राज्यातील २४ नगर परिषदांमध्ये आज मतदान
उद्या मतमोजणीमुंबई : राज्यातील १६ जिल्ह्यांमधील २४ नगर परिषदांमध्ये २० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणुका अशा नगरपालिका व नगर परिषदांमध्ये होत आहेत, जिथे अध्यक्ष, सदस्य किंवा काही ठिकाणी फक्त सदस्यांच्या निवडणुका न्यायालयीन कारणांमुळे यापूर्वी पुढे ढकलण्यात आल्या होत्या.या सर्व ठिकाणी २१ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुकांच्या ठिकाणी २० डिसेंबर रोजी सरकारने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.या निवडणुकीत अंबरनाथ, कोपरगाव, बारामती, अक्कलकोट, महाबळेश्वर, फुलंब्री, मुखेड, निलंगा, अंजनगाव सुर्जी, वसमत, बाळापूर, यवतमाळ, वाशीम, देऊळगाव राजा, देवळी, रत्नागिरी व गुऱ्हाळ या नगरपरिषदांचा समावेश आहे. निवडणूक आयोगाने ४ नोव्हेंबर रोजी राज्यातील २४६ नगरपालिका व ४२ नगर परिषदांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. काही ठिकाणी उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी आवश्यक वेळ न देता निवडणूक चिन्हे वाटप करण्यात आली. हे नियमांविरुद्ध असल्याचे लक्षात घेऊन आयोगाने त्या ठिकाणी निवडणूक प्रक्रिया स्थगित केली.२४ नगरपालिका आणि नगर पंचायतींच्या अध्यक्षपदासह सर्व सदस्य पदांसाठी व ७६ नगरपालिका, नगरपंचायतींमधील १५४ सदस्य पदांसाठी २० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. २१ डिसेंबर रोजी सर्व ठिकाणी मतमोजणी होईल.
मतदार याद्यांच्या सखोल तपासणीतून तामिळनाडूत ९८ लाख नावे हटविली
मृत, स्थलांतरीत, तसेच दुबार-तिबार नावांचा समावेश२६ लाख ९४ हजार मृत मतदारांचा समावेश , ६६ लाख ४४ हजार मतदार कायमस्वरूपी स्थंलातरीत , ३ लाख ३९ हजार २७८ दुबार मतदारनवी दिल्ली : सध्या देशातील काही राज्यांत सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या पुनरीक्षणादरम्यान, तामिळनाडूमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. एसआयआरनंतर तयार करण्यात आलेल्या तामिळनाडूमधील मतदार यादीच्या मसुद्यामधून तब्बल ९७ लाख ३७ हजार ८३२ नावे हटववण्यात आली आहेत. तर नव्या मतदार यादीच्या मसुद्यामध्ये ५ कोटी ४३ लाख, ७६ हजार ७५५ मतदारांचा समावेश आहे.तामिळनाडूच्या मुख्य निवडणूक अधिकारी अर्चना पटनायक यांनी सांगितले की, मतदार याद्यांच्या पुनरीक्षणानंतर तयार करण्यात आलेल्या राज्यातील मतदार याद्यांच्या मसुदा यादीमध्ये ५ कोटी ४३ लाख, ७६ हजार ७५५ मतदारांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये २ कोटी ६६ हजार महिला आणि २ कोटी ७७ लाख पुरुषांचा समावेश आहे. एसआयआर पूर्वी तामिळनाडूमध्ये सुमारे ६ कोटी ४१ लाख नोंदणीकृत मतदार होते. तसेच या प्रक्रियेनंतर त्यापैकी तब्बल ९७ लाख ३७ हजार ८३२ मतदारांची नावे हटवण्यात आली आहेत.नोंदणीकृत पत्त्यावर मतदार आढळलेच नाहीहटवण्यात आलेल्या मतदारांमध्ये २६ लाख ९४ हजार मृत मतदारांचा समावेश आहे. तर ६६ लाख ४४ हजार मतदार असे आहेत; जे कायमस्वरूपी स्थलांतरीत झालेले आहेत. ३ लाख ३९ हजार २७८ दुबार मतदारांची नावेही यादीतून हटवण्यात आली आहेत. या मतदारांची नाव एकापेक्षा अधिक ठिकाणी नोंदवलेली आहेत. ज्या मतदारांना स्थलांतरीत म्हणून चिन्हांकित करण्यात आले होते. त्यातील ६६ लाख ४४ हजार ८८१ मतदार राज्यात घरोघरी जाऊन करण्यात आलेल्या पडताळणीच्या तीन टप्प्यांनंतरही नोंदणीकृत पत्त्यावर आढळून आले नसल्याची माहिती अर्चना पटनायक यांनी दिली.मतदारांना हटवण्याचा कटदरम्यान, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी केलेल्या तीव्र विरोधानंतरही तामिळनाडूमध्ये एसआरआयची प्रक्रिया पार पाडण्यात आली आहे. स्टॅलिन यांच्या डीएमके पक्षाने एसआयआरविरोधात सर्वोच्च न्यायालयात एक याचिकादेखील दाखल केली होती. आता एसआयआरवर टीका करताना स्टॅलिन यांनी त्याचा लोकशाहीविरोधी पाऊल असा उल्लेख केला आहे.
सातारा अमली पदार्थ प्रकरणात शिंदे कुटुंबीयांचा सहभाग नाही
विरोधकांनी केलेले आरोप चुकीचे; मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून निर्वाळामुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा त्यांच्या कुटुंबीयांचा सातारा अमली पदार्थ प्रकरणात कोणताही सहभाग नाही. पोलिसांनी आजवर केलेल्या तपासात कोणताही पुरावा आढळून आलेला नाही. विरोधकांनी केवळ राजकीय स्वार्थापोटी सातारा अमली पदार्थ प्रकरणात शिंदे यांच्यावर आरोप केले आहेत, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी शिंदे यांच्यावरील आरोप फेटाळून लावत त्यांची पाठराखण केली.महापालिका निवडणुकांमधील जागावाटपाची चर्चा व एकमेकांच्या कार्यकर्त्यांना पक्षप्रवेश देण्याच्या घटनेमुळे ताणलेल्या राजकीय संबंधाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी शिंदे यांची पाठराखण केली. कसल्याही प्रकारचा संबंध नसताना विरोधकांनी आरोप करणे चुकीचे आहे, असेही फडणवीस म्हणाले. उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पुढील गोष्टी स्पष्ट होतील, असे म्हणत माणिकराव कोकाटे यांच्याबाबत अधिक बोलणे मुख्यमंत्र्यांनी टाळले.बिबट्या पुनर्वसन केंद्रांची संख्या वाढविणार :राज्यात बिबट्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. अधिवासातून बाहेर येऊन मानवी वस्तीतील हालचाली वाढल्या आहेत. त्यामुळे बिबट्यांच्या पुनर्वसन केंद्रांची युद्ध पातळीवर निर्मिती केली जात आहे. मानवी वस्तीत आलेल्या बिबट्यांना पकडून त्यांना केंद्रात ठेवले जाईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
चिखलदरा : विदर्भाचे नंदनवन चिखलदरा पर्यटनस्थळावरील पारा घसरलेला आहे. गुरुवारी पहाटे ३ ते ५ दरम्यान ५ अंश सेल्सिअसची नोंद घेण्यात आली. यावर्षी सर्वात कमी ३ अंश सेल्सिअसपर्यंत पारा घसरला होता. तेव्हापासून कायम एक अंकी आकड्यावर चिखलदऱ्याचे तापमान स्थिरावले आहे. स्थानिक ऊबदार कपड्यांसह शेकोटी पेटवून बचाव करीत आहेत. आठवडाभर थंडीची लाट जाणवणार असल्याचे हवामान खात्याने जाहीर केले आह
जागावाटपात सन्मान न ठेवल्यास शिवसेनेची स्वबळाची तयारी!
भाजपच्या 'त्या' प्रस्तावानंतर मुंबईसाठी मास्टरप्लान तयारमुंबई : भाजप आणि शिवसेनेने मुंबई महापालिका निवडणुकीसाठी युतीची घोषणा करत जागावाटपाची चर्चा सुरु केली आहे. शिवसेनेने भाजपकडे १२५ जागांची मागणी केली. पण भाजपने त्यांना जागावाटपाच्या पहिल्या टप्प्यात केवळ ५० ते ६० जागा देऊ केल्या आहेत. त्यामुळे आता शिवसेनेने निवडणुक लढविण्यासाठी प्लान बी तयार करुन तशी तयारीही सुरु केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपने सन्मानजनक जागा न दिल्यास शिवसेनेनं पर्यायी योजना आखली असून स्वबळावर निवडणुक लढविण्याचा निर्णय घेतला असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.१५ जानेवारीला मुंबई महापालिकेसाठी मतदान होईल. दुसऱ्याच दिवशी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येईल. २०२२ ला महापालिका सभागृहाची मुदत संपुष्ठात आल्यानंतर तीन वर्षे प्रशासकीय राजवट होती. शिवसेनेने गेल्या काही महिन्यांमध्ये उबाठा गटातील माजी नगरसेवक मोठ्या प्रमाणावरआपल्याकडे खेचले आहेत. याच संख्याबळाच्या आधारे शिवसेनेने भाजपकडे १२५ जागांची मागणी केली. पण भाजपने त्यांना केवळ ५० ते ६० जागा देऊ केल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेने पर्यायी योजना म्हणून २२७ जागांवर तयारी केल्याची माहिती आहे. युती करुन संख्याबळ घटण्याचा धोका लक्षात घेता, स्वबळावर ताकद आजमावून शंभरच्या आसपास नगरसेवक निवडून आणण्यासाठी शिवसेनेकडून चाचपणी सुरु झाली आहे.मुलाखतीसाठी तीन निरीक्षकांची नियुक्ती : 'महायुतीमधील पक्ष म्हणून शिवसेना मुंबई महापालिकेची निवडणूक लढवेल. सर्वोत्तम उमेदवार देण्यावर आमचा भर आहे. त्यामुळेच आम्ही सगळ्या प्रभागातील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आहेत. ही प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शक राहावी यासाठी तीन निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे,' अशी माहिती शेवाळे यांनी दिली. अन्य पक्षांपेक्षा शिवसेनेच्या मुलाखतींना मिळणारा प्रतिसाद जास्त मोठा आहे. यातून एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना केलेले काम अधोरेखित होतं, असे शेवाळे म्हणाले. शिवसेनेतील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेच्या मुलाखतींना देणाऱ्यांमध्ये राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसेशी संबंध राहिलेल्यांचा समावेश आहे. महापालिका निवडणूक लढवण्यासाठी ही मंडळी उत्सुक आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिवसेना पहिल्यांदाच मुंबई महापालिका निवडणुकीला सामोरी जात आहे.२७०० इच्छुकांच्या मुलाखतीमुंबई महापालिकेत एकूण २२७ प्रभाग येतात. या सगळ्या प्रभागांमध्ये स्वबळावर लढण्याची चाचपणी शिवसेनेने तयारी सुरु केली आहे. शिवसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार जवळपास शिवसेनेकडून निवडणूक लढविण्यासाठी २७०० इच्छुकांनी मुलाखती दिल्या आहेत. प्रत्येक प्रभागात मजबूत आणि जिंकण्याची खात्री असलेला उमेदवार शोधण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे शेवाळे यांनी सांगितले.
विक्रोळीत उबाठाचे खाते रिकामेच राहणार?
िचत्र पालिकेचे :विक्रोळी िवधानसभासचिन धानजी मुंबई : विक्रोळी विधानसभेत सलग तिसऱ्यांदा निवडून येत उबाठा शिवसेना नेते संजय राऊत यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांनी बांधला आहे. या प्रभागात महायुतीचे नगरसेवकांचे प्राबल्य असूनही विजयाचा तिलक महायुतीच्या उमेदवाराच्या कपाळी लावता आलेला नाही. विशेष म्हणजे या प्रभागातून निवडून आलेले तिन्ही नगरसेवक आता शिवसेनेत गेल्यामुळे या विधानसभेत उबाठाचे खाते रिकामी झाले आहे. त्यामुळे नगरसेवक निवडून आणत पक्षाची ताकद वाढवण्याचा प्रयत्न उबाठाचा असेल, परंतु महायुती सर्वच नगरसेवक निवडून आणत सुनील राऊतांची डोकेदुखी अधिक वाढवणार का यावर सर्वांचे लक्ष असेल. विक्रोळी विधानसभेमध्ये भाजपाचे दोन, शिवसेनेचे तीन आणि राष्ट्रवादी काँग्रेस शप यांचे एक अशाप्रकारे सहा नगरसेवक असून उबाठाकडील तिन्ही नगरसेवक हे शिवसेनेत गेले आहे. त्यामुळे या विधानसभेत नगरसेवक संख्याबळानुसार शिवसेनेची ताकद मोठी असल्याने जागा वाटपांत चार जागा शिवसेनेला सुटल्या जातील आणि दोन जागांवर भाजपाचे उमेदवार असतील अशी शक्यता आहे. तर महाविकास आघाडीमध्ये प्रभाग १११ आणि प्रभाग ११८वर मनसेचा दावा असेल. यातील प्रभाग ११८ हा शंभर टक्के मनसेला सोडला जाण्याची शक्यता आहे. तर उबाठा चार जागांवर आणि एक जागा मनसे व एक जागा राष्ट्रवादी काँग्रेस शप यांना सोडली जाण्याची शक्यता आहे.लोकसभा निवडणुकीतील विक्रोळी मतदार संघातील निकालसंजय दिना पाटील, उबाठा : ६८,६७२मिहिर कोटेचा, भाजपा : ५२,८०७विक्रोळी विधानसभेतील निकालसुनील राऊत, उबाठा : ६६,०९३सुवर्णा करंज, शिवसेना : ५०,५६७प्रभाग क्रमांक ११०(ओबीसी)हा प्रभाग पूर्वी महिलांकरता राखीव होता आणि या प्रभागातून भाजपाच्या सारीका मंगेश पवार या निवडून आल्या होत्या. परंतु आता हा प्रभाग ओबीसी राखीव झाला आहे. त्यामुळे भाजपाकडून पुन्हा सारीका पवार यांची उमेदवारी पक्की मानली जात आहे. तर उबाठाकडून दत्ताराम पालेकर, प्रणय पवार आणि सचिन चोरमले यांच्यात स्पर्धा आहे. यातील प्रणय पवार हे सारीका मंगेश पवार यांचे पुतणेच असून सचिन चोरमले हा त्यांचा स्वीय सहायक होता आणि त्यानंतर पवार कुटुंबाला सोडून आमदार सुनील राऊत यांच्याकडे गेला होता. तर काँग्रेसकडून परशुराम कोपरकर, राष्ट्रवादी काँग्रेसकडून धनंजय पिसाळ आणि मनसेकडून पृथ्वीराज येरुणकर आणि सचिन घागरे यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र याठिकाणी भाजपा, उबाठा आणि काँग्रेस यांच्यामध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.प्रभाग क्रमांक ११७ ( ओबीसी महिला)हा प्रभाग यापूर्वी ओबीसी महिलाकरता राखीव होता आणि या प्रभागातून शिवसेनेच्या सुवर्णा करंजे या निवडून आल्या होत्या. आता पुन्हा हा प्रभाग ओबीसी महिलाकरता राखीव झाल्याने शिवसेनेकडून सुवर्णा करंजे यांची उमेदवारी पक्की मानली जात आहे. या प्रभागातून उबाठामधून श्वेता पावसकर आणि मामी मंचेकर यांची नावे चर्चेत आहेत. भाजपाकडून रजनी कदम यांचे नाव चर्चेत असले तरी महायुती झाल्यास ही जागा शिवसेनेला सोडली जावू शकते. त्यामुळे याठिकाणी शिवसेना विरुध्द उबाठा अशी लढत होण्याची दाट शक्यता आहे.प्रभाग क्रमांक ११८ (एस सी महिला)हा प्रभाग पूर्वी खुला असल्याने या मतदार संघातून शिवसेनेचे उपेंद्र सावंत निवडून आले होते. आता उपेंद्र सावंत हे शिवसेनेत असले तर प्रभाग एस सी महिला राखीव झाल्याने त्यांना दुसऱ्या प्रभागाचा शोध घ्यावा लागणार आहे . त्यामुळे एस सी महिला प्रभागातून सिंड्रेला गवळी तर उबाठातून माधुरी दोडके यांच्या नावाची चर्चा आहे. तर मनसेकडून माजी नगरसेविका प्रियंका श्रुंगारे यांच्या नावाची चर्चा आहे. हा प्रभाग ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये मनसेला सोडला जावू शकतो. त्यामुळे मनसे विरुध्द शिवसेना अशी लढत या प्रभागात होवू शकते.प्रभाग क्रमांक ११९ (सर्वसाधारण)हा प्रभाग यापूर्वी ओबीसी महिलाकरता राखीव होता आणि आता हा प्रभाग सर्वसाधारण प्रवर्गाकरता राखीव झाला आहे. याप्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनिषा रहाटे या निवडून आल्या होता. परंतु हा प्रभाग खुला झाल्याने या प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेस (शप)कडून मनिषा रहाटे यांना पुन्हा संधी आहे. तर शिवसेनेचे माजी नगरसेवक या प्रभागातून इच्छुक आहेत तर उबाठाकडून चंद्रशेखर जाधव यांचेही नाव इच्छुकाच्या यादीत आहे. उबाठा , राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे यांच्या युतीमध्ये ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडली जाणार असल्याने उबाठाच्या उमेदवाराला प्रभाग खुला होवूनही डोक्यावर हात मारत बसावे लागणार आहे.प्रभाग क्रमांक १२०( सर्वसाधारण)हा प्रभाग पूर्वी महिला आरक्षित होता आणि या प्रभागातून शिवसेनेच्या राजराजेश्वरी रेडेकर या निवडून आल्या होत्या. परंतु आता हा प्रभागा सर्वसाधारण प्रवर्गकरता राखीव झाला आहे. या प्रभागातून शिवसेनेकडून राजराजेश्वरी रेडेकर यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे. तर उबाठाकडून निलेश पोहोकर आणि माजी नगरसेवक विश्वास शिंदे यांची नावे चर्चेत आहेत. मात्र, या प्रभागात काँग्रेस तसेच मनसेच्य इच्छुक उमेदवाराची चर्चा नाही. त्यामुळे या प्रभागात शिवसेना विरुध्द उबाठा अशीच थेट लढतहोणार आहे.प्रभाग क्रमांक १२२( सर्वसाधारण)हा प्रभाग यापूर्वी ओबीसी महिला करता राखीव होता आणि या प्रभागातून भाजपच्या वैशाली पाटील या निवडून आल्या होत्या . परंतु आता या प्रभागाचे आरक्षण हे सर्वसाधारण झाले असून हा प्रभाग खुला झाल्याने भाजपाकडून विद्यमान नगरसेविका वैशाली पाटील यांच्यासह श्रीनिवास त्रिपाटी यांच्या नावाची चर्चा आहे. तर उबाठाकडून विजय कुरकुटे, सचिन मदने आणि निलेश साळुंखे यांच्या नावाची चर्चा आहे. तर या प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्याकडून माजी नगरसेवक चंदन शर्मा यांच्याही नावाची चर्चा होती. परंतु चंदन शर्मा यांनीही आता भाजपात प्रवेश केल्यामुळे भाजपामधील इच्छुकांच्या यादीतील एक नाव वाढले आहे. चंदन शर्मा यांच्या प्रवेशामुळे वैशाली पाटील आणि श्रीनिवास त्रिपाटी यांच्या उमेदवारीवर काट मारली जाण्याची शक्यता आहे. चंदन शर्मा यांच्या माध्यमातून या प्रभागावर राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा होता. पण चंदन शर्मा यांच्या भाजपा प्रवेशामुळे आता या प्रभागातील उबाठाची दावेदारी अधिक मजबूत झाली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंदन शर्मा यांना भाजपात प्रवेश दिल्याचे बोलले जात आहे.
पूर्व द्रुतगती महामार्गासह पुलांची डागडुजी
मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्यावतीने बांधण्यात आलेली पूल आता महापालिकेला हस्तांतरीत झाली आहे. त्यामुळे हस्तांतरित झालेल्या पूर्व द्रुतगती महामार्गावरील सहा पुलांची डागडुजी आता महापालिकेच्यावतीने केली जाणार आहे. या मार्गावरील सर्व पुलांची दुरवस्था झाल्याने या पुलांवरील पृष्ठभागाची मास्टिकचा वापर करून त्याची डागडुजी केली जाणार आहे. मुंबईतील पूर्व द्रुतगती मार्ग मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून महानगरपालिकेस सुधारणा देखभाल करण्यासाठी आहे तशा स्थितीत २९ नोव्हेंबर २०२२ रोजी हस्तांतरीत करण्यात आलेला आहे. एकूण १९ किलोमीटर आणि सरासरी ६० मीटर रुंद असलेल्या पूर्व द्रुतगती महामार्गाची देखभाल महापालिकेच्या माध्यमातून केली जात आहे. तसेच पावसाळ्यात या मार्गावर तसेच पुलांवर खड्डे पडू नये यासाठीचीही काळजी घेतली जात आहे. पूर्व द्रुतगती मार्गावरील एमएमआरडीएच्या अखत्यारित असलेली पुलही महापालिकेला हस्तांतरित करण्यात आली आहे.यामध्ये ऐरोली, जे. व्ही. एल. आर, विक्रोळी, ए. जी. एल. आर, छेडा नगर, अंधेरी कुर्ला लिंक रोड आदी पुलांचा समावेश आहे. या पुलांची व इतर दुरवस्था झाल्याने या पुलांच्या पृष्ठभागाची मास्टिक वापरून सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. येणाऱ्या पावसाळ्यात पूर्व द्रुतगती मार्गावर खड्डे पडणार नाहीत व त्यावरील प्रवास सुखकर होईल. या अानुषंगाने पुलांच्या डागडुजीचे काम हाती घेण्यात आल्याचे रस्ते विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. महापालिकेच्यावतीने पूर्व द्रुतगती महामार्गावरील दुरवस्था झालेल्या काही भागांची आणि पुलांच्या पुष्ठभागाची सुधारणा मास्टिक डांबराचा वापर करण्याकरता सुमारे ६५कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. या डागडुजीच्या कामांसाठी स्पेको इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीची निवड करण्यातआली आहे.
दिव्य मराठी ॲपने आयोजित केलेल्या ‘लढाई मनपाची, आवाज नागरिकांचा' टॉक शोला प्रभाग १९ मध्ये उदंड प्रतिसाद मिळाला. यावेळी 'भाजप आणि महायुतीचे लोक विकासाबद्दल बोलायचे झाले की ते पळ काढतात,' अशी टीका एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी केली. त्यावर प्रत्युत्तर देताना करत भाजपच्या उमेदवारांनी 'एमआयएमने सत्तेत असताना कोणते ठोस काम केले,' असा सवाल केला. महापालिका निवडणुका जाहीर होताच छत्रपती संभाजीनगर शहरातील राजकीय तापमान वाढू लागले आहे. तब्बल दहा वर्षांनंतर १५ जानेवारी रोजी महापालिका निवडणुका होत असून, यानिमित्ताने यावेळी तरी नागरिकांचे प्रश्न सुटणार का, असा सवाल शहरभरातून उपस्थित केला जात आहे. एकीकडे सत्ताधारी आणि इच्छुक उमेदवारांनी आपण केलेल्या कामांची यादी मांडण्यास सुरुवात केली आहे, तर दुसरीकडे विरोधकांकडून त्यावर जोरदार टीका होत आहे. ‘दिव्य मराठी ॲप’ने आयोजित केलेल्या ‘लढाई मनपाची, मुद्दा नागरिकांचा’ या संवादात प्रभाग क्रमांक १९ मधील नागरिकांनी आपल्या प्रलंबित प्रश्नांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. असा आहे प्रभाग छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक १९ हा क्रांती चौकापासून सुरू होऊन बाळासाहेब ठाकरे चौक, श्रीराम चौक, वीर सावरकर चौक, शाहनूरमिया दर्गाह परिसर मार्गे बीड बायपासपर्यंत विस्तारलेला आहे. या प्रभागाची एकूण लोकसंख्या ३९,०९२ इतकी आहे. मात्र, इतक्या मोठ्या लोकसंख्येला आजही मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत असल्याचे या संवादातून स्पष्ट झाले. यावेळी विष्णू शिंदे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. 'आमच्या प्रभागात भाजपचे नगरसेवक होते, मात्र आजही पायी चालण्यासाठी नीट रस्ते नाहीत. पाण्याची टाकी असूनही ती पूर्ण क्षमतेने सुरू झालेली नाही. ड्रेनेज लाइनचे पाणी अक्षरशः रस्त्यावर तुंबते, पण त्याकडे कोणीही लक्ष देत नाही. निवडणुकीच्या वेळी मतं मागायला सगळे येतात, मात्र निवडून गेल्यानंतर नागरिकांचे प्रश्न दुर्लक्षित केले जातात,' असा आरोप त्यांनी केला. दरम्यान, इतर नागरिकांनीही प्रभागातील समस्यांचा पाढा वाचला. अनेक भागांतील रस्त्यांची दुरवस्था झाली असून पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाणी साचते. पिण्याच्या पाण्याचा अनियमित पुरवठा, स्वच्छतेचा अभाव आणि कचरा उचलण्यास होणारा विलंब यामुळे दैनंदिन जीवन विस्कळीत होत असल्याचे नागरिकांनी सांगितले. विकास कमी आणि जातीयवाद जास्त संवादादरम्यान एमआयएम आणि भाजप यांच्यात शाब्दिक वादही रंगला. एमआयएमच्या उमेदवारांनी भाजपवर जात-धर्माच्या राजकारणाचा आरोप करत, 'भाजप विकासापेक्षा जातीय मुद्द्यांवर निवडणुका लढते. विकासाबद्दल बोलायचे झाले की ते पळ काढतात,' अशी टीका केली. त्यावर पलटवार करत भाजपच्या उमेदवारांनी निशाणा साधत, 'एमआयएमने सत्तेत असताना कोणते ठोस काम केले? आज रस्ते, ड्रेनेज, पाणी आणि सुरक्षिततेचे प्रश्न गंभीर आहेत. वाढती गुन्हेगारी आणि महिलांची असुरक्षितता याला कोण जबाबदार?' असा सवाल उपस्थित केला. मोकळी जागा म्हणजे कचऱ्याचा ढिगार समस्यांबाबत बोलताना रिझवान पठाण यांनी कचरा व्यवस्थापनाचा मुद्दा उपस्थित केला. 'आठ वर्षांपूर्वी जशी रस्त्यावर कचऱ्याची समस्या होती, तशीच ती आजही कायम आहे. तसेच निवास कॉलनी आणि देवा नगरीतील पुलाचा प्रश्न गेल्या दहा वर्षांपासून प्रलंबित असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे,' असे ते म्हणाले. अशोक तुपे यांनी प्रभागातील गरजांकडे लक्ष वेधताना प्रत्येक चौकात स्पीड ब्रेकर, २४ तास ऍम्ब्युलन्स सेवा, रस्त्यावरील अतिक्रमण हटवणे, नवीन सिमेंट रस्त्यालगत पेव्हर ब्लॉक बसवणे, पाण्याचा वेळ सकाळी आठ ते दुपारी एक या कालावधीत ठेवणे, सर्व स्ट्रीट लाइट्स कार्यरत करणे आणि अनावश्यक वाढलेली झाडे छाटण्याची मागणी केली. तसेच वीज बंद होणार असल्यास किमान १२ तास आधी एसएमएसद्वारे माहिती देण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. यावेळी संवादात उपस्थित नागरिकांनी दोन्ही पक्षांवर नाराजी व्यक्त करत थेट भूमिका मांडली. 'सत्ता कुणाचीही असो, आमच्या समस्या मात्र तशाच आहेत. निवडणूक आली की सगळे विकासाची भाषा करतात, पण निवडून गेल्यानंतर कोणीच फिरकत नाही,' अशी प्रतिक्रिया सतीश सातपुते यांनी दिली. एकंदरच, या संवादातून प्रभाग क्रमांक १९ मधील वास्तव समोर आले असून राजकीय आरोप-प्रत्यारोपांपेक्षा नागरिकांचे दैनंदिन जीवनाशी संबंधित प्रश्न अधिक गंभीर असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे येणाऱ्या महापालिका निवडणुकीत जाती-धर्माच्या राजकारणापेक्षा प्रत्यक्ष काम करणाऱ्या, उत्तरदायित्व स्वीकारणाऱ्या आणि नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देणाऱ्या उमेदवारालाच संधी देण्याचा सूर प्रभागातील मतदारांकडून उमटताना दिसत आहे.
शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! खडकवासल्याचे पाणी सुटले; दौंड, इंदापूर, बारामतीला मिळणार दिलासा
प्रभात वृत्तसेवा पुणे – खडकवासला धरणातून रब्बी हंगामातील पहिले आर्वतन सोडण्यास मागील आठवड्यापासून सुरुवात झाली आहे. सद्यः स्थितीत कालव्यातून एक हजार क्युसेकने पाणी सोडण्यात येत असून, हे आर्वतन सुमारे 40 ते 50 दिवस सुरू राहणार असल्याची माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली. या आर्वतनचा फायदा हवेली, इंदापूर, दौंड आणि बारामती तालुक्यांतील शेतीला फायदा होणार आहे. […] The post शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! खडकवासल्याचे पाणी सुटले; दौंड, इंदापूर, बारामतीला मिळणार दिलासा appeared first on Dainik Prabhat .
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १९ मध्ये राहणाऱ्या नागरिकांना अनेक मूलभूत नागरी समस्यांना रोज सामोरे जावे लागत आहे. शहरातील महत्त्वाच्या प्रभागांपैकी एक असलेल्या या भागात विकासाच्या घोषणा ऐकू येतात. मात्र, प्रत्यक्षात अनेक प्रश्न अद्याप कायम असल्याची खंत दिव्य मराठी ॲपच्या 'लढाई मनपाची, मुद्दा नागरिकांचा' टॉक शोमध्ये व्यक्त केली. प्रभाग क्रमांक १९ हा क्रांती चौकापासून सुरू होऊन बाळासाहेब ठाकरे चौक, श्रीराम चौक, वीर सावरकर चौक, शाहनूरमिया दर्गाह परिसर मार्गे बीड बायपासपर्यंत विस्तारलेला आहे. या प्रभागाची एकूण लोकसंख्या ३९,०९२ इतकी आहे. मात्र, इतक्या मोठ्या लोकसंख्येला आजही मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत आहे. खराब रस्त्यांमुळे अपघातात वाढ प्रभागातील रस्त्यांची अवस्था चिंताजनक आहे. अनेक अंतर्गत रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असून काही रस्त्यांचे काम अर्धवट अवस्थेत आहे. पावसाळ्यात या रस्त्यांवर पाणी साचते, तर उन्हाळ्यात धूळ उडते. त्यामुळे वाहनचालक, पादचारी, शालेय विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिक यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अपघातांची शक्यता वाढत असून वाहतूकही वारंवार विस्कळीत होते. यावर बोलताना प्रभागातील सुरैया बेगम पठाण म्हणतात की, 'मी शहानूरवाडी झोपडपट्टीमधील रहिवासी असून रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे आम्हाला प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. या रस्त्यामुळे आमच्या भागात अपघात झाल्यावर अनेकांचे जागीच जीव गेले आहेत. आमच्या भागाकडे ना कोणी फिरकत पण नाही. आम्ही कस जगावं हा प्रश्न आम्हाला कधी - कधी पडतो.' या भागातील रस्त्यांची दुरवस्था ही केवळ वाहतुकीपुरती मर्यादित नसून तिचा थेट परिणाम नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर होत आहे. रुग्णवाहिकांना अनेक वेळा अरुंद आणि खड्डेमय रस्त्यांमुळे उशीर होतो. तर खुल्या ड्रेनेजमुळे लोकांना भागात जाताना त्रास होतो. एवढच नवे तर सुरैया बेगम म्हणतात की भटक्या कुत्र्यांचा आम्हाला प्रचंड त्रास होतो. बाहेर कामासाठी पडलं की, ते अंगावर अटॅक करतात. ज्योतीनगर सुंदर आहे का? ज्योतीनगरमध्ये राहणाऱ्या दीपाली श्रीखंडे म्हणतात की, 'आपण आपलं घर सुंदर ठेवतो तसा आपला भागही सुंदर असावा अशी साधी अपेक्षा आम्हा नागरिकांची असते. आमच्याकडे मध्यंतरी घंटा गाडी व्यवस्थित येत नव्हती. पण आता ती सुरळीत आहे. मात्र, गाडीवाल्यांचा टाइम एक नाही. त्यामुळे कचरा जमा होतो आणि रस्त्यावरती कचऱ्याचे ढिगारे साचतात. लोक अक्षरशः चांगल्या रस्त्यांना कचरा कुंडी बनून टाकतात. केवळ कचराच नाही तर आमच्याकडे पाण्याची समस्याही तितकीच गंभीर आहे.' दुसरीकडे याच भागाबद्दल बोलताना 'सपर्णा चिंचवाल' म्हणतात की, 'येणाऱ्या नगरसेवकांकडून नागरिकांना काय अपेक्षा आहेत. हा मुख्य प्रश्न आहे. आमच्या भागात रस्ते चांगले आहेत. आम्हाला पाणी मिळत आणि आमच्याकडे घंटा गाडी देखील व्यवस्थित येते. त्यामुळे माझ्या मते आमच्या भागात कोणत्या समस्या आम्हाला तीव्र होतो असं मला वाटत नाही. पण ज्या भागात विकास पोहचू शकला नाही तिथे तो पोहोचला गेला पाहिजे एवढीच अपेक्षा आहे.' या विविध प्रतिक्रिया पाहता, प्रभाग क्रमांक १९ मधील वास्तव वेगवेगळ्या भागांत वेगवेगळे असल्याचे स्पष्ट होते. काही परिसरांमध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध असल्या तरी काही भागांत अद्याप रस्ते, पाणी, स्वच्छता आणि सुरक्षिततेसारख्या मूलभूत प्रश्नांशी नागरिकांना झगडावे लागत आहे. त्यामुळे या प्रभागातील विकास असमान असल्याचे चित्र समोर येत आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की, प्रभागातील काही ठराविक भागांपुरता विकास मर्यादित न राहता सर्व भागांपर्यंत समान पद्धतीने पोहोचणे आवश्यक आहे. यावर बोलताना ज्येष्ठ नागरिक म्हणतात की, राजकारणी लोकांनी एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की ते नागरिकांचे प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांनी स्वतःच्या विकासाकडे लक्ष न देता नागरिकांच्या विकासाकडे लक्ष दिले पाहिजे. या प्रभागातील नागरिकांनी रस्ते, पाणी, गटार आणि स्वच्छता या प्रश्नांबरोबरच एक मुद्दा वारंवार उपस्थित केला आहे, तो म्हणजे समान विकासाचा अभाव. काही भागांमध्ये सुविधा उपलब्ध असताना काही भागांमध्ये आजही नागरिकांना मूलभूत गरजांसाठी संघर्ष करावा लागत आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की, विकास कामे करताना संपूर्ण प्रभागाचा विचार होणे आवश्यक आहे. केवळ निवडक भागांमध्येच कामे न करता, ज्या भागांमध्ये अजूनही समस्या कायम आहेत, तिथे तातडीने उपाययोजना होणे गरजेचे आहे. या संदर्भात अनेक नागरिकांनी महानगरपालिकेकडे तक्रारी केल्याचे सांगितले जाते. मात्र तक्रारी करूनही समस्यांमध्ये फारसा बदल झालेला नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे. प्रभाग क्रमांक १९ मधील रस्त्यांची दुरुस्ती, पाणीपुरवठा सुधारणा, गटार स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापन या कामांकडे प्रशासनाकडून लक्ष दिले जाते का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १९ मधील नागरिकांना मूलभूत सुविधा केव्हा मिळणार, हा प्रश्न अद्यापही कायम आहे. कचऱ्याची समस्या सर्वात गंभीर रिजवान पठान म्हणाले की, 8 वर्षांपासून लोक रस्त्यावर कचरा फेकतात आमच्या प्रभागात गेली 8 वर्षे ही समस्या आहे. याकडे कुणाचेी लक्ष नाही. तर दुसरीकडे निवास कॉलनी ते देवानगरीला जोडणारा पुल आहे त्याला कठडे नाहीत, त्यावर कचरा फेकलेला असतो या पुलावरुन पायी जाणे तर सोडाच पण दुचाकी आणि चारचाकी घेऊन जाताना सुद्धा खूप त्रास होतो.
बांगलादेशचे भारतविरोधी युवा नेते मानले जाणारे 31 वर्षीय उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर हिंसाचार उसळला आहे. राजधानी ढाका येथे जाळपोळ आणि हिंसाचार करणाऱ्या आंदोलकांनी माजी पंतप्रधान शेख हसीना आणि त्यांच्या अवामी लीग पक्षावर हत्येचा आरोप केला आहे. हादी यांना गोळी मारल्यानंतर हल्लेखोर सीमा ओलांडून भारतात लपले असल्याचा आरोप आहे. हिंसक जमावाने एका हिंदू तरुणाला मारहाण करून ठार केले आणि त्याचा मृतदेह विवस्त्र करून फाशीवर लटकवले. अखेर हा हादी कोण आहे, ज्याच्या हत्येमुळे बांगलादेशात संताप उसळला आहे, हत्येच्या कटाचा संबंध भारताशी का जोडला जात आहे, फेब्रुवारीमध्ये बांगलादेशात सार्वत्रिक निवडणुका होऊ शकतील का, आजच्या एक्सप्लेनरमध्ये जाणून घेऊया… प्रश्न-1: रिक्षातून जात असताना हादी यांची गोळी मारून हत्या कशी झाली?उत्तर: बांगलादेश पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या शुक्रवारी म्हणजेच 12 डिसेंबर रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास उस्मान हादी बॅटरी रिक्षातून ढाका येथील फकिरापूल येथून विजयनगरकडे जात होते. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसले की, एक बाईक मागून रिक्षाजवळ आली, नंतर उजव्या बाजूला येऊन थांबली आणि बाईकवर मागे बसलेल्या व्यक्तीने अगदी जवळून हादीवर गोळी झाडली. बाईकवरील दोन्ही हल्लेखोरांनी हेल्मेट घातले होते. संपूर्ण घटना काही सेकंदात घडली आणि ते लगेच घटनास्थळावरून पळून गेले. गोळी डोक्यात लागल्याने हादी गंभीर जखमी झाला होता. इन्कलाब मंचाचे कार्यकर्ते मोहम्मद रफी, हादीच्या मागे दुसऱ्या रिक्षात होते. त्यांनी सांगितले की, ढाका येथील एका मशिदीत शुक्रवारच्या नमाजानंतर ते उच्च न्यायालयाच्या दिशेने जात होते, तेव्हा विजयनगरला पोहोचताच त्यांच्यावर हल्ला झाला. हादीला 15 डिसेंबर रोजी एअरलिफ्ट करून उपचारासाठी सिंगापूरला नेण्यात आले होते, जिथे 18 डिसेंबर रोजी सिंगापूर जनरल हॉस्पिटलमध्ये त्याचा मृत्यू झाला. आज 19 डिसेंबर रोजी हादीचा मृतदेह ढाका येथे आणण्यात आला आहे, परंतु त्यापूर्वीच रात्री ढाकामध्ये हिंसाचार उसळला होता. हादीची भारतविरोधी प्रतिमा आणि शेख हसीना सरकारच्या विरोधाला यामुळे तो बांगलादेशातील विद्यार्थी आणि विरोधकांचा नेता बनला. प्रश्न-2: हादी बांगलादेशात आंदोलक विद्यार्थ्यांचा नेता कसा बनला?उत्तर: उस्मान हादीचा जन्म दक्षिण बांगलादेशातील झालाकाठी जिल्ह्यातील नलचिटी गावात झाला होता. हादी इस्लामी धार्मिक वातावरणात मोठा झाला. 2011 मध्ये ढाका विद्यापीठातून राज्यशास्त्राचा अभ्यास पूर्ण केल्यानंतर, त्याने खाजगी विद्यापीठांमध्ये शिकवले आणि बांगलादेशातील परिस्थितीवर पुस्तके लिहिली. गेल्या वर्षी शेख हसीना सरकारविरोधातील निदर्शनांदरम्यान हादीचे राजकीय महत्त्व वाढले. ऑगस्ट 2024 मध्ये सत्तापालटानंतर ‘इन्कलाब मंच’ नावाचे नवीन संघटन उभे राहिले, हादी त्याचा मुख्य संयोजक आणि प्रवक्ता होता. हा मंच कट्टरपंथी इस्लामिक संघटना जमात-ए-इस्लामीच्या जवळचा मानला जातो. हादीने फेब्रुवारी 2025 मध्ये होणाऱ्या निवडणुकीत ढाका-8 जागेवरून अपक्ष उमेदवार म्हणून लढण्याची घोषणा केली होती. लेखिका तस्लिमा नसरीन यांनी सोशल मीडियावर लिहिले आहे की, 'एका जिहादीच्या मृत्यूनंतर हजारो जिहादी संपूर्ण बांगलादेशात दंगल करत आहेत. जे मिळेल ते तोडत आहेत, सर्व काही जाळून राख करत आहेत.' प्रश्न-3: हादीच्या हत्येचा कट कोणी रचला?उत्तर: हादीच्या हत्येमध्ये आवामी लीगशी संबंधित व्यक्तींची नावे समोर येत आहेत. असे म्हटले जात आहे की हादीची हत्या केल्यानंतर दोन्ही हल्लेखोर भारतात पळून गेले होते. बांगलादेश पोलिसांनी फैजल करीम मसूद उर्फ दाऊद खानला अटक केली आहे. फैजलला हादीवर गोळीबार करणारा मुख्य शूटर मानले जाते. तो अवामी लीगच्या विद्यार्थी शाखा, छात्र लीगशी संबंधित आहे. शेख हसीना यांच्या बंडानंतर बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार बनलेल्या मुहम्मद युनूस यांनी दहशतवादविरोधी कायद्यांतर्गत छात्र लीगवर बंदी घातली होती. बांगलादेशातील वृत्तपत्र प्रोथोमालोनुसार, हादीवर हल्ला झाला तेव्हा आलमगीर शेख नावाचा दुसरा एक व्यक्ती फैजलसोबत होता. बांगलादेश पोलिसांनी या दोघांना अटक करण्यासाठी माहिती देणाऱ्याला 50 लाख टाका (सुमारे 37 लाख रुपये) चे बक्षीस जाहीर केले होते. 15 डिसेंबर रोजी, बांगलादेशच्या रॅपिड ॲक्शन बटालियन (RAB)ने नारायणगंज परिसरातून फैजलचा आणखी एक साथीदार, 30 वर्षीय कबीर याला अटक केली. RAB च्या मीडिया विंगचे कमांडर MZM एन्तेखाब चौधरी यांनी सांगितले की कबीर या हल्ल्यात थेट सामील होता. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे की फैजल 4 डिसेंबर रोजी कबीर आणि इतर दोघांसोबत इन्किलाब मंच सांस्कृतिक केंद्रात घुसला होता, जिथे तो हादीसोबत बोलताना दिसला. फैजलने 9 डिसेंबर रोजी त्याच केंद्रात हादीसोबतच्या बैठकीलाही हजेरी लावली होती. यापूर्वी, RAB ने हादीच्या गोळीबाराच्या संदर्भात फैजलची पत्नी सामिया, तिची मैत्रीण मोनिका आणि तिचा मेहुणा शिपु यांना ताब्यात घेतले होते. प्रोथोम आलोनुसार, हादीच्या हत्येनंतर फैजल आणि आलमगीर भारतात घुसले होते. घटनेदरम्यान त्यांनी पाच वेळा वाहने बदलली होती. त्यांनी त्यांच्या बाईकवर बनावट लायसन्स प्लेट लावली होती आणि त्यांचे फोन व सिम कार्ड फेकून दिले होते. कतारस्थित झुल्करनैन सैयर नावाच्या पत्रकाराने सोशल मीडिया पोस्टमध्ये दावा केला होता की, फैजल आणि आलमगीर १२ डिसेंबर रोजी हलुआघाट सीमा ओलांडून भारतात घुसले होते आणि सध्या ते आसाममधील गुवाहाटीमध्ये आहेत. झुल्करनैन सैयरने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, भारतात प्रवेश केल्यानंतर, बांगलादेश सरकारचे माजी मंत्री जहांगीर कबीर नानक यांच्या खाजगी सचिवाने फैजलला एक भारतीय नंबर, +91-00-39-0 दिला होता. याच सिमचा वापर करून, फैजलने हादीवर हल्ल्याच्या रात्री अनेक फोन नंबरवर सेल्फी पाठवली होती. यापैकी एक फोटो गुवाहाटीमध्ये काढण्यात आला होता. ट्रूकॉलरवर हा नंबर शोधल्यास एक बंगाली संदेश दिसतो ज्यात लिहिले होते की, 'हा दहशतवाद्याचा मुलगा हादीचा मारेकरी आहे.' हादीने स्वतः अवामी लीगवर त्याच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप केला होता. 13 नोव्हेंबर रोजी एका फेसबुक पोस्टमध्ये, हादीने लिहिले होते की, गेल्या तीन तासांत, अवामी लीगच्या मारेकऱ्यांनी किमान 30 परदेशी नंबरवरून माझ्या नंबरवर फोन आणि मेसेज केले आहेत. मी सतत पाळत ठेवलेल्या स्थितीत आहे. ते माझे घर जाळून टाकतील. ते माझ्या आई, बहीण आणि पत्नीवर बलात्कार करतील आणि मला मारून टाकतील. तथापि, ढाकास्थित JagoNews24 च्या अहवालानुसार, 14 डिसेंबर रोजी, ढाका पोलिसांनी सांगितले होते की, हल्लेखोर भारतात घुसले असल्याचा कोणताही ठोस पुरावा नाही. अनेक बांगलादेशी राजकारणी आणि पत्रकार हादीच्या हत्येसाठी भारताला दोषी ठरवत आहेत. प्रश्न-4: हादीच्या हत्येप्रकरणी भारतावर कोणते आरोप केले जात आहेत?उत्तर: गेल्या वर्षी बांगलादेशात झालेल्या बंडानंतर, नॅशनल सिटीझन्स पार्टी नावाच्या दुसऱ्या पक्षाची स्थापना करण्यात आली होती. त्याचे नेते, युनूस सरकारमधील माजी मंत्री नाहिद इस्लाम यांनी हादीच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर अनेक पोस्ट केल्या होत्या. या पोस्टमध्ये नाहिदने लिहिले होते की, हादी बांगलादेशसाठी लढताना शहीद झाले. भारताने हादीचे मारेकरी आणि हसीनाला आमच्याकडे सोपवावे. 13 डिसेंबर रोजी बांगलादेश ट्रिब्यूनला दिलेल्या एका मुलाखतीत नाहिदने आरोप केला होता की भारताने हादीवर हल्ला केला होता. ढाका येथील वृत्तपत्र डेली सन नुसार, ढाकाच्या परराष्ट्र मंत्रालयाने बांगलादेशमधील भारतीय उच्चायुक्त प्रणय वर्मा यांना समन्स बजावले होते आणि भारत सरकारला विनंती केली होती की, हादीचे हल्लेखोर भारतीय हद्दीत प्रवेश केल्यास त्यांना अटक करून आमच्याकडे सोपवावे. वृत्तसंस्था पीटीआयनुसार, बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाने असेही म्हटले होते की, पळपुट्या शेख हसीना यांना भडकाऊ विधाने करू देण्याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे, ज्यात त्या आपल्या समर्थकांना बांगलादेशात दहशतवादी कारवाया करण्यासाठी चिथावत आहेत. त्यांचा उद्देश बांगलादेशातील आगामी निवडणुका निष्फळ करणे हा आहे.' प्रश्न-5: हादीच्या हत्येनंतर बांगलादेशात काय परिस्थिती आहे?उत्तर: हादीच्या मृत्यूच्या बातमीनंतर, 18 डिसेंबर रोजी रात्री उशिरा ढाकासह बांगलादेशातील अनेक भागांमध्ये उस्मान हादीचे समर्थक आणि विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हिंसाचार आणि जाळपोळ केली. भारतीय उच्चायुक्तांच्या निवासस्थानासमोर मोठा जमाव जमला होता. उच्चायुक्तांवरही दगडफेक करण्यात आली होती. हादीच्या हत्येच्या आणि अवामी लीगविरोधी घोषणांच्या साथीने अवामी लीगच्या कार्यालयातही तोडफोड आणि आग लावण्यात आली होती. बांगलादेशचे पहिले राष्ट्रपती आणि शेख हसीना यांचे वडील शेख मुजीबुर रहमान यांच्या निवासस्थानाची तोडफोड करण्यात आली होती. या घरावर फेब्रुवारी 2024 मध्ये आणि पुन्हा ऑगस्ट 2024 मध्ये दोनदा हल्ला करण्यात आला होता. शेख हसीना यांच्या अवामी लीग सरकारमधील माजी शिक्षण मंत्री मोहिबुल हसन चौधरी यांच्या घराची तोडफोड करून आग लावण्यात आली होती. बांगलादेशातील सर्वात मोठ्या वृत्तपत्रांच्या, डेली स्टार आणि प्रथम आलोच्या कार्यालयांची तोडफोड करून आग लावण्यात आली होती. सुमारे 25 पत्रकार अनेक तास या इमारतीत अडकले होते. विरोधकांच्या जमावाने एका हिंदू तरुणाला मारहाण करून ठार केले, नंतर त्याचे कपडे काढून त्याला झाडावर लटकवले आणि आग लावली. पोलिसांनी मृताची ओळख दीपू चंद्र दास अशी केली. तस्लिमा नसरीनने लिहिले, एका हिंदू तरुणाला झाडावर लटकवून जाळण्यात आले, पण कोणीही थरथरले नाही. सर्वांनी 'नारा-ए-तकबीर अल्लाह-ओ-अकबर'च्या घोषणा दिल्या. हा जिहादीस्तानचा खरा चेहरा आहे. प्रशासनाने हादीच्या सन्मानार्थ 20 डिसेंबर रोजी राज्य शोक दिन घोषित केला. युनूसने सांगितले की, शहीद उस्मान हादीचा मृत्यू देशाच्या राजकीय आणि लोकशाही जीवनासाठी मोठे नुकसान आहे. सरकार त्याच्या पत्नीची आणि एकुलत्या एक मुलाची जबाबदारी घेईल. दरम्यान, इन्कलाब मंचाने सांगितले की, दंगलखोर कोण होते हे त्यांना माहीत नाही. जमात-ए-इस्लामी आणि बीएनपी देखील हिंसाचारापासून दूर राहिले आहेत. सैन्याने ढाका आणि चितगावच्या बहुतेक भागांवर नियंत्रण मिळवले आहे. प्रश्न-6: हादीच्या हत्येचा बांगलादेशच्या निवडणुकीवर काय परिणाम होईल?उत्तर: शेख हसीना यांच्या बंडानंतर दीड वर्षांनी, 12 फेब्रुवारी 2026 रोजी बांगलादेशमध्ये संसदीय निवडणुका होणार आहेत. निवडणूक आयुक्त एएमएम नसीरुद्दीन यांनी हादीवरील हल्ल्याच्या एक दिवस आधी ही घोषणा केली होती. मे 2025 मध्ये, हसिनाच्या पक्षाला, अवामी लीगला नोंदणीतून निलंबित करण्यात आले होते, ज्यामुळे तो पुढील वर्षाच्या निवडणुकीत भाग घेऊ शकणार नाही. दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पक्ष, बीएनपीचे नेते आणि माजी पंतप्रधान खालिदा झिया गंभीर आजारी आहेत. बीएनपीला लवकर निवडणुका हव्या होत्या. तिसरा पक्ष, जमात-ए-इस्लामी बांगलादेशला भारतविरोधी मानले जाते. जमातने अप्रत्यक्षपणे युनुसला पाठिंबा दिला होता आणि युनुसने पक्षावरील बंदी उठवली होती. हादीला जमातच्या जवळचा देखील मानले जात होते. चौथी आघाडी नॅशनल सिटीझन्स पार्टी आहे. भारतविरोधी राजकारण बांगलादेशात प्रभावी आहे. त्यामुळे हादीच्या मृत्यूनंतर बांगलादेशात शांततापूर्ण निवडणुका घेणे कठीण वाटत आहे. मोहम्मद युनूसने हादीच्या हत्येला निवडणुकीपूर्वी हिंसा भडकवण्याचे षडयंत्र म्हटले आहे. युनूसने सांगितले की, कोणत्याही प्रकारची उदारता दाखवली जाणार नाही. हादीच्या हत्येत सामील असलेल्या सर्व लोकांना लवकरच न्यायव्यवस्थेसमोर आणले जाईल आणि त्यांना कठोर शिक्षा दिली जाईल. जेएनयूचे प्राध्यापक आणि परराष्ट्र व्यवहार तज्ज्ञ राजन कुमार म्हणतात की, युनूससमोर बांगलादेशातील परिस्थिती सामान्य करण्याचा मुख्य आव्हान आहे, जे कठीण वाटते. त्यामुळे, शांततापूर्ण निवडणुका होतील आणि लोकशाही सरकार स्थापन होईल की नाही, हे सांगणे कठीण आहे. प्रश्न-7: बांगलादेशातील सध्याच्या परिस्थितीचा भारतावर काय परिणाम?उत्तर: तज्ज्ञांच्या मते, हादीच्या मृत्यूमुळे बांगलादेशात भारतविरोधी भावना आणखी मजबूत होतील. भारतासाठी सर्वात मोठी चिंता ‘चिकन नेक’ किंवा सिलीगुडी कॉरिडॉरच्या सुरक्षेची आहे. भारताचा ईशान्य भाग केवळ 22 किमीच्या अरुंद पट्ट्याने उर्वरित भारताशी जोडलेला आहे, जो बांगलादेशने वेढलेला आहे. बांगलादेशात भारतविरोधी सरकार किंवा अस्थिरता या भागाच्या सुरक्षेसाठी मोठे आव्हान ठरू शकते.
‘गांधी’नावावरून वाद! मनरेगा योजनेतील बदलांविरोधात पुणे काँग्रेस आक्रमक
प्रभात वृत्तसेवा पुणे – महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) या जनहितकारी योजनेच्या तरतुदींमध्ये अत्यंत चुकीचे बदल केल्याचा आरोप करत पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने शुक्रवारी केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन केले.काँग्रेस प्रणित केंद्र शासनाने आपल्या कार्यकाळात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) ही जनहितकारी योजना निश्चित केली होती. मात्र केंद्र शासन […] The post ‘गांधी’ नावावरून वाद! मनरेगा योजनेतील बदलांविरोधात पुणे काँग्रेस आक्रमक appeared first on Dainik Prabhat .
Pune News: पुणे-महाबळेश्वर ई-शिवाई बस सुरू; पहा वेळापत्रक आणि आरक्षणाची संपूर्ण माहिती
प्रभात वृत्तसेवा पुणे – महाबळेश्वर, पाचगणी पर्यटनस्थळ हे पर्यटकांच्या आवडीचे ठिकाण. आता हिवाळा सुरू झाल्यामुळे महाबळेश्वरला जाणाऱ्या पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. प्रवाशांना आरामदायी, वातानुकुलीत पर्यावरणपुरक प्रवासासाठी स्वारगेट आगारातर्फे महाबळेश्वरसाठी वातानुकूलित ई-शिवाई बस सेवा सुरू केली आहे.स्वारगेट-महाबळेश्वर-स्वारगेट मार्गावर ई-शिवाई वातानुकूलित बसच्या एकूण चार फेऱ्या नियोजित आहेत. स्वारगेटला सकाळी साडेपाच, साडेसहा तर दुपारी तीन, चार वाजता […] The post Pune News: पुणे-महाबळेश्वर ई-शिवाई बस सुरू; पहा वेळापत्रक आणि आरक्षणाची संपूर्ण माहिती appeared first on Dainik Prabhat .
पुण्यात आज राजकीय भूकंप! तब्बल २२ माजी नगरसेवक करणार भाजपमध्ये प्रवेश
प्रभात वृत्तसेवा पुणे – महापालिका निवडणुकांची घोषणा झाली असून, सर्वच राजकीय पक्षांकडून इच्छुकांच्या मुलाखती संपवून उमेदवारांची यादी अंतिम करण्याचे काम सुरू आहे. असे असतानाच शहरातील शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष तसेच काॅग्रेसमधील माजी नगरसेवक भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. उद्या (शनिवारी) मुंबईतील प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हे […] The post पुण्यात आज राजकीय भूकंप! तब्बल २२ माजी नगरसेवक करणार भाजपमध्ये प्रवेश appeared first on Dainik Prabhat .
शहरात थंडीची लाट! पारा ७ अंशांवर घसरला; शिवाजीनगर, पाषाणमध्ये हुडहुडी भरवणारी थंडी
प्रभात वृत्तसेवा पुणे – सलग दुसऱ्या दिवशी शहरासह जिल्ह्यातील किमान तापमानात दोन ते तीन अंशाने घट झाल्यामुळे थंडीचा पारा ७ अंशापर्यंत खाली आला आहे. परिणामी जिल्ह्यातील बारामती, माळीण तर शहरातील पाषाण आणि शिवाजीनगर परिसरात पुन्हा थंडीची लाट आली .मागील आठवड्यात शहरासह उपनगरातील किमान तापमान १० ते ११ अंशाच्या पुढे गेल्यामुळे थंडीचा जोर ओसरला होता. मात्र, […] The post शहरात थंडीची लाट! पारा ७ अंशांवर घसरला; शिवाजीनगर, पाषाणमध्ये हुडहुडी भरवणारी थंडी appeared first on Dainik Prabhat .
काही वर्षांपूर्वी एका एकपात्री कार्यक्रमात एका कलाकाराने बहुतेक राजकीय नेत्यांची खिल्ली उडवली होती. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वड्रा राजकारणात सक्रिय झाल्या असल्यामुळे त्यांचाही विषय आला. प्रियंका गांधी यांना काँग्रेसमध्ये प्रमुख भूमिका मिळाली पाहिजे अशी काँग्रेसमधील नेत्यांची मागणी आहे. त्याचे कारण काय तर त्या त्यांच्या आजी इंदिरा गांधी यांच्यासारख्या दिसतात. तसे तर मग जयराम रमेशही दिसतात […] The post अग्रलेख : काँग्रेसची आशा appeared first on Dainik Prabhat .
प्रभात वृत्तसेवा पुणे – भाजप पुण्यात शिवसेनेसोबत युती करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर करताना राष्ट्रवादी काँग्रेससोबत मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यानंतर आता भाजप आमच्या माजी नगरसेवकांना पक्षात प्रवेश देत आहे, ही कसली मैत्री? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते करत आहेत. त्यामुळे पुण्यात राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाशी आघाडी करण्यास आमची […] The post PMC Election: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंच्या बैठकीत स्थानिक नेत्यांनी मांडली स्पष्ट भूमिका appeared first on Dainik Prabhat .
Nagar Parishad Election: मतदानाला जाताय ना? बारामती, फुरसुंगीसह ‘या’भागांत आज सार्वजनिक सुटी जाहीर
प्रभात वृत्तसेवा पुणे – राज्य निवडणूक आयोग यांच्या आदेशानुसार लोकशाहीचा पवित्र उत्सव साजरा करताना मतदान अधिकाऱ्यांनी आपले कर्तव्ये जबाबदारीने बजाविण्याबाबत सूचना दिल्या आहेत. मतदारांनी नगरपरिषदेच्या निवडणुकीकरिता उर्त्स्फूतपणे मतदान करावे, नागरिक व राजकीय पक्षांनी आदर्श आचारसहिंतेचे पालन करून शांततेत पूर्ण प्रक्रिया पार पाडावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे. राज्य […] The post Nagar Parishad Election: मतदानाला जाताय ना? बारामती, फुरसुंगीसह ‘या’ भागांत आज सार्वजनिक सुटी जाहीर appeared first on Dainik Prabhat .
Pune News: शिक्षण मंडळाचा कारभार ठप्प? कनिष्ठ लिपिकांची पदे रिक्त असल्याने कर्मचारी बेमुदत संपावर
प्रभात वृत्तसेवा पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कार्यालयांतील रिक्त पदे तातडीने भरावीत, या मागणीसाठी महाराष्ट्र शिक्षण बोर्ड कर्मचाऱ्यांनी बेमुदत आंदोलन पुकारले आहे. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील सर्व विभागीय मंडळांमधील कर्मचारी गेल्या तीन दिवसांपासून आंदोलन करत आहेत. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणेअंतर्गत कार्यरत असलेल्या ९ विभागीय मंडळ कार्यालयांमध्ये […] The post Pune News: शिक्षण मंडळाचा कारभार ठप्प? कनिष्ठ लिपिकांची पदे रिक्त असल्याने कर्मचारी बेमुदत संपावर appeared first on Dainik Prabhat .
Pune News: ‘हे गीत म्हणजे महासागराला अर्ध्य’! ९९ व्या मराठी साहित्य संमेलनाचे अधिकृत गीत प्रकाशित
प्रभात वृत्तसेवा पुणे – गीत लिहिणे ही वाटते तितकी सोपी गोष्ट नाही. एकवेळ चित्रपटाचे गीत लिहिणे सोपे आहे. संमेलनगीत लिहिणे ही फार वेगळी बाब आहे. ९९ व्या साहित्य संमेलनाच्या गीतामधून संमेलनासारख्या महासागराचा कार्यविस्तार, रूपरेषा, संमेलन भूमीचा इतिहास, परंपरा, भवताल यांना मुठीत पकडले आहे. हे गीत म्हणजे महासागरातून दोन ओंजळी पाणी घेऊन त्या सागरालाच अर्ध्य अर्पण […] The post Pune News: ‘हे गीत म्हणजे महासागराला अर्ध्य’! ९९ व्या मराठी साहित्य संमेलनाचे अधिकृत गीत प्रकाशित appeared first on Dainik Prabhat .
Chakan Accident: तळेगाव-चाकण रोडवर भीषण अपघात; ट्रक-रिक्षा धडकेत दोन ठार, दोघे गंभीर
प्रभात वृत्तसेवा पिंपरी – भरधाव ट्रकने समोरून येणाऱ्या रिक्षाला जोरदार धडक दिल्याने दोन प्रवाशांचा मृत्यू झाला असून अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना गुरुवारी (दि. १८ डिसेंबर) सकाळी वाघजाईनगर येथील तळेगाव चाकण रोडवर घडली.या प्रकरणी देशराज साहब सिंगलोधी (वय ३५, रा. महाळुंगे इंगळे) यांनी गुरुवारी (दि. १८) उत्तर महाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली […] The post Chakan Accident: तळेगाव-चाकण रोडवर भीषण अपघात; ट्रक-रिक्षा धडकेत दोन ठार, दोघे गंभीर appeared first on Dainik Prabhat .
सांगवीत रात्रीचा थरार! ‘कोयता गँग’चा पुन्हा धुमाकूळ; तरुणाला गाठून भररस्त्यात केला जीवघेणा हल्ला
प्रभात वृत्तसेवा पिंपरी – जुन्या भांडणाच्या रागातून एका टोळक्याने कोयता आणि दांडक्याने एका तरुणावर जीवघेणा हल्ला करून परिसरात दहशत निर्माण केली. ही घटना गुरुवारी (दि. १८ डिसेंबर) रात्री जुनी सांगवी येथील सी.क्यु.ए.ई. मेन गेट शेजारील गणपती मंदिराजवळ घडली.या प्रकरणी प्रथमेश प्रशांत कवडे (वय २१, रा. जुनी सांगवी) यांनी गुरुवारी (दि. १८) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद […] The post सांगवीत रात्रीचा थरार! ‘कोयता गँग’चा पुन्हा धुमाकूळ; तरुणाला गाठून भररस्त्यात केला जीवघेणा हल्ला appeared first on Dainik Prabhat .
PCMC Election: भाजप-राष्ट्रवादीत जोरदार फिल्डिंग; बंडखोरी रोखण्यासाठी नेत्यांची नवी चाल..जाणून घ्या
प्रभात वृत्तसेवा पिंपरी – महापालिका निवडणुकीची घोषणा होताच पिंपरी चिंचवड शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. सर्वच पक्षांतील इच्छुकांनी उमेदवारी मिळविण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे. भाजपसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, आरपीआय, वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना या प्रमुख पक्षांकडे इच्छुकांची संख्या मोठी असल्याने बंडखोरीची भीती वाढली आहे. ही बंडखोरी रोखण्यासाठी सर्वच पक्ष उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम […] The post PCMC Election: भाजप-राष्ट्रवादीत जोरदार फिल्डिंग; बंडखोरी रोखण्यासाठी नेत्यांची नवी चाल..जाणून घ्या appeared first on Dainik Prabhat .
नागरिक श्वास कसा घेणार? आकुर्डीतील प्रदूषण रोखणारी यंत्रणा बंद; डॉक्टरांचा गंभीर इशारा
प्रभात वृत्तसेवा रावेत – आकुर्डी परिसरातील खंडोबा चौकात बसविण्यात आलेली ड्राय मिस्ट बेस्ड फाउंटन ही हवेतील धूलिकण नियंत्रित करणारी महत्त्वाची यंत्रणा अनेक आठवड्यांपासून बंद आहे. परिसरात वेगाने सुरू असलेल्या मेट्रोच्या कामामुळे या यंत्रणेच्या दुरुस्तीस विलंब झाल्याचे समोर येत असून त्याचा थेट परिणाम स्थानिक हवेच्या गुणवत्तेवर होत आहे. गत काही महिन्यांपासून प्रदूषणाची पातळी सातत्याने वाढत असून […] The post नागरिक श्वास कसा घेणार? आकुर्डीतील प्रदूषण रोखणारी यंत्रणा बंद; डॉक्टरांचा गंभीर इशारा appeared first on Dainik Prabhat .
Revenue Officers Strike: महसूल अधिकाऱ्यांचे राज्यव्यापी आंदोलन स्थगित; शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद
प्रभात वृत्तसेवा वडगाव मावळ – पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील गौण खनिज उत्खनन प्रकरणात निलंबित करण्यात आलेल्या महसूल अधिकाऱ्यांच्या निलंबनाबाबत राज्य शासनाने सकारात्मक भूमिका घेतल्याने महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांचे राज्यव्यापी आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी निलंबनाची कारवाई तीन दिवसांच्या आत मागे घेण्यात येईल, असे स्पष्ट आश्वासन दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. […] The post Revenue Officers Strike: महसूल अधिकाऱ्यांचे राज्यव्यापी आंदोलन स्थगित; शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद appeared first on Dainik Prabhat .
Pune Election: राज्यातील स्थानिक स्वराज संस्थांचा ‘फायनल राऊंड’! १४३ जागांसाठी आज मतदान
प्रभात वृत्तसेवा पुणे – नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध न्यायालयात अपील झाले होते. त्यामुळे जिल्ह्यातील बारामती, फुरसुंगी-उरुळी देवाची यांसह 23 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या अध्यक्ष व सदस्यपदांसाठी; तसेच विविध नगरपरिषदा व नगरपंचायतींमधील 143 सदस्यपदांच्या जागांसाठी आज (20 डिसेंबर) मतदान होणार आहे. तर ३ डिसेंबर रोजी झालेले मतदान व उद्या होणाऱ्या मतदानाची मतमोजणी […] The post Pune Election: राज्यातील स्थानिक स्वराज संस्थांचा ‘फायनल राऊंड’! १४३ जागांसाठी आज मतदान appeared first on Dainik Prabhat .
प्रभात वृत्तसेवा राजगुरुनगर – राजगुरुनगर नगर परिषद निवडणूक मतमोजणी येत्या रविवारी (दि 21) रोजी सकाळी दहा वाजता सुरू होणार असून त्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.राजगुरुनगर नगर परिषद निवडणुकीच्या रविवारी दि. 21 रोजी होणार्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. शैलजा पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन मतमोजणी प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी […] The post Rajgurunagar: नगरपरिषदेसाठी उद्या मतमोजणी! चिठ्ठीद्वारे ठरणार समान मतांचा निकाल; वाचा महत्त्वाच्या सूचना appeared first on Dainik Prabhat .
प्रभात वृत्तसेवा बारामती – सासरकडील शेतजमीन मिळविण्याच्या उद्देशाने कट रचून सासरा आणि मेहुणीचा खून केल्याप्रकरणी बारामती जिल्हा व सत्र न्यायालयाच्या तदर्थ न्यायाधीश एस. आर. पाटील यांनी जावयासह तिघांना जन्मठेप तसेच प्रत्येकी २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.विशाल सोपान वत्रे (रा. मसनरवाडी, ता. दौंड), जयदीप जयराम चव्हाण (रा. येडेवाडी, लिंगाळी, ता. दौंड) आणि केरबा नारायण मेरगळ […] The post Baramati Crime: सासरा आणि मेहुणीच्या मारेकऱ्यांना जन्मठेप! बारामती कोर्टाचा ऐतिहासिक निकाल..वाचा सविस्तर appeared first on Dainik Prabhat .
Khed News: महाळुंगे इंगळे गावाला मिळाली नवी ओळख; प्रशासकीय इमारत व शाळेचे लोकार्पण
प्रभात वृत्तसेवा महाळुंगे इंगळे – श्रीक्षेत्र महाळुंगे इंगळे (ता. खेड) येथे नूतन प्रशासकीय ग्रामपंचायत इमारत तसेच नूतन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इमारतीचे उद्घाटन खेड तालुक्याचे आमदार बाबाजी काळे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.खेड तालुक्यातील श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या महाळुंगे इंगळे ग्रामपंचायतीची जुनी इमारत मोडकळीस आली होती. त्या जागी उभारण्यात आलेली नवी प्रशासकीय ग्रामपंचायत इमारत […] The post Khed News: महाळुंगे इंगळे गावाला मिळाली नवी ओळख; प्रशासकीय इमारत व शाळेचे लोकार्पण appeared first on Dainik Prabhat .
पुणे-सातारा हायवेवर मध्यरात्री थरार! भरधाव कारने दोन दुचाकींना उडवले; ४ तरुण जखमी
प्रभात वृत्तसेवा नसरापूर – पुणे-सातारा महामार्गावर वेळू गावाच्या हद्दीत (ता. भोर) शुक्रवारी (दि. १९) मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास भरधाव कारने दोन दुचाकींना पाठीमागून धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात चार तरुण जखमी झाले असून सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी भूषण किरण गिरीगोसावी (वय २२, सध्या रा. कोथरूड, पुणे) यांनी राजगड पोलीस […] The post पुणे-सातारा हायवेवर मध्यरात्री थरार! भरधाव कारने दोन दुचाकींना उडवले; ४ तरुण जखमी appeared first on Dainik Prabhat .
Indapur News: राजू शेट्टी, सदाभाऊ खोतांना कोर्टाचा मोठा दिलासा; इंदापूर ऊस आंदोलनाचा निकाल जाहीर
प्रभात वृत्तसेवा इंदापूर – इंदापूरमध्ये ऊसदराच्या मागणीसाठी सन २०१२ मध्ये झालेल्या तीव्र ऊस आंदोलनाशी संबंधित दाखल गुन्ह्यांप्रकरणी तब्बल १३ वर्षांनंतर मोठा न्यायालयीन दिलासा मिळाला आहे. या आंदोलनादरम्यान दाखल करण्यात आलेल्या एकूण आठ गुन्ह्यांपैकी तीन गुन्ह्यांत माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह सतिशभैय्या काकडे, माजी मंत्री सदाभाऊ खोत, निलेश देवकर यांच्यासह ५१ आंदोलकांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. […] The post Indapur News: राजू शेट्टी, सदाभाऊ खोतांना कोर्टाचा मोठा दिलासा; इंदापूर ऊस आंदोलनाचा निकाल जाहीर appeared first on Dainik Prabhat .
उरुळी कांचन हादरले! ६० वर्षीय वृद्धाचा दिवसाढवळ्या थरारक खून; रक्ताच्या थारोळ्यात सापडला मृतदेह
प्रभात वृत्तसेवा उरुळी कांचन – पेठ (ता. हवेली) येथील एका 60 ते 62 वयोगटातील व्यक्तीचा अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने खून केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. 19) उघडकीस आली. ही घटना पेठ-वडाचीवाडी ग्रामपंचायत हद्दीतील म्हसोबा मंदिर परिसरात घडली असून या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.संपत चौधरी (वय अंदाजे 60 ते 62, रा. पानमळा, वडाचीवाडी, पेठ) […] The post उरुळी कांचन हादरले! ६० वर्षीय वृद्धाचा दिवसाढवळ्या थरारक खून; रक्ताच्या थारोळ्यात सापडला मृतदेह appeared first on Dainik Prabhat .
पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’! हायवेवरील हॉटेलमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा भांडाफोड
प्रभात वृत्तसेवा लोणी काळभोर – पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील प्रसिद्ध हॉटेल जयश्री रेस्ट्रो, बार आणि लॉजिंग येथे खुलेआम सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश करण्यात लोणी काळभोर पोलिसांना यश आले आहे. ही कारवाई कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील कवडीपाट टोलनाक्याजवळ शुक्रवारी (दि. 19) दुपारी साडे दोन वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. हॉटेलमध्ये बेकायदेशीर वेश्याव्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना […] The post पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’! हायवेवरील हॉटेलमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा भांडाफोड appeared first on Dainik Prabhat .
Shaurya Din 2026: शौर्य दिनासाठी लोणी काळभोर पोलिसांचा मास्टर प्लॅन; २४ तास राहणार करडी नजर
प्रभात वृत्तसेवा लोणी काळभोर – 1 जानेवारी रोजी शौर्य दिनासाठी येणा-या नागरिकांना कुठलाही त्रास होऊ नये अशा पद्धतीने पोलिस प्रशासन काम करणार असून या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज आहे. पोलीस ठाण्याच्या हद्दीत ग्रामसुरक्षा दलाच्या सहाय्याने पोलीस प्रशासन 24 तास गस्त घालणार आहे अशी माहिती लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ […] The post Shaurya Din 2026: शौर्य दिनासाठी लोणी काळभोर पोलिसांचा मास्टर प्लॅन; २४ तास राहणार करडी नजर appeared first on Dainik Prabhat .
Wagholi News: महिला शक्तीचा जागर! ८०० रणरागिनींनी गाजवलं क्रिकेटचं मैदान; पाहा कोण ठरलं विजेते?
प्रभात वृत्तसेवा वाघोली – वाघोली-खराडी वूमन्स प्रीमियर लीग सीझन 2 ही भव्य महिला क्रिकेट स्पर्धा प्रचंड उत्साहात आणि जल्लोषात पार पडली. महिलांच्या क्रीडा क्षेत्राला नवी दिशा देणार्या या स्पर्धेत तब्बल 60 संघांनी सहभाग घेतला असून 800 पेक्षा अधिक महिला खेळाडूंनी आपल्या क्रिकेट कौशल्याचे प्रभावी प्रदर्शन केले. त्यामुळे वाघोली-खराडी परिसरात ही स्पर्धा विशेष चर्चेचा विषय ठरली. […] The post Wagholi News: महिला शक्तीचा जागर! ८०० रणरागिनींनी गाजवलं क्रिकेटचं मैदान; पाहा कोण ठरलं विजेते? appeared first on Dainik Prabhat .
३० वर्षांची दारूबंदी फक्त नावापुरतीच? पारगावच्या मुख्य चौकात ‘हे’दृष्य पाहून ग्रामस्थ हादरले
प्रभात वृत्तसेवा पारगाव – सुमारे ३० वर्षांपासून दारूबंदीसाठी जिल्ह्यात प्रसिद्ध असणाऱ्या पारगावामध्ये मुख्य चौकाच्या कडेला रिचवून टाकलेल्या मोकळ्या प्लॅस्टिक पिशव्यांचा (फुगे) खच पडत आहे.पारगाव हे तालुक्यातील एक मोठे गाव असून ३० वर्षांपूर्वी स्व. आबासाहेब करमरकर, वसुधा सरदार व काही तरुणांनी दारूबंदीसाठी उभ्या केलेल्या चळवळीमुळे आजतागाईत गावात वाईन्स किंवा परमिट रूमची दुकाने निर्माण झाली नाहीत. म्हणून […] The post ३० वर्षांची दारूबंदी फक्त नावापुरतीच? पारगावच्या मुख्य चौकात ‘हे’ दृष्य पाहून ग्रामस्थ हादरले appeared first on Dainik Prabhat .
‘भाईगिरी’भोवली! बारामतीत खंडणी उकळणारा तिसरा आरोपी पोलिसांच्या ताब्यात
प्रभात वृत्तसेवा बारामती – कटफळ (ता. बारामती) येथील अवजारे बनवणाऱ्या एका उद्योजकाकडून स्वतःला ‘बारामतीचा डॉन’ असल्याचे सांगत वारंवार धमक्या देऊन ८५ हजार रुपयांची खंडणी वसूल केल्याप्रकरणी फरार असलेला तिसऱ्या आरोपीला बारामती तालुका पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने आरोपीस तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.फिर्यादी हे बारामती एमआयडीसी परिसरात अवजारे बनवणारी कंपनी चालवतात. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, […] The post ‘भाईगिरी’ भोवली! बारामतीत खंडणी उकळणारा तिसरा आरोपी पोलिसांच्या ताब्यात appeared first on Dainik Prabhat .
Bhor News: सारोळ्यात ४३ लाखांचा दारू साठा जप्त; पुणे-सातारा महामार्गावर मोठी कारवाई, दोघांना अटक
प्रभात वृत्तसेवा सारोळा – गोवा राज्यात उत्पादित आणि महाराष्ट्रात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेल्या विदेशी मद्याची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या टोळीचा राज्य उत्पादन शुल्क, सासवड विभागाने पर्दाफाश केला आहे. पुणे-सातारा महामार्गावरील सारोळे (ता. भोर) येथे सापळा रचून केलेल्या या कारवाईत ट्रक, स्कॉर्पिओ आणि मद्यसाठ्यासह एकूण ४३ लाख ५७ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन आरोपींना […] The post Bhor News: सारोळ्यात ४३ लाखांचा दारू साठा जप्त; पुणे-सातारा महामार्गावर मोठी कारवाई, दोघांना अटक appeared first on Dainik Prabhat .
Manchar Election: मंचरचा ‘बाजीगर’कोण? रविवारी फुटणार विजयाचे फटाके, शहरात उत्सुकता शिगेला
प्रभात वृत्तसेवा मंचर – मंचर नगरपंचायतीच्या निवडणुकीची मतमोजणी रविवार, दि.२१ रोजी होणार असून, ती तारीख जशी जशी जवळ येत आहे.तशी तशी नगराध्यक्ष पदाचे तसेच नगरसेवक पदाचे उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांची धडधड वाढत चालली आहे.संपूर्ण शहराचे लक्ष आता केवळ मतमोजणी आणि विजय उमेदवाराच्या अधिकृत घोषणेकडे लागले आहे. मंचर नगरपंचायतीच्या निवडणुकीत एका नगराध्यक्ष पदासाठी तसेच सोळा प्रभागांमधील […] The post Manchar Election: मंचरचा ‘बाजीगर’ कोण? रविवारी फुटणार विजयाचे फटाके, शहरात उत्सुकता शिगेला appeared first on Dainik Prabhat .
वाईकरांचे लक्ष निकालाकडे! सकाळी १० वाजता उघडणार मतपेट्या; ‘असा’आहे प्रशासनाचा प्लॅन
प्रभात वृत्तसेवा वाई : वाई नगरपरिषद पंचवार्षिक निवडणुकीच्या निकालासाठी प्रशासनाने सर्व पातळ्यांवर तयारी पूर्ण केली असून, मतमोजणी प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक व सुरक्षित वातावरणात पार पडावी यासाठी सविस्तर नियोजन करण्यात आले आहे. मतमोजणीसाठी नेमण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचार्यांचे प्रशिक्षण घेण्यात आले असून योग्य त्या सूचना केल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मतमोजणीसाठी एकूण 11 टेबलांची व्यवस्था […] The post वाईकरांचे लक्ष निकालाकडे! सकाळी १० वाजता उघडणार मतपेट्या; ‘असा’ आहे प्रशासनाचा प्लॅन appeared first on Dainik Prabhat .
प्रभात वृत्तसेवा सातारा – सातारा येथे होणाऱ्या नियोजित १५ व्या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाच्या निमित्ताने विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.” घालमोड्या दादांचे संमेलन व आमची भूमिका ” या विषयावर ज्येष्ठ पत्रकार व विचारवंत निरंजन टकले (नाशिक) यांचे व्याख्यान मंगळवार, दि. २३ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता दैवज्ञ सांस्कृतिक भवन, यादव गोपाळ पेठ, सातारा येथे […] The post Vidrohi Sahitya Sammelan: ‘घालमोड्या दादांचे संमेलन’ नक्की कोणाचे? ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले उलगडणार गुपित appeared first on Dainik Prabhat .
Satara News: औंध-गणेशवाडी रोड ठरतोय ‘मृत्यूचा सापळा’; अजून किती बळी गेल्यावर प्रशासनाला जाग येणार?
प्रभात वृत्तसेवा औंध – औंध ते गणेशवाडी रस्त्यावरील अरुंद वळण व पुल वाहनधारकांसाठी जीवघेणा व मृत्यूचा सापळा पडला आहे. औंध येथील कोल्हाटी वस्ती नजीकच्या पुलाचे व रस्त्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने रुंदीकरण करावे व हा मार्ग वाहतुकीसाठी सुरक्षित करावा अशी मागणी केली जात असून मागील दोन दिवसांपूर्वी एका दुचाकी वाहनधारकाचा हकनाक बळी या अरूंद रस्ता व […] The post Satara News: औंध-गणेशवाडी रोड ठरतोय ‘मृत्यूचा सापळा’; अजून किती बळी गेल्यावर प्रशासनाला जाग येणार? appeared first on Dainik Prabhat .
Satara Election: शिंदे गटाचा भाजपला ‘दे धक्का’! साताऱ्यातील ‘त्या’प्रभागाचा वाद आता थेट हायकोर्टात
प्रभात वृत्तसेवा सातारा – सातारा नगरपरिषदेच्या प्रभाग क्र. 5 (ब) साठी दि. 2 डिसेंबर रोजी झालेल्या निवडणुकीला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. ही याचिका शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे उमेदवार निलेश मोरे यांनी दाखल केली असून, भ्रष्टाचार, धमकावणे, हिंसाचार तसेच आदर्श आचारसंहितेच्या गंभीर उल्लंघनामुळे ही निवडणूक रद्द ठरविण्याची मागणी […] The post Satara Election: शिंदे गटाचा भाजपला ‘दे धक्का’! साताऱ्यातील ‘त्या’ प्रभागाचा वाद आता थेट हायकोर्टात appeared first on Dainik Prabhat .
दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, दिनांक २० डिसेंबर २०२५
पंचांगआज मिती मार्गशीर्ष अमावस्या ०७.१५ पर्यंत शके १९४७,चंद्र नक्षत्र मूळ,योग गंड चंद्र राशी धनु, भारतीय सौर २९ मार्गशीर्ष शके १९४७, शनिवार दिनांक २० डिसेंबर २०२५ .मुंबईचा सूर्योदय ०७.०६, मुंबईचा सूर्यास्त ०६.०५ मुंबईचा चंद्रोदय ०७.१७ मुंबईचा चंद्रास्त ०६.०५ राहू काळ ०९.५१ ते ११.१३ .मार्गशीर्ष अमावास्या-समाप्ती-सकाळी-०७;१२,संत गाडगे महाराज पुण्यतिथिदैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)मेष : दैनंदिन महत्त्वाची कामे पूर्ण होतील. वृषभ : विरोधक तसेच इतर शत्रूंवर विजय मिळवू शकाल.मिथुन : कुटुंबातील तरुण-तरुणींच्या एक समस्या सुटतील.कर्क : विचारवंत व्यक्तींच्या सहवासाचा लाभ मिळेल.सिंह : एखादी महत्त्वाची घटना घडू शकते.कन्या : कुटुंबात सुसंवाद राहील.तूळ : नवीन कामे उत्साहाने हाती घ्याल. वृश्चिक : मनोरंजनाकडे कल राहील.धनू : अपेक्षित महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.मकर : नोकरीतील परिस्थिती उत्तम राहील. कुंभ : व्यापार विस्तार करू शकाल.मीन : व्यवसायात भागीदाराची मदत होऊ शकेल.
IND vs SA India beat South Africa T20I Series : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पाचव्या आणि निर्णायक टी-२० सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा ३० धावांनी पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने ५ सामन्यांची ही मालिका ३-१ अशा फरकाने आपल्या नावावर केली आहे. टी-२० विश्वचषक २०२४ नंतर भारतीय संघाचा या फॉरमॅटमधील हा सलग सातवा द्विपक्षीय […] The post IND vs SA : भारताचा आफ्रिकेवर ‘विराट’ विजय! मालिका ३-१ ने खिशात; हार्दिक-तिलकसह वरुण ठरला विजयाचा शिल्पकार appeared first on Dainik Prabhat .
अहमदाबाद : नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेल्या अटीतटीच्या लढतीत भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा ३० धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने पाच सामन्यांची टी-२० मालिका ३-१ अशा फरकाने जिंकली आहे. भारताने विजयासाठी दिलेल्या २३२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा डाव ८ बाद २०१ धावांवर मर्यादित राहिला. भारताचा हा १४ वा टी-२० मालिका विजय असून, २०२५ या वर्षाचा शेवट टीम इंडियाने दणक्यात केला आहे.https://prahaar.in/2025/12/19/india-in-the-final-of-the-u19-asia-cup/भारताचा विजय : ३० धावांनी विजय मिळवून मालिका ३-१ ने जिंकली.स्टार परफॉर्मर्स : हार्दिक पंड्या (६३ धावा, १ विकेट), तिलक वर्मा (७३ धावा), वरुण चक्रवर्ती (४ विकेट).विक्रमी धावसंख्या : भारताने ५ बाद २३१ धावांचा डोंगर उभारला होता.फलंदाजीचा थरार : हार्दिक-तिलकची शतकी भागीदारीनाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला उतरलेल्या भारताची सुरुवात वादळी झाली. अभिषेक शर्मा (३४) आणि संजू सॅमसन (३७) यांनी पहिल्या विकेटसाठी ६३ धावांची भागीदारी केली. कर्णधार सूर्यकुमार यादव (५) स्वस्तात बाद झाल्यानंतर, हार्दिक पंड्या आणि तिलक वर्मा या जोडीने आफ्रिकन गोलंदाजांची पिसं काढली. दोघांनी चौथ्या विकेटसाठी अवघ्या ४९ चेंडूत १०५ धावांची तुफानी भागीदारी केली. अवघ्या १६ चेंडूत अर्धशतक झळकावत एकूण ६३ धावा केल्या. ३० चेंडूत अर्धशतक पूर्ण करत ७३ धावांची झुंजार खेळी केली.दक्षिण आफ्रिकेचा पाठलाग : डिकॉकच्या विकेटने फिरला सामनामोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना सलामीवीर क्विंटन डिकॉकने (६५ धावा, ३५ चेंडू) आक्रमक सुरुवात केली. त्याने हेंड्रिक्ससोबत ६९ धावांची सलामी दिली. मात्र, वरुण चक्रवर्तीने हेंड्रिक्सला बाद करून ही जोडी फोडली. डिकॉक जोपर्यंत खेळत होता, तोपर्यंत आफ्रिकेच्या आशा जिवंत होत्या. जसप्रीत बुमराहने डिकॉकला बाद करताच आफ्रिकेचा डाव गडगडला. यानंतर वरुण चक्रवर्तीने पुन्हा एकदा आपली जादू दाखवत एडन मार्कराम आणि डोनोव्हन फरेरा यांना सलग चेंडूंवर बाद करून आफ्रिकेचे कंबरडे मोडले. डेव्हिड मिलर (१८) बाद झाल्यावर भारताचा विजय निश्चित झाला.
National Herald case : नॅशनल हेराॅल्ड प्रकरणी ईडी उच्च न्यायालयात
Sonia Gandhi | Rahul Gandhi – नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी ईडीने शुक्रवारी दिल्ली उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. विशेष न्यायालयाने त्या प्रकरणात नुकताच कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि त्यांचे पुत्र राहुल गांधी यांना दिलासा दिला. त्या निर्णयाला ईडीने आव्हान दिले आहे. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणातील मनी लॉण्डरिंग संदर्भात ईडीकडून याआधी आरोपपत्र दाखल करण्यात आले. मात्र, त्या आरोपपत्राची […] The post National Herald case : नॅशनल हेराॅल्ड प्रकरणी ईडी उच्च न्यायालयात appeared first on Dainik Prabhat .
मतदानाच्या आदल्यादिवशी EVMमध्ये छेडछाड? राजकीय वातावरण तापलं, कुठे घडला प्रकार?
ठाणे : अंबरनाथ नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शनिवार २० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी प्रशासनाने काटेकोर तयारी केली असून, सुमारे १५०० पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तैनाती करण्यात आली आहे. मात्र, मतदानाच्या आदल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी शिंदे गटाच्या नेत्यांनी EVM मशीनमध्ये छेडछाड झाल्याचा गंभीर आरोप करून राजकीय वर्तुळात खळबळ माजवली आहे. या प्रकरणात शिंदे गटाचे […] The post मतदानाच्या आदल्यादिवशी EVMमध्ये छेडछाड? राजकीय वातावरण तापलं, कुठे घडला प्रकार? appeared first on Dainik Prabhat .
Pune News : पोलिसांनी वेळेत दोषारोपपत्र दाखल न केल्याने डिफॉल्ट जामीन
पुणे – वानवडी परिसरात ऑक्टोबर महिन्यामध्ये रोहन प्रकाश अंगारके नामक व्यक्तीकडे पोलिस तपासा दरम्यान मेफेड्रॉन (एम डी) नामक अमली पदार्थ मोठ्या प्रमाणात आढळून आला होता. हा अमली पदार्थ आरोपी विकण्यासाठी जात असताना पोलिसांनी आरोपीस अटक केली व त्या सदर्भात वानवडी पोलीस स्टेशन येथे एन.डी.पी.एस कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला होता. आरोपीने ॲड अजित पवार व ॲड […] The post Pune News : पोलिसांनी वेळेत दोषारोपपत्र दाखल न केल्याने डिफॉल्ट जामीन appeared first on Dainik Prabhat .
Sanju Samson double milestone in IND vs SA 5th T20I : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाचव्या टी-२० सामन्यात संजू सॅमसनने आपल्या नावावर खास पराक्रम केला आहे. प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळालेल्या संजूने या सामन्यात केवळ ३७ धावांची खेळी केली, तरीही त्याने टी-२० क्रिकेटमधील दोन मोठे टप्पे पार करत दिग्गजांच्या यादीत प्रवेश केला आहे. […] The post IND vs SA : सॅमसनचा मोठा धमाका! टी-२० क्रिकेटमध्ये केला खास पराक्रम; विराट-रोहितच्या क्लबमध्ये मारली एन्ट्री appeared first on Dainik Prabhat .
ठाकरेंच्या खासदाराचं अमित शाहांना पत्र, थेट एकनाथ शिंदेंना पदावरून हटवण्याची केली मागणी
मुंबई : सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील सावरी गावात मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रँचने १३ डिसेंबर रोजी छापा टाकून एका दुर्गम भागातील शेडमध्ये सुमारे ४५ किलो एमडी (मेफेड्रोन) अमली पदार्थ जप्त केले. या ड्रग्जची बाजारकिंमत अंदाजे १४५ कोटी रुपये आहे. या प्रकरणात अनेकांना अटक करण्यात आली असून, हे शेड “तेज यश” नावाच्या रिसॉर्टपासून अवघ्या १२०० मीटर अंतरावर […] The post ठाकरेंच्या खासदाराचं अमित शाहांना पत्र, थेट एकनाथ शिंदेंना पदावरून हटवण्याची केली मागणी appeared first on Dainik Prabhat .
IND vs SA : संजूचा नादच खुळा! १००० धावांचा टप्पा पार करत अभिषेक-सूर्याच्या पंगतीत पटकावले स्थान
भारतीय संघाचा धडाकेबाज सलामीवीर संजू सॅमसनने दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या शेवटच्या टी-२० सामन्यात आपल्या फलंदाजीने मैदानात वादळ निर्माण केले. मिळालेल्या संधीचे सोने करत संजूने केवळ धावांचा पाऊस पाडला नाही, तर आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये आपल्या १,००० धावांचा टप्पाही दिमाखात पूर्ण केला. विशेष म्हणजे, सर्वात जलद १,००० धावा करण्याच्या बाबतीत त्याने अनेक दिग्गज खेळाडूंना मागे टाकले आहे.सर्वात वेगवान १००० धावा: संजूने मोडले राहुल आणि तिलकाचे रेकॉर्डटी-२० कारकिर्दीत १००० धावा पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या चेंडूंच्या संख्येनुसार, संजू सॅमसनने आता हार्दिक पांड्याच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. संजूने ही कामगिरी करण्यासाठी फक्त ६७९ चेंडू घेतले. यादरम्यान त्याने केएल राहुल आणि तिलक वर्मा यांसारख्या खेळाडूंना पिछाडीवर टाकले आहे.https://prahaar.in/2025/12/19/ahmedabad-t20-tilak-hardiks-stormy-innings-helps-india-post-232-runs-against-south-africa/भारताच्या सर्वात कमी चेंडूत १००० टी-२० धावा ५२८ – अभिषेक शर्मा ५७३ – सूर्यकुमार यादव ६७९ – हार्दिक पंड्या ६७९ – संजू सॅमसन ६८६ – केएल राहुल ६९० – तिलक वर्मासंथ सुरुवात पण ऐतिहासिक षटकार!या सामन्यापूर्वी संजूला १००० धावांचा टप्पा ओलांडण्यासाठी फक्त ५ धावांची गरज होती. डावाची सुरुवात त्याने अत्यंत संयमाने केली आणि तिसऱ्या चेंडूवर खाते उघडले. मात्र, दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मार्को जॅन्सनला मारलेला खणखणीत षटकार ऐतिहासिक ठरला. याच षटकारासह त्याने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या १००० धावा पूर्ण केल्या. भारतासाठी हा टप्पा गाठणारा तो १४ वा भारतीय फलंदाज आणि तिसरा यष्टीरक्षक-फलंदाज ठरला आहे.भारतीय संघात तीन मोठे बदलनाणेफेकीदरम्यान कर्णधार सूर्यकुमार यादवने टीम इंडियामध्ये तीन महत्त्वाचे बदल केल्याचे जाहीर केले. शुभमन गिलच्या जागी संजू सॅमसनला सलामीची संधी देण्यात आली. गोलंदाजीमध्ये हर्षित राणाच्या जागी अनुभवी जसप्रीत बुमराहचे पुनरागमन झाले. फिरकीपटू कुलदीप यादवच्या ऐवजी वॉशिंग्टन सुंदरला अंतिम ११ मध्ये स्थान मिळाले. पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषकाच्या दृष्टीने हा सामना आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मालिका जिंकण्यापेक्षा, संघ म्हणून आम्हाला नक्की काय हवे आहे, हे अजमावण्याची ही सर्वोत्तम वेळ आहे, असे सूर्यकुमारने यावेळी स्पष्ट केले.दोन्ही संघातील खेळाडूभारत : अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग.दक्षिण आफ्रिका : क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), रीझा हेंड्रिक्स, एडन मार्कराम (कर्णधार), डेवाल्ड ब्रेविस, डेव्हिड मिलर, डोनोव्हन फरेरा, जॉर्ज लिंडे, मार्को जॅन्सन, कॉर्बिन बॉश, लुंगी एनगिडी, ओटनील बार्टमन.
Election News : आपची 21 उमेदवारांची पहिली यादी जाहीर
मुंबई – आम आदमी पक्षाने (आप) आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत सर्व २२७ जागांवर उमेदवार उभे करण्याची घोषणा करताना २१ उमेदवारांची पहिली यादी शुक्रवारी जाहीर केली. भारताचे प्रमुख शहर असतानाही मुंबईची अवस्था बिकट आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे वार्षिक बजेट 75 हजार कोटी रुपये असूनही नागरिकांना दर्जेदार सार्वजनिक सेवा मिळत नाहीत. देशातील सर्वाधिक कर भरणाऱ्या मुंबईकरांना निकृष्ट सुविधा […] The post Election News : आपची 21 उमेदवारांची पहिली यादी जाहीर appeared first on Dainik Prabhat .
सेवागिरी रथावर ८७ लाख ४० हजार रुपये अर्पण
पुसेगाव : श्रीसेवागिरी महाजांच्या रथोत्सवासाठी विविध भागातून आलेल्या भाविकांनी मोठ्या भक्तीभावाने यावेळी रथावर ८७ लाख ४० हजार रुपयांच्या नोटा अर्पण केल्या. यावर्षी ७५ हजार रुपयांनी वाढ झाली आहे. गुरुवार सकाळी दहा वाजता कृष्णा खारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे, राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे, आमदार मनोज घोरपडे यांच्या हस्ते रथ पुजन झाले. यावेळी मठाधिपती […] The post सेवागिरी रथावर ८७ लाख ४० हजार रुपये अर्पण appeared first on Dainik Prabhat .
अहमदाबाद टी-२०: तिलक-हार्दिकची तुफानी खेळी भारताचा दक्षिण आफ्रिकेसमोर धावांचा २३२ डोंगर
अहमदाबाद : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील अंतिम आणि निर्णायक सामना आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगला आहे. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची अक्षरशः धुलाई करत २० षटकांत ५ बाद २३१ धावांची विशाल धावसंख्या उभारली आहे. या डावाचे मुख्य आकर्षण ठरला तो अष्टपैलू हार्दिक पांड्या. त्याने अवघ्या १६ चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. हे कोणत्याही भारतीय फलंदाजाकडून टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये झळकावलेले दुसरे वेगवान अर्धशतक आहे. युवराज सिंगच्या (१२ चेंडू) नावावर अजूनही अव्वल स्थान आहे. हार्दिकने आपल्या ६३ धावांच्या खेळीत ५ चौकार आणि ५ उत्तुंग षटकार खेचले.मालिकेत आधीच दोन शतके झळकावलेल्या तिलक वर्माने आपला फॉर्म कायम राखत ४० चेंडूंत नाबाद ६८ धावांची संयमी पण आक्रमक खेळी केली. त्याने ३० चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले होते. तिलक आणि हार्दिक यांच्यात चौथ्या विकेटसाठी नाबाद ९९ धावांची भागीदारी झाली, ज्यामुळे भारताला २०० पार मजल मारता आली. अखेरचे वृत्त हाती आले तेव्हा दक्षिण आफ्रिकेला मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी २३१ धावांचे कठीण आव्हान पार करावे लागणार आहे.डावातील महत्त्वाचे टप्पे:संजू सॅमसनचे पुनरागमन: शुभमन गिलच्या जागी संघात आलेल्या संजू सॅमसनने पॉवरप्लेमध्ये फटकेबाजी करत ३७ धावा केल्या.अभिषेक शर्माची सलामी: अभिषेकने २१ चेंडूंत ३४ धावांची वेगवान सुरुवात करून दिली.सूर्याची अपयशी मालिका: कर्णधार सूर्यकुमार यादव पुन्हा एकदा मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरला, तो अवघ्या ५ धावांवर बाद झाला.दक्षिण आफ्रिकेकडून कॉर्बिन बॉशने २ बळी घेतले, तर जॉर्ज लिंडेने संजू सॅमसनचा महत्त्वाचा बळी टिपला.भारतीय संघ सध्या मालिकेत २-१ ने आघाडीवर असून, हा सामना जिंकल्यास भारत ही मालिका ३-१ ने खिशात घालेल.भारताच्या फलंदाजांची आक्रमकता:हार्दिक पांड्या : ६३ (२५ चेंडू) (५ चौकार, ५ षटकार)तिलक वर्मा : ६८ (४० चेंडू) (३ चौकार, ४ षटकार)संजू सॅमसन : ३७ (२२ चेंडू)अभिषेक शर्मा : ३४ (२१ चेंडू)शिवम दुबे नाबाद : ३ (१० चेंडू)जितेश शर्मा नाबाद : ०
SIR तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचा पश्चिम बंगाल दौरा, ३२०० कोटींचे प्रकल्प सुरू
मुंबई : सध्या पश्चिम बंगालमध्ये SIR मुद्द्यावरून तणावपूर्ण वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राज्य दौरा होत असल्याने राजकीय व प्रशासकीय पातळीवर विशेष हालचालींना वेग आला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी २० डिसेंबर रोजी पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर जाणार आहेत. सकाळी सुमारे ११.१५ वाजता ते नादिया जिल्ह्यातील राणाघाट येथे राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करतील. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान उपस्थितांना संबोधितही करणार आहेत.या दौऱ्यात पंतप्रधान सुमारे ३२०० कोटी रुपयांच्या दोन राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. यामध्ये नादिया जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३४ वरील ६६.७ किलोमीटर लांबीच्या बाराजागुली ते कृष्णनगर या मार्गाच्या चौपदरीकरणाचा समावेश आहे.तसेच उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३४ वरील १७.६ किलोमीटर लांबीच्या बारासात ते बाराजागुली या मार्गाच्या चौपदरीकरणाची पायाभरणीही पंतप्रधान मोदी करणार आहेत.हे दोन्ही प्रकल्प कोलकाता आणि सिलीगुडी यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरणार आहेत. या महामार्गांमुळे प्रवासाचा वेळ सुमारे दोन तासांनी कमी होण्याची शक्यता असून वाहतुकीचा प्रवाह अधिक सुरळीत होणार आहे. त्यामुळे वाहनांचा परिचालन खर्च कमी होण्यास मदत होईल तसेच कोलकाता, पश्चिम बंगालमधील इतर जिल्हे आणि शेजारील देशांशी संपर्क अधिक मजबूत होणार आहे.या प्रकल्पांमुळे परिसरातील आर्थिक विकासाला चालना मिळणार असून पर्यटन क्षेत्रालाही मोठी गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
पंतप्रधान येत्या २० आणि २१ डिसेंबरला आसाम दौऱ्यावर
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २० आणि २१ डिसेंबरला आसामला भेट देणार आहेत. दिनांक २० डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता पंतप्रधान गुवाहाटी येथे पोहोचतील. तेथे ते लोकप्रिय गोपीनाथ बरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नव्या टर्मिनल इमारतीची पाहणी आणि उद्घाटन करतील. याप्रसंगी ते उपस्थितांना संबोधित देखील करणार आहेत.दिनांक २१ डिसेंबर रोजी सकाळी पावणेदहाच्या सुमारास पंतप्रधान गुवाहाटी येथील बोरागाव येथे असलेल्या शहीद स्मारक क्षेत्रापाशी जाऊन हुतात्म्यांना आदरांजली वाहतील, त्यानंतर ते दिब्रुगडमधील नामरुप येथे पोहोचतील आणि तेथे आसाम व्हॅली खते आणि रसायने कंपनीच्या अमोनिया-युरिया खत प्रकल्पाचे भूमिपूजन करतील. या ठिकाणी देखील पंतप्रधान सभेला संबोधित करतील.दिनांक २० डिसेंबर रोजी पंतप्रधानांच्या हस्ते लोकप्रिय गोपीनाथ बारदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नव्या टर्मिनल इमारतीचे उद्घाटन होईल. ही नवी इमारत म्हणजे आसाममधील जोडणी व्यवस्था, आर्थिक विस्तार आणि जागतिक सहभाग याबाबतीत एक परिवर्तनकारी टप्पा ठरेल.नुकत्याच बांधून पूर्ण झालेल्या आणि सुमारे १ .४ लाख चौरस मीटर क्षेत्रावर पसरलेल्या या नव्या टर्मिनल इमारतीची रचना दर वर्षी १ .३ कोटी प्रवाशांची हाताळणी करू शकेल अशा पद्धतीने करण्यात आली असून या कामाला धावपट्ट्या, हवाई क्षेत्र विषयक प्रणाली, अॅप्रोन्स तसेच टॅक्सीवे यांच्या संदर्भातील महत्त्वाच्या अद्यायावतीकरणाचे पाठबळ लाभले आहे.निसर्ग संकल्पनेवर आधारित असलेल्या भारताच्या पहिल्या विमानतळ टर्मिनलचे डिझाईन आसामच्या जैवविविधता आणि सांस्कृतिक वारशातून प्रेरणा घेऊन, बांबू ऑर्किड्स या संकल्पनेपासून प्रेरित आहे. या टर्मिनलमध्ये स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या सुमारे १४० मेट्रिक टन ईशान्येकडील बांबूचा नाविन्यपूर्ण वापर करण्यात आला आहे. काझीरंगापासून प्रेरित हिरवीगार लँडस्केप, जापी नक्षीकाम, प्रतिष्ठित गेंड्याचे प्रतीक आणि कोपोऊ फुलांचे प्रतिबिंब दर्शवणारे ५७ ऑर्किड-प्रेरित स्तंभ या रचनेला वेगळेच सौंदर्य देतात. जवळपास एक लाख स्थानिक प्रजातींच्या वनस्पतींनी सजलेले एक अनन्यसाधारण आकाश वन आगमन करणाऱ्या प्रवाशांना वनाचा अनुभव देते.हे टर्मिनल प्रवाशांची सुविधा आणि डिजिटल नवोन्मेषाच्या बाबतीत नवीन मापदंड स्थापित करते. जलद सुरक्षा तपासणीसाठी फुल-बॉडी स्कॅनर, डिजीयात्रा-सक्षम संपर्कविरहित प्रवास, स्वयंचलित सामान हाताळणी, फास्ट-ट्रॅक इमिग्रेशन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित विमानतळ संचालन यांसारखी वैशिष्ट्ये अखंड, सुरक्षित आणि कार्यक्षम प्रवासाची खात्री देतात.२१ डिसेंबरच्या सकाळी नामरूपला जाण्यापूर्वी, पंतप्रधान ऐतिहासिक आसाम आंदोलनातील हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शहीद स्मारक क्षेत्राला भेट देतील. सहा वर्षे चाललेले हे जनआंदोलन परकीयमुक्त आसाम आणि राज्याच्या अस्मितेच्या संरक्षणासाठीच्या सामूहिक संकल्पाचे प्रतीक होते.दिवसाच्या उत्तरार्धात, पंतप्रधान आसाममधील दिब्रुगड येथील नामरूप येथे, ब्रह्मपुत्रा व्हॅली फर्टिलायझर कॉर्पोरेशन लिमिटेडच्या सध्याच्या आवारात उभारण्यात येणाऱ्या नवीन ब्राउनफील्ड अमोनिया-युरिया खत प्रकल्पाचे भूमिपूजन करतील.पंतप्रधानांच्या शेतकरी कल्याणाच्या दृष्टिकोनाला पुढे नेत, १०,६०० कोटी रुपयांपेक्षा जास्त अंदाजित गुंतवणुकीचा हा प्रकल्प आसाम आणि शेजारील राज्यांच्या खतांची गरज पूर्ण करेल, आयातीवरील अवलंबित्व कमी करेल, मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करेल आणि प्रादेशिक आर्थिक विकासाला चालना देईल. हा प्रकल्प औद्योगिक पुनरुज्जीवन आणि शेतकरी कल्याणाचा आधारस्तंभ आहे.
रचना संसद महाविद्यालयाचा रौप्य महोत्सव; ‘आउट ऑफ द बॉक्स’ कला कार्यशाळेचे आयोजन
मुंबई : रचना संसद कॉलेज यांचे रौप्य महोत्सव वर्ष म्हणजेच 25 वर्ष पूर्ण झाली. महाविद्यालयातर्फे आयोजित केलेल्या मास्टरक्लास या उपक्रमाला रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त योग जुळून आला. या उपक्रमाचा विषय “आउट ऑफ दी बॉक्स “हा होता . कार्यशाळा नालीदार (कॉरुगेटेड) व पॅकेजिंग बॉक्सचा कला प्रतिष्ठापना (Art Installation) या माध्यमासाठी सर्जनशील पुनर्वापर कसा करता येतो याची ओळख करून देते. दैनंदिन वापरातील टाकाऊ साहित्याचे अर्थपूर्ण, मोठ्या आकारातील कलाकृतींमध्ये रूपांतर करणे हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश आहे, ज्यातून कल्पना, भावना आणि सामाजिक मूल्ये व्यक्त केली जातात. याचे मार्गदर्शन माजी विद्यार्थी डॉ. सुमित पाटील यांनी केले . त्यांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांना नवीन दृष्टिकोन लाभला.रचना संसद महाविद्यालयाला जशी २५ वर्षे पूर्ण झाली तसे आउट ऑफ दी बॉक्स जाऊन पुटठ्याचा बॉक्स पासून दोन नवीन उपक्रम घेण्यात आले. ज्यात या बॉक्स पासून पौराणिक काळातील खेळ जसे पंचिशी बनवणे हा उपक्रम होता . या खेळात विविध शैक्षणिक पायऱ्या दर्शविण्यात आल्या होत्या . एका गटाने वृक्षाद्वारे इतिहासातील २५ तत्वांचा उल्लेख केला .ही कार्यशाळा शाश्वतता आणि पर्यावरण जागरूकतेवरही भर देते, ज्यामुळे टाकाऊ साहित्य हे एक मौल्यवान संसाधन म्हणून पाहण्याची दृष्टी विकसित होते. बॉक्स कापणे, दुमडणे, थर लावणे आणि जोडणी करून सहभागी कुटुंब, समाज, पर्यावरण, आठवणी किंवा कल्पनाशक्ती यांसारख्या विषयांची अभिव्यक्ती करतात. असे महाविद्यालाच्या मुख्याध्यापिका डॉ अदिती झा यांनी आपले मत व्यक्त केले.
भारत U19 आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत
मुंबई : भारताच्या युवा संघाने अंडर-१९ आशिया चषक २०२५ स्पर्धेत दमदार कामगिरी सुरूच ठेवत उपांत्य फेरीत श्रीलंकेचा आठ विकेट्सनी पराभव केला. या विजयासह भारताने स्पर्धेतील सलग चौथा सामना जिंकत अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे.दुबईतील आयसीसी अकॅडमी मैदानावर झालेल्या या पावसामुळे प्रभावित सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत ७ गडी गमावून १३८ धावा केल्या. श्रीलंकेच्या डावावर भारतीय गोलंदाजांनी चांगले नियंत्रण ठेवत धावगती रोखली.प्रत्युत्तरात भारतीय संघाने आक्रमक आणि संयमी खेळी करत केवळ १८ षटकांत २ गडी गमावून लक्ष्य गाठले. विहान आणि आरोन यांनी अर्धशतकी खेळी साकारत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. भारताने १२ चेंडू राखून सामना जिंकत आपली ताकद दाखवून दिली.या विजयासह भारत अंडर-१९ आशिया चषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला असून आता अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यात चुरशीचा सामना रंगणार आहे. युवा संघाच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे भारतीय क्रिकेटप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
1xBet प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, युवराज सिंह ते सोनू सूद यांच्या मालमत्ता जप्त
नवी दिल्ली : ऑनलाइन सट्टेबाजीशी संबंधित 1xBet अॅप प्रकरणात प्रवर्तन निदेशालयाने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणातील मनी लॉन्ड्रिंग चौकशीत भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंह, रॉबिन उथप्पा तसेच बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींच्या कोट्यवधी रुपयांच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत.ईडीकडून करण्यात आलेल्या नव्या प्रोव्हिजनल अटॅचमेंटमध्ये युवराज सिंह, रॉबिन उथप्पा, अभिनेत्री उर्वशी रौतेला, अभिनेता सोनू सूद, खासदार-अभिनेत्री मिमी चक्रवर्ती, अभिनेता अंकुश हाजरा आणि अभिनेत्री नेहा शर्मा यांचा समावेश आहे.ईडीने जप्त केलेल्या मालमत्तांमध्ये युवराज सिंह यांची सुमारे २.५ कोटी रुपये, रॉबिन उथप्पा यांची ८.२६ लाख रुपये, उर्वशी रौतेला यांची २.०२ कोटी रुपयांची मालमत्ता असून ही मालमत्ता त्यांच्या आईच्या नावावर नोंदणीकृत आहे. सोनू सूद यांची १ कोटी रुपयांची मालमत्ता, मिमी चक्रवर्ती यांची ५९ लाख रुपये, अंकुश हाजरा यांची ४७.२० लाख रुपये तर नेहा शर्मा यांची १.२६ कोटी रुपयांची मालमत्ता अटॅच करण्यात आली आहे.ही चौकशी कथित बेकायदेशीर बेटिंग अॅप्सशी संबंधित असून या अॅप्सच्या माध्यमातून गुंतवणूकदार आणि सर्वसामान्य नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचा तसेच मोठ्या प्रमाणावर करचुकवेगिरी झाल्याचा आरोप आहे.1xBet ही जागतिक स्तरावर ओळखली जाणारी बेटिंग कंपनी असून गेल्या १८ वर्षांपासून बेटिंग इंडस्ट्रीत कार्यरत आहे. या प्लॅटफॉर्मवर हजारो क्रीडा स्पर्धांवर सट्टा लावण्याची सुविधा उपलब्ध असून कंपनीची वेबसाइट आणि अॅप ७० भाषांमध्ये कार्यरत असल्याची माहिती आहे.आजच्या कारवाईत ईडीने एकूण ७.९३ कोटी रुपयांच्या मालमत्ता अटॅच केल्या आहेत. याआधी या प्रकरणात शिखर धवन यांच्या ४.५५ कोटी रुपये आणि सुरेश रैना यांच्या ६.६४ कोटी रुपयांच्या मालमत्ताही जप्त करण्यात आल्या होत्या. आतापर्यंत 1xBet प्रकरणात ईडीकडून एकूण १९.०७ कोटी रुपयांच्या मालमत्ता अटॅच करण्यात आल्या आहेत.
Pune Crime : येरवडा कारागृहात कैद्यावर प्राणघातक हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू
पुणे : येरवडा कारागृहात सराईत गुन्हेगारांनी केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या एका कैद्याचा उपचारादरम्यान ससून सर्वोपचार रुग्णालयात शुक्रवारी मृत्यू झाला. या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल नागनाथ कांबळे (वय २६, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) असे मृत कैद्याचे नाव आहे. या प्रकरणी आकाश सतीश चंडालिया (वय ३०, रा. जयजवाननगर, येरवडा) आणि […] The post Pune Crime : येरवडा कारागृहात कैद्यावर प्राणघातक हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू appeared first on Dainik Prabhat .
AUS vs ENG : ‘हे तंत्रज्ञान काढून टाका!’, स्निकोमीटरच्या चुकीच्या निर्णयामुळे मिचेल स्टार्क संतापला
Mitchell Starc fumes as faulty Snickometer decisions : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटीत खेळापेक्षा वादाचीच जास्त चर्चा रंगली आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला असून ऑस्ट्रेलियाने आपली पकड मजबूत केली असली, तरी खराब तंत्रज्ञानामुळे कांगारूंच्या गोटात प्रचंड संताप पाहायला मिळत आहे. विशेषतः अनुभवी वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने मैदानावरील ‘स्निकोमीटर’ (Snickometer) तंत्रज्ञानाला हटवण्याची मागणी केली […] The post AUS vs ENG : ‘हे तंत्रज्ञान काढून टाका!’, स्निकोमीटरच्या चुकीच्या निर्णयामुळे मिचेल स्टार्क संतापला appeared first on Dainik Prabhat .
Devendra Fadnavis : “ड्रग्ज प्रकरणाशी शिंदेंना जोडण्याचा प्रयत्न चुकीचा”–देवेंद्र फडणवीस
Eknath Shinde | Devendra Fadnavis – सातारा जिल्ह्यातील ड्रग्ज कारखाना प्रकरणाशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जोडण्याच्या काँग्रेसच्या आरोपांवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी तीव्र टीका केली. शिंदे यांचा या प्रकरणाशी कोणताही संबंध नसून काँग्रेसचे आरोप पूर्णपणे राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुंबईत पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, उपमुख्यमंत्री शिंदे यांना ड्रग्ज कारखान्याशी […] The post Devendra Fadnavis : “ड्रग्ज प्रकरणाशी शिंदेंना जोडण्याचा प्रयत्न चुकीचा” – देवेंद्र फडणवीस appeared first on Dainik Prabhat .
ऐन निवडणुकीत भाजपचा मोठा निर्णय; दिग्गज आमदाराची तडकाफडकी उचलबांगडी, नेमकं काय घडलं?
नाशिक : महानगरपालिकांच्या निवडणूकांसाठी भाजपाने मुलाखतींचा पहिला टप्पा पार करताना तयारीला सुरुवात केली. मात्र मध्येच पक्षातील गटबाजी उफाळून आल्याने, भाजपला आगामी निवडणूकांसाठी आपला कर्णधारच बदलावा लागला आहे. महिनाभरापूर्वी नाशिक महानगरपालिकेच्या निवडणूक प्रमुखपदावर आमदार राहुल ढिकलेंची नियुती करण्यात आली होती. मात्र आता भाजपने ढिकलेंना हटवून त्याजागी आमदार देवयानी फरांदेंकडे निवडणूकीची जबाबदारी सोपवली आहे. मात्र वरिष्ठांच्या तडकाफडकी […] The post ऐन निवडणुकीत भाजपचा मोठा निर्णय; दिग्गज आमदाराची तडकाफडकी उचलबांगडी, नेमकं काय घडलं? appeared first on Dainik Prabhat .
आशिया चषकाचा महासंग्राम! अंतिम फेरीत पुन्हा IND vs PAK आमनेसामने; रविवारी रंगणार हायव्होल्टेज थरार!
IND vs PAK Final in Under-19 Asia Cup 2025 : अंडर-१९ आशिया चषक २०२५ च्या विजेतेपदासाठी आता भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी आमनेसामने येणार आहेत. आपापल्या उपांत्य फेरीत भारताने श्रीलंकेचा, तर पाकिस्तानने बांगलादेशचा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली आहे. रविवारी होणाऱ्या या ऐतिहासिक सामन्याकडे आता संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष लागले आहे. भारताचा श्रीलंकेवर […] The post आशिया चषकाचा महासंग्राम! अंतिम फेरीत पुन्हा IND vs PAK आमनेसामने; रविवारी रंगणार हायव्होल्टेज थरार! appeared first on Dainik Prabhat .
Election News : शिंदेसेनेकडून मुंबईत स्वबळाची तयारी.! 227 जागांसाठी उमेदवारांच्या घेतल्या मुलाखती
Election News – मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकविण्यासाठी भाजप व शिंदेसेनेने तयारी सुरु केली आहे. दोन्ही पक्षांमध्ये जागा वाटपाची बोलणीची पहिली फेरी देखील झाली असून दोन्ही पक्षांनी सर्व प्रभागातील इच्छूक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती देखील पूर्ण केल्या आहेत. दोन्हीपक्षातील कार्यकर्ते ठामपणाने युती होणार असे जरी सांगत असले तरी देखील शिंदेसेनेने सावध भूमिका घेताना, पूर्ण 227 उमेदवारांच्या मुलाखती […] The post Election News : शिंदेसेनेकडून मुंबईत स्वबळाची तयारी.! 227 जागांसाठी उमेदवारांच्या घेतल्या मुलाखती appeared first on Dainik Prabhat .
विदर्भ, मराठवाडा, उत्तर-पश्चिम महाराष्ट्र, ठाणे विभागातील पदाधिकारी उपस्थित...राष्ट्रवादी काँग्रेस आणि मुख्यमंत्री यांची बैठक आज अपेक्षित ;महायुती म्हणून सामोरे जायचे यावर धोरण ठरवले जाण्याची शक्यता...मुंबई - राज्यातील २९ महानगरपालिकेंच्या निवडणूका जाहीर झाल्या असून दिनांक २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. अशावेळी त्या - त्या जिल्ह्यासाठी नेमलेले समन्वयक, शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष यांच्यासमवेत आढावा बैठक घेतल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.महिला आर्थिक विकास मंडळ सभागृहात पार पडलेल्या बैठकीत विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, लातूर, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर, जळगाव, धुळे, पश्चिम महाराष्ट्रातील पिंपरी - चिंचवड, पुणे, सांगली, इचलकरंजी, कोल्हापूर, सोलापूर, मुंबई - ठाणे विभागातील कल्याण' डोंबिवली, ठाणे शहर, मिरा-भाईंदर, वसई - विरार या महानगर पालिका क्षेत्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यासोबत राजकीय परिस्थिती आणि महायुती म्हणून सामोरे जाताना नेमकी कोणती पाऊले उचलली गेली पाहिजेत व आतापर्यंत त्या- त्या महानगरपालिकेत मित्रपक्षांशी चर्चा झाली असेल याबाबतचा अहवाल घेतला असेही सुनिल तटकरे यांनी सांगितले.आज (शुक्रवारी) रात्री राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्यासोबत बैठक होणार आहे. त्यावेळी चर्चा होईल. राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांनाही याची माहिती दिली जाईल आणि कदाचित आमची आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बैठक अपेक्षित आहे. ती बैठक झाली तर राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणूकांना महायुती म्हणून सामोरे जायचे यावर धोरण ठरवले जाईल असे स्पष्ट मत सुनिल तटकरे यांनी व्यक्त केले.महायुतीबाबत ठिकठिकाणी वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. मी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलल्यानंतर भाजप प्रभारी यांच्याशी चर्चा करत आहे. त्यामुळे या सर्व निवडणूका महायुती म्हणून सामोरे जाण्याचे धोरण ठरले जाईल असे पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना सुनिल तटकरे यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली.प्रत्येक महानगरपालिकानिहाय राजकीय परिस्थिती वेगवेगळी आहे. ज्या ठिकाणी सत्ता आहे ते अधिक संख्याबळ मागणे हे स्वाभाविक आहे. कार्यकर्त्यांच्या भावना जरुर असतात परंतु महायुती म्हणून चर्चेच्या अनेक फेरी घडवाव्या लागत असतात. परंतु महायुती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अनुकूल आहे असेही सुनिल तटकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांवर बोलताना सांगितले.
जुबीन गर्ग मृत्यू प्रकरणात घातपाताचा संशय नाही, सिंगापूर पोलिसांचा खुलासा
सिंगापूर : भारतीय नागरिक जुबीन गर्ग यांच्या मृत्यूबाबत सिंगापूर पोलिसांनी अधिकृत निवेदन जारी करत. या प्रकरणाबाबत सोशल मीडियावर सुरू असलेल्या तर्कवितर्कांची दखल घेत सिंगापूर पोलिस दलाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.सिंगापूर पोलिस दलाच्या माहितीनुसार, जुबीन गर्ग यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सध्या सिंगापूर कोरोनर्स अॅक्ट २०१० अंतर्गत सुरू आहे. आतापर्यंत झालेल्या तपासात कोणताही घातपात किंवा गुन्हेगारी कट आढळून आलेला नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.दरम्यान, भारतातील माध्यमांमध्ये या प्रकरणी विशेष तपास पथकाने चार जणांवर हत्येचा गुन्हा दाखल केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले असले तरी सिंगापूर पोलिसांकडून सध्या कोणताही संशयास्पद प्रकार नोंदवण्यात आलेला नाही.सिंगापूर पोलिसांचा तपास पूर्ण झाल्यानंतर हा अहवाल राज्य कोरोनरकडे सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर कोरोनर इन्क्वायरी घेण्यात येणार असून ही प्रक्रिया मृत्यूचे कारण आणि परिस्थिती स्पष्ट करण्यासाठी असते. ही चौकशी जानेवारी आणि फेब्रुवारी २०२६ दरम्यान होणार असून त्याचा निष्कर्ष सार्वजनिक केला जाणार आहे.सिंगापूर पोलिस दलाने या प्रकरणाचा सखोल आणि व्यावसायिक पद्धतीने तपास केला जात असल्याचे नमूद करत नागरिकांना अप्रमाणित माहिती पसरवू नये आणि अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे.
जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी राज्याची पणन व्यवस्था अत्याधुनिक व सर्व सोयी-सुविधायुक्त करण्यासाठी शासन प्रयत्नशीलमुंबई : महाराष्ट्रात उत्पादित डाळिंबाचा हंगामातील पहिला कंटेनर मुंबईतील जेएनपीटी बंदरातून समुद्रमार्गे अमेरिकेसाठी रवाना करण्यात आला असून, कृषी पणन मंडळाच्या वाशी नवी मुंबई येथील विकिरण सुविधा केंद्रावरून हा कंटेनर रवाना करण्यात आला आहे. राज्यातील फळनिर्यातीच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा टप्पा आहे,अशी माहिती राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी दिली.सध्याच्या काळात अमेरिका - भारत कृषी-निर्यातविषयक घडणाऱ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमध्ये उच्चस्तरीय चर्चा सुरू आहेत. अशा परिस्थितीत डाळिंबाचा पहिला कंटेनर रवाना होणे हे भारताची विश्वासार्हता, गुणवत्ता आणि आंतरराष्ट्रीय मानकांशी सुसंगततेचे प्रतीक असल्याचे मानले जात आहे.यासंदर्भात पणनमंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील उत्पादित होणारे फळे भाजीपाला आणि इतर शेतमालाला राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात स्पर्धात्मक दर मिळण्यासाठी जागतिक स्पर्धेत टिकेल अशी पणन व्यवस्था सक्षम करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. आंबे,डाळिंब इतर फळे व भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांच्या मेहनतीला जागतिक बाजारपेठेत स्पर्धात्मक मूल्य मिळावे, यासाठी राज्य शासन, कृषि पणन मंडळ आणि केंद्र शासन प्रयत्नशील आहे. अमेरिकेसाठी हंगामातील पहिला जेएनपीटी बंदरातून डाळिंब कंटेनर रवाना होणे हे राज्याच्या कृषी-निर्यात क्षमतेसाठी तसेच शेतकऱ्यांना उत्पन्नवाढीच्या दृष्टीने प्रोत्साहित करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे. येणाऱ्या काळात निर्यात सुविधा केंद्रातून मोठ्या क्षमतेने डाळिंब निर्यात केले जाणार आहेत असे पणन मंत्री म्हणाले”भारतीय डाळिंबांचा अमेरिकन बाजारपेठेतील वाटा वाढल्यास राज्यातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पन्न २० ते ३० टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी नमूद केले. यासाठी महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, अपेडा, एनपीपीओ व निर्यातदार अमेरिकन अधिकाऱ्यांसोबत सातत्याने तांत्रिक व धोरणात्मक पातळीवर कार्यरत आहेत.सन २०१७ -१८ मध्ये काही तांत्रिक कारणामुळे अमेरिकेला भारतातून डाळिब निर्यात बंद झाली होती. परिणामी जवळपास सहा वर्षे भारतीय डाळिंब अमेरिकन बाजारपेठेत पोहोचू शकला नव्हता. निर्यात पुन्हा सुरू करण्यासाठी केंद्र शासनाच्या अपेडा व राष्ट्रीय वनस्पती संरक्षण संस्था (एनपीपीओ) यांनी अमेरिकेच्या कृषी विभागाशी (यू.एस.डी.ए.) तांत्रिक व प्रशासकीय पातळीवर सातत्याने चर्चा करून कृषी पणन मंडळाच्या विकिरण सुविधा केंद्रावर आवश्यक चाचण्या घेऊन अहवाल सादर केले.पॅक-हाऊसमध्ये डाळिंबाची प्रतवारी व प्रक्रिया आंतरराष्ट्रीय मानकांनुसार करण्यात आली. त्यानंतर यू.एस.डी.ए. व एनपीपीओ अधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष तपासणीनंतर विकिरण प्रक्रिया पार पाडण्यात आली.४८०० बॉक्सेसमधून १७६१६ किलो (सुमारे १७.६ मेट्रिक टन) डाळिंब निर्यात करण्यात आली आहे.सन २०२४ मध्ये अमेरिकेने निर्यातीसाठी काही शास्त्रीय निकष लागू केले आहेत. यामध्ये माईट वॉश प्रोटोकॉल, सोडियम हायपोक्लोराईडद्वारे निर्जंतुकीकरण, तसेच वॉशिंग व ड्रायिंग प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली आहे. तसेच डाळिंबाचे ४ किलो क्षमतेच्या प्रमाणित बॉक्समध्ये पॅकेजिंग करून अधिकृत विकिरण सुविधा केंद्रात विकिरण प्रक्रिया करण्यात आली आहे. या सर्व प्रक्रिया यू.एस.डी.ए. व एनपीपीओ अधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष तपासणी व मान्यतेनंतरच पूर्ण केल्या गेल्या आहेत.या प्रसंगी यू.एस.डी.ए. निरीक्षक श्री. रॉबर्टो रिवाझ, एनपीपीओचे डॉ. बी. एल. मिना, कृषि पणन मंडळाचे विभाग प्रमुख श्री. अनिमेष पाटील, अपेडाचे श्री. बामणे तसेच संबंधित अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.कृषि पणन मंडळाचे कार्यकारी संचालक श्री. संजय कदम यांनी सांगितले की, “चालू २०२५ -२६ हंगामात अमेरिकेस सुमारे ३०० मेट्रिक टन डाळिंब निर्यातीचे नियोजन करण्यात आले आहे.”अमेरिकेतील बाजारपेठेत डाळिंबाची मागणी झपाट्याने वाढत असून, तेथील डाळिंब बाजारपेठ सध्या अंदाजे १.२ ते १.५ अब्ज अमेरिकी डॉलर इतकी आहे. विशेषतः भारतीय ‘भगवा’ व ‘सुपर भगवा’ जातींना चव, रंग व साखर-आम्ल संतुलनामुळे अधिक मागणी आहे.
विश्वविजेत्या दृष्टिहीन भारतीय महिला क्रिकेटपटू मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी
मुंबई : दृष्टिहीन महिलांच्या क्रिकेटमधील पहिला टी-२० विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय महिला संघाने ऐतिहासिक विजय साजरा करताना, शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी संघातील खेळाडूंसोबत संवाद साधला आणि त्यांच्या यशाचे कौतुक केले.कोलंबोत नुकत्याच पार पडलेल्या 'फर्स्ट वुमेन्स टी२० वर्ल्ड कप क्रिकेट फॉर द ब्लाइंड २०२५'च्या अंतिम सामन्यात भारताने नेपाळचा सात गडी राखून पराभव करत विश्वविजेतेपद पटकावले. हा दृष्टिहीन महिलांच्या क्रिकेटमधील पहिलाच टी-२० विश्वचषक होता आणि त्याचा मान भारताने मिळवला. या विश्वविजेतेपदापर्यंत पोहोचण्यासाठी संघातील सदस्यांनी अनेक आव्हानांवर मात केली आहे. संघातील अनेक खेळाडू लहान खेड्यांतील, शेतकरी कुटुंबातील किंवा छोट्या शहरांतील वसतिगृहांतील आहेत. त्यांचा हा प्रवास प्रेरणादायी आहे.महाराष्ट्राच्या गंगा कदम यांना या संघाचे उपकर्णधारपद भूषवण्याची संधी मिळाली. नऊ भावंडांच्या शेतकरी कुटुंबातील गंगा लहानपणापासून दृष्टिहीन आहे. भविष्याचा विचार करून तिच्या वडिलांनी तिला अंधांसाठीच्या विशेष शाळेत दाखल केले. तिथे सुरुवातीला गंमत म्हणून क्रिकेट खेळायला लागली. आवाजाच्या आधारावर चेंडूचा माग काढणे, वेळेचा अंदाज घेणे अशी अनेक आव्हाने होती. मात्र २६ वर्षीय गंगाने चिकाटीनं सराव करत हे कौशल्य आत्मसात केले. मुख्यमंत्र्यांनी तिचे विशेष कौतुक केले.
नाशिक : सदनिका घोटाळा प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार आणि माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. नाशिक सत्र न्यायालयाने कोकाटे यांचा जामीन मंजूर केला आहे. यामुळे त्यांच्या अटकेची शक्यता सध्यातरी टळली असली, तरी त्यांच्या आमदारकीबाबतचा सस्पेन्स कायम आहे.काय आहे संपूर्ण प्रकरण?नाशिकमधील एका गाजलेल्या सदनिका घोटाळा प्रकरणात नाशिक सत्र न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांना दोषी धरत दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. या निकालांनंतर नाशिक पोलिसांनी कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले होते. पोलिसांचे एक पथक त्यांना अटक करण्यासाठी मुंबईतही दाखल झाले होते, परंतु प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना त्यावेळी अटक करण्यात आली नव्हती.हायकोर्टाचा नेमका निकाल काय?सत्र न्यायालयाच्या निर्णयाला कोकाटे यांनी हायकोर्टात आव्हान दिले होते. आज झालेल्या सुनावणीत, न्यायालयाने कोकाटे यांना जामीन मंजूर केला. सत्र न्यायालयाचा निकाल योग्य की अयोग्य, यावर हायकोर्टाने सध्या कोणतेही भाष्य केलेले नाही. केवळ अटकेपासून तात्पुरता दिलासा मिळाला असून मुख्य खटल्यावरील सुनावणी प्रलंबित आहे.वकिलांची बाजू: अटक टळली, पण लढा सुरूचकोकाटे यांच्या वकील ॲड. श्रद्धा दुबे पाटील यांनी निकालानंतर माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी स्पष्ट केले की, कोर्टाने कोकाटे यांची शिक्षा रद्द केलेली नाही, तर त्यांना केवळ जामीन दिला आहे. यामुळे त्यांची तूर्तास अटक टळली आहे. हायकोर्टाने सत्र न्यायालयाच्या निकालाच्या वैधतेवर अजून कोणताही अंतिम निर्णय दिलेला नाही.आमदारकीचे काय होणार?दोन वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा झाल्यास लोकप्रतिनिधीची आमदारकी धोक्यात येते. या तांत्रिक मुद्द्यावर हायकोर्टाने महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले आहे. कोकाटे यांची आमदारकी राहणार की जाणार, याचा अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांचा असेल, असे कोर्टाने स्पष्ट केले. कोर्टाच्या निकालाची अधिकृत प्रत मिळाल्यानंतर विधानसभा अध्यक्ष नियमांनुसार कोकाटेंच्या सदस्यत्वाबाबत निर्णय घेतील.
इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेसाठी शाळांना नोंदणी करण्याचे आवाहन
मुंबई : राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती (विजाभज), इतर मागास वर्ग (इमाव) आणि विशेष मागास प्रवर्ग (विमाप्र) या प्रवर्गातील इयत्ता १ ली ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वर्ष २०२५–२६ साठी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती, गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना ऑनलाईन पद्धतीने महाडीबीटी प्रणालीद्वारे राबविण्यात येणार आहेत. या अनुषंगाने मुंबई शहर जिल्ह्यातील सर्व शाळांनी महाडीबीटी पोर्टलवर आवश्यक नोंदणी व माहिती अद्ययावत करण्याचे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक मुंबई शहर रविकिरण पाटील यांनी केले आहे.या योजनेसाठी शाळा स्तरावर मुख्याध्यापकांनी महाडीबीटी पोर्टलवरील https://prematric.mahait.org/Login/Login लॉगिनद्वारे शाळेची नोंदणी करणे आवश्यक आहे. प्री-मॅट्रिक योजनांसाठी अर्ज नोंदणी करताना मुख्याध्यापकांनी Pre_SE27XXXXXXXXX_Principal हा युजर आयडी व Pass@123 हा पासवर्ड वापरून लॉगिन करावे. त्यानंतर शाळेचे प्रोफाइल, मुख्याध्यापक व लिपिकांची माहिती तसेच विद्यार्थ्यांची वैयक्तिक व शैक्षणिक माहिती अद्ययावत करावी.विद्यार्थी ज्या योजनेसाठी पात्र आहेत, त्या संबंधित शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज नोंदणी करणे आवश्यक आहे. अर्ज प्रक्रियेदरम्यान काही अडचणी उद्भवल्यास संबंधितांनी लेखी स्वरूपात कळवावे अथवा astdirmumcityvint@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधावा.मुंबई शहर जिल्ह्यातील सर्व शाळांमधील विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी मुख्याध्यापक व शाळा कर्मचारी यांनी विद्यार्थी व पालकांना योग्य मार्गदर्शन करून अर्ज प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यास सहकार्य करावे. एकही पात्र विद्यार्थी या योजनेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
राज्यातील २३ नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी शनिवारी मतदान
मुंबई : राज्यातील २३ नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या अध्यक्ष व सदस्यपदांसाठी, तसेच विविध नगरपरिषदा व नगरपंचायतींमधील १४३ सदस्यपदांच्या जागांसाठी (ता. २० ) मतदान होणार असून सर्व नगरपरिषदा व नगरपंचायतींची मतमोजणी २१ डिसेंबर २०२५ रोजी होणार आहे.राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील २८८ नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम ४ नोव्हेंबर २०२५ रोजी जाहीर केला होता. त्यानुसार ०२ डिसेंबर २०२५ रोजी २६३ नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी मतदान झाले. उर्वरित ठिकाणी उद्या मतदान होणार आहे. सर्व संबंधित ठिकाणी २१ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता मतमोजणी सुरू होईल.
शरद मोहोळ प्रकरणात मोठा ट्विस्ट..! मुख्य आरोपीला तात्काळ सोडण्याचे न्यायालयाचे आदेश, नेमकं काय घडलं?
पुणे : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ यांच्या भरदिवसा झालेल्या हत्येच्या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. या खुनातील कथित मुख्य सूत्रधार विठ्ठल शेलार याला मुंबई उच्च न्यायालयाने बेकायदेशीर अटक ठरवत तात्काळ मुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. पोलिसांच्या अटक प्रक्रियेतील कायदेशीर त्रुटींमुळे हा निर्णय आला असून, यामुळे पुणे पोलिसांच्या तपासाला मोठा धक्का बसला आहे. नेमकं प्रकरण […] The post शरद मोहोळ प्रकरणात मोठा ट्विस्ट..! मुख्य आरोपीला तात्काळ सोडण्याचे न्यायालयाचे आदेश, नेमकं काय घडलं? appeared first on Dainik Prabhat .
Cooper Connolly : प्रीती झिंटाचा मास्टरस्ट्रोक यशस्वी! ऑक्शनमध्ये बोली लागताच ‘या’खेळाडूची तळपली बॅट
Cooper Connolly justifies Punjab Kings 3 crore in BBL : आयपीएल २०२६ च्या मिनी ऑक्शनमध्ये पंजाब किंग्सने (PBKS) ज्या खेळाडूवर विश्वास दाखवला, तो आता खऱ्या अर्थाने फॉर्मात आला आहे. ऑस्ट्रेलियाचा युवा अष्टपैलू खेळाडू कूपर कॉनोलीने बिग बॅश लीगमध्ये (BBL) वादळी फलंदाजी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या कामगिरीमुळे पंजाब किंग्सचा ३ कोटींचा हा निर्णय […] The post Cooper Connolly : प्रीती झिंटाचा मास्टरस्ट्रोक यशस्वी! ऑक्शनमध्ये बोली लागताच ‘या’ खेळाडूची तळपली बॅट appeared first on Dainik Prabhat .
Kolhapur – जिल्ह्यातील हुपरी येथे एकुलत्या एक मुलाने आपल्या जन्मदात्या आई-वडिलांची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हुपरी शहरातील महावीर नगर परिसरात पहाटेच्या सुमारास घडलेल्या या घटनेने संपूर्ण कोल्हापूर जिल्हा हादरून गेला आहे. नारायण भोसले आणि विजयमाला भोसले असे हत्या झालेल्यांची नावे आहेत. या दुहेरी हत्येप्रकरणी त्यांचा मुलगा आरोपी सुनील भोसले (४८) याला पोलिसांनी […] The post Kolhapur : कोल्हापूर दुहेरी हत्याकांडाने हादरले.! एकुलत्या एक मुलानेच जन्मदात्या आई-वडिलांना संपविले appeared first on Dainik Prabhat .
आमच्या परवानगीशिवाय तपोवनातील वृक्षतोड करू नये; उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दणका
नाशिक : नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या ‘सिंहस्थ कुंभमेळा’साठी साधूग्राम बनवण्यासाठी तपोवन येथील १८०० झाडांची वृक्षतोड रोखण्याबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर नुकतीच मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. या याचिकेची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकार, नाशिक महापालिका आणि वृक्ष प्राधिकरणाला नोटीस बजावली असून त्यांना उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे राज्य सरकारला मोठा दणका […] The post आमच्या परवानगीशिवाय तपोवनातील वृक्षतोड करू नये; उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दणका appeared first on Dainik Prabhat .
सॅमसंग गॅलेक्सी ‘Z Fold 8’ची पहिली झलक! कॅमेरा सेटअप असणार खूपच दमदार, पाहा….
Camera Specifications | Z Fold 8 : सॅमसंग प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. सॅमसंगचा पुढील पिढीचा फोल्डेबल स्मार्टफोन, ‘Galaxy Z Fold 8’, आगामी 2026 च्या उन्हाळ्यात लॉन्च होण्याची शक्यता आहे. जरी या लॉन्चला अजून बराच अवधी असला, तरी या फोनच्या कॅमेरा वैशिष्ट्यांची माहिती आतापासूनच ऑनलाइन लीक झाली आहे. या नवीन अपडेटनुसार, सॅमसंग आपल्या आगामी फोल्डेबल […] The post सॅमसंग गॅलेक्सी ‘Z Fold 8’ची पहिली झलक! कॅमेरा सेटअप असणार खूपच दमदार, पाहा…. appeared first on Dainik Prabhat .
बीड : बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आता एक वर्षांहून अधिक काळ उलटून गेला. तरीही, अद्याप या प्रकरणाची सुनावणी बीड न्यायालयात सुरु आहे. शुक्रवारी (19 डिसेंबर) झालेल्या सुनावणीत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या खटल्यातून सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्यावर आक्षेप घेत त्यांना हटविण्यात यावे, अशी मागणी आरोपींनी केली आहे. ते राजकीय […] The post Santosh Deshmukh Case : संतोष देशमुखांच्या मारेकरांचं नाव पुकारताच सुदर्शन घुले चक्कर येऊन पडला खाली, कोर्टात नेमकं काय घडलं? appeared first on Dainik Prabhat .
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंना हायकोर्टाचा दिलासा! अटकेची टांगती तलवार टळली, जामीन मंजूर
मुंबई : नाशिकमधील (Nashik News) बहुचर्चित सदनिका घोटाळा प्रकरणात अडकलेले राष्ट्रवादीचे नेते माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांना मुंबई उच्च न्यायालयाने आज मोठा दिलासा दिला आहे. नाशिक सत्र न्यायालयाने कोकाटे यांच्या विरोधात जारी केलेल्या अटक वॉरंटला उच्च न्यायालयाने तूर्तास स्थगिती दिली असून त्यांचा जामीन मंजूर केला आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून कोकाटे यांच्यावर असलेली अटकेची टांगती तलवार आता टळली आहे.https://prahaar.in/2025/12/19/kokate-has-not-surrendered-the-arrest-warrant-remains-in-effect-the-government-prosecutor-took-an-aggressive-stance-in-the-mumbai-high-court/नेमके प्रकरण काय?१९९५ च्या गृहनिर्माण घोटाळा (सदनिका प्रकरण) संदर्भात नाशिकच्या न्यायालयाने नुकताच निकाल दिला होता. या प्रकरणात कोकाटे यांना दोषी ठरवून दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. या निकालानंतर कोकाटे हे न्यायालयासमोर हजर न झाल्यामुळे नाशिक सत्र न्यायालयाने त्यांच्या विरोधात कडक अटक वॉरंट जारी केले होते. पोलिसांकडून कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता निर्माण झाल्याने, कोकाटे यांनी या वॉरंटला आव्हान देत तातडीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.उच्च न्यायालयाचा निर्णयमुंबई उच्च न्यायालयात आज या अर्जावर सविस्तर सुनावणी झाली. कोकाटे यांच्या वकिलांनी मांडलेली बाजू आणि प्रकरणाची पार्श्वभूमी विचारात घेत न्यायालयाने कोकाटे यांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला. १ लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर त्यांचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे नाशिक पोलिसांच्या अटकेची कारवाई आता थांबली आहे. तूर्तास कोकाटे यांना न्यायालयाकडून जीवदान मिळाले असले, तरी मूळ शिक्षेच्या विरोधातील त्यांची न्यायालयीन लढाई यापुढेही सुरू राहणार आहे. या निर्णयामुळे कोकाटे समर्थकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.
मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि ती तिचा पती राज कुंद्रा यांच्या अडचणीत कायम वाढ होताना दिसत आहे. पाहिलं म्हणजे २०११ मध्ये सुरू झालेले अश्लील चित्रपट निर्मितीचे प्रकरण ज्यात तो अटक झाला आणि त्याचे जामीन अर्ज फेटाळले गेले; दुसरे म्हणजे सध्या (२०२५ मध्ये) सुरू असलेले ६० कोटी रुपयांच्या आर्थिक फसवणुकीचे प्रकरण, ज्यात अंमलबजावणी संचालनालय (ED) आणि मुंबई पोलिसांची कारवाई सुरू आहे,या कारवाईचा दरम्यान १८ डिसेंबर ला आयकर विभागाने शिल्पाच्या मुंबईतील जुहू येथील घरावर छापा टाकला. हि कारवाई बंगळुरू यामधील तिच्या प्रसिद्ध हॉटेल बॅस्टियन गार्डन सिटीशी संबंधित एका प्रकरणासंदर्भात करण्यात आली आहे. आयकर विभाग मुंबईतीलच नव्हे तर बंगळुरूच्या हॉटेलच्या ठिकाणीही छापा टाकून शोध मोहीम राबवण्यात येत आहे.रेस्टॉरंट आणि त्याचाशी संबंधित कंपन्यांच्या आर्थिक नोंदी तपासल्या जात असून, हॉटेल व्यवसायात गुंतवणूक, उत्पन्न आणि कर भरण्यात अनियमितता असल्याचा आयकर विभागाला संशय असलयाने हि धडक कारवाई केली जात आहे.
बॉलीवूड क़्विन माधुरी दिक्षित साकारणार नवी भूमिका: जाणून घ्या कुठे आणि कधी पाहायला मिळणार ...
मुंबई : बॉलीवूडची ग्लॅमर्स अभिनेत्री माधुरी दीक्षित साकारणार हटके भूमिका. ott वर चर्चेत असणारी वेब सिरीज म्हणजेच Mrs Deshpande, अखेर हि वेब सिरीज आज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. माधुरी दीक्षित यांनी २०२२ मध्ये 'द फेम गॅमे ' ह्या वेब सिरीज मध्ये उत्कृष्ट काम केले होते . यामुळेच Mrs Deshpande या वेब सिरीज साठी प्रेक्षक उत्सुक आहेत.माधुरी दीक्षित (Mrs Deshpande) हि वेब सिरीज १९ डिसेंबर २०२५ ला हॉटस्टार वरती रिलीझ होणार असून या वेब सिरीज मध्ये माधुरी दीक्षित एका वेगळ्याच रूपात दिसणार आहे. ही सिरीज क्राइम आणि थ्रिलर असून, माधुरी दीक्षित यात सीरिअल किलरची भूमिका साकारणार आहे, आजपर्यंत साकारलेल्या सोज्वळ भूमिकांपासून थेट सिरीअल किलर ची भूमिका खूपच आगळी वेगळी असणार आहे.या सीरिजचं दिग्दर्शन नागेश कुकुनूर यांनी केलं आहे. ही सीरिज फ्रेंच मिनीसीरिज 'ला मांटे'चे अधिकृत रूपांतरण आहे. 'ला मांटे' ही सीरिजची निर्मिती एलिस चेगरे-ब्रेग्नोट, निकोलस जीन आणि ग्रेगोइरे डेमाइसन यांनी केली होती. ह्या सिरीज चे एकूण ६ एपिसोड आहेत आणि ते एकत्रच म्हणजेच १९ डिसेंबर मध्य रात्री रिलीझ होणार आहे. या सीरिजमध्ये माधुरी दीक्षितसोबत मराठी अभिनेता सिद्धार्थ चांदेकरही महत्त्वाची भूमिका साकारतोय. तर प्रियांशु चटर्जी आणि दीक्षा जुनेजा हे कलाकारही वेगवेगळ्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.
1X Betting App Case : ईडीची मोठी कारवाई! युवराज सिंग, सोनू सूदसह ‘या’सेलिब्रिटींची मालमत्ता जप्त
Yuvraj Singh and Sonu Sood 1X Betting App Case : ऑनलाइन बेटिंग (सट्टेबाजी) विश्वातील नामांकित अॅप ‘१एक्स बेट’शी (1XBet) संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत भारतीय क्रिकेट संघाचे माजी दिग्गज खेळाडू युवराज सिंग आणि रॉबिन उथप्पा यांच्यासह बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध कलाकारांच्या कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेवर जप्ती आणली आहे. ईडीच्या […] The post 1X Betting App Case : ईडीची मोठी कारवाई! युवराज सिंग, सोनू सूदसह ‘या’ सेलिब्रिटींची मालमत्ता जप्त appeared first on Dainik Prabhat .
Mahua Moitra : तृणमूलच्या महुआ मोईत्रा यांना दिलासा; लोकपालचा आदेश रद्द !
Mahua Moitra – संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेण्याच्या प्रकरणावरुन तृणमूल काँग्रेस खासदार महुआ मोईत्रा यांना दिल्ली उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. महुआ मोइत्रा यांच्याविरुद्धच्या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्याची परवानगी देणारा लोकपालचा आदेश न्यायालयाने रद्दबातल ठरवला आहे. यापूर्वी, २१ नोव्हेंबर रोजी, न्या. अनिल क्षेत्रपाल आणि न्या. हरीश वैद्यनाथन शंकर यांच्या खंडपीठाने महुआ मोइत्रा यांना अंतरिम […] The post Mahua Moitra : तृणमूलच्या महुआ मोईत्रा यांना दिलासा; लोकपालचा आदेश रद्द ! appeared first on Dainik Prabhat .
१) हायकोर्टाकडून माणिकराव कोकाटेंना जामीन शासकीय कोट्यातील सदनिका गैरव्यवहार प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे आमदार आणि माजी क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांना दिलासा मिळाला आहे. नाशिक सत्र न्यायालयाने कोकाटे यांना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली होती. या शिक्षेविरोधात कोकाटेंनी मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल केलं होतं. आज, १९ डिसेंबर रोजी न्यायमूर्ती आर. एन. […] The post माणिकराव कोकाटेंना जमीन..! एपस्टीन सेक्स रॅकेट प्रकरण ते आणखी एका मंत्र्याचा राजीनामा…; TOP 10 News वाचा एका क्लिकवर appeared first on Dainik Prabhat .
मुंबई : शासकीय कोट्यातील सदनिका गैरव्यवहार प्रकरणात नाशिक सत्र न्यायालयाने माजी क्रीडा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे आमदार माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली होती. या शिक्षेविरोधात कोकाटे यांनी मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. आज (१९ डिसेंबर २०२५) न्यायमूर्ती आर. एन. लढ्ढा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. न्यायालयाने कोकाटे […] The post मोठी बातमी..! हायकोर्टाकडून माणिकराव कोकाटेंना जामीन मंजूर; शिक्षेला स्थगिती नाकारल्याने आमदारकीवर संकट appeared first on Dainik Prabhat .
Alex Carey record in AUS vs ENG 3rd Test : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या प्रतिष्ठित ‘ॲशेज’ मालिकेतील तिसऱ्या सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाने आपली पकड घट्ट केली आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक फलंदाज ॲलेक्स कॅरीने आपल्या अष्टपैलू खेळीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले असून, त्याने १२ वर्षांनंतर एका खास विक्रमाची नोंद केली आहे. ऑस्ट्रेलियाची ३५६ धावांची […] The post AUS vs ENG : ॲलेक्स कॅरीचा दमदार डबल धमाका! ऑस्ट्रेलियासाठी 12 वर्षांनंतर ‘या’ खास पराक्रमाची केली पुनरावृत्ती appeared first on Dainik Prabhat .
मुंबई : प्राचीन भारत हा जगातील सर्वाधिक प्रगत आणि आर्थिक महासत्ता असणारा देश होता. भारतातील ज्ञान, परंपरा आणि संस्कृतीमुळे देश जगात आघाडीवर होता. या प्राचीन ज्ञानाची आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाशी प्रभावी सांगड घातल्यास भारत पुन्हा एकदा ‘विश्वगुरू’ होऊ शकतो, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. वांद्रे-कुर्ला संकुलातील ग्रँड हयात येथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर के पी ग्लोबलचे अध्यक्ष राजेश शर्मा, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे संस्थापक अध्यक्ष स्वामी विद्यानंद, जे एस डब्ल्यू ग्रूपचे अध्यक्ष सज्जन जिंदाल आयटी मंत्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक शैलेश त्रिवेदी उपस्थित होते.https://prahaar.in/2025/12/19/kokate-has-not-surrendered-the-arrest-warrant-remains-in-effect-the-government-prosecutor-took-an-aggressive-stance-in-the-mumbai-high-court/‘इनव्हेशन, सेल्फ रिलायन्स अँड प्रोस्पेरिटी’ (शोध, स्वावलंबन आणि समृद्धी) या देशाच्या विकासदिशा ठरविणाऱ्या संकल्पनेवर या मंचावर मंथन होत असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, हिंदू ही केवळ धर्मव्यवस्था नसून जीवनपद्धती व विचारप्रणाली आहे. हजारो वर्षांपासून ही परंपरा जिवंत आहे. अनेक प्राचीन संस्कृती लुप्त झाल्या; मात्र सिंधू–हिंदू संस्कृती आजही टिकून आहे. पुराव्यांवर सिद्ध झालेले हे सांस्कृतिक सातत्य दहा हजार वर्षांपूर्वीपासून अस्तित्वात असल्याचे दर्शवते. भारत हा नवनिर्मितीचा मूळ स्रोत आहे. खगोलशास्त्र व भूगोलासारखी शास्त्रे प्राचीन काळात भारतात अत्यंत प्रगत होती. वेद आणि वेदपूर्व साहित्यामध्ये त्याची साक्ष आढळते. जगात आता पाचवी औद्योगिक क्रांती सुरू असून ही क्रांती डिजिटायजेशनमुळे होत आहे. तसेच एआय आणि डाटा या क्षेत्राला या क्रांतीमध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. यासाठी लागणारे उत्पादन महत्वाचे आहे. उत्पादन क्षेत्र हे अर्थव्यवस्थेचे कणा आहे. इनोव्हेशनचे मूळ उत्पादनातच आहे आणि या क्रांतीचे नेतृत्व करण्याची क्षमता भारताकडे आहे.कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि डेटा क्षेत्रात भारत आघाडीवर असून २०३० पर्यंत जगातील सर्वाधिक डेव्हलपर्स भारतीय असतील, असे मायक्रोसॉफ्टचे प्रमुख सत्य नाडेला यांनीही नमूद केल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. एआयमुळे उद्योगांमध्ये आमूलाग्र बदल होत असून या इनोव्हेशनमध्ये नेतृत्व करण्याची क्षमता भारतात आहे. ‘आत्मनिर्भर भारत’ या प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या संकल्पनेचा उल्लेख करत मुख्यमंत्री म्हणाले की, १४० कोटी लोकसंख्येचा देश आत्मनिर्भर बनणे अत्यावश्यक आहे. स्वदेशी म्हणजे देशातच उत्पादन, भारतीय कंपन्यांमार्फत तंत्रज्ञानाचा विकास करण्यात येत आहे. चीनने जपानचे तंत्रज्ञान वापरले, त्याचे रिव्हर्स इंजिनिअरिंग केले. पण भारतात तंत्रज्ञान समजून घेऊन आत्मनिर्भर होण्याची क्षमता आहे. तंत्रज्ञानाला आज असलेले महत्व ओळखून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अनेक क्षेत्रात तंत्रज्ञान हस्तांतरणाची अट घातली आहे.फडणवीस म्हणाले, जगाचा चीनवरील विश्वास त्यांच्या विस्तारवादी धोरणांमुळे कमी झाला असताना भारताच्या नेतृत्वावर आणि संस्कृतीवर जागतिक विश्वास वाढत आहे. आफ्रिकेमध्ये विकासाच्या नव्या संधी असून, त्या संधींमध्ये जो देश सक्रिय सहभाग घेईल तोच जागतिक नेतृत्व करेल. भारत आणि आफ्रिकी देशांमधील संबंध दृढ असून अनेक आफ्रिकी देश प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना आपला नेता मानतात. मुंबईत लवकरच ५४ आफ्रिकी देशांना होस्ट करणारी एक भव्य इमारत उभारली जाणार आहे. उद्योजकांनी आफ्रिकेकडे लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. आफ्रिकेत नैसर्गिक साधनसंपत्ती प्रचंड असून नव्या तंत्रज्ञानासाठी आवश्यक कच्चा माल उपलब्ध आहे. आफ्रिकेत उत्पादन सुरू झाल्यास जागतिक अर्थव्यवस्थेत आमूलाग्र बदल होईल आणि त्याचे नेतृत्व भारत करेल, असेही फडणवीस म्हणाले.पापुआ न्यू गिनीच्या शिष्टमंडळाने गॅस उत्खननासाठी भारताला निमंत्रण दिल्याचा उल्लेख करत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ही सर्व संधी भारताच्या प्राचीन परंपरेतून आलेल्या जागतिक विचारांचे फलित आहे. विचारांच्या बळावर जग जिंकण्याची ही परंपरा आहे. हे सर्व जोडण्याचे काम वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमसारखे मंच करू शकतात. जागतिक व्यापारात २० टक्के वाटा मिळवण्याचे स्वप्नही या व्यापक दृष्टिकोनातून साकार होऊ शकते. दरम्यान, श्री सिमेंटच्या बांगर ग्रुपने राज्यातील चंद्रपूर येथे २ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यासाठीचे ‘इंटेंट लेटर’ मुख्यमंत्री फडणवीस यांना मंचावर सादर केले. ही गुंतवणूक म्हणजे राज्याच्या विकासावर दाखवलेला विश्वास आहे.
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : जी उत्तर, के पूर्व विभाग आणि एच पूर्व विभागातील मोठ्या आकाराच्या जलवाहिनी जोडणीचे काम हाती घेतले जाणार आहे. ही कार्यवाही सोमवार, २२ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजेपासून शुक्रवार, २६ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १ वाजेपर्यंत (एकूण ९९ तास) सुरु राहणार आहे. परिणामी, जी उत्तर, के पूर्व आणि एच पूर्व विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे. तसेच, नियमित पाणीपुरवठ्याच्या वेळेतदेखील बदल होणार आहे, याची नागरिकांनी कृपया नोंद घ्यावी, असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) च्या मेट्रो लाईन ७ अ प्रकल्पाच्या कामासाठी २४०० मिलीमीटर व्यासाच्या अपर वैतरणा मुख्य जलवाहिनीचा काही भाग वळविण्यात आला आहे. या वळविण्यात आलेल्या भागाचे छेद – जोडणी (क्रॉस – कनेक्शन) चे काम मुंबई महानगरपालिकेमार्फत करण्यात येणार आहे. ही कार्यवाही अत्यंत महत्त्वाची असून नियोजनबद्ध पद्धतीने व तांत्रिक निकषांचे पालन करून करण्यात येणार आहे. या दरम्यान नागरिकांना पाणीपुरवठ्यात कमीतकमी अडथळा येईल, यासाठी आवश्यक ते नियोजन करण्यात आले आहे.सोमवार, २२ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजेपासून शुक्रवार, दिनांक २६ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १ वाजेपर्यंत जलवाहिनी जोडणीची कामे सुरु राहणार आहेत. त्यामुळे जी उत्तर, के पूर्व आणि एच पूर्व विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे.जी उत्तर, के पूर्व व एच पूर्व विभागातील नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. दुरुस्तीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरावे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून पुढील काही दिवस पाणी उकळून - गाळून प्यावे, महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.१. ‘जी उत्तर’ विभाग :(धारावी सकाळचा पाणीपुरवठा) - धारावी लूप मार्ग, ए. के. जी. नगरधारावी सकाळचा पाणीपुरवठा - जस्मिन मील मार्ग, माटुंगा कामगार वसाहत, संत रोहिदास मार्ग, ६० फूट मार्ग, ९० फूट मार्ग, संत कक्कैया मार्ग, एम. पी. नगर ढोरवाडा, महात्मा गांधी मार्ग (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ पहाटे ४.०० ते दुपारी १२.००) (सोमवार, दिनांक २२ डिसेंबर ते गुरुवार, दिनांक २५ डिसेंबर २०२५ दरम्यान दररोज सकाळी ९.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत कमी दाबाने पाणीपुरवठा)धारावी सायंकाळचा पाणीपुरवठा - धारावी मुख्य मार्ग, गणेश मंदीर मार्ग, दिलीप कदम मार्ग, जस्मिन मील मार्ग, माहीम फाटक, ए. के. जी. नगर (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ सायंकाळी ४.०० ते रात्री ९.००) (सोमवार, दिनांक २२ डिसेंबर ते गुरुवार, दिनांक २५ डिसेंबर २०२५ दरम्यान दररोज सायंकाळी ५.०० ते रात्री १०.०० या वेळेत कमी दाबाने पाणीपुरवठा)*२. ‘के पूर्व’ विभाग :कबीर नगर, बामणवाडा, पारसीवाडा, विमानतळ क्षेत्र, तरुण भारत वसाहत, इस्लामपुरा, देऊळवाडी, पी ऍन्ड टी वसाहत (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ दुपारी २.०० ते सायंकाळी ५.३०) (सोमवार, दिनांक २२ डिसेंबर ते गुरुवार, दिनांक २५ डिसेंबर २०२५ दरम्यान दररोज दुपारी २.०० ते सायंकाळी ५.३० या वेळेत कमी दाबाने पाणीपुरवठा)*कोलडोंगरी, जुनी पोलीस गल्ली, विजय नगर (सहार रस्ता) मोगरापाडा (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ सायंकाळी ५.०० ते रात्री १०.००) (सोमवार, दिनांक २२ डिसेंबर ते गुरुवार, दिनांक २५ डिसेंबर २०२५ दरम्यान दररोज सायंकाळी ५.०० ते रात्री १०.०० या वेळेत कमी दाबाने पाणीपुरवठा)३. ‘एच पूर्व’ विभाग :वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) मोतिलाल नगरसह (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ रात्री १०.०० ते रात्री ११.४०) (सोमवार, दिनांक २२ डिसेंबर ते गुरुवार, दिनांक २५ डिसेंबर २०२५ दरम्यान दररोज रात्री १०.०० ते रात्री ११.४० या वेळेत कमी दाबाने पाणीपुरवठा)प्रभात वसाहत, टीपीस-३, आग्रीपाडा, कलिना, सीएसटी मार्ग, हंसभुग्रा मार्ग, विद्यापीठ, सीएसटी मार्गाची दक्षिण बाजू, यशवंत नगर, सुंदर नगर, कोलिवरी गाव, तीन बंगला, शांतिलाल कंपाऊंड, पटेल कंपाऊंड, गोळीबार मार्ग, खार भुयारी मार्ग (सब वे) ते खेरवाडी, नवापाडा, बेहराम नगर, ए. के. मार्ग, शासकीय वसाहत वांद्रे (पूर्व) (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ मध्यरात्री ३.३० नंतर ते सकाळी ९.००) (मंगळवार, दिनांक २३ डिसेंबर ते गुरुवार, दिनांक २५ डिसेंबर २०२५ दरम्यान दररोज मध्यरात्री ३.३० नंतर ते सकाळी ९.०० या वेळेत कमी दाबाने पाणीपुरवठा)
मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, तत्काळ तिकीट बुकिंगसाठी नवे नियम
पुणे : तत्काळ तिकीट बुकिंगमधील गैरप्रकार रोखण्यासाठी मध्य रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांसाठी तिकीट बुकिंग अधिक सुरक्षित आणि पारदर्शक करण्यासाठी ओटीपीद्वारे पडताळणीची नवी प्रणाली टप्प्याटप्प्याने लागू केली जात आहे. या निर्णयानुसार १९ डिसेंबरपासून पुण्याशी संबंधित मध्य रेल्वेच्या आणखी पाच गाड्यांवर ही व्यवस्था अंमलात येणार आहे.नव्या पद्धतीनुसार पुणे–अमरावती एक्सप्रेस, पुणे–सोलापूर हुतात्मा एक्सप्रेस, सीएसएमटी–कोल्हापूर कोयना एक्सप्रेस, एलटीटी–गोंडा गोदान एक्सप्रेस आणि एलटीटी–जयनगर एक्सप्रेस या गाड्यांवर तत्काळ तिकीट बुकिंगसाठी ओटीपी पडताळणी बंधनकारक राहणार आहे.या बदलानंतर आरक्षण काउंटर, अधिकृत एजंट तसेच IRCTCच्या वेबसाइट किंवा मोबाइल ॲपवरून केलेल्या तत्काळ तिकीट बुकिंगसाठी प्रवाशांना ओटीपी देणे आवश्यक असेल. बुकिंगवेळी नोंदवलेल्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी पाठवला जाईल आणि तो टाकल्यानंतरच तिकीट निश्चित होणार आहे.ओटीपी पडताळणीदरम्यान कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी प्रवाशांनी तिकीट बुकिंग करताना स्वतःचा चालू आणि अचूक मोबाईल क्रमांक नोंदवावा, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या नव्या व्यवस्थेमुळे तत्काळ तिकीट बुकिंगमध्ये पारदर्शकता वाढेल आणि गैरवापराला आळा बसण्यास मदत होईल.

22 C