SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

30    C
...

भोंदू अशोक खरातच्या अडचणीत वाढ, कुटुंबियांचीही वाढणार अडचण; कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर..., हालचालींना वेग

नाशिक : संपूर्ण देशालाच हादरवून सोडणाऱ्या भोंदू अशोक खरातच्या (Ashok Kharat) अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. महिलांवरील अत्याचार, आर्थिक फसवणूक, अंधश्रद्धेला खतपाणी घालणे असे गंभीर आरोप खरातवर आहे. सध्या भोंदू खरात कोठडीत असून त्याची कसून चौकशी सुरु आहे. खरात याच्या कथित आर्थिक गैरव्यवहारांप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) कारवाईचा वेग वाढवला असून, त्याच्या बेनामी संपत्तीवर टाच आणण्यासाठी कठोर पाऊल उचलली जात आहेत. त्यामुळे आता अशोक खरातसह त्याच्या कुटुंबीयांचीही अडचण वाढणार आहे.भोंदू खरातकडे कोट्यवधींची मालमत्ता खरातची किमान १५ ते १७ हजार कोटींची संपत्ती असल्याचा अंदाज आहे. यात कोट्यवधीची बेनामी मालमत्ता आहे. प्राथमिक तपासात बेकायदेशीर मार्गाने मिळवलेली मालमत्ता तात्पुरती जप्त (प्रोव्हिजनल अटॅचमेंट) करण्याची प्रक्रिया 'ईडी'कडून राबवली जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. पुढील टप्प्यात खरातला समन्स बजावून चौकशी, बैंक खात्यांची तपासणी, आर्थिक देवाणघेवाणीचे विश्लेषण आणि आवश्यकता असल्यास अटकेची कारवाईही केली जाऊ शकते. त्यामुळे एसआयटीकडून ईडीकडे खरातचा (Ashok Kharat) ताबा काही दिवसांपुरता जाऊ शकतो. त्यासाठी ईडी न्यायालयाची परवानगी मागणार आहे. सध्या खरात पाचव्या गुन्ह्यात पोलिस कोठडीत आहे.ईडीकडून एक स्वतंत्र गुन्हा खरातवर अगोदरच दाखल झालेला आहे. त्यानंतर त्याच्या घरासह कार्यालयावर ईडीने धाड टाकली होती. या चौकशीत खरातचे प्रॉपर्टी रॅकेट समोर आले होते. त्यात आता खरातशी संबंधित शासनातील काही अधिकारी, खासगी ब्रोकर, पुणे व नाशिकमधील काही विकासक रडारवर आहेत. नाशिक-अहिल्यानगर-पुणे (Nashik-Ahilyanagar-Pune) यादरम्यानचे खरातचे प्रॉपर्टी रॅकेट उघड झाल्यानंतर सोलापूरमध्ये देखील खरातने जमीन लाटल्याचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर ईडीकडून अत्यंत सावध पावले उचलली जात असून पहिल्या टप्प्यात खरातचे बँक खाते तात्पुरते सील करण्यात आले.कुटुंबियांचीही होणार अडचणअशोक खरात आधीच अडचणीत असताना ईडीने जर खरातच्या एखाद्या मालमत्तेवर तात्पुरती टाच (प्रोव्हिजनल अटॅचमेंट) आणली तर त्याचे कुटुंबीय देखील अडचणीत येतील. कारण असे झालयास खरातच्या मालमत्तेबाबत आणि व्यवहारांवर अनेक निर्बंध येतील. महत्त्वाचे म्हणजे संबंधित मालमत्ता खरात जरी तुरुंगात असला तरी त्याच्या कुटुंबातील वारसदारास अन्य कोणालाही विकता येणार नाही तसेच दुसऱ्याच्या नावावर हस्तांतरण, गिफ्ट किंवा वसीयतद्वारे बदल करणेही बंद होणार आहे. बँकेत कर्जासाठी खरात व त्याच्या पत्नीच्या नावावर असलेली मालमत्ता गहाण ठेवता येणार नाही. याशिवाय कागदपत्रांमध्ये फेरफार करणे किंवा मालमत्ता लपवण्याचे प्रयत्न केल्यास तो कायदेशीर गुन्हा ठरू शकतो.

फीड फीडबर्नर 21 Apr 2026 3:30 pm

Navi Mumbai- Panvel : नवी मुंबई–पनवेलमध्ये अवकाळी पावसाची हजेरी; उकाड्यातून दिलासा, पण नागरिकांची तारांबळ

नवी मुंबई : गेल्या काही दिवसांपासून तीव्र उकाड्याने हैराण झालेल्या नवी मुंबई आणि पनवेल परिसरातील नागरिकांना आज सकाळी अचानक आलेल्या अवकाळी पावसाने मोठा दिलासा मिळाला. दमट हवामानामुळे पावसाची शक्यता वर्तवली जात असतानाच सकाळी सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास पनवेलसह नवी मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावली. ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह आलेल्या या पावसामुळे कामासाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. रेल्वे स्थानके, मुख्य रस्ते, बाजारपेठा आणि चौकांमध्ये अचानक गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.दुचाकीस्वारांना या पावसाचा सर्वाधिक फटका बसला असून अनेकांनी झाडांच्या आडोशाला किंवा बसथांब्यांवर आसरा घेतला. काही ठिकाणी वाहतुकीवरही तात्पुरता परिणाम झाला. तरीही या सरींसोबत आलेल्या गार वाऱ्यामुळे वातावरणात सुखद गारवा निर्माण झाला आणि उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांनी या पावसाचा मनमुराद आनंद घेतला. लहान मुलांनी तर पावसात भिजत खेळण्याचा आनंद लुटला. मात्र कार्यालयात जाणारे कर्मचारी, शाळकरी विद्यार्थी आणि प्रवासी वर्ग यांना पावसामुळे भिजतच प्रवास करावा लागला.https://prahaar.in/2026/04/21/manipur-earthquake-5-2-magnitude-earthquake-hits-manipur-panic-among-citizens/दरम्यान, हवामान खात्याने आधीच उकाड्यासोबतच काही भागांत पावसाची शक्यता व्यक्त केली होती. बदलत्या हवामानामुळे पुढील दोन ते तीन दिवस अशाच हलक्या सरी पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आजचा पाऊस हा केवळ हवामानातील बदल नसून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांसाठी दिलासादायक ठरला आहे.https://prahaar.in/2026/04/21/ipl-2026-tilak-varma-mumbai-indians-triumph-on-the-back-of-tilak-varmas-magnificent-century/दरम्यान, बदलापूर परिसरातही अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. गेल्या दोन दिवसांपासून तापमान चाळीस अंशांच्या पुढे गेल्याने नागरिक त्रस्त झाले होते. अशातच सकाळी ढग दाटून आले आणि गडगडाटासह पावसाने शहराला झोडपून काढले. अचानक आलेल्या या पावसामुळे कामावर जाणाऱ्या नोकरदार वर्गाची विशेष गैरसोय झाली. अनेकांना भिजतच रेल्वे स्थानक गाठावे लागले, तर ग्रामीण भागातही या पावसाचा परिणाम जाणवला. एकूणच, या अवकाळी पावसाने उकाड्यापासून दिलासा दिला असला तरी दैनंदिन जीवनात काही प्रमाणात विस्कळीतपणा निर्माण केल्याचे चित्र पाहायला मिळाले.

फीड फीडबर्नर 21 Apr 2026 3:30 pm

Mumbai 3.0 : अटल सेतू ते पुणे द्रुतगती जोडमार्ग फेब्रुवारी २०२७ पर्यंत पूर्ण होणार

- ‘मुंबई ३.०’साठी कनेक्टिव्हिटीचे जाळे; जोडमार्गाचे अभियांत्रिकी टप्पे पूर्णत्वाकडेमुंबई : मुंबई आणि पुणे या दोन प्रमुख शहरांमधील प्रवासाचे अंतर अवघ्या काही मिनिटांवर आणणाऱ्या 'अटल सेतू ते मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग' या जोडप्रकल्पाने (कनेक्टर) महत्त्वाचे अभियांत्रिकी टप्पे ओलांडले आहेत. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) या कामाला विशेष गती दिली असून, आतापर्यंत १४३ ठिकाणी पाया उभारणी (फाऊंडेशन) पूर्ण झाली आहे. या प्रकल्पामुळे 'मुंबई ३.०' च्या संकल्पनेला बळ मिळणार असून नवी मुंबई विमानतळ आणि पुण्याकडे जाणारा प्रवास सिग्नलविरहित होणार आहे.७.३५ किमी लांबीच्या या सहा मार्गिकांच्या पुलाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. एकूण १७६ पायाभूत ठिकाणांपैकी १४३ ठिकाणचे काम पूर्ण झाले असून, १४१ ठिकाणी पियर्स (खांब) उभे राहिले आहेत. प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या ८३० प्रीकास्ट गर्डर्सपैकी ६५३ गर्डर्सची उभारणी पूर्ण झाली आहे. पळस्पे परिसरात द्रुतगती मार्गाला जोडण्यासाठी स्लिप रोड्स आणि सर्व्हिस रोड्सच्या रुंदीकरणाचे कामही समांतरपणे सुरू आहे, ज्यामुळे वाहतूक कोंडीविना प्रवाशांना महामार्गावर प्रवेश मिळेल.हा कॉरिडॉर पूर्ण झाल्यानंतर अटल सेतूमार्गे (शिवडी-न्हावा शेवा) चिर्ले आणि पळस्पेवरून थेट पुण्याकडे जाता येईल. यामुळे प्रवासाच्या वेळेत मोठी बचत होणार असून लॉजिस्टिक्स क्षेत्रालाही गती मिळणार आहे. विशेष म्हणजे, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळालाही या मार्गामुळे सुलभ प्रवेश मिळणार असल्याने हा मार्ग भविष्यात मुंबई आणि पुण्याच्या आर्थिक प्रगतीचा कणा ठरणार आहे.https://prahaar.in/2026/04/21/us-india-trade-deal-indian-delegation-to-visit-washington-this-week-for-us-india-trade-deal/नोकरदार आणि विद्यार्थ्यांचा दैनंदिन प्रवास सुलभ होईल : डॉ. संजय मुखर्जी, महानगर आयुक्त, एमएमआरडीएअटल सेतूमार्गे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आता सिग्नलविरहित प्रवास शक्य होईल. यामुळे नोकरदार आणि विद्यार्थ्यांचा दैनंदिन प्रवास सुलभ होईल. 'मुंबई ३.०' घडवताना तासांचा प्रवास मिनिटांत आणण्याचे आमचे 'मुंबई इन मिनिट्स' हे उद्दिष्ट या प्रकल्पाद्वारे पूर्ण होत आहे.गुंतवणुकीला पूरक वातावरण :फेब्रुवारी २०२७ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे एमएमआरडीएचे उद्दिष्ट आहे. हा मार्ग नव्या विकासकेंद्रांना जोडणारा दुवा ठरेल. यामुळे मुख्य मुंबईवरील ताण कमी होऊन नवी मुंबई आणि आसपासच्या भागात औद्योगिक गुंतवणूक आणि रोजगारनिर्मितीला मोठी चालना मिळेल. समुद्री पूल, द्रुतगती मार्ग आणि मेट्रो नेटवर्कचे एकात्मिक जाळे विणण्याच्या एमएमआरडीएच्या योजनेतील हा एक महत्त्वाचा दुवा आहे.प्रकल्पाची वैशिष्ट्ये :लांबी : ७.३५ किलोमीटर.मार्गिका : सहा (११.५ मी. + ११.५ मी. रुंद).प्रमुख जोडणी : अटल सेतू, मुंबई-पुणे एक्सप्रेसवे आणि नवी मुंबई विमानतळ.सद्यस्थिती : १४१ पियर्स आणि ६५३ गर्डर्सची उभारणी पूर्ण.

फीड फीडबर्नर 21 Apr 2026 3:30 pm

आठवणींच्या मैफलीत

आशय : वीणा सानेकर डहाणू जवळ ऐने नावाचे छोटेसे गाव आहे. या गावात वसलेल्या स्नेहनगरीत जाण्याचा योग नुकताच आला. एका बाजूला क्रीडांगण, नवीनच वसलेले कला कुटिर, सर्वत्र हिरवीगार झाडे, सहअध्ययन केंद्र, मध्यभागी बैठक जमवण्यासाठी मस्त जागा…, दुसरीकडे बैठी शाळा, छोटीशी बाग आणि खेळ…! ही स्नेहनगरी वसवणाऱ्या शिक्षणतज्ज्ञ आणि भाषातज्ज्ञ रमेश पानसे यांची भेट म्हणजे समृद्ध करणारा अनुभव! बालशिक्षणात रमलेले पानसे सर शिक्षणाबद्दल तासन् तास बोलू शकतात...’ त्यादिवशी मात्र कवितांच्याच मैफलीचा बेत सरांनी उत्स्फूर्तपणे ठरवला.सगळे नव्याने उभ्या राहिलेल्या पर्णकुटीत जमले. बैठकीची गोल रचना. दिवे लागल्याने प्रकाशाची पखरण वातावरण सुंदर करत होती. सगळे सुचेल तशा कविता म्हणत होते. किती वेगवेगळ्या कवितांचा आनंद सगळे लुटत होते. सोबत अनिताताईंनी केलेली गरमगरम भजी शामदादा समोर ठेवत होते आणि मैफलीला अधिकच रंग चढत होता.यानिमित्ताने आपल्या आवडत्या कविता सगळेच आठवत - शोधत होते.युगामागुनी चालली रे युगे ही कितीदा करावी भास्करा वंचनाकितीकाळ कक्षेत धावू तुझ्या मी कितीदा करू प्रितीची याचनाही कुसुमाग्रजांची पृथ्वीचे प्रेमगीत कविता, कुब्जा ही इंदिरा संतांची कविता, बा.भ . बोरकरांची कविता, पु. शि.रेगे, सदानंद रेगे, वसंत आबाजी डहाके, गदिमा, शांता शेळके यांची कविता अशा वेगवेगळ्या कविता उपस्थित जयेश, ज्योती, सुषमाताई, स्नेहल, ईशा, पानसे सर अशा सर्वांनीच सादर केल्या. अधूनमधून कुणी स्वतःच्या जपून ठेवलेल्या कविताही सादर करीत होते.या रंगलेल्या मैफलीत मोजकेच छोटे प्रेक्षक होते. त्यांच्यासाठी विंदा करंदीकरांच्या ‘एटु लोकांचा देश,’ ‘अबबब अबबब केवढा फणस आई’ या बालकविताही सादर झाल्या. मनमोहन नातू, पद्मा गोळे यांच्या कविता ऐकायला मिळणे हा दुर्मिळ आनंद होता. सेल्युलर तुरुंगाची भिंत आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यातील संवाद मनमोहन नातू यांच्या कवितेतून साकारला तर ‘मी एक पक्षीण आकाश वेडी दुज्याचे मला भान मुळी नसे’ ही कविता समर्थ स्त्रीचा आत्मस्वर टिपत होती.शब्दांमध्ये जगणे पुन्हा, शब्दांमध्ये मरणे पुन्हा हे अंतहीन समुद्रसे माझा परि दुबळा पसा अशी अवस्था कविता ऐकताना होत होती.‘सई माया सजनीले, सैनच पडेना हे व्हराडी लोकगीत’ ऐकणे आणि ताल धरणे हा अत्यंत वेगळाच आनंद होता. लघुअनियतकालिकांच्या चळवळीचे पानसे सर म्हणजे महत्वाचे साक्षीदार. त्या सगळ्या काळातील वाड्मयीन घडामोडीं विषयी पानसे सर मोकळेपणाने बोलत राहिले. सतीश काळसेकर, मनोहर ओक, गुरुनाथ धुरी यांच्यावर सर भरभरुन बोलत. तसेच मराठीच्या विविध प्राध्यापक व लेखक - कवींच्या आठवणी निघत होत्या. शंकर वैद्य सरांचे अध्यापन आणि त्यांची कविता हा सरांचा आवडता विषय. सरांचा ‘दर्शन’ हा कवितासंग्रह या गप्पांमध्ये पुन्हा पुन्हा आठवत राहिला. एम ए च्या वर्गात असताना सरोजिनी बाई वैदय, शंकर वैद्य सर, डहाके सर, गणोरकर बाई, पुष्पा भावेबाई यांचे वर्ग स्मरत होते. अनपेक्षितपणे जमलेली ही मैफिल कवितांची होती, शब्दांची होती, गीतांची आणि गीतकारांची होती, तितकीच ती माणसांच्या अविस्मरणीय आठवणींची होती.

फीड फीडबर्नर 21 Apr 2026 3:10 pm

Santosh Deshmukh : 'त्यांच्यावर कुटुंबीयांचा दबाव'..., मस्साजोगच्या सरपंचपदाच्या उमेदवाराचा खळबळजनक आरोप

संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या सरपंच संतोष देशमुख ( Santosh Deshmukh ) यांच्या मस्साजोग या गावात राजकीय वातावरण रंगले आहे. मस्साजोग गावच्या सरपंच पदाची पोटनिवडणुक ही बिनविरोध होईल अशी चर्चा होती कारण या जागेसाठी संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी संतोष देशमुख या उभ्या होत्या मात्र आता ही निवडणूक बिनविरोध होणार नसून अश्विनी संतोष देशमुख आणि स्वरूपानंद विश्वनाथराव देशमुख यांच्यात आता थेट लढत होणार आहे. आणखी ३ उमेदवार निवडणूक लढवण्यास इच्छुक होते मात्र अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ५ पैकी ३ उमेदवारांनी माघार घेतल्याने ही चुरस अधिकच स्पष्ट झाली आहे.'त्यांच्यावर कुटुंबीयांचा दबाव' - स्वरूपानंद देशमुखदिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या निधनाने रिक्त झालेली जागा ही त्यांच्या पत्नी अश्विनी देशमुख ( Ashwini Santosh Deshmukh )यांना मिळावी यासाठी अनेक जण आग्रही होते मात्र तसे काही घडले नाही. दरम्यान अश्विनी देशमुख यांच्या विरोधात उभे असलेले उमेदवार स्वरूपानंद देशमुख यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. स्वरूपानंद देशमुख यांनी गंभीर आरोप करत म्हटले की, अश्विनी देशमुख या स्वतः हून निवडणूक लढवत नसून त्यांच्यावर त्यांच्या कुटुंबाचा, विशेषतः त्यांच्या दिराचा मोठा दबाव आहे. काहींची राजकीय महत्त्वाकांक्षा आडवी येत असल्याने अश्विनी देशमुख यांना या निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले असल्याचा आरोप त्यांनी केला....तर गावासमोर नाक घासेनसरपंच पदाची पोटनिवडणूक २८ एप्रिल रोजी होणार असून २९ एप्रिल रोजी मतमोजणी होईल. दरम्यान स्वरूपानंद देशमुख हे पोटनिवडणुकीत उभे राहिल्याने त्यांना अनेकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. कोणाच्या तरी सांगण्यावरून किंवा 'डमी' उमेदवार म्हणून स्वरूपानंद देशमुख उभे राहिले आहेत, असा आरोप त्यांच्यावर केला जात होता. या आरोपाला त्यांनी प्रत्युत्तर देत खुले आव्हान देत म्हटले आहे की जर मी कोणाच्या सांगण्यावरून उभा राहिलो आहे हे सिद्ध झाले, तर सर्व गावासमोर नाक घासून त्यांना पाठिंबा द्यायला तयार आहे.हीच त्यांना खरी श्रद्धांजलीयापूर्वी मला ग्रामस्थांनी साडेतीन वर्षे काम करण्याची संधी दिली होती. आता पुढील १८ महिन्यांच्या कार्यकाळात संतोष देशमुख यांचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली असेल, असेही स्वरूपानंद देशमुख यांनी म्हटले आहे. दरम्यान एकीकडे सहानभूतीची लाट आणि दुसरीकडे अनुभवाचा दावा यापैकी ग्रामस्थ कोणाला कौल देतील हे निवडणूक निकालात दिसून येईल. त्यामुळे या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे.

फीड फीडबर्नर 21 Apr 2026 3:10 pm

Manipur Earthquake : मणिपुरमध्ये ५.२ रिश्टर तीव्रतेचा भूकंप; नागरिकांमध्ये घबराट

मणिपुरच्या अनेक भागांमध्ये आज म्हणजेच मंगळवार २१ एप्रिल रोजी पहाटे भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ५.२ इतकी नोंदवण्यात आली असून, त्याचे केंद्र कामजोंग जिल्ह्यात होते.नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीच्या माहितीनुसार, हा भूकंप सकाळी ५.५९ वाजता झाला. धक्के जाणवताच कामजोंग आणि आसपासच्या भागातील नागरिकांमध्ये घबराट पसरली आणि अनेकजण घाबरून घराबाहेर पडले. भूकंपाचे केंद्र अक्षांश २४.७०३ उत्तर आणि रेखांश ९४.४१५ पूर्व येथे, सुमारे ६२ किलोमीटर खोलीवर असल्याचे सांगण्यात आले. या धक्क्यांचा परिणाम शेजारच्या नागालँड आणि आसाम राज्यांमध्येही जाणवला.https://prahaar.in/2026/04/20/india-south-korea-relations-from-chips-to-ships-india-korea-will-create-new-opportunities-together-prime-minister-narendra-modi/सुदैवाने, या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी किंवा मोठ्या नुकसानीची माहिती मिळालेली नाही. यापूर्वी सोमवारी उत्तराखंडमधील पौडी गढवाल येथे रात्री ८.३२ वाजता रिश्टर स्केलवर ३ तीव्रतेचा भूकंप झाला होता, ज्याचे केंद्र सुमारे १० किलोमीटर खोलीवर होते. तसेच सोमवारी सकाळी जपानमध्ये ७.४ तीव्रतेचा भूकंप झाला होता. या भूकंपामुळे समुद्रात सुमारे ८० सेंटीमीटर उंच लाटा उसळल्या आणि किनाऱ्यावर आदळल्या. त्यानंतर जपानमध्ये सुनामीचा इशाराही देण्यात आला होता.

फीड फीडबर्नर 21 Apr 2026 3:10 pm

US-India Trade Deal : अमेरिका-भारत व्यापार करारासाठी भारतीय शिष्टमंडळ या आठवड्यात वॉशिंग्टनला भेट देणार

भारत आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय व्यापार करारासंदर्भातील प्रयत्न आता अंतिम आणि सर्वात महत्त्वाच्या टप्प्यात पोहोचले आहे. या कराराला अंतिम स्वरूप देण्यासाठी भारतीय प्रतिनिधीमंडळ या आठवड्यात वॉशिंग्टनला पोहोचत आहे. अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर याबाबत माहिती दिली आहे.सर्जिओ गोर यांनी एका ट्विटद्वारे अधिकृत पुष्टी करत सांगितले की, भारतीय व्यापार प्रतिनिधीमंडळ या आठवड्यात वॉशिंग्टनला पोहोचत आहे. या महत्त्वाच्या दौऱ्याचा मुख्य उद्देश द्विपक्षीय व्यापार कराराला अंतिम स्वरूप देणे हा आहे. भारत- अमेरिका द्विपक्षीय व्यापार कराराशी संबंधित औपचारिकता पूर्ण करण्यासाठी विशेष भारतीय व्यापार प्रतिनिधीमंडळ याच आठवड्यात वॉशिंग्टन दौऱ्यावर जाणार आहे.https://prahaar.in/2026/04/21/share-market-stock-market-rises-in-early-trade-sensex-nifty-gains/अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांनी या दौऱ्याचे स्वागत करत, व्यापार कराराला अंतिम रूप देण्याच्या दिशेने हे मोठे पाऊल असल्याचे म्हटले आहे. या कराराच्या आर्थिक परिणामांवर भाष्य करताना अमेरिकन राजदूत म्हणाले की, हा आगामी करार भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांसाठी ‘विन-विन’ म्हणजेच फायदेशीर ठरणार आहे.अमेरिकन राजदूतांच्या विधानामुळे ट्रम्प प्रशासन हा द्विपक्षीय करार दोन्ही देशांसाठी परस्पर लाभदायक मानत असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता उद्योगजगताचे लक्ष या आठवड्यात वॉशिंग्टनमध्ये होणाऱ्या महत्त्वाच्या बैठका आणि करारावर अंतिम शिक्का कधी बसतो याकडे लागले आहे.

फीड फीडबर्नर 21 Apr 2026 3:10 pm

महाराष्ट्रीय साड्या

महाराष्ट्रीय साड्या या राज्याच्या समृद्ध संस्कृती आणि इतिहासाचा जिवंत पुरावा आहेत. नाजूक जरीकामासाठी ओळखली जाणारी प्रसिद्ध पैठणी साडी असो किंवा पारंपरिक महाराष्ट्रीय शैलीत नेसली जाणारी प्रतिष्ठित नऊवारी साडी असो, या साड्या संपूर्ण भारतातील आणि भारताबाहेरील महिलांना आजही मोहित करत आहेत. त्यांच्यातील अभिजातता आणि परंपरेच्या संगमामुळे, कोणत्याही साडीप्रेमीच्या वॉर्डरोबमध्ये त्या असायलाच हव्यात. या लेखात आपण महाराष्ट्रीय साड्यांचे विविध प्रकार, त्यांचे सांस्कृतिक महत्त्व आणि पारंपरिक तसेच आधुनिक अशा दोन्ही लूक्ससाठी तुम्ही त्या कशा स्टाईल करू शकता, याबद्दल जाणून घेऊ या.महाराष्ट्रातील साड्यांचे प्रकारमहाराष्ट्रातील साड्या अत्यंत वैविध्यपूर्ण आहेत, प्रत्येक साडी राज्याच्या वेगवेगळ्या भागातून उगम पावते आणि सांस्कृतिक जडणघडणीत तिचे एक खास स्थान आहे. येथे काही सर्वात प्रतिष्ठित प्रकार दिले आहेत :१. पैठणी साडीपैठणी ही महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध साडी आहे. ‘रेशीमची राणी’ म्हणून ओळखली जाणारी ही साडी तिच्या आकर्षक रंगांसाठी, नाजूक हाताने विणलेल्या जरीच्या काठांसाठी आणि मोराची नक्षी असलेल्या पदरासाठी प्रसिद्ध आहे. पारंपरिकरीत्या शुद्ध रेशमापासून बनवलेल्या पैठणी साड्या शतकानुशतके ऐश्वर्य आणि परंपरेचे प्रतीक राहिल्या आहेत.२. नऊवारी साडीनऊवारी साडी, जिला ‘कास्ता’ साडी असेही म्हणतात, तिच्या नेसण्याच्या पद्धतीमुळे वैशिष्ट्यपूर्ण आहे. सर्वसाधारण सहा-वारी साडीच्या विपरीत, नऊवारी साडी नऊ-वारी लांब असते आणि तिची नेसण्याची पद्धत पायजम्यासारखी असते, ज्यामुळे महिलांना सहजपणे वावरता येते. ही साडी महाराष्ट्राच्या पारंपरिक संस्कृतीत खोलवर रुजलेली आहे आणि अनेकदा सण-उत्सव व लग्नसमारंभांमध्ये परिधान केली जाते.३. कोल्हापुरी साडीकोल्हापुरी साड्या साध्या, वजनाने हलक्या असून रोजच्या वापरासाठी किंवा लहान-सहान सणासुदीच्या प्रसंगांसाठी उत्तम आहेत. त्यांचे सुज्ञतापूर्ण लालित्य आणि आरामदायीपणा यामुळे, परंपरा आणि व्यावहारिकता यांचा मेळ घालू इच्छिणाऱ्या महिलांमध्ये त्या लोकप्रिय आहेत.४. नारायण पेठ साडीनारायण पेठ या गावातून उगम पावलेल्या या साड्या, त्यांच्या आकर्षक काठांसाठी ओळखल्या जातात; हे काठ सामान्यतः लाल किंवा काळ्या रंगाचे असून त्यावर बारीक सोनेरी जरीकाम केलेले असते. त्या त्यांच्या मजबूत पोत आणि तेजस्वी रंगांसाठी ओळखल्या जातात, ज्यामुळे धार्मिक विधी आणि सणांसाठी त्या एक लोकप्रिय निवड ठरतात.महाराष्ट्रीय साड्यांचे सांस्कृतिक महत्त्वमहाराष्ट्रातील प्रत्येक प्रकारच्या साडीला एक गहन सांस्कृतिक आणि पारंपरिक महत्त्व आहे. या साड्या केवळ वस्त्र नाहीत; त्या राज्याच्या समृद्ध इतिहासाचे आणि कलाकुसरीचे प्रतिबिंब आहेत.हातमागाचा वारसा : पैठणीसारख्या महाराष्ट्रीय साड्या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या प्राचीन तंत्रांचा वापर करून विणल्या जातात. प्रत्येक साडी ही प्रेमाचे प्रतीक असते आणि तिच्या गुंतागुंतीच्या नक्षीकामामुळे व हाताने विणलेल्या स्वरूपामुळे ती पूर्ण होण्यास अनेकदा महिने लागतात.परंपरेचे प्रतीक : लग्न असो, धार्मिक उत्सव असो किंवा सांस्कृतिक कार्यक्रम असो, महाराष्ट्रीय साडी नेसणे हे परंपरेप्रती आदराचे प्रतीक मानले जाते. नऊवारीसारख्या साड्यांना महाराष्ट्रीय विवाहसोहळे आणि विधींमध्ये विशेष महत्त्व असून, त्या शालीनता, सामर्थ्य आणि वारसा यांचे प्रतीक मानल्या जातात.महाराष्ट्रीय साड्या कशा स्टाईल कराव्यातमहाराष्ट्रीयन) साड्या बहुगुणी असून वेगवेगळ्या प्रसंगांनुसार त्या विविध प्रकारे नेसता येतात. तुम्हाला पारंपरिक लूक हवा असो किंवा आधुनिकतेचा स्पर्श, या साड्यांमध्ये असंख्य पर्याय उपलब्ध आहेत.पारंपारिक देखावापारंपरिक महाराष्ट्रीयन लूकसाठी, नऊवारी साडी नेसून त्यासोबत नथ, हिरव्या बांगड्या आणि 'चिंचपेटी' नावाचा पारंपरिक मोत्यांचा हार यांसारखे पारंपरिक महाराष्ट्रीयन दागिने घाला. सांस्कृतिक सौंदर्याचा पुरेपूर अनुभव घेण्यासाठी हा लूक टिकली आणि कोल्हापुरी चपला घालून पूर्ण करा.समकालीन फ्यूजनजर तुम्हाला तुमच्या पैठणी साडीला आधुनिक टच द्यायचा असेल, तर ती एका समकालीन ब्लाउजसोबत परिधान करा -उदाहरणार्थ, कोल्ड शोल्डर किंवा हाय-नेक डिझाइन. लग्नसमारंभ किंवा सणासुदीच्या कार्यक्रमांसाठी योग्य असलेल्या फ्यूजन लूकसाठी तुम्ही कमरेला बेल्ट लावून साडीला आवळू शकता. साडीला अधिक महत्त्व देण्यासाठीकमीत कमी दागिने घाला.सणासुदीचे प्रसंगकोल्हापुरी आणि नारायण पेठ साड्या लहान सणांच्या प्रसंगांसाठी उत्तम आहेत. एक मोहक पण तरीही साधा लूक मिळवण्यासाठी तुम्ही हलका नेकलेस, कानातले आणि साधी टिकली लावू शकता.- प्रतिनिधी

फीड फीडबर्नर 21 Apr 2026 3:10 pm

Water Safety: पाणी दिसायला स्वच्छ म्हणजे सुरक्षित असेलच असं नाही!

Water Safety आपल्या शरीरासाठी पौष्टिक आहार जितका महत्त्वाचा आहे, तितकेच स्वच्छ पाणी, मोकळी हवा आणि स्वच्छ परिसरही गरजेचे आहेत. पाणी स्वच्छ असेल तर आरोग्य चांगले राहते आणि आरोग्य चांगले असेल तर जीवनात प्रगती होते. म्हणूनच प्रत्येकाने पाण्याच्या स्वच्छतेकडे गंभीरपणे लक्ष देणे गरजेचे आहे.

दैनिक प्रभात 21 Apr 2026 2:49 pm

Kalki Koechlin : कल्की कोचलिनने ‘त्या’घटनेनंतर झालेल्या मानसिक आरोग्याबाबत केला खुलासा

Kalki Koechlin : कल्कीचा घटस्फोट झाला तेव्हा तिला भरपूर मानसिक वेदना सहन कराव्या लागल्या.

दैनिक प्रभात 21 Apr 2026 2:48 pm

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर डागली टीकेची तोफ म्हणाले “जर खरोखरच महिलांविषयी कळकळ असेल, तर….”

Uddhav Thackeray : भारतीय कामगार सेनेच्या 58 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला.

दैनिक प्रभात 21 Apr 2026 2:45 pm

Pune Water Supply : पुण्याच्या पाणीकपातीवर प्रशासनाने घेतला हा महत्वाचा निर्णय

पुणे : सूर्याचा प्रकोप हा वाढत जातोय, तापमानाचा पारा इतका वाढलाय की थेट तापमान ४०- ४५ अंशापर्यत जाऊन पोहोचलाय, त्यामुळे पाण्याची वाफ देखील मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे धरणामंधील पाणीसाठा हा कमी होण्याची चिन्हे आहेत. पुण्यात पाणीकपातीबाबत नागरिकांमध्ये संभ्रम असून प्रशासनाने याबाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे.पुण्यात मुबलक पाणीसाठा पाणीकपाती बाबत महत्वाचा निर्णय घेताना पुणे प्रशासनाने धरणांमधील सध्या पाणीसाठ्याची आधारे घेत आकडेवारीनुसार सध्याचा साठा ११.५ टीएमसी ( ३९ % ) असून गेल्या वर्षी हा साथ १०.४ टीएमसी ( ३६ %) होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा १ टीएमसी पाणीसाठा अधिक असल्याने पालिकेचा पाणी कपातीला विरोध आहे. तसेच शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चारही धरणांची स्थिती सध्या समाधानकारक आहे.https://prahaar.in/2026/04/16/heatwave-sop-mandates-12-4pm-break-for-informal-workers/अल निनो च्या प्रभावामुळे कमी पावसाची शक्यता असल्याने जलसंपदा विभागाने पुणे पालिकेला १५ % कपात करण्याचे आवाहन केले होते. समाधानकारक पाऊस पडेपर्यंत पाणीकपात चालू ठेवण्याचा प्रस्ताव त्या पत्रात मांडण्यात आला होता. मात्र पालिकेने प्रस्ताप तूर्तास बाजूला ठेवला आहे.https://prahaar.in/2026/04/21/share-market-stock-market-rises-in-early-trade-sensex-nifty-gains/पालिकेच्या म्हणण्यानुसार शहरातील अनेक भागात कमीदाबाने पाणीपुरवठा होत आहे, यावरून नागरिक प्रचंड तक्रार करत आहेत. पाणीकपात हा उपाय नसून वितरण पद्धत सुधारली पाहिजे हे नागरिकांचे मत आहे. पुण्याच्या पाणीकपातीचा निर्णय सध्या बारामतीच्या पोटनिवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ही बैठक सध्या लांबणीवर आहे. कालवा समितीची बैठक पूर्ण झाल्यानंतरच पुण्यात पाणीकपात करायची की नाही हा प्रश्न मार्गी लागणार आहे.

फीड फीडबर्नर 21 Apr 2026 2:10 pm

ट्रम्पकडून ती आनंदवार्ता आली अन् शेअर बाजाराने मोठी उसळी मारली ; नेमकं काय घडलं ?

अमेरिका इराण युद्धामुळे शेअर बाजारात ( Share Market )मोठ्या घडामोडी घडत होत्या. गुंतवणूकदार यामुळे चांगलेच धास्तावाले होते. त्यामुळे शेअर बाजारात देखील मोठी पडझड पहायला मिळत होती. हे युद्ध लवकरात लवकर थांबावे अशी आशा सर्वानाच होती पण कधी अमेरिकेतून तर कधी इराणमधून निराशा समोर येत होती. असे असले तरी सध्या युद्ध काही दिवसांसाठी बंद आहे. अशातच अमेरिकेतून अशी काही गुडन्यूज समोर आली आहे आहे की शेअर बाजारात ( Share Market ) मोठी उसळी दिसून आली. विशेष म्हणजे आखाती देशातील युद्धाची (war )धग कायम असतानाही शेअर बाजाराने मोठी उसळी मारली आहे.आज सकाळी बाजार उघडताच घडले असे काही...आज सकाळी बाजार उघडताच सकाळी 9:20 वाजता, सेन्सेक्स 430 अंकांच्या तेजीसह 78,950 अंकावर व्यापार करत होता. तर निफ्टी 50 हा 117 अंकांच्या उसळीसह 24,480 च्या स्तरावर ट्रेड करत होता. भारत आणि अमेरिका व्यापार कराराविषयी ( India US Trade Deal) मोठी अपडेट समोर आल्यानंतर आखाती युद्धाची भीती झटक्यात बाजूला झाली आणि गुंतवणूकदारांनी या सोहळ्यात सहभाग घेतला. आणि गुंतवणुकीस पुन्हा समोर आले. जणू आज मंगळवारी शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे मंगलच मंगल झाले. बीएसई बास्केटमध्ये अदानी पोर्ट (Adani Port) , आयसीआयसीआय बँक (ICICI ), एल अँड टी, बजाज फायनान्स हे टॉप गेनर ठरले.आज सेन्सेक्स आणि निफ्टी सुसाट आज बाजार सुरू होताच सेन्सेक्स आणि निफ्टी रॉकेटसारखा उडाला. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा सेन्सेक्सने 500 अंकाहून अधिक उसळी आली. तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज, NSE Nifty ने तेजीचा घोडा दौडवला. 30 शेअर्सचा बीएसई सेन्सेक्स इंडेक्स 96.86 अंक वा 0.12 टक्क्यांच्या तेजीसह उघडला होता. पहिल्या सत्रात सेन्सेक्सने 78,617.16 अंकाची सुरुवात केली. एनएसई निफ्टी 50 ने दिवसाची सुरुवात चांगली झाली. आज निफ्टी 50 हा 9.70 अंक वा 0.04 टक्क्यांच्या उसळीसह 24,374.55 च्या स्तरावर उघडला.अमेरिकेतून आलेल्या वृत्तानुसार, भारत आणि अमेरिकेत व्यापारी करारात ( India US Trade Deal) मोठा बदल पहायला मिळू शकतो. 20 एप्रिलपासूनच याविषयीच्या चर्चा सुरु असून त्याचा सकारात्मक परिणामही दिसून येत आहे. अमेरिकेन न्यायालयाने टॅरिफ हे बेकायदेशीर म्हटले होते. टॅरिफ (tariff ) रद्द करण्याचे आदेश दिले होते. दरम्यान दर्पण जैन यांच्या नेतृत्वात एक डझन भारतीय अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ अमेरिकन दौऱ्यावर असल्याचे आणि ते अनेक विषयावर चर्चा करणार असल्याचे समोर येत आहे.

फीड फीडबर्नर 21 Apr 2026 2:10 pm

ऐतिहासिक संधी गमावली

संसदेत मांडण्यात आलेले 'नारी शक्ती वंदन' विधेयक पराभूत झाले आणि एका ऐतिहासिक बदलाची संधी हुकली. ८५० जागांपर्यंत संसदेचा विस्तार आणि महिलांना ३३ टक्के आरक्षण देणारी ही घटनादुरुस्ती केवळ तांत्रिक कारणास्तव नव्हे, तर राजकीय श्रेयवाद आणि जुन्या पुरुषी मानसिकतेच्या पेचप्रसंगात अडकली.१७एप्रिल २०२६ हा दिवस भारतीय इतिहासातील आणि विशेषतः महिलांच्या अधिकारांच्या संदर्भात एक 'काळा दिवस' म्हणून गणला जाईल. संसदेच्या जागांची संख्या ८५० करणारी आणि वैधानिक संस्थांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देणारी महत्त्वपूर्ण घटनादुरुस्ती संसदेत पराभूत झाली. महिलांप्रती देशात सन्मानाची भावना निर्माण करू शकणारे हे विधेयक संसदेने हाणून पाडले. या दुर्दैवी घटनेला जबाबदार कोण? तर तीच जुनी पुरुषी मानसिकता आणि भाजपला विरोध करण्याच्या नावाखाली एकत्र आलेली काँग्रेस व तिचे साथीदार पक्ष. विरोधकांनी स्वतःच्या क्षुद्र राजकीय स्वार्थासाठी एक ऐतिहासिक संधी गमावली आहे. आज जरी विरोधक मोदींना पराभूत केले म्हणून आनंदात असले तरीही त्यांना याचा जाब द्यावा लागेल. महिलांना मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी झगडावे लागले आहे आणि ब्रिटनमध्येही महिलांना आधी मतदानाचा हक्क नव्हता. त्यांच्याकडे मोठ्या चळवळी झाल्या आणि महिलांना मतदानाचा हक्क मिळाला. भारतीय महिलांच्या बाबतीत हाच पुरुषी मानसिकतेचा अनुभव येतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या दूरदर्शी नेतृत्वामुळे भारतीय महिलांना मतदानाचा हक्क मिळाला; मात्र पुरुषी मानसिकता आड आली आणि महिलांना प्रतिनिधित्व देण्याच्या बाबतीत तीच मानसिकता कारण ठरली. ती आजही ठरत आहे. ६० कोटी भारतीय महिलांचे हक्क आणि स्वप्ने विधेयक पराभूत झाल्यामुळे चिरडली गेली आहेत.मोदी यांनी या विधेयकाची काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांनी भ्रूणहत्या केली असे म्हटले. त्यात असत्य काहीच नाही. कारण काँग्रेस प्रथमपासूनच महिलांविरोधी होती आणि आजही आहे. हेच राहुल गांधी यांनी आपल्या भाषणातून दाखवून दिले. त्यांनी दक्षिणेतील राज्यांना कमी प्रतिनिधित्व देण्याचा भाजपचा डाव आहे हे सांगण्यासाठी या विधेयकाची हत्या केली. पण राहुल यांची आजी इंदिरा गांधी या पंतप्रधान झाल्या, त्या महिलांना प्रतिनिधित्व देण्यात आल्यामुळे हे राहुल विसरले. वास्तविक 'नारी शक्ती वंदन' अधिनियमामुळे भारताच्या नारीशक्तीला तिचा उचित सन्मान आणि योग्य हक्क दिले जाणार होते. कारण हा कायदा महिलांची सामाजिक जबाबदारी निश्चित करण्याबरोबरच सामाजिक चेतनाही आणणार होता. मोदी सरकारची धोरणे महिलांप्रती अत्यंत अनुकूल आहेत. पण विरोधकांना हे सहन होणारे नाही. त्यामुळे त्यांनी दक्षिणेतील राज्यांचा आधार घेत हे विधेयक हाणून पाडले. जेव्हा मुलींची भ्रूणहत्या करण्यात येते तेव्हा ती मानसिकता अशा बदलांनी पराभूत होते. मोदी सरकारला हेच हवे होते; मात्र काँग्रेस आणि विरोधी मानसिकतेला ते नको होते. आता भारत विकसित देश होण्याच्या दिशेने निघाला आहे आणि या परिस्थितीत महिलांना त्यांचे उचित आणि योग्य हक्क दिले असते, तर ते जास्त योग्य दिसले असते. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते तत्र रमन्ते देवता असे एक संस्कृत वचन आहे. म्हणजे जेथे नारीचे पूजन केले जाते तेथे देवताही रमतात. पण अर्थात काँग्रेस आणि त्यांच्या नतद्रष्ट साथीदारांना इतके उच्च विचार कसे सुचतील. त्यामुळे त्यांनी त्यांच्या भात्यातील एकमेव बाण काढला आणि एकी करून विधेयक हाणून पाडले.महिला आरक्षण विधेयक नवा विचार नव्हता, पण मोदी यांच्या नेतृत्वाची खरी परीक्षा होती. आता हे विधेयक जरी हाणून पाडण्यात विरोधी पक्ष यशस्वी झाले असले तरीही त्यांना महिला मतदार क्षमा करणार नाहीत. त्या पुढील निवडणुकीत जरूर धडा शिकवतील. कारण या विरोधी पक्षांनी महिलांचा अक्षम्य अपराध केला आहे. सामाजिक मानसिकता बदलण्याची ताकद या विधेयकात होती. महिला आरक्षण विधेयक प्रथम १९९० पासून मांडले होते पण कधी पक्षीय राजकारणाच्या भिंतींना ते धडकून पुढे सरकले नाही. पंचायत समित्यांमध्ये ते लागू करण्यात आले आणि महिलांना काही प्रमाणात प्रतिनिधित्व मिळाले. पण तेथेही पुरुषच महिलांवर अधिराज्य गाजवत. महिलांना आरक्षण देण्याची तरतूद या विधेयकात होती; मात्र २९८ सदस्यांनी विधेयकाच्या बाजूने, तर २३० सदस्यांनी प्रतिकूल मत दिल्याने विधेयक पराभूत झाले. पण हा पराभव मोदींचा नाही तर तो विरोधकांचा आहे. या विधेयकाच्या बरोबरीने २०२६-२७ मध्ये मतदारसंघांची पुनर्रचनेचा प्रश्न होता आणि याचाच आधार घेत विरोधकांनी विधेयकाच्या विरोधी मतदान केले. कोटामुळे राजकीय प्रतिनिधित्व कमी होईल अशी भीती दक्षिणेतील राज्ये आणि तृणमूल काँग्रेस यांनी घेतली. भाजपचा हा निवडणुकीचे प्रतिनिधित्वाची पुनर्रचना करण्याचा डाव आहे असा आरोप या पक्षांनी केला. पण भाजपचा प्रत्यारोप असा होता की, विरोधी पक्ष महिला विरोधी आणि दुर्बल घटक विरोधी आहेत. तसेच महिलांना योग्य प्रतिनिधित्व देण्यासाठी हा प्रयोग आवश्यक आहे.गृहमंत्री अमित शहा यांनी सभागृहाला असे आश्वासन दिले होते, की ८१६ सदस्यांच्या सभागृहात दक्षिणेतील राज्यांचे प्रतिनिधित्व आता आहे तितकेच राहील. पण विरोधक हे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते आणि त्यांनी विधेयक पराभूत केले. विरोधक आणि सत्ताधारी पक्ष या परिसीमन विधेयकावरून संघर्ष करत आहेत. त्यात विरोधक विधेयक पराभूत करण्यात यशस्वी झाले आहेत. पण महिला आरक्षण आणि परिसीमन हे एकमेकांशी निगडित आहेत आणि हे विरोकांच्या ध्यानी आलेले नाही. मोदी सरकारचा हा संसदेत पहिलाच पराभव आहे. महिलांना जेव्हा आपले खरे द्रोही कोण आहेत हे लक्षात येईल तेव्हा त्या काँग्रेसला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत. विरोधकांनी प्रगतीपेक्षा राजकारणाचा पर्याय निवडला आहे. त्याची शिक्षा त्यांना महिला मतदार देतीलच. पण या विधेयकाने काँग्रेस आणि पुरुषी मानसिकतेची शिकार असलेल्यांचे खरे कारनामे उघड झाले आहेत.

फीड फीडबर्नर 21 Apr 2026 2:10 pm

Operation Sindoor : “मर्यादा ओलांडू नका, भारत विसरत नाही”; पहलगाम हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्ताने भारतीय लष्कराचे सूचक ट्विट

- भारतीय लष्कराकडून ‘ऑपरेशन सिंदूर’ची आठवणमुंबई : जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ रोजी पाकिस्तानी दहशतवाद्यांनी २६ हिंदू पर्यटकांचे टार्गेट किलींग केले होते. या भ्याड हल्ल्याची उद्या म्हणजेच बुधवार २२ एप्रिल रोजी वर्षपूर्ती असून त्याच्या पूर्वसंध्येला भारतीय लष्कराने ट्विटरव (एक्स) पोस्ट करत “मर्यादा ओलांडू नका, भारत विसरत नाही” असे सांगत ‘ऑपरेशन सिंदूर’ची आठवण करवून दिली आहे.यासंदर्भातील पोस्टमध्ये भारतीय सेनेने नमूद केले की, “जेव्हा मानवतेच्या मर्यादा ओलांडल्या जातात, तेव्हा उत्तरही ठाम आणि निर्णायक असते. न्याय मिळाला आहे. भारत एकजूट आहे.” यासोबतच एका ग्राफिकमध्ये “काही मर्यादा कधीही ओलांडल्या जाऊ नयेत. भारत विसरत नाही,” असा संदेश देण्यात आला.https://prahaar.in/2026/04/21/pune-water-supply-administration-takes-this-important-decision-regarding-water-cuts-in-pune/पहलगाममधील हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानविरुद्ध कठोर कारवाई केली होती. भारतीय सेनेने पाकिस्तान तसेच पाकव्याप्त जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ले चढवले. या कारवाईदरम्यान ९ प्रमुख दहशतवादी लॉन्चपॅड उद्ध्वस्त करण्यात आले आणि लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद व हिज्बुल मुजाहिदीन यांच्या तळांना लक्ष्य करण्यात आले. या लष्करी कारवाईत १०० हून अधिक दहशतवादी ठार झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये ४ दिवस तणावपूर्ण संघर्ष सुरू राहिला. मोठे नुकसान सहन केल्यानंतर पाकिस्तानच्या डीजीएमओने भारताच्या डीजीएमओशी संपर्क साधत युद्धविरामाची विनंती केली. पाकिस्तानच्या विनवणीनंतर अखेर १० मे रोजी दोन्ही बाजूंमध्ये युद्धविरामावर सहमती झाली.When boundaries of humanity are crossed, the response is decisive.Justice is Served.India Stands United.#SindoorAnniversary #JusticeEndures #NationFirst pic.twitter.com/rtgYu9Hg11— ADG PI - INDIAN ARMY (@adgpi) April 21, 2026https://prahaar.in/2026/04/21/iran-us-conflict-will-jd-vance-visit-pakistan-uncertainty-persists-ahead-of-iran-us-talks/सेनाप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’चे कौतुक करत ते स्पष्ट राजकीय निर्देशांखाली तिन्ही सैन्यदलांमधील उत्कृष्ट समन्वयाचे उदाहरण असल्याचे म्हटले होते. तसेच, १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मिशन सुदर्शन चक्र’ची घोषणा केली होती. या मोहिमेचा उद्देश शत्रूच्या घुसखोरीला आळा घालणे आणि भारताच्या आक्रमक क्षमतांमध्ये वाढ करणे हा आहे.

फीड फीडबर्नर 21 Apr 2026 2:10 pm

युद्धज्वराचा हिंदोळा

आखाती युद्ध केवळ भूराजकीय संघर्ष नसून जागतिक अर्थव्यवस्थेच्या मुळावर घाव घालणारे संकट ठरते. तेलाच्या किमतींपासून रोजगारापर्यंत प्रत्येक स्तरावर त्याचे परिणाम दिसून येतात. अशा वेळी दीर्घकालीन उपाययोजना, पर्यायी ऊर्जा स्रोतांचा विकास, आर्थिक स्वावलंबन आणि स्थिर धोरणे यांची गरज अधिक तीव्रतेने जाणवते. अन्यथा, प्रत्येक जागतिक संघर्षासोबत अर्थव्यवस्थेची हीच घसरण पुन्हा पुन्हा अनुभवावी लागेल.आखाती प्रदेशातील युद्ध हे केवळ दोन-तीन देशांपुरते मर्यादित राहात नाही, तर त्याचे पडसाद संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर उमटतात. तेलसंपन्न आखाती देश जागतिक ऊर्जा पुरवठ्याचे केंद्र असल्यामुळे तेथील अस्थिरता ही थेट आर्थिक अस्थिरतेत रूपांतरित होते. अशा युद्धपरिस्थितीत सर्वप्रथम फटका बसतो तो कच्च्या तेलाच्या किमतींना. तेलाच्या किमती झपाट्याने वाढू लागल्या की वाहतूक, उत्पादन, वीजनिर्मिती अशा सर्वच क्षेत्रांवर परिणाम होतो आणि महागाईचा भडका उडतो. भारतासारख्या तेलआयात-निर्भर देशासाठी ही परिस्थिती अधिकच गंभीर ठरते. आयातीवरील खर्च वाढल्याने चालू खाते तुटीवर ताण आता येतो, रुपयाचे अवमूल्यन होते आणि सरकारसमोर आर्थिक संतुलन राखण्याचे मोठे आव्हान उभे राहते. पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढल्याने सर्वसामान्यांच्या खिशावर थेट परिणाम होतो, तर उद्योगक्षेत्रासाठी उत्पादनखर्च वाढतो. परिणामी, बाजारातील मागणी घटते आणि आर्थिक वाढीचा वेग मंदावतो. या पार्श्वभूमीवर कॉर्पोरेट कंपन्यांच्या नफ्यावर मोठा परिणाम दिसून येतो. उत्पादनखर्च वाढणे, कच्च्या मालाच्या पुरवठ्यात अडथळे निर्माण होणे आणि जागतिक मागणीत घट होणे या कारणांमुळे कंपन्यांच्या नफ्याचे प्रमाण कमी होते. अनेक कंपन्यांना खर्च कमी करण्यासाठी उपाययोजना कराव्या लागतात. त्यात नवीन प्रकल्पांना स्थगिती देणे, विस्तार योजनांना ब्रेक लावणे किंवा कर्मचाऱ्यांची कपात करणे यांचा समावेश असतो. अशा परिस्थितीत कॉर्पोरेट क्षेत्राची जोखीम घेण्याची क्षमता कमी होते आणि दीर्घकालीन गुंतवणुकीचे निर्णय पुढे ढकलले जातात. असे गंभीर परिणाम होत असल्याने परिस्थितीचा वेध घ्यायला हवा.युद्धामुळे निर्माण झालेली अनिश्चितता ही गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा अडथळा असते. देशांतर्गत तसेच परदेशी गुंतवणूकदार सुरक्षित पर्यायांकडे वळतात. शेअर बाजारात चढ-उतार वाढतात. भांडवली बाजारातील विश्वास कमी होतो आणि नवीन गुंतवणुकीचा ओघ मंदावतो. परकीय गुंतवणूक घटल्यास तंत्रज्ञान हस्तांतरण, रोजगारनिर्मिती आणि औद्योगिक वाढ यांवरही नकारात्मक परिणाम होतो. या सर्व प्रक्रियेचा फटका बसतो तो रोजगार क्षेत्राला. उद्योगांमध्ये उत्पादन कमी झाले, गुंतवणूक थांबली आणि नफा घटला की कंपन्या सर्वप्रथम मनुष्यबळावर गदा आणतात. नवीन भरती थांबते, कंत्राटी कर्मचाऱ्यांची कपात होते आणि काही वेळा कायमस्वरूपी नोकरकपातही केली जाते. सेवाक्षेत्रातही याचा परिणाम जाणवतो, कारण ग्राहकांचा खर्च कमी झाल्याने व्यवसायांवर ताण वाढतो. परिणामी मध्यमवर्गीय तसेच निम्नवर्गीय कुटुंबांची आर्थिक घडी विस्कटते. युद्धाचा परिणाम केवळ थेट आर्थिक आकड्यांपुरता मर्यादित राहत नाही, तर समाजाच्या मानसिकतेवरही परिणाम करतो. अनिश्चिततेमुळे लोक खर्च करण्यापेक्षा बचतीकडे वळतात. त्यामुळे बाजारातील मागणी आणखी घटते. हीच साखळी अर्थव्यवस्थेच्या मंदीला अधिक गती देते. जागतिक स्तरावर व्यापारमार्गांमध्ये अडथळे निर्माण झाल्यास निर्यात-आयात व्यवहारांवरही परिणाम होतो आणि जागतिकीकरणाच्या प्रक्रियेलाच धक्का बसतो. अशा परिस्थितीत सरकारसमोर मोठे आव्हान उभे राहते. महागाई नियंत्रणात ठेवणे, आर्थिक वाढ टिकवून ठेवणे आणि रोजगारनिर्मितीला चालना देणे या तिन्ही गोष्टी एकाच वेळी साध्य करणे कठीण होते.यातून वित्तीय तूट वाढण्याचा धोका निर्माण होतो, तर सामाजिक कल्याण योजनांवरील खर्च वाढवण्याची गरजही भासते. त्यामुळे आर्थिक धोरणे आखताना संतुलन साधणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. पश्चिम आशियातील इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल यांच्यातील भीषण संकटाच्या छाया आता भारतीय अर्थव्यवस्थेवर पडू लागल्या आहेत. या युद्धाचा फारसा परिणाम होणार नाही आणि आम्ही विशेष काळजी घेतली आहे, असे केंद्र सरकारतर्फे सांगण्यात येत असले, तरी इतर देशांप्रमाणे भारतावरही विपरीत परिणाम होणार आहे, हे स्पष्ट आहे. ‘मूडीज’ या जागतिक पतमानांकन संस्थेने २०२६-२७ साठी भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या, म्हणजेच जीडीपीच्या वाढीचा अंदाज ६.८ टक्क्यांवरून ६ टक्के इतका खाली आणला आहे. याचे कारण या युद्धामुळे होर्मुझ खाडीमधील वाहतूक अनेक देशांसाठी बंद झाली आणि अन्यत्रही क्षेपणास्त्र हल्ले सुरू असल्यामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली. भारताला लागणाऱ्या एकूण कच्च्या तेलापैकी ५५ आणि एलपीजीपैकी ९० टक्क्यांपेक्षा जास्त पुरवठा याच युद्धग्रस्त भागातून होतो. खतांच्या आयातीवर परिणाम झाल्यामुळे खाद्यपदार्थांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे २०२४-२५ मध्ये २.४ टक्के असलेली सरासरी महागाई आता ४.८ टक्क्यांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. यापूर्वी, म्हणजे १९७३ मध्ये तेल निर्यातदार राष्ट्रांनी अचानकपणे इंधनाचे दर वाढवल्यामुळे भारतावर महासंकट कोसळले होते. त्यावेळी याच्या परिणामी, तसेच सातत्याच्या दुष्काळामुळे भाववाढीचे संकट कोसळले होते.आजघडीला भारताची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा खूपच चांगली आहे. अन्नधान्याची टंचाई केव्हाच दूर झाली आहे. परंतु तरीही आताचा काळ जागतिकीकरणाचा असल्यामुळे पूर्वीपेक्षा आता युद्धजन्य स्थितीचे फटकेही जास्त बसण्याची शक्यता असते. याचे कारण परदेशांतून भारतात येणाऱ्या पैशांपैकी ४० टक्के वाटा हा आखाती देशातून येतो. त्याचप्रमाणे उदारीकरणानंतर जागतिक व्यापारातील भारताचा हिस्सा हळूहळू वाढत आहे आणि वेगवेगळ्या वस्तूंची व सेवांची निर्यात भारत करू लागला आहे. युद्धाच्या वणव्यामुळे अमेरिकेतील इंधनदराने सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. युद्धापूर्वी तीन डॉलर प्रति गॅलनच्या खाली असलेले पेट्रोल दर चार डॉलरच्या पार गेले. तर मालवाहतुकीसाठी कणा मानल्या जाणाऱ्या डिझेलच्या किमतीत युद्ध सुरू झाल्यापासून ४७ टक्क्यांची वाढ झाली आणि त्याचे दर ५.५०डॉलर प्रति गॅलनपर्यंत पोहोचले. युरिया आणि खतांच्या किमती वाढल्याने अमेरिकन शेतकऱ्यांवर सुमारे ५० हजार डॉलर्सचा अतिरिक्त बोजा पडला आहे. त्याचप्रमाणे कम्प्युटर चिप्स बनवण्यासाठी लागणाऱ्या हेलियम वायूचा ३५ टक्के पुरवठा कतारमधून होतो. हा पुरवठा थांबल्याने सिलिकॉन व्हॅलीतील टेक कंपन्यांवर मोठे संकट कोसळले आहे. रुग्णालयातील एमआरआय उपकरणासाठी हेलियम अनिवार्य असतो, ज्याची टंचाई आता दूर व्हायला हवी. होर्मुझची नाकेबंदी अधिक काळ सुरू राहिल्यास अमेरिकेमध्ये मंदी येणे अटळ आहे. अमेरिकेचा २०२६ मधील विकासदर २.६ टक्क्यांवरून थेट एक टक्क्यावर येण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. याचा अर्थ अमेरिका पुन्हा एकदा १९७०च्या दशकातील ‘स्टॅगफ्लेशन’सारख्या परिस्थितीत पोहोचू शकते. अशा परिस्थितीत विकासदर कमी आणि महागाई जास्त असते. शिवाय युद्ध थांबले तरी बंद झालेल्या तेलविहिरी पुन्हा सुरू होण्यासाठी अनेक महिने लागतात. तसेच युद्धात उद्ध्वस्त झालेल्या पायाभूत सुविधांच्या दुरुस्तीला काही वर्षे लागू शकतात. त्यामुळे इंधन दर पूर्वीच्या स्तरावर येथे येण्याची शक्यता कमीच आहे. अमेरिकेची स्थिती अशी राहिल्यास भारतासारख्या मोठी अर्थव्यवस्था असलेल्या देशांनाही चटके बसणार, हे स्पष्ट आहे. वास्तविक, यापूर्वी देशांतर्गत अर्थव्यवस्थेमध्ये पैशांचा ओघ वाढला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, सर्वसामान्य नागरिक असो वा मोठे उद्योग समूह, आपल्या गरजा आणि विस्तारासाठी बँकांकडे कर्ज मागणाऱ्यांचे प्रमाण वेगाने वाढत आहे. देशातील ९५ टक्के बाजारपेठ व्यापणाऱ्या ४१ प्रमुख बँकांकडून गोळा केलेल्या माहितीनुसार, उद्योगांना देण्यात येणाऱ्या कर्जामध्ये मोठी झेप पाहायला मिळाली आहे. गेल्या वर्षी उद्योगांची कर्जवृद्धी केवळ साडेसाते टक्के होती. ती आता वाढून १३.५ टक्के झाली आहे. पायाभूत सुविधा अभियांत्रिकी, रसायने, पेट्रोलियम आणि कापड उद्योगांतून कर्जाची सर्वाधिक मागणी दिसून आली आहे. या क्षेत्रात १६.१६ टक्के वाढ झाली असून, प्रामुख्याने एनबीएफसी आणि कमर्शियल रियल इस्टेट क्षेत्राकडून मोठी मागणी आली आहे. वैयक्तिक कर्ज विभागात १५ टक्क्यांची वाढ झाली आहे गृहकर्जामध्ये स्थिरता दिसत असली, तरी वाहनकर्ज आणि गोल्ड लोन घेणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे.अर्थात ही आकडेवारी युद्धापूर्वीची, फेब्रुवारी महिन्यातील आहे. त्यानंतरच्या परिस्थितीत जमीन-अस्मानाचा फरक पडला आहे. त्यामुळे बदलत्या स्थितीत कॉर्पोरेट क्षेत्राचे नफे १५ टक्क्यांनी तरी कमी होतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कंपन्यांचे नफे पावणेतीन लाख कोटी रुपयांनी, म्हणजेच जीडीपीच्या ०.८ टक्क्यांनी घटण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा अंदाज भारतीय स्टेट बँकेने व्यक्त केला आहे.

फीड फीडबर्नर 21 Apr 2026 2:10 pm

Sharad Pawar : शरद पवार पुन्हा रुग्णालयात; सुप्रिया सुळेंनी दिली प्रकृतीबाबत महत्वाची माहिती

Sharad Pawar : ज्येष्ठ नेते शरद पवार यांना प्रकृतीच्या कारणास्तव मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दैनिक प्रभात 21 Apr 2026 1:45 pm

Vidya Balan : “रितेशला मी अभिनेत्री म्हणून पसंत नसावी”; कार्यक्रमादरम्यान विद्या बालनने सांगितला किस्सा

Vidya Balan : चित्रपटात रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे.

दैनिक प्रभात 21 Apr 2026 1:42 pm

रॅपिडो ड्रायव्हरचा तरूणीला आक्षेपार्ह मेसेज, म्हणाला... तुझं वय काय ? एकटी राहतेस ? अन् पुढे धक्कादायक घडलं...

गेल्या काही वर्षात ऑनलाईन व्यवहार असो किंवा वस्तू ने-आण करण्याची पद्धत, सर्व काही बदलले आहे. यासोबतच प्रवासासाठी सुद्धा ऑनलाईन कॅब असेल किंवा बाईक टॅक्सी यांचा वापर देखील सर्रास वाढला आहे. पण हे सर्व होत असताना सुरक्षितरित्या सर्व गोष्टी होणे आवश्यक असते. आपला प्रवास कुठल्याही त्रासाशिवाय होणे हा हेतू डोळ्यसमोर ठेऊन आपण ऑनलाईन कॅब असेल, बाईक असेल टॅक्सी असेल हे बुक करतो मात्र या प्रवासात किंवा प्रवासानंतर प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. असाच रॅपिडो सेवेचा लाभ घेतलेल्या अनुष्का नावाच्या मुलीला याचा अनुभव आला आहे.नेमकं काय घडलं ?उत्तर प्रदेशातील गाझियाबदामध्ये (Uttarpradesh)अनुष्का नावाच्या मुलीसोबत एक विचित्र प्रकार घडला. अनुष्काने इन्स्टाग्रामवरील तिच्या अकाऊंटवरून हा भयावह अनुभव शेअर केला असून त्यामुळे हा मुद्दा चर्चेत आला आहे. तिच्या म्हणण्यानुसार, घटनेच्या रात्री तिची रॅपिडोची राईड पूर्ण झाल्यानंतरही त्या ड्रायव्हरने डायरेक्ट व्हॉट्सॲपवर मेसेज करत तिच्याशी संपर्क साधला. तिला तिच्या ड्रॉप पॉईंटवर सोडल्यावरही त्याने तिला मेसेज केला. ” ओळखलं नाहीस का? आत्ता तर ड्रॉप करून आलो” असं त्याने लिहीलं . त्यावर तरूणीने तू रॅपिडो रायडर आहेस का असा सवाल विचारल्यावर त्याने हो असं उत्तर दिलं. एवढंच नव्हे तर पुढे त्याने आणखीही मेसेज केला. “तू खूप क्युट दिसते. ट्रॅडिनशल कपड्यांत छान दिसत होतीस, तुझं वय काय ?” असे मेसेज त्या ड्रायव्हरने पुढे केले. ती एकटी राहते का असंही त्याने जाणून घेण्याचा प्रयत्न त्याने केला, असा दावा संबंधित तरूणीने केला आहे.

फीड फीडबर्नर 21 Apr 2026 1:31 pm

Share Market : सुरुवातीच्या व्यवहारात शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स-निफ्टीमध्ये वाढ

मुंबई : देशांतर्गत शेअर बाजारात आज (मंगळवार, २१ एप्रिल) सुरुवातीच्या व्यवहारात तेजीचा कल दिसून येत आहे. व्यवहारांची सुरुवात किंचित वाढीने झाली. बाजार उघडल्यानंतर लगेचच खरेदीदारांनी खरेदीचा सपाटा सुरू केला, ज्यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांमध्ये मोठी वाढ झाली. सकाळी १०:०० वाजेपर्यंत, सेन्सेक्स ०.६३ टक्क्यांनी आणि निफ्टी ०.५६ टक्क्यांनी वधारला होता.शेअर बाजारातील दिग्गज कंपन्यांमध्ये, नेस्ले इंडिया, ॲक्सिस बँक, एशियन पेंट्स, अदानी पोर्ट्स आणि टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स यांचे शेअर्स १.६८ टक्के ते ०.७२ टक्क्यांपर्यंतच्या वाढीसह व्यवहार करत होते. दुसरीकडे, एसबीआय लाइफ इन्शुरन्स, एचडीएफसी लाइफ, डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज, इन्फोसिस आणि जिओ फायनान्शिअल यांचे शेअर्स ३.१९ टक्के ते ०.५० टक्क्यांपर्यंतच्या घसरणीसह व्यवहार करत होते.आजच्या व्यवहारानुसार, शेअर बाजारात २,७१७ शेअर्समध्ये सक्रिय व्यवहार सुरू होते. यापैकी २,१६९ शेअर्समध्ये वाढ झाली, तर ५४८ शेअर्समध्ये घट झाली. त्याचप्रमाणे, सेन्सेक्समधील ३० पैकी २७ शेअर्स खरेदीच्या पाठिंब्यामुळे तेजीत राहिले. दुसरीकडे, विक्रीच्या दबावामुळे तीन शेअर्समध्ये घट झाली. निफ्टीमधील ५० पैकी ४२ शेअर्समध्ये वाढ झाली, तर आठ शेअर्समध्ये घट झाली.बीएसई सेन्सेक्स आज ९६.८६ अंकांच्या वाढीसह ७८,६१७.१६ अंकांवर उघडला. व्यवहार सुरू झाल्यानंतर लगेचच खरेदीदारांनी खरेदी सुरू केली, ज्यामुळे निर्देशांकाच्या हालचालीला चालना मिळाली. तथापि, नफावसुलीच्या उद्देशाने अधूनमधून विक्रीचे सत्रही सुरू होते. असे असूनही, निर्देशांकाच्या हालचालीवर लक्षणीय परिणाम झाला नाही. बाजारात सुरू असलेल्या खरेदी-विक्रीच्या पार्श्वभूमीवर, सकाळी १० वाजेपर्यंत सेन्सेक्स ४९२.२७ अंकांनी वाढून ७९,०१२.५७ अंकांवर व्यवहार करत होता.https://prahaar.in/2026/04/21/mumbai-local-update-central-railway-services-disrupted-for-the-second-consecutive-day-massive-crowds-at-diva-station/सेन्सेक्सप्रमाणेच, एनएसई निफ्टीनेही आज ९.७० अंकांच्या किंचित वाढीसह २४,३७४.५५ अंकांवर व्यवहाराला सुरुवात केली. बाजार उघडताच, निर्देशांक घसरून २४,३५४.९० अंकांवर पोहोचला. त्यानंतर, खरेदीदारांनी आपली खरेदी तीव्र करून निफ्टीच्या हालचालीला चालना दिली. खरेदीच्या पाठिंब्याने, निर्देशांक २४,५१२.३५ अंकांपर्यंत उसळी घेऊन पोहोचला. यानंतर, नफावसुलीच्या विक्रीमुळे त्याच्या हालचालीतही किंचित घट झाली. बाजारात सुरू असलेल्या खरेदी-विक्रीच्या पार्श्वभूमीवर, सकाळी १० वाजेपर्यंतच्या व्यवहारानंतर, निफ्टी १३६.३० अंकांच्या वाढीसह २४,५०१.१५ अंकांच्या पातळीवर व्यवहार करत होता.तत्पूर्वी, आदल्या दिवशी, सोमवारी, सेन्सेक्स २६.२७ अंकांच्या म्हणजेच ०.०३ टक्क्यांच्या वाढीसह ७८,५२०.३० अंकांच्या पातळीवर बंद झाला होता. तर निफ्टी सोमवारी ११.३० अंकांच्या म्हणजेच ०.०५ टक्क्यांच्या वाढीसह २४,३६४.८५ अंकांच्या पातळीवर बंद झाला होता.

फीड फीडबर्नर 21 Apr 2026 1:31 pm

Airtel Recharge: एअरटेलचा 84 दिवसांचा प्लान महाग; ग्राहकांना पुन्हा बसला झटका

Airtel Recharge नव्या 899 रुपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना पूर्वीसारखेच फायदे मिळणार आहेत. या प्लानमध्ये 84 दिवसांची वैधता मिळते. तसेच अनलिमिटेड लोकल, एसटीडी आणि नॅशनल रोमिंग कॉलिंगची सुविधा दिली जाते. याशिवाय दररोज 100 एसएमएसही मिळतात.

दैनिक प्रभात 21 Apr 2026 1:16 pm

Yusuf Pathan: माजी भारतीय क्रिकेटपटू युसूफ पठाणच्या सासऱ्यासह मेहुण्याला अटक; किरकोळ कारणावरुन मोठा राडा

Yusuf Pathan : भायखळा पोलिसांनी तात्काळ कारवाई करत खालिद खान, उमरशाद खान आणि शोएब खान यांना अटक केली.

दैनिक प्रभात 21 Apr 2026 1:05 pm

Hungary PM Peter Magyar : हंगेरीत सत्तापालट होताच इस्रायलशी संबंध ताणले; नव्या पंतप्रधानांकडून नेतन्याहूना अटकेची धमकी

Hungary PM Peter Magyar : ICC ने बेंजामिन नेतन्याहू आणि इस्रायलचे माजी संरक्षण मंत्री योव गॅलँट यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केले होते.

दैनिक प्रभात 21 Apr 2026 12:32 pm

Mumbai Local Update : दुसऱ्या दिवशीही मध्य रेल्वे विस्कळीत; दिवा स्थानकात प्रचंड गर्दी

ठाणे : मध्य रेल्वेमार्गावरील डोंबिवली रेल्वे स्थानक येथे सोमवारी लोकल ट्रेनचा डबा रुळावरून घसरून झालेल्या अपघाताचा परिणाम दुसऱ्या दिवशीही कायम असल्याचे दिसून आले. या घटनेमुळे मंगळवारी सकाळी ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली असून प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.विशेषतः दिवा रेल्वे स्थानक येथे सकाळपासूनच प्रवाशांची प्रचंड गर्दी उसळलेली पाहायला मिळाली. स्थानकाच्या दोन्ही फलाटांवर टोकापर्यंत खच्चून भरलेली गर्दी दिसून येत होती. महिला प्रवाशांची संख्याही लक्षणीय होती. या गर्दीचे छायाचित्रे सध्या सामाजिक माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर प्रसारित होत असून परिस्थितीची गंभीरता अधोरेखित करत आहेत.https://prahaar.in/2026/04/20/mumbai-local-empty-local-coach-derails-in-dombivli-train-schedule-disrupted/दरम्यान, सकाळपासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने जाणाऱ्या अप मार्गावरील लोकल ट्रेन सुमारे वीस ते पंचवीस मिनिटे उशिराने धावत असल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारी झालेल्या अपघातानंतर रेल्वे वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू असतानाच खर्डी स्थानकाजवळ रात्री आवश्यक दुरुस्ती कामांसाठी विशेष ब्लॉक घेण्यात आला होता. हा ब्लॉक पहाटे तीन वाजता संपून सेवा पूर्ववत होणे अपेक्षित होते, मात्र तो सकाळी सहा वाजेपर्यंत सुरू राहिल्यामुळे लोकल आणि एक्सप्रेस गाड्यांची वाहतूक ठप्प झाली.https://prahaar.in/2026/04/21/mumbai-against-drugs-mumbai-against-drugs-campaign-to-launch-in-mumbai-starting-may-1-2026-decision-reached-today-during-a-meeting-chaired-by-guardian-minister/या सर्व घडामोडींमुळे मंगळवारीही मध्य रेल्वेच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम झाला असून प्रवाशांना उशिरा धावणाऱ्या गाड्यांचा फटका बसत आहे. रेल्वे प्रशासनाने परिस्थिती लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले असले तरी सध्या तरी प्रवाशांना गर्दी आणि विलंबाचा सामना करावा लागत आहे.

फीड फीडबर्नर 21 Apr 2026 12:10 pm

Iran - America War : जेडी वॅन्स पाकिस्तानला जाणार का? इराण- अमेरिका चर्चेपूर्वी अनिश्चितता कायम

वॉशिंग्टन : अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव अत्यंत धोकादायक वळणावर पोहोचला असून, कूटनीती आणि संघर्ष यांच्या दरम्यान थेट युद्धाची शक्यता निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे. या तणावपूर्ण पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानमध्ये प्रस्तावित दुसऱ्या फेरीच्या चर्चेसाठी आपले विशेष दूत स्टीव विटकॉफ आणि जॅरेड कुशनर यांना इस्लामाबादला पाठवले आहे. मात्र, या चर्चेबाबतचे चित्र अद्याप पूर्णपणे स्पष्ट झालेले नाही. कारण या बैठकीत अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वॅन्स सहभागी होणार की नाही, याबाबत अजूनही संभ्रम कायम आहे.एका बाजूला ट्रम्प यांनी स्टीव विटकॉफ आणि जॅरेड कुशनर यांना इस्लामाबादला पाठवून निर्णायक लढाई आता चर्चेच्या टेबलावर लढली जाईल, असा स्पष्ट संदेश दिला आहे. तर दुसऱ्या बाजूला उपराष्ट्राध्यक्ष जेडी वॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यावरचे अनिश्चिततेचे सावट या चर्चेची गंभीरता आणि रणनीती यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे.https://prahaar.in/2026/04/20/iran-america-war-did-america-seize-an-iranian-cargo-ship/माहितीनुसार, उपराष्ट्राध्यक्ष जेडी वॅन्स अद्याप अमेरिकेतून रवाना झालेले नाहीत. वॅन्स सध्या अमेरिकेतच आहेत आणि त्यांच्या पाकिस्तान दौऱ्याबाबत कोणतीही स्पष्ट पुष्टी झालेली नाही. यावरून चर्चेची तयारी अद्याप पूर्णपणे अंतिम झालेली नसल्याचे संकेत मिळतात. काही माध्यमांच्या वृत्तानुसार, जेडी वॅन्स मंगळवारी पाकिस्तान दौऱ्यावर जाऊ शकतात. तेथे इराणशी संबंधित मुद्द्यांवर नव्या फेरीची चर्चा होण्याची शक्यता आहे. मात्र, इराणने अद्याप या चर्चेत सहभागी होण्याची अधिकृत पुष्टी केलेली नाही. त्यामुळे अनिश्चितता कायम आहे.दरम्यान चर्चेबाबत केवळ अमेरिकेकडूनच नव्हे, तर इराणकडूनही स्पष्टता नाही. इराणी अधिकाऱ्यांनी चर्चेत सहभागी होण्याचा विचार सुरू असल्याचे संकेत दिले आहेत, मात्र अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. यापूर्वी इराणने अमेरिकेवर गैरप्रामाणिकपणाचा आरोप करत चर्चेत अनुत्सुकता दाखवली होती.https://prahaar.in/2026/04/20/iran-america-war-irgcs-dominance-in-irans-decision-making-process-possibility-of-talks-with-america-low/दुसरीकडे पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे या संभाव्य चर्चांसाठी कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख असीम मुनीर हे संपूर्ण प्रक्रियेत मध्यस्थाची भूमिका बजावत आहेत. यापूर्वी ११ ते १२ एप्रिलदरम्यान दोन्ही बाजूंमध्ये सुमारे २१ तास चर्चा झाली होती, मात्र ती कोणताही निष्कर्ष निघाल्याशिवाय संपली होती. आता युद्धविरामाची मुदत जवळ येत असताना ही दुसरी फेरी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. एकूणच, जेडी वॅन्स यांच्या दौऱ्याबाबतचा संभ्रम आणि इराणची अनिश्चित भूमिका यामुळे ही चर्चा यशस्वी होईल की नाही, हे सांगणे कठीण आहे. येत्या काही दिवसांतच हे ठरणार आहे की हा कूटनीतिक प्रयत्न शांततेकडे नेईल की परिस्थिती आणखी गंभीर बनेल.

फीड फीडबर्नर 21 Apr 2026 12:10 pm

Swanandi Sardesai: स्वानंदी सरदेसाई झाली नवरी; पारंपरिक लूकने जिंकली चाहत्यांची मनं

Swanandi Sardesai स्वानंदीने १९ एप्रिल २०२६ रोजी अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर लग्न केलं. तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर नवऱ्यासोबतचा फोटो शेअर करत “श्री. व सौ.” अस कॅप्शन दिल आहे. या पोस्टमधून तिच्या लग्नाची माहिती समोर आली. स्वानंदीच्या पतीचं नाव विक्रांत रामदास असं आहे.

दैनिक प्रभात 21 Apr 2026 12:02 pm

Wagholi News : लोहगावमधील बांधकामांवर होणारी अन्यायकारक कारवाई थांबवा! कठोर कारवाईची नगरसेवकांची मागणी

Wagholi News : या विषयावर चर्चा करण्यासाठीप्रभाग क्रमांक १,२,३ चे नगरसेवक रामभाऊ दाभाडे अनिल सातव, ऐश्वर्या पठारे, श्रेयस खांदवे, तसेच सुरेंद्र पठारे, बॉबी टिंगरे उपस्थित होते.

दैनिक प्रभात 21 Apr 2026 11:56 am

Revenue department : महसूल विभागाचा बेमुदत संप; राज्यभर कामकाजावर मोठा परिणाम

Revenue department : या संपाचा सर्वाधिक फटका सर्वसामान्य नागरिकांना बसण्याची शक्यता आहे.

दैनिक प्रभात 21 Apr 2026 11:54 am

Dr. Gopalrao Patil : भाजपचे माजी खासदार काळाच्या पडद्याआड! लातूरमध्ये शोककळा

Dr. Gopalrao Patil : भाजपचे माजी खासदार डॉ. गोपाळराव विठ्ठलराव पाटील यांचे निधन झाले असून, लातूर जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.

दैनिक प्रभात 21 Apr 2026 11:34 am

Meghna Sakore-Bordikar : प्रभावी उपाययोजेनेमुळे, अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर १३ बालविवाह रोखण्यात विभागाला यश; मेघना साकोरे-बोर्डीकर

मुंबई : राज्यात अक्षय तृतीयेचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत असताना या शुभ मुहूर्तावर होणाऱ्या बालविवाहांना आळा घालण्यासाठी महिला व बालविकास विभागाने व्यापक आणि प्रभावी उपाययोजना राबविल्याने राज्यभरात १३ बालविवाह रोखण्यात यश आले याचे महिला व बालविकास राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी सांगितले.राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन मार्गदर्शनाने यंत्रणा सज्जअक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा मुहूर्त असल्याने या दिवशी सामूहिक विवाहांसोबत बालविवाहांचे प्रमाण वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन विभागाने आधीच सतर्कता बाळगली होती. यासाठी राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली महिला व बालविकास विभागाचे सचिव, आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक तसेच संबंधित अधिकारी यांच्या उपस्थितीत ऑनलाईन बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याच्या आणि बालविवाह रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या.राज्यात जनजागृतीचे व्यापक अभियानराज्यात जिल्हा, तालुका आणि ग्रामस्तरावर जनजागृतीचे व्यापक अभियान राबविण्यात आले. जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाईल्ड हेल्पलाईन १०९८, अंगणवाडी सेविका, ग्राम बाल संरक्षण समित्या आणि बालकल्याण क्षेत्रात कार्यरत संस्थांच्या माध्यमातून कीर्तन, भागवत, पथनाट्य, पदयात्रा, पोस्टर्स, स्टीकर्स आदी विविध उपक्रमांतून नागरिकांना बालविवाहाचे दुष्परिणाम पटवून देण्यात आले. तसेच, बालविवाह प्रतिबंधक शपथ घेण्याचे कार्यक्रम आयोजित करून प्रत्येक घरापर्यंत जनजागृती पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला.गुन्हा दाखल करण्याची तरतूद असल्याची माहितीमुलीचे वय १८ वर्षांपेक्षा कमी किंवा मुलाचे वय २१ वर्षांपेक्षा कमी असल्यास अशा विवाहांना आळा घालण्यासाठी मंगल कार्यालय मालक, वाजंत्री पथक, पुजारी तसेच संबंधित नातेवाईकांवर २४ तासांत गुन्हा दाखल करण्याची तरतूद असल्याची माहितीही नागरिकांना देण्यात आली.रायगड १, अहिल्यानगर ५, बुलढाणा १, यवतमाळ २, छत्रपती संभाजीनगर १,धाराशिव २, परभणी १ असे एकूण १३ बालविवाह रोखण्यात यश मिळाले.महिला व बालविकास विभागाच्या या प्रभावी आणि समन्वयित कारवाईया सर्व प्रयत्नांचा सकारात्मक परिणाम दिसून आला असून अक्षय तृतीयेच्या दिवशी राज्यातील विविध ठिकाणी होणारे १३ बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश मिळाले. यापैकी यवतमाळ जिल्ह्यात एका प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला व बालविकास विभागाच्या या प्रभावी आणि समन्वयित कारवाईमुळे बालविवाहासारख्या कुप्रथेविरुद्ध ठोस संदेश समाजात पोहोचला असून भविष्यातही अशा प्रकारच्या मोहिमा अधिक प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याचे राज्यमंत्री श्रीमती मेघना बोर्डीकर यांनी यावेळी सांगितले.

फीड फीडबर्नर 21 Apr 2026 11:30 am

Tea Side Effects: उन्हाळ्यात जास्त चहा पिताय? हे साइड इफेक्ट्स जाणून घेतले तर आजच कमी कराल!

Tea Side Effects चहामध्ये कॅफीन आणि टॅनिनसारखे घटक असतात. हे घटक मर्यादित प्रमाणात घेतले तर फारसा त्रास होत नाही, पण जास्त प्रमाणात घेतल्यास शरीरावर त्याचे दुष्परिणाम दिसू लागतात. विशेषतः रिकाम्या पोटी चहा पिणे किंवा दिवसभरात अनेक वेळा चहा घेणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.

दैनिक प्रभात 21 Apr 2026 11:12 am

BMC News : नारी शक्ती वंदन अधिनियम विधेयक नामंजूर, महापालिका सभागृहात तीव्र पडसाद

विरोधी पक्षांचा तीव्र शब्दांत केला निषेधमुंबई :महिलांना योग्य प्रमाणात सर्व विधी मंडळात, विधानसभा, लोकसभा या ठिकाणी प्रतिनिधीत्व मिळावे यासाठी नारी शक्ती वंदन अधिनियम या विधेयकाला बहुमताने नामंजूर करण्यात आल्याने याचा निषेध करण्यात आले. काँग्रेस आणि उबाठासह इतर विरोधी पक्षांचा समाचार घेत भाजपने तीव्र निषेध करत महिलांच्या सक्षमीकरणा प्रवाह आम्ही रोखू शकत नाही. आम्ही महिलांना न्याय दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशारा सभागृहात देण्यात आला.मुंबई महापालिका सभागृहात सभागृहनेते गणेश खणकर यांनी संसदेत नारी शक्ती वंदन अधिनियम या विधेयकाला बहुमताने नामंजूर करण्यात आल्याने तसेच तसेच विधेयकाला विविध कारणे पुढे कयन विरोध करणाऱ्या विरोधी पक्षांचा निषेधाचे निवेदन सभागृहात केले. यावर काँग्रसचे गटनेते अश्रफ आझमी यांनी विधेयक का नामंजूर करण्यात आले याची कारण देत पक्षाने महिलांना प्राधान्य दिले.म्हणून काँग्रेसचे नेतृत्व आले होते,असे सांगण्याचा प्रयत्न केला. यावर भाजपच्या राजेश्री शिरवडकर यांनी देश महासत्तेच्या दिशेने जात असल्याने हा विरोध असल्याचे सांगितले. तर विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी नारी वंदनीय आहे, नंदनीय करू नका असे सांगत हे आरक्षण आले तरी वरळीत आरक्षण झाले तर मलाच उमेदवारी मिळेल असाही विश्वास व्यक्त केला.राखी जाधव यांनी महिलेला संधी मिळाली तर ती नेतृत्व करते असे सांगितले, तर बेस्ट समिती अध्यक्षा तृष्णा विश्वासराव यांनी उबाठाला कांग्रेसच्या मांडीवर बसल्याचा आरोप केला. तर प्रिती सातम यांनी हे विधेयक नामंजूर झाल्यामुळे पुढील महिला शिक्षा भोगणार असल्याचे सांगत मुस्लिम महिलांची तलाकमधून सुटका देशाच्या पंतप्रधानांनी केली असे सांगत ज्या पक्षाला घराणेशाहीच्या गाद्या उबवायच्या आहेत, म्हणून त्यांनी विरेाध केल्याचे सांगितले. शीतल गंभीर यांनी २७ वर्षांपूर्वी जर काँग्रेसने यावर निर्णय घेतला असता तर आज ही चर्चा करावी लागली नसती,असे सांगितले.https://prahaar.in/2026/04/20/bmc-news-massive-enforcement-drive-in-the-bandra-to-santacruz-east-area-water-pipeline-encroachments-cleared-in-bandra/विशाखा राऊत यांनी उबाठाच्या महिला आघाडीचे स्वर्गीय सुषमा स्वराज यांनी कौतुक केल्याचे सांगितले. तर श्रध्दा जाधव यांनी महिला सक्षम असून हे विधेयक नामंजूर झाल्यामुळे पंतप्रधानांनी याची नैतिक जबाबदारी स्वीकारुन महिलेला पंतप्रधान करावे अशी सूचना केली. तर तेजस्वी घोसाळकर यांनी विधेयक मंजूर न होणे हा काळा दिवस असल्याचे सांगितले. तर स्वप्ना म्हात्रे यांनी महिलेसारखी ताकद कुणाकडेच नसल्याचे सांगितले.यावर महापौर रितू तावडे यांनी आपण महापौर किंवा पिठासीन अधिकारी म्हणून बोलत नसून एक महिला म्हणून बोलत असल्याचे सांगत हा राजकीय नैतिक दिवाळखोरीचा हा ठसठसीत पुरावा असल्याचे सांगितले. हीच का विरोधी पक्षाची महिला सक्षमीकरणाची व्याख्या का असा सवाल करत रितू तावडे यांनी विरोधकांना याची किंमत मोजावीच लागेल असा इशाराही दिला. हे विधेयक मंजूर झाले नसले तरी महिलांच्या सक्षमीकरणाचा प्रवाह रोखला जावू शकत नाही,असे सांगत त्यांनी तीव्र शब्दांत याचा निषेध केला.यावेळी चर्चत संध्या दोशी, विजय उबाळे,मेहेर हैदर,दिक्षा कारकर, विशाखा राऊत, तुलिफ मिरांडा, अंकित प्रभू, नवनाथ बन, मिनल तुर्डे, प्रकाश दरेकर,संगिता शर्मा, प्रमोद सावंत, राणी दि्वेदी, आशा मराठे, साईनाथ दुर्गे,हेतल गाला, सिध्दार्थ शर्मा, तेजिंदर तिवाना, विजेंद्र शिंदे, सचिन पडवळ आदींनी चर्चेत भाग घेतला होता.https://prahaar.in/2026/04/20/bmc-all-assistant-commissioners-must-prioritize-cleanliness-in-their-respective-zones-additional-commissioners-directive/

फीड फीडबर्नर 21 Apr 2026 11:10 am

BMC News : मुंबई महापालिकेच्या १५३ वर्षांत सभागृहाच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण

महापालिका अधिनियमांमध्ये तरतूद नाही तरीही सत्ताधारी पक्षाने उचलले पाऊलमुंबई : मुंबई महापालिकेच्या इतिहासात प्रथमच सभागृहाच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले आहे. महापालिकेचे सोमवारी पार पडलेले अर्थसंकल्पीय चर्चेचे यू ट्युब लाईव्ह करण्यात आले. अशाप्रकारे महापालिकेच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण करण्यात आल्याने नगरसेवकांसह त्यांच्या चाहत्यांमध्ये आनंद व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, हे थेट प्रक्षेपण करताना महापालिकेच्या अधिनियमांचे उल्लंघन झाले असून अधिनियमांमध्ये स्पष्ट तरतूद नसतानाही या सभागृहाचे कामकाज लाईव्ह करण्यात आल्याने सर्व माजी नगरसेवकांसह निवृत्त सचिवांकडूनही आश्चर्य व्यक्त केले जात आहे.https://prahaar.in/2026/04/20/bmc-all-assistant-commissioners-must-prioritize-cleanliness-in-their-respective-zones-additional-commissioners-directive/मुंबई महापालिका सभागृहात विरोधी पक्षनेते किशोरी पेडणेकर यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर महापालिका सभागृहाचे कामकाजाचे थेट प्रक्षेपण करण्याची मागणी झाली होती. त्यानंतर महापौर आणि सभागृहनेत्यांनी सभागृहाचे कामकाजाचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार सोमवारपासून महापालिकेच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले आहे.https://prahaar.in/2026/04/20/bmc-news-massive-enforcement-drive-in-the-bandra-to-santacruz-east-area-water-pipeline-encroachments-cleared-in-bandra/महापालिकेचे पहिले सभागृह ४ सप्टेंबर १८७३मध्ये भरले होते. त्यानंतर मागील १५ वर्षांपासून महापालिकेचे कामकाज लाईव्ह करण्यात यावे अशी मागणी सातत्याने नगरसेवकांकडून केले जात आहे. परंतु आजवर केवळ आणि केवळ अधिनियमांमध्ये तरतूद नसल्याची कारणे देत अशाप्रकारची सुविधा महापालिका सभागृहात देण्यास येत नव्हती.अशाप्रकारे सभागृहाचे कामकाज लाईव्ह करण्यासाठी धोरणात्मक निर्णय नसल्यामुळे मागील महिन्यात माजी महापौर व नगरसेविका श्रध्दा जाधव आणि नगरसेवक अंकित प्रभू यांनी सभागृहाचे कामकाज लाईव्ह करण्याची मागणी ठरावाच्या सूचनेद्वार केली. परंतु याबाबतचेही ठरावही सभागृहात मंजूर झालेले नाही. मात्र, महापालिकेच्या इतिहासात सभागृहाचे कामकाज लाईव्ह होताना ते नियमांचे उल्लंघन करून सुुरु करण्यात आल्याचे स्पष्ट दिसून आले आहे. महापौर आणि सभागृह नेत्यांनी केवळ प्रायोगिक तत्वावर सभागृहाचे कामकाज लाईव्ह करताना अधिनियमातील तरतुदींचा विचार केलेला दिसून येत नाही. त्यामुळे जोवर अधिनियमांमध्ये तरतूद होत नाही तोवर प्रायोगिक तत्वावरही याचे थेट प्रक्षेपण करता येत नाही. तरीही हा प्रकार घडल्यामुळे प्रत्यक्षात नियमांचे उल्लंघन झाल्याची चर्चा सर्वच स्तरावर सुरु आहे.

फीड फीडबर्नर 21 Apr 2026 11:10 am

Nitesh Rane : प्रशासकीय गतिमानतेत मंत्री नितेश राणेंच्या खात्याचा पहिला क्रमांक

मत्स्यव्यवसाय विभागाच्या उपक्रमांना राज्यस्तरीय ‘प्रगती’ पुरस्कार; ‘ड्रोन’ गस्त आणि कृत्रिम भित्तिका प्रकल्प ठरले अव्वलमुंबई : राज्याच्या सागरी क्षेत्रात ड्रोन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि कृत्रिम भित्तिकांच्या माध्यमातून मत्स्यसंपदेचे संवर्धन करणाऱ्या मत्स्यव्यवसाय विभागाच्या दोन महत्त्वाकांक्षी उपक्रमांनी राज्य सरकारचा मानाचा ‘राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान २०२५-२६’ पुरस्कार पटकावला आहे. मंत्रालयीन प्रशासकीय विभागांतून राबविण्यात आलेल्या ‘ड्रोन आधारित देखरेख’ यंत्रणेला प्रथम, तर क्षेत्रीय कार्यालयांच्या श्रेणीत ‘शाश्वत मत्स्यव्यवसाय विकास’ उपक्रमाला अव्वल स्थान मिळाले आहे.https://prahaar.in/2026/04/21/nitesh-rane-joint-coastal-management-makes-its-mark-in-the-state-through-the-pragati-campaign-minister-nitesh-rane-praises-the-initiative/राज्यातील किनारपट्टीवर होणारी अवैध मासेमारी आणि घुसखोरी रोखण्यासाठी मंत्री नितेश राणे यांच्या पुढाकाराने जानेवारी २०२५ पासून ड्रोन गस्त सुरू करण्यात आली होती. या प्रणालीमुळे अरबी समुद्रातील हालचालींवर नियंत्रण मिळवणे सुलभ झाले आहे. विशेषतः एलईडी दिव्यांचा वापर करून केली जाणारी बेकायदेशीर पर्ससीन मासेमारी आणि परराज्यातील हायस्पीड ट्रॉलर्सची घुसखोरी रोखण्यात या तंत्रज्ञानाने मोठी भूमिका बजावली आहे. या यशामुळे मत्स्यव्यवसाय विभागाची प्रशासकीय गतिमानता सिद्ध झाली असून, त्याला राज्यस्तरीय प्रथम पारितोषिकाने गौरविण्यात आले आहे.https://prahaar.in/2026/04/21/nitesh-rane-a-major-leap-in-marine-fisheries-management-under-the-pragati-initiative-minister-nitesh-rane-lauded-with-a-%e2%82%b910-lakh-award/‘शाश्वत मत्स्यव्यवसाय विकास व मत्स्यसंपदेचे संरक्षण’ या उपक्रमांतर्गत अरबी समुद्र किनारपट्टीवरील १८२ गावांमध्ये कृत्रिम भित्तिका उभारण्यात आल्या आहेत. या भित्तिकांमुळे माशांसाठी सुरक्षित प्रजनन अधिवास निर्माण झाला असून, ५० मीटरचे संरक्षण क्षेत्र विकसित झाले आहे. या उपक्रमाचा सकारात्मक परिणाम मत्स्योत्पादनावर झाला असून, उत्पादनात तब्बल २९ हजार किलोची वाढ नोंदवली गेली आहे.पारंपरिक मच्छीमारांच्या आर्थिक उत्पन्नात वाढया कृत्रिम भित्तिकांच्या देखभालीसाठी स्थानिक मच्छीमार सहकारी संस्थांना प्रत्येकी एक लाख रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देऊन त्यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. याशिवाय, समुद्रातील प्लास्टिक कचरा आणि ‘घोस्ट नेट’ संकलनावरही भर देण्यात आला आहे. यामुळे पारंपरिक मच्छीमारांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ झाली असून सागरी पर्यावरणाचे रक्षण झाले आहे.मत्स्यव्यवसाय विभागाने ड्रोन तंत्रज्ञान आणि डिजिटल डेटा मेंटनन्समध्ये केलेले काम कौतुकास्पद आहे. या यशामुळे मच्छीमार बांधवांची आर्थिक उन्नती आणि सागरी सुरक्षेला बळ मिळाले आहे. या यशाचे श्रेय विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी आणि मच्छीमार बांधवांचे आहे. - नितेश राणे, मंत्री, मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास

फीड फीडबर्नर 21 Apr 2026 11:10 am

Mumbai Against Drugs : मुंबईत ‘Mumbai Against Drugs’ मोहिमेची १ मे २०२६ पासून सुरुवात; मुंबई उपनगर सह पालकमंत्री खासदार लोढा यांच्या बैठकीत आज निर्णय 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षभर चालणाऱ्या या मोहिमेद्वारे जनजागृती आणि सामाजिक सहभाग वाढवण्याचा उद्देश – मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमीत साटमसरकार, स्वयंसेवी संस्था, शाळा आणि नागरिक मिळून अंमली पदार्थांविरुद्ध लढा उभारणार – आमदार अमीत साटमवाढत्या अतिसेवनाच्या मृत्यूंच्या पार्श्वभूमीवर मुंबईत व्यापक अंमली पदार्थविरोधी चळवळ – आमदार अमीत साटममुंबई: अंमली पदार्थांच्या व्यसनाविरुद्ध जनआंदोलन उभे करण्याच्या उद्देशाने “Mumbai Against Drugs” ही विशेष मोहीम १ मे २०२६ पासून मुंबईत एक वर्षासाठी राबविण्यात येणार असल्याची माहिती मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमीत साटम यांनी दिली.मुंबई उपनगर सह पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीस मुंबई भाजप अध्यक्ष आणि आमदार अमीत साटम उपस्थित होते. या मोहिमेचे नियोजन व आराखडा ठरविण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीस मुंबई उपनगर जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी, क्रीडा अधिकारी, महानगरपालिका अधिकारी तसेच विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.‘Mumbai Against Drugs’ ही मोहीम १ मे २०२६ पासून सुरू करण्यात येईल. ही मोहीम सलग १२ महिने (३६५ दिवस) चालणार आहे, असे आमदार अमीत साटम यांनी सांगितले.https://prahaar.in/2026/04/14/%e2%82%b930-crore-drugs-racket-busted-in-mumbai-md-factory-operating-in-a-room-rented-for-just-%e2%82%b913000/अंमली पदार्थांच्या अतिसेवनामुळे होत असलेल्या अलीकडील मृत्यू ही गंभीर इशारा देणारी बाब आहे की, केवळ पोलीस कारवाईने हा प्रश्न सुटणार नाही. या पार्श्वभूमीवर मा. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी यांच्या मार्गदर्शनाखाली समाजातील सर्व घटकांना एकत्र आणून व्यापक अंमली पदार्थविरोधी जनआंदोलन उभारण्यात येत आहे. या उपक्रमाद्वारे आपण प्रभावीपणे अंमली पदार्थांच्या विरोधात लढा उभारू शकतो, असे आमदार साटम यांनी पुढे सांगितले.https://prahaar.in/2026/04/14/goregaons-nesco-drugs-party-mastermind-of-the-nesco-drugs-party-in-goregaon-finally-in-police-custody/या मोहिमेत शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, स्वयंसेवी संस्था (NGOs), धार्मिक संस्था व प्रमुख उपासना स्थळे, रहिवासी संघटना (RWAs), विविध क्षेत्रातील मान्यवर (सेलिब्रिटी), पालक-शिक्षक संघटना (PTAs), विविध कॉर्पोरेट संस्था तसेच सर्व शासकीय कार्यालयांचा सहभाग राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.या मोहिमेचा मुख्य उद्देश विशेषतः तरुणांमध्ये अंमली पदार्थांविषयी जागृती निर्माण करणे हा आहे. महाविद्यालये, शाळा, शैक्षणिक संस्था आणि जिथे तरुणांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात आहे अशा ठिकाणी विविध उपक्रम राबविण्यात येतील. जनजागृती, समुदाय सहभाग आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग यावर भर देत अंमली पदार्थांच्या विरोधात प्रभावी लढा उभारण्यात येईल, असे आमदार अमीत साटम यांनी सांगितले.

फीड फीडबर्नर 21 Apr 2026 11:10 am

Sunetra Pawar : बारामतीत आज सांगता सभा; सुप्रिया सुळेंची उपस्थिती, शरद पवारांचं काय? सुनेत्रा पवार म्हणाल्या…

Sunetra Pawar : आज सुनेत्रा पवारांच्या प्रचारार्थ बारामतीत सांगता सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला शरद पवार उपस्थित राहणार का याविषयी सगळ्यानांच उत्सुकता आहे.

दैनिक प्रभात 21 Apr 2026 11:01 am

Strike: राज्यातील १७ लाख शासकीय कर्मचारी, शिक्षक बेमुदत संपावर; नेमक्या काय आहेत मागण्या?

Strike : राज्य सरकारने संप बेकायदेशीर ठरवत संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला आहे.

दैनिक प्रभात 21 Apr 2026 10:43 am

Gut Health: तुमचं पोट खरंच हेल्दी आहे का? हे टेस्ट सांगतील आतड्यांची खरी स्थिती

Gut Health आपल्या आतड्यांमध्ये लाखो-कोट्यवधी “गुड” आणि “बॅड” बॅक्टेरिया असतात. हे बॅक्टेरिया अन्न पचवण्यास, शरीराला आवश्यक पोषक घटक शोषून घेण्यास, रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यास आणि हार्मोन्स संतुलित ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे गट हेल्थ व्यवस्थित असेल तर शरीरात ऊर्जा टिकून राहते आणि अनेक आजारांपासून बचाव होतो.

दैनिक प्रभात 21 Apr 2026 10:17 am

Aneet Padda: आजोबांच्या आठवणींनी भावूक झाली अनीत पड्डा; पोस्ट वाचून चाहत्यांचे डोळे पाणावले

Aneet Padda पोस्टच्या शेवटी तिने अतिशय भावूक शब्द लिहिले, “आज मी आकाशात सर्वात तेजस्वी तारा पाहिला आणि मला समजलं की तुम्ही तिथे आहात. आजोबा, मी तुम्हाला कायम प्रेम करत राहीन.” या ओळींनी अनेक चाहत्यांना भावूक केले आहे.

दैनिक प्रभात 21 Apr 2026 9:36 am

TOP 10 News : सरकारी कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर ते तिलकचे शतक अन् गुजरातचं ‘पॅक-अप’; जाणून घ्या आजच्या TOP 10 News

TOP 10 News : राज्य, देश, विदेश, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोड... !

दैनिक प्रभात 21 Apr 2026 9:21 am

Weather Update : मुंबईत पाऊस परतणार; काही तासांत मुंबईसह या तीन शहरात पावसाचा इशारा; सतर्कतेचा इशारा जारी

मुंबई : महाराष्ट्र अनेक पावसाच्या सारी कोसळत आहेत, कुठे गारपीठ तर कुठे सोसाट्याचा वारा आणि वीज, शिवाय भारतीय हवामान विभागाने आणि महाराष्ट्र हवामान विभागाने जाहीर केलेल्या अंदाजानुसार २० ते २४ एप्रिल या याकाळात मुंबईसह इतर शहरात वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. तसेच काही ठिकाणी मेघगर्जना आणि वीजा पडण्याच्या शक्यता वर्तवण्यात आली आहे.या शहरात पावसाची हजेरीहवामान विभागाच्या अंदाजानुसार मुंबईला मंत्रालयाकडूनही सतर्कतेचा इशारा हा देण्यात आला आहे. पुढील ३ तासांत मुंबईसह, मुंबई उपनगर, रायगड, ठाणे या शहरात पावसाची शक्यता आहे.बदलापूरमध्ये पावसाची हजेरीआज सकाळच्या सुमारास बदलापूरमध्ये पावसाने हजेरी लावली. अचानक आलेय पावसाने चाकरमान्यांची धांदल उडाली. दोन दिवसापासून बदलापूर आणि ग्रामीण भागात पारा ४० अंशापर्यंत गेला आणि आज पावसाने हजेरी लावली.नागरिकांची तारांबळवातावरणात होणाऱ्या हा बदलामुळे कडक उन्हाळ्यात नागरिकांना काही काळ थंडावा मिळणार असून ऐन उन्हाळ्यात पडणाऱ्या या पावसामुळे नागरिकांनी तारांबळ उडणार आहे हे निश्चित त्यामुळे नागरिकांनी स्वतःची काळजी घेत सुरक्षित ठिकाणी राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.पुढील ४ दिवस या भागात जोरदार पावसाची शक्यताभारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार २० ते २४ एप्रिल दरम्यान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या कालावधीत विशेषतः मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, आणि कोकण विभागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे.प्रशासनाच्या उपाययोजनाग्रामपंचायत, पोलीस आणि आरोग्य विभागांनी तातडीने जनजागृती करावीरुग्णवाहिका, अग्निशमन दल, आणि आपत्कालीन पथके सज्ज ठेवावीतशाळा, सभागृह व सार्वजनिक इमारती सुरक्षित निवाऱ्यासाठी खुल्या ठेवाव्यातहवामान खात्याचे अद्ययावत इशारे गावतळीपर्यंत त्वरित पोहोचवावे

फीड फीडबर्नर 21 Apr 2026 9:10 am

Weather update : पुन्हा अवकाळीचे संकट! पुढील चार दिवस महत्वाचे; या जिल्ह्यांना अलर्ट जारी

Weather update : पुढील पाच दिवस हवामान विभागाने विविध जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला असून, गारपीटसह जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.

दैनिक प्रभात 21 Apr 2026 8:33 am

Bollywood Movies : ‘आखरी सवाल’चा पोस्टर रिलीज: संजय दत्त यांचा इंटेन्स अवतार ठरतोय चर्चेचा विषय

मुंबई : निर्माते निखिल नंदा आणि संजय दत्त यांच्या निखिल नंदा मोशन पिक्चर्स बॅनरखाली बनलेला ‘आखरी सवाल’ हा चित्रपट दमदार स्टारकास्टसह सज्ज आहे. यात संजय दत्त, अमित साध, नमाशी चक्रवर्ती, समिरा रेड्डी, त्रिधा चौधरी आणि नीतू चंद्रा यांची प्रमुख भूमिका आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक अभिजीत मोहन वरांग यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.संजय दत्त मुख्य भूमिकेत असलेला ‘आखरी सवाल’ हा 2026 मधील सर्वात बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक म्हणून समोर येत आहे. चित्रपटाच्या घोषणेनंतरपासूनच याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे आणि नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टीझरने या उत्साहात आणखी भर घातली आहे. टीझरमधून मिळालेली झलक ही प्रभावी आणि विचार करायला लावणारी असून, हा चित्रपट खऱ्या घटनांवर आधारित असल्याचे संकेत मिळतात. तो काही अत्यंत चर्चित आणि वादग्रस्त विषयांना स्पर्श करतो.https://prahaar.in/2026/04/19/sachin-pilgaonkar-and-madhurani-gokhale-reunite-after-22-years-in-the-film-kapuskonda/आता चित्रपटाच्या बहुप्रतीक्षित रिलीजपूर्वी निर्मात्यांनी एक प्रभावी नवीन पोस्टर प्रदर्शित केले आहे. या पोस्टरमध्ये संजय दत्त पुढच्या बाजूला बसलेले दिसतात, त्यांच्या मागे लोकांनी भरलेली एक खोली आहे, ज्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वात अधिकार आणि रहस्य जाणवते. विशेष म्हणजे त्यांच्या समोर “RSS – An Antinational Organisation” नावाचे पुस्तक दिसते, जे चित्रपटाच्या धाडसी कथानकाचा आणि त्यांच्या गुंतागुंतीच्या, प्रभावी भूमिकेचा संकेत देते. हे दृश्य चित्रपटाच्या गंभीर आणि थरारक वातावरणाची झलक देत असून, विविध स्तरांवर उलगडणारी आणि वादग्रस्त विषयांवर भाष्य करणारी कथा दर्शवते.पोस्टर शेअर करताना निर्मात्यांनी लिहिले,https://www.instagram.com/p/DXV6839jBWW/?igsh=MWE1dGw3Y3R2ZmszbQ==नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टीझरमधून असेही सूचित होते की चित्रपट भारताच्या इतिहासातील काही महत्त्वाच्या घटनांवर आधारित असेल, जसे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर घातलेला बंदी आदेश, बाबरी मशीद पाडण्याची घटना आणि महात्मा गांधी यांच्या हत्येचा प्रसंग. हा चित्रपट जगातील सर्वात मोठ्या स्वयंसेवी संघटनांपैकी एकाच्या प्रवासावर प्रकाश टाकत, त्याचा एक वेगळा दृष्टिकोन सादर करतो. विचार करायला लावणारे प्रश्न उपस्थित करत, हा चित्रपट प्रेक्षकांना वेगवेगळ्या दृष्टिकोनातून सत्याच्या अधिक जवळ नेण्याचा प्रयत्न करतो.https://prahaar.in/2026/04/19/ranveer-and-deepika-ranveer-and-deepika-to-become-parents-for-the-second-time-check-out-the-photo-sharing-the-good-news/‘आखरी सवाल’ या चित्रपटाचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक अभिजीत मोहन वरांग यांनी केले आहे. निखिल नंदा प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती निखिल नंदा आणि संजय दत्त यांनी केली असून, सहनिर्माते म्हणून पुनीत नंदा, डॉ. दीपक सिंग, गौरव दुबे आणि उज्ज्वल आनंद यांचा सहभाग आहे. उत्कर्ष नैठाणी यांनी या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद लिहिले आहेत. हा चित्रपट 8 मे 2026 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

फीड फीडबर्नर 21 Apr 2026 8:30 am

Vijay Deverakonda And Shouryuv: नानीकडून पहिला क्लॅप; विजय देवरकोंडाच्या नव्या चित्रपटाची दमदार सुरुवात

Vijay Deverakonda And Shouryuv हा चित्रपट ‘हाय नन्ना’ फेम दिग्दर्शक शौर्युव यांचा दुसरा चित्रपट आहे. त्यामुळे त्यांच्या या नव्या प्रोजेक्टकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा खूपच वाढल्या आहेत. मुहूर्ताच्या वेळी नानी आणि विजय देवरकोंडा एकमेकांना भेटले आणि त्यांनी एकमेकांना मिठी मारत आनंद व्यक्त केला. हा क्षण चाहत्यांसाठी खास ठरला.

दैनिक प्रभात 21 Apr 2026 8:21 am

Nitesh Rane : “प्रगती” अभियानात सागरी मत्स्यव्यवस्थापनाची झेप; १० लाखांच्या पारितोषिकाने मंत्री नितेश राणेंचे कौतुक!

राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानातील राज्यस्तरीय निकाल जाहीर.मुंबई : राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा २०२५-२६ अंतर्गत राज्यातील विविध विभाग, महानगरपालिका, जिल्हा परिषद तसेच शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सादर केलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांना राज्य शासनाने गौरविले आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयाद्वारे राज्यस्तरीय पारितोषिक विजेत्यांची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. राज्यस्तरावर थेट प्राप्त प्रस्तावांमध्ये संयुक्त सागरी मत्स्यव्यवस्थापन या शाश्वत मत्स्यव्यवसाय प्रकल्पाला १० लाखांचे पारितोषिक मिळाले. याबद्दल राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांचे कौतुक होत आहे.या स्पर्धेत मंत्रालयीन विभागापासून ते स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंत विविध स्तरांवरून आलेल्या प्रस्तावांचे मूल्यमापन करून उत्कृष्ट उपक्रमांची निवड करण्यात आली. ड्रोन आधारित देखरेख व डिजिटल डेटा मेंटेनन्स प्रणाली या उपक्रमाला प्रथम क्रमांक मिळत सुमारे १० लाखापर्यंत पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत. तर कार्यालयीन कामकाजातील सुधारणा उपक्रमालाही उच्च स्थान मिळाले आहे.https://prahaar.in/2026/04/21/nitesh-rane-joint-coastal-management-makes-its-mark-in-the-state-through-the-pragati-campaign-minister-nitesh-rane-praises-the-initiative/राज्यस्तरावर थेट प्राप्त प्रस्तावांमध्ये संयुक्त सागरी मत्स्यव्यवस्थापन या शाश्वत मत्स्यव्यवसाय प्रकल्पाला १० लाखांचे पारितोषिक मिळाले. तसेच झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या तंत्रज्ञानाधारित संवाद उपक्रमालाही सन्मानित करण्यात आले.

फीड फीडबर्नर 21 Apr 2026 8:10 am

Bachu Kadu : विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट! शिंदेंकडून दिग्गज नेत्याला उमेदवारीची अॅाफर? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Bachu Kadu : शेतकरी नेते आणि प्रहारचे सर्वेसर्वा बच्चू कडू यांना शिवसेना शिंदे गटाकडून विधानपरिषदेची अॅाफर मिळाल्याची चर्चा आहे.

दैनिक प्रभात 21 Apr 2026 8:00 am

आजचे एक्सप्लेनर:इराणचा चर्चेला नकार, तरीही 17 तास उड्डाण करून इस्लामाबादला का जात आहेत व्हेन्स? काय आहे ट्रम्प यांचे पुढचे पाऊल?

अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हेन्स आणि त्यांची टीम 17 तासांच्या उड्डाणानंतर आणि सुमारे 11,500 किलोमीटरच्या प्रवासानंतर इस्लामाबादला पोहोचत आहेत. मात्र, इराण शांतता चर्चेच्या दुसऱ्या फेरीत भाग घेण्यास नकार देत आहे. अमेरिकेने होर्मुझच्या सामुद्रधुनीवर नाकेबंदी केली आहे आणि इराणी जहाज तुस्काला जप्त केले आहे, त्यामुळे इराण संतप्त झाला आहे. इराण खरंच पाकिस्तानात चर्चेसाठी जाणार नाही का, अमेरिका-इराण करार कुठे अडकला आहे आणि या युद्धात पुढे काय होईल? आजच्या एक्सप्लेनरमध्ये जाणून घेऊया... प्रश्न-1 : पाकिस्तानात दुसऱ्या टप्प्यातील शांतता चर्चेसाठी कोण कोण पोहोचत आहे?उत्तर : अमेरिकेचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ आणि ट्रम्प यांचे जावई जेरेड कुशनर सोमवारी संध्याकाळी शांतता चर्चेसाठी इस्लामाबादला पोहोचणार आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वी सांगितले होते की, उपाध्यक्ष जे.डी. व्हेन्स सुरक्षा चिंतेमुळे पाकिस्तानला जाणार नाहीत. मात्र, व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी नंतर पुष्टी केली की व्हेन्स यात सहभागी होतील. अल जझीराने सूत्रांच्या हवाल्याने वृत्त दिले आहे की, वाटाघाटींबाबतच्या अनिश्चिततेमुळे विटकॉफ आणि कुशनर आधी इस्लामाबादला पोहोचतील. जर वाटाघाटी पुढे सरकल्या, तर व्हेन्स देखील नंतर पाकिस्तानला जातील. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी यापूर्वी सांगितले होते की, जर कोणताही करार निश्चित झाला, तर ते स्वतः पाकिस्तानला जातील, परंतु त्यांच्या आगमनाची अद्याप पुष्टी झालेली नाही. अमेरिकन शिष्टमंडळाच्या आगमनापूर्वी इस्लामाबादला पोहोचण्याची अपेक्षा असलेले एक अग्रीम पथक रविवारी दोन C-17 मालवाहू विमानांनी इस्लामाबादला पोहोचले होते, ज्यात अमेरिकन शिष्टमंडळाचे सुरक्षा उपकरणे आणि ताफ्याची वाहने होती. दुसरीकडे, इराणने अद्याप इस्लामाबाद भेटीची पुष्टी केलेली नाही. सरकारी माध्यम IRNA नुसार, इराणने वाटाघाटींमध्ये भाग घेण्यास नकार दिला आहे. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बागाई यांनी सांगितले की, शांतता चर्चेत जायचे की नाही याबद्दल आम्ही अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. वाटाघाटींमध्ये जाण्याची आमची कोणतीही योजना नाही. प्रश्न-2 : खरंच इराण चर्चेत सहभागी होणार नाही का?उत्तर : 15 एप्रिल रोजी, पाकिस्तानी फील्ड मार्शल असीम मुनीर यांनी तेहरानला भेट दिली होती. त्यांच्या तीन दिवसांच्या भेटीदरम्यान, त्यांनी इराणच्या सर्वोच्च नेतृत्वासोबत भेट घेतली होती. पहिल्या फेरीची चर्चा निष्फळ ठरल्यानंतर पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियन यांच्याशी 45 मिनिटे चर्चा केली होती. असे मानले जात होते की इराण अमेरिकेसोबतच्या कराराबाबत सकारात्मक होता. मात्र, इराणचे सरकारी माध्यम IRNA आता म्हणते की इराणी शिष्टमंडळ चर्चेसाठी इस्लामाबादला जाणार नाही. वाटाघाटींच्या आसपासच्या संकटात, ट्रम्प आणि असीम मुनीर यांनी फोनवर बोलणे केले. पाकिस्तानी सुरक्षा सूत्रांनुसार, असीम मुनीर यांनी ट्रम्प यांना सांगितले होते की, जर होर्मुझच्या सामुद्रधुनीवरील नाकेबंदी सुरू राहिली, तर इराणसोबतच्या वाटाघाटी पुढे सरकणार नाहीत. ट्रम्प यांनी उत्तर दिले की ते यावर विचार करतील. सध्या पाकिस्तानात वाटाघाटींसाठी इस्लामाबादमधील दोन 5-स्टार हॉटेल्स रिकामी करण्यात आली आहेत. त्यांच्याकडे जाणारे रस्ते सील करण्यात आले आहेत. सरकारी कार्यालये आणि दूतावासांवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. इराणची राजधानी तेहरानहून अडीच तासांत इस्लामाबादला पोहोचता येते. त्यामुळे, अमेरिकेच्या शिष्टमंडळाच्या आगमनानंतरही इराणची भूमिका बदलू शकते. अल जझीराने सूत्रांच्या हवाल्याने असेही वृत्त दिले आहे की, इराणी शिष्टमंडळ मंगळवारी सकाळपर्यंत इस्लामाबादला पोहोचेल. यामध्ये स्पीकर मोहम्मद बाघर गालिबाफ आणि परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांचा समावेश असण्याची शक्यता आहे. तेहरानमधील आंतरराष्ट्रीय संबंधांचे तज्ज्ञ सय्यद मोजतबा जलालझादेह यांच्या मते, इराण देशांतर्गत कठोर भूमिका घेत आहे. परंतु, चर्चेसाठी आपले पथक पाठवून ते हे देखील दाखवून देईल की इराण राजनैतिक कारवाईपासून मागे हटले नाही. प्रश्न-3 : अमेरिका-इराणच्या करारात अडचण कुठे आहे?उत्तर : अमेरिका आणि इराण यांच्यातील करारात 3 मुद्द्यांवर अडचण आहे... अमेरिकेला इराणचा अणुकार्यक्रम 20 वर्षांसाठी बंद करायचा आहे इराणला होर्मुझच्या सामुद्रधुनीतून अमेरिकेला हटवायचे आहे इस्रायलने लेबनॉनवरील हल्ले थांबवावेत प्रश्न-4 : चर्चेपूर्वी इराणी जहाजावर हल्ला करून अमेरिकेने चूक केली का? उत्तर : रविवारी रात्री सुमारे 2:30 वाजता यूएस सेंट्रल कमांड (CENTCOM) ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट केले की यूएस नेव्हीने ओमानच्या आखातात इराणी ध्वज असलेल्या मालवाहू जहाजाला ताब्यात घेतले आहे... या घटनेनंतर ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर लिहिले की, इराणी जहाज टूस्का पूर्ण नियंत्रणात आहे आणि त्यातील मालाची तपासणी केली जात आहे. ट्रम्प यांनी असेही म्हटले की, यूएस ट्रेझरी डिपार्टमेंटने त्याच्या बेकायदेशीर कारवायांमुळे टूस्कावर आधीच अनेक निर्बंध लादले आहेत. दरम्यान, इराणच्या हजरत खातम अल-अंबिया लष्करी मुख्यालयाने एक निवेदन जारी करून म्हटले की, अमेरिकेने युद्धविरामाचे उल्लंघन केले आहे. ही चाचेगिरी आहे आणि इराण लवकरच प्रत्युत्तर देईल. किंग्स कॉलेज लंडनचे प्राध्यापक अँड्रेस क्रिग सांगतात की, शांतता चर्चेपूर्वी इराणी जहाजावर हल्ला करून अमेरिकेने IRGC ला असा दावा करण्याची संधी दिली आहे की, अमेरिकेवर विश्वास ठेवता येत नाही. मिडल ईस्ट इन्स्टिट्यूटमधील इराणी कार्यक्रमाचे संचालक ॲलेक्स वाटांका म्हणतात की, जहाजावरील गोळीबारामुळे इराणमधील त्या संघटनेला प्रोत्साहन मिळाले आहे, जी इराणने 90% पर्यंत युरेनियम समृद्ध करावे आणि अणुबॉम्ब बनवण्याच्या दिशेने पुढे जावे अशी इच्छा बाळगते. प्रश्न-5 : 22 एप्रिलला युद्धविराम संपेल, त्यानंतर युद्धात काय परिस्थिती निर्माण होत आहे?उत्तर : इराण आणि अमेरिका यांच्यातील दोन आठवड्यांचा तात्पुरता युद्धविराम 22 एप्रिल रोजी संपेल. अमेरिकेने इराणी जहाज जप्त केल्याने आणि शांतता चर्चेत भाग घेण्यास नकार दिल्याने पुढील परिस्थिती गुंतागुंतीची झाली आहे. आता तीन युद्धाचे 3 सिनेरिओ उदयास येत असल्याचे दिसते... सिनेरिओ-1 : युद्धविराम कायम राहील सिनेरिओ-2 : मर्यादित लष्करी कारवाई सिनेरिओ-3 : पूर्ण युद्धाची पुनरावृत्ती

दिव्यमराठी भास्कर 21 Apr 2026 7:25 am

जन्मावेळी बाळाला, मृत्यूवेळी मृतदेहाला पाजतात दारू:कोया लोकांमध्ये सख्ख्या आत्याच्या मुलीशीच लग्न; नियम मोडल्यास जिवंतपणी पिंडदान

रात्री 8 वाजताची वेळ. गावातील एक घर रंगीबेरंगी बल्ब आणि हॅलोजन दिव्यांनी उजळून निघाले आहे. ढोल वाजत आहेत. अंगणात महिला एका रांगेत जमिनीवर बसल्या आहेत. सर्वांसमोर पानांपासून बनवलेले द्रोण ठेवले आहेत. येथे कोणताही पुरुष नाही. डोक्यावर माठ घेऊन एक महिला येते. या माठात दारू आहे. ज्याला ‘लंदा’ आणि ‘इड्डिकुल’ म्हणतात. लंदा शिळ्या भातापासून आणि इड्डिकुल महुव्यापासून बनवली जाते. महिला डोक्यावरून माठ खाली ठेवते आणि द्रोणात सर्व महिलांना दारू वाढते. दुसरी महिला सर्वांच्या द्रोणात भाजलेली सोयाबीन वाढते. गाणी गात येथे वृद्ध-तरुण, सर्व वयोगटातील महिला दारू पीत आहेत. येथे महिला पाहुण्या आहेत आणि यजमानही. दिव्य मराठीच्या ‘आम्ही लोक’ या मालिकेत मी मनीषा भल्ला यावेळी कोया समुदायाची कथा घेऊन आले आहे. ओडिशा, आंध्र प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये त्यांची एकूण लोकसंख्या 9 लाख आहे. यापैकी दीड लाख ओडिशाच्या मलकानगिरीमध्ये स्थायिक झाले आहेत… वर मी ज्या मेजवानीचा उल्लेख केला आहे, ती एका लग्नाची आहे. चमकदार पिवळी साडी, ओठांवर हलकी गुलाबी लिपस्टिक, गळ्यात चांदीच्या नाण्यांची माळ घातलेल्या वधूची पाऊले हळूहळू पुढे पडत आहेत. दुसरीकडे, पांढऱ्या पोशाखातील वर तिची वाट पाहत आहे. तेव्हा पुरोहित पुढे येऊन दोघांना जवळजवळ उभे करतो. वराच्या मनगटावर गवताची एक गाठ बांधतो. मंत्र म्हणतो, मग वधूचा हात वराच्या हातात देतो. तेव्हा तिथे उपस्थित महिला वधूच्या स्वागतासाठी कोया गाणी गाऊ लागतात. हे लग्न ओडिशातील नक्षलग्रस्त जिल्हा मलकानगिरीपासून सुमारे 35 किलोमीटर दूर असलेल्या राखेलगुडा गावात होत आहे. येथील आदिवासी नेते अडमा राखा यांचा मुलगा निरंजन आणि नवीन सून बासंती यांच्या लग्नाचा उत्सव साजरा केला जात आहे. लग्न होताच महिला पुन्हा दारू पिऊ लागतात. थोड्या वेळाने त्या एकमेकींच्या कमरेत हात घालून नाचायला सुरुवात करतात. सुमारे 15 मिनिटांनंतर त्या थकून बसतात. यानंतर, पुरोहित नवरदेव-नवरीला बेडरूममध्ये सोडून येतात आणि बाहेरून दरवाजाला कडी लावतात. बाहेर बसलेल्या महिला पुन्हा गाणी गाऊ लागतात. आत्याच्या मुलीशी लग्न न केल्यास शिक्षा मिळते याच दरम्यान, अडमा राखा येतात, ज्यांच्या मुलाचे लग्न आहे. मी त्यांना म्हणालो- ‘वधू खूप सुंदर आहे.’ ते म्हणू लागले की माझी सून बासंती तर घरचीच मुलगी आहे. जवळजवळ संपूर्ण बालपण आमच्यासमोर गेले आहे. मी आश्चर्यचकित होऊन विचारले- ‘घरची मुलगी म्हणजे काय?’ ते म्हणाले- ‘माझ्या मुलगा निरंजनचे लग्न, माझ्या बहिणीच्या मुलीशी म्हणजे त्याच्या सख्ख्या आत्याच्या मुलीशी झाले आहे. हीच आमची प्रथा आहे.’ सख्ख्या आत्याची मुलगी नसेल तर? ‘तर वडिलांच्या दूरच्या बहिणीच्या मुलीशीही लग्न होते.’ मी विचारले- ‘काही खास कारण?’ अडमा सांगतात- ‘ती घरची मुलगी आहे. तिला आमच्या कुटुंबाच्या चालीरीतींची समज आहे. ती आम्हाला कधीही नुकसान पोहोचवणार नाही, म्हणूनच ही परंपरा चालत आली आहे.’ ‘जर कोणी असे केले नाही तर मग काय करतात?’ ‘समाजातून बहिष्कृत केले जाते. जिवंत असतानाही पिंडदान करतात. कोया लोकांमध्ये बाहेरील समुदायात विवाह कोणत्याही परिस्थितीत स्वीकार्य नाही.’ आता अडमा मला इरमा पवासी नावाच्या महिलेशी भेट घालून देतात. त्या सांगतात की, ‘आमच्या लोकांमध्ये जेव्हाही लग्न किंवा कोणत्याही विधीमध्ये मोठी मेजवानी असते, तेव्हा जेवणाची जबाबदारी संपूर्ण गावाची असते. गावातील लोक लग्न असलेल्या घरी महुआची दारू, कोंबडी, बकरी आणि मासे पोहोचवतात. जसे आज तुम्ही ज्या लग्नात आला आहात, त्यासाठीही महिला अनेक दिवसांपासून जंगलातून महुआ गोळा करून दारू बनवण्यात गुंतल्या होत्या.’ इरमा मला आणि माझ्या साथीदार मुन्नाला जेवण करण्यासाठी सांगतात. पत्रावळीत माशाचे डोके, मटण, चिकन, भात, रायता आणि पनीर वाढले जाते. काही वेळाने गावातील सर्व लोक जेवण करून आपल्या घरी परत येऊ लागतात, पण महिलांची मैफिल तशीच चालू राहते. कच्चे घर, पण स्वच्छता अशी की प्रत्येक कोपरा चमकतो दुसऱ्या दिवशी सकाळी मी पुन्हा माझा साथीदार मुन्नासोबत गावाकडे निघाले. येथे प्रत्येक घर मातीचे बनलेले आहे, पण ते व्यवस्थित सजवले आहेत. पुढे बांबूचे कुंपण आणि लहान गेट्स आहेत. घरांची छप्परं ताडाच्या पानांनी झाकलेली आहेत. हवेत महुव्याचा सुगंध मिसळलेला आहे. जवळपास प्रत्येक घरासमोर महुआ वाळत आहे. मुन्ना सांगतो की- ‘आमच्याकडे महुव्याच्या दारूशिवाय कोणताही विधी पूर्ण होत नाही.’ मुन्ना मला सर्वात आधी त्याच्या घरी घेऊन गेला. बाहेर कडक ऊन होते, पण घरात थंडी जाणवत होती. स्वच्छताही अशी होती की जमिनीवर पडलेली वस्तू न संकोचता उचलून खाता येईल. आंगणाच्या एका कोपऱ्यात, उघड्यावर जेवण बनत होते. हीच त्यांची स्वयंपाकघर आहे. स्वयंपाकघरात भांडीही तेवढीच आहेत, जेवढी जेवण बनवण्यासाठी आवश्यक आहेत. आतमध्ये फक्त एकच खोली आहे. समोर ठेवलेल्या खुर्चीवर मला बसायला सांगितले. खाटेवर धान्य ठेवले आहे. जेवण शिजण्याचा सुगंध येत आहे. मुन्ना सांगतो की, ‘आमच्या घरांमध्ये एकच खोली असते. इथेच खातो, इथेच झोपतो. आज जेवणात भात, डाळ आणि माशांच्या अंड्यांची भुर्जी बनत आहे.’ काही वेळ इथे थांबल्यानंतर आम्ही अडमा राखाच्या घराकडे निघालो. इथे अडमा राखा आमची वाट पाहत होते. मी त्यांच्याकडे प्रत्येक घराबाहेर सुकत असलेल्या महुव्याचा उल्लेख केला. ते म्हणाले - ‘नाते घेऊन जायचे असो, लग्नाचा प्रसंग असो किंवा कोणाचा मृत्यू, प्रत्येक विधीमध्ये आमच्याकडे दारू आवश्यक आहे. याच कारणामुळे महुआ मोठ्या प्रमाणात वापरला जातो. जेव्हा मुलाकडचे लोक मुलीच्या घरी स्थळ घेऊन जातात, तेव्हा दारू म्हणजे लंदा आणि इड्डिकुल नक्की घेऊन जातात. याशिवाय बोलणी पुढे सरकत नाही. समजा, स्थळ निश्चित करण्यासाठी मुलाकडच्या लोकांना मुलीच्या घरी पाच वेळा जावे लागले, तर प्रत्येक वेळी दारूचे प्रमाण वाढवले जाते. पहिल्यांदा एक बाटली, दुसऱ्यांदा दोन, तिसऱ्यांदा तीन. लग्न निश्चित झाल्यावर मुलाकडचे लोक आपल्या ऐपतीनुसार मुलीच्या कुटुंबाला रोख रक्कम, तांदूळ आणि दारू भेट देतात.’ दुसरी कोणतीही दारू प्यायल्यास 10 हजार रुपयांचा दंड अडमा सांगतात- ‘आमच्या लोकांमध्ये जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर दारूला महत्त्व आहे. बाळाचा जन्म झाल्यावर सर्वात आधी दारू चाखायला दिली जाते. मृत्यूच्या वेळीही तोंडात दारू टाकली जाते. तरीही, आमचे काही नियम खूप कडक आहेत. समुदायाबाहेर लग्न केल्यास आणि पारंपरिक दारू सोडून दुसरी दारू प्यायल्यास 10 हजार रुपये दंड भरावा लागतो. महिलांच्या दारू पिण्याबद्दल विचारले असता, ते हसू लागले. ते म्हणाले- ‘ही आमची परंपरा आहे. आमच्या समाजात स्त्रिया आणि पुरुष समान आहेत, सर्वांचा आनंद सारखाच आहे.’ दिवसानुसार मुलांचे नाव ठेवले जाते अडमाच्या घरात उपस्थित गौरी कवासी सांगतात- ‘येथे मुलांच्या नामकरणाची पद्धतही अनोखी आहे. येथे नावे, दिवसाच्या आधारावर ठेवली जातात- जसे, शुक्रवारी जन्मलेल्या मुलाला ‘शुक्री’ आणि गुरुवारी जन्मलेल्याला ‘गुरु’ म्हटले जाते.’ वादावर पोलीस ठाण्यात जात नाहीत, स्वतःच निर्णय घेतात मुन्ना सांगतात- कोया लोक, आपले घरगुती आणि सार्वजनिक वाद कधीही पोलीस ठाण्यात घेऊन जात नाहीत. समाजाच्या बाबतीत कोणत्याही बाहेरील व्यक्तीला हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. ते तारखांच्या व्यवस्थेला मानत नाहीत. निर्णय घेण्यासाठी आमच्याच समाजातील एका वृद्ध व्यक्तीची निवड केली जाते, ज्यावर कधीही कोणताही आरोप लागलेला नसावा. यांना आम्ही पेद्दा म्हणतो. पेद्दाच दंडाचा निर्णय घेतात. या मालिकेत पुढील आठवड्यात वाचा अशाच अनोख्या गालो लोकांची कहाणी….

दिव्यमराठी भास्कर 21 Apr 2026 7:13 am

पंखा ओकतोय आग, रात्रीही आराम का नाही:भारतातील उष्ण रात्री कशा बनत आहेत सायलेंट किलर; यापासून कसे वाचाल

भारतात उन्हाळ्याचा अर्थ आता फक्त दुपारच्या भाजणाऱ्या उन्हापुरता मर्यादित राहिलेला नाही. आता सूर्य मावळल्यानंतरही दिलासा मिळत नाही. रात्री 11 वाजताही भिंती गरम राहतात, पंखे गरम हवा फेकतात आणि कूलर-एसीदेखील अनेकदा निरुपयोगी वाटतात. वैज्ञानिक याला ‘वॉर्म नाईट्स’ (गरम रात्री) म्हणतात. या गरम रात्रींचा थेट परिणाम हृदय, किडनी आणि झोपेवर होत आहे. देशातील 734 जिल्ह्यांपैकी 57% जिल्हे आता उच्च किंवा खूप उच्च उष्णता धोका क्षेत्रात आले आहेत, जिथे सुमारे 76% लोकसंख्या राहते. तर, या 'वॉर्म नाईट्स' म्हणजे काय, त्या का वाढत आहेत आणि त्यापासून वाचण्याचा मार्ग काय आहे; दिव्य मराठी एक्सप्लेनरमध्ये 6 महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे… प्रश्न-1: ‘वॉर्म नाइट’ म्हणजे काय आणि ती पूर्वीपेक्षा वेगळी का आहे? उत्तर: भारतीय हवामान विभाग, म्हणजेच IMD नुसार, जेव्हा रात्रीचे किमान तापमान सामान्यपेक्षा 4.5 ते 6.4 अंश सेल्सिअसने जास्त होते, तेव्हा त्याला 'वॉर्म नाईट' म्हणतात. जर हे अंतर यापेक्षाही जास्त असेल, तर प्रकरण 'अत्यंत गंभीर' श्रेणीत येते. पूर्वी उष्णतेच्या लाटेचा अर्थ होता- दिवसा 40C पेक्षा जास्त तापमान असलेली उष्ण हवा. त्यापासून वाचण्याचे उपाय होते - सावली, पाणी, घरात राहा. पण उष्ण रात्रीत घरही शत्रू बनते. दिवसभर सिमेंटच्या भिंती आणि सिमेंटचे छत सूर्यप्रकाश स्वतःमध्ये शोषून घेतात. जेव्हा सूर्य मावळतो, तेव्हा तीच उष्णता हळूहळू बाहेर पडू लागते. अगदी त्याच वेळी जेव्हा तुम्ही झोपण्याचा प्रयत्न करत असता. परिणाम? रात्री 11 वाजताही भिंतीला हात लावला, तर ती गरम लागते आणि पंखे आग ओकतात. गेल्या काही वर्षांत उष्ण रात्री वेगाने वाढल्या आहेत… प्रश्न-2: वाढत्या 'वॉर्म नाइट्स'मागे (उष्ण रात्रींमागे) खरी कारणे काय आहेत?उत्तरः रात्रीची वाढती उष्णता यासाठी 3 मोठी कारणे जबाबदार आहेत… 60% जबाबदारी काँक्रीटच्या इमारती आणि रस्त्यांची हवेतील वाढती आर्द्रता आणि दमटपणा जागतिक तापमानवाढ आणि झाडांची कमतरता प्रश्न-3: रात्री उष्ण झाल्याने आरोग्यावर काय परिणाम होतो? उत्तर: CEEW म्हणजेच कौन्सिल ऑन एनर्जी, एन्व्हायर्नमेंट अँड वॉटरनुसार, रात्रीची उष्णता 'सायलेंट किलर'प्रमाणे काम करते… शरीराची शीतकरण प्रणाली ठप्प होते: मानवी शरीराचे तापमान 37C असते. रात्री बाहेर थंडी असते, तेव्हा शरीराला पूर्ववत होण्यासाठी वेळ मिळतो. पण जर रात्रीचे तापमान 25C च्या खाली आले नाही, तर शरीर स्वतःला पूर्ववत करू शकत नाही. याला 'हीट स्ट्रेस' म्हणतात. शास्त्रज्ञांचा अंदाज आहे की 2100 पर्यंत, जास्त उष्ण रात्रींमुळे मृत्यूचा धोका जवळपास सहा पटीने वाढेल. हृदयावर थेट हल्ला: जेव्हा शरीर रात्री थंड होत नाही, तेव्हा हृदयाला शरीराचे तापमान कमी करण्यासाठी सतत अतिरिक्त मेहनत करावी लागते. यामुळे रक्तदाब वाढतो आणि झोपेदरम्यान 'सायलेंट हार्ट अटॅक' किंवा हृदय निकामी होण्याचा धोका अनेक पटींनी वाढतो. झोपेची नासाडी: जेव्हा रात्रीचे तापमान 27C च्या वर जाते, तेव्हा झोपेचे सर्वात महत्त्वाचे भाग - REM स्लीप आणि डीप स्लीप - खराब होऊ लागतात. दिवसाच्या तीव्र उष्णतेनंतर, उष्ण रात्री झोपेच्या शरीरविज्ञानाला थेट बाधा पोहोचवतात, ज्यामुळे आरोग्यासाठी गंभीर धोके निर्माण होतात. स्मरणशक्ती कमी होणे, चिडचिडेपणा, नैराश्य… हे सर्व उष्ण रात्रींचे दीर्घकालीन परिणाम आहेत. प्रश्न-४: उष्ण रात्रींमुळे आर्थिक परिणाम काय होतील? उत्तर: उष्ण रात्री आरोग्यासोबतच आपल्या आणि देशाच्या आर्थिक विकासात अडचणी निर्माण करू शकतात… प्रश्न-5: उष्ण रात्रींपासून कूलर-एसी आपल्याला वाचवतील का? उत्तर: नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वेच्या आकडेवारीनुसार, भारतात फक्त 24% घरांमध्ये एसी किंवा कूलर आहेत. शहरांमध्ये हे प्रमाण 40% आहे, तर गावांमध्ये केवळ 15%. पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये तर फक्त 5% घरांमध्ये एसी आहेत. ही तीच राज्ये आहेत जिथे उष्णता सर्वाधिक कहर करते. पण एसी काही जादूची काठी नाही. एसी खोलीला थंड करतो, पण बाहेरची हवा आणखी गरम करतो. म्हणजेच, एसी चालवल्याने आपण स्वतः तर वाचतो, पण संपूर्ण शहराची उष्णता वाढत जाते. प्रश्न-6: उष्ण रात्रींचा सामना करण्यासाठी काय करावे? उत्तर: CEEW ने आपल्या अहवालात भारत सरकारला शिफारस केली आहे की काही महत्त्वाच्या सूचना त्यांच्या उष्णता कृती आराखड्यात समाविष्ट कराव्यात… 1. बहुतेक योजना फक्त दिवसाच्या उष्णतेवर लक्ष केंद्रित करतात. तर आता उष्ण रात्री, जास्त आर्द्रता देखील योजनेत समाविष्ट करावी लागेल. राज्यांनी हवामान विभागाच्या अंदाजानुसार आणि आकडेवारीचा वापर करून विजेची मागणी आणि रोगांशी लढण्याची तयारी केली पाहिजे. 2. 2024 पासून, उष्णतेच्या लाटेला राज्य आपत्ती निवारण निधी (SDMF) अंतर्गत निधीसाठी समाविष्ट करण्यात आले आहे. राज्ये या पैशाचा वापर करून शीतकरण निवारा आणि अलर्ट प्रणाली तयार करू शकतात. याव्यतिरिक्त, शहरांमध्ये झाडे आणि हिरवळ वाढवण्यावर भर देऊ शकतात. 3. ज्या राज्यांचे अर्ध्याहून अधिक जिल्हे उष्णतेमुळे उच्च-जोखीम असलेल्या श्रेणीत आहेत, त्या भागांना 'राज्य-विशिष्ट आपत्ती' म्हणून घोषित केले पाहिजे. असे केल्याने SDRF चा अतिरिक्त 10% निधी उपलब्ध होतो, ज्याचा वापर उष्णतेमुळे होणारे मृत्यू, शेतीचे नुकसान आणि आपत्कालीन प्रशिक्षणासाठी केला जाऊ शकतो. 4. तापमान एका निश्चित मर्यादेपलीकडे जाताच, मजुरांच्या खात्यात त्वरित पैसे जमा केले जावेत जेणेकरून त्यांना तीव्र उष्णतेत काम करावे लागणार नाही. नागालँड आणि अहमदाबाद (SEWA) येथे हा प्रयोग यशस्वी झाला आहे. 5. जर भारताने पुढील 10 वर्षांत AC ची ऊर्जा कार्यक्षमता दुप्पट केली, तर ग्राहकांचे 2.2 लाख कोटी रुपये वाचू शकतात. यामुळे केवळ लोकांची वीज बिले कमी होणार नाहीत, तर पॉवर ग्रिडवरील दाबही कमी होईल आणि गंभीर वीज कपातीची परिस्थिती टाळता येईल. उष्ण रात्रींमध्ये तुम्हाला ओआरएस (ORS), लिंबू पाणी आणि ताक यांसारखी पेये पित राहायला पाहिजे, जेणेकरून शरीराच्या शीतकरण प्रणालीला मदत मिळेल. रात्री झोपण्यापूर्वी छत आणि भिंतींवर पाणी शिंपडा, यामुळे काँक्रीटमधील साठलेली उष्णता लवकर बाहेर पडते. सुती आणि हलके कपडे घाला. वृद्ध आणि मुलांवर विशेष लक्ष द्या. ही बातमी दैनिक भास्करमध्ये फेलोशिप करत असलेल्या आकाश कुमार यांनी लिहिली आहे.

दिव्यमराठी भास्कर 21 Apr 2026 7:00 am

Fake Police Verification : पुण्यात बनावट पोलीस व्हेरिफिकेशनचं मोठं रॅकेट; एका चुकीमुळे तरुणाची नोकरी गेली

Fake Police Verification : बनावट पोलीस व्हेरिफिकेशन प्रकरणी पुण्यात एकाला अटक, पोलिसांकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन.

दैनिक प्रभात 21 Apr 2026 7:00 am

तामिळनाडूत भाजपला खाते उघडणे कठीण:120-140 जागांसह स्टालिन परतण्याची शक्यता, थलापती विजयला 5 ते 15 जागा

तमिळनाडूमधील 234 जागांसाठी 23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. सरकार स्थापन करण्यासाठी 118 जागांची आवश्यकता आहे. DMK आणि AIADMK यांच्यात लढत आहे. एकीकडे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांचे द्रविडियन मॉडेल आणि त्यांच्या लोकप्रिय योजना आहेत, तर दुसरीकडे जयललितांचा वारसा सांभाळणारी AIADMK आणि हिंदुत्वाच्या आधारावर पाय रोवण्याचा प्रयत्न करणारी भाजपची युती आहे. 20 दिवसांच्या निवडणूक कव्हरेजदरम्यान, दिव्य मराठीची टीम उत्तर तमिळनाडूमधील चेन्नई आणि वेल्लोर, पश्चिमेकडील तिरुपूर, दक्षिणेकडील मदुराई, रामनाथपुरम आणि मध्य भागातील त्रिची येथे पोहोचली. सामान्य लोक, ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय तज्ञांच्या माध्यमातून या 3 गोष्टी समजून आल्या… 1. तमिळनाडूमध्ये स्टॅलिन सरकार पुन्हा सत्तेत येऊ शकते. DMK युतीला 120 ते 140 जागा मिळू शकतात. यापैकी DMK ला 100 ते 110, काँग्रेसला 10 ते 15 आणि युतीमधील इतर पक्षांनाही 10 ते 15 जागा मिळू शकतात. 2. दुसरी मोठी पार्टी AIADMK च्या आघाडीला 90 ते 100 जागा मिळण्याची शक्यता आहे. AIADMK ला 70 ते 80 जागा मिळू शकतात. 27 जागांवर लढणाऱ्या भाजपचे खाते उघडणे कठीण आहे, परंतु पक्षाने खूप चांगली कामगिरी केली, तर 5 पर्यंत जागा मिळू शकतात. कोईम्बतूर दक्षिण, तिरुनेलवेली, नागरकोइल, मोडाकुरिची आणि कारैकुडी या जागांवर विजयाची अधिक शक्यता आहे. आघाडीतील इतर पक्षांना 5 ते 10 जागा मिळू शकतात. 3. तमिळ चित्रपटांमधील सुपरस्टार थलापती विजयच्या नवीन पक्ष TVK ची एंट्री फिकी दिसत आहे. पक्षाला 5 ते 15 जागा मिळू शकतात. तथापि, पक्षाचा मतांचा वाटा 12% राहू शकतो. स्टॅलिन यांच्या परतण्याची कारणे मजबूत युती, महिलांमध्ये लोकप्रिय योजना आणि स्टॅलिन यांची प्रतिमा AIADMK-भाजप का मागे पडले? AIADMK मधील वाद, हिंदुत्व कार्ड अयशस्वी, स्टॅलिनला घेरण्यात अपयश थलापती विजयचे किंगमेकर बनणे का कठीण आहे तज्ज्ञांचे मतस्टॅलिन यांनी निवडणुकीला तामिळनाडू विरुद्ध दिल्ली असे स्वरूप दिले

दिव्यमराठी भास्कर 21 Apr 2026 6:50 am

Land Division Fees : मोठी बातमी! शेतजमीन वाटणीपत्रासाठी नोंदणी शुल्क माफ; सरकारकडून परिपत्रक जारी

Land Division Fees : जमिनीचे वाटप करताना आकारले जाणारे नोंदणी शुल्क आता पूर्णपणे माफ; महसूल विभागाने जारी केले सुधारित परिपत्रक.

दैनिक प्रभात 21 Apr 2026 6:45 am

PMC News : आयुक्त आणि स्थायी समिती अध्यक्षांमध्ये जुंपली! “जिथून आलात तिथे परत जावे लागेल”म्हणत धमकी?

PMC News : पालिकेच्या ४ हजार २३ जागांवर जाहिरात फलक लावण्याच्या प्रस्तावावरून आयुक्त आणि श्रीनाथ भिमाले यांच्यात थेट शाब्दिक युद्ध.

दैनिक प्रभात 21 Apr 2026 6:30 am

Chandrakant Patil : मुलींसाठी उच्च शिक्षण आता पूर्णपणे मोफत होणार; चंद्रकांत पाटलांची मोठी घोषणा

Chandrakant Patil : विद्यार्थिनींना आता शिक्षण आणि परीक्षा शुल्कासोबतच 'इतर शुल्कात' मिळणार १०० टक्के सवलत; उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांचे संकेत.

दैनिक प्रभात 21 Apr 2026 6:15 am

अग्रलेख : मुद्दा एकच, भूमिका दोन

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या दुहेरी नागरिकत्वाच्या प्रश्नावर अलाहाबाद उच्च न्यायालयाने चौकशी करण्याचा जो आदेश दिला होता, तो आदेश उच्च न्यायालयाने स्वतःच रोखून धरण्याचा प्रकार घडला आहे.

दैनिक प्रभात 21 Apr 2026 6:00 am

PMC News : ‘निवासी घरांवर हातोडा, मग पब-हॉटेल्सवर मेहेरबानी का?’नगरसेवकांचा प्रशासनाला सवाल

PMC News : केवळ निवासी घरांवर अतिक्रमण विरोधी पथकाचा हातोडा, मोठ्या पब आणि हॉटेल्सकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष; नगरसेवकांचा संताप.

दैनिक प्रभात 21 Apr 2026 5:45 am

दिल्ली वार्ता : राजकीय फायदा महत्त्वाचा!

महिला आरक्षणाचा (Women’s Reservation) मुद्दा बारगळला असला तरी आगामी सर्व निवडणुकांमध्ये भाजप याचा वापर करणार यात किंचितही शंका उरली नाही.

दैनिक प्रभात 21 Apr 2026 5:30 am

Ayush Komkar Case : नगरसेविका लक्ष्मी आंदेकरांचा मुक्काम जेलमध्येच! आयुष कोमकर खून प्रकरणात न्यायालयाचा दणका

Ayush Komkar Case : जामीन दिला तर पुण्यात पुन्हा टोळीयुद्ध भडकेल; सरकारी वकिलांचा युक्तिवाद मान्य करत न्यायालयाने फेटाळला जामीन अर्ज.

दैनिक प्रभात 21 Apr 2026 5:30 am

भाष्य; फडणवीसांच्या PC ची चिरफाड:राजकारणात जिंकणे महत्त्वाचे, पण विश्वास गमावणे हे मोठ्या पराभवाचे कारण ठरू शकते

देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणात एक अभ्यासू, शांत व तथ्यांवर आधारित बोलणारे नेते म्हणून ओळखले जातात. पण सध्या ते एका वेगळ्याच चर्चेत गुरफटलेले दिसतात. पूर्वी आकडेवारी, कायदे व वास्तव यावर युक्तिवाद करणारे फडणवीस आता महिला आरक्षण व डिलिमिटेशनच्या मुद्यावर आपल्या पक्षाचे राजकीय कथानक अधिक आक्रमकपणे रेटताना दिसत आहेत. त्यांच्यात झालेला हा बदल केवळ शैलीतला आहे की, विचारसरणीतला हा प्रश्न आता अधिक ठळकपणे उपस्थित होत आहे. सध्या महाराष्ट्राचेच नव्हे तर अवघ्या देशाचे राजकारण महिला आरक्षण विधेयक व डिलिमिटेशन या दोन मुद्यांभोवती फिरत आहे. महिला आरक्षण विधेयकाचा उद्देश संसद व विधानसभांमध्ये महिलांना 33 टक्के प्रतिनिधित्व देण्याचा आहे. तर डिलिमिटेशन ही लोकसंख्येनुसार मतदारसंघांची पुनर्रचना करण्याची प्रक्रिया आहे. घटनात्मक व प्रशासकीय दृष्टीने हे दोन्ही विषय स्वतंत्र आहेत. राजकीय क्षेत्रातील जाणकारांना हे माहिती आहे. पण त्यानंतरही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारच्या पत्रकार परिषदेत या दोन्ही गोष्टींना एकमेकांना जोडण्याचा कथित केवीलवाणा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांची ही भूमिका केवळ राजकीय रणनीतीचा भाग आहे की जाणीवपूर्वक निर्माण केलेला गोंधळ? असा प्रश्न विचारला जात आहे. आधुनिक राजकारणात मुद्दे सोप्या भाषेत मांडले जातात. हे खरे आहे. पण त्या प्रक्रियेत संदर्भ बदलले गेले किंवा चुकीची जोडणी केली गेली, तर ते केवळ स्पष्टीकरण राहत नाही. ते जनतेची दिशाभूल करण्याकडे झुकते. त्यामुळेच फडणवीस यांच्या अलीकडील भूमिकांकडे केवळ विरोधक नव्हे, तर सामान्य नागरीकही प्रश्नार्थक नजरेने पाहत आहेत. फडणवीसांची भूमिका भाजपच्या अजेंड्याचा भाग विरोधकांच्या मते, फडणवीस यांनी महिला आरक्षण व डिलिमिटेशनवर मांडलेली भूमिका केवळ मुद्यापुरती मर्यादित नाही. तो भाजपच्या एका व्यापक राजकीय अजेंड्याचा भाग आहे. मुद्यांचे असे सादरीकरण करणे की त्यातून जनमत विशिष्ट दिशेने वळेल, ही आजच्या राजकारणातील सामान्य पद्धत बनत चालली आहे. पण फडणवीस यांच्यासारख्या अनुभवी नेत्याकडून राजकारणाला एक वेगळी अपेक्षा असते. कारण, त्यांनीच यापूर्वी तथ्याधारित राजकारणाची ओळख निर्माण केली. त्यामुळे त्यांच्याविषयी सोशल मीडियात 'खोटं बोलण्याचं गोल्ड मेडल फडणवीसांना द्यायला हवं' अशी उपरोधिक विशेषणे वापरली जाण्याकडे केवळ विनोद म्हणून पाहता येत नाही. तो लोकांच्या मनात निर्माण झालेल्या शंकेचा व असंतोषाचा संकेत आहे. एखाद्या नेत्याच्या वक्तव्यांवर वारंवार प्रश्न उपस्थित होतात, तेव्हा त्याचा परिणाम त्यांच्या विश्वासार्हतेवर होतो. लोकशाहीत विश्वास ही सर्वात मोठे भांडवल असते आणि तेच जर कमी होऊ लागले, तर त्याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात. फडणवीस खरोखर बदलले आहेत का? हा प्रश्न सरळ असला तरी त्याचे उत्तर तितकेच गुंतागुंतीचे आहे. एकीकडे राजकारणातील वाढती स्पर्धा, तात्काळ प्रतिक्रिया देण्याचा दबाव आणि सत्तेचे समीकरण यामुळे नेत्यांची भाषा सध्या अधिक आक्रमक झाली आहे. दुसरीकडे, याच प्रक्रियेत तथ्यांचा वापर कसा आणि किती प्रमाणात केला जातो, यावरही प्रश्न निर्माण होत आहेत. त्यामुळे हा बदल परिस्थितीजन्य आहे की जाणीवपूर्वक, हे प्रत्येकाने आपल्या आकलनानुसार ठरवावे लागेल. राजकारण तथ्यांवरच आधारित असायला हवे लोकशाही केवळ मतदानावर टिकत नाही. ती माहितीवर आधारित निर्णयांवर टिकते. त्यामुळे माहितीच संदिग्ध किंवा अर्धवट असेल, तर जनतेचे निर्णयही प्रभावित होऊ शकतात. म्हणूनच कोणत्याही नेत्याने, मग तो कोणत्याही पक्षाचा असो, त्याने आपल्या वक्तव्यांची जबाबदारी घेणे आवश्यक आहे. राजकारणात आक्रमकता असू शकते, मतभेद असू शकतात, पण ते तथ्यांच्या आधारावरच असले पाहिजेत. शेवटी प्रश्न एकाच गोष्टीवर येऊन ठेपतो तो म्हणजे, राजकारणासाठी सत्याशी तडजोड करणे योग्य आहे का? देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या प्रभावी नेत्यांनी या प्रश्नाचे उत्तर त्यांच्या कृतीतून दिले, तरच त्यांचा ‘खरेपणा’ टिकून राहील. अन्यथा, ‘राजकारण’ आणि ‘सत्य’ यांच्यातील अंतर वाढतच जाईल, आणि त्याचा परिणाम केवळ एका नेत्यावर नव्हे, तर संपूर्ण लोकशाही व्यवस्थेवर होईल. फडणवीसांच्या पत्रकार परिषदेची चिरफाड महिला आरक्षण विधेयकाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विरोधकांवर अत्यंत आक्रमक टीका केली. त्यांनी विरोधकांवर '70 कोटी महिलांचा विश्वासघात' केल्याचा आरोप केला. त्यात त्यांनी वापरलेली भाषा, ‘भ्रूणहत्या’, ‘तांडव’, ‘आनंदोत्सव’ आदी शब्द ही केवळ राजकीय टीका नाही. ती एक तीव्र भावनिक व आक्रमक राजकीय रणनीती असल्याचे स्पष्ट दिसते. या भाषेमुळे त्यांच्या भूमिकेला धार मिळते, पण त्याचवेळी प्रश्नही निर्माण होतो की, ही मांडणी पूर्णतः तथ्यांवर आधारित आहे का? की ती राजकीय प्रभाव वाढवण्यासाठी केलेली अतिशयोक्ती आहे? महिला आरक्षण विधेयक हा विषय देशातील महिलांच्या प्रतिनिधित्वाशी संबंधित आहे. त्यामुळे ही गोष्ट फार संवेदनशील आहे. फडणवीसांनी विरोधकांवर हे विधेयक पाडण्याचा आरोप केला. त्यांनी त्याला महिलांविरोधी मानसिकतेचे उदाहरण ठरवले. पण इथेच वादाची खरी सुरुवात होते. कारण विरोधकांचे म्हणणे वेगळे आहे. त्यांच्या मते, हा मुद्दा केवळ महिला आरक्षणाचा नाही. तो डिलिमिटेशन, जनगणना व अंमलबजावणीच्या वेळापत्रकाशी जोडलेला आहे. फडणवीस यांनी त्यांच्या भाषणात डिलिमिटेशनचा इतिहास मांडत 1976 पासून 2002 आणि पुढे 2023 पर्यंतच्या विविध घटनादुरुस्त्यांचा संदर्भ दिला. त्यांनी असा युक्तिवाद केला की, महिला आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी डिलिमिटेशन आवश्यक आहे आणि त्यामुळेच सरकारने संबंधित विधेयके मांडली. ही मांडणी तांत्रिकदृष्ट्या काही अंशी योग्य वाटते. कारण 2023 च्या घटनादुरुस्तीत जनगणना आणि परिसीमनानंतरच आरक्षण लागू होईल, असे नमूद करण्यात आले आहे. मात्र, विरोधकांनी सरकारच्या या भूमिकेमागे राजकीय गणित असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे या प्रकरणी ‘सत्य विरुद्ध राजकारण’ हा वाद निर्माण होतो. मुख्यमंत्र्यांची शैली पाहिली, तर ती स्पष्टपणे आक्रमक व जनमत तयार करणारी आहे. त्यामुळे ‘भ्रूणहत्या’ सारखा शब्द वापरणे हे भावनिक प्रतिक्रिया निर्माण करण्यासाठी प्रभावी ठरते, पण त्याचवेळी तो अतिशयोक्तीपूर्णही वाटू शकतो. कारण संसदीय प्रक्रियेत एखादे विधेयक नाकारले जाणे ही लोकशाहीतील सामान्य बाब आहे. त्याला अशा तीव्र शब्दांत मांडणे म्हणजे मुद्द्याला वेगळ्या पातळीवर नेणे होय. फडणवीसांनी महात्मा जोतिबा फुले यांच्या विचारांचा उल्लेख करत विरोधकांवर टीका केली, हेही राजकीय दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे. समाजसुधारकांच्या वारशाचा संदर्भ देऊन नैतिक आधार मिळवण्याचा प्रयत्न यात दिसतो. मात्र, यावरही प्रश्न उपस्थित होतो की, सामाजिक न्यायाच्या मुद्द्यांना राजकीय संघर्षात अशा प्रकारे वापरणे कितपत योग्य आहे? भाजप आणि महायुतीकडून 1 कोटी महिलांच्या सह्या गोळा करण्याचा निर्णय हा केवळ आंदोलन नसून स्पष्टपणे जनमत घडवण्याचा प्रयत्न आहे. लोकशाहीत हे पूर्णपणे वैध असले तरी त्यामागे राजकीय दबाव निर्माण करण्याची रणनीती स्पष्ट दिसते. ‘महिलांना संघटित करू, जनमताचा रेटा तयार करू’ हे विधान 5 राज्यांतील विधानसभा निवडणुकीकडे अंगुलीनिर्देश करणारे आहे. काँग्रेसच्या आरोपांना उत्तर देताना फडणवीस यांनी जनगणना आणि 2011 च्या आकडेवारीचा संदर्भ देत आपली बाजू स्पष्ट केली. त्यांनी विरोधकांचा प्रश्न ‘बाळबोध’ असल्याचे म्हटले, यावरून त्यांच्या भूमिकेतील आत्मविश्वास दिसतो. मात्र, अशा प्रकारची भाषा राजकीय संवाद अधिक तीव्र करते आणि संवादाची दरी वाढवते, हेही तितकेच खरे आहे. शेवटी, या वादातून एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा पुढे येतो, तो म्हणजे लोकशाहीत सत्य किती महत्त्वाचे आहे? जर प्रत्येक पक्ष आपापल्या सोयीने तथ्ये मांडू लागला, तर सामान्य नागरिकाला खरे-खोटे ओळखणे कठीण होईल. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या अनुभवी नेत्याकडून अपेक्षा हीच आहे की, त्यांनी केवळ राजकारण न करता तथ्यांवर आधारित स्पष्टता कायम ठेवावी. कारण शेवटी राजकारणात जिंकणे महत्त्वाचे असते, पण विश्वास गमावणे हे कोणत्याही नेत्यासाठी सर्वात मोठ्या पराभवाचे कारण ठरू शकते.

दिव्यमराठी भास्कर 21 Apr 2026 5:30 am

Water Cut Pune : गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद; ‘या’भागांवर होणार मोठा परिणाम

Water Cut Pune : शहरातील जलशुद्धीकरण केंद्रे आणि पंपिंग स्टेशनमध्ये तातडीच्या दुरुस्तीचे काम; गुरुवारी मध्यरात्रीपर्यंत पाणीपुरवठा पूर्णपणे ठप्प राहणार.

दैनिक प्रभात 21 Apr 2026 5:15 am

Knife Attack : गोळेवस्तीत पती-पत्नीचा राडा! शेजाऱ्यांवर चाकूने जीवघेणा हल्ला, परिसरात खळबळ

Knife Attack : उरुळी कांचनच्या गोळेवस्तीत शिवीगाळीच्या वादातून चाकू हल्ला; तरुणाच्या कपाळावर वार करून दांपत्याने दिली जीवे मारण्याची धमकी.

दैनिक प्रभात 21 Apr 2026 5:00 am

दखल : माता मृत्यूदराचे वास्तव

माता मृत्यूदरात (Maternal Mortality) 86 टक्क्यांची घट झाल्याचे सकारात्मक चित्र आहे. मात्र गरीब, दुर्गम, ग्रामीण भागातील मातांसाठी हेच चित्र नकारात्मक आहे.

दैनिक प्रभात 21 Apr 2026 5:00 am

Shikrapur Accident : शिक्रापूरात तीन वाहनांचा भीषण अपघात! कंटेनरची दोन कारला धडक, दोघे जखमी

Shikrapur Accident : दुभाजक तोडून समोरून आलेल्या कंटेनरने दिला मोठा तडाखा; संभाजीनगरच्या प्रवाशांची कार अपघातात उद्ध्वस्त, आरोपी चालकावर गुन्हा दाखल.

दैनिक प्रभात 21 Apr 2026 4:30 am

Neera River Ghat : लाखो वारकऱ्यांचा जीव टांगणीला? नीरा स्नानासाठी सुरक्षित घाट कधी; नेत्यांच्या हालचाली सुरू

Neera River Ghat : पालखी सोहळ्यातील महत्त्वाच्या 'नीरा स्नाना'साठी भाविकांची मोठी गर्दी होते, मात्र घाटाअभावी वारकऱ्यांची सुरक्षितता धोक्यात.

दैनिक प्रभात 21 Apr 2026 4:15 am

Akluj Animal Market : आता आठवड्यातून दोनदा भरणार जनावरांचा बाजार! अकलूज बाजार समितीचा मोठा निर्णय

Akluj Animal Market : माळशिरस तालुक्यातील जनावरांच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारांना मिळणार बळ; व्यापाऱ्यांच्या मागणीनंतर बाजार समितीने उचलले महत्त्वपूर्ण पाऊल.

दैनिक प्रभात 21 Apr 2026 4:00 am

Dowry Harassment : वाघोली हादरली! एकाच दिवशी दोन विवाहितांच्या आत्महत्या; आरोपी पती जेरबंद

Dowry Harassment : माहेरून सोन्याची अंगठी आणि रोख १० लाखांसाठी छळ; दोन विवाहितांच्या आत्महत्येप्रकरणी सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल.

दैनिक प्रभात 21 Apr 2026 3:45 am

Dilip Walse Patil : आंबेगावात अधिकाऱ्यांची मेहेरबानी चालणार नाही! वळसे पाटलांच्या ‘त्या’आदेशामुळे प्रशासनात खळबळ

Dilip Walse Patil : आंबेगाव तालुक्यातील प्रलंबित कामे तत्परतेने मार्गी लावण्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे प्रशासनाला सक्त निर्देश.

दैनिक प्रभात 21 Apr 2026 3:30 am

Anganwadi Accident : धक्कादयक! अंगणवाडीच्या छताचं प्लास्टर कोसळलं; चिमुकले थोडक्यात वाचले

Anganwadi Accident : अवघ्या चार वर्षांपूर्वी बांधलेल्या इमारतीची दुरवस्था; संतापलेल्या पालकांनी प्रशासनाला धरले धारेवर, दुरुस्तीची केली मागणी.

दैनिक प्रभात 21 Apr 2026 3:15 am

BJP Protest In PCMC : पालिकेत ‘नारी शक्ती’चा एल्गार! काँग्रेसच्या विरोधात नगरसेविका आक्रमक, नेमकं काय घडलं?

BJP Protest In PCMC : महिला आरक्षणावरील आघाताचा निषेध करण्यासाठी एप्रिल महिन्याची सभा ५ मे पर्यंत तहकूब; योगिता नागरगोजे यांनी मांडला निषेधाचा ठराव.

दैनिक प्रभात 21 Apr 2026 3:00 am

Temple Theft : पांडवकालीन सिद्धेश्वर मंदिरात चोरी! यात्रेचा उत्साह संपताच चोरट्यांचा डल्ला

Temple Theft : भोपाळबुवा आणि सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेनंतर अवघ्या काही तासांतच चोरी; अज्ञात चोरट्यांनी दोन दानपेट्या फोडून रोकड केली लंपास.

दैनिक प्रभात 21 Apr 2026 2:45 am

Red Cliff School : रेड क्लिप स्कूलची मनमानी! विद्यार्थ्यांसह पालकांचे पालिकेसमोर आंदोलन; नेमकं प्रकरण काय?

Red Cliff School : चोविसावाडी येथील रेड क्लिप शाळेच्या शुल्कवाढी विरोधात संताप; आरटीई विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्याची मागणी.

दैनिक प्रभात 21 Apr 2026 2:15 am

Attack On Farmer : मोशीमध्ये भरदिवसा थरार! हप्त्यासाठी शेतकाऱ्यावर वसुली एजंटचा चाकूने वार, नक्की काय घडलं?

Attack On Farmer : हप्ते भरले नसल्याच्या रागातून चाकूने वार करून शेतकऱ्याला केले जखमी; एमआयडीसी भोसरी पोलिसांनी तीन एजंटना केली अटक.

दैनिक प्रभात 21 Apr 2026 2:00 am

PCMC BJP Slogan : “अरे या सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय..”भाजप नगरसेवकांची जीभ घसरली

PCMC BJP Slogan : महापालिका प्रवेशद्वारावर रंगलेल्या आंदोलनात प्रशांत शितोळे यांच्यासह कार्यकर्त्यांचा गोंधळ; चूक लक्षात येताच बदलली घोषणा.

दैनिक प्रभात 21 Apr 2026 1:45 am

Pimpri Chinchwad : रस्ता आहे की मृत्यूचा सापळा? अवजड वाहनांची वर्दळ आणि अर्धवट काम; पुनावळ्यात संतापाची लाट

Pimpri Chinchwad : काटे वस्ती परिसरातील मुख्य रस्ता गेल्या अनेक दिवसांपासून अपूर्ण; एका लेनच्या कामामुळे धूळ आणि चिखलाचे साम्राज्य.

दैनिक प्रभात 21 Apr 2026 1:30 am

Khalapur News : बाजारपेठेत माकडांचा थरार! घरात घुसून वस्तूंची फेकाफेक; नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण

Khalapur News : चौक बाजारपेठ परिसरात माकडांच्या टोळ्यांचा घरांमध्ये शिरकाव; अन्नधान्य पळवणे आणि भांडी फोडण्याच्या प्रकारांमुळे गृहिणींमध्ये संतापाची लाट.

दैनिक प्रभात 21 Apr 2026 1:15 am

Eknath Shinde : साताऱ्यात बालकांसाठी हृदय शस्त्रक्रिया शिबिर; चिमुकल्यांसाठी एकनाथ शिंदेंची मोठी भेट

Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ६२ व्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेतर्फे मोफत हृदय तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन.

दैनिक प्रभात 21 Apr 2026 1:00 am

Pangolin Smuggling : खवले मांजराच्या तस्करीचं ‘डोंबिवली कनेक्शन’! एकाला अटक, मोठं रॅकेट उघड होणार

Pangolin Smuggling : चिपळूणहून आलेल्या बसमध्ये दबा धरून बसलेला डोंबिवलीचा तस्कर वन विभागाच्या जाळ्यात; ५.९८० किलो खवले जप्त.

दैनिक प्रभात 21 Apr 2026 12:45 am

Jaykumar Gore : राजकारणात नवी खेळी! स्वीकृत सदस्यांचा मार्ग मोकळा; आठ दिवसांत होणार मोठा निर्णय

Jaykumar Gore : जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्ये स्वीकृत सदस्यांची नियुक्ती होणार; विधानसभेच्या मंजुरीनंतर आता शासन निर्णयाची प्रतीक्षा.

दैनिक प्रभात 21 Apr 2026 12:30 am

GT vs MI : हार्दिकच्या पलटनचा दमदार कमबॅक! तिलकच्या शतकानंतर गुजरातचं १०० धावांत ‘पॅक-अप’; मुंबईचा ९९ धावांनी विजय

GT vs MI : या सामन्यात मुंबईने गुजरातचा ९९ धावांनी धुव्वा उडवत हंगामातील आपला दुसरा विजय नोंदवला आहे.

दैनिक प्रभात 20 Apr 2026 11:38 pm

BMC News : सर्व सहायक आयुक्तांनी आपापल्या विभागातील स्वच्छतेवर भर द्या, अतिरिक्त आयुक्तांचे निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महानगरपालिकेच्या प्रत्येक विभागाच्या सहायक आयुक्तांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील रस्ते स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, नाले स्वच्छता, बस थांबे आदी ठिकाणच्या स्वच्छतेकडे अधिक लक्ष देऊन परिसर स्वच्छ ठेवण्यास प्राधान्य द्यावे, अशा सूचना अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा यांनी आज दिल्या आहेत. त्यांनी पश्चिम उपनगरातील ३ विभाग कार्यांच्या कार्यक्षेत्रातील विविध ठिकाणांची आकस्मिक पाहणी केली.अतिरिक्त आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी आज (दिनांक २० एप्रिल २०२६) पश्चिम उपनगरांतील एच पूर्व, पी उत्तर आणि पी दक्षिण या विभागांमधील विविध ठिकाणांना आकस्मिक भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी विभागांमधील परिसर स्वच्छता आणि नाले स्वच्छतेच्या कामांचा पाहणी केली. त्यानंतर त्यांनी 'एच पूर्व' विभागाच्या सहाय्यक आयुक्त मृदुला अंडे, 'पी उत्तर' विभागाचे सहायक आयुक्त कुंदन वळवी आणि 'पी दक्षिण' विभागाचे सहायक आयुक्त अनिरूद्ध कुलकर्णी यांच्याशी दूरध्वनी संवाद साधला. या दूरध्वनी संवादा दरम्यान त्यांनी संबंधित सहाय्यक आयुक्त यांना विविध बाबींच्या अनुषंगाने निर्देश दिले आहेत.पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून मुंबई महानगरातील मोठ्या आणि लहान नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे वेगाने सुरु आहेत. कंत्राटदाराने काढलेला ओला गाळ ४८ तासानंतरच त्याचे वहन होत आहे की नाही, याकडेही संबंधित अभियंत्यांनी प्राधान्याने लक्ष केंद्रीत करावे. तसेच सहायक आयुक्तांनी संबंधित अभियंत्यांकडून या सर्व कामाचा दररोज आढावा घ्यावा, अशा सूचनाही डॉ. शर्मा यांनी आजच्या आकस्मिक पाहणीनंतर संबंधित सहाय्यक आयुक्तांना दिल्या आहेत.'पी दक्षिण' विभागातील दाजीवाडी भाजी मंडई, राणीसती मार्ग मंडी परिसरातील स्वच्छता कामांचाही त्यांनी आढावा घेतला. तसेच तिनही विभागातील उड्डाणपुलांखालील आणि परिसरातील कचरा हटवून परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रभावी कार्यवाही करावी, असे निर्देशही शर्मा यांनी आजच्या आकस्मिक पाहणीनंतर दिले आहेत.

फीड फीडबर्नर 20 Apr 2026 11:10 pm

Kagiso Rabada Record : कगिसो रबाडाचा पॉवरप्लेमध्ये धुमाकूळ! लसिथ मलिंगाला मागे टाकत ‘हा’पराक्रम करणारा दुसराच विदेशी खेळाडू

Kagiso Rabada Record : २० एप्रिल रोजी झालेल्या सामन्यात रबाडाने पॉवरप्लेमध्येच मुंबईच्या तीन दिग्गज फलंदाजांना बाद करून श्रीलंकेचा महान गोलंदाज लसिथ मलिंगा याचा एक मोठा विक्रम मोडीत काढला आहे.

दैनिक प्रभात 20 Apr 2026 11:05 pm

Satara News : धक्कादायक ! 10 दिवसांपूर्वी विवाह झालेल्या नवदाम्पत्यावर काळाचा घाला

कराड– चिपळूण मार्गावर येरफळे गावच्या हद्दीत गारवा हॉटेलसमोर सोमवारी दुपारी (Satara News) दोन वाजण्याच्या सुमारास ट्रकला ओलांडून पुढे जात असताना समोरून येणाऱ्या पिकअप गाडीची दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक झाल्याने अपघात झाला.

दैनिक प्रभात 20 Apr 2026 11:03 pm

US – Iran Talk 2nd Round: अमेरिका आणि इराणमध्ये उद्या इस्लामाबादमध्ये थेट चर्चेची दुसरी फेरी; ‘ग्रँड बार्गेन’साठी उपराष्ट्रपती जे.डी. व्हॅन्स सज्ज

US - Iran Talk 2nd Round: दोन्ही देशांमध्ये गेल्या ४९ वर्षांपासून नसलेला संवाद आता सुरू झाला आहे. दोन्ही बाजूंनी चर्चेची तयारी दर्शवली असली तरी, अनेक दशकांपासूनचा अविश्वास हा या प्रक्रियेतील सर्वात मोठा अडथळा आहे.

दैनिक प्रभात 20 Apr 2026 10:53 pm

Narendra Modi : पंतप्रधान मोदींचा मोठा निर्णय! शरद पवारांच्या खासदारावर सोपवली महत्त्वाची जबाबदारी

Narendra Modi : महात्मा ज्योतिबा फुले यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त केंद्र सरकारने स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची सदस्य म्हणून निवड झाली आहे.

दैनिक प्रभात 20 Apr 2026 10:44 pm

Bank of Maharashtra : बँक ऑफ महाराष्ट्रच्या नफ्यात 35 टक्क्यांची भरघोस वाढ

Bank of Maharashtra : सोमवारी एनएसईवर, या बँकेचा शेअर 3.86 टक्क्यांनी वाढून 75.54 रुपयांवर बंद झाला. कंपनीचे बाजारमूल्य 2,261.32 कोटी रुपयांनी वाढून 58,194.30 कोटी रुपयांवर पोहोचले.

दैनिक प्रभात 20 Apr 2026 10:33 pm

Dasun Shanaka Ban : मोठा बातमी! राजस्थान रॉयल्सच्या ‘या’खेळाडूवर घातली बंदी, नेमकं कारण काय? जाणून घ्या

Dasun Shanaka Ban : या कारवाईनंतर दासुन शनाकाने आपली चूक मान्य करत जाहीर माफी मागितली आहे.

दैनिक प्रभात 20 Apr 2026 10:30 pm

Water Cut : दक्षिण मुंबईत बुधवारी पाणीकपात होणार, नागरिकांचे हाल होणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेतर्फे शिवडी येथील टनल भंडारवाडा टेकडी जलाशय वाहिनीवर हाजीबंदर मार्ग एफ दक्षिण विभागात दोन नग १५०० मिलीमीटर व्यासाचे बटरफ्लाय व्हॉल्व बसविण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. हे काम भंडारवाडा टेकडी जलाशय, फॉसबेरी टेकडी जलाशय आणि गोलंजी टेकडी जलाशय यांचा पाणीपुरवठा सुव्यवस्थित करण्यासाठी केले जाणार आहे. ही कार्यवाही बुधवार, २२ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजल्यापासून गुरूवारी, २३ एप्रिल २०२६ रोजी पहाटे ४ वाजेपर्यंत एकूण १८ तास सुरु राहणार आहे. परिणामी, ए, बी, सी, ई आणि एफ दक्षिण विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर काही भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.कृपया संबंधित विभागातील नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. पाणीपुरवठा बंदच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, तसेच नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पुढील ४ ते ५ दिवस पाणी उकळून - गाळून प्यावे, महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.कोणत्या परिसरात असेल कपात ?‘ए’ विभाग - पी.डि'मेलो मार्ग रहिवासी, रामगड झोपडपट्टी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी), सेंट जॉर्ज रुग्णालय, शासकीय दंत महाविद्यालय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय), नौदल डॉकयार्ड‘बी’ विभाग - उमरखाडी, नूरबाग, चिंचबंदर, वालपाखाडी, कारागृह मार्ग (जेल रोड), रामचंद्र भट्ट मार्ग, आनंदराव सुर्वे मार्ग, समंतभाई नानजी मार्ग, डॉ. महेश्वरी मार्ग, केशवजी नाईक, भाग एस. व्ही. पी., शायदा मार्ग, फ्लँक रोड नवरोजी हिल, टंडेल (उ), निशाणपाडा स्ट्रीटटँडेल, तंतनपुरा, सॅम्युएल मोहम्मद उमर कोकील मार्ग, आय. एम. एम., वाय. एम. रोड, डोंटाड, खडक, इस्तायल मोहल्ला, धोबी मार्ग, शेरिफ देवजी, व्ही. व्ही. चंदन, दरियास्थान, काजी सय्यद, सय्यद मुखरी, इस्साजी, नृसिंहनाथ, जंजीकार, रघुनाथ महाराज, जुना बंगालीपुरा, भंडारी, अभयचंद गांधी मार्ग, लोकमान्य टिळक मार्ग (एल. टी. रोड), निशाणपाडा, मशिद बंदर.इमामवाडा, आय. आर. मार्ग, मोहम्मद अली, मेमनवाडा, पिरु गल्ली, कंबेकर, नखोडा, कोलसा, नारायण धुरु, अब्दुल रहमान स्ट्रीटनंदलाल जानी मार्ग, लीलाधर साह मार्ग, दाणाबंदर, संत तुकाराम मार्ग, पी.डिमेलो मार्ग, वाडीबंदररेल्वे परिसर , मुंबई बंदर परिसरसी’ विभाग -बॅनियन स्ट्रीट, इस्माईल कर्टे रोड, एसबीयूटी क्षेत्र, बोरा बाजार रस्ता, सरदार वल्लभभाई रस्ता, काजी रस्ता, अली उमर रस्ता, बापू कोटे मार्ग, झाम रस्ता, मशीद रस्ता, चिमना बुचर रस्ता, मटन रस्ता, धाबू रस्ता, पाकमोडिया स्ट्रीटई’ विभाग - १. नेसबिट रोड, एन. एम. जोशी मार्ग, मदनपुरा, बदलूपुरा, नागपाडा, शेख हाफिझुद्दीन मार्ग, मेघराज शेट्टी मार्ग, गणेश हरि पारुंडेकर मार्ग, पाईस रस्ता, मुसा किल्लेदार रस्ता, सोफिया जुबेर मार्ग, डिमटिमकार मार्ग, एम. ए. मार्ग, टँकपाखाडी मार्ग, क्लिअर रोड, बी. जे. मार्ग, के. के. रोडडिमटिमकर मार्ग, उंद्रिया रस्ता, खंडिया रस्ता, टेमकर रस्ता, शेख कमरूद्दीन रस्ता, मस्तान टँक मार्ग, टँक रस्ता, काझीपुरा, डंकन मार्ग, जे. जे. रस्ताम्हातारपाखाडी मार्ग, सेंट मेरी मार्ग, नेसबिट मार्ग, ताडवाडी, रेल्वे संकुल, शिवदास चापसी मार्ग (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ - सकाळी ६.३५ ते ८.१५ वा.)एम. एस. अली मार्ग, बेलासिस मार्ग, कामाठीपुरा, एस. पी. मार्ग, शुक्लाजी रस्ता, मनाजी राजूजी मार्ग, आग्रीपाडादत्ताराम लाड मार्ग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, भाई बाल मुकुंद मार्ग, काळाचौकी, चिंचपोकळी, टी. बी. कदम मार्गमाझगाव कोळीवाडा, नरसू नाखवा विठोबा मार्ग, ब्रह्मदेव खोद मार्ग, दरगाह गली, बॅ. नाथ पै मार्ग, दिलीमा स्ट्रीट, रुग्णालय गल्ली, चर्च लेन, बेकर्स लेन, नवाब टँक पूल, गन पावडर मार्ग, नवा नगर, डॉकयार्ड रोडहाथीबाग जागा, शेठ मोतिशाह गल्लीमुंबई बंदर क्षेत्रजे. जे. रुग्णालयरामभाऊ भोगले मार्ग, फरबंदर नाका, वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय, घोडपदेव नाका, म्हाडा संकुल, शेठ मोतिशाह गल्ली, टी. बी. कदम मार्ग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, डॉ. मस्कारहन्स मार्ग, डी. पी. वाडी, काळाचौकी, नारियल वाडी, संत सावता मार्ग, चंपी भिमजी मार्ग, ए. जी. पवार गल्ली, वीर तानाजी मालुसरे मार्गबॅ. नाथ पै मार्ग, मोदी कंपाउंड, अँटलस मिल कंपाउंड, घोडपदेव क्षेत्रशिवदास चापशी मार्गदारूखाना, लाकूड बंदर, कोळसा बंदर, दरगाह गली, क्वे स्ट्रीटकस्तुरबा रुग्णालय नायर रुग्णालय‘एफ दक्षिण’ विभाग - अभ्युदय नगर , शिवडी, वडाळा (पूर्व) , डॉ. ई. बोर्जेस मार्ग, बुस्टिंगलालबाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, चिवडा गल्ली, डॉ. एस. एस. राव मार्ग, दत्ताराम लाड मार्ग, जिजीभॉय गल्ली, महादेव पालव मार्ग, साने गुरुजी मार्ग, गॅस कंपनी गल्लीदादर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, जगन्नाथ भातणकर मार्ग, बी. जे. देवरुखकर मार्ग, गोविंदजी केणी मार्ग, हिंदमाता जेरबाई वाडिया मार्ग, स्प्रिंग मिल चाळ, गं. द आंबेकर मार्ग, गोविंदजी केणी मार्ग, शेटे मार्केट, भोईवाडा गाव, हाफकीन इन्स्टिट्यूट गं. द आंबेकर मार्ग ते ५० टेनामेंट्स, एकनाथ घाडी मार्ग, परळ गाव मार्ग, नाना भाई परळकर मार्ग, भगवानराव परळकर मार्ग, विजयकुमार वाळींबे मार्ग, एस. पी. कंपाऊंड (काही भागात)आचार्य दोंदे मार्ग, टी. जे. रोड, झकेरिया बंदर मार्ग, शिवडी छेद मार्ग, शिवडी किल्ला मार्ग, गाडी अड्डा, शिवडी कोळीवाडा,मुंबई बंदर परिक्षेत्रपरशुराम नगर, जिजामाता नगर, अंबेवाडी (काही भाग), साईबाबा मार्ग, मिंट वसाहत, राम टेकडीके. ई. एम. रुग्णालय, टाटा रुग्णालय, जेरबाई वाडिया रुग्णालय, एमजीएम रुग्णालय

फीड फीडबर्नर 20 Apr 2026 10:30 pm

BMC : महापालिका आयुक्तांच्या भेटीनंतर अतिरिक्त आयुक्तांची रुग्णालयात धाव

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :मुंबई महापालिका आयुक्तपदी विराजमान झाल्यानंतर आश्विनी भिडे यांनी महापालिका रुग्णालयाला भेटी देवून तेथील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर आरोग्य विभागाच्या अतिरिक्त आयुक्तांना रुग्णालयात जाण्याची इच्छा प्रकट झाली. अतिरिक्त आयुक्त डॉ विपिन शर्मा यांनी सोमवारी एम.व्ही.देसाई रुग्णालयाला भेटी देवून तेथील रुग्णांशी संवाद साधला आहे.मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा यांनी सोमवारी २० एप्रिल २०२६ रोजी मालाड पूर्व परिसरात असणाऱ्या महानगरपालिकेच्या मनोहर वामन देसाई रुग्णालयाला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभाग, अतिदक्षता विभाग आणि रुग्णालयातील विविध विभागांना भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी रुग्णालयात वैद्यकीय उपचारांसाठी आलेल्या रुग्णांशीही संवाद साधला. त्याचबरोबर रुग्णालयात कार्यरत असणारे डॉक्टर, परिचारिका आणि संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्याशी देखील त्यांनी संवाद साधून तेथील परिस्थितीची माहिती घेतली.डॉ विपिन शर्मा यांच्याकडे मागील अनेक महिन्यांपासून आरोग्य विभागचा पदभार असून आजवर या रुग्णलयांना कधीही त्यांनी भेटी दिल्या नाहीत.पण आयुक्तांनी आता भेटी देवून आढावा घेण्यास सुरुवात केल्यानंतरही त्यांनाही आता रुग्णालयात जाण्याची वेळ आली.अतिरिक्त आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या या दौ-या दरम्यान त्यांच्या समवेत महानगरपालिकेच्या उपनगरीय रुग्णालयांचे प्रमुख वैद्यकीय अधीक्षक व खाते प्रमुख डॉक्टर चंद्रकांत पवार हे देखील उपस्थित होते. डॉ. शर्मा यांनी आजच्या भेटीदरम्यान रुग्णालयातील यंत्रसामग्री, रुग्णवाहिका तसेच रुग्णालयाशी संबंधित विविध बाबींचा आढावा घेऊन तेथील परिस्थिती बाबत संबंधितांशी सविस्तर चर्चा केली. तसेच डॉक्टर, परिचारिका व वैद्यकीय सेवा सुविधा देणाऱ्या संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संवाद साधताना डॉ. शर्मा यांनी आवर्जून निर्देशित केले की, रुग्णालयातील डॉक्टर आणि वैद्यकीय सेवा सुविधा देणारे संबंधित कर्मचारी या सर्वांनी रुग्णालयात वैद्यकीय उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांशी अधिकाधिक सौहार्दपूर्ण पद्धतीने संवाद साधावा आणि रुग्णांचे समुपदेशन योग्य रीतीने करावे. रुग्णालयातील स्वच्छता व सेवा सुविधा याबाबत डॉ. शर्मा यांनी समाधान व्यक्त केले.मनोहर वामन देसाई रुग्णालय हे मालाड पूर्व परिसरात असणारे महानगरपालिकेचे एक महत्त्वाचे रुग्णालय आहे. १८० खाटांचे हे रुग्णालय सन १९७६ पासून मुंबईकरांना वैद्यकीय सेवा सुविधा देत आहे. या रुग्णालयाची बाह्य रुग्ण नोंदणी कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी ८ ते ११ यादरम्यान सुरू असते, अशी माहिती देखील रुग्णालय प्रशासनाद्वारे या निमित्ताने कळविण्यात आली आहे.

फीड फीडबर्नर 20 Apr 2026 10:30 pm

India-US FTA: अमेरिकेसोबतचा मुक्त व्यापार करार जवळपास अंतिम; वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची माहिती

India-US FTA: गेल्या आर्थिक वर्षात देशाची अमेरिकेला होणारी निर्यात 0.92 टक्क्यांनी वाढून 87.3 अब्ज डॉलर्सवर पोहोचली, तर आयात 15.95 टक्क्यांनी वाढून 52.9 अब्ज डॉलर्स झाली.

दैनिक प्रभात 20 Apr 2026 10:29 pm