Dharashiv Accident :
Indian Wells Final 2026 : अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात मेदवेदेवने स्पेनच्या कार्लोस अल्काराझचा ६-३, ७-६ (३) अशा सरळ सेटमध्ये पराभव केला.
अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण संघर्ष; खामेनीच्या ठिकाणाबाबत संभ्रम, खामेनी रशियात ?
मॉस्को/तेहरान : इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आणखी एक मोठी घडामोड समोर आली आहे. इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांना गुप्तपणे रशियात हलवण्यात आल्याचा दावा कुवेतमधील एका वृत्तपत्राने केला आहे. या वृत्तामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.संघर्ष सुरू झाल्यानंतर इराणचे माजी सर्वोच्च नेते अय्यातुला खामेनी यांच्या मृत्यूनंतर देशात मोठी राजकीय हालचाल झाली होती. त्यानंतर मोजतबा खामेनी यांची सर्वोच्च नेतेपदी निवड करण्यात आली. मात्र या काळात त्यांच्याही सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात होती.कुवेतच्या अल जरीदा या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, मोजतबा खामेनी यांना अत्यंत गुप्त पद्धतीने रशियन लष्करी विमानातून मॉस्कोला नेण्यात आले. इराणमधील वाढत्या हल्ल्यांमुळे आणि सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यांना मॉस्कोतील क्रेमलिन परिसरातील विशेष वैद्यकीय सुविधेत दाखल करण्यात आल्याचा दावा देखील या वृत्तात करण्यात आला आहे.दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका मुलाखतीत मोजतबा खामनेई यांच्या स्थितीबाबत अनिश्चितता व्यक्त केली. ते जिवंत आहेत की नाही, याबाबत स्पष्ट माहिती उपलब्ध नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या या वक्तव्यामुळे या प्रकरणाभोवती आणखी चर्चा सुरू झाली आहे.इराणच्या सूत्रांनी मात्र मोजतबा खामेनी सुरक्षित असल्याचे म्हटले आहे. तरीही त्यांना रशियात हलवण्यात आल्याच्या वृत्तामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. जर हे वृत्त खरे ठरले, तर रशियाची भूमिका या संघर्षात अधिक महत्त्वाची ठरू शकते आणि इराण-अमेरिका-इस्रायल तणाव आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Top 10 News : बारामतीची पोटनिवडणूक जाहीर ते लाडक्या बहिणींना मोठं सरप्राईज..: वाचा आजच्या टॉप दहा बातम्या
Pune News : विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापुर्ण शिक्षण मिळायला हवे –डॉ. पंडित विद्यासागर
आता दिवसेंदिवस शिक्षण खुप महाग होत चालले असून शिक्षणातही खासगीकरणही वाढले आहे. विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापुर्ण शिक्षण (Pune News) मिळायला पाहिजे.
By Election Announced : बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीची घोषणा; ‘या’दिवशी पार पडणार मतदान
केंद्रीय निवडणूक आयोगाने तामिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम, केरळ आणि पुदुचेरी या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची तारीख (By Election Announced) जाहीर केली आहे.
IPL 2026 Captains : या हाय-व्होल्टेज हंगामासाठी सर्व १० फ्रेंचायझींनी आपल्या कर्णधारांची घोषणा केली असून, यावेळी काही जुन्या अनुभवी चेहऱ्यांसोबतच नव्या युवा खेळाडूंनाही नेतृत्वाची संधी देण्यात आली आहे.
12 Exams Cancelled : बोर्डाचा मोठा निर्णय ! इयत्ता बारावीच्या परीक्षा अचानक रद्द; नेमकं काय घडलं?
इराण विरुद्ध इस्रायल आणि अमेरिकेच्या संयुक्त कारवाईमुळे सुरू झालेल्या युद्धाचा परिणाम आता शिक्षण क्षेत्रावरही (12 Exams Cancelled) दिसून येत आहे.
“पश्चिम बंगालची जनता परिवर्तनासाठी सज्ज”- पंतप्रधान नरेंद्र मोदी
- पंतप्रधानांनी केले १८.६८०कोटींच्या प्रकल्पांचे उद्घाटनपश्चिम बंगालमध्ये अनागोंदी कारभाराने कळस गाठला आहे. त्यामुळे राज्यात परिवर्तनाची लाट उसळली असून जनता बदलासाठी सज्ज असल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. कोलकाता येथील ऐतिहासिक ब्रिगेड परेड ग्राऊंडवर शनिवारी आयोजित सभेला संबोधित करताना ते बोलत होते.यावेळी पंतप्रधान म्हणाले की ब्रिगेड परेड ग्राऊंडचा इतिहास देशाला दिशा देणाऱ्या आंदोलनांचा साक्षीदार आहे. स्वातंत्र्यलढ्याच्या काळात याच मैदानातून ब्रिटिश सत्तेविरोधात उठलेला आवाज संपूर्ण देशभर क्रांतीत परिवर्तित झाला होता. त्याचप्रमाणे आता “नव्या बंगाल”च्या निर्मितीचा बिगुलही याच ठिकाणाहून वाजत असल्याचे त्यांनी नमूद केले. बंगालमध्ये बदलाची इच्छा आता भिंतींवर लिहिली गेली आहे आणि लोकांच्या मनातही कोरली गेल्याचे मोदी म्हणाले.मोदींच्या सभेत राज्य सरकारकडून अडथळे निर्माण :याप्रसंगी पंतप्रधानांनी आरोप केला की राज्य सरकारने या सभेला अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला. लोकांना सभेला येण्यापासून रोखण्यासाठी पूल बंद करण्यात आले, वाहनांची वाहतूक थांबवण्यात आली तसेच भाजपचे झेंडे व पोस्टर काढून टाकण्यात आले, असा आरोप त्यांनी केला. तसेच एवढ्या अडथळ्यांनंतरही मोठ्या संख्येने जमलेल्या जनसमुदायाला त्यांनी “परिवर्तनाची लाट” असे संबोधले. राज्यातील राजकीय परिस्थितीवर बोलताना त्यांनी सांगितले की आधी काँग्रेस, त्यानंतर डाव्या पक्षांचे सरकार आणि आता तृणमूल काँग्रेस या सर्व काळात बंगालचा विकास खुंटला आहे. कट मनी, कमिशन आणि भ्रष्टाचाराच्या राजकारणामुळे विकास योजनांचा लाभ सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचत नाही, असा आरोपही त्यांनी केला.Highlights from a euphoric rally in Kolkata yesterday! It’s clear West Bengal is supporting BJP…@BJP4Bengal pic.twitter.com/2JTv4SwzZn— Narendra Modi (@narendramodi) March 15, 2026केंद्र सरकारच्या विविध योजनांचा उल्लेख :सभेदरम्यान केंद्र सरकारच्या विविध योजनांचा उल्लेख करताना त्यांनी पीएम सूर्यघर मुफ्त बिजली योजना आणि आयुष्यमान भारत या योजनांचा उल्लेख केला. या योजनांमुळे देशभरातील लाखो लोकांना लाभ मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, पश्चिम बंगालमध्ये राज्य सरकारच्या भूमिकेमुळे या योजनांचा पूर्ण लाभ लोकांना मिळत नसल्याचा दावा त्यांनी केला. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांनी पश्चिम बंगाल आणि पूर्व भारतातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी १८.६८० कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन केले. यात रस्ते, रेल्वे आणि बंदरांशी संबंधित प्रकल्पांचा समावेश आहे. सुधारित कनेक्टिव्हिटीमुळे व्यापार, उद्योग आणि रोजगाराच्या संधींना चालना मिळेल, असे त्यांनी सांगितले.सहा पुनर्विकसित रेल्वे स्थानकांचे उद्घाटन :यावेळी पंतप्रधानांनी अमृत भारत अंतर्गत राज्यातील सहा पुनर्विकसित रेल्वे स्थानकांचे उद्घाटन केले तसेच पुरुलिया-आनंद विहार टर्मिनल एक्स्प्रेसया रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला.भक्कम पायाभूत सुविधा आणि आधुनिक कनेक्टिव्हिटी ही “विकसित बंगाल”ची मजबूत पायाभरणी ठरेल, असा विश्वास व्यक्त करत बंगाल पुन्हा एकदा देशाच्या विकासाला दिशा देईल, असे पंतप्रधानांनी सांगितले.
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू जीवंत आहेत की... ?
तेल अविव : इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या मृत्यूचे वृत्त व्हायरल होत आहे. पण इस्रायल सरकारच्या प्रवक्त्याने हे वृत्त फेटाळले आहे. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू जीवंत आणि सुखरुप आहेत असे प्रवक्त्याने सांगितले.पश्चिम आशियात अमेरिका आणि इस्रायल यांनी संयुक्तपणे इराण विरोधात युद्ध पुकारले आहे. या युद्धाची सुरुवात २८ फेब्रुवारी २०२६ रोजी झाली. आज म्हणजेच रविवार १५ मार्च रोजी युद्धाने १६ व्या दिवसांत प्रवेश केला आहे. युद्धाला दोन आठवड्यांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. पण अमेरिकेच्या अपेक्षेप्रमाणे इराण शरण आलेला नाही. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प ट्रुथ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून सातत्याने इराणला मोठे दणके दिल्याचे सांगत आहेत. तर इराण अधूनमधून आखाती देशांतील पंचतारांकीत हॉटेल, बहुराष्ट्रीय बँकांची कार्यालये, आंतरराष्ट्रीय विमानतळ, अमेरिकेचे आखाती देशांतील तळ, अमेरिकेचे रडार स्टेशन आदी ठिकाणी हल्ले केल्याचे सांगत आहे. इराणची लढण्याची बरीचशी ताकद नष्ट केल्याचे ट्रम्प सांगत आहेत. पण अमेरिकेची अवघ्या १६ दिवसांत दोन लढाऊ विमानं आणि सहा हवेत इंधन भरणारी केसी १३५ स्ट्रॅटोटँकर अशी एकूण आठ विमानं पाडल्याचे इराण सांगत आहे.इराण विरुद्ध आपलीच सरशी होत असल्याचे सांगणाऱ्या अमेरिकेने हळू हळू युद्धात मारल्या गेलेल्या स्वतःच्या सैनिकांची नावं जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे खरं काय आणि खोटं काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. या संभ्रम निर्माण करणाऱ्या वातावरणात इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या मृत्यूचे वृत्त व्हायरल झाले. पण वृत्त व्हायरल झाल्यानंतर काही तासांनी इस्रायल सरकारच्या प्रवक्त्याने पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू जीवंत आणि सुखरुप असल्याचे सांगितले.शुक्रवारी एक व्हिडीओ एक्स अर्थात ट्विटरवरून व्हायरल झाला होता. यात इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू युद्धाविषयी पत्रकारांशी बोलताना दिसत होते. या भाषणात दिसत असलेल्या पंतप्रधान नेतन्याहू यांच्या हालचाली अतिशय मर्यादीत आहेत. हा व्हिडीओ एडिट केला आहे किंवा एआयच्या मदतीने तयार केला आहे, असे मत अनेकांनी सोशल मीडियाद्वारे व्यक्त करायला सुरुवात केली. व्हिडीओत बराच वेळ इस्रायलचे दोन ध्वज आणि मागील पडदा एकदम स्थिर असल्याचे सांगत सोशल मीडिया युझरनी तर्कवितर्क करायला सुरुवात केली होती. काही युझरनी तर नेतन्याहू यांच्या हाताला पाच बोटे असताना व्हिडीओत थोडा वेळ पंतप्रधानांच्या बोटाला सहा बोटे कशी दिसत आहेत असा प्रश्न उपस्थित करून व्हिडीओच्या सत्यतेविषयी शंका उपस्थित केली. यानंतरच इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या मृत्यूचे वृत्त व्हायरल झाले.
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी ! लाभार्थी महिलांना मिळणार थेट 3 हजार रुपये
ही योजना (Ladki Bahin Yojana) महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणासाठी अत्यंत लोकप्रिय ठरली आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून लाभार्थ्यांना हप्त्यांमध्ये अनियमितता आणि विलंब जाणवत आहे.
Election Dates : निवडणूक आयोगाने आसाम, केरळ, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि पश्चिम बंगालच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत.
एकादशीच्या दिवशी 'या'गोष्टी केल्यास भगवान विष्णू होतील प्रसन्न !
धार्मिक मान्यतेनुसार हिंदू धर्मात एकादशी व्रताचे विशेष महत्त्व आहे. मान्यतेनुसार या दिवशी मनोभावे पूजा केल्यास भगवान विष्णूची विशेष कृपा प्राप्त होते. तसेच, जीवनातील अडथळे दूर होतात. हिंदू पंचांगानुसार, वर्षात एकूण २४ एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशीचे धार्मिक महत्त्व वेगवेगळे आहे. यंदा मार्च २०२६ मध्ये पापमोचनी एकादशी आणि कामदा एकादशी या दोन महत्त्वाच्या एकादशी आहेत.कामदा एकादशी २९ मार्च २०२६ रोजी साजरी केली जाणार असून धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी काही शुभ योग देखील तयार होत आहेत, त्यामुळे या पूजेचे आणि व्रताचे फार महत्त्व आहे.एकादशीच्या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करावं आणि स्वच्छ कपडे परिधान करावेत. त्यानंतर भगवान विष्णूंची मनोभावे पूजा अर्चना करावी. या दिवशी विष्णू मंत्र किंवा विष्णू सहस्रनामाचा जप करणे शुभ मानले जाते.धार्मिक मान्यतेनुसार एकादशीचे व्रत मनोभावे केल्यास भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि आपल्याला भगवान विष्णूची विशेष कृपा प्राप्त होते.
निवडणूक आयोगाने केली पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा
नवी दिल्ली : देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यासाठी भारत निवडणूक आयोग दिल्लीत पत्रकार परिषद घेत आहे. आसाम, पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू आणि पुदुच्चेरी या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा थोड्याच वेळात होणार आहे. आसाम विधानसभेचा कार्यकाळ २० मे रोजी, केरळचा २३ मे रोजी, तामिळनाडूचा १० मे रोजी, पश्चिम बंगालचा ७ मे रोजी आणि पुद्दुचेरीचा १५ जून रोजी संपत आहे. यामुळे पाचही राज्यांच्या विधानसभा निवडणुका ७ मे पूर्वीच घेतल्या जाण्याची दाट शक्यता आहे. निवडणूक जाहीर होताच संबंधित राज्यांमध्ये आचारसंहिता लागू होणार आहे.महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा २८ जानेवारी रोजी बारामती येथे विमान अपघातात मृत्यू (Death) झाला. तर अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे हृदयविकाराच्या झटक्याने काही महिन्यांपूर्वी निधन झाले होते. यामुळे बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघ रिक्त झाले आहेत. या दोन मतदारसंघांसाठी पोटनिवडणुकीची घोषणा आज भारत निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतच होण्याची शक्यता आहे. निवडणूक जाहीर होताच संबंधित मतदारसंघांमध्ये आचारसंहिता लागू होणार आहे.आधीच्या विधानसभा निवडणुकांवेळी संबंधित राज्यांमध्ये काय झाले होते ? आसाम - १२६ जागांसाठी तीन टप्प्यात मतदान झाले. रालोआने ७५ जागा जिंकल्या आणि भाजपच्या नेतृत्वात सलग दुसऱ्यांदा सत्ता स्थापन केली. पश्चिम बंगाल - २९४ जागांसाठी आठ टप्प्यात मतदान झाले. तृणमूल काँग्रेसने २१५ आणि भाजपने ७७ जागा जिंकल्या. ममता बॅनर्जी मुख्यमंत्री झाल्या. तामिळनाडू - २३४ विधानसभेच्या जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान झाले. द्रमुकने १३३, अण्णाद्रमुकने ६६ आणि भाजपने ५ जागा जिंकल्या. द्रमुकचे एमके स्टॅलिन मुख्यमंत्री झाले. केरळ - १४० जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान झाले. एलडीएफने ९९ आणि यूडीएफने ४१ जागा जिंकल्या. सीपीआयचे पिनारायी विजयन सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. पुद्दुचेरी - ३० जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान झाले. एनडीएने १६, तर यूपीएने ९ जागा जिंकल्या. एनडीएचा घटक पक्ष असलेल्या अखिल भारतीय एन.आर. काँग्रेसचे एन. रंगास्वामी मुख्यमंत्री झाले.https://www.youtube.com/watch?v=hl54zfkfiuQ
राहुल गांधी संसदेत केवळ चहा आणि पकोडे खाण्यासाठी जातात - अमित शाह यांची जहरी टीका
आसामच्या दौऱ्यात आज म्हणजेच रविवार १५ मार्च रोजी राज्यातील आरोग्य सेवा प्रकल्पांच्या उद्घाटन आणि पायाभरणी समारंभात उपस्थितांना संबोधित करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आदिशक्ती कामाख्या आणि लचित बर्फुकन, वीर चिलाराय आणि महाराज पृथु यांसारख्या महापुरुषांचे स्मरण करून भाषणाची सुरुवात केली. त्यांनी राहुल गांधींवर निशाणा साधत म्हटले की, ते संसदेत चहा आणि पकोडे खाण्यासाठी जातात. राहुल गांधींना संसदेबद्दल माहिती नाही. संसद ही नाश्त्याची जागा नाही.गुवाहाटीतील बिरुवारी येथील प्रज्योतिश मेडिकल कॉलेज कॅम्पसमध्ये आयोजित एका कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री शाह यांनी राज्याच्या भाजप सरकारचे आणि मुख्यमंत्री डॉ. हिमंता बिस्वा सर्मा यांचे कौतुक केले. ते म्हणाले, १० वर्षांपूर्वी राज्याची आरोग्य सेवा व्यवस्था खूपच खराब होती. आज आसामची आरोग्य सेवा व्यवस्था खूपच चांगली आहे. आसाममध्ये अनेक चांगल्या वैद्यकीय संस्था स्थापन झाल्या आहेत. कर्करोग संस्थेच्या बांधकामामुळे आरोग्य क्षेत्राला अभूतपूर्व चालना मिळाली आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी रतन टाटांची आठवण काढली. शाह म्हणाले, सरकारी रुग्णालयात प्रोटॉन थेरपी देणारे आसाम हे देशातील पहिले राज्य असणार आहे. ईशान्येकडील भागात कर्करोगाच्या रुग्णांची संख्या जास्त आहे. विरोधी पक्ष काँग्रेस पक्षावर निशाणा साधताना शहा म्हणाले की, काँग्रेस पक्षाने स्वतःच्या कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित केले आणि राज्यातील जनतेच्या आरोग्याची त्यांना पर्वा नव्हती. ईशान्येकडील कर्करोगाच्या रुग्णांची संख्या जास्त आहे.विश्व के सबसे बड़े #IndiaAIImpactSummit2026, जहाँ 80 देशों के CEO और 22 देशों के राष्ट्राध्यक्ष आए, वहाँ कांग्रेस ने नग्न प्रदर्शन करके भारत को बदनाम किया। pic.twitter.com/Y4kXUJslvq— Amit Shah (@AmitShah) March 15, 2026काँग्रेस पक्षावर उघड टीका करताना गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, डॉ. मनमोहन सिंग आसाममधून पंतप्रधान झाले. मनमोहन सिंग यांनी आसामच्या आरोग्य क्षेत्रासाठी कोणतेही पाऊल उचलले नाही. काँग्रेसच्या राजवटीत आरोग्य क्षेत्रात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही त्यांनी केला. ते म्हणाले की, राहुल गांधी संसदेत काहीही बोलू शकत नाहीत, ते पळून जातात आणि जिथे जगभरातून लोक भारताची ताकद पाहण्यासाठी येतात, तिथे राहुल गांधी त्याचा विरोध करतात. भारताच्या एआय शिखर परिषदेचे जगभरात कौतुक झाले, पण काँग्रेसने त्या शिखर परिषदेला विरोध केला. मोदी आणि भाजपला विरोध करताना राहुल गांधींनी भारताला विरोध करायला सुरुवात केली आहे. अमित शाह यांनी राहुल गांधींच्या या कृतीचा निषेध केला. ते म्हणाले की, राहुल गांधी भाजपला विरोध करून देशाची टीका करत आहेत.आपल्या भाषणात अमित शाह यांनी गेल्या दहा वर्षांत आसाममधील मागील काँग्रेस आणि भाजप सरकारांच्या कार्यक्रमांचा आणि कामांचा उल्लेख केला आणि म्हटले की, आसामने आरोग्यसेवेच्या क्षेत्रात लक्षणीय प्रगती केली आहे.
Shirur News : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कारकूड वस्ती (ता. शिरूर) येथे विद्यार्थ्यांना व्यावहारिक शिक्षणाचा अनुभव
Sanju Samson Honor : केरळचे क्रीडा मंत्री व्ही. अब्दुरहीमान यांनी जाहीर केले की, सोमवारी तिरुवनंतपुरम येथील सेंट्रल स्टेडियमवर संजूचा विशेष नागरी सत्कार करण्यात येणार आहे.
Madhya Pradesh : मोदींची नक्कल करणे शिक्षकाला पडले महागात; मिळाली ‘ही’मोठी शिक्षा
भाजपशासित मध्य प्रदेशात, एलपीजी सिलिंडरच्या वाढत्या किमतींवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल करणे एका सरकारी शाळेतील शिक्षकाला (Madhya Pradesh) चांगलेच महागात पडले आहे.
Sanya Malhotra : मुंबईत अभिनेत्री सान्या मल्होत्रा हिने स्वतःचं हक्काचं नवीन घर खरेदी केली असल्याची आनंदाची बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे.
Threat to the Badshah : पंजाबी गायक बादशाहला जीवे मारण्याची धमकी;लॉरेन्स बिश्नोई टोळी पुन्हा कार्यरत
बॉलीवूड सुपरस्टार रणवीर सिंगनंतर आता प्रसिद्ध पंजाबी गायक बादशाहला जीवे मारण्याची धमकी (Threat to the Badshah) मिळाली आहे.
- होर्मुझची सामुद्रधुनी सुरक्षित करण्यासाठी अमेरिकेचे अनेक देशांना आवाहनअमेरिका–इस्रायल–इराण संघर्षाचा आज १६वा दिवस असून होर्मुझ सामुद्रधुनी खुली आणि सुरक्षित ठेवण्यासाठी बलाढ्य अमेरिकेला आता इतर देशांच्या मदतीची गरज भासते आहे. अमेरिकेने चीन, जपान, दक्षिण कोरिया आणि ब्रिटन यांसारख्या देशांकडून मदतीची अपेक्षा केली आहे.सर्व देशांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे : डोनाल्ड ट्रम्पट्रम्प यांनी सांगितले की होर्मुझ सामुद्रधुनीतून मोठ्या प्रमाणात जागतिक व्यापार आणि ऊर्जा पुरवठा होतो. त्यामुळे या सागरी मार्गाच्या सुरक्षिततेसाठी सर्व संबंधित देशांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यांनी असा दावाही केला की अलीकडील हल्ल्यांनंतर इराणची लष्करी क्षमता मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. मात्र ड्रोन, समुद्री खाणी आणि कमी पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांमुळे अद्याप धोका कायम असल्याचे त्यांनी नमूद केले.दरम्यान, या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इंधन वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. होर्मुझ सामुद्रधुनी हा जगातील कच्च्या तेलाच्या व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचा मार्ग असून जागतिक तेल वाहतुकीपैकी सुमारे २० टक्के पुरवठा याच मार्गातून होतो. दुसरीकडे, इराणने मित्रदेशांना आश्वासन देत या सामुद्रधुनीत अडथळा निर्माण करण्याचा कोणताही हेतू नसल्याचे सांगितले आहे.याचदरम्यान एलपीजी वाहून नेणारी दोन भारतीय जहाजे सुरक्षितपणे होर्मुझ सामुद्रधुनी पार करून भारताकडे रवाना झाली आहेत. जहाजवाहतूक आणि जलमार्ग मंत्रालयाचे विशेष सचिव राजेश कुमार सिन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय ध्वजांकित एलपीजी वाहक शिवालिक आणि नंदा देवी यांनी शनिवारी हा मार्ग पार केला. ही दोन्ही जहाजे मिळून सुमारे ९२,७०० टन एलपीजी घेऊन भारतात येत आहेत.
Actress Kriti Kharbanda : लग्नाला दोन वर्ष पूर्ण झाल्याबद्दल अभिनेत्री क्रिती खरबंदाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत पतीबद्दल भावना व्यक्त केल्या.
उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला, पाकिस्तानी दहशतवादी ठार
बारामुल्ला : भारतीय सैन्याने जम्मू काश्मीरमधील उरी सेक्टरमधील बुछारमधून घुसखोरी करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न उधळून लावला. भारतीय लष्कर आणि जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत एक पाकिस्तानी दहशतवादी ठार झाला. घटनास्थळावरून सैन्याने एक एके रायफल, पिस्तूल आणि मोठ्या प्रमाणात दारूगोळा जप्त केला.जम्मू-काश्मीर पोलिसांनी घुसखोरीच्या प्रयत्नाबाबत दिलेल्या विशिष्ट गुप्तचर माहितीच्या आधारे, १४-१५ मार्च दरम्यान मध्यरात्री उरी सेक्टरमधील बुछारमध्ये संयुक्त कारवाई करण्यात आली. जवानांना झाडांमागे कोणीतरी लपले असल्याचे लक्षात आले. यानंतर बारकाईने तपास सुरू होताच दोन्ही बाजूने गोळीबार सुरू झाला. या चकमकीत एक पाकिस्तानी दहशतवादी ठार झाला. यानंतर सुरक्षा पथकाने घटनास्थळावरून शस्त्रसाठा जप्त केला. खबरदारीचा उपाय म्हणून नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर भारतीय सैन्याने गस्तीमध्ये वाढ केली आहे. पाकिस्तानच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.याआधी १० मार्च रोजी जम्मू आणि काश्मीरच्या नौशेरा सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर भारतीय सैन्याने घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला होता. या कारवाईदरम्यान एका पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्याला ठार केले होते. भारतीय लष्कराच्या व्हाईट नाईट कॉर्प्सने ही माहिती दिली होती.
IRGC on Benjamin Netanyahu: इराण आणि इस्रायलमधील युद्धादरम्यान, इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) ने सोशल मीडियावर फिरणाऱ्या बेंजामिन नेतन्याहू यांच्या मृत्यूच्या अफवांवर एक मोठे विधान जारी करून आगीत तेल ओतले आहे.
'नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्यात फक्त हिंदूंचीच दुकानं हवी'
नाशिक : नाशिक जिल्ह्यात २०२७ मध्ये होणार असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यात फक्त हिंदूंचीच दुकानं हवी. कुंभमेळ्याला हजेरी लावणाऱ्यांनी याच दुकानांतून खरेदी करण्याला प्राधान्य द्यावे. सिंहस्थ कुंभमेळ्यात जर कोणी मुसलमान दुकान लावण्याचा प्रयत्न करत असेल तर ते दुकान उखडून टाका असा इशारा भाजप नेते नितेश राणे यांनी दिली. ते नाशिकमध्ये हिंदू हित रक्षातर्फे आयोजित नित्य गरजांना आवश्यक अशा शेकडो हिंदू कारागीर व लघु व्यावसायिकांच्या यादीचे प्रकाशन व लोकार्पण सोहळ्यात बोलत होते. याप्रसंगी नितेश राणे ‘हिंदूंचा रुपया हिंदूलाच’ या विषयावर बोलले. हिंदू व्यक्तीने त्याच्या गरजेच्या वस्तू आणि सेवांची खरेदी करताना हिंदू व्यवसायिकालाच प्राधान्य द्यावे, असे भाजप नेते नितेश राणे म्हणाले. याप्रसंगी मंचावर कामाख्या देवीचे कालीचरण महाराज, आमदार सीमा हिरे, हिंदू हित रक्षाचे प्रवीण जोशी उपस्थित होते.https://www.youtube.com/shorts/4FDlyIlNsw4भारतात हिंदूंच्या बाजूने आणि हिंदूंच्या हितासाठी बोलायचे नाही तर काय पाकिस्तानमधील इस्लामाबादमध्ये जाऊन बोलायचे ? असा प्रश्न भाजप नेते नितेश राणे यांनी उपस्थित केला. त्यांना 'गजवा - ए - हिंद'च्या माध्यमातून २०४७ पर्यंत भारताला इस्लामिक राष्ट्र बनवायचे आहे. पण आम्ही हे कधीच होऊ देणार नाही. यासाठी सर्व हिंदूंनी एकत्र येण्याची गरज आहे. आपण सतर्क आणि जागरूक राहायला पाहिजे. कुणाच्याही जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्रावर हिंदू असे लिहिलेले असते, त्यावर मंत्री किंवा आमदार असे लिहिलेले नसते. त्यामुळे शेवटच्या श्वासापर्यंत मी हिंदूंसाठी उभा आहे. आज जर आपण हिंदू म्हणून एकत्र आलो नाही तर पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही, असे मंत्री नितेश राणे म्हणाले.https://www.youtube.com/shorts/ioPLxwO4Bmsआम्ही हिंदुत्ववादी विचाराचे सरकार निवडून देण्यासाठी तुमच्याकडे आलो होतो आणि तुम्ही हिंदुत्ववादी सरकार निवडून दिले. त्यावेळी आम्ही आश्वासन दिले होते की, आम्ही धर्मांतर विरोधी कायदा आणू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हिंदूंच्या रक्षणासाठी ठोस कायदे करण्याचे काम सुरू आहे. आम्ही आमदार व मंत्री फक्त हिंदूंमुळे बसलो आहोत त्यांनी आम्हाला मत दिले नाही आणि आम्ही त्यांच्याकडे मत मागायला देखील गेलो नाही. सध्या माझ्याकडे मत्स्य व बंदरे खाते आहे. यापूर्वी हिंदूंच्या नावाने धरणांवर ठेके असायचे मात्र तो चालवणारा मुसलमान असायचा. आता ते चालणार नाही; असे मंत्री नितेश राणे म्हणाले.https://www.youtube.com/shorts/shhMEojUzaMकार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतमाता आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर शंखनाद आणि ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी महापौर हिमगौरी आडके, नगरसेविका उषा बेंडकुळे, नगरसेवक नितीन निगळ, सुरेश पाटील, वंदना पाटील, रामसिंग बावरी, बबलू परदेशी आदी उपस्थित होते.https://www.youtube.com/shorts/TN9TrdA3Mhoसिंहस्थ कुंभमेळा २०२७ : नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणारा सिंहस्थ कुंभमेळा २०२७ हा एक अत्यंत महत्त्वाचा धार्मिक उत्सव आहे, जो दर १२ वर्षांनी एकदा आयोजित केला जातो. यंदा नाशिक जिल्ह्यात ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी सिंहस्थ कुंभमेळा सुरू होणार आहे आणि त्याची समाप्ती २४ जुलै २०२८ रोजी होणार आहे. नियोजनानुसार ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी त्र्यंबकेश्वर, रामकुंड आणि पंचवटी येथे पारंपरिक ध्वजारोहणाने सिंहस्थ कुंभमेळ्याचा शुभारंभ होणार आहे. यंदाच्या सिंहस्थात २ ऑगस्ट २०२७, ३१ ऑगस्ट २०२७ आणि ११ तसेच १२ सप्टेंबर २०२७ रोजी शाही स्नान होणार आहे. महायुती सरकारने नाशिक जिल्ह्यातील सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी २२,१८१ कोटी रुपयांच्या विकासकामांना मंजुरी दिली आहे. रस्ते विकास, गोदावरी नदीचे शुद्धीकरण, नवीन घाटांचे बांधकाम आणि रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण यांसारख्या मोठ्या प्रकल्पांचा यात समावेश आहे. सिंहस्थ कुंभमेळा पंचवटीतील रामकुंड आणि त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्त या पवित्र ठिकाणी होणार आहे.सिंहस्थ म्हणजे काय ? : जेव्हा गुरु सिंह राशीत प्रवेश करतो, तेव्हा नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळा होतो, म्हणूनच याला सिंहस्थ किंवा सिंहस्थ कुंभमेळा असे म्हणतात. हा एकमेव कुंभमेळा आहे जो एकाच (नाशिक जिल्हा) जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी होणार आहे. वैष्णव आखाड्यांसाठी नाशिकच्या पंचवटीतील रामकुंड आणि शैव आखाड्यांसाठी त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्त या पवित्र ठिकाणी शाही स्नान तसेच इतर अनेक धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.
Sanjay Jha: “आम्ही राज्यसभा निवडणूक जिंकू,” ; बिहार भाजप बैठकीनंतर ‘या’मंत्र्यांचा दावा
Sanjay Jha: बिहारमधील राज्यसभा निवडणुकीच्या उत्साहात राजधानी पाटणा याठिकाणी आज सकाळीच मोठ्या प्रमाणात राजकीय हालचाली पाहायला मिळाल्या.
भूमी पेडणेकरचा मराठमोळा लुक व्हायरल, पैठणी आणि चंद्रकोरनं चाहते घायाळ
बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री भूमी पेडणेकरने नुकताच सोशल मिडियावर तिच्या मराठमोकळ्या लुकचे काही फोटो शेअर केले आहेत. भूमीच्या या लुकची सोशल मिडियावर जोरदार चर्चा सुरु असून सध्या भूमीचे हे फोटोज सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल होत असल्याचे पाहायला मिळत आहे.या मराठमोळ्या लुकमध्ये भूमीनं अबोली रंगाची फुलांची नक्षीकामं असलेली सुंदर अशी पैठणी परिधान केली असून तिने या साडीवर सुंदर असा गुलाबी ब्लाउज घातला आहे. अतिशय आकर्षक नक्षीकाम असलेल्या या ब्लाउजने सर्वाचं लक्ष वेधून घेतलं आहे.भूमिने घातलेला हा ब्लाउज पंकज एस हेरिटेजच्या कलेक्शनमधील असून या ब्लाउजवर सोन्याच्या जरीचं नक्षीकाम केलेलं आहे. तर, या सुंदर ब्लाउजवर मौल्यवान खड्यांचे वर्कदेखील करण्यात आलेलं आहे.या मराठमोळ्या लुकमध्ये भूमिने साडीबरोबरच आकर्षक असे दागिनेही घातले आहेत. भूमिने या लुकमध्ये सोन्याच्या मण्यांची माळ घातली असून यासोबतच तिने नथ, झुमके, बुगडी, बांगड्या आणि केसांमध्येही सुंदर असे दागिने घातलेले आहेत. तसेच तिने २२ कॅरेट सोन्याची 'हसली' या नावाचा दागिना गळ्यात घातला आहे. भूमिने घातलेले हे दागिने पूजा निगमने डिझाइन केले असून भूमिच्या कपाळावरील धातूच्या टिकलीने सर्वांच लक्ष वेधून घेतलं आहे. भूमिने कपाळावर लावलेली ही टिकली सुरमयी ब्रँडची असून तिच्या नॅचरल लुक मेकअप आणि सिम्पल अशा हेअरस्टाईलमुळे भूमी पेडकणेरचं सौंदर्य अधिकच खूलून दिसत आहे.
लवकरच 'या'ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार बॉर्डर २ सिनेमा
सिनेमागृहात आपली दमदार छाप पाडल्यानंतर आता लवकरच बॉर्डर 2 हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. १९९७ मध्ये आलेला बॉर्डर चित्रपट अजूनही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. तसेच, बॉर्डर २ या चित्रपटालाही प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे. मात्र, ज्यांना बॉर्डर २ हा चित्रपट सिनेमागृहात जाऊन पाहता आला नाही. त्यांना आता घरबसल्या बॉर्डर २ पाहण्याचा आनंद घेता येणार आहे.सिनेमागृहात प्रदर्शित झाल्यानंतर 2 महिन्यातच आता हा चित्रपट डिजीटल प्लॅटफॉर्मवर पाहता येणार असून येत्या २० मार्च २०२६ रोजी बॉर्डर २ हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे ज्यांना हा चित्रपट सिनेमागृहात पाहता आला नाही. त्यांना आता हा चित्रपट लवकरच घरबसल्या पाहायला मिळणार आहे.बॉर्डर २ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जगभरातून ४४९.६५ कोटी रुपयांची कमाई केली असून भारतातून या चित्रपटाने एकूण ३२८.९६ कोटीची कमाई केली आहे.
Ram Gopal Verma : सरकार 4 बाबत मोठी अपडेट! अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची जोडी पुन्हा झळकणार
Ram Gopal Verma : दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी सरकार 4 ची घोषणा केल्यानंतर आमिताभ आणि अभिषेक दोघेही दिसणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तर इतर कलाकारांबाबत माहिती उघड केलेली नाही.
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्पची सारवासारव; इराणला युद्ध थांबवायचे आहे पण...
इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत असल्याचे दिसत आहे. अशातच शनिवारी (१४ मार्च) इराणने सौदी अरेबियातील अमेरिकेच्या महत्त्वाच्या हवाई तळावर क्षेपणास्त्र हल्ला केला. या हल्ल्यात अमेरिकन हवाई दलाच्या हवेत इंधन भरणाऱ्या KC-135 स्ट्रॅटोटँकर प्रकारातील पाच विमानांचे मोठे नुकसान झाले.KC-135 प्रकारची टँकर विमाने अमेरिकन हवाई दलाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जातात. या विमानांच्या मदतीने लढाऊ विमानांना हवेतच इंधन पुरवले जाते. एका KC-135R विमानाची किंमत साधारणपणे ३९.६ ते ५३ दशलक्ष डॉलर्स (सुमारे ३३० ते ४५० कोटी रुपये) इतकी आहे. त्यामुळे पाच विमानांचे नुकसान झाल्यास अमेरिकेला अंदाजे २५० ते ४०० दशलक्ष डॉलर्स (सुमारे २१०० ते ३३०० कोटी रुपये) इतका आर्थिक फटका बसला आहे.अशी परिस्थिती असूनही आम्ही युद्धात खूप चांगल्या परिस्थितीत आहोत, आम्ही इराणवर भारी पडतोय आणि इराणला युद्ध थांबवायचे आहे पण आम्ही तयार नाही अशी विधानं करून डोनाल्ड ट्रम्प वारंवार सारवासारव करत आहेत.डोनाल्ड ट्रम्प यांनी सध्या तरी इराणसोबत युद्ध समाप्त करण्यासाठी कोणत्याही करारास आपण तयार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांच्या मते, इराण करार करू इच्छित आहे, मात्र सध्या असलेल्या अटी पुरेशा नाहीत. तथापि, त्या अटी नेमक्या काय असतील याबाबत त्यांनी कोणतीही माहिती दिली नाही.माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प म्हणाले की, जर कोणताही करार झाला तर त्यामध्ये इराणने आपला अणु कार्यक्रम पूर्णपणे बंद करणे ही अट निश्चितपणे असेल. त्यांनी असेही सांगितले की, स्ट्रेट ऑफ होर्मुजच्या सुरक्षेसाठी ते अनेक देशांसोबत मिळून योजना तयार करत आहेत. हा समुद्री मार्ग तेलवाहू जहाजांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. युद्धामुळे या मार्गावर तणाव वाढल्याने जगभरात तेलाच्या किंमती वाढल्या आहेत.ट्रम्प यांनी सांगितले की अनेक देशांनी या जलमार्गाच्या सुरक्षेसाठी मदत करण्याची तयारी दर्शवली आहे. चीन, फ्रान्स, जपान, दक्षिण कोरिया आणि युनायटेड किंगडम यांसारखे देशही जहाजांची सुरक्षित वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी आपली युद्धनौका पाठवू शकतात, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
पाकिस्तानच्या 'या'खेळाडूला आपलाच संताप पडला महागात; आयसीसीकडून डिमेरिट पॉइंटची शिक्षा
पाकिस्तानचा फलंदाज सलमान आघा Salman Agha पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात धावबाद झाल्यानंतर मैदानात संताप व्यक्त केल्यामुळे International Cricket Council (आयसीसी) ने त्याला फटकारले असून त्याच्या खात्यात एक डिमेरिट पॉइंट जोडण्यात आला आहे.पाकिस्तान नॅशनल क्रिकेट टीम आणि बांग्लादेश नॅशनल क्रिकेट टीम यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ही घटना घडली. अर्धशतक झळकावल्यानंतर सलमान आघा खेळत असताना डावाच्या ३९ व्या षटकात बांगलादेशचा कर्णधार मेहेदी हसन मिराझ गोलंदाजीसाठी आला. त्या षटकात मोहम्मद रिझवान Mohammad Rizwan ने पुढे येत फटका मारला असता चेंडू नॉन-स्ट्राइक एंडवर उभ्या असलेल्या आघाच्या पायाला लागला.चेंडू थांबवण्याच्या प्रयत्नात मिराजची आघाशी धडक झाली. मात्र त्यानंतर मिराजने चेंडू पटकन उचलून स्टंप्सकडे फेकला आणि आघाला धावबाद केले. तिसऱ्या पंचाने बाद ठरवल्यानंतर सलमान आघा संतापला आणि त्याने आपले हेल्मेट व ग्लोव्हज मैदानावर फेकून नाराजी व्यक्त केली.ही कृती आयसीसीच्या आचारसंहितेच्या लेव्हल-१ उल्लंघनात मोडत असल्याचे मानण्यात आले. त्यामुळे आघाच्या खात्यात एक डिमेरिट पॉइंट नोंदवण्यात आला आहे. मागील २४ महिन्यांतील हा त्याचा पहिलाच गुन्हा असल्याचे आयसीसीने स्पष्ट केले असून आघानेही ही शिक्षा स्वीकारली आहे.
Mumbai: चेंबूरमधील संतापजनक घटना; एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार
मुंबई: मुंबईत एक संतापजनक घटना समोर आली आहे. चेंबूरच्या टिळक नगर परिसरात एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन नराधमांना अटक केली आहे. या घटनेमुळे मुंबईतील महिला आणि मुलींच्या सुरक्षितेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.चेंबुरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचारमिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि दोन्ही आरोपी हे गोवंडी येथील शिवाजी नगर परिसरातील रहिवासी आहेत. कामाच्या बहाण्याने आरोपींनी या अल्पवयीन मुलीला टिळक नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बोलावून घेतले होते. तिला निर्जन ठिकाणी असलेल्या झुडपात नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप पीडितेने केला आहे.मुलीच्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी तातडीने आफताब आणि अनिस नावाच्या दोन संशयितांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) आणि पोक्सो (POCSO) कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना सोमवारी न्यायालयात हजर केले जाणार असून, त्यांना पोलीस कोठडी मिळण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.दुसरीकडे, बीडच्या परळी तालुक्यातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. परळी तालुक्यातील एका गावामध्ये एका सोळा वर्षीय मुलीवर दोघांनी अत्याचार केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. यामध्ये आरोपीने या मुलीला घरी बोलावून दुसऱ्या साथीदाराने तिचे हातपाय बांधत अत्याचार केले होते. या मुलीने याबाबतची माहिती कुटुंबीयांना दिल्यानंतर कुटुंबीयांनी याचा जाब आरोपींना विचारताच आरोपींनी त्यांना देखील शिवीगाळ करत धमकी दिली आहे. याप्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहेत.
Nora Fateh : नोरा फतेहीचे नवीन आयटम नंबर साँग रिलीज झाले असून, या गाण्यात संजय दत्तने तिची साथ दिली आहे.
Pak-Afghan War: कंदहारमधील तालिबान तळावर हवाई हल्ले ; पाकिस्तानने घेतला ड्रोन हल्ल्यांचा बदला
Pak-Afghan War: पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. तालिबानशी संबंधित ड्रोन हल्ल्यांनंतर पाकिस्तानी लष्कराने कंदहार भागातील एका प्रमुख तालिबानी तळावर हवाई हल्ला केला आहे.
पश्चिम बंगाल आणि आसामसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा रविवारी संध्याकाळी होणार ?
नवी दिल्ली : पश्चिम बंगाल आणि आसामसह देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा आज म्हणजेच रविवार १५ मार्च २०२६ रोजी संध्याकाळी चार वाजता पत्रकार परिषदेद्वारे होणार असल्याचे समजते. भारत निवडणूक आयोग दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन निवडणूक कार्यक्रम जाहीर करणार असल्याचे वृत्त आहे.आसाम, पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू आणि पुदुच्चेरी या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा आज म्हणजेच रविवार १५ मार्च २०२६ रोजी संध्याकाळी चार वाजता पत्रकार परिषदेद्वारे होणार असल्याचे समजते.आसाम विधानसभेचा कार्यकाळ २० मे रोजी, केरळचा २३ मे रोजी, तामिळनाडूचा १० मे रोजी, पश्चिम बंगालचा ७ मे रोजी आणि पुद्दुचेरीचा १५ जून रोजी संपत आहे. यामुळे पाचही राज्यांच्या विधानसभा निवडणुका ७ मे पूर्वीच घेतल्या जाण्याची दाट शक्यता आहे.आधीच्या विधानसभा निवडणुकांवेळी संबंधित राज्यांमध्ये काय झाले होते ? आसाम - १२६ जागांसाठी तीन टप्प्यात मतदान झाले. रालोआने ७५ जागा जिंकल्या आणि भाजपच्या नेतृत्वात सलग दुसऱ्यांदा सत्ता स्थापन केली. पश्चिम बंगाल - २९४ जागांसाठी आठ टप्प्यात मतदान झाले. तृणमूल काँग्रेसने २१५ आणि भाजपने ७७ जागा जिंकल्या. ममता बॅनर्जी मुख्यमंत्री झाल्या. तामिळनाडू - २३४ विधानसभेच्या जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान झाले. द्रमुकने १३३, अण्णाद्रमुकने ६६ आणि भाजपने ५ जागा जिंकल्या. द्रमुकचे एमके स्टॅलिन मुख्यमंत्री झाले. केरळ - १४० जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान झाले. एलडीएफने ९९ आणि यूडीएफने ४१ जागा जिंकल्या. सीपीआयचे पिनारायी विजयन सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. पुद्दुचेरी - ३० जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान झाले. एनडीएने १६, तर यूपीएने ९ जागा जिंकल्या. एनडीएचा घटक पक्ष असलेल्या अखिल भारतीय एन.आर. काँग्रेसचे एन. रंगास्वामी मुख्यमंत्री झाले.
Sharukh Khan : शाहरुखचा मन्नत बंगला लवकरच दिसणार नव्या स्वरुपात, सीआरझेडकडून मिळाला मोठा दिलासा
अभिनेता शाहरुख खानचा मन्नत बंगला हा जगप्रसिद्ध असून हा बंगला पाहण्यासाठी अनेकजण उत्सुकतेनं येतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून शाहरुखचा मन्नत बंगला अडचणीत सापडला होता. या बंगल्याच्या बांधकामात सीआरझेड नियमांचं उल्लंघन केल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. पण, आता शाहरुख खानला याबाबत दिलासा मिळाला असून मन्नत बंगल्याच्या विस्ताराला सीआरझेड अर्थात किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाकडून १९४ व्या बैठकीत ग्रीन सिग्नल मिळाला आहे.काही महिन्यांपूर्वी शाहरुखच्या मन्नत बंगल्याच्या बांधकामावर नियमांचं उल्लंघन केल्याबाबत आक्षेप घेण्यात आला होता. मन्नत बंगल्याच्या बांधकामावेळी सीआरझेडच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र, आता सीआरझेडकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यामुळे मन्नत या बंगल्याच्या परिसरात दोन तळमजले, पहिल्या ते सहाव्या मजल्यापर्यंत बांधकाम करण्यात येणार आहे.शाहरुखच्या मन्नत बंगल्याचे क्षेत्रफळ सुमारे २४४६.४० चौरस मीटर असून या भूखंडावर एकूण बांधकाम ४५५३.४४ चौरस मीटरपर्यंत वाढवण्यात येणार आहे. यापैकी एफएसआय क्षेत्र ३०२९.२० चौरस मीटर आहे. तर, उर्वरित भाग नॉन- एफएसआय स्वरुपामध्ये असून या नवीन सुधारणेमुळे जवळपास ५९६ चौरस मीटर अतिरिक्त बांधकाम करण्यात येणार आहे.
राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार
मुंबई : राज्याच्या ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक आरोग्य आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांना अमेरिकेतील यूएस इंडिया एसएमई काउन्सिल (U.S. India SME Council, Washington DC) यांच्यातर्फे आउटस्टँडिंग व्हिजनरी लीडर अँड ट्रू चेंजमेकर (Outstanding Visionary Leader & True Changemaker) हा प्रतिष्ठेचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार १४ मार्च २०२६ रोजी जाहीर करण्यात आला असून त्यांचा सत्कार २५ मार्च २०२६ रोजी सकाळी १० वाजता नवी दिल्ली येथील भारत मंडपममध्ये आयोजित विशेष समारंभात करण्यात येणार आहे.राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर यांनी महाराष्ट्रात विशेषतः परभणी जिल्ह्यात ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबवले आहेत. महिला उद्योजकांना प्रोत्साहन, लखपती दीदी योजना, ग्रामीण महिलांसाठी सिल्क अँड मिल्क उपक्रम, तसेच एकल महिला सशक्तीकरण अभियान यांसारख्या योजनांद्वारे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत.महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आल्याची माहिती परिषदेत देण्यात आली आहे.अमेरिका-भारत आर्थिक सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी कार्यरत असलेली यूएस इंडिया एसएमई काउन्सिल (U.S. India SME Council) ही संस्था लघु व मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देणे, नाविन्यपूर्ण उद्योजकता वाढविणे तसेच पायाभूत सुविधा, ऊर्जा, शाश्वत विकास, आरोग्य आणि ग्रामीण विकास अशा विविध क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढविण्यासाठी काम करते.
Anushka Shetty : 44 व्या वर्षी अनुष्का शेट्टी विवाहबंधनात अडणार? बिझनेसमनसोबत जोडलं जातयं नाव
Anushka Shetty : साऊथ चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री अनुष्का शेट्टी लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याची चर्चा रंगली आहे.
Uri Sector: जम्मू आणि काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील उरी सेक्टरमध्ये भारतीय लष्कर आणि जम्मू आणि काश्मीर पोलिसांना मोठे यश मिळाले.
Maharashtra Weather : वाढत्या उन्हामुळे शाळेच्या वेळेत बदल! ‘या’जिल्ह्याने घेतला निर्णय
Maharashtra Weather : वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Election Commission: भारतीय निवडणूक आयोग (ECI) आज दुपारी ४ वाजता दिल्लीतील विज्ञान भवन याठिकाणी पत्रकार परिषद घेणार आहे.
मध्य पूर्वेमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर रविवारी एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेस या विमान कंपन्या या प्रदेशातून ये-जा करणाऱ्या एकूण ७२ नियोजित आणि अनियोजित उड्डाणांचे संचालन करणार आहेत.दोन्ही विमान कंपन्या १५ मार्च रोजी जेद्दा आणि मस्कटसाठी त्यांच्या नियोजित सेवा सुरू ठेवणार आहेत. भारत आणि जेद्दा दरम्यान एकूण ८ उड्डाणांचा समावेश आहे. विमान कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, एअर इंडिया दिल्ली आणि मुंबई येथून प्रत्येकी एक परतीची सेवा चालवेल, तर एअर इंडिया एक्सप्रेस बेंगळुरू आणि कोझिकोड येथून प्रत्येकी एक उड्डाण संचालित करेल.एअर इंडिया एक्सप्रेस मस्कटसाठी आणि तेथून एकूण १२ नियोजित उड्डाणेही चालवणार आहे. यात दिल्ली, कोची, कोझिकोड, मंगळुरू, मुंबई आणि तिरुवनंतपुरम येथील सेवांचा समावेश असेल. याशिवाय, एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेस संयुक्त अरब अमिरात (यूएई) आणि सौदी अरेबियासाठी तसेच तेथून एकूण ५२ अनियोजित उड्डाणे संचालित करतील. ही उड्डाणे प्रस्थान स्थानकांवरील स्लॉटची उपलब्धता आणि त्या वेळच्या परिस्थितीनुसार चालवली जाणार आहेत.विमान कंपनीच्या माहितीनुसार, ही सर्व उड्डाणे संबंधित भारतीय आणि स्थानिक नियामक प्राधिकरणांच्या आवश्यक परवानग्यांसह चालवली जात आहेत. तसेच, एअर इंडिया समूह पश्चिम आशियातील गंतव्यस्थानांसाठी आणि तेथून अतिरिक्त अॅड-हॉक उड्डाणे सुरू करण्याच्या प्रत्येक संधीचा शोध घेत असल्याचेही सांगण्यात आले आहे.दरम्यान, एअर इंडिया आणि इंडिगो नंतर अकासा एअरनेही आपल्या उड्डाणांवर इंधन अधिभार (फ्यूल सरचार्ज) लागू केला आहे. मध्य पूर्वेमधील बदलत्या भू-राजकीय परिस्थितीमुळे एव्हिएशन टर्बाइन फ्यूल (एटीएफ)च्या किंमती वाढल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
पश्चिम आशियात वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नौदलाने फारसच्या आखाताजवळ आपल्या अनेक युद्धनौका तैनात केल्या आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, भारताकडे येणाऱ्या व्यापारी जहाजांना गरज पडल्यास मदत करता यावी यासाठी या युद्धनौका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. अहवालानुसार, भारतीय व्यापारी जहाजे आणि त्यांच्या चालक दलाची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठीच नौदलाची ही तैनाती करण्यात आली आहे.दरम्यान, शनिवारी इराणी अधिकाऱ्यांनी भारताकडे येणाऱ्या भारतीय ध्वजधारक दोन एलपीजी जहाजांना होर्मुज सामुद्रधुनीतून (जलडमरू मध्यातून) जाण्याची परवानगी दिली. यापैकी एक जहाज शिवालिक असून, जहाज ट्रॅकिंग संकेतस्थळानुसार ते सध्या ओमानजवळ दिसून आले होते. हे जहाज २१ मार्चपर्यंत आपल्या गंतव्यस्थानी पोहोचण्याची शक्यता आहे.बंदर, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाने शुक्रवारी फारसच्या आखातातील समुद्री परिस्थिती तसेच भारतीय नाविक आणि जहाजांच्या सुरक्षेसाठी उचलण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. मंत्रालयाच्या माहितीनुसार, फारसच्या आखातात भारतीय ध्वज असलेल्या २४ जहाजांवर ६६८ भारतीय नाविक कार्यरत आहेत, तर होर्मुज सामुद्रधुनीच्या पूर्व भागात तीन जहाजांवर ७६ भारतीय नाविक उपस्थित आहेत.मंत्रालयाने सांगितले की महासंचालक (डीजी) शिपिंग विभाग जहाजमालक, आरपीएसएल संस्था आणि परदेशातील भारतीय दूतावासांशी सतत समन्वय राखून आहे. सर्व जहाजे आणि चालक दलावर सातत्याने नजर ठेवली जात आहे. २४ तास कार्यरत नियंत्रण कक्ष सुरू झाल्यापासून आतापर्यंत २,४२५ हून अधिक दूरध्वनी कॉल आणि ४,४४१ ईमेल प्राप्त झाले आहेत. तसेच अडकलेल्या २२३ पेक्षा अधिक भारतीय नाविकांची सुरक्षित परतफेड सुनिश्चित करण्यात आली आहे.भारतामधील इराणचे राजदूत मोहम्मद फतहाली यांनीही सांगितले की पश्चिम आशियातील संघर्ष सुरू असतानाही इराण भारताकडे जाणाऱ्या जहाजांना होर्मुज सामुद्रधुनीतून सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देईल. भारत आणि इराण हे जुने मित्रदेश असल्याचे सांगत त्यांनी दोन्ही देशांचे हित आणि भविष्य परस्परांशी जोडलेले असल्याचे नमूद केले.याशिवाय, भारतातील इराणच्या सर्वोच्च नेत्यांचे प्रतिनिधी अब्दुल मजीद हकीम इलाही यांनी स्पष्ट केले की इराणला होर्मुज सामुद्रधुनी कधीही बंद करायची नव्हती. मात्र सध्याच्या परिस्थितीमुळे जहाजांची वाहतूक प्रभावित झाली असल्याचे त्यांनी सांगितले. वाढत्या तेलदरांचा परिणाम संपूर्ण जगावर होत असल्याने जगातील नेत्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर युद्ध थांबवण्यासाठी दबाव आणावा, असेही त्यांनी म्हटले.
शालेय पोषण आहार पुरवणाऱ्या संस्था येत्या ३० एप्रिलपर्यंत गॅस सिलिंडरचा पुरवठा
मुंबई: प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना शिजविलेला आहार पुरवठा करणा-या महिला सेवाभावी संस्थांना पोषण आहार शिजविण्याकरिता अखंडितपणे एल. पी. जी. गॅस पुरवठा मिळावा यासाठी महापालिका शिक्षण विभागानेशिधावाटप नियंत्रक आणि नागरी पुरवठा संचालक यांना पत्र पाठवले आहे. महापालिका प्राथमिक आणि माध्यमिक शाळा तसेच खासगी प्राथमिक शाळा यांना पोषण आहार पुरवणाऱ्या संस्थांना किमान एप्रिल २०२६ अखेर पर्यंत एल.पी.जी. गॅस पुरवठा करण्याचे निर्देश संबंधित गॅस पुरवठा करणा-या आस्थापनांना तथा कंपनीस देण्यात यावेत अशी मागणी शिक्षण विभागाने रेशनिंग अधिकाऱ्यांकडे केली आहे.प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजना ही केंद्र पुरस्कृत योजना असून या योजने अंतर्गत केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीमार्फत मुंबईतील शाळांमधील इयत्ता १ली ते इयत्ता ८वी च्या ५ लाख ४० हजार विद्यार्थ्यांना शिजविलेल्या आहाराचा पुरवठा करण्यासाठी महानगरपालिकेकडून पात्र ठरविण्यात आलेल्या १४७ संस्थांमार्फत शिजवलेल्या आहाराचा पुरवठा केला जात आहे.सध्या जागतिक युध्दजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर १० मार्च २०२६ पासून पात्र सर्व सेवाभावी संस्थांना व्यावसायिक गटामध्ये गृहित धरून हिंदुस्तान पेट्रोलियम व भारत गॅस संस्था यांनी एल.पी.जी. गॅस सिलेंडर देण्यास मनाई केलेली आहे.घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा व्यावसायिक ठिकाणी न करणेबाबत राज्याच्या शिधावाटप अधिकारी यांजकडून एल. पी. जी. गॅस सिलेंडर पुरवठा करणा-या संस्थांना तसे पत्र देण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे १० मार्च २०२६ रोजी सर्व संस्थांनी याबाबत मुंबई महानगरपालिकेच्या पी. एम. पोषण विभागास दूरध्वनीद्वारे तसेच प्रत्यक्ष संपर्क करून सदर बाबतची माहिती दिलेली आहे. तसेच ही गॅस टंचाई पुढील किमान एक ते दीड महिना असण्याची माहिती संस्थांना गॅस पुरवठा करणा-या संस्थांकडून मौखिकरित्या मिळालेली आहे. त्यामुळे सद्यस्थितीत विद्यार्थ्यांना शिजवलेला आहार पुरवठा कसा करावा हा प्रश्न या सर्व सेवाभावी संस्थांसमोर उभा राहिला आहे.तसेच १२ मार्च २०२६ रोजी आहार शिजवण्यासाठी एल. पी. जी. गॅस मिळत नसल्याबाबत संस्थांकडून पत्र प्राप्त झालेली आहेत व या पत्रांद्वारे त्यांना गॅस पुरवठा मिळण्यासाठी सहकार्य करण्याबाबत संस्थांकडून या कार्यालयास विनंतीही करण्यात आलेली आहे.याबाबत शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांनी अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे यांच्या निदर्शनास ही बाब आणून रेशनिंग विभागाला निर्देश देण्याच्या सूचना केल्यानंतर शिक्षण विभागाने पुढील कार्यवाही केली आहे.शिक्षणाधिकारी (प्राथमिक) किर्तीवर्धन किरीतकुडवे यांच्या स्वाक्षरीने शिधावाटप नियंत्रक आणि नागरी पुरवठा संचालक यांना पत्र पाठवण्यात आले आहे. त्यात त्यांनी असे म्हटले आहे की, एल.पी.जी. गॅसशिवाय आहार शिजवणे महिला संस्थांना शक्य होणार नाही. परंतू या सर्वांचा विपरित परिणाम विद्यार्थ्यांच्या पोषण आहार पुरवठयावर होण्याची दाट शक्यता आहे. मुंबईतील मनपा, मनपा अनुदानित, खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांमध्ये किमान ५ लाख ४० हजार विद्यार्थ्यांना शिजवलेल्या आहाराचा लाभ देण्यात येत आहे व आहार पुरवठा न झाल्यास यासर्व विद्यार्थ्यांच्या पोषणाचा प्रश्न पी. एम. पोषण विभागासमोर निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.येत्या ३०. एप्रिल २०२६ पर्यंत सर्व शाळा नियमितपणे सुरू असणार राहतील. त्यामुळे विद्यार्थ्यांना दि. ३० एप्रिल २०२६ पर्यंत नियमित शिजवलेला आहार पुरवठा होणे आवश्यक आहे. एप्रिल २०२६ पर्यंत युध्दजन्य परिस्थिती सुरू राहिल्यास पी.एम. पोषण योजना अबाधितपणे सुरू ठेवण्याकरिता किमान एप्रिल २०२६ पर्यंत विद्यार्थ्यांना नियमित पोषक आहार मिळावा यासाठी संस्थांकडून प्राप्त झालेल्या विनंतीनुसार एल.पी.जी. गॅस पुरवठा करण्याचे निर्देश आपणाकडून संबंधित गॅस पुरवठा करणा-या आस्थापनांना तथा कंपनीस देण्यात यावेत,असे नमूद केले आहे.
Ritu Tawde : मुंबई महानगरपालिकेच्या महापौर रितू तावडे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत.
Donald Trump on Iran: मध्यपूर्वेतील सुरू असलेल्या युद्धादरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, ते सध्या युद्ध संपवण्यासाठी इराणशी करार करण्यास तयार नाहीत.
एलपीजी पुरवठ्याबाबत महत्त्वाचा बदल, 'या'कुटुंबांना घरगुती एलपीजी सिलिंडर दिले जाणार नाहीत
नवी दिल्ली: पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने घरगुती स्वयंपाकाच्या गॅस (एलपीजी) पुरवठ्याबाबत एक मोठा आणि महत्त्वाचा बदल केला आहे. नवीन नियमांनुसार, ज्या कुटुंबांकडे आधीच पाईपद्वारे नैसर्गिक वायू (पीएनजी) कनेक्शन आहेत त्यांना आता घरगुती एलपीजी सिलिंडर दिले जाणार नाहीत. पीएनजी आणि एलपीजी कनेक्शन असलेल्या ग्राहकांना त्यांचे एलपीजी कनेक्शन तात्काळ परत करावे लागतील. शनिवारी जारी केलेल्या अधिसूचनेद्वारे हा निर्णय लागू करण्यात आला आणि तो तात्काळ लागू झाला आहे.आता एकाच घरात पीएनजी (पाईप गॅस) आणि एलपीजी (सिलेंडर) दोन्ही कनेक्शन ठेवणे बेकायदेशीर ठरेल.ज्यांच्याकडे सक्रिय पीएनजी कनेक्शन आहे ते यापुढे त्यांचे जुने एलपीजी सिलेंडर पुन्हा भरू (बुक) शकत नाहीत.ज्यांच्याकडे दोन्ही सुविधा आहेत त्यांना त्यांचे घरगुती एलपीजी कनेक्शन तात्काळ विभागाकडे परत करावे लागेल.पाईप गॅस (पीएनजी) ग्राहकांना आता नवीन घरगुती एलपीजी कनेक्शनसाठी अर्ज करता येणार नाही.मंत्रालयाने जारी केलेल्या राजपत्र अधिसूचनेत पेट्रोलियम गॅस (पुरवठा आणि वितरण नियमन) आदेश, २००० मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. नवीन तरतुदींनुसार, पीएनजी कनेक्शन धारण करणाऱ्या कोणालाही नवीन घरगुती एलपीजी कनेक्शन घेता येणार नाही. पीएनजी आणि एलपीजी दोन्ही धारण करणाऱ्या ग्राहकांना एलपीजी सिलिंडर रिफिल घेता येणार नाहीत. अशा ग्राहकांना त्यांचे एलपीजी कनेक्शन परत करावे लागतील.सरकारी मालकीच्या तेल कंपन्या (IOCL, BPCL, HPCL) आणि त्यांचे वितरक अशा घरांना LPG देऊ शकणार नाहीत. LPG चा मर्यादित पुरवठा चांगल्या प्रकारे व्यवस्थापित करणे आणि PNG सारख्या पर्यायांची उपलब्धता नसलेल्या गरजू कुटुंबांपर्यंत सिलिंडर पोहोचवणे हे सरकारचे स्पष्ट उद्दिष्ट आहे. PNG प्रामुख्याने शहरी भागात उपलब्ध आहे, जिथे पाइपलाइनद्वारे स्वस्त आणि पर्यावरणपूरक गॅस उपलब्ध आहे. तथापि, ग्रामीण आणि लहान शहरांमध्ये LPG हे प्राथमिक इंधन राहिले आहे. या बदलामुळे PNG उपलब्ध असलेल्या भागात LPG ची मागणी कमी होईल, ज्यामुळे ग्रामीण ग्राहकांसाठी अनुदानित सिलिंडरची उपलब्धता वाढेल.'एक घर, एक इंधन' धोरणाच्या दिशेने एक पाऊल म्हणूनही या पावलाकडे पाहिले जाते. सरकारने यापूर्वी दुहेरी कनेक्शनवर बंदी घालण्याचा प्रयत्न केला होता, परंतु आता हा नियम स्पष्ट आणि काटेकोरपणे लागू करण्यात आला आहे. ग्राहकांना सल्ला देण्यात आला आहे की जर त्यांच्याकडे दोन्ही कनेक्शन असतील तर त्यांनी जवळच्या एलपीजी वितरकाला किंवा कंपनीच्या पोर्टलला भेट देऊन ताबडतोब कनेक्शन परत करावे. परतफेड करण्यासाठी कोणताही दंड आकारला जाणार नाही, परंतु नियम मोडल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.
US-Israel Iran War: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या संरक्षणासाठी इतर देशांना जहाजे पाठवण्याचे आवाहन केले.
Nishikant Dubey : पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर मंदिराचे दरवाजे कामासाठी बंद ठेवण्यात आले आहेत. असे असताना भाजप खासदार डॅा. निशिकांत दुबे यांच्यासाठी दरवाजे उघडण्यात आले असा आरोप केला जात आहे.
Top 10 news: राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी केलेल्या एका वक्तव्याने सध्या राज्यात वादाची ठिणगी पेटलीय.
Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या आनंदाची बातमी, १ जूनपासून...
मुंबई: मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या कोकणवासियांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. दरवर्षी पावसाळ्यात किंवा सुट्ट्यांच्या दिवसात ज्या महामार्गावर तासनतास अडकून पडावे लागते, त्या प्रवासातील सर्वात मोठे अडथळे आता दूर होणार आहेत.गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या एका महत्त्वाच्या टप्प्याचे काम आता मार्गी लागत असून, यामुळे प्रवाशांचा मोठा वेळ वाचणार आहे. हा बदल नेमका कुठे होणार आहे आणि कधीपासून प्रवाशांना याचा लाभ मिळेल, याची माहिती आता समोर आली आहे.रायगड जिल्ह्यातील माणगाव आणि इंदापूर या दोन ठिकाणच्या बायपासचे काम आता अंतिम टप्प्यात पोहोचले असून १ जूनपर्यंत हे दोन्ही बायपास वाहतुकीसाठी खुले करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. खासदार सुनील तटकरे यांनी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या आढावा बैठकीत ही महत्त्वाची माहिती दिली. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील ही दोन शहरे वाहतूक कोंडीसाठी ओळखली जातात, मात्र आता या बायपासमुळे प्रवाशांची या त्रासातून कायमस्वरूपी सुटका होणार आहे.माणगाव आणि इंदापूर या शहरांमधून महामार्ग जात असल्याने तिथे नेहमीच वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळतात. विशेषतः पर्यटन हंगामात ही कोंडी प्रवाशांची सत्त्वपरीक्षा घेणारी ठरते. यावर उपाय म्हणून बायपासचे काम हाती घेण्यात आले होते, मात्र कोकण रेल्वेचा काही भाग या कामात आड येत असल्याने गती मंदावली होती. रेल्वेचे विद्युत पोल आणि इतर तांत्रिक सुविधांमुळे कामात अडथळे निर्माण झाले होते. यासंदर्भात खासदार तटकरे यांनी कोकण रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली असून, रेल्वे प्रशासनाने हे पोल आणि सुविधा तातडीने हलविण्याचे आश्वासन दिले आहे.१ जूनपासून वेगवान प्रवासया बैठकीनंतर बायपासच्या कामातील सर्व तांत्रिक अडचणी दूर झाल्या असून आता कामाला वेग आला आहे. संबंधित यंत्रणांना कामाची गती वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व काही नियोजनानुसार झाल्यास १ जूनपासून माणगाव आणि इंदापूर बायपासवरून वाहने धावू लागतील. हे दोन्ही बायपास सुरू झाल्यानंतर मुंबई-गोवा महामार्गावरील प्रवास केवळ वेगवानच नाही, तर अधिक सुरक्षितही होणार आहे. स्थानिक नागरिकांसह कोकणात जाणाऱ्या हजारो प्रवाशांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
मी रामकृष्ण, ओडिशातील मलकानगिरी जिल्ह्यातील तंडकी गावाचा रहिवासी आहे. मला चार मुले आहेत, सर्व अंथरुणावर पडून असतात. ते हलू शकत नाहीत. सर्वजण तरुण आहेत, लग्नाच्या वयाचे आहेत. त्यांना हायपोटोनिया नावाचा आजार आहे. जन्मावेळी ही मुले ठीक होती, पण हळूहळू त्यांना या आजाराने ग्रासले. पत्नी त्यांच्या दुःखात आजारी पडू लागली आहे. मी 8 हजार रुपये कमावतो. कोणावरही उपचार करू शकत नाही. मी अशा अडचणीत आहे, ज्यावर कोणताही उपाय नाही. कोणासाठी मृत्यू मागावा हेच मला समजत नाही. आजपासून 23 वर्षांपूर्वी मला पहिली मुलगी झाली. आमच्याकडे मुलगा-मुलगी असा कोणताही फरक केला जात नाही. वडील म्हणून मी खूप आनंदी होतो, पण 6 महिन्यांनंतरही माझी मुलगी हलू शकत नव्हती. आवाज दिल्यावर ती आमच्याकडे बघतही नव्हती. मी जास्त शिकलेलो नाही, त्यामुळे त्यांना काय झाले आहे हे मला काही समजत नव्हते. आधी स्थानिक डॉक्टरांना दाखवले, पण काहीच कळले नाही. तसेही आमचा परिसर नक्षलग्रस्त आहे. येथे दवाखाने वगैरे काही खास नाहीत. डॉक्टरांनी सांगितले की याला भुवनेश्वरला घेऊन जा. मलकानगिरीहून भुवनेश्वरला जाणे इतके सोपे नव्हते. पंचायत कार्यालयात धान्य वाटून मी महिन्याला 8 हजार रुपये कमवतो. सध्या, मुलीला दाखवण्यासाठी भुवनेश्वरला घेऊन गेलो. तेथे डॉक्टरांनी सांगितले की तिला हायपोटोनिया आहे. हा आजार कधीच बरा होणार नाही. हा आजार नेमका काय आहे, हे मला समजले नाही. नंतर लोकांकडून कळले की हा एक आनुवंशिक आजार आहे. भुवनेश्वर व्यतिरिक्त, आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम शहर आमच्या घरापासून जवळ पडते, जिथे यावर उपचार होतात. पण विशाखापट्टणम, भुवनेश्वरपेक्षाही जास्त महागडे शहर आहे. येण्या-जाण्याच्या एका खेपेत 20 ते 25 हजार रुपये लागतात. एवढे पैसे मी देऊ शकत नाही. आता मुलांवर उपचार करू शकत नाही, पण त्यांची सेवा करत आहे. आता तर माझी पत्नी मुलांबद्दल विचार करून करून आजारी पडू लागली आहे. ती विचार करते की एखादे तरी सामान्य मूल जन्माला आले असते तर. तीन वर्षांनंतर माझी पत्नी पुन्हा गर्भवती झाली. यावेळी खूप आशा होती की देव आमचं ऐकेल. पण भीतीही होती की हे बाळही मुलीसारखं होऊ नये. बरं, मला पुन्हा एक मुलगी झाली. सुरुवातीला ती ठीक होती. वर्षभर तिला कोणताही आजार आहे हे कळलं नाही. पण आम्ही सतर्क होतो. जेव्हा ती चालण्यायोग्य झाली, तेव्हा ती स्वतःच्या पायांवर उभी राहू शकली नाही. आम्हाला वाटलं की काही मुलं उशिरा चालतात. आम्ही वाट पाहत राहिलो, पण ती चालली नाही. जवळपास दोन वर्षांनंतरही ती स्वतःच्या पायांवर उभी राहू शकली नाही. आम्ही पती-पत्नी तर हे विचार करूनच थरथरलो की ही मुलगीही पहिल्या मुलीसारखीच होत आहे. आम्ही तिला चालवण्याचा खूप प्रयत्न केला, पण ती हळूहळू मोठ्या मुलीसारखीच होत गेली. आम्ही घाबरून तिला भुवनेश्वरला घेऊन गेलो. तिथे डॉक्टरांनी सांगितले की ही देखील बरी होणार नाही. हिलाही हायपोटोनिया आजार आहे. निराश होऊन मी घरी परतलो. आता आम्ही दोन-दोन दिव्यांग मुलींना वाढवू लागलो. आमच्याकडे दुसरा कोणताही मार्ग नव्हता. आम्हाला वाटले की कदाचित देवाची हीच इच्छा असावी. मी सकाळी कामावर जात असे आणि माझी पत्नी मुलींची काळजी घेत असे. त्यांना अंघोळ घालत असे, खाऊ घालत असे. जसजशा मुली मोठ्या होत गेल्या. त्यांचे वजन वाढत गेले. विशेषतः मोठ्या मुलीचे वजन वाढल्याने पत्नीला त्यांना उचलणे कठीण होऊ लागले. समस्या वाढली. दोन वर्षांनी माझी पत्नी पुन्हा गर्भवती झाली. यावेळी आशा होती की आमची झोळी भरली जाईल. पण तसे झाले नाही. देवाला काहीतरी वेगळेच मंजूर होते. आम्हाला दोन जुळे मुले झाले. ते जन्माला येताच आम्ही त्यांना डॉक्टरांकडे घेऊन गेलो. पण त्यांना कोणताही आजार आहे की नाही हे डॉक्टर सांगू शकले नाहीत. वर्षभरानंतर दुर्दैवाने माझ्या दोन्ही जुळ्या मुलांनाही तोच हायपोटोनिया आजार असल्याचे समजले. आता मला चार मुले आहेत. पहिली मुलगी २३ वर्षांची झाली आहे. दुसरी २० वर्षांची आणि दोन्ही मुलांचे वय १९ वर्षे आहे. चार-चार तरुण मुले, सर्व विकलांग आणि असा आजार जो आता कधीही बरा होऊ शकत नाही. आता मी हरलो आहे. पत्नी आजारी राहू लागली आहे, तिचे उपचार करू शकत नाहीये. मुलांबद्दल विचार करून-करून ती गप्प राहू लागली आहे. फक्त जेवण बनवते. त्यानंतर दिवसभर शांत बसून राहते. ज्या वयात वडील मुलांच्या लग्नाचे संबंध शोधतात, त्या वयात मी चार-चार तरुण मुलांचे मलमूत्र साफ करत असतो, असा विचार करतो. सकाळी मी एकटाच उठतो. चारही मुलांना शौचास आणि ब्रश करायला लावतो. आंघोळ घालतो, धुतो. या दरम्यान माझी पत्नी नाश्ता तयार करत असते. चारही मुलांना नाश्ता घालतो आणि मग मी नाश्ता करतो. सकाळी पंचायत कार्यालयात जाताना या मुलांना खुर्चीवर बसवून जातो. सोबत मोबाईलवर गाणे लावून ठेवतो. ही मुले गाणे किती ऐकू शकतात, माहीत नाही. या दरम्यान पंचायतचे काम सोडून दररोज दुपारी घरी येतो. वजन जास्त असल्यामुळे आता माझी पत्नी त्यांची काळजी घेऊ शकत नाही. दुपारी येऊन त्यांना खुर्चीवरून उचलून चटईवर झोपवतो आणि मग जेवण घालतो. जेवण घातल्यानंतर थोडा वेळ थांबतो. जर कोणी मलमूत्र केले तर ते साफ करतो, पुन्हा कार्यालयात जातो. मी एकटाच घर आणि बाहेरची जबाबदारी सांभाळतो. बस हेच आयुष्य झालं आहे. पंचायतीत दिवसभर धान्य उचलण्यात हात गुंतलेले असतात आणि घरी येऊन मुलांना उचलून इकडून तिकडे करण्यात. अनेकदा मुले स्वतःला घाण करतात, पण पत्नी त्यांची अडचण समजू शकत नाही. 23 वर्षे झाली आहेत. आम्ही पती-पत्नी ना कोणाच्या घरी जाऊ शकतो, ना कोणाच्या लग्नकार्यात. चार-चार अपंग मुलांना कोणाच्या भरवशावर सोडून जाऊ? आता तर लोकांनी आमच्या घरी येणेही बंद केले आहे. रात्री माझी मुले ओरडतात. आम्हाला माहीत नाही का. कदाचित शरीरात दुखत असेल किंवा बसून किंवा झोपून थकले असतील. आम्हाला अनेक लोकांनी सांगितले की या मुलांना विष देऊन टाका. असेच एक दिवस खास ओळखीचे गृहस्थ माझ्या घरी आले. मी या मुलांना एक-एक करून अंघोळ घालत होतो. मग सगळ्यांना उचलून चटईवर झोपवत होतो. त्या दिवशी त्यांना माझी अडचण बघवली नाही. ते मला घराबाहेर घेऊन गेले आणि म्हणाले की असे कधीपर्यंत करत राहणार? तुमचे आयुष्य तर यातच संपून जाईल. असे करा, या मुलांना विष देऊन टाका. ते असे बोलून निघून गेले. ते गेल्यानंतर मी विचार करू लागलो की, माझ्या मुलांना मी कसे मारू? आमच्या नशिबात त्यांची सेवाच लिहिली आहे आणि मी ते स्वीकारले आहे. (रामकृष्ण यांनी आपल्या या भावना भास्कर रिपोर्टर मनीषा भल्ला यांच्याशी शेअर केल्या)
Nitesh Rane : नाशिक येथे आयोजित एका कार्यक्रमात भाजप नेते मंत्री नितेश राणे यांनी एक मोठं वक्तव्य केले आहे.
मुंबई: बहुप्रतीक्षित मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक' प्रकल्पाचं काम पूर्ण झालं आहे. या प्रोजेक्टशी संबंधित असलेल्या एक इंजिनियरने सोशल मिडिया एक्सवर एक व्हिडिओ शेअर करीत याबाबत माहिती दिली. मुंबई-पुणे मिसिंग लिंक प्रकल्प इंजिनियरिंगचा अद्भूत नमुना आहे. हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर मुंबई-पुण्यातील अंतर तब्बल ६ किलोमीटरपर्यंत कमी होईल. इतकच नाही तर २५ ते ३० मिनिटांची प्रवासाचा वेळ वाचेल. मिसिंग प्रकल्पाची एकूण लांबी १३.३ किलोमीटर इतकी आहे. यामध्ये ६५० मीटर लांब केबल ब्रिजचा समावेश आहे. याची एकूण उंची १८२ मीटर (६० मजली इमारत) आहे.सतीश माने नावाच्या एका वापरकर्त्याने यासंदर्भातील व्हिडिओ एक्सवर शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी मुंबई-पुणे मिसिंग लिंक प्रकल्पाचं काम पूर्ण झाल्याचं त्यांनी एक्सवर माहिती दिली. माने यांच्या पोस्टनुसार, मिसिंग लिंक प्रकल्पाचं काम १२ मार्चला पूर्ण झालं. सूत्रांच्या माहितीनुसार, या मिसिंग लिंक प्रकल्पाचा शुभारंग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातून होऊ शकतं. मुंबई-पुणे मिसिंग लिंक प्रकल्पात टायगर व्हॅलीच्यावर एक ६५० मीटर लांब केबल-स्टेड पुल तयार करण्यात आला आहे. या खांबांची उंची साधारण १८२ मीटर असून ज्यामुळे हा पुल भारतातील सर्वात उंच रस्ते पुलांपैकी एक ठरतो. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने याची उभारणी केली आहे.कधी सुरू होणार मिसिंग लिंक?काही दिवसांपूर्वी आलेल्या अपडेटनुसार, या प्रकल्पाचं ९८ टक्के काम पूर्ण झालेलं आहे. १ मे २०२६ (महाराष्ट्र दिन) रोजी हा प्रकल्प सुरू होण्याची शक्यता आहे. हा प्रकल्प तयार करण्यासाठी साधारण ६,६९५ कोटींचा खर्च झाला आहे. या प्रकल्पात दोन मुख्य बोगद्यांचा समावेश आहे. एक बोगदा साधारण ८.९ किलोमीटर लांब आहे. हा देशातील सर्वात लांब बोगद्यांपैकी एक आहे. मिसिंग लिंक सुरू झाल्यानंतर खंडाळा घाट क्षेत्रात होणारे अपघात आणि लँडस्लाइडमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीतून सुटका मिळेल.खोपोली एक्झिटपासून कुसगाव (लोणावळा) पर्यंतचा कठीण आणि वळणदार घाट विभाग या लिंकमुळे दूर होईल. अलिकडेच मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर एक टँकर उलटल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली तेव्हा याची अत्यंत गरज होती.
कोल्हापूर: कोल्हापूरच्या कागल येथे राष्ट्रीय महामार्ग-48 वर 6-लेन एलिव्हेटेड कॉरिडॉरला मंजुरी मिळाली आहे.३५७.९९ कोटींच्या या प्रकल्पामुळे वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि कार्यक्षम होणार असून उद्योग व मालवाहतुकीला मोठी चालना मिळणार आहे.महाराष्ट्राच्या प्रगतीला वेग देणाऱ्या या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मन:पूर्वक आभार मानले आहेत.कोल्हापूरच्या विकासाला नवे पंख! कागलमध्ये ₹357.99 कोटींचा एलिव्हेटेड कॉरिडॉर मंजूर!कोल्हापूरच्या कागल येथे राष्ट्रीय महामार्ग-48 वर 6-लेन एलिव्हेटेड कॉरिडॉरला मंजुरी!₹357.99 कोटींच्या या प्रकल्पामुळे वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि कार्यक्षम होणार असून… https://t.co/teBTaxSFEE— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 14, 2026कोल्हापूरातील एलिव्हेटेड कॉरिडॉर मंजूर
Pune Crime : पुणे तेथे काय उणे! पोपटाचा आणि मांजराचा वाद थेट पोलीस ठाण्यात; पाहा नेमकं काय घडलं?
Pune Crime : पुणे तेथे काय उणे, असे म्हणतात ते उगाच नाही. शहरात एखादी किरकोळ घटना कधी मोठ्या वादात रूपांतरित होईल, याचा नेम नाही.
Dr Sanjay Tambat : विकसित भारत २०४७ साठी ‘मातृभाषेतून’शिक्षण आवश्यक; डॉ. संजय तांबट यांचे प्रतिपादन
Dr Sanjay Tambat : श्री संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यापक महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद उत्साहात संपन्न; उत्कृष्ट शोधनिबंधांना सन्मान.
Pune Traffic Police : एसटी आणि मेट्रो प्रवाशांना दिलासा; नो पार्किंगमध्ये रिक्षा लावणाऱ्या आणि युनिफॉर्म नसणाऱ्यांवर कारवाईचा बडगा.
Pune Water Supply : चुकीच्या बिलांची दुरुस्ती केल्यास जलसंपदा विभागालाच पालिकेला द्यावे लागतील ४११ कोटी; आयुक्तांचा खळबळजनक दावा.
13 मार्चच्या रात्री अमेरिकेने इराणच्या खार्ग बेटावर बॉम्ब हल्ला केला होता. डोनाल्ड ट्रम्प यांनी याला इराणच्या 'मुकुटा'वरील हल्ला म्हटले आहे. येथूनच इराणचे 90% निर्यात होणारे तेल जाते. आता बातमी आहे की, सुमारे 2500 अमेरिकन मरीन ताब्यात घेण्याच्या इराद्याने खार्गकडे पुढे सरकत आहेत. यामुळे जगात तेलाच्या किमती वेगाने वाढू शकतात आणि युद्ध लांबणीवर जाऊ शकते. इराणसाठी खार्ग बेट इतके महत्त्वाचे का आहे, अमेरिका खरोखरच ताब्यात घेण्याची तयारी करत आहे का आणि असे झाल्यास इराण काय करेल; हे आजच्या एक्सप्लेनरमध्ये जाणून घेऊया... प्रश्न-1: खार्ग बेट काय आहे, त्यावर अमेरिकेने हल्ला का केला? उत्तर: खार्ग बेट पर्शियन आखातात सुमारे 8 किमी लांब आणि 4-5 किमी रुंद प्रवाळ खडकांनी बनलेले बेट आहे. प्रवाळ म्हणजे सुकल्यानंतर दगड बनलेली सागरी वनस्पती. इराणी भूभागापासून त्याचे अंतर फक्त 50 किमी आहे. खार्ग, 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ' पासून सुमारे 480 किमी उत्तर-पश्चिमेला स्थित आहे. आपल्या सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या भौगोलिक स्थानामुळे, वेगवेगळ्या वेळी अनेक देशांनी त्यावर ताबा मिळवला आहे, म्हणूनच इराणमध्ये त्याला पर्शियन आखाताचे 'अनाथ मोती' म्हणजेच 'ऑर्फन पर्ल' असे म्हटले गेले आहे… 16 व्या शतकात, युरोपातील पोर्तुगाल देशाच्या खलाशांनी खार्ग बेटाचा नौदल तळ म्हणून वापर केला. 18 व्या शतकात डच लोकांनी येथे तटबंदी केली होती, परंतु 1766 मध्ये पर्शियन समुद्री चाच्यांनी ते डच लोकांकडून हिसकावून घेतले. 1838 ते 1842 आणि त्यानंतर 1856 मध्ये त्यावर ब्रिटिशांचा ताबा होता. 20 व्या शतकात, इराणचे शाह मोहम्मद रझा शाह पहलवी यांनी त्याला राजकीय कैद्यांच्या हद्दपारीच्या ठिकाणी रूपांतरित केले. त्यानंतर 1956 मध्ये येथे तेलाचे साठे (भंडार) बनवण्याचे काम सुरू झाले. रेझा शाह अमेरिकेच्या जवळचे होते. 1960 मध्ये अमेरिकन कंपनी 'अमोको' (Amoco) सोबत भागीदारीत रेझा शाह यांनी खार्गला तेल टर्मिनल म्हणून विकसित केले होते. खार्ग खोल पाण्याच्या मध्यभागी स्थित आहे, जिथे मोठ्या जहाजांना डॉक (नांगर) करणे सोपे आहे. 1979 मध्ये इराणमध्ये झालेल्या इस्लामिक क्रांतीनंतर अयातुल्ला खोमेनी यांची सत्ता स्थापित झाली. या दरम्यान अमोकोची मालमत्ता जप्त करण्यात आली आणि खार्गवर पूर्णपणे इराणचा ताबा झाला. खोमेनी यांच्या कार्यकाळात खार्गवर पायाभूत सुविधा उभारण्यात आल्या होत्या. आज सुमारे 20 चौरस किमी क्षेत्रात पसरलेले खार्ग, इराणसाठी तेल टर्मिनल म्हणून काम करते. इराण जेवढेही कच्चे तेल काढतो, ते पाइपलाइनद्वारे खार्गवर बनवलेल्या स्टोरेज टँकमध्ये साठवले जाते. इराण त्याला इतर देशांसाठी 'निषिद्ध बेट' (फॉरबिडन आयलंड) म्हणतो. इराणी सेना IRGC स्वतःच खार्गची सुरक्षा सांभाळते. 13 मार्च 2026 च्या रात्री अमेरिकेने खार्गवर हल्ला केला. ट्रम्प यांनी 'ट्रुथ सोशल' मीडियावर एका पोस्टमध्ये लिहिले, 'मध्य-पूर्वेच्या इतिहासातील सर्वात शक्तिशाली बॉम्बवर्षावात खार्ग बेटावरील लष्करी लक्ष्ये पूर्णपणे नष्ट झाली आहेत.' ट्रम्पने आपल्या पोस्टमध्ये पुढे लिहिले, 'आम्ही नैतिकतेमुळे खार्गवरील तेल पायाभूत सुविधा नष्ट न करण्याचा निर्णय घेतला आहे. तथापि, जर इराण किंवा इतर कोणी 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मधून जहाजांच्या अखंड वाहतुकीत अडथळा आणण्याचा प्रयत्न करेल, तर मी माझ्या निर्णयावर त्वरित पुनर्विचार करेन.' तज्ञांच्या मते, जगभरातील तेल पुरवठ्याची टंचाई कमी करण्यासाठी अमेरिकेने खार्गवर हल्ला केला आहे. इराणच्या संपूर्ण तेल पायाभूत सुविधांसाठी अत्यंत महत्त्वाच्या खार्गवर हल्ला करून त्याला हा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे की त्याने शेजारील आखाती देशांच्या तेल प्रकल्पांवर हल्ला करू नये. इराणच्या मीडिया एजन्सी 'फार्से' (Fars) ने म्हटले आहे की, सध्या खार्गवर झालेल्या अमेरिकन हल्ल्यांमुळे त्याच्या तेल पायाभूत सुविधांना कोणतेही नुकसान झालेले नाही. प्रश्न-2: खार्ग बेट इतके महत्त्वाचे का आहे? त्यावर काय-काय होते? उत्तर: इराण जमिनीवरील आणि समुद्रातील अशा दोन्ही प्रकारच्या तेलाच्या विहिरींमधून दररोज सुमारे 30 लाख बॅरल तेल काढते. 2024 मध्ये ही क्षमता दररोज सुमारे 46 लाख बॅरल होती. खार्ग बेट इराणच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. कारण या बेटावरूनच इराणचे सुमारे 90% कच्चे तेल तेल टँकरमध्ये भरून चीन, भारत यांसारख्या जगभरातील अनेक देशांमध्ये पाठवले जाते. खार्गवर संपूर्ण तेल पायाभूत सुविधा 3 टप्प्यांत काम करते... इराणी तेलाच्या विहिरींमधून खार्गपर्यंत तेल पोहोचवणे: इराणी ऑफशोर ऑइल कंपनी म्हणजेच IOOC ने अबुझार, फोरुजान, दोरुद, लवान बेट आणि सिरी बेटावर समुद्राच्या मध्यभागी तेल क्षेत्रे (ऑइल फील्ड्स) तयार केली आहेत. म्हणजेच हे असे प्रकल्प आहेत ज्यात समुद्राच्या मध्यभागी प्लॅटफॉर्म तयार करून तेलाच्या विहिरी खोदण्यात आल्या आहेत. अबुझार, फोरुजान आणि दोरुदच्या सागरी तेल क्षेत्रांमधून दररोज सुमारे 2.1 लाख बॅरल कच्चे तेल (क्रूड ऑइल) बाहेर पडते, जे पाइपलाइनद्वारे थेट खार्गला पाठवले जाते. खार्गला पोहोचलेल्या तेलाचा साठा करणे: खार्गला पोहोचल्यानंतर, येथील प्रोसेसिंग युनिट्सद्वारे कच्चे तेल (क्रूड ऑइल) मोठ्या साठवण टाक्यांमध्ये (स्टोरेज टँक्स) ठेवले जाते. या टाक्यांमध्ये एका वेळी सुमारे 1.8 कोटी बॅरल तेल साठवले जाऊ शकते. काही साठवण टाक्यांमध्ये प्रक्रिया केलेले तेल (प्रोसेस्ड ऑइल) देखील साठवले जाते. साठवलेले तेल जहाजांमध्ये भरून पाठवणे: खार्गच्या पूर्वेकडील किनाऱ्यावर असलेल्या बंदरावर कच्चे तेल (क्रूड ऑइल) मोठ्या टँकरमध्ये म्हणजेच तेलाच्या जहाजांवर भरले जाते. येथे एका दिवसात सुमारे 10 मोठ्या टँकर जहाजांमध्ये सुमारे 70 लाख बॅरलपर्यंत तेल भरले जाऊ शकते. खार्ग, इराणसाठी इतके महत्त्वाचे बेट आहे, कारण इतर कोणताही प्रमुख तेल उत्पादक देश एकाच ठिकाणी आपले जवळपास संपूर्ण तेल निर्यात केंद्र (ऑइल एक्सपोर्ट हब) बनवत नाही. सौदी अरेबिया, कुवेत, यूएई आणि अगदी मेक्सिको व व्हेनेझुएलानेही आपली अनेक वेगवेगळी बंदरे आणि जमिनीवरील प्लांट्सवर तेल निर्यात केंद्रे (ऑइल एक्सपोर्ट हब) बनवली आहेत. इराणसाठी आता एक धोका असाही आहे की अमेरिकेने म्हटले आहे की ते होर्मुझमधून तेल भरलेल्या जहाजांच्या निर्यातीसाठी नौदल पाठवण्यास सुरुवात करेल. अमेरिकेच्या नौदलाच्या 3 युद्धनौकांमधून सुमारे 2500 सैनिक मध्यपूर्वेत पोहोचत आहेत. अनेक अहवालांमध्ये असेही म्हटले जात आहे की ट्रम्प खार्गवर कब्जा करू शकतात. प्रश्न-3: तर काय खरंच अमेरिका खार्ग बेटावर कब्जा करण्याच्या तयारीत आहे? उत्तर: सुमारे 2500 अमेरिकन मरीन आणि किमान एक 'अँफिबियस असॉल्ट शिप' (समुद्र आणि जमिनीवर दोन्ही बाजूंनी हल्ला करू शकणारे जहाज) मध्यपूर्वेकडे रवाना झाल्याचे अहवाल आहेत. अमेरिकन वृत्तसंस्था 'वॉल स्ट्रीट जर्नल'नुसार अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी अमेरिकेच्या सेंट्रल कमांड (CENTCOM) च्या विनंतीवरून ही मंजुरी दिली आहे. या असॉल्ट शिप ग्रुपमध्ये तीन अमेरिकन युद्धनौका USS ट्रिपोली, USS न्यू ऑर्लिन्स आणि USS सॅन डिएगो यांचा समावेश आहे. त्यावर एकूण 5000 पर्यंत मरीन कमांडो स्वार होऊ शकतात. USS ट्रिपोलीला व्यावसायिक उपग्रहाद्वारे तैवानजवळ प्रशांत महासागराच्या परिसरात पाहिले गेले होते. तिथून मध्य पूर्वेला पोहोचायला साधारण एक आठवड्याचा वेळ लागू शकतो. रिपोर्ट्सनुसार, CENTCOM ने ही मदत यासाठी मागितली आहे, जेणेकरून इराणवर हल्ल्यासाठी अधिक पर्याय उपलब्ध असतील आणि गरज पडल्यास जमिनीवरील मोहीम देखील चालवता येईल. अधिकृतपणे अमेरिकेने सध्या असे म्हटले नाही की ते खार्गवर कब्जा करणार आहे. त्याचबरोबर या नवीन तैनातीला ट्रम्प यांच्या त्या विधानाशी जोडूनही पाहिले जात आहे, ज्यात त्यांनी म्हटले होते की अमेरिकन नौदल लवकरच 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ' मधून जाणाऱ्या जहाजांना सुरक्षा देण्यास सुरुवात करेल. मात्र, ट्रम्पचा खार्गवर ताबा मिळवण्याचा इरादा जुना आहे. 1988 मध्ये ट्रम्प फक्त एक अमेरिकन व्यापारी असताना, त्यांनी अल-जझिराला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की ते खार्गवर ताबा मिळवतील. त्यावेळीही इराण-इराक युद्धामुळे खार्ग आणि होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या तेलवाहू जहाजांवर हल्ले आणि बॉम्बवर्षाव होत होता. 'Axios' च्या अहवालानुसार, अमेरिका आणि इस्त्रायलने गेल्या काही दिवसांत खार्ग बेटावर ताबा मिळवण्याबाबत पुन्हा चर्चा केली आहे. याव्यतिरिक्त, पेंटागॉनचे माजी वरिष्ठ सल्लागार मायकल रुबिन यांनी गेल्या आठवड्यात अमेरिकन मीडिया संस्था 'पॉलिटिको'ला सांगितले की त्यांनी ट्रम्प प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी खार्गचे महत्त्व आणि त्यावर ताबा मिळवण्याच्या मुद्द्यावर चर्चा केली आहे. मायकल यांच्या मते, जर ट्रम्पना बॉम्बवर्षावाच्या पलीकडे जाऊन इराणवर दबाव वाढवायचा असेल, तर खार्गवर ताबा मिळवणे इराणी शासनाला त्याच्या मुख्य आर्थिक स्रोतापासून दूर करू शकते. ट्रम्प यांनी 'फॉक्स न्यूज रेडिओ'ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, 'खार्गवर कब्जा करणे हे माझ्या प्राधान्यक्रमाच्या यादीत सर्वात वर नाही, परंतु तो अनेक पर्यायांपैकी एक आहे. मी कधीही माझा निर्णय बदलू शकतो.' प्रश्न-4: जर खार्गच्या तेल साठ्यावर हल्ला झाला तर तेलावर काय परिणाम होईल? उत्तर: जर अमेरिकेने खार्ग बेटावर तीव्र बॉम्ब हल्ला केला किंवा जमिनीवर कब्जा करण्याचा प्रयत्न केला, तर इराणची कच्च्या तेलाची निर्यात पूर्णपणे थांबू शकते. अमेरिकन वित्तीय संस्था 'जेपी मॉर्गन चेझ' (JPMorgan Chase) नुसार, जर अमेरिकेने खार्गवर ताबा मिळवला तर इराणच्या तेल क्षेत्रांमधून तेलाच्या उत्पादनावर थेट परिणाम होणार नाही, परंतु त्याची तेल निर्यात थांबेल. जेव्हा अमेरिकेसाठी तिथे तेल उत्पादन सुरू करणे सोपे नसेल. यामुळे बाजारात अनिश्चितता आणि गोंधळ वाढू शकतो. 'जेपी मॉर्गन' नुसार, जर खार्ग बेटावर हल्ला झाला तर तेलाचे भाव वेगाने वाढू शकतात. किंमत 150 डॉलर प्रति बॅरलपर्यंत जाऊ शकते. ब्रिटिश संशोधन संस्था 'चॅथम हाऊस' (Chatham House) चे तज्ज्ञ नील क्विलियम देखील म्हणतात की खार्गवरील हल्ल्यामुळे तेलाचे भाव 150 डॉलरपर्यंत पोहोचू शकतात आणि हा परिणाम दीर्घकाळ टिकेल. प्रश्न-5: जर अमेरिकेने खार्गवर ताबा मिळवला तर युद्ध वाढेल का? उत्तर: अमेरिकन तज्ज्ञ पॅट्रिक डी. हान यांच्या मते खार्गवर अमेरिकेच्या ताब्यामुळे युद्ध अधिक बिघडू शकते, कारण अशा स्थितीत इराणकडे गमावण्यासाठी काही खास शिल्लक राहणार नाही. खारगमध्ये इराणी लष्करी तळांवर हल्ल्यापूर्वी इराणी संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बाघर गालिबाफ यांनी इशारा दिला होता की, 'इराणच्या दक्षिणेकडील सागरी सीमेवरील बेटांवर हल्ला झाल्यास इराण सर्व प्रकारचा संयम सोडून देईल. ही बेटे इराणच्या अर्थव्यवस्था आणि सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची आहेत.' बाघर यांनी इशारा देत म्हटले की, इराण प्रत्युत्तर देण्यापासून मागे हटणार नाही आणि त्याचे परिणाम अमेरिकेवर असतील. इराणने यापूर्वीही सौदी अरेबिया आणि UAE च्या तेल ठिकाणांवर हल्ले केले आहेत. इराणी सैन्याने म्हटले आहे की, जर त्यांच्या तेल आणि ऊर्जा पायाभूत सुविधांवर हल्ला झाला, तर भविष्यातही मध्य-पूर्वेत अमेरिकेसोबत काम करणाऱ्या तेल कंपन्यांना लक्ष्य केले जाईल. प्रश्न-6: यापूर्वी कधी खार्गवर हल्ला झाला होता का, तेव्हा इराणने काय केले होते? उत्तर: 1980 च्या दशकात इराक-इराण युद्धादरम्यान, इराकने खार्गवर हल्ले केले होते. 1984 मध्ये इराकने खार्गवरील हल्ले तीव्र केले. यावेळी अमेरिकेने चेतावणी दिली होती की, जर 'होर्मुझ स्ट्रेट' बंद झाले तर ते देखील हस्तक्षेप करेल. इराकी हवाई दलाने खार्गवर बॉम्बफेक करून बहुतेक टर्मिनल नष्ट केले होते. 1986 मध्ये खार्गची तेल पायाभूत सुविधा जवळजवळ पूर्णपणे बंद झाली होती. यावेळी इराणने 20 तेल टँकरची 'शटल सेवा' सुरू केली होती. खार्गपासून या लहान टँकरमध्ये तेल भरून होर्मुझजवळ लारक, लवान आणि सिरी बेटांवर पोहोचवणे सुरू केले. येथेही इराणने तेलाचे छोटे डेपो बनवले आहेत. इराणी लढाऊ विमाने या टँकरना एस्कॉर्ट (सुरक्षा) करत होती. इराणने होर्मुझच्या आसपासही समुद्री सुरुंग पेरले होते. मात्र इराकने या टँकरवरही हल्ला केला होता, आणि अमेरिकेनेही इराणची अनेक जहाजे आणि समुद्रात बांधलेले त्याचे दोन तेल प्लॅटफॉर्म नष्ट केले होते. तरीही इराणने दररोज सुमारे 15 लाख बॅरल तेलाची निर्यात सुरू ठेवली होती. ऑक्टोबर 2024 मध्येही इस्रायल खार्गला लक्ष्य करू इच्छित होता. या दरम्यान, इराणने खार्गवरून तेल टँकर हटवण्यास सुरुवात केली होती. अहवालानुसार, इराण यावेळीही असेच करत आहे. 28 फेब्रुवारी 2026 पूर्वी खार्गमध्ये सुमारे 27 टँकमध्ये तेल भरलेले होते, तर सध्या फक्त 10 टँकमध्येच तेल उपलब्ध आहे. इराण पुन्हा आपले तेल लवान आणि सिरी बेटांवर हलवू शकतो. तथापि, खार्गमध्ये 70 लाख बॅरलच्या साठवण क्षमतेच्या तुलनेत या बेटांवर क्षमता कमी आहे. संशोधन सहकार्य- सौरभ सिंह
PMC News : समाविष्ट गावांना झटका! मालमत्ता करात सवलत मिळण्याची आशा मावळली; महापालिकेचा मोठा निर्णय
PMC News : मुख्यसभेच्या जुन्या ठरावांचा दाखला देत महापालिकेने सवलतीचा प्रस्ताव फेटाळला; स्थायी समितीचेही मूकसंमती.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर बीडीडी संकुलातील ८६४ पुनर्वसन सदनिकांचे वितरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार
मुंबई: आशियातील नागरी पुनरुत्थानाच्या सर्वात मोठ्या बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील नायगाव येथील प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात पूर्ण झालेल्या ५ पुनर्वसन इमारतींतील एकूण ८६४ पात्र रहिवाशांना प्रातिनिधिक स्वरुपात सदनिकांचे वितरण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर, नरीमन पॉइंट येथे सोमवार, दि. १६ मार्च, २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता करण्यात येणार आहे. यामध्ये ४२३ सदनिका नागरिकांच्या सुरक्षेसाठी तत्पर असलेल्या पोलिस विभागातील निवृत्त पोलीस, त्यांचे वारस व कार्यरत पोलीस कर्मचाऱ्यांकरिता आहेत.म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळामार्फत राज्य शासनाच्या अत्यंत महत्वाकांक्षी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाची अंमलबजावणी केली जात आहे. या प्रकल्पांतर्गत नायगाव येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर बीडीडी संकुल’ असे नामकरण करण्यात आले आहे. नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पात दोन पुनर्वसन इमारतीत एकूण २० टॉवर बांधण्यात येणार आहेत. यात पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत पुनर्वसन इमारत क्रमांक ०१ मधील एकूण ८ टॉवर्स पैकी ५ टॉवर्समधील ८६४ सदनिकांच्या वितरण कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, कौशल्य विकास, उद्योजकता व नावीन्यता मंत्री तथा मुंबई उपनगराचे सह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा मुंबई उपनगराचे पालकमंत्री अॅड. आशिष शेलार, महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या ६.४५ हेक्टर जागेवर तळ अधिक ३ मजल्यांच्या ४२ चाळींमध्ये ३३४४ भाडेकरू वास्तव्यास आहेत. दोन टप्प्यात राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पात २३ मजल्यांच्या २० पुनर्वसन इमारती उभारल्या जात आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये नायगाव बीडीडी चाळीतील प्लॉट 'ब' मधील १४०१ रहिवाश्यांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. यामध्ये ८ पैकी ५ पुनर्वसन इमारतींतील ८६४ सदनिकांच्या चाव्या मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते प्रदान केल्या जात आहेत. उर्वरित ५३७ सदनिकांचे बांधकाम अंतिम टप्प्यात असून एप्रिल २०२६ मध्ये हे काम पूर्ण होणार आहे. हा प्रकल्प राबवितांना एकूण भूखंडापैकी सुमारे ६५ टक्के जागेचा वापर पुनर्वसनासाठी करण्यात आला आहे.तसेच प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील प्लॉट 'अ' मधील १९ चाळींच्या जागेवर प्रस्तावित १२ पुनर्वसन इमारतींपैकी ३ पुनर्वसन इमारतींचे बांधकाम प्रगतिपथावर आहे. पहिल्या टप्प्यांतर्गत चाळींतील रहिवाशांचे तात्पुरत्या संक्रमण शिबिरात स्थलांतरण करण्यात आले आहे. तसेच चाळीतील रहिवाशांना भाडे किंवा संक्रमण गाळे यापैकी पर्याय निवडण्याचा विकल्प उपलब्ध करून देण्यात आला. निवासी व अनिवासी गाळेधारकास २५ हजार रुपये प्रति महिना ११ महिन्यांचे आगाऊ भाडे देण्यात येत आहे.सुमारे दोन ते तीन पिढ्यांपासून १६० चौरस फुटाच्या खोलीत राहणाऱ्या पात्र रहिवाशांना म्हाडामार्फत पुनर्वसन इमारतीत ५०० चौरस फूट चटई क्षेत्रफळाची अत्याधुनिक सोयी सुविधांनी युक्त २ बीएचके स्वरुपातील सदनिका मालकी तत्त्वावर विनामुल्य वितरित केली जाणार आहे. पुनर्वसन सदनिकेत व्हिट्रीफाईड टाईल, अॅल्युमिनियम फ्रेमच्या खिडक्या, ग्रानाईट स्वयंपाकाचा ओटा, अग्निरोधक यंत्रणा यासह ब्रांडेड प्लंबिंग फिटिंग्स आदी सारख्या अनेक सुविधा देण्यात आल्या असून भूकंप रोधक तंत्रज्ञानवर आधारित उभारलेल्या या इमारतींमध्ये दोन पॅसेंजर लिफ्ट, एक फायर लिफ्ट, सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येक मजल्यावर सीसीटीव्ही यंत्रणा देखील बसविण्यात आली आहे. या प्रकल्पांतर्गत ३ मजल्यांचे बेसमेंट पार्किंग, स्टील्ट एरिया आणि प्रशस्त जिने आहेत.नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पांतर्गत एक स्वयंपूर्ण वसाहतीचे निर्माण होणार असून यामध्ये स्वतंत्र शाळेची इमारत, स्वतंत्र वेलफेअर सेंटर आदी सुविधांचे नियोजन करण्यात आले असून मलनिस्सारण प्रकल्प, सौर ऊर्जा प्रणाली, पर्जन्यजल संचयन आदी सुविधा असणार आहेत. तसेच या प्रकल्पातील पुनर्वसित इमारतींच्या सामायिक सोयी सुविधांची 'म्हाडा'तर्फे बारा वर्षे देखभाल केली जाणार आहे.नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील लाभार्थ्यांना हा कार्यक्रम घरबसल्या पाहता यावा यासाठी म्हाडातर्फे सदर कार्यक्रमाचे वेबकास्टिंग करण्यात येणार असून, त्याचे थेट प्रक्षेपण म्हाडाच्या अधिकृत @mhadaofficial या यूट्यूब तसेच फेसबुक चॅनलवरून करण्यात येईल.तसेच प्रकल्पातील वयोवृद्ध व इतर लाभार्थ्यांच्या सोयीसाठी मंडळातर्फे प्रकल्पस्थळी, म्हणजेच नायगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर बीडीडी संकुलातील पुनर्वसन इमारत क्रमांक टी–६ व टी–७ यांच्या आवारात विशेष मंडप उभारण्यात येणार आहे. या मंडपात सुमारे ५०० नागरिकांसाठी बसण्याची व्यवस्था करण्यात येणार असून, येथे यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजित सदनिका वितरण समारंभाचे थेट प्रक्षेपण मोठ्या एलईडी पडद्यांवर पाहण्याची सुविधा ‘म्हाडा’तर्फे उपलब्ध करून देण्यात येणार आहे.देशातील नागरी पुनरुत्थानाच्या सर्वात मोठ्या बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या अंमलबजावणीकरिता म्हाडा सुकाणू अभिकरण (नोडल एजन्सी) म्हणून म्हाडा सक्षमतेने कार्य करीत आहे. दि. १४ ऑगस्ट २०२५ रोजी वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पांतर्गत पहिल्या टप्प्यातील ५५६ सदनिकांचे वितरण करण्यात आले. बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पांतर्गत मुंबईतील वरळी, ना.म. जोशी मार्ग-परळ, नायगाव येथील सुमारे ८६ एकर जागेवर वसलेल्या १९५ चाळींचा समावेश असून १५ हजार ५९३ रहिवाशांचे पुनर्वसन केले जात आहे. ना. म. जोशी मार्ग-परळ प्रकल्पामध्ये २ हजार ५६० निवासी व अनिवासी गाळे असून १४ पुनर्वसन इमारती बांधल्या जात आहेत. वरळी येथे ९६८९ निवासी व अनिवासी गाळे असून ३४ पुनर्वसन इमारती उभारण्यात येत आहेत. नायगाव (दादर) येथे ३ हजार ३४४ निवासी व अनिवासी गाळे असून २० पुनर्वसन इमारती उभारण्याचे काम सुरू आहे.
SPPU News : आखाती देशांतील तणावामुळे गॅस पुरवठा विस्कळीत; दोन दिवसांपासून पुणे विद्यापीठाच्या रिफेक्टरीमध्ये केवळ वरण-भात मिळत आहे.
फार वर्षांपूर्वी मी दक्षिण भारत फिरण्यासाठी गेलो होतो. आम्हाला तसे जायचे होते तिरूपतीला, पण जाता-जाता वाटेत जे काही पाहण्यासारखे आहे ते पाहण्याचा प्रयत्न तेव्हा केला. मी दोनच वेळा तिकडे जाऊन आलो आहे, एकदा लहान असताना आणि एकदा माझी 12 वी झाल्यानंतर. आता या दोन्ही घटनांना बराच काळ लोटून गेला असला तरी एक गोष्ट नाही बदलली. ही गोष्ट म्हणजे, दक्षिण भारतात सकाळच्या वेळी कुठेही जा, मग ते हॉटेल असेल, नाश्ता सेंटर असेल, डोस्याची गाडी असेल किंवा मंदिर असेल.. एक आध्यात्मिक सौंदर्य असलेला आवाज आणि त्या आवाजातून ऐकू येणारे स्तोत्र, भजन हे अजूनही तसेच आहेत. यात बदल नाही. हा दैवी आवाज म्हणजे एम. एस. सुब्बुलक्ष्मी यांचा... जर देवाकडे किंवा आध्यात्मिक उंचीवर जाण्याचा कुठला भक्तिमार्ग असेल तर तो एम.एस. सुब्बुलक्ष्मी यांच्या आवाजातून असणार आणि देवानेच सुब्बुलक्ष्मींची या कामासाठी निवड केली असणार असे मला नेहमीच वाटत आले आहे. म्हणजे इतर कोणत्या गायिकांमध्ये अशी प्रतिभा नाही, असे माझे मुळीच म्हणणे नाही. परंतु, प्रत्येकाची गायन शैली वेगळी आहे, प्रत्येकाच्या आवाजात वेगळी जादू आहे, प्रत्येकाचा आवाज हा मनाला वेगवेगळ्या पद्धतीने स्पर्शून जातो. तसा सुब्बुलक्ष्मींचा आहे. त्यांच्या आवाजाने सकाळच होत नाही, त्यांच्या आवाजाशिवाय कुठली पूजाही अपूर्णच वाटते, असा प्रभाव सुब्बुलक्ष्मींचा माझ्यासह अनेकांच्या मनावर असणार. रागदरबारच्या आजच्या भागात जाणून घेणार आहोत 'नाइटिंगेल ऑफ इंडिया' अशी उपाधी मिळालेल्या आणि भक्तीगीतांमधूनही आंतरराष्ट्रीय ख्याती मिळवू शकतो हे दाखवून देणाऱ्या मदुरै षणमुखावदिवु सुब्बुलक्ष्मी अर्थात एम.एस सुब्बुलक्ष्मी यांच्याविषयी.. एम. एस. सुब्बुलक्ष्मी, ज्यांना 'क्वीन ऑफ कर्नटिक म्युझिक' म्हणून संबोधले जाते, त्या भारतातील सर्वात प्रभावशाली शास्त्रीय गायकांपैकी एक होत्या. 16 सप्टेंबर 1916 रोजी तामिळनाडूतील मदुराई येथे जन्मलेल्या सुब्बुलक्ष्मी या 'भारतरत्न' पुरस्कार प्राप्त करणाऱ्या पहिल्याच संगीतकार ठरल्या. त्यांच्या आवाजात भक्ती, पावित्र्य आणि सांस्कृतिक खोलीचे दर्शन घडते. ज्यामुळे त्या केवळ एक कलाकारच नव्हे, तर भारतीय संगीताच्या जागतिक राजदूत बनल्या. कर्नाटक संगीत, सामाजिक कार्ये आणि भारताची सांस्कृतिक मुत्सद्देगिरी या क्षेत्रांतील त्यांचे योगदान, त्यांच्या निधनानंतरही अनेक दशके लोटली असली तरी, आजही अतुलनीय ठरते.. संगीत प्रवासाची सुरुवात एम. एस. सुब्बुलक्ष्मी यांनी आपल्या संगीत प्रवासाची सुरुवात, स्वतःच्या आई वीणा वादक षण्मुखवडिवू अम्माल यांच्या मार्गदर्शनाखाली केली. वयाच्या 13व्या वर्षी, म्हणजेच 1929 मध्ये, त्यांनी कुंभकोणम येथे आपला पहिला जाहीर कार्यक्रम सादर केला. त्यांचा खोल आणि भारदस्त आवाज, तसेच त्यातील भावनिक खोली यामुळे लवकरच संपूर्ण दक्षिण भारतात त्यांच्याकडे लक्ष वेधले गेले. त्यांनी शास्त्रीय संगीतातील स्त्री-पुरुष भेदाच्या भिंती तोडल्या आणि आपल्या चाहत्यांमध्ये 'कुंजम्मा' हे प्रेमळ बिरुद मिळवले. सुब्बुलक्ष्मी यांच्या मैफिलींमध्ये तांत्रिक अचूकता आणि आध्यात्मिक भक्ती यांचा सुरेख संगम साधला जात असे, यामुळेच भारतीय संगीत 1966 मध्ये संयुक्त राष्ट्रांसह आंतरराष्ट्रीय स्तरावरील मंचांपर्यंत पोहोचले. संगीत परंपरेत खोलवर रुजलेल्या कुटुंबात जन्मलेल्या एम. एस. सुब्बुलक्ष्मी यांना बालपणीच झालेल्या कर्नाटक संगीताच्या संस्कारांनी त्यांच्या कलाजीवनाचा पाया रचला. त्यांच्या आईचे वीणावादन त्यांना अनेकदा प्रेरणा देत असे. औपचारिक शिक्षणाची व्याप्ती मर्यादित असूनही, त्यांचे संगीत शिक्षण अत्यंत सखोल होते आणि सेमंगुडी श्रीनिवास अय्यर व अरियाकुडी रामानुज अय्यंगार यांसारख्या दिग्गजांचे त्यांना मार्गदर्शन लाभले होते. 'हिज मास्टर्स व्हॉइस' (HMV) या लेबलसाठी त्यांनी सुरुवातीच्या काळात केलेल्या ध्वनिमुद्रणांना प्रचंड लोकप्रियता लाभली. किशोरवयीन काळातच, त्या आघाडीच्या पुरुष संगीतकारांच्या बरोबरीने आपली कला सादर करू लागल्या होत्या. जी त्या काळातील स्त्रियांसाठी एक अत्यंत दुर्मिळ बाब होती आणि या घटनेनेच भारतीय शास्त्रीय संगीतातील त्यांच्या क्रांतीकारी प्रवासाचा श्रीगणेशा झाला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. चित्रपटसृष्टीत पदार्पण एम. एस. सुब्बुलक्ष्मी यांची 1930 च्या दशकात मद्रास म्युझिक ॲकॅडमीमध्ये त्यांनी सादर केलेल्या कार्यक्रमांमुळे, एक 'संगीत-विदुषी' म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. त्यागराज, मुथुस्वामी दीक्षितार आणि श्यामा शास्त्री यांच्या रचनांच्या सादरीकरणासाठी त्या विशेषत्वाने ओळखल्या जाऊ लागल्या. गुंतागुंतीचे राग अत्यंत स्पष्टतेने आणि भक्तीभावाने सादर करण्याच्या त्यांच्या क्षमतेमुळे त्यांना राष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त झाली. त्यांनी काही काळासाठी चित्रपटसृष्टीतही पदार्पण केले आणि 'सेवा सदनम्' (1938) व 'मीरा' (1945) यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. संत-कवयित्री मीराबाई यांच्या जीवनावर आधारित असलेल्या 'मीरा' या चित्रपटाने त्यांच्या भक्तीपूर्ण गायनशैलीचे दर्शन घडवले आणि त्यांना देशव्यापी प्रसिद्धी मिळवून दिली. ज्यामुळे त्या भारताच्या आध्यात्मिक पुनरुज्जीवनाचा 'संगीत-स्वर' बनल्या. ‘सावित्री’ चित्रपटाविषयी 1941 साली प्रदर्शित झालेला ‘सावित्री’ हा चित्रपट तमिळ सिनेसृष्टीतील एक ऐतिहासिक मैलाचा दगड ठरला, ज्याच्या यशामागे दोन प्रमुख कारणे होती. पहिले म्हणजे, प्रख्यात गायिका एम.एस. सुब्बुलक्ष्मी यांनी या चित्रपटात सावित्रीची नव्हे, तर 'नारदा'ची भूमिका अत्यंत प्रभावीपणे साकारली होती. दुसरे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज स्टार अभिनेत्री शांता आपटे यांनी यात केलेली 'सावित्री'ची भूमिका. दिग्दर्शक वाय. व्ही. राव (ज्यांनी सत्यवानाची भूमिकाही केली होती) हे मूळचे तेलगू असूनही तमिळ चित्रपटसृष्टीत अत्यंत प्रयोगशील मानले जात. विशेष म्हणजे, तमिळ भाषेचा लवलेशही माहिती नसताना केवळ स्वतःच्या चिकाटीच्या आणि अभ्यासू वृत्तीच्या जोरावर शांता आपटे यांनी ही भाषा आत्मसात केली आणि आपल्या अभिनयाने सर्वांना थक्क करून सोडले. संगीताच्या बाबतीतही हा चित्रपट अत्यंत समृद्ध होता, कारण यात तब्बल 18 गाणी होती, जी त्या काळाच्या मानाने खूप मोठी संख्या होती. यात शांता आपटे यांनी 8, तर एम.एस. सुब्बुलक्ष्मी यांनी 6 गाणी गायली होती, तसेच शांता आपटे आणि वाय. व्ही. राव यांची दोन युगुलगीतेही प्रचंड लोकप्रिय झाली. जरी हा चित्रपट 'ब्लॉकबस्टर' ठरला नसला, तरी तो व्यावसायिकदृष्ट्या कमालीचा यशस्वी झाला. या चित्रपटामुळे शांता आपटे यांच्या राष्ट्रीय स्तरावरील लोकप्रियतेत फारसा बदल झाला नसला, तरी एम.एस. सुब्बुलक्ष्मी यांना मात्र या सिनेमाने एका रात्रीत ‘सुपरस्टार’ बनवले. दोन दिग्गज गायिकांच्या या अनोख्या संगमामुळे ‘सावित्री’ हा चित्रपट आजही रसिकांच्या स्मरणात आहे. सुब्बुलक्ष्मी यांचा विवाह 10 जुलै 1940 रोजी, सुब्बुलक्ष्मी यांनी आपल्यापेक्षा 14 वर्षांनी ज्येष्ठ असलेले स्वातंत्र्यसैनिक आणि पत्रकार त्यागराज सदाशिवम् (1902-1997) यांच्याशी विवाह केला. त्यांची ही साथ 57 वर्षे टिकणार होती आणि संगीत, कला व साहित्य क्षेत्रातील सेवेच्या दृष्टीने अत्यंत फलदायी ठरणार होती. 1940 मध्ये, त्यांनी दोघांनी मिळून कालिदासाच्या 'अभिज्ञान शाकुंतलम्' या नाटकावर आधारित 'शकुंतलाई' या चित्रपटाची निर्मिती केली. के. सुब्रमण्यम् उपलब्ध नसल्यामुळे, त्यांनी एलिस रॉडरिक डंकन (1909-2001) या अमेरिकन चित्रपट दिग्दर्शकाची निवड केली. या दिग्दर्शकाने 1940 च्या दशकात तमिळ भाषेचा एकही शब्द समजत नसतानाही अनेक लोकप्रिय तमिळ चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते. हा चित्रपट प्रचंड यशस्वी ठरला आणि त्यातील सुब्बुलक्ष्मी यांनी गायलेली गाणी अत्यंत मंत्रमुग्ध करणारी होती. सुब्बुलक्ष्मी म्हणजे सुस्वरा लक्ष्मी- उस्ताद बडे गुलाम अली खान सुब्बुलक्ष्मी यांनी केवळ एका प्रादेशिक संगीत-व्यक्तिमत्त्वापुरते मर्यादित राहू नये, अशी सदाशिवम् यांची इच्छा होती. त्यांना राष्ट्रीय स्तरावर कीर्ती प्राप्त व्हावी, ज्याच्या त्या खरोखरच मानकरी होत्या, असे त्यांना मनापासून वाटत होते. 1943 मध्ये, सुब्बुलक्ष्मी यांनी मुंबई येथील 'विक्रमादित्य महोत्सवा'त सहभाग घेतला. त्यांनी 'राग शंकराभरणम्' हा अत्यंत सुंदर राग, अत्यंत कसदार आणि निपुण शैलीत सादर केला. तसेच, त्यांनी तुलसीदास, मीराबाई आणि गुरु नानक यांचे भजनही गायले, ज्यांनी श्रोत्यांना पूर्णपणे भुरळ पाडली. उस्ताद बडे गुलाम अली खान यांनी त्यांचे वर्णन 'सुस्वरा लक्ष्मी' अर्थात सुमधुर आवाजाची देवी अशा शब्दांत केले. सरोजिनी नायडूंनी दिली स्वतःची 'नाइटिंगेल ऑफ इंडिया' उपाधी 'मीरा' या चित्रपटाची हिंदी आवृत्ती 5 डिसेंबर 1947 रोजी नवी दिल्ली येथील 'प्लाझा थिएटर'मध्ये प्रदर्शित झाली. प्रेक्षकांमध्ये लॉर्ड माउंटबॅटन, एडविना माउंटबॅटन, जवाहरलाल नेहरू, आर.के. षण्मुगम (अर्थमंत्री) आणि सरोजिनी नायडू यांचा समावेश होता. चित्रपट पाहिल्यानंतर नायडू म्हणाल्या की, 'भारताची कोकिळा' (नाइटिंगेल ऑफ इंडिया) हा किताब जो एक कवयित्री म्हणून त्यांनी अनेक दशकांपासून भूषवला होता, तो त्या आनंदाने सुब्बुलक्ष्मीकडे सुपूर्द करत आहेत. महात्मा गांधींना तिचे गायन ऐकण्याची इच्छा होती आणि वर्ध्याच्या सेवाग्राममध्ये सुब्बुलक्ष्मीने भजनांचे सादरीकरण केल्यानंतर, 'आपण सुब्बुलक्ष्मीचे निस्सीम चाहते बनलो आहोत', असे त्यांनी म्हटले होते. 'भारतरत्न' पुरस्कार जाहीर सुब्बुलक्ष्मी यांचे पती सदाशिवम् यांचे 1997 मध्ये वयाच्या 95 व्या वर्षी निधन झाले. 57 वर्षांची त्यांचा सहवास संपुष्टात आल्यामुळे, सुब्बुलक्ष्मी यांना आपले आयुष्य पूर्णपणे अंधकारमय झाल्यासारखे वाटले. त्यांना अन्नाची विट आली, त्यांना झोप लागेनाशी झाली. त्यांनी आपले गायन कमी केले आणि घराबाहेर जाणे टाळले. परंतु, अवघ्या काही महिन्यांतच त्यांच्या आयुष्यात आनंदाची एक घटना घडली. त्यांना 1954 मध्ये 'पद्मभूषण' आणि 1975 मध्ये 'पद्मविभूषण' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. आता भारत सरकारने त्यांना 'भारतरत्न' पुरस्कार जाहीर केला. 14 जानेवारी 1998 रोजी नवी दिल्ली येथील राष्ट्रपती भवनात आयोजित एका समारंभात, तत्कालीन राष्ट्रपती के.आर. नारायणन यांच्या हस्ते त्यांना हा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. 'तमिळ इसाई चळवळी'त सहभाग सुब्बुलक्ष्मी या संत त्यागराजांच्या भक्तीसंगीतात पूर्णपणे तल्लीन झाल्या होत्या. त्यागराजांच्या भजनांपासून त्या केवळ एकदाच काही काळासाठी दुरावल्या होत्या. तो काळ म्हणजे 1940 चे दशक, जेव्हा त्या तमिळ संगीताचा प्रसार करण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या 'तमिळ इसाई चळवळी'चा एक भाग बनल्या होत्या. त्यागराजांची भजने जरी प्रामुख्याने तमिळनाडूमध्ये लोकप्रिय असली, तरी ती मूळतः तेलुगू भाषेत आणि काही प्रमाणात संस्कृतमध्ये रचलेली आहेत. परंतु, त्यागराजांच्या गीतांपासून त्या फार काळ दूर राहू शकल्या नाहीत. त्या पुन्हा त्या गीतांकडे वळल्या, कारण ती गीते त्यांच्या आत्म्याला स्पर्श करणारी होती. रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय कर्नाटक संगीताच्या अध्वर्यू एम.एस. सुब्बुलक्ष्मी यांना त्यांच्या अलौकिक सांगीतिक सेवेसाठी अनेक सर्वोच्च नागरी आणि सांस्कृतिक पुरस्कारांनी गौरवण्यात आले. त्यांच्या सन्मानाची सुरुवात 1954 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने झाली, ज्यानंतर 1956 मध्ये संगीत नाटक अकादमी आणि 1968 मध्ये ‘संगीता कलानिधी’ या प्रतिष्ठित पदव्यांनी त्यांना सन्मानित करण्यात आले. 1974 मध्ये रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय संगीतकार ठरल्या, तर 1975 मध्ये त्यांना पद्मविभूषण आणि 1988 मध्ये कालिदास सन्मान प्रदान करण्यात आला. पुढे, 1990 मध्ये राष्ट्रीय एकात्मतेसाठीचा इंदिरा गांधी पुरस्कार आणि 1998 मध्ये भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ देऊन त्यांच्या दैदीप्यमान कारकिर्दीचा गौरव करण्यात आला. तिरुपती बालाजी मंदिराचे 'निवासी कलाकार' होण्याचा दुर्मिळ बहुमान एम.एस. सुब्बुलक्ष्मी यांच्या सांगीतिक कर्तृत्वाचा गौरव म्हणून त्यांना आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिराचे 'निवासी कलाकार' होण्याचा दुर्मिळ बहुमान मिळाला होता. त्यांच्या महान योगदानाची स्मृती जतन करण्यासाठी भारत सरकारने 2005 मध्ये त्यांच्या चित्रासह एक विशेष स्मारक टपाल तिकीट प्रसिद्ध केले. याच मालिकेतील पुढचा टप्पा म्हणून, तिरुपती नागरी विकास प्राधिकरणाने 2006 मध्ये त्यांच्या सन्मानार्थ शहरात त्यांचा एक भव्य कांस्य पुतळा उभारून त्यांच्या चिरंतन कलेला अनोखी श्रद्धांजली अर्पण केली. आपल्या संगीताने त्यांनी भारतच नव्हे तर परदेशातील श्रोत्यांनाही मंत्रमुग्ध करणाऱ्या सुब्बुलक्ष्मी यांचे 11 डिसेंबर 2004 रोजी वयाच्या 88 व्या वर्षी निधन झाले. सुब्बुलक्ष्मी या आज जरी या जगात नसल्या तरी त्यांच्या आवजाच्या आणि असंख्य गीतांच्या, भजनांच्या तसेच स्तोत्रांच्या माध्यमातून त्या आजही अजरामर आहेत..
PMC News : झोपडपट्टीपासून बंगल्यांपर्यंत सर्वांना मोजावे लागणार जादा पैसे; महापालिका आयुक्तांनी नव्या दरवाढीवर उमटवले शिक्कामोर्तब.
PMC News : सौरऊर्जेचा वापर वाढवण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी; मात्र स्थायी समितीने आयुक्तांच्या नकारात्मक अभिप्रायावर उमटवले शिक्कामोर्तब.
भारतातील समाजसुधारणा अचानक झाली नाही. त्यासाठी अनेक सुधारकांनी आपले योगदान दिले. पण त्यानंतरही इतिहासाने काही मोजक्याच लोकांची दखल घेतली आणि अनेकांकडे कथितपणे हेतुपुरस्सर असे दुर्लक्ष केले. अशाच व्यक्तींमध्ये गोपाळबाबा वलंगकर यांचा समावेश होतो. वलंगकरांनी अस्पृश्यता, अंधश्रद्धा व सामाजिक अन्यायाविरोधात एक मोठा संघर्ष उभा केला. प्रसंगी समाजाला 'विटाळलेले भांडे जाळले की शुद्ध होते, मग माणूस विटाळला तर त्यालाही भाजायचे का?' असा अंतर्मुख करणारा प्रश्न विचारत समाजाच्या डोक्यात झिणझिण्याही आणल्या. त्यामुळेच त्यांना आंबेडकरी चळवळीचा आधारवड मानले जाते. चला तर मग आज 'धुरंधर'मध्ये प्रकाश टाकूया गोपाळबाबा वलंगरकर यांच्या जीवनपटावर... सर्वप्रथम वलंगकरांची कौटुंबिक माहिती गोपाळबाबा वलंगकर यांचा जन्म 1840 साली रावढूळ गावात झाला. त्यांचे पूर्ण नाव गोपाळनाक विठ्ठलनाक साळवी असे होते. त्यांचे मूळ गाव वलंग होते. हे गाव महाड-मंडणगड रस्त्याने रावढूळला जाताना सोनघरपासून दक्षिणेस 3 किमी अंतरावर आहे. रावढूळ येथील जाधव हे गोसावी घराणे विठ्ठलनाक साळवी यांचे आजोळ व सासूरवाडी होते. त्यामुळे विठ्ठलनाक रावढूळला स्थायिक झाले. कोकणातील 52 गावाच्या महार जातपंचायतीचे न्यायाधीश असले्लया गेणू बुवा जाधवांचे नातेवाईक असल्यामुळे विठ्ठलनाक यांचे साळवी हे आडनाव मागे पडून लोक त्यांना आदराने वलंगकर म्हणत असत. गोपाळबाबा यांच्या पूर्वजांनी छत्रपतींच्या स्वराज्यात चाकरी केली. रायगडासह अनेक किल्ल्यांवर पहारेदारी केली. एवढेच नाही तर शिवरायांच्या गुप्तहेर खात्याचा प्रमुख असलेल्या बहिर्जी नाईकांच्या पथकातही जाधव कुटुंबातील काही लोक गोसावी होते. ते गावोगाव फिरून शत्रूची खबर घेऊन माहिती पुरवत असत. कौटुंबिक माहितीनंतर पुढे... गोपाळबाबा वलंगरांचे शिक्षण इंग्रजी आमदनीत झाले. त्यातून त्यांची दृष्टी विकसित झाली. बुद्धी चौकस आणि तर्कनिष्ठ बनली. इंग्रजी पलटणीतील नोकरीमुळे त्यांच्या अंगात शिस्त व स्वभावात बंडखोरपणा आला. विशेषतः योग्यवेळी महात्मा जोतिबा फुले यांच्या संपर्कात आल्यामुळे त्यांच्यात धर्मग्रंथांची चिकित्सा करून त्यांच्यातील फोलपणा उघड करण्याची बुद्धिप्रामाण्यवादी विचारसरणी वाढीस लागली. त्यांनी फुल्यासारखेच भारतीय समाजव्यवस्थेकडे एका वेगळ्या नजरेने पाहिले. त्यामुळेच बुद्ध, कबीर, बसवेश्वर, चक्रधर, नामदेव, चोखोबा, तुकोबा व फुले यांनी ज्या विषमतावादी विचारसरणीच्या विद्रोह केला, त्याच विद्रोहाचे वारसदार म्हणून वलंगकरांकडे पाहिले जाते. एवढेच नाही, तर 20 व्या शतकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात निर्माण झालेल्या, वाढलेल्या आणि रुजलेल्या मानवमुक्तीच्या लढ्याची पायाभरणी करण्याचे श्रेयही महात्मा फुले यांच्या सोबतीने वलंगकरांना जाते. त्यामुळे वलंगकर हेआंबेडकरी चळवळीचे आधारवड ठरतात. पण त्यानंतरही त्यांची म्हणावी तशी दखल इतिहासाने घेतली नाही. अस्पृश्यांच्या चळवळीचा आरंभबिंदू डॉक्टर प्रेम हनवते यांनी आपल्या गोपाळबाबा वलंगकर या पुस्तकात वलंगकरबाबांची जडणघडण विषद केली आहे. ते म्हणतात, गोपाळ बाबा वलंगकर यांचा कालखंड हा अस्पृश्यांच्या चळवळीचा आरंभबिंदू असून, आंबेडकरपूर्व कालखंड आहे. साधारणतः 1850 ते 1900 असा हा कालखंड आहे. या कालखंडाच्या खांद्यावरूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची दैदिप्यमान चळवळ पुढे गेली. या काळात अस्पृश्यांची सामाजिक, राजकीय, आर्थिक परिस्थिती कशी होती? याचा अंदाज आपल्याला येतो. कोरेगाव भीमा लढाई झाली तेव्हा ब्रिटिश राजवटीत अस्पृश्य तरुणांना मिलिटरीमध्ये सेवा करण्याची संधी उपलब्ध होती. त्यामुळे कोकणातील अस्पृश्य तरुणांचे मिलिट्रीत जाण्याचे प्रमाण बऱ्यापैकी होते. गोपाळबाबा 1886 साली सैन्यातून निवृत्त होऊन रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथे स्थायिक झाले. त्यानंतर त्यांनी तिथेच सामाजिक हक्क मिळवण्याची चळवळ सुरू केली. नेमक्या याच काळात जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा डंका सर्वत्र वाजत होता. त्यांच्या सामाजिक न्यायाच्या विचारांचा समाजावर मोठा प्रभाव पडला होता. बाबांनी त्यांच्यापासून प्रेरणा घेतली. शिक्षण हाच मानवी उत्थानाचा मार्ग आहे हे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी अस्पृश्य मुलांना शिक्षण मिळावे म्हणून केलेला संघर्ष अत्यंत रोमांचक आहे. अस्पृश्यांवरील शेकडो वर्षांची शिक्षणबंदी उठवली वलंगकरांचा इतिहास सांगताना डॉक्टर हनवते पुढे सांगतात, क्रांतिबा फुले, गोपाळबाबा वलंगकरांमुळे याच कालखंडात अस्पृश्य समाजावरील शेकडो वर्षांची शिक्षणबंदी उठवली गेली. फुल्यांनी अस्पृश्यांसाठी 1851 साली देशातील पहिली शाळा काढली आणि शेकडो वर्षांची मनुस्मृती पुरस्कृत अस्पृश्यांवरील शिक्षणबंदी उद्ध्वस्त झाली. यामुळे वलंगकर व त्यांच्या सहकाऱ्यांना वाटू लागले की, ब्रिटिश राजवटीतच आपल्याला मानवी हक्क प्राप्त होऊ शकतात. ब्रिटिश सरकार दयाळू आहे, ते मानवी अंतःकरणाने विचार करते. त्यांच्यामुळे अस्पृश्यांना न्याय मिळेल असा आशावाद निर्माण झाला होता. हिंदू धर्मात हस्तक्षेप न करण्याचे ब्रिटिशांचे धोरण होते. ते केवळ हिंदुस्तानात शांततेने राज्य करता यावे म्हणून हे धोरण ब्रिटिश पार्लमेंटने ठरवले होते. पण नेमके हेच धोरण अस्पृश्यांवर अन्याय करणारे होते. कारण हिंदू व्यवस्थेत विषमतापूर्ण जातिव्यवस्था होती. कालबाह्य रूढी, अंधश्रद्धा होत्या. अन्याय सामाजिक व्यवस्था होती. या संदर्भात अस्पृश्यांना वाटत होते की, ब्रिटिश सरकारने हस्तक्षेप करून हा अन्याय दूर करावा. गोपाळबाबा व त्यांच्या सहकाऱ्यांनी याविषयी ब्रिटिश सरकारकडे अपील केले. एवढेच नव्हे तर छत्रपती भोसले यांच्या आश्रयाने जगणारे व नावलौकिक सांगणारे पेशवे कटकारस्थाने करणारे आहेत. त्यांनी छत्रपतींशी बेईमानी केल्याचा इतिहास सांगितला. यावरून वलंगकर किती मुत्सद्दी होते हे लक्षात येते. गोपाळबाबा वलंगकर आद्य पत्रकार वलंगकरांना समाज उद्धाराचे कार्य करताना टोकाच्या टीकेचा सामना करावा लागला. वृत्तपत्रातून त्यांच्यावर टीका झाली. पण ते डगमगले नाही. विरोधकांना त्यांनी अत्यंत संयमाने आणि स्पष्ट शब्दांत प्रत्यु्त्तर दिले. त्यांनी स्थापन केलेल्या अनार्य दोष परिहारक मंडळ या कार्यावर दिनबंधू मधून कुणीतरी साळूबाई या टोपण नावाने लेखन करून टीका केली. तेव्हा वलंगकरांनी अस्पृश्यांवर करण्यात येणाऱ्या जुलमाचा मार्मिक शब्दांत आढावा घेतला. दलितांवर होणारे अन्याय, अत्याचार चव्हाट्यावर मांडणारे, दलितांच्या ाबजूने वृत्तपत्रातून भूमिका घेणारे वलंगकर हे आद्य पत्रकार होते. वलंगकरांनी वेगवेगळ्या वर्तमानपत्रांतून पंडित कोंडीराम हे टोपण नाव धारण करून काव्यरचना केली. आपल्या काव्यातून अस्पृश्यांवरील अन्यायाला वाचा फोडली. ते केवळ आपल्या सांसारिक जीवनात गुरफटून राहिले नाही, तर आयुष्यभर अस्पृश्यता, दारिद्र्य व ज्ञान या विरोधात संघर्ष करत राहिले. कोकण व कोकणाबाहेरील जनतेच्या भेटी घेऊन जनजागृतीचे काम केले. महाड शहरात कापड विकत घेणाऱ्यांना दुकानदार लांबूनच कापड दाखवत. तसेच एकदा अंगावर टाकलेला कपडा परत घेत नसत. वलंगकरांच्या प्रयत्नांमुळे अस्पृश्यांना कपडे पारखून घेता येऊ लागले. अस्पृश्यांना धर्मशाळेत प्रवेश मिळत नव्हता. पण वलंकरांच्या प्रयत्नामुळे त्यांना ओसरीत राहता येऊ लागले. सवर्णांनी रोखल्या होत्या प्रगतीच्या वाटा ब्रिटिश कालखंडात अस्पृश्यांना उन्नतीचे मार्ग उपलब्ध होऊ लागले होते. भारताची सामाजिक जडणघडण सुरू झाली होती. रस्ते, रेल्वेमार्ग, कापडगिरण्या, जहाज बांधणी व सैन्यात अस्पृश्यांना नोकऱ्या मिळू लागल्या. नेमक्या याच टप्प्यावर भारतातील उच्चवर्णीय हिंदूंनी अस्पृश्यांच्या प्रगतीच्या वाटा कशा रोखल्या, त्यांच्या कावेबाजपणावर डॉक्टर हनवते यांनी प्रखरपणे लिहिले आहे. ते लिहितात, 1857 च्या बंडानंतर ब्रिटिशांनी भारतातील लष्कराची पुनर्चना करण्याचे ठरवले. तेव्हा भारतातील या बंडाच्या कारणाचा शोध घेण्यात आला. अर्थात ब्रिटिशांना सल्ला देणारे उच्चभ्रू हिंदू लष्करातील अधिकारी होते. त्याप्रमाणे ब्रिटिशांना सल्ला देण्यात आला की, सैन्यात अस्पृश्यांना भरती केल्याने सैन्यातील उच्चभ्रू हिंदू सैनिकांच्या स्थानाला धक्का बसतो. अस्पृश्य समाजातील सुभेदार मेजर, जमादार यांच्या हाताखाली काम कणे कमीपणाचे वाटते. त्यातून पुढील काळात असंतोष निर्माण होऊ शकतो व त्यातून पुन्हा बंड होऊ शकते अशी भीती व्यक्त केली. त्यामुळे ब्रिटिशांनी अस्पृश्यांची सैन्यातील भरतीच बंद केली. 'मार्शल रेस थिअरी'चा कांगावा हिंदू अधिकाऱ्यांनी आणखी एक शक्कल लढवली. ती म्हणजे मार्शल रेस थिअरी. भारतातील ब्रिटिश सैन्यात मार्शल रेस थिअरी आणली गेली. मार्शल रेस म्हणजे लढाऊ जाती व नॉन मार्शल रेस म्हणजे बिगरलढाऊ जाती अशी वर्गवारी करण्यात आली. अस्पृश्य समाजाला नॉनमार्शल म्हणजे बिगर लढाऊ ठरवण्यात आले. अशा प्रकारचा मनुवादी डाव ब्रिटिश सैन्यातील हिंदू अधिकाऱ्यांनी खेळला. अस्पृश्यांनी आपल्यापेक्षा मोठ्या पदावर जाऊ नये हा त्यामागचा डाव होता. खरे तर अस्पृश्यांनी ब्रिटिशांसाठी अनेक लढाया गाजवल्या होत्या. 1 जानेवारी 1818 कोरेगाव भीमाच्या लढाईचा इतिहास ताजा असताना अस्पृश्यांना नॉनमार्शल कसे ठरवण्यात आले? उच्चभ्रू हिंदू अधिकाऱ्यांचे सल्ले ऐकून ब्रिटिश सरकारने अस्पृश्यातील 8 सुभेदार मेजर, 62 सुभेदार, 34 जमादार व हजारो अस्पृश्य सैनिकांना निवृत्त केले. या अन्यायाविरोधात गोपाळबाबा वलंगकर, शिवराम वाईकर, सुभेदार मेजर रामनाक मालनाक (रामजी आंबेडकर) यांनी न्यायमूर्ती रानडे यांच्या मदतीने आवाज उठवला. 1894 मध्ये मुंबई सरकारकडे अस्पृश्यांच्या सैन्य भरतीवरील बंदी उठवण्याची मागणी केली. सरकारकडे केलेल्या या अपिलात महार कसे शूरवीर आहेत, इमानदार आहेत हे सांगण्यासाठी कोरेगाव भीमाच्या लढाईतील पराक्रमाची आठवण करून दिली. त्यानंतर ब्रिटिशांनी पुन्हा अस्पृश्यांसाठी लष्कराची कवाडे उघडी केली. पाण्याला विटाळ होतो म्हणजे नेमके काय? गोपाळबाबा एखाद्या संतांप्रमाणे राहायचे. कीर्तन करायचे. समाजाला डोळस करायचे. त्यामुळे लोक त्यांना बाबा, बुवा, अथवा सद्गुरू असे आदराने म्हणायचे. 'महाडमधील लोक चळवळी' या पुस्तकात साहित्यिक प्रभाकर भुस्कुटे सांगतात, वलंगकर बाबा कीर्तनाला उभे राहिले, म्हणजे लोकांची प्रचंड गर्दी होत असे. अंधश्रद्धा, दुष्ट चालिरीती, अनिष्ठ रूढी परंपरा यावर ते परखडपणे भाष्य करत. माणूस माणसाला शिवला म्हणजे विटाळ होतो, म्हणजे नेमके काय होते? ते कर्मठ मंडळींना विचारीत. अस्पृश्य माणूस दगडाला शिवला म्हणजे दगडाचा देव वाटतो, म्हणजे काय वाटते? अस्पृश्यांच्या सावलीचा विटाळ, मातीवर उमटलेल्या पाऊलांचा विटाळ... अहो, विटाळ म्हणजे काय? माणसाला माणसाचा विटाळ होतो म्हणजे दोघांपैकी नेमके कोणाला शिंगे फुटतात? पाण्याला विटाळ होतो म्हणजे नेमके काय? पाणी नाहीसे होते का? भांड्याला विटाळ होतो म्हणजे नेमके काय होते? पाणी नाहीसे होते का? भांड्याला विटाळ होतो म्हणजे नेमके काय होते? भांडे बोलू लागते की हलायला लागते? या प्रश्नांची उत्तरे धर्मरुढीजवळ नाही. पाणी विटाळले की, गोमूीत्र टाकून शुद्ध होते. भांडे विटाळले म्हणजे ते जाळले की शुद्ध होते. मग माणूस अस्पृश्यांच्या स्पर्शाने विटाळला तर त्याला भाजायचे का? एखादा पवित्र हिंदू डॉक्टर मेलेल्या, सडलेल्या माणसाच्या प्रेताचे शव विच्छेदन करतो तेव्हा तो अपवित्र होत नाही. मात्र, अस्पृश्य रोग्याची नाडी तपासताना तो तसा बरे अपवित्र होतो? असे अनेक प्रश्न गोपाळबाबा कीर्तनातून लोकांना विचारायचे आणि त्यांच्या मेंदूला गदा गदा हलवायचे. वलंगकरांच्या खंडाळ्यातील कीर्तनाचा किस्सा तत्कालीन समाजसुधारक सर नारायणराव चंदावरकर 1894 साली एका व्याख्यानात वलंगकरांच्या खंडाळा येथे झालेल्या कीर्तनाविषयी सांगतात की, हा आपला देश जातिबंधनांनी अगदी बद्ध झालेला आहे, तरीसुद्धा अगदी खालच्या वर्गाचे म्हणून ज्यांना मानले जाते, त्या महारात सुद्धा अशी माणसे आढळतात, की ज्यांचा भाव, त्यांची भक्ती आपल्या अंतःकरणास अगदी तल्लीन सोडतात. भक्तांच्या व साधूंच्या पद्यांचे अगदी साध्या रीतीने त्यांनी केलेले निरुपण ऐकून मनाला फार समाधान वाटते. काही वर्षांपूर्वी खंडाळ्यास एका महारबुवाने हरिकीर्तन केले. त्यावेळी साधुसंतांची आठवण करताना त्याने अगदी कळवळ्याने म्हटले, अहो संत हो. आपण आमच्यावर फार उपकार केले आहेत. ज्यावेळी वेदांनी आम्हाला टाकले, ब्राह्मणांनी झिडकारले व लोकांनी आम्हास बहिष्कृ. केले, त्यावेळी आम्ही जे अगदी पतन पावलेले, सर्वात तिरस्करणीय वाटणारे महार त्यांना आपण जवळ केले. आपण आम्हाला आमच्या उद्धाराचा मार्ग दाखवला व आमच्या ठिकाणी आशा उत्पन्न केली. त्या आपले आम्ही उतराई कसे होणार? वलंगकर होते बाबासाहेबांचे प्रेरणास्थान बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यात गोपाळबाबांना फार आदराचे स्थान होते. ते गोपाळबाबांना आपले प्रेरणास्थान मानत. अस्पृश्यांच्या चळवळीचे आरंभबिंदू असलेल्या वलंगकराविषयीचा आदर त्यांनी वेळोवेळी व्यक्त केला. मुंबई असेंब्लीच्या 1937 च्या निवडणुकीत स्वतंत्र मजूर पक्षातर्फे कुलाबा मतदारसंघात उभे असलेले आपले सहकारी सुभेदार विश्राम सवादकर यांच्या निवडणूक प्रचार मोहिमेचा शुभारंभ करण्यासाठी आंबेडकर रावढूळ येथे आले होते. तेव्हा त्यांनी गोपाळबाबांच्या अभिवादन केले होते. फुले व वलंगरांच्या सत्यशोधक चळवळीचे आम्ही वारसदार आहोत हे मोठ्या अभिमानाने ते सांगत. ते एका टीकाकाराला उत्तर देताना म्हणतात, आम्ही सत्यशोधकी आहोत. त्याबद्दल आम्हास कोणत्याही तऱ्हेचा विशाद न वाटता आनंदच वाटतो. सत्यशोधकी चळवळ म्हणजे समानतेची व सद्धर्माची चळवळ असे आमचे ठाम मत आहे. आमच्या मित्रास आमची सूचना आहे की, त्यांनी सत्यशोधक व्हावे व आपल्या जातभाईसाठी सत्यशोधक बनवण्याचा प्रयत्न करावा. गोपाळबाबा वलंगकरांचा संघर्ष आजही आपल्याला अन्यायाच्या विरोधात ठामपणे उभे राहणे, अंधश्रद्धा व रूढींना प्रश्न विचारणे, प्रत्येक माणसाच्या हक्कांसाठी आवाज उठवणे किती महत्त्वाचे आहे हे शिकवतो. त्यामुळे वलंगकरांचे जीवन फक्त इतिहासातील एक घटना नाही; तर ते एक प्रेरणास्थान आहे. ही प्रेरणा समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येकाला मार्गदर्शन करते. आज आपल्याला सामाजिक समतेचे जे काही हक्क मिळाले आहेत, त्यामागे वलंगकरांसारख्या धुरंधरांची मेहनत आहे. त्यांच्या चळवळीची किरणे अजूनही आपल्याला प्रकाश देत आहेत. त्यामुळे आपण त्यांच्याविषयी नेहमीच कृतज्ञ राहिले पाहिजे. धुरंधर मालिकेतील खालील स्टोरीज वाचा… धुरंधर-66; मुक्ता साळवे:वेद आपले 'धर्मपुस्तक' नाही असे ठणकावून सांगणाऱ्या गावकुसाबाहेरील दलित महिलेचा पहिला विद्रोही हुंकार धुरंधर-65; भाऊ दाजी लाड:भारताच्या प्राचीन वारशाचा शोध घेत कुष्ठरोगावर औषध शोधून पाश्चात्यांना जबर धक्का देणाऱ्या जिद्दी तरुणाची गोष्ट धुरंधर-64; दुर्गाबाई देशमुख:राष्ट्रसेवेची अखंड ज्योत असणाऱ्या फ्रॉकवाल्या छोट्या शिक्षिकेची निष्ठा अन् निडरपणाची गोष्ट धुरंधर-63; वासुदेव सीताराम बेंद्रे:शिवजयंतीची तारीख निश्चित करणारा अन् शंभूराजांचे ऐतिहासिक पुनर्वसन करणारे मराठ्यांच्या इतिहासाचे भीष्माचार्य धुरंधर-62; गुरुवर्य केळूसकर:'दादोजी कोंडदेव अन् रामदास स्वामी शिवरायांचे गुरू नाहीत' असे ठामपणे सांगणारा महाराष्ट्राचा उपेक्षित वाङ्मयमहर्षी धुरंधर-61; सी. व्ही. रामन:आकाशाचा अन् समुद्राच्या पाण्याचा रंग निळाच का? या प्रश्नाचे उत्तर प्रकाशाच्या गुणधर्मातून देणारा भौतिकशास्त्रज्ञ धुरंधर-60; अलेक्झांडर कनिंगहॅम:काशी लगत स्वर्गात जाणाऱ्या पायऱ्यांचा शोध लावणारा अन् बुद्धांचा भारत शोधणारा इंग्रजी लष्करी अधिकारी धुरंधर-59; संत बंका:देव आमचाही असेल तर मंदिर का नाही? असा प्रश्न करणारे मोठ्या ग्रंथांचे नव्हे, तर मोठ्या प्रश्नांचे संत! धुरंधर-58; अँटोनियो ग्राम्शी:तुरुंगाच्या 4 भिंतीत जग बदलण्याची शक्ती शोधणारा अन् वैचारिक क्रांती शस्त्रांपेक्षा वरचढ असल्याचे सांगणारा विचारवंत धुरंधर-57; डॉ. श्रीराम लागू:'देवाचे अस्तित्व हीच मोठी अंधश्रद्धा' असल्याचे ठणकावून सांगत समाजाला अस्वस्थ करणारा बुद्धिवादी माणूस धुरंधर-56; राणी गाइदिन्ल्यू:झाशीच्या राणीची गोष्ट माहिती असणाऱ्यांना इंग्रजांना आव्हान देणाऱ्या आदिवासी कन्येची गोष्ट माहिती आहे का? धुरंधर-55; पां. म. बापट:सशस्त्र क्रांतिकारक ते अहिंसक सत्याग्रहाचा सेनापती अन् अखेर झाडू उचलून ग्राम स्वच्छता करणारा सुधारक धुरंधर-54; नाना पाटील:म्हार, मांगांना लांब का ठेवता? ते घान कामं करत्यात म्हणून? तुमचा डावा हातही तेच करतो, असे सांगणारा क्रांतिसिंह धुरंधर-53; नेल्सन मंडेला:भारताला दुसरे घर मानणाऱ्या आफ्रिकन गांधींची कहाणी; 27 वर्षे कैद भोगूनही मनात कटूता न ठेवणारा मदिबा धुरंधर-52; शकुंतला देवी:शाळेचे तोंड न पाहता संगणकाची परीक्षा पाहणाऱ्या अन् गणिताला खेळ मानणाऱ्या कानडी महिलेची जादूई कहाणी धुरंधर-51; केशवराव जेधे:ब्राह्मणेतर चळवळीचा प्रमुख चेहरा अन् सामाजिक न्यायासाठी झगडणारा ठसकेबाज दृढनिश्चयी मराठी लढवय्या धुरंधर-50; डॉक्टर सलीम अली:पक्ष्यांच्या जगाचे रहस्य उलगडून मानवाला निसर्गाच्या दिशेने जाण्यास प्रेरित करणारा पक्ष्यांचा 'चालता फिरता विश्वकोश' धुरंधर-49; सर रोनाल्ड रॉस:'साला एक मच्छर'! मलेरिया अन् डास यांच्यातील परस्पर संबंध शोधून मानवतेची सेवा करणारा थोर वैज्ञानिक धुरंधर-48; होमी जहांगीर भाभा:दगडधोंड्यांच्या भारतात अणुज्योत पेटवून अज्ञानाचा अंधःकार दूर करणारा श्रीमंत घरातला बंडखोर तरुण धुरंधर-47; बिंदेश्वरी प्रसाद मंडल:ओबीसींच्या सामाजिक न्यायाच्या इमारतीचा सर्वात मजबूत पाया रचणाऱ्या बिहारच्या जमीनदाराची कथा धुरंधर-46; कार्ल बुशबी:ना ट्रेन ना प्लेन ना बाईक, तब्बल 27 वर्षांच्या अन् 58 हजार किलोमीटरच्या पदयात्रेची अनोखी कथा जी आजही सुरूय धुरंधर-45; जाईबाई चौधरी:स्त्री जीवन फुलवणारी अन् दलित महिलांना शैक्षणिक, सांस्कृतिक संजीवणी देणारी विदर्भातील थोर सेविका धुरंधर-44; ओशो रजनीश:पापाला पुण्याचे अन् हिंसेला अहिंसेचे कपडे घालावे लागतात असे सांगत ईश्वरापूर्वी स्वतःला शोधण्याचा सल्ला देणारा थोर दार्शनिक धुरंधर-43; अमृता प्रीतम:मैं तेनु फिर मिलांगी, कित्थे? किस तरह? पता नहीं; प्रेम, वेदना अन् स्वातंत्र्याचा सूर छेडत बाईचे जगणे मांडणारी लेखिका धुरंधर-42; दगडाबाई शेळके:स्वतःच्या नवऱ्याचे दुसरे लग्न लावून मराठवाडा मुक्तिसंग्रामात स्वतःला झोकून देणारी जालन्याची 'झाशीची राणी' धुरंधर-41; यशवंत घाडगे:दुसऱ्या महायुद्धात मर्दुमकी दाखवत ब्रिटिशांकडून इटलीच्या सैनिकांना कंठस्नान घालणारा मराठी सैनिक धुरंधर-40; शाहीर अमर शेख:धग, रग, आग, धुंदी अन् बेहोशीची जिवंत बेरीज असणारा तथा 'बर्फ पेटला हिमालयाला विझवायला चला' म्हणणारा शाहीर धुरंधर-39; टी. एन. शेषन:'नेत्यांना नाश्त्यात खाणारे' तथा EC ला अभूतपूर्व ताकद अन् प्रतिष्ठा मिळवून देणारे भारताचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त धुरंधर-38; डॉ. एम एस स्वामीनाथन:उपासमारीच्या सावटाखाली झुरणाऱ्या भारताला स्वावलंबनाचे स्वप्न दाखवून ते सत्यात उतरवणारा शास्त्रज्ञ धुरंधर-37; मेजर शैतान सिंह:1962 च्या भारत - चीन युद्धात 120 जवानांच्या जोरावर शत्रूचा फडशा पाडणारा अन् पोट फाटले तरी मैदान न सोडणारा बहाद्दर धुरंधर-36; राणी वेलू नाचियार:महिलांची फौज तयार करून ईस्ट इंडिया कंपनीच्या सैनिकांना पहिल्यांदा धूळ चारणारी शिवगंगाची 'वीर मंगई' धुरंधर-35; अय्यनकाली:महिलांना छाती झाकण्याची परवानगी मिळवून देणारा अन् दलितांनी पिकवलेले धान्य चालते, मग ते का चालत नाहीत? असा प्रश्न करणारा सुधारक धुरंधर-34; जगन्नाथ शंकरशेठ:लोकांचा विश्वास जिंकणारी श्रीमंती गरिबांवर उधळणारा अन् परकियांनाही आपला वाटणारा मुंबईचा खरा शिल्पकार धुरंधर-33; अण्णाभाऊ साठे:दीड दिवस शाळेत जाऊन साहित्याचा सूर्य झालेला लोकशाहीर; जात, धन अन् धर्मदांडग्यांना आव्हान देणारा अण्णा धुरंधर-32; धीरूभाई अंबानी:गरिबीवर मात करत कोट्यवधी भारतीयांना मोठी स्वप्ने पाहण्याची प्रेरणा देणारे भारताचे एक अप्रतिम उद्योग रत्न धुरंधर-31; राजर्षी शाहू महाराज:अस्पृश्याला मानाचे पान अन् नांगरासाठी तोफा वितळवून लोखंड देणारे शाहू महाराज ग्रेट का होते? धुरंधर-30; चे गेव्हारा:अन्यायाविरोधात लढण्याची जिद्द जागवून अवघ्या जगातील क्रांतीचा चेहरा बनलेला तुमच्या 'T शर्ट'वरील क्रांतिदूत धुरंधर-29; संत कबीर:पैशांच्या मागे पळणाऱ्यांचा देव कसा? असा परखड सवाल करत समस्त मानवतेला साधेपणाचा संदेश देणारा महानायक धुरंधर-28; राणी चेन्नम्मा:स्वकियांची फंदफितुरी जमिनीत गाडून 1857 च्या सशस्त्र उठावापूर्वी इंग्रजांना धूळ चारणारी 'कर्नाटकची लक्ष्मीबाई' धुरंधर-27; अहिल्याबाई होळकर:न्यायबुद्धीने स्वतःच्या नवऱ्याला धारेवर धरत चोराच्याही पोटाचा प्रश्न सोडवणाऱ्या दूरदृष्टीच्या शासक धुरंधर-26; डॉ. जयंत नारळीकर:ब्रह्मास्त्र होते तर रामाच्या राज्यात वीज होती का? असा झोंबणारा प्रश्न करणारा भारताचा मराठमोळा शास्त्रज्ञ धुरंधर-25; मुथुलक्ष्मी रेड्डी:महिला हक्क अन् आईचे 'देवदासी'पण पाहून त्याविरोधात लढा पुकारणाऱ्या भारताच्या पहिल्या महिला आमदार धुरंधर-24; कुलदीपसिंग चांदपुरी:पाकच्या 2000 हून अधिक सैनिकांना 120 जवानांच्या बळावर धूळ चारणारा लढवय्या; '1971' ची अमर गाथा धुरंधर-23; चंद्रप्रभा सैकियानी:पडदा प्रथेवर लाथ घालून महिलांना आभाळ खुले करणारी आसामची हिरकणी; कुमारी माता झाली तरी डगमगली नाही धुरंधर-22; कर्मवीर भाऊराव पायगौंडा पाटील:महाराष्ट्राच्या मातीत शिक्षणाचा सूर्य पेरून उपेक्षितांच्या झोपडीत ज्ञानाचे पीक काढणारा खरा 'धुरंधर' धुरंधर-21; प्रबोधनकार ठाकरे:मराठी समाज मनात मोक्याच्या ठिकाणी पक्क्या गाठी मारून जातिभेदांच्या जखमांचा खोलवर शोध घेणारा बहुजन हिंदुत्त्ववादी धुरंधर-20; भीमराव रामजी आंबेडकर:चवदार तळ्याला ताळ्यावर आणणारा दलितोद्धारक अन् सामाजिक समरसतेचा खरा विवेकी शिल्पकार धुरंधर-19; जिगर मुरादाबादी:'शराब पीने दे मस्जिद में बैठ कर, या वो जगह बता जहाँ खुदा नहीं,' असे म्हणत मौलवींकडून टाळ्या पिटवून घेणारा सूफी शायर धुरंधर-18; आनंदीबाई जोशी:'पृथ्वीच्या पाठीवर हिंदुस्तान इतका दुसरा रानटी देश नाही', असे ठणकावून सांगणाऱ्या भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर धुरंधर-17; भगतसिंग:'बॉम्ब अन् पिस्तुले क्रांती आणत नाहीत, क्रांती लोकांच्या मनात जन्मते', असे ठामपणे सांगणारा 'शहीद ए आझम' धुरंधर-16; शहाजीराजे भोसले:छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याच्या संकल्पनेचे प्रेरणास्थान अन् बृहन्महाराष्ट्राची स्थापना करणारा धोरणी राजा धुरंधर-15; ई. व्ही. रामासामी:देव आहे हे सिद्ध करण्याचे आव्हान देत तर्कशुद्ध अन् निर्भय मतांद्वारे समाजात क्रांती घडवणारा भारताचा 'पेरियार' धुरंधर-14; कार्नेलिया सोराबजी:रूढी परंपरांना आव्हान देत शिक्षण, समानता अन् मानवी हक्कांसाठी अथक झगडणारी भारताची पहिली महिला बॅरिस्टर धुरंधर-13; खासेराव जाधव:बहुजन समाजाच्या खांद्यावरील निरक्षरतेचे 'जू' काढून त्यांना उच्च शिक्षणाच्या गंगेचे पाणी पाजणारा अवलिया धुरंधर-12; तंट्या भिल्ल:आदिवासींमध्ये राष्ट्रीयत्व जागवणारा 'रॉबिनहूड', थोर स्वातंत्र्यसैनिक; वाचा स्वातंत्र्य लढ्यातील संघर्षाचे सोनेरी पान धुरंधर-11; विठ्ठल सखाराम पागे:उकिरड्याला खरकटे माहिती नसल्याच्या काळात 'भूकबळी'वर नामी उपाय शोधणारा राजकारणी धुरंधर-10; मोहन हिराबाई हिरालाल:विनोबा भावेंचे 'सर्वायतन' नक्षलग्रस्त गडचिरोलीत रुजवणारा अन् गरिबांना लक्ष्मीदर्शन घडवणारा अवलिया धुरंधर-9; फातिमा शेख:सावित्रीमाईंची मैत्रीण अन् भारताची पहिली मुस्लिम शिक्षिका; फातिमा एक काल्पनिक पात्र होत्या का? तुम्हीच ठरवा धुरंधर-8; एकनाथ दगडू आवाड:बापाचा बुचडा कापून 'पोतराज' प्रथेवर घाव घालणारा पोरगा; कथित गुन्हेगारीने बदनाम झालेल्या बीडचा थोर माणूस धुरंधर-7; स्वामी विवेकानंद:मानवतेचा उत्कृष्ट प्रेमी, महान निधर्मी तत्ववेत्ता; नरेंद्रनाथ दत्त यांचे अखेरचे काही तास कसे होते? धुरंधर-6; कंदुकुरी वीरेशलिंगम पंथुलु:अंधश्रद्धेवर लाथ घालून विधवा पुनर्विवाह अन् ज्ञानाची वात पेटवणारा आंध्रचा 'लेखणी'सम्राट धुरंधर-5; भाऊराव कृष्णराव गायकवाड ऊर्फ दादासाहेब गायकवाड:दोन वेळा वाचवले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्राण धुरंधर-4; डॉ. विश्राम रामजी घोले:महिला उत्थानासाठी पेटून उठलेला सुधारक, ज्यांची 'बाहुली' ठरली स्त्री शिक्षणाची पहिली बळी धुरंधर-3; पार्वतीबाई आठवले:वैधव्य अन् परावलंबन दैवी भोग मानणारी, पण पोटच्या गोळ्याच्या काळजीने असामान्य झालेली एक निरक्षर स्त्री धुरंधर-2; बसव प्रेमानंद:अंधश्रद्धेच्या खाटेवर आजारी पडलेल्या समाजाला विज्ञानाचे औषध देऊन चमत्कारांची पुरती हवा काढणारा थोर दार्शनिक धुरंधर-1; नरहर अंबादास कुरुंदकर:विचारांची श्रीमंती वाढवणारा अन् आजच्या किर्र वैचारिक काळोखात प्रकाशवाट दाखवणारा थोर विचारवंत
Pune News : ७०० ग्रॅम ते १ किलो वजनाचा दुर्मिळ मासा पाहण्यासाठी गर्दी; निर्यात सुरू होईपर्यंत पुणेकर चाखणार परदेशी चव.
Khopoli News : नगररचना विभागाच्या चौकशीत २०२२-२३ मधील बनावट पावती घोटाळा उघड; बांधकाम परवानग्या तातडीने रद्द.
Pune News : फॅशनसाठी नव्हे, पॅशनसाठी काम करा! शेफ हेमंत ओबेरॉय यांचा विद्यार्थ्यांना मोलाचा सल्ला
Pune News : टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा ४४ वा पदवीदान समारंभ संपन्न; मुख्यमंत्री प्रमोद सावंत, शेफ हेमंत ओबेरॉय आणि ए. महेशकुमार रेड्डी यांना 'डी.लिट' पदवीने सन्मानित.
Maval News : सिलेंडरसाठी २० दिवस वेटिंग? मावळच्या शेतकऱ्यांनी शोधला जालीम उपाय; जाणून घ्या काय आहे?
Maval News : घरगुती गॅस सिलेंडरसाठी लांबच लांब रांगा आणि वाढत्या खर्चामुळे ग्रामीण भागातील नागरिक पर्यायी ऊर्जास्रोतांचा शोध घेत आहेत.
Balkrushna Nikam : प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित, मात्र जिल्ह्याच्या मंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे पाटण तालुक्यात नाराजीचा सूर.
आनंदी पालकत्व ; डाॅ. स्वाती गानूटीनएजर्स मुलांना संयम कसा शिकवाल?संयम हा एक चांगला गुण आहे, मात्र तो जन्मतःच नसतो. तो विकसित करावा लागतो. आजच्या वेगवान आणि ताबडतोब सगळं मिळणाऱ्या जगात टीनएजर्सना संयम ठेवणे कठीण जाते. अनेक मुलांना खूप वेळ रिझल्ट्सची वाट पाहणे, निराशा सहन करणे किंवा आपली पाळी येईपर्यंत थांबणे अवघड वाटते. पण ‘संयम’ खूप महत्त्वाचे जीवनकौशल्य आहे. संयम मुलाचं भावनिक आरोग्य टिकवायला, चांगले निर्णय घ्यायला आणि निरोगी नातेसंबंध ठेवायलामदत करतो.पालक म्हणतात, माझी मुलगी उतावळी आहे. माझा मुलगा फार हायपर आहे. जे हवे ते त्यांना ताबडतोब हवं असतं आणि हवंंच असतं. जरा म्हणून ऐकून घ्यायला, थांबायला तयार नसतात ही मुलं. कधी कधी तर वाटतं की हे उतावळेपण त्यांच्यामध्ये वारशातूनच आलंय अशी विधानेही पालकांकडून ऐकायला मिळत असतात.पालकांनो, मुलांना वेळेत संयम शिकवायला हवा. खरं म्हणजे मुलांकडे संयम नसतो असं नाही, मात्र अलीकडच्या काळात घरात एकुलतं एक मुल असल्याने मुलांना ओव्हर प्रोटेक्ट केलं जातं त्यांचं मन खूप जपलं जातं. मुलांच्या आवडीनिवडी लक्षात ठेवून पुरवल्या जातात. प्राधान्याने त्याच्यावर काम केलं जातं. त्यांना हव्या असलेल्या वस्तू मागणी होताच त्वरित घेऊन दिल्या जातात. त्यामुळे एखाद्या गोष्टीसाठी थांबायचं असतं, त्या वस्तूची मागणी करताना खरंच आपल्याला त्या वस्तूची गरज आहे का? आई-बाबा तेवढे पैसे खर्च करू शकतात का? किंवा मी थांबू शकतो का? हा सगळा सारासार विचार करणे यासाठी जो संयम हवा, तो खरोखरच मुलांना शिकवायला हवा.मुलांना हे सांगू या, की संयम म्हणजे काय असतो, तर शांतपणे वाट पाहायला शिकणं असतं. न चिडता, न रागावता, गिव्हअप न करता.मुलांनो तुम्ही संयमाने का वागायचं कारण जर तुम्हाला चांगल्या गोष्टी आयुष्यात मिळाव्या असं वाटत असेल, तर चांगल्या गोष्टींसाठी वेळ द्यावा लागतो. जसं आपण बी पेरलं, की एका रात्रीत रोप उगवत नाही. त्याला फुलं येत नाहीत किंवा फळं येत नाहीत आणि त्याचं झाड बहरून येत नाही. तसंच संयम म्हणजे बीचे फूल होऊ देण्यासाठी, वाढ होऊ देण्यासाठी थांबणं. मुलांना सांगावं लागेल, की संयमातून तुम्ही शिकता, की तुमची टर्न येणार आहे. तुमचा नंबर येणार आहे तोपर्यंत थांबायला हवं. संयम ठेवलात, की तुम्हाला तुमच्या स्वप्नांपर्यंत पोहोचायला मदत होते. संयम असला की तुम्ही शांत डोक्याने विचार करू शकता. तुमची सारासार विचार बुद्धी तुम्हाला वागताना, निर्णय घेताना मदत करते. कधी-कधी मुलांना गोष्टी ताबडतोब व्हाव्या असं वाटतं पण ते नॉर्मलच असतं. मात्र जेव्हा तुम्ही संयम ठेवायला शिकता, शांतपणे वेळ देऊन काम करता तेव्हा तुमचं हृदय मजबूत होतं आणि तुमचं मन शहाणपणाने विचार करतं.पालकांनो मुलांना संयम कसा शिकवता येईल ते पाहूया :१. स्वतः संयम दाखवामुलं मोठ्यांकडून पाहून खूप काही शिकतात. तुम्हाला तुमच्या मुलाने संयम शिकावा असे वाटत असेल, तर तुम्ही स्वतः तो पाळा. रांगेत थांबताना, एखादी अडचण आली तर किंवा ताण आला तरी शांत राहण्याचा प्रयत्न करा. तुमचं वागणं त्यांच्यासाठी उदाहरण असते. जेव्हा तुमचा संयम आजमावला जातो, तेव्हा त्याबद्दल मोकळेपणाने बोला. तुम्हाला कसं वाटतं आणि तुम्ही शांतपणे परिस्थिती कशी हाताळता हे सांगा. उदा. ट्रॅफिकमध्ये अडकला, उशीर झाला तरी शांतपणाने परिस्थिती हाताळता येते. न रागावता न चिडता थांबता येते.२. मुलांना सब्र का फल मीठा होता है! काही गोष्टी उशिरा मिळण्याची सवय लावा.पी हळद आणि हो गोरी असं एखाद्या गोष्टीबद्दल ताबडतोब फळ मिळेल अशी अपेक्षा करणं योग्य नाही. तर कष्ट केले तरी काही वेळाने फळ मिळेल हा विचार, दृष्टिकोन, संयमाशी जोडलेले आहे आणि आयुष्यात यश मिळवण्यासाठी महत्त्वाचे आहे. राग किंवा चुळबूळ करावीशी वाटत असेल, तर हळूहळू दीर्घ श्वास घ्या हेही सांगता येईल.उदा. एखादी खास वस्तू घेण्यासाठी पैसे साठवणे, बाग लावून तिची काळजी घेणे किंवा एखाद्या कौशल्यासाठी सातत्याने सराव करणे.३. शांत राहण्याचा सराव (माइंडफुलनेस)माइंडफुलनेस म्हणजे सध्याच्या क्षणावर लक्ष देणे. त्यामुळे घाईघाईने प्रतिक्रिया देणे कमी होते आणि भावना नियंत्रणात राहतात.मुलांना खोल श्वास घेणे, ध्यान करणे किंवा योगा करायला प्रोत्साहित करा. यामुळे प्रतिक्रिया देण्याआधी थांबून विचारकरण्याची सवय लागते.४. वास्तव ध्येय ठरवायला मदत कराध्येय ठरवणे आणि त्यासाठी मेहनत करणे यामुळे संयम शिकता येतो. पण ध्येय लहान टप्प्यांत विभागलेले असावे.मुलांसोबत लहान आणि मोठी ध्येये ठरवा. प्रत्येक छोट्या यशाचा आनंद साजरा करा. त्यामुळे त्यांना समजेल, की हळूहळू प्रगती करणे महत्त्वाचे आहे.५. थांबण्याच्या संधी द्याआजकाल सर्व काही लगेच मिळते, त्यामुळे मुलांना वाट पाहण्याची सवय नसते. त्यांना थोडा वेळ थांबावे लागेल अशा गोष्टी करा.उदाहरणे:कोडी सोडवायला लावा पण त्यात संयमाची गरज असते.स्वयंपाक-पदार्थ बनवताना त्या पदार्थासाठी सुरुवातीला लागणारी सगळी तयारी करणे संयम शिकवते. तसंच चिरणे, वाफवणे, या गोष्टींसाठी संयम ठेवावा लागतो.छंद-वाद्य वाजवणे, चित्रकला किंवा हस्तकला यासाठी सराव आणि वेळ लागतो.६. समस्या सोडवण्याची कौशल्ये शिकवाकाही वेळा गोष्टी मनासारख्या होत नाहीत म्हणून अधीरता येते. समस्या सोडवण्याची पद्धत शिकवल्यास मुलं शांत राहायला शिकतात.समस्या सोडवण्याची पद्धत :समस्या ओळखा - काय त्रास देत आहे ते स्पष्ट करा. उपाय सुचवा-वेगवेगळे मार्ग विचारात घ्या. पर्याय तपासा-प्रत्येक उपायाचे फायदे-तोटे पाहा. कृती करा-एक उपाय निवडून प्रयत्न करा. विचार करा-काय चांगले झाले, काय नाही ते बघा.७. संयमाचे कौतुक करामुलांनी संयम दाखवला, तर त्यांचे कौतुक करा. आधी लगेच प्रतिक्रिया देणारे मूल शांत राहिले तर त्याची दखल घ्या. मला माहीत आहे शांत राहणे वाट बघणं कठीण असतं, पण तू ते करून दाखवलंस असे मुलाला म्हणा. त्यांच्या भावना समजून घ्या. मुलांनी संयम दाखवल्यास त्यांना बक्षीसही देता येईल. बक्षीस मोठे असण्याची गरज नाही. कौतुकाचे शब्द किंवा छोटी विशेष परवानगीही पुरेशी असते. त्यामुळे त्यांना संयमाचे महत्त्व कळते.संयम हा जन्मजात गुण नसून सरावाने विकसित होणारे कौशल्य आहे. योग्य मार्गदर्शन आणि आधार दिल्यास किशोरवयीन मुले हळूहळू संयम शिकू शकतात. यामुळे ते आयुष्यातील आव्हानांना शांतपणे आणि विचारपूर्वक सामोरे जाऊ शकतात.किशोरवयीन मुलांना संयम शिकवण्यासाठी तुम्ही स्वतः शांत राहून उदाहरण द्या, त्यांना शांत राहण्याच्या सोप्या पद्धती शिकवा आणि थोडा वेळ थांबायला लावा. कंटाळा आला तर छंद लावायला सांगा, कामांसाठी टाइमर वापरायला सांगा आणि “मला आता राग येतोय” किंवा “मला अधीर वाटतंय” अशा भावना ओळखायला मदत करा.तुम्ही संयमाने वागलात, तर तुम्हाला जाणवतं की तुम्ही कणखर होऊ लागताय. जी मुलं संयमाने विचार करतात ते हिंमतवाले असतात आणि शहाणे असतात. संयम ठेवला तर तुम्ही राग आणि दुःखापासून लांब राहाल. आनंदी राहण्याची गुरुकिल्ली काय आहे तर संयम. त्यामुळे तुम्ही खूश राहाल, यशस्वी व्हाल. थांबणं म्हणजे वेळ फुकट घालवणं नाही, तर संयम म्हणजे जगण्यावर विश्वास ठेवणं असतं. हे मुलांना आवर्जून सांगा.
‘रूक जा रात, ठहर जा रे चंदा...’
नॉस्टॅल्जिया ; श्रीनिवास बेलसरेपूर्वी अनेक सिनेमा असे निघाले की त्यांनी प्रेक्षकांना ढसढसा रडवले होते. त्याची दोन कारणे होती. त्याकाळी लोक कथेत रंगून जात, कथेतील पात्रांच्या जीवनाशी समरस होत आणि बहुतेकदा कथानक लोकांच्या भावविश्वाशी जुळणारेच असायचे. हल्लीसारखे मोठमोठे गँगस्टर्स, दक्षिण भारतातील सिनेमासारखे राजकारणातील कुटील गुंड, त्यांचे उद्योग, कोणतेही नितीमुल्ये न मानणारे नवे स्वच्छंदी जग आणि त्यातल्या बेधुंद तरुणतरुणी, पोलीस-कम-गुन्हेगार, मनोविकृत खुनशी, हिंसक व्यक्ती यांचे जीवन दाखवून त्यांचे उदात्तीकरण करणाऱ्या कथा लोकप्रिय होण्याचा तो काळ नव्हता.दुसरी गोष्ट म्हणजे निर्मातेसुद्धा केवळ दोन घडीचे मनोरंजन हे एकमेव उद्दिष्ट ठेवून कलानिर्मिती करण्यासाठी अगतिक झालेले नव्हते. सिनेमा चालेल की नाही? ही भीती नसल्याने आदर्शवादी कथानक असलेल्या सिनेमासाठीसुद्धा निर्माते मिळायचे आणि प्रेक्षकही मिळायचे. त्यामुळे कवी, संगीतकार, लेखक, समाजसुधारक, बेकार तरुण, गरीब शेतकरी, तत्त्वनिष्ठ जेलर, ध्येयवादी शिक्षक असेही लोक कथेचे नायक होऊ शकत.आज ज्या क्षेत्रात कोणतेच नैतिक मूल्य न पाळता केवळ पैसा हेच दैवत मानले जाते, त्या वैद्यकीय व्यवसायातही केवळ रुग्णांची सेवा हेच कर्तव्य मानून आयुष्य वेचणारे डॉक्टरही कथानायक होऊ शकत. असाच नायक असलेला ‘दिल एक मंदीर.’ आला १९६३ ला. राजकुमार (राम), राजेंद्रकुमार (डॉ. धर्मेश) आणि मीनाकुमारी (सीता) यांच्याबरोबर शुभा खोटे, अचला सचदेव, कुट्टी पद्मिनी आणि मेहमूद हे कलाकार होते. दिल एक मंदिरची कथा हा एक प्रेमाचा त्रिकोण होता. सी. व्ही. श्रीधर यांनी त्यांच्याच ‘नेंजील ओर आलयम’ या १९६२ सालच्या तमिळ नाटकावर बेतलेला हा सिनेमा केवळ २७ दिवसांत पूर्ण झाल्याने एक विक्रमच निर्माण करून गेला. मीना कुमारी खास या सिनेमासाठी सितार वाजवायला शिकली.शंकर-जयकिशन यांचे संगीत असलेली सर्व गाणी अत्यंत लोकप्रिय झाली. हसरत जयपुरींचे ‘दिल एक मंदिर हैं’ हे जोगिया रागात बसवलेले गाणे, तर वार्षिक बिनाका गीतमालात दुसऱ्या क्रमांकावर गाजले. ‘रूक जा रात ठहर जा रे चंदा’ हे शैलेंद्रचे गीतही वर्षभरात वाजलेल्या १९२ हिट गाण्यात २१व्या क्रमांकावर वाजले. सिनेमाने एकूण ८ फिल्मफेयर पुरस्कारांसाठी नामांकन आणि राजकुमारला ‘सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्याचे’ तर अर्जुनदेव रष्क यांना ‘सर्वश्रेष्ठ संवादलेखनाचे’ फिल्मफेयर पारितोषिक मिळवून दिले.स्व. इंदिराजींनी राजेंद्रकुमार, कुट्टी पद्मिनी आणि मीनाकुमारीचा त्यांच्या निवासस्थानी बोलावून सत्कार केला होता. सिनेमा भारतीय सिनेसृष्टीने इतका पसंत केला की अगदी अलीकडे जसे त्याचे रिमेक ‘आयी तेरी याद’(१९८०), ‘अरमान’(२००३) आले तसेच पूर्वी ‘मनसे मंदिरम’ (तेलगू १९६६), ‘कुकुंम रक्षी’ (कन्नड १९७७), हृदयम ओरू क्षेत्रम (मल्याळम १९७८) या दक्षिण भारतीय भाषांतही निघाले होते.डॉ.धर्मेश (राजेंद्रकुमार) एक सेवाभावी डॉक्टर आहे. त्याचे सीतावर (मीनाकुमारी) निस्सीम प्रेम आहे; परंतु तिचा विवाह रामशी (राजकुमार) होतो. रामला कर्करोग झाल्याने तो उपचार घेण्यासाठी योगायोगाने डॉ. धर्मेश यांच्या दवाखान्यात दाखल होतो. जवळजवळ सगळी कथा या दवाखान्यातच घडते.डॉ. धर्मेश त्याच्या इतर डॉक्टर मित्रांशी रामाच्या केसबद्दल चर्चा करतो. रामचा कर्करोग खूप खोलवर गेलेला असल्याने शस्त्रक्रिया अटळ असते. त्यावेळी सीताला तिच्या धर्मेशशी असलेल्या पूर्वीच्या प्रेमाच्या पार्श्वभूमीमुळे अनेक अभद्र शंका येऊ लागतात, मात्र धर्मेश तिला ‘मी रामला वाचवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करेन’ असे आश्वासन देतो. तो ते पाळतोही; परंतु त्या केसवर खूप अभ्यास केल्याने शस्त्रक्रियेच्या दिवसापर्यंत तो प्रचंड थकून गेलेला असतो.रामवरची शस्त्रक्रिया यशस्वी होते. तो आनंदाने ही बातमी सीताला सांगतो आणि परत जात असताना मध्येच कोसळतो. अतिश्रमाने त्याला हृद्यविकाराच्या झटका आलेला असतो. त्यातच त्याचा मृत्यू होतो अशी ही टोकाची शोकांतिका!शस्त्रक्रियेपूर्वीच्या एका भावुक प्रसंगाच्या वेळी रामला आपण या भयंकर रोगातून जिवंत वाचू अशी अजिबात खात्री वाटत नसते. आता आपले आयुष्य संपणार. सीताबरोबरचे सहजीवनही संपुष्टात येणार असे मनाला उद्विग्न करणारे विचार मनात फेर धरू लागलेले असतानाच तो परिस्थितीला धीरोदात्तपणे सामोरे जायचा निर्णय घेतो. एका भावुक क्षणी तो तिला विनंती करतो. ‘मी यातून वाचेन आणि आपली पुन्हा भेट होईल की नाही हे मला माहीत नाही. पण आज तू आपल्या लग्नाच्या दिवशी केला होतास तसा वेश करून माझ्याजवळ थोडा वेळ बस.’ त्याने त्याच आठवणीसह जग सोडून जायची मनाची तयारी केलेली असल्याने त्याची ही भाबडी विनंती असते.त्या अत्यंत करुण प्रसंगासाठी शैलेंद्र या मनस्वी कवीने लिहिलेल्या गाण्याने प्रेक्षकांच्या अनेक पिढ्यांना अक्षरश: ढसढसा रडवले. कुणालाही भावुक करणारे शैलेंद्रचे ते शब्द होते-“रूक जा रात ठहर जा रे चंदा,बीते ना मिलनकी बेला.आज चांदनीकी नगरीमे,अरमानोंका मेला.रूक जा रात...”जसे रामला वाटते की, ही आपल्या जीवनाची शेवटची रात्र आहे. तशीच भयानक शंका सीतालाही भेडसावते आहे. पण तिच्या मनात अंधुक अशा आशाही दाटलेल्या आहेत. काहीतरी चमत्कार होईल आणि आपले सौभाग्य सुरक्षित राहील असेही तिला वाटते. मनातून ती त्या भयानक रात्रीला, जणू कालचक्रालाच विनंती करते, की तू कृपा करून थांब. माझ्या जीवलगाबरोबरच्या सहवासाची ही रात्र अखेरची ठरू देऊ नकोस.’रामने सांगितल्याप्रमाणे त्यांच्या मिलनाच्या वेळच्या पहिल्या रात्रीचा वेश करून, मीनाकुमारी इच्छेविरुद्ध सजून आलेली आहे. तिच्याही मनात हातातून निघून चाललेल्या आयुष्याच्या आठवणी दाटल्या आहेत. आपल्या पतीशी मिलनाची ती पहिली रात्रच परत आलेली आहे असा तिला भास होतो. त्याच रात्रीच्या चांदण्या आज पुन्हा आपल्याप्रेमाच्या कथा सांगत आहेत असे तिला वाटते-“पहले मिलनकी यादे लेकर,आयी हैं यह रात सुहानी.दोहराते हैं फिर यह सितारे,मेरी तुम्हारी प्रेम कहानी.रूक जा रात ठहर जा रे चंदा...”कितीही आशा धरली तरी सीताच्या मनातून पतीच्या मृत्यूची भीती जात नाही. ती पतीलाही पुन्हापुन्हा आश्वासन देऊन सांगू इच्छिते, ‘जरी शरीरे दोन असली तरी आपली मने एकच आहेत. जीवलगा, मी सतत तुझ्याबरोबर असणार आहे. केवळ या जीवनात नाही तर मृत्यूनंतरही मी तुझ्याबरोबर असेन.’“कलका डर ना कलकी चिंता,दो तन हैं मन एक हमारे.जीवन सीमाके आगे भीआऊंगी मैं संग तुम्हारे...”मनस्वी प्रेमाच्या अशा जुन्या कथा संवेदनशील मनांना नक्कीच अस्वस्थ करतात. हे गाणे आणि तो प्रसंग इतका करुण आहे की प्रेक्षक दोघांच्याही भावनांशी अगदी समरस होऊन जातात. डोळ्यांत अश्रू दाटल्याशिवाय राहत नाहीत.मास कम्युनिकेशनमधील ‘कॅथार्सिस थियरी’ (मानवी भावनांच्या विरेचनाची गरज) लक्षात घेता मनाच्या निकोप वाढीसाठी अशा कथानकांचीसुद्धा एक गरज असतेच.
संवाद ; गुरुनाथ तेंडुलकरअलीकडेच मी एक व्हिडीओ पुन्हा एकदा नव्याने पाहिला. जगद्विख्यात गायिका आशा भोसले यांच्या नव्वदाव्या वाढदिवसाचं औचित्य साधून दुबईत एक भव्य कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमाचा व्हिडीओ..... यूट्यूबवर हा व्हिडीओ उपलब्ध आहे. तुम्ही देखील तो व्हिडीओ आवर्जून पाहा. त्या कार्यक्रमात आशाताईंनी अनेक नवी-जुनी गाणी स्वतः गाऊन उपस्थितांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला आहे. अगदी ‘दम मारो दम’पासून ते ‘पिया तू अब तो आजा’पर्यंत आणि ‘हंगामा हो गया’पासून ते ‘कभी अलविदा ना कहना’ पर्यंत अनेक गाणी त्या पूर्ण जोमात आणि जोशात गायल्या आहेत.हा कार्यक्रम पाहताना आशाताईंच्या चेहऱ्यावरचे भाव, गाताना त्यांनी धरलेला पायाचा ठेका आणि हालचालीतली सहजता पाहून यांचं वय नव्वद झालं हे सांगून देखील खरं वाटलं नाही. आशाताईंचा हा नव्वदीचा कार्यक्रम पाहताना माझ्या मनात एक विचार आला. केवळ वय वाढलं म्हणून माणसाला म्हातारपण येत नाही. केवळ वय वाढलं म्हणून माणसाचं तारुण्य सरत नाही. तारुण्य आणि वृद्धत्व ही केवळ मनाची अवस्था असते.कुठं असतं हे तारुण्य?तारुण्य तिथं असतं जिथे प्रगल्भता आणि अवखळपणा दोन्हीही एकत्र नांदतात. तारुण्य तिथं असतं जिथे जोम, जोश आणि उत्साह असतो. तारुण्य तिथं असतं जिथे धमन्यांतून वाहणारं रक्त कायम गरम असतं. तारुण्य तिथं असतं जिथं फुलं पाहून ओठावर हास्य उमलतं आणि मोरपिसाच्या स्पर्शानं अंग रोमांचित होतं. तारुण्य तिथं असतं जिथं अन्याय पाहिला की हाताच्या मुठी वळतात आणि ओठ दाताखाली मुडपला जातो. तारुण्य तिथं असतं जिथं डोक्यात व्यवहाराची गणितं असतात, पण मनात मात्र कविता फुललेली असते. तारुण्य तिथं असतं जिथं मंदिरातली आरती ऐकून हात टाळ्या पिटतात आणि लेझीम-ढोलाचा नाद कानात घुमला की पाय त्या ठेक्यावर ताल धरतात. तारुण्य तिथं असतं जिथं डोळ्यांत भावुक स्वप्नं असतात आणि गात्रांत थरात असतो.तारुण्य तिथं असतं जिथं चित्तात शुभसंकल्प धारण केले जातात आणि ते सिद्धीस नेण्याची जिद्द असते. तारुण्य तिथं असतं जिथं भूतकाळाचं ओझं न बाळगता भविष्यकाळाचं स्वागत करण्याची वृत्ती असते.माणसाचं तारुण्य हे त्याच्या वयावर कधीही अवलंबून नसतं. ती मनाची एक अवस्था असते. ती एक वृत्ती असते. वय काय ते तर वाढतच असतं. दररोज सकाळी उगवलेला सूर्य संध्याकाळी मावळतो. कॅलेंडरवरची तारीख बदलते. वर्ष सरलं की कॅलेंडरसुद्धा बदलते. सरलेल्या प्रत्येक दिवसागणिक आपलं वय वाढतच जातं. ते वाढणारच असतं. पण वय वाढलं तरी वय होऊ न देणं मात्र आपल्या हातात असतं. ‘वय वाढणं.’ आणि ‘वय होणं.’ या दोन्ही गोष्टी सर्वस्वी भिन्न आहेत. मनाची योग्य जोपासना केली की माणूस अखेरच्या श्वासापर्यंत तरुण राहू शकतो. त्यासाठी जीवनाकडे पाहण्याचा निकोप आणि आशादायक दृष्टिकोन ठेवायला हवा. सौंदर्यग्राही वृत्ती तसंच उत्कट भावनाशीलतादेखील जपायला हवी.याच चिरतारुण्यावर आधारित सुप्रसिद्ध आत्माराम रावजी देशपांडे उर्फ कवी अनिल यांची चिरयौवन... ही कविता मला एस.एस.सी.च्या मराठी क्रमिक पुस्तकात होती. प्रत्येकवेळी ही कविता वाचताना मनाला एक वेगळाच आनंद लाभतो. अनिलांची ही कविता म्हणजे मराठी कवितेच्या विश्वातील एक चिरतरुण कविता मानली जाते.चिरयौवनफिरून वर्षचक्र हे पुढे पुढेच जातसेविशी तिशी नि चाळिशीहि लोटली जरी दिसेअसे तरीहि गोठली न जीवनातली उषातशाच रंगसंगतीत वृत्ती गुंतती तशाअजून ऊन रक्त हे भरे नसानासातुनीतसाच रोमहर्ष आणि अंग ये थरारूनीविरक्ति ? छे.... सदानुरुक्ति... भक्ति प्रेमभक्त मीतरंगऊर्मि प्रीतिच्या अजून यौवनात मीअजून यौवनात मी नि दंग जीवनात याप्रसादही प्रमादही प्रमोद आणखी दयाविचार आणखी विकार भावनांत पाझरेमधू न त्यातला सरे म्हणे न मीहि त्या पुरेअरे कशास जीवना विचार आणसी मनाउदंड पाज आजची उद्यचि तीही आण नापुरे भरावयास पात्र हे नको करू कमीतिथे सदा अतृप्त मी अजून यौवनात मीअजून यौवनात मी मुले फुले सभोवतीविकासती विलासती हसून हासवीत तीप्रलोभनात प्रीतिच्या कुणी हसे झुरे तिथेतिथे सखे नि सोबती कुणी इथे कुणी तिथेप्रसन्न चित्त हासते बघुनिया मजेस त्यामुलात मूल होत मी फुलांत भृंग होत त्याभरीत रंग बैठकीत स्नेह सोबतीत मीप्रियेस प्रेम होत मी अजून यौवनात मीअजून यौवनात मी जगात जागत्या अशाजगावयास गावया पहावया उषा निशाइथे निसर्गचारुता इथे प्रयत्न मानवीउचंबळोनि वृत्ती ये उमेद घेऊनी नवीविवर्त भ्रांति भास हा अशा जगा म्हणो कुणीमला इथेच सत्य ते दिसे पटे क्षणोक्षणीविकासलेच ब्रह्म है, न जीवबंधनात मीनसे मुमुक्षु, मुक्त मी अजून यौवनात मीकवी : अनिलकवितासंग्रह पेर्ते व्हा
Mulshi News : मुळशीत शेतकरी आक्रमक! मोकाट जनावरांचा बंदोबस्त करा, अन्यथा मुळा नदीत घेणार ‘जलसमाधी’
Mulshi News : रात्रीच्या वेळी शेतात शिरणाऱ्या हिंस्त्र वळूंच्या हल्ल्याची भीती; जीव मुठीत धरून शेतकरी राखताहेत आपली पिके.
Ambegaon Crime : वनविभागाच्या पथकाकडून गोहे खुर्द आणि महाळुंगे परिसरातून अवैध लाकूड साठा जप्त; तपासात धक्कादायक माहिती समोर.
Ranjangaon MIDC : सहाय्यक कामगार आयुक्तांच्या उपस्थितीत औद्योगिक पट्ट्यात तपासणी; कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासनाचे पाऊल.
Bus Fire News : पुण्याहून नागपूरकडे जाणाऱ्या बसचे भीषण अग्निकांड; बघ्यांच्या गर्दीमुळे दोन तास महामार्गाची वाहतूक विस्कळीत.
विशेष; मीनाक्षी वैद्यहिंदू पंचांगानुसार चैत्र शुद्ध प्रतिपदेला येणारा हा नववर्षाचा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा. अनेक औचित्य असणारा हा सण दारात उभा आहे. हल्ली अशा प्रसंगी आनंदाचे शिखर गाठताना ग्राहक व्यवसायवाढीसाठी आखल्या जाणाऱ्या धोरणाच्या शृंखलेत असा अडकतो की, पुढे हप्ते फेडणे कठीण होते. सण जोशात साजरा व्हावा, पण सणांबरोबर रूढ होऊ लागलेले जोरदार खरेदीसारखे नवे प्रघात काळजीपूर्वक अंगीकारण्याची गरज जाणवते.आपण भारतीय प्रत्येक सणाचे फार धुमधडाक्यात स्वागत करतो. भारतीयांना सण साजरे करायला फार आवडतात. सणासुदीला काय काय करायचे, याचे इमले सगळेजण सणाआधीच बांधायला सुरुवात करतात. हिंदू पंचांगानुसार चैत्र शुद्ध प्रतिपदेला येणारा हा नववर्षाचा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा. महाराष्ट्रात गुढीपाडवा हा सण जल्लोषात साजरा केला जातो. दारासमोर बांबू उभारल्यानंतर घरचा गृहस्थ त्या बांबूला रेशमी वस्त्र गुंडाळतो. त्याला आंब्याचे तोरण, कडुलिंबाची डहाळी, साखरेची गाठी आणि फुलांचा हार घालून त्यावर चांदीचा, तांब्याचा किंवा स्टेनलेस स्टीलचा तांब्या पालथा घालून त्या थांब्यावर कुंकवाने स्वस्तिक काढतो. गुढी उभारण्यापूर्वी गृहिणी जागा स्वच्छ करून रांगोळी काढते. भारतातील कोणत्याही प्रांतात गेलो तरी मंगल प्रसंगी गृहिणीने घरासमोर रांगोळी काढणे आणि पारंपरिक पद्धतीने गृहस्थ आणि गृहिणीने वेशभूषा करणे ही परंपरा आपल्याला दिसून येते. गुढी उभारल्यानंतर कडुलिंबाची पाने आणि गूळ यांचा नैवेद्य दाखवला जातो. गुढीसमोर याच पदार्थांचा नैवेद्य का दाखवायचा, यावर विचार केल्यावर लक्षात आलं की, आपल्या पूर्वजांनी किती दूरदृष्टी ठेवून हा नैवेद्य ठेवला. चैत्र महिना ऋतूबदलाचा असतो. या बदलामुळे शरीरात काही बिघाड होऊन त्रास होऊ नये म्हणून कडुलिंबाची पानं आणि गूळ यांचं सेवन करायला सांगितलं आहे. माणूस अतिशय शंकेखोर स्वभावाचा असतो. प्रत्येक गोष्टीत शंका व्यक्त करण्याची त्याला सवय असते. ही सवय आपल्या पूर्वजांच्या लक्षात आली म्हणूनच त्यांनी गुढीसमोर नैवेद्य म्हणून कडुलिंबाची पानं आणि गूळ ठेवण्याची परंपरा सुरू केली.नैवेद्य म्हटलं की माणूस सेवन करण्यास नकार देत नाही. नैवेद्य त्याच्याही नकळत ऋतुबदलाने होणाऱ्या त्रासापासून वाचवतो. कडुलिंबाची पानं खाल्याने आरोग्य उत्तम राहतं. शरीरातील क्षार बाहेर फेकले जातात. गुळामुळे शरीरातील हिमोग्लोबिन वाढते. गुढीपाडवा महाराष्ट्राबाहेरही साजरा केला जातो. त्याचे नाव आणि सण साजरा करण्याची पद्धत वेगळी आहे. काश्मीरमधील हिंदू समाज हा दिवस ‘नवरेह’ म्हणून साजरा करतो. हा दिवस काश्मिरी पंचांगानुसार नववर्षाचा प्रारंभ असतो. चैत्र महिन्यात काश्मीरमध्ये निसर्गरम्य वातावरण निर्माण झालेले असते. वसंत ऋतू काश्मीरमध्ये अगदी हळुवारपणे पाऊल ठेवतो आणि सगळीकडे उत्साहाचा, फुलांचा, सुखद हवामानाचा वर्षाव होतो. त्यामुळे ‘नवरेह’ हा निसर्गाशी संवाद साधणारा आणि आत्मपरीक्षणाचा दिवस मानला जातो. येथे गुढी उभारण्याची परंपरा नसली तरी प्रतिकात्मक विधींमधून नववर्षाचा अर्थ अधोरेखित केला जातो. नवरेहच्या पूर्वसंध्येला घरातील ज्येष्ठ स्त्री किंवा कुटुंबप्रमुख एका ताटात तांदूळ, नाणी, पंचांग, देवप्रतिमा, दही, फुले, पुस्तक किंवा लेखणी अशा वस्तू ठेवतात. पहाटे कुटुंबातील सदस्य सर्वप्रथम त्या ताटातील वस्तू पाहतात. या प्रतिकांमधून वर्षभरातील समृद्धी, ज्ञान, अन्नधान्य आणि आर्थिक स्थैर्याची अपेक्षा व्यक्त केल्या जाते. काश्मीरमध्येही तिथले लोक पारंपरिक पद्धतीने वेशभूषा परिधान करून या दिवसाचे स्वागत करतात. तेथे या दिवशी मंदिर दर्शन केले जाते, मंदिरात विशेष प्रार्थना केली जाते तसेच पारंपरिक भोजनाची तयारी केली जाते.चैत्र महिना अलगद येताच उत्तर भारतात नवरात्राची सुरुवात होते. या दिवशी ‘घटस्थापना’ केली जाते. घरात किंवा मंदिरात पवित्र कलश स्थापित करून देवीची उपासना आरंभ केली जाते. नवरात्रीतील नऊ दिवस उपवास केला जातो. या नऊ दिवसांमध्ये भजन-कीर्तन आणि धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते. त्यामुळे उत्तर भारतात एक भारावलेलं वातावरण तयार होतं. चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस शक्तीच्या उपासनेचा आणि आध्यात्मिक शुद्धीचा प्रारंभ मानला जातो. उत्तर भारतात महाराष्ट्राप्रमाणे गुढी किंवा ध्वज उभारण्याची परंपरा नाही. नववर्षाचे स्वागत करण्यासाठी सामूहिक पूजा आणि मंदिरांमधील विशेष कार्यक्रमांमधून नववर्षाचे स्वागत केले जाते. काही ठिकाणी मेळावे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन केले जाते. उत्तर भारतात या वेळी गोड प्रसाद, पुरी-भाजी किंवा काला चना यासारखे पदार्थ नैवेद्य म्हणून दिले जातात. चैत्र हा रब्बी पिकांच्या कापणीचा काळ असतो. गहू, हरभरा आणि इतर पिकांचे उत्पादन शेतात तयार होते. त्यामुळे ग्रामीण समाजासाठी हा आनंदाचा क्षण असतो. निसर्गातील नवपालवी आणि फुलांचा बहर नववर्षाच्या आशावादाशी जोडला जातो. भारतीय कालगणना निसर्गचक्राशी निगडित असल्याचे आपल्याला या सणांमधून दिसून येते. हा सण नेमका कधीपासून सुरू झाला असेल याचा मागोवा घेतला, तर सर्वप्रथम ब्रह्मदेवांचं नाव समोर येतं. पुराणातील संदर्भानुसार या दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली, अशी मान्यता आहे. त्यामुळे चैत्र प्रतिपदा ही कालगणनेचा आरंभबिंदू मानली जाते. दुसरा बिंदू रामायणकाळाशी जोडला जातो.रामायणकालीन घटना तपासता लक्षात येते की, श्री प्रभू रामचंद्र यांनी रावणाचा वध केल्यानंतर सीता, लक्ष्मण आणि हनुमान यांच्यासह पुष्पक विमानाने अयोध्येला परतले. श्री रामचंद्रांच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी आणि त्यांचे भव्य स्वागत करण्यासाठी घरोघरी गुढी उभारली गेली आणि पताकांनी सगळी अयोध्यानगरी सजवली गेली. या नववर्षाच्या स्वागताचा तिसरा बिंदू शककालाशी जोडला जातो. शालिवाहन शकाची सुरुवातही चैत्र प्रतिपदेला झाल्याचे मानले जाते. या दिवसापासून शालिवाहन शक सुरू झाले. चैत्र प्रतिपदेला अशा तिन्ही बिंदूंनी मान दिला आहे. भारतात साजरे होणारे सण आणि भारतीय अर्थव्यवस्था यांचं गुणोत्तर सणांवर बरंच अवलंबून असतं. सण आले की निगडित वस्तूंनी बाजारपेठ फुलून येते. याचे उत्तम उदाहरण म्हणजेे गणेशोत्सव आणि दिवाळी. हे मुख्य सण आहेत. इतर बारीकसारीक सणांचाही बाजारपेठेवर परिणाम होत असतो. सणासुदीला अनेक तात्पुरते रोजगार निर्माण होत असतात. सणांच्या काळात खरेदी करण्याची मानसिकता वाढते. गुढीपाडवा हा ‘शुभारंभ’ मानला जात असल्याने माणूस अनेकदा मोहात पडून गरजेची नसलेली पण हवी असलेली वस्तू विकत घेतो. या वस्तू त्याने विकत घ्याव्यात म्हणून वेगवेगळे उत्पादक सवलतीचे आमिष दाखवून त्यांची क्रयशक्ती वाढवून बचत कमी करतात पण हे लोकांच्या लक्षातच येत नाही. या अानुषंगाने काही पथ्ये आणि तथ्ये आजघडीला समजून घेणे गरजेचे आहे.सणासारख्या प्रसंगी आनंदाचे शिखर गाठण्यासाठी ग्राहक नको त्या व्यापारी मोहजालात फसतो. त्याने केलेली खरेदी ही कंपनीचा तात्पुरता वाढलेला व्यवसाय दाखवते, पण कंपनीने व्यवसायवाढीसाठी आखलेल्या धोरणाच्या शृंखलेत ग्राहक असा अडकतो की पुढे हप्ते फेडणे कठीण होते आणि ग्राहक स्वतःच्या बचतीला स्वतःच गळती लावतो. सण साजरा करणं वाईट नाही, पण सणाचा मान राहील अशा पद्धतीने साजरे करायला हवेत. या सणामुळे अनेक लहान-मोठे रोजगार निर्माण होतात. त्यामुळे बरेचजण आपली क्रयशक्ती वाढवण्याचा प्रयत्न करतो. ती खोटी क्रयशक्ती व्यावसायिक वेगवेगळ्या प्रलोभनाद्वारे ग्राहकांच्या गळी उतरवतात. आजकाल ईकॉमर्स, डिजिटल मार्केटिंगमुळे खरेदी खूपच सुलभ झाली आहे. ती खरंच सुलभ झाली आहे की आपल्या डोळ्यांसमोर चुकीच्या पद्धतीने माहिती ठेऊन ती सुलभ झाल्याचे व्यापारी आपल्या मनावर ठसवतात याचा विचार ग्राहकाने करायला हवा. सणाचं पावित्र्य बाजूला सारून आपल्या मनातील इच्छांच्या बाजारीकरणाला आपल्याही नकळत मदत होते आहे का, हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. आजकाल बाजूच्या घरात असलेल्या वस्तूंची बरोबरी करून तीच वस्तू आपल्या आवाक्यात नसताना खरेदी करण्याची लालसा वाढत चालली आहे. व्यावसायिक याचा सहज फायदा घेतात. या पार्श्वभूमीवर गुढीपाडवा साजरा करताना सणाचे पावित्र्य, औचित्य जपणे महत्त्वाचे ठरते. सणांना नव्या काळात नवी झळाळी लाभत असताना जरूर अनुसरावी, पण ‘जुने ते सोने’ का मानले जाते, हे समजून घ्यायचीही तयारी असायला हवी.
सुरक्षित उत्पादने, आश्वस्त ग्राहक
ग्राहक दिन ; स्नेहल नाडकर्णीमाणसाचं समाधान वाढण्याऐवजी अपेक्षा वाढतात तेव्हा तो अधिक भौतिक सुखं मिळवण्याच्या मागे लागतो. अर्थात माणसाने असमाधानी राहण्यात कंपन्यांचा फायदाच असतो. कंपन्या सातत्याने जाहिरातबाजी करतात अन् सामान्य माणूस त्याला बळी पडतो. सुखाच्या मागे धावता धावता मानसिक असुरक्षितता, फसवणूक मात्र वाट्याला येते. तेव्हा ग्राहक हिताची पायमल्ली झाल्याची जाणीव माणसाला होते. अशा वेळी माणूस ग्राहक संरक्षण कायद्याचा आधार शोधतो.अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांनी १५ मार्च १९६२ रोजी अमेरिकन काँग्रेसमध्ये ग्राहकांच्या हक्कांवर ऐतिहासिक भाषण केले आणि ग्राहक हक्कांना अधिकृत मान्यता देणारे ते पहिले जागतिक नेते ठरले. त्यानुसार जगभरात सर्वप्रथम अमेरिकेतील नागरिकांना ग्राहक हक्क लाभले. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन १९८३ मध्ये पहिला जागतिक ग्राहक दिन साजरा करण्यात आला. तेव्हापासून दरवर्षी १५ मार्च रोजी जगभरात जागतिक ग्राहक दिन साजरा केला जातो.‘आंतरराष्ट्रीय ग्राहक संघटने’च्या (कन्झ्युमर इंटरनॅशनल) चळवळीमुळे १९८५ मध्ये संयुक्त राष्ट्राची ग्राहक संरक्षण मार्गदर्शक तत्त्वे अस्तित्वात आली. त्या आधारे २४ डिसेंबर १९८६ मध्ये भारतात ग्राहक संरक्षण कायदा अस्तित्वात आला. ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत भारतीय ग्राहकांना पुढील ६ अधिकार देण्यात आले आहेत.१. माहितीचा अधिकारप्रत्येक ग्राहकाला कोणत्याही उत्पादनाची किंवा सेवेची शुद्धता, किंमत आणि गुणवत्ता याबाबत माहिती विचारण्याचा पूर्ण अधिकार आहे.२. निवडीचा अधिकारग्राहकाला आपल्या इच्छेनुसार कोणतीही वस्तू किंवा सेवा निवडण्याचा अधिकार आहे. दुकानदार कोणत्याही ग्राहकाला एखादे विशिष्ट उत्पादन घेण्यास भाग पाडू शकत नाही.३. सुरक्षिततेचा अधिकारग्राहकांना सुरक्षित उत्पादने आणि सेवा मिळणे, हा त्यांचा अधिकार आहे.४. ग्राहक शिक्षणाचा अधिकारग्राहकांना त्यांच्या हक्कांविषयी जागरूक करण्यासाठी सरकारने वेळोवेळी ‘जागो ग्राहक जागो’ सारख्या उपयुक्त मोहिमा राबवाव्यात.५. मत ऐकले जाण्याचा अधिकारजर कोणत्याही ग्राहकासोबत अन्याय झाला असेल तर ग्राहकाला त्याविरुद्ध आवाज उठवण्याचा पूर्ण अधिकार आहे.६. निवारण मिळविण्याचा अधिकारग्राहक न्यायालयामध्ये आपली बाजू मांडून न्याय मिळविण्याचा अधिकार ग्राहकाला आहे.भारतात अधिक ग्राहकाभिमुख आणि विस्तारीत ग्राहक संरक्षण कायदा २०१९ लागू करण्यात आला आहे. ‘उत्पादन दायित्वा’चे प्रकरण समाविष्ट करून या कायद्यांतर्गत ग्राहकांना अधिक संरक्षण देण्यासाठी दोषपूर्ण उत्पादने किंवा सेवांमुळे ग्राहकांना होणारे नुकसान, वैयक्तिक दुखापत किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्यास उत्पादक, विक्रेते आणि सेवा प्रदाते भरपाई देण्यास जबाबदार असतात.सुरक्षित उत्पादनांसाठी, बाजारपेठेतील गैरव्यवहार आणि ग्राहकांच्या हक्कांचे उल्लंघन करणाऱ्या सामाजिक अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी जागतिक आणि स्थानिक पातळीवरून काय केले पाहिजे याचे मार्गदर्शन करण्यासाठी ‘कन्झ्युमर इंटरनॅशनल’ ही ग्राहक शिखर संघटना काम करत असते. या संघटनेचे जवळपास १०० देश आणि २०० ग्राहक संघटना सभासद आहेत. ही संघटना ग्राहक हितरक्षणार्थ वेगवेगळे विषय विचारात घेऊन प्रत्येक वर्षाची विशिष्ट संकल्पना जाहीर करते. यामुळे ग्राहकांचे लक्ष महत्त्वाच्या मुद्द्यांकडे जाऊन त्यांच्यात जागरूकता निर्माण होते. जागतिक डिजिटल बाजारपेठेत, ग्राहकांचा विश्वास आणि जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारी उत्पादन सुरक्षा ही वेगाने निर्माण होणारी एक गंभीर समस्या आहे. यावर्षी १५ मार्च २०२६ रोजी होणाऱ्या जागतिक ग्राहक दिनानिमित्त ‘Safe products Confident Consumer’ किंवा ‘सुरक्षित उत्पादने, आश्वस्त ग्राहक’ ही थीम जाहीर करण्यात आली आहे. सामान्य ग्राहक अनेकदा त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाबाबत अनभिद्य असतात. त्यांचा आवाज दडपला जाऊ नये यादृष्टीने हा दिवस महत्त्वाचा ठरतो.आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ जाहिरात करून ग्राहक टिकवता येत नाही, तर व्यवसायवृद्धीच्या दृष्टीने उत्पादनाचा दर्जा आणि सुरक्षितता सर्वोच्च असणे उत्पादकाची नैतिक जबाबदारी आहे. अन्नापासून ते औषधांपर्यंत आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांपासून ते डिजीटल उत्पादनांपर्यंत हजारो उत्पादने तसेच बँक, विमा इत्यादी विविध सेवा बाजारपेठेत उपलब्ध आहेत. त्या उत्पादनात व सेवेत जेवढी पारदर्शकता आणि सुरक्षितता असेल, तेवढा ग्राहक अधिक आश्वस्त राहील.ग्राहकांची सुरक्षितता विविध प्रकारची असते. अन्नपदार्थ भेसळमुक्त आणि पोषक असणे यासाठी भारतीय अन्नसुरक्षा आणि मानके प्राधिकरण (FSSAI) अन्नाच्या गुणवत्तेवर नियंत्रण ठेवते. तसेच भारतीय मानक ब्युरो (BIS)द्वारे पडताळणी करून संबंधित उत्पादने ‘ISI’, ‘CRS’, ‘Hallmark’ने प्रमाणित केली जातात. म्हणूनच खाद्यपदार्थांवर ‘FSSAI’ किंवा ‘Agmark’, औद्योगिक व इलेक्ट्रॉनिक उत्पादनांवर ‘ISI’ किंवा ‘CRS’ मार्क, सोन्यावर ‘Hallmark’ असणे म्हणजे उत्पादनांच्या गुणवत्तेची आणि सुरक्षिततेची हमी.वापरकर्त्याच्या गोपनीयतेचे आणि डेटाचे रक्षण करणे. गोळा केलेला कोणता डेटा कसा वापरला जातो, याची स्पष्ट माहिती ‘नियम व अटी’मध्ये असणे. वापरकर्त्याची संवेदनशील माहिती स्टोअर करताना आणि पाठवताना ती एनक्रिप्टेड असणे. सायबर धोक्यांपासून संरक्षण करण्यासाठी सॉफ्टवेअर सतत अपडेट करणे. फसवणूक झाल्यास चॅटबॉटद्वारे तत्काळ डिजिटल प्रतिसाद व स्थानिक भाषेत हेल्पलाईन उपलब्ध असणे म्हणजे वापरकर्त्याच्या दृष्टीने ते ‘सुरक्षित डिजिटल उत्पादन’ ठरू शकते. ह्याची जाणीव असणे ग्राहक हिताय ठरते.उत्पादकांनी सुरक्षिततेची कास धरल्यास आणि ग्राहकांनी जागरूकतेचा वसा घेतल्यास एक सुदृढ समाज घडू शकतो. थोडक्यात, “सुरक्षित उत्पादन, ग्राहकाची शान; ग्राहक हक्कांचा ठेवा मान!”mgpshikshan@gmail.com
Shirur News : युद्धजन्य स्थितीच्या अफवा आणि पॅनिक बुकिंग टाळा; तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी घेतला इंधन साठ्याचा आढावा.
Gas Shortage : पुणे-सातारा महामार्गावर पुन्हा पेटल्या ‘चुली’! गॅस टंचाईमुळे हॉटेल चालकांची मोठी कसरत
Gas Shortage : जागतिक युद्धाच्या सावटाखाली पुणे-सातारा हायवेचा हॉटेल व्यवसाय कोलमडला; व्यावसायिक सिलिंडरअभावी चुलीचा आधार घेण्याची वेळ.
Vitthalrao Langhe : चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचे स्वागत करू आणि चुकीचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची मात्र येथून थेट उचलबांगडी करू, असा इशारा आ. विठ्ठलराव लंघे पाटील यांनी दिला.
Satara Crime : माण तालुक्यातील पळशीत धक्कादायक प्रकार; ५० रुपये चोरीच्या खोट्या आळामुळे १३ वर्षांच्या बालकाला लाकडी काठीने अमानुष मारहाण.
गोष्ट लहान, मोठा अर्थ : शिल्पा अष्टमकरमनुष्याच्या आयुष्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे त्याची स्वयंप्रतिमा. स्वयंप्रतिमा म्हणजे व्यक्तीने स्वतःबद्दल मनात तयार केलेले चित्र. आपण कसे आहोत, आपल्यात कोणत्या क्षमता आहेत, आपण काय करू शकतो किंवा करू शकत नाही. याबद्दलची आपली जी धारणा असते, तीच आपली आत्मप्रतिमा (स्वयंप्रतिमा) असते.एखाद्या व्यक्तीची प्रगती, आत्मविश्वास आणि यश हे मोठ्या प्रमाणावर त्याच्या आत्मप्रतिमेवर अवलंबून असते. जर एखाद्या व्यक्तीची स्वतःबद्दलची भावना सकारात्मक असेल, तर तो कोणत्याही अडचणीला धैर्याने सामोरे जातो. उलट स्वतःबद्दल नकारात्मक विचार असतील, तर माणूस आपल्या क्षमतांचा उपयोगच करू शकत नाही.आत्मप्रतिमा कशी घडते?आत्मप्रतिमा एका दिवसात तयार होत नाही. ती अनेक गोष्टींमुळे तयार होत असते. बालपणीचे संस्कार, पालक, शिक्षक आणि समाजाकडून मिळणारे प्रोत्साहन,यश आणि अपयशाचे अनुभव, स्वतःबद्दल केलेले विचार आणि आत्मसंवाद, जर लहानपणापासून मुलांना प्रोत्साहन, विश्वास आणि प्रेम मिळाले, तर त्यांची आत्मप्रतिमामजबूत होते.सकारात्मक आत्मप्रतिमेचे महत्त्वसकारात्मक आत्मप्रतिमा असलेली व्यक्ती आत्मविश्वासाने निर्णय घेते, अपयशातून शिकते, नवीन गोष्टी करण्याची तयारी ठेवते, इतरांशी आदराने वागते, समाजात आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणून उभी राहते , अशा व्यक्तीला यश मिळवण्यासाठी बाहेरील परिस्थितीपेक्षा स्वतःवरील विश्वास अधिक मदत करतो.आत्मप्रतिमा सुधारण्यासाठी काय करावे?आत्मप्रतिमा सुधारण्यासाठी काही गोष्टींचा अवलंब करणे आवश्यक आहे -१. स्वतःच्या गुणांची जाणीव ठेवावी.२. नकारात्मक विचारांऐवजी सकारात्मक विचार करावेत.३. छोट्या यशाचेही कौतुक करावे.४. सतत शिकण्याची आणि स्वतःला सुधारण्याची वृत्ती ठेवावी.५. स्वतःची तुलना इतरांशी न करता स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष द्यावे.स्वयंप्रतिमा म्हणजे आपल्या आयुष्याचा पाया आहे. जशी आत्मप्रतिमा तशी व्यक्तीची वाटचाल. म्हणून प्रत्येकाने स्वतःकडे सकारात्मक दृष्टीनेपाहणे आणि स्वतःवर विश्वास ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.“ज्याची आत्मप्रतिमा मजबूत असते, त्याच्यासाठी अशक्यही शक्य होते.”शाळा, महाविद्यालयातून विद्यार्थ्यांना पुस्तकी शिक्षण दिले जाते. वेगवेगळे विषय शिकविले जातात. जीवनात यशस्वी होण्यासाठी शिक्षण देणे गरजेचे आहे. आपल्यामध्ये गुणांची वृद्धी व्हावी, बेरीज व्हावी व दोषांची वजाबाकी व्हावी. आपले जीवन यशस्वी होण्यासाठी आत्मप्रतिमा चांगली असली पाहिजे.आपल्या आवडी-निवडी, क्षमता, अभियोग्यता, अभिव्यक्ती यांच्या आधारे स्वतःची योग्यता-अयोग्यता तपासून मनात स्वतःचे एक मानसिक चित्र तयार होते त्यालाच स्वयंप्रतिमा किंवा आत्मप्रतिमा असे म्हणतात. आपले व्यक्तिमत्त्व कसे आहे याचा शोध स्वयंप्रतिमेत घेता येतो. आपण कसे आहोत व कसे असायला पाहिजे यामधील अंतर हे वास्तव स्वयंप्रतिमा व आदर्श स्वयंप्रतिमा यामधील अंतराइतके असते. यामधील अंतर कमी करण्याइतपत जर विकास घडला तरच ध्येयापर्यंत पोहोचता येते व इच्छा-आकांक्षा पूर्ण होतात.जर आपल्याला स्वतःबद्दल विश्वास वाटत असेल, आपल्याबद्दल खात्री वाटत असेल, जगाच्या पाठीवरील सर्व प्रकारची सुखाची साधने उपभोगण्याची पात्रता आपल्यात आहे असे वाटत असेल तरच आपली स्वयंप्रतिमा सकारात्मक असते. आपल्यातील याच प्रकारची स्पंदने बाहेर पडतात. ती विश्वातील याच प्रकारची स्पंदने आपल्याकडे आकर्षितात व आपल्या वाट्याला सर्वप्रकारची सुखाची साधने प्राप्त होतात. आपली स्वयंप्रतिमा नकारात्मक असेल, विश्वातील चांगल्या गोष्टींचा उपभोग घ्यायला आपण पात्र नाही असे वाटत असेल, तर खालावलेली परिस्थिती आपल्या वाट्याला येते म्हणून रामदास स्वामी म्हणतात,“मना त्वाचि रे पूर्व संचित केले।तयासारखे भोगणे प्राप्त झाले ।”आपण गरीब असलो, ग्रामीण भागातील असलो, बाह्य व्यक्तिमत्त्व फारसे आकर्षक नसले तरी आपली मानसिकता सकारात्मक असली पाहिजे. ऐष आरामाचे जीवन आपल्यासाठी नाही. आमच्या नशिबी कुठले सुख, भाग्य आमच्या वाट्याला येणार नाही, उच्चस्तरीय गोष्टी आपल्याला जमणार नाहीत. आपला प्रभाव इतरांवर पडणार नाही या विचारांमुळे स्वयंप्रतिमा दूषित होते. या प्रकारची वैचारिक स्पंदने बाहेर पडतात व त्याच प्रकारची परिस्थिती आपल्या वाट्याला येते.स्वयंप्रतिमा जितकी स्वच्छ, सुस्पष्ट व निकोप असेल तेवढ्या प्रमाणात विकास प्रक्रियांची सुसंगती घडून आणता येते. नवीन अनुभवांचे संस्कार प्रभावीपणे करता येतात.आत्मप्रतिमा बदलली, तर संपूर्ण व्यक्तिमत्त्वात बदल होऊ शकतो. बालपणीच्या संस्काराचा आत्मप्रतिमा तयार होण्यात सिंहाचा वाटा असतो. ज्यांना बालपणात खूप भीती दाखविली जाते त्या व्यक्ती भित्र्या बनतात. रागीट व्यक्ती वातावरण बिघडवितात.लोक ऊणे-दुणे काढतात, चिकित्सक सारखी चौकशी करत असतात. प्रेमळ लोक अंत:करणाला पाझर फोडतात. आत्मप्रतिमेवर उमटणारे ठसे स्वभाववैशिष्ट्ये बनतात.आपल्या आयुष्याची किंमत कुमारवयात कळणे आवश्यक आहे. या वयातच आत्मप्रतिमा बदलल्यास आयुष्याचे मोल वाढते. यासाठी मनाच्या विशिष्ट अवस्थेत जाऊन (अल्फा अवस्था) अंतर्मनाला सूचना देता येतात. माझ्यामध्ये दररोज आत्मविश्वास वाढत आहे. प्रत्येक बाबतीत प्रत्येक दिवशी मी जास्तीत जास्त चांगला होत आहे. जगामधील सर्व सुखाची साधने उपभोगण्यास मी पात्र आहे. मी जगप्रवास करणार आहे. माझ्या आयुष्यात मला सुख-शांती व समाधान मिळणार आहे. मी जनसेवा करणार आहे. मी भरपूर कष्ट व मेहनत करणार आहे. अशा सूचना अंतर्मनाला देऊन आत्मप्रतिमा बदलता येते.आपल्या देशातील सर्व मुला-मुलींच्या आत्मप्रतिमा निकोप ठेवणे, आत्मप्रतिमा विस्कळीत असल्यास अंतर्मनाला सूचना देऊन त्यामध्ये इच्छित बदल घडविणे या दृष्टीने प्रयत्न केल्यास व्यक्तिमत्त्वात बदल होऊन ते मनुष्यबळ देशाला उपयोगी पडेल व देशाचा विकास होईल.
प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफसोशल मीडियावर एक बातमी वाचली. त्या बातमीतील घटना खूप अस्वस्थ करून गेली. त्या घटनेचा सारांश देते. साधारण चाळिशीचे जोडपे. दिसायला खूप सुंदर. अगदी चार-पाच वर्षे एकमेकांना जाणून घेऊन प्रेमविवाह केलेले!एके दिवशी एक घटना घडली आणि त्या दुर्दैवी घटनेची नोंद सीसीटीव्हीने घेतलेली होती. रात्री १२ च्या सुमारास हे चाळिशीचे जोडपे बराच वेळ रेल्वे क्रॉसिंग गेटजवळ उभे होते. त्यांना दूरवरून एक एक्स्प्रेस गाडी येताना दिसली आणि ते शांतपणे एकमेकांचा हात घट्ट हातात धरून रेल्वे रुळावर जाऊन उभे राहिले. याच सीसीटीव्हीने त्यांच्या शरीराच्या कुठे आणि कशा ठिकऱ्या उडाल्या याचीही व्यवस्थित नोंद घेतली. त्यानंतर जेव्हा या दोघांनी केलेल्या आत्महत्येचा तपास केला गेला तेव्हा लक्षात आले की, त्यांना मूलबाळ होत नसल्यामुळे त्यांनी आत्महत्या केली. बाकी बातमीत त्या दोघांची नावे, ते कोणत्या गेटजवळ उभे होते, कोणत्या गाडीने त्यांना उडवले वगैरे माहिती आहेच, जी या लेखात देणे मला जरूरी वाटली नाही.माणसाचा मृत्यू कदाचित मला कमी अस्वस्थ करतो; परंतु ‘आत्महत्या’ ही गोष्ट मला खरंच खूप जास्त अस्वस्थ करते. ‘मूलबाळ न होणे’ ही समस्या आहे का? किंवा अगदी ठरवून काही जोडपी ‘मूलबाळ होऊ देत नाहीत’ हीसुद्धा समस्या आहे का? जगात अगणित समस्या आहेत. त्या सर्व समस्यांपेक्षा आपली समस्या कमी महत्त्वाची आहे, असे का मानले जात नाही? असा का विचार केला जात नाही?आजच्या काळात असंख्य अनाथाश्रम आहेत तिथून एखादे मूल दत्तक घेऊन त्यांनी वाढवले असते, तर चालले नसते का? एका जीवाला कुटुंब मिळालं असतं आणि एका कुटुंबाला कदाचित जीवदान...!जेव्हा कोणता तरी टोकाचा निर्णय घ्यायचा असतो आणि ती गोष्ट आपल्याला ती चुकीची की बरोबर, हे जाणून घेण्यासाठी कदाचित घरात वयस्कर माणसे नसतील, कदाचित नातेवाईक आणि शेजारीपाजारी सुद्धा जवळचे वाटत नसतील तरीसुद्धा अनेक मानसोपचार तज्ज्ञ आहेत, त्यांच्याकडे हे का जात नाहीत?अत्यंत सुदृढ, उच्चशिक्षित, समाजात नावलौकिक असणारी, आर्थिक सुबत्ता असणारी माणसेसुद्धा मानसिक रुग्ण होतात याचे वाईट वाटते. आपण एखाद्या समस्येला तोंड देऊ शकत नाही, त्याचा आपल्याला त्रास होतोय हे सुरुवातीला तरी आपल्याला कळत असते तेव्हाच स्वतःहून मानसोपचार तज्ज्ञाकडे जाण्याची गरज असते. आजकाल मनाला उपचार होऊ शकेल अशी अतिशय उत्तम औषधोपचार पद्धती असल्याचे अनुभव डॉक्टरांकडून आणि ज्यांनी अशा तऱ्हेचे उपचार घेतले आहेत त्यांच्याकडूनही ऐकले आहेत.दात दुखायला लागल्यावर आपण दंतवैद्याकडे जातो, ताप आल्यावर आपल्या फॅमिली डॉक्टरकडे जातो, हात तुटल्यावर हाड वैद्यांकडे जातो आणि तो जोडून घेतो तसे सहजपणे मानसिक समस्या निर्माण झाल्यावर आपण मानसोपचार तज्ज्ञाकडे का जात नाही? तिथे जाणे कमीपणाचे वाटते का? किंवा डॉक्टर काही औषध, गोळ्या देईल; परंतु आपली समस्या काही मिटवू शकणार नाही असे त्यांना वाटते का? काही कळत नाही. अशा दुर्दैवी घटना घडून गेल्यानंतर त्याच्या बातम्या मिळतात.असो. माझ्या ओळखीच्या एका कुटुंबाने एक मुलगी दत्तक घेतली आणि तिला शिकवून त्यांनी डॉक्टर केले. तिला त्यांनी दत्तक घेतले तेव्हा ती दीड वर्षांची होती पण ती जेव्हा पाचवीत गेली तेव्हा त्या दांपत्याने तिला समोर बसवून तू आमची ‘दत्तक’ मुलगी आहेस हे समजावून सांगितले. इतकेच नव्हे तर तिला त्या अनाथाश्रमात घेऊन गेले जिथून त्यांनी तिला दत्तक घेतले होते. तीन-चार तास त्या अनाथाश्रमात घालवल्यावर तिला स्वतःचे कुटुंब असल्याचे महत्त्व लक्षात आले. तिच्या आई-वडिलांचे प्रेम लक्षात आले. इथपर्यंतची ही घटना सामान्य आहे पण त्या पुढची घटना मात्र आपल्याला विचार करायला लावणारी आहे. मुलगी पंचवीस वर्षांची झाली आणि तिच्या आई-वडिलांना या मुलीच्या लग्नाचे वेध लागले; परंतु मुलीने आई-वडिलांना अशी अट घातली की, जो मुलगा माझ्याशी लग्न करेल तो लग्नानंतर लगेचच अनाथ बालकाचे पालकत्व स्वीकारण्याची जबाबदारी माझ्या सोबतीने आनंदाने उचलेल त्याच्याशीच मी लग्न करणार!या लेखाच्या शेवटी जाता जाता मला हेही सांगायला आवडेल की, समाजात चांगल्या विचारांची माणसे खूप असतात. तिला योग्य जोडीदार मिळाला आणि आज ती दोन मुलांची आई आहे आणि त्यातील एक मूल हे दत्तक आहे!pratibha.saraph@ gmail.com
मनस्विनी : पूर्णिमा शिंदेनात्याचं आयुष्यातील महत्त्व अनन्यसाधारण. मानलं तर खूप काही. मानलं नाही तर काहीच नाही. नात्यांची बँक अशी साठवण आहे की, ज्यात जीवाभावाची माणसं समाविष्ट होतात. नाती म्हणजे केवळ रक्ताचीच नाहीत, तर मनाचीही मानलेली. ही खोलवर काळजात, हृदयात असतात. ती मनापासून जपलेली. नात्यांना कोणत्याही नावाची, लेबलची लिपी नसते. गरज नसते. मनात वसते, भासते ते असते नाते. खूप काही देऊन जाते. भावभावनांना श्रीमंती देते. काही नाही दिले तरी चालेल पण आपुलकी, आपलेपणा, अपारमाया, जिव्हाळा देते. जीवापाड जीव लावणे म्हणजे नातं. खरी परीक्षा नात्यांची ती असते जेव्हा अडचणीच्या वेळी कोणी आपल्या पाठीशी उभं राहतं. सांत्वनासाठी कोणी तर दुःखात कोण येतं की केवळ मतलबासाठीच येतात. त्यावरून स्वार्थ नि:स्वार्थ. कठीण प्रसंगच असतो तो.समर्थ रामदास म्हणतात, ‘कठीण समय येता कोण कामास येतो?’ खरेच आहे. प्रसंगाला सामोरे जातो ना तेव्हा नात्यांची खरी परीक्षा किंवा कसोटी असते. ही माणसाला श्रीमंत बनवत असते. जिव्हाळा, आपुलकी देते. रोज बोलणं होत नाही... चालेल! रोज भेटणं होत नाही... चालेल! पण एक अशी खात्री असावी, विश्वास असावा की नात्याची गॅरंटी असावी. आपला माणूस आपल्याला सोडून कुठे जाणार नाही. ती एक खात्री. शब्दाचे मोल स्वरात किंवा सुरात कळले पाहिजे. एकमेकांना जपले पाहिजे, ओळखले पाहिजे, एकमेकांचे झाले पाहिजे. आदरभाव, सन्मान, काळजी, प्रेम यांना नात्यात जागा असते. द्वेष, मत्सर, कपट यांना कधीच नात्यात जागा नसते. शब्दाला किंमत दिली जाते. शब्द हातावर ओंजळीमध्ये घेतले, झेलले जातात, अाशा तिथेच पूर्ण होतात. नाती टिकावीत म्हणून संवादाचा गोडवा असावा. प्रेमळ साथ असावी. अडचणीच्या वेळेस सोबत असावी. संवेदनशीलता असावी.जो माणूस संवेदना किंवा भावनाशून्य असतो तो माणूस कसला? एखादा जीवाभावाचे नातं टिकवायचं तर तिथे मायेचा ओलावा असला पाहिजे! हे एक हक्काचं, विश्वासाचं प्रतीक असलं पाहिजे आणि ती मनाला खात्री असली पाहिजे. समजूत घालण्यापेक्षा एकमेकांना समजून घेणं जास्त चांगलं. स्वतःपेक्षा जेव्हा व्यक्ती दुसऱ्या प्रेम करते तेव्हा त्या व्यक्तीच्या अपेक्षाही नि:स्वार्थ असतात. प्रत्येकाने गुणदोषासहित आपल्या माणसाला, प्रियजनांना आयुष्यभरासाठी स्वीकारावे आणि जपावे. मग ते नातं कोणतंही असो. नातं हे विश्वासावरच फुलतं, सजतं, डोलतं आणि बहरतं.काही नाती बाजारू, व्यवहारी असतात. वेगळी असतात, खोटी स्वार्थाने बरबटलेली. निखळ मैत्री, निर्मळ मन, निरपेक्ष साथ ही भावभावनांची असावी. शरीराचे आकर्षण म्हणजे प्रेम नसतं. ते तर नातं कधीच होऊ शकत नाही. प्रेमाच्या नावावर नात्यात मनाचे बांध फुटतात. एखाद्या प्रेमात विरह झालेल्या तरुण-तरुणीला विचारा मनाची अवस्था काय होत असते. ते आहे आकर्षण! विरोधाभास!! लबाडीने केलेली कोणतीच गोष्ट आयुष्यात कधीच पुरत नाही. त्याला डाग लागतो. अविस्मरणीय पण खऱ्या प्रेमाला कसलाच पुरावा, पैसा, प्रलोभन्यांची गरज नसते. आकर्षण, चैन, हव्यास याने बरबटलेली नाती बेगडी असतात. सहज तुटतात. संवाद संपला तर वादसुरू होतो.मी पणा, अहंकार सारे बाजूला सारून समोरच्याचा मनाचा प्रेमाचा विचार आणि स्वीकार करावा. यासाठी समोरच्याने देखील संवेदनशील सौजन्य जपावे. आठवण झाली की, हक्काने झटकन बोलता यावी अशी मोकळीक नात्यात असते. नातं जपावं. मन जपावं. लोक म्हणतात नातं टिकवायला हिम्मत लागते पण माझ्या मते नातं टिकवायला हिम्मत नाही समोरच्याच्या मनात आपली किंमत लागते. कधी कधी होतं काय आपण चंदन असूनही समोरचा आपल्याला लाकूड समजून बसतो. खऱ्या हिऱ्याची किंमत ती व्यक्ती हातातून निसटल्याशिवाय कळत नसते. आयुष्यात ज्याने गमावलेय त्याला विचारा नात्याची किंमत आणि मनाची अवस्था.जीवापाड जीव लावणारा माणूस हरवणाऱ्याला विचारा! त्या प्रामाणिक प्रेमाला जुमानणारी माणसं सुद्धा असतात जगात. रंगलेल्या गालांचे मुके घेणारी दुनिया बेलगाम आहे. आभासी झगमगीत आहे. येथे खऱ्यांना, भल्यांना प्रत्यय आला की सबक मिळतो. भावनांशी खेळणारी माणसे हृदय तोडून जातात. त्यांना धडा मिळाल्याशिवाय कळत नाही. आपलं कोण आणि परक कोण? मग ती उदासीनता, बैचेनी, खिन्नता आणि उजाडलेलं जग यामुळे जगण्यातील सुंदरता नष्ट होते. यावर अनुभवास मिळते ती नात्यातील सुंदरता! जाग वेळीच येणं गरजेचं असतं. मग ती झोपेतून असो वा जागेपणी. असो. खरं खोटं तपासून बघा. पारखून बघा. चकाकतं ते सोनं नसतंच ते खोटंही असू शकतं. खऱ्या बावनकशी सोन्याची निवड, तो खरेपणा भाग्यात असायला लागतो. नात्याला मोजमाप नाही पण माफ करणं असतं. नात्यात गोत्र नाही पण पात्रता असावी. हा खरेपण ज्याला कळला तो खरा जिंकला. नात्याकडे व्यवहार म्हणून पाहू नका. तरच नातं चमकेल आणि चेहराही! त्याचबरोबर आयुष्यही उजळेल आणि जीवनही. नातं म्हणजे आयुष्याचा उत्सव! नातं म्हणजे निभावलं तर जिवंतपणे स्वर्ग; नाहीतर जिवंतपणे मरणयातना! नातं हे दोन्ही बाजूने मनाने विश्वासाने जिंकायचे असतं.यातच आयुष्याचा उत्सव साजरा करता येतो. जीवनही सजतं हीच खरी नात्याची सुंदरता.
Moshi Accident : भरधाव ट्रक चालकाचा निष्काळजीपणा जीवावर बेतला; लातूरच्या २१ वर्षीय चालकाला एमआयडीसी भोसरी पोलिसांनी ठोकल्या बेड्या.
Traffic Update : मुंबई-बेंगळुरू महामार्गावर बॅरिकेडिंग आणि ट्रॅफिक वॉर्डन तैनात; प्रवाशांनी सहकार्य करण्याचे पोलीस उपआयुक्त विवेक पाटील यांचे आवाहन.

30 C