मुंबई: मुंबईत राष्ट्रीय फेरीवाला धोरण लागू करण्याच्यादृष्टीकोनातून पात्र फेरीवाल्यांना बसण्यास जागा निश्चित करून देण्यासाठी फेरीवाल्यांच्या प्रतिनिधींची निवड करण्यासाठी निवडणूक पार पडली. या नगर पथविक्रेता समिती निवडणूक निकालाबाबत न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार महापालिका प्रशासनाच्यावतीने तत्काळ निकाल जाहीर करण्याची मागणी खुद्द महापौरांनी केली आहे. तसेच या फेरीवाला सर्वेमध्ये ज्यांनी भाग घेतला होता, त्यातील पात्र फेरीवाल्यांसाठी मार्गदर्शक तत्वे बनवण्याचा आणि ज्या स्टॉल्सधारकांची फेरीवाल्यांमध्ये गणना होत आहे, त्यांना फेरीवाल्यांमधून वगळून त्यांची गणना स्टॉल्सधारकांमध्ये करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. येत्या शुक्रवारी महापौर रितू तावडे यांच्या अध्यक्षतेखालील महापालिकेतील पक्षांच्या गटनेत्यांच्या बैठकीत फेरीवाला धोरणासंदर्भात निर्णय घेतला जाणार आहे.मुंबईतील बांग्लादेशी फेरीवाल्यांविरोधातील मोहिम हाती घेण्यात आली असतानाच प्रलंबित धोरणाची अडचण समोर आली आहे. पात्र फेरीवाल्यांचे पुनर्वसन आणि मार्गदर्शक तत्वे तयार करण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या राष्ट्रीय फेरीवाला धोरणांतर्गत नगर पथविक्रेता समिती सदस्यपदाची निवडणूक पार पडली असली तरी याला स्थगिती आहे. परिणामी पात्र आणि अपात्र तसेच फेरीवाला आणि ना फेरीवाला क्षेत्राबाबतची कार्यवाही ठप्प झाली आहे. दरम्यान, याबाबत न्यायालयातील याचिकेवरील सुनावणीमध्ये २३ मार्च २०२६रोजी या समितीच्या निवडणुकीचा निकाल जाहिर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे या निवडणुकीचा निकाल तत्काळ जाहीर करण्यात यावा अशाप्रकारची सूचना करण्यात आली असून याबाबत शुक्रवारी होणाऱ्या गटनेत्यांच्या सभेपुढे यावर निर्णय घेतला जाणार आहे.नगर पथविक्रेता समिती अर्थात टाऊन वेंडींग कमिटी सदस्य निवडीच्या निवडणूक निकालाबरोबरच सन २०१४ फेरीवाल्यांसंदर्भात करण्यात आलेल्या सर्वेमध्ये प्राप्त ९९, ४३५ अर्जदारांची पडताळणी पुढील ४ महिन्यांच्या आतमध्ये करून त्यांच्या व्यावसायाची जागा निश्चित करून त्यांच्या विक्रीला परवानगी देण्याचे निर्देश न्यायालयाने दिलेले आहेत. तसेच शहरातील रस्ते व पदपथावर असलेल्या सर्व तात्पुरत्या किंवा कायमस्वरुपी स्टॉल्सची सखोल तपासणी व छाननी करण्याचे निर्देश दिलेले आहेत. तसेच ज्यांचे स्टॉल्स आहेत, त्यांना फेरीवाले म्हणून गणना न करता स्टॉल्सधारक म्हणून ग्राह्य धरण्यात यावे, यासाठी प्रशासनाने फेरीवाला कायद्याची तत्काळ अंमलबजावणी करण्याची सूचना महापौरांनी केली असून यासर्व अनुषंगाने शुक्रवारी होणाऱ्या महापौर रितू तावडे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेतील सर्व पक्षीय गटनेत्यांच्या सभेत यावर निर्णय घेवून प्रशासनाला पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश दिले जाणार आहे. त्यामुळे मुंबईतील पात्र आणि अपात्र फेरीवाल्यांबाबत शुक्रवारी महापालिकेत धोरणात्मक निर्णय घेतला जाण्याची शक्यता असून त्यानुसार आता प्रशासनाला फेरीवाल्यांची पात्रता निश्चित करून अपात्र फेरीवाल्यांवर कारवाई करणे शक्य होणार आहे.फेरीवाल्यांच्या सन २०१४मधील सर्वेमधील अर्ज : १,२८,४४३
मुंबईतील सर्वच स्कायवॉकवर उभारणार सरकते जिने; स्थायी समिती सदस्यांनी केली मागणी
मुंबई: बोरीवली रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला असलेल्या स्कायवॉकवर सरकता जिना बांधला जाणार असून अशाप्रकारे महापालिकेच्या ताब्यात असलेल्या सर्वच स्कायवॉकवर सरकते जिने बांधले जावेत अशाप्रकारची मागणी महापालिकेतील स्थायी समिती सदस्यांनी केली.बोरीवली पश्चिमेला रेल्वे स्थानकासमोर गोरा गांधी हॉटेल समोरील स्कायवॉकला जोडण्यासाठी सरकता जिना बसविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. याबाबतचा प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता देताना झालेल्या चर्चेत सदस्यांनी ही मागणी केली. हा प्रस्ताव मंजुरीला आला असता सभागृहनेते गणेश खणकर यांनी या स्कायवॉकला जोडणारा सरकता जिना आवश्यक आहे. त्यामुळे महापालिकेच्या ताब्यात असलेल्या सर्वच स्कायवॉकवर सरकते जिने बसवले जावेत अशी मागणी करत मुंबईत अशाप्रकारे किती सरकते जिने बसवले आहेत याची विचारणा केली. अशाप्रकारच्या सरकत्या जिन्यांची सुरुवात रेल्वेत झाली. त्यामुळे तेथील वारंवार बंद पडत असलेल्या या जिन्यांचा अनुभव घेता स्कायवॉकला जोडणाऱ्या सरकत्या जिन्यांसोबतच त्यांची दैनंदिन देखभालीचीही सेवा त्यात अंतर्भूत असावी अशी सूचना केली. तर भाजपचे ऍड मकरंद नार्वेकर यांनी मरिन लाईन्स येथे सरकते जिने बसवण्यासाठी अडीच वर्षांपासून प्रयत्न सुरु आहेत, तरीही बसवले जात नसल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. तर भाजपच्या शितल गंभीर देसाई यांनी माहिम मोरी रोड आणि सेनापती बापट मार्गावरील जंक्शनवरील पुलावर सरकते जिने आणून ठेवले आहेत, पण अजुनही पॅकिंगमधून बाहेरच काढलेले नाही असे सांगितले. तर वाकोला येथील स्कायवॉकला सरकत्या जिन्यांसह वर छप्परही बसवण्याची सूचना तुलिफ मिरांडा यांनी केली. अंधेरी पश्चिम येथील हरी मस्जिद येथील स्कायवॉवर सरकत्या जिन्याची आवश्यकता असल्याचे यशोधर फणसे यांनी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत श्रध्दा जाधव, डॉ सईदा खान, प्रकाश दरेकर,जमीर कुरेशी आदींनी चर्चेत भाग घेतला.
श्रीरामपूरमध्ये राम नवमीदिवशी मिरवणुकीवर दगडफेक, १२ जणांवर गुन्हा
अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात रामनवमीच्या उत्सवाला दगडफेकीचे गालबोट लागले आहे. गोंधवणी परिसरातून श्रीराम मंदिराच्या दिशेने निघालेल्या भव्य शोभायात्रेवर अचानक दगडफेक झाल्याने एकच खळबळ उडाली. सय्यद बाबा चौकातील दर्गा परिसरात ही घटना घडली आहे. यामध्ये दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत. या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला असून पोलिसांनी तातडीने धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. सध्या श्रीरामपूरमध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून शहरात तणावपूर्ण शांतता आहे.कशी झाली दगडफेक?मिळालेल्या माहितीनुसार, श्रीरामपूरमधील गोंधवणी येथून रामनवमीनिमित्त पारंपरिक शोभायात्रा काढण्यात आली होती. ही मिरवणूक उत्साहात श्रीराम मंदिराकडे जात असताना सय्यद बाबा चौकातील दर्गा परिसरात पोहोचली. याच वेळी अचानक मिरवणुकीच्या दिशेने दगड येण्यास सुरुवात झाली.यामुळे मिरवणुकीत सहभागी असलेल्या भाविकांमध्ये मोठी धावपळ उडाली. या हल्ल्यात दोन तरुण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, सय्यद चौकातील काही स्थानिकांनी दावा केला आहे की, आधी मिरवणुकीतून दगडफेक करण्यात आली होती. या परस्परविरोधी दाव्यांमुळे तणाव अधिकच वाढला.मौलाना आणि १२ जणांविरोधात गुन्हा दाखलया घटनेप्रकरणी सुयोग झिरांगे यांनी श्रीरामपूर पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी मस्जिदमधील मौलाना आणि इतर १० ते १२ अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी घटनेचा पंचनामा सुरू केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दगडफेक करणाऱ्यांचा शोध घेतला जात आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी स्वतः श्रीरामपूरमध्ये तळ ठोकून आहेत.आमदार संग्राम जगतापांचा रांगडा अवतारअहिल्यानगर जिल्ह्यात एका बाजूला श्रीरामपूरमध्ये तणावाचे वातावरण असताना, दुसरीकडे अहिल्यानगर शहरात मात्र राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित रामनवमी मिरवणुकीत आमदार जगताप यांनी चक्क 'अफजल खान वध' आणि 'गर्व से कहो हम हिंदू हैं' असे पोस्टर्स झळकवले. मिरवणूक कोतवाली पोलीस ठाण्याच्या चौकात येताच कार्यकर्त्यांनी त्यांना खांद्यावर उचलून घेतले आणि आमदारांनी भगवा पंचा फिरवत, दंड थोपटत जोरदार नृत्य केले.तब्बल १० वर्षांनंतर पारंपरिक मार्गावरून मिरवणूकअहिल्यानगर शहरात यंदाची रामनवमी विशेष ठरली, कारण तब्बल १० वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर ही मिरवणूक पुन्हा एकदा पारंपरिक मार्गाने काढण्यात आली. हजारोंच्या संख्येने तरुण या मिरवणुकीत सहभागी झाले होते. आमदारांच्या आक्रमक पवित्र्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. प्रशासनाने या मिरवणुकीसाठी ड्रोन आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून चोख बंदोबस्त ठेवला होता, जेणेकरून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये.श्रीरामपूरमधील दगडफेकीच्या घटनेनंतर पोलिसांनी नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे. सोशल मीडियावर कोणतीही आक्षेपार्ह पोस्ट किंवा अफवा पसरवू नका, असा इशारा देण्यात आला आहे. श्रीरामपूरमधील संवेदनशील भागात सध्या राज्य राखीव दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या असून, परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
Excise Duty Reduction:
सार्वजनिक शौचालयांमध्ये महिलांसाठी आकारले जाणारे शुल्क माफ?
मुंबई: मुंबईतील झोपडपट्टी भागात राहणाऱ्या महिलांकडून सार्वजनिक शौचालय वापरासाठी आकारल्या जाणाऱ्या शुल्काबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे महिलांसाठी सार्वजनिक शौचालयांमध्ये आकारले जाणारे शुल्क हे तत्काळ रद्द करण्याची मागणी करण्यात आली असून शुक्रवारी होणाऱ्या गटनेत्यांच्या सभेमध्ये यावर निर्णय घेतला जाणार आहे.शिवसेना पदाधिकारी डॉ नविन शेवाळे यांनी याबाबत उपमहापौर संजय घाडी यांना निवेदन देवून ही मागणी केली असून हे पत्र उपमहापौरांच्या माध्यमातून गटनेत्यांच्या सभेपुढे धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी मंजुरी घेण्यासाठी ठेवण्यात आले आहे. शेवाळे या मागणीनुसार उपमहापौर संजय घाडी यांनी गटनेत्यांच्या बैठकीपुढे मांडलेल्या पत्रामध्ये असे नमुद केले आहे की,झोपडपट्टी विभागातील अनेक गरीब व कष्टकरी महिलांना सार्वजनिक शौचालय वापरण्यासाठी दररोज शुल्क भरावे लागते. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या महिलांसाठी हा अतिरिक्त खर्च मोठा बोजा ठरत असून, त्यामुळे अनेक महिलांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.या शुल्कामुळे महिलांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेवरही परिणाम होत आहे. स्वच्छतेच्या मूलभूत सुविधांसाठी शुल्क आकारणे अन्यायकारक असल्याचे सांगत, सर्व महिलांसाठी सार्वजनिक शौचालये मोफत उपलब्ध करून देण्याची मागणी हा प्रस्ताव गटनेत्यांच्या सभेपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे . त्यामुळे गटनेते यावर काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष असेल.
Coriander Storage: “फ्रिजशिवायही कोथिंबीर राहील ताजी; वापरा हे ३ सोपे उपाय”
Coriander Storage उन्हाळ्यात उष्णता आणि कोरडेपणामुळे कोथिंबिरीची पानं लवकर सुकतात. त्यांचा ताजेपणा, सुगंध आणि पोषणमूल्य कमी होतं. त्यामुळे योग्य पद्धतीने साठवणूक करणं खूप महत्त्वाचं आहे. खाली दिलेले तीन सोपे उपाय तुम्हाला यासाठी मदत करू शकतात.
Pankaja Munde : मंत्री पंकजा मुंडे यांनी एका कार्यक्रमात बोलताना दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची आठवण काढत भावनिक भाषण केले आहे.
Vijay-Rashmika: “रश्मिका-विजयचा खास अंदाज; लग्न घडवणाऱ्यांचे मानले आभार”
Vijay-Rashmika
Ashok Kharat case : अशोक खरात याने पोलिस चौकशीत केलेल्या घृणास्पद कृत्याचे समर्थन करणारा खळबळजनक दावा केला आहे.
Top 10 News:मंत्रालयात लाचखोरीच्या प्रकरणामुळे अगोदरच अडचणीत आलेल्या मंत्री नरहरी झिरवळांचा पाय आणखी खोलात गेलाय.
घाटकोपरमधील मराठी तरुणीला कंपनीतल्या लोकांनी दिला त्रास; काम सोडल्यावरही..., अखेर मनसेने दाखवला इंगा
मुंबई: मराठी माणसांना प्रवासादरम्यान किंवा एखाद्या कंपनीच्या कार्यालयात परप्रांतीय लोकांनी त्रास दिल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते त्यांना चांगलाच इंगा दाखवतात. मराठी-हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून होणारे वादही मनसे स्टाईलने सोडवले जात असल्याचं पाहायला मिळतं. घाटकोपर येथील मराठी तरुणीलाही मनसेनं मदत केल्याचं समोर आलं आहे. अश्विनी घाडगे असं या मराठी मुलीचं नाव आहे.नेमकं घडलं काय?मिळालेल्या माहितीनुसार,घाटकोपरमधील सेराब्रस कन्सल्टिंग (Cerabrus Consulting) नावाच्या कंपनीकडून मराठी तरुणी अश्विनी घाडगेला ३ महिन्यांचा पगार देण्यात आला नव्हता. कंपनीचे लोक अश्विनीला त्रास द्यायचे. त्यानंतर तिने नोकरी सोडून दिल्यावर तिचा तीन महिन्यांचा पगार थकवण्यात आला.तरुणीसह कुटुंबीयांनी मानले राज ठाकरेंचे आभारकंपनीच्या मालकांनी पगार थकवल्याने मनसेनं ठिय्या आंदोलन केलं. वारंवार पाठपुरावा करूनही कंपनीकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने कुटुंबीयांनी मनसेकडे धाव घेतली. मनसेच्या ठिय्या आंदोलनानंतर अश्विनीच्या खात्यात पगार जमा झाला. त्यानंतर अश्विनी आणि तिच्या कुटुंबीयांनी राज ठाकरे यांचे आभार मानले.
Yami Gautam यामी गौतमने याआधी उरी: द सर्जिकल स्ट्राइक, आर्टिकल ३७० आणि ‘हक’सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. या सर्व चित्रपटांमध्ये देशभक्ती किंवा राष्ट्रीय भावना अधोरेखित करण्यात आली आहे. त्यामुळे तिला ‘राष्ट्रवादी अभिनेत्री’ असा टॅग मिळाल्याची चर्चा अनेकदा झाली आहे.
Maharashtra Rain Update: राज्यातील 'या'भागात दोन दिवस वादळी पावसाचा अलर्ट
मुंबई: सध्या राज्यातील काही भागात अंशतः हवामान आभाळी असून ही स्थिती या आठवड्यात कायम राहण्याची शक्यता आहे. राज्याच्या दक्षिण भागांमध्ये दुपारनंतर वादळी पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. हा पाऊस प्रामुख्याने कर्नाटक आणि तेलंगणा सीमेलगत असलेल्या मराठवाडा, मध्य महाराष्ट्र व विदर्भातील सीमावर्ती भागांमध्ये राहण्याची शक्यता आहे.२ दिवस मुसळधार पावसाची शक्यता३० मार्च रोजी राज्यातील काही भागांमध्ये प्रामुख्याने दुपारनंतर आभाळी हवामान तयार होऊन मेघगर्जनेसह पाऊस आणि वादळी वाऱ्यांची स्थिती निर्माण होण्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. सध्याच्या अंदाजानुसार ही स्थिती प्रामुख्याने खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रातील भागांमध्ये दिसून येऊ शकते. उर्वरित विदर्भात देखील हवामानात बदल दिसू शकतो. या दरम्यान विजांचा कडकडाट, वादळी वारे, पाऊस आणि काही ठिकाणी गारपिटीची शक्यता नाकारता येत नाही. ३१ मार्च रोजी सुद्धा राज्याच्या काही भागांमध्ये या हवामानाचा परिणाम दिसू शकतो.शेतकऱ्यांनी पुढील काही दिवस हवामानाच्या अद्ययावत अंदाजांकडे लक्ष ठेवावे आणि त्यानुसार शेतीची कामे नियोजित करावीत. सध्या रब्बी पिकांची काढणी सुरू असल्याने शेतकऱ्यांनी काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा झाकून ठेवण्याची व्यवस्था करावी. तसेच वादळी वारे, पाऊस आणि संभाव्य मारपिटीपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.
अवैध सॉफ्टवेअर वापरून ट्रेनची तत्काळ तिकिटे बुक केली जात आहेत. एका सामान्य प्रवाशाला IRCTC ॲपवर माहिती भरण्यासाठी जेवढा वेळ लागतो, त्यापेक्षा कमी वेळात हे सॉफ्टवेअर तिकिटे बुक करतात. 25 ते 30 सेकंदांत एक तिकीट बुक होते. त्यानंतर ही तिकिटे 300 ते 500 रुपयांपर्यंत कमिशन घेऊन विकली जातात. सणासुदीच्या काळात कमिशन चार पटींनी वाढते. हे रॅकेट चालवणारे सूत्रधार 5वी नापास आहेत, तर ज्या अधिकाऱ्यांवर गैरव्यवहार थांबवण्याची जबाबदारी आहे, ते IIT–IIM सारख्या संस्थांमधून शिकलेले आहेत, पण ते ही गडबड थांबवू शकत नाहीत. दर 2-3 महिन्यांनी नवीन ओळख: असे बदलतात वेबसाइट, सॉफ्टवेअर आणि बँक खाते नेक्ससमध्ये पूर्वी काम केलेल्या एका एजंटने सांगितले की, टोळीचा म्होरक्या दर दोन ते तीन महिन्यांनी वेबसाइट, सॉफ्टवेअरची नावे, बँक खाती आणि मोबाइल नंबरदेखील बदलतो, जेणेकरून कोणत्याही प्रकारच्या ट्रॅकिंगपासून वाचता येईल. वापरले जाणारे नंबर पूर्णपणे बनावट असतात, तर पैशांच्या व्यवहारासाठी 'म्युल अकाउंट्स' म्हणजे आमिष दाखवून किंवा बनावट पद्धतीने तयार केलेल्या खात्यांचा वापर केला जातो. सध्या ‘टेस्ला’, ‘गदर’, ‘स्टारलिंक’, ‘स्पेसएक्स’, ‘सुपरमॅन’, ‘बीएमडब्ल्यू’ आणि ‘थंडर’ यांसारख्या नावांनी सॉफ्टवेअर विकले जात आहेत, जे सुपर मास्टरपासून ते युझरपर्यंत वेगवेगळ्या स्तरांवरील एजंट्सना दिले जातात, जे तिकीट बुकिंगचे काम सांभाळतात. संपूर्ण नेटवर्क व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुप्सद्वारे चालवले जाते, जिथे सॉफ्टवेअरशी संबंधित प्रत्येक माहिती आणि अपडेट मेसेजद्वारे शेअर केले जातात. अवैध तिकीट घोटाळ्यातील ५ प्रमुख व्यक्ती: ऑपरेटरपासून सीबीआयपर्यंत, असे चालते संपूर्ण नेटवर्क ऑपरेटर : हेच अवैध सॉफ्टवेअर चालवतात. डेव्हलपर आणि ट्रॅव्हल एजंट्समधील दुवा आहेत. एजंटना अवैध सॉफ्टवेअरचा लॉग-इन आयडी आणि पासवर्ड देतात. यामुळे एजंट तत्काळ तिकीट उघडताच वेगाने तिकीट बुक करू शकतात. तिकीट एजंट : अवैध सॉफ्टवेअरचा वापर करून तिकीट बुक करतात. याद्वारे IRCTC वेबसाइटला आपोआप ॲक्सेस करणे, कॅप्चा बायपास करणे आणि तत्काळ तिकीट सेकंदात बुक करतात. कमिशन वसूल करतात. CRIS : बेकायदेशीर सॉफ्टवेअर वापरून बुकिंग थांबवण्यात सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टम म्हणजेच CRIS ची तांत्रिक भूमिका आहे. रेल्वेच्या आयटी सिस्टीमचा विकास करणे, सर्वर लॉग आणि ट्रॅफिक पॅटर्नचे निरीक्षण करून संशयास्पद हालचाली ओळखणे, असे आयपी ॲड्रेस आणि युझर अकाउंट ब्लॉक करणे, CAPTCHA, OTP सारखी सुरक्षा मजबूत करण्याची जबाबदारी CRIS वर आहे. RPF : रेल्वे प्रोटेक्शन फोर्स म्हणजेच (RPF) वर तिकीट दलाल, एजंट नेटवर्क आणि बेकायदेशीर बुकिंगच्या हालचाली ओळखणे, कारवाई करणे, छापे टाकणे आणि तपास करण्याची जबाबदारी आहे. CBI : या गैरव्यवहाराशी संबंधित तीन प्रकरणांची चौकशी केली आहे, परंतु अद्याप गुन्हेगारी थांबवू शकलेली नाही. टोळीच्या सूत्रधारांना पकडून त्यांना गजाआड करण्याची जबाबदारी आहे. CBI ने सलमान-शमशेरला नेक्ससचा किंगपिन म्हटले CBI गेल्या 14 वर्षांपासून याची चौकशी करत आहे. 2012 मध्ये पहिली एफआयआर (FIR) दाखल केली होती. तेव्हा चौथी पास सलमान, अहमदाबादचे आयटी प्रोफेशनल कुलवीर सिंग, सतीश तिवारी आणि सीताराम निषाद यांना अटक करण्यात आली होती. एजन्सीने आरोपपत्रात यूपीच्या सलमान अहमद खान आणि शमशेर आलम यांना अवैध सॉफ्टवेअरने तिकीट बुकिंगचे किंगपिन म्हटले आहे. सलमानला 2018 मध्ये आणि शमशेरला 2023 मध्येही पकडण्यात आले होते, यावरून हे सिद्ध होते की दोघे अजूनही हे नेक्सस चालवत आहेत. वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये CBI ने आतापर्यंत चार वेळा गुन्हे दाखल केले आहेत, पण ना नेक्सस बंद झाले, ना कोणताही गुन्हा तडीस गेला. पहिले प्रकरण : 2012 मध्ये पहिल्यांदा नाव समोर आले, पण नेटवर्क तुटले नाही 20 फेब्रुवारी 2012 रोजी CBI आणि रेल्वे दक्षता विभागाने संयुक्त छाप्यात पहिल्यांदा ही फसवणूक पकडली होती. तेव्हा मेहताब अहमद खान, पी नागाकुमार, महबूब मलिक, संतराम यादव, सलमान अहमद खान आणि कुलबीर सिंग छाबडा यांना अटक करण्यात आली होती. सध्याची स्थिती : न्यायालयाने सर्वांना दोषी ठरवले होते, पण त्यांच्यावर IPS च्या कलम 120B – गुन्हेगारी कट आणि रेल्वे कायदा 143 लावण्यात आला. त्यामुळे न्यायालयाने केवळ 6 महिन्यांची कैद आणि दंडाची शिक्षा सुनावली. दुसरे प्रकरण : सॉफ्टवेअर माफियाचे ‘सूत्रधार’ उघडकीस आले, पण प्रकरण अजूनही खटल्यात आहे 2014–15 मध्ये प्रकरण नोंदवले गेले. या प्रकरणाच्या आरोपपत्रात सीबीआयने लिहिले आहे की, ‘सलमान सलीम खान हा मुख्य व्यक्ती आहे, जो शमशेर आलमसोबत मिळून संपूर्ण टोळीला नियंत्रित करतो. दोघांना अवैध तत्काळ रेल्वे तिकीट बुकिंग सॉफ्टवेअर विकण्याच्या व्यवसायातील प्रमुख सूत्रधार म्हणून ओळखले गेले आहे.’ ‘सलमान सलीम खान अवैध सॉफ्टवेअर व्यवसायात तांत्रिक कामही सांभाळत होता, जसे की इंटरनेट डोमेनवर ॲप्लिकेशन होस्ट करणे, विक्री आणि सेवेशी संबंधित वितरक आणि एजंट्ससोबत समन्वय साधणे’ सीबीआयने शब्बीर खोजा, शेख सलीम, नवनीत प्रजापती, टी स्टालिन, मोहम्मद हमीद, नौमान सलीम खान, रईस अहमद अकबर, सलमान सलीम खान आणि शमशेर आलम यांना आरोपी बनवले आहे. सध्याची स्थिती : हा खटला सध्या सुनावणीच्या मध्यभागी आहे. पुरावे सादर केले जात आहेत आणि नोंदवले जात आहेत. या खटल्याची पहिली सुनावणी 28 फेब्रुवारी 2017 रोजी झाली होती. पुढील सुनावणी 28 मार्च रोजी आहे. सर्व आरोपी जामिनावर बाहेर आहेत. तिसरा खटला : सीबीआयचाच प्रोग्रामर बनला मास्टरमाइंड, बिटकॉइन-हवालातून चालत होता कोट्यवधींचा खेळ 25 डिसेंबर 2017 रोजी CBI ने स्वतःच्याच प्रोग्रामर अजय गर्ग यांच्या विरोधात FIR दाखल केली. आरोप आहे की त्यांनी WinZip, Neo, Reget सारखे अवैध सॉफ्टवेअर तयार केले होते, जे IRCTC च्या तत्काल तिकीट प्रणालीला बायपास करू शकत होते. या सॉफ्टवेअरच्या मदतीने एजंट वेगाने मोठ्या संख्येने तिकिटे बुक करत होते, ज्यामुळे सामान्य प्रवाशांना तिकिटे मिळत नव्हती. तपासात समोर आले की अजय गर्ग यांनी अनिल गुप्ता आणि इतर सहकाऱ्यांसोबत मिळून हे सॉफ्टवेअर देशभरातील एजंटना विकले. या बदल्यात पैसे बिटकॉइन, हवाला आणि रोख स्वरूपात घेतले जात होते. छाप्यांमध्ये सुमारे 89 लाख रुपये रोख आणि 61 लाख रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले. सध्याची स्थिती : या प्रकरणात CBI ने 2021 मध्ये आरोपपत्र दाखल केले होते. परंतु प्रिव्हेंशन ऑफ करप्शन ॲक्ट, 1988 हटवला होता, यावर न्यायालयाने असहमती दर्शवली. CBI ला पुन्हा तपासाचे आदेश दिले. सध्या आरोपांवर युक्तिवाद सुरू आहे. गर्ग जामिनावर बाहेर आहे. चौथे प्रकरण : 18 FIR, परंतु केवळ 2 प्रकरणांमध्ये तपास झाला 2020 मध्ये RPF मध्ये दाखल झालेल्या 18 FIR पुढे नेण्यासाठी RPF च्या DG कडून CBI चौकशीची मागणी करण्यात आली. आरोपींमध्ये सिराज अहमद खान, शमशेर आलम, किफायत आलम, जितेंद्र शर्मा उर्फ गोरा जीतू खोदारे, राजेश यादव, रामकुमार यादव आणि ऋषभ जैन यांच्या नावांचा समावेश होता. सध्याची स्थिती : 18 पैकी फक्त 2 एफआयआरची चौकशी झाली. उर्वरित प्रकरणांची तपासणी झाली नाही. तर, स्वतः सीबीआय संचालकांनी चौकशीसाठी फाईल पुढे पाठवली आहे. 5400 एजंट, कोट्यवधींचा खेळ - 1 लाख रुपयांची 80 ई-तिकिटे जप्त मे 2018 मध्ये रेल्वे सुरक्षा दल म्हणजेच RPF आणि सेंट्रल रेल्वेच्या दक्षता पथकाने मुंबईत सलमान खानला अटक केली होती. 2 मे 2018 रोजी जोगेश्वरी परिसरात छापेमारीदरम्यान त्याला लॅपटॉपसह पकडण्यात आले. चौकशीत समोर आले की, तो ‘Counter V2’ नावाच्या बेकायदेशीर सॉफ्टवेअरद्वारे देशभरात सुमारे 5,400 एजंटचे नेटवर्क चालवत होता, ज्यामुळे एजंट काही सेकंदात तत्काळ तिकीट बुक करत होते. कारवाईदरम्यान त्याच्या सिस्टीममधून सुमारे 1 लाख रुपयांची 80 ई-तिकिटे जप्त करण्यात आली आणि नंतर सर्व्हरच्या तपासणीत 6,600 पेक्षा जास्त PNR, सुमारे 1.47 कोटी रुपये किमतीच्या तिकिटांचा डेटा मिळाला. या प्रकरणी RPF, भायखळाने रेल्वे कायद्याच्या कलम 143 अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. 15 एप्रिल 2023 रोजी RPF ने शमशेर आलमला तामिळनाडूतील तिरुवन्नामलाई येथून अटक केली. तपास यंत्रणांनुसार, शमशेरने IRCTC च्या तत्काळ तिकीट बुकिंगला बायपास करण्यासाठी ‘फ्युजन’सह अनेक बेकायदेशीर सॉफ्टवेअर तयार केले होते आणि ते देशभरातील खाजगी तिकीट एजंटना भाड्याने देत असे. असे सांगण्यात आले की, तो गेल्या सुमारे 10 वर्षांपासून मुंबईतील टिटवाळा परिसरातून नेटवर्क चालवत होता आणि त्याच्या सॉफ्टवेअरद्वारे एजंट काही सेकंदात तिकिटे बुक करत होते. पोलिसांनुसार, या नेटवर्कद्वारे सुमारे 50 कोटी रुपयांपर्यंतचा अवैध व्यवसाय झाला. चौकशीत समोर आले की तो आधी ‘Sharp’, ‘Tez’, ‘Nexus++’ आणि ‘Fusion’ यांसारखे सॉफ्टवेअर मासिक भाड्याने देत असे आणि नंतर मित्रांसोबत मिळून नेटवर्क देशभरात पसरवले. अटकेनंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. सध्या तो जामिनावर बाहेर आहे. पैसे कसे कमावतात या 5 अधिकाऱ्यांवर गैरव्यवहार रोखण्याची जबाबदारी ‘सुरक्षा वैशिष्ट्ये जोडताच त्यावर तोडगाही निघतो’ तपास करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ‘तपासात समोर आले होते की, पूर्व यूपीमध्ये बसून आरोपी अवैध सॉफ्टवेअरने देशभरात तिकीट बुकिंगचे रॅकेट चालवत आहेत. त्यांच्या सॉफ्टवेअरमध्ये डेटा आधीच फीड केलेला असतो. सेकंदात तिकिटे बुक होतात.’ ‘संपूर्ण रॅकेट अजूनही सक्रिय आहे, कारण सर्वजण जामिनावर बाहेर आहेत. IRCTC कडून जी काही सुरक्षा वैशिष्ट्ये जोडली जातात, हे लोक लगेच त्यावर तोडगा काढतात, त्यामुळे आता आरपीएफने त्यांना अटक करावी. ज्यांची नावे आरोपपत्रात आहेत, तेच हे रॅकेट चालवत आहेत.’ IRCTC, CBI ला प्रश्न पाठवले – भास्करने या प्रकरणात IRCTC आणि CBI ची बाजू जाणून घेण्यासाठी त्यांना प्रश्न पाठवले आहेत. अजून उत्तर आलेले नाही. उत्तर येताच बातमीत अपडेट केले जाईल.
सर्वात आधी सोशल मीडियावर व्हायरल झालेला चंदीगडचा हा व्हिडिओ पाहा- सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ चंदीगडचा आहे. त्यात एक डिलिव्हरी बॉय जवळपास दोन तास त्याच स्थितीत उभा राहिला. त्याच्या तोंडात सिगारेट आणि हातात लाइटर होते. जवळच्या लोकांनी त्याला बराच वेळ पाहिले आणि नंतर पोलिसांना माहिती दिली. जेव्हा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, तेव्हा लोकांनी म्हणायला सुरुवात केली की तो “झॉम्बी ड्रग”चा व्यसनी आहे, ज्यामुळे लोक तासन्तास तिथेच गोठून जातात. हे 'झॉम्बी ड्रग' काय आहे, लोक खरोखरच त्याच्या प्रभावाखाली पुतळ्यासारखे होतात का, ते भारतात कसे पोहोचले, हे आजच्या एक्सप्लेनरमध्ये जाणून घेऊया... प्रश्न-1: चंदीगडच्या डिलिव्हरी बॉयने खरंच 'झॉम्बी ड्रग' घेतले होते की इतर काही कारण होते?उत्तर : 24 मार्च रोजी चंदीगडच्या सेक्टर 33B मध्ये लोकांनी एका डिलिव्हरी बॉयला नशेत पाहिले. तो एक पाऊलही हलू शकत नव्हता. तो सुमारे अडीच तास रस्त्याच्या कडेला उभा होता. त्याचे डोळे बंद होते आणि तो हाताने लाइटरही पेटवू शकत नव्हता. लोकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांचे एक पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्या तरुणाला पोलीस ठाण्यात घेऊन गेले. पोलीस स्टेशन-34 चे स्टेशन हाऊस ऑफिसर इन्स्पेक्टर सतिंदर यांनी सांगितले की, डिलिव्हरी बॉयला पोलीस ठाण्यात आणून चौकशी करण्यात आली. तरुणाने कोणाशीही गैरवर्तन केले नव्हते. त्यामुळे चौकशी केल्यानंतर त्याचे नाव आणि पत्ता नोंदवून त्याला ताकीद देऊन सोडून देण्यात आले. त्यानंतर तो स्वतःच स्टेशनमधून निघून गेला.तरुणाने कोणते ड्रग घेतले होते की नाही, याबद्दल पोलिसांनी कोणतीही निश्चित माहिती दिली नाही. तो दारूच्या नशेत होता की दुसरे काही कारण होते, की वैद्यकीय त्रासामुळे तो उभा राहून बेशुद्ध होऊ लागला होता, हे स्पष्ट नाही. तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्याला झॉम्बी ड्रग शी जोडले जात आहे. प्रश्न-2: 'झॉम्बी ड्रग' काय आहे, ज्याला या प्रकरणाशी जोडले जात आहे?उत्तर : प्राण्यांना दिली जाणारी औषधे आहेत-झायलेझिन (Xylazine). उपचारादरम्यान झायलेझिन प्राण्यांना शांत करते, त्यांना हलक्या बेशुद्ध अवस्थेत ठेवते आणि त्यांची वेदना कमी करते. याच कारणामुळे याला सामान्यतः Tranq म्हणून ओळखले जाते. झायलेझिन एक नॉन-ओपिओइड औषध आहे, म्हणजे ते अफूपासून बनत नाही. पण हेच झायलेझिन फेंटॅनिल, हेरोइन किंवा कोकेनसारख्या ओपिओइड औषधांसोबत मिसळून घेतल्यास ते जलद नशा करते. झायलेझिन आणि ओपिओइड्सच्या या मिश्रणाला बोलचालीच्या भाषेत झॉम्बी ड्रग म्हणून ओळखले जाते. या नावामागील कारण आहे, या ड्रग्जचा परिणाम. खरं तर, याचे व्यसनी लोक अनेकदा बराच काळ एकाच स्थितीत बेशुद्ध अवस्थेत पडून राहतात. त्यांच्या शरीरावर फोड आणि पुरळ येतात आणि जखमेच्या ठिकाणी लाल चट्टे पडू लागतात. अनेक सायन्स फिक्शन चित्रपटांमध्ये व्हायरसने संक्रमित जिवंत प्रेतासारखे धोकादायक व्यक्ती दाखवले जातात. हे व्यक्ती बेशुद्ध राहतात, म्हणूनच झायलेझिनचा वापर करणाऱ्यांना झॉम्बी ड्रग ॲडिक्ट म्हटले जाते. झायलेझिन सर्वप्रथम 1962 मध्ये एका जर्मन कंपनीने विकसित केले होते. त्याचा उपयोग प्राण्यांमधील वेदना कमी करण्यासाठी आणि ऑपरेशनदरम्यान त्यांना बेशुद्ध करण्यासाठी होतो. ते मानवांसाठी योग्य नाही. नशेसाठी फेंटानाइल किंवा हेरोइनसोबत झायलेझिनचा वापर का केला जातो याची दोन मुख्य कारणे आहेत... अहवालानुसार, झायलेझिन खूप स्वस्त आहे. ते बेकायदेशीर ड्रग्ज बाजारात अंदाजे 500 ते 1000 रुपये प्रति किलो मिळते. अमेरिकेच्या ड्रग्ज एन्फोर्समेंट ॲडमिनिस्ट्रेशन (DEA) च्या अहवालानुसार, झायलेझिनचा वापर फेंटॅनाइल किंवा हेरॉईनसोबत भेसळ म्हणून केला जातो, कारण त्याचे मानसिक परिणामदेखील होतात. ते स्वस्त असल्यामुळे भेसळ केल्याने ड्रग्ज तस्करी करणाऱ्यांचा नफा वाढतो. 2. याची नशा जास्त काळ टिकते खरं तर, 1959 मध्ये बनवलेले पेनकिलर फेंटॅनाइल, आज हेरॉईनपेक्षा जास्त महाग आहे. तथापि, ते अधिक नशिल्यामुळे हेरॉईनऐवजी फेंटॅनाइलचा वापर वाढत आहे. इतर मादक द्रव्यांमध्ये मिसळून त्याची मात्रा वाढवली जाते, ज्यामुळे ड्रग्ज तस्करी करणाऱ्यांचा नफा वाढतो. अमेरिकेच्या पॅसिफिक नॉर्थवेस्ट नॅशनल लॅबोरेटरीच्या अहवालानुसार, अमेरिकेत, 1 किलो हेरॉईन सुमारे 6,000 डॉलरमध्ये खरेदी करून सुमारे 80 हजार डॉलरमध्ये विकले जाऊ शकते. तसेच, जर 6 हजार डॉलरमध्ये फेंटॅनिल खरेदी केले, तर त्याच्या तीव्र परिणामांमुळे ते बेकायदेशीरपणे सुमारे 16 लाख डॉलरमध्ये विकले जाऊ शकते. फेंटॅनिलचा नशा फक्त थोड्या काळासाठी टिकतो, त्यामुळे त्यात स्वस्त झायलेझिन मिसळले जाते, ज्यामुळे त्याचा प्रभाव जास्त काळ टिकतो. DEA नुसार, त्याचा प्रभाव आणि कालावधी वाढवण्यासाठी फेंटॅनिलमध्ये झायलेझिन मिसळले जाते. द ब्रिटिश मेडिकल असोसिएशनच्या मॅगझिन BMJ जर्नल्सनुसार, अमेरिकेतील फिलाडेल्फियामध्ये ड्रग्ज व्यसनींच्या एका अभ्यासात असे आढळून आले आहे की, फेंटॅनिलमध्ये झायलेझिन मिसळल्याने जुन्या काळातील हेरॉईन घेतल्यासारखे वाटते, ज्याचा प्रभाव जास्त काळ टिकतो. झायलेझिन फेंटॅनिलच्या आगमनापूर्वी तयार होणाऱ्या हेरॉईनसारखीच स्थिती किंवा झोपेची स्थिती निर्माण करते. अहवालानुसार, झॉम्बी ड्रग्ज घेणाऱ्या बहुतेक लोकांना हे माहीत नसते की ते ही भेसळयुक्त औषधे घेत आहेत. प्रश्न-3: 'झॉम्बी ड्रग'च्या प्रभावाखाली एखादी व्यक्ती पुतळा बनते का?उत्तर : झॉम्बी ड्रगमध्ये समाविष्ट असलेले झायलेझिन मानवी मेंदू आणि मज्जातंतूंमधील अल्फा-2 रिसेप्टर्सना सक्रिय करते. हे रिसेप्टर आपल्या सेंट्रल नर्व्हस सिस्टमवर कार्य करून नॉरपिनेफ्रिन नावाच्या न्यूरोट्रांसमीटरचे प्रकाशन कमी करते. नॉरपिनेफ्रिनचे कार्य आपल्याला जागृत, निश्चित आणि सतर्क ठेवणे आहे. जेव्हा झायलेझिन अल्फा-2 रिसेप्टरला सक्रिय करते, तेव्हा नॉरपिनेफ्रिन निष्क्रिय होते. याचे दोन परिणाम आहेत... झायलेझिनसोबत मिसळलेले फेंटॅनाइल किंवा इतर कोणतेही औषध हा परिणाम अधिक तीव्र करते. प्रश्न-4: 'झॉम्बी ड्रग'ची अशी प्रकरणे यापूर्वी नोंदवली गेली आहेत का?उत्तर : भारतात अद्याप झायलेझिनच्या मानवी वापराची कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. तथापि, अमेरिकेत त्याचा वापर सर्वाधिक आहे. 2000 च्या दशकाच्या सुरुवातीला अमेरिकेतील प्यूर्टो रिको बेटावर ड्रग्ज व्यसनींनी याचा वापर केला होता. त्यावेळी त्याला घोड्यांना बेशुद्ध करणारे औषध म्हणून ओळखले जात होते. 2006 मध्ये फिलाडेल्फिया, अमेरिकेत झायलेझिनच्या वापरामुळे 7 लोकांच्या मृत्यूची पुष्टी झाली होती. 2014 पर्यंत हेरॉईनसारख्या ड्रग्जमध्ये भेसळ म्हणून त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होऊ लागला. एप्रिल 2023 मध्ये बायडेन प्रशासनाने त्याला वाढता राष्ट्रीय धोका घोषित केले. 2022 मध्ये युक्रेनमध्येही एका मृत्यूची पुष्टी झाली. 2024 मध्ये ब्रिटिश सरकारनेही त्याला नियंत्रित ड्रग्जच्या यादीत समाविष्ट केले. अहवालानुसार, फिलाडेल्फियामध्ये झायलेझिनचा वापर सर्वाधिक आहे, जो तेथील ड्रग्जच्या अतिसेवनामुळे होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी 31% आहे. सध्या, त्याचा वापर संपूर्ण अमेरिकेत पसरला आहे. चंदीगडचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडिया वापरकर्ते विचारत आहेत की भारतात हे 'झॉम्बी ड्रग' कुठून आले? प्रश्न-5: हे 'झॉम्बी ड्रग' भारतात कसे आले, कोणत्या भागात त्याचा सर्वाधिक वापर होत आहे?उत्तर : भारतात झायलेझिनच्या बेकायदेशीर वापराबाबत कोणतीही अचूक आणि अधिकृत माहिती नाही. सरकारच्या सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) नुसार, झायलेझिनचा वापर केवळ प्राण्यांच्या उपचारांसाठीच केला जाऊ शकतो. मानवांमध्ये त्याचा वापर बेकायदेशीर आहे. AIIMS येथील राष्ट्रीय औषध अवलंबित्व उपचार केंद्र (NDDTC) आणि केंद्र सरकारचे सामाजिक न्याय मंत्रालय अंमली पदार्थांचे व्यसन रोखण्यासाठी काम करतात. 2019 च्या NDDTC सर्वेक्षणानुसार, भारतात अंदाजे 5.7 कोटी लोक हेरॉईन आणि हेरॉईनसारख्या अफू-आधारित अंमली पदार्थांचे व्यसनी आहेत. याव्यतिरिक्त, अंदाजे 4 कोटी लोक फार्मास्युटिकल्स आणि अंमली पदार्थांच्या गैरवापराच्या इतर प्रकारांचा वापर करतात. 2024 च्या DEA अहवालानुसार, मेडोतोमिडाइन हे नवीन औषध झायलेझिनची जागा घेत आहे. ते झायलेझिनपेक्षा 300 पट अधिक नशकारक आहे. अहवालानुसार, चीन दोन्ही औषधांचा सर्वात मोठा निर्यातदार आहे, त्यानंतर भारताचा क्रमांक लागतो. भारतात, पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि ईशान्य हे असे प्रदेश आहेत जे बेकायदेशीर अंमली पदार्थांची तस्करी आणि अंमली पदार्थांच्या वापरामुळे सर्वाधिक प्रभावित आहेत. 2021 च्या NCRB डेटानुसार, उत्तर प्रदेशमध्ये NDPS कायद्यांतर्गत सर्वाधिक प्रकरणे नोंदवली गेली, जो बेकायदेशीर अंमली पदार्थांच्या वापराशी संबंधित कायदा आहे. 10,432 प्रकरणांसह महाराष्ट्र आणि पंजाबचा क्रमांक लागतो. तथापि, प्रति 10 लाख लोकसंख्येमागे अंमली पदार्थांशी संबंधित गुन्ह्यांच्या बाबतीत पंजाब अव्वल स्थानावर आहे. युनायटेड नेशन्स ऑफिस ऑन ड्रग्स अँड क्राईम (UNODC) च्या अहवालानुसार, जगभरात बेकायदेशीर अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी दोन प्रदेश कुख्यात आहेत: पहिला अफगाणिस्तान, इराण आणि पाकिस्तान आणि दुसरा: म्यानमार, थायलंड आणि लाओस. हे दोन प्रदेश जगातील बहुतेक अफू-आधारित आणि इतर अंमली पदार्थांचा पुरवठा करतात. 2021 पर्यंत अफगाणिस्तान सर्वात मोठा अफू उत्पादक होता. आता म्यानमार सर्वाधिक अफूचे उत्पादन करतो. UNODC चे म्हणणे आहे की या दोन प्रदेशांमधील स्थानामुळे दक्षिण आशियामध्ये, विशेषतः भारत, अंमली पदार्थांच्या बेकायदेशीर वापरामुळे जास्त प्रभावित आहे.
Pune Metro : पुणेकरांनो सावधान! मेट्रो मार्गाच्या ५० मीटर परिसरात बांधकाम करताय? आधी ही बातमी वाचा
Pune Metro : मेट्रो मार्गाच्या दोन्ही बाजूंना ५० मीटर परिसरात खोदकाम बंधनकारक असतानाही नियमांकडे दुर्लक्ष; भविष्यात मोठ्या दुर्घटनेची शक्यता.
Supreme Court : २०२२ च्या शिक्षक भरतीतील सर्व निवड याद्या रद्द करून गुणवत्तेच्या आधारे नव्याने याद्या जाहीर करण्याचे निर्देश.
चोरीच्या संशयाने दोन चिमुकल्यांना रात्रभर उलटं टांगलं; सांगलीत खळबळ
सांगली: सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील बनपुरी गावात माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. केवळ चोरीच्या संशयावरून दोन निष्पाप चिमुकल्यांना उलटं टांगून रात्रभर अमानुष छळ करण्यात आला. या क्रूर अत्याचारात १० वर्षीय सानिका हिचा मृत्यू झाला, तर तिची ११ वर्षीय बहीण अनुजा गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात उपचार घेत आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरला आहे.घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, केवळ शेजारच्या घरात चोरी केल्याचा संशय शेजाऱ्याने घेतल्याने संतापाच्या भरात या दोन चिमुकल्यांवर त्यांच्या आई-वडिलांकडून निर्दयी अत्याचार करण्यात आला. नाना हैबत यमगर असं मुलींच्या वडिलांचं नाव आहे.बुधवारी सायंकाळी सुमारे पाचच्या सुमारास मुलींच्या वडिलांनीच दोन्ही मुलींना हात-पाय बांधून घरातील पत्र्याच्या अँगलला उलटं टांगलं. रात्रभर त्या चिमुकल्या वेदनेने तडफडत 'पाणी, पाणी' अशी आर्त हाक देत होत्या. मात्र, निर्दयी आई-वडिलांनी त्यांना मदत तर दूरच, पाण्याचा थेंबही दिला नाही.रात्रभर झालेल्या छळाने पहाटे मृत्यूअसह्य वेदना सहन करताना सानिकाने रात्रीच प्राण सोडले. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, मुलगी मृत आणि उलटी टांगलेल्या अवस्थेत असतानाही आई-वडील त्या खाली निवांत झोपले होते. गुरुवारी सकाळी आजोबांनी मुलींना खाली उतरवलं, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. सानिका मृतावस्थेत आढळली, तर अनुजा बेशुद्ध अवस्थेत होती.अनुजाला तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. तर सानिकाला दुसऱ्या रुग्णालयात नेण्यात आलं असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.बहिणीच्या जबाबातून उघड झाला प्रकारअनुजा शुद्धीवर आल्यानंतर तिने डॉक्टरांना दिलेल्या जबाबात संपूर्ण प्रकार उघड झाला. 'वडिलांनी आम्हाला उलटं टांगून मारहाण केली' असं तिने सांगितल्यावर डॉक्टरांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली आणि या अमानुष घटनेचा पर्दाफाश झाला.सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून संबंधित आरोपींवर खून आणि खुनाच्या प्रयत्नासारखे गंभीर गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे समाजमन हादरलं असून बालसुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
Ram Navami 2026 : बाळा जो जो रे…! तुळशीबाग राम मंदिरात पाळणा हलला; अवघे मंदिर झाले राममय
Ram Navami 2026 : तुळशीबाग राम मंदिरात सलग २६५ व्या वर्षी श्रीराम नवमीचा उत्साह; दर्शनासाठी पुणेकरांची अलोट गर्दी.
Pune Fuel Shortage पुण्यात पेट्रोल-डिझेलचा तुटवडा? पंपांवर लांबच लांब रांगा; जाणून घ्या काय आहे सत्य
Pune Fuel Shortage : पेट्रोल-डिझेलच्या टंचाईच्या अफवा सोशल मीडियावरून पसरल्याने पेट्रोल पंपांवर गर्दी होत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
हिंदू, बौद्ध आणि शीख या धर्मातील कोणत्याही अनुसूचित जातीतील व्यक्तीने म्हणजे एससीने धर्मांतर (Editorial) केले तर एससी म्हणून मिळणारे लाभ, संरक्षण व हक्क तो गमावतो.
Pune News : पुणे की बारामती? एमपीसीबीच्या कार्यालयावरून राजकारण तापलं; वाचा नेमका काय आहे वाद
Pune News : पुणे शहराचा विस्तार आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता कार्यालय पुण्यातच हवे; आमदार हेमंत रासने यांची पर्यावरण मंत्र्यांकडे मागणी.
MNGL Gas Connection : एमएनजीएलचा ‘गॅस’ फुसका! ४ वर्षे उलटली तरी कनेक्शन नाही..वाचा सविस्तर
MNGL Gas Connection : प्रभात आणि लॉ कॉलेज रस्त्यावर ४ वर्षांपूर्वीच पाइपलाइन टाकूनही घराघरांत गॅस पोहोचवण्यात एमएनजीएल अपयशी ठरली आहे.
गेल्या शतकात अमेरिकेने 96 हून अधिक देशांमध्ये लष्करी कारवाई (Editorial) केली. जगभर 800 हून अधिक लष्करी तळ उभारले.
Pune News : चांदणी चौक ते राम नदीपर्यंतचा रस्ता ६० मीटर रुंद होणार; उड्डाणपूल आणि ग्रेड सेपरेटरसाठी २०० कोटींचा प्रस्ताव सादर.
Kalas Theft Incident : कळस परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ! एकाच रात्रीत मोटारसायकल, सोन्याचे गंठण लंपास
Kalas Theft Incident : महिनाभरापूर्वी घेतलेली नवीन मोटारसायकल चोरली, तर झोपलेल्या महिलेच्या गळ्यातील गंठण कापले; कळस परिसरात चोरट्यांच्या टोळीचा थरार.
हवामान : धास्ती ‘सुपर एल निनो’ची!
या वर्षाच्या अखेरपर्यंत ‘सुपर एल नीनो’चा (super el nino) प्रभाव निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे संपूर्ण जगाचे हवामानचक्र विस्कळीत होते.
Ram Navami : ३२५ वर्षांचा वारसा! भोरच्या राजवाड्याची ती ऐतिहासिक परंपरा, जी आजही अंगावर शहारे आणते
Ram Navami 2026 : सनई-चौघड्यांच्या सुरात आणि 'श्रीराम' जयघोषात भोरचा राजवाडा दणाणला; राजघराण्यातील वंशजांच्या उपस्थितीत जन्मोत्सव सोहळा संपन्न.
Gas Cylinder Shortage : ७ तारखेपासून व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा ठप्प; हॉटेलऐवजी रुग्णालय आणि शाळांना प्राधान्य दिल्याने १३० हॉटेल व्यावसायिकांवर कुऱ्हाड.
Shirur News : शिरूर तालुका पुन्हा ‘एकसंघ’होणार? २०२९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी हालचालींना वेग
Shirur News : निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष; संभाव्य बदलांमुळे अनेक इच्छुकांनी आतापासूनच सुरू केली मतदारसंघांत मोर्चेबांधणी.
Ram Navami 2026 : अयोध्येतील मंदिर उद्घाटनानंतर रामनवमी उत्सवात आमूलाग्र बदल; धार्मिक विधीचे रूपांतर भव्य सार्वजनिक सोहळ्यात.
Inter-religion Marriage : दीड वर्षांपासूनच्या प्रेमसंबंधातून मुलीचे पळून जाऊन लग्न; वाघोली पोलीस ठाण्यात नातेवाईक आणि कार्यकर्त्यांचा जोरदार गोंधळ.
Shirur Crime : विश्वासघात! कंटेनरचे १० टायर चोरून चालक पसार; जातेगाव खुर्द येथील धक्कादायक प्रकार
Shirur Crime : चालकाचा संपर्क तुटल्याने जीपीएस लोकेशनवरून गुपित उघड; जातेगाव खुर्द येथील पंजाबी खालसा ढाब्यासमोर उभा होता कंटेनर.
Rajgurunagar News : नगराध्यक्ष मंगेश गुंडाळ यांचे थकबाकीदारांना आवाहन; केवळ चालू आर्थिक वर्षासाठीच मिळणार सवलतीचा लाभ.
Shri Ram Navami : पिंपरी-चिंचवडमध्ये राम नवमीचा अभूतपूर्व उत्साह! जय श्रीरामच्या गजराने शहर दुमदुमले
Shri Ram Navami : पिंपरी-चिंचवडमधील प्रमुख मंदिरांमध्ये पहाटेपासून अभिषेक आणि धार्मिक विधी; कीर्तन-भजनाने अवघे शहर झाले राममय.
Ram Navami 2026 : इंद्रायणीनगरमध्ये रामनामाचा जयघोष! विहिंप आणि बजरंग दलातर्फे रामनवमी उत्साहात
Ram Navami 2026 : विश्व हिंदू परिषद बजरंग दल, इंद्रायणीनगर प्रखंडतर्फे विविध उपक्रमांचे आयोजन; ह.भ.प. युवराज महाराज भगत यांचे प्रभू श्रीरामांच्या जीवनावर प्रेरणादायी प्रवचन.
Maval News : मावळात श्रीराम जन्मोत्सव उत्साहात! आकर्षक रोषणाई आणि भजन-कीर्तनाने भक्तीचा जागर
Maval News : वारंगवाडी, कातवीसह मावळच्या ग्रामीण भागात श्रीराम नवमीची रेलचेल; मंदिर परिसर विद्युत रोषणाईने उजळले.
Gondavale News : मोधळ ओढा आणि शनि मंदिर परिसरात तरसाचा वावर वाढला; वन विभागाकडून रात्रीच्या वेळी सतर्क राहण्याचे नागरिकांना आवाहन.
PCMC Abhay Yojana : महापालिकेच्या तिजोरीत ८६० कोटी जमा! अभय योजनेचा लाभ घेण्यासाठी ५ दिवस शिल्लक
PCMC Abhay Yojana : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अभय योजनेला नागरिकांचा उदंड प्रतिसाद; ८६० कोटी ५९ लाखांचा मालमत्ता कर वसूल.
PCMC News : महापालिकेला मिळेनात कंत्राटी डॉक्टर! पालिकेच्या रुग्णालयांमध्ये मोठं संकट; काय आहे कारण?
PCMC News : थेरगाव, भोसरी, जिजामाता आणि तालेरा रुग्णालयांतील विविध विभागांसाठी तज्ज्ञांचा शोध सुरू; वॉक-इन इंटरव्ह्यूद्वारे रिक्त पदे भरण्याचे प्रशासनाचे प्रयत्न.
Water Supply : पंपिंग स्टेशनला आता ‘सॉफ्ट स्टार्टर’चा आधार; पाणीपुरवठ्यातील तांत्रिक बिघाड थांबणार?
Water Supply : पंपिंग झोनमधील विविध पंपहाऊसमध्ये बसविले जाणार सॉफ्ट स्टार्टर; तांत्रिक कार्यक्षमता वाढवून पाणीपुरवठा अधिक सुरळीत करण्याचा प्रयत्न.
PMR Growth Hub : नदी प्रदूषण नियंत्रण, सांडपाणी व्यवस्थापन आणि औद्योगिक सुविधांवर भर; शाश्वत विकासासाठी ४० हजार कोटींच्या निधीची तरतूद.
Student Safety : भुईंज बसस्थानक ते कर्मवीर विद्यालय सेवा रस्त्यावर वाहतूक कोंडीचा विळखा; अल्पवयीन दुचाकीस्वारांमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर.
Ashok Kharat Video: व्हॉट्स अॅपवर भोंदूबाबा अशोक खरातचे ‘ते’ 8 व्हिडिओ व्हायरल
नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाने (Ashok Kharat Video) संपूर्ण महाराष्ट्र हादरला असतानाच, या प्रकरणातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्यांवर आता सरकारने कडक कारवाई सुरू केली आहे.
Maharashtra mla & Kharat Connection: संतांच्या महाराष्ट्रात अशा काळ्या जादूला राजमान्यता मिळणे दुर्दैवी आहे. खरातने स्वतःच्या दैवी शक्तीचा आभास निर्माण करण्यासाठी रिमोटवर चालणारे नकली साप आणि वाघाच्या कातड्याचा वापर केला.
Satara News : विषारी औषध घालून मोकाट कुत्र्यांना मारले; कराडमधील धक्कादायक घटना
शहरातील गल्लीबोळात फिरणार्या मोकाट कुत्र्यांना अज्ञाताने खाऊतून विषारी औषध घातल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस (Satara News) आला आहे.
मुंबई महापालिकेचे दवाखाने अष्टौप्रहर सुरु ठेवा; स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांचे निर्देश
मुंबई: मुंबई महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने सुरु असलेले दवाखाने विशिष्ट वेळेतच सुरु असतात. त्यामुळे रुग्णांना रात्रीच्या वेळी वैद्यकीय आरोग्य सुविधा उपलब्ध होत नाही. त्यामुळे महापालिकेच्यावतीने चालवल्या जाणारे सर्व दवाखाने हे अष्टौप्रहर सुरु ठेवावेत,अशाप्रकारचे निर्देश महापालिका स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणाद्वारे दिले आहेत.मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये सन २०२६-२७चा अर्थसंकल्प सादर करण्यात आला असून या अर्थसंकल्पावर स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी भाषण केले. या भाषणामध्ये अध्यक्षांनी, उच्चरक्तदाब, कर्करोग इत्यादी असंसर्गजन्य रोगांसाठी आवश्यक असलेल्या दर्जेदार उपकरणांनी दवाखाने सुसज्ज केले जातील. ही प्रशंसनीय बाब म्हटले आहे. मात्र, महानगरपालिकेचे दवाखाने दिवसातील विशिष्ट वेळेत सुरु असतात. फक्त दिवसा हे दवाखाने सुरु असल्यामुळे नागरिकांना रात्रीच्या वेळी खाजगी दवाखान्यात जावे लागते. परंतु रात्री १०.३० किंवा ११.०० नंतर खाजगी दवाखानेही बंद होत असल्याने केवळ औषध तथा इंजेक्शन्स यांनी बऱ्या होणाऱ्या औषधांकरताही रुग्णांना नाईलाजाने खाजगी रुग्णालय अथवा महानगरपालिकेच्या रुग्णालयात जावे लागते. त्यामुळे रुग्णालयाच्या धर्तीवर महानगरपालिकेचे दवाखानेही अष्टौप्रहर सुरु ठेवावेत. आणि माझ्या या सूचनेची अंमलबजावणी करण्याकरिता प्रशासनाने अनुकूलरित्या विचार करावा,असे निर्देश दिले.सर्व प्रमुख रुग्णालये, उपनगरीय रुग्णालये, विशेष रुग्णालये, प्रसुतिगृहांमध्ये रुग्णशय्या उपलब्धतेचा केंद्रीकृत डॅशबोर्ड तयार करावा. त्यामुळे कमीत कमी वेळेत रुग्णांना रुग्णसेवा उपलब्ध होईल. या दृष्टीने प्रशासनाने विचार करावा,अशाही सूचना केल्या.मुंबई महापालिकेतील अनेक पदे रिक्त असल्याने तसेच काही रद्द करण्यात येत असल्याने महापालिकेच्या कामकाजावर होणाऱ्या परिणामांचा समाचार घेताना स्थायी समिती अध्यक्षांनी पदे रद्द करून महापालिकेच्या विद्यमान कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार नाही. अथवा महापालिकेच्या सेवांवर आणि कार्यक्षमतेवर परिणाम होणार नाही या याची तसेच आवश्यक तिथे पदे भरण्याची दक्षता आयुक्तांनी घ्यायला हवी.
Maharashtra Petrol-Diesel: टंचाईच्या भीतीने वाहनचालक टाक्या फुल करून घेत असताना अंबरनाथमध्ये एक थरारक घटना घडली. सारंग पोळके नावाच्या वाहनचालकाने आपल्या दुचाकीची टाकी पूर्ण भरून घेतली होती. मात्र, वाढत्या तापमानामुळे...
कमला मिलमध्ये महापालिकेची न भूतो, न भविष्यती कारवाई; डॉ अश्विनी जोशी यांनी अशक्य गोष्ट केली शक्य
मुंबई: मालमत्ता कराच्या थकबाकी वसुलीसाठी अतिरिक्त आयुक्त डॉ अश्विनी जोशी यांनी चाबूक हाती घेताच याच्या महसूल वाढीला आता गती येत आहे. त्या माध्यमातून महानगरपालिकेने अटकावणी व जप्तीची कारवाई अधिक तीव्र करण्याच्या अनुषंगाने कर निर्धारण व संकलन विभाग तसेच जी दक्षिण विभागाच्या संयुक्त विद्यमाने कमला मिल परिसरातील रमेश घमंडीराम गोवानी व गौरव इन्व्हेस्टमेंट यांच्या मालकीच्या सात गाळ्यांसह कार्यालय, वाहनतळ, इंटरनेट सेंटर, टाटा पॉवर उप केंद्रावर गुरुवारी २६ मार्च २०२६ रोजी जप्तीची कारवाई केली. यासोबतच संबंधित मालमत्तांचा पाणीपुरवठाही खंडित करण्यात आला आहे. कमला मिलमधील या कंपन्यांविरोधात जाण्याची हिंमत कोणत्याही महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दाखवली नव्हती, ही हिंमत आता डॉ अश्विनी जोशी यांनी दाखवत अशक्यही गोष्ट शक्य करून दाखवली आहे.अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांचे मार्गदर्शन आणि सहआयुक्त ( कर निर्धारण व संकलन) विश्वास शंकरवार, सहायक आयुक्त ( कर निर्धारण व संकलन) गजानन बेल्लाळे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. सन २०२५ - २६ या आर्थिक वर्षाचा तसेच थकीत मालमत्ता कर ३१ मार्च २०२६ पूर्वी न जमा केल्यास संबंधित मालमत्ताधारकांविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. तसेच, थकीत करभरणा न करणाऱ्या मालमत्तांवर अटकावणी आणि जप्तीची कारवाई करण्यात येत आहे.कमला मिल परिसरातील रमेश गोवानी व मेसर्स गौरव इन्व्हेस्टमेंट यांच्याकडे मालमत्ता करापोटी १४ कोटी २२ लाख रूपयांची थकबाकी आहे. तसेच, ६७ लाख २५ हजार ७३१ रूपयांचीही थकबाकी आहे. दिलेलया मुदतीत मालमत्ता कर भरणा न केल्यामुळे टाटा पॉवर उपकेंद्र, इंटरनेट सेंटर, मोकळे वाहनतळासह सात गाळे आणि गोवानी यांच्या मालकीच्या कार्यालयावर गुरुवारी जप्तीची कारवाई करण्यात आली. यासोबतच संबंधित मालमत्तांचा पाणीपुरवठाही खंडित करण्यात आला आहे.अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी म्हणाल्या की, मालमत्ताधारकांनी ३१ मार्च २०२६ पर्यंत कर भरणा करणे अपेक्षित आहे. त्यामुळे, थकबाकी असलेल्या सर्व मालमत्ताधारकांनी तसेच चालू आर्थिक वर्षाचा करभरणा न केलेल्या मालमत्ताधारकांनी ३१ मार्च २०२६ पूर्वी करभरणा करून दंडात्मक कारवाई टाळावी. मालमत्ताधारकांना विहित वेळेत मालमत्ता करभरणा करता यावा, यासाठी सार्वजनिक सुटी व साप्ताहिक सुटीच्या दिवशी म्हणजे २६, २८ व २९ मार्च २०२६ रोजी सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत तसेच ३० आणि ३१ मार्च २०२६ रोजी सकाळी ८ ते रात्री १२ वाजेपर्यंत नागरी सुविधा केंद्र (सीएफसी) सुरू ठेवण्यात आली आहेत, असेही डॉ. अश्विनी जोशी यांनी सांगितले.
किडनी फेल होणे हा अचानक होणारा आजार नसून दीर्घकाळाच्या दुर्लक्षाचा परिणाम असतो. आरोग्याची छोटी काळजी भविष्यातील मोठा धोका टाळू शकते, त्यामुळे शरीर देत असलेल्या संकेतांकडे दुर्लक्ष करू नका.
Alandi ram navami: तीर्थक्षेत्र आळंदी देवाची येथे श्री रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीवर मनमोहक ‘चंदन उटी’ साकारण्यात आली. यंदा माऊलींच्या समाधीवर चंदनाच्या माध्यमातून अत्यंत देखणा असा ‘शिंदेशाही पगडी’ अवतार साकारण्यात आला, हे रूप पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. पुण्यातील प्रसिद्ध मूर्तिकार अभिजीत धोंडफले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कलाकृती साकारली. चंदनाच्या उटीतून शिंदेशाही […]
Ashok Kharat Case : खरातनंतर आणखी एका स्वयंघोषित गुरुचा कारनामा उघड
अशोक खरात प्रकरण (Ashok Kharat Case) राज्यभरात चर्चेत असतानाच वसईत स्वयंघोषित धर्मगुरूने केलेल्या महिलेवर अत्याचाराची धक्कादायक घटना समोर आली आहे.
देशातील पेट्रोलियम आणि एलपीजी पुरवठ्याची परिस्थिती पूर्णपणे सुरक्षित आणि नियंत्रणात असल्याचे मंत्रालयाने अधोरेखित केले.
War Update: UAE मध्ये क्षेपणास्त्र कोसळून भारतीय नागरिकाचा मृत्यू; अबू धाबीत भीषण दुर्घटना
War Update: या घटनेनंतर यूएई प्रशासनाने आपली सुरक्षा यंत्रणा अधिक कडक केली असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. इराण आणि इस्रायलमधील तणावाचे सावट आता संपूर्ण आखाती देशांवर पसरले असून, या घटनेमुळे तिथे राहणाऱ्या भारतीय समुदायामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
Dabewala E-Bikes : डबेवाल्यांना लवकरच १०५ ई बाईक्स; महापौर रितू तावडे यांनी केली घोषणा!
मुंबईतील एक प्रवेशद्वार डबेवाला संकल्पनेवरमुंबई (विशेष प्रतिनिधी)मुंबईत प्रस्तावित प्रवेशद्वारांपैकी एक प्रवेशद्वार डबेवाला संकल्पनेवर आधारित उभारण्याचा मानस व्यक्त करत मुंबई महापौर रितू तावडे यांनी डबेवाल्यांसाठी लवकरच १०५ ई-बाइक्स उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची घोषणा केली. पूर्वीच्या तुलनेत डबेवाल्यांची संख्या काहीशी कमी झाली असली तरी या सेवेचा गौरव आणि प्रतिष्ठा आजही तितकीच उंचावलेली आहे. व्यवस्था केवळ जेवण पोहोचवण्यापुरती मर्यादित नसून उत्कृष्ट व्यवस्थापन आणि सेवा संस्कृतीचे जिवंत उदाहरण आहे. डबेवाले हे खऱ्या अर्थाने मुंबईच्या कार्यसंस्कृतीचे राजदूत आहेत असेही गौरवोद्गार महापौरांनी मुंबई डबेवाला आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्राच्या पाहणी प्रसंगी काढले.महापौर रितू तावडे यांनी वांद्रे (पश्चिम) येथील रिझवी महाविद्यालय परिसरातील ‘मुंबई डबेवाला आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्र’ ला काल मंगळवारी २५ मार्च २०२६ रोजी सायंकाळी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी केंद्रातील विविध विभागांची पाहणी केली तसेच डबेवाल्यांशी संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. डबेवाला केंद्र भेटीप्रसंगी नगरसेविका स्वप्नाली म्हात्रे, नगरसेविका सायली कुलकर्णी, मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष रामदास करवंदे, सचिव किरण गवांदे, नूतन मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष उल्हास मुके, सचिव विनोद शेट्टी, तसेच अनुभव केंद्राचे सुबोध सांगळे आणि डबेवाला संघटनेचे इतर मान्यवर सदस्य उपस्थित होते.याप्रसंगी महापौरांनी महापौरांनी डबेवाल्यांच्या दैनंदिन कामकाजातील ‘सॉर्टिंग’ (वर्गीकरण), ‘कोडिंग’ आणि वितरण प्रक्रियेची सविस्तर माहिती घेतली. अत्यंत गुंतागुंतीची ही प्रक्रिया अत्यल्प त्रुटींनी पार पाडत लाखो डबे वेळेत पोहोचवण्याच्या त्यांच्या कौशल्याचे त्यांनी कौतुक केले. मुंबई डबेवाला आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्र हे डबेवाल्यांच्या ऐतिहासिक परंपरेचे जतन व प्रसार करणारे महत्त्वाचे ठिकाण आहे. येथे डबे वर्गीकरण, कोडिंग आणि वितरण प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव घेता येतो. डिजिटल आणि इंटरॅक्टिव्ह माध्यमांतून या सेवेचा इतिहास व परंपरा अभ्यागतांना समजावून सांगितली जाते. त्याची पाहणी महापौर तावडे यांनी केली.केंद्रातील ‘वारसा प्रदर्शन’ आणि ‘व्ही आर झोन’ (Virtual Reality) द्वारे डबेवाल्यांचा प्रवास प्रभावीपणे सादर केला जातो. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ‘डबेवाला’ स्वरूपातील स्वतःचे छायाचित्र पाहण्याची सुविधा देखील येथे उपलब्ध असून, महापौरांनी त्याचाही अनुभव घेतला.सुमारे १३५ वर्षांहून अधिक काळ अखंडपणे सुरू असलेली डबेवाल्यांची सेवा ही कौतुकाच्या पलीकडची आहे. संपूर्ण मुंबईत दुपारी ठराविक वेळेत जेवणाचे डबे पोहोचवण्याची ही व्यवस्था लाखो नागरिकांच्या जीवनाशी निगडित आहे. वारकरी परंपरेतून प्रेरित होऊन भगवंताचे नामस्मरण करत सुरू असलेली ही सेवा मुंबईला जागतिक स्तरावर प्रतिष्ठा मिळवून देणारी ठरली आहे. डबेवाल्यांचे सांघिक कार्य, वेळेचे अचूक नियोजन आणि शिस्तबद्ध कार्यपद्धती ही व्यवस्थापन शिकणाऱ्या प्रत्येकासाठी आदर्श आहे, असे महापौर रितू तावडे यांनी नमूद केले.महापौरांची सह्दयतादरम्यान, डबेवाला संघटनेचे सदस्य दिनेश आरडे यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना बुधवारी २५ मार्च २०२६ रोजी सायंकाळी तातडीने डॉ. रु. न. कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही माहिती मिळताच महापौर रितू तावडे यांनी कूपर रुग्णालयात जाऊन श्री. आरडे यांची भेट घेतली आणि विचारपूस केली. तसेच, संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना आवश्यक ते निर्देश दिले. आरडे यांची प्रकृती आता स्थिर आहे.नव्या उर्जेने पुन्हा उभी राहिली डबेवाल्यांची सेवाडबेवाला सेवेची सुरुवात १८९० मध्ये झाली. या सेवेची मुळे वारकरी संप्रदायाशी जोडलेली आहेत. सध्या मुंबईत दररोज सुमारे एक लाख डबे वितरित केले जातात; कोविडपूर्व काळात ही संख्या दुप्पट होती. टाळेबंदीच्या काळात मुंबईकरांसह जगभरातून मिळालेल्या मदतीमुळे डबेवाल्यांचा उदरनिर्वाह सुरू राहिला आणि त्यांच्या कुटुंबांना मोठा आधार मिळाला, अशी माहिती डबेवाला संघटनेच्या वतीने माहिती देताना किरण गवांदे यांनी सांगितली. या संकटातून प्रेरणा घेऊन ही सेवा नव्या उर्जेने पुन्हा उभी राहत असल्याचे त्यांनी नमूद केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार श्रीकांत भारतीय यांच्या पाठिंब्यामुळे डबेवाला आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्र उभे राहिले, असे नमूद करीत जगभरातून येणारे पर्यटक, विद्यार्थी आणि व्यवस्थापन तज्ज्ञ यांच्यासाठी हे केंद्र माहितीचा मोठा स्रोत ठरत असल्याचेही गवांदे यांनी नमुद केले.
Petrol-Diesel: महाराष्ट्रात इंधनाची खरी परिस्थिती काय? मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्टच सांगितले….
Petrol-Diesel: नागरिकांनी अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा आणि संयम बाळगून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन राज्य सरकारतर्फे करण्यात आले आहे.
Ashok Kharat Case : तुमचा व्हिडिओ सापडला का हो? खरात प्रकरणावरुन महिला नेत्यांमध्ये जुंपली
दोन्ही नेत्यांमधील (Ashok Kharat Case) ही ट्विटर छन्नाछन्नी सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे.
Pune Crime : ‘स्वस्त सोन्याच्या’ आमिषाने दीड कोटींची फसवणूक; फरार दाम्पत्याला अटक
मोबाईल लोकेशन आणि सोशल मीडियाच्या मदतीने आरोपी देशातील विविध राज्यांत फिरत असल्याचे समोर आले.
Pune Crime : फ्लॅट आणि गोडाऊनचे आमिष; ६० लाखांची फसवणूक, दत्तवाडीतील बिल्डरवर गुन्हा
गणेश पेठ परिसरातील ‘अमान प्लाझा’ या प्रकल्पामध्ये फ्लॅट आणि गोडाऊन देण्याचे आश्वासन देत फिर्यादीकडून मोठी रक्कम उकळल्याचा आरोप आहे.
Team India ODI Schedule : बीसीसीआयने टीम इंडियाच्या आगामी वनडे सामन्यांचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे.
Deccan Queen Railway Festival : प्रतिष्ठित 'डेक्कन क्वीन'रेल्वे महोत्सव होणार साजरा
मध्य रेल्वेचा मुंबई विभाग २७ मार्च २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे, गौरवशाली 'डेक्कन क्वीन एक्सप्रेस' (ट्रेन क्रमांक 12123/12124) चा 'रेल्वे महोत्सव' साजरा करणार असल्याची अभिमानाने घोषणा करत आहे.कार्यक्रमाची ठळक वैशिष्ट्येछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून गाडी सुटण्याच्या एक तास आधी, म्हणजेच १७:१० वाजता, उत्सवाचा प्रारंभ होईल. गाडीच्या भव्यतेचे प्रतीक म्हणून, तिला फुलांनी सुशोभित करण्यात येईल. १९३० सालापासून चालणारी, भारतातील पहिली सुपरफास्ट आणि विजेवर चालणारी गाडी असलेल्या 'डेक्कन क्वीन'चा समृद्ध इतिहास दृकश्राव्य सादरीकरणाद्वारे उलगडून दाखवला जाईल.आधुनिकीकरणाची कामे‘रेल्वे महोत्सवा’चा भाग म्हणून, प्रवाशांचा आराम वाढवण्यासाठी आणि तिचे ऐतिहासिक आकर्षण जपण्यासाठी डेक्कन क्वीनचे महत्त्वपूर्ण नूतनीकरण करण्यात आले आहे:* प्रवासादरम्यान उत्कृष्ट भोजनाचा अनुभव देण्यासाठी डायनिंग कारचे ऐतिहासिक सौंदर्यशास्त्रानुसार नूतनीकरण करण्यात आले आहे, तसेच फर्निचर, छत आणि फरशीचे नूतनीकरण करण्यात आले आहे.* स्वच्छता सुधारण्यासाठी स्वच्छतागृहांमध्ये विनाइल, ड्युरो वाइप मॅट्स, साबण आणि टिश्यू डिस्पेंसर बसवण्यात आले आहेत.* एसी कोचच्या आसनांना सीट कव्हर्स लावून अद्ययावत केले आहे; दरवाजाच्या भागात विनाइलची सोय केली आहे.* छत आणि पॅनल बोर्ड आकर्षक थीमसह पुन्हा डिझाइन केले आहेत;* एअर फ्रॅग्रन्स डिस्पेंसर बसवण्यात आले आहेत.ऐतिहासिक वारसा१ जून १९३० रोजी सुरू झालेली डेक्कन क्वीन ही मुंबई आणि पुणे यांना जोडणारी भारतातील पहिली डिलक्स ट्रेन होती. तिने अनेक गोष्टींमध्ये पुढाकार घेतला: भारतातील पहिली सुपरफास्ट ट्रेन, पहिली लांब पल्ल्याची इलेक्ट्रिक इंजिन असलेली प्रवासी ट्रेन आणि व्हॅस्टिब्युल असलेल्या पहिल्या काही रेल्वेंपैकी हि एक गाडी आहे. ही गाडी 'फक्त महिलांसाठी' डबा आणि 'डायनिंग कार' असलेली पहिली गाडी होती. अनेक दशकांमध्ये, व्हॅक्यूम ब्रेक स्टॉकपासून ते आधुनिक जर्मन तंत्रज्ञानावर आधारित एलएचबी (LHB) डब्यांपर्यंत तिचा विकास झाला आहे, ज्यामुळे अधिक सुरक्षितता आणि आराम सुनिश्चित झाला आहे.वारसा महत्त्वडेक्कन क्वीन ही केवळ एक रेल्वेगाडी नसून, ती एक अशी संस्था आहे जिने पिढ्यानपिढ्या निष्ठावान (जीवलग) प्रवाशांना एकत्र जोडले आहे. आपला समृद्ध इतिहास आणि सतत होणारे आधुनिकीकरण यांमुळे, ती परंपरा आणि नावीन्य यांचा मेळ घालण्याच्या मध्य रेल्वेच्या वचनबद्धतेचे प्रतीक बनून राहिली आहे.मध्य रेल्वे प्रवासी, रेल्वेप्रेमी आणि सर्वसामान्य जनतेला वारसा, जुन्या आठवणी आणि प्रगतीचा हा उत्सव साजरा करण्यासाठी सहभागी होण्याचे निमंत्रण देते.
Ashok Kharat Case : झुंबरामागचे ‘ते’गुपित आलं समोर; अशोक खरात प्रकरणात नवा खुलासा
नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात (Ashok Kharat Case) याच्याविरुद्ध दाखल झालेल्या सर्व १० गुन्ह्यांचा तपास आता विशेष तपास पथक करणार आहे.
IPL 2026 Schedule : बीसीसीआयने आयपीएल 2026चं उर्वरित दुसऱ्या टप्प्याचं वेळापत्रक जाहीर केलं आहे.
Ashok Kharat : अशोक खरातचं आणखी एक ‘पुणे कनेक्शन’उघड; पुरुषांनाही सोडलं नाही !
नाशिकमधील सरकारवाडा पोलीस ठाण्यात बुधवारी खरातच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
Covid 19: कोरोनाचा नवा व्हेरियंट 23 देशांत पसरला; जगभरात आरोग्याबाबत चिंता वाढली
Covid 19: आरोग्य यंत्रणांनी नागरिकांना गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणे, हातांची स्वच्छता राखणे आणि लक्षणे दिसल्यास तातडीने चाचणी करून घेण्याचे आवाहन केले आहे. भारतात अद्याप याचा मोठा धोका समोर आला नसला, तरी आंतरराष्ट्रीय विमानांमुळे खबरदारी घेणे आवश्यक आहे.
Ashok Kharat Case : भोंदू खरातच्या संपर्कात आमदाराची बायको? राज्यात उडाली खळबळ
भोंदू बाबा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोक खरात (Ashok Kharat Case) याच्याशी संबंधित गंभीर प्रकरणात आता एक अतिशय धक्कादायक आणि संवेदनशील माहिती समोर आली आहे.
David Warner Slam Captains : पीएसएल कर्णधारांच्या पत्रकार परिषदेत डेव्हिड वॉर्नर आणि पाकिस्तानी खेळाडूंमध्ये जुंपल्याचे पाहायला मिळाले.
पुणे, नाशिक, जळगावसह काही शहरांमध्ये वाहनचालकांनी खबरदारी म्हणून मोठ्या प्रमाणात पेट्रोल भरण्यास सुरुवात केली.
Mamata Banerjee : मतदार यादीतील 30 लाख नावांचे श्रेय तृणमूलचेच; ममता बॅनर्जी यांची भाजपवर टीका
पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी गुरुवारी भाजपवर जोरदार निशाणा साधला.
Pune: राजगड विकास परिषदेची नवी कार्यकारिणी जाहीर
Pune: शिवजयंतीनिमित्त स्थापनेची घोषणा; राजगड व भोर तालुक्याच्या विकासाला गती देण्याचा संकल्प
Pinarayi Vijayan : राहुल गांधी म्हणजे भाजपची बी-टीम; पिनराई विजयन यांचे प्रत्युत्तर
केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन (Pinarayi Vijayan) आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यातील शाब्दिक युद्ध आता टोकाला पोहोचले आहे.
Turkish oil tanker : तुर्कीच्या तेलवाहू जहाजावर ड्रोन हल्ला.! इंजिन रुम आणि ब्रिजचे मोठे नुकसान
या हल्ल्यामागे युक्रेनचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात असला तरी, तुर्की सरकारने अद्याप अधिकृतपणे कोणावरही ठपका ठेवलेला नाही.
Nuwan Thushara Fitness : संघातील गोलंदाजीची फळी एकामागून एक धक्के सहन करत असून, आता श्रीलंकेच्या एका स्टार गोलंदाजाचा पत्ता कट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
धनंजय मानेंवरही धुरंधरची क्रेझ, सोशल मिडियावर घातला धूमाकूळ
बॉलिवूडचा'धुरंधर' २ सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या सिनेमातील काही सीन सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरलही होत आहेत. विशेष म्हणजे या सिनेमातील अभिनेता रणवीर सिंहचा शेवटचा सीन अतिशय भावुक करणारा आहे. सिनेमातील रणवीरचा हा सीन पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं आहे.पण, सोशल मीडिया कंटेंट क्रीएटर सुमित पाटील यानं एक आगळीवेगळी शक्कल लढवत 'धुरंधर'मधील हा सीन आणि मराठी प्रेक्षकांचा जीव की प्राण असलेला 'अशी ही बनवाबनवी' सिनेमातील काही पात्रांसह एक वेगळाच व्हिडीओ तयार केला आहे. या व्हिडीओनं सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला असून हा व्हिडिओ प्रेक्षकांच्या पसंतीसउतरला आहे.या व्हिडीओत सुमितने 'धुरंधर' सिनेमातील त्या भावुक सीनचा आधार घेतला आहे, जेथे रणवीर सिंग आपल्या मिशननंतर मायदेशी परततो. पण यात त्याने 'अशी ही बनवाबनवी' मधील अशोक सराफ (धनंजय माने), सुधीर जोशी (विश्वासराव) आणि लता थत्ते (मालकीण) यांच्या पात्रांचा वापर केला असून यामध्ये त्यानं अशोक सराफ यांनी साकारलेल्या धनंजय मानेचं पात्र रणवीरच्या जागी दाखवलंय.AIच्या मदतीने तयार केलेल्या या व्हिडीओमध्ये 'Dhanandhar माने इथेच राहत होते' अशा आशयाचे मजेशीर टेक्स्ट वापरण्यात आले आहे. तसेच घरमालक, जुनी केरसुणी आणि ७० रुपयांच्या हिशोबावरून केलेले भाष्य पाहून आजही प्रेक्षकांना हसू आवरता येत नाहीय.या रीलवर प्रेक्षकांनी कमेंट्सचा पाऊस पाडला असून एका युजरने उपरोधिकपणे म्हटंलयं की, इस्राइलहून औषधं आणणं आता थोडं कठीण आहे, तर दुसऱ्यानं अशोक मामांचं कौतुक करत महाराष्ट्रचे अशोक मामा... ऑल टाइम फेव्हरेट अशी कमेंट केली आहे. अनेकांनी हा व्हिडीओ पाहून हसून हसून डोळ्यात पाणी आल्याचं म्हटलं आहे.
Election 2026: विविध ठिकाणी अचानक नाकाबंदी करण्यासाठी ५,२०० पेक्षा जास्त 'स्टॅटिक सर्विलांस टीम' अहोरात्र कार्यरत आहेत. सीमावर्ती राज्यांच्या अधिकाऱ्यांसोबतही आढावा बैठका घेऊन सुरक्षेचे कडेकोट नियोजन करण्यात आले आहे.
Mahadev Betting App Case : महादेव ॲप प्रकरणी ईडीची दुबईमध्ये मोठी कारवाई
महादेव ऑनलाइन सट्टेबाजी ॲप प्रकरणात (Mahadev Betting App Case) अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई करत सुमारे 1700 कोटी रुपयांच्या 20 स्थावर मालमत्ता तात्पुरत्या स्वरूपात जप्त केल्या आहेत.
धक्कादायक! मुलुंडमध्ये १६ वर्षीय मुलीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला; आरोपी अटकेत
मुंबई : मुलुंड परिसरात घडलेल्या धक्कादायक घटनेने मुंबईत खळबळ उडाली आहे. केवळ बोलणं बंद केल्याच्या रागातून एका तरुणाने १६ वर्षीय मुलीवर कोयत्याने हल्ला केल्याची भीषण घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली असून तिच्यासोबत असलेल्या मित्रालाही मारहाण करण्यात आली.मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आशिष बनसोड आणि पीडित मुलगी दोघेही बदलापूर येथील रहिवासी असून एकमेकांना ओळखत होते. काही वैयक्तिक कारणांमुळे मुलीने त्याच्याशी संवाद बंद केला होता. याच संतापातून आरोपीने मुलुंडमधील तिच्या कॉलेजजवळ तिला गाठत सोबत आणलेल्या कोयत्याने तिच्या गळ्यावर वार केला. यावेळी तिच्यासोबत असलेल्या मित्रालाही त्याने गंभीर जखमी केले. हल्ल्यानंतर आरोपीने दोघांनाही जीवे मारण्याची धमकी दिली.या प्रकरणी मुलुंड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला शस्त्रासह अटक केली आहे. आरोपीवर यापूर्वीही बदलापूरमध्ये विविध गुन्हे दाखल असल्याची माहितीbadlaur समोर आली आहे. सध्या पोलीस अधिक तपास करत आहेत.दरम्यान, या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. केवळ बोलण्यास नकार दिल्यामुळे एवढ्या टोकाचा हल्ला होणे ही अत्यंत चिंताजनक बाब असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अधिक कडक उपाययोजना आणि समाजात जागरूकता वाढवण्याची गरज व्यक्त होत आहे.
Iran-US-Israel War : कुवैत इंटरनॅशनल विमानतळावर ड्रोन हल्ला; इंधन टाकीला आग
आखाती देशाच्या उड्डाण मंत्रालयाने बुधवारी (२५ मार्च) दिलेल्या माहितीनुसार कुवेत इंटरनॅशनल विमानतळावर ड्रोनद्वारे हल्ला करण्यात आला. यावेळी इंधन टाकीला आग लागली. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.प्राथमिक माहितीनुसार, नागरी उड्डाण महासंचालनालयाने ऑनलाइन जारी केलेल्या निवेदनात सांगितले की या हल्ल्यात फक्त “मर्यादित” नुकसान झाले आहे. प्रवक्ते अब्दुल्ला अल-राजही यांनी सांगितले की संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ आपत्कालीन प्रक्रिया लागू केल्या आणि आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाला तैनात करण्यात आले.इराण अमेरिका इस्रायल यांच्यात युद्ध सुरु झाल्यापासून कुवैत विमानतळावर अनेक वेळा हल्ले झाले आहेत. १४ मार्च रोजी नागरी उड्डाण प्राधिकरणाने सांगितले होते की अनेक ड्रोनद्वारे करण्यात आलेल्या हल्ल्यात विमानतळाला लक्ष्य करण्यात आले आणि त्याच्या रडार प्रणालीवरही हल्ला झाला. त्या घटनेतही कोणतीही जीवितहानी झाली नव्हती.यापूर्वी ८ मार्च रोजी ड्रोनने विमानतळावरील इंधन टाक्यांना लक्ष्य केले होते. तसेच त्याआधी प्रवासी टर्मिनलवर झालेल्या एका हल्ल्यात काही लोक किरकोळ जखमी झाले होते आणि काही प्रमाणात नुकसानही झाले होते.
नव्या अबकारी (Excise) धोरणाला मंजुरी दिली असून आता पेट्रोल पंपांवरही दारू विक्रीला परवानगी देण्यात आली आहे.
IPL 2026 opening ceremony : आयपीएल २०२६ चा बिगुल २८ मार्चपासून वाजणार असला तरी, यंदा क्रिकेट चाहत्यांना एका मोठ्या बदलाला सामोरे जावे लागणार आहे.
India Fuel Stock Update:
Accident News : पुण्यातील कल्याणीनगर अपघाताची पुनरावृत्ती ! प्रसिद्ध उद्योजकाचा दुर्दैवी मृत्यू
पुण्यातील कल्याणीनगर अपघाताची आठवण करून देणारी हृदयद्रावक घटना कल्याणमध्ये (Accident News) घडली आहे.
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प घेणार शी जिनपिंग यांची भेट; ‘या’दिवशी करणार चीनचा दौरा.!
ट्रम्प यांनी यापूर्वी ऑक्टोबरमध्ये दक्षिण कोरियात शी जिनपिंग यांची भेट घेतली होती. आता मे महिन्यात होणाऱ्या या प्रदीर्घ-प्रतिक्षित भेटीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
Rain Update: पुढील चार दिवस ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. काही भागांत पावसासोबत गारपीट होण्याची भीती असल्याने शेतकऱ्यांसमोर पिकांच्या नुकसानीचे मोठे संकट उभे ठाकले आहे.
न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांच्या एकल पीठाने (High Court of Bombay) दिलेल्या निकालात प्रवाशांना एक सावधगिरीचा इशाराही दिला आहे.
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याचा कोकणात अपघात, उंच चढावरून घसरली बाईक
महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोममधून घराघरात पोहचलेला लोकप्रिय अभिनेता निखिल बने याचा कोकणात बाईक राईड करताना अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यानं स्वतः त्याचा अपघात झाल्याची माहिती सोशल मीडियावर एका व्हिडिओतून दिली सुदैवानं निखिलला गंभीर दुखापत झालेली नाही. तो किरकोळ जखमी झालाय. त्याच्या हातापायाला दुखापत झाल्याचं त्यानं व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं आहे.निखिल बने सध्या 'कोको राईड' नावाची एक युट्युब ब्लॉग सिरीज करत आहे. या सिरीजच्या शूटसाठी तो कोकणात मंडणगड-दापोली परिसरात बाईकवर फिरत होता. त्यावेळी हिंमतगडाकडे जाताना हा अपघात झाल्याचा त्यांने सांगितलं आहे.या गावातील एका उंच चढावरून जात असताना त्याची बाईक अचानक घसरली आणि त्यामुळे त्याला गाडीवर नियंत्रण ठेवता आलं नाही, असं त्याने यावेळी सांगितलं. या अपघातात त्याच्या हाताला आणि पायाला दुखापत झाल्याचेही त्याने सांगितले आहे.या व्हिडिओत बोलत असताना तो म्हणाला की 'इतकं छान वाटतंय, वेगवेगळे लोक येतात. प्रेमाने बोलतायत. प्रत्येक ठिकाणी मला हा अनुभव येतोय. खूप गोड माणसं आहेत. फिरलं पाहिजे. ' पुढे तो म्हणाला , ' एक प्रॉब्लेम झाला. हिम्मतगडाकडे जाताना एक छोटसं गाव आहे. तिथून उजवीकडून मी वर जात होतो. तिथे चढ होता. मला गाडी कंट्रोल झाली नाही . मी तिथे पडलो. त्याचवेळी बाईक वरून जाणारे दादा होते, ते खारी-बटर विकतात त्यांनी मला मदत केली. त्या गावातल्या बायकांनी मला पाणी विचारलं मदत केली. कोकणातल्या बऱ्याच लोकांचं कौतुक आहे. इथल्या सगळ्यांचे खूप खूप आभार. या सगळ्यांची नाव मला माहित नाहीत पण चेहरे कधीच नाही विसरू शकणार.'
RCB Name Change : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) या संघाची मालकी बदलल्यानंतर नाव बदलणार की नाही? जाणून घेऊया.
Kerosene Oil : केंद्राची केरोसीन वाटपास मंजुरी.! शिधापत्रिका धारक कुटुंबास मिळणार ३ लिटर केरोसीन
पहिल्या पंधरवड्यात एकूण वाटपाच्या 85 टक्के केरोसीन सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मुंबई : राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या बळीराजाला बळ देण्यासाठी राज्य सरकारने 'मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते' योजनेत अत्यंत महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या आहेत. शेतीमालाची शेतातून बाजारपेठेपर्यंत होणारी वाहतूक पावसाळ्यातही विनाअडथळा व्हावी, या दृष्टीने आता या रस्त्यांचे जाळे अधिक मजबूत केले जाणार आहे. बारमाही शेतरस्त्यांच्या निर्मितीसाठी योजनेच्या नियमावलीत बदल करण्यात आले असून, यामुळे केवळ वाहतूक सुलभ होणार नाही, तर शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य बाजारपेठ मिळण्यासही मदत होईल. ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांचा विकास करून शेतकऱ्यांच्या सर्वांगीण प्रगतीला वेग देणे, हा या बदलांमागचा मुख्य उद्देश असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.https://prahaar.in/2026/03/26/in-andhra-pradesh-a-private-passenger-bus-collided-with-a-dumper-a-staggering-13-people-were-burnt-to-death-22-sustained-burn-injuries/तर ७ दिवसांत होणार कारवाईराज्यातील गाव नकाशात दर्शविलेले रस्ते आणि शासकीय जमिनींवरील अतिक्रमणे हटवण्यासाठी प्रशासनाने आता कंबर कसली आहे. नवीन नियमावलीनुसार, सार्वजनिक रस्त्यांवर अडथळा निर्माण करणाऱ्यांना संबंधित तहसीलदारांमार्फत ७ दिवसांची अंतिम नोटीस बजावण्यात येणार आहे. या निर्धारित सात दिवसांच्या कालावधीत जर संबंधिताने स्वतःहून अतिक्रमण काढले नाही, तर कोणतीही पूर्वसूचना न देता प्रशासन थेट कारवाई करून जागा मोकळी करणार आहे. ग्रामीण भागातील दळणवळण सुलभ व्हावे आणि रस्ते मोकळे राहावेत, या उद्देशाने सरकारने हा कठोर निर्णय घेतला असून, यामुळे अतिक्रमण करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.आधार कार्ड आणि फार्मर आयडी होणार 'ब्लॉक'ज्या शेतरस्त्यांवरून इतर शेतकऱ्यांना ये-जा करण्याचा कायदेशीर अधिकार आहे, अशा मार्गांवर पीक लागवड करण्यास किंवा अडथळा निर्माण करण्यास कडक मनाई करण्यात आली आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शेतकऱ्यांवर केवळ कायदेशीर कारवाईच होणार नाही, तर त्यांचे आधार कार्ड आणि फार्मर आयडी तब्बल ५ वर्षांसाठी ब्लॉक करण्यात येणार आहेत. याचा अर्थ असा की, दोषी आढळणाऱ्या शेतकऱ्यांना पुढील पाच वर्षे कोणत्याही शासकीय योजनांचा, अनुदानाचा किंवा मदतीचा लाभ घेता येणार नाही.जमीन दान करणाऱ्यांसाठी सरकारचे नवे नियम'मुख्यमंत्री बळीराजा शेत रस्ते' योजनेतंर्गत जमीन उपलब्ध करून देण्याबाबत राज्य सरकारने अत्यंत पारदर्शक आणि स्पष्ट नियमावली जाहीर केली आहे. या योजनेसाठी सरकार कोणतेही सक्तीचे भूसंपादन करणार नाही, तर केवळ शेतकऱ्यांच्या संमतीनेच रस्ते तयार केले जातील. जे शेतकरी स्वेच्छेने आपली जमीन रस्त्यासाठी देतील, त्यांना नोंदणीकृत दानपत्र, बक्षीसपत्र किंवा हक्कसोड पत्र करणे आवश्यक असेल आणि त्याची अधिकृत नोंद संबंधित शेतकऱ्याच्या ७/१२ उताऱ्यावर केली जाईल. विशेष म्हणजे, या प्रक्रियेसाठी लागणारे मुद्रांक शुल्क (Stamp Duty) आणि नोंदणी शुल्क पूर्णपणे माफ करण्यात आले आहे. मात्र, यात एक महत्त्वाची अट अशी आहे की, एकदा कायदेशीर प्रक्रियेद्वारे जमीन रस्त्यासाठी दिल्यानंतर, संबंधित शेतकऱ्याला ती जमीन भविष्यात पुन्हा परत मागण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार राहणार नाही.शेतरस्ते समितीच्या रचनेत मोठा बदल७ जानेवारी २०२६ रोजीच्या मूळ शासन निर्णयानुसार, या समितीत केवळ 'प्रगतशील' शेतकऱ्यांचा समावेश करण्याची अट होती. मात्र, नव्या सुधारणेनुसार आता संबंधित विधानसभा क्षेत्रातील कोणत्याही ५ शेतकऱ्यांची निवड करण्याचे सर्वाधिकार स्थानिक आमदारांना देण्यात आले आहेत. या बदलामुळे आता समितीमध्ये कोणाची वर्णी लावायची, याचा पूर्ण अधिकार लोकप्रतिनिधींकडे राहणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील रस्ते विकासकामांना राजकीय गती मिळण्याची शक्यता असून, आमदारांच्या पसंतीच्या कार्यकर्त्यांना किंवा शेतकऱ्यांना या महत्त्वाच्या समितीत स्थान मिळणार आहे.बळीराजासाठी 'सुविधा' आणि 'शिस्त'या योजनेत करण्यात आलेल्या बदलांमुळे शेतरस्त्यांचे जाळे केवळ मजबूतच होणार नाही, तर पावसाळ्यातही शेतीमालाची वाहतूक करणे अत्यंत सुलभ होणार आहे. एकीकडे शेतकऱ्यांना रस्ते आणि दळणवळणाची उत्तम 'सुविधा' पुरवतानाच, दुसरीकडे प्रशासनाने स्वच्छ 'शिस्त' राखण्यावरही भर दिला आहे. रस्त्यांवर होणारी अतिक्रमणे रोखण्यासाठी आणि रस्ते सर्वांसाठी खुले ठेवण्यासाठी अत्यंत कठोर नियम लागू करण्यात आले आहेत.
Dhurandhar 2 : 'त्या'व्हायरल व्हिडीओवर आदित्य धरचा संताप, नेटकऱ्यांना दिला कारवाईचा इशारा
रणवीर सिंहच्या धुरंधर २ सिनेमानं जगभरात धूमाकूळ घातला आहे. या सिनेमाचे अनेक सिन सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. पण, यादरम्यान काही नेटकरी सोशल मिडियावर एआयद्वारे बनावट व्हिडीओ बनवून ते तूफान व्हायरल करत आहेत. अशातच एका वादग्रस्त व्हिडीओवर दिग्दर्शक आदित्य धर संतपला असून आदित्यनं याबाबत कठोर कारवाई करण्याचा इशारा नेटकऱ्यांना दिला आहे. आपल्या सोशल मिडीयावर एक पोस्ट करत आदित्य धरनं याबाबत संताप व्यक्त केला आहे.आपल्या पोस्टमध्ये आदित्यनं म्हटंलयं की देशभरात आणि जगभरात धुरंधर: द रिव्हेंज या सिनेमाला जो प्रतिसाद मिळत आहे त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. या प्रेमाचा मी कायम ऋणी असेन. पंरतु काहीजण अधिकृतरित्या प्रदर्शित झालेल्या प्रमोशनल मटेरियलला मॉर्फ करून फसवणूक करणारे व्हिडीओ, आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर करून खोटे आणि दिशाभूल करणाऱ्या गोष्टी पसरवत आहेत. ही गोष्ट माझ्या निदर्शनास आली असून अशाच एका बनावट/खोट्या फोटोमध्ये हमजा/जसकीरतला पगडी बांधताना ध्रूमपान करताना खोटेपणानं दाखवलं आहे. हे अजिबात सत्य नाही आणि आमच्या सिनेमात किंवा कोणत्याही अधिकृत मटेरिअलमध्ये असं दृश्य नाही. असं दिग्दर्शक आदित्य धरने आपल्या पोस्टमध्ये स्पष्ट केलं आहे.'लोकांना भडवण्यासाठी आणि खोडसाळपणा करण्यासाठी जाणूनबुजून हा प्रकार करण्याला आला आहे. शीख समाजासाठी माझ्या मनात प्रचंड आदर आहे आणि सिनेमातील प्रत्येक भूमिका, दृश्य, सादरीकरण अत्यंत संवेदेनशीलपणे, आदरपूर्वक आणि जबाबदारीने चित्रित करण्यात आलं आहे. या बनावट कंटेंटद्वारे चुकीची माहिती पसरवणं हा अप्रामाणिकपणा आणि दुर्भावनापूर्ण आहे. मी प्रेक्षकांना विनंती करतो की त्यांनी अधिकृत कंटेटवरच विश्वास ठेवावा आणि त्या हेतूनेच सिनेमा पाहावा. चुकीच्या हेतूने पसरवल्या जाणाऱ्या एआय जनरेटेड कंटेटला बळी पडू नये. अशा गोष्टींवर कडक कारवाई करण्यात येईल'. अशा शब्दात आदित्यने संताप व्यक्त केला आहे. @RanveerOfficial @rampalarjun @duttsanjay @ActorMadhavan #AkshayeKhanna #SaraArjun @bolbedibol @AdityaDharFilms #JyotiDeshpande @LokeshDharB62 @jiostudios @B62Studios @TSeries @JioHotstar @StarGoldIndia pic.twitter.com/VMCS4ImdG4— Aditya Dhar (@AdityaDharFilms) March 26, 2026सोशल मिडीयावर याआधीही धुरंधर २ सिनेमाच्या शेवटच्या सीनचा व्हिडीओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये जसकीरत आपल्या कुटुंबीयांची आनदानं भेट घेतो. मात्र, प्रत्यक्षात सिनेमाचा शेवट असा दाखवण्यात आलेला नाही.

34 C