Ajit Pawar : अजित पवारांच्या अपघाती निधनाबद्दल रोहित पवारांनी उपस्थित केले ‘हे’ 5 मोठे प्रश्न
माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे झालेल्या भीषण विमान अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.
Devendra Fadnavis: विलिनिकरण हा राष्ट्रवादीचा अंतर्गत विषय - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मंत्रिमंडळ बैठकीत अजित पवारांची स्वप्नपूर्ती करणारे अनेक निर्णयमुंबई : “राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाचा प्रश्न हा त्यांच्या पक्षाचा आहे. त्याबाबत बोलणे मला योग्य वाटत नाही. योग्य वेळी अधिकृत घोषणा झाली, त्यांच्यात काही ठरले, तरच मी प्रतिक्रिया देईन. रोज उगाच पतंग कशाला उडवायचे,” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी स्पष्ट केले. सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाटचाल सकारात्मक राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. “आज त्यांची पहिली मंत्रिमंडळ बैठक होती. दुखवटा असल्याने औपचारिक स्वागत न करता शब्दसुमनांनी स्वागत करण्यात आले. कालच्या निवडणुकीत त्यांची कामगिरी समाधानकारक होती,” असे मुख्यमंत्री म्हणाले.मंत्रिमंडळ बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री बोलत होते. मंत्रिमंडळ बैठकीत राज्याच्या विकासाशी संबंधित अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने होणाऱ्या पुरंदर येथील विमानतळ प्रकल्पासाठी भूमी अधिग्रहणास मान्यता देण्यात आली आहे. निधी उभारणीसह संबंधित प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून ९६ टक्के शेतकऱ्यांनी संमती दिली आहे. १ जूनपर्यंत भूमी अधिग्रहण पूर्ण करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.तिसऱ्या मुंबईच्या संकल्पनेला गती देण्यासाठी अटल सेतूच्या जवळ एमएमआरडीएला नियोजन प्राधिकरण म्हणून दिलेल्या जागांवर सिडको आणि एमआयडीसीचे नियम लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे भूसंपादन आणि विकासकामे अधिक वेगाने करता येतील, असे मुख्यमंत्री म्हणाले. जलसंपदा विभागासंदर्भातही मोठा निर्णय घेण्यात आला आहे. नाबार्डच्या माध्यमातून १५ हजार कोटी रुपयांचे दीर्घमुदतीचे कर्ज घेऊन ४० प्रकल्प आणि १०० कालवे पूर्ण करण्यास मान्यता देण्यात आली आहे. पुढील एक-दोन वर्षांत हे प्रकल्प पूर्ण झाल्यास साडेतीन लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार असून एकूण आठ लाख एकर क्षेत्राला ओलिताची सुविधा उपलब्ध होईल. राज्यातील सर्व विभागांना याचा लाभ होणार असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.संघाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाले नसल्याने पोटदुखी:राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या कार्यक्रमावर राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेलाही मुख्यमंत्र्यांनी प्रत्युत्तर दिले. “ज्यांना निमंत्रण मिळाले नाही, त्यांना त्याचे वाईट वाटत आहे. त्यामुळे ज्यांना निमंत्रण मिळाले, त्यांच्यावर टीका केली जात आहे. संघाला शंभर वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर समाजातील विविध क्षेत्रांतील लोकांना संघाबाबत स्पष्ट माहिती मिळावी, वाद-अपवाद दूर व्हावेत, यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता,” असे फडणवीस म्हणाले.मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय:- जलसंपदा प्रकल्पांना गती : नाबार्डकडून १५ हजार कोटी रुपयांचे दीर्घमुदतीचे कर्ज. ५७ अपूर्ण सिंचन प्रकल्प व १९३ पूर्ण प्रकल्पांच्या वितरण प्रणालीत सुधारणा. राज्यातील सुमारे ८ लाख हेक्टर कृषी क्षेत्र सिंचनाखाली येणार.- पुरंदर विमानतळ प्रकल्प : पुणे जिल्ह्यातील पुरंदर विमानतळासाठी विशेष हेतू प्राधिकरणाची स्थापना. भूसंपादन व अनुषंगिक बाबींसाठी ६ हजार कोटींच्या कर्जास मान्यता. एमआयडीसी, एमएडीसी व सिडको यांचा सहभाग.- तिसऱ्या मुंबईच्या संकल्पनेला चालना : अटल सेतू प्रभाव क्षेत्रासाठी भूसंपादन व भूवाटप धोरणास मंजुरी. एमएमआरडीएमार्फत भविष्यातील विकास प्रकल्पांना गती.- कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम : मौजे विकासवाडी (ता. करवीर) येथे १२ हेक्टर ७६ आर शासकीय जमीन उपलब्ध करून देण्यास मंजुरी.- ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियान : १ एप्रिल २०२६ ते ३१ मार्च २०२७ या कालावधीत अभियान राबविणार. आरोग्य सुधारणा, प्रतिबंधात्मक उपाय, उपचार व पुनर्वसनावर भर. दरवर्षी ८० कोटी ७५ लाख रुपयांची तरतूद.- एमआयडीसीसाठी जमीन हस्तांतरण : पुणे जिल्ह्यातील रत्नपुरी मळा (ता. इंदापूर) येथे महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाची १,००० एकर जमीन नव्या औद्योगिक वसाहतीसाठी एमआयडीसीला देण्यास मंजुरी.- क्रीडा व पायाभूत सुविधा विकास : मुंबईतील कोलेकल्याण येथे महाटेनिस फाऊंडेशनमार्फत टेनिस पायाभूत सुविधांना मंजुरी. बारामती क्रीडा संकुलातील कटफळ येथे ७५ कोटी १३ लाख रुपयांच्या क्रीडा सुविधांना मान्यता.- शिक्षण व विज्ञान क्षेत्र : राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनातील बक्षिसांच्या रकमेत वाढ. सार्वजनिक व खासगी विद्यापीठ व व्यावसायिक शिक्षणविषयक कायद्यांत सुधारणा.- प्रशासन व महसूल सुधारणा : ई-मेलद्वारे बजावलेली नोटीस कायदेशीर ठरणार. अपर जिल्हाधिकारी पदांच्या ११ नव्या पदनिर्मितीस मंजुरी. कर, व्याज व दंड थकबाकी तडजोडीसाठी अध्यादेशास मान्यता.- उद्योग व ऊर्जा क्षेत्र : नागपूर जिल्ह्यात कोल टू केमिकल प्रकल्पासाठी ११७ हेक्टर जमीन एमआयडीसीला उपलब्ध. परभणीतील इंद्राणी सहकारी सूतगिरणीस शासकीय अर्थसहाय्य.- अन्नधान्य वितरण प्रणाली : राज्यात सुधारित धान्य वितरणासाठी एकत्रित निविदा प्रक्रियेस मान्यता, वितरण व्यवस्था अधिक सक्षम होणार.- लघुपाटबंधारे प्रकल्प : अकोला जिल्ह्यातील पिंपळशेंडा प्रकल्पाच्या दुरुस्तीस ६ कोटी ६० लाख रुपयांची मंजुरी, २५५ हेक्टर क्षेत्राला सिंचन लाभ.
मुंबई : राज्यात शेतकरी आत्महत्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन राज्य सरकारने ठोस पाऊल उचलले आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी विशेष ‘टास्क फोर्स’ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यासंदर्भातील परिपत्रक कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी जारी केले आहे.या टास्क फोर्सचे अध्यक्ष म्हणून विस्तार व प्रशिक्षण विभागाचे संचालक रफिक नाईकवाडी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली सुनील बोरकर, उदय देशमुख, गणेश घोरपडे, जीवन बुंदे, नंदकिशोर नाईनवाड, सत्यजित शितोळे आणि सोनाली शिळकर यांचा समावेश असणार आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांबरोबरच शेतकऱ्यांच्या मानसिक आरोग्यावर काम करणाऱ्या तज्ज्ञांनाही या कृती दलात स्थान देण्यात आले आहे.‘शिवार फाउंडेशन’च्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मानसिक आरोग्यावर संशोधन करणारे कृषी समाजशास्त्रज्ञ डॉ. विनायक हेगाणा आणि महिला शेतकऱ्यांच्या मानसिक आरोग्यावर विशेष अभ्यास करणाऱ्या मानसोपचार तज्ज्ञ सृष्टी डोईजड यांची विशेष सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे या टास्क फोर्सच्या कार्यपद्धतीत प्रशासकीय निर्णयांसोबत मानवी संवेदनशीलता आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा समतोल साधला जाणार आहे.राज्यात शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी विविध योजना व उपक्रम राबवले जात असले, तरी हवामान बदलामुळे वाढणाऱ्या नैसर्गिक आपत्ती, पिकांचे नुकसान, आर्थिक अडचणी, सामाजिक दबाव आणि मानसिक अस्थैर्य यामुळे शेतकरी अजूनही मोठ्या संकटात सापडत आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना वेळेत मार्गदर्शन आणि मानसिक आधार देणे अत्यावश्यक असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.नेमके काम काय करणार?- या टास्क फोर्सच्या माध्यमातून आपत्तीपूर्व, आपत्तीच्या काळात आणि आपत्तीनंतर शेतकऱ्यांना शेती, आर्थिक, सामाजिक आणि मानसिक अशा चतुःसूत्री दृष्टिकोनातून मदत केली जाणार आहे. शेतकऱ्यांच्या समस्या स्वतंत्रपणे न पाहता एकात्मिक पद्धतीने त्यावर उपाययोजना करण्यावर भर दिला जाणार आहे. शेतकऱ्यांना नैराश्यातून बाहेर काढणे आणि संकटांना तोंड देण्यासाठी सक्षम बनवणे, हा या कृती दलाचा मुख्य उद्देश आहे.- कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी स्पष्ट केले की, शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न केवळ आत्महत्येनंतर मदत देण्यापुरता मर्यादित ठेवून चालणार नाही. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, त्यांना मानसिक स्थैर्य देणे आणि आधीपासून सक्षम बनवणे अधिक महत्त्वाचे आहे. यासाठी कृषी विभागातील योजना इतर विभागांशी समन्वय साधून अधिक प्रभावीपणे राबविण्यात येणार आहेत.
Indo-US deal : शशी थरूर यांनी करारातील खालील मुद्द्यांवर चिंता व्यक्त केली. अमेरिका भारतीय निर्यातीवर १८ टक्के शुल्क लावत असताना, भारताने मात्र स्वतःचे शुल्क शून्याच्या जवळ आणण्याचे आणि कृषी क्षेत्र खुले करण्याचे मान्य केले आहे.
Shashi Tharoor : अपघातग्रस्त गाडीतील एअरबॅग बदलण्यासारखा अर्थसंकल्प; शशी थरूर यांची सरकारवर टीका
केंद्रीय अर्थसंकल्पाला फिका आणि वाया गेलेली संधी असे संबोधत काँग्रेस खासदार शशी थरूर (Shashi Tharoor) यांनी मंगळवारी लोकसभेत सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली.
Narayan Rane Health : खासदार नारायण राणे रुग्णालयात दाखल; नेमकं काय झालं?
Narayan Rane Health : भाजपाचे ज्येष्ठ नेते खासदार नारायण राणे यांना मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या (Chandrapur Municipal Corporation) निवडणुकीत मोठा राजकीय उलटफेर झाला आहे. काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीचा फायदा घेत भाजपने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला सोबत घेऊन सत्ता स्थापन केली.
Stock Market Rise: शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी तेजी; प्रमुख शेअर्सच्या किंमतींमध्ये मोठी हालचाल
Stock Market Rise:
Nitesh Rane: सलमान खान उद्धव ठाकरेंपेक्षा चांगला हिंदू - मंत्री नितेश राणेंचा हल्लाबोल
सरसंघचालकांच्या उद्बोधनावर ठाकरे बंधूंनी केलेल्या टीकेला दिले प्रत्युत्तरमुंबई : “सलमान खान हा उद्धव ठाकरेंपेक्षा चांगला हिंदू आहे. उद्धव ठाकरे खरेच हिंदू आहेत का, हे तपासण्याची वेळ आली आहे. सलमान खानने किमान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची हिंमत दाखवली. पण, उद्धव ठाकरे कधी राहुल गांधींच्या समोर स्वतःच्या वडिलांना हिंदुहृदयसम्राट म्हणण्याची हिंमत दाखवतील का, हे उद्धव किंवा संजय राऊतांना विचारा”, असा हल्लाबोल राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी केला.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी मुंबईत केलेल्या उद्बोधनावर राज ठाकरे आणि अन्य विरोधकांनी केलेल्या टीकेचा मंत्री राणे यांनी कठोर शब्दांत समाचार घेतला. सरसंघचालकांनी भाषेविषयी केलेल्या विधानावर राज ठाकरेंनी आक्षेप घेत समाज माध्यमांवर टीका केली. त्याला प्रत्युत्तर देताना नितेश राणे म्हणाले, “रा. स्व. संघाच्या कार्यक्रमात मी स्वतः उपस्थित होतो. आदरणीय सरसंघचालकांनी भाषेविषयी जे विचार मांडले, त्याविषयी ज्यांनी राज ठाकरेंना माहिती दिली, ती कदाचित चुकीची असावी. सरसंघचालकांनी, राष्ट्रभाषेचा आपल्याला अभिमान असला पाहिजे, असे म्हटले. त्यासोबतच त्यांनी भारतभरातील भाषांविषयी सखोल विश्लेषण केले, त्याबद्दल राज ठाकरेंना कुणी माहिती दिलेली दिसत नाही. राज ठाकरेंनी जे ट्वीट सरसंघचालकांच्या भाषणाबद्दल केले, तशाप्रकारचे ट्वीट ते कुणा मौलवीच्या भाषणाबाबत करताना दिसत नाहीत. उद्याची अजान मराठीत करा, असे ते सांगत नाही. मालेगाव किंवा मुंब्र्यात जाऊन मराठी भाषेचा आग्रह धरत नाहीत. हिंदुत्वाविरोधी द्वेष पसरवून पाकिस्तानमध्ये बसलेल्या अब्बांना खूश करण्याचा हा प्रयत्न आहे. त्यामुळेच जनतेने यांना घरी बसवले आहे”, असेही राणे म्हणाले.
Rohit Pawar : आमदार रोहित पवार यांनी १० फेब्रुवारी रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत गंभीर शंका उपस्थित केल्या आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर आणि पत्रकारांशी बोलताना अनेक महत्त्वपूर्ण निर्णय आणि प्रकल्पांबाबत माहिती दिली.
Govinda Exit Politics : अभिनेता गोविंदाने राजकारण सोडलं; सांगितलं सर्वात मोठं कारण… VIDEO
गोविंदाने मार्च २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला होता.
Om Birla No-confidence motion: काँग्रेस खासदारांनी या प्रस्तावावर स्वाक्षऱ्या केल्या असून, समाजवादी पक्ष (सपा) आणि द्रमुक (DMK) यांनी या प्रस्तावाला आपला पाठिंबा जाहीर केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
महाराष्ट्राच्या राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत 'हे'महत्वाचे निर्णय घेण्यात आले.
मुंबई : नाबार्डकडून जलसंपदा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पंधरा हजार कोटींचे दीर्घ मुदतीचे कर्ज. यातून ५७ अपूर्ण सिंचन प्रकल्प व १९३ पूर्ण प्रकल्पांच्या वितरण प्रणालीमध्ये सुधारणा करण्यात येणार. राज्यातील ८ लाख हेक्टर कृषि क्षेत्राला सिंचन सुविधा निर्माण होण्याने राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार. (जलसंपदा विभाग)कोल्हापूर जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम होणार. मौजे विकासवाडी ( ता. करवीर) १२ हेक्टर ७६ आर शासकीय जमीन उपलब्ध करून देण्यास मंजुरी. कोल्हापुरच्या क्रिडा विकासाला चालना मिळणार. (महसूल, नोंदणी व मुद्रांक शुल्क)पुणे जिल्ह्यातील पुरंदर विमानतळासाठी विशेष हेतू प्राधिकरणाची स्थापना. प्रकल्पाला गती देण्यासाठी, भुसंपादन व अनुषांगिक बाबींसाठी सहा हजार कोटींचे कर्ज. एमआयडीसी, एमएडीसी आणि सिडको यांची सहभागीदारी, त्यांच्याकडे भागीदारीनुसार कर्ज फेडीची जबाबदारी. या कर्जाला शासन मान्यता व हमी देण्यास मान्यता. (उद्योग विभाग)राज्यात ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव अभियान’ राबविणार. गावपातळीवर आरोग्य सुधारणा घडवून आणण्यावर भर. ग्रामपंचायतीली राज्यस्तरीय पुरस्कारासाठी पाच ते २ कोटी रुपयांचा पुरस्कार. ग्रामपंचाय ते जिल्हापरिषद स्तरापर्यंत पुरस्कार. जीवनशैलीत, आहारात बदल करण्यासाठी प्रोत्साहन, प्रतिबंधात्मक उपाययोजना, वेळेवर उपचार व पुनर्वसन हे अभियानाचे चार स्तंभ. राज्यस्तरापासून उपक्रेंद्र- ग्रामस्तरापर्यंतचे नियोजन. आर्थिक वर्ष १ एप्रिल २०२६ ते ३१ मार्च २०२७ पर्यंत अभियान कालावधी. अभियानाकरिता दरवर्षी ८० कोटी ७५ लाख रुपयांची तरतूद. (सार्वजनिक आरोग्य विभाग)पुणे जिल्ह्यातील रत्नपुरी मळा (ता. इंदापूर) येथील एमआयडीसीला जमीन मिळणार. महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाची रत्नपुरी मळ्यातील एक हजार एकर जमीन नविन औद्योगिक वसाहतीसाठी एमआयडीसीला हस्तांतरीत होणार. उद्योजकांसाठी दिलासा, गुंतवणूक व रोजगार संधी निर्माण होणार (महसूल विभाग)मुंबईत मौजे कोलेकल्याण (ता. अंधेरी) येथे महाटेनिस फाऊंडेशनच्या माध्यमातून पायाभूत सुविधा. टेनिस खेळाला प्रोत्साहन, खेळाडुंना सुविधा निर्माण होणार. यासाठी म्हाडाच्या भुखंडांवर माध्यमातून संयुक्त भागीदारी तत्वावर विकास योजना राबविण्यास मंजुरी. (गृहनिर्माण विभाग)अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू (मुंबई पारबंदर प्रकल्प) प्रकल्पाच्या प्रभाव क्षेत्राकरीता नियुक्त नव नगर विकास प्राधिकरण क्षेत्रात तसेच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत भविष्यात राबविण्यात येणाऱ्या विकास प्रकल्पासाठी भूसंपादन व भूवाटपाच्या धोरणास मान्यता. तिसरी मुंबईच्या दिशेने वाटचालीस गती मिळणार. (नगर विकास)राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनातील बक्षिसांच्या रकमेत वाढ. विद्यार्थी, शिक्षक, प्रयोगशाळा परिचर यांना मिळणार वाढीव बक्षीस. (शालेय शिक्षण)महाराष्ट्र सार्वजनिक – खासगी भागीदारी (पीपीपी) धोरण – २०२६ जाहीर. वित्तीय मुल्य २५ कोटीहून अधिक असेल, अशा सार्वजनिक – खासगी भागीदारी प्रकल्पांना मंजूरी देण्याचे अधिकार मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीला. नियोजन विभागात यासाठी स्वतंत्र कार्यासन निर्मितीस मान्यता ( नियोजन विभाग)ईलेक्ट्रॉनिक माध्यमातून ई-मेलद्वारे बजावण्यात आलेली नोटीसही कायदेशीर. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ मधील कलम २३०- (नोटीस बजाविणेची रित) मध्ये इलेक्ट्रानिक मेलव्दारे नोटीस बजाविण्याच्या नियमात दुरूस्ती. (महसूल विभाग)परभणी जिल्ह्यातील इंद्राणी सहकारी सूतगिरणीला (ता. मानवत) शासन अर्थसहाय्य मिळणार (वस्त्रोद्योग विभाग)राज्यात अपर जिल्हाधिकारी यांच्या ११ पदांच्या निर्मितीस मान्यता. जिल्ह्यांचे भौगिलिक क्षेत्र, वाढलेली लोकसंख्या व अंतर विचारात घेता विविध सेवा जलद मिळाव्यात यासाठी उच्च स्तरीय समितीच्या शिफारशीनुसार पद निर्मिती. ( महसूल व वन विभाग)नागपूर जिल्ह्यातील मौजा लिंगा (ता. कळमेश्वर) येथे कोल टू केमिकल प्रकल्पासाठी ११७ हेक्टर १९ आर जमीन एमआयडीसीला उपलब्ध करून देणार. (महसूल विभाग)बारामती जिल्हा क्रीडा संकुल अंतर्गत मौजे कटफळ येथील क्रीडा सुविधांसाठी ७५ कोटी १३ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास मान्यता. यातून ८० हजार चौरस मीटरवर पॅव्हेलियन, जलतरण तलाव, स्केटिंग रिंग, आर्चरी रेंज, बास्केटबॉल मैदान अशा सुविधा उभारण्यात येणार (शालेय शिक्षण व क्रीडा विभाग)सुधारित धान्य वितरण प्रणालीत अन्नधान्य व इतर जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करण्यासाठी वाहतूक कंत्राटे निश्चितीसाठी एकाच वेळी निविदा प्रक्रीया राबविण्यास मान्यता. यामुळे मुंबई – ठाणे शिधावाटप क्षेत्रातील ५ परिमंडळे व ३४ जिल्ह्यांमधील वितरण प्रणाली सक्षम होणार, यात सुसूत्रता येणार ( अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग)अकोला जिल्ह्यातील पिंपळशेंडा (ता. मुर्तिजापूर) येथील लघू पाटबंधारे प्रकल्पाच्या ६ कोटी ६० लाख रुपयांच्या दुरूस्ती अंदाजपत्रकास मंजुरी. यामुळे २५५ हेक्टरला सिंचन उपलब्ध होणार ( मृद व जलसंधारण विभाग)महाराष्ट्र कर, व्याज, शास्ती किंवा विलंब शुल्क यांच्या थकबाकीची तडजोड करण्याबाबत (सुधारणा व विधिग्राह्यीकरण) अध्यादेशास मंजुरी (वित्त विभाग)महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील १०९ (३) (घ) मध्ये सुधारणेस मान्यता. (उच्च व तंत्र शिक्षण)महाराष्ट्र विनाअनुदानित खासगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था (प्रवेश व शुल्क विनियमन) अधिनियम, २०१५ मध्ये सुधारणा करण्यास, त्याबाबतच्या अध्यादेशास मान्यता. ( उच्च व तंत्र शिक्षण विभाग)
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी आज मंत्रालयात पदभार स्वीकारला. त्याअगोदर सकाळी आपल्या पक्षाच्या नेत्यांसह सिध्दीविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतले.त्यानंतर चैत्यभूमीवर जाऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना नतमस्तक झाल्या.सुनेत्रा पवार भावूक:सिध्दीविनायक मंदिर आणि चैत्यभूमीवर गेल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात जाऊन दादांच्या केबिनमध्ये प्रतिमेला अभिवादन केले. यानंतर मंत्रालयात पदभार स्वीकारला. यावेळी दादांच्या प्रतिमेला अभिवादन करताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार भावूक झाल्याचे पहायला मिळाले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, युवा नेते पार्थ पवार,वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ,ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक, माजी मंत्री धनंजय मुंडे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे,सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे,पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक, पक्षाचे कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे,प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर,माजी मंत्री अनिल भाईदास पाटील,आमदार सना मलिक शेख, आमदार सतिश चव्हाण, आमदार अमोल मिटकरी,आमदार विक्रम काळे, आमदार शेखर निकम, आमदार प्रतापराव चिखलीकर पाटील, आमदार राजू नवघरे, आमदार आशुतोष काळे,आमदार हिरामण खोसकर, आमदार पंकज भुजबळ,माजी आमदार झिशान सिद्दीकी, मुंबई कार्याध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, प्रदेश सरचिटणीस संजय तटकरे,सहकोषाध्यक्ष संजय बोरगे,आदींसह सर्व आमदार, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
IND vs PAK : आयसीसीने(ICC) घेतलेली कठोर भूमिका आणि मित्रराष्ट्रांच्या विनंतीनंतर पाकिस्तान सरकारने नमते घेत आपल्या संघाला भारताविरुद्ध खेळण्यासाठी ग्रीन सिग्नल दिला आहे
सर्व राज्य विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याचा भाजपचा हेतू आहे. पण त्यामुळे मतदारसंघांच्या सीमांकनानंतर राज्यातील पुढील विधानसभा निवडणुका २०२८ ऐवजी २०२९ मध्ये लोकसभा निवडणुकांसह होतील, असा अंदाज मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी (Revanth Reddy) यांनी व्यक्त केला.
Maharashtra Cabinet Decisions :
Baba Siddique murder case:
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला अभिनेता सलमान खानने उपस्थित राहण्याची हिंमत दाखवली. उद्धव ठाकरेंपेक्षा सलमान खान जास्त हिंदू निघाला.
Ghooskhor Pandat : ‘घूसखोर पंडत’चे नाव बदलणार; वाद उफाळल्याने निर्मात्यांचा मोठा निर्णय
मनोज बाजपेयी अभिनीत आगामी 'घूसखोर पंडत' (Ghooskhor Pandat) चित्रपटाची घोषणा झाल्यापासून वाद सुरू आहे. हा वाद चित्रपटाच्या शीर्षकाभोवती फिरतो, ज्यामध्ये पंडित हा शब्द वापरला आहे. व्यापक निषेधानंतर, हे प्रकरण दिल्ली उच्च न्यायालयात पोहोचले.
Thanya Nathan C: अभिमानस्पद! देशाला मिळाल्या पहिल्या दृष्टिहीन महिला न्यायाधीश
देशाला लवकरच पहिल्या महिला दृष्टिहीन न्यायाधीश मिळणार आहेत. ही देशासाठी अभिमानस्पद गोष्ट आहे. केरळच्या दृष्टिहीन वकील तान्या नाथन सी. (Thanya Nathan C.) लवकरच राज्यातील पहिल्या दृष्टिहीन महिला न्यायाधीश होणार आहेत.केरळच्या 'सिव्हिल जज' (ज्युनियर डिव्हिजन) पदांसाठी नुकत्याच पार पडलेल्या परीक्षेत त्यांनी दिव्यांग श्रेणीतील गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक पटकावला आहे. २४ वर्षीय तान्या या कन्नूर विद्यापीठाच्या लॉ ग्रॅज्युएट असून त्यांनी एलएलबी परीक्षेतही प्रथम क्रमांक मिळवला होता.जन्मजात अंधत्व असूनही तान्या यांनी ब्रेल लिपी, स्क्रीन रीडिंग तंत्रज्ञान आणि अढळ संकल्पाच्या जोरावर आपलं शिक्षण पूर्ण केलं. त्यांचं हे यश केवळ वैयक्तिक मेहनतीचे उदाहरण नसून न्यायक्षेत्रातील सर्वसमावेशकतेचं प्रतीक ठरत आहे.कोण आहेत तान्या नाथन सी ?न्यायाधीश होण्यापूर्वी तान्या कंजूर जिल्ह्यातील तातिपरम्बा येथे एक पॅक्टिसिंग वकील (Practicing lawyer) म्हणून कार्यरत होत्या. अवघ्या २४ वर्षांच्या वयात त्यांनी हे यश मिळवून संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे. तान्या जन्मजात दृष्टिहीन असून त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण धर्मा होम या विशेष शाळेत घेतले. पुढे पारासिनीक्कडवू उच्च माध्यमिक शाळेतून दहावी आणि मोराझा सरकारी उच्च माध्यमिक शाळेतून बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली. बारावीनंतर त्यांनी कायदाचे शिक्षण घेण्याचा निर्णय घेतता, कुटुंबाच्या भक्कम पाठिंब्यामुळे त्यांनी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केली आणि कन्जूर विद्यापीठातील एलएलबी अभ्यासक्रमात अव्वत स्थान मिळवले. त्या संस्थेतील त्या एकमेव दृष्टिहीन विद्यार्थिनी होत्या, तान्या नाथन यांचा हा प्रवास केवळ वैयक्तिक यशाचा नसून, तो दिव्यांग व्यक्तींच्या क्षमतांवर विश्वास ठेवण्याचा आणि समावेशक न्यायव्यवस्थेचा सशक्त संदेश देणारा ठरत आहे.यापूर्वी, २०१३ साली राजस्थानचे ब्रह्मानंद शर्मा (Brahmanand Sharma) हे भारतातील पहिले दृष्टीहिन न्यायाधीश ठरते होते. तर जागतिक स्तरावर सर जॉन अपनी वॉल पांना जगातील पहिले १०० टक्के नेत्रहिन न्यायाधीश मानले जातात.
Prajakta Mali Post :प्राजक्ता माळीने आई वडिलांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने खास पोस्ट शेअर केली आहे.
री-रिलीजपूर्वी सलमान खानची जुनी मुलाखत व्हायरल; ‘तेरे नाम’च्या यशामागचं रहस्य उघड
“मी काहीच केलं नाही…” — ‘तेरे नाम’च्या यशावर सलमान खानचं मोठं विधान व्हायरलमुंबई : सलमान खानची कल्ट क्लासिक फिल्म ‘तेरे नाम’ २७ फेब्रुवारी २०२६ रोजी पुन्हा एकदा चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या पार्श्वभूमीवर सुपरस्टारची एक जुनी मुलाखत सध्या सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ केवळ चित्रपटाचा प्रभाव आठवण करून देत नाही, तर सलमान खानची प्रचंड नम्रताही अधोरेखित करतो.व्हायरल होत असलेल्या या क्लिपमध्ये सलमान खान ‘तेरे नाम’मधील स्वतःच्या योगदानाबाबत अत्यंत प्रामाणिकपणे बोलताना दिसतो. मूळ प्रदर्शनावेळी बॉक्स ऑफिसवर विक्रम करणाऱ्या आणि पुढे सांस्कृतिक प्रतीक ठरलेल्या या चित्रपटाच्या यशाचे श्रेय तो स्वतःकडे न घेता दिग्दर्शक, पटकथा, संवाद आणि संपूर्ण कथेला देतो.सलमान खान ठामपणे सांगतो की राधे मोहनसारखा लक्षात राहणारा व्यक्तिरेखा त्याच्या अभिनयामुळे नाही, तर दिग्दर्शकाची दृष्टी, मजबूत पटकथा, लेखकांची लेखणी आणि प्रभावी संवाद यांमुळे साकार झाली आहे. त्याच्या मते, कोणत्याही व्यक्तिरेखेची खरी ताकद ही कथानकाच्या रचनेत दडलेली असते.https://www.instagram.com/reels/DUQD9bGCDDA/मुलाखतीत सलमान म्हणतो, “मी या चित्रपटात काहीच केलं नाही,” आणि स्पष्ट करतो की, राधे मोहनचा प्रभाव हा त्याला कथेत ज्या पद्धतीने लिहिण्यात आलं आणि ज्या परिस्थितीत उभं केलं गेलं, त्यातून निर्माण झाला आहे.https://x.com/vishalrc007/status/2020075161828093972?s=48&t=Y9DsjYyNhqhxjvgHZqZCbwसलमानच्या मते, राधे मोहनचा भावनिक प्रवास, त्याचा संयम आणि नैतिक बळ हे सर्व आधीच पटकथेत ठामपणे मांडलेले होते. तो पुढे असेही सांगतो की या व्यक्तिरेखेची खोली ही त्याच्यावर लादलेल्या परिस्थितींमधून, त्याच्या शांततेतून आणि कथेनं त्याला घ्यायला लावलेल्या निर्णयांतून दिसून येते.हा बयान अधिक खास ठरतो कारण ‘तेरे नाम’ने आपल्या काळात प्रचंड वेड निर्माण केले होते. सलमान खानचे लांब केस देशभर ट्रेंड बनले होते, कॉलेज कॅम्पसमध्ये चित्रपटाचे संवाद घुमत होते आणि त्याचा भावनिक क्लायमॅक्स प्रेक्षकांना अंतर्मुख करून गेला होता. लोकप्रियतेचा असा प्रभाव होता की सूरत शहरात एका ट्रॅफिक सर्कलला थेट चित्रपटाच्या नावावरून ‘तेरे नाम चौकडी’ असे नाव देण्यात आले.जवळपास दोन दशकांनंतर, २७ फेब्रुवारी २०२६ रोजी ‘तेरे नाम’ पुन्हा मोठ्या पडद्यावर परतत असताना, सलमान खानचे हे शब्द चित्रपटाच्या वारशाला एक नवी खोली देतात. हे एका अशा अभिनेत्याचे प्रतिबिंब आहे, जो सुपरस्टार असूनही स्टारडमपेक्षा कथेला अधिक महत्त्व देतो. ही री-रिलीज केवळ नॉस्टॅल्जियासाठी नाही, तर आजही पडद्याच्या पलीकडे जिवंत असलेल्या या चित्रपटाकडे नव्या नजरेने पाहण्याची संधी आहे
नोकरदारांसाठी महत्त्वाची बातमी, या तारखेपासून UPI मधून पटकन पैसे काढता येणार
मुंबई: नोकरदार वर्गासाठी आनंदाची बातमी आहे. EPFO चे पैसे थेट UPI वरुन काढता येणार आहेत. आपल्या हक्काचे पैसे कर्मचाऱ्यांना आता कधीही काढता येणार आहेत. एप्रिल २०२६ रोजी काही नवीन बदल होणार आहेत. त्याचा थेट फायदा कर्मचाऱ्यांना होणार आहे.तुमच्या हक्काच्या EPFO मधील पैसे काढण्यासाठी आता क्लेम फॉर्म भरून दिवसेंदिवस वाट पाहण्याची गरज उरणार नाही. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं आपल्या ८ कोटी सदस्यांसाठी 'EPFO 3.0' अॅपमध्ये हे महत्त्वाचं आणि नवीन अपग्रेड आणत आहे. या अंतर्गत एप्रिल २०२६ पर्यंत एक नवीन मोबाईल ॲप लाँच केला जाईल, ज्याद्वारे सदस्य थेट UPI वापरून आपल्या खात्यातील पैसे काढू शकतात.पीएफ काढण्याची प्रक्रिया आता सोपी होणार आहे. नव्या नियमांनुसार, सदस्य आपल्या युपीआय पिनचा वापर करून लिंक केलेल्या बँक खात्यात तात्काळ पैसे वळवू शकतील. आजारपण, लग्न, शिक्षण किंवा घराच्या कामासाठी लागणारा पैसा आता अवघ्या तीन दिवसांत हातात येईल. विशेष म्हणजे, हे काम स्वत: वापरकर्ता करु शकणार आहे.युपीआयद्वारे पैसे काढताना एका व्यवहारासाठी २५ हजार रुपयांची मर्यादा असण्याची शक्यता आहे. निवृत्तीनंतरची सुरक्षा जपण्यासाठी तुमच्या एकूण बॅलन्सपैकी किमान २५ टक्के हिस्सा 'लॉक' राहील, तर उर्वरित मोठा हिस्सा तुम्ही गरजेनुसार काढू शकाल. लांबच लांब क्लेम प्रोसेसऐवजी आता थेट डिजिटल सेटलमेंटवर भर दिला जाईल.
ठाणे: आजपासून म्हणजेच मंगळवार १० फेब्रुवारी पासून बारावीच्या परीक्षांना सुरुवात झाली आहे. तर २० फेब्रुवारी पासून दहावीच्या परीक्षांना सुरुवात होणार आहे. अशातच ठाणे वाहतूक पोलिसांनी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी उशीर होऊ नये म्हणून एक अनोखी शक्कल लढवली आहे.परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना होणाऱ्या प्रवासाच्या अडचणी कमी करण्यासाठी, ठाणे वाहतूक पोलिसांनी ठाणे पोलीस आयुक्तालयात मोटारसायकलवर ५४ वाहतूक हवालदार तैनात केले आहेत.वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, विद्यार्थी किंवा त्यांचे पालक वाहतूक नियंत्रण हेल्पलाइन, व्हॉट्सअॅप किंवा १८ ट्रॅफिक युनिटपैकी कोणत्याही एका युनिटद्वारे त्यांचे लाईव्ह लोकेशन शेअर करून मदत मागू शकतात. वाहतूक कोंडी किंवा वाहनांच्या बिघाडामुळे त्यांना उशीर होऊ नये म्हणून दुचाकीवरून एक ट्रॅफिक कॉन्स्टेबल त्या ठिकाणी पोहोचेल आणि त्यांना परीक्षा केंद्रावर सोडेल.गेल्या वर्षीही असाच एक उपक्रम ठाणे वाहतूक पोलिसांकडून राबवण्यात आला होता. त्यावेळी ३२ पोलिसांनी दुचाकीवरून वाहतूक कोंडीत अडकलेल्या ३४ विद्यार्थ्यांची मदत केली होती.सध्या सर्वत्र अनेक रस्त्यांची कामे, मेट्रो बांधकाम आणि महामार्ग प्रकल्प सुरू असल्याने वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होते. अशातच परीक्षेच्या काळात सकाळी १० ते ११ वाजेपर्यंत जड वाहनांना त्या मार्गांवरून जाण्यास मनाई करण्यात आली आहे. जड वाहन चालकांनी याचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असेही पोलिसांनी सांगितले.ठाणे पोलिस आयुक्तालयांतर्गत, दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी २२३ आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी १२६ परीक्षा केंद्रे आहेत.
Manipur violence: मणिपूरमधील उखरुलमध्ये हिंसाचार उसळल्याची माहिती समोर आली आहे. लिटन सारीखोंग गावात सशस्त्र हल्लेखोरांनी अनेक घरांना आग लावल्याचे सांगण्यात येत आहे.
Sunny Deol and Preity Zinta: बॉलीवूड अभिनेता सनी देओल अलिकडेच ‘बॉर्डर 2’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस आला. त्याच्या या चित्रपटाला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली. त्यानंतर आता त्याचा आगामी चित्रपट ‘लाहोर १९४७’ अखेर प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटामध्ये सनी देओलसोबत प्रीती झिंटा मुख्य भूमिकेत असून बऱ्याच काळानंतर ही जोडी मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार आहे. प्रिती झिंटा […]
Dating Apps: व्हॅलेन्टाईन्स डे आधी डेटिंग अॅप्सवर सायबर हल्ला, वापरकर्त्यांना सतर्कतेचा इशारा
Bumble कंपनीने स्पष्ट केले आहे की, एका कॉन्ट्रॅक्टरने फिशिंग ईमेलला प्रतिसाद दिल्यामुळे हॅकर्सना काही काळासाठी प्रवेश मिळाला होता. मात्र, वेळेत त्यांना सिस्टीममधून बाहेर काढण्यात आले असून कोणत्याही युजरचे अकाउंट, पासवर्ड किंवा चॅट लीक झालेले नाहीत.
Pimpri Chinchwad: मनमोहक दृश्य ! परदेशातील नाही तर पिंपरी चिंचवड शहरातील रस्ते…..
Pimpri Chinchwad : पिंपरी चिंचवड शहरातील रस्त्यांच्या दुतर्फा असलेल्या वृक्षांना सध्या फुलांचा बहर आलाय. वसंत ऋतू मध्ये या वृक्षांना फुलांचा बहर येत असतो. शहरातील रावेत, निगडी प्राधिकरण परिसरात असलेली बहवा, चेरी ब्लॉसम, विविध रंगी बाऊनाईंविल्ला, ब्लूमिंग येल्लो आदी वृक्षांची फुले सध्या वाटसरुंना आपल्याकडे आकर्षित करत आहे. रखरखत्या उन्हात ही रस्त्यावरून जाताना वाटसरुंना प्रदेशातील रस्त्यावरुन फिरत […]
Tripti Dimri: “पालकांना वाटायचं, अभ्यास टाळण्यासाठी मी अभिनेत्री व्हायचं स्वप्न पाहतेय”
तृप्तीने सांगितलं की, तिने ‘लैला मजनू’सारख्या तीव्र प्रेमकथेने अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली असली, तरी प्रत्यक्ष आयुष्यात ती वेड्या प्रेमावर विश्वास ठेवत नाही. “प्रत्येकाची प्रेमाबद्दलची दृष्टी वेगळी असते. मला मात्र फक्त खऱ्या प्रेमावर विश्वास आहे. अतीव प्रेम मला फारसं कळत नाही,” असं ती म्हणाली. तिचा चित्रपट व्हॅलेंटाईन डेच्या आसपास प्रदर्शित होत असला, तरी त्या दिवसाचं तिला विशेष आकर्षण नसल्याचंही तिने स्पष्ट केलं.
Himanta Biswa Sarma: आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या मुस्लिमविरोधी व्हिडिओवरील वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. मुख्य न्यायाधीश सूर्यकांत यांनी याचिकांवर महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे.
Sunetra Pawar: उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारताच सुनेत्रा पवार यांचं पहिलं ट्विट; म्हणाल्या...
मुंबई: अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली. मात्र आज म्हणजेच मंगळवार १० फेब्रुवारी रोजी त्यांनी राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून मंत्रालयात अधिकृतपणे आपला पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारताच त्यांनी पहिलं ट्विट करून महाराष्ट्राला एक वचन दिलं आहे.दादांची जागा कोणीच घेऊ शकत नाही; पण त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याचा आणि अधिक सक्षम महाराष्ट्र घडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी नक्की करेन, असे वचन सुनेत्रा पवार यांनी या ट्विटमधून दिलं आहे.काय म्हणाल्या सुनेत्रा पवार ?आज महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारत असताना विश्वासाची, कर्तव्याची आणि त्यागाची जाणीव सुद्धा आहे. मा. अजितदादांनी आयुष्यभर महाराष्ट्राच्या जनतेसाठी झटत विकासाचा जो ध्यास घेतला, तोच माझ्यासाठी मार्गदर्शक दीपस्तंभ आहे. दादांची कार्यशैली, निर्णयक्षमता आणि लोकांशी असलेले आत्मीय नाते, हेच बळ घेऊन मी पुढील वाटचाल करणार आहे. त्यांच्या अपूर्ण स्वप्नांना पूर्णत्व देणे, शेतकरी, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षांना न्याय देणे, हीच माझी प्राथमिकता असेल.दादांची जागा कोणीच घेऊ शकत नाही; पण त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याचा आणि अधिक सक्षम महाराष्ट्र घडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी नक्की करेन. या कठीण प्रसंगी जनतेने दिलेले प्रेम, आधार आणि विश्वास हेच माझे सामर्थ्य आहे. त्यांच्या स्मृतीपुढे आज मी एकच वचन देते की, महाराष्ट्राच्या हितासाठी निष्ठेने आणि समर्पणाने कार्य करत राहीन, असे ट्वीट सुनेत्रा पवार यांनी केले आहे.आज महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारत असताना विश्वासाची, कर्तव्याची आणि त्यागाची जाणीव सुद्धा आहे. मा. अजितदादांनी आयुष्यभर महाराष्ट्राच्या जनतेसाठी झटत विकासाचा जो ध्यास घेतला, तोच माझ्यासाठी मार्गदर्शक दीपस्तंभ आहे.दादांची कार्यशैली, निर्णयक्षमता आणि… pic.twitter.com/5Tc2PsfDQ9— Sunetra Ajit Pawar (@SunetraA_Pawar) February 10, 2026सुनेत्रा पवारांना दिल्लीचं निमंत्रण:दरम्यान, अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यातील राजकारण पूर्णपणे बदलले असून, आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येणार का? या चर्चेने जोर धरला आहे. याच संदर्भात राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीत केवळ राज्याच्या राजकीय परिस्थितीवरच नव्हे, तर सुनेत्रा पवार यांच्या नवीन जबाबदारीवरही सविस्तर चर्चा झाल्याचे समजते. या बैठकीत विलीनीकरणाच्या मुद्द्यावर चर्चा सुरू असताना अमित शहा यांनी काही लोकांना यात केवळ राजकारण दिसत आहे, असे विधान केल्याचे समोर आले आहे. या विधानामुळे भाजपचा दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाला छुपा विरोध आहे की काय? असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी प्रफुल्ल पटेल यांच्याशी संवाद साधताना सुनेत्रा पवार यांची विचारपूस केली. अजित पवार यांचे सर्व अंत्यविधी आणि धार्मिक विधी पूर्ण झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांना दिल्लीला घेऊन या, असे खास निमंत्रणच या दोन्ही बड्या नेत्यांनी पटेल यांना दिले आहे. या आगामी दिल्ली दौऱ्यात राष्ट्रवादीच्या भविष्यातील वाटचालीवर मोठा निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.प्रफुल्ल पटेल यांनी विलिनीकरणावर स्पष्टच सांगितलं:राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी या सर्व वावड्या असल्याचे सांगत विलीनीकरणाच्या शक्यता पूर्णपणे फेटाळून लावल्या आहेत. विलीनीकरणाबाबत अजितदादांची माझ्याशी कधीही चर्चा झाली नाही आणि अशा कोणत्याही हालचाली सुरू नाहीत, असे स्पष्टीकरण पटेल यांनी दिले आहे. अजित पवार यांच्या मनातील रणनीतीचा उलगडा करताना पटेल म्हणाले की, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मते विभागली जाऊ नयेत, यासाठी अजितदादा आग्रही होते. आपण सर्व वेगवेगळे लढलो तर मतांचे विभाजन होईल आणि त्याचा फटका बसेल. त्यामुळे शरद पवार गटाशी केवळ निवडणूक समन्वय साधण्याबाबत दादांनी भूमिका मांडली होती, अशी माहिती पटेल यांनी दिली. थोडक्यात सांगायचे तर, दोन्ही पक्षांचे विलीनीकरण नव्हे, तर केवळ निवडणुकांपुरता समन्वय साधण्याचा अजितदादांचा विचार होता, असे आता स्पष्ट झाले आहे.
India US Trade Deal: राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'झिरो टॅरिफ' विधानानंतर, व्हाईट हाऊसच्या एका 'फॅक्ट शीट'ने भारत आणि अमेरिका यांच्यातील नवीन व्यापार कराराभोवती असलेल्या गोंधळाचे स्पष्टीकरण दिले आहे.
रिलेशनशिपबाबत रिंकू राजगुरूचा स्पष्ट दृष्टिकोन; म्हणाली “मी बॉयफ्रेंड बनवणारी मुलगी नाही
मुंबई : ‘सैराट’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री रिंकू राजगुरू सध्या तिच्या आगामी चित्रपटांमुळे चर्चेत आहे. ‘आशा’ या चित्रपटानंतर आता तिचा नवा सिनेमा ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ प्रेक्षकांच्या भेटीला येत असून, या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान रिंकूने तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत स्पष्ट भूमिका मांडली आहे.एका मुलाखतीत रिलेशनशिप आणि लग्नाबाबत बोलताना रिंकू राजगुरूने सध्याच्या पिढीतील नातेसंबंधांवर आपलं मत मांडत, “मी बॉयफ्रेंड बनवणारी मुलगी नाही. मला थेट लग्नावर विश्वास आहे,” असं स्पष्टपणे सांगितलं. तिच्या या वक्तव्यामुळे चाहत्यांमध्ये आणि सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे.रिंकू यापूर्वीही अनेक वेळा प्रेम, लग्न आणि जोडीदाराबाबत तिचा पारंपरिक दृष्टिकोन मांडत आली आहे. जेन-झी पिढीतील असूनही सध्याच्या रिलेशनशिप पद्धतीशी आपण सहमत नसल्याचं तिनं याआधीही सांगितलं आहे.प्रेमाबाबत बोलताना रिंकूने हलक्याफुलक्या शैलीत प्रतिक्रिया देत, “मी प्रेमात पडत नाही, माझे डोळे बघूनच लोक माझ्या प्रेमात पडतात,” असंही नमूद केलं. तिच्या या विधानाची सध्या चाहत्यांमध्ये विशेष चर्चा होत आहे.दरम्यान, रिंकू राजगुरूचं नाव यापूर्वी अभिनेता आकाश ठोसर आणि कृष्णराज महाडिक यांच्यासोबत जोडण्यात आलं होतं. मात्र या दोन्ही प्रकरणांत केवळ मैत्री असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर रिलेशनशिपच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला होता. कामाच्या आघाडीवर, ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ हा चित्रपट १३ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होत असून, या चित्रपटाकडं प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.
उबाठा गट हा शून्यात हरवलेला पक्ष भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांचा घणाघात
मुंबई : सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचा पोटभाडेकरू असलेला उबाठा गट हा शून्यात हरवलेला पक्ष आहे असा घणाघात भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी मंगळवारी केला. प्रदेश भाजपा कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजितदादा यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हेच मूळ पक्ष आहेत यावर मतदारांनी लागोपाठ तीनदा शिक्कामोर्तब केले असून त्या पक्षांवर बोलण्याचा अधिकार राऊतांना नाही असे बन यांनी नमूद केले.शिवसेना आणि अजितदादांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अमित शाह यांचा पक्ष झाला आहे अशी पोरकट टीका करणा-या राऊतांना खडे बोल सुनावत बन म्हणाले की विधानसभा, नगर पालिका आणि महापालिका निवडणुकांमध्ये उबाठा गटाला शून्यावर समाधान मानावे लागले असून मतदारांनी त्यांचा निकाल लावला आहे.उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार या एनडीएचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वेसर्वा या नात्याने दिल्लीत भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेत असतील तर त्यात गैर काय आहे. उद्धव ठाकरे आणि राऊतांना लक्ष्य करत बन म्हणाले की दिल्लीत राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्या दारात याचकासारखे उभे राहण्यापेक्षा सुनेत्राताई स्वाभिमानाने राष्ट्रवादी पक्षाची धुरा सांभाळत आहेत आणि खंबीरपणे उपमुख्यमंत्री म्हणून काम करत आहे त.राऊतांना भारताच्या प्रगतीमध्ये देखील अधोगती दिसतेराहुल गांधी सातत्याने परदेशात जाऊन भारताची बदनामी करतात याउलट पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेशात जाऊन भारताची मान अभिमानाने उंचावण्याचे काम करतात असे टीकास्त्र बन यांनी सोडले. परदेशात जाऊन आपल्या देशाची बदनामी करणे म्हणजे देशद्रोह असून राहुल गांधी आणि राऊत देशद्रोही आहेत. काँग्रेसच्या कार्यकाळात दहशतवाद्यांसाठी रेड कार्पेट अंथरले जायचे मात्र पंतप्रधान मोदी द्विपक्षीय संबंध दृढ करत देशात परकीय गुंतवणुकीचा ओघ कसा वाढेल या दिशेने धोरण आखणी करत आहेत. मोदी द्वेष आणि भाजपा द्वेषाने पछाडलेल्या राऊतांना भारताच्या प्रगतीमध्ये देखील अधोगती दिसते हे दुर्दैव असल्याचे बन म्हणाले.लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याची हिंमत असेल तर आणा मात्र त्यावेळी तुमच्या इंडी आघाडीच्या ठिकऱ्या उडाल्याशिवाय राहणार नाहीत असा खणखणीत इशारा बन यांनी दिला. या अविश्वास प्रस्तावाच्या निमित्ताने इंडी आघाडी फुटलेली आहे हे लक्षात येईल. सूज्ञ मतदारांनी अविश्वास दाखवत राहुल गांधी आणि उबाठा गटाला धडा शिकवला, त्यांना कोणावरही अविश्वास ठराव आणण्याचा अधिकारच नाही या शब्दांत बन यांनी टोमणा लगावला.बन म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करण्याचा अधिकार संजय राऊतांना नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा संविधानाला मानत गेली १०० वर्षे चारित्र्यवान पिढ्या बनवण्याचे काम करत आहे. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे सरकार असताना विरोध करणा-यांची घरे तोडली गेली होती, वेळोवेळी संविधानाला पायदळी तुडवण्याचे काम करण्यात आले होते. देशात आणीबाणी लादून संविधानाला पायदळी तुडवण्याचे काम इंदिरा गांधींनी केले होते याची आठवणही बन यांनी करून दिली. भाजपाच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकार असो की महाराष्ट्रातील महायुती सरकार असो संविधानानुसार चालते तुमच्यासारख्यांच्या बेताल विधानावर चालत नाही अशी प्रखर टीका श्री. बन यांनी केली.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या मातृभाषेवरील वक्तव्याचा विपर्यास करून त्यांच्यावर टीका करणा-या राज ठाकरे यांना लक्ष्य करत बन म्हणाले की, भागवत यांच्या वक्तव्याचा इतकाच अर्थ होता की मातृभाषेवर प्रेम करता करता इतर भाषांचा द्वेष करू नका. मराठी भाषेचा अभिमान बाळगत असताना इतर भाषांचा आपल्या हातून द्वेष होता कामा नये हे महत्वाचे असे श्री. बन यांनी स्पष्ट केले.
Nirmit Sawant : नऊवारी साडी, हातात बंदूक…, अभिनेत्री निर्मिती सावंत पुन्हा एकदा सासूच्या भूमिकेत
Nirmit Sawant : निर्मिती सावंत यांच्या नव्या सिनेमाचे नाव 'सुपर डुपर' असे असून यात अभिनेता ललित प्रभाकर देखील नवीन भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहे.
Silver Price Today: चांदी एकाच झटक्यात १०,००० रुपयांनी स्वस्त ; आजचा १ किलोचा भाव किती? जाणून घ्या
Silver Price Today: आठवड्याच्या दुसऱ्या व्यापारी दिवशी म्हणजेच आज सोने आणि चांदीच्या किमती पुन्हा घसरल्या. या काळात MCX वर सोने आणि चांदीच्या वायदा करारांमध्ये घट झाली.
Breastfeeding: स्तनपान का आवश्यक? आई आणि बाळाच्या आरोग्याचं मजबूत नातं
मातेच्या दुधात बाळाच्या वाढीसाठी लागणारी सर्व पोषकतत्त्वं असतात. आईचं दूध नैसर्गिक, निर्जंतुक आणि सहज पचणारे असते. त्यामुळे बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. स्तनपानामुळे बाळाचा शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकास चांगल्या प्रकारे होतो. भविष्यात रक्तदाब, मधुमेह, दमा, हृदयविकार, कर्करोग यांसारख्या आजारांपासून संरक्षण मिळण्यास मदत होते.
Rahul Gandhi on naravane book: माजी लष्करप्रमुख जनरल नरवणे यांच्या पुस्तकाभोवतीचा वाद वाढत चालला आहे. काँग्रेस खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या पुस्तकाबाबतच्या टिप्पण्यांना उत्तर दिले आहे.
मुंबई: राजकीय वर्तुळातून एक आनंदाची बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती सुळे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. सारंग अरुण लखानी यांच्यासोबत रेवती सुळेंचं लग्न ठरलं आहे. सुशील कुमार शिंदे यांची मुलगी स्मृती शिंदे यांनी सोशल मीडियात पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. सारंग अरुण लखानी नागपूरचे आहेत. त्यामुळे रेवती सुळे नागपूरची सून होणार आहे. तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने रेवती सुळे यांचं लग्न ठरल्याची सूत्रांचे माहिती आहे.पवारांचे नातजावई सारंग लखानी कोण आहेत?राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सर्वसर्वा शरद पवार यांचे नातजावई आणि त्यांची लेक सुप्रिया सुळे यांचे होणारे जावई सारंग अरुण लखानी हे विश्वराज ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक असलेल्या अरुण लखानी यांचे पुत्र आहेत. सारंग अरुण लखानी हे एक चांगले बॅडमिंटनपटूही आहेत. त्यांनी विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेतलेला आहे.सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांना रेवती सुळे आणि विजय सुळे अशी दोन मुलं आहेत. रेवती सुळे हिने प्रतिष्ठित London School of Economics मधून पदवी पूर्ण केली आहे. बारामती लोकसभा निवडणुकीत रेवती सुळे यांनी प्रथमच आपल्या आई सुप्रिया सुळे यांच्यासाठी प्रचारात सक्रिय सहभाग घेतला होता. View this post on Instagram A post shared by Smruti Shinde (@smruti.shinde4271)
Chandrapur Municipal Corporation : चंद्रपूर महापालिकेत उबाठा गटाने भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे पालिकेवर भाजपचा महापौर विराजमान होणार आहे.
LOKSABHA SPEAKER OM BIRLA: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान लोकसभेत झालेल्या गोंधळावरून राजकारण तीव्र झाले आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावादरम्यान सभागृहात घोषणाबाजी आणि निदर्शने झाली.
PM Narendra Modi And Sharad Pawar : शरद पवारांना तातडीने काल बारामतीहून पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले.
महाशिवरात्रीनिमित्त कोकण रेल्वेकडून विशेष रेल्वे; जाणून घ्या वेळ आणि स्थानके
मुंबई : महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन कोकण रेल्वेने विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेच्या सहकार्याने मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) आणि सावंतवाडी रोड दरम्यान या विशेष गाड्या धावणार आहेत.कोकण रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, सणाच्या कालावधीत प्रवाशांची अतिरिक्त गर्दी होण्याची शक्यता असून, त्यासाठी प्रवाशांना अधिक प्रवास सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही व्यवस्था करण्यात आली आहे.विशेष गाड्यांचे वेळापत्रकसीएसएमटी ते सावंतवाडी रोड ही विशेष रेल्वे गाडी एकूण तीन फेऱ्यांमध्ये चालवली जाणार आहे. ही गाडी १४, १९ आणि २१ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री सीएसएमटी स्थानकावरून सुटणार आहे. तर परतीच्या प्रवासासाठी सावंतवाडी रोड येथून याच तारखांना सायंकाळी ५.२० वाजता गाडी सुटणार आहे. ही विशेष रेल्वे पुढील दिवशी दुपारी ४.०५ वाजता सीएसएमटी येथे पोहोचणार आहे.रेल्वेचे नियोजित थांबेया विशेष गाड्यांना मार्गावर दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सवर्धा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ या प्रमुख स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.प्रवाशांसाठी दिलासामहाशिवरात्रीनिमित्त मोठ्या संख्येने कोकणात जाणाऱ्या भाविक व प्रवाशांना या विशेष रेल्वे गाड्यांचा फायदा होणार आहे. अतिरिक्त गाड्यांमुळे नियमित सेवांवरील ताण कमी होण्यास मदत होणार असून प्रवास अधिक नियोजित आणि सुरळीत होण्याची अपेक्षा आहे.दरम्यान, प्रवाशांनी प्रवासापूर्वी अधिकृत रेल्वे संकेतस्थळ किंवा अधिकृत माहिती स्रोतांवरून तिकीट उपलब्धता व वेळापत्रकाची खात्री करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबई : हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांच्या यादीत स्थान दिले आहे. त्यासंदर्भातील युनेस्कोचे अधिकृत प्रमाणपत्र स्वीकारण्यासाठी राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार हे आज रात्री महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत शिष्टमंडळासह फ्रान्स दौऱ्यावर जाणार आहेत.दि.११ ते १६ फेब्रुवारी २०२६ दरम्यान ते पॅरिस येथे होणाऱ्या महत्त्वपूर्ण कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील. युनेस्को मुख्यालयामध्ये महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे उभारण्यात आलेल्या भारतरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळ्याला यावेळी एका विशेष कार्यक्रमात ॲड. आशिष शेलार हे अभिवादन करणार आहेत. सुमारे दीड वर्षांच्या प्रदीर्घ प्रक्रियेनंतर गतवर्षी दि.११ जुलै २०२५ रोजी, युनेस्कोच्या ४७व्या अधिवेशनात, 'मराठा मिलिटरी लँडस्केप्स ऑफ इंडिया' या नावाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील 12 किल्ल्यांना जागतिक वारसा यादीत स्थान देण्यात आले. या मानांकनाचे अधिकृत प्रमाणपत्र महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ पॅरिस येथे स्वीकारणार आहे.छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीय आक्रमणाशी लढून उभारलेल्या हिंदवी स्वराज्याच्या रक्षणाकरता, सुरक्षित शासनव्यवस्था आणि लोककल्याण, यासाठी साकारलेली गड-किल्ल्यांची साखळी हा भारतीय इतिहासातील अद्वितीय लष्करी व राज्यकारभाराचा नमुना मानला जातो. रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी आणि तामिळनाडूमधील जिंजी असा १२ किल्ल्यांचा समूह आज 'जागतिक वारसा स्थळ' म्हणून संपूर्ण जगासमोर उभा राहिला आहे. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर फेब्रुवारी २०२५ मध्ये अॅड. शेलार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारचे चार सदस्यीय प्रतिनिधीमंडळ पॅरिसमध्ये युनेस्कोसमोर तांत्रिक आणि धोरणात्मक मांडणी करून या मानांकनासाठी सादरीकरण आणि युक्तीवाद करून आले होते. आता प्रत्यक्ष मानांकन-पत्र स्वीकारण्याच्या व ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याच्या या दौऱ्याला शिवरायांच्या पराक्रमाचा आणि मराठा साम्राज्याच्या वारशाचा जागतिक सन्मान असा गौरवशाली आयाम लाभत आहे. या दौऱ्यात अॅड. आशिष शेलार युनेस्कोचे महासंचालक, संबंधित तज्ञ व भारताचे युनेस्कोमधील स्थायी प्रतिनिधी श्री. विशाल शर्मा यांच्यासमवेत स्वतंत्र बैठकींमध्ये सहभागी होऊन महाराष्ट्रातील इतर प्रस्तावित वारसास्थळांबाबत सविस्तर चर्चा करणार आहेत.कोकणातील कातळशिल्पे, महाराष्ट्रातील सागरी किल्ले तसेच अमूर्त सांस्कृतिक वारशांतर्गत पंढरपूर वारी, गणेशोत्सव व दहीहंडी यांना जागतिक वारसा म्हणून मान्यता मिळविण्यासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या प्रयत्नांना या भेटीत नवे बळ मिळेल, असा विश्वास ॲड. आशष शेलार यांनी व्यक्त केला आहे. यासोबतच वांद्रे, मुंबई येथे उभारण्यात येत असलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ‘महाराष्ट्र वस्तुसंग्रहालया’साठी पॅरिसमधील नामांकित संग्रहालये, त्यांचे व्यवस्थापन, प्रदर्शनरचना, डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर इत्यादी बाबींचा अभ्यास करून त्या धर्तीवर येथील संग्रहालय अधिक समृद्ध करण्यासाठी हे शिष्टमंडळ या दौऱ्यात पाहाणी व अभ्यास करणार आहे.दरम्यान, भारताचे संविधानाला ७५ वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धपुतळा युनेस्को मुख्यालयाला भेट दिला असून, दि.२६ नोव्हेंबर २०२५ रोजी संविधान दिनानिमित्त या पुतळ्याची स्थापना पॅरिसमध्ये युनेस्को मुख्यालयात झाली आहे. सामाजिक न्याय, समानता, बंधुता आणि शिक्षणाद्वारे सक्षमीकरण यांची डॉ. आंबेडकरांनी दिलेली शिकवण ही युनेस्कोच्या मुलभूत ध्येयाशी सुसंगत आहे. पॅरीसमधील त्यांच्या या स्मारकाला विशेष कार्यक्रम व मानवंदना सोहळ्यात ॲड.आशिष शेलार अभिवादन करणार आहेत. डॉ. बाबासाहेबांना पॅरीसमध्ये केलेले हे अभिवादन भारतीय लोकशाहीच्या मूल्यांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर नव्याने अधोरेखित करणारे पाऊल आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. या दौऱ्यामुळे राज्याचा सांस्कृतिक वारसा, पर्यटनक्षमता आणि जागतिक पातळीवरील प्रतिमा अधिक भक्कम होणार आहे.
BJP's reply to Raj Thackeray :मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भाषिक वादाच्या विधानावर पोस्ट लिहिली होती. आता भाजपकडून त्यास जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
India AI Impact Summit 2026: भारत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जगात एक मोठे पाऊल पुढे टाकण्यास सज्ज आहे. नवी दिल्लीत होणारा इंडिया एआय इम्पॅक्ट समिट २०२६ हा केवळ एक तंत्रज्ञान कार्यक्रमच नाही तर भविष्यातील तंत्रज्ञान, धोरणे आणि नवोपक्रमांसाठी एक प्रमुख व्यासपीठ देखील असणार आहे.
IND vs PAK सामना निश्चित; ICCच्या हस्तक्षेपानंतर पाकिस्तानने १० दिवसात टेकले गुडघे
मुंबई : भारत–पाकिस्तान क्रिकेट सामना होणार की नाही, या मुद्द्यावर निर्माण झालेला तिढा अखेर सुटला आहे. टी-20 वर्ल्ड कप २०२६ अंतर्गत भारताविरुद्ध खेळण्यास नकार देणाऱ्या पाकिस्तानने अखेर माघार घेतली असून, ICCच्या मध्यस्थीनंतर १५ फेब्रुवारी रोजी कोलंबो येथे हा सामना होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) भारताविरुद्ध सामना न खेळण्याची आक्रमक भूमिका घेतली होती. सुरक्षेच्या कारणास्तव बांग्लादेशने भारतात येण्यास नकार दिल्यानंतर पाकिस्तानने बांग्लादेशच्या समर्थनार्थ भारताविरुद्ध सामना बहिष्कृत करण्याची धमकी दिली होती. यामुळे ICCसह आंतरराष्ट्रीय क्रिकेट वर्तुळात अस्वस्थता निर्माण झाली होती.भारत पाकिस्तान सामना म्हणजे क्रिकेटचाहत्यांसाठी चुरशीची अटीतटीचा सामना , त्यामुळे या सामन्याची तिकिटांची किंमतही लाखो -करोडोंच्या'घरात जाते. त्यामुळे भारत–पाकिस्तान सामना रद्द झाल्यास स्पर्धेच्या आर्थिक गणितावर मोठा परिणाम होणार असल्याची जाणीव ICCला झाल्यानंतर त्यांनी थेट संघर्षाऐवजी कूटनीतीचा मार्ग स्वीकारला. या प्रक्रियेत श्रीलंका, यूएई आणि बांग्लादेश क्रिकेट बोर्डाचा सहभाग निर्णायक ठरला.कोलंबो येथे सामना आयोजित असल्याने श्रीलंका क्रिकेट बोर्डाने पाकिस्तानवर दबाव वाढवला. श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षांनीही थेट पाकिस्तान संघाशी संवाद साधत सामना होणे आवश्यक असल्याचे मत मांडले. याशिवाय, यूएई क्रिकेट बोर्डाने क्रिकेटच्या व्यावसायिक हितांचा मुद्दा पुढे करत पाकिस्तानला भूमिकेवर पुन्हा विचार करण्याचा सल्ला दिला.दरम्यान, ज्यांच्यासाठी पाकिस्तान उभा राहिला होता, त्या बांग्लादेश क्रिकेट बोर्डानेही भूमिका बदलत पाकिस्तानला सामना खेळण्याची विनंती केली. ICCकडून बांग्लादेशच्या हितांचे संरक्षण करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर पाकिस्तानाला माघार घ्यावीच लागली. या सर्व घडामोडीनंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अखेर नमती भूमिका घेत भारताविरुद्ध सामना खेळण्यास संमती दिली आहे. त्यामुळे १५ फेब्रुवारी रोजी कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रंगणार आहे.
नालासोपाऱ्यात बांधकामस्थळी अल्पवयीन मुलाचा अपघाती मृत्यू; पोलिसांकडून चौकशी सुरू
नालासोपारा : नालासोपारा पूर्व भागात सुरू असलेल्या एका बांधकाम प्रकल्पात घडलेल्या दुर्दैवी अपघातात एका अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली असून पोलीस याप्रकरणी सखोल तपास करत आहेत.प्राथमिक माहितीनुसार, संबंधित मुलगा आपल्या वडिलांसोबत बांधकामस्थळी गेला होता. त्या ठिकाणी सुरू असलेल्या कामादरम्यान बांबू काढण्याची प्रक्रिया सुरू होती. याचवेळी तिसऱ्या मजल्यावर काम करत असताना अचानक मुलाचा तोल सुटला आणि तो थेट खाली कोसळला.अपघातानंतर घटनास्थळी उपस्थित कामगारांनी आणि नागरिकांनी तातडीने मुलाला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या घटनेमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.घटनेची माहिती मिळताच तुळींज पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. बांधकामस्थळी आवश्यक सुरक्षाव्यवस्था होती की नाही, तसेच अल्पवयीन मुलाकडून काम करून घेतले जात होते का, याबाबत विविध बाबींची तपासणी सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.दरम्यान, या घटनेने बांधकामस्थळांवरील सुरक्षितता आणि बालकामगारांबाबतच्या नियमांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
Sunetra Pawar :उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी मंत्रालयात जात पदभार स्विकारला. आज होणाऱ्या मंत्रीमंडळ बैठकीला त्या हजर राहणार असल्याची शक्यता आहे.
150 days E-Governance Reform Program: ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमातील उत्कृष्ट जिल्हा परिषदा
मुंबई: राज्यातील शासकीय कामकाज अधिक पारदर्शक, गतिमान आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी राबवण्यात आलेल्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत कार्यालयाची वेबसाइट, आपले सरकार प्रणाली, ई-ऑफीस, कार्यालयाचा डॅशबोर्ड, व्हॉट्सऍप चॅटबॉट, AI व Blockchain चा शासकीय कामकाजात वापर आणि GIS चा कामात वापर अशा ७ सर्वंकष मुद्यांवर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शासकीय कार्यालयांची निवड दि. २६ जानेवारी २०२६ रोजी जाहीर करण्यात आली.निवडणूक आचारसंहितेमुळे प्रलंबित ठेवलेला जिल्हा परिषद कार्यालये संवर्गाचा निकाल आज जाहीर होत आहे. १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स कार्यक्रमात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पुणे, सांगली, ठाणे, नागपूर व नाशिक जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि त्यांच्या चमूंचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हार्दिक अभिनंदन केले. तसेच सर्व विजेत्यांचा लवकरच राज्य शासनातर्फे गौरव करण्यात येईल.https://x.com/CMOMaharashtra/status/2021079212023558243?s=20विविध संवर्गांतील उत्कृष्ट कार्यालयांची सविस्तर यादी जाहीर करण्यात आली होती. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्हा परिषदांची नावे येत्या ८ फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आली आहेत.१५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स कार्यक्रमात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्हा परिषदापुणेसांगलीठाणेनागपूरनाशिक
Bangladesh Election: : बांगलादेशमध्ये १२ फेब्रुवारी रोजी निवडणुका होणार आहेत. दरम्यान, राजकीय वातावरण तापले आहे. लोक दररोज नवीन गोष्टी ऐकतात, विशेषतः कोणत्या देशाचा प्रभाव कोणावर आहे याबद्दल.
Revati Sule Marriage: सुप्रिया सुळेंच्या मुलीचं लग्न ठरलं; होणारा जावई कोण? रेवती होणार नागपुरची सून
Revati Sule Marriage : सारंग अरुण लखानी असे सुप्रिया सुळे यांच्या जावयाचे नाव असून ते नागपूरचे आहेत.
Calcium Deficiency: हाडांमधील कॅल्शियमची कमतरता: कारणे, लक्षणे आणि उपाय
कॅल्शियमची गरज फक्त लहान मुलांनाच नसते. तान्ह्या बाळांपासून ते वयोवृद्धांपर्यंत, पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये अधिक, वाढीच्या वयातील मुली, गरोदर स्त्रिया आणि स्तनपान करणाऱ्या माता या सगळ्यांमध्ये कॅल्शियमची गरज जास्त असते.
मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या राजकीय घडामोडींना वेग आल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा तातडीचा दिल्ली दौऱ्यावर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या भविष्यातील वाटचालीबाबतच्या चर्चांनी राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे. अजित पवारांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या चर्चा आणि सुनेत्रा पवारांचा आगामी दिल्ली दौरा याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी अचानक दिल्ली दौरा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असल्याचे चित्र आहे. फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्रातील बदललेली राजकीय समीकरणे आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर या बैठकीत खलबतं झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर चर्चामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमित शाह यांच्या निवासस्थानी तब्बल दीड तास चर्चा केल्याची माहिती आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. या विलीनीकरणाबाबत भाजपची नेमकी भूमिका काय असेल, यावर या दौऱ्यात चर्चा झाली आहे.अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. काही स्थानिक नेत्यांनी दावा केला होता की लवकरच विलीनीकरणाची अधिकृत घोषणा होऊ शकते. दुसरीकडे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले की, केवळ 'निवडणूक समन्वय' साधण्याबाबत अजितदादांची भूमिका होती, असे स्पष्ट केले आहे. परंतु, कार्यकर्त्यांचा वाढता दबाव पाहता विलीनीकरणाची शक्यता नाकारता येत नाही.सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरानव्याने उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेल्या सुनेत्रा पवार सुद्धा येत्या १२-१३ फेब्रुवारीला दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती आहे. सुनेत्रा पवार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. या दौऱ्यात राष्ट्रवादीच्या भविष्यातील वाटचालीवर आणि राज्यसभेच्या जागेवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
पक्ष विलीकरणाच्या चर्चा, तरीही सुनेत्रा पवारांचा दिल्ली दौरा ठरला; मोदी-शहांची लवकरच होणार भेट
मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे गेल्या महिन्यात विमान अपघातात निधन झाले. आणि प्रश्न निर्माण झाला तो राष्ट्रवादी आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या विलीनीकरणाचा याच पार्श्वभूमीवर शरद पवार आणि सुनेत्रा पवार यांच्या अनेक भेटी झाल्या. आणि या भेटींमुळेच पक्षाच्या एकत्रीकरण्याच्या चर्चेला आणखी उधाण आले. सोमवारी सायंकाळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांची बैठक झाली. सुमारे तासभर चाललेल्या या बैठकीत सध्याची राजकीय परिस्थिती, पक्षाची पुढील दिशा आणि भविष्यातील निर्णयांबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.या बैठकीनंतरच सुनेत्रा पवार यांच्या दिल्ली दौऱ्याच्या हालचालींना गती मिळाल्याचे दिसून येत आहे.सुनेत्रा पवार मुंबईत मंत्रालयात उपस्थित राहून उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारणार आहेत. त्यानंतर त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहभागी होणार असून, प्रशासकीय कामकाज पूर्ण केल्यानंतर त्या आजच दिल्लीकडे रवाना होणार आहेत. दिल्लीमध्ये त्या महाराष्ट्र सदन येथे मुक्काम करणार असल्याची माहिती आहे.दिल्ली दौऱ्यादरम्यान सुनेत्रा पवार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याचे सांगितले जात आहे. या भेटींमध्ये कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार, याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नसली तरी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकीय भूमिकेबाबत संवाद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.दरम्यान, अलीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील दिल्ली दौरा केला होता. त्यानंतर लगेचच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार राजधानीत जात असल्याने राज्यातील राजकीय हालचाली अधिकच लक्षवेधी ठरल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे भवितव्य, स्वतंत्र अस्तित्व ठेवण्याचा निर्णय की व्यापक राजकीय आघाडीत भूमिका यावर चर्चा सुरू असल्याचे चित्र आहे.याच काळात बारामतीत पवार कुटुंबीयांच्या बैठका झाल्या होत्या. त्यानंतर शरद पवार यांची प्रकृती अस्वस्थ झाल्याची माहिती समोर आली. व्हायरल संसर्गामुळे त्यांना पुण्यातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.एकीकडे शरद पवारांवर उपचार सुरू असताना, दुसरीकडे सुनेत्रा पवारांचा दिल्ली दौरा आणि संभाव्य उच्चस्तरीय भेटी यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुढील काही दिवसांत महत्त्वपूर्ण घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Venezuela Oil: डोनाल्ड ट्रम्प यांचा तेल खेळाचा प्लॅन आता काम करत असल्याचे दिसून येत आहे. व्हेनेझुएलावरील अलिकडच्या हल्ल्यानंतर आणि राष्ट्राध्यक्ष मादुरो यांच्या अटकेनंतर, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी देशाच्या तेल साठ्यावर नियंत्रण असल्याचा दावा केला.
Pune News : टिळक अभिरुप राष्ट्रीय न्यायालय स्पर्धेत चव्हाण महाविद्यालय विजेते
Pune News : गोवा येथील इंडियन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ लीगल एज्युकेशनचा संघ उपविजेता ठरला.
पूर्व उपनगराला १८ वर्षांनंतर लाभला महापौर
मुंबई : मुंबईच्या महापौरपदासाठी भाजपच्यावतीने रितू तावडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून या प्रतिस्पर्धी पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल न केल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार आहे. येत्या बुधवारी या निवडणुकीची औपचारिकता पार पाडली जाईल. रितू तावडे या पूर्व उपनगरातील घाटकोपर पूर्व भागातील असून तावडे यांच्या रुपातून पश्चिम उपनगराला तब्बल १८ वर्षांनंतर महापौर लाभणार आहे. यापूर्वी सन २००५-०७ या कालावधीत पूर्व उपनगरातून दत्ता दळवी हे शेवटचे महापौर झाले होते.मुंबईच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी येत्या बुधवारी ११ फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे.. यासाठी शनिवारी ०७ फेब्रुवारी रोजी उमेदवारी अर्ज दाखल केले. ही निवडणूक बिनविरोध असल्यामुळे महापौरपदी रितू तावडे आणि उपमहापौरपदी संजय घाडी यांची निवड होणार आहे . रितू तावडे यांच्या रुपात पूर्व उपनगराला तब्बल १८ ते २० वर्षांनी महापौर लाभला आहे. सन १९९६-९७ पासून सन २०२२ पर्यंत तत्कालिन शिवसेनेचे महापौर निवडून येत असून या कालावधीमध्ये एकमेव महापौर हा पूर्व उपनगरातील लाभला आहे. सन २००५- २००७मध्ये पूर्व उपनगरातील विक्रोळीतील नगरसेवक दत्ता दळवी यांची निवड करण्यात आली होती. या कालावधीमध्ये सात महापौर हे शहर भागातील होते . तर तीन महापौर हे पश्चिम उपनगरातील होते.काँग्रेसच्या सन १९९२ ते ९७च्या काळातील चार महापौरांपैंकी चारही महापौर पनगरातील होते.. यामध्ये तीन महापौर पूर्व उपनगराचे आणि एक महापौर पश्चिम उपनगरातील होते.
Supriya Sule : शरद पवार यांना प्रकृतीच्या कारणास्तव पुण्यातील रुबी हॅालमध्ये दाखल करण्यात आले असून, त्यांची कन्या खासदार सुप्रिया सुळेंनी त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे.
Supriya Sule : शरद पवार यांना प्रकृतीच्या कारणास्तव पुण्यातील रुबी हॅालमध्ये दाखल करण्यात आले असून, त्यांची कन्या खासदार सुप्रिया सुळेंनी त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे.
Top 10 news: राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी शनिवारी मतदान पार पडलं त्याचा निकाल काल हाती लागला. या निकालात सत्ताधारी महायुतीनं पुन्हा एकदा वर्चस्व गाजवलं.
विशाल म्हणाले, “नव्या गायकांसाठी एक सल्ला कृपया कोणत्याही मंत्री, नेता किंवा त्यांच्या सेक्रेटरीकडून ओळखीचा वापर करून मला फोन करवण्याचा प्रयत्न करू नका.” असं केल्यास आपल्याला भेटण्याची संधी कायमची संपते, असं त्यांनी ठामपणे सांगितलं.
Rohit Pawar : अजित पवार विमान अपघात; रोहित पवार गौप्यस्फोट करणार? आजच्या पत्रकार परिषदेकडे लक्ष
Rohit Pawar :आमदार रोहित पवार अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत काय बोलणार याकडे लक्ष असणार आहे.
Yamini Jadhav: महापौरपदापाठोपाठ यामिनी जाधव यांना उपमहापौरपदानेही दिली हुलकावणी
मुंबई: मुंबईच्या महापौरपदाची स्वप्ने आजवर जाधव कुटुंबाला अनेकदा दाखवली गेली. अनुसूचित जाती प्रवर्ग आल्याने यशवंत जाधव आणि त्यानंतर एकदा एस सी महिला प्रवर्ग आल्याने यामिनी जाधव यांना महापौरपदाची आस लागली होती. परंतु शिवसेनेने दुसऱ्याच नगरसेवकाला उमेदवार देत जाधव कुटुंबांची स्वप्ने उधळून लावली. परंतु यावेळी उपमहापौरपदासाठी यामिनी जाधव यांच्या नावाची चर्चा होती पण तिथे जाधव यांच्याऐवजी संजय घाडी यांना उमेदवारी दिली गेली. त्यामुळे उपमहापौरपदही जाधव कुटुंबाला मिळाले नाही. त्यामुळे महापौरपदापाठोपाठ आता उपमहापौरपदानेही यामिनी जाधव यांना हुलकावणी दिल्याचे दिसून आले आहे.मुंबई महापालिकेत शिवसेनेचे २९ नगरसेवक आणि भाजपचे ८९ नगरसेवक निवडून आल्याने महापौरपदासाठी भाजपच्यावतीने रितू तावडे आणि शिवसेनेच्यावतीने संजय घाडी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. परंतु शिवसेनेच्यावतीने उपमहापौरपदासाठी यामिनी जाधव आणि तृष्णा विश्वासराव यांच्या नावाची चर्चा होती. परंतु यामिनी जाधव यांचे नाव उपमहापौरपदासाठी अग्रस्थानी होते . त्यामुळे पुन्हा एकदा जाधव कुटुंबावर अन्याय झाल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे.यापूर्वी सन २००२मध्ये अनूसुचित जातीच्या महापौरपदाचे आरक्षण पडल्यानंतर यशवंत जाधव यांचे नाव होते, परंतु शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी महादेव देवळे यांच्या नावाची घोषणा केली. त्यामुळे यशवंत जाधव यांचे नाव मागे पडले. त्यानंतर सन २०१२ ते २०१७ या कालावधीमध्ये सुरुवातीला महिला एस सी प्रवर्गाकरता आरक्षण पडल्यानंतर यामिनी जाधव आणि स्नेहल आंबेकर यांची नावे चर्चेत होती. पण यामिनी जाधव यांना न देता तत्कालिन शिवसेनेने स्नेहल आंबेकर यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे जाधव कुटुंबाचे दुसऱ्यांदा महापौर होण्याचे स्वप्न भंग पावले. त्यानंतर पुन्हा एकदा सन २०१९मध्ये सर्वसाधारण प्रवर्ग आल्याने तत्कालिन स्थायी समिती अध्यक्ष म्हणून यशवंत जाधव यांचे नाव चर्चेत होते. परंतु शेवटच्या क्षणाला किशोरी पेडणेकर यांनी बाजी मारली आणि त्या महापौर बनल्या. त्यामुळे तिसऱ्यांदा जाधव कुटुंबात जाणारे महापौर पद लांबणीवर पडले. त्यातच आता महापौर नाही तर उपमहापौर पद मिळेल अशी आशा असतानाच शिवसेनेने त्यांचा पत्ता कापून संजय घाडी यांना उमेदवारी दिल्यामुळे महापौर पदानंतर आता उपमहापौर पदही त्यांच्या घरी जावू शकलेले नाही, हे दिसून आले आहे. यामिनी जाधव हे आक्रमक व्यक्तिमत्व असल्याने तसेच माजी आमदार असल्यामुळे सभागृहात त्यांची आवश्यकता लक्षात घेवून त्यांना उपमहापौर दिले नसल्याचे बोलले जात आहे.
Devendra Fadnavis meets Amit Shah : शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अजित पवार यांच्यामध्ये विलीनिकरणावर बैठका झाल्याचा दावा केला जात आहे.
Devendra Fadnavis meets Amit Shah : शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अजित पवार यांच्यामध्ये विलीनिकरणावर बैठका झाल्याचा दावा केला जात आहे.
दिल्ली: बीसीसीआयच्या केंद्रीय करार यादीतून दुर्लक्षित खेळाडू: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने पुढील हंगामासाठी खेळाडूंची केंद्रीय करार यादी जाहीर केली आहे. कसोटी आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार शुभमन गिलला बढती देण्यात आली आहे, तर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना पदावनत करण्यात आले आहे. रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह सर्वोच्च श्रेणीत कायम आहेत. गेल्या हंगामाच्या तुलनेत, बीसीसीआयने अनेक प्रमुख खेळाडूंना केंद्रीय करार यादीतून वगळले आहे, त्यापैकी एक अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमी आहे.करार यादीतून मोहम्मद शमी आणि ईशान किशन यांची नावे गायबबीसीसीआयच्या केंद्रीय करार यादीतून सर्वात मोठे नाव गायब आहे ते म्हणजे मोहम्मद शमी आहे. शमीने देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी केली आहे, परंतु त्याला सातत्याने टीम इंडियामधून वगळण्यात आले आहे. आता, त्याला केंद्रीय करार यादीतूनही वगळण्यात आले आहे. दरम्यान, अलीकडेच टी-२० संघात परतलेला इशान किशन देखील या यादीतून वगळण्यात आला आहे. गेल्या हंगामाच्या यादीतूनही किशनला वगळण्यात आले होते कारण बीसीसीआयने त्याला देशांतर्गत क्रिकेटमध्ये न खेळल्यामुळे यादीतून वगळले होते.यावेळी सरफराज खानलाही केंद्रीय करार मिळाला नाही. इंडियन प्रीमियर लीगमध्ये आरसीबी संघाचे नेतृत्व करणारा रजत पाटीदार यालाही वगळण्यात आले आहे, तर वेगवान गोलंदाज मुकेश कुमारलाही यावेळी केंद्रीय करार देण्यात आलेला नाही.ही ५ नावे वगळलीमोहम्मद शमी, इशान किशन, रजत पाटीदार, सरफराज खान, मुकेश कुमारबीसीसीआयची नवीन केंद्रीय करार यादीग्रेड ए - शुभमन गिल, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजाग्रेड ब - रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत, कुलदीप यादव, सूर्यकुमार यादव, यशस्वी जैस्वाल, श्रेयस अय्यरग्रेड क - अक्षर पटेल, टिळक वर्मा, रिंकू सिंग, शिवम दुबे, संजू सॅमसन, अर्शदीप सिंग, प्रसीद कृष्णा, आकाशदीप, ध्रुव जुरेल, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, नितीश कुमार रेड्डी, अभिषेक शर्मा, साई सुदर्शन, रवी बिश्नोई, रुतुराज गायकवाड
Baramati Election Results : दादांच्या शिस्तीचे कार्यकर्त्यांकडून पालन; विजयी मिरवणूक न काढता बारामतीत राष्ट्रवादीचा सर्व जागांवर विजय.
Pune Election Results : मुळशी तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची सरशी; जिल्हा परिषदेच्या २ जागांसह पंचायत समितीवरही वर्चस्व, तर भाजपचे ऐतिहासिक खाते.
Government Job: राज्यात ७० हजार पदांची भरती होणार; मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती
मुंबई : महाराष्ट्रात लवकरच ७० हजार पदांची नोकरभरती प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ही भरती डिजिटल पद्धतीने होणार असून तरुणांसाठी ही मोठी सुवर्णसंधी आहे. या भरतीमध्ये लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात येणाऱ्या २० हजार पदांचा समावेश आहे. तर उर्वरित पदे आयोगाबाहेरील विविध विभागांमधील आहेत.सेवा प्रवेश नियमावलीत मोठे बदलसह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सेवा प्रवेश नियमावली सुधारणा संदर्भात उच्चस्तरीय बैठक पार पडली. बैठकीस मुख्य सचिव राजेश अग्रवाल तसेच सर्व अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव आणि संबंधित विभागांचे सचिव उपस्थित होते.भरती प्रक्रियेत आवश्यक कौशल्ये, पात्रता निकष आणि कामाच्या स्वरूपानुसार निर्णय घेतले जातील, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. सेवा प्रवेश नियमावलीतील बदलांचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळ बैठकीत मांडला जाणार आहे.पारदर्शक आणि डिजिटल भरती प्रक्रियाभरती प्रक्रियेत अनावश्यक कागदपत्रे, लांब रांगा आणि विलंब टाळण्यासाठी ऑनलाइन व डिजिटल व्हेरिफिकेशन मॉडेल विकसित करण्यावर भर देण्यात येणार आहे. ब्लॉकचेन तंत्रज्ञान (Blockchain Verification) आणि डिजिलॉकर प्रणालीचा (DigiLocker System) वापर करून प्रमाणपत्र पडताळणी सुलभ करण्यात येईल. पासपोर्टसारख्या संवेदनशील दस्तऐवजांची ऑनलाइन पडताळणी शक्य असल्यास, इतर प्रक्रियांमध्येही हे मॉडेल वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या.राज्य प्रशासनात कार्यक्षमतेला गती
Palghar: आंतरराष्ट्रीय नेमबाज संभाजी पाटीलचा भीषण अपघातात मृत्यू
पालघर: भारताचे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करणारा नेमबाज संभाजी शिवाजी पाटील याचा वयाच्या २७ व्या अपघाती मृत्यू झाला आहे. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मनोरजवळ संभाजी पाटीलचा भीषण कार अपघात झाला. सोमवारी सकाळी १० ते ११ च्या सुमारास ही घटना घडली. या अपघातात फॉर्च्युनर कारचा अक्षरशः चक्काचूर झाला असून क्रीडा क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.संभाजी पाटील पुण्याहून गुजरातच्या दिशेने प्रशिक्षणासाठी जात होता. पालघर जिल्ह्यातील मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दुर्वेश गावाजवळ, त्याची भरधाव फॉर्च्युनर कार एका उभ्या असलेल्या अवजड हयावा ट्रकला पाठीमागून जोरदार धडकली. ही धडक इतकी भीषण होती की कारचा पुढचा भाग ट्रकच्या खाली घुसला आणि गाडीचा चेंदामेंदा झाला.नेमकं घडलं काय?अपघातात संभाजी पाटील याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्यासोबत असलेला मित्र प्रणय आणि प्रशांत चौधरी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मनोर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बालाजी मुंढे करत आहेत. प्राथमिक माहितीनुसार, वाहनचालकाचे नियंत्रण सुटल्याने किंवा उभ्या ट्रकचा अंदाज न आल्याने हा अपघात झाला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.मूळचा छत्रपती संभाजीनगरचा असलेला संभाजी पाटील बालेवाडी क्रीडा संकुलात क्रीडा अधिकारी म्हणून कार्यरत होता. त्याने नेमबाजीमध्ये अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पदके पटकावली होती.संभाजी पाटील नेमबाजीतील कारकीर्द२०१६- कनिष्ठ जागतिक नेमबाजी स्पर्धेत (गबाना) सुवर्णपदक.२०१७ - कनिष्ठ विश्वचषक स्पर्धेत सांघिक रौप्य पदक.२०१८-२० - ऑल इंडिया रेल्वे आणि मध्य रेल्वे नेमबाजी स्पर्धांमध्ये सातत्याने सुवर्णपदके.अलीकडेच त्याची पुन्हा एकदा राष्ट्रीय नेमबाज म्हणून निवड झाली होती.
Khed Election Results : खेड तालुक्यात सत्तांतराची लाट कायम; विधानसभा निवडणुकीनंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवरही शिवसेना (उबाठा) गटाचे वर्चस्व.
आसाममध्ये मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा आणि काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांच्यातील वाद वाढत आहे. मुख्यमंत्र्यांनी गोगोई यांच्या ब्रिटिश पत्नी एलिझाबेथ कोलबर्न आणि पाकिस्तानी नागरिक अली तौकीर शेख यांच्या संबंधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांचा आरोप आहे की एलिझाबेथ पाकिस्तानमधील एका फर्ममध्ये काम करत होत्या आणि त्यांनी भारताशी संबंधित माहिती तौकीरला पाठवली. मात्र, गौरव याला लोकांना मूळ मुद्द्यावरून भरकटवण्याचा डाव म्हणतात. त्यांचे म्हणणे आहे की हिमंता यांच्याविरोधात आरोपांचा डोंगर उभा आहे, त्यामुळे ते वैयक्तिक हल्ले करत आहेत. ते मुख्यमंत्री राहण्याच्या लायकीचे नाहीत. आसाममध्ये लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत. यापूर्वी या राजकीय आरोपांवर दैनिक भास्करने काँग्रेस नेते गौरव गोगोई यांच्याशी संवाद साधला. संपूर्ण मुलाखत वाचा… प्रश्न: मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा तुमच्यावर पाकिस्तानशी संबंध असल्याचा आरोप करत आहेत?उत्तर: लोकांना स्पष्टपणे दिसत आहे की काँग्रेस भ्रष्टाचाराचे मुद्दे उपस्थित करत आहे. 4,000 एकर जमीन मुख्यमंत्री आणि त्यांच्या कुटुंबाच्या ताब्यात आहे. येथे बेरोजगारी आणि महागाई ही मोठी समस्या आहे. हे लपवण्यासाठी भाजप खोटे आरोप करत आहे. हे आरोप एक-दोन महिन्यांपासून नाही, तर एक वर्षापासून करत आहेत. त्यांनी एक एसआयटी (SIT) देखील स्थापन केली होती, ज्याचा अहवाल त्यांना 6 महिन्यांपूर्वीच मिळाला होता. तरीही ते गप्प राहिले. हा अहवाल त्यांनी केंद्र सरकारलाही दिला नाही. जर प्रकरण इतके महत्त्वाचे आहे, तर 6 महिने का बसून राहिलात? लोकांनाही कळून चुकले आहे की, हा केवळ आपला भ्रष्टाचार लपवण्यासाठी, काँग्रेसच्या अजेंड्याला रुळावरून खाली उतरवण्यासाठी, लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी त्यांची राजकीय चाल आहे. प्रश्न: मुख्यमंत्री तुमच्या कुटुंबाच्या नागरिकत्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत?उत्तर: आम्ही आमच्या समाजात बाहेरून आलेल्या सुनेचा खूप आदर करतो. आसामच्या लोकांनी माझ्या कुटुंबाला तोच आदर दिला आहे. मुख्यमंत्र्यांकडे माझ्या दिवंगत वडिलांविरुद्ध बोलण्यासाठी काहीही उरलेले नाही. मी तीन वेळा खासदार आहे. मी 10 वर्षांपासून संसदीय राजकारणात आहे. माझ्याविरुद्ध त्यांना काहीही मिळत नाहीये, तर त्यांच्याविरुद्ध पुराव्यांचा डोंगर उभा राहत आहे. अवैध कंपन्या, त्यांच्या कुटुंबाच्या नावावर चॅनल उघडले आहे, त्यात जाहिरातींच्या नावाखाली किती सरकारी निधी जातो, त्यांच्या कुटुंबाच्या नावावर कंपनी आहे, त्यासाठी नियम बदलून मालमत्तेचे मालक बनवले जाते. कुठेतरी त्यांची हीच दुविधा आहे की, त्यांनी माझ्या कुटुंबाविरुद्ध काय बोलावे. म्हणून ते वैयक्तिक टिप्पणी करत आहेत. प्रश्न: भाजप तुमच्या पत्नीवर आरोप करते, काँग्रेस मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आरोप करते. आसाममध्ये 'पत्नी राजकारण' (वाइफ पॉलिटिक्स) सुरू आहे का?उत्तर: आम्ही जे प्रश्न उपस्थित करत आहोत, ते लोकांशी संबंधित आहेत. जमिनीचे नियम कसे बदलले जात आहेत. निवडून आलेले मुख्यमंत्री आपल्या कुटुंबाला जाहिरातींच्या नावाखाली सरकारी पैसा का देत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाचे (PWD) कंत्राट त्यांच्या कुटुंबाला का मिळत आहेत. माझ्या कुटुंबाबद्दल बोलायचं झाल्यास, कधी परदेशी एजंट, कधी गुप्तहेर, कधी नागरिकत्व असे आरोप केले, ज्यांचे कोणतेही पुरावे नाहीत. प्रश्न: मुख्यमंत्री हिमंता यांचा मुस्लिम व्यक्तीला लक्ष्य करणारा व्हिडिओ व्हायरल झाला. तुम्ही याकडे कसे पाहता?उत्तर: हा खूप घृणास्पद व्हिडिओ आहे. राज्याच्या निवडून आलेल्या मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारच्या व्हिडिओला प्रोत्साहन देणे अत्यंत दुर्दैवी आहे. त्यांनी गुन्हा केला आहे. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हायला हवी. मला कळले आहे की कायदेशीर कारवाई सुरू झाली आहे. त्यांनी व्हिडिओ डिलीट केला असला तरी, हे पहिले प्रकरण नाही. यापूर्वी त्यांनी एका विशिष्ट समुदायाविरुद्ध खूप द्वेषपूर्ण भाषा वापरली आहे. त्यावर कायदेशीर कारवाई होत आहे. त्यांनी पत्रकार परिषदेत माझ्या 5 आणि 9 वर्षांच्या मुलांच्या पासपोर्टचे तपशील माध्यमांसमोर ठेवले. हा देखील कायदेशीर गुन्हा आहे. ते वारंवार सिद्ध करत आहेत की ते आसाम किंवा कोणत्याही राज्याच्या मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर बसण्यास पात्र नाहीत. प्रश्न: मुख्यमंत्री मुस्लिमांवर सातत्याने वक्तव्ये करत आहेत. यावर काँग्रेस काय करत आहे?उत्तर: लोकांना माहीत आहे की ते स्वतःला हिंदू नेता सिद्ध करू इच्छितात. हे कसे हिंदू नेते आहेत, जे राज्यात गायींच्या तस्करीला प्रोत्साहन देत आहेत. याशी संबंधित लोकांना मंत्री बनवले आहे, त्यांना तिकीट देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी हिंदू जमातीची सुमारे 12 हजार एकर जमीन अडाणी-अंबानींना विकली आहे. येथील बंगाली लोक स्वतःला भारतीय म्हणतात. आज भाजपच्या राजकारणामुळे त्यांना लोक बांगलादेशींसारखे पाहू लागले आहेत. यांनी आसाममधील हिंदू समाजावर अन्याय केला आहे आणि त्यांच्या क्षुल्लक राजकारणामुळे हिंदूही खूप प्रभावित झाले आहेत. याच गोष्टी आम्ही लोकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रश्न: गाईंच्या तस्करीमध्ये कोण लोक सामील आहेत?उत्तर: हे त्यांना माहीत आहे, लोकांनाही माहीत आहे की गाईंच्या तस्करीमध्ये गुंतलेले व्यक्ती त्यांच्या मंत्रिमंडळात आहेत आणि खूप जवळचे आहेत. येथे कोळसा सिंडिकेट सुरू आहे. ईडीने सांगितले आहे की दररोज हजारो ट्रक आसाम-मेघालय सीमा ओलांडतात. प्रत्येक ट्रकमधून 1.5 लाख रुपयांची वसुली होते. प्रश्न: मुस्लिमांची घरे पाडली जात आहेत किंवा मतदार यादीतून त्यांची नावे वगळली जात आहेत, त्यांच्यासाठी काँग्रेस काय करत आहे?उत्तर: बेकायदेशीर बांगलादेशी घुसखोरी हा एक संवेदनशील मुद्दा आहे. काँग्रेस सरकारने यावर ठोस पावले उचलली होती. आम्ही सीमेवर जितके कुंपणाचे काम केले, ते भाजप सरकार केंद्रात 10 वर्षे राहूनही करू शकले नाही. आम्ही जितक्या बांगलादेशी घुसखोरांना परत पाठवले, त्याच्या अर्धेही भाजप सरकार करू शकले नाही. आम्ही बेकायदेशीर बांगलादेशींची ओळख पटवण्यासाठी NRC प्रक्रिया सुरू केली होती, भाजप सरकार ती देखील पूर्ण करू शकले नाही. मूळ समस्येचे निराकरण करण्यात भाजप वारंवार अपयशी ठरले आहे. प्रश्न: काँग्रेस कोणत्या मुद्द्यांसह जनतेत जाईल, मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याची घोषणा होईल का?उत्तर: आम्ही नुकतेच प्रत्येक जिल्ह्यात जाऊन लोकांशी बोललो आहोत की त्यांना काय हवे आहे. याचा सारांश आम्ही लवकरच प्रकाशित करू. मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याचा निर्णय केंद्रीय नेतृत्व घेईल. आम्हाला जी कोणतीही जबाबदारी दिली जाईल, ती पार पाडण्यासाठी आम्ही पूर्णपणे तयार आहोत. प्रश्न: तुमच्यावर आरोप आहेत की तुम्ही राहुल गांधींच्या जवळ आहात आणि कार्यकर्त्यांपासून दूर राहता?उत्तर: आसाममध्ये जर जमिनीवरील कार्यकर्ते आणि सामान्य लोकांमध्ये सर्वात जास्त कोणी राहत असेल, तर तो मी आहे. मुख्यमंत्री तुम्हाला व्यासपीठांवर आणि गर्दीत दिसतील, पण मजूर, दुकानदार किंवा कोणत्याही शोकाकुल कुटुंबाच्या घरी कधीच दिसणार नाहीत. आम्ही प्रयत्न करतो की प्रत्येक घर, प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचावे.
Dattatray Bharne : 'दादांचा विचार हाच विकासाचा मार्ग'; श्रीराज भरणे यांच्या प्रचंड विजयानंतर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे झाले भावूक.
5 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज यांनी घोषणा केली होती - आम्ही T20 विश्वचषकात भारतासमोर सामना खेळणार नाही. परंतु एका आठवड्याच्या आतच पाकिस्तान सरकारने पुन्हा यू-टर्न घेतला आहे. पाकिस्तानने घोषणा केली आहे की, पाकिस्तानी क्रिकेट संघ 15 फेब्रुवारी रोजी भारतासमोर होणारा T20 विश्वचषकाचा सामना खेळेल. काही अहवालानुसार, 8 फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीत ICC ने अप्रत्यक्षपणे धमकी दिली आहे, तर काही अहवालानुसार PCB ने भारतासमोर खेळण्याच्या बदल्यात 3 अटी ठेवल्या आहेत. अखेर पाकिस्तान भारतासोबत खेळायला का तयार झाले, PCB ने कोणत्या 3 अटी ठेवल्या आहेत, ICC त्या पूर्ण करेल का; जाणून घेऊया आजच्या एक्सप्लेनरमध्ये.. प्रश्न-1: अखेर पाकिस्तान भारतासमोर खेळायला का तयार झाले? उत्तर: पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अधिकाऱ्यांमध्ये रविवारी लाहोरमध्ये बैठक झाली होती. 5 तास चाललेल्या या बैठकीत बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष अमिनुल इस्लाम देखील सहभागी झाले होते. बैठकीत जवळपास निश्चित झाले होते की पाकिस्तान भारतासोबत सामना खेळेल. त्यानंतर पीसीबी प्रमुख मोहसिन नक्वी यांनी सोमवारी संध्याकाळी पाकिस्तानच्या पंतप्रधानांशी बोलून बैठकीची माहिती दिली होती. रात्रीपर्यंत पाकिस्तान सरकारच्या अधिकृत X हँडलवरून घोषणा करण्यात आली की पाकिस्तानी संघ भारतासोबत सामना खेळेल. पाकिस्तान सरकारने सांगितले की, हा निर्णय क्रिकेटच्या भावनेचे रक्षण करण्यासाठी आणि जागतिक क्रीडा मंचावर सर्व भागीदार देशांच्या समर्थनासाठी घेण्यात आला आहे. आपल्या पोस्टमध्ये पाकिस्तान सरकारने सांगितले की, श्रीलंका क्रिकेटचे अध्यक्ष अनुरा कुमार दिसानायके यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्याशी फोनवर बोलले होते. याशिवाय बांगलादेश आणि यूएई क्रिकेट बोर्डानेही आयसीसी बैठकीनंतर पीसीबीशी चर्चा केली होती. या देशांच्या विनंती आणि पाठिंब्यानंतर पाकिस्तानने भारतासोबत सामना खेळण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, दैनिक भास्करचे स्पोर्ट्स एडिटर बिक्रम प्रताप सिंह म्हणतात, 'पाकिस्तानने भारतासोबतच्या सामन्यावर बहिष्कार टाकणे हे केवळ एक प्रेशर टॅक्टिक (दबाव आणण्याची रणनीती) होती. त्यांना स्वतःला आधीपासूनच भारतासोबत खेळायचे होते. पाकिस्तानला बऱ्याच काळापासून ICC ला आपली उपस्थिती जाणवून द्यायची होती. त्यांना ICC मधून अधिक महसूल मिळावा अशी त्यांची इच्छा होती. बांगलादेशसोबतच्या परिस्थितीमुळे पाकिस्तानला संधी मिळाली.' प्रश्न-2: पाकिस्तानने भारतासोबत खेळण्यासाठी कोणत्या अटी ठेवल्या आहेत?उत्तर: रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तानला भारतासोबत T20 विश्वचषक सामना खेळण्याच्या बदल्यात त्याच्या 3 अटी पूर्ण करायच्या आहेत... अट-1: आयसीसीकडून मिळणारे उत्पन्न वाढवावेआयसीसी आपल्या 12 पूर्णवेळ सदस्य देशांना दरवर्षी आपल्या कमाईचा एक हिस्सा महसूल म्हणून देते. सध्या पाकिस्तानला आयसीसीकडून सुमारे 34.5 दशलक्ष डॉलर म्हणजेच अंदाजे 313 कोटी रुपये महसूल मिळतो. हे आयसीसीच्या कमाईच्या 5.75% आहे. पाकिस्तान हा आयसीसीकडून चौथा सर्वाधिक महसूल मिळवणारा देश आहे. भारताला सर्वाधिक सुमारे 230 दशलक्ष डॉलर महसूल मिळतो, जो आयसीसीच्या वार्षिक कमाईच्या अंदाजे 38.5% आहे. अट-2: भारतीय खेळाडूंनी सामन्यादरम्यान हस्तांदोलन करावे सप्टेंबरमध्ये झालेल्या आशिया कपदरम्यान भारतीय पुरुष क्रिकेट संघाने पाकिस्तानी खेळाडूंसोबत हस्तांदोलन करण्यास नकार दिला होता. भारतीय संघाने आशियाई क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आणि PCB प्रमुख मोहसिन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी घेण्यासही नकार दिला होता. अट-3: भारत-पाकिस्तान दरम्यान द्विपक्षीय मालिका पुन्हा सुरू व्हावी2012-13 मध्ये भारत आणि पाकिस्तान दरम्यान शेवटची द्विपक्षीय (बायलेटरल) मालिका आयोजित करण्यात आली होती. 2008 च्या मुंबई हल्ल्यानंतर भारतीय संघाने पाकिस्तानात सामने खेळणेही बंद केले आहे. याच कारणामुळे पाकिस्तानच्या यजमानपदाखाली आयोजित केलेला आशिया कप 2025 देखील भारताने UAE मध्ये खेळला होता. आता पाकिस्तानला वाटते की भारतासोबत द्विपक्षीय (बायलेटरल) मालिका पुन्हा सुरू व्हावी. त्याचबरोबर पाकिस्तान, बांगलादेश आणि भारताने त्रिकोणीय (ट्रायलेटरल) मालिका खेळावी. प्रश्न-3: तर काय ICC ने पाकिस्तानच्या तिन्ही अटी मान्य केल्या?उत्तर: PCB च्या सर्व अटी मान्य करणे ICC च्या हातात नाही, कारण… ICC चे महसूल मॉडेल आधीच निश्चित2023 मध्ये ICC ने नवीन महसूल मॉडेल जाहीर केले होते, ज्या अंतर्गत 2024-27 पर्यंत पूर्णवेळ सदस्य देशांना किती पैसे मिळतील हे निश्चित झाले होते. देशांना मिळणारा महसूल 4 आधारांवर निश्चित करण्यात आला होता... देशाचा क्रिकेट इतिहास 2027 पर्यंत याच मॉडेलनुसार सर्व देशांना वार्षिक महसूल मिळेल. तोपर्यंत ICC पाकिस्तानला मिळणारा महसूल वाढवू शकत नाही. पाकिस्तानची अट पूर्ण करण्यासाठी ICC ला त्याच्या 2028-31 च्या महसूल मॉडेलमध्ये असे बदल समाविष्ट करावे लागतील, ज्यामुळे PCB चा महसूल वाढू शकेल. द्विपक्षीय मालिका भारत सरकारचा निर्णय हँडशेकचा निर्णय खेळाडूंच्या हातात प्रश्न-4: ICC ने अशी कोणती कारवाई केली असती, ज्यामुळे पाकिस्तान भारतासोबत सामना खेळायला तयार झाले असते?उत्तर: ICC ने कठोर पाऊले उचलली असती, ज्यामुळे पाकिस्तान क्रिकेटला मोठा धक्का बसला असता... ICC कडून मिळणाऱ्या 313 कोटींच्या महसुलावर बंदी PCB ICC कडून वार्षिक महसूल म्हणून जे 313 कोटी रुपये घेते, तो त्याच्या एकूण कमाईचा एक मोठा भाग आहे. ICC ने यावर बंदी घातली असती. T20 विश्वचषकात गट टप्प्यातील एक सामना खेळल्यास संघाला अंदाजे 2.5 कोटी रुपये मिळतात. तर स्पर्धेत 5व्या ते 12व्या क्रमांकावर राहणाऱ्या संघाला अंदाजे 4.1 कोटी रुपये, जिंकल्यास अंदाजे 27.5 कोटी आणि उपविजेता ठरल्यास अंदाजे 14.7 कोटी भारतीय रुपये मिळतात. भारतासोबत सामना न खेळल्यामुळे जर पाकिस्तानच्या गुणतालिकेतील स्थानावर परिणाम झाला असता, तर त्याच्या स्पर्धेतून होणाऱ्या कमाईवर परिणाम झाला असता. सामन्याचे गुण थेट गमवावे लागले असते जर पाकिस्तानने भारतासोबत 15 फेब्रुवारीचा सामना खेळला नसता, तर सामना न खेळताच पाकिस्तानचा पराभव मानला गेला असता. यामुळे भारताला 2 गुण मिळाले असते आणि न खेळताच पाकिस्तानचे 2 गुण कमी झाले असते. जर पाकिस्तान गट टप्प्यात आपला कोणताही सामना हरला असता, तर त्याच्या सुपर-8 मध्ये पोहोचण्याची शक्यता कमी झाली असती. पाकिस्तान सुपर लीग बंद होण्याचा धोका पाकिस्तान सुपर लीग म्हणजेच PSL पूर्णपणे परदेशी खेळाडूंवर अवलंबून आहे. ICC ने ठरवले असते तर इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिजसारख्या देशांतील खेळाडूंना PSL मध्ये खेळण्यासाठी NOC देण्यास नकार दिला असता. अशा परिस्थितीत परदेशी खेळाडूंशिवाय PSL ची ब्रँड व्हॅल्यू संपली असती. ब्रॉडकास्टर्सनी माघार घेतली असती. असा अंदाज आहे की यामुळे PCB ला वार्षिक सुमारे 50 कोटी भारतीय रुपयांचे नुकसान झाले असते. पाकिस्तानी खेळाडूंचे नुकसान प्रश्न-5: ICC कोणत्याही परिस्थितीत भारत-पाकिस्तान सामना का आयोजित करू इच्छिते?उत्तर: भारत आणि पाकिस्तानचा सामना ICC साठी सर्वाधिक महसूल मिळवून देतो. जगातील इतर कोणत्याही सामन्यापेक्षा हा सामना जास्त पाहिला जातो. 2023 च्या विश्वचषकात भारत-पाकिस्तानचा सामना सुमारे 17 कोटी लोकांनी पाहिला होता. हा सामना न झाल्यास ICC चे नुकसान होईल… प्रश्न-6: पाकिस्ताननंतर बांगलादेशही आपला निर्णय बदलू शकतो का?उत्तर: आयसीसीसोबत लाहोरमध्ये झालेल्या बैठकीत बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षांच्या उपस्थितीवरून हे स्पष्ट होते की, बहिष्काराच्या मुद्द्यावर दोन्ही देश एकत्र आहेत. आता जर पाकिस्ताननंतर बांगलादेशने आपला निर्णय बदलण्याची इच्छा व्यक्त केली तरी तो T20 विश्वचषकाचा भाग होऊ शकत नाही. त्याच्या जागी विश्वचषकात समाविष्ट झालेला स्कॉटलंड संघ दोन सामने खेळूनही चुकला आहे. तथापि, असे होऊ शकते की आयसीसीसोबत झालेल्या बैठकीत बांगलादेशही भविष्यात भारतासोबत होणारे सामने खेळण्यास सहमत झाला असेल.
Pune Election Results : एकाच गावातील तीन उमेदवार अन् १२८ मतांचे अंतर; राष्ट्रवादीची हक्काची जागा हुकली, भाजपला भोवले सुप्त लाटेचे राजकारण.
Pune Election Results : हवेलीत राष्ट्रवादीची सरशी; जिल्हा परिषदेच्या ४ जागांसह पंचायत समितीवरही वर्चस्व, भाजपला ४ तर शिवसेनेला १ जागेवर समाधान.
Pune Election Results : पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचा 'सुसाट' प्रवास; ७३ पैकी ५१ जागांसह एकहाती सत्ता, भाजप दुसऱ्या तर ठाकरे गट तिसऱ्या क्रमांकावर.
राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी झालेल्या निवडणुकीच्या निकालानंतर या ग्रामीण भागातील मतदारांनीसुद्धा पुन्हा एकदा महायुतीच्या बाजूनेच कौल दिल्याचे दिसून येते.
लक्षवेधी : माहिती अधिकार कायद्याचे भवितव्य
आर्थिक सर्वेक्षण अहवालात नव्याने अभ्यास करण्याची आणि त्यातील काही तरतुदींमध्ये बदल करण्याची शिफारस करण्यात आली आहे. या सूचनांमुळे माहिती अधिकार कायदा कमकुवत होणार का, याबाबत...
Apple Price Hike : परदेशी सफरचंद महागले! बाजारात आवक घटली, दर गगनाला भिडले; जाणून घ्या ताजे भाव
Apple Price Hike : इराणमधील अंतर्गत संघर्षामुळे पुरवठा साखळी विस्कळीत; मार्केट यार्डात सफरचंदाची आवक निम्म्यावर आल्याने किमतीत वाढ.
Nagar Road Accident : नगर रोडवर भीषण अपघात! भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेत २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू
Nagar Road Accident : विमाननगर एसआरए वसाहतीतील २४ वर्षीय तरुणावर काळाचा घाला; विमानतळ पोलिसांनी ट्रॅक्टर चालकाला घेतले ताब्यात.
तीन बहिणींनी एका अंतरंगी खेळाच्या आहारी जाऊन आत्महत्या केली. या घटनेच्या मुळाशी ‘कोरियन लव्हर गेम’ नावाचे एक जीवघेणे व्यसन असल्याचे समोर आले आहे.
Pune Family Court : मिळणारी पोटगी महिन्याच्या मध्यालाच संपतेय; वाढत्या महागाईमुळे शहरी भागातील विभक्त महिलांच्या संघर्षात मोठी वाढ.
HSC Board Exam 2026 : राज्यात १५ लाख ३२ हजार विद्यार्थ्यांचा कस; झेरॉक्स सेंटर्स बंद राहणार तर गैरप्रकार करणाऱ्यांवर होणार थेट पोलीस कारवाई.
PMPML Bus : परीक्षेला जाताय? पीएमपी बसमध्ये आता मिळणार ‘हे’खास फायदे; जाणून घ्या
PMPML Bus : परीक्षा काळात वाहतूक कोंडीचा अडथळा नको! शालेय व्यवस्थापनाच्या सूचनेनुसार अतिरिक्त बसेस सोडण्याचा प्रशासनाचा निर्णय.
Land Survey Rules : राज्यातील सर्व महानगरपालिका आणि नगरपालिकांमध्ये नवे नियम लागू; जमिनीच्या तुकडेबंदीसह बेकायदेशीर व्यवहारांवर येणार गदा.
Pune Crime : १४ जानेवारीपासून पोलिसांना गुंगारा देणारा धनराज जाधव वानवडीतून ताब्यात; गुन्हे शाखेची मोठी कामगिरी.

30 C