मुंबईतील १२ प्रभाग समित्या बिनविरोध, पाच प्रभाग समित्यांमध्ये होणार निवडणूक
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेत महापौर आणि उपमहापौरांसह चार वैधानिक समित्यांच्या अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता महापालिकेच्या वैधानिक समित्या असलेल्या १७ प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी बुधवारी ०४ मार्च रोजी उमेदवारी अर्ज संबंधित प्रभागातील सचिवांना सादर केले. या १७ प्रभाग समित्यांपैंकी ११ प्रभाग समित्यांमध्ये बिनविरोध निवडणूक होणार आहे. तर जी उत्तर प्रभाग समितीमध्ये मनसेचे यशवंत किल्लेदार आणि उबाठाचे जोसेफ कोळी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असले तरी प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी पंधरा मिनिटे यातील एक उमेदवार अर्ज मागे घेणार असल्यामुळे याठिकाणीही बिनविरोध निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकूण १२ प्रभाग समित्यांमध्ये बिनविरोध निवडणूक होणार आहे.मुंबई महापालिकेच्या सर्व प्रभाग समित्यांच्या निवडणूका तीन टप्प्यात म्हणजे गुरुवारी ५ मार्च, शुक्रवारी ६ मार्च आणि येत्या सोमवारी ९ मार्च रोजी होणार आहेत. या तिन्ही टप्प्यातील निवडणुकांमध्ये महापौर आणि उपमहापौर हे पिठासीन अधिकारी म्हणून कामकाज सांभाळणार आहे.मुंबई महापालिकेच्या पाच समित्यांमध्ये म्हणजे ए,बी अँड ई , एफ दक्षिण व एफ उत्तर , पी पूर्व व पी पश्चिम, एस अँड टी , एम पूर्व या प्रभाग समित्यांमध्ये प्रतिस्पर्धी उमेदवारांनी अर्ज भरल्याने याठिकाणी निवडणूक होणार आहे. तर यातील एस अँड टी या प्रभाग समितीमध्ये महायुती आणि विरोधक यांची सदस्य संख्या समसमान असल्यामुळे याठिकाणी ईश्वर चिठ्ठीवर अध्यक्षांची निवड होणार आहे.येत्या गुरुवारी ०५ मार्च रोजी होणाऱ्या प्रभाग समिती :सी अँड डी : भाजप- अकाश पुरोहित,ए,बी अँड ई : काँग्रेस -ज्ञानराज निकम, भाजप- रोहिदास लोखंडेएफ दक्षिण व एफ उत्तर : उबाठा- श्रध्दा जाधव, शिवसेना -मानसी सातमकरआर उत्तर व आर मध्य : भाजप- प्रकाश दरेकरआर दक्षिण विभाग : भाजप-लिना देहेरकरपी पूर्व व पी पश्चिम : राष्ट्रवादी काँग्रेस- अजित रावराणे, काँग्रेस- हैदर अलीयेत्या शुक्रवारी ०६ मार्च रोजी होणाऱ्या प्रभाग समितीएच पूर्व व एच पश्चिम : उबाठा- रोहिणी कांबळे,जी उत्तर : मनसे :यशवंत किल्लेदार, उबाठा- जोसेफ कोळीजी दक्षिण : उबाठा : पद्मजा चेंबूरकर,पी दक्षिण : भाजप- श्रीकला पिल्लेके पश्चिम : भाजप – रोहन राठोडके -उत्तर व के- दक्षिण : भाजप- प्रकाश मुसळे
SA vs NZ : मिचेल सँटनरच्या नेतृत्वाखालील कीवी संघाने दक्षिण आफ्रिकेचे 'अजेय' राहण्याचे स्वप्न मोडीत काढत दुसऱ्यांदा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.
Jayant Patil : वारकरी संप्रदायाचा अपमान खपवून घेणार नाही; जयंत पाटील विधानसभेत आक्रमक
Jayant Patil : श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेवगिरी यांनी ज्ञानेश्वरी व तुकाराम गाथेबद्दल केलेल्या विधानावर जयंत पाटील यांनी विधानसभेत तीव्र आक्षेप घेतला आहे.
Gold-Silver Prices: युद्ध लांबणार; सोने-चांदीच्या दरात मोठी हालचाल, पहा नवे दर
Gold-Silver Prices: बुधवारी एप्रिल मधील पुरवठ्याच्या सोन्याचा भाव 1.16 टक्क्यांनी म्हणजे 1,872 रुपयांनी वाढून 1 लाख 62 हजार 980 रुपये प्रति दहा ग्रॅम या पातळीवर गेला होता.
Gulf War Impact: केंद्र सरकारने जारी केलेल्या कर्जरोख्यांची विक्री वाढून कर्जरोख्यावरील परतावा सध्या तीन आठवड्याच्या उच्चांकी पातळीवर गेला आहे. प्राप्त माहितीनुसार 10 वर्षाच्या सरकारी रोख्यावरील परतावा वाढून 6.7112 टक्क्यांवर गेला आहे.
भारताच्या सागरी सीमेजवळ पोहोचलं युद्ध
पाणबुडी हल्ल्यात १०१ सैनिकांसह इराणी युद्धनौका बुडाली, ७८ जखमीनवी दिल्ली : हिंदी महासागरात श्रीलंकेच्या दक्षिण किनारपट्टीवर बुधवारी एका इराणीयुद्धनौकेवर भीषण पाणबुडी हल्ला झाल्याची खळबळजनक घटना घडली. या हल्ल्यात इराणची आयआरआयएस डेना ही युद्धनौका समुद्रतळाला गेली असून, त्यावरील किमान १०१ कर्मचारी बेपत्ता आहेत, तर ७८ जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती श्रीलंकेच्या नौदलाने आणि संरक्षण मंत्रालयाने दिली.
Indian rupee’s record low: युद्धाचा भारताला आर्थिक फटका; रुपया गडगडला, महागाई वाढण्याचा धोका
Indian rupee’s record low: रुपयाचा भाव बुधवारी 67 पैशांनी कोसळून 92.16 प्रती डॉलर या ऐतिहासिक निचांकी पातळीवर गेला. सोमवारी रुपयाचा भाव 41 पैशांनी कोसळला होता. त्यामुळे दोनच दिवसात रुपयाचे एक टक्क्याने अवमूल्यन झाले आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे ही घसरण कधी थांबेल याची शाश्वती नाही.
SA vs NZ : मार्को यान्सनची ईडन गार्डन्सवर तुफानी फिफ्टी! १६ वर्षांनंतर मोडला ‘हा’मोठा विक्रम
SA vs NZ : सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या यान्सनने कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर ३० चेंडूंत नाबाद ५५ धावांची तडाखेबंद खेळी केली.
Russia : रशियाचे तेलवाहू जहाज लीबियाजवळ बुडाले; दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी नाही
या टँकरमधून रशियाच्या तेलाची वाहतूक केली जात असल्यामुळे या टँकरवर पाश्चात्य देशांकडून निर्बंध घातले गेले होते.
जामखेड हादरले..! कुख्यात गुंड सागर मोहळकरवर भरदिवसा गोळीबार; परिसरात मोठी खळबळ
Jamkhed News : जामखेडमधील कुख्यात गुंड पैलवान सागर मोहळकरवर अज्ञात हल्लेखोरांनी सहा राऊंड गोळीबार केला आहे.
US-Iran War: दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच घडली ‘ही’घटना; हिंदी महासागरात सापडले 87 मृतदेह
US-Iran War: अमेरिकेच्या सेंट्रल कमांडचे प्रमुख ॲडमिरल ब्रॅड कूपर यांनी सांगितले की आतापर्यंत सुरू असलेल्या युद्धात इराणच्या किमान १७ युद्धनौका बुडवण्यात आल्या आहेत. आम्ही इराणचे संपूर्ण नौदल बुडवत आहोत, असे ते एका व्हिडिओ संदेशात म्हणाले.
LNG supply : औद्योगिक क्षेत्र संकटात.! देशात एलएनजीचा पुरवठा विस्कळीत
नवी दिल्ली – पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धादरम्यान कतारने द्रवीभूत नैसर्गिक वायू (एलएनजी) उत्पादन थांबवले आहे. यामुळे भारताला होणारा पुरवठा विस्कळीत झाला आहे. इराण आणि इस्रायल-अमेरिका यांच्यातील संघर्षाचा सर्वात मोठा फटका ऊर्जा क्षेत्राला बसला आहे. यामुळे विविध औद्योगिक ग्राहक आणि शहरी गॅस वितरण (सीजीडी) कंपन्यांसाठी पुरवठ्यात ४० टक्क्यांपर्यंत कपात करण्यात आली आहे. जगातील सर्वात मोठा […]
पुण्याच्या इंदिरा युनिव्हर्सिटीच्या संचालकांनी मानले उपमुख्यमंत्री शिंदेंचे आभार
मुंबई: “आजवर तुमच्याबद्दल फक्त ऐकून होते, मात्र तुम्ही प्रत्यक्षात संकटाच्या वेळी मदतीला धावून येता, याची खात्री आज पटली,” अशा शब्दांत इंदिरा युनिव्हर्सिटीच्या अध्यक्ष तरीता शंकर यांनी एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले.युद्धजन्य परिस्थितीत दुबई येथे अडकलेल्या पुणे विद्यापीठाच्या ८४ विद्यार्थ्यांना विशेष विमानाने सुरक्षित मायदेशी परत आणल्याबद्दल त्यांनी व्हिडिओ कॉलद्वारे उपमुख्यमंत्री शिंदे यांचे आभार मानले.अमेरिका–इस्त्रायल आणि इराण यांच्यात निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे मध्यपूर्वेतील वातावरण अचानक अस्थिर झाले. त्याच काळात पुण्यातील इंदिरा युनिव्हर्सिटीचे ८४ विद्यार्थी शैक्षणिक सहलीसाठी दुबई येथे गेले होते. युद्धाचा भडका उडाल्यानंतर आंतरराष्ट्रीय उड्डाणांबाबत अनिश्चितता निर्माण झाल्याने हे सर्व विद्यार्थी तिथेच अडकून पडले.ही बाब समजताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ याची दखल घेत प्रशासनाशी समन्वय साधला. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आली आणि सर्व ८४ विद्यार्थ्यांना काल रात्री सुखरूप भारतात परत आणण्यात आले.विद्यार्थी मायदेशी परतल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी सुटकेचा निश्वास सोडला. इंदिरा युनिव्हर्सिटीच्या अध्यक्ष तरिता शंकर यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधत केलेल्या तत्पर मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.संकटाच्या वेळी विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी पुढाकार घेतल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संवेदनशील आणि तत्पर नेतृत्वाचे पुन्हा एकदा दर्शन घडल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
Mumbai Traffic Police :
'ऊर्जा क्षेत्राला सक्षम करण्यासाठी कालबद्धरित्या प्रकल्पांची अंमलबजावणी करा'
मुंबई : राज्यात ऊर्जा क्षेत्रात मोठी गुंतवणूक होत असून जलसंपदा विभागाच्या माध्यमातून उदंचन जलविद्युत प्रकल्पांसाठीचे विविध कंपन्यांसोबत एकूण ५५ सामंजस्य करार आज करण्यात आले आहेत. या करारांद्वारे ७८,२१५ मेगावॅट वीज निर्मिती क्षमतेची उभारणी प्रस्तावित आहे. एकूण गुंतवणूक सुमारे ₹४,१६,७०१ कोटी रुपये इतकी अपेक्षित असून या प्रकल्पाद्वारे सुमारे १,२७,९९० रोजगार निर्मिती होणार आहे. ऊर्जाक्षेत्राला सक्षम करण्यासाठी करार महत्वाचे असून कालबद्धरित्या या प्रकल्पांची अंमलबजावणी करावी, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.विधानभवनात राज्यातील उदंचन जलविद्युत प्रकल्पांची (पंपस्टोरेज प्रकल्प) आढावा बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधितांना सूचित केले. बैठकीस जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदा (विदर्भ,तापी व कोकण खोरे विकास महामंडळ) मंत्री गिरीश महाजन यांच्या सह जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर व इतर संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्यात मोठ्या प्रमाणात ऊर्जा क्षेत्राच्या बळकटीकरणाच्या दृष्टीने जलसंपदा विभागाच्या माध्यमातून उदंचन जलविद्युत प्रकल्पांची उभारणी करण्यात येत आहे. या कामाची व्याप्ती वाढवण्याच्या दिशेने या क्षेत्रातील नामांकित विविध कंपन्यांसोबत राज्य शासनाने सांमजस्य करार केले आहेत. आतापर्यंत एकूण ५५ सांमजस्य करार हे उदंचन जलविद्युत प्रकल्पांच्या निर्मितीसाठी करण्यात आले आहेत. अल्पावधीतच या प्रकल्पांच्या कामाने गती घेतली असून ५५ पैकी १०३०० मेगा वॅट क्षमतेच्या सहा प्रकल्पांच्या सविस्तर प्रकल्प अहवालांना केंद्रीय विद्युत प्राधिकरणाची मंजूरी मिळाली असून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली आहे. तसेच ८२०० मेगावॅट क्षमतेच्या पाच प्रकल्पांचे सविस्तर प्रकल्प अहवाल मंजुरीच्या टप्प्यात आहेत. या गुंतवणुकीमुळे राज्यातील ऊर्जा उत्पादन क्षमता लक्षणीय वाढणार असून औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे. तसेच मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होऊन स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल. या प्रकल्पांच्या उभारणीचे काम गतीने पुढे जात असून विहित कालमर्यादेत हे प्रकल्प कार्यान्वित होतील यादृष्टीने सर्व संबंधित यंत्रणांनी प्राधान्याने आणि समन्वयाने काम करण्याच्या सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिल्या.जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर यांनी सांगितले की, उदचंन जलविद्युत प्रकल्पांचे सामंजस्य करार १२ ऑगस्ट, ३ सप्टेंबर, २६ सप्टेंबर २०२४ तसेच २९ एप्रिल, १ व १५ जुलै, ३ नोव्हेंबर आणि १० डिसेंबर २०२५ रोजी करण्यात आले. प्रमुख कंपन्यांमध्ये अदानी ग्रीन एनर्जी लि. (९९०० मेगावॅट, ₹५४,४५० कोटी, ३० हजार रोजगार), एनएचपीसी लि. (७३५० मेगावॅट, ₹४४,१०० कोटी, ७३५० रोजगार), जेएसडब्लू एनर्जी (८२०० मेगावॅट, ₹३६,५१४ कोटी, १५,२०० रोजगार), टीएचडीसीआयएल (६७९० मेगावॅट, ₹३३,६२२ कोटी, ६३०० रोजगार) आणि टोरंट पॉवर लि. (५६०० मेगावॅट, ₹२८ हजार कोटी, १३,५०० रोजगार) यांचा समावेश आहे. याशिवाय टाटा पॉवर कंपनी लि., एनटीपीसी लि., जेएसडब्ल्यू निओ एनर्जी लि., मेघा इंजि. अँड इन्फ्रा लि., वेलस्पन न्यू एनर्जी लि., रिन्यू हायड्रो पॉवर प्रा. लि., महाजेनको रिन्यूएबल एनर्जी लि. आणि अवाडा ॲक्वा बॅटरीज प्रा.लि या कंपन्यांनीही सामंजस्य करार केलेले आहेत..................मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज म्हणजेच बुधवार ४ मार्च २०२६ रोजी विधान भवन, मुंबई येथे महाराष्ट्र शासन (जलसंपदा विभाग) आणि चँम्बेरी पॉवर प्रायव्हेट लिमिटेड (ईडीएफ पॉवर सोल्युशन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड समूह ) यांच्यात पुणे व रायगड जिल्ह्यात पिंपळपाडा–सावळे उदंचन जलविद्युत प्रकल्प उभारण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री गिरीश महाजन, ईडीएफ पॉवर सोल्युशन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी गिरेक सर्व्हन आणि इतर मान्यवर उपस्थित होते. आतापर्यंत मंजूर झालेल्या ५५ उदंचन जलविद्युत प्रकल्पांद्वारे महाराष्ट्रात ७८,२१५ मेगावॅट वीज निर्मिती, सुमारे ₹४.१७ लाख कोटींची गुंतवणूक आणि सुमारे १.२८ लाख रोजगारांच्या संधी निर्माण होणार आहेत.असा आहे आजचा सामंजस्य करारक्षमता - २१०० मेगावॅटगुंतवणूक - ₹१०,२१७ कोटीरोजगार संधी - २५००
मुंबई, दि. ४ : - पुणे व रायगड जिल्ह्यांत २१०० मेगावॉट क्षमतेचा पिंपळपाडा-सावळे उदंचन जलविद्युत प्रकल्प विकसित करण्यासाठी चॅम्बेरी पॉवर (ईडीएफ सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड यांची समूह कंपनी) यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला.विधान भवन येथे यावेळी आयोजित या कार्यक्रमास जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदा (विदर्भ, तापी,कोकण पाटबंधारे विकास महामंडळ) व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी (महाजनको)चे व्यवस्थापकीय संचालक राधाकृष्णन बी., ईडीएफ सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुरिएक सर्वन तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.राज्य शासनाच्या सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) धोरणानुसार २१०० मेगावॉट क्षमतेचा उदंचन जलविद्युत प्रकल्प उभारण्यासाठी हा करार करण्यात आला आहे. ऊर्जा साठवण आणि स्थिर वीजपुरवठा सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.योजनांनुसार औद्योगिक दराने सुमारे १,७६२.२१ कोटी रुपयांचा महसूल तर प्रतिवर्ष पुनर्भरणातून सुमारे १२८.३२ कोटी रुपयांचा महसूल राज्याला मिळणे अपेक्षित आहे. ऊर्जा क्षेत्रातील ही मोठी गुंतवणूक राज्याच्या औद्योगिक विकासाला चालना देणारी ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.प्रकल्पाचा तपशील : चॅम्बेरी पॉवर प्रायव्हेट लिमिटेडमार्फत पिंपळपाडा-सावळे उदंचन जलविद्युत प्रकल्प पुणे व रायगड जिल्ह्यांत विकसित करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे १० हजार २१७ कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित असून अंदाजे २,५०० रोजगार निर्मिती होणार आहे.महाराष्ट्रातील उदंचन जलविद्युत प्रकल्प : राज्यात आतापर्यंत एकूण ५५ उदंचन जलविद्युत प्रकल्पांद्वारे ७८,२१५ मेगावॉट वीज निर्मिती अपेक्षित आहे. या माध्यमातून सुमारे ४.१७ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक तर १.२८ लाख मनुष्यबळासाठी रोजगारनिर्मिती होणार आहे.
डॉ. अभिजित चौधरी 'पीएमआरडीए'चे नवे आयुक्त
मुंबई : राज्य शासनाने बुधवारी दोघा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले असून, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) आयुक्तपदी डॉ. अभिजित चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते सध्या नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून कार्यरत होते.दुसरीकडे, 'पीएमआरडीए'चे विद्यमान महानगर आयुक्त योगेश म्हसे मंत्रालयातील अल्पसंख्याक विकास विभागाच्या सचिवपदी बदली करण्यात आली आहे. पुण्याच्या रिंग रोडसह अन्य महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना गती देण्याची जबाबदारी आता डॉ. चौधरी यांच्यावर असेल.
मुंबई :गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा आणि अलिबाग दरम्यान धावणाऱ्या प्रवासी बोटींचे आधुनिकीकरण करून प्रवाशांना अधिक सुरक्षित आणि दर्जेदार सेवा देण्याच्या सूचना मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्या आहेत.मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात 'गेटवे एलिफंटा जलवाहतूक सहकारी संस्थे'च्या प्रलंबित विषयांबाबत महत्त्वाची बैठक पार पडली.बैठकीत मंत्री नितेश राणे यांनी स्पष्ट केले की, 'प्रवाशांची सुरक्षा ही शासनाची सर्वोच्च प्राथमिकता आहे.' सध्या वापरात असलेल्या जुन्या बोटींच्या जागी अत्याधुनिक आणि सुरक्षित 'अपग्रेडेड' बोटी आणण्याच्या सूचना त्यांनी संस्थेला दिल्या.संस्थेच्या सध्या ९० बोटी कार्यरत आहेत. या बोटींचे टप्प्याटप्प्याने आधुनिकीकरण करून नवीन आणि 'ॲडव्हान्स' बोटी खरेदी करण्याबाबत मंत्री नितेश राणे यांनी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना सूचित केले.नवीन बोटी खरेदी करण्यासाठी संस्थेला आर्थिक अडचण येऊ नये, यासाठी संस्थेच्या सदस्यांना कर्ज उपलब्ध करून देण्याचे आश्वासन मंत्री नितेश राणे यांनी दिले. जलवाहतूक क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी शासन सर्वतोपरी मदत करण्यास तयार असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.पर्यटकांना आणि स्थानिक प्रवाशांना जागतिक दर्जाची सेवा मिळावी, यासाठी तांत्रिक बाबींवर भर देण्याचे निर्देशही देण्यात आले. प्रवाशांना चांगली सेवा आणि सुरक्षा देणे हे आपले कर्तव्य असल्याचेही मंत्री नितेश राणे म्हणाले.या बैठकीस राज्यमंत्री योगेश कदम, महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीप, मत्स्यव्यवसाय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
KGF fame Yash's बहुप्रतीक्षित ‘टॉक्सिक’ची रिलीज तारीख पुढे ढकलली; या तारखेला उघडणार पडदा
मुंबई : कन्नड स्टार यशच्या बहुचर्चित ‘टॉक्सिक: ए फेरी टेल फॉर ग्रोन-अप्स’ या चित्रपटाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. जगभर १९ मार्चला प्रदर्शित होणार असल्याची घोषणा करण्यात आलेला हा सिनेमा आता त्या तारखेला थिएटरमध्ये येणार नाही.‘रॉकी भाई’च्या कमबॅकची चार वर्षांपासून रंगलेली चर्चा चाहत्यांना पुन्हा प्रतीक्षा करायला लावणारी ठरली आहे.जागतिक तणावाचा फटकानिर्मात्यांच्या मते, मध्यपूर्वेतील अस्थिर वातावरण आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील तणावाचा परिणाम वितरणावर होण्याची शक्यता आहे. ‘टॉक्सिक’ हा चित्रपट जागतिक बाजारपेठ डोळ्यासमोर ठेवून तयार करण्यात आला आहे.कन्नडसोबतच इंग्रजी भाषेतही शूटिंग करण्यात आल्याने परदेशातील प्रदर्शनाला विशेष महत्त्व होते. मात्र सध्याच्या परिस्थितीत जागतिक रिलीज करणे धोकादायक ठरू शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.यशची अधिकृत भूमिकासोशल मीडियावर चाहत्यांशी संवाद साधताना यशने स्पष्ट केले की, प्रेक्षक आणि वितरण भागीदारांचे हित लक्षात घेऊन प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. नवीन नियोजनानुसार हा हाय-ऑक्टेन ॲक्शन ड्रामा आता ४ जून २०२६ रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.दमदार स्टारकास्टदिग्दर्शक गीतू मोहनदास यांच्या या चित्रपटात गीतू मोहनदास दिग्दर्शित या चित्रपटात नयनतारा, कियारा अडवाणी, हुमा कुरेशी आणि तारा सुतारिया यांसारखी तगडी कलाकार फळी झळकणार आहे.‘धुरंधर २’ला सोलो रिलीजचा फायदा?‘टॉक्सिक’ शर्यतीतून बाहेर पडल्याने १९ मार्चला प्रदर्शित होणाऱ्या धुरंधर २ ला थेट फायदा होण्याची शक्यता आहे. बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगचा हा स्पाय थ्रिलर आता स्पर्धेशिवाय थिएटरमध्ये उतरणार आहे. मोठ्या चित्रपटाची टक्कर टळल्याने बॉक्स ऑफिसवर एकहाती कमाईची संधी निर्माण झाल्याचे चर्चा सुरु आहे.चाहत्यांची नजर जूनकडेसध्या ‘टॉक्सिक’च्या नव्या रिलीज डेटची अधिकृत घोषणा करण्यात आली असून, पुढील काही महिन्यांत प्रमोशनचा वेग वाढवला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, मार्चमध्ये बॉक्स ऑफिसवर ‘धुरंधर २’चा दबदबा राहणार का, याकडे चित्रपटसृष्टीचे लक्ष लागले आहे.
Mumbai Politics : राज ठाकरेंच्या ‘या’भूमिकेमुळे उद्धव ठाकरेंना बसणार फटका?
Mumbai Politics : मुंबई महापालिकेच्या १७ प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे. मनसेने तटस्थ राहण्याचा निर्णय घेतल्याने प्रभाग समिती एस आणि टी मध्ये ठाकरेसेनेला फटका बसण्याची शक्यता आहे.
SA vs NZ : न्यूझीलंडविरुद्धच्या अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात डी कॉकने केवळ ९ धावांवर आपली विकेट गमावली. विशेष म्हणजे, या संपूर्ण स्पर्धेत तो सलग चौथ्यांदा एका ऑफ स्पिनरच्या गोलंदाजीवर बाद झाला
Rajya Sabha Election : महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने ४ उमेदवारांची घोषणा केली आहे.
मच्छिमार आणि महिला कामगारांसाठी विश्रामगृह तातडीने खुले करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश
मुंबई :ससून डॉक येथील मच्छिमार, महिला कामगार आणि बोटधारकांच्या प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून, या परिसराच्या आधुनिकीकरणाला वेग दिला जाईल, अशी ग्वाही मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी आज येथे दिली.मंत्रालयात आयोजित एका महत्त्वपूर्ण बैठकीत ससून डॉकच्या आधुनिकीकरणाचा सविस्तर आढावा मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी घेतला. यावेळी मच्छिमारांच्या विविध मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली. या बैठकीला आमदार राजेश राठोड, मत्स्यव्यवसाय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि मच्छिमार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.ससून डॉक येथे मत्स्य व्यावसायिक आणि विशेषतः महिला कामगारांसाठी शासनाने बांधलेले विश्रामगृह तातडीने खुले करावे, असे स्पष्ट निर्देश मंत्री नितेश राणे यांनी दिले. यामुळे कामाच्या ठिकाणी महिलांची मोठी गैरसोय दूर होणार आहे. बोटधारक आणि व्यावसायिकांना भेडसावणाऱ्या तांत्रिक तसेच प्रशासकीय अडचणींवर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. या समस्या प्राधान्याने सोडवण्याचे आश्वासन मंत्र्यांनी दिले.मासे उतरवणे, साठवणूक आणि विक्री या साखळीत मच्छिमारांना कोणत्याही अडचणी येऊ नयेत, यासाठी पायाभूत सुविधा बळकट करण्यावर भर देण्यात आला.
इराणच्या सुरक्षा दलांसह नेत्यांवरही इस्रायलचे हल्ले.! नागरिकांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
खामेनींच्या हत्येनंतर तेथील राजवट उलथवून टाकणे हे आपले उद्दिष्टच नव्हते, असे ट्रम्प म्हणाले.
IAS Transfers: महाराष्ट्रातील 2 आयएएस अधिकाऱ्यांची बदली; पहा कोणाला कुठे जबाबदारी
IAS Transfers: जाणकारांच्या मते नागपूर महापालिकेतील नागरी प्रशासनाचा अनुभव डॉ. चौधरी यांना PMRDA च्या भूसंपादन आव्हाने आणि नगर नियोजनातील अडचणी सोडवण्यात उपयुक्त ठरेल.
पुणे मेट्रोचा विस्तार ठरला; विमानतळापर्यंत पोहोचणार मेट्रो, असा असेल नवा मार्ग
पुणे : शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीला पर्याय देत मेट्रो सेवा आता थेट लोहगाव विमानतळाच्या दारात पोहोचणार आहे. वनाझ–रामवाडी मार्गिकेचा विस्तार करण्याचा निर्णय निश्चित झाला असून, कल्याणीनगरमार्गे विमानतळाशी जोडणी करण्यास मान्यता देण्यात आली आहे.सहा पर्यायांतून कल्याणीनगर स्पर लाईनची निवडबैठकीत सादर करण्यात आलेल्या विविध पर्यायांपैकी महामेट्रो कडून सुचवलेल्या कल्याणीनगर स्पर मार्गाला प्राधान्य देण्यात आले. या चर्चेला केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित होते. नव्या आराखड्यानुसार मेट्रो कल्याणीनगर स्थानकानंतर सिम्बायोसीस परिसरातून पुढे जात विमानतळाजवळील एरोमॉलपर्यंत धावणार आहे. त्यामुळे प्रवाशांना थेट टर्मिनलजवळ उतरता येणार आहे.संरक्षण हद्दीचा अडथळा टळलायापूर्वी विमानतळ जोडणीसाठी विचारात घेतलेल्या मार्गांमध्ये संरक्षण खात्याच्या जमिनींचा प्रश्न निर्माण होत होता. नव्या पर्यायात मेट्रो सार्वजनिक रस्त्यांच्या ‘राईट ऑफ वे’मधून नेण्याचा प्रस्ताव असल्याने मोठ्या भूसंपादनाची गरज भासणार नाही. प्रकल्पासाठी मर्यादित जागेचे अधिग्रहण अपेक्षित असून, परवानग्या मिळवण्याची प्रक्रिया तुलनेने सुलभ राहील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.प्रवाशांना थेट फायदारामवाडी किंवा परिसरातून विमानतळासाठी वेगळा रस्ता निवडण्याची गरज कमीट्रॅफिकमुळे होणारा उशीर आता होणार नाहीविमानतळावर पोहोचण्यासाठी पूर्वीप्रमाणे अनेक तास आधी निघावे लागणार नाहीकार्यालयीन आणि व्यावसायिक प्रवाशांचा मेट्रोमुळे खूप वेळ हा वाचणार आहे.विस्तारित मार्गाचा तपशीलवार प्रकल्प अहवाल लवकरच पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनकडे सादर केला जाणार आहे या मंजुरीनंतर आर्थिक आणि तांत्रिक प्रक्रिया सुरू होईल.पुढचे नियोजनलवकरच या विस्तारित मार्गाचा सविस्तर प्रकल्प आराखडा (DPR) पुणे महानगरपालिकेला सादर करणार आहे. यासोबतच वनाझ ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली या मार्गांच्या कामालाही लवकरच गती मिळणार आहे. तसेच शहराच्या वाढत्या विस्तारासाठी शेवाळेवाडी-कात्रज-वाकड फाटा असा महामार्गाला समांतर मेट्रो मार्गही नियोजित आहे.शहराच्या वाहतूक व्यवस्थेला नवा आयामविमानतळाशी थेट मेट्रो जोडणी ही दीर्घकाळ प्रलंबित मागणी होती. नव्या निर्णयामुळे पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला धोरणात्मक बळ मिळणार असून, वाढत्या नागरी विस्ताराच्या पार्श्वभूमीवर हा टप्पा महत्त्वाचा मानला जात आहे.
Sam Curran Statement : भारत विरुद्ध इंग्लंड या हायव्होल्टेज सामन्यापूर्वी इंग्लंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू सॅम करन याने एक मोठे विधान केले आहे.
India’s LNG supplies: पेट्रोनेटने कतारला 'फोर्स मेजर' नोटीस दिली; पेट्रोनेटसह गेल, IOC, BPCLच्या शेअर्समध्ये मोठी घसरण
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अटक केल्यानंतर त्यांच्या मातोश्री निवासस्थानालाच तात्पुरते तुरुंग घोषित करण्याची सरकारची योजना होती.
NCP Merge : राष्ट्रवादीच्या विलानीकरणावर जयंत पाटलांचं सर्वात मोठं विधान
NCP Merge : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाच्या चर्चांवर जयंत पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
या प्रणाली अंतर्गत शेतकरी ऑफलाइन मोडमध्ये त्यांच्या मोबाइल फोनवर पिकांचे फोटो घेऊ शकतात...
राज्यसभेसाठी महाविकास आघाडीकडून शरद पवार रिंगणात
मुंबई : राज्यसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला अखेर निश्चित झाला असून, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. काँग्रेसने या जागेवरील आपला दावा सोडून पवारांना पाठिंबा जाहीर केल्यामुळे ही निवडणूक आता बिनविरोध होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.https://prahaar.in/2026/03/04/bjp-announces-four-names-for-rajya-sabha/गेल्या काही दिवसांपासून राज्यसभेच्या या जागेवरून महाविकास आघाडीत खलबते सुरू होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) नेत्यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी सातत्याने संपर्क साधून ही जागा पवारांसाठी सोडण्याची विनंती केली होती. या पार्श्वभूमीवर, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ गटनेते विजय वडेट्टीवार आणि आमदार सतेज पाटील यांची राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भेट घेतली. या चर्चेनंतर काँग्रेसने शरद पवारांच्या उमेदवारीला हिरवा कंदील दाखवला.काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष असल्याने राज्यसभेच्या या जागेवर त्यांचा 'नैसर्गिक दावा' मानला जात होता. मात्र, शरद पवार यांची संसदीय कारकीर्द आणि महाविकास आघाडीतील त्यांचे स्थान लक्षात घेता, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी स्वतः पुढाकार घेतला. खर्गे यांनी राज्यातील काँग्रेस नेत्यांना शरद पवारांच्या पाठिशी उभे राहण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतरच महाविकास आघाडीचा हा फॉर्म्युला निश्चित झाला.या निर्णयाची घोषणा करताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, शरद पवार हे महाविकास आघाडीचे संयुक्त उमेदवार असतील. आघाडीतील सर्व घटक पक्ष त्यांना मतदान करतील. दरम्यान, शरद पवारांसारखा ज्येष्ठ नेता मैदानात असल्याने, सत्ताधाऱ्यांकडून अतिरिक्त उमेदवार उभा केला जाण्याची शक्यता कमी असून, ही निवड बिनविरोध होईल, असे बोलले जात आहे.आजोबा - नातू राज्यसभेतदुसरीकडे, शरद पवारांचे नातू आणि अजित पवार यांचे सुपूत्र पार्थ पवार देखील राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यामुळे आजोबा आणि नातू एकत्र राज्यसभेत दिसणार आहेत.
India LPG Stock: 30 दिवसांत गॅस सिलिंडर संपणार? पश्चिम आशियातील युद्धाचा भारताला मोठा फटका!
India LPG Stock: तेल मंत्रालयाने सांगितले की, सध्या देशातील ऊर्जा साठा मोठ्या प्रमाणात सुरक्षित असून परिस्थिती नियंत्रणात आहे. संकट कमी करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्यास सरकार सज्ज असल्याचेही मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
IND vs ENG : सेमीफायनल सामन्यापूर्वी सलामीवीर अभिषेक शर्मा, इशान किशन आणि अक्षर पटेल यांनी मुंबईच्या प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात जाऊन गणपती बाप्पाचे आशीर्वाद घेतले.
अखेर निर्णय झाला..! राज्यसभेच्या सातव्या जागेसाठी शरद पवार अधिकृत उमेदवार; काँग्रेसकडून समर्थन
Sharad Pawar : राज्यसभेच्या सातव्या जागेसाठी अखेर शरद पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.
BMC News : अखेर वाद मिटला.! बीएमसीत ठाकरेसेना आणि मनसेचा समेट; २५ मिनिटांच्या चर्चेनंतर वादावर पडदा
मनसे नेते संदीप देशपांडे यांनीही चर्चेवर समाधान व्यक्त करत कोणतीही वेगळी भूमिका घेणार नसल्याचे संकेत दिले.
कृषी निर्यातीला युद्धाची झळ; केंद्र सरकारशी समन्वय साधून तोडगा काढणार
मुंबई : इराण आणि इस्रायल यांच्यातील वाढत्या संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार विस्कळीत झाला असून, त्याचा मोठा फटका महाराष्ट्रातील कांद्यासह कृषी उत्पादक शेतकरी आणि निर्यातदारांना बसू लागला आहे. निर्यातीसाठी सज्ज असलेले सुमारे २०० कंटेनर जेएनपीटी बंदरात अडकले असून, या गंभीर परिस्थितीची राज्य सरकारने दखल घेतली आहे. केंद्र सरकारशी समन्वय साधून निर्यातदार आणि शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना केल्या जातील, अशी ग्वाही बंदरे व मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी बुधवारी विधानसभेत दिली.काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी 'पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन'द्वारे हा मुद्दा सभागृहात मांडला. युद्धजन्य परिस्थितीमुळे शिपिंग कंटेनरचा खर्च दोन ते चार हजार डॉलर्सपर्यंत पोहोचला आहे. विमा प्रीमियम आणि जहाजांच्या उपलब्धतेअभावी निर्यात ठप्प झाली आहे. लासलगावसारख्या मोठ्या बाजारपेठांमधील व्यवहार थांबल्यास कांद्याचे भाव कोसळण्याची भीती आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदत किंवा 'बाजार हस्तक्षेप योजना' राबवून दिलासा देणार का? असा सवाल पटोले यांनी उपस्थित केला.नाना पटोले यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री नितेश राणे म्हणाले की, हा विषय अत्यंत संवेदनशील असून शासनाने याची गांभीर्याने नोंद घेतली आहे. राज्याचा बंदरे मंत्री म्हणून मी आज सकाळीच केंद्रीय जहाजबांधणी मंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्याशी संपर्क साधला आहे. आंतरराष्ट्रीय संकटामुळे राज्यातील शेतकरी आणि निर्यातदारांचे नुकसान होऊ नये, ही सरकारची प्राथमिकता आहे. कंटेनर वाहतूक, जहाजांची उपलब्धता आणि वाढीव विमा दरांबाबत केंद्र सरकारशी सतत संपर्क सुरू आहे. निर्यात प्रक्रियेतील तांत्रिक आणि आर्थिक अडथळे दूर करून राज्यातील शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान कमीत कमी राखण्यासाठी राज्य सरकार आग्रही आहे. याविषयी शासन वेळोवेळी अद्ययावत माहिती निवेदनाद्वारे सभागृहाला सादर करेल, असेही राणे यांनी स्पष्ट केले.https://www.youtube.com/shorts/SfN7p0Jy8oc
करारी पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत पूजा सावंत
मुंबई :मराठी चित्रपटसृष्टीत आघाडीच्या नायिकेला पोलिसांच्या वर्दीत पाहणं हे तसं दुर्मिळच. मात्र आगामी ‘सालबर्डी’ चित्रपटात ही चौकट मोडत पूजा सावंत एका करारी, निर्भीड आणि तडफदार पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येत आहे. पी.आय.मनोरमा प्रधान असं तिच्या व्यक्तिरेखेचं नाव आहे. नुकताच 'सालबर्डी' या चित्रपटाचा दमदार टिझर आणि कलाकारांचे प्रभावी पोस्टर दिमाखात प्रदर्शित करण्यात आले असून, त्याने प्रेक्षकांची उत्सुकता कमालीची वाढवली आहे.या सोहळ्यात पूजाने डॅशिंग एंट्री घेत आपल्या भूमिकेची झलक दाखवली. पोलिस अधिकाऱ्याच्या व्यक्तिरेखेसाठी तिने विशेष मेहनत घेतली असून, पोलिसांची देहबोली,अधिकारपूर्ण संवादशैली आणि शिस्तबद्ध वर्तन यांचा सखोल अभ्यास करत ही भूमिका पूजाने साकारली आहे. वास्तवदर्शीपणा जपण्यासाठी तिने प्रत्यक्ष पोलिस अधिकाऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या कामकाजाचे बारकाईने निरीक्षण केले.आपल्या भूमिकेबद्दल बोलताना पूजा सांगते, ‘वर्दी अंगावर चढताच एक वेगळाच रुबाब आपोआप येतो. तो वेगळा दाखवावा लागत नाही. वर्दीतच एक ताकद असते. माझी ही भूमिका प्रत्येक स्त्रीला प्रेरणा देणारी ठरेल.’ चित्रपटातील थरारक स्टंट्स आणि दमदार अॅक्शन सीन्स हे 'सालबर्डी' चे खास आकर्षण असणार आहेत. येत्या १७ एप्रिलला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.महाराष्ट्रातील दुर्गम भागात वसलेल्या ‘सालबर्डी’ गावात घडणाऱ्या रहस्यमय, भयावह आणि अस्वस्थ करणाऱ्या घटनांचा थरारक शोध घेणारा हा चित्रपट नेब्यूला फिल्म्सच्या बॅनरखाली साकारण्यात आला आहे. या चित्रपटाची निर्मिती अनिल देवडे पाटील, डॉ. गजानन जाधव आणि राम जाधव यांनी केली असून, दिग्दर्शनाची धुरा रमेश साहेबराव चौधरी यांनी सांभाळली आहे.चित्रपटाचे छायांकन व संकलन सिद्धेश संतोष मोरे यांचे आहे. पटकथा व संवाद रोहित शुक्रे यांचे असून, गुरु ठाकूर आणि मुकुंद भालेराव यांच्या गीतांना पद्मनाभ गायकवाड यांचे संगीत लाभले आहे. पार्श्वसंगीताची जबाबदारी अमर मोहिले यांनी सांभाळली आहे. अजय गोगावले, जावेद अली आणि आनंदी जोशी यांच्या आवाजाने चित्रपटातील गाणी सजली आहेत. नृत्यदिग्दर्शन फुलवा खामकर आणि आशीष पाटील यांनी केले आहे. कार्यकारी निर्माते दीपक कुदळे पाटील असून, वेशभूषा प्रणिता चिंदगे, रंगभूषा श्रीनिवास मेनूगे आणि कलादिग्दर्शन प्रदीप गुरव यांचे आहे.
मुंबई-विजयदुर्ग ‘रो-रो’ आता रायगड, रत्नागिरी आणि वेंगुर्ल्यातही थांबणार
मुंबई : मुंबई ते विजयदुर्ग या बहुप्रतिक्षित ‘रो-रो’ सेवेचा विस्तार आता अधिक व्यापक होणार आहे. या मार्गावर आता रायगडमधील दिघी, रत्नागिरीतील जयगड आणि सिंधुदुर्गातील वेंगुर्ला हे तीन नवे थांबे देण्याचा निर्णय महाराष्ट्र सागरी महामंडळाने (एमएमबी) घेतला आहे. या तिन्ही ठिकाणच्या जेट्टींची कामे अंतिम टप्प्यात असून, येत्या महिनाभरात ही सेवा प्रवाशांसाठी खुली केली जाणार आहे. यामुळे कोकण किनारपट्टीवरील जलवाहतुकीचे जाळे अधिक मजबूत होणार आहे.महायुती सरकारचा महत्त्वाकांक्षी असणाऱ्या मुंबई-विजयदुर्ग रो-रो सेवेचा शुभारंभ मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला. या सेवेला कोकणवासियांकडून मिळणारा प्रतिसाद पाहता, मार्गावरील अन्य प्रमुख बंदरांना जोडण्याची मागणी जोर धरत होती. दिघी (रायगड) हा दक्षिण रायगडला जलमार्गाने जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. औद्योगिक आणि बंदर विकासाच्या दृष्टीने जयगड (रत्नागिरी) हा थांबा महत्त्वाचा ठरेल. वेंगुर्ला (सिंधुदुर्ग) येथील थांब्यामुळे मालवण, तारकर्ली, शिरोडा या पर्यटनस्थळांना भेट देणे सुलभ होणार आहे. तसेच, वाहनांसह प्रवासाची सोय असल्याने चाकरमन्यांच्या वेळेत आणि इंधन खर्चात मोठी बचत होईल.नेरुळ-मुंबई जलवाहतूकही लवकरचमुंबई-विजयदुर्ग रो-रो सेवेच्या विस्तारासोबतच, महाराष्ट्र सागरी महामंडळामार्फत नेरुळ ते मुंबई ही जलवाहतूक सेवाही लवकरच सुरू करण्यात येणार आहे. यामुळे नवी मुंबई आणि मुंबई दरम्यानचा प्रवास अधिक वेगवान आणि सुखकर होणार आहे.हर्णे बंदरात थांबा मिळावा - गृह राज्यमंत्री योगेश कदम रोरो सेवेचा लाभ दापोलीवासियांना व्हावा यासाठी हर्णे बंदरात थांबा देण्याची मागणी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी बुधवारी बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांच्याकडे केली आहे. ही सेवा मुंबई ते कोकण प्रवासासाठी अतिजलद वाहतुकीचा पर्याय ठरणार असून, यामुळे सागरी दळणवळण सुकर होणार असल्याचे मंत्री कदम म्हणाले. दापोली तालुक्यात प्रवासासाठी रेल्वे मार्गाची सुविधा नसल्याने प्रवाशांना सागरी मार्गाने प्रवास करावा लागतो. त्यामुळे हर्णे बंदरात रो-रो सेवेचा थांबा दिल्यास सागरी दळणवळणास अधिक चालना मिळेल. हर्णे बंदरात सद्यस्थितीत जेट्टीचे बांधकाम सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.
Todays Top 10 News: वाचा आजच्या टाॅप बातम्या
मोठी बातमी..! राज्यातील ३१६ अधिकारी तडकाफडकी निलंबित; अजून ५ हजार कर्मचारी रडारवर
Suspended officers : महाराष्ट्र राज्य सरकारने बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांच्या आधारे नोकरी मिळवणाऱ्या ३१६ कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.
केंद्र सरकार हिंदी लादण्याच्या बाबतीत आता सर्व मर्यादा ओलांडत असून, तामिळ अस्मितेशी खेळू नका, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
Stock Market: अमेरिका-इस्रायल-इराण संघर्ष आणि कच्च्या तेलाच्या किमतींमधील तीव्र वाढ यामुळे जागतिक बाजारपेठांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून, त्याचे थेट पडसाद भारतीय बाजारावर उमटत असल्याचे विश्लेषकांचे मत आहे.
Rohit Pawar : “….पण कोणीतरी या कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे”; रोहित पवार स्पष्टच म्हणाले
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूची चौकशी दोन दिवसांत हाती घेतली, तर बारामती अपघाताला एक महिना उलटूनही अशीच कारवाई झाली नाही.
SA vs NZ Semifinal : २०२४ च्या विश्वचषकातही प्रोटियाज संघ फायनलमध्ये पोहोचला होता, जिथे त्यांना भारताकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.
Congress vs BJP : “ही भारताची संसद की उत्तर कोरिया?”काॅंग्रेसची पंतप्रधान मोदींवर बोचरी टिका
Congress vs BJP
'पल्स'मुळे आरोग्य क्षेत्रात जगात महाराष्ट्राचा लौकिक वाढणार
मुंबई :सध्या जगामध्ये प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञानाची प्रगती होत आहे. आरोग्य क्षेत्रातही दररोज नवनवे तंत्रज्ञान येत आहे. नवनवीन संशोधन, येणारे तंत्रज्ञान, दुर्धर आजारावरील परवडणारे उपचार आणि आजारांना प्रतिबंध या सर्वांचा संगम मुंबईत आयोजित ‘पल्स’ परिषदेत होणार आहे. त्यामुळे निश्चितच आरोग्य क्षेत्रात जगात महाराष्ट्राचा लौकिक वाढणार आहे, असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.'पल्स' या वैद्यकीय परिषदेचे आयोजन मुंबईत जिओ वर्ल्ड सेंटर, येथे २७ व २८ मार्च २०२६ रोजी करण्यात येणार आहे. पल्स २०२६ च्या ' कर्टन रेझर' कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विधानभवन येथे पार पडला. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ उपस्थित होत्या.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मानवी आरोग्यासाठी निर्माण होणाऱ्या नवनवीन आव्हानांवर यशस्वी मात करण्यासाठी राज्य शासन कार्यरत आहे. सध्या शासन, खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्राने सोबत येऊन यावर उपाय काढण्याची आवश्यकता असून खासगी क्षेत्राने संशोधनातून अशा समस्यांवर उपाय काढावे, असे आवाहनही त्यांनी केले.या परिषदेच्या आयोजनातून जागतिक स्तरावर असणाऱ्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रात मोठे सकारात्मक बदल होतील. आपल्या संपूर्ण आरोग्य यंत्रणेला सक्षम करण्यासाठी पल्स परिषद ही मोठी संधी आहे. परिषदेकरिता जगभरातून जवळपास १३० नामांकित डॉक्टर्स, वैद्यकीय शिक्षण देणाऱ्या संस्थांमधील अभ्यासक, संशोधक येणार आहेत. सध्या असलेली युद्धजन्य परिस्थिती तोपर्यंत निवळून जाईल आणि विनासायास तज्ज्ञ परिषदेला येऊ शकतील. जर ही परिस्थिती कायम राहिली, तर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्यांना परिषदेत सहभागी करून घेतल्या जाईल. परिषदेत २० सत्रांच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रातील संशोधन, नवनवीन तंत्रज्ञान, परवडणाऱ्या खर्चात मिळू शकणारे उपचार, दुर्धर आजारांवरील उपचार याविषयी चर्चा होणार आहेत, असेही मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानामुळे संपूर्ण आरोग्य क्षेत्राचा कायापालट होत आहे. या तंत्रज्ञानामुळे दिवसेंदिवस आरोग्य क्षेत्रात बदल होत आहेत. परिषदेच्या यशस्वी आयोजनानंतर पुढील प्रत्येक वर्षी परिषद आयोजित व्हावी. या परिषदेच्या आयोजनातून आरोग्य यंत्रणेला निश्चितच बळकट करण्याचे कार्य होईल, अशी अपेक्षाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, परिषदेच्या माध्यमातून आरोग्य व वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील नवोन्मेष, संशोधन पुढे येईल. या क्षेत्रात नवनवीन संकल्पना, कार्य करणाऱ्या स्टार्टअप्सलाही परिषदेत या व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. जगभरातून उद्योग क्षेत्रात कार्यरत असलेले तज्ञ, अभ्यासक, संशोधक परिषदेत येणार आहेत त्यामुळे आपल्या आरोग्यवस्थेचा पाया अधिक बळकट करणे शक्य होणार आहे. वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या, मुंबईत होणारी ही परिषद आरोग्य, वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात मोठ्या संधी उपलब्ध करून देणार आहे. या संधीचा उपयोग राज्यातील दुर्गम, अती दुर्गम भागात दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी होणार आहे. ही परिषद राज्याच्या आरोग्य, वैद्यकीय शिक्षण क्षेत्राचे भविष्यातील मार्गक्रमण अधोरेखित करणारी ठरणार आहे.मुख्यमंत्री यांच्या सल्लागार पूजा मिसाळ यांनी कार्यक्रमात सादरीकरण करीत परिषदेच्या आयोजनामागील भूमिका विषद केली. कार्यक्रमादरम्यान परिषदेवर आधारित चित्रफीत दाखविण्यात आली. तसेच कार्यक्रमासाठी निर्मित संकेतस्थळाची माहिती देण्यात आली. परिषदेच्या माहितीवर आधारित साहित्याचे प्रकाशनही करण्यात आले. यावेळी वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरज कुमार, आयुक्त अनिल भंडारी, अभिनेत्री सोहा अली खान, वैद्यक मुफझ्झल लकडवाला, स्वप्नाली कदम, रिलायन्स रुग्णालय समूह तसेच लीलावती रुग्णालयाचे डॉक्टर उपस्थित होते.
दापोलीतील हर्णे बंदराला सागरी रो-रो सेवेचा थांबा मिळावा राज्यमंत्री योगेश कदम यांची मागणी
मुंबई : मुंबई ते विजयदुर्ग या सागरी रो-रो सेवेला रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील हर्णे बंदर येथे थांबा देण्यात यावा, अशी मागणी राज्याचे गृह (शहरे), महसूल, ग्रामविकास व पंचायत राज, अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण राज्यमंत्री योगेश कदम यांनी मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.मुंबई ते कोकण प्रवास अधिक जलद आणि सुलभ व्हावा या उद्देशाने महाराष्ट्र सागरी मंडळामार्फत मुंबई ते विजयदुर्ग ही रो-रो सेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेमुळे मुंबई–कोकण दरम्यान सागरी वाहतुकीचा पर्याय उपलब्ध होऊन प्रवाशांना मोठी सोय होणार आहे.राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, दापोली तालुक्यातील हर्णे बंदर येथे सध्या जेट्टीचे बांधकाम सुरू आहे. दापोली तालुक्यात रेल्वे मार्गाची सुविधा नसल्याने येथील नागरिकांना मुंबईसह इतर भागात जाण्यासाठी प्रामुख्याने रस्ते किंवा सागरी मार्गावर अवलंबून राहावे लागते. अशा परिस्थितीत मुंबई–विजयदुर्ग रो-रो सेवेला हर्णे बंदर येथे थांबा दिल्यास दापोली तालुक्यासह परिसरातील नागरिकांना मोठा फायदा होईल.तसेच कोकणातून मुंबईकडे प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांसाठी सागरी मार्ग अधिक सोयीस्कर होईल आणि स्थानिक स्तरावर सागरी वाहतुकीला चालना मिळेल, असेही त्यांनी नमूद केले आहे.त्या अनुषंगाने मुंबई ते विजयदुर्ग रो-रो सेवेला हर्णे बंदर (ता. दापोली) येथे थांबा देण्याबाबत संबंधित यंत्रणांना आवश्यक निर्देश द्यावेत, अशी मागणी राज्यमंत्री योगेश कदम यांनी मंत्री नितेश राणे यांच्याकडे केली आहे.
परदेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना सुरक्षित परत आणणार
मुंबई :युद्धजन्य परिस्थितीमुळे काही देशांची हवाई वाहतूक सेवा बंद झाल्यानंतर परदेशात अडकलेल्या भारतीयांबाबत राज्य शासन सतर्क असून त्यांना सुरक्षित परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली.विधान परिषद सदस्य संजय केनेकर, ॲड. निरंजन डावखरे, सत्यजित तांबे, ॲड. अनिल परब, शशिकांत शिंदे यांनी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारे परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासंदर्भात महाराष्ट्र शासन करत असलेल्या उपाययोजनासंदर्भात प्रश्न विचारला होता.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, हवाई वाहतूक सेवा बंद झाल्यानंतर पर्यटक, व्यावसायिक तसेच ट्रान्झिटमध्ये असलेल्या नागरिकांचे संदेश आल्यानंतर तत्काळ केंद्र शासनाच्या परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधण्यात आला. त्याचबरोबर संबंधित देशांतील भारतीय दूतावासांना सक्रिय करण्यात आले असून नागरिकांना दूतावासाशी संपर्क साधण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.मंत्री गिरीश महाजन यांच्यावर समन्वयाची जबाबदारीआपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्यावर समन्वयाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. नागरिकांसाठी विशेष व्हॉट्सॲप हेल्पलाईन क्रमांक जाहीर करण्यात आला असून त्यावरून येणाऱ्या तक्रारींचे निराकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मंत्री महाजन यांनी व्हिडिओ कॉलद्वारे अडकलेल्या अनेक नागरिकांशी संवाद साधला आहे.मुख्य राजशिष्टाचार अधिकारी राजेश गावंडे यांनाही जबाबदारी देण्यात आली असून त्यांनी दूतावासांसोबत बैठक घेऊन आवश्यक एसओपी नागरिकांपर्यंत पोहोचविल्या आहेत. या सूचनांची माहिती ‘एक्स’ (ट्विटर) खात्यावरूनही प्रसारित करण्यात आली आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.केंद्र सरकारकडूनच परत आणण्याची प्रक्रियामुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, राज्य शासनाने महाराष्ट्रातील नागरिकांना परत आणण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याची तयारी दर्शविली होती. मात्र केंद्र सरकारने सध्या असुरक्षित हवाई वाहतुकीमुळे ही प्रक्रिया केंद्राच्या अखत्यारितच ठेवण्याचा सल्ला दिला आहे. विविध राज्यांनी स्वतंत्र प्रयत्न केल्यास गोंधळ निर्माण होऊ शकतो, असेही केंद्राचे मत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.सध्या एअर इंडियाची काही विमाने संबंधित ठिकाणी जाऊ लागली असून टप्प्याटप्प्याने नागरिकांना परत आणले जात आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत परिस्थितीत सुधारणा होईल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.कुवैतमध्ये ट्रान्झिट प्रवाशांना दिलासाकुवैत येथे ट्रान्झिटमध्ये असलेल्या काही प्रवाशांना व्हिसा नसल्याने अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र भारतीय दूतावासाच्या प्रयत्नांमुळे त्यांची तात्पुरती व्यवस्था करण्यात आली असून त्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत.दुबईत अन्नव्यवस्थामिहीर कोटेचा यांनी दुबई येथे ओळखीच्या व्यक्तींच्या माध्यमातून अडकलेल्या नागरिकांसाठी दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था सुरू केली आहे. आर्थिक अडचणीत असलेल्या नागरिकांना या उपक्रमाचा लाभ होत आहे.प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विश्वासमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, गेल्या काही वर्षांत परदेशातील भारतीयांना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून परत आणण्याचा अनुभव केंद्र सरकारला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार या प्रकरणावर बारकाईने लक्ष ठेवून आहे, सर्व नागरिकांना सुरक्षित परत आणले जाईल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.तेलसाठा पुरेसा, शेतमाल निर्यातीचा मुद्दा तपासणारतेलसाठ्याबाबत सध्या देशाकडे सुमारे दोन महिन्यांचा साठा उपलब्ध असल्याने तातडीने दरवाढीची भीती नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र युद्धामुळे परदेशात अडकलेल्या शेतमाल निर्यातीचा प्रश्न गांभीर्याने घेतला जाईल आणि आवश्यक त्या पातळीवर हस्तक्षेप करण्याचा विचार करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.परदेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना पूर्ण सुरक्षिततेने परत आणू, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहाच्या माध्यमातून व्यक्त केला.
हरवलेल्या महिला शोधण्यासाठी राज्यात स्पेशल सेल
मुंबई :हरवलेल्या महिलांना शोधण्यासाठी राज्य शासनाने स्पेशल सेल तयार केला आहे. या सेलमध्ये अतिरिक्त महासंचालक (एडीजी) स्तराच्या महिला अधिकाऱ्यांना नेमण्यात आले आहे. या शोध मोहिमांचे नियोजन आणि अंमलबजावणी ते पाहतात. या विशेष सेलने केलेल्या कामामुळे गेल्या वर्षभरात सापडलेल्या महिलांची संख्या १० टक्क्यांनी वाढली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.याबाबत सदस्य निरंजन डावखरे यांनी प्रश्न उपस्थित केला. तर सदस्य भाई जगताप यांनी उपप्रश्न उपस्थित केला.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, स्पेशल सेलच्या माध्यमातून महिला अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली नियमित बैठकांचे आयोजन करून प्रगतीचे परीक्षण केले जाते, तसेच हरवलेल्या महिलांच्या शोधासाठी राज्यभरात मोहिम हाती घेतल्या जात आहेत. पहिल्या वर्षभरात साधारण ५५ ते ६० टक्के महिलांचा शोध लागतो, तर अडीच ते तीन वर्षांच्या कालावधीत हा आकडा ९० टक्क्यांपर्यंत पोहोचतो. राज्य शासनाचे उद्दिष्ट ९५-९६ टक्क्यांपर्यंत पोहोचणे आहे आणि तोपर्यंत काम थांबवले जाणार नाही. दरवर्षी नवीन ऑपरेशन्स राबवून हरवलेल्या महिलांच्या शोधात सुधारणा करण्यावर शासन भर देत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.याबाबत अधिक माहिती देताना राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर म्हणाले, हरविलेल्या मुला,मुलींच्या शोधासाठी राज्यात जुलै २०१५ ते डिसेंबर २०२४ अखेर १३ ऑपरेशन मुस्कान राबविण्यात आली असून त्यामध्ये ४१,१९३ लहान मुले,मुली यांचा शोध घेण्यात आला आहे. २० जानेवारी ते २० फेब्रुवारी दरम्यान ऑपरेशन मुस्कान १४ मोहिम सुरू असून १६ फेब्रुवारी २०२६ पर्यंत ४५४ मुले व ९४७ मुली अशी एकूण १४०१ बालके शोधण्यात आलेली आहेत. हरविलेल्या महिला व बालकांचा शोध घेण्यासाठी ‘ऑपरेशन शोध’ ही विशेष मोहिम राबविण्यात आली आहे. राज्यात महिला व बालकांच्या सुरक्षिततेसाठी निर्भया पथकाची स्थापना करण्यात आली आहे. महिला व मुली यावरील अत्याचारास प्रतिबंध करण्याकरिता पोलिसांची गस्त वाढविणे, पोलीस काका, पोलीस दीदी या उपाययोजना करण्यात येत आहेत. राज्यात सर्व पोलीस ठाणे स्तरावर महिला मदत कक्षाची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहितीही राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी दिली.
Shirur News : फाकटे (ता. शिरूर) येथे आगीत एका कुटुंबाचे घर आणि संसार पूर्णतः नष्ट झाले.
Rajshri Deshpande : ‘सेक्रेड गेम्स’फेम अभिनेत्रीची कॅन्सरविरुद्धची लढाई ! रुटीन चेकअपसाठी गेली अन्..
अभिनेत्री राजश्री देशपांडे (Rajshri Deshpande) यांचा जन्म छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे झाला असून त्यांनी अभियांत्रिकी आणि नंतर अभिनय प्रशिक्षण घेतले आहे.
Pakistan ODI Squad : आगामी बांगलादेश दौऱ्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या १५ सदस्यीय वनडे संघातून माजी कर्णधार बाबर आझम याला धक्कादायकरीत्या डच्चू देण्यात आला आहे.
CM Baliraja Farm Road Scheme: योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकार सामाजिक उत्तरदायित्व निधीचा (CSR) वापर करणार आहे. मतदारसंघनिहाय आमदार-स्तरीय समित्यांमार्फत कामांवर नियंत्रण ठेवले जाईल. दरमहा आढावा बैठकांद्वारे कामाची प्रगती तपासली जाईल, असेही मंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
‘वनसंज्ञे’तील चुकीच्या नोंदींचा फटका, सिंधुदुर्गमधील अडीच लाख हेक्टर क्षेत्र विकासापासून वंचित
मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वनसंज्ञेच्या नोंदींमधील सावळागोंधळ आणि प्रशासकीय विसंगतीचा मुद्दा उपस्थित करीत शिवसेना आमदार निलेश राणेंनी बुधवारी सरकारला धारेवर धरले. वनसंज्ञेतील चुकीच्या नोंदींमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अडीच लाख हेक्टर क्षेत्र विकासापासून वंचित आहे. जिल्ह्यातील ४२ हजार २४२ हेक्टर क्षेत्रावर लादण्यात आलेल्या वनसंज्ञेबाबत कोणतीही अधिकृत नोंद जिल्हा प्रशासनाकडे नसताना, शासनाने मोगम आकड्यांच्या आधारे उत्तर दिलेच कसे, असा रोखठोक सवाल त्यांनी उपस्थित केला. यावर उत्तर देताना, या प्रकरणातील कायदेशीर गुंतागुंत सोडवण्यासाठी विशेष सरकारी वकील (स्पेशल कौन्सिल) नेमून सर्वोच्च न्यायालयात राज्याची बाजू प्रभावीपणे मांडली जाईल, असे आश्वासन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.लक्षवेधी सूचनेद्वारे हा ज्वलंत प्रश्न मांडताना आमदार निलेश राणे यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, “सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४२ हजार २४२ हेक्टर क्षेत्राबाबत मी जेव्हा विचारणा केली, तेव्हा जिल्हा प्रशासन, महसूल विभाग किंवा माहिती अधिकार कार्यालयाकडे या आकड्याची कोणतीही अधिकृत नोंद उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे, शासनाने मी दिलेल्या मोगम आकड्यांचा आधार घेऊन त्यात शासकीय, खासगी आणि संपादित वनक्षेत्राचे सविस्तर तपशील दिले आहेत. जो आकडा अभिलेखातच नाही, त्याचे उत्तर शासन कशाच्या आधारे तयार करते? हा आकडा नेमका आला कुठून? ढगातून काढलेल्या आकड्यांवर वनसंज्ञा ठरवताय का?”, असा सवाल त्यांनी केला.राणे म्हणाले, चुकीच्या पद्धतीने वनसंज्ञा नोंदवल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३०० हून अधिक गावे बाधित झाली आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची विकासकामे करता येत नाहीत. सरकारकडे याची अधिकृत नोंद नाही. आम्ही अनेक सातबारे तपासल्यानंतर ही बाब समोर आली. साधे रस्ते बांधणे किंवा गावातील मंदिरांची दुरुस्ती करणेही शक्य नाही, कारण वन विभागाकडून परवानगी मिळत नाही. सुमारे ४० ते ४२ वर्षांपूर्वी सॅटलाईट पद्धतीने ही नोंद करण्यात आली असून ती आजतागायत कायम आहे. याचा फटका कोकणच्या विकासाला बसत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ साडेपाच लाख हेक्टर असून त्यापैकी अडीच लाख हेक्टर जमीन विविध प्रकारच्या आरक्षणाखाली आहे. अशा परिस्थितीत निधी मिळूनही विकास करणे मोठे आव्हान ठरत आहे, असे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. विधान भवन, मुंबई | राज्य विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन – २०२६आज विधानसभा सभागृहात वनसंज्ञा लक्षवेधीवर बोलताना सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या ज्वलंत प्रश्नांकडे शासनाचे ठामपणे लक्ष वेधले.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणावर जमीन विविध झोन व आरक्षणाखाली अडकून पडल्याने शेतकरी व… pic.twitter.com/5Jb0ETi4jP— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) March 4, 2026सिंधुदुर्ग जिल्ह्यात केवळ २ टक्केच सरकारी वनजमीन?सॅटेलाइट सर्वेक्षणानंतर जिल्ह्यात ९८ टक्के क्षेत्र खासगी वन म्हणून नोंदवले गेले आहे. याचा अर्थ जिल्ह्यात केवळ २ टक्केच सरकारी वनजमीन आहे का?, असा सवाल निलेश राणे यांनी केला. या अनागोंदीमुळे शेतकरी, कबुलायतदार आणि आकारीपट धारक अडचणीत आले आहेत. जमिनींचे व्यवहार ठप्प झाले असून, वन विभाग यावर स्पष्ट बोलायला तयार नाही, असा संतापही राणे यांनी व्यक्त केला.आकडेवारी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रतिज्ञापत्रातील - महसूलमंत्रीआमदार निलेश राणे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले की, ही आकडेवारी १९९५ मधील 'टी. एन. गोदाबर्मन थिरुमुलपाद विरुद्ध केंद्र सरकार' या खटल्यातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तयार करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या नोंदीनुसार २६ हजार २४२.३६ हेक्टर क्षेत्र वनक्षेत्र म्हणून नोंदवलेले आहे. यात १७ हजार हेक्टर शासकीय, तर ८ हजार ७१३ हेक्टर खासगी क्षेत्र आहे. सुमारे ४८३ हेक्टर क्षेत्र खारफुटी (मॅन्ग्रोव्ह) अंतर्गत येते. ही आकडेवारी राज्याने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रावर आधारित असल्याने ती जिल्हास्तरावर स्वतंत्रपणे उपलब्ध नसावी, असे त्यांनी सांगितले.सर्वोच्च न्यायालयात दुरुस्ती अर्ज दाखलजिल्ह्यातील जमिनींच्या आरक्षणाबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले की, सुमारे ९ हजार हेक्टर क्षेत्र 'राखीव रस्ते' किंवा अन्य स्वरूपात चुकीने नोंदवले गेले आहे. याबाबत राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात दुरुस्ती अर्ज दाखल केला आहे. नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलने (एनजीटी) क्षेत्रफळ कमी झाल्याबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत, मात्र आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू. शाळा, मंदिरे, दवाखाने आणि आकारीपट धारकांच्या जमिनींबाबत जिल्हा व तालुकास्तरीय समित्यांच्या माध्यमातून पुनरावलोकन करून स्वतंत्र प्रस्ताव तयार केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.वनमंत्र्यांविषयी नाराजी याविषयी विधिमंडळाच्या आवारात माध्यमांशी संवाद साधताना आमदार निलेश राणे म्हणाले, संबंधित क्षेत्र वनजमिनीतून वगळण्यासाठी कार्यवाही करू, असे आश्वासन महसूल मंत्र्यांनी दिले असून यासंदर्भात कोकण विभागाची बैठकही लवकरच होणार आहे. मात्र, या संपूर्ण प्रकरणात वनविभागाकडून कोणतीही ठोस भूमिका मांडलेली दिसत नाही. त्यांच्या नोंदीमध्ये संबंधित जमिनींची नोंदच नाही, हीच या अडचणीची मुळ कारणे आहेत. जेव्हा प्रत्यक्ष सर्वेक्षण होईल, तेव्हा कोकणातील किती जमीन खरोखर वनखात्याची आहे आणि किती जमीन उपग्रह नकाशांच्या आधारे आमच्यावर लादण्यात आली आहे, हे स्पष्ट होईल. आमची मागणी इतकीच आहे की, चुकीच्या पद्धतीने वनखात्यात दाखल झालेल्या जमिनी त्यातून वगळाव्यात. महसूल विभाग आपल्या कक्षेत जे काही आवश्यक आहे ते करत आहे; मात्र वनविभागानेही तेवढ्याच गांभीर्याने या प्रश्नाकडे पाहून पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
शहरी भागातील गृहनिर्माण संस्थांना ‘एनए’ करातून मोठा दिलासा
मुंबई : राज्यातील शहरी भागातील गृहनिर्माण संस्थांवर आकारला जाणारा अकृषिक (एनए) कर रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला असून, यापुढे जुन्या किंवा नव्या कोणत्याही बांधकामांवर हा कर आकारला जाणार नाही. तसेच पूर्वीची थकबाकीदेखील शासनाने माफ केली असल्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत दिली.अर्थसंकल्पीय अधिवेशनातील प्रश्नोत्तराच्या तासात आमदार भीमराव तापकीर यांनी शहरी भागातील गृहनिर्माण संस्थांसाठी अकृषिक कर माफ करण्याबाबत प्रश्न उपस्थित केला. त्यावर महसूल मंत्री बावनकुळे यांनी हा निर्णय स्पष्ट केला.तापकीर यांनी आपल्या प्रश्नात नमूद केले की, शहरी भागातील बांधकामांवरील जागांवर अकृषिक कर आकारला जात होता. १० मार्च २०२६ रोजी शासनाने काढलेल्या परिपत्रकानुसार हा कर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र या निर्णयापूर्वी झालेल्या बांधकामांवर आकारलेला कर रद्द केला जाणार का तसेच भविष्यात बांधकाम परवानगी देताना हा कर बांधकाम व्यावसायिकांकडून एकरकमी वसूल केला जाणार का, असे दोन प्रश्न त्यांनी उपस्थित केले.मंत्री बावनकुळे उत्तरात म्हणाले की, राज्य सरकारने वार्षिक अकृषिक कर पूर्णपणे रद्द केला आहे. त्यामुळे जुनी किंवा नवी अशी कोणतीही बांधकामे असोत, त्यांच्यावर आता एनए कर आकारला जाणार नाही. यापूर्वी आकारलेला कर तसेच थकबाकी देखील शासनाने माफ केली आहे. त्यामुळे राज्यातील गृहनिर्माण संस्था आणि फ्लॅटधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच रूपांतरण करासंदर्भात शासनाने सुलभ पद्धत लागू केली असल्याचेही सांगून, त्यानुसार २००१ पूर्वी झालेल्या बांधकामांसाठी २००१ च्या रेडी रेकनर दराच्या ०.१० टक्के इतका दर निश्चित करण्यात आला आहे. हा दर एक हजार चौरस मीटर क्षेत्रफळासाठी लागू राहील.याशिवाय मोठ्या क्षेत्रफळाच्या विकासासाठी एकरकमी रक्कम भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. चार हजार चौरस मीटरपर्यंतच्या क्षेत्रासाठी ०.२५ टक्के तर त्यापेक्षा जास्त म्हणजे एक एकराहून अधिक क्षेत्रासाठी ०.१५ टक्के इतका दर आकारून एकदाच रक्कम भरल्यास संबंधितांना पुढील करातून सूट मिळणार आहे.या नव्या प्रणालीमुळे नागरिकांना वारंवार महसूल कार्यालयात जावे लागणार नाही तसेच करप्रणाली अधिक सुलभ होणार असल्याचेही बावनकुळे यांनी सांगितले. या निर्णयामुळे गृहनिर्माण संस्थांवरील आर्थिक भार कमी होणार असून शहरी भागातील हजारो फ्लॅटधारकांना दिलासा मिळणार असल्याचे त्यांनी नमूद केले.दरम्यान, सरकारच्या या निर्णयामुळे शहरी भागातील गृहनिर्माण संस्थांसाठी अकृषिक कराच्या प्रश्नावर पूर्णविराम मिळाला असून नागरिकांना कर, दंड किंवा व्याजाचा कोणताही अतिरिक्त भार सहन करावा लागणार नसल्याचेही महसूल मंत्र्यांनी स्पष्ट केले.
ई-पीक पेरा नोंदणीसाठी ऑफलाइन फोटो अपलोडची सुविधा
मुंबई :राज्यातील ई-पीक पेरा नोंदणी प्रक्रियेत नेटवर्क किंवा सर्व्हरच्या अडचणीमुळे शेतकऱ्यांना येणाऱ्या समस्यांवर उपाय म्हणून ऑफलाइन फोटो नोंदणीची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी नेटवर्क नसतानाही आपल्या शेतातील पिकाचा फोटो काढून ठेवला तर नेटवर्क उपलब्ध झाल्यानंतर तो आपोआप प्रणालीवर अपलोड होईल, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत दिली.अर्थसंकल्पीय अधिवेशनातील प्रश्नोत्तराच्या तासात आमदार अनिल पाटील यांनी राज्यातील पीक पेरा नोंदणी प्रक्रियेत येणाऱ्या अडचणींबाबत प्रश्न उपस्थित केला.पाटील यांनी सांगितले की, २०२१ पासून ई-पीक पेरा प्रणाली मोठ्या प्रमाणावर सुरू झाली असून २०२५-२६ पासून ती कडक पद्धतीने अंमलात आणली जात आहे. मात्र ग्रामीण भागात अनेक ठिकाणी नेटवर्क नसणे, सर्व्हर डाऊन होणे, जीपीएस त्रुटी तसेच संबंधित अधिकाऱ्यांची अनुपलब्धता यामुळे शेतकऱ्यांना पीक पेरा नोंदणी करताना अडचणी येत आहेत. त्यामुळे नेटवर्क समस्यांवर उपाय, ऑफलाइन सुविधा, जनजागृतीसाठी विशेष शिबिरे आणि जिल्हा स्तरावर हेल्पडेस्क उभारण्याबाबत सरकार काय उपाययोजना करणार आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले की, ई-पीक पेरा नोंदणीसाठी आता डीसीएस (DCS) प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. या प्रणालीमुळे शेतकऱ्यांना नेटवर्क उपलब्ध नसतानाही शेतातील पिकाचा फोटो मोबाईलवर घेता येतो. नेटवर्क उपलब्ध झाल्यानंतर तो फोटो आपोआप प्रणालीवर अपलोड होतो. त्यामुळे नेटवर्क नसल्यामुळे नोंदणी थांबण्याची समस्या कमी होणार आहे.या प्रक्रियेत सुमारे ८० टक्के नोंदणी शेतकऱ्यांनी स्वतः करावी, असा शासनाचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. उर्वरित नोंदणी महसूल विभागाच्या माध्यमातून केली जाते. काही शेतकरी तांत्रिक अडचणींमुळे नोंदणी करू शकत नसल्यास तलाठी, महसूल सहाय्यक किंवा नियुक्त सहाय्यक यांच्या माध्यमातून पीक पेरा नोंदवला जातो. ई-पीक पेरा नोंदणीची प्रक्रिया साधारणपणे पेरणीनंतर पहिल्या ५५ दिवसांत शेतकऱ्यांनी स्वतः करायची असते. त्यानंतर उर्वरित नोंदणी महसूल विभागाच्या माध्यमातून पूर्ण केली जाते, असेही त्यांनी स्पष्ट केले. राज्यातील नोंदणीच्या प्रगतीबाबत माहिती देताना बावनकुळे म्हणाले की, काही जिल्ह्यांमध्ये चांगली प्रगती झाली आहे.ई-पीक पेरा प्रणाली ही केंद्र सरकारच्या प्रणालीवर आधारित असल्यामुळे त्यातील तांत्रिक बाबींमध्ये राज्य स्तरावर काही मर्यादा आहेत. तरीही शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे महसूल मंत्र्यांनी सांगितले.
पालघरमधील सूर्या धरणग्रस्तांना ४५ वर्षांनंतर मिळणार न्याय
मुंबई : पालघर जिल्ह्यातील सूर्या धरणामुळे विस्थापित झालेल्या चंद्रानगर आणि हनुमाननगर येथील आदिवासी बांधवांना तब्बल ४५ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर जमिनीचा मालकी हक्क मिळणार आहे. पुढील एका महिन्याच्या आत उर्वरित सर्व २०५ प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना सात-बारा उतारे आणि जमिनीचे नकाशे वाटप करण्यात येतील, अशी महत्त्वपूर्ण घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत केली. आमदार राजेंद्र गावित यांनी या संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.गावित यांनी सांगितले की, पालघर जिल्ह्यात १९७० ते १९८२ दरम्यान सूर्या धरण प्रकल्प पूर्ण झाला. या प्रकल्पासाठी एकूण ११ गावांचे विस्थापन झाले. त्यापैकी चंद्रानगर आणि हनुमाननगर या दोन गावांतील रहिवाशांचे पुनर्वसन करण्यात आले असले तरी गेल्या सुमारे ४५ वर्षांपासून अनेक शेतकऱ्यांना सातबारा उतारे, गाव नकाशा, चतुर्सीमा नकाशा किंवा संपादित जमिनींचा योग्य मोबदला मिळालेला नाही. तसेच सातबारा उतारे नसतानाही या परिसरातील जमिनी वाढवण बंदर प्रकल्पासाठी तसेच बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी संपादित करण्यात आल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. या पार्श्वभूमीवर प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना सातबारा उतारे कधी देण्यात येणार आणि त्यांच्या जमिनींचा मोबदला कधी मिळणार, असा सवाल त्यांनी केला.महसूल मंत्री बावनकुळे यांनी सांगितले की, या प्रकरणात एकूण ४६७ खातेदार आहेत. त्यापैकी २६२ खातेदारांना सातबारा उतारे आधीच देण्यात आले असून उर्वरित सुमारे २०० हून अधिक शेतकरी अद्याप बाकी आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या भागात जमिनींचे स्पष्ट सीमांकन झालेले नसल्यामुळे काही ठिकाणी क्षेत्रफळात बदल झाले आहेत. काही शेतकऱ्यांच्या जमिनी इतरांच्या क्षेत्रात गेल्या आहेत, तर काही ठिकाणी अतिक्रमणाच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे सर्व जमिनींचे पुन्हा सीमांकन करून अचूक नकाशे तयार करण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.हे काम पूर्ण करून उर्वरित शेतकऱ्यांना महिनाभराच्या आत सातबारा उतारे व संबंधित नकाशे देण्यात येतील. त्यानंतर ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी वाढवण बंदर आणि बुलेट ट्रेन प्रकल्पात संपादित झाल्या आहेत, त्यांना त्यांचा मोबदला देण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यात येईल, असेही मंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट केले. या प्रक्रियेमुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Vijay Thalapathy : “निवडणुका माझ्यासाठी भावनांचा महासागर…”–विजय थलापथी
विधानसभा निवडणुकांबाबत तामिळनाडूमध्ये राजकीय हालचाली तीव्र झाल्या आहेत. सर्व राजकीय पक्ष त्यांच्या तयारी करण्यात व्यस्त आहेत.
वर्ग-२ जमिनीच्या मालकांसाठी मोठी बातमी! राज्य सरकारने महत्वाची अट केली रद्द
मुंबई : राज्यातील वर्ग-२ जमिनीधारकांसाठी महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर राज्य मंत्रिमंडळाने मालकी हक्क रूपांतरातील पाच वर्षांची सक्ती हटवण्यास मंजुरी दिली. त्यामुळे आता संबंधित धारकांना जमीन मिळाल्यानंतर ठराविक कालावधी थांबण्याची आवश्यकता राहणार नाही.मालकी रूपांतराची प्रक्रिया होणार जलदवर्ग-२ प्रकारातील जमिनी या प्रामुख्याने शासनाकडून भाडेपट्टा, कब्जे हक्क किंवा अटींसह वितरित केल्या जातात. या जमिनींची सातबारा उताऱ्यावर स्वतंत्र नोंद असते. पूर्वी पूर्ण मालकी (वर्ग-१) मिळवण्यासाठी पाच वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्याशिवाय अर्ज स्वीकारला जात नव्हता.नव्या आदेशानुसार ही कालमर्यादा पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे. संबंधित जमीनधारक थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर करून आवश्यक शुल्क भरल्यानंतर मालकी हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करू शकणार आहेत.नजराणा भरण्याची अट मात्र कायमप्रतीक्षा अट हटवली असली तरी आर्थिक अटींमध्ये बदल झालेला नाही. जमीन रूपांतरासाठी सध्याच्या रेडी रेकनर मूल्यानुसार ठरावीक टक्केवारी शासनाकडे जमा करावी लागणार आहे. महसूल विभागाकडून स्पष्ट करण्यात आले की, प्रक्रिया सुलभ होईल; मात्र महसूल नियम शिथिल केलेले नाहीत.गृहनिर्माण, उद्योग आणि शेती क्षेत्राला फायदा१९६६ च्या दशकानंतर राज्यभर मोठ्या प्रमाणावर विविध उद्देशांसाठी वर्ग-२ जमिनी केल्या गेल्या जस की गृहनिर्माण संस्था, औद्योगिक प्रकल्प, व्यावसायिक संकुले आणि कृषी उपक्रम यासाठी जमिनी दिल्या, . महाराष्ट्र मधील पुणे शहरासह अनेक ठिकाणी अशा जमिनींची संख्या लक्षणीय आहे. नव्या निर्णयामुळे शेती प्रकल्प, औद्योगिक उपक्रम, व्यावसायिक संकुले आणि गृहनिर्माण सोसायट्यांना थेट फायदा होणार आहे.विशेषतः शहरी भागात प्रकल्प रखडण्यामागील प्रमुख अडथळा म्हणजे वर्ग-२ अटी होत्या. आता मालकी स्पष्ट झाल्याने पुनर्विकास, बँक कर्ज प्रक्रिया आणि गुंतवणूक निर्णय अधिक वेगाने होण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.अर्ज प्रक्रिया कशी राहील? संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज सादर करणे आवश्यक जमीन कागदपत्रे आणि मालकी तपशील जोडणे बंधनकारक निर्धारित नजराणा भरल्यानंतर आदेश निर्गमित मंजुरीनंतर सातबाऱ्यावर वर्ग-१ नोंद नोंदवली जाईलमहसूल अधिकाऱ्यांच्या मते, प्रशासकीय टप्पे कमी झाल्याने नागरिकांचा वेळ आणि खर्च दोन्ही वाचणार आहेत.व्यवहारात पारदर्शकता वाढण्याची अपेक्षाजमीन व्यवहारातील अनिश्चितता कमी करणे हा या निर्णयामागील उद्देश असल्याचे सूत्रांनी सांगितले. मालकी हक्क स्पष्ट झाल्यास बाजारमूल्य वाढ, गुंतवणूक प्रवाह आणि बांधकाम क्षेत्राला चालना मिळेलराज्य सरकारच्या या निर्णयामुळे हजारो जमीनधारकांना दिलासा मिळणार असून, महसूल विभागाकडून लवकरच अंमलबजावणीचे सविस्तर परिपत्रक जारी होण्याची शक्यता आहे.
'संजय राऊतांना उबाठा गटात काडीचीही किंमत राहिली नाही'
मुंबई : राज्यसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये कुरघोड्यांचे राजकारण शिगेला पोहोचल्याने मविआचे घोडे अडले आहे. मविआ मधील तिन्ही पक्ष आपापले घोडे दामटवण्याचा प्रयत्न करत आहेत. आदित्य ठाकरे यांचा शरद पवारांच्या उमेदवारीला विरोध असताना, धूर्त संजय राऊत शरद पवारांचे नाव सातत्याने पुढे करत आहेत. उबाठा गटाचे प्रवक्ते असूनही आपली खासदारकीची टर्म संपल्यानंतर खासदारकी शाबूत ठेवण्यासाठी उबाठा गटाच्या प्रियांका चतुर्वेदींना डावलून शरद पवारांचे नाव पुढे करण्याची धूर्त खेळी संजय राऊत खेळत आहेत अशी टीकेची झोड भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी बुधवारी उठवली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मात्र उबाठा गटाच्या उमेदवारीबद्दल राऊतांच्या शब्दांना काडीचीही किंमत नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला.यावेळी बन म्हणाले की, राऊत आणि उबाठा गट हे वारंवार माती खात असल्यानेच मतदारांनी विधानसभा, महापालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या अशा लागोपाठच्या निवडणुकांमध्ये त्यांना घरी बसवले आहे. परराष्ट्र धोरणासंदर्भात अज्ञानी राऊत हीन राजकारण करून राष्ट्रीय हित आणि देशाच्या प्रतिमेला धक्का पोहोचवत असून त्यांनी संवेदनशील अशा परराष्ट्रविषयक मुद्द्यांमध्ये नाक खुपसू नये असा इशारा श्री. बन यांनी दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी आणि ठाम नेतृत्वाखाली राष्ट्रीय हित, सामरिक संतुलन आणि जागतिक स्थैर्य या मुद्द्यांना प्राधान्य देत वेळोवेळी उभय देशांतील संवादाच्या बळावर आज भारत जागतिक स्तरावर स्वाभिमानाने उभा असल्याचेही त्यांनी नमूद केले.जागतिक स्तरावरील युद्धजन्य स्थितीला एपस्टीन फाईल्सशी जोडणे हे केवळ राऊतांचे कल्पनारंजन आहे. त्यांची कल्पकशक्ती सुमार दर्जाची असून बौद्धिक दिवाळखोरीचे त्यातून दर्शन घडते असा घणाघात बन यांनी केला.
Famous Actor Death : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता काळाच्या पडद्याआड; मनोरंजन विश्वात हळहळ
Famous Actor Death : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते आणि गोदरेज समूहाचे माजी संचालक विजय कृष्णा यांचे निधन झाले आहे.
आशिष शेलार यांनी केली ‘पीएम व्हिजन टू आर्ट’ स्पर्धेच्या विजेत्यांच्या नावाची घोषणा
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त गेल्या वर्षी संपूर्ण भारत देशात ‘पीएम व्हिजन टू आर्ट’ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून यात, ७५ विजेत्यांची निवड करण्यात आली आहे. बुधवारी (४ मार्च) राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी याबाबतची घोषणा केली.देशाच्या प्रगतीचा आणि दूरदृष्टीचा कलात्मक पद्धतीने सादरीकरण करुन ‘विकसित भारत’ या संकल्पनेला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभागाच्या महाराष्ट्र चित्रपट,रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने Vision to Art: The National Poster Design Contest” ही राष्ट्रीय पोस्टर डिझाइन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा २० सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत पार पडली. यासाठी ॲडव्हरटाईसिंग एजन्सीज असोसिएशन ऑफ इंडिया (AAAI) आणि Manifest या संस्थेचे विशेष सहकार्य मिळाले.राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या नेतृत्त्वाखाली तसेच सांस्कृतिक कार्य सचिव डॉ. किरण कुलकर्णी आणि महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.यास्पर्धेमध्ये स्वतंत्र डिझायनर, ब्रँडिंग व डिझाइन स्टुडिओ, जाहिरात व क्रिएटिव्ह एजन्सीज, तसेच डिझाइन व व्हिज्युअल कम्युनिकेशनचे विद्यार्थी अशा सर्वांना आपली कला सादर करण्याची संधी या स्पर्धेच्या माध्यमातून मिळाली. या स्पर्धेसाठी एकूण ९ विषय देण्यात आले होते. त्यात,आत्मनिर्भर भारत, डिजिटल इंडिया, बेटी बचाओ बेटी पढाओ, स्वच्छ भारत अभियान, योग, वेव्ह्ज समिट,मेक इन इंडिया, स्किल इंडिया आणि क्लायमेट चेंज (हवामान बदल) या विषयांचा समावेश होता.या स्पर्धेसाठी संपूर्ण भारतभरातून आणि विविध वयोगटांमधून सुमारे ३ हजाराहून नोंदी प्राप्त झाल्या. पद्मश्री पुरस्कारप्राप्त व्यक्तींंसह भारतातील नामवंत क्रिएटिव्ह दिग्गजांनी काटेकोर मूल्यमापन व परीक्षक प्रक्रियेत सहभाग घेतला आणि अंतिम ७५ विजेत्यांची निवड या स्पर्धेत करण्यात आली.या स्पर्धेचे परिक्षण पुढील परिक्षकांनी केले...१.अच्युत पालव - पद्मश्री पुरस्कार विजेते - भारतीय सुलेखनकार आणि शिक्षक२. वासुदेव कामथ - पद्मश्री पुरस्कार विजेते - आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशंसित भारतीय कलाकार३. सुधारक ओलवे - पद्मश्री पुरस्कार विजेते - मुंबईस्थित माहितीपट छायाचित्रकार४. प्रसून जोशी - पद्मश्री पुरस्कार विजेते - भारतीय कवी, लेखक, गीतकार आणि मॅककॅन वर्ल्ड ग्रुप इंडियाचे सीईओ५. रवी जाधव - भारतीय चित्रपट दिग्दर्शक, अभिनेता, पटकथा लेखक आणि निर्माता६. भरत दाभोलकर - भारतीय अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक७. गौरव दालमिया - दालमिया ग्रुप होल्डिंग्जचे अध्यक्ष८. श्रीनिवासन स्वामी - आर के स्वामी लिमिटेडचे कार्यकारी गट अध्यक्ष आणि जाहिरात एजन्सीज असोसिएशन ऑफ इंडिया (एएएआय) चे अध्यक्ष.विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे...SKILL INDIA :आस्था गुप्ता अखिलेश आहुजा आर्या पनवारमहेश बोलईकर राजेश गज्जर झिकोलनआत्मनिर्भर इंडिया :अभिषेक बिष्टअनिकेत दुबेजॉय देबनाथमिताली कापुरे सेजल.एच.शाह उमेश एस वृषिन यादवस्वच्छ भारत अभियान :अमन झाकमलेश वैशाली अनंत मुरुडकर खुशी तोमरमल्हार भरत सरवदे ओम अनिल धाडगे सोहनी सिंग वैष्णवी दीक्षितWAVES SUMMIT :हातिम अबीझर कमलेश वैशाली अनंत मुरुडकर लीना डिसूझा शिविका पांडेसुहानी गुप्तायोग :अजितेश शर्मानील नाडर रुजवी किरण संकपाल शाक्षी शारदा श्रुती गोलम विनय कुमार मौर्यहवामान बदल :अर्पिता बंडू मनवतकर अविशेक साहूदिशांत प्रशांत ढगे कुमार सत्यम सिन्हारोहित राजशुभम बिष्ट सिया सत्यवान मालेकर उमेश दत्ताराम निगडेबेटी बचाओ बेटी पढाओ :अभ्रक भट्टाचार्यआकाश कुमारआनंद सोनाजी गायकवाडआर्या गहाणेआर्या नागवेकरभाग्यश्री जोशीचेतन महिंद्र पांचाल विनोद मोहन बंजाराश्याम पतंगे लक्ष्मण बाबू ससेमारीसाईराज शिगवणसंजीव मेंढे पार्थ गुप्तायशप्रियासंजय कमिल्या ऋतुजा जंगमउमेश दत्ताराम निगडेमेक इन इंडिया :चॅटरबॉक्स कम्युनिकेशनवल्लभ येवलेकरशर्वरी शरद सावंतनमन दवेकृषा वखारियाइशिता पटनाईक ईश्वरी प्रवीण तारकरसाची शुक्लासंदीप कुमारसंयुक्ता शेखर पवारविराज विजय पटवेकरडिजिटल इंडिया :हर्ष जगतापकलीम अख्तरनिलेश परमात्मा यादवउत्कर्ष भदाडेकस्तुरी पटेलगोरख जे. घोलपश्रीरंग अमृता देवेंद्र साळुंखे
T20 World Cup 2026 : इंग्लंड विरुद्धच्या उपांत्य सामन्यापूर्वी खेळाडूंनी घेतला बाप्पाचा आशीर्वाद
मुंबई : टी२० विश्वचषक २०२६ च्या उपांत्य सामन्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघातील काही क्रिकेपटूंनी मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिराला भेट दिली. ५ मार्च रोजी वानखेडे स्टेडियमवर इंग्लंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी, ईशान किशन, अभिषेक शर्मा आणि अक्षर पटेल यांनी गणपती बाप्पाचे दर्शन घेतले आणि यशासाठी प्रार्थना केली.ईशान किशन, अभिषेक शर्मा आणि अक्षर पटेल यांनी पारंपारिक पूजा विधी केले. मंदिरात भाविकांच्या गर्दीत, क्रिकेपटूंनी गणपतीचे दर्शन घेतले आणि संघाच्या विजयासाठी प्रार्थना केली. हे तिघेही सध्या भारतीय संघातील महत्त्वाचे क्रिकेटपटू आहेत.या विश्वचषकात सलग तीन सामन्यात शून्यावर बाद झाल्यानंतर, अभिषेक शर्माने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १५ धावा केल्या, त्यानंतर झिम्बाब्वेविरुद्ध ५५ धावांची खेळी केली. त्यानंतर त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध १० धावा केल्या. नॉकआउट सामन्यांमध्ये या सलामीवीर फलंदाजाकडून चाहत्यांना खूप अपेक्षा आहेत.
Dhananjay Munde : अजित पवार यांच्या बारामती विमान दुर्घटनेबाबत रोहित पवारांनी सखोल चौकशीची मागणी केली आहे.
Shirur News : भिसीच्या नावाखाली अनेक पोलिसांनाच गंडा; लाखो रुपयांचा व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात
Shirur News
Pune News : रसिकलाल धारीवाल यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ९वे वार्षिक रक्तदान शिबिर संपन्न
Pune News :
Smriti Mandhana : कौतुकास्पद! स्मृती मानधना पुन्हा ठरली आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत अव्वल
आयसीसी क्रमवारीमध्ये भारतीय महिला संघाची उपकर्णधार स्मृती मानधना एकदिवसीय फलंदाजांमध्ये अव्वल स्थानावर विराजमान झाली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या नुकत्याच संपलेल्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील मानधनाच्या दमदार कामगिरीमुळे तिला आयसीसी रँकिंग मध्ये पुन्हा एकदा अव्वल स्थान मिळाले आहे.स्मृती मानधनाने दक्षिण आफ्रिकेच्या लॉरे वोल्वार्डला मागे टाकत ७९० गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे. तर वोल्वार्ड सध्या ७८२ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. आपल्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यात शतक झळकावणारी एलिसा हीली ७४४ गुणांसह चौथ्या स्थानावर राहिली. बेथ मुनी तिसऱ्या स्थानावर तर अॅशले गार्डनर (७२४) पाचव्या स्थानावर आहे. भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर नवव्या स्थानावर आणि जेमिमा रॉड्रिग्ज १२ व्या स्थानावर आहे.तर गोलंदाजीमध्ये अलिना किंग (७७५) ने अव्वल स्थान पटकावले आहे.गार्डनर (५१६) एकदिवसीय अष्टपैलू क्रिकेटपटूंच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे, दुसऱ्या स्थानावर असलेल्या वेस्ट इंडिजच्या हेली मॅथ्यूज (४१८) वर ९८ गुणांची आघाडी कायम ठेवली आहे. सदरलँड (५३४) २३ स्थानांनी झेप घेऊन ३४ व्या स्थानावर पोहोचली आहे. दीप्ती पाचव्या स्थानावर असून ती अष्टपैलू क्रिकेटपटूंच्या यादीत पहिल्या १० मध्ये आहे.
पश्चिम आशियातील संघर्षामुळे दीड हजारांपेक्षा जास्त उड्डाणे रद्द
नवी दिल्ली : पश्चिम आशियातील संघर्षामुळे दीड हजारांपेक्षा जास्त उड्डाणे रद्द झाली आहेत. देशाचे नागरी विमान वाहतूक मंत्रालय श्चिम आशियातील काही भागांमधील हवाई क्षेत्रातील बदलत्या स्थितीवर आणि आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांवर होणाऱ्या त्याच्या परिणामांवर सतत लक्ष ठेवून आहे. सध्याच्या परिस्थितीमुळे आजवर भारतीय विमान सेवांची १२२१ उड्डाणे आणि परदेशी विमान सेवांची ३८८ उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.भारतीय विमान कंपन्यांनी त्यांच्या वेळापत्रकात योग्य ते बदल केले आहेत. लांब पल्ल्याच्या आणि अति-लांब पल्ल्याच्या विमान वाहतूक सेवा आता प्रतिबंधित हवाई क्षेत्र टाळून पर्यायी मार्गांद्वारे टप्प्याटप्प्याने पुन्हा सुरू केल्या जात आहेत.अडकलेल्या प्रवाशांच्या प्रवासासाठी विशेष व्यवस्था केली जात आहे. विमान कंपन्या आवश्यकतेनुसार अतिरिक्त विमाने तैनात करत आहेत आणि प्रवाशांचा प्रवास सुरक्षित तसेच सुव्यवस्थित व्हावा यासाठी परदेशी विमान वाहतूक प्राधिकरणे आणि परदेशातील भारतीय दूतावासांशी जवळचा समन्वय राखला जात आहे. भारतीय विमानसेवा कंपन्यांद्वारे आज एकूण 24 उड्डाणे केली जात आहेत. याव्यतिरिक्त, गेल्या २४ तासांत एमिरेट्स आणि एतिहाद यांनी आखाती देशांतून ९ उड्डाणे केली आहेत.भारतीय विमानसेवा कंपन्यांनी ४ मार्च रोजी आणखी ५८ उड्डाणांचे नियोजन केले आहे. यामध्ये इंडिगोची ३० आणि एअर इंडिया तसेच एअर इंडिया एक्सप्रेसची २३ उड्डाणे समाविष्ट आहेत.भारत आणि आखाती प्रदेशात कार्यरत असलेल्या परदेशी विमान कंपन्या देखील कार्यान्वयन आणि हवाई क्षेत्राशी संबंधित बाबींचा विचार करून मर्यादित सेवा सुरू ठेवत आहेत.प्रवाशांची सुरक्षा ही सर्वोपरि आहे. सर्व विमान कंपन्यांना प्रवाशांशी पारदर्शक संवाद राखण्याचा आणि परतावा, पुनर्नियोजन आणि प्रवासी सहाय्य यासंदर्भातील नियामक नियमांचे काटेकोर पालन करण्याची सूचना देण्यात आली आहे.नागरी विमान वाहतूक मंत्रालय विमान कंपन्यांशी सतत संपर्कात आहे आणि या काळात तिकिटांच्या किमतींमध्ये कोणतीही अनावश्यक वाढ होणार नाही याची खात्री करण्यासाठी प्रवासी भाड्यासंदर्भात बारकाईने लक्ष ठेवून आहे.प्रवाशांना विमानतळावर जाण्यापूर्वी त्यांच्या संबंधित विमान कंपन्यांशी थेट अद्ययावत विमान स्थिती तपासण्याचा आणि अद्यतनांसाठी केवळ अधिकृत स्त्रोतांवर अवलंबून राहण्याच्या सूचना सल्ला देण्यात आल्या आहेत.सुरक्षित उड्डाण संचालन, सेवा पूर्ववत करणे आणि प्रभावित प्रवाशांना मदत करणे यासाठी मंत्रालय विमान कंपन्या, विमानतळ ऑपरेटर, नियामक प्राधिकरणे आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाशी सातत्याने समन्वय साधत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या दौऱ्यावर असलेल्या फिनलँडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांचे स्वागत केले. स्टब यांच्या भेटीमुळे भारत आणि फिनलँडमधील द्विपक्षीय संबंध आणखी मजबूत होतील असा विश्वास पंतप्रधान मोदींनी यावेळी व्यक्त केला.पंतप्रधान कार्यालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, फिनलँडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब आज सकाळी (बुधवार, ४ मार्च) नवी दिल्लीत पोहोचले. परराष्ट्र राज्यमंत्री के. व्ही. सिंह यांनी राष्ट्रपती स्टब यांचे विमानतळावर औपचारिक स्वागत केले आणि त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की भारत आणि फिनलँडमधील संबंध नवीन उंचीवर पोहोचतील.पंतप्रधान मोदींनी सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले की, भारतात आपले स्वागत आहे, राष्ट्रपती अलेक्झांडर स्टब. मी तुमच्याशी पूर्णपणे सहमत आहे की तुमची भेट भारत-फिनलँड संबंधांना नवीन उंचीवर घेऊन जाईल. आपल्या भेटीची आणि रायसीना संवाद २०२६ मधील तुमच्या मुख्य भाषणाची मी उत्सुकतेने वाट पाहत आहे. मोदींनी स्टब यांच्या पोस्टला उत्तर देताना ही टिप्पणी केली.Welcome to India, President Alexander Stubb. I fully agree with you, your visit will take India-Finland relations to new heights. I eagerly look forward to our meeting tomorrow and to your keynote address at the Raisina Dialogue 2026. @alexstubb https://t.co/pJs0N3J9Mr— Narendra Modi (@narendramodi) March 4, 2026तत्पूर्वी, अलेक्झांडर प्रेसिडेंट स्टब यांनी सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये लिहिले की, मी भारतीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच इतर महत्त्वाच्या नेत्यांना भेटेन. या भेटीमुळे व्यापारासह भारत-फिनलँड संबंध आणखी मजबूत होतील. रायसीना डायलॉग २०२६ मध्ये अध्यक्ष स्टब प्रमुख पाहुणे आणि प्रमुख वक्ते देखील असतील. द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यासाठी ते पंतप्रधान मोदींसोबत प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर देखील चर्चा करतील.
अखेर ठरलं..! मविआचा उमेदवार आज ठरणार, ‘या’५ नावांची जोरदार चर्चा
Rajya Sabha Election : मविआकडून शरद पवार, प्रियांका चतुर्वेदी यांच्यासह ५ नावांची चर्चा आहे. संजय राऊत यांनी आज संध्याकाळपर्यंत नाव जाहीर होईल असे सांगितले आहे.
US Space Force: इराणकडून अमेरिकेचे मोठे नुकसान ; कतारमधील बॅलिस्टिक क्षेपणास्त्र रडार झटक्यात उडवले
US Space Force: अमेरिकेविरुद्ध बदला घेण्यासाठी इराणने कतारमधील एका महत्त्वाच्या रडार सिस्टीमवर हल्ला केला. हा रडार म्हणजे यूएस स्पेस फोर्सचा AN/FPS-132 बॅलिस्टिक मिसाइल अर्ली वॉर्निंग रडार आहे.
Israel - Iran War : चर्चेसाठी खूप उशीर झाला; आता माघार नाही - डोनाल्ड ट्रम्प
इराणवर इस्रायल आणि अमेरिकेच्या संयुक्त हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा दावा केला आहे. मंगळवारी (३ मार्च) संध्याकाळी ‘ट्रुथ सोशल’वर पोस्ट करत ट्रम्प यांनी इराणची एअरफोर्स, नेव्ही आणि नेतृत्व व्यवस्था पूर्णपणे नष्ट झाल्याचा दावा केला.राष्ट्राध्यक्ष ट्रम्प म्हणाले की, इराणच्या अणु आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमावर देखरेख ठेवण्यासाठी कराराबाबत चर्चा करण्यासाठी आता खूप उशीर झाला आहे. एका ओपिनियन लेखावर प्रतिक्रिया देताना त्यांनी लिहिले, “त्यांची एअर डिफेन्स, एअरफोर्स, नेव्ही आणि नेतृत्व संपले आहे. आता ते चर्चा करू इच्छित आहेत. पण मी त्यांना सांगितले आता खूप उशीर झाला आहे!”अमेरिका आणि इस्रायल यांनी २८ फेब्रुवारीपासून इराणविरोधात सुरू केलेली लष्करी कारवाई अद्याप सुरूच आहे. या युद्धात आतापर्यंत शेकडो लोकांचा मृत्यू झाला असून, त्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई तसेच तेहरानमधील अनेक वरिष्ठ राजकीय आणि लष्करी नेत्यांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे.मंगळवारपासून अमेरिका आणि इस्रायलचे हल्ले सुरू असतानाही इराणकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे. इराणी क्षेपणास्त्रे आणि ड्रोननी शेजारील अरब देशांतील अमेरिकेच्या अनेक लष्करी ठिकाणांना लक्ष्य केले आहे.इराणी ड्रोनने सौदी अरेबियातील अमेरिकन दूतावासालाही लक्ष्य केले असून, या हल्ल्यात इमारतीचे मोठे नुकसान झाले आहे. यापूर्वी कुवैतमधील अमेरिकन मिशनवरही हल्ला झाला होता. इराणकडून शेजारील अरब देशांवर सतत क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हल्ले केले जात असल्याचे वृत्त आहे.दरम्यान, इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांच्या हालचालींवरही निर्बंध आणले आहेत. या सामुद्रधुनीतून जगातील सुमारे २० टक्के तेल आणि द्रवीकृत नैसर्गिक वायू (LNG) व्यापार होतो.इराणी रेड क्रिसेंट सोसायटीच्या माहितीनुसार, अमेरिका-इस्रायली हल्ल्यांमध्ये इराणमध्ये किमान ७८७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर इस्रायलमध्ये इराणी क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे ११ जण ठार झाले आहेत. इराणसमर्थित दहशतवादी संघटना हिज्बुल्लाहनेही इस्रायलवर हल्ले केले असून, त्याला दिलेल्या प्रत्युत्तरात लेबनॉनमध्ये ५२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
tamilnadu elections: तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी द्रमुक आणि काँग्रेसमधील युतीची औपचारिकता आज पूर्ण झाली.
Mojtaba Hosseini:
Toxic Release Date Postponed : चाहत्यांचा हिरमोड! यशच्या ‘टॅाक्सिक’ची रिलीजडेट पुढे ढकलली
Toxic Release Date Postponed : अभिनेता यश याच्या बहुचर्चित टॅाक्सिक चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे.
Jayant Patil : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासंदर्भात अनेक दावे-प्रतिदावे देखील करण्यात आले होते.
Shivneri ST Bus : एसटीच्या ‘शिवनेरी’ ची झेप आता मुंबई–पुण्याच्या पलीकडे!
— परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणामुंबई – पुणे महामार्गाची ‘राणी’ म्हणून ओळख मिळवलेल्या एसटीच्या अत्याधुनिक, आरामदायी आणि सुरक्षित ‘शिवनेरी’ बस सेवेची झेप आता राज्यभर घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लवकरच मुंबई–पुणे मार्गाच्या पलीकडे महाराष्ट्रातील प्रमुख शहरांदरम्यान शिवनेरी धावणार असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.सन २००२ मध्ये सुरू झालेल्या शिवनेरी सेवेने वक्तशीरपणा, उत्कृष्ट आसनव्यवस्था आणि सुरक्षित प्रवास या गुणवैशिष्ट्यांमुळे उच्च मध्यमवर्गीय प्रवाशांचा विश्वास जिंकला. इतर बससेवेपेक्षा तिकीटदर थोडे अधिक असतानाही सातत्याने मिळणाऱ्या उत्तम प्रतिसादामुळे ही सेवा सुरुवातीपासूनच नफ्यात आहे, असे मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले.२०० अत्याधुनिक व्होल्व्हो बसांची खरेदी :राज्यभर विस्तारासाठी २०० नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त व्होल्व्हो बसेस खरेदी करण्याची निविदा प्रक्रिया सुरू आहे. या बसेस एसटीच्या ताफ्यात दाखल होताच, मुंबई–पुणेप्रमाणेच इतर महत्त्वाच्या शहरांदरम्यानही शिवनेरी सेवा सुरू होईल.प्रस्तावित मार्गांमध्ये :नाशिक–पुणे, नाशिक–छत्रपती संभाजीनगर, नाशिक–जळगाव–धुळे, पुणे–कोल्हापूर, पुणे–सांगली, पुणे–सोलापूर, नागपूर–चंद्रपूर, नागपूर–अमरावती–अकोला अशा प्रमुख शहरांचा समावेश आहे. त्यामुळे राज्याच्या विविध भागांतील प्रवाशांना आलिशान, सुरक्षित आणि विश्वासार्ह प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे.ई-बस सेवेलाही उत्तम प्रतिसाद :सध्या दादर–स्वारगेट, दादर–शिवाजीनगर, बोरीवली–स्वारगेट, बोरीवली–शिवाजीनगर, ठाणे–स्वारगेट आणि ठाणे–शिवाजीनगर या मार्गांवर पर्यावरणपूरक ई-शिवनेरी बस सेवा सुरू असून प्रवाशांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.ज्येष्ठ व महिलांसाठी सवलती :महिला प्रवाशांना तसेच ६५ ते ७५ वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना तिकीटदरात ५० टक्के सवलत, तर ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना शिवनेरी प्रवास पूर्णपणे विनामूल्य आहे. त्यामुळे नव्या मार्गांवरही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळेल, असा विश्वास मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केला.३० ‘स्लिपर शिवनेरी’ची भर :नवीन २०० बसेसमध्ये ३० शयनयान (स्लिपर) बसेसचा समावेश असेल. सध्या ज्या मार्गांवर विना-वातानुकूलित शयनयान बससेवा आहे, त्या ठिकाणी ‘स्लिपर शिवनेरी’ सुरू करून प्रवासी सेवेला अधिक उन्नत रूप दिले जाणार आहे. आरामदायी बेड-कोच सुविधा, सुरक्षितता आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे दीर्घ पल्ल्याच्या प्रवासात प्रवाशांना नव्या अनुभवाची हमी मिळणार आहे.‘शिवनेरी’चा हा विस्तार म्हणजे केवळ बससेवेची वाढ नव्हे, तर महाराष्ट्राच्या प्रगत आणि गतिमान प्रवाससंस्कृतीची नवी दिशा आहे.असे प्रतिपादन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले आहे.
Rajya Sabha Elections: बिहारमध्ये होळी किंवा दिवाळी राजकीय वातावरण तापल्याशिवायसाजरी करता येत नाही. सध्या मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे पुत्र निशांत कुमार राजकारणात प्रवेश करून राज्यसभेवर पाठवण्याच्या जोरदार चर्चा सुरु आहे.
मुंबई : दक्षिण मुंबईतील सर्वात गजबजलेला भाग असलेल्या वरळी नाक्यावरील वाहतुकीचा ताण कायमचा कमी करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने (BMC) युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. वरळीतील दोन महत्त्वाच्या रस्त्यांना जोडणाऱ्या 'मिसिंग लिंक'वर पालिकेचा पूल विभाग आता दोन अत्याधुनिक पुलांची उभारणी करणार आहे. या नवीन पुलांमुळे वरळी नाक्यावर होणारी वाहनांची भीषण कोंडी फुटण्यास मोठी मदत होणार असून, या परिसरातील वाहतुकीचा भार जवळपास ५० टक्क्यांनी कमी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हे दोन्ही पूल अस्तित्वात आल्यानंतर वाहनधारकांना वरळी नाक्यावर न अडकता थेट इच्छित स्थळी पोहोचता येईल. सध्या या भागात सिग्नल आणि अरुंद रस्त्यांमुळे प्रवाशांचा मोठा वेळ वाया जातो, मात्र या पुलांच्या कामामुळे 'मिसिंग लिंक' पूर्ण होऊन कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. पालिकेच्या या निर्णयामुळे केवळ वरळीकरच नाही, तर दक्षिण मुंबईत ये-जा करणाऱ्या हजारो चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.https://prahaar.in/2026/03/04/apples-big-bang-in-india-the-most-powerful-macbook-pro-2026-launched-so-far-when-will-pre-orders-start/दोन प्रमुख मार्ग थेट जोडले जाणारसध्या लोअर परळ, प्रभादेवी आणि पेडर रोडला जोडणाऱ्या डॉ. ॲनी बेझंट मार्ग व ई मोजेस मार्ग या दोन रस्त्यांमध्ये थेट कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. हे दोन्ही रस्ते एकमेकांना समांतर असूनही, एका रस्त्यावरून दुसऱ्या रस्त्यावर जाण्यासाठी वाहनधारकांना वरळी नाक्यापर्यंत तब्बल २ किलोमीटरचा वळसा घालावा लागतो. यामुळे इंधन आणि वेळ दोन्ही वाया जात असल्याने पालिकेने आता यावर कायमस्वरूपी तोडगा काढला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या पूल विभागाने नेहरू विज्ञान केंद्र (Nehru Science Centre) येथील नाल्यावर एका नवीन पुलाची उभारणी करण्याचे नियोजन केले आहे. हा नवीन पूल थेट नेहरू तारांगणाजवळ (Nehru Planetarium) उतरणार आहे. या पुलामुळे डॉ. ॲनी बेझंट मार्ग आणि ई मोजेस मार्ग हे दोन्ही प्रमुख रस्ते एकमेकांना थेट जोडले जातील. परिणामी, वाहनचालकांना आता वरळी नाक्यावर जाण्याची गरज उरणार नाही, ज्यामुळे त्या भागातील वाहतुकीचा ताण निम्म्याने कमी होईल आणि कोस्टल रोडकडे जाणारा प्रवास अधिक सुखकर होईल.वरळीतील 'नाल्यावरील' पुलाचे काम अंतिम टप्प्यात; फेब्रुवारी २०२७ ची डेडलाईनअतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम फेब्रुवारी २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य पालिकेने ठेवले आहे. नोव्हेंबर २०२२ मध्ये सुरू झालेला हा प्रकल्प आता आपल्या निर्णायक टप्प्यात पोहोचला असून, तो पूर्ण झाल्यानंतर दक्षिण मुंबईकडे जाणाऱ्या हजारो वाहनचालकांचा प्रवासाचा वेळ किमान १५ मिनिटांनी वाचणार आहे. हा प्रकल्प तांत्रिकदृष्ट्या अत्यंत आव्हानात्मक मानला जात आहे, कारण हा संपूर्ण पूल एका विशाल नाल्यावर उभारला जात आहे. दलदलीचा भाग आणि पाण्याचा प्रवाह लक्षात घेता, पुलाचे पिलर्स आणि स्ट्रक्चर उभे करताना पालिकेच्या पूल विभागाला विशेष खबरदारी घ्यावी लागत आहे. मात्र, वरळी नाक्यावरील ट्रॅफिक जॅममधून सुटका करण्यासाठी हा पूल 'गेम चेंजर' ठरणार आहे. एकदा हा मार्ग वाहतुकीसाठी खुला झाला की, डॉ. ॲनी बेझंट मार्ग आणि ई मोजेस मार्ग यांच्यातील कनेक्टिव्हिटी सुधारून प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल.नेहरू केंद्र आणि तारांगण आता येणार एकमेकांच्या जवळमुंबईतील वरळी परिसरातील दोन प्रमुख पर्यटन स्थळे, नेहरू विज्ञान केंद्र आणि नेहरू तारांगण, एकमेकांपासून हाकेच्या अंतरावर असूनही सध्या पर्यटकांना आणि वाहनचालकांना तिथे पोहोचण्यासाठी मोठा वळसा घालावा लागतो. मात्र, महानगरपालिकेने हाती घेतलेल्या नवीन पुलामुळे हा फेरा आता कायमचा बंद होणार आहे. या पुलाच्या उभारणीमुळे ही दोन्ही महत्त्वाची स्थळे रस्तेमार्गे थेट जोडली जाणार असून, पर्यटकांचा वेळ आणि कष्ट दोन्ही वाचणार आहेत. या पुलाचा सर्वात मोठा फायदा मुंबईच्या महत्त्वाकांक्षी कोस्टल रोडला (सागरी किनारा मार्ग) होणार आहे. या नवीन लिंकमुळे कोस्टल रोडवरून येणाऱ्या आणि जाणाऱ्या वाहनांना वरळीतील अंतर्गत भागात शिरणे आणि बाहेर पडणे अधिक सुलभ होईल. पर्यायाने, दक्षिण मुंबईतील मुख्य रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण कमी होऊन सागरी किनारा मार्गाचा वापर करणाऱ्या प्रवाशांना हा एक उत्तम 'कनेक्टिंग पॉईंट' ठरणार आहे. यामुळे केवळ पर्यटनच नाही, तर दैनंदिन प्रवासाची गतीही वाढणार आहे.
मध्य-पूर्वेतील महायुद्ध सुरु होऊन ५ दिवस झाले असून याची झळ आता भारतालाही बसली आहे. या युद्धात भारताच्या २५ वर्षीय दीक्षितचा ड्रोनने बळी घेतला आहे. ओमानच्या किनारपट्टीवर मस्कतजवळ एका मालवाहू ऑईल टँकरवर झालेल्या ड्रोन हल्ल्यात मुंबईतील कांदिवली परिसरात राहणाऱ्या दीक्षित सोलंकी याचा मृत्यू झाला आहे.मूळचा दीवचा असलेला २५ वर्षीय दीक्षित सोलंकी काही काळापूर्वी व्यवसायानिमित्त मुंबईत स्थायिक झाला होता. तो मुंबईतील कांदिवली भागात वास्तव्यास होता. ओमानच्या मस्कत किनारपट्टीपासून ५२ नॉटिकल मैलांवर 'MKD Vyom' या ऑईल टँकरवर स्फोटकांनी भरलेल्या ड्रोन बोटीने धडक दिली. या भीषण स्फोटात टँकरच्या इंजिन रूमला आग लागली आणि त्यात दीक्षितचा जागीच मृत्यू झाला.दीक्षित हा दीवमधील मच्छीमार व्यावसायिक अमृतलाल सो25-year-oldलंकी यांचा धाकटा मुलगा होता. महिनाभरापूर्वीच आईच्या निधनानंतर तो गावी आला होता आणि पुन्हा कर्तव्यावर परतला होता, मात्र काळाने त्याच्यावर झडप घातली.भारतीय दूतावासाकडून दुःख व्यक्त :ओमानमधील भारतीय दूतावासाने दीक्षित सोलंकीच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. टँकरवरील इतर २५ क्रू मेंबर्सची (ज्यात १६ भारतीय होते) सुखरूप सुटका करण्यात आली आहे.
मुंबई : बहुचर्चित राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने बुधवारी उमेदवारांची घोषणा केली असून, नेहमीप्रमाणे यंदाही 'धक्कातंत्रा'चा अवलंब केला आहे. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले या दिग्गज नेत्यांसोबतच, भाजपने माया ईवनाते आणि रामराव वडकुते या दोन नव्या चेहऱ्यांना संधी देऊन सामाजिक समीकरणे साधण्याचा प्रयत्न केला आहे.भाजपने यंदा उमेदवारी देताना राज्यातील महत्त्वाच्या समाजघटकांना प्रतिनिधीत्व दिले आहे. नागपूरच्या माजी महापौर राहिलेल्या माया इवनाते या भाजपचा राज्यातील महत्त्वाचा आदिवासी चेहरा आहेत. त्या अनुसूचित जमाती राष्ट्रीय आयोगाच्या सदस्या होत्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख असून, त्यांच्या निवडीतून भाजपने विदर्भातील आदिवासी मतांचे समीकरण साधले आहे.धनगर समाजाचे प्रतिनिधित्व करणारे रामराव वडकुते यांनी अहिल्यादेवी होळकर शेळी-मेंढी विकास महामंडळाचे अध्यक्ष म्हणून दीर्घकाळ काम केले आहे. विधान परिषदेचा अनुभव गाठीशी असलेल्या वडकुते यांच्या रूपाने भाजपने पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील धनगर समाजाला साद घातली आहे.आगामी राज्यसभा निवडणुकीकरिता भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या वतीने महाराष्ट्रातून भाजपा राष्ट्रीय महासचिव विनोदजी तावडे यांच्यासह अन्य नावांची घोषणा केली आहे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले, मायाताई चिंतामण इवनाते आणि रामरावजी वडकुते यांच्या… pic.twitter.com/d2ppvayBSD— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) March 4, 2026विनोद तावडे पुन्हा संसदीय राजकारणात:पक्षाच्या राष्ट्रीय राजकारणात महत्त्वाची भूमिका निभावणारे विनोद तावडे यांना अपेक्षेप्रमाणे राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय झाला आहे. तर, मित्रपक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) प्रमुख रामदास आठवले यांच्यावर भाजपने पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. राज्यातील विधानसभेच्या सध्याच्या संख्याबळानुसार, राज्यसभेच्या सात जागांपैकी भाजपचे चार उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. उर्वरित जागांवर शिवसेनेच्या वतीने माजी खासदार राहुल शेवाळे यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून पार्थ पवार गुरुवारी अर्ज दाखल करतील.महाविकास आघाडीची कोंडी?दुसरीकडे, महाविकास आघाडीकडे असलेल्या संख्याबळानुसार त्यांची केवळ एक जागा निवडून येऊ शकते. मात्र, या जागेवर शरद पवार गट, काँग्रेस की उबाठा गट आपला उमेदवार देणार, याबाबत अद्याप एकमत झालेले नाही. दरम्यान, भाजपने आपल्या उमेदवारांच्या माध्यमातून मराठा, दलित, आदिवासी आणि धनगर अशा सर्वच समाजघटकांना सामावून घेण्याचा प्रयत्न केल्याने, ही निवडणूक केवळ औपचारिकता उरते की काही वेगळे वळण घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
Rajya Sabha Election 2026 : भाजपकडून राज्यसभेसाठी दोन नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.
Adulterated Mawa सणाच्या दिवसांत मिठाईची मागणी वाढते. या संधीचा गैरफायदा घेत काही विक्रेते कृत्रिम दूध, धुण्याची पावडर, यूरिया व इतर घातक रसायनांचा वापर करून बनावट मावा तयार करतात. हा मावा दिसायला आकर्षक असला तरी तो आरोग्यास अत्यंत घातक ठरतो.
Rohit Pawar Press Conference : AAIB कडून अजित पवार यांच्या विमानाचा प्राथमिक अहवाल प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत विविध प्रश्न उपस्थित केले आहेत.
BJP Maharashtra Rajya Sabha Election Candidate : 10 राज्यांमधील 37 राज्यसभेच्या जागांसाठी 16 मार्च रोजी निवडणुका होणार आहेत.
US Israel Conflict: अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांनंतर, पाकिस्तानची चिंता वाढली आहे, कारण त्याची इराणशी ९०० किलोमीटरपेक्षा जास्त सीमा आहे.
PM Modi : युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींची ओमान, कतारच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा
अमेरिका आणि इस्रायलने इराणवर संयुक्त लष्करी कारवाई केल्यानंतर पश्चिम आशिया प्रदेशातील परिस्थिती झपाट्याने बदलत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (३ मार्च) दुपारी खाडी प्रदेशातील प्रमुख नेत्यांशी दूरध्वनीवरून चर्चा केली.पंतप्रधानांनी ओमानचे सुलतान हैथम बिन तारिक तसेच कुवैतचे क्राउन प्रिन्स शेख सबाह अल-खालिद अल-अहमद अल-मुबारक अल-सबाह यांच्याशी स्वतंत्रपणे दूरध्वनीवर संवाद साधला. या चर्चेदरम्यान त्यांनी संबंधित देशांमध्ये सुरू असलेल्या हल्ल्यांबाबत चिंता व्यक्त केली. तसेच त्या देशांमध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरही चर्चा करण्यात आली.Spoke with my brother, H.H. Sheikh Tamim bin Hamad Al Thani, the Amir of Qatar. We stand firmly in solidarity with Qatar and strongly condemn any violation of its sovereignty and territorial integrity. We emphasized the urgent need to restore peace and stability in the region…— Narendra Modi (@narendramodi) March 3, 2026पंतप्रधान मोदी यांनी कतारचे अमीर शेख तमीम बिन हमाद अल-थानी यांच्याशीही दूरध्वनीवर संवाद साधला. कतारवरील हल्ल्यांचा त्यांनी निषेध केला आणि तेथील भारतीय समुदायाला दिलेल्या सहकार्य व काळजीबद्दल अमीर यांचे आभार मानले. गेल्या ४८ तासांत पंतप्रधान मोदी यांनी संयुक्त अरब अमिरात (यूएई), इस्रायल, सौदी अरेबिया, जॉर्डन, बहरीन, ओमान, कुवैत आणि कतार या देशांच्या नेत्यांशी दूरध्वनीवर चर्चा केली आहे.यापूर्वी सोमवारी पंतप्रधान मोदी यांनी जॉर्डनचे राजा किंग अब्दुल्ला दुसरे यांच्याशीही दूरध्वनीवर संवाद साधला होता. प्रदेशातील वाढत्या तणावाच्या परिस्थितीवर या चर्चेत सविस्तर चर्चा झाली. चर्चेनंतर पंतप्रधानांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत म्हटले की, “मी जॉर्डनचे राजा किंग अब्दुल्ला दुसरे यांच्याशी संवाद साधला. प्रदेशातील झपाट्याने बदलणाऱ्या परिस्थितीबाबत मी गंभीर चिंता व्यक्त केली. शांतता, सुरक्षा आणि जॉर्डनच्या जनतेच्या कल्याणासाठी भारताचा पाठिंबा पुन्हा अधोरेखित केला. या कठीण काळात जॉर्डनमधील भारतीय समुदायाची काळजी घेतल्याबद्दल त्यांचे आभार मानले.”Had a productive telephone conversation with Crown Prince of Kuwait, H.H. Sheikh Sabah Al-Khaled Al-Hamad Al-Mubarak Al-Sabah. India condemns violation of Kuwait's sovereignty and territorial integrity and stands with its people in this difficult hour.We underscored the…— Narendra Modi (@narendramodi) March 3, 2026सोमवारीच (२ मार्च) पंतप्रधान मोदी यांनी बहरीनचे राजा आणि सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स यांच्याशीही दूरध्वनीवर चर्चा केली. माध्यमांच्या वृत्तानुसार, या संभाषणात इराण-इस्रायल संघर्षासह विविध प्रादेशिक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.
मुंबई : टेक विश्वातील दिग्गज कंपनी अॅपलने (Apple) भारतीय बाजारपेठेत आपले सर्वात शक्तिशाली लॅपटॉप MacBook Pro (2026) अधिकृतपणे लाँच केले आहेत. कंपनीच्या या फ्लॅगशिप लाइनअपमधील हे लेटेस्ट मॉडेल असून, ते आतापर्यंतचे सर्वात 'पॉवरफुल' मॅकबुक असल्याचा दावा केला जात आहे. हे नवीन लॅपटॉप दोन आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध असून, या आठवड्याच्या शेवटी ग्राहकांसाठी त्याची 'प्री-ऑर्डर' प्रक्रिया सुरू होणार आहे. या लॅपटॉपचे मुख्य आकर्षण म्हणजे यामध्ये अॅपलचे अत्यंत प्रगत M५ प्रो (M5 Pro) आणि M५ मॅक्स (M5 Max) हे नवीन प्रोसेसर देण्यात आले आहेत. वेगवान कामगिरी आणि जड सॉफ्टवेअर सहज चालवण्यासाठी यामध्ये ६४GB पर्यंत रॅमची (RAM) सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ग्राफिक्स डिझाइनिंग, व्हिडिओ एडिटिंग आणि कोडिंग करणाऱ्या प्रोफेशनल्ससाठी हे नवे मॅकबुक प्रो एक गेम-चेंजर ठरणार आहे.https://prahaar.in/2026/03/04/bjp-candidates-for-ward-committee-decided-names-announced/भारतात नवीन MacBook Pro (2026) च्या किमती जाहीरअॅपल प्रेमींसाठी एक मोठी बातमी समोर आली असून, कंपनीने आपल्या सर्वात प्रगत MacBook Pro (2026) ची भारतीय बाजारपेठेतील किंमत जाहीर केली आहे. ग्राहकांना १४-इंच आणि १६-इंच अशा दोन डिस्प्ले पर्यायांमध्ये हे लॅपटॉप खरेदी करता येतील. यामध्ये १४-इंच स्क्रीन असलेल्या M5 Pro (24GB RAM, 1TB स्टोरेज) मॉडेलची सुरुवातीची किंमत २,४९,९०० रुपये ठेवण्यात आली आहे. जर तुम्हाला अधिक ताकदवान M5 Max चिप असलेले व्हेरिअंट हवे असेल, तर त्याची किंमत ३,९९,९०० रुपयांपासून सुरू होते. विशेष म्हणजे, रॅम, स्टोरेज आणि CPU/GPU च्या अपडेट्सनुसार या किमतींमध्ये ४० हजार ते १ लाखांपर्यंत वाढ होऊ शकते. मोठ्या स्क्रीनची आवड असलेल्या लोकांसाठी १६-इंच मॅकबुक प्रो उपलब्ध असून, त्यातील M5 Pro चिप असलेल्या मॉडेलची किंमत २,९९,९०० रुपये आहे. तर, या लाइनअपमधील सर्वात प्रीमियम M5 Max प्रोसेसर असलेल्या १६-इंच मॉडेलची किंमत चक्क ४,२९,९०० रुपये निश्चित करण्यात आली आहे. जर ग्राहकांनी ४TB स्टोरेज आणि ६४GB रॅम सारखे टॉप-एंड फीचर्स निवडले, तर या लॅपटॉपची किंमत अधिक वाढणार आहे. हे नवीन लॅपटॉप सिल्व्हर आणि स्पेस ब्लॅक या दोन आकर्षक रंगांमध्ये लाँच करण्यात आले आहेत. भारतातील ग्राहकांसाठी ही प्री-ऑर्डर प्रक्रिया ४ मार्चपासून अॅपल इंडियाच्या अधिकृत ऑनलाइन स्टोअरवर सुरू झाली आहे. ज्यांना हे सुपरफास्ट लॅपटॉप खरेदी करायचे आहेत, ते आता आपले बुकिंग करू शकतात. वाढीव ग्राफिक परफॉर्मन्स आणि अवाढव्य बॅटरी बॅकअपमुळे हे मॉडेल टेक विश्वात चर्चेचा विषय ठरत आहेत.MacBook Pro (2026) मध्ये १६०० निट्स ब्राइटनेस आणि २४ तासांचा बॅटरी बॅकअपअॅपलने लाँच केलेल्या MacBook Pro (2026) मध्ये स्क्रीनपासून ते प्रोसेसरपर्यंत सर्वच बाबतीत मोठी प्रगती पाहायला मिळत आहे. या लॅपटॉपमध्ये १६.२ इंचाचा भव्य लिक्विड रेटिना XDR डिस्प्ले देण्यात आला आहे, जो १,६०० निट्सच्या पीक ब्राइटनेससह येतो. विशेष म्हणजे, यामध्ये १२०Hz रिफ्रेश रेट आणि 'नॅनो-टेक्सचर' स्क्रीनचा पर्याय असल्याने वापरकर्त्यांना एक वेगळाच व्हिज्युअल अनुभव मिळणार आहे. व्हिडीओ कॉलिंगसाठी यामध्ये १२-मेगापिक्सेलचा प्रगत वेबकॅम असून, तो 'सेंटर स्टेज' आणि 'डेस्क व्ह्यू'ला सपोर्ट करतो, ज्यामुळे प्रोफेशनल कामांसाठी हा लॅपटॉप अधिक उपयुक्त ठरतो. या डिव्हाइसच्या अंतर्गत ताकदीबद्दल बोलायचे झाले तर, यामध्ये अॅपलच्या M5 प्रो आणि M5 मॅक्स चिप्सचा वापर करण्यात आला आहे. M5 प्रो मॉडेलमध्ये १८-कोर CPU आणि २०-कोर GPU आहे, तर M5 मॅक्समध्ये ४०-कोर पर्यंतचा शक्तिशाली GPU देण्यात आला आहे. भारी ग्राफिक टास्क आणि AI कामांसाठी यात १६-कोरचे न्यूरल इंजिन आणि हार्डवेअर-एक्सेलरेटेड रे ट्रेसिंगची सुविधा आहे. वापरकर्ते त्यांच्या गरजेनुसार यात १२८GB पर्यंत रॅम आणि ८TB पर्यंत अवाढव्य स्टोरेज (SSD) वाढवू शकतात. कनेक्टिव्हिटीसाठी यात वाय-फाय ७, ब्लूटूथ ६ आणि अॅपलची विशेष N1 नेटवर्किंग चिप देण्यात आली आहे. बॅटरीच्या बाबतीत अॅपलने मोठा दावा केला आहे. या मॅकबुकमध्ये १००Wh ची बॅटरी असून ती सलग २४ तास व्हिडिओ प्लेबॅक देऊ शकते. १४०W फास्ट चार्जिंगच्या मदतीने हा लॅपटॉप अत्यंत वेगाने चार्ज होतो. याशिवाय, प्रोफेशनल युजर्ससाठी SDXC कार्ड स्लॉट, HDMI पोर्ट आणि दोन थंडरबोल्ट ५ पोर्ट्स देण्यात आले आहेत. सुरक्षिततेसाठी टच आयडी (Touch ID) आणि टाईपिंगसाठी बॅकलिट मॅजिक कीबोर्ड यांसारखी प्रीमिअम फीचर्स या लॅपटॉपला परिपूर्ण बनवतात.
Janhvi Kapoor: “…मी माझ्या भावासोबत घडताना पाहिलं”; अर्जुन कपूरच्या ट्रोलिंगवर जान्हवीची प्रतिक्रिया
Janhvi Kapoor: बॉलीवूड कलाकरांना अनेकदा सोशल मीडियावर ट्रोल केले जाते. यात अभिनेता अर्जुन कपूरचा देखील समावेश आहे. अर्जुन अनेकदा त्याच्या फ्लॉप करिअरमुळे आणि खासगी आयुष्यामुळे ट्रोल केलं जातं. यावर अर्जुन कपूरची सावत्र बहीण जान्हवी कपूरने प्रतिक्रिया दिली आहे. एका मुलाखतीदरम्यान जान्हवी म्हणाली, “मी जितकं सोशल मीडिया कल्चरला समजून घेतलं, त्यानुसार मला असं वाटतं की प्रत्येकाला […]

33 C