Pune Metro Fraud : नागार्जुन कन्स्ट्रक्शन'चे बनावट कंत्राट दाखवून जैन दांपत्याला जाळ्यात ओढले; मेट्रोला साहित्य पुरवठ्याचा केला होता बनाव.
Ujani Dam Bridge : चांडगाव (इंदापूर) ते पोमलवाडी (करमाळा) थेट जोडले जाणार; वेळ आणि इंधनाची मोठी बचत करणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प.
Haveli News : हवेलीतील ‘कचरा’कोंडी फुटणार? ९ मार्च रोजी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक
Haveli News : २७ फेब्रुवारीच्या भीषण आगीनंतर निर्माण झालेली स्फोटक स्थिती; पीएमआरडीए (PMRDA), प्रदूषण मंडळ आणि जिल्हा परिषदेचे अधिकारी घेणार सहभाग.
Loni Kalbhor Accident : पुणे-सोलापूर हायवेवर भीषण अपघात! भरधाव पिकअप उलटली; दोन होमगार्ड जखमी
Loni Kalbhor Accident : सोलापूरहून पुण्याकडे जाणाऱ्या पिकअपवरील ताबा सुटल्याने एमआयटी कॉर्नर येथे अपघात; ड्युटीवर असलेले दोन होमगार्ड जखमी झाले आहेत.
Loni Kalbhor News : पुणे-सोलापूर महामार्गावर ओढ्याशेजारी कचरा जाळण्याचे प्रकार वाढले; खाजगी जागा आणि गायरानात कचरा टाकल्याने ग्रामस्थांचा संताप.
PCMC News : रावेतकडून दापोडीपर्यंत नद्यांच्या प्रदूषणाची नोंद होणार; दूषित पाणीपुरवठ्याच्या वाढत्या तक्रारींमुळे प्रशासनाचे मोठे पाऊल.
Maharashtra Budget 2026 : स्टार्टअप योजनांचा लाभ फक्त जुन्या उद्योजकांनाच; नव्या तरुणांना तारणाशिवाय कर्ज मिळेना, अर्थसंकल्पावर चेंबर ऑफ इंडस्ट्रिजचे ताशेरे.
Share Market Fraud : कोल्हापूर, पुणे, मुंबई आणि राजस्थानमध्ये पोलिसांच्या धाडी; १ कोटी ८० लाख रुपयांची रोकड बँक खात्यातच गोठवली.
Maval News : एका मताने खेळ पलटला! मावळ खरेदी-विक्री संघात राष्ट्रवादीतच जुंपली; कुणाचे नशीब चमकले?
Maval News : मावळ खरेदी-विक्री संघात सत्तेसाठी काटाजोड लढत; अवघ्या एका मताच्या फरकाने सभापती पदाचा निकाल, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
Gudi Padwa 2026 : लाल, हिरव्या आणि केशरी रंगांच्या जरीच्या वस्त्रांसह पितळी कलशांनी सजलेली 'मिनी गुढी'; यंदा घरोघरी दिसणार नवा लुक.
Pimpri Chinchwad News : समुद्री मार्गाने होणारी आयात-निर्यात धोक्यात आल्याने पिंपरी-चिंचवडमधील इंजिनिअरिंग आणि ऑटोमोबाईल क्षेत्राला युद्धाची झळ बसत आहे.
Rajur Bandh : मागील १० महिन्यांपासून आठ-आठ दिवस पाणी नसल्याने राजूरकर संतप्त; भंडारदरा धरणातून कायमस्वरूपी पाईपलाईन योजनेसाठी भव्य रास्ता रोको आंदोलन.
Census 2027 : सातारा जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात ५,५०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती; फेब्रुवारी २०२७ मध्ये पूर्ण होणार प्रत्यक्ष लोकसंख्या मोजणीचा दुसरा टप्पा.
Kalamma Devi Yatra : चांदोली राष्ट्रीय उद्यानातील उदगिरी गावात मानव आणि वन्यजीव सहअस्तित्वाचे दर्शन; 'बाजी' नावाच्या नर वाघाचा मंदिर परिसरात वावर.
Satara News : महाराणी ताराबाई समाधी परिसर आणि अजिंक्यतारा किल्ल्याच्या संवर्धनासाठी राज्य शासनाकडून ३५८ कोटींच्या विकास आराखड्याला मंजुरी.
Amit Shah : “३१ मार्चपर्यंत देश नक्षलवादमुक्त होणार,”अमित शहांचा मुंडलीतून नक्षलवाद्यांना थेट इशारा
Amit Shah :
IND vs NZ Final : या ऐतिहासिक सामन्यासाठी आयसीसीने अंपायर्स आणि मॅच रेफरी यांची घोषणा केली आहे.
Gold-Silver Rates: युद्ध सुरू असतानाही सोने-चांदीच्या दरात घसरण; पाहा आजचे ताजे भाव
Gold-Silver Rates: दिल्ली सराफात सोन्याचा दर 1,100 रुपयांनी कमी होऊन 1 लाख 64 हजार 100 रुपये प्रति दहा ग्रॅम या पातळीवर गेला. चांदीचा दरही शुक्रवारी 600 रुपयांनी कमी होऊन 2 लाख 71 हजार 700 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला.
Russian oil : युद्धाअगोदर रशियाचे बरेच तेल विविध देशाकडे जात होते. मात्र युद्धामुळे या जहाजांच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत रशियाची बरीच जहाजे भारताजवळ आहेत.
Plane Crash : पुन्हा विमानाचा भीषण अपघात; थेट जंगलात कोसळलं, दोन वैमानिक शहीद
Plane Crash :
IND vs NZ Semifinal : कोणत्याही क्रीडा प्रकारासाठी 'पीक कॉनकरन्सी'चा (एकाच वेळी पाहणारे प्रेक्षक) हा आतापर्यंतचा सर्वात मोठा जागतिक विक्रम आहे.
Balen Shah Nepal's next PM: १५० मतदारसंघांतील मतमोजणी सुरू असताना RSP ने दोन जागी विजय मिळवला असून आणखी १०६ जागांवर आघाडी घेतली आहे.
Maharashtra Politics : राज्यसभेची उमेदवारी डावलल्यामुळे शिवसेना नेते आनंदराव अडसूळ आक्रमक झाले आहेत.
Mumbai-Pune expressway: मुंबई ते बेंगळुरू प्रवास अवघ्या पाच तासांत करणे शक्य करणाऱ्या नव्या एक्सप्रेसवेचे काम लवकरच सुरू होणार आहे. केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यात महामार्ग प्रकल्पांचा आढावा घेतल्यानंतर ही माहिती दिली.
Aditya Thackeray : “शरद पवारांबद्दल आदरच, पण…,”नाराजीच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
Aditya Thackeray
Lionel Messi : या भाषणादरम्यान त्यांनी मेस्सीची तुलना फुटबॉल सम्राट पेले यांच्याशी केली, तर मेस्सीच्या उपस्थितीतच त्याचा कट्टर प्रतिस्पर्धी ख्रिस्तियानो रोनाल्डोचाही उल्लेख 'ग्रेट' म्हणून केला.
राज्य सरकारला मोठा धक्का! तीन आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या रद्द
IAS Transfer News : केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाने (CAT) केरळमधील तीन आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश रद्द केले आहेत.
IND vs NZ : जर पावसाचा किंवा इतर कोणत्या कारणाने या महामुकाबल्यात व्यत्यय आला, तर नेमके काय होईल? चषकावर कोणाचं नाव कोरलं जाणार? जाणून घ्या
Ban social media use by children: कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राज्य विधानसभेत अर्थसंकल्प सादर करताना १६ वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया वापरण्यास बंदी घालण्याची घोषणा केली. तर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी १३ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंदी ९० दिवसांत लागू करण्याचे जाहीर केले.
Mumbai ATS : महाराष्ट्र एटीएसने मुंबईत शोधमोहीम राबवून अयान शेख या विद्यार्थ्याला अटक केली आहे.
Rahul Gandhi : “राजकारण आणि आंतरराष्ट्रीय संबंध यांची वाटचाल अंधकाराकडे”–राहुल गांधी
दुसऱ्याची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न कोणीही करत नाही; केवळ बॉम्बफेक करणे आणि जीव घेणे एवढेच सध्या सुरू आहे.
Pune Metro: पुणे मेट्रोच्या प्रत्येक गाडीत तीन डबे असून तिन्ही डब्यांमध्ये ही आसन व्यवस्था लागू करण्यात आली आहे. त्यामुळे विशेषतः महिला आणि ज्येष्ठ प्रवाशांची सोय होणार आहे.
Sunil Gavaskar disappointment : सामन्यादरम्यान मैदानावरील 'डीजे' (DJ) आणि प्रेक्षकांच्या वर्तनावरून महान फलंदाज सुनील गावसकर यांनी कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत.
RTE admissions: न्यायमूर्ती राज वाकोडे आणि न्यायमूर्ती अनिल किलोर यांच्या खंडपीठाने ५ मार्च रोजी दिलेल्या आदेशात नोंदवले की याचिकाकर्ते अनुसूचित जमातीचे सदस्य असून त्यांनी आपल्या मुलाच्या RTE च्या २५ टक्के कोट्यांतर्गत प्रवेशासाठी अर्ज करण्याचा प्रयत्न केला. मात्र घरापासून १ किलोमीटरच्या आत कोणतीही शाळा उपलब्ध नसल्याने ते अर्जच करू शकले नाहीत. या प्रकरणावर पुढील सुनावणी ९ मार्च रोजी होणार आहे.
Maharashtra Budget 2026 : राज्य सरकारने शिक्षणासाठी १० नवीन एज्युसिटी, स्टार्टअप्ससाठी महाफंड आणि परदेशी नोकरीसाठी 'महिमा' संस्थेची घोषणा केली आहे.
Maharashtra Budget: महाराष्ट्र अर्थसंकल्प 2026-27; सर्वसामान्यांसाठी 10 महत्त्वाचे निर्णय
Maharashtra Budget: मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीची मोठी घोषणा केली. फडणवीस यांनी सादर केलेला अर्थसंकल्प एकूण चार स्तंभांवर आधारित आहे. त्यात प्रगतीशील, शाश्वत, सर्वसमावेशक आणि सुशासनावर भर दिला आहे. सर्वसामान्यांसाठी 10 महत्त्वाचे निर्णय वाचा...
Maha Budget 2026 : राज्याचा ४० हजार ५५२ कोटींच्या तुटीचा अर्थसंकल्प
राजकोषीय तूट १ लाख ५० हजार ४९१ कोटींवर; महसूल वाढीचा वेग कायम असल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावामुंबई : यशवंतराव चव्हाण आणि वसंतराव नाईक यांच्यानंतर मुख्यमंत्री म्हणून अर्थसंकल्प सादर करणारे देवेंद्र फडणवीस हे राज्याचे तिसरे मुख्यमंत्री ठरले. शुक्रवारी त्यांनी राज्याचा सन २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. त्यात ४० हजार ५५२ कोटी रुपयांची महसुली तूट अंदाजित करण्यात आली आहे. एकीकडे 'विकसित महाराष्ट्र २०४७' चे स्वप्न साकार करण्यासाठी पायाभूत सुविधा आणि कल्याणकारी योजनांवर भर दिला जात असताना, राजकोषीय तूट १ लाख ५० हजार ४९१ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. मात्र, ही तूट मर्यादेत राखण्यात सरकारला यश आल्याचा दावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला आहे.देशाच्या एकूण वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) संकलनात महाराष्ट्र आजही अग्रस्थानी आहे. राज्याचा महसूल वाढीचा दर देशाच्या सरासरीपेक्षा अधिक असून, कर दरांच्या पुनर्रचनेमुळे उत्पादन आणि उपभोग या दोन्ही क्षेत्रांत सकारात्मक वाढ दिसून आली आहे. सन २०२५-२६ मध्ये महसुली जमेचा सुधारित अंदाज ६ लाख १ हजार ४८९ कोटी रुपये निश्चित करण्यात आला आहे, असे फडणवीस म्हणाले.राज्याच्या एकूण खर्चातही मोठी वाढ झाली आहे. सन २०२५-२६ चा एकूण खर्च ७ लाख ५५ हजार ९२० कोटी रुपयांवर गेला असून, भांडवली आणि कल्याणकारी योजनांवरील खर्च वाढल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. आगामी वर्षासाठी (२०२६-२७) ७ लाख ६९ हजार ४६७ कोटी रुपयांच्या खर्चाची तरतूद करण्यात आली आहे.अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे जिल्हा वार्षिक योजना : २१ हजार ८६७ कोटी रुपयांची तरतूद (गेल्या वर्षीच्या तुलनेत १,७०२ कोटींची वाढ). कार्यक्रम खर्च : २ लाख ७५ हजार ६२६ कोटी रुपये. अनुसूचित जाती घटक कार्यक्रम : २३ हजार १५० कोटी रुपये. आदिवासी घटक कार्यक्रम : २१ हजार ७२३ कोटी रुपये.वित्तीय शिस्त राखली - मुख्यमंत्रीराजकोषीय तूट वाढलेली दिसत असली, तरी ती स्थूल राज्य उत्पन्नाच्या ३ टक्क्यांच्या मर्यादेत ठेवण्यात शासन यशस्वी झाले आहे. तसेच महसुली तूट सातत्याने १ टक्क्याच्या खाली राखल्याने राजकोषीय उत्तरदायित्व व वित्तीय व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन झालेले नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट आले आहे.
Agriculture Budget :
कर्ज काढून फटाके फोडल्यासारखे हा अर्थसंकल्प आहे, विकासाचे मृगजळ दाखवणारा आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.
अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांवर भर ; वडाळ्यात जागतिक दर्जाचे 'स्टार्टअप हब',मुंबई : मुंबई महानगर प्रदेशाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी राज्य सरकारने अर्थसंकल्पातून पायाभूत सुविधांचा धडाका लावला आहे. मुंबई आणि महानगरातील २० लाख झोपड्यांचा पुनर्विकास करण्यासह १० लाख परवडणारी घरे निर्माण करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला आहे. यासोबतच वडाळा येथे जागतिक दर्जाचे 'स्टार्टअप आणि इनोव्हेशन हब' उभारले जाणार असून, 'नो न्यू स्लम फ्रेमवर्क'द्वारे शहरात नवीन झोपडपट्ट्या होणार नाहीत, याची दक्षता घेतली जाणार आहे.मुंबईच्या वाहतुकीसाठी मेट्रो प्रकल्पांना मोठा निधी दिला जाणार आहे. यामध्ये वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया (मेट्रो ११) हा २३ हजार ४८७ कोटींचा संपूर्ण भूमिगत प्रकल्प धारावी आणि वांद्रेपर्यंत विस्तारला जाईल. तसेच, मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ (मेट्रो ८) आणि तळोजा ते खांदेश्वर अशा नवीन मार्गिका प्रस्तावित आहेत. शहरातील अंतर्गत प्रवास वेगवान करण्यासाठी 'ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह', 'गोरेगाव-मुलुंड' आणि 'ठाणे ते बोरीवली' यांसारखे महत्त्वाचे भुयारी मार्ग (टनेल) उभारले जाणार आहेत.अटलसेतूला जोडून २०० चौरस किमी क्षेत्रात 'तिसरी मुंबई' विकसित करण्याची घोषणा करण्यात आली आहे. यात कर्नाळा, साई, चिरनेर आणि नवी मुंबई विमानतळ परिसरातील ग्रीनफिल्ड शहरांचा समावेश असेल. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनची ठाणे ते तलासरी दरम्यानची तीन स्थानके फेब्रुवारी २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
जुनी वाहने स्क्रॅप केल्यास नवीन वाहनावर ३० टक्क्यांपर्यंत सवलत
अर्थसंकल्पात घोषणा; प्रदुषणकारी वाहनांच्या 'पर्यावरण करा'त दुप्पट वाढमुंबई : वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासह जुनी, प्रदुषणकारी वाहने रस्त्यावरून हटवण्यासाठी राज्य सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. जुनी वाहने स्क्रॅप करून नवीन वाहन खरेदी करणाऱ्यांना मोटार वाहन करात (रोड टॅक्स) ३० टक्क्यांपर्यंत घसघशीत सूट जाहीर करण्यात आली आहे. त्याचवेळी जुन्या खासगी वाहनांवर आकारल्या जाणाऱ्या 'पर्यावरण करा'त (ग्रीन टॅक्स) दुपटीने वाढ करण्यात आली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेनुसार, बीएस-४ व त्यावरील वाहने मोडीत काढून नवीन वाहन घेतल्यास मोटार वाहन करात १६ टक्के सूट मिळेल. बीएस-३ आणि त्याखालील वाहने मोडीत काढल्यास नवीन वाहन खरेदीवर ३० टक्के इतकी सूट मिळणार आहे. तसेच, क्रेन आरोहित वाहनांसाठी वाहन किमतीच्या ७ टक्के करासह ३० लाख रुपयांची कमाल मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.त्याशिवाय जुन्या खासगी (परिवहनेतर) वाहनांचा वापर कमी करण्यासाठी सरकारने पर्यावरण करात मोठी वाढ केली आहे. यामुळे जुन्या पेट्रोल-डिझेल गाड्यांचा मालकी हक्क महागणार आहे. दुचाकीसाठी २ हजार रुपयांवरून आता ४ हजार रुपये कर भरावा लागेल. तर, हलक्या मोटार वाहनांसाठी (पेट्रोल) ३ हजार रुपयांवरून ६ हजार रुपये वाढ प्रस्तावित आहे. डिझेल कारसाठी साडेतीन हजार रुपयांवरून ७ हजार रुपये कर प्रस्तावित करण्यात आला आहे.मुद्रांक शुल्कातील दंडात मोठी वाढकमी मुद्रांक शुल्कावर दस्तऐवज नोंदवण्याच्या प्रकारांना चाप लावण्यासाठी सरकारने दंडात्मक कारवाई कडक केली आहे. महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमातील विविध कलमान्वये होणाऱ्या शास्तीची (दंड) रक्कम ५ हजार रुपयांवरून थेट १ लाख रुपयांपर्यंत वाढवण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.अर्थसंकल्पात दिलेल्या माहितीनुसार, सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी राज्याचा स्वतःचा कर महसूल ४ लाख ९ हजार ५९३ कोटी रुपये अंदाजित आहे. तर आगामी २०२६-२७ या वर्षासाठी हे उद्दिष्ट ४ लाख १५ हजार ६५३ कोटी रुपये इतके निश्चित करण्यात आले आहे.
पुणे आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी तरतूद
पुणे : पुणे मेट्रोचा दुसरा टप्पा, खडकवासला-स्वारगेट-हडपसर-लोणी काळभोर मार्ग आणि पुणे ते शिरूर ५३ किमीचा उन्नत मार्ग.विमानतळ विकास : नवी मुंबई विमानतळाचा दुसरा टप्पा, पुरंदर विमानतळासाठी विशेष निधी आणि राज्यातील इतर विमानतळांच्या विस्तारासाठी निधी.कनेक्टिव्हिटी : राज्यातील मेट्रो नेटवर्क १ हजार २०० किमीवर, तर द्रुतगती मार्गांचे जाळे ६ हजार किमीवर नेण्याचे उद्दिष्ट. कल्याण ते लातूर आणि शिरूर ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान नवीन ग्रीनफिल्ड महामार्ग उभारले जाणार आहेत.महत्त्वाच्या घोषणा- उत्तन ते विरार सागरी सेतू ५८,७५४ कोटी रुपये खर्चून मुंबई ते वाढवण बंदर जोडणार.- बाळकुम ते गायमुख आणि उलवे किनारी मार्ग. अटलसेतूला मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाशी जोडणार.- ऑरेंज गेट (पूर्व मुक्त मार्ग) ते मरीन ड्राईव्ह, गोरेगाव-मुलुंड, ठाणे ते बोरीवली, आणि खारघर ते तुर्भे भुयारी मार्ग . गायमुख जंक्शन ते फाऊंटेन हॉटेल ते भाईंदर (६ आणि ९ किमी लांबीचे मार्ग). वांद्रे-वरळी सागरी सेतू ते हायस्पीड रेल्वेस्थानक (बीकेसी) ते मुंबई विमानतळ.ग्रामीण रस्त्यांसाठी भरीव निधीमहाराष्ट्र अमृतकाल योजना : ६ हजार २७२ किमी द्रुतगती मार्ग आणि १४ हजार ९१९ किमीचे राज्य/जिल्हा मार्ग.मुख्यमंत्री ग्रामसडक योजना (टप्पा-३) : २३ हजार किमीचे रस्ते.काँक्रिटीकरण : १ हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेली गावे काँक्रिट रस्त्यांनी जोडणार (४ हजार ५०० कोटी).पर्यटन परिरथ : ५००० पेक्षा जास्त लोकसंख्येच्या वस्त्यांना ४ हजार २४७ किमीच्या 'पर्यटन मार्गा'ने जोडणार.
UPSC Result : भाजप नेत्याच्या मुलाचा देशात तिसरा क्रमांक; मुख्यमंत्र्यांकडून कौतुकाची थाप
UPSC Result : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) निकालात हरियाणातील भाजप नेते कृष्ण ढुल यांचा मुलगा एकांश ढुल याने देशात तिसरा क्रमांक पटकावला आहे.
मागील वेळी संपूर्ण २५ जांगासाठी झालेल्या मतदानात जिल्ह्यातील ४ उमेदवार विजयी झाले होते.
Maharashtra Budget 2026 : महाराष्ट्रातील खेळाडूंचा आंतरराष्ट्रीय पदकांच्या शर्यतीत जास्तीत जास्त सहभाग सुनिश्चित करण्यासाठी 'मिशन लक्षवेध'चा विस्तार करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
मुंबई : मुंबईतील पथविक्रेत्यांच्या (हॉकर) प्रश्नासंदर्भात दाखल असलेल्या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली असून उच्च न्यायालयाचा निर्णय लवकरच अपेक्षित आहे. मात्र हा निर्णय येईपर्यंत २०२४ च्या पात्र यादीप्रमाणे पथविक्रेत्यांना तात्पुरत्या स्वरूपाची जागा (पिचेस) उपलब्ध करून देण्याचे महापालिकेला निर्देश देण्यात येतील अशी माहिती, मंत्री डॉ. उदय सामंत यांनी विधानसभेत दिली.मुंबई शहरात पथविक्रेता कायद्याची अंमलबजावणी करण्याबाबत लक्षवेधी प्रश्न आमदार रईस शेख यांनी उपस्थित केले होते.यावर मंत्री सामंत म्हणाले की, मुंबई महानगरपालिका क्षेत्रात २०१४ मध्ये हॉकरांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्या वेळी १,२८,४४३ अर्ज वितरित करण्यात आले होते. त्यापैकी ९९,४३५ अर्ज महानगरपालिकेला प्राप्त झाले असून त्यातील ३२,४१५ पथविक्रेते अधिकृतपणे पात्र ठरले आहेत. हॉकरांच्या प्रश्नावर विविध संघटनांनी न्यायालयात धाव घेतली होती. पथविक्रेत्यांच्या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कायमस्वरूपी हॉकर झोन निश्चित होईपर्यंत अनावश्यक निष्कासन करू नये तसेच आवश्यक असल्यास पुनर्वसनाची व्यवस्था करावी, असे निर्देश देण्यात आले होते.मंत्री डॉ.सामंत म्हणाले की ,पथविक्रेता सर्वेक्षणाला पाच वर्षे पूर्ण झाल्यास नव्याने सर्वेक्षण करून योग्य-अयोग्य ठिकाणांची पडताळणी करावी. मुंबई महानगरपालिकेने केंद्र सरकारच्या पथविक्रेता कायद्यानुसार शहरात हॉकर झोन निश्चित करण्यासाठी नियोजन आराखडा तयार करावा आणि विक्री प्रमाणपत्रांची छाननी करून नवीन प्रमाणपत्रे देण्याची प्रक्रिया राबवावी. दादर परिसरात पहाटे २ ते सकाळी १० वाजेपर्यंत भाजीपाला वाहून आणणाऱ्या ट्रकांमुळे वाहतुकीची समस्या निर्माण होते. या संदर्भात मुंबई पोलीस आणि महानगरपालिकेने नागरिकांना त्रास होऊ नये तसेच वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात, असेही निर्देश देण्यात आले आहेत.विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर म्हणाले की,२०१४ जी पात्र हॉकर्स यादी अंतिम आहे. या हॉकर्सना रोजगारापासून वंचित ठेवता कामा नये. त्यानुषंगाने पात्र हॉकर्सना तात्पुरत्या स्वरूपाची जागा (पिचेस) देण्यात यावेत.ज्यावेळी कायमस्वरूपी पिचेस देणार आहात त्यावेळी तात्पुरते पिचेस काढून घेवू शकता असे निर्देश त्यांनी दिले.या प्रश्नाच्या चर्चेत विधानसभा सदस्य अमिन पटेल,अमित साटम,अस्लम शेख यांनी सहभाग घेतला.
Maha Budget 2026 : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा या लोकांना मिळणार लाभ
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत राज्याचा २०२६ - २७ आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात राज्याची अर्थव्यवस्था ७.९ टक्क्यांच्या वेगाने वाढत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेची घोषणा केली. या योजनेच्या माध्यमातून आता शेतमजुरांना लाभ मिळणार आहे.शेतात काम करताना दुर्घटना झाली आणि त्यात जखमी झाल्यामुळे उपचार करण्याची वेळ आली तर पात्र असलेल्या शेतकरी तसेच शेतमजूर यांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ मिळेल. या अंतर्गत संबंधित व्यक्तीला दुर्घटना झाली तर आर्थिक संरक्षण मिळणार असून ग्रामीण कुटुंबांना मोठा आधार मिळणार आहे. राज्यातील ३० लाख शेतकऱ्यांना 'महाविस्तार' या एआय तंत्रज्ञानाद्वारे शेतीविषयक सर्व तांत्रिक आणि बाजारपेठेतील माहिती त्वरित उपलब्ध करून दिली जाईल. ज्या शेतकऱ्यांकडे स्मार्टफोन नाहीत, त्यांच्यासाठी 'वसुधा' ही विशेष मेसेज सेवा सुरू करण्यात येणार आहे. याद्वारे सरकारी योजनांची माहिती थेट त्यांच्या फोनवर पाठवली जाईल.महिला शेतकऱ्यांच्या उद्योजकतेसाठी विशेष कार्यक्रम राबवून त्यांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. तसेच शासनाच्या सर्व योजना डिजिटल माध्यमांतून थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवल्या जाणार आहेत.
अर्थसंकल्प मांडताना मुख्यमंत्र्यांनी 'विकसित महाराष्ट्र २०४७' चे व्हिजन डॉक्युमेंट जाहीर केले. २०२७ पर्यंत राज्याची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर्सवर नेण्याचे मुख्य ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Tamil Nadu Government :
Maharashtra Health Budget 2026: महात्मा फुले जनारोग्य योजनेंतर्गत उपचारांची संख्या १,३५६ वरून २,३९९ वर नेण्यात येणार आहे. तसेच या योजनेत सहभागी रुग्णालयांची संख्या १,७९२ वरून ४,५३७ पर्यंत वाढविण्यात येईल. नऊ प्रकारच्या अवयव प्रत्यारोपण उपचारांसाठी आता २२ लाख रुपयांपर्यंतचा खर्च राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या राखीव निधीतून करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
Sanju Samson : कोण आहे ती मुलगी? भारत जिंकताच झाली व्हायरल; संजू सॅमसनशी काय आहे संबंध? पाहा VIDEO
Sanju Samson : सामना सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीताच्या वेळी घडलेला एक खास क्षण सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्याचा संदर्भ सॅमसन आणि सामन्याशी जोडला जात आहे.
अर्थसंकल्पात ‘लाडकी बहीण’ योजनेवर शिक्कामोर्तब; योजना पुढेही...
मुंबई : महाराष्ट्राचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध विकासकामांसाठी तरतुदी जाहीर केल्या. यावेळी राज्यातील महिलांसाठी राबविण्यात येत असलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेबाबतही त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली.गेल्या काही दिवसांपासून ही योजना सुरू राहणार की बंद होणार, याबाबत विविध चर्चा रंगत होत्या. अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान मुख्यमंत्र्यांनी या चर्चांना पूर्णविराम देत योजना पुढेही सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले.योजनेसाठी निधीची तरतूदमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी आवश्यक निधीची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना पुढेही आर्थिक सहाय्य मिळत राहणार आहे. मात्र या योजनेतून मिळणाऱ्या आर्थिक मदतीत वाढ करण्याबाबत कोणतीही नवीन घोषणा करण्यात आलेली नाही.दरमहा आर्थिक मदतमहायुती सरकारच्या कार्यकाळात सुरू करण्यात आलेली ही योजना राज्यभरात मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय ठरली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा सुमारे १५०० रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते.आर्थिक ताणया योजनेमुळे राज्याच्या अर्थसंकल्पावर मोठा आर्थिक भार येत असल्याची चर्चा काही काळापासून सुरू होती. काही वेळा हप्ते उशिरा जमा झाल्याच्या घटनांमुळे योजना बंद होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र नव्या अर्थसंकल्पातील घोषणेनंतर ही योजना पुढेही सुरू राहणार असल्याचे स्पष्ट झाले असून, लाभार्थी महिलांना दिलासा मिळाला आहे.
Women's Day 2026 : ८ मार्च रोजी साजऱ्या होणाऱ्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने, निवृत्ती, मुलांचे शिक्षण, घर खरेदी किंवा आणीबाणीच्या प्रसंगांसाठी महिलांनी कोणत्या ७ दीर्घकालीन गुंतवणूक पर्यायांचा विचार करावा, ते जाणून घेऊया. लक्षात ठेवा, जितक्या लवकर गुंतवणूक सुरू कराल, तितका चक्रवाढ व्याजाचा (compounding) अधिक फायदा मिळेल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला.
Maha Budget 2026 : राज्यातील शेतकऱ्यांना २ लाखापर्यंत कर्जमाफी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा; ७ लाख ६९ हजार ४६७ कोटींचा अर्थसंकल्प सादरमुंबई : विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना महायुती सरकारने दिलेल्या आश्वासनाची प्रत्यक्ष पूर्तता करताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी शेतकऱ्यांना २ लाखापर्यंत कर्जमाफी देण्याची घोषणा केली. त्यासोबतच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कायम ठेवताना, त्यासाठी भरीव तरतूद करण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली. यंदाच्या अर्थसंकल्पाचे आकारमान तब्बल ७ लाख ६९ हजार ४६७ कोटी इतके आहे.दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अनुपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०२६-२७ साठीचा अर्थसंकल्प जाहीर केला. विधान परिषदेत अर्थराज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी राज्याचा अर्थसंकल्प मांडला. मुख्यमंत्री म्हणाले, आम्ही निवडणुकीत केलेल्या घोषणेनुसार, राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना' मी जाहीर करीत आहे. ३० सप्टेंबर २०२५ रोजी पीककर्ज थकित असलेल्या पात्र शेतकर्यांना २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी दिली जाईल. नियमित कर्ज परतफेड करणार्या पात्र शेतकर्यांना प्रोत्साहन म्हणून ५० हजार रुपये अनुदानही दिले जाईल.कर्जमाफी आणि प्रोत्साहनपर लाभ देण्यासोबतच बँकिंग यंत्रणा सक्षम करण्यासाठी, तसेच शेतकऱ्यांना कायमस्वरुपी कर्जमुक्त करण्यासाठी समितीच्या शिफारसींनुसार कार्यवाही करणार आहोत, असेही त्यांनी सांगितले. आमच्या सरकारने जून ते ऑक्टोबर २०२५ पर्यंत शेतकर्यांना १५ हजार ४९२ कोटी रुपये वितरित केले. आता शेतीमालाला जागतिक बाजारपेठ देण्यासाठी १० ते १५ पिकांची एकात्मिक मूल्यसाखळी निर्माण करणार आहोत, अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली. अॅग्रीस्टॅक, महावेध, क्रॉपसॅप, महाडीबीटी, को. ऑप स्टॅक इत्यादी डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून एकात्मिक इकोसिस्टीम उभारणार असल्याचे त्यांनी सांगितले.कृषी क्षेत्रातील भांडवली गुंतवणूक वाढवणारमुख्यमंत्री म्हणाले, शेतीत एआयचा वापर सुरू करण्यात आला आहे. महाविस्तार एआय, वसुधा व्हॉईस टेलिफोनी, पुश टेलिफोनी, महाराष्ट्र अॅग्रीकल्चर डेटा एक्सचेंज, एआय सक्षम सँडबॉक्स इत्यादी उपक्रम सुरू करण्यात आले आहे. यापुढे ४ कृषी विद्यापीठांमध्ये एआय क्षमता आणि कृषी स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी आर्टिफिशियल इंटिलिजन्स इनोव्हेशन अँड इन्क्युबेटर सेंटरची स्थापना करणार आहोत. जेणेकरून उत्पादन खर्चात २५ टक्के घट होऊन उत्पादकता वाढीला चालना मिळेले.जानेवारी २०२६ पर्यंत १ कोटी ३१ लाख फार्मर्स आयडी तयार करण्यात आले आहेत. आता त्यात आदिवासी वनपट्टेधारक शेतकरी समाविष्ट करणार आहोत. कृषी समृद्धी योजनेंतर्गत २०२६-२७ पासून ४ वर्षांत भांडवली गुंतवणूक वाढवली जाणार आहे. त्याशिवाय नवीन प्राकृतिक शेती अभियानांतर्गत ५ लाख हेक्टर क्षेत्र प्राकृतिक शेतीखाली आणण्याचे उद्दिष्ट असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.लाडकी बहीण योजना कायम राहणारमुख्यमंत्री म्हणाले, लाडकी बहीण योजना बंद करणार, अशा वावड्या निवडणुकीत आणि त्यानंतरही उठण्यात आल्या. मात्र, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कायम राहणार असून, या अर्थसंकल्पात त्यात भरीव तरतूद करण्यात आली आहे. त्याशिवाय सर्व जिल्ह्यांत एकल महिलांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले असून, या अहवालाचे विश्लेषण करून एकल महिलांसाठी विशेष धोरण आणले जाणार आहे.राज्यात आतापर्यंत २७ लाख लखपती दिदी झाल्या. २०२६-२७ मध्ये आणखी २५ लाख लखपती दिदी करणार आहोत. त्याव्यतिरिक्त महिला बचतगटांच्या वस्तू उत्पादन, विक्रीसाठी १३ जिल्ह्यांत उमेद मॉल उभारले जाणार आहेत. अंगणवाडी सेविकांना आर्थिक नियोजनाबाबत प्रशिक्षण, योजनेतील लाभार्थ्यांना आर्थिक साक्षर करुन लाभाचे व्यवस्थापन, गुंतवणुकीचे मार्गदर्शन करणार आहोत.
Maha Budget 2026 : मंत्री नितेश राणे यांच्या खात्याला अर्थबळ
मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना जाहीर; दरवर्षी १ हजार २४० कोटींची तरतूद करणारजलवाहतुकीचे जाळे ३४० किमीपर्यंत विस्तारणार, नवीन टर्मिनल्ससाठी ६ हजार ६०० कोटींची तरतूदमुंबई : मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास विभागाच्या माध्यमातून अव्वल कामगिरी करणाऱ्या मंत्री नितेश राणे यांच्या खात्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पातून नवे अर्थबळ दिले. प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेच्या धर्तीवर राज्याची 'मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना' जाहीर करीत दरवर्षी १ हजार २४० कोटींची तरतूद करणार असल्याचे स्पष्ट केले. अशी योजना जाहीर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेंतर्गत प्रतिवर्षी १ हजार २४० कोटी रुपये देण्यात येतील. राज्यातील २० हजार ५९४ मासेमारांना याचा लाभ होणार आहे. त्याशिवाय सध्याचे १२५ किमी जलमार्गांचे जाळे ३४० किमीपर्यंत विस्तारण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली. त्यासाठी विद्यमान २१ जलमार्गांवरील २० टर्मिनल्सचे अद्ययावतीकरण केले जाणार आहे. ११ नवीन जलमार्गांवर २४ नवीन टर्मिनल्स उभारले जातील. त्यासाठी ६ हजार ६०० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्याशिवाय मुंबईतील रेडिओ क्लब येथील नवीन जेट्टी डिसेंबर २०२७ पर्यंत पूर्ण करण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली...................मरीन शिपयार्ड क्लस्टर विकसित करणारराज्यात मरीन शिपयार्ड क्लस्टर विकसित करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पात केली. मासेमारांसाठी सातपाटी येथे अत्याधुनिक मत्स्यबंदर उभारण्यासह आसपासच्या ४४ गावांत कौशल्य विकासाचे उपक्रम राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याशिवाय वाढवण बंदराजवळ चौथी मुंबई विकसित केली जाईल. लॉजिस्टीक्स आणि वेअर हाऊसिंगसाठी विकास केंद्रे निर्माण करणार आहोत. वाढवण बंदरामुळे १२ लाखांहून अधिक रोजगार निर्माण होणार असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत महाराष्ट्र राज्याचा वर्ष २०२६-२७ साठीचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी मुख्यमत्री फडणवीस यांनी महिलांच्या कल्याणासाठीही मोठ्या घोषणा केली. लाडकी बहिण योजना पुढे सुरू ठेवण्यासोबतच, त्यांनी लखपती दिदी करण्यासंदर्भात, महिला स्वयंसहाय्यता समूहांसाठी आणि एकल महिलांसाठीही मोठ्या घोषणा केल्या आहेत.२५ लाख बहिणींना लखपती दिदी करण्याचे उद्दिष्ट :अर्थसंकल्पावेळी महिला वर्गाशी संबंधित योजनांसंदर्भात भाष्य करताना, महाराष्ट्र ग्रामिण जीवनोन्नती अभियानांतर्गत आतापर्यंत सुमारे ३७ लाख 'लखपती दिदी' झाल्या आहेत. आता २०२६-२०२७ मध्ये आणखी २५ लाख बहिणींना 'लखपती दिदी' करण्याचे उद्दिष्ट आहे, अशी घोषणा फडणवीस यांनी केली. याशिवाय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'लाडकी बहिण' योजनाही पुढे चालू ठेवण्यासंदर्भात भाष्य केले.एकल महिलांच्या कल्याणासाठीही घोषणा :दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकल महिलांच्या कल्याणासाठीही मोठी घोषणा केली आहे. सध्या राज्यांतील सर्व जिल्ह्यांमध्ये एकल महिलांचे सर्वेक्षण सुरू असून, ते पूर्ण झाल्यानंतर, त्याचे योग्य विश्लेषण करून, एकल महिलांच्या कल्याणासाठी सुयोग्य धोरण आणले जाईल, असे फडणवीस यांनी यावेळी जाहीर केले.उमेद मॉल जिल्हा विक्री केंद्र उभारणीस मान्यता :महिला स्वयंसहाय्यता समूहांच्या वस्तूंसंदर्भात आणि त्यांच्या विक्रीसंदर्भात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र राज्य ग्रामिण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या, महिला स्वयंसहाय्यता समूहांच्या वस्तू आणि विक्रीसाठी हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी पहिल्या टप्प्यांत १३ जिल्ह्यांमध्ये 'उमेद मॉल जिल्हा विक्री केंद्र उभारणीस मान्यता देण्यात आली आहे.
Tiger Baji : देवीच्या यात्रेला दरवर्षी येतोय चक्क वाघ; ‘सेनापती’नंतर यंदा ‘बाजी’ची ‘एण्ट्री’
Tiger Baji :
UPSC Result: यूपीएससी निकालात महाराष्ट्राचे किती उमेदवार? जाणून घ्या सर्वांची नावे
UPSC Result: जाहीर निकालात ३४८ उमेदवारांची शिफारस सध्या तात्पुरत्या स्वरूपात असून २ उमेदवारांचे निकाल रोखून ठेवण्यात आले आहेत. शिफारस केलेल्या उमेदवारांनी केलेल्या आरक्षण दाव्यांची अंतिम पडताळणी संबंधित प्राधिकरणांकडून केली जाणार असल्याचे निकालाच्या अधिसूचनेत नमूद आहे.
Jammu and Kashmir : श्रीनगरमधील मध्यवर्ती भाग लाल चौक येथे असलेले ऐतिहासिक घंटा घर परिसर पूर्णपणे सील करण्यात आला आहे.
Sakshi Dhoni Video : या हाय-व्होल्टेज सामन्याचा आनंद घेण्यासाठी माजी भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनी पत्नी साक्षीसोबत व्हीआयपी बॉक्समध्ये उपस्थित होता
UPSC Result: यूपीएससी परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर; अनुज अग्निहोत्री देशात प्रथम, पाहा यादी
UPSC Result: अनुज अग्निहोत्री यांनी ऑल इंडिया रँक १ पटकावत देशभरातील लाखो स्पर्धकांमध्ये बाजी मारली. AIIMS जोधपूरमधून MBBS पूर्ण केलेल्या या डॉक्टरने वैद्यकीय क्षेत्र सोडून नागरी सेवेत घेतलेल्या झेपाने अनेक युवा स्पर्धकांना प्रेरणा दिली आहे.
शहरातील प्रसिद्ध ‘कॅफे पिटर’ या ब्रँडच्या मालकी हक्कावरून मोठा आर्थिक वाद समोर आला आहे.
Maharashtra Budget 2026 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा २०२६-२७ चा अर्थसंकल्प सादर केला.
Stock Market Today: आजचे सत्र सुरुवातीपासूनच नकारात्मक राहिले. निफ्टी १०९ अंक घसरून २४,६५६ वर, तर सेन्सेक्स ३५६ अंकांनी खाली येत ७९,६५९ वर उघडला. रुपयाही डॉलरच्या तुलनेत ५ पैशांनी कमकुवत होऊन ९१.६५ च्या पातळीवर उघडला होता.
Maha Budget 2026 : राज्याच्या अर्थसंकल्पातून मुंबईला काय मिळाले ?
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत राज्याचा २०२६ - २७ आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात देशाची आर्थिक राजधानी आणि राज्याची राजधानी असलेल्या मुंबईच्या विकासासाठी अनेक घोषणा करण्यात आल्या.जानेवारी २०२६ मध्ये प्रदीर्घ काळानंतर मुंबई महापालिकेत भारतीय जनता पार्टीचा महापौर झाला. त्यानंतर सादर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात मुंबईसाठी भरीव तरतुदी आहेत.राज्याच्या २०२६ - २७ च्या अर्थसंकल्पातून मुंबईला काय मिळाले ? मुंबई महानगर प्रदेशाची अर्थव्यवस्था २०३० पर्यंत १४० अब्ज डॉलर्सवरून ३०० अब्ज डॉलर्सपर्यंत नेणार वडाळा येथे १३० एकर जमिनीवर जागतिक दर्जाचे स्टार्टअप आणि इनोव्हेशन हब करणार मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या ठाणे तलासरी मार्गाचे काम २०२७ अखेरपर्यंत पूर्ण होणार अटल सेतू परिसरात तिसरी मुंबई विकसित करणार वाढवण जिल्हा, पालघर येथे चौथी मुंबई विकसित करणार, चौथ्या मुंबईत लॉजिस्टिक आणि विकास केंद्रे निर्माण करणार झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामार्फत मुंबईतील २० लाख घरांच्या पुनर्विकासासाठी तसेच भाडे तत्वावरील घरांसह १० लाख घरे विकसित करण्यासाठी बृहन्मुंबई आराखडा तयार करणार मुंबई महापालिका क्षेत्रात नवी झोपडपट्टी उभी राहणार नाही यासाठी GIS आधारे मॅपिंगचा वापर करून No New Slum Framework विकसित करणार वडाळा ते गेट ऑफ इंडिया मेट्रो मार्गिका ११ यासाठी २३ हजार ४८७ कोटी किंमतीचा भूमिगत प्रकल्प उभारणार. या प्रकल्पाचा विस्तार धारावी पुनर्विकास प्रकल्पातून पुढे वांद्रे उपनगरी स्थानक आणि वांद्रे टर्मिनसपर्यंत करण्याची योजना मुंबई ते नवी मुंबई विमानतळ जोडणारा मेट्रो ८ यासाठी २२ हजार ८६२ कोटी किंमतीचा प्रकल्प उभारणार पूर्व आणि पश्चिम उपनगराला जोडणाऱ्या गोरेगाव मुलुंड भूयारी मार्गाचे काम अंतिम टप्प्यात ठाणे ते बोरिवली या १८ हजार ८३८ कोटींच्या प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर, जून २०२८ पर्यंत हा मार्ग पूर्ण होईल वांद्रे वरळी सागरी सेतू ते बुलेट ट्रेन स्थानक, वांद्रे कुर्ला संकुल ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे भूयारी मार्गाने जोडण्यात येईल. अटल सेतू ते मुंबई कोस्टल मार्ग आणि वांद्रे वरळी सागरी मार्ग या रस्त्यावर सिग्नलविरहित वाहतुकीसाठी शिवडी-वरळी उन्नतमार्गाचे काम प्रगतीपथावर, सप्टेंबर २०२६ पर्यंत हे काम पूर्ण होईल. अटल सेतू ते मुंबई-पुणे द्रूतगती मार्ग जोडणारा १ हजार १०२ कोटी किंमतीचा उन्नत मार्ग फेब्रुवारी २०२७ पर्यंत पूर्ण करणार दक्षिण मुंबईला समृद्धी महामार्गाशी थेट जोडण्यासाठी छेडा नगर ते आनंद नगर आणि आनंद नगर ते साकेत, ठाणे उन्नत मार्गाचे काम डिसेंबर २०२८ पर्यंत पूर्ण करणार वांद्रे ते वर्सोवा सागरी सेतू या मार्गाचे चारही टप्प्यातील काम प्रगतीपथावर हा प्रकल्प मे २०२८ पर्यंत पूर्ण करणार वर्सोवा -दहिसर-भाईंदर या २२ हजार १६६ कोटी किंमतीच्या किनारी मार्ग प्रकल्प सुरू असून डिसेंबर २०२८ पर्यंत हा मार्ग पूर्ण करणार
Maha Budget 2026 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या अर्थसंकल्पामधील महत्वाच्या घोषणा
मुंबई : महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प आज म्हणजेच शुक्रवार ६ मार्च २०२६ रोजी दुपारी दोन वाजल्यापासून विधानसभेत सादर करत आहेत.विधिमंडळात राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक मोठ्या महत्वाच्या घोषणा केल्या. शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा कर्जमाफीची घोषणा केली आहे. त्यानुसार आता ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत पीक कर्ज थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा थेट लाभ मिळणार असून, या योजनेचे नामकरण 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना' असे करण्यात आले आहे.All set to present the Maharashtra Budget 2026–27, outlining the roadmap for the state’s next phase of Viksit Maharashtra. @SunetraA_Pawar @Ashishjaisw3Adv#Maharashtra #Budget4ViksitMaharashtra pic.twitter.com/NxcDhyLrF8— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 6, 2026मुख्यमंत्री फडणवीसांनी जाहीर केलेल्या महत्वाच्या घोषणा : छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक आणि पानिपत येथे मराठा शौर्य स्मारक उभारण्यात येणार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरूच राहणार नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचा प्रोत्साहन भत्ता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना २ लाख पर्यंत चे कर्ज माफ करण्यात आले आहे. मुख्यमंत्री बळीराजा योजना २०२७ मध्येही सुरू राहणार राज्य सरकारकडून ३०० कोटी वृक्ष लागवडीची मोहीम हाती घेतली जाणार आहे. महाराष्ट्रातील सौर कृषी पंप योजनेची गिनीज बुकात नोंद महाराष्ट्रातील सौर कृषी पंप योजनेची गिनीज बुकात नोंद. मागेल त्याला सौर कृषीपंप योजने अंतर्गत ६ लाखाहून अधिक पंप तिसऱ्या आणि चौथ्या मुंबईसाठी अर्थसंकल्पात नियोजन अटल सेतू परिसरात तिसरी मुंबई आणि चौथी मुंबई वाढवण परिसरात उभारणार आहे. पाच ज्योतिर्लिंगांचा विकासासाठी तरतूद अजित पवारांचं स्मारक उभारणार यंदाचा अर्थसंकल्प अजितदादांना समर्पित एम्सच्या धर्तीवर महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य संस्था नागपूरात कार्यन्वित करण्यात येणार साताऱ्यातील दरे गाव परिसरात निसर्गोपचार केंद्र उभारणार अहिल्याबाई होळकर यांच्या नावे कर्जमाफी योजना सुरु करणार १२ किल्ले संवर्धनासाठी विशेष निधी देणार कर्करोग, मधुमेह, हृद्यविकार याचे लवकर निदान करण्यासाठी ४५०० कोटीचीं योजना पुढील तीन वर्षाकरिता सिंधुदुर्ग, रत्नागिरीसाठी सिंधुरत्न समृद्धी योजना २.० प्रस्तावित
“मी आत्महत्या करून तुमच्या नावांचा उल्लेख करीन” तर युवराज परतानी याने “माझी पावर वापरून तुमच्या नोकऱ्या घालवतो” अशी धमकी दिली.
Maharashtra Budget 2026 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवंगत अजित पवार यांना अर्थसंकल्प समर्पित केला.
Sanju Samson statement : या सामन्यात ८९ धावांची खेळी करणाऱ्या संजू सॅमसनला 'सामनावीर' घोषित करण्यात आले, मात्र त्याने या विजयाचे सर्व श्रेय जसप्रीत बुमराहला दिले आहे.
Maharashtra Budget 2026: या अर्थसंकल्पात शेतकरी आणि शेती क्षेत्राला केंद्रस्थानी ठेवत अनेक महत्त्वाच्या योजना जाहीर करण्यात आल्या. राज्यातील १० ते १५ ठिकाणी एकत्रित मूल्य साखळी उभारण्याचा सरकारचा मानस आहे. यामुळे शेतमालाला योग्य दर मिळण्यास मदत होणार असल्याचे सांगण्यात आले.
Maharashtra Budget 2026: महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२६ सादर करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई आणि राज्यभरातील दळणवळण सुधारण्यासाठी अनेक मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांची घोषणा केली.
मुंबई : महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प आज म्हणजेच शुक्रवार ६ मार्च २०२६ रोजी दुपारी दोन वाजल्यापासून विधानसभेत सादर करत आहेत. अशातच शेतकऱ्यांसाठी सरकारने मोठी घोषणा केली आहे.विधिमंडळात राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा कर्जमाफीची घोषणा केली आहे. त्यानुसार आता ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत पीक कर्ज थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा थेट लाभ मिळणार असून, या योजनेचे नामकरण 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना' असे करण्यात आले आहे.योजनेचे स्वरूप काय?दोन लाखांपर्यंत कर्जमाफी :ज्या शेतकऱ्यांचे पीक कर्ज ३० सप्टेंबर २०२५ रोजी थकीत होते, अशा पात्र शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज पूर्णपणे माफ करण्यात येणार आहे.नियमित कर्जदारांसाठी आनंदाची बातमीःजे शेतकरी आपल्या कर्जाचे हप्ते वेळेवर आणि नियमितपणे भरत आहेत, अशा प्रामाणिक कर्जदार शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून ५०,००० रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे.या निर्णयामुळे राज्यातील लाखो कर्जबाजारी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, शेती व्यवसायाला पुन्हा उभारी मिळण्यास मदत होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
राज्यातील लाडकी बहीण योजना ही अतिशय लोकप्रिय योजनांपैकी एक योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे.
Maharashtra Budget 2026-27 : राज्याचे मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर करत आहेत. या अर्थसंकल्पात १० मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत.
मोठी बातमी..! मुख्यमंत्र्यांकडून शेतकरी कर्जमाफीची घोषणा; कोणाला मिळणार लाभ? वाचा…
Maharashtra Budget 2026 : महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२६: पात्र शेतकऱ्यांचे २ लाखांपर्यंतचे पीककर्ज माफ होणार.
Nitin Gadkari: 'मैं डंडा लेके बैठा हूँ, मुझे मैनेज करने वाला पैदा नहीं हुआ', असे म्हणत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी पेट्रोलियम लॉबीवर जोरदार टीका करत स्पष्ट शब्दांत इशारा दिला.
Maha Budget 2026 : जाणून घ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनमध्ये आतापर्यंत झालेल्या महत्वाच्या घोषणा
मुंबई : महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प आज म्हणजेच शुक्रवार ६ मार्च २०२६ रोजी दुपारी दोन वाजल्यापासून विधानसभेत सादर करणार आहेत.सलग पाचव्या वर्षी राज्याच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीची गती कायम राहील असा अंदाज असून, चालू आर्थिक वर्षात ७.९ टक्के वाढ अपेक्षित आहे. सन २०२५-२६ च्या पूर्वानुमानानुसार, राज्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये सन २०२४-२५ च्या तुलनेत ७.९ टक्के वाढ अपेक्षित आहे. सन २०२५-२६ मध्ये 'कृषि व संलग्न कार्ये', 'उद्योग' व 'सेवा' या क्षेत्रांच्या वास्तविक स्थूल राज्य मूल्यवृद्धिमध्ये अनुक्रमे ३.४ टक्के, ५.७ टक्के व ९.० टक्के वाढ अपेक्षित आहे. पूर्वानुमानानुसार सन २०२५-२६ मध्ये सांकेतिक (चालू किंमतींनुसार) स्थूल राज्य उत्पन्न ₹ ५१,००,५९७ कोटी अंदाजित असून वास्तविक (सन २०११-१२ च्या स्थिर किंमतींनुसार) स्थूल राज्य उत्पन्न ₹ २८,८२,६९९ कोटी अंदाजित आहे.अर्थसंकल्पीय अधिवेशनमध्ये आतापर्यंत झालेल्या घोषणा : महात्मा फुलेंच्या २०० व्या जयंती निमित्त राज्यात विशेष कार्यक्रम अर्थसंकल्पातून राज्याच्या विकासाची रुपरेखा मांडण्याचा प्रयत्न संत गाडगेबाबा तीर्थक्षेत्र सर्किट उभारणार संत गाडगेबाब ग्राम सडक योजना राबवणार चवदार तळ्याच्या शताब्दी वर्षानिमित्त पायाभूत सुविधा उभारणार २०२६-२७ हे वर्ष सामाजिक समता समरसता वर्ष म्हणून साजरे करणार बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीनिमित्त विशेष योजना राबवणार अजित पवारांचे स्मारक उभारणार अजित पवारांच्या नावाने गतिमान नागरी सेवा पुरस्कार देणार यंदाचा अर्थसंकल्प अजित पवारांच्या स्मृतींना समर्पित राज्याला गतिमान करण्यासाठी प्रगतीशील, शाश्वत, सर्वसमावेशक आणि सुशासन असे चार टप्पे निश्चित केले आहे. त्यात १६ उपक्षेत्रे निश्चित केली आहेत. २०४७ पर्यंत विकसित महाराष्ट्र घडविण्याचा मानस शेतकऱ्यांच्या शेतमालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी एकात्मिक मूल्य साखळी तयार करणार राज्यातील चारही कृषी विद्यापीठात एआय आणि इन्क्युबेशन सेंटर्स स्थापन करणार मत्स्यव्यवसाय प्रतिवर्षी १ हजार ४०० कोटी भाराच्या मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेला मान्यता देण्यात येत आहे मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेला मान्यता इन्व्हेस्ट महाराष्ट्र हा डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करणार ५० लाख रोजगार निर्मितीसाठी सेवा आणि उद्योग क्षेत्रासाठी आयुक्तालय स्थापन करण्याची घोषणा मुंबई, सिंगापूर आणि दुबईत पर्यटन कक्ष सुरू करणार सह्याद्री खोऱ्यातील वासोटा किल्ल्याजवळ रोप-वे उभारणार
Reproductive Health: बदलती जीवनशैली ठरतेय धोकादायक; तरुणांमध्ये वाढतोय प्रजनन विकारांचा धोका
Reproductive Health आरोग्यतज्ज्ञांच्या मते, सध्या प्रत्येक सहा दांपत्यांपैकी एका दांपत्याला गर्भधारणेत अडचणी येतात. ही समस्या केवळ महिलांमध्येच नसून पुरुषांमध्येही वाढताना दिसत आहे. हार्मोन्सचे असंतुलन, प्रजनन अवयवांतील समस्या, वाढते वय, काही आजार किंवा चुकीची जीवनशैली यांसारखी अनेक कारणे यामागे असू शकतात.
population management policy: आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी राज्याच्या घटत्या प्रजनन दराबद्दल चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी विधानसभेत लोकसंख्या व्यवस्थापन धोरणाचा प्रस्तावही मांडला आहे.
Kalki 2 : सिक्वलमध्ये भूमिका मोठी असणार; अभिनेत्री दिशा पटानीने सांगून टाकलं
Kalki 2 : दुसऱ्या भागात दिशा पटानी हिला जास्त स्क्रिन टाइम मिळणार असल्याचे तिने स्वतः सांगितले आहे.
CM Devendra Fadnavis live : महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा…पाहा VIDEO
CM Devendra Fadnavis live :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर मंत्र्यांची विधानसभेत उपस्थिती आहे.
गेल्या वर्षीचा अर्थसंकल्प तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडला होता. दुर्दैवी अपघाताच्या घटनेमुळे आता अर्थ खात्याची जबाबदारी असलेले मुख्यमंत्री हा अर्थसंकल्प सादर करताना दिसत आहेत.
India Buy Russia Oil: तेल मिळणार, पण सूट नाही… ; भारत रशियाकडून जास्त किमतीत कच्चे तेल खरेदी करणार
India Buy Russia Oil: मध्य पूर्वेतील युद्धामुळे जागतिक तेल संकट निर्माण होण्याची भीती आहे. दरम्यान, अमेरिकेने भारताला रशियाकडून तेल खरेदी करण्यासाठी ३० दिवसांची सूट दिली आहे,
Buldhana News: आईला कॉल करत संपवलं आयुष्य; नेमकं घडलं काय?
बुलढाणा: आईला शेवटचा कॉल करुन तरुणाने आपली जीवनयात्रा संपवल्याची बातमी समोर येत आहे. ही काळीज पिळवटून टाकणारी घटना बुलढाण्यामध्ये घडली आहे. आई हा अखेरचा संवाद असे म्हणत मुलाने आपल्या जन्मदातीला कॉल केला अन् गळफास घेत आयुष्य संपवले. ज्ञानेश्वर एकनाथ सपकाळ असं आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.आई हा शेवटचा कॉल..याबाबत सविस्तर माहिती अशी की, बुलढाण्याच्या करडीमध्ये एका तरुणाने आईला कॉल करुन त्यांच्या डोळ्यादेखत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मृत एकनाथ सपकाळ वय वर्ष ३९ यांचे धाड येथील भाग १, गट क्र. ५७ मध्ये शेत आहे. २ मार्च रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास ज्ञानेश्वर यांनी आपल्या आईला फोन केला आणि हा आपला शेवटचा संवाद असल्याचे सांगितले. आई, हा माझा तुला शेवटचा फोन आहे...' असं ते आईला कॉलवर बोलले.मुलाचे हे शब्द ऐकताच आईच्या पोटात गोळा आला. आपला लेक काहीतरी विपरित पाऊल उचलतोय हे त्यांच्या लक्षात आले अन त्यांनी दुसऱ्या मुलासह शेताकडे धाव घेतली. ते शेतात पोहोचले तेव्हा ज्ञानेश्वर यांचा फोन सुरूच होता. समोरून आई आणि भाऊ येताना दिसताच, ज्ञानेश्वर यांनी आंब्याच्या झाडाला बांधलेल्या नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन उडी घेतली. काही क्षणांतच त्यांची प्राणज्योत मालवली. आई आणि भावाच्या डोळ्यादेखत हा काळीज पिळवटून टाकणारा प्रकार घडला.आई आणि भावाच्या डोळ्यादेखत आत्महत्याया घटनेची माहिती मिळताच धाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळ पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी धाड येथील ग्रामीण रुग्णालयात रवाना केला. ज्ञानेश्वर यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा आणि भाऊ असा मोठा आप्त परिवार आहे. या प्रकरणी रघुनाथ पांडुरंग सपकाळ यांनी धाड पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे. त्यांनी आत्महत्या का केली, याचे कारण समजू शकले नाही. गुन्ह्याचा पुढील तपास ठाणेदार प्रताप भोस यांच्या मार्गदर्शनात पोलिस अंमलदार श्रीकृष्ण चव्हाण हे करत आहेत.
Social Media ban: कर्नाटक सरकारने राज्यात १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया वापरावर बंदी घालण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना ही घोषणा केली.
संगमनेर / मुंबई :रशियाकडून कच्च्या तेलाची (Crude Oil) खरेदी करण्याबाबत अमेरिकेने भारतासाठी वापरलेल्या भाषेवरून नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. भारत हा एक स्वतंत्र आणि सार्वभौम लोकशाही देश आहे, ही अमेरिकेची कोणतीही कॉलनी नाही अशा शब्दांत तांबे यांनी अमेरिकेला सुनावले आहे.युक्रेन-रशिया युद्धानंतर रशियावर लादलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर, भारताने आपल्या गरजेनुसार रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवली आहे. या व्यवहाराबाबत भाष्य करताना अमेरिकेने नुकत्याच केलेल्या एका विधानाचा संदर्भ देत सत्यजित तांबे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली.रशियाकडून तेल खरेदीसाठी 'परवानगी' देण्याच्या संदर्भात अमेरिकेने जे शब्द वापरले आहेत, ते भारताच्या स्वाभिमानाला ठेच पोहचवणारे असल्याचे तांबे यांनी म्हटले आहे. भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे. कोणत्याही बाह्य शक्तीने भारताला काय करावे आणि काय करू नये, हे सांगण्याची गरज नाही. डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळातील अमेरिकेच्या धोरणांवर टीका करताना तांबे म्हणाले की, अमेरिका केवळ पैसा, सत्ता आणि सैन्य ताकदीच्या जोरावर जगाला वेठीस धरण्याचे प्रकार करत आहे. भारताच्या केंद्र सरकारने आपल्या परराष्ट्र धोरणाबाबत अधिक सजग राहण्याची गरज आहे. देशाच्या स्वाभिमानाशी कोणत्याही प्रकारची तडजोड होता कामा नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.दरम्यान, भारताने जागतिक व्यासपीठावर वारंवार स्पष्ट केले आहे की, आपली तेल खरेदी ही केवळ देशाच्या ऊर्जा सुरक्षेसाठी आणि जनतेच्या हितासाठी आहे. मात्र, अमेरिकेच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे आता देशांतर्गत राजकीय स्तरातूनही अशा प्रकारे तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. सत्यजित तांबे यांच्या या विधानामुळे परराष्ट्र धोरण आणि देशाचा स्वाभिमान या विषयावर आता सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे.भारत हा एक स्वतंत्र तसेच लोकशाही देश आहे, ही काय अमेरिकेची किंवा इतर कोणत्याही देशाची कॉलनी नाही. भारताच्या स्वाभिमानाला धोका निर्माण होऊ देऊ नये.—सत्यजित तांबे
कर्नाटकात लहान मुलांना सोशल मीडिया वापरण्यास बंदी
नवी दिल्ली: कर्नाटकात मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालण्यात आली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी विधानसभेत सोशल मीडिया बंदीची घोषणा केली. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की १६ वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया वापरण्यास मनाई आहे. त्यांनी सांगितले की, १६ वर्षांखालील मुलांवर मोबाईल फोन वापरण्याच्या नकारात्मक परिणामांमुळे ही बंदी घालण्यात आली आहे.देशातील पहिले राज्यमुलांसाठी सोशल मीडिया वापरावर बंदी घालणारे कर्नाटक हे देशातील पहिले राज्य बनले आहे. तथापि, गोवा, महाराष्ट्र आणि बिहार देखील मुलांसाठी सोशल मीडिया वापरावर बंदी घालण्याबाबत भागधारकांशी सल्लामसलत करत आहेत. या राज्यांमध्ये, मुलांसाठी सोशल मीडिया निर्बंध लागू करण्यासाठी सरकारी टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे.गेल्या महिन्यात, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी राज्य उच्च शिक्षण परिषदेच्या कुलगुरूंशी बोलताना, सोशल मीडिया वापरावरील वय-आधारित निर्बंधांवर चर्चा केली, ऑस्ट्रेलियाचे उदाहरण दिले. सरकारने सोशल मीडिया बंदीसाठी आंतरराष्ट्रीय मॉडेल्सचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला.बेंगळुरूमध्ये एआय इनोव्हेशन झोन बांधला जाणारत्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की इस्रो आणि केओनिक्सच्या सहकार्याने आयआयएससी अंतर्गत बेंगळुरू रोबोटिक्स आणि एआय इनोव्हेशन झोन नावाचा रोबोटिक्स आणि एआय कॅम्पस स्थापन केला जाईल. त्यांनी स्पष्ट केले की सोशल मीडियाच्या नकारात्मक परिणामांमुळे आणि १६ वर्षांखालील मुलांवर मोबाईल फोनचा वाढता वापर यामुळे हा कठोर निर्णय घेण्यात आला आहे.गेल्या महिन्यात, नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे झालेल्या एआय समिट दरम्यान, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही सांगितले की भारत सोशल मीडियावर वयानुसार निर्बंध लागू करण्याची तयारी करत आहे. अनेक देशांनी सोशल मीडिया वापरावर वयानुसार निर्बंधांची आवश्यकता मान्य केली आहे.
Gold Silver Price: पश्चिम आशियातील बिघडणारी परिस्थिती आणि कतार-इराण संघर्षामुळे सोने आणि चांदीच्या किमतीत पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
Natasha Stankovic या फोटोंमध्ये नताशा अतिशय स्टायलिश लूकमध्ये दिसत आहे. तिने काळ्या रंगाचा आकर्षक वन-पीस ड्रेस परिधान केला असून हातात पांढऱ्या रंगाचा सुंदर केकही दिसत आहे. साधा पण एलिगंट लूक आणि आत्मविश्वासपूर्ण स्टाईलमुळे तिचे हे फोटो चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.

27 C