Koynanagar News : माहेरच्या ओढीला सन्मानाचा हळवा स्पर्श; कामरगावात माहेरवाशीणींचा भावनिक गौरव
Koynanagar News : पाटण तालुक्यातील कामरगाव येथे शिमगा महोत्सवानिमित्त माहेरवाशीण सन्मान सोहळा उत्साहात पार पडला.
Israel - Iran war: भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने सर्व बाजूंनी संयम बाळगण्याचे आणि एकमेकांच्या सार्वभौमत्वाचा आदर करण्याचे आवाहन केले आहे.
Sanju Samson : उपकर्णधार अक्षर पटेलने संजूच्या अनुभवावरून त्याची मजेशीरपणे फिरकी घेतली, ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Medical College Name : राज्यातील ‘या’वैद्यकीय संस्थांना अजित पवारांचे नाव; राज्य शासनाचा मोठा निर्णय
Medical College Name : बारामतीतील शासकीय सर्वोपचार रुग्णालय आणि मेडद येथील आयुर्वेद महाविद्यालयाचे नामकरण 'स्व. अजितदादा पवार' यांच्या नावाने करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
मुळशीत कुस्तीचा थरार! शिवराज राक्षे आणि विरेंद्र कुमार सिंह आमनेसामने
Karmole Kusti Dangal 2026 : मुळशीतील करमोळी येथे ३ मार्चला भव्य कुस्ती मैदान भरत आहे. शिवराज राक्षे आणि विरेंद्र कुमार सिंह यांच्यात ३.५१ लाखांच्या गदेसाठी मुख्य लढत होणार आहे.
मोठी बातमी..! ‘या’प्रकरणात धनंजय मुंडेंना पुन्हा दिलासा; अंजली दमानियांना धक्का
Dhananjay Munde : माजी मंत्री धनंजय मुंडे यांना कृषी घोटाळा प्रकरणात लोकायुक्तांकडून मोठा दिलासा मिळाला आहे.
Young Iranians Celebrate Khamenei Death: इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतर देश दोन टोकांमध्ये विभागला गेला आहे. एकीकडे सरकारसमर्थक रस्त्यांवर उतरून अमेरिका व इस्रायलविरोधात बदल्याच्या घोषणा देत आहेत, तर दुसरीकडे तरुण पिढी आणि महिला सोशल मीडियावर ‘ट्रम्प डान्स’ रील्सद्वारे आनंद साजरा करत आहेत. अमेरिका-इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यात मृत्यू- इराणच्या माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिका व […]
Maharashtra Government : महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; ‘त्या’नावांमधून हटविला मागासवर्गीय शब्द
महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत चालवल्या जाणाऱ्या शासकीय वसतिगृहांच्या नावांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केला आहे.
सोशल मीडियावर फिरत असलेल्या एका छायाचित्रात एक तरुणी खामेनेई यांचा फोटो जाळताना आणि त्याच आगीतून सिगारेट पेटवताना दिसते.
Iran Israel War : इराणचा सर्वात मोठा प्रतिहल्ला; थेट इस्रायलच्या पंतप्रधानांचे कार्यालय उडवले?
Iran Israel War : इराणने इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचे कार्यालय उडवल्याचा दावा केला आहे.
US-Israel-Iran War: भारतीय दूतावासने सोशल मीडियाद्वारे दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे की, ते ओमानच्या सुरक्षा यंत्रणांशी सातत्याने समन्वय साधत आहेत.
Pakistani Players Fined : विश्वचषकातील लाजिरवाण्या कामगिरीनंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने बड्या खेळाडूंना ५० लाख रुपयांचा (पाकिस्तानी रुपये) दंड ठोठावला आहे.
Pune Metro Update : पुणे मेट्रोचा महत्त्वाचा निर्णय; तिकीट स्कॅन केल्यावरच उघडणार AFC गेट्स
Pune Metro Update : ३ मार्चपासून पुणे मेट्रो स्थानकांवरील एएफसी (AFC) गेट्स नेहमी बंद राहतील. प्रवाशांनी तिकीट किंवा मेट्रो कार्ड स्कॅन केल्यावरच हे दरवाजे उघडतील.
US fighter jets: कुवेतमध्ये अमेरिकेची 3 लढाऊ विमाने कोसळली
US fighter jets: दरम्यान, इराणकडून करण्यात आलेल्या प्रतिहल्ल्यात अमेरिकेचे मोठे नुकसान झाले आहे. कुवेतमधील 'कॅम्प अरिफजान' येथील तळावर झालेल्या हल्ल्यात अमेरिकेचे ३ जवान ठार झाले असून ५ जण गंभीर जखमी झाले आहेत.
पुणेकरांनो लक्ष द्या! धूलीवंदनानिमित्त ३ मार्चला पुणे मेट्रो अर्धा दिवस बंद, कधी होणार सुरु?
Pune Metro Update : धूलीवंदन (धुळवड) सणामुळे ३ मार्च रोजी सकाळी ६ ते दुपारी ३ वाजेपर्यंत पुणे मेट्रो सेवा बंद राहणार आहे.
अयातुल्ला अली खामेनेई यांच्या निधनानंतर इराणमध्ये सत्तांतर, नेतृत्व निवड आणि परराष्ट्र धोरणात मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Todays Top 10 News: आखाती देशांत युद्ध पेटल्याने खासदार काळेंसह ५० हजार महाराष्ट्रीय पर्यटक अडकले आहेत. होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्याने भारतावर इंधन संकट ओढावले असून शेअर बाजारातही मोठी पडझड झाली आहे. केंद्र सरकार सतर्क आहे.
मुंबईत भर रस्त्यात पत्नीची पतीने केली हत्या
मुंबई : अंधेरी पूर्व भागातील सागबाग रोडवरील आराध्या रुग्णालयासमोर शनिवार २८ फेब्रुवारी २०२६ रोजी संध्याकाळी साडेचार वाजता एक धक्कादायक घटना घडली. राजेश एकनाथ छत्रे या ४६ वर्षीय व्यक्तीने कौटुंबिक वादातून पत्नी पंचभिला राजेश छत्रे या ३८ वर्षीय महिलेची भर रस्त्यात हत्या केली. पतीने पत्नीवर चाकूने घातक वार केले. यामुळे गंभीर जखमी झालेल्या पंचभिला राजेश छत्रे यांचा थोड्याच वेळात मृत्यू झाला.या प्रकरणात अंधेरी एमआयडीसी पोलिसांनी राजेश एकनाथ छत्रे याला अटक केली आहे. भर रस्त्यात हत्या झाल्यामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण होते पण आता परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांनी सांगितले.हत्येच्या प्रकरणात पोलिसांनी परिसरातले सीसीटीव्ही फूटेज तसेच फॉरेन्सिकच्या दृष्टीने महत्त्वाचे नमुने आणि पुरावे यांचे संकलन केले आहे. गुन्ह्यात वापरलेला चाकू पण जप्त करण्यात आला आहे. पंचभिला यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. एमआयडीसी पोलिसांनी आरोपी विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) तसेच महाराष्ट्र पोलिस कायद्याच्या कलम ३७(१)(अ) आणि १३५ अंतर्गत गुन्हा दाखल केला. आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
Rohit Sharma words : या विजयानंतर संजू सॅमसनचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, ज्यामध्ये माजी कर्णधार रोहित शर्माने संजूला दिलेला सल्ला आज तंतोतंत खरा ठरला आहे.
सुप्रीम लीडर खामेनी यांच्या हत्येनंतर इराणची इस्लामिक सत्ता आता आपल्या अस्तित्वासाठी लढत आहे. अमेरिका-इस्रायलच्या घातक हल्ल्यांदरम्यान, त्याने पूर्ण ताकदीने प्रत्युत्तर दिले आहे. इराणने केवळ इस्रायलवरच नाही, तर संपूर्ण मध्यपूर्वेत क्षेपणास्त्रे आणि ड्रोनचा वर्षाव केला आहे. इराणच्या राष्ट्रपतींचे म्हणणे आहे की, खामेनी यांच्या हत्येचा बदला घेणे हे देशाचे कर्तव्य आणि अधिकार आहे. इराणच्या शस्त्रागारात कोणती शस्त्रे आहेत आणि तो हे युद्ध किती दिवस लांबवू शकतो; जाणून घेऊया दिव्य मराठी एक्सप्लेनरमध्ये... इराण किती दिवस सामना करू शकेल? 28 फेब्रुवारी रोजी अमेरिका-इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यानंतर, इराणने इस्रायल आणि मध्य पूर्वेतील अमेरिकेच्या लष्करी तळांना लक्ष्य केले… टोगाच्या मते इराणची शस्त्रे कमी होत आहेत पण ती अजून संपण्यापासून दूर आहेत. तो येत्या काही दिवसांपर्यंत हल्ले सुरू ठेवू शकतो. ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटीमधील मध्य पूर्वेकडील अभ्यासाचे प्राध्यापक अमीन सैकल यांच्या मते, ‘इराण काही दिवसांत हार मानणार नाही, कारण आता सत्ता टिकवण्याची लढाई आहे. त्यांनी स्वतःला दीर्घकाळाच्या लढाईसाठी तयार केले आहे. त्यांच्याकडे कमी पल्ल्याची आणि लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे आणि हजारो ड्रोन आहेत.’ तरीही काही तज्ञांचे मत आहे की, जर इराणने याच वेगाने हल्ले सुरू ठेवले तर त्याची शस्त्रे काही दिवसांत संपून जातील. दीर्घकाळ युद्ध सुरू ठेवण्यासाठी त्याला शस्त्रे वापरण्याचा वेग कमी करावा लागेल. *** संशोधन सहकार्य: ब्रज पांडे
Warning to MIM : राज्यात जो कायदा मोडेल, त्याचं कंबरडं मोडू; ‘या’नेत्याचा एमआयएमला इशारा
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने शहरातील शहागंज भागात केलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेनंतर राजकीय वातावरण तापले आहे. एका गर्भवती महिलेसह तिच्या पती आणि दिराला फळ विक्रेत्यांनी बेदम मारहाण केल्यानंतर महापालिकेने तातडीने बुलडोझर कारवाई करून अतिक्रमण हटवले.
तारापूर औद्योगिक वसाहतीत वायू गळती
बोईसर : पालघर जिल्ह्यातील बोईसरमधील तारापूर औद्योगिक वसाहतीतल्या भघेरिया केमिकल्समध्ये (जुने नाव : झेनित केमिकल्स) ओलियम वायूची गळती झाली. परिसरात असलेल्या अनेक नागरिकांना तसेच कामगारांना या वायू गळतीचा त्रास झाला. ओलियम वायू हवेच्या संपर्कात आल्याने सल्फर डाय ऑक्साईड आणि इतर सल्फरस ऑक्साईडची निर्मिती झाली. यामुळे अनेकांना डोळे चुरचुरणे, डोळे लाल होणे, घशाला कोरड पडणे, घसा खवखवणे अशा स्वरुपाचा त्रास जाणवू लागला. केमिकल फॅक्टरीपासून पुढे दोन किमी. च्या परिसरात अनेकांनी त्रास जाणवल्याची तक्रार केली.ओलियमचा मोठा साठा असणाऱ्या एमआयडीसीच्या डी झोनमधील भघेरिया केमिकल्स मध्ये दुपारी दोन ते सव्वा दोन दरम्यान वायू गळती झाली. त्यावेळी परिसरात वाऱ्याची दिशा पश्चिमेकडून पूर्वेकडे अशी होती. यामुळे ओलियम वायू हवेच्या संपर्कात आला आणि वेगाने सल्फर डाय ऑक्साईड आणि इतर सल्फरस ऑक्साईडची निर्मिती झाली. हे वायू वेगाने भोवतालच्या परिसरात पसरले आणि नागरिकांना त्रास झाला.वायू गळतीच्या तक्रारी येताच जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांनी आपत्कालीन व्यवस्था कक्ष तसेच महसूल व इतर यंत्रणेला सतर्क केले. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी राजू वसावे घटनास्थळी पोहोचले असून पोलिसांचा मोठा ताफा कंपनीच्या परिसरात तैनात आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी राजू वसावे घटनास्थळी पोहोचले असून पोलिसांचा मोठा ताफा कंपनीच्या परिसरात तैनात आहे. कंपनीच्या बाजूने जाणारा मार्ग तात्पुरता बंद करण्यात आला आहे.महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अग्निशामन दलाचा बंब घटनास्थळी पोहोचला असून ओलियम गळती रोखण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. काही महिन्यांपूर्वी एमआयडीसीच्या शिवाजीनगर भागात अशाच सल्फ्युरिक ऍसिड व ओलियम ची गळती टाकीमध्ये होऊन हा परिसर बाधित झाला होता.परिसरात वायू गळती झाल्यास काय करावे ? शांत राहा आणि घरात, ऑफिसमध्ये जिथे आहात तिथेच शक्यतो थांबा घरातील सर्व दरवाजे व खिडक्या बंद ठेवा, पंखे, एसी व इतर वायुवीजन यंत्रणा तात्पुरती बंद ठेवा अत्यावश्यक असल्यास बाहेर पडताना नाक व तोंड ओल्या कापडाने झाका प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करा लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व श्वसनविकार असलेल्या व्यक्तींची विशेष काळजी घ्यापरिसरात वायू गळती झाल्यास काय करू नये ? घाबरू नका, अफवा पसरवू नका गळती झालेल्या ठिकाणी गर्दी करणे टाळा गळतीच्या ठिकाणी जाण्याचा किंवा तपास करण्याचा प्रयत्न करू नका अप्रमाणित माहिती सोशल मीडियावर शेअर करू नका आपत्कालीन सेवांच्या कामात अडथळा आणू नका
Suryakumar Yadav : या विजयाचा महानायक ठरलेल्या संजू सॅमसनचे कौतुक करताना कर्णधार सूर्यकुमार यादव भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.
Maharashtra Politics : बड्या नेत्याचा उद्धव ठाकरेंना फोन; केली ‘ही’विनंती
राज्यसभेच्या महाराष्ट्रातील (Maharashtra Politics) ७ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असून, १६ मार्च २०२६ रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे.
Maharashtra Accident : धुळवडीसाठी निघालेल्या ४ मित्रांवर काळाचा घाला; बीडमध्ये भयानक अपघात
Maharashtra Accident : शिरूर रस्त्यावर कार अपघातात कृष्णा मुळे या तरुणाचा मृत्यू झाला असून तीन मित्र जखमी झाले आहेत.
माजी खासदाराचे निधन, मुख्यमंत्र्यांनी पाठवला शोकसंदेश
लातूर : लातूर पॅटर्नचे शिल्पकार, माजी खासदार, माजी कुलगुरू आणि प्रख्यात विचारवंत डॉ. जनार्दन वाघमारे यांचे सोमवारी २ मार्च रोजी सकाळी साडेआठ वाजता निधन झाले. त्यांच्या निधनाने शिक्षण, समाजकारण आणि सार्वजनिक जीवनातील एक ज्येष्ठ, अभ्यासू, वैचारिक नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.डॉ. जनार्दन वाघमारे यांचा जन्म ११ नोव्हेंबर १९३४ रोजी लातूर जिल्ह्यात झाला. डॉ. वाघमारे यांनी आयुष्यभर शिक्षण आणि सामाजिक परिवर्तनाच्या कार्यासाठी स्वतःला वाहून घेतले. शिक्षणतज्ज्ञ, साहित्य अभ्यासक आणि राजकारणी म्हणून त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली. ते नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे (SRTMU) संस्थापक आणि कुलगुरू विद्यापीठाच्या स्थापनेपासून शैक्षणिक पायाभूत रचना उभारण्यापर्यंत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. मराठवाड्यात उच्च शिक्षणाची दारे सर्वसामान्यांसाठी खुली करण्यामागे त्यांचा मोठा वाटा होता. इंग्रजी साहित्याचे प्राध्यापक म्हणून त्यांनी दीर्घकाळ अध्यापन केले. निग्रो साहित्य, दलित साहित्य आणि पुरोगामी साहित्य चळवळीवर त्यांनी सखोल अभ्यासपूर्ण लेखन व संशोधन केले. सामाजिक न्याय, समता आणि परिवर्तनवादी विचारसरणी यांवर त्यांनी परखड मांडणी केली. राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यसभेवर खासदार म्हणून गेले असताना शिक्षण, सामाजिक न्याय आणि वंचित घटकांच्या प्रश्नांवर म्हणून त्यांनी प्रभावी भूमिका मांडली. लातूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष म्हणून त्यांनी प्रभावी कामगिरी केली होती. डॉ. जनार्दन वाघमारे यांच्या पार्थिवावर लातूर जिल्ह्यातच औसा तालुक्यातील कवठा या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले.मुख्यमंत्र्यांचा शोकसंदेशविद्वत्ता, तत्वनिष्ठता आणि लोकाभिमुखता यांचा त्रिवेणी संगम असलेल्या माजी खासदार प्रा. डॉ. जनार्दन वाघमारे यांच्या निधनामुळे शिक्षण, राजकारण आणि समाजकारण यांना जोडणारा मार्गदर्शक असा दुवा निखळला आहे, अशी भावना व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ विचारवंत, माजी खासदार, माजी कुलगुरू डॉ. जनार्दन वाघमारे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, प्रा. डॉ. वाघमारे यांचा इंग्रजी भाषा आणि साहित्यासह अर्थशास्त्र, राज्यशास्त्राचा गाढा अभ्यास होता. शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी अध्यापन आणि प्रशासन या अंगाने मोठा ठसा उमटवला. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू म्हणूनही त्यांनी प्रभावी कार्य केले. विशेष म्हणजे त्यांनी लातूरचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्षपदही भुषविले. या काळात त्यांनी शहराच्या विकासासाठी लातूर व्हिजन म्हणून आराखडा तयार केला. शहरातील स्वच्छता, पाणी पुरवठा तसेच नागरी सुविधांसाठी प्रयत्न केले. त्यामुळे लातूरला तत्कालीन संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानात प्रथम पुरस्कार देखील मिळाला होता. राज्यसभा सदस्य म्हणूनही त्यांनी विविध संसदीय समितीवर काम केले. लातूरचे किल्लारी भूकंपशास्त्र संशोधन आणि नांदेड – किनवटच्या आदिवासी संशोधन आणि अभ्यास केंद्रांच्या स्थापनेत त्यांचा पुढाकार होता. त्यांना संयुक्त राष्ट्र संघाच्या अधिवेशनात भारताचे प्रतिनिधी मंडळाचा सदस्य म्हणून म्हणणे मांडण्याची संधी मिळाली होती. त्यांनी वैविध्यपूर्ण विषयांवर विपुल साहित्य निर्मिती केली. त्यांची ही ग्रंथसंपदा आपल्या सर्वांसाठी एक प्रकारचे संचित आहे. ज्येष्ठ विचारवंत डॉ वाघमारे यांच्या निधनामुळे शिक्षण, राजकारण आणि समाजकारण यांना जोडणारा मार्गदर्शक असा दुवा निखळला आहे. ही सामाजिक क्षेत्राची हानी आहे. आम्ही वाघमारे कुटुबिंयाच्या दुःखात सहभागी असून, ईश्वराने त्यांना हा आघात सहन करण्याची ताकद द्यावी, अशी प्रार्थना करतो.
ही घटना या प्रदेशात वाढलेल्या लष्करी हालचालींच्या वेळी घडली. द वॉल स्ट्रीट जर्नलमधील एका वृत्तात म्हटले आहे की....
मुंबई महानगरपालिकाने मुंबईकरांसाठी (BMC's gift to Mumbaikars) एक महत्त्वपूर्ण आणि जनहिताचा निर्णय घेतला आहे.
Wagholi News : 68 व्या महाराष्ट्र केसरी 2025-26 स्पर्धेचा वासापूजन व मातीपूजन सोहळा संपन्न
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ यांच्या मान्यतेने रामकृष्ण सातव पाटील आयोजित ६८वी महाराष्ट्र केसरी २०२५-२६ स्पर्धेचा पवित्र प्रारंभ म्हणून वासापूजन व मातीपूजन सोहळा सोमवार, दि. २ मार्च २०२६ रोजी सकाळी १० वाजता, बाजारतळ मैदान, वाघोली, पुणे येथे संपन्न झाला.
मोठी बातमी..! महाराष्ट्रातील ‘हे’खासदार अडकले इराण-इस्रायल युद्धात; महत्त्वाची माहिती समोर
Iran Israel War : इराण-इस्रायल युद्धामुळे विमानसेवा रद्द झाल्याने जालन्याचे काँग्रेस खासदार डॉ. कल्याण काळे कुटुंबासह दुबईत अडकले आहेत.
अमेरिका-इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांच्या निधनानंतर जगभरातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
Sanju Samson Reaction : आपल्या नाबाद ९७ धावांच्या खेळीने भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिल्यानंतर संजूने सामन्यानंतर आपला संघर्ष आणि दिग्गज खेळाडूंकडून मिळालेल्या शिकवणीबद्दल भाष्य केले.
EPFO Interest Rate: व्याजदर 8.25% कायम; 7 कोटी खातेधारकांना पैसे कधी मिळणार? जाणून घ्या
EPFO Interest Rate: EPFO ने सलग दोन वर्षे ८.२५ टक्के व्याजदर कायम ठेवला आहे. वित्त वर्ष २०२३-२४ मध्ये हा दर ८.१५ टक्क्यांवरून ८.२५ टक्क्यांवर नेण्यात आला होता.
सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे-गोरे (Ashwini Bidre Case) यांच्या हत्येच्या घटनेला आता आठ वर्षे उलटली आहेत, तरीही या प्रकरणातील काही गूढ आणि सरकारी यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे कुटुंबीयांनी थेट राष्ट्रपती आणि सरन्यायाधीशांकडे इच्छामरणाची मागणी केली आहे.
इराणचा सौदीच्या तेल शुद्धीकरण प्रकल्पावर हल्ला, जगाची वाढली चिंता
तेहरान : अमेरिका आणि इस्रायल विरुद्ध इराण अशी लढाई सुरू झाल्यामुळे आखाती देशांमध्ये अस्थिरतेचे आणि अनिश्चिततेचे वातावरण आहे. लढाईत तीन देश थेट सहभागी आहेत आणि दहा पेक्षा जास्त देशांचा लढाईत अप्रत्यक्ष सहभाग आहे. मध्य आशियाचे रुपांतर युद्धभूमीत झाले आहे. इराणने आखाती देशांतील अमेरिकेच्या विविध नौदल तळांवर तसेच हवाई दलाच्या तळांवर हवाई हल्ले केले आहेत. या हल्ल्यांना अद्याप संबंधित आखाती देशांनी थेट प्रत्युत्तर दिलेले नाही. या पार्श्वभूमीवर इराणने सौदी अरेबियाची राष्ट्रीय कंपनी असलेल्या 'अराम्को'वर ड्रोनद्वारे हवाई हल्ला केला.जगातील सर्वात मोठी खनिज तेल कंपनी म्हणून मिरवणाऱ्या 'अराम्को'वर ड्रोनद्वारे हल्ला होणे ही बाब सौदीसाठी प्रतिष्ठेचा विषय झाली आहे. हल्ला झाल्यामुळे 'अराम्को'ने सोमवारी रास तनुरा येथील तेल शुद्धीकरण बंद केलं. रास तुनरा येथील तेल शुद्धीकरण बंद झाल्यावर बेंट क्रूड तेलाच्या किमती ९.३२ टक्क्यांनी वाढल्या.खबरदारीचा उपाय म्हणून रास तनुरामधील तेल शुद्धीकरण प्रक्रिया बंद ठेवण्यात आली आहे. पण परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र सौदीच्या कंपनीवर हल्ला झाल्यामुळे अनेक देश चिंतेत आहेत. आखाती देशांतून जगाला मोठ्या प्रमाणात तेलाचा पुरवठा होतो. या परिस्थितीत आखाती देश लढू लागल्यापासून तेलाच्या दरात वाढ होऊ लागली आहे. तेलाच्या दरांनी गेल्या चार वर्षांमधील उच्चांक गाठला आहे. होर्मुज सामुद्रधुनीतून होणारा व्यापार जवळपास ठप्प आहे.जगातील अनेक देश अराम्को कंपनीकडून तेल खरेदी करतात. यात चीन, जपान, दक्षिण कोरिया, भारत, अमेरिका या प्रमुख देशांचा समावेश आहे. भारत दिवसाला १.१ मिलियन बॅरल्स खनिज तेल सौदी अराम्कोकडून खरेदी करतो. जपान त्यांच्या गरजेच्या ४० टक्के तेल खरेदी अराम्कोकडून करतो. यासोबतच फिलीपीन्स, मलेशिया, थायलंड, सिंगापूर, तैवान, पोलंड, नेदरलँड्स, इटली, स्पेन, फ्रान्स, ग्रीन, इजिप्त, जॉर्डन, बहारिन, दक्षिण आफ्रिकादेखील अराम्कोकडून खनिज तेल खरेदी करतात.लढाईत तेल विहिरी आणि तेल शुद्धीकरण प्रकल्प यांना वारंवार लक्ष्य केले तर तेलाच्या किंमती उसळण्याचा धोका आहे. यामुळे युद्ध आणखी धोकादायक स्थितीत पोहोचण्याची शक्यता वाढली आहे.
मध्यपूर्वेत वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही हिच्याबाबत चाहत्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात होती.
राज्यात उन्हाचा तडाखा वाढणार; हवामान विभागाचा गंभीर इशारा
Weather Forecast : राज्यात मार्च महिन्यात उन्हाचा तडाखा वाढणार असून कमाल तापमान ३७ अंशांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.
CSK New Jersey : चेन्नई सुपर किंग्जच्या नव्या जर्सीचे अनावरण
पाच वेळा विजेत्या चेन्नई सुपर किंग्जने म्हणजेच सीएसकेने आयपीएल २०२६ च्या आधी त्यांची नवीन जर्सीचे अनावरण केले आहे. चेन्नईने शनिवारी (२८ फेब्रुवारी) सोशल मीडियावर एका पोस्ट करून खळबळ उडवून दिली होती. ज्यामध्ये रविवारी सकाळी ७:०७ वाजता भारतीय वेळेनुसार मोठी घोषणा करण्यात येणार असल्याचे नमूद केले होते.त्यानुसार सीएसकेने नंतर एक व्हिडिओ रिलीज करून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. या व्हिडिओमधून चेन्नईच्या टीमने आयपीएलच्या नवीन हंगामापूर्वी सीएसके कॅम्पमध्ये धोनीचे आगमन झाल्याची माहिती दिली आणि आयपीएल २०२६ जर्सीची पहिली झलक देखील दाखवली. त्यामुळे चाहत्यांच्या आनंदात वाढ झाली.
US fighter jet crashes in Kuwait : इराणसोबत सुरू असलेल्या युद्धात अमेरिकेला एक मोठा धक्का बसला आहे. कुवेतमध्ये अमेरिकेचे एफ-१५ फायटर जेट कोसळले आहे. सुदैवाने, हे विमान उडवणारे पायलट आणि त्यांचे सहकारी वेळीच बाहेर पडल्याने सुरक्षित आहेत. पण याची अजूनही पुष्टी झालेली नाही. सोशल मीडियावर या घटनेचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. यामध्ये विमान हळूहळू खाली […]
Rose For Skin : त्वचेसाठी गुलाबाचे ५ सोपे उपाय; मिळवा नैसर्गिक तेज आणि फ्रेश लूक!
Rose For Skin गुलाबात अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. त्यामुळे त्वचेवरील सूज कमी होण्यास मदत होते. तसेच सूर्याच्या अतिनील किरणांमुळे होणाऱ्या त्वचेच्या नुकसानापासूनही काही प्रमाणात संरक्षण मिळते. डार्क सर्कल्स, पिंपल्स, डाग-धब्बे आणि कोरडेपणा कमी करण्यासाठी गुलाब उपयुक्त ठरतो.
Israel - Iran War : आखाती देशांतील महाराष्ट्रातील नागरिकांसाठी राज्य शासनाच्या अत्यावश्यक सूचना
इराण–इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मध्य-पूर्व व आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीचा विचार करून परदेशात वास्तव्यास असलेल्या तसेच अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी राज्य शासनाने अत्यावश्यक सूचना जारी केल्या आहेत. राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली.परराष्ट्र व्यवहार मंत्रालय तसेच संबंधित देशांतील भारतीय दूतावासांनी २४७ आपत्कालीन हेल्पलाईन सुरू केल्या असून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा व स्थानिक प्रशासन तसेच भारतीय दूतावासांकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.परदेशात अडकलेल्या नागरिकांबाबत माहिती देण्यासाठी अथवा आपत्कालीन मदतीसाठी राज्य आपत्कालीन कार्य केंद्र (SEOC) २४७ कार्यरत राहणार आहे. नागरिकांनी टोल फ्री क्रमांक १०७७, मोबाईल +९१-९३२१५८७१४३, दूरध्वनी ०२२-२२०२७९९० किंवा controlroom@gov.in व कुवैत फोन : +९६५-६५५०१९४६ (२४७ आपत्कालीन), ई-मेल : community.kuwait@mea.gov.in या ई-मेलवर संपर्क साधावा.देशनिहाय आपत्कालीन संपर्क क्रमांकही जाहीर करण्यात आले आहेत. कतार (दोहा), संयुक्त अरब अमिरात (अबूधाबी/दुबई) आणि सौदी अरेबिया (रियाध/जेद्दाह) येथील भारतीय दूतावासांचे हेल्पलाईन क्रमांक व ई-मेल आयडी नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत.राज्य शासनाने सर्व नागरिकांना शांतता राखण्याचे, स्थानिक घडामोडींवर लक्ष ठेवण्याचे व अधिकृत सूचनांची प्रतीक्षा करण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असून आवश्यक ती मदत तातडीने पुरविण्यात येईल, असेही राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने स्पष्ट केले आहे.
India -Canada Business: कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी २ मार्चपर्यंत भारत दौऱ्यावर आहेत. सोमवारी त्यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
Toxic Movie Tabahi Song: ‘टॉक्सिक’चे ‘तबाही’ गाणे रिलीज; पण व्हिडिओ नाही म्हणून चाहत्यांचा संताप!
Toxic Movie Tabahi Song 'टॉक्सिक: अ फेयरी टेल फॉर ग्रोन-अप्स' या चित्रपटातील तबाही हे गाणे २ मार्च रोजी प्रदर्शित करण्यात आले. पण निर्मात्यांनी पूर्ण व्हिडिओऐवजी केवळ ऑडिओ आणि लिरिक्स व्हर्जन रिलीज केले. त्यामुळे सोशल मीडियावर चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
Pune-Pimpri 40 Senior Citizen Stuck In Dubai : 'सध्या आम्ही सुरक्षित आहोत. मात्र भारत सरकारने येथून आमची सुटका करुन मायदेशी सुखरूप घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करावेत,' अशी विनंती दुबईमध्ये अडकलेल्या अनिता नेटके यांनी केली आहे.
Holi Special Shahi Thandai Recipe घरची ठंडाई पूर्णपणे नैसर्गिक घटकांपासून तयार केली जाते. यात कोणतेही कृत्रिम रंग किंवा रसायने नसतात. त्यामुळे ती चविष्ट तर असतेच, पण आरोग्यासाठीही फायदेशीर ठरते. या पेयामुळे शरीराला नैसर्गिक थंडावा मिळतो आणि दिवसभराच्या धावपळीतून आलेला थकवाही कमी होते.
Israel - Iran War : इराण इस्रायल युद्धाचे कच्च्या तेलाच्या दरावर परिणाम
इराणवर अमेरिका आणि इस्रायल यांनी केलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी उसळी पाहायला मिळाली आहे. रविवारी (१ मार्च) आशियाई बाजार उघडताच कच्च्या तेलाच्या दरात सुमारे १० टक्क्यांची वाढ नोंदवली गेली.सोमवारी सुरुवातीच्या व्यवहारात आंतरराष्ट्रीय बेंचमार्क असलेल्या ब्रेंट क्रूड आणि वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट या दोन्ही प्रकारांच्या किमती झपाट्याने वाढल्या. एका टप्प्यावर ब्रेंट क्रूडची किंमत १२ टक्क्यांहून अधिक वाढून प्रति बॅरल सुमारे ८२ डॉलरपर्यंत पोहोचली. शुक्रवारी ती ७३ डॉलरवर बंद झाली होती. नंतर काही प्रमाणात दरात घसरण झाली असली तरी वाढीचा कल कायम राहिला. सोमवारी सकाळपर्यंत आशियाई बाजारात ब्रेंट क्रूड सुमारे ७९ डॉलरच्या आसपास व्यवहार करत होता, तर अमेरिकन क्रूडमध्येही मोठी वाढ दिसून आली.यावर्षी जानेवारीपासूनच आंतरराष्ट्रीय तेलदरांमध्ये जवळपास २० टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यातच मध्यपूर्वेतील तणावामुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेमुळे बाजारात भीतीचे वातावरण पसरले आहे. तज्ज्ञांच्या मते, पुढील घडामोडी इराणच्या प्रत्युत्तरात्मक कारवाईवर आणि महत्त्वाच्या पुरवठा मार्गांवरील स्थितीवर अवलंबून असतील. विशेषतः Strait of Hormuz या सामुद्रधुनीबाबत मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. पर्शियन आखाताला ओमानच्या आखाताशी जोडणारा हा एकमेव सागरी मार्ग असून जगातील सुमारे पाचव्या भागाचे कच्चे तेल या मार्गाने वाहून नेले जाते. दररोज अंदाजे १५ दशलक्ष बॅरल कच्चे तेल या अरुंद सामुद्रधुनीतून जाते. सौदी अरेबिया, कुवेत, कतार आणि इराक यांसारखे प्रमुख तेल उत्पादक देश या मार्गाचा वापर करतात.भारताच्याही दृष्टीने हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण देशाच्या कच्च्या तेलाच्या गरजेचा मोठा हिस्सा या मार्गाने आयात केला जातो. जर इराण आणि इस्रायलमधील संघर्ष अधिक तीव्र झाला आणि होर्मुझ सामुद्रधुनीत अडथळे निर्माण झाले, तर जागतिक पुरवठ्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत शिपमेंट मंदावणे किंवा थांबणे शक्य आहे, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तेल आणि पेट्रोलियम पदार्थांच्या किमतींमध्ये आणखी वाढ होऊ शकते.किमती किती पुढे जाऊ शकतात ?तज्ज्ञांचा अंदाज आहे की ब्रेंट क्रूड तेलाचे दर प्रति बॅरल १००-११५ डॉलर्सपर्यंत पोहोचू शकतात. जर समुद्री मार्ग विस्कळीत झाला तर किमती १२०-१४० डॉलर्सपर्यंत वाढू शकतात, तर सतत बंद पडण्याच्या धोक्यामुळे तेल १५० डॉलर्स किंवा त्याहून अधिक होऊ शकते.ओपेकच्या भूमिकेबद्दल, तज्ञांचा असा विश्वास आहे की सौदी अरेबिया आणि युएईकडे दररोज अंदाजे ४-५ दशलक्ष बॅरल्स अतिरिक्त क्षमता आहे. तथापि, त्यातील बराचसा पुरवठा अजूनही होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणाऱ्या वाहतुकीवर अवलंबून आहे.तज्ज्ञांच्या अंदाजानुसार ब्रेंट क्रूडच्या दरात प्रत्येक १ डॉलरची वाढ झाली तर भारतात किरकोळ स्तरावर पेट्रोलच्या दरात सुमारे ०.५५ रुपये प्रति लिटर आणि डिझेलच्या दरात सुमारे ०.५२ रुपये प्रति लिटर इतका दबाव निर्माण होतो. त्यामुळे अलीकडील १० टक्क्यांच्या वाढीचा परिणाम भारतातील इंधनदरांवर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे पेंट, ल्युब्रिकेंट, टायर उद्योग तसेच विमानवाहतूक क्षेत्राच्या खर्चात वाढ होऊ शकते आणि त्यामुळे कंपन्यांच्या नफ्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकार उत्पादन शुल्कात कपात करणे किंवा तेल कंपन्यांच्या नफ्यावर मर्यादा आणणे यांसारखे उपाय करू शकते, असेही तज्ज्ञांचे मत आहे.
US fighter jet : अमेरिकेचं लढाऊ विमान कुवेतमध्ये कोसळल्याचा व्हिडीओ व्हायरल
सोमवार २ मार्च २०२६ रोजी कुवेतमध्ये अमेरिकेचे एफ-१५ (F-15) लढाऊ विमान कोसळल्याचा आणि आगीच्या गोळ्यात रूपांतर झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मिड-ईस्ट मधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडली असूनपायलट सुरक्षितपणे बाहेर पडल्याचे प्राथमिक अहवालात म्हटले आहे. विमानाचा ढिगारा मीना अल-अहमदी रिफायनरी परिसरात पडल्याने दोन कामगार जखमी झाल्याचे वृत्त आहे.मिळालेल्या माहितीनुसार, तांत्रिक बिघाड झाल्याने हे विमान कोसळल्याचे सांगण्यात आले असून अद्याप अधिकृत कारण स्पष्ट झालेले नाही. कुवेतमधील पश्चिम भागात हे विमान कोसळले असून या घटनेनंतर आता अमेरिकन किंवा कुवेती प्रशासनाकडून अधिकृत दुजोरा देण्याची प्रतीक्षा आहे. मात्र सध्या संपूर्ण सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून विमान कोसळल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
Thane: अभिनेत्री ज्युनियर कलाकारांना आमिष दाखवून करत होती फसवणूक; सेक्स रॅकेट प्रकरणात अटकेत
ठाणे: ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने एका मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी २७ वर्षीय एका अभिनेत्रीला अटक करण्यात आली असून, ती हिंदी मालिका आणि मॉडेलिंग क्षेत्रात काम करणाऱ्या ज्युनिअर कलाकारांना पैशांच्या आमिषाने वेश्याव्यवसायात ढकलत होती. रविवारी पोलिसांनी या कारवाईची माहिती दिली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अभिनेत्रीबाबत गुप्त माहिती मिळाली होती. २८ फेब्रुवारी रोजी दुपारी ठाण्यातील मासुंदा तलाव परिसरात पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून सापळा रचला. अभिनेत्रीने एका पीडित तरुणीसाठी बनावट ग्राहकाकडून ३० हजार रुपये स्वीकारले. यातील २० हजार रुपये ती स्वतःकडे ठेवणार होती, तर केवळ १० हजार रुपये पीडित तरुणीला देण्याचे ठरले होते. पैसे स्वीकारताच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी या अभिनेत्रीला रंगेहाथ पकडत अटक केली.'यूट्यूब' आणि 'मॉडेलिंग'चा आधारतपासात असे समोर आले आहे की, ही अभिनेत्री स्वतः काही हिंदी मालिकांमध्ये काम करते. तिने यूट्यूब चॅनल आणि मॉडेलिंग क्षेत्रात ओळख असलेल्या अनेक गरजू तरुणींची या व्यवसायासाठी निवड केली होती. गेल्या वर्षभरापासून ती हे रॅकेट चालवत असल्याची कबुली तिने पोलिसांना दिली आहे.या कारवाई दरम्यान पोलिसांनी दोन पीडित तरुणींची सुटका केली आहे. या तरुणींना पुढील पुनर्वसनासाठी सरकारी महिला सुधारगृहात पाठवण्यात आले आहे.
18 ते 20 वर्षांच्या मुली आहेत. सगळ्या एकापेक्षा एक सरस आहेत. होळीसाठी बाहेरून आणल्या आहेत. बॅचलर पार्टीसाठी पूर्णपणे फिट आहेत. एका मुलीचा दर 8 हजार रुपये लागेल. आम्ही लगेच तुमच्यासाठी 5 मुलींची व्यवस्था करतो. तुम्ही फक्त आम्हाला टोकन मनी द्या, एक्स्ट्रा सर्व्हिससाठी डान्सर डील करेल. मुली लोकेशनवर पोहोचण्यापूर्वी दारू पोहोचेल. तुम्ही फक्त पाहुण्यांचे खिसे रिकामे करा, आम्ही होळीला पूर्ण एन्जॉयची हमी देतो..। होळीला पूर्ण एन्जॉयची हमी देणारे एजंट बँड पार्टीच्या नावाखाली दारू आणि मुलींची डील करत आहेत. ऑफिसबाहेर वेगवेगळ्या बँड पार्टीचे बोर्ड लागले आहेत, पण आतमध्ये डर्टी होळीची तयारी सुरू आहे. अशा एजंट्सना उघड करण्यासाठी भास्करचे अंडरकव्हर रिपोर्टर ग्राहक बनून पोहोचले. भास्करच्या इन्वेस्टिगेशनमध्ये वाचा आणि बघा होळीला दारूसह मुलींचा सौदा करणाऱ्या एजंट्ससोबतची डील… डीजेचा धंदा कमी झाला, म्हणून मुलींची डील सुरू केली लग्न आणि पार्टीमध्ये बँड बाजांच्या जागी आता डीजेने घेतली आहे. बदलाच्या या ट्रेंडमध्ये रिकाम्या झालेल्या बहुतेक बँड पार्ट्यांनी आपला धंदाही बदलला आहे. ते दारू आणि मुलींची डील करू लागले आहेत. भास्करच्या तपास पथकाला माहिती मिळाली की पाटणाच्या पॉश भागातील बँड-बाजांच्या ऑफिसमध्ये होळीच्या रंगीत पार्टीसाठी बुकिंग होत आहे. ग्राहक बनून भास्करचे अंडरकव्हर रिपोर्टर जेव्हा बँड-बाजांच्या ऑफिसमध्ये पोहोचले, तेव्हा संपूर्ण डील गुप्त कॅमेऱ्यात कैद झाली. भास्करचे अंडरकव्हर रिपोर्टर ग्राहक बनून पटना जंक्शनच्या करबिगहिया येथे पोहोचले. येथे अनेक बँड आहेत जे होळीसाठी मुलींची डील करत असल्याची माहिती मिळाली होती. खूप तपासणी केल्यानंतर, दिलीप पानवाल्याकडून शिव शंकर बँडचा संचालक सूरज याची माहिती मिळाली. रिपोर्टर सूरजकडे पोहोचला, तेव्हा तो मुलींची डील करताना भास्करच्या गुप्त कॅमेऱ्यात कैद झाला. सूरजचे दावे बघा… सर्व काही व्यवस्था होईल. पार्टीमध्ये जाणाऱ्या मुलींकडून न्यूड डान्स करून घेणे, दारू पाजणे आणि पार्टीत सहभागी लोकांसोबत बसणे हे सामान्यच आहे. जर पार्टीत कोणी पैसे दिले, तर मुली एक्स्ट्रा सेवेसाठी तयार होतात. काम होते, पैसे त्यांच्या मर्जीवर आहेत. बहुतेक मुली तयार होतात. बॅचलर पार्टीदरम्यान मुली स्वतःहून ऑफर करतात. त्या पूर्णपणे प्रशिक्षित असतात, कधी काय मागणी असेल. मुली अशा असतात, ज्यांच्यासाठी लोक हवी ती किंमत द्यायला तयार होतात. आमच्याकडे सर्व मुली अनुभवी आहेत, आम्ही त्यांनाच कामावर पाठवू. फक्त तुम्हाला आधी हे सांगावे लागेल की ग्राहक कोणत्या स्तराचे आहेत. तुम्ही ग्राहकाचा स्तर सांगितलात तर आम्ही त्या स्तराच्या मुलींची व्यवस्था करू. आम्हाला पूर्णपणे माहीत असते की कोणत्या प्रोफाइलच्या व्यक्तीला कोणत्या प्रोफाइलची मुलगी आवडेल. म्हणून आधी प्रोफाइल जाणून घेऊन आम्ही मुलींना पाठवतो. नेत्यांचा तर दर्जाच वेगळा असतो शिव शंकर बँडचा संचालक सूरज म्हणाला- नेत्यांचा दर्जा आणि आवड सर्व काही वेगळे असते. बहुतेक नेते आजकाल सोशल मीडियाला घाबरतात. त्यामुळे ते अशा पार्टीची कोणालाही कानोकान खबर लागू देत नाहीत. मागणी करताना ते आधीच आपली निवड सांगतात. बहुतेक नेते बंद खोलीतील पार्टीसाठी मुलींची मागणी करतात. यावेळी होळीलाही अशीच बुकिंग झाली आहे. त्या लोकांनी त्यांच्या लोकेशनवर पार्टीसाठी ऑर्डर दिली आहे. वेळेआधीच आम्ही तिथे पूर्ण व्यवस्था करून देतो. आजपर्यंत कोणत्याही पार्टीने कोणतीही तक्रार केलेली नाही. ज्याचीही बुकिंग आम्ही घेतली आहे, त्याला भरपूर आनंद देऊन आम्ही समाधानी केले आहे. दारूची काही चिंता नाही, सर्व मिळेल सूरजने पुढे सांगितले, पार्टीत दारूची व्यवस्था करून दिली जाईल, पण रांचीच्या दरापेक्षा दुप्पट किंमत लागेल. होळीला खूप मागणी आहे, माल मिळत नाहीये. ॲडव्हान्स दिल्यास दारू हॉटेलमध्येच किंवा तुमच्या लोकेशनवर पोहोचवली जाईल. माझ्याकडे सर्व प्रकारची व्यवस्था आहे. तुम्ही ज्या दारूचे नाव सांगाल, त्याची व्यवस्था करून दिली जाईल. बिहारमध्ये दारूबंदी आहे, त्यामुळे ती महाग मिळत आहे. पैसे खर्च करणाऱ्याला ती सर्वत्र सहज मिळत आहे. तुमचे लोकेशन जिथे असेल तिथे आम्ही पूर्ण व्यवस्थेसह सर्व काही पोहोचवून देऊ. व्हिडिओ बनवू नका, रूममध्ये सीसीटीव्ही कॅमेरा नसावा सूरज म्हणाला, बॅचलर पार्टीचा व्हिडिओ बनवला जात नाही. हा गुन्हा आहे आणि जर तो सोशल मीडियावर आला तर मोठा गोंधळ होईल. आपण सर्वजण आत जाऊ. म्हणून सर्वांचे मोबाईल बाजूला ठेवायला सांगा. रूममध्ये सीसीटीव्ही कॅमेराही नसावा. जे काही चुकीचे होईल, ते पडद्यामागेच व्हावे. सरकार खूप कठोर आहे, पोलीसही तपास करत आहेत. प्रशासनाच्या दृष्टीने हा खूप मोठा गुन्हा आहे, त्यामुळे दारू आणि मुलींचा आनंद खूप लपवून घेतला जातो. टोकन मनीपासून रेट कार्ड निश्चित आहे सूरजने टोकन मनीपासून ते पूर्ण रेट कार्ड सांगितले. सूरज म्हणाला- पाटणामध्ये लोकल बॅचलर पार्टीसाठी एका मुलीचे 8 हजार रुपये घेतले जातात. पाच मुलींसाठी 40 हजार रुपये द्यावे लागतील. आम्ही 5 मुलींचा सेट देतो, ज्यामुळे पाहुणे पूर्णपणे समाधानी होतील. ही आमची टोकन मनी म्हणून असते. यानंतर मुलगी काय करते आणि खुश करण्यासाठी काय दर ठरवते हे वेगळे द्यावे लागते. हे तिच्या मर्जीवर अवलंबून असते. याशिवाय येण्या-जाण्याचा खर्च तुम्हाला वेगळा द्यावा लागेल. ज्या मुलींना पार्टीत नेले जाते, त्यांचे वय 18 ते 20 वर्षांच्या दरम्यान असते. आमचा प्रयत्न असतो की मुली 18 वर्षांवरील असाव्यात, कारण त्यापेक्षा कमी वयाच्या मुली असतील तर मोठा लांबलचक खटला होतो. जर मुली 18 वर्षांवरील असतील तर कोणी काही करू शकत नाही. काम चुकीचे आहे, पण आम्ही ते पूर्ण प्रामाणिकपणे करतो. जशी डील करतो, तशी मुलगी पाठवतो. कोणीही तक्रार करू शकत नाही. शिव शंकर बँडचे संचालक सूरज यांच्याशी व्यवहार केल्यानंतर आम्ही जसे बाहेर पडलो, तसे एजंट सुमनने आवाज देऊन थांबण्याचा इशारा केला. सुमनने बोलता बोलता स्पष्ट सांगितले की, सर्व व्यवस्था होऊन जाईल. बोलण्यात विश्वास बसल्यावर कमिशनच्या लालसेने सुमनने एका मोठ्या नावाचा खुलासा केला. जर हे काम योग्य पद्धतीने आणि कोणत्याही अडचणीशिवाय करायचे असेल, तर थेट पंजाब बँडचे प्रोप्रायटर लक्ष्मण यांच्याकडे जा. या कामासाठी लक्ष्मणपेक्षा मोठी सेटिंग कोणाचीही नाही. तो या कामाचा मास्टरमाईंड आहे. पाटणाच नाही तर बिहारमध्ये अशा प्रकारचे मोठे मोठे अरेंजमेंट तोच सांभाळतो. बिहारच नाही तर अनेक राज्यांमध्ये त्याचे नेटवर्क काम करते. लक्ष्मणकडे असे सक्रिय नेटवर्क आहे, ज्यामुळे तो कोणत्याही प्रकारची पार्टी, मुलगी, दारू किंवा इतर व्यवस्था मिनिटांत करून देतो. ज्या लोकांना गोपनीयता हवी असते, त्यांच्यासाठी वेगळी व्यवस्था असते आणि कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही, त्यामुळे तो डील करतो. जर लक्ष्मणने या कामासाठी होकार दिला, तर ग्राहकाला कुठेही भटकण्याची गरज पडत नाही आणि संपूर्ण काम सहजपणे होते. फक्त तिथेपर्यंत पोहोचवून देईन, पण माझेही लक्ष ठेवा. एक बँड एका शहरापुरते मर्यादित नाही नेटवर्क सूरज आणि सुमन यांच्याशी झालेल्या संवादातून हे स्पष्ट झाले की, हा धंदा फक्त एका व्यक्तीपुरता किंवा एका बँडपुरता मर्यादित नाही. या धंद्यात मोठे नेटवर्क काम करत आहे. बँड बाजाच्या नावाखाली संचालक सेक्स रॅकेटचे मोठे नेटवर्क चालवत आहेत. ते बॅचलर पार्टीमध्ये न्यूड डान्ससाठी मुलींची डील करत आहेत. इव्हेंट मॅनेजमेंटच्या नावाखाली हे संपूर्ण रॅकेट चालवले जात आहे. सुमनकडून मिळालेल्या माहितीनंतर लक्ष्मणला उघड करण्यासाठी त्याला गुप्त कॅमेऱ्यावर आणणे हे मोठे आव्हान होते. कमिशनच्या लालसेपोटी सुमनने ग्राहक बनून गेलेल्या अंडरकव्हर रिपोर्टरला लक्ष्मणाच्या पत्त्यावर पोहोचवले. सुमनच्या रेफरन्सने आल्यावर लक्ष्मणाने मोकळेपणाने डील केली आणि धंद्याचा खुलासा केला. पंजाब बँडचा मालक लक्ष्मणच्या काळ्या धंद्याबद्दल त्याच्याच तोंडून ऐका. आधी या कामात कमी पैसे मिळत होते, पण आता जास्त पैसे मिळत आहेत. मागणीही खूप वाढली आहे, पण आता या धंद्यात जास्त लोक आले आहेत. त्यामुळे आता थोडी-थोडी अडचणही वाढली आहे. सण किंवा इतर कोणत्याही विशेष प्रसंगी मागणी खूप वाढते. अशा वेळी आधीच बुकिंग करून घेतल्यास कोणतीही अडचण येत नाही. आम्ही दिवस आणि रात्र दोन्ही वेळेची व्यवस्था करतो. बॅचलर पार्टीसाठी आधीच व्यवस्था करणे आवश्यक असते. अशा पार्ट्यांसाठी मुली उपलब्ध करून दिल्या जातात आणि एका मुलीसाठी 6 हजार रुपये घेतले जातात. मुली पार्टीत डान्स करतात. जर कोणी अतिरिक्त सेवेची मागणी केली, तर त्यासाठी वेगळे पैसे द्यावे लागतात. आतापर्यंत अनेक पार्ट्यांसाठी अशी व्यवस्था केली गेली आहे. होळीसाठी आमची आधीच बुकिंग सुरू आहे. आमच्या सर्व मुली पूर्णपणे व्यावसायिक असतात. त्यामुळे कोणत्याही प्रकारची तक्रार नसते. मी व्हॉट्सॲपवर मुलींचे फोटो पाठवतो, तुम्ही पसंत करून तुमच्या पाहुण्यांकडून बुकिंग निश्चित करून घ्या. बॅचलर पार्टीसाठी एका मुलीचे 6 हजार द्यावे लागतील. याव्यतिरिक्त 500 रुपये तिला वेगळे द्यावे लागतात. ग्राहक कोणत्या प्रकारचे आहेत, हे आधी सांगणे आवश्यक असते. नंतर कोणतीही समस्या येऊ नये, म्हणून प्रत्येक गोष्ट स्पष्ट करूनच मुलींना बुकिंगवर पाठवले जाते. पोलीस आणि प्रशासनही खूप सतर्क झाले आहे. प्रत्येकावर लक्ष ठेवत आहे. म्हणून आम्ही आता आमच्या कामाचा ट्रेंड थोडा बदलला आहे. एजंट म्हणाला - CV बोला, मुली समजून घेतील पंजाब बँडचा मालक लक्ष्मणने नवीन ट्रेंडचा खुलासा केला. संभाषणात त्याने संपूर्ण प्रणाली समजावून सांगितली आणि दावा केला की प्रणालीनुसार काम केल्यास कोणतीही अडचण येणार नाही. स्थान योग्य असेल आणि कोणतीही माहिती लीक होणार नाही, तर होळीला पूर्ण आनंद घेता येईल. लक्ष्मणच्या तोंडून नवीन ट्रेंडची संपूर्ण कहाणी जाणून घ्या. या कामात आता 'सेक्स' शब्दाचा वापर केला जात नाही, तर त्याला 'CV' हा कोडवर्ड देण्यात आला आहे. तुम्ही मुलींना 'CV' म्हणताच, त्यांना समजेल. यासाठी वेगळे पैसे घेतले जातात. मुलगी जितकी जास्त सुंदर असेल, तितकीच जास्त पैशांची मागणी करेल. आता सर्व बोलणे फोनवरच होईल. प्रत्यक्ष कमी बोला, येथे कमी या. सर्व काही फोनवरून डील करा, ऑनलाइन पैसे पाठवा आणि होळीसाठी ॲडव्हान्स बुकिंग करून पूर्ण आनंद घ्या. पंजाब बँडचा मालक लक्ष्मणच्या म्हणण्यानुसार, अंडरकव्हर रिपोर्टरने भेटीनंतर अनेक वेळा फोन केला. डीलवर चर्चा सुरू राहिली. याच दरम्यान लक्ष्मणने काही मोबाईल नंबर देऊन बोलण्यास सांगितले. त्याने दावा केला की हे लोकही पूर्ण व्यवस्था करतील आणि मुलींना लोकेशनवर पाठवतील. लक्ष्मणने नितीन आणि पंकजचे मोबाईल नंबर दिले. अंडरकव्हर रिपोर्टरने सर्वात आधी ग्राहक बनून नितीनला फोन केला. रिपोर्टर - लक्ष्मणजींकडून तुमचा नंबर मिळाला आहे? नितीन - जी बोला, काय काम आहे? रिपोर्टर - लक्ष्मणजींनी तुम्हाला काही सांगितले नाही का? नितीन - बोलणे तर होत असते, सांगा तुमचे काय काम आहे? रिपोर्टर - तुम्हाला भेटून बोलणे झाले असते तर जास्त चांगले राहिले असते? नितीन - नाही, भेटणे शक्य नाही, काम सांगा फोनवरच होऊन जाईल. रिपोर्टर - फोनवर सांगण्यातही अडचण आहे, तुम्ही समजू शकता. नितीन - समजलो, मोकळेपणाने बोला सर्व होऊन जाईल. रिपोर्टर - होळीच्या पार्टीसाठीच लक्ष्मणजींनी तुम्हाला बोलायला सांगितलं आहे. नितीन - बॅचलर पार्टीसाठी जेवढ्या मुलींची गरज आहे, तेवढ्या मिळतील. रिपोर्टर - काय सिस्टिम आहे, होळीच्या रंगीबेरंगी पार्टीसाठी किती खर्च येईल? नितीन - मुलींची संख्या आणि पार्टीची जागा सांगा, सगळं होऊन जाईल. रिपोर्टर - न बघता कसं फायनल करायचं, तुम्ही भेटला असता तर बरं झालं असतं. नितीन - होऊन जाईल, फोटो पाठवत आहे, पसंत करा व्यवस्था होऊन जाईल. रिपोर्टर - यानंतरची काय सिस्टिम तुम्ही बनवली आहे? नितीन - काही नाही, पार्टीच्या लोकेशनवर मुली पाठवल्या जातात, पैसे तिथेच घेतले जातात. अंडरकव्हर रिपोर्टरने पंजाब बँडचा संचालक लक्ष्मणच्या संदर्भाने पंकजला फोन केला. ओळख सांगितल्यावर पंकज समजला आणि त्याने संपूर्ण प्रणाली सांगितली. होळीला कोणत्या प्रकारे ॲडव्हान्स बुकिंग होत आहे, या नेटवर्कचा त्याने पूर्ण खुलासा केला. आता पंकजचे दावेही जाणून घ्या.. आमच्याकडे सर्व व्यावसायिक आहेत. आम्ही तुम्हाला मोबाईलवर संपूर्ण प्रोफाइल पाठवत आहोत. तुम्ही जिला पसंत कराल, तिला तुमच्या पार्टीसाठी आरक्षित केले जाईल. तुम्हीही पाहुण्यांची संपूर्ण प्रोफाइल पाठवा, त्याप्रमाणे आम्ही सर्व व्यवस्था करू. आम्ही प्रोफाइल पाहिल्यानंतरच मुलींना अंतिम करतो. जो व्यक्ती पैसे खर्च करत आहे, त्याला तक्रारीची संधी मिळायला नको. आम्ही ग्राहकाच्या आवडीनुसार पार्टीसाठी सर्व गोष्टींची व्यवस्था करतो. जागा जुन्या बस स्टँडजवळ आहे. जर दुसरी जागा हवी असेल, तर त्याची माहिती द्या. त्या ठिकाणी मुलींना पाठवले जाईल. तुम्ही सर्व प्रक्रिया फोनवर करा, भेटण्याची गरज नाही. आम्ही बुकिंग अंतिम केल्यानंतर तुमच्या ठिकाणी वेळेवर संपूर्ण व्यवस्था करून देऊ. लक्ष्मणने अंडरकव्हर रिपोर्टरचा मोबाईल नंबर एजंट नितीशला दिला. होळीवर मोठ्या पार्टीची माहिती मिळाल्यावर नितीशने थेट अंडरकव्हर रिपोर्टरला कॉल केला. त्याने होळीला न्यूड डान्सपासून ते दारू पार्टीपर्यंतची पूर्ण डील केली. नितीश - तुमचा नंबर मिळाला आहे, तुम्हाला होळीला पार्टी करायची आहे का? रिपोर्टर - हो, करायची तर आहे, नंबर कोणी दिला? नितीश - लक्ष्मणने दिला आहे, आमच्याकडे याची पूर्ण व्यवस्था आहे, होळीला सर्व प्रकारचा आनंद देऊ. रिपोर्टर - होळीला रंगीत बॅचलर पार्टी करायची आहे, व्यवस्था चांगली असावी. नितीश - ठीक आहे, सर्व व्यवस्था होईल, तुम्ही आधी बुकिंग करून घ्या. रिपोर्टर - काय बुकिंग करावे लागेल? नितीश - लोकेशन ठरवावी लागेल ना? पार्टी कुठे करायची आहे, सर्व माहिती पाठवून द्या. रिपोर्टर - व्यवस्था होईल ना? आधी किती पैसे ॲडव्हान्स द्यावे लागतील? नितीश - सर्व काही अरेंज होईल, कोणालाही आधी पैसे देण्याची गरज नाही. रिपोर्टर - मग ॲडव्हान्स बुकिंग कशी होईल, नंतर तुम्ही नकार दिला तर काय होईल? नितीश - नाही भाऊ, पूर्ण व्यवस्था झाल्यावरच पैसे द्यावे लागतील. एजंट नितीशने रेट कार्ड सांगितले एजंट नितीशने संपूर्ण रेट कार्ड सांगितले आणि म्हणाला- पूर्ण मजा करा. तुमचे पाहुणेही पूर्णपणे आनंदी होऊन जातील. आम्ही एक-दोन नव्हे, तर डझनभर पार्ट्यांसाठी होळीला सेटिंग करून ठेवले आहे. वेळेवर लोकेशनवर सर्वांना पाठवले जाईल. सर्व व्यवस्थाही केली जाईल. एजंट नितीशच्या तोंडून संपूर्ण रेटकार्ड जाणून घ्या फक्त तुम्ही हे सांगा की कोणत्या प्रकारची पार्टी करायची आहे. हे देखील सांगा की किती दिवसांसाठी पाहिजे. जर पूर्ण रात्रीचे जेवण घ्यायचे असेल, तर त्याचा वेगळा चार्ज लागेल. 5 मुलींचे 20 हजार रुपये लागतील. यात तुम्हाला सर्व काही मिळेल. मुलीला जसे हवे तसे ठेवा, ती कोणतीही अडचण करणार नाही. जागा तुमची ठरवलेली असेल. तुम्ही फक्त हे सांगा की पाटण्यात कुठे पाहिजे. बोरिंग रोड, कंकडबाग, रेल्वे स्टेशन, गांधी मैदान किंवा इतर कोणताही परिसर असेल तर तोही सांगा. ज्या एरियाचे नाव सांगाल, तिथे मुली पोहोचतील. पेमेंट माझ्याशिवाय इतर कोणालाही द्यायचे नाही. कोणत्याही प्रकारची कुरकुर नसावी. मुली पटनाच्या असतील आणि उत्तर प्रदेशच्याही असतील. या सर्व खूप व्यावसायिक आहेत. सर्व काही व्यवस्थित ठेवतात, तुमची प्रोफाइल जशी आहे, तशा मुली पूर्णपणे फिट आहेत. आमच्या मुली 17 ते 20 वर्षांपर्यंतच्या आहेत. मुलींचे फोटो आधीच पाठवले आहेत. मुलगी पसंत करा, तुम्ही सांगा ती वेळेवर निघून जाईल. कोणत्याही मुलीला कोणतीही अडचण येऊ नये. याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे, सर्व काही सिस्टिमनुसार व्हावे. कोणतेही काम असे नसावे, ज्यामुळे कोणतीही अडचण निर्माण होईल. तरीही सर्व मुली पूर्णपणे प्रशिक्षित आहेत, त्या प्रत्येक अडचणीतूनही बाहेर पडतात.
Ajinkyatara Fort : अजिंक्यतारा किल्ल्यावरुन पडून एकाचा मृत्यू
Ajinkyatara Fort : एक व्यक्ती किल्ल्याच्या कड्यावरून खोल दरीत पडल्याची कॉल मिळताच शिवेंद्रसिंहराजे ट्रेकर्सच्या टीमने आवश्यक साहित्यासह किल्ल्यावर धाव घेतली।
Holi Songs : होळी स्पेशल: ‘रंग बरसे’ पासून ‘बलम पिचकारी’पर्यंत; या गाण्यांशिवाय रंगत नाही रंगपंचमी!
Holi Songs
US-Israel Iran War: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत सुरू असलेल्या तणावाबाबत एक महत्त्वाचे विधान केले आहे. त्यांनी हा संघर्ष चार आठवडे टिकू शकतो असे म्हटले आहे.
Iran-Israel War : इराणचे सर्वोच्च नेते खामेनेई यांच्या मृत्यूची बातमी मिळताच भारतातील अनेक भागात विरोध प्रदर्शन पाहायला मिळाले.
ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने आणि आता तालिबानने नूर खान एअरबेसवर केला हल्ला
रावळपिंडी : ऑपरेशन सिंदूरमध्ये (२०२५) भारताने आणि आता अफगाणिस्तानमध्ये सत्तेत असलेल्या तालिबानने (२०२६) पाकिस्तानच्या रावळपिंडी येथील नूर खान एअरबेसवर हल्ला केला. अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी पाकिस्तानला दणका दिला आहे. रावळपिंडीतील नूर खान एअरबेस, क्वेटा (बलुचिस्तान) येथील १२ व्या डिव्हिजनचे मुख्यालय, खैबर पख्तूनख्वा येथील मोहमंद एजन्सीमधील ख्वाजई कॅम्प आणि इतर अनेक महत्त्वाच्या पाकिस्तानी लष्करी आस्थापनांना आणि कमांड सेंटरना लक्ष्य केल्याचे अफगाणिस्तानने जाहीर केले.पाकिस्तानने काबूल आणि बगरामला लक्ष्य करून हवाई हल्ले केले. या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून अफगाणिस्तानने पाकिस्तान विरोधात लष्करी कारवाई केली. जर पुन्हा पाकिस्तानने अफगाणिस्तानमध्ये हल्ले केले अथवा अफगाणिस्तानच्या हवाई सीमेचे उल्लंघन केले तर अफगाणिस्तानकडून आतापर्यंत दिले त्यापेक्षा तीव्र प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा अफगाणिस्तानने पाकिस्तानला दिला आहे.पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात फेब्रुवारी २०२६ पासून नव्याने संघर्षाला सुरुवात झाली आहे. या संघर्षात पाकिस्तानचे शेकडो सैनिक ठार झाल्याचा दावा तालिबानने केला आहे. तर पाकिस्तानच्या लष्करी कारवाईत ४१५ अफगाण तालिबानी लढवय्ये मारले गेले आणि ५८० हून अधिक जखमी झाले असे पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण मंत्री अत्ताउल्लाह तरार यांनी सांगितले. किमान १८२ अफगाण चौक्या नष्ट केल्या आणि ३१ चौक्या ताब्यात घेतल्या तसेच १८५ टँक, चिलखती वाहने आणि तोफखाना नष्ट केला, अफगाणिस्तानातील ४६ ठिकाणांवर प्रभावी हवाई हल्ले केले; असेही पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण मंत्री अत्ताउल्लाह तरार म्हणाले.
White Clothes Care: पांढरे कपडे राहतील वर्षानुवर्षे चमकदार! धुताना या सोप्या टिप्स नक्की पाळा
White Clothes Care जर पांढरे कपडे फिके झाले असतील, तर बाजारात मिळणारे व्हाइटनिंग सोल्यूशन वापरू शकता. हे विशेषतः पांढऱ्या कपड्यांसाठी तयार केलेले असते. कपडे धुण्यापूर्वी प्री-ट्रीटमेंट म्हणून वापरल्यास त्यांची चमक टिकून राहते.
Mumbai Airport: परदेशी प्रवास ठप्प; मुंबई विमानतळावरील १२५ विमानांची उड्डाणं रद्द
मुंबई: मध्यपूर्वेतील इस्राईल, अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धजन्य संघर्षाचा मोठा फटका मुंबईतील आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीला बसला आहे. रविवारी (१ मार्च) दुपारी अडीच वाजेपर्यंत मुंबई विमानतळावरून सुटणारी तब्बल १२५ उड्डाणे रद्द करण्यात आली. यामुळे शेकडो विद्यार्थी, पर्यटक आणि खेळाडू विमानतळावर अडकून पडले असून प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत.आखाती देशांचे हवाई क्षेत्र बंदअमेरिका आणि इस्राईलने इराणवर संयुक्त लष्करी कारवाई केल्यानंतर सुरक्षिततेच्या कारणास्तव अनेक आखाती देशांनी आपले हवाई क्षेत्र (Airspace) तात्पुरते बंद केले आहे. परिणामी, युरोप आणि अमेरिकेकडे जाणारी विमाने लांबणीवर पडली आहेत किंवा रद्द करण्यात आली आहेत.कोणत्या सेवांवर परिणाम?एअर इंडिया: मुंबईहून लंडन, न्यूयॉर्क, शिकागो, टोरंटो, फ्रँकफर्ट आणि पॅरिसला जाणारी रविवार आणि सोमवारची सर्व उड्डाणे रद्द झाली आहेत. दिल्लीहून तेल अवीवला जाणारे विमानही सुरक्षिततेसाठी अर्ध्यातून पुन्हा मुंबईला वळवण्यात आले.इंडिगो: इंडिगोनेही पश्चिम आशियातील आपली उड्डाणे रद्द केली असून मुंबई-लंडन सेवा विस्कळीत झाली आहे.प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरणविमान वाहतूक अचानक कोलमडल्याने प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे. अनेक विमान कंपन्या प्रवाशांना तिकिटाचा परतावा किंवा पर्यायी मार्गांचे आश्वासन देत आहेत. पण, हा युद्धजन्य संघर्ष अधिक लांबल्यास आंतरराष्ट्रीय विमान तिकीट दरात मोठी वाढ होण्याची आणि हवाई वाहतूक दीर्घकाळ विस्कळीत राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आरक्षणाच्या पेचामुळे रखडलेल्या निवडणुका २०२७ मध्ये होणार ?
मुंबई : महाराष्ट्रातल्या ५० टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या २२ जिल्हा परिषदांच्या तसेच त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांच्या निवडणुका या रखडल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने ५० टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या कोणत्याही जिल्ह्यात जिल्हा परिषदांच्या तसेच त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांच्या निवडणुका घेण्यास स्थगिती दिली आहे. या स्थगितीमुळे निवडणुका रखडल्या आहेत. पेच सुटला तरी या निवडणुका घेण्यास आता थेट २०२७ उजाडण्याची शक्यता आहे.न्यायालयाच्या या भूमिकेमुळे राज्यातील २२ जिल्ह्यांमधील ग्रामीण राजकारणात मोठी शांतता पसरली आहे. जोपर्यंत ५० टक्के आरक्षण मर्यादेचा कायदेशीर पेच सुटत नाही, तोपर्यंत या जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांवर प्रशासकांचेच वर्चस्व राहणार आहे. राज्य शासनाने नवा जीआर काढून ग्रामीण पातळीवर ग्रामसेवक, सरपंच या पदांवर आधीपासून कार्यरत असलेल्यांनाच प्रशासक म्हणून नेमणूक दिली आहे. पुढील निवडणूक होऊन विजयी व्यक्तींनी पदभार स्वीकारेपर्यंत आधीचे ग्रामसेवक, सरपंच हेच प्रशासक म्हणून काम करतील. यामुळे ग्रामीण प्रश्न सोडवण्यासाठी स्थानिक प्रश्नांची जाण असलेली व्यक्ती उपलब्ध होईल तसेच ग्रामीण विषय हाताळण्यात कोणताही अडथळा किंवा अडचण येणार नाही, असा विश्वास राज्य शासनाने व्यक्त केला आहेराज्यात १ एप्रिल २०२६ पासून जनगणनेच्या कामाला सुरुवात होत आहे, जे ३० सप्टेंबरपर्यंत चालेल. या जनगणनेचा अहवाल सादर होण्यास आणखी तीन महिने लागतील. लोकसंख्येचा नवीन डेटा न्यायालयात सादर झाल्यानंतरच निवडणुकांचा मार्ग मोकळा होऊ शकतो. त्यामुळे आरक्षणाच्या पेचामुळे रखडलेल्या २२ जिल्हा परिषदांच्या तसेच त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांच्या निवडणुका २०२७ च्या सुरुवातीला होण्याची शक्यता आहे.
धर्मांतराविरुद्ध सर्व देशवासियांनी एकत्र येणं गरजेचं - अमित शाह
शीख पंथाच्या दहा गुरूंनी अशी परंपरा निर्माण केली आहे, जी केवळ भारतासाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी अनुकरणीय आहे. त्यामुळे शीखांच्या गुरूंच्या जीवनातून प्रेरणा घेऊन धर्मांतराच्या विरोधात सर्व देशवासीयांनी एकजूट व्हायला हवे असे गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले.नवी मुंबई येथे गुरु श्री तेगबहादूर जी यांच्या ३५० व्या शहीदी दिवस समागम समारंभात गुरु साहेबांच्या स्मृतीस अभिवादन करून उपस्थितांशी अमित शाह यांनी संवाद साधला. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.काय म्हणाले अमित शाह ?आपल्या संबोधनात केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय स्तरावर श्री गुरु तेगबहादूर साहिब जी यांचा ३५० वा शहीदी दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला, जो संपूर्ण भारतासाठी भाग्याचा विषय आहे. ते म्हणाले की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण महाराष्ट्रात गुरु तेगबहादूर यांचे जीवनकार्य तरुणांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष कार्यक्रम आयोजित केले. जर नववे गुरु तेगबहादूर यांनी हिंदू धर्म आणि हिंदूंच्या रक्षणासाठी बलिदान दिले नसते, तर संपूर्ण जगात एकही हिंदू उरला नसता. संपूर्ण भारत आणि जगभरातील सनातन धर्माचे अनुयायी गुरु तेगबहादूर यांनी हिंदू धर्म वाचवण्यासाठी यातना सहन करत आपले बलिदान दिले.आज महाराष्ट्र ने नवी मुंबई में श्री गुरु तेग बहादुर जी के 350वें शहीदी समागम में गुरु साहिब के जीवन और उनके अद्वितीय पराक्रम को स्मरण कर नमन किया। जाति, वर्ग, पंथ और समाज की सभी संकीर्णताओं से ऊपर उठकर, प्रत्येक भारतवासी को अपनी संस्कृति के लिए एकजुट होकर संघर्ष करने की प्रेरणा… pic.twitter.com/GvjRFN3LZ2— Amit Shah (@AmitShah) March 1, 2026अमित शाह पुढे म्हणाले की, शीख परंपरेचा मूळ आधार एकता, बंधुत्व, सर्वसमावेशकता आणि वीरता हा राहिला आहे आणि गुरु ग्रंथ साहिबमध्ये याच तत्वांचा समावेश करण्यात आला आहे. संत नामदेव, नरसी मेहता, कबीर, संत रविदास यांसारख्या अनेक प्रसिद्ध संतांच्या पदांना गुरु ग्रंथ साहिबमध्ये स्थान देण्याचे काम दशम पित्याने केले आहे. त्यांनी असेही नमूद केले की, महाराष्ट्र सरकारने अनेक समाजांना गुरु तेगबहादूर जी यांच्या विचारांशी जोडण्याचे काम केले आहे.
Pushkar Shrotri father : सुधाकर श्रोत्री हे अखेरपर्यंत ‘पार्लेकर कायस्थ’ या त्रैमासिकाचे संपादक म्हणून कार्यरत होते.
Chandra Grahan 2026 भारतामध्ये केवळ अरुणाचल प्रदेशातून पूर्ण खग्रास चंद्रग्रहण स्पष्टपणे दिसेल. कोलकाता येथे सुमारे ९० टक्के ग्रहण दिसेल. गडचिरोली येथे ३० टक्के, चंद्रपूर आणि नागपूर येथे चंद्र उगवताना सुमारे २५ टक्के ग्रहण दिसेल.
Delhi Airport : पश्चिम आशियातील तणावामुळे दिल्ली विमानतळावरील उड्डाणे विस्कळीत
नवी दिल्ली : पश्चिम आशियामध्ये वाढत्या संघर्षामुळे दिल्ली विमानतळावरील अनेक उड्डाणांवर परिणाम झाला आहे. काही फ्लाइट्स रद्द करण्यात आल्या असून अनेक उड्डाणे उशिराने धावत असल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विमानतळावर प्रवासी चिंताग्रस्त आणि त्रस्त अवस्थेत दिसून आले.यासंदर्भात एका प्रवाशाने सांगितले की, मध्यपूर्वेतील परिस्थिती गंभीर झाल्यामुळे मक्का-मदीना येथे जाण्यात अडथळे निर्माण झाले आहेत. संघर्षामुळे अनेक देशांच्या विमानसेवा प्रभावित झाल्या आहेत. मात्र, एका सौदी एअरलाइनची सेवा वेळेवर सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. भारतासह इतर देशांच्या विमानकंपन्यांच्या उड्डाणांमध्ये विलंब आणि रद्द होण्याच्या घटना घडत असल्याने प्रवाशांना गैरसोय होत आहे. दरम्यान, एक कुटुंब उमरासाठी दिल्लीहून सौदी अरेबियाला रवाना होणार होते. या कुटुंबातील एका प्रवाशाने सांगितले की, आम्ही उमरा करण्यासाठी मक्का येथे जात आहोत. सध्याची परिस्थिती कठीण आहे, परंतु आमची वेळ आल्याने आम्ही जाण्याचा निर्णय घेतला. आम्ही अर्ज खूप आधी केला होता, तेव्हा परिस्थिती पूर्णपणे सामान्य होती.यासोबतच एका महिला प्रवाशाने सांगितले की भारत आणि सौदी एअरलाइनच्या उड्डाणे सुरळीत सुरू आहेत आणि कोणतीही अडचण आलेली नाही. हज यात्रेकरूंची विशेष काळजी घेतल्याबद्दल त्यांनी सौदी एअरलाइनचे कौतुक केले. उपलब्ध माहितीनुसार, सौदी एअरलाइनने आपली कोणतीही फ्लाइट रद्द केलेली नाही. दुसऱ्या एका प्रवाशाने भीती व्यक्त करताना सांगितले की, थोडी भीती वाटते, पण ईश्वरावर विश्वास आहे. तो आपले रक्षण करेल. आपण विश्वास ठेवला पाहिजे. तो आपल्याला कधीही एकटे सोडणार नाही असे त्यांनी सांगितले. दरम्यान पश्चिम आशियातील तणावाचा परिणाम आंतरराष्ट्रीय हवाई सेवांवर होत असून, प्रवाशांनी प्रवासापूर्वी संबंधित विमानकंपन्यांकडून अद्ययावत माहिती घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
मुंबई : अमेरिका आणि इस्रायल यांनी संयुक्तपणे इराणवर हवाई हल्ले सुरू केले आहेत. या हल्ल्यांना इराणकडून प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न सुरू आहे. लढाईला सुरुवात झाली आहे. या लढाईचा प्रतिकूल परिणाम भारतासह जगभरच्या शेअर बाजारांवर झाला. भारतीय शेअर बाजार आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवार २ मार्च रोजी सकाळी धाडकन कोसळला. सेन्सेक्स २७०० अंकांनी घसरला तर निफ्टी २४ हजार ७०० च्या खाली गेला. निप्टी फिफ्टी हा ५०० पेक्षा जास्त अंकांनी घसरला.सेन्सेक्स २,७४३ अंकांनी घसरून ७८,५४३ वर उघडला, तर निफ्टी फिफ्टी हा ५१९ अंकांनी घसरून २४,६५९ वर उघडला. या तीव्र घसरणीमुळे बीएसईवर सूचीबद्ध असलेल्या सर्व कंपन्यांच्या एकूण बाजार भांडवलातील ७.८ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम बुडाली.सेन्सेक्समध्ये इंडिगो, लार्सन अँड टुब्रो (एल अँड टी), इटरनल, अदानी पोर्ट्स आणि एशियन पेंट्स हे सर्वाधिक घसरणीचे शेअर्स होते, जे २ ते ४ टक्के या प्रमाणात घसरले. भारत इलेक्ट्रॉनिक्सचे शेअर्स एक टक्क्यापेक्षा जास्त वाढले. एनएसईवरील क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये निफ्टी रिअॅलिटी सर्वाधिक घसरणीचे शेअर्स होते, जे सुमारे २ टक्के घसरले, तर निफ्टी ऑटो, निफ्टी आयटी, निफ्टी पीएसयू बँक, निफ्टी कंझ्युमर ड्युरेबल्स आणि निफ्टी ऑइल अँड गॅस हे प्रत्येकी एक टक्क्यापेक्षा जास्त घसरले.कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत. ब्रेंट क्रूडच्या किमती ६ टक्के वाढवून प्रति बॅरल ७७.०८ डॉलर वर पोहोचली. WTI क्रूड ५.५ टक्के वाढून ७०.७१ डॉलरवर पोहोचले. रुपयाच्या विनिमयाच्या दरात घसरण झाली. एका डॉलरसाठी आता ९१ रुपयांपेक्षा जास्त रक्कम मोजावी लागणार आहे. भारतीय गुंतवणूकदारांनी या संकटातही शेअर खरेदीवर भर ठेवला. भारतातल्या संरक्षण क्षेत्रातल्या कंपन्या या संकटात तग धरून असल्याचे चित्र आहे.
पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराण – इस्रायल संघर्ष अधिक तीव्र झाल्याचे पाहायला मिळत आहे. अमेरिका आणि इस्रायलने शनिवारी (२८ फेब्रुवारी) सकाळी इराणवर एकाच वेळी ३० ठिकाणी हल्ले करून युद्धाला सुरुवात केली आहे. या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.या परिस्थितीचा परिणाम आता संपूर्ण जगावर होताना दिसत आहे. अशातच तिसऱ्या महायुद्धाच्या नांदीला सुरुवात झाली आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे. अतिरेकी संघटना हिजबुल्लाह यांनी इराण ला पाठिंबा देत इस्रायलवर रात्रभर क्षेपणास्त्र हल्ला केला. सोमवारी मध्यरात्रीपासून इस्रायलवर क्षेपणास्त्र आणि आत्मघाती ड्रोन्सचा पाऊस पाडला आहे. या मोठ्या घडामोडीमुळे जगावर तिसऱ्या महायुद्धाचे सावट गडद झाले आहे.खामेनेईंच्या रक्ताचा बदला घेणार :लेबनानमधील इराण समर्थक उग्रवादी संघटना 'हिजबुल्लाह'ने अधिकृत निवेदन जारी करत या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. अयातुल्ला अली खामेनेई यांच्या पवित्र रक्ताचा बदला घेण्यासाठी आणि इस्रायलच्या अत्याचाराला उत्तर देण्यासाठी आम्ही शेकडो मिसाईल्स आणि ड्रोन्सनी इस्रायलला लक्ष्य केले आहे, असे हिजबुल्लाहने म्हटले आहे. विशेष म्हणजे, गेल्या एक वर्षात पहिल्यांदाच हिजबुल्लाहने अशा प्रकारे मोठ्या हल्ल्याची उघड जबाबदारी स्वीकारली आहे.
Chandra Grahan 2026: चंद्रग्रहणात धुळवड खेळावी? काय करावे, टाळावे? जाणून घ्या
मुंबई: यंदा होळी आणि चंद्रग्रहण अशी दुर्मीळ घटना जुळून आली आहे. २ मार्च रोजी होलिका दहन असून ३ मार्चला पौर्णिमेसोबतच ग्रस्तोदित चंद्रग्रहण लागणार आहे. ज्योतिषाचार्य श्रीकेतन कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, दाते पंचांगानुसार या दिवशी वेधकाळ असूनही धूलिवंदन आणि होळीचा उत्साह साजरा करता येणार आहे. पण ग्रहणाचे शास्त्र पाळताना काही नियम पाळणे आवश्यक आहे. विशेषतः गर्भवती, वृद्ध आणि मुलांसाठी वेधकाळाचे नियम वेगळे आहेत. आपण होळीच्या पूजेवेळी, चंद्रग्रहणाचा काळ, वेधकाळात काय करावे आणि काय टाळावे जाणून घेऊया...यंदा २०२६ मध्ये होळी आणि चंद्रग्रहण एकत्र येत असल्याने अनेकांना शंका आहेत. २ मार्च होलिका दहन तर ३ मार्च चंद्रग्रहण आणि धूलिवंदन आहे.२ मार्च २०२६ – होलिका दहनवार: सोमवारभद्रा असली तरी सूर्यास्तानंतर प्रदोषकाळात होलिका दहन करावे.होलिका पूजन करून कुटुंबासह प्रदक्षिणा करावी.नकारात्मकता, रोग, दुःख दूर होण्यासाठी प्रार्थना करावी.३ मार्च २०२६ – पौर्णिमा आणि ग्रस्तोदित चंद्रग्रहणग्रहण सुरू: दुपारी ३:२० वाजताभारतामध्ये ग्रहणाचा आरंभ.चंद्र उदयाला येताना ग्रहण लागलेलेच दिसेल.ग्रहण मोक्ष (समाप्ती): संध्याकाळी ६:४८ वाजतावेधकाळ कधी?मंगळवारी सूर्योदयापासून वेधकाळ सुरू.आजारी व्यक्ती, गर्भवती स्त्रिया, लहान मुले आणि वृद्धांनी सकाळी ११ वाजेपासून वेध पाळावे.वेधकाळात काय करता येईल?- पौर्णिमेचा कुळधर्म, पूजा-अर्चा, अभिषेक करता येईल.- देवाला नैवेद्य दाखवू शकता (अतिशय थोडा).- अभिषेकाचे तीर्थ प्रसाद म्हणून घेऊ शकता.- एक घास अन्नाचा फक्त वास घेऊ शकता.- गुरुजी / सुवासिनी यांना कोरडा शिधा आणि दक्षिणा देऊन कुळधर्म करता येईल.- श्राद्ध करता येईल – स्वयंपाक नैवेद्यापुरता करून नंतर गाईला द्यावा.- वेधामध्ये पूजन निषिद्ध नाही, पण भोजन निषिद्ध आहे.धूलिवंदन (धुळवड) खेळता येईल का?होय, वेधकाळात धूलिवंदन आणि रंग खेळणे करता येईल.आपल्या गावाच्या सूर्यास्तापासून ६:४८ वाजेपर्यंत ग्रहणाचा पर्वकाल आहे.काही ठिकाणी पर्वकाल कमी असेल तर ६:४८ वाजेनंतर मोक्षस्नान करावे.१५–२० मिनिटांपेक्षा जास्त पर्वकाल असल्यास सूर्यास्तानंतर स्नान करून थोडा जप करावा आणि ६:४८ वाजेनंतर मोक्षस्नान करावे. त्यानंतर भोजन करावे.पूजनावेळी (उदा. सत्यनारायण पूजन)श्री सत्यनारायण भगवानांच्या चरणी एक किंवा पाच तुळशीपत्र अर्पण करावी. प्रसाद (शिरा/पंचामृत) मध्ये एक तुळशीपत्र ठेवून नैवेद्य दाखवावा.काय करू नये?तुळशीपत्र तुटलेले, सुकलेले वापरू नये. नखे लावून तोडू नये. सकाळी स्नानानंतरच तोडावे.रविवार, एकादशीनंतर द्वादशीच्या दिवशी तुळस तोडणे टाळावे (परंपरेनुसार). योग्य पद्धतीने ठेवलेले तुळशीपत्र घरात सकारात्मक ऊर्जा आणि शांती आणते असे मानले जाते.
Share Market: इस्रायल-अमेरिका-इराण युद्धामुळे शेअर बाजार कोसळला, सेन्सेक्स ८० हजारांच्या खाली
मुंबई: मध्यपूर्वेत इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यात वाढलेल्या संघर्षामुळे जागतिक आर्थिक बाजारपेठा हादरल्या आहेत. युद्धजन्य परिस्थितीमुळे कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये उसळी आली असून त्याचा थेट परिणाम भारतीय शेअर बाजारावर झाला आहे. सोमवारी प्री-ओपनिंग सत्रातच शेअर बाजारात मोठी घसरण नोंदवण्यात आली.प्री-ओपनिंगमध्ये धक्काप्री-ओपनिंग सत्रात BSE Sensex तब्बल २,७०० हून अधिक अंकांनी कोसळला. काही वेळासाठी बाजारात मोठी घबराट पसरली होती. सेन्सेक्स ८० हजारांच्या खाली घसरल्याने गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं. तसेच NIFTY ५० निर्देशांकही प्री-ओपनिंगमध्ये ५०० हून अधिक अंकांनी खाली आला. नियमित व्यवहार सुरू झाल्यानंतरही घसरगुंडी कायम राहिली. एका टप्प्यावर सेन्सेक्स १००० अंकांनी घसरला, तर निफ्टी ३२४ अंकांनी खाली व्यवहार करत होता.तेलदरवाढीचा बाजारावर परिणामइराणवरील अमेरिका-इस्रायल हल्ल्यांनंतर कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये झपाट्याने वाढ झाली. आशियाई व्यवहारात Brent Crude तब्बल १३ टक्क्यांपर्यंत वाढला. नंतर किंमत काहीशी स्थिर झाली असली तरी टोकियो वेळेनुसार दुपारपर्यंत आंतरराष्ट्रीय बेंचमार्क सुमारे ५ टक्क्यांनी वाढून ७६.४८ डॉलर प्रति बॅरलवर होता. तेलदरवाढीमुळे महागाई वाढण्याची भीती असून भारतासारख्या आयातदार देशांवर त्याचा अधिक परिणाम होऊ शकतो.आशियाई बाजार देखील घसरणीसह खुले झाले. हाँगकाँगचा Hang Seng Index सुमारे 2 टक्क्यांनी खाली आला, तर जपानचा Nikkei 225 निर्देशांक सुमारे १.५ टक्क्यांनी घसरला. अमेरिकेतही नियमित व्यवहारांपूर्वीचे स्टॉक फ्युचर्स घसरले. S&P ५०० आणि NASDAQ Composite यांना ट्रॅक करणारे फ्युचर्स सुमारे ०.७ टक्क्यांनी खाली होते. यामुळे वॉल स्ट्रीटवरही अस्थिर व्यवहार होण्याचे संकेत मिळाले आहेत.जागतिक तणाव, तेलदरवाढ आणि संभाव्य महागाईचा दबाव या तिहेरी परिणामामुळे गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली आहे. संघर्ष अधिक तीव्र झाल्यास बाजारातील अस्थिरता वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. पुढील काही दिवस जागतिक घडामोडींवरच बाजाराची दिशा अवलंबून राहणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.
Stock Market Today: अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांमुळे निर्माण झालेल्या जागतिक अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदारांना धक्का बसला आहे.
Dates Benefits: दररोज खजूर खा आणि शरीर ठेवा तंदुरुस्त! जाणून घ्या खजूर खाण्याचे ‘६’जबरजस्त फायदे
Dates Benefits तज्ज्ञांच्या मते, सकाळी रिकाम्या पोटी खजूर खाल्ल्यास सर्वाधिक फायदा होतो. सकाळी २ ते ३ खजूर खाल्ल्यास शरीराला लगेच नैसर्गिक ग्लुकोज मिळते आणि दिवसभर ऊर्जा टिकून राहते.
Israel-Iran War:
Ranbir Kapoor: ‘कॅमेरा मुंह के अंदर डाल रहा है, पागल…’, रणबीर कपूरने पापाराझीला फटकारले
Ranbir Kapoor: रणबीर कपूरने अगदी हलक्या-फुलक्या अंदाजात कॅमेरामनची फिरकी घेतली.
अमेरिका - इस्रायलच्या संयुक्त लष्करी कारवाईनंतर मध्यपूर्वेतील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनी कतारचे पंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री शेख मोहम्मद बिन अब्दुलरहमान बिन जसीम अल थानी यांच्याशी फोनवरून चर्चा केली. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इराण - इस्रायलच्या प्रमुखांशी फोनवरून चर्चा केली.Had a telephone call with PM Benjamin Netanyahu to discuss the current regional situation. Conveyed India's concerns over recent developments and emphasised the safety of civilians as a priority. India reiterates the need for an early cessation of hostilities.@netanyahu— Narendra Modi (@narendramodi) March 1, 2026सुरक्षा मंत्रिमंडळासोबत बैठक :इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यात सुरु असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीची (सीसीएस) महत्त्वाची बैठक पार पडली. पंतप्रधानांच्या दिल्लीस्थित निवासस्थानी ही बैठक पार पडली. या बैठकीला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन उपस्थित होत्या.सूत्रांच्या माहितीनुसार, पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षामुळे उद्भवलेल्या जागतिक परिस्थितीचा सविस्तर आढावा या बैठकीत घेण्यात आला. विशेषतः या घडामोडींचा भारताच्या सुरक्षेवर, ऊर्जा पुरवठ्यावर, अर्थव्यवस्थेवर आणि परराष्ट्र संबंधांवर होणाऱ्या संभाव्य परिणामांवर चर्चा करण्यात आली. तसेच, परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना सुरक्षित परत आणण्याच्या उपाययोजनांवरही विचारविनिमय झाल्याचे समजते.
Trimbakeshwar Temple Video: त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकाला मारहाण, भाविकांमध्ये संतापाचे वातावरण
नाशिक: होळी, धुलिवंदनाच सण, सलग सुट्ट्यांमुळे नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथील ज्योतिर्लिंग मंदिरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. या गर्दीला नियंत्रित करत सर्व भाविकांना दर्शन देताना देवस्थान ट्रस्टच्या सुरक्षा रक्षकांची आणि प्रशासनाची चांगलीच दमछाक होत आहे. अशातच त्र्यंबकेश्वर येथील ज्योतिर्लिंग मंदिरात एका भाविकाला सुरक्षा रक्षकांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.देवाच्या दारात भाविकाला मारहाणयाबाबत माहिती अशी की, नाशिकच्या त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात सुरक्षारक्षकाकडून एका भाविकाला बेदम मारहाण करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. सुरक्षारक्षकाने या भाविकाचे कपडे फाडत लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. मंदिरातील एका भाविकाने या मारहाणीचा प्रकार मोबाईलमध्ये कैद केला आहे. या घटनेवरुन सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.भाविकांचा संतापहा भाविक दर्शन रांगेत बसून जप करत होता, पुढे जाण्यास तयार नव्हता त्यामुळे सुरक्षारक्षक आणि त्याच्यामध्ये वाद झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्र्यंबकेश्वर पोलिसांनी या घटनेची दखल घेतली असून या घटनेबाबत अधिक तपास सुरू आहे. दरम्यान, त्र्यंबकेश्वर मंदिरात सुरक्षारक्षकांचा वाद आणि मारहाणीच्या घटना नेहमीच्याच झाल्या असून मंदिर संस्थानवर नियंत्रण कोणाचे ? हा प्रश्न पुन्हा उपस्थित होत आहे.
US-Israeal Attacks Iran: मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी फोनवरून चर्चा केली. संभाषणादरम्यान त्यांनी या प्रदेशात लवकर युद्धबंदीची गरज असल्याचे सांगितले.
Top 10 news: राज्याचे दिवंगत उमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघाताच्या घटनेला 1 महिना झाल्यानंतर विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल समोर आला.
Mumbai-Vijaydurg Ro-Ro Ferry : भरमसाठ तिकीट दर आणि बोटीवरील महागडी खानपान सेवा यामुळे प्रवास ठरला महागडा
श्रीनगर: जम्मू-काश्मीरमध्ये भारत-पाकिस्तान सीमाभागात पाकिस्तानच्या कुरापती पुन्हा वाढू लागल्या आहेत. एकीकडे अफगाणिस्तान विरोधाच्या युद्धात पाकिस्तानचं मोठं नुकसान होत आहे. असं असतानाही पाकिस्तान भारताच्या हवाई हद्दीत ड्रोन पाठवण्याची हिंमत करत आहे. या घटना सातत्याने समोर येत आहेत. जम्मू-काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषा पार करुन एक पाकिस्तानी ड्रोन भारताच्या हद्दीत घुसण्याच्या तयारीत होता. पण भारतीस सैन्याच्या निदर्शनास येताच सैन्याने त्या ड्रोनच्या दिशेला गोळीबार करण्यास सुरुवात केली. यामुळे ते ड्रोन परत पाकिस्तानच्या दिशेला पळून गेले. विशेष म्हणजे गेल्या तीन दिवसांमधील ही दुसरी घटना आहे. ड्रोन दिगवार परिसरात काही क्षण घिरट्या मारत होते. त्यानंतर ते पाकव्याप्त काश्मीरच्या दिशेला परतले.सीमेवर तैनात असलेल्या एका सैनिकाने रविवारी पहाटे ६ वाजून १० मिनिटाच्या सुमारास पाकिस्तानचे ड्रोन पाहिले. त्यानंतर ते पाडण्यासाठी त्याच्या दिशेला गोळीबार केला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या ड्रोनने पहाटे पावणे सहा ते सहा वाजेच्या सुमारास भारताच्या हवाई हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला होता. या ड्रोनवर गोळीबार केल्यानंतर ड्रोन तातडीने पाकिस्तानच्या दिशेला परत गेले.या ड्रोनच्या माध्यमातून सर्च ऑपरेशन केलं जात आहे. ड्रोनमधून कुठलं शस्त्र किंवा काही अंमली पदार्थ एअरड्रॉप तर केले गेले नाहीत ना, याबाबत शोध घेतला जात आहे. याआधी २७ फेब्रुवारीला देखील भारतीय लष्कराच्या जवानाने भारताच्या हवाई हद्दीत शिरलेल्या पाकिस्तानी ड्रोनच्या दिशेला गोळीबार केला होता.महिन्याभरापूर्वीदेखील अशीच घटना घडलीविशेष म्हणजे महिन्याभरापूर्वी जम्मू-काश्मीरच्या सांबा जिल्ह्यातही आंतरराष्ट्रीय सीमेजवळ अशाच प्रकारे पाकिस्तानी ड्रोन घिरट्या मारताना दिसले होते. सुरक्षा एजन्सीजने देखील ड्रोन दिसल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला होता. तसेच ड्रोन दिसल्यानंतर BSF च्या जवानांनी त्या ड्रोनवर गोळीबार केला होता. या घटनेनंतर तातडीने परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती. तसेच सर्च ऑपरेशन जारी करण्यात आले होते.विशेष म्हणजे अशाप्रकारे पाकिस्तानच्या ड्रोनच्या घुसखोरीच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस आधीदेखील कठुआ जिल्ह्यात ड्रोन घिरट्या मारताना दिसल्याचं वृत्त समोर आलं होतं. त्यादिवशी तब्बल पाच मिनिटांपर्यंत ड्रोन भारताच्या हवाई हद्दीत बघायला मिळालं होतं. त्यामुळे सुरक्षा दल तातडीने अलर्ट झाले होते. पण तरीही सीमाभागात सातत्याने पाकिस्तानच्या कुरापती बघायला मिळत आहेत.
‘निवडणुकीनंतर जर देशाला पुन्हा बदलाची गरज भासली, तर आम्ही कोणत्याही वेळी, कोणत्याही ठिकाणी पुन्हा आंदोलनासाठी तयार आहोत. काही लोक भारतविरोधी प्रचाराचा प्रयत्न करतात, पण आम्ही खरे Gen Z नेते भारताबद्दल कोणतीही नकारात्मक भावना ठेवत नाही.’ नेपाळमध्ये झालेल्या Gen Z आंदोलनातील प्रमुख चेहऱ्यांपैकी एक टंका धामी आगामी निवडणुकीबद्दल उत्साहित आहेत. त्यांचे मत आहे की आंदोलनाने निवडणुकीत राजकीय पक्षांच्या प्राधान्यक्रमात बदल केला आहे. मात्र, आणखी एक Gen Z नेत्या तनुजा पांडे यांचे मत यापेक्षा वेगळे आहे. त्या म्हणतात, ‘राजकीय पक्षांनी आमच्या आंदोलनाचा गरज पडल्यास वापर केला आणि नंतर दुर्लक्ष केले.’ नेपाळमध्ये गेल्या वर्षी 8-9 सप्टेंबर रोजी Gen Z आंदोलन झाले. त्यानंतर आता पहिल्यांदाच 5 मार्च रोजी निवडणुका होत आहेत. या निवडणुकीत Gen Z आंदोलनातून पुढे आलेले नेते कुठे आहेत? भारताबद्दल नेपाळचा Gen Z काय विचार करतो आणि नवीन सरकारकडून त्यांच्या काय अपेक्षा आहेत. हे जाणून घेण्यासाठी आम्ही काठमांडूमध्ये Gen Z आंदोलनातील प्रमुख नेते आणि सामान्य लोकांशी संवाद साधला. रस्त्यांपासून ते रॅलींपर्यंत Gen Z चा उल्लेखसप्टेंबरपासून नेपाळमध्ये सुशीला कार्की यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकार कार्यरत आहे. निवडणुका जरी ऐन भरात असल्या तरी काठमांडूचे रस्ते भारताप्रमाणे बॅनर-पोस्टरने भरलेले दिसत नाहीत. रस्त्याच्या कडेला निवडणूक सभा मात्र नक्कीच होताना दिसतात. Gen Z च्या आंदोलनादरम्यान संसद, सर्वोच्च न्यायालय आणि अनेक सरकारी इमारतींमध्ये जाळपोळ करण्यात आली होती. भिंतींवर त्यांचे निशाण अजूनही आहेत. चौकाचौकातून ते निवडणूक सभांपर्यंत एक उल्लेख वारंवार येतो, तो म्हणजे Gen Z चा. यावरून हे समजते की Gen Z च्या आंदोलनानंतर होणाऱ्या पहिल्या निवडणुकीवर कोणत्या मुद्द्यांचा प्रभाव राहणार आहे. आम्ही Gen Z नेते टंका (पंकज) धामी यांच्याशी बोलून हे अधिक समजून घेण्याचा प्रयत्न केला. टंका सध्या नेपाळी कम्युनिस्ट पार्टीमध्ये सेंट्रल कमिटी सदस्य म्हणून सक्रिय आहेत. आम्ही विचारले की या निवडणुकीत Gen Z आंदोलनाचे मोठे चेहरे कुठे आहेत? यावर ते सांगतात, 'आंदोलनादरम्यान जे सहकारी जोडले गेले होते, ते आता वेगवेगळ्या राजकीय पक्षांमध्ये आहेत. ज्यांच्याशी त्यांचे विचार जुळतात, ते त्यांच्यासोबत सामील झाले आहेत.' 'आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही देशाची राजकीय विचारसरणी बदलण्याचा प्रयत्न केला होता. बदल एका दिवसात येत नाही, त्यासाठी वेळ आणि राजकीय समज दोन्ही आवश्यक आहेत. आम्ही कोणालाही राजकारणापासून दूर ठेवू इच्छित नाही. प्रत्येक व्यक्तीला राजकारणात भाग घेण्याचा अधिकार आहे. म्हणून आम्ही ठरवले की आमच्यापैकी काही लोक नेपाळी कम्युनिस्ट पार्टीसोबत मिळून काम करतील.' टंका धामी दावा करतात की आता सर्व पक्ष भ्रष्टाचार आणि तरुणांशी संबंधित मुद्द्यांवर अधिक जागरूक दिसत आहेत. ते तरुणांचा दृष्टिकोन समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. बालेन शाह यांच्या समर्थनात नाहीत Gen Z नेतेटंका धामी यांना नवीन सरकारकडून अपेक्षा आहे की त्यांनी तरुणांना नेतृत्वात सामील करावे आणि भ्रष्टाचार संपवावा. ते म्हणतात, 'जर जमिनीवरील वास्तविकता पाहिली तर नेपाळी कम्युनिस्ट पक्षाला पाठिंबा मिळत आहे. आम्हाला आशा आहे की आमचे नेते देशाला पुढे नेण्यासाठी पुढाकार घेतील. बालेन शाह आणि राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाचा प्रश्न आहे, त्यांच्या अजेंडा आणि विकासाच्या योजनेबद्दल आम्हाला शंका आहे. देशाला पुढे कसे नेले जाईल, याचा आम्हाला स्पष्ट रोडमॅप हवा आहे, जो त्यांच्याकडे दिसत नाही.' टंका धामी Gen Z मध्ये भारतविरोधी भावनांच्या दाव्यांना चुकीचे ठरवतात. ते म्हणतात, 'भारतासोबत आमचे अनादी काळापासून घट्ट नाते राहिले आहे. भारताने नेपाळच्या विकास आणि प्रगतीमध्ये सहकार्य करावे अशी आमची इच्छा आहे. काही लोक भारतविरोधी प्रचाराचा प्रयत्न करतात, पण आम्ही भारताविषयी अशी कोणतीही भावना ठेवत नाही. आम्हाला दोन्ही देशांमध्ये मजबूत संबंध हवे आहेत.' Gen Z ला पुन्हा एकदा कमी तिकिटे मिळाली आम्ही टंका धामी यांच्याप्रमाणेच Gen Z आंदोलनातील प्रमुख चेहऱ्यांपैकी एक असलेल्या तनुजा पांडे यांच्याशीही बोललो. त्या सध्या कोणत्याही पक्षाशी संबंधित नाहीत. तनुजा म्हणतात की, आंदोलनाशी संबंधित फार कमी नेते यावेळी निवडणूक लढवत आहेत. तरीही त्यांना आंदोलनातून पुढे आलेल्या लोकांचा राजकारणातील सहभाग बघायचा आहे. तनुजा आरोप करत म्हणतात, ‘नवीन पिढीला राजकारणात तिचा वाटा मिळालेला नाही. राजकीय पक्षांनी गरज पडल्यावर आमच्या आंदोलनाचा वापर केला आणि नंतर दुर्लक्ष केले, जे खूप निराशाजनक आहे.‘ ‘संसाधनांच्या दृष्टीने नेपाळमध्ये निवडणूक लढणे सोपे नाही. आमचा हेतू कधीही राजकीय पक्षात सामील होण्याचा नव्हता, तर सध्याच्या पक्षांमध्ये सुधारणा घडवून आणण्याचा होता. आज त्याच पक्षांमध्ये युवा कार्यकर्ते आपल्या नेत्यांकडून उत्तरे मागत आहेत.’ निवडणुकांकडे कसे पाहत आहेत Gen Z नेते?निवडणुकीबद्दल तनुजा म्हणतात, ‘नेपाळ सध्या संक्रमणाच्या टप्प्यात आहे. निवडणुकीला फक्त काही दिवस बाकी आहेत आणि देशात संमिश्र भावना आहे. काही लोक राजकारणात आलेल्या नवीन शक्तींकडून अपेक्षा करत आहेत, तर काही जुन्या नेतृत्वाच्या परत येण्याने घाबरले आहेत.’ त्या सर्व पक्षांवर आरोप करत म्हणतात, ‘कोणत्याही राजकीय पक्षाने 8 आणि 9 सप्टेंबरच्या घटनांच्या चौकशी अहवाल सार्वजनिक करण्याची स्पष्ट मागणी केलेली नाही. आम्हाला निवडणुका हव्या आहेत कारण लोकशाहीत त्याला पर्याय नाही, पण अनेक प्रश्नांची उत्तरे आम्हाला अजून मिळालेली नाहीत. 8 आणि 9 सप्टेंबर रोजी काय घडले, आमच्या मित्रांची हत्या कोणी केली आणि कोणी जाळपोळ केली हे माहीत नसताना मतदान करणे संभ्रमित करणारे आहे.’ Gen Z आंदोलनाचे मुद्दे निवडणुकीत दिसत आहेत का? यावर तनुजा म्हणतात, ‘Gen Z ने उपस्थित केलेले मुद्दे पक्षांच्या निवडणूक जाहीरनाम्यात नक्कीच आहेत, पण त्यांच्या हेतूंमध्ये नाहीत.’ तरीही त्या हे देखील मान्य करतात की भ्रष्टाचार हा एक गंभीर मुद्दा आहे, जो व्यवस्थेचा भाग बनला आहे. त्यामुळे तो संपवण्यासाठी वेळ लागेल. त्या पुढे म्हणतात, ‘आता जे संकेत दिसत आहेत, ते फारसे उत्साहवर्धक नाहीत. कारण अनेक जुने भ्रष्ट लोक पुन्हा निवडणूक लढवत आहेत. जर ते संसदेत परतले तर लोकशाहीच्या नात्याने आम्हाला निकाल स्वीकारावे लागतील, पण ज्या शक्तींविरुद्ध आम्ही आंदोलन केले, त्यांना पुन्हा स्वीकारणे आमच्यासाठी कठीण होईल.’ Gen Z भारतविरोधी नाही, चीनशी मैत्रीही आवश्यकया निवडणुकीला तनुजा परराष्ट्र धोरणाच्या दृष्टीनेही महत्त्वाचे मानते. त्या म्हणतात, ‘नेपाळ भू-राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा आहे. त्यात भारत आणि चीनसारख्या शेजाऱ्यांची रुची स्वाभाविक आहे. आपली नेतृत्व क्षमता याला देशाच्या हितासाठी कसे वापरते यावर ते अवलंबून आहे.’ अलीकडच्या काळात काही नेत्यांनी केलेल्या भारतविरोधी विधानांना तनुजा चुकीचे ठरवते. त्या म्हणतात, ‘आपले परराष्ट्र धोरण अलिप्ततावादावर आधारित आहे आणि आपण त्यावरच कायम राहिले पाहिजे. अति-राष्ट्रवाद आपल्याला कुठेही घेऊन जाणार नाही. नेत्यांनी शेजाऱ्यांबद्दल भडकाऊ बोलण्याऐवजी त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे. आम्हाला भारत आणि चीन दोघांशीही चांगले संबंध हवे आहेत.’ आंदोलनाच्या वेळी बालेन शाह नायक होते, आता त्यांना पाठिंबा का नाही?Gen Z च्या आंदोलनादरम्यान बालेन शाह यांचे नाव सर्वाधिक चर्चेत होते. रॅपरमधून राजकारणी बनलेल्या बालेन यांच्या राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाला Gen Z चा आवडता पक्ष मानले जात होते. मात्र तनुजा यावर सहमत नाहीत. त्यांचे म्हणणे आहे की बालेन शाह आश्वासने देतात, पण कामात कच्चे आहेत. त्या बालेन यांना Gen Z चा पाठिंबा असल्याचा दावा चुकीचा ठरवतात. Gen Z चे काय मुद्दे आहेत, कोणाला पाठिंबा देत आहेत? 24 वर्षांची मोनिका विद्यार्थिनी आहे. तिला वाटते की आता देशात एक स्थिर सरकार यावे. भ्रष्टाचार थांबावा आणि सर्वांना रोजगार मिळावा. ती बालेन शाह यांना पाठिंबा देते. मोनिका म्हणते, ‘जो निषेध झाला होता, त्याचा परिणाम या निवडणुकीत नक्कीच दिसेल. ही निवडणूक बदलासाठीच होत आहे आणि आम्हाला आशा आहे की आता बदल होईल. आम्हाला बालेन शाह यांच्यासारखा नवीन नेता हवा आहे. आम्हाला वाटते की लोकांनी घंटीला (बालेन शाह यांच्या राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाचे निवडणूक चिन्ह) मतदान करावे.‘ 25 वर्षांची विद्यार्थिनी दीपा खडका देखील भ्रष्टाचाराला एक मोठा मुद्दा मानते. ती म्हणते, ‘आंदोलनानंतर आम्हाला आशा आहे की परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल. जे काही घडले, ते भ्रष्टाचाराच्या कारणामुळे घडले, त्यामुळे आता त्याचा अंत व्हायला हवा. आम्हाला त्याच बदलाची अपेक्षा आहे.‘ पहिल्यांदा मतदान करणार असलेले Gen Z काय म्हणाले?5 मार्च रोजी होणाऱ्या निवडणुकीत 8 लाख नवीन मतदार देखील आहेत. या पहिल्यांदा मतदान करणाऱ्या Gen Z मतदारांवर सर्व पक्षांचे लक्ष आहे. यापैकी एक 21 वर्षांचा अपशन चंद महेंद्रनगरच्या कंचनपूरमध्ये राहतो. तो काठमांडूमध्ये राहून शिक्षण घेत आहे. अपशनचे मत आहे की येणारी निवडणूक खूपच क्रांतिकारी ठरू शकते. भ्रष्टाचार आणि बेरोजगारीसारख्या मुद्द्यांवरच्या प्रश्नावर अपशन निराशा व्यक्त करतात. ते म्हणतात, ‘मला वाटत नाही की अचानक कोणताही मोठा बदल दिसेल, कारण भ्रष्टाचार खालपासून वरपर्यंत आहे. जर सरकार बदलले आणि तरुणांना नेतृत्वाची संधी मिळाली, तर एक-दोन वर्षांत काही बदल दिसेल अशी आशा आहे.‘ बेरोजगारीच्या मुद्द्यावर ते पुढे म्हणतात, ‘परिस्थिती गंभीर आहे. नेपाळ एक विकसनशील देश आहे. येथे 30% पेक्षा जास्त तरुण नोकरीसाठी परदेशात जात आहेत. मला आशा आहे की नवीन सरकार नवीन धोरणे आणेल आणि नोकरीच्या संधी वाढवण्यासाठी काम करेल. तथापि, त्वरित बदल कठीण आहे, याला वेळ लागेल.‘ निवडणुकीत अपशन नवीन चेहऱ्यांना पाठिंबा देण्याबद्दल बोलतात. त्यांचे मत आहे की देशाची सूत्रे आता नवीन आणि तरुण नेत्यांच्या हातात असावीत. फक्त पंतप्रधान किंवा राष्ट्रपतीच नाही, तर स्थानिक पातळीवरून उदयास येणारे तरुण नेतेही देशाच्या विकासात मोठी भूमिका बजावू शकतात. Gen Z बदलासाठी काहीही करण्यास तयार अपशनप्रमाणेच, 21 वर्षांचे पिसभत्ता देखील पहिल्यांदाच मतदान करणारे आहेत. ते काठमांडू विद्यापीठात शिक्षण घेत आहेत. पिसभत्ता आंदोलनाची आठवण करून दुःखी होतात. ते सांगतात, ‘मी आंदोलनाच्या दिवशी परीक्षा द्यायला गेलो होतो. परीक्षा संपल्यावर बातमी मिळाली की यात अनेक लोक मारले गेले. ऐकून खूप वाईट वाटले. असे वाटले की भ्रष्टाचाराविरोधात आवाज उचलणाऱ्या तरुणांना याची किंमत जीव देऊन चुकवावी लागली.‘ पिसभत्ता मानतात की आंदोलनाचा निवडणुकीवर नक्कीच परिणाम होईल. आधी अनेक लोक वारंवार एकाच पक्षाला मतदान करत होते, पण आता ते मतदान करण्यापूर्वी एकदा नक्की विचार करतील आणि कदाचित दुसऱ्या पक्षालाही संधी देतील. आगामी निवडणुकांमधून पिसभत्ता यांना मोठ्या बदलाची अपेक्षा आहे. ते म्हणतात, ‘एक तरुण म्हणून माझी अपेक्षा आहे की देशात चांगला विकास व्हावा, भ्रष्टाचार संपवावा आणि सरकारमध्ये बदल यावा. आधी एकाच पक्षाचे सरकार वारंवार येत राहिले त्यामुळे तसा बदल दिसला नाही आणि भ्रष्टाचार कायम राहिला. आता बदल व्हायला हवा, म्हणूनच मी नवीन सरकारला पाठिंबा देत आहे.‘ ‘पुन्हा आंदोलन करण्याची गरज पडल्यास आम्ही त्यासाठीही तयार आहोत. तरुणांमध्ये ऊर्जेची कमतरता नाही, बदल आणि सुधारणांसाठी आम्ही सर्व काही करू.‘
Taapsee Pannu: “बॉलिवूडमध्ये हीरोच ठरवतो हीरोइन?”…तापसी पन्नूचा धक्कादायक खुलासा
Taapsee Pannu तापसी नुकतीच ‘अस्सी’ या चित्रपटात दिसली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा यशस्वी ठरला नसला, तरी तिच्या अभिनयाचे कौतुक झाले. स्त्रीप्रधान चित्रपट आणि ठाम मतांसाठी ओळखली जाणारी तापसी म्हणाली की, तिला काही चित्रपट केवळ मुख्य अभिनेत्याच्या पसंतीमुळे गमवावे लागले.
Jay Pawar Post : व्हिडिओमध्ये VSR चे मालक रोहित सिंह मुख्य पायलटच्या सीटवर उड्डाणादरम्यान झोपलेले दिसत आहेत.
Rajpal Yadav: “७ वर्षांत १२०० कोटींचे प्रोजेक्ट्स!”…. जामिनानंतर राजपाल यादवचा मोठा दावा
Rajpal Yadav ९ कोटी रुपयांच्या चेक बाउन्स प्रकरणात त्यांना आत्मसमर्पण करावे लागले होते. या काळात बॉलिवूडमधील काही कलाकारांनी त्यांना मदतीचा हात दिला. त्यामध्ये सोनू सूद, सलमान खान आणि अजय देवगण यांची नावे विशेष उल्लेखनीय आहेत. या सर्वांचे त्यांनी मनापासून आभार मानले.
मुंबई: नोकरदार महिलांच्या सुरक्षिततेसाठी असणाऱ्या कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ प्रतिबंध कायदा म्हणजेच पॉश ॲक्टची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी राज्यभरातील सर्व शासकीय, खाजगी कार्यालयातील अंतर्गत तक्रार समितीचे परीक्षण (पॉश ऑडिट) एक महिन्यात करण्यात यावे असे निर्देश राज्यातील सर्व जिल्हाधिकारी तसेच विभागीय आयुक्तांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी दिले आहेत.कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध मनाई व निवारण) अधिनियम, २०१३ (PoSH Act) नुसार प्रत्येक शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, महामंडळ, मंडळ, स्वायत संस्था व खाजगी आस्थापनांमध्ये अंतर्गत समिती (IC) स्थापन करून प्रभावीपणे कार्यरत असणे बंधनकारक आहे, तसेच जिल्हास्तरावर स्थानिक तक्रार निवारण समिती (LC) असणे बंधनकारक आहे.राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्याकडे येणाऱ्या विविध तक्रारी, अहवाल तसेच राज्यभरात दौरा करताना याबाबत अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत. अनेक कार्यालयांमध्ये अंतर्गत समितीची स्थापना नाही, केवळ कागदावर असलेल्या समिती, त्याबाबत जाणीव जागृती नसणे, समितीला कामकाजाचे प्रशिक्षण नसणे, वार्षिक अहवाल सादर न होणे, दर्शनी भागात फलक नाही असे निदर्शनास येते.या पार्श्वभूमीवर, या कायद्याच्या अंमलबजावणीबाबत अंतर्गत समिती परीक्षण (पॉश ऑडिट) करण्याचे निर्देश राज्यभरातील सर्व जिल्हाधिकारी तसेच विभागीय आयुक्त यांना देण्यात आले आहेत.आयोगाने दिलेले निर्देश
सचिन तेंडुलकरसोबत क्रिकेटविश्वात पदार्पण, पुढे बॉलिवूड स्टार बनला; कोण आहे हा अभिनेता?
मुंबई: कपिल देव, इरफान पठाण, सुनील गावस्कर, हरभजन सिंग आणि शिखर धवन यांच्यासह अनेक क्रिकेट स्टार्सनी बॉलिवूड चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका साकारल्या आहेत. पण तुम्हाला अशा क्रिकेट स्टारबद्दल माहिती आहे का ज्याने क्रिकेट सोडून अभिनयाला आपलं करिअर बनवलं? आपण टीम इंडियाचा माजी खेळाडू आणि वेगवान गोलंदाज सलील अंकोलाबद्दल बोलत आहोत, ज्यानं वयाच्या २८ व्या वर्षी क्रिकेट जगताला सोडून चित्रपटांमध्ये काम केलं. सलील अंकोलानं सचिन तेंडुलकरसोबत पदार्पण केलं. अचानक क्रिकेटमधून निवृत्त होण्यापूर्वी त्याने फक्त २० आंतरराष्ट्रीय सामने खेळले.सलील अंकोलाची कारकीर्दसलील अंकोलाला एकेकाळी भारतीय क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाजांपैकी एक मानलं जायचं. त्यानं सचिन तेंडुलकरसोबत पदार्पण केलं. त्यानंतर तो क्रिकेट सोडून बॉलिवूडकडे वळला आणि नंतर त्याच्या कारकिर्दीत एक वेळ अशी आली जेव्हा त्यानं छोट्या पडद्यासाठीही काम केलं. सलील अंकोलाचा क्रिकेट ते अभिनय हा प्रवास चढ-उतारांनी भरलेला होता.क्रिकेटमधून निवृत्तीसलील अंकोलानं अगदी लहान वयात क्रिकेट खेळायला सुरुवात केली. त्यानं १९८८ मध्ये महाराष्ट्रासाठी फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आणि त्याच्या पहिल्याच हंगामात २७ विकेट्स घेत सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. लवकरच त्यानं राष्ट्रीय संघात स्थान मिळवलं आणि सचिन तेंडुलकरसोबत पाकिस्तानविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्याची कसोटी कारकीर्द फक्त एक सामना चालली, परंतु तो आठ वर्षे एकदिवसीय संघात राहिला. सलीलने २० एकदिवसीय सामने खेळले. सलील अंकोलानं १९९६ च्या विश्वचषकातही भाग घेतला. पण, संघात सतत अनुपस्थित राहिल्यामुळे आणि दुखापतींमुळं त्यानं वयाच्या २८ व्या वर्षी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.सलील अभिनयाकडे वळलाक्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर, सलील अंकोला अभिनयाकडे वळला. त्यानं २००० मध्ये 'कुरुक्षेत्र' या चित्रपटातून पदार्पण केलं. त्यानंतर सलील अंकोला 'बिग बॉस' च्या पहिल्या सीझनमध्ये सहभागी झालेला. चित्रपटांनंतर, सलील अंकोला टेलिव्हिजनकडे वळला आणि 'कोरा कागज' आणि 'श्श्श्श...कोई है' सारख्या शोमध्ये दिसला.
जून 2025- अमेरिका आणि इराणमध्ये अणुकरारावर चर्चा सुरू होती. ऐनवेळी, इस्रायलने इराणच्या अणुकार्यक्रमाला स्वतःसाठी धोका असल्याचे सांगत त्यावर हल्ला केला. अमेरिकाही यात सामील झाला. अमेरिकेच्या गुप्तचर संस्थांना इराणने अणुबॉम्ब बनवल्याचे कोणतेही पुरावे मिळाले नसतानाही. फेब्रुवारी 2026- अमेरिका आणि इराणमध्ये पुन्हा अणुकरारावर चर्चा सुरू होती, करार जवळपास निश्चित होणारच होता. इस्रायल आणि सौदी अरेबियाने ट्रम्प यांना पुन्हा इराणवर हल्ला करण्यासाठी राजी केले. जानकारांचे मत आहे की, ट्रम्प पुन्हा एकदा नेतन्याहूसाठी युद्ध लढत आहेत. शेवटी, नेतन्याहूने ट्रम्प यांना इराणविरुद्धच्या युद्धात कसे ओढले, खामेनींना मारल्याने इस्रायलला काय फायदा, एक्सप्लेनरमध्ये संपूर्ण कहाणी… प्रश्न-१: नेतन्याहू यांनी ट्रम्प यांना इराणवर हल्ला करण्यासाठी कसे तयार केले?उत्तर: नेतन्याहू गेल्या सुमारे २ दशकांपासून हेच सांगत आहेत की इराण अणुबॉम्ब (किंवा अणुशस्त्रे) बनवण्याच्या मार्गावर आहे, जे इस्रायलसाठी धोकादायक आहे. गेल्या वर्षी ४ फेब्रुवारी २०२५ रोजी इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू ट्रम्प यांना भेटण्यासाठी अमेरिकेत पोहोचले होते. याच भेटीनंतर इराणवर इतक्या मोठ्या हल्ल्याची पार्श्वभूमी तयार झाली… अमेरिकेच्या हल्ल्यांमध्ये इराणच्या अणु ठिकाणांचे मोठे नुकसान झाले. तो अणुबॉम्ब बनवण्यासाठी आवश्यक युरेनियम गोळा करण्याच्या लक्ष्यापासूनही अनेक वर्षे मागे पडला होता. यानंतर इराण आणि अमेरिकेत पुन्हा अणु करारावर चर्चा सुरू झाली, पण यावेळी नेतन्याहू यांनी इराणच्या क्षेपणास्त्रांच्या धोक्याचा उल्लेखही सुरू केला. प्रश्न-२: जेव्हा इराणचे अणु ठिकाणे उद्ध्वस्त झाली, तेव्हा ट्रम्प यांनी पुन्हा हल्ला का केला?उत्तर: जूनमध्ये अमेरिकेच्या हल्ल्यानंतर काही अहवालांमध्ये असे म्हटले जाऊ लागले की इराणचा अणु कार्यक्रम पूर्णपणे संपलेला नाही. ऑक्टोबर २०२५ मध्ये नेतन्याहू यांनी इराणकडून आणखी एक धोका सांगितला. ते म्हणाले, 'लोकांना यावर विश्वास बसत नाही, पण इराण ८ हजार किमी पल्ल्याच्या आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा विकास करत आहे. इराण कोणत्याही अमेरिकन शहराला लक्ष्य करू शकतो.' यानंतर ट्रम्प यांनीही हाच दावा पुन्हा केला. तर इराणने याचा सतत इन्कार केला. तो अमेरिकेसोबत अणु करार आणि त्याच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमाबाबतही चर्चा करत होता. फेब्रुवारीच्या सुरुवातीला ट्रम्प प्रशासनाने इराणसोबतच्या संघर्षातून माघार घेऊन राजनैतिक चर्चेतून मार्ग काढण्याचे संकेत दिले होते. दोन्ही देशांमध्ये करारावर पुन्हा चर्चा सुरू झाली. विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ आणि ट्रम्प यांचे जावई जेरेड कुशनर इराणच्या अणु आणि क्षेपणास्त्र कार्यक्रमाबाबत इराणी नेत्यांशी चर्चा करत होते. ओमान यात मध्यस्थी करत होता. जिनिव्हा येथे 26 फेब्रुवारी रोजी करारावर तिसऱ्या फेरीची चर्चा झाली. 28 फेब्रुवारी रोजी मध्यस्थी करणारे ओमानचे परराष्ट्र मंत्री बदर अलबुसैदी म्हणाले, 'मला वाटते की शांतता करार आपल्या आवाक्यात आहे. आम्ही कराराच्या दिशेने बरीच प्रगती केली आहे. इराणने अणुबॉम्बसाठी आवश्यक सामग्रीचा त्याग करण्याची वचनबद्धता दर्शविली आहे. त्यांच्याकडे याचा कोणताही साठा नाही. जर तुम्ही संवर्धित सामग्री म्हणजेच युरेनियम साठवू शकत नसाल, तर बॉम्बही बनवू शकत नाही.' अलबुसैदी यांनी हे देखील सांगितले, 'माध्यमांनी या वस्तुस्थितीकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष केले आहे. मी एका मध्यस्थाच्या दृष्टिकोनातून हे स्पष्ट करू इच्छितो.' पुढील आठवड्यात व्हिएन्ना येथे कराराच्या तांत्रिक अटींवर उर्वरित चर्चा होणार होती. त्याआधीच इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर हल्ला केला. करारावरील निर्णायक चर्चेच्या अगदी आधी इराणवर हल्ला करण्याची ही दुसरी वेळ आहे. अमेरिकन वृत्तपत्र वॉशिंग्टन पोस्टनुसार, या प्रकरणाशी परिचित असलेल्या 4 लोकांनी सांगितले की, इस्त्राईल आणि सौदी अरेबिया आठवड्यांपासून इराणवर अमेरिकेने हल्ला करावा यासाठी वकिली करत होते. अहवालानुसार, 'सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान म्हणजेच MBS सार्वजनिकरित्या या प्रकरणाच्या राजनैतिक समाधानाबद्दल बोलत होते, परंतु गेल्या महिन्यात त्यांनी ट्रम्प यांना अनेक खाजगी कॉल केले आणि इराणवर हल्ला करण्याची वकिली केली. नेतन्याहू यांनीही इराणवर अमेरिकेकडून हल्ला करवून घेण्याची आपली दीर्घकाळापासूनची मोहीम सुरू ठेवली.' MBS ने अमेरिकन अधिकाऱ्यांशी बोलताना सांगितले की, जर अमेरिकेने आता कारवाई केली नाही, तर इराण आणखी धोकादायक बनून समोर येईल. MBS चे भाऊ आणि सौदीचे संरक्षण मंत्री खालिद बिन सलमान यांनीही जानेवारीमध्ये अमेरिकन अधिकाऱ्यांसोबतच्या गुप्त बैठकांमध्ये सांगितले की, हल्ला न केल्यास नुकसान होईल. नेतन्याहू आणि MBS यांच्या या प्रयत्नांदरम्यान 19 फेब्रुवारी रोजी ट्रम्प यांनी सांगितले की, 10 दिवसांच्या आत एकतर करार होईल किंवा इराणला त्याचे परिणाम भोगावे लागतील. तर यापूर्वी ट्रम्प स्वतःच म्हणाले होते की, जूनमध्ये झालेल्या हल्ल्यांमध्ये इराणचा अणु कार्यक्रम पूर्णपणे नष्ट झाला होता. गेल्या शुक्रवारी ट्रम्प त्यांच्या मार-ए-लागो रिसॉर्टमध्ये होते. तेथे उपस्थित लोकांनी सांगितले की ट्रम्प थकलेले दिसत होते. नंतर ते इराणवर हल्ल्याची घोषणा करणारा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी त्यांच्या खाजगी खोलीत गेले. शनिवारी ट्रम्प यांनी इराणवर मोठ्या हल्ल्याचा आदेश दिला. प्रश्न-३: तर काय इराणविरुद्ध नेतन्याहूची वैयक्तिक लढाई आहे?उत्तर: सुरुवातीपासूनच अमेरिकन जनता आणि अमेरिकेचे बहुतेक खासदार इराणवरील अमेरिकन हल्ल्याच्या विरोधात राहिले आहेत. मेरीलँड विद्यापीठाच्या अलीकडील सर्वेक्षणानुसार केवळ २१% अमेरिकनांनी सांगितले की ते इराणसोबतच्या युद्धाच्या बाजूने आहेत. अमेरिकन खासदार रशीदा तलैब म्हणतात, ‘ट्रम्प अमेरिकन राजकारणातील उच्चभ्रू लोकांच्या आणि इस्रायली वर्णद्वेषी सरकारच्या हिंसक कल्पनांवर आधारित काम करत आहेत, आणि त्या बहुतेक अमेरिकनांना दुर्लक्षित करत आहेत जे स्पष्टपणे म्हणतात की आता आणखी युद्ध नको आहे.’ ट्रम्प यांनी त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळाच्या सुरुवातीपासून 'अमेरिका फर्स्ट' धोरणाबद्दल बोलले आहे, ज्यात जुन्या काळाप्रमाणे अमेरिकेला युद्धांमध्ये ओढण्याऐवजी प्रगतीवर लक्ष केंद्रित केले आहे. तर इस्रायल आणि नेतन्याहू यांच्याकडे या युद्धामागे दोन मोठी उद्दिष्टे होती.. 1. अमेरिका आणि इराण यांच्यातील करार थांबवणे 2. मध्यपूर्वेतील सर्वात मोठा प्रतिस्पर्धी इराणला कमकुवत करणे प्रश्न-4: या युद्धामुळे इस्त्रायलला जास्त फायदा की अमेरिकेला?उत्तर: जर इराणसोबत अमेरिकेचे संबंध सुधारले असते, तर इस्त्रायलला मध्यपूर्वेत एक मजबूत आव्हान मिळाले असते. आतापर्यंत इस्त्रायल हा अमेरिकेकडून सर्वाधिक आर्थिक आणि लष्करी मदत मिळवणारा देश आहे. त्याचबरोबर, खामेनीनंतर इराणमध्ये नवीन सत्ता आल्याने अमेरिकेलाही फायदे आहेत. मध्य पूर्वेतील कतार, इराक, सीरिया, जॉर्डन, कुवेत आणि सौदी अरेबियासारख्या देशांमध्ये अमेरिकेने आपले लष्करी तळ (मिलिटरी बेस) उभारले आहेत. इराणच्या ताब्यात असलेल्या लाल समुद्रातील मार्गांद्वारे अमेरिकेचा तेल आणि इतर वस्तूंचा व्यापारही चालतो. इराण हा एकमेव असा देश आहे, जिथे अमेरिकेचा कोणताही तळ नाही. जर इराणमध्ये अमेरिकेच्या मनाप्रमाणे सरकार आले, तर संपूर्ण मध्यपूर्वेवर त्याचे नियंत्रण होईल. प्रश्न-५: या युद्धात सौदीसारख्या अरब देशांनी इराणला साथ का दिली नाही?उत्तर: मध्यपूर्वेतील मुस्लिम देशांमध्ये सुन्नी-शिया असा भेद आहे. सौदी अरेबिया आणि इराण यांच्यात या देशांच्या नेतृत्वावरून वर्चस्वाची जुनी लढाई आहे. याशिवाय सौदी अरेबिया, कतार, यूएई (UAE) यांसारख्या सुन्नीबहुल अरब देशांचे अमेरिकेशी लष्करी, आर्थिक आणि राजनैतिक संबंध आहेत. इराण कमकुवत होताच या देशांचे अमेरिकेशी असलेले संबंध आणखी चांगले होतील. तर या प्रदेशात इराणव्यतिरिक्त इराक, लेबनॉन आणि सीरिया असे देश आहेत, जे शियाबहुल आहेत. मात्र हे देश स्वतःच खूप कमकुवत आहेत आणि अंतर्गत सत्तासंघर्षाशी झुंजत आहेत. इराण, ज्या हूती आणि हिजबुल्लाहसारख्या संघटनांना मदत करत आला आहे, त्या वेगवेगळ्या वेळी इतर इस्लामिक देशांसाठी धोका बनल्या आहेत. याचे आणखी एक कारण असे आहे की जगातील सर्व इस्लामिक देशांमध्ये फक्त पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहेत. मध्यपूर्वेतील अरब देशांना अमेरिकेने सुरक्षा हमी दिली आहे, त्या बदल्यात त्यांनी अणुबॉम्ब न ठेवण्याचे वचन दिले आहे. अशा परिस्थितीत हे देश इराणच्या अणुकार्यक्रमाला स्वतःसाठीही एक धोका मानतात. प्रश्न-६: सुप्रीम लीडर खामेनी यांना मारल्याने इराण-अमेरिकेचा उद्देश पूर्ण होईल का?उत्तर: तज्ञांचे मत आहे की खामेनी यांची हत्या केल्यानेही अमेरिका आणि इस्रायलसाठी इराणमध्ये सत्ता परिवर्तन करणे सोपे नाही...
Tapovan Tree Cutting : संयुक्त समितीच्या अहवालावर एनजीटीची तूर्तास मौन बाळगले; महापालिकेला सर्व पक्षकारांना अहवाल देण्याचे निर्देश.
इस्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर राजधानी तेहरानमध्ये ‘रक्ताचा बदला रक्त’ अशा घोषणा दिल्या जात आहेत. तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर इस्फहानमध्ये अमेरिका-इस्रायलविरोधात रस्त्यावर उतरलेल्या लोकांनी रस्ते भरले आहेत. जाजन आणि यसुज शहरातही लोक संतापले आहेत. कोम शहरातील जमकरान मशिदीवर लाल झेंडा फडकत आहे, ज्याचा अर्थ 'बदला' असा आहे. हल्ल्यानंतर इराणमध्ये इंटरनेट पूर्णपणे काम करत नाहीये. संपर्क यंत्रणा ठप्प झाली आहे. सरकारी वृत्तवाहिनीवरूनच माहिती मिळत आहे. दैनिक भास्करने इराणमधील लोकांशी संवाद साधला. त्यांनी आम्हाला फोटो आणि व्हिडिओ पाठवले आहेत, ज्यातून तेथील परिस्थितीची माहिती मिळते. खामेनी यांच्या मृत्यूनंतर कराज शहरात लोक जल्लोष करतानाही दिसले. याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. आम्ही इस्रायलमधील परिस्थितीवर भारतातील इस्रायली राजदूत रुवेन अजार यांच्याशीही बोललो. ‘खामेनी देवदूत होते, त्यांच्यासाठी हौतात्म्य पत्करू’आम्ही तेहरानमध्ये राहणाऱ्या एका सरकारी कर्मचाऱ्याशी, महमूदशी बोललो. महमूद हे बदललेले नाव आहे, कारण त्यांनी ओळख उघड न करण्याची विनंती केली होती. महमूद म्हणतात, ‘सुप्रीम लीडरच्या हौतात्म्यानंतर आम्ही इराणमध्ये असे दृश्य पाहिले आहे, जे आजपर्यंत पाहिले नव्हते.' 'अमेरिकेसारख्या शक्तिशाली देशासोबत युद्धाच्या दरम्यान खामेनी यांना अखेरची सलामी देण्यासाठी आलेल्या लोकांमुळे रस्ते भरून गेले. इराणमधील प्रत्येक मूल सूड घेण्यासाठी तयार आहे.’ अमेरिका आणि इस्रायलच्या लढाऊ विमानांनी तेहरानमधील खामेनी यांच्या कार्यालयीन संकुलावर 30 क्षेपणास्त्रे डागली होती. या हल्ल्यात त्यांची मुलगी-जावई, सून आणि नात यांच्यासह संकुलात उपस्थित असलेले 40 कमांडर मारले गेले आहेत. हल्ल्याच्या वेळी खामेनेई कमांडरांसोबत बैठक करत होते. ‘तेहरानवर अजूनही मिसाईलचा वर्षाव’भारतीय वंशाचे अहमद अब्बास 15 वर्षांपासून तेहरानमध्ये राहत आहेत. आमच्या बोलण्यापूर्वी अर्ध्या तासापूर्वीच अहमदच्या घराशेजारी स्फोट झाले होते. त्यांच्या मते, लोकांना सांगण्यात आले आहे की, आजूबाजूला स्फोट होताच घरातून त्वरित बाहेर पडावे आणि मोकळ्या जागेत जावे. दिवसात अनेक वेळा असे करावे लागते. अहमद सांगतात, ‘पश्चिम आणि उत्तर तेहरानमध्ये सतत हल्ले होत आहेत. आजूबाजूच्या भागातून अनेक लोक कामासाठी तेहरानला येतात. आता सर्वजण घरी परतले आहेत. तेहरानमध्ये सामान्य दिवसांच्या तुलनेत कमी गर्दी आहे.’ खामेनी यांच्या मृत्यूनंतर निघालेल्या मिरवणुकीत अहमदही सहभागी झाले होते. यावर अहमद सांगतात, ‘मिरवणुकीत सहभागी झालेल्या लोकांमध्ये एक भावना स्पष्ट दिसत होती की युद्धाला योग्य निष्कर्षापर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. नक्कीच अमेरिका समोर आहे. इस्त्राईलची तर फार मोठी ताकद नाही. त्यांना या धैर्याला उत्तर द्यावे लागेल.’ ‘इराणवर 28 फेब्रुवारीच्या सकाळी हल्ला झाला. आम्ही विचार केला नव्हता की हे सर्व इतक्या लवकर होईल. मला वाटते की खामेनी यांच्या हौतात्म्यामुळे इराण एक होत आहे. इराणचे लोक खामेनी यांच्या समर्थनार्थ हौतात्म्य पत्करण्याचे नारे देत आहेत. युद्धात खंबीरपणे लढण्यासाठी स्वतःला मानसिकदृष्ट्या तयार करत आहेत.’ ‘आधी आम्हाला सांगण्यात आले की सुप्रीम लीडर आणि त्यांचे जवळचे लोक ठीक आहेत. रात्री उशिरा टीव्हीवरून कळले की ते शहीद झाले आहेत. यानंतर इराणमध्ये हल्ल्यापेक्षाही मोठी लाट उसळली आहे.’ ‘खामेनी यांच्या मृत्यूची बातमी रात्री उशिरा दिली, जेणेकरून लोक बाहेर पडू नयेत’खामेनी यांच्या मृत्यूची बातमी इराणच्या लोकांना रात्री सुमारे 3 वाजता देण्यात आली. असे यासाठी केले, जेणेकरून लोक लगेच रस्त्यावर येऊ नयेत आणि त्यांना धक्का बसू नये. तरीही, बातमी मिळताच लोक रस्त्यावर आले. रडू लागले, विलाप करू लागले. अहमद सांगतात, ‘इराणमध्ये लोकांचे सुप्रीम लीडरशी भावनिक नाते आहे. त्यांचा विरोध करणारेही आहेत, पण असे लोक खूप कमी आहेत. लोकांच्या मनात खामेनीबद्दल खूप आदर आहे. इराण सोडा, भारत आणि पाकिस्तानसारख्या देशांमध्येही त्यांचे चाहते मोठ्या संख्येने आहेत.’ इराण अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांनी वेढलेला आहे, त्याला परदेशी मदत मिळत आहे का? अहमद उत्तर देतात, अनेक देश इराणच्या बाजूने उभे आहेत. इराककडून पाठिंबा मिळाला आहे. लेबनॉन कोणत्याही क्षणी युद्धात सामील होऊ शकतो. येमेनमध्येही आमच्याकडे अशा शक्ती आहेत, ज्या या युद्धात सामील होतील.’ इराणकडून मोठ्या क्षेपणास्त्र हल्ल्याची तयारीअहमद म्हणतात, ‘लोकांना असे वाटते की इराणने इतका जबरदस्त हल्ला करावा की शत्रूंना नमण्यास भाग पडावे. उत्तर असे असावे की पुढच्या वेळी हल्ला करण्यापूर्वी कोणीही हजार वेळा विचार करेल.’ आम्ही यावर एका इराणी अधिकाऱ्याशी बोललो. त्यांची ओळख उघड केली जाऊ शकत नाही. अधिकाऱ्याने सांगितले की इराणची सर्वात मोठी ताकद बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आहेत. आमच्याकडे क्षेपणास्त्रांचा साठा आहे. आम्ही मोठ्या हल्ल्याची तयारी करत आहोत. यामुळे शत्रूला आश्चर्याचा धक्का देऊ. हल्ला कधी होईल, हे वेळच सांगेल. सध्या आमचे लक्ष्य स्पष्ट आहे- अमेरिकन लष्करी तळ आणि इस्रायल. बदला पूर्ण होईपर्यंत आम्ही त्यांच्यावर हल्ले करत राहू. इस्रायली राजदूत म्हणाले- हल्ल्यानंतर भारताला माहिती दिली होतीइस्रायलने सर्वात आधी इराणवर हल्ले केले होते. नंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हल्ल्यात सहभागी असल्याची पुष्टी केली. इराणवर इस्रायलचा एका वर्षातील हा दुसरा हल्ला आहे. यावेळी हा हल्ला भारतीय पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानंतर लगेच झाला आहे. पंतप्रधान मोदी किंवा भारतीय परराष्ट्र मंत्रालयाला हल्ल्याबद्दल माहिती देण्यात आली होती का, इस्रायलमध्ये युद्धाबाबत काय परिस्थिती आहे? आम्ही हे प्रश्न भारतातील इस्रायलचे राजदूत रुवेन अजार यांना विचारले. प्रश्न: इराणवरील हल्ल्याचा अंतिम उद्देश काय आहे?उत्तर: सर्वप्रथम, आम्हाला समोर दिसत असलेला धोका, म्हणजे इराणचा अणुकार्यक्रम संपवायचा आहे. इराण दशकांपासून लष्करी अणुकार्यक्रम चालवण्याचा प्रयत्न करत आहे. याव्यतिरिक्त, तो बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची ताकद वाढवण्यासाठी काम करत आहे, जेणेकरून इस्रायलला नष्ट करता येईल. इराण संपूर्ण प्रदेशात आपल्या प्रॉक्सी गटांना निधी, शस्त्रे आणि तंत्रज्ञान पुरवत आहे. इराण 2027 पर्यंत इस्रायलला संपवण्याबद्दल बोलत होता. जूनमध्ये आम्ही त्याच्यावर हल्ले केले होते. इराणने आता सहकार्य करण्यास नकार दिल्याने, आम्ही पुन्हा ऑपरेशन सुरू केले आहे. प्रश्न: जर इराणमध्ये सरकार बदलले, तर ते कसे सरकार असेल?उत्तर: इराणमध्ये सत्ता बदलेल की नाही हे आम्हाला माहीत नाही, पण आम्ही ते नक्कीच व्हावे अशी आमची इच्छा आहे. काही आठवड्यांपूर्वीच सध्याच्या सरकारने आपल्या हजारो नागरिकांना ठार मारले होते. प्रश्न: इराणवरील हल्ला पंतप्रधान मोदींच्या इस्रायल दौऱ्यानंतर लगेचच झाला आहे. त्यांना हल्ल्याबद्दल माहिती देण्यात आली होती का?उत्तर: भारताला आमची परिस्थिती चांगलीच माहीत आहे. पंतप्रधान मोदी इस्रायलमध्ये असताना, आम्हाला ऑपरेशन होणार आहे हे माहीत नव्हते. याला 28 फेब्रुवारीच्या सकाळी मंजुरी देण्यात आली. तोपर्यंत पंतप्रधान मोदी दौरा पूर्ण करून परतले होते. इस्रायलच्या परराष्ट्र मंत्र्यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री जयशंकर यांच्याशी फोनवर बोलून माहिती दिली होती. प्रश्न: परराष्ट्रमंत्री जयशंकर काय म्हणाले?उत्तर: भारताने आपली भूमिका स्पष्टपणे मांडली. भारत चर्चा आणि स्थिरता इच्छितो. आम्ही अनेक वर्षे इराणशी मुत्सद्देगिरीद्वारे चर्चा करण्याचा प्रयत्न केला आहे. अमेरिकेला असे वाटले की इराण मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून वेळ काढत आहे आणि अटी मान्य करण्यास तयार नाही. प्रश्न: सध्या इस्रायलमध्ये कसे वातावरण आहे?उत्तर: इस्रायल स्वतःला सुरक्षित ठेवू इच्छितो. इस्रायलवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि ड्रोनद्वारे सतत हल्ले होत आहेत. अनेक लोक खामेनेईच्या मृत्यूवर आनंद साजरा करत आहेत, कारण इराणचा सर्वोच्च नेता इस्रायलवर हल्ल्याचे आदेश देत असे, इस्रायलच्या लोकांना मारत असे, आता तो नाही. आम्ही इराणमध्येही उत्सवाचे फोटो पाहिले आहेत. मला वाटते की इराणचे लोक या संधीचा उपयोग करून सत्ता बदलतील. इराणचा प्रतिहल्ला, अमेरिकेच्या तीन सैनिकांचा मृत्यूइस्त्रायल आणि अमेरिकेने इराणची राजधानी तेहरानसह 10 मोठ्या शहरांना लक्ष्य केले. या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत 200 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. एका शाळेवर क्षेपणास्त्र पडल्याने 148 मुलींचा मृत्यू झाला. याला प्रत्युत्तर म्हणून इराणने अमेरिकेच्या सहयोगी 9 देशांवर हल्ले केले आहेत. पेंटागॉनने 1 मार्च रोजी सांगितले की, इराणवरील हल्ल्यादरम्यान तीन अमेरिकन सैनिक ठार झाले आहेत. 5 सैनिक जखमी झाले आहेत. 28 फेब्रुवारी रोजी सुरू झालेल्या युद्धानंतर अमेरिकन सैनिकांच्या मृत्यूची ही पहिलीच नोंद आहे. दुसरीकडे, इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्डने दावा केला की, सैन्याने अमेरिकेच्या विमानवाहू नौका USS अब्राहम लिंकनवर चार बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली आहेत. मात्र, अमेरिकेने हा दावा फेटाळून लावला. एका अमेरिकन अधिकाऱ्याने अल जझीराशी बोलताना सांगितले की, इराणची क्षेपणास्त्रे विमानवाहू नौकेपर्यंत पोहोचली नाहीत. जहाजाला कोणतेही नुकसान झाले नाही. यादरम्यान, इराणचे अध्यक्ष मसूद पेजेश्कियान यांनी स्टेट टीव्हीवर व्हिडिओ संदेश जारी केला आहे. त्यांनी सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले. तसेच, अंतरिम नेतृत्व परिषदेने काम सुरू केले असल्याचे सांगितले. पेजेश्कियान हे देखील तीन सदस्यीय अंतरिम समितीत आहेत. इराणचे माजी अध्यक्ष अहमदीनेजाद यांचे निधनइराणच्या लेबर न्यूज एजन्सीने माजी अध्यक्ष महमूद अहमदीनेजाद यांच्या मृत्यूचा दावा केला आहे. त्यांचा मृत्यू १ मार्च रोजी हवाई हल्ल्यात झाला. एजन्सीने दावा केला की, इस्रायल-अमेरिकेच्या संयुक्त हवाई हल्ल्यात तेहरानच्या ईशान्येकडील नारनाक भागातील त्यांच्या घराला लक्ष्य करण्यात आले. अहमदीनेजाद २००५ ते २०१३ पर्यंत इराणचे अध्यक्ष होते. इराणच्या हल्ल्यांमुळे UAE मध्ये 3 ठार, एक भारतीयही जखमीसंयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये इराणच्या हल्ल्यात तीन लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पाकिस्तान, नेपाळ आणि बांगलादेशचे नागरिक आहेत. एका भारतीयासह 58 लोक जखमी झाले आहेत. इराणने UAE च्या दिशेने 165 बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली, त्यापैकी 152 हवाई संरक्षण प्रणालीने नष्ट केली आणि 13 समुद्रात पडली. याव्यतिरिक्त, 541 ड्रोन प्रक्षेपित करण्यात आले, त्यापैकी 506 अडवले गेले, तर 35 देशाच्या सीमेत पडले.
Lakhpati Didi Pune : पुणे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून २७ हजार बचत गटांचे जाळे; महिलांनी रोवले उद्योग क्षेत्रात पाऊल.
मुंबई : भारताने दक्षिण आफ्रिका संघाचा पाच विकेटने पराभव करत सेमी फायनलमध्ये आपली जागा निश्चित केली आहे. भारताकडून संजू सॅमसनने केलेल्या नाबाद ९७ धावांच्या खेळीने हा विजय सहज साकार करता आला. या सामन्यात वेस्ट इंडिज संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना २० ओव्हर मध्ये १९५-४ धावा केल्या होत्या. भारताने १९.२ ओव्हर मध्ये हे आव्हान पूर्ण करत पाच विकेटने विजय मिळवला. भारताने हा विजय मिळवला असला तरी वेस्ट इंडिजने काही सहजासहजी सामना सोडलेला नव्हता. संपूर्ण सामन्याचा एक असा टर्निंग पॉईंट आहे, जिथे खऱ्या अर्थाने म्हणता येईल की भारताच्या बाजूने सामना झुकला. नेमका कोणता जाणून घ्या.या सामन्यामध्ये देव पावला अन् सूर्यकुमार यादवने टॉस जिंकला. भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. वर्ल्ड कप मधील सर्व सामने पाहता, भारताची गोलंदाजी कुठेतरी कमकुवत दिसली. त्यामुळे आजच्या सामन्यातही गोलंदाजांच्या कामगिरीवर सर्वांचं लक्ष लागून होतं. आजचा सामना खऱ्या अर्थाने गोलंदाजीमध्येच फिरला तो नेमका कुठे?वेस्ट इंडिज संघाने बॅटींगला आल्यावर सुरुवातीला थोडासा सावध पवित्रा घेतलेला पाहायला मिळाला. सुरुवातीच्या दोन ओवर्समध्ये त्यांनी थेट आक्रमण केले नाही पण त्यानंतर तिसऱ्या ओव्हरपासून सुरुवात केली होती. कॅप्टन शाई होप आज गतीने खेळताना दिसला नाही. त्यामुळे रोस्टन चेज याने आक्रमक खेळायला सुरुवात केली होती. मात्र वरूण चक्रवर्तीने ९ नव्या ओव्हरला त्याला आऊट केले. त्यानंतर मैदानात आलेल्या हेटमायर याने आपल्या शैलीत खेळायला सुरुवात केली. अवघ्या १२ बॉलमध्येच त्याने २७ धावा करत भारतीय गोलंदाजांवर दबाव आणला होता. त्यामुळे वेस्ट इंडिज मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करणार असा दिसू लागलं होतं. पण त्यावेळी भारताचा संकट मोचक आणि यॉर्कर किंग म्हणून प्रसिद्ध असलेला बुमराहने संपूर्ण सामनाच एक ओव्हरला फिरवला. जर हेटमायर संजूसारखा टिकला असता तर सहज स्कोरही जास्त झाला असता. त्यामुले हेटमायरची विकेट महत्त्वाची होती.वेस्ट इंडिज संघाची पहिली विकेट ६८ धावांवर गेली होती त्यानंतर हेटमायर त्याच्या खऱ्या रूपात यायला लागला होता. परंतु बुमराहने त्याला आपल्या जाळ्यात अडकवत त्याला आऊट केलं. बर हा गडी इतक्यावरच थांबला नाही, याच ओव्हरमध्ये पाचव्या चेंडूवर बुमराहने चेजला आऊट करत सामना पलटवला. त्यामुळे बुमराहने एकाच ओव्हरमध्ये घेतलेल्या दोन विकेट सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरल्या असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. भारताने आता या विजयासह सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे.
UAE मध्ये रायगड आणि नवी मुंबईतील नागरिक अडकले; आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द, प्रवाशांना फटका
रायगड: मध्यपूर्वेत भडकलेल्या तणावाची झळ आता थेट सामान्य प्रवाशांना बसू लागली आहे. इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यात वाढलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आखाती देशांमध्ये सुरक्षेची परिस्थिती गंभीर बनली आहे. त्याचा परिणाम म्हणून अनेक देशांनी आपली हवाई हद्द तात्पुरती बंद केली असून आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द किंवा पुढे ढकलण्यात आली आहेत. या घडामोडींमुळे संयुक्त अरब अमिराती ( UAE ) येथे गेलेले रायगड आणि नवी मुंबई परिसरातील काही नागरिक सध्या तेथेच अडकून पडले आहेत.संघर्ष तीव्र झाल्यानंतर विमान कंपन्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून उड्डाणे स्थगित करण्याचा निर्णय घेतला. परिणामी, परतीच्या प्रवासाची तयारी करून विमानतळावर पोहोचलेले अनेक प्रवासी अचानक अनिश्चिततेत सापडले. काही जण हॉटेलमध्ये तात्पुरती व्यवस्था करून थांबले आहेत, तर काही प्रवासी विमानतळ परिसरातच परिस्थिती सुधारण्याची वाट पाहत आहेत. सोशल मीडियावरून संपर्क साधत आपल्या कुटुंबियांना धीर देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांच्या माहितीनुसार, लष्करी हालचाली आणि प्रतिहल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर आखातातील हवाई क्षेत्र अत्यंत संवेदनशील झाले आहे. इराणकडून अमेरिकन तळांना लक्ष्य केल्याच्या वृत्तांनंतर तणाव आणखी वाढल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर नागरी विमान वाहतूक सुरक्षेच्या कारणास्तव मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली आहे. भारतासह विविध देशांतील हजारो प्रवाशांच्या प्रवासावर याचा परिणाम झाला आहे.दरम्यान, UAE मधील भारतीय दूतावास आणि संबंधित यंत्रणा परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याची माहिती मिळत आहे. अडकलेल्या नागरिकांशी संपर्क साधून आवश्यक ती मदत पुरविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. परिस्थिती स्थिर झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने उड्डाणे पूर्ववत करण्याचे नियोजन असल्याची माहितीही समोर येत आहे.रायगड आणि नवी मुंबईतील कुटुंबीयांमध्ये मात्र चिंतेचे वातावरण आहे. आपल्या नातेवाईकांची सुरक्षितता आणि परतीचा प्रवास कधी सुरू होणार याबाबत सर्वांच्या नजरा अधिकृत घोषणांकडे लागल्या आहेत. केंद्र शासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. परदेशात असलेल्या भारतीयांनी स्थानिक प्रशासन आणि भारतीय दूतावासाशी संपर्कात राहावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. मध्यपूर्वेतील या युद्धजन्य परिस्थितीचे पडसाद किती काळ उमटणार, हे अद्याप स्पष्ट नसले तरी सध्या तरी प्रवाशांसाठी प्रतीक्षेचीच परीक्षा सुरू आहे.
SPPU News : भारतीय ज्ञान परंपरेची आधुनिक शिक्षणाला जोड; कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांचे प्रतिपादन
SPPU News : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मालवीय मिशन टीचर ट्रेनिंग सेंटरच्या वतीने शिक्षकांसाठी विशेष उपक्रम संपन्न.
Pune Airport : आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी मोठी अपडेट! पुण्यातून दुबई-अबुधाबीला जाणारी विमानं रद्द
Pune Airport : दुबई विमानतळावर अडकलेल्या पुणेकर पर्यटकांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिला धीर; सुरक्षिततेसाठी विमानसेवा अनिश्चित काळासाठी स्थगित.
Pune Railway : लोणावळा, वसई रोड, सुरत आणि इटारसीमार्गे प्रवास होणार सोपा; रेल्वे प्रशासनाकडून वेळापत्रक जाहीर.

27 C