Student Suicide : हॉल तिकीट आणून घरी परतल्यानंतर आई कामावर जाताच १७ वर्षीय विद्यार्थ्याचा टोकाचा निर्णय; विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न गंभीर.
PCMC News : महापालिकेत पुन्हा चैतन्य! नागरिक अन कार्यकर्त्यांनी महापालिका फुलली
PCMC News : तिसऱ्या मजल्यावरील बंद दालने पुन्हा उघडली; महापौर आणि उपमहापौर निवडीनंतर राजकीय हालचालींना वेग, कार्यकर्त्यांची मोठी वर्दळ.
PCMC News : शिवसेनेच्या विजयी उमेदवारांनी फेट्यावर 'किवळे पॅटर्न'चे स्टिकर्स लावून सभागृहात प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा.
Ajit Pawar : ५९ एकर गायरान जमीन पिंपरी चिंचवड मनपाकडे विनामूल्य हस्तांतरित करण्यात अजित पवारांचा सिंहाचा वाटा; नगरसेवक पंकज भालेकर यांचे आयुक्तांना निवेदन.
Satara Crime : ॲपल कंपनीचा बनावट माल विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ‘या’४ व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल
Satara Crime : शाहूपुरी पोलिसांची शाहू स्टेडियम आणि एसटी स्टँड परिसरात मोठी कारवाई; ॲपल कंपनीच्या हुबेहूब नक्कल केलेल्या बनावट मालाचा साठा जप्त.
Mahabaleshwar Election : महाबळेश्वरच्या दुर्गम भागातही निवडणूक यंत्रणा पोहोचली; चोख पोलीस बंदोबस्त आणि मशिनरीसह प्रशासन मतदानासाठी सज्ज.
Koregaon News : कोरेगाव तालुक्यातील आठवडा व जनावरे बाजार आज राहणार बंद
Koregaon News : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी कोरेगाव तालुक्यातील सर्व आठवडा बाजार व जनावरे बाजार बंद ठेवण्याचे आदेश.
दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, ०७ फेब्रुवारी २०२६
पंचांगआज मिती माघ कृष्ण षष्ठी शके १९४७. चंद्र नक्षत्र चित्रा. योग शूल.चंद्र राशी कन्या.भारतीय सौर १७ माघ शके १९४७.शनिवार दिनांक ७ फेब्रुवारी २०२६ .मुंबईचा सूर्योदय ०७.१०, मुंबईचा सूर्यास्त ०६.३४, मुंबईचा चंद्रोदय ११.३२ मुंबईचा चंद्रास्त १०.३०, राहू काळ १०.०१ ते ११.२७. चांगला दिवसदैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)
Agni-3 Missile:
कराडमध्ये खळबळ! NCP नेत्याच्या मुलावर बिबट्याचा जीवघेणा हल्ला; उंडाळे येथील घटना
Leopard Attack : कराडमधील उंडाळे परिसरात राष्ट्रवादीचे नेते उदयसिंह पाटील-उंडाळकर यांचे चिरंजीव अधिराज पाटील यांच्यावर बिबट्याचा हल्ला
Loan against gold: सोन्यावरील कर्ज दुप्पट; तरीही घाबरण्याचे कारण नाही – RBI
Loan against gold: गेल्या दोन वर्षात सोन्याच्या तारणावर दिले गेलेले कर्ज दुप्पटीन वाढलेले आहे. मात्र सोन्याचे मूल्य आणि कर्ज याचे प्रमाण रिझर्व बँकेने घालून दिलेल्या मर्यादित आहे. याबाबत चिंता करण्याची गरज नाही असे रिझर्व बँकेला वाटते.
U19 World Cup : हरारेमध्ये वैभव सूर्यवंशीच्या वादळी (१७५) शतकाच्या जोरावर भारताने इंग्लंडचा पराभव करून विक्रमी सहाव्यांदा विश्वचषक उंचावला.
युवा भारत सहाव्यांदा विश्वविजेता, अंतिम सामन्यात इंग्लंडवर 'वैभव'शाली विजय
हरारेत तिरंगा डौलाने फडकलाहरारे : आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या १९ वर्षांखालील भारतीय क्रिकेट संघाने विश्वविजेतेपद मिळवले आहे. हरारेमध्ये शुक्रवारी झालेल्या अंतिम सामन्यात भारताच्या युवा संघाने इंग्लंडच्या युवा संघाला १०० धावांनी पराभूत केले. या विजयासह युवा भारतीय संघ सहाव्यांदा विश्वविजेता झाला आहे. यापूर्वी २०००, २००८, २०१२, २०१८ आणि २०२२ मध्ये भारताने १९ वर्षांखाली वर्ल्ड कप जिंकला होता. भारताला अंतिम सामन्यात विजय मिळवून देण्यात १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचा मोलाचा वाटा होता.अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडसमोर ऐतिहासिक ४१२ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ ४०.२ षटकांत ३११ धावांवर सर्वबाद झाला. भारताच्या जवळपास सर्व गोलंदाजांनी विकेट घेतल्या. इंग्लंडसाठी बेन डावकिन्स, बेन मायेस आणि सॅलेब फाल्कोनर यांनी चांगली झुंज दिली, पण त्यांना संघाला विजयापर्यंत नेता आले नाही. या दोघांनी संघाला ३५ षटकांच्या आत अडीचशेचा टप्पा पार करून दिला. यादरम्यान फाल्कोनरने अर्धशतकही पूर्ण केले. पण त्यांची ९२ धावांची भागीदारी ३६ व्या षटकांत आरएस आंब्रिशने मिन्टोला बाद केले. अखेर ४१ व्या षटकांत त्याला कनिष्क चौहानने खिलान पटेलच्या हातून झेलबाद केले. फाल्कोनरने ६७ चेंडूंत ९ चौकार आणि ७ षटकारांसह ११५ धावा केल्या. भारताकडून आरएस आंब्रिशने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. दीपेश देवेंद्रन आणि कनिष्क चौहानने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. खिलान पटेल आणि आयुष म्हात्रे यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. तत्पूर्वी भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा धाडसी निर्णय घेतला. सलामीवीर ॲरॉन जॉर्ज (९) स्वस्तात बाद झाल्यानंतर डावाची सूत्रे वैभव सूर्यवंशी आणि कर्णधार आयुष म्हात्रे यांनी आपल्या हाती घेतली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १४२ धावांची जबरदस्त भागीदारी करत इंग्लंडच्या गोलंदाजांना हतबल केले.वैभव सूर्यवंशीने केवळ वेगाने धावाच केल्या नाहीत, तर युवा क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रमही आपल्या नावे केला. आयुष म्हात्रेने कर्णधाराला साजेशी खेळी करत ५१ चेंडूंत ५३ धावा केल्या, ज्यात ७ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. आयुष १९ व्या षटकात बाद झाला, पण तोपर्यंत भारताने मोठ्या धावसंख्येचा पाया रचला होता. भारतीय फलंदाजांच्या तुफान फटकेबाजीमुळे इंग्लंडला आता हा सामना जिंकण्यासाठी ४१२ धावांची गरज आहे. जर इंग्लंडने हे लक्ष्य गाठले, तर तो एक नवा जागतिक विक्रम ठरेल. मात्र, भारताची आक्रमक गोलंदाजी पाहता इंग्लंडला रोखून विश्वविजेतेपदावर नाव कोरण्याचे आव्हान भारतासमोर आहे.त्यानंतर वैभवला वेदांत त्रिवेदीचीही साथ मिळाली. वैभवने ५५ चेंडूंत शतक पूर्ण केले. त्यानंतर मात्र तो अत्यंत आक्रमक खेळू लागला. त्याने ७१ चेंडूंतच दीडशतक पूर्ण केले होते. तो द्विशतकाच्या दिशेने वाटचाल करत होता.मात्र २६ व्या षटकात त्याला मॅनी लम्लडेनने थॉमस यूच्या हातून झेलबाद केले. वैभवने १५ चौकार आणि १५ षटकारांसह ८० चेंडूंत १७५ धावांची खेळी केली. ही अंतिम सामन्यातील सर्वात मोठी खेळी आहे. तो बाद झाल्यानंतर वेदांत त्रिवेदी आणि उपकर्णधार विहान मल्होत्रा यांच्यातही ५१ धावांची भागीदारी झाली. मात्र विहान ३६ चेंडूंत ३० धावा करून जेम्ल मिन्टोच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर वेदांतही ३२ धावांवर मिन्टोच्याच गोलंदाजीवर बाद झाला. तरी नंतर अभिग्यान कुंडूने आक्रमक ३१ चेंडूंत ४० धावांची खेळी केली. आरएस आंब्रिशने १८ धावांची खेळी केली. खिलान पटेल ३ आणि हेनिल पटेल ५ धावांवर बाद झाले. पण कनिष्क चौहानने शेवटच्या षटकात आक्रमक फलंदाजी करत भारताला ४०० धावांचा टप्पा पार करून दिला.भारताने ५० षटकात ९ बाद ४११ धावा केल्या. कनिष्क चौहान २० चेंडूंत ३७ धावांवर नाबाद राहिला. इंग्लंडकडून गोलंदाजी करताना जेम्स मिन्टोने ३ विकेट्स घेतल्या. सेबास्टियन मॉर्गन आणि ऍलेक्स ग्रीन यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. मॅनी लम्सडेनने १ विकेट घेतली.रोहित, हरमनप्रीत आणि आता आम्ही…वर्ल्डकपची ट्रॉफी जिंकल्यानंतर कर्णधार आयुष म्हात्रे म्हणाला, “मी माझ्या भावना शब्दात व्यक्त करू शकत नाही. पण हा आमच्यासाठी एक अविस्मरणीय क्षण आहे. मुलांनी खरोखरच खूप छान कामगिरी केली. आम्ही जी उद्दिष्टे ठेवली होती, ती त्यांनी उत्तमरीत्या पूर्ण केली. सर्वांनी आपला नैसर्गिक खेळ केला.त्यामुळे, मला खरोखर खूप आनंद झाला आहे.” तसेच वैभव सूर्यवंशीचं कौतुक करताना आयुष म्हणाला, “तो फक्त आपल्या खेळावर लक्ष केंद्रित करतो. त्याने ज्या प्रकारची खेळी केली, त्यासाठी आमच्याकडे शब्दच नाहीत. तो एक दर्जेदार फलंदाज आहे हे आम्हाला ठाऊक होतं आणि तो काय करू शकतो हे त्याने या सामन्यात दाखवून दिलं आहे.” तसेच “रोहित शर्माने वर्ल्डकप जिंकला, हरमनप्रीतनेही जिंकला आणि आता आम्ही… त्यामुळे हा वारसा पुढे नेताना आम्हाला खूप आनंद होतोय. ही परंपरा अशीच पुढे नेण्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.”कुणाला जमलं नाही ते करून दाखवलंदहाव्यांदा युवा वर्ल्ड कप स्पर्धेतील फायनल खेळताना इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई करताना युवा टीम इंडियाने यूथ वनडेत तिसऱ्यांदा ४०० पेक्षा अधिक धावा केल्या. अन्य कोणत्याही संघाला एकपेक्षा अधिक वेळा एवढी मोठी धावसंख्या उभारता आलेली नाही. याआधी युवा वर्ल्ड कप फायनलमधील सर्वोच्च धावसंख्येचा रेकॉर्ड हा ऑस्ट्रेलियाच्या नावे होता. २०२४ मध्ये कांगारुंच्या युवा टीमनं ७ विकेट्सच्या मोबदल्यात २५३ धावा केल्या होत्या. यंदाच्या हंगामात फायनलमध्ये ४११ धावांसह युवा टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा विक्रमच मोडला नाही तर अशक्यप्राय टार्गेट सेट करत पहिल्या डावातच फायलची अर्धी लढाई जिंकल्याचे पाहायला मिळाले.केलेब फाल्कनरची शतकी झुंज अपयशीइंग्लंडच्या फलंदाजांनी विजयी धावांचा पाठलाग करताना झुंज देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात त्यांना यश आलं नाही. मिडल ऑर्डरमध्ये बॅटिंगसाठी आलेल्या केलेब फाल्कनर याने अखेरपर्यंत झुंज दिली. केलेबने शतक करत भारताला सहज जिंकू दिले नाही. केलेबने इंग्लंडला विजयी करण्यासाठी खूप प्रयत्न केले. मात्र भारताच्या डोंगराएवढ्या आव्हानासमोर त्याचे प्रयत्न अपुरे ठरले. केलेबने इंग्लंडसाठी सर्वाधिक ११५ धावांचे योगदान दिले. ओपनर बेन डॉकिन्स याने ६६ धावा केल्या. बेन मेस याने ४५ धावा जोडल्या. या व्यतिरिक्त इंग्लंडच्या इतर फलंदाजांनी झटपट आऊट होणे मैदानाबाहेरचा रस्ता धरला. जरी वैभव सूर्यवंशीच्या १७५ धावांची चर्चा मोठी असली, तरी फाल्कनरने अंतिम सामन्यात खेळलेली ही खेळी क्रिकेट रसिक दीर्घकाळ लक्षात ठेवतील.२०००: मोहम्मद कैफच्या नेतृत्वाखाली पहिले जेतेपद.२००८: विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक विजय.२०१२: उन्मुक्त चंदच्या शतकाने मिळवून दिलेले यश.२०१८: पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखालील निर्भेळ यश.२०२२: यश धुलच्या नेतृत्वाखाली पाचवा विजय.२०२६: आता आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली सहाव्यांदा विश्वविजेतेपदावर कब्जा.
वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात मुंबई पुष्पोत्सवाचा शुभारंभ
मुंबई (विशेष प्रतिनिधी) :मुंबई पुष्पोत्सवाप्रमाणेच येत्या काळात पूर्व आणि पश्चिम उपनगरांतही पुष्पोत्सव सुरू करण्यात येणार आहे,अशी घोषणा करतानाच महापालिका अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे यांनी या पुष्पोत्सवातून प्रेरणा घेवून नागरिकांनीही आपल्या घरात फुलझाडे लावावीत, असे आवाहन केले.मुंबई महानगरपालिका आणि वृक्ष प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने भायखळा (पूर्व) येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालय येथे मुंबई पुष्पोत्सव भरविण्यात आला आहे. यंदाचा हा २९ वा पुष्पोत्सव आहे. यंदाच्या पुष्पोत्सवात फुलांनी सजविलेले संगीत क्षेत्रातील वाद्य अशी संकल्पना साकारण्यात आली आहे. रंगीबेरंगी फुलांच्या सजावटीतून बासरी, तबला, वीणा, सतार, मृदुंग, गिटार, पेटी, टाळ, सनई, तुतारी, सॅक्सोफोन यासारखी संगीत वाद्ये साकारली आहेत.विविधरंगी फुलांनी साकारलेल्या संगीत क्षेत्रातील वाद्यांच्या प्रतिकृती… शोभेच्या खड्यांनी साकारलेले गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचे चित्र…फुलांनी सजविलेले फुलपाखरू…बहरलेली फुलझाडे…आश्चर्यचकीत करणारी बोन्साय वनस्पती…झेंडू, गुलाब, मोगरा आदींसह मनमोहून टाकणारी सुगंधी फुलांची सजावट…औषधी वनस्पती…वेली, भाजीपाला, मसाल्याची रोपे… आणि या सर्वांसाठी खते, कुंड्या आदींनी सजलेल्या यंदाच्या मुंबई पुष्पोत्सवाचा शुक्रवारी ६ फेब्रुवारी २०२६ शुभारंभ झाला.मुंबई पुष्पोत्सव ६ फेब्रुवारी ते रविवार ८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत सर्व नागरिकांसाठी खुला आहे.मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी आणि अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे तसेच उप आयुक्त (उद्याने) अजितकुमार आंबी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळी उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी, संचालक (प्राणिसंग्रहालय) डॉ. संजय त्रिपाठी व विविध मान्यवर उपस्थित होते.शुभारंभ सोहळ्यानंतर आयुक्तांसह सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणि मुंबईकरांनी प्रदर्शनाला भेट दिली. फुलांनी सजविलेले संगीत क्षेत्रातील वाद्यांची मांडणी पाहून महापालिका आयुक्त डॉ भूषण गगराणी यांनी उद्यान विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. सजावटीसाठी परिश्रम घेणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना फुलांची कुंडी भेट देण्यात आली.बागेसाठी लागणाऱ्या वस्तुंचे, खतांचेही प्रदर्शन पुष्पोत्सवात मांडले आहे. यासोबतच वेगवेगळ्या बोन्साय प्रजाती, औषधी वनस्पतीही प्रदर्शनात ठेवण्यात आल्या आहेत. पुष्पोत्सवात बागकामाचे साहित्य, कीटकनाशके, फवारणी यंत्रे, खते आदीच्या विक्रीसाठी दालने आहेत. पहिल्याच दिवशी पुष्पोत्सव पाहण्यासाठी गर्दी उसळल्याची माहिती उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली.
मोठी बातमी..! एकनाथ खडसेंना कोर्टाचा दणका; पत्नीविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी; काय आहे प्रकरण?
Eknath Khadse : पुण्यातील भोसरी जमीन व्यवहार प्रकरणात एकनाथ खडसे आणि त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना मुंबई सत्र न्यायालयाने झटका दिला आहे.
RBI MPC Meet: रिझर्व बँकेने शुक्रवारी आपला रेपो हा मुख्य व्याजदर 5.25% या कमी पातळीवर कायम ठेवला आहे.
हरारेत सूर्यवंशीचा शतकी 'तांडव', कर्णधार आयुष म्हात्रेची भक्कम साथ
हरारे : १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या महाअंतिम सामन्यात भारतीय युवा संघाने इंग्लंडविरुद्ध धावांचा पाऊस पाडत ऐतिहासिक कामगिरी केली. हरारे स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर भारताने इंग्लंडसमोर विजयासाठी तब्बल ४१२ धावांचे विशाल लक्ष्य ठेवले. भारताच्या या डावाचा मुख्य नायक ठरला तो युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी, ज्याने आपल्या बॅटने विश्वविक्रमी शतकी खेळी साकारली.भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा धाडसी निर्णय घेतला. सलामीवीर ॲरॉन जॉर्ज (९) स्वस्तात बाद झाल्यानंतर डावाची सूत्रे वैभव सूर्यवंशी आणि कर्णधार आयुष म्हात्रे यांनी आपल्या हाती घेतली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १४२ धावांची जबरदस्त भागीदारी करत इंग्लंडच्या गोलंदाजांना हतबल केले.वैभव सूर्यवंशीने केवळ वेगाने धावाच केल्या नाहीत, तर युवा क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रमही आपल्या नावे केला. आयुष म्हात्रेने कर्णधाराला साजेशी खेळी करत ५१ चेंडूत ५३ धावा केल्या, ज्यात ७ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. आयुष १९ व्या षटकात बाद झाला, पण तोपर्यंत भारताने मोठ्या धावसंख्येचा पाया रचला होता.भारतीय फलंदाजांच्या तुफान फटकेबाजीमुळे इंग्लंडला आता हा सामना जिंकण्यासाठी ४१२ धावांची गरज आहे. जर इंग्लंडने हे लक्ष्य गाठले, तर तो एक नवा जागतिक विक्रम ठरेल. मात्र, भारताची आक्रमक गोलंदाजी पाहता इंग्लंडला रोखून विश्वविजेतेपदावर नाव कोरण्याचे आव्हान भारतासमोर आहे.त्यानंतर वैभवला वेदांत त्रिवेदीचीही साथ मिळाली. वैभवने ५५ चेंडूत शतक पूर्ण केले. त्यानंतर मात्र तो अत्यंत आक्रमक खेळू लागला. त्याने ७१ चेंडूतच दीडशतक पूर्ण केले होते. तो द्विशतकाच्या दिशेने वाटचाल करत होता. मात्र २६ व्या षटकात त्याला मॅनी लम्लडेनने थॉमस यूच्या हातून झेलबाद केले. वैभवने १५ चौकार आणि १५ षटकारांसह ८० चेंडूत १७५ धावांची खेळी केली. ही अंतिम सामन्यातील सर्वात मोठी खेळी आहे. तो बाद झाल्यानंतर वेदांत त्रिवेदी आणि उपकर्णधार विहान मल्होत्रा यांच्यातही ५१ धावांची भागीदारी झाली. मात्र विहान ३६ चेंडूत ३० धावा करून जेम्ल मिन्टोच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर वेदांतही ३२ धावांवर मिन्टोच्याच गोलंदाजीवर बाद झाला. तरी नंतर अभिग्यान कुंडूने आक्रमक ३१ चेंडूत ४० धावांची खेळी केली. आरएस आंब्रिशने १८ धावांची खेळी केली. खिलान पटेल ३ आणि हेनिल पटेल ५ धावांवर बाद झाले. पण कनिष्क चौहानने शेवटच्या षटकात आक्रमक फलंदाजी करत भारताला ४०० धावांचा टप्पा पार करून दिला.भारताने ५० षटकात ९ बाद ४११ धावा केल्या. कनिष्क चौहान २० चेंडूत ३७ धावांवर नाबाद राहिला.इंग्लंडकडून गोलंदाजी करताना जेम्स मिन्टोने ३ विकेट्स घेतल्या. सेबास्टियन मॉर्गन आणि ऍलेक्स ग्रीन यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. मॅनी लम्सडेनने १ विकेट घेतली. अखेरचे वृत्त हाती आले तेव्हा इंग्लंडला ४१२ धावांचा टप्पा पूर्ण करायचा होता.१५ षटकार, १५ चौकार; ८० चेंडूत १७५ धावाभारत आणि इंग्लंडच्या यांच्यात सुरू असलेल्या १९ वर्षांखालील मुलांच्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात वैभव सूर्यवंशीच्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने तुफानी आघाडी घेतली.सलामीवीर वैभव सूर्यवंशी याने तुफान फटकेबाजी करत दीडशतकी खेळी केली. त्याने ८० चेंडूत १७५ धावांची खेळी साकारली. त्याच्या खेळीत १५ चौकार आणि १५ षटकार होते.वैभवने ५५ चेंडूत शतक पूर्ण केले. त्यासोबतच १९ वर्षांखालील विश्वचषक अंतिम सामन्यात वैभवने सर्वात जलद शतक ठोकले. तर संपूर्ण स्पर्धेत त्याचे दुसरे सर्वात जलद शतक ठरले.
टी-२० विश्वचषकाचा शनिवारपासून रणसंग्राम, भारतासमोर अमेरिकेचे कडवे आव्हान
मुंबई : टी-२० विश्वचषकाचा बिगुल वाजला असून, गतविजेता भारतीय संघ शनिवारी घरच्या मैदानावर म्हणजेच वानखेडे स्टेडियमवर अमेरिकेविरुद्ध आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोन दिग्गज खेळाडूंच्या निवृत्तीनंतर नव्या दमाची ही 'मराउडिंग' भारतीय संघ प्रथमच जागतिक मंचावर आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी सज्ज झाली आहे.कर्णधार सूर्यकुमार यादव फॉर्मात परतल्याने भारतीय संघ अधिक मजबूत झाला आहे. आतापर्यंत सूर्याच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने टी-२० क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. रोहित शर्माने २०२४ मध्ये टी-२० विश्वचषक जेतेपद जिंकल्यानंतर टी-२० फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर सूर्यकुमार यादवला टी-२० संघाच्या नेतृत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने एकही टी-२० मालिका गमावलेली नाही. तर भारतीय संघाने टी-२० क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी केल्याने टी-२० विश्वचषक २०२६ चे जेतेपद पटकावण्यासाठी भारतीय संघ फेव्हरेट मानला जात आहे.स्फोटक फलंदाज इशान किशन यष्टिरक्षक-फलंदाज म्हणून सलामीैीला येण्याची शक्यता आहे, तर त्याला युवा प्रतिभावान अभिषेक शर्मा साथ देऊ शकतो. मधल्या फळीत टिळक वर्माची शांतता आणि हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, शिवम दुबे या अष्टपैलू खेळाडूंची ताकद कोणत्याही धावसंख्येचा पाठलाग करण्यास सक्षम आहे. या सामन्याचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे अमेरिकेच्या संघात असलेले 'स्थानिक' चेहरे. अमेरिकेचा वेगवान गोलंदाज सौरभ नेत्रावळकर, अष्टपैलू हरमीत सिंग आणि शुभम रंजने हे तिघेही मुंबईकडून वानखेडेवर खेळलेले आहेत. आपल्या जुन्या सहकाऱ्यांविरुद्ध आणि ओळखीच्या खेळपट्टीवर खेळताना हे 'मुरब्बी मुंबईकर' अमेरिकेला विजयाची संधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतील. गोलंदाजीची धुरा जसप्रीत बुमराह सांभाळणार असून त्याला अर्शदीप सिंग आणि वेगवान गोलंदाज हर्षित राणा साथ देतील. फिरकीच्या जाळ्यात अमेरिकेला अडकवण्यासाठी कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती सज्ज आहेत. मात्र, वानखेडेवरील दवाचा परिणाम खेळावर होऊ शकतो, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. टी-२० वर्ल्डकप २०२६ मध्ये गट टप्प्यातील दिवसभरात रोज ३ सामने खेळवले जाणार आहे. हे तिन्ही सामने वेगवेगळ्या वेळांना खेळवले जाणार असून पहिला सामना ११ वाजता, दुसरा सामना ३ वाजता, तर तिसरा सामना संध्याकाळी ७ वाजता खेळवला जाईल. विविध ठिकाणी हे सामने खेळवले जाणार आहेत.अमेरिकेला पलटवार करण्याची तयारीअमेरिकेने यापूर्वी पाकिस्तानसारख्या माजी विजेत्याला नमवून आपली ताकद दाखवून दिली आहे. श्रीलंकेतील तीन आठवड्यांच्या सराव शिबिरानंतर अमेरिकेचा संघ मोठ्या आत्मविश्वासाने मैदानात उतरत आहे.भारताचे ‘अ’ गटातील सामने ७ फेब्रुवारी भारत वि. अमेरिका वानखेडे स्टेडियम मुंबई १२ फेब्रुवारी भारत वि. नामिबिया अरुण जेटली स्टेडियम दिल्ली १५ फेब्रुवारी भारत वि. पाकिस्तान आर. प्रेमदासा स्टेडियम कोलंबो १८ फेब्रुवारी भारत वि. नेदरलँड्स नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला दिला पाठिंबा
मुंबई (विशेष प्रतिनिधी) :मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा एकमेव नगरसेवक निवडून आला असून या नगरसेवकानेही आता शिवसेनेला आपला पाठिंबा दर्शवला आहे. मालाडमधील राष्ट्रवादी काँग्रेस (शप) अजित रावराणे यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यामुळे शिवसेनेचे संख्याबळाला अधिक बळ प्राप्त झाले आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन नगरसेवकांचाही शिवसेनेला पाठिंबा असून यासाठी सहयोगी गट बनवून अधिकृत पाठिंब्याची प्रक्रिया सुरु आहे . त्यामुळे येत्या तीन ते चार दिवसांमध्येही ही प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे .मुंबई महापालिकेत भाजपचे ८९ आणि शिवसेनेचे २९ अशाप्रकारे ११८ असे निम्म्यापेक्षा अधिक संख्या होत आहे. तर महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे ०३ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा एक अशाप्रकारे नगरसेवक निवडून आलेले आहेत. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटाच्या ३ नगरसेवकांचा पाठिंबा सहयोगी गटाच्या माध्यमातून मिळवण्याचा प्रयत्न शिवसेनेच्यावतीने सुरु आहे. याबाबत दोन्ही पक्षांमध्ये चर्चा सुरु आहे . मात्र, याबाबत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झालेली नाही . त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण होवून हा पाठिंबा मिळाला जाईल असे बोलले जात आहे.दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे मालाडमधील एकमेव नगरसेवक असलेल्या अजित रावराणे यांनीही शिवसेनेला आपला पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे शिवसेनेसोबत आता नगरसेवक अजित रावराणे राहणार आहेत. याबाबत नगरसेवक अजित रावराणे यांनी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा दिला आहे . पण त्यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेला नाही. मी शरद पवार साहेब यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच असून एकमेव नगरसेवक असल्यामुळे मी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. . विभागात विकास कामे करण्यासाठी विकास निधीची गरज असते आणि याचे आश्वासन शिवसेनेने दिल्यामुळे मी त्यांना पाठिंबा दिल्याचे रावराणे यांनी सांगितले.
राज्यातील शेतजमिनींच्या पोटहिश्शांची आता मोजणी
प्रत्येक भूखंडाला मिळणार भू आधार क्रमांक ७/१२ आणि नकाशांचा मेळ बसणारमहसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा मोठा पुढाकारमुंबई : राज्यातील ग्रामीण भागातील शेतजमिनींच्या नकाशा तसेच ७/१२ उतारामधील तफावत दूर करण्यासाठी महसूल विभागाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विशेष पुढाकाराने राज्यातील शेतजमिनींच्या पोटहिश्शांची मोजणी करून नकाशे आणि अधिकार अभिलेख (७/१२) अद्ययावत करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून आता जमिनींचे प्रलंबित वाद मिटण्यास मदत तर होईलच शिवाय, प्रत्येक भूखंडाला आता 'भू-आधार' क्रमांक (ULPIN) मिळणार आहे.२ कोटींहून अधिक पोटहिश्शांचा होणार 'डिजिटल' कायापालटराज्यात १८९० ते १९३० या काळात पहिली भूमापन प्रक्रिया झाली होती. त्यानंतर १९९२ पासून डिसेंबर २०२४ पर्यंत खरेदी-विक्री, वारस हक्क किंवा वाटणीमुळे तब्बल २ कोटी १२ लाख ७६ हजार ४९९ नवे पोटहिस्से तयार झाले आहेत. मात्र, या सर्व पोटहिश्शांची प्रत्यक्ष मोजणी न झाल्याने सरकारी दप्तरी नकाशे आणि ७/१२ उतारा यांचा ताळमेळ लागत नव्हता. ही अडचण दूर करण्यासाठी जमाबंदी आयुक्त, पुणे यांच्या स्तरावरून आता 'पोटहिस्सा मोजणीचा पथदर्शी प्रकल्प' सुरू करण्यात येत आहे.काय आहे 'भू-आधार' ?केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, प्रत्येक जमिनीच्या तुकड्याला आता Unique Land Parcel Identification Number (ULPIN) म्हणजेच 'भू-आधार' क्रमांक दिला जाणार आहे. आधार कार्डाप्रमाणेच जमिनीची सर्व माहिती या एका क्रमांकावर उपलब्ध असेल. यामुळे पीक विमा, बँकांकडून कर्ज मिळवणे आणि सरकारी योजनांचा लाभ घेणे शेतकऱ्यांसाठी अधिक सोपे होणार आहे.शेतकऱ्यांना होणारे थेट फायदे:वादातून सुटका: जमिनीचे क्षेत्र आणि हद्दी निश्चित झाल्यामुळे शेतकऱ्यांमधील आपसातील वाद कमी होतील.अचूक नकाशे: ७/१२ उताऱ्याप्रमाणे प्रत्यक्ष जागेचा नकाशा उपलब्ध होईल.डिजिटल डेटाबेस: पीक विमा आणि नुकसान भरपाईसाठी बँकांकडे अचूक डिजिटल माहिती उपलब्ध असेल.खरेदी-विक्री सुलभ: जमिनीच्या व्यवहारापूर्वी मोजणीची प्रक्रिया जलद आणि पारदर्शक होईल.अंमलबजावणीसाठी समित्यांची स्थापनाया प्रकल्पाच्या सनियंत्रणासाठी राज्य स्तरावर अप्पर मुख्य सचिव (महसूल) यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. तसेच जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी आणि तालुका स्तरावर उपविभागीय अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली समित्या या कामाचा आठवड्याला आढावा घेतील. यामध्ये खासगी सर्वेक्षण संस्थांचीही मदत घेतली जाणार आहे.शेतकऱ्यांच्या जमिनींचे हक्क अबाधित राखण्यासाठी आणि पारदर्शकता आणण्यासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे. नकाशे आणि ७/१२ यांचा मेळ बसल्यामुळे ग्रामीण भागातील जमिनींचे अर्थकारण अधिक मजबूत होईल, - चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
तिरुपती : तिरुपती बालाजी मंदिरातील लाडू प्रसादाच्या शुद्धतेवरून सुरू असलेला वाद पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांनी माजी मुख्यमंत्री वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांच्या कार्यकाळाबाबत गंभीर आरोप करत, त्या काळात वापरण्यात आलेल्या तुपाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.कुरनूल जिल्ह्यातील येमिगनूर येथे झालेल्या एका जाहीर सभेत बोलताना मुख्यमंत्री नायडू यांनी आरोप केला की, जगन मोहन रेड्डी सरकारच्या काळात तिरुपतीचे लाडू बनवण्यासाठी वापरलेले तूप रसायनांपासून तयार करण्यात आले होते. या तुपाच्या निर्मितीत वापरलेले काही घटक हे बाथरूमच्या साफसफाईसाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनांशी संबंधित आहे .त्यामुळे धार्मिक भावना आणि आरोग्याच्या दृष्टीने हा मुद्दा संवेदनशील ठरला आहे.मुख्यमंत्री नायडू यांनी तिरुमला तिरुपती देवस्थानम (TTD) च्या कार्यपद्धतीवरही भाष्य केले. त्यांनी सांगितले की, सध्याच्या व्यवस्थापनाखाली प्रसादाच्या दर्जात सुधारणा करण्यात आली आहे. पूर्वी आणि आताच्या लाडूंमध्ये स्पष्ट फरक जाणवतो. यावेळी त्यांनी टीटीडीचे माजी अध्यक्ष वाय. व्ही. सुब्बा रेड्डी यांच्या काही जुन्या वक्तव्यांचा संदर्भ देत, भेसळीच्या आरोपांकडे लक्ष वेधले.दरम्यान, तिरुपती लाडू प्रकरणात यापूर्वीही तपास यंत्रणांनी कारवाई केली आहे. फेब्रुवारी २०२५ मध्ये या प्रकरणाशी संबंधित काही डेअरी व्यावसायिकांना अटक करण्यात आली होती. लाडूसाठी वापरलेल्या तुपात भेसळ असल्याच्या संशयावरून विशेष तपास पथक (SIT) आणि सीबीआयमार्फत चौकशी सुरू करण्यात आली होती.याआधी सप्टेंबर महिन्यातही मुख्यमंत्री नायडू यांनी लाडू प्रसादात वापरण्यात आलेल्या घटकांवर प्रश्न उपस्थित केले होते. ताज्या वक्तव्यांमुळे हा मुद्दा पुन्हा एकदा राजकीय व धार्मिक चर्चेचा विषय ठरला आहे. दरम्यान, या आरोपांवर वायएसआर काँग्रेसकडून अधिकृत प्रतिक्रिया येण्याची प्रतीक्षा आहे.
Election News : आता तीन किंवा अधिक मुलांचे पालकही निवडणूक लढवू शकणार; राज्य सरकारची मोठी घोषणा
Election News : राजस्थानच्या भजनलाल शर्मा सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी असलेली 'दोन मुलांची अट' रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
Maharashtra Weather Update : कोकणात पारा ३५ अंशांच्या पार गेला असून भिरा येथे सर्वाधिक ३८ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले.
शनिवारपासून सुरू होणार टी२० क्रिकेटचा थरार
मुंबई : पुरुषांचा आयसीसी टी ट्वेंटी विश्वचषक शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होत आहे. या विश्वचषकाचा अंतिम सामना रविवार ८ मार्च २०२६ रोजी आहे. तब्बल २९ दिवस टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धा रंगणार आहे. भारत आणि श्रीलंका या दोन देशांनी यंदा विश्वचषकाचे संयुक्तरित्या आयोजन केले आहे. यंदाच्या विश्वचषकात वीस संघ सहभागी झाले आहेत. या संघांची प्रत्येकी पाच अशा पद्धतीने ए, बी, सी, डी या चार गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. गतविजेत्या भारताचा सलामीचा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.स्पर्धेच्या पहिल्या म्हणजे शनिवार ७ फेब्रुवारी रोजी तीन साखळी सामने होणार आहेत. श्रीलंकेतील कोलंबो येथे पाकिस्तान आणि नेदरलँड्स यांच्यात पहिला सामना होईल. कोलकात्यात वेस्ट इंडिज आणि स्कॉटलंड यांच्यात सामना रंगणार आहे. मुंबईत भारत आणि अमेरिका यांच्यात लढत होणार आहे.गट विभागणी (Groups) गट A: भारत, पाकिस्तान, अमेरिका, नेदरलँड, नामिबिया. गट B: ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, आयर्लंड, झिम्बाब्वे, ओमान. गट C: इंग्लंड, वेस्ट इंडीज, नेपाळ, स्कॉटलंड, इटली. गट D: दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, संयुक्त अरब अमिराती, कॅनडा.पहिल्या टप्प्यात गट फेरी अर्थात साखळी सामन्यांची फेरी होणार आहे. यात प्रत्येक संघ गटातील इतर चार संघांशी प्रत्येकी एक सामना खेळेल. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ सुपर 8 या फेरीत जातील. नंतर चार - चार संघांचे दोन गट केले जातील. सुपर 8 या फेरीअंती दोन्ही गटातून सर्वोत्तम २-२ संघ उपांत्य फेरीला पात्र ठरतील. यानंतर दोन उपांत्य सामने होतील. यातील पहिला उपांत्य सामना कोलंबो किंवा कोलकाता येथे तर दुसरा उपांत्य सामना मुंबईत वानखेडेवर होणार आहे. अंतिम सामना अहमदाबाद किंवा कोलंबो येथे होणार आहे.T20 विश्वचषक वेळापत्रक २०२६तारीखसामनावेळ (IST)मैदान७ फेब्रुवारीनेदरलँड वि. पाकिस्तानसकाळी 11:00एसएससी, कोलंबो७ फेब्रुवारीस्कॉटलंड वि. वेस्ट इंडीजदुपारी 3:00ईडन गार्डन्स, कोलकाता७ फेब्रुवारीभारत वि. अमेरिकासंध्याकाळी 7:00वानखेडे, मुंबई८ फेब्रुवारीअफगाणिस्तान वि. न्यूझीलंडसकाळी 11:00चिदंबरम, चेन्नई८ फेब्रुवारीइंग्लंड वि. नेपाळदुपारी 3:00वानखेडे, मुंबई८ फेब्रुवारीश्रीलंका वि. आयर्लंडसंध्याकाळी 7:00प्रेमदासा, कोलंबो९ फेब्रुवारीस्कॉटलंड वि. इटलीसकाळी 11:00ईडन गार्डन्स, कोलकाता९ फेब्रुवारीओमान वि. झिम्बाब्वेदुपारी 3:00एसएससी, कोलंबो९ फेब्रुवारीकॅनडा वि. दक्षिण आफ्रिकासंध्याकाळी 7:00मोदी स्टेडियम, अहमदाबाद१० फेब्रुवारीनामिबिया वि. नेदरलँडसकाळी 11:00अरुण जेटली, दिल्ली१० फेब्रुवारीन्यूझीलंड वि. युएईदुपारी 3:00चिदंबरम, चेन्नई१० फेब्रुवारीपाकिस्तान वि. अमेरिकासंध्याकाळी 7:00एसएससी, कोलंबो११ फेब्रुवारीअफगाणिस्तान वि. दक्षिण आफ्रिकासकाळी 11:00मोदी स्टेडियम, अहमदाबाद११ फेब्रुवारीऑस्ट्रेलिया वि. आयर्लंडदुपारी 3:00प्रेमदासा, कोलंबो११ फेब्रुवारीइंग्लंड वि. वेस्ट इंडीजसंध्याकाळी 7:00वानखेडे, मुंबई१२ फेब्रुवारीश्रीलंका वि. ओमानसकाळी 11:00पल्लेकेले, कॅन्डी१२ फेब्रुवारीइटली वि. नेपाळदुपारी 3:00वानखेडे, मुंबई१२ फेब्रुवारीभारत वि. नामिबियासंध्याकाळी 7:00अरुण जेटली, दिल्ली१३ फेब्रुवारीऑस्ट्रेलिया वि. झिम्बाब्वेसकाळी 11:00प्रेमदासा, कोलंबो१३ फेब्रुवारीकॅनडा वि. युएईदुपारी 3:00अरुण जेटली, दिल्ली१३ फेब्रुवारीनेदरलँड वि. अमेरिकासंध्याकाळी 7:00चिदंबरम, चेन्नई१४ फेब्रुवारीआयर्लंड वि. ओमानसकाळी 11:00एसएससी, कोलंबो१४ फेब्रुवारीस्कॉटलंड वि. इंग्लंडदुपारी 3:00ईडन गार्डन्स, कोलकाता१४ फेब्रुवारीन्यूझीलंड वि. दक्षिण आफ्रिकासंध्याकाळी 7:00मोदी स्टेडियम, अहमदाबाद१५ फेब्रुवारीनेपाळ वि. वेस्ट इंडीजसकाळी 11:00वानखेडे, मुंबई१५ फेब्रुवारीनामिबिया वि. अमेरिकादुपारी 3:00चिदंबरम, चेन्नई१५ फेब्रुवारीभारत वि. पाकिस्तानसंध्याकाळी 7:00प्रेमदासा, कोलंबो१६ फेब्रुवारीअफगाणिस्तान वि. युएईसकाळी 11:00अरुण जेटली, दिल्ली१६ फेब्रुवारीइंग्लंड वि. इटलीदुपारी 3:00ईडन गार्डन्स, कोलकाता१६ फेब्रुवारीऑस्ट्रेलिया वि. श्रीलंकासंध्याकाळी 7:00पल्लेकेले, कॅन्डी१७ फेब्रुवारीकॅनडा वि. न्यूझीलंडसकाळी 11:00चिदंबरम, चेन्नई१७ फेब्रुवारीआयर्लंड वि. झिम्बाब्वेदुपारी 3:00पल्लेकेले, कॅन्डी१७ फेब्रुवारीस्कॉटलंड वि. नेपाळसंध्याकाळी 7:00वानखेडे, मुंबई१८ फेब्रुवारीदक्षिण आफ्रिका वि. युएईसकाळी 11:00अरुण जेटली, दिल्ली१८ फेब्रुवारीनामिबिया वि. पाकिस्तानदुपारी 3:00एसएससी, कोलंबो१८ फेब्रुवारीभारत वि. नेदरलँडसंध्याकाळी 7:00मोदी स्टेडियम, अहमदाबाद१९ फेब्रुवारीइटली वि. वेस्ट इंडीजसकाळी 11:00ईडन गार्डन्स, कोलकाता१९ फेब्रुवारीश्रीलंका वि. झिम्बाब्वेदुपारी 3:00प्रेमदासा, कोलंबो१९ फेब्रुवारीअफगाणिस्तान वि. कॅनडासंध्याकाळी 7:00चिदंबरम, चेन्नई२० फेब्रुवारीऑस्ट्रेलिया वि. ओमानसंध्याकाळी 7:00पल्लेकेले, कॅन्डी २१ फेब्रुवारीपासून सुपर-8 चे सामने सुरु होतील. पहिला उपांत्य सामना : ४ मार्च (कोलंबो किंवा कोलकाता) दुसरा उपांत्य सामना : ५ मार्च (मुंबई) – जर भारत पात्र झाला तर हा सामना वानखेडेवर होईल. अंतिम सामना : ८ मार्च (अहमदाबाद किंवा कोलंबो)
Vaibhav Suryavanshi : वैभवच्या या खेळीने भारताचा माजी स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवाग भारावून गेला आहे. त्याने सोशल मीडियावर खास पोस्ट करत वैभवचे कौतुक केले आहे.
RBI New Rule:ऑनलाइन फ्रॉड झाल्यास RBI कडून मिळणार 25 हजार रुपयांपर्यंत भरपाई; जाणून घ्या नवा नियम
RBI New Rule
Tirupati laddu : आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध तिरुपती वेंकटेश्वर मंदिराच्या लाडूंमध्ये (प्रसाद) मागील सरकारच्या काळात भेसळयुक्त तुपाचा वापर करण्यात आल्याचा गंभीर आरोप मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी केला आहे.
सर्वजण आपापल्या परीने त्या महिलेला चांगलेच सल्ले देत असले, तरी यातील कोणते सल्ले स्वीकारावेत आणि कोणते नाही, या बद्दल विचार करून मात्र त्या महिलेच्या मनामध्ये चांगलाच गोंधळ उडत असतो.
मुंबईच्या सुवर्णकाळाची सुरुवात..., मुंबई महानगरपालिकेतील भाजपा पक्ष कार्यालयाचे उद्घाटन
मुंबई : मुंबई महानगरपालिकेतील भाजपा पक्ष कार्यालयाचे उद्घाटन आज, ६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता करण्यात आले. जवळपास ३-४ वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर हे कार्यालय पुन्हा एकदा राजकीय हालचालींसाठी खुले झाले आहे. मुंबई भाजपा अध्यक्ष अमीत साटम आणि गटनेते गणेश खणकर यांच्या उपस्थितीत हा उद्घाटन समारंभ पार पडला.उद्घाटन कार्यक्रमात भाजपचा 'मराठी बाणा' दिसून आला. उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी नवनिर्वाचित नगरसेवकांनी पारंपारिक मराठी पेहराव केला होता. कार्यालयात सत्यनारायणाची पूजा आणि विधिवत पूजन करून नवीन सत्ताकाळाचा शुभारंभ करण्यात आला. मुंबई महानगरपालिकेतील भाजपच्या आगामी काळातील वाटचालीचा हा नवा अध्याय मानला जात आहे. ही एका नव्या पर्वाची सुरुवात आहे.या प्रसंगी कार्यालयाबाहेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भव्य रांगोळी काढण्यात आली होती आणि त्यावर मुंबईच्या सुवर्णकाळाची सुरुवात असा संदेश देण्यात आला होता. कार्यालयाच्या उद्घाटनाच्या वेळी महानगरपालिका निवडणूकीत निवडून आलेले सर्व नगरसेवक आणि नगरसेविका उपस्थित होते.नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीनंतर भाजपाने पक्ष कार्यालय ताब्यात घेतले असून, येत्या ११ फेब्रुवारी २०२६ रोजी होणाऱ्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी पक्षाची रणनीती या कार्यालयातूनच आखण्यास सुरुवात केली आहे.
Pune: आजारी वृद्ध महिलेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या 58 वर्षीय व्यक्तीला 10 वर्षे सक्तमजुरी
Pune: ही घटना सप्टेंबर २०१९ मध्ये घडली. पीडित व आरोपी नात्यातील आहे. पीडित आजारी होती. त्यावेळी दवाखान्यात घेऊन गेला. परत येत असताना....
मुंबई: आयुर्वेदानुसार, वात-पित्त-कफ दोषांचे संतुलन राखून कर्करोगासारख्या आजारावर लक्षणीय नियंत्रण मिळवता येते. आयुर्वेदात कर्करोगाशी लढण्यास मदत करणारे असंख्य घटक आहेत. कर्करोगाचे एक कारण म्हणजे शरीरात विषारी पदार्थांचा संचय होय. शरीराचे डिटॉक्सिंग करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. चला कर्करोगावर नियंत्रण ठेवू शकणाऱ्या आयुर्वेदिक घटकांचा शोध घेऊयात.आयुर्वेदिक डॉक्टरांच्या मते, आयुर्वेदिक उपचारांनी हा भयानक आजार पूर्णपणे नष्ट होऊ शकत नाही, परंतु तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करून तो बरा होऊ शकतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आयुर्वेदिक औषधांचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत.कर्करोग नियंत्रित करण्यासाठी आयुर्वेदिक गोष्टीअश्वगंधा - आयुर्वेदानुसार, अश्वगंधा हे एक रसायन आहे, ज्याचे अनेक फायदे आहेत. अश्वगंधा सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि केमोथेरपीच्या थकव्यापासून लवकर बरे होण्यास मदत होते. अश्वगंधा नियमित सेवन केल्याने ताण कमी होतो आणि झोप सुधारते. अनेकांचा असा विश्वास आहे की, अश्वगंधा सेवन केल्याने कर्करोगाच्या पेशी वाढण्यापासून रोखता येते.हळद - आयुर्वेदाने हळदीला अत्यंत फायदेशीर घटक म्हणून घोषित केले आहे. हळदीमध्ये आढळणारे कर्क्यूमिन हे संयुग त्याच्या अँटिऑक्सिडंट गुणधर्मांमुळे तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. हळदीचे सेवन केल्याने तुमच्या शरीरातील जळजळ कमी होऊ शकते. ही आयुर्वेदिक औषधी वनस्पती तुमच्या पेशींना मुक्त रॅडिकल्सपासून वाचवते. त्याचे सेवन केल्याने कर्करोगाच्या पुनरावृत्तीचा धोका देखील कमी होऊ शकतो.तुळस - तुळस ही एक हर्बल वनस्पती आहे, जी केवळ धार्मिकदृष्ट्याच पूजनीय नाही तर औषधी वनस्पती म्हणून देखील खूप लोकप्रिय आहे. तुळशीमध्ये अँटीऑक्सिडेंट गुणधर्म असतात जे कर्करोगाच्या पेशींच्या वाढीस प्रतिबंध करतात. तुळशीचे नियमित सेवन केल्याने तुमचे फुफ्फुस स्वच्छ होते आणि तुमची मानसिक स्थिती मजबूत होते.आयुर्वेदाच्या मदतीने काय करता येते आणि काय करता येत नाही?आयुर्वेदिक औषध तुमची प्रतिकारशक्ती वाढवू शकते आणि थकवा कमी करू शकते. यामुळे केवळ शारीरिक ताण कमी होत नाही तर मानसिक ताण कमी होण्यासही मदत होते.तथापि, तुम्ही हे लक्षात ठेवले पाहिजे की, कर्करोग हा एक गंभीर आजार आहे, म्हणून डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे. आयुर्वेदाचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत, परंतु कर्करोगावर आयुर्वेद हा एकमेव उपचार नाही.
Baramati ZP Election : बारामतीत निवडणूक तयारी पूर्ण; ईव्हीएम मशीन केंद्रांवर दाखल : वैभव नावडकर
Baramati ZP Election : बारामती तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी २९९ मतदान केंद्रांवर कर्मचारी आणि साहित्य रवाना झाले आहे.
Jalna: महसूल विभागात खळबळ! 25 कोटींचा अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यातील मुख्य आरोपी आशिष पैठणकरला बेड्या
Jalna: अंबड आणि घनसावंगी तालुक्यात झालेल्या सुमारे २४ कोटी ९० लाख ७७ हजार ८११ रुपयांच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार आणि फरार आरोपी आशिष प्रमोदकुमार पैठणकर याला आर्थिक गुन्हे शाखेने अखेर अटक केली आहे.
आता घरातील वातावरण पुन्हा एकदा फिरणार आहे. कारण राखी सावंत म्हंटलं की, राडा होणारच आणि मनोरंजनाचा तडका देखील लागणार आहे.
Todays Top 10 News: वाचा आजच्या राज्य, देश-विदेशसह महत्वाच्या टाॅप 10 बातम्या...
राज्यात खळबळ..! नटून थटून आलेला नवरदेव भर मंडपातून पळाला; नेमकं काय घडलं?
Beed Crime News : बीड जिल्ह्यातील कपिलधार येथे अल्पवयीन मुलीचा विवाह रोखण्यात पोलिसांना यश आले आहे.
Mohammed Siraj : हर्षितच्या जागी अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याला मुख्य संघात स्थान देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, लवकरच याची अधिकृत घोषणा केली जाणार आहे.
जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज
मुंबई : राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गतच्या १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी उद्या (ता. ७) मतदान होत असून जिल्हा परिषदेच्या ७३१ ; तर आणि पंचायत समित्यांच्या १ हजार ४६२ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. एकूण ७ हजार ४३८ इतके उमेदवार निवडणूक रिंगणात असून सर्व मिळून एकूण २ कोटी ८ लाख २० हजार ७०२ इतकी मतदार संख्या आहे. संपूर्ण मतदान प्रक्रियेसाठी पुरेशा पोलिस बंदोबस्ताचीदेखील व्यवस्था करण्यात आली आहे.राज्य निवडणूक आयोगाने रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या १२ जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गतच्या १२५ पंचायत समित्यांच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा १३ जानेवारी २०२६ रोजी केली होती. त्यानुसार ५ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान होणार होते; परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर झाल्यानंतर मतदानाच्या तारखेत बदल करण्यात आला. त्यानुसार आता उद्या (ता. ७) सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होणार आहे. मतमोजणी ९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता सुरू होईल. त्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल.एकूण जागा आणि उमेदवारसर्व बारा जिल्हा परिषदांच्या एकूण ७३१ जागा असून, त्यातील ३६९ जागा महिलांसाठी राखीव आहेत. अनुसूचित जातींसाठी 83, अनुसूचित जमातींसाठी २५ आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी १९१ जागा आरक्षित आहेत. जिल्हा परिषदांच्या या सर्व जागांसाठी एकूण 2 हजार ६२४ उमेदवार निवडणूक लढवित आहेत.सर्व १२५ पंचायत समित्या मिळून एकूण १ हजार ४६२ जागा असून, त्यातील ७३१ जागा महिलांसाठी राखीव आहेत. अनुसूचित जातींसाठी 166, अनुसूचित जमातींसाठी ३८ आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी ३४२ जागा आरक्षित आहेत. पंचायत समित्यांच्या या सर्व जागांसाठी एकूण ४ हजार ८१४ उमेदवार निवडणूक लढवत आहेत.मतदार आणि मनुष्यबळनिवडणूक होत असलेल्या जिल्हा परिषदांच्या व त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांच्या एकूण मतदारांमध्ये १ कोटी ६ लाख ३३ हजार २६९ पुरुष, १ कोटी १ लाख ८६ हजार ९६५ महिला; तर ४६८ इतर मतदारांचा समावेश आहे. त्यांच्यासाठी एकूण २५ हजार ४७१ मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे. संपूर्ण मतदान प्रक्रियेसाठी सुमारे १ लाख २८ हजार इतक्या मनुष्यबळाची व्यवस्था केली आहे. त्यात सुमारे १२५ निवडणूक निर्णय अधिकारी आणि १२५ सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा समावेश आहे.ईव्हीएमची व्यवस्थाजिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठीच्या २५ हजार ४७१ मतदान केंद्रांची संख्या लक्षात घेऊन पुरेशा इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची (ईव्हीएम) व्यवस्था करण्यात आली आहे. त्यात ५१ हजार ५३७ कंट्रोल युनिट आणि १ लाख १० हजार ३२९ बॅलेट युनिटचा समावेश आहे. त्यासाठी सर्व सबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना वेळोवेळी प्रशिक्षणदेखील देण्यात आले आहे.दोन मते देणे अपेक्षितजिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका नेहमी एकाच वेळी घेण्यात येतात. त्यामुळे प्रत्येक मतदाराला एक मत जिल्हा परिषदेच्या निवडणूक विभागासाठी आणि एक मत पंचायत समितीच्या निर्वाचक गणासाठी द्यावे लागते. जिल्हा परिषद निवडणूक विभागासाठी (गट) मतदान यंत्रावर म्हणजे बॅलेट युनिटवर पांढऱ्या रंगाची; तर पंचायत समितीच्या निर्वाचक गणासाठी बीयूवर गुलाबी रंगाची मतपत्रिका असते. उमेदवारांची संख्या कमी असल्यास एकाच बीयूवर या दोन्ही मतपत्रिका असतात; परंतु उमेदवारांची संख्या अधिक असल्यास आवश्यकतेनुसार एकापेक्षा जास्त बीयूचा वापर केला जातो.मतदारांचे नाव शोधण्याची सुविधाजिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठीच्या मतदार यादीतील मतदाराचे नाव आणि मतदान केंद्र शोधण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने ‘मताधिकार’ हे मोबाईल ॲप उपलब्ध करून दिले आहे. ते ‘गुगल प्ले स्टोअर’वरून डाऊनलोड करता येईल. त्यात मतदाराचे ‘संपूर्ण नाव’ किंवा ‘मतदार ओळखपत्रा’चा क्रमांक नमूद करून मतदार यादीतील नाव शोधता येईल. मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी https://mahasecvoterlist.in/ हे संकेतस्थळदेखील उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यावरही मोबाईल ॲपप्रमाणेच मतदार यादीतील आपले नाव शोधता येईल.ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगासाठीमतदान केंद्रांवर ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, तान्ह्याबाळासह असणाऱ्या स्त्रिया, गरोदर स्त्रिया आदींना मतदानासाठी प्राधान्य दिले जाईल.अशा मतदारांसाठी मतदान केंद्रावर रॅम्पची व्यवस्था असेल. त्याचबरोबर व्हिलचेअरचीही व्यवस्था केली जाईल; तसेच मतदान केंद्रावर विजेची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची, सावलीची सुविधा, शौचालयाची व्यवस्था उपलब्ध करून दिली जाईल. सर्व मतदान केंद्रांमध्ये किमान सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देश सर्व संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.चौकट मतदान नक्की कराराज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गतच्या १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी उद्या (ता. ७) मतदान होत आहे. या निवडणुका म्हणजे आपले गाव व परिसराचे भवितव्य ठरविणाऱ्या असतात. म्हणूनच या निवडणुकांमध्ये मोठ्या संख्येने मतदान करून आपणही आपल्या गाव व परिसराच्या उन्नतीत मोलाचे योगदान देऊ शकतो. त्याचबरोबर या निवडणुकांच्या माध्यमातून आपण लोकशाहीचा पाया बळकट करण्यातही हातभार लाऊ शकतो. त्यामुळे जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये मतदान करून आपण मतदानाचा आपला बहुमोल हक्क बजवायलाच हवा, त्यासाठी आपण नक्की मतदान करावे, असे मी सर्व संबंधित मतदार बंधू- भगिनींना नम्रपणे आवाहन करतो. -दिनेश वाघमारे, राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र
मुंबई : खऱ्या मित्रांसोबत केलेला प्रवास हा केवळ ठिकाणं बदलण्यासाठी नसतो, तर तो स्वतःला शोधण्यासाठी आणि नाती अधिक घट्ट करण्यासाठी असतो. मैत्रीचा हाच हळुवार आणि तितकाच स्वछंदी प्रवास मोठ्या पडद्यावर मांडण्यासाठी 'सखे गं साजणी' हा चित्रपट सज्ज झाला आहे. नुकतंच या चित्रपटाचं 'कूल' पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं असून, सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.https://prahaar.in/2026/02/06/vadh-2-movie-review-vadh-sanjay-mishra-neena-gupta-kumud-mishra-emotionally-resonant-thriller/मराठीतील लोकप्रिय त्रिकूट पहिल्यांदाच एकत्रया चित्रपटाचं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे याची तगडी स्टारकास्ट. मराठी सिनेसृष्टीतील ग्लॅमरस अभिनेत्री प्रार्थना बेहेरे, सौंदर्याची खाण पूजा सावंत आणि आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता अभिजीत खांडकेकर हे तीन लोकप्रिय चेहरे या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये हे तिघेही निरभ्र आकाशाकडे पाहत आयुष्याचा आनंद लुटताना दिसत आहेत. त्यांचा हा 'कूल' आणि 'ट्रेंडी' अंदाज तरुणाईला आकर्षित करणारा ठरत आहे. 'सखे गं साजणी' ही गोष्ट आहे तीन मित्रांच्या प्रवासाची. पोस्टरवरून हे स्पष्ट होतंय की, हा चित्रपट केवळ फिरण्यावर आधारित नसून, मैत्रीची एक नवी व्याख्या आणि आयुष्य नव्याने जगण्याची उर्मी देणारा ठरणार आहे. तिघांच्या चेहऱ्यावरील हास्य आणि पोस्टरची मांडणी पाहून प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.बड्या निर्मिती संस्थेची धुराअभिनेत्री प्रार्थना बेहेरे आणि निर्माते-दिग्दर्शक अभिषेक जावकर यांच्या 'रेडबल्ब स्टुडिओ' (Redbulb Studios) मार्फत या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी खुद्द अभिषेक जावकर यांनीच सांभाळली आहे. विशेष म्हणजे, अभिनेता अभिजीत खांडकेकर याने अभिनयासोबतच या चित्रपटाच्या निर्मितीमध्येही सहभाग नोंदवला आहे. त्यांच्यासोबत आदित्य वासुदेव घरत, श्रेयश विलास सावंत यांनी निर्मितीची धुरा सांभाळली आहे, तर अभिषेक दिलीप वाकचौरे आणि जतीन उपाध्याय हे सहनिर्माते म्हणून जोडले गेले आहेत.प्रदर्शनाची तारीख अद्याप गुलदस्त्यातपोस्टरने तर चाहत्यांची मनं जिंकली आहेत, मात्र हा चित्रपट नेमका कधी प्रदर्शित होणार, हे अद्याप निर्मात्यांनी जाहीर केलेले नाही. 'प्रवास आणि आठवणी' यांचा हा सुंदर मेळ मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षकांना थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
१९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात वैभवची वादळी खेळी; फक्त ३० चेंडू आणि ....
मुंबई : सर्वत्र सध्या चर्चा सुरु आहे ती फक्त आणि फक्त १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्याची आणि त्यातही धुवांधार फलंदाजी करणाऱ्या वैभव सूर्यवंशीची. कारण वैभव सूर्यवंशीने पुन्हा एकदा इतिहास रचलाय. झिम्बाब्वेतील हररेमध्ये इंग्लंड विरुद्ध सुरू असलेल्या अंतिम सामन्यात वैभवने फक्त ५५ चेंडूंमध्ये शानदार शतक झळकावले आहे.शानदार शतकांची खेळी१९ वर्षांखालील वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये इंग्लंड विरुद्ध खेळताना वैभवने पराक्रम केला. त्याने केवळ ५५ चेंडूत ८ चौकार आणि ८ उत्तुंग सिक्सर मारत आपलं शतक पूर्ण केल आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून आधी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता जो वैभवने सार्थ ठरवला आहे. शतक झळकावल्यानंतरही वैभवची आक्रमक खेळी सुरू राहिली. त्याने अवघ्या ८० चेंडूत १७५ धावा केल्या. यात १५ चौकार आणि १५ षटकारांचा समावेश होता. अवघ्या ३० चेंडूत वैभवने १५० धावा केल्या.विक्रमी खेळीशतकी खेळीसोबतच वैभव सूर्यवंशीने अनेकी दिग्गज खेळाडूंचे विक्रम मोडले आहेत. १९ वर्षांखालील वर्ल्ड कपच्या एकाच एडिशनमध्ये सर्वधिक षटकार मारण्याचा विक्रम आता वैभवच्या नावावर जमा झाला आहे. त्याने १६.१ ओव्हरमध्ये फिरकीपटू फरहान अहमदच्या चेंडूत लॉन्ग ऑफच्या वरून षटकार मारत डेवाल्ड ब्रेव्हिसचा विक्रम मोडीत काढला आहे. बेबी एबी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या ब्रेव्हिसने २०२२ मध्ये ६ सामन्यात २० षटकार मारले होते, पण वैभवने त्यालाही मागे टाकले आहे.विराट आणि शुभमन गिललाही टाकले मागेवैभवने ऐतिहासिक खेळीदरम्यान भारतीय दिग्गज खेळाडूंनाही मागे टाकले आहे. चक्क विराट कोहली, शुभमन गिल यांचे विक्रम वैभवने मोडले आहेत. २००८ च्या वर्ल्ड कपमधील तन्मय श्रीवास्तवचा रेकॉर्ड मोडीत काढत तो यूथ वनडेमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा तिसरा फलंदाज झाला आहे. फायनलपूर्वी वैभवला हा टप्पा गाठण्यासाठी ८० धावांची गरज होती, जी त्याने सहज पूर्ण केली. या स्पर्धेत त्याने यापूर्वीच विराट कोहली, शुभमन गिल, सरफराज खान आणि उन्मुक्त चंद यांसारख्या मोठ्या खेळाडूंच्या धावांचे विक्रम मागे टाकले आहेत.भारताने सेमीफायनलमध्ये अफगाणिस्तानच्या ३११ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करून विजय मिळवला होता, तर इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला २७ धावांनी हरवून अंतिम सामन्याचे तिकीट मिळवले होते. सध्या भारतीय संघ आपला १० व फायनल सामना खेळत आहे तर इंग्लंडचा संघ सहाव्यांदा अंतिम सामन्यात पोहोचला आहे. भारताने आतापर्यंत ५ वेळा हे विजेतेपद मिळवले आहे. तर सध्या इंग्लंड आपल्या १९९८ नंतर आपल्या दुसऱ्या ट्रॉफीची प्रतीक्षा करत आहेत.
मृणाल ठाकूरने ‘वध 2’चे केले कौतुक; नीना गुप्ता आणि संजय मिश्रा यांच्या अभिनयाचे भरभरून कौतुक
मुंबई : अभिनेत्री मृणाल ठाकूरने नीना गुप्ता आणि संजय मिश्रा यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या बहुप्रतिक्षित चित्रपट ‘वध 2’च्या संपूर्ण टीमचे मनापासून कौतुक केले आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या निमित्ताने मृणालने आपल्या सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत चित्रपटातील दमदार अभिनय आणि संपूर्ण टीमच्या मेहनतीचे खुलेपणाने कौतुक केले.कंटेंट-ड्रिव्हन आणि आशयपूर्ण सिनेमांना नेहमीच पाठिंबा देणाऱ्या मृणाल ठाकूरने ‘वध 2’च्या कलाकारांसह तांत्रिक टीमच्या कामगिरीचे विशेष कौतुक केले. आपल्या पोस्टमध्ये ती म्हणाली, ‘वध 2’च्या संपूर्ण टीमचे अभिनंदन! प्रत्येकाची कामगिरी अप्रतिम आहे. प्रत्येक बारकाव्यात मेहनत आणि मनापासून केलेले काम दिसून येते. चित्रपट उद्या प्रदर्शित होत आहे… नक्की पाहा!”‘वध 2’ हा समीक्षकांनी गौरवलेल्या ‘वध’ या चित्रपटाचा सिक्वेल आहे. पहिल्या भागाला त्याच्या सशक्त कथानकासह संजय मिश्रा आणि नीना गुप्ता यांच्या प्रभावी अभिनयासाठी विशेष प्रशंसा मिळाली होती. जसपाल सिंग संधू यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला हा स्पिरिच्युअल सिक्वेल लव फिल्म्सच्या बॅनरखाली तयार करण्यात आला असून लव रंजन आणि अंकुर गर्ग यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. 2026 मधील सर्वाधिक चर्चेत असलेल्या आणि बहुप्रतिक्षित चित्रपटांमध्ये ‘वध 2’ने आधीच आपले स्थान निर्माण केले आहे.चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखी वाढली, जेव्हा 2025 मध्ये गोव्यात झालेल्या 56व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI)मध्ये ‘वध 2’चा गाला प्रीमियर पार पडला. या वेळी चित्रपटाला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद आणि टाळ्यांची दाद मिळाली. यामुळे संजय मिश्रा आणि नीना गुप्ता हे भारतीय सिनेमाचे खरे आधारस्तंभ असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले.लव फिल्म्स प्रस्तुत ‘वध 2’ हा जसपाल सिंग संधू लिखित व दिग्दर्शित चित्रपट असून, लव रंजन आणि अंकुर गर्ग यांनी त्याची निर्मिती केली आहे. हा चित्रपट 6 फेब्रुवारी 2026 रोजी देशभरातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.
इराणने पुन्हा एकदा जगाची झोप उडवली, इराणच्या क्षेपणास्त्राची धक्कादायक रेंज, जाणून घ्या
दिल्ली: अमेरिका आणि इराण या दोन देशांमधील तणावाने जगाचं टेन्शन वाढलं आहे. कोणत्याही क्षणी अमेरिका इराणवर हल्ला करू शकते, असे सांगितले गेले आहे. इराणच्या दिशेने अमेरिकेने एक पाऊस पुढे टाकले. दरम्यान इराणने थेट अमेरिकेने आमच्यावर हल्ला केला तर हल्ला करणाऱ्याचे हात कापू आणि पूर्ण जगाला उद्धवस्थ करू असे थेट म्हटले. अमेरिका आणि इराणमधील तणाव फक्त दोन देशांसाठीच नाही तर जगासाठी घातक असल्याचे पुढे आले आहे. तर इराणसोबत व्यापार करणाऱ्या देशांवरही मोठा टॅरिफ लावण्याचा धक्कादायक निर्णय अमेरिकेने घेतला. इराण सरकारविरोधात लोक रस्त्यावर उतरले होते आणि याच आंदोलन करणाऱ्या लोकांना पाठबळ देताना अमेरिका दिसली. अमेरिकेच्या या भूमिकेमुळे इराणमध्ये इंटरनेटही बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. आमच्या घरातील गोष्टींमुळे कोणी बाहेरच्या हस्तक्षेप केला तर ते सहन करणार नसल्याचे त्यांनी म्हटले.आता इराणने पुन्हा एकदा जगाची झोप उडवल्याचे बघायला मिळत आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) ने एक नवीन भूमिगत क्षेपणास्त्र सिटी बांधली आहे. खोरमसिटी-४ बॅलिस्टिक क्षेपणास्त्र देखील पूर्णपणे तैनात केली आहेत. काही दिवसांपूर्वी अमेरिका आणि इस्त्रायलने मिळून इराणमधील अणुस्थळे उद्धवस्थ केली होती. यादरम्यानच ही बातमी समोर येत आहे.भूमिगत क्षेपणास्त्र २००० किलोमीटरचा पल्ला आणि १५०० किलोग्रॅम वजनाचे वॉरहेड असलेल्या या क्षेपणास्त्राने इराणची लष्करी शक्ती लक्षणीयरीत्या वाढवली आहे. हे क्षेपणास्त्र मध्य पूर्वेतील अनेक देश, इस्रायल आणि युरोपच्या काही भागांना टार्गेट करू शकते. फक्त हेच नाही तर अमेरिकन तळांनाही टार्गेट करू शकते. १५०० किलो हे जड वॉरहेड मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यासाठी वापरले जाऊ शकते.इराणने या क्षेपणास्त्राचा उल्लेख प्रमुख शस्त्र म्हणून केला आहे. फक्त संरक्षणासाठीच नव्हे तर जलद प्रतिहल्ला करण्यासाठी सुद्धा वापरले जाईल. इराणच्या या क्षेपणास्त्रमुळे जगाची झोप उडाली आहे. मोठा हल्ला करण्याची याची क्षमता आहे. अमेरिकेचे अध्यक्ष सतत इराणला धमक्या देताना दिसत आहेत. दरम्यानच इराणने आपली नक्की काय ताकद आहे, हे संपूर्ण जगाला दाखवून दिले आहे.
बेकायदेशीर डास प्रतिबंधक अगरबत्तींच्या विरोधात महाराष्ट्र सरकारचे कारवाईचे आदेश
मुंबई : सार्वजनिक आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्राच्या कृषी विभागाने एक ठोस पाऊल उचलले आहे. राज्यभरातील सर्व कीटकनाशक निरीक्षकांना ‘कम्फर्ट’ आणि ‘स्लीप वेल’ या ब्रँड नावाने विकल्या जाणाऱ्या बेकायदेशीर डास प्रतिबंधक अगरबत्तींच्या विक्रीविरोधात तातडीने कठोर कारवाई करण्याचे निर्देश कृषी विभागाने दिले आहेत. सरकारने कीटकनाशक कायदा, १९६८ आणि कीटकनाशक नियम, १९७१ यांच्या अंमलबजावणीचे आदेश दिले. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर छापे घालणे, माल जप्त करणे आणि खटला दाखल करणे अशी कारवाई सरकार करू शकते.भारतामध्ये घरगुती कीटकनाशकांचा सुरक्षित आणि जबाबदारीने वापर व्हावा यासाठी काम करणाऱ्या, ना-नफा तत्त्वावर चालणाऱ्या होम इन्सेक्ट कंट्रोल असोसिएशन (HICA) या संस्थेने सरकारच्या या कारवाईचे स्वागत केले आहे. गेल्या काही महिन्यांपासून HICA ही प्रशासनाच्या संपर्कात होती. मंजुरी नसलेली रसायने वापरणाऱ्या डास प्रतिबंधक अगरबत्तींबाबत तिने संबंधित यंत्रणांना वेळोवेळी सतर्क केले होते.यापूर्वी आंध्र प्रदेशमध्ये ‘स्लीप वेल’ आणि मुंबईमध्ये ‘कम्फर्ट’ या डास प्रतिबंधक अगरबत्तींच्या तपासण्या प्रयोगशाळांत करण्यात आल्या होत्या. त्यावेळी त्यांत बेकायदेशीर आणि मंजुरी नसलेली कीटकनाशके आढळली होती. त्यामुळे अनेक राज्यांमध्ये या प्रकरणाची चौकशी सुरू झाली आणि कारवाईही करण्यात आली. मुंबईत या संदर्भात अनेक ठिकाणी छापे घालण्यात आले आणि ‘कम्फर्ट डास प्रतिबंधक अगरबत्ती’वर बंदी घालण्यात आली. त्यानंतर अवघ्या १५ दिवसांत महाराष्ट्र सरकारने आपली कारवाई राज्यव्यापी पातळीवर वाढवली असून, दोन्ही उत्पादनांची विक्री रोखण्यासाठी नवीन परिपत्रक जारी केले आहे.महाराष्ट्राच्या कृषी संचालकांनी राज्यातील सर्व विभागीय सहसंचालकांना आणि कीटकनाशक निरीक्षकांना हे नवे परिपत्रक पाठवले आहे. ‘कम्फर्ट’ आणि ‘स्लीप वेल’ या डास प्रतिबंधक अगरबत्तींची विक्री करणाऱ्या किरकोळ विक्रेत्यांवर आणि वितरकांवर तातडीने कठोर कारवाई करण्याचे निर्देश त्यात देण्यात आले आहेत. या परिपत्रकानुसार, छापे घालणे, बेकायदेशीर साठा जप्त करणे, तसेच केलेल्या सर्व कारवाईचा अहवाल कृषी आयुक्तालयाकडे सादर करणे क्षेत्रीय अधिकाऱ्यांना बंधनकारक करण्यात आले आहे.महाराष्ट्र सरकारने दुकानदार आणि वितरकांना स्पष्ट इशारा दिला आहे की, नोंदणी नसलेल्या कीटकनाशक उत्पादनांची विक्री किंवा वितरण करणे बेकायदेशीर आहे आणि त्यासाठी कायद्याअंतर्गत शिक्षा होऊ शकते. या उत्पादनांचा साठा ठेवणे आणि विक्री करणे तातडीने थांबवण्याचे आदेश सर्व विक्रेत्यांना देण्यात आले आहेत.‘होम इन्सेक्ट कंट्रोल असोसिएशन’चे (HICA) मानद सचिव जयंत देशपांडे म्हणाले, “कम्फर्ट आणि स्लीप वेल यांसारख्या बेकायदेशीर डास प्रतिबंधक अगरबत्तींबाबत महाराष्ट्र सरकारने वेळेत आणि ठोस कारवाई केली, याचे आम्ही मनापासून कौतुक करतो. अगरबत्तीच्या स्वरूपात डासप्रतिबंधक म्हणून बेकायदेशीर आणि मंजुरी नसलेली रसायने वापरणे ही अतिशय गंभीर बाब आहे. त्यामुळे लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. अशा उत्पादनांची विक्री कोणतीही परवानगी न घेता जाणीवपूर्वक केली जाते आणि ग्राहकांना ती सुरक्षित असल्याचा चुकीचा समज करून दिला जातो. बनावट डास प्रतिबंधक अगरबत्त्या नकळत खरेदी करणाऱ्या नागरिकांच्या हितासाठी ही कारवाई आहे. बेकायदेशीर उत्पादन करणाऱ्यांना आणि त्यांच्या वितरणाला मदत करणाऱ्यांना अजिबात सहन केले जाणार नाही, असा स्पष्ट संदेश सरकारने यातून दिला आहे. इतर सर्व राज्यांमध्येदेखील अशी सातत्यपूर्ण कारवाई व्हावी, अशी मागणी आम्ही करतो. तसेच, ग्राहकांनी फक्त वैध सीआयबीआरसी नोंदणी क्रमांक असलेलीच डासप्रतिबंधक उत्पादने खरेदी करावीत, असा सल्ला देतो.”‘HICA’ने किरकोळ विक्रेते आणि वितरक यांना सर्व नियमांचे पूर्ण पालन करण्याचे आवाहन केले आहे. तसेच ग्राहकांनी पॅकेजिंगवर वैध सीआयआर क्रमांक असलेलीच डासप्रतिबंधक उत्पादने खरेदी करावीत, असेही संघटनेने स्पष्टपणे सांगितले आहे.
Bird Flu : देशात पुन्हा बर्ड फ्लूची एन्ट्री; केंद्र सरकारकडून सतर्कतेचा इशारा
Bird Flu : चेन्नईमध्ये घातक H5N1 विषाणूमुळे १५०० हून अधिक पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे.
Russian general Vladimir Alekseyev - रशियाच्या लष्करी गुप्तचरांच्या उपप्रमुखावर आज राजधानी मॉस्कोमध्ये गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यामध्ये अधिकारी गंभीर जखमी झाला आहे.
Rinku Singh Facebook : भारतीय संघाचा स्टार फलंदाज रिंकू सिंग एका वेगळ्याच अडचणीत सापडला आहे. रिंकूचे फेसबुक अकाऊंट सायबर गुन्हेगारांनी हॅक केले आहे.
‘Vadh 2’ movie review : 'वध २'मध्ये पुन्हा एकदा दिसणार नीना गुप्ता-संजय मिश्रांची जादू!
मुंबई : चित्रपटसृष्टीत नेहमीच बंदिवास आणि सामाजिक नियंत्रणाच्या कथा प्रभावीपणे मांडल्या गेल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर एक नवा वास्तववादी चित्रपट 'वध २' प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या कथेचा केंद्रबिंदू आहे शंभूनाथ मिश्रा (संजय मिश्रा), जो आर्थिक ओझ्याखाली दबलेला आणि वैयक्तिक आयुष्यात एकाकी पडलेला एक तुरुंग रक्षक आहे. त्याच्या आयुष्यात वळण येते जेव्हा त्याचा संपर्क मंजू सिंग (नीना गुप्ता) या कैद्याशी येतो. मंजू जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे, मात्र तिने तो गुन्हा केला असावा की नाही, याबाबत शंका आहे. एकीकडे तुरुंगातील या दोन जीवांमध्ये एक भावनिक जवळीक निर्माण होत असतानाच, एका रात्री राजकीय संबंध असलेला एक गुन्हेगार तुरुंगातून गायब होतो आणि संपूर्ण व्यवस्थेला धक्का बसतो. या प्रकरणाच्या तपासासाठी अतीत सिंग (अमित के. सिंग) हा कर्तव्यदक्ष अधिकारी सूत्रे हाती घेतो. इथूनच कथेला खरा वेग मिळतो. चित्रपटात केवळ रहस्यच नाही, तर समाजातील खोलवर रुजलेली जातीय समीकरणे आणि सत्तेचा संघर्ष देखील प्रभावीपणे मांडला आहे. यामध्ये पूर्वग्रहदूषित वृत्तीचा जेलर (कुमुद मिश्रा) आणि एका विकृत कैद्याची (अक्षय डोग्रा) भूमिका व्यवस्थेतील क्रूरता अधोरेखित करते. तुरुंगातील एकाकीपणा, मानवी भावना आणि राजकारण यांचा हा त्रिवेणी संगम प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडणारा आहे.https://prahaar.in/2026/02/06/maharashtra-will-increase-bjp-strength-in-rajya-sabha-will-there-be-unopposed-elections-for-7-seats-in-april/आधीचा वध हा चित्रपट तुम्ही पहिला असेल आणि आता त्याच्या सिक्वेलचा ट्रेलर पाहिला, तर कथेचा गुंता आणि त्यामागचं 'का' हे तुम्हाला सुरुवातीच्या काही मिनिटांतच लक्षात येऊ शकतं. निर्मात्यांनी मुद्दाम या चित्रपटातील मुख्य कलाकार आणि त्यांची पडद्यावरील नावे तशीच ठेवली आहेत. मात्र, यावेळी कथेची पार्श्वभूमी बदलली असून ती घरगुती ड्रामाऐवजी तुरुंगाच्या भिंतीआड घडते. न्यायव्यवस्थेतील त्रुटी आणि नैतिक गुंतागुंतीवर हा चित्रपट भाष्य करतो. 'दृश्यम' चित्रपटाने लोकप्रिय केलेला नैतिक कारणासाठी केलेली हत्या (Murder with a Moral) हाच धागा या चित्रपटातही जोडलेला आहे. एकाच संकल्पनेचा हा पुढचा टप्पा असल्याचे जाणवते. चित्रपटाचा वेग हा 'स्लो बर्न' म्हणजेच हळूहळू उलगडणारा असला, तरी प्रेक्षकांना फारसे अनपेक्षित धक्के मिळत नाहीत. मात्र, चित्रपटाचा शेवट आणि त्यातील 'फायनल ट्विस्ट' हा अत्यंत प्रभावी आहे. हा चित्रपट 'कर्मा'च्या सिद्धांताला एक नवा आयाम देतो. आपल्या पापाची शिक्षा मिळण्यासाठी पुढच्या जन्माची वाट पाहावी लागत नाही, तर याच जन्मात आणि याच ठिकाणी त्याचा हिशोब होतो, हे निर्मात्यांनी मोठ्या खुबीने मांडले आहे. जरी चित्रपट काहीसा प्रेडिक्टेबल वाटत असला, तरी शेवटच्या काही मिनिटांतील वळण प्रेक्षकांना थक्क करून सोडते.दिग्दर्शक जसपाल सिंग संधू यांचा सामाजिक 'थ्रिलर'लेखक-दिग्दर्शक जसपाल सिंग संधू यांचा नवा चित्रपट न्यायव्यवस्थेच्या संकल्पनेवरच प्रश्नचिन्ह उभे करतो. जातीवाद, तुरुंगातील बंदीवास आणि सत्तेचा अधिकार या वास्तववादी गोष्टी त्यांनी या कथेत अत्यंत कौशल्याने गुंफल्या आहेत. सपन नरुला यांची सिनेमॅटोग्राफी आणि सिद्धांत मल्होत्रा यांचे प्रोडक्शन डिझाइन आपल्याला खऱ्याखुऱ्या तुरुंगात असल्याचे भासवते. नीना गुप्ता आणि संजय मिश्रा या जोडीने पुन्हा एकदा आपल्या अभिनयातील शांत तीव्रता आणि भावनिक खोली सिद्ध केली आहे. संजय मिश्रा यांनी 'शंभू'च्या भूमिकेत आपली खास शैली आणली आहे, तर नीना गुप्ता यांनी 'मंजू'च्या पात्राला एक वेगळाच संघर्ष आणि डौल मिळवून दिला आहे. मात्र, या सगळ्यात कुमुद मिश्रा यांनी साकारलेला जेल सुप्रीटेंडेंट प्रकाश सिंग लक्ष वेधून घेतो. केवळ आडनावावरून माणसाची जात शोधणाऱ्या आणि स्वतःच्या पूर्वग्रहामुळे न्याय भरकटलेल्या अधिकाऱ्याच्या भूमिकेला त्यांनी अनेक छटा दिल्या आहेत. दिग्दर्शकाने 'चांगले' आणि 'वाईट' हे स्पष्ट करण्यात बराच वेळ खर्च केल्याने, कथेतील 'ग्रे शेड' (मध्यम बाजू) काहीशी दुर्लक्षित राहिली आहे. थ्रिलर चित्रपट असूनही यात पुरावे नष्ट करण्याची पद्धत अतिशयोक्तीपूर्ण वाटते. तसेच, आजच्या काळात तपासात महत्त्वाचे असणारे 'कॉल डिटेल्स' सारखे मुद्दे सोयीस्करपणे विसरले गेले आहेत. जेव्हा सहाय्यक कलाकार आपला हेतू सुरुवातीलाच स्पष्ट करतात, तेव्हा दोन तासांच्या चित्रपटात मुख्य गौप्यस्फोटापर्यंत पोहोचण्याचा प्रवास काहीसा संथ आणि ओढून ताणून केल्यासारखा वाटतो.चित्रपटाच्या दुसऱ्या भागात विसंगतीचा फटकासंजय मिश्रा, नीना गुप्ता आणि कुमुद मिश्रा यांसारखे दिग्गज कलाकार जेव्हा एका 'स्लो बर्न' थ्रिलरमध्ये काम करतात, तेव्हा प्रेक्षकांच्या अपेक्षा उंचावलेल्या असतात. मात्र, या चित्रपटाच्या दुसऱ्या भागात कथानकाचा समतोल बिघडल्याचे प्रकर्षाने जाणवते. चित्रपटाचा मूळ स्वभाव संथ आणि वास्तववादी असताना, त्यातील काही पात्रांची मांडणी या स्वभावाशी विसंगत ठरली आहे. तपास अधिकारी (Investigating Officer) साकारणारे अमित के. सिंग चित्रपटाच्या एकूण गांभीर्यामध्ये फिट बसताना दिसत नाहीत. त्यांचे अभिनय प्रदर्शन पाहताना असं वाटतं की, ते एखाद्या मोठ्या बॉलिवूड कमर्शियल चित्रपटासाठी 'ऑडिशन' देत आहेत. जिथे नीना गुप्ता आणि संजय मिश्रा यांसारखे कलाकार अभिनयाची एक वेगळीच उंची गाठत आहेत, तिथे एका गंभीर तपासादरम्यान अधिकाऱ्याचे शरीर प्रदर्शन (Body flaunting) किंवा सिगारेट ओढताना दिलेली स्टाईल अनावश्यक वाटते. दिग्दर्शकाने कदाचित चित्रपटात थोडे ग्लॅमर किंवा 'रंग' भरण्यासाठी हे केले असावे, पण या गंभीर थ्रिलरमध्ये तो प्रयोग सपशेल फसला आहे. अखेरीस, हा चित्रपट एखाद्या चांगल्या उद्देशाने लिहिलेल्या पण चुकीच्या ठिकाणी विरामचिन्हे (Punctuation marks) असलेल्या वाक्यासारखा वाटतो, ज्याचा मूळ अर्थ आणि प्रभाव मांडणीमुळे कमी झाला आहे.
Anju Krishna : मनोरंजन विश्वात मोठी खळबळ.! ड्रग्ज प्रकरणात अभिनेत्री सह ७ जणांना अटक
या प्रकरणात नाव येण्यापूर्वी अंजू कृष्णाला तमिळ आणि मल्याळम चित्रपटांतील अभिनयासाठी ओळखले जात होते.
MPC meeting: बँक ग्राहकांच्या सुरक्षेसाठी RBIचा मोठा निर्णय; फसवणूक आणि ‘मिस-सेलिंग’ला बसणार लगाम
MPC meeting: रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी पतधोरण समितीच्या बैठकीनंतर या महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. विशेष म्हणजे, आरबीआयने यंदा 'रेपो रेट' ५.२५ टक्क्यांवर स्थिर ठेवला आहे.
Harshit Rana Injured : टीम इंडियाचा युवा वेगवान गोलंदाज हर्षित राणा गुडघ्याच्या गंभीर दुखापतीमुळे या टी-२० विश्वचषकाच्या महाकुंभातून बाहेर पडला आहे.
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी अखेरची संधी! e-KYC मधील चूक दुरुस्त करा, शेवटची तारीख काय?
Ladki Bahin Yojana : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे.
Bitcoin Price Crash: ऑक्टोबर २०२५ मध्ये $१,२६,००० चा टप्पा गाठल्यानंतर किमतीत मोठी पडझड
Islamabad Blast: मशिदीत नमाज सुरु असताना स्फोट, १२ ठार; इस्लामाबादमध्ये आणीबाणी घोषित
इस्लामाबाद: पाकिस्तानची राजधानी असलेल्या इस्लामाबादमधील एका इमामबारगाहमध्ये भीषण स्फोट झाला. या स्फोटात आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला असून ३० जण गंभीर जखमी झाले आहेत. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इस्लामाबादमध्ये आणीबाणी घोषित करण्यात आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, इस्लामाबादमधील एका शिया मशिदीत हा आत्मघातकी हल्ला झाला आहे. आत्मघातकी हल्लेखोराने आत प्रवेश केल्यानंतर गेटजवळ स्वतःला उडवून दिले. यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे आणि चार जण जखमी झाले आहेत. तर मीडिया रिपोर्ट्सनुसार आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला आहे. स्फोटाचे वृत्त मिळताच पोलिस आणि बचाव पथके घटनास्थळी पोहोचली आणि प्राथमिक बचाव कार्य सुरू झाले आहे.स्फोटानंतर, इस्लामाबादमधील पॉलीक्लिनिक, पाकिस्तान इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (पीआयएमएस) आणि सीडीए हॉस्पिटलमध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. रुग्णालयाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार; पिआयएमएसच्या कार्यकारी संचालक (ईडी) यांच्या सूचनेनुसार रुग्णालयात आणीबाणी लागू करण्यात आली आहे.त्यांनी पुढे सांगितले की, मुख्य आपत्कालीन, ऑर्थोपेडिक, बर्न सेंटर आणि न्यूरोलॉजी विभाग सक्रिय करण्यात आले आहेत. जखमींना पिआयएमएस आणि पॉलीक्लिनिकमध्ये दाखल करण्यात येत आहे.
पंतप्रधानांबाबतचे काँग्रेस खासदारांचे वर्तन संसदेच्या परंपरेला काळीमा फासणारे
भाजपाचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांचे टीकास्त्रमुंबई : देशाच्या इतिहासात प्रथमच लोकसभेमध्ये पंतप्रधानांना भाषण देता येईल असे सुरक्षित वातावरण नव्हते ही दुर्दैवाची बाब आहे. या घटनेचा भारतीय जनता पार्टी धिक्कार करते. संसदेमध्ये लोकशाही मार्गाने आंदोलन न करता काँग्रेसच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आसनासमोर येऊन त्यांच्या जीवाला धोका उत्पन्न होईल असे वर्तन करत आंदोलन केले. संसदेच्या समृद्ध परंपरेला आणि इतिहासाला काळीमा फासणा-या काँग्रेस खासदारांच्या या वर्तनाचे समर्थन उबाठा गट आणि संजय राऊत करत आहेत हे अत्यंत चीड आणणारे आहे असे शरसंधान भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन साधले.यावेळी श्री. बन म्हणाले की, कायम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा द्वेष करण्याचे काम काँग्रेसने आणि विरोधकांनी केले. देशविकासासाठी पंतप्रधान करत असलेली कामे काँग्रेसच्या डोळ्यात खुपतात. म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पातळी सोडून उबाठा गट आणि काँग्रेसने सातत्याने असूयेपोटी टीका केली आहे. ‘मौत का सौदागर’, ‘मोदी तेरी कब्र खुदेगी’ या आणि अशा शब्दांत टीकेचा टीपेचा सूर लावला गेला आहे. बिहार निवडणुकीवेळी तर कहर करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्रींबद्दल हिणकस वक्तव्य केले होते.उद्धव ठाकरे, राऊत डरपोकपंतप्रधान नरेंद्र मोदी देश आणि देशाच्या जनतेच्या विकासासाठी आणि सुरक्षेसाठी झटत आहेत. भारताला विकासाची नवी उंची प्रदान करत आहेत. मात्र उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कोवीडमध्ये जनता मरण यातना भोगत होती, देशोधडीला लागत होती, अशा स्थितीत अडीच वर्षे उद्धव ठाकरे घरात बसून सरकार चालवत होते. जनतेच्या सुरक्षेची, रक्षणाची जबाबदारी असलेल्या तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तेव्हा जबाबदारीपासून पळ काढत घरात लपून बसले होते. शिंदे आणि त्यांनतर फडणवीस सरकार काळात उद्धव ठाकरे घरात लपून बसले होते असा हल्लाबोल श्री. बन यांनी केला.पंतप्रधान मोदींवर टीका करण्याची पात्रता राऊतांची नाही असे म्हणत श्री. बन यांनी राऊतांचा समाचार घेतला. पंतप्रधानांच्या सक्षम नेतृत्वावर मतदारांनी विश्वास ठेवत सलग तीन वेळा त्यांना पंतप्रधानपदी निवडून दिले आहे. राऊ हे अनेक वर्षे राज्यसभेचे खासदार आहेत, त्यांनी खासदार म्हणून फंडातून एकही लोकहिताचे काम केले नाही. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्याचा अधिकार नाही अशी प्रखर टीका श्री. बन यांनी केली.भारताची प्रगती राऊतांना बघवत नाहीभारत अमेरिका व्यापार करार करून भारताच्या अर्थव्यवस्थेला एक नवी उंची प्राप्त होणार आहे. भारताची नव्हे तर पाकिस्तानची मान उंचावण्याचे कायमच राऊतांचे धोरण आहे असा घणाघात श्री. बन यांनी केला. भारताची बदनामी करणार असाल तर जशास तसे उत्तर भाजपा आणि जनता देईल असा इशाराही त्यांनी दिला.एपस्टीन फाइलबद्दल राऊतांनी बोलू नये. बिनबुडाचे आरोप करण्याऐवजी नको त्या विषयात बोलू नये. पाटकर फाइल काढली तर राऊतांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही असे श्री. बन यांनी सुनावले. माताभगिनीना कसा त्रास देण्यात आला त्याचे पितळ पाटकर फाइलमुळे उघडे पडेल असेही श्री. बन यांनी नमूद केले.‘ज्यांचे मीठ खावे त्यांची चाकरी करावी’ राऊतांना खोचक सल्लासंजय राऊत यांची जीभ राहुल गांधी आणि शरद पवार यांचे कौतुक करताना झडत नाही. उद्धव ठाकरेंचे कौतुक करताना राऊत दिसत नाहीत. किमान ज्यांचे मीठ खाता त्यांच्याशी तरी इमान राखा असा खोचक सल्ला श्री. बन यांनी राऊतांना दिला.
मोठी बातमी..! शिवसेना शिंदे गटात बंडखोरी, पक्षात मोठी फूट, राजकीय वर्तुळात खळबळ
Maharashtra politics :
Sikkim Earthquake: सिक्कीममध्ये जाणवले चक्क १३ भूकंपाचे धक्के
सिक्कीम: सिक्कीमच्या काही भागात चक्क १३ भूकंपाचे धक्के जाणवले. गुरुवारी रात्री उशिरा ते शुक्रवार सकाळपर्यंत हे धक्के जाणवले. राज्यातील सहा जिल्ह्यांपैकी चार जिल्ह्यांमध्ये या भूकंपाची नोंद झाली आहे. मंगन, नामची, गंगटोक आणि गेजिंग या जिल्ह्यांमध्ये हे धक्के जाणवले आहे.मिळालेल्या माहितीनुसार या भूकंपांची तीव्रता रिश्टर स्केलवर २.२ ते ४.५ पर्यंत होती.या भूकंपामुळे लोक भीतीने घराबाहेर पडले आणि परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.अनेक रहिवासी काही मिनिटे घरा बाहेरच थांबले. त्यांना भूकंपाच्या संभाव्य धक्क्यांची भीती वाटत होती.भारत सरकारच्या भूगर्भ विज्ञान मंत्रालयाच्या राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या आकडेवारीनुसार, नामची जिल्ह्यात चार आणि गंगटोक आणि गेजिंग जिल्ह्यात प्रत्येकी एक भूकंप जाणवला. गुरुवारी रात्री १:०९ वाजता गेझिंग जिल्ह्यात भूकंपाचा पहिला धक्का जाणवला, तर शुक्रवारी पहाटे ५:२९ वाजता नामची जिल्ह्यात शेवटचा धक्का जाणवला.तर गेझिंग जिल्ह्यात पहाटे १:०९ वाजता पहिला धक्का जाणवला, ज्याची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.५ इतकी नोंदवली गेली. त्यानंतर, गंगटोक जिल्ह्यात दुपारी १:१५ वाजता ३.१ तीव्रतेचे, मंगन जिल्ह्यात दुपारी १:२३ वाजता २.२ तीव्रतेचे, मंगन जिल्ह्यात दुपारी २:०३ वाजता २.५ तीव्रतेचे, नामची जिल्ह्यात दुपारी २:२० वाजता ३.९ तीव्रतेचे आणि नामची जिल्ह्यात दुपारी २:४३ वाजता २.४ तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले.त्याच क्रमाने, मंगन जिल्ह्यात दुपारी २:५६ वाजता २.४ रिश्टर स्केलचा भूकंप, मंगन जिल्ह्यात दुपारी २:५९ वाजता २.५ रिश्टर स्केलचा भूकंप, नामची जिल्ह्यात दुपारी ३:११ वाजता ४.० रिश्टर स्केलचा भूकंप, मंगन जिल्ह्यात दुपारी ३:३६ वाजता २.८ रिश्टर स्केलचा भूकंप, मंगन जिल्ह्यात दुपारी ३:५२ वाजता २.७ रिश्टर स्केलचा भूकंप, मंगन जिल्ह्यात दुपारी ४:५७ वाजता २.२ रिश्टर स्केलचा भूकंप आणि अखेर नामची जिल्ह्यात सायंकाळी ५:२९ वाजता २.९ रिश्टर स्केलचा भूकंप जाणवला.
Islamabad Blast: पाकिस्तानात शुक्रवारच्या नमाजानंतर भीषण स्फोट, 31 जणांचा मृत्यू, 169 जखमी
Islamabad Blast:
Islamabad Blast: पाकिस्तानात शुक्रवारच्या नमाजानंतर भीषण स्फोट, 15 जणांचा मृत्यू, 80 हून अधिक जखमी
Islamabad Blast:
J&K Budget 2026: जम्मू-काश्मीरचा 1.27 लाख कोटींचा अर्थसंकल्प सादर; मोठ्या घोषणा जाणून घ्या…
J&K Budget 2026: गुंतवणूक, नाविन्यता आणि लोकसहभागातून जम्मू-काश्मीरला आधुनिक आणि प्रगतीशील प्रदेश बनवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
Dcm Sunetra Pawar : सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा वाद. विधानसभा सदस्य नसताना घेतलेली शपथ असंवैधानिक आहे का?
Vaibhav Suryavanshi Century : वैभव सूर्यवंशीने अंडर-१९ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात इंग्लंडविरुद्ध ऐतिहासिक शतकी खेळी करत क्रिकेट विश्वाचे लक्ष वेधून घेतले आहे.
Bharat Taxi App: भारतीय टॅक्सी चालक ओला किंवा उबरपेक्षा किती जास्त कमावू शकतात?, जाणून घ्या...
मुंबई: जर तुम्ही ओला किंवा उबरने दररोज प्रवास करत असाल किंवा टॅक्सी चालवून उदरनिर्वाह करत असाल, तर ही बातमी तुम्हाला आश्चर्यचकित करू शकते. गेल्या काही वर्षांपासून, ड्रायव्हर्स उच्च कमिशन आणि वाढत्या भाड्यांबद्दल तक्रार करत आहेत. पण आता एक नवीन मॉडेल समोर आले आहे, जे ड्रायव्हर्सचे खिसे भरण्याचा आणि प्रवाशांना दिलासा देण्याचा दावा करते. हे मॉडेल म्हणजे भारत टॅक्सी, जे सरकारने सुरू केले आहे. ओला आणि उबरपेक्षा भारत टॅक्सीने ड्रायव्हर्स किती जास्त कमाई करतात आणि गणित काय सांगते ते जाणून घेऊया.भारत टॅक्सी अॅप म्हणजे काय?भारत सरकारच्या सहकार मंत्रालयाने देशातील पहिले सहकारी राइड-हेलिंग प्लॅटफॉर्म, भारत टॅक्सी अॅप लाँच केले. याला सहकार टॅक्सी कोऑपरेटिव्ह लिमिटेड द्वारे चालवले जाते. ५ फेब्रुवारी २०२६ रोजी केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी ते देशभरात लाँच केले. सध्या, ते दिल्ली-एनसीआर आणि इतर काही राज्यांमध्ये पायलट प्रोजेक्ट म्हणून चालवले जात आहे. हे अॅप कॅब, ऑटो आणि बाईक टॅक्सी सेवा प्रदान करते.सहकारी मॉडेलचा अर्थ
अजित पवारांच्या मृत्यूचे राजकारण थांबवा!, मुख्यमंत्र्यांनी सत्ताधारी आणि विरोधकांना सुनावले
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघाती निधनानंतर सुरू झालेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, याबाबत सुरू असलेले राजकारण तात्काळ थांबवावे, असा इशारा त्यांनी दिला आहे. हा वाद निरर्थक, चुकीचा आणि खालच्या पातळीचा असल्याचे सांगत, सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही बाजूंना त्यांनी खडेबोल सुनावले.अजित पवार यांच्या निधनानंतर काही घटकांकडून विविध तर्कवितर्क मांडले जात असून, या दु:खद घटनेतून राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला. जनतेत लोकप्रिय असलेले आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अचानक आपल्यातून निघून गेल्यानंतर अशा प्रकारचे राजकारण करणे अत्यंत चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक जण या घटनेला स्वतःच्या राजकीय चष्म्यातून पाहण्याचा प्रयत्न करत असून, ही मानसिकता धोकादायक असल्याचेही त्यांनी नमूद केले.Mahaमुंबईहून बारामतीकडे प्रचारसभेसाठी रवाना झाले असताना अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला होता. या घटनेनंतर काही तासांतच सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याने नव्या चर्चांना तोंड फुटले. मात्र, या सर्व घडामोडींना अनावश्यक राजकीय रंग देणे अयोग्य असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. अशा दु:खद प्रसंगी संयम राखणे, संवेदनशीलता दाखवणे आणि कुटुंबीयांच्या भावनांचा आदर करणे हीच अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.'महिंद्रा'ची १५ हजार कोटींची गुंतवणूकविदर्भाला औद्योगिक केंद्र म्हणून विकसित करण्याच्या राज्य सरकारच्या प्रयत्नांबाबत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडच्या १५ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे स्वागत केले. ‘अॅडव्हांटेज विदर्भ’ कार्यक्रमात या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची घोषणा करण्यात आली असून, नागपूरमध्ये १ हजार ५०० एकर क्षेत्रावर देशातील सर्वात मोठा एकात्मिक वाहन आणि ट्रॅक्टर उत्पादन प्रकल्प उभारला जाणार आहे. तसेच, संभाजीनगर येथे १५० एकरांवर सप्लायर पार्क विकसित करण्यात येणार आहे. हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर दरवर्षी ५ लाखांहून अधिक वाहनांचे आणि १ लाख ट्रॅक्टरचे उत्पादन होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. या गुंतवणुकीमुळे रोजगारनिर्मिती, पायाभूत सुविधा आणि प्रादेशिक विकासाला गती मिळेल तसेच वाहनउद्योग, शेती उपकरणे, तंत्रज्ञान आणि सप्लाय चेन क्षेत्राला चालना मिळेल. महाराष्ट्राला उत्पादन क्षेत्रात अग्रस्थानावर नेण्याच्या दृष्टीने ही गुंतवणूक महत्त्वाची ठरणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
मुंबई : मुंबई महापालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार मुंबईतील काही विभागांमध्ये महापालिकेच्या वतीने अनधिकृत फेरीवाले आणि पदपथांवर करण्यात आलेल्या वाढीव बांधकामांवर कारवाई होत आहे. मात्र ही कारवाई होत असतानाच संपूर्ण मुंबईचे लक्ष ज्या कारवाईने वेधून घेतले आहे,ते आहे डोंगरी, मोहम्मद अली रोड येथील कारवाईने. या भागातील फेरीवाले आणि त्यांच्या अतिक्रमणावर कारवाई करण्याची हिंमत होत नव्हती. पण नवख्या सहाय्यक आयुक्त असलेल्या योगेश देसाई यांनी मुस्लिम बहुल विभागात ही धडक कारवाई करत महापालिका आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त (शहर) यांचा विश्वास सार्थ ठरवला आहे. महापालिकेच्या या कारवाईंमुळे डोंगरी, पायधुनीत जाऊन कारवाई करून दाखवा असे आव्हान देण्याची हिंमत जनतेची होणार नाही.महापालिकेच्या बी विभागाच्या वतीने सलग चार दिवस कारवाई सुरू असून या कारवाईमध्ये फेरीवाल्यांसह त्यांची वाढीव बांधकामे ही जमीनदोस्त करण्यात आलेली आहे. महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्त यांचं पाठबळ असल्यास सहाय्यक आयुक्त काय करू शकतो हे नवख्या असलेल्या बी विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश देसाई यांनी करून दाखवले आहे. योगेश देसाई यांच्यासारख्या नवख्या सहाय्यक आयुक्तांना बी विभागाची दिल्याने प्रशासनावर तीव्र टीका झाली होती. या विभागात अनुभवी किंवा विभागाच्या कार्यकारी अभियंता यांची प्रभारी नियुक्ती करून जबाबदारी सोपवण्यात यावी असे म्हटले जात होते. पण नवख्या असलेल्या योगेश देसाई यांनी सहाय्यक आयुक्त पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अत्यंत संवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या बी विभागातील अनधिकृत बांधकामांची बजबजपुरी माजलेल्या या भागात ही कारवाई करून आपण एक सक्षम सहाय्यक आयुक्त आहोत हे दाखवून दिले आहे.योगेश देसाई यांच्या चमूने २९ फेब्रुवारीपासून हाती घेतलेल्या या कारवाईत ५ मार्च पर्यंत सरदार वल्लभ भाई पटेल रोड. इब्राहिम मोहम्मद अली रोड,युसूफ मेहरली रोड,लोकमान्य टिळक रस्ता आधी ठिकाणी कारवाई करत २५ अनधिकृत स्टॉल, ४० वाढीव बांधकामे,१० बोलार्ड ग्रील तसेच ३५ फेरीवाल्यांवर कारवाई करतानाचा या भागात सखोल स्वच्छता मोहीम राबवून रस्ते आणि पदपथ साफ केले. या विभागात यापूर्वी महापालिकेचे तत्कालीन सहायक आयुक्त उदयकुमार शिरूरकर यांनी अशाप्रकारे धडक कारवाईचा धडाका लावला होता. शिरूरकर हे महापालिकेचे अधिकारी होते आणि परीक्षा देत सहाय्यक आयुक्त बनले होते. त्यामुळे त्यांना महापालिकेच्या कामकाजाचा आणि कार्यपद्धती तसेच भौगोलिक परिस्थितीची कल्पना होती. पण योगेश देसाई यांच्यासारख्या नवख्या अधिकाऱ्याने या संवेदनशील विभागात सातत्यपूर्ण कारवाई करून आपण काही कमी नसल्याचे दाखवून दिले आहे.कुर्ल्यातील घटनेनंतर मुंबईत फेरीवाले आणि त्यांच्या वाढीव बांधकामांवरोधात सुरू झालेल्या या कारवाईत बी विभागातील ही कारवाई जनतेचा महापालिकेवरील विश्वास वाढवताना दिसत आहे.मागील पाच ते सहा दिवसातील कारवाईठिकाण:इब्राहिम मोहम्मद अली रोड(नारायण धुरू स्ट्रीट मांडवी)सरदार वल्लभ भाई पटेल रोड()इब्राहिम मोहम्मद मर्चंड रोड, मांडवीसंत तुकाराम रोड,युसूफ मेहरली रोड,लोकमान्य टिळक रस्ताकारवाई:स्टॉल्स :२५वाढीव बांधकामे :४०बोलार्ड ग्रील :१०बेकायदेशीर फेरीवाले: ३५
मृणाल ठाकूरचे बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचे फोटो व्हायरल; चाहते आश्चर्यचकित
Mrunal Thakur : दक्षिण चित्रपटसृष्टी गाजवलेली आणि तितकीच मराठमोळ्या चित्रपटांहून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री मृणाल ठाकूर हिच्याबद्दल सध्या सोशल मीडियावर भलत्याच चर्चा रंगल्या आहेत. गेल्या काही महिन्यांपासून अनेक अभिनेत्यांसोबत तीच नाव जोडलं जात आहे. अशातच मृणालचा सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाला आहे.बॉलीवूड अभिनेत्री मृणाल ठाकूर ही व्हायरल झालेल्या फोटोमध्ये बेबी बंपसह दिसत आहे. तिच्यासोबत वरूण धवन हा अभिनेता अगदी आपुलकीने तिची काळजी घेताना दिसत आहे. परंतु हा व्हिडिओ समोर येताच 'मृणाल प्रेग्नेंट आहे का ?' असा प्रश्न निर्माण होतोय. यामुळे प्रेक्षकांमध्ये अनेक चर्चा सुरु झाल्या आहेत. काही युजर्सनी तर धवनसोबतच्या तिच्या चर्चांशी हा विषय जोडला आहे.खरंच मृणाल ठाकूर प्रेग्नंट आहे?व्हायरल झालेल्या व्हिडीओचं मृणाल ठाकूरच्या पर्सनल लाईफशी काहीही घेणंदेणं नाही आहे. खरतर तिच्या आगामी सिनेमाच्या शुटिंग सेटवरचे हे फोटो आणि व्हिडीओ आहेत. मृणाल ठाकूर आणि अभिनेता वरुण धवन एका आगामी सिनेमात एकत्र दिसणार आहेत. 'है जवानी तो इश्क होना है' या सिनेमाच्या शुटिंग सेटवर दोघेही एकत्र दिसून आले. त्यावेळीच दोघांचा व्हिडीओ व्हायरल झाला. सिनेमातल्या एका शॉर्टसाठी मृणाल ठाकूरनं बेबी बंपचा लूक केला. त्यामुळे ती प्रेग्नंट असल्याचा गैरसमज अनेकांना झाला. पण, खरंतर हा त्यांच्या सिनेमाच्या शुटिंगचा भाग होता.
UP SIR Form Submission Last Date: निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेशात सुरू असलेल्या विशेष सघन पुनरावृत्ती (SIR) मोहिमेसाठी दावे आणि हरकती दाखल करण्याची अंतिम तारीख वाढवली आहे.
Manoj Bajpayee : गोविंदाची जागा मनोज बाजपेयी घेणार? भागम भागच्या सिक्वलची घोषणा
Manoj Bajpayee : दुसऱ्या भागाची घोषणा करण्यात आली असून, या चित्रपटात गोविंदाची जागा मनोज बाजपेयी घेणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
Supreme Court on Prashant Kishor: सर्वोच्च न्यायालयाने आज प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाने बिहार निवडणुकीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी करण्यास नकार दिला.
Eknath Shinde: म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाढदिवस साजरा करणार नाही
मुंबई : ‘राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्याने साऱ्या महाराष्ट्रावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यामुळेच यंदा ९ फेब्रुवारी रोजी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे.कार्यकर्ते, पक्षनेते, पदाधिकारी आणि नागरिकांनाही पुष्पगुच्छ, भेटी आणू नयेत, शुभेच्छा देणारे होर्डिंग्ज लावू नये, तसेच वाढदिवसानिमित्ताने कोणताही सोहळा आयोजित करू नये, असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी केले आहे.'अजित पवार यांच्या अकाली जाण्याच्या वेदनेतून महाराष्ट्र आजही सावरलेला नाही. व्यक्तिश: मी माझा सहकारी आणि मित्र गमावला आहे. अजित पवार यांच्या निधनाने झालेली अपरिमित हानी भरून येणारी नाही. पवार कुटुंबाच्या दु:खात आपण सहभागी आहोत.अशा या दुःखद परिस्थितीत वाढदिवस साजरा करणे, सोहळे-समारंभ करणे मला उचित वाटत नाही. त्यामुळेच परिस्थितीचा गांभीर्य आपण जपू या असे आवाहन शिंदे यांनी केले आहे. माझ्या वाढदिवसानिमित्ताने कुणीही पुष्पगुच्छ आणू नयेत, होर्डिंग्स लावू नयेत, तसेच कोणताही समारंभ, कार्यक्रम आयोजित करू नयेत’, अशी विनंती शिंदे यांनी केली आहे.
Mayor Election 2026: राज्यातील ९ महानगरपालिकांना मिळाले महापौर
- भाजपची सरशी; मुंबईचा प्रथम नागरिक कोण हे उद्या स्पष्ट होणारमुंबई: राज्यातील विविध महानगरपालिकांमध्ये आज महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. या प्रक्रियेत भाजप-महायुतीने स्पष्ट आघाडी घेतल्याचे चित्र दिसून आले. जळगाव, धुळे, कोल्हापूर, पिंपरी-चिंचवड, नागपूर, अमरावती, सोलापूर, नाशिक आणि अहिल्यानगर या महत्त्वाच्या महानगरपालिकांमध्ये महापौर निवडी पूर्ण झाल्या असून काही ठिकाणी चुरशीच्या वाटणाऱ्या लढती अखेर बिनविरोध झाल्या, तर काही ठिकाणी भाजपने मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला.सोलापूर महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपचे विनायक कोंड्याल यांची बिनविरोध निवड झाली. शिवसेना आणि एमआयएमच्या उमेदवारांनी ऐनवेळी माघार घेतल्याने कोंड्याल यांचा मार्ग मोकळा झाला. जळगाव महानगरपालिकेत भाजपच्या दीपमाला काळे यांची महापौरपदी निवड झाली असून शिवसेनेच्या मनोज चौधरी यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली आहे. दीपमाला काळे यांनी जळगाव महापालिकेच्या १७व्या महापौर म्हणून पदभार स्वीकारला.नागपूर महानगरपालिकेत भाजपच्या नीता ठाकरे यांनी १०४ मते मिळवत काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केला. तर धुळे महानगरपालिकेत तिरंगी लढत झाली. या निवडणुकीत भाजपच्या मायादेवी परदेशी यांनी ५० मते मिळवून महापौरपदावर विजय मिळवला. राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेनेच्या संयुक्त उमेदवाराला केवळ १३ मते मिळाली. दुसरीकडे, नांदेड महानगरपालिकेत प्रथमच भाजपचा महापौर निवडून आला आहे. ८१ पैकी ४५ जागा जिंकून भाजपने स्पष्ट बहुमत मिळवले असून महापौरपदासाठी कविता मुळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. उपमहापौरपदासाठी दिपकसिंह रावत यांची निवड निश्चित झाली आहे.कोणत्या शहरात कोणाचा महापौर?- सोलापूरमध्ये महापौरपदी विनायक कोंड्याल (भाजप) यांची निवड झाली असून उपमहापौर निवडीची प्रक्रिया सुरू आहे. जळगावमध्ये दीपमाला काळे (भाजप) महापौर तर मनोज चौधरी (शिवसेना) उपमहापौर, अहिल्यानगरमध्ये ज्योती गाडे (राष्ट्रवादी-एपी) महापौर तर धनंजय जाधव (भाजप) उपमहापौर, नागपूरमध्ये नीता ठाकरे (भाजप) महापौर असून उपमहापौरपदी लीला हाथीबेड यांची निवड झाली आहे.- धुळ्यात मायादेवी परदेशी (भाजप) महापौर आणि ज्योत्स्ना पाटील उपमहापौर, नाशिकमध्ये हीमगौरी आडके (भाजप) महापौर तर विलास शिंदे (शिवसेना) उपमहापौर, छत्रपती संभाजीनगरमध्ये समीर राजूरकर (भाजप) महापौर आणि राजेंद्र जंजाळ (शिवसेना-शिंदे) उपमहापौर पदी निवड झाली आहे.- पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपचे रवी लांडगे, तर उपमहापौरपदी शर्मिला बाबर (भाजप) यांची निवड झाली आहे. कोल्हापुरात रुपाराणी निकम (भाजप) महापौरपदी विराजमान झाल्या आहेत.मुंबईचा चेहरा उद्या ठरणार- मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा निकाल लागून पंधरा दिवसांहून अधिक कालावधी उलटला असून आता महापौर आणि उपमहापौर पदासाठीची प्रक्रिया निर्णायक टप्प्यात पोहोचली आहे. यंदाचे महापौरपद महिलेसाठी आरक्षित असल्याने मुंबईचा प्रथम नागरिक कोण होणार, याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे. महापौर आणि उपमहापौर पदासाठी शनिवारी (दि. ७ फेब्रुवारी) नामांकन अर्ज दाखल करण्यात येणार आहेत.- महापालिकेत भाजप आणि शिवसेनेकडे संख्याबळ अधिक असल्याने या दोन्ही पदांवर महायुतीचेच उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे. मात्र ही निवडणूक बिनविरोध होऊ न देण्याचा निर्णय उबाठा गटाने घेतल्याने लढत रंगण्याची चिन्हे आहेत. महायुतीतील सत्तासमीकरणानुसार मुंबई महापालिकेत भाजपकडे महापौरपद, तर शिवसेनेकडे उपमहापौरपद दिले जाणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.नवी मुंबईत नाट्यमय घडामोडी- नवी मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपच्या सुजाता पाटील, तर उपमहापौरपदी दशरथ भगत यांची बिनविरोध निवड झाली आहे. महापौर व उपमहापौर पदासाठी शिवसेना आणि भाजप यांच्यात थेट राजकीय लढत होण्याची शक्यता निर्माण झाली होती. शिवसेनेच्या वतीने दोन्ही पदांसाठी उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केल्यामुळे ही निवडणूक अधिकच चुरशीची ठरणार असल्याचे संकेत मिळाले होते. भाजपकडे स्पष्ट बहुमत असतानाही ही लढत राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली होती.- मात्र निवडणुकीच्या आधीच नाट्यमय घडामोडी घडल्या. शिवसेनेकडून महापौरपदासाठी दाखल करण्यात आलेला नामांकन अर्ज मागे घेण्यात आल्याने भाजपच्या उमेदवार सुजाता पाटील यांची बिनविरोध महापौरपदी निवड झाली. त्यानंतर उपमहापौरपदासाठीही शिवसेनेने नामांकन अर्ज मागे घेतल्यामुळे भाजपचे दशरथ भगत हे बिनविरोध उपमहापौर म्हणून निवडून आले.
दोन प्रवाशांच्या भांडणात तरुणाने कायमचा गमावला डोळा; जाणून घ्या नेमकं प्रकरण
मुंबई : मुंबईची लोकल ही मुंबईची लाईफलाईन आहे. मुंबईची शान आहे, पण याच रेल्वेवर हल्ली प्रवाशांचा ताण वाढत चालला आहे. लोकलमध्ये गर्दी इतकी असते अनेकवेळा प्रवाशांची भांडणं आणि गर्दीमुळे रागाच्या भरात प्रवाशांकडून गुन्हे देखील घडत आहेत. काही दिवसांपूर्वीच मालाडमध्ये झालेल्या भांडणात एकाने दुसऱ्याला भोसकले होते.नेमकं घडलं काय ? त्यानंतर असाच एक धक्कदायक प्रकार बांद्रे स्थानकावर घडला आहे. दोन प्रवाशांच्या वादात एका अज्ञात इसमाने फेकलेला दगड एका तरुणाला लागला असून प्रवाशाचा डोळा कायमचा निकामी झाला आहे.निशांत कुमार खत्री ( २८ ) असं दुखापतग्रस्त तरुण दादरचा रहिवासी आहे. तो एका खासगी कंपनीत अकाऊंट्स विभागात काम करतो. बुधवारी रात्री १०.४० च्या सुमारास निशांत अंधेरी- चर्चगेट फास्ट लोकलने घरी परतत होते. डब्यात दोन प्रवाशांमध्ये जोरात भांडण सुरु झाले. ११ च्या सुमारास हि ट्रेन वांद्रे स्थानकावर पोहोचली तेव्हा भांडण करणाऱ्यांपैकी एक जण खाली उतरला आणि त्याने दगड उचलून भांडत दुसऱ्या व्यक्तीवर फेकला. परंतु हा दगड त्या व्यक्तीला न लागता निशांत खत्रीचाय डाव्या डोळ्याला अत्यंत वेगाने लागला. यामुळे निशांतचा डोळा रक्तबंबाळ झाला.वेळीच मदती न मिळाल्याने नुकसाननिशांतने दिलेल्या माहितीनुसार, लोक नुसते बघतच राहिले कोणीही मदत करायला पुढे आले नाही. त्याला स्वतःच चालत स्टेशन मास्तराच्या ऑफिस पर्यंत जावे लागले. तिथेही त्यांच्या दाखल कोणी घेतली माही ताटकळत ४५ मिनिटे त्याला बसवून ठेवण्यात आले. त्यानंतर त्याला भाभा रुग्णालयात आणि नंतर हिंदुजा रुग्णालयात नेण्यात आले. उपचाराला इतका उशीर झाला कि डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्याच्या डाव्या डोळ्याची दृष्टी ही कायमची गेली. निशांत हा त्याच्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा आणि लवकरच त्याचा साखरपुडा होणार होता. पण या घटनेने त्याचे आयुष्य हे कायमचे उध्वस्त झाले आहे.पोलीस कारवाईवांद्रे रेल्वे पोलिसांनी ( GRP ) या प्रकरणी अज्ञात प्रवाशांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलाम ११८ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सध्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेत आहेत.
US Iran Embassy: “लवकरात लवकर इराण सोडा” ; अमेरिकन दूतावासाने त्यांच्या नागरिकांना दिला सल्ला
US Iran Embassy: अमेरिका आणि इराणमधील परिस्थिती बिकट होत चालली आहे. कारण आज अमेरिकन दूतावासाने इराणमधील आपल्या नागरिकांना तात्काळ बाहेर पडण्याचा सल्ला दिला.
RBI Repo Rate: रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, रेपो रेटचा दर कायम; कर्जदारांना दिलासा नाही
मुंबई: रिझर्व्ह बँकेने (RBI) रेपो रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही. आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी शुक्रवारी रेपो रेट ५.२५ टक्के स्थिर ठेवण्याची घोषणा केली. आरबीआयच्या या निर्णयामुळे कर्जांवरील व्याजदरही तसेच राहतील आणि ग्राहकांना कोणताही दिलासा मिळणार नाही. रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीने तटस्थ राहून आपली भूमिका कायम ठेवली आहे. म्हणजेच गरज पडल्यास आरबीआय भविष्यात व्याजदर कमी करण्यास किंवा वाढविण्यास तयार आहे. संजय मल्होत्रा म्हणाले की, अमेरिकेसोबतच्या व्यापार करारामुळे भारताच्या निर्यातीला मोठी चालना मिळेल.पुढे बोलताना आरबीआय गव्हर्नर म्हणाले की, भारत अजूनही एफडीआयसाठी पसंतीचे ठिकाण आहे. भारताची अर्थव्यवस्था आणि वाढ सध्या मजबूत स्थितीत आहे. देशाची जीडीपी वाढ ७.४ टक्के होण्याच्या मार्गावर आहे.महागाई अजूनही नियंत्रणातसंजय मल्होत्रा यांनी सांगितले की, देशातील महागाई नियंत्रणात आहे. आर्थिक वर्ष २०२६ मध्ये देशातील किरकोळ महागाई दर २ टक्क्यांवरून २.१ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. आरबीआयने चालू आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीसाठी महागाईचा अंदाज २.९ टक्क्यांवरून ३.२ टक्के केला आहे. आरबीआय गव्हर्नरने आर्थिक वर्ष २०२७ च्या पहिल्या तिमाहीसाठी महागाईचा अंदाज ३.९ टक्क्यांवरून ४ टक्के केला आहे. दुसऱ्या तिमाहीसाठी महागाईचा अंदाज ४ टक्क्यांवरून ४.२ टक्के करण्यात आला आहे.रेपोरेटमधून सर्वसामान्यांना दिलासा नाहीभारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक नुकतीच संपली. या बैठकीत सर्वसामान्यांना काहीच फायदा झाला नाही. रेपो दरात काहीच कपात न झाल्याने EMI मध्ये कोणताही बदल होणार नाही. महागाईत सर्वसामान्यांना रेपो दर कमी होण्याची आशा होती. त्यामुळे व्याजदर कपातीचा फायदा त्यांना मिळाला असता. त्यांचा ईएमआय अजून काही रुपयांनी कमी झाला असता. मोठ्या गृहकर्जावरील ही व्याजदर कपात वर्षाकाठी मोठी ठरते. त्यामुळे ग्राहकांच्या खिशावरील ताण कमी होतो.
BMC Mayor Election 2026: शरद पवार शिंदेंना पाठिंबा देणार? राजकीय वर्तुळात हालचालींना वेग
मुंबई: मुंबई महानगरपालिकेतील महापौर आणि उपमहापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. सध्या राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा देणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.शरद पवार यांचा शिंदे गटाला अप्रत्यक्ष पाठिंबा:मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेसोबत लढणाऱ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीने महायुतीला पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा एकमेव नगरसेवक अजित रावराणे यांनी शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. अजित रावराणे यांच्याकडून मुंबई महापालिकेसाठी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा देण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर आता शरद पवार यांनी शिंदे गटाला अप्रत्यक्ष पाठिंबा दिला अशा चर्चा राजकीय वर्तुळात पसरू लागल्या आहेत.भाजप आणि शिवसेना (शिंदे) गटाकडूनही आपल्या नगरसेवकांना मुंबईत राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ८ फेब्रुवारीला रविवार असल्याने काही नगरसेवक जत्रेसाठी रवाना होण्याची शक्यता वर्तवली जात असली तरी, १० फेब्रुवारीपर्यंत अनिवार्यपणे मुंबईत हजर राहा, असे स्पष्ट सांगण्यात आले आहे. महापौर निवडणूक तोंडावर असताना ‘संख्या’ अबाधित ठेवण्यासाठी सर्वच पक्षांनी नगरसेवकांवर लक्ष केंद्रीत केल्याचे चित्र आहे.शनिवार ७ फेब्रुवारी रोजी महापौरपदासाठी अर्ज स्विकारले जाणार:उद्या म्हणजेच शनिवार ७ फेब्रुवारी रोजी महापौरपदासाठी अर्ज स्विकारले जाणार आहेत. तर बुधवार ११ फेब्रुवारीला मुंबई महापालिकेच्या महापौरपदाची घोषणा करण्यात येणार आहे. त्याच दिवशी म्हणजेच ११ फेब्रुवारी रोजीच दुपारी १२ वाजता विशेष सभेचं आयोजन करण्यात आलं असून महापौरपादासाठी अर्ज मागे घेण्याची वेळ सभागृह भरण्याच्या १५ मिनिटं आधी असणार आहे.८९ नगरसेवकांची स्वतंत्र गटनोंदणी :सोमवार २ फेब्रुवारी रोजी कोकण भवनात भाजपच्या एकूण ८९ नगरसेवकांची स्वतंत्र गटनोंदणी झाली. तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची एकत्र गटनोंदणी झाली. त्यामुळे महायुतीच्या नगरसेवकांची एकूण संख्या १२१ वर पोहोचली आहे.
मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या दणदणीत विजयाचा फायदा आता महायुतीला राज्यसभेतही मिळणार आहे. येत्या एप्रिल महिन्यात राज्यातील ७ राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ संपत असून, विधानसभेतील नव्या संख्याबळानुसार महायुतीचे पारडे जड झाले आहे. भाजपचे सर्वाधिक १३७ आमदार निवडून आल्याने भाजपच्या वाट्याला ४ जागा, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला १ आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला १ जागा मिळण्याची दाट शक्यता आहे. दुसरीकडे, विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचा मोठा फटका महाविकास आघाडीला बसणार आहे. यापूर्वी महाविकास आघाडीच्या ताब्यात असलेल्या ३ जागा आता महायुतीच्या खात्यात जाण्याची चिन्हे आहेत. मविआतील प्रमुख पक्षांचे संख्याबळ कमी झाल्याने त्यांना ७ पैकी केवळ १ जागेवर समाधान मानावे लागू शकते. विशेष म्हणजे, कार्यकाळ संपणाऱ्या खासदारांमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांचाही समावेश असल्याने, त्यांच्या जागेवर आता कोणाची वर्णी लागते किंवा मविआ आपली एकमेव जागा कोणाला देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यसभेसाठी आवश्यक असलेला ३७.५ मतांचा कोटा पूर्ण करणे हे विरोधकांसाठी मोठे आव्हान ठरणार आहे.https://prahaar.in/2026/02/06/nashik-mayor-election-bjp-to-get-mayor-post-in-nashik-eknath-shinde-sena-joins-ruling-alliance/शरद पवारांसह कोणाकोणाचा समावेश ?राज्यातील एकूण १९ जागांपैकी ७ जागांचा कार्यकाळ येत्या २ एप्रिल रोजी संपणार आहे. यामध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीतील अनेक बड्या चेहऱ्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) सर्वेसर्वा शरद पवार आणि त्यांच्या पक्षाच्या फौजिया खान या निवृत्त होत आहेत. ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांचाही कार्यकाळ याच दिवशी पूर्ण होणार असून, काँग्रेसच्या रजनी पाटील यांचीही मुदत संपत आहे. दुसरीकडे, महायुतीमधील केंद्रीय मंत्री रामदास आठवले, माजी केंद्रीय मंत्री भागवत कराड आणि भाजपचे धैर्यशील पाटील यांचीही खासदारकी २ एप्रिल रोजी संपणार आहे. विधानसभा निवडणुकीतील बदललेल्या संख्याबळामुळे या रिक्त होणाऱ्या जागांवर आता कोणाची वर्णी लागते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. सध्याच्या गणितानुसार, महायुतीला यातील बहुतांश जागांवर विजय मिळवणे सोपे असले तरी मविआ आपली एकमेव जागा राखण्यासाठी कोणाला रिंगणात उतरवते, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
NEET Student Death Case: NEET विद्यार्थ्याच्या मृत्यूवरून राजकारण सुरू आहे. राबडी देवी यांनी या प्रकरणात मंत्री किंवा मंत्र्यांचा मुलगा यात समावेश असल्याचा आरोप केला होता.
Mint Water: पुदिना फक्त उन्हाळ्यातच उपयोगी असतो असे नाही, तर हिवाळ्यातही तो आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतो. योग्य प्रमाणात पुदिन्याच्या पाण्याचे सेवन केल्यास पचन सुधारते, शरीराला थंडावा मिळतो आणि रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्हणजेच शुक्रवार ६ फेब्रुवारी रोजी 'परीक्षा पे चर्चा' च्या निमित्ताने विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आलेल्या विद्यार्थ्यांचे आसामी 'गमोसा' देऊन स्वागत केले.पुढील काही दिवसांमध्ये देशभरातील विविध राज्यातील बोर्डाच्या परीक्षा सुरू होणार आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही निवडक विद्यार्थ्यांशी संवाद साधला. आज या कार्यक्रमाशी ४.५० कोटीहून अधिक विद्यार्थी, पालक आणि शिक्षक जोडले गेले आहेत.परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातून सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील १० वीचा विद्यार्थी प्रणव भोसलेची निवड झाली. याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले आहे. 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमात सांगलीच्या मातीचा, महाराष्ट्राच्या लेकराचा गौरव झाल्याची भावना मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'परीक्षा पे चर्चा २०२६' साठी देशभरातील तब्बल ४.५ कोटी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. या स्पर्धेतून देशभरातून केवळ ३६ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. यात महाराष्ट्रातून एकमेव विद्यार्थी म्हणून सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील अजितराव घोरपडे विद्यालय, कळंबी येथील १० वीचा विद्यार्थी प्रणव भोसलेची झालेली निवड आपल्या प्रत्येकाचे हृदय अभिमानाने भरून टाकणारी आहे.सांगलीच्या मातीचा, महाराष्ट्राच्या लेकराचा गौरव!मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या 'परीक्षा पे चर्चा 2026' साठी देशभरातील तब्बल 4.5 कोटी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. या स्पर्धेतून देशभरातून केवळ 36 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. यात महाराष्ट्रातून एकमेव विद्यार्थी… pic.twitter.com/WhcGqkXFNv— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 6, 2026ग्रामीण भागातील शाळेत शिकणारा आपला मुलगा थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधणार... ही संधी केवळ प्रणवसाठीच विशेष नाही, तर यामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्याच्या स्वप्नाला नवे बळ मिळणार आहे. प्रणवसोबत विद्यालयाचे मुख्याध्यापक डी. एन. पाटील यांनाही या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.प्रणवचे व त्याला घडवणाऱ्या पालकांचे, शिक्षकांचे आणि त्याच्या विद्यालयाच्या संपूर्ण परिवाराचे मनःपूर्वक अभिनंदन!
Lucky Oberoi shot dead: पंजाबमधील जालंधर याठिकाणी आम आदमी पक्षाचे (आप) स्थानिक नेते लकी ओबेरॉय यांची आज सकाळी गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे.
Hemant Dhome :क्रांतिज्योती विद्यालय -मराठी माध्यम चित्रपटाच्या निर्मात्यांनी दुसऱ्या भागाची घोषणा केली आहे.
Rhea Chakraborty : रिया चक्रवर्ती 'फॅमिली बिझनेस' या वेब सीरिजच्या माध्यमातून अभिनय कारकिर्दीची नवी सुरुवात करणार
चेन्नई: तामिळनाडूची राजधानी चेन्नईत बर्ड फ्लूचा इशारा देण्यात आला आहे. चेन्नईमध्ये शेकडो कावळे मृत आढळले आहेत. प्रयोगशाळेतील चाचण्यांमध्ये H5N1 विषाणू असल्याची माहिती समोर आली आहे. चाचणीत कावळ्यांचा मृत्यू H5N1 म्हणजेच बर्ड फ्लूमुळे झाल्याचे म्हटले आहे. या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी आरोग्य अधिकाऱ्यांनी सर्वसामान्यांसाठी एक सूचना जारी केली आहे. H5N1 विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी जैवसुरक्षा प्रोटोकॉलनुसार कावळे आणि कोंबड्यांचे सर्व मृतदेह जाळून टाकावेत किंवा खोल खड्ड्यात पुरावेत असे निर्देश अधिकाऱ्यांनी दिले आहेत.सरकारने जारी केलेला सल्लागारजनतेने मृत पक्षांना स्पर्श करणे किंवा त्यांना सांभाळणे टाळण्याचा सल्ला सरकारने मार्गदर्शक सूचनांमध्ये दिला आहे. तसेच कोणत्याही नवीन प्रकरणांची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांना त्वरित देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. केंद्रीय पशुसंवर्धन मंत्रालयाने तामिळनाडूच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी तात्काळ लक्ष देण्याचे आवाहन केले आहे.H5N1 म्हणजे काय?H5N1 हा इन्फ्लूएंझा A विषाणूचा एक अतिशय धोकादायक प्रकार आहे, जो प्रामुख्याने पक्षांना आणि वन्य पक्षांना संक्रमित करतो. याला सामान्यतः 'बर्ड फ्लू' म्हणून ओळखले जाते आणि ते पक्षांमध्ये वेगाने पसरू शकते. जरी H5N1 प्रामुख्याने पक्षांना होत असला तरीही तो कधीकधी मानवांना आणि इतर प्राण्यांना देखील संक्रमित करू शकतो.किती धोकादायक असू शकतो?H5N1 विषाणू सामान्य लोकांसाठी खूप धोकादायक मानला जातो. हा विषाणू पक्षांमध्ये वेगाने पसरतो. मानवांमध्ये संसर्ग दुर्मिळ आहे, परंतु जेव्हा होतो तेव्हा गंभीर असू शकतो. अनेक पुष्टी झालेल्या मानवी प्रकरणांमध्ये न्यूमोनियासारखे गंभीर श्वसन आजार आढळले आहेत.
Gold and silver Rate: आनंदवार्ता! सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या आजचे दर
मुंबई: ऐन लग्नसराईमध्ये सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये (Gold and silver Rate) घट झाल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात चढ-उतार सुरु होते. मात्र आज म्हणजेच शुक्रवार ६ फेब्रुवारी रोजी सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे.भारत युरोप मुक्त व्यापार करारानंतर आता भारत अमेरिका या दोन देशांमध्ये मुक्त करार (US-India Trade Deal) झाल्याने भारतीय बाजारपेठेत मोठी उलथापालथ सुरू होती. त्याचाच परिणाम म्हणून सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार होताना दिसत आहेत.जाणून घ्या आजचे दर:आज (६ फेब्रुवारी) सकाळी ९ वाजता एमसीएक्सवर चांदीच्या किमती प्रति किलो १५ हजार रुपयांनी घसरल्या. चांदीची किंमत प्रति किलोसाठी २ लाख २९ हजार ८७२ रुपयांवर पोहोचली. एमसीएक्सवर चांदीने ६% कमी सर्किट मारले. एवढंच नव्हे तर सोन्याच्या किमतीतही आज ०.८२ टक्क्यांनी घसरण दिसून येत आहे. सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅमसाठी १ लाख ५० हजार ६७५ रुपये इतकी झाली आहे.
Nashik Mayor : ठरलं तर मग! नाशिकमध्ये महापौर भाजपचा होणार, तर उपमहापौर...?
नाशिक : नाशिकच्या राजकारणात आज एक मोठी आणि ऐतिहासिक घडामोड पाहायला मिळाली. नाशिक महानगरपालिकेच्या सत्तास्थापनेचा पेच अखेर सुटला असून, भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेने एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात लढलेले हे दोन्ही पक्ष आता सत्तेत सहभागी होणार असून नाशिकवर महायुतीचा झेंडा फडकला आहे. नाशिकमध्ये भाजपचा महापौर आणि शिंदेंच्या शिवसेनेचा उपमहापौर विराजमान होणार आहे. या सत्तासमीकरणात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने आणि राज ठाकरेंच्या मनसेने देखील भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे नाशिक महापालिकेत भाजप, शिंदेंची शिवसेना, राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि मनसे अशा चार पक्षांची महासत्ता पाहायला मिळणार आहे.https://prahaar.in/2026/02/06/february-2026-bank-holidays-india-rbi-schedule/दुसरीकडे, संख्याबळ नसल्याने ठाकरेंच्या शिवसेनेने महापौरपदाच्या निवडणुकीतून माघार घेतली आहे, ज्यामुळे आता नाशिकला हिमगौरी आडके यांच्या रूपाने भाजपचा महापौर आणि विलास शिंदे यांच्या रूपाने शिंदेंच्या शिवसेनेचा उपमहापौर बिनविरोध मिळणार आहे. आज सकाळी महापालिकेत निवडीची प्रक्रिया सुरू झाली असून, भाजपचे नगरसेवक मोठ्या उत्साहात दाखल होत आहेत. विशेषतः भाजपच्या महिला नगरसेविकांनी पारंपरिक पोशाख आणि भगवे फेटे परिधान करून महापालिकेत प्रवेश केला, ज्यामुळे संपूर्ण परिसर भगवामय झाला आहे. दरम्यान, ठाकरेंच्या शिवसेनेने माघार घेतल्यामुळे त्यांचा 'विरोधी पक्षनेता' होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. थोड्याच वेळात नाशिकला नवीन महापौर आणि उपमहापौर अधिकृतपणे मिळणार आहेत.गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेली प्रशासकीय राजवट अखेर आज संपुष्टात येत असून, नाशिकला नवा लोकनियुक्त महापौर आणि उपमहापौर मिळणार आहे. या ऐतिहासिक क्षणासाठी महापालिकेच्या सभागृहाचे रूप पूर्णपणे पालटले आहे. नूतनीकरण केलेली आसनव्यवस्था, आकर्षक रंगरंगोटी आणि फुलांच्या सजावटीसह सभागृहाला एखाद्या वधूसारखा नवा साज देण्यात आला आहे. पुढच्या काही तासांतच नवीन महापौरांच्या निवडीची औपचारिक प्रक्रिया पार पडणार असून, या सोहळ्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने चोख तयारी केली आहे. चार वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर नाशिकचा कारभार पुन्हा एकदा लोकप्रतिनिधींच्या हातात जाणार असल्याने नाशिककरांमध्ये आणि राजकीय वर्तुळात प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे. थोड्याच वेळात नव्या महापौरांच्या नावाची अधिकृत घोषणा होणार असून त्यानंतर नाशिकमध्ये 'महायुती'चा जल्लोष पाहायला मिळेल.
Mumbai Municipality : मुंबई महापौर आणि उपमहापौर निवडीच्या अगोदर मोठी राजकीय घडामोड घडली आहे.
Gadchiroli Naxal Encounter : छत्तीसगड सीमेलगतच्या भामरागड उपविभागातील अबुझमाड जंगल परिसरात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये भीषण चकमक झाली. यामध्ये आतापर्यंत तीन नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले आहे.
Pune News : अजित पवारांच्या निधनानंतर पुणे महानगरपालिकेचा अजब निर्णय; टिकेनंतर निर्णय मागे
Pune News : 15 तारखेला पुणे महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले होते.
मुलतानी बेकरीच्या मालकाने उचलेले टोकाचे पाऊल; सोलापुरात खळबळ
सोलापूर: सोलापुरात एकेकाळी अत्यंत प्रसिद्ध असलेल्या मुलतानी बेकरीचे मालक सुनील मोतीलाल सदारंगानी यांनी अपार्टमेंटच्या 17 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. सोलापूर शहरातील विजयपूर रोडवरील पनाश अपार्टमेंटमध्ये गुरुवारी दुपारी एक वाजता ही घटना घडली आहे. या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.मिळालेल्या माहितीनुसार, सुनील सदारंगानी हे गुरुवारी दुपारच्या सुमारास स्वतःच्या चारचाकी वाहनातून विजयपूर रोडवरील पनाश अपार्टमेंटमध्ये आले होते. गाडी अपार्टमेंटच्या आवारात उभी करून ते पायऱ्यांच्या साहाय्याने थेट वरच्या मजल्याकडे गेले. काही वेळाने अपार्टमेंटच्या कठड्यावर एक व्यक्ती हात जोडून उभी असल्याचे स्थानिक नागरिकांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ ही बाब सुरक्षारक्षकाच्या निदर्शनास आणून दिली. सुरक्षारक्षकाने सदारंगानी यांना खाली आणले. परंतु, चावी वरच राहिल्याचा बहाणा करून ते पुन्हा वर गेले आणि उडी मारली. या संपूर्ण घटनेची नोंद सीसीटीव्ही कॅमेऱ्यात झाली असून, संबंधित व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल होत आहे. या घटनेत सुनील सदारंगानी यांचा जागीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे.घटनेची माहिती मिळताच विजापूर नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासाहेब गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली. अपार्टमेंट परिसरात उभ्या असलेल्या चारचाकीच्या नंबरवरून पोलिसांनी नातेवाईकांशी संपर्क साधला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला. सुनील सदारंगानी हे चार-पाच दिवसांपूर्वी पत्नीसोबत सोलापुरात आले होते आणि येथेच स्थायिक होण्याचा त्यांचा विचार होता. ते राजकुमार राठी यांचे जावई होते. त्यांना दोन मुले असून, एक मुलगा अमेरिकेत तर दुसरा पुण्यात व्यवसाय करतो. घटनेची माहिती मिळताच अमेरिकेत असलेला मुलगा सोलापूरकडे रवाना झाला आहे. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता मोदी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.आत्महत्या करण्यामागचं नेमकं कारण काय?एकेकाळी सोलापूर शहर व जिल्ह्यात मुलतानी बेकरीचे नाव सगळीकडे प्रसिद्ध होते. त्या काळात सुनील सदारंगानी यांचे संबंध अनेक नामवंत व्यक्तींशी होते. पण, काही वर्षांपूर्वी बेकरी बंद पडली आणि त्यानंतर ते पुण्यातील खराडी परिसरात वास्तव्यास गेले. मागील काही वर्षांपासून ते आर्थिक अडचणींचा सामना करत होते. तसेच, मानसोपचार तज्ज्ञांकडून त्यांच्यावर उपचार सुरू होते, अशी माहिती नातेवाईक आणि परिचितांनी पोलिसांना दिली आहे. दरम्यान, पनाश अपार्टमेंटमध्येच त्यांनी आत्महत्या का केली आणि त्यांनी हे टोकांचे पाऊल उचलण्यामागचे कारण काय, याचा तपास पोलीस करत आहेत.
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्हणजेच शुक्रवार ६ फेब्रुवारी रोजी 'परीक्षा पे चर्चा' च्या निमित्ताने विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आलेल्या विद्यार्थ्यांचे आसामी 'गमोसा' देऊन स्वागत केले.पुढील काही दिवसांमध्ये देशभरातील विविध राज्यातील बोर्डाच्या परीक्षा सुरू होणार आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही निवडक विद्यार्थ्यांशी संवाद साधला. आज या कार्यक्रमाशी ४.५० कोटीहून अधिक विद्यार्थी, पालक आणि शिक्षक जोडले गेले आहेत.यावेळी मुलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विविध भेटवस्तू दिल्या. ज्यामध्ये पंतप्रधान मोदींचे रेखाचित्र, स्वतः मुलांनी बनवलेले पुष्पगुच्छ आणि त्रिपुरातील नारळाच्या लाकडापासून बनवलेली सतार, सेंद्रिय चहा (यावर पंतप्रधान मोदी म्हणाले की ते चहा विक्रेत्याला चहा देत आहेत) आणि आसाममधील गमछा इत्यादी वस्तूंचा समावेश आहे.A wonderful discussion with students on approaching exams with confidence and positivity. Do watch this very special episode of Pariksha Pe Charcha!#ParikshaPeCharcha26 https://t.co/k7IN79qvek— Narendra Modi (@narendramodi) February 6, 2026अभ्यासासोबतच मानसिक शांती देखील महत्त्वाची:परीक्षा पे चर्चा २०२६ या पर्वातून अभ्यासासोबतच मानसिक शांती देखील महत्त्वाची आहे यावर भर दिला जात आहे. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी विद्यार्थ्यांना ५ कानमंत्र दिले आहेत. तसेच परीक्षेला घाबरू नका तर त्याला धैर्याने सामोरे जा. पंतप्रधान मोदींच्या सल्ल्याचे पालन करून तुम्ही परीक्षेत तुमची सर्वोत्तम कामगिरी साध्य करू शकता.पंतप्रधान मोदींनी दिले विद्यार्थ्यांना हे ५ कानमंत्र- परीक्षांना उत्सवासारखे मान द्या.- इतरांशी नाही तर स्वतःशी स्पर्धा करा.- तंत्रज्ञानाचा सुज्ञपणे वापर करा.- कठीण कामांना प्रथम सामोरे जा.- पोपट नाही तर परीक्षा योद्धा बना.
हार्बर मार्गावरील वातानुकूलित लोकलमुळे वाहतूक विस्कळीत
मुंबई : हार्बर मार्गावर वातानुकूलित लोकल सेवा सुरू झाल्यानंतर, प्रवाशांना दररोज लोकलच्या विस्कळीत झालेल्या लोकल वेळापत्रकाला सामोरे जावे लागत आहे. गुरुवारी सकाळच्या सुमारास सीएसएमटीहून पनवेलला जाणाऱ्या वातानुकूलित लोकलचे दरवाजे विलंबाने लागत असल्याने, प्रत्येक स्थानकात लोकल उशिराने पोहचत होती. तसेच चेंबूर रेल्वे स्थानकादरम्यान आपत्कालीन साखळी ओढल्याने, लोकलचा खोळंबा झाला. परिणामी, संपूर्ण दिवसभर प्रवाशांना लोकलच्या लेटलतीफ कारभाराला सामोरे जावे लागले.वातानुकूलित लोकलमुळे हार्बर मार्गावरील वेळापत्रक पूर्णपणे विस्कळीत झाले. आज वातानुकूलित लोकलच्या दरवाज्यात तांत्रिक बिघाड झाल्याने, या लोकलसह इतर सामान्य लोकल विलंबाने धावल्या. गेल्या काहीदिवसांपासून प्रवाशांना हा त्रास सहन करावा लागत होता. तर, आज सकाळी ७.४० वाजता सीएसएमटी-पनवेल वातानुकूलित लोकलचे दरवाजे बंद होण्यास विलंब होत असल्याने, रेल्वे स्थानकात बराच वेळ लोकल उभी राहत होती. वातानुकूलित लोकल स्थानकात येण्यास, दरवाजे खुले होण्यास, पुन्हा हे दरवाजे बंद करण्यास आणि लोकल मार्गस्थ होण्यास बराच वेळ जात होता. यात वेळ खर्ची झाल्याने मागून येणाऱ्या लोकलला विलंब झाला. परिणामी, सर्वसामान्य प्रवाशांना त्याचा मनस्ताप सहन करावा लागला. गुरुवारी दुपारी १२.२४ वाजता पनवेल ते सीएसएमटी लोकल सुटली. ही लोकल दुपारी १.१५ च्या सुमारास चेंबुर येथे पोहचली असता, या लोकलची आपत्कालीन साखळी (अलार्म चेन पुलिंग) ओढण्यात आली. त्यामुळे हार्बर मार्गावरील लोकल सेवा २० मिनिटे उशिराने धावत होती.

28 C