'मदर ऑफ ऑल डिल्स'असं म्हणत भारत आणि युरोपमधील मुक्त कराराचे पंतप्रधानांकडून कौतुक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोवा येथे होणाऱ्या 'इंडिया एनर्जी वीक (IEW) २०२६' च्या चौथ्या आवृत्तीचे ऑनलाईन उद्घाटन केले. या कार्यक्रमात बोलत असतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत आणि युरोपियन युनियनमधील मुक्त व्यापार कराराचे वर्णन 'मदर ऑफ ऑल डिल्स' असे करत कौतुक केले आहे. या करारामुळे जगाचा भारतावरील विश्वास वाढला आहे, असे देखील ते यावेळी म्हणाले.भारत आणि युरोपियन युनियन मंगळवार, २७ जानेवारी रोजी ऐतिहासिक मुक्त व्यापार कराराची म्हणजेच एफटीएची घोषणा करणार आहेत. या एफटीएच्या माध्यमातून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टैरिफ धोरणांमुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेला तोंड देण्यासाठी दोन्ही देश सर्वसमावेशक दृष्टीकोन तयार करतील अशी अपेक्षा वर्तवण्यात येत आहे.इंडिया एनर्जी वीक या कार्यक्रमात नेमकं काय बोलले पंतप्रधान मोदी जाणून घेऊया :भारत आता ऊर्जा विकासावर काम करत आहे. भारत वाहतुकीवरही काम करत आहे. एनर्जी वीकच्या या नवीन आवृत्तीसाठी आज सुमारे १२५ देशांचे प्रतिनिधी गोव्यात जमत आहेत. जे ऊर्जा सुरक्षित आणि शाश्वत भविष्याबद्दल चर्चा करत आहेत. पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की; तुम्ही सर्वजण ऊर्जा सुरक्षित आणि शाश्वत भविष्याबद्दल चर्चा करण्यासाठी भारतात आला आहात. मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. कालच, भारत आणि युरोपियन युनियनने एका मोठ्या करारावर स्वाक्षरी केली. जगभरातील लोक मदर ऑफ ऑल डिल्स म्हणून त्याची चर्चा करत आहेत. हा करार १४० कोटी भारतीयांसाठी तसेच युरोपातील अनेक नागरिकांसाठी फायद्याचा ठरणार आहे.PM @narendramodi’s remarks during the India Energy Week. https://t.co/AzhUyYCQR0— PMO India (@PMOIndia) January 27, 2026जगातील दोन सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांमधील समन्वय :भारत आणि युरोपियन युनियनमध्ये होणाऱ्या कराराबद्दल पंतप्रधान मोदी म्हणाले, हा करार जगातील दोन सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांमधील समन्वयाचे एक उत्तम उदाहरण आहे. हा करार जागतिक जीडीपीच्या जवळपास २५ टक्के आणि जागतिक व्यापाराच्या जवळपास एक तृतीयांश भागाचे प्रतिनिधित्व करतो. हा करार व्यापारासोबतच लोकशाही आणि कायद्याच्या राज्याप्रती आपली सामायिक वचनबद्धता मजबूत करतो.गुंतवणूकदारांसाठी मोठा फायदा :भारतातील वाढत्या संधींचा उल्लेख करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, जगाची मागणी पूर्ण करण्यासाठी भारत देखील उत्कृष्ट संधी प्रदान करतो. आज, आम्ही जगातील पेट्रोलियम उत्पादनांच्या टॉप ५ निर्यातदारांपैकी एक आहोत. आमची निर्यात व्याप्ती १५० हून अधिक देशांमध्ये पसरलेली आहे. भारतातील या वाढत्या संधी तुम्हाला फार उपयोगात येणार आहेत. म्हणूनच, एनर्जी वीकचे हे व्यासपीठ आमच्या भागीदारीचा शोध घेण्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे. आमच्याकडे प्रचंड शुद्धीकरण क्षमता आहे. शुद्धीकरण क्षमतेत आम्ही जगात दुसऱ्या क्रमांकावर आहोत आणि लवकरच पहिल्या क्रमांकावर येऊ. आज, भारताची शुद्धीकरण क्षमता अंदाजे २६० एमएमटीपीए आहे. ती ३०० एमएमटीपीए पर्यंत वाढवण्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. गुंतवणूकदारांसाठी हा एक मोठा फायदा आहे.
बंगळुरू : कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये एका क्रिकेट सामन्यानंतर झालेल्या वादाचे पर्यावसान भीषण हत्याकांडात झाले आहे. किरकोळ वादातून एका २७ वर्षीय तरुणाने आपल्या मित्राच्या चालत्या कारला लटकून थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र मित्राने क्रूरतेचा कळस गाठत कार थेट झाडावर आदळली. या भीषण अपघातात कारला लटकलेल्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून, हा सर्व अंगावर शहारे आणणारा प्रकार कारच्या डॅशकॅममध्ये कैद झाला आहे.नेमकी घटना काय?मिळालेल्या माहितीनुसार, मृत प्रशांत (वय २८, रा. हेब्बागोडी) आणि त्याचा मित्र रोशन हेगडे (वय २७) हे एका स्थानिक क्रिकेट स्पर्धेत सहभागी झाले होते. या स्पर्धेत त्यांच्या संघाचा पराभव झाला, ज्यावरून मैदानावरच दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली. संध्याकाळी दोघांनी एकत्र मद्यपान केले, मात्र क्रिकेटमधील पराभवाचा राग शांत झाला नव्हता. मद्याच्या नशेत हा वाद पुन्हा उफाळून आला.डॅशकॅममधील तो भयानक थरारवाद वाढल्यानंतर रोशन आपल्या कारमध्ये बसून निघून जाऊ लागला. त्याला थांबवण्यासाठी प्रशांतने धावत्या कारच्या डाव्या बाजूच्या खिडकीचा दरवाजा घट्ट पकडला. प्रशांत कारला लटकलेला असतानाही रोशनने गाडीचा वेग कमी केला नाही. संतापलेल्या रोशनने जाणूनबुजून कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर नेऊन आदळली. या धडकेत गाडीचा दरवाजा आणि झाड यामध्ये प्रशांत चिरडला गेल्याने तो गंभीर जखमी झाला.पोलिस कारवाई आणि गुन्ह्याची नोंदअपघातानंतर प्रशांतला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, परंतु वाटेतच त्याची प्राणज्योत मालवली. कार चालक रोशन हेगडे हा देखील या अपघातात गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी कारमधील डॅशकॅम फुटेज जप्त केले असून, त्या आधारे रोशनविरुद्ध खुनाचा (Murder) गुन्हा दाखल केला आहे.
UGC Protest : दिल्लीतील यूजीसी मुख्यालयाबाहेर निदर्शने ; भाजपमध्येही नवीन नियमांना विरोध तीव्र
UGC Protest : उच्च शिक्षणावरून एक नवीन वाद निर्माण झाला आहे. यूजीसीच्या नवीन उच्च शिक्षण संस्थांमध्ये समानता नियमावली, २०२६ मुळे राजकीय वादळ निर्माण झाले आहे.
Sayaji Shinde : AIMIM पक्षाच्या नगरसेविका सहर शेख यांच्या वादग्रस्त विधानावर अभिनेते सयाजी शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या उत्साहाला गालबोट; स्पीकर कोसळून तीन वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
सोमवार २६ जानेवारी रोजी स्पीकर कोसळून एका तीन वर्षांच्या चिमूरडीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना विक्रोळी येथे घडली. विक्रोळीच्या टागोर नगरमधील आंबेडकर नगर परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला.सोमवारी संपूर्ण भारत देशात ७७ व्या प्रजासत्ताक दिनाचा जल्लोष सुरू असताना विक्रोळीत मात्र या उत्साहाला गालबोट लागलं आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त लावण्यात आलेला स्पीकर कोसळून एका चिमूरडीचा मृत्यू झाला आहे. तिच्या या मृत्यूला एक चिंधीवाला जबाबदार आसल्याचे समोर आले आहे. सिसिटीव्हीच्या फुटेजमधून चिंध्या गोळ्या करणाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात घडल्याचे समोर आले.तीन वर्षांची चिमूरडी रस्त्यावरून धावत जात असताना तिच्या अंगावर हा स्पीकर कोसळला. सिसिटीव्ही फुटेज नुसार,चिंध्या गोळ्या करणाऱ्याच्या डोक्यावर असलेलं गाठोड स्पीकरच्या वायरमध्ये अडकून तो स्पीकर त्या मुलीच्या अंगावर पडून ती गंभीर जखमी झाली. मात्र उपचरसाठी रुग्णालयात दाखल करण्याच्या आतच तिचा मृत्यू झाला.या घटनेची विक्रोळी पोलिस ठाण्याकडून दखल घेण्यात आली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. तर दुसरीकडे पुण्यात देखील आपघातांची मालिका सुरूच आहे. या अपघातात आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. पाषाण, पुणे - सोलापूर महामार्ग आणि मुंबई - बेंगळुरू मार्ग या परिसरांत हे अपघात घडले आहेत.पाषाण परिसरात भरधाव वाहनाच्या धडकेत एका ७३ वर्षीय ज्येस्ष्ठ महिलेचा मृत्यू झाला आहे. अतुल विजयकुमार पाटील यांनी या घटनेची तक्रार चतु:शृंगी पोलिस ठाण्यात नोंदवली आहे. त्यानुसार पोलिसांनी त्या वाहनचालकावर गुन्हा दाखल केला आले. हा अपघात शनिवार २४ जानेवारी रोजी सकाळी घडला.दुसरी घटना मुंबई - बेंगळुरू मार्गावर घडली. रस्त्यात थांबलेल्या ट्रकवर मोटार आदळून हा अपघात घडला. भीमा राजेंद्र जाधव असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असून शुभम डुबळे असे मोटारचालकाचे नाव आहे. या प्रकरणी आंबेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून त्यानुसार ट्रकचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार शुभम आणि त्याचा मित्र भीमा हे दिवे घाट परिसरातील श्री कानिफनाथ मंदिरात दर्शनासाठी गेले होते. आंबेगाव परिसरातील बाबाजी पेट्रोल पंपासमोर रस्त्याच्या कडेला ट्रक थांबला होता. ट्रक चालकाने पाठीमागील दिवे सुरू ठेवले नव्हते. रस्त्यात अंधारात थांबलेला ट्रक मोटारचालक शुभम याला दिसला नसल्याने त्या ट्रकवर माेटार आदळून मोटारचालक शुभम आणि त्याचा मित्र भीमा हे जखमी झाले. मात्र भीमा याचा मृत्यू झाला.
पुणे : पुण्यातील वाघोली परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका आईनेच आपल्या पोटच्या ११ वर्षांच्या मुलाची निर्घृण हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एवढेच नाही, तर या क्रूर मातेने आपल्या १३ वर्षांच्या मुलीलाही जीवे मारण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने मुलगी या हल्ल्यातून बचावली असून तिची मृत्यूशी झुंज सुरू आहे. वाघोलीतील 'बाईफ रोड' परिसरात वास्तव्यास असलेल्या सोनी संतोष जायभाय (मूळ रा. कंधार, जि. नांदेड) या महिलेने हे टोकाचे पाऊल उचलले. घरगुती कारणातून किंवा मानसिक तणावातून हे कृत्य घडले असावे, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. या हल्ल्यात ११ वर्षीय साईराज संतोष जायभाय याचा जागीच मृत्यू झाला. मुलाची हत्या केल्यानंतर आरोपी महिलेने १३ वर्षांच्या धनश्री जायभाय हिच्यावरही प्राणघातक हल्ला चढवला. गंभीर जखमी झालेल्या धनश्रीला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच लोणी कंद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून आरोपी महिलेला ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. एका आईनेच असं टोकाचं पाऊल का उचललं, या प्रश्नाने संपूर्ण पुणेकर सुन्न झाले आहेत.https://prahaar.in/2026/01/27/aiims-bhopal-security-breach-female-employee-robbed-inside-elevator-cctv-video-viral/'त्या' पाषाणहृदयी मातेच्या कृत्याने पोलीसही सुन्नअवघ्या दोन दिवसांत वाघोलीत ही दुसरी मोठी गुन्हेगारी घटना घडल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण आहे. आरोपी आईने आपल्या मुलाची हत्या केल्यानंतर घराच्या पांढऱ्याशुभ्र फरशीवर पडलेले रक्ताचे डाग या घटनेच्या भीषणतेची साक्ष देत आहेत. या घटनेमुळे पुण्याच्या पूर्व भागातील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. लोणी कंद पोलिसांनी आरोपी महिलेला तात्काळ ताब्यात घेतले आहे. मात्र, तिने आपल्या पोटच्या गोळ्यावर वार का केले? हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. हा प्रकार कौटुंबिक वादातून घडला की संबंधित महिला काही मानसिक तणावाखाली होती, या दिशेने पोलिसांचा तपास सुरू आहे. वाघोली परिसरात सातत्याने वाढणाऱ्या गुन्हेगारी घटनांमुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे सर्वसामान्यांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे.
Winter Storm in America : अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर हिमवादळाने कहर केला आहे. या हिवाळ्यातील वादळाने न्यूयॉर्क, न्यूजर्सी, मॅसॅच्युसेट्स आणि न्यू इंग्लंडच्या अनेक भागांना तडाखा दिला आहे.
Health Tips: उठताच चक्कर येणे म्हणजे काय? जाणून घ्या कारणे आणि उपाय
Health Tips: कधी कधी झोपेतून किंवा बसलेल्या अवस्थेतून अचानक उभं राहताच डोळ्यांसमोर अंधारी येते, डोकं गरगरतं किंवा तोल जातो. बहुतांश लोक हे थकवा, अशक्तपणा किंवा कमी झोप यामुळे होतं असं समजून दुर्लक्ष करतात.
Mumbai Municipal Commissioner : मुंबई महापालिकेचा महापौर कोण होणार याची उत्सुकता वाढली आहे. सध्याचे पालिका आयुक्त भूषण गगरानी दोन महिन्यात सेवानिवृत्त होणार आहेत.
मजबूत तिमाही निकाल व ताळेबंदीनंतर ॲक्सिस बँकेच्या शेअर्समध्ये ६% तुफान वाढ
मोहित सोमण: आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सकाळच्या सत्रात घसरण झाली. प्रामुख्याने जागतिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारात गुंतवणूकदारांनी विक्रीच्या दबावामुळे सेल ऑफ केले असले तरी सकाळी इंट्राडे स्तरावर ॲक्सिस बँकेच्या शेअर्समध्ये तुफान वाढ झाली आहे. तिमाही निकालानंतर गुंतवणूकदारांनी शेअरला मोठा प्रतिसाद देताना सत्राच्या सुरुवातीला तर ६% इंट्राडे वाढ शेअरने नोंदवली आहे. सकाळी ११ वाजता बँकेच्या शेअर्समध्ये ५.५२% वाढ झाल्याने शेअर १३२७.४० रूपयांवर व्यवहार करत आहे. बँकेने काल उशीरा प्रजासत्ताक दिनी तिमाही निकाल जाहीर केला. ज्यामध्ये बँकेच्या निव्वळ नफ्यात इयर ऑन इयर बेसिसवर २.९०% वाढ झाली होती. डिसेंबर महिन्यात इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) ६३०४ कोटीवरून ही वाढ ६४९० कोटींवर पोहोचली. तर बँकेच्या निव्वळ व्याज उत्पन्नात (Net Interest Income NII) इयर ऑन इयर बेसिसवर ५% वाढ झाली असून ती १३६०६ कोटीवरून १४२८७ कोटींवर पोहोचली आहे.तर बँकेच्या ऑपरेटिंग नफ्यात इयर ऑन इयर बेसिसवर ३.२०% वाढ झाली असून ती वाढ १०५३४ कोटीवरून यंदाच्या तिमाहीत १०८७६ कोटीवर पोहोचली आहे. तर बँकेच्या निव्वळ एनपीएत (Net Non Performing Assets NPA) तिमाही बेसिसवर (QoQ) ०.४४% वरून ०.४२% घसरण झाली आहे. तर स्थूल एनपीएत (Gross NPA) १.४६% वरून १.४०% वर घसरण झाली जी सकारात्मक बाब होती. उपलब्ध माहितीनुसार, बँकेच्या प्रोविजनिंगमध्ये ४.२% वाढ झाली आहे गेल्या वर्षीच्या डिसेंबर तिमाहीतीलह२१५६ कोटी तुलनेत ती वाढत २२४६ कोटींवर वाढली आहे.एकूणच स्थिर निव्वळ व्याज उत्पन्न (NII) आणि मजबूत शुल्क उत्पन्नामुळे बँकेची आर्थिक कामगिरी व स्थिती मजबूत झाली आहे. बँकेने चांगली CASA (Current Account Saving Account CASA) मध्येही वाढ नोंदवल्याने ठेवींमध्येही वाढ नोंदवली असून किरकोळ आणि लहान कर्जांच्या वितरणात सातत्याने वाढ झाल्यामुळे कर्ज वाटपातील वाढही नोंदवली आहे. तर एनपीएतही घसरण व प्रोविजनिंगमध्ये वाढ नोंदवल्याने बँकेच्या ताळेबंदीत चांगली कामगिरी असल्यचे दिसून येते. असेट क्वालिटीत सुधारणा झाली असताना गुंतवणूकदारांनी शेअर खरेदीत वाढ केल्याने आज शेअर मोठ्या प्रमाणात उसळला होता. गेल्या ५ दिवसांत बँकेच्या शेअर्समध्ये १.७२%, एक महिन्यात ७.७४% व वर्षभरासाठी ४०.०१% वाढ झाली आहे. तर इयर टू डेट बेसिसवर (YTD) शेअर्समध्ये ४.१६% वाढ झाली असल्याचे आकडेवारीत स्पष्ट होते. विशेष म्हणजे कुठल्याही ब्रोकरेजने शेअरला 'विक्रीचा' कॉल दिलेला नाही.
Alankar Agnihotri : यूजीसी नियमांच्या विरोधात राजीनामा देणारे उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातील शहर दंडाधिकारी अलंकार अग्निहोत्री यांच्यावर योगी सरकारने कारवाई केली आहे.
शाहरुख खानच्या 'किंग'चित्रपटाचा प्रोमो समोर; रिलीज तारीख जाहीर...
मुंबई : चित्रपट सृष्टीतील सर्वांचा आवडता अभिनेता शाहरुख खान. शाहरुख खानचा बहुप्रतीक्षित चित्रपट 'किंग'ची आतुरतेनं प्रेक्षक वाट पाहत आहेत. शाहरुख खानने त्याच्या किंग या चित्रपटाचा प्रोमो आणि रिलीज डेटची घोषणा केली आहे. या घोषणेमुळे प्रेक्षकवर्गाची आतुरता वाढली आहे. 'किंग खान' हा चित्रपट २४ डिसेंबर २०२६ जी रिलीज होणार आहे. दरम्यान २४ जानेवारी रोजी चित्रपटाच्या निर्मात्यांनी शाहरुख खानला हाय-ऑक्टेन अॅक्शन मोडमध्ये दाखवणारा प्रोमो रिलीज केल्यानंतर अनेकजण प्रभावित झाले आहेत.शाहरुख खान किंग ऑफ द रिंग्जच्या भूमिकेत बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार हे आता प्रोमो पाहूण सिद्ध होत आहे. हा चित्रपट 'जवान'प्रमाणेच खूप दमदार असणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करत आहेत.शाहरुख खानचा फर्स्ट लूक प्रदर्शित :शाहरुख खाननं त्याच्या इंस्टाग्रामवर फर्स्ट लूक शेअर केला आहे, ज्यामध्ये तो दमदार दिसत आहे. यात त्याने रक्ताने माखलेला पांढरा शर्ट घातला आहे, आणि तो रागानं एका इमारतीवर हल्ला करताना दिसत आहे. प्रोमोमध्ये, शाहरुख खाननं संकेत दिला की, त्याचा करिष्मा पुन्हा एकदा पडद्यावर दिसेल. या चित्रपटात शाहरुख खानबरोबर दीपिका पदुकोण देखील दिसणार आहे. दरम्यान यापूर्वी अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि शाहरुख खान यांनी 'पठाण' आणि 'जवान' या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले आहे, त्यामुळं हा चित्रपट देखील खूप धमाकेदार असणार असेही आता यूजर्स म्हणताना सोशल मीडियावर दिसत आहेत.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या झंझावाती प्रचार दौऱ्याचा महाबळेश्वर मधून सुरवात
जिल्हा परिषद पंचायत समिती प्रचाराचे फुंकले रणशिंग२८ जानेवारी ते ३ फेब्रुवारी पर्यंत उपमुख्यमंत्री शिंदे राज्यभर घेणार प्रचार सभासातारा ( महाबळेश्वर) : राज्यातील महानगरपालिका निवडणुकांचा धुरळा खाली बसतो ना बसतो तोच १२ जिल्ह्यातील जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कंबर कसली असून त्यांची सुरवात आज सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील तळदेव येथे घेतलेल्या प्रचार सभेद्वारे करण्यात आली.या झंझावाती प्रचार दौऱ्यात उपमुख्यमंत्री शिंदे हे २८ जानेवारी रोजी परभणी, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यात, तर २९ जानेवारी रोजी सोलापूर धाराशिव येथे, तर ३० जानेवारी रोजी पुणे सांगली जिल्ह्यात, ३१ जानेवारी रोजी सातारा जिल्ह्यात, १ फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यात तर २ फेब्रुवारी रोजी छत्रपती संभाजी नगर आणि रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेच्या उमेवारासाठी प्रचारसभा आणि रोड शो घेणार आहेत. निवडणुका म्हटल्या की शिंदे प्रचारात कोणतीही कसूर ठेवत नाहीत त्याचाच प्रत्यय पुन्हा एकदा या प्रचार दौऱ्याच्या दरम्यान आल्याशिवाय राहणार नाही.यापूर्वी विधानसभा निवडणुकीत त्यांनी ७१ प्रचार सभा घेतल्या होत्या, नगरपालिका निवडणुकीत ५४ प्रचार सभा घेतल्या होत्या, त्यानंतर नुकत्याच पार पाडलेल्या मनपा निवडणुकीत त्यांनी २९ प्रचारसभा २० रोड शो मध्ये सहभाग घेतला होता. त्यानंतर आता ते पुन्हा एकदा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत.आज तळदेव येथे पहिली सभा पार पडल्यानंतर उद्या सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील मेढा येथे त्यांची दुसरी प्रचारसभा पार पडणार आहे.नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेला दुसऱ्या क्रमांकावर आणल्यानंतर आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत देखील पक्षाचा हाच दबदबा कायम राखण्यासाठी शिंदे मैदनात उतरले असून, येत्या आठवडाभर आपल्या प्रचार सभांनी ते महाराष्ट्र पिंजून काढत पुन्हा एकदा पक्षाची यशस्वी घडदौड कायम राखण्यासाठी ते पूर्ण ताकतीने मैदानात उतरणार आहेत.
Girish Mahajan : “बाबासाहेबांचं नाव घेण्याची लाज वाटत असेल तर यांना देशात राहण्याचा अधिकार आहे का?”
Girish Mahajan : काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर साधला निशाणा
Karisma Kapoor: बॉलीवूडमधील प्रसिद्ध कपूर घराणं हे केवळ सिनेसृष्टीतल्या योगदानासाठीच नव्हे, तर त्यांच्या खानपानाच्या खास संस्कृतीसाठीही ओळखलं जातं.
भोपाळ : देशातील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या 'एम्स' (AIIMS) रुग्णालयातून सुरक्षेला आव्हान देणारी एक अत्यंत गंभीर घटना समोर आली आहे. रुग्णालयातील स्त्रीरोग विभागात कार्यरत असलेल्या वर्षा सोनी या महिला कर्मचाऱ्याला लिफ्टमध्ये एका अज्ञात तरुणाने लुटल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेमुळे रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून महिला कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वर्षा सोनी या रक्ताच्या पेढीमागील लिफ्टने जात असताना ही घटना घडली. लिफ्टमध्ये एकटाच असलेल्या आणि मास्क घातलेल्या एका तरुणाने संधी साधून वर्षा यांच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरदस्तीने खेचले आणि फरार झाला. ही संपूर्ण घटना लिफ्टमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाली आहे. रुग्णालयासारख्या गर्दीच्या आणि संवेदनशील ठिकाणी भरदिवसा अशी घटना घडल्याने आरोग्य सेवा क्षेत्रातील महिलांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त खेळू जात आहे. गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरला आहे की नाही? असा संतापजनक प्रश्न उपस्थित होत आहे. एम्ससारख्या हाय-प्रोफाईल संस्थेत जर महिला कर्मचारी सुरक्षित नसतील, तर सर्वसामान्यांचे काय, अशी चर्चा आता रंगली आहे.क्षणार्धात गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले अन्...Even AIIMS Bhopal isn’t safe. A woman was robbed inside a hospital elevator. No guard. CCTV caught it.Under BNS, robbery became snatchingmax 3 yrs, easy bail. Result? Snatching cases explode. Fear of law vanishes. pic.twitter.com/b4lwbHiFhf— Anurag Dwary (@Anurag_Dwary) January 26, 2026रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने रुग्णालयात तुलनेने सुरक्षा व्यवस्था कमी होती, याचाच फायदा घेऊन एका सराईत चोरट्याने हा धाडसी गुन्हा केला. अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पत्ता विचारण्याच्या बहाण्याने चोरट्याने महिला कर्मचाऱ्याला गाठले आणि संधी मिळताच लूट केली. वर्षा सोनी या लिफ्टने जात असताना आरोपीने लिफ्टमध्ये प्रवेश केला. त्याने वर्षा यांना 'नेत्ररोग विभाग' कुठे आहे, अशी विचारणा करून संशय येणार नाही याची काळजी घेतली. लिफ्ट तिसऱ्या मजल्यावर पोहोचताच, बाहेर पडण्याच्या बहाण्याने चोरट्याने अचानक वर्षा यांच्या गळ्यातील सोन्याची मोत्यांची माळ आणि मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न केला. वर्षा यांनी हिंमतीने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, मात्र चोरट्याने त्यांना जोरात धक्का देऊन खाली पाडले आणि मंगळसूत्र घेऊन पसार झाला. हा सर्व प्रकार लिफ्टमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून त्यात चोरट्याची क्रूरता स्पष्टपणे दिसत आहे. घटनेच्या वेळी लिफ्ट परिसरात एकही सुरक्षा रक्षक तैनात नव्हता. बराच वेळ पीडित महिला तिथे रडत बसली होती. त्यानंतर एका गार्डने त्यांना पाहिले. बागसेवनिया पोलीस ठाण्यात तक्रार देऊनही अद्याप एफआयआर (FIR) नोंदवण्यात आलेला नाही, यामुळे संताप व्यक्त होत आहे.https://prahaar.in/2026/01/27/kolkata-massive-fire-at-warehouse-8-death-and-20-missing-rescue-operations-underway/'BNS' कायद्यातील लवचिकतेमुळे गुन्हेगारांचे धाडस वाढले?भोपाळच्या 'एम्स' रुग्णालयातील लिफ्टमध्ये झालेल्या लुटीच्या घटनेने केवळ सुरक्षेचाच नाही, तर नवीन भारतीय न्याय संहिता (BNS) कायद्यातील बदलांचा मुद्दाही ऐरणीवर आणला आहे. तज्ज्ञांच्या मते, कायद्यातील काही कलमांची तीव्रता कमी झाल्यामुळे गुन्हेगारांमधील पोलिसांचा आणि शिक्षेचा धाक ओसरला आहे की काय, अशी भीती आता व्यक्त केली जात आहे. जुन्या कायद्यानुसार दरोडा, लूटमार किंवा चेन स्नॅचिंगसारख्या गंभीर गुन्ह्यांसाठी १० ते १४ वर्षांच्या कडक कारावासाची तरतूद होती. मात्र, नवीन 'बीएनएस' कायद्यांतर्गत यातील काही गुन्ह्यांसाठी कमाल शिक्षेची मर्यादा केवळ ३ वर्षांपर्यंत खाली आली आहे. नव्या कायद्यात अनेक गुन्ह्यांमध्ये अटक करणे अनिवार्य राहिलेले नाही. पोलीस आता आरोपींना केवळ नोटीस बजावून सोडू शकतात. अटकेची सक्ती नसल्याने गुन्हेगारांना मोकळे रान मिळत असल्याचा आरोप होत आहे. शिक्षेची तीव्रता कमी झाल्याचा परिणाम थेट जमिनीवर दिसून येत आहे. गुन्हेगारांना तात्काळ जामीन मिळणे किंवा कमी शिक्षेची खात्री असल्याने सार्वजनिक ठिकाणी लूटमारीचे धाडस वाढले आहे.
NATO Chief Mark Rutte : मागच्या काही दिवसांपासून अमेरिका आणि युरोपियन युनियन यांच्यात तणाव वाढला आहे.
भारतीय इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सकाळी घसरणच अस्थिरता निर्देशांक १३% वर 'या'कारणामुळे
मोहित सोमण: भारत व ईयु एफटीएसाठी अनिश्चितता व युएस इराण यांच्यातील वाढत्या तणावामुळे गुंतवणूकदारांनी आज एकदा अस्थिर कौल दिला आहे.त्यामुळे सकाळच्या सत्रात इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सकाळच्या सत्रात घसरण झाली. सेन्सेक्स २९१.२४ व निफ्टी ७३.६० अंकांने कोसळला आहे. सेन्सेक्स बँक निर्देशांकात वाढ झाली असताना बँक निफ्टीत घसरण झाली आहे. विशेष उल्लेख म्हणजे अस्थिरता निर्देशांक (VIX Volatility Index) हा १२.९२% जवळपास १३% उसळल्याने बाजारात मोठी अस्थिरता अधोरेखित होते. मिड स्मॉल कॅप शेअर्समध्येही मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याने बाजारात तेजीची मानसिकता नसल्याचे अधोरेखित झाले. सुरूवातीच्या करात आज सर्वाधिक घसरण मेटल वगळता कुठल्याही शेअर्समध्ये वाढ झालेली नाही. सर्वाधिक घसरण मिडिया, रिअल्टी,ऑटो, कंज्यूमर ड्युरेबल्स या शेअर्समध्ये झाली आहे. सकाळच्या सत्रात सर्वाधिक वाढ केपीआर मिल्स (१०.५०%), एक्सिस बँक (१०%), रेनबो चाईल्ड (८.७२%), सोना बीएलडब्लू प्रिसीजन (७.४३%), एमसीएक्स (७.३६%), लेमन ट्री हॉटेल्स (६.३५%), युटीआय एएमसी (५.३८%) समभागात झाली असून सर्वाधिक घसरण आर आर केबल्स (१९.८७%), केपीआयटी टेक्नॉलॉजी (१०%), गो डिजिट जनरल (७.१२%), आवास फायनांसर (६.७६%), इंटलेक्ट डिझाईन (६.२६%), कल्पतरू प्रोजेक्ट (५.९९%), ईरीस लाईफसायन्स (५.७४%), ब्रेनबीज सोलूशन (५.०६%) समभागात झाली आहे.
बुलढाण्यात झेंडावंदन कार्यक्रमात मुख्याध्यापकांचा हृदयविकाराच्या झटक्यानी मृत्यू; गावात पसरली शोककळा
बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यात हृदय पिळवणारी घटना घडली आहे. ७७ व्या प्रजासत्ताक दिनी सगळीकडे उत्साहाचं वातावरण असताना या आनंदात मिठाचा खडा पडला. मोताळा तालुक्यातील मोहेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झेंडावंदन कार्यक्रम सुरू होता. त्या दरम्यान शाळेतील मुख्याध्यापक दिलीप राठोड यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला . ही घटना झेंडावंदनाच्या कार्यक्रमादरम्यान घडल्यामुळे नागरिक, उपस्थित शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थांमध्ये मोठी शोककळा पसरली आहे.दिलीप राठोड हे शाळेचे मुख्याध्यापक म्हणून जबाबदारीनं काम करत होते. प्रजासत्ताक दिनाच्या राष्ट्रध्वज फडकावण्याच्या क्षणीच त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, हृदयविकाराचा झटका इतका तीव्र होता की तत्काळ उपचार मिळाले तरी वाचवणं शक्य झालं नाही. या घटनेनं संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातील शिक्षणवर्ग आणि ग्रामीण भागात शोकाची लाट पसरली आहे. अनेकांनी सोशल मीडियावर आणि स्थानिक पातळीवर शोक व्यक्त केला आहे. प्रजासत्ताक दिनासारख्या राष्ट्रीय उत्सवात अशी दुर्दैवी घटना घडणं हे अत्यंत दुःखद आहे. दिलीप राठोड यांनी शिक्षण क्षेत्रात दिलेल्या योगदानाची आठवण कायम राहील. त्यांच्या कुटुंबीयांना, सहकारी शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना या अपरिहार्य नुकसानीचे सांत्वन करणे कठीण आहे. स्थानिक प्रशासनानं या घटनेची दखल घेऊन आवश्यक मदत आणि चौकशी करण्याची अपेक्षा सर्वच स्तरातून व्यक्त होत आहे.या घटनेमुळे हृदयविकाराच्या वाढत्या समस्येकडंही लक्ष वेधलं जात आहे. ह्या घटना विशेषतः तणावपूर्ण कामकाज आणि वयस्क व्यक्तींमध्ये आढळून येत आहे . आरोग्य तज्ज्ञांनी नियमित तपासणी आणि जीवनशैलीत बदल करण्याचं आवाहन केलं आहे.अशाच दुसऱ्या एका घटनेत, धाराशिव जिल्ह्यात प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमादरम्यान एका उत्पादन शुल्क उपनिरीक्षकाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला, असं एका अधिकाऱ्यानं सांगितलं. अधिकारी म्हणाले की, मोहन जाधव (५६) हे उमरगा तालुक्यातील तळमोडे सीमा तपासणी नाक्यावर ध्वजारोहणानंतर कर्मचाऱ्यांच्या सामूहिक छायाचित्रासाठी उभे असताना अचानक त्यांची प्रकृती बिघडली आणि ते कोसळले.जाधव यांना तातडीनं उमरगा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं, जिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला होता. ते सोलापूरच्या प्रतापनगर भागातील रहिवासी होते, असं अधिकाऱ्यानं सांगितलं. एका प्रत्यक्षदर्शीनं मोबाईलवर चित्रित केलेल्या व्हिडिओमध्ये जाधव यांचा तोल जाऊन ते खाली पडताना दिसत आहेत, त्यानंतर त्यांचे सहकारी त्यांच्या मदतीसाठी धावले.
Fire At Warehouse : १५ तास उलटले तरी आग... ८ जणांचा होरपळून मृत्यू, तर २० जण अजूनही बेपत्ता
कोलकाता : देशभरात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह असताना, कोलकात्याच्या आनंदपूर परिसरात सोमवारी पहाटे काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. एका सुक्या अन्नाचे उत्पादन करणाऱ्या कारखान्याला आणि शेजारील डेकोरेटरच्या गोदामाला भीषण आग लागली. तब्बल १५ तास उलटूनही आग पूर्णपणे नियंत्रणात आलेली नाही. या दुर्घटनेत आतापर्यंत ८ कामगारांचे मृतदेह हाती लागले असून, २० जण ढिगाऱ्याखाली बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. गोदामात मोठ्या प्रमाणात ज्वलनशील पदार्थ असल्याने आगीने रौद्र रूप धारण केले. प्रत्यक्षदर्शींच्या मते, आग इतकी वेगाने पसरली की कोणालाही बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा शोध घेण्यासाठी अग्निशमन दल जेसीबी मशीन्स आणि आधुनिक रोबोटिक कॅमेऱ्यांची मदत घेत आहे. सापडलेले मृतदेह पूर्णपणे जळाले असल्याने त्यांची ओळख पटवण्यासाठी आता डीएनए चाचणीची मदत घ्यावी लागणार आहे. बेपत्ता कर्मचारी पंकज हलदार याने मध्यरात्री ३:३० च्या सुमारास आपल्या नातेवाईकांना अखेरचा फोन केला होता. कारखान्याचा मुख्य दरवाजा बाहेरून बंद आहे, आम्ही भिंत तोडून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतोय, हे त्याचे शेवटचे शब्द ऐकून नातेवाईकांनी हंबरडा फोडला आहे.https://prahaar.in/2026/01/27/scattered-rain-likely-in-some-parts-of-mumbai/ऊर्जामंत्र्यांकडून घटनास्थळाची पाहणीआनंदपूर येथील सुक्या अन्नाच्या गोदामाला आणि मोमो फॅक्टरीला लागलेल्या आगीने रौद्र रूप धारण करण्यामागे कारखान्यातील ज्वलनशील पदार्थ कारणीभूत असल्याचे समोर आले आहे. रविवारी रात्री कारखान्यात 'नाईट शिफ्ट'चे काम जोरात सुरू असतानाच मध्यरात्री ३ च्या सुमारास ही दुर्घटना घडली. कारखान्यात साठवून ठेवलेले पाम तेल आणि स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचा एकामागोमाग एक स्फोट झाल्याने आगीने रौद्र रूप धारण केले, ज्यामुळे बचाव कार्यात मोठे अडथळे निर्माण झाले. गॅस सिलिंडरच्या स्फोटांमुळे आगीची तीव्रता एवढी वाढली की पहाटे लागलेली आग विझवण्यासाठी सकाळी ११ वाजेपर्यंत झुंज द्यावी लागली. अद्यापही काही ठिकाणी धुमसणारी आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून राज्याचे ऊर्जामंत्री अरुप बिस्वास यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. त्यांनी मदतकार्याचा आढावा घेतला असून, मृतांच्या आणि बेपत्ता लोकांच्या नातेवाईकांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. परिसरातील अरुंद रस्ते आणि आगीमुळे पसरलेल्या काळपट धुरामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना आत शिरताना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागला.
गंभीर आजार टाळण्यासाटी, वर्षातून एकदा करा ‘या’ चाचण्या
TOP BLOOD TESTS TO DO EVERY YEAR : गंभीर आजार वेळेवर ओळखता यावेत आणि ते टाळता यावेत यासाठी वर्षातून एकदा नियमित आरोग्य तपासणी (हेल्थ चेकअप) करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. रेगुलर ब्लड टेस्ट करणं तुमच्या एकूण आरोग्यावर लक्ष ठेवण्याचा एक महत्त्वाचा मार्ग आहे. ब्लड टेस्टमुळे शरीर वयानुसार कसे बदलते याचा मागोवा घेण्यास मदत होते. तसंच आरोग्याबद्दल माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत होते. प्रत्येक व्यक्तीने, विशेषतः ३० वर्षांनंतर, वर्षातून एकदा करून घ्याव्यात. ब्लड टेस्ट तुमच्या एकूण आरोग्याचे आणि कल्याणाचे एक महत्त्वाचे चित्र प्रदान करतात. चाचण्या आजार लवकर ओळखण्यास मदत करतात. चांगले आरोग्य राखण्यासाठी आणि लपलेल्या आरोग्य समस्या टाळण्यासाठी नियमित ब्लड टेस्ट करणं अत्यंत महत्त्वाचं आहे.महत्वपूर्ण ब्लड टेस्टची यादी पुढीलप्रमाणे :संपूर्ण रक्त गणना (CBC): नियमित संपूर्ण रक्त गणना चाचणी तुमच्या रक्तातील प्रत्येक प्रमुख पेशीच्या वेगवेगळ्या घटकांची पातळी मोजते, ज्यामध्ये हे समाविष्ट आहे. लाल रक्तपेशी (RBCs) पांढऱ्या रक्त पेशी (WBCs) प्लेटलेट्स हिमोग्लोबिन (लाल रक्तपेशींमधील प्रथिने) रक्तातील रक्ताचे प्रमाण सरासरी कॉर्पस्क्युलर व्हॉल्यूम पुरेशा रक्त पेशींचा अभाव व्हिटॅमिन बी६ किंवा बी१२ सारख्या पौष्टिक कमतरता ऊतींना सूज येणे लोहाची कमतरता संसर्गाची चिन्हेवय व गरजेनुसार अतिरिक्त चाचण्या ईसीजी (ECG) – हृदयाच्या कार्यासाठी छातीचा एक्स-रे / फुफ्फुस तपासणी – श्वसनासंबंधी आजारांसाठी थायरॉईड चाचणी (TSH) – वजन, थकवा, हार्मोन असंतुलनासाठीमहिलांसाठी विशेष पॅप स्मिअर टेस्ट – गर्भाशयाच्या कर्करोगासाठी मॅमोग्राफी / स्तन तपासणी – स्तन कर्करोगासाठी हिमोग्लोबिन व कॅल्शियम तपासणी पुरुषांसाठी विशेष PSA टेस्ट (५० वर्षांनंतर) – प्रोस्टेट तपासणीसाठीइलेक्ट्रोलाइट्स पॅनेल: मूलभूत इलेक्ट्रोलाइट्स चाचणीमध्ये रक्तातील काही खनिज संयुगे मोजणे समाविष्ट असते, जसे की... सोडियम पोटॅशियम मॅग्नेशियम क्लोराइड या पॅरामीटर्समधील असामान्यता डिहायड्रेशन, कुपोषण किंवा हार्मोनल असंतुलन इत्यादी दर्शवते.यकृत पॅनेलयकृत पॅनेल किंवा यकृत कार्य चाचणी यकृताद्वारे बनवलेले एंजाइम, प्रथिने आणि इतर पदार्थ यासारखे वेगवेगळे पॅरामीटर्स मोजते. अल्ब्युमिन अल्कलाइन फॉस्फेटेस (ALP) अॅ्लानाइन एमिनोट्रान्सफरेज (ALT) एस्पार्टेट एमिनोट्रान्सफेरेज (AST) बिलीरुबिन: या घटकांचे वाढलेले प्रमाण फॅटी लिव्हर, हिपॅटायटीस, सिरोसिस इत्यादी यकृताच्या आजारांचे संकेत देऊ शकते, तर कमी एएलपी पातळी हाडांच्या चयापचय विकारांचे निदान चिन्हक असू शकते.लिपिड पॅनेल: ही चाचणी रक्तातील वेगवेगळ्या प्रकारच्या कोलेस्टेरॉल आणि संबंधित चरबींचे स्तर दर्शवते. यामध्ये सहसा समाविष्ट असते: एचडीएल किंवा चांगले कोलेस्ट्रॉल एलडीएल किंवा वाईट कोलेस्ट्रॉल ट्रायग्लिसराइड्स एकूण कोलेस्टेरॉलथायरॉईड फंक्शन: थायरॉईड पॅनेल किंवा थायरॉईड फंक्शन टेस्ट, तुमचा थायरॉईड विशिष्ट हार्मोन्स कसा बनवत आहे आणि त्यांना कसा प्रतिसाद देत आहे हे तपासते. यामध्ये समाविष्ट आहे...ट्रायओडोथायरोनिन (T३ ): हे संप्रेरक, T४ सोबत, तुमच्या हृदयाचे ठोके आणि शरीराचे तापमान नियंत्रित करते.थायरॉक्सिन (T४ ): T३ सोबत, हे संप्रेरक तुमच्या चयापचयाचे नियमन करते.थायरॉईड-उत्तेजक संप्रेरक (TSH): हे संप्रेरक तुमच्या थायरॉईडद्वारे सोडल्या जाणाऱ्या संप्रेरकांच्या पातळीवर नियंत्रण ठेवते.या संप्रेरकांच्या असामान्य पातळीमुळे विविध समस्या उद्भवू शकतात, जसे की कमी प्रथिने पातळी, वाढलेल्या थायरॉईड ग्रंथी आणि टेस्टोस्टेरॉन किंवा इस्ट्रोजेनसह लैंगिक संप्रेरकांची असामान्य पातळी.मधुमेह पॅनेल: मधुमेहाच्या निदानात्मक चाचण्यांमध्ये उपवास प्लाझ्मा ग्लुकोज (FPG), जेवणानंतर रक्तातील ग्लुकोज आणि ग्लायकेटेड हिमोग्लोबिन (HbA1c) चाचण्यांचा समावेश आहे. या चाचणीद्वारे डॉक्टर तुमच्या रक्तातील साखर किती नियंत्रणात आहे हे ठरवतात. HbA1c चाचणी शरीरातील ग्लुकोजचे प्रमाण मोजते आणि प्रामुख्याने मधुमेह असलेल्या लोकांमध्ये रक्तातील साखर नियंत्रणाचे निरीक्षण करण्यासाठी वापरली जाते. हे संभाव्य मधुमेह किंवा प्रीडायबिटीज शोधण्यास देखील मदत करू शकते.आवश्यक पोषक तत्वांसाठी चाचण्या: लोह, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी१२ आणि मॅग्नेशियम यासारख्या विशिष्ट पोषक तत्वांचे प्रमाण मोजणाऱ्या रक्त चाचण्या शरीराच्या योग्य कार्यासाठी आवश्यक असतात. बहुतेक लोकांमध्ये विविध कारणांमुळे या पोषक तत्वांची कमतरता भासते. म्हणून या पातळीचे निरीक्षण करणे आणि ते कमी असताना त्यांना पूरक आहार देणे महत्वाचे आहे. या पोषक तत्वांनी पूरक आहार घेतल्याने लोहाच्या कमतरतेमुळे होणारा अशक्तपणा, पडण्याचा धोका, फ्रॅक्चर आणि तीव्र किंवा जुनाट वेदना यासारख्या अनेक आरोग्य समस्या टाळता येतात.डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच ह्या चाचण्या कराव्यात. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.
India EU Trade Deal : भारत आणि युरोपियन युनियनमधील व्यापार करारावरील वाटाघाटी अंतिम झाल्या आहेत.
मुंबईच्या काही भागांमध्ये तुरळक पावसाची शक्यता
मुंबई : राज्यातील किमान तापमानात चढ-उतार सुरूच असून थंडीची तीव्रता कमी-अधिक होत आहे. त्यातच मुंबई शहर आणि उपनगरांतील काही भागांमध्ये येत्या काळात तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. २७ जानेवारी रोजी महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. हवामानातील बदलत्या स्थितीमुळे आकाशात ढगांची ये-जा वाढली असून, विशेषतः दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या सुमारास हलक्या सरी पडण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.जवळच अरबी समुद्र असल्यामुळे समुद्रातील आर्द्रतेचे प्रमाण वाढत असल्याने मुंबईत उकाड्याची तीव्रता काहीशी वाढली आहे. या उष्ण आणि दमट हवामानामुळे ढग निर्मितीस पोषक वातावरण तयार होत असून, त्याचा परिणाम म्हणून शहराच्या काही भागांत तुरळक पाऊस किंवा रिमझिम सरी पडू शकतात. दक्षिण मुंबई, पश्चिम उपनगरांतील काही परिसर तसेच मध्य रेल्वे मार्गालगतच्या भागांत अधूनमधून हलका पाऊस पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु हा पाऊस सर्वत्र एकसारखा नसेल, तर तो स्थानिक स्वरूपाचा असण्याची अधिक शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुळे काही भागांत पावसाच्या सरी कोसळतील, तर काही भाग कोरडे राहू शकतात. या हलक्या पावसामुळे तापमानात किंचित घट जाणवू शकते आणि नागरिकांना उकाड्यापासून थोडासा दिलासा मिळू शकतो.दरम्यान, भारतात सक्रिय असलेल्या पश्चिमी चक्रावाताचा परिणाम आता राज्याच्या हवामानावरही जाणवण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवस राज्यात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. या बदलत्या स्थितीत आज राज्यातील काही भागांत हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.तसेच अचानक होणाऱ्या पावसामुळे वाहनचालकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे. रस्ते ओलसर झाल्यास वाहतुकीचा वेग मंदावू शकतो. तसेच बाहेरच्या कामांसाठी घराबाहेर पडताना छत्री किंवा रेनकोट सोबत ठेवण्याचा सल्ला देण्यात येत आहे.
Sudhir Mungantiwar : चंद्रपूर महापालिकेत हालचालींना वेग आला असून महापौर पदासाठी मोठी चढाओढ सुरू झाली आहे. या सगळ्यात भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मोठा दावा केला आहे.
Top 10 news : दिल्लीतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबईत महापौरपदाबाबत कोणतीही तडजोड करुन नका, असा आदेश देण्यात आला होता.
Bank Strike: बँकांचा आज देशव्यापी संप; ‘या’ बँका राहणार बंद
युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) ने देशभरातील बँक कर्मचाऱ्यांच्या (Bank Strike) ५ दिवसांच्या कामाच्या आठवड्याच्या मागणीसाठी २७ जानेवारी २०२६ रोजी देशव्यापी संप पुकारला आहे. या संपामुळे देशभरातील विशेषतः सार्वजनिक क्षेत्रातील (पब्लिक सेक्टर) बँकांच्या शाखांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे आणि अनेक बँका बंद राहू शकतात. ८ मार्च २०२४ रोजी इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) आणि युनियन यांच्यात वेतन सुधारणा करारावर स्वाक्षरी झाली होती.या संयुक्त नोटमध्ये सर्व शनिवारी सुट्टी देण्यावर सहमती दर्शवण्यात आली होती.परंतु त्यांना सुट्ट्या ह्या न मिळाल्यामुळे बँक कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी २७ जानेवारी रोजी बँक कर्मच्याऱ्यांनी संप पुकारला आहे. या संपामुळे महाराष्ट्रासह देशभरातील बँकिंग सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. देशभरातील प्रमुख सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे कर्मचारी संपावर जाणार आहेत. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) या नऊ संघटनांच्या संयुक्त मंचाने या संपाचे आवाहन केले आहे. मार्च २०२४ मध्ये झालेल्या करारात मान्य होऊनही '५ दिवसांचा आठवडा' अद्याप लागू न झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे.संपाचे मुख्य कारणपाच दिवसांचा आठवडा ही बँक कर्मचाऱ्यांची ही मागणी २०१५ पासून प्रलंबित आहे.प्रत्येक शनिवारी बँकांना सुट्टी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते, मात्र अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नाही. या विलंबाचा निषेध म्हणून आणि पाच दिवस काम, दोन दिवस सुट्टी लागू करण्यासाठी हा एकदिवसीय संप पुकारण्यात आला आहे. सध्याच्या नियमांनुसार, बँक कर्मचाऱ्यांना दर महिन्याचा दुसरा आणि चौथा शनिवार सुट्टी असते. सर्व शनिवारी सुट्टी देऊन आठवड्यात केवळ ५ दिवस काम असावे. ५ दिवसांचा आठवडा केल्यास कर्मचारी दररोज ४० मिनिटे अतिरिक्त काम करण्यास तयार आहेत, जेणेकरून कामाच्या तासांचे नुकसान होणार नाही.Bank Strike: बँकांचा आज देशव्यापी संप;‘या’बँका राहणार बंदया संपात स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), पंजाब नॅशनल बँक (PNB), बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक यांसारख्या सर्व प्रमुख सरकारी बँकांचा समावेश आहे. खासगी बँकांचे कामकाज सुरू राहण्याची शक्यता असली तरी, चेक क्लिअरन्स यांसारख्या सेवांवर सरकारी बँकांच्या संपामुळे परिणाम होऊ शकतो. ८ मार्च २०१४ रोजी इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) आणि युनियन यांच्यात वेतन सुधारणा करारावर स्वाक्षरी झाली होती. या संयुक्त नोटमध्ये सर्व शनिवारी सुट्टी देण्यावर सहमती दर्शवण्यात आली होती. मात्र, वित्तीय सेवा विभागाकडून (DFS) याला अद्याप हिरवा कंदील मिळालेला नाही. गेल्या ९ महिन्यांपासून सरकारकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने युनियनने संपाचे हत्यार उपसले आहे.ग्राहकांसाठी महत्त्वाच्या टिप्स२७ जानेवारीला बँकांचे व्यवहार बंद राहतील, त्यामुळे चेक जमा करणे किंवा मोठे रोख व्यवहार आधीच करून घ्या. संपाच्या काळात नेट बँकिंग, यूपीआय (UPI) आणि मोबाईल बँकिंग सेवा सुरू राहतील. संपाच्या काळात एटीएममधील रोख रकमेचा तुटवडा जाणवू शकतो, त्यामुळे आवश्यक रोकड आधीच काढून ठेवा.
हिंदू समाजाला तीन मुले होण्यापासून कोणीही रोखलेलं नाही; डॉ. मोहन भागवत
मुझफ्फरपूर : मुझफ्फरपूर येथील सामाजिक समरसता चर्चासत्र बोलताना डॉ. मोहन भागवत म्हणाले की, भारतात विविधता आहे, भारत हा विविधतेने नटलेला आहे, परंतु विभाजीतता अजिबात नाहीये. ब्रिटिशांनी वाढत्या विभाजनांनी राज्य केलं; आता आपल्याला ती विभागणी संपवून समाजाला एकत्र करण्याची गरज आहे.लोकसंख्या नियंत्रणाच्या प्रश्नावर म्हणाले की, सरकार दोन अपत्य धोरणाबद्दल बोलत असताना हिंदू समाजाला तीन मुलं होण्यापासून कोणीही रोखलेलं नाही.आज भारताच्या प्रगतीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे, परंतु आव्हानं देखील कमी झालेली नाहीत. काही परदेशी शक्तींना भारताची प्रगती नको आहे कारण त्यांना त्यांची 'दुकानदारी' बंद पडेल अशी भीती त्यांना वाटते. म्हणूनच ते भारताच्या विकासाच्या मार्गात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. भीती आणि कमकुवतपणावर मात करण्यासाठी स्वावलंबन आवश्यक आहे यावर त्यांनी भर दिला, जे समस्यांवर कायमस्वरूपी उपाय देऊ शकते.परदेशी शक्ती आणि भारताच्या प्रगतीची चिंता विषयी डॉ. मोहन भागवत म्हणाले .जागतिक स्तरावर सुसंवादाच्या अभावाबद्दल सरसंघचालकांनी चिंता व्यक्त केली आणि सांगितलं की जर सुसंवाद नसेल तर लोक आपापसात लढतील आणि नष्ट होतील. ऐतिहासिक उदाहरणे देत त्यांनी स्पष्ट केलं की, कोणत्याही परदेशी शक्तीनं भारताला स्वतःच्या सत्तेनं वश केलं नाही, तर आपल्या अंतर्गत विभाजनांचा फायदा घेऊन राज्य केलं. जर समाजात सुसंवाद निर्माण झाला तर लोक एकमेकांचे सुख-दु:ख वाटून घेतील आणि समस्या आपोआप सुटतील. डॉ. भागवत म्हणाले की, समाज आता जागृत होत आहे आणि देश वेगाने प्रगती करत आहे. जर समाजाने ब्लॉक किंवा सबडिव्हिजन पातळीवर आपल्या समस्यांवर चर्चा केली तर लोकांना आता कोणत्याही नेत्यावर अवलंबून राहण्याची गरज राहणार नाही. त्यांनी विविध जाती आणि समुदायांच्या उन्नतीबद्दल तसंच इतर समुदायांच्या समस्या सोडवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दलही विचारपूस केली.दुसऱ्या प्रश्नोत्तर सत्रादरम्यान, सरसंघचालकांनी केवळ समस्या दाखवण्याऐवजी उपाय देखील सुचवले पाहिजेत यावर भर दिला. आज, देश चांगल्या शक्तीच्या बळावर प्रगती करत आहे, जिथे लोक त्यांच्या पातळीवर सामाजिक समस्या सोडवत आहेत. मात्र, हे प्रयत्न तळागाळातील पातळीपर्यंत नेणे आवश्यक आहे. त्यांनी स्पष्ट केलं की समस्या केवळ पद्धतशीर उपायांनी सोडवल्या जाणार नाहीत; केवळ परस्पर चिंतनातूनच कायमस्वरूपी उपाय सापडतील. डॉ. भागवत यांनी सांगितलं की, ब्लॉक स्तरावरील समुदाय आणि जात संघटनांनी भौतिक आणि नैतिक उन्नतीचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. त्यांनी यावर भर दिला की समाजसेवा ही केवळ श्रीमंतांपुरती मर्यादित नाही. फक्त चांगलं मन असलेले लोकच दुःखी आणि गरजूंची सेवा करू शकतात. अनेक गावांमधील उदाहरणे देत त्यांनी सरकारी मदतीशिवाय समुदायांनी त्यांच्या समस्या कशा सोडवल्या आहेत हे स्पष्ट केलं.
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांकडून आयईडी स्फोट; ११ जवान जखमी
बिजापूर/रायपूर : रविवारी २५ जानेवारीला छत्तीसगडमधील बिजापूरच्या उसुर पोलीस स्टेशन परिसरात आयईडी स्फोट झाला. इथे सुरक्षा दलांचे नक्षलविरोधी ऑपरेशन सुरू होते . ऑपरेशन सुरू असताना कर्रेगुट्टाच्या जंगलात नक्षलवाद्यांनी पेरलेल्या आयईडीचा स्फोट झाला. या दुर्घटनेत सुरक्षा दलांचे ११ जवान जखमी झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, या नंतर जखमी जवानांना उपचारासाठी विमामनं रायपूरला नेण्यात आले. जखमींवर रायपूरच्या रामकृष्ण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत डॉ. पंकज धबालिया यांनी दुजोरा दिला आहे.छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त जिल्हा बिजापूरमध्ये सुरक्षा दलांचे नक्षलविरोधी ऑपरेशन सुरू असताना अचानक स्फोट झाला. या कारवाईत जिल्हा राखीव रक्षक (DRG) आणि बस्तर फायटर्सचे जवान सहभागी होते. याशिवाय, रिझोल्युट अॅक्शन कोब्रा सीआरपीएफच्या कमांडो बटालियनची टीम देखील सहभागी होती. या स्फोटात ११ जवान जखमी झाले, ज्यामध्ये डीआरजीचे १० आणि कोब्रा बटालियनच्या एका जवानाचा समावेश आहे.रामकृष्ण रुग्णालयाचे डॉ. पंकज धबालिया यांनी सांगितलं की, आयईडी स्फोटात जखमी झालेल्या ११ जवानांना रायपूरमधील रामकृष्ण रुग्णालयात आणण्यात आलं. एका जवानाला प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. तर ११ जवानांवर अजूनही रामकृष्ण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यापैकी चार ते पाच जण गंभीर जखमी आहेत आणि काही जवानांवर शस्त्रक्रिया करण्यात येत आहे. या संपूर्ण घटनेनंतर आयईडी स्फोटात जखमी झालेल्या सर्व 11 जवानांना काल रात्री उशिरा लष्कराच्या एमआय-17 हेलिकॉप्टरनं रायपूर इथं चांगल्या उपचारांसाठी नेण्यात आलं. रामकृष्ण रुग्णालयातील डॉक्टरांच्या मते, सर्व जखमी जवान धोक्याबाहेर आहेत आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी संपूर्ण परिसरात शोधमोहीम राबवली आहे. तसंच अलर्ट जारी करण्यात आला.नोव्हेंबर २०२५ मध्ये, सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांसाठी सुरक्षित आश्रयस्थान मानल्या जाणाऱ्या कर्रेगुट्टा येथील उसुर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या तडपाला गावात एक छावणी उभारली होती. एप्रिल-मे २०२५ मध्ये, केंद्रीय आणि राज्य सुरक्षा दलांनी कर्रेगुट्टा टेकड्यांच्या सभोवतालच्या घनदाट जंगलात २१ दिवसांची मोठी कारवाई केली, ज्यामध्ये ३१ नक्षलवादी ठार झाले होते.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर २०२५ मध्ये, सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांसाठी सुरक्षित आश्रयस्थान मानल्या जाणाऱ्या कर्रेगुट्टा येथील उसुर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या तडपाला गावात एक छावणी उभारली होती. एप्रिल-मे २०२५ मध्ये, केंद्रीय आणि राज्य सुरक्षा दलांनी कर्रेगुट्टा टेकड्यांच्या सभोवतालच्या घनदाट जंगलात २१ दिवसांची मोठी कारवाई केली, ज्यामध्ये ३१ नक्षलवादी ठार झाले होते. या कारवाईत ३५ शस्त्रे,४५० आयईडी आणि मोठ्या प्रमाणात डिटोनेटर, स्फोटके आणि वैद्यकीय साहित्य, विद्युत उपकरणं आणि नक्षलवादी साहित्यासह इतर साहित्य जप्त केलं होतं
Today Bank Holiday : प्रलंबित मागण्यांसाठी बँक कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी आज देशव्यापी संप पुकारला
Tejashri Pradhan: “कोणीच तुमचा ऑरा कॉपी करू शकत नाही”; तेजश्री प्रधानचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल
Tejashri Pradhan: लोकप्रिय मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधान सोशल मीडियावर कायमच चर्चेत असते. तिच्या अभिनयाइतकीच तिची स्टाईल, विचार आणि कॅप्शनही चाहत्यांना भुरळ घालतात.
Maharashtra Weather Today : पुणे, मुंबईसह उपनगरांमध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरण
35 वर्षांचे शेख मुकंदर मोहम्मद पहाट होण्यापूर्वीच कामासाठी घरातून निघाले होते. तारीख 14 जानेवारी होती. ओडिशाच्या बालासोरमध्ये राहणारे मुकंदर गवंडी होते. गवंडीचे काम न मिळाल्यास ते गाड्या लोड करत असत. त्या दिवशी त्यांना लोडिंगचेच काम मिळाले होते. कुटुंब सायंकाळी त्यांच्या परतण्याची वाट पाहत होते, तेव्हाच फोन आला की मुकंदर हॉस्पिटलमध्ये आहेत. कळले की जमावाने त्यांना गो-तस्करीच्या आरोपाखाली बेदम मारहाण केली आहे. काही तास उपचारानंतर मुकंदरने प्राण सोडले. पोलिसांनी जमावाकडून मारहाण (मॉब लिंचिंग) च्या कलमाखाली 6 लोकांना अटक केली आहे. बहुतेक आरोपींचे वय 22 ते 25 वर्षे आहे. सर्वजण हिंदूवादी संघटनांशी संबंधित आहेत. आरोप आहे की या लोकांनी मुकंदरला लाठी-काठ्यांनी मारले, जय श्रीरामच्या घोषणा द्यायला लावल्या. मारहाणीचा व्हिडिओही बनवला, जो नंतर व्हायरल झाला. मुकंदरच्या हत्येतील आरोपी तुरुंगात आहेत, पण शिक्षा मुकंदरचे कुटुंब भोगत आहे. पत्नी मनौरीच्या कडेवर दोन महिन्यांची मुलगी आहे. वडिलांना 6-7 वर्षांपूर्वी अर्धांगवायू झाला होता, त्यामुळे ते चालू शकत नाहीत. भिंतीला टेकून बसलेले असतात. एकूण 6 लोकांचे कुटुंब आहे, ज्याची जबाबदारी मुकंदरवर होती. कुटुंबाला मदतीच्या स्वरूपात तहसीलदारांकडून 20 हजार रुपये मिळाले आहेत. यावर मनौरी म्हणतात, ‘20 हजार रुपयांत काय होणार. एवढे पैसे तर पतीला दफन करण्यातच खर्च झाले.’ गर्दीच्या हल्ल्याचा तोच नमुना, गोतस्करीच्या संशयावरून गाडी थांबवली, आणि बेदम मारहाण केलीशेख मुकंदर मोहम्मद बालासोर जिल्ह्यातील अस्तिया गावात राहत होते. या गावापासून सुमारे १५ किमी अंतरावर चांदीपूर रेंज आहे, जिथे भारताच्या सर्वात शक्तिशाली क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली जाते. मुकंदरच्या कुटुंबाकडे शेती नव्हती, त्यामुळे त्यांनी शिक्षण घेतले नाही आणि गवंडीकाम शिकले. ते दिवसाला ५०० रुपये कमवत होते. मकर संक्रांतीमुळे गवंड्याचे काम मिळण्याची अपेक्षा नव्हती, म्हणून ते 14 जानेवारीला लोडिंगचे काम करण्यासाठी गेले. त्यांची गाडी जयदेव गावातून जात होती. व्हॅनमध्ये मुकंदरसोबत ड्रायव्हरही होता. वाटेत काही लोकांनी त्यांना थांबवले. आरोप आहे की गाडी थांबताच सर्वजण मुकंदर आणि ड्रायव्हरला मारहाण करू लागले. ड्रायव्हर तर वाचून पळून गेला, पण मुकंदरला काठ्या आणि प्लास्टिकच्या पाईपने मारहाण करण्यात आली. बातमी मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि मुकंदरला बालासोरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्याच दिवशी मुकंदरचा मृत्यू झाला. सुरुवातीला कुटुंबाला वाटले की हे प्रकरण लुटमारीचे आहे. नंतर घटनेचा व्हिडिओ समोर आला. यात दिसत आहे की काही लोक मुकंदरला मारहाण करत आहेत. 'जय श्रीराम' आणि 'गाय माझी माता आहे' असे बोलण्यास सांगत आहेत. जीव वाचवण्यासाठी मुकंदर सर्व काही बोलत राहिला, पण जमावाने मारहाण करणे थांबवले नाही. मुकंदरच्या घरात आता एक विधवा, तीन मुले आणि आजारी वडीलअस्तिया गावात गवत-फुसक्यांच्या छपराच्या आणि मातीच्या भिंतींच्या घरात मुकंदरचे कुटुंब राहते. घरात 65 वर्षांचे अब्बू शेख सादर मोहम्मद आहेत. लकव्यामुळे ते आजारी असतात. मुलाच्या मृत्यूनंतर त्यांनी जेवणही बंद केले आहे. मुकंदरचा चुलत भाऊ, 23 वर्षांच्या शेख जितेंद्र मोहम्मदने त्याला डोळ्यासमोर तडफडताना पाहिले होते. तो दावा करतो की ज्या पिकअप गाडीत मुकंदर होता, ती रिकामी होती. तस्करी किंवा इतर कोणत्याही चुकीच्या कामाचा प्रश्नच उद्भवत नाही. व्हॅनचा चालक बेपत्ता आहे. त्याच्या भूमिकेची चौकशी व्हायला हवी. जितेंद्र सांगतात, ‘14 जानेवारीला भावाला गवंडी कामातून सुट्टी होती. तरीही तो सकाळी 4 वाजता घरातून निघाला होता. तो धामरा-चांदीपूर रोडच्या दिशेने गेला होता. सकाळी 7 वाजता फोन आला की, जिल्हा रुग्णालयात या, मुकंदरचा अपघात झाला आहे. मी लगेच आई आणि वहिनीला घेऊन निघालो.’ आम्ही सुमारे 8 वाजता रुग्णालयात पोहोचलो. भाऊ खूप जखमी झाला होता. तो वेदनेने विव्हळत होता. शरीराचा असा कोणताही भाग नव्हता जिथे त्याला मार लागला नसेल. मी विचारले की तुम्हाला कोणी मारले आहे का? त्याने मान हलवून होकार दिला. त्याने वहिनीला मारहाण करणाऱ्यांची नावेही सांगितली होती. ‘सुरुवातीला आम्हाला वाटले की हे लुटमारीचे प्रकरण आहे. तोपर्यंत धार्मिक कोन समोर आला नव्हता. व्हिडिओ व्हायरल झाल्याने संपूर्ण गोष्ट कळली. मी विचार केला की माझ्या पत्नीला रुग्णालयात आणायला हवे. म्हणून मी तिला घेण्यासाठी सासरी गेलो. परत येताना फोन आला की भावाची तब्येत बिघडत आहे. मी रुग्णालयात पोहोचलो, तेव्हा डॉक्टरांनी मला त्यांच्या केबिनमध्ये बोलावून सांगितले की मुकंदर आता या जगात नाही.’ पत्नी म्हणाली- पती वेदनेने तळमळत होते, काही बोलूही शकले नाहीतमुकंदरची पत्नी मनौरीला माहीत नव्हते की ते कोणत्या वेळी घरातून बाहेर पडले. त्यांनी विचार केला की ते रोजच्यासारखे कामावर गेले असतील. हाच विचार करून त्या मुलांसोबत घरी राहिल्या. पतीची बातमी मिळताच, त्या हॉस्पिटलमध्ये पोहोचल्या. मनौरी सांगते, ‘त्यांची प्रकृती खूप नाजूक होती. ते वेदनेने तळमळत होते. धड बोलूही शकले नाहीत. एवढे मात्र नक्की सांगितले की त्यांना कोणत्या लोकांनी मारले आहे. इशारा करून सांगितले की ते 10 पेक्षा जास्त होते. सर्वांची नावे सांगू शकले नाहीत. थोड्याच वेळात त्यांचे श्वास थांबले.’ दोन महिन्यांच्या मुलीला कडेवर घेऊन बसलेल्या मनौरी रडू लागतात. त्या म्हणतात, 'तेच एकटे कमावणारे होते. रोजचे ५०० रुपये मिळत होते. त्यावरच घर चालायचे. सासरे आजारी असतात, त्यांचीही जबाबदारी तेच उचलत होते.' सरकारकडून काही मदत मिळाली का? मनौरी उत्तर देतात, 'नाही, तहसीलदार घरी आले होते. रेड क्रॉस फंडमधून २० हजार रुपये दिले आहेत. एवढ्यात काय होणार? २० हजार रुपयांत मी या मुलांना शिकवू शकेन का?' नातेवाईक म्हणाले- मुकंदर जर गो तस्करी करत असता, तर मजुरी का केली असती?मुकंदरचे नातेवाईक हुसैन सांगतात, 'मुकंदरला जिथे काम मिळे, तिथे तो जात असे. घटनेच्या दिवशी तो माशांच्या पेट्या लोड करायला गेला होता. तेव्हा गर्दीने त्याला घेरले. ही सकाळी 4 ते 5 वाजेच्या दरम्यानची गोष्ट आहे.' हुसेन १४ जानेवारीच्या संध्याकाळी सुमारे ५ वाजता रुग्णालयात पोहोचले होते. तेव्हा मुकंदरच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाले होते. सर्वांनी एफआयआर दाखल करण्याचे ठरवले. सर्वजण रात्री ८:३० वाजता सदर पोलीस ठाण्यात गेले आणि गुन्हा दाखल केला. हुसेन सांगतात, 'सोशल मीडियावर काही लोकांनी स्टोरी टाकली होती. यात मुकंदरला मारहाण करताना दाखवले होते. त्याच्याकडून 'जय श्रीराम'च्या घोषणा वदवून घेतल्या जात होत्या. 'जय श्रीराम' म्हणण्यात कोणतीही अडचण नाही, पण जबरदस्तीने घोषणा वदवून घेणे चुकीचे आहे.' १४ जानेवारीच्या रात्री सुमारे १० वाजता मुकंदरचा मृतदेह घरी आणण्यात आला. १५ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता त्यांच्यावर दफनविधी करण्यात आले. एसडीपीओने कुटुंबाला आश्वासन दिले की आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल. गो-तस्करीच्या आरोपांवर हुसेन प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हणतात, 'कुणी म्हणत आहे की गाडीत गाय होती, तर कुणी म्हणत आहे की गाडी रिकामी होती. जर गाय होती, तर पोलिसांना खबर द्यायला हवी होती. पोलिसांनी सांगितले की घटनास्थळावरून एक गाय मिळाली आहे. गाय गाडीच्या आत होती की बाहेर, हे स्पष्ट होऊ शकले नाही. याची चौकशी व्हायला हवी.' पोलिसांना घटनास्थळी जखमी गाय मिळाली, मुकंदरच्या हत्येत 6 जणांची नावेपोलिसांना घटनास्थळी जखमी अवस्थेत एक गाय मिळाली. तिला गोशाळेत पाठवण्यात आले. पोलिसांनी पिकअप व्हॅन जप्त करून पोलीस ठाण्यात नेली. त्याच दिवशी संध्याकाळी मुकंदरचा भाऊ जितेंद्र मोहम्मद याने 5 जणांवर हत्येचा आरोप करत तक्रार दाखल केली. पोलिसांनी BNS च्या कलम 103(2) अंतर्गत एफआयआर (FIR) दाखल केला आहे. हे कलम मॉब लिंचिंगमध्ये लावले जाते. यात जन्मठेपेपासून ते मृत्यूदंडापर्यंतची शिक्षा होऊ शकते. पोलिसांनुसार, पाच नामनिर्देशित आरोपींपैकी तीन घटनास्थळी उपस्थित होते. तिघांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. यात २५ वर्षांचा सरोज कुमार बेहरा उर्फ पिंटू, २९ वर्षांचा चिन्मय कुमार दास उर्फ चिनू आणि २२ वर्षांचा सागर मोहालिक उर्फ चंदू यांचा समावेश आहे. उर्वरित दोन आरोपींना पुरावे न मिळाल्याने सोडून देण्यात आले. व्हिडिओ फुटेजच्या आधारे नंतर आणखी तीन आरोपींना अटक करण्यात आली. यात २४ वर्षांचा आशिष कुमार नायक उर्फ लिपू, २४ वर्षांचा रमेश दास आणि २५ वर्षांचा चंदू दास यांचा समावेश आहे. गोसेवा संस्थेचा दावा- भरधाव वेगामुळे गाडी उलटली, मारहाणीमुळे मृत्यू नाहीबालासोर येथील माँ भारती गोसेवा केंद्राचे सचिव जितेंद्र स्वाईं यांच्या मते, ही संपूर्ण घटना त्यांच्या घराशेजारी घडली. हा परिसर सदर पोलीस स्टेशनच्या सुंदरी भागात येतो. जितेंद्र सांगतात, 'ओडिशा राज्यात गोहत्येच्या घटना सातत्याने घडत आहेत. हे थांबवण्यासाठी बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद यांसारख्या संघटनांनी अनेकदा पोलीस, जिल्हा प्रशासन आणि सरकारकडे तक्रारी केल्या आहेत. तरीही गोहत्या थांबलेली नाही.' जितेंद्र दावा करतात की, हा परिसर गोहत्येचे केंद्र मानला जातो. ही गोष्ट स्थानिक पोलिसांनाही माहीत आहे. मुकंदरबद्दल ते सांगतात, ‘त्या दिवशी सकाळी काही लोक फिरत होते. पिकअप वाहनाच्या चालकाला वाटले की ते त्याला पकडायला येत आहेत. घाबरून त्याने वेगाने गाडी वळवली, त्यामुळे ती उलटली. गाडी उलटताच चालक पळून गेला. हेल्पर मुकंदर आतच अडकून पडला. तेथे उपस्थित लोकांनी त्याला बाहेर काढले आणि पाणी पाजले.’ जितेंद्र यांच्या मते, मुकंदरची तब्येत बिघडताना दिसली, तेव्हा लोकांनी पोलीस आणि रुग्णवाहिकेला फोन केला. अनेक वेळा फोन केल्यानंतर पोलीस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली आणि सुमारे 7 वाजता मुकंदरला रुग्णालयात दाखल केले. दुपारी 3 वाजता मुकंदरचा मृत्यू झाल्याचे समजले. व्हायरल व्हिडिओबद्दल जितेंद्र म्हणतात की, व्हिडिओची सत्यता पडताळणी तपासणीनंतरच होऊ शकते. जितेंद्र म्हणतात, 'मृत्यूला थेट हत्या म्हणणे घाईचे ठरेल. रुग्णालयात मृत्यू निश्चितच झाला आहे, पण खरे कारण शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट होईल. एफआयआरमध्ये पवन भोईचे नाव आहे. तो एक समर्पित गोरक्षक आहे. बापू पांडा जिम चालवतात, त्यांचा कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नाही. बजरंग दलाचे बालासोर सह-प्रमुख पिंटू यांचेही नाव आहे. ते घटनास्थळी उपस्थितच नव्हते.' 'कदाचित काही लोक मॉर्निंग वॉकसाठी तिथे गेले असतील आणि मोबाईल लोकेशनच्या आधारावर त्यांना ताब्यात घेतले असेल. असे असेल, तर यासाठी कोणत्याही संघटनेला जबाबदार धरू नये.' याबद्दल आम्ही बालासोरचे एसपी प्रत्यूष दिवाकर यांच्याशीही बोललो. व्हिडिओच्या आधारे आरोपींना पकडण्यात आले आहे, असे ते फक्त म्हणाले. आम्ही सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहोत.
21 जुलै 2025 रोजी जगदीप धनखड यांनी अचानक उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला. पद सोडण्याच्या कारणावरून प्रश्न उपस्थित झाले. त्यानंतर 42 दिवसांनी सप्टेंबरमध्ये धनखड यांनी सरकारी बंगलाही सोडला. नवीन बंगल्यासाठी गृहनिर्माण आणि शहरी मंत्रालयाला अर्ज पाठवण्यात आला. हे सर्व प्रोटोकॉलनुसार झाले. राजीनामा देऊन 6 महिने आणि अर्ज करून 5 महिने उलटले आहेत, परंतु माजी उपराष्ट्रपती अजूनही एका खाजगी फार्म हाऊसमध्ये राहत आहेत. बंगला मिळण्यास विलंब झाल्याने धनखड यांच्या जवळचे लोक म्हणतात, 'सप्टेंबरमध्ये सांगण्यात आले होते की त्यांच्या नावाने बंगला अलॉट झाला आहे. दुरुस्तीला सुमारे 3 महिने लागतील. नोव्हेंबरमध्ये आणि नंतर जानेवारीत बंगल्याची स्थिती विचारली असता, पुन्हा दुरुस्तीचीच गोष्ट सांगण्यात आली.' दिव्य मराठीने विलंबाचे कारण जाणून घेण्यासाठी विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला, परंतु उत्तर मिळाले नाही. त्यामुळे आम्ही गृहनिर्माण आणि शहरी मंत्रालयातील राज्यमंत्री तोखन साहू यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्याकडून उत्तर मिळाले- 'बंगला अजून अलॉटच झालेला नाही. माजी उपराष्ट्रपतींना आवडेल, तसा तो लगेच अलॉट केला जाईल.' दोन्ही बाजूंचे म्हणणे आणि दावे एकमेकांपेक्षा पूर्णपणे वेगळे आढळले. अशा परिस्थितीत प्रश्न असा आहे की, शेवटी खरे कोण बोलत आहे. राज्यमंत्री तोखन साहू की ते अधिकारी, जे धनखड यांना बंगल्याच्या दुरुस्तीबद्दल सांगत आहेत. दिव्य मराठीच्या टीमने आपल्या स्रोतांद्वारे संपूर्ण प्रकरण समजून घेतले. अधिकाऱ्यांनी ५ महिन्यांत ३-४ वेळा सांगितले - घराची दुरुस्ती होताच हस्तांतरित करू सर्वात आधी आम्ही माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या एका जवळच्या सूत्राशी बोलून बंगल्याची स्थिती जाणून घेतली. सूत्राने सांगितले, ‘सरकारी बंगला सोडल्यानंतर सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात धनखड यांना संबंधित मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले होते की बंगल्याचे नूतनीकरण केले जात आहे. नोव्हेंबरपर्यंत हस्तांतरित करण्याची पूर्ण आशा आहे.' नोव्हेंबरमध्येही बंगला मिळाला नाही. नूतनीकरणात किती वेळ लागेल हेही कळले नाही. तेव्हा विभागात एक-दोनदा पुन्हा चौकशी करण्यात आली. यावेळीही आधीचेच उत्तर मिळाले की बंगल्याची दुरुस्ती केली जात आहे. सूत्रांनी पुढे सांगितले, 'माझी एका आठवड्यापूर्वी धनखडजींशी भेट झाली होती. तेव्हा कळले की 10-11 जानेवारी रोजी त्यांनी संबंधित अधिकाऱ्याला पुन्हा फोन करायला लावला होता. आधी 2-3 वेळा जे उत्तर मिळाले होते, तेच यावेळीही मिळाले. त्यांना सांगण्यात आले की घराची दुरुस्ती सुरू आहे. बंगला बराच काळ रिकामा होता. त्यामुळे जास्त वेळ लागत आहे. लवकरच बंगला सुपूर्द केला जाईल अशी अपेक्षा आहे.' बंगला क्रमांक-34 वाटप झाल्याचे कळलेचार महिन्यांपूर्वी गृहनिर्माण आणि शहरी मंत्रालयाच्या एका अधिकृत सूत्राने सांगितले होते की, एपीजे अब्दुल कलाम रोडवरील 34 क्रमांकाचा बंगला माजी उपराष्ट्रपतींना वाटप करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यानंतर माध्यमांमध्ये अनेक बातम्या आल्या की बंगला वाटप करण्यात आला आहे. धनखड यांच्या जवळच्या सूत्रांनीही याची पुष्टी केली. माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड सप्टेंबर, 2025 पासून हरियाणातील इनेलो पक्षाचे प्रमुख अभय चौटाला यांच्या फार्म हाऊसमध्ये राहत आहेत. हे दिल्लीतील छतरपूर येथे आहे. सरकारी बंगला न मिळाल्याने धनखड यांच्या अशा खासगी फार्महाऊसमध्ये स्थलांतरित होण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. अभय चौटाला यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले, ‘जगदीप धनखड यांच्यासोबत आमचे घरगुती संबंध आहेत. त्यांच्यासोबत जे घडले, ते योग्य नाही. मी त्या वादावर काहीही बोलणार नाही. फार्महाऊसच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, हे माझे नाही, तर त्यांचेच आहे असे समजा. त्यांना जोपर्यंत हवे असेल, तोपर्यंत ते येथे राहतील.' तरीही या सगळ्यामध्ये धनखड यांनी राजीनामा देताना साधलेले मौन सरकारी निवासस्थान रिकामे करून खाजगी फार्म हाऊसमध्ये स्थलांतरित झाल्यानंतरही तुटले नाही. बंगला क्रमांक 34 मध्ये कोणतीही दुरुस्ती होत नाहीयेदिव्य मराठीची टीम माजी उपराष्ट्रपतींना वाटप करण्यात आल्याचे सांगितले जात असलेल्या बंगला क्रमांक 34 वर पोहोचली. दिल्लीत हा टाईप-8 बंगला अगदी ओस पडला आहे. हे पाहून स्पष्टपणे लक्षात येते की येथे अनेक वर्षांपासून कोणीही आलेले नाही. येथे ना साफसफाई झाली आणि ना दुरुस्ती. आम्ही बाहेरून जेवढे पाहू शकलो, तेवढे पाहण्याचा प्रयत्न केला. तेथे ना कोणताही कामगार दिसला आणि ना गवंडी दिसला. यावरून हे स्पष्ट होते की बंगल्याची दुरुस्ती सुरू नाहीये. याची खात्री करण्यासाठी आम्ही गार्डशीही बोललो. आम्ही विचारले की हा बंगला वाटप झाला आहे का. गार्डने उत्तर दिले- ‘नाही, जर वाटप झाला असता तर आम्हाला कळले असते. आता तर लोक फक्त तो पाहण्यासाठी येत आहेत.‘ याची दुरुस्ती झाली होती का किंवा दुरुस्तीसाठी काही आदेश आला होता? उत्तर मिळालं- ‘नाही, जर दुरुस्तीची सध्या कोणती योजना असती, तर आम्हाला माहिती मिळाली असती, पण अशी कोणतीही माहिती नाही.‘ धनखड यांनी बंगला मिळण्यापूर्वी दबावाखाली सरकारी घर सोडले का?गृहनिर्माण आणि शहरी मंत्रालयाच्या अधिकृत सूत्रांनी सांगितले, ‘21-22 ऑगस्ट रोजी धनखड यांच्याकडून विभागाला बंगल्यासाठी अर्ज मिळाला होता. आधी चर्चा झाली होती की ते सरकारी बंगला मिळाल्यानंतरच सध्याचे सरकारी घर सोडतील. मात्र, त्यांनी सप्टेंबर 2025 मध्ये नवीन ठिकाण मिळाल्याशिवायच बंगला सोडला.‘ याबद्दल विचारले असता, धनखड यांच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले की, 'त्यांना सांगण्यात आले की नवीन सरकारी बंगला मिळायला किमान 3 महिने लागतील. त्यामुळे त्यांनी उपराष्ट्रपतींचे निवासस्थान सोडून फार्म हाऊसमध्ये स्थलांतर केले.' त्यांच्यावर सरकारी घर सोडण्यासाठी दबाव होता का? सूत्रांनी सांगितले की, यावर त्यांच्याशी माझे जास्त बोलणे झाले नाही, पण काहीतरी दबाव नक्कीच असावा. म्हणूनच सरकारी घर मिळाल्याशिवाय त्यांनी जुना बंगला सोडला. अधिकाऱ्यांकडून उत्तर मिळाले नाही, मंत्री म्हणाले- धनखड यांना पसंत पडल्यास, लगेच वाटप केले जाईलदिव्य मराठीच्या टीमने गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. सूत्रांनी सांगितले होते की विभागाच्या सध्याच्या सचिवांना बंगल्यासाठी अर्ज देण्यात आला आहे. आम्ही सचिव श्री कटिकिथाला श्रीनिवास यांच्याशी अनेक वेळा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण फोन बंद होता. यानंतर आम्ही विभागाच्या जनरल पूल रेसिडेन्शियल अकोमोडेशन (GPRA) चे डायरेक्टर ऑफ स्टेट संदीप कुल्हाडिया आणि माणिकचंद्र सोनोवाल यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. येथेही आमच्या कॉलला प्रतिसाद मिळाला नाही. यानंतर आम्ही विभागाचे राज्यमंत्री तोखन साहू यांच्याशी संपर्क साधला. माजी उपराष्ट्रपतींच्या बंगल्याबद्दल विचारले असता, त्यांनी सांगितले, 'या विषयावर सध्या माहिती नाही. अधिकाऱ्यांकडून अपडेट घेऊन सांगू शकेन.' दोन दिवसांनंतर आम्ही त्यांच्याशी पुन्हा बोललो, तेव्हा मंत्री म्हणाले, 'सरकारी बंगला माजी उपराष्ट्रपतींचा हक्क आहे. तो त्यांना मिळणारच. फक्त त्यांना एखादा बंगला पसंत यावा. प्रक्रिया सुरू आहे. धनखडजींना जो बंगला आवडेल, तो विभाग तात्काळ त्यांना अलॉट करेल.' तर, आतापर्यंत बंगला अलॉट झाला नाही का? उत्तर मिळाले, 'नाही, बंगला तेव्हाच अलॉट होईल, जेव्हा धनखडजींना तो पसंत पडेल.' आम्हाला तर कळले होते की बंगला अलॉट झाला आहे? मंत्री म्हणतात, 'नाही, मला जी माहिती मिळाली, ती मी तुम्हाला सांगितली. बाकी याबद्दल मी आणखी चौकशी करेन.' कोणत्याही माजी उपराष्ट्रपतीला निवासस्थान मिळण्यास यापूर्वी इतका विलंब झाला नव्हताविभागातील एका सूत्राला आम्ही विचारले की, यापूर्वीही कोणत्याही माजी उपराष्ट्रपतीला बंगल्यासाठी 5-6 महिने वाट पाहावी लागली होती का? उत्तर मिळाले, ‘यापूर्वीच्या दोन माजी उपराष्ट्रपतींचा रेकॉर्ड पाहिल्यास, मला चांगले आठवते की, दोघांनाही एक-दोन महिन्यांच्या आत बंगला मिळाला होता. त्यांच्या आधीच्या माजी उपराष्ट्रपतींनाही प्रोटोकॉलनुसार लवकरच बंगले मिळाले होते.’ मग त्यांना बंगला मिळायला उशीर का होत आहे? धनखड यांना खरंच कोणताही बंगला आवडत नाहीये का? उत्तर मिळालं, 'हे प्रकरण खूप संवेदनशील आहे. कोणतीही माहिती लीक झाली, तर गोंधळ होईल. या प्रकरणात कोणालाही माहिती देऊ नये, असे विभागाला सक्तीने सांगण्यात आले आहे.' व्यंकय्या नायडू निवृत्त होताच बंगला अलॉट झाला होतामाजी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ 10 ऑगस्ट 2022 रोजी संपला. सूत्रांनुसार, नायडू यांच्यासाठी निवृत्तीच्या काही दिवसांपूर्वीच बंगला निश्चित करण्यात आला होता. नूतनीकरणामुळे ते 20 ऑक्टोबर 2022 रोजी शिफ्ट झाले होते. 20 ऑक्टोबर 2022 रोजी त्यांनी ट्वीट करून सांगितले होते की ते नवीन सरकारी बंगल्यात शिफ्ट झाले आहेत. नायडू यांच्या आधी, माजी उपराष्ट्रपती हमीद अंसारी यांचा दुसरा आणि अंतिम कार्यकाळ 10 ऑगस्ट 2017 रोजी संपला. अंसारी 11 ऑगस्ट 2007 ते 10 ऑगस्ट 2017 पर्यंत 10 वर्षे पदावर होते. त्यांच्याही निवृत्तीनंतर सरकारी बंगल्यात स्थलांतरित होण्याबाबत कोणताही विलंब किंवा वाद आढळत नाही. सूत्रांनुसार, तेही निवृत्तीच्या 3-4 दिवसांनंतर जनपथ येथील एका बंगल्यात स्थलांतरित झाले होते. माजी उपराष्ट्रपतींनी सरकारी शेफची सुविधा घेतली नाहीधनखड यांच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले की, ‘त्यांना सरकारी बंगल्यासाठी बराच काळ वाट पाहावी लागत आहे. प्रोटोकॉलनुसार, माजी उपराष्ट्रपतींना कर्मचारी स्थलांतरित होताच मिळाले होते. मात्र, त्यांनी शेफची सुविधा घेतली नाही. स्वयंपाकघरात ते आपले खाजगी कर्मचारी वापरत आहेत. त्यांना बाकीचे सुरक्षा रक्षक, स्वच्छता कर्मचारी, माळी आणि अधिकारी यांच्यासह सर्व काही मिळाले आहे. प्रोटोकॉलनुसार, गाड्या आणि नियमित वैद्यकीय कर्मचारी देखील आहेत. आम्ही विचारले की स्वयंपाकघरातील कर्मचारी न घेण्यामागे काही खास कारण आहे का? उत्तर मिळाले- 'नाही, काही खास कारण वाटत नाही. कदाचित त्यांना फार्म हाऊसचा शेफ जास्त आवडला असेल.'
भारत आणि युरोपियन युनियनमध्ये आज मुक्त व्यापार कराराची (FTA) घोषणा होऊ शकते. यामुळे 200 कोटी लोकांची एक संयुक्त बाजारपेठ तयार होईल, जी जगाच्या 25% GDP ला व्यापेल. भारताचे वाणिज्य मंत्री पीयूष गोयल आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन या दोघांनी याला 'मदर ऑफ ऑल डील्स' म्हटले आहे. याला डोनाल्ड ट्रम्प यांच्या अंदाधुंद शुल्काचे (टॅरिफ) उत्तर मानले जात आहे. 'मदर ऑफ ऑल डील्स' काय आहे, या करारामुळे तुमच्या खिशावर काय परिणाम होईल आणि यामुळे ट्रम्प यांच्या शुल्काची (टॅरिफ) भरपाई होऊ शकेल का; दिव्य मराठी एक्सप्लेनरमध्ये अशा 6 महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे… प्रश्न-1: भारत-EU दरम्यान होणारी 'मदर ऑफ ऑल डील्स' काय आहे? उत्तर: जेव्हा दोन किंवा अधिक देश परस्परांनी ठरवतात की ते एकमेकांच्या वस्तू आणि सेवांवरील कर, निर्बंध आणि अडथळे कमी करतील किंवा रद्द करतील, तेव्हा त्याला फ्री ट्रेड ॲग्रीमेंट म्हणजेच FTA म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचे तर, FTA हा व्यापाराचा 'टोल फ्री हायवे' आहे. गेल्या 4 वर्षांत भारताने यूके, ओमान आणि न्यूझीलंडसह 8 FTA वर स्वाक्षरी केली आहे. आता 27 जानेवारी रोजी युरोपियन युनियनसोबतही FTA ची घोषणा होऊ शकते. भारत-EU मधील हा व्यापार करार 3 मुख्य कारणांमुळे 'मदर ऑफ ऑल डील्स' म्हणून ओळखला जात आहे… लंडनच्या इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटच्या वरिष्ठ विश्लेषक सुमेधा दासगुप्ता यांच्या मते, ‘सध्याच्या परिस्थितीमुळे जागतिक व्यापार डगमगत आहे. अशा वेळी भारत आणि EU ला विश्वासार्ह व्यापार भागीदाराची गरज आहे. भारताला अमेरिकेच्या शुल्काचा (टॅरिफ) परिणाम कमी करायचा आहे, तर EU ला चीनवरील अवलंबित्व कमी करायचे आहे, ज्याला ते विश्वसनीय मानत नाही.’ प्रश्न-2: भारत आणि EU या करारावर स्वाक्षरी करण्यासाठी कसे सहमत झाले? उत्तर: भारत आणि युरोपियन युनियन यांच्यात व्यापार कराराबाबत जून 2007 मध्ये चर्चा सुरू झाली होती. त्यावेळी त्याला व्यापक व्यापार आणि गुंतवणूक करार म्हणजेच BTIA असे म्हटले जात होते. त्यावेळी भारताकडून त्याचे नेतृत्व पंतप्रधान मनमोहन सिंग करत होते. 15 फेऱ्यांच्या बैठका झाल्या, परंतु 2013 मध्ये BTIA ची चर्चा पूर्णपणे थांबली. EU ला त्याच्या 95% पेक्षा जास्त निर्यातीवरील शुल्क (टॅरिफ) रद्द करायचे होते, तर भारत फक्त 90% पर्यंत तयार होता. याशिवाय, या 5 मोठ्या कारणांमुळेही हा करार रखडला होता… जून-जुलै 2022 मध्ये भारत-युरोपियन युनियन (EU) दरम्यान मुक्त व्यापार कराराची (FTA) चर्चा पुन्हा सुरू झाली. तेव्हापासून ऑक्टोबर 2025 पर्यंत दोन्ही बाजूंच्या अधिकाऱ्यांनी 14 बैठका घेतल्या. या बैठकांमध्ये 2007 ते 2013 पर्यंत निश्चित झालेल्या मुद्द्यांवरही चर्चा करण्यात आली. ज्यात असे ठरले की... भारताचे वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांनी गेल्या आठवड्यात सांगितले होते की, भारत आणि EU यांच्यातील कराराच्या 24 पैकी 20 प्रकरणांवरील चर्चा पूर्ण झाली आहे. अहवालानुसार, 27 जानेवारी रोजी दिल्लीत होणाऱ्या 16व्या भारत-युरोपियन युनियन शिखर परिषदेत दोन्ही पक्ष FTA वर स्वाक्षरी करू शकतात. प्रश्न-3: या करारामुळे भारताला काय फायदा होईल? उत्तर: भारताने 2025 मध्ये EU देशांना 6.8 लाख कोटी रुपयांचा माल विकला होता. तर EU कडून 5.5 लाख कोटी रुपयांचा माल खरेदी केला होता. भारत-EU च्या व्यापार करारामुळे भारताच्या या क्षेत्रांना सर्वाधिक फायदा होईल… युरोपमध्ये भारतीय कपडे अधिक विकले जातील भारतात युरोपच्या संरक्षण फॅक्टरी लागण्याची शक्यता फार्मा आणि केमिकल व्यापार 20% वाढू शकतो कार्बन करातून दिलासा मिळण्याची आशा याव्यतिरिक्त, भारतातील लोकांना युरोपियन दारू, युरोपियन कार आणि औद्योगिक उत्पादने स्वस्त मिळतील, कारण त्यांच्यावरील प्रीमियम शुल्कात (टेरिफ) कपात होईल. प्रश्न-4: या करारामुळे युरोपीय देशांना काय फायदा होईल? उत्तर: भारत-EU च्या व्यापार करारामुळे युरोपियन युनियनच्या या क्षेत्रांना सर्वाधिक फायदा होईल… भारतात युरोपीय दारू आणि वाईनचा वापर वाढेल भारतात युरोपियन गाड्यांची मागणी वाढेल याव्यतिरिक्त, युरोपमधील आयटी, अभियांत्रिकी, व्यवसाय सेवा आणि दूरसंचार यांसारख्या उच्च-मूल्याच्या सेवा क्षेत्रांनाही भारतात अधिक संधी मिळतील, कारण या क्षेत्रांमध्ये इतर देशांच्या तुलनेत कमी शुल्क (टेरिफ) लागेल. प्रश्न-5: भारत-EU व्यापार करार ट्रम्पच्या शुल्काचे (टेरिफ) उत्तर बनेल का? उत्तर: ट्रम्प यांनी सध्या भारताच्या वस्तूंवर 50% शुल्क (टेरिफ) लावले आहे, जे त्यांच्या सत्तेत येण्यापूर्वी 10% पेक्षा कमी होते. यामुळे भारताच्या निर्यातीवर खूप नकारात्मक परिणाम झाला आहे. ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्ह (GTRI) नुसार, नोव्हेंबर 2025 मध्ये भारताची वस्तू निर्यात अंदाजे 3 लाख कोटी रुपये होती. हे वर्ष 2024 पेक्षा 11% कमी होते. फक्त अमेरिकेत होणाऱ्या निर्यातीत 28.5% घट झाली. मे 2025 मध्ये भारताने अमेरिकेला सुमारे 80 हजार कोटी रुपयांची निर्यात केली होती. ऑक्टोबरमध्ये ही घटून 56 हजार कोटी रुपये झाली. या अहवालानुसार, अमेरिकेत होणारी निर्यात 2024-2025 च्या 86.5 अब्ज डॉलरवरून घटून 2025-2026 मध्ये अंदाजे 50 अब्ज डॉलर राहू शकते. म्हणजेच भारतीय स्थानिक बाजाराला 3 लाख कोटी रुपयांचे नुकसान होईल. सर्वाधिक परिणाम टेक्स्टाईल, ज्वेलरी, कोळंबी आणि गालिचे यांसारख्या क्षेत्रांवर होईल. द हिंदू नुसार, या क्षेत्रांमध्ये निर्यात अंदाजे 70% पर्यंत घटण्याची शक्यता आहे, ज्यामुळे लाखो नोकऱ्यांवर संकट येऊ शकते. अमेरिकेत होणाऱ्या या निर्यातीवरील वाढलेल्या शुल्काचा (टेरिफचा) परिणाम जमिनीवर दिसू लागला आहे. सुरतसारख्या प्रमुख केंद्रातून मिळालेल्या अहवालानुसार, हिऱ्यांच्या उत्पादनात कपात करण्यास सुरुवात झाली आहे. सुरतमधील हिरे पॉलिशिंग उद्योग 12 लाख लोकांना रोजगार देतो. अर्थशास्त्रज्ञ शरद कोहली म्हणतात की, व्यापार करारानुसार (ट्रेड डील) किमान 90% वस्तूंवरील शुल्क (टेरिफ) शून्य होईल. यामुळे भारतीय वस्तू चीनइतक्या स्वस्त होऊ शकतात आणि युरोपमध्ये त्यांची मागणीही वाढेल. ट्रम्प यांच्या शुल्कामुळे (टेरिफमुळे) भारताला हिरे आणि रत्नांमध्ये जे नुकसान झाले आहे, त्याची भरपाई येथून होऊ शकते. मात्र, पूर्ण भरपाईबद्दल सांगणे शक्य नाही. परंतु 3 ते 4 वर्षांत EU-भारत यांच्यातील व्यापार अंदाजे 22 लाख कोटींपर्यंत जाऊ शकतो. प्रश्न-6: भारत-EU व्यापार करार अमेरिकेसाठी अडचणी कशा निर्माण करेल? उत्तर: EU आणि भारत जवळ आल्याने अमेरिकेसाठी अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात… भारत-EU दोन्ही अमेरिकेचे मोठे व्यापार भागीदार आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये JNU चे प्राध्यापक स्वर्ण सिंग यांच्या मते, ‘ट्रम्प यांनी टॅरिफचा शस्त्रासारखा वापर केल्यामुळे अमेरिकेच्या धोरणात्मक भागीदारांना जुन्या व्यावसायिक व्यवस्थांना पर्याय शोधण्यास भाग पाडले आहे. यामुळे EU-India FTA केवळ आर्थिक गरजेचा परिणाम नाही, तर एक धोरणात्मक निर्णय बनतो, जिथे दोन लोकशाही भागीदार जागतिक आर्थिक संरचनेला नवीन आकार देत आहेत.’ युरोप आणि अमेरिका पारंपारिक मित्र राहिले आहेत. हे संबंध 100 वर्षांहून अधिक जुने आहेत. परंतु गेल्या काही काळापासून अमेरिकन टॅरिफ आणि ग्रीनलँडला घेऊन संबंध बिघडले आहेत. त्याचप्रमाणे, भारतातून अमेरिकेत होणाऱ्या निर्यातीवर 50% टॅरिफ लावण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे, जुलै 2025 मध्ये ट्रम्प यांनी EU वर 30% टॅरिफ लावण्याची धमकी दिली होती. स्वर्ण सिंग म्हणतात, ‘या घटनांनी EU ची NATO व्यतिरिक्त इतर भागीदारी शोधण्याची इच्छा अधिक मजबूत केली आहे. त्यामुळे EU–India FTA केवळ आर्थिक राजनैतिक संबंधांपर्यंत मर्यादित न राहता, अमेरिकेविरुद्ध EU साठी एक भू-राजकीय विमा म्हणून समोर येतो.’
दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, २७ जानेवारी २०२६
पंचांगआज मिती माघ शुद्ध नवमी शके १९४७. चंद्र नक्षत्र भरणी. योग शुक्ल चंद्र राशी मेष. भारतीय सौर०७ माघ शके १९४७.मंगळवार दिनांक २७ जानेवारी २०२६ मुंबईचा सूर्योदय ०७.१४ मुंबईचा चंद्रोदय १२.५२ एएम मुंबईचा सूर्यास्त ०६.२८ मुंबईचा चंद्रास्त ०२.३३ उद्याची, राहू काळ ०३.३९ ते ०५.०४ .११;०० पर्यन्त चांगलादैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)मेष : आरोग्य उत्तम राहून मानसिक स्वास्थ्य लाभेलवृषभ : दीर्घकालीन अडलेली कामे पूर्ण होण्याच्या मार्गावर असतीलमिथुन : समाजातील मान्यवरांच्या ओळखी होऊन मदत लाभेलकर्क : द्विधा मनस्थिती मध्ये निर्णय घेऊ नका.सिंह : तुमचा इतरांवर प्रभाव राहील नोकरीत प्रगती संभवते.कन्या : व्यवसायात नवीन तंत्रज्ञान वापरू शकालतूळ : पारिवारिक समस्या सोडविता येतील.वृश्चिक : रोजच्या जीवनात बदल घडेल.धनू : जवळचे प्रवास घडतीलमकर : घरात आनंदी वातावरण राहीलकुंभ : धार्मिक कार्यात रस घ्यालमीन : मनावरील ताण निवळेल
MI vs RCB : बई इंडियन्सने टेबल-टॉपर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (RCB) १५ धावांनी पराभव करत आपली ताकद दाखवून दिली आहे.
Bhagat Singh Koshyari : महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना केंद्र सरकारकडून पद्मभूषण पुरस्कार जाहीर होतांच विरोधकांनी टीकेची झोड उठवली असून राजकीय वातावरण तापले आहे.
Yuzvendra Chahal Statement : चहलच्या मते, २०२२ पूर्वी भारतीय संघाचा दृष्टिकोन वेगळा होता. विशेषतः ६ ते १५ या मधल्या षटकांमध्ये संघ अनेकदा आपली लय गमावत असे.
Government job : कामाची बातमी.! ‘या’सरकारी विभागात चालू आहे सर्वात मोठी भरती, असा करा अर्ज….
जर तुम्ही सरकारी नोकरीची तयारी करत असाल, तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची माहिती आहे. विविध विभागांमध्ये या पदांसाठी अर्ज प्रक्रिया 27 जानेवारी 2026 पासून सुरू होईल.
Nat Sciver Brunt Century : नॅट सायव्हर-ब्रंटने डब्ल्यूपीएलमधील पहिलेवहिले शतक झळकावत नवा इतिहास रचला आहे.
Job In Russia: रशियात मजुरांचा प्रचंड तुटवडा; 40 हजार भारतीय कामगारांना मिळणार रोजगाराची संधी
Job In Russia: या वर्षाच्या अखेरीस सुमारे ४० हजार भारतीय मजुरांना रशियात रोजगाराची संधी मिळण्याची शक्यता आहे.
Ganesh Naik On Nitesh Rane : एमआयएम नगरसेविका सहर शेख यांच्या 'हिरव्या मुंब्रा' विधानावरून भाजपमध्ये मतभेद
Bank Strike : आज मध्यरात्रीपासून बँक कर्मचारी जाणार संपावर; ‘या’बँका उद्या राहणार बंद
युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) ने देशभरातील बँक कर्मचाऱ्यांच्या (Bank Strike) ५ दिवसांच्या कामाच्या आठवड्याच्या मागणीसाठी २७ जानेवारी २०२६ रोजी देशव्यापी संप पुकारला आहे
Don Bradman Baggy Cap : सर डॉन ब्रॅडमन यांची ऐतिहासिक 'बॅगी ग्रीन' कॅप सोमवारी एका लिलावात तब्बल ४,६०,००० ऑस्ट्रेलियन डॉलर्सना विकली गेली.
इंडिया पोस्ट जीडीएस भरती २०२६ च्या अधिसूचनाची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
UGC New Rules: उत्तर प्रदेशातील लखनऊ जिल्ह्यातील कुम्हरावां मंडळातील ११ पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि पदांचा सामूहिक राजीनामा दिल्याने खळबळ माजली आहे.
West Indies Squad : वेस्ट इंडिजचा टी-२० वर्ल्ड कपचा संघ पाहून इतर देशांची झोप उडणार
Girish Mahajan Atrocity : नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव न घेतल्याने मंत्री गिरीश महाजन वादात सापडले आहेत.
Lifestyle : पांढऱ्या कपड्यांवर डाग? चिंता नको.! ‘ही’बातमी वाचा जुने डागही होतील स्वच्छ
पांढऱ्या कपड्यांवरील शाई, भाजी, चहा आणि कॉफीचे डाग काढणे कठीण असू शकते.
Murlidhar Mohol : महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र संघटनेच्या सन २०२६ च्या नवीन दिनदर्शिकेचे मोठ्या उत्साहात प्रकाशन करण्यात आले.
Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंना अजून एक धक्का ! निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदेनी डाव साधला
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची (Maharashtra Politics) रणधुमाळी सुरू असताना आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे
Sanju Samson Form : अजिंक्य रहाणेच्या मते, संजू सॅमसनकडे अफाट क्षमता आहे आणि केवळ काही सामन्यांतील अपयशामुळे त्याला संघाबाहेर काढणे चुकीचे ठरेल.
India-EU FTA: या करारासाठीची चर्चा २००७ मध्ये सुरू झाली होती. तब्बल १८ वर्षांच्या वाटाघाटींनंतर हा समझोता होत आहे.
ZP Election : आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकांबाबत मोठी अपडेट…
ZP Election : ५० टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याच्या कारणावरून रखडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकांबाबतची न्यायालयीन सुनावणी लांबणीवर पडली आहे.
Post Office Scheme : FD पेक्षा मिळणार जास्त व्याज ! काय आहे पोस्ट ऑफिसची ‘ही’खास योजना?
यामुळे भविष्यासाठी किंवा निवृत्तीनंतर पुरेशी बचत होत नाही आणि ऐनवेळी कुटुंबीयांना आर्थिक अडचणी येतात. अशा परिस्थितीत पोस्ट ऑफिसने (Post Office Scheme) ज्येष्ठ नागरिकांसाठी आणलेली
Abhishek Sharma superstition : अभिषेक शर्माने सामन्यानंतर आपल्या वादळी अर्धशतकानंतर एक मॅजिक ट्रिकच्या खुलासा केला आहे.
Nagar-Daund Railway: या प्रकल्पामुळे नगरकरांचा रेल्वे प्रवास आता अधिक वेगवान आणि विनाअडथळा होणार असून, रेल्वेचा वेग ताशी १२० किमीपर्यंत पोहोचणार आहे.
७ फेब्रुवारीपासून सुरू होणारा टी२० विश्वचषक हा जियो-पॉलिटिक्सचा आखाडा बनला आहे. प्रथम, बांगलादेश संघाने भारतात खेळण्यास नकार दिला, त्यानंतर आयसीसीने त्यांना विश्वचषकातून काढून टाकले. आता, सर्वांच्या नजरा पाकिस्तानवर आहेत की ते देखील विश्वचषकावर बहिष्कार टाकतील का. तथापि, २५ जानेवारी रोजी पाकिस्तानी संघाची घोषणा झाल्यानंतर त्यांचा विश्वचषकातील सहभाग जवळजवळ निश्चित मानला जात आहे. बांगलादेशला चिथावणी देऊन पाकिस्तान विश्वचषक का खेळत आहे? जाणून घेऊयात आजच्या एक्सप्लेनरमध्ये... प्रश्न १: पाकिस्तानने बांगलादेशला भारतात विश्वचषक न खेळण्यासाठी चिथावणी दिली का? उत्तर: बांगलादेशला चिथावण्यात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची मोठी भूमिका आहे... संघर्षासाठी लिहिले पत्र: २० जानेवारी रोजी, पीसीबीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (आयसीसी) पत्र लिहून बांगलादेशच्या भारत दौऱ्यावर न जाण्याच्या निर्णयाचे समर्थन केले. त्यांनी असा युक्तिवाद केला की, सुरक्षेच्या चिंता वैध आहेत. पीसीबीने सामूहिक दबाव आणण्यासाठी या पत्राची प्रत सर्व आयसीसी सदस्य देशांनाही पाठवली. मतदानात बांगलादेशला पाठिंबा: २१ जानेवारी रोजी आयसीसी बोर्डाच्या बैठकीत बांगलादेशचे सामने भारताऐवजी श्रीलंकेत हलवण्यासाठी मतदान झाले. चौदा देशांनी बांगलादेशच्या विरोधात मतदान केले, तर फक्त पाकिस्तानने त्यांना पाठिंबा दिला. सामन्यांची तयारी थांबवल्याच्या बातम्या: २० आणि २१ जानेवारी रोजी पाकिस्तान संघ आणि पीसीबीने बांगलादेशच्या समर्थनार्थ विश्वचषक तयारी थांबवल्याचे वृत्त समोर आले. नक्वी यांचे प्रक्षोभक विधान: २४ जानेवारी रोजी बांगलादेश विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर, पीसीबी प्रमुख मोहसीन नक्वी म्हणाले, बांगलादेशला अन्याय्य वागणूक देण्यात आली आहे. नक्वी यांनी आयसीसीवर दुटप्पीपणाचा आरोप केला आणि म्हटले की पाकिस्तान खेळेल की नाही हे सरकार ठरवेल. १९८३ चा विश्वचषक विजेता आणि माजी भारतीय अष्टपैलू मदन लाल यांनी आयसीसीच्या निर्णयाचे समर्थन करत म्हटले की पाकिस्तानने बांगलादेशची दिशाभूल केली आणि भारताचा अपमान करण्यासाठी त्यांना चिथावणी दिली. प्रश्न २: पाकिस्तान बांगलादेशप्रमाणे विश्वचषकावर बहिष्कार टाकेल का? उत्तर: बांगलादेश खेळेल की नाही यावरून वाद सुरू असताना, पाकिस्तानी माध्यमांनी पीसीबीच्या सूत्रांचा हवाला देत वृत्त दिले की जर बांगलादेश विश्वचषकातून बाहेर पडला तर पाकिस्तान देखील बहिष्कार टाकेल. त्यानंतर २४ जानेवारी रोजी पीसीबीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी सांगितले की, पाकिस्तान खेळेल की नाही याचा निर्णय पाकिस्तान सरकार घेईल. तथापि, पाकिस्तानकडे विश्वचषकात सहभागी न होण्याचे कोणतेही वैध कारण नाही. परिणामी, २५ जानेवारी रोजी पाकिस्तानने टी२० विश्वचषक २०२६ साठी आपला संघ जाहीर केला, ज्यामध्ये बाबर आझम, शादाब खान आणि नसीम शाह सारखे वरिष्ठ खेळाडू आहेत. तथापि, मीडिया रिपोर्ट्सनुसार, नुकसान नियंत्रित करण्यासाठी पाकिस्तान खालील पावले उचलू शकते... प्रश्न ३: बांगलादेशला चिथावणी देण्यात आली होती, मग पाकिस्तान विश्वचषक का खेळत आहे? उत्तर: पाकिस्तानकडे विश्वचषकावर बहिष्कार टाकण्याचे कोणतेही वैध कारण नाही, कारण त्याचे सामने आधीच श्रीलंकेत होणार आहेत. आयसीसीने असा इशाराही दिला आहे की जर पीसीबीने विश्वचषकाबाबत कोणत्याही राजकारणात भाग घेतला किंवा स्पर्धेतून माघार घेतल्याची घोषणा केली तर भविष्यातील स्पर्धा आणि लीगमधून त्यांना निर्बंधांना सामोरे जावे लागू शकते. शिवाय, पाकिस्तान क्रिकेटचे उत्पन्न रोखले जाऊ शकते. पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू बासित अली यांनी म्हटले आहे की, जर पाकिस्तानने विश्वचषक खेळण्यास नकार दिला तर ते दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर ढकलले जाऊ शकते. प्रसारकांना मोठे नुकसान सहन करावे लागेल, ज्याचा परिणाम पाकिस्तान क्रिकेटवरही होईल. पाकिस्तानने सामने खेळले पाहिजेत कारण त्यांना भारतात खेळायचे नाही. वृत्तानुसार पीसीबीचे प्रमुख मोहसिन नक्वी यांनी अलीकडेच लाहोरमध्ये खेळाडूंची भेट घेतली आणि सांगितले की, विश्वचषक खेळण्याचा अंतिम निर्णय सरकार घेईल. नक्वी वारंवार त्यांचे विधान बदलत आहेत आणि खोटे आरोप करत आहेत. प्रश्न ४: जर पाकिस्तान विश्वचषकात खेळला नाही तर पाकिस्तानचे किती नुकसान होईल? उत्तर: पाकिस्तानने विश्वचषकावर बहिष्कार टाकल्याने राजकारण, क्रीडा आणि महसूल या तिन्ही आघाड्यांवर नुकसान होईल. ५ मुद्द्यांमध्ये समजून घ्या… १. आयसीसीकडून वार्षिक महसूल रोखणे आयसीसीच्या २०२४-२७ महसूल मॉडेल अंतर्गत, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा वाटा ५.७५% आहे. परिणामी, पीसीबीला दरवर्षी आयसीसीकडून अंदाजे $३४.५ दशलक्ष किंवा २९० कोटी भारतीय रुपये मिळतात. पाकिस्तानी चलनात ही रक्कम अंदाजे ९६० कोटी पाकिस्तानी रुपये आहे. जर पाकिस्तानने विश्वचषकावर बहिष्कार टाकला तर आयसीसी ही रक्कम रोखू शकते. ही रक्कम भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड व्यतिरिक्त इतर देशांच्या क्रिकेट बोर्डांसाठी उत्पन्नाचा सर्वात मोठा स्रोत आहे. २. सहभाग शुल्क आणि बक्षीस रकमेचे थेट नुकसान प्रत्येक संघाला स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अंदाजे २५ दशलक्ष भारतीय रुपये मिळतात. स्पर्धेत पाचव्या ते १२व्या स्थानावर असलेल्या संघाला $४५०,००० किंवा अंदाजे ₹४१ दशलक्ष (४.१ कोटी) मिळतात. विजेत्या संघाला अंदाजे ₹२७५ दशलक्ष (२७५ दशलक्ष) आणि उपविजेत्या संघाला अंदाजे ₹१४७ दशलक्ष (१४७ दशलक्ष) मिळतात. पाकिस्तानसारख्या बलाढ्य संघाला उपांत्य फेरी किंवा अंतिम फेरीत खेळण्याची अपेक्षा आहे. जर पाकिस्तानने खेळण्यास नकार दिला, तर त्यांना किमान ₹७० दशलक्ष (७० दशलक्ष) चे थेट नुकसान होईल. ३. दोन दशलक्ष डॉलर्सचा दंड जर पाकिस्तानने विश्वचषकावर बहिष्कार घातला तर आयसीसीच्या नियमांनुसार त्याला ₹२ दशलक्ष (२ दशलक्ष) किंवा अंदाजे ₹१८० दशलक्ष (१८० दशलक्ष) दंड होऊ शकतो. ४. द्विपक्षीय मालिकांवर बंदी आयसीसी केवळ पाकिस्तान क्रिकेटच्या महसुलातच नव्हे तर त्याच्या भविष्यातील क्रिकेट कॅलेंडरमध्येही व्यत्यय आणू शकते. अहवाल असे सूचित करतात की, आयसीसी पाकिस्तानला इतर देशांसोबतच्या द्विपक्षीय मालिकांवर बंदी घालू शकते. पाकिस्तानला आशिया कपमधूनही वगळले जाऊ शकते. असे झाल्यास, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड किंवा न्यूझीलंडसारखे प्रमुख संघ पाकिस्तानात येणार नाहीत. प्रसारण हक्कांपासून पाकिस्तानचे कोट्यवधी रुपये गमवावे लागतील. ५. पाकिस्तान सुपर लीग बंद होण्याचा धोका पाकिस्तानची पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) पूर्णपणे परदेशी खेळाडूंवर अवलंबून आहे. जर आयसीसीची इच्छा असेल तर ते इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजसारख्या देशांतील खेळाडूंना पीएसएलमध्ये खेळण्यासाठी एनओसी देण्यास नकार देऊ शकते. अशा परिस्थितीत, परदेशी खेळाडूंशिवाय, पीएसएलची ब्रँड व्हॅल्यू नष्ट होईल. प्रसारक माघार घेतील. असा अंदाज आहे की यामुळे पीसीबीला दरवर्षी अंदाजे ५०० दशलक्ष भारतीय रुपयांचे नुकसान होऊ शकते. प्रश्न ५: पाकिस्तानी खेळाडूंना काय नुकसान होईल? उत्तर: विश्वचषकात न खेळल्याने पाकिस्तानी खेळाडूंच्या कारकिर्दीला आणि आर्थिक नुकसान होईल... प्रत्येक खेळाडूला १.६ दशलक्ष रुपयांपेक्षा जास्त नुकसान होईल पाकिस्तानी खेळाडूंना आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळण्यासाठी ४००,००० पाकिस्तानी रुपये मॅच फी मिळते. पहिल्या फेरीत पाकिस्तानला चार सामने खेळायचे होते. जर एखाद्या खेळाडूने सर्व सामने खेळले तर त्यांना १.६ दशलक्ष पाकिस्तानी रुपये मिळायचे. जर पाकिस्तान खेळला नाही तर प्रत्येक खेळाडूला सामना शुल्काचे थेट नुकसान होईल. आयसीसी टी-२० क्रमवारीत पाकिस्तान ७ व्या क्रमांकावर आहे. संघ दुसऱ्या फेरीत पोहोचेल अशी अपेक्षा होती. जर पाकिस्तान विश्वचषकात खेळला नाही तर खेळाडूंना लाखोंचे नुकसान होईल. रँकिंगवर परिणाम, लीगमध्ये खेळण्याची संधी नाही सध्या, चार पाकिस्तानी खेळाडू आयसीसी टी-२० क्रमवारीत फलंदाजी, गोलंदाजी आणि अष्टपैलू श्रेणींमध्ये पहिल्या १० मध्ये आहेत. विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेत न खेळल्याने या खेळाडूंच्या क्रमवारीवर थेट परिणाम होईल. काही खेळाडू टॉप १० मधून बाहेरही पडू शकतात. विश्वचषकात खेळणे प्रत्येक खेळाडूच्या कारकिर्दीसाठी महत्त्वाचे असते. जर बहिष्कार पडला तर खेळाडू मोठे सामने खेळण्याचा अनुभव गमावतील. त्याच वेळी, पाकिस्तानी खेळाडूंना बिग बॅश लीग, ILT20 इत्यादी इतर क्रिकेट बोर्डांद्वारे चालवल्या जाणाऱ्या लीगमध्ये खेळण्यासाठी ICC कडून NOC मिळणार नाही. प्रायोजकांकडून माघार घेण्याची धमकी जेव्हा बांगलादेश संघ विश्वचषकातून बाहेर पडला तेव्हा SG सारख्या कंपन्या अनेक बांगलादेशी खेळाडूंना प्रायोजित करत होत्या. पण आता SG बांगलादेशी खेळाडूंना प्रायोजित करण्यापासून माघार घेणार आहे. पाकिस्तानच्या बाबतीतही असेच घडू शकते. पेप्सी आणि CA स्पोर्ट्स सारख्या कंपन्या माघार घेऊ शकतात, कारण प्रत्येक प्रायोजकाला त्यांचे खेळाडू विश्वचषक सारख्या मोठ्या आणि प्रसिद्ध व्यासपीठावर दिसावे असे वाटते. प्रश्न ६: जेव्हा पाकिस्तानला श्रीलंकेत त्यांचे सामने खेळण्याची परवानगी देण्यात आली, तेव्हा बांगलादेश का नाही? उत्तर: बांगलादेशचे सामने श्रीलंकेत न होण्याची तीन प्रमुख कारणे आहेत... १. सुरक्षेचा धोका पडताळलेला नाही सुरक्षा चिंता दाखवून बांगलादेशने भारतात खेळण्यास नकार दिला. तथापि, अहवाल असे सूचित करतात की यजमान देशांच्या सुरक्षेची देखरेख करणाऱ्या ICC च्या भ्रष्टाचार विरोधी आणि सुरक्षा युनिट (ACSU) ला भारतात असा कोणताही धोका आढळला नाही. पाकिस्तानबद्दल बोलताना धमक्यांचा हवाला देत त्यांनी म्हटले आहे की, त्यांच्या खेळाडूंच्या जीवाला भारतात धोका आहे. आयसीसीने ऐतिहासिक कारणास्तव हा एक विशेष प्रकार मानला आणि पाकिस्तानचे सामने भारतात आयोजित केले नाहीत. २. शेवटच्या क्षणी वेळापत्रकात बदल करणे कठीण ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सुरू होणाऱ्या टी२० विश्वचषकाचे वेळापत्रक, ठिकाणे, प्रसारण आणि तिकिटे निश्चित करण्यात आली आहेत. बांगलादेशने स्पर्धा सुरू होण्याच्या एक महिन्यापेक्षा कमी वेळ आधी स्थळ बदलण्याची विनंती केली होती. हे अचानक घडले. अशा परिस्थितीत, शेवटच्या क्षणी संपूर्ण टी२० विश्वचषकाचे वेळापत्रक बदलणे आयसीसीसाठी कठीण होते. लॉजिस्टिक आणि प्रसारणाच्या विचारांमुळे बांगलादेशचे सामने श्रीलंकेत हलवणे अशक्य होते. पाकिस्तानबद्दल, विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर होताच आयसीसीने पाकिस्तानमधील त्यांचे सामने मंजूर केले. यापूर्वी, भारताने २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानला जाण्यास नकार दिला होता आणि दोन्ही देशांमधील सामने तटस्थ ठिकाणी आयोजित करण्याचा करार झाला होता. ३. इतर देशही अशाच प्रकारच्या मागण्या चातुर्य दाखवण्यासाठी करतील. आयसीसीला सर्वात मोठी भीती होती की जर त्यांनी त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी बांगलादेशचे सामने श्रीलंकेत आयोजित केले तर इतर संघ देखील त्यांना त्यांचे स्थळ बदलण्यासाठी दबाव आणतील. हे योग्य ठरणार नाही.भारत हा स्पर्धेचा मुख्य यजमान देश आहे. जर अधिक सामने श्रीलंकेत हलवले गेले तर भारतीय प्रसारक आणि प्रायोजकांना हजारो कोटींचे नुकसान सहन करावे लागेल. यामुळे वाद आणखी वाढेल.
Budget decoded: सरकारी योजना तुमच्या कुटुंबाच्या आर्थिक स्थितीवर कसा परिणाम करतात? जाणून घ्या..
Budget decoded: बजेट म्हणजे केवळ कर वाढवणे किंवा घटवणे नव्हे, तर तो सरकारच्या कमाईचा आणि खर्चाचा संपूर्ण आराखडा असतो.
Mouni roy :मौनी तिच्या सादरीकरणादरम्यान रागाने स्टेजवरून निघून जात असल्याचा व्हिडिओ रेडिटवर समोर आला असून, हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.
Private Jet Crash : मोठी दुर्घटना..! खासगी विमान कोसळलं; ८ प्रवाशी करत होते प्रवास
Private Jet Crash :
Abhishek Sharma Bat Check : सध्या सोशल मीडियावर न्यूझीलंडचे खेळाडू अभिषेक शर्माची बॅट चेक करतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
Chandrapur Politics : चंद्रपूरच्या राजकारणात होणार मोठा उलटफेर? भाजप मोठी चाल खेळणार
चंद्रपूर महानगरपालिकेच्या (Chandrapur Politics) निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला असून, भाजपकडून काँग्रेसला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू झाल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
Dhurandhar : ‘धुरंधर’ चित्रपटातील अभिनेता अटक; घरकाम करणाऱ्या महिलेवर 10 वर्ष केला अत्याचार
Dhurandhar : ‘धुरंधर’ चित्रपटात झळकलेला अभिनेता नदीम खान याला घरकाम करणाऱ्या महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली
Karnataka Ranji Squad Announce: धक्कादायक निर्णय! केएल राहुलचे संघात पुनरागमन, कर्णधारही अचानक बदलला
Karnataka Ranji Squad : केएल राहुलच्या पुनरागमनामुळे कर्नाटक संघाची फलंदाजीची फळी मजबूत झाली आहे.
Boat Accident : सागरी किनाऱ्यावर हाहाकार; ३५० प्रवाशांची बोट समुद्रात बुडाली; अनेक जण ठार
Boat Accident : फिलिपाईन्समध्ये ३५९ प्रवाशांना घेऊन जाणारी एक बोट समुद्रात बुडाली. आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाला असून ३०१ प्रवाशांना वाचवण्यात यश आले आहे.
फिलिपाईन्समध्ये बोट बुडून अनेकांचा मृत्यू
झांबोआंगा : फिलिपाईन्समध्ये झांबोआंगा येथून सुलू प्रांतातील जोलो बेटाच्या दिशेने निघालेली बोट समुद्रात बुडाली. बुडालेल्या बोटीत ३५० पेक्षा जास्त नागरिक होते. यातील अनेकांचा बुडून मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत आहे. बचाव पथकाने १५ मृतदेह समुद्रातून बाहेर काढले आहेत. अद्याप २८ जण बेपत्ता आहेत. बचाव पथकाने ३१६ जणांना वाचवले आहे.बुडालेली बोट ही इंटर-आयलंड कार्गो आणि पॅसेंजर सेवा होता. बोटीत ३३२ प्रवासी आणि २७ क्रू मेंबर्स (कर्मचारी) होते. समुद्रातून प्रवास करत असताना बोटीत तांत्रिक बिघाड झाला. या बिघाडामुळे सोमवारी पहाटे बोट समुद्रात बुडाली.समुद्रात असताना सोमवारी २६ जानेवारी २०२६ रोजी मध्यरात्री एक वाजून ५० मिनिटांनी बोटीकडून एक संकटात सापडल्याचा संदेश पाठवण्यात आला. हा संदेश मिळताच बचाव पथक घटनास्थळाच्या दिशेने रवाना झाले. पण पथक पोहोचण्याआधीच बालुक द्वीप गावापासून साधारण २ किलोमीटर अंतरावर बोट बुडाली. वाचलेल्या प्रवाशांना तटरक्षक दलाने तातडीने बालुक द्वीप गावात नेले, तिथेच त्यांच्यावर आवश्यक ते उपचार करण्यात आले.तटरक्षक दलाची टीम तसेच तटरक्षक दलाचे एक विमान, हवाई दलाची आणि नौदलाची टीम हे सर्वजण संयुक्तपणे मदतकार्य करत आहेत. बेपत्ता असलेल्यांचा शोध सुरू आहे. बोट बुडण्याचे कारण अद्याप समजलेले नाही. या प्रकरणी चौकशी होणार आहे.फिलिपाईन्समध्ये बोट बुडण्याच्या घटना अनेकदा घडतात. फिलिपाईन्सच्या बेटांच्या दरम्यान लहान - मोठी चक्रीवादळे वारंवार येत असतात. या चक्रीवादळांमुळे तसेच जहाजांची योग्य निगा न राखणे, गर्दी आणि सुरक्षा नियमांची कडक अंमलबजावणी न होणे या कारणांमुळेही फिलिपाईन्समध्ये अनेकदा बोटी बुडाल्या आहेत. ताज्या दुर्घटनेचे कारण जाणून घेण्यासाठी चौकशी सुरू आहे.
IAS Tina Dabi: प्रजासत्ताक दिन सोहळ्यादरम्यान झालेल्या एका ‘मानवीय चुकी’मुळे त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
Principal Died : देशभरात २६ जानेवारी २०२६ रोजी प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना महाराष्ट्रात दोन दुर्दैवी घटना (Principal Died) घडल्या ज्यामुळे उत्साहावर शोककळा पसरली
Shreyas Iyer Opportunity : तिलक वर्मा उर्वरित दोन टी-२० सामन्यात खेळू शकणार नाही. त्यामुळे श्रेयस अय्यरला संधी मिळाली.
Uddhav Thackeray : लातूरमध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. औशाचे माजी आमदार दिनकरराव माने यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
Budget 2026: विमा क्षेत्राला कर सवलतींची अपेक्षा; पॉलिसीधारकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता
Budget 2026: विमा क्षेत्राला अधिक स्वस्त आणि सुलभ करण्यासाठी आयकर सवलतीत वाढ करण्याची आग्रही मागणी उद्योगाकडून केली जात आहे.
प्रजासत्ताक दिनी धाराशिवमध्ये पोलिसाचा मृत्यू
धाराशिव : प्रजासत्ताक दिनी ध्वजवंदन केल्यानंतर थोड्याच वेळात ५५ वर्षीय मोहन भीमा जाधव या पोलीस अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. ही घटना धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील तलमोड येथे घडली.मोहन जाधव हे तलमोड येथील चेक पोस्टवर एक्साईज इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत होते. प्रजासत्ताक दिनानिमित्त त्यांनी चेक पोस्टवर ध्वजवंदन केले. तिरंग्याला सलामी दिल्यानंतर ते उपस्थितांसोबत फोटो काढत होते. फोटो काढणे सुरू असतानाच मोहन जाधव यांना अस्वस्थ वाटू लागले. काही लक्षात येण्याआधीच हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि ते सर्वांसमोर जमिनीवर कोसळले. त्यांना तातडीने उपचारासाठी नेण्यात आले. पण रुग्णालयात पोहोचण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी तपासणी करुन त्यांचा मृत्यू झाल्याचे अधिकृतरित्या जाहीर केले.मोहन जाधव हे मूळचे सोलापूर येथील रहिवासी होते. कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची विभागात ओळख होती. त्यांना नुकतेच प्रमोशन मिळालं होतं, त्यामुळे त्यांच्या कुटुंबात आणि मित्रपरिवारात आनंदाचे वातावरण होते. मात्र, पदोन्नतीचा आणि राष्ट्रीय उत्सवाचा हा आनंद नियतीने हिरावून नेला. सोमवार २६ जानेवारी २०२६ रोजी त्यांनी राष्ट्रध्वजाला दिलेली सलामी ही त्यांची अखेरची सलामी ठरली.
Ramesh Tikhe Death : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख पदाधिकारी रमेश तिखे (Ramesh Tikhe Death) यांचा हृदयविकाराने निधन झाल्याची खळबळजनक बातमी समोर आली
Budget 2026: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारी रोजी लोकसभेत सलग नवव्यांदा देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
Badrinath-Kedarnath : चार धाम तीर्थक्षेत्रांवर गैर-हिंदूंच्या प्रवेशावर बंदी घालण्याच्या दिशेनेबद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
कर्तव्यपथावर 'गणपती बाप्पा मोरया'चा गजर, प्रजासत्ताक दिनी दिसले देशाचे सामर्थ्य
नवी दिल्ली : भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राजधानी नवी दिल्लीत कर्तव्यपथावर संचलनाचे अर्थात परेडचे आयोजन करण्यात आले होते. या संचलनात महाराष्ट्रासह एकूण १७ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे तसेच १३ केंद्रीय विभागांचे चित्ररथ सहभागी झाले. या व्यतिरिक्त भूदल, नौदल, हवाई दल, देशातील केंद्रीय निमलष्करी दले यांचाही संचलनात सहभाग होता. स्वदेशी धनुष तोफ तसेच टी ९० भीष्म रणगाडा, अर्जुन एम के १ मेन बॅटल टँक, नाग मिसाइल, मार्क २ चीही झलक दिसली. संचलनाचा समारोप हवाई दलाच्या विमानांच्या ताफ्याने दिल्लीच्या आकाशात चित्तथरारक कसरती करत केला.https://www.youtube.com/shorts/FlW1Gp7-EBkपरेड अर्थात संचलनाच्या माध्यमातून देशाचे सामर्थ्य, समृद्ध सांस्कृतिक वारसा, प्रगती, लष्करी पराक्रम यांचे प्रतिबिंब दिसले. भारताच्या वाढत्या लष्करी सामर्थ्याची झलक दिसली.https://www.youtube.com/shorts/-rk5aAD-1xE'स्वातंत्र्याचा मंत्र : वंदे मातरम् आणि समृद्धीचा मंत्र : आत्मनिर्भर भारत ' या संकल्पनेअंतर्गत कर्तव्य पथावर ३० चित्ररथ आणि अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण झाले. बंकिमचंद्र चटर्जींची रचना असलेले भारताचे राष्ट्रीय गीत 'वंदे मातरम्' ला दिडशे वर्ष झाल्याच्या निमित्ताने केंद्र सरकारचे सांस्कृतिक मंत्रालय विशेष चित्ररथ घेऊन परेडमध्ये सहभागी झाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कार्यक्रमाची पाहणी केली.चित्ररथांच्या माध्यमातून भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचे, सांस्कृतिक विविधतेचे आणि विविध क्षेत्रांमधील स्वावलंबनाकडे होणाऱ्या प्रगतीचे दृश्य वर्णन सादर करण्यात आले. ज्यामध्ये हस्तकला आणि लोक परंपरांपासून ते स्वावलंबन, नवोन्मेष, संरक्षण तयारी आणि राष्ट्र उभारणी उपक्रमांपर्यंतच्या विषयांचा समावेश होता. परेडमध्ये सैनिकांच्या तुकड्या सहभागी झाली. लष्करी बँड पथके आकर्षक धून वाजवत परेडमध्ये सहभागी झाली.https://www.youtube.com/shorts/gJSzMY5qw3oमहाराष्ट्राच्या चित्ररथाची गणेशोत्सव ही संकल्पना होती. या निमित्ताने दिल्लीत गणपती बाप्पा मोरया हा गजर घुमला. महाराष्ट्राचा चित्ररथ येताच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पियूष गोयल यांनी टाळ्या वाजवून कौतुक केलं.युरोपियन कौन्सिलचे प्रेसिडेंट अँटोनियो कोस्टा आणि युरोपियन युनियनच्या प्रेसिडेंट उर्सुला वॉन डेर लेयन हे २०२६ च्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. परंपरेनुसार, राष्ट्रध्वज फडकवण्यात आला, त्यानंतर राष्ट्रगीत आणि स्वदेशी १०५-मिमी लाईट फील्ड गन वापरून २१ तोफांची सलामी देण्यात आली. दरवर्षीप्रमाणे, पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देऊन लाल किल्ल्यावर आले. राष्ट्रपती, विशेष अतिथी आणि पंतप्रधान आणि इतर मान्यवर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत परेड झाली.जागतिक अॅथलेटिक पॅरा चॅम्पियनशिपचे विजेते, नैसर्गिक शेती करणारे शेतकरी, पीएम स्माइल योजनेअंतर्गत पुनर्वसन केलेले ट्रान्सजेंडर आणि भिकारी, गगनयान, चांद्रयान इत्यादी अलीकडील इस्रो मोहिमांमध्ये सहभागी असलेले सर्वोत्तम कामगिरी करणारे शास्त्रज्ञ/तांत्रिक व्यक्ती, राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशनमध्ये SIGHT (स्ट्रॅटेजिक इंटरव्हेंशन फॉर ग्रीन हायड्रोजन ट्रान्झिशन) कार्यक्रमांतर्गत हायड्रोजन उत्पादन आणि इलेक्ट्रोलायझर उत्पादनासाठी प्रोत्साहन मिळालेल्या कंपन्यांचे प्रमुख/सीईओ आणि प्रमुख प्रकल्पांमध्ये काम करणारे डीआरडीओचे सर्वोत्तम कामगिरी करणारे शास्त्रज्ञ/तांत्रिक व्यक्ती आदी दहा हजार मान्यवर विशेष आमंत्रणाचा मान राखत परेड बघण्यासाठी उपस्थित होते.
Inderjit Singh Bindra : बीसीसीआयचे माजी अध्यक्ष आय. एस. बिंद्रा यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी दिल्लीत निधन झाले.
Republic Day: देशाच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सोमवारी दिल्लीतील कर्तव्यपथावर भारतीय लष्कराच्या बदलत्या आणि आधुनिक स्वरूपाचे दर्शन घडले.
IAF Officer Akshita Dhankhar: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना ध्वजारोहणात सहकार्य करण्याचा ऐतिहासिक बहुमान भारतीय हवाई दलाच्या (IAF) फ्लाइट लेफ्टनंट अक्षिता धनखर यांना मिळाला.
February Travel Destinations: फेब्रुवारीत फिरायचंय? हवामानच जणू हाक देतंय या ठिकाणी
February Travel Destinations: फेब्रुवारी हा असा महिना आहे, जेव्हा थंडी हळूहळू कमी होते, उकाडा अजून जाणवत नाही आणि प्रवासासाठी हवामान अगदी परफेक्ट असतं. ना अंग गोठवणारी थंडी, ना थकवणारी गरमी.
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात आपली परंपरा कायम ठेवली.
Social Media Influencer : प्रसिद्ध मराठी इन्फ्लुएन्सर आणि रील स्टार प्रथमेश कदमने आजारपणामुळे प्राण गमावल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
Simran Bala :जम्मू आणि काश्मीरमधील केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (CRPF) २६ वर्षीय सहाय्यक कमांडंट सिमरन बाला आज दिल्लीतील प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये त्यांच्या दलाच्या सर्व-पुरुष तुकडीचे नेतृत्व केले.
शक्तिपीठ महामार्ग महाराष्ट्रातील या जिल्ह्यांतून जाणार
मुंबई : एमएसआरडीसीने ८५६ किमीच्या महाराष्ट्रातील १३ जिल्ह्यांतील ३९५ गावांतून जाणार असलेल्या शक्तिपीठ महामार्गाचा सुधारित प्लॅन मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठवला आहे. नागपूर ते मुंबई या समृद्धी महामार्गाप्रमाणेच राज्याच्या विकासाला गती देणारा शक्तिपीठ महामार्ग हा नागपूर ते गोवा असा असेल.स्थानिकांशी संवाद साधल्यानंतर जनतेच्या मागण्या आणि त्यांचे प्रश्न यांचा सर्वांगीण विचार करून एमएसआरडीसीने शक्तिपीठ महामार्गाचा सुधारित प्लॅन तयार केला आहे. आधीचा ८४० किमीचा महामार्ग आता ८५६ किमीचा झाला आहे. आधी १२ जिल्ह्यांतील ३५० गावांतून जाणार असलेला हा मार्ग आता १३ जिल्ह्यांतील ३९५ गावांतून जाणार आहे. या महामार्गामुळे प्रवास वेगाने होईल. मालवाहतूक करणे सोपे होईल.शक्तिपीठ महामार्गात आता सातारा या जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर, बीड, धाराशीव, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या १३ जिल्ह्यांतून शक्तिपीठ महामार्ग जाणार आहे.आधी जुन्या प्लॅननुसार १४६ गावांतील मोजणी झाली होती. यातील आवश्यक ती माहिती वापरली जाईल आणि जिथे गरज असेल तिथे पुन्हा मोजणी घेतली जाईल तसेच उर्वरित गावांतही जमीन मोजणीची कामं वेगाने केली जातील, अशी माहिती एमएसआरडीसीने दिली. जमीन मोजणी पूर्ण केल्यानंतर कायद्यानुसार योग्य तो मोबदला देऊनच भूसंपादन केले जाईल, असे राज्य शासनाच्यावतीने सांगण्यात आले आहे.
Mexico Soccer Field Firing : फुटबॉल सामन्यादरम्यान गोळीबार ; ११ जणांचा मृत्यू तर १२ जण जखमी
Mexico Soccer Field Firing : मेक्सिकन शहर ग्वानाजुआटो, सॅलामांका याठिकाणी फुटबॉलचा सामना सुरु असताना मैदानावर अंधाधुंद गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे.
Girish Mahajan : गिरीश महाजन यांनी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात भाषण करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव न घेतल्याने वाद
Mahhi Vij New Car: घटस्फोटानंतर माही विजचा मोठा निर्णय; लेक तारासाठी ५० लाखांची मिनी कूपर भेट
Mahhi Vij New Car: टीव्ही अभिनेत्री माही विज सध्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अभिनेता जय भानुशालीपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतल्यानंतर माही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सतत बातम्यांमध्ये आहे.
मोदी सरकारचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना होणार फायदा
नवी दिल्ली : मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी नवी दिल्लीत एका उच्चस्तरीय बैठकीत महाराष्ट्रातून ३.३७ लाख मेट्रिक टन तूर खरेदीला मंजुरी दिली आहे. या खरेदीसाठी केंद्राने २६९६ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. तूर खरेदी ही मूल्य समर्थन योजनेंतर्गत किमान आधारभूत किमतीनुसार होणार आहे.केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना हमीभाव मिळेल आणि थेट खरेदीमुळे दलालांचा त्रासही संपणार आहे. पारदर्शक खरेदीसाठी केंद्रांची संख्या वाढवण्याचे आणि आधुनिक तंत्रज्ञान वापरण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी घेतलेल्या बैठकीला महाराष्ट्राचे विपणन अर्थात मार्केटिंग विभागाचे मंत्री जयकुमार रावल उपस्थित होते. त्यांनी राज्यातील तूर उत्पादनाची सविस्तर माहिती बैठकीत सादर केली. तसेच बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांशी खरेदी प्रक्रियेच्या नियोजनाबाबत चर्चा केली.केंद्राच्या निर्णयानुसार तूर खरेदी ही नाफेड आणि एनसीसीएफ या दोन केंद्रीय संस्था महाराष्ट्र शासनाशी समन्वय राखून करतील. गरज पडल्यास खरेदी केंद्रांची संख्या वाढवण्याचे निर्देशही केंद्रीय कृषीमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
India-EU trade deal : भारत युरोपियन युनियन (EU) मधील कारवरील शुल्क ४० टक्क्यांपर्यंत कमी करू शकतो. सध्या ११० टक्के शुल्क लागू आहे.

27 C