PCMC Census 2026 : १६ मे ते १४ जून २०२६ दरम्यान होणार घरगुती सर्वेक्षण; प्रत्येक कुटुंबाची सामाजिक आणि आर्थिक माहिती संकलित केली जाणार.
PCMC News : नगरसेवक म्हणतात ‘आमची सहीच नाही’; मग ५२ कोटी कोणाच्या खिशात गेले?
PCMC News : स्थायी समितीची मान्यता डावलून महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलमांचे उल्लंघन; विधी विभागाचा धक्कादायक अभिप्राय.
Maval News : नाणे मावळात ज्वारीचा सुकाळ! यंदा विक्रमी उत्पादनाने बळीराजा सुखावला
Maval News : ज्वारीच्या कडब्यामुळे चाऱ्याची टंचाई दूर; वाढत्या महागाईच्या काळात म्हैस पालन करणाऱ्या शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च घटणार.
दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १० एप्रिल २०२६
पंचांगआज मीती चैत्र कृष्ण चतुर्थी नंतर पंचमी शके १९४८. चंद्र नक्षत्र अनुराधा. योग व्यतिपात. चंद्र राशी वृश्चिक. भारतीय सौर २० चैत्र शके १९४८. शुक्रवार दिनांक १० एप्रिल २०२६ मुंबईचा सूर्योदय ०६.२५ मुंबईचा चंद्रोदय ११.०२, मुंबईचा सूर्यास्त ०६.५४. मुंबईचा चंद्रास्त ०९.१३, राहू काळ ०७.५९ ते ०९.३२. कालाष्टमी,चांगला दिवस दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)
Satara News : शाहू महाराजांच्या ‘मदारी’ हत्तीची समाधी उपेक्षित; खाजगी बांधकामामुळे अस्तित्व धोक्यात
Satara News : गुरुवार बागेसमोरील खाजगी बांधकामामुळे समाधी परिसराचे नुकसान; तातडीने संवर्धन करण्याची नागरिकांची आग्रही मागणी.
Satara News : सातारा पालिकेचा मोठा ‘गेम’? उच्च न्यायालयाचा आदेशही सात वर्षे फाईलबंद!
Satara News : लघुउद्योगांसाठी दिलेले भूखंड परस्पर विकले; बेकायदेशीर हस्तांतरण आणि पोटभाडेकरूंच्या विळख्यात करंजे एमआयडीसी.
Homemade Body Scrub : उन्हाळ्यात 'हे'घरगुती स्क्रब ठरतील फायदेशीर, त्वचा होईल चमदार
उन्हाळ्यात तीव्र ऊन, आर्द्रतेमुळे चेहरा काळवंडतो. कडक उन्हामध्येही चेहरा फ्रेश राहावा, चेहऱ्यावरची चमक कायम राहावी यासाठी कॉफी स्क्रब हा अतिशय उत्तम पर्याय आहे. प्रदूषण, सूर्यप्रकाश आणि मृत त्वचेच्या पेशींमुळे त्वचा निस्तेज आणि खडबडीत होऊ शकते. कॉफी बॉडी स्क्रबमुळे त्वचा उजळून येईल. हा स्क्रब उन्हाळ्यात खुप फायदेशीर ठरेल.कॉफी आणि नारळ तेलकॉफी आणि नारळ तेलचा स्क्रब हा सर्वात सोप्या आणि प्रभावी स्क्रबपैकी एक असून नारळ तेल त्वचेला खोलवर आर्द्रता देतं आणि कॉफी मृत त्वचेच्या पेशी काढून टाकतं. दोन मोठे चमचे खोबरेल तेलात अर्धा कप कॉफी पावडर मिसळा. हे मिश्रण हळुवारपणे संपूर्ण शरीरावर चोळा. हा स्क्रब कोरड्या त्वचेला आराम देतो आणि त्वचेला मऊ बनवण्यास उपयुक्त ठरतो.कॉफी आणि ब्राऊन शुगरकॉफी आणि ब्राऊन शुगरचा स्क्रब त्वचेवर मृत पेशींचा थर साचला असेल, तर हा स्क्रब उत्तम आहे. साखरेचे कण त्वचेला खोलवर स्वच्छ करतात, ज्यामुळे त्वचा ताजीतवानी आणि तेजस्वी दिसते. हे स्क्रब तयार करण्यासाठी समान प्रमाणात कॉफी आणि ब्राऊन शुगर घेऊन त्यात थोडं ऑलिव्ह ऑइल घाला.कॉफी आणि मधकॉफी आणि मधाचा स्क्रब मधात बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म असतात, यामुळे त्वचेला आर्द्रता मिळते आणि डाग कमी करण्यास मदत होते. त्वचेचा रंग एकसमान करण्यासाठी आणि नैसर्गिक चमक आणण्यासाठी हा स्क्रब उत्तम आहे. २ चमचे कॉफी पावडरमधे एक चमचा मध आणि थोडं गुलाबजल मिसळून हे स्क्रब तयार करा.कॉफी आणि दहीकॉफी आणि दही हा स्क्रब उन्हामुळे त्वचा काळवंडली असेल, तर उत्कृष्ट ठरेल. दही आणि कॉफीचं मिश्रण खूप प्रभावी ठरतं. दह्यातील लॅक्टिक ॲसिड काळवंडलेपणा दूर करतं, तर कॉफीमुळे त्वचा ताजीतवानी वाटते. अर्धा कप दह्यामधे ३ चमचे कॉफी पावडर मिसळा. हे मिश्रण शरीरावर लावून, दहा - पंधरा मिनिटं तसेच राहू द्या आणि नंतर स्क्रब करून काढून टाका.कॉफी आणि दालचिनीकॉफी आणि दालचिनीचा स्क्रब कॉफी आणि दालचिनीचं मिश्रण शरीराच्या ज्या भागांवर अतिरिक्त चरबी किंवा सेल्युलाईट आहे, त्यांच्यासाठी उत्तम आहे. हे मिश्रण बनवण्यासाठी, अर्धा चमचा दालचिनी पावडर आणि थोडं बदामाचं तेल कॉफीत मिसळा.स्क्रबिंग करताना नेहमी गोलाकार पद्धतीनं हळुवारपणे स्क्रब करा. बॉडी स्क्रब आठवड्यातून फक्त एकदा किंवा दोनदाच वापरा. अतिवापरामुळे त्वचा सोलली जाऊ शकते. मॉइश्चरायझर म्हणून स्क्रबिंगनंतर लोशन किंवा बॉडी बटर लावा. कोणतीही एलर्जी असल्यास योग्य ती काळजी घ्यावी.
Ajinkya Rahane Six : केकेआर विरुद्ध एलएसजी सामन्यात अजिंक्य रहाणेने मारलेल्या षटकाराची सर्वत्र चर्चा होत आहे.
Silver Motors Nissan: पुणे कॅम्पमध्ये ‘सिल्व्हर मोटर्स निसान’च्या नव्या भव्य शोरूमचे उद्घाटन
Silver Motors Nissan: ‘सिल्व्हर जुबिली ग्रुप’च्या सातत्यपूर्ण प्रगतीतील आणखी एक उल्लेखनीय कामगिरी
Finn Allen Controversial Catch : फिन ॲलनच्या विकेटवरून सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली असून त्याच्या कॅचचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत.
Sanjay Raut : “एफआयआर दाखल करून घेण्याची संधी होती”; काँग्रेस निर्णयावर संजय राऊतांचे विधान
एफआयआर दाखल झाल्यास आपण बारामती पोटनिवडणुकीच्या शर्यतीतून माघार घेऊ, असे काँग्रेसने यापूर्वीच स्पष्ट केले होते.
Police Suspended : वाघोली पोलीस स्टेशनच्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन
Police Suspended: पोलीस हवालदार किरण अब्दागिरे, पोलीस शिपाई गणेश खाडे आणि किरण कांबळे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. परिमंडळ सातचे पोलीस उपायुक्त सोमय मुंडे यांनी त्यांच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत.
BMC : स्वच्छतेबाबत महापालिकेचा वॉर रुम; महापालिका आयुक्तांनी दिले निर्देश
मुंबई (विशेष प्रतिनिधी)मुंबईत स्वच्छतेसंदर्भातील कामकाज प्रभावीपणे होत असल्याचे सुनिश्चित करण्यासाठी मध्यवर्ती नियंत्रण कक्ष (वॉर रुम) स्थापन करावे. तसेच, स्थानिक स्तरावर योग्यप्रकारे स्वच्छता होत असल्याची खात्री करण्यासाठी संबंधित प्रशासकीय विभागांच्या सहायक आयुक्तांनी नियमितपणे क्षेत्र भेटी द्याव्यात, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी दिले आहेत.घनकचरा व्यवस्थापन विभागाचे विविध प्रकल्प, उपक्रम आणि कामकाजाचा आढावा महानगरपालिका मुख्यालयात आयोजित बैठकीत गुरुवारी ०९ एप्रिल २०२६ रोजी घेण्यात आला. यावेळी उप आयुक्त (महानगरपालिका आयुक्त कार्यालय) प्रशांत गायकवाड, उप आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर, संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे पुढे म्हणाल्या, स्वच्छता ही नियमित प्रक्रिया आहे. त्यामुळे, ती नियमितपणे तितक्याच प्रभावीपणे होणे आवश्यक आहे. मुंबईतील सागरी किनारी रस्ता, महामार्गांवर सूक्ष्म पद्धतीने स्वच्छता व्हायला हवी. रस्त्यांवर वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे, याठिकाणी यांत्रिकी पद्धतीने स्वच्छता करण्यासाठी स्वतंत्र वाहने हवीत. या मार्गांवर स्वच्छतेसाठी आवश्यक असणाऱ्या विविध बाबी अंतर्भूत असणारी विशेष वाहने (कस्टमाईज्ड व्हेईकल) तयार करण्यासाठी उत्तम संस्थांची मदत घ्यावी. काही वर्दळीची ठिकाणे स्वच्छतेच्या दृष्टीने उत्तम बनवावीत आणि मग तिथे तशीच स्वच्छता कायम राहील, यासाठी नागरिकांना जागरुक करावे, असेही त्यांनी सांगितले.दरम्यान, मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा विभाग अंतर्गत कचरा संकलनासाठी आणलेल्या अद्ययावत वाहनांपैकी दहा टक्के वाहने ही इलेक्टॉनिक (ई-व्हेईकल) आहेत. घनकचरा संकलनाच्या कामासाठी मोठ्या क्षमतेची इतक्या मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक वाहने वापरणारी महानगरपालिका ही देशातील पहिलीच महानगरपालिका आहे, असेही आश्विनी भिडे यांनी यावेळी सांगितले. तसेच, स्वच्छतेप्रती नागरिकांचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी महानगरपालिकेकडून आयोजित ‘मुंबई क्लीन लीग’ या स्पर्धेत नागरिक तसेच आस्थापनांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.यावेळी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे विविध प्रकल्प, उपकरण, कामकाज आदींबाबत उप आयुक्त श्री. किरण दिघावकर यांनी सविस्तर सादरीकरण केले. यावेळी ते म्हणाले की, सध्या महानगरपालिकेच्या वतीने मुंबईतून सुमारे ७२०० मेट्रिक टन घनकचरा संकलित करून त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली जाते. संपूर्ण मुंबईत उत्तमप्रकारे स्वच्छता राखण्यासाठी सेवा आधारित (सर्व्हिस बेस्ड) कंत्राट पद्धती अवलंबण्यात आली आहे. तसेच, घनकचरा संकलन व वहनाच्या अनुषंगाने नवीन वाहने आणली आहेत. पूर्वी यासाठी १ हजार १९६ वाहने कार्यरत होती. पण, नव्याने आलेल्या वाहनांमध्ये क्षमतावृद्धी केल्याने आता या वाहनांची सख्या ९८८ वर आली आहे. तसेच, त्यांची रंगसंगतीही बदलण्यात आली आहे. मुंबईत ४६ ठिकाणी सुका कचरा विलगीकरण केंद्र आहेत. तर, ९४ वाहने यासाठी पूर्णवेळ कार्यरत आहेत. घरगुती काळजीयोग्य कचरा (डोमेस्टिक सॅनिटरी वेस्ट) संकलनासाठी महानगरपालिकेकडून विशेष सेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेचा लाभ अनेक आस्थापनांकडून प्रभावीपीणे घेतला जात आहे, अशी माहितीही दिघावकर यांनी दिली.
अमेरिका आणि इराण (Iran-US-Israel War) यांच्यात दोन आठवड्यांच्या युद्धविरामानंतर इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी त्यांच्या पहिल्या माध्यमांशी संवादात सांगितले की हा युद्धविराम अद्याप अत्यंत नाजूक स्थितीत आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत संकेत दिला की हा संघर्षाचा “अंत नाही” आणि जर इस्त्रायलची निश्चित उद्दिष्टे पूर्ण झाली नाहीत, तर इस्त्रायल पुन्हा कधीही लष्करी कारवाई सुरू करू शकतो.पंतप्रधान नेतन्याहू म्हणाले, “आमची बोट ट्रिगरवरच आहे आणि गरज पडल्यास आम्ही कोणत्याही क्षणी पुन्हा युद्धात (Iran-US-Israel War) उतरायला पूर्णपणे तयार आहोत.” त्यांनी यावरही भर दिला की युद्धविरामाचा करार इस्त्रायलच्या पूर्ण सहकार्यानेच झाला असून, इस्त्रायलला शेवटच्या क्षणी याची माहिती देण्यात आली होती हा दावा त्यांनी फेटाळून लावला.https://prahaar.in/2026/04/09/green-asha-indian-ship-indian-ship-green-asha-arrives-in-mumbai-in-the-wake-of-iran-war/पंतप्रधानांनी स्पष्ट केले की इराणसोबत झालेला हा तात्पुरता करार हिजबुल्लाहवर लागू होत नाही. त्यांनी इशारा देत सांगितले की तेहरानसोबत शत्रुत्वात तात्पुरती विश्रांती असली तरी इस्त्रायली सैन्य हिजबुल्लाहवरील (Iran-US-Israel War) हल्ले सुरूच ठेवेल.दरम्यान, लेबनानमधील मानवीय संकट अधिकच गंभीर होत चालले आहे. लेबनानच्या (Iran-US-Israel War) नागरी संरक्षण विभागाने बुधवारी दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण लेबनानमध्ये झालेल्या इस्त्रायली हल्ल्यांमध्ये मृतांचा आकडा वाढून २५४ वर पोहोचला आहे. युद्धविराम करार असूनही सुरू असलेल्या इस्त्रायली कारवायांची तीव्रता या आकड्यांमधून स्पष्ट होत आहे.
Strait of Hormuz: युद्धाच्या सुरुवातीला अमेरिकेचे लक्ष्य इराणमधील सत्तापालट आणि लष्करी तळांना उद्ध्वस्त करणे हे होते. इराणने सुरुवातीला ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी प्रत्युत्तर दिले, मात्र खरा 'मास्टरस्ट्रोक...
Gas Cylinder : देशाची ऊर्जा साखळी मजबूत.! १५ हजार टन एलपीजी घेऊन जहाज मुंबईत दाखल
गुरुवारी, ९ एप्रिल २०२६ ला १५,४०० टन एलपीजी घेऊन ग्रीन आशा हे भारतीय जहाज यशस्वीरित्या नवी मुंबईतील जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणात दाखल झाले.
- गारगाई पाणी प्रकल्पाला महापालिकेची मंजुरी, बहुमताच्या जोरावर प्रस्ताव मंजूरमुंबई (विशेष प्रतिनिधी)मुंबईकरांना सध्या पाण्याची समस्या भेडसावत असून मागणी आणि तफावत यामध्ये सुमारे ६०० दशलक्ष लिटर पाण्याची कमतरता आहे. त्यामुळे मुंबईची पाण्याची गरज भागवण्यासाठी गारगाई पाणी प्रकल्पाला गती देताना स्थायी समितीमध्ये मंजुरी दिल्यानंतर गुरुवारी महापालिका सभागृहातही मंजुरी देण्यात आली आहे. मात्र, गारगाई पाणी प्रकल्पाच्या प्रस्तावाला उबाठाने विरोध केला असून महायुतीने बहुमताच्या जोरावर याप्रकल्पाला मंजुरी दिली. त्यामुळे समुद्राच्या पाण्याचे गोडे करण्याच्या प्रकल्प कामाला गती देतानाच गारगाई पाणी प्रकल्पालाही गती देण्याचा प्रयत्न होत असताना उबाठाने गारगाईला विरोध करत एकप्रकारे मुंबईकरांना अतिरिक्त ४४० दशलक्ष लिटर पाणी मिळवून द्यायचे नाही अशी भूमिका घेतल्याचे स्पष्ट दिसून आले.गारगाई पाणी प्रकल्पाला मंजुरी देण्याचा प्रस्ताव महापालिका सभागृहात आला असता उबाठाचे यशोधर फणसे यांनी समुद्राचे पाणी गोडे करण्याच्या प्रकल्पाला महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण यांची मंजुरी मिळाली आहे आणि आता केंद्र सरकारची मंजुरी बाकी आहे. त्यामुळे या प्रकल्प कामाला सुरुवात होणार असल्याचे सांगत हा प्रकल्प सहा वर्षांमध्ये पूर्ण होणार आहे. त्यामुळे या प्रकल्पातून पाणी मिळणार असेल गारगाई पाणी प्रकल्पाची गरज का असा सवाल तर गारगाईच्या मंजुरीचा प्रस्ताव फेरविचारासाठी पाठवण्याची मागणी फणसे यांनी केली. या प्रकल्पात तीन लाख झाडे कापण्यात येणार असल्यामुळे याला आमचा विरोध असल्याचेही फणसे यांनी सांगितले. याला काँग्रेसचे अश्रफ आझमी यांनी समर्थन दिले. तर भाजपचे प्रविण छेडा यांनी हा प्रस्ताव उबाठा शिवसेनेची सत्ता असतानाच २०१९मध्ये आणला गेला होता आणि त्यावेळी महापौर आपलाच होता असा सवाल उबाठाला करत झाडे कापली नाही तर पुनर्रोपित केली जाणार आहेत तर प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करताना ५ पट नुकसान भरपाई दिली जाणार आहे,असे सांगितले. तर भाजपचे नवनाथ बन यांनी मुंबईकरांची पाण्याची भविष्यातील गरज ओळखून जर आपण याला मंजुरी दिली नाही तर भावी पिढी आपल्याला माफ करणार नाही असे सांगितले. तर उबाठाच्या विशाखा राऊत यांनी मलजल प्रक्रिया केंद्रातून १२०० दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होणार असून त्यासाठी स्वतंत्र जलवाहिनी टाकली गेली आहे का असा सवाल केला.तर भाजपचे प्रकाश दरेकर यांनी मुंबईतील पाण्याची तफावत भरुन काढण्यासाठी या गारगाई पाणी प्रकल्पाची गरज असून जर पाण्याचा प्रश्न आपण सोडवू शकलो नाही तर भविष्यात पाण्यावरुन युध्द होण्याची भीती वर्तवली. तर उबाठाचे सचिन पडवळ यांनी फणसे यांच्या मागणीला पाठिंबा देताना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या व्यासपीठावरील फलकाचे फोटो झळकावत आम्ही विरोधाला विरोध करणार नाही असे सांगितले. तर विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी गारगाई प्रकल्प नकोच असे नाही, पण पर्यावरणाचा विचार व्हायला हवा. एप्रिलपासून या कामाला सुरुवात होणार असून तेथील कुटुंबाच्या पुनर्वसनाच्या मुद्दयावर आमचा विरोध आहे. त्यातुलनेत समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्प पूर्ण करू शकतो असे सांगत गारगाई प्रकल्प दप्तरी दाखल करण्याची मागणी केली. याचा समाचार सभागृहनेते गणेश खणकर यांनी उबाठाच्या मागणीचा विरोध करत मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी सध्याचा पाणी साठा अपुरा असल्यामुळे गारगाई पाणी प्रकल्पाची गरज आहे. त्यामुळे पाण्याच्या मुद्दयावरुन राजकारण न करता गारगाई पाणी प्रकल्पाला गती देतानाच आवश्यकतेनुसार समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू.हा प्रकल्प कुणी आणला यापेक्षा मुंबईकरांना अधिक पाणी कसे मिळेल हे पाहणे आवश्यक आहे. त्यादृष्टीकोनातून यासाठीच्या पुढील परवानगी आणण्याचा प्रयत्न केला जाईल असे सांगण्याचा प्रयत्न केला.यावर महापौर रितू तावडे यांनी उपसूचना मताला टाकून बहुमताच्या आधारे फेटाळून लावली आणि त्यानंतर मूळ प्रस्तावही बहुमताच्या आधारे मंजूर केला. यामध्ये उबाठासह काँग्रेस आणि इतर पक्षांच्या ८८ नगरसेवकांनी याला विरोध केला. तर भाजप आणि शिवसेनेच्या १०२ नगरसेवकांनी याला पाठिंबा दिल्यामुळे बहुमताच्या आधारे याला मंजुरी दिली. ही उपसूचना मंजुरीला टाकताना महापौरांनी अनुकूल प्रतिकूल म्हटल्यानंतर पोलची मागणी करण्याऐवजी आधीपासून ही मागणी केल्यामुळे महापौरांनी नियमांवर बोट दाखवून त्यांची पोलची मागणीही फेटाळून लावली.महापौरांनी अशाप्रकारे केला विरोधकांचा गेमपोलची मागणी मान्य केल्यामुळे उबाठा काँग्रेसचे सर्व नगरसेवक आक्रमक झाले. पण त्याचवेळी महापौरांनी विरोधी पक्षनेत्यांना निवेदन करण्यासाठी नाव पुकारले. त्यावर विरोधी पक्षनेत्या निवेदन मांडण्याच्या तयारीत होत्या, तर दुसरीकडे उबाठाचे नगरसेवक हे सभात्याग करावा अशी सूचना करत विरोधी पक्षांना निवेदन करू नये असे सांगत होते. त्यामुळे काहीशा त्रासिक होत विरोधी पक्षनेत्यांनी मान्सूनपूर्व कामांच्या तयारीचे निवेदन मांडण्यास सुरुवात केली आणि उबाठाच्या नगरसेवकांना सभात्याग करण्याऐवजी सभागृहात बसून त्यावर चर्चेत भाग घ्यावा लागला. त्यामुळे निवेदनाच्या मुद्दयावरून महापौरांनी उबाठाचे मनसुबेच उधळवून लावले.
Saudi and Iran : शस्त्रसंधीनंतर सौदी आणि इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये महत्त्वाची चर्चा
इराण, इस्रायल आणि अमेरिका (Iran-US-Israel War) यांच्यात पाकिस्तानमध्ये होणाऱ्या निर्णायक शांतता चर्चेपूर्वीच सौदी अरेबिया आणि तेहरान (Saudi and Iran) यांच्यातील संबंध पुन्हा जवळ येताना दिसत आहेत. यावरून खाडी प्रदेशात आता गोळीबाराऐवजी संवादाचा मार्ग स्वीकारला जाण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.माहितीनुसार, सौदी अरेबियाचे परराष्ट्रमंत्री प्रिन्स फैसल बिन फरहान आणि इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची (Saudi and Iran) यांच्यात दूरध्वनीवर सविस्तर चर्चा झाली. या चर्चेत दोन्ही नेत्यांनी खाडीतील तणाव कमी करण्यासोबतच प्रादेशिक स्थैर्य प्रस्थापित करण्यावर भर दिला. पश्चिम आशियात तणाव वाढल्यानंतर दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये झालेली ही पहिलीच चर्चा आहे. ही चर्चा अशा वेळी झाली आहे, जेव्हा लेबनॉनवरील इस्रायली हल्ल्यांमुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने होर्मुज सामुद्रधुनीभोवती घेराबंदी करत जागतिक व्यापारालाच धोका निर्माण केला आहे.दरम्यान, अनेक वर्षांपासून इराण आणि सौदी अरेबिया (Saudi and Iran) यांच्यात तणावपूर्ण संबंध होते. अमेरिकेच्या लष्करी कारवाईनंतर इराणने सौदी अरेबिया, कतार आणि यूएईसारख्या देशांनाही थेट लक्ष्य केले होते. सौदी अरेबियातील तेल प्रकल्पांवरही हल्ले झाले होते. मात्र आता इराणला आपल्या शेजारी देशांशी समन्वय साधण्याची गरज असल्याची जाणीव झाल्याचे दिसत आहे.
मंत्रालय परिसरात उभारण्यात येत असलेल्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाचा सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज सविस्तर आढावा घेतला. या बैठकीत बांधकामाची सद्यस्थिती, कामाची गती, गुणवत्ता नियंत्रण, सुरक्षितता उपाययोजना तसेच नियोजित वेळापत्रकानुसार काम पूर्ण करण्याबाबत त्यांनी संबंधितांना निर्देश दिले.यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (बांधकामे) आबासाहेब नागरगोजे, मुंबई प्रादेशिक विभागाच्या मुख्य अभियंता प्रज्ञा वाळके, अधिक्षक अभियंता बडे, यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी, अभियंते व कंत्राटदार उपस्थित होते.यावेळी मंत्री भोसले यांनी इमारतीचे बांधकाम अत्याधुनिक तांत्रिक निकषांनुसार व दर्जेदार साहित्य वापरून करण्यात यावे, असे स्पष्ट निर्देश दिले. शासनाच्या वाढत्या प्रशासकीय गरजा लक्षात घेता ही इमारत भविष्योन्मुख संकल्पनेतून उभारण्यात येत असून विविध विभागांचे कामकाज एकाच छताखाली अधिक कार्यक्षम पद्धतीने होण्यासाठी याचा मोठा फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.इमारतीत प्रशस्त कार्यालयीन जागा, अत्याधुनिक सभागृहे, डिजिटल पायाभूत सुविधा, स्वच्छतागृह, ऊर्जा बचत प्रणाली, अग्निसुरक्षा व्यवस्था तसेच पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात येणार आहे. यामुळे मंत्रालयातील कामकाज अधिक गतिमान होऊन अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी सुसज्ज कार्यपरिसर उपलब्ध होणार आहे. तसेच नागरिकांना विविध विभागांशी संबंधित कामांसाठी अधिक सुटसुटीत व जलद सेवा मिळण्यास मदत होईल, असेही मंत्री भोसले यांनी नमूद केले.बांधकाम करताना सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करावे, कामाच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड करू नये तसेच कामाची नियमित पाहणी करून टप्प्याटप्प्याने प्रगती अहवाल सादर करावा, असे निर्देशही त्यांनी दिले. काम वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ व यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्यावर भर द्यावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.मंत्रालय परिसरातील वाढत्या प्रशासकीय गरजांची पूर्तता करण्याबरोबरच ही नवीन इमारत राज्याच्या प्रशासकीय कार्यक्षमतेत भर घालणारी ठरेल. इमारत तयार झाल्यानंतर काही कार्यालये येथे स्थलांतरीत करण्यात येणार आहेत. यामुळे सध्या मंत्रालयातील मुख्य तसेच विस्तार इमारती मधील गर्दी कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केला.
Jayakumar Rawal : कांदा प्रक्रिया उद्योगांना चालना देणार; मंत्री जयकुमार रावल यांची माहीती
Jayakumar Rawal, जयकुमार रावल, कांदा, Onion, शेतकरी, Farmer, महाराष्ट्र, Maharashtra
मुंबई : विधिमंडळातील युवा सदस्यांनी आपल्या मतदारसंघाच्या विकासाबरोबरच शिक्षण, रोजगार, कौशल्य विकास, तंत्रज्ञान आणि उद्योजकता यांसारख्या व्यापक विषयांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा सायन्स आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करून प्रशासन अधिक पारदर्शक आणि गतिमान करण्यासाठी पुढाकार घेण्यात यावा, असे आवाहन महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी केले.राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या महाराष्ट्र - गोवा – गुजरात या विभाग – ७ च्या पणजी येथे आयोजित वार्षिक परिषदेमध्ये विकसित भारत – २०२७ चे उद्दीष्ट साध्य करतांना विधिमंडळातील युवा सदस्यांची भूमिका या विषयावर ते बोलत होते. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक ९ व १० एप्रिल, २०२६ रोजी ही परिषद पणजी येथे आयोजित करण्यात आली असून त्यास राज्यसभेचे उप सभापती हरिवंश सिंह, महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधानपरिषदेच्या उप सभापती नीलम गोऱ्हे, महाराष्ट्रासह राज्यविधानमंडळांचे सदस्य उपस्थित आहेत. गोवा विधानसभेचे अध्यक्ष डॉ. गणेश गावकर आणि गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही या परिषदेत आपले महत्वपूर्ण विचार मांडले.महाराष्ट्र विधानसभा अण्णा बनसोडे यावेळी बोलतांना पुढे म्हणाले -भारत हा जगात तरुणांची सर्वाधिक संख्या असलेला देश आहे. लोकशाही प्रक्रियेत युवा आमदारांचा वाढता सहभाग ही सकारात्मक बाब आहे. तरुण सदस्यांनी सभागृहात सातत्याने उपस्थित राहणे आवश्यक आहे. महाराष्ट्राचे दिवंगत माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची एक आठवण मला इथे सांगावीशी वाटते. सभागृहात नवीन आलेल्या सदस्यांनी सभागृहाची बैठक सुरू झाल्यापासून ती संपेपर्यंत संपूर्ण दिवस सभागृहात उपस्थित रहायला हवे, असा त्यांचा नेहमी आग्रह असे. इतकेच नव्हे, तर ते स्वतः संपूर्ण वेळ सभागृहात उपस्थित राहात असत. असे केल्याने राज्यातील सर्व प्रश्नांची माहिती होते आणि त्या माध्यमातून राज्यातील सर्वसामान्य जनतेचे, नव्या पिढीचे, युवकांचे प्रश्न सोडवता येऊ शकतात, अशी त्यामागे त्यांची भूमिका असे. विकसीत भारताचा संकल्प पूर्ण करण्याकरिता नव्या पिढीतील आमदारांच्या भूमिकेचा विचार करताना एका अनुभवसंपन्न नेत्याच्या या विचारांचे अनुसरण करण्याचा प्रयत्न नव्या सदस्यांनी करायला हवा, असे मला वाटते. शिक्षण आणि कौशल्य विकास हा विकसित भारताचा पाया असल्याचे नमूद करत, शाळा, महाविद्यालये आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी युवा लोकप्रतिनिधींनी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन त्यांनी केले.पर्यावरण संवर्धनाच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी शाश्वत विकासाची गरज अधोरेखित केली. हरित ऊर्जा, जलसंधारण आणि प्रदूषणमुक्त विकास यावर भर देत पुढील पिढ्यांसाठी सुरक्षित भविष्य घडवण्यासाठीची आवश्यकता असल्याचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी स्पष्ट केले.
Laura Cardoso Record : बीसीए कालाहारी महिला टी-२०' स्पर्धेत एका महिला गोलंदाजाने चक्क ९ बळी घेत जागतिक विक्रमाला गवसणी घातली आहे.
मुंबई : राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा दरातील चढ-उतारांपासून संरक्षण मिळून स्पर्धात्मक दर मिळावा, सोबतच सामान्य ग्राहकांचे हितही जपले जावे, यासाठी कांद्यावर प्रक्रिया उद्योगास चालना देण्यावर भर देण्यास शासन कटीबद्ध असल्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत मंत्री रावल यांनी कांदा प्रक्रिया व साठवणुकीच्या उपाययोजनांवर सविस्तर चर्चा केली. या बैठकीस महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे सरव्यवस्थापक तथा महाराष्ट्र अॅग्रीबिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्पाचे संचालक विनायक कोकरे, अतिरिक्त प्रकल्प संचालक डॉ.अमोल यादव, मे. एस-४-एस टेक्नॉलॉजीजचे प्रतिनिधी अश्विन पावडे, मॅग्नेटचे प्रकल्प उपसंचालक संजय पिंगट आदी उपस्थित होते.मंत्री रावल म्हणाले की, महाराष्ट्र हे देशातील प्रमुख कांदा उत्पादक राज्य असून दरवर्षी मोठ्या प्रमाणावर कांदा उत्पादन होते. सुमारे ७० टक्के कांदा देशांतर्गत वापरला जातो, तर उर्वरित ३० टक्के उत्पादन अतिरिक्त असते. या अतिरिक्त उत्पादनावर प्रक्रिया करून मूल्यवर्धन करणे अत्यावश्यक आहे. कांद्यावर प्रक्रिया करणारे प्रक्रिया उद्योग उभे राहिले पाहिजे. त्यामुळे उत्पादन कितीही वाढले तरी प्रक्रिया करून कांदा पावडर व चिप्स तयार करता येईल. तयार केलेल्या पदार्थांची विक्री टप्प्याटप्प्याने देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारात करता येईल. तसेच या प्रक्रियेत महिला बचतगटांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या.शासनासाठी शेतकरीहित सर्वतोपरी आहे. त्यामुळे महाराष्ट्रात अशा प्रकारचे प्रक्रिया उद्योग उभारल्यास शेतकऱ्यांचे हित तर जपलेच जाईल, शिवाय स्थानिक रोजगारनिर्मिती होईल आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालनाही मिळेल, असा विश्वास मंत्री रावल यांनी व्यक्त केला.राज्यात मोठ्या प्रमाणावर कांदा उत्पादन होत असून, उत्पादन जास्त झाल्यास भाव घसरतात आणि शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागतो. दुसरीकडे भाव वाढल्यास ग्राहकांमध्ये नाराजी निर्माण होते. यातून मार्ग काढण्यासाठी प्रक्रिया उद्योग उभारणे हा प्रभावी पर्याय असल्याचे मंत्री रावल यांनी स्पष्ट केले.मे. एस-४-एस टेक्नॉलॉजीजच्या वतीने यावेळी प्रकल्पाची तांत्रिक माहिती सादर करण्यात आली. प्रस्तावित प्रकल्प हा कमाल क्षमतेचा असावा, जेणेकरून जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा लाभ घेता येईल. सौर उर्जेवर चालणारे तंत्रज्ञान स्वीकारल्यास ते अधिक उपयुक्त ठरेल. त्याअनुषंगाने सर्वसमावेशक आराखडा सादर करण्याच्या सूचना मंत्री रावल यांनी यावेळी केल्या.००००
मुंबई : मुंबईची नवी जीवनवाहिनी ठरणाऱ्या मेट्रो-३ म्हणजेच ‘अॅक्वा लाईन’ने मुंबईकर विद्यार्थी आणि पर्यटकांना एक मोठे गिफ्ट दिले आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (MMRC) प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ आणि खिशाला परवडणारा करण्यासाठी विशेष सवलतीच्या पासची घोषणा केली आहे. 'डिजिटल मोबिलिटी'ला चालना देण्यासाठी हे सर्व पास नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) वर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.विद्यार्थ्यांच्या प्रवासाचा खर्च आता २५ टक्क्यांनी कमी!शाळा-महाविद्यालयाला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मेट्रोने मोठा आधार दिला आहे. इयत्ता १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी खालीलप्रमाणे सवलत लागू असेल४५ आणि ६० ट्रिप पासवर २५% थेट सवलतवैधता: ३० दिवस.यामुळे विद्यार्थ्यांचा दरमहा प्रवासाचा खर्च लक्षणीयरीत्या कमी होणार असून सुरक्षित आणि वातानुकूलित प्रवासाची खात्री मिळणार आहे.पर्यटकांच्या सेवेसाठी ‘अनलिमिटेड’ मेट्रो राईडमुंबई फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यकांसाठी मेट्रोने खास 'टुरिस्ट पास' सादर केले आहेत. एकदा पास काढला की कितीही वेळा प्रवास करण्याची मुभा मिळणार आहे:१ दिवसाचा पास (अमर्यादित प्रवास): फक्त ₹२८०३ दिवसांचा पास (अमर्यादित प्रवास): फक्त ₹७००दिव्यांग आणि नियमित प्रवाशांनाही लाभकेवळ विद्यार्थीच नव्हे, तर दिव्यांग प्रवाशांनाही ४५ आणि ६० ट्रिप पासवर २५% सवलत कायम ठेवण्यात आली आहे. तसेच, नियमित नोकरदार वर्गासाठी MetroConnect3 अॅपवर ४५ ट्रिपसाठी १०% आणि ६० ट्रिपसाठी १५% सवलत आता NCMC कार्डच्या माध्यमातून घेता येईल.
Gold Silver Price : युध्दविरामाच्या अवघ्या २४ तासांतच सोन्या - चांदीच्या दारात मोठी घसरण
सोन्या-चांदीच्या दरात आज पुन्हा एकदा मोठी घसरण नोंदवली गेल्याने सराफा बाजारात आश्चर्याचे वातावरण निर्माण झाले आहे. काल अमेरिकेकडून शस्त्रसंधीची घोषणा झाल्यानंतर सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली होती. मात्र अवघ्या २४ तासांतच दरात झालेल्या या घसरणीमुळे बाजारातील अनिश्चितता पुन्हा वाढली आहे.आजच्या व्यवहारात सोन्याच्या दरात सुमारे २,१०० रुपयांची घट झाली आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,५१,४८० रुपयांवर आला आहे. तसेच ८ ग्रॅम सोन्याचा दर १,८७२ रुपयांनी घसरून १,२१,१८४ रुपयांवर पोहोचला आहे. २२ कॅरेट सोन्याच्या दरातही २,१५० रुपयांची घसरण झाली असून तो १,३८,८५० रुपयांवर आला आहे. तर १८ कॅरेट सोन्याचा दर १,७६० रुपयांनी कमी होऊन १,३६,६१० रुपयांवर स्थिरावला आहे.सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही मोठी घसरण पाहायला मिळाली. चांदीच्या दरात तब्बल ७,००० रुपयांची घट झाली असून, सध्या एक किलो चांदीचा दर २,५५,००० रुपयांवर आला आहे. दरातील या अचानक बदलामुळे गुंतवणूकदार आणि व्यापाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.तज्ज्ञांच्या मते, काल दरात झालेल्या मोठ्या वाढीनंतर गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात नफा वसुली केली, ज्यामुळे आज दरांवर दबाव आला. तसेच शस्त्रसंधीची घोषणा झाल्यानंतरही इराणकडून सावध भूमिका घेतली जात असल्याने जागतिक पातळीवर अनिश्चितता कायम आहे.जागतिक घडामोडी, गुंतवणूकदारांची बदलती भूमिका आणि बाजारातील अस्थिरता यामुळे सोन्या-चांदीच्या दरात सध्या मोठे चढ-उतार सुरू आहेत. येत्या काही दिवसांतही हा कल कायम राहण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
CD Gopinath Death : भारताचे सर्वात ज्येष्ठ कसोटी क्रिकेटपटू सी.डी. गोपीनाथ यांचे वयाच्या ९६ व्या वर्षी निधन झाले आहे.
नीला या रोबोटची नियुक्ती केवळ प्रदर्शनासाठी नसून, मतदारांना प्रत्यक्ष मदत करण्यासाठी करण्यात आली होती.
Assembly Elections 2026: मतदानाचा विक्रम मोडला! आसाम 85% पार, पुदुच्चेरीत 89% तर केरळही मागे नाही
Assembly Elections 2026: आसाममध्ये सर्व 126 विधानसभा मतदारसंघांमध्ये सायंकाळी ६ वाजेपर्यंत 85.04 टक्के मतदान झाले. हे प्रमाण 2021 मधील 82.04 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. राज्यात भाजप-आघाडी (NDA) सलग तिसऱ्या कार्यकाळासाठी प्रयत्न करत आहे, तर काँग्रेस सत्तेत पुनरागमनासाठी प्रयत्नशील आहे.
मुंबई : यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यात औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी केळापूर तालुक्यातील मौजे घोंगरी येथील 86.08 हेक्टर शासकीय जमिनीवर नवीन औद्योगिक क्षेत्र स्थापन करण्याच्या प्रस्तावाला गती देण्यात येईल, असे उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत यांनी सांगितले.उद्योगमंत्री डॉ.सामंत यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. बैठकीस मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड तसेच एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत म्हणाले या प्रस्तावित क्षेत्राची प्राथमिक स्थळ पाहणी 26 डिसेंबर 2023 रोजी करण्यात आली होती. त्यानंतर उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील भूमी निवड समितीमार्फत 19 ऑगस्ट 2024 रोजी सविस्तर स्थळपाहणी करण्यात आली. त्यानंतर 86.08 हेक्टर ई-श्रेणी शासकीय जमीन औद्योगिक क्षेत्रासाठी योग्य असल्याचे निष्पन्न झाले.स्थानिक उद्योजकांकडून औपचारिक मागणी प्राप्त झालेली नसली तरी पांढरकवडा परिसरात औद्योगिक क्षेत्राची आवश्यकता आहे. या अनुषंगाने संबंधित जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ कडे विनामूल्य हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव आहे. तसेच प्रस्तावित औद्योगिक क्षेत्रासाठी पांढरकवडा–आदिलाबाद राष्ट्रीय महामार्ग क्र. 44 पर्यंत जोडरस्ता विकसित करण्याची आवश्यकता आहे.बैठकीत मौजे वटफळी (ता. नेर, जि. यवतमाळ) येथील औद्योगिक क्षेत्रासाठी सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेचाही आढावा घेण्यात आला. भूसंपादन टप्प्याटप्प्याने करण्याच्या सूचना देताना, एकूण 550 एकरपैकी प्रथम 250 एकर आणि त्यानंतर पुढील 250 एकर क्षेत्राचे भूसंपादन करण्याचे निर्देश उद्योग मंत्री डॉ. सामंत यांनी दिले.
Reduce Plastic : तुमचा पहिला टूथब्रश आजही पृथ्वीवर कोठेतरी पडून आहे
प्लास्टिक प्रदूषण कमी करण्यासाठी प्रत्येक घटकाला योगदान द्यावे लागेल: राज्यपाल जिष्णु देव वर्मादेशात दरवर्षी ३४ लाख टन प्लास्टिक कचरा तयार होत आहे. यापैकी ४० टक्के प्लास्टिक अंतिमतः नदी, नाले व भूगर्भात जात आहे. नद्या व समुद्रात प्लास्टिक गेल्यामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होत आहे. प्लास्टिक प्रदूषणामुळे मत्यव्यवसाय, पर्यटन व आरोग्याला धोका निर्माण होत आहे. त्यामुळे प्लास्टिकला योग्य पर्याय शोधावा लागेल आणि प्लास्टिक प्रदूषण कमी करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाला योगदान द्यावे लागेल, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आज येथे केले.संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण विभागातर्फे 'प्लास्टिक उत्पादने व प्लास्टिक पॅकेजिंग आवरणांचा पर्यावरणावरील दुष्परिणाम' या विषयावर आयोजित तज्ज्ञांच्या मुंबई येथे झालेल्या चर्चासत्राला राज्यपाल संबोधित करीत होते.स्वच्छ पाणी व स्वच्छ पर्यावरणाशिवाय विकसित भारताचे लक्ष्य गाठता येणार नाही असे सांगून प्लास्टिक पासून पर्यावरणाला होणारा धोका लक्षात घेऊन कॉर्पोरेट, उद्योग, नीती निर्माते या सर्वांना या कार्यात पुढाकार घ्यावा लागेल व त्यासाठी विद्यार्थी, युवक व समाजाच्या इतर सर्व घटकांमध्ये जागरुकता निर्माण करावी लागेल, असे राज्यपालांनी सांगितले.शाश्वततेशिवाय झालेल्या विकासाला 'विकास' म्हणता येणार नाही असे सांगून राज्यपालांनी प्लास्टिक प्रदूषणाच्या गंभीर समस्येवर मात करण्यासाठी शासन, उद्योग जगत आणि नागरिकांना एकत्रितपणे प्रयत्न करण्याचे आवाहन केले.तुम्ही वापरलेला पहिला टूथब्रश आजही भूगर्भात पडून आहे:ईश्वर सर्वव्यापी आहे, तसेच प्लास्टिकही आज सर्वव्यापी झाले असून हिमालयाच्या शिखरापासून समुद्राच्या सखोल भागापर्यंत प्लास्टिक पोहोचले आहे. तुम्ही वापरलेला पहिला टूथब्रश आज देखील जमिनीच्या पोटात कोठेतरी पडून आहे. त्यामुळे प्लास्टिक वस्तू व प्लास्टिक आवरणामुळे होणारे प्रदूषण कमी करणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाचे भारतातील प्रमुख बाळकृष्ण पशुपती यांनी यावेळी केले.रिझर्व्ह बँकेची शाश्वत वित्तपुरवठ्याची योजना असून त्यामाध्यमातून पर्यावरण रक्षणाच्या कार्याला वित्त पुरवठ्याच्या माध्यमातून चालना दिली जात असल्याचे बँकेचे कार्यकारी अध्यक्ष आर केशवन यांनी यावेळी सांगितले.यावेळी राज्यपालांच्या हस्ते ‘वर्क इन प्रोग्रेस: रिड्युसिंग द प्लास्टिक फूटप्रिंट ऑफ प्रॉडक्ट्स अँड पॅकेजिंग’ या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.बैठकीला विविध कॉर्पोरेट कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य शाश्वतता अधिकारी तसेच या क्षेत्रातील तज्ज्ञ उपस्थित होते.
Ai+ Nova Flip 5G: अवघ्या 30 हजार रुपयांत फोल्डेबल मोबाईल भारतात लाॅंच; पहा फिचर्स
Ai+ Nova Flip 5G: परवडणाऱ्या किमतीत फोल्डेबल स्मार्टफोन देत Ai+ ने बाजारात स्पर्धा वाढवण्याचा प्रयत्न केला आहे.
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना लागणार लॉटरी; मंत्री आदिती तटकरेंची मोठी घोषणा
राज्यातील लाखो लाभार्थी महिलांसाठी (Ladki Bahin Yojana) महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे.
TCS Q4FY26 Results: गुरुवारी BSE वर TCS चा शेअर 1.09 टक्क्यांनी वाढून ₹2,587.75 वर बंद झाला. याउलट, प्रमुख निर्देशांकात 1.20 टक्क्यांची घसरण नोंदवली गेली.
All priests will earn the same : मंदिरांतील पुजाऱ्यांचे मानधन एकसमान होणार
राज्य सरकार धोरण ठरवणार; मंत्रालयात झाली विशेष बैठकमुंबई : काही देवस्थानांमध्ये पुजाऱ्यांना नियमित वेतन दिले जाते, तर काही ठिकाणी दक्षिणा स्वरूपात उत्पन्न मिळते. या विविध पद्धती लक्षात घेऊन राज्यभर एकसमान आणि न्याय प्रणाली विकसित करण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. याविषयी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी मंत्रालयात नुकतीच बैठक घेतली. या बैठकीला धर्मादाय आयुक्त एस्. एस्. कलोती यांसह प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.या विषयी अधिक माहिती देतांना राज्यमंत्री आशिष जयस्वाल म्हणाले, सुरक्षा रक्षक, माथाडी कामगार यांना ज्याप्रमाणे स्वतंत्र धोरण तयार करण्यात आले आहे, त्याच धर्तीवर राज्यातील विविध देवस्थानांमध्ये पिढ्यानपिढ्या सेवा देणाऱ्या पारंपरिक पुजारी समाजाच्या हक्कांचे संरक्षण आणि त्यांच्या सन्मानपूर्वक उपजीविकेसाठी राज्यशासन लवकरच सर्वसमावेशक धोरण आणणार आहे. धार्मिक परंपरेचा सन्मान राखत पुजाऱ्यांना स्वतंत्र आणि सुसंगत दर्जा देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.यामध्ये देवस्थानांच्या उत्पन्नाचे पारदर्शक वितरण, पुजाऱ्यांचे मानधन निश्चित करणे, तसेच त्यांच्या पारंपरिक हक्कांचे संरक्षण यांवर विशेष भर दिला जाणार आहे. पारंपरिक पुजारीवर्ग कोणत्याही ठराविक प्रशासकीय चौकटीत बसत नाहीत. त्यांच्या सेवेला ना निश्चित वेतन आहे, ना कायदेशीर संरक्षण आहे. परिणामी अनेक ठिकाणी त्यांना असुरक्षिततेचा सामना करावा लागत आहे. हे लक्षात घेऊन शासन त्यांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी ठोस आणि दीर्घकालीन उपाययोजना करत आहे. पारंपरिक पुजारी, गुरव, तांबोळी आदी सर्व घटकांचा समावेश करून त्यांना सामाजिक आणि आर्थिक संरक्षण देण्याचा शासनाचा व्यापक दृष्टीकोन आहे.’उत्पन्न व्यवस्थापनासाठी स्वतंत्र न्यासदेवस्थानांच्या मालमत्ता, जमीन आणि उत्पन्न यांचे व्यवस्थापन करण्यासाठी स्वतंत्र ट्रस्ट स्थापन करण्याविषयी विचार विनिमय सुरू आहे. मंदिर परिसर, सभा मंडप तसेच इनाम जमिनी यांचा समावेश करून मंदिर व्यवस्थेला कायदेशीरदृष्ट्या बळकट करण्याचा कायदेशीर प्रयत्न चालू आहे. याविषयी सखोल अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. मंदिरांचे प्रकार, विद्यमान कार्यपद्धती आणि न्यायालयीन निर्णय यांचा अभ्यास करून मंदिरांचे ‘अ’, ‘ब’, ‘क’ श्रेणींमध्ये वर्गीकरण करून धोरण निश्चित करण्यात येणार आहे, असे या वेळी आशिष जयस्वाल म्हणाले.
Gahininath fort : गहिनीनाथ गडाच्या विकासासाठी कटिबद्ध - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
लाखो भाविकांच्या उपस्थितीत नारळी सप्ताह भक्तिमय वातावरणात संपन्नबीड : म्हसोबावाडी (ता. आष्टी, जि. बीड) येथे पार पडलेल्या श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाच्या ९४ व्या नारळी सप्ताहाच्या समारोप प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत भावनिक शब्दांत आपली भूमिका मांडली, “मी येथे मुख्यमंत्री म्हणून नाही, तर गहिनीनाथ महाराजांचा अनुयायी म्हणून नतमस्तक होण्यासाठी आलो आहे. गडाच्या विकासासाठी रस्ता असो वा अन्य कोणताही प्रश्न, तो सोडविण्यास मी कटिबद्ध आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.संत वामनभाऊ महाराज यांनी सुरू केलेल्या या परंपरेचा समारोप गुरुवारी (दि. ९) काल्याच्या कीर्तनाने झाला. यावेळी गहिनीनाथ गडाचे विठ्ठल महाराज, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, आमदार सुरेश धस, आमदार धनंजय मुंडे, माजी आमदार भीमराव धोंडे, माजी आमदार साहेबराव दरेकर, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, बाळासाहेब आजबे, प्रताप ढाकणे, सरपंच शिवा शेकडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “संत वामनभाऊ यांनी केलेले कार्य अविस्मरणीय आहे. नाथ संप्रदायात गहिनीनाथांचे महात्म्य मोठे असून, या गडावर प्रत्येक काम अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडते, हे मी प्रत्यक्ष अनुभवले आहे.” विशेष म्हणजे, या नारळी सप्ताहाचे नियोजन २०३९ पर्यंत निश्चित झाले आहेत यातच या भक्तीकार्याचे यश दिसते .समाजाला एकत्र आणण्याचे हे काम अतिशय मोलाचे असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, “गहिनीनाथ गडाचा नारळी सप्ताह कायमस्वरूपी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या यजमानपदाखाली व्हावा व त्यांनी गडाचे पालकत्व घ्यावे, दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या कार्याच्या आठवणींना उजाळा देत, त्यांच्या विचारांवर आपण काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.दरम्यान, आमदार सुरेश धस यांनी नगर-बीड महामार्गाच्या कामासाठी भरीव निधीची मागणी करत, या रस्त्यावर होणारे अपघात रोखण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. नारळी सप्ताह कार्यक्रमास भाविकांची मोठी गर्दी झाली होती.
Ashok Kharat : 'लक्ष्मण'ते भोंदूबाबा 'अशोक खरात'; ४० वर्षांपूर्वीच गावकऱ्यांनी दिला होता बेदम चोप!
अहिल्यानगर : महिलांच्या लैंगिक शोषणाप्रकरणी सध्या तुरुंगात असलेल्या अशोक खरात याच्या कृत्यांची मुळं चाळीस वर्षांपूर्वीच रोवली गेली होती, अशी धक्कादायक माहिती तपासातून समोर आली आहे. सिन्नरच्या तांदळवाडीत जन्मलेला आणि दहावीत नापास झालेला एक सामान्य तरुण, पुढे लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेत कसा 'ब्रम्हांडशास्त्रज्ञ' बनला, याचा थक्क करणारा इतिहास उजेडात आला आहे.पहिली शिकार आणि गावकऱ्यांचा चोपदहावीत अपयशी ठरल्यानंतर अशोक खरात अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यातील आपल्या नातेवाईकांकडे गेला होता. तिथेच त्याने भोंदूगिरीचे पहिले दुकान थाटले. सुरुवातीच्या काळातच त्याने गावातील एका महिलेला आपल्या जाळ्यात ओढून तिच्यावर अत्याचार केले होते. मात्र, गावकऱ्यांना या कृत्याचा सुगावा लागताच त्यांनी खरातला बेदम चोप दिला होता. याच मारहाणीनंतर भीतीपोटी तो गावातून पळून गेला आणि पुढील १५ वर्षे अज्ञातवासात राहिला.काळ्या जादूतून 'ब्रम्हांडशास्त्रा'चा अवतारअज्ञातवासात असताना खरातने बंगालमध्ये काही काळ वास्तव्य करून 'काळी जादू' आत्मसात केल्याचे बोलले जाते. काही वर्षांनंतर जेव्हा तो परतला, तेव्हा त्याने स्वतःला 'कॅप्टन' आणि 'ब्रम्हांडशास्त्रज्ञ' अशा पदव्या लावून घेतल्या. परदेशात जाऊन आल्याचा बनाव रचून १९९५ मध्ये त्याने सिन्नरच्या मिरगाव परिसरात आपले बस्तान मांडले. एका शेतकऱ्याची जागा बळकावून तिथे मंदिर उभारले आणि हळूहळू आपला प्रभाव वाढवण्यास सुरुवात केली.https://prahaar.in/2026/04/09/sikkim-landslide-indian-army-makes-war-like-efforts-to-rescue-tourists-trapped-in-landslide-operation-him-setu-begins/अधिकारी आणि राजकीय वरदहस्ताने जमिनींची लूटअशोक खरातच्या तथाकथित दरबारात केवळ सामान्य भक्तच नव्हे, तर बडे अधिकारी आणि राजकीय नेत्यांचीही उठबस वाढली होती. याच प्रभावाचा वापर करून त्याने अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी हडप केल्या. बनावट अधिकारी पाठवून लोकांना भीती दाखवणे आणि त्यांच्याकडून पैसे उकळणे हा त्याचा रोजचा धंदा बनला होता. या सर्व आडोशाखाली त्याने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे आता उघड होत आहे.वेळेत कारवाई झाली असती तर...जर ४० वर्षांपूर्वी त्याने पहिल्या महिलेवर अत्याचार केला होता, तेव्हाच त्याच्यावर कायदेशीर कारवाई झाली असती, तर आज 'खरात फाईल्स'सारखा भीषण प्रकार घडलाच नसत्ता. वयाच्या २० व्या वर्षीच त्याला बेड्या पडल्या असत्या, तर गेल्या चार दशकांत शेकडो निष्पाप लोक त्याच्या भोंदूगिरीचे आणि शोषणाचे बळी ठरले नसते, अशी हळहळ आता व्यक्त केली जात आहे.
Green Asha Indian Ship : इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जहाज ‘ग्रीन आशा’ मुंबईत दाखल
- होर्मुझ पार करत १५ हजार टन एलपीजीचा पुरवठामुंबई : इराण युद्धामुळे निर्माण झालेल्या ऊर्जा संकटाच्या पार्श्वभूमीवर भारतीय तेलवाहू जहाज 'ग्रीन आशा' (Green Asha Indian Ship) आज म्हणजेच गुरुवार ९ एप्रिल रोजी मुंबईत दाखल झाले आहे. १५,००० टन एलपीजी घेऊन जाणारे हे जहाज मुंबईत आले आहे. या भारतीय जहाजाने होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडून मुंबईत प्रवेश केला आहे.इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यात दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधी जाहीर करण्यात आली आहे. इराणने होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्याची घोषणाही केली आहे. परिणामी, या काळात आणखी बरीच जहाजे भारतात येऊ शकतात.'ग्रीन आशा' हे (Green Asha Indian Ship) जहाज १५,४०० टन एलपीजी घेऊन नवी मुंबईतील जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी (जेएनपीए) येथे दाखल झाले आहे. जेएनपीएने म्हटले आहे की; भारतीय ध्वज असलेल्या 'ग्रीन आशा' या एलपीजी जहाजाचे स्वागत करण्यात आले. या जहाजाने होर्मुझची सामुद्रधुनी यशस्वीपणे पार करून बीपीसीएल-आयओसीएलद्वारे संचालित जेएनपीएच्या लिक्विड बर्थवर नांगर टाकला.'ग्रीन आशा'चे (Green Asha Indian Ship) आगमन महत्त्वपूर्ण आहे, कारण युद्ध सुरू झाल्यापासून होर्मुझची सामुद्रधुनी पार करून जेएनपीएमध्ये पोहोचणारे हे अशा प्रकारचे पहिलेच जहाज आहे. हे जहाज १५,४०० टन एलपीजी घेऊन आले आहे. प्राधिकरणाने म्हटले आहे, जहाज, त्यावरील माल आणि सर्व कर्मचारी सुरक्षित आहेत. हे आगमन गुंतागुंतीच्या भू-राजकीय परिस्थितीतही सागरी कारवायांची कार्यक्षमता दर्शवते आणि देशाला अत्यावश्यक एलपीजीचा अखंड पुरवठा सुनिश्चित करते.दरम्यान इराणकडून होर्मुज सामुद्रधुनी संदर्भात एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. इराणने आता जहाजांच्या वाहतुकीसाठी पर्यायी समुद्री मार्गांची घोषणा केली आहे.सामुद्रधुनीचे पर्यायी मार्ग :प्रवेश मार्ग : ओमान समुद्रातून होर्मुज सामुद्रधुनीत (Strait of Hormuz) प्रवेश करणारी जहाजे आता लारक बेटाच्या उत्तरेकडील भागातून प्रवास करतील. त्यानंतर ती पर्शियन आखाताच्या दिशेने पुढे जातील. संभाव्य धोक्यांपासून बचाव करत सुरक्षित प्रवेश मिळावा हा या मार्गाचा उद्देश आहे.निर्गमन मार्ग : आखातातून बाहेर पडणाऱ्या जहाजांसाठीही नवीन मार्ग निश्चित करण्यात आला आहे. ही जहाजे लारक बेटाच्या दक्षिणेकडील भागातून ओमान समुद्राच्या दिशेने रवाना होतील.इराणचे म्हणणे आहे की, या नव्या मार्गांचा उद्देश जहाजांना सुरक्षित आणि अखंड प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देणे हा आहे. जलमार्गात कोणतीही अप्रिय घटना टाळणे आणि आंतरराष्ट्रीय नौवहन सुरळीत ठेवणे, या दिशेने हा एक महत्त्वाचा उपक्रम असल्याचेही इराणने स्पष्ट केले आहे. (Iran-US-Israel War)
मुंबई : धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील विखरन येथील 250 मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्पासाठी संपादित जमिनीपैकी उर्वरित क्षेत्र महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे हस्तांतरित करण्याच्या प्रस्तावास गती देण्यात द्यावी, असे निर्देश उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत यांनी दिले.उद्योग मंत्री डॉ.सामंत यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात झाली. बैठकीस पणन व रोजगार हमी मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.वेलारासु, सहमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा घुगे, उद्योग विभागाचे सहसचिव श्रीकांत पुलकुंडवार, महाजनकोचे संबंधित अधिकारी तसेच मे. टी.पी. कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.या बैठकीत सुमारे 1350 एकर एकूण क्षेत्रांपैकी अंदाजे 400 ते 500 एकर जमीन महाराष्ट्र राज्य औद्योगिक महामंडळाकडे हस्तांतरित करण्याबाबत महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी (महाजनको) च्या अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली. या प्रस्तावावरील तांत्रिक व प्रशासकीय बाबींचा आढावा घेऊन आवश्यक त्या कार्यवाहीस गती देण्याचे निर्देश डॉ.सामंत यांनी दिले.महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीमार्फत मौजे मेथी व विखरन (ता. शिंदखेडा, जि. धुळे) येथे 250 मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी एकूण 540.05 हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. यामध्ये खाजगी वाटाघाटीद्वारे 476.06 हेक्टर, भूसंपादन अधिनियमांतर्गत 28.66 हेक्टर तसेच शासकीय 34.91 हेक्टर जमिनीचा समावेश आहे.यापूर्वी यांनी सुमारे 900 एकर जमीन सौर प्रकल्पासाठी देऊन उर्वरित सुमारे 400 एकर जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे हस्तांतरित करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने अंतिम निर्णयासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात येणार असून, यात संबंधित बाबींचा सर्वंकष आढावा घेऊन अंतिम निर्णय जाहीर करण्यात येईल, असे उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत यांनी सांगितले.
इराण आणि अमेरिका यांच्यात दोन आठवड्यांचा युद्धविराम झाल्यानंतर इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीवरील आपली पकड अधिक घट्ट केली आहे.
Parbhani Bribe: दोन्ही प्रकरणांमुळे जिल्ह्यात एकाच दिवशी उघडकीस आलेल्या लाचखोरीच्या घटनांनी खळबळ उडाली आहे.
IAS Transfers : IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; मध्यरात्री अचानक काय घडलं?
महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशानंतर आता दिल्लीच्या प्रशासकीय यंत्रणेत मोठा फेरबदल (IAS Transfers) झाला आहे. बुधवारी (८ एप्रिल २०२६) मध्यरात्री दिल्ली सरकारने IAS आणि DANICS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले.
Pune news : पाषाण तलावात मृत माशांचा खच; जलजीवन धोक्यात, नागरिक संतप्त
पाषाण तलाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात मृत माशांचा खच साचल्याने गंभीर पर्यावरणीय व आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच बीसीसीआयने आयपीएलसाठी अनेक कठोर नियम लागू केले आहेत. या नवीन नियमांनुसार, सामन्यादरम्यान केवळ संघाच्या रोस्टरवर म्हणजेच क्रिकेटपटूंच्या यादीत असलेल्या क्रिकेटपटूंनाच मैदानावर प्रवेश करण्याची किंवा फिरण्याची परवानगी असेल.या सदस्यांना आता मैदानावर येण्याची परवानगी नाही :रोस्टरमध्ये केवळ १६ क्रिकेटपटूंनाच ही परवानगी असेल. प्रत्येक संघ आपल्या रोस्टरमध्ये १६ क्रिकेटपटूंचाच समावेश करू शकतो. यामध्ये अंतिम ११ क्रिकेटपटूंचा समावेश असेल. याव्यतिरिक्त, आणखी चार क्रिकेटपटूंना इम्पॅक्ट सब (बदली क्रिकेटपटू) आणि क्रिकेटपटू खेळाडू म्हणून ठेवता येईल. या १६ क्रिकेटपटूंव्यतिरिक्त संघाच्या इतर कोणत्याही सदस्याला मैदानावर येण्याची परवानगी नसेल.नियमांचे पालन न केल्यास संघ व क्रिकेटपटूंच्या अडचणी वाढणार :नवीन नियमांनुसार, संघाच्या रोस्टरवर नाव नसलेल्या क्रिकेटपटूंना मैदानावर पेय, बॅट किंवा ग्लोव्हज घेऊन जाण्याची परवानगी नसेल. त्यांना इतर क्रिकेटपटूंना संदेश देण्यासही मनाई असेल. बिब घातलेल्या केवळ पाच क्रिकेटपटूंनाच सीमारेषेभोवती फिरण्याची परवानगी असेल. उर्वरित क्रिकेटपटूंना डगआऊटमध्येच थांबावे लागेल. या नियमांचे पालन न केल्यास संघ आणि क्रिकेटपटूंना अडचणी निर्माण होऊ शकतात.संघ व्यवस्थापनाला स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत की, सामन्यादरम्यान बदली क्रिकेटपटूंच्या अनावश्यक हालचालींवर कठोरपणे बंदी घालण्यात येईल. सीमारेषा आणि एलईडी जाहिरात फलक यांच्यामध्ये केवळ मर्यादित क्रिकेटपटूंनाच परवानगी दिली जाईल.https://prahaar.in/2026/04/09/bangladesh-finally-relents-bangladesh-cricket-board-invites-india/बीसीसीआयकडून नियम अजून कडक होणार :बीसीसीआय हे नियम आणखी कडक करण्याचा विचार करत आहे. असे मानले जाते की, एमपीसी (खेळाच्या अटी) च्या कलम ११.५.२ आणि २४.१.४ ची अधिक कठोर अंमलबजावणी करण्यासाठी हा नवीन नियम लागू करण्यात आला आहे. कलम ११.५.२ नुसार, पंचांच्या परवानगीशिवाय मैदानावर पेय घेऊन जाणे किंवा वेळ वाया घालवणे हे नियमांच्या विरुद्ध आहे.आयपीएल २०२६ दरम्यान बीसीसीआयने हा निर्णय का घेतला आहे, याचे कारण सध्या अस्पष्ट आहे. असे मानले जाते की, सामन्यादरम्यान शिस्त राखणे, अनावश्यक गर्दी आणि व्यत्यय कमी करणे, तसेच खेळाचा वेग सुधारणे यासाठी हे नियम लागू करण्यात आले आहेत.
बॉलिवूडमधील बहुचर्चित ‘धुरंधर: द रिव्हेंज’ या चित्रपटासंदर्भात महत्त्वाची कायदेशीर घडामोड समोर आली आहे.
Maharahstra Byelection :
David Miller Decision : दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर आणि आर अश्विन यांनी या प्रकरणावर परस्परविरोधी मते व्यक्त केली आहेत.
जालना जिल्ह्यामधील अंबड तालुक्यात एक धक्कादायक आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. पोटच्या मुलानेच आपल्या वडिलांची कुऱ्हाडीनं वार करून निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनं संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण आणि एकच खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, आज म्हणजेच गुरुवारी ९ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ५ वाजताच्या सुमारास अंबड तालुक्यातील रुई गावात सकाळच्या सुमारास दिलीप राजगुरू (वय ४५) यांचं पार्थिव त्यांच्या राहत्या घराजवळ रक्तरंजित अवस्थेत आढळून आलं. ही बाब ग्रामस्थांच्या निदर्शनास येताच त्यांनी तत्काळ तीर्थपुरी पोलीस ठाण्याला माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करत तपासाला सुरुवात केली. प्राथमिक तपासात दिलीप राजगुरू यांच्या डोक्यावर आणि शरीरावर कुऱ्हाडीचे गंभीर घाव असल्याचं आढळून आलं, त्यामुळे ही हत्या असल्याचं स्पष्ट झालं.या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली. दिलीप राजगुरू यांचा स्वतःचा मुलगा विलास राजगुरू (वय १९) यानेच आपल्या एका साथीदाराच्या मदतीनं ही हत्या केल्याचं उघड झालं. पोलिसांनी संशयाच्या आधारे विलासला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यानं गुन्ह्याची कबुली दिली. या हत्येमागील कारण ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे.नेमकं काय घडलं ?विलासच्या आईचं म्हणजेच दिलीप राजगुरू यांच्या पत्नीचं काही वर्षांपूर्वी निधन झालं होतं. त्यानंतर ते एकटेच राहत होते. दरम्यान, त्यांनी दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतला होता आणि विशेष म्हणजे, विवाहाच्या दिवशीच त्यांची हत्या करण्यात आली. वडिलांच्या या निर्णयाबद्दल मुलगा विलास नाराज होता. वडील दुसरं लग्न करत असल्याचा राग त्याच्या मनात खोलवर घर करून बसला होता.विलासनं रागातून आपल्या एका मित्राच्या मदतीनं वडिलांच्या हत्येचा कट रचला. सकाळच्या सुमारास संधी साधून विलासनं वडिलांवर कुऱ्हाडीनं सपासप वार केले, यावेळी त्यांचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे, ज्या दिवशी दिलीप राजगुरू यांच्या नवीन आयुष्याची सुरुवात होणार होती, त्याच दिवशी त्यांचा दुर्दैवी अंत झाला.या घटनेमुळे रुई गावासह संपूर्ण जालना जिल्हा हादरला आहे. नात्यांमधील वाढता दुरावा आणि संताप किती टोकाला जाऊ शकतो, याचं हे भीषण उदाहरण असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. दरम्यान, तीर्थपुरी पोलीस ठाण्यात आरोपी मुलगा विलास राजगुरू आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील तपास वरिष्ठांच्या आदेशावरून तीर्थपुरी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक वैशाली पवार यांच्याकडून सुरु आहे.
BJP vs Shiv Sena : भाजपचा ‘हा’नेता म्हणजे दुसरा अशोक खरात; शिंदेच्या आमदाराचा गंभीर आरोप
बुलढाणा जिल्ह्यातील महायुतीतील अंतर्गत वाद (BJP vs Shiv Sena) पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. शिवसेना (शिंदे गट)चे बुलढाणा आमदार संजय गायकवाड यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार विजयराज शिंदे यांच्यावर अतिशय गंभीर आरोप केले आहेत.
Parth Pawar : पार्थ पवारांची संसदेत अजितदादा स्टाईल एन्ट्री! ‘गुलाबी जॅकेट’ने जागवल्या आठवणी
हे जॅकेट केवळ एक वस्त्र नव्हते, तर ते महाराष्ट्राचे दिवंगत जननेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची एक अविभाज्य ओळख होती.
David Miller Emotional : विजयाचा घास तोंडातून हिरावला गेल्याने दिल्लीचा अनुभवी फलंदाज डेव्हिड मिलर पूर्णपणे कोलमडून गेला.
Dhurandar 2 : बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई, आता 'या' OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार धुरंधर २
मुंबई : रणवीर सिंहच्या धुरंधर सिनेमानं जगभरात धुमाकूळ घातला असून सिनेमा रिलीज होऊन २१ दिवस उलटले असतानाही सिनेमागृहातील गर्दी कमी होण्याचं नाव घेत नाहीये. बॉक्स ऑफिसवरील रेकॉर्ड मोडून काढणारा हा सिनेमा सर्वात कमी वेळात १००० कोटींचा नेट आकडा गाठणारा एकमेव भारतीय सिनेमा ठरला आहे. हा सिनेमा अनेकांनी एकापेक्षा जास्त वेळा थिएटरमध्ये जाऊन पाहिला आहे. अशातच आता या धुरंधर २ सिनेमाच्या ओटीटी रिलीजसाठी प्रेक्षक उत्सुक झाले आहेत. जर तुम्हीलाही हा सिनेमा ओटीटीवर पाहायचा असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे.या सिनेमानं जागतिक पातळीवर १६६० कोटींहून अधिक कलेक्शन केलं असून धुरंधर २ नं भारतात १२०० कोटींचा गल्ला पार केला आहे. इतकं मोठं कलेक्शन करून धुरंधर २ पहिल्या भागापेक्षाही सुपरहिट ठरला आहे. १९ मार्चला रिलीज झालेल्या या सिनेमाची क्रेझ अजूनही कायम आहे.दरम्यान, आता धुरंधर २ च्या ओटीटी रिलीजबद्दल मोठी माहिती समोर आली आहे. धुरंधरचा पहिला भाग नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला होता. यानंतर प्रेक्षकांना वाटलं होतं की दुसरा भागही याच प्लॅटफॉर्मवर रिलीज होईल. मात्र, आदित्य धर यांनी या सिनेमाचे डिजिटल हक्क 'जिओ हॉटस्टार' ला विकले आहेत. त्यामुळे आता हा स्पाय थ्रिलर पाहण्यासाठी तुम्हाला जिओ हॉटस्टारचं सबस्क्रिप्शन घ्यावं लागणार आहे. अशातच हा सिनेमा ओटीटीवर कधी रिलीज होणार याबाबत चर्चा सुरू झाली आहे.https://prahaar.in/2026/04/09/dhurandhar-2-deepika-finally-breaks-her-silence-about-the-movie-dhurandhar-2-tells-trolls/मिळालेल्या माहितीनुसार जिओ हॉटस्टार धुरंधर २ सिनेमा IPL 2026 संपल्यानंतर स्ट्रीम करण्याच्या तयारीत आहे. आयपीएलची धामधूम सुरू असताना सिनेमाच्या व्ह्यूअरशिपवर परिणाम होऊ नये, हा यामागचा विचार असल्यानं मे महिन्याचा शेवटचा आठवडा किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात 'धुरंधर २' ओटीटीवर पाहायला मिळणार आहे.
मुंबई : राज्यातील कल्पक आणि उत्साही तरुणांसाठी प्रशासकीय सेवेचा अनुभव घेण्याची सुवर्णसंधी पुन्हा एकदा उपलब्ध झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी 'मुख्यमंत्री फेलोशिप प्रोग्राम' यावर्षीही सुरू ठेवण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला असून, यामुळे प्रशासनात काम करण्याची इच्छा असलेल्या तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. केवळ रोजगार उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मर्यादित हेतू नसून, तरुणांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांचा उपयोग सरकारी योजना अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी करणे हा मुख्य उद्देश आहे. निवड झालेल्या फेलोना थेट मंत्रालयात काम करण्याची आणि राज्याच्या धोरण-निर्मिती प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवण्याची संधी मिळणार आहे.मुख्यमंत्री फेलोशिप'साठी ६० जागांची भरतीयावर्षी एकूण ६० जागांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. या प्रक्रियेत सामाजिक समावेशकता जपण्यासाठी ३३ टक्के जागा, म्हणजेच एकूण २० जागा महिलांसाठी राखीव ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे प्रशासकीय कामात महिलांचा सहभाग वाढण्यास मोठी मदत होणार आहे. या फेलोशिपसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा २१ ते २६ वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रतेचा विचार करता, उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान ६० टक्के गुणांसह पदवी संपादन केलेली असावी. विशेषतः अभियांत्रिकी (Engineering) आणि व्यवस्थापन (Management) यांसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षणासोबतच किमान एक वर्षाचा कामाचा अनुभव असणे अनिवार्य करण्यात आले आहे. या निकषांची पूर्तता करणाऱ्या तरुणांनाच राज्याच्या धोरण-निर्मिती प्रक्रियेत थेट सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.https://prahaar.in/2026/04/09/girlfriend-throat-slit-at-petrol-pump-by-boyfriend-sambhajinagar-shaken-after-murder/आकर्षक मानधन अन् 'गट-अ' दर्जाचा सन्मानया फेलोशिपसाठी निवडल्या जाणाऱ्या उमेदवारांना दरमहा ६१,५०० रुपये मानधन दिले जाणार असून, त्यांना शासकीय सेवेतील 'गट-अ' दर्जाच्या अधिकाऱ्याप्रमाणे समकक्ष मान दिला जाणार आहे.ही नियुक्ती १२ महिन्यांच्या कंत्राटी स्वरूपाची असली तरी, थेट मंत्रालय आणि मुख्यमंत्र्यांच्या चमूसोबत काम करण्याची संधी या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरत आहे. उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली काम केल्यामुळे मिळणारा अनुभव भविष्यात स्पर्धा परीक्षा किंवा कॉर्पोरेट क्षेत्रातील मोठ्या पदांसाठी मैलाचा दगड ठरणार आहे. तरुणांना प्रशासकीय शिस्त आणि धोरणात्मक कामाचा अनुभव एकाच वेळी मिळावा, या हेतूने हे मानधन आणि दर्जा निश्चित करण्यात आला आहे.मंत्रालयात कामाचा अनुभव अन् IIT मुंबईची पदवीमुख्यमंत्री फेलोशिप केवळ प्रशासकीय अनुभवापुरती मर्यादित न राहता, आता तरुणांच्या शैक्षणिक प्रगतीचाही मार्ग प्रशस्त करणार आहे. या उपक्रमांतर्गत निवड झालेल्या फेलोंना देशातील नामांकित संस्था आयआयटी पवई (IIT Bombay) यांच्या सहकार्याने 'सार्वजनिक धोरण' (Public Policy) या विषयातील विशेष पदव्युत्तर प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण करण्याची संधी मिळणार आहे. शासकीय कामकाजाचे प्रत्यक्ष अनुभव घेत असतानाच, धोरण-निर्मितीमागील शास्त्रीय आणि तांत्रिक बाजू समजून घेता यावी, या हेतूने हा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. प्रतिष्ठित आयआयटीकडून मिळणारे हे प्रमाणपत्र युवकांसाठी भविष्यातील करिअरच्या दृष्टीने अत्यंत मोलाचे ठरणार आहे. कामाच्या अनुभवासोबतच उच्च दर्जाचे शैक्षणिक मूल्य देणारा हा उपक्रम प्रशासकीय कार्यक्षमता वाढवण्यासाठी मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास सरकारकडून व्यक्त केला जात आहे.कठोर निकष आणि गुणवत्तेवर भरराज्याच्या प्रशासकीय प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी राबवल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री फेलोशिपसाठी सरकारने अत्यंत पारदर्शक आणि कठोर निवड प्रक्रिया निश्चित केली आहे. केवळ गुणवंत आणि पात्र तरुणांनाच या संधीचा लाभ घेता यावा, यासाठी शैक्षणिक आणि अनुभवाचे निकष स्पष्ट करण्यात आले आहेत.या फेलोशिपसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय २१ ते २६ वर्षांच्या दरम्यान असणे अनिवार्य आहे. शैक्षणिक पात्रतेबाबत कोणत्याही शाखेतील किमान ६०% गुणांसह पदवी प्राप्त असणे गरजेचे आहे. विशेषतः व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षणासोबतच किमान एक वर्षाचा प्रत्यक्ष कामाचा अनुभव असण्याची अट घालण्यात आली आहे. या निकषांमुळे केवळ पदवीच नाही, तर प्रत्यक्ष कामाची ओढ आणि प्रशासकीय समज असलेल्या कल्पक तरुणांना मंत्रालयात आपली चमक दाखवण्याची संधी मिळणार आहे.प्रशासकीय अनुभवासोबतच सन्मानजनक वेतनराज्य सरकारकडून निवड झालेल्या फेलोंना दरमहा ₹६१,५०० इतके आकर्षक विद्यावेतन दिले जाणार आहे. आर्थिक लाभासोबतच या फेलोशिपचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, या तरुणांना कामाच्या ठिकाणी थेट शासकीय सेवेतील 'गट-अ' दर्जाच्या अधिकाऱ्याचा समकक्ष दर्जा आणि सन्मान प्राप्त होणार आहे. प्रशासकीय शिस्त आणि कामाचे स्वरूप लक्षात घेता, ही नियुक्ती १२ महिन्यांच्या निश्चित कालावधीसाठी असेल. या एक वर्षाच्या कार्यकाळानंतर ही नियुक्ती आपोआप संपुष्टात येईल.'असा' करा ऑनलाईन अर्जया प्रक्रियेत प्रामुख्याने लेखी परीक्षा आणि त्यानंतर वैयक्तिक मुलाखतीचा समावेश असेल. केवळ गुणांच्या आधारेच नाही, तर उमेदवाराची विचार करण्याची क्षमता आणि प्रशासकीय ओढ पाहूनच अंतिम निवड केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपला ऑनलाईन अर्ज विहित मुदतीत सादर करायचा आहे. अर्ज भरताना शैक्षणिक कागदपत्रे आणि अनुभवाच्या प्रमाणपत्रासोबतच एक प्रभावी ‘स्टेटमेंट ऑफ पर्पज’ (SOP) अपलोड करणे अनिवार्य आहे. या पत्रातून उमेदवाराचा प्रशासकीय कामातील रस आणि भविष्यातील व्हिजन स्पष्ट होणे गरजेचे आहे. ज्या तरुणांना सरकारी यंत्रणेत राहून सकारात्मक बदल घडवण्याची जिद्द आहे, त्यांच्यासाठी ही एक सुवर्णसंधी असून पात्र उमेदवारांनी या प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Pune News : मांजरी स्टेशनचा कायापालट तर रामटेकडीला मिळणार नवे ब्लॉक स्टेशन
पुणे : पुणे रेल्वे विभागाने वाढती प्रवासी गर्दी आणि रेल्वे वाहतुकीवरील ताण लक्षात घेऊन दोन महत्त्वाचे प्रकल्प जाहीर केले आहेत. मांजरी स्थानकाचे उन्नतीकरण आणि रामटेकडी येथे नवीन ब्लॉक स्टेशन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यामुळे गाड्यांच्या विलंबाचा प्रश्न कमी होण्याची अपेक्षा आहे.मांजरी स्थानकाचा दर्जा उंचावणारसध्या मांजरी हे केवळ एक हाल्ट स्थानक असून येथे मर्यादित गाड्या थांबतात. मात्र आता त्याचा ‘B’ श्रेणीतील स्थानकात समावेश करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांसाठी अधिक सुविधा आणि सेवा उपलब्ध होणार आहेत.मार्गावरील बदल आणि फायदाहडपसर ते लोणी या १२ किलोमीटरच्या अंतरात सध्या एकाच वेळी एकच गाडी धावू शकते. मांजरी स्थानकाच्या उन्नतीकरणानंतर हा मार्ग दोन भागांत विभागला जाईल. त्यामुळे एकाच वेळी दोन गाड्या चालवणे शक्य होईल. परिणामी गाड्यांची वारंवारता वाढेल आणि उशीर होण्याचा विषय कायमचा संपेल. या प्रकल्पाअंतर्गत नवीन लूप लाईन, प्रगत सिग्नल यंत्रणा आणि प्रवाशांसाठी आवश्यक सुविधा उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांचा अनुभव अधिक सुलभ आणि सुरक्षित होईल.रामटेकडी येथे नवीन स्टेशनपुणे-मिरज मार्गावरील वाहतूक सुधारण्यासाठी रामटेकडी येथे नवीन ब्लॉक स्टेशन उभारण्याचा प्रस्ताव आहे. पुणे आणि सासवड रोड स्थानकांमधील अंतर कमी केल्यामुळे गाड्यांची हालचाल अधिक वेगवान आणि समांतर पद्धतीने होऊ शकणार आहे. या संपूर्ण प्रकल्पासाठी सुमारे 40 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. रेल्वे मार्गाची क्षमता वाढवणे आणि वेळापत्रक अधिक शिस्तबद्ध करणे हे यामागचे मुख्य उद्दिष्ट आहे.ब्लॉक स्टेशन म्हणजे काय?ब्लॉक स्टेशन हे आधुनिक सिग्नल यंत्रणेसह कार्यरत असते. या यंत्रणेमुळे दोन गाड्यांमध्ये सुरक्षित अंतर राखले जाते आणि वाहतुकीचे नियोजन अधिक प्रभावीपणे करता येते.रेल्वे प्रशासनाची भूमिकापुणे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले की या प्रकल्पांमुळे रेल्वे संचालन अधिक कार्यक्षम होईल. प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळतील आणि वेळेची बचत होईल. वाढत्या प्रवासी संख्येचा विचार करून हे पाऊल उचलण्यात आले आहे. एकूणच, मांजरी आणि रामटेकडी येथील विकासकामांमुळे पुणेकरांचा प्रवास अधिक वेगवान आणि सोयीस्कर होणार आहे.
Iran-US-Israel War : होर्मुज सामुद्रधुनीवर इराणचा मोठा निर्णय; इराणकडून पर्यायी समुद्री मार्ग जाहीर
पश्चिम आशियात सुरू असलेल्या तणावाच्या (Iran-US-Israel War) पार्श्वभूमीवर आता होर्मुज सामुद्रधुनी (Strait of Hormuz) संदर्भात एक मोठी घडामोड समोर आली आहे. माहितीनुसार, इराणने जहाजांच्या वाहतुकीसाठी पर्यायी समुद्री मार्गांची घोषणा केली असून, याचा जागतिक व्यापार आणि तेलपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (आयआरजीसी) च्या नौदलाने जारी केलेल्या निवेदनात सांगितले की, समुद्री सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत हा निर्णय घेण्यात आला आहे. आयआरजीसी नौदलाने सर्व मालवाहू जहाजे आणि नौकांना नव्याने निश्चित केलेल्या मार्गांचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. जहाजांची ये-जा आयआरजीसी नौदलाच्या कडक देखरेखीखाली केली जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. (Iran-US-Israel War)जगातील सुमारे २० टक्के तेल वाहतूक याच सामुद्रधुनीतून (Strait of Hormuz) होत असल्याने सुरक्षेबाबत चिंता वाढल्या होत्या. दोन आठवड्यांच्या तात्पुरत्या युद्धविरामाचा भाग म्हणून होर्मुज सामुद्रधुनी तात्पुरती पुन्हा खुली करण्यात आली असून, त्याचाच एक भाग म्हणून इराणने (Iran-US-Israel War) हा निर्णय घेतला आहे.https://prahaar.in/2026/04/09/iran-us-israel-war-israel-claims-death-of-top-hezbollah-leader-in-beirut-airstrike/सामुद्रधुनीचे पर्यायी मार्ग :प्रवेश मार्ग : ओमान समुद्रातून होर्मुज सामुद्रधुनीत (Strait of Hormuz) प्रवेश करणारी जहाजे आता लारक बेटाच्या उत्तरेकडील भागातून प्रवास करतील. त्यानंतर ती पर्शियन आखाताच्या दिशेने पुढे जातील. संभाव्य धोक्यांपासून बचाव करत सुरक्षित प्रवेश मिळावा हा या मार्गाचा उद्देश आहे.निर्गमन मार्ग : आखातातून बाहेर पडणाऱ्या जहाजांसाठीही नवीन मार्ग निश्चित करण्यात आला आहे. ही जहाजे लारक बेटाच्या दक्षिणेकडील भागातून ओमान समुद्राच्या दिशेने रवाना होतील.इराणचे म्हणणे आहे की, या नव्या मार्गांचा उद्देश जहाजांना सुरक्षित आणि अखंड प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देणे हा आहे. जलमार्गात कोणतीही अप्रिय घटना टाळणे आणि आंतरराष्ट्रीय नौवहन सुरळीत ठेवणे, या दिशेने हा एक महत्त्वाचा उपक्रम असल्याचेही इराणने स्पष्ट केले आहे. (Iran-US-Israel War)
Beed: मस्साजोग सरपंच निवडणूकीत ट्विस्ट; संतोष देशमुख यांच्या पत्नीविरोधात ‘हा’व्यक्ती मैदानात
Beed: मस्साजोग ग्रामपंचायतीतील ही निवडणूक भावनिक तसेच राजकीयदृष्ट्या महत्त्वाची ठरण्याची चिन्हे आहेत.
ज्या ठिकाणी वृक्षतोड सुरू आहे, त्याच ठिकाणी वृक्षतोडीच्या निर्णयाचे समर्थन करणारे फलकही लावण्यात आले आहेत.
Narendra Modi : बंगालमध्ये सत्तापरिवर्तन अटळ; पंतप्रधान मोदी यांची ममता बॅनर्जींवर टीका
पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण तापले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी गुरुवारी सत्ताधारी तृणमूल काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला.
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील करमाड परिसरात आज दुपारी माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत भीषण घटना घडली. एका माथेफिरू तरुणाने आपल्याच प्रेयसीचा भरवस्तीत निर्घृण खून केल्याने संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेने केवळ कायदा-सुव्यवस्थेचे वाभाडे काढले नसून, महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीररित्या ऐरणीवर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पूजा सुदाम गावंडे ही तरुणी करमाड येथील गणपती मंदिराजवळ असलेल्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावर कामाला होती. आज दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास, जेव्हा पेट्रोल पंपावर नेहमीप्रमाणे लोकांची वर्दळ होती, तेव्हा तिचा प्रियकर त्या ठिकाणी पोहोचला. काही कळण्याच्या आतच, त्याने खिशातून चाकू काढून पूजाच्या गळ्यावर सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पूजाचा जागीच मृत्यू झाला. भरदिवसा आणि लोकांच्या प्रत्यक्ष डोळ्यादेखत घडलेल्या या थरारामुळे पेट्रोल पंपावरील कर्मचारी आणि ग्राहक स्तब्ध झाले. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. आरोपीने इतक्या धाडसाने हे कृत्य केल्यामुळे पोलिसांच्या गस्तीवर आणि गुन्हेगारांवरील धाकावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. करमाड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.https://prahaar.in/2026/04/09/minister-chhagan-bhujbal-through-the-efforts-of-minister-chhagan-bhujbal-approval-for-the-construction-of-the-main-building-worth-rs-3-38-crore-of-nimgaon-wakada-primary-health-center-in-niphad/शाब्दिक चकमक अन् थेट गळ्यावर वारपूजा गावंडे ही तरुणी नेहमीप्रमाणे इंडियन ऑईल पेट्रोल पंपावर आपली ड्युटी करत होती. दुपारी साडेबाराच्या सुमारास तिचा प्रियकर सत्यम रावसाहेब गावंडे तिथे पोहोचला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला त्या दोघांमध्ये कोणत्यातरी कारणावरून बाचाबाची सुरू झाली. दोघांमधील हा वाद क्षणाक्षणाला वाढत गेला. संतापाने बेभान झालेल्या सत्यमने आपल्या खिशातील चाकू बाहेर काढला आणि काहीही विचार न करता पूजाच्या गळ्यावर सपासप वार केले. हा हल्ला इतका अनपेक्षित आणि भीषण होता की पूजाला सावरण्याची संधीही मिळाली नाही. चाकूचा वार वर्मी लागल्याने आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यामुळे पूजा रक्ताच्या थारोळ्यात तिथेच कोसळली. उपस्थित लोकांनी मदतीसाठी धाव घेण्यापूर्वीच तिचा जागीच मृत्यू झाला होता. भरवस्तीत घडलेल्या या प्रकारामुळे पेट्रोल पंपावरील कर्मचारी आणि नागरिक सुन्न झाले आहेत.नेमकं काय घडलं ?करमाड येथील पेट्रोल पंपावर घडलेल्या पूजा गावंडे हत्या प्रकरणाने आता एक नवे वळण घेतले आहे. या घटनेचा अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ समोर आला असून, आरोपीने केवळ पूजाची हत्याच केली नाही, तर तिला वाचवण्यासाठी येणाऱ्यांनाही जीवे मारण्याची धमकी दिल्याचे उघड झाले आहे. ज्यावेळी सत्यम गावंडे पूजावर चाकूने वार करत होता, तेव्हा पंपावरील एका व्यक्तीने मोठ्या धैर्याने तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, रक्ताने माखलेला चाकू हवेत फिरवत आरोपीने त्या व्यक्तीलाही धाक दाखवला आणि मागे हटण्यास भाग पाडले. उपस्थित नागरिकांच्या डोळ्यादेखत हा थरार घडला आणि या दहशतीचा फायदा घेत आरोपी सत्यमने घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची भीषणता पाहून करमाड पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून पूजाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी (Post-mortem) रुग्णालयात पाठवला आहे. प्राथमिक माहितीनुसार, या हत्येमागे प्रेमप्रकरणातील जुना वाद किंवा चारित्र्याचा संशय असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. फरार आरोपी सत्यम गावंडेच्या शोधासाठी करमाड पोलिसांनी विशेष पथके रवाना केली आहेत. सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे हत्या करण्याचे धैर्य गुन्हेगारांमध्ये येतेच कसे, असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
Matka King : दमदार स्टारकास्ट असणाऱ्या नागराज मंजुळेंच्या 'मटका किंग'चा ट्रेलर प्रदर्शित
मुंबई : मराठी सिनेविश्वात सैराट, फॅन्ड्री, नाळ यांसारख्या सिनेमांमधून मातीतल्या वास्तववादी कथा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणारे दिग्दर्शक-निर्माते नागराज पोपटराव मंजुळे (Nagraj Manjule)आता ओटीटीवर नव्या अवतारात झळकणार आहेत. मटका किंग या वेबसिरीजच्या माध्यमातून नागराज मंजुळे पुन्हा एकदा एक दमदार कथानक घेऊन समोर आले आहेत. सध्या या वेब सिरीजची मनोरंजन विश्वात एकच चर्चा आहे. ओटीटीवर येणारी 'मटका किंग' (Matka King) ही वेब सिरीज केवळ एक गुन्हेगारी कथा नसून नागराज मंजुळे यांची ही नवी निर्मिती एका अशा जगात घेऊन जाते, जिथे ‘मटका’ हा फक्त जुगार नसून सत्ता, गणित, मानसशास्त्र आणि सामाजिक वास्तव यांचा गुंता आहे.‘मटका किंग’ची कथा एका अशा काळात घडते, जेव्हा मटका हा फक्त खेळ नव्हता, तर अनेकांच्या आयुष्याचा केंद्रबिंदू होता. या जगात पैसा जितक्या वेगानं येतो, तितक्याच वेगानं माणसाला गिळतोही. मालिका या जगाच्या ग्लॅमरला फक्त पृष्ठभागावर ठेवत नाही, तर त्यामागचं काळं वास्तव उघड करत जाते. एक अशी दुनिया, जी कधीकाळी जगली गेली होती, आणि एक अशी व्यक्तिरेखा, जी निरीक्षण आणि अनुभवातून घडवली गेली, हे दोन्ही प्राइम व्हिडिओच्या “मटका किंग” मध्ये एकत्र येतात.अभय कोराणे यांनी क्रिएट आणि लिहिलेली, तसेच नागराज पोपटराव मंजुळे यांनी क्रिएट, लिखित आणि दिग्दर्शित केलेल्या या मालिकेत विजय वर्मा, कृतिका कामरा, सई ताम्हणकर, सिद्धार्थ जाधव, भूपेंद्र जडावत आणि गुलशन ग्रोवर प्रमुख भूमिकांमध्ये आहेत. याबरोबरच भारत जाधव, गिरीश कुलकर्णी, जेमी लीव्हर, किशोर कदम, सायरस सहुकार, अर्पिता सेठिया, संभाजी तांगडे, इश्तियाक खान, संजीव जोटांगिया आणि सिमरन अश्विनी देखील महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकणार आहेत.https://youtu.be/9T1oy0y8-zY?si=3Tb9LCquqPJ256dpयेत्या १७ एप्रिल २०२६ रोजी Amazon Prime Video वर प्रदर्शित होणारी ही मालिका, मजबूत लेखन, वास्तववादी दिग्दर्शन आणि दमदार अभिनयामुळे या वर्षातील सर्वात चर्चेत राहणाऱ्या वेबसिरिजपैकी एक ठरू शकते. जर तुम्हाला वास्तववादी कथा आवडत असतील, तर ‘मटका किंग’ वेबसिरिज तुमच्यासाठी उत्तम ठरणार आहे.
मुंबई : मत्स्यव्यवसायात राज्याला देशात अग्रस्थानी नेण्यासाठी राज्य शासनाने अनेक योजना, उपक्रम सुरू केले आहेत. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे तितकेच महत्त्वाचे आहे. या माध्यमातून मत्स्यव्यवसायात महाराष्ट्र नंबर वन करण्यात येईल, असे प्रतिपादन मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी केले.मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना, कृषी समकक्ष दर्जा व त्या अनुषंगाने सवलती आणि केंद्र शासनाच्या योजना अंमलबजावणीबाबत भा.कृ.अनु.प. (भारतीय कृषी अनुसंधान परिषद)- केंद्रीय मात्स्यिकी शिक्षण संस्था, वर्सोवा येथे आयोजित कार्यशाळेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी विभागाचे सचिव डॉ. रामास्वामी एन., मत्स्यव्यवसाय आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, एमएफडीसी चे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश खपले, केंद्रीय मात्स्यिकी शिक्षण संस्थेचे, संचालक श्री. शाहुजी आणि मत्स्यव्यवसाय विभागाचे जिल्हास्तरीय अधिकारी उपस्थित होते.मत्स्यव्यवसाय मंत्री राणे म्हणाले, मत्स्यव्यवसायाला कृषीचा दर्जा देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. मत्स्यव्यवसाय क्षेत्राला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेस अन्य योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थीस देऊन त्याला अधिक सक्षम करण्यासाठी अधिकाऱ्यांनी काम करावे. विभागाच्या योजनांची व्यापक प्रचार प्रसिद्धी करण्यासाठी जिल्हास्तरावर कॅम्प घेऊन जनजागृती करावी. तसेच यासाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करावा, असेही ते म्हणाले.मत्स्यव्यवसाय विभागाच्या योजनांसाठी शासनाने मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला असल्याचे सांगत, मत्स्यव्यवसाय मंत्री राणे म्हणाले, भविष्यात राज्याच्या मत्स्यव्यवसाय विभागाच्या योजनांचा अभ्यास अन्य राज्यांनी करावा असे वातावरण निर्माण करण्यासाठी विभागातील सर्वच घटकांनी टीमवर्क म्हणून काम करावे. योजनांच्या अंमलबजावणीत उल्लेखनीय काम करणाऱ्यांचा गौरव केला जाईल असे सांगून मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे म्हणाले, यासाठी स्पर्धा आयोजित केली जाईल.मत्स्यव्यवसाय सचिव डॉ. एन. रामास्वामी म्हणाले, मत्स्यव्यवसाय मध्ये उत्पादकता वाढवण्यासाठी राज्यस्तर व जिल्हा नियोजन मधून २८ योजना राबविण्यात येत आहेत. जिल्हास्तरावरील योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा नियोजन मधून अधिकचा निधी अधिकाऱ्यांनी उपलब्ध करून घ्यावा. मत्स्यव्यवसाय विभागाच्या योजना क्लस्टर पद्धतीने राबविल्या जाणार असून या योजनांच्या माध्यमातून उत्पादकता वाढण्यास मदत होईल. विभागाच्या योजनांची लाभार्थी निवड देखील अधिकाऱ्यांनी मिशन मोडवर करावी असेही त्यांनी या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना सांगितले.मत्स्यव्यवसाय आयुक्त प्रेरणा देशभ्रतार म्हणल्या, अर्थव्यवस्थेमध्ये मत्स्यव्यवसाय महत्त्वाचा भाग आहे. विभागाच्या योजनांची परिणामकारक अंमलबजावणी करून मत्स्यव्यवसायाला अधिक गती देण्यासाठी विभागाच्या योजना लाभार्थीने पोहोचवण्यास सर्वांनीच पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.या कार्यशाळेत मत्स्यव्यवसाय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
Bangladesh Cricket Board : अखेर बांगलादेश नरमला; बांग्लादेश क्रिकेट बोर्डाकडून भारताला आमंत्रण
बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने (बीसीबी) (Bangladesh Cricket Board) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसी) पत्र लिहून कळवले आहे की, बांगलादेश संघ भारताला भेट देण्यास इच्छुक असून, या वर्षाच्या अखेरीस बांगलादेशमध्ये द्विपक्षीय मालिका खेळण्यासाठी भारताला आमंत्रित केले आहे. सध्याच्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेचा भाग म्हणून भारत यावर्षी बांगलादेशचा दौरा करणार आहे, ज्यामुळे या घडामोडीचे महत्त्व आणखी वाढले आहे. यातून बांगलादेशातील नवीन प्रशासनाचा भारतासोबत संबंध प्रस्थापित करण्याचा आणि क्रिकेट संबंधांमधील अलीकडील तणावपूर्ण काळातून पुढे जाण्याचा प्रयत्न दिसून येतो.विशेष म्हणजे बांगलादेशने तमीम इक्बाल यांची देशाचे सर्वात तरुण क्रिकेट प्रमुख म्हणून नियुक्ती केल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.बांगलादेश क्रिकेट बोर्डाला झाली संभाव्य नुकसानीची जाणीव :कोलकाता नाईट रायडर्सने बांगलादेशी (Bangladesh Cricket Board) वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानचा आयपीएल करार रद्द केला होता. त्यानंतर बीसीबीने त्याला टी-२० विश्वचषकासाठी भारतात येण्यास परवानगी नाकारली. त्यानंतर आयसीसीने बांगलादेशला टी-२० विश्वचषकातून वगळून, बांगलादेशऐवजी स्कॉटलंडचा समावेश करण्याचा निर्णय घेतला.आयसीसी आणि बीसीसीआयबरोबर झालेल्या संघर्षानंतर आपल्या क्रिकेटला होणाऱ्या संभाव्य नुकसानीची जाणीव बांगलादेश क्रिकेट बोर्डाला आता झाली आहे. त्यामुळे, बोर्डाने बीसीसीआयला पत्र लिहून क्रिकेट संबंध सुधारण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.https://prahaar.in/2026/04/08/ipl-2026-sunil-gavaskar-sunil-gavaskar-criticizes-unfit-cricketers/दुसरीकडे, बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे (Bangladesh Cricket Board) प्रमुख अमीनुल इस्लाम बुलबुल यांना सरकारने पदावरून हटवल्यानंतर त्यांनी आयसीसीकडे धाव घेतली आहे. अमीनुल इस्लाम बुलबुल हे त्यांच्या खेळाच्या दिवसांतील लढवय्या वृत्तीसाठी ओळखले जात होते. कसोटी शतक झळकावणारे ते पहिले बांग्लादेशी फलंदाज होते.वास्तविक पाहता, बांगलादेशच्या नवनिर्वाचित सरकारने स्थापन केलेल्या राष्ट्रीय क्रीडा परिषदेने बुलबुल यांच्या नेतृत्वाखालील बोर्ड बरखास्त करून त्या जागी ११ सदस्यीय अंतरिम समितीची स्थापना केली. नवीन निवडणुका होईपर्यंत ही समिती बोर्डाच्या कामकाजावर देखरेख ठेवेल. या तदर्थ समितीच्या प्रमुखपदी बांगलादेशचे माजी कर्णधार तमीम इक्बाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. (Bangladesh Cricket Board)
Rahuri By-election: माघारीनंतरचे चित्र स्पष्ट झाल्याने आता राहुरीत कोण बाजी मारणार याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे. या पोटनिवडणुकीसाठी 23 एप्रिलला मतदान होणार असून 4 मे रोजी निकाल जाहीर होणार आहेत.
North Korea : उत्तर कोरियाची क्लस्टर-बॉम्ब क्षेपणास्त्रांची चाचणी; दक्षिण कोरियाला दिला इशारा
उत्तर कोरियाने (North Korea) गुरुवारी जाहीर केले की, त्यांनी अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्रांसह विविध नवीन शस्त्रप्रणालींच्या यशस्वी चाचण्या घेतल्या आहेत.
मुंबई : रंगभूमीवर काही नाटकं प्रेक्षकांच्या मनात कायम घर करून राहातात. यांपैकीच'शांतेचं कार्टं चालू आहे' हे एक गाजलेलं आणि आवडतं नाटक आता पुन्हा एकदा रंगभूमीवर परतणार आहे. काही काळ विश्रांतीनंतर हे नाटक नव्या उत्साहात पुन्हा सादर होत असून, येत्या ११ एप्रिल २०२६ रोजी प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिर मध्ये त्याचा प्रयोग रंगणार आहे.'शांतेचं कार्ट चालू आहे' हे लक्ष्मीकांत बेर्डे अभिनीत एक अजरामर मराठी विनोदी नाटक, जे आपल्या अफलातून विनोदी अभिनयासाठी ओळखलं जातं. या नाटकात लक्ष्मीकांत बेर्डे यांनी मुख्य भूमिका साकारलेली, नयनतारा यांच्यासोबत त्यांची जुगलबंदी प्रेक्षकांना प्रचंड आवडलेली. अशातच आता हे नाटक रंगभूमीवर पुन्हा परतणार असल्यानं प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.अमेय विनोद खोपकर सादर करत असलेलं हे नाटक, एव्हीके पिक्चर्स आणि सीजी ग्रुप यांच्या निर्मितीतून साकारलं आहे. दिग्दर्शक विजय केंकरे यांच्या नेटक्या दिग्दर्शनातून आणि लेखक श्रीनिवास भणगे यांच्या लेखणीतून उभं राहिलेलं हे नाटक प्रेक्षकांना पोट भरून हसवतानाच जीवनातील नातेसंबंधांवरही भाष्य करतं. संगीतकार अजित परब यांच्या सुरांनी नाटकात अधिकच रंगत आणली असून स्वाती खोपकर, दिनेश खंडागळे आणि निनाद नं बत्तीन या नाटकाचे निर्माते आहेत. यात प्रियदर्शन जाधव, विक्रांत कोळपे, सुकन्या काळण, राजेश चिटणीस, प्रदीप जोशी, मयुरा रानडे आणि विशाखा सुभेदार यांसारखी लोकप्रिय कलाकार झळकणार आहेत.कुटुंबातील छोट्या-मोठ्या प्रसंगांमधून उलगडणारे नातेसंबंध, त्यातील गंमती-जंमती, गैरसमज आणि आपुलकी यांचा हलकाफुलका वेध या नाटकातून घेतला जातो. त्यामुळे हे नाटक प्रेक्षकांना हसवतानाच आपलंसंही वाटतं. पूर्णपणे कौटुंबिक स्वरूपाचं असल्यामुळे, हे नाटक सगळ्यांनी एकत्र बसून पाहाण्यासारखं आहे.हास्य आणि भावनांचा समतोल साधणारं 'शांतेचं कार्टं चालू आहे' हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर आपली छाप पाडण्यासाठी सज्ज झालं आहे. त्यामुळे यंदा उन्हाळ्याच्या सुट्टीत नाट्यरसिकांना कुटुंबासोबत हलकंफुलकं आणि दर्जेदार मनोरंजनाचा आनंद घेता येणार आहे.
फेब्रुवारी २०२६ पासून सुरू झालेल्या अमेरिका - इस्त्रायल आणि इराण (Iran-US-Israel War) या युद्धात अमेरिका आणि इस्रायलने इराणवर मोठे हवाई हल्ले केले. त्यात इराणच्या अनेक लष्करी ठिकाणांवर प्रचंड नुकसान झालं. त्याच्या प्रत्युत्तरात इराणने अमेरिकेच्या तळांवर, इस्रायलवर आणि मध्यपूर्वेतील इतर देशांवर मिसाइल आणि ड्रोन हल्ले केले. या संघर्षामुळे संपूर्ण मध्यपूर्व देश पेटून उठले.पण आताची मोठी बातमी म्हणजे इस्त्रायलच्या सैन्याने गुरुवारी दावा केला की, बुधवारी (८ एप्रिल) बेरूतमध्ये झालेल्या इस्त्रायली (Iran-US-Israel War) हवाई हल्ल्यात हिज्बुल्लाह नेता नईम कासिम यांच्या सचिवाचा मृत्यू झाला आहे.आयडीएफने (इस्त्रायल डिफेन्स फोर्स) सांगितले की, बेरूतमधील तल्लेत खयात परिसरात, हिज्बुल्लाहचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या दाहियेह भागाबाहेर अली युसुफ हर्षी याला लक्ष्य करण्यात आले. समोर आलेल्या फुटेजमध्ये या हल्ल्यामुळे एक बहुमजली इमारत अंशतः कोसळल्याचे दिसून आले. सैन्याच्या माहितीनुसार, हर्षी हा कासिम यांचा पुतण्या आणि वैयक्तिक सचिव होता. (Iran-US-Israel War)सैन्याने एका निवेदनात म्हटले आहे की, “हर्षी हा हिज्बुल्लाहचे महासचिव नईम कासिम यांचा निकटवर्तीय सहकारी आणि वैयक्तिक सल्लागार होता. त्यांच्या कार्यालयाचे तसेच सुरक्षेचे व्यवस्थापन करण्यात त्याची महत्त्वाची भूमिका होती.”दरम्यान, आयडीएफने सांगितले की रात्रीच्या वेळी लिटानी नदीवरील दोन प्रमुख मार्गांवर हल्ला करण्यात आला. या मार्गांचा वापर हिज्बुल्लाह दक्षिण लेबनानमध्ये हजारो शस्त्रे, रॉकेट्स आणि लॉन्चर्स पोहोचवण्यासाठी करत होता.याशिवाय, दक्षिण लेबनानमध्ये सुमारे 10 शस्त्रसाठे, रॉकेट लॉन्चर आणि हिज्बुल्लाहच्या मुख्यालयांवरही हल्ले करण्यात आल्याची माहिती सैन्याने दिली आहे. (Iran-US-Israel War)त्यामुळे आता परिस्थिती अशी आहे की, एकीकडे युद्धविराम जरी जाहीर करण्यात आला असला तरीही लेबनॉन आणि हेजबोलावरील हल्ले (Iran-US-Israel War) मात्र अजूनही सुरूच आहेत. अमेरिकेने स्पष्ट केलं आहे की जर करार पाळला गेला नाही, तर ते पुन्हा मोठा हल्ला करू शकतात. तर इराणही मागे हटायला तयार नाही.
निमगाव वाकडा प्राथमिक आरोग्य केंद्रास मिळणार सुसज्ज विस्तारीत इमारत....येवला : राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून निफाड तालुक्यातील निमगाव वाकडा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ३ कोटी ३८ लाखांच्या मुख्य इमारतीच्या बांधकामाला जिल्हा वार्षिक योजनेमधून मंजुरी मिळाली असून लवकरच या कामाला सुरुवात होऊन वैद्यकीय सुविधा देण्यासाठी सुसज्ज इमारत मिळणार आहे.निमगाव वाकडा येथे राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे काम अंतिम टप्प्यात आहे. मात्र ही इमारत लहान असल्याने रुग्णांना सेवा देण्यासाठी अपुरी पडणार होती. त्यादृष्टीने निमगाव वाकडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या विस्तारित इमारतीसाठी मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून आरोग्य विभागाकडे पाठपुरावा सुरू होता. त्यानुसार जिल्हा वार्षिक योजनेमधून या कामास प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून, संबंधित निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या प्रकल्पांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्राची सुसज्ज व आधुनिक इमारत उभारण्यात येणार आहे. यामध्ये रुग्णांना आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येणार आहे.विशेष म्हणजे मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून येथील वैद्यकिय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाचे देखील काम सुरू असून हे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. निमगाव वाकडा प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरातील तीन गावांच्या सीमा असल्याने मोठ्याप्रमाणात उपचार घेण्यासाठी रुग्ण या प्राथमिक आरोग्य केंद्रात येतात. त्यादृष्टीने मंत्री छगन भुजबळ यांच्या कडून याठिकाणी आरोग्य सेवांचे बळकटीकरण करण्यात येत आहे.सदर आरोग्य केंद्राच्या विस्तारीकरणामुळे निमगाव वाकडा तसेच परिसरातील नागरिकांना दर्जेदार व तात्काळ आरोग्य सेवा मिळणार आहेत. ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा सक्षम करण्याच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार या कामाची अंमलबजावणी करण्यात येणार असून, दर्जेदार व पारदर्शक पद्धतीने बांधकाम पूर्ण करण्यावर भर दिला जाणार आहे.प्रतिक्रिया....मंत्री छगन भुजबळ यांनी येवला मतदारसंघातील ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा बळकट करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले असून, त्यातूनच हा निधी मंजूर झाला आहे. या कामामुळे परिसरातील नागरिकांना थेट लाभ होणार आहे. चांगल्या दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहे.
Stock Market: ‘या’कारणांमुळे शेअर बाजार कोसळला; सेन्सेक्समध्ये 931 अंकांची घसरण
Stock Market: तज्ञांच्या मते, कच्च्या तेलाच्या किंमती उच्च पातळीवर राहिल्यास वित्त वर्ष 2027 साठी कंपन्यांच्या कमाईच्या अंदाजात कपात होऊ शकते. मात्र अलीकडील घसरणीनंतर बाजाराचे मूल्यांकन अद्याप आकर्षक असून, भू-राजकीय परिस्थिती सुधारल्यास मध्यम कालावधीत बाजार पुन्हा सावरू शकतो.
उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे आज म्हणजेच गुरुवार ९ एप्रिल रोजी अतीक अहमदचा (Gangster Atiq Ahmed) ड्रायव्हर, मोहम्मद इरफान, याची दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना प्रयागराज मधील केली येथील बिस्मिल्लाह चौकाजवळ घडली.नेमकं काय घडलं ?मिळालेल्या माहितीनुसार, बिस्मिल्लाह चौकाजवळ इरफान चहा पित असताना हा हल्ला झाला. चेहऱ्यावर रुमाल बांधलेले चार हल्लेखोर दोन मोटरसायकलवरून आले होते. त्यापैकी एकजण खाली उतरला आणि थेट इरफानच्या छातीत गोळी झाडली. गोळीबार होताच परिसरात घबराट पसरली आणि आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जखमी अवस्थेत इरफानला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.तपासात असे समोर आले आहे की, मोहम्मद इरफान हा अतीक अहमदच्या भावाशी संबंधित होता आणि पूर्वी तो त्याच्यासोबत राहत तसेच गाडी चालवत असे. दरम्यान, या हत्येमुळे इरफानच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, त्याचे कुटुंबीय रुग्णालयात आक्रोश करताना दिसले.आसिफ दुर्रानी आणि त्याच्या भावावर संशय :या प्रकरणात कुटुंबीयांनी आसिफ दुर्रानी आणि त्याच्या भावावर संशय व्यक्त केला आहे. प्राथमिक माहितीनुसार, इरफान आणि आसिफ यांच्यात मालमत्तेच्या व्यवहारावरून वाद होता आणि त्यातूनच ही हत्या झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हल्लेखोरांची ओळख पटवणार :पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, आरोपींचा शोध सुरू आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हल्लेखोरांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. डीसीपी यांनी सांगितले की, आरोपींना पकडण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत आणि लवकरच त्यांना अटक केली जाईल.सध्या या घटनेचा अधिक तपास सुरू असून, कायदेशीर कारवाई वेगाने केली जात आहे.
Gayatri Datar : लोकप्रिय अभिनेत्रीसोबत घडला 'हा'धक्कादायक प्रकार, पोस्ट शेअर करत दिली माहिती
मुंबई : 'तुला पाहते रे' मालिकेतून घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री गायत्री दातार ( Gayatri Datar) सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. गायत्री लवकरच लग्न करणार असून काही दिवसांआधी तिनं तिच्या लग्नाची बातमी चाहत्यांना दिली. तिचं लग्न काही दिवसांवर येऊन ठेपलं आहे. तिच्या केळवणालाही सुरुवात झाली आहे. पण, त्याआधीच गायत्रीच्या आयुष्यात एक धक्कादायक घटना घडली आहे.या घटनेमुळे अभिनेत्री गायत्री दातार प्रचंड घाबरली असून तिला तिच्या बिल्डिंगमधून बाहेर पडायलाही भीती वाटत आहे. तिच्याबरोबर घडलेला हा धक्कादायक प्रकार गायत्रीनं इन्स्टाग्राम पोस्टद्वारे सांगितला आहे.गायत्री दातार मुंबईहून पुण्याला जाण्यासाठी निघाली होती. त्यासाठी तिनं कॅब बुक केली पण थोड्या वेळातच कॅन्सलही केली. त्यानंतर आता कॅब ड्राइव्हर तिला त्रास देत असून शिवीगाळ करत आहे. यामुळे गायत्री दातार प्रचंड घाबरली आहे. नेमकं काय झालं हे गायत्रीनं पोस्टमध्ये सांगितलं.गायत्रीनं पोस्टमध्ये लिहिलंय, @indrive.in मी आज सकाळी मुंबईहून पुण्याला जाण्यासाठी कॅब बुक केली होती. पण मला पॅकिंगसाठी जास्त वेळ लागणार असल्याचं लक्षात आल्यानंतर ती कॅब ड्रायव्हर येण्याआधीच मी कॅन्सल केली. त्यानंतर गेल्या २ तासांपासून तो ड्रायव्हर वेगवेगळ्या नंबरवरून सतत फोन करून मला त्रास देत आहे. परिस्थिती इतकी बिघडली आहे की मला माझ्या सोसायटीतून बाहेर पडायलाही भीती वाटतेय. मी अक्षरशः रडत आहे. मला खूपच भीती वाटते आहे कारण त्यानं मला अनेक वेळा फोन करून शिवीगाळ केली आहे. तो ज्या अनेक नंबरवरून फोन करत आहे त्यामुळे तो माझा पाठलाग करू शकतो आणि मला काहीतरी इजा पोहोचवू शकतो अशी भीती वाटत आहे. InDrive सपोर्टकडूनही काहीच मदत मिळत नाही.गायत्रीने शेअर केलेल्या पोस्टनंतर चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे.गायत्री सध्या, 'सीरियल किलर' या मराठी नाटकात काम करत आहे. या नाटकाचे महाराष्ट्रभर दौरे सुरू आहेत. प्रेक्षकांचा या नाटकाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या पोस्टनंतर गायत्रीनं अद्याप कोणतीही अपडेट दिलेली नाही. ती सुखरूप असावी अशी प्रार्थना तिचे चाहते करत आहेत.
पश्चिम बंगालमधील हल्दिया येथे एका निवडणूक (West Bengal Assembly Election 2026) सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्हणजेच गुरुवार ९ एप्रिल रोजी ममता बॅनर्जी यांच्या अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस सरकारवर जोरदार हल्ला चढवला. गुंतवणुकीचे वातावरण भीतीतून नव्हे, तर विश्वासातून निर्माण होते आणि तो विश्वास केवळ भाजपच देऊ शकते, असे मोदी म्हणाले. ही निवडणूक सामान्य नसून, 'बंगालचे वैभव पुन्हा स्थापित करण्याची' निवडणूक आहे, असे ते म्हणाले.नेमकं काय म्हणाले पंतप्रधान मोदी ?पंतप्रधान (Narendra Modi) म्हणाले की, पश्चिम बंगाल एकेकाळी देशाच्या आर्थिक आणि औद्योगिक प्रगतीचे केंद्र होते, पण सध्याच्या सरकारने राज्याला विकासाच्या मापदंडावर मागे ढकलले आहे. हल्दियाच्या ऐतिहासिक महत्त्वाचा संदर्भ देत ते म्हणाले की, प्राचीन काळी हा प्रदेश जागतिक व्यापाराचे प्रमुख केंद्र होता आणि आधुनिक भारतातही एक प्रमुख औद्योगिक केंद्र आहे. पण आता तेथील कारखाने बंद होत आहेत.तृणमूल काँग्रेस 'भीती आणि सिंडिकेट राजकारण' करत असल्याचा आरोप करताना पंतप्रधान मोदी (Narendra Modi) पुढे म्हणाले की, उद्योग आणि कारखाने विश्वासावर चालतात, 'गुंडगिरी'वर नाही. ज्या राज्यांमध्ये भाजप सत्तेत आहे, तिथे विकास आणि गुंतवणुकीसाठीचे वातावरण याच विश्वासावर तयार केले जाते आणि असेच मॉडेल बंगालमध्ये राबवले जाईल.रोजगार आणि स्थलांतराच्या मुद्द्यावरून सरकारवर हल्लाबोल करताना पंतप्रधान (Narendra Modi) म्हणाले की, एकेकाळी लोक रोजगारासाठी हल्दियाला येत असत, पण आज येथील तरुण कामाच्या शोधात इतर राज्यांमध्ये स्थलांतर करत आहेत. त्यांनी आरोप केला की, तृणमूल सरकारच्या काळात खासगी क्षेत्रातील संधी मर्यादित आहेत आणि सरकारी भरतीमध्ये भ्रष्टाचाराने थैमान घालून ठेवल्यामुळे तरुणांची स्वप्ने भंग पावत आहेत.मोदी म्हणाले की, राज्यात 'कट मनी आणि कमिशन'ची पद्धत प्रचलित आहे, ज्यामुळे सामान्य जनता त्रस्त आहे. त्यांनी दावा केला की, बंगालच्या जनतेने यावेळी बदलाचा निश्चय केला आहे आणि भाजपच्या विजयाचा उत्साह जनतेमध्ये स्पष्टपणे दिसत आहे.नंदिग्रामचा उल्लेख करत ते (Narendra Modi) म्हणाले की, पाच वर्षांपूर्वी तेथील निकालांनी बदलाचा मार्ग दाखवला होता आणि भवानीपूरमध्येही त्याचीच पुनरावृत्ती होईल. हे २०२१ च्या विधानसभा निवडणुकांचे एक पूर्वचिन्ह होते, जिथे सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांच्यासमोर मोठे आव्हान उभे केले होते.धर्म-आधारित आरक्षणाच्या मुद्द्यावर, पंतप्रधानांनी (Narendra Modi) तृणमूल सरकारवर हल्ला चढवला आणि आपली मतपेढी मजबूत करण्यासाठी संविधानाचे उल्लंघन करणारी धोरणे राबवत असल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, न्यायालयांनी असे प्रयत्न वारंवार फेटाळून लावले आहेत. पण लांगुलचालनाच्या राजकारणामुळे सरकार न्यायपालिकेचा किंवा संविधानाचा आदर करत नाही.मोदी (Narendra Modi) म्हणाले की, जर भाजपचे सरकार आले, तर सर्व योजना संविधानानुसार राबवल्या जातील आणि समाजातील प्रत्येक घटकाला त्याचे हक्क मिळतील. त्यांनी विशेषतः महिष्य समाजाचा उल्लेख केला आणि सांगितले की त्यांच्या मागण्यांकडे बऱ्याच काळापासून दुर्लक्ष केले जात आहे.केंद्र सरकारच्या योजनांचा संदर्भ देत पंतप्रधान (Narendra Modi) म्हणाले की, प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेमुळे (पीएम मत्स्य संपदा योजना) देशातील मासे आणि कोळंबीच्या उत्पादनात लक्षणीय वाढ झाली आहे. पण या योजनेची बंगालमध्ये योग्य अंमलबजावणी झालेली नाही. त्यांनी असा आरोप केला की, तृणमूल सरकार 'पीएम' नावाशी संबंधित योजनांमध्ये एकतर बदल करते किंवा त्यांची अंमलबजावणीच करत नाही.या संदर्भात, त्यांनी आयुष्मान भारत योजनेचा उल्लेख केला आणि सांगितले की, ही योजना गरीब आणि वृद्धांना मोफत उपचार देत असली तरी, बंगालमध्ये तिची अंमलबजावणी झालेली नाही. राजकीय स्पर्धेमुळे जनतेला त्रास सहन करावा लागत आहे, असे ते म्हणाले.'डबल-इंजिन सरकार'चे समर्थन करताना पंतप्रधान (Narendra Modi) म्हणाले की, केंद्र आणि राज्यात एकाच पक्षाचे सरकार असल्यास विकासाला गती मिळते. त्यांनी आश्वासन दिले की, बंगालमधील भाजप सरकार बंदर-आधारित विकास, नील अर्थव्यवस्था (ब्लू इकॉनॉमी) आणि कृषी क्षेत्राला चालना देईल, ज्यामुळे शेतकरी आणि मच्छीमारांना थेट फायदा होईल.रोजगार निर्मितीचे आश्वासन देताना मोदी (Narendra Modi) म्हणाले की, भाजप सरकार स्थापन झाल्यानंतर तरुणांना अधिक संधी देण्यासाठी राज्यात रोजगार मेळावे आयोजित केले जातील. बंगालमध्ये बदलाची लाट पसरली असून, जनता भीतीचे राजकारण संपवून विकास आणि विश्वासाच्या मार्गावर पुढे जाण्यास सज्ज आहे.
Punjab Election 2027:पंजाबच्या आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी दोन नवीन राजकीय पक्ष आपले अस्तित्व निर्माण करू शकतात.
Dilip Mohite Patil : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेते माजी आमदार दिलीप मोहिते पाटील भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. अखेर मोहिते पाटील यांनी माध्यमांसोबत संवाद साधत भूमिका स्पष्ट केली आहे.
Baramati by-election : अखेर काँग्रेसने बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतून माघार घेतली आहे.
मुंबई : लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिलांना आता घाबरण्याची गरज नाही कारण चर्चगेट ते डहाणू दरम्यान लोकलनं प्रवास करणाऱ्या लाखो महिला प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वे सुरक्षा दलाने (RPF) महिलांच्या सुरक्षेसाठी 'सखी' हा विशेष व्हॉट्सअॅप उपक्रम सुरू केला आहे. या माध्यमातून महिला प्रवासी थेट आरपीएफच्या महिला अधिकाऱ्यांशी जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत त्यांना आता अवघ्या काही मिनिटांत मदत मिळणार आहे.चर्चगेट ते डहाणू पर्यंत एकूण ११ व्हॉट्सअॅप ग्रूप्स तयार करण्यात आले असून या ग्रूपचे नेतृत्व महिला उपनिरीक्षक किंवा सहाय्यक महिला उपनिरीक्षक करत आहेत. महिला प्रवाशाने छेडछाड, चोरी किंवा पुरुषांच्या घुसखोरीबाबत फोटो आणि स्थानकाचं नाव ग्रूपवर टाकल्यास, पुढच्या एक-दोन स्थानकांतच आरपीएफचे जवान मदतीसाठी डब्यात हजर होतील.या उपक्रमात आतापर्यंत १५०० हून अधिक नियमित महिला प्रवासी सहभागी झाल्या असून केवळ तांत्रिक मदतच नव्हे तर आरपीएफनं प्रत्यक्ष कारवाईचा बडगाही उभारला आहे. गेल्या ६ महिन्यांत महिलांच्या डब्यात घुसखोरी करणाऱ्या ६,१९५ पुरुषांवर रेल्वे कायद्याच्या कलम १६२ अन्वये कारवाई करण्यात आली आहे. या घुसखोरांकडून तब्बल १३ लाख ८४ हजार १०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.रेल्वे सुरक्षा आयुक्त रजत कुंडगीर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविला जात आहे. रेल्वेची '१३९' ही हेल्पलाईन सेवा सुरू असली, तरी व्हॉट्सअॅप ग्रूपमुळे फोटो आणि लोकेशन शेअर करणं फार सोपं झाल्यानं गुन्हेगारांना पकडणं अधिक सुलभ होणार आहे. त्यामुळे या नवीन उपक्रमामुळे आता लोकलमध्ये प्रवास करताना महिलांना घाबरण्याची गरज नाही.
Talegaon Dhamdhere : यात्रेचे यंदाचे ७४ वे वर्ष असून यात्रा शुक्रवार दि. १० व शनिवार दि. ११ रोजी पार पडणार
Bigg Boss Marathi 6 : राखी सावंतनं मर्यादा ओलांडल्या, दीपाली आणि राकेशबाबत केलं 'हे'वक्तव्य
मुंबई : बिग बॉस मराठी सीझन ६ यंदा अनेक गोष्टींमुळे चर्चेत आहे. याचबरोबर घरात राखी सावंतनं एन्ट्री घेतल्यानंतर स्पर्धकांमध्ये वाद आणखीनच वाढलेले दिसत आहेत. प्रत्येक स्पर्धकामध्ये राखीनं भांडण लावण्याचा प्रयत्न केला. या शोमध्ये राखीनं रुचिताच्या चारित्र्यावरही शिंतोडे उडवले. अशातच आता राखीनं मर्यादेची पातळी ओलांडली असून दीपाली सय्यदच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल नको ते बोलली आहे.दीपाली आणि राकेश चांगले मित्र असून हे राखीला कायम खटकत आलंय. राखी आणि राकेश एकत्र बसलेले असतात. त्यावरून राखी दीपाली आणि राकेश यांना डिवचते. 'एक सिंगल मुलगा आणि लग्न झालेली मुलगी' असं राखी म्हणते. 'लाज वाटायला पाहिजे तुला, लग्न केलेल्या बाईसोबत...' असं राखी राकेशला म्हणते. यावरून राखी, दीपाली आणि राकेश यांच्यात वाद होतो. पुढे राखी दीपालीला म्हणते, 'तू घाण केलीस' दीपाली राखीला म्हणते, 'मी नाही तू घाण केलीस. माझ्या लग्नाला २६ वर्षे झालेली आहेत. मी माझं लग्न टिकवलंय. तुझ्यासारखं नाही...इकडे तिकडे तोंड काळं कर, असं करणाऱ्यातली नाहीयेयावेळी दीपालीला राग अनावर होतो. तर राखी मुद्दाम राकेशवरून दीपालीला बोलते. 'हिचं राकेशवर प्रेम आहे' असं राखी म्हणते. पुढे राखी दीपालीला म्हणते, 'अफेअर करते. लग्न झालंय तरी हे करते. तुझ्या मनात घाण आहे. लग्न झाल्यानंतरही असं कसं वागतात.' दीपालीही त्यावरून राखीला सुनावते. दीपालीला अश्रू अनावर होतात. त्यानंतर राकेश दीपालीला समजावतो.
India-Bangladesh Relations: गेल्या वर्षी भारत आणि बांगलादेश यांच्यातील तणाव शिगेला पोहोचल्यानंतर, बांगलादेश आता संबंध सुधारण्यासाठी पावले उचलत आहे.
Kareena Kapoor trolled : काहींनी करीना कपूरच्या मताशी सहमती दर्शवली, तर काहींनी तिच्यावर टीका केली आहे.
Jaya Bachchan: १५व्या वर्षीच करिअरची सुरुवात; अमिताभपूर्वीच स्टार झाल्या जया बच्चन
Jaya Bachchan जया बच्चन यांनी अवघ्या १५व्या वर्षी अभिनयाची सुरुवात केली. त्यांची पहिली फिल्म होती ‘महानगर’, ज्याचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक सत्यजित रे यांनी केले होते. १९६३ साली प्रदर्शित झालेल्या या बंगाली चित्रपटात त्यांनी बालकलाकार म्हणून भूमिका साकारली होती.
Crime News : शिरूर येथे एटीएसची मोठी कारवाई; मॅफेड्रॉन ड्रग्ज विक्री करणारे दोघे ताब्यात
Crime News : रांजणगाव एमआयडीसी व शिरूर परिसरात सध्या एमडी सारख्या अत्यंत घातक अमली पदार्थाच्या विळख्यात अनेक तरुण व्यसनाधीन झाल्याचे धक्कादायक चित्र समोर आल्याचे वृत्त एका प्रसिद्धी माध्यमावर प्रसारित झालेले होते.
EPFO New Updates: झटपट पटापट करा विड्रॉ UPI अन् पेन्शन ; सरकार लवकरच लॉन्च करणार EPFO 3.0
EPFO New Updates:
मुंबई : सर्व जगामध्ये नवकार महामंत्राचा आजच्या पवित्र दिवशी सामूहिक जप होत आहे. आपली संस्कृती ही विश्वबंधुत्वाची आणि शांती प्रस्थापित करणारी आहे. आपल्या संस्कृतीला नवकार महामंत्र निश्चितच सर्वव्यापी करतो. नवकार महामंत्रामध्ये विश्व कल्याणची शक्ती असून विश्वशांतीसाठी या महामंत्राच्या जपाचा निश्चितच सकारात्मक परिणाम होणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन यांच्यावतीने विश्व नवकार महामंत्र दिवस कार्यक्रमाचे आयोजन वरळी येथील एनएससीआय डोम मध्ये करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. व्यासपीठावर आचार्य परम सागर महाराज, निरंजन सागर महाराज, सौम्य सागर महाराज, मानव कोठारी, भगवत कोठारी,आशिष शहा आदी उपस्थित होते.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, या जगामध्ये सर्व सजीव प्राणी ही सृष्टीचे मुले आहेत. सर्वांना जीवन जगण्याचा अधिकार आहे. 'जिओ और जीने दो' हे आपले तत्व जैन विचारांमधून प्रतिपादित होते. विश्व कल्याणसाठी यापेक्षा दुसरा विचार असूच शकत नाही. नवकार मंत्र हा अशा विचारांना पुढे नेण्यास मदत करतो. नवकार मंत्राच्या जपातून पाप शुद्धी होऊन सकारात्मक कार्य करण्याची ऊर्जा मिळते. या महामंत्राच्या सामूहिक जपाने संपूर्ण विश्वाच्या शांतीसाठी एक महायज्ञ सुरू आहे. या मंत्रामुळे नवजीवन आपल्याला प्राप्त होते.नवकार मंत्राच्या माध्यमातून पाच तत्वांना आपण नमस्कार करतो. सर्व जगाला यातून आपण नमस्कार करीत असतो. मंत्राच्या जपाने अरिहंत परिस्थिती निर्माण होते. तीर्थंकरांची अवस्था ही अरिहंताची आहे. या मंत्राच्या जपाने जगामध्ये असलेल्या सर्व सकारात्मक शक्ती आपल्याशी जोडल्या जातात. हा मंत्र केवळ व्यक्तीच्या विचारांनाच शांती देत नाही, तर 'इनर सेल्फ' लासुद्धा शांती देतो. विश्वशांतीचा विचार देणाऱ्या, आनंद देणारा , सकारात्मक शक्तींना जोडणाऱ्या या मंत्राचा जप विश्व कल्याणासाठी फलदायी आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी अधोरेखित केले.जैन समाज प्रत्येक जीव, जंतू, प्राणी यांचा विचार करणारा असून भूतदया आणि प्राणी सेवा ही समजात केली जाते. प्राणीसेवेचा विचार केवळ शब्दांमध्ये न ठेवता प्रत्यक्ष वास्तविकतेत जैन समाजामध्ये आणला जातो, असे गौरवोद्गार ही मुख्यमंत्री फडणवीस यांनी काढले. कार्यक्रमाला जैन समाजातील आचार्य, मुनी, उपाध्यय, साध्वी व जैन समाज बांधव उपस्थित होते.
Dhurandhar 2 : अखेर 'धुरंधर २'सिनेमाबाबत दीपिकानं सोडलं मौनं, ट्रोल करणाऱ्यांना म्हणाली....
मुंबई : रणवीर सिंहच्या धुरंधर २ सिनेमानं जगभरात धुमाकूळ घातला आहे. हा सिनेमानं बॉक्स ऑफिसवर ऐतिहासिक कमाई केली आहे. अशातच सोशल मीडियावर एका वेगळ्याच वादाला तोंड फुटलं होतं. रणवीरची पत्नी अभिनेत्री दीपिका पादुकोणनं या सिनेमाबद्दल सोशल मीडियावर मौन बाळगल्यानं तिला मोठ्या प्रमाणावर ट्रोल केलं जात होतं. पण, अखेरआता दीपिकानं ट्रोलर्सना आपल्या खास शैलीत सडेतोड उत्तर दिलं आहे.'धुरंधर: द रिव्हेंज'रिलीज होऊन आता ३ आठवडे पूर्ण होत आले असून या काळात अनेक कलाकारांनी या सिनेमाचं आणि रणवीरचं कौतुक केलं, पण दीपिकानं याबाबत एकही पोस्ट शेअर केली नव्हती. यावरून तिला सोशल मीडियावर भङयंकर ट्रोल केलं गेलं.एका व्हायरल पोस्टमध्ये असं म्हटलं होतं की, दीपिकानं ५०० कोटी रुपयांच्या बजेट असलेल्या या सिनेमाला 'सायलेंट ट्रीटमेंट' दिली आहे. तिनं सिनेमाच्या प्रीमियरला जाणं टाळलं आणि सासू-सासरऱ्यांसोबत सतार वादनाच्या कार्यक्रमाला जाणं पसंत केलं.या पोस्टवर कमेंट करताना दीपिकानं लिहिलं की, मित्रांनो, मी हा सिनेमा तुमच्या सर्वांच्या आधी पाहिला आहे, आता सांगा जोक कुणावर झाला?दीपिकानं सोशल मीडियावर धुरंधर २ बद्दल पोस्ट केली नसली, तरी ती रणवीरच्या यशात सहभागी असल्याचं दिसून आलं आहे. सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर ती रणवीर आणि तिचे सासरे जगजित सिंग भवनानी यांच्यासोबत मुंबईतील प्रसिद्ध कॅफे आणि डोसा सेंटरमध्ये डिनरसाठी जाताना दिसली होती.दीपिका पादुकोणनं यापूर्वी डिसेंबरमध्ये 'धुरंधर'च्या पहिल्या भागाचं भरभरून कौतुक केलं होतं. तेव्हा तिने रणवीरचा अभिमान असल्याचं सांगत फॅन्सना हा सिनेमा पाहण्याचं आवाहनही केलं होतं. यावेळी मात्र तिनं सोशल मीडियापासून लांब राहून वैयक्तिक पातळीवर आनंद साजरा करण्याला प्राधान्य दिलं आहे.दीपिकाच्या या शांततेवर चाहत्यांनी राग व्यक्त केला होता. मात्र, आता दीपिकानं याबाबत तिला ट्रोल करणाऱ्यांना अगदी मजेशीर पद्धतीनं यावर उत्तर दिलं आहे.
Sanya Malhotra : ‘दंगल गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री सान्या मल्होत्रा तिच्या ब्रेकअपच्या चर्चांमुळे लाइमलाइटमध्ये आली आहे.
Parth Pawar Oath Ceremony :
Donald Trump on iran: अमेरिका आणि इराण यांच्यातील दोन आठवड्यांच्या शस्त्रसंधीच्या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांनी एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे.
Devendra Fadnavis : शेवटचे काही तास बाकी, राजकीय हालचालींना वेग; आता CM फडणवीसांचा ‘या’नेत्याला फोन
Devendra Fadnavis : बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगवान घडामोडी घडताना दिसत आहेत. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन केल्याची माहिती समोर आली आहे.
Devendra Fadnavis : शेवटच्या तासांत राजकीय हालचालींना वेग; आता CM फडणवीसांचा ‘या’नेत्याला फोन
Devendra Fadnavis : बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगवान घडामोडी घडताना दिसत आहेत. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन केल्याची माहिती समोर आली आहे.
Nashik Fake Police : AI,पोलीस आणि स्त्रियांची लाखोंची फसवणूक; तोतया पोलीस अटकेत
नाशिक : नाशिक जिल्ह्यात तंत्रज्ञानाचा गैरवापर करून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) च्या मदतीने स्वतःला पोलीस अधिकारी म्हणून सादर करत महिलांना जाळ्यात ओढून आर्थिक लूट करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.AI च्या मदतीने बनावट ओळखआसिफ तडवी असे आरोपीचे नाव असून, त्याने AI तंत्रज्ञानाचा वापर करून स्वतःचे पोलीस वर्दीतील बनावट फोटो तयार केले होते. हे फोटो इतके वास्तवदर्शी होते की, सोशल मीडियावर पाहणाऱ्या महिलांना तो खरा पोलीस अधिकारी असल्याचा विश्वास बसत होता. इंस्टाग्रामवर सक्रिय राहून तो महिलांशी संपर्क साधत असे.प्रेमाच्या जाळ्यात अडकवून लूटसिन्नरमधील एका महिलेला त्याने अशाच प्रकारे जाळ्यात ओढले. विश्वास संपादन केल्यानंतर विविध कारणे सांगत त्याने तिच्याकडून सुमारे 3 लाख रुपये उकळले. घरगुती अडचणी आणि पोलीस प्रशिक्षणाच्या नावाखाली पैशांची मागणी केली जात होती. पीडित महिलेने पुढे पैसे देण्यास नकार दिल्यानंतर आरोपीने धमक्यांचा मार्ग अवलंबला. AI च्या मदतीने महिलेचे आक्षेपार्ह फोटो तयार करून ते व्हायरल करण्याची धमकी दिली. या प्रकारामुळे घाबरलेल्या महिलेने पोलिसांकडे धाव घेतली.पोलिसांचा सापळा आणि अटकतक्रारीनंतर वावी पोलिसांनी सापळा रचून आरोपीला पकडले. महिलेच्या माध्यमातून भेटण्याचे आमिष दाखवून त्याला बोलावण्यात आले आणि अटक करण्यात आली. आरोपीच्या मोबाईलमधून मोठ्या प्रमाणावर बनावट फोटो, चॅट्स आणि आक्षेपार्ह व्हिडिओ जप्त करण्यात आले आहेत.अनेक महिलांची फसवणूक?पोलिसांच्या प्राथमिक तपासात आरोपीने अशाच प्रकारे अनेक महिलांना जाळ्यात ओढल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मोबाईलमधील डेटाच्या आधारे पुढील तपास सुरू असून, आणखी पीडित महिला समोर येण्याची शक्यता आहे.नाशिक ग्रामीण पोलिसांनी नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. सोशल मीडियावर कोणीही पोलीस असल्याचा दावा करत असल्यास त्याची खातरजमा करणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.एकूणच, तंत्रज्ञानाचा गैरवापर करून फसवणूक करण्याच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज अधोरेखित झाली आहे. या प्रकरणातून डिजिटल सुरक्षा आणि जागरूकतेचे महत्त्व पुन्हा एकदा समोर आले आहे.
Watermelon Side Effects: रिकाम्या पोटी कलिंगड खाणं ठरू शकतं धोकादायक; जाणून घ्या ५ मोठे तोटे
Watermelon Side Effects तज्ज्ञांच्या मते, कलिंगड मध्ये नैसर्गिक साखरेचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे रिकाम्या पोटी ते खाल्ल्यास रक्तातील साखर झपाट्याने वाढू शकते. विशेषतः मधुमेह किंवा प्रीडायबिटीज असलेल्या लोकांसाठी हे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे अशा लोकांनी सकाळी उठल्यावर लगेच कलिंगड खाणे टाळावे.

28 C