SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

29    C
...

Pete Hegseth : इराणचे युद्ध अंतहीन नाही, पण जीवितहानी अटळ; अमेरिकेचे युद्ध मंत्री पीट हेगसेथ यांचे मोठे वक्तव्य

अमेरिका -इस्रायलने इराणविरोधात छेडलेले युद्ध अतंहीन नाही. पण त्याची प्याप्ती अधिक वाढणार असून या युद्धात जीवितहानी अटळ आहे, असे अमेरिकेचे युद्धमंत्री पीट हेगसेथ (Pete Hegseth) यांनी म्हटले आहे.

दैनिक प्रभात 3 Mar 2026 9:14 pm

राज्यसभेचा सस्पेन्स संपला? मविआकडून शरद पवारांचं नाव निश्चित; ठाकरेंनीही दिला होकार

Rajya Sabha Election 2026 : महाविकास आघाडीकडून शरद पवार तर महायुतीकडून पार्थ पवार यांच्या नावाची चर्चा आहे.

दैनिक प्रभात 3 Mar 2026 9:06 pm

Pakistan : पाकिस्तान कडून अफगाणिस्तानमधील दौरुगोळ्याचे गोदाम उद्ध्वस्त

पाकिस्तानी सैन्याने खोस्तमधील एक दारूगोळा डेपो उद्ध्वस्त केला. पाक-अफगाण सीमेजवळच्या या डेपोची माहिती मिळताच ही कारवाई केली गेली.

दैनिक प्रभात 3 Mar 2026 8:50 pm

Ravi Shankar Prasad : लोकसभेच्या विशेषाधिकार समितीच्या अध्यक्षपदी रविशंकर प्रसाद यांची नियुक्ती

माजी केंद्रीय कायदा मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद (Ravi Shankar Prasad) यांची मंगळवारी लोकसभेच्या विशेषाधिकार समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

दैनिक प्रभात 3 Mar 2026 8:38 pm

Middle East Crisis: युद्धाने भारताचा ‘बासमती’अडकला! 4 लाख टन तांदूळ बंदरांवर पडून, शेतकरी-निर्यातदार हवालदिल

Middle East Crisis: यंदा भारतात बासमतीचे विक्रमी उत्पादन झाले आहे. मात्र निर्यात मागणीत अचानक आलेल्या घटीमुळे बासमतीचे भाव सुमारे ६ टक्क्यांनी खाली आले आहेत. बिर्याणी, पुलाव आणि अन्य पदार्थांसाठी वापरला जाणारा लांब दाण्याचा बासमती तांदूळ केवळ भारत आणि पाकिस्तानमध्येच मोठ्या प्रमाणात पिकवला जातो.

दैनिक प्रभात 3 Mar 2026 8:33 pm

Kolhapur tourist : दुबईहून सुरक्षित परतले कोल्हापूरचे पर्यटक; सांगितलं थरारक अनुभव…

दुबईमध्ये अडकलेले कोल्हापूर जिल्ह्यातील २३ पर्यटकांचा गट मंगळवारी मुंबईत सुरक्षितपणे परतला आहे.

दैनिक प्रभात 3 Mar 2026 8:29 pm

Narendra Modi : जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर? PM मोदींचा ८ देशांशी संवाद; भारताची भूमिका स्पष्ट

Narendra Modi : राण-इस्रायल संघर्ष तीव्र होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या ४८ तासांत ८ देशांच्या प्रमुखांशी संवाद साधला आहे.

दैनिक प्रभात 3 Mar 2026 8:27 pm

पश्चिम आशियातील संघर्षावर भारताने दिली अधिकृत प्रतिक्रिया

नवी दिल्ली : इराण आणि आखाती प्रदेशात २८ फेब्रुवारी २०२६ पासून संघर्ष सुरू आहे. हा संघर्ष सुरू झाल्याचे समजताच भारताने तीव्र चिंता व्यक्त केली होती. त्यावेळीही भारताने सर्व बाजूंना संयम बाळगण्याचे, वाढ टाळण्याचे आणि नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याचे आवाहन केले होते. दुर्दैवाने, रमजानच्या पवित्र महिन्यात, या प्रदेशातील परिस्थिती लक्षणीयरीत्या आणि सतत बिघडत चालली आहे.आता संघर्ष हळू हळू वेगवेगळ्या देशांमध्ये पसरत असल्याचे दिसत आहे. सामान्य जीवन आणि आर्थिक क्रियाकलाप ठप्प झाले असले तरी विनाश आणि मृत्यू वाढले आहेत. या प्रदेशाच्या सुरक्षितता आणि स्थिरतेत महत्त्वाचे योगदान असलेला जवळचा शेजारी म्हणून, या घडामोडी मोठ्या चिंता निर्माण करतात, असे परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले.आखाती प्रदेशात जवळजवळ एक कोटी भारतीय नागरिक राहतात आणि काम करतात. त्यांची सुरक्षितता आणि कल्याण ही सर्वोच्च प्राथमिकता आहे. त्यांच्यावर नकारात्मक परिणाम करणाऱ्या कोणत्याही विकासापासून आपण अभेद्य राहू शकत नाही. आमच्या व्यापार आणि ऊर्जा पुरवठा साखळ्या देखील या भूगोलातून जातात. कोणत्याही मोठ्या व्यत्ययाचे भारतीय अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होतात. जागतिक कार्यबलात ज्या देशाचे नागरिक प्रमुख आहेत अशा देशाप्रमाणे, भारत व्यापारी जहाजावरील हल्ल्यांनाही ठामपणे विरोध करतो. गेल्या काही दिवसांत अशा हल्ल्यांमध्ये काही भारतीय नागरिकांनी आपले प्राण गमावले आहेत किंवा बेपत्ता आहेत. या पार्श्वभूमीवर, भारत चर्चेतून तोडगा काढण्याचे आवाहन संघर्षात गुंतलेल्यांना करत आहे.प्रभावित देशांमधील भारतीय दूतावास आणि वाणिज्य दूतावास भारतीय नागरिक आणि सामुदायिक संघटनांच्या संपर्कात आहेत. सुरू असलेल्या संघर्षामुळे ज्यांच्याशी अद्याप संपर्क झालेला नाही अशा भारतीय नागरिक आणि सामुदायिक संघटनांना दूतावासाच्या संपर्कात राहण्याचे आवाहन भारत सरकार करत आहे. संघर्षात अडकलेल्या भारतीयांना सर्वतोपरी मदत देत असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने दिली.संघर्षाशी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या संबंधित असलेल्या देशांच्या सरकारांशी भारत सरकार संपर्कात आहे. पंतप्रधान मोदी आणि परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी संबंधितांशी चर्चा केली आहे. सरकार बदलत्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून राष्ट्रीय हितासाठी आवश्यक ते निर्णय घेत आहे आणि घेत राहील, असेही परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले.

फीड फीडबर्नर 3 Mar 2026 8:10 pm

Donald Trump : अमेरिकेने आतापर्यंत इराणची 9 जहाजे बुडवली; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

अमेरिकेने आतापर्यंत इराणची 9 जहाजे बुडवल्याचा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी केला आहे. बुडवण्यात आलेल्या या जहाजांपैकी काही जहाजे मोठी आणि प्रभावी होती.

दैनिक प्रभात 3 Mar 2026 7:48 pm

होळीच्या आनंदावर विरजण! भंडारा-गोंदियात काळाचा घाला; नेमकं काय घडलं?

Maharashtra news : महाराष्ट्र होळी २०२६: भंडारा जिल्ह्यात कार-दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू झाला असून गोंदियात तलावात बुडून दोन मुलांचा अंत झाला आहे.

दैनिक प्रभात 3 Mar 2026 7:44 pm

Pratap Sarnaik : “शिवसेनेत फूट पडू देणार नाही…”–प्रताप सरनाईक

सत्ता महत्त्वाची असली तरी पक्षाची एकजूट त्याहून महत्त्वाची आहे.

दैनिक प्रभात 3 Mar 2026 7:43 pm

West Asia conflict-Dry fruit trade: इराण युद्धाचा थेट फटका तुमच्या स्वयंपाकघराला! पिस्ता, केशर, खजूर महागले; पुढे आणखी संकट?

West Asia conflict-Dry fruit trade: पुरवठा साखळी तुटण्याचा धोका लक्षात घेता, सर्वसामान्यांच्या खिशावर येत्या काळात आणखी मोठा भार पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दैनिक प्रभात 3 Mar 2026 7:42 pm

मध्य पूर्वेतल्या बदलत्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत ऊर्जेसंदर्भात पूर्णपणे सज्ज

विविध स्रोतांकडून कच्चे तेल आणि पेट्रोलियम खरेदी, पुरवठ्याच्या स्थितीवर देखरेखीसाठी 247 नियंत्रण कक्षनवी दिल्ली : मध्य पूर्वेतील संघर्ष आणि बदलती जागतिक ऊर्जा परिस्थिती या पार्श्वभूमीवर पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी प्रसारमाध्यमांना सद्यस्थितीत देशाच्या तयारीविषयी माहिती दिली.जागतिक पातळीवर, भारत हा पेट्रोलियम उत्पादनांचा तिसरा सर्वात मोठा आयातदार, चौथा सर्वात मोठा रिफायनर आणि पाचवा सर्वात मोठा निर्यातदार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. मध्य पूर्वेतील परिस्थितीमुळे उद्भवणाऱ्या अल्पकालीन व्यत्ययांना तोंड देण्यासाठी देशाकडे कच्च्या तेलाचा तसेच पेट्रोल, डिझेल आणि एटीएफ यांसह महत्त्वाच्या पेट्रोलियम उत्पादनांचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.गेल्या काही वर्षात भारताने स्त्रोतांच्या वैविध्यकरणाद्वारे आपल्या लोकसंख्येसाठी ऊर्जेची उपलब्धता आणि किफायतशीरता, दोन्ही सुनिश्चित केली असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. भारतीय ऊर्जा कंपन्यांना आता होर्मूझच्या सामुद्रधुनी मार्गे न येणारा ऊर्जा पुरवठाही उपलब्ध आहे. त्यामुळे होर्मूझच्या सामुद्रधुनीमार्गे येणाऱ्या पुरवठ्यात तात्पुरता अडथळा निर्माण झाल्यास ही पर्यायी जहाजे उपलब्ध होऊन पुरवठ्यात साहाय्यभूत ठरतील.देशभरातील पेट्रोलियम उत्पादनांचा पुरवठा आणि साठास्थिती, यावर अविरत देखरेख ठेवण्यासाठी मंत्रालयाने 247 नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. सध्या, सरकार साठ्याच्या बाबतीत बऱ्यापैकी समाधानी आहे. भारतीय ग्राहकांचे हित जपणे हे सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे. यासाठी सरकार सतर्क असून स्थिती अधिक प्रभावीपणे हाताळण्यासाठी गरज भासल्यास टप्प्याटप्प्याने उपाययोजना केल्या जाऊ शकतात.

फीड फीडबर्नर 3 Mar 2026 7:30 pm

Devendra Fadanvis : नागपूरमधील स्फोटानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी केले ‘हे’आवाहन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी स्फोटकांच्या निर्मितीतील काही विशिष्ट प्रोटोकॉल आणि प्रक्रियांचे १०० टक्के ऑटोमेशन करण्याचे आवाहन केले आहे.

दैनिक प्रभात 3 Mar 2026 7:24 pm

Manoj Jarange : “मला रोज धमक्या मिळतात, मी मरणाला भीत नाही पण…”; मनोज जरांगे यांचा दावा

मी समाजासाठी लढतोय म्हणून मला रोज धमक्या देण्यात येत असल्याचे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी दावा केला आहे.

दैनिक प्रभात 3 Mar 2026 7:17 pm

फुलांची होळी उपक्रमातून महापौर रितू तावडे यांनी दिला पर्यावरणपूरक सण साजरे करण्याचा संदेश

मुंबई : होळी व धुळवड/रंगपंचमी हे सण आनंदात साजरे करावेत आणि त्यासोबत पर्यावरणाचे संरक्षण करण्याचे सामाजिक कर्तव्यही सर्वांनी पार पाडावे, त्यासाठी मुंबईची महापौर या नात्याने स्वतः कृतीतून संदेश द्यावा, या उद्देशाने ‘फुलांची होळी’ हा पर्यावरणपूरक उपक्रम आयोजित केला, असे उद्गार मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी काढले. या उपक्रमात वापरात आलेल्या फुलांचा सेंद्रिय खत निर्मितीसाठी उपयोग करण्यात येणार असून हरित मुंबईसाठी नागरिकांनी हातभार लावावा, असे आवाहन देखील महापौरांनी या निमित्ताने केले आहे.मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या पुढाकाराने घाटकोपर (पूर्व) येथे राजावाडी उद्यानात ‘फुलांची होळी’ हा पर्यावरणपूरक उपक्रम आज (दिनांक ३ मार्च २०२६) सकाळी आयोजित करण्यात आला. महापौर श्रीमती रितू तावडे, आमदार पराग शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि स्थानिक नागरिकांच्या उत्साहात हा उपक्रम पार पडला.रासायनिक रंगांचा वापर टाळून, पाण्याचा अपव्यय न करता, फुलांच्या पाकळ्यांनी धूलिवंदन सण साजरा करणे, पर्यायाने नागरिकांमध्ये पर्यावरणाबाबत जनजागृती करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. या उपक्रमानंतर संपूर्ण परिसराची स्वच्छता करण्यात आली. फुलांची होळी उपक्रमात वापरलेली फुले संकलित करण्यात आली. ही फुले सेंद्रिय खतनिर्मितीसाठी वापरण्यात येणार आहेत. यामुळे फुलांचे रूपांतर उपयुक्त खतामध्ये होऊन स्वच्छ व हरित मुंबईच्या संकल्पनेला हातभार लागणार आहे.यावेळी महापौर रितू तावडे म्हणाल्या की, होलिका दहन व धुळवड/रंगपंचमी हे सण जबाबदारीने साजरे करणे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. झाडांची तोड न करता, कोरड्या लाकडाचा वापर करून पारंपरिक पद्धतीने होलिका दहन करावे, तसेच प्लास्टिक, टायर, रबर व रसायनयुक्त रंगवलेले साहित्य जाळू नये. धुळवडीच्या दिवशी पाण्याचा अपव्यय टाळावा, पर्यावरणपूरक नैसर्गिक व सेंद्रिय रंगांचा वापर करावा, असे आवाहन महानगरपालिकेने केले होते. त्याही पुढे जाऊन फुलांची होळी यासारखा पर्यावरणपूरक आणि आपल्या संस्कृतीचा परिचय देणारा उपक्रम मी स्वतः मुंबईची महापौर या नात्याने राबवला. त्यातून एक कृतिशील संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.आमदार पराग शाह म्हणाले की, मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी फुलांची होळी उपक्रम राबवून पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाचा संदेश स्वतःपासून दिला आहे. सर्व नागरिकांनी सण साजरे करताना पर्यावरणाचे भान देखील जपावे. ध्वनी प्रदूषण टाळावे, रुग्णालये, निवासी व संवेदनशील भागात आवाजाची पातळी मर्यादेत ठेवावी. ‘फुलांची होळी’ हा उपक्रम त्याचे उत्तम उदाहरण असल्याचे ते म्हणाले. फक्त एवढ्यावरच न थांबता, या फुलांचे सेंद्रिय खत तयार करून वापरात येणार असल्याने स्वच्छ, हरित व निरोगी मुंबईसाठी हातभार लागणार आहे. अशा उपक्रमांचे अनुकरण करून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन देखील शाह यांनी केले.

फीड फीडबर्नर 3 Mar 2026 7:10 pm

Smriti Mandhana : स्मृती मंधानाच्या शिरपेचात मानाचा तुरा; सातत्यपूर्ण कामगिरीचं मिळालं बक्षीस

भारतीय महिला क्रिकेट संघाच्या स्टार सलामीवीर आणि उपकर्णधार स्मृती मंधानाने (Smriti Mandhana) आज ICC महिला वनडे फलंदाजी क्रमवारीत पुन्हा नंबर 1 स्थान पटकावले आहे.

दैनिक प्रभात 3 Mar 2026 7:10 pm

EPFO: तुमच्या जुन्या विसरलेल्या PF खात्यातील पैसे थेट बँकेत येणार; फक्त ‘हे’एक काम करा

EPFO: दरम्यान, आधार आणि बँक खाते EPF शी जोडलेले असल्यास जुन्या निष्क्रिय खात्यातील पैसे आपोआप मिळणार आहेत. त्यामुळे अशा सदस्यांनी आपले आधार व बँक खाते EPF शी जोडलेले आहे किंवा नाही हे तातडीने तपासून घ्यावे.

दैनिक प्रभात 3 Mar 2026 7:01 pm

राज्यातील अकुशल कामगारांच्या थकीत मजुरीचा प्रश्न सुटला

मनरेगा अंतर्गत १ हजार १६८ कोटींचा निधी मंजूर; होळीच्या पार्श्वभूमीवर केंद्राचा श्रमिकांना मोठा दिलासामुंबई : राज्यातील ग्रामीण भागातील अर्थचक्राला गती देण्यासाठी केंद्र सरकारने 'महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने'अंतर्गत (मनरेगा) महाराष्ट्रासाठी १ हजार १६८ कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर केला आहे. २०२५-२६ या आर्थिक वर्षातील चौथ्या हप्त्याच्या स्वरूपात हे अनुदान प्राप्त झाले असून, यामुळे अकुशल कामगारांच्या थकीत मजुरीचा प्रश्न सुटणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाचे स्वागत करत, यामुळे ग्रामीण रोजगाराला मोठी चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.गेल्या काही महिन्यांपासून राज्यात 'मनरेगा'अंतर्गत काम करणाऱ्या अकुशल कामगारांची मजुरी थकीत होती. सुमारे ६७ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध नसल्याने ग्रामीण भागातील श्रमिक आर्थिक कोंडीत सापडले होते. 'होळी'च्या सणापूर्वी हा निधी मिळावा, अशी मागणी जोर धरत होती. केंद्राच्या या निर्णयामुळे थकीत मजुरीसह पुढील कामांसाठीही मोठा निधी उपलब्ध झाला आहे.श्रमिकांच्या हिताचा विचारश्रमिकांच्या हिताचा विचार करून केंद्र सरकारने २०२५-२६ या वर्षासाठी १ हजार १६८ कोटी रुपयांचा चौथा हप्ता मंजूर केला आहे. याचा सर्वाधिक फायदा आमच्या आदिवासी, अनुसूचित जाती आणि ग्रामीण भागातील गरजू कुटुंबांना होईल. सणासुदीच्या काळात हा निधी ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठा आधार देणारा ठरेल. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्रीग्रामीण विकासाला गती'मनरेगा' हा ग्रामीण भागातील कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा मुख्य स्रोत आहे. केंद्राकडून प्राप्त झालेल्या या निधीमुळे नवीन कामांना मंजुरी मिळणे सोपे होणार आहे. विशेषतः दुष्काळी आणि दुर्गम भागातील मजुरांना वेळेवर वेतन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

फीड फीडबर्नर 3 Mar 2026 6:30 pm

दोन महिन्यांत राज्यातील सव्वा कोटी नागरिकांची आरोग्य तपासणी

आरोग्य जागर : सिकलसेलपासून कर्करोगापर्यंतच्या मोहिमांना मोठे यशमुंबई : राज्यातील जनतेचे आरोग्य सुदृढ राखण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या विविध राष्ट्रीय आरोग्य मोहिमांना नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. अवघ्या दोन महिन्यांत सव्वा कोटी नागरिकांच्या आरोग्य तपासणीचा टप्पा पूर्ण करण्यात आला असून, ३१ मार्च २०२६ पर्यंतची निश्चित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सध्या राज्यभरात आरोग्य यंत्रणा युद्धपातळीवर कार्यन्वित करण्यात आली आहे.राज्यात १५ जानेवारीपासून राबवण्यात आलेल्या 'अरुणोदय' अभियानांतर्गत शून्य ते ४० वयोगटातील ७३ लाख ४५ हजार व्यक्तींची नोंदणी करण्यात आली. यातील ५३ लाख ४७ हजार जणांची प्रत्यक्ष तपासणी पूर्ण झाली असून, १ हजार ६४५ नवीन रुग्ण आणि २७ हजार ११२ वाहक शोधण्यात आरोग्य विभागाला यश आले आहे. या मोहिमेमुळे सिकलसेल प्रतिबंधासाठी मोठी मदत होणार आहे.'राष्ट्रीय बाल स्वास्थ्य' कार्यक्रमांतर्गत जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांच्या कालावधीत ३८१ चिमुकल्यांवर हृदय शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडल्या. याशिवाय हर्निया, क्लेफ्ट लिप यांसारख्या गंभीर व्याधींवरील २२ हजार ५३९ शस्त्रक्रिया करून बालकांना नवजीवन देण्यात आले आहे.आरोग्य मोहिमांचे अंकगणित१) असंर्गजन्य रोग - २५ लाख जणांची रक्तदाब तपासणी; १० लाख जणांवर उपचार सुरू.२) मधुमेह तपासणी - १२.५२ लाख तपासण्या; २.८८ लाख रुग्णांचे निदान.३) हत्तीरोग निर्मूलन - ६०१ रुग्णांवर शस्त्रक्रिया४) क्षयरोग - १.१२ लाख रुग्णांना 'फूड बास्केट'चे वितरण५) गर्भवती माता - ४ हजार ५८० तीव्र रक्तक्षय असलेल्या मातांना आयर्न सुक्रोज उपचार.गडचिरोली 'मलेरिया मुक्त' होणार दुर्गम भागातील आरोग्यावर विशेष लक्ष केंद्रित करताना गडचिरोली जिल्ह्यात मलेरिया निर्मूलनासाठी ८४ हजार ७३२ विशेष कीटकनाशकयुक्त मच्छरदाण्यांचे वाटप करण्यात आले आहे. तसेच, आयसीएमआरच्या सहकार्याने या भागात सहा संशोधन प्रकल्पही राबविले जात आहेत. कुष्ठरुग्णांच्या संपर्कात आलेल्या सुमारे ३.६७ लाख जणांना प्रतिबंधात्मक उपचार देण्यात आले आहेत. सोबतच मौखिक, स्तन आणि गर्भाशयमुख कर्करोगाच्या तपासण्यांसाठी विशेष शिबिरे आयोजित करून संशयित रुग्णांवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत. राज्यातील ज्या आरोग्य संस्थांचे बांधकाम पूर्ण झाले आहे, तिथे तातडीने मनुष्यबळ आणि सामग्री उपलब्ध करून ३१ मार्च २०२६ पर्यंत त्या पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याचा शासनाचा ठाम निर्धार आहे. नागरिकांनी या सर्व मोहिमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले आहे.

फीड फीडबर्नर 3 Mar 2026 6:30 pm

इराण-इस्त्रायल युद्ध भडकणं दुर्दैवी! १ कोटी भारतीयांच्या सुरक्षेसाठी मोदी सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; मोठी अपडेट समोर

Iran Isreal Conflict : इराण आणि इस्रायलमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

दैनिक प्रभात 3 Mar 2026 6:15 pm

जाहिरातीतून एसटी कमविणार २५० कोटी रुपये

मुंबई : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात धावणारी ‘लालपरी’ आता केवळ प्रवाशांनाच नव्हे, तर महसूलवाढीलाही वेग देणार आहे. पुढील पाच वर्षांत केवळ जाहिरातींच्या माध्यमातून एसटी महामंडळाला तब्बल २५० कोटी रुपयांपेक्षा अधिक महसूल मिळणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली.एसटी महामंडळाच्या मुख्यालयात पार पडलेल्या ३१० व्या संचालक मंडळाच्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, सहा.कामगार आयुक्त पल्लवी सहारे, तसेच सर्व खातेप्रमुख उपस्थित होते.मंत्री सरनाईक म्हणाले, “ एसटी महामंडळाची २५१ आगारे आणि ६१० पेक्षा अधिक लहान-मोठी बसस्थानके राज्यभर पसरलेली आहेत. सुमारे १२ हजार बसेसच्या ताफ्याद्वारे दररोज ५० ते ५५ लाख प्रवाशांची ने-आण केली जाते. भविष्यात बससंख्या वाढल्यानंतर ही दैनंदिन प्रवासी संख्या १ कोटींपर्यंत जाईल. अशा व्यापक पोहोच असलेल्या माध्यमावर जाहिरात देणे म्हणजे उत्पादकांसाठी सुवर्णसंधीच आहे.”चांद्यापासून बांदयापर्यंत, गावखेड्यांपासून महानगरांपर्यंत पोहोचणाऱ्या एसटीच्या प्रत्येक चाकासोबत आता महसुलाची नवी चक्रेही फिरणार आहेत. बसस्थानके, त्यांचा परिसर, बसेसच्या आतील व बाहेरील भाग तसेच उपलब्ध सर्व संसाधनांचा पुरेपुर वापर करून जाहिरात महसूल वाढविण्याचा महत्त्वाकांक्षी आराखडा तयार करण्यात आला आहे. यासाठी स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया राबविण्यात आली असून, पुढील पाच वर्षांसाठी २५० कोटी रुपयांहून अधिक महसूल देणारी निविदा स्वीकारण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.‍ सदयस्थितीत कार्यरत असलेले जाहिरात परवानाधारकांचा परवाना कालावधी समाप्त झाल्यानंतर जाहिरातीचे अधिकार नविन परवानाधारकांकडे जाणार आहेत.सध्या जाहिरातींद्वारे दरवर्षी सुमारे २२ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. नव्या निविदेमुळे या उत्पन्नात तब्बल दुपटीपेक्षा जास्त वाढ होणार आहे. अशाप्रकारे “तिकीट विक्रीव्यतिरिक्त विविध पर्यायी स्रोतांमधून उत्पन्न निर्माण झाले, तर एसटीला भविष्यात तोट्याच्या गर्तेत जाण्याची वेळ येणार नाही,” असा विश्वासही मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केला.

फीड फीडबर्नर 3 Mar 2026 6:10 pm

Pakistan operation : पाकिस्तानच्या कारवाईत ६७ अफगाण तालिबानी ठार

पाकिस्तानी सैन्याने काल रात्रभरात केलेल्या कारवाईमध्ये आणखी ६७ अफगाण तालिबानींचा खात्मा केला आहे.

दैनिक प्रभात 3 Mar 2026 6:04 pm

T20 World Cup 2026 : उपांत्य फेरीपूर्वी आयसीसीची मोठी घोषणा; ‘या’ 10 जणांची सामना अधिकारी म्हणून केली नियुक्ती

आयसीसी पुरुष टी20 विश्वचषक २०२६ स्पर्धेत (T20 World Cup 2026) आता फक्त तीन सामन्यांचा खेळ शिल्लक राहिला आहे. दोन उपांत्य फेरी आणि एक अंतिम सामना.

दैनिक प्रभात 3 Mar 2026 6:04 pm

Rajya Sabha Election 2026: राज्यसभेसाठी एकनाथ शिंदेंचा उमेदवार ठरला? ‘या’नावाची जोरदार चर्चा

Rajya Sabha Election 2026: या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुतीच्या वाट्याला येणाऱ्या जागांपैकी शिवसेनेची (शिंदे गट) एक जागा असेल,

दैनिक प्रभात 3 Mar 2026 5:50 pm

Holi 2026 Skin Care Tips : रंगांनी भंग नको.! रंग खेळण्यापूर्वी आणि नंतर अशी घ्या स्वतःची काळजी

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे योग्य कपडे निवडणे. पूर्ण बाह्यांचे सुती कपडे सर्वोत्तम आहेत. रंग तुमच्या त्वचेवर घासू नयेत म्हणून सैल-फिटिंग कपडे घाला.

दैनिक प्रभात 3 Mar 2026 5:43 pm

Dharmendra Pradhan : बदलणाऱ्या जगात शिक्षण हाच सेतू; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे मोठे वक्तव्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 मध्ये स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षापर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनविण्याचा दूरदर्शी संकल्प मांडला आहे. आजच्या जागतिक आर्थिक परिदृश्यात भारत एक उज्ज्वल केंद्रबिंदू म्हणून उभा आहे.

दैनिक प्रभात 3 Mar 2026 5:43 pm

K.P. Unnikrishnan : माजी केंद्रीय मंत्री के. पी. उन्नीकृष्णन यांचे निधन

ज्येष्ठ समाजवादी नेते आणि माजी केंद्रीय मंत्री के. पी. उन्नीकृष्णन (K.P. Unnikrishnan) यांचे आज कोझिकोड येथे वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले.

दैनिक प्रभात 3 Mar 2026 5:22 pm

Oil Price on US Iran Conflict: कच्च्या तेलाचा भाव 100 डॉलरपार जाणार? इतिहासातील सर्वात मोठ्या तेल पुरवठा संकटाची भीती

Oil Price on US Iran Conflict: १ मार्च रोजी होर्मुझमधून केवळ ५ तेलटँकर गेले, जेथे दररोज सुमारे ६० टँकर जात होते. 'कमोडिटीज अॅट सी'च्या आकडेवारीनुसार ही माहिती समोर आली आहे.

दैनिक प्रभात 3 Mar 2026 5:21 pm

US Iran Conflict: अमेरिका-इराण युद्धाचा भारतावर काय परिणाम होणार? महागाई, शेअर बाजार ते आयात-निर्यातपर्यंत सर्व काही समजून घ्या

US Iran Conflict: दरम्यान, युद्ध लवकर थांबले तर भारतावर मर्यादित परिणाम होतील, परंतु संघर्ष लांबला आणि होर्मुझ सामुद्रधुनी बंद झाली तर मात्र महागाई, रुपया, शेअर बाजार आणि व्यापार या सर्व आघाड्यांवर भारताला मोठ्या आव्हानांना सामोरे जावे लागू शकते.

दैनिक प्रभात 3 Mar 2026 5:05 pm

ST Bus : “जाहिरातीतून एसटीला मिळणार २५० कोटी”; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहीती

एसटी महामंडळाच्या मुख्यालयात पार पडलेल्या ३१० व्या संचालक मंडळाच्या बैठकीत ते बोलत होते.

दैनिक प्रभात 3 Mar 2026 5:00 pm

Team India : चर्चा तर होणारच ! टीम इंडियाने पाळला ‘तो’क्षण; थेट सरावाची वेळ बदलली

T20 विश्वचषक २०२६ मध्ये भारताने (Team India) सुपर ८ मध्ये वेस्ट इंडिजचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. गुरुवार, ५ मार्च रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारत विरुद्ध इंग्लंड हा उपांत्य सामना होणार आहे.

दैनिक प्रभात 3 Mar 2026 4:56 pm

Iran Earthquake : इराणवर दुहेरी संकट? युद्धाच्या भडक्यात अणू प्रकल्पांजवळ भूकंप

Iran Earthquake : दक्षिण इराणमधील गेराश भागात ४.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला आहे.

दैनिक प्रभात 3 Mar 2026 4:54 pm

8th Pay Commission: वैद्यकीय भत्ता 1 हजारांवरून 20 हजार रुपये होणार? जाणून घ्या कर्मचाऱ्यांच्या 8 प्रमुख मागण्या

8th Pay Commission: नवीन शिफारशी १ जानेवारी २०२६ पासून लागू होतील अशी अपेक्षा आहे. ३१ डिसेंबर २०२५ पूर्वी निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पेंशनमध्येही सुधारणा केली जाणार असून त्यांनाही वाढीव रकमेचा लाभ मिळणार आहे.

दैनिक प्रभात 3 Mar 2026 4:46 pm

Pune News : पुण्यात होळीच्या कार्यक्रमात मोठी दुर्घटना; लाईटचा गर्डर कोसळून १५ जण जखमी

Pune News : पुण्यातील कोरेगाव पार्क-मुंढवा रोडवरील रॉयल फार्म येथे होळीच्या कार्यक्रमात लाईटचा गर्डर कोसळून १५ तरुण जखमी झाले.

दैनिक प्रभात 3 Mar 2026 4:40 pm

Rajya Sabha Candidate List : भाजपची राज्यसभेसाठी पहिली यादी जाहीर; महाराष्ट्रातील उमेदवारांच्या नावाचं काय?

Rajya Sabha Candidate List : भाजपची राज्यसभेसाठी पहिली यादी जाहीर झाली असून नितीन नवीन यांना बिहारमधून उमेदवारी मिळाली आहे.

दैनिक प्रभात 3 Mar 2026 4:00 pm

Shirur Fire News : फाकटे येथे मध्यरात्री घराला भीषण आग; संसारोपयोगी साहित्य जळून खाक

Shirur Fire News : शिरूर तालुक्यातील फाकटे येथील भिल्लवस्तीवर सुनील सूर्यवंशी यांच्या घराला मंगळवारी मध्यरात्री भीषण आग लागली.

दैनिक प्रभात 3 Mar 2026 3:45 pm

NIA Investigation: पहलगाम हल्ल्यातील महत्वाचा पुरावा GoPro कॅमेरा ; तपासासाठी एनआयए चीनची मदत घेणार

NIA Investigation: २२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाममधील बैसरन मैदानावर झालेल्या भयानक दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देशाला हादरवून टाकले. या हल्ल्यात एका नेपाळी नागरिकासह २६ पर्यटकांचा मृत्यू झाला.

दैनिक प्रभात 3 Mar 2026 2:55 pm

Mumbai ATS Raid : मुंबईत 4 ठिकाणी एटीएसची छापेमारी; दहशतवाद्यांशी संबध असल्याचा संशय

Mumbai ATS Raid : मुंबईतील कुर्ला आणि गोवंडी या परिसरातील एकूण तीन ठिकाणांवर एटीएसने एकाच वेळी छापे टाकले.

दैनिक प्रभात 3 Mar 2026 2:50 pm

Kartik Aaryan : चित्रपटाचे बजेट 25 कोटी, कमावले 156 कोटी; कार्तिक आर्यनच्या करिअरला कलाटणी देणार ‘हा’चित्रपट होतोय री-रिलीज

Kartik Aaryan : अभिनेता कार्तिक आर्यनचा एक जुना चित्रपट पुन्हा रिलीज करण्यात येणार आहे. अभिनेत्याने स्वतः याविषयी पोस्ट लिहून जाहीर केले आहे.

दैनिक प्रभात 3 Mar 2026 2:36 pm

Vishakha Subhedar: डोळ्यात अश्रू ! कुवैतमध्ये अडकलेल्या मुलासाठी अभिनेत्री विशाखा सुभेदारांची सरकारला भावनिक साद

Vishakha Subhedar विशाखा सुभेदार यांचा मुलगा अभिनय लंडनला जात असताना त्याचे विमान कुवेत येथे उतरवण्यात आले. मात्र युद्धजन्य परिस्थितीमुळे पुढील सर्व उड्डाणे रद्द झाली. परिणामी तो गेल्या चार दिवसांपासून कुवेतमध्ये अडकून पडला आहे.

दैनिक प्रभात 3 Mar 2026 2:28 pm

Iran Earthquake: मोठी बातमी ! अमेरिकेच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे इराणला ४.३ तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का

Iran Earthquake:अमेरिका-इस्रायलमधील हल्ले आणि युद्धादरम्यान, आज दुपारी इराणमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. अमेरिकन भूगर्भीय सर्वेक्षण (USGS) नुसार, दक्षिण इराणच्या गेराश प्रदेशात ४.३ तीव्रतेचा भूकंप झाला.

दैनिक प्रभात 3 Mar 2026 1:42 pm

Nishant Kumar: बिहारच्या राजकारणाला मिळणार नवा चेहरा ; नितीश कुमार यांच्या मुलाची राज्यसभेत होणार एन्ट्री

Nishant Kumar: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे पुत्र निशांत कुमार राजकारणात प्रवेश करणार हे निश्चित आहे. जेडीयूचे श्रवण कुमार यांनी याविषयी स्पष्ट माहिती दिली आहे.

दैनिक प्रभात 3 Mar 2026 1:26 pm

Pune Metro : पुणेकरांनो काळजीपूर्वक लक्ष द्या! आजपासून पुणे मेट्रोकडून करण्यात आलाय ‘हा’मोठा बदल

Pune Metro : पुणे मेट्रोकडून एक मोठा बदल करण्यात आला आहे. तिकीट काढल्यानंतरच AFC गेट्स उघडणार आहेत. आता नवीन बदलानुसार AFC गेट्स आधीपासूनच बंद असणार आहेत.

दैनिक प्रभात 3 Mar 2026 1:09 pm

Pune Metro : पुणेकरांना काळजीपूर्वक लक्ष द्या! आजपासून पुणे मेट्रोकडून करण्यात आलाय ‘हा’मोठा बदल

Pune Metro : पुणे मेट्रोकडून एक मोठा बदल करण्यात आला आहे. तिकीट काढल्यानंतरच AFC गेट्स उघडणार आहेत. आता नवीन बदलानुसार AFC गेट्स आधीपासूनच बंद असणार आहेत.

दैनिक प्रभात 3 Mar 2026 1:09 pm

Sonia Gandhi on PM Modi: खामेनी यांच्या मृत्यूनंतर सरकारच्या मौनावर सोनिया गांधींचा सवाल ; परराष्ट्र धोरणावरही प्रश्न उपस्थित

Sonia Gandhi on PM Modi:इस्रायली-अमेरिकन हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला सय्यद अली हुसैनी खामेनी यांच्या मृत्युने देशातील राजकीय वातावरण तापले आहे.

दैनिक प्रभात 3 Mar 2026 1:00 pm

Baramati Crime News : तरुणावर कोयत्याने वार करून लुटणाऱ्या तिघांना बेड्या; बारामती तालुका पोलिसांची कारवाई

Baramati Crime News : एलसी कंपनी लेक परिसरात तरुणावर कोयत्याने वार करून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम लुटल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली.

दैनिक प्रभात 3 Mar 2026 12:48 pm

Deepika Padukone : दीपिकाला लेक दुआपासून हवाय ब्रेक पण…, सोशल मीडियाद्वारे व्यक्त केली मनातील भावना

Deepika Padukone : दीपिका पदुकोनने इन्स्टाग्रामवर शेअर केलेली स्टोरी सध्या प्रत्येक आईसाठी चर्चेचा विषय ठरली आहे.

दैनिक प्रभात 3 Mar 2026 12:44 pm

Shankar Mahadevan Birthday: इंजिनिअर ते संगीतसम्राट…शंकर महादेवन यांचा ‘ब्रेथलेस’ प्रवास

Shankar Mahadevan Birthday शिक्षणाच्या बाबतीत त्यांनी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. मात्र त्यांचे मन कायम संगीताकडेच ओढ घेत होते. इंजिनिअरिंगची पदवी घेतल्यानंतरही त्यांनी सुरक्षित करिअरचा मार्ग न निवडता संगीतक्षेत्रातच पूर्णवेळ काम करण्याचा निर्णय घेतला.

दैनिक प्रभात 3 Mar 2026 12:43 pm

Dhananjay Munde tweet : शेवटी संयम सर्वात महत्त्वाचा! धनंजय मुंडेंचं ट्वीट चर्चेत; म्हणाले “षडयंत्र करणाऱ्यांना….”

Dhananjay Munde tweet : हा षडयंत्रांचा काळ आहे. आपल्यापैकी अनेकांच्या अश्या भावनिक व अविचारी कृतीमुळे आपल्याविरुद्ध षडयंत्र करणाऱ्यांना अधिक बळ मिळते, हे लक्षात घ्या. शेवटी संयम सर्वात महत्त्वाचा! असे ट्वीट माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांनी केले आहे.

दैनिक प्रभात 3 Mar 2026 12:33 pm

कोकण रेल्वे मार्गावरील कोलमडलेल्या वेळापत्रकाची चौकशी करून ठोस उपाययोजना करा

एसएमएस प्रणाली अद्ययावत करून प्रवाशांना सुखकर प्रवासाची योग्य सेवा, सुविधा द्याखासदार नरेश म्हस्के यांचे रेल्वे मंत्री आणि कोकण रेल्वेच्या अध्यक्षांना खरमरीत पत्रठाणे : कोकण रेल्वेच्या सर्वच गाड्यांचे अप आणि डाऊन मार्गावरचे वेळापत्रक साफ कोलमडले आहे. सात तास, पाच तास विलंबाने गाड्या धावत आहेत. यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड संताप आणि नाराजीची लाट आहे. विलंबाने धावणाऱ्या रेल्वे गाड्यांमुळे लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिकांना प्रचंड मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. खासदार नरेश म्हस्के यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत रेल्वे मंत्री आणि कोकण रेल्वेचे चेअरमन यांना खरमरीत पत्र लिहीत कायमस्वरूपी ठोस तोडगा काढण्याची सूचना केली आहे.कोकण रेल्वे मार्गावर सुरू असलेल्या सातत्यपूर्ण अनियमिततेमुळे कोकणात सणासुदीच्या काळात जाणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. या मार्गावरील जवळपास सर्वच प्रमुख गाड्या नियमितपणे तासन्‌तास उशिराने धावत असून ही परिस्थिती आता अपवाद न राहता नियमच बनली आहे. रोजच्या या विलंबामुळे… pic.twitter.com/mGbQoK5BGW— Naresh Mhaske (@nareshmhaske) March 2, 2026खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि कोकण रेल्वेच्या अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे की, कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या बहुतांश प्रमुख गाड्या या निर्धारित वेळेपेक्षा तासन्‌तास उशिराने धावत असून ही बाब आता अपवाद नसून रोजचीच समस्या बनली आहे. या सततच्या विलंबामुळे प्रवाशांच्या वैयक्तिक तसेच व्यावसायिक आयुष्यावर गंभीर परिणाम होत असून मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे.दिनांक १ मार्च २०२६ रोजीचे उदाहरण देताना त्यांनी सांगितले की, प्रीमियम समजली जाणारी सुपरफास्ट तेजस एक्स्प्रेस २२११९ ही गाडी सुमारे सात तास उशिराने धावत होती. तिकिटात जेवणाचा समावेश असून सुद्धा प्रवाशांना जेवण मिळालेले नाही. जेव्हा तेजससारख्या प्रतिष्ठित गाडीची ही अवस्था असेल, तर इतर एक्सप्रेस व प्रवासी गाड्यांची स्थिती किती बिकट असेल याची कल्पना करता येणे कठीण असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.गाड्यांच्या विलंबनाबाबतची एसएमएस सूचना प्रणाली विश्वासार्ह नसल्याची तक्रारही त्यांनी केली आहे. अनेक प्रवाशांना वेळेवर कोणतीही माहिती न मिळाल्याने त्यांना रेल्वे स्थानकांवर तासन्‌तास प्रतीक्षा करावी लागत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले आहे.होळी, पालखी त्यांनतर मे महिन्याची सुट्टी आणि येणाऱ्या सण उत्सवानिमित्त लाखो कोकणवासी रेल्वेने आपल्या गावी जात असतो. कोकण रेल्वेचा प्रवास हा सुखकर आणि सुरक्षित असल्याची प्रवाशांची भावना आहे. रेल्वेमुळे प्रवासातील वेळेचीही बचत होत असते. त्यामुळे लाखो कोकणकर रेल्वे प्रवासाला प्राधान्य देत असतात. त्यामुळे प्रवाशांच्या भावनेचा आदर करून कोकण रेल्वे प्रशासनाने केवळ तात्पुरत्या उपाययोजनांवर न थांबता वेळेचे काटेकोर नियोजन प्रभावी करून तांत्रिक सुधारणेवर भर देऊन प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी सूचना खासदार नरेश म्हस्के यांनी केली आहे.

फीड फीडबर्नर 3 Mar 2026 12:10 pm

दुबईत अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून विशेष विमानाची व्यवस्था

मुंबई : इराण-इस्रायल-अमेरिका यांच्यातील तीव्र संघर्षामुळे मध्य पूर्वेतील हवाई क्षेत्र बंद पडल्याने दुबईसह यूएईमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील अनेक नागरिकांना मदत करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने पावले उचलली आहेत. या संकटात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या मदतीसाठी त्यांनी वैयक्तिकरित्या संवाद साधला आणि विशेष विमानांची व्यवस्था केली आहे.स्टार एअर ची दोन विशेष विमाने आज दुपारी फुजैरा एअरपोर्ट (Fujairah Airport) वरून उड्डाण घेणार आहेत:• VTGSO – दुपारी ३.३० वाजता टेकऑफ• VT GSH – संध्याकाळी ४.३० वाजता टेकऑफया दोन्ही विमानांमधून एकूण १६४ प्रवासी आज संध्याकाळी ५.३० ते ७.०० या वेळेत मुंबई एअरपोर्टवर दाखल होतील. यात पुण्यातील इंदिरा स्कूल ऑफ बिझनेस स्टडीज चे ८४ विद्यार्थी तसेच ठाणे, मुरबाड, अहिल्यानगर आदी भागातील इतर नागरिकांचा समावेश आहे.उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वीच या मराठी नागरिकांशी संवाद साधला होता. “तुम्ही सर्व सुरक्षित आहात, काळजी करू नका, महाराष्ट्र शासन आणि मी स्वतः तुमच्या पाठीशी ठाम उभा आहे. तुम्हाला सुखरूप मायदेशी परत आणण्यासाठी सर्व प्रयत्न केले जातील,” असा शब्द एकनाथ शिंदे यांनी दिला होता. त्यानंतर सर्व संबंधित यंत्रणांशी अखंड संपर्क साधून या १६४ प्रवाशांना मायदेशी आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

फीड फीडबर्नर 3 Mar 2026 12:10 pm

Benjamin Netanyahu: “होय, माझ्या मित्राने फोन करून….” ; पंतप्रधान मोदींच्या फोनवर बेंजामिन नेतन्याहू यांचे उत्तर

Benjamin Netanyahu: इराणसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.

दैनिक प्रभात 3 Mar 2026 12:08 pm

Skipping Breakfast Side Effects: सकाळचा नाश्ता टाळता? सावधान! रिकाम्या पोटी राहण्याचे गंभीर दुष्परिणाम जाणून घ्या

Skipping Breakfast Side Effects रात्री ७ ते ८ तास झोप घेतल्यानंतर आपले शरीर उपवासाच्या अवस्थेत असते. सकाळचा नाश्ता हा हा उपवास तोडतो आणि शरीराचा मेटाबॉलिझम सुरू करतो. जर नाश्ता केला नाही, तर शरीराची कॅलरी जाळण्याची प्रक्रिया मंदावते. यामुळे वजन वाढण्याची शक्यता वाढते.

दैनिक प्रभात 3 Mar 2026 11:59 am

Prakash Ambedkar Tweet : …तर नरेंद्र मोदी यांनी खुर्ची खाली करावी; प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?

Prakash Ambedkar Tweet : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख नेते प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी मोठं वक्तव्य केले आहे. यामुळे राजकारण तापणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

दैनिक प्रभात 3 Mar 2026 11:52 am

Nagpur SBL Company Blast : नागपूर स्फोटाप्रकरणी पोलिसांकडून 11 जणांना अटक; धक्कादायक बाब तपास अहवालातून समोर

Nagpur SBL Company Blast : या प्रकरणात एकूण २१ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, १० आरोपी फरार आहेत. यात कंपनीचा मालक आलोक चौधरी हा देखील अद्याप फरार आहे.

दैनिक प्रभात 3 Mar 2026 11:44 am

Shraddha Kapoor Birthday: अभिनयासोबत गाण्यातही कमाल; जाणून घ्या श्रद्धा कपूरचा बहुआयामी प्रवास

Shraddha Kapoor Birthday श्रद्धाने आपल्या करिअरची सुरुवात तीन पत्ती या चित्रपटातून केली. या चित्रपटात अमिताभ बच्चन प्रमुख भूमिकेत होते. त्यानंतर २०११ मध्ये तिने ‘लव्ह का द एंड’मध्ये काम केले. मात्र तिच्या करिअरला खऱ्या अर्थाने उभारी मिळाली ती २०१३ साली प्रदर्शित झालेल्या 'आशिकी २' या चित्रपटामुळे.

दैनिक प्रभात 3 Mar 2026 11:40 am

Hormuz Straight Blocked: इराण-इस्रायल युद्धाने जगावर आर्थिक संकट ! इराणकडून होर्मुजची सामुद्रधुनी बंद ; जहाज दिसताच पेटवण्याचे आदेश

Hormuz Straight Blocked: मध्य पूर्वेतील सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, इराणच्या क्रांतिकारी रक्षकांनी सोमवारी एक मोठी घोषणा केली. त्यांनी सांगितले की होर्मुझची सामुद्रधुनी जहाजांसाठी बंद करण्यात आली आहे.

दैनिक प्रभात 3 Mar 2026 11:34 am

Israel vs Iran War : बॅाम्बस्फोटांचे आवाज…बुर्ज खलिफा परिसरात धुराचे लोट..; मुंबईत परतल्यानंतर प्रवाशाने सांगितला थरारक अनुभव

Israel vs Iran War : दुबईहून मुंबईत दाखल झाल्यानंतर एका प्रवाशाने थरारक अनुभव माध्यमांशी बोलताना सांगितला.

दैनिक प्रभात 3 Mar 2026 11:17 am

CJI Surya Kant: ‘हा निर्णय एआयने तयार केलाय…’ ; सर्वोच्च न्यायालयाने ‘त्या’न्यायाधीशांना सुनावले खडेबोल

CJI Surya Kant:सर्वोच्च न्यायालयाने न्यायालयीन प्रक्रियेत कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) च्या गैरवापरावर कडक भूमिका घेतली आहे.

दैनिक प्रभात 3 Mar 2026 11:06 am

Holi Stain Removal: होळीचा पक्का रंग काढण्याचा सोपा आणि प्रभावी उपाय; पांढरे कपडेही होतील नव्यासारखे!

Holi Stain Removal तज्ज्ञांच्या मते, सर्वात मोठी चूक म्हणजे रंग लागलेल्या कपड्यांवर थेट डिटर्जंट टाकून धुणे. त्याऐवजी पहिल्या टप्प्यात कपडे साध्या पाण्यात भिजवणे महत्त्वाचे आहे.

दैनिक प्रभात 3 Mar 2026 10:59 am

Hina Khan Post : हिना खानची पंतप्रधान मोदींच्या समर्थनार्थ पोस्ट; म्हणाली…

Hina Khan Post : अमेरिका-इस्त्राईल आणि इराणच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अभिनेत्री हिना खान हिची एक सोशल मीडिया पोस्ट सध्या प्रचंड चर्चेत आली आहे

दैनिक प्रभात 3 Mar 2026 10:49 am

Superstar Vijay Thalpati : घटस्फोटाची चर्चा; विवाहबाह्य संबंधाचा आरोप, अशातच विजयची सोशल मीडियावरून पहिली पोस्ट म्हणाला…

Superstar Vijay Thalpati : घटस्फोटाच्या चर्चा सुरू असतानाच थलपती विजयने सोशल मीडियावरून पोस्ट शेअर केली आहे.

दैनिक प्रभात 3 Mar 2026 10:29 am

Ahan Pandey :सैयारा चित्रपटाच्या रिलीजनंतर अहानवर झाली होती शस्त्रक्रिया; खुलासा करत म्हणाला “बराच वेळ…”

Ahan Pandey : सैयारा चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर अहान पांडेवर शस्त्रक्रिया झाली होती. नेमकं काय झालं होतं याविषयी त्याने एका मुलाखतीत खुलासा केला आहे.

दैनिक प्रभात 3 Mar 2026 9:57 am

Riyadh American Embassy Attack: “जिवंत राहायचं असेल तर ताबडतोब तिथून निघा” ; युद्धादरम्यान मध्य पूर्वेतील अमेरिकन लोकांना इशारा

Riyadh American Embassy Attack: अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांनंतर, परिस्थिती इतकी धोकादायक बनली आहे की अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने १४ मध्यपूर्वेतील देशांमधील नागरिकांना तात्काळ बाहेर पडण्याचा इशारा जारी केला आहे.

दैनिक प्रभात 3 Mar 2026 9:56 am

Newborn Sleep: २४ तासांत बाळाला किती झोप हवी? नव्या संशोधनातून पालकांसाठी दिलासा देणारा खुलासा

Newborn Sleep बालरोग तज्ज्ञ आणि अलीकडील संशोधनानुसार ० ते ३ महिन्यांच्या नवजात बाळांना दिवसात सरासरी १४ ते १७ तास झोपेची गरज असते.

दैनिक प्रभात 3 Mar 2026 9:54 am

Tumbbad 2: ‘तुम्बाड २’मध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीची दमदार एंट्री; हस्तरच्या दुनियेत सोहम शाहसोबत रंगणार नवा थरार

Tumbbad 2 २०१८ साली प्रदर्शित झालेल्या तुम्बाड या चित्रपटाने वेगळ्या कथानकामुळे आणि गूढ वातावरणामुळे प्रेक्षकांची मनं जिंकली होती. ‘हस्तर’ या रहस्यमय पात्राभोवती फिरणारी ही कथा प्रेक्षकांना एका वेगळ्याच दुनियेत घेऊन गेली.

दैनिक प्रभात 3 Mar 2026 9:27 am

Top 10 news: आणखी एका न्यायालयीन लढ्यात धनंजय मुंडेंना यश, आघाडीचा राज्यसभेचा उमेदवार ठरला?, इराण-इस्त्रायलचे युद्ध बळीराजाच्या पथ्यावर, जाणून घ्या अशा टॉप १० बातम्या

Top 10 news: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार धनंजय मुंडे यांना आणखी एका न्यायालयीन लढ्यात यास आलय. कृषी साहित्य खरेदी, ऑफिस ऑफ प्रॉफिट यासह वेगवेगळ्या आरोप करणाऱ्या अंजली दमानिया यांचे सर्व आरोप राज्य लोक आयुक्तांनी फेटाळून लावले आहेत.

दैनिक प्रभात 3 Mar 2026 9:20 am

सेक्स वर्कसाठी बदनाम थामेलची नाईट लाईफ ठप्प:निवडणुकीत स्पा सेंटरवर टाळे, गल्ल्यांमध्ये घोषणा- यावेळी बालेन सरकार

नेपाळची राजधानी काठमांडूमधील थामेल परिसर परदेशी पर्यटकांची पहिली पसंती आहे. सर्वात प्रसिद्ध बार-पब इथेच आहेत. पार्टी करण्याची आवड असलेले थामेलमध्येच येतात. संध्याकाळच्या वेळी हे ठिकाण दिव्यांच्या रोषणाईने गजबजलेले असते. येथे स्पा सेंटरच्या नावाखाली देहविक्रीचा धंदा चालतो. गेल्या काही वर्षांत यात वेगाने वाढ झाली असल्याचे लोक सांगतात. बार-पबमधून बाहेर पडणाऱ्या पर्यटकांच्या आसपास सेक्स वर्कर्स आणि एजंट फिरताना दिसतात. नेपाळमध्ये 5 मार्च रोजी निवडणुका आहेत. थामेलमध्येही याचा परिणाम स्पष्ट दिसतो. रस्त्यांवर बाईक रॅली निघत आहेत. वेगवेगळ्या पक्षांचे लोक घोषणाबाजी करत जातात. 'यावेळी बालेन सरकार' अशा घोषणा घुमत आहेत. रस्त्यांवर पक्षांच्या बॅनर-पोस्टरने सजवलेल्या गाड्या धावत आहेत. निवडणूक कर्तव्यावर असलेले पोलीस जवान गस्त घालत आहेत. निवडणुकीमुळे बहुतेक दुकाने बंद आहेत, त्यामुळे गर्दीही कमी आहे. निवडणुकीच्या कव्हरेजदरम्यान आम्ही थामेलला पोहोचलो. इथे पब आणि रेस्टॉरंट मालक, व्यापारी आणि रिटेल दुकानदारांशी निवडणुका, त्यांचे मुद्दे आणि सरकार बदलणाऱ्या Gen Z च्या आंदोलनावर चर्चा केली. निवडणुकीमुळे पोलिसांची गस्त वाढली, एजंट गायब, 10-12 दिवसांपासून व्यवसाय बंद थामेल हे नेपाळमधील सर्वात मोठे मार्केट आणि काठमांडूमधील सर्वात महागडे क्षेत्र आहे. इथे लहान दुकानांचे भाडे 70-80 हजार ते 3 लाख रुपयांपर्यंत आहे. इथे नाईट लाईफ, मोठी हॉटेल्स, बजेट हॉटेल्स, रेस्टॉरंट्स सर्व काही आहे. म्हणूनच नेपाळला येणारे पर्यटक इथे नक्की येतात. पर्यटनाचा चांगला हंगाम मार्च, एप्रिल, मे मध्ये असतो. त्यानंतर सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये ट्रेकिंगसाठी उत्तम वेळ आहे. ऑफ-सीझनमध्येही येथे बरेच लोक येतात. या परिसरात अनेक स्पा सेंटर्स आहेत. लोक सांगतात की, थामेलमध्ये गेल्या काही वर्षांपासून स्पा सेंटरच्या नावाखाली सेक्स वर्क सुरू आहे. रात्रीचे 10 वाजताच बाजार बंद होऊ लागतो आणि रस्त्यांवर एजंट फिरू लागतात. आम्ही येथील व्यापाऱ्यांशी सेक्स वर्कबद्दल बोललो, तेव्हा ते कॅमेऱ्यावर काहीही बोलणे टाळत राहिले. मात्र, कॅमेरा बंद करताच ते मान्य करतात की रात्री येथे सेक्स वर्क होते. बिहारमधून आलेले मोहम्मद वसीम अक्रम 2017 पासून थामेलमध्ये राहत आहेत. त्यांचा नेपाळी हस्तनिर्मित वस्तूंच्या निर्यातीचा व्यवसाय आहे. वसीमही यावर उघडपणे बोलत नाहीत. ते म्हणतात की, रात्री सेक्स वर्कसारख्या गोष्टींबद्दल मला माहिती नाही. मी 9-10 वाजेपर्यंत दुकान बंद करतो. क्लब उघडे असतात, लोक जातात, पण तिथे काय होते, हे मला माहीत नाही. एक व्यावसायिक अग्नि ढकाल यांचे मत आहे की, प्रत्येक चांगल्या ठिकाणी काही वाईट गोष्टी असतात. ते म्हणतात, 'कायदेशीर आणि बेकायदेशीर दोन्ही प्रकारच्या गोष्टी कुठेही होऊ शकतात. फक्त थामेलला चुकीचे ठरवणे योग्य नाही. काही लोक गोष्टी वाढवून सांगतात, पण मी याला पूर्णपणे चुकीचे म्हणू शकत नाही आणि पूर्णपणे बरोबरही नाही.' एका व्यापाऱ्याने ऑफ द रेकॉर्ड सांगितले की, लैंगिक कार्य नक्कीच होते, पण निवडणुकीतील कठोरता आणि पोलिसांच्या गस्तीमुळे गेल्या 10-12 दिवसांपासून सर्व काही बंद आहे. ते म्हणतात, 'मुली निवडणुकीसाठी घरी गेल्या आहेत. पोलिसांच्या कठोरतेमुळे एजंटही धोका पत्करू इच्छित नाहीत. म्हणूनच सर्व काही बंद आहे. निवडणुकीनंतर पुन्हा सुरू होईल.' थामेलमध्ये माजी महापौर बालेन शाह यांना चांगला पाठिंबाकाठमांडूमध्ये 2 मार्च रोजी होळी साजरी करण्यात आली. थामेलमध्येही पर्यटक, व्यापारी आणि सामान्य लोक होळीच्या रंगात रंगले होते. होळी खेळणाऱ्या तरुणांचा एक गट राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाचे प्रमुख बालेन शाह यांच्या समर्थनार्थ 'आता बालेन सरकार' अशा घोषणा देत होता. त्यांना पाहून काही दुकानदारांनी पाठिंब्यासाठी टाळ्या वाजवल्या. काठमांडूचे माजी महापौर बालेन शाह यांना थामेलमध्ये चांगला पाठिंबा दिसतो. मात्र, नेत्यांचे नाव घेऊन बोलणे लोक टाळतात. इशाऱ्यांमध्ये मनातील गोष्ट नक्कीच बोलून जातात. नेपाळमध्ये Gen Z आंदोलनानंतर लोक राजकारणावर उघडपणे बोलत नाहीत. नेपाळमध्ये गेल्या वर्षी 8-9 सप्टेंबर रोजी Gen Z आंदोलन झाले होते. यानंतर पंतप्रधान केपी ओली आणि त्यांच्या मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला. तेव्हापासून सुशीला कार्की देशाच्या अंतरिम पंतप्रधान आहेत. लोक म्हणाले- Gen Z चे सरकार येणार आहे 50 वर्षांचे शंकर खनाल पत्नी आणि मुलासोबत 31 वर्षांपासून थामेलमध्ये हस्तकलेचा व्यवसाय करत आहेत. त्यांच्या बोलण्यात नवीन पिढीसाठी आशा आणि जुन्या व्यवस्थेबद्दलचा राग स्पष्ट दिसतो. ते म्हणतात की Gen Z च्या आंदोलनानंतर व्यवसायात फारशी सुधारणा दिसली नाही, पण भ्रष्टाचार, आरोग्य आणि शिक्षणावरील तरुणांच्या मागण्या योग्य आहेत. शंकर Gen Z आंदोलनाचा चेहरा बनलेल्या बालेन शाह यांचे नाव घेत नाहीत, पण त्यांना वाटते की नेपाळमध्ये आता Gen Z चे सरकार येणार आहे. ते म्हणतात- अपेक्षा आहे की निवडणुकीनंतर गोष्टी बदलतील. जर नवीन सरकारने युवकांच्या मागण्या समजून काम केले, भ्रष्टाचार थांबवला, शिक्षण आणि आरोग्यात सुधारणा केली, तर सर्व काही ठीक होऊ शकते. ‘जुने लोक बाजूला व्हावेत, सरकारमध्ये नवीन लोक यावेत’24 वर्षांचे कविराज थामेलमध्ये रिटेल दुकान चालवतात. ते म्हणतात की सध्या व्यवसाय ठीक नाही. निवडणुकीमुळे बरेच लोक गावी गेले आहेत. कविराज सांगतात की आंदोलनामुळे पर्यटनावर परिणाम झाला होता. ते म्हणतात, ‘आंदोलनानंतर पर्यटक निम्मे झाले होते. आता होळी आहे, पण पूर्वीसारखी गर्दी नाही. पूर्वी इथे पाय ठेवायला जागा नसायची. कॉन्सर्ट व्हायचे. आता तसे वातावरण नाही.’ बालेन शाह यांच्यावरही मतं विभागली गेली, लोक म्हणाले- गोंधळ घालून देश चालत नाहीअसं नाही की थामेलच्या मार्केटमध्ये फक्त बालेन शाहचे समर्थक आहेत. असेही लोक आहेत, जे मानतात की सिस्टम बदलण्याची गरज आहे, पण स्थिरता नसेल, तर सर्वांचे नुकसान आहे. 30 वर्षांपासून थामेलमध्ये दुकान चालवणारे अग्नी ढकाल निवडणुकीत राजकीय स्थैर्याला महत्त्वाचे मानतात. ते म्हणतात की राजकीय भ्रष्टाचार थांबवावा लागेल. जर भ्रष्टाचार थांबला नाही, तर कोणताही पक्ष आला तरी, विशेष फरक पडणार नाही. अग्नी नाव न घेता बालेन शाह यांच्याशी असहमत आहेत. ते म्हणतात, 'युवकांच्या आंदोलनाचा फायदा घेण्यासाठी आता अनेक लोक पुढे येत आहेत. काही पक्ष त्यावेळी आंदोलनाचा भाग नव्हते, पण आता फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. लोक अनेकदा खोट्या गोष्टी बोलतात.' पर्यटनाचा हंगाम, पण इस्रायल-इराण युद्धाचा परिणामशाल बनवणाऱ्या कारखान्याचे मालक बोयेसरा सिटोला देखील मानतात की सध्या व्यवसाय चांगला चाललेला नाही. ते म्हणतात की निवडणुकीचे वातावरण आहे. इस्रायल-इराण-अमेरिकेमध्ये युद्ध सुरू आहे. याचा परिणामही झाला आहे. या काळात हंगाम असतो आणि पर्यटक यायला हवेत, पण पर्यटक कमी झाले आहेत. बोयेसरा म्हणतात, ‘आंदोलनाच्या सुरुवातीला व्यवसाय खूपच मंदावला होता. नंतर परिस्थिती थोडी सुधारली. काम चांगले चालू लागले. सध्या काम कमी आहे, पण निवडणुकीनंतर व्यवसाय सुधारेल अशी अपेक्षा आहे. येथील लोकांना शांतता हवी आहे. जर देशात शांतता आणि राजकीय स्थिरता असेल, तर पर्यटक वाढतील आणि व्यवसाय चांगला होईल. नवीन पिढी आणि सरकारकडून अपेक्षा आहे की ते देशात शांतता आणतील आणि भ्रष्टाचार कमी करतील.’ लोकेंद्र बहादूर 26 वर्षांपासून कलेचा व्यवसाय करतात. ते तरुणांच्या आंदोलनाने आनंदी आहेत. ते म्हणतात की तरुण पुढे येतील आणि भ्रष्टाचार होणार नाही तर चांगले राहील. नवीन पिढी समोर आली आहे हे जग पाहत आहे. निवडणुकीनंतर परिस्थिती सुधारेल असे वाटते. सुशिक्षित लोक आले तर चांगले धोरणे आणि नियम बनवतील. चांगले नियम असतील तर व्यवसायही आपोआप सुधारेल. निवडणुकीवर पर्यटन आणि हॉटेल व्यावसायिक काय म्हणालेकुमार गौतम 16 वर्षांपासून थामेलमध्ये हॉस्टेल आणि ट्रेकिंग कंपनी चालवतात. ते सांगतात की गेल्या काही वर्षांत व्यवसायात चढ-उतार राहिले आहेत. आंदोलनाच्या वेळी परिस्थिती खूप वाईट होती. आता सुधारली आहे. निवडणुकीनंतर जो पक्ष येईल, त्याने पर्यटनासाठी काम करावे. कुमार पुढे म्हणतात, ‘नेपाळची सर्वात मोठी ताकद पर्यटन आहे. येथे हिमालय आहे, राफ्टिंग आहे, अनेक साहसी उपक्रम आहेत. हिंदूंसाठी सर्वात मोठे मंदिर पशुपतिनाथ आहे. बुद्धांचे जन्मस्थानही येथेच आहे. जर सरकारने या संसाधनांचे चांगले मार्केटिंग केले, तर आणखी पर्यटक येतील. लोक नवीन पक्षाचा विचार करत आहेत. अनेक वर्षांपासून जुने पक्ष एकत्र काम करत आहेत. जर सुशिक्षित नवीन लोक राजकारणात आले, तर नक्कीच काहीतरी चांगला बदल होईल.’

दिव्यमराठी भास्कर 3 Mar 2026 9:04 am

मेरठमध्ये सापडलेल्या मृतदेहावर यूपी पोलिसांनी खोटे सांगितले का:मृत अर्चिता की तुर्कमेनिस्तानची मुहब्बत; आई म्हणाली- मृतदेह लपवून जाळला

यूपीच्या मेरठमधील मवाना खुर्द परिसर. 21 फेब्रुवारी रोजी येथे फार्म हाऊसजवळ शेतात एका मुलीचा मृतदेह आढळला. चेहरा जळालेला असल्याने ओळखणे कठीण होते. पाच दिवसांनंतर, 26 फेब्रुवारी रोजी मेरठ पोलिसांनी खून प्रकरणाचा खुलासा केला आणि 4 आरोपींना अटक केली. पोलिसांनी दावा केला की 500 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केल्यानंतर आरोपींना पकडण्यात आले आहे. पोलिसांनी मृतदेह दिल्लीची रहिवासी असलेल्या अर्चिता अरोराचा असल्याचे सांगितले. पत्रकार परिषदेत सांगितले की ती अनेकदा मेरठमधील एका हॉटेलमध्ये येत असे. त्या दिवशी नशेत असताना हॉटेल मालक आणि त्याच्या साथीदारांशी तिचे भांडण झाले. अर्चिताने बलात्कार प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली, तेव्हा आरोपींनी तिचे तोंड ब्लँकेटने दाबून तिची हत्या केली. नंतर ओळख लपवण्यासाठी चेहऱ्यावर ऍसिड टाकून मृतदेह शेतात फेकून दिला. पोलिसांनी ५ दिवसांत खुनाचे गूढ सोडवले, पण एक प्रश्न तरीही अनुत्तरित राहिला. तो हा की अर्चिताचे कुटुंब किंवा रक्ताच्या नात्यातील कोणीही तिचा मृतदेह घेण्यासाठी का आले नाही. दैनिक भास्करने मेरठचे एसएसपी, एसपी देहात, सीओ आणि एसएचओ मवाना यांना हा प्रश्न विचारला तेव्हा उत्तर मिळाले की सध्या याची चौकशी सुरू आहे. मुलीची ओळख आधार कार्डवरून पटवण्यात आली आहे. दैनिक भास्करने तपास केला, तेव्हा मुलीची ओळखच बदलली. आधार कार्डवर नाव अर्चिता अरोरा, फोटो परदेशी मुलीचा तुर्कमेनिस्तान आणि उझबेकिस्तानमधील दोन महिलांनी मृतदेहाबाबत दोन दावे केले. हे पोलिसांच्या दाव्यांपेक्षा वेगळे होते. दोन्ही महिलांचे म्हणणे आहे की 25 फेब्रुवारी रोजी त्यांनी पोलिसांना सांगितले होते की मरण पावलेली मुलगी भारतीय नसून, तुर्कमेनिस्तानची रहिवासी असलेली मुहब्बत आहे. ती 15 वर्षांपूर्वी भारतात आली होती. दलालांनी तिचा पासपोर्ट जप्त करून तिला सेक्स रॅकेटमध्ये अडकवले होते. तिच्या शरीरावर असलेले टॅटू लपवण्यासाठी तिला जागोजागी जाळण्यात आले होते. या दाव्यांबाबत आम्ही सर्वप्रथम मेरठ पोलिसांशी बोललो. ग्रामीण एसपी अभिजीत कुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते की, मुलीच्या आधार कार्डवर अर्चिता अरोरा असे नाव नोंदवले आहे. मात्र, पोलिसांनी माध्यमांसमोर आधार कार्ड दाखवले नाही. आम्ही पोलिसांमधील आमच्या सूत्रांमार्फत आधार कार्डची प्रत पाहिली. त्यावर अर्चिता अरोरा हे नाव आणि जन्मतारीख २७ एप्रिल १९८४ अशी आहे. पत्ता दिल्लीतील कोटला मुबारकपूरचा आहे. आधार कार्डवरील फोटो भारतीय नसून, परदेशी मुलीचा आहे. यामुळे आमचा संशय वाढला. याचा शोध घेण्यासाठी आम्ही मेरठ पोलिसांच्या तपास अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. २६ फेब्रुवारीच्या संध्याकाळी एक परदेशी महिला आली होती, असे समजले. तिनेही असाच दावा केला की, ज्या मुलीचा मृतदेह सापडला आहे, ती तुर्कमेनिस्तानची रहिवासी होती. मात्र, पोलिसांनी आम्हाला पोलीस ठाण्यात आलेल्या त्या महिलेची माहिती दिली नाही. तुर्कमेनिस्तानमध्ये आईने इअरिंग-ब्लॅकटॉपवरून मुलीला ओळखले खूप शोध घेतल्यानंतर आम्हाला 28 फेब्रुवारी रोजी पोलीस ठाण्यात आलेल्या महिलेची माहिती मिळाली. तिचे नाव अजीजा सांगण्यात आले. ती उझबेकिस्तानची रहिवासी आहे. आम्ही तिला विचारले की मेरठमध्ये सापडलेल्या मुलीच्या मृतदेहाबद्दल तुम्हाला कसे कळले, तुम्ही पोलिसांना काय सांगितले होते? यावर अजीजाने सांगितले, ‘आमच्याकडे चंदीगडमध्ये राहणाऱ्या एलीनाचा फोन आला होता. 25 फेब्रुवारीच्या संध्याकाळी मेरठ पोलिसांनी तिला फोन केला आणि मुलीच्या (मुहब्बत) मृतदेहाचा फोटोही पाठवला होता. तिच्या कॉल डिटेलमध्ये शेवटचा नंबर एलीनाचाच होता. ती मुहब्बतची ओळखीची होती.‘ ‘एलिनाने मुलीची (मुहब्बत) आई नाहमदिनोवा गुलनाराला तिचा फोटो पाठवला. फोटोमध्ये मुलीने ब्लॅक टॉप घातला होता. चेहरा जळाल्यामुळे तिला ओळखणे कठीण होते. मात्र, इअर रिंग्जवरून आईने तिला ओळखले.’ आई म्हणाली- पोलिसांनी डीएनए टेस्ट केली तरी चालेल, पण अस्थी द्यागुलनारा तुर्कमेनिस्तानमध्ये राहत आहे. दैनिक भास्करने अजीजाच्या माध्यमातून त्यांच्याशी व्हिडिओ कॉलवर बोलणे केले. आम्ही विचारले की आधार कार्डमध्ये या मुलीचे नाव अर्चिता अरोरा असे लिहिले आहे. मग तुम्ही तिला मुहब्बत कसे सांगत आहात? यावर ती म्हणते, 'ही माझी मुलगी मुहब्बतच आहे. तिचा जन्म 25 नोव्हेंबर 1985 रोजी झाला आहे. ती सुमारे 15 वर्षांपूर्वी नोकरीसाठी भारतात गेली होती. तेव्हापासून ती तिथेच आहे. आधार कार्डवर चुकीचे नाव लिहिले आहे. तिचा पासपोर्ट काही लोकांनी जप्त केला आहे.' आम्ही विचारले की तुम्ही मृतदेहाचा फोटो पाहून ती तुमची मुलगीच आहे हे कसे ओळखले? गुलनारा म्हणते, 'तिच्या कपड्यांवरून आणि कानातल्या रिंगवरून ओळखले. पोलिसांना तिच्याजवळ जे आधार कार्ड मिळाले आहे, त्यावर माझ्या मुलीचा खरा फोटो आहे. मरणारी माझी मुलगी मुहब्बतच आहे.' 'जर पोलिसांकडे डीएनए नमुना असेल, तर माझी तपासणी करू शकतात. मात्र, आम्हाला सांगण्यात आले की पोलिसांनी माहिती न देता तिचा मृतदेह जाळला. हे चुकीचे आहे. माझ्याकडे स्वतः भारतात येण्याइतके पैसे नाहीत.' 'आम्ही अजीजाच्या माध्यमातून तुर्कमेनिस्तान दूतावासाला पत्र पाठवले आहे, जेणेकरून आमच्या अनुपस्थितीत अजीजानेच पोलिसांशी संपर्क साधावा. कमीत कमी आता आमच्या मुलीच्या अस्थींची राख तरी आम्हाला सोपवण्यात यावी, जेणेकरून आम्ही आमच्या रीतीरिवाजानुसार तिला निरोप देऊ शकू.' पोलिसांना सत्य माहीत होते, जवळच्या व्यक्तीचा दावा- 16 फेब्रुवारीपासून फोन बंद होता आता प्रश्न असा आहे की, पोलिसांनी जेव्हा 26 फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषद घेतली, तेव्हा त्यांना माहीत नव्हते का की मरणारी अर्चिता अरोरा नसून मुहब्बत आहे. दैनिक भास्करने याचीही चौकशी केली. 26 फेब्रुवारी रोजी मेरठ ग्रामीण एसपी अभिजीत कुमार यांनी पत्रकार परिषद घेतली होती. माध्यमांना अधिकृत प्रेस नोट देखील पाठवला होता. मेरठ पोलिसांनी जारी केलेल्या प्रेस नोटमध्ये स्पष्टपणे लिहिले आहे की, मृत मुलगी अर्चिता अरोरा होती. तिच्या हत्येच्या आरोपाखाली ४ जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपींची नावे अरविंद उर्फ मोनू, संदीप उर्फ राहुल, चंचल उर्फ बंटी आणि विवेक उर्फ काका अशी आहेत. पोलिसांनी प्रेस नोट आणि पत्रकार परिषद या दोन्हीमध्ये एकच दावा केला. पोलिसांनुसार, अर्चिता आधी पंजाबमधील अंबाला येथे राहत होती. नंतर ती दिल्लीला आली होती. तिच्या आधार कार्डवरून याची पुष्टी झाली आहे. आता प्रश्न असा निर्माण होतो की पोलिसांना अर्चिता अरोराची खरी ओळख माहीत नव्हती का? आमच्या तपासणीत असे समोर आले आहे की, चंदीगडमध्ये राहणाऱ्या एलिनाला 25 फेब्रुवारीच्या रात्री 8 वाजण्याच्या सुमारास मेरठ पोलिसांचे सब-इन्स्पेक्टर सुमित तोमर यांचा फोन आला होता. हा फोन 7460984*** या नंबरवरून आला होता. तपास पथकात सुमित तोमर यांचाही समावेश आहे. आम्ही अजीजाच्या माध्यमातून एलिनाशीही बोललो. त्या सांगतात, ‘पोलिसांचा फोन आला होता की काही दिवसांपूर्वी एका मुलीचा मृतदेह सापडला होता. चेहरा जळालेला होता. एक आधार कार्ड सापडले आहे. त्यावर अर्चिता अरोराचे नाव आहे. मुलीच्या फोनच्या कॉल डिटेलमधून तुमचा नंबर मिळाला. तुमच्या ओळखीची कोणती मुलगी बेपत्ता आहे का?‘ ‘मी सांगितले की हो, एक मुलगी 12 फेब्रुवारीला मेरठला गेली होती. 16 फेब्रुवारीला तिच्याशी शेवटचे बोलणे झाले होते. तेव्हापासून तिचा फोन बंद आहे, पण तिचे खरे नाव अर्चिता अरोरा नाही. ती आधी अंबालामध्ये होती. नंतर दिल्लीला गेली होती. मग पोलिसांनी एका मृतदेहाचा फोटो पाठवला. चेहरा भाजलेला होता. कपड्यांवरून आम्ही ओळखले की ही मुहब्बतच आहे, पण पोलिसांना विश्वास बसला नाही.‘ ‘म्हणून आम्ही दिल्लीत राहणाऱ्या अजीजाला 26 फेब्रुवारीलाच पोलिसांकडे पाठवले होते. त्यांनीही पोलिसांना मुहब्बतबद्दल सांगितले, पण पोलीस सत्य लपवत आहेत.‘ आम्ही विचारल्यावर एलीनाने सब इन्स्पेक्टरच्या इनकमिंग आणि आउटगोइंगचा पूर्ण रेकॉर्डही पाठवला. चॅटमध्ये राहुलने लिहिले होते 'मुहब्बत आली', मग पोलिसांना कसे माहीत नव्हते? मृत पावलेली मुलगी तुर्कमेनिस्तानची मुहब्बतच आहे. याबाबत आम्हाला आणखी एक पुरावा मिळाला आहे. मेरठ पोलिसांनी ज्या 4 लोकांना अटक केली आहे. त्यापैकी राहुल आणि मोनू दोघेही थेट परदेशी मुलींच्या संपर्कात होते. तेच मुलींना हॉटेलमध्ये बोलावले होते. राहुलचा मॅनेजर मोनू आहे. राहुलच चॅट करून परदेशी मुलींना बोलावतो होता. त्यानंतरची जबाबदारी मोनूची होती. दैनिक भास्करला राहुलची एक चॅट मिळाली आहे. ही 7 फेब्रुवारीच्या आसपासची आहे. यात एका व्यक्तीने राहुलला विचारले - काम कसे आहे? राहुलने उत्तर दिले - सध्या रशियन स्टाफ आहे. मग त्या व्यक्तीने विचारले - मुहब्बत आली आहे का? राहुलने उत्तर दिले - होय जी. मग दोघांमध्ये व्हॉइस नोट पाठवून बोलणे होते. आणखी एका चॅटमधून असे दिसून येते की अटक केलेल्या राहुल आणि मोनूला मुहब्बतबद्दल माहिती होती. पोलिसांनी त्यांची चौकशीही केली, पण त्यांनी कोणतीही माहिती दिली नाही. मात्र, आम्ही हा प्रश्न केसच्या तपासाशी संबंधित एका वरिष्ठ अधिकाऱ्याला विचारताच, ते उत्तर देण्यास टाळाटाळ करू लागले. मग थोड्याच वेळात त्या अधिकाऱ्याने अजीजाला फोन केला. ते विचारू लागले की मुहब्बत नावाच्या मुलीशी संबंधित तपशील आम्हालाही पाठवा. असे यासाठी झाले कारण 26 फेब्रुवारी रोजी अजीजा मेरठ पोलिसांना भेटली होती, पण पोलिसांनी तिच्या बोलण्याला गांभीर्याने घेतले नव्हते. पासपोर्ट आणि आधारमध्ये एकच फोटो, टॅटू ऍसिडने जाळले तुर्कमेनिस्तानमधून मुहब्बतच्या आईने आम्हाला तिचे अनेक फोटो पाठवले आहेत. हे पाहून कळते की मुहब्बतच्या उजव्या हातावर आणि कमरेवर टॅटू होता. फोटो आधार कार्डवरीलच आहे, पण नाव आणि पत्ता चुकीचा लिहिला आहे. 21 फेब्रुवारीला मुलीचा मृतदेह सापडला होता, तेव्हा तिचा चेहरा जळालेला होता. तिच्या हातावर आणि कमरेवरही जागोजागी ऍसिडने जाळले होते. म्हणजे हे स्पष्ट आहे की मुलीच्या ओळखीच्या खुणा मिटवण्याचा प्रयत्न केला गेला. पोलिसांनी यावर आरोपींना प्रश्न विचारले नाहीत. आम्ही एसपी देहात अभिजीत कुमार यांना विचारले की, ज्या हॉटेलमध्ये मुलगी आली होती, त्याच्या सीसीटीव्ही फुटेजवरून तिची ओळख पटू शकते. त्यांनी सांगितले की, सीसीटीव्ही फुटेज हटवण्यात आले आहेत. ते परत मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत. तज्ञांचे म्हणणे- आधार कार्ड नागरिकत्वाचा पुरावा नाहीतुर्कमेनिस्तानच्या मुहब्बतने बनावट आधार कार्ड बनवले होते की, हे फक्त कुटुंब आणि ओळखीच्या लोकांचा दावा आहे. हे समजून घेण्यासाठी आम्ही मानवी तस्करीच्या जाळ्यातून परदेशी मुलींना वाचवणाऱ्या स्वयंसेवी संस्थेशी संबंधित हेमंत शर्मा यांच्याशी बोललो. ते म्हणतात, ‘बहुतेक परदेशी मुलींकडे भारताची बनावट ओळखपत्रे मिळतात. काही वेळा त्या स्वतःच्या इच्छेने आधार कार्ड बनवून घेतात, तर काही वेळा एजंट बनवतात. त्यांना सेक्स रॅकेटसाठी तस्करी करून आणले जाते. हॉटेल आणि क्लबमध्ये पाठवल्यावर त्यांना भारतीय ओळखपत्राची गरज पडते.‘ हेमंत पुढे म्हणतात, ‘तुर्कमेनिस्तानमधील एका महिलेने आता दावा केला आहे की, मरण पावलेली मुलगी माझी मुलगी होती. तिने पासपोर्टही दाखवला आहे. आधार कार्ड आपल्या देशात केवळ ओळखपत्र आहे. ते नागरिकत्वाचा आधार नाही. ही गोष्ट सर्वोच्च न्यायालयानेही सांगितली आहे. त्यामुळे पोलिसांनी केवळ आधार कार्डवरील नाव आणि पत्ता पाहून गप्प बसणे चुकीचे आहे. त्यांना परदेशी मुलगी असल्याची माहिती मिळताच तात्काळ चौकशी करण्याची गरज होती.‘ यावर मेरठ ग्रामीणचे एसपी अभिजीत कुमार यांचे म्हणणे आहे की, कागदपत्रे आणि आरोपींच्या जबाबाच्या आधारे तपास करण्यात आला आहे. येत्या काळात आणखी काही पुरावे मिळाल्यास, ते देखील तपासात समाविष्ट केले जातील.

दिव्यमराठी भास्कर 3 Mar 2026 8:54 am

Dhananjay Munde: धनंजय मुंडेंना दिलासा; ‘त्या’प्रकरणात क्लीनचीट, अजंली दमानियांना धक्का

Dhananjay Munde: मुंबई उच्च न्यायालयाने धनंजय मुंडे यांच्या बाजूने निकाल दिला व संबंधितांचे आरोप फेटाळून लावल्यानंतर अंजली दमानिया यांनी राज्य लोक आयुक्तांकडे याबाबत तक्रार केली होती.

दैनिक प्रभात 3 Mar 2026 8:40 am

Devendra Fadnavis : युद्धजन्य परिस्थितीमुळे महाराष्ट्रातील नागरिक अकडले; मुख्यमंत्री स्वतः विविध यंत्रणांशी संपर्कात, ‘या’नेत्यावर मोठी जबाबदारी

Devendra Fadnavis : इराण-अमेरिका-इस्राइल यांच्यातील संघर्ष आता वाढताना दिसत आहे. दुबईला या संघर्षाची मोठी झळ बसली आहे. अनेक महाराष्ट्रातील नागरिक दुबई विमानतळावर अडकून पडले आहेत. अशातच मुख्यमंत्री कार्यालयाकडून महत्वाची माहिती जारी करण्यात आली आहे.

दैनिक प्रभात 3 Mar 2026 8:39 am

‘सक्षम कौशल्य सर्वेक्षण’ विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र संकल्पनेतील महत्वपूर्ण पाऊल

मुंबई : युवकांचा देश असलेल्या भारतातील तरुण पिढीमध्ये जागतिक पातळीवर नेतृत्व करण्याची क्षमता आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे ‘विकसित भारत २०४७’ हे स्वप्न आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेला ‘विकसित महाराष्ट्र’चा रोडमॅप साकार करण्यासाठी कौशल्य विकास हा पायाभूत टप्पा आहे. शासनाच्या या संकल्पनेमध्ये युवकांच्या क्षमतेचा कल जाणून घेणारी ‘सक्षम कौशल्य सर्वेक्षण’ योजना देशातील अशी पहिलीच सर्वेक्षण योजना असून रोजगार निर्मितीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्याने महत्वाचे उचललेले पाऊल राज्यासाठी दिशादर्शक ठरेल, असा विश्वास सांस्कृतिक कार्य, माहिती तंत्रज्ञान मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.आशिष शेलार यांनी व्यक्त केला.मुंबईतील वांद्रे, खार, सांताक्रुझ पश्चिम भागातील (एच पश्चिम वॉर्ड) सुमारे ५५ हजार घरांतील युवकांचा कौशल्य क्षमता कल जाणून घेण्यासाठी सुरू होत असलेल्या ‘सक्षम कौशल्य सर्वेक्षण’ योजनेचे उद्घाटन पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते झाले. त्यांच्याच संकल्पनेतून सुरू करण्यात आलेले हे सर्वेक्षण मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय आणि कौशल्य विकास विभागामार्फत राबविण्यात येणार आहे. वांद्रे पश्चिम येथील नॅशनल कॉलेजच्या सभागृहात झालेल्या या योजनेच्या उद्घाटन समारंभास स्थानिक लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्यासह कौशल्य विकास उपायुक्त आनंद माळी, राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्थेचे विभागीय संचालक सी.एस. मूर्ती, कौशल्य विकास विभाग मुंबईचे उपायुक्त सचिन जाधव, सहायक आयुक्त शैलेश भगत, नॅशनल कॉलेजच्या प्राचार्य नेहा जगतियानी, जिल्हाधिकारी कार्यालय आणि कौशल्य विकास विभागातील अधिकारी, उद्योजक, विविध महाविद्यालयांचे प्राचार्य आणि विद्यार्थी उपस्थित होते.पालकमंत्री ॲड.आशिष शेलार म्हणाले, भारताकडे लोकसंख्येचे सामर्थ्य आहे. युवकांना योग्य दिशा, कौशल्यविकास आणि रोजगारनिर्मितीची संधी मिळत असल्याने भारत जागतिक नेतृत्वाकडे वाटचाल करू शकतो. ‘सक्षम कौशल्य सर्वेक्षण’ हा युवकांच्या क्षमता आणि कौशल्य कल जाणून घेण्यासाठीचा देशातील पहिला उपक्रम आहे. एआय-आधारित आणि पारदर्शक पद्धतीने १८ ते ४० वयोगटातील युवकांचा सर्वेक्षणाद्वारे डेटा संकलित करुन त्याआधारे युवकांची कौशल्ये ओळखून त्यांना प्रशिक्षण संस्थांशी जोडले जाईल. या सर्वेक्षणानंतर २०२७ पर्यंत सुमारे १५ हजार युवकांना प्रशिक्षण देण्याचा आणि त्यापैकी पाच हजार युवकांना रोजगार किंवा उद्योजकतेच्या माध्यमातून स्वावलंबी करण्याचा संकल्प आहे. यासाठी उद्योग, विविध कंपन्या आणि कॉर्पोरेट क्षेत्राशी समन्वय साधून रोजगार किंवा स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी साखळी व्यवस्था उभी केली जाईल. यासाठी शासनाबरोबरच महाविद्यालयांनी आणि युवकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन पालकमंत्री ॲड शेलार यांनी केले.जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी युवकांना मुंबईत विविध क्षेत्रात मोठी संधी असल्याचे सांगून त्यांचा कल जाणून प्रशिक्षण आणि मार्गदर्शन मिळाले तर ते रोजगार आणि स्वयंरोजगार क्षेत्रात मोठे योगदान देऊ शकतील, असा विश्वास व्यक्त केला. पुढील दोन ते तीन महिन्यात राबविण्यात येणारे सर्वेक्षण, युवकांच्या कलानुसार प्रशिक्षण आणि रोजगार अथवा स्वयंरोजगाराचे मार्गदर्शन या तीन टप्प्यांमध्ये राबविण्यात येईल देशातील या पहिल्या सर्वेक्षण योजनेमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय आणि कौशल्य विकास विभागाबरोबरच उद्योग, कामगार, महानगरपालिका, बचतगट, विविध क्षेत्रातील उद्योजक यांचा महत्वपूर्ण सहभाग असल्याचे त्यांनी सांगितले. युवकांचा कल विचारात घेऊन त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याने महाविद्यालये, नागरिक आणि युवकांनी यामध्ये सक्रीय सहभाग घेऊन ही योजना यशस्वी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी कटियार यांनी केले.‘सक्षम कौशल्य सर्वेक्षण’ योजनेच्या ‘सक्षम युवक, सक्षम राज्य’ या लोगोचे यावेळी मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. त्याचप्रमाणे विविध उद्योजकांसमवेत प्रशिक्षण आणि रोजगार निर्मितीबाबत सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी मुंबई उपनगर जिल्ह्यातील पश्चिम विभागीय कौशल्य स्पर्धेतील (राष्ट्रीयस्तर) विजेत्या विध्यार्थांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कौशल्य विकास विभागाच्या वतीने सहायक आयुक्त शैलेश भगत यांनी आभार मानले.सक्षम कौशल्य सर्वेक्षण योजनेविषयी सक्षम कौशल्य सर्वेक्षण योजनेचा उद्देश हा १८ ते ४० वयोगटातील पुरुष व महिला उमेदवारांचा कल (interest) लक्षात घेऊन संबंधित उमेदवारांना प्रशिक्षणाअंती रोजगारक्षम बनविणे हा आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात सापिओ ॲनालायटीक या संस्थेद्वारे एच पश्चिम वार्डातील जवळपास ५५ हजार घरी भेट आणि एआय आधारित सर्वेक्षण करण्यात येईल. सर्वेक्षणांतर्गत प्रत्येक घरातील उमेदवारांची विहित नमुन्यामध्ये माहिती जमा करण्यात येईल. विशेषत: १८ ते ४० वयोगटातील पुरुष व महिला उमेदवारांचे शिक्षण व रोजगार मिळवण्याकरीता आवश्यक असलेले कौशल्य प्राप्त करण्याचा कल जाणून घेण्यात येईल. संबंधित उमेदवारांना शासनाद्वारे मान्यताप्राप्त अभ्यासक्रमाची माहिती देण्यात येईल व त्या अनुषंगाने उमेदवारांचा कौशल्य प्राप्त करून घेण्याचा कल नोंदविण्यात येईल. उपलब्ध असलेले अधिकृत कौशल्य प्रशिक्षण संस्था त्याचप्रमाणे नजीकच्या अंतरावर उपलब्ध करुन घेण्यात येईल. उमेदवाराने कौशल्य प्रशिक्षणाकरिता दाखविलेल्या कलानुसार संबंधित अभ्यासक्रम उपलब्ध असलेल्या प्रशिक्षण संस्थेमध्ये सुरू करण्यात येऊन याठिकाणी उमेदवारांना अभ्यासक्रमनिहाय प्रशिक्षण देण्यात येईल. उमेदवारांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर अधिकृत प्रशिक्षण संस्थेद्वारे नजीकच्या उद्योजक/ आस्थापना येथे उमेदवारांना प्रशिक्षण संस्थेद्वारे रोजगार/ स्वयंरोजगार उपलब्ध करुन देण्यात येईल. उद्योजक/ आस्थापना नोंदणी, कौशल्य प्रशिक्षण देणाऱ्या संस्था, वय वर्षे १८ ते ४० च्या उमेदवारांची नोंदणीकरिता स्वतंत्र पोर्टल/ वेबसाईट निर्माण करण्यात येईल. ज्याद्वारे या योजनेची माहिती संपूर्ण उद्योजक, प्रशिक्षण संस्था, उमेदवारांना प्राप्त होईल. कौशल्य प्रशिक्षणाच्या आधारे उमेदवाराना रोजगार किंवा स्वयंरोजगार प्राप्त करून देण्यात येईल. हे सर्वेक्षण भारतातील पहिले विकेंद्रीकृत, एआय आधारित वर्कफोर्स इंटेलिजन्स मॉडेल उभारत आहे. ही संपूर्ण प्रक्रिया अत्याधुनिक कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित असेल आणि यामधून एक अभिनव, स्वायत्त एआय मॉडेल विकसित केले जाईल. हे स्थानिक पातळीवरील कौशल्य, रोजगार आणि धोरणात्मक नियोजनासाठी दीर्घकालीन बुद्धिमत्ता संरचना निर्माण करेल. या योजनेला जिल्हा नियोजन समिती, मुंबई उपनगर यांच्यामार्फत अनुदान दिले जाईल. तर जिल्हा कौशल्य, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई उपनगर ही कार्यान्वयीन यंत्रणा असेल. या नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत एच पश्चिम वार्ड मुंबई उपनगर येथील दरवर्षी पाच हजार प्रमाणे २०२७ पर्यंत १५ हजार उमेदवारांचे विविध कौशल्य प्रशिक्षण योजनेंतर्गत कौशल्य वृद्धी करुन रोजगार/ स्वयंरोजगार प्राप्त करुन देण्यात येईल. सर्वेक्षण महाराष्ट्रातच नव्हे तर देशात पहिल्यांदाच करण्यात येत आहे.

फीड फीडबर्नर 3 Mar 2026 8:30 am

आखाती देशांतील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांसाठी आपत्कालीन सूचना आणि मदतीसाठीचे हेल्पलाईन आणि व्हॉटसॲप क्रमांक

मुंबई : मध्यपूर्व व आसपासच्या काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण प्रादेशिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार परदेशात वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण सूचना जारी करण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांनी आवश्यक माहितीसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष किंवा पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाच्या नैसर्गिक आपत्ती शाखेमार्फत करण्यात आले आहे.पॅलेस्टाईन (रामल्लाह), कतार (दोहा), सौदी अरेबिया (रियाध), इस्रायल (तेल अवीव), इराण (तेहरान), इराक (बगदाद), कुवेत, बहारीन, मस्कत, जॉर्डन तसेच संयुक्त अरब अमिरात (अबूधाबी) येथे वास्तव्यास असलेल्या सर्व भारतीय नागरिकांनी अत्यंत सतर्क राहावे, अनावश्यक हालचाली टाळाव्यात व स्थानिक प्रशासन तसेच भारतीय दूतावासांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन शासनाच्या वतीने वेळोवेळी करण्यात आले आहे. आपत्कालीन परिस्थितीत संबंधित देशांतील भारतीय दूतावासांच्या २४x७ हेल्पलाईन क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले असून, दूतावासांकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे.परदेशात वास्तव्यास असलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांनी शांतता व संयम राखावा, अधिकृत माहितीकडेच लक्ष द्यावे, आणि आवश्यक असल्यास तात्काळ भारतीय दूतावासांशी संपर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्र शासनाने केले आहे. केंद्र सरकार व संबंधित दूतावासांशी समन्वय ठेवून, महाराष्ट्र शासनाच्या वतीने नागरिकांच्या सुरक्षेबाबत सतर्कता बाळगली जात आहे.संबंधित देशांतील भारतीय दूतावासांचे संपर्क तपशील नागरिकांच्या सोयीसाठी प्रसिद्ध करण्यात आले आहेत. त्यानुसार पॅलेस्टाईन (रामल्लाह) येथे फोन : +९७०-५९२९१६४१८, ई-मेल : repoffice@mea.gov.in/ cons.ramallah@mea.gov.in कतार (दोहा) येथे फोन : ००९७४-५५६४७५०२, ई-मेल : cons.doha@mea.gov.in सौदी अरेबिया (रियाध) येथे फोन : ००-९६६-११-४८८४६९७, व्हॉट्सॲप : ००-९६६-५४२१२६७४८, टोल फ्री : ८००-२४७-१२३४, ई-मेल : cw.riyadh@mea.gov.in इस्रायल (तेल अवीव) येथे फोन : +९७२-५४-७५२०७११/ +९७२-५४-२४२८३७८, ई-मेल : cons1.telaviv@mea.gov.in इराण (तेहरान) येथे फोन : +९८९१२८१०९११५, +९८९१२८१०९१०९, +९८९१२८१०९१०२, +९८९९३२१७९३५९, संयुक्त अरब अमिरात (अबू धाबी / दुबई) येथे टोल फ्री : ८००-४६३४२, व्हॉट्सॲप : +९७१५४३०९०५७१, ई-मेल : pbsk.dubai@mea.gov.in /ca.abudhabi@mea.gov.in कुवेत येथे फोन : +९६५६५५०१९४६, ई-मेल : community.kuwait@mea.gov.in बहरीन येथे फोन : ००९७३-३९४१८०७१, मस्कत येथे टोल फ्री : ८००७१२३४, व्हॉट्सॲप : +९६८९८२८२२७०, ई-मेल : cw.muscat@mea.gov.in/ cons.muscat@mea.gov.in जॉर्डन येथे फोन : ००९६२-७७० ४२२ २७६ आणि इराक (बगदाद) येथे फोन : +९६४ ७७१ ६५१ ११८५ / +९६४ ७७०४४४ ४८९९, वेबसाईट : https://www.eoibaghdad.gov.in/ तसेच ई-मेल : cons.baghdad@mea.gov.in/ cons1.baghdad@mea.gov.in/ pol.baghdad@mea.gov.in नागरिकांना संपर्कासाठी उपलब्ध आहेत.याशिवाय मुंबई जिल्हा प्रशासनाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष : ०२२-२२६६४२३२ / ०८६५७१०६२७३ आणि पोलीस नियंत्रण कक्ष : ०२२-२२६२३०५४ / ०२२-२२६२५०२० आदी पर्याय संपर्कासाठी उपलब्ध केले आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता कोणतीही आवश्यकता असल्यास संपर्क साधण्याचे मुंबई शहराचे निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. शिवनंदा लंगडापुरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.आखाती देशांत अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या मदतीसाठी व्हॉटसॲप क्रमांकआखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्ध परिस्थितीमुळे तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील विविध नागरिकांच्या संपर्कात राज्य सरकार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः सातत्याने विविध यंत्रणांशी संपर्कात असून ते केंद्र सरकारसोबत सुद्धा सातत्याने संपर्क ठेवून आहेत. राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांना त्यांनी समन्वय कार्यात लक्ष घालण्यास सांगितले आहे. केंद्र सरकार सुद्धा सर्वतोपरी मदत महाराष्ट्र सरकारला करीत आहे. दुबईतील इंडियन पीपल्स फोरमच्या सोबत समन्वय साधून महाराष्ट्र सरकारने एक व्हॉटसॲपक्रमांक जारी केला असून ज्यांना मदतीची गरज आहे, त्यांनी या व्हॉटसॲप क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.व्हॉटसॲप क्रमांक : +97150 365 4357

फीड फीडबर्नर 3 Mar 2026 8:30 am

Priya Bapat Jitendra Kumar Dalimb Movie : होळीच्या रंगात ‘या’चित्रपटाची घोषणा! प्रिया बापट आणि ‘पंचायत’फेम जितेंद्र कुमार पहिल्यांदाच एकत्र

Priya Bapat Jitendra Kumar Dalimb Movie प्रियाने पोस्टर शेअर करत एक लक्षवेधी कॅप्शन लिहिली “होळी फक्त रंगाचा सण नाहीये, तर ती एक वॉर्निंग आहे.” या एका वाक्यामुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे. पोस्टरमध्येही काहीतरी गूढ आणि थरारक वातावरण जाणवत असल्याने हा चित्रपट वेगळ्या धाटणीचा असणार, अशी चर्चा सुरू झाली आहे.

दैनिक प्रभात 3 Mar 2026 8:23 am

बारामतीतील शासकीय रुग्णालय व आयुर्वेद महाविद्यालयाला अजित पवारांचे नाव

मुंबई :पुणे जिल्ह्यातील बारामती येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालय तसेच शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयाचे नामकरण ‘स्व. अजित (दादा) पवार’ यांच्या नावाने करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे.वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या ३ जानेवारी २०१३ च्या शासन निर्णयान्वये बारामती येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ५०० रुग्णखाटांचे संलग्नित रुग्णालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर २० जुलै २०२१ रोजीच्या शासन निर्णयानुसार १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व १०० रुग्णखाटांचे आयुर्वेद रुग्णालयही सुरू करण्यात आले.या दोन्ही संस्था ग्रामीण व अर्धनगरी भागातील नागरिकांसाठी महत्त्वाचे आरोग्यकेंद्र ठरली आहेत. येथे विशेषज्ञ वैद्यकीय सेवा, आपत्कालीन उपचार, शस्त्रक्रिया सुविधा तसेच आयुर्वेद उपचार स्थानिक स्तरावर उपलब्ध होत आहेत. परिणामी, पुणे शहरावरील तृतीयस्तरीय आरोग्यसेवेचा ताण कमी होऊन परिसरातील नागरिकांना गुणवत्तापूर्ण व परवडणारी सेवा मिळत आहे.यापूर्वी ३१ मे २०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बारामतीचे नामकरण “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बारामती” असे करण्यात आले होते. आता त्याच अनुषंगाने शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचे नामकरण “स्व. अजित (दादा) पवार सर्वोपचार रुग्णालय, बारामती” असे करण्यात येणार आहे. तसेच शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, बारामती व शासकीय आयुर्वेद रुग्णालय, बारामती यांचे नामकरण अनुक्रमे “स्व. अजित (दादा) पवार शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय, बारामती” असे करण्यात येणार आहे.दिवंगत अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री, वित्तमंत्री तसेच विविध विभागांचे मंत्री म्हणून कार्य करताना राज्याच्या अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्राला विशेष प्राधान्य दिले होते. जिल्हास्तरीय वैद्यकीय पायाभूत सुविधा मजबूत करणे, नवीन वैद्यकीय व आयुर्वेद महाविद्यालयांची स्थापना, आधुनिक वैद्यकीय उपकरणांची उपलब्धता आणि ग्रामीण भागात तृतीयस्तरीय आरोग्यसेवेचा विस्तार या बाबींमध्ये त्यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या प्रयत्नांमुळे बारामती परिसरातील आरोग्य व शैक्षणिक विकासाला गती मिळाल्याचे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.नामाधिकरणानंतर संबंधित संकेतस्थळे, अभिलेखे, नोंदवही, फलक, अधिकृत पत्रव्यवहार व इतर कागदपत्रांमध्ये आवश्यक ते बदल करण्याची जबाबदारी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय, मुंबईचे आयुक्त तसेच संबंधित संस्थांचे अधिष्ठाता यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

फीड फीडबर्नर 3 Mar 2026 8:10 am

पुँछमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारणार

नवी दिल्ली :भारतीय शौर्याचे प्रतीक आणि कोट्यवधी भारतीयांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य अश्वारूढ पुतळा आता जम्मू-काश्मीरमधील भारत-पाकिस्तान सीमेवर असलेल्या पुंछ येथे दिमाखात उभा राहणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्यानिमित्त पुणे येथून निघालेली भव्य 'शिवस्वराज्य यात्रा' राजधानी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात दाखल झाली. यावेळी 'जय भवानी, जय शिवाजी'च्या जयघोषात या रथाचे आणि शिवरायांच्या पुतळ्याचे अत्यंत उत्साहात जंगी स्वागत करण्यात आले.या गौरवशाली सोहळ्याप्रसंगी महाराष्ट्र सदनच्या निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला, ,महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल, सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार आणि जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे, आम्ही पुणेकर' संस्थेचे अध्यक्ष हेमंत जाधव यांनी उपस्थित राहून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे विधिवत पूजन केले. यावेळी दिल्लीतील विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि मोठ्या संख्येने मराठी बांधव उपस्थित होते.आयुक्त आर. विमला यांनी सांगितले की भारतीय सेना सीमेवर शौर्याने कार्यरत आहे. सीमेवर उभारण्यात येणारा हा पुतळा जवानांना आणि देशवासीयांसाठी प्रेरणादायी ठरेल.मराठ्यांच्या देदिप्यमान इतिहासाची साक्ष देणारा हा पुतळा पुणे येथून रवाना झाला असून, त्याने पुणे - मुंबई - बडोदा - अहमदाबाद - उदयपूर - जयपूर असा प्रवास करत दिल्ली गाठली आहे. इथून पुढे हा रथ पानिपत आणि पठाणकोट मार्गे पुंछ येथे पोहोचणार आहे. या प्रवासात ठिकठिकाणी शिवप्रेमींकडून रथाचे स्वागत करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, या स्मारकाच्या भूमिपूजनासाठी महाराष्ट्रातील साल्हेर, शिवनेरी, लोहगड, रायगड, प्रतापगड यांसह युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट असलेल्या 11 किल्ल्यांची आणि तमिळनाडूतील जिंजी अशा एकूण १२ किल्ल्यांची माती आणि पवित्र पाणी नेण्यात येत आहे.या स्मारकाचे आणि पुतळ्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे पुण्याचे ज्येष्ठ शिल्पकार विवेक खटावकर आणि त्यांच्या तिसऱ्या पिढीतील कलाकार विपुल आणि विराज खटावकर यांनी या नऊ फूट उंच पुतळ्याची निर्मिती केली आहे. हा पुतळा उच्च दर्जाच्या फायबरपासून तयार करण्यात आला असून, त्याची रचना अत्यंत देखणी आणि प्रेरणादायी आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर 2023 मध्ये जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे अशाच प्रकारे पुतळा उभारण्यात आला होता. त्यानंतर आता पुंछ येथे अधिक भव्य पुतळा बसवून परिसराचा कायापालट करण्यात येणार आहे.या ऐतिहासिक उपक्रमाचे आयोजन 'आम्ही पुणेकर' संस्था, 'श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ' आणि 'श्री शिवशंभू विचार मंच' यांच्या वतीने करण्यात आले आहे. 'आम्ही पुणेकर' संस्थेचे अध्यक्ष हेमंत जाधव, विश्वस्त अखिल झांजले, विपुल कांबळे आणि संदीप मते यांनी या मोहिमेचे नियोजन केले आहे. या कार्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आणि सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.या स्मारकाची सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे याची सुरक्षा आणि देखभालीची संपूर्ण जबाबदारी भारतीय लष्कराच्या 'मराठा लाइट इन्फंट्री' (MLI) कडे सोपवण्यात आली आहे. पाकिस्तान सीमेपासून (LOC) अवघ्या ५०० मीटर अंतरावर असलेल्या या ठिकाणी ५०० जवान तैनात असून, त्यांनी या स्मारकाची सर्व जबाबदारी स्वीकारली आहे. केवळ पुतळाच नाही, तर या ठिकाणी शिवरायांच्या इतिहासावर आधारित एक विशेष संग्रहालय आणि 'लाईट अँड साऊंड' शो देखील आयोजित करण्याचे नियोजन आहे, जेणेकरून सीमेवर तैनात असलेल्या जवानांना आणि पर्यटकांना शिवरायांच्या पराक्रमाचा इतिहास अनुभवता येईल. मार्चच्या पहिल्या आठवड्यात या अश्वारूढ पुतळ्याचे अधिकृत अनावरण होणार असून, हा क्षण प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा ठरणार आहे.

फीड फीडबर्नर 3 Mar 2026 8:10 am

आखाती देशांतील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांसाठी आपत्कालीन सूचना

मुंबई : मध्यपूर्व व आसपासच्या काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण प्रादेशिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार परदेशात वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण सूचना जारी करण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांनी आवश्यक माहितीसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष किंवा पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाच्या नैसर्गिक आपत्ती शाखेमार्फत करण्यात आले आहे.पॅलेस्टाईन (रामल्लाह), कतार (दोहा), सौदी अरेबिया (रियाध), इस्रायल (तेल अवीव), इराण (तेहरान), इराक (बगदाद), कुवेत, बहारीन, मस्कत, जॉर्डन तसेच संयुक्त अरब अमिरात (अबूधाबी) येथे वास्तव्यास असलेल्या सर्व भारतीय नागरिकांनी अत्यंत सतर्क राहावे, अनावश्यक हालचाली टाळाव्यात व स्थानिक प्रशासन तसेच भारतीय दूतावासांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन शासनाच्या वतीने वेळोवेळी करण्यात आले आहे. आपत्कालीन परिस्थितीत संबंधित देशांतील भारतीय दूतावासांच्या २४x७ हेल्पलाईन क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले असून, दूतावासांकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे.परदेशात वास्तव्यास असलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांनी शांतता व संयम राखावा, अधिकृत माहितीकडेच लक्ष द्यावे, आणि आवश्यक असल्यास तात्काळ भारतीय दूतावासांशी संपर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्र शासनाने केले आहे. केंद्र सरकार व संबंधित दूतावासांशी समन्वय ठेवून, महाराष्ट्र शासनाच्या वतीने नागरिकांच्या सुरक्षेबाबत सतर्कता बाळगली जात आहे.संबंधित देशांतील भारतीय दूतावासांचे संपर्क तपशील नागरिकांच्या सोयीसाठी प्रसिद्ध करण्यात आले आहेत. त्यानुसार पॅलेस्टाईन (रामल्लाह) येथे फोन : +९७०-५९२९१६४१८, ई-मेल : repoffice@mea.gov.in/ cons.ramallah@mea.gov.in कतार (दोहा) येथे फोन : ००९७४-५५६४७५०२, ई-मेल : cons.doha@mea.gov.in सौदी अरेबिया (रियाध) येथे फोन : ००-९६६-११-४८८४६९७, व्हॉट्सॲप : ००-९६६-५४२१२६७४८, टोल फ्री : ८००-२४७-१२३४, ई-मेल : cw.riyadh@mea.gov.in इस्रायल (तेल अवीव) येथे फोन : +९७२-५४-७५२०७११/ +९७२-५४-२४२८३७८, ई-मेल : cons1.telaviv@mea.gov.in इराण (तेहरान) येथे फोन : +९८९१२८१०९११५, +९८९१२८१०९१०९, +९८९१२८१०९१०२, +९८९९३२१७९३५९, संयुक्त अरब अमिरात (अबू धाबी / दुबई) येथे टोल फ्री : ८००-४६३४२, व्हॉट्सॲप : +९७१५४३०९०५७१, ई-मेल : pbsk.dubai@mea.gov.in /ca.abudhabi@mea.gov.in कुवेत येथे फोन : +९६५६५५०१९४६, ई-मेल : community.kuwait@mea.gov.in बहरीन येथे फोन : ००९७३-३९४१८०७१, मस्कत येथे टोल फ्री : ८००७१२३४, व्हॉट्सॲप : +९६८९८२८२२७०, ई-मेल : cw.muscat@mea.gov.in/ cons.muscat@mea.gov.in जॉर्डन येथे फोन : ००९६२-७७० ४२२ २७६ आणि इराक (बगदाद) येथे फोन : +९६४ ७७१ ६५१ ११८५ / +९६४ ७७०४४४ ४८९९, वेबसाईट : https://www.eoibaghdad.gov.in/ तसेच ई-मेल : cons.baghdad@mea.gov.in/ cons1.baghdad@mea.gov.in/ pol.baghdad@mea.gov.in नागरिकांना संपर्कासाठी उपलब्ध आहेत.याशिवाय मुंबई जिल्हा प्रशासनाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष : ०२२-२२६६४२३२ / ०८६५७१०६२७३ आणि पोलीस नियंत्रण कक्ष : ०२२-२२६२३०५४ / ०२२-२२६२५०२० आदी पर्याय संपर्कासाठी उपलब्ध केले आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता कोणतीही आवश्यकता असल्यास संपर्क साधण्याचे मुंबई शहराचे निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. शिवनंदा लंगडापुरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

फीड फीडबर्नर 3 Mar 2026 8:10 am

आणखी एका न्यायालयीन लढाईत धनंजय मुंडेंचा विजय; लोकायुक्तांचा निकालही धनंजय मुंडेंच्या बाजूने!

अंजली दमानियांचे सर्वच आरोप लोकायुक्तांनी लावले फेटाळूनकृषी साहित्य खरेदीबाबतचा उच्च न्यायालयाचा निकाल स्वयंस्पष्ट; लोकायुक्तांचे निरीक्षणकृषी साहित्य खरेदी, ऑफिस ऑफ प्रॉफिटसह दमानियांचे सर्व आरोप लोकायुक्तांनी फेटाळलेतोंडाच्या वाफा काढत मुंडेंची बदनामी करणाऱ्या अंजली दमानियांना उच्च न्यायालयापाठोपाठ लोकायुक्तांकडून चपराकधनंजय मुंडेंवर लावलेले सर्व आरोप न्यायव्यस्थेपुढे ठरले खोटेमुंबई - राज्याचे माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार धनंजय मुंडे यांचा आणखी एका न्यायालयीन लढाईत विजय झाला असून, कृषी साहित्य खरेदी, ऑफिस ऑफ प्रॉफिट यासह वेगवेगळ्या आरोप करणाऱ्या अंजली दमानिया यांचे सर्व आरोप राज्य लोक आयुक्तांनी फेटाळून लावले आहेत.धनंजय मुंडे हे राज्याचे कृषीमंत्री असताना एकात्मिक कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्यसाखळी योजनेंतर्गत विशेष कृती कार्यक्रम राबवून त्याअंतर्गत नॅनो खते, कापूस बॅग, बॅटरी ऑपरेटेड स्प्रे पंप आदी साहित्य खरेदी करण्यात आले, त्यामध्ये अनियमितता करून शेकडो कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला होता. या संदर्भात माननीय मुंबई उच्च न्यायालयाने धनंजय मुंडे यांच्या बाजूने निकाल दिला व संबंधितांचे आरोप फेटाळून लावल्यानंतर अंजली दमानिया यांनी राज्य लोक आयुक्तांकडे याबाबत तक्रार केली होती.लोकायुक्त यांनी दोन्ही बाजूंचे म्हणणे संपूर्णतः ऐकून घेऊन, सर्वोच्च न्यायालयाचे विविध निकाल तसेच संविधानिक तरतुदींचा अभ्यास करून माननीय मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल हा स्वयंस्पष्ट असून या प्रकरणातील आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नसून सदर आरोप फेटाळून लावत असल्याचे आपल्या निकालामध्ये स्पष्ट केले आहे.उच्च न्यायालयाने धनंजय मुंडे यांच्या विरोधातील पडगिलवार यांच्यासह विविध जनहित याचिका यांच्यावरती एकत्रित निकाल देताना हे आरोप केवळ व्यावसायिक दृष्टिकोनातून व खोट्या पुराव्यांच्या आधारे केलेले असून राज्य शासनाने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयावर व्यवसायिक दृष्टीने खोटी माहिती समोर आणून शंका उपस्थित करणे हे कायद्याला धरून नसल्याचे स्पष्ट करत, सर्व याचिका फेटाळून लावल्या होत्या. तसेच याचिकाकर्त्यांना एक लाख रुपयांचा दंड ठोठावला होता.त्यानंतर संबंधित याचिकाकर्त्यांना जर निकाल मान्य नसता तर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात या विरोधात अपील करायला हवे होते मात्र त्यांनी अद्याप अपील न करता दंड भरला; याचाच अर्थ याचिका करते यांना सुद्धा उच्च न्यायालयाने दिलेला निकाल मान्य होता.उच्च न्यायालयाने या निकालामध्ये नोंदविलेली निरीक्षणे ही स्वयंस्पष्ट, निर्णायक व शासनाच्या धोरणाला अनुसरून असल्याने तसेच याचिकाकर्त्या अंजली दमानिया यांच्याकडे संबंधित याचिकेमध्ये जोडलेल्या बाबींव्यतिरिक्त, बनावट पुरावे असून कुठलाही ठोस पुरावा किंवा दखल घेण्यायोग्य काहीही नसल्याने यामध्ये आणखी वेगळी सुनावणी घेण्याचा कोणताही मुद्दा शिल्लक राहत नाही, असेही लोकायुक्तांनी आपल्या निकालात स्पष्ट केले आहे.कृषी साहित्य खरेदी सोबतच अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात ऑफिस प्रॉफिट सह विविध आरोप केले होते. यासंदर्भात धनंजय मुंडे यांचे वकील श्री शार्दुल सिंह यांनी धनंजय मुंडे यांची बाजू मांडताना खासदार जया बच्चन यांच्या संबंधातील सर्वोच्च न्यायालयाच्या एका खटल्याचा संदर्भ देत ऑफिस प्रॉफिट बाबत लोकायुक्तांकडे देण्यात आलेली माहिती ही चुकीची व अर्धवट असल्याचे नमूद केले. या प्रकरणात देखील संविधानातील ठराविक काही कलमे, लोकप्रतिनिधीत्व कायदा, लोकप्रतिनिधींच्या हक्कांचे संरक्षण यांसह सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांचा अभ्यास केला असून, लोक आयुक्तांच्या अखत्यारीतील कोणताही ऑफिस ऑफ प्रॉफिटचा मुद्दा किंवा त्या अनुषंगाने कुठलाही आरोप सिद्ध होत नाही; तसेच याचिकाकर्ते अंजली दमानिया यांनी याबाबत देखील कुठलाही महत्त्वाचा नवीन पुरावा त्यांच्या पुरवणी जबाबात देखील सादर केलेला नाही. त्यामुळे ऑफिस ऑफ प्रॉफिट चा मुद्दा हा देखील निकाली काढला असून, त्यातही धनंजय मुंडे यांना क्लीन चीट देण्यात आली आहे.दरम्यान मागील एका वर्षापासून अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात जे काही आरोप केले ते उच्च न्यायालयाने फेटाळून लावल्यानंतर आता लोकायुक्तांनी देखील सदर आरोप फेटाळून लावले असल्याने, अंजली दमानिया यांच्या केवळ तोंडाच्या वाफा व धनंजय मुंडे यांच्या बदनामीचा असफल प्रयत्न होता, हे सिद्ध झाले आहे, अंजली दमानिया यांना या निकालाने एकप्रकारे न्यायव्यवस्थेने एक प्रकारची चपराक लावली आहे, असे म्हणावे लागेल.दरम्यान धनंजय मुंडे यांच्यावरती मागील काही महिन्यात वेगवेगळ्या प्रकारचे अनेक आरोप करण्यात आले, त्यावरून त्यांची बदनामी करण्याची एकही संधी विरोधकांनी सोडली नाही, मात्र मुंडे यांच्या विरोधातील एक एक आरोप खोटा सिद्ध होण्याची मालिका देखील सुरू असून आज त्यात या निकालाने महत्वाची भर पडली आहे.महत्त्वाचे निकाल कृषीमंत्री असताना कृषी साहित्य खरेदीबाबत करण्यात आलेल्या आरोपात उच्च न्यायालय त्यापाठोपाठ आता लोकायुक्त यांनी देखील मुंडेंच्या बाजूने निकाल दिला. पीकविमा संदर्भात कोणताही घोटाळा झाला नसून राज्यात मागील दहा वर्षातील सर्वाधिक पीकविमा धनंजय मुंडे यांच्या कृषीमंत्री कार्यकाळात महाराष्ट्राला मिळाला, असे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळ सभागृहात घोषित केले. धनंजय मुंडे यांनी निवडणूक आयोगाला विधानसभा निवडणुकीत आपल्या शपथ पत्रात चुकीची माहिती दिल्याच्या आरोपातून क्लीन चीट, मुंडेंच्या बाजूने निकाल. ऑफिस ऑफ प्रॉफिट संदर्भाने केलेले आरोप पूर्णपणे खोटे असल्याचे आजच्या निकालाने स्पष्ट झाले.

फीड फीडबर्नर 3 Mar 2026 8:10 am

'सफाई कर्मचाऱ्यांची प्रलंबित नुकसानभरपाई प्रकरणे तात्काळ निकाली काढा'

मुंबई : गटार (सीवर) सफाईदरम्यान मृत्यू झालेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना प्रलंबित असलेली नुकसानभरपाई तात्काळ देण्यात यावी, असे निर्देश राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष हरदीप सिंह गिल यांनी दिले.राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष हरदीप सिंह गिल यांच्या अध्यक्षतेखाली सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत बैठक झाली. या बैठकीस राज्यसफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर, समाज कल्याण उपायुक्त स्वाती इथापे, सामाजिक न्याय विभागाच्या अवर सचिव प्रज्ञा देशमुख, सहायक संचालक मुंबई शहर प्रसाद खैरनार, सहायक संचालक मुंबई उपनगर रविकिरण पाटील तसेच संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.उपाध्यक्ष हरदीप सिंह गिल म्हणाले, पीडित कुटुंबांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी पात्र कुटुंबांना शासनाच्या तरतुदीनुसार पूर्ण नुकसानभरपाई तातडीने देण्यात यावी. ज्या प्रकरणांमध्ये कुटुंबातील सदस्याला नोकरी देणे अपेक्षित आहे, त्या बाबीही तत्काळ मार्गी लावाव्यात. लाड पागे समितीच्या शिफारशींच्या अनुषंगाने निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयाची अंमलबजावणी राज्यातील सर्व महानगरपालिका व नगरपालिका यांनी तात्काळ करावी. ज्या महानगरपालिका अथवा नगरपालिका याबाबत अंमलबजावणी करणार नाहीत त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात येईल. राज्यात कार्यरत असलेल्या सफाई कामगारांची संख्या किती आहे, यासंदर्भातील सविस्तर अहवाल प्रत्येक महानगरपालिका व नगरपालिका यांनी सादर करावा असेही त्यांनी यावेळी सांगितले. तीन महिन्यांनंतर पुन्हा आढावा बैठक घेण्यात येणार असून, ठरलेल्या मुदतीत काम पूर्ण न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.राज्यसफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर म्हणाले, महाराष्ट्रात लाड-पागे समिती यांच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यात यावी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजनेअंतर्गत घरकुलांचा लाभ ज्या सफाई कामगारांना मिळालेला नाही याबाबत कार्यवाही करावी. सफाई कर्मचाऱ्यांचे नुकसान भरपाई बाबतचे अनेक प्रकरण प्रलंबित आहेत याबाबत तात्काळ कार्यवाही करावी.या बैठकीत मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग प्रतिबंधक कायद्याच्या अंमलबजावणीसंदर्भात, सफाई कामगारांच्या आरोग्य संरक्षणाच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना तसेच प्राप्त झालेल्या तक्रारींवर सविस्तर चर्चा झाली.

फीड फीडबर्नर 3 Mar 2026 8:10 am

खामेनींना रात्री मारायचे होते, CIAने योजना बदलली:3 संकेत मिळाले, तरीही सर्वोच्च नेत्याला का वाचवू शकले नाहीत; अमेरिकेच्या फसवणुकीची कहाणी

जून 2025 मध्ये 12 दिवसांच्या युद्धादरम्यान ट्रम्प म्हणाले होते- ‘आम्हाला माहीत आहे खामेनी कुठे आहेत, पण आता मारणार नाही.’ 22 जून रोजी युद्धबंदी झाली. आठ महिन्यांनंतर 28 फेब्रुवारी 2026 रोजी तेच खामेनी एका अचूक हवाई हल्ल्यात मारले गेले. यादरम्यान दोन्ही देश करारावर सतत चर्चा करत होते. अमेरिकेच्या हल्ल्याचे कोणते संकेत मिळत होते, तरीही इराण सुप्रीम लीडरला का वाचवू शकला नाही; अमेरिकेच्या फसवणुकीची कहाणी दिव्य मराठी एक्सप्लेनरमध्ये जाणून घेऊया… प्रश्न-1: खामेनींवरील हल्ल्याचे कोणते संकेत मिळत होते? उत्तर: अणु करारावरील चर्चेदरम्यान जानेवारी 2025 पासूनच अमेरिकेने इराणला वेढायला सुरुवात केली होती. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून अमेरिकन विमानवाहू नौका USS जेराल्ड फोर्ड आणि USS अब्राहम लिंकन देखील पोहोचल्या होत्या. मध्य पूर्वेत 2003 मध्ये इराकवरील हल्ल्यानंतर ही अमेरिकेची सर्वात मोठी लष्करी तैनाती होती. 17 फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इराण यांच्यातील करारावर जिनिव्हा येथे दुसऱ्या फेरीची चर्चा अयशस्वी झाली. यानंतर अमेरिकेने आपले सुमारे 150 फायटर जेट्स, इंधन टँकर विमान इत्यादी तैनात करण्यास सुरुवात केली. 24 फेब्रुवारी रोजी इस्रायलच्या बेन गुरियन विमानतळावर आणि इस्रायलच्या ओवदा एअरबेसवर 12 F-22 तैनात करण्यात आले. इराण आतापर्यंत बचावात्मकच होता. इराणने UNSC ला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, त्याला तणाव किंवा युद्ध नको आहे आणि तो प्रथम हल्ला करणार नाही. दरम्यान, खामेनींवर हल्ला होऊ शकतो असे 3 मोठे संकेत मिळाले… संकेत 1: ट्रम्पची उघड धमकी- इराणमधील सत्ता बदलू संकेत 2: मीडिया रिपोर्ट्समध्ये सुप्रीम लीडरवर हल्ल्याचा उल्लेख संकेत 3: खामेनी यांनी स्वतः सांगितले - हत्येच्या प्रयत्नासाठी तयार रहा प्रश्न 2: अमेरिका-इस्रायलने इराणला कसे चकवले? उत्तर: सीएनएनच्या अहवालानुसार, नेतन्याहू यांनी 11 फेब्रुवारी रोजी ट्रम्प यांच्यासोबत बैठक घेतली. त्यांना वाटत होते की अणु करारावरील चर्चेतून काहीही फायदा होणार नाही, म्हणून त्यांना इराणवर हल्ला करायचा होता. तेव्हा ट्रम्प यांनी चर्चा सुरू ठेवण्यावर भर दिला. त्यानंतर 17 फेब्रुवारी आणि पुन्हा 26 फेब्रुवारी रोजी जिनिव्हा येथे ट्रम्प यांचे दूत स्टीव्ह विटकॉफ आणि जावई जेरेड कुशनर यांनी अणु करारावर इराणी संघासोबत तिसऱ्या फेरीची चर्चा केली. इराणचे परराष्ट्र मंत्री अराघची म्हणाले, ‘करारापर्यंत पोहोचण्याचा मार्ग सुरू झाला आहे. दोन्ही पक्ष सहमत आहेत.’ मध्यस्थी करणारे ओमानचे परराष्ट्र मंत्री बदर अलबुसैदी यांनीही सांगितले की, करारावर सहमती होण्यात आता कोणताही अडथळा नाही. कराराच्या तांत्रिक पैलूंवर पुढील आठवड्यात जिनिव्हा येथे पुन्हा चर्चा होणार होती. यहूदी धर्मात शुक्रवार शब्बातचा दिवस असतो. म्हणजे सुट्टी घेऊन कुटुंबासोबत आराम करण्याचा आणि देवाची प्रार्थना करण्याचा दिवस. खामेनींच्या हत्येनंतर 1 मार्च रोजी प्रकाशित झालेल्या टाइम्स ऑफ इस्रायलच्या एका बातमीनुसार, 27 फेब्रुवारी रोजी शुक्रवारी संध्याकाळी इस्रायली लष्करी अधिकाऱ्याने सुट्टी घेतली. जर एखादी मोठी लष्करी कारवाई होणार असेल, तर अधिकारी लष्करी मुख्यालयात उपस्थित असतात. पण 27 च्या संध्याकाळी IDF चे चीफ ऑफ स्टाफ लेफ्टनंट जनरल इयाल जमीर आणि इतर वरिष्ठ अधिकारी शब्बातसाठी आपापल्या घरी गेले आणि कुटुंबासोबत रात्रीचे जेवण केले. असे यासाठी केले गेले जेणेकरून इराणी गुप्तहेर नेटवर्कला सर्व काही सामान्य वाटावे आणि त्यांना मोठ्या ऑपरेशनची शंका येऊ नये. याशिवाय, अमेरिकन गुप्तचर संस्था सीआयएने ऐनवेळी अशी माहिती दिली की हल्ल्याची वेळ रात्रीऐवजी दिवसा निश्चित करण्यात आली, तर दिवसा खामेनी स्वतःला सुरक्षित समजत होते. प्रश्न-३: सीआयएच्या माहितीनंतर खामेनींवरील हल्ल्याची वेळ कशी बदलली? उत्तर: एनवायटीने या ऑपरेशनशी संबंधित सूत्रांच्या हवाल्याने १ मार्च रोजी खामेनींच्या हत्येनंतर एक अहवाल जारी केला. यात म्हटले होते की, अमेरिकन एजन्सी सीआयए महिन्यांपासून खामेनींर गुप्तपणे नजर ठेवून होती. ती खामेनींच्या हालचाली आणि त्यांच्या ठिकाणाबद्दल माहिती गोळा करत होती. जून 2025 मध्ये इराण-इस्रायल यांच्यात 12 दिवस चाललेल्या युद्धादरम्यान सीआयएचे नेटवर्क मजबूत झाले होते. त्याला याचीही अचूक माहिती मिळत होती की खामेनी कुठे राहतात, कोणाला भेटतात, कसे बोलतात आणि धोक्याच्या परिस्थितीत ते कुठे लपू शकतात. सामान्यतः खामेनी इराणची राजधानी तेहरानमधील एका उच्च सुरक्षा असलेल्या कॅम्पसमध्ये राहत होते. याला ‘बेत-रहबरी’ म्हणजेच सर्वोच्च नेत्याचे घर म्हटले जाते. ते इमारतीतून फारसे बाहेर पडत नव्हते. त्यांचे सर्व कामकाज याच इमारतीतून चालत असे. येथेच लष्कराचे कमांडर आठवड्यातून एकदा बैठकीसाठी येत असत. CIA ला कळले की 28 फेब्रुवारी म्हणजेच शनिवारी सकाळी तेहरानमधील याच उच्च सुरक्षा कॅम्पसमधील एका इमारतीत इराणच्या उच्च अधिकाऱ्यांची एक बैठक होणार आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट ही कळली की खामेनी देखील यात सहभागी होणार आहेत. अमेरिकन वृत्तवाहिनी CNN ने एका इस्रायली सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की खामेनी दिवसाच्या प्रकाशात स्वतःला अधिक सुरक्षित समजत होते. त्यांनी आपली सतर्कता कमी केली होती. याच कॅम्पसमध्ये इराणच्या राष्ट्रपतींचे कार्यालय, खामेनींचे कार्यालय आणि इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे कार्यालय होते. CIA ने आपली ही उच्च अचूकतेची माहिती इस्रायलला दिली. यावेळी आयडीएफ प्रमुख इयाल जमीर, इस्रायली लष्करी गुप्तचर विभागाचे प्रमुख मेजर जनरल श्लोमी बाइंडर आणि मोसादचे संचालक डेव्हिड बर्निया वॉशिंग्टनमध्ये होते. या माहितीच्या आधारे अमेरिका आणि इस्रायलने त्यांच्या हल्ल्याची वेळ बदलली. अमेरिका-इस्रायल आधी शुक्रवारी रात्री हल्ला करणार होते. नंतर बदललेल्या योजनेनुसार, इस्रायलच्या लढाऊ विमानांनी शनिवारी सकाळी सुमारे 6 वाजता त्यांच्या तळांवरून उड्डाण केले. या हल्ल्यासाठी कमी विमानांची गरज होती, परंतु ती जास्त अंतरावर अचूक हल्ला करणाऱ्या शस्त्रांनी सुसज्ज होती. उड्डाण केल्यानंतर सुमारे 2 तासांनी तेहरानमध्ये सकाळी सुमारे 9 वाजून 40 मिनिटांनी इस्रायली क्षेपणास्त्रांचा हल्ला झाला. यावेळी एका इमारतीत इस्रायली लष्करी अधिकारी आणि दुसऱ्या इमारतीत खामेनी उपस्थित होते. अमेरिकन मीडिया रिपोर्ट्सनुसार, सीआयएच्या सखोल विश्लेषण आणि एआय प्रणालीच्या मदतीने हल्ल्याची वेळ आणि लक्ष्य निश्चित करण्यात आले. या हल्ल्यांमध्ये अचूक हल्ला करणारे प्रिसिजन गाइडेड बंकर बस्टर बॉम्ब, लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे आणि एकतर्फी हल्ला करणाऱ्या ड्रोनचा वापर करण्यात आला. प्रश्न-४: गेल्या वर्षी इस्रायलच्या हल्ल्यातून खामेनी कसे वाचले होते? उत्तर: 13 जून 2025 रोजी इस्रायलने इराणच्या अणु ठिकाणांवर हल्ला सुरू केला. त्यानंतर 15 जून रोजी इस्रायलने आपल्या सीमेपासून 2,300 किमी दूर असलेल्या पूर्व इराणमधील मशहद विमानतळाला लक्ष्य केले. खामेनींच्या सुरक्षेसाठी हा मोठा धोका मानला गेला, त्यानंतर त्यांना तेहरान शहरापासून 343 किमी दूर असलेल्या उत्तर-पूर्वेकडील लाविजान परिसरात बांधलेल्या एका बंकरमध्ये हलवण्यात आले. इस्रायलने तेहरानमधील खामेनींच्या कंपाऊंडवरही बॉम्ब टाकले होते, पण खामेनी तिथे उपस्थित नव्हते. खामेनींच्या अधिकृत वेबसाइट Khamenei.ir वर जारी केलेल्या त्यांच्या काही व्हिडिओंचे विश्लेषण करून अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले होते की हे नवीन ठिकाणाहून जारी केलेले कमी-गुणवत्तेचे व्हिडिओ आहेत. खामेनी, त्यांचा मुलगा मोज्तबा खामेनी आणि उर्वरित कुटुंबासह लाविजानच्या बंकरमध्ये राहत आहेत. एप्रिल आणि ऑक्टोबर 2024 मध्ये जेव्हा इराणने इस्रायलवर हवाई हल्ला केला होता, तेव्हाही खामेनी इथेच लपले होते. खामेनी याच बंकरमधून संदेश जारी करत होते. त्यांना भेटायला येणाऱ्या अधिकाऱ्यांना फोन वापरण्यास मनाई होती. त्यांना डोळ्यांवर पट्टी बांधून खामेनीजवळ नेले जात असे. हा बंकर जमिनीपासून 200 फूट खाली आहे. इतक्या खोलवर बांधलेला बंकर सामान्य क्षेपणास्त्रे किंवा बॉम्बने नष्ट करणे कठीण असते. 22 जून रोजी अमेरिकेच्या B2 बॉम्बर विमानांनी इराणच्या अणु प्रयोगशाळेवर बॉम्ब हल्ला केला, पण खामेनींच्या ठिकाणांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला गेला अशी कोणतीही बातमी आली नाही. प्रश्न-5: मग यावेळी खामेनी गुप्त बंकरमध्ये का गेले नाहीत? उत्तर: अमेरिकन आणि ब्रिटीश गुप्तचर संस्थांनुसार, खामेनी यांनी 'प्लॅन बी' तयार केला होता. असे म्हटले जात होते की, जर इराणमधील सध्याचे विरोध प्रदर्शन नियंत्रणात आले नाही, तर खामेनी आपल्या मुलासह आणि इतर 20 जवळच्या लोकांसह रशियाला पळून जातील. इस्रायली गुप्तचर अधिकारी म्हणत होते की, खामेनी यांच्यासाठी रशियाला पळून जाणे हाच शेवटचा पर्याय आहे. सीरियाचे हुकूमशहा बशर अल असद यांनीही डिसेंबर 2024 मध्ये रशियात आश्रय घेतला होता. मात्र, इराणच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने खामेनी यांच्या मृत्यूनंतर अमेरिकन वेबसाइट ड्रॉप साइटला सांगितले की, खामेनी यांचा असा कोणताही प्लॅन नव्हता. हे सर्व ट्रम्प यांना अधिक प्रभावशाली दाखवण्यासाठी रचलेले एक नाटक होते. 17 फेब्रुवारी 2026 रोजी खामेनी तेहरानमध्ये आयोजित एका सार्वजनिक सभेत दिसले. त्यांनी इराणच्या शस्त्रास्त्रांच्या गरजेबद्दल भाषणही दिले. अधिकाऱ्यांच्या मते, ‘इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने खामेनी यांना त्यांचे राहण्याचे आणि कामाचे ठिकाण बदलण्याचा सल्ला दिला होता, परंतु खामेनी यांचा दृष्टिकोन पूर्णपणे वेगळा होता. ते सुरक्षा उपाय वाढवण्याऐवजी गोष्टी शक्य तितक्या सामान्य ठेवण्यावर भर देत होते.’ अमेरिकन स्वयंसेवी संस्था फाउंडेशन फॉर डिफेन्स डेमोक्रेसीज (FDD) ने 19 फेब्रुवारी रोजी लिहिले की खामेनी यांचा सूर विनाशकारी झाला होता. ते त्या ऐतिहासिक शिया धार्मिक नेत्यांचा संदर्भ देत होते ज्यांनी कराराऐवजी हौतात्म्य पत्करले. जेव्हा ट्रम्प यांनी इराणला बिनशर्त शरणागती पत्करण्याची चेतावणी दिली, तेव्हा खामेनी यांनी आपल्या निवेदनात म्हटले होते, 'तुम्ही हे करू शकणार नाही.' खामेनी यांचे गुरु आणि माजी सर्वोच्च नेते खोमेनी यांनीही 1979 मध्ये अमेरिकेला अशाच प्रकारे प्रत्युत्तर दिले होते. 22 जानेवारी रोजी खामेनी यांनी सर्व अधिकारी आणि नेत्यांना चार स्तरांपर्यंत आपले उत्तराधिकारी निश्चित करण्यास सांगितले होते. त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले होते की, 'आम्ही घाबरणार नाही, अमेरिकेला असा धक्का देऊ की ते पुन्हा उभे राहू शकणार नाहीत.' 24 फेब्रुवारी रोजी फॉरेन पॉलिसीमध्ये एक विश्लेषण प्रकाशित झाले. यात खामेनी यांच्या इराणवरील हल्ल्यापूर्वीच्या विचारांबद्दल लिहिले होते. अहवालानुसार, ‘खामेनींच्या विश्वात हौतात्म्य ही एक पवित्र आणि नैतिक विजय आहे आणि प्रतिकार करताना मृत्यू येणे हा पराभव नाही. त्यांची विचारसरणी होती की समझोता हे दुर्बळतेचे लक्षण आहे. दबावाखाली माघार घेतल्यास दबाव वाढतो. त्यांना खोमेनींचा तो इतिहास पुन्हा घडवायचा नव्हता, जेव्हा त्यांनी 1988 मध्ये इराकशी युद्ध थांबवण्यासाठी समझोता केला होता.’ कार्नेगी एंडोमेंट फॉर इंटरनॅशनल पीसचे वरिष्ठ फेलो करीम सजादपूर म्हणतात, ‘इराणी राजवट जगातील सर्वात एकाकी सत्तांपैकी एक आहे. इराणी अधिकाऱ्यांसाठी कोणताही चांगला बाहेर पडण्याचा मार्ग (एक्झिट प्लॅन) नाही. जगात अशी फार कमी ठिकाणे आहेत जिथे ते निर्वासित म्हणून राहू शकतात. म्हणूनच त्यांच्यापैकी बहुतेक मानतात की त्यांना एकतर मारावे लागेल किंवा मरावे लागेल.’

दिव्यमराठी भास्कर 3 Mar 2026 8:08 am

दुबईत अडकलेल्या मराठी जनांच्या मदतीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुढाकार

युद्धजन्य परिस्थितीमध्ये अडकलेल्या मराठी नागरिकांशी संवाद साधून त्यांना दिला आधारदुबईतील बृहनमहाराष्ट्र मंडळाच्या मदतीने सर्वांपर्यंत मदत पोहचवण्याचा प्रयत्नमुंबई :- इराण आणि इस्रायल अमेरिका यांच्यात युद्धाचा भडका उडाल्याने त्याचा फटका आखाती देशांनाही बसला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर राज्यातील नागरिक हे दुबईत अडकून पडले आहेत. या नागरिकांना शक्य ती मदत करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे.या युद्धामुळे ठाणे, मुरबाड, पुणे, अहिल्यानगर अशा विविध भागातून दुबईला गेलेल्या नागरिकांनी मदतीसाठी उपमुख्यमंत्री शिंदे यांना संपर्क केला. यात पुण्यातील इंदिरा स्कूल ऑफ बिझनेस स्टेडीजच्या विद्यार्थ्यांचाही समावेश होता. या महाविद्यालयाचे ८४ विद्यार्थी सध्या दुबईत अडकून पडले आहेत. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दुबईतील बृहन्महाराष्ट्र मंडळाचे डॉ. संजीव पैठणकर आणि सोमनाथ पाटील यांच्या मदतीने या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी शिंदे यांनी त्यांना धीर दिला. या कठीण परिस्थितीत हा एकनाथ शिंदे तुमच्या पाठीशी ठामपणे उभा असून तुम्हाला सुखरूपपणे महाराष्ट्रात परत आणण्यासाठी शक्य ते सारे प्रयत्न नक्की केले जातील असे शिंदे यांनी सांगितले.तसेच तिथे अडकलेल्या इतर नागरिकांशीही त्यांनी संवाद साधला. आपण कोणतीही चिंता करून नका, जिथे आहात तिथे आपल्याला काही कमी पडू नये यासाठी शक्य ती सारी मदत देण्याचे प्रयत्न बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या वतीने करण्यात येत असल्याचे शिंदे यांनी त्यांना सांगितले.तसेच महाराष्ट्र शासन आणि उपमुख्यमंत्री म्हणून हा एकनाथ शिंदे तुमच्या पाठीशी ठामपणे उभा असून तुम्हाला सुखरूपपणे मायदेशी परत आणण्यासाठी शक्य ते सारे प्रयत्न केले जातील असे सांगून शिंदे यांनी या नागरिकांना आश्वस्त केले.

फीड फीडबर्नर 3 Mar 2026 7:30 am

आजचे एक्सप्लेनर:युद्धात इराण एकटा कसा पडला, रशिया-चीनसारखे मित्र उघडपणे मदत का करत नाहीत; भारताच्या भूमिकेची चर्चा का?

इराणची रशियासोबत 20 वर्षांची सामरिक भागीदारी. चीनसोबत 400 अब्ज डॉलरचा करार. BRICS आणि SCO सारख्या मंचांवरही एकत्र. पण जेव्हा अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ला केला, तेव्हा हे मोठे मित्र फक्त निवेदन देत राहिले. युद्धाच्या मैदानात इराणला एकटे सोडण्यात आले आहे. सध्याच्या युद्धात कोणता देश कोणासोबत आहे, इराणला रशिया-चीन उघडपणे मदत का करत नाहीत आणि भारताच्या भूमिकेची इतकी चर्चा का आहे; जाणून घेऊया आजच्या एक्सप्लेनरमध्ये… प्रश्न-1: युद्धाच्या परिस्थितीत इराणला कोणत्या देशांकडून लष्करी मदतीची अपेक्षा होती? उत्तर: इराणला सर्वाधिक अपेक्षा रशिया आणि चीनकडून होती… चीनसोबत 400 अब्ज डॉलरचा करार युक्रेन युद्धात रशियाला मदत केली होती. प्रश्न-2: युद्धात चीन उघडपणे इराणला मदत का करत नाहीये? उत्तर: इराणवर अमेरिकेचे हल्ले सुरू झाल्यानंतर, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की इराणच्या सुरक्षेचा आणि त्याच्या सीमांचा आदर केला पाहिजे. तणाव कमी करून पुन्हा चर्चा सुरू केली पाहिजे. मात्र, चीनने इराणला लष्करी मदत देण्याचे कोणतेही संकेत दिले नाहीत. अमेरिकन थिंकटँक CSIS चे वरिष्ठ सहयोगी ॲडम फर्रार यांचे मत आहे की इराण सर्वात कठीण लष्करी परीक्षेला सामोरे जात आहे. अशा परिस्थितीत चीनकडून मदत मिळण्याची शक्यता कमी आहे. चीन-इराणने सामरिक आणि व्यापार भागीदारी केली असली तरी, कोणतीही अधिकृत लष्करी युती नाही. चीनचे स्वतःचे प्राधान्यक्रम आणि समस्या आहेत, ज्यामुळे तो इराणला निधी किंवा शस्त्रे देण्यापासून परावृत्त होईल. खरं तर, चीनचे संपूर्ण लक्ष त्याच्या अर्थव्यवस्थेवर आणि प्रदेशावर आहे. चीनला असे वाटते की 2027 मध्ये जेव्हा तो तैवानवर कब्जा करेल, तेव्हा कोणताही देश मध्ये येऊ नये. त्याचबरोबर चीनचे उद्दिष्ट आहे - 2035 पर्यंत जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणे. सध्या त्याची अर्थव्यवस्था 19 ट्रिलियन डॉलरची आहे आणि 5% च्या वेगाने वाढत आहे. ब्रिटिश थिंकटँक चॅथम हाऊसमध्ये मध्य-पूर्वेचे सहयोगी फेलो अहमद अबूदू यांचे म्हणणे आहे की चीनची ही भूमिका नवीन नाही. जून 2025 मध्ये 12 दिवसांच्या युद्धादरम्यानही चीनने इराणला कोणतीही मदत केली नव्हती. खरं तर, कुठेतरी चीनलाही माहीत आहे की जर इराणकडे अणुशक्ती आली तर मध्य-पूर्वेत अडचणी निर्माण होतील, सागरी व्यापारावर परिणाम होईल आणि चीनही त्यापासून अलिप्त राहणार नाही. प्रश्न-3: कराराच्या असूनही रशिया इराणला उघडपणे मदत का करत नाहीये? उत्तर: रशियन परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, 'संयुक्त राष्ट्रांच्या एका सार्वभौम आणि स्वतंत्र सदस्य देशाविरुद्ध तयारीने आणि कोणत्याही चिथावणीशिवाय हल्ले करण्यात आले. अमेरिका-इस्रायलने मध्य पूर्वेला दरीत ढकलले आहे.'2 मार्च रोजी रशियन परराष्ट्र मंत्रालयाने X पोस्टमध्ये लिहिले, 'आम्ही तणाव कमी करण्याची, शत्रुत्व संपवण्याची आणि पुन्हा चर्चा सुरू करण्याची मागणी करतो. हे प्रकरण संयुक्त राष्ट्र चार्टर आणि अणुबॉम्बच्या अप्रसार कराराद्वारे सोडवले जावे. 'मात्र, रशियाने इराणला लष्करी मदत देण्याचे कोणतेही संकेत दिलेले नाहीत… प्रश्न-4: 'जागतिक शांतते'चा झेंडा फडकवणारे संयुक्त राष्ट्र (UN) शांत का आहे? उत्तर: संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी निवेदन जारी केले, 'मी या हल्ल्यांचा निषेध करतो. अमेरिका-इस्त्रायलने इराणवर केलेला हल्ला आणि त्यानंतर इराणने दिलेले प्रत्युत्तर हे आंतरराष्ट्रीय शांततेसाठी खूप मोठा धोका बनले आहे. सर्व पक्षांनी लढा थांबवून चर्चेतून तोडगा काढावा. 'गुटेरेस यांचे काम केवळ वक्तव्ये करण्यापलीकडे जाऊन संयुक्त राष्ट्र चार्टर लागू करणे आहे. 1945 मध्ये तयार झालेल्या या चार्टरचे मुख्य काम युद्ध थांबवणे आहे. याचा अनुच्छेद 2(4) सांगतो की कोणताही देश दुसऱ्या देशाच्या सार्वभौमत्वावर किंवा जमिनीवर हल्ला करणार नाही. तर अनुच्छेद 51 कोणत्याही देशाला हल्ल्यादरम्यान स्वतःचे संरक्षण करण्याचा पूर्ण अधिकार देतो. तरीही अमेरिका-इस्त्रायलने इराणवर हल्ला केला आणि आता इराण त्यांच्यावर आणि अनेक आखाती देशांवर हल्ला करत आहे. पण असे का...मूलभूत घटना अशी आहे की, कायदे किंवा नियम लागू करण्यासाठी शक्ती किंवा सैन्य असावे लागते. संयुक्त राष्ट्र दोन्ही बाबतीत मागे आहे. त्याच्याकडे अशी कोणतीही शक्ती किंवा सैन्य नाही, जे नियमांचे पालन करण्यास भाग पाडू शकेल. यामुळेच संयुक्त राष्ट्राला 'दात नसलेला सिंह' म्हटले जाते. जर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC) सध्याच्या हल्ल्यांविरोधात कोणताही प्रस्ताव आला तरी, तो मंजूर होणे खूप कठीण आहे. कारण UNSC मध्ये 5 देश - अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स आणि ब्रिटन हे स्थायी सदस्य आहेत आणि त्यांच्याकडे व्हेटो पॉवर आहे. अमेरिका व्हेटोचा वापर करू शकतो. जर जनरल असेंब्लीमध्ये असा कोणताही प्रस्ताव मंजूर झाला तरी तो गैर-बंधनकारक राहील. म्हणजेच, तो मानण्यास भाग पाडणार नाही. केवळ शिफारस किंवा नैतिक दबावासारखे काम करेल. ऑस्ट्रेलियातील युनिव्हर्सिटी ऑफ द सनशाईन कोस्टमध्ये आंतरराष्ट्रीय संबंधांचे प्राध्यापक शॅनन ब्रिनकट यांचे मत आहे की, आंतरराष्ट्रीय कायदा प्रणाली आता पतनाच्या दिशेने वाटचाल करत आहे. जेव्हा शक्तिशाली देश कोणत्याही बहाण्याने अवैध युद्ध छेडतात, मुत्सद्देगिरीचा (डिप्लोमेसी) शस्त्र म्हणून वापर करून वाचतात आणि उघडपणे सत्ता परिवर्तनाचा प्रयत्न करतात, तेव्हा नियम-आधारित व्यवस्था खऱ्या अर्थाने संपलेली असते। प्रश्न-5: अमेरिका-इराण युद्धात भारताच्या भूमिकेची इतकी चर्चा का आहे? उत्तर: हल्ल्याच्या पहिल्याच दिवशी, म्हणजेच 28 फेब्रुवारी रोजी, भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने निवेदन जारी केले की, आम्ही सर्व पक्षांना संयम राखण्याचे, तणाव कमी करण्याचे आणि लोकांच्या संरक्षणाला प्राधान्य देण्याचे आवाहन करतो.परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनीही यूएई, सौदी अरेबिया, इस्रायल, इराण इत्यादी देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांशी फोनवर चर्चा केली आणि परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली. 1 मार्चच्या रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यूएईचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी फोनवर संवाद साधला. दुसऱ्या दिवशी पंतप्रधान मोदींनी युद्धाबद्दल सांगितले की, तेथील परिस्थिती चिंताजनक आहे. भारत आपल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढेल. आम्ही चर्चेतून समस्या सोडवण्याच्या बाजूने आहोत. अमेरिकन थिंकटँक ब्रुकिंग्स इन्स्टिट्यूशनमधील वरिष्ठ फेलो तन्वी मदान यांनी सोशल मीडिया X वर लिहिले, ‘पंतप्रधान मोदींनी अध्यक्ष MBZ यांना फोन करून इराणचे नाव न घेता यूएईवरील हल्ल्यांचा तीव्र निषेध केला. त्यानंतर त्यांनी नेतन्याहू यांना फोन केला. ना समर्थन केले, ना निषेध केला. फक्त अलीकडील घडामोडींवर चिंता व्यक्त केली. भारताचे माजी परराष्ट्र सचिव कंवल सिब्बल यांचे मत आहे की, इराणमध्ये सध्या जे काही घडत आहे, त्यावर भारताने गंभीर चिंता व्यक्त केली पाहिजे. इराणमध्ये आमचे हितसंबंध आहेत. आपण तेथील चाबहार बंदरात गुंतवणूक केली आहे. जर इराणमध्ये अस्थिरता आली, तर संपूर्ण मध्य पूर्वेत अस्थिरता येईल आणि त्याचे परिणाम आपल्यालाही भोगावा लागेल. प्रश्न-६: अरब आणि युरोपीय देशांची भूमिका काय आहे? उत्तर: ब्रिटन, फ्रान्स, जर्मनीसह अनेक युरोपीय आणि अरब देशांनी सध्याच्या परिस्थितीवर निवेदने जारी केली आहेत… ब्रिटन: आम्ही इराणवरील सुरुवातीच्या हल्ल्यात सहभागी नव्हतो आणि पुढेही सहभागी होणार नाही. आम्ही मध्यपूर्वेतील आमच्या हितांचे रक्षण करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यास तयार आहोत. चर्चेने प्रकरण सोडवले पाहिजे. तथापि, पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी सांगितले की त्यांनी इराणी क्षेपणास्त्र स्थळांवर बचावात्मक हल्ल्यासाठी ब्रिटिश लष्करी तळाचा वापर करण्यास अमेरिकेला परवानगी दिली आहे. ऑस्ट्रेलिया: आम्ही इराणला अणुबॉम्ब मिळवण्यापासून आणि आंतरराष्ट्रीय शांतता-सुरक्षेसाठी धोका बनण्यापासून रोखण्यासाठी अमेरिकेच्या कारवाईला पाठिंबा देतो. पंतप्रधान अँथनी अल्बानीज म्हणाले, ‘आम्ही इराणला अणुबॉम्ब मिळवण्यापासून रोखण्याच्या अमेरिकेच्या प्रयत्नांना पाठिंबा देतो. ‘फ्रान्स: आम्ही आमच्या जवळच्या भागीदारांच्या सुरक्षेसाठी आवश्यक संसाधने वापरण्यास तयार आहोत. वाढलेला तणाव सर्वांसाठी धोकादायक आहे. तो थांबला पाहिजे. फ्रेंच अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन म्हणाले की युद्ध सुरू झाल्यास आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेवर परिणाम होईल. युरोपीय संघ: मध्यपूर्वेतील परिस्थिती धोकादायक आहे. नागरिकांची सुरक्षा आणि आंतरराष्ट्रीय कायद्याला प्राधान्य दिले पाहिजे. युरोपीय आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयेन म्हणाल्या, ‘आम्ही सर्व पक्षांना संयम राखण्याचे, लोकांचे रक्षण करण्याचे आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचा आदर करण्याचे आवाहन करतो’ पाकिस्तान: इराणवर अनावश्यक हल्ले झाले आहेत, ज्यांचा आम्ही तीव्र निषेध करतो. या संकटावर शांतता आणि चर्चेने तोडगा काढण्यासाठी मुत्सद्देगिरी त्वरित सुरू केली पाहिजे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी खामेनी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले. ते म्हणाले की आम्ही इराणी लोकांसोबत आहोत. पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कायद्याच्या उल्लंघनावर चिंता व्यक्त करतो. गल्फ को-ऑपरेशन कौन्सिल (GCC): आमच्या लोकांच्या मालमत्ता आणि निवासी भागांना लक्ष्य करण्यात आले आहे. आम्ही इराणी हल्ल्यांचा निषेध करतो. इराणने आमच्या सार्वभौमत्वाचे आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन केले आहे.GCC मध्ये UAE, बहरीन, सौदी अरेबिया, ओमान, कतार आणि कुवेत यांचा समावेश आहे. इराणने या सर्वांना लक्ष्य केले आहे. GCC ने हल्ले थांबवण्यावर आणि चर्चेला महत्त्व देण्यावर भर दिला. तर, इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरागची यांनी शेजाऱ्यांना लक्ष्य केल्याचा इन्कार केला. ते म्हणाले की आम्ही आमच्या शेजाऱ्यांवर हल्ला करत नाही आहोत. आम्ही या देशांमध्ये असलेल्या अमेरिकन तळांना लक्ष्य करत आहोत।

दिव्यमराठी भास्कर 3 Mar 2026 6:00 am

Sanju Samson World Record : संजू सॅमसनचा वर्ल्ड रेकॉर्ड! टी-२० विश्वचषकात ‘हा’खास पराक्रम करणारा ठरला जगातील पहिलाच खेळाडू

Sanju Samson World Record : या खेळीदरम्यान संजूने अनेक प्रस्थापित विक्रम केले. मात्र, त्याने एक असा विश्वविक्रम नावे केला आहे, जो आजवर कोणालाही जमला नव्हता.

दैनिक प्रभात 2 Mar 2026 11:05 pm

Amol Mitkari : VSR मालकाला तात्काळ अटक करा; अन्यथा राष्ट्रवादी लढा उभारेल, अमोल मिटकरी आक्रमक

Amol Mitkari : अजित पवार विमान अपघात प्रकरणात जय पवार यांनी वैमानिकाच्या जागी झोपलेल्या रोहित सिंह यांचा व्हिडिओ शेअर केल्याने खळबळ उडाली आहे.

दैनिक प्रभात 2 Mar 2026 10:55 pm

Nargis Fakhri : झोपही येत नाही, पुढच्या क्षणी काय होणार.! इराणी ड्रोनमुळे दुबईत अभिनेत्री ‘नरगिस फाखरी’ची उडाली झोप

नरगिस फाखरीने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर दुबईतील घराच्या बाल्कनीतून काढलेली फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत.

दैनिक प्रभात 2 Mar 2026 10:41 pm