच्या बरोबर वाद-विवाद टाळा मतभेदाची शक्यता नोकरीत शांत राहण्याची आवश्यकता वरिष्ठांच्या मतास प्राधान्य देणे महत्त्वाचे ठरेल प्रवास घडतील.मदत मिळेलवृश्चिक : शुभ ग्रहांचे पाठबळ लाभल्यामुळे आर्थिक आलेख उंचावलेला अनुभवाल नोकरी व्यवसायातील जुनी येणी वसूल होतील नेहमीच्या उत्पन्नांच्या मार्गा व्यतिरिक्त इतर मार्गांनी उत्पन्नात भर पडू शकते सरकारी क्षेत्रातून मदत मिळू शकते सरकारी अनुदानातून लाभ मिळू शकतो सरकारदरबारी जर एखादी प्रकरण प्रविष्ट असेल तर त्या प्रकरणी यश मिळेल तसेच आर्थिक सहाय्य मिळू शकते व्यवसायिक कर्ज मंजूर होतील ओळख यांच्या माध्यमातून मदत मिळेल मात्र असंगाशी संग ठेवणे महागात पडेल.तसेच अतिआत्मविश्वास घातक ठरू शकतो वाहने चालविताना वाहनाच्या वेगावर नियंत्रण आवश्यक राहील दुखापतीचे भय नोकरी-व्यवसायात पत प्रतिष्ठा वधारेल वैयक्तिक मानसन्मान मिळू शकतो केलेल्या कार्याचा गौरव होऊन कौतुकास पात्र ठरला नोकरीत वरिष्ठांची मर्जी राहीलभाग्योदयधनु : काही प्रमाणात कडू तसेच गोड फळे चाखण्यास मिळतील तरुण-तरुणींचा भाग्योदय नोकरी विषयक प्रश्न संपुष्टात येतील प्रयत्न विशेष सफल होतील त्याच प्रमाणे ओळखीमध्ये तिथून कामे पार पडू शकतात कुटुंबात अथवा बाहेरील क्षेत्रात वादविवाद टाळा. प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल कुटुंब परिवारातील विवाहयोग्य तरुण-तरुणींचे विवाह निश्चित होतील व्यवसायिक वादग्रस्त येणी आल्यामुळे आश्चर्य वाटेल. विवाह जमतील अपवादात्मक विवाहयोग. सरकार दरबारची प्रलंबित अवस्थेतील कार्य गतिमान होऊन पूर्णत्वाकडे झुकते कलाकार साहित्य क्षेत्रातील मंडळींना अनुकूल कालावधी प्रसिद्धी संभवते तसेच मानधनात वाढ होऊन नवीन कार्य हाती घ्यालजवळच्या व्यक्तींच्या विचित्र वागणुकीमुळे मनस्तापाची चिन्हे पण आपण लगेचच टोकाची भूमिका घेण्याचे टाळा पूर्ण विचारांती शांतपणे निर्णय घ्या लहान मोठे आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगणे गरजेचे ठरेल गर्भवती महिलांनी स्वतःची जास्त काळजी घ्यावी.प्रवास घडतीलमकर : जवळच्या व्यक्ती मातृत्वाच्या भावनेने आपल्याशी वागण्याची शक्यता आहे समज-गैरसमज होण्याची शक्यता. कोणीही काहीही आरोप केल्यास शांततेने घ्या परिस्थितीवर विजय मिळवण्यासाठी हे आवश्यक ठरणार आहे संबंधित स्त्रियांशी सौजन्यपूर्ण वागणूक आवश्यक आहे प्रतिष्ठेचे विषयक समस्या निर्माण होऊ शकतात कुटुंबातील सदस्यांच्या प्रकृती जपा कोणाच्या आजारपणाचा अथवा शस्त्रक्रियेचे योग आहेत मानसिक व शारीरिक त्रासाची शक्यता उत्तरार्धात काहीसे प्रतिकूल वाटणारे ग्रहमान बदलेल काही चांगल्या शुभ घटना घट झाल्यामुळे मानसिकता सुधारेल दिलासा मिळेल व्यवसायातील तसेच नोकरीत धंद्यातील परिस्थिती मध्ये फारसा बदल अपेक्षित नाही व्यवसायानिमित्त प्रवास घडतील प्रवास सफल होतील कुटुंबातील विद्यार्थी वरदान कडून अपेक्षित वाढता मिळतील अडलेली कामे मार्गी लावण्यात यश मिळेल उद्योग-व्यवसायात यश मिळेल परंतु आळसाला दूर सारणे हितकारक ठरेलधनलाभाचे योगकुंभ : अनुकूल परिस्थिती असली तरी सध्याच्या परिस्थितीचे शांतपणे अवलोकन करून मगच निर्णय घ्यावे लागतील आर्थिक आवक जरी येत राहिली तरी खर्चाचे प्रमाण आणि वाढलेले अनुभवास येऊ शकेल कुटुंब परिवारासाठी काही खर्च अपरिहार्य तर काही खर्च अचानक समोर उभे राहिल्यामुळे त्याची पूर्तता करावी लागेल व्यवसायातील उलाढाल वाढलेली दिसून येईल.धनलाभाचे योग आर्थिक व्यवहार करताना सावधानता बाळगली पाहिजे कारण मानवी उपद्रव संभवतो अपरिचित अपरिचित व्यक्तींबरोबर वागवत टाळावेत कलाकारांना अनुकूल कालावधी केलेल्या कामाचा गौरव होऊन मानसन्मान मिळेल नोकरीमध्ये आपल्या कामाचे कौतुक होईल खेळाडूंना आपले कौशल्य सिद्ध करण्याच्या संधी मिळतील तसेच गुणांना वाव मिळेल सरकारी नोकरीतील जातकांना बदली सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.व्यावसायिक लाभमीन : व्यवसायात अधिक लाभ संभवतात व्यवसायिक परिस्थिती समाधान कारक राहून उलाढाली मध्ये वृद्धि होईल जुन्या सहकार यांच्यासमवेत व्यवसाय करण्याची संधी उपलब्ध होईल भागीदारी व्यवसायात भागीदाराच्या बरोबर वाद-विवाद मतभेद नको. कुटुंब परिवारामध्ये विरोध वाढू शकतो राजकारणात सक्रिय असलेल्या जातकांनी अधिक सावध राहण्याची आवश्यकता आहे आश्चर्यकारकरित्या जवळचे लोक शत्रुत्व वागू शकतात येथे शत्रूंच्या कारवाया कडे नीट लक्ष ठेवणे क्रमप्राप्त ठरेल विरोधकांच्या विरोधाला नवी धार चढल्याचीजाणीव होईल.काही व्यक्तींच्या गाठीभेटी मनस्ताप वाढवू सत्ता एखाद्या अनामिक भीतीचा पगडा मनावर राहू शकतो तरुण-तरुणींनी शक्यतो सावधगिरी बाळगावी आपण चुकीचे वागत नाही ना याची वेळोवेळी स्वतः नोंद घेणे आवश्यक आहे
Nevasa News : घोडेगावात चुली पेटल्या! सिलिंडरसाठी ४५ दिवसांचा वेटिंग पिरियड; नेमकं गौडबंगाल काय?
Nevasa News : नेवासा तालुक्यातील घोडेगाव परिसरात गॅस सिलिंडरचा भीषण तुटवडा; ४५ दिवसांशिवाय बुकिंगच होत नसल्याने सामान्य नागरिक आक्रमक.
Petrol - Diesel: नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही डीलर किंवा पेट्रोल पंपाला सोडले जाणार नाही, असे मंत्रालयाने स्पष्ट केले.
Shirur News: गॅस सिलिंडरची अवैध साठेबाजी, वितरणात अडथळा, जादा दर आकारणी किंवा काळाबाजार करणाऱ्यांवर जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल, असा सज्जड इशारा तहसीलदारांनी दिला.
Nevasa News: बनावट कागदपत्रे तयार करणारे दलाल, त्यांना पाठीशी घालणारे अधिकारी आणि पोलिसांची निष्क्रिय भूमिका यामुळे हे प्रकार वारंवार घडत आहेत.
Meta Layoffs: ३१ डिसेंबरपर्यंतच्या अधिकृत आकडेवारीनुसार मेटामध्ये सुमारे ७९ हजार कर्मचारी कार्यरत होते. त्यामुळे ही कपात झाल्यास सुमारे १६ हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात येऊ शकतात.
Iran US War: ट्रम्प यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की अमेरिकी सेना पुढेही गप्प बसणार नाही. अमेरिकी सैन्य इराणच्या किनारी भागाजवळ लष्करी कारवाई करत असून इराणी जहाजे बुडवली जात आहेत, असे ट्रम्प यांनी सांगितले. कोणत्याही परिस्थितीत होर्मुझ सामुद्रधुनी सुरक्षित व मुक्त करूनच अमेरिका थांबेल, असे आश्वासन त्यांनी दिले.
Panjab Election : पंजाबमध्ये भाजप स्वबळावर लढणार? एसएडीशी युतीची शक्यता जवळपास संपुष्टात
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची शनिवारी पंजाबमध्ये (Panjab Election) सभा झाली. त्यावेळी त्यांनी अतिशय सूचक भूमिका मांडली.
Iran-US Tensions: होर्मुझ सामुद्रधुनीवरील तणावामुळे संपूर्ण जगाची नजर या युद्धावर खिळली आहे. अमेरिकेने या युद्धाला कमी लेखण्याची चूक केली का? जाणून घेऊया पाच मोठी कारणे.
Thane News: जप्त केलेल्या सिलिंडरमध्ये भारत गॅस, हिंदुस्तान पेट्रोलियम, गो गॅस व गॅस वन या विविध कंपन्यांचा समावेश होता. ४ किलो, १२ किलो, १७ किलो व १९ किलो क्षमतेचे घरगुती व व्यावसायिक असे वेगवेगळ्या प्रकारचे सिलिंडर यात होते.
PM Surya Ghar yojana : 'पंतप्रधान सूर्य घर'योजनेत महाराष्ट्राची बाजी
- उत्तर प्रदेश, गुजरातला टाकले मागे; चार महिन्यांत १ लाख ८ हजार घरांवर सौर यंत्रणामुंबई : स्वच्छ आणि शाश्वत ऊर्जेच्या दिशेने सुरू असलेल्या 'पंतप्रधान सूर्य घर : मोफत वीज' योजनेच्या अंमलबजावणीत महाराष्ट्राने देशात अव्वल स्थान पटकावले आहे. निवासी घरांच्या छतावर सौर यंत्रणा बसविण्यात महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकाचे राज्य ठरले असून, देशातील एकूण सौर संचांपैकी सुमारे २० टक्के वाटा एकट्या महाराष्ट्राचा आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिली.नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबर २०२५ ते फेब्रुवारी २०२६ या अवघ्या पाच महिन्यांच्या कालावधीत महाराष्ट्रात १ लाख ८ हजार ३२७ घरांमध्ये सौर यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. राज्याने या कामगिरीच्या जोरावर उत्तर प्रदेश आणि गुजरात सारख्या सौर ऊर्जेत आघाडीवर असलेल्या राज्यांनाही मागे सारले आहे.महाराष्ट्रातील सौर यंत्रणांच्या स्थापनेचा वेग लक्षवेधी आहे. ताज्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्राने उत्तर प्रदेश (९५ हजार ६६५) आणि गुजरात (९४ हजार ३६४) या राज्यांवर मात केली आहे. विशेष म्हणजे, राजस्थान, आसाम, छत्तीसगड आणि ओडिशा या चार राज्यांची एकत्रित आकडेवारी गृहीत धरली, तरी महाराष्ट्रातील सौर संचांची संख्या त्यापेक्षा जास्त आहे. केरळ, मध्य प्रदेश, हरियाणा, उत्तराखंड आणि जम्मू-काश्मीर या पाच राज्यांच्या एकत्रित संख्येपेक्षाही महाराष्ट्र सौर ऊर्जेच्या प्रसारात आघाडीवर आहे.शाश्वत ऊर्जेला प्राधान्य :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या योजनेमुळे नागरिकांना मोफत किंवा स्वस्त वीज मिळण्यासोबतच कार्बन उत्सर्जन कमी करण्यास मदत होत आहे. पंतप्रधानांच्या दूरदर्शी नेतृत्वामुळे देशात स्वच्छ ऊर्जेचा वापर वाढला असून, महाराष्ट्राने या मोहिमेत अग्रस्थान मिळवून देशाला नवी दिशा दिली आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.कोणत्या राज्यात किती सौर यंत्रणा?महाराष्ट्र : १,०८,३२७उत्तर प्रदेश : ९५,६६५गुजरात : ९४,३६४आंध्र प्रदेश : ३०,९१५राजस्थान : ३९,४८४
Thane News : उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई ! ठाण्यात आंतरराज्य मद्य तस्करीचा पर्दाफाश
जिल्ह्यात कार्यरत असलेल्या एका मोठ्या आंतरराज्य बेकायदेशीर मद्य तस्करी रॅकेटचा (Thane News) राज्य उत्पादन शुल्क विभागाने पर्दाफाश केला आहे.
Narendra Modi : जबाबदार पक्षाची भूमिका निभावण्यात कॉंग्रेस अपयशी; नरेंद्र मोदींची टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी शर्टलेस निदर्शने आणि गॅस सिलिंडर गदारोळावरून कॉंग्रेसवर पुन्हा जोरदार टीकास्त्र सोडले.
Indian LPG vessels: खाडी देशांतून एलपीजी वाहून आणणारी दोन भारतीय जहाजे, 'शिवालिक' आणि 'नंदा देवी' हे शनिवारी पहाटे कोणत्याही अडथळ्याशिवाय होर्मुझ सामुद्रधुनी यशस्वीरीत्या पार करून गुजरातच्या मुंद्रा आणि कांडला बंदरांच्या दिशेने निघाली आहेत.
Fraud News : निवृत्त बेस्ट कर्मचाऱ्याला 39 लाखांचा गंडा; 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
भांडुपमध्ये डिजिटल अरेस्टची घटना घडली आहे. एका निवृत्त बेस्ट कर्मचाऱ्याला तब्बल ३९.६० लाखांचा गंडा (Fraud News) घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Iran Kharg Island: इराणचे आर्थिक हृदय अमेरिकेच्या निशाण्यावर; मध्यपूर्वेत नव्या संकटाची चाहूल
Iran Kharg Island: खार्गच्या तेल क्षमतेवर थेट हल्ला झाल्यास तीव्र प्रतिशोध होण्याची शक्यता असून त्यातून प्रादेशिक ऊर्जायुद्ध भडकू शकते. असे झाल्यास आयात केलेल्या कच्च्या तेलावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असलेल्या आशियाई अर्थव्यवस्थांना, विशेषतः भारताला, याचा मोठा फटका बसेल.
नोटबंदीच्या वेळी जशा रांगा लावून माणसे मारली गेली. तेच आता सिलेंडरच्या रांगेत होईल, असे भयंकर चित्र देशात दिसत आहे.
या प्रकल्पांमुळे १०,००० हून अधिक लोकांना रोजगार मिळेल आणि विदर्भाच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल, अशी माहीती केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी (G. Kishan Reddy) यांनी दिली.
Gas Shortage : अत्यावश्यक सेवांना 100 टक्के पुरवठा.! राज्य सरकारकडून गॅस वितरणाबाबत नियमावली जारी
राज्यात जवळपास सर्वच शहरांत स्वयंपाकाच्या गॅसचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे गॅस एजन्सीपुढे नागरिकांच्या लांबलचक रांगा लागल्या आहेत.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पुन्हा घुमली 'वनराणी'ची शिट्टी
- बॅटरीवर चालणाऱ्या इंजिनासह आधुनिक सेवा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते उद्घाटनमुंबई : मुंबईकरांच्या बालपणीच्या आठवणींशी घट्ट नाते असलेली, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील ‘वनराणी’ मिनी ट्रेन अखेर नव्या रूपात रुळावर परतली आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्री तथा उत्तर मुंबईचे खासदार पीयूष गोयल यांच्या हस्ते शनिवारी या ट्रेनचे उद्घाटन करण्यात आले. २०२१ मधील ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे विस्कळीत झालेली ही सेवा तब्बल सहा वर्षांनंतर अधिक आधुनिक आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञानासह पर्यटकांच्या सेवेसाठी सज्ज झाली आहे.या सोहळ्याला राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना पीयूष गोयल यांनी उत्तर मुंबईच्या प्रगतीचा आणि निसर्ग संवर्धनाचा संकल्प बोलून दाखवला. ऊर्जा-कार्यक्षम आणि बॅटरीवर आधारित इंजिन, आधुनिक कोचेस आणि मार्गिकेलगतच्या सौंदर्यीकरणामुळे पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.यावेळी वनमंत्री गणेश नाईक म्हणाले की, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आता दोन प्रकारच्या ट्रेन धावणार आहेत. यामध्ये आधुनिक सुविधेची 'व्हिस्टाडोम मिनी ट्रेन' आणि जुन्या आठवणींना उजाळा देणारी 'वनराणी विंटेज ट्रेन' यांचा समावेश आहे. या दोन्ही ट्रेन बॅटरीवर चालणाऱ्या असल्याने उद्यानातील शांतता आणि प्रदूषणाची पातळी राखण्यास मदत होईल. निसर्गरम्य वातावरण आणि जैवविविधतेचा अनुभव पर्यटकांना आता अधिक जवळून घेता येणार आहे.तौक्ते चक्रीवादळाचा बसला होता फटका :मे २०२१ मध्ये आलेल्या 'तौक्ते' चक्रीवादळामुळे राष्ट्रीय उद्यानातील रेल्वे मार्गाचे आणि मिनी ट्रेनच्या इंजिनाचे अतोनात नुकसान झाले होते. परिणामी, ही लोकप्रिय सेवा बंद पडली होती. मुंबईकरांनी या ट्रेनच्या पुनरागमनासाठी मोठी प्रतीक्षा केली होती. आता या नव्या सुविधेमुळे शालेय सहली, निसर्गप्रेमी आणि पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
Devendra Fadnavis : राज्यात कुठेही गॅसची टंचाई नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी केले स्पष्ट
राज्यात कुठेही गॅसची टंचाई नाही. काँग्रेस पक्ष जाणीवपूर्वक लोकांमध्ये भीती निर्माण करुन त्यांनी रांगा लावाव्या यासाठी प्रयत्न करत आहेत, असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला आहे.
Google's doodle : गुगलचं विशेष ‘पाय डे’ डूडल; गणितातील प्रसिद्ध स्थिरांकाला गुगलकडून अनोखा सलाम
मुंबई : गुगलने जगभरातील गणितप्रेमींसाठी १४ मार्च २०२६ रोजी खास डूडल सादर करून ‘पाय डे’ साजरा केला. या विशेष डूडलच्या माध्यमातून गणितातील सर्वात प्रसिद्ध स्थिरांक असलेल्या पाय (π) चा गौरव करण्यात आला आहे. दरवर्षी १४ मार्च हा दिवस ‘पाय डे’ म्हणून साजरा केला जातो, कारण या तारखेचा अंकक्रम ३/१४ असा असून तो ‘पाय’च्या अंदाजे मूल्याशी (३.१४) जुळतो.गुगलने आपल्या डूडलच्या माध्यमातून सांगितले की गणित आणि भौतिकशास्त्रातील असंख्य सूत्रांमध्ये ‘पाय’ या संख्येचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. ही संख्या विशेष मानली जाते कारण तिचा दशांश विस्तार अनंत असून तो कधीही पुन्हा पुन्हा येत नाही. त्यामुळे गणितज्ञांसाठी ‘पाय’ ही संख्या संशोधनाचा आणि कुतूहलाचा विषय राहिली आहे.‘पाय’ म्हणजे वर्तुळाच्या परीघ आणि त्याच्या व्यास यांच्यातील गुणोत्तर होय. म्हणजेच कोणत्याही वर्तुळाचा परीघ त्याच्या व्यासाने भागल्यास जे स्थिर मूल्य मिळते ते ‘पाय’ म्हणून ओळखले जाते. व्यास म्हणजे वर्तुळाच्या केंद्रातून जाणारी आणि दोन्ही टोकांना वर्तुळाला स्पर्श करणारी सरळ रेषा, तर परीघ म्हणजे वर्तुळाभोवतीचे एकूण अंतर. या गुणोत्तराचे अचूक मूल्य अनंत दशांशांपर्यंत जाते. दैनंदिन गणिती गणनांसाठी मात्र ३.१४ किंवा २२/७ ही सुलभ मूल्ये मोठ्या प्रमाणावर वापरली जातात.गुगलच्या डूडलमध्ये या गणितीय संकल्पनेचा ऐतिहासिक वारसाही अधोरेखित करण्यात आला आहे. प्राचीन ग्रीक गणितज्ञ आर्किमिडीज यांनी ‘पाय’चे अधिक अचूक मूल्य शोधण्यासाठी महत्त्वपूर्ण पद्धत विकसित केली होती. त्यांनी ९६ बाजू असलेल्या बहुभुजांचा वापर करून वर्तुळाच्या आत आणि बाहेर बहुभुज रेखाटले आणि त्या पद्धतीने ‘पाय’चे वरचे आणि खालचे मर्यादित मूल्य निश्चित केले. ही पद्धत त्या काळात गणितीय संशोधनातील एक मोठी प्रगती मानली जाते.गुगल डूडलची परंपरा देखील तितकीच रोचक आहे. गुगलच्या मुख्यपृष्ठावर विशेष प्रसंगी दिसणारे हे डूडल प्रत्यक्षात १९९८ मध्ये सुरू झाले. त्या वेळी लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन यांनी बर्निंग मॅन या उत्सवासाठी पहिले डूडल तयार केले होते. पुढे २००० साली बॅस्टिल डे निमित्त पहिलं आंतरराष्ट्रीय डूडल सादर करण्यात आलं. त्यानंतर २०१० मध्ये पॅक-मॅन च्या वाढदिवसानिमित्त गुगलने पहिले ‘इंटरॅक्टिव्ह गेम डूडल’ सादर करून डूडल्सच्या संकल्पनेत नवा टप्पा गाठला.आजचे ‘पाय डे’ डूडल हे त्या समृद्ध परंपरेचा एक भाग मानले जात आहे. गणित, विज्ञान आणि मानवी ज्ञानाच्या प्रगतीमध्ये ‘पाय’ या संख्येचे असलेले महत्त्व अधोरेखित करत गुगलने जगभरातील वापरकर्त्यांना या अद्भुत गणितीय स्थिरांकाची आठवण करून दिली आहे. हे डूडल केवळ गणितप्रेमींसाठीच नव्हे तर विज्ञान आणि ज्ञानाच्या जगाबद्दल उत्सुकता असलेल्या प्रत्येकासाठी एक खास आकर्षण ठरले आहे.
Gas Cylinders : गॅस सिलिंडरसाठी नागरीक हैराण.! मुंबईत ३० टक्के हॉटेल, उपाहारगृहे बंद
गॅसचा साठा कमी असल्याने स्वयंपाकघरातील कामकाजही मर्यादित करण्यात आले आहे. गॅसची उपलब्धता कमी होत असल्याने सर्वसामान्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे.
Anil Kumble : ‘तो’निर्णय KKR ला महागात पडू शकतो; माजी फिरकीपटू अनिल कुंबळे यांनी दिला इशारा
भारतीय क्रिकेटचे दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळे (Anil Kumble) यांनी कोलकाता नाईट रायडर्सच्या (केकेआर) संघ व्यवस्थापनावर कडक शब्दांत टीका केली आहे.
सुनील ग्रोव्हरची मिमिक्री ही केवळ विनोद नाही तर बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्याला श्रद्धांजली आहे.
Meta आपल्या जागतिक कर्मचाऱ्यांपैकी २० टक्के कर्मचाऱ्यांची कपात करणार ?
- एआय तंत्रज्ञानातील वाढत्या स्पर्धेमुळे कर्मचारी संरचनेत बदलमेटा प्लॅटफॉर्म ही फेसबुक आणि इंस्टाग्राम या लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची मूळ कंपनी पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपातीच्या चर्चेत आली आहे. Reutersच्या अहवालानुसार, कंपनी आपल्या जागतिक कर्मचाऱ्यांपैकी सुमारे २० टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा विचार करत असल्याची माहिती समोर आली आहे.३१ डिसेंबर २०२५ पर्यंत कंपनीमध्ये जवळपास ७९ हजार कर्मचारी कार्यरत होते. या आकड्यानुसार जर २० टक्के कपात करण्यात आली, तर सुमारे १५ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांवर नोकरी जाण्याची वेळ येऊ शकते.एआय गुंतवणुकीमुळे खर्च वाढ :मेटाने अलीकडच्या काळात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक सुरू केली आहे. अत्याधुनिक एआय तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी डेटा सेंटर्स, संगणकीय क्षमता आणि संशोधनावर अब्जावधी डॉलर खर्च केले जात आहेत. वाढत्या खर्चाचा ताळमेळ साधण्यासाठी कर्मचारी कपातीचा पर्याय विचारात घेतला जात असल्याचे अहवालात म्हटले आहे.मात्र कंपनीचे प्रवक्ते अँडी स्टोन (Andy Stone) यांनी या बातम्या ‘काल्पनिक’ असल्याचे सांगत सध्या कोणतीही कर्मचारी कपात करण्याची योजना नसल्याचे स्पष्ट केले आहे.एआय प्रकल्पांमध्ये मोठी गुंतवणूक :एआय क्षेत्रात आघाडी घेण्यासाठी मेटाने आपल्या ‘सुपरइंटेलिजन्स लॅब्स’मध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. या लॅबमध्ये जागतिक स्तरावरील संशोधक आणि अभियंत्यांना सहभागी करून घेतले जात आहे. याच पार्श्वभूमीवर कंपनीने अलेक्झांडर वांग (Alexandr Wang) यांच्या Scale AI या एआय स्टार्टअपमध्ये सुमारे १४.५ अब्ज डॉलरची गुंतवणूक केल्याचे वृत्त आहे. तसेच २०२८ पर्यंत एआय इन्फ्रास्ट्रक्चर उभारणीसाठी तब्बल ६०० अब्ज डॉलर खर्च करण्याचे लक्ष्यही कंपनीने ठेवले आहे.यापूर्वीही झाली होती मोठी कपात :जर मेटाने २० टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले, तर ही कंपनीच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्मचारी कपात ठरेल. यापूर्वी नोव्हेंबर २०२२ मध्ये कंपनीने सुमारे ११ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढले होते. त्यानंतर मार्च २०२३ मध्ये आणखी १० हजार कर्मचाऱ्यांची कपात करण्यात आली होती.तंत्रज्ञान क्षेत्रात बदलाचे वारे :मेटासह इतर तंत्रज्ञान कंपन्याही एआयवरील वाढत्या खर्चामुळे कर्मचारी संरचनेत बदल करत आहेत. यावर्षी जानेवारीमध्ये Amazonने सुमारे १६ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले होते. तसेच Atlassianनेही एआयमध्ये गुंतवणूक वाढवण्यासाठी १६०० कर्मचाऱ्यांची कपात केली आहे.याशिवाय Microsoft, Accenture आणि Tata Consultancy Services यांसारख्या कंपन्याही एआयमुळे बदलणाऱ्या तंत्रज्ञान क्षेत्राशी जुळवून घेण्यासाठी आपल्या कर्मचाऱ्यांची पुनर्रचना करत आहेत.एकूणच, एआय तंत्रज्ञानातील वाढत्या स्पर्धेमुळे जगभरातील मोठ्या टेक कंपन्या आपली कार्यपद्धती आणि कर्मचारी रचना बदलत आहेत. त्यामुळे आगामी काळात तंत्रज्ञान क्षेत्रात अशा प्रकारचे मोठे निर्णय अधिक प्रमाणात पाहायला मिळण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आसाम प्रदेश काँग्रेस कमिटीला मोठा धक्का (Resignation of Congress Leader) बसला आहे.
Strait of Hormuz: होर्मुझ सामुद्रधुनीतून जगातील सुमारे २० टक्के कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूचा पुरवठा होतो. अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे हा मार्ग बंद पडला आहे.
मुंबई : मुंबई महानगर परिसरातील नामांकित खासगी रुग्णालयांनी राज्य शासनाच्या एकत्रित आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेत अधिक सक्रियपणे सहभागी व्हावे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.मुंबई महानगर क्षेत्रातील खासगी रुग्णालयांचा या योजनेत सहभाग वाढवण्यासाठी मंत्रालयात मंत्री आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीला सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, शांताराम मोरे, सुलभा गायकवाड, चंद्रकांत पाटील, अभिजित पाटील, मनीषा चौधरी, दिलीप लांडे, संजय उपाध्याय तसेच आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि खासगी रुग्णालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते.यावेळी बोलताना मंत्री आबिटकर म्हणाले की, गरीब व गरजू नागरिकांना परवडणारी आणि दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे हा राज्य शासनाचा प्रमुख उद्देश आहे. या पार्श्वभूमीवर आयुष्मान भारत आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. या योजनांचा लाभ अधिकाधिक रुग्णांना मिळावा यासाठी मोठ्या व नामांकित खासगी रुग्णालयांनीही पुढाकार घेणे आवश्यक आहे.मुंबईसारख्या महानगरात अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध असून त्याचा लाभ गरीब आणि मध्यमवर्गीय रुग्णांनाही मिळावा, यासाठी खासगी रुग्णालयांचा सहभाग वाढणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. शासनाकडून योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.मंत्री आबिटकर यांनी सांगितले की, राज्य शासनाने या योजनेतील उपचारांची संख्या १३५६ वरून २३९९ पर्यंत वाढवली आहे. तसेच उपचारांच्या दरातही वाढ करण्यात आली आहे. रुग्णालयांची नोंदणी प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आणि पारदर्शक पद्धतीने निश्चित कालमर्यादेत पार पडत आहे. गुणवत्ता निकष पूर्ण करणाऱ्या रुग्णालयांना अतिरिक्त प्रोत्साहन रक्कमही दिली जात आहे.मुंबई महानगर क्षेत्रातील खासगी रुग्णालयांनी आयुष्मान भारत व महात्मा फुले जनआरोग्य योजनेमध्ये सहभागी व्हावे.मुंबई महानगर परिसरातील नामांकित खाजगी रुग्णालयांनी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत सहभाग घ्यावा यासाठी मंत्रालयात विशेष बैठक पार पडली.या बैठकीत मुंबई महानगर… pic.twitter.com/cOjY61JGo4— Prakash Abitkar (@abitkar_prakash) March 13, 2026गेल्या वर्षभरात घेतलेल्या विविध सुधारात्मक निर्णयांमुळे रुग्णसंख्या, उपचारांची संख्या आणि त्यावरील खर्चातही लक्षणीय वाढ झाली असल्याचे त्यांनी नमूद केले.तसेच योजनेचे जिल्हा समन्वयकांनी स्थानिक लोकप्रतिनिधींशी समन्वय साधून काम करावे, तसेच पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील जनआरोग्य समित्यांच्या नियमित बैठका घेण्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.दरम्यान, राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनीही राज्यातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगितले. विधानसभेत दिलेल्या आश्वासनानुसार ही बैठक आयोजित करण्यात आली असून खासगी रुग्णालयांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून योजनेत सहभागी व्हावे, असे त्यांनी आवाहन केले.बैठकीत आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक यांनी योजनेत करण्यात आलेल्या बदलांची माहिती दिली. तर राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांनी उपचारांतील वाढ, दरातील बदल, ऑनलाईन प्रणाली आणि दाव्यांच्या वेळेवर अदायगी याबाबत सादरीकरण केले.यावेळी उपस्थित आमदार तसेच मुंबई महानगर परिसरातील खासगी रुग्णालयांच्या प्रतिनिधींनीही आपली मते मांडली.
- सततच्या पराभवातून आलेल्या नैराश्यातूनच काँग्रेसचा देशाविरोधात मोर्चाआसाम सोबतच देशातील बहुतेक राज्यांमध्ये जनतेने काँग्रेसला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. त्यामुळे सतत हरणारी काँग्रेस लवकरच पराभवाचे शतक पूर्ण करेल. पराभवाच्या याच नैराश्यातून काँग्रेसने देशविरोधात मोर्चा उघडल्याची घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. आसाममध्ये आज, शनिवारी (१४ मार्च) पंतप्रधानांच्या हस्ते शिलाँग–सिलचर कॉरिडोरचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी आयोजित सभेत ते बोलत होते.याप्रसंगी गेल्या महिन्यात भारत मंडपम येथे झालेल्या एआय समिटदरम्यान काँग्रेस सदस्यांनी केलेल्या आंदोलनाचा उल्लेख करत मोदी म्हणाले की, एआय समिटला बदनाम करण्याच्या प्रयत्नात काँग्रेसने विचित्र प्रकारचे आंदोलन केले. त्यांनी सार्वजनिक ठिकाणी स्वतःचे कपडे फाडून निषेध नोंदवला.या आंदोलनावर टीका करताना मोदी म्हणाले की, आता काँग्रेसकडे निराशेत स्वतःचे कपडे फाडण्याव्यतिरिक्त काहीही शिल्लक नसल्याचे दिसून येते.कांग्रेस निकट भविष्य में हार की सेंचुरी मारने वाली है। इसी हताशा में अब वो देश में पैनिक क्रिएट करने पर उतर आई है। इसलिए असम के मेरे भाई-बहनों और नौजवानों को कांग्रेस के फ्रस्ट्रेशन से बहुत सावधान रहना है। pic.twitter.com/XtzYdXUE3A— Narendra Modi (@narendramodi) March 14, 2026आसामच्या युवकांविषयी बोलताना पंतप्रधानांनी सांगितले की, काँग्रेसने असमला ‘फोडा आणि राज्य करा’ या धोरणाची प्रयोगशाळा बनवली होती. मात्र आज असमच्या युवकांसमोर संधींचे विस्तीर्ण आकाश खुले झाले आहे. तसेच काँग्रेसने ईशान्य भारताला अनेक वर्षे दुर्लक्षित केले. स्वातंत्र्यानंतर सीमारेषा अशा पद्धतीने निश्चित करण्यात आल्या की बराक खोऱ्याचा समुद्राशी असलेला संपर्क पूर्णपणे तुटल्याचे मोदींनी नमूद केले. बराक खोरे एकेकाळी महत्त्वाचे व्यापारमार्ग आणि औद्योगिक केंद्र म्हणून ओळखले जात होते, पण त्याची ताकद हिरावून घेतली गेली. स्वातंत्र्यानंतरही अनेक दशकं काँग्रेस सत्तेत होती, तरीही बराक खोऱ्याच्या विकासासाठी कोणतेही ठोस पाऊल उचलले गेले नसल्याची टीका त्यांनी केली.पंतप्रधानांनी ठामपणे सांगितले की, असममधील भाजपच्या नेतृत्वाखालील डबल-इंजिन सरकार बराक खोऱ्याला बदलण्यासाठी आणि त्याला पुन्हा व्यापार व उद्योगाचे महत्त्वाचे केंद्र बनवण्यासाठी काम करत आहे. जिथे काँग्रेसची विचारसरणी संपते, तिथून आमचे काम सुरू होते. हा ईशान्य भारतातील पहिला एक्सेस-कंट्रोल्ड हाय-स्पीड कॉरिडोर असेल. हा केवळ महामार्ग प्रकल्प नाही, तर ईशान्य भारतातील लोकांच्या दशकांपासूनच्या प्रतीक्षेचा अंत असल्याचे मोदींनी सांगितले.
Guidelines on Gas Shortage: सरकारच्या परिपत्रकानुसार गॅस वितरणाचे तीन स्तर निश्चित करण्यात आले आहेत.
LPG Shortage : गॅस मिळत नाही आता नो प्रॉब्लेम; फक्त ‘हे’काम करा झटक्यात मिटेल टेन्शन
इस्रायल आणि इराण यांच्यातील तीव्र संघर्षामुळे (LPG Shortage) पश्चिम आशियातील स्थिती अस्थिर झाली आहे. भारत एलपीजीच्या (LPG Shortage) सुमारे ६०% गरजा आयात करतो, त्यापैकी ९०% पेक्षा जास्त होर्मुझ सामुद्रधुनीमार्गे येतो.
भव्य राष्ट्रध्वज नागपूरच्या राष्ट्राभिमानाचे प्रतीक ठरेल - मुख्यमंत्री फडणवीस
देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी असंख्य स्वातंत्र्य सैनिकांनी प्राणांची आहुती दिली याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे. याची सदैव जाण ठेवून नागपुरात उभारण्यात आलेला हा भव्य राष्ट्रध्वज येथील जनतेच्या राष्ट्राभिमानाचे प्रतीक ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.नागपूर येथील ऐतिहासिक कस्तुरचंद पार्कवर नागपूर महानगरपालिका आणि लोकमत वृत्तपत्र समूह यांनी साकारलेल्या २०० फूट उंच भारतीय राष्ट्रध्वजाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण झाले. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी आमदार संदीप जोशी आणि विकास ठाकरे, महापौर नीता ठाकरे, प्रभारी महापालिका आयुक्त डॉ. विपीन इटनकर, अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत आणि वैष्णवी बी, लोकमतच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन डॉ. विजय दर्डा आदी उपस्थित होते.काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस ?परदेशात त्या - त्या देशांचे राष्ट्रध्वज उभारल्याचे दिसत होते. राष्ट्रभिमान जागविण्यासाठी भारतातही राष्ट्रध्वज उभारण्यात यावेत, अशी मागणी व्हायची मात्र, त्याला फ्लॅग कोडची अडचण येत होती. ती अडचण दूर झाल्याने देशात भव्य राष्ट्रध्वज उभारण्यात येत आहेत. नागपुरातील या ऐतिहासिक कस्तुरचंद पार्कवर उभारण्यात आलेला हा राष्ट्रध्वज प्रत्येक नागपूरकराचा राष्ट्रभिमान जागविणारा असा आहे. याचे उत्तम आरेखन करण्यात आले आहे. नागपुरातून अन्य राज्याकडे जाणाऱ्या शहरांचे शहरांचे प्रतीकही येथील भिंतींवर दिसून येत आहेत. या शहरात असा भव्य राष्ट्रध्वज उभारण्यात आला ते अभिमानास्पद आहे. हा राष्ट्रध्वज बघून देशाभिमाने उर भरून येतो, असेही त्यांनी सांगितले. लोकमत वृत्तपत्र समूहाने हा राष्ट्रध्वज उभारण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल त्यांनी कौतुक केले.भारतीय ध्वज फडकताना पाहून उर स्वाभिमानाने आणि अभिमानाने भरून आला आहे.(भारतीय ध्वजाचा लोकार्पण सोहळा | नागपूर | 14-3-2026)#Maharashtra #IndianNationalFlag pic.twitter.com/eeTTK4IeTB— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 14, 2026डॉ. विजय दर्डा यांनी स्वागत पर भाषण केले. तत्पूर्वी, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते येथील कोनशिलेचे अनावरण झाले. त्यांनी राष्ट्रध्वजवंदन व राष्ट्रध्वजाचे अनावरण केले.२००९ मध्ये कस्तुरचंद पार्क येथे राष्ट्रध्वज उभारण्याची संकल्पना मांडण्यात आली. २०१६ मध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन झाले. या राष्ट्रध्वजाचे वास्तूविशारद शांतनू भाल्ला आहेत.
तुम्ही आसामच्या चहाच्या बागयंमध्ये काम केले आणि गुजरातमधील माझ्या गावात ही चहाची पाने खूप दूरवर पोहोचली.
टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये (T20 World Cup) भारताने ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर देशभरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, या विजयाच्या सेलिब्रेशनसोबतच सोशल मीडियावर एक अनावश्यक वादही पेटला.
TMC BJP clash:
Operation White Hammer : आंध्र प्रदेशात ४७ कोटींचे अंमली पदार्थ जप्त; दोघांना अटक
सिंथेटिक ड्रग्जच्या बेकायदेशीर उत्पादनाविरोधात महत्त्वपूर्ण कारवाई करत, महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) आंध्र प्रदेशातील एनटीआर जिल्ह्यातील कोंडापल्ली औद्योगिक विकास क्षेत्रात एनडीपीएस कायदा, १९८५ अंतर्गत सायकोट्रॉपिक पदार्थ अल्प्राझोलमचे उत्पादन करणाऱ्या एका छुप्या सुविधेचा पर्दाफाश केला आहे.गुप्तचर यंत्रणेच्या माहितीवर आधारित आणि सुव्यवस्थित असे 'ऑपरेशन व्हाईट हॅमर' हे अभियान ११ आणि १२ मार्च २०२६ रोजी राबवण्यात आले, ज्यातून रासायनिक उत्पादन युनिटच्या नावाखाली कार्यरत असलेला अल्प्राझोलमच्या उत्पादनाचा एक पूर्ण विकसित औद्योगिक सेटअप उघडकीस आला.परिसरात झडती घेण्यात आली असता २३७ किलो अल्प्राझोलम जप्त करण्यात आले ज्याचे बाजारमूल्य अंदाजे ४७ कोटी रुपये आहे, तसेच ८०० किलोहून अधिक प्रमुख कच्चा माल, २८६० लिटर विविध रसायने आणि रिअॅक्टर, ड्रायर आणि सेंट्रीफ्यूज सारखी औद्योगिक उपकरणे जप्त करण्यात आली, ज्यातून ही एक संघटित, मोठ्या प्रमाणात गुप्त उत्पादन सुविधा असल्याचे दिसून येते.प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की रसायन आणि औषधनिर्माण क्षेत्रात २० वर्षांहून अधिक अनुभव असलेल्या एका औषधविक्रेत्याने हैदराबादमध्ये कच्चा माल आणि वितरण व्यवस्था करणाऱ्या त्याच्या सहकाऱ्याशी संगनमत केले होते. आरोपीने अल्प्राझोलमचे छुप्या पद्धतीने उत्पादन करण्यासाठी कारखान्याचा परिसर भाड्याने घेतला होता. दोन्ही सूत्रधारांना अटक करण्यात आली आहे.चालू आर्थिक वर्षात, डीआरआयने गुप्तचर यंत्रणेच्या माहितीच्या आधारे आठ गुप्त औषध उत्पादन युनिट्स उद्ध्वस्त केले आहेत, ज्यामुळे सरकारच्या नशा मुक्त भारत अभियान आणि समाजाचे आणि लोकांचे अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थांच्या धोक्यापासून संरक्षण करण्याप्रति त्यांची दृढ वचनबद्धता पुन्हा स्पष्ट झाली आहे.
Nashik Kumbh Mela : नाशिक कुंभमेळ्यासाठी २२,१८१ कोटी रुपयांच्या कामांना मान्यता
- त्र्यंबक-नाशिकचा कुंभमेळा जगाला आकर्षण वाटणारा असावा - मुख्यमंत्री फडणवीसत्र्यंबक - नाशिक मध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन २०२७ मध्ये करण्यात येत असून या कुंभमेळ्यात देश - विदेशातून करोडो भाविक येणार आहेत. कुंभमेळ्याच्या माध्यमातून येथे येणारा प्रत्येक भाविक भारताची पर्यायाने महाराष्ट्राचे प्रतिबिंब सोबत नेणार आहे. त्यामुळे याच्या यशस्वी आयोजनातून जगाला आकर्षण वाटणारा कुंभमेळा करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.त्र्यंबक-नाशिक सिंहस्थ कुंभमेळाकरिता करण्यात येत असलेल्या विविध कामांसाठी २२ हजार १८१ कोटी रुपयांच्या कामांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवनात आयोजित कुंभमेळा शिखर समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यामध्ये पहिल्या टप्प्यातील ५ हजार १४० कोटी आणि दुसऱ्या टप्प्यातील १७ हजार ४१ कोटी रुपयांच्या कामांचा समावेश आहे. कुंभमेळा निमित्त सुरू असलेली आणि प्रस्तावित असलेल्या कामांमध्ये कुणी वाईट हेतूने किंवा मुद्दाम विलंब होण्याच्या हेतूने अडथळा आणत असेल, तर त्याची गय केली जाणार नाही. त्याच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला.बैठकीला अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र सिंह राजे भोसले, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार सीमा हिरे, आमदार देवयानी फरांदे, आमदार सरोज अहिरे, आमदार सर्वश्री पंकज भुजबळ, माणिकराव कोकाटे, दिलीप बनकर, हिरामण खोसकर, राहुल ढिकले, नाशिकच्या महापौर हिमगौरी आहेर उपस्थित होत्या.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, कुंभमेळा निमित्ताने करण्यात येणाऱ्या कामांकरिता लागणाऱ्या जमिनीच्या भूसंपादनाचा योग्य मोबदला शेतकऱ्यांना देण्यात यावा. नाशिक वर्तुळ मार्गातील अडथळे दूर करीत विशेष बाब म्हणून ५० टक्के भूसंपादन पूर्ण झाल्यानंतर रस्त्याच्या कामाला सुरुवात करावी. कुंभमध्ये स्वच्छता अत्यंत महत्वाची असून या कामांमध्ये करण्यात येणारी शौचालय दर्जेदार असावी. कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकच्या परिसरातील स्थानकांची पायाभूत सुविधांची कामे रेल्वेच्या माध्यमातून सुरू करण्यात येत आहेत. यामध्ये निफाड रेल्वे स्थानकाचाही समावेश करण्यात यावा, याबाबत रेल्वेने पडताळणी करून कार्यवाही करावी.कुंभमेळ्यासाठी येणारे भाविक शिर्डी व शनिशिंगणापूरला निश्चितपणे जाणार आहेत. त्यामुळे शिर्डी ते नाशिक रस्त्याचे काम करण्यात यावे. कुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांना संपर्कामध्ये कुठलीही अडचण होऊ नये, म्हणून मोबाईल संपर्काची व्यवस्था भक्कम असावी. त्यासाठी आतापासूनच तयारी करण्यात यावी. द्वारका जंक्शन येथे वाहतूक सुरळीत करण्यासाठी सुरू असलेल्या कामांमध्ये अंतर्गत रस्त्यांचा विचार करून परिसरातील रस्त्यांचा एकीकृत विकास करावा. नवीन घाटांच्या जागेकरिता शेतकऱ्यांना मोबदला देण्यात यावा, यासाठी विशिष्ट पद्धतीचा अवलंब करावा. त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त व नाशिक येथील गोदावरी नदीतील पाणी कुंभमेळा दरम्यान शुद्ध राहण्यासाठी यंत्रणांनी विशेष काळजी घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.नाशिक येथील काळाराम मंदिराचे काम करताना आजूबाजूच्या वाहतुकीला अडथळा होणार नाही, याबाबत दक्षता घेण्यात यावी. राम काल पथाच्या कामाला गती देण्यात यावी. शहरातील ऑप्टिकल फायबर केबलचे काम वेगाने पूर्ण करावे. तसेच स्मार्ट सिटी प्रकल्पातील नादुरुस्त सीसीटीव्ही बाबत पडताळणी करून नवीन सीसीटीव्ही कार्यान्वित करण्यासाठी उच्चस्तरीय समितीची मान्यता घ्यावी. अमृत स्नानांच्या दरम्यान शहरातील भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता महाविद्यालयांमधील जागा पार्किंग तसेच पोलिसांसाठी घेण्याबाबत संबंधित विभागाशी चर्चा करून निर्णय घ्यावा. निवृत्तीनाथ मंदिर ट्रस्टच्या कामांचा समावेश करून पुढील कार्यवाही करण्यात यावी. नाशिक शहर व परिसरातील जवळपास दोन ते चार हजार मुलांना कुंभमेळ्याच्या निमित्ताने आवश्यक कौशल्याचे प्रशिक्षण देऊन त्यांना स्वयंसेवक म्हणून काम करण्यासाठी प्रेरित करावे. महिला बचत गटांच्या कुंभमेळातील समावेशनाबाबत पडताळणी करून तशा पद्धतीचे बिझनेस मॉडेल उभारावे, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.बैठकीत नाशिक त्रंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी सादरीकरण केले.बैठकीला मुख्य सचिव राजेश अग्रवाल, अपर मुख्य सचिव (गृह) मनिषा म्हैसकर, अपर मुख्य सचिव (परिवहन) संजय सेठी, अपर मुख्य सचिव (वित्त) ओ. पी गुप्ता, नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मनपा आयुक्त मनीषा खत्री आदी उपस्थित होत्या. तसेच नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त जलज शर्मा यांनी दूरदृश्य संवाद प्रणाली द्वारे बैठकीत सहभाग घेतला.
Bhambri-Goransson : भांब्री-गोरान्सनचे इंडियन वेल्स मास्टर्स टेनिसमधील आव्हान संपुष्टात
भारताचा टेनिसपटू युकी भांब्री आणि त्याचा स्वीडिश जोडीदार आंद्रे गोरान्सन (Bhambri-Goransson) यांचा 'इंडियन वेल्स मास्टर्स' स्पर्धेतील स्वप्नवत प्रवास उपांत्य फेरीत संपला.
Rahul Gandhi : “संघात मागासवर्गीय दलितांसाठी स्थान नाही…”; राहुल गांधींची खोचक टीका
रायबरेलीचे खासदार असलेले राहुल गांधी सामाजिक न्याय आणि संविधानाच्या मुद्द्यांवर चर्चा करताना काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करत होते.
- अमेरिकेचे हजारो कोटींचे नुकसानइराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत असल्याचे दिसत आहे. शनिवारी (१४ मार्च) इराणने सौदी अरेबियातील अमेरिकेच्या महत्त्वाच्या हवाई तळावर क्षेपणास्त्र हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात अमेरिकन हवाई दलाच्या हवेत इंधन भरणाऱ्या KC-135 स्ट्रॅटोटँकर प्रकारातील पाच विमानांचे मोठे नुकसान झाले. या घटनेमुळे केवळ लष्करीच नव्हे तर संपूर्ण गल्फ (खाडी) प्रदेशाच्या अर्थव्यवस्थेलाही मोठा धक्का बसल्याची चर्चा आहे.अमेरिकन हवाई दलाला फटका :सौदी अरेबियातील प्रिन्स सुलतान एअर बेसवर झालेल्या या क्षेपणास्त्र हल्ल्यावेळी पाचही टँकर विमाने जमिनीवर उभी होती. ती पूर्णपणे नष्ट झाली नसली तरी गंभीररीत्या नुकसानग्रस्त झाली असून सध्या उड्डाणासाठी सक्षम नसल्याचे सांगितले जात आहे. सुदैवाने या हल्ल्यात कोणताही अमेरिकन सैनिक मृत्युमुखी पडलेला नाही. मात्र, यापूर्वी इराकच्या पश्चिम भागात घडलेल्या दुर्घटनेत एका KC-135 विमानातील सहा क्रू सदस्यांचा मृत्यू झाला होता.विमानांचे आर्थिक व लष्करी महत्त्व :KC-135 प्रकारची टँकर विमाने अमेरिकन हवाई दलाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जातात. या विमानांच्या मदतीने लढाऊ विमानांना हवेतच इंधन पुरवले जाते. एका KC-135R विमानाची किंमत साधारणपणे ३९.६ ते ५३ दशलक्ष डॉलर्स (सुमारे ३३० ते ४५० कोटी रुपये) इतकी आहे. त्यामुळे पाच विमानांचे नुकसान झाल्यास अमेरिकेला अंदाजे २५० ते ४०० दशलक्ष डॉलर्स (सुमारे २१०० ते ३३०० कोटी रुपये) इतका आर्थिक फटका बसू शकतो. या विमानांची कमतरता अमेरिकेच्या हवाई मोहिमांवरही परिणाम करू शकते.गल्फ देशांवर आर्थिक दबाव :या संघर्षात गल्फ देश थेट सहभागी नसले तरी त्यांच्या भूमीवर होणारे हल्ले आणि हॉर्मुझ सामुद्रधुनीतील तणावामुळे त्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. युद्ध सुरू झाल्यापासून गल्फ देशांना एकूण १५ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त ऊर्जा महसूल गमवावा लागल्याचा अंदाज आहे. त्यात एकट्या सौदी अरेबियाला सुमारे ४.५ अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले असून दररोज जवळपास ७४५ दशलक्ष डॉलर्सचा फटका बसत आहे. सौदीतील रास तनुरा रिफायनरी आणि यूएईतील अल धफ्रा एअर बेससारख्या महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ले झाल्याने तेल उत्पादनातही घट झाली आहे.संघर्ष आणखी तीव्र होणार ?अमेरिकेने इराणच्या खार्ग बेटावर केलेल्या कारवाईनंतर इराणने अमेरिकेच्या लॉजिस्टिक क्षमतेला लक्ष्य करत प्रतिहल्ला केल्याचे मानले जात आहे. वाढत्या लष्करी खर्चाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने अतिरिक्त ५० अब्ज डॉलर्सच्या निधीची मागणी केली आहे. दरम्यान, या संघर्षामुळे गल्फ प्रदेशातील अर्थव्यवस्था आणि ऊर्जा पुरवठ्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
धामणगाव गढी परिसरात चक्क अस्वलाचा मुक्त संचार सीसीटीव्हीत कैद; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
अमरावती जिल्ह्यातील धामणगाव गढी परिसरात अस्वलाचा मुक्त संचार आढळून आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पहाटेच्या सुमारास गावातील मुख्य रस्त्यावर एक अस्वल फिरताना दिसले. हा संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा व्हिडिओ सध्या ग्रामस्थांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.गावातील रस्त्यांवर आणि वस्ती जवळ अस्वल दिसल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. विशेषतः रात्री आणि पहाटेच्या वेळी घराबाहेर पडताना ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पालकांनी लहान मुलांना एकटे बाहेर न जाण्याच्या सूचना दिल्या आहेत.धामणगाव गढी परिसर जंगलालगत असल्याने वन्य प्राणी अधूनमधून गावाच्या हद्दीत येत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. मात्र यावेळी अस्वल थेट गावातील रस्त्यावर फिरताना दिसल्यामुळे नागरिकांनी तातडीने वनविभागाने लक्ष देण्याची मागणी केली आहे.स्थानिक नागरिकांनी वनविभागाने त्वरित पथक पाठवून अस्वलाला सुरक्षितपणे पकडून पुन्हा जंगलात सोडावे, तसेच गाव परिसरात नियमित गस्त वाढवून नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी, अशी मागणी केली आहे.दरम्यान, सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या या घटनेनंतर ग्रामस्थांनी सतर्कता बाळगण्यास सुरुवात केली असून वनविभागाकडून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
संजय राऊत देशात अराजकता निर्माण करत आहेत; भाजपाचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा घणाघात
- आदित्य ठाकरेंना संपवण्याची सुपारी संजय राऊतांनी घेतलीमुंबई : उबाठा खासदार संजय राऊत हे पत्रकार परिषदांमधून अफवा पसरवून देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भाजपाचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला. राऊत यांच्या वक्तव्यांमुळे देशाची बदनामी होत असल्याचा दावा करत त्यांच्या वक्तव्यांवर तीव्र टीका त्यांनी केली.भाजपा प्रदेश कार्यालयात शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना बन म्हणाले की, संजय राऊत गॅस टंचाईबाबत सातत्याने चुकीची माहिती पसरवत आहेत. शहरांमध्ये गॅस सिलेंडरचे बुकिंग केल्यानंतर सुमारे २५ दिवसांत ग्राहकांच्या घरापर्यंत सिलेंडर पोहोचत असल्याचे त्यांनी सांगितले. काही ठिकाणी मर्यादित तुटवडा जाणवत असला तरी तो वितरकांकडून साठेबाजीमुळे निर्माण झाल्याचे त्यांनी नमूद केले.केंद्र आणि राज्य सरकार या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे सांगत घरगुती गॅस सिलेंडरची कमतरता भासू दिली जाणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. नोंदवलेल्या प्रत्येक मागणीप्रमाणे नागरिकांच्या घरापर्यंत सिलेंडर पोहोचवण्यास सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील परिस्थितीवर नियमित आढावा घेतला जात असल्याचेही बन यांनी सांगितले. इराणसह विविध देशांकडून कच्च्या तेलाचा पुरवठा सुरळीत राहावा यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. भारत सध्या सुमारे ४० देशांकडून कच्चे तेल आयात करत असून देशात पेट्रोल आणि डिझेलसाठी कुठेही मोठ्या रांगा लागलेल्या नाहीत, असे त्यांनी सांगितले.गॅस टंचाईबाबत काँग्रेस, राहुल गांधी आणि संजय राऊत यांच्याकडून सामान्य नागरिकांमध्ये असंतोष निर्माण करण्यासाठी चुकीची माहिती पसरवली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. काही ठिकाणी जाणीवपूर्वक सिलेंडरची साठेबाजी होत असल्याचे सांगत अशा साठेबाजांवर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.आदित्य ठाकरेंना संपवण्याची सुपारी संजय राऊतांनी घेतली :मिठी नदीचा गाळ खाऊन कोण श्रीमंत झालं, मिठी नदीच्या गाळातून कोणी घर बांधले हे मुंबईकरांना माहित आहे. या घोटाळ्यातला दिनो मोरिया कोणाचा मित्र होता, कुणाच्या मित्राची चौकशी झाली, मिठी नदीच्या माध्यमातून कशा पद्धतीने मुंबईकरांना लुटलं याची इत्यंभूत माहिती सगळ्यांना आहे. संजय राऊत हे मिठी नदीचा वारंवार उल्लेख करून आदित्य ठाकरे यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत. आदित्य ठाकरेंना बदनाम करण्याची सुपारी संजय राऊत यांनी घेतली आहे. आदित्य ठाकरे यांना संपवायचं आणि संपूर्ण उबाठा गट आपल्या ताब्यात घ्यायचा, याच साठी संजय राऊत मिठी नदी, मिठी नदी चा गाळ याबद्दल चर्चा होण्याचा प्रयत्न करत आहेत.
Indapur News : इंदापुरात गॅसचा काळाबाजार करणाऱ्यांची आता खैर नाही, प्रशासनाकडून थेट कारवाईचा इशारा
Indapur News : आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम देशांतर्गत गॅसपुरवठ्यावर दिसू लागला आहे. याच संधीचा फायदा घेऊन इंदापूर तालुक्यात गॅसचा काळाबाजार करणाऱ्यांविरुद्ध आता प्रशासनाने कंबर कसली आहे. गॅसचा अवैध साठा किंवा काळाबाजार करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, दोषी आढळल्यास थेट गुन्हे दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा सर्व गॅस एजन्सीना इंदापूर तालुक्याचे […]
Palghar Accident News : पालघर परिसरात घडलेल्या एका अपघातात मालगाडीची धडक लागून तीन तरुणांनी आपला जीव गमावला आहे.
Protein Requirement: तुमच्या वजनानुसार किती प्रोटीन घ्यावे? अभ्यासात समोर आले महत्त्वाचे गणित
Protein Requirement तज्ज्ञांच्या मते, एखाद्या व्यक्तीला दिवसातून किती प्रोटीन आवश्यक आहे हे त्याच्या वजनावर, वयावर आणि शारीरिक हालचालींवर अवलंबून असते. काही संशोधनानुसार एका सामान्य प्रौढ व्यक्तीला प्रति किलो वजनामागे सुमारे ०.८ ते १ ग्रॅम प्रोटीन आवश्यक असते.
Pune News : स्वारगेट चौकात दोन दिवसांत ३७५ बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई
Pune News : स्वारगेट चौकातील बेशिस्त वाहतूक आणि अवैध रिक्षा थांब्यांमुळे होणारी कोंडी फोडण्यासाठी वाहतूक शाखेने धडक मोहीम हाती घेतली आहे. गेल्या दोन दिवसांत स्वारगेट वाहतूक विभाग आणि प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) केलेल्या संयुक्त कारवाईत तब्बल ३७५ रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, १० सदोष रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत. या धडक मोहिमेमुळे गेल्या काही […]
The Hundred Auction : काव्या मारनच्या 'त्या'कृतीवर बीसीसीआयची पहिली प्रतिक्रिया
काव्या मारन यांच्या मालकीच्या सनरायजर्स लीड्स या टीमनं इंग्लंड येथे होणाऱ्या द हंड्रेड २०२६ च्या ऑक्शनमध्ये पाकिस्तान क्रिकेट संघाचा फिरकीपटू अबरार अहमद याला संघात घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे. द हंड्रेडमध्ये आयपीएलशी संबंधित संघांच्या फ्रँचायजीकडून पाकिस्तानी खेळाडूंवर बोली लावली जाणार नसल्याची चर्चा होती. परंतु, प्रत्यक्षात तसं घडलेलं नाही. त्यामुळे काव्या मारन आणि सनरायजर्स लीड्सवर सोशल मीडियावर प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. तसेच आयपीएलमधील काव्या मारनच्या सनरायझर्स हैदराबाद संघाला आयपीएलमधून काढून टाका, अशी मागणी देखील करण्यात येत आहे.या प्रकरणावर आता बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी बीसीसीआयच्या वतीने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणात बीसीसीआय हस्तक्षेप करू शकत नाही, असं त्यांनी सांगितलं आहे.काय म्हणाले राजीव शुक्ला ?राजीव शुक्ला यांनी सांगितले की हा करार आयपीएलशी संबंधित नसून परदेशातील लीगशी संबंधित आहे. त्यामुळे त्या फ्रँचायझीनेच याबाबत निर्णय घ्यावा लागेल. “हे आमच्या कार्यक्षेत्रात येत नाही. हा परदेशी लीगचा विषय आहे, त्यामुळे आम्ही काही करू शकत नाही,” असे त्यांनी सांगितले.लंडनमध्ये झालेल्या लिलावात सनरायझर्स लीड्सने अबरार अहमदला १,९०,००० पौंड (सुमारे २.५५ लाख डॉलर) इतक्या रकमेत खरेदी केले. त्यामुळे भारतीय मालकीच्या संघाकडून ‘द हंड्रेड’मध्ये करार मिळवणारा तो पहिला पाकिस्तानी खेळाडू ठरला आहे.१२ मार्च रोजी पार पडलेल्या ‘द हंड्रेड’च्या लिलावादरम्यान, ‘सनरायझर्स लीड्स’ने ‘ट्रेंट रॉकेट्स’ संघावर मात करत, अबरार अहमदला तब्बल १,९०,००० पौंडांच्या (सुमारे २.३४ कोटी रुपये) मोठ्या रकमेला आपल्या संघात सामील करून घेतले. मात्र, या निर्णयामुळे सोशल मीडियावर एकच चर्चा आणि वाद सुरू झाला; कारण अबरार अहमदने यापूर्वी अनेकदा सोशल मीडियावर भारताविषयी आक्षेपार्ह विधाने केल्याचे आरोप समोर आले होते.याचा परिणाम म्हणून, काही चाहत्यांनी सोशल मीडियावर जाऊन आयपीएलमधील संघ असलेल्या ‘सनरायझर्स हैदराबाद’वर बहिष्कार टाकण्याची मागणी केली. या संपूर्ण वादानंतर, ‘सनरायझर्स लीड्स’च्या अधिकृत ‘X’ खात्याबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली.आज १३ मार्च रोजी असे निदर्शनास आले की, या संघाचे ‘X’ खाते अचानक निलंबित (suspended) करण्यात आले आहे. खाते उघडण्याचा प्रयत्न केल्यानंतर, “हे खाते निलंबित करण्यात आले आहे. ‘असा संदेश दिसत आहे. 'X’ च्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खात्यांना निलंबित केले जाते.” मात्र, नेमक्या कोणत्या विशिष्ट नियमाचे उल्लंघन झाल्यामुळे हे खाते निलंबित करण्यात आले आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.दरम्यान, ‘सन ग्रुप’ने गेल्या वर्षीच ‘द हंड्रेड’ स्पर्धेतील ‘लीड्स’ संघाचे संपूर्ण मालकी हक्क संपादन केले होते. हे हक्क मिळण्यापूर्वी, हा संघ ‘नॉर्दर्न सुपरचार्जर्स’ या नावाने ओळखला जात असे. ‘सन ग्रुप’ने ‘इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाकडून’ (ECB) ४९ टक्के आणि ‘यॉर्कशायर काउंटी क्रिकेट क्लबकडून’ उर्वरित ५१ टक्के हिस्सा खरेदी करून, या संघावर (फ्रँचायझीवर) पूर्ण नियंत्रण मिळवले होते.संघाचे मुख्य प्रशिक्षक डॅनियल व्हेटोरी यांनी स्पष्ट केले की, अबरारचा संघात समावेश करण्याचा निर्णय हा अनेक ऑस्ट्रेलियन खेळाडूंशी चर्चा केल्यानंतरच घेण्यात आला होता. पाकिस्तानी खेळाडूंना संघात घ्यायचे की नाही, यावर चर्चा करण्यासाठी लिलावापूर्वी फ्रँचायझीमध्ये कोणतीही विशिष्ट बैठक झाली नव्हती.
North Korea Ballistic missile : इराण - अमेरिका युद्धात उत्तर कोरियाची एन्ट्री ?
- उत्तर कोरियाने सोडल्या १० बॅलेस्टिक मिसाईलइराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल यांच्यातील संघर्षाचा आजचा १५ वा दिवस आहे. या युद्धामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाला आहे. खनिज तेलाचे दर प्रचंड वाढले आहेत. दरम्यान, इराण युद्धात माघार घेत नसल्याने आता अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणमध्ये सैन्य घुसवण्याची तयारी सुरु केली आहे. अमेरिकेचे २५०० मरिन कमांडो आणि एक एम्फिबियस असॉल्ट शिप पश्चिम आशियाच्या दिशेने रवाना झाली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये अमेरिका इराणमध्ये एखादी मोठी लष्करी कारवाई करण्याची शक्यता आहे.अशातच आता उत्तर कोरिया देखील युद्धात उतरणार अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. उत्तर कोरियाच्या लष्कराने शनिवारी पूर्व समुद्रकिनाऱ्यावरुन १० बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे (Ballistic missile) डागली आहेत. त्यामुळे आता या युद्धात उत्तर कोरिया देखील उडी मारणार का अशा चर्चा रंगू लागल्या आहेत.मात्र उत्तर कोरियाकडून ही केवळ क्षेपणास्त्रांची चाचणी असल्याचे सांगितले जात आहे. उत्तर कोरिया आणि जपानने १० बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.दक्षिण कोरियाकडूनही उत्तर कोरियाकडून क्षेपणास्त्रांची चाचणी करण्यात आल्याच्या वृत्ताबाबत भाष्य करण्यात आले आहे. उत्तर कोरियाने पूर्वे समुद्रकिनाऱ्यावरुन अज्ञात वस्तू प्रक्षेपित ( संभाव्य क्षेपणास्त्र चाचणी) केल्याचे दक्षिण कोरियाचे म्हणणे आहे. जपान या सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. उत्तर कोरियाने सोडलेली क्षेपणास्त्रे समुद्रात पडल्याची माहिती जपानकडून देण्यात आली आहे.
मुंबई : भाजप नेत्या आणि महापौर रितू तावडे यांनी फेसबुकच्या माध्यमातून एक आक्रमक पोस्ट शेअर करत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेवर (UBT) जोरदार हल्ला चढवला आहे. मिठी नदीतून निघणारा गॅस ही नैसर्गिक संपत्ती नसून, गेली २५ वर्षे मुंबईवर सत्ता गाजवणाऱ्यांच्या भ्रष्टाचाराचा साचलेला कचरा आहे, अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.https://prahaar.in/2026/03/14/state-government-guidelines-for-gas-cylinder-supply-priority-to-essential-services-stocks-are-ample-appeal-issued-not-to-heed-rumors/२५ वर्षांच्या सत्तेचा हिशोब अन् 'ब्रिमस्टोवॅड'चा उल्लेखरितू तावडे यांनी आपल्या पोस्टमध्ये मुंबई महापालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या अकार्यक्षमतेवर बोट ठेवले आहे. मिठी नदीच्या रुंदीकरणासाठी आणि स्वच्छतेसाठी 'ब्रिमस्टोवॅड' (Brimstowad) प्रकल्पांतर्गत हजारो कोटी रुपये खर्च करण्यात आले. मात्र, इतका मोठा निधी खर्च होऊनही प्रत्येक पावसाळ्यात मुंबई का बुडते? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. हा पैसा मुंबईकरांच्या हितासाठी वापरण्याऐवजी मातोश्रीच्या लाडक्या कंत्राटदारांच्या तिजोरीत गेला आहे, असा खळबळजनक आरोपही त्यांनी यावेळी केला.देशाला ऊर्जेच्या क्षेत्रात स्वयंपूर्ण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी रात्रंदिवस प्रयत्न करत असताना आणि 'उज्ज्वला' योजनेद्वारे घराघरात गॅस पोहोचवत असताना, मुंबईतील नेत्यांनी मात्र येथील जलस्त्रोतांना 'गॅस चेंबर' बनवून ठेवले आहे, अशी टीका तावडे यांनी केली. मिठी नदीच्या दुर्गंधीमुळे स्थानिक नागरिकांना श्वसनाचे आजार होत असून, स्वतःला 'पर्यावरण प्रेमी' म्हणवणारे नेते २५ वर्षांत एक नदी स्वच्छ करू शकले नाहीत, हेच त्यांच्या सत्तेचे सर्वात मोठे अपयश असल्याचे त्यांनी नमूद केले.'मिठी घोटाळ्याची' चौकशी होणाररितू तावडे यांनी मुंबईकरांना आवाहन करताना म्हटले आहे की, आता नाक बंद करून जगण्याचे दिवस संपले असून भ्रष्टाचाराला गाडण्याची वेळ आली आहे. आमची मुंबईत सत्ता आल्यावर आम्ही या 'मिठी घोटाळ्याची' सखोल चौकशी करू. हे भ्रष्टाचाराचे स्मारक आम्ही नष्ट करू, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मुंबईला या दुर्गंधीतून आणि भ्रष्टाचारातून मुक्त करण्यासाठी भाजप कटिबद्ध असल्याचेही त्यांनी शेवटी स्पष्ट केले.
Raftaar Movie: ‘रफ्तार’मध्ये राजकुमार राव-कीर्ती सुरेश एकत्र; कथेमुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता
Raftaar Movie या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य निंबालकर करत आहेत. तर निर्मितीची जबाबदारी राजकुमार राव यांची पत्नी आणि अभिनेत्री पत्रलेखा यांनी त्यांच्या ‘कम्पा फिल्म’ या बॅनरखाली घेतली आहे. चित्रपटाची कथा वेगाने वाढणाऱ्या स्टार्टअप जगावर आधारित असल्याचे सांगितले जात आहे.
मध्यपूर्वेतील वाढत्या तणावादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका मोठ्या लष्करी कारवाईची घोषणा केली आहे. अमेरिकन सैन्याने इराणच्या धोरणात्मकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या खर्ग आयलँड (Kharg Island) वर शक्तिशाली हवाई हल्ले केल्याचे ट्रम्प यांनी स्पष्ट केले. अमेरिकेच्या 'युनायटेड स्टेट्स सेंट्रल कमांड' (CENTCOM) मार्फत ही मोहीम फत्ते करण्यात आली असून, हा मध्यपूर्वेच्या इतिहासातील सर्वात भीषण बॉम्बहल्ला असल्याचा दावा त्यांनी केला आहे. ट्रम्प यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे या कारवाईची सविस्तर माहिती दिली. त्यांच्या आदेशानुसार झालेल्या या हल्ल्यात खर्ग बेटावरील सर्व इराणी लष्करी तळे आणि महत्त्वाची लष्करी लक्ष्ये पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आली आहेत. मात्र, एकीकडे लष्करी ताकद दाखवतानाच ट्रम्प यांनी सावध पवित्राही घेतला. या बेटावर इराणच्या तेलाशी संबंधित मोठी यंत्रणा आहे; परंतु होणारे मोठे आर्थिक नुकसान आणि मानवी संकट लक्षात घेता, त्यांनी तेलाच्या पायाभूत सुविधांना (Oil Infrastructure) धक्का न लावण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे केवळ लष्करी सामर्थ्य नष्ट करण्यावरच या हल्ल्याचा भर होता. इराणच्या आक्रमकतेला चोख प्रत्युत्तर देणे आणि अमेरिकेचे मध्यपूर्वेतील वर्चस्व अधोरेखित करणे, हा या मोहिमेचा मुख्य हेतू असल्याचे दिसून येत आहे. खर्ग बेट हे इराणच्या तेल निर्यातीचे मुख्य केंद्र आहे, तिथे लष्करी तळांवर हल्ला करून अमेरिकेने इराणच्या नाकेबंदीचा प्रयत्न केला आहे. या कारवाईमुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली असून, जागतिक राजकारणात आणि तेलाच्या बाजारपेठेत याचे मोठे पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.https://prahaar.in/2026/03/14/warning-if-religious-conversion-is-carried-out-through-coercion-or-inducement-state-government-presents-new-proposal-for-anti-conversion-law/खर्ग बेट का आहे जागतिक राजकारणाच्या केंद्रस्थानी?
वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांना स्वायतत्ता देण्यासाठी समिती स्थापन
मुंबई : मुंबईतील ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर ज. जी. समूह रुग्णालय तसेच नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या संस्थांना स्वायत्तता देण्यासंदर्भात सविस्तर धोरणात्मक आराखडा तयार करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी राज्याचे माजी मुख्य सचिव जयंत कुमार बांठिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भात वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने शासन निर्णय जारी केला आहे.स्वायत्ततेच्या माध्यमातून राज्यातील प्रमुख शासकीय वैद्यकीय संस्थांची शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन क्षमता आणि आरोग्यसेवा अधिक प्रभावी करण्याचा शासनाचा उद्देश असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. समितीत टाटा मेमोरिअल रुग्णालयाचे माजी संचालक डॉ. राजेंद्र बडवे, के.ई.एम. रुग्णालयाचे माजी संचालक डॉ. संजय ओक, ग्रॅन्ट वैद्यकीय महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. रणजीत माणकेश्वर, बै. जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पुणे येथील प्राध्यापक व विभागप्रमुख डॉ. राजेश कार्यकर्ते, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलसचिव यांचा सदस्य म्हणून समावेश आहे. तसेच महाराष्ट्र वैद्यक परिषदेचे प्रबंधक हे समितीचे सदस्य सचिव असतील.नेमके काम काय करणार?- राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची सध्याची प्रशासकीय व शैक्षणिक संरचना, स्वायत्त दर्जा देण्याची आवश्यकता,संभाव्य लाभ, तसेच देश-विदेशातील यशस्वी मॉडेल्सचा अभ्यास समिती करणार आहे. यामध्ये एम्स, पीजीआय चंदीगड आणि टाटा मेमोरिअलसारख्या संस्थांच्या व्यवस्थापन पद्धतीचा आढावा घेण्यात येणार आहे.- स्वायत्त महाविद्यालयांसाठी संचालक मंडळ आणि शैक्षणिक परिषद यांची रचना, व अधिकार. संचालक/अधिष्ठाता यांचे अधिकार व जबाबदाऱ्या. स्वायत्त व्यवस्थेसाठी आवश्यक आर्थिक व प्रशासकीय यंत्रणेबाबत शिफारस करणे. आर्थिक स्वातंत्र्य, अंतर्गत महसूल निर्मिती, लेखापरीक्षण व्यवस्था, तसेच कर्मचारी व अध्यापकांसाठी नवीन सेवा अटी आणि धोरणे याबाबत समिती शिफारसी करणार आहे. आवश्यक कायदेशीर, प्रशासकीय व धोरणात्मक बदलांबाबतही समिती शासनाला मार्गदर्शन करणार आहे.- शासकीय शैक्षणिक संस्थांना स्वायत्तता देताना त्यांची कार्यक्षमता वाढविण्याकरिता प्रशासकीय व आर्थिक बाबींमध्ये अधिकारांचे हस्तांतरण सुचवणे. स्वायत्त संस्थेच्या कार्यक्षमतेसाठी देखरेख, मूल्यमापन व उत्तरदायित्व यंत्रणेबाबत शिफारस करणे. धोरणाची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने करण्याकरिता आराखडा तयार करणे आदि कामे समिती करणार आहे.तीन महिन्यांत अहवाल देणारसमितीने सविस्तर अहवाल तीन महिन्यांच्या आत शासनाला सादर करायचा आहे. समितीला आवश्यक ती माहिती आणि तांत्रिक सहाय्य वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयामार्फत (डीएमईआर) उपलब्ध करून देण्यात येणार असून सदस्यांना शासन नियमानुसार मानधन, प्रवास खर्च व इतर भत्ते देण्यात येणार आहेत.
गॅस सिलिंडरच्या पुरवठ्यासाठी राज्य सरकारची नियमावली
अत्यावश्यक सेवांना प्राधान्य; साठा मुबलक, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहनमुंबई : इराण आणि इस्राईल दरम्यान निर्माण झालेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक इंधन पुरवठा साखळीवर परिणाम झाल्याने राज्य सरकारने खबरदारीचे पाऊल उचलले आहे. घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनाने विशेष नियमावली (एसओपी) जाहीर केली असून, रुग्णालये, शाळा आणि वसतिगृहे यांसारख्या अत्यावश्यक सेवांना गॅस पुरवठ्यात प्राधान्य देण्याचे निर्देश दिले आहेत.राज्यात इंधनाचा तुटवडा निर्माण होऊ नये आणि नागरिकांमध्ये घबराट पसरू नये, यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाने सूक्ष्म नियोजन केले आहे. एलपीजी सिलिंडरच्या वितरणासाठी आता स्वतंत्र प्राधान्यक्रम निश्चित करण्यात येणार असून, त्यानुसार शासकीय संस्था आणि सार्वजनिक उपक्रमांना पहिला पुरवठा केला जाईल. त्यानुसार रुग्णालये, शासकीय वसतिगृहे, मध्यान्ह भोजन योजना, आश्रमशाळा आणि महाविद्यालयांच्या मेससाठी गॅसचा पुरवठा प्राधान्याने केला जाईल.राज्य, विभाग, जिल्हा आणि तालुका स्तरावर तातडीने नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात येणार असून तक्रारींसाठी 'व्हॉट्सॲप' सुविधाही उपलब्ध केली जाईल. गॅस बुकिंग ॲप आणि मिस्ड कॉल सेवेतील तांत्रिक त्रुटी दूर करण्याचे आदेश तेल कंपन्यांना देण्यात आले आहेत. एलपीजी वाहतूक करणारी वाहने आणि गॅस एजन्सींना आवश्यकतेनुसार पोलीस संरक्षण पुरवण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनावर असेल. तेल कंपन्या आणि रेशनिंग नियंत्रकांना दररोजचा साठा आणि वितरणाचा अहवाल राज्यस्तरीय नियंत्रण कक्षाला सादर करणे बंधनकारक असेल.राज्याकडे पुरेसा इंधनसाठाराज्यात घरगुती गॅसचा कोणताही तुटवडा नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. राज्याची दैनंदिन मागणी साधारण ९ हजार मेट्रिक टन इतकी असून, रिफायनरीमधील उत्पादन आता ११ हजार मेट्रिक टनांपर्यंत वाढवण्यात आले आहे.इंधन साठ्याची स्थितीविभाग : दैनंदिन मागणी : सद्यस्थितीघरगुती एलपीजी : ९,००० मे. टन : उत्पादन ११,००० मे. टनांवरपेट्रोल : १५,००० किलो लिटर : साठा मुबलकडिझेल : ३८,००० किलो लिटर : पूर्ण क्षमतेने पुरवठास्थानिक लोकप्रतिनिधींची मदत घेणारगॅस पुरवठ्याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम किंवा घबराट निर्माण होऊ नये, यासाठी ग्रामपंचायत सदस्य आणि स्थानिक लोकप्रतिनिधींची मदत घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आगामी सण-उत्सवांच्या काळात सार्वजनिक संस्थांचा पुरवठा खंडित होणार नाही, याची विशेष काळजी घेतली जाणार आहे. पाईप्ड नॅचरल गॅस (पीएनजी) आणि पेट्रोल-डिझेलचा साठाही पुरेसा असल्याने जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन सरकारने केले आहे.
Vanshika Chadha : बालपणीची मैत्रीण होणार जोडीदार! कुलदीप यादवची होणारी पत्नी वंशिका चड्ढा कोण?
Vanshika Chadha : आज १४ मार्च रोजी भारतीय संघातील फिरकीपटू कुलदीप यादव लग्नबंधनात अडकणार आहे. हा त्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्वाचा क्षण असणार आहे.
North Korea Missile Launch जपानच्या पंतप्रधान कार्यालयाने सोशल मीडियावरील एक्स या माध्यमातून या घटनेची माहिती दिली. पोस्टमध्ये म्हटले आहे की, उत्तर कोरियाने पूर्व दिशेकडे समुद्राच्या दिशेने आंतरखंडीय क्षेपणास्त्र डागले आहे. सध्या या घटनेची अधिक माहिती गोळा केली जात असून नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे, असे आवाहनही सरकारने केले आहे.
Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांची होणार सुटका; केंद्र सरकारकडून NSA अंतर्गत कारवाई रद्द
Sonam Wangchuk : लडाखला राज्याचा दर्जा मिळावा आणि संविधानाच्या सहाव्या अनुसूचीमध्ये त्याचा समावेश करण्याच्या मागणीसाठी गेल्या वर्षी लेहमध्ये हिंसक निदर्शने झाली.
Kharg Island : सभ्यतेच्या कारणास्तव बेटावरील तेल पायाभूत सुविधा नष्ट न करण्याचा निर्णय घेतला - डोनाल्ड ट्रम्प
Rohini Khadse : चित्रा वाघ यांनी गॅस सिलेंडर मिळण्याबाबत केलेल्या विधानानंतर रोहिणी खडसेंनी चित्रा वाघ यांचा चांगलाच समाचार घेत जोरदार निशाणा साधला.
युद्धामुळे महागणार विमान प्रवास?
नवी दिल्ली : मध्य पूर्वेतील तणावाचे चटके आता विमान प्रवासालाही बसणार आहेत. इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता हवाई प्रवासावरही दिसू लागला आहे. देशातील सर्वात मोठी एअरलाइन कंपनी इंडिगोने १४ मार्चपासून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान तिकिटांवर अतिरिक्त इंधन अधिभार (फ्यूल सरचार्ज) लागू करण्याची घोषणा केली आहे. या निर्णयानंतर विमानप्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता तिकिटांसोबत ४२५ ते २३०० रुपयांपर्यंत अतिरिक्त शुल्क भरावे लागणार आहे.कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, हा नवीन नियम १४ मार्चच्या रात्री १२ वाजल्यापासून लागू होणार असून त्या वेळेनंतर केलेल्या सर्व नवीन बुकिंगवर हा इंधन अधिभार आकारला जाईल. मध्य पूर्वेतील वाढत्या भू-राजकीय तणावामुळे जेट इंधनाच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे परिचालन खर्च वाढल्याने कंपनीला हा निर्णय घ्यावा लागल्याचे इंडिगोने स्पष्ट केले आहे.कंपनीच्या मते, भारत आणि भारतीय उपखंडातील विमानप्रवासासाठी ४२५ रुपये इतका इंधन अधिभार आकारला जाईल. मध्य पूर्वेकडील उड्डाणांसाठी हा अधिभार ९०० रुपये असेल. तसेच दक्षिण-पूर्व आशिया, चीन, आफ्रिका आणि पश्चिम आशियातील उड्डाणांसाठी १८०० रुपये अतिरिक्त शुल्क आकारले जाईल. युरोपकडे जाणाऱ्या विमानप्रवासासाठी प्रवाशांना २३०० रुपये इतका इंधन अधिभार भरावा लागणार आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय मार्गांवरील प्रवास अधिक महाग होण्याची शक्यता आहे.एअरलाइन कंपन्यांच्या एकूण खर्चात एव्हिएशन टर्बाइन फ्यूल (ATF) म्हणजेच जेट इंधनाचा मोठा वाटा असतो. इंडिगोच्या मते, एटीएफचा हिस्सा एअरलाइनच्या एकूण परिचालन खर्चाच्या सुमारे ४० टक्के असतो. मध्य पूर्वेतील वाढत्या तणावामुळे या इंधनाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या जेट फ्यूल मॉनिटरनुसार या प्रदेशात इंधनाच्या किमती ८५ टक्क्यांपेक्षा जास्त वाढल्या आहेत.कंपनीने असेही सांगितले की, इंधनाच्या वाढत्या किमतींचा संपूर्ण परिणाम थेट तिकिटांच्या भाड्यात जोडला असता तर विमानप्रवास आणखी महाग झाला असता. त्यामुळे प्रवाशांवरील आर्थिक भार काही प्रमाणात कमी ठेवण्यासाठी मर्यादित स्वरूपात इंधन अधिभार आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.दरम्यान, इंडिगोच्या आधी एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेस यांनीही विमान तिकिटांवर इंधन अधिभार लागू करण्याची घोषणा केली होती. त्यामुळे वाढत्या इंधन दरांचा परिणाम आता भारतातील हवाई प्रवासावर स्पष्टपणे दिसू लागला आहे. आगामी काळात मध्य पूर्वेतील परिस्थिती कायम राहिली तर विमानप्रवासाचे दर आणखी वाढण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

27 C