SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

27    C
... ...View News by News Source

फुटबॉल मॅचेससाठी घरातून निघाला पालघरात मृतावस्थेत सापडला; मुंबईच्या अंडर-१६ खेळाडूचा रहस्यमय मृत्यू

पालघर : मुंबईजवळील पालघर परिसरात एका फुटबॉल खेळाडूचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ‘पुण्याला मॅचेस खेळायला जात आहे’ असे सांगून घराबाहेर पडलेला हा तरुण दोन दिवसांनी घनदाट जंगलात मृतावस्थेत सापडला. या घटनेमुळे क्रीडा क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.मृत तरुणाचे नाव सागर सोरती असे असून त्याने मुंबईच्या अंडर-१६ फुटबॉल संघात आपल्या खेळाची छाप सोडलेला उदयोन्मुख खेळाडू होता. १५ नोव्हेंबर रोजी घरातून बाहेर पडल्यापासून १६ नोव्हेंबरपासून त्याचा कुटुंबीयांशी कोणताही संपर्क नव्हता. आपल्या मुलाने २ दिवस काही संपर्क न केल्याने कुटुंबीयांनी शोधमोहीम सुरू केली, तेव्हा १८ नोव्हेंबर रोजी पालघर जिल्ह्यातील कासा पोलिसांना मेंढवण खिंडच्या जंगलात एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत तरुणाचा मृतदेह आढळला. एका उदयोन्मुख खेळाडूचा मृतदेह पालघर जिल्ह्यात संशयास्पद अवस्थेत आढळल्याने मोठी खळबळ उडाली. घटनास्थळी सापडलेल्या मोबाईलच्या आधारे पोलिसांनी ओळख पटवली.या प्रकरणाची नोंद घेऊन कासा पोलिसांनी तपास सुरू केला आहे. सागरच्या मृत्यूमागचे कारण अजून स्पष्ट झाले नसून विविध अंगांनी तपास सुरू आहे. एका उज्ज्वल भविष्य असलेल्या खेळाडूचा असा अंत झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

फीड फीडबर्नर 24 Nov 2025 10:30 am

वाई नगरपालिकेच्या निवडणुकीत एकनाथ शिंदेंना धक्का

सातारा : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा माहोल असताना, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना त्यांच्या होमपिचवरच अनपेक्षित धक्का बसला आहे. वाई नगरपालिका निवडणुकीत झालेल्या अचानक घडामोडींमुळे शिवसेनेचा उमेदवार बाद झाला असून संबंधित नेत्याचे पदही गेल्याने पक्षात खळबळ माजली आहे.वाई नगरपालिकेत शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख विकास शिंदे यांनी त्यांच्या भावाला, प्रवीण शिंदे यांना उमेदवारी दिली होती. मात्र अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या क्षणी विकास शिंदे यांनी भावाला उमेदवारी मागे घ्यायला सांगितल्याने परिस्थिती एकदम बदलली. हा निर्णय कोणालाही विश्वासात न घेता घेतल्याचा आरोप करत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रणजितसिंह भोसले यांनी विकास शिंदे यांच्या विरोधात निलंबनाची कारवाई केली. त्यामुळे उमेदवारही बाद झाला आणि उपजिल्हाप्रमुखांचे पदही गमावले.घडलेल्या या प्रकारानंतर विकास शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. जिल्हाप्रमुख आणि संपर्कप्रमुखांकडून उमेदवारीबाबत कोणतीही सूचना न मिळाल्याने शेवटच्या दोन मिनिटांत एबी फॉर्म मागे घेतल्याचा दावा त्यांनी केला. तसेच अनेक वेळा संपर्क साधूनही पक्षाकडून स्पष्ट भूमिका न आल्यामुळेच हा निर्णय घ्यावा लागल्याचे त्यांनी सांगितले.याचबरोबर विकास शिंदे यांनी जिल्हाप्रमुख रणजित भोसले यांच्यावर गंभीर आरोप केले. वाई तालुक्यात राहूनही इतर पक्षांशी अधिक संपर्क साधणे, टार्गेट करणे, विरोधात बातम्या छापून आणणे आणि कोणतीही नवीन शाखा उभी न करणे अशा अनेक गोष्टींसाठी त्यांनी भोसले यांना जबाबदार ठरवले. वाईतील या नाट्यमय घटनांमुळे निवडणूक रणधुमाळीत नवीन घडामोडींची भर पडली आहे आणि शिवसेनेसमोर प्रश्न उभा राहिला आहे.

फीड फीडबर्नर 24 Nov 2025 10:30 am

Shilpa Shetty: शिल्पा शेट्टीचा मॉडर्न-रेट्रो लुक व्हायरल; फॅन्स म्हणाले, ‘एजलेस ब्यूटीची बरोबरीच नाही!’

Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी पुन्हा एकदा आपल्या शानदार स्टाइलमुळे सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. चित्रपटांपासून थोडी दूर राहूनही शिल्पा नेहमीच आपल्या फॅशन आणि ग्लॅमरने चाहत्यांना प्रभावित करत असते. अलीकडेच तिने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या नवीन फोटोंनी इंटरनेटवर खळबळ माजवली आहे. मॉडर्न–रेट्रो फ्यूजन लुकने जिंकली मने शिल्पाने आपल्या नव्या फोटोशूटमध्ये ट्यूब-टॉप ब्लाउज आणि धोती-स्टाईल साडी […] The post Shilpa Shetty: शिल्पा शेट्टीचा मॉडर्न-रेट्रो लुक व्हायरल; फॅन्स म्हणाले, ‘एजलेस ब्यूटीची बरोबरीच नाही!’ appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 24 Nov 2025 10:22 am

भाजप विरुद्ध राष्ट्रवादी थेट लढत; ९ अपक्ष, ४ ठिकाणी बंडखोरीने चुरस वाढली

Bhor Municipal Election 2025 | भोर नगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी (भाजपा) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात ‘कांटे की टक्कर’ होत आहे, तर नऊ अपक्ष उमेदवारांच्या रिंगणामुळे आणि दोन्ही पक्षांमधील बंडखोरीमुळे लढत अधिकच चुरशीची झाली आहे. भोर शहरात एकूण दहा प्रभाग असून, २० नगरसेवक निवडले जाणार आहेत. १६,७१६ मतदार असलेल्या या निवडणुकीत प्रमुख […] The post भाजप विरुद्ध राष्ट्रवादी थेट लढत; ९ अपक्ष, ४ ठिकाणी बंडखोरीने चुरस वाढली appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 24 Nov 2025 10:14 am

पालकांनी मोबाइलला दिला नाही, म्हणून ८ वीच्या विद्यार्थीने केली आत्महत्या

मुलांमध्ये दिवसेंदिवस मोबाईलचे व्यसन इतके वाढत आहे की मुले आता मैदानी खेळ पूर्णपणे विसरले आहेत. पालकांकडे मुले सतत मोबाईलचा तगादा लावत असल्याने हल्ली बहुतेक घरात मोबाईलवरून पालक आणि मुलात वाद होताना दिसतातनागपूर : आई-वडिलांनी मोबाईल दिला नाही म्हणून एका आठवीत शिकणाऱ्या मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मोबाईल फोनच्या अतिवापरामुळे मुलांची मने इतकी कमजोर, हलकी झाली आहेत की आत्महत्येसारखा विचार मुलांच्या मनात अगदी सहजपणे येतो.ही घटना नागपूर येथील चणकापूर गावात घडली आहे मृत मुलीचे नाव (मुलीचे नाव दिव्या सुरेश कोठारे) असे आहे. या घटनेनंतर पोलिसांना घटनास्थळी जाऊन मृतदेहाचा पंचनामा करुन तो शवविच्छेदनासाठी पाठवून दिला आहे.दिव्या इयत्ता ८ वीत शिकत होती. गेले बरेच दिवस दिव्या मोबाईलचा अतिवापर करत होती. शिवाय अभ्यासाचा कंटाळा देखील करत होती. ही गोष्ट तिच्या पालकांच्या निदर्शनास आली. त्यामुळे दिव्याच्या पालकांनी जमेल तेवढं तिला मोबाईलपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला. शिवाय मोबाईल कमी करून अभ्यास कर असा सल्ला देखील दिला.गेल्या बऱ्याच दिवसापासून हे सुरु होत. त्यामुळे दिव्या तणावात होती. मात्र शुक्रवारी दिव्याच्या आत्याच्या लग्नासाठी कोठारे कुटुंबीय लग्नसराईत व्यस्त होते. सायंकाळी नेहमीप्रमाणे दिव्याने कटुंबीयांकडे मोबाईल मागितला, मात्र घरच्यांनी नकार दिला. मोबाईल न दिल्याने दिव्या रागावली. संतापाच्या भरात ती आत्याच्या घरातून निघून सरळ स्वतःच्या घरी आली.घरी कोणी नसल्याची संधी साधून घरात बांधलेल्या पाळण्याच्या दोरीला तिने गळफास घेतला. काही वेळाने तिची मोठी बहीण तिला शोधत घरी आली असता हा प्रकार उघडकीस आला. कुटुंबियांना घटनेचा प्रकार समजताच दिव्याच्या पालकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच खापरखेडा पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला असून आत्महत्येची नोंद केली आहे. मात्र या घटनेने सर्व पालकांना हादरून सोडले आहे.

फीड फीडबर्नर 24 Nov 2025 10:10 am

मिनी मंत्रालयाच्या निवडणुका लांबणार? जिल्हा परिषद निवडणुकीवर अजित पवारांचे भाकीत

मुंबई : राज्यात स्थानिक स्वराज्य निवडणुकांचा धुरळा पुन्हा एकदा रंगणार असतानाच जिल्हा परिषद निवडणुकीवर टांगती तलवार आहे . नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकांची तयारी सुरू असताना महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुकांबाबत चर्चेला वेग आला आहे. मात्र, जिल्हा परिषद निवडणूक आणखी पुढे ढकलली जाऊ शकते, असा अंदाज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.धाराशिव येथे बोलताना अजित पवार यांनी, जिल्हा परिषद निवडणुका स्थगित होण्याची शक्यता असल्याची माहिती वकिलांकडून मिळाल्याचे सांगितले. हे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे आणि मंगळवारी होणाऱ्या सुनावणीत महत्त्वाचा निर्णय अपेक्षित आहे. त्यामुळे निवडणुका लांबणीवर जाण्याची चिन्हे स्पष्ट झाल्याचे त्यांनी सूचित केले. ओबीसी आरक्षणावरील पेचामुळे जिल्हा परिषद निवडणुकीची प्रक्रिया अडकली आहे आणि अंतिम निर्णयानंतरच पुढील दिशा निश्चित होणार आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यातील आरक्षण मर्यादा ओलांडल्याच्या आरोपांवर विविध याचिका दाखल झाल्या असून न्यायालयाने यावरील सीमा स्पष्ट ठेवण्याचा पूर्वीच निर्देश दिला होता. न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला जानेवारी २०२६ पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण करण्याचे आदेश दिल्यानंतर प्रक्रिया सुरू झाली. मात्र, ५० टक्के आरक्षण मर्यादा ओलांडल्याचे मुद्दे समोर आल्यानंतर निवडणूक वेळापत्रक पुन्हा अनिश्चित झालं आहे.आता सर्वोच्च न्यायालयाचा निकाल निर्णायक ठरणार असून जिल्हा परिषद निवडणुका होणार की पुढे ढकलल्या जाणार यावर चित्र स्पष्ट होईल. तोपर्यंत इच्छुकांच्या उत्साहावर विर्जन पडल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे.

फीड फीडबर्नर 24 Nov 2025 10:10 am

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपासून ते इस्त्रायलच्या एअरस्ट्राईकपर्यंत टॉप १० बातम्या ; वाचा एका क्लिकवर

उद्याच्या सुनावणीवर निवडणुकांचे भवितव्य राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत उद्या म्हणजेच मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. अनेक स्थानिक स्वराज्य संस्थामंध्ये ५० टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडण्यात आलीय. त्यात १५ जिल्ह्यांत सरपंच आरक्षणातही ५० टक्क्यांचा निकष पाळला गेला नसल्याची बाब समोर आलीय. तेलंगणातही ५० टक्क्यांची मर्यादा पार केल्याने उच्च न्यायालयाने ताशेरे ओढताच राज्य निवडणूक आयोगाने तेथील […] The post स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपासून ते इस्त्रायलच्या एअरस्ट्राईकपर्यंत टॉप १० बातम्या ; वाचा एका क्लिकवर appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 24 Nov 2025 9:45 am

काहीतरी धमाकेदार येतंय !!! ‘बिग बॉस मराठी 6’सुरू होणार? नव्या प्रोमोमुळे चर्चांना उधाण

Bigg Boss Marathi 6 | हिंदी ‘बिग बॉस १९’चा ग्रँड फिनाले लवकरच पार पडणार आहे. या पर्वाचा विजेता कोण होणार? याची सर्वांच उत्सुकता लागली आहे. याचदरम्यान आता मराठी बिग बॉस लवकरच सुरू होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. ‘कलर्स मराठी’ वाहिनीने एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामुळे सर्वत्र बिग बॉस मराठीचा नवीन सीझन येणार […] The post काहीतरी धमाकेदार येतंय !!! ‘बिग बॉस मराठी 6’ सुरू होणार? नव्या प्रोमोमुळे चर्चांना उधाण appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 24 Nov 2025 9:35 am

ऐतिहासिक! नव्या सरन्यायाधीशांच्या शपथविधीला ब्राझीलसह सात देशांचे मुख्य न्यायमूर्ती राहणार उपस्थित

नवी दिल्ली: भारताचे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत आज शपथ घेणार आहेत. भारताच्या ५३व्या न्यायमूर्तींचा शपथविधी राष्ट्रपती भवनात होणार आहे. सरन्यायाधीशांच्या शपथ समारंभाबाबात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ब्राझीलसह सात देशांचे मुख्य न्यायाधीश आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उपस्थित राहणार आहेत. ज्यात भूतान, केनिया, मलेशिया, मॉरिशस, नेपाळ आणि श्रीलंकेचे समावेश आहे. भारतीय न्यायव्यवस्थेच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या सरन्यायाधीशाच्या शपथविधी समारंभाला इतर देशांचे न्यायिक शिष्टमंडळ उपस्थित राहणार असल्याचा प्रकार घडणार आहे. ब्राझील, भूतान, केनिया, मलेशिया, मॉरिशस, नेपाळ आणि श्रीलंका देशातील मुख्य न्यायाधीश आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आपल्या कुंटुंबियांसोबत हजेरी लावणार आहेत.https://prahaar.in/2025/11/24/justice-suryakant-will-take-oath-as-the-53rd-chief-justice-of-india-today/राष्ट्रपती भवनात होणाऱ्या शपथविधी समारंभासाठी अनेकांना निमंत्रणे देण्यात आली आहेत. ज्यात न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या संपूर्ण कुटुंबाला निमंत्रण देण्यात आले आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या पत्नी आणि दोन मुली शपथविधीला उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे. तर सूर्यकांत यांचे त्यांचे तीन भाऊ ऋषिकांत, शिवकांत आणि देवकांत यांनाही या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.दरम्यान न्यायाधीश सूर्यकांत यांनी अनेक घटनात्मक खंडपीठांवर काम केले आहे. आजपर्यंत त्यांनी घटनात्मक, मानवी हक्क आणि प्रशासकीय कायद्याशी संबंधित एक हजारहून अधिक निर्णय घेतले आहेत. त्यांच्या प्रमुख निर्णयांमध्ये ३७० रद्द करण्याचा निर्णय कायम ठेवणे समाविष्ट आहे. तसेच सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनसह सर्व बार असोसिएशनमधील एक तृतीयांश जागा महिलांसाठी राखीव ठेवण्याचे निर्देश देण्याचे श्रेय देखील न्यायमूर्ती सूर्यकांत यांना जाते.

फीड फीडबर्नर 24 Nov 2025 9:30 am

भारताचे ५३वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत घेणार आज शपथ!

नवी दिल्ली: भारताचे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत आज शपथ घेणार आहेत. भारताच्या ५३व्या न्यायमूर्तींचा शपथविधी राष्ट्रपती भवनात होणार आहे. सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत यांचा कार्यकाळ सुमारे १४ महिन्यांचा असणार आहे. सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांची नियुक्ती, बदली आणि पदोन्नतीचे नियमन करणाऱ्या कायद्यानुसार, सर्वोच्च न्यायालयातील सर्वात वरिष्ठ न्यायमूर्तींना सरन्यायाधीश म्हणून नियुक्त केले जाते. या परंपरेनुसार, न्यायमूर्ती सूर्यकांत भारताचे ५३वे सरन्यायाधीश होणार आहेत.न्यायमूर्ती सूर्यकांत यांची ओळख?न्यायमूर्ती सूर्यकांत भारताचे ५३ वे सरन्यायधीश म्हणून शपथ घेणार आहेत. संवैधानिक, सेवा आणि नागरी कायद्यातील कौशल्यासाठी ओळखले जाणारे न्यायमूर्ती सूर्यकांत यांची न्यायालयीन कारकीर्द चार दशकांहून अधिक काळाची आहे. या कालावधीत त्यांनी भारतातील विविध न्यायालये आणि कायदेशीर संस्थांमध्ये महत्त्वाच्या भूमिका पार पाडल्या आहेत.हरियाणातील हिसार येथे १० फेब्रुवारी १९६२ रोजी एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेले न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी १९८१ मध्ये हिसार येथील सरकारी महाविद्यालयातून पदवी पूर्ण केली. १९८४ मध्ये त्यांनी रोहतक येथील महर्षी दयानंद विद्यापीठातून कायद्याची पदवी प्राप्त केली आणि त्याच वर्षी हिसार येथील जिल्हा न्यायालयात सराव सुरू केला.१९८५ मध्ये ते पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात सराव करण्यासाठी चंदीगडला गेले, जिथे त्यांनी संवैधानिक, सेवा आणि दिवाणी बाबींमध्ये कौशल्य मिळवले. गेल्या काही वर्षांत त्यांनी अनेक विद्यापीठे, मंडळे, महामंडळे, बँका आणि उच्च न्यायालयातही महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.९ जानेवारी २००४ रोजी न्यायमूर्ती सूर्यकांत यांची पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे कायमस्वरूपी न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. पुढे ५ ऑक्टोबर २०१८ रोजी न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला. २४ मे २०१९ रोजी त्यांना सर्वोच्च न्यायालयात बढती देण्यात आली.१२ नोव्हेंबर २०२४ पासून सर्वोच्च न्यायालयाच्या कायदेशीर सेवा समितीचे अध्यक्ष म्हणूनही काम करत करत होते.

फीड फीडबर्नर 24 Nov 2025 9:10 am

Smriti Mandhana Palash Muchhal Wedding | एकाच दिवशी दोन धक्के…स्मृतीच्या वडिलानंतर पलाश मुच्छलचीही प्रकृती बिघडली

सांगली : भारतीय महिला क्रिकेट संघाच्या उपकर्णधार स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचा सांगलीत २३ नोव्हेंबर रोजी रविवारी होणारा विवाह सोहळा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आला आहे. आनंदाच्या क्षणी शनिवारी अचानक स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना यांची तब्येत बिघडली. त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना लगेचच सांगलीच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, आता त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना काही दिवस डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार घ्यावे लागणार आहेत. त्यामुळे स्मृतीने विवाह सोहळा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.या घटनेनंतर पलाश मुच्छल याचे देखील पित्त वाढले आणि व्हायरल इन्फेक्शन झाले. त्यालाही एका खासगी रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आले असून प्राथमिक उपचारानंतर तो हॉटेलवर परतला आहे.ऐन लग्नाच्यावेळी स्मृतीच्या बाबांची आणि होणाऱ्या नवऱ्याची तब्येत बिघडल्याने घरात सध्या चिंतेचे वातावरण आहे. कुटुंबातील जवळचे नातेवाईक तोहीन मिश्रा यांनी सांगितले की, वडिलांची तब्येत पूर्णपणे सुधारल्यानंतरच विवाह सोहळा आयोजित केला जाणार आहे. मानधना आणि मुच्छल कुटुंबीयांनी एकत्रितपणे हा निर्णय घेत, चाहत्यांना कोणत्याही अफवा न पसरवण्याची आणि स्मृतीच्या वडिलांच्या लवकर स्वास्थ्यासाठी प्रार्थना करण्याची विनंती केली आहे.सांगलीत गेल्या दोन दिवसांपासून भारतीय महिला क्रिकेट संघातील खेळाडू उपस्थित होते. आज दुपारी चार वाजता मुख्य विवाह सोहळा पार पडणार होता. सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यतादेखील व्यक्त केली गेली होती. मात्र प्रकृतीच्या अडचणींमुळे आजचा हा सोहळा पुढे ढकलण्यात आला आहे.

फीड फीडबर्नर 24 Nov 2025 9:10 am

गौरी गर्जे मृत्यूप्रकरणी अखेर पंकजा मुंडेंच्या पीएला अटक; मध्यरात्री पोलिस स्थानकात शरण

Gauri Garje Death Case | भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या स्वीय सहाय्यक अनंत गर्जेची पत्नी डॉ. गौरी पालवेने वरळी येथील राहत्या घरी आत्महत्या केली. ती शनिवारी संध्याकाळी घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. मात्र, तिचा मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोप गौरी गर्जे यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. याप्रकरणी अनंत गर्जे, त्यांची बहीण शीतल गर्जे- आंधळे आणि दीर […] The post गौरी गर्जे मृत्यूप्रकरणी अखेर पंकजा मुंडेंच्या पीएला अटक; मध्यरात्री पोलिस स्थानकात शरण appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 24 Nov 2025 9:08 am

स्पॉटलाइट: राजकुमारी डायनाचा रिव्हेंज ड्रेस पुन्हा चर्चेत का?:पतीच्या अफेअरशी त्याचा काय संबंध, त्याला रिव्हेंज ड्रेस का म्हणतात, पाहा व्हिडिओ

राजकुमारी डायनाचा साधा दिसणारा ड्रेस इतका चर्चेत का आला की त्याला रिव्हेंज ड्रेस म्हटले जाऊ लागले आणि आजही तो त्याच नावाने ओळखला जातो? या ड्रेसमध्ये असे काय खास होते आणि ३१ वर्षांनंतरही तो पुन्हा एकदा बातम्यांमध्ये का आला आहे? संपूर्ण माहितीसाठी, वरील प्रतिमेवर क्लिक करा आणि व्हिडिओ पाहा.

दिव्यमराठी भास्कर 24 Nov 2025 9:06 am

धर्मध्वजा-2: नेहरू म्हणाले, रामलल्लाचा पुतळा हटवा:डीएम म्हणाले, मी राजीनामा देईन पण असे करणार नाही; टाळे लागण्यापासून ते संरचना कोसळण्यापर्यंतची कहाणी

अयोध्या आणि राम मंदिरावरील कायदेशीर लढाईचा दुसरा टप्पा २२-२३ डिसेंबर १९४९च्या रात्री सुरू झाला जेव्हा रामलल्ला अचानक वादग्रस्त रचनेत दिसले. उत्तर प्रदेशपासून दिल्लीपर्यंत सर्वजण हादरले. पंतप्रधान नेहरूंनी मूर्ती हटवण्याचे आदेश दिले. तथापि, फैजाबाद जिल्ह्याच्या तत्कालीन जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी स्पष्टपणे घोषित केले की ते राजीनामा देतील, पण मूर्ती हटवणार नाहीत. १९८६ मध्ये न्यायालयाच्या आदेशानंतर केवळ ४० मिनिटांनी वादग्रस्त रचनेचे कुलूप उघडण्यात आले. १९८९ मध्ये पंतप्रधान राजीव गांधी यांनी मंदिराची पायाभरणी केली. त्यानंतर, ६ डिसेंबर १९९२ रोजी दुपारी एका अनियंत्रित जमावाने वादग्रस्त रचनेचा पाडाव केला. दुसऱ्या भागात, १९४९ मध्ये रामलल्लाच्या मूर्ती दिसण्यापासून ते ६ डिसेंबर १९९२ रोजी वादग्रस्त संरचना पाडण्यापर्यंतची कहाणी.. २३ डिसेंबर १९४९, अयोध्या पोलिस स्टेशन ७ क्रमांकाचे कॉन्स्टेबल माता प्रसाद धापा टाकत पोलिस स्टेशनमध्ये आले आणि म्हणाले, साहेब, खूप गंभीर प्रकरण घडले आहे.पोलीस अधिकारी रामदेव दुबे यांनी वर्तमानपत्राची घडी घातली आणि विचारले, काय झालं?\रामलल्लाची मूर्ती बाबरी मशिदीच्या रचनेत, म्हणजेच जन्मस्थानात ठेवली आहे. पोलिस अधिकाऱ्याला धक्का बसला आणि त्याने विचारले, कोणी ठेवली?\साहेब, ५०-६० लोक होते. ते सर्व गर्दीत हरवून गेले. मला त्यापैकी तिघांची नावे नक्की माहिती आहेत: अभय रामदास, राम शुक्ला दास आणि सुदर्शन दास. बाकीच्यांबद्दल मला माहिती नाही. दुबे यांनी विचारले, मशिदीचे कुलूप कसे उघडले? आपली नोकरी धोक्यात असल्याचे पाहून काळजीत असलेल्या माता प्रसाद म्हणाले, साहेब, त्यांनी कुलूप तोडले. कॉन्स्टेबल क्रमांक ७ हंसराज यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्नही केला, पण त्यांनी ऐकले नाही. त्यांनी आत जागा तयार करण्यासाठी पायऱ्या आणि भिंतींवरून चुना काढला आणि मूर्ती आत ठेवली. दुबेंनी विचारले, सध्या वातावरण कसे आहे?साहेब, गर्दी वाढत आहे. लोक भजने गात आहेत. काही जण म्हणत आहेत की रामलल्ला प्रकट झाला आहे. त्या रात्री तिथे ड्यूटीवर असलेले कॉन्स्टेबल अब्दुल बरकतही तेच म्हणत आहेत. मंदिराच्या व्हरंड्याबाहेरचा आवाज वाढत होता. कोणीतरी पुन्हा पोलिस ठाण्यात कळवले की गर्दी ५,००० किंवा ६,००० पर्यंत वाढली आहे. प्रत्येकजण आत जाण्याचा प्रयत्न करत होता. दुबे यांनी ताबडतोब वरिष्ठ अधिकाऱ्यांना बातमी पाठवली. बातमी मिळताच फैजाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात गोंधळ उडाला. जिल्हाधिकारी के.के. नायर टेबलावर पसरलेले अहवाल वाचत होते. पोलिस अधीक्षक (एसपी) त्याच खोलीत चालत होते. साहेब, अयोध्येत गर्दी आधीच ५,००० पेक्षा जास्त झाली आहे. फैजाबादमध्येही तणाव आहे, ते म्हणाले.नायर यांनी त्यांचा चष्मा नीट केला– “अयोध्या पोलिस स्टेशनचा एफआयआर आला आहे का?” एसपींनी फाईल पुढे सरकवली, हो, उपनिरीक्षक रामदेव दुबे यांचा अहवाल. कलम १४७, २९५, ४४८... तिघांची नावे, उर्वरित ५०-६० अज्ञात. मशिदीला अपवित्र केल्याचा उल्लेख आहे. त्याच क्षणी, शहर दंडाधिकारी गुरुदत्त सिंह खोलीत आले आणि म्हणाले, साहेब, परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ शकते. कलम १४४ लागू करावे. कलम १४५ अंतर्गत, इमारत जप्त करून ताब्यात घ्यावी. नायर यांनी विचारले, समुदायाचा मूड कसा आहे? गुरुदत्त यांनी स्पष्टपणे सांगितले की, लोक रामलल्लाच्या 'दर्शनाला' चमत्कार मानत आहेत. जर आता कोणी मूर्ती हटवण्याबद्दल बोलले तर तो कायद्याचा प्रश्न राहणार नाही तर धर्माचा लढा असेल. नायर काही सेकंद गप्प राहिले. मग ते म्हणाले, ठीक आहे, कलम १४४ लागू करा. इमारत ताब्यात घ्या आणि फैजाबाद नगरपरिषदेच्या अध्यक्षा प्रिया दत्त राम यांना रिसीव्हर म्हणून नियुक्त करा. कोणताही लेखी आदेश जारी करण्यापूर्वी पूर्वस्थिती पूर्ववत करावी. गुरुदत्त यांनी विचारले - वादग्रस्त रचनेवर कुलूप लावायचे?\आम्ही कागदावर कुलूप मागवणार नाही, नायर हळूवारपणे म्हणाले. जमिनीवर काय होईल ते रिसीव्हर ठरवेल. दरम्यान, ही बातमी दिल्लीतील पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंपर्यंत पोहोचली. नेहरूंनी फाईल बंद केली आणि विचारले, फैजाबादमध्ये काय चालले आहे? मशिदीत एक मूर्ती ठेवली आहे? अधिकाऱ्याने उत्तर दिले, हो, अहवालात तेच म्हटले आहे.नेहरू म्हणाले, मला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री गोविंद बल्लभ पंत यांच्याशी बोलू द्या. थोड्या वेळाने, पंत टेलिफोन लाईनवर होते. नेहरू कडक आवाजात म्हणाले: पंतजी, हे खूप धोकादायक उदाहरण आहे. मशिदीत एक मूर्ती ठेवण्यात आली आहे. ती ताबडतोब काढून टाका. हे प्रकरण आताच सोडवले पाहिजे, अन्यथा एक मोठा वाद बनेल. पंत थोडा वेळ थांबले आणि म्हणाले, हो, मी ते पूर्ण करेन.फोन कट झाला. लखनौहून फैजाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांना आदेश पाठविण्यात आला: मूर्ती ताबडतोब हटवा. संध्याकाळपर्यंत फैजाबाद जिल्हाधिकारी कार्यालयातील वातावरण तणावपूर्ण झाले होते. जिल्हा दंडाधिकारी केके नायर यांनी एसपींना विचारले, जर आपण आज रात्री मूर्ती हटवण्याचा प्रयत्न केला तर काय होईल?एसपींनी सरळ उत्तर दिले, साहेब, आपल्याला गोळीबार करावा लागेल. गोळ्यांशिवाय हे अशक्य आहे. अशा वातावरणात कोणताही हिंदू आपल्यासोबत उभा राहणार नाही. सगळे म्हणत आहेत की रामलल्ला इथेच राहतील. गुरुदत्त सिंगही खोलीत होते. ते पुढे म्हणाले, साहेब, जर मूर्ती हटवली गेली तर दंगली होऊ शकतात. हा फक्त अयोध्येचा मुद्दा राहणार नाही; संपूर्ण जिल्हा पेटून उठेल. नायर यांनी फाईल बंद केली, पेन आणि कागद उचलला आणि मोठ्याने लिहू लागले. कमिशनरने मशिदीतून मूर्ती काढून त्या जन्मभूमी मंदिरात हलवण्याची योजना आखली आहे. आम्ही त्यावर चर्चा केली, परंतु मी स्पष्ट करतो की मी या कल्पनेशी सहमत नाही. यामुळे जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याचा धोका आहे. एसपी म्हणाले, साहेब, कृपया हेदेखील लक्षात ठेवा की परवानाधारक शस्त्रधारकांकडून शस्त्रे गोळा करणे अद्याप शक्य नाही. जर संघर्ष झाला तर गोळीबार होऊ शकतो. नायर यांनीही तेच कागदावर लिहिले. नंतर त्यांनी लिहिले, हिंदू पुतळे जिथे आहेत तिथेच ठेवण्याच्या बाजूने आहेत. ते त्यांच्यासाठी मारण्यास आणि मरण्यास तयार आहेत. काँग्रेस पक्षातही, मला पुतळे हटवण्याचे समर्थन करणारा एकही हिंदू सापडला नाही. मला जिल्ह्यात एकही पुजारी सापडणार नाही जो कोणत्याही लोभासाठी पुतळे हटवण्यास तयार असेल. नायर यांनी सुचवले की सरकारने मशीद ताब्यात घ्यावी आणि नियुक्त पुजारी वगळता हिंदू आणि मुस्लिमांना प्रवेशबंदी करावी. हे प्रकरण न्यायालयात पाठवावे. जोपर्यंत न्यायालय निकाल देत नाही तोपर्यंत कोणालाही ताबा देऊ नये. यामुळे रक्तपात टाळता येईल. मग नायर यांनी काही वेळ पेन थांबवले आणि लिहिले - जर सरकारने कोणत्याही किंमतीत पुतळे हटवण्याचा निर्णय घेतला तर मी विनंती करेन की मला प्रथम राजीनामा मिळावा. माझा विवेक मला तसे करण्याची परवानगी देत ​​नाही. खोलीत शांतता पसरली. एसपी आणि गुरु दत्त यांनी एकमेकांकडे पाहिले.एसपींनी हळूच विचारले, साहेब, तुम्ही हा अहवाल पाठवाल का? नायर यांनी सही केली, हो. हा अहवाल नाहीये, माझ्या विवेकाची साक्ष आहे. काहीही झाले तरी, उद्या कोणीही असे म्हणू नये की आम्ही परिस्थितीचा विचार न करता केवळ फाईलच्या आधारे निर्णय घेतला. २३ डिसेंबर रोजी दुपारी वादग्रस्त वास्तूला कुलूप लावण्यात आले. चार पुजारी आणि एका कोशाध्यक्षाला आत जाण्याची परवानगी देण्यात आली. इतर भाविकांना फक्त बाहेरून रामलल्लाचे दर्शन घेता आले. कुलूप पाहून एका तरुणाने म्हटले, ते कुलूप लावा, पण ही मशीद नाही, ती जन्मभूमी आहे. १९८६: ४० मिनिटांत कुलूप उघडण्याचा आदेश देण्यात आला १ फेब्रुवारी १९८६ रोजी फैजाबादमधील घड्याळात दुपारी ४ वाजत होते. जिल्हा न्यायाधीश कृष्ण मोहन पांडे न्यायालयात बसले होते. बाहेर शेकडो लोक गर्दी करत होते. पण आत फक्त तीनच लोक होते: न्यायाधीश पांडे, जिल्हा दंडाधिकारी इंदू कुमार पांडे आणि एसएसपी करमवीर सिंग. वादग्रस्त वास्तूचे कुलूप उघडण्यासाठी टेबलावर एक याचिका होती. न्यायाधीश पांडे यांनी दोन्ही अधिकाऱ्यांकडे पाहिले आणि म्हणाले, मला माहिती आहे की तुम्हा दोघांनाही तो परिसर माहिती आहे. माझा प्रश्न सोपा आहे. जर मी कुलूप उघडण्याचा आदेश दिला तर फैजाबादमधील कायदा आणि सुव्यवस्थेचे काय होईल? तुमचा अहवाल काय म्हणतो? एसएसपी करमवीर सिंग यांना माहित होते की या प्रश्नाचे उत्तर दिल्लीच्या लिपीनुसार असावे. पंतप्रधानांचे सल्लागार अरुण नेहरू करमवीर सिंग यांना आदेश देत होते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री वीर बहादूर सिंग यांना याची माहिती नव्हती. करमवीर सिंग म्हणाले, कोणतीही अडचण येणार नाही. आम्ही व्यवस्था केली आहे. दुपारी ४:४० वाजता न्यायाधीश कृष्ण मोहन पांडे यांनी कुलूप उघडण्याचे आदेश दिले. आदेश दिल्यानंतर जेमतेम ४० मिनिटे उलटल्यानंतर, संध्याकाळी ५:२० वाजता, इंदू कुमार पांडे आणि करमवीर सिंग वादग्रस्त रचनेच्या प्रवेशद्वारावर उपस्थित होते. कुलूप उघडण्याचे थेट प्रक्षेपण करण्यासाठी लखनौ दूरदर्शनची टीम तीन तासांच्या प्रवासानंतर आधीच पोहोचली होती. एसएसपी कर्मवीर सिंग यांनी कुलूप उघडताच संपूर्ण अयोध्या जय श्री राम च्या जयघोषाने दुमदुमून गेला. १९८९: राजीव गांधी यांनी पायाभरणी केली तीन वर्षांनंतर, १९८९ च्या लोकसभा निवडणुका जवळ येत होत्या. पंतप्रधान राजीव गांधी सत्तेच्या शिखरावर होते, परंतु राजकीय विरोध वाढत होता. त्यांचे वैयक्तिक सहाय्यक आर.के. धवन यांनी त्यांना एक धोरणात्मक पाऊल सुचवले. धवन म्हणाले, निवडणुकीपूर्वी अयोध्येत राम मंदिराची पायाभरणी करा. तुमचा निवडणूक प्रचार अयोध्येपासून सुरू करा. यामुळे भावनिक लाट निर्माण होईल आणि हिंदू मतदार मनापासून मतदान करतील. राजीव गांधींना ही कल्पना आवडली. ९ नोव्हेंबर १९८९ रोजी अयोध्येत राम मंदिराच्या पायाभरणी समारंभाची तयारी सुरू झाली. राज्याचे नवे मुख्यमंत्री नारायण दत्त तिवारी यांना या निर्णयाचे राजकीय परिणाम होण्याची भीती वाटत होती. ते केंद्रीय गृहमंत्री बुटा सिंग यांच्यावरही नाराज होते. तिवारी यांनी त्यांच्या पीएला सांगितले की, पाया घालण्याचे ठिकाण वादग्रस्त नाही हे प्रशासनाने प्रमाणित करावे यावर बुटा सिंग ठाम आहेत. तर हे खोटे आहे. त्यांना माहित आहे की ही वादग्रस्त जमीन आहे. अखेर राजीव गांधी सरकारने राम मंदिराची पायाभरणी केली. काँग्रेसने अयोध्येतून निवडणूक मोहीम सुरू केली. हजारो लोकांच्या गर्दीला संबोधित करताना राजीव गांधींनी जाहीर केले की, आम्ही या देशात रामराज्य स्थापन करण्यासाठी वचनबद्ध आहोत. पण तरीही १९८९ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाचा पराभव झाला. अडवाणी ओरडत राहिले, कारसेवकांनी बांधकाम पाडले मे १९९२, उज्जैन संतांची एक बैठक सुरू होती. तिथून दिल्लीला एक स्फोटक संदेश पाठवण्यात आला ज्यामध्ये घोषणा करण्यात आली की अयोध्येत कारसेवा ९ जुलै १९९२ रोजी सुरू होईल. या घोषणेमुळे पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव यांचे राजकीय सल्लागार जितेंद्र प्रसाद अस्वस्थ झाले. जितेंद्र प्रसाद यांनी घाईघाईने कोणालातरी फोन केला - संतांना दिल्लीत येऊन पंतप्रधानांना भेटायला सांगा. हे प्रकरण एकतर्फी वाटू नये. अन्यथा सरकार काहीही करत नाही असा संदेश जाईल. दिल्लीतील पंतप्रधानांच्या निवासस्थानी पी.व्ही. नरसिंह राव यांच्यासमोर महंत अवैद्यनाथ, परमहंस रामचंद्र दास आणि पेजावर स्वामी यांच्यासह अनेक संत बसले होते. महंत अवैद्यनाथ थेट म्हणाले - पंतप्रधान, एक वर्ष झाले आहे. मंदिराच्या मुद्द्यावर कोणताही गंभीर पुढाकार घेतलेला नाही. आम्ही ९ जुलैपासून कार सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही फक्त तुम्हाला माहिती देत ​​आहोत, जेणेकरून नंतर आम्ही असे म्हणू शकणार नाही की आम्ही तुम्हाला माहिती न देता सुरुवात केली. नरसिंह राव हळूवारपणे म्हणाले, मलाही यावर जलद तोडगा हवा आहे. मला अयोध्येत मंदिर बांधायचे आहे, पण हा प्रश्न राजकीय बनला आहे. धार्मिक बाबी धार्मिक आधारावर सोडवल्या पाहिजेत. मला तुमचे आशीर्वाद हवे आहेत. परमहंस रामचंद्र दास कठोरपणे म्हणाले, पंतप्रधान, हे राजकारण नाहीये, हा राजकीय इच्छाशक्तीचा प्रश्न आहे. बैठक संपली, पण राव यांनी कारसेवा थांबवण्यास सांगितले नाही किंवा पुढे काय करायचे ते सांगितले नाही. ९ जुलै रोजी अयोध्येत कारसेवेला सुरुवात झाली. प्रस्तावित मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराची पायाभरणी सकाळी ८:४० वाजता १,४०० वैदिक विद्वानांच्या जपाच्या दरम्यान करण्यात आली. तत्कालीन भाजप खासदार विनय कटियार आणि विश्व हिंदू परिषदेचे प्रमुख अशोक सिंघल यांनी पहिली काँक्रीटची बकेट ओतली. हे बांधकाम राज्य सरकारच्या मालकीच्या २.७७ एकर जमिनीवर होत होते. केंद्र सरकार याला न्यायालयाचा अवमान म्हणत होते. तथापि, भाजप सरकारचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री कल्याण सिंह राजकीय ढाल म्हणून उभे राहिले. त्यांनी सांगितले की हे बांधकाम एका विवादित क्षेत्रात होत आहे. ११ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एम.एन. वेंकटचलैय्या यांनी स्पष्टपणे सांगितले की कोणतीही कायमस्वरूपी बांधकामे पाडली जातील. त्यानंतर, २६ जुलै रोजी कार सेवा थांबवण्यात आली. रविवार, ६ डिसेंबर १९९२. सकाळी: ७:०० वाजता ठिकाण: भाजप खासदार विनय कटियार यांचे निवासस्थान - हिंदू धाम, अयोध्या अयोध्येतील हवा जय श्री राम च्या जयघोषाने दुमदुमून गेली. सर्वत्र कारसेवकांचा समुद्र गर्दी करत होता. विनय कटियारच्या घरातील फोन वाजला. दुसऱ्या बाजूला पंतप्रधान नरसिंह राव होते. राव म्हणाले, विनयजी, आजची कारसेवा शांततेत होईल, बरोबर? ती फक्त प्रतीकात्मक असेल, बरोबर?विनय कटियार यांनी आश्वासन दिले, काल जे काही ठरले ते होईल, पंतप्रधान. प्रतीकात्मक कार सेवा असेल, कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही. तुम्ही खात्री बाळगा. सकाळी ८ वाजता, लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी हिंदू धाम येथे पोहोचले. अशोक सिंघल तिथे आधीच बसले होते. अडवाणी हळूवारपणे म्हणाले, आपण प्रतीकात्मक कार सेवेत एवढी मोठी गर्दी कशी जमवू? जर गर्दी नियंत्रणाबाहेर गेली तर आपण काय करू? अशोक सिंघल म्हणाले, अडवाणीजी, लोक वर्षानुवर्षे चिन्हांची नाही तर निकालांची वाट पाहत आहेत.तेवढ्यात मुख्यमंत्री कल्याण सिंह यांनी फोन केला. कल्याण सिंह यांनी कटियार यांना सांगितले, विनयजी, परिस्थितीवर नियंत्रण मिळवा. कारसेवकांना नियंत्रणात ठेवणे महत्वाचे आहे. कटियार यांनी त्यांचे वचन पुन्हा सांगितले - मुख्यमंत्री महोदय, जे ठरले आहे त्यानुसार प्रतीकात्मक कार सेवा आयोजित केली जाईल. आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू. निरीक्षक, डीएम आणि पहिला सामना वेळ: सकाळी ९ ते दुपारी १२ फैजाबाद सर्किट हाऊसमध्ये जिल्हा दंडाधिकारी (डीएम), एसएसपी (एसएसपी) आणि सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षक तेज शंकर यांच्यात बैठक सुरू होती. सकाळी ९:३० वाजता कारसेवा सुरू झाली. राम चबुतऱ्याभोवती बॅरिकेड्स उभारण्यात आले. साधू आणि संत त्यांच्या पूजा साहित्यासह व्यासपीठावर बसले. त्यानंतर एएसपी अंजू गुप्ता नेत्यांसह वादग्रस्त ठिकाणी पोहोचल्या. अडवाणींना पाहून जमावाने गृहीत धरले की नेते कारसेवा थांबवण्यासाठी किंवा मर्यादित करण्यासाठी आले आहेत, जसे त्यांनी पूर्वी केले होते. संतप्त कारसेवकांनी बॅरिकेड्सवर धडकण्यास सुरुवात केली. पोलिसांनी लाठीमार केला, ज्यामुळे त्यांचा राग आणखी भडकला. अडवाणी आणि जोशी यांना धक्काबुक्की करण्यात आली. आरएसएस आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांना मुख्य व्यासपीठावर, राम कथा कुंजवर आणण्यात यश मिळवले. गर्दीचा मूड बदलला होता. व्यासपीठावरून भाषणे सुरू झाली, नेत्यांनी प्रतीकात्मक कारसेवेचे आवाहन केले. नंतर, रचनेकडे बोट दाखवत ते त्याला मुघल गुलामगिरीचे प्रतीक म्हणू लागले. भाषणांनी उसळत्या भावनांना आणखीनच चालना दिली. दुपारी १२ वाजताच्या सुमारास, लालकृष्ण अडवाणी यांनी मायक्रोफोन घेतला. त्याच क्षणी शेषावतार मंदिराच्या दिशेने पोलिसांवर दगडफेक सुरू झाली. मोकळ्या मैदानात असलेल्या पोलिसांना दगडफेकीच्या सततच्या माऱ्यामुळे मागे हटावे लागले. पोलिस निघून जाताच, सुमारे २०० कारसेवक बॅरिकेड्स तोडून बाबरी मशीद परिसरात गेले. पाडकाम 'नियंत्रण कक्ष' वेळ: दुपारी १२ ते १:३० सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षक तेज शंकर राम चबुतऱ्यावर उपस्थित होते. साधू आणि संत हवन करत होते. अचानक, कारसेवकांच्या जमावाने हवन कुंडावर हल्ला केला. पूजा साहित्य पायदळी तुडवले गेले. साधू आणि संतांनी निघून जाणेच योग्य ठरले. तेज शंकर यांच्या लक्षात आले की राम चबुतऱ्यावर विटा ठेवण्याऐवजी, कारसेवक वादग्रस्त रचनेतून विटा काढत होते. वादग्रस्त संकुलाजवळील पोलिसांच्या वॉचटावरवर एक कारसेवक चढताना दिसला. बळाचा वापर न करण्याचे आदेश देण्यात आल्यामुळे पोलिसांना माघार घ्यावी लागली होती. टॉवरवरील कारसेवकाने शिट्टी वाजवली आणि कारसेवकांना निर्देश दिले: कुठे चढायचे, कोणत्या भागात हल्ला करायचा. वॉचटावर आता बाबरी पाडण्यासाठी नियंत्रण कक्ष बनला होता. कारसेवकांनी टेलिफोन लाईन्स कापल्या. अयोध्येची संपर्क व्यवस्था जमावाच्या दयेवर सोडण्यात आली. मशिदीच्या घुमटांवर हुक आणि दोरी लावण्यात आल्या. राम कथा कुंजच्या व्यासपीठावरून, लालकृष्ण अडवाणी वारंवार कारसेवकांना आवाहन करत होते, परंतु कारसेवकांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. अशोक सिंघल आणि महंत नृत्य गोपाल दास हे देखील स्टेजवरून उतरले आणि कॅम्पसकडे निघाले, पण गर्दीने त्यांचा मार्ग अडवला. त्यांचे कपडेही फाटले होते. स्टेजवर कोणीतरी लाऊडस्पीकरची तार कापली. आता स्टेजवरील आवाज बंद झाला होता. फक्त हातोड्यांचा आवाज आणि जय श्री राम च्या घोषणा ऐकू येत होत्या. कल्याण सिंग यांचा हट्टीपणा वेळ: दुपारी १२:२५ ते २:५० अयोध्येची बातमी दिल्लीत पोहोचताच गोंधळ उडाला. केंद्रीय गृहसचिवांनी उत्तर प्रदेशच्या डीजीपीशी बोलले. कडक स्वरात गृहसचिवांनी फोनवरून सांगितले, ही रचना पाडली जात आहे. ताबडतोब केंद्रीय सैन्याचा वापर करा. दुपारी १२:२५ वाजता केंद्रीय गृहमंत्री एस.बी. चव्हाण यांनी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांना फोन केला. संतप्त झालेल्या चव्हाण यांनी कल्याण सिंह यांना सांगितले, मुख्यमंत्री, ताबडतोब केंद्रीय सैन्याचा वापर करा; इमारतीवर हल्ला झाला आहे! कल्याण सिंह यांनी उत्तर दिले, मला वेगळी माहिती मिळत आहे. मी परिस्थिती जाणून घेईन आणि तुमच्याशी बोलेन. दुपारी १२:३० वाजता कल्याण सिंह यांनी अयोध्या नियंत्रण कक्षाला फोन केला. त्यांचा राग शिगेला पोहोचला होता. ते म्हणाले, गोळीबार न करता कारसेवकांना मागे हटवा! दुपारी १:३० वाजता, अयोध्या नियंत्रण कक्षाला मुख्यमंत्र्यांचा लेखी संदेश मिळाला - गोळ्या डागल्या जाणार नाहीत, त्याशिवाय परिसर रिकामा करा. दुपारी १:५० वाजता, आयटीबीपीच्या तीन बटालियन अयोध्येला रवाना झाल्या, परंतु कारसेवकांच्या मोठ्या जमावाने त्यांना वाटेतच अडवले. दगडफेक सुरू झाली. दंडाधिकाऱ्यांनी केंद्रीय दलाला माघार घेण्याचा लेखी आदेश जारी केला. बाबरी मशिदीच्या घुमटावर वाढत्या हल्ल्यांमुळे रामलल्लाचे पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी रामलल्लाला बाहेर काढण्याचा निर्णय घेतला. जेव्हा कारसेवकांनी रामलल्लाला बाहेर येताना पाहिले तेव्हा त्यांनी मशिदीच्या घुमटावर हल्ले तीव्र केले. दुपारी २:५० वाजता, गुप्तचर विभागाने गृह मंत्रालयाला अहवाल दिला: संरचनेचा पहिला घुमट कोसळला आहे. केंद्रीय सैन्य घटनास्थळी पोहोचू शकत नाही. उत्तर प्रदेश सरकार गोळीबार न करता परिस्थिती नियंत्रणात आणण्याची मागणी करत आहे, जे शक्य नाही. शेवटी, मशीद पाडण्यात आली. मुख्यमंत्री कल्याण सिंह यांनी ताबडतोब बैठक बोलावली. त्यांनी गोळीबार न करण्याचा आदेश नोंदवला, जेणेकरून कोणत्याही अधिकाऱ्यावर जबाबदारी टाकली जाणार नाही. संध्याकाळी ५:३० वाजता त्यांनी एका ओळीचे राजीनामा पत्र लिहिले आणि ते राज्यपालांना सादर केले: मी राजीनामा देत आहे. कृपया ते स्वीकारा. उद्या अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या बांधकामाची कहाणी वाचा.

दिव्यमराठी भास्कर 24 Nov 2025 8:47 am

Pune News: वाहतूक कोंडीवर ‘मेगा सोल्युशन’! ३० मीटर जमिनीखाली ४५ किमीचा बोगदा; २२ हजार कोटींचा महाप्रकल्प

प्रभात वृत्तसेवा पुणे – शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पुणे- अहिल्यानगर, पुणे- सोलापूर, पुणे- सातारा आणि पुणे- मुंबई एक्स्पेस वे अशा चारही महामार्गांना जोडणारा सुमारे ४५ किलोमीटर लांबीचा बोगदा करण्याचा पर्याय पुढे आला आहे. यासंदर्भात सल्लागार कंपनीने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे (पीएमआरडीए) हे प्रस्ताव सादर केले आहे.यानुसार येरवडा ते खडीमशिन चौक, शिवाजीनगर ते येरवडा आणि […] The post Pune News: वाहतूक कोंडीवर ‘मेगा सोल्युशन’! ३० मीटर जमिनीखाली ४५ किमीचा बोगदा; २२ हजार कोटींचा महाप्रकल्प appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 24 Nov 2025 8:15 am

पुण्यात बिबट्याची दहशत! लोहगाव विमानतळ आणि औंधमध्ये बिबट्या दिसला; वनविभागाचा हाय अलर्ट

प्रभात वृत्तसेवा पुणे – लोहगाव विमानतळ आणि औंध परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्याने वनविभागाने नागरिकांना खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत.१९ नोव्हेंबरला पहाटे साडेपाच वाजता आणि पुन्हा सायंकाळी सात वाजून चाळीस मिनिटांनी विमानतळाच्या परिसरात परिसरात एक बिबट्या दिसल्याचे २० नोव्हेंबर रोजी पुणे विमानतळ प्राधिकरणाने वन विभागाला कळवले आहे.लोहगावच्या हद्दीत गेल्या १५-२० दिवसांपासून बिबट्याचे निरीक्षण सुरू आहे. त्याला पकडण्यासाठी […] The post पुण्यात बिबट्याची दहशत! लोहगाव विमानतळ आणि औंधमध्ये बिबट्या दिसला; वनविभागाचा हाय अलर्ट appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 24 Nov 2025 8:00 am

उमरटीतून ५०० गावठी कट्टे पुण्यात! गावठी शस्त्रं आणि गुन्हेगारांच भयावह कनेक्शन; पोलिसांचा मोठा खुलासा

प्रभात वृत्तसेवा पुणे – मध्य प्रदेशातील उमरटी गावातून मागील पाच वर्षांत पुणे शहरात तब्बल पाचशे गावठी कट्टे विकण्यात आले आहेत. या कट्ट्यांचा वापर गुन्हेगारी कारवायांसाठी केला आहे. यामुळे हे कट्टे ज्या ज्या गुन्हेगारी कारवायांत वापरले, त्यामध्ये संबंधित विक्रेत्यांनाही आरोपी केले जाणार आहे. इतकेच नव्हे, तर शनिवारी उमरटीतील कारवाईत अटक केलेल्यांना मोक्काच्या कक्षेत घेण्यात येणार आहे. […] The post उमरटीतून ५०० गावठी कट्टे पुण्यात! गावठी शस्त्रं आणि गुन्हेगारांच भयावह कनेक्शन; पोलिसांचा मोठा खुलासा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 24 Nov 2025 7:50 am

RSSसारखी रणनीती आखणार का मायावती?:MY फॉर्म्युल्याला टक्कर देण्याची तयारी, 2027 मध्ये भाजप नव्हे तर अखिलेश लक्ष्य

लखनौमध्ये मायावतींनी रॅली काढली तेव्हा गर्दी खूप वाढली होती. ही गर्दी सोबत भाकरी घेऊन आलेली होती. कल्पना करा की जनता किती वचनबद्ध असेल, केवळ मायावतींच्या नावाने जमली असेल. अन्यथा, जेव्हा खाण्यापिण्याची व्यवस्था चांगली असते तेव्हाच लोक रॅलींना उपस्थित राहतात. कधीकधी, लोक लग्नाच्या मिरवणुकीसारखे स्वागत करण्याची मागणी करतात. ज्येष्ठ पत्रकार अमिताभ अग्निहोत्री हे केवळ बसपाची रॅली नाही तर मायावतींच्या सक्रिय राजकारणात पुनरागमनाचे प्रतीक मानतात. ते म्हणतात की, ही रॅली मायावतींची मजबूत मतपेढी दर्शवते, जी त्यांच्या पुन्हा सक्रिय होण्याची वाट पाहत आहे. बसपाच्या एका नेत्याने याला दुजोरा देत म्हटले आहे की, मायावती यांनी उत्तर प्रदेशातील सर्व १८ विभागांमध्ये तसेच पश्चिम उत्तर प्रदेशातील ५-७ जिल्ह्यांमध्ये रात्रीच्या वेळी कॅम्पिंग करण्यास सहमती दर्शविली आहे. गेल्या वेळी मायावतींनी निवडणुकीपूर्वी काही सभा घेतल्या होत्या, परंतु यावेळी आम्ही शक्य तितक्या सभा घेण्याचा प्रयत्न करू. खरं तर, २००७ पासून मायावतींच्या राजकीय सक्रियतेत सातत्याने घट होत गेली आहे. हा परिणाम त्यांच्या जागांच्या संख्येत आणि मतदारांच्या वाट्यामध्येही दिसून आला. २००७ मध्ये २०६ जागा आणि ३०.४% मते मिळवणाऱ्या बसपाच्या २०१२ मध्ये ८० जागा आणि २५.९% मते कमी झाली. २०१७ मध्ये १९ जागांसह हा मतदानाचा वाटा २२% आणि २०२२ मध्ये फक्त एका जागेसह १३% पर्यंत घसरला. २०२७ मध्ये उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीसाठी मायावतींची रणनीती काय आहे? त्या कोणाला आपला विरोधक मानत आहेत? यावेळी त्या आरएसएसप्रमाणे प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याची तयारी करत आहेत का? दैनिक भास्करने बसपा, पक्ष नेते आणि राजकीय तज्ज्ञांमधील सूत्रांकडून हे समजून घेण्याचा प्रयत्न केला. यूपी निवडणुकीत मायावतींचा प्रभाव दिसून येईलबसपातील आमच्या सूत्रांनी आम्हाला सांगितले की, यावेळी मायावती यांनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वीच आपली उपस्थिती दाखवण्यास सुरुवात केली नाही, तर त्यांनी आधीच आपली उपस्थिती दाखवण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी ९ ऑक्टोबर रोजी लखनऊमध्ये एक रॅली काढली आणि त्यानंतर १९ नोव्हेंबर रोजी दिल्लीत पाच सभा घेतल्या. हा फक्त एक प्रोमो आहे; मायावती संपूर्ण चित्रपटात मुख्य पात्र असतील. यावेळी एवढी सक्रियता का? उत्तर होते, बसपा प्रमुखांना हे लक्षात आले आहे की जर दलित राजकारणासाठी जागा सोडली तर दुसरे कोणीतरी यात पाऊल ठेवू शकते. दशकांचे कष्ट वाया जातील. बघा, कोणीही जिवंत असताना त्यांचा वारसा कोणालाही हिरावून घेऊ देऊ इच्छित नाही. त्यांच्या जवळच्या लोकांनीही त्यांना सल्ला दिला आहे. तुम्ही मला सांगा, चंद्रशेखर आझाद सारख्या नेत्याने मायावतींच्या अनुपस्थितीमुळेच आपले स्थान सुरक्षित केले. म्हणूनच आता त्या केवळ त्यांच्या पारंपरिक मतदारांनाच नव्हे तर मुस्लिम मतदारांनाही गमावण्याचा निर्धार करत आहेत. यावेळी, मायावती दोघांनाही खुश करण्याचा विचार करत आहेत. ते पुढे स्पष्ट करतात, पुढील वर्षभरात, मायावती लखनौप्रमाणेच जिल्ह्यातील कार्यकर्त्यांसोबत किमान सहा रॅली आणि २० बैठका घेतील. हे अद्याप अंतिम झालेले नसले तरी, त्या त्यांच्या काही कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन त्यांना उत्साहित करू शकतात. मायावती १८ विभागांमध्ये रात्र घालवणार, चहा-जेवणावर रणनीती आखली जाईलउत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी मायावतींनी आणखी कोणती तयारी केली आहे असे विचारले असता, ज्येष्ठ पत्रकार अमिताभ अग्निहोत्री म्हणाले, मी जवळजवळ ३५ वर्षांपासून बसपा कव्हर करत आहे. मी काही वर्षांपासून कांशीराम यांचे राजकारण पाहिले आहे. मी मायावतींचे राजकारणही जवळून पाहिले आहे. यावेळी त्या निश्चितच एक कसून रणनीती आखत आहेत. यावेळी मायावती उत्तर प्रदेशातील १८ विभागांमध्ये रात्रीचे शिबिरे घेतील. यापूर्वी त्यांनी कांशीराम यांच्यासोबत रात्रीचे शिबिरे घेतली होती. त्यावेळी त्या सायकलने गावोगावी फिरत होत्या. पण मायावती बसपा प्रमुख आणि नंतर मुख्यमंत्री झाल्यापासून, रात्रीचे शिबिरे झालेले नाहीत आणि सायकलही बाहेर काढण्यात आलेली नाही. तथापि, यावेळी मायावती बसपा सुप्रीमो म्हणून कामगारांमध्ये जाणार नाहीत, तर कांशीराम यांच्यासोबत गेलेल्या मायावती म्हणून जातील. त्यांच्या रात्रीच्या कॅम्पिंगचा अर्थ फक्त बैठका घेणे नाही, तर कार्यकर्त्यांसोबत दिवसरात्र घालवणे आणि त्यांच्यात पूर्वीसारखाच उत्साह निर्माण करणे आहे. नाव न सांगण्याच्या अटीवर बसपाचा एक नेता या दाव्याला दुजोरा देतो. तो म्हणतो, यावेळी, आम्ही अधिक सभा घेण्याचा प्रयत्न करू आणि कोणताही परिसर वगळला जाणार नाही याची खात्री करू. म्हणून, सभांची मालिका फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये सुरू होईल. रात्रीचा चौपाल चार उद्दिष्टांसह आयोजित केला जाईल१. सूत्रानुसार, हे रात्रीचे शिबिर एका कुटुंबासारखे असेल जिथे कुटुंबप्रमुख एकत्र बसून त्यांचे दुःख आणि वेदना सामायिक करण्याचा निर्णय घेतात. यामुळे कार्यकर्ते आणि बसपा प्रमुख यांच्यातील दरी कमी होईल. २. बसपा सुप्रिमो स्वतः पक्ष कार्यकर्त्यांकडून अभिप्राय घेतील, जेणेकरून त्यावर पुढील काम करता येईल. ३. या काळात पक्षाचा विस्तारही होईल. प्रत्येक कार्यकर्ता पक्षात सामील होऊ इच्छिणाऱ्या काही नवीन लोकांना सोबत घेऊन येईल. ४. रात्रीच्या शिबिराचा मोठ्या प्रमाणात प्रचार केला जाईल आणि त्यांच्या नेत्या मायावती परतल्या आहेत असा संदेश देण्याचा प्रयत्न केला जाईल, जेणेकरून दलित मतदारांना खात्री मिळेल आणि ज्यांना जबरदस्तीने बाहेर पडण्यास भाग पाडले गेले आहे त्यांना परत आणता येईल. MY च्या विरुद्ध असलेल्या DM वर काम सुरू; अखिलेश चक्रव्यूहात अडकणारयावेळी, बसपा प्रमुखांनी सपा प्रमुख अखिलेश यादव यांच्याविरुद्ध भूलभुलैया रचण्यास सुरुवात केली आहे. सूत्रानुसार, या निवडणुकीत मायावती आणि ओवैसी एकत्र असतील. दोघांमध्ये आधीच चर्चा झाली आहे. जागावाटपाची व्यवस्था जवळजवळ अंतिम झाली आहे. बसपा नेते आणि प्रवक्ते एमएच खान यांना याबद्दल विचारले असता ते म्हणाले, मायावती कधी मुस्लिमांसोबत नव्हत्या? मागील निवडणुकांमधील आकडेवारी पहा; त्यांनी नेहमीच मुस्लिमांना मोठ्या संख्येने तिकिटे दिली. तथापि, ओवेसींसोबतच्या युतीबद्दल ते म्हणाले, यावर बसपा प्रमुख निर्णय घेतील. त्या जे काही निर्णय घेतील ते सर्वांना मान्य असेल. याबद्दल ज्येष्ठ पत्रकार अमिताभ म्हणतात, पश्चिम उत्तर प्रदेशात चौधरी चरण सिंह यांच्या पक्षाने जाट-मुस्लिम राजकारण केले. तिथे हा फॉर्म्युला प्रचंड हिट झाला. तथापि, २०१३ मध्ये मुझफ्फरनगर दंगलीनंतर हा फॉर्म्युला तुटला. चौधरी चरण सिंह यांचे वारस अजित सिंह यांचाही मृत्यू झाला. तथापि, हे फॉर्म्युला निश्चितच चाचणी केलेले आहे. जर दलित आणि मुस्लिम एकत्र आले तर अंदाजे २३-२४% मते एकत्र येतील. निवडणुकीवर प्रभाव पाडण्यासाठी ही संख्या पुरेशी मोठी आहे. एका तरुण दलित बसपा कार्यकर्त्याने म्हटले आहे की, हे डीएम समीकरण अखिलेश यादव यांना सर्वात जास्त नुकसान पोहोचवेल आणि दलितांना हेच हवे आहे. कारण उत्तर प्रदेशात यादवांकडून दलितांवर सर्वाधिक अत्याचार होतात. ब्राह्मण हे फक्त एक प्रतिष्ठित व्यक्ती आहेत. दलित आणि मुस्लिमांना एकत्र येण्यास कोणतीही अडचण नाही. काम आधीच सुरू झाले आहे. आमचे पथक तयार आहेत. ते शांतपणे काम करत आहेत, मोठ्याने नाही तर घरोघरी जाऊन काम करत आहेत, जेणेकरून निवडणुकीच्या किमान सहा महिने आधी आम्हाला डेटा गोळा करता येईल. त्यानंतर आम्ही या युतीसाठी आमची तयारी आणखी मजबूत करू शकतो. शांतपणे घरोघरी जाऊन आरएसएसप्रमाणे बैठका घेत आहेत का?ते म्हणतात, आरएसएस ही एक अशी संघटना आहे जी एका चांगल्या रणनीतीनुसार विकसित आणि अंमलात आणते. हे निर्विवाद आहे. जर तुम्ही एखाद्याकडून काही शिकू शकत असाल तर शिकण्यात काय नुकसान आहे? पश्चिम उत्तर प्रदेशातील हे तरुण कार्यकर्ते त्यांची ओळख उघड करू इच्छित नाहीत. ते म्हणतात की त्यांना वरून फक्त मतदारांमध्ये बोलण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यांनी त्यांच्या रणनीतीबद्दल माध्यमांशी चर्चा करू नये. निवडणुका जवळ आल्यावर मायावती स्वतः हे स्पष्ट करतील. मिश्रा-माया आणि पुतण्या आकाश हे त्रिकूट झाले सक्रियबसपमधील आमच्या सूत्रांनी सांगितले की, आजकाल मायावती आणि त्यांचे दत्तक बंधू सतीश चंद्र मिश्रा २००७ मध्ये होते तितकेच जवळचे आहेत. भेटींचे प्रमाण वाढले आहे. मायावती, त्यांचे पुतणे आकाश आणि मिश्रा हे त्रिकूट सध्या पक्षात प्रभावी शक्ती आहेत. आकाशसोबतचे मतभेद दूर करण्यात सतीश चंद्र मिश्रा यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचेही सूत्रांनी उघड केले. यावेळी मायावती पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि मतदारांना रॅली आणि सार्वजनिक सभांमध्ये सांगतील की कांशीरामच्या मृत्यूनंतर मायावतींनी दलित हितांना प्रोत्साहन दिले तसेच आकाश त्यांच्यानंतरही तेच करतील. बसपा ही भाजपची बी-पार्टी आहे का?बसपाचे प्रवक्ते एमएच खान म्हणतात, हा केवळ विरोधकांचा प्रचार आहे. ते हे जाणूनबुजून करतात. जेव्हा आधी युती झाल्या होत्या तेव्हा परिस्थिती वेगळी होती. आता त्या वेगळ्या आहेत. सध्या तरी आम्ही भाजपला आव्हान म्हणून उभे राहू, त्यांच्यासोबत नाही. तथापि, बसपाच्या एका सूत्राने असेही म्हटले आहे की पक्षाचे प्राथमिक लक्ष्य सपाला आव्हान देणे आहे. भाजप दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि राजकारणात कोणीही कायमचे शत्रू किंवा मित्र नसतात. हो, या निवडणुकीत सपा कायमचे शत्रू आहे. मी एवढेच म्हणू शकतो. मायावतींचे जुने सहकारी म्हणाले - बहनजींना समजणे अशक्य आहेआम्ही नसीमुद्दीन सिद्दीकी यांच्याशीही बोललो, जे ३६ वर्षांपासून मायावतींचे राजकीय भागीदार आहेत. ते आठ वर्षांपूर्वी त्यांच्यापासून वेगळे झाले. नसीमुद्दीन सिद्दीकी यांचा असा विश्वास आहे की मायावतींची रणनीती समजणे अशक्य आहे. ते स्पष्ट करतात, एके दिवशी, अचानक, बहनजींनी लखनऊच्या त्याच मैदानात एक सभा बोलावली जिथे त्यांनी नुकतीच एक सभा घेतली होती आणि भाजपशी युती तोडली. तिने कोणाशीही सल्लामसलत केली नाही किंवा कोणतीही बैठक घेतली नाही. तुम्ही त्यावेळी सरकारमध्ये एक वरिष्ठ मंत्री होता. तिने तिच्या स्वतःच्या वरिष्ठ मंत्र्यांशी सल्लामसलत केली नव्हती का? 'नाही, तिचे स्वतःचे काही लोक होते. मी आता त्यांची नावे घेणार नाही. माझे त्यांच्याशीही कोणतेही वैर नाही. फक्त त्यांच्याकडूनच सल्ला घेतला गेला होता.' तुम्ही सतीशचंद्र मिश्रा यांचा उल्लेख करत आहात का? 'नाही, मी कोणाचेही नाव घेणार नाही.' मायावती ६ डिसेंबर रोजी नोएडामध्ये रॅली घेणार६ डिसेंबर रोजी, बाबा साहेब डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त, मायावती नोएडा येथे एक भव्य रॅली काढत आहेत. या रॅलीद्वारे मायावती पुन्हा एकदा त्यांच्या राजकीय शक्तीचे प्रदर्शन करतील. त्या त्यांच्या विरोधकांना संदेश देण्याचा प्रयत्न करतील की बसपा कार्यकर्ते अजूनही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. नोएडा रॅलीद्वारे, मायावती नोएडा, गाझियाबाद, मेरठ आणि बुलंदशहरमधील त्यांच्या हरलेल्या मतदारांना आकर्षित करण्याची तयारी करत आहेत.

दिव्यमराठी भास्कर 24 Nov 2025 7:39 am

Pune Crime: चोरट्यांचा कहर! थेट महापालिकेचे पथदिवे आणि खांबच पळवले; बिबवेवाडीत खळबळ

प्रभात वृत्तसेवा पुणे – बिबवेवाडी भागात सुशोभीकरणासाठी ठेवलेले पथदिवे, तसेच खांब चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. संत एकनाथनगर भागात ही घटना घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.याप्रकरणी पुणे महापालिकेच्या बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयातील अभियंता शिवानंद अंकोलीकर (वय ४५) यांनी बिबवेवाडी पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिबवेवाडीतील पुष्पमंगल कार्यालय ते संत एकनाथनगर परिसरात […] The post Pune Crime: चोरट्यांचा कहर! थेट महापालिकेचे पथदिवे आणि खांबच पळवले; बिबवेवाडीत खळबळ appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 24 Nov 2025 7:30 am

थंडीची लाट ओसरली? पुण्यात दिवसा उन्हाचा चटका, रात्री मात्र गारवा; वाचा वेधशाळेचा नवीन अंदाज

प्रभात वृत्तसेवा पुणे – सलग तिसऱ्या दिवशी किमान तापमानाचा पारा दोन अंशाने वाढल्यामुळे रविवारी (दि. २३) शहरातील तापमान १४ अंशाच्या पुढे गेले. परिणामी शहरासह जिल्ह्यातील थंडीचा कडाका कमी झाला आहे. मात्र, पहाटे आणि रात्री थंडी जाणवत आहे. पाषाण १६.२, शिवाजीनगर १६.७, कोरेगांव पार्क १९.५ असे किमान तापमान नोंदवले गेले. पुढील दोन दिवस शहरातील कमाल व […] The post थंडीची लाट ओसरली? पुण्यात दिवसा उन्हाचा चटका, रात्री मात्र गारवा; वाचा वेधशाळेचा नवीन अंदाज appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 24 Nov 2025 7:15 am

नियतीचा क्रूर खेळ! भावाच्या पाठोपाठ बहिणीनेही सोडला जीव; जुन्नरमधील घटनेने डोळ्यांत येईल पाणी

प्रभात वृत्तसेवा जुन्नर – जुन्नरमधील जुना बस स्थानकासमोरील ईदगाह मैदानालगत असणाऱ्या एका शेततळ्यात बुडून बहीण – भावाचा शनिवारी (दि. २२) रात्री मृत्यू झाला.आफान अफसर इनामदार (वय १०) व रिफद अफसर इनामदार (वय ७, दोघे रा. खडकवस्ती, जुन्नर) अशी या मृतांची नावे आहेत. शनिवारी दुपारी चारपासून ते घरात नसल्याचे त्यांच्या आईच्या लक्षात आले. परिसरात शोधाशोध करूनही […] The post नियतीचा क्रूर खेळ! भावाच्या पाठोपाठ बहिणीनेही सोडला जीव; जुन्नरमधील घटनेने डोळ्यांत येईल पाणी appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 24 Nov 2025 7:00 am

अग्रलेख : विकासाचे निकष

दक्षिण आफ्रिकेमध्ये झालेल्या जी20 शिखर परिषदेमध्ये बोलताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकासाचे निकष बदलण्याच्या मुद्द्यावर जोर दिला. आतापर्यंत विकासाबाबत मानल्या गेलेल्या निकषांचा फेरआढावा घेण्याची गरज असून सर्वसमावेशक आणि शाश्‍वत विकासावर लक्ष केंद्रित करायला हवे, असे नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणामध्ये म्हटले आहे. या महत्त्वाच्या विषयाव्यतिरिक्त नरेंद्र मोदी यांनी अंमली द्रव्यांचा वाढता प्रसार, अंमलीद्रव्य आणि […] The post अग्रलेख : विकासाचे निकष appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 24 Nov 2025 6:55 am

‘लाडकी बहीण’योजनेत मोठा बदल! ई-केवायसीच्या अटीतून ‘या’महिलांना मिळाली सूट; वाचा नवीन नियम

प्रभात वृत्तसेवा पुणे – मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या; परंतु वडील किंवा पतीचे छत्र हरपलेल्या महिलांसाठी राज्य शासनाने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. योजनेतील ई-केवायसी प्रक्रियेदरम्यान पती किंवा वडिलांचे आधार कार्ड सादर करण्याच्या अटीमुळे अनेक महिलांची अडचण होत होती. आता या महिलांना मृत्यू प्रमाणपत्र किंवा तत्सम कागदपत्रे सादर केल्यास या जाचक अटीतून विशेष सूट […] The post ‘लाडकी बहीण’ योजनेत मोठा बदल! ई-केवायसीच्या अटीतून ‘या’ महिलांना मिळाली सूट; वाचा नवीन नियम appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 24 Nov 2025 6:45 am

विद्यापीठ प्रशासन आणि प्राध्यापक संघटना आमनेसामने! ६ दिवसांनंतर तरी ‘कोंडी’फुटणार का? आज मोठी बैठक

प्रभात वृत्तसेवा पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्राध्यापकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठीय व महाविद्यालयीन अध्यापक संघटनेने’ (स्पुक्टो) पुकारलेले बेमुदत धरणे आंदोलन अधिक तीव्र झाले आहे. आंदोलनास सहा दिवस झाले असून प्रशासन आणि संघटना यांच्यातील चर्चा निष्फळ ठरल्याने कोंडी कायम आहे. या पार्श्वभूमीवर आता सोमवारी (दि. २५ ) कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी […] The post विद्यापीठ प्रशासन आणि प्राध्यापक संघटना आमनेसामने! ६ दिवसांनंतर तरी ‘कोंडी’ फुटणार का? आज मोठी बैठक appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 24 Nov 2025 6:30 am

घर खरेदीदारांसाठी ‘गुड न्यूज’! आता नुकसानभरपाई मिळणार अवघ्या ६० दिवसांत..पहा नवे नियम

प्रभात वृत्तसेवा पुणे – घर खरेदीदारांना नुकसानभरपाई मिळण्यात विलंब होऊ नये, यासाठी महाराष्ट्र रियल इस्टेट नियामक प्राधिकरणाने (महारेरा) नवी कार्यप्रणाली जाहीर केली असून त्यात बांधकाम व्यावसायिकांनी नुकसानभरपाई ६० दिवसांत देणे बंधनकारक केले आहे.पहिल्यांदा संधी देऊनही नुकसान भरपाई दिली नसल्यास विकासकाची प्रकरणे संबंधित नागरी दंडाधिकाऱ्याकडे पाठवली जातील. यामुळे विकासकाला तीन महिन्यांचा कारावास होऊ शकतो. यामुळे घर […] The post घर खरेदीदारांसाठी ‘गुड न्यूज’! आता नुकसानभरपाई मिळणार अवघ्या ६० दिवसांत..पहा नवे नियम appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 24 Nov 2025 6:15 am

मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात नवा ट्विस्ट! खारगे समितीने बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियाला बजावली नोटीस

प्रभात वृत्तसेवा पुणे – मुंढवा येथील शासकीय जमीन गैरव्यवहार प्रकरणात नेमण्यात आलेल्या अतिरिक्त महसूल सचिव विकास खारगे समितीने बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियाला देखील बाजू मांडण्यासाठी पुढील आठवड्यात हजर राहण्याची नोटीस बजाविली आहे. दरम्यान या प्रकरणात दस्त करणाऱ्या अमेडिया एंटरप्राइझेस या कंपनीला मुद्रांक शुल्क भरण्यासाठी दिलेली वाढीव मुदत सोमवारी (दि. २४) समाप्त होत आहे. त्यामुळे कंपनी […] The post मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात नवा ट्विस्ट! खारगे समितीने बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियाला बजावली नोटीस appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 24 Nov 2025 6:00 am

३०० हून अधिक रिसॉर्ट्स पाडले! जलसंपदा विभागाची धरण परिसरातील अतिक्रमणांवर धडक मोहीम

प्रभात वृत्तसेवा पुणे – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात झालेली अतिक्रमणे अखेर जमीनदोस्त करण्यात आली आहेत. जलसंपदा विभागाने मागील एका आठवड्यापासून सुरू केलेल्या धडक मोहिमेत खडकवासला, पानशेत, पवना , कासारसाई आदी धरणांच्या परिसरातील 300 हून अधिक अतिक्रमणे काढली आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली. जिल्ह्यात खडकवासला, वरसगाव, पानशेत, पवना, कासारसाई अशी मोठी […] The post ३०० हून अधिक रिसॉर्ट्स पाडले! जलसंपदा विभागाची धरण परिसरातील अतिक्रमणांवर धडक मोहीम appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 24 Nov 2025 5:45 am

थोडक्यात वाचले! दुचाकीस्वार गेला अन् बिबट्या आला; अवसरी खुर्दमध्ये काळजाचा ठोका चुकवणारी घटना

प्रभात वृत्तसेवा मंचर – अवसरी खुर्द (ता.आंबेगाव) येथील भोरमळ्यामध्ये हुतात्मा बाबू गेनू सागर डिंभा उजव्या कालव्यावरून शनिवार, दि.२२ रोजी रात्री ११.३० वाजता जात असताना शेतकरी सोमनाथ भोर यांच्या चारचाकी वाहनासमोर अचानक बिबट्या आडवा गेला.चारचाकी गाडीमुळे शेतकरी थोडक्यात वाचला. काही क्षणांपूर्वीच एक दुचाकीस्वार त्या ठिकाणाहून निघून गेल्याने मोठा अनर्थ टाळला. शेतकरी सोमनाथ भोर हे आपले दैनंदिन […] The post थोडक्यात वाचले! दुचाकीस्वार गेला अन् बिबट्या आला; अवसरी खुर्दमध्ये काळजाचा ठोका चुकवणारी घटना appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 24 Nov 2025 5:30 am

सत्ताधार्‍यांचे उमेदवार कसे बिनविरोध होतात? नगरपरिषद निवडणुकीत युगेंद्र पवारांचा मोठा गौप्यस्फोट

प्रभात वृत्तसेवा बारामती – बारामती नगर परिषदेवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आठ नगरसेवक बिनविरोध निवडून गेल्याने कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. पण दुसरीकडे सत्ताधार्‍यांच्या ’बिनविरोध पॅटर्न’ची महाराष्ट्रात चर्चा होत आहे. सत्ताधारी पक्षाचेच उमेदवार बिनविरोध कसे होतात? असा प्रश्न महाराष्ट्राला पडला आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी अजित पवार यांच्यावर अतिशय गंभीर आरोप […] The post सत्ताधार्‍यांचे उमेदवार कसे बिनविरोध होतात? नगरपरिषद निवडणुकीत युगेंद्र पवारांचा मोठा गौप्यस्फोट appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 24 Nov 2025 5:15 am

कराडमध्ये शिंदेंच्या सेनेला धक्का? रणजीत पाटलांना ‘धनुष्यबाण’नाहीच; एबी फॉर्म नक्की कुणी अडवला?

प्रभात वृत्तसेवा कराड – शिवसेनेचे नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कराडला कोट्यवधींचा निधी दिला. मात्र, कराडमध्ये पालिका निवडणूका पक्षाच्या धनुष्यबाण या चिन्हावर लढवता येत नसल्याची खंत आहे. त्यामुळे अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहे. नगराध्यक्षपदासाठी माझी अपक्ष उमेदवारी आहे. त्याशिवाय प्रभागातील समविचारी अपक्षांची मोट बांधून, पालिकेत नवा पर्याय देणार आहे. आता पाच अपक्ष सोबत असून, […] The post कराडमध्ये शिंदेंच्या सेनेला धक्का? रणजीत पाटलांना ‘धनुष्यबाण’ नाहीच; एबी फॉर्म नक्की कुणी अडवला? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 24 Nov 2025 5:00 am

वाईकरांनो जागे व्हा! पुन्हा तीच ‘मलिदा गँग’निवडणुकीच्या रिंगणात; शहराचे ‘टेंडर’काढणार की विकास करणार?

प्रभात वृत्तसेवा भुईंज ( सचिन इथापे ) – वाई नगरपालिका निवडणूक जसजशी जवळ येवू लागली तसतशी रंग भरू लागली आहे. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीमधून शिंदे शिवसेनेने माघार घेत पक्षातील गद्दारांना बाजूला करून ठराविक मुद्द्यावर कार्यकर्त्यांनी भाजपशी हातमिळवणी केल्याने भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गट अशीच लढत होणार, हे लपून राहिलेले नसले तरी टेंडरसाठी वाई शहराची ज्यांनी […] The post वाईकरांनो जागे व्हा! पुन्हा तीच ‘मलिदा गँग’ निवडणुकीच्या रिंगणात; शहराचे ‘टेंडर’ काढणार की विकास करणार? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 24 Nov 2025 4:30 am

सीसीटीव्हीच्या निगराणीत टीईटी! साताऱ्यात ११ हजार शिक्षकांनी दिली परीक्षा; रिअल टाइम ट्रॅकिंगने नजर

प्रभात वृत्तसेवा सातारा – यावर्षीची शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) रविवारी सातारा शहरातील 31 केंद्रांवर झाली. या परीक्षेसाठी जिल्ह्यातील 11 हजार 971 परीक्षार्थींनी नोंदणी केली होती. त्यापैकी 11 हजार 202 शिक्षक उपस्थित होते. 769 शिक्षकांनी परीक्षेस दांडी मारली. कॅमेर्‍यांच्या निगराणीखाली परीक्षा झाल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांचे फेस रेकग्निशन आणि बायोमेट्रिक तपासणी करण्यात आली. चेहरा […] The post सीसीटीव्हीच्या निगराणीत टीईटी! साताऱ्यात ११ हजार शिक्षकांनी दिली परीक्षा; रिअल टाइम ट्रॅकिंगने नजर appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 24 Nov 2025 4:15 am

Mhaswad Election: विकास काय घरच्या पैशाने केला का? महादेव जानकरांचा सत्ताधाऱ्यांना रोखठोक सवाल

प्रभात वृत्तसेवा म्हसवड – मी मंत्री असताना एका वर्षात साडेबारा हजार कोटींची विकासकामे केली होती. ती कामे माझ्या खिशातून नव्हे, तर जनतेच्या करांच्या पैशातून केली. त्यामुळे मी विकास केला, असे कोणी मंत्री म्हणत असेल, तर तो त्याच्या घरातील पैशाने केलेला नाही. मी कधीही मंत्रिपदाचा आव आणला नाही. मला माण तालुका भयमुक्त व दहशतमुक्त करायचा आहे. […] The post Mhaswad Election: विकास काय घरच्या पैशाने केला का? महादेव जानकरांचा सत्ताधाऱ्यांना रोखठोक सवाल appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 24 Nov 2025 4:00 am

Khatav News: आजपासून पुसेगावमध्ये वाहतूक बदल! येरळा नदी पुलापासून वाहतूक बंद; ‘हा’आहे पर्यायी मार्ग

प्रभात वृत्तसेवा पुसेगाव – पुसेगाव, ता. खटाव येथील बाजारपेठेतून जाणार्‍या सातारा-लातूर राष्ट्रीय महामार्गावरील श्री सेवागिरी महाराज मंदिराशेजारील येरळा नदीवरील पूल ते बाचल कॉर्नर रस्ता रुंदीकरण व काँक्रिटीकरणाचे काम पुन्हा उद्या, दि. 24 पासून सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रभारी पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी 19 नोव्हेंबर रोजी काढलेल्या आदेशानुसार, सोमवार (दि. 24) ते 5 […] The post Khatav News: आजपासून पुसेगावमध्ये वाहतूक बदल! येरळा नदी पुलापासून वाहतूक बंद; ‘हा’ आहे पर्यायी मार्ग appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 24 Nov 2025 3:45 am

खड्डे, कचरा, करवाढ! सासवडच्या सत्ताधाऱ्यांना अभिजीत जगतापांचा दणका; प्रचाराला जोरदार शुभारंभ!

प्रभात वृत्तसेवा सासवड – सासवड नगरपरिषदेच्या विकासकामांचा बट्ट्याबोळ सध्याच्या सत्ताधार्‍यांनी करून ठेवला असून, नागरिकांचे मूलभूत प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालले आहेत अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अभिजीत मधुकर जगताप यांनी त्यांच्या प्रचार शुभारंभाच्या वेळी केली.सासवड येथील शिवतीर्थ चौकात महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या वतीने सासवड नगरपरिषद निवडणुकीचा प्रचाराचा नारळ वाढवून शुभारंभ […] The post खड्डे, कचरा, करवाढ! सासवडच्या सत्ताधाऱ्यांना अभिजीत जगतापांचा दणका; प्रचाराला जोरदार शुभारंभ! appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 24 Nov 2025 3:30 am

Wagholi News: ‘हम दो, हमारे दो’विसरले आणि सदस्यपद गमावले! बकोरीतील ग्रामपंचायत सदस्याला घरचा रस्ता

प्रभात वृत्तसेवा वाघोली – बकोरी ग्रामपंचायतीचे सदस्य संतोष रानबा वारघडे यांच्या सन 2001 नंतर जन्मलेल्या आपत्यांची संख्या तीन असल्यामुळे त्यांना ग्रामपंचायत सदस्य म्हणून अपात्र ठरवण्यात आल्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांनी दिला आहे.याबाबत रामराव तुळशीराम कुटे राहणार बकोरी यांनी 7 फेब्रुवारी 2024 रोजी जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार अर्ज केला होता. त्या अनुषंगाने ग्रामपंचायत सदस्य संतोष वारघडे यांना […] The post Wagholi News: ‘हम दो, हमारे दो’ विसरले आणि सदस्यपद गमावले! बकोरीतील ग्रामपंचायत सदस्याला घरचा रस्ता appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 24 Nov 2025 3:15 am

Leopard News: बिबट्याला बघताच कुत्री तुटून पडली! खडकीतील ‘तो’अंगावर काटा आणणारा प्रसंग.. वाचा सविस्तर

प्रभात वृत्तसेवा मंचर – खडकी (गणेशवाडी) ता.आंबेगाव येथे रविवार, दि.२३ रोजी पहाटे सुमारे ५ वाजता पांडुरंग किसन पाटील यांच्या घरासमोरच्या गेटवरून बिबट्या उडी मारून थेट अंगणात शिरला. त्यावेळी अंगणात दोन कुत्रे होते.बिबट्या दिसताच ती कुत्री मोठ्याने भुंकू लागली आणि दोन्ही बाजूंनी त्याला सामोरे गेली. हा अनपेक्षित प्रतिकार पाहून बिबट्याने अक्षरशः पळ काढला. कुत्र्यांची प्रसंगावधानाने मोठी […] The post Leopard News: बिबट्याला बघताच कुत्री तुटून पडली! खडकीतील ‘तो’ अंगावर काटा आणणारा प्रसंग.. वाचा सविस्तर appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 24 Nov 2025 3:00 am

Indapur : जनतेचा रोष आणि नेत्यांचा हट्ट! इंदापूरच्या राजकारणात ‘ठेकेदार’जिंकणार की ‘निष्ठावंत’हरणार..जाणून घ्या

प्रभात वृत्तसेवा पळसदेव – राज्यात नगरपालिकांच्या निवडणुकांचा तडाखा सुरू असतानाच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका देखील तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)कडून जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी उमेदवार निश्चित करण्याची प्रक्रिया वेग घेत आहे. काही गटांत उमेदवार ठरले असून त्यांनी जाहीरपूर्व कामाला सुरुवातही केली आहे; तर काही प्रभागांत अजूनही […] The post Indapur : जनतेचा रोष आणि नेत्यांचा हट्ट! इंदापूरच्या राजकारणात ‘ठेकेदार’ जिंकणार की ‘निष्ठावंत’ हरणार..जाणून घ्या appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 24 Nov 2025 2:45 am

श्रमेव जयते

पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी संसदेत श्रम संहितेला मंजुरी देऊन भारतातील ४० कोटी कामगारांना त्यांच्या श्रमांचा लाभ मिळवून दिला आणि प्रतिष्ठा मिळवून दिली आहे. या सुधारणा स्वतंत्र भारतातील सर्वात मोठ्या आणि परिवर्तनकारी असल्याचे सांगण्यात येत आहेत. या नव्या सुधारणा वसाहतवादी काळातील म्हणजे कालबाह्य आणि निरूपयोगी झालेल्या ब्रिटिश राजवटीतील कामगार कायद्यांची जागा घेतील. भारताला विकसित देश बनवण्याच्या दृष्टीने या नव्या सुधारणा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. ट्रेड युनियन्स आणि डाव्या प्रणित पक्षाच्या कामगार संघटना सोडल्या, तर बहुतेक सर्वांनी या सुधारणांचे स्वागत केले आहे. कारण या सुधारणेमुळे आर्थिक लाभाबरोबरच कामागारांना सुरक्षाही देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. यामुळे लिंगभेद पूर्णपणे संपुष्टात आला आहे. लिंगभेद आता संपुष्टात आल्याचे जाहीर होत असून, देशभरातील लाखो महिलांच्या दृष्टीने या सुधारणा अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. एमएसएमई म्हणजे लघू, सूक्ष्म व मध्यम उद्योग क्षेत्रात महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात आहे. देशातील जवळपास एक पंचमांश एमएसएमई उद्योगांचे नेतृत्व महिलांकडे आहे. या महिला उद्योजकांना अधिक सामर्थ्य व संधी देण्यासाठी या सुधारणा ‘नारीशक्ती’चा खरा सन्मान करतात.या कोडमुळे महिला कामगारांची उत्पादकता वाढेल, कार्यक्षेत्रात त्यांना अधिक संधी मिळेल आणि सामाजिक न्यायाची भक्कम पायाभरणी होईल. हे या सुधारणांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. आतापर्यंत ही नियमावली अनेक क्षेत्रांत पाळली जात नसे; मात्र आता असा भेदभाव चालणार नाही. महिलांना समोर ठेवून हे कोड तयार करण्यात आले असले तरीही सर्व कामगारांना आणि देशातील कामगारशक्तीचा विचार करण्यात आला आहे. नव नियुक्तांना नियुक्तीपत्रे देण्याची तरतूद, महिलांसाठी कामाचे तास निश्चित करणे आणि वेतन वेळेवर देणे, कामावर अपघात झाला, तर त्याची पूर्ण भरपाई देणे आणि कामगार वर्गाची प्रतिष्ठा वाढवणे हा लेबर कोडचा उद्देश आहे. हे नवीन लेबर कोड का आणावे लागले मागे एक विचार आहे. तो म्हणजे जे लेबर म्हणजे कामगारविषयक कायदे होते ते सर्व कालबाह्य झाले आहेत आणि ते ब्रिटिश काळातील होते. त्यामुळे त्यामध्ये व्यापक सुधारणा करणे काळाची गरज बनली होती. या नव्या कोडचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे महिलांना आता रात्रपाळीत काम करण्याची तसेच धोकादायक व जड यंत्रसामग्री हाताळणाऱ्या क्षेत्रात, जसे की खाणकाम, अशा ठिकाणी काम करण्याची औपचारिक परवानगी देण्यात आली आहे. मात्र, यासाठी संबंधित महिलांची स्पष्ट संमती आवश्यक असेल आणि त्यांच्या सुरक्षेसाठी कडक उपाययोजना बंधनकारक असतील. यामुळे लिंगाधिष्ठित भेदभाव दूर करण्याचा ठोस प्रयत्न केला गेला आहे. तसेच तक्रार निवारण समित्यांमध्ये महिलांना पुरेसे प्रतिनिधित्व मिळेल, अशी तरतूद करण्यात आली आहे. या कोडद्वारे प्रत्येक कामगाराला सामाजिक सुरक्षा प्रदान करण्याची तरतूद करण्यात आली आहे, हे त्याचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. याशिवाय, सर्व कामगारांसाठी ईएसआयसीचे दरवाजे खुले करण्यात आले आहेत. एकच कामगार जरी धोकादायक कामात गुंतलेला असेल, तरीही त्याला ईएसआयसीचा संपूर्ण लाभ मिळणार आहे.या कोडचे सर्वात वैशिष्ट्य म्हणजे जिग कामगार म्हणजे स्विगी किंवा ओला, उबेर यासारख्या कामगारांनाही इएसआयसीचाचा लाभ मिळेल. त्यांना यापूर्वी असे लाभ दिले जात नव्हते. वेतन संहिता,औद्योगिक संबंध संहिता आणि सामाजिक सुरक्षा संहिता या सर्वांना एकत्रित करून हा लेबर कोड तयार करण्यात आला आहे. सरकारने या कोडद्वारे ‘इज ऑफ डुइंग बिझीनेस’ला चालना दिली असली तरीही काँग्रेसने नेहमीच्या सवयीप्रमाणे सरकारच्या प्रत्येक निर्णयावर टीका करण्याच्य्या प्रथेला जागून याही निर्णयावर टीका केली आहे. हे कायदे कामगारांच्या मागण्या लक्षात न घेता लागू केले असून राष्ट्रीय किमान वेतन, नागरी रोजगार हमी आणि सार्वत्रिक आरोग्य कवचाचा लाभ यापासून कायदे वंचित आहेत, असे काँग्रेसने म्हटले आहे. काँग्रेसने हे कायदे म्हणजे भांडवलशाहीला पोषक असून त्यामुळे त्यांना हवे तेव्हा कुणालाही काढता येणार आहे असे म्हटले आहे. अर्थात हे खरे आहे की, ले ऑफची तरतूद १०० वरून ३०० करण्यात आली आहे आणि यामुळे पूर्वी जी शंभर कामगार असलेल्या कंपन्या बंद करण्याची परवानगी सरकारकडून घ्यावी लागत असे त्याला आता ३०० कामगार असणे गरजेचे आहे. काँग्रेसने अशी टीका केली आहे की, या कोडमध्ये हायर अॅण्ड फायर राजवटीला चालना मिळेल, पण काँग्रेसने यापेक्षाही कामगारविरोधी कायदे आणले होते. त्यामुळे आता या कोडविरोधात तक्रारीचा सूर लावणे म्हणजे केवळ भाजपविरोधात काही करता येणे शक्य नाही म्हणून गळे काढणे आहे.काँग्रेस आणि ट्रेड युनियन्स यांचा या नव्या कोडला विरोध आहे. कारण दोन्ही सत्तेतून बाहेर आहेत आणि ट्रेड युनियन्स, तर डाव्यांच्या आहेत. काँग्रेस सरकार डाव्यांच्या ओंजळीतून पाणी पित होते, तेव्हा डाव्यांची मनमानी चालत होती. पण आता मोदी सरकारने डाव्यांचे अस्तित्व संपवले आहे आणि त्यामुळे डाव्यांची पोटदुखी सुरू आहे. नवी संहिता ही लोकशाहीविरोधी आहे असे डाव्या संघटनांनी म्हणणे म्हणजे विनोद आहे, कारण डाव्यांची लोकशाही पालन करण्याची ख्याती नाही. अर्थात सर्वच कामगार कांग्रेसच्या विचारांवर चालणारे नाहीत. त्यांनी या नव्या सुधारणांना पाठिंबा दर्शवला आहे आणि मोदी सरकारची प्रशंसा केली आहे. यात सर्वात महत्वाचे म्हणजे अर्थतज्ज्ञांनी मोदी सरकारची संहिता अल्पकालीन आव्हानांना सामोरी जाणारी आहे पण दीर्घकालीन आर्थिक गेन म्हणजे देणारी आहे असे मत व्यक्त केले आहे. या कोडमुळे आर्थिक वाढीला चालना मिळणार असून रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणात होणार आहे. हा एक मोठा फायदा आहे. तसेच रोजगार निर्मितीही अत्यंत स्पर्धात्मक वातावरण आणि स्वयंपूर्ण राष्ट्रात होणार आहे अशी भावना व्यक्त केली आहे. या कोडमुळे ‘इज ऑफ डुइंग बिझीनेस’ तयार होणार आहे आणि हेच मोदी सरकारचे अंतिम उद्दिष्ट आहे.

फीड फीडबर्नर 24 Nov 2025 2:30 am

Indapur News: इंदापूर अंधारमुक्त होणार! १ किलोवॅट सौर योजनेने हजारो घरांत येणार प्रकाश; अनुदानाचा वर्षाव

प्रभात वृत्तसेवा इंदापूर – इंदापूर तालुक्यातील गरीब, आर्थिकदृष्ट्या दुर्बल (बीपीएल) आणि ईडब्ल्यूएस कुटुंबांसाठी महावितरणची 1 किलोवॅट सौरयोजना म्हणजे अक्षरशः अभूतपूर्व दिलासा ठरणार आहे. 25 वर्षे मोफत वीज आणि अतिरिक्त निर्मित विक्रीतून थेट उत्पन्न मिळवून देणारी ही योजना तालुक्यातील हजारो घरांना ऊर्जा स्वावलंबन मिळवून देणार आहे. राज्याचे कृषिमंत्री व इंदापूरचे लोकप्रतिनिधी दत्तात्रय भरणे यांच्या पुढाकारामुळे ही […] The post Indapur News: इंदापूर अंधारमुक्त होणार! १ किलोवॅट सौर योजनेने हजारो घरांत येणार प्रकाश; अनुदानाचा वर्षाव appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 24 Nov 2025 2:15 am

कोकणातली निवडणूक...!

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हटल्या की, साहजिकच त्या निवडणुका गाव असो की, शहर त्या-त्या भागातील कार्यकर्त्यांसाठी महत्त्वाच्या आहेत. त्यातच मधल्या सात-आठ वर्षांनंतर या निवडणुका होत आहेत. निवडणुका लढवण्यासाठी काही ठिकाणी एकापेक्षा अधिक इच्छुक उमेदवार असणार आहेत. सत्ताधारी पक्षात इच्छुकांची संख्या ही नेहमीच मोठी असते. तशी ती संख्या या निवडणुकीतही असलेली पाहायला मिळते. यातूनच मग निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्यांना उमेदवारी मिळाली नाही की साहजिकच इच्छुकांबरोबरच नाराजांची संख्याही मोठी असते. कोकणातही सर्वच पक्षांमध्ये जसे इच्छुक आहेत तसे नगरसेवक पदाची उमेदवारी मिळाली नाही यासाठी नाराजही आहेत. महाराष्ट्रात कोकणाच राजकारण नेहमीच फारच वेगळ असत...महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अर्ज भरणे, उमेदवारी अर्ज मागे घेणे, छाननी अशा निवडणुकीतील सर्व प्रक्रिया पार पडत आहेत. राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यात कोणत्या राजकीय पक्षाने दुसऱ्या कोणत्या राजकीय पक्षाशी कधी कसा घरोबा केला हे खरं तर कोणालाच कळलेले नाही, असे राज्यातील चित्र आहे. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका म्हटल्या की, साहजिकच त्या निवडणुका गाव असो की शहर त्या-त्या भागातील कार्यकर्त्यांसाठी महत्त्वाच्या आहेत. त्यातच मधल्या सात-आठ वर्षांनंतर या निवडणुका होत आहेत. निवडणुका लढवण्यासाठी काही ठिकाणी एकापेक्षा अधिक इच्छुक उमेदवार असणार आहेत. सत्ताधारी पक्षात इच्छुकांची संख्या ही नेहमीच मोठी असते. तशी ती संख्या या निवडणुकीतही असलेली पाहायला मिळते. यातूनच मग निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्यांना उमेदवारी मिळाली नाही की साहजिकच इच्छुकांबरोबरच नाराजांची संख्याही मोठी असते. कोकणातही सर्वच पक्षांमध्ये जसे इच्छुक आहेत तसे नगरसेवक पदाची उमेदवारी मिळाली नाही यासाठी नाराजही आहेत. महाराष्ट्रात कोकणाच राजकारण नेहमीच फारच वेगळ असत. कोकणामध्ये निवडणूक कोणतीही मग ती ग्रामपंचायत असो की लोकसभेची निवडणूक असली तरीही कोकणच्या राजकारणात केंद्रस्थानी राणेच असतात. कोकणाच्या राजकीय इतिहासाची मांडणी करताना १९९० पर्यंत मागे गेल्यास १९९० पासूनच्या सर्वच निवडणुका या माजी केंद्रीय मंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री खा. नारायण राणे यांच्या नावाभोवतीच फिरत राहिल्या आहेत.कोकणातील यावेळच्या निवडणुकांमध्ये रायगडमध्ये महायुतीत वेगळी राजकीय मांडणी झाली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट यामध्ये विस्तव जात नाही अशी स्थिती आहे. राष्ट्रावादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, अदिती तटकरे आणि शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरतशेठ गोगावले आणि चार आमदार असा कधी उघड तर बऱ्याचवेळा सुप्त संघर्ष रायगडच्या राजकारणात राहिला आहे. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत महायुतीतील शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट एकत्र येण्याची शक्यता नव्हती. त्यामुळे रायगडचं राजकारण नेहमीप्रमाणेच तापलेलं राहिलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात महाविकास आघाडीत फूट पडलेली दिसते. रत्नागिरी जिल्ह्यातील चार नगर परिषदा व तीन नगर पंचायतीच्या निवडणुका होत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात महायुती झाली आहे. शिवसेना शिंदे गट आणि भाजपा अशी महायुती झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, राजापूर, चिपळूण, खेड या फार जुन्या असलेल्या नगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत. रत्नागिरी नगर परिषदेत शिवसेना शिंदे गट व भाजप अशी युती झाली आहे, तर रत्नागिरी नगर परिषदेत उबाठाकडून निवडणूक प्रतिष्ठेची करण्याचा प्रयत्न झाला आहे. देवरूख, गुहागर आणि लांजा या नगरपंचायतीची निवडणूक होत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड नगरपालिका निवडणुकीत भाजप वैभव खेडेकर आणि माजी मंत्री रामदास कदम व मंत्री योगेश कदम यांनी एकत्र येत महायुतीतून ही निवडणूक लढवली जात आहे. राजापूर नगर परिषद निवडणुकीत माजी आमदार हुस्नबानू खलिपे काँग्रेसतर्फे निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत, तर चिपळूण नगर परिषदेच्या निवडणुकीत चिपळूणचे माजी आमदार, माजी नगराध्यक्ष रमेश कदम हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे निवडणूक रिंगणात उतरले आहेत. चिपळूणमध्ये आ. भास्कर जाधव रमेश कदम यांच्या सोबत आहेत. रत्नागिरी नगर परिषदेत शिवसेना भाजपा महायुती, उबाठा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशी लढत रत्नागिरीत पाहायला मिळणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात देवरूख आणि गुहागर या नगरपंचायती नगराध्यक्ष भाजपला देण्यात आले, तर लांजा नगरपंचायत आणि राजापूर, रत्नागिरी, चिपळूण या नगर परिषदा भाजपने महायुतीतील शिंदे सेनेला दिल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी, वेंगुर्ले आणि मालवण या फार फार जुन्या असलेल्या नगर परिषद आहेत, तर कणकवली नगर पंचायतीची निवडणूक होत आहे. सावंतवाडीतील राजघराण्यांच्या स्नुषा श्रद्धाराजे भोसले निवडणूक रिंगणात आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीतील घटक पक्ष तसेच महाविकास आघाडीतील घटकपक्ष जिल्ह्यात स्वतंत्र निवडणुकीला सामोरे जात आहेत.महायुतीतील भारतीय जनता पक्ष शिवसेना शिंदे गट या तर्फे निवडणूक लढविली जात आहे. तर महाविकास आघाडीतील काँग्रेस घटक पक्षाने या निवडणुकीत स्वबळाचा नारा देत निवडणूक रिंगणात उतरले आहेत. तर उबाठाकडून कणकवलीत शहर विकास आघाडीत, आणि मालवण, सावंतवाडी, वेंगुर्लेत स्वतंत्र निवडणूक लढवत आहेत. कोकणात निवडणुकीत नेहमीप्रमाणेच कणकवली नगरपंचायत निवडणूक चर्चेच्या केंद्रस्थानी राहिली आहे. यावेळच्या निवडणुकीत ‘राजकारणामध्ये दीर्घकाळ कोणीही कोणाचा मित्र नसतो आणि राजकारणात दीर्घकाळ कोणी कोणाचा शत्रू नसतो’ हे पुन्हा एकदा या निवडणुकीच्या निमित्ताने अधोरेखित केले आहे. सिंधुदुर्गात भाजपच्या प्रचाराची आघाडी सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे सांभाळत आहेत, तर शिवसेना शिंदे गटाकडून माजी मंत्री आ. दीपक केसरकर, मालवण-कुडाळचे आ. निलेश राणे पाहत आहेत. कोकणातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पुन्हा एकदा चर्चेत आणि लक्षवेधी ठरत आहेत हे आजचे चित्र पुढील आठवड्यात हे चित्र अधिक गडद होईल. जिल्हापरीषद, पंचायत समिती निवडणुकीत त्याचे पदर अजूनही उलगडले जातील.- संतोष वायंगणकर

फीड फीडबर्नर 24 Nov 2025 2:10 am

Manchar Election: भावनिक साद आणि डिजिटल संवाद; मंचरमध्ये हायटेक प्रचाराचा धुराळा

प्रभात वृत्तसेवा मंचर – मंचर नगरपंचायतीची निवडणूक मतदान जसजशी जवळ येत आहे, तसतशी तिची चुरसही वाढू लागली आहे. उमेदवारी अर्जांच्या पार्श्वभूमीवर आता प्रचाराचे स्वरूप अधिक आक्रमक होत असून अनेक उमेदवारांनी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर सुरू केला आहे. फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्रामसह विविध सोशल प्लॅटफॉर्मवर भावनिक आवाहन, व्हिडिओ संदेश, कुटुंबीयांसह ग्रामस्थांची साथ दाखवणारी पोस्ट यांची रेलचेल […] The post Manchar Election: भावनिक साद आणि डिजिटल संवाद; मंचरमध्ये हायटेक प्रचाराचा धुराळा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 24 Nov 2025 2:00 am

PCMC Water Crisis: निवडणुकीची कामे जोरात अन पाणी नाही घरात! महापालिकेची पाणीपुरवठा यंत्रणा ढेपाळली

प्रभात वृत्तसेवा पिंपरी – महापालिकेकडून निगडी जलशुद्धीकरण केंद्रातील दुरुस्तीसाठी गुरूवारी (दि. २०) पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. मात्र, पाच दिवसांनंतर देखील हा पाणीपुरवठा सुरळित करणे महापालिका प्रशासनाला शक्य झाले नाही. एकीकडे निवडणुकीची धामधूम सुरू असून त्यासाठीची प्रशासकीय कामे जोरात सुरू आहेत. मात्र, दुसरीकडे शहरातील मतदारांना पिण्यासाठी पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनावर […] The post PCMC Water Crisis: निवडणुकीची कामे जोरात अन पाणी नाही घरात! महापालिकेची पाणीपुरवठा यंत्रणा ढेपाळली appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 24 Nov 2025 1:45 am

पिंपरीत ‘स्वीप’ची लाट! एकाच वेळी ३८ हजार नागरिकांनी घेतली मतदानाची शपथ; निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज

प्रभात वृत्तसेवा पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नियोजित सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने शहरातील मतदारांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करण्यासाठी स्वीप उपक्रमांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अंतर्गत रविवारी (दि. २३) सुमारे ३८ हजार ३४० जणांनी मतदान करण्याची शपथ घेतली. मोशी येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’ स्मारकाला मानवंदना देण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका, अविरत श्रमदान, सायकल मित्र, […] The post पिंपरीत ‘स्वीप’ची लाट! एकाच वेळी ३८ हजार नागरिकांनी घेतली मतदानाची शपथ; निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 24 Nov 2025 1:30 am

सारे काही बेस्टसाठी...

मागील आठवड्यात आपण पाहिलेच की, बेस्ट कर्मचाऱ्यांच्या भल्याची जणू सर्वांनाच अचानक काळजी वाटू लागली आहे. आजवर त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणारे पक्ष आणि नेतेही आता बेस्ट कर्मचाऱ्यांच्या लढ्यात उडी घेताना दिसत आहेत. यामागील खरी पार्श्वभूमी म्हणजे मुंबई महापालिका निवडणुका. निवडणुका समीप आल्या की कामगारांच्या वेदना राजकीय मंचावर पोहोचतात; हे नवीन नाही. असो... एकीकडे मागील आठवड्यात बेस्ट कामगार नेते शशांक राव यांनी त्यांच्या कार्यालयात आंदोलन केले. दुसरीकडे अनेक वर्ष शिवसेना उबाठाशी निष्ठावान राहिलेले अनेक वर्षे बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी शिंदे गटात प्रवेश केला व उबाठावर जोरदार टीका केली. मात्र त्यात मागील आठवड्यात बाजी मारली ती, नारायण राणेप्रणीत बेस्ट समर्थ कामगार संघटनेने. त्यांनी थेट बेस्ट महाव्यवस्थापक सोनिया सेठी यांची भेट घेतली व खेळाचा पटच उलटवून टाकला. त्यांनी बेस्ट व्यवस्थापक सोनिया सेठी यांची घेतलेली भेट ही साऱ्या प्रकरणालाच कलाटणी देणारी ठरली.समर्थ कामगार संघटनेचे सरचिटणीस विलास पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नुकतीच बेस्ट महाव्यवस्थापिका सोनिया सेठी यांची भेट घेतली. ही भेट अत्यंत सकारात्मक वातावरणात पार पडली असल्याचे बोलण्यात येत असून, बेस्ट कर्मचाऱ्यांच्या अनेक समस्या मार्गी लागण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या बैठकीत महत्त्वाच्या मागण्यांवरही चर्चा करण्यात आली. त्यात महत्त्वाच्या मागण्या होत्या की, बेस्टचा ‘क’ दर्जाचा अर्थसंकल्प मुंबई महापालिकेच्या ‘अ’ दर्जाच्या अर्थसंकल्पात विलीन करणे तसेच २०१९ मध्ये कामगार संघटनांसोबत झालेल्या करारानुसार, बेस्टच्या ३,३३७ मालकीच्या बसगाड्यांचा ताफा अबाधित ठेवणे. त्यासाठी आवश्यक नव्या बसगाड्या तातडीने खरेदी करणे. या मागण्यांना अंशतः मंजुरी देत, सेठी यांनी यासाठी मोठा निधी आवश्यक असल्याचे नमूद केले. तसेच, हा महत्त्वाचा आर्थिक निर्णय महापालिका आयुक्त आणि मुख्यमंत्री यांच्या स्तरावर जाऊन मंजूर होणार असून, त्याकरिता त्या लवकरच दोघांची भेट घेणार आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे वेतनश्रेणी करार सन २०१६-२०२१ आणि २०२१-२०२६ पर्यंत सातव्या वेतन आयोगाप्रमाणे तातडीने लागू करावा, यावरही चर्चा करण्यात आली. यावर सेठी यांनी संघटनेने प्रस्ताव तयार करून द्यावा, त्यावर बेस्ट सकारात्मक विचार करेल, असे सांगितले. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची थकीत अंतिम देयके त्वरीत देण्यास तोंडी मान्यता देत बेस्ट प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतली.बेस्ट उपक्रमातील परिवहन आणि विद्युत विभागातील कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती प्रक्रियेबाबत आता महत्त्वाचा आणि बऱ्याच काळापासून अपेक्षित निर्णय घेण्यात आला आहे. अधिकारी वर्गाप्रमाणेच कर्मचारी वर्गाच्या बढत्याही त्वरित राबवण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला असून, यापुढे प्रथम खालच्या पदावरील कर्मचाऱ्यांना बढती दिली जाईल आणि त्यानंतरच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बढत्या करण्यात येतील. आर्थिक अडचणीच्या काळात अधिकारी वर्गाच्या बढत्या होत असताना, कर्मचाऱ्यांच्या बढत्या मात्र थांबल्या होत्या. त्यामुळे निर्माण झालेला असंतोष दूर करण्यास या निर्णयामुळे मोठी मदत होणार आहे. बसचालक आणि बसवाहक यांच्या सेवावाटपात सेवा ज्येष्ठतेला प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, ही पद्धत लागू करण्यासाठी बेस्टवर कोणताही अतिरिक्त आर्थिक भार पडणार नाही, याची दक्षता घेण्यात आली आहे. यासोबतच ज्येष्ठता ठरवताना कामगाराची जात हा घटक ग्राह्य धरण्यात येणार नाही, तर केवळ परिचय क्रमांकाच्या आधारेच सेवा-ज्येष्ठता निश्चित केली जाईल, अशी भूमिकाही महाव्यवस्थापकांनी स्पष्ट केली आहे. त्यामुळे कार्यपद्धतीत अधिक पारदर्शकता आणि न्याय्यतेची भावना निर्माण होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे. कामगार संघटनांमधील नोंदणीची प्रक्रिया आता अधिक पारदर्शक होण्यासाठी संपूर्णतः ऑनलाईन केली जाणार आहे. त्यामुळे संघटनांचे सदस्यत्व नोंदवताना होणारा मनमानी हस्तक्षेप किंवा गैरव्यवहार थांबू शकतो. सध्या विद्यमान कर्मचाऱ्यांवर वाढत असलेल्या कामाच्या ताणाची दखल घेत प्रशासनाने नवीन ५०० बस-वर्ग कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांवरील कार्यभार कमी होण्यास आणि बससेवा अधिक सुकरपणे चालवण्यास मदत मिळणार आहे.या घडामोडीत जे कर्मचारी काही कारणास्तव बडतर्फ करण्यात आलेले आहेत त्यांना फायदा होणार आहे. कारण बेस्ट उपक्रमाने बडतर्फ कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याचे पत्र काढलेले आहे. बडतर्फ कर्मचाऱ्यांकडून अर्ज व बॉण्ड पेपरची पूर्तता करून घेण्यात आलेली असून त्यांना पुन्हा कामावर घेण्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या इतर गोष्टींचे आश्वासन मिळाल्याने कर्मचारी संघटनेचा व नारायण राणे प्रणित बेस्ट समर्थ कामगार संघटनेचा विजय मानला जात आहे. तर विशेष म्हणजे या मागण्यांचे नुसते तोंडी आश्वासन मिळालेले नसून याचा मसुदा तयार केला गेला आहे. तो लवकरच बेस्ट प्रशासन बेस्ट महाव्यवस्थापकांना दाखवून त्यावर स्वाक्षरी होईल. त्यामुळे हा मसुद्यातील गोष्टींचे पालन करणे हे बेस्टला बंधनकारक असणार आहे. त्यामुळे आता समर्थ कामगार बेस्ट संघटनेचा दबदबा वाढल्याचे चित्र दिसत आहे.दुसरीकडे, यानंतरच्या दिवशी कामगार नेते शशांक राव यांनी बेस्ट महाव्यवस्थापकांची भेट घेतली. दोन आठवड्यांपूर्वी त्यांनी केलेले उपोषण महाव्यवस्थापकांच्या विनंतीवरून मागे घेतले होते आणि त्या दिलेल्या आश्वासनांची पूर्तता होत आहे का याची पाहणी करण्यासाठी ते या भेटीला गेले होते. मात्र या चर्चेदरम्यान त्यांनी निवृत्त कर्मचाऱ्यांच्या कोणत्याही मुद्द्याचा उल्लेख केला नाही, अशी माहिती मिळाली आहे. त्यांनी मुख्यत्वे सध्या सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांशी संबंधित प्रश्नांवर लक्ष केंद्रित केले. तसेच, खासगी कंत्राटावर कार्यरत असलेल्या बसचालक, वाहक आणि इतर कामगारांच्या प्रश्नांवरही त्यांनी भूमिका मांडली. यामुळे बेस्टचे निवृत्त कर्मचारी स्पष्टपणे नाराज झाले असून त्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांचा सवाल असा की, “आम्ही इतकी वर्षे बेस्टची सेवा केली, सेवानिवृत्तीनंतर आमची स्थिती अधिक कठीण झाली आहे. मग आमची गरज शशांक राव यांच्या संघटनेला आता वाटत नाही का? केवळ आर्थिकदृष्ट्या महत्त्व असलेले कामगारच संघटनेला दिसत आहेत का?” निवृत्त कर्मचाऱ्यांच्या मते, ही भूमिका कामगार संघटनेच्या मूलभूत तत्त्वांशी विसंगत आहे. त्यामुळे आता त्यांच्या असंतोषाला अधिक तीव्रता आली असून, बेस्ट प्रशासनासोबतच संघटनांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.तर आता बेस्टचे माजी कर्मचारी भाई पानवडीकर यांनी बेस्ट सेवानिवृत्त कर्मचारी संघटना स्थापन केली असून बेस्ट प्रशासनाविरोधात कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी जोरदारपणे लढण्याचा निर्धार गेल्या आठवड्यात डोंबिवली येथे मेळावा घेऊन करण्यात आला. या संघटनेतर्फे मुंबई बाहेरील म्हणजे मुंबई, महाप्रदेश, ठाणे, डोंबिवली, कल्याण, नवी मुंबई येथील निवृत्त बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संघर्षासाठी ही समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यासाठी आज सोमवारपासून आझाद मैदानात एक दिवसीय उपोषणे करण्यात येणार आहे. याला इतर संघटनांनी साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. दुसरीकडे उबाठा गटाने नेतृत्व बदल केल्याने बेस्ट कामगार सेनेची नेतृत्व सचिन अहिर यांनी यांच्याकडे आले आहे त्यांनी आता कायदेशीर लढ्यासाठी कोणाही कर्मचाऱ्याला आता यापुढे स्वतः पैसे करावे खर्च करावे लागणार नाहीत तर बेस्ट कामगार सेना संपूर्ण न्यायालयीन खर्च करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे.त्यामुळे निवृत्त असोत किंवा सध्या सेवेत असलेले बेस्ट कर्मचारी असोत, त्यांच्या मागे आज अनेक जण उभे ठाकलेले दिसत आहेत. ही स्वागतार्ह बाब असली, तरी कर्मचाऱ्यांच्या मनात मात्र संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. कामगारांना अनेक प्रश्न छळत आहेत. आज कामगारांची ही अवस्था नेमकी कोणामुळे? वेतनश्रेणी करार कोर्टात टाकून दहा वर्षे कोण अडकवून ठेवून बसले? स्वतःकडे पुरेशा गाड्या नसताना खासगी बस आणण्यास परवानगी कशी मिळाली आणि त्याला विरोधासाठी कोर्टात धाव का घेतली गेली नाही? ३,३३७ बसगाड्यांचा ताफा कायम ठेवण्याचा करार कोणी केला आणि तरीही खासगी बससेवा सुरू करण्यास कोण जबाबदार? बेस्ट प्रशासनाविरुद्ध प्रत्येक वेळी न्यायालयीन लढाया छेडून, दिसायला कामगारांच्या बाजूने उभे राहण्याचा दिखावा तर केला; मात्र प्रत्यक्षात प्रशासनाला बळकटी आणि कामगारांचे खच्चीकरण करण्याचे दुटप्पी धोरण कोणी अवलंबले? खासगीकरणास विरोधाची भाषा करायची आणि दुसरीकडे खासगी कामगार संघटना चालवायची, अशी दिशाभूल करणारी भूमिका कोण घेत आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे आता स्वतः कर्मचाऱ्यांनीच शोधायची आहेत. कारण बेस्टची बाजू मांडणारे, संघर्षाचे दावे करणारे अनेकजण आज चहूबाजूंनी उभे आहेत. मात्र कर्मचाऱ्यांच्याच हाती आहे. खरोखर त्यांच्यासाठी लढणारा नेता कोण आणि कोणाच्या मागे ठामपणे उभे राहायचे. योग्य निवड करून स्वतःची बाजू ताकदीने मांडण्याची जबाबदारी आता पूर्णपणे कर्मचाऱ्यांवरच आहे. हे तेवढेच निर्विवाद सत्य आहे.- अल्पेश म्हात्रे

फीड फीडबर्नर 24 Nov 2025 1:30 am

Maval Politics: मावळच्या राजकारणाचं विदारक सत्य; पैसा आणि पावरपुढे निष्ठावान कार्यकर्ता हतबल

प्रभात वृत्तसेवा कामशेत – मावळ तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्या टप्प्यातील वडगाव नगरपंचायत, तळेगाव दाभाडे नगरपरिषद आणि लोणावळा नगरपरिषद या तीनही निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. स्थानिक निवडणुका म्हणजे कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाला संधी देणाऱ्या, पक्षासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांना पुढे आणणाऱ्या निवडणुका म्हणून ओळखल्या जातात. परंतु यंदाच्या निवडणुकीत चित्र अगदी उलट दिसत आहे. विविध पक्षांच्या उमेदवारी याद्यांचा अभ्यास केल्यास […] The post Maval Politics: मावळच्या राजकारणाचं विदारक सत्य; पैसा आणि पावरपुढे निष्ठावान कार्यकर्ता हतबल appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 24 Nov 2025 1:15 am

PCMC News: महापालिकेत ‘नो आयडी, नो एन्ट्री’! अधिकारी-कर्मचाऱ्यांना ओळखपत्राशिवाय कडेकोट बंदी

प्रभात वृत्तसेवा पिंपरी – महापालिकेच्या मुख्यालय इमारतीसह इतर कार्यालयात सुरक्षेच्या दृष्टीने कर्मचारी व अधिकाऱ्यांना ओळखपत्राशिवाय प्रवेश देण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच महापालिकेच्या सर्वच कार्यालयामध्ये प्रवेश करताना नागरिकांना गेट पास देऊन आणि गेटवरील ये-जा रजिस्टरला नोंदी घेवून आवश्यक त्या बाबींची तपासणी केल्यानंतरच नागरिकांना देखील प्रवेशद्वारातून प्रवेश देण्याची दक्षता घ्यावी, असे आदेश सामान्य प्रशासन विभागाकडून मुख्य […] The post PCMC News: महापालिकेत ‘नो आयडी, नो एन्ट्री’! अधिकारी-कर्मचाऱ्यांना ओळखपत्राशिवाय कडेकोट बंदी appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 24 Nov 2025 12:45 am

PCMC Election: महापालिकेची तिजोरी भरली! मतदार यादी विक्री तेजीत; १५ लाखांचा टप्पा पार

प्रभात वृत्तसेवा पिंपरी – महापालिकेने प्रभागनिहाय मतदार यादी प्रसिध्दी केल्यानंतर त्याची विक्री सुरू झाली आहे. पहिल्या दोन दिवसात विविध प्रभागातील इच्छुकांनी १९७ मतदार याद्या विकत घेतल्या आहेत. या यादी विक्रीतून निवडणूक विभागाला १५ लाख २९ हजार ३९० रुपये शुल्क देखील जमा झाले आहे.महापालिका निवडणूक विभागाने दिलेल्या माहितीनुसार मतदार यादी खरेदीसाठी नागरिक आणि विविध पक्ष-घटक मोठ्या […] The post PCMC Election: महापालिकेची तिजोरी भरली! मतदार यादी विक्री तेजीत; १५ लाखांचा टप्पा पार appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 24 Nov 2025 12:30 am

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, २४ नोव्हेंबर २०२५

पंचांगआज मिती मार्गशीर्ष शुद्ध चतुर्थी शके १९४७, चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा, योग शूल, चंद्र राशी धनु, भारतीय सौर ३ पौष शके १९४७, सोमवार दिनांक २४ नोव्हेंबर २०२५. मुंबईचा सूर्योदय ०६.५० मुंबईचा सूर्यास्त ०५.५९ मुंबईचा चंद्रोदय १०.११ एएम मुंबईचा चंद्रास्त ०९.१५ पीएम राहू काळ ०८.१४ ते ०९.३७. विनायक चतुर्थी, गुरु तेगबहादूर शहीद दिन, शुभ दिवस - सकाळी - ०८.२५ पर्यंत.दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)मेष : कामातील अडथळे दूर होतील.वृषभ : मनावरील ताण निघून जाईल.मिथुन : उलाढाली अपेक्षेप्रमाणे होतील.कर्क : कामे सहज यशस्वी होतील.सिंह : मान-सन्मान प्राप्त होईल.कन्या : व्यवसायामध्ये चांगले वातावरण असेल.तूळ : सरकारी कामे करून घ्या.वृश्चिक : सामाजिक प्रतिष्ठा मिळणार आहे.धनू : आर्थिक फायदे मिळतील.मकर : नवीन मार्ग मिळतील.कुंभ : मानसिक चिंता वाटणार आहे.मीन : योजना कार्यान्वित होऊ शकतात.

फीड फीडबर्नर 24 Nov 2025 12:30 am

PCMC Election: पिंपरी-चिंचवडमध्ये निवडणुकीचा ‘गेम’सुरू? मतदार यादीतील घोळाने राजकीय वर्तुळात खळबळ

प्रभात वृत्तसेवा पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभागनिहाय मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीमध्ये मोठ्या प्रमाणावर घोळ असून राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक ज्या प्रभागातून निवडून आले होते, त्या प्रभागातील मतदारच दुसऱ्या प्रभागामध्ये टाकण्यात आले आहेत. यामधून भाजपाने निवडणूक कारभारात हस्तक्षेप करत राष्ट्रवादी काँग्रेसला कोंडीत पकडण्याचा डाव आखला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. […] The post PCMC Election: पिंपरी-चिंचवडमध्ये निवडणुकीचा ‘गेम’ सुरू? मतदार यादीतील घोळाने राजकीय वर्तुळात खळबळ appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 24 Nov 2025 12:15 am

Blind Women T20 World Cup : भारतीय दृष्टीहीन महिला संघाने पटकावला पहिला-वहिला टी-२० विश्वचषक

Indian Blind Womens Team won T20 world cup 2025 : भारताच्या महिला क्रिकेटसाठी नोव्हेंबर महिना दुहेरी आनंदाचा ठरला आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय संघाने एकदिवसीय विश्वचषक जिंकल्यानंतर, आता भारतीय दृष्टीहीन महिला क्रिकेट संघाने पहिला-वहिला टी-२० विश्वचषक जिंकून या यशावर कळस चढवला आहे. कर्णधार दीपिका टीसीच्या नेतृत्वाखालील भारताने अंतिम सामन्यात नेपाळचा ७ गडी राखून दणदणीत पराभव […] The post Blind Women T20 World Cup : भारतीय दृष्टीहीन महिला संघाने पटकावला पहिला-वहिला टी-२० विश्वचषक appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Nov 2025 10:46 pm

निवृत्त पोलिस अधिकारी आणि डॉक्टरची १.४४ कोटींची फसवणूक; दोन अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

ठाणे – ठाण्यातील एका निवृत्त पोलिस अधिकारी आणि त्यांच्या डॉक्टर मित्राला गुंतवणुकीतून जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून १.४४ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. गेल्या दोन वर्षांत झालेल्या या फसवणुकीप्रकरणी पोलिसांनी पुणे आणि गोव्यातील रहिवासी असलेल्या दोन व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी कल्याण येथील रहिवासी असलेल्या ६७ वर्षीय माजी पोलिस अधिकाऱ्याला आणि त्यांच्या […] The post निवृत्त पोलिस अधिकारी आणि डॉक्टरची १.४४ कोटींची फसवणूक; दोन अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Nov 2025 10:42 pm

रात्र वैऱ्याची आहे, गाफील राहू नका; राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत जर आपण गाफील राहिलो तर, मराठी माणसांसाठी ही शेवटची निवडणूक असेल, असे मनसेप्रमुख राज ठाकरे म्हणाले आहेत. एकदा मुंबई हातातून गेली तर आपल्याला कोणालाही काही जमणार नाही. हातातून मुंबई गेली तर हे लोक थैमान घालतील असे म्हणत राज ठाकरेंनी नाव न घेता सत्ताधारी पक्षांवर हल्लाबोल केला आहे. मुंबईमध्ये आयोजित करण्यात […] The post रात्र वैऱ्याची आहे, गाफील राहू नका; राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Nov 2025 10:41 pm

“ओबीसी कोट्याबाबत घटनात्मक पेचप्रसंग”–चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई – ओबीसी कोट्याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या कार्यवाहीमुळे घटनात्मक पेचप्रसंग निर्माण झाला असल्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी सांगितले. जिल्हा परिषद निवडणुका पुढे ढकलता येतील का, या प्रश्नाचे उत्तर देताना ते बोलत होते. एक घटनात्मक पेचप्रसंग निर्माण झाला आहे आणि त्यावर उपाय शोधण्याची गरज आहे. मला वाटते की, २५ नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे. […] The post “ओबीसी कोट्याबाबत घटनात्मक पेचप्रसंग” – चंद्रशेखर बावनकुळे appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Nov 2025 10:21 pm

दक्षिण आफ्रिकेच्या अध्यक्षांशी पंतप्रधान मोदींची चर्चा

जोहान्सबर्ग – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जोहान्सबर्गमध्ये जी-२० शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा यांची भेट घेतली. भारताच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जी-२० शिखर परिषदेदरम्यान घेतलेल्या निर्णयांचा पाठपुरावा केल्याबद्दल आणि त्यावर आधारित पुढील कार्य केल्याबद्दल दक्षिण आफ्रिकेच्या जी-२० संबंधी प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले. भारत आणि दक्षिण आफ्रिका संबंधांचा आधार असलेल्या ऐतिहासिक संबंधांना उजाळा देत, […] The post दक्षिण आफ्रिकेच्या अध्यक्षांशी पंतप्रधान मोदींची चर्चा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Nov 2025 9:56 pm

IND vs SA : मार्को यान्सन बनला नवा ‘सिक्सर किंग’! भारताविरुद्ध ‘हा’पराक्रम करणारा जगातील एकमेव खेळाडू

Marco Jansen’s record of sixes : गुवाहाटीच्या बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारतासमोर पहिल्या डावात ४८९ धावांचा विशाल स्कोर उभा केला आहे. आफ्रिकेच्या तळाच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांचा कस पाहिला, ज्यामध्ये सेनुरन मुथुसामी आणि मार्को यान्सन यांनी निर्णायक भूमिका बजावली. यासह यान्सनने भारताविरुद्ध एक खास पराक्रमही केला. मुथुसामीचे संयमी शतक आणि […] The post IND vs SA : मार्को यान्सन बनला नवा ‘सिक्सर किंग’! भारताविरुद्ध ‘हा’ पराक्रम करणारा जगातील एकमेव खेळाडू appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Nov 2025 9:51 pm

एचआयव्ही उपचारात महाराष्ट्र नं. 1; नाकोकडून राष्ट्रीय पातळीवरील सर्वोच्च सन्मान

मुंबई : केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अखत्यारीतील राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेद्वारे (नाको) घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पातळीवरील आढाव्यात काळजी आधार आणि उपचार सेवा प्रदान करण्यासाठी देशातील सर्वोत्तम राज्य म्हणून महाराष्ट्र राज्यास सन्मान मिळाला आहे. महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेला(एमसॅक) विजयवाडा येथे आयोजित केलेल्या केंद्रीय समारंभात हा प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करण्‍यात आला. नाकोच्या कामगिरी निर्देशांकानुसार […] The post एचआयव्ही उपचारात महाराष्ट्र नं. 1; नाकोकडून राष्ट्रीय पातळीवरील सर्वोच्च सन्मान appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Nov 2025 9:24 pm

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा, केएल राहुल कर्णधार

मुंबई : आगामी दक्षिण आफ्रिका विरुद्ध तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. सलामीवीर शुभमन गिल मानेच्या दुखापतीमुळे पूर्णतः बरा न झाल्याने या मालिकेतून बाहेर राहणार आहे. त्याच्याऐवजी केएल राहुल विकेटकीपिंगसोबतच संघाचे नेतृत्व देखील करणार आहे. संघात दुसरा विकेटकीपर म्हणून ऋषभ पंत खेळणार आहे. तर मुख्य वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला देखील विश्रांती देण्यात आली आहे. श्रेयस अय्यरलाही दुखापतीमुळे संधी मिळू शकली नाही.युवापिढीचा आक्रमक फलंदाज ऋतुराज गायकवाड दक्षिण आफ्रिका अ विरुद्धच्या उत्कृष्ट कामगिरीनंतर पुन्हा भारतीय संघात दमदार कमबॅक केला आहे. त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपली जबरदस्त कामगिरी सादर करून निवडकर्त्यांचे लक्ष वेधले.संघात अनुभवी फलंदाज रोहित शर्मा, विराट कोहली, यशस्वी जयस्वाल यांसारखे खेळाडू आहेत, तर तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, ध्रुव जुरेल, हर्षित राणा यांसारखे तरुण खेळाडू संघात चमक दाखवणार आहेत. ऑलराउंडर्स रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव संघाचा बॅलन्स अधिक मजबूत करतील. बॉलिंगच्या जबाबदाऱ्या प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग यांच्यावर राहणार आहेत.दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या आगामी तीन वनडे सामन्यांसाठी घोषणा झालेल्या भारतीय संघात फलंदाजांमध्ये रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा आणि ऋतुराज गायकवाड यांचा समावेश आहे. केएल राहुल संघाचा कर्णधार असून त्याचबरोबर विकेटकीपिंगची जबाबदारी पार पाडणार आहे, तर ऋषभ पंत दुसरा विकेटकीपर म्हणून संघात आहे. ऑलराउंडर खेळाडूंमध्ये रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर आणि कुलदीप यादव यांचा समावेश आहे, तर गोलंदाजीच्या विभागात प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, ध्रुव जुरेल आणि नितीश कुमार रेड्डी यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी असेल.वनडे मालिकेचे वेळापत्रक पुढीलप्रमाणेपहिला सामना ३० नोव्हेंबरला रांची येथे, दुसरा सामना ३ डिसेंबरला रायपूर येथे आणि तिसरा सामना ६ डिसेंबरला विशाखापट्टणम येथे खेळवला जाणार आहे.

फीड फीडबर्नर 23 Nov 2025 9:10 pm

‘द केरळ स्टोरी’ फेम अदाला मोठा धक्का; लाडक्या आजीचे निधन, महिनाभर सुरू होते उपचार

मुंबई : लोकप्रिय अभिनेत्री अदा शर्मा सध्या वैयक्तिक आयुष्यात मोठ्या दुःखातून जात आहे. ‘द केरळ स्टोरी’मुळे देशभरात ओळख मिळवलेल्या अदाच्या अत्यंत लाडक्या आजीचे निधन झाले आहे. आदा त्यांना प्रेमाने ‘पाती’ असे संबोधत असे आणि त्यांचे नाते अतिशय घट्ट होते. आज (२३ नोव्हेंबर) सकाळी त्यांनी शेवटचा श्वास घेतला.अदा शर्माच्या आजींना अल्सरेटिव्ह कोलायटिस आणि डायव्हर्टिक्युलायटिस या गंभीर आजारांनी ग्रासले होते. गेल्या जवळपास महिनाभर त्या रुग्णालयात उपचार घेत होत्या. अदा सोशल मीडियावर आजीसोबतचे क्षण वारंवार शेअर करायची. तिचे ‘पार्टी विथ पाती’ हे व्हिडिओ चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाले होते.सूत्रांनुसार, अदा आजीच्या सर्वात जवळची होती आणि बऱ्याच काळापासून ती त्यांच्या सोबतच राहत होती. मात्र अदाने अजून या दुःखद प्रसंगाबाबत कोणतेही अधिकृत विधान केलेले नाही.अदा आणि तिच्या आजीचे नाते किती जिव्हाळ्याचे होते याचे अनेक किस्से आहेत. २०२१ मधील एका मुलाखतीत अदाने सांगितले होते की तिची आजी सोशल मीडियावर तिच्या पोस्टवरील कमेंट्स काळजीपूर्वक वाचायची.ट्रोलिंग दिसल्यास त्या स्वतःच त्यावर भन्नाट प्रतिक्रिया द्यायच्या. काही महिन्यांपूर्वी अदाने आजीच्या वाढदिवसाचा एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यात दोघींचा आपुलकीचा संवाद स्पष्ट दिसत होता.अदा शर्मा आणि तिची आई या आजीच्या मूळ गावी म्हणजे केरळमध्ये स्मृतिसभा आयोजित करणार आहेत.कामाच्या दृष्टीने पाहता, अदा शर्माने २००८ मध्ये ‘१९२०’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील तिच्या कामगिरीचं मोठ्या प्रमाणावर कौतुक झालं आणि तिला ‘बेस्ट फिमेल डेब्यू’ साठी फिल्मफेअर नामांकनही मिळालं. अलीकडेच ती ‘तुमको मेरी कसम’ या चित्रपटात अनुपम खेर आणि ईशा देओलसोबत दिसली होती, मात्र चित्रपटाला अपेक्षित यश मिळू शकले नाही.

फीड फीडबर्नर 23 Nov 2025 9:10 pm

उत्तरेकडील राज्यांना थंडीचा तडाखा, दोन जणांचा मृत्यू झाला

नवी दिल्ली : उत्तर भारतात काही ठिकाणी झालेल्या बर्फवृष्टीनंतर अनेक राज्यांत थंडीने हुडहुडी भरली आहे. मध्‍य प्रदेशातील भोपाळ, इंदूरसह सात जिल्ह्यांत थंडीची लाट आली. पंचमढीत यंदा प्रथमच तापमान ५.८ अंश सेल्सिअस इतके कमी नोंदविले गेले. दरम्‍यान, मध्य प्रदेशात गत दोन दिवसांत थंडीमुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तराखंडमध्ये कडाक्याची थंडी असून चमोली जिल्ह्यात शेषनेत्र तलाव […] The post उत्तरेकडील राज्यांना थंडीचा तडाखा, दोन जणांचा मृत्यू झाला appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Nov 2025 9:08 pm

कर्नाटक काँग्रेसमध्ये पडले दोन गट, ताकद वाढवण्यासाठी दोन्ही गटांकडून आमदारांना ५० कोटी रुपयांसह फ्लॅट आणि फॉर्च्युनरची ऑफर ?

बंगळुरू : मुख्यमंत्री सिद्धारमैया आणि उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार या दोघांच्या नेतृत्वात कर्नाटक काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. प्रत्येक गट आपली ताकद वाढवण्यासाठी प्रतिस्पर्धी गटाच्या आमदारांना ५० कोटी रुपयांसह फ्लॅट आणि फॉर्च्युनर गाडीची ऑफर देत आहे; असा आरोप भाजप नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते चालवाडी नारायणस्वामी यांनी केला आहे. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी हा आरोप केला. काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्यावर मंत्रिपद मिळवून देण्यासाठी २०० कोटींची मागणी केल्याचाही आरोप त्यांनी केला. या प्रकरणात सखोल चौकशी करुन दोषींवर कारवाई करावी; अशीही मागणी चालवाडी नारायणस्वामी यांनी केली आहे.नारायणस्वामी यांचे आरोप अशा वेळी आले आहेत, जेव्हा माध्यमांमध्ये कर्नाटक काँग्रेसमधील नेतृत्व बदलाची चर्चा जोर धरत आहे. कर्नाटकच्या काँग्रेस सरकारने अलिकडेच अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सिद्धारमैया आणि डी.के. शिवकुमार यांच्यात सत्ता वाटपाचा करार झाला होता. त्यानुसार अर्धा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे कर्नाटकमध्ये आता सत्ता बदलाची चर्चा जोर धरू लागली आहे. काही काँग्रेस नेते या संभाव्य बदलाला 'नोव्हेंबर क्रांती' असेही म्हणत आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.केंद्रीय मंत्री आणि जेडीएस नेते एचडी कुमारस्वामी यांनीही कर्नाटकच्या राजकारणावर भाष्य केले आहे. येत्या पाच-सहा महिन्यांत राज्यात 'अविश्वसनीय घटनाक्रम' पाहायला मिळतील, असे भाकीत त्यांनी केले आहे. राजकारणात कोण कधी काय निर्णय घेईल हे सांगणे अशक्य आहे आणि राज्यात सध्या अशीच 'क्रांती' होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे, असे ते म्हणाले. काँग्रेसने मात्र भाजपच्या नेत्यांचे आरोप फेटाळले आहेत.

फीड फीडबर्नर 23 Nov 2025 8:10 pm

डॉ. गौरी गर्जे आत्महत्या प्रकरण, FIR नोंदीत नेमकं काय?

मुंबई : मंत्री पंकजा मुंडे यांचा PA अनंत गर्जेची पत्नी डॉ. गौरी गर्जे हिने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर घडली. लग्नाच्या काही महिन्यांतच असे घडलेल्या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.डॉ. गौरी आणि अनंत गर्जे यांचे ७ फेब्रुवारी रोजी लग्न झाले होते. मात्र, अनंत गर्जे यांच्या विवाहबाह्य संबंधांमुळे दोघांमध्ये सतत वाद चालू होते, असे गौरीच्या कुटुंबीयांनी सांगितले आहे. या वादामुळे मानसिक तणाव वाढल्याचेही कुटुंबीयांनी म्हटले आहे.या घटनेनंतर वरळी पोलिसांनी FIR नोंद केली असून, त्यात अनंत गर्जे यांच्यासह त्याचा भाऊ व बहीण यांच्यावरही आरोप नोंदवण्यात आले आहेत. FIR नुसार, या तिघांनी डॉ. गौरी यांच्यावर त्रास देणे, अपमान करणे आणि आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप आहे.गौरीच्या कुटुंबीयांनी या प्रकरणात हत्या झाल्याचा दावा देखील केला आहे आणि पोलिसांना त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे. सध्या पोलीस या घटनेचा तपास करत आहेत आणि आरोपींविरुद्ध पुढील कारवाईची प्रक्रिया सुरु आहे.नक्की काय आहे FIR मध्ये ? शब्दशः वाचा..गौरी गर्जे हिच्या वडिलांनी अनंत गर्जे आणि त्यांचा भाऊ, बहिणीविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले की, मुलगी गौरी ही मुंबईमध्ये रहावयास होती त्यावेळी ती मला व माझी पत्नी अलकनंदा हिचेशी फोनवर बोलत असे त्यावेळी ती मला व माझी पत्नी हिला सांगत असे की, अनंत हा तिच्या घरगुती किरकोळ कारणावरुन सतत वाद घालत असे. त्यावेळी मी व माझी पत्नी तिला समजविण्याचा प्रयत्न करत असे की, त्यांना कामाचा त्रास होत असेल त्यामुळे वाद होत असतील.तिने मोबाईलवरून माझ्या मोबाईल क्रमांकवर व्हॉट्सअँपद्वारे काही फोटो पाठवले. दिनांक ३०/०९/२०२५ रोजी संध्याकाळी ०७.०० वाजण्याच्या सुमारास माझी मुलगी गौरी हिने तिच्या ते फोटो मी पाहिले असता, त्यामध्ये दिनांक १६/११/२०२१ रोजीचे ममता हॉस्पिटल, लातूर येथील गर्भवती स्त्रीचे संमतीपत्र आणि जाहीरनामा असल्याचे दिसले. त्यामध्ये श्रीमती किरण सिध्दार्थ इंगळे असे महिलेचे नाव असून तिच्या पतीचे नाव अनंत भगवान गर्जे असे नमुद होते. त्या कागदपत्रावरुन अनंत याचे किरण या महिलेशी काहीतरी संबंध असल्याचे मला वाटले म्हणून मी तात्काळ गौरीला फोनद्वारे संपर्क करून तिला सदर कागदपत्राबाबत विचारले असता गौरीने सदरचे कागदपत्र हे तिला घर शिफ्ट करतांना मिळून आल्याचे रडत सांगत होती. तेव्हा तिला आम्ही तुझ्याकडे येतो तू रडू नकोस शांत बस असे सांगितले, तेव्हा तिने मला आपण येऊ नका, आपण आलात तर अनंत हा तिला तिचे नाव चिठ्ठीत लिहुन आत्महत्या करीन अशी धमकी देत आहे असे सांगितले. तसेच तिने मला अनंत व किरण सिध्दार्थ इंगळे यांच्या अफेयर बाबत माझा दीर अजय, नणंद शीतल राजेंद्र आंधळे यांना यापूर्वी माहित होते व तिने त्याबदल नणंद शीतल सोबत अनंतच्या अफेयर बाबत बोलले होते, परंतु नणंद शीतल हिने तिला तुझे अनंत सोबत जमले नाही तर मी माझ्या भावाचे दुसरे लग्न लावीन अशी धमकी देत असल्याचे सांगितले. त्यानंतर माझी पत्नी अलकनंदा हिने गौरी हिची नणंद शीतल यांना फोन करून सदरबाबत विचारले असता, शीतल हिने आम्ही आमचं बघून घेवू म्हणत फोन ठेवला.दिनांक ०३/१०/२०२५ रोजी माझा जावई अनंत याचा वाढदिवस असल्याने मी व माझी पत्नी गौरीकडे मुंबईला जाणार होतो. पण गौरीने आम्हाला फोनवरून कळविले की, तुम्ही माझ्याकडे मुंबईला येवू नका असे रडत रडत सांगत होती. तरी सुद्ध आम्हाला तिची काळजी वाटत असल्याने अनंत याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गौरीला कोणतीही पूर्व कल्पना न देता दिनांक ०३/१०/२०२५ रोजी सकाळी ०६.३० वाजण्याच्या सुमारास मी व माझी पत्नी असे गौरी हिच्या मुंबई येथील वरळी येथील रुमवर आलो होतो. त्यावेळी ती आम्हाला म्हणाली की, तुम्ही कशाला घरी आलात, अनंत माझ्यावर रागावतील असे म्हणत होती. तेव्हा मी तिला अनंतच्या अफेयर बाबत त्याच्याशी कोणतीही चर्चा करणार नाही असे सांगितले होते. तेव्हा ती शांत झाली. त्यावेळी आम्हाला गौरी हिचे चेहऱ्यावर व गळ्यावर मारल्याचे व्रण दिसले. तेव्हा मी व माझे पत्नीने गौरी हिला त्या जखमांबाबत विचारणा केली असता, गौरी हिने आम्हाला उडवाउडवीची उत्तरे दिली. यांनतर तिच्याकडे आम्ही अधिकची चौकशी केली असता तिने आम्हाला सांगितले की, तिचा दीर अजय याने याआधीच तिला अनंतच्या आणि किरण सिध्दार्थ इंगळे हिचेसोबत असलेल्या अफेयर बाबत सांगितले होते, परंतु ते तिने मनावर घेतले नव्हते. पण गौरी हि नविन घरी शिफ्ट करत असताना तिला किरण हिचे प्रेग्नंट असल्याचे कागदपत्र सापडले होते. त्या कागदप‌त्रामध्ये तिचा पती म्हणून अनंत याचे नाव नमुद होते, त्यामुळे ती नाराज होती.सदरबाबत तिने अनंत यास विचारले असता त्याने तुला काय करायचे ते कररामी कोणाला घाबरत नाही, जर तू याबददल कोणाला सांगितले तर तुझे नाव चिठ्ठीत लिहून आत्महत्या करीन अशी धमकी दिली होती. त्यानंतर आम्ही संध्याकाळी जावई अनंतचा वाढदिवस साजरा करून रात्री ०८.०० वाजण्याच्या सुमारास परत बीडला निघुन गेलो,दि २१/११/२०२५ रोजी जावई अनंत याने रात्री १०.१५ वाजता माझे मोबाईलवर दोन मिसकॉल आले होते. परंतु मी बाथरूमला गेलो असल्याने कॉल उचलू शकलो नाही. त्यानंतर मी जावई अनंत यांना फोन केला असता अनंत यांनी फोन उचलला नाही म्हणून मी गौरीला फोन करून विचारपूस केली असता तिने सर्व ठीक असल्याचे सांगितले. काल दिनांक २२/११/२०२५ रोजी संध्याकाळी ०६.४५ या सुमारास जावई अनंत याने गला फोन करून कळविले की, मामा गौरी सुसाइड करायला लागली तिला समजावा, मी अनंतला गौरीकडे फोन देण्यास सांगिताले असता त्यांनी गौरीला फोन न देता गौरीला दवाखान्यात घेवून जात असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने लगेचच माझे पत्नीला कॉल करून मामी माझे समोर गौरीचे प्रेत आहे असे सांगून फोन ठेवला त्यानंतर मी व माझी पत्नी सदरवेळी एकत्रच असल्याने आम्ही अनंतला पुन्हा कॉल केला. परंतु त्याने कॉलला प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर आम्ही आमचे मुंबई येथे राहणारे मामेभाऊ कारभारी खेडकर या नातेवाईकांना सदरची हकीकत सांगून गौरीच्या घरी जावून माहिती घेण्यास सांगितले असता रात्री ०८.०० वा दरम्यान त्यानी आम्हाला कॉल करून करून गौरी मयत झाली असून तिला सध्या नायर रुग्णालय येथे ठेवल्याचे सांगितले. त्यानंतर आम्ही मुंबईला येवून नायर रुग्णालय येथे गेलो असता अनंतने गौरीने आत्महत्या केल्याचे सांगितले.तरी माझी मुलगी नामे गौरी हीस तिचा पती अनंत गर्जे याने लग्न झाल्यानंतर काहि कालावधीतच किरकोळ कारणावरून वाद घालण्यास तसेच किरण सिध्दार्थ इंगळे या महिलेसोबत असलेले अफेरबाबत गौरी हिरा समजल्याने तिस मानसिक व शारिरिक त्रास देण्यास सुरुवात केली व जर तिने तिचे माहेरच्या लोकांना याबाबत काही सांगितले तर स्वतःचे जीवाचे काहीतरी बरेवाईट करेल अशी धमकी देवुन तिला ब्लॅकमेल करून त्रास देत असे. तसेच अनंत गर्जे यांची बहिण शीतल राजेंद्र आंधळे हि देखील गौरी हिस जर तुझे अनंत याचेशी जमत नसेल तर त्याचे दुसरे लग्न लावून देऊ अशी धमकी देत असे.त्यानंतर दिनांक २२/११/२०२५ रोजी अनंत भगवान गर्जे यांनी मला फोन करून सांगितले की, गौरी हीने आत्महत्या केली आहे. म्हणुन माझी मुलगी गौरी हिच्या मृत्युस तिचा पती अनंत भगवान गर्जे, बहीण शीतल भगवान गर्जे-आंधळे, दीर अजय भगवान गर्जे हे जबाबदार असून जावई अनंत गर्जे हा गौरी हिने आत्महत्या केल्याचे सांगत असला तरी त्यामध्ये खरेच आत्महत्या आहे की काही घातपात आहे? याबाबत माझी मुलगी गौरी हिंचे आत्महत्येचा कायदेशीर तपास होवून सत्य समोर येणेबाबत तपास होऊन मला न्याय मिळावा म्हणून वरील तीन लोकांविरूध्द माझी कायदेशीर तक्रार आहे, असे गौरीच्या वडिलांनी म्हटले.

फीड फीडबर्नर 23 Nov 2025 8:10 pm

Smriti Mandhana : स्मृतीच्या वडिलांची प्रकृती आता कशी आहे? डॉक्टरांनी दिली माहिती; म्हणाले, ‘सतत ईसीजी मॉनिटरिंग…’

Smriti Mandhana Father Health Latest Updates : भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार खेळाडू स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचा आज होणारा विवाहसोहळा अचानक स्थगित करण्यात आला आहे. ऐन लग्नाच्या दिवशी स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना यांची प्रकृती खालावल्याने हा निर्णय घेण्यात आला. त्यांना हृदयविकाराचा झटका येण्याची लक्षणे दिसल्याने तातडीने रुग्णालयात दाखल केले होते. आता त्यांच्या […] The post Smriti Mandhana : स्मृतीच्या वडिलांची प्रकृती आता कशी आहे? डॉक्टरांनी दिली माहिती; म्हणाले, ‘सतत ईसीजी मॉनिटरिंग…’ appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Nov 2025 7:52 pm

एकीकडं ‘बिनविरोध पॅटर्न’ची चर्चा, तर दुसरीकडे पुतण्या युगेंद्र पवारांचे अजित पवारांवर गंभीर आरोप

बारामती (पुणे) : बारामती नगरपरिषदेच्या निवडणुकीत अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे तब्बल ८ नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. याचा जल्लोष सत्ताधारी गट साजरा करत असतानाच दुसरीकडे शरद पवार गटाच्या युवा नेत्याने आणि अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी थेट काकांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या या आरोपाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. नेमकं काय म्हणाले […] The post एकीकडं ‘बिनविरोध पॅटर्न’ची चर्चा, तर दुसरीकडे पुतण्या युगेंद्र पवारांचे अजित पवारांवर गंभीर आरोप appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Nov 2025 7:46 pm

De De Pyaar De 2 Box Office Collection : ‘दे दे प्यार दे 2’चा बॉक्स ऑफिसवर दबदबा कायम; 10 दिवसांत केलं मोठी कमाई !

De De Pyaar De 2 Box Office Collection : अजय देवगण आणि रकुल प्रीत सिंह यांची रोमँटिक कॉमेडी फिल्म ‘दे दे प्यार दे 2’ प्रदर्शित होऊन 10 दिवस झाले असून, या कालावधीतही चित्रपटाची कमाई स्थिर गतीने सुरू आहे. 14 नोव्हेंबरला रिलीज झालेल्या या चित्रपटासमोर 21 नोव्हेंबरला ‘मस्ती 4’ आणि ‘120 बहादुर’ ही दोन नवीन चित्रपट […] The post De De Pyaar De 2 Box Office Collection : ‘दे दे प्यार दे 2’चा बॉक्स ऑफिसवर दबदबा कायम; 10 दिवसांत केलं मोठी कमाई ! appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Nov 2025 7:38 pm

अस्लम शेख प्रकरण चिघळले, मालाडच्या मालवणीत भाजप युवा मोर्चा आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमनेसामने

मुंबई : मालाडच्या मालवणी येथे अग्निशामक दलाच्या कार्यालयासमोर भाजप युवा मोर्चाचे शेकडो कार्यकर्ते एकत्र आले. या कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांच्या विरोधात घोषणा दिल्या. या भागातच काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांचे एक कार्यालय आहे. भाजप युवा मोर्चाने घोषणाबाजी सुरू करताच काँग्रेस कार्यकर्तेही रस्त्यावर आले. यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांची धरपकड केली. तसेच घटनास्थळी मोठा बंदोबस्त ठेवला.अस्लम शेख यांनी मालाडमध्ये उभारलेली रोहिंग्या आणि बांगलादेशी मुसलमानांची वस्ती पाडून घुसखोरांना त्यांच्या देशात परत पाठवून द्यावे, अशी मागणी भाजपने केली आहे. भाजपकडून सर्वात आधी ही मागणी मंगलप्रभात लोढा यांनी केली. मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनीही लोढांना या मागणीसाठी पाठिंबा जाहीर केला. अखेर या मुद्यावरुन काँग्रेस आणि भाजप यांच्यात राजकीय धुमश्चक्री रंगण्यास सुरुवात झाली. अलिकडेच भाजपच्या मंगलप्रभात लोढा यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना एक पत्र पाठवले. या पत्रात त्यांनी अस्लम शेख धमकावत असल्याचे नमूद करून कारवाईची मागणी केली. लोढा यांच्या मागणीला मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी जाहीर पाठिंबा दिला होता. धमकी देणारे अस्लम शेख आणि त्यांच्या बेकायदा वर्तन करणाऱ्या समर्थकांवर कायदेशीर कारवाई व्हायलाच हवी, असेही अस्लम शेख म्हणाले होते. आता या घडामोडींवरुन मालवणीत काँग्रेस आणि भाजप यांच्यातील तणाव वाढू लागला आहे.अस्लम शेख यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केल्याप्रकरणी पोलिसांनी भाजपच्या काही आंदोलकांना ताब्यात घेत मालवणी पोलीस ठाण्यात आणलं होतं. यानंतर भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्यासह आणखी काही नेते पोलीस ठाण्यात आले होते. याच दरम्यान मालवणी पोलीस ठाण्याच्या बाहेर भाजप कार्यकर्त्यांकडून ठिय्या आंदोलन सुरू झालं.https://prahaar.in/2025/11/22/congress-and-bjp-workers-face-to-face-in-mumbai/प्रकरण नेमके आहे तरी काय ?मुंबई भाजप आणि काँग्रेस नेते अस्लम शेख यांच्यातील वाद आता टोकाला पोहोचला आहे. मुंबई भाजप आणि काँग्रेस नेते अस्लम शेख यांच्यातील वाद आता टोकाला पोहोचला आहे. अस्लम शेख यांनी मंत्री मंगलप्रभात लोढा यांना धमकी दिल्याचा आरोप करत भाजपकडून अस्लम शेख यांच्यावर टीका केली जात होती. यातूनच अमित साटम यांनी खोचक शब्दांत अस्लम शेख यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील अंधेरी येथे अमित साटम यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केलं होतं.

फीड फीडबर्नर 23 Nov 2025 7:30 pm

Nitin Gadkari : कृषी विकासासाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांची गरज : नितीन गडकरी

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्याची गरज अधोरेखित केली. शेतकरी उत्पादक संघटनेवरील कार्यशाळेला संबोधित करताना त्यांनी सांगितले , शेतकऱ्यांच्या सर्व समस्या शेतकऱ्यांच्या उत्पादक कंपनीच्या माध्यमातून जिल्ह्यांतील आयुक्तालय स्तरावर सोडवल्या पाहिजेत. शेतकऱ्यांच्या आकर्षणाचे केंद्र ठरलेल्या आणि नागपुरात मागील तीन दिवसांपासून सुरु असलेल्या ॲग्रो व्हिजन 2025 या कृषी प्रदर्शनात […] The post Nitin Gadkari : कृषी विकासासाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांची गरज : नितीन गडकरी appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Nov 2025 7:28 pm

Chennai bullet train : चेन्नईचे बुलेट ट्रेनचे स्वप्न साकारणार ! प्रकल्पाचा संपूर्ण आराखडा समोर, पाहा….

Chennai bullet train : दक्षिण मध्य रेल्वेने दक्षिण भारतातील पहिली बुलेट ट्रेन साकारण्यासाठी या प्रकल्पाचा तपशीलवार प्रकल्प अहवाल तमिळनाडू सरकारला सादर केला आहे आणि सर्वेक्षणाचे काम सुरू ठेवण्यासाठी मंजुरी मागितली आहे. हैदराबाद-चेन्नई हाय-स्पीड रेल कॉरिडॉर हा प्रकल्प ७७८ किमी लांबीचा असून त्यामुळे या दोन्ही शहरांमधील प्रवासाचा वेळ लक्षणीयरित्या कमी होणार आहे. या बुलेट ट्रेन प्रकल्पाचे […] The post Chennai bullet train : चेन्नईचे बुलेट ट्रेनचे स्वप्न साकारणार ! प्रकल्पाचा संपूर्ण आराखडा समोर, पाहा…. appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Nov 2025 7:25 pm

Election News : नोटबंदी, लॉकडाऊनची आठवण.! मतदार पडताळणीवरून केंद्रावर निशाणा; राहुल गांधींची कडवट प्रतिक्रिया

Rahul Gandhi – मतदारयाद्या पडताळणीवरून (एसआयआर) कॉंग्रेसने निवडणूक आयोग आणि भाजपवरील टीकेचे सत्र कायम ठेवले. पडताळणी प्रक्रियेच्या अंमलबजावणीत सहभागी काही बुथस्तरीय अधिकाऱ्यांचा (बीएलओ) विविध कारणांवरून मृत्यू झाला. त्यावरून कॉंग्रेसने टीकेची धार वाढवली. मतदारयाद्यांची पडताळणी कुठली सुधारणा नसून जबरदस्तीने लादलेली प्रक्रिया आहे, असे भाष्य लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केले. तर, ती प्रक्रिया नोटंबदी आणि […] The post Election News : नोटबंदी, लॉकडाऊनची आठवण.! मतदार पडताळणीवरून केंद्रावर निशाणा; राहुल गांधींची कडवट प्रतिक्रिया appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Nov 2025 7:12 pm

वरळीतील आत्महत्या प्रकरण: पतीचे विवाहबाह्य संबंध आणि सासरच्या छळाला कंटाळून डॉक्टरची आत्महत्या, गुन्हा दाखल

मुंबई : मुंबईतील वरळीमध्ये पंकजा मुंडे यांचा PA अनंत गर्जे याची पत्नी डॉक्टर गौरी पालवे गर्जे हिने शनिवारी संध्याकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना समजताच परिसरात आणि राजकीय वर्तुळात तणाव निर्माण झाला.गौरी पालवे आणि अनंत गर्जे यांचा विवाह फेब्रुवारी महिन्यात बीडमध्ये झाला होता. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून विवाहबाह्य संबंधांमुळे पती-पत्नीमध्ये सातत्याने भांडणे आणि मानसिक तणाव निर्माण झाल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. गौरी पालवे केईएम रुग्णालयात डॉक्टर म्हणून कार्यरत होती. शनिवारी दुपारी १ वाजेपर्यंत ती रुग्णालयात होती आणि नंतर घरी आली. यानंतर संध्याकाळी तिने हे धक्कादायक पाऊल उचलले.सुरुवातीला पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. परंतु गुन्हा दाखल करण्यास उशीर झाल्याने गौरीच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार केली. अखेर रविवारी वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.पोलिसांनी अनंत गर्जे, त्याची बहीण शीतल गर्जे-आंधळे आणि दीर अजय गर्जे यांच्या विरोधात भारतीय दंड संहिता कलम १०८, ८५, ३५२ आणि ३५१(२) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. या तिघांवर त्रास देणे, अपमान करणे आणि आत्महत्येस प्रवृत्त करणे याचा आरोप आहे.कुटुंबीयांच्या मते, सासरच्या मंडळींकडून सतत छळ होत होता. तसेच गौरीने पतीच्या मोबाईलमध्ये काही चॅटिंग पकडल्याचेही समोर आले. यामुळे निर्माण झालेल्या मानसिक तणावामुळे तिने हे पाऊल उचलल्याचे पालवे कुटुंबातील सदस्यांनी सांगितले.गौरी पालवे गर्जेने आपला जीव दिला नसून तिची हत्या करण्यात आली आहे, असा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे. या घटनेमुळे मुंबईच्या राजकीय व सामाजिक वर्तुळात तणाव निर्माण झाला आहे.सध्या अनंत गर्जे कुठे आहे, याची माहिती मिळालेली नाही. पोलिस आता या प्रकरणात अनंत गर्जे आणि त्यांच्या कुटुंबीयांविरुद्ध पुढील कारवाई काय करतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

फीड फीडबर्नर 23 Nov 2025 7:10 pm

Sangram Thopate : थोपटे गेले आणि गड कोसळला.! ५० वर्षांच्या सत्तेनंतर भोर नगरपालिकेत काँग्रेसला एकही उमेदवार नाही

Sangram Thopate : एकेकाळी काँग्रेसचा अभेद्य गड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भोर नगरपालिकेच्या निवडणुकीत यंदा काँग्रेस पक्षाचे अस्तित्वच संपुष्टात आले आहे. ज्या नगरपालिकेत काँग्रेसने तब्बल ५० वर्षे सत्ता गाजवली, तिथे यंदा पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवणारा एकही उमेदवार काँग्रेसला उभा करता आलेला नाही. माजी आमदार संग्राम थोपटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेसची झालेली ही दयनीय अवस्था जुन्या […] The post Sangram Thopate : थोपटे गेले आणि गड कोसळला.! ५० वर्षांच्या सत्तेनंतर भोर नगरपालिकेत काँग्रेसला एकही उमेदवार नाही appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Nov 2025 6:52 pm

पालघरमध्‍ये खड्ड्यामुळे एकाचा बळी; एकजण गंभीर जखमी

पालघर – पालघर जिल्ह्यात नालासोपारा परिसरात रविवारी सकाळी एका मोठ्या खड्ड्यात स्कुटी आदळल्‍यानंतर एका ट्रकने चिरडल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाला आहे. हा अपघात सकाळी ८ वाजता घडला. मृत व्यक्तीचे नाव महेश देसाई असे आहे. तो एका खासगी कंपनीत व्यवस्थापक होता. त्याचा सहकारी लवकुश वर्मा हे गंभीर जखमी झाले आहेत. त्‍यांना […] The post पालघरमध्‍ये खड्ड्यामुळे एकाचा बळी; एकजण गंभीर जखमी appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Nov 2025 6:45 pm

मुथुस्वामीचे पहिले शतक आणि जॅन्सनची दमदार खेळी; दक्षिण आफ्रिकेने उभारला ४८९ धावांचा डोंगर

गुवाहाटी : गुवाहाटी येथे सुरू असलेल्या भारत–दक्षिण आफ्रिका दुसऱ्या कसोटी सामन्यात पाहुण्या संघाने दुसऱ्या दिवशी प्रभावी फलंदाजी करत ४८९ धावांची मोठी मजल मारली. दक्षिण आफ्रिकेच्या खालच्या फळीतील फलंदाजांनी जबरदस्त कामगिरी बजावत भारतीय गोलंदाजीचा कस लावला. सेनुरन मुथुस्वामीने कारकिर्दीतील पहिले कसोटी शतक, तर मार्को जॅन्सनने ९३ धावांची झळाळती खेळी करत संघाला भक्कम धावसंख्या मिळवून दिली. भारताने दिवसाखेरीस बिनबाद नऊ धावा केल्या.दक्षिण आफ्रिकेने गुवाहाटी कसोटीत दुसऱ्या दिवशी सहा बाद २४७ या धावसंख्येवरुन खेळ पुढे सुरू केला. मुथुस्वामी आणि काइल व्हेरेन यांच्या संयमी भागीदारीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने पहिले सत्र गाजवले. भारतीय गोलंदाजांनी शिस्तबद्ध मारा करून दडपण आणण्याचा प्रयत्न केला, परंतु फलंदाजांनी बचावात्मक शैलीत धावा करत भागीदारी ५० धावांच्या पार नेली.जडेजाने व्हेरेनला बाद केले. व्हेरेन ४५ धावा करून परतला. पण त्यापूर्वी त्याने मुथुस्वामीसोबत ८८ धावांची भागीदारी केली. पुढच्या सत्रात दक्षिण आफ्रिकेच्या खालच्या फळीने भारतीय गोलंदाजांवर प्रतिहल्ला चढवला. जॅन्सन आणि मुथुस्वामीने जडेजा तसेच वॉशिंग्टन सुंदरच्या गोलंदाजीवर फटकेबाजी करत वेगाने धावा केल्या.मुथुस्वामीने कुलदीप यादवची गोलंदाजी फोडून काढली. चौकार–षटकार लगावत १०९ धावांची मजल मारली. जॅन्सनदेखील शतकाकडे वाटचाल करत होता, परंतु ९३ धावांवर तो बाद झाला. शेवटच्या चार जोड्यांनी धावसंख्येत आणखी २४३ धावांची भर घातली.दक्षिण आफ्रिकेचा डाव ४८९ धावांवर आटोपला.मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना भारतीय संघाने संयमाने सुरुवात केली. यशस्वी जयस्वालने जॅन्सनच्या चेंडूवर चौकार मारत भारतीय डावाची सुरुवात केली. दिवसअखेर जयस्वाल आणि केएल राहुल खेळत होते. भारताने बिनबाद नऊ धाला केल्या.दक्षिण आफ्रिकेने पहिल्याच डावात भक्कम धावसंख्या उभी केल्याने सामना त्यांच्या बाजूने झुकलेला दिसत आहे. भारतीय संघावर आता मोठी धावसंख्या ओलांडण्याचे आव्हान आहे. तिसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजीची कसोटी लागणार आहे. भारत अद्याप ३८० धावांनी पिछाडीवर आहे.

फीड फीडबर्नर 23 Nov 2025 6:30 pm

सरकारची ‘तिजोरी माझ्या हातात’; अजित पवारांच्या विधानावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया

नागपूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विकास निधीबाबत केलेल्या विधानानंतर, निवडणूक आयोगाने अश्‍या विधानांवर लक्ष ठेवले पाहिजे, असे राष्ट्रवादी काँग्रेस (शप)च्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. माझ्या हातात राज्य सरकारची तिजोरी आहे. त्यामुळे माझ्या घड्याळाच्या पाठीशी उभा राहिलात, तर बारामतीसारखे काम तुमच्याकडे करु शकतो, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नळदुर्ग नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या […] The post सरकारची ‘तिजोरी माझ्या हातात’; अजित पवारांच्या विधानावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Nov 2025 6:26 pm

आयोगाची ही कृती राष्ट्रविरोधी; यादीच्या मसुद्यावरून आदित्य ठाकरेंचा आयोगावर निशाणा

मुंबई : राज्य निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर अपलोड केलेली मुंबईच्या मतदार यादीची तारीख २० नोव्हेंबर रोजी अधिकृतपणे प्रकाशित झालेल्या यादीपेक्षा वेगळी आहे,आणि ही राष्ट्रविरोधी कृती असल्याचे ठाकरेसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. एक्स वरील एका पोस्टमध्ये ठाकरे म्हणाले, मतदार यादीचा मसुदा अधिकृतपणे प्रकाशित करण्यात आला आणि २० नोव्हेंबरच्या संध्याकाळपर्यंत अपलोड करण्यात आला. आधी ती ७ […] The post आयोगाची ही कृती राष्ट्रविरोधी; यादीच्या मसुद्यावरून आदित्य ठाकरेंचा आयोगावर निशाणा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Nov 2025 6:21 pm

Sanju Samson : संजू सॅमसनचं मोठं कमबॅक! या स्पर्धेसाठी मिळाली संघाची मोठी जबाबदारी

Sanju Samson to lead Kerala in Syed Mushtaq Ali Trophy : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी मर्यादित षटकांच्या मालिकेपूर्वी भारताचा स्टार फलंदाज संजू सॅमसनबाबत मोठी बातमी समोर आली आहे. आगामी ‘सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी’ या देशांतर्गत टी-२० स्पर्धेसाठी केरळ क्रिकेट असोसिएशनने आपल्या संघाची घोषणा केली असून, संघाचे नेतृत्व संजू सॅमसन कडे सोपवण्यात आले आहे. आयपीएल २०२६ च्या […] The post Sanju Samson : संजू सॅमसनचं मोठं कमबॅक! या स्पर्धेसाठी मिळाली संघाची मोठी जबाबदारी appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Nov 2025 6:20 pm

भारत–दक्षिण आफ्रिका मालिकेआधी दुखापतींचे सावट; गिल आणि अय्यर दोघेही एकदिवसीय मालिकेबाहेर

मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. आधीच उपकर्णधार श्रेयस अय्यर २-३ महिन्यांसाठी मैदानाबाहेर आहे. आता संघाचा कर्णधार शुभमन गिलही ३० नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या मालिकेतून बाहेर राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. कोलकात्यात झालेल्या पहिल्या कसोटीत गिलच्या मानेला झालेल्या दुखापतीमुळे त्याला पुढील काही दिवस विश्रांतीची गरज भासणार आहे.दुखापतीनंतरही शुभमन गिल भारतीय संघासोबत कोलकाता ते गुवाहाटी अशा प्रवासात सहभागी झाला. येथे दुसरी कसोटी सामना सुरू आहे. शुभमन गिलला अधिक काळ आराम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अंदाज आहे की, गिल ९ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी पूर्णपणे तंदुरुस्त होऊ शकतो. पुढील आठवड्यात त्याची पुन्हा तपासणी होणार आहे, त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल.बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “दुर्दैवाने शुभमन गिल दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांसाठी उपलब्ध राहणार नाही. गुवाहाटीमध्ये निवड समितीची बैठक होणार असून केएल राहुल, अक्षर पटेल आणि ऋषभ पंत यांच्या नावांवरही चर्चा होऊ शकते.”ऋषभ पंत सध्या एकदिवसीय संघाचा नियमित भाग नसला, तरी संघ व्यवस्थापन त्याला या फॉरमॅटमध्ये पुन्हा संधी देण्याचा विचार करू शकतो. संघातील उजव्या हाताच्या फलंदाजांची संख्या जास्त असल्याने डावखुऱ्या फलंदाजाला संधी देण्याची शक्यता आहे.शुभमन गिल बाहेर पडल्याने यशस्वी जयस्वाल रोहित शर्मासोबत सलामीला येऊ शकतो. तर श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत चौथ्या क्रमांकासाठी ऋषभ पंत किंवा तिलक वर्मा हे पर्याय विचारात घेतले जाऊ शकतात.

फीड फीडबर्नर 23 Nov 2025 6:10 pm

Shahajibapu Patil : मला पाडण्यासाठी भाजपने शेकापला मदत केली; शहाजीबापू पाटलांचा आरोप

सोलापूर : सांगोला मतदारसंघात भाजप-शिंदे सेना यांच्यातील दरी रुंदावली आहे. शिंदे सेनेचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी भाजपवर मोठा आरोप करत म्हटले आहे की, “गेल्या विधानसभा निवडणुकीत मला पराभूत करण्यासाठी भाजपने शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवार बाबासाहेब पाटील यांना मदत केली. लोकसभा निवडणुकीत आजारी असतानाही भाजप उमेदवाराला १५ हजार मतांचे लीड देणाऱ्या शहाजीबापूंची साथ विधानसभेला भाजपने […] The post Shahajibapu Patil : मला पाडण्यासाठी भाजपने शेकापला मदत केली; शहाजीबापू पाटलांचा आरोप appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Nov 2025 5:56 pm

पंकजा मुंडेंच्या पीएच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू; कुटुंबीयांचा छळाचा आरोप

मुंबई : पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या स्वीय सहाय्यक अनंत गर्जेची पत्नी डॉ. गौरी पालवेने घरगुती वादातून मुंबईच्या वरळी येथील राहत्या घरी आत्महत्या केल्याचे पोलिसांनी रविवारी सांगितले. ती शनिवारी संध्याकाळी घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. मात्र, तिचा मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोप गौरी गर्जे यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. आमच्या मुलीने आत्महत्या केली नसून तिची हत्या […] The post पंकजा मुंडेंच्या पीएच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू; कुटुंबीयांचा छळाचा आरोप appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Nov 2025 5:29 pm

Ayodhya : अयोध्येतील राम मंदिरावर २५ नोव्हेंबर रोजी होणार ध्वजारोहण; ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार पंतप्रधान मोदी

Ayodhya – २५ नोव्हेंबर रोजी उत्तर प्रदेशातील अयोध्येत नवीन इतिहास लिहिला जाईल. श्री राम जन्मभूमी मंदिराच्या शिखरावर भगवा विजय ध्वज फडकवण्यासाठी एक भव्य समारंभ आयोजित केला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार असतील. रामनगरीतील भव्य कार्यक्रमासाठी शहरात तयारी जोरात सुरू आहे आणि सुरक्षेपासून सजावटीपर्यंत प्रत्येक स्तरावर विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. ध्वजात […] The post Ayodhya : अयोध्येतील राम मंदिरावर २५ नोव्हेंबर रोजी होणार ध्वजारोहण; ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार पंतप्रधान मोदी appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Nov 2025 5:12 pm

सांगलीत स्मृती मंधानाच्या लग्नाआधी अनपेक्षित घटना; वडिलांची तब्येत बिघडल्याने विवाह सोहळा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलला

सांगली : भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मंधाना आणि पलश मुच्छल यांच्या विवाह सोहळ्यात एक अनपेक्षित विघ्न आले. लग्न समारंभाची थाटामाटात तयारी सुरू असताना स्मृतीच्या वडिलांची प्रकृती अचानक बिघडली. त्यामुळे विवाह सोहळा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आला आहे.सकाळी नाश्ता करताना श्रीनिवास मंधाना यांची तब्येत बिघडली. काही वेळातच त्यांची प्रकृती अधिकच खराब झाली. त्यामुळे त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होईल असे सांगितले असले तरी, पूर्ण बरे होण्यासाठी काही वेळ लागणार असल्याची शक्यता आहे.दुपारी ३.३० वाजता स्मृती आणि पलाशच्या विवाहाचा मुहूर्त ठरलेला होता. परिसरात मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था आणि आकर्षक सजावट करण्यात आली होती. मात्र, स्मृतीच्या वडिलांची तब्येत बिघडल्याची माहिती मिळताच लग्नस्थळी सर्व तयारी थांबवण्यात आली. फार्म हाऊसची सजावट काढण्याचे काम सुरू झाले आहे. कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे.स्मृती मंधानाचा तिच्या वडिलांवर खूप जीव आहे. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होईपर्यंत लग्नाचा कोणताही कार्यक्रम करू नये, असा निर्णय तिने घेतला आहे. कुटुंबीयांनीही हा निर्णय मान्य केला आहे. विवाह सोहळा पुढे कधी होणार याबाबत अद्याप तारीख निश्चित नाही.

फीड फीडबर्नर 23 Nov 2025 5:10 pm

स्मृतीच्या वडिलांना ह्रदयविकाराचा झटका ते शिंदेंच्या दुराव्यावर फडणवीसांचे स्पष्टीकरण; वाचा आजच्या टॉप १० बातम्या

१) एकमेकांशी न बोलण्यासारखं काहीही घडलेलं नाही मागील काही दिवसांपासून महायुतीत काही तरी बिनसल्याची चर्चा सुरू आहे. भाजप आणि शिवसेना यांच्यातील संबंध बिघडल्याचे देखील म्हंटले गेले. याचदरम्यान, एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याने नाराजीच्या चर्चेत आणखी भर पडली. मात्र या चर्चांवर प्रतिक्रिया देत फडणवीसांनी आमच्या दोघात कुठलाही […] The post स्मृतीच्या वडिलांना ह्रदयविकाराचा झटका ते शिंदेंच्या दुराव्यावर फडणवीसांचे स्पष्टीकरण; वाचा आजच्या टॉप १० बातम्या appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Nov 2025 5:05 pm

Pune news : पिस्तूल बाळगणाऱ्या सराइताला गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या

पुणे : पिस्तूल बाळगणाऱ्या सराइताला गुन्हे शाखेने मंगळवार पेठ परिसरातून अटक केली. त्याच्याकडून देशी बनावटीचे एक पिस्तूल आणि काडतूस जप्त करण्यात आले. रमजान उर्फ टिपू आदम पटेल (वय ३३, रा. भाजी बाजार, शिरूर, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. गुन्हे शाखेच्या युनिट एकमधील पोलीस कर्मचारी हेमंत पेरणे आणि नीलेश साबळे हे मंगळवार पेठेत […] The post Pune news : पिस्तूल बाळगणाऱ्या सराइताला गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Nov 2025 4:51 pm

Smriti Mandhana Wedding : ‘बाबा बरे होईपर्यंत लग्न नाही…’, वडिलांची प्रकृती बिघडल्याने स्मृतीचा विवाहसोहळा पुढे ढकलला

Smriti Mandhana Wedding Postponed : भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधाना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचा आज होणारा विवाह सोहळा अचानक पुढे ढकलण्यात आला आहे. आज (रविवार, २३ नोव्हेंबर) सांगलीमध्ये हा शाही विवाह सोहळा पार पडणार होता. मात्र, लग्नाच्या आनंदी वातावरणात अचानक एक दुर्दैवी घटना घडली. स्मृतीचे वडील श्रीनिवास मंधाना यांची प्रकृती अचानक खालावल्याने […] The post Smriti Mandhana Wedding : ‘बाबा बरे होईपर्यंत लग्न नाही…’, वडिलांची प्रकृती बिघडल्याने स्मृतीचा विवाहसोहळा पुढे ढकलला appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Nov 2025 4:47 pm

Red Fort Blast Case : दहशतवाद्यांमधील भांडणाने निर्माण झाला वाद; दिल्ली स्फोटाबाबत मोठी माहिती समोर…

Red Fort Blast Case : १० नोव्हेंबर रोजी दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटात सहभागी असलेल्या ह्युंदाई आय२० कारचा चालक उमर-उन-नबी बद्दल एक मोठा खुलासा झाला आहे. त्याचे आदिल अहमद राथेरशी गंभीर मतभेद होते. राथेरची सध्या चौकशी सुरू आहे. आदिल हा उमरसोबत स्फोटातही कट रचणारा आहे. या मतभेदांमुळे उमर आदिल अहमद राथेरच्या लग्नाला उपस्थित राहिला नसल्याचे […] The post Red Fort Blast Case : दहशतवाद्यांमधील भांडणाने निर्माण झाला वाद; दिल्ली स्फोटाबाबत मोठी माहिती समोर… appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Nov 2025 4:36 pm

IND vs SA : ‘तू घरी खेळतोय का?’कुलदीपवर संतापला कर्णधार ऋषभ, नेमकं काय होतं कारण? पाहा VIDEO

Rishabh Pant Shout at Kuldeep Yadav : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना गुवाहाटीत खेळला जात आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी सेनुरन मुथुसॅमीच्या शतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात ४८९ धावांचा डोंगर उभारला आहे. या सामन्यात भारतीय संघाला विकेट्स घेण्यासाठी अक्षरशः खूप कष्ट घ्यावे लागले. दरम्यान सामन्याच्या दुसऱ्या दिवशी कर्णधार ऋषभत पंतचा एक […] The post IND vs SA : ‘तू घरी खेळतोय का?’ कुलदीपवर संतापला कर्णधार ऋषभ, नेमकं काय होतं कारण? पाहा VIDEO appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Nov 2025 4:16 pm

मुंबईच्या मतदारयादीत ११ लाख दुबार मतदार

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारयादीबाबत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महानगरपालिकेने प्रकाशित केलेल्या प्रारूप मतदारयादीत तब्बल ११ लाखांपेक्षा जास्त मतदारांची नावे एकापेक्षा अधिक ठिकाणी असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता टिकवणे हे निवडणूक आयोगासमोर मोठे आव्हान आहे.प्रारूप यादी तपासताना ११,०१,५०५ मतदार दुबार असल्याचे आढळले. विशेष म्हणजे, यापैकी सुमारे एक लाख मतदारांची नावे तीन किंवा चार वेगवेगळ्या यादीत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामध्ये सर्वाधिक संख्या पश्चिम उपनगरांची (४,९८,५९७) असून, पूर्व उपनगरात ३,२९,२१६ आणि मुंबई शहरात २,७३,६९२ दुबार नोंदी आढळल्या आहेत.मतदारयादीवरील हरकती आणि सूचनांसाठी २७ नोव्हेंबर ही अंतिम तारीख जाहीर करण्यात आली आहे. तर ५ डिसेंबरला अंतिम मतदारयादी प्रसिद्ध होणार आहे. मुंबईतील एकूण मतदारसंख्या १ कोटी ३ लाख ४४ हजार ३१५ इतकी असून, त्यापैकी ११ लाखांहून अधिक नावे पुनरावृत्तीची असल्याने निवडणूक आयोग आणि महापालिका या दोघांवरही दुरुस्तीचे मोठे दडपण आले आहे.महापालिकेने दुबार मतदारांची समस्या दूर करण्यासाठी काही उपाययोजना जाहीर केल्या आहेत. प्रारूप मतदारयादीत जे मतदार दुबार नोंदले गेले आहेत, त्यांची नावे स्वतंत्रपणे चिन्हांकित करण्यात आली आहेत. अशा मतदारांना स्वतःहून आपले अतिरिक्त नाव वगळण्याची संधी दिली जाणार असून, अंतिम यादी जाहीर होण्यापूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, मतदानाच्या दिवशी जर एखाद्या मतदाराची दुबार नोंदणी आढळली, तर त्या व्यक्तीकडून दुसरीकडे मतदान केले नसल्याचे प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात येईल. महापालिकेच्या या उपाययोजनांमुळे मतदारयादीतील चुका कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

फीड फीडबर्नर 23 Nov 2025 4:10 pm

स्मृती–पलाशच्या विवाहसोहळ्याची जोरदार चर्चा; संगीत समारंभाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

सांगली : भारतीय क्रिकेटमधील स्टार खेळाडू स्मृती मंधाना आणि प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक व चित्रपट निर्माते पलाश मुच्छल यांच्या राजेशाही लग्नसोहळ्याची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या प्री-वेडिंग कार्यक्रमांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. प्रपोजलपासून ते हळद, मेहेंदी आणि आता झालेल्या धमाल संगीत समारंभापर्यंत प्रत्येक क्षणावर चाहत्यांचे लक्ष केंद्रीत झाले आहे. आज (२३ नोव्हेंबर) या दोघांचा विवाहसोहळा पार पडणार असून, त्याआधी झालेली संगीत नाईट खास चर्चेचा विषय ठरली आहे.या समारंभात स्मृती आणि पलाशच्या रोमँटिक परफॉर्मन्सने वातावरण आणखी आनंदमय केले. सलमान खानच्या ‘सालाम-ए-इश्क’ चित्रपटातील ‘तेनु लेके मे जावांगा’ या गाण्यावर दोघांनी जबरदस्त डान्स केला. स्मृतीने पलाशच्या गळ्यात हार घालत डान्सला सुरुवात केली आणि त्यानंतर दोघांनी एकत्र केलेल्या सिग्नेचर स्टेपनं उपस्थितांचे मन जिंकले. त्यांचा हा रोमँटिक व्हिडीओ काही क्षणातच सोशल मीडियावर व्हायरल झाला.संगीत समारंभात आणखी एक आकर्षण ठरला तो टीम इंडियाच्या महिला क्रिकेटरांचा ग्रुप डान्स. स्मृतीच्या टीममेट जेमिमा रॉड्रीग्ज, श्रीयंका पाटील, राधा यादव, अरुंधती रेड्डी आणि यष्टिवादी याचिका भाटिया यांनी ‘तेरा यार हू मै’ या गाण्यावर दिलखुलास परफॉर्मन्स देत कार्यक्रमात रंगत आणली. त्यांचा उत्साही डान्स पाहून उपस्थितांनी त्यांचेही तितकेच कौतुक केले.पलाश आणि स्मृतीच्या लग्नाला फिल्म आणि क्रीडा क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित राहणार आहेत. प्री-वेडिंग फोटोंनी आधीच सोशल मीडियावर धुमाकूळ घातला असून, त्यांच्या भव्य विवाहसोहळ्याची झलक पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे.

फीड फीडबर्नर 23 Nov 2025 4:10 pm

भारतामध्ये पहिली हायब्रिड SUV घेऊन ‘Kia’सज्ज; फीचर्स आणि किंमत एकदा पाहाच…

Kia Motors | SUV 2026 Kia Sorento – ‘Kia Motors’ लवकरच भारतीय बाजारात आपली पहिली हायब्रिड ‘SUV 2026 Kia Sorento’ लॉन्च करण्याची तयारी करत आहे. ही SUV भारतात प्रथमच टेस्टिंगदरम्यान दिसली असून, Kia च्या लाइनअपमध्ये ती Seltos च्या वरच्या सेगमेंटमध्ये स्थान मिळवेल. थर्ड-रो सीटिंगसह ही मोठी SUV Toyota Fortuner सारख्या प्रीमियम गाड्यांना थेट टक्कर देऊ […] The post भारतामध्ये पहिली हायब्रिड SUV घेऊन ‘Kia’ सज्ज; फीचर्स आणि किंमत एकदा पाहाच… appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Nov 2025 3:56 pm

Prashant Kishor : बिहार निवडणुकीत मतांची हाणामारी : प्रशांत किशोर

पाटणा : निवडणूक रणनीतीकार आणि जन सुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाच्या खराब कामगिरीनंतर रविवारी मौन सोडले आणि असा दावा केला की, या निवडणुकांमध्ये मतांची हाणामारी झाली आहे. पण त्यांनी हेही कबूल केले की सध्या त्यांच्याकडे आरोप सिद्ध करण्यासाठी कोणतेही पुरावे नाहीत. एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते […] The post Prashant Kishor : बिहार निवडणुकीत मतांची हाणामारी : प्रशांत किशोर appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Nov 2025 3:37 pm