SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

27    C
... ...View News by News Source

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार ०४ फेब्रुवारी २०२६

पंचांगआज मिती माघ कृष्ण तृतीया शके १९४७.नक्षत्र पूर्वा फाल्गुनी ,योग अतिगंड,चंद्र राशी सिंह ,भारतीय सौर १५ माघ शके १९४७. बुधवार दिनांक ४ फेब्रुवारी २०२६,.मुंबईचा सूर्योदय ०७.१२ मुंबईचा सूर्यास्त ०६.३३, मुंबईचा चंद्रोदय ०८.५७ पीएम, मुंबईचा चंद्रास्त ०८.४६ एएम, राहू काळ १२.५२ ते १२.५२. १२ पर्यन्त चांगलादैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)

फीड फीडबर्नर 4 Feb 2026 12:30 am

मुंबई विमानतळावर विमानांचा मोठा अपघात टळला

मुंबई : मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एक मोठी बातमी आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी ३ फेब्रुवारी २०२६ रोजी विमानांचा मोठा अपघात टळला आहे.हाती आलेल्या प्राथमिक वृत्तानुसार, एअर इंडिया आणि इंडिगो कंपनीच्या प्रत्येकी एका प्रवासी विमानाचे पंख एकमेकांना धडकले. जेव्हा हा अपघात झाला त्यावेळी दोन्ही विमानांमध्ये प्रवासी होते.कोइम्बतूरला जाण्यासाठी मागे सरकणारे एअर इंडियाचे विमान एआय २७३२ आणि हैदराबादहून आगमन झाल्यानंतर विमानतळाच्या टॅक्सी वे वरून पुढे सरकत असलेले इंडिगोचे विमान ६ई ७९१ यांच्यात टक्कर झाली. दोन्ही प्रवासी विमानांचे पंख एकमेकांना धडकले. एअर इंडिया आणि इंडिगो या दोन्ही कंपन्यांनी या घटनेच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.एअर इंडियाचे विमान उड्डाणासाठी प्रतीक्षेत होते आणि टॅक्सी वे वर पुढे सरकण्यासाठी वाट बघत होते त्याचवेळी दुसऱ्या कंपनीच्या विमानाच्या संपर्कात आले. दोन्ही विमानांच्या पंखांच्या टोकांचा संपर्क झाला, ज्यामुळे आमच्या विमानाच्या पंखांच्या टोकाचे नुकसान झाले, अशी माहिती एअर इंडियाकडून देण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून, एअर इंडियाचे विमान पुढील तांत्रिक तपासणीसाठी रिकामे केले आहे आणि थांबवले आहे. सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे उतरवण्यात आले आहे आणि तंत्रज्ञ विमानाची तपासणी करत आहेत. प्रवासी सुरक्षित असून पर्यायी विमानाने लवकरच पुढील प्रवास सुरू करतील, असे एअर इंडियाकडून सांगण्यात आले.विमानतळावरील घटनेची माहिती नागरी विमान वाहतूक संचालनालयाला अर्थात डीजीसीएला देण्यात आली आहे. प्रवाशांच्या गैरसोयीसाठी एअर इंडियाने दिलगिरी व्यक्त केली आहे. प्रवाशांची आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे, असेही एअर इंडियाने सांगितले.इंडिगोचे विमान विमानतळावर पार्क केले असून सर्व प्रवाशांना सुरक्षितरित्या उतरवण्यात आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून इंडिगोच्या विमानाची तंत्रज्ञांद्वारे तपासणी सुरू आहे. इंडिगोनेही प्रवाशांची आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे सांगितले.

फीड फीडबर्नर 3 Feb 2026 11:10 pm

मध्यप्रदेशच्या तरुणांनी महापालिकेच्या वाहनतळाचा घेतला ताबा... महापालिकेने उचलले हे पाऊल

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :हुतात्मा चौक येथील वाहनतळाच्याठिकाणी महापालिकेच्यावतीने निशुल्क सेवा दिली जात असतानाच याठिकाणी मध्य प्रदेशमधील दोन तरुणांनी हे वाहनतळ ताब्यात घेवून तिथे अनधिकृतपणे कारपार्किग चालवून वाहनचालकांकडून पैसे वसूल करत असल्याची बाब समोर आली आहे. यानंतर या दोन्ही तरुणांविरोधात महापालिकेने पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे.फोर्ट येथील डिएन रोडवरील हुतात्मा चौक येथील महापालिकेने यापूर्वी चालवण्यास दिलेले वाहनतळ संबंधितांकडून काढून तिथे निशुल्क सेवा सुरु केली होती. परंतु असे असतानाच याठिकाणी दोन व्यक्ती हे खाजगी वाहना चालकांकडून अनाधिकृतरित्या पार्कीगच्या नावाखाली पैसे घेत असल्याचे दिसून आले. या व्यक्तींकडे व्हॅलेट टॅग नावाचे पार्किंग पावती दिसून आली. यापावतीबाबत महापालिकेच्या मुकादमांनी विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. याठिकाणी निशुल्क सेवा असतानाही या व्यक्तींकडून पार्कींगच्या नावाखाली प्रती तास १५० रुपये आकारले जात होते. त्यानंतर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी याची वर्दी पोलिसांमध्ये दिल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांच्या माहितीमध्ये हे दोन्ही तरुण १८ वर्षांचे असून पंजाब ग्रील हॉटेलसमोरील पदपथावर राहतात आणि मध्यप्रदेशमधील सतनामध्ये राहणारे आढळून आले. त्यानंतर माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.

फीड फीडबर्नर 3 Feb 2026 11:10 pm

रानडे मार्गावर ठेच लागून ज्येष्ठ नागरिकावर जखमी होण्याची आली वेळ, कुटुंबाने महापालिकेकडे ही मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :मुंबईतील पदपथ आणि खोदलेले रस्ते पुन्हा योग्यप्रकारे न बनवल्यास ते असमांतर बनवून बऱ्याचदा पादचाऱ्यांसाठी अडचणीच्या ठरतात. असाच प्रकार काही दिवसांपूर्वी दादर रानडे मार्गावर घडला आहे. युटीलिटी डकच्या मॅनहोल्सजवळ योग्यप्रकारे असमांतर रस्ता बनल्याने ज्येष्ठ नागरिक ठेच लागून पडले आणि गंभीर जखमी झाले. त्यामुळे या ज्येष्ठ नागरिकांच्या कुटुंबाने याप्रकरणी महापालिकेच्या जी उत्तर विभागाला निवेदन देत तीव्र नाराजी व्यक्त केली आणि या उपचारासाठी झालेल्या सर्व खर्चाची मागणी केली आहे.दादर पश्चिम येथील रानडे मार्गावर शौकीन पान शॉपसमोरील डकच्या आसपास असमांतर रस्ता असल्याने त्याला पाय अडकून ७४ वर्षीय कांतीलाल देढीया हे जखमी झाले. त्यांच्या गुडघ्याला मार लागून हातही फॅक्चर झाला. महापालिका प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे मॅनहोल्सच्या आसपासची जागा समांतर न करता असमांतर केल्यामुळे पायाला ठेच लागून कांतीलाल देढीया हे पडले आणि जखमी झाले. त्यानंतर तेथील फळ विक्रेत्यांना बाजुला करत त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची प्रक्रिया केली. त्यानंतर देढीया कुटुंबाने त्यांच्यावर भाटीया रुग्णालयात उपचार केले.यानंतर कांतीलाल देढीया यांनी महापालिका जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त यांना निवेदन देत याबाबती तीव्र नाराजी व्यक्त केली. महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडला असून त्यांच्या उपचारासाठी झालेला खर्च हा महापालिकेने आपल्याला द्यावा अशी मागणी निरव देढीया यांनी महापालिकेकडे केली आहे.. खड्डे आणि खराब रस्त्यामुळे हा प्रकार घडला आहे. त्यामुळे औषध उपचाराचा खर्चाची मागण करतानाच ही दुर्घटना जिथे घडली त्या रानडे मार्गाच्या त्या भागाची सुधारणा करून पादचाऱ्यांना सुरळीत चालता येईल अशाप्रकारे रस्ता बनवून दिला जावा अशीही मागणी केली आहे. यावेळी निरव यांनी वडिलांच्या उपचारासाठी झालेली सर्व रुग्णालयाची बिले तसेच औषधांची बिलेही जोडली आहेत...................दादर भागातील अनेक रस्ते तसेच पदपथ हे असमांतर असल्यामुळे बऱ्याचदा ज्येष्ठ नागरिकच नाही तर अनेक जण पडत असतात. त्यातील काहीजण जखमी झाले आहेत. देढीया प्रकरणात तर हे आता त्यांच्या कुटुंबाने तक्रार केली आणि उपचाराचा खर्च मागितला म्हणून हे समोर आले आहे. पण दादरमधील प्रत्येक रस्ते आणि पदपथ हे असमांतर असल्यामुळे महापालिका प्रशासनाने याची गंभीर दखल घेवून सर्वच पदपथ चालण्याजोगे करावेत आणि रस्तेही. -सुनील शाह, अध्यक्ष दादर व्यापारी संघ

फीड फीडबर्नर 3 Feb 2026 11:10 pm

Stock Market Rise: कमी आयात शुल्काचा भारताला मोठा फायदा; दागिने आणि वाहन सुटे भाग कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी वाढ

Stock Market Rise: गोल्डीआम इंटरनॅशनल कंपनीच्या शेअरचा भाव 20 टक्क्यांनी, वैभव ग्लोबल कंपनीच्या शेअरचा भाव 9.13 टक्क्यांनी, कल्याण ज्वेलर्स कंपनीच्या शेअरचा भाव 4.91 टक्क्यांनी, शृंगार हाऊस ऑफ मंगळसूत्र कंपनीच्या शेअरचा भाव 4.51 टक्क्यांनी वाढला.

दैनिक प्रभात 3 Feb 2026 10:52 pm

Murder Case : आमदार अमित देशमुखांसमोर तरुणाची निर्घृण हत्या; आंबेडकर चौकात नेमकं काय घडलं?

Latur Murder Case : लातूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आमदार अमित देशमुख यांच्या समोरच एका २१ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली.

दैनिक प्रभात 3 Feb 2026 10:48 pm

ग्‍लोबल बिझनेस समिट २०२६

महाराष्‍ट्र सरकारने प्रमुख राज्‍य सहयोगी म्‍हणून ग्‍लोबल बिझनेस समिट २०२६ सोबत सहयोगाची घोषणा केली आहे. हे समिट जागतिक व्‍यवसाय प्रमुख, धोरणकर्ते व संस्‍थात्‍मक गुंतवणूकदार यांना महाराष्‍ट्राचे प्रबळ धोरण आराखडा, धोरणात्‍मक उपक्रम आणि गुंतवणूकदार-अनुकूल परिसंस्‍था दाखवण्‍यासाठी व्‍यासपीठ ठरेल.महाराष्‍ट्र सरकारच्‍या उद्योग, गुंतवणूक व सेवा विभागाचे प्रधान सचिव आयएएस डॉ. पी. अनबलगन म्‍हणाले, ''गेल्‍या काही वर्षांपासून महाराष्‍ट्रातील विविध क्षेत्रांमध्‍ये स्थिरपणे गुंतवणूक होत आहे. यामधून भारतातील व जगभरातील कंपन्‍यांचा राज्‍याची धोरणे आणि विकास दृष्टिकोनामध्‍ये असलेला विश्वास दिसून येतो. ग्‍लोबल बिझनेस समिट २०२६ सोबत आमचा सहयोग आम्‍हाला जागतिक गुंतवणूकदारांशी संलग्‍न होण्‍यास, क्षेत्रांमधील संधी दाखवण्‍यास आणि शाश्वत औद्योगिक व तंत्रज्ञान विकासामध्‍ये महाराष्‍ट्राची भूमिका दृढ करण्‍यास मदत करेल.''ग्‍लोबल बिझनेस समिट २०२६ महाराष्‍ट्राला असे धोरणात्‍मक उपक्रम जागतिक स्‍तरावर सादर करण्‍याची संधी देते. प्रबळ पायाभूत सुविधा, कुशल कर्मचारीवर्ग आणि उत्तमरित्‍या विकसित केलेला औद्योगिक पाया यांसह राज्‍य तंत्रज्ञान, एरोस्पेस व संरक्षण, अक्षय ऊर्जा, कृषी व अन्‍न प्रक्रिया, लॉजिस्टिक, फार्मास्युटिकल्स व केमिकल्‍स, ऑटोमोटिव्ह, वस्त्रोद्योग आणि इतर अनेक क्षेत्रांमध्ये गुंतवणूकीच्या मोठ्या संधी उपलब्ध करून देते. राज्‍य प्रमुख शहरांसह द्वितीय व तृतीय श्रेणीच्‍या प्रदेशांमध्‍ये देखील गुंतवणूकीला चालना देत आहे.महाराष्‍ट्र भारतातील सर्वात मोठी राज्य अर्थव्यवस्था आहे, जेथे देशाच्या एकूण जीडीपीमध्ये राज्याचा वाटा १३.६ टक्‍क्‍यांपेक्षा अधिक आहे. २०२९-२०३० पर्यंत १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनण्याच्‍या दीर्घकालीन ध्‍येयासह राज्‍य सरकार स्‍पर्धात्‍मकता वाढवण्‍यावर, रोजगार निर्माण करण्‍यावर आणि संतुलित प्रादेशिक विकासाला चालना देण्‍यावर लक्ष केंद्रित करत आहे. या ध्‍येयाला अधिक पाठिंबा देण्‍यासाठी सरकारने नुकतेच महाराष्‍ट्र उद्योग, गुंतवणूक व सेवा धोरण २०२५ आणि महाराष्‍ट्र ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर (जीसीसी) पॉलिसी २०२५ यांना मंजूरी दिली आहे.महाराष्‍ट्र उद्योग, गुंतवणूक व सेवा धोरण २०२५ पुढील दशकामध्‍ये औद्योगिक व सेवा-केंद्रित विकास करण्‍याच्‍या राज्‍याच्‍या धोरणाला सादर करते. हे धोरण देशांतर्गत व परकीय गुंतवणूक आकर्षित करण्‍यावर, उत्‍पादन व सेवांना पाठिंबा देण्‍यावर, नाविन्‍यतेला चालना देण्‍यावर आणि सुलभपणे व्‍यवसाय करण्‍याच्‍या पद्धतींमध्‍ये सुधारणा करण्‍यावर लक्ष केंद्रित करते. तसेच, हे धोरण एमएसएमई विकास, रोजगार निर्मिती आणि शाश्वत औद्योगिक विकासावर देखील भर देते. या धोरणांतर्गत 'इन्‍व्‍हेस्‍ट महाराष्‍ट्र'सारख्‍या संस्‍थात्‍मक उपाययोजना सुरू करण्‍यात आल्‍या आहे. 'इन्‍व्‍हेस्‍ट महाराष्‍ट्र' हा एकीकृत डिजिटल प्‍लॅटफॉर्म आहे, जो गुंतवणूकदारांना सर्वप्रकारे साह्य करण्‍यासाठी आणि सरकारी विभागांमध्‍ये समन्‍वय राखण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आला आहे.महाराष्‍ट्र ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर (जीसीसी) पॉलिसी २०२५ ग्‍लोबल कॅपिबिलिटी सेंटर्ससाठी प्रमुख गंतव्‍य म्‍हणून राज्‍याचे स्‍थान अधिक दृढ करण्‍यावर लक्ष केंद्रित करते. या धोरणांतर्गत ४०० नवीन जीसीसींची स्‍थापना करण्‍यात येईल, तसेच २०२५ ते २०३० दरम्‍यान जवळपास ४ लाख उच्‍च-कुशल रोजगार निर्माण करण्‍यात येतील. या धोरणांतर्गत जवळपास ५०,६०० कोटी रूपयांची गुंतवणूक होण्‍याची अपेक्षा आहे, ज्‍यामुळे संशोधन व‍ विकास, डिजिटल सेवा आणि विशेष व्‍यवसाय कार्यसंचालन अशा क्रियाकलापांना पाठिंबा मिळेल. या धोरणामध्‍ये गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी विशेष इन्‍सेंटिव्‍ह्ज आणि पायाभूत सुविधांना पाठिंबा देण्‍याचा देखील समावेश आहे.

फीड फीडबर्नर 3 Feb 2026 10:30 pm

Masoud Pezeshkian : अमेरिकेबरोबरची चर्चा निष्पक्ष व्हावी.! इराणच्या अध्यक्षांनी व्यक्त केली अपेक्षा

दुबई – अमेरिकेबरोबरचा तणाव कमी करण्याच्या हेतूने होणारी चर्चा निष्पक्ष आणि न्याय्य असावी, असे निर्देश इराणचे अध्यक्ष महसूद पेझेश्‍कीयान यांनी परराष्ट्र मंत्रालयाला दिले आहेत. हिंसक आंदोलनामुळे अमेरिकेबरोबर वाढलेला तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेबरोबर चर्चा व्हावी,यासाठी इराणकडून प्रथमच स्पष्ट संकेत दिले गेले आहेत. इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्‍कीयान हे सुधारणावादी नेते म्हणून ओळखले जातात. देशातील परिस्थिती आता आपल्या […]

दैनिक प्रभात 3 Feb 2026 10:27 pm

मोठी बातमी..! राष्ट्रवादीच्या तडफदार जिल्हाध्यक्षाचं निधन; पवार कुटुंबियांचा एकनिष्ठ नेता गमावला

Ravindra Nana Pagar passed away : राष्ट्रवादी काँग्रेसचे नाशिक जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्र नाना पगार यांचे अल्पशा आजाराने आज 3 फेब्रुवारी रोजी निधन झाले.

दैनिक प्रभात 3 Feb 2026 10:27 pm

Aluminum And Steel Tariffs: भारतीय वस्तूंवर आता 18% आयात शुल्क; ॲल्युमिनियम आणि स्टीलवर मात्र 50% टॅक्स कायम

Aluminum And Steel Tariffs: अमेरिका भारतीय अल्युमिनियम, पोलाद, लोखंड इत्यादी वस्तूवर पूर्वीप्रमाणे 50 टक्के आयात शुल्क लावणार असल्याचे स्पष्टीकरण या उद्योगाने केले आहे.

दैनिक प्रभात 3 Feb 2026 10:26 pm

Trinamool Congress : बंगालमधील तृणमूलचा पाठिंबा घटतोय; भाजपचा दावा

पश्‍चिम बंगालमधील आगामी विधानसभा निवडणुकीला ताकदीने सामोरे जाण्यासाठी भाजपने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. बंगालमधील सत्ताधारी तृणमूल कॉंग्रेसचा (Trinamool Congress) पाठिंबा घटत चालल्याचा दावा त्या पक्षाने केला आहे.

दैनिक प्रभात 3 Feb 2026 10:20 pm

USD INR: डॉलरच्या तुलनेत रुपया झाला मजबूत; भारतात परकीय गुंतवणुकीचा ओघ वाढणार

USD INR: रुपयाचे मूल्य मंगळवारी तब्बल 122 पैसे म्हणजे 1.22 टक्क्यांनी वाढून 90.27 रुपये प्रति डॉलर या पातळीवर गेले.

दैनिक प्रभात 3 Feb 2026 10:17 pm

लातूरमध्ये कौटुंबिक वादातून आयकर अधिकाऱ्याचा मृत्यू; मुलानेच...

लातूर : लातूर जिल्ह्यातून एक गंभीर आणि धक्कादायक घटना समोर आली असून, आयकर विभागात कार्यरत असलेल्या एका अधिकाऱ्याचा घरातच मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, कौटुंबिक वादातून झालेल्या हल्ल्यात अधिकाऱ्याचा मृत्यू झाला असून, या प्रकरणात त्यांच्या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.मृत अधिकाऱ्याचे नाव कृष्णकुमार सन्मुखराव (वय अंदाजे ५५) असे असून, ते मूळचे अहमदपूर तालुक्यातील रहिवासी होते. सध्या ते लातूर शहरालगत खोपेगाव परिसरात कुटुंबासह राहत होते. त्यांनी अलीकडेच या भागात स्वतःचे घर उभारले होते.ही घटना ३ फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास घडली. घरात असताना कृष्णकुमार सन्मुखराव आणि त्यांचा मुलगा शंतनू यांच्यात वाद झाला. हा वाद इतका वाढला की, रागाच्या भरात मुलाने वडिलांवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या कृष्णकुमार सन्मुखराव यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच लातूर ग्रामीण पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलिसांनी आरोपी मुलाला ताब्यात घेतले आहे.वडील आणि मुलामधील वादाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. आरोपीला बुधवारी न्यायालयात हजर करण्यात येणार असून, पुढील चौकशीत या घटनेमागील नेमके कारण समोर लवकरच समोर येईल

फीड फीडबर्नर 3 Feb 2026 10:10 pm

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन निवडणुकीची स्थगिती कायम, रोहित पवारांच्या अडचणीत वाढ

नवी दिल्ली : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि आमदार रोहित पवार यांना सर्वोच्च न्यायालयाने जोरदार दणका दिला असून, संस्थेतील बेकायदेशीर सदस्य नोंदणीवरून अत्यंत कडक शब्दांत फटकारले आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती विपुल एम. पंचोली आणि न्यायमूर्ती जोयमाल्य बागची यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने रोहित पवारांच्या नेतृत्वाखालील प्रशासनावर ताशेरे ओढताना म्हटले की, मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती देऊन तुम्हाला यापेक्षा फसवणूक करण्यापासून रोखले आहे. ६ जानेवारीला होणाऱ्या निवडणुकांवरील स्थगिती उठवण्यास सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट नकार दिला.न्यायालयाची परवानगी न घेता आणि घटनेत सुधारणा न करता सुमारे ४०० नवीन सदस्यांची नोंदणी करण्यात आली. या नवीन सदस्यांमध्ये रोहित पवारांचे निकटवर्तीय आणि राजकीय कार्यकर्त्यांचा भरणा असल्याचा आरोप माजी क्रिकेटपटू केदार जाधव आणि इतरांनी केला होता. एमसीएच्या मूळ घटनेला बगल देऊन ही प्रक्रिया राबवण्यात आल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. न्यायालयाची आक्रमक भूमिका पाहून रोहित पवार यांच्या वकिलांनी याचिका मागे घेण्याची तयारी दर्शवली. न्यायालयाने स्पष्ट बजावले की, एकतर ही याचिका सन्मानाने मागे घ्या, नाहीतर आम्ही ती फेटाळून लावू. अखेर, हे प्रकरण पुन्हा मुंबई उच्च न्यायालयाकडे वर्ग करण्यात आले आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या या दणक्यानंतर आता सर्वांचे लक्ष ४ फेब्रुवारी रोजी मुंबई उच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीकडे लागले आहे. या निकालामुळे रोहित पवारांची क्रिकेट प्रशासनातील पकड सैल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याआधी दोन महिन्यात साधारण ४०० नव्या सदस्यांची बेकायदेशीर पद्धतीने नोंदणी करण्यात आल्याचा ठपका उच्च न्यायालयाने ठेवला होता. या नोंदणी केलेल्या सदस्यांमध्ये रोहित पवार यांच्या कुटुंबातील सदस्य, नातेवाईक आणि इतर जवळच्या लोकांचा समावेश होता. यात रोहित पवार यांच्या पत्नी कुंती पवार, खासदार सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती, रोहित पवार यांचे सारसे सतीश मगर, तसेच त्यांच्या कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना सदस्य करून घेतले आहे.

फीड फीडबर्नर 3 Feb 2026 10:10 pm

स्वच्छ सर्वेक्षण २०२६; शहर स्वच्छ करण्यासाठी महापालिकेच्या प्रयत्नांमध्ये सहभागी व्हा, नागरिकांना मुंबई मनपाचे आवाहन

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :केंद्र शासनाकडून स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ चा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. यंदाच्या स्वच्छ सर्वेक्षणात बृहन्मुंबईची उत्तम कामगिरी असावी, यासाठी संपूर्ण मुंबई महानगरात स्वच्छता राखून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने केले आहे. तसेच, महानगरपालिकेतील घनकचरा, पर्जन्यजल, मलनिस्सारण प्रचालन, मुंबई सांडपाणी विल्हेवाट प्रकल्प, शिक्षण आदी विभागांनी मुंबई क्षेत्रात स्वच्छ सर्वेक्षणासाठी उत्तम समन्वयातून प्रभावी उपाययोजना कराव्यात. मूल्यमापन व अहवालासाठी आवश्यक असलेली सर्वसमावेशक, अचूक व अद्ययावत माहिती संकलित करावी, असे निर्देशही जोशी यांनी दिले आहेत.स्वच्छ सर्वेक्षणाच्या अनुषंगाने, महानगरपालिका मुख्यालयात सोमवारी ०२ फेब्रुवारी २०२६ बैठक पार पडली. त्यावेळी त्या बोलत होत्या. उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर यांच्यासह विविध विभागांतील अधिकारी यावेळी उपस्थित होते. केंद्र शासनाच्या गृहनिर्माण आणि नागरी कार्य मंत्रालयाच्या वतीने शहरांमधील स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि नागरिक सहभागाचे मूल्यांकन करून क्रमवारी लावण्याच्या उद्देशाने दरवर्षी स्वच्छ सर्वेक्षणाचे आयोजन केले जाते. यंदा स्वच्छ सर्वेक्षणाचे दहावे वर्ष आहे. उत्तम स्वच्छता, कचरा वर्गीकरण, संकलन आणि वाहतूक, प्रक्रिया आदी बाबींवर या अंतर्गत मूल्यमापन केले जाते.स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ साठी केंद्र शासनाकडून ‘स्वच्छता की नई पहल-बढाए हाथ, करे सफाई साथ’ ही मध्यवर्ती संकल्पना मांडण्यात आली आहे. या अंतर्गत, स्वच्छतेसंदर्भात नागरिकांचा अभिप्राय आणि पडताळणीला अधिक महत्व देण्यात आले आहे. यानुसार, संकेतस्थळ आणि अॅप्सच्या माध्यमातून वर्षभर डिजिटल अभिप्राय संकलित केले जातील. उघड्यावर शौच व लघवी करण्यावर प्रतिबंधाच्या अनुषंगाने नवीन मानके निश्चित करण्यात आली आहेत. तसेच, शाळांमधील वर्तन बदल कार्यक्रमांवर भर देण्यात येत आहे. यंदाच्या सर्वेक्षणात किनारपट्टीवरील शहरांसाठी स्वतंत्र मूल्यांकन निकष लावण्यात आले आहेत. पर्यटन / वारसा / धार्मिक स्थळे आणि जास्त वर्दळीची सार्वजनिक ठिकाणे यांच्याशी संबंधित स्वच्छतेच्या निकषांवरही विशेष भर देण्यात आला आहे.स्वच्छ सर्वेक्षणात या प्रयत्नांचे योग्य मूल्यमापन दिसण्यासाठी प्रभावीपणे उपाययोजना करणे आवश्यक आहे. यासाठी, घनकचरा व्यवस्थापन, मलनिस्सारण प्रचालन व प्रकल्प, मुंबई सांडपाणी विल्हेवाट प्रकल्प, पर्जन्य जलवाहिनी तसेच शिक्षण विभाग आदी विभागांनी समन्वयातून प्रभावी उपाययोजना कराव्यात. मूल्यमापन व अहवालासाठी आवश्यक असलेली सर्वसमावेशक, अचूक व अद्ययावत माहिती संकलित करावी. तसेच, यंदा सर्वेक्षणात नागरिक सहभाग व शाळा-आधारित उपक्रमांवर विशेष भर देऊन नागरिक व विद्यार्थ्यांचा या प्रक्रियेत सहभाग सुनिश्चित करावा. विद्यार्थ्यांमध्ये बालवयातच स्वच्छतेच्या सवयी रुजल्या तर सामाजिक स्तरावर दीर्घकालीन व शाश्वत वर्तनबदल घडतो. यामुळे, नागरी स्वच्छतेला हातभार लागतो. नागरिकांनीही स्वच्छतेला प्राधान्य देत महानगरपालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. अश्विनी जोशी यांनी यावेळी केले.

फीड फीडबर्नर 3 Feb 2026 10:10 pm

किया इंडियाने जानेवारी २०२६ मध्ये विकल्या २७ हजार ६०३ कार

मुंबई :किया इंडिया या देशातील आघाडीच्‍या मास-प्रीमियम ऑटोमेकर कंपनीने सकारात्‍मकतेसह कॅलेंडर वर्ष २०२६ ची सुरूवात केली, जेथे जानेवारीमध्‍ये एकूण २७,६०३ युनिट्सची विक्री केली. जानेवारी २०२५ मध्‍ये विक्री करण्‍यात आलेल्‍या २५,०२५ युनिट्सच्‍या तुलनेत वार्षिक १०.३ टक्‍के वाढीची नोंद करत या कामगिरीमधून कंपनीची स्थिर वाढ, प्रमुख विभागांमध्‍ये स्थिर मागणी आणि भारतातील ग्राहकांमध्‍ये कियाच्‍या वैविध्‍यपूर्ण उत्‍पादन ऑफरिंग्‍जसाठी वाढती पसंती दिसून येते.जानेवारीमध्‍ये कंपनीच्‍या विक्री गतीचे श्रेय पोर्टफोलिओमध्‍ये सतत मागणीला जाते. ऑल-न्‍यू किया सेल्‍टोसला बाजारपेठेतून उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळत आहे, किया सोनेटची कामगिरी कायम राहिली आहे आणि ग्राहकांकडून किया कॅरेन्‍स क्‍लॅव्हिस व क्‍लॅव्हिस ईव्‍हीसाठी सतत पसंती मिळत आहे. न्‍यू-जनरेशन सेल्‍टोस भारतातील सर्वात प्रभावी व मध्‍यम आकाराची एसयूव्‍ही म्‍हणून आपला वारसा अधिक दृढ करत आहे, तसेच किया इंडियाच्‍या विकासाच्‍या पुढील टप्‍प्‍यामध्‍ये महत्त्वाची भूमिका बजावण्‍यास सज्‍ज आहे. सोनेटने उच्‍च आकारमानाच्‍या कॉम्‍पॅक्‍ट एसयूव्‍ही विभागामध्‍ये ब्रँडची प्रबळ उपस्थिती दर्शवणे सुरूच ठेवले आहे. तसेच, कॅरेन्‍स लाइन-अपने रिक्रिएशन वेईकल व ईव्‍ही क्षेत्रातील कियाची उपस्थिती अधिक प्रबळ केली आहे, ज्‍यामधून वैविध्‍यपूर्ण व भविष्‍यासाठी सुसज्‍ज गतीशीलता सोल्‍यूशन्‍ससाठी ग्राहकांची वाढती पसंती निदर्शनास येते.या मासिक कामगिरीबाबत मत व्‍यक्‍त करत किया इंडियाच्‍या सेल्‍स अँड मार्केटिंगचे वरिष्‍ठ उपाध्‍यक्ष श्री. अतुल सूद म्‍हणाले, ''वर्ष २०२६ मधील प्रेरणादायी शुभारंभामधून ग्राहकांचा किया ब्रँडवर सतत असलेला विश्वास दिसून येतो. न्‍यू-जनरेशन सेल्‍टोससाठी सकारात्‍मक प्रतिसाद, सोनेटसाठी स्थिर मागणी आणि कॅरेन्‍स क्‍लॅव्हिस व कॅरेन्‍स ईव्‍हीसाठी वाढती लोकप्रियता यामधून आमच्‍या पोर्टफोलिओची क्षमता व संतुलन निदर्शनास येते. या कामगिरीमधून विभागांमध्‍ये वैविध्‍यपूर्ण, भविष्‍यासाठी सुसज्‍ज उत्‍पादने प्रदान करण्‍यावरील, तसेच सतत एकूण मालकीहक्‍क अनुभव अधिक उत्‍साहित करण्‍यावर आम्ही आमचे लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येते.''कियाचा पोर्टफोलिओ वैविध्‍यपूर्ण होत आहे, जेथे डिझाइन, तंत्रज्ञान आणि सुरक्षिततेवर अधिक लक्ष केंद्रित केले जाते. न्‍यू-जनेरशन सेल्‍टोस व सोनेट त्‍यांच्‍या विभागांमध्‍ये प्रगत कनेक्टिव्‍हीटी व ड्रायव्‍हरला साह्य करणारी वैशिष्‍ट्ये देतात, तर कॅरेन्‍स क्‍लॅव्हिस स्थिर ६-सीटर व ७-सीटर कॉन्फिग्‍युरेशन व तिसऱ्या रांगेमध्‍ये केबिनसह वरचढ ठरते. तसेच कियाची पहिली मेड-इन-इंडिया इलेक्ट्रिक वेईकल क्‍लॅव्हिस ईव्‍ही व्‍यावहारिक सात-आसनी ईव्‍ही आहे. या ईव्‍हीमध्‍ये कनेक्‍टेड तंत्रज्ञान असण्‍यासह आरामदायीपणा, सुरक्षितता व दैनंदिन उपयुक्‍ततेवर अधिक लक्ष केंद्रित करण्‍यात आले आहे.सुव्‍यवस्थित उत्‍पादन पोर्टफोलिओसह किया इंडिया आगामी महिन्‍यांमध्‍ये ही गती कायम ठेवण्‍यास उत्तमरित्‍या सुसज्‍ज आहे. कंपनी ग्राहकांच्‍या बदलत्‍या अपेक्षांची पूर्तता करत एकूण ब्रँड अनुभव उत्‍साहित करण्‍याप्रती कटिबद्ध आहे, जेथे ग्राहक-केंद्रित दृष्टिकोनाच्‍या पाठबळासह वेळेवर उत्‍पादनामध्‍ये सुधारणा करत आहे.कियाचे ३७६ शहरांमधील ८४१ टचपॉइण्‍ट्सचे वाढते नेटवर्क किया ब्रँडला देशभरातील ग्राहकांच्‍या जवळ नेत आहे, तसेच महानगर व उदयोन्‍मुख बाजारपेठांमध्‍ये सेल्‍स, सर्विस व मालकीहक्‍क साह्य सहजपणे उपलब्‍ध होण्‍याची खात्री घेत आहे. या सुविधेला १२२ सर्टिफाईड प्री-ओन्‍ड आऊटलेट्सचा पाठिंबा आहे, जे ग्राहकांसाठी सुलभ एक्‍स्‍चेंजेस्, त्‍वरित पेमेंट्स आणि त्रासमुक्‍त मालकीहक्‍क हस्‍तांतरणाची खात्री घेतात.

फीड फीडबर्नर 3 Feb 2026 10:10 pm

Revanth Reddy : “गुन्हेगारीचे संरक्षण लोकशाहीत होत नाही…”–मुख्यमंत्री रेवंत रेड्डी

जेव्हा हजारो कोटी रुपये आणि शेकडो एकर जमीन बेकायदेशीरपणे लुटली जाते, तेव्हा चौकशी आवश्यक आहे.

दैनिक प्रभात 3 Feb 2026 10:02 pm

Earthquake : भूकंपाने देश हादरला..! नागरिक घरातून सैरावैरा पळाले, सर्वत्र हाहाकार

Myanmar Earthquake : म्यानमारमध्ये रात्री ९:०५ वाजता भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. याचे पडसाद कोलकाता आणि पश्चिम बंगालमध्येही उमटले असून नागरिक दहशतीखाली आहेत.

दैनिक प्रभात 3 Feb 2026 9:53 pm

Crime news : ठाण्यात २७ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी महिलेला अटक

ठाणे जिल्ह्यात २७ कोटी रुपयांच्या मेफेड्रोन जप्ती प्रकरणी अनेक गुन्हे दाखल असलेल्या एका महिला ड्रग्ज तस्कराला अटक करण्यात आली आहे.

दैनिक प्रभात 3 Feb 2026 9:42 pm

Medha Kulkarni : UPI चा जगभर डंका, पण सुरक्षेचं काय? खासदार मेधा कुलकर्णी यांनी वेधले लक्ष

Medha Kulkarni : खासदार मेधा कुलकर्णी यांनी राज्यसभेत आंतरराष्ट्रीय UPI व्यवहारांच्या सुरक्षा आणि नियामक अडचणींकडे लक्ष वेधले.

दैनिक प्रभात 3 Feb 2026 9:25 pm

Aleema Khan : इम्रान खान यांची बहीण अलीमा खान यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी

पाकमधील दहशतवादविरोधी न्यायालयाने इम्रान खान यांच्या भगिनी अलीमा खान (Aleema Khan)यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट बजावले आहे. नोव्हेंबर २०२४ मध्ये पीटीआय पक्षाने केलेल्या आंदोलनाप्रकरणी हे वॉरंट बजावण्यात आले आहे.

दैनिक प्रभात 3 Feb 2026 9:15 pm

यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २६ दिवसांचे? - नियोजन सुरू; विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तर परिषदेत आशिष जयस्वाल मांडणार अर्थसंकल्प

मुंबई : राज्य विधिमंडळाचे यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन एकूण २६ दिवसांचे असण्याची शक्यता असून, त्यापैकी सुट्ट्या वगळता २० दिवस प्रत्यक्ष कामकाज होणार आहे. विधानसभा आणि विधान परिषदेच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत या तारखा अंतिम केल्या जातील.संसदीय कार्य विभागाने तयार केलेल्या संभाव्य वेळापत्रकानुसार २३ फेब्रुवारी ते २० मार्च या कालावधीत अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे. ६ मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाईल. विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्प मांडणार असून, विधान परिषदेत ही जबाबदारी अर्थ राज्यमंत्री आशिष जयस्वाल पार पाडणार आहेत. दिवंगत अर्थमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर अर्थसंकल्प कोण सादर करणार, याबाबत चर्चा सुरू होती. अखेर मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही धुरा स्वतः खांद्यावर घेतली आहे.अर्थसंकल्पीय तयारी ही दीर्घकालीन प्रक्रिया असते. किमान सहा महिन्यांपासून विविध योजना, तरतुदी, नव्या प्रस्तावांचा समावेश, तसेच ऐनवेळी उद्भवणाऱ्या विषयांसाठीची आर्थिक तरतूद यावर सखोल काम केले जाते. अजित पवार हे गेल्या अनेक महिन्यांपासून या प्रक्रियेत सहभागी होते. मात्र आता मुख्यमंत्री फडणवीस अर्थसंकल्प सादर करणार असल्याने अंतिम टप्प्यात कोणते बदल होतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

फीड फीडबर्नर 3 Feb 2026 9:10 pm

“महायुतीच्या एकजुटीपुढे कुणाचीही डाळ शिजणार नाही, सिंधुदुर्गात महायुतीच्या १०० टक्के विजयाचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्धार

कुडाळच्या विराट सभेत तळ कोकणावर महायुतीचा भगवा फडकवण्याचे आवाहनकुडाळ : कोकणात शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तिन्ही पक्षांची ताकद एकत्र असून, जिल्हा परिषद निवडणुकीत ज्या जिल्ह्यात शंभर टक्के विजयाची खात्री देता येईल, तो जिल्हा म्हणजे सिंधुदुर्ग असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेचा कारभार निष्कलंक राहिल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुडाळ येथे पार पडलेल्या विराट जाहीर सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या महाविजयाचा ठाम विश्वास व्यक्त केला.सभेत शिंदे यांनी मतदारांना आवाहन करत महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करून जिल्हा परिषदेवर महायुतीचा भगवा फडकवण्याचे आवाहन केले. यावेळी पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे, माजी मंत्री दीपक केसरकर, उद्योगमंत्री उदय सामंत, रवींद्र फाटक, प्रमोद जठार, दत्ता दळवी, संजय आंग्रे, दीप्ती पडते, श्वेता कोरगावकर यांच्यासह महायुतीचे सन्माननीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.शिंदे म्हणाले की, मुंबई आणि ठाण्यात महायुतीला मिळालेला विजय हा कोकणातील मतदारांच्या निर्णायक भूमिकेमुळे शक्य झाला आहे. कोकणी माणसाने या निवडणुकांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली असून, त्याचाच परिणाम म्हणून मुंबई, ठाणे आणि राज्यातील अनेक महापालिका व नगरपालिकांमध्ये महायुतीला यश मिळाले. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असल्याचे सांगत, कार्यकर्त्यांच्या मेहनतीवरच आमदार, खासदार, मंत्री आणि मुख्यमंत्री घडत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.महायुतीची एकजूट हीच आमची खरी ताकद असल्याचे सांगताना शिंदे यांनी नितेश आणि निलेश राणे एकत्र असल्यामुळे सिंधुदुर्गात विरोधकांची डाळ शिजणार नाही, असा विश्वास व्यक्त केला. आधीच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या अनेक जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध किंवा मोठ्या फरकाने निवडून आले असल्याचे सांगत, यावेळीही इतिहास घडेल, असे त्यांनी नमूद केले.नारायण राणे यांच्या नेतृत्वाबाबत बोलताना शिंदे यांनी त्यांच्या प्रशासकीय क्षमतेचा उल्लेख केला. मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते म्हणून राणे यांनी घेतलेल्या अभ्यासपूर्ण आणि धाडसी निर्णयांची आठवण करून देत, धोकादायक इमारतींबाबत त्यांनी घेतलेल्या तत्काळ निर्णयांमुळे लाखो लोकांचे घरे वाचल्याचा अनुभव त्यांनी सभेत सांगितला. राणे साहेबांचा दरारा, अभ्यास आणि प्रशासनावरची पकड कोकणाच्या विकासासाठी नेहमीच उपयोगी ठरल्याचे त्यांनी स्पष्ट केले.शिंदे यांनी सांगितले की, राणे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आज एक आदर्श परिषद म्हणून ओळखली जाते. पुढील काळातही शंभर टक्के विजय मिळवून ही परिषद महाराष्ट्रात आदर्श ठरेल, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून कोकणातील विकास प्रस्तावांना कॅबिनेटमध्ये तात्काळ मंजुरी मिळते, असेही त्यांनी नमूद केले.विकासासाठी मोठ्या बजेटची आवश्यकता असल्याचे सांगत, कणकवलीसारख्या भागांसाठी किमान १०० कोटी रुपयांचे बजेट असावे, अशी भूमिका त्यांनी मांडली. रस्ते, पाणीपुरवठा, सिंचन, पर्यटन, उद्योग, रोजगार आणि मूलभूत सुविधांसाठी निधी कमी पडू देणार नाही, असा शब्द त्यांनी दिला.शिंदे यांनी आपल्या कार्यकाळातील लोकहिताच्या निर्णयांची सविस्तर माहिती दिली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुलींच्या उच्च शिक्षणासाठी 100 टक्के फी सवलत, शेतकरी सन्मान योजना, पीक विमा योजना, १३२ सिंचन प्रकल्पांना गती, महिलांसाठी आरोग्य व सुरक्षितता योजना, तसेच ५ लाख रुपयांचा विमा संरक्षण या सर्व योजना सर्वसामान्यांच्या जीवनात परिवर्तन घडवणाऱ्या असल्याचे त्यांनी सांगितले.शिंदे यांनी केंद्र सरकारच्या भूमिकेचाही विशेष उल्लेख केला. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने यंदाच्या बजेटमध्ये कोकणाचा विचार करत पर्यटन, बंदरविकास, काजू, आंबा, नारळ यासारख्या स्थानिक उत्पादनांशी संबंधित योजना आणि पायाभूत सुविधांसाठी तरतूद केली आहे. सिंधुदुर्ग हा निसर्गाने नटलेला, छोटा पण प्रचंड विकासक्षम जिल्हा असून, केंद्र आणि राज्य सरकार मिळून या भागाचा सर्वांगीण विकास घडवून आणतील,” असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.“तरुणांच्या हाताला काम, उद्योगांना चालना आणि पर्यटनातून रोजगारनिर्मिती हे आमचे प्राधान्य असून, सिंधुदुर्गाला काहीही कमी पडू देणार नाही,” असेही त्यांनी ठामपणे सांगितले. शेवटी शिंदे यांनी मतदारांना आवाहन करत सांगितले की, शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तिन्ही पक्षांचे अधिकृत उमेदवारच निवडून आणावेत. बंडखोर किंवा इतर कोणालाही मत देऊ नका, असे स्पष्ट करत धनुष्य-बाण, कमळ आणि घड्याळ या चिन्हांवर लक्ष ठेवण्याचे त्यांनी आवाहन केले.“ही निवडणूक केवळ मतदानापुरती नाही, तर सिंधुदुर्गाच्या आणि आपल्या मुलाबाळांच्या भविष्याचा फैसला करणारी आहे. महायुतीला मत म्हणजे विकासाला मत,” असे सांगत त्यांनी सभेचा समारोप केला. उपस्थितांचे आभार मानत त्यांनी “जय महाराष्ट्र”च्या घोषणांसह सभेची सांगता केली आणि महायुतीत नव्याने प्रवेश करणाऱ्यांचे स्वागत केले.

फीड फीडबर्नर 3 Feb 2026 9:10 pm

Yumnam Khemchand Singh : मणिपूरमध्ये पुन्हा सरकार होणार स्थापन; युमनाम खेमचंद सिंह बनणार मुख्यमंत्री

मणिपूरमधील भाजप विधिमंडळ पक्षनेतेपदी मंगळवारी ज्येष्ठ नेते युमनाम खेमचंद सिंह (Yumnam Khemchand Singh) यांची निवड झाली. त्यामुळे मुख्यमंत्री म्हणून सिंह यांच्या नेतृत्वाखाली मणिपूरमध्ये पुन्हा लोकनियुक्त सरकार स्थापन होणार असल्याचे स्पष्ट झाले.

दैनिक प्रभात 3 Feb 2026 8:46 pm

Ajit Pawar : अजितदादांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पुण्यात शोकसभा

Ajit Pawar : ही शोकसभा बुधवार, दिनांक 4 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 5 वाजताबालगंधर्व रंग मंदिर, शिवाजीनगर, पुणे येथे होणार आहे.

दैनिक प्रभात 3 Feb 2026 8:40 pm

सी-टीईटी देणाऱ्या शिक्षकांना निवडणूक कामातून सूट

मुंबई : ‘केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा’ (सी-टीईटी) देणाऱ्या शिक्षकांना जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या कर्तव्यातून सूट देण्यात आली असून, तसे निर्देश सर्व संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आल्यानंतर १२ जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गतच्या १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीच्या मतदानाच्या तारखेत बदल करण्यात आला. त्यानुसार ५ फेब्रुवारीऐवजी आता ७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. त्याच वेळी राज्यातील काही शिक्षकांची सी-टीईटी परीक्षा असल्यामुळे संबंधित शिक्षकांना निवडणूक कर्तव्यातून सूट देऊन, पर्यायी व्यवस्था करण्याबाबत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत.

फीड फीडबर्नर 3 Feb 2026 8:30 pm

Baramati News : बारामतीत ‘कृतीतून श्रद्धांजली’: अजित पवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ 62 बाटल्या रक्त संकलित

Baramati News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांना आगळ्यावेगळ्या पद्धतीने श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी बारामतीतील तरुण आणि सामाजिक कार्यकर्ते सरसावले आहेत.

दैनिक प्रभात 3 Feb 2026 8:27 pm

Devendra Fadnavis : पायाभूत सुविधा, उद्योग प्रकल्पांसाठी जमीन अधिग्रहण जलद करा; मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी पायाभूत सुविधा आणि औद्योगिक विकास प्रकल्पांसाठी जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश मंगळवारी अधिकाऱ्यांना दिले.

दैनिक प्रभात 3 Feb 2026 8:17 pm

मोठा अनर्थ टळला..! पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड

Pankaja Munde Helicopter : मंत्री पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे समोर आले आहे.

दैनिक प्रभात 3 Feb 2026 8:09 pm

Gold Silver Price Hike: सोने-चांदी पुन्हा सुसाट! तीन दिवसांच्या घसरणीनंतर किमतीत मोठी वाढ

Gold Silver Price Hike: मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) ५ मार्च २०२६ च्या डिलिव्हरीसाठी असलेल्या चांदीच्या दरात संध्याकाळी अचानक तेजी दिसून आली.

दैनिक प्रभात 3 Feb 2026 7:59 pm

Giriraj Singh : राहुल गांधींकडून भारतीय सैन्याचा अपमान; भाजप नेते गिरीराज सिंह यांची टीका

Giriraj Singh : केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह (Giriraj Singh) यांनी काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसेच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली आहे.

दैनिक प्रभात 3 Feb 2026 7:46 pm

शाहरुख खानच्या ‘किंग’च्या आंतरराष्ट्रीय वितरणासाठी रेड चिलीज एंटरटेनमेंट, मार्फ्लिक्स पिक्चर्स आणि यशराज फिल्म्स यांची ऐतिहासिक भागीदारी

मुंबई : रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि मार्फ्लिक्स पिक्चर्स यांनी शाहरुख खान अभिनीत बहुप्रतिक्षित चित्रपट ‘किंग’च्या आंतरराष्ट्रीय वितरणासाठी यशराज फिल्म्ससोबत हातमिळवणी केली आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील तीन दिग्गज बॅनर्स एकत्र येत असल्याने ‘किंग’बाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे.२०२६ मध्ये प्रदर्शित होणाऱ्या सर्वात मोठ्या चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘किंग’ने घोषणेदरम्यानच जबरदस्त चर्चा निर्माण केली आहे. आता यशराज फिल्म्स आंतरराष्ट्रीय वितरणाची जबाबदारी सांभाळणार असल्याने, हा चित्रपट जगभरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये भव्य स्तरावर प्रदर्शित होणार आहे.https://www.instagram.com/p/DUSm-bEjMJg/?igsh=am5jMWF0dnMyMGw1या भागीदारीची अधिकृत घोषणा सोशल मीडियावर करण्यात आली असून, निर्मात्यांनी ‘किंग’च्या जगाची एक झलक चाहत्यांसमोर मांडली आहे. या झलकांमध्ये शाहरुख खान एका धाडसी, आक्रमक आणि नव्या अवतारात दिसत असून, भव्य लोकेशन्स आणि प्रभावी फ्रेम्समुळे चित्रपटाची दृश्यभाषा अधिक ठळक झाली आहे. या दमदार प्रतिमांमुळे चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला असून, २०२६ च्या अखेरीस ‘किंग’ गर्जना करण्यास सज्ज असल्याचे संकेत मिळत आहेत.रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि मार्फ्लिक्स पिक्चर्स यांच्या निर्मितीखाली तयार होणारा ‘किंग’ हा २०२६ मधील सर्वाधिक अपेक्षित बिग-स्क्रीन स्पेक्टॅकल ठरणार असून, तो २४ डिसेंबर २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे.

फीड फीडबर्नर 3 Feb 2026 7:30 pm

औद्योगिक वापरासाठी सरकारी जमिनी आता विनामूल्य हस्तांतरित होणार - अधिकाधिक गुंतवणूक आणण्यासाठी प्रयत्न; प्रस्ताव सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यात औद्योगिक गुंतवणूक आणि रोजगारनिर्मितीला गती देण्यासाठी विविध विभागांकडील शासकीय जमिनी औद्योगिक वापरासाठी विनामूल्य हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिले. यामुळे उद्योजकांना कमी दरात भूखंड उपलब्ध होतील आणि राज्यातील औद्योगिक विकासाला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) विविध प्रकल्पांसाठी सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेचा आढावा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला उद्योग मंत्री उदय सामंत (दूरदृश्य प्रणालीद्वारे), मुख्य सचिव राजेश अग्रवाल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, उद्योग विभागाचे प्रधान सचिव पी. अन्बलगन, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलरासु, एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड तसेच संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी (दूरदृश्य प्रणालीद्वारे) उपस्थित होते.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्यात सुरू असलेले सर्व प्रकल्प येत्या तीन वर्षांत पूर्ण होतील, अशा पद्धतीने नियोजन करावे. यासाठी भूसंपादन प्रक्रियेला गती देणे आवश्यक असून ही प्रक्रिया पारदर्शकपणे राबवावी. प्रकल्पांसाठी जमीन देणाऱ्या नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले. त्याचबरोबर वनक्षेत्र नसलेल्या जास्तीत जास्त सलग जागेचे भूसंपादन करून ती उद्योजकांना उपलब्ध करून द्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.औद्योगिक विकासासाठी राज्यात ८ हजार ९६९ एकर क्षेत्र उपलब्धराज्यातील औद्योगिक विकासासाठी विविध विभागांमध्ये एकूण ८ हजार ९६९ एकर क्षेत्र उपलब्ध असून नव्याने २०,४३१ एकर जमीन ताब्यात घेण्यात आल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, राज्यात औद्योगिक गुंतवणुकीसाठी मोठ्या प्रमाणावर मागणी येत आहे. उद्योजकांच्या गरजांचा विचार करून एमआयडीसीने एक लाख एकर जमीन उपलब्ध करण्याचे उद्दिष्ट ठेवावे. मुंबई–पुणे–नागपूर पट्ट्यासह नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर आदी भागांमध्येही गुंतवणूकदारांकडून जमिनीची मागणी वाढत असून संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी भूसंपादनाच्या कामांना गती द्यावी. यासाठी शासन स्तरावरून आवश्यक ते सर्व साहाय्य दिले जाईल, असे त्यांनी सांगितले.शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनाचा घेतला आढावा- बैठकीत एमआयडीसीच्या भूसंपादनासोबतच एमएसआरडीसीकडील शक्तिपीठ एक्स्प्रेस वे, विरार–अलिबाग मल्टिमोडल कॉरिडॉर, नागपूर–गोंदिया, भंडारा–गडचिरोली, नागपूर–चंद्रपूर, नवेगाव–सुरजागड मिनरल कॉरिडॉर तसेच जालना–नांदेड एक्स्प्रेस वे या प्रकल्पांच्या सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेचाही आढावा घेण्यात आला.- उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांनी कोकणातील भूसंपादन प्रक्रियेदरम्यान कुठेही वनजमिनीचे संपादन करण्यात आले नसल्याची माहिती दिली. तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील अतिरिक्त गोंडपिंपरी औद्योगिक क्षेत्रात उद्योजकांना जमीन उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने उपस्थित केलेल्या त्रुटींची पूर्तता करून प्रस्ताव मान्यतेसाठी प्राप्त झाला असून, या प्रस्तावास मान्यता देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

फीड फीडबर्नर 3 Feb 2026 7:30 pm

राज्यातील सर्व अपूर्ण विमानतळे ‘एमएडीसी’कडे देणार मुख्यमंत्र्यांचे निर्देश; विमानतळ विकासात सिडको आणि नगरविकास विभागाचे सहकार्य घेणार

मुंबई : राज्यातील विमानतळ विकासाला गती देण्यासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीची (एमएडीसी) क्षमता वाढवून राज्यातील निर्माणाधीन आणि अपूर्ण असलेली सर्व विमानतळे विकासाकरिता या कंपनीकडे देण्यात यावीत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिले. विमानतळ विकासाची एकसंध आणि प्रभावी यंत्रणा उभारण्यावर भर देत त्यांनी संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, अशी सूचनाही त्यांनी दिली.वेगाने होत असलेल्या पायाभूत सुविधांच्या विकासामुळे पुणे शहर आणि परिसर गुंतवणुकीचे केंद्र बनत असून औद्योगिकरण आणि नागरीकरणाचा वेग लक्षणीयरीत्या वाढला आहे. भविष्यातील पुणे शहराची गरज लक्षात घेऊन पुरंदर विमानतळाची निर्मिती करण्यात यावी, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला मुख्य सचिव राजेश अग्रवाल, अपर मुख्य सचिव (वित्त) ओ. पी. गुप्ता, अपर मुख्य सचिव (परिवहन) संजय सेठी, प्रधान सचिव (उद्योग) पी. अन्बलगन, मुख्यमंत्र्यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलरासू आदी उपस्थित होते.मुख्यमंत्री फडणवीस यांनी विमानतळासाठी आवश्यक भूसंपादन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) माध्यमातून ठरावीक कालमर्यादेत पूर्ण करून विमानतळ विकासाचा मोठा टप्पा पार करण्याचे निर्देश दिले. विमानतळ विकासासाठी निधी उपलब्धतेची एक निश्चित पद्धत ठरवावी, तसेच भूसंपादनाची कार्यवाही एमआयडीसीने पूर्ण करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. विमानतळ विकास प्रक्रियेत सिडको आणि नगरविकास विभागाने आपापली जबाबदारी निश्चित करून ती प्रभावीपणे पार पाडावी, असे निर्देश देण्यात आले. विमानतळ कार्यान्वित झाल्यानंतर संबंधित परिसर ‘डेव्हलपमेंट झोन’ म्हणून विकसित होणार असल्याने सिडकोने आतापासूनच त्या परिसरातील जमीन उपलब्धतेची खात्री करून घ्यावी, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.पुरंदर विमानतळाबाबत दिले महत्त्वाचे निर्देश- पुरंदर विमानतळाच्या उर्वरित भूसंपादनासाठी एमआयडीसीने अधिसूचना काढावी, तसेच विमानतळ विकासासाठी निधी उपलब्धतेबाबतचा प्रस्ताव पुढील मंत्रिमंडळ बैठकीत सादर करावा, असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. सद्यस्थितीत प्रस्तावित क्षेत्रापैकी १ हजार २१६ हेक्टर आर जमिनीची संयुक्त मोजणी पूर्ण करून त्यासंदर्भातील हरकतींसह सविस्तर अहवाल शासनास सादर करण्याचे आदेशही त्यांनी दिले.- पुरंदर विमानतळासाठी पुणे जिल्ह्यातील वनपुरी, कुंभार वळण, उदाची वाडी, एखतपूर, मुंजवडी, खानवडी आणि पारगाव या सात गावांमध्ये भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. या गावांमध्ये भूसंपादनासाठी गावनिहाय उपजिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी दर्जाचे भूसंपादन अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.

फीड फीडबर्नर 3 Feb 2026 7:30 pm

BMC Mayor : मुंबईचा महापौर जवळपास निश्चित? ‘या’ तीन महिला नगरसेविकांची नावे आघाडीवर

BMC Mayor : मुंबई महापालिकेच्या महापौर पदासाठी महिला आरक्षण जाहीर झाल्याने चुरस वाढली आहे.

दैनिक प्रभात 3 Feb 2026 7:26 pm

K. Annamalai : भाजप नेते के. अन्नामलाई यांचा विधानसभा प्रभारी पदाचा राजीनामा

भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष के. अन्नामलाई (K. Annamalai) यांनी घोषणा केली आहे की, ते २०२६ च्या विधानसभा निवडणुकीसाठी कोइम्बतूरमधील सिंगनल्लूरसह सहा मतदारसंघांमधील निवडणूक दौऱ्याच्या प्रभारी पदावरून पायउतार होतील

दैनिक प्रभात 3 Feb 2026 7:20 pm

Today Top 10 News: मंत्री मुंडेंचा हेलिकाॅप्टर अपघात टळला ते 7 खासदार निलंबित…वाचा आजच्या टाॅप बातम्या

Today Top 10 News: वाचा आजच्या महाराष्ट्र,देश-विदेश सह सर्व क्षेत्रातील टाॅप बातम्या....

दैनिक प्रभात 3 Feb 2026 7:18 pm

Ind Vs Pak : भारत –पाकिस्तान सामन्यावर गौतम गंभीरच्या ‘त्या’वक्तव्याची होतेय चर्चा

आयसीसी पुरुष टी20 विश्वचषक २०२६ ला येत्या ७ फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. भारत (Ind Vs Pak) आणि श्रीलंका यांच्या संयुक्त आयोजनात होणाऱ्या या स्पर्धेत भारतीय संघाला जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे.

दैनिक प्रभात 3 Feb 2026 7:03 pm

Amit Shah : ‘ते’विधान महागात; पियुष गोयल यांना अमित शहांनी फटकारलं

Amit Shah : अमित शहांची पियुष गोयल यांच्यावर नाराजी; पक्षाच्या अंतर्गत निर्णयावर भाष्य करणं टाळण्याच्या सूचना

दैनिक प्रभात 3 Feb 2026 6:49 pm

Job vacancy : कामाची बातमी..! १० वी पास तरुणांना मिळणार सरकारी नोकरी; असा करा अर्ज, पगार सुद्धा दमदार !

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डातून १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

दैनिक प्रभात 3 Feb 2026 6:49 pm

KDMC Mayor : केडीएमसीच्या महापौरपदी हर्षाली थविल यांची निवड

महानगरपालिका निवडणुकांच्या निकालानंतर, अखेर आज अनेक महानगरपालिकांना महापौर (KDMC Mayor) मिळाला असून, कल्याण डोंबिवली आणि मीरा-भाईंदरमध्ये महापौर निवडला आहे.

दैनिक प्रभात 3 Feb 2026 6:31 pm

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त सरसंघचालक मोहन भागवत साधणार मान्यवरांशी संवाद - वरळीच्या नेहरू सेंटरमध्ये दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त सरसंघचालक मोहन भागवत हे मुंबईत समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधणार आहेत. वरळी येथील नेहरू सेंटरच्या सभागृहात येत्या शनिवारी ७ आणि रविवारी ८ फेब्रुवारी रोजी एका कार्यक्रमांतर्गत व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले असून आर्थिक, न्यायिक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, क्रीडा, कला, चित्रपटसृष्टि, रहिवासी संघ अशा विविध क्षेत्रातील ८००-९०० मान्यवरांशी संवाद साधण्यात येणार आहे.गेल्या १०० वर्षातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वाटचाल, संघाचा विचार, महत्वपूर्ण टप्पे, आगामी योजना याबाबत भागवत आपले विचार मांडतील. तसेच भविष्यात संघाच्या कार्यात लोकांचा सहभाग वाढवा, यादृष्टीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.गेले चार महिने या कार्यक्रमाची तयारी सुरू आहे. विविध १० श्रेणी तयार करून त्या-त्या क्षेत्रातील मान्यवरांशी संपर्क साधला गेला. यामध्ये कला क्षेत्रातील आशा भोसले, हृदयनाथ मंगेशकर चित्रपट जगतातील बोनी कपूर, क्रीडा क्षत्रातील चिराग शेट्टी, लेखक विश्वास पाटील चिन्मय मिशनसहअन्य संत परंपरेतील लोक कार्यक्रमाला येणार आहेत, असे आंबेकर यांनी स्पष्ट केले.देशभरात विविध शहरात अशा व्याख्यानमालांची शृंखला सुरू होती. शताब्दी वर्षानिमित्त मुंबईत होणारी व्याख्यानमाला ही या मालिकेतील शेवटची व्याख्यानमाला आहे. यापुर्वी दिल्ली, बेंगळुरू, आणि कोलकातामध्ये अशा व्याख्यानमाला पार पडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर समाजाच्या विविध घटकातील मान्यवरांशी संवाद आणि प्रश्नोत्तरे असे या दोन दिवसीय कार्यक्रमाचे स्वरूप असणार आहे. ७ फेब्रुवारीला पहिल्या दिवशी दोन सत्रात मोहन भागवत यांचे व्याख्यान होईल. तर, दुसऱ्या दिवशी सकाळी कार्यक्रमाला सुरुवात होणार असून सरसंघचालक भागवत हे श्रोत्यांच्या प्रश्नांना उत्तरे देतील.२०२५ च्या विजयादशमीपासून चालू झालेले शताब्दी वर्ष २०२६ च्या विजयादशमीपर्यंत असणार आहे. हे वर्ष म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्राप्रती समर्पित सेवेच्या शतकाचे प्रतीक आहे. समाजातील विविध घटकांना जोडण्यासाठी गृह संपर्क, हिंदू संमेलन, प्रबुद्ध गोष्टी संमेलने, सद्भाव बैठक आणि युवा संमेलन यांसह अनेक प्रेरणादायी कार्यक्रमांची रचना करण्यात आल्याचेही आंबेकर यांनी सांगितले. यावेळी कोकण प्रांत संघाचालक अर्जुन चांदेकरदेखील उपस्थित होते.राष्ट्रीय सवयांसेवक संघाची स्थापना १९२५ मध्ये झाली. त्यानंतर १९३५ मध्ये गिरगावमध्ये पहिली शाखा सुरू झाली. मुंबईत अनेक प्रचारक तयार झाले आणि देशातील विविध भागात जाऊन संघाचे कार्य केले. विशेषतः मुंबईतील प्रचारक शिवरामपंत जोगळेकर यांनी दक्षिणेकडे, तामीळनाडूमध्ये जाऊन संघाच्या कार्याचा प्रसार प्रचार केला. मुंबईत सुरुवातीच्या काळात गिरणी कामगारांसाठी शाखांचे आयोजन करण्यात आले होते.

फीड फीडबर्नर 3 Feb 2026 6:30 pm

Himachal Pradesh Accident : काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना! प्रवाशांनी भरलेली बस खोल दरीत कोसळली; 3 जणांचा मृत्यू

Himachal Pradesh Accident : हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या सीमेवर भीषण बस अपघात झाला असून ३ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.

दैनिक प्रभात 3 Feb 2026 6:17 pm

Mahatma gandhi statue : ऑस्ट्रेलियात महात्मा गांधींच्या पुतळ्याची चोरी; यापूर्वीही झाला होता विटंबनेचा प्रयत्न, वाचा…

Mahatma gandhi statue : मेलबर्न शहरात असलेल्या ऑस्ट्रेलियन इंडियन कम्युनिटी सेंटरमधून 'महात्मा गांधी' यांचा ब्राँझचा पुतळा चोरीला गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे

दैनिक प्रभात 3 Feb 2026 6:11 pm

Rohit Sharma : पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यावर रोहित शर्माने दिली ‘ही’प्रतिक्रिया; म्हणाला…

भारतीय क्रिकेटचा स्टार खेळाडू आणि माजी कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याला केंद्र सरकारकडून पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिलादेखील या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

दैनिक प्रभात 3 Feb 2026 6:06 pm

Kapil Dev : बहिष्कारावरून कपिल देव यांनी पाकिस्तानला दिला ‘हा’मोठा इशारा

Kapil Dev : टी20 विश्वचषक २०२६ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हायव्होल्टेज सामना बहिष्कार करण्याच्या पाकिस्तानच्या निर्णयावर भारतीय क्रिकेटचे दिग्गज कपिल देव (Kapil Dev) यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

दैनिक प्रभात 3 Feb 2026 5:44 pm

Praful Patel : राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावर प्रफुल पटेलांनी मौन सोडलं, काय म्हणाले पहा

Praful Patel : राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत प्रफुल पटेल आहेत का? अजित पवारांच्या अपघाताबाबत पटेलांनी काय मोठा दावा केला?

दैनिक प्रभात 3 Feb 2026 5:43 pm

Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांना मोदी-शहांनी दिल्लीला बोलावलं; राजधानीत हालचालींना वेग

Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

दैनिक प्रभात 3 Feb 2026 5:38 pm

शाश्वत शेती, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीकरणासाठी गोदरेज ॲग्रोव्हेटसोबतचा करार महत्वपूर्ण ठरणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

या करारांतर्गत ९ जिल्ह्यांतील ५ हजारांहून अधिक महिला शेतकऱ्यांना शाश्वत शेतीचे प्रशिक्षण मिळणारमुंबई : “महाराष्ट्रातील शेतकरी हे राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. शेतीवर अवलंबून असलेल्या हजारो कुटुंबांमध्ये महिलांची भूमिका निर्णायक आहे. गोदरेज ॲग्रोव्हेटसोबतचा हा करार शाश्वत शेती, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करण्याच्या राज्य सरकारच्या कटिबद्धतेचे प्रतीक असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.राज्यातील महिला शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखालीगोदरेज ॲग्रोव्हेट लिमिटेड आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (एमएसआरएलएम–उमेद) यांच्यात महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारामुळे राज्यातील ९ कापूस उत्पादक जिल्ह्यांतील ५ हजारांहून अधिक महिला शेतकऱ्यांना शाश्वत व आधुनिक शेती पद्धतींचे प्रशिक्षण मिळणार आहे.महिला शेतकरी सक्षमीकरणाच्या दिशेने महत्वाचे पाऊलयावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, “महाराष्ट्रातील शेतकरी हे आपल्या राज्याचा कणा आहेत. हजारो कुटुंबांची उपजीविका शेतीवर अवलंबून असून, त्यातील अनेक कुटुंबांचे नेतृत्व कर्तृत्ववान महिला करत आहेत. अशा शेतकऱ्यांना सुलभ कर्ज आणि आवश्यक मदत वेळेवर मिळावी यासाठी आमचे शासन कटिबद्ध आहे. या पार्श्वभूमीवर गोदरेज ॲग्रोवेटसोबतची भागीदारी ही शाश्वत कृषी पद्धती आणि लैंगिक समावेशनाबाबत आमच्या बांधिलकीचे प्रतीक आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि वैज्ञानिक शेती पद्धतींच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विशेषतः महिला शेतकरी आत्मनिर्भर बनून राज्याच्या अर्थव्यवस्थेत मोलाचे योगदान देतील, यासाठी हे पाऊल महत्त्वाचे ठरेल, महिला शेतकऱ्यांना वैज्ञानिक शेती पद्धती, बाजारपेठेतील संधी आणि माहितीपूर्ण निर्णयक्षमतेस सक्षम करून, हा उपक्रम महाराष्ट्रातील शेती उत्पादनक्षमता, उपजीविका आणि ग्रामीण टिकाऊपणा यामध्ये दीर्घकालीन सुधारणा साधण्याचा यशस्वी प्रयत्न आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.उपक्रमाची व्याप्ती आणि उपयुक्ततासंयुक्त राष्ट्रांनी २०२६ हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केलेल्या पार्श्वभूमीवर हा तीन वर्षांचा उपक्रम राबवण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील नऊ कापूस उत्पादक जिल्ह्यांतील ५,००० हून अधिक महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी गोदरेज ॲग्रोवेट आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांचा सामंजस्य करार करण्यात आला आहे. या अंतर्गत महिला शेतकऱ्यांना चांगल्या कृषी पद्धती (GAP) आणि एकात्मिक कीड व्यवस्थापन (IPM) याबाबत प्रशिक्षण देण्यात येईल, ज्यामुळे उत्पादन खर्च कमी होऊन उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार आहे. राज्य शासन मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली महिला शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, वैज्ञानिक मार्गदर्शन आणि बाजारपेठेशी जोडण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे.महिला शेतकरी वर्गाला सक्षमकरण्याच्या दिशेने हे निश्चितच एक महत्वपूर्ण पाऊल आहे.ही तीन वर्षांची भागीदारी स्वयं-सहायता गट (SHGs) आणि महिला शेतकऱ्यांना चांगल्या कृषी पद्धती (Good Agricultural Practices – GAP) आणि एकात्मिक कीड व्यवस्थापन (Integrated Pest Management – IPM) स्वीकारण्यासाठी प्रोत्साहित करेल, ज्यामुळे शेती उत्पादनक्षमता वाढून शाश्वत व सक्षम उपजीविका निर्माण होणार आहे.५० हजार एकर क्षेत्रावर ५ हजारांहून अधिक महिला शेतकरी आणि १०० स्वयंसहायता गट या उपक्रमाचा लाभया योजनेच्या पहिल्या टप्प्यात नागपूर, अमरावती, यवतमाळ, वाशिम, परभणी, जळगाव, बीड, अकोला आणि नांदेड या ९ जिल्ह्यांचा समावेश आहे. सुमारे ५० हजार एकर क्षेत्रावर ५ हजारांहून अधिक महिला शेतकरी आणि १०० स्वयंसहायता गट या उपक्रमाचा लाभ घेणार आहेत. पुढील तीन वर्षांत हा उपक्रम ५०० हून अधिक स्वयंसहायता गटांपर्यंत विस्तारण्यात येणार आहे. तसेच कापसाबरोबरच मका व इतर पिकांपर्यंत पोहोचवण्याचा मानस आहे.या कराराअंतर्गत एमएसआरएलएम–उमेदकडून स्वयंसहायता गट व कृषी सखी नेटवर्कद्वारे महिला शेतकऱ्यांचे संघटन व समन्वय साधला जाणार आहे. तर गोदरेज ॲग्रोव्हेटकडून प्रशिक्षण कार्यशाळा, प्रात्यक्षिक शेतजमिनी, शेतकरी क्षेत्रशाळा व सुरक्षितता किट्स पुरवण्यात येणार आहेत. या सामंजस्य कराराअंतर्गत, गोदरेज ॲग्रोवेट आणि MSRLM-उमेद संयुक्तपणे GAP, IPM आणि सुरक्षितता पद्धतींवरील प्रशिक्षण कार्यशाळा, शेतकरी क्षेत्रीय शाळा (Farmer Fie ld Schools), प्रात्यक्षिक प्लॉट्स आणि सुरक्षितता किट्सचे वितरण करणार आहेत.

फीड फीडबर्नर 3 Feb 2026 5:30 pm

Sunetra Pawar : मोठी बातमी! सुनेत्रा पवारांना मोदी-शहांचे निमंत्रण; दिल्लीत राजकीय हालचालींना वेग!

मुंबई : अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली असली तरी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा पेच अजूनही कायम आहे. खासदार प्रफुल्ल पटेल यांचे नाव या पदासाठी आघाडीवर असल्याचे मानले जात होते, मात्र पटेल यांनी स्वतः आपण या शर्यतीत नसल्याचे स्पष्ट करत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, प्रफुल्ल पटेल यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या भेटीत पक्षाच्या आगामी नेतृत्वाबाबत आणि सुनेत्रा पवार यांच्या नवीन जबाबदारीबाबत चर्चा झाल्याचे समजते. पटेल यांनी अध्यक्षपद नाकारल्यामुळे आता पक्ष कोणाच्या नेतृत्वाखाली पुढे जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.https://prahaar.in/2026/02/03/nitesh-rane-slams-sanjay-raut-over-asking-question-bjp-corruption-file-in-ajit-pawar-plane-crash/प्रफुल्ल पटेल यांची मोदी-शहांसोबत बैठकप्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना महाराष्ट्रातील सद्यस्थितीची सविस्तर माहिती दिली. विशेषतः सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी आणि त्यानंतरचे राजकीय वातावरण यावर या भेटीत सविस्तर चर्चा झाल्याचे समजते. प्रफुल्ल पटेल यांनी मोदी आणि शाह यांची स्वतंत्र भेट घेऊन साधारण ५ ते ६ मिनिटे संवाद साधला. या महत्त्वाच्या भेटीनंतर आता लवकरच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण आणि पक्षाचे आगामी राष्ट्रीय अध्यक्ष या विषयांवरही या बैठकीत गुप्त चर्चा झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. प्रफुल्ल पटेल यांनी आपण अध्यक्षपदाच्या शर्यतीत नसल्याचे आधीच स्पष्ट केल्यामुळे आता सर्व सूत्रे सुनेत्रा पवार यांच्याकडेच राहतील, असे संकेत मिळत आहेत.सुनेत्रा पवारांना दिल्लीचं निमंत्रणदरम्यान, अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यातील राजकारण पूर्णपणे बदलले असून, आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येणार का? या चर्चेने जोर धरला आहे. याच संदर्भात राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीत केवळ राज्याच्या राजकीय परिस्थितीवरच नव्हे, तर सुनेत्रा पवार यांच्या नवीन जबाबदारीवरही सविस्तर चर्चा झाल्याचे समजते. या बैठकीत विलीनीकरणाच्या मुद्द्यावर चर्चा सुरू असताना अमित शहा यांनी काही लोकांना यात केवळ राजकारण दिसत आहे, असे विधान केल्याचे समोर आले आहे. या विधानामुळे भाजपचा दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाला छुपा विरोध आहे की काय? असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी प्रफुल्ल पटेल यांच्याशी संवाद साधताना सुनेत्रा पवार यांची विचारपूस केली. अजित पवार यांचे सर्व अंत्यविधी आणि धार्मिक विधी पूर्ण झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांना दिल्लीला घेऊन या, असे खास निमंत्रणच या दोन्ही बड्या नेत्यांनी पटेल यांना दिले आहे. या आगामी दिल्ली दौऱ्यात राष्ट्रवादीच्या भविष्यातील वाटचालीवर मोठा निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.प्रफुल्ल पटेल यांनी विलिनीकरणावर स्पष्टच सांगितलंराष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी या सर्व वावड्या असल्याचे सांगत विलीनीकरणाच्या शक्यता पूर्णपणे फेटाळून लावल्या आहेत. विलीनीकरणाबाबत अजितदादांची माझ्याशी कधीही चर्चा झाली नाही आणि अशा कोणत्याही हालचाली सुरू नाहीत, असे स्पष्टीकरण पटेल यांनी दिले आहे. अजित पवार यांच्या मनातील रणनीतीचा उलगडा करताना पटेल म्हणाले की, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मते विभागली जाऊ नयेत, यासाठी अजितदादा आग्रही होते. आपण सर्व वेगवेगळे लढलो तर मतांचे विभाजन होईल आणि त्याचा फटका बसेल. त्यामुळे शरद पवार गटाशी केवळ निवडणूक समन्वय साधण्याबाबत दादांनी भूमिका मांडली होती, अशी माहिती पटेल यांनी दिली. थोडक्यात सांगायचे तर, दोन्ही पक्षांचे विलीनीकरण नव्हे, तर केवळ निवडणुकांपुरता समन्वय साधण्याचा अजितदादांचा विचार होता, असे आता स्पष्ट झाले आहे.

फीड फीडबर्नर 3 Feb 2026 5:30 pm

Rahul Gandhi: चीनचे रणगाडे 500 मीटर अंतरावर असताना दिल्लीत काय घडत होतं? राहुल गांधींच्या विधानावर संसदेत गदारोळ

Rahul Gandhi: माजी लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांच्या 'फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी' या अद्याप प्रकाशित न झालेल्या आत्मचरित्रातील काही कथित संदर्भांनी देशाच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे.

दैनिक प्रभात 3 Feb 2026 5:28 pm

IND Vs PAK : …तरच टीम इंडिया विरुद्ध खेळणार! पाकिस्तानने ठेवली ‘ही’मोठी अट

आयसीसी पुरुष टी20 वर्ल्ड कप २०२६ मध्ये भारत आणि पाकिस्तान (IND Vs PAK) यांच्यातील हायव्होल्टेज सामना होणार नसल्याची मोठी बातमी समोर आली आहे. पाकिस्तान सरकारने १ फेब्रुवारी २०२६ रोजी अधिकृत घोषणा करून आपल्या क्रिकेट (IND Vs PAK) संघाला स्पर्धेत सहभागी

दैनिक प्रभात 3 Feb 2026 5:25 pm

Praful Patel : प्रफुल पटेलांनी घेतली मोदी-शाहांशी भेट; बंद दाराआड झाली महत्वाची चर्चा…

Praful Patel : दिल्लीमध्ये सध्या संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी एनडीएच्या खासदारांची बैठक घेतली होती.

दैनिक प्रभात 3 Feb 2026 5:12 pm

अजित पवारांचा अपघात झालेल्या 'व्हीएसआर व्हेंचर'विमान कंपनीचे ऑडिट करा; 'डीजीसीए'चे आदेश

मुंबई : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर या घटनेच्या तपासाला गती देण्यात आली असून, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने संबंधित विमान कंपनीविरोधात कठोर पावले उचलली आहेत. अजित पवार ज्या कंपनीच्या विमानाने प्रवास करत होते, त्या 'व्हीएसआर व्हेंचर' कंपनीचे सखोल ऑडिट करण्याचे आदेश डीजीसीएने दिले असून, त्याचा अहवाल १५ फेब्रुवारीपर्यंत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.अपघातग्रस्त 'लिअरजेट ४५ एक्सआर' (मालक - व्हीएसआर व्हेंचर) विमानाच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी डीजीसीएने विशेष पथक नेमले आहे. या ऑडिटअंतर्गत कंपनीचे रोजचे कामकाज, वैमानिकांचे लॉगबुक, तसेच विमानांच्या देखभाल आणि तांत्रिक तपासणीशी संबंधित कागदपत्रांची कसून छाननी केली जाणार आहे. विमानांची नियमित तपासणी होत होती का आणि नोंदी अचूक व पारदर्शक पद्धतीने ठेवण्यात आल्या होत्या का, याची विशेष तपासणी केली जाणार आहे.अजित पवार हे २८ जानेवारी रोजी जिल्हा परिषद निवडणूक प्रचारासाठी विमानाने मुंबईहून बारामतीकडे निघाले होते. बारामती विमानतळावर लँडिंगचा पहिला प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर दुसऱ्यांदा लँडिंग करत असताना विमानाचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह अन्य चार जणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर अपघातामागील कारणांचा सखोल तपास करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.कंपनीचा इतिहास वादग्रस्तया अपघाताच्या तांत्रिक आणि वातावरणीय कारणांचा शोध 'एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो' घेत असून, त्याच वेळी डीजीसीएने कंपनीच्या एकूण कार्यपद्धतीवर लक्ष केंद्रित करत विशेष ऑडिट सुरू केले आहे. चौकशीदरम्यान 'व्हीएसआर व्हेंचर' कंपनीचा वादग्रस्त इतिहासही समोर आला आहे. युरोपियन युनियन एव्हिएशन सेफ्टी एजन्सीने यापूर्वीच या कंपनीच्या विमानांना त्यांच्या हवाई क्षेत्रात प्रवेशास मनाई केली होती. तसेच सप्टेंबर २०२३ मध्ये याच कंपनीच्या ‘व्हिटी-डीबीएल’ या विमानाचा मुंबईत अपघात झाला होता. त्या प्रकरणात विचारलेल्या प्रश्नांना कंपनी समाधानकारक उत्तरे देऊ शकली नव्हती. दरम्यान, माहिती देण्यास टाळाटाळ केल्याच्या पार्श्वभूमीवर १७ डिसेंबर २०२४ रोजी युरोपियन एजन्सीने कंपनीचे 'थर्ड कंट्री ऑपरेटर' प्रमाणपत्र रद्द केले होते. मात्र, हे प्रमाणपत्र एका वर्षानंतर पुन्हा बहाल करण्यात आले होते.

फीड फीडबर्नर 3 Feb 2026 5:10 pm

जागतिक मनुष्यबळ तयार करणे आणि स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार तत्पर - कौशल्य विकास मंत्री श्री मंगलप्रभात लोढा

महाराष्ट्र राज्य कौशल्य स्पर्धेचे मंत्री लोढा यांच्या हस्ते उदघाटनमुंबई : जगातील अत्यावश्यक मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेता दर्जेदार कुशल मनुष्यबळ तयार करणे आणि स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार तत्पर असल्याचे कौशल्य विकास मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांनी म्हटले आहे. राज्यात लागू करण्यात आलेली 'पीएम सेतू योजना' आणि ''मुख्यमंत्री महाफंड स्वयंरोजगार योजना' हा त्याचाच प्रमुख भाग असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मंत्री लोढा यांच्या हस्ते कुर्ला येथील डॉन बॉस्को इन्स्टिटयूट ऑफ टेक्नोलॉजी येथे महाराष्ट्र राज्य कौशल्य स्पर्धेचे (IndiaSkills २०२६ ) उद्घाटन झाले .यावेळी संबोधित करताना मंत्री लोढा यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (NSDC) आणि महाराष्ट्र कौशल्य विकास सोसायटी (MSSDS) यांच्या विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांनी यावेळी सांगितले की,आदरणीय प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी जी यांनी देशातील युवकांसाठी कौशल्य विकासाचा भव्य आणि प्रेरणादायी दृष्टिकोन मांडत तरुणांना नवी दिशा दिली आहे. याच संकल्पनेतून त्यांनी देशभरातील आयटीआयच्या अत्याधुनिकीकरणासाठी ६० हजार कोटींची 'पीएम सेतू योजना' योजना आखली आहे. महाराष्ट्रालाही त्याचा लाभ होणार असून पहिल्या टप्प्यात २४२ कोटी खर्च करून छत्रपती संभाजी नगर, पुणे आणि नागपूरच्या आयटीआयचे आधुनिकीकरण होणार आहे. हाच दृष्टिकोन महाराष्ट्रात माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या गतिमान नेतृत्वाखाली प्रभावीपणे अंमलात आणला जात आहे. पुढच्या काही दिवसात स्वयंरोजगार आणि स्टार्टअप्स करीता 'मुख्यमंत्री महाफंड स्वयंरोजगार योजना' आकाराला आली आहे. या योजनेतून राज्यभरातील ५ लाख स्टार्टअप्स सुरु करणाऱ्या तरुणांना सामायिक ऑनलाईन चाचणीद्वारे निवड करून ५ लाखांची आर्थिक मदत मिळवून दिली जाणार असून त्याच्या व्याजाचा अर्धा भार ही सरकार उचलणार असल्याची माहिती मंत्री लोढा यांनी यावेळी दिली.चीन मधील शांघाय येथे या वर्षी जागतिक कौशल्य स्पर्धा होणार आहेत. त्याकरिता यांत्रिकी (Mechatronics), वीज संच मांडणी (Electrical Installations) इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी, औद्योगिक तंत्रज्ञान, सायबर सेक्युरिटी आणि सामाजिक सुरक्षा तंत्रज्ञान या सहा कौशल्य क्षेत्रांशी संबंधित कौशल्य स्पर्धांचे देशभरात आयोजन करण्यात येत आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीने मुंबईत ३ आणि ४ फेब्रुवारी दरम्यान या स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेत राज्यभरातून शेकडो विद्यार्थ्यांनी सहभागी घेतला असून राज्यस्तरावरील विजेते उमेदवार गांधीनगर, गुजरात येथे होणाऱ्या राष्ट्रीय कौशल्य स्पर्धेत सहभागासाठी पात्र ठरतील. या स्पर्धेतून विजेते उमेदवारांची नावे पुढील आंतरराष्ट्रीय नामांकनासाठी पाठविण्यात येणार आहेत.भारतात २०२९ मध्ये जागतिक कौशल्य स्पर्धेचे आयोजन झाले पाहिजेकौशल्य विकास मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांनी कौशल्य विकासावर भर देताना प्राचीन भारताल्या समृद्धीचे दाखले देऊन उपस्थित विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले की, देशात सृजनशीलता असून कोणत्याही क्षेत्रात भारत यापुढे मागे राहणार नाही. कौशल्य विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांनी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून भविष्य घडवण्याचा प्रयत्न करावा. महाराष्ट्रात पुढच्या वर्षभरात ऑलिम्पिकच्या धर्तीवर कौशल्य स्पर्धांचे आयोजन करून विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला वाव द्यावा. तसेच पुढच्या तीन वर्षात म्हणजेच २०२९ची जागतिक कौशल्य स्पर्धा महाराष्ट्रात होईल यासाठी जोरदार प्रयत्न करावेत.महाराष्ट्र राज्य कौशल्य स्पर्धेच्या उदघाटन समारंभाला महाराष्ट्र कौशल्य विकास सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अमितजी सैनी, सोसायटीचे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी श्री. आनंदजी माळी, डॉन बॉस्को सेंटर फॉर लर्निंगचे संचालक फादर अँटोनी पिंटो आणि डॉन बॉस्को इन्स्टिटयूट ऑफ टेक्नोलॉजीचे प्राचार्य श्री. अमर प्रभू तसेच सीआयआयच्या कौशल्य विकास पॅनलचे संयोजक श्री. बॉबी कुरियाकोस यावेळी उपस्थित होते.

फीड फीडबर्नर 3 Feb 2026 5:10 pm

Eknath Shinde: कोकणात प्रदूषणकारी कंपन्यांना थारा नाही; जनतेच्या आरोग्याशी खेळ होऊ देणार नाही!

लोटे परशुराम एमआयडीसीतील ‘मितेनी’–‘लक्ष्मी ऑरगॅनिक’ कंपनीबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिकाचिपळूण, ता. ३ : कोकणच्या मातीवर, पाण्यावर आणि जनतेच्या श्वासावर घाला घालणाऱ्या प्रदूषणकारी उद्योगांविरोधात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी थेट रणशिंग फुंकलं! चिपळूण तालुक्यातील खेड येथील लोटे परशुराम एमआयडीसीत इटलीतून हद्दपार करण्यात आलेली मितेनी कंपनी अप्रत्यक्षपणे ‘लक्ष्मी ऑरगॅनिक’ या नावाने कार्यरत आहे. “अशा प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांना कोकणात थारा देणार नाही! जनतेच्या आरोग्याशी खेळ होऊ देणार नाही!”असे सांगत त्यांनी अत्यंत आक्रमकपणे आणि स्पष्ट शब्दात आपली भूमिका मांडली. विकासाच्या नावाखाली कोकणचा निसर्ग आणि लोकांचे आयुष्य धोक्यात घालणाऱ्या शक्तींविरोधात सरकार कठोरात कठोर भूमिका घेईल, असा निर्धार त्यांनी यावेळी जनतेसमोर मांडला.जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चिपळूणच्या इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राजकीय सभेऐवजी जणू विकासाचा रणसंग्रामच उघडला. हजारोंच्या जनसमुदायासमोर त्यांनी कार्यकर्त्यांची ताकद, कोकणाशी शिवसेनेचं ऐतिहासिक नातं, महिलांपासून शेतकऱ्यांपर्यंतच्या योजना, केंद्र-राज्य सरकारची “डबल इंजिन” शक्ती आणि रत्नागिरी जिल्ह्यावर भगवा फडकवण्याचा निर्धार एका श्वासात मांडला.सभेच्या सुरुवातीलाच शिंदेंनी उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अकाली निधनावर श्रद्धांजली अर्पण करत वातावरण भावनिक केलं. मात्र त्यानंतर त्यांनी स्पष्ट केलं की ही केवळ उमेदवारांची नाही, तर कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि ही निवडणूक विकासाच्या भवितव्याचा फैसला करणारी आहे.शिंदेंनी ठामपणे सांगितलं की पक्षाचा खरा कणा हा कार्यकर्ता आहे. या पक्षात कोणी मालक नाही, कुणी नोकर नाही, आपण सगळे कार्यकर्ते आहोत आणि संपूर्ण पक्षाचा डोलारा हा कार्यकर्त्यांच्या जीवावर उभा आहे, असा थेट संदेश त्यांनी शिवसेना, भाजप आणि आरपीआयच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिला.कोकणाच्या ऐतिहासिक आणि पवित्र भूमीचा उल्लेख करत त्यांनी शिवसेना आणि कोकणाचं भावनिक नातं उलगडलं. शिवसेनेचा जन्म मुंबईत झाला असला तरी तिची नाळ कोकणात पुरलेली आहे, बाळासाहेबांनी कोकणावर भरभरून प्रेम केलं आणि कोकणानेही शिवसेनेवर तेवढंच प्रेम केलं, असं सांगत त्यांनी नारळी-पोफळी, आंबा, काजू, मत्स्य व्यवसाय आणि निसर्गसंपन्न कोकणाच्या विकासाची गरज अधोरेखित केली.विधानसभेतील महायुतीच्या २३२ आमदारांच्या ऐतिहासिक विजयाचा उल्लेख करत शिंदेंनी, हा विजय माझ्या लाडक्या बहिणींच्या भावाने घडवलेला चमत्कार असल्याचं सांगितलं आणि महिलांच्या मतदानशक्तीचं खुलेपणाने कौतुक केलं.लाडकी बहिण योजनेबाबत बोलताना त्यांनी ठाम शब्दांत सांगितलं की ही योजना कधीही बंद होणार नाही. दरवर्षी ४५ हजार कोटी रुपयांचा खर्च करून अडीच ते पावणेतीन कोटी महिलांना थेट लाभ दिला जात आहे. या योजनेमुळे महिलांना स्वतःच्या नावावर पैसे काढण्याचा अधिकार मिळाला, समाजात सन्मान वाढला आणि आत्मनिर्भरतेचा मार्ग खुला झाला, असं त्यांनी सांगितलं.शेतकऱ्यांसाठी सरकारने राबवलेल्या योजनांचा आढावा घेताना त्यांनी शेतकरी सन्मान योजना, पिक विमा सुलभ योजना, कर्जमाफीसाठी समिती स्थापन आणि अतिवृष्टीसाठी ३२ हजार कोटींच्या पॅकेजचा उल्लेख केला. छोट्या शेतकऱ्यांनाही न्याय दिला जाईल आणि शेतकऱ्यांना सरकार कधीही सोडणार नाही, असा ठाम शब्द त्यांनी दिला.मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री सहायता निधीतून कोट्यवधी रुपयांची मदत दिल्याचा उल्लेख करत त्यांनी सांगितलं की ७० ते ८० हजार रुग्णांना थेट लाभ झाला असून अनेकांचे प्राण वाचले आहेत. माझ्या एका सहीमुळे लोकांचे जीव वाचत असतील तर त्याहून मोठं समाधान काहीच नाही, असं त्यांनी भावनिक शब्दांत सांगितलं.‘शासन आपल्या दारी’ या महत्त्वाकांक्षी योजनेमुळे सरकारी कार्यालयांचे फेरे थांबले असून जवळपास पाच कोटी लोकांपर्यंत सेवा पोहोचल्याचा दावा त्यांनी केला. ही महाराष्ट्राच्या प्रशासनातील मोठी उपलब्धी असल्याचं त्यांनी नमूद केलं.कोकणाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी विकासाचा मास्टरप्लॅन मांडला. मुंबई ते अलिबाग ते सिंधुदुर्ग-गोवा असा ग्रीनफिल्ड रस्ता, कोकण विकास प्राधिकरण, काजू, आंबा आणि मत्स्य व्यवसायाला चालना, ३० लाख कोटींचे उद्योग करार, रस्ते आणि रेल्वेला प्राधान्य, तसेच पर्यटन स्थळांचे सुशोभीकरण या सर्व बाबी त्यांनी सविस्तर मांडल्या.महिलांसाठी बचत गट, प्रशिक्षण केंद्रे आणि ‘लखपती दीदी’ योजनेच्या माध्यमातून आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग मोकळा केला जाईल, असं सांगत त्यांनी महिलांच्या सक्षमीकरणावर भर दिला.मितेनी - लक्ष्मी ऑरगॅनिक या प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांबाबत बोलताना त्यांनी लोकांचे आरोग्य सर्वात महत्त्वाचे आहे आणि जे कारखाने लोकांच्या आरोग्याला घातक ठरतील त्यांना सरकार कधीही पाठीशी घालणार नाही असे स्पष्ट केले.चिपळूण तालुक्यातील भूस्खलनग्रस्त भागांसाठी संरक्षण भिंत उभारण्याचा आणि कळवंडे धरणाच्या दुरुस्तीचा ठाम शब्द देत त्यांनी लोकजीवन धोक्यात येऊ देणार नाही, ही सरकारची जबाबदारी असल्याचं सांगितलं.ज्येष्ठ नागरिकांसाठी एसटीमध्ये सवलत, तीर्थदर्शन योजना, तसेच महिलांसाठी व्यावसायिक केंद्रे आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक आणि आर्थिक बळकटीकरणाचा कार्यक्रम राबवला जात असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.केंद्र सरकारच्या बजेटचं कौतुक करत शिंदेंनी सांगितलं की भारत आर्थिक महासत्तेकडे वाटचाल करत आहे आणि हे बजेट त्या दिशेने टाकलेलं दमदार पाऊल आहे. केंद्र आणि राज्य सरकार सर्वसामान्य माणसाचा विचार करून काम करत असल्याचंही त्यांनी नमूद केलं.राजकारणात शब्दाला किंमत असते, असा ठाम संदेश देत त्यांनी आपली त्रिसूत्री मांडली. उपलब्धता, साधेपणा आणि विश्वासार्हता. शब्द दिला की तो पाळणं हीच माझी ओळख आहे, असं त्यांनी सांगितलं.शेवटी त्यांनी थेट आवाहन केलं की ७ तारखेला धनुष्यबाण आणि कमळाच्या निशाणावर बटण दाबा, सर्व उमेदवारांना विजयी करा आणि रत्नागिरी जिल्ह्यावर महायुतीचा भगवा डौलाने फडकवा. ही केवळ मतदानाची नाही, तर तुमच्या आणि कोकणाच्या भवितव्याची निवडणूक आहे, असा ठाम एल्गार त्यांनी केला.सभागृहात आणि सभोवतालच्या रस्त्यांवर उसळलेला जनसागर, महिलांचा, युवकांचा आणि कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता ही सभा केवळ प्रचारसभा नव्हती, तर चिपळूण आणि कोकणाच्या विकासासाठी दिलेली राजकीय घोषणा ठरली.यावेळी उद्योग मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसेनेचे सर्व उमेदवार आणि चिपळूणमधील सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फीड फीडबर्नर 3 Feb 2026 5:10 pm

Jammu and Kashmir : “काश्मीरबाहेरील विद्यार्थी, व्यापाऱ्यांचा छळ थांबवा”–मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला

काश्मिरी लोकांचा सतत होणारा छळ अस्वीकार्य असून यावर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

दैनिक प्रभात 3 Feb 2026 4:57 pm

Congress MPs Suspended : काँग्रेसचे आठ खासदार निलंबित; नेमकं प्रकरण काय?

Congress MPs Suspended : अशिस्त वर्तनाचा ठपका ठेवत काँग्रेसच्या ८ खासदारांना थेट २ एप्रिलपर्यंत निलंबित करण्यात आले आहे.

दैनिक प्रभात 3 Feb 2026 4:56 pm

Sunetra Pawar : उपमुख्यमंत्रीपदानंतर आता सुनेत्रा पवार सांभाळणार ‘ही’मोठी जबाबदारी

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या आकस्मिक आणि दुर्दैवी निधनाने संपूर्ण राज्य हादरले होते. २८ जानेवारी २०२६ रोजी मुंबईहून बारामतीकडे विमानाने प्रवास करताना झालेल्या भीषण विमान अपघातात त्यांचे निधन झाले.

दैनिक प्रभात 3 Feb 2026 4:52 pm

Rahul Gandhi : लोकसभेत राहुल गांधींनी पुन्हा उचलला चीनचा मुद्दा; केंद्रीय मंत्र्यांचे प्रत्युत्तर, गदारोळानंतर कामकाज स्थगित

Rahul Gandhi: मंगळवारी सभागृहाची कार्यवाही सुरू होताच राहुल गांधी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शन प्रस्तावादरम्यान चीनचा मुद्दा छेडला. ते म्हणाले, लडाखमध्ये चीनचा हस्तक्षेप सातत्याने वाढत आहे.

दैनिक प्रभात 3 Feb 2026 4:36 pm

Rohit Pawar : बेकायदा काम करण्याची हिंमत कशी झाली? सर्वोच्च न्यायालयाने रोहित पवारांना फटकारले

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमधील सदस्यत्वावरून सुरू असलेल्या वादात सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांना कडक शब्दात फटकारले आहे.

दैनिक प्रभात 3 Feb 2026 4:15 pm

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे पुणे आणि बीड जिल्ह्याचे पालकत्व

मुंबई : बारामती येथे विमान दुर्घटनेत अजित पवार यांचे निधन झाल्यानंतर उपमुख्यमंत्री पदाची धुरा त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या खांद्यावर देण्यात आली. त्यानंतर आता पुणे आणि बीड या दोन्ही जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. याबाबतचा अधिकृत आदेश मंगळवारी काढण्यात आला.अजित पवार यांच्या पश्चात सुनेत्रा पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्री म्हणून राज्य उत्पादन शुल्क, अल्पसंख्यांक आणि औकाफ, तसेच क्रीडा युवक कल्याण ही खाती देण्यात आली. दरम्यान, अजित पवार हे पुणे आणि बीड या दोन्ही जिल्ह्यांचे पालकमंत्री होते. त्यामुळे त्यांच्या निधनानंतर या जिल्ह्यांचे पालकत्व कोणाकडे जाणार, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती. अपेक्षेप्रमाणे पुणे आणि बीड या दोन्ही जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्यात आले आहे. यामुळे अजित पवार यांच्याकडे असलेल्या जबाबदाऱ्या पुढे नेण्याची जबाबदारी आता सुनेत्रा पवार यांच्यावर आहे.बीड जिल्ह्यात घडलेल्या वादग्रस्त घटनांनंतर अजित पवार यांनी स्वतःकडे या जिल्ह्याचे पालकत्व घेतले होते. त्यानंतर त्यांनी बीड जिल्ह्यातील दौरे वाढवले होते. बीडसह पुणे जिल्ह्यातील गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न सुरू केले होते. तसेच बीड जिल्ह्याला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अजित पवार यांनी ठोस पावले उचलली होती.

फीड फीडबर्नर 3 Feb 2026 4:10 pm

'मिर्झापूर: द फिल्म'च्या अखेरच्या शूटिंगनंतर अली फजल भावूक, शेअर केला खास संदेश

मुंबई: बहुप्रतीक्षित 'मिर्झापूर: द फिल्म'चे अखेरचे शूटिंग शेड्यूल पूर्ण झाले असून, भारतातील सर्वात लोकप्रिय क्राइम फ्रँचायझींपैकी एका प्रवासातील हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. कल्ट-फेव्हरेट वेब सिरीजवर आधारित ही फिल्म 2026 मध्ये मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. यामध्ये मिर्झापूरच्या धोकादायक जगाला आणखी भव्य स्वरूपात दाखवण्यात येणार आहे.शूटिंग पूर्ण होताच, गुड्डू पंडित अर्थात गुड्डू भैय्या ही आयकॉनिक भूमिका साकारणारे अभिनेता अली फजल भावूक झाले. त्यांनी सेटवरील काही पडद्यामागील क्षण शेअर करत इंस्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट केली. या दीर्घ आणि तीव्र प्रवासाबद्दल लिहिताना त्यांनी म्हटले, हा प्रवास खूप लांबचा आहे. थोडं प्रेम आणि थोडी नफरत यांच्यातला हा एक प्रवास आहे. 'मिर्झापूर: द फिल्म'चं अंतिम शेड्यूल पूर्ण झालं आहे.अली फजल यांनी संपूर्ण कास्ट आणि क्रूचे त्यांच्या मेहनत आणि समर्पणाबद्दल आभार मानले. त्यांनी या चित्रपटाला एक मास्टरपीस असे संबोधले. ते पुढे म्हणाले, या सगळ्या प्रवासात जेव्हा कॅमेरा आमच्यावर होता, तेव्हा आम्ही आमचं सर्वोत्तम दिलं. मला अभिमानाने सांगावं वाटतं की संपूर्ण मिर्झापूर टीम आणि कलाकारांनी आम्ही जे उत्तम करतो तेच प्रामाणिकपणे केलं.दमदार पात्रं आणि रॉ स्टोरीटेलिंगमुळे मिर्झापूरने गेल्या काही वर्षांत मोठी फॅन फॉलोइंग तयार केली आहे. आता ही कथा मोठ्या पडद्यावर येत असल्याने प्रेक्षकांच्या अपेक्षा आणखी वाढल्या आहेत. ओरमॅक्स सिनेमॅटिक्सच्या सर्वाधिक प्रतिक्षित हिंदी चित्रपटांच्या यादीत 'मिर्झापूर: द फिल्म'ने आपलं स्थान मिळवलं आहे. विशेषतः आयकॉनिक पात्र मुन्ना भैय्याच्या पुनरागमनासाठी चाहते मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत आहेत.पुनीत कृष्णा यांनी निर्मित केलेला आणि गुरमीत सिंग दिग्दर्शित 'मिर्झापूर: द फिल्म' 2026 मध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात कालीन भैय्या (पंकज त्रिपाठी), गुड्डू पंडित (अली फजल), मुन्ना त्रिपाठी (दिव्येंदु) यांच्यासह अभिषेक बॅनर्जीदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर आठ आठवड्यांनी हा चित्रपट भारतासह 240 हून अधिक देश आणि प्रदेशांमध्ये प्राइम मेंबर्ससाठी स्ट्रीमिंगवर उपलब्ध होणार आहे.

फीड फीडबर्नर 3 Feb 2026 4:10 pm

Ladki Bahin Yojana : १५०० चे २१०० रुपये होणार अन् नावही बदलणार? शिंदेंच्या घोषणेनंतर मिटकरींचा नवा ‘मास्टरस्ट्रोक’

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाने ओळखली जावी, यासाठी या योजनेला अजित पवार यांचे नाव देण्यात यावे

दैनिक प्रभात 3 Feb 2026 4:09 pm

Budget 2026: मानसिक आरोग्याकडे विशेष लक्ष; ‘निमहांस-2’ची स्थापना होणार, का आहे ही गरज महत्त्वाची?

Budget 2026: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 1 फेब्रुवारी 2026 रोजी सलग नवव्यांदा देशाचा अर्थसंकल्प सादर केला. या बजेटमध्ये आरोग्य सुविधांना बळकटी देण्यासाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या असून, मानसिक आरोग्य सुधारणा हा यावेळचा विशेष फोकस ठरला आहे.

दैनिक प्रभात 3 Feb 2026 3:43 pm

Manjusha Nagpure : पुण्याचे महापौरपद सिंहगड रोडकडे! मंजूषा नागपुरे यांची बिनविरोध निवड; भाजप-राष्ट्रवादीच्या 'मैत्री'मुळे निवडणूक केवळ औपचारिकता

पुणे : पुणे महापालिकेच्या (PMC) नव्या महापौर म्हणून भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका मंजूषा नागपुरे यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, यंदा पुण्याचे महापौरपद भूषवण्याचा मान पहिल्यांदाच सिंहगड रोड परिसराला मिळाला आहे. प्रभाग क्रमांक ३५ (सनसिटी माणिक बाग) येथून सलग तिसऱ्यांदा प्रतिनिधित्व करणाऱ्या नागपुरे या यंदाच्या निवडणुकीतही बिनविरोध निवडून आल्या होत्या. पुणे महापालिकेची ही निवडणूक अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात झालेल्या महत्त्वपूर्ण चर्चेनंतर, महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक बिनविरोध करण्याचे ठरले होते. या निर्णयाचा मान राखत राष्ट्रवादी काँग्रेसने आपला उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे मंजूषा नागपुरे यांचा मार्ग सुकर झाला. मंजूषा नागपुरे यांचा प्रदीर्घ अनुभव आणि सलग तीन वेळा मिळालेला विजय लक्षात घेता पक्षाने त्यांच्यावर ही मोठी जबाबदारी सोपवली आहे. आता केवळ निवडणूक प्रक्रियेची औपचारिकता बाकी असून, लवकरच त्या अधिकृतपणे पुण्याच्या प्रथम नागरिक म्हणून पदभार स्वीकारतील.पुण्याच्या महापौरपदी मंजूषा नागपुरे यांची घोषणामहापौरपदासाठी भाजपच्या मंजूषा नागपुरे तर उपमहापौरपदासाठी आरपीआय (आठवले गट) चे परशुराम वाडेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. मात्र, या निवडीनंतर कोणताही जल्लोष न करण्याचा एक महत्त्वपूर्ण आणि संवेदनशील निर्णय भाजपने घेतला आहे. राज्याचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या निधनामुळे पुण्यात सध्या शोककळा आहे. या पार्श्वभूमीवर, निवडीचा आनंद साजरा करताना कुठेही फटाके वाजवू नका किंवा गुलाल उडवू नका, अशा कडक सूचना भाजपच्या सर्व नगरसेवकांना देण्यात आल्या आहेत. इतकेच नव्हे तर शहरात कुठेही विजयाचे बॅनर्स लावू नयेत, असेही पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सभागृह नेते गणेश बिडकर यांनी यासंदर्भात सर्व नगरसेवकांना मार्गदर्शन करत, परिस्थितीचे गांभीर्य राखण्याचे आवाहन केले आहे. राजकीय प्रक्रिया म्हणून ही निवड केली जात असली तरी, शहरात असलेल्या दु:खाच्या वातावरणामुळे अत्यंत साधेपणाने हा कार्यक्रम पार पडणार आहे.पुणे महापालिकेत 'महिला राज'भाजपने या निवडणुकीत महिला सक्षमीकरणावर भर देत तब्बल ११९ महिलांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. यापैकी ५० पेक्षा अधिक महिला नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत, जे पुणे महापालिकेच्या इतिहासातील एक मोठे यश मानले जात आहे. पुण्याच्या प्रथम नागरिक होण्यासाठी अनेक अनुभवी नावांची चर्चा सुरू होती. यामध्ये प्रामुख्याने रंजना टिळेकर, वर्षा तापकीर आणि मानसी देशपांडे यांची नावे आघाडीवर होती. शेवटी पक्षाने मंजूषा नागपुरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले असले तरी, या विजयाने पुणे महापालिकेत खऱ्या अर्थाने 'महिला राज' आल्याचे चित्र दिसत आहे.अजित दादांनी दिलेला शब्द राष्ट्रवादी पाळणारपुणे महापालिकेची निवडणूक मैत्रीपूर्ण लढली गेली.देवेंद्र फडणवीस-अजित पवार यांच्यात झालेल्या चर्चेनुसार महापौर-उपमहापौर पदाची निवडणूक बिनविरोध होईल असे ठरले होते. त्यामुळे या निवडणुकीत उमेदवार दिला जाणार नाही, अशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे.पुणे महापालिका निकाल एकूण जागा १६५ भाजप- ११९ शिवसेना -० ऊबाठा-१ राष्ट्रवादी शरद पवार -३ राष्ट्रवादी अजित पवार -२७ काँग्रेस -१५ एमआयएम-० अपक्ष-० इतर -०

फीड फीडबर्नर 3 Feb 2026 3:30 pm

नवजात बालिकेला कचऱ्याच्या पिशवीत भरलं आणि... खारमधील हृदयपिळवणारा प्रकार

मुंबई : खार पश्चिम येथे नवजात बालिकेला कचऱ्याच्या पिशवीत भरून इमारतीतील रिफ्युजी रूममध्ये फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. निर्भया पथकामुळे बालिकेचे प्राण थोडक्यात वाचले आहे, तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी पोलिसांनी छत्तीसगडची रहिवासी असलेल्या २० वर्षीय तरुणीवर गुन्हा दाखल केला आहे.ओम निर्माण इमारतीच्या १४ व १५ मजल्याच्या मधील रिफ्युजी रुममध्ये कचऱ्याच्या पिशवीत नवजात बालिका दिसल्यामुळे नागरिकांनी लगेच खार पोलीस ठाण्यात कळवलं. पोलिसांना ही घटना कळताच निर्भया पथक तातडीने घटनास्थळी हजर झाले. निर्भया पथकाच्या तत्परतेमुळे बालिकेचे थोडक्यात प्राण जाता जाता वाचले.वैद्यकीय उपचारासाठी तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या बालिकेवर भाभा रुग्णालय उपचार सुरु आहे.अविवाहित म्हणून पोटच्या पोरीचा त्यागपोलिसांनी केलेल्या चौकशीत अक्षरशः धक्कादायक माहिती समोर आली आहे. ओम निर्माण इमारतीतील १५ व्या मजल्यावर एका कुटूंबाकडे घरकाम करणाऱ्या तरुणीने एका गोंडस मुलीला जन्म दिला. परंतु, ती अविवाहित असल्यामुळे एकटी मुलीचं संगोपन कस करणार हा प्रश्न निर्माण झाल्यामुळे तिने त्या मुलीला तिकडेच सोडण्याचा निर्णय घेतला. शेवटी तिने त्या बालिकेला कचऱ्याच्या पिशवीत ठेवून रिफ्युजी रूममध्ये टाकल्याची कबुली पोलिसांना दिली. प्रस्तुतीनंतर या तरुणीची प्रकृती खालावल्याने तिलाही भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

फीड फीडबर्नर 3 Feb 2026 3:30 pm

देशात पुन्हा परतणार पाऊस; 'या'९ राज्यात वादळी वाऱ्यासह दमदार पावसाची हजेरी

नवी दिल्ली : देशातील बहुतांश राज्यात फेब्रुवारीत एरवी पाऊस पडत नाही. पण बदलत्या हवामानाचा परिणाम नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर होत आहे, भारतातील ऋतुचक्रही पूर्णपणे कोलमडले आहे. आता भारतीय हवामान विभागाने देशातील काही राज्यांसाठी पुन्हा एकदा पावसाचा इशारा जारी केला आहे.हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, उत्तर भारतासह मध्य आणि पश्चिम भारतातील एकूण नऊ राज्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर प्रदेश, हरियाणा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, जम्मू-काश्मीर आणि लडाख या भागांमध्ये पुढील काही दिवस हवामान बिघडण्याचा अंदाज आहे.विशेषतः हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये ३ फेब्रुवारीपर्यंत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असून, काही ठिकाणी वाऱ्यांचा वेग ताशी ४० ते ५० किलोमीटरपर्यंत जाण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. डोंगराळ भागांमध्ये याचा परिणाम अधिक जाणवण्याची शक्यता आहे.दरम्यान, अरबी समुद्र आणि लगतच्या किनारपट्टी भागांमध्येही हवामानात बदल होण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे मच्छीमारांनी पुढील काही दिवस समुद्रात जाणे टाळावे, अशा सूचना संबंधित यंत्रणांकडून देण्यात आल्या आहेत. हवामानातील या बदलांमुळे शेती, वाहतूक आणि दैनंदिन जीवनावर परिणाम होण्याची शक्यता असून, नागरिकांनी अधिकृत हवामान अंदाजांवर लक्ष ठेवून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

फीड फीडबर्नर 3 Feb 2026 3:30 pm

सलमान खानचा 'तेरे नाम'२२ वर्षांनी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला; जाणून घ्या कधी होणार प्रदर्शित?

Tere Nam Re-release Date : सलमान खानचा 'तेरे नाम' हा चित्रपट परत येत आहे आणि सलमान खानचे चाहते या चित्रपटाचा अनुभव घेण्यासाठी उत्सुकतेने तयार आहेत. हा चित्रपट पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा रोमँटिक चित्रपट २७ फेब्रुवारी २०२६ रोजी मोठ्या पडद्यावर परतणार आहे. २००३ मध्ये प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटाला २३ वर्षे पूर्ण होत आहेत.यापूर्वी हा चित्रपट १५ ऑगस्ट २००३ रोजी प्रदर्शित झाला होता.हा चित्रपट जेव्हा पहिल्यांना चित्रपटगृहात प्रदर्शित झालेला तेव्हा त्याच्या कथेनी आणि सलमान खानच्या भूमिकेने आणि त्यामध्ये विशेषतः सलमान खानच्या हेअरस्टाईलने प्रेक्षकवर्गाची मने जिंकली होती.'तेरे नाम' या चित्रपटामध्ये सलमान खान आणि भूमिका चावला यांची मुख्य भूमिका होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन सतीश कौशिक यांनी केले होते. यापूर्वी जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झालेला तेव्हा त्यांनी जवळजवळ १४ कोटींची कमाई केली होती. तर जगभरात त्याचे कलेक्शन हे २४.५४ कोटी पर्यंत पोहचलेले. त्या वर्षी या चित्रपटाला तब्बल २४ नॉमिनेशन मिळाली होती. जुन्या हिंदी आवडत्या चित्रपटगृहांमध्ये परतण्याच्या अलिकडच्या ट्रेंडनंतर हे पुनरागमन झाले आहे, कारण प्रेक्षक वर्षानुवर्षे प्रेमात पडलेल्या कथांसाठी येत आहेत. चाहत्यांसाठी, गर्दीच्या सिनेमागृहात राधेचा वेदनादायक प्रणय पाहण्याची ही एक दुर्मिळ संधी आहे, जिथे संगीत आणि भावना मोठ्या पडद्यावरच पाहता येतील.बॉक्स ऑफिसचा इतिहास आणि सिक्वेल योजनासुमारे १२ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवलेल्या 'तेरे नाम'ने त्याच्या मूळ प्रदर्शनादरम्यान जगभरात २४.५४ कोटी रुपये कमावले. चित्रपट थिएटरमध्ये पुनरागमन करताना हा चित्रपट कसा कामगिरी करतो याकडे आता व्यापार विश्लेषकांचे लक्ष लागले आहे.सलमान खानने यापूर्वी 'तेरे नाम २'च्या शक्यतेबद्दल माध्यमांशी संवाद साधला होता. त्याने खुलासा केला होता की सतीश कौशिक यांच्याशी चर्चा सुरू आहे; परंतु, दिग्दर्शकाच्या अकाली निधनानंतर त्याचा सिक्वेल कधीच पुढे सरकला नाही.

फीड फीडबर्नर 3 Feb 2026 3:30 pm

धक्कादायक! टायगर पॉईंटवर मुंबईच्या मुलीने केली आत्महत्या; खरं कारण आलं समोर

पुणे : सोलो ट्रेकिंगसाठी आलेल्या विद्यार्थिनीचा १ फेब्रुवारी सायंकाळी ५ च्या सुमारास मृतदेह आढळून आला. लोणावळ्यातील प्रसिद्ध टायगर पॉईंट या परिसरात आढळून आलेल्या मुंबईतील तरुणीच्या मृत्यू प्रकरणाने राज्यभरात चर्चेला उधाण आले होते. ४०० फूट खोल दरीत सापडलेल्या मृतदेहाच्या घटनेचा सखोल तपास केल्यानंतर पोलिसांनी हा मृत्यू अपघाती नसून आत्महत्येचा असण्याची प्राथमिक शक्यता व्यक्त केली आहे.मृत तरुणीचे नाव श्रेया नरेंद्र पटी (वय १९) असे असून ती मुंबईतील रहिवासी होती. श्रेया ही नामांकित महाविद्यालयातून कायद्याचे शिक्षण घेत होती. श्रेयाला फिरण्याची आवड असल्याने ती लोणावळ्यात ट्रेकिंगसाठी गेली होती. सुरुवातीला ही घटना अपघात किंवा घातपात असल्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र घटनास्थळाची पाहणी, पंचनामा आणि इतर प्राथमिक पुराव्यांच्या आधारे लोणावळा ग्रामीण पोलिसांनी तपासाची दिशा बदलली.पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, श्रेया काही दिवसांपासून मानसिक तणावात होती. कौटुंबिक पातळीवरील अंतर्गत मतभेद आणि वैयक्तिक समस्यांमुळे तिची मानसिक स्थिती अस्थिर झाल्याचे तपासात आढळले. फिरण्याची आवड असल्याने तिने घरी लोणावळ्यात ट्रेकिंगला जाते असे सांगून टायगर पॉइंटवर आत्महत्या केली.घटनेनंतर शिवदुर्ग रेस्क्यू पथक, डॉग स्क्वॉड आणि ड्रोनच्या मदतीने शोधमोहीम राबवण्यात आली. सुमारे ३९० फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढण्यात आला, घटनास्थळाच्या आसपास तिच्या वैयक्तिक बॅगेत ओळखपत्र, मोबाईल आणि लॅपटॉप पोलिसांना आढळले असून त्याआधारे तिच्या घरच्यांशी पोलिसांनी संपर्क साधला. सायबर तज्ज्ञांच्या मदतीने मोबाईल आमी लॅपटॉप उपकरणे अनलॉक करण्याची प्रक्रिया सुरू असून, त्यातून तिच्या शेवटच्या हालचाली आणि संवादाबाबत अधिक माहिती मिळण्याची शक्यता आहे.लोणावळा ग्रामीण पोलीस निरीक्षक यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळावरील पुरावे आणि परिस्थिती पाहता आत्महत्येचा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आला आहे. मात्र, मृत्यूमागील सर्व पुरावे तपासल्यानंतरच अंतिम अहवाल सादर केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

फीड फीडबर्नर 3 Feb 2026 3:10 pm

Mumbai-Pune journey: मुंबई-पुणे प्रवास आता फक्त ४८ मिनिटांत - रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी १ फेब्रुवारी २०२६ रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी वाढवण बंदरासाठी थेट जलद रेल्वे जोडणीची घोषणा केली. त्यानंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोमवारी २ फेब्रुवारी रेल्वे प्रकल्पांसाठीची अर्थसंकल्पीय तरतुदींची माहिती दिली. यावेळी त्यांनी राज्यात १ लाख ७० हजार कोटी रुपयांचे प्रकल्पांचे काम सुरू असल्याचे सांगून आता लवकरच मुंबई-पुणे प्रवास फक्त ४८ मिनिटांमध्ये करता येईल असे सांगितले.काय म्हणाले रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव ?राज्यात १ लाख ७० हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे काम सुरू आहे. यात दुहेरीकरण, चौपदरीकरण अशा मार्गांचा समावेश आहे. राज्यातील दुसरी बुलेट ट्रेन मुंबई-पुणे-हैदराबाद मार्गावर धावणार आहे. याचबरोबर वाढवण बंदराला नव्या समर्पित मालवाहतुकीची जोडणी देण्यात येणार आहे. यामुळे प्रवासी आणि मालवाहतुकीला गती मिळणार आहे, असे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले.#ViksitBharatBudget:7 High-Speed Rail Corridors as growth connectors between cities ⬇️ Mumbai to Pune Pune to Hyderabad Hyderabad to Bengaluru Hyderabad to Chennai Chennai to Bengaluru Delhi to Varanasi Varanasi to Siliguri pic.twitter.com/XY5PEVge1y— Ashwini Vaishnaw (@AshwiniVaishnaw) February 1, 2026१५ डब्यांच्या अधिक लोकल फेऱ्या:रेल्वेमंत्र्यांनी पुढे सांगितले की; कोकण रेल्वेच्या दुहेरीकरणात कवच प्रणाली कार्यान्वित करण्याची प्रक्रिया रेल्वे मंत्रालयाने सुरू केली आहे. तसेच मुंबई उपनगरी रेल्वेवरील गाड्यांची प्रवासी क्षमता वाढवण्यासाठी १५ डब्यांच्या अधिक लोकल फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. त्याचबरोबर लोकलची प्रवासी संख्या लक्षात घेता मेट्रोहून अधिक उन्नत आराखड्यात २३८ वातानुकूलित लोकलची बांधणी करण्यात येणार आहे.मुंबई-पुणे ४८ मिनिटांत :अर्थसंकल्पात चार हजार किलोमीटर लांबीचा बुलेट ट्रेन विस्ताराचा दुसरा टप्पा जाहीर करण्यात आला. मुंबई-पुणे-हैदराबादसह सात मार्गांचा यात समावेश करण्यात आला आहे. मुंबई-हैदराबाद मार्गावरून राज्यातील दुसरी बुलेट ट्रेन धावणार आहे. यामुळे मुंबई-पुणे अंतर केवळ ४८ मिनिटांत तर पुणे-हैदराबाद हे अंतर एक तास ५५ मिनिटांत पूर्ण करणे शक्य होणार आहे. याचा थेट फायदा मुंबई-पुणेदरम्यान ये-जा करणाऱ्या प्रवाशांना होईल. बुलेट ट्रेनमुळे दोन्ही महत्त्वाच्या शहरांमधील प्रवास अंतर कमी होईल. त्याचबरोबर बुलेट मार्गालगत कंपन्या, शहरीकरण आणि आयटी हब उभारणीमुळे रोजगारातही वाढ होणार असल्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले आहे.

फीड फीडबर्नर 3 Feb 2026 3:10 pm

India US Trade Deal: ‘शेती अन् दुग्धजन्य क्षेत्राशी कोणतीही तडजोड नाही…’ ; अमेरिकेसोबतच्या व्यापार करारावर भारत आपल्या भूमिकेवर ठाम

India US Trade Deal: भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करारावर सरकारने आपली भूमिका पूर्णपणे स्पष्ट केली आहे. उच्चस्तरीय सूत्रांनुसार, या करारात कृषी आणि दुग्ध क्षेत्रांचा समावेश केला जाणार नाही.

दैनिक प्रभात 3 Feb 2026 3:02 pm

Riteish And Genelia Deshmukh 14th Anniversary : “…हा वनवास कधीच संपू नये”; रितेश-जिनिलियाचा मजेशीर अंदाज

Riteish And Genelia Deshmukh 14th Anniversary : रितेश देशमुखने जिनिलियाला 14 व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिल्या खास शुभेच्छा

दैनिक प्रभात 3 Feb 2026 2:50 pm

Medha Rana : बॅार्डर 2 मधील अभिनेत्रीने शेअर केला अनुभव; म्हणाली “….त्यासाठी खूप संयम”

Medha Rana : बॅार्डर २ मध्ये मेधा राणा हिला मिळालेल्या भूमिकेला पुरेपूर न्याय तिने दिला असून, चित्रपटाविषयीचा तिने आपला अनुभव शेअर केला.

दैनिक प्रभात 3 Feb 2026 2:43 pm

NDA Meeting: भारत-अमेरिका व्यापार करारानंतर NDA च्या बैठकीत आनंदोत्सव साजरा ; पंतप्रधानांनी खासदारांना दिला विशेष सल्ला

NDA Meeting: दिल्लीत आज झालेल्या एनडीए संसदीय पक्षाच्या बैठकीत व्यापार करार आणि अर्थसंकल्पाचे कौतुक करण्यापुरते मर्यादित नव्हते.

दैनिक प्रभात 3 Feb 2026 2:41 pm

मी राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष होणार नाही - प्रफुल्ल पटेल

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या सुरू असलेल्या घडामोडींवरून विरोधकांकडून जाणीवपूर्वक चुकीचे नेरेटिव्ह पसरवले जात असल्याचा आरोप करत प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट शब्दांत आपली भूमिका मांडली. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांचा घाईघाईत शपथविधी करण्यात आला आणि त्यासाठी आपण व सुनील तटकरे कारणीभूत असल्याचे आरोप तसेच आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार असल्याच्या चर्चांवर पटेल यांनी सविस्तर भाष्य केले.प्रफुल्ल पटेल म्हणाले की, मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या शर्यतीत नाही आणि असा कोणताही विचार माझ्या मनात नाही. अध्यक्षपदाचा निर्णय माझ्याशिवाय होईल, हे मी स्पष्टपणे सांगतो. आज आमच्यासमोर विलीनीकरणाचा विषय महत्त्वाचा नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता कोण असेल, हा पूर्णपणे आमच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे.सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत बोलताना पटेल यांनी सांगितले की, सर्व भावना समजून घेऊनच हा निर्णय घेण्यात आला. पवार कुटुंबात तीन दिवसांचा दुखवटा असल्याची माहिती स्वतः सुनेत्रा पवार यांनी दिली होती. अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबाबाबत आमच्या मनात नेहमीच आदराची भावना आहे.आमच्याबाबत अनेकांकडून उलटसुलट वक्तव्य केली जात असून, राज ठाकरे किंवा अन्य कोणाचा आमच्या पक्षाशी काय संबंध, असा सवालही पटेल यांनी उपस्थित केला. काहीजण जाणीवपूर्वक गैरसमज पसरवत असल्याचा आरोप त्यांनी केला.विलीनीकरण होणार का?अजित पवार राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या बाजूने होते, त्यादृष्टीने बैठकाही झाल्या, असा दावा शरद पवार गटाकडून केला जात आहे. याविषयी पटेल म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतविभाजन टाळण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढाव्यात, असा निर्णय अजित पवार यांनी घेतला होता आणि त्याबाबत आमच्याशी चर्चा झाली होती. मात्र ही चर्चा केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपुरतीच मर्यादित असल्याचे अजित पवार यांनी अनेक मुलाखतींमध्ये स्पष्ट केले आहे, असेही पटेल यांनी नमूद केले.

फीड फीडबर्नर 3 Feb 2026 2:30 pm

Lok Sabha adjourned: राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरून आजही सभागृहात गोंधळ; लोकसभा अध्यक्षांची भाजप-काँग्रेस खासदारांसोबत बैठक

Lok Sabha adjourned: भारत-अमेरिका व्यापार करारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरकारला लक्ष्य करण्याचा प्रयत्न करणाऱ्या काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांच्या सदस्यांनी मंगळवारी लोकसभेत गोंधळ घातला.

दैनिक प्रभात 3 Feb 2026 1:57 pm

Mrunal Thakur: ‘प्रेम माणसाला अधिक चांगलं बनवतं’ – धनुषसोबतच्या चर्चांदरम्यान मृणाल ठाकुरने प्रेमाबद्दल मोकळेपणाने व्यक्त केलं मत

Mrunal Thakur: अभिनेत्री मृणाल ठाकुर सध्या तिच्या आगामी चित्रपट ‘दो दीवाने सहर में’ आणि नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘भीगी भीगी’ या गाण्यामुळे चर्चेत आहे. या दरम्यान काही काळापासून तिचं नाव अभिनेता धनुष याच्यासोबत जोडलं जात आहे. लग्नाच्या अफवाही पसरल्या होत्या, मात्र त्या नंतर खोट्या ठरल्या.

दैनिक प्रभात 3 Feb 2026 1:44 pm

Ajit Pawar: “अजितदादांचा दशक्रिया विधी होणार नाही”, त्यामागचं कारण काय?

Ajit Pawar : अस्थि विसर्जनाच्या वेळीच आवश्यक ते सर्व विधी पूर्ण

दैनिक प्रभात 3 Feb 2026 1:42 pm

National President : सुनेत्रा पवारांंकडेच नेतृत्व जाणार? लवकरच राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या नावाची घोषणा होणार

National President : सुनेत्रा पवार यांच्याचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नाव पुढे केले जात असून, लवकरच याबाबत निर्णय होणार आहे.

दैनिक प्रभात 3 Feb 2026 1:40 pm

India-US Trade Deal: “दागिने, कपडे, गाड्या…” ; भारत-अमेरिका व्यापार करारामुळे काय-काय स्वस्त होणार? वाचा

India-US Trade Deal: भारत आणि अमेरिका यांच्यात झालेल्या व्यापार कराराला भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी एक ऐतिहासिक वळण मानले जात आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील फोन संभाषणानंतर हा मोठा करार जाहीर करण्यात आला.

दैनिक प्रभात 3 Feb 2026 1:36 pm

राष्ट्रवादीत घडामोडींना वेग; शरद पवारांचा दिल्ली दौरा अचानक रद्द, पुण्याला रवाना

मुंबई : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या हालचालींच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आपला दिल्ली दौरा अचानक रद्द केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना वेग आला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी दिल्लीला जाण्याचे नियोजन असतानाच त्यांनी हा निर्णय घेतला असून, ते मुंबईहून पुण्याकडे रवाना झाले आहेत.शरद पवार सोमवारी रात्री मुंबईत होते. दिल्ली दौरा रद्द केल्यानंतर त्यांचा आजचा मुक्काम पुण्यात राहणार असून, त्यानंतर ते बारामतीला जाण्याची शक्यता आहे. बारामतीत पुढील दोन ते तीन दिवस त्यांचा मुक्काम असण्याची माहिती आहे. दिल्ली दौरा अचानक का रद्द करण्यात आला, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या नियुक्तीबाबत चर्चा सुरू असताना हा दौरा रद्द झाल्याने अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे.दरम्यान, राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा कारभार हाती घेतला. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतण्यासाठी त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. सुनेत्रा पवार यांच्या राज्यसभेचा कार्यकाळ आणखी दोन वर्षे शिल्लक होता, त्यांची मुदत ४ जुलै २०२८ रोजी संपणार होती. मात्र, ही जागा राखून ठेवण्याऐवजी सहा वर्षांची पूर्ण मुदत असलेल्या राज्यसभेच्या जागेवर पार्थ पवार यांना पाठवले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही जागा लवकरच भरली जाण्याची शक्यता असून, त्यासाठी पार्थ पवार यांनी मोर्चेबांधणी सुरू केल्याची माहिती आहे.अजित पवार यांच्या निधनानंतर पार्थ पवार आणि जय पवार हे दोघेही राजकारणात अधिक सक्रिय होतील, असा अंदाज वर्तवला जात होता. यापूर्वी बारामतीतील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात या दोघांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. आता अजित पवार यांच्या निधनामुळे त्यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी आली आहे. एकीकडे सुनेत्रा पवार राज्याrashtrawadi त उपमुख्यमंत्री म्हणून सूत्रे सांभाळतील, तर पार्थ पवार दिल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतिनिधित्व करतील, अशी शक्यता व्यक्त होत आहे. या संदर्भात पक्षाच्या बैठकीत पार्थ पवार यांनी वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केल्याची माहिती आहे. पार्थ यांनी यापूर्वी २०१९ मध्ये मावळ मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र, त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.

फीड फीडबर्नर 3 Feb 2026 1:30 pm

‘पेड्डी’चे निर्माते वेंकट सतीश किलारू आणि दिग्दर्शक बुच्ची बाबू सना यांनी राम चरणचे जुळ्या बाळांच्या आनंदवार्तेवर केले अभिनंदन

राम चरणच्या आगामी पेड्डी या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. अशातच त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. मेगा पॉवर स्टार राम चरण आणि त्याची पत्नी उपासना कामिनेनी कोनिडेला हे जुळ्या बाळांचे पालक झाले आहेत. या आनंदाच्या क्षणाचा उत्साह पेड्डी चित्रपटाच्या संपूर्ण टीममध्येही पाहायला मिळत आहे.या खास प्रसंगी चित्रपटाचे निर्माते वेंकट सतीश किलारू आणि दिग्दर्शक बुच्ची बाबू सना यांनी राम चरणचे मनापासून अभिनंदन केले. सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या एका फोटोमध्ये दोघेही राम चरणला फुलांचा गुलदस्ता देताना दिसत आहेत. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे— “#Peddi चे निर्माते वेंकट सतीश किलारू आणि दिग्दर्शक बुच्ची बाबू सना यांनी मेगा पॉवर स्टार राम चरणला जुळ्या बाळांच्या आगमनानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या. कुटुंबाला भरभरून आनंद आणि प्रेमाच्या शुभेच्छा.”https://www.instagram.com/p/DUN7Ah8E8sV/?igsh=MW5qeHQxeWk5NG03NA==उल्लेखनीय म्हणजे पेड्डी हा राम चरणच्या बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. चित्रपटाच्या घोषणेनंतरपासूनच प्रेक्षकांमध्ये याबाबत मोठी उत्सुकता आहे. चित्रपटातील पहिले गाणे ‘चिकिरी चिकिरी’ रिलीज होताच ते सुपरहिट ठरले असून, त्यामुळे चित्रपटाची लोकप्रियता आणखी वाढली आहे.बुच्ची बाबू सना यांच्या लेखन व दिग्दर्शनाखाली तयार होत असलेल्या पेड्डी मध्ये राम चरण मुख्य भूमिकेत झळकणार आहे. त्याच्यासोबत शिवराजकुमार, जान्हवी कपूर, दिव्येंदू शर्मा आणि जगपती बाबू यांच्याही महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत. वेंकट सतीश किलारू निर्मित हा चित्रपट 27 मार्च 2026 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

फीड फीडबर्नर 3 Feb 2026 1:30 pm

IND vs PAK : पाकिस्तान नेहमीप्रमाणे यू-टर्नघेईल; सुनील गावस्कर यांची पाकिस्तानवर टीका

मुंबई: टी-२० विश्वचषकापूर्वी पाकिस्तान सरकारने भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. १५ फेब्रुवारी रोजी कोलंबो येथे होणाऱ्या गट फेरीच्या सामन्यात पाकिस्तानचा भारताशी सामना होणार होता. मात्र आयसीसीने म्हणजेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने बांगलादेशला स्पर्धेतून बाहेर काढल्यानंतर पाकिस्तान सरकारने हा निर्णय घेतला आहे.आयसीसीचा पाकिस्तानला थेट इशारा:पीसीबीने स्पष्ट केलं की, पाकिस्तान संघ टी-२० वर्ल्ड कपमध्ये सहभागी होईल, मात्र १५ फेब्रुवारी रोजी भारताविरुद्ध होणारा सामना खेळणार नाही. या निर्णयामुळे संपूर्ण स्पर्धेच्या नियोजनावर पाणी फेरलं असून, आयसीसीने यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आयसीसीने पीसीबीला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील,असा थेट इशाराही दिला आहे.भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांना पाकिस्तान यू-टर्न घेईल असे वाटते. मात्र तरीही पाकिस्तानने १५ फेब्रुवारी रोजी भारताविरुद्धच्या टी-२० विश्वचषक सामन्यावर बहिष्कार टाकला तर आयसीसीने त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करावी असे आवाहन देखील गावस्कर यांनी केले आहे.काय म्हणाले सुनील गावस्कर ?या सर्व प्रकरणावर बोलतांना सुनील गावस्कर यांनी पाकिस्तान लवकरच 'यू-टर्न' घेईल असे सांगितले. मला असं वाटतं की पुढील चार-पाच दिवसांत, जेव्हा संपूर्ण जगभरातून आणि पाकिस्तानच्याच माजी खेळाडूंच्याही प्रतिक्रिया येतील तेव्हा पाकिस्तान नेहमीप्रमाणे यू-टर्न घेईल. यात नवीन काय आहे? आपल्या सर्वांना माहित आहे की पाकिस्तानचे क्रिकेटपटू निवृत्त होतात आणि नंतर चार दिवसांनी ते आपली निवृत्ती मागे घेतात आणि म्हणतात की 'आमच्या चाहत्यांनी आम्हाला अधिक खेळायला सांगितले'. हे पुन्हा घडू शकते,मात्र जर त्यांनी आपला निर्णय कायम ठेवला तर आयसीसीने त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी. अशा शब्दांमध्ये सुनील गावस्कर यांनी आपले मत मांडले.

फीड फीडबर्नर 3 Feb 2026 1:30 pm

Dhurandhar 2 Teaser : रक्ताने माखलेला अवतार आणि डोळ्यांत अंगार! रणवीर सिंहच्या 'धुरंधर २'चा नवा पोस्टर रिलीज; सोशल मीडियावर वादळ

मुंबई : भारतीय बॉक्स ऑफिसवर कमाईचे सर्व विक्रम मोडीत काढणाऱ्या 'धुरंधर' चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच निर्मात्यांनी आज 'धुरंधर २' (Dhurandhar: The Revenge) चा एक अत्यंत थरारक आणि रक्ताने माखलेला नवीन पोस्टर प्रदर्शित केला आहे. या पोस्टरमध्ये रणवीर सिंह पावसात उभा असून, लाल प्रकाशामुळे तो रक्ताच्या वर्षावात भिजल्याचा भास होत आहे. रणवीरने हा पोस्टर शेअर करताना आता बिघडण्याची वेळ आली आहे अशी कॅप्शन दिली असून, यामुळे चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

फीड फीडबर्नर 3 Feb 2026 1:10 pm

Supreme Court on Meta: व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांच्या डेटावरून सर्वोच्च न्यायालयाने मेटाला फटकारले ; म्हणाले,”तुम्ही लोकांसोबत खेळ..”

Supreme Court on Meta: व्हॉट्सअॅप आणि मेटा गोपनीयता धोरण प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने अतिशय कठोर भूमिका घेतली आहे.

दैनिक प्रभात 3 Feb 2026 1:04 pm

Rakul Preet Singh: ‘लोक तर दुसऱ्यांची बदनामी करतात…’ रकुल प्रीत सिंहने बॉलिवूडमधील पेड पीआरची उघड केली पोल

Rakul Preet Singh: अभिनेत्री रकुल प्रीत सिंह हिने बॉलिवूड इंडस्ट्रीत सुरू असलेल्या पेड पीआर (पैसे देऊन केलेला प्रचार) संस्कृतीबाबत स्पष्टपणे मत मांडले आहे. काही कलाकार आपल्या कामामुळे नाही, तर पडद्यामागे होणाऱ्या प्रचारामुळे चर्चेत राहतात, यावर तिने थेट भाष्य केलं.

दैनिक प्रभात 3 Feb 2026 12:54 pm

Sonali Kulkarni : ‘पडद्याचं जॅकेट’; अनोख्या फॅशनमुळे सोनाली कुलकर्णी ट्रोल

Sonali Kulkarni : काहींनी सोनाली कुलकर्णीच्या फॅशन सेन्सवर प्रश्न उपस्थित करत तिला ट्रोल केले आहे.

दैनिक प्रभात 3 Feb 2026 12:54 pm