ICC Trophy Comparison : सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने नुकताच टी-२० विश्वचषक जिंकला असला, तरी ऑस्ट्रेलियाची बरोबरी करण्यासाठी भारताला अजून थोडा पल्ला गाठायचा आहे.
Stock Market Crash: आखाती युद्धाचा जगभर थरकाप! चीन, जपान, कोरिया, अमेरिका…सगळे शेअर बाजार कोसळले
Stock Market Crash: अमेरिकेने इराणविरोधात हल्ला करूनही अमेरिकन शेअर बाजाराचे आतापर्यंत जास्त नुकसान झाले नव्हते. मात्र आता युद्ध जास्त चिघळण्याची शक्यता वाढल्यामुळे अमेरिकेतील माहिती तंत्रज्ञान कंपन्यासह इतर कंपन्यांच्या शेअरची विक्री वाढून अमेरिकेतील शेअर बाजाराचे निर्देशांक ही कमी झाले.
मोठा निर्णय! जमीन महसूल सुधारणा विधेयक विधानसभेत मंजूर; नेमका काय होणार फायदा?
Maharashtra Land :
Attack in Saudi Arabia : सौदीतील हल्ल्यात भारतीयांची जीवितहानी नाही; भारतीय दूतावासाने केले स्पष्ट
सौदी अरेबियामध्ये (Attack in Saudi Arabia) काल इराणकडून झालेल्या माऱ्यामध्ये कोणीही भारतीयाची जीवितहानी झालेली नाही, असे रियाधमधील भारतीय दूतावासाने स्पष्ट केले आहे.
Oil Crisis: 1939 सारखा काळ पुन्हा येतोय का? दुसऱ्या महायुद्धाशी आजच्या तेल संकटाच्या भयावह समानता
Oil Crisis: भारताने १९७३, १९७९ आणि १९९१ च्या प्रत्येक तेल संकटात मंदीला सामोरे जावे लागले होते. या वेळी परिस्थिती वेगळी असण्याचे कोणतेही ठोस कारण दिसत नाही. १ मार्चपूर्वी केलेले सर्व अर्थसंकल्पीय अंदाज आणि व्यापार समतोलाचे अंदाज आता नव्याने तपासावे लागणार आहेत. हे सगळे पाहता दुसऱ्या महायुद्धाशी साम्य अधिकच गडद होत चालले आहे.
Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या महिला खेळाडूंच्या जीवाचे रक्षण करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
Latur News : लातूरमध्ये भाजप पदाधिकाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न; काय घडलं नेमकं?
महानगरपालिकेत (Latur News) पक्षाने दुसऱ्या नेत्याला नामनिर्देशित नगरसेवक म्हणून निवडल्याबद्दल निराश होऊन लातूर जिल्ह्यातील एका भाजप पदाधिकाऱ्याने सोमवारी डिझेल ओतून स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला
Politics: राहुल गांधी यांनी पश्चिम आशियाशी संबंधित इंधन दर आणि आर्थिक संकट हे लोकांचे महत्त्वाचे प्रश्न असल्याचे अधोरेखित केले. इंधनाचे दर, आर्थिक उद्ध्वस्तपणा हे महत्त्वाचे नाही का? हे जनतेचे प्रश्न आहेत आणि आम्हाला हे आवश्यक वाटते.
Congress Mla : काँग्रेसच्या बड्या नेत्याची आमदारकी रद्द; राज्याच्या राजकारणात खळबळ
Congress Mla : ग्वाल्हेर उच्च न्यायालयाने काँग्रेस आमदार मुकेश मल्होत्रा यांची निवडणूक अवैध ठरवली आहे.
India Politics: काही दिवसांपूर्वी TMC ने काँग्रेससह इतर विरोधी पक्षांना सांगितले होते की, जर ते CEC ज्ञानेश कुमार यांच्या महाभियोगाला पाठिंबा देतील तर TMC लोकसभा अध्यक्ष बिर्ला यांना हटविण्याच्या ठरावाला पाठिंबा देईल.
Crude Oil : देशात क्रूड ऑइलचा पुरेसा साठा असल्याने तूर्तास दरवाढ नाही; सरकारने केले स्पष्ट
पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने देशातील क्रूड ऑइल (Crude Oil) साठ्याबाबतची चिंता दूर केली आहे. देशाकडे पुढील 7 ते 8 आठवड्यांसाठी पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली आहे.
Satara News :
Babar Azam : बाबर आझमचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो लोकांना फळे वाटताना दिसत आहे
दिल्लीला नवीन नायब राज्यपाल मिळाले असून, तरनजीत सिंग संधू (Taranjit Singh Sandhu) हे दिल्लीचे २३ वे नायब राज्यपाल म्हणून बुधवारी, ११ मार्च रोजी शपथ घेणार आहेत.
Gary Kirsten : १५ एप्रिलपासून आपल्या पदाची सूत्रे स्वीकारतील आणि त्यांचा हा करार दोन वर्षांसाठी असेल.
इंधन पुरवठ्यातील अनिश्चिततेमुळे देशात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीची मागणी (LPG Gas Booking) वाढली आहे.
Pune News :
Sanju Samson Post : या ऐतिहासिक यशानंतर संजूने आपल्या यशाचे श्रेय पत्नी चारुलता हिला दिले आहे.
MNS News : जोरदार कमबॅक ! ‘या’पंचायत समितीवर पहिल्यांदाच फडकला मनसेचा झेंडा
मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी रायगडावर जाऊन आपल्या पक्षाचा 20 वा वर्धापन दिन साजरा केला. तसेच, वर्धापनदिनी आज मनसेची (MNS News) जोरदार नोंदणीही सुरू आहे.
Ravindra Chavan : महाराष्ट्र अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप आमदारांच्या गैरहजेरीमुळे पक्ष अडचणीत आला आहे.
New Rent Rules Viral : व्हायरल पोस्टनुसार नव्या नियमांमध्ये पुढील बदल झाल्याचे सांगितले जात आहे. सर्व भाडे करारांची डिजिटल नोंदणी करारावर स्वाक्षरी झाल्यापासून ६० दिवसांत ऑनलाइन करणे बंधनकारक असेल.
कंत्राटदारांकडून वेळेत बस न मिळाल्याने मुंबईत 'बेस्ट'चा तुटवडा
राज्यमंत्र्यांची कबुली; स्क्रॅपिंग पॉलिसीचाही बेस्टला मोठा फटकामुंबई : मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या 'बेस्ट' बसची सेवा सध्या व्हेंटिलेटरवर आहे, असा आरोप करीत मुंबईतील आमदारांनी सोमवारी विधान परिषदेत प्रश्नांची सरबत्ती केली. त्यावर, कंत्राटदारांकडून वेळेत बस न मिळाल्याने मुंबईत 'बेस्ट' बसचा तुटवडा असल्याची कबुली नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिली.विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात आमदार सुनील शिंदे यांनी बेस्टच्या खालावलेल्या स्थितीबाबत प्रश्न उपस्थित केला होता. यावर झालेल्या चर्चेत प्रवीण दरेकर आणि सचिन अहिर यांनीही उपप्रश्न विचारून प्रशासकीय दिरंगाईवर बोट ठेवले. त्यावर राज्यमंत्री मिसाळ म्हणाल्या, मुंबईची वाढती लोकसंख्या आणि प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता शहराला किमान १० हजार बसची आवश्यकता आहे. बेस्टने विविध कंत्राटदारांना ६ हजार ५५५ बस पुरवठ्यासाठी कार्यादेश (वर्क ऑर्डर) दिले होते. मात्र, कंत्राटदारांकडून बस वेळेत उपलब्ध होऊ न शकल्याने अपेक्षित प्रमाणात बससेवा वाढवता आली नाही. मार्च २०२३ पर्यंत १,३०० बस उपलब्ध होणे अपेक्षित होते, मात्र सध्या केवळ ६८५ बस उपलब्ध झाल्या आहेत.स्क्रॅपिंग पॉलिसीनुसार १५ वर्षांनंतर बस स्क्रॅप केल्या जात असल्याने बेस्टच्या मालकीच्या बसची संख्या कमी झाली आहे. पूर्वी बेस्टकडे १ हजार ८८२ मालकीच्या बस होत्या, मात्र सध्या ही संख्या २४९ इतकी राहिली आहे. उर्वरित बस भाडेतत्त्वावर घेतल्या असून सध्या २ हजार ५५८ भाडेतत्त्वावरील बस उपलब्ध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. मुंबईतील बेस्ट बससेवेबाबत अनेक तक्रारी येत असून, यावर सविस्तर चर्चा करण्यासाठी लवकरच मुंबईतील सर्व स्थानिक आमदार आणि परिवहन विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांची संयुक्त बैठक घेतली जाईल, असे आश्वासन मिसाळ यांनी यावेळी दिले.
Marriage Problem: आमदार सोळंके म्हणाले, मी ग्रामीण भागाचे प्रतिनिधित्व करतो आणि तिथली परिस्थिती अत्यंत भयावह आहे. आज प्रत्येक लहान-मोठ्या खेडेगावात २५ ते ३० वयोगटातील किमान ५० ते १०० तरुण असे आहेत, ज्यांचे वय उलटून गेले तरी लग्न झालेले नाही.
KRA Jewellers : या उपक्रमात प्रामुख्याने समाजावर सकारात्मक प्रभाव निर्माण करणाऱ्या, मात्र अनेकदा प्रसिद्धीपासून दूर राहून काम करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात आला.
Rohit Ritika Video : व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये रोहित शर्मा सीमारेषेबाहेर उभा असून रितिका बॅरेकेट्सच्या पलीकडे उभी आहे.
भाजपवर शोककळा! नेत्याचा कार अपघातात मृत्यू; नर्मदा स्नानाहून परतताना काळाचा घाला
Bjp Leader Death :
लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या पाठोपाठ मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार (Gyanesh Kumar) विरोधकांच्या निशाण्यावर आहेत. कुमार यांना पदावरून हटवण्याची मागणी करणारा ठराव मांडण्याची तयारी विरोधकांनी केली आहे.
हुंडाबंदी कायदा अधिक कठोर होणार, राज्यमंत्री पंकज भोयरांनी दिली ग्वाही
मुंबई : गेल्या काही वर्षांत राज्यात घडलेल्या हुंडाबळी प्रकरणांचा मुद्दा सोमवारी विधानसभेत चांगलाच गाजला. यावेळी लग्नाळू तरुणांना मुली मिळत नसल्याचा मुद्दाही चर्चेत आला. दरम्यान, सभागृहात आमदारांनी मांडलेल्या व्यथेसंदर्भात विचार करून हुंडाबळी कायदा अधिक कडक करण्यासंदर्भात विचार करण्याचे आश्वासन राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिले.काँग्रेस आमदार ज्योती गायकवाड यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे हुंडाबळीच्या घटनांचा मुद्दा उपस्थित केला. त्या म्हणाल्या की, अलीकडे हुंडाबळीच्या घटना वाढल्या असून पुरोगामी महाराष्ट्रात या घटना धक्कादायक आहेत. एनसीआरपीच्या अहवालानुसार, देशात प्रत्येक दिवशी २० मुलींचा हुंडाबळीमध्ये मृत्यू होतो. या प्रकरणातील मुलींसाठी मोफत वसतीगृह आणि शिक्षित मुलींसाठी नोकऱ्या तसेच अशिक्षित मुलींसाठी मोफत प्रशिक्षण उपलब्ध करून देणार का? हुंडाबळी प्रकरणात कठोर शिक्षा दिली जाणार का? असा प्रश्न त्यांनी विचारला. विधानसभा सदस्य नमिता मुंदडा, स्नेहा दुबे, प्रकाश सोळंके विक्रम पाचपूते, डॉ. नितीन राऊत यांनी या चर्चेत सहभाग घेतला.यावर उत्तर देताना राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर म्हणाले की, केंद्र शासनाच्या हुंडा प्रतिबंधक अधिनियम १९६१ च्या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी राज्यात महिला व बालविकास विभागाच्या ३ नोव्हेंबर २००३ च्या अधिसुचनेद्वारे महाराष्ट्र हुंडा प्रतिबंधित नियम २००३ तयार करण्यात आला. राज्यस्तर, जिल्हास्तर आणि तालुका स्तरावर हुंडा प्रतिबंधक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच महिला व बालकांवरील अत्याचारांना प्रतिबंध घालण्यासाठी अपर पोलिस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली महिला व बाल अपराध प्रतिबंधक हा स्वतंत्र विभाग तयार करण्यात आला आहे. गृहविभागाच्या वतीने महिला हेल्पलाईन, भरोसा सेल, महिला दक्षता समिती, स्वतंत्र पोलिस तपास पथक स्थापन करण्यात आले आहे.राज्यात किती हुंडाबळी?राज्यस्तरावर २०२१ मध्ये हुंडा बळी प्रकरणी १७२ गुन्हे दाखल करण्यात आले तर, ५३४ आरोपींना अटक करण्यात आली. २०२२ मध्ये १८० गुन्हे आणि ५१५ आरोपींना अटक, २०२३ मध्ये १७० गुन्हे आणि ३८१ आरोपींना अटक, २०२४ मध्ये १३९ गुन्हे आणि २३४ आरोपींना अटक तर, २०२५ मध्ये १३८ गुन्हे आणि २१३ आरोपींना अटक करण्यात आली.कायद्यात सुधारणा करा - स्नेहा दुबेयावेळी आ. स्नेहा दुबे यांनी सध्या अस्तित्वात असलेल्या कायद्यात सुधारणा करण्याची गरज व्यक्त केली. एखादे लग्न ठरल्यानंतर लग्नाच्या तारखेच्या तीन महिने आधी वर आणि वधू विभागांची नोंदणी करून संबंधित कुटुंबाच्या अकाऊंटवर वॉच ठेवणार का? कुणाच्या नावावर किती पैसे ट्रान्सफर झाले? कुणाच्या नावाने गाडी बुक झाली? आणि लग्नात देण्यात येणाऱ्या भेटींची एखाद्या यंत्रणेमार्फत नोंद ठेवणार का? असा प्रश्न त्यांनी विचारला. यावर या सूचना नोंदवून घेऊन त्यावर उचित कार्यवाही करण्यात येईल, असे मंत्री भोयर यांनी सांगितले. तसेच लग्नाचा प्रसंग हा कौटुंबिक प्रसंग असतो. अशावेळी शासनाने तिथे विनापरवानगी जाऊन कारवाई करणे, यावर एकमत होणार नाही. तक्रार प्राप्त झाल्यास निश्चितपणे कारवाई करण्यात येईल, असेही ते म्हणाले.शेतकरी तरुणांना लग्नासाठी मुली मिळेनात - प्रकाश सोळंकेआ. प्रकाश सोळंके यांनी लग्नाळू मुलांचा प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले की, ग्रामीण भागात प्रत्येक खेडेगावात जवळपास ५० ते १०० मुलांचे वय उलटून गेल्यानंतरही शेती व्यवसाय करत असल्याने त्यांना लग्नासाठी मुलीच मिळत नाही. आता मुलींना हुंडा दिल्यानंतर लग्न होत आहे. तसेच फसवणूकीचेही प्रकार वाढले असून बोगस मुली आणून लग्न करतात. त्यामुळे याचा शासन विचार करेल का? असे ते म्हणाले. यावर आपल्याकडून सूचना घेऊन उचित कार्यवाही करण्यात येईल, असे राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सांगितले.
इंधन तुटवड्याबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
गांधी परिवाराची गुलामी करणाऱ्यांनी देशाची बदनामी थांबवावीमुंबई : आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार तेल आणि गॅसबाबत काळजी घेत आहे. आंतरराष्ट्रीय परिस्थिती आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण तरीही कुठेही तुटवडा पडू नये, यासाठी सर्व प्रकारच्या उपाययोजना सुरु आहेत. कुणीही अफवा पसरवू नये आणि कुणीही अफवेवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी केले.विधानभवन परिसरात माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, अफवांवर विश्वास ठेवून इंधनाचा साठा केल्यास परिस्थिती खराब होईल. त्यातून मागणी आणि पुरवठा ही साखळी तुटेल. त्यामुळे कुठल्याही अफवेवर विश्वास ठेवू नका, माध्यमांनी पुरावा नसलेल्या गोष्टी दाखवून लोकांमध्ये भीती तयार करू नये. केंद्र सरकार याबाबत उचित काळजी घेत आहे, असेही ते म्हणाले.काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या वक्तव्यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ज्यांचे आयुष्य एका परिवाराची गुलामी करण्यात गेले, त्यांना देश कसा चालवला जातो, देश कसा सार्वभौम ठेवायचा? याबाबत काहीही माहिती नाही. आज मोदीजींनी ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित केली आहे. अन्यथा, भारताची काय परिस्थिती असती, हे आपल्याला माहिती आहे. ज्यावेळी टॅरिफ वॉर झाला, तेव्हाही भारत झुकला नाही तर, त्याचा सामना केला. भारताने अनेक देशांसोबत टॅरिफ करार केले, त्यामुळे ज्यांनी टॅरिफ वॉर केला, त्यांनादेखील मागे हटावे लागले. त्यामुळे एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी असे भाष्य करणे हास्यास्पद आहे, अशी टीका फडणवीसांनी केली.विरोधकांना तोंड दाखवायला जागा नाहीशेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर केलेल्या आंदोलनावर भाष्य करताना फडणवीस म्हणाले, आता विरोधकांना तोंड दाखवायला जागा उरलेली नाही. गिरे तो भी टांग उपर असे विरोधकांचे सुरु आहे. जनता विरोधकांसोबत नाही. महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये जनतेने विरोधकांना जमीन दाखवली आहे. आम्ही निवडणुका जिंकण्याकरिता नाही तर, निवडणूका जिंकल्यानंतर कर्जमाफी केली आहे. त्यामुळे जनतेचा आमच्यावर विश्वास आहे. विरोधकांनी कितीही आंदोलन केले तरी, जनता त्यांच्यासोबत नाही, असा टोलाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.
आयएएस अधिकारी देवेंद्र सिंह यांचे निलंबन मागे
मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान मंत्र्यांच्या आदेशाकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी आयएएस अधिकारी देवेंद्र सिंह यांच्यावर थेट निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. पर्यावरण आणि वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी ब्रीफिंगसाठी वारंवार बोलावूनही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव एम. देवेंद्र सिंग उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली होती. मात्र, त्यांनी याबाबतचे पुरावे सादर केल्यानंतर त्यांचे निलंबन मागे घेण्यात येत असल्याची माहिती संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी विधानसभेत दिली.चंद्रपूरमधील आमदारांनी पर्यावरणासंदर्भात मागील गुरुवारी सभागृहात प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर मंत्री पंकजा मुंडे यांना तत्काळ उत्तर देता आले नाही. त्यांनी सभागृहात सांगितले की, संबंधित अधिकाऱ्याला याबाबत पूर्वकल्पना देऊन ब्रीफिंगसाठी बोलावण्यात आले होते. मात्र, त्यांनी ब्रीफिंग दिले नाही आणि वारंवार बोलावूनही ते उपस्थित राहिले नाहीत. तालिका अध्यक्ष दिलीप लांडे यांनी या बाबीची गंभीर दखल घेत तत्काळ निलंबनाचे आदेश दिले. त्यानुसार शुक्रवारी सामान्य प्रशासन विभागाकडून अतिरिक्त सचिव व्ही. राधा यांच्या सहीने आदेश जारी करण्यात आला. अखिल भारतीय सेवा (शिस्त व अपील) नियम, १९६९ मधील नियम ३(१)(a) अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. मात्र, याबाबत सिंह यांनी अनुपस्थिती बाबतचे पुरावे सादर केल्यानंतर निलंबन मागे घेण्यात आले आहे.संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत याचबाबतची माहिती देताना सांगितले की, आयएएस अधिकारी एम. देवेंद्र सिंग यांनी पुरावे सादर करत घडलेल्या प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यामुळे त्यांचे निलंबन तत्काळ मागे घेण्यात यावे आणि त्यांच्या पदावर त्यांना रुजू करण्यात यावे, असा प्रस्ताव मांडत आहे.
Shoaib Akhtar Criticizes : ऐतिहासिक विजयानंतर भारतीय संघावर कौतुकांचा वर्षाव होत असताना, दुसरीकडे पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने भारतावर टीका केली आहे.
Weather Update : राज्यात उष्णतेची लाट येणार; तापमान 40 अंशांच्या पुढे, शेतकऱ्यांची चिंता वाढली
weather update : राज्यात तापमानात झपाट्याने वाढ होत असून मुंबईत ११ मार्चपर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
गुढीपाडवा का साजरा केला जातो? जाणून घ्या गुढीपाडव्याचे महत्त्व, पूजा विधी आणि परंपरा
मुंबई : महाराष्ट्रात गुढीपाडवा हा सण हिंदू नववर्षाची सुरुवात म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक अत्यंत शुभ दिवस मानला जातो. या दिवशी अभ्यंगस्नान करून घरासमोर गुढी म्हणजेच ब्रह्मध्वज उभारण्याची परंपरा आहे. नवीन वर्षासाठी संकल्प करून शुभ कार्याची सुरुवात करण्याचा हा दिवस मानला जातो.यंदा १९ मार्च २०२६ रोजी गुढीपाडवा साजरा केला जाणार आहे. या दिवशी नवीन वर्षाच्या पंचांगाची पूजा करून वर्षभर त्याचा वापर करण्याची प्रथा आहे.गुढीपाडव्याचे धार्मिक महत्त्वपुराणानुसार सृष्टीची निर्मिती ब्रह्मदेवाने चैत्र शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी केली असे मानले जाते. त्यामुळे हा दिवस सृष्टीचा वाढदिवस मानून गुढी उभारून साजरा केला जातो.दुसऱ्या कथेनुसार पैठणचे राजा शालिवाहन यांनी अत्याचारी शकांचा पराभव करून जनतेची मुक्तता केली. त्या विजयाच्या स्मरणार्थ शालिवाहन शक सुरू झाला आणि त्यानंतर चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून नूतन वर्ष साजरे करण्याची परंपरा सुरू झाली.तिसऱ्या मान्यतेनुसार विष्णू यांचा अवतार असलेल्या राम अवताराने रावणाचा पराभव केला. यानंतर राम अयोध्येत परत येत होते त्यावेळी नागरिकांनी गुढ्या उभारून त्यांचे स्वागत केले. त्या दिवसाच्या स्मरणार्थ गुढीपाडवा साजरा केला जातो.गुढीपाडव्याची पूजा कशी करावी ?गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून घराची स्वच्छता करावी आणि अंगाला सुगंधी तेल लावून अभ्यंगस्नान करावे. घराच्या दारासमोर सुंदर रांगोळी काढून नवीन कपडे परिधान करावेत.दरवाजाला आंब्याच्या पानांचे तोरण बांधावे. बांबूची काठी स्वच्छ करून तिच्या टोकाला तांबडे किंवा पिवळे कापड, फुलांची माळ आणि त्यावर उलटा कलश ठेवून गुढी उभारावी. काही ठिकाणी गुढीला बत्ताशांची माळही घातली जाते. या गुढीला ब्रह्मध्वज असेही म्हणतात.यानंतर गुढीची पूजा करावी. कडुनिंबाची कोवळी पाने, जिरे, मिरी, हिंग, सैंधव मीठ आणि ओवा यांचे मिश्रण करून ते थोडेसे खाण्याची प्रथा आहे. वर्षाच्या सुरुवातीला कडुनिंब खाल्ल्याने आरोग्य चांगले राहते, असे मानले जाते.त्यानंतर नवीन वर्षाच्या पंचांगाची पूजा करून त्यातील वर्षफळ वाचले जाते. गोड पदार्थ खाऊन हा नूतन वर्षाचा दिवस आनंदात साजरा केला जातो. सूर्यास्तापूर्वी गुढीला नमस्कार करून ती खाली उतरवण्याची प्रथा आहे.या दिवशी काय करतात?गुढीपाडव्याच्या दिवशी मौल्यवान वस्तू खरेदी करणे, नवीन कामाची सुरुवात करणे आणि शुभ कार्याचा आरंभ करणे अत्यंत मंगल मानले जाते. त्यामुळे महाराष्ट्रात हा सण मोठ्या आनंदात आणि श्रद्धेने साजरा केला जातो.
लवकरच बाजारात येणार Apple iPhone 18 Pro Max; जाणून घ्या 'या'नवीन फीचर्स बद्दल
मुंबई : Apple iPhone 17e नंतर आता Apple च्या पुढील फ्लॅगशिप स्मार्टफोन्सची चर्चा सुरू झाली आहे. कंपनी लवकरच Apple iPhone 18 Pro बाजारात लवकरच आणणार आहे. लॉन्चला अजून वेळ असला तरी काही रिपोर्ट्समधून या फोनच्या डिझाइन, कॅमेरा, बॅटरी आणि हार्डवेअरबद्दल काही माहिती समोर आली आहे.फ्रंट डिझाइनमध्ये मोठा बदलरिपोर्टनुसार, यावेळी सर्वात मोठा बदल फोनच्या फ्रंट डिझाइनमध्ये दिसू शकतो. Face ID साठी लागणारे सेन्सर आणि हार्डवेअर डिस्प्लेच्या खाली बसवले जाऊ शकतात. जर असे झाले तर iPhone मध्ये सध्या दिसणारा Dynamic Island हटवला जाऊ शकतो.त्याऐवजी सेल्फी कॅमेरा स्क्रीनच्या वर डाव्या बाजूला छोट्या होल-पंच स्वरूपात दिसू शकतो. त्यामुळे स्क्रीन अधिक स्वच्छ आणि मोठी वाटेल.एकूण डिझाइनमध्ये फारसा बदल नाहीकाही रिपोर्ट्सनुसार फोनचा एकूण डिझाइन साधारण Apple iPhone 17 Pro सीरीजसारखाच असू शकतो. म्हणजेच बॉडी, मटेरियल आणि कॅमेरा मॉड्यूलच्या डिझाइनमध्ये मोठे बदल नसतील.कॅमेरा आणि नवीन कलर ऑप्शनफोनच्या मागील बाजूला कंपनी पूर्वीसारखाच ट्रिपल कॅमेरा सेटअप देऊ शकते, जो थोडा उभ्या कॅमेरा प्लॅटफॉर्मवर असेल.याशिवाय Apple प्रो मॉडेल्ससाठी काही नवीन रंगांवरही काम करत असल्याचे सांगितले जाते. त्यामध्ये डीप पर्पल, बर्गंडी आणि कॉफी ब्राउन सारखे आपल्याला Apple iPhone 18 Pro मध्ये मिळू शकतात.कंपनीने अद्याप अधिकृतपणे कोणतीही माहिती जाहीर केलेली नाही. सध्या ही सर्व माहिती लीक रिपोर्ट्सवर आधारित असल्यामुळे या फीचर्सची खरी माहिती फोनच्या अधिकृत लॉन्चवेळीच समोर येईल.
Pankaj Bhoyar : राज्यात हुंडा संबंधित गुन्ह्यांमध्ये घट; मंत्री पंकज भोयर यांची विधानसभेत माहीती
गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रात हुंडा संबंधित गुन्ह्यांमध्ये घट झाली आहे, अशी माहीती मंत्री पंकज भोयर (Pankaj Bhoyar) यांनी दिली आहे.
Teachers suspended : राज्यभरात 81 शिक्षक-कर्मचाऱ्यांचे निलंबन; शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ
Teachers suspended : मास कॉपीच्या प्रकारांवर मोठी कारवाई करण्यात आली असून आतापर्यंत 81 शिक्षक व कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. ही माहिती राज्य मंडळाने परिपत्रकाद्वारे दिली आहे.
महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीच्या (Rajya Sabha Election) पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरे गटावर (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) गंभीर आरोप केले आहेत.
MS Dhoni Post : विजयानंतर धोनीने सोशल मीडियावर टीम इंडियाचे कौतुक करतानाच गौतम गंभीरसाठी लिहिलेली खास ओळ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेते महामंडळे पुढील अधिवेशनाच्या आत स्थापन करणार
-- मंत्री आशिष शेलार यांची ग्वाही; पत्रकारांच्या समस्यांवर व्यापक बैठक घेणारमुंबई : पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी सरकारने जाहीर केलेले आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची कार्यवाही पुढील अधिवेशनाच्या आत करण्यात येईल, तसेच पत्रकारांच्या विविध विषयांवर पत्रकार संघटना, शासनातील विविध विभाग, संबंधित लोकप्रतिनिधी यांची एक व्यापक बैठक लवकरच घेण्यात येईल, अशी ग्वाही मंत्री अशी शेलार यांनी सोमवारी (९ मार्च) विधान परिषदेत दिली.आमदार श्रीकांत भारतीय यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित करून पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधले. या लक्षवेधीमध्ये त्यांनी पत्रकार आणि वृत्तपत्र विद्यार्थ्यांसाठी सरकारने जाहीर केलेले आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणे, कोरोनानंतर वृत्तपत्र क्षेत्रात निर्माण झालेल्या अडचणी, त्यातून निर्माण झालेला रोजगाराचा प्रश्न, बाळशास्त्री जांभेकर यांच्या नावाने असलेल्या त्यांचे योजनेचे प्रस्ताव रखडणे, वर्तमानपत्र खरेदी करणारे वाचकांना आयकरात सूट देणे, पत्रकारांच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी महामंडळातर्फे मदतीची आवश्यकता, गृहनिर्माण योजनेअंतर्गत पत्रकारांना घरे देणे, जाहिरातीवरील जीएसटी रद्द करणे, अशा विविध विषयांकडे लक्ष वेधले होते.मुख्यमंत्र्यांच्यावतीने उत्तर देताना मंत्री आशिष शेलार यांनी सांगितले की, दोन्ही महामंडळे स्थापन करण्याचा निर्णय मंत्री मंडळाने १० आक्टोबर २०२४ ला घेतला असून विविध खात्यांशी या विषयांचा समन्वय करायचा असल्याने ती प्रक्रिया सुरु असून पुढील अधिवेशनाच्या आत याबाबत संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करुन ही महामंडळे स्थापन करण्यात येतील, अशी ग्वाही दिली. तसेच वर्तमानपत्रांचे आपल्या. लोकशाही प्रक्रियेत महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यामुळेच चौथा स्तंभ म्हणून आपण स्थान दिले आहे. कोरोना काळात या क्षेत्रासमोर अनेक अडचणी निर्माण झाली तशीच काही नवीन आव्हाने सुध्दा उभी राहिली. त्यामुळे यातून मार्ग काढून या क्षेत्रातील अडचणी सोडवण्यासाठी शासन जे जे प्रयत्न करते आहे तेही त्यांनी आपल्या उत्तरात विषद केले.दरम्यान, या चर्चेत आमदार सतेज पाटील आणि अन्य सदस्यांनी ही भाग घेऊन बाळशास्त्री जांभेकर पेन्शन योजनेतील विलंब व काही अटी शर्तींबाबत प्रश्न उपस्थित केले. तर पत्रकार सुरक्षा कायदा या विषयाकडे लक्ष वेधले. दरम्यान, हे विषय विविध खात्यांशी संबंधित असल्याने याबाबत एक सर्व विभागांची संयुक्त बैठक येत्या अधिवेशनाच्या आत घेण्यात येईल. त्यामध्ये या सगळ्या प्रश्नांवर चर्चा करू, असे मंत्री शेलार यांनी आश्वस्त केले.
बोर्डाच्या परीक्षेसाठी AI चा वापर करून शिक्षकांनीच पुरवल्या कॉपी; तब्बल इतके शिक्षक निलंबित
मुंबई : महाराष्ट्रात दहावी-बारावीच्या बोर्ड परीक्षेदरम्यान एआय तंत्रज्ञानाचा गैरवापर करून कॉपी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात सहभागी असल्याचे आढळल्यानंतर राज्यातील तब्बल ८१ शिक्षकांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा यांनी दिलेल्या माहितीनुसार, परीक्षेदरम्यान काही ठिकाणी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा वापर करून उत्तरं मिळवली जात होती. यासाठी विशेषतः ChatGPT सारख्या साधनांचा वापर करून कॉपी केल्याचे समोर आले आहे.या प्रकरणात बीड जिल्ह्यात सर्वाधिक कारवाई करण्यात आली. बीडमधील चौसाळा परीक्षा केंद्रात अनेक शिक्षक यात सहभागी असल्याचे तपासात उघड झाले. काही ठिकाणी शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी संगनमत केले होते. तंत्रज्ञानाच्या मदतीने उत्तरं पुरवली जात होती.मंडळाने केलेल्या प्राथमिक चौकशीनंतर संबंधित शिक्षकांना निलंबित करण्यात आले असून या प्रकरणात पुढील शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता आहे. परीक्षेची पारदर्शकता टिकवून ठेवण्यासाठी आणि तंत्रज्ञानाचा गैरवापर थांबवण्यासाठी मंडळाने ही कठोर कारवाई केल्याचे सांगितले आहे.
Auto Rickshaw Permits: राज्य सरकारचा मोठा निर्णय! नवीन रिक्षा परमिट बंद, ‘त्या’परमिटचीही चौकशी सुरू
Auto Rickshaw Permits: अधिकृत आकडेवारीनुसार राज्यात आतापर्यंत सुमारे १४ लाख रिक्षा परमिट वितरित करण्यात आले आहेत. रस्त्यांवरील रिक्षांची संख्या वर्षागणिक मोठ्या प्रमाणात वाढत असून यामुळे आधीच कोंडीत सापडलेल्या रस्त्यांवर आणखी ताण येत आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
भारतीय क्रिकेट संघाने रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या ICC मेन्स T20 वर्ल्ड कप २०२६ च्या (T20 World Cup) फायनलमध्ये न्यूझीलंडचा ९६ धावांनी दणदणीत पराभव करून इतिहास रचला आहे.
Stock Market: जागतिक बाजारांमधून आलेले कमकुवत संकेत आणि रुपया नव्या नीचांकी पातळीवर पोहोचल्यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास डळमळीत झाला. त्यामुळे आज बाजारात सर्वत्र मोठ्या प्रमाणात विक्री दिसून आली. मात्र अखेरच्या तासात निचांकी पातळीवर खरेदी झाल्याने बाजाराने किंचित सावरण्याचा प्रयत्न केला.
Virat Kohli Insta story : संजूच्या या यशाने प्रभावित होऊन दिग्गज क्रिकेटपटू विराट कोहलीने इन्स्टाग्रामवर एक खास पोस्ट शेअर करत त्याचे कौतुक केले आहे.
S. Jaishankar : पश्चिम आशियातील संघर्षावर भारताने स्पष्ट केली भूमिका; परराष्ट्रमंत्री म्हणाले…
भारत हा शांतता, संवाद आणि मुत्सद्देगिरीचा पुरस्कर्ता असून, या भागात त्वरित तणाव कमी करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) यांनी सोमवारी राज्यसभेत केले.
Hyundai Verna: नव्या Verna मध्ये ब्लॅक क्रोम रेडिएटर ग्रिल, ड्युअल LED प्रोजेक्टर हेडलाइट्स, नव्याने डिझाइन केलेले बंपर आणि R16 डायमंड-कट अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत.
बेकायदेशीर बाईक टॅक्सी चालवणाऱ्या कंपनीचा तात्पुरता परवाना रद्द..-- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
मुंबई : मुंबई व आसपासच्या भागात वाढत असलेल्या बेकायदा बाईक टॅक्सी सेवेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कठोर कारवाईचा इशारा दिला असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, तसेच संबंधित कंपन्यांचे तात्पुरते परवाने रद्द करण्यात आल्याची घोषणा परिवहन मंत्री यांनी विधानपरिषदेत केली.विधानपरिषदेत नियम ९३ अंतर्गत सदस्य सुनील शिंदे यांनी उपस्थित केलेल्या सूचनेवर उत्तर देताना परिवहन मंत्र्यांनी सांगितले की, केंद्र सरकारच्या मोटार वाहन अॅग्रीगेटर मार्गदर्शक तत्वे २०२० नुसार महाराष्ट्रात ई-बाईक (दुचाकी) टॅक्सी वाहतूक व्यवस्थेसाठी स्वतंत्र धोरण तयार करण्यात आले आहे. या धोरणाला राज्य मंत्रिमंडळाने ७ ऑगस्ट २०२४ रोजी मान्यता दिली असून राज्यातील एक लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये ई-बाईक टॅक्सी सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.यानुसार “ महाराष्ट्र ई-बाईक-टॅक्सी नियम, २०२४ ” अधिसूचित करण्यात आले असून या नियमांनुसार बाईक टॅक्सी शंभर टक्के इलेक्ट्रिक असणे बंधनकारक आहे. तसेच सर्व अटी व नियमांची पूर्तता करण्यासाठी अर्जदारांना ठराविक कालावधी देण्यात आला आहे.या प्रक्रियेनुसार उबर इंडिया सिस्टिम्स प्रा. लि., रोपेडो ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस प्रा. लि. आणि ॲनी टेक्नॉलॉजीज प्रा. लि. (ओला) या कंपन्यांना मुंबई महानगर क्षेत्रात ३० दिवसांसाठी तात्पुरता परवाना (Provisional Licence) देण्यात आला होता. या कालावधीत सर्व आवश्यक अटींची पूर्तता करून अंतिम परवाना घेणे अपेक्षित होते.मात्र काही कंपन्यांनी नियमांची पूर्तता न करता बेकायदा वाहतूक सुरू केल्याचे निदर्शनास आले. तसेच काही ठिकाणी बाईक टॅक्सी चालकांकडून अपघात व महिलांच्या सुरक्षिततेसंदर्भात तक्रारी समोर आल्या आहेत. त्यामुळे संबंधित कंपन्यांना परिवहन विभागाने नोटिसा बजावल्या असून काही प्रकरणांमध्ये पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.परिवहन विभागाने राज्यभरातील प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांना बेकायदा बाईक टॅक्सी वाहनांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. पथकांमार्फत तपासणी करून दोषी वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. एप्रिल २०२४ पासून आतापर्यंत १३० दुचाकी वाहनांवर कारवाई करून सुमारे ३३ लाख रुपयांहून अधिक दंड वसूल करण्यात आला असल्याची माहितीही मंत्र्यांनी दिली.राज्य सरकारने बाईक टॅक्सी सेवा नियमानुसार आणि सुरक्षित पद्धतीनेच सुरू राहील यासाठी कठोर उपाययोजना केल्या असून नियमांचे उल्लंघन सहन केले जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Rihanna : सुप्रसिद्ध गायिका रिहानाच्या घरावर गोळीबार, संशयित महिलेला अटक
मनोरंजन जगतातील सुप्रसिद्ध गायिका रिहाना हिच्या घरावर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. एका महिलेने रिहानाच्या घराच्या दिशेने वारंवार गोळीबार केला. या घटनेत कुणीही जखमी झाले नसून गोळीबार करणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे.लॉस एंजेलिस पोलिस विभागाने याची पुष्टी करत सांगितले की, रविवारी ८ मार्च रोजी रिहानाच्या घराजवळ गोळीबाराची घटना घडली. या वेळी ५ ते ७ गोळ्या झाडण्यात आल्या. गोळ्या घराच्या गेटला लागल्या, मात्र घराच्या आत पोहोचल्या नाहीत. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. त्या वेळी घरात लोक उपस्थित होते. पोलिसांनी सांगितले की या प्रकरणात ३० वर्षाच्या एका महिलेला अटक करण्यात आली आहे.हल्ल्यानंतर पोलिसांनी एका गाडीचा माग काढला. ही पांढऱ्या रंगाची टेस्ला कार होती. ती रिहानाच्या घराच्या जवळ एका ठिकाणी आढळून आली आणि त्या ठिकाणाहून संशयित महिलेला अटक करण्यात आली. अधिकाऱ्यांनी अद्याप त्या महिलेची ओळख किंवा गोळीबारामागील हेतू जाहीर केलेला नाही. या प्रकरणाची पुढील चौकशी सुरू आहे.BREAKING: Police are on scene after several gunshots were fired toward a home belonging to @rihanna in Beverly Hills.Officers with the Los Angeles Police Department say one woman has been arrested in connection with the shooting. pic.twitter.com/LCsIliYAfk— Matthew Seedorff (@MattSeedorff) March 9, 2026माहितीनुसार ३८ वर्षांची रिहाना आपल्या पार्टनर रॅपर एएसएपी रॉकी आणि त्यांच्या तीन मुलांसोबत बेव्हर्ली हिल्स येथील घरात राहते. या प्रकरणावर रिहानाच्या प्रतिनिधींनी अद्याप सार्वजनिकरीत्या कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.रॉबिन रिहाना फेंटी ही जगातील सर्वात प्रभावशाली गायिका आणि उद्योजिका आहे. आपल्या संगीत कारकिर्दीव्यतिरिक्त तिने स्वतःच्या ब्रँडच्या माध्यमातून फॅशन, कॉस्मेटिक्स आणि ब्युटी क्षेत्रात मोठे जागतिक व्यवसाय साम्राज्य उभे केले आहे.
Raj Thackeray : रायगडावरून राज ठाकरेंची गर्जना ! 19 तारखेला करणार मोठी घोषणा
महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाच्या (Raj Thackeray) आज स्थापनेला २० वर्षे पूर्ण झाली आहेत. या ऐतिहासिक वर्धापनदिनानिमित्त रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी एक खास कार्यक्रम पार पडला.
Maharashtra HPV vaccination: ही राज्यस्तरीय मोहीम केंद्र सरकारने २८ फेब्रुवारी २०२६ रोजी देशभरात सुरू केलेल्या राष्ट्रीय एचपीव्ही लसीकरण उपक्रमाचाच भाग आहे. डिसेंबर २०२५ मध्ये महाराष्ट्राने गार्डासिल-४ (Gardasil 4) या क्वाड्रिव्हॅलेंट एचपीव्ही लसीचे ९,४७,३८० डोस खरेदी केले होते.
मस्साजोग प्रकरणाची पुनरावृत्ती? जंगलात सापडली जळालेली हाडं, माजी सरपंचासोबत नेमकं काय घडलं?
Kolhapur Crime News : कोल्हापूरच्या पाटगावचे माजी सरपंच महेश पिळणकर ७ जानेवारीपासून बेपत्ता आहेत.
Indian Cricket Team : जागतिक क्रिकेटमध्ये भारताचाच दबदबा, दोन वर्षात सात ट्रॉफींवर कब्जा
गेल्या काही वर्षांत भारतीय क्रिकेट संघ सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. ज्यामुळे जागतिक क्रिकेटमध्ये भारताचे स्थान सातत्याने उंचावत आहे. गेल्या दोन वर्षांत भारताने सहा विश्वविजेतेपदे आणि एक चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. भारताने क्रिकेटच्या विविध फॉरमॅटमध्ये ही कामगिरी सुरू ठेवली आहे. या काळात युवा क्रिकेटपटूंनीही क्रिकेटमध्ये भारताचे भविष्य उज्वल असल्याचे दाखवून दिले आहे. तर वरिष्ठ पुरुष संघाने सातत्याने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.पुरुषांचा टी-२० विश्वचषक (२०२४) जिंकला :रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत २०२४ चा टी-२० विश्वचषक जिंकला हतै. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव केला होता. आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचा भारताचा दुष्काळ त्याने या निमित्ताने संपवला होता. भारताने दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक आपलं नाव कोरंल होतं. अंतिम सामन्यात, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केल्यानंतर, भारताने २० षटकांत सात विकेट्स गमावून १७६ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, दक्षिण आफ्रिकेला २० षटकांत आठ विकेट्स गमावून केवळ १६९ धावा करता आल्या.रोहितच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली (२०२५) :रोहित शर्माच्याच नेतृत्वाखाली भारताने २०२५ च्या सुरुवातीला न्यूझीलंडला मात देत चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. न्यूझीलंडसमोर ५० षटकांत २५२ धावांचे लक्ष्य होते, जे भारतीय संघाने चार विकेट्स शिल्लक असताना साध्य केले. कर्णधार रोहित शर्माच्या ८३ चेंडूत ७६ धावांच्या खेळीमुळे भारताने ४९ षटकांत सहा विकेट्सच्या मोबदल्यात २५४ धावा करून विजय मिळवला.भारतीय महिला अंडर-१९ संघाने ताकद दाखवली :भारतीय महिला अंडर-१९ संघाने गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत ही स्पर्धा जिंकली. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेला २० षटकांत फक्त ८२ धावा करता आल्या. भारतीय महिला संघाने ११.२ षटकांत एका विकेटच्या मोबदल्यात ८४ धावा करून विजेतेपद पटकावले होते.महिला संघ पहिल्यांदाच विश्वविजेता (२०२५) :२०२५ हे वर्ष भारतासाठी खरोखरच संस्मरणीय होते. भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा उडवत पहिल्यांदाच एकदिवसीय विश्वचषक जिंकला. महिला क्रिकेटमधील ही भारताची पहिली आयसीसी ट्रॉफी होती. प्रथम फलंदाजी करताना भारताने ५० षटकांत ७ बाद २९८ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेचा संघ २४६ धावांवर आटोपला. दीप्ती शर्माने पाच विकेट्स घेत भारताच्या या विश्वचषक विजयात निर्णाय भूमिका बजावली.भारतीय महिला अंध संघाने पटकावला टी२० विश्वचषक (२०२५) :भारतीय महिला अंध संघाने २०२५ चा टी२० विश्वचषकही जिंकला. कोलंबोमधील पी. सारा ओव्हल येथे खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने नेपाळचा सात विकेट्सने पराभव केला. ही स्पर्धा पहिल्यांदाच होत होती आणि भारताला ही जागतिक स्पर्धा जिंकण्यात यश आले. भारताने नेपाळला पाच विकेट्सवर ११४ धावांवर रोखले. भारतीय संघाने १२ षटकांत तीन विकेट्स गमावक ११७ धावा करून लक्ष्य गाठले.सहाव्यांदा १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकला (२०२६) :भारतीय १९ वर्षांखालील संघाने या वर्षाच्या सुरुवातीला सहाव्यांदा विश्वविजेतेपद मिळवून इतिहास रचला. भारत या स्पर्धेत सर्वाधिक विजय मिळवणारा संघ आहे. अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडचा १०० धावांनी पराभव केला. भारताने इंग्लंडसमोर ४१२ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात, इंग्लंड संघ ४०.२ षटकांत ३११ धावांवर आटोपला. टीम इंडियासाठी वैभव सूर्यवंशी अंतिम सामन्याचा स्टार होता. त्याने ८० चेंडूत १७५ धावांची धमाकेदार खेळी केली. दरम्यान, इंग्लंडकडून कॅलेब फॉकनरने शतक झळकावले, पण संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. फॉकनरने ६७ चेंडूत ११५ धावांची खेळी केली.वरिष्ठ पुरुष संघाने टी-२० विजेतेपद कायम राखले (२०२६) :सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील संघाने टी-२० क्रिकेटमध्ये आपले वर्चस्व कायम ठेवत टी-२० विश्वचषक विजेतेपद यशस्वीरित्या राखले आहे. या स्पर्धेत एखाद्या संघाने प्रथमच विजेतेपद राखले आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात, भारताच्या २५५ धावांच्या प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संघ १९ षटकांत १५९ धावांवर आटोपला. टीम इंडियाने तिसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकला आहे. यापूर्वी, २००७ मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली आणि २०२४ मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने टी-20 विश्वचषक जिंकण्याची किमया साधली होती. सूर्यकुमार यादवचाही जागतिक विजय मिळवणाऱ्या कर्णधारांमध्ये आता सामील झाला आहे. अहमदाबादमध्ये २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकातील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर अनेक गोष्टी बोलल्या जात होत्या. पण आता टीम इंडियाने इतिहासाची पुनरावृत्ती करत नवा इतिहास रचला आहे.
Anil Ambani : अनिल अंबानींवर फसवणुकीचा नवा गुन्हा दाखल; सीबीआयची कारवाई
केंद्रीय तपास ब्युरो (सीबीआय) ने अनिल अंबानी आणि त्यांच्या कंपनी रिलायन्स कम्युनिकेशन्स (आरकॉम) च्या इतर संचालकांविरुद्ध फसवणुकीचा नवा गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) च्या तक्रारीवरून करण्यात आली असून २०१३ ते २०१७ या कालावधीत बँकेसोबत सुमारे १,०८५ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम ४२० (फसवणूक) आणि १२०बी (गुन्हेगारी कट) अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे.पीएनबीचे व्यवस्थापक संतोषकृष्ण अन्नवरपु यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, अनिल अंबानी आणि कंपनीच्या इतर संचालकांनी बँकेकडून घेतलेल्या कर्जाच्या निधीचा कथित गैरवापर केला. एफआयआरमध्ये नमूद केल्याप्रमाणे, या प्रकरणात पीएनबीला सुमारे ६२१.३९ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे, तर युनायटेड बँक ऑफ इंडिया (जिचे नंतर पीएनबीमध्ये विलीनीकरण झाले) ला ४६३.८० कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. बँकेच्या म्हणण्यानुसार, कंपनीने घेतलेले कर्ज अशा ठिकाणी गुंतवले किंवा वळवले ज्याची माहिती बँकेला देण्यात आली नव्हती.दरम्यान, यापूर्वी फेब्रुवारी महिन्यातही सीबीआयने अनिल अंबानी आणि रिलायन्स कम्युनिकेशन्सविरोधात आणखी एका बँक फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्या प्रकरणात २०१३ ते २०१७ या काळात बँक ऑफ बडोदा सोबत २,२२० कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची फसवणूक झाल्याचा आरोप तपास यंत्रणांनी केला आहे.याच प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर प्रवर्तन निदेशालय (ईडी) ने अनिल अंबानी यांच्या अनेक मालमत्तांवर जप्तीची कारवाई केली आहे. मुंबईतील त्यांचा ‘एबोड’ नावाचा आलिशान बंगला जप्त करण्यात आला असून त्याची अंदाजित किंमत सुमारे ३,७१६ कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. तसेच दिल्ली, नोएडा, गाझियाबाद, मुंबई, पुणे, ठाणे, हैदराबाद, चेन्नई, कांचीपुरम आणि पूर्व गोदावरी या शहरांमध्ये असलेल्या निवासी घरे, कार्यालयीन जागा आणि जमिनींचाही यात समावेश आहे.मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत करण्यात आलेल्या या कारवाईत आतापर्यंत सुमारे १५ हजार कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. रिलायन्स कम्युनिकेशन्सद्वारे झालेल्या कथित बँक फसवणुकीच्या प्रकरणात अनिल अंबानी यांच्यावर एकूण सुमारे ४० हजार कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराचा तपास सुरू असल्याचे तपास यंत्रणांनी सांगितले आहे.
इस्रायलचा लेबनॉनवर केमिकल अॅटॅक, ह्युमन राइट्स वॉचचा गंभीर आरोप
योहमोर : इस्रायलने लेबनॉनमधील योहमोर गावात हिझुबल्लाह या अतिरेकी संघटनेच्या तळावर हल्ला करण्याच्या निमित्ताने एक केमिकल अॅटॅक अर्थात रासायनिक हल्ला केल्याचा आरोप ह्युमन राइट्स वॉच नावाच्या संस्थेने केला आहे. ह्युमन राइट्स वॉच ही एक मानवाधिकारांसाठी लढणारी संस्था आहे.ह्युमन राइट्स वॉचच्या आरोपानुसार इस्रायलने योहमोर गावावर पांढऱ्या फॉस्फरसचा मारा केला. दुसऱ्या महायुद्धानंतर झालेल्या आंतरराष्ट्रीय करारानुसार कोणताही देश दुसऱ्या देशाविरुद्ध अथवा तिथल्या एका प्रदेशाला लक्ष्य करून रासायनिक (केमिकल्स) किंवा जैविक (बायॉलॉजिकल) हल्ला (अॅटॅक) करू शकत नाही. पण इस्रायलने योहमोर गावावर पांढऱ्या फॉस्फरसचा मारा केला आहे. दक्षिण लेबनॉनमधील योहमोर गावात निवासी भागाला लक्ष्य करून इस्रायलने तोफखाना आणि पांढरा फॉस्फरस वापरला. इस्रायली सैन्याने गावकऱ्यांना आणि दक्षिण लेबनॉनमधील डझनभर इतर रहिवाशांना स्थलांतर करण्याचा इशारा दिल्यानंतर हा हल्ला केला.पांढरा फॉस्फरस हा एक धोकादायक रासायनिक पदार्थ आहे. तो मेणासारखा पिवळा किंवा पांढरा दिसतो आणि त्याला लसणासारखा वास येतो. हवेतील ऑक्सिजनच्या संपर्कात आल्यावर तो आपोआप जळतो, ज्यामुळे ८१५ अंश सेल्सिअस पर्यंत तापमान निर्माण होते. शरीर पांढऱ्या फॉस्फरसच्या संपर्कात आल्यास जळू लागते. त्वचा आणि हाडे जळायला सुरुवात होते. या हल्ल्यातून वाचलेल्यांना गंभीर स्वरुपाच्या व्याधी, त्वचारोग, श्वास घेण्यास त्रास होणे, डोळ्यांची आग होणे, हृदयक्रिया मंदावणे किंवा बंद पडणे, मृत्यू येणे अशा स्वरुपाचे त्रास होऊ शकतात. निवासी वस्तीत पांढरा फॉस्फरस मोठी आग लावू शकतो. यामुळेच पांढरा फॉस्फरस वापरून हल्ला करणे हे घातक आणि मानवतेच्या विरुद्ध असल्याचा आरोप ह्युमन राइट्स वॉचने केला आहे.इस्रायलने युद्धाच्या निमित्ताने पांढऱ्या फॉस्फरसचा बेकायदेशीर वापर करणे ही चिंता वाढवणारी बाब आहे. याचे नागरिकांवर गंभीर परिणाम होऊ शकतात. युद्ध आणखी घातक होऊ शकते; अशी भीती ह्युमन राइट्स वॉचने व्यक्त केली आहे. पण इस्रायलने पांढऱ्या फॉस्फरसचा बेकायदेशीर वापर केल्याचा आरोप फेटाळला आहे. शत्रूविरोधात धुराचा पडदा तयार करण्यासाठी पांढऱ्या फॉस्फरसचा वापर केल्याचा दावा इस्रायलने केला आहे.पांढरा फॉस्फरस फॉस्फेट खडकांमधून काढला जातो आणि तो लष्करी उद्देशांसाठी कवच, बॉम्ब किंवा रॉकेटमध्ये वापरला जातो. जाळल्यावर, तो फॉस्फरस पेंटॉक्साइडपासून बनलेला जाड पांढरा धूर निर्माण करतो. युद्धात, याचा वापर धुराचा पडदा तयार करण्यासाठी केला जातो जेणेकरून शत्रूला दाट धुरात काहीही दिसू नये.रात्रीच्या वेळी रणांगण प्रकाशित करण्यासाठी देखील याचा वापर केला जातो. शत्रूच्या जागा, वाहने किंवा साहित्य जाळण्यासाठी देखील याचा वापर केला जाऊ शकतो. नागरी भागात किंवा नागरिकांजवळ आग लावणारे शस्त्र म्हणून त्याचा वापर करण्यास मनाई आहे, कारण त्यामुळे अंदाधुंद नुकसान होते. लष्करी कारवायांदरम्यान वापरल्यास ते बेकायदेशीर मानले जाते परंतु त्यामुळे नागरिकांना धोका निर्माण होतो.लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार २ मार्च २०२६ ते ८ मार्च २०२६ दरम्यान इस्रायली हवाई हल्ल्यांमध्ये एकूण ४०० जणांचा मृत्यू झाला. यात ८३ मुले, ४२ महिला, ९ बचाव कर्मचारी यांचा समावेश आहे. तसेच २५४ मुले आणि २७४ महिलांसह १,१३० हून अधिक लोक जखमी झाले आहेत.
West Bengal Election : पश्चिम बंगालच्या निवडणूका 3 टप्प्यांत घ्या; भाजपची निवडणूक आयोगाकडे मागणी
भारतीय जनता पक्षाच्या एका उच्चस्तरीय शिष्टमंडळाने सोमवारी भारतीय निवडणूक आयोगाच्या पूर्णपीठाची भेट घेऊन आगामी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक (West Bengal Election) जास्तीत जास्त तीन टप्प्यांत घेण्याची आग्रही मागणी केली आहे.
Vidhan Parishad Election : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ९ जागा मे २०२६ मध्ये रिक्त होत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा कार्यकाळ १३ मे रोजी संपत
म्युनिसिपल बाँडच्या माध्यमातून नाशिकच्या विकासाला गती!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे 'महाराष्ट्राच्या शहरी स्थानिक स्वराज्य संस्थेचा (ULB) ग्रीन म्युनिसिपल बाँड' या नाशिक महानगरपालिकेच्या पब्लिक इश्यूचे नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये घंटानादाद्वारे लिस्टिंग केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील महानगरपालिकांनी म्युनिसिपल बाँड मार्केटचा अधिकाधिक वापर करावा, यावर नेहमीच भर दिला आहे. त्यासाठी केंद्र सरकारने योजना जाहीर करून पहिल्या टप्प्यात ₹२०० कोटींपर्यंतचे बाँड्स काढण्यास मान्यता दिली होती. या उपक्रमाच्या यशानंतर, नुकत्याच सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महानगरपालिकांना ₹१००० कोटींपर्यंत म्युनिसिपल बाँड्स काढण्याची मुभा दिली आहे. त्याचबरोबर त्यासाठीचा इन्सेंटिव्हदेखील ₹२० कोटी पासून ₹२०० कोटीपर्यंत नेण्यात आला असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.नाशिक महानगरपालिकेने अवघ्या एका वर्षात दुसऱ्यांदा म्युनिसिपल बाँड इश्यू करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. पब्लिक इश्यूच्या माध्यमातून नाशिक महानगरपालिका कुंभमेळ्याशी संबंधित प्रकल्पांसह नागरी विकासाच्या विविध उपक्रमांसाठी म्युनिसिपल बाँडद्वारे निधी उभारणी करत आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.येत्या दीड वर्षांत नाशिक महानगरपालिका क्षेत्रात सुमारे ₹२५,००० कोटींची विविध विकासकामे होणार आहेत. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर उभारले जाणारे हे प्रकल्प केवळ तात्पुरते नसून, दीर्घकालीन स्वरूपात नाशिकच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारे ठरणार आहेत. त्यामुळे भविष्यात नाशिक हे गुंतवणुकीचे आकर्षण केंद्र म्हणून विकसित होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.नाशिक महानगरपालिकेने अशाच अभिनव उपक्रमांच्या माध्यमातून शहर विकासात गुणात्मक आणि दर्जात्मक परिवर्तन घडवून आणत राहावे. या उपक्रमासाठी नाशिकच्या महापौर, कुंभमेळ्याच्या आयोजनाशी संबंधित सर्व अधिकारी आणि संपूर्ण टीमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केले. तसेच या बाँड इश्यू प्रक्रियेत नॅशनल स्टॉक एक्स्चेंजने सल्लागार म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली असून विविध वित्तीय संस्थांनीही मोलाचे सहकार्य केले आहे.यावेळी मंत्री गिरीष महाजन, नाशिकच्या महापौर हिमगौरी आहेर-आडके, नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष चौहान व इतर मान्यवर उपस्थित होते.
भारताचा शेषनाग १५० ड्रोन, नवं घातक शस्त्र
नवी दिल्ली : पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धामुळे ड्रोनचे महत्त्व आणखी वाढले आहे. याआधी रशिया - युक्रेन लढाईत दोन्ही देशांनी तसेच ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने पाकिस्तान विरोधात ड्रोनचा शस्त्राप्रमाणे प्रभावी वापर केला. आता भारत शेषनाग १५० नावाच्या नव्या अतिशय प्रभावी आणि संहारक ड्रोनच्या निर्मितीत गुंतला आहे.पश्चिम आशियातील युद्धात इराण मोजके पैसे खर्चून तयार केलेले ड्रोन हे बॉम्ब प्रमाणे इस्रायल तसेच अमेरिकेविरोधात वापरत आहेत. हे ड्रोन आकाराने लहान आणि वेगवान असल्यामुळे निकामी करणे कठीण आहे. अमेरिका आणि इस्रायल जी आधुनिक क्षेपणास्त्र विरोधी क्षेपणास्त्र प्रणाली वापरतात, त्याने हे ड्रोन निकामी करता येतात. पण अवघ्या काही हजारांचा ड्रोन नष्ट करण्यासाठी लाखो रुपये खर्चून तयारी केलेली महागडी क्षेपणास्त्र वापरली जात आहेत. शिवाय इराणी ड्रोनचा मोठा ताफा आला तर ती सर्व ड्रोन निकामी करणे कठीण जाते आणि किमान काही ड्रोन शत्रूचे नुकसान करण्यात यशस्वी होत आहेत. या घडामोडींचा अभ्यास करून भारताने स्वतःच्या नव्याने विकसित होत असलेल्या ड्रोनमध्ये आवश्यक ते बदल केले आहेत. यामुळे भारतीय ड्रोन अतिशय प्रभावी आणि संहारक झाले आहेत.भारताच्या शेषनाग १५० या ड्रोनची ऑपरेशनल रेंज एक हजार किमी. पेक्षा जास्त आहे. यामुळे हे ड्रोन एकदा उड्डाण केल्यानंतर लांबचा प्रवास सहज करू शकतात. सलग पाच तास आकाशात कार्यरत राहण्याची क्षमता या ड्रोनमध्ये आहे. निश्चित केलेल्या लक्ष्यावर घिरट्या घालत अथवा लांबून लक्ष ठेवणे, रिअल टाइम पाळत ठेवणे हे काम शेषनाग १५० ड्रोन सहज करू शकतात. तसेच हे ड्रोन २० ते ४० किलो स्फोटके वाहून नेऊ शकतात. विशिष्ट लक्ष्यावर स्फोटके टाकणे अथवा स्फोटकांसह लक्ष्यावर जाऊन आदळणे असेही हा ड्रोन करू शकतो. एकाचवेळी हजारो शेषनाग १५० ड्रोनचा ताफा विशिष्ट परिसरावर हल्ला करण्यासाठी प्रक्षेपित करण्यासाठी चाचण्या सुरू असल्याचे सूत्रांकडून समजते.
नवी मुंबई : नवीन पनवेल येथे जीर्ण इमारतीच्या पुनर्विकास बैठकीला हिंसक वळण मिळाले. नवीन पनवेल सेक्टर १४ येथील अमृतवेल को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीमध्ये पुनर्विकासाच्या विषयावर आयोजित सर्वसाधारण सभेत सोसायटीचे अध्यक्ष रवींद्र भगत आणि त्यांचा मुलगा अजिंक्य भगत यांनी बाहेरील तरुणांना बोलावून रहिवाशांना मारहाण केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.बैठकीदरम्यान पुनर्विकासाच्या अटी तसेच प्रक्रियेवरून सभासद आणि व्यवस्थापन समिती यांच्यात शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर या वादाचे रूपांतर धक्काबुक्कीत झाले.या वादादरम्यान सोसायटीचे अध्यक्ष रवींद्र भगत यांचा मुलगा अजिंक्य भगत याने काही बाहेरील तरुणांना सोसायटीत बोलावले. या तरुणांनी बैठकीत घुसून उपस्थित रहिवाशांना बेदम मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.या मारहाणीत सोसायटीतील दोन जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Tomahawk Missile Attack: इराणच्या मिनाब शहरातील मुलींच्या प्राथमिक शाळेवर २८ फेब्रुवारी रोजी झालेल्या टोमाहॉक क्षेपणास्त्र हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज आता व्हायरल झाले आहे. या फुटेजमध्ये अमेरिकेचे क्षेपणास्त्र शाळेवर आदळताना दिसत आहे.
Aishwarya-Abhishek Bachchan : सलमान खानच्या गाण्यावर थिरकले ऐश्वर्या-अभिषेक बच्चन; व्हिडिओ व्हायरल
Aishwarya-Abhishek Bachchan :
Apurva Nemlekar अपूर्वा आणि तनुज यांनी १४ फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलेंटाईन्स डे या खास दिवशी थाटामाटात विवाह केला. लग्नानंतर आता हे दोघे गोव्याच्या सुंदर समुद्रकिनाऱ्यावर निवांत वेळ घालवत आहेत.
विश्वविजेत्या भारतीय संघाच्या अभिनंदनाचा ठराव विधिमंडळात
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजू सॅमसन, अभिषेक शर्मा आणि बुमराहच्या कामगिरीचे केले कौतुकमुंबई : भारतीय क्रिकेट संघाने टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करत पुन्हा एकदा विजेतेपद पटकावले असून, या ऐतिहासिक यशाबद्दल संपूर्ण भारतीय संघाचे अभिनंदन करणारा ठराव आज विधानसभेत आणि विधान परिषदेत मांडण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. भारतीय संघाने अंतिम सामन्यात केलेल्या दमदार कामगिरीमुळे टी-२० इतिहासात नवा विक्रम नोंदवला गेला असल्याचेही त्यांनी नमूद केले.अंतिम सामन्यात भारतीय फलंदाजांनी सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत मजबूत पायाभरणी केली. विशेषतः संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांनी केलेल्या प्रभावी फलंदाजीमुळे भारताला मोठा धावसंख्येचा टप्पा गाठता आला. या धावसंख्येच्या जोरावर भारतीय गोलंदाजांनीही न्यूझीलंडवर पूर्ण दबाव ठेवत सामना एकतर्फी केला.गोलंदाजीत जसप्रीत बुमराह यांनी संपूर्ण मालिकेत भेदक मारा करत संघाला निर्णायक आघाडी मिळवून दिली. अंतिम सामन्यातही त्यांनी न्यूझीलंडच्या फलंदाजीला रोखत प्रभावी कामगिरी केली. मालिकेत भारताने केवळ एकच सामना गमावला असून उर्वरित सर्व सामन्यांत ठोस विजय मिळवत ही मालिका जिंकली, असे मुख्यमंत्री म्हणाले.या विजयात कर्णधार सुर्यकुमार यादव यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण संघाने उत्कृष्ट सामूहिक खेळ सादर केला. संघातील मुंबईच्या खेळाडूंनीही लक्षणीय योगदान दिल्याचे नमूद करत त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. भारतीय संघाने मिळवलेला हा दिमाखदार विजय देशासाठी अभिमानास्पद असून राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत आज अभिनंदनाचा ठराव मांडून खेळाडूंचा गौरव करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
'भांडवली बाजारातील'बॉण्ड'च्या माध्यमातून शहरांच्या विकासाला निधीचे बळ'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये नाशिक महापालिकेच्या ग्रीन बॉण्डचे लिस्टिंगमुंबई : महानगरपालिकांना आपल्या विविध विकास कामांसाठी भांडवली बाजारात बॉण्ड जारी करून निधी उभारता येतो. नाशिक महापालिकेप्रमाणे ' इनोव्हेटिव्ह फंड' निर्माण करून विकासाला निश्चितच निधीचे बळ मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.बीकेसी येथील नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये नाशिक महापालिकेच्या ग्रीन बॉण्डचे लिस्टिंग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते ' रिंगिंग बेल' वाजवून करण्यात आले.यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, नाशिकच्या महापौर श्रीमती हिमगौरी आहेर, उपमहापौर विलास शिंदे, स्थायी समिती सभापती मच्छिद्र सानप, नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष चौहान, मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता, नाशिक कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंग, महानगरपालिका आयुक्त श्रीमती मनीषा खत्री, आदी उपस्थित होते.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, नाशिक महानगरपालिकेने एकाच आर्थिक वर्षात प्रथम खाजगी प्लेसमेंट आणि आता सार्वजनिकरित्या असे दोन्ही म्युनिसिपल बॉण्ड जारी करून या महापालिकेने भांडवली बाजारात प्रवेश केला आहे. भांडवली बाजाराच्या माध्यमातून महापालिकांनी निधी उभा करून लोकोपयोगी कामे केली पाहिजेत. यासाठी केंद्र शासनाने योजनादेखील घोषित केली आहे. पहिल्या टप्प्यात २०० कोटी रुपयांपर्यंतचे बॉण्ड्स काढण्याकरिता केंद्राने मान्यता दिली होती. याचे यश बघता केंद्रीय अर्थसंकल्पात या बॉण्डची मर्यादा १ हजार कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. याकरिता देण्यात येणारे प्रोत्साहन मूल्यदेखील २०० कोटी रुपयांपर्यंत करण्यात आले आहे.कुंभमेळ्याच्या तयारीसाठी नाशिक महानगरक्षेत्रात जवळपास २५ हजार कोटींची विकासाची कामे सुरू करण्यात आली आहेत. कुंभमेळ्यासाठी करण्यात येणाऱ्या विकास कामांमुळे निर्माण होणारी व्यवस्था कुंभ साठीच नाही, तर नाशिक शहर विकसित महानगरांच्या श्रेणीमध्ये आणण्यास कारणीभूत ठरणार आहे. यामुळे पुढील काळात नाशिक हे गुंतवणुकीचे चुंबक म्हणून उदयास येणार आहे, असा आशावादही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.नाशिक महापालिकेने या दोन्ही टप्प्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. केंद्र शासनाच्या प्रोत्साहन मूल्य आणि अर्बन चॅलेंज फंडच्या माध्यमातून नाशिक महापालिकेला बिनव्याजी पैसे मिळणार आहेत. या बॉण्डच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या निधीद्वारे नाशिक महापालिका सार्वजनिक हिताचे पाणीपुरवठा संबंधित प्रकल्प पूर्ण करणार आहे. यामुळे पाण्याची गळती ४७ टक्क्यांवरून २० टक्क्यांपर्यंत कमी होणार आहे. शहरी विकासातील प्रकल्प पूर्ण करण्यासाठी या बॉण्डचा उपयोग होणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.राज्यातील छोट्या महापालिकां मधील विकास कामे करण्यासाठी एकत्रितपणे १ हजार कोटी रुपयांचे अशाच प्रकारचे बॉण्ड भांडवली बाजारात काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जेणेकरून महापालिकांनाही केंद्र शासनाच्या या योजनांचा लाभ मिळेल. नाशिक महापालिकेने अशाच पद्धतीने इनोव्हेटिव्ह फंडच्या माध्यमातून गुणात्मकदृष्ट्या शहराचा विकास करावा, अशी अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.कार्यक्रमादरम्यान नॅशनल स्टॉक्स एक्सचेंजचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष चौहान यांनी आपले मनोगत व्यक्त केले. नाशिक महापालिकेच्या महानगर आयुक्त मनीषा खत्री यांनी बोंड विषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मानसी सोनटक्के यांनी केले कार्यक्रमाला नाशिक महापालिकेतील लोकप्रतिनिधी, तथा अधिकारी उपस्थित होते.बॉण्डच्या निधीतून होणारी विकास कामेबॉण्डमधून उभारलेला निधीचा वापर विविध पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांसाठी होणार आहे. यामध्ये मुकणे धरण पंपिंग स्टेशन येथे क्षमता वाढविणे, विल्होळी येथे नविन जलशुद्धीकरण केंद्र, विल्होळी नवीन जलशुद्धीकरण केंद्र ते साधुग्रामपर्यत मुख्य गुरुत्व वाहिनी टाकणे आदींचा समावेश आहे. प्रकल्पाचा मुख्य उद्देश म्हणजे कुंभमेळ्याच्या काळात तसेच त्यानंतरही नाशिक शहराला स्वच्छ व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे आहे.
Heat Wave Alert: उन्हाची तीव्रता वाढली, राज्यातील 'या'जिल्ह्यांना हीट वेव्हचा इशारा
मुंबई: उन्हाळा वेळेआधीच तीव्र होताना दिसत आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यातील तापमानाने पस्तिशी ओलांडली असून आता हवामान विभागाने पुढील दोन दिवस राज्यातील १८ जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. कमाल तापमान ३८ ते ४० अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.कोणत्या जिल्ह्यांना इशारा?कोकण आणि मुंबई परिसर: पालघर, ठाणे, मुंबई.उत्तर महाराष्ट्र: धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक.पश्चिम महाराष्ट्र: अहिल्यानगर.मराठवाडा: छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, लातूर.विदर्भ: अकोला, अमरावती, वर्धा.अकोला आणि अमरावतीत १८ मार्चपर्यंत लाटराज्यातील बहुतांश भागात ही लाट बुधवारपर्यंत असेल, पण विदर्भातील अकोला आणि अमरावती या दोन जिल्ह्यांमध्ये ही उष्णतेची लाट अधिक काळ म्हणजे १८ मार्चपर्यंत सक्रिय राहणार आहे. या भागात तापमानाचा पारा सरासरीपेक्षा ४ ते ५ अंशांनी जास्त राहण्याची शक्यता आहे.काय काळजी घ्यावी?पुरेसे पाणी प्या, शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होऊ देऊ नका.दुपारी १२ ते ३ या वेळेत शक्यतो कडक उन्हात बाहेर जाणे टाळा.सुती आणि सैल कपडे वापरा, बाहेर जाताना छत्री किंवा टोपीचा वापर करा.लहान मुले आणि ज्येष्ठांनी विशेष काळजी घ्यावी, कारण त्यांना उष्माघाताचा त्रास लवकर होऊ शकतो.उष्ण व दमट वाऱ्यांचा प्रवाह वाढल्याने आर्द्रतेत वाढ झाली आहे, ज्यामुळे तापमानात मोठी वाढ नोंदवण्यात येत आहे. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यातच ही परिस्थिती निर्माण झाल्याने यंदाचा उन्हाळा अधिक तीव्र राहण्याचे संकेत मिळत आहेत.
९ मार्च पासून नवीन ऑटो रिक्षा परवान्यांना स्थगिती..
-- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली घोषणामुंबई : वाढती वाहतूक कोंडी रोखणे व शहरी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी ९ मार्चपासून राज्यभर नवीन ऑटो रिक्षांना परवाना देण्यास स्थगिती देण्यात येत आहे, अशी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. तथापि, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नवीन ऑटो रिक्षांना कोणत्या निकषांवर नवीन परवाने द्यावेत,या संदर्भात निर्णय घेतला जाईल, त्यानूसार पुढील निर्णय घेतला जाणार आहे.अशी माहिती मंत्री सरनाईक यांनी दिली.मंत्री सरनाईक म्हणाले की, महाराष्ट्रातील ५ लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये ऑटो रिक्षा परवान्यांबाबत निर्णय घेण्याचे अधिकार राज्य सरकारकडे असल्याचे स्पष्ट करत भारत सरकारच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने महाराष्ट्र शासनाला याबाबत स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेण्याचा सल्ला दिला आहे.महाराष्ट्राचे परिवहन या नात्याने यांनी या संदर्भात केंद्र सरकारकडे केलेल्या पत्रव्यवहारानंतर केंद्राने कार्यालयीन स्मरणपत्राद्वारे ही माहिती दिली आहे. मोटार वाहन (दुरुस्ती) अधिनियम, २०१९ अंतर्गत राज्य सरकारांना वाहतूक व्यवस्थेचे नियमन करण्यासाठी आवश्यक लवचिकता देण्यात आली असल्याचेही यात नमूद करण्यात आले आहे.मोटार वाहन अधिनियम, १९८८ मधील कलम ६७ (३) नुसार राज्य सरकारांना प्रवासी व माल वाहतुकीसंदर्भातील परवाने बदलण्याचा तसेच विविध योजना राबविण्याचा अधिकार देण्यात आला आहे. या अधिकारांचा वापर करून राज्य सरकारांना लास्ट माईल कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी तसेच वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करता येणार असल्याचे केंद्राने स्पष्ट केले आहे.याबरोबरच सध्या अस्तित्वात असलेले ऑटो रिक्षा परवाने अनेक ठिकाणी एकाच घरात देण्यात आलेले आहेत, काही परवाने बांग्लादेशी नागरिकांना अवैध रितीने दिल्याच्या तक्रारी आमच्या कडे प्राप्त झाल्या आहेत. आता पर्यंत राज्यभरात सरसकट १४ लाखांपर्यंत ऑटो रिक्षा परवाने दिलेले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील मोठ्या शहरांमध्ये ऑटो रिक्षा परवान्यांबाबतचा विषय स्थानिक परिस्थिती आणि वाहतुकीच्या गरजेनुसार राज्य शासनाने योग्य पद्धतीने हाताळावा, असा सल्ला केंद्र सरकारने दिला आहे.परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या निर्णयाचे स्वागत करत सांगितले की, राज्यातील नागरिकांना अधिक चांगली आणि सुलभ वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन लवकरच आवश्यक त्या धोरणात्मक निर्णयांवर विचार करणार आहे.
सौदी अरेबियातील क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर भारतीयाच्या मृत्यूची अफवा; दूतावासाचे स्पष्टीकरण
रियाध : मध्यपूर्वेत सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सौदी अरेबियात झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. अल-खर्ज परिसरातील एका निवासी इमारतीवर क्षेपणास्त्र पडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेत एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाल्याची चर्चा होती; मात्र भारतीय दूतावासाने ही माहिती चुकीची असल्याचे स्पष्ट केले आहे.इस्रायल आणि अमेरिकेने इराणविरोधात कारवाई सुरू केल्यानंतर गेल्या काही दिवसांत संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. या पार्श्वभूमीवर इराणकडून कतार, बहरीन, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीतील अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.भारतीय नागरिकाच्या मृत्यूची बातमी चुकीचीअल-खर्ज येथे झालेल्या हल्ल्यानंतर सुरुवातीला काही स्थानिक सूत्रांनी एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाल्याचे म्हटले होते. मात्र भारतीय दूतावासाने अधिकृत निवेदन देत ही माहिती फेटाळून लावली. दूतावासाने दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत कोणत्याही भारतीयाचा मृत्यू झालेला नाही, तर एक भारतीय नागरिक जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.नेमकी घटना कशी घडली?गेल्या आठवड्यात इराणकडून केलेल्या हल्ल्यांच्या मालिकेत सौदी अरेबियातील अल-खर्ज परिसरालाही लक्ष्य करण्यात आले. हा भाग लष्करीदृष्ट्या संवेदनशील मानला जातो. प्राथमिक अहवालात एक भारतीय आणि एक बांगलादेशी नागरिक मृत झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र नंतर अधिकृत दुरुस्तीत स्पष्ट करण्यात आले की, दोन बांगलादेशी नागरिकांचा मृत्यू झाला असून एका भारतीयासह एकूण १२ जण जखमी झाले आहेत.जखमी भारतीयावर उपचार सुरूभारतीय दूतावासाने सोशल मीडियावरील निवेदनात सांगितले की, जखमी भारतीय नागरिकाला अल-खर्जमधील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दूतावासातील समुदाय कल्याण विभागाचे प्रतिनिधी वाय साबीर यांनी रुग्णालयात भेट देऊन जखमीची प्रकृती जाणून घेतली. दूतावास स्थानिक प्रशासनाशी सतत संपर्कात असल्याचेही सांगण्यात आले.भारतीय नागरिकांसाठी सूचनासौदी अरेबियातील तणावपूर्ण परिस्थिती लक्षात घेऊन रियाध आणि जेद्दाह येथील भारतीय मिशनने नागरिकांसाठी काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. स्थानिक प्रशासनाने जारी केलेल्या सुरक्षा नियमांचे पालन करावे अनावश्यक प्रवास टाळावा आणि सतर्क राहावे. रियाध, जेद्दाह आणि दम्मम येथून भारतासाठी विमान सेवा सध्या सुरू आहे. आपत्कालीन परिस्थितीत दूतावासाच्या हेल्पलाईन क्रमांकांवर संपर्क साधावासौदी अरेबियाचा इराणला इशारादरम्यान, या हल्ल्यांनंतर आखाती प्रदेशातील तणाव अधिक वाढला आहे. सौदी अरेबियाने इराणच्या कारवायांवर तीव्र प्रतिक्रिया देत, अरब देशांवरील हल्ले थांबवले नाहीत तर त्याचे गंभीर परिणाम होतील, असा इशारा दिला आहे. सौदी परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, या कारवायांमुळे प्रादेशिक स्थैर्यावर परिणाम होत असून भविष्यातील संबंधांवरही त्याचा परिणाम होऊ शकतो.
Alia Bhatt: महिला दिनी आलिया भट्टला मिळाले खास गिफ्ट; मुलगी राहा आणि रणबीर कपूरने दिले गोड सरप्राईज!
Alia Bhatt ८ मार्च रोजी जगभरात महिला दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने अनेक कलाकारांनी महिलांच्या सन्मानाबद्दल पोस्ट शेअर केल्या. अभिनेत्री रश्मिका मंदाना, ट्विंकल खन्ना तसेच अभिनेता अक्षय कुमार यांसारख्या अनेक कलाकारांनीही महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
इराणचे दिवंगत सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांचे पुत्र मोज्तबा खामेनी यांना त्यांचा उत्तराधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. इराणच्या सरकारी दूरदर्शनने सोमवारी पहाटे ही घोषणा केली. आयातुल्ला अली खामेनी यांच्या हत्येनंतर सुरू झालेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून परिस्थिती आता नाट्यमय वळणावर पोहोचली आहे.मोज्तबा खामेनी यांना या पदाचे संभाव्य दावेदार म्हणून बऱ्याच काळापासून पाहिले जात होते. विशेष म्हणजे, मोज्तबा खामेनी यांनी यापूर्वी कधीही कोणत्याही सरकारी पदासाठी निवडणूक लढवली नव्हती आणि त्यांची कोणत्याही अधिकृत पदावर नियुक्तीही झाली नव्हती. इराणच्या ८८ सदस्यीय धार्मिक तज्ज्ञांच्या सभेने (एक्स्पर्ट्स असेंब्ली) मोजतबा खामेनेई यांची देशाच्या नव्या सर्वोच्च नेत्यपदी निवड केली.इराण आणि अमेरिकेच्या युद्धाचा आज दहावा दिवस आहे. यादरम्यानच ही घोषणा करण्यात आली आहे. जसे जसे हे युद्ध पुढे जात आहेत, तसे अधिक घातक होत आहे. इराणच्या तेहरानला सर्वाधिक या युद्धाचा झळा बसत आहे.दहा दिवसांच्या या युद्धात आतापर्यंत इराणच्या दोन सर्वाेच्च नेत्यांना अमेरिकेने ठार केले. आता मोज्तबा खामेनी यांनी इराणच्या सर्वाेच्च नेत्याचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी लगेचच इस्त्रायलवर घातक क्षेपणास्त्रांनी मोठा हल्ला केला. मोज्तबा खामेनी यांच्या नियुक्तीनंतर इराणकडून क्षेपणास्त्राचा पहिला मारा केला गेला.माझ्या मंजुरीशिवाय कोणताही नवीन नेता जास्त काळ टिकू शकणार नाही - ट्रम्पदरम्यान, मोज्तबा खामेनी यांच्या निवडीला अमेरिकेचा विरोध होण्याची शक्यता आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वी म्हटले होते की, “खामेनी यांचा मुलगा मला स्वीकारार्ह नाही. आम्हाला इराणमध्ये असा नेता हवा आहे जो शांतता आणि सौहार्द निर्माण करेल.”व्हाइट हाऊसने यावर तातडीने कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. ट्रम्प यांनी एका मीडिया चॅनेलशी बोलताना असेही म्हटले होते की, “माझ्या मंजुरीशिवाय कोणताही नवीन नेता जास्त काळ टिकू शकणार नाही.”
मध्य पूर्वेतील तणावाबाबत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचे राज्यसभेत मोठे विधान, काय म्हणाले?
नवी दिल्ली: परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी आज राज्यसभेत मध्य पूर्वेतील तणावाबाबत एक महत्त्वाचे विधान केले आहे. ते म्हणाले, पंतप्रधान मोदी उदयोन्मुख घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत आणि संबंधित मंत्रालये प्रभावी प्रतिसाद सुनिश्चित करण्यासाठी समन्वय साधत आहेत.परराष्ट्र मंत्री म्हणाले, आमच्या सरकारने २० फेब्रुवारी रोजी एक निवेदन जारी करून खोल चिंता व्यक्त केली होती. सर्व पक्षांना संयम बाळगण्याचे आवाहन केले होते. आमचा अजूनही असा विश्वास आहे की तणाव कमी करण्यासाठी संवाद आणि राजनैतिक कूटनीतिचा वापर केला पाहिजे.'हा संघर्ष भारतासाठी चिंतेचा विषय'एस जयशंकर म्हणाले, हा संघर्ष भारतासाठी चिंतेचा विषय आहे. आपण शेजारील प्रदेश आहोत आणि पश्चिम आशियातील स्थिरता आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे. १ कोटी भारतीय आखाती देशांमध्ये राहतात आणि काम करतात. इराणमध्ये अभ्यास किंवा रोजगारासाठी काही हजार भारतीय देखील आहेत. हा प्रदेश आपल्या ऊर्जा सुरक्षेसाठी महत्त्वाचा आहे. त्यात तेल आणि वायूचे अनेक महत्त्वाचे पुरवठादार समाविष्ट आहेत. पुरवठा साखळीतील गंभीर व्यत्यय आणि अस्थिरतेचे वातावरण हे गंभीर मुद्दे आहेत.\The Prime Minister continues to closely monitor the emerging developments, and relevant ministries are coordinating to ensure effective responses, says EAM Dr S Jaishankar as he makes a statement in the Rajya Sabha on the situation in West Asia. https://t.co/AXC9nujGpk pic.twitter.com/dDLt9S92QH— ANI (@ANI) March 9, 2026जयशंकर म्हणाले, संघर्ष सतत वाढत आहे आणि या प्रदेशातील सुरक्षा परिस्थिती बिघडली आहे. हा संघर्ष इतर देशांमध्ये पसरला आहे आणि विध्वंस वाढत आहे. सामान्य जीवनावर स्पष्टपणे परिणाम होत आहे.'दोन भारतीयांचा मृत्यू, एक बेपत्ता'आम्ही व्यापारी जहाजावरील दोन भारतीय खलाशी गमावले आहेत आणि एक अजूनही बेपत्ता आहे, असे जयशंकर यांनी सांगितले आहे.तेहरानमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांबद्दल काय सांगितले?जयशंकर यांनी सांगितले की, तेहरानमधील भारतीय दूतावासाने इराणमध्ये अडकलेल्या अनेक भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात मदत केली आहे. विद्यार्थ्यांना देशाबाहेर हलवण्यात दूतावासाने सक्रिय सहकार्य केले. त्यांनी पुढे सांगितले की, इराणमधील भारतीय नागरिकांना आर्मेनियामार्गे भारतात परत आणण्यासाठी आणि बाहेर काढण्यात मदत करण्यात आली. दूतावास पूर्णपणे सक्रिय आणि उच्च सतर्क आहे. आम्ही भारतीय समुदायाच्या सुरक्षिततेसाठी आणि मदतीसाठी पूर्ण वचनबद्धतेने काम करत आहोत.
Mojtaba Khamenei attack: मध्यपूर्वेतील सुरू असलेल्या युद्धादरम्यान, इराणमधून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. इस्रायली लष्कराने दावा केला आहे की, इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजताब खामेनी यांना लक्ष्य करण्यात आले असून ते हल्ल्यात गंभीर जखमी झाले.
गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता प्रकल्पातील बाधितांना या महिना अखेरपर्यंत कांजुरमार्गला मिळणार घरे
मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. या रस्ते विकास प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या नागरिकांच्या निवासासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कांजूर (पश्चिम) येथे ‘बृहन्मुंबई प्रकल्पबाधित गृहनिर्माण प्रकल्प’ अंतर्गत सुमारे १० हजार ५० चौरस मीटर क्षेत्रफळावरील ७ इमारतींमध्ये ९०६ सदनिकांचे बांधकाम प्रगतिपथावर आहे. पैकी २ इमारतींचे बांधकाम अंतिम टप्प्यात असून २५२ प्रकल्प बाधितांचे मार्च २०२६ अखेरपर्यंत पुनर्वसन करावे. उर्वरित सदनिकांचे बांधकाम ठरलेल्या वेळेत पूर्ण करावे. जेणेकरून, त्या लवकरात लवकर प्रकल्पबाधितांना सुपूर्द करता येतील. तसेच, प्रकल्पाच्या ठिकाणी पुरविण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक उपाययोजना तत्काळ कराव्यात, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिले आहेत.मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ‘बृहन्मुंबई प्रकल्पबाधित गृहनिर्माण प्रकल्प’ अंतर्गत कांजूर (पश्चिम) येथे गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्पबाधितांसाठी बांधण्यात येत असलेल्या सदनिकांची अभिजीत बांगर यांनी शुक्रवारी ६ मार्च २०२६ रोजी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. नगर अभियंता रामचंद्र कदम, प्रमुख अभियंता (पूल) राजेश मुळे यांच्यासह संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग (GMLR) प्रकल्प हा एकूण चार टप्प्यांमध्ये प्रस्तावित आहे. या प्रकल्पामुळे बाधित नागरिकांच्या निवासासाठी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कांजूर (पश्चिम) येथे सुमारे १०,०५० चौरस मीटर क्षेत्रफळावर ७ इमारती बांधण्यात येत आहेत. यामध्ये, तळमजला + २३ मजल्यांच्या इमारतींचा समावेश आहे. या ५ इमारतींमध्ये प्रकल्पबाधितांसाठी एकूण ९०६ सदनिका बांधण्यात येत आहेत. प्रत्येक सदनिकेचे क्षेत्रफळ ३०० चौरस फूट असून त्यामध्ये बैठक, शयनकक्ष (संलग्नित स्वच्छतागृह), स्वयंपाकघर यांचा समावेश आहे. तसेच, प्रकल्पाच्या परिसरात बाजार, सामुदायिक सभागृह, वाचनालय, आरोग्य केंद्र, सांडपाणी प्रक्रिया केंद्र (एसटीपी) आदी सुविधाही पुरवण्यात येणार आहेत.या पार्श्वभूमीवर, बांधकामाची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी बांगर यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यामध्ये सदनिकांच्या आतमधील संरचना; पाणी, स्वच्छतागृह, वीज, उद्वाहन (लिफ्ट), पायऱ्या, अग्निसुरक्षाविषयक उपाययोजना आदींची गुणवत्ता तसेच त्यासंबंधित महत्त्वपूर्ण बाबींची त्यांनी अत्यंत बारकाईने पाहणी केली आणि एकंदर प्रगतीविषयी समाधान व्यक्त केले.सदनिकांचे बांधकाम योग्यप्रकारे आणि दर्जेदारपणे सुरू आहे. तथापि, याठिकाणी वास्तव्यास येणाऱ्या प्रकल्पबाधित नागरिकांसाठी अन्य आवश्यक सोयीसुविधांचीही विहित वेळेत पूर्तता करावी. तसेच, सदनिकांचे बांधकाम ठरलेल्या वेळेत पूर्ण करुन या सदनिका त्यांना लवकरात लवकर उपलब्ध करुन दिल्या जातील, यासाठी योग्य नियोजन आणि अंमलबजावणी करावी, अशा सूचनाही बांगर यांनी यावेळी दिल्या.बांगर म्हणाले की, गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्प टप्पा ३ अंतर्गत जून २०२६ पासून बोगदा खनन संयंत्राद्वारे भूमिगत बोगद्यांच्या खोदकामास सुरुवात केली जाणार आहे. तत्पूर्वी, अमर नगर येथे लॉन्चिंग शाफ्टचे काम सुरु होणे अपेक्षित आहे. त्यासाठी जागेची आवश्यकता आहे. अमर नगर येथील प्रकल्प बाधितांचे कांजूर (पश्चिम) येथे पुनर्वसन केले जाणार आहे. पात्र कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी ७ इमारतींमध्ये सुमारे ३०० चौरस फुटांच्या सदनिकांची उभारणी करण्यात येत आहे. प्रकल्पग्रस्त नागरिकांना सुरक्षित व सन्मानजनक निवास उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा पुनर्वसन उपक्रम राबविण्यात येत आहे. या गृहनिर्माण संकुल परिसरात अंतर्गत रस्ते, मोकळी जागा आणि आवश्यक नागरी सुविधा विकसित करण्यात येत आहे. २ इमारतींचे बांधकाम पूर्ण झाले असून मार्च २०२६ अखेरपर्यंत बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळणे अपेक्षित आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात २५ सदनिका उपलब्ध होतील. तर, उर्वरित ५ इमारतींना एप्रिल २०२६ अखेरपर्यंत बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळणे अपेक्षित आहे. प्रकल्पाच्या ठिकाणी पुरविण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक उपाययोजना तत्काळ करण्याचे निर्देश संबंधितांना दिल्याचे बांगर यांनी नमूद केले.
Iran Israel War : 'इराण बदला घेणारच, डोनाल्ड ट्रम्प यांना मोठी किंमत चुकवावी लागेल'
- इराणने दिला अमेरिकेला थेट इशाराइराणचे वरिष्ठ सुरक्षा अधिकारी अली लारीजानी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कठोर इशारा दिला आहे. इराण आपल्या नेत्यांच्या आणि नागरिकांच्या हत्येचा बदला घेणारच, असे स्पष्ट करत त्यांनी ट्रम्प यांना त्याची “मोठी किंमत चुकवावी लागेल,” असे म्हटले आहे.इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी यांचे निकटवर्तीय मानले जाणारे लारीजानी म्हणाले, “आमच्या नेत्यांच्या आणि आमच्या लोकांच्या रक्ताचा बदला आम्ही नक्की घेऊ. ट्रम्प यांना याची किंमत चुकवावी लागेल.”हे वक्तव्य अशा वेळी समोर आले आहे, जेव्हा इराणचा अमेरिका आणि इस्त्रायल यांच्यासोबत मोठा लष्करी संघर्ष सुरू आहे. लारीजानी यांनी दावा केला की इराण अमेरिका आणि इस्रायलच्या तळांवर हल्ले करत असून त्यांना मोठे नुकसान पोहोचवत आहे.लारीजानी यांनी व्हेनेझुएलाचे उदाहरण देत सांगितले की अमेरिकेला वाटले होते की हे युद्ध लवकर जिंकता येईल, जसे त्याने व्हेनेझुएलामध्ये केले होते; मात्र यावेळी ते अपयशी ठरत असल्याचा दावा त्यांनी केला.यापूर्वी शनिवारी अली लारीजानी यांनी आणखी काही धक्कादायक दावे केले होते. त्यांच्या मते इराणने अनेक अमेरिकन सैनिकांना पकडले असून त्यांना तुरुंगात ठेवले आहे. मात्र, अमेरिकेने हे दावे तात्काळ फेटाळून लावत ते इराणच्या खोटेपणाचे उदाहरण असल्याचे म्हटले.लारीजानी यांनी ट्रम्प यांच्यावर आणखी आरोप करत सांगितले की ते इराणच्या हल्ल्यांमध्ये मारल्या गेलेल्या अमेरिकन सैनिकांच्या मृत्यूबाबत चुकीची माहिती देत आहेत. त्यांच्या मते प्रत्यक्षात मृत अमेरिकन सैनिकांची संख्या ५०० पेक्षा जास्त आहे.दरम्यान, रविवारी Israel ने इराणच्या तेल ठिकाणांवर हल्ला केला. त्याचवेळी Islamic Revolutionary Guard Corps ने Bahrain मधील अमेरिकन लष्करी तळावर हल्ला केल्याचा दावा केला. या तळाचा वापर इराणमधील जलशुद्धीकरण प्रकल्पाला लक्ष्य करण्यासाठी करण्यात आला होता.खाडी क्षेत्रात इराणकडून प्रत्युत्तरात्मक हल्ले सुरूच असून त्यामुळे येरूशलम आणि दोहायेथे हवाई हल्ल्याचा इशारा जारी करण्यात आला आहे.
Alia Bhatt : अल्फा या आगामी चित्रपटातील अभिनेत्री आलिया भट्टचा दमदार लूक रिलीज करण्यात आला असून, चित्रपट प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे.
Sinhagad Ghat : सिंहगड घाटात टेम्पो १५० फूट खोल दरीत कोसळला; पाच जण थोडक्यात बचावले
Sinhagad Ghat : या अपघातात ३ जण किरकोळ जखमी झाले असून २ जण पूर्णपणे सुखरूप आहेत.
Artificial Intelligence अलीकडे काही आंतरराष्ट्रीय संशोधनांमध्ये एआयमुळे महिलांच्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका निर्माण होऊ शकतो, असे म्हटले गेले होते. मात्र भारतातील ताज्या आकडेवारीत वेगळीच चित्र दिसून येते.
Donald Trump: जागतिक स्तरावर चिंतेचा विषय ठरलेल्या इराण आणि इस्रायल-अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या भीषण युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीअत्यंत महत्वाचे विधान केले आहे.
पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आणि होर्मुज जलसंधीतून जाणाऱ्या जहाजांच्या हालचालींवर वाढलेल्या धोक्यामुळे भारताने आपल्या तेलपुरवठ्याची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. भारतीय रिफायनरी कंपन्यांनी आता अमेरिका, लॅटिन अमेरिका, रशिया आणि पश्चिम आफ्रिका यांसारख्या पर्यायी स्रोतांमधून कच्च्या तेलाची खरेदी वाढवली आहे. यामागील उद्देश देशातील इंधनपुरवठा स्थिर ठेवणे आणि संभाव्य संकट टाळणे हा आहे.ऊर्जा क्षेत्राशी संबंधित अधिकाऱ्यांच्या मते, भारतीय रिफायनऱ्यांनी आपल्या खरेदी धोरणात बदल केला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज, एचपीसीएल (हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड) आणि एचपीसीएल-मित्तल एनर्जी लिमिटेड यांसारख्या कंपन्यांनी पश्चिम आफ्रिका, अमेरिका, लॅटिन अमेरिका तसेच रशिया येथून अतिरिक्त कच्चे तेल खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेकडून रशियन तेलासाठी दिलेल्या ३० दिवसांच्या तात्पुरत्या सूटीमुळे भारतासाठी तेल आयातीचा एक नवा मार्गही खुला झाला आहे.पेट्रोलियम मंत्रालयाच्या सूत्रांनुसार, भारत आता सध्याच्या संघर्षाच्या क्षेत्राबाहेरील भागांतून अधिक तेल खरेदी करत आहे. यामुळे होर्मुज जलसंधीव्यतिरिक्त इतर स्रोतांमधून येणाऱ्या तेलाचा वाटा सुमारे ७० टक्क्यांपर्यंत वाढला आहे. वर्ष २०२५ मध्ये हा आकडा सुमारे ६० टक्के होता. भारत आपल्या एकूण कच्च्या तेलाच्या गरजांपैकी सुमारे ८८ टक्के तेल आयात करतो, त्यामुळे पुरवठ्याचे अनेक स्रोत उपलब्ध ठेवणे आवश्यक मानले जात आहे.पेट्रोलियम मंत्रालयातील एका अधिकाऱ्याच्या मते, सध्या देशाकडे सुमारे १४.४ कोटी बॅरल कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध आहे. हा साठा देशातील सुमारे ५० दिवसांच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी पुरेसा मानला जातो. याशिवाय सामरिक पेट्रोलियम साठ्यात सुमारे ९.५ दिवसांच्या शुद्ध आयात गरजा भागवण्यासाठी पुरेसे कच्चे तेल सुरक्षित ठेवण्यात आले आहे.सरकारी तेल कंपन्यांकडेही कच्चे तेल आणि पेट्रोलियम उत्पादनांचा मोठा साठा उपलब्ध आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या कंपन्यांकडे सुमारे ६४.५ दिवसांच्या शुद्ध आयात गरजांइतका साठा आहे. सामरिक साठ्यासह पाहिले असता, देशाकडे एकूण सुमारे ७४ दिवसांच्या गरजा भागवण्याइतके तेल उपलब्ध आहे.दरम्यान, इराण आणि अमेरिका यांच्यात वाढत्या तणावामुळे जागतिक तेलबाजारातही चढ-उतार दिसत आहेत. होर्मुज जलसंधीमधून जहाजांची सुरक्षित वाहतूक याबाबत चिंता वाढली आहे. याच दरम्यान कुवैतने खबरदारीचा उपाय म्हणून तेल उत्पादन आणि रिफायनिंगमध्ये कपात करण्याची घोषणा केली आहे. या परिस्थितीमुळे केवळ एका आठवड्यात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये सुमारे ३५ टक्क्यांपर्यंत वाढ नोंदवली गेली आहे.
Ayushmann Khurrana : ‘अहमदाबादचा शाप अखेर मोडला’; भारताच्या विजयानंतर आयुष्मान खुरानाची पोस्ट
Ayushmann Khurrana : अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींनीही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत टीम इंडियाचे कौतुक केले.
Delhi liquor scam: केजरीवाल-सिसोदिया यांच्या सुटकेच्या आदेशाला स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार
Delhi liquor scam: दिल्ली दारू घोटाळा प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाच्या निर्दोष सुटकेच्या आदेशाला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे.
Malaika Arora मलायका अरोराचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच चाहत्यांच्या आणि माध्यमांच्या चर्चेचा विषय राहिले आहे. गेल्या काही महिन्यांपासून तिचे नाव हर्ष मेहता यांच्यासोबत जोडले जात आहे. काही आठवड्यांपूर्वी दोघांचा रोममधील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
Gas Cylinder: गॅस नियमांत मोठे बदल; पुण्यातील 'या'ग्राहकांना आता मिळणार नाही गॅस सिंलिंडर
पुणे: तुम्ही जर घरगुती गॅस सिलिंडर वापरत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. आतापासून KYC (केवायसी) प्रक्रिया पूर्ण नसलेल्या ग्राहकांना गॅस सिलिंडरचा पुरवठा बंद करण्याचा निर्णय गॅस कंपन्यांनी घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी आता अनेक ठिकाणी सुरू झाली असून, केवायसी नसल्यास तुमचे गॅस बुकिंग ऑनलाइन स्वीकारले जाणार नाही. त्यामुळे ऐनवेळी होणारी धावपळ टाळण्यासाठी तातडीने ही प्रक्रिया पूर्ण करणं बंधनकारक आहे.केवायसीसोबतच गॅस वितरणाबाबत आणखी एक मोठा बदल करण्यात आला आहे. आता दोन सिलिंडर बुक करण्यामधील कालावधी २१ दिवसांवरून थेट ३० दिवसांपर्यंत वाढवण्यात आला आहे. म्हणजेच, एकदा सिलिंडर घेतल्यानंतर आता तुम्हाला पुढील बुकिंगसाठी किमान ३० दिवस वाट पाहावी लागणार आहे. या नियमामुळे ग्राहकांच्या प्रतीक्षा कालावधीत आठ दिवसांची वाढ झाली असून, याचा थेट परिणाम गॅसच्या उपलब्धतेवर होणार आहे.आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन पुरवठा साखळीवर मोठा ताण आला आहे. कच्च्या तेलाच्या किमती आणि पुरवठ्यातील अनिश्चिततेमुळे एलपीजी सिलिंडरच्या उपलब्धतेवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. वितरकांनी स्पष्ट केले आहे की, प्रलंबित केवायसी आणि वाढती मागणी यामुळे वितरण व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण झाला आहे.नागरिकांनी गॅसचा वापर काटकसरीने करावा आणि आपल्या जवळच्या वितरकाकडे जाऊन तातडीने केवायसी अपडेट करून घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे. अन्यथा, गॅस बुकिंगमध्ये तुम्हालाही मोठा मनस्ताप सहन करावा लागू शकतो.
Ishan Kishan : सामन्याच्या आधी इशान किशनवर दुःखाचा डोंगर; इशानने विजयाचं श्रेय दिलं या व्यक्तीला
मुंबई : अहमदाबादच्या जगातल्या सगळ्यात मोठ्या स्टेडियमवर सव्वा लाख चाहत्यांच्या साक्षीने भारतीय संघाने दणदणीत वर्चस्वासह टी-२० वर्ल्डकपच्या अंतिम लढतीत न्यूझीलंडचा धुव्वा उडवत जेतेपदावर नाव कोरले. २०२४ मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाने जेतेपदाची कमाई केली होती. आतापर्यंत कोणत्याच संघाला जेतेपद कायम राखता आले नव्हते. दोन वर्षांपूर्वी रोहितसेनेचा भाग असणाऱ्या सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारतीय संघाने अंतिम मुकाबल्यात प्रथम फलंदाजी करताना २५५ धावांचा डोंगर रचला. संजू सॅमसन, अभिषेक शर्मा आणि इशान किशन या आघाडीच्या शिलेदारांनी वादळी अर्धशतकी खेळी साकारत मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. या डोंगरासमोर खेळताना न्यूझीलंडने नियमित अंतरात विकेट्स गमावल्या. तिलक वर्माने लॉकी फर्ग्युसनचा झेल घेताच खेळाडूंनी एकच जल्लोष केला. न्यूझीलंडचा डाव १५९ धावांतच आटोपला.दरम्यान, न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्याआधी भारताचा फलंदाज इशान किशनच्या चुलत बहीणीचं आणि तिच्या पतीचं कार अपघातामध्ये निधन झालं. याबाबत सामना संपल्यानंतर स्वत: इशान किशनने माहिती दिली. मात्र हे सर्व विसरुन इशान किशन मैदानात उतरला आणि आक्रमक अर्धशतक ठोकलं. अर्धशतक झळकावल्यानंतर इशान किशनने आकाशात बघत बहिणीला श्रद्धांजली वाहिली. वैष्णवी सिंह आणि ऋत्विक ठाकूर असं मृत व्यक्तींची नावं आहेत.काय म्हणाला इशान ?इशान किशन म्हणाला, फायनलच्या अगदी आधी मी माझ्या चुलत बहिणीला कार अपघातात गमावले. मी तिच्यासाठी खेळलो, मी हार्दिक पांड्यासोबत बोललो आणि त्याने संघाला प्राधान्य देण्यास सांगितले. मी हा विजय तिला समर्पित करतो आणि आज महिला दिन आहे, त्यामुळे तो अधिक खास बनतो, असंही इशान किशन म्हणाला. दरम्यान, इशान किशनने २५ चेंडूत ५४ धावा केल्या. यामध्ये ४ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश आहे.Ishan Kishan said, I lost my cousin sister in a car accident just before the Final. I played for her, I spoke to Hardik bhai, and he said to put the team ahead. I dedicate this victory to her and also today is Women's Day, so it makes it more special. pic.twitter.com/iVShVsuql9— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 9, 2026बुमराहच्या वेगाची जादू :फलंदाजांनी आपले काम योग्यरित्या पूर्ण केले होते. त्यामुळे सर्व जबाबदारी गोलंदाजांवर होती. आव्हान मोठं होतं. पण न्यूझीलंडच्या ताफ्यातही एकापेक्षा एक स्फोटक फलंदाज होते. त्यांना लवकर बाद केलं नसतं. तर टीम इंडियाचं टेन्शन वाढलं असतं. त्यामुळे सूर्यकुमार यादवने जसप्रीत बुमराहला लवकर गोलंदाजीला बोलवलं. बुमराहने पहिल्याच चेंडूवर रचिन रवींद्रला बाद करत माघारी धाडलं. बुमराहने या सामन्यात गोलंदाजी करताना ४ षटकात १५ धावा खर्च करून ४ गडी बाद केले.
इराणच्या हल्ल्यात अमेरिकेच्या संरक्षण व्यवस्थेचा चक्काचूर; मध्यपूर्वेतील तणाव वाढला
नवी दिल्ली : मध्यपूर्वेत वाढत चाललेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इराणने केलेल्या हल्ल्यांमुळे अमेरिकेच्या काही महत्त्वाच्या लष्करी सुविधांना फटका बसल्याची माहिती समोर येत आहे. इराण आणि इस्त्रायल यांच्यातील युद्ध हे दिवसेंदिवस तीव्र होत चाललं आहे. या युद्धातून एक महत्वाची बातमी समोर आली आहे. एक हल्ला आणि अमेरिकेसारख्या महासत्तेची नाचक्कीमहासत्ता अमेरिकेची डिफेन्स सिस्टीम ही प्रचंड मोठी आहे. आणि अमेरिकेच्या या ताकदीची चर्चा ही जगभर आहे. परंतु आता तीच ताकद इराणच्या एका हल्ल्याने ढासळली आहे.कतारमधील अमेरिकन तळावर हल्लाइराणकडून ड्रोनच्या मदतीने कतारमधील अल उदीद एअर बेस परिसरात तैनात असलेल्या अमेरिकन रडार प्रणालीवर निशाणा साधण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. सुमारे १.१ अब्ज डॉलर्स किंमतीची ही अर्ली वॉर्निंग प्रणाली गंभीररीत्या बाधित झाल्याचे वृत्त समोर आले आहे.त्याचवेळी बहरीनमध्ये असलेल्या अमेरिकन नौदलाच्या पाचव्या ताफ्याच्या मुख्यालयाजवळील काही सॅटेलाइट कम्युनिकेशन सुविधांना नुकसान झाले आहे.THAAD प्रणाली चक्काचूरजगातील प्रगत क्षेपणास्त्र प्रतिकार यंत्रणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या THAAD प्रणालीलाही या घटनांमध्ये अपेक्षित यश मिळाले नसून जॉर्डनमधील मुवफ्फाक साल्टी एअर बेस तसेच यूएईतील काही ठिकाणी तैनात असलेल्या THAAD रडार यंत्रणांवर इराणकडून अचूक हल्ले करण्यात आल्याची माहिती आहे. यामध्ये सुमारे ३०० दशलक्ष डॉलर्स किमतीच्या उपकरणांचे नुकसान झाल्याची चर्चा आहे.भारताच्या S-400 प्रणालीचा अनुभव२०२५ च्या संघर्षात पाकिस्तानने चिनी उपग्रहांच्या मदतीने भारताच्या S-400 डिफेन्स सिस्टमचे लोकेशन शोधले होते. तरीही पाकिस्तानचे एकही ड्रोन किंवा क्षेपणास्त्र S-400 च्या जवळ पोहोचू शकले नाही. याहल्ल्याची वेगळीरणनीतीचे मुख्य कारण म्हणजे भारतीय जवानांनी ही सिस्टम वेगाने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवली, ज्यामुळे शत्रू गोंधळला. तज्ज्ञांच्या मते, THAAD प्रणाली मुख्यतः उंचावरून येणाऱ्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांना रोखण्यासाठी तयार करण्यात आली आहे. परंतु इराणने या वेळी लो-फ्लाइंग क्रूझ मिसाइल्स आणि आत्मघाती ड्रोन यांचा वापर करत वेगळी रणनीती अवलंबली.यामुळे विविध दिशांनी आणि एकाच वेळी झालेल्या हल्ल्यांना रोखणे कठीण झाले. THAAD सोबत असलेल्या पॅट्रियट आणि आयर्न डोम सारख्या संरक्षण प्रणालींनाही मोठे आव्हान निर्माण झाल्याचे तज्ज्ञ सांगतात.संभाव्य नुकसानाचा आढावा तज्ज्ञांनी सांगितले आहेकतार: सुमारे १.१ अब्ज डॉलर्सची अर्ली वॉर्निंग रडार प्रणाली बाधितबहरीन: नौदल तळाजवळील सॅटेलाइट कम्युनिकेशन सुविधा प्रभावितजॉर्डन / यूएई: THAAD रडार प्रणालीला नुकसानमध्यपूर्वेतील या घडामोडींमुळे जागतिक सुरक्षाव्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून परिस्थितीवर आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष केंद्रीत झाले आहे.
पश्चिम आशियातील संघर्षाचा परिणाम, शेअर बाजार आपटला, गुंतवणूकदारांचे १२ लाख कोटींचे नुकसान
मुंबई : पश्चिम आशियातील संघर्षाचा परिणाम मुंबईसह जगभरातील शेअर बाजारांवर दिसून आला. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवार ९ मार्च २०२६ रोजी मुंबईचा शेअर बाजार दोन हजारांपेक्षा जास्त अंकांनी घसरला. तर कच्च्या तेलाची किंमत ११५ डॉलरवर पोहोचली. सर्व प्रमुख शेअर बाजारांमध्ये मोठ्या प्रमाणात विक्री झाल्यामुळे दोन ते तीन टक्क्यांची घसरण झाली. या घसरणीमुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचे सुमारे बार लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले.सकाळी १०:३० वाजता एनएसईचा निफ्टी फिफ्टी निर्देशांक ६८६.८५ अंकांनी किंवा २.८टक्क्यांनी घसरून २३,६६३.६० अंकांवर पोहोचला, जो एप्रिल २०२५ मध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पहिल्यांदा टॅरिफ जाहीर केल्यापासूनचा सर्वात कमी स्तर आहे. बीएसई सेन्सेक्स निर्देशांक ७६,७२७.९९ अंकांवर आहे, जो २,१९०.९२ अंकांनी किंवा २.८ टक्क्यांनी घसरला आहे. संपूर्ण सेन्सेक्स लाल रंगात आहे. बाजारातील अस्थिरता दर्शविणारा इंडिया VIX, सत्राच्या सुरुवातीला २२ टक्क्यांनी वाढून २४ अंकांपेक्षा जास्त झाला, जो जवळजवळ २ वर्षातील सर्वोच्च स्तर आहे.जागतिक शेअर बाजारांमध्ये विक्रीचा जोर वाढल्यानंतर हे घडले आहे. शुक्रवारी अमेरिकन बाजार एक - दोन टक्के घसरले. सर्व आशियाई बाजारांनी आठवड्याची सुरुवात घसरणीने केली, जपान आणि दक्षिण कोरियामधील निर्देशांक सात ते आठ टक्के घसरले.सोमवारी सकाळी कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींचा परकीय चलन बाजारावर परिणाम झाल्यामुळे रुपयाही डॉलरच्या तुलनेत ९२.३२ वर घसरला, म्हणजेच ५७ पैशांनी घसरला. युद्ध सुरू झाल्यापासून रुपया दबावाखाली आहे, ज्यामुळे रिझर्व्ह बँकेला घसरण रोखण्यासाठी डॉलर्सची विक्री करून मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप करावा लागला.इंडिगो ऑपरेटर इंटरग्लोब एव्हिएशनचे शेअर्स सात टक्क्यांनी घसरले. ही निफ्टी फिफ्टीतील सर्वात मोठी घसरण आहे. इंटरग्लोब एव्हिएशनचे शेअर्स युद्ध सुरू झाल्यापासून आतापर्यंत १६ टक्क्यांनी घसरले आहेत. निफ्टी फिफ्टीत सोमवारी प्रामुख्याने वाहन उद्योग, वित्तीय सेवा आणि माध्यम समुहांशी संबंधित कंपन्यांच्या शेअरमध्ये तीन टक्क्यांपेक्षा जास्त घसरण झाली.
S Jaishankar: भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी पश्चिम आशियातील परिस्थितीवर राज्यसभेत निवेदन दिले. इराणी जहाजांची माहिती देताना, हिंद महासागरात तीन इराणी जहाजे होती, त्यापैकी एकाला आम्ही आश्रय दिला. असे म्हटले.
Harshvardhan Sapkal : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी मोठं वक्तव्य केले आहे. यासोबत त्यांनी केंद्र सरकरवर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे.
Raj Thackeray : मनसेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने पक्ष सदस्य नोंदणी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
Natural Drinks: उन्हाळ्याची चाहूल! त्वरित ऊर्जा देणारी ही ५ नैसर्गिक पेये ठेवा आहारात
Natural Drinks शरीरात योग्य प्रमाणात पाणी असणे आरोग्यासाठी खूप गरजेचे असते. पाण्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण व्यवस्थित राहते आणि पोषक घटक शरीराच्या प्रत्येक भागापर्यंत पोहोचतात.
- भारतीय दूतावासाने दिली माहितीइराणने रविवारी (८ मार्च) सौदी अरेबियावर क्षेपणास्त्र हल्ला केला. या हल्ल्यात निवासी भागात एक प्रोजेक्टाइल पडल्याने सुरुवातीला एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली होती. मात्र रियाधमधील भारतीय दूतावासाने आज म्हणजेच सोमवार ९ मार्च रोजी स्पष्ट केले की या हल्ल्यात कोणत्याही भारतीय नागरिकाचा मृत्यू झालेला नाही. तसेच त्यांनी सांगितले की कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका, आम्ही सौदी अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात आहोत.भारतीय नागरिकाच्या मृत्यूची बातमी चुकीची :यापूर्वी सौदी नागरी संरक्षण (सिव्हिल डिफेन्स) अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितले होते की अल-खरज शहरात झालेल्या या घटनेत मृत्यू झालेल्या दोन जणांमध्ये एक भारतीय आणि एक बांगलादेशी नागरिक होता. मात्र आता भारतीय दूतावासाने भारतीय नागरिकाच्या मृत्यूची बातमी चुकीची असल्याचे स्पष्ट केले आहे.काय सांगितले भारतीय दूतावासाने :भारतीय दूतावासाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत म्हटले, “काल संध्याकाळी अल-खरज येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेत कोणत्याही भारतीय नागरिकाचा मृत्यू झालेला नाही, ही दिलासादायक बाब आहे.” दूतावासाने पुढे सांगितले, “कौन्सुलर अधिकारी वाय. साबिर काल रात्री अल-खरज येथे गेले होते आणि या दुर्दैवी घटनेत जखमी झालेल्या भारतीय नागरिकाची त्यांनी भेट घेतली.” दूतावासाने पुढे माहिती दिली की सध्या त्या जखमी व्यक्तीवर अल-खरजमधील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.दरम्यान, सौदी प्रवक्त्यांनी म्हटले की नागरी पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्याचे प्रयत्न हे आंतरराष्ट्रीय मानवीय कायद्याचे उघड उल्लंघन आहे आणि अशा प्रकरणांमध्ये निर्धारित प्रक्रिया लागू करण्यात आली आहे. तसेच सौदी अरेबियाने निवेदन जारी करत सांगितले की इराणी हल्ल्यांमुळे देशात संताप वाढत आहे.दरम्यान, भारतीय दूतावासाने रविवारी आपल्या नागरिकांसाठी अॅडव्हायजरी जारी केली. यात नागरिकांनी सतर्क राहावे आणि सुरक्षा मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच स्थानिक अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या सूचनांचे प्रामाणिकपणे पालन करण्यास सांगितले आहे. दूतावासाने एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले, “या प्रदेशातील आणि सौदी अरेबियातील सध्याची परिस्थिती लक्षात घेता, सध्या सौदी अरेबियामध्ये असलेल्या सर्व भारतीय नागरिकांनी सतर्क राहावे,” असे आवाहन करण्यात आले आहे.

32 C