Pune Mayor Election : दिवंगत अजित पवार, सुरेश कलमाडी आणि डॉ. बाबा आढाव यांच्या निधनामुळे भाजपकडून कोणताही उत्सव न साजरा करण्याचा निश्चय.
HSC Exam 2026 : अमरावतीमध्ये सर्वाधिक ५५, तर कोकणात सर्वात कमी ८ केंद्रांवर सीसीटीव्ही नाहीत; भरारी पथकांकडून आकस्मिक भेटींचे नियोजन.
Mayani Election Results : मायणी जिल्हा परिषद गटासह मायणी आणि कलेढोण या दोन्ही पंचायत समिती गणांमध्ये भाजपचे उमेदवार विजयी; विरोधकांचा सुपडा साफ.
Satara ZP Election Results : तब्बल साडेचार दशकांनंतर कोयना विभागात पाटणकर गटाची पीछेहाट; शिवसेनेने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर मिळवला विजय.
Parshuram Wadekar : आंदोलक ते उपमहापौर! कोण आहेत ‘बिनविरोध’उपमहापौर परशुराम वाडेकर?
Parshuram Wadekar : भिडेवाड्याला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा मिळवून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा; सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्याची मोठी झेप.
Manjusha Nagpure : कॉर्पोरेट नोकरी ते महापौर; कसा आहे मंजूषा नागपुरे यांचा प्रवास? जाणून घ्या
Manjusha Nagpure : एम.कॉम, एमबीए (HR) आणि आयटी क्षेत्रातील अनुभवानंतर सार्वजनिक जीवनात प्रवेश; पुण्याच्या विकासासाठी सज्ज उच्चशिक्षित नेतृत्व.
Bhosari Traffic Update : १० तारखेपासून सुरू होणाऱ्या भरती प्रक्रियेमुळे भोसरीतील अंतर्गत रस्ते वळवले; वाहनचालकांनी सहकार्य करण्याचे आवाहन.
PMRDA News : पीएमआरडीएमध्ये परवानग्यांसाठी नवी नियमावली, आता कामाला येणार वेग..वाचा सविस्तर
PMRDA News : परवानग्या आणि लेआऊट मंजुरीसाठी आता वारंवार पाठपुरावा करण्याची गरज नाही; आयुक्तांचे वेळबद्ध प्रक्रियेचे आदेश
PCMC News : महापालिकेच्या तिजोरीत १४६ कोटींची भर पडणार; अखेर ‘त्या’निविदा प्रक्रियेला मुहूर्त मिळाला
PCMC News : रस्ते कमानी, विजेचे खांब आणि दिशादर्शक फलकांच्या जाहिरातींतून १४६ कोटी रुपये पालिकेच्या तिजोरीत जमा होणार.
दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, १० फेब्रुवारी २०२६
पंचांगआज मिती माघ कृष्णा अष्टमी ०७.३० पर्यंत नंतर नवमी शके १९४७. चंद्र नक्षत्र विशाखा ०७.५६ पर्यंत नंतर अनुराधा. योग ध्रुव. .चंद्र राशी वृश्चिक,भारतीय सौर २० माघ शके १९४७.मंगळवार, दिनांक १० फेब्रुवारी २०२६ .मुंबईचा सूर्योदय ०७.०९, मुंबईचा सूर्यास्त ०६.३६, मुंबईचा चंद्रोदय ०२.२८ उद्याची, मुंबईचा चंद्रास्त १२.२४ , राहू काळ ०३.४४ ते ०५.१०.चांगला दिवसदैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)
Kasarwadi Accident : कासारवाडी पुलावर भीषण अपघात; आयशर ट्रकच्या धडकेत ३२ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू
Kasarwadi Accident : धडक दिल्यानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार; दापोडी पोलिसांकडून अनोळखी चालकावर गुन्हा दाखल.
Wai Election Results : बावधन ते भुईंज…कुठे गुलाल उधळला अन् कुठे शांतता? पाहा वाईचा संपूर्ण निकाल
Wai Election Results : जिल्हा परिषदेच्या ४ पैकी ३ जागांवर राष्ट्रवादीचे वर्चस्व, तर पंचायत समितीतही ५-३ च्या फरकाने आघाडी.
BCCI Central Contract : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) २०२५-२६ या हंगामासाठी खेळाडूंच्या नवीन वार्षिक कराराची घोषणा केली आहे.
कॅनडा विरूद्धच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा मोठा विजय
अहमदाबाद : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये कॅनडा विरूद्धच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने मोठा विजय मिळवला. नाणेफेक जिंकून गोलंदाजी निर्णय घेणे कॅनडाला भोवले. प्रथम फलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेने २० षटकांत चार बाद २१३ धावा केल्या. नंतर २० षटकांत २१४ धावा करण्याच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी कॅनडाचा संघ मैदानात उतरला. पण दक्षिण आफ्रिकेच्या प्रभावी गोलंदाजीपुढे कॅनडाची डाळ शिजली नाही. कॅनडाने २० षटकांत आठ बाद १५६ धावा एवढीच मजल मारली. दक्षिण आफ्रिकेचा ५७ धावांनी विजय झाला.दक्षिण आफ्रिकेचा लुंगी न्गिडी हा गोलंदाज सामनावीर झाला. त्याने कॅनडाच्या चार फलंदाजांना बाद केले. लुंगी न्गिडीने कर्णधार असलेल्या दिलप्रीत बाजवा (शून्य धावा), युवराज समरा (१२ धावा), निकोलस किर्टन (चार धावा) आणि हर्ष ठाकर (३३ धावा) या चौघांना बाद केले.कॅनडाकडून दिलप्रीत बाजवाने शून्य, युवराज समराने १२, नवनीत धालीवालने ६४, निकोलस किर्टनने ४, श्रेयस मोव्वाने ९, हर्ष ठाकरने ३३, साद बिन जफरने ११, जसकरण सिंगने शून्य, दिलोन हेलिगरने नाबाद ४, कलीम सनाने नाबाद ५ धावांचे योगदान दिले. दक्षिण आफ्रिकेच्या लुंगी न्गिडीने चार, मार्को जॅनसेनने दोन तर कॉर्बिन बॉश आणि कगिसो रबाडाने प्रत्येकी एक विकेट घेतली.याआधी दक्षिण आफ्रिकेकडून एडेन मर्करामने ३२ चेंडूत १० चौकार आणि एक षटकार मारत ५९ धावा केल्या. क्विंटन डी कॉकने त्याला छान साथ देत २२ चेंडूत २५ धावा करताना दोन चौकार मारले. नंतर आलेल्या रायन रिकेलटनने २१ चेंडूत तीन चौकार आणि एक षटकार मारत वेगाने ३३ धावा केल्या. डेवॉल्ड ब्रेव्हिसने ६ धावा केल्या. डेव्हिड मिलरने नाबाद ३९ आणि ट्रिस्टन स्टब्सने नाबाद ३४ धावांचे योगदान दिले. कॅनडाकडून अंश पटेलने ३ तर दीलप्रीत बाजवाने एक विकेट घेतली.
सैफ अली खानने काळ्या रंगाचा सूट आणि बूट घातले होते, तर करीनाने काळ्या रंगाचा ड्रेस घातला होता. मात्र, हा ड्रेस त्यांची जवळची मैत्रीण आणि अभिनेत्री मलायका अरोराचा असल्याची चर्चा आहे.
Labor unions strike: कामगार संघटनांच्या या संपाचा देशातील 600 जिल्ह्यावर प्रभाव पडणार आहे.
Newasa News : सौंदाळा ग्रामपंचायतीचा आदर्श उपक्रम ! ग्रामसभेत रक्तदान करून “जातमुक्त”गाव घोषित
ग्रामसभेत रक्तदान कार्यक्रमाचे आयोजन करून आणि सामाजिक कार्यकर्ते प्रमोद झिंजाडे यांच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत गावाने स्वतःला “जातमुक्त गाव” म्हणून अधिकृतपणे घोषित केले आहे.
Rajnath Singh : राजनाथ सिंह यांची ग्रीकच्या संरक्षण मंत्र्यांसोबत महत्वाची चर्चा
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज नवी दिल्लीत हेल्लेनिक प्रजासत्ताकाचे संरक्षण मंत्री निकोलाओस-जॉर्जिओस डेन्डियास यांच्याबरोबर द्विपक्षीय बैठक घेतली.
New income tax rules: 1 एप्रिलपासून व्यवहारांमध्ये मोठे बदल; पॅन कार्डचे नवे नियम वाचले का?
New income tax rules: प्राप्त माहितीनसार प्राप्तिकर कायद्यातील नियमांची संख्या 511 वरून 333 इतकी करण्यात आली आहे. तर फॉर्मची संख्या 399 वरून 190 इतकी कमी करण्यात आली आहे.
मोठी बातमी..! राज्यात ७० हजार पदांची नोकरभरती; मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा
Maharashtra Mega Bharti : महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांमध्ये ७० हजार पदांची नोकरभरती केली जाणार आहे. यामध्ये MPSC मार्फत ५० हजार पदांचा समावेश असेल.
बीसीसीआयच्या नव्या करारानुसार रोहित शर्मा, विराट कोहली ब श्रेणीचे खेळाडू
मुंबई : बीसीसीआयने सोमवार ९ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रमुख खेळाडूंसाठी २०२५ - २६ च्या हंगामाचा नवा करार जाहीर केला. या करारानुसार रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांना आता ब श्रेणीचे (बी ग्रेड) खेळाडू ठरवण्यात आले आहे. या हंगामात ए+ श्रेणीचा करार टाळण्यात आला आहे. कोणत्याही खेळाडूचा समावेश ए+ या श्रेणीत केलेला नाही.एकूण ३० खेळाडूंसोबत २०२५ - २६ च्या हंगामासाठी करार करण्याचा निर्णय झाला आहे. या निर्णयानुसार खेळाडूंसाठी आता फक्त ए, बी आणि सी अशा तीन ग्रेड अर्थात अ, ब, क अशा तीन श्रेणी असतील. शुभमन गिल, रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह आता ए ग्रेड अर्थात अ श्रेणीत असतील.विराट कोहली, रोहित शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, केएल राहुल, मोहम्मद सिराज, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत, कुलदीप यादव, यशस्वी जयस्वाल, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर हे ११ खेळाडू बी ग्रेड अर्थात ब श्रेणीत असतील.अक्षर पटेल, टिळक वर्मा, रिंकू सिंग, शिवम दुबे, संजू सॅमसन, अर्शदीप सिंग, प्रसीद कृष्णा, आकाश दीप, ध्रुव जुरेल, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, नितीश कुमार रेड्डी, अभिषेक शर्मा, साई सुदर्शन, रवी बिश्नोई, ऋतुराज गायकवाड हे १६ खेळाडू सी ग्रेड अर्थात क श्रेणीत असतील.सी ग्रेड अर्थात क श्रेणीत साई सुदर्शन या नव्या खेळाडूचा समावेश झाला आहे. बीसीसीआयच्या करारातून मोहम्मद शमी, ईशान किशन, रजत पाटीदार, मुकेश कुमार, सर्फराझ खान यांना यावेळी वगळण्यात आले आहे.
मुंबईतील मालमत्ता कर थकवणाऱ्या २० थकबाकीदारांची नावे जाहीर
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : निर्धारित कालावधीमध्ये कर भरणा करण्यास टाळाटाळ करणा-या तसेच आर्थिक क्षमता असूनही मालमत्ताकर न भरणा-या २० मोठ्या थकबाकीदारांची नावे महापालिकेने जाहीर केली आहेत. या थकबाकीदारांमध्ये रघुवंशी मिल सोसायटी सह आशापुरा डेव्हलपर्स ,डी बी एस रिएल्टी आदींचा समावेश आहे. या थकबाकीदारांना महानगरपालिकेकडून कलम २०३ अन्वये जप्तीची नोटीस बजावण्यात आली आहे. विहीत मुदतीत कर भरणा न केल्यास मुंबई महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार या मालमत्तेवर कलम २०४, २०५, २०६ अन्वये प्रथमतः मालमत्तेतील चीज वस्तू जप्त करुन लिलाव केला जाईल. जप्त चीज वस्तुतूनही कर वसूल झाला नाही तर, कलम २०६ अन्वये मालमत्तेचा लिलाव करण्यात येईल, असे नोटीसीद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.मालमत्ता कर हा महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे. मालमत्ताकर देयके मिळाल्यापासून ९० दिवसांच्या आत मालमत्ता कर महानगरपालिकेकडे जमा करणे आवश्यक आहे. या कालावधीत कर न भरल्यास महानगरपालिकेकडून टप्पेनिहाय कारवाई सुरू करण्यात येते. महानगरपालिकेच्या करनिर्धारण व संकलन खात्याचे अधिकारी प्रत्यक्ष संपर्क आणि संवाद साधून मालमत्ता कर भरण्यासाठी पाठपुरावा करतात. तरीही मालमत्ता कर न भरल्यास 'डिमांड लेटर' पाठवण्यात येते. यानंतरच्या पुढच्या टप्प्यात मालमत्ता धारकास २१ दिवसांची अंतिम नोटीस दिली जाते. त्यानंतर थकबाकीदारांची मालमत्ता जप्ती, लिलाव आदी कारवाई केली जाते.महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या नेतृत्वाखाली आणि सहआयुक्त (कर निर्धारण व संकलन) विश्वास शंकरवार यांच्या मार्गदर्शनाखाली कर निर्धारण व संकलन खात्याच्या वतीने मुंबई शहर व उपनगरांमधील मालमत्ता कर वसुलीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विविध प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी विविध माध्यमांतून जनजागृती तसेच आवाहन करण्यात येत आहे. नागरिकांची कर भरणा करण्याकरीता होणारी गैरसोय टाळण्यासाठी ऑनलाईल सुविधा उपलब्ध आहे. याबाबतची माहिती महानगरपालिकेच्या https://www.mcgm.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. कर भरणा ऑनलाईन करण्याकरीता करदात्यांनी महानगरपालिका संकेतस्थळावरील माहितीचा वापर करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.तरीही, काही मोठ्या थकबाकीधारकांकडून अद्याप कर भरणा करण्यात येत नसल्याने आाणि त्यांना वेळोवेळी सूचना देऊनही योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने कर निर्धारण व संकलन खात्याच्या वतीने जप्तीची नोटीस बजावण्यात आल्या आहेत. दंड रकमेसह थकबाकी रकमेचा यात समावेश आहे. महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार लिलावाची कार्यवाही करण्यात येईल. यामुळे नोटीसप्राप्त मालमत्ताधारकांनी कारवाई टाळण्यासाठी तातडीने कर भरणा करावा, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.सोमवारी ९ फेब्रवारी २०२६ रोजी कर भरण्यासाठी पाठपुरावा केलेल्या ‘टॉप ट्वेण्टी’ मालमत्ताधारकांची यादी-१) रघुवंशी मील्स् लिमिटेड (जी दक्षिण विभाग) - १४० कोटी ६१ लाख ६८ हजार ६३० रुपये२) राजहंस असोसिएट्स (एस विभाग) - ४७ कोटी ०२ लाख ९९ हजार ६८७ रुपये३) आशापुरा डेव्हलपर्स (एच पूर्व विभाग) - ४४ कोटी ८७ लाख ८० हजार ००५ रुपये४) सुमेर बिल्टकॉर्प प्रायव्हेट लिमिटेड (ई विभाग) - ३९ कोटी ३० लाख ४७ हजार ४९१ रुपये५) समीर एन भोजवानी (के पश्चिम विभाग) - ३१ कोटी ७३ लाख २३ हजार ४१६ रुपये६) डीबीएस रिऍल्टी (एल विभाग) - २९ कोटी १२ लाख २१ हजार ६३५ रुपये७) आमीर पार्कस् ऍण्ड ऍम्युझमेंट प्रायव्हेट लिमिटेड (पी दक्षिण विभाग) - २७ कोटी ७९ लाख ५५ हजार ०३९ रुपये८) डीबीएस रिऍल्टी (एल विभाग) - २२ कोटी ४२ लाख ६० हजार ०६३ रुपये९) डीबीएस रिऍल्टी (एल विभाग) - २२ कोटी ४० लाख ४८ हजार ४८५ रुपये१०) एस.डी. कॉर्पोरेशन (आर दक्षिण विभाग) - २१ कोटी ४३ लाख ४२ हजार १०९ रुपये११) ए.आर. जाफर (डी विभाग) - २१ कोटी ३ लाख ३६ हजार ७५२ रुपये१२) डीबीएस रिऍल्टी (एल विभाग) - २० कोटी ५६ लाख ३३ हजार ८४१ रुपये१३) डीबीएस रिऍल्टी (एल विभाग) - २० कोटी ५६ लाख ३० हजार ४२१ रुपये१४) डीबीएस रिऍल्टी (एल विभाग) - २० कोटी ५५ लाख ६२ हजार ०३६ रुपये१५) डीबीएस रिऍल्टी (एल विभाग) - २० कोटी ५४ लाख १८ हजार ४२६ रुपये१६) डीबीएस रिऍल्टी (एल विभाग) - २० कोटी ५४ लाख ०४ हजार ७४९ रुपये१७) डीबीएस रिऍल्टी (एल विभाग) - २० कोटी ५३ लाख ४६ हजार ६२१ रुपये१८) गॅलेक्सी कॉर्पोरेशन १० प्लॅनेट (एच पश्चिम विभाग) - २० कोटी २२ लाख ८२ हजार ६६२ रुपये१९) डीबीएस रिऍल्टी (एल विभाग) - १९ कोटी १० लाख ४१ हजार ३२० रुपये२०) डीबीएस रिऍल्टी (एल विभाग) - १८ कोटी ६७ लाख ६९ हजार ४०२ रुपये
Gautam Gambhir praises : गंभीरच्या मते, मैदानावर आणि मैदानाबाहेर सूर्यकुमार ज्या प्रकारे परिस्थिती हाताळतो, त्यामुळे प्रशिक्षक म्हणून त्यांचे काम अधिक सोपे झाले आहे.
Acidity : रात्री जेवणानंतर ऍसिडिटीचा त्रास होतोय? ‘हे’पदार्थ देतील झटपट आराम, येईल चांगली झोप.!
पित्ताच्या समस्येने ग्रासलेले अनेक जण आपल्या आजूबाजूला आढळतात. त्यापैकी प्रत्येकजण तुम्हाला वेगवेगळे उपाय सांगतील.
Gold-Silver Price Today: सोने-चांदीच्या दरात मोठी हालचाल; पाहा आजचे ताजे दर
Gold-Silver Price Today: दिल्ली सराफात सोमवारी सोन्याचा दर 1,300 रुपयांनी म्हणजे 0.83 टक्क्यांनी वाढून 1 लाख 58 हजार 500 रुपये प्रति दहा ग्रॅम या पातळीवर गेला.
Q3 results 2026: बँकिंग क्षेत्रात भरभराट; 12 सरकारी बँकांचा नफा 52,603 कोटींवर
Q3 results 2026: तिसर्या तिमाहित सरकारी बँकांचा नफा तब्बल 18 टक्क्यांनी वाढून 52,603 कोटी रुपयावर गेला आहे.
Pune Police : पुणे पोलिसांची मोठी कारवाई; ७३ तोळे सोने अन् लाखोंची फसवणूक; निलंबित हवालदाराला बेड्या
Pune Police : पुणे पोलिसांच्या भारती विद्यापीठ पथकाने आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यातील निलंबित हवालदार गणेश जगतापला आंध्रप्रदेशातून अटक केली आहे.
Devendra Fadanvis : जाधव समितीचा अहवाल सरकारकडे सादर; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली माहिती
राज्यातील शाळांसाठी त्रिभाषा धोरण तयार करण्यासाठी गेल्या वर्षी स्थापन करण्यात नरेंद्र जाधव समितीने आपला अहवाल सरकारला सादर केला असल्याची माहीती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी दिली आहे.
IND vs PAK : पाकिस्तानच्या अटींना आयसीसीने दाखवली केराची टोपली! मोहसीन नक्वींना २४ तासांचा अल्टिमेटम
IND vs PAK : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) भारताविरुद्ध खेळण्यासाठी घातलेल्या सर्व अटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) पूर्णपणे फेटाळून लावल्या आहेत.
Pune: माजी सरन्यायाधीश उदय लळीत यांच्या हस्ते ‘सूर्यदत्त राष्ट्रीय जीवनगौरव’पुरस्कारांचे वितरण
Pune
Manjusha Nagpure : पुण्याच्या महापौरांनी जिंकली सर्वांची मने, ‘या’एका कृत्याने होतंय सर्वत्र कौतुक
Manjusha Nagpure : पुण्याच्या महापौरपदी बिनविरोध निवड झाल्यावर मंजुषा नागपुरे यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिलेला पुष्पगुच्छ स्वीकारण्यास नकार दिला.
zilla parishad election : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत भाजपची एकहाती सत्ता
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भाजपने एकहाती सत्ता मिळवली आहे.
ZP Election Result : मावळ जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) भाजपचा पूर्णपणे सुपडासाफ केला आहे.
किया इंडियाचा बीपीसीएलसोबत ईव्ही चार्जिंग सुविधेचा विस्तार
मुंबई : किया इंडियाने आज भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) सोबत सामंजस्य करारावर (एमओयू) स्वाक्षरी केल्याची घोषणा केली. या सहयोगांतर्गत त्यांच्या सार्वजनिक ईव्ही चार्जिंग नेटवर्कचा विस्तार करण्यात आला आहे, तसेच त्यांची के-चार्ज परिसंस्था देशभरात १५,००० हून अधिक चार्जिंग टचपॉइण्ट्सपर्यंत वाढली आहे. हा धोरणात्मक सहयोग किया ईव्ही ग्राहकांसाठी चार्जिंग सुविधा अधिक प्रमाणात उपलब्ध करून देतो, तसेच इलेक्ट्रिक वेईकल अवलंबनामधील सर्वात मोठ्या अडथळ्यांचे निराकरण करतो, जेथे रेंजसंदर्भात आत्मविश्वास निर्माण करतो.या विकासाबाबत मत व्यक्त करत किया इंडियाच्या सेल्स अॅड मार्केटिंगचे वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. अतुल सूद म्हणाले, ''ईव्हीच्या अवलंबनामध्ये सोयीसुविधा व आत्मविश्वास अत्यंत महत्त्वाचे आहेत. बीपीसीएलसोबत या सहयोगाच्या माध्यमातून आम्ही ईव्ही मालकीहक्काला ग्राहकांसाठी अधिक व्यावहारिक व विनासायास करत आहोत, जेथे मोठ्या प्रमाणात चार्जिंग सुविधा वाढवत आहोत. के-चार्ज नेटवर्कमध्ये वाढीसह किया ईव्ही ग्राहकांना अधिक खात्रीशीरपणे प्रवासाचे नियोजन करता येते, तसेच भारताच्या शाश्वत गतीशीलतेप्रती व्यापक परिवर्तनाला पाठिंबा मिळतो.''भारतातील इलेक्ट्रिक गतीशीलतेला गती मिळत असताना ईव्हींचा अवलंब करण्याचा विचार करत असलेल्या ग्राहकांसाठी चार्जिंग सुविधेची उपलब्धता महत्त्वपूर्ण घटक आहे. के-चार्जमध्ये बीपीसीएलच्या सार्वजनिक चार्जिंग पायाभूत सुविधेला एकीकृत करत किया इंडियाने दैनंदिन ईव्ही उपयुक्ततेला दृढ केले आहे, तसेच ग्राहकांना शहरी भाग, महामार्ग व आंतरशहरीय मार्गांवर विनासायास प्रवास करण्यास सक्षम करत आहे.किया इंडिया आणि बीपीसीएल यांनी ओएनजीसी अकॅडमी ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (एटीआय), गोवा येथे २७ ते ३० जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या इंडिया एनर्जी वीक २०२६ च्या चौथ्या एडिशनदरम्यान या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या करारांतर्गत कियाच्या के-चार्ज प्लॅटफॉर्मवर ३,००० हून अधिक बीपीसीएल चार्जिंग पॉइण्ट्स ऑनबोर्ड करण्यात येतील, ज्यासह नेटवर्कची राष्ट्रीय स्तरावरील उपस्थिती मोठ्या प्रमाणात वाढेल.मायकिया अॅप आणि किया इंडिया वेबसाइटच्या माध्यमातून उपलब्ध असलेला के-चार्ज प्लॅटफॉर्म ग्राहकांना सहजपणे चार्जिंग स्टेशन्स शोधण्याची, तेथे पोहोचण्याची आणि सिंगल, युनिफाईड डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून चार्जिंगसाठी पेमेंट करण्याची सुविधा देतो. विस्तारित नेटवर्कमुळे स्वतंत्र चार्जिंग प्रदात्यांवरील अवलंबन कमी होईल आणि ईव्ही मालकीहक्क अनुभव अधिक खास होईल.पायाभूत सुविधेचे विस्तारीकरण किया इंडियाच्या वाढत्या ईव्ही पोर्टफोलिओशी संलग्न आहे. किया इंडियाची पहिली मेड-इन-इंडिया इलेक्ट्रिक वेईकल कॅरेन्स क्लॅव्हिस ईव्हीला एैसपैस ७-सीटर कॉन्फिग्युरेशन आणि तंत्रज्ञान-केंद्रित ऑफरिंगसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. कियाच्या प्रीमियम जागतिक ईव्ही - ईव्ही६ आणि प्रमुख ईव्ही९ यांनी ब्रँडच्या भारतातील इलेक्ट्रिक गतीशीलता उपस्थितीला अधिक दृढ केले आहे.चार्जिंग पायाभूत सुविधा व परिसंस्था सहयोगांमध्ये सतत गुंतवणूकांसह किया इंडियाने इलेक्ट्रिक गतीशीलतेला अधिक सहजसाध्य, विश्वसनीय आणि ग्राहक-अनुकूल करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे, ज्यासह कियाच्या देशातील ईव्ही विकासाच्या पुढील टप्प्याला पाठिंबा मिळत आहे.
स्कॉटलंडचा इटलीवर ७३ धावांनी विजय, गुणतालिकेत उलथापालथ झाल्याचा इंग्लंडला फटका
नवी दिल्ली : स्कॉटलंड संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या क गटात इटलीविरुद्धच्या लढतीत ७३ धावांनी विजय मिळवला. स्कॉटलंडच्या जॉर्ज मुन्सीच्या (८४ धावा) उल्लेखनीय फटकेबाजीनंतर गोलंदाजांनी कमाल केली आणि क गटाच्या गुणतालिकेत इंग्लंडला तिसऱ्या क्रमांकावर ढकलले.जॉर्ज मुन्सी व मिचेल जॉन्स यांनी पहिल्या विकेटसाठी १३.५ षटकांत १२६ धावा जोडल्या. मुन्सीने सलग दुसरे अर्धशतक झळकावले आणि तो शतक पूर्ण करेल असे वाटत होते. पण, १४ व्या षटकात ग्रांट स्टीवर्टने त्याची विकेट घेतली. मुन्सीने ५४ चेंडूंत १३ चौकार व २ षटकारांसह ८४ धावा केल्या. या वर्ल्ड कपमधील ही संयुक्तीक सर्वोत्तम खेळी ठरली. भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने अमेरिकेविरुद्ध ८४ धावा केल्या होत्या. दरम्यान इटलीचा कर्णधार वेय मॅडसेन याचा खांदा क्षेत्ररक्षण करताना निखळला आणि त्याला सामन्यातून माघार घ्यावी लागली.जॉन्सही ३० चेंडूंत ३७ धावांवर माघारी परतल्यानंतर ब्रेंडन मॅकमुलेनने मोर्चा सांभाळला आणि १८ चेंडूंत ४ षटकारांच्या मदतीने नाबाद ४१ धावा कुटल्या. कर्णधार रिची बेरिंगटन ( १५) व टॉम ब्रूस ( १) फार काही करू शकले नाही. मिचेल लिस्कने ५ चेंडूंत २ चौकार व २ षटकारांसह २२ धावांची नाबाद खेळी केली आणि संघाला २० षटकांत ४ बाद २०७ धावांपर्यंत पोहोचवले.ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत २००+ धावा करणारा स्कॉटलंड हा पहिला संलग्न संघ ठरला. यापूर्वी अमेरिकेने कॅनडाविरुद्ध १९७ धावा केल्या होत्या. वर्ल्ड कप स्पर्धेत पदार्पण करणाऱ्या इटलीला लक्ष्याचा पाठलाग करताना १३४ धावाच करता आल्या. कर्णधार वायन मॅडसेन दुखापतीमुळे मैदानावर उतरू शकला नाही आणि नववी विकेट पडताच स्कॉटलंडचा विजय पक्का झाला. स्कॉटलंडकडून बेन मॅनेंटीने ३१ चेंडूंत ५२ धावांची खेळी केली. त्यापाठोपाठ हॅरी मॅनेंटी ( ३७) व जेजे स्मुट्स ( २२) हे चांगले खेळले. अन्य फलंदाज अपयशी ठरले. स्कॉटलंडच्या मिचेल लिस्कने १७ धावांत ४ विकेट्स घेतल्या, तर मार्क वॅटने दोन बळी टिपले.
हर्षित राणाच्या गुडघ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया!
मुंबई : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतून माघार घेणाऱ्या भारतीय वेगवान गोलंदाज हर्षित राणाच्या गुडघ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली आहे. दुखापतीमुळे तो ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२६ मधून बाहेर पडला होता आणि त्याच्या जागी मोहम्मद सिराजची भारतीय संघात निवड केली गेली आहे.भारताच्या विश्वचषक मोहिमेला सुरुवात होण्याच्या काही दिवस आधी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सराव सामन्यादरम्यान राणाला दुखापत झाली. त्यानंतर त्याने मैदान सोडले आणि त्यानंतर झालेल्या वैद्यकीय तपासणीत तो वर्ल्ड कप स्पर्धा खेळू शकणार नाही, असे दिसून आले. त्यामुळे निवड समितीने त्याला संघातून वगळण्याचा निर्णय घेतला. हर्षित राणाची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे आणि आता संपूर्ण लक्ष पुनर्वसन आणि पुनर्प्राप्तीकडे आहे. येत्या काही आठवड्यात वैद्यकीय पथक त्याच्या प्रगतीवर बारकाईने लक्ष ठेवणार आहे. तो पुन्हा मजबूत आणि पूर्णपणे तंदुरुस्त होईल याची खात्री करण्यासाठी एक संरचित पुनर्वसन कार्यक्रम तयार केला जाईल.मार्चच्या अखेरीस सुरू होणाऱ्या आयपीएल २०२६ च्या हंगामात पुनरागमन करण्यासाठी या वेगवान गोलंदाजाने आधीच आपले लक्ष केंद्रित केले आहे. हर्षितने भारतासाठी २ कसोटी, १४ वन डे व ९ ट्वेंटी-२० सामन्यांत प्रतिनिधित्व करताना ३९ विकेट्स घेतल्या आहेत. तो ट्वेंटी-२० संघातील एक प्रमुख खेळाडू आहे आणि त्याने गोलंदाजीसह फलंदाजीतही आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. त्यामुळे त्याचे नसणे संघासाठी तापदायक ठरू शकते.
क्षेत्ररक्षण करताना इटलीच्या कर्णधाराचा हात निखळला
मुंबई : टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेला शनिवारी ७ फेब्रुवारीपासून सुरूवात झाली आहे. अनेक मोठ्या संघांची लहान संघांची तारांबळ उडवल्याचे दिसून आले. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये सुरूवातीलाच नवख्या संघांनी आपली ताकद दाखवून दिली आहे. वर्ल्ड कप सुरू असताना काही खेळाडूंना दुखापतीने ग्रासले आहे. त्यामुळे काहींना संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडावे लागले आहे. चालू सामन्यात क्षेत्ररक्षण करताना चेंडू अडविण्यासाठी झेप घेतल्यामुळे कर्णधाराचा खांदा निखळल्याने त्याला स्पर्धेबाहेर जावे लागले आहे.इटली आणि स्कॉटलँडमध्ये सामना पार पडला. या सामन्यात इटलीचा ७३ धावांनी पराभव झाला. या सामन्यामध्ये इटलीचा कर्णधार मॅडसेन याने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. स्कॉटलँड संघाने प्रथम फलंदाजी करताना २० ओव्हरमध्ये २०७-४ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना इटलीचा संघ १६.४ ओव्हरमध्ये १३४ धावा करू शकला. या सामन्यादरम्यान एक वाईट घटना घडली. कर्णधार वेन मॅडसेन याला क्षेत्ररक्षण करत असताना गंभीर दुखापत झाली. चेंडू अडवण्याच्या प्रयत्नात त्याने उडी मारली. यादरम्यान तो जोरात खांद्यावर पडला.सुरूवातीला सर्वांना वाटले नव्हते की ही गंभीर दुखापत असेल. पण जेव्हा तो वेदनेने मैदानावर पडून राहिला. मॅडसेनला पाहण्यासाठी मैदानामध्ये फिजिओथेरपिस्टला आले आणि त्याची विचारपूस केल्यावर त्याला बाहेर घेऊन गेले. त्याचा खांदा निखळल्याची माहिती समोर आली आहे. पॉवर प्लेच्या चौथ्या षटकामध्ये हे घडले. इटली आणि स्कॉटलंडमधील सामना कोलकाता येथील ईडन गार्डनवर पार पडला. इटली संघ पहिल्यांदाच वर्ल्ड कपमध्ये सहभागी झाला होता. मात्र पहिल्याच सामन्यात कॅप्टनला दुखापतीमुळे बाहेर जावे लागले आहे.
मुंबईचा ‘रणजी’तील प्रवास थांबला!
मुंबई : के.एल. राहुल आणि रवीचंद्रन स्मरण यांच्या दमदार खेळींच्या बळावर कर्नाटकने रणजी करंडक स्पर्धेत ४२ जेतेपदं नावावर असणाऱ्या मुंबईला ४ विकेट्सनी नमवले. या पराभवासह मुंबईचं यंदाच्या रणजी करंडक स्पर्धेतले आव्हान संपुष्टात आले.बीकेसी इथल्या शरद पवार क्रिकेट अकादमी इथे झालेल्या लढतीत, मुंबईचा पहिला डाव अवघ्या १२० धावांतच आटोपला. मुंबईचा कर्णधार शार्दूल ठाकूरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. खेळपट्टी गोलंदाजांना सहाय्यक होती. कर्नाटकच्या भेदक गोलंदाजीसमोर मुंबईच्या फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करली. सलामीवीर अखिल हेरवाडकरने ६० धावांची एकाकी झुंज दिली. मुंबईच्या सात फलंदाजांना दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही. सर्फराझ खान दुखापतग्रस्त असल्याने या सामन्यात खेळू शकला नाही. अनुभवी अजिंक्य रहाणेने वैयक्तिक कारणास्तव रणजी करंडक स्पर्धेच्या उत्तरार्धात खेळणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. यशस्वी जैस्वाल (५), मुशीर खान (१), क्रायसिस मॅन म्हणून प्रसिद्ध सिद्धेश लाड (१२) धावा करू शकले. शम्स मुलानी, शार्दूल ठाकूर आणि तनुष कोटियन यांनाही मोठी खेळी करता आली नाही. सामन्याच्या पहिल्याच दिवशी झटपट बाद होणे मुंबईला चांगलेच महागात पडले. कर्नाटकतर्फे विदवत कावेरप्पा, प्रसिध कृष्णा आणि श्रेयस गोपाळ यांनी प्रत्येकी ३ विकेट्स पटकावल्या.कर्नाटकच्या फलंदाजांनाही धावांसाठी संघर्ष करावा लागला. मयांक अगरवालच्या ९२ धावांच्या खेळीच्या जोरावर कर्नाटकने १७३ धावांची मजल मारत अल्प आघाडी मिळवली. के.एल.राहुलने २८ धावा करत मयांकला चांगली साथ दिली. या दोघांचा अपवाद वगळता कर्नाटकच्या बाकी फलंदाजांनी हाराकिरी केली. मुंबईतर्फे मोहित अवस्थी आणि तुषार देशपांडे यांनी प्रत्येकी ४ विकेट्स पटकावल्या.मुंबईचे ३२५ धावांचे लक्ष्यमुंबईने दुसऱ्या डावात पहिल्या डावातल्या चुका टाळत खेळ केला. मुंबईने दुसऱ्या डावात ३७७ धावा केल्या. यष्टीरक्षक फलंदाज आकाश आनंदने सर्वाधिक ७० धावा केल्या. मुशीर खान (४९), तनुष कोटियन (४८) आणि तुषार देशपांडे (४७) यांनी महत्त्वपूर्ण खेळी केल्या. मुंबईने कर्नाटकसमोर ३२५ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले.रवीचंद्रन स्मरणने डाव सावरलाया लक्ष्याचा पाठलाग करताना कर्नाटकने मयांकर अगरवालला झटपट गमावले. देवदत्त पड्डीकल ३९ धावा करून बाद झाला. करुण नायर १३ धावा करून तंबूत परतला. मात्र के.एल.राहुलने एका बाजूने नांगर टाकून मॅरेथॉन खेळी साकारली. राहुलने १४ चौकार आणि एका षटकारासह १३० धावांची खेळी केली. राहुल बाद झाल्यानंतर रवीचंद्रन स्मरणने सूत्रे स्वीकारली. स्मरणने नाबाद ८३ तर विद्याधर पाटीलने ३१ धावांची खेळी केली.
शुभारंभ शुभदिनी, नव्या मराठी कलाकृतीसाठी मनवा नाईक आणि गौरी कालेलकर-चौधरी एकत्र
मुंबई : सर्जनशील मनं एकत्र आली की कलाकृतीला नवी उंची मिळते… आणि असाच एक सुंदर योग आता मराठी मनोरंजन विश्वात घडतोय! निर्माते सिद्धेश चौधरी, गौरी कालेलकर-चौधरी आणि लेखिका-अभिनेत्री मनवा नाईक या पहिल्यांदाच एका नव्या मराठी चित्रपटासाठी एकत्र येत आहेत.माघी गणेश जयंतीचा शुभमुहूर्त साधत, गणरायाच्या चरणी त्यांनी आपल्या आगामी कलाकृतीची मुहूर्तमेढ रोवली. शुभारंभ शुभदिनी हा क्षण त्यांच्या नव्या प्रवासाचा नवा अध्याय ठरणार आहे. ‘मधुसूदन कालेलकर प्रोडक्शन्स’च्या बॅनरखालील ह्या आगामी मराठी चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन मनवा नाईक करणार आहेत. दमदार संहिता, ताजं कथानक आणि भक्कम टीमवर्कच्या जोरावर ही कलाकृती प्रेक्षकांसाठी खास पर्वणी ठरणार आहे.अभिनय, दिग्दर्शन, निर्मिती अशा वेगवेगळ्या क्षेत्रात काम करून मनवा हिने आजवर उत्तम कलाकृती दिल्या आहेत. 'पोर बाजार' या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन, 'चूक भूल द्यावी घ्यावी', 'सरस्वती' या मालिकांची तसेच वेबसिरीजची निर्मिती केली आहे.‘नो एंट्री पुढे धोका आहे’, ‘जाऊ द्या ना बाळासाहेब', ‘फक्त लढ म्हणा’ यांसारख्या चित्रपटात तसेच हिंदी, मराठी मालिकांमध्ये तिने खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. ‘मधुसूदन कालेलकर प्रोडक्शन्स’च्या निर्माती गौरी कालेलकर-चौधरी यांनी ‘घरत गणपती’ या गाजलेल्या मराठी चित्रपटासोबत ‘एक तिची गोष्ट’ या नृत्यनाटिकेची निर्मिती केली आहे.या नव्या उपक्रमाबद्दल बोलताना गौरी कालेलकर-चौधरी म्हणाल्या, “एक उत्तम संहिता माझ्याकडे आली आणि निर्माती म्हणून ती कलाकृती करावी असं मनापासून वाटलं. मनवा लेखिका-दिग्दर्शिका म्हणून माझ्यासोबत ठामपणे उभी राहिली. आमच्या टीमवर्कमधून रसिकांना एक दर्जेदार अनुभव देण्याचा आम्हाला विश्वास आहे.”ही नवीन कलाकृती मराठी प्रेक्षकांसाठी नक्कीच उत्सुकता वाढवणारी बातमी ठरणार आहे!
मुंबई आणि नवी मुंबईत सेकंड हग्स–मायगेटची संयुक्त मोहीम
मुंबई :मुंबई व नवी मुंबईतील रहिवाशांना आता स्वच्छ व नीटनेटके राहणीमान आणि मुलांसाठी स्मार्ट शॉपिंगचा अनुभव मिळणार आहे. संपूर्ण भारतातील मुलांच्या उत्पादनांच्या खरेदी-विक्रीसाठी वेबसाइट सेकंड हग्सने भारतातील आघाडीची समुदाय व्यवस्थापन वेबसाइट मायगेटसोबत सहयोग केला आहे. या सहयोगांतर्गत राज्यातील निवडक गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये अनावश्यक वस्तू उपयोगात आणण्यासाठी अनोखी मोहिम राबवण्यात येणार आहे.रविवार १५ फेब्रुवारी रोजी मुंबई व नवी मुंबईतील तीन गृहनिर्माण सोसायट्या रूस्तमजी रिजेन्सी (दहिसर पश्चिम), मोराज रिव्हरसाइड पार्कनेम (पनवेल) आणि लोढा सिएलो (ठाणे पश्चिम) येथे परस्पदसंवादात्मक किओस्क्स स्थापित करण्यात येतील. यामध्ये रहिवाशांना सेकंड हग्स वेबसाइटच्या माध्यमातून मुलांच्या उत्पादनांची सहजपणे खरेदी-विक्री करण्याबाबत माहिती मिळू शकते. या प्रत्यक्षपणे राबवण्यात येणाऱ्या उपक्रमाला ११ ते १८ फेब्रुवारीपर्यंत मायगेट अॅपवर डिजिटल माध्यमाद्वारे पाठिंबा देण्यात येईल, ज्यासह इन-अॅप बॅनर्स आणि नोटिफिकेशन्सच्या माध्यमातून संपूर्ण शहरामधील लाखो निवासींपर्यंत पोहोचता येईल आणि कुटुंबांना स्मार्ट, पसारामुक्त पर्यायांची निवड करण्याचा संदेश देण्यात येईल.या उपक्रमाबाबत मत व्यक्त करत सेकंड हग्सच्या संस्थापिका व सीईओ स्वर्णा डागा मिमानी म्हणाल्या, ''शहरातील घरांमध्ये अनेकदा सामानाचा पसारा मोठी समस्या असते, विशेषत: मुले मोठी झाल्यावर त्यांच्यासाठी खरेदी केलेल्या खेळण्यांचा मोठा पसारा होतो. या मोहिमेच्या माध्यमातून आम्हाला पालकांना जाणीव करून द्यायचे आहे की, आपल्याकडील घरामध्ये विनावापर पडून असलेल्या वस्तू इतरांना देणे अर्थपूर्ण असू शकते. अशा वस्तू कुटुंबाला प्रत्यक्ष आर्थिक मूल्य मिळवून देऊ शकतात. तसेच, यामुळे इतर पालकांना आपल्या मुलांसाठी गरजेच्या वस्तू किफायतशीर दरामध्ये मिळवण्यास मदत होते. पालकत्वाची जबाबदारी काहीशी हलकी करणे आणि एकमेकांना साह्य करणे हाच आमचा मनसुबा आहे.''सेकंड हग्स ही संपूर्ण भारतातील वेबसाइट आहे, जेथे पालक ० ते १२ वर्ष वयोगटातील मुलांसाठी वापरलेल्या व नवीन वस्तूंची खरेदी-विक्री करू शकतात. यामध्ये बेबी गिअर, कपडे, खेळणी आणि नर्सरीसाठी आवश्यक वस्तूंचा समावेश आहे. सुलभता व सोयीसुविधेसाठी डिझाइन करण्यात आलेली सेकंड हग्स आपल्या वेबसाइटवर डिजिटल पेमेंट्स आणि घरपोच पिकअप व डिलिव्हरी सेवा देते, ज्यामधून खरेदी-विक्रीसाठी सुलभ अनुभव मिळतो.या वेबसाइटवर सुस्थितीत असलेल्या जुन्या वस्तू उपलब्ध आहेत, ज्या मूळ किमतीपेक्षा ५० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक सवलतीच्या दरांत मिळतात. तसेच ही वेबसाइट प्रत्यक्ष घाऊक व्यापाऱ्यांकडून मिळवलेली मुलांची अगदी नवीन उत्पादने देखील उपलब्ध करून देते. यामुळे कुटुंबांना उच्च दर्जाच्या आवश्यक वस्तू अत्यंत स्वस्त व किफायतशीर दरांमध्ये मिळू शकतात.मुंबई व नवी मुंबईमध्ये राबवण्यात येणारे हे क्रियाकलाप महाराष्ट्र आणि तेलंगणामधील मोठ्या बहु-शहरीय मोहिमेचा भाग आहेत, ज्यासह भारतातील पालकांसाठी मुलांच्या उत्पादनांची खरेदी-विक्री सुलभ, किफायतशीर व सहजसाध्य करण्याप्रती सेकंड हग्सचे मिशन अधिक दृढ होत आहे.
दीपिकाच्या पोस्टवरील रणवीर सिंगची कमेंट जिंकतेय चाहत्यांची मने
मुंबई : रणवीर सिंगने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे की तो ‘परफेक्ट हसबंड गोल्स’ का आहे. पत्नी दीपिका पादुकोणच्या लेटेस्ट सोशल मीडिया पोस्टवर त्याने केलेली छोटीशी पण प्रभावी कमेंट — “OHH MOMMA” — क्षणातच इंटरनेटवर व्हायरल झाली.
राज्यात ७० हजार पदांची लवकरच नोकरभरती
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; नव्या पद्धतीने भरती होणारमुंबई : राज्यात लवकरच नोकर भरती प्रक्रिया नव्या पद्धतीने राबवली जाणार आहे. जवळपास ७० हजारांहून अधिक पदांची भरती टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे. यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सुमारे २० हजार पदे आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाबाहेरील पदांचा समावेश असणार आहे. भरती प्रक्रिया राबविताना आवश्यक कौशल्ये, सेवा प्रवेश, पात्रता आणि कामाच्या स्वरूपानुसार निर्णय घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिले.मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे सेवा प्रवेश नियमावली सुधारणेसंदर्भात बैठक झाली. या बैठकीस मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह प्रशासनातील सर्व अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव तसेच सचिव उपस्थित होते.राज्य प्रशासनातील महत्त्वाच्या विभागांकडे सर्वांगीण प्रशासन सुधारणा वेगाने राबवाव्यात याव्यात.मनुष्यबळ व्यवस्थापन आणि भरती प्रक्रियेतील पारदर्शकता याला प्राधान्य असेल. राज्य शासनाच्या सेवा प्रवेश नियमावली सुधारणेसंदर्भातील निर्णय लवकरच मंत्रिमंडळ बैठकीत घेतला जाणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सामान्य प्रशासन विभाग हा केवळ औपचारिक नाही, तर शासनाच्या संपूर्ण भरती प्रणालीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. राज्य शासनाच्या विविध विभागात ७० हजार पदे भरल्यानंतर विभागाच्या कार्यक्षमतेत भर पडणार आहे.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या परिषदेत महाराष्ट्र शासनाने मांडलेले मनुष्यबळ व्यवस्थापन मॉडेल सर्वाधिक प्रशंसनीय ठरले. त्यावेळी प्रधानमंत्री मोदी यांनी इतर राज्यांनाही हे सुधारणा मॉडेल स्वीकारण्याचे निर्देश दिले. यामुळे महाराष्ट्र प्रशासन सुधारणा क्षेत्रात देशासाठी मार्गदर्शक ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.भरती प्रक्रियेत अनावश्यक कागदपत्रे, लांब रांगा आणि विलंब टाळण्यासाठी ऑनलाईन व डिजिटल व्हेरिफिकेशन मॉडेल विकसित करण्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी भर देण्याच्या सूचना केल्या.पासपोर्टसारख्या संवेदनशील दस्तऐवजांची ऑनलाईन पडताळणी शक्य असल्यास, इतर प्रक्रियांमध्येही हे मॉडेल वापरता येईल. यासाठी प्रत्येक विभागाने ब्लॉकचेन पद्धतीबरोबरच डीजीलॉकर प्रणालीत प्रमाणपत्रे उपलब्ध करून देण्यासाठी योग्य ती व्यवस्था करावी. भरती प्रक्रियेत कोणताही संशय, पक्षपात किंवा अन्याय होऊ नये, यासाठी संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि विश्वासार्ह असावी. त्याचबरोबर युवकांच्या मनात शंका राहू नयेत, यासाठी प्रणाली स्वच्छ आणि वेगवान असणे गरजेचे आहे. येणाऱ्या एका वर्षात महाराष्ट्रात गव्हर्नन्स रिफॉर्मचे नवे मॉडेल उभे राहील. यात प्रत्येक विभागाची भूमिका महत्त्वाची आहे. यासाठी कोणत्याही विभागाने मागे राहता सर्वांनी एकत्र येऊन प्रशासन सुधारणा यशस्वी कराव्यात असेही श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
लोकसभेतील आठ विरोधी खासदारांचे निलंबन मागे घ्यावे, यासाठी तृणमूल काँग्रेस (टीएमसी) लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिणार असल्याची माहिती पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी (Abhishek Banerjee) यांनी सोमवारी दिली. संसद सुरळीत चालावी, अशी आमची इच्छा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
ZP Election : पुणे जिल्हा परिषद निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून राष्ट्रवादी काँग्रेसने आपले वर्चस्व कायम राखले आहे.
Brian Bennett Catch : ब्रायन बेनेटने घेतलेल्या एका अविश्वसनीय झेलने जगभरातील क्रिकेट चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. ज्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय.
या भरतीत सहभागी होण्यासाठी, उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून बॅचलर पदवी पूर्ण केलेली असावी.
Mona Juul : नॉर्वेच्या माजी राजदूत मोना जुल यांचा राजीनामा
Mona Juul : एपस्टीन फाईल्समध्ये नाव आल्यामुळे नॉर्वेच्या माजी राजदूत महिलेने राजीनामा दिला आहे. मोना जुल (Mona Juul) यांनी १९९० च्या दशकात इस्रायल-पॅलेस्टिनमध्ये शांतता प्रस्थापनेसाठी प्रयत्न केले होते. तसेच अलिकडेच त्या जॉर्डनमध्ये नॉर्वेच्या राजदूत देखील राहिल्या होत्या.
नवी दिल्ली : देशाच्या संसदेसह राजधानीतील नऊ नामांकित शाळांना बॉम्बस्फोटाने उडवून देण्याचा धमकीचा ईमेल आल्याने आज सकाळी दिल्लीत मोठी खळबळ उडाली आहे. या ईमेलमध्ये '१३ फेब्रुवारी रोजी दुपारी १:११ मिनिटांनी' संसदेत मोठा स्फोट घडवून आणू, असा थेट इशारा देण्यात आला आहे. या धक्कादायक मेलमुळे सुरक्षा यंत्रणांची झोप उडाली असून दिल्लीत हाय-अलर्ट जारी करण्यात आला आहे. धमकीच्या या मजकुरात दहशतवादी अफजल गुरूचा उल्लेख करण्यात आला असून, दिल्लीला खलिस्तान बनवू, अशी प्रक्षोभक भाषा वापरण्यात आली आहे. सोमवार सकाळी दिल्लीतील विविध शाळांमधून 'इमरजेन्सी कॉल' येताच दिल्ली फायर सर्व्हिस (DFS), बॉम्ब शोधक पथक आणि डॉग स्क्वॉड तातडीने घटनास्थळी दाखल झाले. आतापर्यंत एकूण ९ शाळांना अशा प्रकारचा मेल प्राप्त झाल्याचे समोर आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित शाळा आणि संसदेच्या परिसरातील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. सध्या सर्व शाळांमध्ये कसून तपासणी सुरू असून पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलीस या ईमेलचा तांत्रिक तपास करत असून हा मेल नेमका कुठून आला, याचा शोध घेत आहेत.https://prahaar.in/2026/02/09/exams-are-the-beginning-of-a-beautiful-journey-face-them-with-confidence-a-motivational-message-from-the-honourable-education-minister-shri-dadaji-bhuse-to-the-students/इमेलमध्ये काय म्हटलंय ?'खलिस्तान नॅशनल आर्मी' या नावाचा उल्लेख असलेल्या या मेलमध्ये, दहशतवादी अफजल गुरूच्या आठवणीत दिल्लीला खलिस्तान बनवण्याची धमकी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, १३ फेब्रुवारी रोजी दुपारी १:११ मिनिटांनी संसदेमध्ये मोठा स्फोट घडवून आणू, असा थेट इशारा या ईमेलद्वारे देण्यात आला आहे. या धमकीच्या ईमेलमुळे दिल्ली पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांची मोठी धावपळ उडाली आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सायबर सेलच्या मदतीने या ईमेलचे मूळ 'लोकेशन' शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ईमेलमधील मजकुरात पंजाब खलिस्तान आहे असे प्रक्षोभक विधानही करण्यात आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून दिल्लीतील संसद भवन, महत्त्वाचे सरकारी कार्यालय आणि सर्व संवेदनशील भागांत कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.सुरक्षा अलर्ट मोडवरसंसदेसह शाळांना बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा मेल प्राप्त होताच दिल्ली पोलीस आता पूर्णपणे **'अलर्ट मोड'**वर आले आहेत. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून संपूर्ण राजधानीत, विशेषतः संवेदनशील भागांमध्ये अभेद्य सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. ज्या ९ शाळांना स्फोटाचे धमकीवजा मेल आले होते, त्या शाळांच्या परिसरात स्थानिक पोलिसांसह निमलष्करी दलाच्या तुकड्या तैनात करून सुरक्षेचा स्तर वाढवण्यात आला आहे. संशयित हालचालींवर बारीक नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज आणि साध्या वेशातील पोलिसांची गस्त वाढवण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची अनुचित घटना टाळण्यासाठी प्रशासन सज्ज असून पालकांनी घाबरू नये, असे आवाहनही करण्यात येत आहे.
पंजाबमध्ये लॉ कॉलेजच्या वर्गात हत्या, विद्यार्थ्याने झाडल्या गोळ्या
पंजाब : लॉ कॉलेज मधील एका हत्याकांडाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भर वर्गात गोळीबार झाल्यामुळे कॉलेजमध्ये भीतीचे वातावरण आहे.नेमकं घडलं काय ?मिळालेल्या माहितीनुसार मृत मुलीचे नाव संदीप कौर असे आहे तर गोळीबार करणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव प्रिन्स राज असे आहे. हे दोघेही लॉ कॉलेज यामध्ये पहिल्या वर्षाला शिकणारे विद्यार्थी आहेत. सकाळच्या सुमारास लेक्चर सुरू होण्यापूर्वी काही तास आधी कॉलेजच्या एका वर्गात प्रिन्स राजने संदीप कौर या विद्यार्थिनीच्या डोक्यात गोळ्या घालून तिची हत्या केली.विद्यार्थ्याने त्याच्या वर्गातील एका विद्यार्थिनीवर भर वर्गात गोळ्या झाडल्या. त्यानंतर विद्यार्थ्याने स्वतःच्या डोक्यात देखील गोळ्या झाडल्या. या गोळीबारात विद्यार्थिनीचा जागीच मृत्यु असून आरोपी विद्यार्थ्याला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेने कॉलेज परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून प्रेम प्रकरणातून ही हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घडलेली घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. घडलेल्या घटनेचं गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी संपूर्ण लॉ कॉलेज सील केला आहे.
राणेंचा बालेकिल्ला अभेद्य! सिंधुदुर्गच्या जनतेने मशाल विझवली
सुहास शेलारकोकणच्या लाल मातीतील राजकारणाचे संदर्भ जरी बदलत असले, तरी येथील रांगडा स्वभाव आणि नेतृत्वावरील निष्ठा आजही कायम आहे, याची प्रचिती सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निकालाने आली. ५० पैकी तब्बल ४१ जागांवर विजय मिळवत भाजप-महायुतीने विरोधकांचा सपशेल पराभव केला असून, ‘राणेंचा बालेकिल्ला’ आजही अभेद्य असल्याचे स्पष्ट केले आहे. राजकारणात लाटा येतात-जातात; मात्र जनतेच्या मनात ज्यांची मुळे खोलवर रुजलेली असतात, त्यांना कोणतीही राजकीय वादळे डळमळीत करू शकत नाहीत, हे या निकालाने पुन्हा सिद्ध केले आहे.हा निकाल म्हणजे खासदार व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या दशकानुदशकांच्या तपस्येची, सातत्यपूर्ण जनसंपर्काची आणि विकासाभिमुख राजकारणाची पुनःपुष्टी आहे. कोकणच्या विकासासाठी त्यांनी मांडलेल्या दूरदृष्टीपूर्ण आराखड्याला जनतेने नेहमीच भक्कम पाठिंबा दिला आहे. या विजयाचे प्रमुख शिल्पकार म्हणून मंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांचा उल्लेख करावा लागेल. या दोन्ही युवा नेत्यांनी जिल्हाभरात उभी केलेली आक्रमक, शिस्तबद्ध आणि परिणामकारक संघटनात्मक बांधणी पाहता विरोधकांची सारी गणिते कोलमडून पडली.कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी या विधानसभा मतदारसंघात मिळालेले निर्विवाद वर्चस्व हे विकासाच्या राजकारणाचे ठळक यश मानावे लागेल. रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण आणि आरोग्य यांसारख्या मूलभूत सुविधांवर राणे कुटुंबाने दिलेला सातत्यपूर्ण भर जनतेला भावलेला आहे. 'बोले तैसा चाले' या उक्तीप्रमाणे राणेंनी प्रत्यक्ष कृतीवर भर दिला, त्याचेच प्रतिबिंब आजच्या निकालात उमटले आहे. विरोधासाठी विरोध करणाऱ्यांना बाजूला सारत जनतेने विकासालाच कौल दिला आहे.दुसरीकडे, स्वतःला कोकणचा कैवारी म्हणवून घेणाऱ्या ‘उबाठा’ गटाची या निवडणुकीतील दयनीय अवस्था चर्चेचा विषय ठरली आहे. अवघ्या तीन जागांवर त्यांना समाधान मानावे लागले असून, सात तालुक्यांपैकी अनेक ठिकाणी खातेही उघडता आलेले नाही. त्यांची ‘मशाल’ विझत चालल्याची ही स्पष्ट चिन्हे आहेत. केवळ भावनिक साद घालून राजकारण करता येत नाही; जमिनीवर उतरून सातत्याने काम करावे लागते, हा धडा सिंधुदुर्गच्या जनतेने त्यांना दिला आहे. संघटनेसाठी आयुष्य वेचलेल्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केल्याचे फळ उबाठा गटाला आज भोगावे लागत आहे.राजकारणात टीका-टिप्पणी आणि आव्हाने येतच असतात; मात्र जो नेता जनतेच्या सुख-दुःखात खंबीरपणे सहभागी होतो, जनता त्याच्याच पाठीशी उभी राहते, हे सिंधुदुर्गने दाखवून दिले आहे. महायुतीचा हा विजय जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीला अधिक गती देणारा ठरेल, यात शंका नाही. या निकालाने हेही सिद्ध केले, की राणेंचा बालेकिल्ला कालही मजबूत होता, आजही अभेद्य आहे आणि भविष्यातही विकासाच्या बळावर तो तसाच दिमाखात उभा राहील! या विजयासाठी भाजप-शिवसेनेच्या महायुतीला शुभेच्छा.
Vande Bharat Train : मुंबई-कोकण मार्गावर वंदे भारत ट्रेनचा अपघात; मोकाट जनावरांना धडकली ट्रेन
Vande Bharat Train : मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेसची कुडाळजवळ गुरांना धडक बसल्याने ओएचई उपकरणांचे नुकसान झाले आहे.
Todays Top 10 News: महाराष्ट्र, देश-विदेश सह आजच्या महत्वाच्या बातम्या वाचा
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा उद्यापासून टप्प्याटप्प्याने सुरू होत आहेत. या महत्त्वाच्या शैक्षणिक टप्प्यावर राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना धीर देण्यासाठी आणि त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री माननीय दादाजी भुसे यांनी एका विशेष व्हिडिओ संदेशाद्वारे संवाद साधला आहे. परीक्षा म्हणजे आयुष्याचा शेवट नसून एका सुंदर प्रवासाची ही सुरुवात आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी कोणत्याही दडपणाशिवाय आत्मविश्वासाने या परीक्षेला सामोरे जावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. राज्यात १० फेब्रुवारीपासून इयत्ता १२ वीच्या आणि २० फेब्रुवारीपासून इयत्ता १० वीच्या परीक्षांना प्रारंभ होत आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना शिक्षण मंत्री श्री . भुसे म्हणाले की, विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी गेल्या अनेक महिन्यांपासून या परीक्षेसाठी मोठी मेहनत घेतली आहे. विद्यार्थ्यांच्या कष्टाला आणि जिद्दीला नक्कीच यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.https://prahaar.in/2026/02/09/deputy-chief-minister-sunetra-pawar-will-take-charge-tomorrow/पालकांच्या स्वप्नांची जाणीवविद्यार्थ्यांना भावनिक साद घालताना श्री.दादाजी भुसे म्हणाले, जेव्हा तुम्ही परीक्षा केंद्रावर उत्तरपत्रिका लिहायला बसता, तेव्हा तुमच्या हातात केवळ कागद नसतो, तर त्यामध्ये तुमच्या आई-वडिलांनी पाहिलेली स्वप्ने दडलेली असतात. ही स्वप्नपूर्ती करण्यासाठी तुम्ही अहोरात्र कष्ट केले आहेत. त्यामुळे स्वतःच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास ठेवा.आरोग्य आणि सकारात्मकतेचा मंत्रपरीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनी सकारात्मक विचार करावा, पुरेशी झोप घ्यावी आणि सकस आहार घ्यावा, असा सल्ला त्यांनी दिला आहे. मन शांत ठेवून आणि हसतमुख राहून पेपर लिहिल्यास परीक्षेचा ताण जाणवणार नाही, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.वेळेचे पालन आणि प्रामाणिकपणापरीक्षेच्या शिस्तीबाबत मार्गदर्शन करताना त्यांनी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचण्याचे आवाहन केले. तुम्ही या देशाचे भविष्य आहात आणि तुमचा प्रामाणिकपणा हीच तुमची खरी ओळख आहे, अशा शब्दांत त्यांनी विद्यार्थ्यांचे मनोबल उंचावले. शेवटी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार आणि संपूर्ण राज्य शासनाच्या वतीने त्यांनी सर्व परीक्षार्थींना उज्ज्वल यशासाठी मनापासून शुभेच्छा दिल्या. आपल्या कष्टाच्या जोरावर विद्यार्थी राज्याचे नाव नक्कीच उज्ज्वल करतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांची प्रतिक्रियामुंबई : आज जाहीर झालेले जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल म्हणजे राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री व आमचे नेते अजितदादा पवार यांच्या कार्याला आणि त्यांच्या अविरत परिश्रमांना जनतेने कृतज्ञतापूर्वक अर्पण केलेली आदरांजली आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.अजितदादांनी आयुष्यभर तळागाळातील माणसासाठी झटत विकासाला गती दिली. आजचा हा निकाल म्हणजे त्यांच्या विचारांवरील, त्यांच्या नेतृत्वावरील अढळ श्रद्धेची साक्ष आहे. या माध्यमातून दादांचा वारसा जपत अधिक जबाबदारीने आणि प्रामाणिकपणे जनतेची सेवा करण्याचा आमचा संकल्प अधिक दृढ झाला आहे असेही सुनील तटकरे यांनी 'एक्स' वर म्हटले आहे.
मराठी भाषा आणि साहित्याच्या समृद्ध परंपरेचा जागर करत, पुण्यात आयोजित करण्यात आलेला दोन दिवसांचा साहित्यिक महोत्सव अत्यंत उत्साहात पार पडला.
ZIM vs OMA : ओमानने दिलेल्या अवघ्या १०४ धावांचे आव्हान झिम्बाब्वेने केवळ १३.३ षटकांत २ गडी गमावून पूर्ण केले.
दोन मुलांची आई असलेली इशिता हिने अलीकडेच शेअर केले की दुसऱ्या बाळंतपणानंतर दोन महिन्यांत तिने १५ किलो वजन कसे कमी केले.
महाराष्ट्रातील जिल्हा परिषद निवडणुकीत लातूर जिल्ह्यातील निकालांनी (Latur ZP Election) राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. २०१७ च्या निवडणुकीत ३६ जागा जिंकून एकहाती सत्ता मिळवणाऱ्या भाजपला यंदा मोठा फटका बसला आहे.
ZP Election Result : जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुक निकालांमध्ये भाजपने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Indian Army : भारतीय सैन्याकडून नेपाळला 50 लष्करी वाहने सुपूर्द
भारत आणि नेपाळ या दोन्ही देशांमधील लष्करी सहकार्य आणि मैत्रीचा वारसा पुढे नेत, भारतीय सैन्याने (Indian Army) सोमवारी नेपाळ लष्कराला ५० लष्करी उपयुक्तता वाहने सुपूर्द केली.
Supreme Court : “डिजिटल फसवणुकीद्वारे रक्कम हडपणे म्हणजे दरोडा”; सुप्रीम कोर्टाची स्पष्ट भूमिका !
डिजिटल अटक प्रकरणांमध्ये भरपाई देण्यासाठी एक चौकट तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने आरबीआय, दूरसंचार विभाग आणि इतरांना संयुक्तपणे बैठक घेण्यास सांगितले.
त्रिभाषा धोरण राबविण्यासंदर्भात नरेंद्र जाधव समितीकडून सरकारला अहवाल सादर
मुंबई : राज्यातील शाळांमध्ये त्रिभाषा धोरण राबविण्यासंदर्भात शिक्षणतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांच्या समितीनं आज आपला अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केला आहे. समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे हा अहवाल सादर केला.राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्यातील शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा शिकविण्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयाला झालेल्या विरोधानंतर राज्य सरकारनं शिक्षणतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समितीची घोषणा केली होती. या समितीकनं राज्यभरात दौरे करत राजकीय नेत्यांसह संस्था, संघटनांच्या प्रतिनिधींसोबत संवाद कार्यक्रम, जनसुनावणी घेतली. त्यानंतर आता समितीनं हा अहवाल सरकारला सादर केला असून लवकरच हा अहवाल मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येणार आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उद्या स्वीकारणार पदभार
मंत्रिमंडळ बैठकीला लावणार हजेरी; राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्यालयालाही भेट देणारमुंबई : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेल्या सुनेत्रा पवार मंगळवारी, १० फेब्रुवारी रोजी औपचारिकरित्या पदभार स्वीकारणार आहेत. पदभार स्वीकारल्यानंतर त्या मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहणार असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्यालयालाही भेट देणार आहेत.सुनेत्रा पवार यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण, तसेच अल्पसंख्याक आणि औकाफ या मंत्रालयांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. १० फेब्रुवारी रोजी सकाळी मंत्रालयात पदभार स्वीकारल्यानंतर दुपारी १२ वाजता होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीला त्या उपस्थित राहतील. अजित पवार यांच्या निधनामुळे या आठवड्यातील मंत्रिमंडळ बैठक रद्द करण्यात आली होती.दरम्यान, दिवंगत अजित पवार यांच्याकडे असलेले पुणे आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पददेखील सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्यात आले आहे. तसेच अजित पवार यांच्या वापरातील मंत्रालयातील दालने आणि शासकीय निवासस्थान सुनेत्रा पवार यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.पदभार स्वीकारण्याच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह सर्व मंत्री आणि आमदार उपस्थित राहणार आहेत. मंत्रिमंडळ बैठकीनंतर सुनेत्रा पवार मंत्रालयानजीकच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्यालयातही हजेरी लावणार आहेत. पदभार स्वीकारल्यानंतर त्या पहिला निर्णय कोणता घेणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
Jammu and Kashmir : जम्मू आणि काश्मीरने मध्य प्रदेशचा ५६ धावांनी पराभव करत पहिल्यांदाच या प्रतिष्ठेच्या स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे.
Zilla Parishad Result : अजितदादांच्या निकटवर्तीय नेत्याला मोठा धक्का; ZP निवडणुकीत पराभव
Zilla Parishad Result :
Newasa News : दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी बहुजन दिव्यांग क्रांती सेनेकडून उपोषण सुरु
नेवासा तालुक्यातील (Newasa News) दिव्यांग बांधवांच्या विविध न्याय्य मागण्यांसाठी बहुजन दिव्यांग क्रांती सेनाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष अमित जेधे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार, ९ फेब्रुवारी रोजी नेवासा नगरपंचायत चौकात उपोषण सुरू करण्यात आले आहे.
मिनी विधानसभेतही भाजप-महायुतीचा डंका
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत दमदार कामगिरी; भाजप क्रमांक एकचा पक्ष, एकनाथ शिंदे यांना मिळाले वाढदिवसाचे गिफ्ट, राष्ट्रवादीनेही गड राखलेमुंबई : नगरपालिका, महानगरपालिका आणि आता जिल्हा परिषद- पंचायत समितीच्या निवडणुकीतही भाजप-शिवसेना महायुतीने चमकदार कामगिरी करीत दमदार विजय मिळवला आहे. राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. विशेष म्हणजे या निवडणुकीत उबाठा गटाला जिल्हा परिषदेत एकही जागा जिंकता आलेली नाही. त्यामुळे आजवरचा हा त्यांचा सर्वात मानहानीकारक पराभव ठरला असून, ग्रामीण भागातील जनतेने ठाकरेंच्या नेतृत्त्वाला स्पष्ट नाकारले, हे या निकालातून स्पष्ट झाले आहे.छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, लातूर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितींसाठी या निवडणुका पार पडल्या. महापालिका निवडणुकीनंतर घसरत चाललेल्या मतदानाच्या टक्केवारीबद्दल चिंता व्यक्त होत असतानाच खेड्यापाड्यांतून म्हातारे-कोतारे, आयाबाया आणि तरुणाई मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडल्याने आश्वासक चित्र दिसले. या निवडणुकीत तब्बल ६८.२८ टक्के मतदान झाले. त्यामुळे लढती अटीतटीच्या होतील, असे तर्क लावले जातात असताना, ग्रामीण मतदारांनी भाजप महायुतीला स्पष्ट कौल दिला.उबाठा आणि काँग्रेसला जिल्हा परिषदेत एकही जागा जिंकता आली नाही. तर, पंचायत समितीतही त्यांची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली. या निवडणुकीत भाजप राज्यातील नंबर एकचा पक्ष ठरला असून, भाजपची ग्रामीण भागातील पकड किती खोलवर रुजली आहे, हे स्पष्ट झाले आहे. भाजपनंतर एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी सरस कामगिरी केली आहे.राज्यातील १२ जिल्हा परिषदांपैकी आठ जिल्हा परिषदांवर भाजपने वर्चस्व मिळवले. शिवसेनेला तीन जिल्हा परिषदांमध्ये सत्ता मिळाली, तर राष्ट्रवादी काँग्रेसला एका जिल्हा परिषदेत यश मिळाले आहे. काँग्रेसने कोल्हापूर आणि लातूरमध्ये चांगली कामगिरी केली असली, तरी त्यांना सत्तेसमीप जाण्याइतके संख्याबळ मिळाले नाही. दुसरीकडे उबाठा गटाला जिल्हा परिषदेत खातेही उघडता आलेले नाही. या पराभवामागे उबाठा गटाच्या वरिष्ठ नेतृत्वाची निष्क्रियता कारणीभूत ठरल्याचे मत व्यक्त केले जात आहे. उबाठाच्या एकाही बड्या नेत्याने या निवडणुकीत सक्रिय प्रचार केला नाही किंवा कार्यकर्त्यांना बळ दिले नाही. याचाच परिणाम निकालात दिसून आल्याचा टोला भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी लगावला आहे.जिल्हा परिषदेत कोणाला किती जागा?जिल्हा परिषद एकूण भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस उबाठा शरद पवार मनसे इतर१) छत्रपती संभाजी नगर,62,23,19,2,1,8,1,0,7२) धाराशिव,55,12,12,5,2,5,3,0,2३) कोल्हापूर,67,11,11,10,13,2,0,0,5४) लातूर,58,17,1,10,18,1,1,0,3५) परभणी,54,17,3,6,3,2,0,0,0६) पुणे,73,8,5,43,0,7,1,0,0७) रायगड,59,10,14,16,1,5,0,0,5८) रत्नागिरी,55,1,26,2,0,5,0,0,2९) सांगली,61,17,5,5,8,1,16,0,3१०) सातारा,64,32,10,17,0,0,1,0,0११) सिंधुदुर्ग,50,19,7,0,0,0,0,0,1१२) सोलापूर,68,39,6,10,0,0,0,0,3पंचायत समित्यांमध्ये भाजपचा दबदबामहाराष्ट्रातील पंचायत समित्यांच्या निवडणुकांत भाजपने जोरदार मुसंडी मारत १२५ पैकी ४५ ठिकाणी विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील काँग्रेस व राष्ट्रवादीचे पारंपरिक बालेकिल्ले भेदण्यात भाजपला यश आले असून, ग्रामीण राजकारणातील सत्तासमीकरणे बदलत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत शिवसेनेला २४, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला २० पंचायत समितीच्या चाव्या मिळाल्या. पुण्यासह काही जिल्ह्यांमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवार गट एकत्र लढले होते, तर काही ठिकाणी स्वतंत्र. शरद पवार यांच्या पक्षाला पंचायत समित्यांमध्ये केवळ ८ ठिकाणी विजय मिळाल्याने त्यांची ग्रामीण भागातील पकड ढिली होत असल्याचे संकेत मिळत आहेत. राष्ट्रीय पक्ष म्हणवणाऱ्या काँग्रेसला काँग्रेसला केवळ ८, तर उबाठा गटाला ५ ठिकाणी यश मिळाले.पंचायत समित्यांचे चित्रएकूण - १२५भाजप - ४५शिवसेना - २४राष्ट्रवादी - २०काँग्रेस - ८शरद पवार - ८उबाठा - ५इतर - १सिंधुदुर्ग जिल्ह्यात फक्त 'राणे ब्रँड'- संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत ‘राणे ब्रँड’ची हवा दिसून आली. या निवडणुकीत महायुतीने स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता अबाधित राखली असून, उबाठा गटाला कोकणी जनतेने जवळपास नाकारल्याचे स्पष्ट झाले आहे.- या निकालातून मंत्री नितेश राणे यांचे तळकोकणातील राजकीय वर्चस्व ठळकपणे अधोरेखित झाले आहे. स्थानिक पातळीवरील प्रभावी संघटन, नियोजनबद्ध प्रचार आणि आक्रमक नेतृत्व याचा थेट फायदा महायुतीला झाल्याचे दिसून आले.- निकालानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत मंत्री नितेश राणे यांनी ग्रामीण विकासावर भर देण्याचा पुनरुच्चार केला. ते म्हणाले, “सत्तेच्या माध्यमातून ग्रामीण भागात सर्वांगीण विकास केला जाईल. दरडोई साडेचार लाख रुपयांचे उत्पन्न निर्माण करण्याचा आमचा संकल्प आहे,” असे त्यांनी सांगितले.- यावेळी त्यांनी बंडखोर उमेदवारांच्या मुद्द्यावरही भाष्य केले. “निवडून आलेले बंडखोर उमेदवार हे मूळ भाजपचेच आहेत. मात्र, कमळ चिन्हाच्या विरोधात अपक्ष म्हणून निवडणूक लढवल्याचा फटका महायुतीला बसला. ‘अदृश्य हातां’च्या माध्यमातून भाजपच्या उमेदवारांचा पराभव घडवून आणण्याचा प्रयत्न झाला. मात्र, त्या अदृश्य हातांना भविष्यात बाजूला केले जाईल,” असा इशाराही त्यांनी दिला.
आयटेलकडून मिलिटरी ग्रेड असलेला आकर्षक स्मार्टफोन ए१०० लाँच
मुंबई : आयटेल या भारतातील आघाडीच्या टेक ब्रँडने नुकतेच ब्लॉकबस्टर व डिझाइनर ए१०० स्मार्टफोन लाँच केला आहे. प्रत्येकाचे लक्ष वेधून घेणारी डिझाइन असलेला हा स्मार्टफोन टिकाऊपणा व किफायतशीरपणासंदर्भात आघाडीवर आहे. ए१०० स्मार्टफोनमध्ये मिलिटरी ग्रेड सर्टिफिकेशन (एमआयएल-एसटीडी-८१०एच) आहे, ज्यामधून वापरकर्त्यांना अद्वितीय टिकाऊपणा व मन:शांती मिळते. अल्ट्रालिंक असलेला हा स्मार्टफोन नेटवर्क कनेक्टीव्हीटी नसलेल्या ठिकाणी देखील कनेक्टीव्हीटी देतो. ए१०० स्मार्टफोन ६४ जीबी रॉमसह (३+५*) जीबी व (४+८*) जीबी या दोन रॅम व्हेरिएण्ट्समध्ये उपलब्ध आहे.११ कोटींहून अधिक ग्राहक, १.३ लाखांहून अधिक रिटेल आऊटलेट्समध्ये रिटेल उपस्थिती आणि १००० हून अधिक सर्विस सेंटर्ससह आयटेल भारतातील सर्वात विश्वसनीय ब्रँड आहे. किंमत फक्त ६७९९ रूपये (३ जीबी व्हेरिएण्ट) आणि ७४९९ रूपये (४ जीबी व्हेरिएण्ट) असलेला हा स्मार्टफोन भारतभरातील रिटेल स्टोअर्समध्ये उपलब्ध आहे. या स्मार्टफोनवर १०० दिवसांमध्ये मोफत स्क्रिन रिप्लेसमेंट ऑफर देखील देण्यात आली आहे, ज्यामुळे भारतात फक्त आयटेलकडून देण्यात येणाऱ्या अद्वितीय विश्वसनीयतेची खात्री मिळते.या लाँचबाबत मत व्यक्त करत आयटेल इंडियाचे सीईओ श्री. अरिजीत तालापात्रा म्हणाले, ''भारतातील अधिकाधिक ग्राहकांसाठी स्मार्टफोन गरजेचा बनला आहे, जो दीर्घकाळापर्यंत कायम राहण्याची अपेक्षा आहे. ए१०० सह आम्ही वापरकर्त्यांच्या सर्वाधिक व महत्त्वपूर्ण गरजेवर लक्ष केंद्रित केले आहे, ते म्हणजे दीर्घकाळापर्यंत कार्यरत राहणारा, आकर्षक डिझाइन असलेला, तसेच किफायतशीर असलेला स्मार्टफोन. वैशिष्ट्ये जसे मिलिटरी ग्रेड टिकाऊपणा आणि अल्ट्रालिंक व्यावहारिक नाविन्यतेमध्ये सामावलेले आहेत, जी आयटेलची खासियत आहे. जागतिक स्तरावर रॅम/रॉम किमतींमध्ये वाढ झालेली असताना देखील आम्ही आमचे डिवाईसेस भारतसाठी किफायतशीर दरांमध्ये उपलब्ध असण्याची खात्री घेतली आहे.''आयटेल ए१०० मध्ये आकर्षक ६.६-इंच ९० हर्टझ एचडी+ डिस्प्ले आहे, ज्याला पूरक इमर्सिव्ह डीटीएस-समर्थित साऊंड तंत्रज्ञान आहे, जे आकर्षक रंगसंगती, सुस्पष्ट आवाज व लक्षवेधक व्हिज्युअल्ससह मधुरमय संगीतचा आनंद देण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे. या स्मार्टफोनमध्ये भर करण्यात आलेले सर्वोत्तम डायनॅमिक बार वापरकर्त्यांना विनाव्यत्यय बॅटरी स्टेटस, कॉल्स, नोटिफिकेशन्ससह कनेक्टेड ठेवते. फोटोग्राफीप्रेमींना ८ मेगापिक्सल रिअर कॅमेरा आवडेल, ज्यामध्ये आकर्षक व सुस्पष्ट फोटो कॅप्चर करण्यासाठी प्रगत इमेज प्रोसेसिंग देखील आहे. ए१०० मध्ये आयआर ब्लास्टर देखील आहे, ज्यामुळे दुरून टीव्ही, एअर कंडिशनर्स आणि इतर इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेस सहजपणे नियंत्रित करता येतात.ऑक्टा-कोअर युनिसोक टी७१०० प्रोससरची शक्ती आणि अँड्रॉईड १५ गो असलेला ए१०० विनासायास मल्टीटास्किंग, सुलभ गेमिंग आणि प्रभावी व्हिडिओ कॉल्सची खात्री देतो. सुरक्षितता व सहज उपलब्धतेसाठी ए१०० मध्ये फेस अनलॉक आणि साइड-माऊंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे, ज्यामधून संरक्षण व सोयीसुविधा मिळतात. विशाल ५००० एमएएच बॅटरी आणि १० वॅट चार्जरसह हा डिवाईस दिसवभर कार्यरत राहण्याची खात्री मिळते. हा स्मार्टफोन सिल्क ग्रीन, प्युअर ब्लॅक आणि टायटॅनियम गोल्ड या लक्षवेधक रंगांमध्ये उपलब्ध आहे.
अजित पवारांच्या निधनामुळे भाजपने विजयाचा जल्लोष टाळला
मुंबई : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपने अभूतपूर्व यश मिळवल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असले, तरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर भाजपने विजयाचा कोणताही जल्लोष न करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिली.भाजप प्रदेश मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रत्येक निवडणुकीसाठी अहोरात्र मेहनत घेत घेतात. मात्र, अजित पवार यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी कार्यकर्त्यांना मोठ्या प्रचारसभा न घेण्याचे आणि शांत, संघटनात्मक पातळीवर निवडणूक लढवण्याचे आदेश दिले होते. या संवेदनशील निर्णयाचा सर्व कार्यकर्त्यांनी आदर केला असून, निवडणूक निकालांनी ही कार्यपद्धती जनतेला मान्य असल्याचे सिद्ध केले आहे, असे चव्हाण म्हणाले.रवींद्र चव्हाण म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गेल्या ११ वर्षांच्या कार्यकाळात शेतकरी, कष्टकरी तसेच शहरी व ग्रामीण भागातील सर्व घटकांसाठी अनेक योजना राबवण्यात आल्या. महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दिवंगत अजित पवार यांनी गेल्या तीन वर्षांत जे प्रभावी काम केले, त्याचीच ही फलश्रुती असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.८० टक्क्यांहून अधिक सदस्य महायुतीचे- कोरोना काळानंतर या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. १२ जिल्हा परिषदांवर महायुतीची सत्ता स्थापन होईल, असे चित्र दिसत आहे. तसेच १२५ पंचायत समित्यांपैकी ५० पेक्षा जास्त ठिकाणी भाजप सत्ता स्थापन करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचे एकत्रित निकाल पाहता, ८० टक्क्यांहून अधिक लोकप्रतिनिधी महायुतीचे निवडून येताना दिसत असून, हा जनतेने दिलेला स्पष्ट कौल आहे, असे ते म्हणाले.- कोकणातील निकालांवर भाष्य करताना रवींद्र चव्हाण म्हणाले की, गेल्या काही निवडणुकांचे निकाल पाहता कोकण महायुतीचा बालेकिल्ला असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. विशेषतः ग्रामीण भागातील मतदारांनी महायुतीच्या बाजूने दिलेला कौल अत्यंत महत्त्वाचा असून, या विश्वासाबद्दल सर्व मतदारांचे त्यांनी आभार व्यक्त केले.
‘लाहोर १९४७’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर
मुंबई : आमिर खान प्रॉडक्शन्सने त्यांच्या आगामी कालखंडावर आधारित भव्य चित्रपट ‘लाहोर १९४७’ च्या थिएटरमधील प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. स्वातंत्र्यदिनाच्या आठवड्यात, १३ ऑगस्ट २०२६ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.या चित्रपटाद्वारे अभिनेता सनी देओल, दिग्दर्शक राजकुमार संतोषी आणि निर्माता आमिर खान प्रथमच एकत्र काम करत आहेत.आमिर खान म्हणतात, “ही कथा धरमजींच्या आवडत्या पटकथांपैकी एक होती, आणि त्यांना हा चित्रपट पाहता आला याचा मला अतिशय आनंद आहे.”सनी देओल, शबाना आझमी, प्रीती झिंटा आणि करण देओल यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचे संगीत ए. आर. रहमान यांनी दिले असून, गीतलेखन जावेद अख्तर यांनी केले आहे. अलीकडील ब्लॉकबस्टर यशानंतर ‘लाहोर १९४७’ हा सनी देओल यांचा पुढील महत्त्वाचा चित्रपट ठरणार आहे.
Michael Leask World Record : सोमवारी झालेल्या सामन्यात स्कॉटलंडने इटलीचा ७३ धावांनी धुव्वा उडवत स्पर्धेतील आपला पहिला विजय नोंदवला.
Sharad Pawar : शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट, डॉक्टरांनी दिली महत्वाची माहिती
Sharad Pawar : शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत रुबी हॉलचे डॉ. अभिजित लोढा यांनी माहिती दिली आहे. पवार साहेब आयसीयूमध्ये नसून खासगी रूममध्ये आहेत.
Jeffrey Epstein Baby Ranch: जेफ्री एपस्टीनचा अंत झाला असला, तरी त्याने विणलेले हे जाळे किती खोलवर होते, हे आता स्पष्ट होत आहे. 'बेबी रांच' ही संकल्पना आधुनिक काळातील सर्वात क्रूर आणि अमानवीय विचारांपैकी एक मानली जात आहे.
ट्रेड विथ जॅझ नावाच्या गुंतवणूक कंपनीतील १,२०० कोटी रुपयांच्या गुंतवणूक घोटाळ्यातील शेकडो पीडितांनी ठाणे (Thane Fraud News) जिल्ह्यात पोलीस आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर निदर्शने केली आहेत.
Pune News : पोलिस भरती साहित्य खरेदी प्रक्रियेत गैरप्रकाराचा आरोप
Pune News : पुणे ग्रामीण पोलीस भरतीसाठी लागणाऱ्या साहित्य खरेदीत गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप बहुजन मुक्ती पार्टीने केला आहे.
Brad Arnold : रॉक संगीताचा हिरो गेला.! गायक ‘ब्रॅड अर्नोल्ड’यांचे निधन; संगीत विश्वावर शोककळा
ब्रॅड अर्नोल्ड यांच्या निधनानंतर रॉक संगीत क्षेत्रात भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे, असे संगीत तज्ज्ञ आणि चाहते सांगत आहेत.
Share Market Today: शेअर बाजारात मोठी उसळी; गुंतवणूकदारांची एकाच दिवसात 6 लाख कोटींची कमाई
Share Market Today: व्यापार कराराच्या सकारात्मक बातम्या आणि बँकिंग क्षेत्रातील खरेदीमुळे शेअर बाजाराने गुंतवणूकदारांना आज मालामाल केले आहे.
Rahul Gandhi : पुस्तकामुळे पंतप्रधान लोकसभेत आले नाहीत; राहुल गांधींची टीका
काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सोमवारी दावा केला की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देण्यासाठी लोकसभेत हजेरी लावली नाही, कारण ते माजी लष्करप्रमुख एम. एम. नरवणे यांच्या पुस्तकातील मुद्द्यांवर चर्चा होण्यास घाबरत होते.
Newasa News : बेलापूर-परळी रेल्वे मार्गाला तात्काळ मंजुरी मिळावी म्हणून कुकाणा येथे आमरण उपोषण सुरू
बेलापूर (श्रीरामपूर)-परळी रेल्वे मार्गाला केंद्र सरकारकडून तात्पुरती स्थगिती देण्यात आल्याच्या निषेधार्थ रेल्वे कृती समितीने (Newasa News) आजपासून कुकाणा येथे ग्रामपंचायत प्रांगणात आमरण उपोषण सुरू केले आहे.
Khushi kapoor : ग्रे जॅकेट आणि ब्लू जीन्स मध्ये दिसला ‘खुशी कपूर’चा हॉट अंदाज, फोटो व्हायरल…
इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीचे लाखो फॉलोअर्स आहेत. तसेच ती लक्झरी ब्रँड्स, फोटोशूट्स आणि रेड कार्पेट लुक्ससाठी प्रसिद्ध आहे.
ZP Election Result 2026: रायगडपासून लातूरपर्यंतच्या १२ जिल्ह्यांत ७३१ जागांसाठी झालेल्या या निवडणूकीत ७ हजार ४३८ उमेदवारांचे भवितव्य ठरले आहे.
मतदानकरून परत येताना महाडमध्ये दरीत कोसळली कार; चौघेजण....
महाड : नुकताच जिल्हा परिषदेची निवडणूकमही पार पडली आहे. आणि आजच त्याचे निकालही लागले आहेत. त्यामुळे मतदानासाठी मुंबईहून गेलेले चाकरमानी परतीच्या प्रवासाला लागले. याचवेळी प्रवासात वरंधा घाटात एक अपघात झाला.मतदानासाठी मुंबईहून महाडला गेलेल्या चार जणांनी परत येताना मृत्यूला चुकवलं आहे. मृत्यूला चकवत कारमधून उड्या मारत आपले जीव वाचवले आहेत.नेमकं घडलं काय ?भोर - महाड वरंधा घाटात ही घटना घडली. कार महाडवरून भोरच्या दिशेने येत होती. घाटात असलेल्या शिरगावचा हद्दीत एका धोकादायक वळणार येताच चालकाचे नियंत्रण सुटले. आणि कर दरीच्या दिशेने जाऊ लागली.दरीत कोसळण्याआधी कारमधून बाहेर....कार दरीच्या दिशेने जात आहे, आपण दरीत कोसळणार हे लक्षात येताच अवघ्या काही क्षणातच चौघांनी कार मधून आभार उडी मारली, आणि त्यांचे जीव थोडक्यात वाचला. चोघे फक्त किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
बिग बॉसच्या घरात येणार “एंटरटेन्मेंटची त्सुनामी!मुंबई: “ड्रामा, धक्का आणि धमाका!” या तीन शब्दांची एकच ओळख म्हणजेच... हो तीच... आता आली एंटरटेनमेंटची लहर, बिग बॉस मराठीच्या घरात पसरणार एंटरटेनमेंटचा कहर... बिग बॉस मराठी सिझन ६ च्या घरात पहिली वाइल्ड कार्ड स्पर्धक राखी सावंतची एंट्री होणार आहे. राखी सावंत घरात पूर्ण एंटरटेन्मेंटची त्सुनामी घेऊन येणार आहे! आतापर्यंत तयार झालेली समीकरणं, नाती, गटबाजी आणि समज-अपसमज… सगळ्यावर राखीचा एकच प्रश्नचिन्ह! तिच्या आगमनाने घरातल्या प्रत्येक सदस्याचा गेम हादरणार हे नक्की. कोणाशी मैत्री, कोणाशी वाद, कोणाच्या नसा दाबायच्या आणि कोणाला भावनिक गोंजारायचं हे सगळं राखीच्या खेळात नेहमीच अनपेक्षित असतं. तेव्हा महाराष्ट्राला एन्टरटेन्मेंटचा भारी डोस मिळणार आहे.राखी सावंत यावर बोलताना म्हणाली, राखी जाणार आणि गेम पालटणार. माझ्याशिवाय बिग बॉस अधुरं आहे. मी घरात गेल्यावर सगळ्यांचा आवाज गायब होतो. जेव्हा राखी सावंत घरात जाणार तिची मर्जी चालणार आहे. मी घरात धम्माल करणार आहे. तुम्हांला माझे वेगवेगळे ड्रेस , माझा गेम पहायला मिळणार आहे. बिग बॉस प्लॅटफॉर्म सगळ्यांना नाही मिळत आपल्याला मिळाला आहे तर त्याचा उपयोग करून घ्या हे माझं म्हणणं आहे. रितेश देशमुख उत्तम अभिनेते आहेत. संपूर्ण महाराष्ट्रमध्ये आपला बिग बॉस मराठी चालतो आहे, मला खुप अभिमान आहे ते हा शो होस्ट करत आहेत. आपल्या मराठी लोकांसाठी आणि महाराष्ट्रासाठी मी बिग बॉस मराठी करत आहे.राखी सावंतचा स्वभाव जितका बिनधास्त, तितकाच बेधडक तिचा खेळ. ती स्वतःच्या अटींवर खेळते आणि वेळ आली तर संपूर्ण घराची दिशा बदलते. बिग बॉस मराठीच्या घरात राखीची एन्ट्री म्हणजे ड्रामाचं लेव्हल अप!
ZP Election Result 2026: सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजप महायुतीचा दणदणीत विजय
सिंधुदुर्ग: राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा रणसंग्राम आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून, मतमोजणीला सुरुवात झाली आहे. ७३१ जिल्हा परिषद जागांपैकी पहिल्या २०० जागांचे कल हाती आले असून, यामध्ये सत्ताधारी महायुतीने स्पष्ट वर्चस्व मिळवल्याचे दिसून येत आहे. शनिवारी पार पडलेल्या या मतदानामध्ये ७ हजार ४३८ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले होते. या निवडणुकीत भाजप मोठा पक्ष ठरला आहे. या निवडणुकीत भाजप शंभरी पार गेला.अशातच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्याचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये भाजप महायुतीला घवघवीत यश मिळालं आहे. जिल्ह्यातील ५० जागांपैकी ३६ जागांचा निकाल जाहीर झाला असून भाजपाला २१ जागा, शिवसेनेला ८, उबाठा २ जागा तर इतर ५ जागांवर आघाडी घेतली आहे.भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी केली होती. त्यामुळे आता देवगड तालुक्यात भाजपा महायुतीने आपली मजबूत पकड कायम ठेवत यश संपादन केले आहे.विजयी उमेदवारांची नावे:पुरळ जिल्हा परिषद गट संजय बोबडी (भाजप - महायुती)पुरळ पंचायत समिती गण संजना आळवे (भाजप महायुती)तिरलोट पंचायत समिती गण रवी तिरलोटकर (भाजप महायुती)शिरगाव जिल्हा परिषद गट देवदत्त दामोदर कदम (भाजप महायुती)तळवडे पंचायत समिती गण सलोनी संतोष तळवडेकर (शिवसेना - महायुती)
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने त्यांना बारामतीहून पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे. खोकल्याचा तीव्र त्रास जाणवू लागल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना तातडीने पुण्यात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.https://prahaar.in/2026/02/09/in-the-zilla-parishad-elections-the-uddhav-thackeray-faction-suffered-a-humiliating-defeat-their-most-embarrassing-loss-to-date/मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांना अस्वस्थ वाटत होते. खोकल्याचा त्रास सुरू होता. आज बारामतीमध्ये असतानाच त्यांची तब्येत अधिक बिघडल्याचे जाणवताच वैद्यकीय सल्ला घेण्यात आला. त्यानंतर कोणताही धोका न पत्करता त्यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये पुढील तपासणीसाठी नेण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या शरद पवार यांचा ताफा वरवंड परिसराच्या जवळ असल्याची माहिती असून, पुढील पाऊण तासात ते रुबी हॉल क्लिनिकमध्ये पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, रुग्णालय प्रशासनाने विशेष वैद्यकीय पथक तैनात ठेवले असून आवश्यक त्या सर्व तयारी करण्यात आल्या आहेत.शरद पवार यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळे देखील असल्याचे समजते आहे. पवार रुग्णालयात दाखल होणार असल्याची माहिती मिळताच रुबी हॉल क्लिनिक परिसरात कार्यकर्ते आणि समर्थक जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव रुग्णालयाबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात येत आहे. शरद पवार यांच्या प्रकृतीबाबतची अधिकृत माहिती डॉक्टरांच्या सखोल तपासणीनंतरच समोर येणार असून, त्यांच्या तब्येतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
मोठी बातमी..! शरद पवारांना तातडीने रुग्णालयात दाखल; नेमकं काय झालं? महत्वाची माहिती समोर
Sharad Pawar : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना श्वसनाचा त्रास आणि ताप आल्याने तातडीने बारामतीहून पुण्यात हलवण्यात आले आहे.
ZP Election : अटी -तटीची लढत ! ‘या’जिल्हा परिषदेमध्ये धाकटीकडून थोरल्या जाऊबाईंचा पराभव
महाराष्ट्रातील जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये (ZP Election) लातूर जिल्ह्यातील निकालांनी चांगलाच थरार निर्माण केला आहे. लातूर जिल्हा परिषदेच्या ५९ जागांपैकी ५२ जागांचे निकाल जाहीर झाले असून, काँग्रेसने सर्वाधिक १९ जागा जिंकून पहिल्या क्रमांकाचा पक्ष म्हणून आपली मजबूत स्थिती दाखवली आहे.
KL Rahul Century : कर्नाटकच्या या ऐतिहासिक विजयाचा नायक ठरला तो अनुभवी फलंदाज केएल राहुल, ज्याने दबावाखाली खेळताना आपल्या कारकिर्दीतील २४ वे प्रथम श्रेणी शतक झळकावले.
काँग्रेस नेते आणि माजी आमदार बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणातील आरोपी आकाशदीप करज सिंग याला सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला.
ZP Election 2026: माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांना मोठा धक्का; मुलगी, मुलगा, सून, पुतण्या पराभूत
ZP Election 2026: नांदेड महापालिका आणि बदलापूर नगरपरिषदेनंतर आता जिल्हा परिषदेतही मोठ्या नेत्यांच्या नातेवाईकांना मतदारांनी नाकारले आहे. परभणीतील हा निकाल आगामी राजकीय गणितांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

25 C