SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

35    C
...

पंतप्रधान मोदींचा विक्रम, सर्वाधिक ८९३१* दिवस सरकार प्रमुख

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारचे नेतृत्व करत सार्वजनिक पदावर दीर्घकाळ काम करण्याचा नवा विक्रम केला आहे. त्यांनी सलग ८९३१ दिवस सार्वजनिक पदावर राहून सरकारचे नेतृत्व केले आहे आणि करत आहेत. याआधी सिक्कीमचे माजी मुख्यमंत्री पवन कुमार चामलिंग यांनी ८९३० सार्वजनिक पदावर राहून सरकारचे नेतृत्व करण्याचा विक्रम केला होता.A milestone rooted in service, hard work and unwavering commitment.Today, PM @narendramodi Ji surpasses the 8,930-day record of former Sikkim CM Pawan Kumar Chamling, becoming the longest-serving head of a government in India.PM Modi Ji's 8,931 days in public life, first as…— Amit Shah (@AmitShah) March 22, 2026नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून ७ ऑक्टोबर २००१ रोजी पहिल्यांदा पदभार हाती घेतला आणि मे २०१४ पर्यंत गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम केले. नंतर २६ मे २०१४ रोजी त्यांनी देशाचे १४ वे पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारला, तेव्हापासून ते देशाचे नेतृत्व करत आहेत. मोदींनी ७ ऑक्टोबर २००१ पासून आतापर्यंत ८९३१ दिवस सार्वजनिक पदावर राहून सरकारचे नेतृत्व केले आहे आणि करत आहेत.मागील काही वर्षांत पंतप्रधान मोदींनी अनेक राजकीय मापदंड प्रस्थापित केले आहेत. ते गुजरातचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि राज्याचे नेतृत्व करण्याचा सर्वाधिक व्यापक अनुभव असलेले पंतप्रधान आहेत. स्वातंत्र्यानंतर जन्मलेले ते पहिले भारतीय पंतप्रधान आहेत.Prime Minister Shri @narendramodi is now the longest-serving head of a government in India.Pure devotion to the nation and its people defines PM Modi Ji. From his unwavering commitment as the Chief Minister of Gujarat to his dedicated leadership as the Prime Minister, his life… pic.twitter.com/llGPwziZZC— Rajnath Singh (@rajnathsingh) March 22, 2026मोदींचा कार्यकाळ सततच्या निवडणुकीतील यशाने गाजला आहे. पंतप्रधान मोदींनी भारतीय जनता पक्षाला २०१४, २०१९ आणि २०२४ च्या सलग तीन लोकसभा निवडणुकांमध्ये विजय मिळवून दिला आणि दोन पूर्ण कार्यकाळ पूर्ण करून तिसऱ्यांदा परतणारे ते पहिले बिगर-काँग्रेसी पंतप्रधान आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे यूट्यूबवर ३० दशलक्ष सबस्क्रायबर आहेत. यूट्युबवर सर्वाधिक सबस्क्रायबर असलेल्या नेत्यांमध्ये पंतप्रधान मोदी जगात अव्वलस्थानी आहे. पंतप्रधान मोदींचे इन्स्टाग्रामवरील फॉलोअर १० कोटींपेक्षा जास्त आहेत. तसेच पंतप्रधान मोदींचे एक्स अर्थात ट्विटरवरील फॉलोअर १० कोटी सहा लाखांपेक्षा जास्त आहेत. लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर असलेल्या नेत्यांमध्ये पंतप्रधान मोदी जगात अव्वलस्थानी आहेत.

फीड फीडबर्नर 22 Mar 2026 2:30 pm

Iran-US-Israel War : भारतीय भूमीचा इराण हल्ल्यासाठी वापर नाही; भारताने फेटाळून लावले 'ते'दावे

भारत सरकारने सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका दाव्याचे खंडन करत स्पष्ट केले आहे की, भारताने अमेरिकेला आपल्या भूमीवरून इराणवर हल्ला करण्यासाठी कोणतीही परवानगी दिलेली नाही. परराष्ट्र मंत्रालयाने हा दावा पूर्णपणे भ्रामक आणि निराधार असल्याचे म्हटले आहे.परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकृत फॅक्ट-चेक विभागाने सांगितले की, भारत कोणत्याही देशाला आपल्या भूमीचा वापर तिसऱ्या देशावर लष्करी कारवाईसाठी करू देत नाही. अशा प्रकारच्या बातम्यांचा वास्तवाशी कोणताही संबंध नसून नागरिकांनी अशा अफवांपासून सावध राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.हा दावा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वरील एका पोस्टद्वारे समोर आला होता. त्या पोस्टमध्ये अमेरिकेने पश्चिम भारतातून इराणवर बॉम्बहल्ला करण्यासाठी लष्करी संसाधनांच्या वापराची परवानगी मागितल्याचा उल्लेख करण्यात आला होता. या दाव्याला भारत-अमेरिका दरम्यान झालेल्या एलईएमओए (Logistics Exchange Memorandum of Agreement) कराराशी जोडून दाखवण्यात आले.तज्ज्ञांच्या मते, एलईएमओए हा २०१६ मध्ये भारत आणि अमेरिकेदरम्यान झालेला एक लॉजिस्टिक सहकार्य करार आहे. या कराराचा उद्देश दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये सहकार्य वाढवणे हा आहे. या अंतर्गत दोन्ही देश एकमेकांच्या लष्करी तळांचा वापर इंधन भरणे, दुरुस्ती, रसद पुरवठा, संयुक्त सराव आणि मानवीय मदत यासाठी करू शकतात.मात्र, एलईएमओए करार कोणत्याही प्रकारच्या आक्रमक लष्करी कारवाईसाठी किंवा तिसऱ्या देशावर हल्ला करण्यासाठी परवानगी देत नाही, हे स्पष्ट करण्यात आले आहे. हा करार केवळ सहाय्यक स्वरूपाचा असून त्याचा वापर परस्पर संमतीने आणि आवश्यकतेनुसारच केला जातो.परराष्ट्र मंत्रालयाने पुन्हा एकदा नागरिकांना आवाहन केले आहे की, सोशल मीडियावरील अप्रमाणित बातम्यांवर विश्वास ठेवू नये आणि केवळ अधिकृत स्रोतांवरच अवलंबून राहावे.

फीड फीडबर्नर 22 Mar 2026 2:10 pm

आसाममध्ये पोलीस कमांडो कॅम्पवर दहशतवादी हल्ला

तिनसुकिया : आसामच्या तिनसुकिया जिल्ह्यातील पोलीस कमांडो कॅम्पवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. रविवारी मध्यरात्री दोन नंतर दहशतवाद्यांनी हल्ला सुरू केला. दहशतवाद्यांनी कॅम्पला लक्ष्य करून मॉर्टरद्वारे पाच आरपीजी गोळे डागले. यातील चार गोळे कॅम्पच्या आत फुटले. या हल्ल्यात कॅम्पमधील चार जवान जखमी झाले. जखमी कमांडोंवर कॅम्पमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जवान जखमी होण्याव्यतिरिक्त कॅम्पमध्ये आणखी काही नुकसान झाले आहे की नाही हे अद्याप समजलेले नाही. पोलीस कमांडो कॅम्पवरील हल्ल्याचा तपास सुरू आहे.तिनसुकियाचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक मयंक कुमार झा यांच्या नेतृत्वाखालील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे एक पथक घटनेनंतर तात्काळ घटनास्थळी पोहोचले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, या हल्ल्यानंतर तिनसुकिया जिल्हा आणि अप्पर आसामच्या इतर भागांमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.याआधी ऑक्टोबर २०२५ मध्ये दहशतवाद्यांनी तिनसुकियातील काकोपाथर येथील भारतीय लष्कराच्या छावणीवर गोळीबार केला होता, ज्यात तीन जवान किरकोळ जखमी झाले होते. मध्यरात्रीच्या सुमारास हल्लेखोरांनी एका धावत्या वाहनातून छावणीवर गोळीबार केला होता. लष्कराने तात्काळ प्रत्युत्तर दिले होते. पण हल्लेखोर वाहनातून सुसाट वेगाने पळून गेले होते. बंदी घातलेल्या युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम-इंडिपेंडंट या दहशतवादी गटाने लष्करी छावणीवर हल्ला केला होता. आता पोलिसांच्या कॅम्पवर झालेल्या हल्ल्यातही बंदी घातलेल्या युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम-इंडिपेंडंट या दहशतवादी गटाचाच हात असल्याचा संशय व्यक्त होत आहे.आसामध्ये विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. राज्यात ९ एप्रिल रोजी मतदान होईल आणि ४ मे रोजी मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर आसामच्या नागरिकांमध्ये दहशत पसवण्याच्या उद्देशानेच पोलीस कमांडो कॅम्पवर हल्ला करण्यात आल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

फीड फीडबर्नर 22 Mar 2026 1:30 pm

Dhurandhar 2 : धुरंधर २ खरचं ठरला धुरंधर, बॉक्सऑफिसवर ओलांडला ५०० कोटींचा टप्पा

अभिनेता रणवीर सिंहच्या धुरंधर २ ने जगभरात चांगलाच धुमाकूळ घातला असून या सिनेमानं बॉक्स ऑफिसचे सगळेच रेकॉर्ड मोडित काढत ऐतिहासिक अशी विक्रमी कमाई केली आहे. नुकताच ३०० कोटीचा टप्पा पार केल्यानंतर आता धुरंधर २ सिनेमानं ५०० कोटी क्लबमध्ये जबरदस्त एन्ट्री केली आहे.रणवीर सिंहच्या धुरंधर २ सिनेमानं अवघ्या ३ दिवसातचं जगभरात ५०१.०४ कोटींची कमाई केली आहे. तर, भारतात धुरंधर सिनेमानं ३३९.३७ चं नेट कलेक्शन आणि ग्रॉस कलेक्शनमध्ये ४०४.५०४ कोटींचं कलेक्शन केलं आहे.धुरंधर २ सिनेमाचं दमदार बॉक्स ऑफिस कलेक्शनधुरंधर २ सिनेमाचं बॉक्स ऑफिसवर पेड प्रिव्ह्यूजमध्ये ४३ कोटीचं कलेक्शन केलं असून रिलीजच्या पहिल्या दिवशी १०२.५५ कोटींची कमाई केली असून दुसऱ्या दिवशी धुरंधर २ सिनेमानं ८०.७२ कोटींची कमाई केली आहे. तर, तिसऱ्या दिवशी धुरंधर २ सिनेमानं ८०.७२ कोटींची कमाई केली आहे.धुरंधर २ सिनेमाच्या या ऐतिहासिक विक्रमी बॉक्स ऑफिस कलेक्शनमुळे धुरंदरची क्रेझ संर्पूण जगभरात असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच, बॉलिवूडमध्येही अनेकजण धुरंधर २ सिनेमाचं भरभरून कौतुक करत आहेत.

फीड फीडबर्नर 22 Mar 2026 1:30 pm

Riteish Deshmukh : रितेश देशमुखकडून रणवीर सिंहच्या ‘धुरंधर २’ चित्रपटाचे कौतुक

Riteish Deshmukh : रितेश देशमुखने ‘धुरंधर २’ पाहिल्यानंतर इन्स्टाग्रामवर खास पोस्ट शेअर केली.

दैनिक प्रभात 22 Mar 2026 1:17 pm

विमान प्रवास महागणार? देशांतर्गत भाड्यावरील मर्यादा हटवण्याचा केंद्राचा निर्णय

मुंबई : देशांतर्गत विमान प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. केंद्र सरकारने देशांतर्गत विमान भाड्यांवरील तात्पुरती मर्यादा हटवण्याचा निर्णय घेतला असून, सोमवारपासून विमान कंपन्यांना तिकीट दर स्वातंत्र्याने ठरवता येणार आहेत. वाढत्या परिचालन खर्चाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.डिसेंबर २०२५ पर्यंत लागू असलेली भाड्याची मर्यादा काही महिन्यांपूर्वीच लागू करण्यात आली होती. विमानसेवेत मोठ्या प्रमाणावर व्यत्यय आल्यामुळे तिकीट दरात अचानक वाढ झाली होती, त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने ही मर्यादा घातली होती.आता ही मर्यादा हटवल्यामुळे, विमान कंपन्यांवर असलेले कमाल भाड्याचे बंधन राहणार नाही. पूर्वी अंतरानुसार इकॉनॉमी क्लासच्या एकेरी तिकिटासाठी सुमारे १८,००० रुपयांची मर्यादा होती. मात्र, आता कंपन्या मागणी, हंगाम आणि बाजारातील परिस्थितीनुसार दर निश्चित करू शकतील.नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, जास्त मागणी, आपत्कालीन परिस्थिती किंवा सेवा व्यत्ययाच्या काळात अवाजवी भाडेवाढ झाल्यास त्यावर लक्ष ठेवले जाईल. गरज भासल्यास पुन्हा भाडे नियंत्रण लागू करण्याचाही इशारा देण्यात आला आहे.दरम्यान, विमान इंधन (एटीएफ) दरवाढ आणि जागतिक भू-राजकीय तणावामुळे विमान कंपन्यांचा खर्च वाढला आहे. त्यामुळे उद्योगाला काही प्रमाणात दिलासा देण्यासाठी आणि बाजारातील स्थिती पूर्ववत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.वाढत्या आर्थिक दबावामुळे विमान कंपन्यांकडून ही मर्यादा हटवण्याची मागणी सातत्याने होत होती. Federation of Indian Airlines या उद्योग संघटनेनेही भाडे मर्यादेमुळे महसुलावर परिणाम होत असल्याचे सांगत सरकारकडे ही मर्यादा हटवण्याची मागणी केली होती.

फीड फीडबर्नर 22 Mar 2026 1:10 pm

IPL 2026 : हर्षितनंतर आकाश दीपदेखील संपूर्ण आयपीएल हंगामातून बाहेर

आयपीएल २०२६ च्या आधी कोलकाता नाईट रायडर्सच्या अडचणी कमी होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. हर्षित राणानंतर, वेगवान गोलंदाज आकाश दीप देखील आयपीएल २०२६ मध्ये खेळू शकणार नाही. याचा केकेआरच्या वेगवान गोलंदाजीवर गंभीर परिणाम झाला आहे. श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज मथिशा पाथिरानाचा सहभागही अजून अनिश्चित आहे. हे स्पष्ट आहे की, तो सुरुवातीच्या सामन्यांमध्ये खेळणार नाही. परिणामी, अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील संघाला आगामी हंगामापूर्वी वेगवान गोलंदाजासाठी बदली क्रिकेटपटू शोधावा लागणार आहे.आकाश दिप आयपीएलमधून बाहेर आहे आणि संपूर्ण हंगाम खेळू शकणार नाही. असे समजले आहे की, आकाश दीपच्या पाठीच्या खालच्या भागात स्ट्रेस रिॲक्शनचा त्रास होत आहे. रणजी ट्रॉफीदरम्यान त्याला ही दुखापत झाली होती. त्याला बरे होण्यासाठी किमान तीन महिने लागण्याची शक्यता आहे. या २९ वर्षीय वेगवान गोलंदाजाला केकेआरने आयपीएल २०२६ च्या लिलावात १ कोटी रुपयांच्या मूळ किमतीत विकत घेतले होते. त्याने यापूर्वी आयपीएलमध्ये लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघांकडून खेळला आहे.देशांतर्गत क्रिकेटमध्ये बंगालकडून खेळणारा आकाश दीप दुखापतींमुळे त्रस्त आहे. त्याने आतापर्यंत आयपीएलमध्ये १४ सामने खेळले असून, ११.८२ च्या इकॉनॉमी रेटने १० बळी घेतले आहेत. तो गेल्या हंगामात लखनऊ संघाचा भाग होता. त्याने सहा सामने खेळून तीन विकेट्स घेतल्या होत्या. तो अद्याप कोणत्याही हंगामातील सर्व सामने खेळलेला नाही. आकाश २०२२ मध्ये आयपीएलमध्ये सामील झाला.जुलै २०२५ मध्ये इंग्लंड दौऱ्यावरील कसोटी मालिकेदरम्यान आकाश दीप जखमी झाला होता. तो मँचेस्टरमधील चौथी कसोटी खेळू शकला नाही. यापूर्वी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील कसोटी मालिकेदरम्यान त्याला दुखापत झाली होती, ज्यामुळे तो तीन महिने मैदानाबाहेर होता. पण तो आयपीएल २०२५ साठी तंदुरुस्त होऊन परतला.गेल्या काही वर्षांपासून आकाश भारतीय कसोटी संघात एक महत्त्वाचा खेळाडू म्हणून उदयास आला आहे. तो जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांच्यासोबत तिसऱ्या वेगवान गोलंदाजाची भूमिका बजावतो. त्याने आतापर्यंत १० कसोटी सामने खेळले असून त्यात २८ बळी घेतले आहेत.

फीड फीडबर्नर 22 Mar 2026 1:10 pm

Devendra Fadnavis : ‘आम्हीच त्याचा भांडाफोड केला’, खरात प्रकरणावर मुख्यमंत्र्यांचा मोठा खुलासा

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात गाजत असलेल्या कॅप्टन अशोक खरात प्रकरणावर भाष्य करताना मोठा खुलासा केला आहे.

दैनिक प्रभात 22 Mar 2026 12:57 pm

Flight Ticket Price: १ एप्रिलपासून विमान प्रवास महागणार ; नागरी हवाई वाहतूक मंत्र्यांचे संकेत

Flight Ticket Price: केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी इशारा दिला आहे. १ एप्रिलपासून लागू होणाऱ्या विमान इंधनाच्या (एटीएफ) दरवाढीमुळे विमान कंपन्यांवरील आर्थिक दबाव वाढू शकतो.

दैनिक प्रभात 22 Mar 2026 12:41 pm

MHADA Lottery: मुंबईसह ठाण्यात बंपर लॉटरी, पाच हजार घरांची लॉटरी कोणत्या प्राईम लोकेशनवर?

मुंबई: मुंबई-ठाणे या शहरात हक्काचे घर घेणे सामान्यांच्या आवाक्या बाहेर आहे मात्र याच शहरात तुमचं घर होणारं. म्हाडाकडून तब्बल पाच हजार घरांसाठी काही दिवसांत जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. यात नक्की मुंबई आणि ठाणे किती घरांचा समावेश असेल आणि कोणत्या प्राईम लोकेशनवर असतील याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.म्हाडा दर वेळी सर्वसामान्यांचे हक्काच्या घरांच स्वप्न पूर्ण करतो. आताही ही संधी मिळणार आहे. त्यासाठी म्हाडा मुंबईतील २८०० ते ३००० घरांच्या विक्रीसाठी मार्चच्या शेवटच्या आठड्यात किंवा एप्रिल सुरुवातीस जाहिरात प्रसिद्ध करण्याच्या तयारीत आहे.यासाठी मुंबई मंडळाकडून सध्या घरांची जमवाजमव तसेच किंमती निश्चित करण्याची प्रक्रिया सुरु झालेली आहे. यातील घरांच्या किंमती ठरल्यानंतर जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल.म्हाडाच्या लॉटरीमध्ये अॅडव्हान्स कॉन्ट्रिब्युशन स्कीम अंतर्गत येणाऱ्या घरांसह पवई, घाटकोप तसेच प्रतीक्षा नगरमधील विखुरलेल्या ६४ घरांचा तसेच मुंबई इमारत दुरुस्ती तसेच पुनर्रचना मंडळाकडून मिळालेल्या १४३ घरांचाही समावेश असणार आहे. ही घरं लोअर परळ, वडाळा आणि माझगाव या प्राईम लोकेशनवर असणार आहेत.मुंबई शहरापाठोपाठ आता म्हाडाच्या कोकणविभागानेही घरांसाठी लॉटरी काढण्याची तयारी सुरु केलेली आहे. यात लॉटरीसाठी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून घरांची जमवाजमव तसेच किंमती निश्चित करण्यासाठी सुरुवात होईल. तर एप्रिलच्या शेवटापर्यंत सुमारे दोन हजार घरांची जाहिरात प्रसिद्ध करण्याचे नियोजन समोर आले आहे.यात मानपाडा, चितळसर आणि बाळकूम अशा विविध ठिकाणांवरील घरांसह २० टक्के योजनेतील घरांचा समावेशी असणार आहे, अशी सर्व माहिती कोकण मंडळाचे मुख्य अधिकारी डॉ.विशाल राठोड यांनी सांगितली आहे.

फीड फीडबर्नर 22 Mar 2026 12:30 pm

Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावे आणखी एका विक्रमाची नोंद ; पवन कुमार चामलिंग यांना टाकले मागे

Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतीय राजकारणात इतिहास रचला आहे. गुजरातचे मुख्यमंत्री आणि पंतप्रधानपदाच्या कार्यकाळासह, मोदींनी सरकार प्रमुख म्हणून एकूण ८,९३१ दिवस पूर्ण केले आहेत.

दैनिक प्रभात 22 Mar 2026 12:14 pm

मृतदेहासह ३०० पेक्षा जास्त प्रवाशांनी साडेतेरा तास केला विमानप्रवास, जाणून घ्या हवेतच महिलेचा मृत्यू होऊनही विमान का परतले नाही ?

लंडन : हाँगकाँग ते लंडन असा प्रवास करत असलेल्या ब्रिटिश एअरवेजच्या विमानात सर्व क्रू सदस्यांसह एकूण ३३१ जण प्रवास करत होते. या विमानाने हाँगकाँग येथून उड्डाण केल्यानंतर जेमतेम तासाभरात विमानात बसलेल्या ६० वर्षीय महिला प्रवाशाचा मृत्यू झाला. नंतर क्रू सदस्यांनी मृतदेह कापडाने झाकून प्रवाशांच्या आसन व्यवस्थेत एकदम शेवटी ठेवून दिला. काही काळानंतर विमानात हळू हळू दुर्गंधी पसरू लागली. ही दुर्गंधी सहन करत प्रवाशांनी त्यांचा साडेतेरा तासांचा प्रवास केला आणि लंडनच्या विमानतळावर आले. लंडन येथे येताच पोलीस पथकाने विमानात प्रवेश केला. सुमारे ४५ मिनिटे पोलिसांनी विमानातच तपासाचे आणि चौकशीचे काम केले. नंतर मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. प्रवाशांना विमानातून उतरण्याची परवानगी मिळाली.हाँगकाँगला का परतले नाही विमान ?विमानाने हाँगकाँग येथून उड्डाण केल्यानंतर जेमतेम तासाभरात विमानात बसलेल्या ६० वर्षीय महिला प्रवाशाचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती विमानातील सर्व प्रवाशांना तसेच जवळच्या नियंत्रण कक्षाला देण्यात आली. पण विमानातील मृत्यू ही नियमानुसार मेडिकल इमर्जन्सी नाही. जर प्रवाशाची तब्येत बिघडली आहे असे आढळले असते तरच विमान मेडिकल इमर्जन्सी म्हणून जवळच्या विमानतळावर अथवा परत हाँगकाँगच्या विमानतळावर उतरवता आले असते. याच कारणामुळे महिला प्रवाशाचा मृत्यू झाल्यानंतरही विमानाने प्रवास पुढे सुरू ठेवला.क्रू सदस्यांनी केली चूकक्रू सदस्यांनी मृतदेह कापडाने झाकून प्रवाशांच्या आसन व्यवस्थेत एकदम शेवटी ठेवून दिला. पण त्या भागातील काचेच्या बंद खिडक्यांना आतल्या बाजूस असलेले प्लॅस्टिकचा दार लावून घेण्यास क्रू सदस्य विसरले. यामुळे प्रवासादरम्यान मृतदेहावर उन्हाचा कवडसा पडला आणि हळू हळू मृतदेह सडून त्यातून दुर्गंधी येण्यास सुरुवात झाली.नियम काय सांगतात ?विमान प्रवासात प्रवाशाचा मृत्यू झाल्यास क्रू सदस्यांनी मृतदेह कापडाने झाकून प्रवाशांची कमीत कमी वर्दळ असलेल्या भागात ठेवावा. अथवा बॉडी बॅगमध्ये पॅक करून मृतदेह प्रवाशांची कमीत कमी वर्दळ असलेल्या भागात ठेवावा. विमानातील सर्व आसनांवर प्रवासी असतील तर ज्याचा मृत्यू झाला त्या प्रवाशाला कापडाने झाकून अथवा बॉडी बॅगमध्ये पॅक करून त्याच्याच आसनावर ठेवावे.

फीड फीडबर्नर 22 Mar 2026 12:10 pm

Pune: हळदीतून केलेल्या नशेचा पर्दाफाश; पोलिसांकडून उच्चभ्रू परिसरातील दोघांना अटक

पुणे: पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार पुण्यातील एका उच्चभ्रू परिसरात घडला आहे. पुणे पोलिसांनी एक मोठं रॅकेट उद्ध्वस्त केलं आहे. या हळदीच्या पाकिटातून 'नशा' विकला जात असल्याची टीप पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी धाड टाकत मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.पुण्यातील उच्चभ्रू बाणेर भागात पोलिसांनी एक ड्रग रॅकेटचा भांडाफोड केला आहे. येथे हळदीच्या पाकिटाच्या आड गांजा विकला जात होता. या प्रकरणात बाणे पोलिसांनी दोन आरोपी अभिषेक बोरसे आणि अक्षय बोरसे या दोघांना अटक केली आहे. यांच्याकडून १६ किलो गांजा ताब्यात घेण्यात आला आहे.पोलिसांकडून १६ किलो गांजा ताब्यातया पाकिटांच्या तपासानंतर पोलिसही हैराण झाले. कारण या पाकिटावर हळद लिहिलं होतं, मात्र प्रत्यक्षात त्या पाकिटांमध्ये गांजा होता. सुरुवातीला पोलिसांनी घटनास्थळावरील तब्बल तीन किलो गांजा जप्त केला. चौकशीदरम्यान आरोपींनी पिंपरी-चिंचवड स्थित आपल्या घरात अमली पदार्थ जमा केल्याचं मान्य केलं आहे. यानंतर पोलिसांनी तातडीने त्या ठिकाणी छापेमारी करीत १३ किलो गांजा जप्त केला. अशा प्रकारे एकूण १६ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.आरोपी एका खासगी कंपनीतील कर्मचारीअटक केलेले दोन्ही आरोपी एका खासगी कंपनीत नोकरी करतात, अशा माहिती समोर आली आहे. तपासानुसार, हळदीच्या पाकिटाचा वापर करीत गांज्याची विक्री करीत होते. या प्रकरणात बाणेर पोलीस पुढील तपास करत आहेत.

फीड फीडबर्नर 22 Mar 2026 12:10 pm

Indian Navy : भारतीय नौदलाची नवी स्टेल्थ युद्धनौका ‘तारागिरी’ लवकरच नौदलाच्या ताफ्यात केली जाणार समाविष्ट

भारताच्या सागरी सार्वभौमत्वाच्या क्षेत्रातील निर्णायक क्षण, असे वर्णन करता येईल, अशा शानदार समारंभात, भारतीय नौदलाची नवी स्टेल्थ युद्धनौका, तारागिरी (एफ ४१) येत्या ३ एप्रिल २०२६ रोजी, नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट केली जाणार आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली विशाखापट्टणम इथे हा सोहळा होणार असून, भारतीय नौदलाला, सर्व दृष्टीने आत्मनिर्भर बनवण्यासाठीच्या प्रवासातला हा एक महत्वाचा टप्पा असेल.प्रकल्प 17 A श्रेणीतील, चौथी युद्धनौका असलेली ‘तारागिरी’, केवळ एक नौका नाही, तर भारताच्या ‘मेक इन इंडिया’ या दृढनिश्चयाचे, आणि भारतीय जहाजबांधणी केंद्राच्या अद्ययावत स्वदेशी अभियांत्रिकी कौशल्याचे ६,६७०टन वजनाचे ते एक मूर्तिमंत प्रतीक आहे.मुंबईच्या माझगाव डॉक शिपबिल्डर्स इथे तयार करण्यात आलेली ही युद्धनौका, या श्रेणीतल्या आधीच्या नौकांच्या संरचनेपेक्षा कितीतरी अत्याधुनिक, सरस असून, पुढच्या पिढीतले तंत्रज्ञान त्यात आहे. आकाराने छोटी, आणि लक्षणीयरित्या, छोटे रडार क्रॉस सेक्शन असलेल्या या युद्धनौकेची प्राणघातक स्टेल्थ क्षमता आहे. याच्या बांधणीत, ७५ टक्क्यांपर्यंत, स्वदेशी तंत्रज्ञान असून, देशांतर्गत औद्योगिक व्यवस्थेत झालेल्या विकासाचे चित्रही या बांधणीतून ठळकपणे अधोरेखित होते. देशभरातील २०० पेक्षा अधिक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, सरकारच्या आत्मनिर्भर अभियानात आपले योगदान देत, अशा स्वदेशी बनावटीत हातभार लावत आहेत, ज्यातून, हजारो रोजगारही निर्माण होत आहेत.डिझेल किंवा गॅस अशा दोन्ही इंधनावर चालणाऱ्या (CODOG) प्रॉपल्शन प्लांट’ने प्रणित, तारागिरी युद्धनौका, ‘उच्च जलद गती- समुद्रात तग धरण्याची उच्च क्षमता’ असलेली आहे. तिला बहुविध आणि बहु आयामी सागरी कारवाया करण्यास सक्षम बनवण्यात आले आहे. या नौकेवर, जागतिक दर्जाची, सुपरसॉनिक जमिनीवरून-जमिनीवर मारा करणारी क्षेपणास्त्रे, मध्यम पल्ल्याची जमिनीवरुन हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे आणि विशेष, पाणबुडी-रोधी युद्ध क्षेपणास्त्रे अशी शस्त्रे तैनात आहेत.या सर्व प्रणाली अत्याधुनिक प्रतिकार व्यवस्थापन प्रणाली (कॉम्बॅट मॅनेजमेंट सिस्टिम) द्वारे एकत्रित करण्यात आलेल्या आहेत, ज्यामुळे जहाजावरील जवान, कोणतेही धोके अथवा हल्ल्यांचा तत्काळ अचूक प्रतिकार करु शकतील.समुद्रातील एक शिकारी जहाज, एवढीच तारागिरीची मर्यादित भूमिका नसेल, तर राजकीय मुत्सद्देगिरीच्या वेळी, तसेच मानवी संकटांच्या काळातही मदत करण्यास ती सुसज्ज आहे. तिची लवचिक कार्यक्षमता, तीव्र अशा युद्धासाठी सज्ज असण्यासोबतच, आपत्ती निवारण आणि इतर मानवी संकटात मदतीसाठी एक आदर्श युद्धनौका म्हणून उपयुक्त ठरणारी आहे.भारतीय नौदल एक सामरीक, सुसंघटित, विश्वासार्ह आणि आत्मनिर्भर शक्ती म्हणून सातत्याने विकसित होत आहे. विकसित आणि समृद्ध भारतासाठी स्वदेशी बनावटीच्या, भारतीयांनीच संचलित केलेल्या युद्धनौकांच्या मदतीने हे नौदल आपल्या सागरी सीमांचे संरक्षण करत आहे.भारतीय नौदलाच्या उदयास येणाऱ्या सागरी शक्तीचे प्रतीक आणि आपल्या सागरी सीमांची संरक्षक म्हणून, तारागिरी आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी सज्ज आहे.

फीड फीडबर्नर 22 Mar 2026 12:10 pm

Sreeleela : “मी रडायचे, खूप त्रास व्हायचा…“; ट्रोलिंगवर श्रीलीलाने सांगितली ‘ती’गोष्ट, म्हणाली “इंडस्ट्री सोडून जाण्याचाही विचार केला होता पण…”

Sreeleela : अभिनेत्री श्रीलीला हिने ट्रोलिंगबद्दल आपले मत व्यक्त करताना महत्वाची गोष्ट सांगितली आहे.

दैनिक प्रभात 22 Mar 2026 12:00 pm

Donald Trump on Robert Mueller: “बरं झालं ते ठार झाले कारण…”कोण होते रॉबर्ट म्यूलर ? अन् डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या मृत्यूवर आनंद का व्यक्त केला?

Donald Trump on Robert Mueller: अमेरिकेच्या फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनचे (एफबीआय) माजी संचालक रॉबर्ट म्यूलर यांचे निधन झाले आहे, मात्र अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या निधनाबद्दल आनंद व्यक्त केला आहे.

दैनिक प्रभात 22 Mar 2026 11:58 am

अपघातात आंतरराष्ट्रीय खेळाडू मुलगा-मुलगी गमावली:हार मानली नाही- 55 व्या वर्षी पुन्हा वडील झाले; आता मुलीला विश्वविजेता बनवले

माझी कहाणी एका सामान्य स्पोर्ट्स प्रशिक्षकाची नाही, तर त्या वडिलांची आहे, ज्यांनी आपली दोन्ही आंतरराष्ट्रीय खेळाडू मुले गमावली… पण खेळ आणि स्वप्नाला मरू दिले नाही. 2004 मध्ये राष्ट्रीय विजेती तिरंदाज मुलगी वोल्गा एका रस्ते अपघातात गेली. अकादमी बंद पडली. कुटुंब विस्कळीत होऊ लागले. त्यानंतर मुलगा लेनिनने MBBS सोडून धनुष्य उचलले - स्वतःसाठी नाही, तर माझ्या आणि त्याच्या बहिणीच्या अपूर्ण स्वप्नासाठी. हळूहळू तो आंतरराष्ट्रीय खेळाडू बनला, प्रशिक्षक बनला आणि अकादमीला पुन्हा उभे केले. पण 2010 मध्ये, ज्या दिवशी त्याला राज्य सन्मान मिळाला, त्याच दिवशी परत येताना वाटेत एका रस्ते अपघातात त्याचाही मृत्यू झाला. नंतर, 55 वर्षांच्या वयात मी पुन्हा वडील झालो. मुलगी शिवानी जन्माला आली. मी दोन वर्षांच्या वयातच तिच्या हातात धनुष्य दिले. आज ती देखील आंतरराष्ट्रीय खेळाडू बनली आहे. आता मी हेच सांगेन- ‘माझा मुलगा लेनिन गेला नाही… तो शिवानीच्या रूपात जिवंत आहे.’ मी सत्यनारायण चेरूकुरी आहे. 'चेरूकुरी वोल्गा आर्चरी अकादमी' चालवतो. 1959 मध्ये आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील नंदीवाडा गावात माझा जन्म झाला. आम्ही एकूण पाच भावंडं होतो - दोन भाऊ आणि तीन बहिणी. वेळेनुसार सर्वजण सोडून गेले... आणि आता मीच एकटा उरलो आहे. त्यावेळी आमचा परिसर दरवर्षी पुराशी झुंजत होता. शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबासाठी परिस्थिती सोपी नव्हती - दरवर्षी काहीतरी उद्ध्वस्त होत असे. याच कारणामुळे, 1964 मध्ये माझ्या आजीच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब विजयवाडा येथे आले. येथे परिस्थिती थोडी सुधारली. आजीने वडिलांना एक बैलगाडी घेऊन दिली, ज्यामुळे त्यांनी सामान वाहून नेण्याचे काम सुरू केले. घर चालू लागले. वडील फक्त शेतकरी किंवा मजूर नव्हते, त्यांना नाचण्याचाही छंद होता. कदाचित तिथूनच माझ्यामध्ये कला आणि खेळ या दोन्हीचे बीज रुजले. वडिलांना वाटत होते की मी कुचिपुडी नर्तक व्हावे. त्यांच्या सांगण्यावरून मी रीतसर नृत्य शिकायला सुरुवातही केली. या वेळेपर्यंत आंध्रमध्ये नृत्यातही माझी एक ओळख निर्माण झाली होती. सर्व काही ठीक चालले होते, पण तेव्हाच लग्न झाले… आणि मग हळूहळू नृत्य सुटले. आयुष्याने जणू त्या वळणावर एक वेगळी दिशा घेतली. नृत्य सुटल्यानंतर माझा कल विद्यार्थी राजकारणाकडे वाढला. त्या काळात मी सीपीआयच्या विद्यार्थी संघटना एआयएसएफ म्हणजेच ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनशी जोडलो गेलो आणि संघटनेच्या कामात सतत सक्रिय राहिलो. याच संदर्भात मला दीर्घकाळ रशियात राहण्याची संधी मिळाली. रशियात विचार बदलणारा काळ होता. तिथे मी लेनिन यांना वाचले आणि हळूहळू त्यांच्या प्रभावाखाली येत गेलो. तिथे अनेकदा म्हटले जायचे की 'लेनिन' म्हणजे लिहिणारे पेन. त्याच वेळी मनात एक गोष्ट बसली – जर कधी मुलगा झाला, तर त्याचे नाव लेनिन ठेवीन. काही वर्षांनी जेव्हा मी भारतात परतलो, तेव्हा आयुष्य पुन्हा सामान्य मार्गावर आले. आधी मला मुलगी झाली. तिचे नाव मी वोल्गा ठेवले आणि तिच्या दीड वर्षानंतर मुलगा झाला. त्याचे नाव लेनिन ठेवले. इकडे, पक्षाच्या कामाच्या निमित्ताने माझे जंगलात आणि आदिवासी भागांतही येणे-जाणे असे. अनेकदा तिथे दिवसेंदिवस थांबावे लागे. तिथेच मी पहिल्यांदा तिरंदाजी जवळून पाहिली. हळूहळू मीही बाण चालवायला शिकलो. जेव्हा घरी परतलो, तेव्हा वाटले की जे शिकलो आहे, ते पुढे नेले पाहिजे. मी लेनिनलाही तिरंदाजी शिकवण्याचा प्रयत्न केला. पण त्यावेळी त्याची रुची कुचिपुडी नृत्यात जास्त होती. तो त्याचमध्ये रमलेला असे. हो, अधूनमधून हौस म्हणून बाण हातात घेत असे. पण एक गोष्ट स्पष्ट होती - लेनिनच्या जन्मासोबतच मी एक स्वप्न पाहिले होते की त्याला तिरंदाजीमध्ये पुढे घेऊन जायचे आहे. फक्त खेळण्यापुरते नाही, तर एक दिवस त्याला आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि प्रशिक्षक म्हणून पाहायचे आहे. याच विचाराने 1997 मध्ये मी सहा मुलांसोबत ‘कृष्णा डिस्ट्रिक्ट आर्चरी अकादमी’ सुरू केली. लेनिन आणि वोल्गा - दोघेही तिथेच सराव करू लागले. तथापि, त्यावेळी लेनिनने तिरंदाजीला करिअर बनवण्याचे ठरवले नव्हते. तो नृत्यातही तितकाच गुंतलेला होता. नंतर 2000 मध्ये एक वळण आले. शालेय खेळांमध्ये लेनिनने तिरंदाजीमध्ये राष्ट्रीय विजेतेपद पटकावले. इथूनच मी ठरवले - आता त्याला याच क्षेत्रात पुढे न्यायचे आहे. मी त्यावेळी देशातील प्रसिद्ध प्रशिक्षक लिंबा राम आणि मंगल सिंह यांना अकादमीशी जोडले. त्यांना सांगितले - लेनिनला तयार करायचे आहे. प्रशिक्षण सुरू झाले. लेनिननेही स्वतःला पूर्णपणे तिरंदाजीमध्ये झोकून दिले. 2003 पर्यंत तो विद्यापीठाचा विजेता बनला होता. नाव होऊ लागले होते. पण घरामध्ये एक वेगळीच चर्चा सुरू होती. माझी मुलगी वोल्गाला वाटत होते की तिचा भाऊ डॉक्टर व्हावा. दोघांमध्ये फक्त दीड वर्षाचे अंतर होते, पण त्यांचे नाते खूप घट्ट होते. वोल्गाला जे काही हवे असायचे ते ती मला नाही, तर थेट लेनिनला सांगायची. तिला थम्स अप प्यायला खूप आवडायचे. लेनिन तिला नकार द्यायचा, ओरडायचाही… पण नंतर तो स्वतःच जाऊन आणायचा. पॉपकॉर्न, चिकन- हे सर्व तोच तिच्यासाठी आणायचा. खरं तर, वोल्गासाठी लेनिन फक्त भाऊ नव्हता- तर तिचा सर्वात विश्वासू साथीदार होता. आणि या काळात वोल्गा स्वतःही मागे नव्हती. 2004 पर्यंत ती अंडर-14, 17 आणि 19 गटांमध्ये खेळली होती. पाच वेळा सुवर्णपदक जिंकले होते. तीरंदाजीमध्ये राष्ट्रीय विजेती होती. घरात एका बाजूला माझे स्वप्न होते- लेनिनने तीरंदाजीमध्ये पुढे जावे आणि दुसऱ्या बाजूला वोल्गाचे स्वप्न- भावाने डॉक्टर व्हावे. दोघे आपापल्या पद्धतीने एकमेकांसाठी जगत होते. लेनिन वैद्यकीय प्रवेश परीक्षेची तयारीही करत होता. तो वोल्गाचे स्वप्न पूर्ण करू इच्छित होता- डॉक्टर बनण्याचे. पण 29 नोव्हेंबर 2004 रोजी अचानक सर्व काही थांबले. दुपारचे साधारण साडेबारा वाजले होते. मी आणि लेनिन स्टेडियममध्ये होतो. मुले सराव करत होती. मी त्यांना बाण पकडण्याची पद्धत समजावून सांगत होतो. सर्व काही सामान्य होते. तेव्हा फोन आला. पलीकडून माझ्या पत्नीच्या रडण्याचा आवाज येत होता. तिने फक्त इतकेच म्हटले- ‘लवकर घरी या… वोल्गा…’ आवाज स्पष्ट नव्हता, पण गोष्ट समजली- काहीतरी गंभीर घडले आहे. मी लेनिनकडे पाहिले आणि म्हटले, ‘चला, घरी जाऊया.’ आम्ही लगेच स्टेडियममधून निघालो. वाटेत मनात एकच प्रश्न होता- काय झाले असेल? घराजवळ पोहोचलो तेव्हा गर्दी दिसली. हृदय धस्स झाले. मी धावत आत गेलो. लेनिन मागे होता. आत पाहिले- वोल्गा जमिनीवर पडली होती. कोणी काही बोलत नव्हते. थोड्याच वेळात स्पष्ट झाले- ती राहिली नाही. कॉलेजमधून स्कूटीवर परत येत होती. घरापासून थोड्याच अंतरावर बसने धडक दिली. जागीच तिचा मृत्यू झाला. सकाळी जाताना फक्त इतकेच म्हटले होते- ‘बाबा, कॉलेजला जात आहे… संध्याकाळी ग्राउंडवर जाऊया.’ ती रोजच्यासारखीच गेली होती. पण त्या दिवशी… ती संध्याकाळ कधीच आली नाही. वोल्गा गेल्यानंतर काहीच समजत नव्हते. अकादमी बंद केली. घरातील वातावरण पूर्णपणे बदलले होते. माझी पत्नी वोल्गाला आठवून-आठवून रडायची. मी त्यांना सांभाळण्याचा प्रयत्न करत होतो, पण मी स्वतःही आतून तुटलो होतो. लेनिन सर्वात जास्त बदललेला दिसत होता. तो जवळजवळ शांत झाला होता. कमी बोलायचा. फक्त कधीकधी विचारायचा- ‘बाबा, हे काय झाले… देवाने दीदीला का नेले?’ या सगळ्यामध्येही लेनिनने तिरंदाजी सोडली नाही. तो सरावासाठी जात राहिला. कदाचित तोच त्याचा आधार होता. काही दिवसांनी त्याचा एमबीबीएसमध्ये प्रवेश झाला. त्याने अभ्यास सुरू केला. पण घरातील शांतता कायम राहिली. जवळपास दोन वर्षे आम्ही पती-पत्नी घरातून बाहेर पडलो नाही. कोणाला भेटलो नाही, बोललो नाही. घरात आधी जे आवाज होते - हसणे, भांडणे, ते सर्व संपले. याच दरम्यान लेनिनने एके दिवशी स्पष्ट सांगितले - ‘बाबा, मी एमबीबीएस करणार नाही. मला तिरंदाजी करायची आहे. आपण पुन्हा अकादमी सुरू केली पाहिजे.’ त्या दिवशी तो आम्हाला अकादमीत घेऊन गेला. पहिल्या दिवशी अकादमीत पोहोचलो तेव्हा सर्व काही सुनसान होते. मैदान रिकामे पडले होते. काही जुने लक्ष्य धुळीत पडले होते. लेनिनने स्वतः जाऊन धनुष्यबाण उचलले. काही मुलांना बोलावले, जे आधी इथे येत होते. हळूहळू ४-५ मुले आली. तो त्यांना रांगेत उभे करत असे, बाण पकडण्याची पद्धत सांगत असे. स्वतः प्रात्यक्षिक दाखवत असे. ‘असे पकडा… लक्ष सरळ ठेवा…’ मी आणि माझी पत्नी एका बाजूला उभे राहून पाहत होतो. थोड्या दिवसांत त्या मैदानात पुन्हा आवाज ऐकू येऊ लागले - बाण लागण्याचा आवाज, मुलांची लगबग. अकादमी पुन्हा सुरू झाली. हळूहळू मुले वाढू लागली… आणि ती जागा पुन्हा जिवंत होऊ लागली. अकादमी पुन्हा सुरू झाली, तेव्हा लेनिनने आणखी एक निर्णय घेतला. तो म्हणाला- आता तिचे नाव ‘वोल्गा आर्चरी अकादमी’ असेल. त्याचा तर्क स्पष्ट होता- ‘वोल्गाला जग ओळखेल. तिचे नाव इथूनच जिवंत राहील.’ आणि त्याच नावाने अकादमी सुरू झाली. यानंतर लेनिन पूर्णपणे यात गुंतला. तो स्वतःही प्रशिक्षण घेत असे आणि लहान मुलांना शिकवत असे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत मैदानात असे. हळूहळू परिणाम दिसू लागले. मुले वाढू लागली. जुने खेळाडू परतले. काही नवीन जोडले गेले. अकादमी पुन्हा राष्ट्रीय स्तरापर्यंत खेळाडूंना पाठवू लागली. याच दरम्यान त्याने एक मोठा निर्णय घेतला. एमबीबीएस सोडून दिले. त्याला माहीत होते की, तिरंदाजी माझ्यासाठी फक्त खेळ नाही, तर जीवन आहे. कदाचित त्याला हेही समजले होते की, मी आता एकटा हे सांभाळू शकणार नाही. त्याने कुचिपुडी नृत्यही सोडून दिले. हळूहळू त्याने आपले सर्व मार्ग सोडून एकच दिशा निवडली - तिरंदाजीची. खरं तर, तो फक्त आपले करिअर घडवत नव्हता. तो माझे स्वप्न आणि वोल्गाची आठवण - या दोन्ही गोष्टी सोबत घेऊन चालला होता. 2005 पर्यंत परिस्थिती पूर्णपणे बदलली होती. देशाच्या वेगवेगळ्या भागांतून मुले येथे येऊ लागली होती. इकडे, लेनिन स्वतःही पुढे जात होता. केरळमध्ये त्याने राष्ट्रीय विजेतेपद जिंकले. आंध्र प्रदेशसाठी सुवर्णपदक आणले आणि मग- त्याची भारतीय संघात निवड झाली. आता तो फक्त प्रशिक्षकाचा मुलगा नव्हता, तर स्वतः एक उदयोन्मुख आंतरराष्ट्रीय खेळाडू बनला होता. मुलीच्या जाण्यानंतर घरात शांतता होती, पण आता पूर्ण लक्ष लेनिनवर होते. तोच आशा होता. तोच आधार. हळूहळू आम्ही तिघे- मी, माझी पत्नी आणि लेनिन वोल्गाच्या आठवणींसोबत तेच स्वप्न जगू लागलो. लेनिननेही स्वतःला पूर्णपणे तिरंदाजीमध्ये झोकून दिले. लहान वयातच त्याची ओळख निर्माण होऊ लागली. फक्त 18 वर्षांच्या वयात तो लेव्हल-3 प्रशिक्षक बनला. तिरंदाजीच्या 'कंपाउंड बो' या तंत्रात त्याची कामगिरी सातत्याने सुधारत गेली. राष्ट्रीय जिंकले, मग आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमावले. तो सिंगापूरला गेला, तिथे प्रशिक्षण घेतले. तिथल्याच एका प्रशिक्षकाने मला सांगितले होते- 'लेनिन खूप पुढे जाईल.' त्यावेळी ही गोष्ट प्रोत्साहन देत होती… आणि नंतर ती खरीही ठरली. 2010 येईपर्यंत लेनिन एक प्रसिद्ध खेळाडू बनला होता. त्याच वर्षी कॉमनवेल्थ गेम्समध्ये आमच्या अकादमीच्या खेळाडूंनी रौप्य पदके जिंकली. राज्य सरकारने 23 सप्टेंबर रोजी हैदराबादमध्ये त्याला सन्मानित करण्यासाठी बोलावले. कार्यक्रम संपला. मुसळधार पाऊस होता. आम्ही गाडीने विजयवाड्याकडे परत येत होतो. विजयवाड्यामध्ये हजारो लोक त्याच्या स्वागताच्या प्रतीक्षेत होते. संध्याकाळचे साधारण 4:40 वाजले होते. विजयवाड्यापासून काही अंतरावर अचानक समोरून एका ऑटोने यू-टर्न घेतला. लेनिन गाडी चालवत होता. त्याने वाचवण्याचा प्रयत्न केला, ब्रेक दाबला… गाडी उसळली… आणि काही सेकंदात सर्व संपले. लेनिन दूरवर जाऊन पडला. जागीच त्याचा मृत्यू झाला. मी पण जखमी झालो होतो. डोक्याला मार लागला होता, हात मोडला होता… पण त्याहून मोठा धक्का हा होता की ज्या दिवशी त्याला सन्मान मिळाला, त्याच दिवशी तो निघून गेला. माझा 24 वर्षांचा मुलगा, जो देशासाठी खेळत होता… राहिला नाही. त्याने त्याच्या छोट्याशा कारकिर्दीत खूप काही केले होते. राष्ट्रीय विजेता राहिला, भारतीय संघाचा भाग राहिला. रेल्वेमध्ये नोकरी मिळाली आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे- अकादमी उभी केली. आता जेव्हा मी अकादमीमध्ये पाहतो, तेव्हा प्रत्येक कोपरा त्याची आठवण करून देतो. तो गेल्यानंतर एका क्षणासाठी वाटले - सर्व संपले. पण मग एक प्रश्न समोर होता - जी मुले येथे शिकत आहेत, त्यांचे काय होईल? मी त्याच दिवशी ठरवले - अकादमी बंद होणार नाही. ज्या दिवशी लेनिनचा मृत्यू झाला… त्याच दिवशी मी अकादमीत गेलो. काम केले. संध्याकाळी मुले माझ्याकडे आली. म्हणाले - ‘सर, आम्ही सर्व लेनिन आहोत… तुम्ही एकटे नाही.’ त्यांचे बोलणे ऐकून वाटले - कदाचित हाच मार्ग आहे. त्या दिवसानंतर अकादमी एका दिवसासाठीही बंद झाली नाही. पण लेनिन गेल्यानंतर पुन्हा माझी पत्नीच मला धीर दिला. ती म्हणाली की आता घरात राहायचं नाहीये. आधी आम्ही अकादमीपासून थोडे दूर राहत होतो. लेनिन गेल्यानंतर मी आणि माझी पत्नी अकादमीमध्येच शिफ्ट झालो. आम्ही इथेच राहू लागलो. पत्नी म्हणाली की अकादमीची मुले आता आमची मुले आहेत. मग वोल्गा आणि लेनिन दोघांच्या नावावर असलेली मालमत्ता मी अकादमीला दिली. लेनिनला जाऊन दीड वर्षांहून अधिक काळ झाला होता. घर आणि अकादमी- दोन्हीही जणू शांत होते. त्याच दरम्यान एक दिवस माझी पत्नी म्हणाली- तिला बाळ हवं आहे. माझे वय 55 वर्षे होते. एका क्षणासाठी वाटले- ही योग्य वेळ आहे का? पण मग वाटले, कदाचित हाच पुढे जाण्याचा मार्ग आहे. मी होकार दिला. 2012 मध्ये आमच्या घरी शिवानीचा जन्म झाला. सुरुवातीपासूनच तिच्यात काहीतरी वेगळेपण होते. मी तिला पाहिलं की... मला वारंवार लेनिनची आठवण यायची. हळूहळू ही भावना अधिक तीव्र होत गेली- तिचे हावभाव, चालण्याची पद्धत, खेळण्याची शैली... सर्व काही कुठेतरी लेनिनसारखे वाटत होते. दोन वर्षांची झाल्यावर, मी तिच्या हातात धनुष्य दिले. हा काही ठरलेला निर्णय नव्हता, सहजच. तिने ते पकडले… आणि मग सोडायचेच नाही म्हटले. ती याच अकादमीमध्ये लहानाची मोठी झाली. मैदान, लक्ष्य, बाण - हेच तिचे खेळणे होते. वेळेनुसार तिने स्वतःची ओळख निर्माण करायला सुरुवात केली आहे. आज ती अंडर-9 तिरंदाजीमध्ये देशाची चॅम्पियन आहे आणि अंडर-12 आणि अंडर-14 मध्ये विश्व चॅम्पियन तिरंदाज आहे. अमेरिका आणि जर्मनीमधून लोक तिच्यावर डॉक्युमेंटरी बनवण्यासाठीही आले होते. आता ती पुढील तयारी करत आहे. लक्ष्य आहे - ऑलिम्पिक पदक जिंकणे. मी अनेकदा म्हणतो- मला शिवानी नाही, तिच्यात लेनिन दिसतो. माझी दोन मुले गेली… पण माझ्यासाठी लेनिन कुठेही गेला नाही. तो दररोज इथेच आहे- शिवानीच्या सवयींमध्ये, तिच्या मेहनतीत, तिच्या खेळात. कदाचित म्हणूनच मी आता मागे वळून जास्त पाहत नाही. फक्त एकच गोष्ट मनात राहते- लेनिनचे नाव पुढे न्यायचे आहे. पण यावेळी माझ्यासोबत धक्कादायक गोष्ट घडली आहे. माझ्या अकादमीतून तयार झालेल्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंना काही प्रशिक्षकांनी पैसे देऊन विकत घेतले आहे. त्या चॅम्पियन खेळाडूंनी पैसे घेऊन त्यांना आपले प्रशिक्षक सांगितले आहे, तर त्यांचा प्रशिक्षक माझा मुलगा लेनिन होता. मी या प्रकरणाला न्यायालयात आव्हान दिले आहे. गुरु-शिष्य परंपरेला तोडून काही लोक पैशांसाठी विकले गेले, तेव्हा माझे मन खूप दुखावले. जेव्हा ते मुलाखतींमध्ये लेनिनऐवजी दुसऱ्या कोणाचे नाव घेतात, तेव्हा मला दुःख होते. (सत्यनारायण चेरूकुरी यांनी आपल्या या भावना भास्कर रिपोर्टर मनीषा भल्ला यांच्याशी शेअर केल्या)

दिव्यमराठी भास्कर 22 Mar 2026 11:55 am

उन्हाळी सुट्ट्यांसाठी मध्य रेल्वेकडून विशेष गाड्यांची घोषणा

मुंबई : उन्हाळ्यातील सुट्ट्या आणि लग्नसराईमुळे वाढलेल्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे. वाढती मागणी लक्षात घेऊन लोकमान्य टिळक टर्मिनस – नागपूर आणि पुणे – नागपूर या मार्गांवर विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.लोकमान्य टिळक टर्मिनस – नागपूर विशेष गाडीच्या दोन फेऱ्या चालवल्या जाणार आहेत. गाडी क्रमांक ०१०२१ ही विशेष गाडी ३ एप्रिल २०२६ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून रात्री १२:५५ वाजता सुटून त्याच दिवशी दुपारी ३:४५ वाजता नागपूर येथे पोहोचेल.परतीच्या प्रवासासाठी गाडी क्रमांक ०१०२२ ही विशेष गाडी ३ एप्रिल २०२६ रोजी नागपूर येथून रात्री ८ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ११:४५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. या विशेष गाडीला ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा या स्थानकांवर थांबे देण्यात येणार आहेत.गाडीची रचना एक वातानुकूलित द्वितीय श्रेणी, सहा वातानुकूलित तृतीय श्रेणी, नऊ शयनयान, चार सामान्य द्वितीय श्रेणी आणि एक सामान्य द्वितीय श्रेणी-सह-गार्ड ब्रेक व्हॅन अशी असेल. प्रवाशांच्या सोयीसाठी आणि वाढत्या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे.

फीड फीडबर्नर 22 Mar 2026 11:30 am

Mumbai Metro: मेट्रो प्रवाशांसाठी महत्त्वाची अपडेट; आता मेट्रोमध्ये मोबाईल पूर्णपणे बंद राहणार

मुंबई : मेट्रोने दररोज प्रवास करणाऱ्यांसाठी एक आश्चर्यजणक बातमी समोर आलेली आहे. आता मेट्रोतून प्रवास करताना तुमचा मोबाईल पूर्णपणे बंद राहणार आहे. सर्व प्रकार समोर येताच प्रवाशांमध्ये गोंधळाचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.गेल्या काही दिवसांपासून मेट्रोने प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली असून भुयारी मेट्रोनेही असंख्यजण प्रवास करत आहेत. पण भुयारी मेट्रोच्या दक्षिण मुंबईतील स्थानकांत प्रवाशांना इंटरनेट सेवेमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून अजूनही या स्थानकांच इंटरनेट सेवा सुरु झाली नाही. आता दुसऱ्या बाजूला आरे ते बीकेसीपर्यंत सुरु असलेली इंटरनेट सेवाही आता बंद करण्यात आलेली आहे.नेमकं कारण काय?समोर आलेल्या माहितीनुसार,जी इंटरनेटसाठी यंत्रणा उभी करणारे कंत्राटदार होते, त्यातील कंत्राटदराने कंत्राटातील अटी आणि शर्थींचे उल्लंघन केले असल्याने एमएमआरसीएलने हे कंत्राट रद्द केले आहे.मेट्रो ३ आरे ते कफ परेड ही भुयारी मार्गिका ३३.५ किमीची असून ऑक्टोबर २०२४ मध्ये आरे ते बीकेसी हा टप्पा सुरु करण्यात आलेला होता. मग यानंतर बीकेसी ते आचार्य अत्रे चौक हा टप्पा २०२५ मध्ये सुरु करण्यात आला आणि त्यात सर्व भुयारी मार्गिकांमध्ये इंटरनेट सेवा देण्यात आली होती. मात्र आता काही महिन्यात सुरु करण्यात आलेल्या आचार्य आत्रे ते कफ परेड या शेवटच्या टप्प्यात इंटरनेट सेवा सुरु करण्यात आलेली नाही.यावर पर्याय म्हणून लवकरच नव्याने ही यंत्रणा उभारण्यासाठी पुन्हा एकदा निविदा काढली जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक असणारी संपर्क यंत्रणा भुयारी मेट्रो स्थानकांत उपलब्ध असल्याचे एसएसआरसीएलकडून सांगण्यात आलेले आहे.आरे ते वरळी या पहिल्या टप्प्यातील मेट्रो स्थानकांवर एअरटेल आणि वोडाफोन तसेच जिओचे नेटवर्क प्रवाशांसाठी उपलब्ध होते. परंतू नेटवर्कची यंत्रणा उभारणाऱ्या कंपनीकडून जास्त प्रमाणात शुक्लाची मागणी केली जात असल्याचे कारण देत या कंपन्यांनी माघार घेतल. मग परत काही कंपन्यांची सेवा पुन्हा सुरु करण्यात एमएमआरसीएलला यश आले. मात्र आता ही यंत्रणा उभारणारी कंपनी तसेच सेवा पुरवठादार कंपन्यांमधील मतभेद कायम राहिलेले आहे.

फीड फीडबर्नर 22 Mar 2026 11:30 am

Iran-US-Israel War : ट्रम्प यांचा इराणला ४८ तासांचा अल्टिमेटम; होर्मुज सामुद्रधुनी खुली करा, अन्यथा ...

अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील तणाव आता अत्यंत गंभीर टप्प्यावर पोहोचला आहे. गेल्या तीन आठवड्यांपासून सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला थेट ४८ तासांचा अल्टिमेटम दिला आहे. होर्मुज सामुद्रधुनी जहाजांच्या वाहतुकीसाठी तात्काळ खुली न केल्यास, अमेरिकन वायूसेना इराणच्या वीज प्रकल्पांवर हल्ले करून त्यांना उद्ध्वस्त करेल, असा थेट इशारा त्यांनी दिला आहे. विशेष म्हणजे, या कारवाईची सुरुवात इराणमधील सर्वात मोठ्या वीज प्रकल्पापासून केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.नेमकं प्रकरण काय?इराण-इस्रायल संघर्ष सुरू झाल्यापासून इराणने आपल्या सागरी हद्दीतील अत्यंत महत्त्वाचा मार्ग असलेली होर्मुज सामुद्रधुनी बंद ठेवली आहे. जगातील एकूण तेल पुरवठ्यापैकी सुमारे २० टक्के वाहतूक या मार्गावरून होते. त्यामुळे या मार्गावरील अडथळ्यांमुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती झपाट्याने वाढल्या आहेत.या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रुथ या सोशल प्लॅटफॉर्मवरून इराणला इशारा देत, “४८ तासांत मार्ग खुला करा, अन्यथा परिणामांना सामोरे जावे लागेल,” असे स्पष्ट केले आहे.तेल दरांचा भडका उडण्याची शक्यताइराणच्या भूमिकेमुळे जागतिक ऊर्जा बाजारावर मोठा दबाव निर्माण झाला आहे. अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसेन्ट यांच्या माहितीनुसार, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी अमेरिकेने इराणी तेलावरील काही निर्बंध तात्पुरते शिथिल केले आहेत. यामुळे सुमारे १४ कोटी बॅरल तेल बाजारात येऊ शकते. मात्र, इराणने आपली भूमिका कायम ठेवली, तर लष्करी कारवाई अपरिहार्य ठरू शकते, असे संकेत अमेरिकेकडून देण्यात आले आहेत.इस्रायलचा दावा: संघर्ष अधिक तीव्रदरम्यान, इस्रायलने दावा केला आहे की इराणने प्रथमच लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा वापर केला आहे. यामुळे संघर्षाचा विस्तार होण्याची भीती वाढली आहे. ट्रम्प यांनीही स्पष्ट केले की, होर्मुज सामुद्रधुनीची सुरक्षा ही केवळ अमेरिकेची जबाबदारी नसून, या मार्गाचा वापर करणाऱ्या इतर देशांनीही यात सक्रिय भूमिका घ्यायला हवी.

फीड फीडबर्नर 22 Mar 2026 11:10 am

Iran Responds Trump: ट्रम्पच्या ४८ तासांच्या अल्टिमेटमला इराणचे प्रत्युत्तर ; आखाती देशांमधील अमेरिकी ठिकाणांवर क्षेपणास्त्रे डागण्याची दिली धमकी

Iran Responds Trump: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टिमेटमला इराण घाबरलेला नाही. उलट, त्याने अमेरिका आणि इस्रायलला धमकी दिली आहे.

दैनिक प्रभात 22 Mar 2026 11:03 am

Pune Accident News : जांभुळवाडी दरी पुलावर भीषण अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली

Pune Accident News : जांभुळवाडी दरी पुलावर रात्री सुमारे पावणे बाराच्या सुमारास 3 ते 4 वाहनांचा भीषण अपघात झाला.

दैनिक प्रभात 22 Mar 2026 10:41 am

Jalgaon: प्रेमविवाह केल्याच्या रागातून तरुणाला विवस्त्र करुन काढली धिंड; जळगावमधील क्रूर घटना

जळगाव: प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलीच्या नातेवाईकांनी तरुणाला नग्न करून बेदम मारहाण करून त्याची गावभर धिंड काढल्याचा प्रकार जळगाव जिल्ह्यात भुसावळ तालुक्यात समोर आला आहे. या घटनेत पोलिसांनी दहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पाच जणांना अटक करण्यात आली आहे. जखमी तरुणाला रुग्णालयात भरती करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.भुसावळ तालुक्यातील खडका गावातील चेतन दिलीप जंगले या तरुणाने आपल्याच समाजातील धनश्री पाटील या तरुणीशी नाशिक पंचवटी येथे जाऊन प्रेम विवाह केला, मात्र हा विवाह मुलीच्या माहेरच्या लोकांना मान्य नव्हता, विवाह झाल्याच्यानंतर चेतन जंगले हा त्याच्या पत्नीसह त्याच्या नातेवाईकांच्याकडे आल्याची माहिती मुलीच्या नातेवाईकांना मिळताच त्यांनी खडका गावात जाऊन चेतन जंगले सह त्याच्या पत्नीला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी काही जणांनी त्याला नग्न करून गावात धिंड काढल्याचा ही धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बेदम मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न होत असल्याचे लक्षात आल्यावर गावातील काही जणांनी मध्यस्थी करून त्याची सुटका केली, त्यामुळे अनर्थ टळला असला तरी, या संपूर्ण घटनेने समाज मन सुन्न झाले आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता,पोलिसांनी तातडीने मारहाण करणाऱ्या दहा बारा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करून पाच जणांना अटक केली आहे.तर मिळालेल्या माहितीनुसार, प्रेमविवाहाच्या वादातून तरुणाला नग्न करून खांबाला बांधून मारहाण केल्याची ही खळबळजनक घटना भुसावळ तालुक्यात घडली. या प्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पाच जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका गावातील तरुण- तरुणीने १८ मार्च २०२६ रोजी नाशिक येथे प्रेमविवाह केला. विवाहानंतर १९ मार्च रोजी त्यांनी भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात हजर राहून विवाहाची माहिती दिली आणि दोघे जण तरुणाच्या मामाच्या घरी मुक्कामी होते.२० मार्च रोजी तरुणीचे नातेवाइक व इतर १० ते १२ जणांनी तरुणाच्या मामाच्या घरी जाऊन तरुणीला मारहाण करत पळवून नेले. यानंतर संशयितांनी तरुणास खांबाला बांधून नग्न करत, लोखंडी रॉड व दगडाने मारहाण केली. त्यानंतर संशयितांनी या तरुणाला दुचाकीने त्यांच्या गावातील घरापर्यंत आणत मारहाण केली. त्याच्या आई-वडिलांनाही घर जाळण्याची धमकी दिली. जखमी अवस्थेत तरुणाला जळगाव जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याचा हात फॅक्चर झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या प्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फीड फीडबर्नर 22 Mar 2026 10:30 am

पंतप्रधान मोदींनी केली इराणी राष्ट्राध्यक्षांशी फोनवर चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (२१ मार्च) इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेशकियन यांच्याशी दूरध्वनीवर संवाद साधत त्यांना ईद आणि नौरोजच्या शुभेच्छा दिल्या. या चर्चेदरम्यान पश्चिम आशियात शांतता, स्थिरता आणि समृद्धी नांदावी, अशी आशा व्यक्त करण्यात आली. यासंदर्भात पंतप्रधानांनी ट्विटरवर (एक्स) पोस्ट लिहून माहिती दिली आहे.याप्रसंगी दूरध्वनीवर संवाद साधतांना पंतप्रधानांनी इरणमधील महत्त्वाच्या पायाभूत सुविधांवर होत असलेल्या हल्ल्यांचा तीव्र निषेध केला. असे हल्ले प्रादेशिक स्थिरतेसाठी धोकादायक ठरत असून जागतिक पुरवठा साखळीवरही त्याचा परिणाम होत असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी समुद्री मार्गांची मुक्तता कायम ठेवण्यावरही भर देण्यात आला. व्यापार सुरळीत चालण्यासाठी जलमार्ग खुले आणि सुरक्षित राहणे अत्यंत आवश्यक असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.इराणमध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी इराण सरकारकडून मिळत असलेल्या सहकार्याबद्दल पंतप्रधानांनी कृतज्ञता व्यक्त केली.दरम्यान, नौरोजच्या निमित्तानेही पंतप्रधानांनी नागरिकांना शुभेच्छा देत सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्य लाभावे, अशी कामना व्यक्त केली. नौरोज हा पारशी आणि इराणी समुदायाचा नववर्षाचा सण असून वसंत ऋतूच्या प्रारंभी साजरा केला जातो.

फीड फीडबर्नर 22 Mar 2026 10:30 am

Iran Israel War: इराणचा इस्रायलमधील डिमोना शहरावर हल्ला, मराठी बहुल भागातील ४७ जण जखमी

तेल अवीव: इस्रायल आणि इराणमधील संघर्षाने शनिवारी रात्री एक अत्यंत भयावह वळण घेतले. इराणने डागलेले एक बॅलिस्टिक क्षेपणास्त्र दक्षिण इस्रायलमधील डिमोना (Dimona) शहरावर कोसळले. इस्रायलमधील हा भाग तिथल्या मोठ्या भारतीय समुदायामुळे 'लिटिल इंडिया' म्हणूनही ओळखले जाते. याच भागात मराठी भाषिकांचे प्रमाण अधिक आहे. या भीषण हल्ल्यात एका १२ वर्षीय मुलासह किमान ४७ जण जखमी झाले असल्याचे वृत्त आहे. इराणने डागलेले मिसाईल इस्रायलच्या हवाई सुरक्षा यंत्रणेला रोखण्यास अपयश आले. त्यामुळे आता इस्रायलची हवाई सुरक्षा यंत्रणा कमकुवत झाली का, याची चर्चा सुरू झाली आहे.डिमोना शहरात जवळपास ३० टक्के लोकसंख्या म्हणजे सुमारे ७,५०० भारतीय वंशाचे ज्यू राहतात. यातील बहुतांशी जण जे मूळचे महाराष्ट्रातील आहेत. येथे अनेक घराघरात मराठी बोलली जाते आणि गल्लीबोळात भारतीय खाद्यपदार्थ (सोनपापडी, भेळपुरी, गुलाबजाम) सहज मिळते. इराणचे क्षेपणास्त्र एका कम्युनिटी बिल्डिंगवर पडल्याने आसपासच्या जुन्या घरांचेही मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने, सायरेन वाजताच बहुतांश नागरिक सुरक्षित निवाऱ्यात (Shelters) पोहोचल्याने मोठी जीवितहानी टळली.टार्गेटवर कोण?इस्रायलने शनिवारी, इराणच्या नतांझ या अणू प्रकल्पावर हल्ला केला. इराणचं आण्विक केंद्र उद्धवस्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने इस्रायलच्या डिमोना शहरावर हल्ला केला. डिमोना शहरात इस्रायलचा अणू प्रकल्प आहे. इराणच्या हल्ल्यात डिमोना येथील अणू संशोधन केंद्र सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे.जखमींची प्रकृती कशी?'मॅगन डेव्हिड ॲडम' (MDA) या आपत्कालीन संस्थेच्या माहितीनुसार,ढिगाऱ्याखाली दबल्याने आणि छर्रे लागल्याने एक १२ वर्षांचा मुलगा गंभीर जखमी आहे. ३१ जणांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. १४ जणांना प्रचंड मानसिक धक्क्यामुळे (Anxiety) रुग्णालयात दाखल करावे लागले आहे.इस्रायलची हवाई यंत्रणा अपयशी...हवाई संरक्षण यंत्रणा हे क्षेपणास्त्र हवेतच रोखण्यात अपयशी ठरली असल्याची कबुली इस्रायली संरक्षण दलाने (IDF) दिली आहे. इराणने या हल्ल्याला आपल्या 'नतांझ' अणू केंद्रावरील हल्ल्याला 'प्रत्युत्तर' असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, डिमोना येथील अणू संशोधन केंद्र सुरक्षित असून तिथे कोणतेही नुकसान झाले नसल्याचे आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेने (IAEA) स्पष्ट केले आहे.

फीड फीडबर्नर 22 Mar 2026 10:30 am

Jhimma 3 Film : हेमंत ढोमेचे चाहत्यांना सरप्राइज; नव्या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर

Jhimma 3 Film: पोस्टरमध्ये सिद्धार्थ चांदेकर एका समुद्रकिनारी डोक्याला हात लावून उभा असलेला पाहायला मिळत आहे.

दैनिक प्रभात 22 Mar 2026 10:17 am

India LPG Crisis: इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर मोठा दिलासा ; हजारो टन LPG घेऊन येणारे ‘पायक्सिस पायोनियर’जहाज भारतात दाखल

India LPG Crisis: मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धामुळे आशियाई देशांना गॅस आणि तेलाच्या तीव्र तुटवड्याचा सामना करावा लागत आहे. भारतही एलपीजीच्या संकटाचा सामना करत आहे.

दैनिक प्रभात 22 Mar 2026 10:01 am

Eknath Shinde : “एकनाथ शिंदेंना गुवाहाटीचा मार्ग अशोक खरातनेच दाखवला”; उद्धव ठाकरेंच्या बड्या नेत्याचे खळबळजनक विधान

Eknath Shinde : अशोक खरात प्रकरणावर भाष्य करताना उद्धव ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी खळबळजनक विधान केले आहे.

दैनिक प्रभात 22 Mar 2026 9:43 am

Navi Mumbai: शिक्षिकेचं भयंकर कृत्य; दोन विद्यार्थ्यांनी संपवलं आयुष्य

नवी मुंबई: नवी मुंबईतील घणसोली परिसरात एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. येथील एका नामांकित शाळेतील शिक्षिकेवर तीन विद्यार्थ्यांवर मोबाईल चोरीचा खोटा आरोप करत त्यांच्या पालकांकडून पैशांची मागणी केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे दोन निष्पाप विद्यार्थ्यांनी टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला असून, त्यापैकी एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.समोर आलेल्या माहितीनुसार, संबंधित शिक्षिकेने शाळेत शिकणाऱ्या तीन विद्यार्थ्यांवर मोबाईल चोरीचा आरोप केला. त्यानंतर विद्यार्थ्यांना वारंवार मानसिक दबावाखाली ठेवत त्यांच्या आईकडे पैशांची मागणी केल्याचा आरोप आहे. इतकेच नव्हे, तर “पैसे दिले नाहीत तर मुलांना परीक्षेला बसू दिले जाणार नाही,” अशी धमकीही देण्यात आल्याचे समोर आले आहे. या सततच्या दबावामुळे आणि भीतीमुळे विद्यार्थ्यांवर प्रचंड मानसिक ताण निर्माण झाला.२ विद्यार्थ्यांनी उचलले टोकाचे पाऊलया मानसिक तणावातून दोन विद्यार्थ्यांनी अत्यंत टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला. या घटनेत एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असून दुसऱ्यावर उपचार सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. या दुर्दैवी घटनेनंतर पालक, नागरिक आणि सामाजिक संघटनांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या मानसिक सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.विद्यार्थ्यांवर होणारा मानसिक ताण, धमक्या आणि अन्यायकारक वागणूक यामुळे किती गंभीर परिणाम होऊ शकतात, याचे हे भीषण उदाहरण मानले जात आहे. या प्रकरणात संबंधित शिक्षिकेवर तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, तसेच शाळा प्रशासनाचीही सखोल चौकशी करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.

फीड फीडबर्नर 22 Mar 2026 9:30 am

Accidents : ओल्या कचऱ्याच्या लिचेटने अपघात वाढले; कचऱ्याचे पाणी रस्त्यावर पडल्याने वाहनचालकांची कसरत

Accidents : महापालिकेकडून शहरातील हाॅटेलचा ओला कचरा संकलन तसेच घरोघरी कचरा संकलित झाल्यानंतर तो कचरा हस्तांतरण केंद्रावरून कचरा प्रकल्पाच्या ठिकाणी मोठ्या डंपरमधून नेला जातो. मात्र, या डंपरमधून या कचऱ्यात असलेले तेलाचे पाणी तसेच कुजलेल्या कचऱ्यामधून निघणारे लिचेट रस्त्यावर पडत असल्याने, वाहने घसरण्याचे प्रकार लक्षणीय प्रमाणात वाढले असून महापालिका प्रशासनाने तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली जात […]

दैनिक प्रभात 22 Mar 2026 9:12 am

Mulshi Water : पुणेकरांना आता मुबलक पाणी? मुळशीचे पाणी देण्यास सरकार अनुकूल

Mulshi Water: पाणी वितरणासाठी पालिकेस लागणार चार-पाच हजार कोटी

दैनिक प्रभात 22 Mar 2026 8:47 am

Top 10 News: SIT कडून अशोक खरातची 7 तास चौकशी, चाकणकरांचे महिला प्रदेशाध्यक्षपदही जाणार? आणि महाराष्ट्र केसरीचा आज रंगणार अंतिम थरार, वाचा अशा टॉप १० बातम्या

Top 10 News: महिलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी भोंदूबाबा अशोक खरातवर बलात्काराचा गुन्हा दाखल असून त्याची SIT कडून चौकशी केली जात आहे.

दैनिक प्रभात 22 Mar 2026 8:47 am

Dilip Walse Patil : अध्यात्माच्या नावाखाली कर्मकांड करू नये : माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

Dilip Walse Patil : निरगुडसर (ता.आंबेगाव) येथे श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त श्री स्वामी समर्थ ग्राम अभियान व पालखी ग्राम प्रदक्षिणा आयोजित कार्यक्रमप्रसंगी माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील बोलत होते.

दैनिक प्रभात 22 Mar 2026 8:47 am

Aspire scheme : अस्पायर’योजनेत वयोमर्यादेचा अडसर; संशोधन योजनेत अनुभवी प्राध्यापकांना संधी देण्याची मागणी

Aspire scheme : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अस्पायर या महत्त्वाकांक्षी संशोधन योजनेचा लाभ घेण्यासाठी लादण्यात आलेल्या ४० वर्षांच्या वयोमर्यादेमुळे शिक्षण वर्तुळात उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहे. या अटीमुळे केवळ तरुण प्राध्यापकांनाच संधी मिळत असून, प्रदीर्घ अनुभव असणारे ४० वर्षांवरील प्राध्यापक या योजनेपासून वंचित राहात आहेत. संशोधनासाठी वयाचा निकष लावल्याने गुणवत्तेवर मर्यादा येत असल्याची टीका होत असून, […]

दैनिक प्रभात 22 Mar 2026 8:38 am

Pune District : गॅस टंचाईवर देशी उपाय! गोबरगॅस प्रकल्पांची वाढ; इंधनासोबत खताचाही दुहेरी फायदा

Pune District : शहरांमध्ये गॅस सिलिंडरसाठी लांबच लांब रांगा लागत असताना, आळेफाटा परिसरातील अनेक शेतकरी घरातील शेण व सेंद्रिय कचर्‍यापासूनच दररोज गॅस तयार करून स्वयंपाक आणि पाणी तापवण्यासाठी वापरत आहेत.

दैनिक प्रभात 22 Mar 2026 8:31 am

Pune News : सुट्टीच्या दिवशीही भरता येणार मिळकतकर

Pune News : विहित मुदतीत कर भरण्याचे पालिकेचे आवाहन; ३१ मार्चपर्यंत साप्ताहिक सुटीला कार्यालये सुरू

दैनिक प्रभात 22 Mar 2026 8:20 am

Pune District : चाकणमध्ये गॅस टंचाईचा ‘स्फोट’ ; पुणे-नाशिक महामार्ग रोखत नागरिकांचा संताप उसळला

Pune District : पोलिसांनी नागरिकांशी संवाद साधून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. काही वेळानंतर वाहतूक सुरळीत करण्यासाठी हालचाली करण्यात आल्या, मात्र नागरिकांचा रोष कायम असल्याचे चित्र होते.

दैनिक प्रभात 22 Mar 2026 8:18 am

LPG Cylinder: गॅस सिलिंडर बुक होत नसेल तर कुठे तक्रार कराल? 'या'हेल्पलाईन नंबरवर तात्काळ मिळेल मदत

मुंबई: मागील काही दिवसांपासून अनेक लोकांना एलपीजी सिलिंडर बुक करताना काही समस्यांना सामोरं जावं लागत आहे. सिलिंडर बुक झाल्यावर त्याची डिलिव्हरी होत नसल्याच्या तक्रारी काही ग्राहकांनी केल्या आहेत. त्यामुळे लोकांना गॅस एजन्सित अनेक फेऱ्या माराव्या लागत आहेत. जर तुम्हालाही सिलिंडर बुक करण्यापासून डिलिव्हरी पर्यंतच्या समस्या जाणवत असतील, तर खाली दिलेल्या क्रमांकावर तुम्ही तक्रार नोंदवू शकता. याबाबतची सविस्तर माहिती जाणून घ्या.सिलिंडर बुक करताना का येतात अडचणी?'नवे नियम' हा बुकिंग न होण्यामागचं सर्वात मोठं कारण आहे.सरकारने नुकतच गॅस पुरवठा सुरळीत करण्यासाठी बुकिंग नियमांमध्ये बदल केलाय. त्यामुळे आता घरगुती गॅस सिलिंडरमध्ये कमीत कमी 25 दिवसांचा गॅप अनिवार्य केला आहे. तुम्ही जर आताच सिलिंडर घेतलं असेल, तर २५ दिवस पूर्ण झाल्याशिवाय तुम्हाला दुसरं सिलिंडर बुक करता येणार नाही.याशिवाय अनेकदा मोबाईल अॅप किंवा वेबसाईटवर अनेक लोकांचा वापर वाढल्याने सिस्टम स्लो होतं. यामुळे बुकिंगमध्ये समस्या येते.जर तुमची गॅस एजन्सी तुमची समस्या समजून घेत नसेल किंवा जाणूनबुजून उशिर करत असेल, तर तुम्ही थेट PG Portal वर तक्रार दाखल करू शकता. हे एक सरकारी प्लॅटफॉर्म आहे. जिथे तुमची तक्रार थेट संबंधीत विभागापर्यंत पोहोचू शकते आणि त्यावर योग्य ती कार्यवाही होऊ शकते.PG Portal वेबसाईट ओपन करा.तुमचं अकाऊंट बनवा किंवा लॉग ईन करा.'Lodge Public Grievance' वर क्लिक करा.'Ministry of Petroleum and Natural Gas'च्या ऑप्शनवर क्लिक करा.इथे एलपीजीच्या समस्यांबाबत लिहा.ग्राहक क्रमांक आणि एजन्सीची माहिती टाकून सबमीट करा.तातडीनं मदत मिळण्यासाठी हेल्पलाईन नंबरजर तुम्ही ऑनलाईन पद्धत वापरत नसाल, तर गॅस कंपनीच्या टोल-फ्री नंबरवरही कॉल करू शकता.Indane Gas: 1800-2333-555HP Gas: 1800-2333-555Bharat Gas: 1800-22-4344

फीड फीडबर्नर 22 Mar 2026 8:10 am

मुंबईकरांच्या तोंड पाणी पळण्याची भीती, काय आहे कारण..

मुंबई: मुंबईला दरदिवशी होणाऱ्या एकूण पाणी पुरवठ्याच्या निम्म्या पाण्याचे शुध्दीकरण भांडुप संकुलातील जलशुध्दीकरण केले जात असून तिथून मुंबईकरांना याचा पाण्याचा पुरवठा होतो. मात्र, धरणातून येणारे पाणी उचलण्यासाठी तसेच मुंबईला पुरवठा करण्यासाठी याठिकाणी असणाऱ्या पंपिंग स्टेशन्समधील चार पंप जुने झाले आहेत. २० हजार पेक्षा अधिक तास या पंपाचा वापर झाल्यामुळे हे कालबाह्य होवू लागले असून भविष्यामध्ये या पंपाची योग्यप्रकारे दुरुस्ती न झाल्यास मुंबईकरांच्या तोंडचे पाणी पळण्याची शक्यता आहे.मुंबईला दरदिवशी ४१०० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा होत असून त्यातील १९१० दशलक्ष लिटर पाण्यासाठी भांडुप संकुलात पंपिंग स्टेशन कार्यरत आहे. १९७८ ते ८०मध्ये हे पंपिंग स्टेशन कार्यान्वित झाले असून तेव्हापासून मुंबईला पाण्याचा पुरवठा करण्याकरता हे पंपिंग स्टेशन २४ तास सुरु आहे. या पंपिंग स्टेशनमध्ये २४६ दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेचे ११ व ८२ दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेचे ३ पंप कार्यरत आहेत. हे ११ हे पंप ६२० किलो वॅट क्षमतेचे आहेत, तर २२० किलो वॅट क्षमतेच्या ३ पंपांचा समावेश आहे. त्यामुळे दिवसाला ७ अधिक २ किंवा जास्तीत जास्त ८ अधिक २ अशाप्रकारे पंप चालवले जातात. तांत्रिक सल्लागारांच्या म्हणण्यानुसार प्रत्येक २० हजार तासांनंतर पंपांची मुख्य दुरुस्ती करणे आवश्यक असते. परंतु सध्या वापरात असलेल्या २४६ प्रतिदिन क्षमतेचे २ पंप आणि ८० दशलक्ष लिटर क्षमतेचे २ पंप हे २० हजार पेक्षा अधिक तास उलटून गेलेले आहेत. तसेच यांचा कालावधी पाच वर्षांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे या पंपांची मुख्य दुरुस्तीचा विचार केला जात असून प्रत्यक्षात या पंपाचा दुरुस्तीनंतर किती फायदा होणार याचाही अंदाज खुद्द महापालिकेच्या अभियंत्यांना नाही. त्यामुळे दुरुस्तीनंतर हे पंप किती चालतील हा प्रश्न असून जर हे पंप बंद पडले तर अतिरिक्त पंप महापालिकेकडे नसल्यामुळे भविष्यात पाण्याची मोठी समस्या निर्माण होवू शकते.मुंबईत सध्या अनेक ठिकाणी पाण्याची तीव्र समस्या असून प्रत्येक नगरसेवकाला सध्या पाण्याच्या तक्रारींचा सामना करावा लागतो. त्यामुळे वाढत्या गरमीच्या काळात हे पंप बंद पडल्यास मुंबई महापालिका प्रशासन काय करणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.

फीड फीडबर्नर 22 Mar 2026 8:10 am

Pune District : शिरूर तालुक्यात अवकाळी पावसाचा तडाखा

Pune District : विशेषतः नारायणगाव बाजारात टोमॅटोची आवक वाढल्याने दर कोसळले असून, अनेक शेतकऱ्यांना वाहतूक खर्चही निघणे कठीण झाले आहे. खत, बियाणे आणि मजुरीचा खर्च प्रचंड वाढलेला असताना मिळणारा भाव नगण्य असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

दैनिक प्रभात 22 Mar 2026 8:07 am

Weather Update : अवकाळी पावसानंतर शहरात उकाड्यात वाढ

Weather Update : अवकाळी पावसानंतर शहरातील उकाडा वाढला आहे. गेल्या २४ तासांत कमाल व किमान तापमनात फारसा बदल झाला नसून, ऊन आणि ढगाळ वातावरणामुळे दिवसभर उकाडा जाणवत होता. लोहगाव येथे ३५.४, तर अन्य परिसरात ३२ ते ३३ अंशांच्या आसपार कमाल तापमानाची नोंद झाली. दरम्यान, पुढील दोन दिवस शहरासह जिल्ह्यात कमाल तापमानात एक ते दोन अंशाने […]

दैनिक प्रभात 22 Mar 2026 8:01 am

Pune District : निमगाव केतकीच्या वाड्याअंधारात; भारनियमनविरोधात ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा

Pune District : परीक्षार्थी विद्यार्थ्यांनाही याचा मोठा फटका बसत आहे. अंधारामुळे परिसरात चोऱ्यांची भीती वाढली असून, आगामी निमगाव केतकी यात्रा विचारात घेता ही वेळ बदलण्याची मागणी जोर धरत आहे.

दैनिक प्रभात 22 Mar 2026 7:57 am

Organic Watermelon : शेतकऱ्यांकडून थेट रस्त्यांवर ‘ऑर्गॅनिक कलिंगड’ विक्री; इराण-अमेरिका-इस्राईल युद्धाचा शेतमाल निर्यातीला फटका

Organic Watermelon : कवडीमोल दराने व्यापाऱ्यांकडून खरेदीला शेतकऱ्यांचा नकार; “ना नफा ना तोटा” तत्त्वावर थेट ग्राहकांशी जोडणी

दैनिक प्रभात 22 Mar 2026 7:56 am

Pune District : महाराष्ट्राची माती जिद्द, ताकद आणि परंपरेचा संगम : राम शिंदे ; नामांकित मल्लांच्या सहभागामुळे ही परंपरा अधिक बळकट

Pune District : अखाड्यातील प्रत्येक डाव जीवनातील संघर्ष आणि यशाचे धडे देणारा असतो. खेळाडूंनी जिंकणे-हरणे यापेक्षा सहभाग, क्रीडाभाव, सातत्य आणि प्रामाणिकपणाला प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

दैनिक प्रभात 22 Mar 2026 7:50 am

भेंडीबाजारात पुन्हा एकदा अनधिकृत बांधकामांसह फेरीवाल्यांवरील कारवाई होणार तीव्र

मुंबई: मुंबई महापालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार मुंबईतील काही विभागांमध्ये महापालिकेच्या वतीने अनधिकृत फेरीवाले आणि पदपथांवर करण्यात आलेल्या वाढीव बांधकामांवर कारवाई होत आहे. त्यानुसार भेंडीबाजार, डोंगरी,मस्जिद बंदर, मोहम्मद अली रोड, जे जे रुग्णालय परिसरातही मोठ्याप्रमाणात कारवाईला सुरुवात झाली होती. मात्र,मुस्लिम समाजाच्या धार्मिक सणामुळे काही प्रमाणात संथ झालेली ही कारवाई आता रमझान ईदनंतर अधिक तीव्र केली जाणार आहे. येत्या मंगळवारपासून या भागातील कारवाई पुन्हा एकदा तीव्र करून अनधिकृत बांधकामांसह फेरीवाल्यांवर कारवाई करून त्यांना पळता भूई कमी करून सोडले जाणार आहे.मुंबईतील फेरीवाल्यांसह अनधिकृत तसेच वाढीव बांधकामांविरोधातील कारवाईचे निर्देश प्राप्त झाल्यानंतर अनेक विभागांच्या सहायक आयुक्तांच्या नेतृत्वाखाली याबाबतची मोहीम तीव्र करण्यात आली. मात्र, यातील सर्वांत लक्षवेधी कारवाई ठरली ती बी विभागाची. विशेष म्हणजे या मुस्लिम बहुल वस्त्यांमध्ये मोठ्याप्रमाणात अनधिकृत तसेच वाढीव कामे झालेली आहेत.तसेच फेरीवाल्यांनीही मिळेल ते रस्ते,पदपथ अडवून नागरिकांचे चालणेही कठिण करून सोडले आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त डॉ भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार तसेच अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली बी विभागाचे सहायक आयुक्त योगेश देसाई यांनी कशाचीही भिडभाड न बाळगता अत्यंत निडरपणे याठिकाणी कारवाईचा सपाटा लावला. सलग आठ ते दहा दिवस कारवाई करून इब्राहिम मोहम्मद अली रोड वरील नारायण धुरू स्ट्रीट, मांडवी, सरदार वल्लभ भाई पटेल रोड, इब्राहिम मोहम्मद मर्चंड रोड, संत तुकाराम रोड, युसूफ मेहरली रोड, लोकमान्य टिळक रस्ता आदी मार्गावरील आणि चौकांमधील रस्ते अडवून बसणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करतानाच वाढीव बांधकामे तसेच रस्ता अडवून ठेवलेले अनधिकृत स्टॉल्स हटवले. एवढेच नाहीतर त्यानंतर परिसरही स्वच्छ केला. रमजान पूर्वी हा परिसर एकदम स्वच्छ बनवण्यात आला. पण त्यानंतर धार्मिक सणाच्या काळात या समाजाच्या नागरिकांना त्रास होवू नये म्हणून काही प्रमाणात कारवाई संथ केली होती, परंतु आता शनिवारी रमजान ईद झाल्यानंतर आता पुढील आठवड्यापासून ही कारवाई पुन्हा एकदा मोठ्याप्रमाणात हाती घेण्यात येणार आहे. स्थानिक नागरिकांच्या धार्मिक भावना लक्षात येवू ही कारवाई तुर्तास संथ केली होती, परंतु आता सण झाल्यामुळे ही कारवाई हाती घेण्यात येणा असल्याची माहिती मिळत आहे. याबाबत बी विभागाचे सहायक आयुक्त योगेश देसाई यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मागील काही दिवसांमध्ये ही कारवाई संथ झाल्याचे दिसून आले असले तरी पुढील आठवड्यात ही कारवाई तीव्र केली जाईल,असे म्हटले आहे.

फीड फीडबर्नर 22 Mar 2026 7:30 am

धुरंधर-2 मध्ये अतिक अहमदची कथा खरी की प्रोपगंडा ?:ISI संबंधांचे पुरावे मिळाले, नोटाबंदी आणि बनावट चलनाची कथा किती खरी?

अलाहाबादमधील चकिया. पांढरा कुर्ता, डोक्यावर फेटा, चेहऱ्यावर स्मितहास्य असलेला एक माफिया. धुरंधर-2 हा चित्रपट तुम्हाला सुरुवातीच्या दृश्यांपासूनच थेट यूपीचे माफिया आणि खासदार राहिलेल्या अतिक अहमदच्या काळात घेऊन जाईल. 15 एप्रिल 2023 रोजी पोलिसांच्या सुरक्षा घेऱ्यात अतिक आणि त्याचा भाऊ अश्रफ अहमद यांची हत्या करण्यात आली होती. धुरंधर-2 मधील आतिफ अहमद या पात्रामुळे अतिक अहमद पुन्हा चर्चेत आला आहे. आतिफ अहमदचे संबंध पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय (ISI), दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा आणि अंडरवर्ल्डशी जोडलेले दाखवले आहेत. चित्रपटात डिस्क्लेमर असला तरी, आतिफचे पात्र हुबेहूब अतिक अहमदशी जुळते आहे. आम्ही चित्रपटात दाखवलेले आतिफ अहमदशी संबंधित प्रत्येक दृश्य आणि संवाद पाहिले. चित्रपटातील दावे आणि अतिकच्या मृत्यूवरील यूपी पोलिसांच्या तपास अहवाल आणि आरोपपत्रातील तथ्यांशी तुलना केली. चित्रपटात माफिया आतिफची 3 वेळा एंट्रीधुरंधर-2 चित्रपट 3 तास 52 मिनिटांचा आहे. चित्रपटाने पहिल्या दिवशी जगभरात 236 कोटी रुपयांची कमाई करून नवा विक्रम केला आहे. सीन: 1 चकियाचा ड्रग्स किंगपहिल्या सीनमध्ये अलाहाबादमध्ये त्याचा दबदबा आणि ड्रग्सचा व्यवसाय दाखवण्यात आला आहे. आतिफ कोणाला भेटायला जात नव्हता, तर लोक त्याच्याकडून चरस, अफू, हशीश आणि टॉर्च पावडरसारखे ड्रग्स विकत घेण्यासाठी अलाहाबादच्या चकियाला येत होते. सीन: २पाकिस्तानशी संबंधदुसऱ्या दृश्यात यूपीचे डीजीपी संजय कुमार यांना दाखवले आहे. हे पात्र माजी डीजीपी प्रशांत कुमार यांच्यासारखे दिसते. या दृश्यात यूपी पोलिसांना पहिल्यांदाच कळते की आतिफचा पाकिस्तानशी संबंध आहे. तो भारतात बनावट चलन आणि अंमली पदार्थांच्या पुरवठ्यात सामील आहे. यूपी पोलिसांना ही गोष्ट कळताच आतिफच्या टोळीवर कारवाई सुरू होते. आतिफ आणि त्याचा भाऊ अशरफ यांना अटक करण्यात येते. चित्रपटातील दावा: 2016 मध्ये झालेली नोटबंदी ISI आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या बनावट चलन रॅकेटचा पर्दाफाश करण्याची मास्टरप्लान होती. भारतीय सुरक्षा एजन्सीने यूपी पोलिसांना सांगितले की, पाकिस्तानशी संबंधित बनावट चलन रॅकेटमध्ये यूपीचा अतीक अहमद सामील आहे. वास्तविकता: अतीक अहमदशी संबंधित उमेश पाल हत्याकांड आणि शस्त्र तस्करी प्रकरणाची चौकशी प्रयागराज पोलीस आणि UP-STF ने केली होती. अतीकचे परदेशी संबंध असल्यामुळे चौकशीत ATS ला देखील समाविष्ट करण्यात आले होते. 13 जुलै, 2023 रोजी CJM कोर्टात तपास एजन्सीने पहिली चार्जशीट दाखल केली. चार्जशीटमध्ये अतीक अहमदच्या कबुलीजबाब आणि पुराव्यांच्या आधारे सांगण्यात आले की, अतीकच्या IS-227 टोळीचा ISI शी थेट संबंध होता. मात्र, यूपी पोलिसांच्या चार्जशीटमध्ये अतीकशी संबंधित बनावट चलन रॅकेटचा उल्लेख कुठेही केलेला नाही. त्यामुळे, चित्रपटातील अतीकशी संबंधित बनावट चलनाबाबतचा दावा खरा नाही. चित्रपटातील दावा: नोट बंदीपूर्वी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी उत्तर प्रदेशच्या डीजीपीसोबत मिळून आतिफ अहमदला अटक केली.वास्तव: नोव्हेंबर 2016 मध्ये नोट बंदीच्या वेळी उत्तर प्रदेशचे डीजीपी सय्यद जावेद अहमद होते. त्यांना 1 जानेवारी 2016 रोजी डीजीपी बनवण्यात आले होते. चित्रपटात डीजीपी संजय कुमारचे पात्र उत्तर प्रदेशचे माजी डीजीपी प्रशांत कुमार यांच्यासारखे दिसते. 1990 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी प्रशांत कुमार त्यावेळी डीजीपी नव्हते. प्रशांत कुमार फेब्रुवारी 2024 मध्ये डीजीपी बनले आणि मे 2025 मध्ये निवृत्त झाले. चित्रपटात दाखवलेली टाइमलाइन योग्य नाही. चित्रपटातील दावा: अतीक अहमदचा आयएसआय आणि दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाशी संबंध होता. तो नेपाळ आणि पंजाबमार्गे भारतात बेकायदेशीर शस्त्रास्त्रांच्या तस्करीमध्ये सामील होता.वास्तव: यूपी पोलिसांनी दावा केला होता की, मृत्यूपूर्वी प्रयागराजमधील शाहगंज पोलीस ठाण्यात चौकशीदरम्यान अतीकने कबूल केले होते की, त्याचा आयएसआय आणि लष्कर-ए-तैयबाशी संपर्क होता. पोलिसांच्या दाव्यानुसार, अतीक म्हणाला होता- ‘माझ्याकडे शस्त्रांची कमतरता नाही. माझे थेट संबंध आयएसआय (ISI) आणि लष्कर-ए-तैयबाशी आहेत. पाकिस्तानमधून ड्रोनद्वारे पंजाब सीमेवर शस्त्रे टाकली जातात आणि आयएसआयशी संबंधित लोक त्या ठिकाणी जाऊन शस्त्रे उचलतात. मला आयएसआय आणि लष्कर-ए-तैयबाशी संबंधित काही लोकांची ठिकाणे माहीत आहेत. माझ्या भाऊ अशरफला इतर लोकांची संपूर्ण माहिती आहे.’ अतीकने पोलिसांना सांगितले की, मला त्या ठिकाणांची माहिती आहे, जिथे ही शस्त्रे लपवून ठेवली आहेत. तिथे कोणतेही घर क्रमांक नाहीत. जर पोलिसांनी मला आणि माझ्या भावाला सोबत नेले, तर आम्ही त्या ठिकाणांची ओळख पटवू शकतो. या कबुलीजबाबानंतर यूपी-एसटीएफ (UP-STF) अतीक आणि अशरफला चकियाच्या कसारी-मसारीच्या जंगलात घेऊन गेली होती. तिथे शस्त्रे लपवली होती. यानंतर दोघांना नियमित वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले. इथेच त्यांची हत्या करण्यात आली. अतीकबद्दल यूपी पोलिसांनी केलेला हा दावा कधीही सिद्ध होऊ शकला नाही. जम्मू-काश्मीरचे माजी डीजीपी एसपी वैद्य म्हणतात, ‘अतीक अहमद खासदार असूनही कुख्यात गुंड होता. त्याच्याकडून ब्रिटिश बुलडॉग रिव्हॉल्व्हर 455 बोर आणि एक वॉल्थर पी88 सारखी परदेशी पिस्तूल जप्त करण्यात आली. ही दोन्ही उच्च-प्रोफाइल शस्त्रे आहेत, जी सहज मिळत नाहीत.’ उत्तर प्रदेश पोलिसांचे माजी डीजीपी डॉ. विक्रम सिंह म्हणतात, ‘अतीक अहमदने कबूल केले होते की उमेश पालच्या हत्येमध्ये आयएसआयने पाठवलेली शस्त्रे वापरली गेली होती. ही शस्त्रे पंजाबमधून यूपीमध्ये आणली गेली होती. अतीकच्या या वक्तव्यानंतर एसटीएफने त्याच्या घर आणि इतर ठिकाणांवर छापा टाकला असता, मोठ्या संख्येने पाकिस्तान ऑर्डिनन्स फॅक्टरीची मोहोर असलेले काडतुसे आणि शस्त्रे सापडली होती.’ सीन: 3अतीक आणि अशरफची हत्याशेवटचे दृश्य पोलीस सुरक्षा घेऱ्यात अतीक अहमदच्या हत्येचे आहे. या दृश्यात प्रत्येक कोन तसाच दाखवला आहे, जसा १५ एप्रिल २०२३ रोजी रात्री १०:३० वाजता पोलीस कोठडीत, मीडियाच्या कॅमेऱ्यांसमोर अतीक अहमदची हत्या झाली होती. हल्लेखोर पत्रकार बनून पोलीस सुरक्षेच्या आत येतात. अतीक अहमद मीडियासमोर म्हणतो- 'मुख्य गोष्ट अशी आहे की गुड्डू मुस्लिम'... तेव्हा अचानक हल्लेखोर जवळ येऊन त्याच्या डोक्यात गोळी मारतात. अतीक आणि त्याचा भाऊ अशरफ यांना मारल्यानंतर तिन्ही हल्लेखोर पोलिसांसमोर आत्मसमर्पण करतात. चित्रपटातील दावा: पाकिस्तानमध्ये बसलेला आयएसआय अधिकारी इलियास काश्मिरी उर्फ मेजर इक्बाल (अर्जुन रामपाल) अतीकच्या मृत्यूचा LIVE व्हिडिओ पाहत होता. अतीक-अशरफच्या हत्येमुळे त्याचे नियोजन फसले. वास्तविकता: 3 जून 2011 रोजी अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात इलियास काश्मिरी मारला गेला होता. त्यावेळी तो साथीदारांसोबत सफरचंदाच्या बागेत बसला होता. तर, अतीकची हत्या 2023 मध्ये झाली. येथेही टाइमलाइन जुळत नाही. STF आणि RAW ला अतीकच्या ISI कनेक्शनची माहिती मिळाली होती दैनिक भास्करने अतीकच्या ISI कनेक्शनवर यूपी STF च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याशी चर्चा केली. त्यांनी सांगितले, ‘अतीक अहमदच्या मृत्यूपूर्वी 2021 मध्ये UP-STF आणि गुप्तचर संस्था रॉ (RAW) ने एक संयुक्त अभियान राबवले होते. सप्टेंबर 2021 मध्ये जीशान कमर नावाच्या दहशतवाद्याला पकडण्यात आले होते. जीशान त्या पाकिस्तानी कॅम्पमध्ये सामील होता, जिथे कसाबला प्रशिक्षण दिले गेले होते.’ ‘जीशानने UP-STF ला सांगितले की 2017 मध्ये तो प्रयागराजहून पाकिस्तानला गेला होता. तेव्हा अतीकचा भाऊ अशरफने पासपोर्ट अधिकाऱ्याला पत्र पाठवले होते, जेणेकरून पासपोर्ट लवकर मिळावा. अशा प्रकारे पहिल्यांदाच अतीकच्या ISI कनेक्शनची माहिती मिळाली होती.’

दिव्यमराठी भास्कर 22 Mar 2026 7:03 am

आजचे एक्सप्लेनर:प्रत्येक युद्धात सोने महाग, तर इराण युद्धात 12,000 रुपये कमी का? भाव 1 लाखाखाली जातील का, खरेदी करावी की वाट पाहावी?

27 फेब्रुवारी 2026 म्हणजे इराण युद्ध सुरू होण्याच्या एक दिवस आधी, भारतात 10 ग्रॅम सोन्याची किंमत 1.59 लाख रुपये होती. युद्धाच्या 22 व्या दिवशी म्हणजे 21 मार्च रोजी, ती अंदाजे 8% नी घसरून 1.47 लाख रुपयांपर्यंत पोहोचली. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोने 14% नी घसरून सुमारे 4,488 डॉलर प्रति कॅरेटपर्यंत पोहोचले. सोन्याचा हा ट्रेंड मागील युद्धांदरम्यानच्या सोन्याच्या ट्रेंडशी जुळत नाही, कारण युद्धामुळे सामान्यतः सोन्याची किंमत वाढत असते. शेवटी इराण युद्धादरम्यान असे काय घडले की सोन्याची किंमत कमी होऊ लागली, यापूर्वीच्या युद्धांमध्ये सोन्याच्या किमतीवर काय परिणाम झाला होता आणि पुढे सोने स्वस्त होईल की महाग, हे आजच्या एक्सप्लेनरमध्ये जाणून घेऊया.... प्रश्न-1: सामान्यतः युद्धादरम्यान सोन्याचा ट्रेंड कसा असतो? उत्तर: सोने सुरक्षित गुंतवणूक मानले जाते. युद्ध सुरू होण्याची शक्यता असली तरी, गुंतवणूकदार सोन्याकडे वळतात, ज्यामुळे सोन्याच्या किमती वाढू लागतात. 1980 च्या दशकापासून, सामान्यतः कोणत्याही युद्धाच्या सुरुवातीच्या काळात सोन्याचे भाव वेगाने वाढण्याचा ट्रेंड राहिला आहे.... तथापि, 13 जून 2025 आणि 28 फेब्रुवारी 2026 रोजी इराणवर सुरू झालेल्या अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यादरम्यान सोन्यात नगण्य वाढ झाली, उलट किमतीत थोडी घटच दिसून आली. प्रश्न-2: इराण युद्धादरम्यान सोन्याचे भाव वाढण्याऐवजी कमी का होऊ लागले? उत्तर: 12 जून 2025 रोजी इराणवरील हल्ल्याच्या एक दिवस आधी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत 3,381 डॉलर प्रति कॅरेट होती. 13 जून रोजी सोन्याचे दर 3,440 पर्यंत पोहोचले, परंतु पुन्हा कमी होऊ लागले. 24 जून रोजी युद्धविरामाच्या दिवशी सोन्याचे दर कमी होऊन 3,317 डॉलर प्रति कॅरेटपर्यंत आले होते. त्याचप्रमाणे 27 फेब्रुवारी 2026 रोजी, म्हणजेच इराणवरील हल्ल्याच्या एक दिवस आधी, सोन्याचा भाव अंदाजे 5,245 डॉलर प्रति कॅरेट होता. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, भारतीय बाजारातही सोन्याचा भाव अंदाजे 1.6 लाख प्रति 10 ग्रॅम होता. तर 21 मार्च रोजी सोन्याचा भाव 4,488 डॉलर प्रति कॅरेटपर्यंत पोहोचला. तसेच भारतीय बाजारात सोन्याचा भाव 1.46 लाख प्रति 10 ग्रॅमपर्यंत कमी झाला. म्हणजेच सोन्याचे दर वाढण्याऐवजी थोडे कमी झाले. तज्ञांच्या मते, गेल्या 21 दिवसांपासून सुरू असलेल्या इराण युद्धादरम्यान सोन्याचे दर वाढण्याऐवजी कमी होण्याची 4 मुख्य कारणे आहेत.... 1. डॉलरच्या मजबुतीमुळे सोन्याची खरेदी घटली 2. सोन्याच्या तुलनेत बँकांच्या व्याजातून अधिक नफ्याची आशा 3. आधीच महाग असलेले सोने विकून नफा नोंदवणे 4. सोने महाग असल्यामुळे घरगुती मागणी घटली प्रश्न-3: सोन्याचे भाव अजून कमी होतील की पुन्हा वाढू शकतात? उत्तर: सोन्याच्या किमतीबाबत सध्या बाजार विश्लेषकांमध्ये अनिश्चिततेचे वातावरण आहे. तज्ञांचे म्हणणे आहे की सोन्याचे दर इराण युद्ध आणि त्यामुळे तेलाच्या किमतींवर अवलंबून आहेत. अमेरिकन इन्व्हेस्टमेंट बँकिंग कंपनी जेपी मॉर्गन चेसच्या मते, 2026 च्या अखेरीस सोन्याचा भाव प्रति कॅरेट 6,300 डॉलरपर्यंत पोहोचू शकतो. जेपी मॉर्गनमध्ये ग्लोबल कमोडिटीज स्ट्रॅटेजीच्या प्रमुख नताशा कनेवा म्हणतात की सोन्याच्या किमती वाढणे अजून थांबलेले नाही. देशांचे सोन्याचे साठे आणि मोठ्या गुंतवणूकदारांचा सोन्याच्या खरेदीचा ट्रेंड अजूनही सुरू राहील. यामुळे सोन्याच्या किमती वाढतील. तर स्विस इन्व्हेस्टमेंट बँक यूबीएस ग्रुपनुसारही सोन्याचे दर प्रति कॅरेट 5,900 डॉलरपर्यंत जाऊ शकतात. लंडनस्थित वित्तीय कंपनी ईबीसी फायनान्शियल ग्रुपच्या मते, जर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव प्रति कॅरेट 6,000 डॉलरपर्यंत पोहोचला आणि डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाला नाही, तर भारतात सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 2 लाख रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. प्रश्न-4: पुढील काही महिने चांदीच्या दरांचा ट्रेंड कसा राहील? उत्तर: इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन म्हणजेच IBJA नुसार, 1 जानेवारी 2025 रोजी 1 किलो चांदीची किंमत 86,017 रुपये होती, जी भारतात सर्वकालीन उच्चांक होती. 2025 च्या अखेरपर्यंत चांदी 170% वाढली होती. त्यानंतर 30 जानेवारी 2026 रोजी चांदी 3.39 लाखांवर बंद झाली. त्यानंतर घट सुरू राहिल्याने इराण युद्ध सुरू होण्यापूर्वी 27 फेब्रुवारी रोजी चांदी 2,66,700 रुपये प्रति किलो होती, जी 20 मार्च 2026 पर्यंत 2,32,364 प्रति किलोवर आली आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारात 20 मार्च रोजी चांदीची किंमत 72 डॉलर प्रति कॅरेट आहे. जेपी मॉर्गनमध्ये प्रेशियस मेटल्स स्ट्रॅटेजीचे प्रमुख ग्रेगरी शियरर म्हणतात की चांदीच्या किमती वाढणे अजून थांबलेले नाही. त्याची औद्योगिक मागणी अजूनही जास्त आहे, तर पुरवठा कमी आहे. गुंतवणूकदार चांदीच्या वाढत्या किमतींवर सट्टा लावत आहेत. भारतीय ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालने फेब्रुवारी 2026 मध्ये असेही म्हटले होते की, वर्षाच्या अखेरीस चांदीची किंमत पुन्हा वाढून 3.8 लाख ते 4.6 लाख रुपये प्रति किलोपर्यंत जाऊ शकते. मात्र, सोन्याप्रमाणे चांदीच्या दरातही घसरणीचे कारण सध्याची भू-राजकीय (जिओ-पॉलिटिकल) परिस्थितीच आहे. ब्रिटनच्या फायनान्शियल सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनी सॅकडन फायनान्शियलनुसार, जोपर्यंत तेल सुरक्षित गुंतवणूक राहील, तोपर्यंत चांदीच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता कमी आहे. भू-राजकीय परिस्थिती सुधारल्यानंतर चांदी पुन्हा रुळावर येऊ शकते. डिस्क्लेमर: ही स्टोरी केवळ शैक्षणिक उद्देशाने लिहिलेली आहे. गुंतवणूकदारांना आमचा सल्ला आहे की, त्यांनी गुंतवणुकीशी संबंधित कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वतःच्या स्तरावर तज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा.

दिव्यमराठी भास्कर 22 Mar 2026 6:46 am

रागदरबार:स्त्री भूमिकेतून पुरुषांसह महिलांनाही भुरळ घालणारे.. वेदनादायी आयुष्य, तरी यशाच्या शिखरावर पोहोचणारे 'स्वरांचे राजहंस- बालगंधर्व'

मराठी रंगभूमी आणि भारतीय संगीताच्या सुवर्णकाळाचे मानबिंदू म्हणजे नारायण श्रीपाद राजहंस उर्फ 'बालगंधर्व'. लोकमान्य टिळकांनी बहाल केलेल्या या पदवीला सार्थ ठरवत, त्यांनी आपल्या अफाट गायकीने आणि विलोभनीय स्त्री भूमिकांनी अवघ्या जगाला भुरळ घातली. जवळपास 5000 नाटकांमधून त्यांनी स्त्री भूमिका निभावली होती. हा एक रेकॉर्डच म्हणावा लागेल. व्यावसायिक यशाचे शिखर गाठलेले हे अलौकिक व्यक्तिमत्व तत्कालीन समाजातील महिलांसाठी 'फॅशन आयकॉन' ठरले, तरीही त्यांचे वैयक्तिक आयुष्य अनेक हृदयद्रावक शोकांतिकांनी भरलेले होते. कलेप्रती असलेली त्यांची अढळ निष्ठा आणि 'द शो मस्ट गो ऑन' ही वृत्ती आजही कलाविश्वात वंदनीय मानली जाते. आजच्या 'रागदरबार'च्या भागात आपण बालगंधर्वांचे जीवन तसेच त्यांनी संगीतात दिलेल्या योगदानाविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. बालगंधर्व यांच्याविषयी लिहिताना त्यांचे वैयक्तिक आयुष्यच समोर आले. आयुष्य इतके खडतर तरी कलेवर असलेले प्रेम, त्यांची हीच गोष्ट मनाला भावते... वयाच्या 10 व्या वर्षीच टिळकांनी दिली 'बालगंधर्व' उपाधी नारायण श्रीपाद राजहंस उर्फ बालगंधर्व हे भारतीय संगीत आणि मराठी रंगभूमीच्या सुवर्णकाळातील एक अजरामर नाव आहे. अवघ्या 10 व्या वर्षी त्यांचे गाणे ऐकून लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी त्यांना 'बालगंधर्व' ही पदवी बहाल केली आणि पुढे याच नावाने त्यांनी जगभरात कीर्ती मिळवली. केवळ नाट्यसंगीतच नव्हे, तर ख्याल, ठुमरी, गझल, दादरा आणि भक्तिगीते यांसारख्या विविध गायन प्रकारांवर त्यांचे अफाट प्रभुत्व होते. त्यांच्या सुमधुर आवाजातील शास्त्रीय बैठक आणि गायकीने भारतीय संगीत क्षेत्रात एक वेगळीच उंची गाठली होती. स्त्री रूपाने पुरुषांसह महिलांनाही पाडली भुरळ ज्या काळात महिलांना रंगभूमीवर काम करण्याची सामाजिक परवानगी नव्हती आणि नाटकात काम करणे प्रतिष्ठेचे मानले जात नसे, त्या काळात बालगंधर्वांनी हुबेहूब स्त्री भूमिका साकारून रंगभूमीची उणीव समर्थपणे भरून काढली. त्यांचे स्त्री रूप इतके सात्विक आणि वास्तववादी असे की, त्यांच्या रूपाची एक झलक पाहण्यासाठी रसिक प्रेक्षक मैलोन्मैल प्रवास करून येत असत. तत्कालीन समाजातील स्त्रियांमध्ये बालगंधर्वांची लोकप्रियता इतकी प्रचंड होती की, ते नाटकात ज्या पद्धतीच्या साड्या नेसत किंवा दागिने घालत, त्यांची हुबेहूब नक्कल करून स्त्रिया तशाच साड्या आणि दागिने बाजारातून आवर्जून विकत घेत असत. म्हणजे महिलांना बालगंधर्वांच्या स्त्री रूपाची भुरळच पडली होती, असे म्हटले तर आश्चर्य वाटू नये. 'द शो मस्ट गो ऑन' बालगंधर्वांची व्यावसायिक कारकीर्द जितकी वैभवशाली आणि आश्चर्यकारक होती, तितकेच त्यांचे वैयक्तिक आयुष्य मात्र तीव्र शोकांतिकेने भरलेले होते. कलेप्रती असलेली त्यांची निष्ठा इतकी अढळ होती की, आपल्या मुलाच्या निधनाची वार्ता कानावर आलेली असतानाही, त्यांनी धिरोदात्तपणे रंगभूमीवरील आपला प्रयोग सुरूच ठेवला. आपल्या काळजावर दगड ठेवून आणि वैयक्तिक दुःखाला बाजूला सारून प्रेक्षकांसाठी प्रयोग पूर्ण करणाऱ्या या महान कलाकाराने 'द शो मस्ट गो ऑन' या उक्तीची प्रचिती तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाला आणून दिली होती. घरातूनच मिळाले संगीताचे बाळकडू भारतीय संगीत आणि रंगभूमीवरील दैदीप्यमान तारा नारायण श्रीपाद राजहंस यांचा जन्म 22 जून 1888 रोजी महाराष्ट्रातील पालूस येथील एका देशस्थ ब्राह्मण कुटुंबात झाला. वडिलांच्या सितारवादनाच्या छंदामुळे त्यांना संगीताचा प्राथमिक वारसा लाभला. तसेच त्यांची आई देखील भजन गायच्या. अभ्यासात फारसा रस नसल्याने त्यांनी बालवयातच गायनाला सुरुवात केली. जळगाव येथील शास्त्रीय संगीत प्रशिक्षण शाळेत त्यांनी संगीताचे रीतसर धडे गिरवले. त्यांच्या सांगीतिक कारकिर्दीतील सर्वात महत्त्वाचा क्षण म्हणजे वयाच्या दहाव्या वर्षी त्यांना लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्यासमोर गाण्याची मिळालेली संधी. त्यांचे अलौकिक गायन ऐकून भारावलेल्या टिळकांनी त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली आणि त्यांना 'बालगंधर्व' ही अजरामर पदवी बहाल केली, ज्या नावाने ते पुढे जगभर लोकप्रिय झाले. शाहू महाराजही गायकीने झाले होते प्रभावित लहानपणापासूनच बालगंधर्व यांचा आवाज अत्यंत मधुर होता, मात्र त्यांना श्रवणदोष असल्याने कमी ऐकू यायचे. अगदी लहान वयात असतानापासूनच त्यांच्या गोड आवाजातील भजनांमुळे ते लोकप्रिय होऊ लागले होते. त्यांचे हे सुरावटींचे कौशल्य कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांच्या नजरेस पडले. बालगंधर्वांना ऐकायला त्रास होतो हे समजताच, महाराजांनी स्वतःच्या खर्चाने त्यांच्यावर योग्य उपचार केले. या उपचारांमुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आणि शाहू महाराजांच्या सहकार्यामुळेच त्यांना प्रसिद्ध 'किर्लोस्कर नाटक मंडळी'मध्ये स्थान मिळाले, जिथून त्यांच्या अभिनय कारकिर्दीचा खऱ्या अर्थाने श्रीगणेशा झाला. वयाच्या 18 व्या वर्षी 'शाकुंतल' नाटकात त्यांनी शकुंतलेची भूमिका साकारली किर्लोस्कर नाटक मंडळी त्या काळात एका उत्तम स्त्री पात्राच्या शोधात होती आणि बालगंधर्वांच्या रूपात त्यांचा हा शोध पूर्ण झाला. 1906 मध्ये मिरज येथे वयाच्या 18 व्या वर्षी 'शाकुंतल' नाटकात त्यांनी शकुंतलेची भूमिका साकारली आणि त्यांचे ते विलोभनीय रूप पाहून प्रेक्षक अवाक् झाले. त्यानंतर सौभद्र, मानापमान, विद्याहरण आणि स्वयंवर अशा अनेक अजरामर नाटकांतून त्यांनी सुभद्रा, भामिनी, देवयानी आणि रुक्मिणी यांसारखी पात्रे जिवंत केली. आपल्या गायकीने आणि सहज अभिनयाने त्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत मराठी रंगभूमीचा सुवर्णकाळ घडवला. बालगंधर्वांनी साड्यांचा नवा ट्रेंड आणला बालगंधर्वांचे सौंदर्य इतके लोभस आणि लावण्यमय होते की ते केवळ सर्वसामान्य प्रेक्षकांनाच नव्हे, तर पुरुषांनाही भुरळ घालत असे. रंगभूमीवर त्यांनी परिधान केलेले दागिने आणि साड्या खास त्यांच्यासाठी ऑर्डर देऊन बनवून घेतल्या जात, ज्या तत्कालीन महिलांमध्ये कमालीच्या लोकप्रिय ठरत. त्यांच्या प्रत्येक नवीन नाटकाच्या प्रयोगानंतर साड्यांचा एक नवा ट्रेंड समाजात रूढ होत असे, यावरून त्यांच्या सौंदर्याचा आणि वेशभूषेचा जनमानसावर असलेला विलक्षण प्रभाव दिसून येतो. 'गंधर्व संगीत मंडळी'ची स्थापना बालगंधर्वांनी 1905 मध्ये 'किर्लोस्कर संगीत मंडळी'द्वारे आपल्या कारकिर्दीचा श्रीगणेशा केला, मात्र नानासाहेब जोगळेकरांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या अंतर्गत वादामुळे त्यांनी 1913 मध्ये गणपतराव बोडस आणि गोविंदराव टेंबे यांच्या सहकार्याने 'गंधर्व संगीत मंडळी'ची स्थापना केली. 1921 पर्यंत या संस्थेचे संपूर्ण स्वामित्व आणि त्यावरील कर्जाची जबाबदारी बालगंधर्वांकडे आली, जी त्यांनी आपल्या नाटकांच्या विलक्षण लोकप्रियतेच्या जोरावर अवघ्या सात वर्षांत पूर्णपणे फेडली. मात्र, नाटकातील नेपथ्य, वेशभूषा आणि वस्तूंच्या अस्सलपणाबाबत व उच्च दर्जाबाबत असलेल्या त्यांच्या आग्रही स्वभावामुळे संस्थेच्या आर्थिक स्थितीत सातत्याने चढ-उतार पाहायला मिळाले. कलेच्या गुणवत्तेशी त्यांनी कधीही तडजोड केली नाही. पोटच्या गोळ्याच्या निधनाची वार्ता कळल्यानंतरही प्रयोग बालगंधर्वांची व्यावसायिक कारकीर्द यशाच्या शिखरावर असली, तरी त्यांचे वैयक्तिक आयुष्य मात्र अत्यंत क्लेशदायक संघर्षातून गेले. 1907 मध्ये लक्ष्मीबाईंशी विवाहबद्ध झालेल्या बालगंधर्वांना सात अपत्ये झाली, मात्र मार्च 1911 मध्ये त्यांनी आपल्या थोरल्या मुलाला आणि मुलीला एकापाठोपाठ एक गमावले. आपल्या पोटच्या गोळ्याच्या निधनाची वार्ता कळल्यानंतरही, कलेप्रती असलेल्या असीम निष्ठेपोटी त्यांनी रंगभूमीवरील आपला प्रयोग अर्ध्यावर सोडला नाही. त्यांचे ते ध्येयनिष्ठ सादरीकरण पाहून प्रेक्षकांच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या, परंतु बालगंधर्वांनी आपल्या वैयक्तिक दुःखाला अभिनयाच्या आड येऊ न देता रंगमंचावर आपला प्रयोग सुरू असताना डोळ्यातून एक अश्रूही येऊ दिले नाही. नाटक सुरू असतानाच लाडक्या मुलीच्या निधनाची वार्ता बालगंधर्वांच्या आयुष्यातील दुःखाची मालिका इथेच थांबली नाही. पहिल्या दोन मुलांच्या निधनानंतर सात वर्षांनी त्यांच्या आणखी दोन मुलांचा मृत्यू झाला. 1928 मध्ये त्यांचे नाट्यमंडळ अमरावती येथे प्रयोगासाठी गेले असताना, त्यांच्या थोरल्या मुलीचे संसर्गामुळे निधन झाल्याची हृदयद्रावक बातमी आली. या धक्क्याने सर्व कलाकार सुन्न झाले होते, तरीही बालगंधर्वांनी प्रेक्षकांचा हिरमोड होऊ नये म्हणून धैर्याने प्रयोगाचा निर्णय घेतला. आपल्या लाडक्या लेकीच्या विरहाचे दुःख उरात दाबून त्यांनी रंगमंचावर केलेले ते सादरीकरण पाहून उपस्थित प्रेक्षकांचे डोळे पुन्हा एकदा पाणावले. त्यांच्या या असीम कलानिष्ठेपुढे सर्व नतमस्तक झाले. नुकत्याच जन्मलेल्या मुलाचे दुसऱ्याच दिवशी निधन 1928 पर्यंत बालगंधर्वांच्या सात अपत्यांपैकी केवळ दोन मुली हयात होत्या, ज्यांचे विवाह त्यांनी मोठे कर्ज काढून अत्यंत थाटामाटात लावून दिले. मुलींच्या लग्नानंतर घरात आलेल्या एकलेपणामुळे पुत्रप्राप्तीच्या ओढीने त्यांनी यज्ञ देखील केला. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर त्यांना पुत्ररत्न प्राप्त झाले खरे, परंतु नियतीचा खेळ असा की तो मुलगा अवघ्या एका दिवसातच मृत्यू पावला. या मोठ्या आघाताने बालगंधर्व सावरत असतानाच, लग्नाच्या 35 वर्षांनंतर त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांचेही निधन झाले. सावलीप्रमाणे सोबत करणाऱ्या पत्नीच्या जाण्याने त्यांच्या आयुष्यातील मुख्य आधारस्तंभ निखळला आणि ते पूर्णपणे कोलमडून गेले. 'धर्मात्मा' या चित्रपटाद्वारे त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण 1935 च्या सुमारास भारतीय चित्रपटसृष्टीचा विस्तार होऊ लागल्याने प्रेक्षकांची ओढ नाटकांकडून चित्रपटांकडे वळली, ज्याचा मोठा फटका नाट्यसृष्टीला बसला. याच काळात बालगंधर्वांवर कर्जाचा मोठा डोंगर उभा राहिला होता. या आर्थिक संकटातून सावरण्यासाठी त्यांनी प्रसिद्ध 'प्रभात फिल्म कंपनी'सोबत सहा चित्रपटांचा करार केला. 1935 मध्ये व्ही. शांताराम दिग्दर्शित 'धर्मात्मा' या चित्रपटाद्वारे त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटात त्यांनी संत एकनाथांची मुख्य भूमिका साकारली होती, मात्र ज्या लोकप्रियतेची अपेक्षा होती, ती त्यांना मोठ्या पडद्यावर मिळू शकली नाही. 50 व्या वर्षी साकारली मीराबाईची भूमिका रंगभूमीचे मोठे चाहते बाबुराव रुईकर यांच्या आग्रहामुळे बालगंधर्वांनी 1937 मध्ये 'साध्वी मीराबाई' चित्रपटात काम करण्याचे मान्य केले. वयाच्या 50 व्या वर्षी त्यांनी साकारलेली मीराबाईची भूमिका तांत्रिकदृष्ट्या प्रगत आणि नवीन कलाकारांच्या वाढत्या स्पर्धेमुळे प्रेक्षकांवर अपेक्षित प्रभाव टाकू शकली नाही. अखेरीस, चित्रपटातील अपयशानंतर ते पुन्हा आपल्या मूळ कर्मभूमीकडे म्हणजेच नाट्यमंडळाकडे वळले. मात्र दुर्दैवाने तिथेही त्यांना पूर्वीसारखे वैभव आणि रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला नाही, कारण काळ आणि प्रेक्षकांची अभिरुची पूर्णपणे बदलली होती. आर्थिक परिस्थिती हालाखीची चित्रपटसृष्टीतील हे अपयश बालगंधर्वांसाठी अत्यंत निराशाजनक ठरले. 'धर्मात्मा' चित्रपट अपेक्षित कामगिरी करू न शकल्यामुळे त्यांनी प्रभात कंपनीसोबतचे उर्वरित करार अपूर्ण सोडले आणि 1936 मध्ये पुन्हा एकदा आपल्या आवडत्या रंगभूमीकडे वळण्याचा निर्णय घेतला. सुमारे 15 महिन्यांच्या संघर्षानंतर त्यांनी आपली नाट्यमंडळी पुन्हा सुरू केली आणि पुन्हा एकदा स्त्री पात्रे साकारण्यास सुरुवात केली. परंतु, बदलत्या काळामुळे आणि प्रेक्षकांच्या आवडीनिवडी बदलल्यामुळे सुरुवातीच्या काळात त्यांची एकापाठोपाठ एक नाटके अपयशी ठरू लागली, ज्यामुळे त्यांच्या समोरील आर्थिक आणि व्यावसायिक आव्हाने अधिकच गडद झाली. 6 प्रेक्षकांच्या समोर केला प्रयोग नाट्यमंडळीच्या संघर्षाच्या काळात एकदा बालगंधर्व आपल्या संचासह येवला येथे प्रयोगासाठी पोहोचले. प्रयोगाची वेळ होऊनही पडदा उघडत नसल्याने विचारणा करणाऱ्या एका व्यक्तीला प्रेक्षक फक्त 6 आहेत असे उत्तर मिळाले. हे ऐकून बालगंधर्व अत्यंत निराश झाले आणि क्षणभर एका खांबाला टेकून उभे राहिले. प्रेक्षक नसल्याने प्रयोग रद्द करावा का, असा प्रश्न उभा राहिला, पण बालगंधर्वांनी त्वरित स्वतःला सावरले आणि मोठ्या निग्रहाने पडदा उचला, प्रयोग होईलच! असा आदेश दिला. रिकाम्या थिएटरमध्ये केवळ सहा प्रेक्षकांसाठी झालेला तो प्रयोग त्यांच्या कलेप्रती असलेल्या असीम निष्ठेचे आणि व्यावसायिक शिस्तीचे मूर्तिमंत उदाहरण ठरला. गंधर्व नाटक मंडळीची सर्व धुरा गौहरबाईंकडे पुढे 1944 मध्ये, बालगंधर्वांनी आपल्या आयुष्यातील एका महत्त्वाच्या वळणावर गंधर्व नाटक मंडळीची सर्व धुरा गौहरबाई यांच्याकडे सुपूर्द केली. वाढते वय आणि बदलती परिस्थिती लक्षात घेता, त्यांनी स्वतः रंगभूमीवर स्त्री भूमिका साकारणे थांबवण्याचा निर्णय घेतला. आपल्या जागी स्त्री पात्रांची महत्त्वाची जबाबदारी त्यांनी आत्मविश्वासाने गौहरबाईंवर सोपवली आणि एका प्रदीर्घ, वैभवशाली अभिनय पर्वाचा निरोप घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे मराठी रंगभूमीवरील एका सुवर्णयुगाची धुरा नव्या पिढीकडे सोपवली गेली, तरीही बालगंधर्वांच्या अभिनयाची छाप जनमानसावर कायम राहिली. पहिल्या पत्नीच्या निधनानंतर गौहरबाईंशी विवाह पहिल्या पत्नीच्या निधनानंतर सुमारे 11 वर्षांनी बालगंधर्वांनी आपल्याच नाट्यमंडळातील सुप्रसिद्ध गायिका गौहरबाई यांच्याशी विवाह केला. गौहरबाई एका छोट्या खेडेगावातून मोठी स्वप्ने उराशी बाळगून मुंबईत आल्या होत्या आणि गंधर्व संगीत मंडळीत त्यांना स्थान मिळाले होते. बालगंधर्वांच्या अलौकिक स्वरांवर आणि कलेवर त्यांचे नितांत प्रेम होते. त्या तासन्तास त्यांचे गाणे मंत्रमुग्ध होऊन ऐकत असत. कलेप्रती असलेल्या याच ओढीमुळे दोघेही एकमेकांकडे आकर्षित झाले आणि त्यांच्यात एक अतुट नाते निर्माण झाले. दुसऱ्या लग्नाला समाजातून विरोध 1951 मध्ये जेव्हा या दोघांनी विवाह केला, तेव्हा समाजात मोठा गदारोळ झाला. त्या काळातील सामाजिक परिस्थिती आणि बालगंधर्वांची ब्राह्मण पार्श्वभूमी यामुळे या आंतरधर्मीय विवाहास दोन्ही कुटुंबांकडून तीव्र विरोध झाला. अनेक टीका आणि विरोधाचा सामना करूनही त्यांनी एकमेकांची साथ सोडली नाही. या दांपत्याला स्वतःचे मूलबाळ झाले नाही, परंतु त्यांनी आपल्या कलेच्या माध्यमातूनच एकमेकांचे आयुष्य समृद्ध करण्याचा प्रयत्न केला. 1964 मध्ये गौहरबाईंचे निधन दुर्दैवाने 1964 मध्ये गौहरबाईंचे निधन झाले आणि बालगंधर्व पुन्हा एकदा एकाकी पडले. आयुष्यात अमाप प्रसिद्धी आणि यश मिळवूनही ते शेवटपर्यंत कर्जाच्या ओझ्याखालीच राहिले, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. उतारवयात ना हाताला काम, ना कुटुंबाचा भक्कम आधार आणि खालावलेले आरोग्य अशा बिकट परिस्थितीत त्यांनी दिवस काढले. एकेकाळी रंगभूमीवर वैभव गाजवणाऱ्या या महान कलावंताची काळजी घेणारे जवळ कोणीही उरले नव्हते. 15 जुलै 1967 बालगंधर्वांनी घेतला शेवटचा श्वास 1960 पासून बालगंधर्वांची प्रकृती अधिकच खालावू लागली होती. त्यांची चिंताजनक अवस्था पाहून पुण्याहून त्यांचे स्नेही मदतीसाठी मुंबईला धावून आले. त्यांच्यावर प्रदीर्घ काळ उपचार सुरू होते, ज्या दरम्यान ते सुमारे तीन महिने कोमामध्ये होते. अखेर 15 जुलै 1967 रोजी या थोर गायकाने आपला शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने केवळ एका महान कलावंताचाच नव्हे, तर मराठी संगीत नाटकांच्या एका वैभवशाली सुवर्णयुगाचा अंत झाला. बालगंधर्वांच्या स्मृती चिरंतन जपण्यासाठी 1968 मध्ये पुणे महानगरपालिकेने 'बालगंधर्व रंगमंदिर' या भव्य नाट्यगृहाची उभारणी केली. ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे यांनी याकामी पुढाकार घेतला होता, तर त्याचे उद्घाटन आचार्य अत्रे यांच्या हस्ते झाले. विशेष म्हणजे, खुद्द बालगंधर्व हयात असतानाच त्यांच्या हस्ते पुणे जिमखाना परिसरात या वास्तूचे भूमिपूजन पार पडले होते. आज हे नाट्यगृह मराठी कलाकारांसाठी आणि रसिकांसाठी एक स्मृतिमंदिरच ठरले आहे.

दिव्यमराठी भास्कर 22 Mar 2026 6:00 am

धुरंधर; सुखदेव थापर:भगत सिंग अन् राजगुरू सोबत हसत फासावर जाणाऱ्या क्रांतिकारी शहीद सुखदेव यांची प्रेरणादायी गोष्ट

भारताला स्वातंत्र्य रातोरात मिळाले नाही. त्यासाठी अनेकांचे रक्त सांडले. कित्येकांनी आपले तारुण्य तुरुंगात घालवले, तर अनेकांनी हसत - हसत फासावर जाण्याचा मार्ग स्वीकारला. त्यंच्या बलिदानातूनच आजची स्वातंत्र्याची सुंदर पहाट उगवली. उद्या देशभरात शहीद दिन साजरा केला जाईल. त्यानिमित्ताने भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांच्यांया बलिदानाचे स्मरण केले जाईल. चला तर आपणही आज ‘धुरंधर’मध्ये पाहूया या तिघांपैकी एक असणाऱ्या शहीद सुखदेव रामलाल थापर यांची प्रेरणादायी गोष्ट… जन्म, कुटुंब आणि बालपणातील संघर्ष 19 व 20 व्या शतकात भारतात अनेक देशभक्तांचा जन्म झाला. त्यात अमर शहीद सुखदेव थापर यांचे नाव अग्रस्थानी आहे. त्यांच्या जन्माविषयी माहिती देताना त्यांचे भाऊ मथुरादास थापर लिहितात की, त्यांचे वडील रामलाल थापर हे एक व्यापारी होते. ते व्यापारासाठी लायलपूर येथे राहत होते, तर आई रल्ली देवी या लुधियानातील नौघरा येथे राहत होत्या. अशा परिस्थितीत 15 मे 1907 रोजी सुखदेव यांचा जन्म झाला. सुखदेव यांचा ज्या लुधियाना शहरात त्यांचा जन्म झाला, ते शहर इतिहासाने समृद्ध आहे. 1481 मध्ये लोधी साम्राज्याच्या काळात युसूफ खान लोधी आणि निहंग खान लोधी यांनी या शहराची स्थापना केली होती. आज हे शहर ‘भारताचे मॅन्चेस्टर’ म्हणून ओळखले जाते. मध्य आशियाहून दिल्लीला जाणाऱ्या मार्गावर वसलेले हे शहर त्या काळात व्यापार आणि संस्कृतीचे एक महत्त्वाचे केंद्र होते. सुखदेव यांचा जन्म झाला तेव्हा पंजाबमध्ये 'पगडी संभाल जट्टा' आंदोलन सुरू होते. सरदार अजित सिंह (शहीद ए आझम भगतसिंग यांचे काका) व पंजाब केसरी लाला लजपतराय यांनी इंग्रजांच्या विरोधात रान पेटवले होते. या आंदोलनाचे प्रमुख केंद्र लायलपूर होते. हे आंदोलन सुरू असतानाच रामलाल थापर यांना सुखदेव यांच्या जन्माची शुभवार्ता समजली. त्यानंतर त्यांनी आपल्या कुटुंबाला लायलपूर येथे आणण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आपली पत्नी रल्लीदेवी व मुलगा सुखदेव यांना लायलपूरला आणले. सुखदेव यांच्या जन्मानंतर त्यांचे वडील आपल्या कुटुंबाला लायलपूर येथे घेऊन गेले. मात्र, नियतीने वेगळेच काही ठरवले होते. लायलपूरला आल्यानंतर अवघ्या दोन-तीन वर्षांतच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. तेव्हा सुखदेव केवळ तीन वर्षांचे होते. त्यानंतर 3 महिन्यांनी त्यांच्या लहान भावाचा जन्म झाला. या कठीण काळात त्यांच्या काका चिंतराम यांनी दोन्ही भावांचा पोटच्या मुलांसारखा सांभाळ केला. बालपणातील स्वभाव आणि खोडकर किस्से सुखदेव यांना खेळात फारसा रस नव्हता. त्यांना शिक्षणात जास्त आवड होती. मात्र त्यांचा स्वभाव थोडा तापट आणि खोडकर होता. त्यांचे चुलत भाऊ जयदेव यांना आपले तुटलेले बोट पाहून सुखदेव यांची मोठी आठवण येते. ते एकेठिकाणी सांगतात, एकदा ते दोघे कुठेतरी जात होते. तेव्हा सुखदेव यांना एक घोडा दिसला. त्यांच्या मनात जयदेव यांची खोड काढण्याची इच्छा निर्माण झाली. त्यानुसार घोडा जवळ येताच त्यांनी त्याला त्याच्या दिशेने ढकले. घोड्याने घाबरून उडी मारली आणि त्याचे खूर जयदेवच्या पायावर पडले. त्यामुळे त्यांचे बोट तुटले. या घटनेनंतर सुखदेव इतके घाबरले की ते रात्रभर झाडावर लपून बसले होते. भगतसिंगांशी अटूट मैत्री सुखदेव यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे भगत सिंह यांच्याशी झालेली मैत्री. सुखदेव यांचे काका चिंतराम आणि भगतसिंग यांचे आजोबा अर्जुन सिंह हे एकमेकांचे जिवलग मित्र होते. या नात्यामुळे दोन्ही कुटुंबांमध्ये ये-जा होती. त्यातून सुखदेव व भगतसिंग यांची मैत्री झाली. ही मैत्री इतकी दृढ होती की, ती त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत कायम राहिली. क्रांतीची बीजे आणि पंजाबमधील आंदोलन पंजाबमध्ये ‘पगडी संभाल जट्टा’ आंदोलन चांगलेच पेटले होते. अजित सिंह आणि लाला लजपतराय यांनी इंग्रजांविरोधात जनजागृतीची एक मोठी मोहीम छेडली होती. या आंदोलनाचे केंद्र लायलपूर होते. अशा वातावरणात वाढलेल्या सुखदेव यांच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत लहानपणापासून पेटली होती. पुढे ते हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन चे सक्रिय सदस्य झाले. त्यांनी या संघटनेचा मोठ्या प्रमाणावर प्रचार केला. त्यांनी भगत सिंह, कॉम्रेड रामचंद्र आणि भगवतीचरण व्होरा यांच्यासोबत लाहोर येथे ‘नौजवान भारत सभा’ची स्थापना केली. या संघटनेचा उद्देश होता तरुणांना स्वातंत्र्यलढ्यासाठी प्रेरित करणे, वैज्ञानिक आणि तर्कसंगत विचार रुजवणे, जातीयतेचा विरोध करणे आणि अस्पृश्यतेविरुद्ध आवाज उठवणे. यावरून सुखदेव यांना सामाजिक क्रांतीही तितकीच महत्त्वाची वाटत होती हे स्पष्ट होते. बॉम्बचे प्रशिक्षण संघटनेच्या निर्णयानुसार सुखदेव बॉम्बचे कवच तयार करण्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी लाहोरला गेले. त्यानंतर त्यांनी झाशी येथे बॉम्बची चाचणी घेतली. यातून त्यांची धाडसी वृत्ती आणि नियोजनशक्ती दिसून येते. 1928 मध्ये ब्रिटिश सरकारने सायमन कमीशन भारतात पाठवला. या कमीशनच्या विरोधात देशभर निदर्शने झाली. लाहोरमध्ये या आंदोलनाचे नेतृत्व लाला लजपतराय यांनी केले. मात्र ब्रिटिश पोलिसांच्या लाठीहल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने क्रांतिकारक संतप्त झाले. त्याचा बदला घेण्यासाठी ब्रिटिश अधिकारी जे.पी. सॉंडर्स याची हत्या करण्यात आली. या कटात सुखदेव यांचा सहभाग होता. या घटनेनंतर ब्रिटिश सरकारने त्यांना अटक केली. तुरुंगातील संघर्ष आणि उपोषण सुखदेव यांना लाहोर तुरुंगात डांबण्यात आले. 1929 मध्ये त्यांनी तुरुंगातील कैद्यांवर होणाऱ्या अमानुष वागणुकीविरोधात उपोषण सुरू केले. हे उपोषण सोडण्यासाठी इंग्रजांनी त्यांना प्रचंड मारहाण केली. डॉक्टरांनी जबरदस्तीने दूध पाजण्याचा प्रयत्न केला. एकदा कोठडी उघडताच सुखदेव बाहेर पळाले. 10 दिवस उपाशी असूनही ते एवढ्या वेगाने पळाले की त्यांना पकडणे कठीण झाले. अखेर त्यांना पकडून मारहाण करण्यात आली. तरीही त्यांच्या चेहऱ्यावर हास्य कायम होते. त्यांनी पोलिसांना लाथ मारली. त्यांचा प्रतिकार करण्याचाही प्रयत्न केला. व्यक्तिमत्त्व, सवयी आणि धैर्य सुखदेव यांचे कपडे नेहमीच घाणेरडे व मळकट असायचे. त्यांचा पोशाष म्हणजे एक मळालेला अलीगडी पायजमा व त्यावर त्याहून अधिक मळकट कुर्ता. त्यांच्या कुर्त्याची सर्व बटणे उघडी असायची. बऱ्याचवेळा कुर्ता सरकून खांद्यावर यायचा. त्यांच्या डोक्यावर व्यापाऱ्यांसाठी एक गोल टोपी असायची. त्यावर तेल व धुळीचे थर दिसून येत. त्यांचे बूट मात्र महागडे होते. त्यांना त्यांच्या राहणीमानावर कुणी बोललेले आवडत नसे. त्यांना जाईच्या फुलांचे गजरे आणि भाजलेले मक्याचे कणीस आवडत होते. एम एम जुनेजा आपल्या शहीद सुखदेव की प्रामाणिक जीवनी या पुस्तकात लिहितात, सुखदेव यांच्या कपड्यावर कुणी टिप्पणी केली ते चिडत असत. ते म्हणायचे, मी इथे एखाद्या लफंग्याशी लग्न करण्यासाठी आलो नाही. तुम्हाला माझे कपडे आवडत नसतील तर तुम्ही तुमचे डोळे बंद करा. मात्र कधी-कधी ते पक्षाचे हीत लक्षात घेऊ पांढरे धोतर व कुर्ता घालत. पण त्यावर टोपी घालणे टाळत. सुखदेव यांच्या धैर्याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे त्यांनी स्वतःच्या हातावर गोंदवलेले नाव नष्ट करण्यासाठी त्यावर नायट्रिक अॅसिड ओतले होते. एम एम जुनेजा याविषयी लिहितात, सुखदेव यांचा विद्यार्थी दशेत असताना क्रांतिकारकांशी कोणताही सबंध नव्हता. तेव्हा त्यांनी त्यांच्या डाव्या हातावर ओम व त्यांचे नाव गोंदवून घेतले. भूमिगत झालेले असताना या खुणेमुळे ते पकडले जाण्याची शक्यता होती. त्या दिवसांत त्यांनी आग्र्यात बॉम्ब बनवण्यासाठी नायट्रिक अॅसिट लपवून आणले होते. सुखदेव यांनी कुणालाही न सांगता, बरेच नायट्रिक अॅसिड त्यांच्या हातावरील गोंदलेल्या खुणेवर टाकले. सायंकाळपर्यंत त्या जागी फोड आले. त्यांचा हात सुजला. त्यांना तापही आला. पण त्यांनी त्याची माहिती कुणालाही दिली नाही. लाहोर कट खटला 1929 च्या लाहोर कट खटल्यात सुखदेवांसह भगतसिंग व राजगुरी हे 3 प्रमुख आरोपी होते. या खटल्याची नोंद “क्राऊन विरुद्ध सुखदेव व इतर” अशी आहे. त्यांच्यावर दिल्लीतील केंद्रीय विधानसभेतील बॉम्ब हल्ल्याच्या कट कारस्थानात हात असल्याचा आरोप ठेवण्यात आला. अखेरीस त्यांना दोषी ठरवण्यात आले आणि फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. महात्मा गांधी यांनी या तिघांना वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु त्यात यश आले नाही. सुखदेव यांनी फासावर चढण्यापूर्वी महात्मा गांधींना सशस्त्र क्रांतिकारी मार्गाचे समर्थन करणारे पत्र लिहिले होते. या पत्रात त्यांनी क्रांतीकारकांविषयी घेण्यात आलेल्या निर्णयावर तीव्र नापसंती व्यक्त करून भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील दोन मुख्य विचारधारांच्या विचारप्रणालीवर प्रकाश टाकला. सुखदेव यांना हंसराज व्होरा यांच्या प्रयत्नांमुळे लाहोर खटल्यात माफीचा साक्षीदार होण्याची संधी मिळाली, पण त्यांनी ती बाणेदारपणे फेटाळून लावली. या प्रसंगातून सुखदेव यांचे अतुलनीय धैर्य, प्रखर देशभक्ती व त्यागी वृत्ती यांचा प्रत्यय येतो. सुखदेव यांच्या सन्मानार्थ लुधियानातील शाळेला त्यांचे नाव देण्यात आले आहे. भगतसिंगांशी वाद असेंब्ली बॉम्ब हल्ला प्रकरणाची आखणी करताना सुखदेव व भगतसिंग यांच्यात वाद झाला. त्याचे झाले असे की, सुखदेव यांचे भगतसिंग यांच्यावर खूप प्रेम होते. ते दोघे भेटल्यानंतर तासंतास एकमेकांशी बोलत बसत. क्रांतिकारांच्या पक्षाच्या केंद्रीय समितीच्या बैठकीत असेंब्लीमध्ये बॉम्ब फेकण्याचा निर्णय झाला. त्या बैठकीला सुखदेव नव्हते. यावेळी भगतसिंग यांनी हा बॉम्ब आपण स्वतः फेकणार असा हट्टा धरला. पण केंद्रीय समितीतील इतर सदस्यांना हे मान्य नव्हते. हे काम इतर कुणीतरी करेल असे त्यांचे मत होते. सुखदेव यांनीही भगतसिंग यांना विरोध केला. यावरून त्यांच्यात मोठा वाद झाला. त्यावर सुखदेव तावातावाने भगतसिंगांना म्हणाले, तुम्ही अहंकारी झाला आहात. तु्म्हाला वाटत आहे की, पार्टी फक्त तुमच्यावरच अवलंबून आहे. तुम्हाला मरणाची भीती वाटत आहे. तुम्ही घाबरट झाले आहात. पार्टीच्या मूल्यांशी मांडणी तुमच्यापेक्षा इतर कुणीही चांगल्या पद्धतीने करू शकत नाही असे तुम्हाला वाटते नाही. असेंब्लीमध्ये इतर कुणीतरी बॉम्ब फेकेल हा निर्णय तुम्ही केंद्रीय समितीला का घेऊ दिला नाही? अखेर या वादानंतर भगतसिंग यांची बॉम्ब फेकण्यासाठी निवड झाली. शेवटचा क्षण आणि अमर बलिदान 23 मार्च 1931 रोजी लाहोरच्या तुरुंगात भगतसिंग, सुखदेव व राजगुरू या तिघांना फाशी देण्यात आली. सतविंदर सिंग यांनी द एक्झिक्युशन ऑफ भगतसिंग नामक पुस्तक लिहिले. त्यात ते लिहितात, भगतसिंग, सुखदेव व राजगुरू एकमेकांचा हात घेऊन फाशीच्या दोरखंडाकडे निघाले होते. भगतसिंग मध्यभागी होते. तर सुखदेव त्यांच्या डावीकडे तर राजगुरू उजवीकडे होते. त्यांच्या पुढे तुरुंगातील कर्मचारी चालत होते. त्या तिघांनी अचानक 'दिल से निकलेगी ना मरकर भी वतन की उल्फ़त, मेरी मिट्टी से भी खुशबू-ए-वतन आएगी' हे त्यांचे आवडते गाणे गाण्यास सुरुवात केली. कुलदीप नय्यर या घटनेविषयी लिहितात, एकेक करत तिघांचेही वजन करण्यात आले. त्यानंतर त्यांना शेवटची आंघोळ करण्याची सूचना करण्यात आली. त्यानतंर त्यांना काळ्या रंगाचे कपडे घालण्यात आले. त्यांचे चेहरे मात्र उघडे होते. त्यांचे दोन्ही हात व पाय बांदले. त्यानंतर त्यांनी आपल्या गळ्यातील फाशीच्या दोरखंडाचे चुंबन घेतले. त्यावेळी फाशी देणाऱ्या जल्लादाने सर्वात अगोदर कोण फासावर जाणार? असा प्रश्न केला. त्यावर सुखदेव म्हणाले, मी जाणार. त्यानंतर एकेक करत सर्वांना फाशी देण्यात आली. डॉक्टर लेफ्टनंट कर्नल जे जे नेल्सन व डॉक्टर एन एस सोधी यांनी त्यांची तपासणी करून तिघांनाही मृत घोषित केले. त्यानंतर त्यांचे मृतदेह कारागृहाच्या मागच्या भिंती फोडून गुप्तपणे बाहेर काढले व लाहोरपासून जवळपास 50 मैल अंतरावर असणाऱ्या हुसैनीवाला येथे सतलज नदीच्या किनाऱ्यावर फेकण्यात आले. धुरंधर मालिकेतील खालील स्टोरीज वाचा… धुरंधर-67; गोपाळबाबा वलंगकर:विटाळलेले भांडे जाळले की शुद्ध होते, मग माणूस विटाळला तर त्यालाही भाजायचे का? असा सवाल करणारा दलितांचा आधारवड धुरंधर-66; मुक्ता साळवे:वेद आपले 'धर्मपुस्तक' नाही असे ठणकावून सांगणाऱ्या गावकुसाबाहेरील दलित महिलेचा पहिला विद्रोही हुंकार धुरंधर-65; भाऊ दाजी लाड:भारताच्या प्राचीन वारशाचा शोध घेत कुष्ठरोगावर औषध शोधून पाश्चात्यांना जबर धक्का देणाऱ्या जिद्दी तरुणाची गोष्ट धुरंधर-64; दुर्गाबाई देशमुख:राष्ट्रसेवेची अखंड ज्योत असणाऱ्या फ्रॉकवाल्या छोट्या शिक्षिकेची निष्ठा अन् निडरपणाची गोष्ट धुरंधर-63; वासुदेव सीताराम बेंद्रे:शिवजयंतीची तारीख निश्चित करणारा अन् शंभूराजांचे ऐतिहासिक पुनर्वसन करणारे मराठ्यांच्या इतिहासाचे भीष्माचार्य धुरंधर-62; गुरुवर्य केळूसकर:'दादोजी कोंडदेव अन् रामदास स्वामी शिवरायांचे गुरू नाहीत' असे ठामपणे सांगणारा महाराष्ट्राचा उपेक्षित वाङ्मयमहर्षी धुरंधर-61; सी. व्ही. रामन:आकाशाचा अन् समुद्राच्या पाण्याचा रंग निळाच का? या प्रश्नाचे उत्तर प्रकाशाच्या गुणधर्मातून देणारा भौतिकशास्त्रज्ञ धुरंधर-60; अलेक्झांडर कनिंगहॅम:काशी लगत स्वर्गात जाणाऱ्या पायऱ्यांचा शोध लावणारा अन् बुद्धांचा भारत शोधणारा इंग्रजी लष्करी अधिकारी धुरंधर-59; संत बंका:देव आमचाही असेल तर मंदिर का नाही? असा प्रश्न करणारे मोठ्या ग्रंथांचे नव्हे, तर मोठ्या प्रश्नांचे संत! धुरंधर-58; अँटोनियो ग्राम्शी:तुरुंगाच्या 4 भिंतीत जग बदलण्याची शक्ती शोधणारा अन् वैचारिक क्रांती शस्त्रांपेक्षा वरचढ असल्याचे सांगणारा विचारवंत धुरंधर-57; डॉ. श्रीराम लागू:'देवाचे अस्तित्व हीच मोठी अंधश्रद्धा' असल्याचे ठणकावून सांगत समाजाला अस्वस्थ करणारा बुद्धिवादी माणूस धुरंधर-56; राणी गाइदिन्ल्यू:झाशीच्या राणीची गोष्ट माहिती असणाऱ्यांना इंग्रजांना आव्हान देणाऱ्या आदिवासी कन्येची गोष्ट माहिती आहे का? धुरंधर-55; पां. म. बापट:सशस्त्र क्रांतिकारक ते अहिंसक सत्याग्रहाचा सेनापती अन् अखेर झाडू उचलून ग्राम स्वच्छता करणारा सुधारक धुरंधर-54; नाना पाटील:म्हार, मांगांना लांब का ठेवता? ते घान कामं करत्यात म्हणून? तुमचा डावा हातही तेच करतो, असे सांगणारा क्रांतिसिंह धुरंधर-53; नेल्सन मंडेला:भारताला दुसरे घर मानणाऱ्या आफ्रिकन गांधींची कहाणी; 27 वर्षे कैद भोगूनही मनात कटूता न ठेवणारा मदिबा धुरंधर-52; शकुंतला देवी:शाळेचे तोंड न पाहता संगणकाची परीक्षा पाहणाऱ्या अन् गणिताला खेळ मानणाऱ्या कानडी महिलेची जादूई कहाणी धुरंधर-51; केशवराव जेधे:ब्राह्मणेतर चळवळीचा प्रमुख चेहरा अन् सामाजिक न्यायासाठी झगडणारा ठसकेबाज दृढनिश्चयी मराठी लढवय्या धुरंधर-50; डॉक्टर सलीम अली:पक्ष्यांच्या जगाचे रहस्य उलगडून मानवाला निसर्गाच्या दिशेने जाण्यास प्रेरित करणारा पक्ष्यांचा 'चालता फिरता विश्वकोश' धुरंधर-49; सर रोनाल्ड रॉस:'साला एक मच्छर'! मलेरिया अन् डास यांच्यातील परस्पर संबंध शोधून मानवतेची सेवा करणारा थोर वैज्ञानिक धुरंधर-48; होमी जहांगीर भाभा:दगडधोंड्यांच्या भारतात अणुज्योत पेटवून अज्ञानाचा अंधःकार दूर करणारा श्रीमंत घरातला बंडखोर तरुण धुरंधर-47; बिंदेश्वरी प्रसाद मंडल:ओबीसींच्या सामाजिक न्यायाच्या इमारतीचा सर्वात मजबूत पाया रचणाऱ्या बिहारच्या जमीनदाराची कथा धुरंधर-46; कार्ल बुशबी:ना ट्रेन ना प्लेन ना बाईक, तब्बल 27 वर्षांच्या अन् 58 हजार किलोमीटरच्या पदयात्रेची अनोखी कथा जी आजही सुरूय धुरंधर-45; जाईबाई चौधरी:स्त्री जीवन फुलवणारी अन् दलित महिलांना शैक्षणिक, सांस्कृतिक संजीवणी देणारी विदर्भातील थोर सेविका धुरंधर-44; ओशो रजनीश:पापाला पुण्याचे अन् हिंसेला अहिंसेचे कपडे घालावे लागतात असे सांगत ईश्वरापूर्वी स्वतःला शोधण्याचा सल्ला देणारा थोर दार्शनिक धुरंधर-43; अमृता प्रीतम:मैं तेनु फिर मिलांगी, कित्थे? किस तरह? पता नहीं; प्रेम, वेदना अन् स्वातंत्र्याचा सूर छेडत बाईचे जगणे मांडणारी लेखिका धुरंधर-42; दगडाबाई शेळके:स्वतःच्या नवऱ्याचे दुसरे लग्न लावून मराठवाडा मुक्तिसंग्रामात स्वतःला झोकून देणारी जालन्याची 'झाशीची राणी' धुरंधर-41; यशवंत घाडगे:दुसऱ्या महायुद्धात मर्दुमकी दाखवत ब्रिटिशांकडून इटलीच्या सैनिकांना कंठस्नान घालणारा मराठी सैनिक धुरंधर-40; शाहीर अमर शेख:धग, रग, आग, धुंदी अन् बेहोशीची जिवंत बेरीज असणारा तथा 'बर्फ पेटला हिमालयाला विझवायला चला' म्हणणारा शाहीर धुरंधर-39; टी. एन. शेषन:'नेत्यांना नाश्त्यात खाणारे' तथा EC ला अभूतपूर्व ताकद अन् प्रतिष्ठा मिळवून देणारे भारताचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त धुरंधर-38; डॉ. एम एस स्वामीनाथन:उपासमारीच्या सावटाखाली झुरणाऱ्या भारताला स्वावलंबनाचे स्वप्न दाखवून ते सत्यात उतरवणारा शास्त्रज्ञ धुरंधर-37; मेजर शैतान सिंह:1962 च्या भारत - चीन युद्धात 120 जवानांच्या जोरावर शत्रूचा फडशा पाडणारा अन् पोट फाटले तरी मैदान न सोडणारा बहाद्दर धुरंधर-36; राणी वेलू नाचियार:महिलांची फौज तयार करून ईस्ट इंडिया कंपनीच्या सैनिकांना पहिल्यांदा धूळ चारणारी शिवगंगाची 'वीर मंगई' धुरंधर-35; अय्यनकाली:महिलांना छाती झाकण्याची परवानगी मिळवून देणारा अन् दलितांनी पिकवलेले धान्य चालते, मग ते का चालत नाहीत? असा प्रश्न करणारा सुधारक धुरंधर-34; जगन्नाथ शंकरशेठ:लोकांचा विश्वास जिंकणारी श्रीमंती गरिबांवर उधळणारा अन् परकियांनाही आपला वाटणारा मुंबईचा खरा शिल्पकार धुरंधर-33; अण्णाभाऊ साठे:दीड दिवस शाळेत जाऊन साहित्याचा सूर्य झालेला लोकशाहीर; जात, धन अन् धर्मदांडग्यांना आव्हान देणारा अण्णा धुरंधर-32; धीरूभाई अंबानी:गरिबीवर मात करत कोट्यवधी भारतीयांना मोठी स्वप्ने पाहण्याची प्रेरणा देणारे भारताचे एक अप्रतिम उद्योग रत्न धुरंधर-31; राजर्षी शाहू महाराज:अस्पृश्याला मानाचे पान अन् नांगरासाठी तोफा वितळवून लोखंड देणारे शाहू महाराज ग्रेट का होते? धुरंधर-30; चे गेव्हारा:अन्यायाविरोधात लढण्याची जिद्द जागवून अवघ्या जगातील क्रांतीचा चेहरा बनलेला तुमच्या 'T शर्ट'वरील क्रांतिदूत धुरंधर-29; संत कबीर:पैशांच्या मागे पळणाऱ्यांचा देव कसा? असा परखड सवाल करत समस्त मानवतेला साधेपणाचा संदेश देणारा महानायक धुरंधर-28; राणी चेन्नम्मा:स्वकियांची फंदफितुरी जमिनीत गाडून 1857 च्या सशस्त्र उठावापूर्वी इंग्रजांना धूळ चारणारी 'कर्नाटकची लक्ष्मीबाई' धुरंधर-27; अहिल्याबाई होळकर:न्यायबुद्धीने स्वतःच्या नवऱ्याला धारेवर धरत चोराच्याही पोटाचा प्रश्न सोडवणाऱ्या दूरदृष्टीच्या शासक धुरंधर-26; डॉ. जयंत नारळीकर:ब्रह्मास्त्र होते तर रामाच्या राज्यात वीज होती का? असा झोंबणारा प्रश्न करणारा भारताचा मराठमोळा शास्त्रज्ञ धुरंधर-25; मुथुलक्ष्मी रेड्डी:महिला हक्क अन् आईचे 'देवदासी'पण पाहून त्याविरोधात लढा पुकारणाऱ्या भारताच्या पहिल्या महिला आमदार धुरंधर-24; कुलदीपसिंग चांदपुरी:पाकच्या 2000 हून अधिक सैनिकांना 120 जवानांच्या बळावर धूळ चारणारा लढवय्या; '1971' ची अमर गाथा धुरंधर-23; चंद्रप्रभा सैकियानी:पडदा प्रथेवर लाथ घालून महिलांना आभाळ खुले करणारी आसामची हिरकणी; कुमारी माता झाली तरी डगमगली नाही धुरंधर-22; कर्मवीर भाऊराव पायगौंडा पाटील:महाराष्ट्राच्या मातीत शिक्षणाचा सूर्य पेरून उपेक्षितांच्या झोपडीत ज्ञानाचे पीक काढणारा खरा 'धुरंधर' धुरंधर-21; प्रबोधनकार ठाकरे:मराठी समाज मनात मोक्याच्या ठिकाणी पक्क्या गाठी मारून जातिभेदांच्या जखमांचा खोलवर शोध घेणारा बहुजन हिंदुत्त्ववादी धुरंधर-20; भीमराव रामजी आंबेडकर:चवदार तळ्याला ताळ्यावर आणणारा दलितोद्धारक अन् सामाजिक समरसतेचा खरा विवेकी शिल्पकार धुरंधर-19; जिगर मुरादाबादी:'शराब पीने दे मस्जिद में बैठ कर, या वो जगह बता जहाँ खुदा नहीं,' असे म्हणत मौलवींकडून टाळ्या पिटवून घेणारा सूफी शायर धुरंधर-18; आनंदीबाई जोशी:'पृथ्वीच्या पाठीवर हिंदुस्तान इतका दुसरा रानटी देश नाही', असे ठणकावून सांगणाऱ्या भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर धुरंधर-17; भगतसिंग:'बॉम्ब अन् पिस्तुले क्रांती आणत नाहीत, क्रांती लोकांच्या मनात जन्मते', असे ठामपणे सांगणारा 'शहीद ए आझम' धुरंधर-16; शहाजीराजे भोसले:छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याच्या संकल्पनेचे प्रेरणास्थान अन् बृहन्महाराष्ट्राची स्थापना करणारा धोरणी राजा धुरंधर-15; ई. व्ही. रामासामी:देव आहे हे सिद्ध करण्याचे आव्हान देत तर्कशुद्ध अन् निर्भय मतांद्वारे समाजात क्रांती घडवणारा भारताचा 'पेरियार' धुरंधर-14; कार्नेलिया सोराबजी:रूढी परंपरांना आव्हान देत शिक्षण, समानता अन् मानवी हक्कांसाठी अथक झगडणारी भारताची पहिली महिला बॅरिस्टर धुरंधर-13; खासेराव जाधव:बहुजन समाजाच्या खांद्यावरील निरक्षरतेचे 'जू' काढून त्यांना उच्च शिक्षणाच्या गंगेचे पाणी पाजणारा अवलिया धुरंधर-12; तंट्या भिल्ल:आदिवासींमध्ये राष्ट्रीयत्व जागवणारा 'रॉबिनहूड', थोर स्वातंत्र्यसैनिक; वाचा स्वातंत्र्य लढ्यातील संघर्षाचे सोनेरी पान धुरंधर-11; विठ्ठल सखाराम पागे:उकिरड्याला खरकटे माहिती नसल्याच्या काळात 'भूकबळी'वर नामी उपाय शोधणारा राजकारणी धुरंधर-10; मोहन हिराबाई हिरालाल:विनोबा भावेंचे 'सर्वायतन' नक्षलग्रस्त गडचिरोलीत रुजवणारा अन् गरिबांना लक्ष्मीदर्शन घडवणारा अवलिया धुरंधर-9; फातिमा शेख:सावित्रीमाईंची मैत्रीण अन् भारताची पहिली मुस्लिम शिक्षिका; फातिमा एक काल्पनिक पात्र होत्या का? तुम्हीच ठरवा धुरंधर-8; एकनाथ दगडू आवाड:बापाचा बुचडा कापून 'पोतराज' प्रथेवर घाव घालणारा पोरगा; कथित गुन्हेगारीने बदनाम झालेल्या बीडचा थोर माणूस धुरंधर-7; स्वामी विवेकानंद:मानवतेचा उत्कृष्ट प्रेमी, महान निधर्मी तत्ववेत्ता; नरेंद्रनाथ दत्त यांचे अखेरचे काही तास कसे होते? धुरंधर-6; कंदुकुरी वीरेशलिंगम पंथुलु:अंधश्रद्धेवर लाथ घालून विधवा पुनर्विवाह अन् ज्ञानाची वात पेटवणारा आंध्रचा 'लेखणी'सम्राट धुरंधर-5; भाऊराव कृष्णराव गायकवाड ऊर्फ दादासाहेब गायकवाड:दोन वेळा वाचवले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्राण धुरंधर-4; डॉ. विश्राम रामजी घोले:महिला उत्थानासाठी पेटून उठलेला सुधारक, ज्यांची 'बाहुली' ठरली स्त्री शिक्षणाची पहिली बळी धुरंधर-3; पार्वतीबाई आठवले:वैधव्य अन् परावलंबन दैवी भोग मानणारी, पण पोटच्या गोळ्याच्या काळजीने असामान्य झालेली एक निरक्षर स्त्री धुरंधर-2; बसव प्रेमानंद:अंधश्रद्धेच्या खाटेवर आजारी पडलेल्या समाजाला विज्ञानाचे औषध देऊन चमत्कारांची पुरती हवा काढणारा थोर दार्शनिक धुरंधर-1; नरहर अंबादास कुरुंदकर:विचारांची श्रीमंती वाढवणारा अन् आजच्या किर्र वैचारिक काळोखात प्रकाशवाट दाखवणारा थोर विचारवंत

दिव्यमराठी भास्कर 22 Mar 2026 5:30 am

मायेचं चैत्रगौर

स्पंदन; अश्विनी शिंदे - भोईरभारतीय माणूस म्हणजे उत्सवप्रिय. सणांमध्ये...उत्सवांमध्ये रमणारा. आज आपल्या सणवार साजरे करण्याच्या पद्धती कालानुरूप बदलत असल्या तरी या सणांच्या निर्मितीमागे असणाऱ्या सांस्कृतिक, सामाजिक व निसर्गाशी जोडलेल्या संदर्भांचा सूक्ष्मपणे विचार केला की जाणवते, हे सण म्हणजे माणसाच्या जगण्याचे सृष्टीचक्राचे अद्भुत... नयनरम्य सोहळेच! मानवी भावभावनांचा एक उद्गार म्हणजेच आपले सण!भारतीय सणाचं व सृष्टीचं आपल्याला एक अनोखं नात दिसतं. आता हेच पाहा ना, चैत्राची चाहूल लागली की प्रत्येक माहेरवाशिणीच्या मनात चैत्रगौर रुणझुणू लागते.चैत्रगौर म्हणजे चैत्र मासात केली जाणारी पार्वतीची पूजा. पार्वती म्हणजे सृजनाचे शक्तिकेंद्र... नवनिर्मितीचे प्रतीक.या चैत्र गौरीचे नि निसर्गाचे आपल्याला नाते दिसते. चैत्र महिना म्हणजे वसंताच्या आगमनाचा. सर्व ऋतूंचा राजा असणाऱ्या या वसंत ऋतूला भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये ‘कुसुमाकर’असे म्हटले आहे. त्याचे कारणही तसेच आहे. वसंतात निष्पर्ण झाडांना पालवी फुटू लागते. विविधरंगी फुलांची जणू रंगपंचमीच आपल्याला वसंतात पाहायला मिळते. शिशिराची पानगळ संपून सृजनाचे कोंंब वसंताच्या आगमनाने चैत्र महिन्यात फुटू लागतात आणि म्हणूनच चैत्र मास म्हणजे सृष्टीच्या नवचैतन्याचा... सृजनाचा देखणा सोहळाच वाटतो. सृजनाचं प्रतीक म्हणूनच की काय सृजनशक्तीची... आदिमायेची पार्वतीची पूजा बांधणारं चैत्रमासातलं हे चैत्रगौर!चैत्रगौरीचं नातं सृष्टीच्या चक्राशी आहे तसंच ते स्त्रीच्या भावभावनांशीही आहे. आजच्या काळात फार कमी घरांमध्ये चैत्रगौर साजरी केली जात असेल. पण पूर्वी माहेरवाशिणीला चार दिवस विसावण्यासाठी... माहेरी आणण्यासाठीच की जणू काय चैत्रगौर या सणाची रुजवात झाली असावी, असे वाटते. चैत्रातली ही गौर म्हणजे माहेरी आलेली पार्वती. या सणाच्या निमित्तानेविवाहित स्त्रिया लग्नानंतर असलेल्या जबाबदाऱ्यांचे ओझे जणू सासरच्या पायरीवर ठेवून पुन्हा एकदा आपले लाड पुरवून घ्यायला... चार क्षण विसावायला जणू एक मुग्ध बालाच होऊन आपल्या माहेरी येतात. या सणाला माहेरवाशिणीला मायेने माहेरी आणतात. तिला गोडधोड खाऊ घालतात. तिचं कोडकौतुक करतात. सणांच्या मुळाशी असलेले हे गर्भितार्थ जेव्हा आपल्याला उलगडतात तेव्हा या सणांचा गोडवा आपल्याला अधिकच जाणवू लागतो.आता ही चैत्रगौर विराजमानही कुठे होते, तर झोपाळ्यावर. झोपाळा म्हटलं की आपल्याला आठवतं ते आपलं बालपण. कसलीच चिंता नाही. काळजी नाही. जबाबदारी नाही. निश्चिंत असणारे बालपणीचे ते दिवस. बालपणी झोपाळ्याशी जडलेलं नातं ती पौगंडावस्थेत येईपर्यंत अलवारपणे जोडलेलं असतं. कुमारवयातील झोपाळ्यावर झुलणारी कुमारिका ‘दिवस तुझे हे फुलायचे, झोपाळ्यावाचून झुलायचे’ या गीतातील शब्दांप्रमाणे आपलं बालपण मागे टाकून स्वतःच्या नाजूक, अलवार भावनांमध्ये कधी गुरफटायला लागतेकळतच नाही.या वयातला झोका म्हणजे तिच्या मुग्धतेची... अलवारतेची स्पंदनंच! जबाबदारीचे भान येईपर्यंत झोपाळ्याप्रमाणे लयीत झुलणारं... स्त्रीचं हे मुग्ध मन! माहेरवाशीण गौराईही जणूमुग्धा होऊन चैत्रात माहेरी आल्यावर परत एकदा आपल्या बालपणापासूनच्या सगळ्या आठवणींतच जगते. तसेच ती आता माहेरी आली आहे त्यामुळे आता निवांत आहे. निश्चिंत आहे हीच भावना कुठेतरी गौराईच्या झोपाळ्यातून व्यक्त होते.चैत्रगौराचं एक वैशिष्ट्य म्हणजे चैत्रगौरातलंचैत्रांगण. आता आपल्याला अंगणच नाही. पण पूर्वी अंगणामध्येचैत्रांगण साकारलं जायचं. या आदिमायेची... शक्तीची जाणीव करून देणारी शंख, चक्र व गदा ही शस्त्रे; हत्ती, कासव, नाग, गरुड ही वाहनेचैत्रांगणातून काढली जात. त्याचबरोबर ओम्, स्वस्तिक, आंबा, श्रीफळ, उंबर, पिंपळ यांच्या रांगोळ्या म्हणजेचैत्रांगण. राधा-कृष्ण, तुळस यांचाही चैत्रांगणात समावेश असे.चैत्रांगणाला असलेले सांस्कृतिक, पौराणिक संदर्भ यांचे तपशिलात जाऊन विश्लेषण करायचे म्हटले, तर एक वेगळाच लेख लिहावा लागेल, इतकी प्रतिकात्मकता या चैत्रांगणात आहे. या ऋतूत मिळणारी फळेव या ऋतूमानातील आहारानुसार गौरीला नैवेद्य अर्पण केला जातो. कैरी घालून वाटलेली हरभऱ्याची डाळ, कैरीचे पन्हे, बत्तासे, टरबूज, कलिंगड, भिजवलेले हरभरे असा नैवेद्य देवीला अर्पण करतात.चैत्रगौरातला सगळ्यात हृद्य प्रसंग म्हणजे चैत्र गौरीचे विसर्जन. माहेरी आलेली माहेरवाशीण सासरी परतताना भरल्या डोळ्यांनी... जड अंतकरणाने... नि जड पावलांनी आपला परतीचा प्रवास सुरू करते. डोक्यावर गौराईला घेऊन गाणी म्हणत पाणवठ्यावर या गौराईला निरोप दिला जातो.गौराईला निरोप देऊन परतताना... आपल्यासोबत आणली जाते पाणवठ्यावरची वाळू . ही वाळू भरल्या डोळ्यांनी घरभर शिंपली जाते. वाळूचे शिंपण म्हणजेच या माहेरवाशीण गौराईच्या हृद्य आठवणी. या वाळूचा कण नि कण भारलेला असतो माहेरवाशिणीच्या सुख दुःखाने. चार दिवस माहेरी येऊन चिमणीप्रमाणे चिवचिवणारी ही माहेरवाशीण पुन्हा एकदा जबाबदारीची कावडं आपल्या खांद्यावर घेण्यासाठी माहेराहून नवी ऊर्जा घेऊन आपल्या सासरी परतते... नि माहेरी ठेवून जाते. वाळूच्या कणाकणात साठलेलं तिचं लोभसं, लडिवाळ, प्रेमाने भारलेलं अस्तित्व!ashwinibhoir23@gmail.com

फीड फीडबर्नर 22 Mar 2026 4:10 am

‘ये जंग क्यों है?’

नॉस्टॅल्जिया; श्रीनिवास बेलसरेताजमहाल’(१९६३) ही तशी प्रेमकथा, पण साहिर लुधियानवी नावाच्या चिंतनशील कवीने १९६३ साली आलेल्या या चित्रपटात एक कमाल करून ठेवली. प्रेमकथेवरच्या सिनेमासाठी त्यांनी चक्क युद्धावरच एक जबरदस्त गाणे लिहून दिले. ते इतर गाण्यांइतके वाजले नसेल, लोकप्रियही झाले नसेल, पण साहिरची खरी गुणवत्ता आणि मानसिकता याच गाण्याने रसिकांसमोर ठेवली. एक तत्त्वचिंतक आणि विचारवंत कवी असे त्याचे रूप हे गाणे स्पष्ट करते.तसे ताजमहालचे ‘जो वादा किया वो निभाना पडेगा..’ हे रफीसाहेब आणि लतादीदींनी गायलेले अजरामर गाणे वार्षिक बिनाकात पहिल्या क्रमांकावर वाजले, ‘सरताज गीत’ बनले तर ‘पाव छु लेने दो, फुलोंको इनायत होगी’ या रोमँटिक द्वंदगीताला लोकप्रियतेत २३ व्या आणि ‘जुर्मे उल्फतपे हमे लोग सजा देते हैं’ला त्यावर्षी ३० वा क्रमांक मिळाला. त्यामुळे ‘ताजमहाल’ लक्षात राहिला तो रोशन यांच्या कर्णमधुर संगीतासाठी आणि साहिर साहेबांच्या भावुक अर्थपूर्ण गाण्यांमुळे. सिनेमाने २ फिल्मफेयर पुरस्कार पटकावले. सर्वोत्तम गीतकार म्हणून साहिर आणि सर्वोत्कृष्ट संगीतकार म्हणून रोशन साहेब. लतादीदींचेही नामांकन ‘सर्वोत्तम गायिका’ म्हणून झाले होते.निर्माते होते ए. के. नडीयादवाला, दिग्दर्शक एम. सादिक आणि डौलदार राजेशाही संवादलेखन होते तबिश सुलतानपुरी यांचे. लेखक कमर जलालाबादी आणि प्रमुख भूमिकेत होते प्रदीपकुमार (राजकुमार खुर्रम, अर्थात शहाजहान), बीना राय (अर्जुमंद बानो म्हणजेच मुमताज), रहमान (जहांगीर), जीवन (शहजादा शहरयार), वीणा (नूरजहा उर्फ मेहरुनिस्सा), जबीन जलील, (लाडली बानो) आणि हेलन.बादशाहा जहांगीरचा मुलगा शहजादा खुर्रम उर्फ शहाजहानची आग्र्याच्या ‘मीना बझार’मध्ये मुमताजशी नजरानजर होते आणि दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात. मात्र जहांगीराची पत्नी नूरजहाला त्याचे लग्न लाडलीशी व्हावे असे वाटत असते. नूरजहां मुमताजच्या प्रेमात अडथळे आणण्यासाठी कारस्थाने करते. शहाजहाला मुद्दाम युद्धावर पाठवते. शेवटी युद्धात जखमी झालेल्या आपल्या मुलाची तिने केलेली सेवा आणि तिचे प्रेम बघून जहांगीर दोघांचे लग्न लावून देतो अशी ही कथा.साहिरजींनी युद्धाच्या एकंदरच व्यर्थतेवर लिहिलेले हे गाणे म्हणजे एका निरागस प्रेमिकेने ईश्वराकडे केलेली कळकळीची प्रार्थना आहे. आज जगभर पेटलेली महाभयंकर युद्धे, सगळीकडे पसरलेला परस्पर द्वेष आणि हिंसा पाहता हे गाणे या सर्वांवरचे एका कवीचे सखोल चिंतन ठरते.सहिष्णू भारतीय मानसिकतेशी एकरूप झालेले असूनही हे गाणे तितकेसे लोकप्रिय झाले नाही, कारण त्यात वापरलेली उर्दू. अनेक अवघड शब्दांचा अर्थ समजणे जड गेल्याने साहिरच्या इतक्या अनमोल रचनेचे महत्त्व रसिकांच्या लक्षातच आले नसावे. लढाईवर जबरदस्तीने पाठवले गेलेल्या शहाजहानसाठी मुमताज प्रार्थना करते असे दृश्य होते. साहीरने पहिल्याच ओळीत एक वेगळा विचार मांडला होता. शब्द होते -“ख़ुदा-ए-बर्तर तेरी ज़मींपर,ज़मींकी ख़ातिर ये जंग क्यूँ है?हर एक फ़त्ह-ओ-ज़फ़रके दामनपे,ख़ून-ए-इंसानका रंग क्यूँ है?”सर्वशक्तिमान परमेश्वरा, हे जग, ही पृथ्वी तुझीच ना? मग या जमिनीवर जमिनीसाठी युद्धे का होतात? (इथे साहिरवर बायबलमधील एका वचनाचा संस्कार दिसून येतो. ‘लेवीय’ या भागातले २५व्या अध्यायातील वचन सांगते ‘सर्व भूमी ईश्वराची आहे, तिच्यावर मर्यादित काळासाठी वावरणारा माणूस हा केवळ एक प्रवासी आहे.’ असेच कुराणातील सुरा निसाच्या आयत १३१ मध्ये सांगितले आहे. आणि खरेच नाही का? कालपर्यंत इराणचे सर्वेसर्वा असलेले खामेनीई आज कुठे आहेत? सर्व जगाची भूमी जिंकल्याचा दावा करणारा सिकंदर, हिटलर, अनेक देश पादाक्रांत करत भारतावर चालून आलेले मोगल बादशहा कुठे आहेत? सगळे प्रवासी ‘निजधामालाच’ निघून गेले ना?पुढे मुमताज खुदाला विचारते ‘जमीन तुझी, आम्हीही तुझीच लेकरे मग मालकीहक्काचा प्रश्न का यावा? दुसऱ्याची जमीन हडपण्यासाठी निर्घृण खून करण्याची, निष्पाप रक्त वाहवण्याची प्रथा का पडली? इतरांचे जीव घेऊन आपला विजय साजरा करण्याची परंपरा का पडली रे, परमेश्वरा?“ज़मीं भी तेरी है हम भी तेरे’ये मिलकियतका सवाल क्या है?ये क़त्ल-ओ-ख़ूँका रिवाज क्यूँ है?ये रस्म-ए-जंग-ओ-जिदाल क्या है?”मुमताज, अर्थात साहिर साहेबांच्या कल्पनेतली मुमताज विचारते, ‘परमेश्वरा, ज्यांना जगातल्या सगळ्याच गोष्टी हव्या आहेत त्यांची मने मात्र इतकी संकुचित का असतात?‘जिन्हें तलब है जहानभरकी,उन्हींका दिल इतना तंग क्यूँ है?ख़ुदा-ए-बर्तर तेरी ज़मींपर,ज़मींकी ख़ातिर ये जंग क्यूँ है?’युद्ध अटळ आहे हे लक्षात आल्यावर चिंताग्रस्त मुमताज देवाला विनवणी करते, ‘देवा निदान गरीब आया-बहिणींना तरी सुरक्षित ठेव. त्यांची अब्रू राख, त्यांना शांतीने जगू दे. ज्या योद्ध्यांना तू ताकदवान बनवलेस त्यांच्या हृदयात निदान विवेकाचा प्रकाश पाड.‘ग़रीब माओं शरीफ़ बहनोंको,अम्न-ओ-इज़्ज़तकी ज़िंदगी दे.जिन्हें अता की है तूने ताक़त,उन्हें हिदायतकी रौशनी दे.’पण परमेश्वरा, तू जन्माला घातलेल्या य:कश्चित मानवाच्या मनात इतका गर्व कशाला, त्याच्या मनावर मीपणाचा एवढा गंज का चढतो? त्याला सत्य का दिसत नाही?‘सरोंमें किब्र-ओ-ग़ुरूर क्यूँ है,दिलोंके शीशे ये रंग क्यूँ है?ख़ुदा-ए-बर्तर तेरी ज़मींपर,ज़मींकी ख़ातिर ये जंग क्यूँ है?’दक्षिणेतले प्रदेश जिंकायला गेलेल्या प्रियकरासाठी प्रार्थना करताना मुमताज म्हणते, ‘देवा, हे लोक तर स्वत:हून मृत्यूला भेटायला निघाले आहेत. तरी तू त्यांना परत येण्याची मुभा ठेव. त्यांच्यासाठी सुरक्षित परतण्याचा मार्ग खुला ठेव. मानवी मनातल्या प्रेमभावनेची बाग अशी उजाड करू नकोस. प्रेमासारख्या नाजूक गोष्टीला तूच सहारा दे.’तिला पुन्हा समाजात रूढ असलेली एक गोष्ट खटकते. परमेश्वराला ती विचारते, ‘या सुंदर जगात प्रेमाचा उत्सव करायचा सोडून माणसे नेहमी आपल्याच वेगवेगळ्या शस्त्रात्रांनी आपल्याच प्रजातीचा संहार करून मिळवलेला विजय का साजरा करतात?‘कज़ाके रस्तेपे जानेवालोंको,बचके आनेकी राह देना,दिलोंके गुलशन उजड़ न जाए,मुहब्बतोंको पनाह देना,जहाँमें जश्न-ए-वफ़ाके बदले,ये जश्न-ए-तीर-ओ-तफ़ंग क्यों है?आजचे जगभराचे भयंकर चित्र पाहून पुन्हा लक्षात येते कवी किती व्यापक आणि मूलभूत विचार देत असतात आणि समाज ते किती हट्टीपणे नाकारत असतो. कदाचित म्हणूनच जर्मन तत्त्वज्ञ जॉर्ज विल्हेम फ्रेडरिक हेगेल यांनी म्हटले होते, ‘अनुभव आणि इतिहास आपल्याला इतकेच शिकवतो की कोणतेच सरकार आणि देश इतिहासापासून काहीही शिकलेले नाहीत.’

फीड फीडबर्नर 22 Mar 2026 4:10 am

पितृसेवा

महाभारतातील मोतीकण; भालचंद्र ठोंबरेएकदा महर्षी व्यासांना त्यांच्या सर्व शिष्यांनी प्रश्न केला की हे भगवान, या जगात सर्व पुण्यमध्ये श्रेष्ठ पुण्य कोणते? तसेच सर्व धर्मात उत्कृष्ट धर्म कोणता आहे, की ज्यामुळे मनुष्य अक्षय स्वर्गात राहण्याचे सुख भोगू शकतो. तसेच असे एखादे व्रत सांगा जे मृत्यू लोकात राहणाऱ्या सर्व प्रकारच्या लोकांना तसेच लहान व थोरापर्यंत कोणालाही करता येईल.महर्षी व्यास म्हणाले, मी तुम्हाला पाच कर्मरूपी महायज्ञ सांगतो. त्यापैकी कोणीही कोणत्याही एकाचे श्रवण व पालन केल्यास मनुष्याला दिव्य लोकांची प्राप्ती होते. हे पाच कर्म रूपी यज्ञ म्हणजे आपल्या माता-पित्याची भक्तिभावे पूजा, पतीची पूजा, प्राणिमात्रावर प्रेम करणे, मित्रांशी द्रोह न करणे आणि भगवान विष्णूंची निष्काम भक्ती हे आहेत. हे पाच यज्ञ सर्व लोक विना कष्ट करू शकतात. सर्व धर्मात या गोष्टींना मान्यता आहे. हे पाळल्यास त्याचे जे फळ मिळते ते अन्य कशानेही मिळत नाही.माता-पित्याची सेवा केल्याने शेकडो यज्ञ केल्यानेही जे पूण्य प्राप्त होत नाही, त्यापेक्षाही जास्त पूण्य मिळते म्हणून माता-पित्यांची सेवा आदराने व भक्तिभावाने करावी.पिता साक्षात धर्माचे स्वरूप आहे. पिताच स्वर्ग आहे, म्हणून पित्याची पूजा व सेवा केल्याने धर्म व स्वर्गीय सुखे प्राप्त होतात. त्याची सेवा करून त्यांना संतुष्ट ठेवणे, हीच मोठी तपश्चर्या आहे. माता-पित्यांना सेवेने संतुष्ट ठेवणाऱ्याला दररोजच्या गंगा स्नानाचे पुण्य लाभते.वडील देवता समान असतात व आईमध्ये सर्व तिर्थे समाविष्ट असतात, म्हणून माता-पितांना प्रदक्षिणा करणाऱ्या पुरुषाला सप्त द्विपाच्या सर्व भुमंडळाची प्रदक्षिणा केल्याचे पुण्य लाभते. माता-पित्याचे पाय धुऊन ते पाणी तीर्थ म्हणून प्राशन केल्याने शेकडो जन्माची पापे नष्ट होतात. आई-वडिलांच्या पायावर डोके ठेवून नमस्कार केल्यावर कपाळाला चिकटणारे धूलीकण तुमच्या पवित्रतेची ग्वाही देतात. ज्यांचे गुडघे, डोके व हात आई-वडिलांना नमस्कार करण्यासाठी जमिनीवर टेकतात, त्यांना अक्षय स्वर्ग प्राप्त होतो.उलट माता-पित्याची आज्ञा पालन न करणारा व त्यांनी सांगितलेल्या गोष्टीचा तिरस्कार करणारा नरकात जातो. माता-पित्याचे पूजन न करता जो भजन करतो तो कृमीरूपाने कल्पापर्यंत नरकात राहतो. आपल्या वृद्ध रोगी तसेच उदरनिर्वाहाचे साधन नसलेल्या, अंध व कानाने ऐकून न येणाऱ्या, माता-पित्यांना जो सोडून देतो तो रौरव नरकात जातो.वृद्धपणी मातापित्याचे पालन-पोषण न करणाऱ्यांचा पुढचा जन्म चांडाळाच्या घरी होतो व तो नीच कर्म करून यातना भोगतो. अशा माणसाच्या सर्व पुण्याचा नाश होतो. माता-पित्याची पूजा न करता केवळ देव-देवतांची पूजा व तीर्थार्टने केल्याने पुण्यची प्राप्ती होत नाही. तो एखाद्या कीटकाप्रमाणे जमिनीवर राहतो. त्यामुळे माता-पित्यांचे पूजन व सेवा यांचा महिमा फार मोठा आहे. त्यामुळे अतुलनीय पुण्य प्राप्त होते, असे पद्म पुराणात सांगितलेले आहे.

फीड फीडबर्नर 22 Mar 2026 4:10 am

मनभावन चैत्रगुढी

स्मृतीगंध; लता गुठेमुंबईसारख्या महानगरात सिमेंटच्या जंगलात राहताना कधी ऋतू बदलतो समजतही नाही; परंतु ग्रामीण भागामध्ये प्रत्येक ऋतूची वैशिष्ट्ये जाणवतात. हिवाळा, उन्हाळा, पावसाळा त्या ऋतूचे वेगळेपण आणि त्याप्रमाणे निसर्गात होणारे बदल हे सर्व अनुभवताना एक चैतन्याचा अनुभव मनाला भुरळ घालतो. चैत्राची चाहूल लागते ती चैत्र पालवीणे. झाडाची जुनी पालवी गळून त्या जागेवर नवीन कोवळी विविध रंगी पालवी अंकुरते आणि काही दिवसांतच सुखद अनुभव यायला लागतो. अनेक झाडांना फुलोरा आलेला असतो. आंब्याचा फुलोरा सर्व परिसर सुगंधित करतो. त्या सुगंधाने कोकीळ मंत्रमुग्ध होऊन गाऊ लागतो. आज खिडकीतून बाहेर पाहताना झाडाला फुटलेल्या नवीन पालवीने लक्ष आकर्षित केलं. आंब्याचा मोहोर समोर दिसत होता; परंतु सुगंध मात्र मनापर्यंत पोहोचलाच नाही. गुढीपाडव्याचा दिवस मनात रेंगाळत होता. आळस झटकून गुढी उभारण्याचा विचार करू लागले.लहानपणी गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी शाळेमध्ये गुरुजी गुढीपाडव्याची समृद्ध, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरा याविषयी माहिती अशा काही पद्धतीने सांगायचे की आम्ही सर्व त्यामध्ये रमून जायचो. “बरं का मुलांनो...” या वाक्याने ते सुरुवात करायचे. पुराण कथेनुसार या दिवशी ब्रह्मदेवांनी सृष्टीची निर्मिती केली, त्यामुळे हा दिवस ‘सृष्टीनिर्मितीचा आरंभ’ मानला जातो. दुसरी गोष्ट म्हणजे, याच दिवशी राम रावणावर विजय मिळवून अयोध्येत परत आले. लोकांनी विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी गुढ्या उभारल्या. त्यामुळे गुढीपाडवा हा ‘सत्याचा असत्यावर विजय’ दर्शवणारा सण आहे आणि तिसरी गोष्ट शालिवाहन राजाने शत्रूंवर विजय मिळवून ‘शालिवाहन शक’ सुरू केलं तो दिवस म्हणजे गुढीपाडवा. त्यामुळे हा दिवस विजय, शौर्य आणि स्वाभिमानाचे प्रतीक मानला जातो. समजलं का? आपण गुढीपाडवा का साजरा करतो? आम्ही माना हलवायचो. हे सर्व आता आठवलं की वाटतं किती सुंदर होतं ते बालपण. याबरोबरच मला आठवली ती लहानपणी अनुभवलेली चैत्रातील सकाळ. सकाळी झोपेतून उठून अंगणात गेलं की मन प्रसन्न व्हायचं. थंडगार वाऱ्याची झुळूक परिसरातील सर्व सुगंध घेऊन अंगाभोवती घुटमळायची. चैत्रातले नवचैतन्य अनुभवताना वाटते, चैत्र म्हणजे नुसता ऋतू बदल नाही, तर नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी आहे. प्रत्येक झाडाचं सौंदर्य जणू सांगत असतं-जुनं सोडून द्या. माझ्या पिकलेल्या पानासारखं आणि नवीन गोष्टींना आत्मसात करा. ते काढून टाकून हिरव्या स्वप्नांची पालवी आत्मसात करा.मराठी नववर्षाचा पहिला दिवस साजरा करतो गुढी उभारून. घराघरांत उभारली जाणारी गुढी म्हणजे केवळ एक परंपरा नाही, तर ती विजयाचं प्रतीक आहे. लहानपणी गुढीची तयारी आदल्या दिवशीपासूनच सुरू व्हायची. आमच्या गावी एरंडाची उंच काठी गुढीसाठी वापरतात. ती आदल्या दिवशीच आणली जायची. आजी घरातील पितांबर आणि तांब्याचा लोटा काढून ठेवायची. लाल रंगाचा प्युअर जरी-काठ असलेला रेशमाचा पितांबर गुढीला बांधला जायचा. त्यावर साखरेची गाठी आणि लिंबाचा ढगळा बांधून ती गुढी चौकामध्ये तुळशी वृंदावनाच्या बाजूला बांधली जायची. गूळ आणि कडुलिंबाचा तौर एकत्र करून त्याचा प्रसाद सर्वांना वाटला जायचा. आरोग्यासाठी चांगला असतो म्हणून वाकडं तोंड करून खात असू.गुढीपाडव्याच्या सकाळी सर्वांच्या घराबाहेर उभारलेली गुढी, दाराला लावलेले तोरण आणि अंगणातली रंगोळी हे सर्व पाहून मन प्रसन्न व्हायचे. कडूलिंब-गुळाचा गंध कडुलिंबाच्या कडूपणात आणि गुळाच्या गोडीत दडलेला अर्थ असा असावा. माणसाचे जीवन हे कडू आणि गोड अनुभवांनी समृद्ध होते. निसर्ग जसा स्वतः नव्यानं सर्व गोष्टींचा आनंदाने स्वीकार करतो. जुन्या वर्षातली पानगळ झटकून नवीन पालवी सुखाने अंगावर फुलवतो तसंच काहीसं आपणही आपल्या मनातील थकवा, निराशा झटकून नव्या आशा-आकांक्षांनी सुख शांती समृद्धीसाठी एकमेकांना शुभेच्छा देतो. चैत्रमास म्हणजे निसर्गाचं प्रत्यक्षात अवतरलेलं स्वप्न. त्या स्वप्नांना अभिमानाने वंदन करणारी गुढी. माणसांच्या स्वप्नांना आकाशात झेप घेण्याची उर्मी, प्रेरणा जागवणारा शुभशकुन. चैत्रमासातला गुढीपाडवा या दोघांच्या संगमातून तयार होतो-एक सुंदर, प्रसन्न आणि आशावादी जीवनाचा आरंभ.निसर्गाच्या या हिरव्यागार कुशीत, गुढीच्या उंचावलेल्या गुढीकडे पाहून अभिमानाने जगण्याची नवी उमेद मनात जागृत होते.

फीड फीडबर्नर 22 Mar 2026 3:30 am

भारताची भविष्योन्मुख वाटचाल

विशेष; प्रा. सुखदेव बखळेगेल्या काही दशकांमध्ये देशातील वीजमागणी झपाट्याने वाढत आहे. पण जीवाश्म इंधनांवर अवलंबून राहणे दीर्घकालीनदृष्ट्या शक्य नाही. या पार्श्वभूमीवर स्वच्छ, स्थिर आणि दीर्घकालीन ऊर्जा स्रोत म्हणून अणुऊर्जेकडे गंभीरपणे पाहिले जात आहे. म्हणून भारताने अणुऊर्जा क्षेत्रात धोरणात्मक बदल करत ‌‘सस्टेनेबल हार्नेसिंग अॅण्ड ॲडव्हान्समेंट न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी फॉर इंडिया‌’ (शांती ॲक्ट २०२५) हा महत्त्वाचा कायदा लागू केला आहे.भारताने अणुऊर्जा क्षेत्रात धोरणात्मक बदल करत ‌‘सस्टेनेबल हार्नेसिंग अॅण्ड ॲडव्हान्समेंट न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी फॉर इंडिया‌’ (शांती ॲक्ट २०२५) हा महत्त्वाचा कायदा लागू केला आहे. हा कायदा लागू करताना केंद्र सरकारने ‌‘ॲटॉमेटिक एनर्जी ॲक्ट, १९६२’ आणि ‌‘सिव्हिल लायबेलिटी फॉर न्यूक्लिअर डॅमेज ॲक्ट २०१०’ हे दोन जुने कायदे रद्द करून त्याऐवजी एकसंध आणि आधुनिक कायदेशीर चौकट तयार केली आहे. त्यामुळे अणुऊर्जा क्षेत्रातील गुंतवणूक, नियमन आणि विकास यांना नवी दिशा मिळण्याची अपेक्षा आहे. भारतातील ऊर्जेची मागणी सातत्याने वाढत आहे. पुढील दोन-तीन दशकांमध्ये देशातील वीजवापर दुप्पट होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. सौर आणि पवन ऊर्जा यांसारख्या नवीकरणीय स्रोतांचा मोठ्या प्रमाणावर विस्तार होत असला तरी त्यांची एक मर्यादा आहे. त्यांची उपलब्धता सतत स्थिर नसते. याउलट अणुऊर्जा हा स्थिर आणि सातत्यपूर्ण वीजपुरवठा करणारा स्रोत आहे. त्यामुळे ऊर्जा मिश्रणात अणुऊर्जेचा वाटा वाढवणे हे भारताच्या दीर्घकालीन ऊर्जा सुरक्षेसाठी महत्त्वाचे मानले जाते. सध्या भारताची अणुऊर्जा क्षमता सुमारे ८.७८ गिगावॅट आहे आणि देशातील एकूण वीज उत्पादनात तिचा वाटा सुमारे तीन टक्के आहे. हा वाटा वाढवण्यासाठी सरकारने महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले आहे. २०४७ पर्यंत शंभर गिगावॅट अणुऊर्जा क्षमता निर्माण करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेला ‌‘शांती कायदा‌’ हा केवळ कायद्यांचे एकत्रिकरण नसून अणुऊर्जा क्षेत्राच्या संपूर्ण रचनेत बदल घडवून आणण्याचा प्रयत्न आहे.शांती कायद्याची व्याप्ती तीन प्रमुख स्तरांवर दिसते. त्यात अणुऊर्जा क्षेत्राचे नियंत्रित उदारीकरण, नियामक व्यवस्था मजबूत करणे आणि गुंतवणुकीसाठी अनुकूल वातावरण तयार करणे, यांचा समावेश आहे. यातील सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे खासगी क्षेत्राला मर्यादित स्वरूपात अणुऊर्जा क्षेत्रात सहभागी होण्याची परवानगी. दीर्घकाळ केवळ सरकारी संस्थांच्या माध्यमातून भारतातील अणुऊर्जा प्रकल्पांचे संचालन होत होते. हे मॉडेल सुरक्षित असले, तरी क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने मर्यादित ठरत होते. नवीन कायद्यामुळे भारतीय खासगी कंपन्या, संयुक्त उपक्रम आणि इतर मान्य संस्थांना अणुऊर्जा प्रकल्प उभारणे, संचालन करणे आणि बंद करणे यासाठी परवाना घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. तथापि, काही अत्यंत संवेदनशील क्षेत्रे अजूनही केंद्र सरकारच्या नियंत्रणाखालीच ठेवण्यात आली आहेत. त्यात युरेनियम समृद्धीकरण, अणुइंधन पुनर्प्रक्रिया, उच्चस्तरीय अणुकचरा व्यवस्थापन, जड पाण्याचे उत्पादन यांचा समावेश आहे. यामुळे राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित बाबींवर सरकारी नियंत्रण कायम राहणार आहे. या कायद्यामुळे अणुऊर्जा क्षेत्रातील नियमन अधिक स्पष्ट आणि मजबूत करण्यात आले आहे. या अंतर्गत ‌‘ॲटॉमिक एनर्जी रेग्युलेटरी बोर्ड‌’ या संस्थेला प्रथमच वैधानिक दर्जा देण्यात आला आहे. परिणामी, या संस्थेची स्वायत्तता आणि विश्वासार्हता वाढण्याची अपेक्षा आहे. नवीन कायद्यात परवाने देणे, तपासणी करणे, उल्लंघनांवर कारवाई करणे आणि दंडात्मक कारवाई करणे यासाठी स्पष्ट प्रक्रिया निश्चित करण्यात आली आहे.अणुऊर्जा प्रकल्पांबाबत गुंतवणूकदारांना सर्वाधिक चिंता असते, ती अपघाताच्या परिस्थितीमध्ये होणाऱ्या आर्थिक जबाबदारीची. पूर्वीच्या कायद्यानुसार ऑपरेटरची नुकसानभरपाई जबाबदारी १५ अब्ज रुपये इतकी मर्यादित होती; परंतु पुरवठादारांविरुद्ध कारवाईच्या तरतुदींमुळे आंतरराष्ट्रीय कंपन्या भारतात गुंतवणूक करण्यास कचरू लागल्या. नवीन कायद्याने स्तरानुसार नुकसानभरपाई प्रणाली लागू केली आहे. मोठ्या रिॲक्टरसाठी ही मर्यादा ३० अब्ज रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे, तर लहान प्रकल्पांसाठी कमी मर्यादा ठेवण्यात आली आहे. याशिवाय स्वतंत्र अणुऊर्जा नुकसानभरपाई निधी तयार करण्याची तरतूद करण्यात आली आहे. भारताने अणुऊर्जा विस्तारासाठी दीर्घकालीन योजना आखली आहे. सरकारच्या मते २०३१-३२ पर्यंत अणुऊर्जा क्षमता २२ गिगावॅटपेक्षा अधिक होऊ शकते. यासाठी देशांतर्गत विकसित ७०० मेगावॉट रिॲक्टर, आंतरराष्ट्रीय सहकार्य प्रकल्प आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. याचबरोबर लघू मॉड्युलर रिॲक्टर (एसएमआर) विकसित करण्यावरही सरकार भर देत आहे. या क्षेत्रात संशोधनाचे नेतृत्व ‌‘भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर‌’सारख्या संस्थेकडे आहे. आज जगभर ऊर्जा संक्रमणाची प्रक्रिया सुरू आहे. सौर आणि पवन ऊर्जेचा विस्तार वेगाने होत असला तरी त्या स्रोतांची उपलब्धता हवामानावर अवलंबून असते. अशा परिस्थितीत अणुऊर्जा स्थिर, कमी कार्बन उत्सर्जन करणारा आणि मोठ्या प्रमाणावर उपलब्ध ऊर्जा स्रोत म्हणून महत्त्वाची ठरते.भारताच्या ऊर्जा धोरणात अणुऊर्जेला आता नवी भूमिका दिली जात आहे, ती नवीकरणीय ऊर्जेची स्पर्धक नसून पूरक स्रोत म्हणून पाहिली जात आहे. ‌‘शांती कायदा‌’ लागू झाल्यानंतर अणुऊर्जा क्षेत्रात गुंतवणुकीच्या नवीन संधी निर्माण होण्याची शक्यता आहे. खासगी कंपन्या, तंत्रज्ञान पुरवठादार आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांसाठी भारताचे अणुऊर्जा क्षेत्र अधिक आकर्षक बनू शकते. यामुळे नवीन प्रकल्पांची गती वाढू शकते. तंत्रज्ञान हस्तांतरणाला चालना मिळू शकते. देशांतर्गत उत्पादन आणि संशोधनाला प्रोत्साहन मिळू शकते. या कायद्याचे यश केवळ कायदेशीर चौकटीवर अवलंबून राहणार नाही. काही महत्त्वाची आव्हाने अजूनही कायम आहेत. त्यात प्रामुख्याने अणुऊर्जा प्रकल्पांचा प्रचंड खर्च, स्थानिक लोकांचा विरोध, पर्यावरणीय चिंता, नियामक प्रक्रियेत होणारा विलंब यावर प्रभावी उपाययोजना केल्याशिवाय अणुऊर्जा विस्तार अपेक्षित गतीने होणे कठीण ठरू शकते. ‌‘शांती कायदा २०२५’ हा भारताच्या अणुऊर्जा धोरणातील महत्त्वाचा टप्पा आहे. ऊर्जा सुरक्षा, हवामानबदल आणि आर्थिक विकास या तीन मोठ्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर हा कायदा भविष्यातील ऊर्जा धोरणाची दिशा ठरवू शकतो. खासगी क्षेत्राचा सहभाग, नियामक संरचनेची बळकटी, गुंतवणूक सुलभता आणि तांत्रिक प्रगती या माध्यमातून अणुऊर्जा क्षेत्राला नवे आयाम मिळण्याची शक्यता आहे; मात्र या धोरणाचे खरे यश अंमलबजावणीवर अवलंबून राहणार आहे. योग्य नियोजन, पारदर्शक प्रशासन आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांचा संगम साधला गेला तर भारताच्या ऊर्जा भवितव्यात अणुऊर्जा एक महत्त्वाचा आधारस्तंभ ठरू शकते.कायद्यांचे एकत्रिकरणच नव्हे, तर अणुऊर्जा क्षेत्राच्या वाढीस अडथळा ठरणाऱ्या काही संरचनात्मक समस्यांवर उपाय शोधण्याचा प्रयत्नही या कायद्यात करण्यात आला आहे. त्यात सरकारी नियंत्रणाखाली असलेले संचालन मॉडेल, गुंतवणूक रोखणारी नुकसानभरपाईची जबाबदारी व्यवस्था, एका बंद, एकमेव ऑपरेटरवर आधारित नियामक रचना हे पूर्वी अडथळे ठरत होते. नवीन कायदा या सर्व बाबींमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करतो. पूर्वी ऑपरेटरला दोषपूर्ण उपकरणांबाबत पुरवठादारांविरुद्ध थेट कारवाई करण्याचा अधिकार होता. यामुळे पुरवठादारांना मोठ्या जोखमीला सामोरे जावे लागत होते आणि अनेक परदेशी कंपन्या भारतात येण्यास कचरू लागल्या. नवीन कायद्यानुसार फक्त करारात नमूद असल्यास किंवा जाणीवपूर्वक चुकीचे कृत्य सिद्ध झाल्यास पुरवठादारांविरुद्ध कारवाई करता येईल. यामुळे भारताची कायदेशीर चौकट आंतरराष्ट्रीय मानकांशी सुसंगत करण्यात आली आहे. कायद्यात नवीन तक्रार निवारण यंत्रणाही तयार करण्यात आली आहे. यामध्ये अणुऊर्जा तक्रार सल्लागार परिषद, नियामक निर्णयांवर अपील करण्यासाठी स्वतंत्र प्राधिकरण, नुकसानभरपाईसाठी विशेष दावा आयुक्त आणि दावा आयोग यांचा समावेश आहे. केंद्र सरकारने २०२५-२६ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात २०० अब्ज रुपये लघू मॉड्युलर रिॲक्टर (एसएमआर) विकसित करण्यासाठी देण्यात आले आहेत. २०३३ पर्यंत किमान पाच स्वदेशी ‌‘एसएमआर‌’ कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.‌‘शांती कायदा २०२५’ हा भारताच्या अणुऊर्जा धोरणातील महत्त्वाचा वळणबिंदू ठरू शकतो. कायद्यांचे एकत्रिकरण, खासगी क्षेत्राचा सहभाग, नुकसानभरपाई व्यवस्थेतील सुधारणा आणि नियामक संस्थेची बळकटी या माध्यमातून अणुऊर्जा क्षेत्राला अधिक सक्षम आणि विस्तारक्षम बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ऊर्जा सुरक्षेसोबतच हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छ आणि स्थिर ऊर्जेची गरज वाढत असताना हा कायदा भारताच्या ऊर्जा भवितव्यासाठी महत्त्वाची पायाभरणी ठरू शकतो.

फीड फीडबर्नर 22 Mar 2026 3:10 am

मॉर्निंग वॉक बेतला जीवावर

क्राइम : अॅड. रिया करंजकरसकाळचं चालणं हे तब्येतीसाठी चांगलं असतं हे खुद्द डॉक्टर सांगतात आणि लोकही सुदृढ राहण्यासाठी पहाटेच फेरफटका मारायला बाहेर पडतात. यामध्ये वयस्कर लोकांची संख्या जास्त असते कारण नोकरीतून रिटायर झालेले असतात. तेवढाच विरंगुळा आणि ओळखीच्या लोकांशी गप्पा मारता येतील म्हणून हे लोक पहाटेच फेरफटका मारण्यासाठी जवळच्याच गार्डनमध्ये जातात.सुरेखा या बँकेतून अकाउंटंट म्हणून रिटायर झाल्या होत्या. काही दिवस गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की, आपल्याकडे आता वेळच वेळ आहे. नोकरीला असताना सकाळी जी धावपळ व्हायची ती आता थांबलेली आहे. तेव्हा हा मोकळा वेळ कसा घालवायचा असा विचार करत असताना सुरेखा यांनी ठरवलं की, आपण पहाटे फेरफटका मारायला जायचं. त्याच्यामुळे पायही मोकळे होतील आणि तब्येतही चांगली राहील. शिवाय काही नवीन ‌व्यक्तींसोबत ओळखही होईल.ठरविल्याप्रमाणे त्या फिरण्यासाठी बाहेर पडल्या. त्यांनी जाताना स्वतः सोबत एक छोटी साईड बॅग घेतली होती. थोडं अंतर चालून गेल्यावर एका ठिकाणी मागून कोणीतरी आपली बॅग हिसकावत असल्याचं त्यांना जाणवलं म्हणून त्यांनी मागे येऊन बघितलं तर स्कुटीवर दोन मुलगे होते. त्या दोघांनी हेमलेट घातलेलं होतं त्यामुळे त्यांचे चेहरे दिसत नव्हते. एक पुढे बसलेला होता, त्याच्या हातात गाडी होती आणि मागचा जो मुलगा होता तो बॅग हिसकावत होता. त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी जोरात आपली बॅग पकडली आणि या झटापटीमध्ये मागे बसलेल्या मुलाने गाडीवरून उतरून सुरेखा यांना जोरात धक्का दिला. त्या धक्क्यात सुरेखा या जमिनीवर पडल्या आणि सुरेखांच्या हातातली बॅग घेऊन ती मुलं गाडीवरून पळाली.पहाटेची वेळ असल्यामुळे रस्त्याला कोणीच नव्हते. फक्त दोन-तीन जण सुरेखासारखेच चालण्यासाठी आले होते. त्यांनी तत्काळ पोलीस स्टेशनला ही माहिती दिली आणि मुख्य म्हणजे सुरेखाची बॅग गेली होती, त्यात पाच ते सहा हजार रुपये होते आणि त्यांचा मोबाईलही त्याच्यातच होता. शिवाय सुरेखाच्या डोक्याला लागल्यामुळे त्यांना आपल्या घरी ही माहिती देताना अडचण येऊ लागली. पोलिसांनी तत्काळ तिथे आल्यानंतर त्यांना दवाखान्यात अॅडमिट केले आणि त्यांच्या कुटुंबाला कळवले.पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे चेक केल्यानंतर त्यांना गाडीचा नंबर दिसला आणि त्या गाडीच्या नंबरच्या पुराव्यानिशी त्यांनी एका तरुणाला ताब्यात घेतले. त्यांनी आम्ही सकाळी सकाळी फिरायला निघालेलो होतो आणि आमच्या सोबत काही मित्र होते, ते पुढे होते असं त्यांनी सांगितलं, म्हणून पुन्हा सीसीटीव्ही चेक केल्यानंतर पुढे उभे असलेल्या गाड्यांवरचे नंबर बघून त्या मित्रांना ताब्यात घेऊन त्यांना साक्षीदार करण्यात आलं आणि त्या साक्षीदार मित्रांनी मागे कसला तरी आवाज झाला म्हणून आम्ही मागे बघितलं तर हे दोघे मित्र त्या बाईची बॅग हिसकावत होते, हे आम्हाला दिसलं. आम्ही घाबरलो आणि तिथून पळालो अशी जबानी त्यांनी दिली. जो गाडी चालवत होता तो पोलिसांच्या ताब्यात आला होता आणि जो सुरेखाची बॅग हिसकावत होता आणि ज्यांनी सुरेखाला पाडलं होतं तो मात्र अजूनही पोलिसांच्या ताब्यात सापडला नव्हता. त्यामुळे ज्याने गाडी चालवली होती, अजूनही तुरुंगातच होता त्याला जामीन मिळत नव्हता कारण त्याचा मित्र अजूनही पोलिसांच्या ताब्यात नव्हता आणि हिसकावून घेतलेली रक्कम आणि मोबाईल अजून मिळालेला होता.या साखळी चोर किंवा गाडीवरून चोरी करणाऱ्यांचं लक्ष हे पहाटे फेरफटका मारणारे लोक जास्त असतात. कारण ही लोकं एक तर सेवानिवृत्त झालेली असतात आणि वयोवृद्ध झाल्यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती जरा कमी झालेली असते. त्यामुळे अशा चोरांशी ते झटापटी करू शकत नाही आणि महिला म्हटल्यावर काही नाही. काहीतरी दागिने त्यांच्याकडे मिळणारच असं त्यांचं लक्ष असतं आणि सुरेखा सेवानिवृत्ती झाल्यानंतर पहिल्यांदाच फेरफटका मारायला गेला आणि त्यांना पहिल्या दिवशीच हा चोराचा फटका मिळाला. आता आपला मोबाईल आणि बॅगेत असलेल्या रकमेसाठी त्यांना पोलीस स्टेशनला येरझारा घालाव्या लागत आहेत आणि एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात मिळाल्यामुळे आता हे सर्व प्रकरण कोर्टात गेलेलं आहे. तेव्हा वयोवृद्ध व्यक्तींनी फेरफटका मारायला जाताना सोबत अजूनही दोन-तीन मित्र-मैत्रिणींना घ्यावे ज्यामुळे रस्त्यावरील चोरांचा धोका जाणवणार नाही.(सत्यघटनेवर आधारित)

फीड फीडबर्नर 22 Mar 2026 2:30 am

जीवनगाणे - अर्थपूर्ण जगण्याचा सुरेल प्रवास

गोष्ट लहान, मोठा अर्थ : शिल्पा अष्टमकरजीवन हे एका सुंदर गाण्यासारखे असते. प्रत्येकाच्या जीवनात वेगवेगळे सूर, ताल, चढ-उतार, आनंद-दुःख यांचा संगम असतो. ‘जीवनगाणे’ हा शब्द आपल्याला जीवनाकडे सकारात्मक, समतोल आणि सजग दृष्टिकोनातून पाहण्याची प्रेरणा देतो.१. जीवनगाण्याचा अर्थ : जीवनगाणे म्हणजे आपले संपूर्ण आयुष्य –आपले विचार, भावना, कृती, नाती आणि अनुभव यांचे एक सुंदर मिश्रण. जसा गाण्यात प्रत्येक स्वर महत्त्वाचा असतो, तसाच जीवनात प्रत्येक क्षण महत्त्वाचा असतो.२. जीवनातील सूर आणि ताल : आनंदाचे सूर – यश, प्रेम, समाधान•. दुःखाचे सूर – अपयश, विरह, संघर्ष. संघर्षाचा ताल – अडचणींना सामोरे जाण्याची ताकद, आशेची लय – पुढे जाण्याची प्रेरणा. जर गाण्यात फक्त एकच स्वर असेल, तर ते कंटाळवाणे वाटते. त्याचप्रमाणे जीवनातही विविध अनुभव आवश्यक असतात.३. सकारात्मक दृष्टिकोनाचे महत्त्व : जीवनगाणे सुंदर बनवण्यासाठी सकारात्मक विचार आवश्यक आहेत.प्रत्येक अडचणीत संधी शोधा , स्वतःवर विश्वास ठेवा. छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधा.४. नातेसंबंधांची भूमिका : जीवनगाणे एकट्याने गाता येत नाही.आपले कुटुंब, मित्र, शिक्षक, सहकारी हे आपल्या जीवनगाण्याचे सहगायक असतात. प्रेम आणि विश्वास नात्यांना मजबूत करतात. संवाद नात्यांमध्ये गोडवा आणतो.५. आत्मविकास – जीवनगाण्याचीसराव प्रक्रिया.जसे गाण्यासाठी सराव आवश्यक आहे, तसेच जीवनासाठीही आत्मविकास गरजेचा आहे. •नवीन गोष्टी शिकणे. चुका स्वीकारून सुधारणा करणे. शिस्त आणि मेहनत ठेवणे.६. अडचणी – जीवनगाण्यातील कठीण स्वर.अडचणी म्हणजे जीवनातील “कठीण नोट्स” आहेत. त्या आपल्याला मजबूत बनवतात. अपयशातून शिकणे. हार न मानणे. धैर्य राखणे.७. समाधान आणि आनंद.खरे जीवनगाणे तेच जे समाधानाने भरलेले असते. जे आहे त्यात आनंद मानणे. कृतज्ञता ठेवणे. इतरांना मदत करणे. जीवनगाणे प्रत्येकाने स्वतःच्या पद्धतीने गायचे असते. त्यात कधी दुःखाचे स्वर असतील, कधी आनंदाचे; पण महत्त्वाचे म्हणजे ते गाणे थांबू नये. “जीवन सुंदर आहे, फक्त ते मनापासून जगण्याची गरज आहे.”उन्हाळ्याचे दिवस होते. आभाळातून जणू आगीचे लोळ बाहेर पडत होते. सर्वत्र दुष्काळ पडला होता. अशा वेळी काही ससे एकत्र जमून एका झाडाखाली विश्रांती घेत होते. दुष्काळामुळे सशांना कोवळी पाने खायला मिळत नव्हती. गावात गेल्यावर तेथील कुत्रे त्यांना त्रास देत. त्यामुळे सर्व ससे दुःखी झाले होते.बोलता-बोलता त्यातील एक ससा म्हणाला, “देवाने आपल्यावर खरोखरच अन्याय केला आहे. सर्व प्राण्यांना स्वसंरक्षणासाठी देवाने काहीतरी दिलं. पण आपल्याला मात्र जीव वाचवण्यासाठी नुसतं पळावं लागतं. त्यामुळे मला जगण्याचा अगदी कंटाळा आला आहे. आता कुठेतरी बुडून मला मरावंसं वाटतं.” त्याचे हे बोलणे ऐकून वैतागलेले इतर ससेही जीव द्यायला तयार झाले आणि खोल पाणी असलेल्या तलावाकडे धावू लागले.तलावाकाठी काही बेडूक विश्रांती घेत होते. सशांना पाहून ते घाबरले आणि पटकन पाण्यात पळाले. ते दृश्य पाहून त्यांच्यातील म्हातारा ससा म्हणाला, “थांबा! मित्रांनो, हे दृश्य पाहून मला असे वाटते, देवाने आपल्यापेक्षाही लहान प्राणी निर्माण केले आहेत. ते आपल्याला घाबरतात. त्यामुळे आपल्याला अगदीच निराश होण्याचे कारण नाही.” हे ऐकून सशांना आपली चूक समजली व त्यांनी आत्महत्येचा विचार सोडून दिला. त्यानंतर काही दिवसांनी पाऊस पडला. हिरवेगार गवत उगवले. आता मात्र सर्व ससे आनंदात राहू लागले.तात्पर्य : जीवनात सुख-दुःखे येतच असतात. म्हणून दुःखाने निराश होऊ नये.विचार : जीवन हे सुख व दुःख यांचा संगम आहे.

फीड फीडबर्नर 22 Mar 2026 2:10 am

पुस्तक चोरी

कथा : रमेश तांबेसकाळी ११ वाजता शाळा भरली आणि शाळेत एकच बोंब झाली. चोरी झाली, चोरी झाली. चोरीची ही वार्ता साऱ्या शाळेत पोहोचली. सगळ्याच मुलांच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव दिसत होते. चोरी आणि शाळेत! मुलं कुजबूजत म्हणाली, “चोरदेखील वेडाच दिसतोय. शाळेत काय मिळणार चोरायला! खडू, वर्गात विसरलेले पेन, पेन्सिल, पट्ट्या आणि खोडरबर!” पण शाळेच्या आवारात पोलिसांच्या गाड्या येऊन थडकल्या. तशी मुले हसण्याची बंद झाली आणि शाळेत काहीतरी मोठे घडले आहे याची त्यांना खात्री पटली.थोड्याच वेळात शिक्षक आपापल्या वर्गात पोहोचले आणि शाळेत काय घडले ते सांगू लागले. तेव्हा कुठे मुलांना कळले की शाळेत चोरी झाली. ती ही की शाळेच्या ग्रंथालयातील जवळपास तीनशे-चारशे पुस्तके गायब झाली. पुस्तकांची चोरी हा प्रकार कोणाच्याही पचनी पडला नव्हता. पोलिसांच्या चेहऱ्यावर देखील एक वेगळेच स्मित दिसत होते. ग्रंथालयात शाळेला मिळालेले पुरस्कार, आकर्षक मानचिन्हे होती. मोठमोठे धार्मिक ग्रंथ होते. पण चोराने त्यांना हात लावला नव्हता. कारण फक्त बालविभागातीलच सगळी पुस्तकं गायब झाली होती. त्यामुळे पोलीसदेखील बुचकळ्यात पडले होते. फक्त छोट्या मुलांची पुस्तके! परी- राक्षसाच्या गोष्टी, बिरबलाच्या गोष्टी, तेनालीरामन अशी जवळपास साडेतीनशे ते चारशे पुस्तके चोरीला गेलेली होती.पोलीस अधिकारी विचार करू लागले. मोठे चोर, मोठी चोरी करतात. शिवाय त्यांना पुस्तके चोरून काहीच मिळणार नव्हते. त्यामुळे चोर हा शाळेतलाच कुणीतरी असावा असा तर्क पोलिसांनी लावून त्या दिशेने आपले काम सुरू केले. आजूबाजूच्या वस्त्यांमध्ये पोलीस गेले. काही वाचनालये, ग्रंथालये त्यांनी पालथी घातली, पण पुस्तकांचा पत्ता नव्हता. एका मागून एक दिवस जाऊ लागला. पण पुस्तके कोणी चोरली याचा शोध लागत नव्हता. तसं चोरीला गेलेली पुस्तके शोधणे सोपे होते. कारण प्रत्येक पुस्तकावर शाळेचास्टॅम्प होता. पण तरीही सुगावा लागत नव्हता.एके दिवशी मुख्याध्यापकांच्या कार्यालयात सर्व शिक्षकांची बैठक सुरू होती. तितक्यात सहावी-सातवीतली दोन मुलं तिथं आली आणि ती म्हणाली, “सर, आम्हीच ती पुस्तकं न सांगता नेली.” मुख्याध्यापक खाडकन खुर्चीतून उठून उभे राहिले. अन् ओरडलेच, “काय तुम्ही चोरी केलीत. अन् तीही पुस्तकांची! पण का?” मुलं म्हणाली, “माफ करा सर, आमचे चुकलेच, आधीच तुम्हाला सारे काही सांगायला हवे होते. पण नाही सांगितले. आता तुम्ही द्याल ती शिक्षा आम्हाला मान्य आहे.” मुलांचं बोलणं ऐकून सर जरा शांत झाले. मग मुले सांगू लागली, “आम्ही आमच्या काकांसोबत पालघर जिल्ह्यातल्या आदिवासी वस्तीवर नेहमी जातो. तिथल्या मुलांना वाचण्यासाठी काहीच नसते. आपल्या ग्रंथालयात भरपूर पुस्तकं असली तरी ती फारशी वाचली जात नाही हे आम्हाला माहीत होतं. आम्ही ग्रंथालयाची नोंद वही तपासली तेव्हा समजलं की, गेल्या वर्षभरात आपल्या बालविभागातील एकही पुस्तक मुलांनी वाचल्याची नोंद नाही. मग अशी कपाटात पुस्तकं ठेवून काय उपयोग! म्हणून ती पुस्तकं आम्ही त्या वाचणाऱ्या मुलांना वाटली.”मुलांचे विचार ऐकून मुख्याध्यापक विचारात पडले. मग सर मुलांच्या जवळ गेले अन् त्यांच्या पाठीवर हात फिरवत म्हणाले, “बाळांनो तुम्ही त्या आदिवासी मुलांना पुस्तकं दिलीत हे काम चांगलं केलं. पण शाळेतली पुस्तक न सांगताना नेणं, चोरून नेणं हा मात्र गुन्हा आहे. असं परत कधी करायचं नाही.” मग मुख्याध्यापक म्हणाले, “आता आपण सर्वजण एक निर्णय घेऊया, की त्या आदिवासी पाड्यातल्या मुलांच्या शिक्षणासाठी सर्वतोपरी मदत आपण करायची. सर्व शिक्षकवर्गानेही लगेचच हो असे म्हणत आपला होकार दिला. मुख्याध्यापकांचा निर्णय ऐकून मुलांच्या चेहऱ्यावर हसू उमटले आणि त्यांचा चेहरा आनंदाने उजळून निघाला.

फीड फीडबर्नर 22 Mar 2026 1:30 am

सहलीचे फायदे

कथा : प्रा. देवबा पाटीलशिवपूर गावाजवळच एक पौराणिक संदर्भ असलेले वेदपूर नावाचे छोटेसे सुप्रख्यात तीर्थक्षेत्र होते. त्याच्याजवळच शिवपुडा डोंगरात एका उंच टेकडीवर एक विशाल असे भव्य पुरातनकालिन हेमाडपंथी शिवमंदिर होते. मंदिराचे बांधकाम त्या जुन्या काळात चांगल्या घोटीव, कोरीव, रेखीव व नक्षीदार काळ्याशार; परंतु चमकदार दगडांमध्ये केलेले होते.आजपर्यंतच्या कोणत्याही व कितीही प्रतिकूल वातावरणात त्या मंदिराची चमक थोडीशीही कमी झाली नव्हती. त्यामुळे त्या मंदिराला एक विशेष प्रकारचे तेज प्राप्त झालेले होते. घोटीव, कोरीव, रेखीव व नक्षीदार दगडांमुळे मंदिराची शोभाही खूप मनोहर झालेली होती. तेथील निसर्गसुद्धा अत्यंत सुंदर व खूप रमणीय म्हणून नावाजलेला होता. डोळ्यांचे पारणे फेडणारा नयनमनोहर असा निसर्ग तेथे लाभलेला होता. त्या निसर्गानेही मंदिराच्या शोभेमध्ये चार चंद्र लावले होते. त्यामुळे वेदपूर हे एक सुंदरसे प्रेक्षणीय स्थळम्हणून त्या परिसरात सुप्रसिद्ध होते. ह्या शिवपूर गावात एक शंकरशेठ नावाचे दुकानदार राहत होते. त्यांना शिवम् नावाचा एकुलता एक मुलगा होता. हा शिवम् खूप अभ्यासू व हुशार मुलगा होता. तसेही तो एकपाठी होता. त्यामुळे एकदा वाचलेले चटकन त्याच्या लक्षात राहायचे. शाळेत अभ्यासात तर त्याचा पहिला नंबर असायचाच, पण इतर शालेय उपक्रमांमध्ये, सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये व खेळांमध्येही तो वरच्याच क्रमांकावर असायचा. बरे, त्याला वाचनाचीही खूप आवड होती. त्यामुळे तो आपल्या शाळेतून नेहमी छान छान गोष्टींची, गोड गोड कवितांची, शालोपयोगी विविध माहितीची पुस्तके आणून वाचायचा.दररोज शाळेतून घरी आल्यानंतर आपल्या मित्रांसोबत अर्धातास खेळून झाले की तो नियमितपणे आधी आपला अभ्यास करून घ्यायचा व नंतर फावल्या वेळेत गोष्टींची, कवितांची वा अभ्यासोपयोगी माहितीची अशी कोणती ना कोणती तरी पुस्तके वाचायचा. त्यामुळे त्याचे भौगोलिक, खगोलीय, वैज्ञानिक ज्ञानही चांगले होते.एका दिवशी शिवम् व त्याचे मित्रमंडळ संध्याकाळी खेळून झाल्यानंतर थोडा वेळ मैदानावर सहज गप्पागोष्टी करीत बसले असताना शिवमने, “मित्रांनो! चलता का एखाद्या सुट्टीच्या दिवशी वेदपूरला सहलीला?”असे विचारत वेदपूरला सहल काढण्याचा आपला मनोदय बोलून दाखविला.सहलीचे नाव काढताबरोबर साऱ्यांना हुरूप आला. तरीपण विशालने खोडा घातलाच. तो म्हणाला, “सहलीला जाण्यापेक्षा मस्तपैकी एखादा चित्रपट बघायला जाऊ की.”“अरे, सहलीचे आपल्याला बरेच फायदे होतात. चित्रपटांपासून आपणास काय मिळते? तेच ते कंटाळवाणे प्रेम, तीच ती डोकं दुखवणारी हाणामारी अन् मन बिघडवणारा हिंसाचार.” कपिल म्हणाला.“सहलीत गेल्याने निसर्गाचे मनोरम्य दर्शन होते. मन प्रसन्न होते. विविध अनुभवांनी बुद्धी सकस होते, ज्ञान मिळते. मनाचा विकास होतो.” शिवम् म्हणाला.“बरोबर, नवनवीन स्थळांची माहिती होते, गावोगावच्या चालीरीती कळतात, त्यातून आपण कोठे व कसे आहोत हे समजते. त्यानुसार आपली प्रगती साधता येते.” कपिलने सांगितले.“सिनेमात मनोरंजन होते, वेळ छान जातो. त्याचे काय?”कुणाल म्हणाला.“सहलीमध्येसुद्ध मनोरंजन होते व तेही एकदम शुद्ध. डोक्यावरील ताण एकदम कमी होतो. सिनेमाने तरी डोळ्यांवर ताण पडून डोक्यावरही तणाव वाढतो.” कौशलने सांगितले.“सहलीत खेळीमेळीने राहल्यामुळे एका वेगळ्याच आनंदाचा अनुभव येतो.” अमोल म्हणाला.“एकमेकांना साहाय्य करण्याची प्रवृत्ती वाढते.” विपुलने सांगितले.“सहलीने मन प्रफुल्लित झाल्याने मनाच्या क्षमतासुद्धा वाढतात. सहली आयुष्यातील धकाधकही कमी करतात म्हणून आजच्या दगदगीच्या जीवनात निसर्गसहलींची, प्रेक्षणीय स्थळांच्या सहलींची अत्यंत आवश्यकता आहे.” शिवम् बोलत होता. सगळ्यांची सहलीची मनोवृत्ती बघून विशाल व कुणालने नमते घेतले व त्यांनी सगळ्यांनी मिळून सहलीचा बेत आखला.

फीड फीडबर्नर 22 Mar 2026 1:10 am

साप्ताहिक भविष्य, २२ ते २८ मार्च २०२६

साप्ताहिक भविष्य, २२ ते २८ मार्च २०२६समस्या सुटतीलमेष : धार्मिक प्रवासाच्या योजना आखाल. त्यासाठी खर्चात वाढ झालेली दिसेल. सर्व कुटुंबांचा सहभाग आनंद देणारा ठरेल. दानधर्मासाठी खर्च कराल. जोडीदाराच्या सहकार्यासाठी पूरक राहाल. उद्योग व्यवसायासाठी विशेष श्रम घेतल्यास नियोजन यशस्वी झालेले दिसेल. परदेश प्रवासाची संधी. कुटुंब परिवारातील तरुण-तरुणींच्या समस्या सुटतील तसेच कुटुंब व परिवारातील वातावरण सुखद राहील. आरोग्यविषयी फारशी चिंता नसेल. जुन्या मित्रांच्या गाठीभेटी होऊ शकतात. गूढ शास्त्राच्या अभ्यासात प्रगती साधाल. रखडलेली कामे मार्गी लागतील. शुभ समाचार मिळतील. नव्या योजना अमलात आणू शकाल. जमीन-जुमला यांची प्रलंबित असलेली कामे मार्गावर येतील. काही कारणास्तव केलेले प्रवास सफल होतील. स्थायी संपत्तीच्या दृष्टिकोनातून काही बदल संभवतातअधिकार, प्रतिष्ठा, सन्मान मिळू शकतोवृषभ : आपल्या कार्यक्षेत्रात पद, अधिकार, प्रतिष्ठा, सन्मान, प्रसिद्धी मिळू शकते. सामाजिक क्षेत्रात कार्यरत राहाल. परोपकारी वृत्ती राहील. सर्वांना मदतीचा हात द्यावा. प्रसिद्धीचे योग आहेत. धार्मिकतेमध्ये रस निर्माण होईल. समाजातील सन्माननीय व्यक्तींचे मार्गदर्शन मिळेल. प्रसिद्धीचे योग आहेत. बेरोजगारांना रोजगार मिळतील. नोकरीच्या चांगल्या संधी उपलब्ध होतील. कुटुंब परिवारातील विवाहयोग्य तरुण-तरुणींचे विवाह ठरतील. व्यवसाय-धंद्यात परदेशी संबंध येऊ शकतो. आपल्या मौल्यवान वस्तू व महत्त्वाची कागदपत्रे व्यवस्थित ठेवा. घरातील वातावरण सुखद राहील.उन्नतीसाठी अनुकूल काळमिथुन : सध्याचे ग्रहमान प्रगतीसाठी तसेच उन्नतीसाठी अनुकूल राहील. उद्योग व्यवसायात धडाडीने काम कराल. अपेक्षित पत्रव्यवहार घडेल. नव्या व्यवहारात उत्तम प्रगती साधू शकाल. नोकरीतही कर्तृत्वाची साथ लाभेल. आपले कार्य कौशल्य कौतुकास्पद असेल. संततीची अभ्यासात प्रगती झालेली बघून समाधान वाटेल. मित्रमंडळींच्या वर्तुळातून सहकार्य लाभेल. सारख्या गुंतवणुकीतून फायदा होण्याचा संभव आहे. विद्यार्थ्यांना गुरुजनांचा सर्वस्व मार्गदर्शन मिळेल तसेच कुसंगत टाळावी. वैवाहिक सौख्यात कुरबुरी चालू राहतील. जोडीदाराच्या प्रकृती स्वास्थ्याची काळजी घ्यावी लागेल. खर्चामध्ये वाढ होईलसामाजिक-धार्मिक क्षेत्रात रसकर्क : काही वेळेस काही घटना आपल्या मनाविरुद्ध घडतील आणि काही अप्रिय निर्णय स्वीकारावे लागतील. व्यवसाय-धंद्यासंबंधी काही समस्या असून त्या सोडवण्यासाठी आपण आपल्या बुद्धी कौशल्याच्या जोरावर व आत्मविश्वासावर व परमेश्वरावर विश्वास ठेवून या परिस्थितीशी दोन हात करू शकता. यश आपलेच आहे मात्र धिम्यागतीने परिस्थितीत सुधारणा होऊन सफल व्हाल. कुटुंबातील धार्मिक कार्य आनंदाने पार पडेल. सामाजिक कार्यात सक्रिय योगदान द्या. मानव अधिकाराबाबत दक्ष राहा. भावंडे नातेवाईक यांचा सहवास व प्रेम मिळेलयश मिळेलसिंह : उद्योग-व्यवसायातील अडीअडचणींवर मार्ग काढण्यात यश मिळेल. मार्गदर्शन मिळेल. मदत मिळेल. शत्रूंवर विजय मिळवाल. उत्साही व हरहुन्नरी राहाल. जास्तीचे कष्ट घेण्याची तयारी असेल. नवीन आव्हाने स्वीकाराल. जिद्द व चिकाटीने मार्गक्रमण कराल. आपल्या कार्याची अथवा कार्यशैलीची प्रशंसा होईल. नोकरी-व्यवसायात आपल्या व्यक्तिमत्त्वाची छाप पडेल. कार्याची व्याप्ती वाढल्यामुळे श्रमही वाढणार आहेत. उत्पन्न वाढेल. व्यवसाय-धंद्यात उलाढाल वाढलेली दिसेल. नातेवाईक व भावंडांचे सौख्य लाभणार आहे. आपापसातील संबंध व नाती चांगली राहतील. लेखन कला छंद यामधून उत्तम यश मिळवता येईल.विविध प्रकारची खरेदी होईलकन्या : कुटुंबात शुभकार्य होण्यासाठी अनुकूल ग्रहमान आहे. कुटुंबातील वातावरण आनंददायक राहील. कुटुंब परिवारातील ज्येष्ठ व्यक्तींच्या सूचनांचा आदर कराल. विविध प्रकारची खरेदी होईल. कुटुंबात धार्मिक वातावरण राहील. विविध वस्त्रालंकार यासाठी खर्च होईल. सर्वांच्या मागण्या पूर्ण कराल. खर्च वाढला असला तरी विविध मार्गांतून धन आगमन होईल. हे दिवस आपणासाठी चैतन्याने भरलेले असतील. आपल्या मुलांची विशेष काळजी घ्या. मित्रमंडळी, नातेवाईक यांच्याकडून अनपेक्षित भेटवस्तू मिळू शकतील. विरुद्धलिंगी व्यक्तीला आपणाविषयी आकर्षण वाटू शकते.संपूर्ण सहकार्य मिळेलतूळ : या दिवसांत काही दिवस आपणासाठी सुखकारक असणार आहे. आपल्याकडे लक्ष देण्यास वेळ मिळणार आहे. आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. आपण चांगले दिसावे यासाठी आपण प्रयत्नशील राहाल, त्यासाठी उपाययोजना कराल. अचानक पाहुणे येण्याची शक्यता आहे. घरातील काही व्यक्तींच्या वागण्याने आपल्याला मनस्ताप होऊ शकतो. त्या व्यक्तीशी बोलून प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. नवीन उपक्रम, उद्योग हे आकर्षक आणि योग्य फायदा मिळण्यासाठी आशादायी असतील. जोडीदाराचे संपूर्ण सहकार्य मिळणार आहे.सुवार्ता समजतीलवृश्चिक : कुटुंब परिवारातील मुला-मुलींकडून त्यांच्या प्रगतीपर सुवार्ता समजतील. त्यांची अभ्यास व खेळ क्षेत्रात चांगली प्रगती होईल. शिक्षण नोकरी-व्यवसायानिमित्त परदेशी जाण्याची संधी मिळून उच्चशिक्षणाचे मार्ग प्रशस्त होतील. त्या कामी गुरुजन तसेच इतरांची मदत मिळू शकते. कुटुंबामध्ये एखादे धार्मिक कार्य होऊ शकते. आप्तेष्ट नातेवाईक यांच्या गाठीभेटी होतील. व्यवसाय धंद्यातील परिस्थिती सर्वसामान्य राहील. नोकरी-व्यवसाय धंद्यानिमित्त मोठे प्रवास घडू शकतात. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा आदर सत्कार होईल. आर्थिक समस्या कुशलतेने हाताळालविविध मार्गांनी धनलाभ होतीलधनु : आर्थिक स्थिती मजबूत राहील. विविध मार्गांनी धनलाभ होतील. मालमत्तेची कामे फायद्यात राहतील. आर्थिक लाभ संभवतो. व्यवसायात महत्त्वाची कामे पार पाडू शकाल. नवीन करार होऊ शकतात. जुनी येणी वसूल होतील मात्र वाद-विवाद सांभाळा. थोडी काळजी घेणे आवश्यक राहील. कुटुंब परिवारात वातावरण चांगले राहील. जीवनसाथीची साथ मिळेल. मुलांकडून शुभ समाचार मिळतील. नोकरीत बदलीची किंवा कामात बदल होण्याची शक्यता आहे. नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील तसेच स्थानांतराचे योग आहेत. काही वेळेस आपल्या मनाविरुद्ध निर्णय स्वीकारावे लागतील.प्रवासाचे योग आहेतमकर : नोकरी, व्यवसाय-धंदानिमित्त जवळच्या तसेच दूरच्या प्रवासाचे योग आहेत. प्रवासामध्ये आपल्या खाण्यापिण्यावर ती नियंत्रण आवश्यक राहील तसेच आपल्या मौल्यवान वस्तू व महत्त्वाची कागदपत्रे सांभाळून ठेवा तसेच आपले वाहन सुरक्षित ठिकाणी ठेवा. वाहनाच्या वेगावर ती नियंत्रण हवे भावंडांच्या भेटीगाठी होऊ शकतील. मुलांकडून अपेक्षा भंग होण्याची शक्यता. आपण शांतपणे निर्णय घेऊन वेळ पडल्यास मुलांशी चर्चा करून समस्या सोडवू शकाल. मुलांच्या बाबतीत अतिआत्मविश्वास टाळा. आर्थिक फायदे होतील. जमीन जुमला तसेच स्थावर संपत्ती याविषयीचे थांबलेले व्यवहार गतीमान होतील.समाधान लाभेलकुंभ : कौटुंबिक सौख्यासाठी आपणास हा काळ अनुकूल आहे. कौटुंबिक गोष्टींना प्राधान्य दिल्यास आपणास खरे समाधान मिळू शकेल. कुटुंबातील सदस्यांच्या वाढत्या मागण्या पूर्ण केल्यामुळे आपल्याला समाधान लाभेल आपल्या बोलण्यातून आत्मविश्वास दिसून येईल. कुटुंबात आपल्या मताला प्राधान्य दिले जाईल. नोकरी-व्यवसायात याअगोदर केलेल्या कामाचे फळ मिळेल. पदोन्नती वेतन वृद्धिचे योग आहेत. मात्र बदलीची तयारी ठेवा. वरिष्ठ आपल्या कामावर खूश राहतील. एखादी नवीन जबाबदारी स्वीकारावी लागण्याची शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती समाधानकारक राहील. व्यवसाय धंद्यातील दीर्घकाळ रखडलेली रक्कम वसूल होईलउद्योग-व्यवसायात यशमीन : आताचा काळ आपणास अत्यंत समृद्धीचा काळ असणार आहे. आपल्या कार्यामध्ये कुठल्याही प्रकारचे अडचणी येऊ शकत नाही. कुटुंबाकडून आपणास सहकार्य मिळणार आहे. तुमची प्रगती निश्चित आहे. उद्योग व्यवसाय आपणास यश मिळणार आहे. नोकरीमध्ये पण आपणास अनुकूल कालावधी आहे. कामाच्या ठिकाणी प्रत्येक बाबीत सखोल विचार करणे आवश्यक आहे. अचानक प्रवासाची शक्यता आहे. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी येऊ शकतात. आपण काही भौतिक सुखाच्या वस्तू खरेदी कराल. एखाद वेळेस जमीन आणि यंत्रांची खरेदी होऊ शकते.

फीड फीडबर्नर 22 Mar 2026 12:30 am

दैनंदिन राशिभविष्य : दिनांक २२ मार्च २०२६ - रविवार

पंचांगआज मिती चैत्र शुद्ध चतुर्थी शके १९४८. चंद्र नक्षत्र भरणी योग वैधृती . चंद्र राशी मेष, भारतीय सौर चैत्र शके १९४७-४८. रविवार दिनांक २२ मार्च २०२६. मुंबईचा सूर्योदय ०६.४१ मुंबईचा चंद्रोदय ०८.४६ एएम मुंबईचा सूर्यास्त ०६.४९ मुंबईचा चंद्रास्त १०.१८ पीएम ,राहू काळ ०५.१८ ते ०६.४९ विनायक चतुर्थी,वैधृती वर्जदैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)

फीड फीडबर्नर 22 Mar 2026 12:10 am

Maharashtra Kesari 2026 : महाराष्ट्र केसरीचा ‘फायनल’थरार! सिकंदर शेख, महेंद्र गायकवाड , हर्षवर्धन सदगीर, जय पाटील अंतिम फेरीत दाखल

Maharashtra Kesari 2026 : गादी आणि माती या दोन्ही विभागांतील उपांत्य फेरीचे (Semi-finals) निकाल जाहीर झाले असून, किताबी गदेसाठीचे अंतिम चार मल्ल निश्चित झाले आहेत

दैनिक प्रभात 21 Mar 2026 11:06 pm

Summer tips : उन्हाळात स्वःताला जपा नाही तर होऊ शकतात ‘हे’गंभीर आजार, वेळीच व्हा सावध.!

सर्व ऋतूंमध्ये उन्हाळा ऋतू हा सर्वात उष्ण असतो. बहुतेक उष्णकटिबंधीय देशात ज्या ऋतूला घाबरतात तो ऋतू म्हणजे उन्हाळा आहे, तर थंड देशांना आनंद देणारा हा ऋतू आहे.

दैनिक प्रभात 21 Mar 2026 10:48 pm

Alka Kerkar : भाजपच्या ज्येष्ठ नेत्या अलका केरकर यांचे निधन

मुंबई महापालिकेच्या माजी उपमहापौर आणि भाजपच्या विद्यमान नगरसेविका अलका केरकर (Alka Kerkar) यांचे अल्प आजाराने आज निधन झाले. त्यांनी लीलावती रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

दैनिक प्रभात 21 Mar 2026 10:37 pm

Abhishek Sharma : २८ मार्चपूर्वीच ऑरेंज आर्मीचा थरार! अभिषेक-इशान जोडीने मैदानावर पाडला २५३ धावांचा पाऊस, पाहा VIDEO

Abhishek Sharma : आयपीएल २०२६ चा बिगुल वाजण्यास अवघे काही दिवस शिल्लक असताना सनरायझर्स हैदराबाद (SRH) संघाने मैदानावर धावांचा पाऊस पाडण्यास सुरुवात केली आहे.

दैनिक प्रभात 21 Mar 2026 10:33 pm

मोठी बातमी..! 6 आमदारांचं तडकाफडकी निलंबन; राज्याच्या राजकारणात खळबळ

Mla suspended : राज्यसभा निवडणुकीत पक्षविरोधी भूमिका घेतल्याचा ठपका ठेवत बिजू जनता दल (बीजेडी) ने आपल्या सहा आमदारांना तात्काळ निलंबित केले आहे

दैनिक प्रभात 21 Mar 2026 10:33 pm

पाकड्यांना पाठवली ईदी, लष्कर-ए-तोयबाचा कमांडर बिलाल आरिफ सलाफी ठार

मुरीदके : पाकिस्तानला अज्ञातांनी ईदी पाठवली आहे. पाकिस्तानमधील मुरीदके येथील लश्कर-ए-तोयबा (LeT) या दहशतवादी संघटनेच्या मुख्यालयात, मरकज तैबामध्ये, स्वयंघोषीत कमांडर बिलाल आरिफ सलाफीची हत्या करण्यात आली . हा हल्ला २१ मार्च रोजी, ईद-उल-फित्रचा नमाज संपल्यानंतर लगेचच झाला. अज्ञात हल्लेखोरांनी आधी जवळून गोळीबार केला नंतर चाकूने वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या बिलाल आरिफ सलाफीचा थोड्याच वेळात मृत्यू झाला.बिलाल आरिफ सलाफीवर जवळून हल्ला झाला आणि मरकज तैबामध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. या गोंधळाचा फायदा घेत हल्लेखोर पळून गेले. हल्ल्यानंतरची परिस्थिती दाखवणारे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. एका व्हिडीओत दहशतवादी बिलाल आरिफ सलाफी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसत आहे. भोवताली असलेली लोकं गोंधळल्याचेही दिसत आहे. व्हिडीओची सत्यता अद्याप पडताळण्यात आलेली नाही. पण पाकिस्तानमध्ये लष्कर-ए-तोयबाचा कमांडर बिलाल आरिफ सलाफी ठार झाल्याची बातमी झपाट्याने पसरत आहे.

फीड फीडबर्नर 21 Mar 2026 10:30 pm

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची घेतली सांत्वनपर भेट

मुंबई : उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी आज देवगिरी शासकीय निवासस्थानी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, खासदार प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुनील तटकरे, पार्थ अजित पवार, जय अजित पवार उपस्थित होते.उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करत आदरांजली वाहिली. या भेटीदरम्यान उपराष्ट्रपती श्री. राधाकृष्णन यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आणि पवार कुटुंबीयांचे सांत्वन केले. या दुःखद प्रसंगी त्यांनी कुटुंबीयांना धीर देत आपल्या संवेदना व्यक्त केल्या.

फीड फीडबर्नर 21 Mar 2026 10:30 pm

Ashok Kharat : विकृत कॅप्टन ‘अशोक खरात’ची 7 तास चौकशी; अनेक मोठी नावं समोर येणार? राजकीय संबंध उघड होणार !

या चौकशीदरम्यान अशोक खरातच्या ऑफिसमधील बॉय नीरज जाधव आणि खरात यांची समोरासमोर चौकशी करण्‍यात आली.

दैनिक प्रभात 21 Mar 2026 10:11 pm

Flight Ticket : 60% फ्री सीट देण्यास विमान कंपन्यांचा विरोध; विमानाच्या तिकीट दरात वाढ होण्याची शक्यता

नागरी विमान वाहतूक संचलयाने गेल्या आठवड्यामध्ये विमानातील 60% सीट निवडताना विमान कंपन्यांनी (Flight Ticket) कसलेही शुल्क लावू नये अशी सूचना केलेली आहे.

दैनिक प्रभात 21 Mar 2026 10:10 pm

'जैन समाजाची सेवा, त्याग, अहिंसेची परंपरा समाजासाठी प्रेरणादायी'

मुंबई : जैन समाजाने समाजसेवा, दानधर्म, अहिंसा आणि त्याग या मूल्यांवर आधारित कार्यातून समाजासमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण केला असल्याचे प्रतिपादन उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णनजी यांनी केले. लोकभवन येथील दरबार हॉलमध्ये संपन्न झालेल्या ६४ व्या जैन दीक्षा समारंभप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमास राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, अध्यात्म परिवार ट्रस्टचे विश्वस्त बाबूलालजी बन्साली, हितेंद्र माणेक, राजेश चंदन तसेच अध्यात्म परिवार ट्रस्टचे सदस्य उपस्थित होते.उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन म्हणाले, जैन समाज देशभरात विविध माध्यमांतून समाजहिताचे कार्य करीत असून सेवा हीच जैन धर्माची ओळख आहे. ६४ जणांनी दीक्षा स्वीकारणे ही बाब अत्यंत प्रेरणादायी असून, त्यातून संयम, साधेपणा आणि आध्यात्मिकतेचा संदेश समाजाला मिळतो. भगवान महावीरांनी दिलेला अहिंसा, अपरिग्रह आणि अनेकांतवादाचा संदेश आजच्या काळात अधिक महत्त्वाचा ठरत असल्याचेही त्यांनी सांगितले. संवाद, सहिष्णुता आणि सर्व जीवसृष्टीबद्दल करुणा या मूल्यांमधूनच शांतता आणि शाश्वततेचा मार्ग सापडू शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. तामिळनाडू आणि जैन धर्म यांचे ऐतिहासिक नाते अधोरेखित करताना उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांनी जैन समाजाने साहित्य, संस्कृती आणि ज्ञानसंवर्धन क्षेत्रात दिलेल्या योगदानाचे कौतुक केले. जैन तत्त्वज्ञानातील जीवनमूल्ये आजच्या समाजासाठीही मार्गदर्शक असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात नमूद केले.जैन धर्माचा संदेश शांतता, संयम व समन्वयाचा: राज्यपाल जिष्णू देवजी वर्मासध्याच्या जागतिक परिस्थितीत जैन धर्मातील मूल्ये मानवजातीला शांतता, समन्वय आणि संयमाचा मार्ग दाखवणारी असल्याचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी सांगितले. आधुनिक जीवनशैली अनेकदा ग्राहकतावाद आणि इच्छांच्या अखंड पाठपुराव्याला प्रोत्साहन देत असली, तरी भारतीय संस्कृतीने नेहमीच साधेपणा, संयम आणि आत्मत्याग यांना महत्त्व दिले असल्याचे त्यांनी सांगितले. आजच्या भौतिकतावादी युगात विविध क्षेत्रांतील व्यक्ती दीक्षेचा मार्ग स्वीकारत आहेत, ही बाब विशेष प्रेरणादायी आहे. भगवान महावीरांच्या अध्यात्मिक पावलांवर चालत विविध जैन आचार्यांनी भारतीय संस्कृतीला चिरंतन मूल्यांनी समृद्ध केले, असे त्यांनी नमूद केले.प्राचीन मंदिरांच्या जतन व जीर्णोद्धारासाठी जैन समाजाने पुढाकार घ्यावा: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसमहाराष्ट्रातील प्राचीन मंदिरांच्या जतन आणि जीर्णोद्धारासाठी जैन समाजाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. जैन समाजाने ज्ञान संवर्धनाबरोबरच प्राचीन वारशाच्या जतनासाठीही महत्त्वपूर्ण योगदान द्यावे. जैन समाजाच्या विविध उपक्रमांचे कौतुक करून ते म्हणाले, प्राचीन हस्तलिखितांचे जतन, संवर्धन आणि मंदिरांच्या संरक्षणासाठी होत असलेले कार्य प्रेरणादायी आहे. सुमारे सात कोटी प्राचीन हस्तलिखितांचे जतन व संवर्धन तसेच प्राचीन जैन मंदिरांच्या संरक्षणाचे कार्य संस्थेकडून करण्यात आले. अहिंसा ही केवळ शारीरिक हिंसेपुरती मर्यादित नसून विचारांमध्येही हिंसा नसावी, हा संदेश जैन तत्त्वज्ञान देते. आजच्या भौतिक जीवनशैलीच्या युगात सर्वकाही सोडून दीक्षा घेणे हे अत्यंत मोठे आणि दृढ निश्चयाचे कार्य आहे. जैन समाजाने आपल्या कार्यातून देशासमोर एक आदर्श निर्माण केला असून, देशाच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीत मोठे योगदान देतानाच दान-पुण्याच्या क्षेत्रातही जैन समाज अग्रस्थानी असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.समाजात एकता आणि समरसता निर्माण करण्यासाठी जैन धर्माचे विचार अत्यंत प्रेरणादायी आहेत : कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढाया कार्यक्रमात कॅबिनेट मंत्री लोढा यांनी म्हटले की, दरबार हॉल मध्ये होणारा दीक्षा स्मरण कार्यक्रम ऐतिहासिक आहे. भगवान महावीर यांच्या अहिंसा, अपरिग्रह आणि जीवदया तत्वांवर आचरण करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. आजच्या वेगवान जगात जैन धर्म आपल्याला संयम, शांती आणि नैतिकतेचा मार्ग दाखवतो. समाजात एकता आणि समरसता निर्माण करण्यासाठी जैन धर्माचे विचार अत्यंत प्रेरणादायी आहेत. आदरणीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी नेहमीच जैन धर्मियांच्या बाबत आदर बाळगला आहे, याबाबत मी त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. जैन समाजाचा सेवाभाव आणि त्यागाचा वारसा हा संपूर्ण राष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट असून यातून समरसता साधली जात असल्याचे कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी यावेळी सांगितले.या कार्यक्रमात जैन समाजाच्या प्रगतीसाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. भगवान महावीर यांच्या जन्मोत्सवानिमित्त - 'अष्ट द्रव्य' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जैन पूजा साहित्य प्रदर्शनास मान्यवरांनी यावेळी भेट दिली.

फीड फीडबर्नर 21 Mar 2026 10:10 pm

माजी उपमहापौर अलका केरकर यांचे निधन

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :मुंबईच्या माजी उपमहापौर आणि वॉर्ड क्रमांक ९८ च्या भाजपच्या विद्यमान नगरसेविका अलका केरकर यांचे शनिवारी अल्पशा आजाराने निधन झाले. लीलावती रुग्णालयात शनिवारी संध्याकाळी त्यांचे निधन झाले. त्या ७४ व्या वर्षांच्या होत्या. त्यांच्या त्यांच्या पश्चात एक मुलगा व मुलगी असा परिवार आहे. मुंबईच्या महापौर पदासाठी पहिल्या नावाची चर्चा अलका केरकर यांची होती, परंतु वयोमानानुसार महापौर पदाच्या स्पर्धेतून त्यांचे नाव मागे पडले होते.भावपूर्ण श्रद्धांजली !मुंबईच्या माजी उपमहापौर आणि वार्ड क्रमांक 98 च्या विद्यमान नगरसेविका श्रीमती अलका केरकर यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. नुकत्याच झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये त्या तिसऱ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आल्या होत्या. निवृत्त शिक्षिका असणाऱ्या अलका… pic.twitter.com/1fDsKXnuUd— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) March 21, 2026नुकत्याच पार पडलेल्या मुंबई सार्वत्रिक निवडणुकीत त्या सलग तिसऱ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आल्या होत्या. निवृत्त शिक्षिका असलेल्या अलका केरकर यांनी सन २०१२ मध्ये प्रथम निवडणूक लढवली होती. त्यानंतर पहिल्याच टर्म मध्ये त्यांना उपमहापौर पद भूषविण्याची संधी मिळाली होती. सन २०१४-२०१५ मध्ये त्यांनी मुंबईच्या उपमहापौरपदाची जबाबदारी सांभाळली होती.याशिवाय स्थायी समिती सह इतर समित्यांमध्येही सदस्यपद त्यांनी भूषवले होते.अत्यंत शांत पण प्रत्येक कामाची इत्यंभूत माहिती आपल्या साध्या राहणीमानातून आणि प्रामाणिक कार्यपद्धतीतून जनतेच्या मनात विशेष स्थान निर्माण केले होते. त्यांच्या प्रभागात त्यांचा दांडगा जनसंपर्क होता.पक्षनिष्ठा, भ्रष्टाचाराविरोधी भूमिका आणि अनधिकृत कामांना कधीही थारा न देण्याचा त्यांचा ठाम स्वभाव यामुळे त्या आदर्श नगरसेविका म्हणून ओळखल्या जात होत्या.सामाजिक आणि प्रशासकीय कार्य: त्या जमिनीशी जोडलेल्या नेत्या म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी नागरी सुधारणा, आरोग्य आणि स्वच्छता या विषयांवर सक्रियपणे काम केले आहे. त्यांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जवळचे संबंध असून पक्ष संघटनेतही त्या सक्रिय होत्या.सामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी त्या नेहमी तत्पर असत.गेल्या तीन दशकांपासून वांद्रे पश्चिममधील जनतेची सेवा आणि भाजपाचे काम त्यांनी मोठ्या संघर्षातून उभे केले. त्यांच्या कार्यकाळात अनेक सामाजिक आणि विकासकामांना गती मिळाली.त्यांच्या निधनाबाबत दुःख व्यक्त करताना संस्कृतिक कार्य आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड आशिष शेलार यांनी असे म्हटले आहे की, “संघर्षाच्या काळातील एक महत्त्वाचा शिलेदार आम्ही गमावला आहे. त्यांच्या जाण्याने वांद्रे पश्चिम हे एक मोठे कुटुंबच दुःखात बुडाले आहे.” अलका केरकर यांच्या निधनाने वांद्रे पश्चिम विभागाचे कधीही न भरून निघणारे नुकसान झाले असून त्यांच्या आठवणी आणि कार्य पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहेत.रविवारी सकाळी अंत्यसंस्कारअलका केरकर यांची अंत्ययात्रा त्यांच्या राहत्या घरापासून म्हणजे मेफेयर अपार्टमेंट, १७ वा रस्ता, शिवाजी नगर समोर, खार पश्चिम येथुन रविवारी सकाळी ११ वाजता निघून शास्त्री नगर सांताक्रूझ पश्चिम येथील हिंदू स्मशानभूमी येथे १२ वाजता अंतिम संस्कार होतील, असे कळवण्यात आले आहे.

फीड फीडबर्नर 21 Mar 2026 10:10 pm

Anaya Bangar Gender Surgery : ५ वर्षांचा लढा अखेर यशस्वी! बापाची साथ अन् लेकीची जिद्द; लिंगबदल शस्त्रक्रिया झाल्यानंतर अनायाने शेअर केली पोस्ट

Anaya Bangar Gender Surgery : संजय बांगर यांची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगर सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.

दैनिक प्रभात 21 Mar 2026 10:04 pm

Sanjay Shirsat : “भोंदूबाबा खरात प्रकरण महाराष्ट्रावरचा कलंक!”; मंत्री संजय शिरसाट यांचा संताप

Sanjay Shirsat : अशोक खरात बलात्कार प्रकरणावरून संजय शिरसाट यांनी कडक शब्दांत टीका केली आहे.

दैनिक प्रभात 21 Mar 2026 10:03 pm

Share Market : पुढील आठवड्यात कोणत्या शेअरवर लक्ष ठेवाल?

चालू आठवड्यात विविध कंपन्यांनी जाहीर केलेले नवीन करार, व्यवस्थापनातील बदल आणि गुंतवणुकीचे (Share Market) मोठे निर्णय यांमुळे या समभागांमध्ये मोठी हालचाल पाहायला मिळू शकते.

दैनिक प्रभात 21 Mar 2026 9:58 pm

Summer tips : उन्हाळ्यातही राहा ‘फ्रेश’आणि ‘एनर्जेटिक’.! आरोग्याची अशी घ्या काळजी, वाचा…

उन्हामुळे सातत्याने शरीरातून बाहेर पडणाऱ्या घामामुळे अशक्तपणा वाढतो. त्याशिवाय डोकेदुखीचं प्रमाणही वाढतं.

दैनिक प्रभात 21 Mar 2026 9:56 pm

Rohit Shetty Firing Case: रोहित शेट्टी निवासस्थान गोळीबार प्रकरण; संयुक्त मोहिमेत गोलू पंडितला अटक

चित्रपट निर्माता रोहित शेट्टी यांच्या घरावर झालेल्या गोळीबाराच्या (Rohit Shetty Firing Case) प्रकरणातील आणखी एका मुख्य आरोपीला उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आली आहे.

दैनिक प्रभात 21 Mar 2026 9:35 pm

Rahul Gandhi : “निवडणुकांनंतर पेट्रोल, डीझेलचे दरही वाढवले जातील”–राहुल गांधी

छोट्या आणि मध्यम उद्योगांवर सर्वांधिक प्रतिकूल परिणाम होईल. दैनंदिन गरजेच्या वस्तू महागतील. परकी संस्थात्मक गुंतवणूकदारांचे पैसे आणखी वेगाने बाहेर जातील.

दैनिक प्रभात 21 Mar 2026 9:30 pm

Diesel Rate : आता डिझेल प्रति लिटर ५ रुपयांनी स्वस्त मिळणार; मंत्री प्रताप सरनाईकांची मोठी घोषणा

Diesel Rate : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटीसाठी नवीन डिझेल खरेदी धोरण जाहीर केले आहे.

दैनिक प्रभात 21 Mar 2026 9:23 pm

एलपीजी पुरवठ्यात २० तर वाटपात ५० टक्के वाढ

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील युद्धामुळे देशात निर्माण झालेल्या ऊर्जा संकटाच्या पार्श्वभूमीवर सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. २३ मार्चपासून व्यावसायिक एलपीजीचा पुरवठा संकटापूर्वीच्या पातळीच्या ५० टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे. सरकारचे लक्ष विशेषतः अन्न सेवा क्षेत्र आणि सामुदायिक स्वयंपाकघरांवर केंद्रित असून जनतेला दिलासा देणे आणि अत्यावश्यक सेवांमध्ये कोणताही व्यत्यय येणार नाही याची खात्री करणे हा त्यामागील उद्देश आहे.सरकार पीएनजी पाईपद्वारे नैसर्गिक वायू पुरवठ्याकडे वळण्यास प्रोत्साहन देत आहे. अनिवार्य नोंदणीची अंमलबजावणी केली जात आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, हा अतिरिक्त २० टक्के एलपीजी सर्वाधिक गरज असलेल्या क्षेत्रांना प्राधान्याने पुरवला जाईल, ज्यामध्ये रेस्टॉरंट, ढाबे, हॉटेल्स, औद्योगिक कॅन्टीन, अन्न प्रक्रिया आणि दुग्ध युनिट्स, सरकारी अनुदानित कॅन्टीन, सामुदायिक स्वयंपाकघर आणि स्थलांतरित कामगारांसाठी ५-किलोचे सिलिंडर यांचा समावेश आहे.केंद्र सरकारने राज्यांना मिळणाऱ्या व्यावसायिक गॅसच्या वाटपात २० टक्क्यांनी वाढ केली आहे. राज्यांना आता व्यावसायिक एलपीजीचा अतिरिक्त २० टक्के पुरवठा मिळेल, ज्यामुळे एकूण पुरवठा ५० टक्के होईल. रेस्टॉरंट, हॉटेल, ढाबे आणि उद्योगांना प्राधान्य दिले जाईल. एलपीजी मिळवण्यासाठी नोंदणी करणे आवश्यक असेल आणि पीएनजीसाठी अर्ज करावा लागेल. मंत्रालयाने सांगितले की, केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार २० राज्यांनी आणि केंद्रशासित प्रदेशांनी गैर-घरगुती एलपीजीच्या पुरवठ्यासाठी आदेश जारी केले आहेत. उर्वरित राज्यांमध्ये, सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडर पुरवत आहेत. गेल्या आठवड्यात अंदाजे १३,४७९ मेट्रिक टन एलपीजी सिलिंडरचा पुरवठा करण्यात आला आहे. शैक्षणिक संस्था आणि रुग्णालयांना प्राधान्य देण्यात आले असून, एकूण व्यावसायिक एलपीजीपैकी अंदाजे ५० टक्के पुरवठा या क्षेत्रांना केला जात आहे.

फीड फीडबर्नर 21 Mar 2026 9:10 pm

समुद्री मार्ग खुले ठेवा, व्यापारात अडथळे नकोत; मोदींचे इराणच्या राष्ट्राध्यक्षांना शांततेचे आवाहन

नवी दिल्ली : पश्चिम आशियामध्ये इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला असताना, भारताने या वादात शांतता प्रस्थापित करण्यासाठी मोठे राजनैतिक पाऊल उचलले आहे. पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी शनिवारी इराणचे राष्ट्राध्यक्ष डॉ. मसूद पेजेश्कियन यांच्याशी फोनवरून सविस्तर चर्चा केली. गेल्या आठ दिवसांतील या दोन्ही नेत्यांमधील ही दुसरी चर्चा असून, भारताने या प्रदेशातील शांतता आणि स्थिरतेसाठी पुन्हा एकदा आग्रही भूमिका मांडली आहे. पंतप्रधान मोदींनी राष्ट्राध्यक्ष पेजेश्कियन यांना ईद-उल-फितर आणि इराणचे नवीन वर्ष नवरोज निमित्त शुभेच्छा दिल्या. ‘हा सण पश्चिम आशियात शांतता, स्थिरता आणि समृद्धी घेऊन येईल,’ अशी आशा पंतप्रधान मोदींनी यावेळी व्यक्त केली. या शुभेच्छांसोबत पंतप्रधान मोदींनी पश्चिम आशियात बिघडत चाललेल्या सुरक्षा व्यवस्थेवर तीव्र चिंता व्यक्त केली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संवादादरम्यान पश्चिम आशियातील बिघडत चाललेल्या परिस्थितीवर भारताची भूमिका अत्यंत स्पष्टपणे मांडली. त्यांनी प्रामुख्याने प्रादेशिक सुरक्षा, जागतिक व्यापार आणि मानवी हित या तीन गोष्टींवर भर दिला.पंतप्रधानांनी पश्चिम आशियातील महत्त्वाच्या पायाभूत सुविधांवर होणाऱ्या हल्ल्यांचा तीव्र निषेध केला. अशा हल्ल्यांमुळे केवळ प्रादेशिक स्थिरता धोक्यात येत नाही, तर जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत होऊन जगाच्या अर्थव्यवस्थेवरही विपरीत परिणाम होतो, असे त्यांनी नमूद केले. तसेच होर्मुझची सामुद्रधुनी हा समुद्री मार्ग सुरक्षित राहणे अनिवार्य असल्याचे मोदींनी सांगितले. युद्धामुळे होणारी निष्पाप नागरिकांची जीवितहानी आणि मालमत्तेच्या नुकसानीबद्दल पंतप्रधानांनी खोलवर दुःख व्यक्त केले. या कठीण काळात इराणमधील भारतीय नागरिकांची सुरक्षा आणि त्यांचे हित ही भारताची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले.भारताची जागतिक नेत्यांशी चर्चापश्चिम आशियातील संकट ओळखून पंतप्रधान मोदी सातत्याने जागतिक नेत्यांच्या संपर्कात आहेत. शुक्रवारी त्यांनी बहरीनचे राजे हमद बिन ईसा अल खलिफा यांच्याशी चर्चा केली होती. यापूर्वी त्यांनी कतारचे अमीर, जॉर्डनचे राजे आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशीही संवाद साधला आहे. कोणताही वाद हा केवळ संवाद आणि मुत्सद्देगिरीनेच सुटू शकतो, हे भारताचे अधिकृत धोरण असल्याचे सांगितले जात आहे.वाढता तणाव आणि भारताची भूमिकाएकीकडे अमेरिका आणि इस्रायल इराणमधील सत्तापालटासाठी आक्रमक पवित्रा घेत आहेत, तर दुसरीकडे इराणचे नवीन सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांनी शत्रूंसमोर न झुकण्याची शपथ घेतली आहे. अशा कठीण काळात भारत मध्यस्थाची भूमिका बजावत आहे.

फीड फीडबर्नर 21 Mar 2026 9:10 pm

'उद्योजक होताना टाटांचा आदर्श ठेवा'

मुंबई : “आजच्या काळात विद्यार्थ्यांनी केवळ पदवी मिळवणे पुरेसे नाही, तर ती पदवी रोजगारात रूपांतरित होणे आवश्यक आहे. तांत्रिक ज्ञानासोबतच सॉफ्ट स्किल्स आणि बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याची क्षमता असणे, ही यशाची गुरुकिल्ली मानली जाते. उद्योजक बनू इच्छिणाऱ्या तरुणांनी रतन टाटा यांचा आदर्श ठेवावा. नफा मिळवण्यासोबतच सामाजिक जबाबदारी कशी पार पाडावी, याचे टाटा हे उत्तम उदाहरण आहेत. प्रत्येक व्यक्तीची प्रगती ही समाजाची, राज्याची आणि पर्यायाने देशाची प्रगती असते”, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी शनिवारी केले.रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचा पहिला दीक्षांत सोहळा लोकभवन येथील दरबार हॉल येथे पार पडला, त्यावेळी या कार्यक्रमात उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन बोलत होते. यावेळी राज्यपाल जिष्णु देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.उपस्थितांना संबोधित करताना उपराष्ट्रपती म्हणाले, उद्योगांच्या मागणीनुसार अभ्यासक्रमात बदल होणे गरजेचे आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, ग्रीन एनर्जी आणि डेटा ॲनालिटिक्स यांसारख्या आधुनिक विषयांचा समावेश करून विद्यार्थ्यांना जागतिक आव्हानांसाठी तयार केले पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था बनला असून, आता तिसऱ्या क्रमांकाच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. ही प्रगती साधताना तरुणांनी 'स्किल इंडिया' आणि 'पीएम-दक्ष' सारख्या व्यासपीठांचा लाभ घ्यावा, असा सल्ला त्यांनी दिला.विद्यापीठांनी नाविन्यता, प्रयोगशीलता जपावी - राज्यपालराज्यपाल जिष्णु देव वर्मा म्हणाले, आधुनिक विद्यापीठांनी नाविन्यता, प्रयोगशीलता जोपासली पाहिजे. शिक्षणामुळे शाश्वत प्रगतीकडे जाण्यासाठी चारित्र्य आणि जबाबदारीची जाणीवही निर्माण झाली पाहिजे. मध्यपूर्वेतील संघर्षांसह सध्याच्या भू-राजकीय घडामोडींचा जागतिक अर्थव्यवस्था आणि उपजीविकेवर आधीच परिणाम होत आहे, ज्यामुळे अनेक नोकऱ्यांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत, विद्यार्थ्यांना वैविध्यपूर्ण आणि संबंधित कौशल्ये आत्मसात करण्यास प्रोत्साहित करणे आवश्यक आहे असेही ते म्हणाले.कुशल मनुष्यबळ ही काळाची गरज - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, केवळ तरुण लोकसंख्या असून चालत नाही, तर त्या लोकसंख्येला कौशल्याची जोड असेल तरच तो देशाचा लोकसंख्याशास्त्रीय लाभांश (डेमोग्राफिक डिविडंड) तयार होतो. पूर्वी भांडवल महत्त्वाचे होते, पण आता गुंतवणूकदार तिथेच जातात जिथे कुशल 'मानव संसाधन' उपलब्ध आहे. कृत्रिम बुध्दीमत्ता हे आव्हान पेलण्यासाठी कुशल मनुष्यबळ तयार करणे गरजेचे आहे. काळानुरूप मानव संसाधन तयार करावे लागेल. उद्योगांच्या गरजेनुसार दिवसागणिक कौशल्य प्रशिक्षणात बदल करावे लागतील. आज रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ 'एआय लिविंग लॅब' सारख्या उपक्रमांतून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उद्योग जगातील समस्या सोडवण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे, ही अभिनंदनीय बाब आहे, असेही ते म्हणाले.

फीड फीडबर्नर 21 Mar 2026 9:10 pm

रुपाली चाकणकरांनंतर महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोण?

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी शुक्रवारी रात्री उशिरा उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. त्यामुळे आता या रिक्त जागी कोणाची वर्णी लागणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. महायुतीमधील सत्तेच्या वाटणीनुसार हे पद राष्ट्रवादी काँग्रेसकडे असून, ते मिळवण्यासाठी पक्षांतर्गत 'लॉबिंग' सुरू झाले आहे. सध्या आमदार सरोज अहिरे, वैशाली नागवडे, राजलक्ष्मी भोसले आणि प्रतिभा शिंदे यांची नावे शर्यतीत असल्याचे समजते.नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांचे नाव आल्यापासून राजकीय वातावरण तापले होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी राजीनाम्याचे आदेश दिल्यानंतर चाकणकर तातडीने उपमुख्यमंत्र्यांच्या 'देवगिरी' या शासकीय निवासस्थानी दाखल झाल्या. या भेटीत चाकणकर यांनी प्रकरणाबाबत आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला; मात्र प्रकरणाचे गांभीर्य आणि वाढता दबाव पाहता, पक्ष आणि सरकारची प्रतिमा जपण्यासाठी त्यांचा राजीनामा घेण्याचा निर्णय सुनेत्रा पवार यांनी घेतला.दरम्यान, चाकणकरांच्या गच्छंतीनंतर भाजप आणि शिवसेना या पदासाठी इच्छुक असल्याची चर्चा असली, तरी राष्ट्रवादी काँग्रेस हे पद सोडण्यास तयार नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आपल्या पक्षाचा कोटा कायम राखण्यासाठी आग्रही आहेत. त्यानुसार त्यांनी पर्यायांची चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. देवळालीच्या आमदार सरोज अहिरे यांचे नाव यात आघाडीवर आहे. खरात प्रकरण नाशिकशी संबंधित असल्याने तिथल्याच आक्रमक महिला नेत्याला संधी देऊन प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न या माध्यमातून होऊ शकतो.अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या आणि पक्षातील सक्रिय चेहरा म्हणून वैशाली नागवडे यांच्या नावाचाही विचार सुरू आहे. त्याशिवाय राजलक्ष्मी भोसले यांच्यासाठीही पडद्यामागे हालचाली सुरू आहेत. पुण्याच्या माजी महापौर म्हणून त्यांना प्रशासकीय कामांचा अनुभव आहे. त्याचा फायदा त्यांना होऊ शकतो. दुसरीकडे, जळगावच्या प्रतिभा शिंदे यांच्या नावावर देखील खल झाला. शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांना आव्हान देण्यासाठी शिंदे यांचा चेहरा वापरता येऊ शकेल. उत्तर महाराष्ट्रात त्यांनी बांधलेले संघटनात्मक काम त्यांच्या पथ्यावर पडू शकते, असेही बोलले जात आहे.कोणाच्या गळ्यात माळ पडणार?या चार नावांपैकी कोणाच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडते की एखादे अनपेक्षित नाव समोर येते, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल. जोपर्यंत नवीन अध्यक्षांची अधिकृत घोषणा होत नाही, तोपर्यंत आयोगाचा दैनंदिन कारभार सचिव किंवा एखाद्या वरिष्ठ सनदी अधिकाऱ्याकडे सोपवला जाण्याची शक्यता आहे.

फीड फीडबर्नर 21 Mar 2026 9:10 pm

भेंडीबाजारात पुन्हा फेरीवाल्यांवर होणार कारवाई

मुंबई : महापालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार मुंबईतील काही विभागांमध्ये महापालिकेच्या वतीने अनधिकृत फेरीवाले आणि पदपथांवर करण्यात आलेल्या वाढीव बांधकामांवर कारवाई होत आहे. त्यानुसार भेंडीबाजार, डोंगरी,मस्जिद बंदर, मोहम्मद अली रोड, जे जे रुग्णालय परिसरातही मोठ्याप्रमाणात कारवाईला सुरुवात झाली होती. मात्र,मुस्लिम समाजाच्या धार्मिक सणामुळे काही प्रमाणात संथ झालेली ही कारवाई आता रमझान ईदनंतर अधिक तीव्र केली जाणार आहे. येत्या मंगळवारपासून या भागातील कारवाई पुन्हा एकदा तीव्र करून अनधिकृत बांधकामांसह फेरीवाल्यांवर कारवाई करून त्यांना पळता भूई कमी करून सोडले जाणार आहे.मुंबईतील फेरीवाल्यांसह अनधिकृत तसेच वाढीव बांधकामांविरोधातील कारवाईचे निर्देश प्राप्त झाल्यानंतर अनेक विभागांच्या सहायक आयुक्तांच्या नेतृत्वाखाली याबाबतची मोहीम तीव्र करण्यात आली. मात्र, यातील सर्वांत लक्षवेधी कारवाई ठरली ती बी विभागाची. विशेष म्हणजे इथे अनधिकृत तसेच वाढीव कामे झाली आहे. तसेच फेरीवाल्यांनीही मिळेल ते रस्ते,पदपथ अडवून नागरिकांचे चालणेही कठिण करून सोडले आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त डॉ भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार तसेच अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली बी विभागाचे सहायक आयुक्त योगेश देसाई यांनी कशाचीही भिडभाड न बाळगता अत्यंत निडरपणे याठिकाणी कारवाईचा सपाटा लावला. सलग आठ ते दहा दिवस कारवाई करून इब्राहिम मोहम्मद अली रोड वरील नारायण धुरू स्ट्रीट, मांडवी, सरदार वल्लभ भाई पटेल रोड, इब्राहिम मोहम्मद मर्चंड रोड, संत तुकाराम रोड, युसूफ मेहरली रोड, लोकमान्य टिळक रस्ता आदी मार्गावरील आणि चौकांमधील रस्ते अडवून बसणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करतानाच वाढीव बांधकामे तसेच रस्ता अडवून ठेवलेले अनधिकृत स्टॉल्स हटवले. स्थानिक नागरिकांच्या धार्मिक भावना लक्षात घेवू्न ही कारवाई तुर्तास संथ केली होती, परंतु आता सणामुळे ही कारवाई हाती घेण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. याबाबत बी विभागाचे सहायक आयुक्त योगेश देसाई यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मागील काही दिवसांमध्ये ही कारवाई संथ झाल्याचे दिसून आले असले तरी पुढील आठवड्यात ही कारवाई तीव्र केली जाईल,असे म्हटले आहे.

फीड फीडबर्नर 21 Mar 2026 9:10 pm

मुंबई मनपा मुख्यालयासह कार्यालये, रुग्णालयांच्या सुरक्षेत वाढ

मुंबई : महापालिका मुख्यालयासह इतर इमारतींमध्ये सुरक्षेच्या दृष्टीकोनातून आता अत्याधुनिक स्वरुपाच्या डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर बसवण्यात येणार आहे. मुंबई महापालिका इमारती, विभाग कार्यालये आणि शीव रुग्णालयासह इतर रुग्णालये आदींसाठी ९७ नवीन अत्याधुनिक पद्धतीचे डोअर फ्रेम खरेदी करण्यात येणार आहे. या अत्याधुनिक डोअर मेटलद्वारे सिग्नल तयार होतो. आधुनिक डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर सिस्टीममध्ये मल्टी झोन तंत्रज्ञान असून जे शरीर स्कॅन करताना धातू नक्की कोणत्या ठिकाणी आहे, हे अचूकपणे दर्शवते. ही उपकरण प्रणाली सीसीटीव्ही आणि बॅगेज स्कॅनरप्रमाणेच सुरक्षेसाठी अत्यंत प्रभावी असल्याचे अधिकाऱ्यांचे मत आहे.मुंबई महानगरपालिकेच्या वर्दळीच्या व संवेदनशील विभागांमध्ये समाजकंटकांकडून होणाऱ्या संभाव्य धोक्याचा विचार करता मुंबई शहरात मजबूत सुरक्षा व्यवस्था असण्याची आवश्यकता आहे. तसेच मुंबई महानगररपालिकेच्या मुख्यालयात तसेच विविध रुग्णालयांमधील नागरिकांची वाढती गर्दी लक्षात घेता, महानगरपालिकेच्या अखत्यारीतील विविध रुग्णालये, विभाग कार्यालये आणि केंद्रीय एजन्सी कार्यालये इत्यादी ठिकाणी कोणतीही अनुचित किंवा अप्रिय घटना घडू नये म्हणून सुरक्षा उपकरणे अद्ययावत स्वरुपात कार्यरत केली जात आहेत. या अंतर्गत डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर सिस्टीम ही एक अद्ययावत सुरक्षा प्रणाली असून एक महत्वाचे सुरक्षा उपकरण आहे. मुंबई महापालिका मुख्यालयासह अनेक महापालिका विभाग कार्यालये तसेच रुग्णालयांमध्ये डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर या कालबाह्य झाल्या आहेत, तर काही ठिकाणी नव्याने बसवण्यात येणार आहे. महापालिका मुख्यालयातील डोअर फ्रेम या ८ ते १० वर्षे जुन्या झाल्या आहेत. त्यानुसार मुंबई महापालिका मुख्यालय,इमारती आणि रुग्णालयांमध्ये एकूण ९७ अशाप्रकार डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी विविध करांसह दीड कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. याकरता समर्थ सिक्युरिटी सिस्टीम या कंपनीची निवड करण्यात आली आहे.ही सुरक्षा प्रणाली प्रामुख्याने शासकीय इमारती, रुग्णायले, विमानतळ, शाळा, मॉल्स सारख्या वर्दळीच्या ठिकाणी आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सुरक्षा वाढविण्याकरिता वापरली जाते. ही सुरक्षा प्रणाली व्यक्तीच्या शरीरावर लपवलेले शस्त्र, स्फोटके किंवा इतर धातूच्या वस्तूंचा शोध लावण्यासाठी वापरली जाते. या प्रणालीमुळे गर्दीचा प्रवाह सुरळीत करण्याची आणि संवेदनशीलता आणि अलार्म सेटिंग्जमध्ये सानुकुलन करण्याकरिताच्या सुविधेचा वापर होतो. यातून जाताना व्यक्तीच्या अंगावर असलेल्या धातूच्या वस्तूंची तात्काळ तपासणी होते. हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड तयार करते. जेव्हा एखादी धातूची वस्तू या क्षेत्रात येते, तेव्हा फील्डमध्ये बदल होतो. ज्यामुळे उपकरणातून सिग्नल (अलार्म) तयार होतो. अनेक आधुनिक डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर सिस्टीम मध्ये मल्टी झोन तंत्रज्ञान असते. जे शरीर स्कॅन करताना धातू नक्की कोणत्या ठिकाणी आहे, हे अचूकपणे दर्शवते. ही उपकरण प्रणाली सीसीटीव्ही आणि बॅगेज स्कॅनरप्रमाणेच सुरक्षेसाठी अत्यंत प्रभावी मानले जाते. त्यामुळे अत्याधुनिक पध्दतीच्या डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर बसवण्याचे प्रस्तावित असल्याचे यांत्रिक व विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

फीड फीडबर्नर 21 Mar 2026 9:10 pm

मुंबई मनपातील संभाव्य घोटाळ्यांवर भाजपचा प्रहार

मुंबई : महापालिकेत प्रशासनातील अधिकाऱ्यांनी कंत्राटदारांसोबत संगनमत करून कामे मिळवण्यासाठी घातलेला घाट आणि त्यातून निर्माण झालेल्या संभाव्य घोटाळ्यांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपने विविध कंत्राट कामांच्या निविदाच रद्द करण्याचा सपाटा लावला. शालेय वस्तूंची खरेदी, राणीबागेतील एक्सॉटिकंपार्क, पदपथावरील रेंलिंगचे काम यांची कंत्राटे रद्द केल्यानंतर आता भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या मागणीनंतर रस्ते थर्मोप्लास्टिक पेंटने रंगवण्यासाठी काढलेली १५० कोटी रुपयांचीही निविदा प्रशासनाने रद्द केली. त्यामुळे करदात्यांच्या पैशांचा गैरवापर कदापि भाजप सहन करणार नसून निविदा प्रक्रियेतच संभाव्य घोटाळ्याचा वास येताच भाजपने अशा कंत्राट कामांच्या निविदाच रद्द करायला लावल्या.भाजपचे मुंबई अध्यक्ष व आमदार अमीत साटम यांनी मागील सोमवारी महापौर रितू तावडे आणि महापालिका आयुक्त डॉ भूषण गगराणी यांना पत्र पाठवून थर्मोप्लास्टिकद्वारे रस्ते रंगवण्याचे १५० कोटी रुपयांच्या कंत्राट कामांच्या निविदा रद्द करण्याची मागणी केली. त्यानंतर महापौर तावडे यांनीही गगराणी यांना पत्र लिहून त्यात कार्यवाहीचे निर्देश दिले. आमदार अमीत साटम यांनी त्यांच्या पत्रात या निविदेतील तर्कसंगतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. शहर, पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगरांच्या रस्त्यांच्या लांबीमध्ये मोठा फरक असतानाही प्रत्येकी ५० कोटींचे वाटप करण्यात आले. पश्चिम उपनगरांमध्ये पूर्व उपनगर आणि शहराच्या तुलनेत जवळपास तीनपट रस्ते आहे. त्यामुळे हे वाटप मनमानी असून त्यामागे योग्य अभ्यासाचा अभाव दिसून येतो, असे नमुद केले होते. मुंबईत सध्या १० हजार कोटींहून अधिक किंमतीची सिमेंट काँक्रीट रस्त्यांची कामे सुरू आहे आणि त्यामध्येच रस्ते मार्किंगचा समावेश केला पाहिजे. म्हणूनच, रस्ते मार्किंगसाठी स्वतंत्र टेंडर काढण्याची कोणतीही अतिरिक्त गरज नाही आणि हा संभाव्य घोटाळा असल्याचे दिसते, असे आमदार अमीत साटम यांनी या पत्रात म्हटले होते. याशिवाय, या टेंडरमध्ये प्रति किलोमीटर पेंट लावण्याचा खर्च नमूद केलेला नसल्यामुळे पारदर्शकतेबाबत प्रश्न निर्माण होत असल्याचे आणि कार्टेलायझेशनचा संशयही त्यांनी व्यक्त केला होता. काही कंत्राटदार अधिकाऱ्यांच्या संगनमताने प्रकल्पांची संकल्पना तयार करून निविदा स्वतःच्या फायद्यासाठी बनवतात. ही पद्धत महापालिकेमधून पूर्णपणे हद्दपार झाली पाहिजे.महापालिकेमधील सर्व यंत्रणा भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. कामांची संकल्पना कंत्राटदारांनी नव्हे तर निवडून आलेले प्रतिनिधी, प्रशासन किंवा दोघांनी मिळून करावी. आपली व्यवस्था कंत्राटदार-केंद्रित न राहता नागरिक-केंद्रित होण्याची गरज आहे. - अमित साटम, अध्यक्ष आमदार भाजप

फीड फीडबर्नर 21 Mar 2026 9:10 pm

MS Dhoni Limping : पहिल्या सामन्यापूर्वीच एमएस धोनीला दुखापत? सीएसकेच्या गोटात खळबळ अन् चाहत्यांची धाकधूक, पाहा VIDEO

MS Dhoni Limping : आयपीएल २०२६ पूर्वी धोनीच्या फिटनेसबाबत सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला असून, त्यामुळे चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

दैनिक प्रभात 21 Mar 2026 8:24 pm

Dawood Ibrahim Land : ‘दाऊद’ला राज्यात मोठा झटका! ‘या’जमिनीचा अखेर लिलाव; दहशतीवर मात करत दोन खरेदीदारांची बाजी

Dawood Ibrahim Land : दहशतवादी दाऊद इब्राहिमच्या रत्नागिरीतील खेड येथील जमिनीचा यशस्वी लिलाव झाला आहे.

दैनिक प्रभात 21 Mar 2026 8:11 pm

Commercial Cylinder : हॉटेलसह छोट्या व्‍यावसायिकांना मोठा दिलासा ! व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा 50 टक्क्यांवर

देशांतर्गत वाढलेल्या उत्पादनामुळे गॅस पुरवठा हळूहळू पूर्वपदावर येत असल्याने व्यावसायिक गॅस सिलिंडरच्‍या (Commercial Cylinder) वितरणात अतिरिक्त २० टक्के वाटपाला मंजुरी दिली आहे.

दैनिक प्रभात 21 Mar 2026 8:10 pm

अशोक खरातशी माझे नाव जोडणे चुकीचे, खरातने खात्यात हस्तक्षेप केल्याचा आरोप दीपक केसरकरांनी फेटाळला

मुंबई : नाशिकमधील वादग्रस्त भोंदू बाबा अशोक खरात याच्या अटकेनंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडालेली असतानाच, आता शिवसेना नेते आणि माजी मंत्री दीपक केसरकर यांनी या प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अशोक खरातशी माझे संबंध जोडणे पूर्णपणे चुकीचे असून, केवळ इशानेश्वर मंदिरामुळे माझी त्याच्याशी ओळख झाली होती, असे केसरकर यांनी स्पष्ट केले आहे.अशोक खरातवर झालेल्या गंभीर आरोपांनंतर त्याचे विविध नेत्यांसोबतचे फोटो व्हायरल झाले होते. यामध्ये दीपक केसरकर यांचाही समावेश आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून होणाऱ्या टीकेला केसरकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. केसरकर म्हणाले की, मी देवभक्त असल्यामुळे शिर्डीला जाताना सिन्नर येथील इशानेश्वर मंदिरात दर्शनासाठी जात असे. याच मंदिराच्या रस्त्याच्या मागणीसाठी खरात मुंबईत आला होता, तेव्हाचा तो फोटो आहे. तो रस्ता आता पूर्ण झाला आहे, हे कुणीही पाहू शकते. एखाद्या सार्वजनिक कामासाठी आलेल्या व्यक्तीसोबत फोटो असणे याचा अर्थ त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील कृत्यांशी आमचा संबंध आहे असा होत नाही. खरातच्या मुलीच्या लग्नाला उपस्थित राहण्याबाबत स्पष्टीकरण देताना, ओळखीच्या नात्याने अशा कार्यक्रमांना हजेरी लावणे ही सामाजिक पद्धत असल्याचे त्यांनी नमूद केले.केसरकर यांच्या काळात 'अशोक खरात शिक्षण खाते चालवत होता' असा आरोप उबाठा गटाने केला होता. यावर उत्तर देताना केसरकर म्हणाले, अशोक खरात एकदाही माझ्या शासकीय कार्यालयात आलेला नाही. मग तो खाते कसे चालवणार? माझ्या कार्यकाळात शिक्षण विभागात जे ऐतिहासिक निर्णय झाले, तसे निर्णय यापूर्वी कधीही झाले नव्हते. माझे खाते उत्तम रितीने काम करत होते, त्यामुळे असे आरोप करणे हास्यास्पद आहे.खरातला न्यायालय योग्य शिक्षा देईलअशोक खरातला त्याच्या कृत्याबद्दल न्यायालय योग्य ती शिक्षा देईलच, पण केवळ ओळखीमुळे राजकीय नेत्यांचे फोटो वापरून त्यांना यात ओढणे चुकीचे आहे. त्याच्या वैयक्तिक गोष्टींबाबत मला कोणतीही माहिती नाही, असेही दीपक केसरकर यांनी सांगितले.

फीड फीडबर्नर 21 Mar 2026 8:10 pm