SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

29    C
...

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, २४ मार्च २०२६

पंचांगआज मिती चैत्र शुद्ध षष्ठी शके १९४८. चंद्र नक्षत्र रोहिणी योग वैधृती, चंद्र राशी वृषभ,भारतीय सौर ३ चैत्र शके १९४७-४८. मंगळवार दिनांक २४ मार्च २०२६ मुंबईचा सूर्योदय ०६.३९ मुंबईचा चंद्रोदय १०.३१ एएम, मुंबईचा सूर्यास्त ०६.५० मुंबईचा चंद्रास्त ००.२९ उद्याची ,राहू काळ ०३.४७ ते ०५.१९ ,चांगला दिवसदैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)

फीड फीडबर्नर 24 Mar 2026 12:30 am

वांद्रे पश्चिम भागांत शनिवारी, रविवारी पाणीकपात

मुंबई: पाली हिल जलाशयाच्‍या पाणी पातळीत सुधारणा करण्‍यासाठी वांद्रे पश्चिम येथील रामदास नायक मार्ग, स्‍वामी विवेकानंद मार्ग आणि आर. के. पाटकर मार्ग जंक्‍शन या दरम्‍यान ७५० मिलीमीटर व्‍यासाची मुख्‍य जलवाहिनी नव्‍याने टाकण्यात आली आहे. ही नवीन मुख्‍य जलवाहिनी कार्यान्वित करण्‍याचे काम शनिवार, २८ मार्च २०२६ रोजी रात्री ११ वाजल्यापासून ते रविवारी २९ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेदरम्‍यान एकूण १६ तास हाती घेण्‍यात येणार आहे. या कार्यवाही दरम्‍यान ‘एच पश्चिम’ विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा रविवारी, २९ मार्च २०२६ रोजी बंद राहणार आहे. तर, काही भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे.या दुरुस्तीच्या कालावधीत पाणी काटकसरीने वापरावे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून पुढील ४ ते ५ दिवस पाणी उकळून - गाळून प्‍यावे, महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.पाणीपुरवठा बंद राहणारा परिसर

फीड फीडबर्नर 23 Mar 2026 11:30 pm

मुंबईत अत्यंत जबाबदारीने आणि प्रभावीपणे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन कार्यक्रम राबवावा; मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

मुंबई: महाराष्ट्रात लवकरच विशेष सखोल पुनरीक्षण (स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन) कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. मुंबईतील निवडणूक प्रक्रियेतील सर्व अधिकाऱ्यांनी मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यात अत्यंत जबाबदारीने आणि प्रभावीपणे विशेष सखोल पुनरीक्षण (स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन) कार्यक्रम राबवावा, असे निर्देश महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी दिले. यासाठी राजकीय पक्षांची बैठक घेऊन प्रत्येक बीएलए (बूथ लेव्हल एजंट) यांची नेमणूक करण्याच्या सूचनाही त्यांनी याप्रसंगी केल्या.भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार, मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण करण्याच्या अनुषंगाने, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकविषयक अधिकाऱ्यांची पूर्वतयारीबाबत बैठक वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालय येथील पेंग्विन सभागृहात सोमवारी २३ मार्च २०२६ रोजी पार पडली. यावेळी ते बोलत होते.राजस्थानचे मुख्य निवडणूक अधिकारी नवीन महाजन, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हाधिकारी (मुंबई शहर जिल्हा) आंचल गोयल, जिल्हाधिकारी (मुंबई उपनगर जिल्हा) सौरभ कटियार, महानगरपालिकेचे सहआयुक्त (करनिर्धारण व संकलन) विश्वास शंकरवार यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यातील मतदान नोंदणी अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी, नायब तहसीलदार (निवडणूक) आदी यावेळी उपस्थित होते.राजस्थानमध्ये नुकताच मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम पार पडला. हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी केलेल्या विविध व्यवस्था, आलेल्या अडचणी व निराकरणासाठी केलेल्या उपाययोजना यासंबंधी राजस्थानचे मुख्य निवडणूक अधिकारी नवीन महाजन यांनी सविस्तर सादरीकरण केले. तसेच, आगामी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमासाठी त्यांनी मार्गदर्शन केले.महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम पुढे म्हणाले की, भारत निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या कार्यक्रमानुसार विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबवावा. राजकीय पक्षांची बैठक घेऊन प्रत्येक बीएलए (बूथ लेव्हल एजंट) यांची नेमणूक करावी, असेही त्यांनी सांगितले.

फीड फीडबर्नर 23 Mar 2026 11:30 pm

मुंबईत वर्षभरात ५५ हजार ३९० क्षयरोग रुग्णांची नोंद

मुंबई: मुंबईत महापालिका सार्वजनिक आरोग्य विभागाकडून क्षय रूग्णांसाठी उच्च दर्जाच्या निदान सेवा, नवीन औषधोपचार पद्धती आणि सातत्यपूर्ण रुग्ण सहाय्य व पाठपुरावा करण्यात येतो. परिणामी, औषध प्रतिरोधक क्षयरोगाचे रुग्ण बरे होण्याचा दर गेल्या ८ वर्षात दुप्पट होऊन ८१ टक्क्यांपर्यंत पोहचला असल्याचा दावा महापालिका आरोग्य विभागाने केला आहे. जागतिक क्षयरोग दिन २४ मार्च रोजी असून विविध आरोग्य संस्थांमध्ये वर्ष २०२५ मध्ये मुंबईत एकूण ५४ हजार ३९० क्षयरोग रुग्णांची संख्या नोंदवली गेली. पैकी ४८ हजार ८३५ रुग्ण मुंबईचे रहिवासी होते. यापैकी ४० टक्के रुग्ण एक्स्ट्रा पल्मनरी, ६ टक्के बालरुग्ण आणि ८ टक्के औषध प्रतिरोधक क्षयरोगाचे प्रकारातील होते,असे आरोग्य विभागाने नमुद केले आहे.राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत केंद्र सरकारने २०२५ मध्ये “क्षयरोग (TB) मुक्त भारत अभियान” सुरू केले. या कार्यक्रम अंतर्गत १३ लाख ८ हजार २०० संवेदनशील लोकसंख्येची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १ लाख २४ हजार ७७४ संशयित रुग्णांचे एक्स-रे करण्यात आले.मुंबईतील आरोग्य संस्थांच्या ठिकाणी ४५ आणि ३४ पोर्टेबल मशीन उपलब्ध आहेत. या संयंत्राद्वारे क्षयरोग व रीफॅम्पीसीन औषध-प्रतिरोधक क्षयरोगाचे मोफत व अचूक निदान केले जाते. तसेच आता केंद्रीय क्षयरोग विभागाकडून ४ पॅथोडिटेक्ट मशीनही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या संयंत्राद्वारे क्षयरोग तसेच रीफॅम्पीसीन व आयसोनाझेड औषध-प्रतिरोधक क्षयरोगाचेही निदान करणे होईल. सध्या २ पॅथोडिटेक्ट संयंत्रे सर जे. जे. रूग्णालय व आयआरएल जीटीबी प्रयोगशाळेत उपलब्ध झाली आहेत. वर्ष २०२५ मध्ये एकूण २ लाख मॉलीक्यूलर चाचण्या करण्यात आल्या.उच्च जोखीम घटक ओळखून योग्य उपचारासाठी ही सेवा दिली जाते. या सेवेअंतर्गत १९,१७२ रुग्णांची नोंदणी करण्यात आली आहे. मुंबईत ३१ डिआर टीबी क्लिनिकमधून मोफत उपचार व औषध दुष्परिणाम व्यवस्थापन सेवा दिली जाते. ६ महिन्यांची प्रगत उपचार पद्धती सुरू करण्यात आली आहे. डिसेंबर २०२५ पर्यंत १०९३ रुग्णांवर उपचार सुरू झाले असून ८९ रुग्णांनी उपचार पूर्ण केले आहेत.पौष्टिक आहार किटनिक्षय मित्रांच्या माध्यमातून दरमहा टीबी रुग्णांना सहा महिन्यांकरिता पौष्टिक आहार किट देण्यात येते. मागील २ वर्षांत निक्षय पोषण योजने अंतर्गत एकूण १,४८,८६७ रेशन किट वितरित करण्यात आले.क्षयरोगाची १० लक्षणेदोन आठवड्यांपेक्षा जास्त खोकला,ताप,वजन घटणे,रात्री घाम येणे,भूक न लागणे,छातीत दुखणे,श्वास घेण्यास त्रास,रक्त किंवा कफ खोकल्यातून येणे,थकवा,मानेला सूजवरीलपैकी कोणतीही लक्षणे आढळल्यास दुर्लक्ष करू नये. नागरिकांनी जवळच्या बीएमसी दवाखाना, हेल्थ पोस्ट किंवा “आपला दवाखाना” येथे जाऊन मोफत तपासणी व उपचार करून घ्यावे, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

फीड फीडबर्नर 23 Mar 2026 11:10 pm

Colombian military plane crash: 110 सैनिकांना घेऊन जाणारे कोलंबियन लष्करी विमान उड्डाणादरम्यान कोसळले

Colombian military plane crash: कोलंबियाच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी हवाई दलाचे 'लॉकहीड मार्टिन हर्क्युलिस सी-१३०' (C-130 Hercules) हे विमान पुर्तो लेगुइझामो (पुतुमायो) येथून उड्डाण करत असताना अपघातग्रस्त झाले. हे ठिकाण इक्वेडोरच्या सीमेजवळ आहे.

दैनिक प्रभात 23 Mar 2026 10:57 pm

Palghar News : पालघरमधील कारखान्यात रसायन गळती; 22 कामगार रुग्णालयात दाखल

पालघर जिल्ह्यातील (Palghar News) बोईसर परिसरातील तारापूर एमआयडीसीमधील एका औषध निर्मिती कारखान्यात रसायनाची गळती झाल्यामुळे २० हून अधिक कामगारांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दैनिक प्रभात 23 Mar 2026 10:48 pm

वर्सोवा-वांद्रे सागरी सेतू प्रकल्पग्रस्त मच्छिमारांना दिलासा; नुकसानभरपाईसाठी विशेष अभ्यासगट स्थापन करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई: वर्सोवा-वांद्रे सागरी सेतू बांधकाम प्रकल्पामुळे मच्छीमार बांधवांच्या होणाऱ्या नुकसान भरपाईसंदर्भात आज मंत्रालयात मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.या बैठकीस माजी आमदार किरण पावसकर, मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव एन रामास्वामी, एमएमआरडीएचे वरिष्ठ अधिकारी, संबंधित विभागांचे अधिकारी तसेच विविध मच्छीमार संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.बैठकीत मत्स्यव्यवसाय आयुक्त कार्यालयाच्या ३० ऑक्टोबर २०२५ रोजीच्या पत्रानुसार तसेच ०९ मार्च २०२३ च्या शासन निर्णयात प्रस्तावित करण्यात आलेल्या सुधारणांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या प्रकल्पामुळे मच्छीमार बांधवांच्या दैनंदिन जीवनावर होणाऱ्या परिणामांचा आढावा घेण्यात आला.यावेळी मंत्री नितेश राणे यांनी सांगितले की, वर्सोवा कोस्टल रोड व भविष्यातील वाढवण पर्यंत होणारा कोस्टल रोड प्रकल्प एमएमआरडीए च्या माध्यमातून पूर्णत्वास येणार आहे. या पार्श्वभूमीवर या भागातील बाधित होणाऱ्या मच्छिमारांना योग्य नुकसानभरपाई मिळावी यासाठी विशेष अभ्यासगट स्थापन करून महिन्याभरात त्याचा अहवाल सादर करावा, असे निर्देश यावेळी मंत्री नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांना दिले.

फीड फीडबर्नर 23 Mar 2026 10:30 pm

Thane Municipal Corporation : ठाणे महापालिकेचे 6,221 कोटींचे अंदाजपत्रक सादर

ठाणे महापालिकेचे (Thane Municipal Corporation) आयुक्त सौरभ राव यांनी सोमवारी २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी ६,२२१.१२ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले.

दैनिक प्रभात 23 Mar 2026 10:28 pm

Virat Kohli Memories : “तो विजय म्हणजे तुक्का नव्हता! शेवटच्या ३ चेंडूंचा थरार सांगताना विराट भावूक; पाहा RCBचा ‘तो’स्पेशल VIDEO

Virat Kohli Memories : विराट कोहलीने त्या ऐतिहासिक रात्रीच्या आठवणींना उजाळा दिला असून, विजयाचा तो क्षण शब्दांत मांडताना तो कमालीचा भावूक झाला.

दैनिक प्रभात 23 Mar 2026 10:25 pm

Assam Opinion Poll 2026: आसाममध्ये कोणाचं सरकार येणार? ओपिनियन पोलमध्ये समोर आली ‘ही’माहिती

Assam Opinion Poll 2026: आसाममधील १२६ जागांसाठी ९ एप्रिल २०२६ रोजी मतदान होणार असून, ४ मे २०२६ रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. या ओपिनियन पोलमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून विरोधकांना आपली रणनीती बदलण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.

दैनिक प्रभात 23 Mar 2026 10:17 pm

मच्छीमारांना सक्षम आणि स्वावलंबी बनविण्यासाठी शासन प्रयत्नशील; मस्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणेंनी दिली माहिती

मुंबई: राज्यातील मच्छीमारांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी बनविण्यासाठी मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजनासह शासन विविध योजनांच्या माध्यमातून प्रयत्नशील आहे, अशी माहिती मस्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिली.मंत्रालय मध्ये आज मच्छीमारांच्या प्रश्नांबाबत विविध मच्छीमार संस्थांच्या प्रतिनिधी सोबत आयोजित बैठकीत मंत्री श्री .राणे बोलत होते. यावेळी मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव रामास्वामी एन, माजी आमदार प्रमोद जठार महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश खपले, प्रकाश एम. लोणारे शासन मंडळाचे सदस्य राष्ट्रीय मत्स्य विकास मंडळ,विविध मच्छीमार संस्थांचे प्रतिनिधी आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.मंत्री राणे यांनी सांगितले की, पारंपरिक मासेमारीसोबतच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवून उत्पादनक्षमतेत वाढ करणे हा शासनाचा मुख्य उद्देश आहे. त्यासाठी मच्छीमारांना अत्याधुनिक बोटी, जाळी, तसेच कोल्ड स्टोरेज सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे.तसेच, मत्स्य व्यवसायासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण, कर्ज सुविधा आणि अनुदान योजनाही अधिक प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. किनारपट्टी भागातील पायाभूत सुविधांचा विकास, बंदरांचे आधुनिकीकरण आणि मत्स्य प्रक्रियेसाठी उद्योग उभारणी यावरही शासन लक्ष केंद्रित करत आहे.मंत्री राणे पुढे म्हणाले की, मच्छीमारांच्या उत्पन्नात वाढ होऊन त्यांचे जीवनमान उंचावणे हे सरकारचे प्रमुख ध्येय आहे. युवकांनी गोड्या पाण्यातील मत्स्य व्यवसायाकडे वळावे, यासाठी विविध प्रोत्साहनपर योजना राबवल्या जात आहेत. शासनाच्या या उपक्रमांमुळे राज्यातील मच्छीमार समुदाय अधिक सक्षम होईल आणि मत्स्य व्यवसायाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

फीड फीडबर्नर 23 Mar 2026 10:10 pm

IPL 2026 Guidelines : BCCIचा नवा ‘फतवा’! IPL 2026 मध्ये सामन्याच्या दिवशी सरावावर बंदी; नियमांचं उल्लंघन केल्यास कारवाई; पाहा नवी गाईडलाईन

IPL 2026 Guidelines : आयपीएल २०२६ च्या रणधुमाळीला सुरुवात होण्यापूर्वी बीसीसीआयने फ्रँचायझींसाठी नवी 'प्रॅक्टिस शेड्युल गाईडलाईन' जारी केली आहे.

दैनिक प्रभात 23 Mar 2026 9:53 pm

राज्यात खळबळ..! नायब तहसीलदारासह 7 महसूल कर्मचाऱ्यांवर कारवाई; मोठा घोटाळा उघड

Handicap Certificate Scam : भंडारा जिल्ह्यात बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांच्या आधारे नोकरी मिळवणाऱ्या ७ महसूल कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.

दैनिक प्रभात 23 Mar 2026 9:51 pm

विधान परिषदेत विरोधकांचे संख्याबळ घटणार; ९ आमदार निवृत्त होणार; संख्याबळानुसार महाविकास आघाडीच्या पदरात केवळ दोनच जागा

मुंबई: विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर, आता विधान परिषदेतही विरोधकांचे संख्याबळ कमालीचे घटणार आहे. येत्या १३ मे २०२६ रोजी वरिष्ठ सभागृहातील ९ सदस्यांची मुदत संपत असून, विधानसभेतील सध्याचे पक्षीय बलाबल पाहता महाविकास आघाडीला या नऊपैकी केवळ दोनच जागांवर समाधान मानावे लागणार आहे. परिणामी, परिषदेतील सत्ताधारी महायुतीची बाजू आणखी भक्कम होणार आहे.निवृत्त होणाऱ्यांमध्ये भाजपचे रणजितसिंह मोहिते-पाटील, संजय केनेकर, संदीप जोशी आणि दादाराव केचे यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त नीलम गोऱ्हे (शिवसेना), अमोल मिटकरी (राष्ट्रवादी काँग्रेस), शशिकांत शिंदे (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट), राजेश राठोड (काँग्रेस) आणि उद्धव ठाकरे (उबाठा) यांचीही मुदत संपत आहे. मंगळवारी या सदस्यांना औपचारिक निरोप दिला जाणार आहे.दरम्यान, मुदत संपत असलेल्या ९ जागांसाठी एप्रिल महिन्यात निवडणूक लागण्याची शक्यता आहे. निवृत्त होणाऱ्यांमध्ये सर्वाधिक सदस्य भाजपचे असले, तरी विधानसभेतील प्रचंड संख्याबळाच्या जोरावर भाजप आपल्या जागा पुन्हा सहज जिंकू शकते.शरद पवार गटाला माघार घ्यावी लागणारविधानसभेतील सद्यस्थिती पाहता महाविकास आघाडीकडे एकूण ४६ (उबाठा २०, काँग्रेस १६ आणि शरद पवार गट १०) आमदार आहेत. या मतांच्या जोरावर मविआला जास्तीत जास्त दोनच जागा जिंकणे शक्य आहे. राज्यसभा निवडणुकीच्या वेळी झालेल्या तडजोडीनुसार, या दोन जागांपैकी एक जागा उबाठा आणि दुसरी जागा काँग्रेसला सोडण्याचे निश्चित झाले आहे.यामुळे शरद पवार गटाला या निवडणुकीतून माघार घ्यावी लागणार आहे.पोटनिवडणुकीनंतर अतिरिक्त बळ मिळणारदुसरीकडे, महायुतीकडे (भाजप १३२, शिवसेना ५७ आणि अजित पवार गट ४१) असे मोठे संख्याबळ आहे. त्यातच राहुरी आणि बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध झाल्यास महायुतीच्या खात्यात अतिरिक्त दोन आमदारांची भर पडणार आहे. यामुळे रिक्त होणाऱ्या नऊ जागांपैकी सात जागांवर महायुतीचा विजय सुकर मानला जात आहे.निवृत्तीनंतर विरोधकांची स्थितीकाँग्रेस : ५उबाठा : ५शरद पवार गट : २

फीड फीडबर्नर 23 Mar 2026 9:30 pm

Kolhapur News : कोल्हापूरच्या जोतिबा मंदिरात राडा! पालखी सोहळ्यात पुजारी आणि भाविक भिडले; २५ जणांवर गुन्हे दाखल

Kolhapur News : जोतिबा मंदिराच्या पालखी मार्गात सासन काठीचा अडथळा आल्यावरून पुजारी आणि भाविकांमध्ये हाणामारी झाली.

दैनिक प्रभात 23 Mar 2026 9:21 pm

Hardik Pandya Reveals : १२ कोटींची फरारी अन् गाणं मात्र ऐकतोय ‘हे’! हार्दिक पंड्याच्या खुलाशानंतर चाहतेही थक्क, पाहा VIDEO

Hardik Pandya Reveals : हार्दिक पंड्याने नुकताच त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील एक रंजक खुलासा केला आहे,

दैनिक प्रभात 23 Mar 2026 9:21 pm

Narhari Zirwal : अन्नपदार्थात भेसळ करताना आढळला तर थेट मकोका लागणार, मंत्री झिरवाळांची मोठी घोषणा

अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांनी विधानपरिषदेत स्पष्ट केले की, अन्न पदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा (मकोका) अंतर्गत कारवाई करण्यात येईल.

दैनिक प्रभात 23 Mar 2026 8:53 pm

US Iran Israel War: ट्रम्पचा दावा फेटाळला! इराण म्हणाला- “अमेरिकेशी कोणतीही चर्चा नाही; भीतीनेच ट्रम्पनी अल्टिमेटम मागे घेतला”

US Iran Israel War: एकीकडे ट्रम्प चर्चेचा दावा करत आहेत, तर दुसरीकडे इराण तो फेटाळत आहे. या परस्परविरोधी दाव्यांमुळे मध्यपूर्वेतील परिस्थिती अधिकच गुंतागुंतीची बनली आहे. पुढील ५ दिवसांत चर्चा कोणत्या दिशेने जाते यावरच युद्धाचे भवितव्य अवलंबून असणार आहे.

दैनिक प्रभात 23 Mar 2026 8:41 pm

MS Dhoni Reaction : धोनीचा शब्द अन् प्रशांतचा शॉट! १४.२ कोटींच्या खेळाडूवर माही का झाला फिदा? पाहा सराव सत्रातील ‘तो’ VIDEO

MS Dhoni Reaction : सीएसकेच्या गोटातून एक रंजक व्हिडिओ समोर आला असून, यामध्ये महेंद्र सिंह धोनी युवा खेळाडूंना गुरुमंत्र देताना दिसत आहे.

दैनिक प्रभात 23 Mar 2026 8:40 pm

Aaditya Thackeray : सरकारमध्ये सेनेच्या मंत्र्यांची जागा दाखवली; आदित्य ठाकरे यांची टीका

सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान मंत्री शंभूराज देसाई यांच्याशी झालेल्या धक्का-बुक्कीच्या मुद्द्यावरून ठाकरेसेना नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी शिदेंसेनेवर निशाणा साधला

दैनिक प्रभात 23 Mar 2026 8:34 pm

Crude Oil Prices: ट्रम्पच्या एका पोस्टने कच्च्या तेलाचे दर धडाधड कोसळले; सोने-चांदीतही मोठी रिकव्हरी

Crude Oil Prices: सोमवारी सकाळी अमेरिका-इराण तणावामुळे कच्चे तेल, सोने आणि चांदी या तिन्हींवर प्रचंड दबाव होता. मात्र संध्याकाळी ट्रम्प यांच्या एका पोस्टने परिस्थिती पूर्णपणे पालटली. यावरून जागतिक बाजार सध्या मध्यपूर्वेतील घडामोडींवर किती संवेदनशीलपणे प्रतिक्रिया देत आहे, हे स्पष्ट होते.

दैनिक प्रभात 23 Mar 2026 8:12 pm

Vijay Wadettiwar : विजय वडेट्टीवार अडचणीत? 100 कोटींचा मानहानी दावा; नेमकं प्रकरण काय

Vijay Wadettiwar : काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्याविरोधात भाजप नेते भरत पाटील राजे यांनी १०० कोटींचा मानहानीचा दावा दाखल केला आहे.

दैनिक प्रभात 23 Mar 2026 8:10 pm

वाढत्या डिझेल दरवाढीने मच्छिमार आर्थिक अडचणीत; केंद्राकडे तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी

मुंबई :महाराष्ट्रातील मच्छीमारांना वाढत्या डिझेल दरांमुळे मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असून, या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने केंद्र सरकारकडे तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी केंद्रीय मंत्री, पंचायती राज तसेच मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय,राजीव रंजन सिंह उर्फ ललन सिंह यांच्याकडे सविस्तर पत्र पाठवून केली आहे.राज्यातील १३६ मच्छीमार सहकारी संस्थांमार्फत चालवल्या जाणाऱ्या सुमारे ७५५० यांत्रिक मासेमारी नौकांसाठी डिझेल कोटा मंजूर असला तरी प्रत्यक्षात वाढत्या दरांमुळे मच्छीमारांचे आर्थिक गणित बिघडले आहे. जागतिक कच्च्या तेलाच्या किमतीतील चढउतारांमुळे डिझेल दरात झालेली वाढ ही त्यामागील प्रमुख कारणे मानली जात आहेत.सहकारी संस्थांना ‘बल्क कन्झ्युमर’ म्हणून वर्गीकृत केल्याने मच्छीमारांना किरकोळ दरांपेक्षा जास्त दराने डिझेल खरेदी करावे लागत आहे. यामुळे सामान्य ग्राहकांपेक्षा मच्छीमारांवर अधिक आर्थिक भार पडत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. वाढत्या इंधन खर्चाचा भार सहकारी संस्थांना सहन करणे कठीण जात असून, हा खर्च अखेरीस वैयक्तिक मच्छीमारांवर टाकला जात आहे. परिणामी अनेक मच्छीमारांना मासेमारीच्या फेऱ्या कमी कराव्या लागत असून, याचा थेट परिणाम मासळी उत्पादन आणि उत्पन्नावर होत आहे.या परिस्थितीमुळे मच्छीमार, मजूर, मासळी विक्रेते आणि संबंधित व्यवसायांवर अवलंबून असलेल्या मोठ्या लोकसंख्येच्या उपजीविकेला धोका निर्माण झाला आहे. मत्स्यव्यवसाय हा अन्नसुरक्षा आणि निर्यातीसाठी महत्त्वाचा क्षेत्र असतानाही, शेतीप्रमाणे इंधन अनुदान किंवा संरक्षण यंत्रणा उपलब्ध नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे.या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने काही महत्त्वाच्या उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. यामध्ये मच्छीमार सहकारी संस्थांचे पुनर्वर्गीकरण करून किरकोळ दराने डिझेल उपलब्ध करून देणे, लक्षित डिझेल अनुदान किंवा थेट लाभ हस्तांतरण (DBT) योजना लागू करणे, तसेच मत्स्यव्यवसायाला इंधन संरक्षण योजनांमध्ये समाविष्ट करणे यांचा समावेश आहे. याशिवाय, मत्स्यव्यवसायासाठी इंधन दर स्थिर ठेवण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर धोरण आखण्याचीही मागणी करण्यात आली आहे.केंद्र सरकारने याकडे तातडीने लक्ष दिल्यास महाराष्ट्रातील मच्छीमारांना मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

फीड फीडबर्नर 23 Mar 2026 8:10 pm

Ashok Kharat Case : अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट ! IPS सातपुतेंनी केले ‘हे’आवाहन

नाशिकमधील स्वयंघोषित अंकशास्त्रज्ञ व 'कॅप्टन' म्हणून ओळखला जाणारा अशोक खरात (Ashok Kharat Case) याच्या लैंगिक शोषण, बलात्कार आणि फसवणुकीच्या काळ्या कारनाम्यांचे नवे-नवे धागेदोरे दररोज समोर येत आहेत.

दैनिक प्रभात 23 Mar 2026 7:31 pm

खासगी कंपन्यांमधील कामाचे तास वाढवणारे विधेयक राज्य सरकारकडून मागे

मुंबई : राज्यातील दुकाने आणि खासगी आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांचे दैनंदिन कामाचे तास १० पर्यंत वाढवण्याबाबतचे सुधारित विधेयक राज्य सरकारने सोमवारी मागे घेतले. या विधेयकातील अनेक तरतुदींबाबत पुरेशी स्पष्टता नसल्याने आणि विविध स्तरांवरून उमटलेल्या प्रतिक्रियांमुळे कामगार विभागाने हे पाऊल उचलल्याचे समजते. सर्व तांत्रिक आणि व्यावहारिक बाबींचा सखोल अभ्यास करून हे विधेयक पुन्हा मांडले जाईल, अशी माहिती कामगार विभागातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिली.राज्य सरकारने 'महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियमा'त सुधारणा करून कामाचे तास ९ वरून १० करणे, कार्यकालयोजन १२ तासांपर्यंत वाढवणे आणि विश्रांतीविना ६ तास कामाची मुभा देणे, अशा तरतुदी प्रस्तावित केल्या होत्या. मात्र, या प्रस्तावित बदलांमुळे कामगार संघटना आणि काही आस्थापनांमध्येही मतमतांतरे पाहायला मिळाली. विशेषतः सलग ६ तास काम आणि वाढीव कार्यकालयोजन यामुळे कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर आणि कार्यक्षमतेवर काय परिणाम होईल, याबाबत स्पष्टता नव्हती.याविषयी माहिती देताना कामगार विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, विधेयकातील काही बाबींबाबत अस्थापनांमध्ये आणि संबंधित घटकांमध्ये स्पष्टता नव्हती. परिणामी, अंमलबजावणीत अडचणी येऊ शकल्या असत्या. त्यामुळे तूर्तास हे विधेयक मागे घेण्याचा निर्णय झाला आहे. आता सर्व बाबींचा परिपूर्ण अभ्यास करून त्यात आवश्यक सुधारणा केल्या जातील आणि त्यानंतरच ते पुन्हा सभागृहात मांडले जाईल.कामगार संख्या आणि नोंदणीचा पेचया विधेयकात, २० पेक्षा कमी कर्मचारी असलेल्या छोट्या आस्थापनांना 'नोंदणी प्रमाणपत्राची' गरज भासणार नाही, अशी तरतूद करण्यात आली होती. अशा छोट्या व्यावसायिकांना केवळ व्यवसायाची माहिती सरकारला देणे बंधनकारक राहणार होते. व्यावसायिक सुलभता वाढवणे आणि छोट्या दुकानदारांवरील प्रशासकीय भार कमी करणे हा त्यामागील उद्देश होता. मात्र, या बदलामुळे कामगारांच्या हक्कांचे संरक्षण कसे होईल आणि अस्थापनांचे वर्गीकरण कसे निश्चित होईल, यावर अस्थापनांच्या प्रतिनिधींमध्ये एकमत होऊ शकले नाही.

फीड फीडबर्नर 23 Mar 2026 7:30 pm

तीन महिन्यांत संपूर्ण राज्याचे 'ईटीएस'सर्वेक्षण

राज्यातील अवैध उत्खननावर 'एसआयटी'चा हातोडा; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत घोषणामुंबई : आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पुढील तीन महिन्यांत संपूर्ण राज्याचे ईटीएस (इलेक्ट्रॉनिक टोटल स्टेशन) सर्वेक्षण आणि गुगल मॅपिंग केले जाईल,अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी विधानसभेत केली. त्याशिवाय ठाणे, पालघर, रायगड आणि नवी मुंबई परिसरातील डोंगरांचे लचके तोडणाऱ्या अवैध उत्खननांची सखोल चौकशी करण्यासाठी आयपीएस अधिकारी आणि विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वाखाली 'एसआयटी' (विशेष तपास पथक) नेमण्याचेही त्यांनी जाहीर केले.आमदार सुनील प्रभू यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना महसूलमंत्री बोलत होते. अनेक ठिकाणी खाणपट्ट्यांची वैधता तपासली गेलेली नाही, पर्यावरण अनुमती नाही आणि स्फोटकांच्या वापरासाठी आवश्यक लायसन्सही नाही. हे सर्व प्रकार रोखण्यासाठी आता पुढच्या तीन महिन्यांत मागील पाच वर्षांतील परवानग्यांचा लेखाजोखा घेतला जाईल, असे बावनकुळे यांनी सांगितले. महसूलमंत्री बावनकुळे म्हणाले, अवैध उत्खननातील रॅकेट उद्ध्वस्त करण्यासाठी आयपीएस अधिकारी आणि विभागीय आयुक्तांचा समावेश असलेली एसआयटी नियुक्त केली जाईल. राज्यात नेमके किती गौण खनिज उत्खनन झाले, याचा खरा आकडा समोर येण्यासाठी संपूर्ण राज्याचे ईटीएस सर्वेक्षण केले जाईल. अवैध धंदे कोणाच्या तरी आशीर्वादाशिवाय चालत नाहीत, असे नमूद करत बावनकुळे यांनी मागील ५ वर्षांत अवैध कामांना मूकसंमती देणाऱ्या अधिकाऱ्यांचीही विभागीय चौकशी करण्याचे आदेश दिले....तर नोंदणी कायमस्वरुपी रद्दअवैध वाहतूक करणारा ट्रक तीन वेळा पकडला गेल्यास आरटीओमार्फत त्या वाहनाचे रजिस्ट्रेशन कायमस्वरूपी रद्द केले जाईल आणि पुढील अधिवेशनापर्यंत राज्यातील खाणींच्या अवैध उत्खननाचा संपूर्ण तपशील देणारी 'श्वेतपत्रिका' (पुस्तक) सभागृहासमोर मांडली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.आरएमसी प्लँटचे होणार 'कॅल्क्युलेशन'मुंबई आणि परिसरात सुरू असलेल्या 'रेडी मिक्स काँक्रीट' (आरएमसी) प्लँटमधून जेवढे कॉंक्रीट बाहेर पडले, त्यासाठी किती खडी आणि वाळू लागली याचे गणित मांडले जाईल. रॉयल्टीचा भरणा आणि प्रत्यक्षातील वापर यामध्ये मोठी तफावत आढळत असून, त्यातून कोट्यवधींचा महसूल बुडाल्याचा संशय मंत्र्यांनी व्यक्त केला.शेतकऱ्यांना दिलासाया चर्चेदरम्यान आमदार दिलीप लांडे, राजू खरे आणि नाना पटोले यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर बोलताना मंत्री म्हणाले की, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी समन्वयाने पुढील तीन दिवस विशेष मोहीम राबवून अवैध उत्खनन तात्काळ बंद करावे. मात्र, ज्यांच्याकडे वैध परवानग्या आहेत, त्यांचे काम बंद पडणार नाही याची काळजी घेतली जाईल. दरम्यान, शेतकऱ्यांनी स्वतःच्या वापरासाठी किंवा घरकुलासाठी शेतातून मुरूम-रेती काढल्यास त्यांच्यावर कोणतीही कारवाई करू नये, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.१३७ कोटींच्या दंडाचीही होणार चौकशीआमदार जितेंद्र आव्हाड यांनी भिवंडीतील एका खाणीवर प्रलंबित असलेल्या १३७ कोटी रुपयांच्या दंडाचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर महसूल मंत्र्यांनी या प्रकरणाची तातडीने माहिती घेऊन वसुलीसाठी कठोर पावले उचलण्याचे आश्वासन दिले.

फीड फीडबर्नर 23 Mar 2026 7:30 pm

Dasun Shanaka : संजू सॅमसन चेन्नईत अन् सॅम करन जखमी! राजस्थान रॉयल्सचं टेन्शन वाढलं असताना संगकारांनी शोधला मास्टर ‘रिप्लेसमेंट

Dasun Shanaka : आयपीएल २०२६ चा हंगाम सुरू होण्यापूर्वी राजस्थान रॉयल्स (RR) संघात मोठे फेरबदल झाले आहेत

दैनिक प्रभात 23 Mar 2026 7:25 pm

Today Top 10 News: शिवसेना मंत्र्यांचा सामूहिक राजीनाम्याचा इशारा ते डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय…वाचा आजच्या टाॅप बातम्या

Today Top 10 News: नांदेडमध्ये माणुसकीचे दर्शन! भावाच्या मृत्यूनंतर दिराने सावरला वहिनीचा संसार, पुतण्यांना दिले पितृछत्र.... वाचा आजच्या टाॅप बातम्या

दैनिक प्रभात 23 Mar 2026 7:05 pm

Narendra Modi : कोरोनाप्रमाणेच पश्चिम आशिया संकटावरही मात करू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला विश्वास

संपूर्ण संसदेने जगाला शांततेचा एकमुखी संदेश द्यावा, असे आवाहनही (Narendra Modi) त्यांनी यावेळी केले.

दैनिक प्रभात 23 Mar 2026 6:51 pm

Harshvardhan Sadgir Expressed : ‘डबल महाराष्ट्र केसरी झालो, पण स्वप्न अपूर्णच राहिलं’, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद दाखवली बोलून

Harshvardhan Sadgir Expressed : डबल महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीरने निवृत्तीचा निर्णय का घेतला? याबाबत मनातील खदखद व्यक्त केली.

दैनिक प्रभात 23 Mar 2026 6:47 pm

NCP Women President : चाकणकरांचे प्रदेशाध्यक्षपदही जाणार? ‘या’महिला नेत्यांची नावे चर्चेत

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पदावरून रुपाली चाकणकर यांना राजीनामा द्यावा लागला. आता पक्षातील महिला प्रदेशाध्यक्ष पदही (NCP Women President) त्यांना गमावावे लागणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.

दैनिक प्रभात 23 Mar 2026 6:32 pm

Nirmala Sitharaman : शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी नाही : अर्थमंत्री निर्मला सीतारामन

Nirmala Sitharaman : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत स्पष्ट केले की शेतकरी कर्जमाफीचा विचार नाही, मात्र जवानांच्या डिसेबिलिटी पेन्शनवरील कर सवलत कायम राहील.

दैनिक प्रभात 23 Mar 2026 6:21 pm

सातारा निवडणुकीतील राड्या प्रकरणी पोलीस अधीक्षकांना निलंबित करा नीलम गोऱ्हेचें निर्देश

मुंबई : आज विधानपरिषदेच्या कामकाजादरम्यान साताऱ्यातील एका धक्कादायक घटनेचे तीव्र पडसाद उमटले. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या धामधुमीत साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांना पोलिसांनी धक्काबुक्की केल्याची घटना समोर आली. एका कॅबिनेट मंत्र्याला अशा प्रकारे पोलिसांकडून वागणूक मिळणे, हे लोकशाही आणि प्रोटोकॉलच्या दृष्टीने अत्यंत गंभीर असल्याचे मत सत्ताधारी आमदारांनी व्यक्त केले. या घटनेमुळे सभागृहात प्रचंड गदारोळ झाला आणि सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी पोलिसांच्या या वर्तवणुकीचा तीव्र निषेध करत आक्रमक पवित्रा घेतला. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत, विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी कडक पावले उचलली आहेत. त्यांनी सभागृहात स्पष्ट आदेश दिले की, लोकप्रतिनिधी आणि मंत्र्यांचा सन्मान राखला गेलाच पाहिजे. या कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत त्यांनी सातारा पोलीस अधीक्षक (SP) तुषार दोशी यांच्यासह या घटनेशी संबंधित असलेल्या इतर पोलीस अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्णयामुळे पोलीस प्रशासनात मोठी खळबळ उडाली असून, जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीला आता राजकीय संघर्षासोबतच प्रशासकीय संघर्षाचीही धार चढली आहे.नेमकं प्रकरण काय ?विधानपरिषदेत मंत्र्यांची 'आपबिती'साताऱ्यात घडलेल्या त्या 'हायव्होल्टेज' ड्राम्याचे पडसाद आज विधानपरिषदेत उमटले, जेव्हा मंत्री शंभूराज देसाई यांनी स्वतःसोबत घडलेला अत्यंत अपमानास्पद प्रकार सभागृहात विशद केला. गेल्या ४० वर्षांच्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत असा भयानक आणि विदारक अनुभव कधीच आला नसल्याचे सांगताना मंत्री देसाई भावूक झाले होते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती असताना, ते आपल्या ३३ सहकाऱ्यांसह मतदानासाठी निघाले होते. मात्र, या सदस्यांचे अपहरण झाल्याची एक खोटी तक्रार करण्यात आली आणि त्या आधारावर पोलीस प्रशासनाने अत्यंत टोकाची भूमिका घेतली. शंभूराज देसाई यांनी सांगितल्यानुसार, मतदान केंद्रापासून अवघ्या १० मीटर अंतरावर असताना साध्या वेशातील १०० हून अधिक पोलिसांनी त्यांना अडवले. मी राज्याचा मंत्री असूनही मला पोलिसांनी अक्षरशः फरफटत नेले, ज्यामध्ये माझ्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे, अशा शब्दांत त्यांनी पोलिसांच्या दडपशाहीचे वर्णन केले. मंत्र्यांसोबत झालेल्या या गैरवर्तणुकीमुळे सभागृहात संतापाची लाट उसळली. सत्ताधारी आमदारांनी याला लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार संबोधले.या प्रकरणावर आक्रमक होत, आमदार विक्रम काळे यांनी सभागृहाचे कामकाज थांबवून या विषयावर खुद्द मुख्यमंत्र्यांनी तात्काळ निवेदन देण्याची मागणी केली. आमदार मकरंद पाटील यांनी अधिक कठोर पवित्रा घेत म्हटले की, सातारा पोलीस अधीक्षक एखाद्या पक्षाच्या 'घरगड्या'सारखे वागले आहेत. त्यांनी केवळ निलंबन करून भागणार नाही, तर दोषी अधिकाऱ्यांना सेवेतून बडतर्फ (Dismiss) करावे, अशी आग्रही मागणी लावून धरली.उपसभापती नीलम गोऱ्हे यांचे कडक निर्देशपरिस्थितीचे गांभीर्य आणि एका कॅबिनेट मंत्र्याला झालेली धक्काबुक्की लक्षात घेऊन, उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी या प्रकरणाचे नेतृत्व स्वीकारत अत्यंत कडक आणि निर्णायक भूमिका घेतली. लोकप्रतिनिधींचा अवमान आणि पोलिसांची दडपशाही खपवून घेतली जाणार नाही, असा स्पष्ट संकेत देत त्यांनी प्रशासनाला जोरदार चपराक लगावली. नीलम गोऱ्हे यांनी सातारा पोलीस अधीक्षक (SP) तुषार दोशी यांच्यासह या संपूर्ण घटनेत सहभागी असलेल्या संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याचे खडे आदेश दिले. कर्तव्यात कसूर आणि मंत्र्यांशी केलेले गैरवर्तन यावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.या प्रकरणातील सत्यता तपासण्यासाठी आणि भविष्यात कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेत अडथळा येऊ नये, यासाठी त्यांनी घटनास्थळाचे सर्व CCTV फुटेज सुरक्षित ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पुराव्यांशी कोणत्याही प्रकारची छेडछाड होऊ नये, याची खबरदारी घेण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या. उपसभापतींनी मंत्री उदय सामंत यांना या संपूर्ण प्रकरणाची व्यक्तिशः दखल घेण्यास सांगितले. या निलंबनाची प्रक्रिया आणि पुढील कायदेशीर कार्यवाही विनाविलंब पूर्ण करून त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले.कॅबिनेट बैठकीतही हा विषय मांडणारविधानपरिषदेतील गदारोळानंतर माध्यमांशी संवाद साधताना मंत्री शंभूराज देसाई यांनी या संपूर्ण प्रकरणामागे एक मोठे 'राजकीय षडयंत्र' असल्याचा खळबळजनक दावा केला आहे. त्यांनी अत्यंत गंभीर आरोप करत सांगितले की, शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आलेल्या दोन सदस्यांवर जाणीवपूर्वक खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आणि केवळ त्यांना फोडण्याच्या उद्देशाने ही सर्व खेळी रचली गेली. मतदान प्रक्रियेला जात असताना एका कॅबिनेट मंत्र्याला आणि खासदारांना अशा प्रकारे बळाचा वापर करून रोखणे, ही निव्वळ 'लोकशाहीची हत्या' असल्याचे त्यांनी नमूद केले. या प्रकरणाचा पाठपुरावा केवळ सभागृहापुरता मर्यादित राहणार नाही, असे स्पष्ट करत देसाई यांनी पुढील रणनीती जाहीर केली. हा विषय राज्याच्या आगामी कॅबिनेट बैठकीत अत्यंत गांभीर्याने मांडला जाईल, जेणेकरून प्रशासनावर वचक बसेल. महायुतीच्या समन्वय समितीमध्ये मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी या विषयावर सविस्तर चर्चा करून पुढील पावले उचलली जातील. आम्ही सध्या मुंबईत अधिवेशनासाठी आहोत, मात्र साताऱ्यात परतल्यानंतर या घटनेमुळे लोकांमध्ये जो संताप आहे, त्याचा तीव्र उद्रेक पाहायला मिळेल, असा गर्भित इशाराही त्यांनी दिला. साताऱ्यासारख्या ऐतिहासिक आणि सुसंस्कृत जिल्ह्यामध्ये पोलीस प्रशासनाकडून झालेली ही दडपशाही राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आहे. आता उपसभापतींच्या निलंबनाच्या आदेशानंतर गृह विभाग नेमकी काय आणि किती तातडीने कारवाई करतो, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधले गेले आहे.

फीड फीडबर्नर 23 Mar 2026 6:10 pm

व्यावसायिक एलपीजीच्या कोट्यात ५० टक्क्यांपर्यंत वाढ; हॉटेल आणि उद्योगांना मोठा दिलासा

ठाणे : देशातील व्यावसायिक एलपीजी (LPG) गॅसच्या पुरवठ्याबाबत केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून, राज्यांना दिल्या जाणाऱ्या एकूण कोट्यात आता ५० टक्क्यांपर्यंत मोठी वाढ करण्यात आली आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचे सचिव डॉ. नीरज मित्तल यांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्राद्वारे या निर्णयाची माहिती दिली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी राज्य शासनाच्या सूचनेनुसार करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली आहे.नव्या धोरणानुसार, राज्यांना यापूर्वी मिळणाऱ्या २० टक्के आणि त्यानंतर सुधारणांच्या आधारे वाढविण्यात आलेल्या १० टक्के कोट्याव्यतिरिक्त आता अतिरिक्त २० टक्के कोटा मंजूर करण्यात आला आहे. यामुळे व्यावसायिक एलपीजीचा एकूण पुरवठा आता संकटपूर्व काळातील पातळीच्या ५० टक्क्यांवर पोहोचला आहे. या वाढीव कोट्याचा सर्वाधिक फायदा रेस्टॉरंट्स, ढाबे, हॉटेल्स, औद्योगिक कॅन्टीन, अन्न प्रक्रिया उद्योग, दुग्धशाळा आणि सरकारी अनुदानित अन्न केंद्रांना होणार आहे. तसेच स्थलांतरित मजुरांसाठी उपलब्ध असलेल्या ५ किलोच्या एफटीएल (FTL) सिलिंडर पुरवठ्यालाही यात प्राधान्य देण्यात आले आहे.या सुविधेचा लाभ घेण्यासाठी सरकारने काही अटीही लागू केल्या आहेत. सर्व व्यावसायिक आणि औद्योगिक एलपीजी ग्राहकांना संबंधित तेल कंपन्यांकडे (OMCs) आपली अधिकृत नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. या कंपन्या ग्राहकांच्या वार्षिक वापराचा आणि त्यांच्या क्षेत्राचा संपूर्ण रेकॉर्ड ठेवणार आहेत, जेणेकरून गॅसचा गैरवापर टाळता येईल. यासोबतच, ज्या भागात पाईप गॅसची (PNG) सुविधा उपलब्ध आहे, तिथे ग्राहकांनी पीएनजीसाठी अर्ज करणे आणि त्या वापरासाठीची तयारी दर्शविणे आवश्यक आहे. या निर्णयामुळे व्यावसायिक क्षेत्रातील इंधन टंचाई दूर होण्यास मदत होणार असून उद्योगांना मोठा दिलासा मिळणार असल्याचा विश्वास शासनाने व्यक्त केला आहे.

फीड फीडबर्नर 23 Mar 2026 6:10 pm

मुंबईतील सफाई कामगारांना मिळणार हक्कांची घरे...

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजना’ अधिवेशनात जाहीर होणार.. उपाध्यक्षांच्या पुढाकारानंतर मुख्यमंत्र्यांचे ठोस आश्वासन..मुंबई :मुंबई महानगरपालिकेतील सफाई कामगारांसाठी मोठा दिलासा देणारी घडामोड घडली असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजना अंतर्गत त्यांना हक्काची घरे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या पुढाकाराने म्युन्सिपल मजदूर युनियनच्या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.या भेटीदरम्यान शिष्टमंडळाने शासन निर्णय २००८ व २०१५ ची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी केली. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेत, मुंबई महापालिकेने नव्याने उभारलेल्या घरांपैकी ५० टक्के घरे सफाई कामगारांना मालकी हक्काने देण्याचे ठोस आश्वासन दिले. तसेच या योजनेची अंमलबजावणी येत्या अधिवेशनात जाहीर करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.दरम्यान, या मागणीसाठी म्युन्सिपल मजदूर युनियन, मुंबईच्या वतीने २३ मार्च रोजी आझाद मैदान येथे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र आंदोलनापूर्वीच उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी मध्यस्थी करत मुख्यमंत्री यांची भेट घडवून आणली आणि तोडगा काढण्यात यश मिळवले.मुंबई महापालिका क्षेत्रातील एकूण ३६ वसाहतींचे पुनर्वसन करण्यात आले असून सुमारे १२,२०० नवीन घरे उभारण्यात आली आहेत. यापैकी ५० टक्के घरे सफाई कामगारांना देण्याचा निर्णय घेतल्याने हजारो कुटुंबांना स्थिर निवासाची संधी उपलब्ध होणार आहे. या बैठकीस विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, म्युन्सिपल मजदूर युनियनचे अध्यक्ष अशोक जाधव, वामन कविस्कर, हिंदुराव जाधव आदी उपस्थित होते.

फीड फीडबर्नर 23 Mar 2026 6:10 pm

Sunil Gavaskar Criticism : ‘त्या खेळाडूंना संघातून काढा…’, IPL 2026 पूर्वी संतप्त सुनील गावस्करांनी फ्रँचायझींना दिला सल्ला, नेमकं कारण काय?

Sunil Gavaskar Criticism : सुनील गावस्कर यांनी परदेशी खेळाडूंवर तीव्र संताप व्यक्त केला असून फ्रँचायझींना अशा खेळाडूंवर कठोर कारवाई करण्याचे आवाहन केले आहे.

दैनिक प्रभात 23 Mar 2026 5:57 pm

US-Israel Iran War: 23 दिवसांच्या युद्धानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा अचानक यू-टर्न; अमेरिका-इराण युद्धात मोठं वळण

US-Israel Iran War:ट्रम्प यांनी स्पष्ट केले की इराणवरील हल्ले ५ दिवसांसाठी पुढे ढकलण्याचा हा निर्णय सुरू असलेल्या चर्चांच्या यशावर अवलंबून आहे. म्हणजेच जर चर्चा अयशस्वी झाली तर हल्ले पुन्हा होऊ शकतात, हे त्यांनी स्पष्टपणे नमूद केले.

दैनिक प्रभात 23 Mar 2026 5:47 pm

Mahayuti : मोठा राजकीय भूकंप..! शिंदे गटाचे सर्व मंत्री राजीनामा देणार? महायुतीतून बाहेर पाडण्याचे दिले संकेत

Mahayuti : सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीतील राड्यावरून शिंदेसेनेच्या मंत्र्यांनी राजीनाम्याची धमकी दिली आहे.

दैनिक प्रभात 23 Mar 2026 5:36 pm

Delhi Car Blast : दिल्‍ली स्‍फोट प्रकरणी काश्मीर खोऱ्यात एनआयएची मोठी कारवाई

दिल्लीतील लाल किल्‍ला स्फोट प्रकरणाच्या (Delhi Car Blast) तपासात राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एनआयए) आज, सोमवारी पहाटे काश्मीर खोऱ्यात मोठी कारवाई केली. या कारवाईत एकूण 12 ठिकाणी छापेमारी केली.

दैनिक प्रभात 23 Mar 2026 5:33 pm

ATM New Rules: 1 एप्रिलपासून ATM नियम बदलणार!

ATM New Rules: नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासून म्हणजेच १ एप्रिल २०२६ पासून देशभरातील ATM वापराचे अनेक नियम बदलणार आहेत.

दैनिक प्रभात 23 Mar 2026 5:24 pm

Player of the Month : ICC कडून भारत-पाकच्या खेळाडूंचा गौरव! फेब्रुवारी महिन्याच्या ‘प्लेअर ऑफ द मंथ’पुरस्कारावर कोरलं नाव

Player of the Month : भारत आणि पाकिस्तानच्या खेळाडूंनी प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कारांध्ये बाजी मारली आहे.

दैनिक प्रभात 23 Mar 2026 5:21 pm

Ips Tejaswi Satpute : भोंदूबाबा खरात प्रकरणाचा तपास करणाऱ्या IPS तेजस्वी सातपुते कोण? वाचा त्यांचा ‘डॅशिंग’प्रवास

Ips Tejaswi Satpute : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाच्या तपासासाठी नेमलेल्या SIT च्या प्रमुख IPS तेजस्वी सातपुते आहेत.

दैनिक प्रभात 23 Mar 2026 5:21 pm

Digital Education : डिजिटल शिक्षणावरुन स्वीडनचा ‘यू-टर्न’

मुलांच्या हातातून टॅब काढून घेऊन त्यांना परत वही पेन आणि पुस्तक देण्यासाठी (Digital Education) स्वीडन सुमारे 1000 कोटी रुपये खर्च करणार आहे. एकूणच डिजिटल लर्निंगचा आपला प्रयोग अयशस्वी होता असं स्वीडनला लक्षात आलेले आहे.

दैनिक प्रभात 23 Mar 2026 5:15 pm

लवकरच केदार शिंदेंचा 'हा'स्त्रीप्रधान सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार

मराठी सिनेविश्वात स्त्रीप्रधान आणि कुटुंबप्रधान विषयांना वेगळीच ओळख मिळवून देणारे दिग्दर्शक केदार यशोधरा शिंदे लवकरच आणखी एक हटके सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहेत.'अगंबाई…अरेच्चा!', 'बाईपण भारी देवा' आणि 'अगं अगं सुनबाई! काय म्हणताय सासूबाई?' या यशस्वी सिनेमानंतर आता 'आई भाड्याने हवी?' या नव्या सिनेमाची दिग्दर्शक केदार शिंदेंनी घोषणा केली आहे.

फीड फीडबर्नर 23 Mar 2026 5:10 pm

IPL 2026 Fan Park : तिकीट नाही? टेन्शन नको! बीसीसीआयने चाहत्यांना दिली खूशखबर; मोफत पाहता येणार आयपीएलचा लाईव्ह थरार

IPL 2026 Fan Park : स्टेडिअमच्या तिकिटांसाठी सुरू असलेली ओढाताण लक्षात घेता, बीसीसीआयने (BCCI) सामान्य चाहत्यांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी दिली आहे.

दैनिक प्रभात 23 Mar 2026 4:50 pm

PM Modi: “युद्ध दीर्घकाळ चालणार”; मोदींनी लोकसभेत सांगितलं भारतापुढील सर्वात मोठं संकट; तेल, वीज, अन्न सगळ्यांवर होणार परिणाम?

PM Modi: पश्चिम आशियातील संघर्ष चौथ्या आठवड्यात प्रवेश करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी लोकसभेत सविस्तर निवेदन केले. या संघर्षाचे भारताच्या अर्थव्यवस्थेवर, राष्ट्रीय सुरक्षेवर आणि मानवतावादी पातळीवर होणारे परिणाम, भारतीयांची सुरक्षा, ऊर्जा पुरवठा आणि अन्नसुरक्षा या सर्व विषयांवर त्यांनी भाष्य केले.

दैनिक प्रभात 23 Mar 2026 4:47 pm

Anil Parab : मंत्र्यांनाच धक्काबुक्की होत असेल, तर सत्तेला लाथ मारा; अनिल परबांचे शिवसेना व राष्ट्रवादीला आव्हान

Anil Parab : सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत मंत्र्यांना झालेल्या धक्काबुक्कीवरून विधान परिषदेत गदारोळ

दैनिक प्रभात 23 Mar 2026 4:39 pm

PM Narendra Modi : ‘होर्मुझ सामुद्रधुनीत अडथळा अस्वीकार्य’; लोकसभेत पंतप्रधान मोदींचा जगाला स्पष्ट संदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम आशियातील तणाव आणि युद्धस्थितीवर लोकसभेत महत्त्वपूर्ण निवेदन करताना होर्मुझ सामुद्रधुनी (Strait of Hormuz) मधील अडथळा कोणत्याही परिस्थितीत मान्य नसल्याचे ठामपणे सांगितले.पश्चिम आशियातील परिस्थिती चिंताजनक असल्याचे नमूद करत पंतप्रधान मोदी म्हणाले की, त्या भागात सुमारे १ कोटी भारतीय राहतात आणि कार्यरत आहेत. या मुद्द्यावर देशात सर्वपक्षीय एकमत असणे अत्यंत गरजेचे आहे. त्यांनी विविध देशांच्या नेत्यांशी संवाद साधल्याची माहितीही यावेळी दिली.युद्ध सुरू झाल्यापासून आतापर्यंत ३.७५ लाखांहून अधिक भारतीयांना सुरक्षितपणे परत आणण्यात आले असून, इराण मधून सुमारे १,००० भारतीयांना परत आणले गेले आहे. यामध्ये अनेक वैद्यकीय विद्यार्थ्यांचा समावेश आहे.होर्मुझ सामुद्रधुनीचे महत्त्व अधोरेखित करत पंतप्रधान म्हणाले की, भारतात येणाऱ्या कच्च्या तेलाचा, गॅसचा, खतांचा आणि इतर ऊर्जा स्त्रोतांचा मोठा हिस्सा या मार्गावर अवलंबून आहे. युद्धामुळे जहाजांच्या हालचालींमध्ये अडचणी निर्माण झाल्या असल्या तरी देशातील इंधनपुरवठ्यावर परिणाम होऊ नये यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.भारत आपल्या एलपीजी गरजांपैकी सुमारे ६० टक्के आयातीवर अवलंबून असल्याचे सांगत त्यांनी घरगुती ग्राहकांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले. तसेच देशांतर्गत उत्पादन वाढवण्यावरही भर दिला जात असल्याचे मोदींनी सांगितले.Speaking in the Lok Sabha. https://t.co/BIrR385m4O— Narendra Modi (@narendramodi) March 23, 2026पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट इशारा देत म्हटले की, आंतरराष्ट्रीय जलमार्गात अडथळे निर्माण करणे, व्यापारी जहाजांवर हल्ले करणे आणि ऊर्जा पायाभूत सुविधांवर आघात करणे अस्वीकार्य आहे. भारत नेहमीच शांतता आणि संवादाच्या बाजूने उभा राहिला असून, कूटनीतीच्या माध्यमातून तणाव कमी करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.या युद्धाचा परिणाम दीर्घकालीन राहू शकतो, त्यामुळे देशाने एकजूट राखणे आवश्यक असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. चुकीची माहिती पसरवणाऱ्यांपासून सावध राहण्याचे आवाहन करत त्यांनी सांगितले की, भारत सर्व संबंधित देशांशी संपर्क ठेवून परिस्थितीवर लक्ष ठेवत आहे.

फीड फीडबर्नर 23 Mar 2026 4:30 pm

हॉकी इंडियाची ८ व्या वार्षिक पुरस्कार २०२५ साठी नामांकने जाहीर

नवी दिल्ली : हॉकी इंडियाने ८ व्या वार्षिक पुरस्कार २०२५ साठी नामांकनांची यादी जाहीर केली. २७ मार्च २०२६ रोजी नवी दिल्लीत होणाऱ्या या पुरस्कार सोहळ्यात, २०२५ या वर्षात भारतीय हॉकीसाठी उत्कृष्ट कामगिरी आणि योगदान देणाऱ्या हॉकूपटू आणि अधिकाऱ्यांचा सन्मान केला जाणार आहे.या सोहळ्यातील प्रमुख पुरस्कारांमध्ये 'हॉकी इंडिया बलबीर सिंग सीनियर प्लेयर ऑफ द इयर' पुरस्काराचा समावेश आहे. जो पुरुष आणि महिला गटातील सर्वोत्कृष्ट हॉकपटूंना दिला जाणार आहे. तसेच, उदयोन्मुख प्रतिभावंतांना 'हॉकी इंडिया जुगराज सिंग इमर्जिंग प्लेयर ऑफ द इयर (पुरुष अंडर-२१)' आणि 'हॉकी इंडिया असुंता लाक्रा इमर्जिंग प्लेयर ऑफ द इयर (महिला अंडर-२१)' या पुरस्कारांनी सन्मानित केले जाणार आहे.विविध स्थानांवरील उत्कृष्ट कामगिरीसाठी 'हॉकी इंडिया बलजीत सिंग गोलकीपर ऑफ द इयर', 'हॉकी इंडिया परगत सिंग बेस्ट डिफेंडर ऑफ द इयर', 'हॉकी इंडिया अजित पाल सिंग बेस्ट मिडफिल्डर ऑफ द इयर' आणि 'हॉकी इंडिया धनराज पिल्लई बेस्ट फॉरवर्ड ऑफ द इयर' हे पुरस्कारही प्रदान केले जातील. या आठ श्रेणींमध्ये एकूण ३२ हॉकीपटूंची निवड करण्यात आली आहे.याव्यतिरिक्त, 'हॉकी इंडिया प्रेसिडेंट्स आउटस्टँडिंग अचिव्हमेंट अवॉर्ड', 'जमन लाल शर्मा इनव्हॅल्युएबल कॉन्ट्रिब्युशन अवॉर्ड', पंच आणि तांत्रिक अधिकाऱ्यांसाठी विशेष सन्मान आणि 'बेस्ट मेंबर युनिट अवॉर्ड' हे पुरस्कारही या सोहळ्यात प्रदान केले जातील.राजगीर (बिहार) येथे २०२५ च्या आशिया कपमध्ये सुवर्णपदक जिंकलेल्या भारतीय पुरुष संघाला आणि तामिळनाडू येथे झालेल्या एफआयएच हॉकी मेन्स ज्युनियर वर्ल्ड कपमध्ये कांस्यपदक जिंकलेल्या भारतीय ज्युनियर पुरुष संघालाही सन्मानित केले जाणार आहे. १५ व्या हॉकी इंडिया राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सदस्य संघांनाही सन्मानित केले जाईल.हॉकी इंडियाचे अध्यक्ष डॉ. दिलीप तिर्की म्हणाले, भारतीय हॉकीसाठी हे वर्ष महत्त्वपूर्ण आहे आणि मागील वर्षातील उत्कृष्ट कामगिरीला मान्यता देणे महत्त्वाचे आहे. हे पुरस्कार हॉकपटू आणि अधिकाऱ्यांच्या समर्पणाचा आणि कामगिरीचा सन्मान करतात.महासचिव भोला नाथ सिंग म्हणाले, हे पुरस्कार खेळाडू, प्रशिक्षक, अधिकारी आणि सदस्य संघांच्या सामूहिक प्रयत्नांना मान्यता देतात, ज्यांनी भारतीय हॉकीला मजबूत करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.नामांकन मिळाले हॉकपटू खालीलप्रमाणे:वर्षातील सर्वोत्कृष्ट गोलकीपर (बलजीत सिंग पुरस्कार): प्रिन्स दीप सिंग, कृष्ण बहादूर पाठक, बिचू देवी खरिबाम, सूरज करकेरावर्षातील सर्वोत्कृष्ट बचावपटू (परगत सिंग पुरस्कार): संजय, अमित रोहिदास, जुगराज सिंग, हरमनप्रीत सिंग.वर्षातील सर्वोत्कृष्ट मिडफिल्डर (अजित पाल सिंग पुरस्कार): हार्दिक सिंग, सुमित, राजकुमार पाल, नीलकांत शर्मा.वर्षातील सर्वोत्कृष्ट फॉरवर्ड (धनराज पिल्लई पुरस्कार): सुखजीत सिंग, अभिषेक, नवनीत कौर, शिलानंद लाक्रा.वर्षातील उदयोन्मुख हॉकीपटू (२१ वर्षाखालील महिला, असुंता लाक्रा पुरस्कार): साक्षी राणा, ज्योती सिंग, सुनीलिता टोप्पो, कनिका सिवाचवर्षातील उदयोन्मुख हॉकीपटू (पुरुष अंडर-२१ , जुगराज सिंग पुरस्कार): प्रिन्स दीप सिंग, मनमीत सिंग, अनमोल एक्का, अर्शदीप सिंग.वर्षातील सर्वोत्तम महिला हॉकपटू (बलबीर सिंग वरिष्ठ पुरस्कार): नवनीत कौर, सलीमा टेटे, लालरेमसियामी, सविता.वर्षातील सर्वोत्तम पुरुष हॉकीपटू (बलबीर सिंग वरिष्ठ पुरस्कार): हार्दिक सिंग, सुखजीत सिंग, संजय, अभिषेक

फीड फीडबर्नर 23 Mar 2026 4:30 pm

नवऱ्याचं कौतुकचं नाही, अभिनेत्री दीपिका पदुकोण सोशल मिडियावर ट्रोल

अभिनेता रणवीर सिंहच्या धुरंधर 2 सिनेमानं जगभरात धूमाकूळ घातली आहे. धुरंधरनं बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करत इतिहास रचला आहे. एकीकडे रणवीरच्या धुरंधरच सर्वत्र भरभरून कौतुक होत असताना मात्र, दुसरीकडे दीपिका पदुकोण सध्या सोशल मीडियावर जोरदार ट्रोल होत आहे.रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्री दीपिका पदुकोण धुरंधर सिनेमाच्या स्पेशल स्क्रीनिंगला उपस्थित नव्हती तसेच, तिने पती रणवीर सिंहचं किंवा सिनेमाचं देखील कौतुक केलेलं नाही. दीपिकानं सोशल मिडियावर धुरंधरसाठी किंवा रणवीरसाठी कोणतीही पोस्ट शेअर केलेली नसून दीपिकाची ही गोष्ट सध्या चाहत्यांना खटकत आहे. सोशल मिडियावर अनेकजण दीपिकावर जोरदार टीका करत आहेत.स्क्रीनिंग मिस केल्यानंतर नुकताच दीपिका आपल्या सासरच्या मंडळींसोबत एका कॉन्सर्टमध्ये दिसली. तिचे कॉन्सर्टमधील अनेक व्हिडिओ आणि फोटोज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून 'ती नवऱ्याच्या सिनेमासाठी वेळ न काढता कॉन्सर्टला गेली', असं म्हणत अनेकजण दीपिकावर टीका करत आहेत.रणवीर सिंहचा धुरंधर सिनेमा जगभरात धूमाकूळ घालत आहे. जगभरातून प्रत्येकजण रणवीरचं कौतुक करत आहे. मात्र, रणवीरची पत्नी अभिनेत्री दीपिका पदुकोणनं रणवीरचं कौतुक का केलं नाही ? असा प्रश्न चाहत्यांना पडला असून याबाबत सोशल मिडियावर चाहत्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

फीड फीडबर्नर 23 Mar 2026 4:30 pm

Ashok Kharat Case : ‘ती’एक चूक अन् अशोक खरातचा संपूर्ण कारनामा समोर

ज्याच्या एका शब्दावर नाशिकमधील मोठे अधिकारी आणि राजकीय नेते लोटांगण घालत होते, तो भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat Case) आता लैंगिक शोषण आणि बलात्काराच्या गंभीर आरोपांखाली अटकेत आहे.

दैनिक प्रभात 23 Mar 2026 4:29 pm

MS Dhoni Retirement : ‘फिटनेस खालावतोय पण मी….!’निवृत्तीच्या प्रश्नावरील धोनीच्या उत्तराने जिंकली चाहत्यांचनी मनं, पाहा VIDEO

MS Dhoni Retirement : आयपीएल २०२६ च्या रणधुमाळीला सुरुवात होण्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्सच्या (CSK) गोटातून सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे

दैनिक प्रभात 23 Mar 2026 4:22 pm

सोलापूर महापालिका व जिल्हा परिषदेवर भाजपचा दबदबा - विरोधी पक्षनेत्याशिवायच कारभार सुरू

सोलापूर : सोलापूर महापालिकेत १०२ पैकी ८७ जागा भाजपने जिंकल्या असून, आठ जागा मिळविलेला एमआयएम दुसऱ्या क्रमांकावर आहे. शिवसेनेला चार जागा मिळाल्या.सोलापूर जिल्हा परिषदेत देखील भाजपचे सदस्य ३८ जागांवर विजयी झाले, तर राज्यातील त्यांचा मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस ११ जागा मिळवत दुसऱ्या क्रमांकावर आहे.महापालिकेची स्थापना १९६४ साली झाली आणि त्यानंतर विरोधी पक्षनेता तसेच पक्षनेतेही निवडले जात होते. मात्र, यंदा महापालिकेत पहिल्यांदाच विरोधी पक्षनेत्यांशिवाय कारभार सुरू आहे. जिल्हा परिषदेतही पहिल्यांदा विरोधी पक्षनेता निवडला गेला नाही.जिल्हा परिषदांची स्थापना १ मे १९६२ रोजी गावपातळीवरील विकास व सत्तेच्या विकेंद्रीकरणासाठी करण्यात आली होती. त्यामध्ये विरोधी पक्षनेता किंवा पक्षनेते अशी पदे नव्हती; त्यामुळे विरोधी पक्षनेता निवडायचा की नाही, हा निर्णय सत्ताधारी पक्षास म्हणजे अध्यक्षास असतो.२००२ साली मदनसिंह मोहिते-पाटील हे सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले. त्यांच्या अडीच वर्षांनंतर पक्षनेतेपद तयार करण्यात आले आणि नंतर विरोधी पक्षनेताही निवड सुरू झाली. दोन्ही पदांसाठी स्वतंत्र दालने तयार केली गेली.आता पहिल्यांदाच भाजपला जिल्हा परिषदेवर पूर्णपणे सत्ता मिळाली असून त्यांनी पक्षनेता व गटनेता निवडले, परंतु विरोधी पक्षनेता निवडला नाही. या निर्णयामुळे आता प्रशासन कार्यान्वयनात एकपक्षीय कारभार सुरू झाला आहे.

फीड फीडबर्नर 23 Mar 2026 4:10 pm

पुणे - मुंढव्यातील पासपोर्ट कार्यालय पाषाणला स्थलांतरित होणार

पुणे : परराष्ट्र मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेले मुंढवा येथील पासपोर्ट सेवा केंद्र (पीएसके) आता कायमस्वरूपी स्थलांतरित होणार आहे. आगामी ३० मार्च २०२६ पासून या केंद्राचे कामकाज बाणेर-पाषाण लिंक रस्त्यावरील नवीन वास्तूतून सुरू होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. त्यामुळे पुणे आणि परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.पिंगळे वस्ती) येथे कार्यरत असलेले हे केंद्र आता पूर्णपणे बंद होईल. त्याऐवजी ‘मॉटक्लेयर बिल्डिंग’, पहिला मजला, बाणेर-पाषाण लिंक रस्ता, पाषाण या नवीन ठिकाणी सर्व सेवा उपलब्ध राहतील. वाढती गर्दी आणि अत्याधुनिक सुविधांची गरज लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. बाणेर, पाषाण, औंध, बावधन आणि हिंजवडी आयटी पार्क परिसरातील नागरिकांसाठी हे नवीन केंद्र अधिक सोयीचे ठरणार आहे. नव्या कार्यालयात आधुनिक सुविधाही असणार आहेत.

फीड फीडबर्नर 23 Mar 2026 4:10 pm

मगरपट्ट्याच्या मागील बाजूस कॅनल फुटल्याने रस्त्यावर पाणीच पाणी

पुणे : मगरपट्टा सोसायटीच्या मागील बाजूस असलेल्या कालव्याला भगदाड पडल्याने मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर पडत असून परिसरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कॅनालमधून वेगाने वाहणारे पाणी रस्त्यावर येत असून मगरपट्टा सोसायटीमध्ये पाणी शिरले आहे. तसेच हडपसर औद्योगिक वसाहतीमध्ये अनेक कंपन्यांमध्ये पाणी शिरले आहे .जवळच असलेल्या जहांगीर नगर येथील वस्तीमध्ये ही पाणी शिरत असून नागरिक भयभीत झाले आहेत.मगरपट्टा रोड परिसरात सुरू असलेल्या पाइपलाइन कामामुळे कॅनालला मोठा धोका निर्माण होऊन अखेर कॅनाल फुटल्याची घटना घडली आहे. तसेच मागील अनेक दिवसांपासून कॅनालमधून किरकोळ पाणी गळती सुरू होती. अखेर मोठे भगदाड पडून कॅनाल फुटला. त्यामुळे परिसरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.मोठ्या प्रमाणावर पाणी आल्याने मगरपट्टाच्या मागील बाजूचे रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली आहे. एका बाजूचा रस्सा बंद झाला असून एकच मार्ग सुरू असल्याने साधारण दोन किलोमीटर वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत.

फीड फीडबर्नर 23 Mar 2026 4:10 pm

मुंबईत क्षयरोग चाचणीसाठी 'बफर स्टॉक'उपलब्ध; मंत्री उदय सामंत यांची विधान परिषदेत माहिती

२३ हजारांहून अधिक कार्ट्रिजेसचा साठा उपलब्धमुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये क्षयरोग (TB) निदानासाठी आवश्यक असलेल्या 'कार्ट्रिजेस'चा (Cartridges) तुटवडा नसल्याचे स्पष्ट करत, सध्या मुबलक साठा उपलब्ध असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज विधान परिषदेत दिली. आमदार पंकज भुजबळ यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी मुंबईतील क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाची सद्यस्थिती सभागृहासमोर मांडली.विधान परिषदेत बोलताना आमदार पंकज भुजबळ यांनी मुंबईतील क्षयरोग चाचण्यांच्या तुटवड्याबाबत आणि सीबी-नॅट (CB-NAAT) मशीनच्या दुरुस्ती अभावी प्रलंबित असलेल्या निदानाबाबत प्रश्न उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना मंत्री उदय सामंत यांनी सांगितले की, मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सध्या क्षयरोग निदानासाठी लागणाऱ्या साहित्याचा पुरेसा साठा आहे.मुंबईतील क्षयरोग निदानाची सद्यस्थिती आणि उपलब्ध साठाविधान परिषदेत मुंबईतील क्षयरोग (TB) निर्मूलन कार्यक्रमावर भाष्य करताना मंत्री उदय सामंत यांनी तांत्रिक सामग्रीच्या उपलब्धतेबाबत सविस्तर आकडेवारी सादर केली. त्यांनी स्पष्ट केले की, सध्या मुंबईत क्षयरोग निदानासाठी आवश्यक असलेल्या साहित्याचा मुबलक साठा उपलब्ध आहे. यामध्ये २३,६६० सीबी-नॅट (CB-NAAT) कार्ट्रिजेस, २४,३०० ट्रू-नॅट (MTB) चिप्स आणि ६,६२० ट्रू-नॅट (RIF) चिप्सचा समावेश आहे. मुंबई महानगरपालिका क्षेत्रात दरमहा साधारणपणे १० हजार कार्ट्रिजेसची गरज भासते, मात्र सध्या त्या गरजेच्या तुलनेत दुप्पट साठा प्रशासनाकडे तयार आहे. भविष्यात कोणताही तुटवडा भासू नये यासाठी शासनाने एक महिन्याचा आगाऊ 'बफर स्टॉक' राखून ठेवण्याचे धोरण स्वीकारले आहे, ज्यामुळे निदानाची प्रक्रिया विनाअडथळा सुरू राहील.यावेळी मंत्र्यांनी राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत झालेल्या प्रगतीवरही प्रकाश टाकला. २०२२ ते २०२५ या कालावधीत मुंबईत तब्बल १ लाख ७५ हजार चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आल्या आहेत. या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळेच मुंबईतील क्षयरोगाचे प्रमाण ११ टक्क्यांवरून ८ टक्क्यांवर खाली आले आहे. निदानाच्या संख्येत झालेली वाढ आणि बाधितांच्या प्रमाणात झालेली ही घट, राज्याच्या आरोग्य यंत्रणेसाठी अत्यंत दिलासादायक आणि आश्वासक बाब असल्याचे मंत्री सामंत यांनी नमूद केले.अद्ययावत उपचार पद्धतीबाबत माहिती देताना मंत्र्यांनी स्पष्ट केले की, राज्यात 'बी-पलाम' (BPaLM) ही अत्याधुनिक उपचार पद्धती कार्यान्वित करण्यात आली आहे. यामुळे 'एमडीआर टीबी' (MDR TB) रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात मोठी सुधारणा झाली आहे. झोपडपट्टी आणि दाट लोकवस्तीच्या भागातही या चाचण्या प्रभावीपणे केल्या जात असल्याचे त्यांनी नमूद केले

फीड फीडबर्नर 23 Mar 2026 4:10 pm

मुंबईत मिळकतीचे फेरफार मिळणार ऑनलाईन - महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा; ३० लाख नागरिकांना मिळणार लाभ

मुंबई : मुंबई शहर जिल्ह्यातील मालमत्ताधारकांसाठी महसूल विभागाने मोठी घोषणा केली आहे. यापुढे मिळकतींच्या फेरफाराची प्रक्रिया पूर्णपणे 'डिजिटल' होणार असून, मुंबईत प्रथमच तब्बल ४५ प्रकारच्या फेरफारांसाठी ऑनलाईन अर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याचा लाभ मुंबईतील सुमारे ३० लाख नागरिकांना मिळेल, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली.मुंबई शहर आणि उर्वरित महाराष्ट्रातील 'प्रॉपर्टी कार्ड' संगणकीकरणाच्या प्रणाली भिन्न असल्यामुळे आतापर्यंत मुंबईत ऑनलाईन फेरफार प्रक्रियेत अनेक तांत्रिक अडथळे येत होते. मात्र, नागरिकांची वाढती गरज लक्षात घेऊन शासनाने विशेष ऑनलाईन प्रणाली विकसित केली असून, आता घरबसल्या अर्जाची सोय उपलब्ध झाली आहे.मुंबई शहर जिल्ह्यातील १९ महसूल विभाग आणि ४ नगररचना योजनांमधील सुमारे २७ हजार ८४७ मिळकत पत्रिका आता 'mahabhumi.gov.in' या संकेतस्थळावर तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या सुविधेमुळे नागरिकांना आपल्या अर्जाची सद्यस्थिती देखील ऑनलाईन तपासता येणार आहे. त्यामुळे आता फेरफाराच्या कामासाठी सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवण्याची गरज भासणार नाही.या नव्या प्रणालीमध्ये केवळ खरेदीखतच नव्हे, तर वारसा नोंद, बक्षीसपत्र, भाडेपट्टा, गहाणखत, रोड सेटबॅक, आरक्षण आणि भूसंपादन अशा विविध ४५ प्रकारच्या नोंदींसाठी ऑनलाईन अर्ज करता येतील. या नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल महसूल मंत्र्यांनी मुंबई शहराच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल आणि त्यांच्या टीमचे विशेष कौतुक केले.

फीड फीडबर्नर 23 Mar 2026 4:10 pm

Raghav Chadha : राघव चढ्ढा भाजपमध्ये जाणार? संजय सिंह यांनी स्पष्टच सांगितले

Raghav Chadha : खासदार संजय सिंह यांनी राघव चढ्ढा यांच्या भाजप प्रवेशाच्या अफवा फेटाळल्या आहेत.

दैनिक प्रभात 23 Mar 2026 4:05 pm

Gold-Silver Crash: सोनं 10 तर चांदी 20 हजारांनी कोसळली; जाणून घ्या 5 प्रमुख कारणे

Gold-Silver Crash: सोमवारी दुपारी सुमारे ३.१५ वाजता MCX वर सोन्याचा वायदा भाव १,३४,०४२ रुपयांवर होता. हा भाव १०,४२० रुपयांनी म्हणजेच ७.२५ टक्क्यांनी खाली आला होता.

दैनिक प्रभात 23 Mar 2026 3:57 pm

Ashok Gehlot : क्रॉस व्होटिंग करणाऱ्यांची आमदारकी रद्द करा; राज्यसभा निवडणुकीवरून अशोक गेहलोत यांची टीका

देशभरातील अनेक राज्यांमध्ये नुकत्याच राज्यसभा निवडणुका (Ashok Gehlot) पार पडल्या आणि हरियाणा, ओडिशा व बिहारमधील क्रॉस-व्होटिंग काँग्रेस पक्षासाठी नुकसानकारक ठरले आहे.

दैनिक प्रभात 23 Mar 2026 3:57 pm

Pune : हडपसरमध्ये अखेर भीती खरी ठरली; अनधिकृत डंपिंगमुळे कालवा फुटला, उद्योगांचे कोट्यवधींचे नुकसान!

Pune: हडपसर औद्योगिक इस्टेट परिसरात शेजारील मोकळ्या प्लॉटमध्ये मागील काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर माती व कचऱ्याचे बेकायदेशीर डंपिंग सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे.

दैनिक प्रभात 23 Mar 2026 3:40 pm

कोनेरू हम्पीची सुरक्षेच्या कारणास्तव कॅन्डिडेट्स स्पर्धेतून माघार

नवी दिल्ली : भारतीय ग्रँडमास्टर कोनेरू हम्पी या महिन्यात सायप्रसमध्ये होणाऱ्या प्रतिष्ठित कॅन्डिडेट्स स्पर्धेत सहभागी होणार नाही. पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर यजमान देशातील सुरक्षा परिस्थितीबद्दल तिने चिंता व्यक्त केली होती. आता तिने स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. हम्पीने 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ही घोषणा केली. तिने लिहिले, खूप विचारविनिमय केल्यानंतर, मी फिडे महिला कॅन्डिडेट्स स्पर्धेतून माघार घेण्याचा कठीण निर्णय घेतला आहे.पश्चिम आशियातील तणावामुळे हम्पीला तिच्या सुरक्षेची चिंता वाटत होती. बतिने 'एक्स' वर लिहिले, मला माहित आहे की मी एकटी कदाचित काहीही बदलू शकत नाही. पण मी कॅन्डिडेट्समध्ये खेळले किंवा नाही, तरी मला जे वाटते ते व्यक्त करणे महत्त्वाचे आहे असे मला वाटते. तिने पुढे लिहिले, ज्या सर्वांनी पाठिंबा दर्शवला आहे, त्या सर्वांची मी आभारी आहे. ज्यांना या परिस्थितीची संवेदनशीलता समजत नसेल, त्यांच्यासाठी मी एवढेच सांगेन.जागतिक अजिंक्यपदाच्या विजेतेपदासाठी आव्हान देणारे खेळाडू निश्चित करणारी कॅन्डिडेट्स स्पर्धा २८ मार्च रोजी सुरू होणार आहे. पुरुषांचे विजेतेपद भारताच्या डी. गुकेश यांच्याकडे, तर महिलांचे विजेतेपद चीनच्या जू वेनजुन यांच्याकडे आहे.बुद्धिबळाची जागतिक नियामक संस्था असलेल्या फिडेचे (FIDE) मुख्य कार्यकारी अधिकारी, एमिल सुटोव्स्की यांनी या चिंता फेटाळून लावल्या आणि सांगितले की, स्थळ बदलण्याची गरज भासेल असे काहीही धोकादायक नाही. सुटोव्स्की म्हणाले, आमच्या योजना बदललेल्या नाहीत. आम्ही कॅन्डिडेट्स स्पर्धेच्या तयारीच्या अंतिम टप्प्यात आहोत. अर्थातच, आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. सायप्रस युद्धक्षेत्र किंवा संघर्षक्षेत्रापासून फार दूर नाही, पण त्याच वेळी ते कोणत्याही प्रकारे थेट त्यात सामील नाही आणि युद्धजन्य परिस्थितीतही नाही. सायप्रस हे भूमध्य समुद्रातील तिसरे सर्वात मोठे बेट असून ते तुर्कस्तानच्या दक्षिणेस वसलेले आहे. ते युरोपियन युनियनचे सदस्य आहे.

फीड फीडबर्नर 23 Mar 2026 3:10 pm

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘राजमाता जिजाऊ’ एसटी बससेवेचे लोकार्पण

मुंबई : ‘राजमाता जिजाऊ’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या अत्याधुनिक एसटी बससेवेचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवार २४ मार्च रोजी विधिमंडळाच्या प्रांगणात होणार आहे. या सोहळ्यास विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे आणि विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.‘राजमाता जिजाऊ’ बससेवेच्या समावेशामुळे एसटीच्या ताफ्यात परंपरा आणि प्रगती यांचा सुंदर संगम साधला गेला आहे. लवकरच एसटी महामंडळाच्या ताफ्यात तब्बल ३ हजार ‘राजमाता जिजाऊ’ या नावाने नव्या स्मार्ट बसेस दाखल होणार असून, त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला मोठे बळ मिळणार आहे. या बसेसना ‘राजमाता जिजाऊ’ हे नाव देण्यामागे हिंदवी स्वराज्याच्या प्रेरणास्थान असलेल्या जिजाऊसाहेबांना अभिवादन करण्याची भावना आहे. स्वराज्याचे शिल्पकार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मागील संस्कारशक्ती म्हणजे राजमाता जिजाऊ होय. या मातृशक्तीचा गौरव या नावातून अधोरेखित करण्यात आला आहे. एसटी महामंडळाने यापूर्वी ‘शिवनेरी’, ‘शिवशाही’, ‘शिवाई’, ‘यशवंती’ आणि ‘हिरकणी’ अशा ऐतिहासिक नावांनी बससेवेला वेगळी ओळख दिली आहे. त्या गौरवशाली परंपरेत आता ‘राजमाता जिजाऊ’ या नावाची भर पडल्याने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा सन्मान अधिक समृद्ध झाला आहे, असे मंत्री सरनाईक म्हणाले.‘राजमाता जिजाऊ’ बससेवा ही केवळ वाहतुकीची सुविधा नसून महाराष्ट्राच्या इतिहासाचा अभिमान आणि आधुनिकतेचा आत्मविश्वास यांचा संगम आहे. या उपक्रमामुळे राज्यातील सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम, सुरक्षित आणि प्रवासी-केंद्रित होईल, असा विश्वास मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.राजमाता जिजाऊ बसची ठळक वैशिष्ट्ये :बसमध्ये ३२ आसन रचना असून एकूण ५६ आसन क्षमता आहे, जी सध्याच्या बसपेक्षा १६ आसनांनी अधिक आहे. त्यामुळे प्रवाशांना अधिक आरामदायी आणि सुलभ प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या या बसमध्ये ४ सीसीटीव्ही कॅमेरे, जीपीएस यंत्रणा, पॅनिक बटन, पब्लिक अनाउन्समेंट सिस्टीम तसेच इलेक्ट्रॉनिक मार्ग फलक यांचा समावेश आहे. त्यामुळे प्रवास अधिक सुरक्षित आणि स्मार्ट होणार आहे.या बसेस प्रामुख्याने दोन शहरांदरम्यानच्या अतिगर्दीच्या मार्गांवर शटल सेवेसाठी चालविण्यात येणार असून, त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचेल आणि वाहतुकीवरील ताण कमी होण्यास मदत होईल.पहिल्या ५० बसेस नागपूर येथे दाखल होणार असून, तेथून या नव्या सेवेला प्रारंभ करण्यात येणार आहे.

फीड फीडबर्नर 23 Mar 2026 3:10 pm

दूध भेसळखोरांना सोडणार नाही, कठोर कारवाईसाठी शासन कटिबद्ध

मुंबई: राज्यातील दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी राज्य शासन अत्यंत गंभीर असून, या गुन्ह्यांच्या मुळाशी जाऊन कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही मंत्री नरहरी झिरवळ यांनी आज विधान परिषदेत दिली. आमदार मनीषा कायंदे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी स्पष्ट केले की, केवळ गुन्हे दाखल करून न थांबता प्रशासकीय यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर भर दिला जात आहे. विशेषतः अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागातील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू असून, नुकतेच १९७ नवीन अन्न निरीक्षक प्रत्यक्ष सेवेत रुजू झाले असल्याची माहिती त्यांनी यावेळी सभागृहाला दिली.आज विधान परिषदेत बोलताना आमदार मनीषा कायंदे यांनी राज्यातील दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमधील (पनीर, मावा इ.) भेसळीच्या वाढत्या प्रकरणांवर तीव्र चिंता व्यक्त केली. विशेषतः आंध्र प्रदेशातील रासायनिक भेसळीमुळे झालेल्या मृत्यूंचा संदर्भ देत, महाराष्ट्रातही अशा भेसळखोरांवर 'सदोष मनुष्यवधाचा' (Culpable Homicide) गुन्हा दाखल होणार का? असा रोखठोक प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यावेळी त्यांनी प्रशासकीय त्रुटींवर बोट ठेवताना सांगितले की, मागील जुलै महिन्यात पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाने नवीन कठोर कायदा आणण्याची घोषणा केली होती, परंतु तो कायदा अद्याप का लागू झाला नाही? तसेच, अन्न व औषध प्रशासन विभागात (FDA) तब्बल ४५% पदे रिक्त असल्याने पुरेसे अन्न निरीक्षक उपलब्ध नाहीत, अशा परिस्थितीत प्रभावी छापे आणि कारवाई कशी होणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. अनेक उत्पादनांच्या एक्सपायरी डेट्स आणि लेबल्समध्ये केल्या जाणाऱ्या फेरफारीवर (Tampering) प्रशासनाचे कोणतेही नियंत्रण नसल्याचे सांगत, त्यांनी संपूर्ण व्यवस्थेतील गंभीर दोष सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.आमदार मनीषा कायंदे यांच्या प्रश्नावर उत्तर देताना मंत्री नरहरी झिरवळ यांनी सांगितले की, दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमधील भेसळ ही एक अतिशय गंभीर बाब असून शासन यावर कडक पावले उचलत आहे. त्यांनी वर्सोवा आणि अंधेरी येथील छाप्यांचा संदर्भ देत मान्य केले की, नामांकित ब्रँड्सच्या पिशव्यांमध्ये भेसळयुक्त दूध भरून विकण्याचे प्रकार समोर आले आहेत. या प्रकरणात आतापर्यंत १४ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून ४ जणांवर तडीपारीची कारवाई प्रक्रिया सुरू असल्याची माहिती त्यांनी सभागृहाला दिली.मंत्री नरहरी झिरवळ यांनी मान्य केले की, मागील काळात अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागात मनुष्यबळाची मोठी कमतरता होती. मात्र, शासनाने यावर तातडीने पावले उचलली असून, नुकतीच १९७ नवीन अन्न निरीक्षकांची (Food Inspectors) भरती प्रक्रिया पूर्ण केली आहे. या नवनियुक्त अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून त्यांना प्रत्यक्ष कामावर पदस्थापना (Posting) देखील देण्यात आली आहे. विभागाच्या सक्षमीकरणासाठी सध्या असलेल्या १२७१ मंजूर पदांऐवजी २५४४ पदांचा नवा आकृतीबंध अपेक्षित असून, त्यासंदर्भातील प्रस्ताव आणि फाईल सध्या वित्त विभागाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आली असल्याचे त्यांनी नमूद केले. भेसळखोरांवर होणाऱ्या कारवाईबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, शासन केवळ गुन्हे दाखल करण्यापुरते मर्यादित न राहता, या गुन्ह्यांच्या मुळाशी जाऊन कठोर कायदेशीर कारवाई करण्यास कटिबद्ध आहे. विशेषतः नामांकित ब्रँड्सच्या नावाखाली होणाऱ्या भेसळीला आळा घालण्यासाठी प्रशासकीय त्रुटी दूर केल्या जातील आणि भविष्यात रिक्त पदे भरून यंत्रणा अधिक सक्षम केली जाईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

फीड फीडबर्नर 23 Mar 2026 3:10 pm

उद्धव ठाकरेंना भोंदूबाबा प्रकरणात सहआरोपी करायचे का ?

मुंबई : भोंदूबाबाचे कारनामे २००३ पासून सुरू होते, मात्र काँग्रेस सरकार आणि महाविकास आघाडी सरकारने त्याला बेड्या ठोकण्याची हिंमत दाखवली नाही. या भोंदूबाबाला पायघड्या घालण्याचे काम, भोंदूबाबाच्या आश्रमाला पाणी पुरवण्याचे काम उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मविआ सरकारने केले. महायुती सरकारमधील नऊ मंत्र्यांना त्यांचे भोंदूबाबासोबत फोटो आहेत म्हणून त्याला आक्षेप घेत सहआरोपी करा अशी मागणी संजय राऊत करत आहेत. मग या न्यायाने उद्धव ठाकरे यांनाही सहआरोपी करायचे का असा खरमरीत सवाल भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी सोमवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. न्याय सर्वांना एकच असायला हवा असेही ते म्हणाले.भोंदूबाबाला बेड्या ठोकण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांचे चार दिवसांपूर्वी अभिनंदन करणारे राऊत आज मात्र या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजकारण करत आहेत अशी टीका करतात हा विनोदच आहे. भोंदूबाबा मुद्द्यावरून राऊत राजकारण करत आहेत. खोटेनाटे आरोप करणे, भोंदूबाबाला पायघड्या घालणे याला हीन राजकारण करणे म्हणतात असे हीन राजकारण करण्यात राऊतांचा हात कोणी धरणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारच्या कारकीर्दीत भोंदूबाबाच्या काळ्या कृत्याला जे कोणी साथ देत असतील त्या सर्वांवर चौकशीअंती कठोर कारवाई होणार असे बन म्हणाले.विरोधी पक्षातील आणि उबाठा गटातील खासदार हे निधीमुळे नाही, तर उद्धव ठाकरे यांच्या वर्तनामुळे नाराज आहेत. उद्धव ठाकरे त्यांना भेटत नाहीत, घराबाहेर पडत नाहीत, मतदारसंघाचा दौरा करत नाहीत की महाराष्ट्राचा दौरा करत नाहीत, याबद्दल त्यांची नाराजी आहे. तसेच आदित्य ठाकरेही आमदार-खासदारांना भेटत नाहीत.यामुळेच ४० आमदार साथ सोडून गेले तरी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि राऊतांना शहाणपण सुचत नाही असा टोमणाही बन यांनी लगावला.राऊत विरुद्ध उबाठा असा संघर्ष सुरूसंजय राऊत यांच्या पुस्तकाच्या हिंदी-इंग्रजी आवृत्तीच्या दिल्लीत होणा-या प्रकाशन समारंभाचे निमंत्रण देऊनही उद्धव ठाकरे यांनी कार्यक्रमाला जाणे टाळले. उबाठा गटात राऊत विरुद्ध ठाकरे असा संघर्ष वाढत असल्यामुळेच उद्धव यांनी दिल्लीतील पुस्तक प्रकाशन समारंभाला जाण्याचे टाळले अशी टीका बन यांनी केली. हा संघर्ष पुढे आणखी तीव्र होण्याची शक्यता ही त्यांनी वर्तवली.उद्धव ठाकरे कर्तृत्वशून्य मुख्यमंत्री आणि आमदारपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कृपेने सहा वर्षांपूर्वी विधान परिषदेचे आमदार झालेले आणि भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसून मुख्यमंत्री झालेले उद्धव ठाकरे हे कर्तृत्वशून्य मुख्यमंत्री आणि आमदार होते. आमदारकीच्या आणि मुख्यमंत्रीपदाच्या कारकीर्दीत उद्धव यांनी महाराष्ट्राच्या हिताचे एकही काम केले नाही, महाराष्ट्राच्या हिताचा एक ही प्रश्न विधान परिषदेत विचारला नाही अशी टीका बन यांनी केली. अडीच दिवस मंत्रालयामध्ये येणारे मुख्यमंत्री म्हणून शरद पवार यांनी उद्धव यांची अवहेलना केली होती याचेही स्मरण बन यांनी करून दिले.

फीड फीडबर्नर 23 Mar 2026 3:10 pm

IPL 2026 : मुंबई इंडियन्समध्ये ‘कॅप्टन्सची लढत’; हार्दिक पंड्याने स्वतःहून कर्णधारपद सोडावे; श्रीकांत यांचा सल्ला

मुंबई इंडियन्स संघाची नजर आयपीएल २०२६ च्या हंगामात सहाव्या विजेतेपदावर आहे. मात्र यंदाचा सीझन खास ठरणार आहे, कारण संघात दोन टी-20 वर्ल्ड कप विजेते कर्णधार एकत्र खेळताना दिसणार आहेत.सध्या हार्दिक पंड्या संघाचे नेतृत्व करत असून, त्याच्या नेतृत्वाखाली रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव हे दोघेही मैदानात उतरतील. हार्दिक पंड्या २०२४ मध्ये मुंबईचा कर्णधार बनला, मात्र त्या हंगामात संघाची कामगिरी निराशाजनक ठरली आणि मुंबई शेवटच्या स्थानावर राहिली. त्यानंतर २०२५ मध्ये संघाने पुनरागमन करत प्लेऑफ गाठले, पण अंतिम फेरीत पोहोचण्यात अपयश आले.दरम्यान, भारताचे माजी फलंदाज श्रीकांत यांनी मोठे वक्तव्य केले आहे. त्यांच्या मते, मुंबई इंडियन्सने कर्णधारपद सूर्यकुमार यादव याच्याकडे सोपवावे.श्रीकांत यांनी यूट्यूब चॅनलवर बोलताना सांगितले की, “ही परिस्थिती थोडी विचित्र आहे. हार्दिक पंड्या चांगले कर्णधार आहेत, पण त्यांच्या नेतृत्वाखाली दोन वर्ल्ड कप विजेते कर्णधार खेळत आहेत. हा संघाचा अंतर्गत निर्णय असू शकतो, पण तो त्यांनाच सोडवावा लागेल.”ते पुढे म्हणाले की, “बाहेरून पाहता सूर्यकुमार यादव हा कर्णधारपदासाठी सर्वोत्तम पर्याय वाटतो. हार्दिकने स्वतःहून कर्णधारपद सोडून सूर्यकुमारला संधी द्यावी.”विशेष म्हणजे, सूर्यकुमार यादवने अद्याप आयपीएलमध्ये कोणत्याही संघाचे पूर्णवेळ कर्णधारपद भूषवलेले नाही. तर हार्दिकने गुजरात टायटन्स संघाला २०२२ मध्ये त्यांच्या पहिल्याच हंगामात विजेतेपद मिळवून दिले होते.श्रीकांत यांनी असेही मत व्यक्त केले की, “हार्दिकने रोहित आणि सूर्यकुमार यांच्या नेतृत्वाखाली भारताला टी-20 वर्ल्ड कप जिंकून दिला आहे. त्यामुळे त्यांनी स्वतः पुढाकार घेत सूर्यकुमारकडे कर्णधारपद सोपवावे. यामुळे संघातील परिस्थिती सहज मार्गी लागू शकते.”

फीड फीडबर्नर 23 Mar 2026 3:10 pm

सातारा जिल्हा परिषद निवडणुकीतील राड्याची सखोल चौकशी करणार

मुंबई : सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या राड्याचे पडसाद सोमवारी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत उमटले. मतदारांना मतदानापासून वंचित ठेवणे हा लोकशाहीचा खून आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संताप व्यक्त केला, तर विधान परिषदेत उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्यासह संबंधित पोलीस अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश दिले. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिले.सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीत भाजपच्या प्रिया शिंदे आणि राजू भोसले विजयी झाले असले, तरी या प्रक्रियेला हिंसक वळण लागले. काही सदस्यांना मतदान प्रक्रियेपासून वंचित ठेवण्यासाठी थेट पोलीस बळाचा वापर करण्यात आल्याचा आरोप झाला. याविषयी विधानसभेत माहिती देताना मंत्री शंभुराज देसाई म्हणाले, मी पक्षाचा प्रतोद म्हणून निवडणूकीपूर्वी जिल्हा परिषद सदस्यांना व्हीप बजावण्यासाठी तेथे उपस्थित होतो. माझ्यासोबत दोन सदस्य मतदानासाठी जात असताना, १०० पोलिसांनी आम्हाला अडवले आणि एखाद्या आरोपीला फरफटत नेतात, याप्रमाणे मला आणि त्या सदस्यांना नेले. मला मुका मार लागला असून, चार दिवसांपासून मी गोळ्या घेत आहे. आमच्याकडे ३३ सदस्य होते आणि त्यांना ते सदस्य कमी करायचे होते. त्यामुळे जिल्हा पोलीस अधिक्षक तुषार दोषी, एलसीबीचे पोलीस निरीक्षक देवकर, सहाय्यक निरीक्षक गर्जे यांच्यासह त्याच्यांसोबत असलेल्या १०० पोलिसांना विधानपरिषद सभागृहात उपसभापतींनी निलंबित केले आहे. या सभागृहानेही त्यांना बडतर्फ करावे, अशी मागणी देसाई केली.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या चर्चेत सहभाग घेतला. ते म्हणाले की, सातारा जिल्ह्यातील घटनेचा मीसुद्धा साक्षीदार आहे. निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर मला शंभुराज देसाई यांनी फोन करून दोन मतदारांवर जुना गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आल्याचे सांगितले. परंतु, त्यांना मतदानापासून वंचित ठेवू नका, असे मी तुषार दोषी यांना फोन करून सांगितले. पोलीस महासंचालकांनाही फोन करून याबद्दल सांगितले. यावर त्यांनी आमचे लोक कुठल्याही परिस्थितीत सदस्यांना मतदानापासून वंचित ठेवणार नसल्याचे स्पष्ट केले होते. पण त्यानंतरही त्यांना अडवण्यात आले. पोलीस मंत्र्यांना आणि मतदारांना (जिल्हा परिषद सदस्य) आरोपीप्रमाणे पकडून घेऊन गेले. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी परिस्थिती पाहिली, अशा शब्दांत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेल्या वस्तुस्थितीच्या आधारे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला आश्वस्त केले.भाजप-शिवसेनेचे मंत्री विधान परिषदेत भिडलेया प्रकरणावरून शिवसेना आणि भाजपच्या मंत्र्यांमध्ये विधान परिषदेत खडाजंगी पाहायला मिळाली. शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनी भाजप कार्यकर्त्यांचा उल्लेख करताच भाजपचे मंत्री जयकुमार गोरे यांनी त्यावर तीव्र आक्षेप घेतला. निवडणूक सुरू असताना मंत्री आत गेलेच कसे? पोलिसांनी कोणाच्या दमदाटीमुळे कोणाला आत सोडले, याचीही चौकशी झाली पाहिजे. वस्तुस्थिती जाणून घेतल्याशिवाय कारवाई करणे अयोग्य आहे, अशी भूमिका गोरे यांनी मांडली. मात्र, उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी मंत्र्यांना झालेली दुखापत आणि सदस्यांना मतदानापासून रोखल्याची बाब गंभीर असल्याने, आपण पोलीस अधिक्षकांच्या तात्काळ निलंबनाचे निर्देश देत असल्याचे स्पष्ट केले.राड्याला साताऱ्याचे पालकमंत्री कारणीभूत – जयकुमार गोरेविधान भवनाच्या आवारात माध्यमांशी संवाद साधताना मंत्री जयकुमार गोरे म्हणाले, सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचे काम पालकमंत्र्यांनी केले. हजारो कार्यकर्ते जिल्हा परिषदेत घुसले असताना निवडणूक कशी पुढे जाणार? भाजपने गुन्हा दाखल केल्याचा आरोप सातत्याने करण्यात आला. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जि.प. सदस्याचे अपहरण झाल्याची तक्रार पहिल्यांदा त्यांच्या चिरंजीवांनी केली. त्याच्याशी भाजपचा काहीही संबंध नाही. जाणीवपूर्वक मारहाण झाल्याचा कांगावा करण्याचा प्रयत्न सुरू असून ते वस्तुस्थितीला धरून नाही. हा फक्त वातावरण निर्मिताचा प्रयत्न आहे. पोलिसांनी लोकशाहीचा गळा घोटला नसून पालकमंत्र्यांनी लोकशाही मार्गाने निवडणूक होऊ दिली नाही. हे लोकशाहीला मारक आहे. साताऱ्यात घडलेली घटना घडवण्यामागे पालकमंत्र्यांची सर्वात मोठी भूमिका आहे, अशी टीका त्यांनी केली.

फीड फीडबर्नर 23 Mar 2026 3:10 pm

अभिनेत्री अनुष्का शर्मा ८ वर्षांनी पुन्हा मोठ्या पडद्यावर झळकणार ?

अभिनेत्री अनुष्का शर्मानं बॉलिवूडच्या अनेक मोठ्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. तसेच, बॉलिवूडच्या तिन्ही खान्ससोबत अनुष्कानं सुपरहिट सिनेमे केले आहेत. फार कमी वेळातच अनुष्का शर्मानं बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीत स्थान मिळवलं. बॉलिवूडमध्ये आपलं वेगळ स्थान निर्माण केल्यानंतर अनुष्कानं प्रसिद्ध क्रिकेटर विराट कोहलीसोबत लग्न केलं आणि आपला संसार थाटला.विराटसोबत लग्न केल्यानंतर अनुष्कानं स्वतःला मोठ्या पडद्यापासून दूर नेलं आणि आपल्या कुटुंबाला प्राधान्य दिलं. अनुष्का दोन मुलांची आई असून आता तब्बल 8 वर्षांनी अनुष्का शर्मा पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. अनुष्का शर्मा 1800 कोटींच्या सिनेमातून कमबॅक करणार असल्याची माहिती आहे.लवकरच अभिनेत्री अनुष्का शर्मा तेलुगू सिनेसृष्टीतून कमबॅक करण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा होत असून अल्लू अर्जुनचा आगामी सिनेमा ज्याचं टायटल तात्पुरतं 'AA22xA6' असं ठेवण्यात आलेलं आहे. अल्लू अर्जुनच्या या सिनेमात अनुष्का शर्मा भूमिका साकारू शकते, अशी जोरदार चर्चा सध्या सुरू असून या सिनेमाचं दिग्दर्शन ॲटली करत आहे. मात्र, या वृत्तांना अद्याप कोणताही अधिकृत दुजोरा मिळाला नसला तरी, जर हे वृत्त खरं ठरलं तर,अनुष्काचा तेलुगू सिनेसृष्टीतील पदार्पणासोबतच तिचा कमबॅक ठरणार आहे.या सिनेमाचं अधिकृत टायटल 8 एप्रिल 2026 रोजी, म्हणजेच अल्लू अर्जुनच्या वाढदिवसाच्या मुहूर्तावर जाहीर केलं जाण्याची शक्यता आहे. हे अनावरण एका विशेष व्हिडीओमार्फत केलं जाणार असून यामध्ये सिनेमाची पहिली झलक पाहायला मिळणार आहे. तसेच, अनुष्काच्या कमबॅकबाबात होत असल्येल्या या चर्चानंतर अनुष्काला पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.

फीड फीडबर्नर 23 Mar 2026 3:10 pm

Washing Machine Cleaning: मेकॅनिकला विसरा! या 2 सोप्या ट्रिक्सने घरच्या घरी करा वॉशिंग मशीन क्लीन

Washing Machine Cleaning एक महत्त्वाची सवय म्हणजे प्रत्येक धुलाईनंतर मशीनचा दरवाजा 15-20 मिनिटे उघडा ठेवणे. यामुळे आतली ओलावा सुकतो आणि बुरशी किंवा वास निर्माण होत नाही.

दैनिक प्रभात 23 Mar 2026 2:55 pm

'भोंदुबाबा अशोक खरात प्रकरणात कुणालाही सोडणार नाही'

मुंबई : नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात ऊर्फ 'कॅप्टन' याच्या अघोरी कृत्यांचे आणि लैंगिक शोषणाचे धक्कादायक वास्तव समोर आल्यानंतर, राज्यभरात खळबळ उडाली. सोमवारी विधानसभेतही या प्रकरणाचे पडसाद उमटले. विरोधकांनी यावर चर्चेची मागणी करत गदारोळ घातला. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्ती करत मंगळवारी या प्रकरणावर निवेदन करणार असल्याचे सांगितले. तसेच भोंदुबाबा प्रकरणात कुणालाही सोडणार नाही, असे आश्वासनही त्यांनी दिले.काँग्रेस गटनेते विजय वडेट्टीवार यांनी अशोक खरात प्रकरणात सोमवारी सभागृहात स्थगन प्रस्ताव मांडला. त्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी, शासन यात कारवाई करत असून शासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी, असे आदेश दिले. मात्र, त्यानंतरही विरोधकांनी या प्रकरणावर चर्चा घडवून आणण्याची मागणी कायम ठेवत गदारोळ घातला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी यात हस्तक्षेप करीत सरकारची भूमिका स्पष्ट केली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, विरोधी पक्षाच्या वतीने जो मुद्दा उपस्थित झाला तो अत्यंत गंभीर आहे. भोंदुबाबा अशोक खरातने आपल्या कथित शक्तींचा दुरुपयोग करत दिशाभूल करून अनेक महिलांसोबत गैरव्यवहार, दुष्कृत्य केल्याचे समोर येत आहे. पोलिसांनी ट्रॅप तयार करून सक्रियपणे यासंदर्भातील कारवाई केली आहे. या प्रकरणात महिला समोर यायला तयार नव्हत्या. पण त्यांना योग्य पद्धतीने धीर दिल्यानंतर आता काही महिलांनी तक्रार केली असून उर्वरित अजून काही महिला तक्रार करतील.१० मार्चपासून कारवाईच्या हालचालीयासंदर्भात कारवाई आता झाली असली तरीसुद्धा याची तयारी आधीपासूनच सुरू होती. अशोक खरातच्या अटकेच्या अगोदर म्हणजेच दि. १० मार्च रोजी दुसऱ्या जिल्ह्यातून एका तक्रारीचा उपयोग करून त्यांचा एलओसीदेखील काढून ठेवला होता, जेणेकरून त्यांना बाहेर पळता येऊ नये. या प्रकरणात पूर्ण कारवाई सुरु असून मी या सभागृहात उद्या याचे सविस्तर निवेदन करेन. हा कोणासाठीही राजकारणाचा प्रश्न नाही तर, महिलांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. महिलांचा दुरुपयोग करून त्यांचे ब्रेन वॉशिंग करण्यासारख्या अनेक गोष्टी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे याप्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मी याबाबत सखोल निवेदन करेन, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.कुणाचा दुरचा संबंध असेल तरीही सोडणार नाहीमी नेहमी क्लिनचिट देत नाही. जो क्लिन असतो त्यालाच क्लिनचिट मिळते. अशी कुठलीच चिट माझ्याकडे नाही. या प्रकरणात ज्याचा दुरान्वयानेही संबंध असेल त्यालाही सोडले जाणार नाही, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

फीड फीडबर्नर 23 Mar 2026 2:30 pm

चोरट्यांनी बँक लुटली, रोख १३.७ लाख रुपये आणि २.१ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे दागिने चोरले

पेशावर : पाकिस्तानमधील खैबर पख्तुनख्वा प्रांताची राजधानी असलेल्या पेशावरमध्ये कोहाट रोडवरील नॅशनल बँकेच्या शाखेतून चोरट्यांनी १३.७ लाख रुपयांची रोख रक्कम आणि २.१० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे दागिने चोरले. बँकेच्या सिक्युरिटी लॉकरमधून चोरट्यांनी दागिने चोरले. डॉन या पाकिस्तानमधील वृत्तपत्राने या संदर्भातले वृत्त दिले आहे.रात्रीच्या वेळी संरक्षणासाठी कोहाट रोडवरील नॅशनल बँकेच्या शाखेसाठी सुरक्षा रक्षकाची नेमणूक झालेली नाही. यामुळे रात्री पकडले जाण्याचा धोका कमी आहे हे लक्षात आल्यानंतर चोरट्यांनी परिसर निर्मनुष्य होण्याची वाट बघितली आणि संधी साधली. बँकेचे धातूचे शटर आणि कुंपण तसेच सिक्युरिटी लॉकर तोडण्यासाठी चोरट्यांनी गॅस कटर, हातोडा, पक्कड या साधनांचा वापर केला. चोरट्यांनी लॉकर तोडून ४०० तोळं सोनं चोरलं. या सोन्याची किंमत २.१० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.संशयितांना ओळखण्यासाठी आणि अटक करण्यासाठी बँकेच्या आजूबाजूच्या इमारतींमध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील आणि शहरातील 'सेफ सिटी प्रोजेक्ट'मधील फुटेज तापसण्याचे काम सुरू असल्याचे स्थानिक पोलिसांनी सांगितले.बँकेवरचा दरोडा हा पेशावरमधील १५ दिवसांपेक्षा कमी काळातील दुसरा मोठा बँक दरोडा आहे. यापूर्वी ६ मार्च रोजी, पोलिसांनी पीरबला भागातील एका खासगी बँकेतील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला होता. त्यानंतर झालेल्या चकमकीत तीन अधिकारी जखमी झाले. एका पोलीस अधिकाऱ्याचा नंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला.

फीड फीडबर्नर 23 Mar 2026 2:30 pm

एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेसचा पश्चिम आशियासाठी ३० विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय

नवी दिल्ली : अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांनंतर, अनेक विमान कंपन्यांना पश्चिम आशियाई देशांमधील आपली उड्डाणे रद्द करावी लागली होती. पण, आजपासून एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेसने पश्चिम आशिया (मुख्यतः सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती) येथून ये-जा करण्यासाठी एकूण ३० अनुसूचित आणि अनियोजित उड्डाणे सुरु करण्याची घोषणा केली आहे. ही माहिती विमान कंपन्यांनी एका अधिकृत निवेदनात दिली असून, प्रवाशांना पुनर्बुकिंग आणि परताव्याचे पर्यायही उपलब्ध करून दिले आहेत.संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, एअर इंडियाने गेल्या तीन आठवड्यांत पश्चिम आशियातील सुमारे २,५०० उड्डाणे रद्द केली आहेत. या सुरक्षा उपायांमुळे एअरलाईनची परिचालन क्षमता ३० टक्क्यांपर्यंत खाली आली आहे. इंधनाच्या किमती दुपटीने वाढल्याने हा निर्णय घेण्यात आला असून, यामुळे प्रवाशांच्या नियोजनात मोठी अडचण निर्माण झाली आहे.दोन्ही विमान कंपन्या जेद्दाह मार्गावरील आपली अनुसूचित सेवा सुरू ठेवतील. भारत आणि जेद्दाह दरम्यान एकूण १० उड्डाणे चालतील, ज्यात एअर इंडिया दिल्ली आणि मुंबईहून प्रत्येकी एक परतीचे उड्डाण चालवेल. एअर इंडिया एक्सप्रेस बंगळूर, कोझिकोड आणि मंगळूरहून प्रत्येकी एक उड्डाण चालवेल. याव्यतिरिक्त, एअर इंडिया एक्सप्रेस मस्कतहून (दिल्ली आणि मुंबईसह) चार अनुसूचित उड्डाणे आणि बंगळूर-कोझिकोडहून रियाधसाठी चार उड्डाणे सुरु करणार आहेत.नियोजित सेवांव्यतिरिक्त, संयुक्त अरब अमिराती (UAE) आणि सौदी अरेबियामधून एकूण १२ अनियोजित (अतिरिक्त) उड्डाणे चालवली जातील. ही उड्डाणे प्रस्थान स्थानकांवरील स्लॉटच्या उपलब्धतेवर आणि इतर परिस्थितींवर अवलंबून असतील. संबंधित भारतीय आणि स्थानिक नियामक प्राधिकरणांकडून आवश्यक परवानग्या मिळवल्या जात आहेत.एअर इंडिया एक्सप्रेसच्या प्रवाशांसाठी एक विशेष सुविधा उपलब्ध आहे. संयुक्त अरब अमिरातीमधील (UAE) कोणत्याही स्थानकावरून भारतातील कोणत्याही गंतव्यस्थानासाठीच्या अतिरिक्त व्यावसायिक एअर इंडिया एक्सप्रेस विमानांमध्ये कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय पुनर्बुकिंग करणे शक्य आहे. एअरलाइन बाधित प्रवाशांशी त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधत आहे, त्यामुळे प्रवाशांना त्यांचे मोबाईल क्रमांक अद्ययावत ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

फीड फीडबर्नर 23 Mar 2026 2:10 pm

IPL 2026 : केकेआरच्या संघात सौरभ दुबेला संधी

तीन वेळचे चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्सने विदर्भातील उंच डावखुरा वेगवान गोलंदाज सौरभ दुबेला करारबद्ध केले आहे. तो भारताचा वेगवान गोलंदाज आकाश दीपची जागा घेणार आहे. आकाश दीप जो पाठीच्या स्ट्रेस रिॲक्शन दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर झाला आहे. दुबेला यापूर्वी २०१६ च्या चॅम्पियन सनरायझर्स हैदराबादने आयपीएल २०२२ साठी करारबद्ध केले होते. पण पाठीच्या दुखापतीमुळे त्याचा कार्यकाळ लवकरच संपुष्टात आला.फ्रँचायझीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले, होय, केकेआरने आगामी हंगामासाठी आकाश दीपचा बदली म्हणून क्रिकेटपटू सौरभ दुबेला करारबद्ध केले आहे. सौरभ केकेआरसाठी नेट बॉलर होता. तो ईडन गार्डन्स आणि मुंबई कॅम्पमध्ये संघासोबत सराव करत होता, पण आता तो मुख्य संघाचा भाग असेल.सौरभ २८ वर्षांचा असून त्याने अद्याप आयपीएलमध्ये पदार्पण केलेले नाही. गेल्या वर्षी अबू धाबी येथे झालेल्या मिनी लिलावात तो विकला गेला नाही. पण, त्याने लिलावासाठी नोंदणी केल्यापासून, तो नोंदणीकृत उपलब्ध क्रिकेटपटूंच्या यादीत (RAPP) होता. कोणताही आयपीएल संघ दुखापतग्रस्त क्रिकेटपटूंच्या जागी या गटातून कोणाचीही निवड करू शकतो.सौरभने विदर्भसाठी ८ लिस्ट ए सामने आणि ३ टी२० सामने खेळले आहेत. तो २०१९ च्या एसीसी इमर्जिंग टीम्स आशिया कपमध्ये भारत 'अ' संघाचा भाग होता. सध्याचे भारतीय फलंदाजी प्रशिक्षक सितांशु कोटक त्यावेळी मुख्य प्रशिक्षक होते. त्यानंतर भारताचे माजी वेगवान गोलंदाज सुब्रतो बॅनर्जी यांनीही राष्ट्रीय निवडकर्ता म्हणून काम पाहिले आणि त्यांचा कार्यकाळ गेल्या वर्षी संपला.भारताचा वेगवान गोलंदाजी करणारा अष्टपैलू क्रिकेटपटू हर्षित राणाच्या जागी कोण खेळेल हे संघाने अद्याप ठरवलेले नाही. फेब्रुवारीमध्ये उजव्या गुडघ्याच्या मेनिस्कस टियरवर शस्त्रक्रिया झाल्यामुळे हर्षित आयपीएलमधून बाहेर आहे. हर्षित आणि आकाश दीप या दोघांसाठी योग्य पर्याय शोधण्याकरिता केकेआर बुधवारपासून चाचण्या घेत आहे.केकेआरचे कर्णधारपद भारतीय सलामीवीर अजिंक्य रहाणेकडे आहे. हा संघ आयपीएल २०२६ मधील आपला पहिला सामना २९ मार्च रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पाच वेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळेल. त्यानंतर त्यांचा पहिला घरचा सामना २ एप्रिल रोजी ईडन गार्डन्सवर सनरायझर्स हैदराबादविरुद्ध होईल. यानंतर ६ एप्रिल रोजी पंजाब किंग्स आणि ९ एप्रिल रोजी लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध घरचे सामने आहेत. संघ सध्या दुखापतींशी झुंज देत आहे.

फीड फीडबर्नर 23 Mar 2026 2:10 pm

The 50 शो जिंकूनही शिव ठाकरेनं गमावलं ५० लाखाचं बक्षिस

शिव ठाकरेची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा होतेयं. बिग बॉस मराठी गाजवल्यानंतर आता शिव ‘The 50’ या प्रसिद्ध शोचा विजेता झाला आहे. या शोमधील सर्व स्पर्धकांना मागे टाकत दमदार खेळ आणि स्ट्रॅटेजीच्या बळावर शिव ठाकरेनं ‘The 50’ शोची ट्रॉफी जिंकलीआहे.रिअ‍ॅलिटी शोच्या दुनियेत सध्या शिव ठाकरे जोरदार चर्चेत असल्याचं पाहायला मिळत आहे. ‘The 50’ जिंकल्यानंतर विजेतेपदाच्या ट्रॉफीसोबत शिवला ५० लाखांची रक्कमही मिळालेली आहे. मात्र, आता ही रक्कम शिव ठाकरेला मिळणार नसून विजेतेपदासोबत मिळालेली ५० लाखांची प्राईज मनी त्यानं स्वतःकडे न ठेवता थेट आपल्या चाहत्याला दिली आहे.‘The 50’ या शोमध्ये एकूण ५० सेलिब्रिटी सहभागी झाले होते. टीव्ही, सोशल मीडिया आणि म्युझिक इंडस्ट्रीतील अनेक प्रसिद्ध कलाकार या शोमध्ये झळकले.‘The 50’ शोचा फॉरमॅट वेगळा असून विजेत्या स्पर्धकाला मिळणारी रक्कम त्याच्या नोंदणीकृत फॉलोअर्समधून निवडलेल्या ‘नंबर वन फॅन’ला दिली जाते. त्यामुळे शिव ठाकरेने जिंकलेले ५० लाख रुपये सीताराम प्रल्हाद अघाव या त्याच्या चाहत्याला देण्यात आले आहेत.

फीड फीडबर्नर 23 Mar 2026 2:10 pm

Baby Care Tips: घरात लहान बाळ आहे? या 6 महत्त्वाच्या गोष्टी पाळा, नाहीतर होऊ शकतात अडचणी!

Baby Care Tips सर्वात महत्त्वाचं म्हणजे, बाळाला प्रेम आणि लक्ष देणं. बाळासोबत वेळ घालवणं, त्याच्याशी बोलणं आणि खेळणं यामुळे त्याला सुरक्षित वाटतं. हा भावनिक संबंध बाळाच्या मानसिक विकासासाठी खूप आवश्यक असतो.

दैनिक प्रभात 23 Mar 2026 2:09 pm

Donald Trump: तेलानंतर आता विजेसाठी लढाई ! “जर अमेरिकी तळांना पुरवठा केला तर…” ; इराणची आखाती देशांना उघडपणे धमकी

Donald Trump: मध्य पूर्वेतील तणाव आता केवळ क्षेपणास्त्रे आणि सैन्यापुरता मर्यादित राहिलेला नाही. यावेळी, या संघर्षाला विजेच्या माध्यमातून एक नवीन किनार मिळाली आहे.

दैनिक प्रभात 23 Mar 2026 1:53 pm

Raj Thackeray : “मुख्यमंत्री महोदय धोबीपछाड राजकारण बाजूला ठेऊन…”; अशोक खरात प्रकरणावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया

Raj Thackeray : 'दैवी शक्तीच्या नावाखाली, राजसत्तेच्या आशीर्वादाने जर स्त्रियांचं शोषण होत असेल तर याच्या इतकं गंभीर काहीच नाही'

दैनिक प्रभात 23 Mar 2026 1:49 pm

Nora Fatehi: नोरा फतेही अडचणीत; वर्क परमिट रद्द करून देशाबाहेर पाठवण्याची मागणी!

Nora Fatehi हे गाणे केडी डेव्हिल या चित्रपटातील असून त्याच्या हिंदी व्हर्जनमधील बोलांवर आक्षेप घेतला जात आहे. अनेकांनी हे गाणे अश्लील आणि महिलांचा अपमान करणारे असल्याचे म्हटले आहे. या वादामुळे केंद्र सरकारने हे गाणे बॅनही केले आहे.

दैनिक प्रभात 23 Mar 2026 1:43 pm

दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणी एनआयएची काश्मिरात छापेमारी

श्रीनगर : दिल्लीतील लाल किला स्फोट प्रकरणाच्या तपासात राष्ट्रीय जांच एजेंसी (एनआयए) ने आज, सोमवारी पहाटे काश्मीर खोऱ्यात मोठी कारवाई करत एकूण १२ ठिकाणी छापेमारी केली. या कारवाईत हंदवाडा, कुपवाडा, कुलगाम, रफियाबाद आणि सोपोर या भागांचा समावेश होता.हंदवाडा जिल्ह्यातील गुलोरा परिसरात एका मोठ्या व्यावसायिकाच्या घरावर एनआयएच्या पथकाने छापा टाकला. अधिकाऱ्यांनी संबंधित ठिकाणी सखोल झडती घेत कागदपत्रे, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि इतर संशयास्पद साहित्याची तपासणी केली. सूत्रांच्या माहितीनुसार, पथकाने पहाटेच कारवाई सुरू केली होती. यापूर्वीही दिल्लीतील स्फोट प्रकरणाच्या अनुषंगाने एनआयएने काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर छापेमारी केली होती. काजीगुंड, शोपियां आणि पुलवामा या भागांमध्ये संशयितांच्या ठिकाणांची तपासणी करण्यात आली होती. या कारवाईत डॉ. अदील, जासिर बिलाल, मौलवी इरफान, डॉ. मुझम्मिल आणि आमिर रशीद यांच्याशी संबंधित ठिकाणांचा समावेश होता.दरम्यान, दिल्लीतील लाल किला मेट्रो स्थानकाजवळ १० नोव्हेंबर २०२५ रोजी झालेल्या स्फोटात १५ जणांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यात एका जिहादी दहशतवाद्याने कारमधून स्वतःला उडवून दिले होते. या घटनेनंतर देशभरातील सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या असून तपास यंत्रणा या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

फीड फीडबर्नर 23 Mar 2026 1:30 pm

पश्चिम आशियातील युद्धामुळे पाकिस्तान भिकेला; एका रात्रीत इंधनाचे भाव २०० रुपयांनी वाढले

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तान सरकारने आता हाय-ऑक्टेन इंधनावरील करात मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. हा कर प्रति लिटर १०० पाकिस्तानी रुपयांवरून थेट ३०० रुपयांपर्यंत वाढवण्यात आला आहे.पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत इंधन दरवाढ आणि आर्थिक परिस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. उच्च-ऑक्टेन इंधनावरील करवाढ प्रामुख्याने आलिशान वाहनांवर परिणाम करणार असून, सार्वजनिक वाहतूक आणि विमान प्रवासाच्या दरांवर थेट परिणाम होणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.दरम्यान, यापूर्वी ६ मार्च रोजी सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर ५५ रुपयांची वाढ केली होती. पश्चिम आशियात सुरु असलेल्या युद्धामुळे आणि जागतिक तेलदरवाढ यामुळे पाकिस्तानातील देशांतर्गत खर्चावर ताण वाढला आहे.त्यामुळे नवीन दरांनुसार आता पेट्रोलची किंमत २६६.१७ रुपयांवरून ३२१.१७ रुपये प्रति लिटर झाली असून, डिझेलचा दर २८०.८६ रुपयांवरून ३३५.८६ रुपये प्रति लिटरपर्यंत पोहोचला आहे.जेट इंधनाच्या दरवाढीचा परिणाम विमान प्रवासावरही दिसून आला आहे. देशांतर्गत विमान भाड्यात सुमारे २,८०० रुपयांची वाढ झाली असून, कराची-लाहोर-इस्लामाबाद मार्गांवर तिकीट दर ५,००० रुपयांपर्यंत गेले आहेत.आंतरराष्ट्रीय प्रवासातही मोठी वाढ झाली असून, भाडे सुमारे १०,००० रुपयांनी वाढून २८,००० रुपयांपर्यंत पोहोचले आहे. विशेषतः मध्य-पूर्व आणि मध्य आशियाई देशांसाठीच्या उड्डाणांमध्ये तब्बल १५,००० रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे.

फीड फीडबर्नर 23 Mar 2026 1:30 pm

होर्मुजच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर इराणकडून २० लाख डॉलर्स शुल्क

तेहरान : पश्चिम आशियामध्ये सुरू असलेले संकट अधिक तीव्र होत असल्याचे दिसत आहे. आता इराणने जागतिक तेल पुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या होर्मुज जलडमरूमधून जाणाऱ्या जहाजांवर निश्चित शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. मीडिया अहवालांनुसार हे शुल्क २० लाख डॉलर्स (सुमारे १८ कोटी रुपये) इतके असेल. इराणी माध्यमांच्या वृत्तानुसार, इराणी संसदेतल्या राष्ट्रीय सुरक्षा समितीचे सदस्य अलाएद्दीन बोरोजेर्दी यांनी ही माहिती दिली असून हे शुल्क लागू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.अलाएद्दीन बोरोजेर्दी यांनी सांगितले की, होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजांवर शुल्क लावण्याचा निर्णय हा नव्या सार्वभौम व्यवस्थेच्या स्थापनेचे प्रतीक आहे. ते म्हणाले, “जलडमरूमधून प्रवास करणाऱ्या काही जहाजांकडून वाहतूक शुल्क म्हणून २० लाख डॉलर्स वसूल करणे हे इराणच्या सामर्थ्याचे प्रदर्शन आहे.” पुढे ते म्हणाले, “युद्धाची एक किंमत असते, त्यामुळे स्वाभाविकपणे आम्हाला असे पाऊल उचलावे लागेल.”बोरोजेर्दी यांची ही प्रतिक्रिया अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर समोर आली आहे. ट्रम्प यांनी इराणला ४८ तासांच्या आत होर्मुज जलडमरूमध्य पूर्णपणे खुला करण्यास सांगितले होते. त्यांनी इशारा दिला की, इराणने तसे केले नाही तर अमेरिकेकडून इराणमधील वीज प्रकल्पांवर हल्ला केला जाईल.दरम्यान, इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी अलीकडील एका वक्तव्यात म्हटले होते की, होर्मुजचा मार्ग इराणच्या शत्रूंना वगळता इतर सर्व देशांसाठी खुला आहे. मात्र या विधानानंतर आता इराणी खासदारांकडूनच होर्मुजमार्गे जाणाऱ्या जहाजांवर मोठे शुल्क लावण्याची भूमिका मांडली जात आहे.होर्मुज जलडमरूमध्य हा जगातील सर्वात महत्त्वाच्या सागरी मार्गांपैकी एक मानला जातो. या मार्गातून जगातील सुमारे २० टक्के तेल आणि गॅस पुरवठा होतो. हा मार्ग बंद झाल्यास जागतिक बाजारात तेल आणि गॅसच्या किंमती झपाट्याने वाढू शकतात. अलीकडील हल्ले आणि वाढत्या तणावामुळे ऊर्जा बाजारात आधीच मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे. इराणच्या सागरी सीमेजवळ असलेला होर्मुज हा अतिशय अरुंद समुद्री मार्ग असून जागतिक तेल निर्यातीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या मार्गावर इराणला रणनीतिक आघाडी असून आवश्यक असल्यास तो पुरवठा अडवण्याची क्षमता त्याच्याकडे आहे.

फीड फीडबर्नर 23 Mar 2026 1:30 pm

Eknath Shinde : …तर आम्ही राजीनामा देऊ; शिवसेना मंत्र्यांनी भाजपवर नाराजी व्यक्त करत शिंदेंकडे स्पष्ट केली भूमिका

Eknath Shinde : साताऱ्याचे एसपी तुषार दोषी यांना निलंबित करण्याचे आदेश उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिले.

दैनिक प्रभात 23 Mar 2026 1:13 pm

BJP on Abdul Basit: “ते जिवंत राहतील तरच…” ; अब्दुल बासित यांच्या दिल्ली-मुंबईवरील हल्ल्याच्या विधानावर भारताचे सडेतोड उत्तर

BJP on Abdul Basit: पाकिस्तान केवळ भारताच्या विरोधात सातत्याने कुटिल कारवाया करत नाही, तर पाकिस्तानी नेते आणि अधिकारी देखील वारंवार धमक्या देतात.

दैनिक प्रभात 23 Mar 2026 1:10 pm

अखेर आलियानं सोडलं धुरंधरबद्दल मौन , कौतक करत चाहत्यांसोबत शेअर केला 'हा'इमोशनल सीन

अभिनेता रणवीर सिंहच्या धुरंधर सिनेमाचं वेडं जगभरात सर्वत्र पाहायला मिळत आहे. धुरंधर २ सिनेमानं प्रेक्षकांबरोबरच अनेक कलाकारांनादेखील भुरळ घातली आहे. रणवीरच्या धुरंधरचं प्रत्येकजण भरभरून कौतुक करत आहेत. यामध्येच आता अभिनेत्री आलिया भटट्ची भर पडली आहे. आलिया भट्टनं रणवीर सिंहच्या धुरंधरचं कौतुक करत धुरंधर सिनेमातील तिचा आवडता सीन सोशल मिडियावर शेअर केला आहे.अभिनेत्री आलिया भट्ट रणवीर सिंहसोबत अनेक सिनेमांमध्ये झळकली आहे. नुकताच आलियानं आपल्या सोशल मिडियावर रणवीर सिंहच्या धुरंधर २ सिनेमाचं कौतुक केलं आहे. तसेच, याबरोबरच आलियानं धुरंधर २ सिनेमाचा एक फोटो शेअर केला असून याबरोबरच आलियानं लिहिलयं की 'जसकिरत सिंग रंगी' आणि हा क्षण हेच सर्वकाही आहे. अभिनेता आणि दिग्दर्शक यांच्यातील परिपूर्ण ताळमेळ हीच खरी जादू आहे. धुरंधर टीमचे अभिनंदन, चित्रपटसृष्टीतील हा एक ऐतिहासिक क्षण आहे.

फीड फीडबर्नर 23 Mar 2026 1:10 pm

Knee Pain: गुडघेदुखीने त्रस्त आहात? घरच्या सोप्या उपायांनी मिळवा आराम!

Knee Pain गुडघ्यात वेदना किंवा कडकपणा जाणवण्यामागे अनेक कारणं असू शकतात. वय वाढल्यावर सांधे कमकुवत होतात, त्यामुळे चालताना किंवा जिना चढताना त्रास होतो. काही वेळा ही समस्या संधिवात (आर्थ्रायटिस), स्नायू ताण (मसल स्ट्रेन) किंवा सूज यांचेही लक्षण असू शकते.

दैनिक प्रभात 23 Mar 2026 12:55 pm

Pune News : मगरपट्टा सिटीत कालवा फुटल्याने पूरसदृश स्थिती; ऐन उन्हाळ्यात लाखो लीटर पाणी वाया

Pune News : या घटनेमुळे परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.

दैनिक प्रभात 23 Mar 2026 12:33 pm

अभिनेता सनी देओलच्या पोस्टवर चक्क पाकिस्तानी चाहत्याची कमेन्ट; म्हणाला...

अभिनेता सनी देओल सध्या बॉर्डर २ मुळे चांगलाच चर्चेत असून नुकताच नेटफ्लिक्सवर बॉर्डर २ सिनेमा रिलीज झाला. तसेच, अभिनेता धर्मेंद्र यांच्या निधनाच्या ३ महिन्यानंतर आता सनी देओलनं सोशल मिडियावर आपल्या आईसोबत एक सुंदर असा फोटो शेअर केला आहे.या फोटोसोबतच अभिनेता सनी देओलनं आई असं लिहून त्यापुढे अनेक हार्ट इमोजीस असलेलं ह्द्यस्पर्शी असं कॅप्शन दिलं आहे.

फीड फीडबर्नर 23 Mar 2026 12:30 pm