Reserve Bank report: बँकांची अनुत्पादक मालमत्ता 2.2% वर, नफा आणि कर्जपुरवठ्यात भक्कम वाढ
मुंबई – रिझर्व बँकेने व्यावसायिक बँकांच्या 2024- 25 वर्षाच्या कामकाजासंदर्भात जारी केलेल्या टिपणामध्ये सांगितले आहे की, बँकांची ढोबळ अनुत्पादक मालमत्ता केवळ 2.2% वर आली आहे. ही अनुत्पादक मालमत्ता अनेक दशकांच्या निचांकी पातळीवर आहे. अहवालात नमूद केले आहे की, सर्वच आघाड्यावर व्यवसाईक बँकांची परिस्थिती सुधारली आहे. बँकांचे नफे वाढत आहेत. बँकांचा कर्ज पुरवठा वाढत आहे. त्याचबरोबर […] The post Reserve Bank report: बँकांची अनुत्पादक मालमत्ता 2.2% वर, नफा आणि कर्जपुरवठ्यात भक्कम वाढ appeared first on Dainik Prabhat .
मुंबई महापालिका निवडणूक, राष्ट्रवादी काँग्रेसची दुसरी यादी जाहीर
मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची दुसरी यादी जाहीर झाली आहे. यात २७ उमेदवारांचा समावेश आहे. याआधी राष्ट्रवादीने जाहीर केलेल्या पहिला यादीत ३७ उमेदवारांचा समावेश होता. यामुळे मुंबईसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने दोन याद्यांच्या माध्यमातून एकूण ६४ उमेदवारांची घोषणा केली आहे. मुंबई मनपासाठी भारतीय जनता पार्टीने १०५ तर उबाठाने ४२ उमेदवारांना एबी फॉर्म दिले आहेत. या व्यतिरिक्त मुंबई मनपासाठी काँग्रेसने ८७, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने सात, राष्ट्रवादी काँग्रेसने ३७, समाजवादी पक्षाने २१, आम आदमी पार्टीने ५१, राष्ट्रीय समाज पक्षाने सहा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.https://prahaar.in/2025/12/29/rashtriya-samaj-partys-first-list-for-mumbai-announced/राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार मुंबई महापालिकेसाठी १५ जानेवारी रोजी मतदान आणि १६ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ३० डिसेंबर पर्यंतचा कालावधी आहे. अतिशय कमी वेळ उरला असताना विविध पक्षांच्या उमेदवारांच्या याद्या जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार मंगळवार ३० डिसेंबर रोजी कार्यालयीन वेळेत उमेदवारांना अर्ज दाखल करता येतील.https://prahaar.in/2025/12/29/congress-and-ncpsp-try-to-avoid-rebel-both-parties-first-list-announced/राष्ट्रवादी काँग्रेसची दुसरी यादी
Samruddhi Expressway Accident |समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू
जालना : समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना जालन्यातील जामवाडी परिसरात घडली आहे. ट्रकला अपघात झाल्याने ट्रकमधील सहा जण खाली उतरले होते. मात्र, मागील बाजूने येणाऱ्या रुग्णवाहिकेने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला. हे सर्व जण ट्रकमधून नाशिकला निघाले होते. ट्रकचा अपघात झाल्याने ते कुटुंब कसाबसा जीव वाचवून […] The post Samruddhi Expressway Accident | समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू appeared first on Dainik Prabhat .
औद्योगिक उत्पादनाचा दोन वर्षांतील उच्चांक; नोव्हेंबरमध्ये 6.7 टक्क्यांनी वाढ
नवी दिल्ली – नोव्हेंबर महिन्यातील पायाभूत सुविधा क्षेत्राची उत्पादकता कमी झाल्याची आकडेवारी गेल्या आठवड्यात जाहीर झाली होती. मात्र या महिन्यातील औद्योगिक उत्पादन 6.7 टक्क्यांनी वाढले असल्याची आशादायक आकडेवारी सरकारने सोमवारी जाहीर केली. हा दोन वर्षातील औद्योगिक उत्पादनाचा उच्चांक आहे. मात्र आगामी काळात औद्योगिक उत्पादन याच गतीने वाढण्याची आवश्यकता आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात औद्योगिक उत्पादन […] The post औद्योगिक उत्पादनाचा दोन वर्षांतील उच्चांक; नोव्हेंबरमध्ये 6.7 टक्क्यांनी वाढ appeared first on Dainik Prabhat .
बेंगळुरू: कन्नड आणि तमिळ मनोरंजन सृष्टीवर सध्या शोककळा पसरली आहे. लोकप्रिय अभिनेत्री नंदिनी सीएम (वय २६) हिने बेंगळुरू येथील आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. राहत्या घरात संशयास्पद परिस्थितीत तिचा मृतदेह आढळून आला. आत्महत्येपूर्वी तिने एक सविस्तर सुसाईड नोट लिहिली असून, त्यामध्ये तिने आपल्या कुटुंबावर गंभीर आरोप केले आहेत. या घटनेमुळे टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये मोठी […] The post 26 वर्षीय टीव्ही अभिनेत्रीने केली आत्महत्या; कुटुंबावर गंभीर आरोप, सुसाईड नोटमध्ये सांगितले मृत्यूचे कारण appeared first on Dainik Prabhat .
नाशिकमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसची युती
नाशिक : उमेदवारी अर्ज भरण्याच्या पूर्वसंध्येला नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीतील जागावाटप होऊ शकले नाही. मागील दोन ते तीन दिवसांपासून जागावाटपासाठी बैठकींचे सत्र सुरू होते. कोणताही तोडगा न निघाल्याने अखेर महायुती संपुष्टात आली. सोमवारी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नरहरी झिरवाळ यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली.झिरवाळ यांनी स्पष्ट केले की, महायुती म्हणून एकत्र निवडणूक लढवण्याची आमची इच्छा होती. मात्र भाजपने घेतलेल्या भूमिकेमुळे आता स्वतंत्र निर्णय घ्यावा लागला. महायुतीत लढण्याचे ठरले असल्याने यापूर्वी जागावाटपाचा विषय पुढे आला नव्हता. मात्र आता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात जागावाटपाबाबत स्वतंत्र चर्चा सुरू झाली आहे. मेरिटनुसार उमेदवारी दिली जाईल,असे झिरवाळ यांनी सांगितले. ज्यांच्याकडे निवडणूक जिंकण्याची क्षमता (इलेक्टेबल मेरिट) आहे, त्यांनाच उमेदवारी देण्यात येईल. तसेच वंचित बहुजन आघाडी आणि आनंद आंबेडकर यांच्या गटाला सोबत घेण्याबाबतही चर्चा सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. रात्री उशिरापर्यंत उमेदवारी निश्चितीबाबत शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांमध्ये चर्चा सुरू होती मंगळवारी दुपारी बारा वाजेपर्यंत एबी फॉर्म मिळणार आहे. दरम्यान भारतीय जनता पक्षात देखील मोठी फूट पडण्याची शक्यता असून, त्यांच्याही निश्चित झालेल्या उमेदवारांना आज एबी फॉर्म चे वितरण केले जाणार आहे
नववर्ष स्वागतासाठी साईनगरी सज्ज : ५०० पोलिसांचा फौजफाटा
शिर्डी : सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाची मंगलमय सुरुवात व्हावी, या भावनेतून जगभरातील लाखो साईभक्त शिर्डीत दाखल झाले आहेत. नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर साईनगरीत अभूतपूर्व गर्दी होत असताना भाविकांच्या सुरक्षिततेसाठी व सुव्यवस्थित दर्शनासाठी पोलीस प्रशासन, साई संस्थान व शिर्डी नगरपरिषद प्रशासन सज्ज झाले असून तब्बल ५०० पोलिसांच्या फौजफाट्यासह शिर्डीत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.देशातील नंबर दोनचे श्रीमंत देवस्थान असलेल्या श्री साईबाबांच्या शिर्डीत दरवर्षी ३१ डिसेंबर रोजी वर्षाच्या अखेरीस भाविकांचा महासागर उसळतो. यंदाही नाताळच्या सुट्ट्या सुरू होताच २५ डिसेंबरपासून शिर्डीत दररोज लाखो भाविक हजेरी लावत असून मंदिर परिसर, दर्शन रांगा, धर्मशाळा, रस्ते व हॉटेल्स गजबजून गेले आहेत.भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता नगर–मनमाड महामार्गावरील मंदिरासमोरील लक्ष्मीनगर ते छत्रपती शिवाजी महाराज चौक हा संपूर्ण रस्ता ‘नो व्हेईकल झोन’ घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा मिळाला असून वाहतुकीचा ताणही कमी झाला आहे. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर शहरात २२० पोलीस अंमलदार, २५ अधिकारी,१ उपविभागीय पोलीस अधिकारी, १ अपर पोलीस अधीक्षक व २५० होमगार्ड असा भक्कम बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मंदिर परिसर व शहरातील संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त पोलीस नजर ठेवून आहेत. भाविकांच्या दागिन्यांची चोरी, चेनस्नॅचिंगसारखे प्रकार रोखण्यासाठी गुन्हे शाखेची विशेष पथके सिव्हिल ड्रेसमध्ये तैनात असून संशयितांची झाडाझडती घेतली जात आहे. भाविकांना सुरळीत व सुरक्षित दर्शन मिळावे, यासाठी गर्दी टप्प्याटप्प्याने सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मंदिर परिसरात बीडीएस, क्यूआरटी पथके सातत्याने तपासणी करत असून ३१ डिसेंबर रोजी दर दोन तासांनी २४ तास हे पथक कार्यरत राहणार आहे. नववर्ष साजरे करताना अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. ३१ डिसेंबर रोजी पहाटे पाच वाजेपर्यंत हॉटेल व्यवसायिकांना परवानगी देण्यात आली असून त्यानंतर नियमभंग किंवा बेकायदेशीर प्रकार आढळल्यास कठोर कारवाईचा इशारा उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी दिला आहे.थंडीचा पारा घसरलेला असतानाही बाबांच्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने भाविक शिर्डीत दाखल झाल्याने शहरातील छोटे-मोठे हॉटेल, लॉजिंग, भोजनालयांना आर्थिक स्थैर्य लाभत आहे.https://www.youtube.com/shorts/XQ_3YS-yw6Uअनंत अंबानीकडून साई संस्थानला ५ कोटींची देणगीख्रिसमस उत्सव आणि नववर्षाच्या स्वागताच्या मंगलमय वातावरणात रिलायन्स उद्योग समूहाचे प्रमुख उद्योगपती अनंत अंबानी यांनी तीर्थक्षेत्र शिर्डीत साईबाबांच्या चरणी नतमस्तक होत श्रद्धेने दर्शन घेतले. साईबाबांच्या धुपारतीला उपस्थित राहत त्यांनी मनोभावे बाबांचे दर्शन घेतले, यावेळी साईनगरीत भक्तिभावाचे वातावरण अनुभवायला मिळाले. अनंत अंबानी यांच्या शिर्डी दौऱ्यानिमित्त श्री साईबाबा संस्थान ट्रस्टच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी त्यांचे औपचारिक स्वागत केले. साई संस्थानच्या परंपरेनुसार त्यांचा शाल व साईबाबांची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी रिलायन्स उद्योग समूहाकडून श्री साईबाबा संस्थानला तब्बल पाच कोटी रुपयांच्या दानाचा धनादेश अनंत अंबानी यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. या भरीव दानामुळे साई संस्थानच्या विविध सेवा, भाविकांसाठीच्या सुविधा तसेच सामाजिक व सेवाभावी उपक्रमांना मोठे बळ मिळणार आहे. दरम्यान,साईबाबांच्या धुपारतीला अनंत अंबानी यांनी उपस्थिती लावल्याने मंदिर परिसरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. अनेक भाविकांनी त्यांच्या उपस्थितीकडे कुतूहलाने पाहिले, तर साई नामाच्या जयघोषात परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. अनंत अंबानी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाकडून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मंदिर परिसर, दर्शन रांगा, प्रवेशद्वार तसेच प्रमुख मार्गांवर अतिरिक्त पोलीस फौजफाटा व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे विशेष लक्ष होते. दर्शन व कार्यक्रम शांततेत पार पडावा यासाठी सर्व यंत्रणा सतर्क होत्या. या भेटीसंदर्भात प्रतिक्रिया देताना साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी साई संस्थानच्या वतीने अनंत अंबानी व रिलायन्स उद्योग समूहाचे मनापासून आभार व्यक्त केले आणि या दानामुळे भाविकसेवा अधिक प्रभावीपणे करता येणार असल्याचे नमूद केले.
तिकीट वाटपावरून मातोश्रीत मध्यरात्री जोरदार राडा
मुंबई : मातोश्रीच्या किचन कॅबिनेटमध्ये रविवारी मध्यरात्री जोरदार राडा झाल्याची माहिती समोर येत आहे. आमदार वरुण सरदेसाई यांच्या सांगण्यावरून अनिल परब समर्थकाचे तिकीट कापल्याने वादाला सुरुवात झाली. पुढे हा वाद टोकाला गेला आणि परब-सरदेसाई हमरातुमरीवर आले. शेवटी पक्षप्रमुखांनी भाच्याची बाजू घेतल्याने स्वतःला निष्ठावंत म्हणून घेणारे परब रागाने लालबूंद झाले आणि बैठक सोडून तडकाफडकी घरचा रस्ता धरला.अंतर्गत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वांद्रे येथील प्रभाग क्रमांक ९५ च्या उमेदवारीवरून हा वाद झाला. अनिल परब यांनी या जागेसाठी त्यांचे समर्थक चंद्रशेखर वायंगणकर यांचे नाव निश्चित केले होते. मात्र, ऐनवेळी वायंगणकर यांचे तिकीट कापून श्रीकांत सरमळकर यांचे जावई आदिक शास्त्री यांना उमेदवारी देण्यात आली. शास्त्री यांच्या नावासाठी स्थानिक आमदार वरुण सरदेसाई यांनी शिफारस केली होती.मात्र, आपल्या समर्थकाचे तिकीट कापले गेल्याने अनिल परब यांचा संयम सुटला. मध्यरात्री सुरू असलेल्या बैठकीत त्यांनी या निर्णयाला कडाडून विरोध केला. त्यात सरदेसाई यांनी मध्ये तोंड घातल्याने, दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. शेवटी वाद इतका विकोपाला गेला, की परब संतापून बैठक सोडून गेले. आता हा वाद कोणते स्वरुप धारण करतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
एमपीएससी परीक्षेत प्रत्येक प्रश्नासाठी उत्तर देणे बंधनकारक
मुंबई :राज्य लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षांच्या उत्तरपत्रिकेत बदल करण्यात आले आहेत. आता एका प्रश्नासाठी पाच पर्याय उमेदवारांना दिले जाणार आहेत. यापैकी कोणताही एका पर्यायाचे वर्तुळ रंगविणे बंधनकारक असेल. असे न केल्यास प्रत्येक उत्तरासाठी २५ टक्के गुण कापले जाणार आहेत. एक मार्च २०२६ नंतर होणाऱ्या परीक्षांपासून हे बदल लागू असणार आहेत. ‘एमपीएससी’ मार्फत नुकतीच याबाबतची सूचना जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार उमेदवारांना उत्तरपत्रिकेबाबत विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. आयोगामार्फत उत्तरपत्रिका दोन भागात विभागण्यात आली आहे. भाग १ आणि भाग २ अशी ही उत्तरपत्रिका असणार आहे. भाग १ हा केवळ प्रश्नांची उत्तरे नोंदविण्यासाठी असून, भाग २ मध्ये उमेदवाराच्या नावासह बैठक क्रमांक, विषय सांकेतांक प्रश्नपत्रिका क्रमांक तसेच स्वाक्षरी असा तपशील असणार आहे. परीक्षा संपल्यानंतर पर्यवेक्षकांमार्फत भाग १ व २ वेगवेगळे केले जाणार आहेत. यामुळे उत्तरपत्रिका मूल्यमापनाबद्दल गोपनीयता राखली जाणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. तसेच आता प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी चारऐवजी पाच पर्याय दिले जाणार आहेत. उत्तराचे चार पर्याय व उत्तर येत नसेल तर पाचवा पर्याय, असे हे पाच पर्याय असणार आहेत. चारपैकी कोणताच पर्याय निवडायचा नसल्यास, उमेदवाराला पाचव्या पर्यायाचे वर्तुळ रंगवावे लागणार आहे. पाचपैकी एकही वर्तुळ रंगवलेले नसल्यास, त्या प्रश्नासाठी २५ टक्के गुण कापले जाणार आहेत. त्यामुळे उमेदवारांना आता उत्तराचा पर्याय रंगविणे बंधनकारक आहे. कोणताही एका पर्यायाचे वर्तुळ रंगविणे बंधनकारक तसे न केल्यास प्रत्येक उत्तरासाठी २५ टक्के गुण कापले जाणार १ मार्च २०२६ नंतर होणाऱ्या परीक्षांपासून हे बदल लागू होणारउत्तरपत्रिका अवैधआयोगामार्फत अजूनही काही नियम जाहीर करण्यात आले आहेत. उत्तरपत्रिकेवर स्वाक्षरी केलेली नसल्यास तसेच काळ्या बॉल पाईंट पेनव्यतिरीक्त इतर पेन वापरल्यास, उत्तरपत्रिकेवर अनावश्यक मजकूर, चिन्हे, अन्य माहिती नमूद केल्यास उत्तरपत्रिका अवैध ठरविली जाणार आहे.
धारावीत दिवंगत सुर्यवंशीच्या मुलांवर आली रडण्याची वेळ, उबाठाला आली नाही दया
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : धारावीमध्ये आजवर उबाठा पक्षाला बळकटी देणाऱ्या राजेंद्र सुर्यवंशी यांच्या कुटुंबाला उबाठाने यंदाच्या निवडणुकीत पूर्णपणे नाराज केले . धारावीतील प्रभाग क्रमांक १८६मधून राजेंद्र सुर्यवंशी यांची कन्या अंजली या इच्छुक होत्या. परंतु मातोश्रीवर गेल्यानंतरही अंजली आणि भाऊ चेतन यांच्या पदरी निराशाच पडली. हे भाऊ बहिण आपल्याला उमेदवारी मिळेल म्हणून आपल्या आईवडिलांचे फोटो घेवून गेले होते. पण उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांच्या अश्रुचा बांध फुटला गेला आणि ते आई वडिलांचे फोटो उ कवटाळून ढसा ढसा रडू लागल्या.धारावीतील प्रभाग क्रमांक १८४मधून राजेंद्र सुयर्वशी हे सन २०१७च्या निवडणुकीत उभे राहिले होते. या प्रभागातून काँग्रेसचे बब्बू खान यांनी त्यांचा पराभव केला होता. त्याआधी राजेंद्र सुर्यवंशी आणि त्यानंतर त्यांच्या पत्नी सुनंदा सुर्यवंशी या नगरसेवक म्हणून निवडून आल्या होत्या. धारावीतील शिवसेनेच्या संघटन वाढीमध्ये राजेंद्र सुर्यवंशी यांचा मोठा हात होता. परंतु कोविडनंतर राजेंद्र सुर्यवंशी आणि सुनंदा सुर्यवंशी यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांची कन्या अंजली सुर्यवंशी यांनी युवा सेनेच्या विधानसभा समन्वयक म्हणून जबाबदारी सांभाळली. तर त्यांचे बंधू चेतन सुर्यवंशी हे युवा सेनेचे माजी विधानसभा समन्वयक होते. उबाठाच्या युवा सेनेच्या माध्यमातून पक्ष संघटन वाढवण्यावर या दोन्ही भाऊ बहिणींनी आई वडिलांच्या निधनानंतर प्रयत्न केलात्यामुळे प्रभाग क्रमांक १८६ अनुसूचित जाती महिला आरक्षित झाल्याने अंजली सुर्यवंशी यांनी मागील काही दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार सुरु केला होता. परंतु, मातोश्रीवर रविवारी रात्रीपासून सुरु असलेल्या अर्ज वाटपामध्ये अंजली सुर्यवंशी यांना उमेदवारी अर्ज नाकारण्यात आली. राजेंद्र सुर्यवंशी यांचे निधन झाल्यानंतर उबाठाने या दोन्ही मुलांची काळजी घेणे अपेक्षित असतानाही उबाठाने या दोन्ही मुलांना उमेदवारी नाकारत त्यांचे स्वप्न चक्काचूर केले आणि त्यांना वाऱ्यावर सोडून दिल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे.
मुलुंडमध्ये चार ते पाच मराठी चेहऱ्यांना संधी
विरोधकांना आता करता येणार नाही मराठी आणि अमराठी वादमुंबई (विशेष प्रतिनिधी) :मुंबईत मराठी आणि अमराठी वाद मुलुंडमधून जन्माला घातला जातो आणि मुलुंडमध्ये वाढत्या जैन गुजराती यांच्या प्रस्थामुळे मराठी माणसांवर अन्याय केला जातो अशाप्रकारचे वातावरण निर्माण केले जात असतानाच आता मुलुंमध्ये भाजपाने मराठी टक्का कायम ठेवण्याचा प्रयत्न केला. मुलुुंड विधानसभेत एकूण सहा नगरसेवक असून त्यातील दोन नगरसेवक हे अमराठी होते. परंतु याही वेळेत मराठी उमेदवारांचा टक्का कायम राखला गेला आहे. त्यामुळे मुलुंडमधील मराठी उमेदवारांचा टक्का कायम राखल्याने विरोधकांना यंदा टीका करायला कोणतीही संधीच उरणार नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.मुलुंड विधानसभेत सन २०१७च्या महापालिका निवडणुकीत मनोज कोटक, प्रभाकर शिंदे, प्रकाश गंगाधरे, नील सोमय्या, रजनी केणी(मृत), समिता कांबळे आदी नगरसेवक निवडून आले होते. यामध्ये दोन अमराठी वगळता इतर चारही मराठी चेहरे निवडून आले होते. परंतु नुकत्याच झालेल्या लोकसभा आणि त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत मराठी आणि अमराठी मुद्दयावरून विरोधकांनी टिका करण्यास सुरुवात करत भाजपाला कोंडीत पकडण्याचे काम केले होते.. मुलुंडमध्ये यापूर्वी मनोज कोटक खासदार म्हणून निवडुन आल्यानंतर तसेच याठिकाणी मिहिर कोटेचा हे आमदार म्हणून निवडून आले तसेच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मिहिर कोटेचा यांना उमेदवारी दिल्यामुळे याठिकाणी अमराठी आणि मराठी मुद्दा पेटला गेला होता. त्यातच मराठी माणसाला घर नाकारल्याने निर्माण झालेल्या वादामुळे हा मुद्दा अधिक पेटला गेला होता. त्यामुळे मुलुंड हा मराठी आणि अमराठी वादाचे केंद्र बिंदू ठरले आहे.त्यामुळे यंदाच्या महापालिका निवडणुकीत या विधानसभेतून मराठी उमेदवारांचे पत्ते कापले जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात होती. त्यामुळे या प्रभागात प्रकाश गंगाधरे, प्रभाकर शिंदे आणि समिता कांबळे यांचे प्रभाग खुले झाल्याने यांचे पत्ते कापले जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, समिता कांबळे यांचा पत्ता कापला गेला असून प्रकाश गंगाधरे आणि प्रभाकर शिंदे यांची उमेदवारी कायम राखली गेली आहे.शिवाय अन्य दोन प्रभागांमध्ये अनिता वैती, दिपिका घाग यांना उमेदवारी दिली आहे. याशिवाय हेतल गाला मोर्वेकर यांनाही उमेदवारी दिल्यामुळे मुलुंडमध्ये एकमेव नील सोमय्या वगळता उर्वरीत चार प्रभागांमध्ये मराठी चेहऱ्यांना संधी दिली आहे. तसेच हेतल गाला या लग्नानंतर मराठी बनल्याने त्यांनाही उमेदवारी दिल्यामुळे या विधानसभेतील सहा पैकी पाच प्रभागांमध्ये मराठी उमेदवारांना संधी दिल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे मुलुंडमध्ये विरोधकांना आता मराठी आणि अमराठी मुद्दा उठववण्याची संधीच दिलेली नाही. यंदाची निवडणूक ही मराठीच्या मुद्दयावर असल्याने आणि मुलुंड विधानसभा क्षेत्र याच्या केंद्र बिंदू असल्याने यंदा भाजपाने ही काळजी घेतल्याने विरोधकांना आता टिका करण्यासाठी नवीन संधी शोधावी लागेल,असे बोलले जात आहे.
एकाच कुटुबांत दोघांना उमेदवारीची लॉटरी
विविध राजकीय पक्षांची एकाच कुटुंबावर मेहेरबानीमुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांची नावे अंतिम करून त्यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल केले जात आहेत. त्यामुळे पक्षांकडून ज्यांना अधिकृत मान्यतेचा ए व बी फॉर्म प्राप्त झाला त्यांनी आपले उमेदवारी उर्ज भरले असून काहींचे अर्ज मंगळवारी शेवटच्या दिवशी भरले जाणार आहे. मात्र विविध राजकीय पक्षांच्यावतीने जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या यादीमध्ये काँग्रेस, भाजप, उबाठा, शिवसेना आणि राष्ट्र्वादी काँग्रेस आदी पक्षांनी एकाच घरात दोघांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे एका बाजुला उमेदवारी मिळाली नाही म्हणून बंउखोरी होत असल्याचे दिसून आले, तिथेच विविध राजकीय पक्षांनी एकाच घरात दोघांना उमेदवारी दिल्याचेही पहायला मिळाले आहे.मुंबईतील प्रभाग क्रमांक १९१मधून माजी आमदार सदा सरवणकर यांचे कन्या प्रिया आणि प्रभाग क्रमांक १९४मधून त्यांचे पुत्र माजी नगरसेवक समाधान सरवणकर यांना शिवसेनेच्यावतीने उमदेवारी देण्यात आली आहे. तर प्रभाग क्रमांक २२६मधून भाजपच्यावतीने मकरंद नार्वेकर आणि प्रभाग क्रमांक २२७मधून हर्षिता नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मकरंद नार्वेकर हे कुलाब्याचे आमदार आणि विधानसभा अध्यक्ष ऍड राहुल नार्वेकर यांचे बंधू आहेत, हर्षिता नार्वेकर या त्यांच्या वाहिनी आहेत. सन२०१७च्या निवडणुकीतही मकरंद नार्वेकर आणि हर्षिता नार्वेकर निवडून आल्या होत्या.मानखुर्दमधील प्रभाग क्रमांक १४२मधून उबाठाच्यावतीने माजी नगरसेविका सुनंदा लोकरे आणि प्रभाग क्रमांक १४१मधून माजी नगरसेवक विठ्ठल लोकरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. विठ्ठल लोकरे यापूर्वी काँग्रेसमध्ये होते. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि निवडून आले. सध्या ते उबाठामध्ये आहे.तर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने प्रभाग क्रमांक १६५मधून अब्दुल रशिद कप्तान मलिक, प्रभाग क्रमांक १६८मधून डॉ सईदा खान आणि प्रभाग क्रमांक १७०मधून बुशरा परवीन मलिक या तिघांना उमेदवारी देण्यात आली आहे. हे तिन्ही उमेदवार नबाव मलिक आणि आमदार सन्ना मलिक यांचे नातेवाईक आहेत.. कप्तान मलिक आणि डॉ सईदा खान हे नवाब मलिक यांचे भाऊ बहिण आहेत तर बुशर परवीन मलिक या वहिनी आहेत. त्यामुळे मलिक कुटुंबात तीन जणांना उमेदवारी देण्यात आली आहे.तर काँग्रेसचे मालाडमधील आमदार अस्लम शेख यांनी आपल्या बहिणीला पुन्हा एकदा संधी दिली आहे. अस्लम शेख यांची बहिण कमरजहाँ सिद्दीकी यांना प्रभाग ३३मधून उमेदवारी देण्यात आली आहे. तर आपल्या मुलाला हैदर अली शेख यांना प्रभाग क्रमांक ३४ उमेदवारी दिली आहे. या दोन्ही उमेदवारांनी आपले अर्ज निवडणूक कार्यालयात दाखल केले.एकाच कुटुंबात दोघांना तसेच तिघांना दिली उमेदवारी कमरजहाँ सिध्दीकी आणि हैदर शेख (अस्लम शेख यांची बहिण आणि मुलग) समाधान सरवणकर आणि प्रिया सरवणकर (भाऊ बहिण) विठ्ठल लोकरे आणि सुनंदा विठ्ठल लोकले (नवरा बायको) मकरंद नार्वेकर आणि हर्षिता नार्वेकर ( दिर भावजय) कप्तान मलिक आणि डॉ सईदा खान, बुशरा परवीन मलिक (भाऊ बहिण आणि वहिनी)
मुंबईतील शरद पवार यांच्या राष्ट्र्वादी काँग्रेसचे अस्तित्व संपले
राखी जाधव भाजपात तर मनिषा रहाटे, पिसाळ अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्येमुंबई (विशेष प्रतिनिधी) :मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास अवघा एक दिवस शिल्लक असतानाच आता विविध पक्षांमध्ये इच्छुकांकडून उडी मारण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये मुंबईतील दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमधील बड्या नेत्यांनी चक्क पक्षाची साथ सोडली आहे. यामध्ये भाजपाच्या महापालिकेच्या माजी दोन गटनेत्यांसह एका नगरसेविकेने राष्ट्र्वादी काँग्रेस आणि भाजपात प्रवेश केला आहे. हे तिन्ही नगरसेवक राष्ट्र्वादी काँग्रेसच्या शरद पवार गटांमध्ये होते. त्यामुळे शरद पवार गटाच्या राष्ट्र्वादी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष राखी जाधव यांनी भाजपात तर माजी महापालिका गटनेते धनंजय पिसाळ आणि बबन कनावजे यांच्यासह मनिषा रहाटे यांनी अजित पवार गटात प्रवेश केला आहे.. त्यामुळे मुंबईतील शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तित्वच आता संपुष्टात आले आहे.मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर माजी महापालिका गटनेते धनंजय पिसाळ, मनिषा रहाटे आणि माजी महापालिका गटनेते राखी जाधव हे शरद पवार यांच्या राष्ट्र्वादी काँग्रेसमध्ये कायम राहिले होते. त्यानंतर राखी जाधव यांना मुंबई राष्ट्र्वादी काँग्रेसचे अध्यक्षपद दिले होते. या तिघांच्या माध्यमातून मुंबईत शरद पवार यांच्या राष्ट्र्वादी काँग्रेसचे अस्तित्व टिकून होते. परंतु हे तिन्ही माजी नगरसेवक आता भाजपा आणि अजित पवार यांच्या राष्ट्र्वादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.राष्ट्र्वादी काँग्रेसच्या राखी जाधव या घाटकोपर मधील प्रभाग क्रमांक १३१मधून निवडून आल्या होत्या आणि भाजपाचे भालचंद्र शिरसाट यांचा पराभव केला होता. परंतु राष्ट्र्वादी काँग्रेस आता उबाठा आणि मनसेसोबत नसल्याने अखेर घाटकोपरमधून निवडून येणे कठिण असल्याने राखी जाधव यांनी भाजपाची साथ पकडली आहे. राखी जाधव यांनी सोमवारी सकाळी स्थानिक आमदार पराग शाह यांची भेट घेतल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री आणि भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. राखी जाधव सन २००२ पासून नगरसेविका आहे. सलग तिन वेळा त्या नगरसेवक म्हणून निवडून आल्या आहेत. तसेच सन २०१७मध्ये निवडून आल्यानंतर पक्षाच्या महापालिका गटनेत्या म्हणून निवड झाली होती.तर राष्ट्र्वादी काँग्रेसच्या प्रभाग क्रमांक ११९मधील मनिषा रहाटे या २०१७च्या सार्वत्रिक निवउणुकीत प्रथम निवडून आली होती. आता आघाडी नसल्याने रहाटे यांनी अजित पवार गटांत उडी मारली आहे. लोकसभा निवडणुकीत उबाठा उमेदवाराचा प्रचार न केल्यामुळे यंदा त्यांचा पराभव करण्यात येणार असल्याची कुणकुण लागल्याने रहाटे यांनी अजित पवार यांच्या राष्ट्र्वादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे बोलले जात आहे.तर मुंबई महापालिकेेचे माजी गटनेते धनंजय पिसाळ हे मागील २००२ पासून निवडून येत आहेत. कधी ते स्वत: तर कधी त्यांची पत्नी भारती पिसाळ या निवडून येत होत्या, परंतु २०१७च्या निवडणुकीत भाजपाच्या सारीका पवार यांनी भारती पिसाळ यांचा पराभव केला. त्यामुळे याठिकाणी एकट्या शरद पवार गटाकडून निवडणूक लढवणे आणि जिंकणे शक्य नसल्याने त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्र्वादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे या तिन माजी नगरसेवकांसह मुंबईतील पक्षाच्या विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपा तसेच राष्ट्र्वादी काँग्रेस (अजित पवार गट)मध्ये प्रवेश केला. त्यामुळे मुंबईतील शरद पवार यांच्या राष्ट्र्वादी काँग्रेसला मोठी धरघर लागली असून दुसरीकडे मुंबईत राष्ट्र्वादी काँग्रेस (अजित पवार गट) अधिक मजबूत झाल्याचे दिसून येत आहे. तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे बबन कनावजे यांनीही शिवसेनेत प्रवेश केला आहे. कनावजे हेही यापूर्वी मुंबई महापालिकेत पक्षाचे गटनेते होते. सध्या ते शरद पवार यांच्या राष्ट्र्वादी काँग्रेसमध्ये होते. परंतु त्यांनीही शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे परळ भागातील पक्षाची ताकदही संपली गेली आहे.यापूर्वी राष्ट्र्वादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका डॉ सईदा खान, माजी नगरसेवक कप्तान मलिक यांनी राष्ट्र्वादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे, तर धनश्री भरडकर, रेश्मा बानो खान आणि सोफिया बानू यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. तर धनंजय पिसाळ आणि मनिषा रहाटे यांनीही राष्ट्र्वादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे राष्ट्र्वादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या माजी नगरसेवकांची संख्या ४ झाली, तर शिवसेनेत गेलेल्या राष्ट्र्वादी काँग्रेसमधील नगरसेवकांची संख्या तीन झाली आहे.वांद्र्यात राष्ट्र्वादी काँग्रेसचे पदाधिकारी नाराजी, शिवसेनेच्या मार्गावरवांद्रे पूर्व तालुक्यातील राष्ट्र्वादी काँग्रेस पक्षाला राम राम करत तालुकाध्यक्ष नितीन गायकवाड यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे नितीन गायकवाड हे पक्षाच्या पदाचा राजीनामा देवून शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचीही जोरदार चर्चा ऐकायला मिळत आहे.
मुंबईतील 20 जागांवरुन महायुतीचं अडलं
मुंबई : महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी एकच दिवस शिल्लक राहिला आहे, तरीही भाजप आणि शिंदेंसेनेमध्ये 20 जागांवरुन असलेला तिढा अजुन सुटलेला नाही. दोन्ही पक्षांच्या निश्चित झालेल्या जागांव्यतिरिक्त ज्या 20 जागा शिल्लक आहेत, त्यापैकी काही जागा या शिवसेनेला पाहीजेत. त्यावर भाजप आणि शिवसेनेच्या दोन्ही नेत्यांमध्ये बैठक सुरू आहे. शिंदेसेनेला आतापर्यंत 85 ते 87 जागा मिळाल्याचे समोर […] The post मुंबईतील 20 जागांवरुन महायुतीचं अडलं appeared first on Dainik Prabhat .
Amit Shah : निवडणुकीसाठीची रणनीती ठरवणार? गृहमंत्री अमित शहा तीन दिवसीय पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर
कोलकता : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सोमवारी सायंकाळी पश्चिम बंगालच्या तीन दिवसीय दौऱ्यासाठी कोलकत्यात दाखल झाले. त्यांच्या दौऱ्यात भाजप आगामी विधानसभा निवडणुकीसाठीची रणनीती निश्चित करणार असल्याचे समजते. तृणमूल कॉंग्रेसची सत्ता असणाऱ्या बंगालमधील निवडणूक ३ ते ४ महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे शहा यांच्या दौऱ्याचे महत्व वाढले आहे. भाजपच्या बंगाल शाखेला सज्ज करण्याच्या इराद्याने शहा प्रमुख […] The post Amit Shah : निवडणुकीसाठीची रणनीती ठरवणार? गृहमंत्री अमित शहा तीन दिवसीय पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर appeared first on Dainik Prabhat .
मुंबई : महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचा बोलबाला पाहायला मिळत आहे. मुंबईत सर्वच राजकीय पक्षांकडून नेत्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी देण्यात आल्या आहेत. शिवसेनेतल्या नेत्यांच्या 6, भाजप 4, राष्ट्रवादी 3 तर काँग्रेस 2 नातेवाईकांना उमेदवारी देण्यात आल्या आहेत. मुंबईसह राज्यातील 29 महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेना, ठाकरेसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, मनसे अशा सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात […] The post मुंबईत सर्वच पक्षांना घराणेशाहीची लागण; नेत्यांचाच मुलगा, लेक, जावई, भाऊ अशांना तिकीटं; पाहा संपूर्ण लिस्ट appeared first on Dainik Prabhat .
लाडक्या बहिणींच्या ई-केवायसीला ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ
मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील दीड कोटी महिलांना ई-केवायसी करण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. अजूनही सुमारे ४५ लाख महिलांनी ई-केवायसी केलेली नाही. त्यामुळे या प्रक्रियेसाठी आणखी एक महिन्याची म्हणजे ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ मिळणार आहे. दुसरीकडे पती-वडील दोन्हीही नसलेल्या लाभार्थींची माहिती स्वतंत्रपणे संकलित केली जाणार असून त्यासाठी संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे.लाडकी बहीण योजनेअंतर्गत सुरवातीला एक कोटी ५६ लाख महिला होत्या, पण निकषांच्या आधारे पडताळणी केल्यानंतर आता एक कोटी दहा लाखांपर्यंतच लाभार्थी राहिले आहेत. तरीपण, आता योजनेच्या निकषांनुसारच ज्या महिला लाभार्थीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे त्यांची पडताळणी केली जात आहे.
भारतीय संरक्षण दलांचे बळकटीकरण; 79000 कोटींच्या संरक्षण खरेदीला केंद्र सरकारची मंजुरी
नवी दिल्ली: देशाच्या सीमा अधिक सुरक्षित करण्यासाठी आणि तिन्ही सैन्य दलांची मारक क्षमता वाढवण्यासाठी केंद्र सरकारने एक मोठे पाऊल उचलले आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या ‘संरक्षण संपादन परिषदेच्या’ (DAC) बैठकीत तब्बल ७९,००० कोटी रुपयांच्या विविध संरक्षण प्रस्तावांना ‘आवश्यकतेची स्वीकृती’ (AoN) देण्यात आली आहे. २९ डिसेंबर २०२५ रोजी झालेल्या या बैठकीत लष्कर, […] The post भारतीय संरक्षण दलांचे बळकटीकरण; 79000 कोटींच्या संरक्षण खरेदीला केंद्र सरकारची मंजुरी appeared first on Dainik Prabhat .
राष्ट्रीय समाज पक्षाची मुंबईसाठीची पहिली यादी जाहीर
मुंबई : राष्ट्रीय समाज पक्षाने मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीत सहा उमेदवारांचा समावेश आहे. याआधी मुंबई मनपासाठी भारतीय जनता पार्टीने १०५ तर उबाठाने ४२ उमेदवारांना एबी फॉर्म दिले आहेत. या व्यतिरिक्त मुंबई मनपासाठी काँग्रेसने ८७, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने सात, राष्ट्रवादी काँग्रेसने ३७, समाजवादी पक्षाने २१, आम आदमी पार्टीने ५१ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.https://prahaar.in/2025/12/29/congress-and-ncpsp-try-to-avoid-rebel-both-parties-first-list-announced/राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार मुंबई महापालिकेसाठी १५ जानेवारी रोजी मतदान आणि १६ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ३० डिसेंबर पर्यंतचा कालावधी आहे. अतिशय कमी वेळ उरला असताना विविध पक्षांच्या उमेदवारांच्या याद्या जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार मंगळवार ३० डिसेंबर रोजी कार्यालयीन वेळेत उमेदवारांना अर्ज दाखल करता येतील. राष्ट्रीय समाज पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी वॉर्ड ४० - आदित्य यादव वॉर्ड १०६ - संजय घरत वॉर्ड १०९ - सविता संतोष उत्तेकर वॉर्ड १३३ - प्रतिक्षा जाधव वॉर्ड १४२ - वनिता राजेंद्र नन्नावरे वॉर्ड २२६ - तुषार प्रभाकर आंब्रेकर
न्यूझीलंडविरुद्ध वनडेतून ३ स्टार खेळाडूंचा पत्ता कट ? दिग्गजांचं कमबॅक ?
मुंबई : जानेवारीत न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी बीसीसीआय लवकरच संघाची घोषणा करणार आहे. खराब फॉर्म आणि वाढत्या स्पर्धेमुळे ऋषभ पंतसह तीन महत्त्वाच्या खेळाडूंना संघातून वगळले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यांच्या जागी घरगुती क्रिकेट पिचवर धावांचा पाऊस पाडणाऱ्या खेळाडूंचे संघात पुनरागमन होणार असल्याचे समजते. निवड समिती सध्या काही कडक निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. यामुळे ऋषभ पंत, तिलक वर्मा आणि ध्रुव जुरेल या तीन स्टार खेळाडूंचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. ऋषभ पंत हा कसोटीत चमकला तरी वन डे तील त्याची कामगिरी निराशाजनक आहे. श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांच्या पुनरागमनामुळे मधल्या फळीत खेळणाऱ्या तिलकला बसावे लागेल असे दिसते. संघासाठी यष्टीरक्षक निश्चित असल्यामुळे ध्रुव जुरेलला संघाबाहेर राहावे लागण्याची शक्यता आहे.दिग्गजांचे कमबॅक शुभमन गिल: दुखापतीतून सावरल्यानंतर कर्णधार म्हणून शुभमन गिलचे पुनरागमन निश्चित मानले जात आहे. हार्दिक पांड्या: पूर्णपणे तंदुरुस्त असलेला हार्दिक पांड्या अष्टपैलू खेळाडू म्हणून पुन्हा वनडे जर्सीत दिसणार आहे. ईशान किशन: घरगुती क्रिकेट आणि विजय हजारे ट्रॉफीमध्ये ऐतिहासिक फलंदाजी करणाऱ्या ईशान किशनने यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून आपला दावा मजबूत केला आहे. श्रेयस अय्यर: दुखापतीमुळे बाहेर असलेला अय्यर बेंगळुरू येथील सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये सराव करत असून, तो निवडीसाठी उपलब्ध असणार आहे.भारत विरुद्ध न्यूझीलंड वनडे वेळापत्रक ११ जानेवारी २०२६: पहिली वनडे (वडोदरा) १४ जानेवारी २०२६: दुसरी वनडे (राजकोट) १८ जानेवारी २०२६: तिसरी वनडे (इंदूर)भारत विरुद्ध न्यूझीलंड टी२० मालिकेसाठीचा संभाव्य १५ खेळाडूंचा संघभारतीय संघ (संभाव्य १५) : शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (उपकर्णधार), रिंकू सिंग, ईशान किशन (यष्टीरक्षक), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह (किंवा मोहम्मद सिराज), मयंक यादव, हर्षित राणा, अक्षर पटेल.रोहित शर्मा आणि विराट कोहलीबद्दल अपडेट?रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी टी२० विश्वचषकानंतर या फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केल्यामुळे, ते या टी२० मालिकेत दिसणार नाहीत. त्यांच्या जागी युवा फलंदाजांना आजमावले जात आहे. तर न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत मात्र हे दोन्ही दिग्गज खेळताना दिसतील. विजय हजारे ट्रॉफीमधील त्यांची कामगिरी पाहता, ते पूर्णपणे फिट असून २०२७ च्या वर्ल्ड कपच्या तयारीसाठी त्यांनी खेळणे गरजेचे आहे. वनडे क्रिकेटमध्ये रोहित शर्माच नेतृत्व करेल, तर टी२० मध्ये शुभमन गिल किंवा सूर्यकुमार यादव यांच्याकडे धुरा असेल.
Ramakrishna Ghosh 7 wickets record in Vijay Hazare Trophy : चेन्नई सुपर किंग्सने (CSK) ज्या खेळाडूवर विश्वास दाखवून त्याला रिटेन केले, त्या रामकृष्ण घोषने आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. विजय हजारे ट्रॉफी २०२५-२६ मध्ये हिमाचल प्रदेशविरुद्ध खेळताना महाराष्ट्राच्या या २८ वर्षीय अष्टपैलू खेळाडूने ऐतिहासिक गोलंदाजी केली. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात […] The post Ramakrishna Ghosh : महाराष्ट्राच्या पठ्ठ्याने सार्थ ठरवला सीएसकेचा विश्वास! विजय हजारे ट्रॉफीत केला मोठा पराक्रम appeared first on Dainik Prabhat .
Tatanagar-Ernakulam Express : टाटानगर-एर्नाकुलम एक्स्प्रेसला भीषण आग; 70 वर्षीय प्रवाशाचा मृत्यू
विशाखापट्टणम (आंध्र पदेश) : अनाकापल्ली येथे टाटानगर-एर्नाकुलम एक्स्प्रेसच्या दोन डब्यांना लागलेल्या भीषण आगीत एका ७० वर्षीय प्रवाशाचा मृत्यू झाला. ही घटना यलमंचिलीजवळ मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या आगीत रेल्वेचे दोन एसी डबे पूर्णपणे जळून खाक झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, टाटानगरहून एर्नाकुलमच्या दिशेने जाणारी ही रेल्वेगाडी आपल्या नियोजित वेळेपेक्षा चार तास उशिराने धावत होती. रात्री साधारण १२:४५ […] The post Tatanagar-Ernakulam Express : टाटानगर-एर्नाकुलम एक्स्प्रेसला भीषण आग; 70 वर्षीय प्रवाशाचा मृत्यू appeared first on Dainik Prabhat .
बंडखोरी टाळण्यासाठी काँग्रेस आणि राशपचे आस्ते कदम, जाहीर केली पहिली यादी
मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार मुंबई महापालिकेसाठी १५ जानेवारी रोजी मतदान आणि १६ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ३० डिसेंबर पर्यंतचा कालावधी आहे. अतिशय कमी वेळ उरला असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या दोन्ही पक्षांनी मुंबईसाठीची उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.https://prahaar.in/2025/12/29/bjp-releases-its-first-list-for-the-mumbai-municipal-corporation-elections-66-candidates-nominated/https://prahaar.in/2025/12/28/ncp-announces-first-list-of-37-candidates-in-mumbai/मुंबई महापालिकेतील २२७ पैकी ६२ जागांवर वंचित लढेल आणि उर्वरित जागांवर काँग्रेस किंवा त्यांच्या सहमतीने मित्र पक्ष लढतील, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जाहीर केले आहे. या घोषणेनुसार उर्वरित १६५ पैकी ८७ जागांसाठी काँग्रेसने उमेदवार जाहीर केले आहे. काँग्रेसचे आणखी उमेदवार पुढील काही तासांत जाहीर होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने फक्त सात उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.https://prahaar.in/2025/12/27/samajwadi-partys-first-list-for-mumbai-municipal-corporation-announced-21-candidates-announced/काँग्रेस - वंचित आघाडीचे सूत्र कळल्यापासून खासदार वर्षा गायकवाड नाराज असल्याचे वृत्त आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने मुंबईसाठीची ८७ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. भाजपने आतापर्यंत ९१ उमेदवारांना एबी फॉर्म दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने ३७, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने सात, समाजवादी पक्षाने २१ आणि आम आदमी पार्टीने ५१ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. उबाठाने आतापर्यंत ४२ जणांना एबी फॉर्मचे वाटप केले आहे.https://prahaar.in/2025/12/28/aap-releases-first-list-of-51-candidates-for-mumbai-municipal-corporation/https://prahaar.in/2025/12/29/the-uddhav-thackeray-group-has-given-ab-forms-to-42-candidates/काँग्रेस उमेदवारांची पहिली यादीराष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी
नागपूर: आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षामध्ये उमेदवारी वाटपावरून अंतर्गत कलह उफाळून आला आहे. नागपूरमधील प्रभाग १५ मध्ये बाहेरून आलेल्या उमेदवारांना झुकते माप दिले जात असल्याचा आरोप करत, संतापलेल्या कार्यकर्त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानाबाहेर घेरले. प्रभाग १५ मधील दोन महिलांच्या जागांवर नुकताच काँग्रेसमधून आलेल्या आणि पक्षप्रवेश केलेल्या […] The post Chandrashekhar Bawankule Video: संतापलेल्या कार्यकर्त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंना घेरलं appeared first on Dainik Prabhat .
सांगोला नगरपालिका निवडणुकीत शिवसेना (एकनाथ शिंदे गट)ला मोठे यश मिळाले आहे. या विजयानंतर शिवसेनेचे नगराध्यक्ष आणि नगरसेवकांच्या सत्कारासाठी आयोजित कार्यक्रमात शिवसेना शिंदे गटाचे नेते शहाजीबापू पाटील यांनी भाषण केले. या भाषणात त्यांनी एक वादग्रस्त आणि अजब दावा करून सर्वांचे लक्ष वेधले. “ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाचे बटन दाबले, ते स्वर्गात जाणार,” असा थेट दावा शहाजीबापू पाटील यांनी […] The post Shahajibapu Patil : ज्यांनी ज्यांनी धनुष्य बाणाचं बटण दाबलं ते स्वर्गात जाणार; शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य appeared first on Dainik Prabhat .
निवडणुकीच्या तोंडावर मनसेला मोठा धक्का; बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा
मुंबई : महापालिका निवडणुकीचे वारे तापू लागले असतानाच मनसेला मोठा धक्का बसला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर मनसेच्या सरचिटणीस स्नेहल जाधव यांनी पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व आणि सर्व पदांवरून तडकाफडकी राजीनामा दिला आहे. वॉर्ड क्रमांक १९२ मधून उमेदवारी जाहीर करताना त्यांचा विश्वासात न घेतल्याने स्नेहल जाधव या तीव्र नाराज झाल्या होत्या. या नाराजीमुळे त्यांनी हा निर्णय घेतला […] The post निवडणुकीच्या तोंडावर मनसेला मोठा धक्का; बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा appeared first on Dainik Prabhat .
BMC Election : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी आता सर्वच पक्षांच्या उमेदवारी याद्या जाहीर होत आहे. त्यामध्ये भारतीय जनता पक्षांना 66 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे भाजपने या सर्वांना एबी फॉर्म देखील दिले आहेत. यामध्ये भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचे चिरंजीव नील सोमय्या, भाजप प्रवक्ते नवनाथ बन, नुकत्याच ठाकरे गटातून भाजपमध्ये आलेल्या तेजस्वी […] The post BMC Election : मुंबई महापालिकेसाठी जाहीर झालेली NCP, NCP (SP), Congress, BJP पक्षांची पहिली यादी पहा एका क्लिकवर appeared first on Dainik Prabhat .
जळगाव : जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या ऐनवेळी निष्ठावंत कार्यकर्त्यांची भावनिक कुचंबणा होत आहे. पक्षाकडून उमेदवारी नाकारली जाऊ लागल्याने अनेक इच्छुक कार्यकर्ते दुसऱ्या पक्षात प्रवेश करत असताना, काहींना मात्र पक्षासोबत राहूनही तिकीट मिळाले नाही. यामुळे एका महिला उमेदवाराला रडू कोसळले. प्रभाग क्रमांक १० मधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून इच्छुक असलेल्या कलाबाई शिरसाठ यांनी आज उमेदवारी अर्ज […] The post निष्ठावंत कार्यकर्त्यांची पक्षाकडून हेळसांड..! अर्ज भरला, पण एबी फॉर्मच दिला नाही; महिला उमेदवाराचा टाहो appeared first on Dainik Prabhat .
Monty Panesar criticizes Shubman Gill : आगामी आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ साठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली असून, यामध्ये एक धक्कादायक बदल पाहायला मिळाला. भारतीय संघाचा भविष्यातील कर्णधार म्हणून पाहिल्या जाणाऱ्या शुबमन गिलला केवळ उपकर्णधारपदावरूनच हटवण्यात आलेले नाही, तर त्याला थेट संघातूनच डच्चू देण्यात आला आहे. अशात इंग्लंडचे माजी खेळाडू मॉन्टी पानेसर याने गिलबद्दल […] The post Shubman Gill : ‘विराटची ऊर्जा वेगळ्या उंचीची, गिलला ते कधीच जमणार नाही!’, इग्लंडच्या माजी खेळाडूची टीका appeared first on Dainik Prabhat .
Municipal Elections : पैसे नाही म्हणून तिकीट नाकारल्याने ‘या’महिला नेत्याने भाजप दिला मोठा इशारा
कोल्हापूर : राज्यात सध्या महापालिका निवडणुकीचा धुरळा उडाला आहे. आपल्याला तिकीट मिळावे म्हणून उमेदवार सध्या पक्ष नेतृत्वाकडे वशिला लावताना दिसत आहेत. काही ठिकाणी तर अनेक उमेदवारांनी तिकीट मिळावे म्हणून अक्षरशः देव पाण्यात ठेवले आहेत. काही ठिकाणी उमेदवारांना तिकीट मिळत आहे तर काही ठिकाणी नाकारलं जात आहे. यादरम्यान कोल्हापूरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. कोल्हापूर […] The post Municipal Elections : पैसे नाही म्हणून तिकीट नाकारल्याने ‘या’ महिला नेत्याने भाजप दिला मोठा इशारा appeared first on Dainik Prabhat .
Silver and Gold Price: सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; गुंतवणूकदारांकडून नफावसुलीचा सपाटा
Silver and Gold Price: जागतिक बाजारपेठेतील कमकुवत कल आणि गुंतवणूकदारांनी केलेल्या नफावसुलीमुळे आज सोने-चांदीच्या किमतीत मोठी पडझड पाहायला मिळाली. चांदीच्या किमतीने सोमवारी सुरुवातीच्या सत्रात नवा ऐतिहासिक उच्चांक गाठला होता, मात्र त्यानंतर झालेल्या जोरदार विक्रीमुळे चांदी ७१२४ रुपयांनी स्वस्त झाली. चांदीसोबतच सोन्याच्या दरातही घट झाली असून, गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या दरवाढीला आज ब्रेक लागला आहे. […] The post Silver and Gold Price: सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; गुंतवणूकदारांकडून नफावसुलीचा सपाटा appeared first on Dainik Prabhat .
New year, new rules: 1 जानेवारीपासून पगार, बँकिंग आणि घरगुती खर्चात होणार मोठे बदल; वाचा सविस्तर
New year, new rules: २०२६ या नवीन वर्षाची सुरुवात सर्वसामान्यांच्या खिशावर आणि दैनंदिन जीवनावर मोठा प्रभाव टाकणारी ठरणार आहे. १ जानेवारीपासून केंद्र सरकार आणि विविध नियामक संस्थांकडून अनेक महत्त्वपूर्ण बदल लागू केले जात आहेत. यामध्ये प्रामुख्याने सरकारी कर्मचाऱ्यांची पगारवाढ, बँकिंग व्यवहारांमधील पारदर्शकता आणि शेतकऱ्यांसाठीच्या नवीन नियमांचा समावेश आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना ‘अच्छे दिन’: ८ व्या वेतन […] The post New year, new rules: 1 जानेवारीपासून पगार, बँकिंग आणि घरगुती खर्चात होणार मोठे बदल; वाचा सविस्तर appeared first on Dainik Prabhat .
Saurabh Bhardwaj : टोल प्लाझामुळे प्रदुषणात वाढ; आपचे नेते सौरभ भारद्वाज यांची भाजपवर टीका
नवी दिल्ली : आम आदमी पक्षाने दिल्लीतील प्रदुषणाच्या मुद्यावरून पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचा खरपूस समाचार घेतला आहे. आपचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष सौरभ भारद्वाज यांनी सोशल मिडियावर एक व्हिडिओ जारी केला आहे. यानुसार, दिल्लीतील प्रदुषण वाढीला भाजप सरकारचा निष्काळजीपणा कारणीभूत आहे. दिल्लीतील टोल प्लाझावर उभ्या गाड्या आणि या गाड्यांतून निघणाऱ्या धुरामुळे हवा आणखी दुषित होत आहे. […] The post Saurabh Bhardwaj : टोल प्लाझामुळे प्रदुषणात वाढ; आपचे नेते सौरभ भारद्वाज यांची भाजपवर टीका appeared first on Dainik Prabhat .
2026 मध्ये AI घडवणार मोठी क्रांती; तज्ज्ञांनी वर्तवलेली शक्यता जाणून घ्या..
मुंबई: गेल्या काही वर्षांपासून चर्चेत असलेले कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ‘AI’ तंत्रज्ञान २०२६ पर्यंत आपल्या कल्पनेपलीकडे प्रगती करणार आहे. केवळ उत्तरे देणारे AI आता ‘काम करणारे AI’ (Agentic AI) म्हणून ओळखले जाईल. २०२६ हे वर्ष तंत्रज्ञान क्षेत्रासाठी एक मैलाचा दगड ठरणार असून, मानवी जीवनशैलीत आमूलाग्र बदल होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. १. ‘एजेंटिक AI’ चा उदय: […] The post 2026 मध्ये AI घडवणार मोठी क्रांती; तज्ज्ञांनी वर्तवलेली शक्यता जाणून घ्या.. appeared first on Dainik Prabhat .
लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी बातमी; सरकारने ई-केवायसीबाबत घेतला मोठा निर्णय
मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत राज्यातील लाखो महिलांना ई-केवायसी (e-KYC) पूर्ण करण्यासाठी मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. सुरुवातीला ३१ डिसेंबर २०२५ ही अंतिम मुदत असून, अजूनही सुमारे ४५ लाख महिलांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. त्यामुळे शासनाकडून एक महिन्याची मुदतवाढ देऊन ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. योजनेच्या […] The post लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी बातमी; सरकारने ई-केवायसीबाबत घेतला मोठा निर्णय appeared first on Dainik Prabhat .
नवी दिल्ली: देशातील तंबाखू शौकिनांना केंद्र सरकारने मोठा धक्का दिला आहे. संसदेने ‘सेंट्रल एक्साइज (संशोधन) विधेयक, २०२५’ मंजूर केले असून, यामुळे सिगरेट, सिगार, हुक्का आणि खैनीवरील उत्पादन शुल्कात (Excise Duty) प्रचंड वाढ करण्यात आली आहे. या निर्णयामुळे तंबाखूजन्य पदार्थांच्या किमती आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाण्याची शक्यता आहे. शुल्कात मोठी वाढ नवीन दुरुस्तीनुसार, सिगरेटवरील उत्पादन शुल्क प्रति […] The post Cigarettes price hike: सिगारेट ओढणाऱ्यांचा खिसा होणार रिकामा; आता एका स्टिकसाठी मोजावे लागणार ‘इतके’ रुपये appeared first on Dainik Prabhat .
एकनाथ शिंदेंना बालेकिल्ल्यात जबर हादरा; बड्या नेत्याचा शरद पवार गटात प्रवेश
ठाणे : ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बालेकिल्ल्यात मोठा धक्का बसला आहे. शिंदे गटाचे प्रमुख नेते अक्षय ठाकूर यांनी घरवापसी करत पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत अक्षय ठाकूर यांनी आज पक्षप्रवेश केला. ते आता कळवा प्रभाग क्रमांक २४ मधून महापालिका निवडणूक […] The post एकनाथ शिंदेंना बालेकिल्ल्यात जबर हादरा; बड्या नेत्याचा शरद पवार गटात प्रवेश appeared first on Dainik Prabhat .
Eknath Shinde : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) यांच्यात युतीची अधिकृत घोषणा झाली आहे. मात्र, या युतीमुळे शिवसेना शिंदे गटात अंतर्गत नाराजी आणि राजीनाम्यांचे सत्र सुरू झाले आहे. माजी नगरसेवक तथा माजी सभागृह नेते कैलास लखा शिंदे यांनी पक्ष नेतृत्वाकडे पत्र लिहून स्वतःची हकालपट्टी करण्याची थेट […] The post Eknath Shinde : एकनाथ शिंदेंना दुहेरी धक्का ! एकाने हकालपट्टी करण्याची केली मागणी तर दुसऱ्याचा थेट राजीनामा appeared first on Dainik Prabhat .
गौतम गंभीरच भारताचा कसोटी प्रशिक्षक
नवी दिल्ली : गौतम गंभीर भारताचा कसोटी प्रशिक्षक म्हणू्न कायम राहील. बीसीसीआय सचिव देवजीत सैकिया यांनी स्पष्ट केले आहे की, कसोटी संघाचा नवा प्रशिक्षक म्हणून व्हीव्हीएस लक्ष्मणशी संपर्क साधल्याच्या बातम्या पूर्णपणे चुकीच्या आणि निराधार आहेत, बोर्डाने कसोटी संघाच्या नेतृत्त्व गटात बदल करण्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.सैकिया यांनी सांगितले की, ही बातमी पूर्णपणे तथ्यहीन आहे. काही प्रतिष्ठित माध्यम संस्था देखील ही बातमी चालवत आहेत, परंतु यात कोणतेही सत्य नाही. बीसीसीआय याचे थेट खंडन करते. अलीकडच्या काळात अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला होता की, कसोटी संघाच्या खराब कामगिरीनंतर व्हीव्हीएस लक्ष्मणला पुढील कसोटी प्रशिक्षक बनवले जाऊ शकते. भारताला मायदेशात दक्षिण आफ्रिकेकडून २-० ने कसोटी मालिका गमवावी लागल्यानंतर या अटकळी समोर आल्या. यापूर्वी न्यूझीलंडविरुद्धही संघाला ०-३ ने पराभवाला सामोरे जावे लागले होते.टेस्ट क्रिकेटमधील अलीकडील अपयशाच्या विपरीत, मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये टीम इंडियाची कामगिरी मजबूत राहिली आहे. गौतम गंभीरच्या प्रशिक्षकपदाखाली भारताने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आशिया कप टी-२० एकही सामना न हरता जिंकले. मात्र, त्यांच्या कार्यकाळात भारताने टेस्टमध्ये ७ सामने जिंकले, १० हरले आणि २ ड्रॉ खेळले आहेत. सध्या भारतासमोरील सर्वात मोठे आव्हान कसोटी नाही, तर टी-२० विश्वचषक आहे. संघ आपल्या विजेतेपदाचे रक्षण करेल. यावेळी संघाची कमान सूर्यकुमार यादवच्या हातात असेल. स्पर्धा ७ फेब्रुवारीपासून सुरू होईल आणि भारत आपला पहिला सामना त्याच दिवशी मुंबईत अमेरिकेविरुद्ध खेळेल.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादींची आघाडी, चिन्हाच्या वादावर निघाला तोडगा
पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमधील आघाडीबाबत मोठी अनिश्चितता होती. कधी आघाडी होणार, तर कधी ती तुटल्याच्या बातम्या येत होत्या. आज या सर्व नाट्यमय घडामोडींना पूर्णविराम मिळाला असून दोन्ही राष्ट्रवादींमधील आघाडीचा अंतिम फॉर्म्युला निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाची चिन्हाबाबतची अट मान्य केल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादींचे उमेदवार आपापल्या अधिकृत चिन्हांवर - ‘घड्याळ’ आणि ‘तुतारी’- निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. यामुळे चिन्हांवरून सुरू असलेला वादही संपुष्टात आला आहे.पुणे महापालिका निवडणुकीसाठी सुरुवातीला शरद पवारांच्या पक्षाने आघाडीत ६५ जागांची मागणी केली होती, तर अजित पवार यांच्या पक्षाकडून ३५ जागांची तयारी दर्शवण्यात आली होती. मात्र, दीर्घ वाटाघाटीनंतर अखेर जागावाटपावर तोडगा निघाला असून पुणे महापालिकेत अजित पवार यांचा पक्ष १२५ जागा, तर शरद पवार यांचा पक्ष ४० जागा लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. हाच आघाडीचा अंतिम फॉर्म्युला असणार असल्याची चर्चा आहे.दरम्यान, आज दोन्ही राष्ट्रवादींच्या आघाडीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता असून, घोषणा होताच अजित पवार यांच्या पक्षाची पहिली उमेदवार यादी जाहीर होणार आहे. यासाठी अजित पवार यांच्या पुण्यातील निवासस्थानी राष्ट्रवादीतील प्रमुख नेत्यांची बैठक सुरू आहे. सध्या दहा ते पंधरा जागांवरील उमेदवारीचा तिढा बाकी असून, त्यावर चर्चा करून आज संध्याकाळपर्यंत पहिली यादी जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.
BMC निवडणुकीत घराणेशाहीचा वरचष्मा, कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी जाहीर केलेल्या पहिल्या उमेदवारी यादीत ‘घराणेशाही’चे स्पष्ट दर्शन घडतेय. शिवसेना (ठाकरे गट), भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि काँग्रेस या सर्वच प्रमुख पक्षांनी सामान्य कार्यकर्त्यांऐवजी नेत्यांच्या नातेवाईकांना झुकते माप दिलेय. ठाकरे गटाने ६, भाजपने ४, राष्ट्रवादीने ३ तर काँग्रेसने २ नातेवाईकांना मैदानात […] The post Today TOP 10 News: BMC निवडणुकीत घराणेशाहीचा वरचष्मा ते सिगरेटच्या किमतीत 4 पट वाढ होणार.. वाचा आजच्या टाॅप 10 बातम्या appeared first on Dainik Prabhat .
Babar Azam Indian Jersey Autograph Controversy : पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझम सध्या ऑस्ट्रेलियन भूमीवर बिग बॅश लीग (BBL) खेळत आहे. मात्र, एका सामन्यादरम्यान त्याने केलेल्या कृतीमुळे सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला आहे. बाबरने भारतीय संघाची जर्सी घातलेल्या एका महिला चाहत्याला त्याच जर्सीवर ऑटोग्राफ दिला, ज्यामुळे भारतीय क्रिकेट चाहते प्रचंड नाराज झाले आहेत. नेमका […] The post Babar Azam : मैदानावर फ्लॉप अन् वादात टॉप! बाबरच्या एका ‘ऑटोग्राफ’मुळे पेटला नवा वाद; नेमकं प्रकरण काय? appeared first on Dainik Prabhat .
NCP First List : शरद पवार गटाची पहिली उमेदवारांची यादी जाहीर, कोण आहेत ते ७ उमेदवार?
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या रणधुमाळीत वेग आला असताना, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपली पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. ही यादी अतिशय मर्यादित असून, केवळ ७ उमेदवारांची नावे समोर आली आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी अंतर्गत उद्धव ठाकरे यांची शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांच्यात युतीची चर्चा सुरू […] The post NCP First List : शरद पवार गटाची पहिली उमेदवारांची यादी जाहीर, कोण आहेत ते ७ उमेदवार? appeared first on Dainik Prabhat .
मोहित सोमण: आज भारत सरकारच्या सांख्यिकी व अंमलबजावणी मंत्रालयाने औद्योगिक उत्पादनाची नोव्हेंबर महिन्यातील आकडेवारी जाहीर केली आहे. गेल्या महिन्यात काही प्रमाणात आर्थिक परिस्थितीमुळे मागणीत घट झालेली असताना औद्योगिक उत्पादन ०.४% पातळीवर वाढले होते. मात्र नोव्हेंबर महिन्यात मूळ धातूंच्या व फॅब्री मेटल उत्पादनात झालेल्या मोठ्या वाढीचा फायदा म्हणून दोन वर्षांतील औद्योगिक उत्पादन पातळीवर आकडेवारी पोहोचली आहे. सरकारी आकडेवारीनुसार, इयर ऑन इयर बेसिसवर थेट नोव्हेंबर महिन्यात औद्योगिक उत्पादनात ८% वाढ झाली आहे. अहवालातील माहितीनुसार, मान्सून काळ संपल्यानंतर खाणकाम उत्पादनातील मोठी वाढ झाल्याने तेही उत्पादन इयर ऑन इयर बेसिसवर ५.४% वाढले.यंदा अहवालाच्या आधारे नोव्हेंबर महिन्यात खाणकाम (Mining), उत्पादन (Manufacturing) क्षेत्रातील वाढ अनुक्रमे ५.४%, ८% पातळीवर झाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले. इलेक्ट्रिसिटीत मात्र ऑक्टोबर तुलनेत नोव्हेंबरमध्ये -१.५% घसरण झाली आहे. ऑक्टोबर महिन्यातील उत्पादनात १५१.३ अंकांच्या तुलनेत नोव्हेंबर महिन्यात १५८.८ पातळीवर वाढ झाली असून इलेक्ट्रिसिटीत ऑक्टोबर महिन्यातील १९३.४ तुलनेत नोव्हेंबर महिन्यात १८१.३ पातळीवर घसरण झाली. खाणकामात आकडेवारीनुसार, ऑक्टोबर महिन्यातील १२६.२ तुलनेत नोव्हेंबर महिन्यात १४१.० पातळीवर वाढ झाल्याचे स्पष्ट झाले. जर इयर ऑन इयर बेसिसवर पाहिल्यास गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यातील ४.४% तुलनेत यंदा ऑक्टोबर महिन्यात २.०% घसरण झाली आहे. तर गेल्या नोव्हेंबर महिन्यातील ५.५ तुलनेत या नोव्हेंबर महिन्यात ८.०% पातळीवर मोठी वाढ झाली आहे.इलेक्ट्रिसिटीत मात्र गेल्या ऑक्टोबर महिन्यातील २.०% तुलनेत या ऑक्टोबर महिन्यात -६.९% घसरण झाली आहे. तर गेल्या नोव्हेंबर महिन्यातील ४.४% तुलनेत यंदा -१.५% पातळीवर घसरण झाली आहे. एकूणच औद्योगिक उत्पादनात इयर ऑन इयर बेसिसवर गेल्या ऑक्टोबरमधील ३.७% तुलनेत यंदा ०.५% पातळीवर वाढ झाली असून नोव्हेंबर महिन्यात इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) ५.०% तुलनेत यंदा ६.७% पातळीवर वाढ झाली आहे. यंदा उत्पादन श्रेणीतील इंडेक्स आधारित सर्वाधिक वाढ पायाभूत सुविधा (Infrastructure) व बांधकाम क्षेत्रात (Construction) झाली आहे. इयर ऑन इयर बेसिसवर ही वाढ ४.७% वरून ७.१% पातळीवर ऑक्टोबर महिन्यात झाली असून नोव्हेंबर महिन्यात मात्र इयर ऑन इयर बेसिसवर १४.१% वरुन -१.३% पातळीवर घसरण झाली आहे.अतिरिक्त माहिती -मूलभूत धातूंचे उत्पादन या उद्योग गटामध्ये, एमएस स्लॅब्स माईल्ड स्टीलचे एचआर कॉइल्स आणि शीट्स आणि मिश्र धातूचे उत्पादन या वस्तूंच्या गटांनी वाढीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.औषधे, औषधी रसायने आणि वनस्पतीजन्य उत्पादनांचे उत्पादन या उद्योग गटामध्ये, पचन विकर आणि अँटासिड्स पीपीआय औषधांसह, पशुवैद्यकीय औषधांसाठी लस आणि मनोविकारविरोधी औषधे (उदा. ओलँझापाइन) या वस्तूंच्या गटांनी वाढीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.याशिवाय मोटार वाहने, ट्रेलर आणि सेमी-ट्रेलरचे उत्पादन या उद्योग गटामध्ये ऑटो घटक/सुटे भाग आणि उपकरणे व व्यावसायिक वाहने आणि प्रवासी कार या वस्तूंच्या गटांनी वाढीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.वापरावर आधारित वर्गीकरणानुसार, नोव्हेंबर २०२५ या महिन्यासाठी प्राथमिक वस्तूंचा निर्देशांक (Index) १५०.७, भांडवली वस्तूंचा ११७.८, मध्यवर्ती वस्तूंचा १७०.१ आणि पायाभूत सुविधा/बांधकाम वस्तूंचा १९८.७ आहे. पुढे, टिकाऊ ग्राहक वस्तू आणि ग्राहक (वस्तूंचे निर्देशांक अनुक्रमे १३४.० आणि १६९.७ आहेत.पावसाळ्याचा हंगाम संपल्यामुळे आणि लोहखनिजासारख्या धातूंच्या खनिजांमध्ये झालेल्या जोरदार वाढीमुळे, खाणकाम क्षेत्रातील वाढ देखील ५.४% पर्यंत पूर्वपदावर
मोटेवाडी येथे विद्युत शॉक बसल्याने तरुण मजुराचा दुर्दैवी मृत्यू
न्हावरे : शिरुर तालुक्यातील मोटेवाडी येथे सुरु असलेल्या कामादरम्यान अचानक विद्युत शॉक लागून एका तरुण मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवार, २७ डिसेंबर रोजी दुपारी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या मयत तरुणाचे नाव भरत महादेव उघडे (वय २९, सध्या रा. कात्रज, पुणे; मूळ रा. पाचवड, ता. परांडा, जि. धाराशिव) असे […] The post मोटेवाडी येथे विद्युत शॉक बसल्याने तरुण मजुराचा दुर्दैवी मृत्यू appeared first on Dainik Prabhat .
Kuldeep Singh Sengar : कुलदीप सेंगरला फाशी द्या; सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय पक्षांकडून मागणी
नवी दिल्ली : उन्नाव बलात्कार प्रकरणात दोषी ठरलेल्या कुलदीप सिंग सेंगरला फाशीची शिक्षा देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय पक्षांनी केली आहे. सामाजिक कार्यकर्त्या योगिता भयाना म्हणतात की, या निर्णयामुळे पीडिता आणि तिच्या कुटुंबाच्या न्यायाच्या आशा पुन्हा बळकट झाल्या आहेत. सीबीआयच्या अपीलावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने सेंगरला नोटीस बजावली आणि चार आठवड्यांच्या आत उत्तर मागितले. […] The post Kuldeep Singh Sengar : कुलदीप सेंगरला फाशी द्या; सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय पक्षांकडून मागणी appeared first on Dainik Prabhat .
राज्यातील महानगरपालिका (BMC Election) निवडणुकांचा बिगूल वाजला असून, राजकीय पक्षांमध्ये निवडणुकीच्या रणधुमाळीला जोरदार सुरुवात झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यापासून अनेक पक्षांमध्ये नाराजीचे सूर उमटत आहेत. गेल्या काही दिवसांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (मनसे) सलग धक्के बसत आहेत. काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरचे मनसे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश केला […] The post BMC Election : एकीकडे उमेदवारांच्या याद्या जाहीर तर दुसरीकडे राज ठाकरेंना मोठा धक्का ! ‘या’ नेत्याचा तडकाफडकी राजीनामा appeared first on Dainik Prabhat .
स्नेहल जाधवांचा मनसेला 'जय महाराष्ट्र'
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) सरचिटणीस स्नेहल जाधव यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व जबाबदाऱ्यांचा राजीनामा दिला आहे. वॉर्ड क्रमांक १९२ मधून उमेदवारी जाहीर करताना विश्वासात न घेतल्याने त्या नाराज असल्याची माहिती आहे. स्नेहल जाधव या आपल्या कार्यकर्त्यांसह एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याची शक्यता असून त्या शिंदेंच्या शिवसेनेत सामील होतील असे समजते.आपल्या राजकीय कारकिर्दीत स्नेहल जाधव यांनी १९९२ ते १९९७ तसेच १९९७ ते २००२ आणि २००२ ते २००७ या कालावधीत सलग तीन वेळा नगरसेविका म्हणून यशस्वी प्रतिनिधित्व केले. त्यानंतर २००७ ते २०१२ या कालावधीत त्यांचे पती नगरसेवक म्हणून निवडून आले होते. वॉर्ड क्रमांक १९२ मधून कुटुंबाने सलग चार वेळा नगरसेवकपदाची निवडणूक जिंकूनही मनसेकडून उमेदवारी नाकारण्यात आल्याने स्नेहल जाधव यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. स्थानिक पातळीवर जनतेशी थेट संपर्क ठेवत विकासकामांचा पाठपुरावा करणाऱ्या स्नेहल जाधव यांना पक्षाकडून अपेक्षित सन्मान व न्याय न मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळेच त्यांनी मनसेला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. या राजीनाम्यामुळे वॉर्ड क्रमांक १९२ सह मुंबईच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना आणि घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे.
मुंबईकरांसाठी गुड न्यूज! थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी मेट्रो 'ॲक्वालाईन'रात्रभर धावणार
मुंबईकरांसाठी गुड न्यूज! थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी मेट्रो 'ॲक्वालाईन' रात्रभर धावणार▪️मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचा मोठा निर्णय▪️पहाटेपर्यंत विशेष फेऱ्यांचे नियोजनमुंबई : नववर्षाच्या स्वागतासाठी घराबाहेर पडणाऱ्या मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित व्हावा, यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (MMRC) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ३१ डिसेंबर २०२५ च्या रात्री सेलिब्रेशनसाठी बाहेर जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी मेट्रोची 'ॲक्वालाईन' (मेट्रो-३) रात्रभर सुरू राहणार आहे. यामुळे मध्यरात्री घरी परतणाऱ्या प्रवाशांना आता टॅक्सी किंवा रिक्षाच्या प्रतीक्षेत राहण्याची गरज भासणार नाही.ही विशेष सेवा ३१ डिसेंबर रोजी रात्री १०:३० वाजल्यापासून सुरू होईल. ही सेवा १ जानेवारी २०२६ रोजी पहाटे ५:५५ वाजेपर्यंत सातत्याने सुरू राहणार आहे. त्यानंतर, १ जानेवारीची नियमित मेट्रो सेवा सकाळी ५:५५ वाजल्यापासून नेहमीप्रमाणे सुरू होईल. म्हणजेच, मुंबईकरांना ३१ डिसेंबरच्या सकाळी सुरू झालेली सेवा थेट १ जानेवारीच्या रात्रीपर्यंत सलग उपलब्ध मिळणार आहे.नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईत मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. अशावेळी रस्त्यांवरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि प्रवाशांना विनासायास प्रवास करता यावा, यासाठी हे नियोजन करण्यात आले आहे. विशेषतः महिला आणि कुटुंबियांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मेट्रोचा हा रात्रभराचा प्रवास अत्यंत सोयीचा ठरणार आहे.मेट्रो प्रशासनाने प्रवाशांना आवाहन केले आहे की, नववर्षाचा आनंद साजरा करताना मेट्रोच्या नियमांचे पालन करावे आणि या विशेष सुविधेचा लाभ घ्यावा.
मुंबईत फक्त ‘जय श्रीरामचे’च नारे लागले पाहिजेत!
मंत्री नितेश राणे यांचे मतदारांना आवाहन; सुरक्षित मुंबईसाठी महायुती हा सक्षम पर्यायमुंबई : “टाटा सामाजिक विज्ञान संस्थेने (टीस) अलिकडे जाहीर केलेल्या अहवालानुसार हिंदू लोकसंख्या सातत्याने कमी होत असून, जिहादी मानसिकतेची लोकसंख्या वाढत आहे. ही धोक्याची घंटा असून, मुंबई सुरक्षित ठेवण्यासाठी आणि मुंबईचा महापौर ‘आय लव्ह महादेव’वाला बनवण्यासाठी महायुती हा सक्षम पर्याय आहे”, असे आवाहन राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी सोमवारी केले.माध्यमांशी संवाद साधताना मंत्री राणे म्हणाले, मुंबई पालिका निवडणूक आम्ही कोणाला कमी लेखण्यासाठी किंवा पराभूत करण्यासाठी लढत नाही. मुंबईकरांचा विकास आणि सुरक्षा, या दोन विषयांवर आम्ही ही निवडणूक लढवत आहोत. आमच्यासाठी निवडणूक हे एक साधन आहे. कारण, निवडणूक जिंकल्यानंतर आमचे महापौर, उपमहापौर, नगरसेवकांच्या माध्यमातून मुंबईला एक सुरक्षित शहर, विकसित शहर बनवण्याचे अधिकार आमच्याकडे येतील. ते अधिकार वापरून आम्ही मुंबईला एक हिंदुत्ववादी विचारांनीयुक्त असे सुरक्षित शहर कशाप्रकारे बनवू शकतो, या दृष्टीकोनातून आम्ही या निवडणुकीकडे पाहतो आहोत. याच विचारांच्या उमेदवारांसह आम्ही ही निवडणूक लढवत आहोत. म्हणून मुंबईला सुरक्षित ठेवण्यासाठी, मुंबईचा महापौर ‘आय लव्ह महादेव’वाला बनवण्यासाठी महायुती हा सक्षम पर्याय मुंबईकरांसमोर आहे.अलिकडे ‘टीस’चा जो अहवाल प्रसिद्ध झाला, त्यात हिंदू समाजाची लोकसंख्या कमी होत चालल्याचे नमूद करण्यात आले आहे. जिहादी मानसिकतेची लोकसंख्या वाढणे, ही धोक्याची घंटा आहे. आम्ही राष्ट्रभक्त विचारांची लोक आहोत. आमच्यासाठी राष्ट्र प्रथम आहे. त्यामुळे आमच्यासाठी ही निवडणूक मुंबईला सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीकोनातून अतिशय महत्त्वाची आहे. बांगलादेश, लंडनसह जगातील विविध देशांत जे सुरू आहे, तो हिरवा शाप मुंबईला लागू द्यायचा नाहीये. मुंबईत फक्त ‘जय श्रीरामचे’च नारे लागले पाहिजेत, येथे ‘सर तन से जुदा’चे नारे चालणार नाहीत! हाच विचार घेऊन आम्ही मुंबईकरांसमोर जाणार आहोत, असेही नितेश राणे यांनी स्पष्ट केले.मुंबईकर मतदार जिहाद्यांना चोख प्रत्युत्तर देणारमुंबईचा महापौर खान-पठाण, बुरखाधारी झाला तर काय अडचण आहे, असा सवाल एमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण यांनी केला होता. त्याला सडेतोड उत्तर देताना नितेश राणे म्हणाले, अशाप्रकारची वक्तव्ये ही मुंबईतील हिंदू समाजाला डिवचण्यासाठी आहेत. गज्वाए-हिंद अंतर्गत या हिंदूराष्ट्राला इस्लामिक राष्ट्र बनवण्याची यांची योजना आहे, त्याची सुरुवात मुंबईतून करू दाखवू, असे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न या वक्तव्यांच्या मागे आहे. कदाचित वारिस पठाणला माहिती नसेल, असे १०० हिरवे साप ठेचत ठेचत मुंबई उभी राहिली आहे. ९२-९३ च्या दंगलीत मुंबईतील हिंदू संपवण्याचा विचार या जिहादी मानसिकतेच्या लोकांनी केला होता. त्या सगळ्यांना ठेचत ठेचत मुंबईतील हिंदू समाज वर्षानुवर्षे इथे राहतो आहे. अशा जिहादी प्रवृत्तीच्या माणसांनी आमच्या मुंबईकडे वाकड्या नजरेने बघितले, तर त्याला चोख प्रत्युत्तर येणाऱ्या १५ जानेवारीला मुंबईकर जनता देईल.
मोठी बातमी..! काँग्रेसची 70 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात कोणाला संधी?
मुंबई : मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या तयारीत आता काँग्रेसने मोठे पाऊल टाकले आहे. पक्षाने आज पहिली उमेदवार यादी जाहीर केली असून, त्यात ७० उमेदवारांची नावे समाविष्ट आहेत. त्यामध्ये, ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात म्हणजे माहिम मतदारसंघातील वार्ड 192 मधून दीपक भिकाजी वाघमारे यांना उमेदवारी दिली आहे. ही यादी अधिकृतपणे काँग्रेसच्या ट्विटर (X) हँडलवरून जाहीर करण्यात आली आहे. पक्षाने […] The post मोठी बातमी..! काँग्रेसची 70 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात कोणाला संधी? appeared first on Dainik Prabhat .
३७५ कोटींच्या आयपीओसाठी WOG Technologies Limited कडून सेबीकडे अर्ज दाखल
मोहित सोमण: डब्लूओजी वोग टेक्नॉलॉजी लिमिटेड (WOG Technologies Limited) कंपनीने आज सेबीकडे आयपीओसाठी डीएचआरपी (Draft Red Hearing Prospectus DHRP) सादर केला आहे. ३७५ कोटी रुपयांच्या इशूसाठी हा अर्ज करण्यात आला असून अद्याप प्राईज बँड निश्चित करण्यात आला नाही. १० रूपये दर्शनी मूल्य (Face Value) असलेल्या १० रूपये प्रति शेअरप्रमाणे ४३२८०० इक्विटी शेअर्सचा हा ऑफर फॉर सेल (OFS) असणार आहे. माहितीनुसार, तर फ्रेश इशूपैकी १० रूपये दर्शनी मूल्यानुसार ३७५००.०० लाखांपर्यंत मूल्यांकन असलेल्या शेअरची विक्री करण्यात येईल असे कंपनीने पब्लिक फायलिंगमध्ये स्पष्ट केले आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या आयपीओतील मिळणाऱ्या निधीचा वापर भांडवली खर्चाच्या गरजेसाठी (Working Capital Requirments), बेल कुलिंग टॉवर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये अतिरिक्त ५०% भागभांडवल (Stake) खरेदी करण्यासाठी, व दैनंदिन कामकाजासाठी करण्यात येणार आहे. आयपीओ फायलिंगनुसार Unistone Capital Pvt Ltd कंपनी आयपीओसाठी बुक लिडिंग मॅनेजर म्हणून काम करणार असून Bigshare Services Pvt Ltd आयपीओसाठी रजिस्ट्रार म्हणून काम करणार आहे. बीएसई व एनएसईवर हा आयपीओ सूचीबद्ध (Listed) होणार असून अद्याप तारखेची निश्चिती करण्यात आलेली नाही.एक्सचेंजमधील माहितीनुसार, एकूण आयपीओतील गुंतवणूकीपैकी पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (QIB) ५०% वाटा, किरकोळ गुंतवणूकदारांसाठी (Retail Investors) ३५% वाटा, विना संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (NII) ३०% वाटा उपलब्ध असणार आहे.उपलब्ध माहितीनुसार, कंपनीच्या महसूलात इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) १०% वाढ झाली असून संपूर्ण २०२४-२५ आर्थिक वर्षात कंपनीच्या करोत्तर नफ्यात (PAT) १४८७% वाढ झाली आहे. तिमाही बेसिसवर मार्च तिमाहीतील तुलनेत १६६.३५ कोटी तुलनेत जून तिमाहीत ४१.६५ कोटींवर उत्पन्न (Total Income) घसरले आहे. तर कंपनीच्या करोत्तर नफ्यात (Profit after tax PAT) मार्च महिन्यातील ४४.२४ कोटी तुलनेत ९.६८ कोटींवर घसरले होते.यासह आर्थिक बाबतीत बघितल्यास, कंपनीच्या आयपीओपूर्व आरोई (Return on Equity) ७१.७९% व आरोसीई (Return on Capital Employed ROCE) ५१.३२% आहे. डेट टू इक्विटी गुणोत्तर (Debt to Equity Ratio) ०.१८% आहे. सत्यपाल सिंह, सुनिल कुमार, अमृता पनवार हे कंपनीचे प्रवर्तक (Promoter) आहेत.आयपीओपूर्वी प्रवर्तकांचे भागभांडवल ८८.६२% आहे.२०१० मध्ये स्थापन झालेल्या WOG टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीने औद्योगिक आणि नगरपालिका ग्राहकांसाठी एकात्मिक पाणी (Integration of Water),सांडपाणी आणि पर्यावरणीय उपायांची रचना करून ती सेवा कंपनी पुरवते. यासह ही कंपनी विविध जागतिक क्षेत्रांमध्ये शाश्वत प्रक्रिया (Sustainable Process) पुनर्वापर (Recycle) आणि कार्यक्षम संसाधन व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करते.कंपनीच्या पोर्टफोलिओ सेवेत WOG टेक्नॉलॉजीज पाणी प्रक्रिया प्रकल्प, सांडपाणी प्रक्रिया प्रणाली, शून्य द्रव उत्सर्जन (Zero Liquid Emissions) उपाय,कचरा ते ऊर्जा प्रकल्प, बायोगॅस प्रकल्प आणि प्रगत प्रक्रिया अभियांत्रिकी यांसारख्या सेवा प्रदान करते, जागतिक स्तरावर ईपीएसी (EPC) (अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम) आणि O&M (संचालन आणि देखभाल) या सेवांचाही समावेश आहे. उपलब्ध माहितीनुसार, ही कंपनी ऊर्जा, रसायने, औषधनिर्माण, वस्त्रोद्योग, अन्न प्रक्रिया आणि नगरपालिका यांसारख्या उद्योगांना सेवा देते. अद्याप सूचीबद्ध होण्याची तारीख अनिश्चित असून पुढील संचालक मंडळाच्या बैठकीत कंपनी निर्णय घेऊ शकते.
तिकीट मिळताच अत्यानंद! गुडघ्यावर बसून चंद्रकांत पाटलांच्या पायावर डोकं ठेवून घेतले आशीर्वाद
Pune BJP ganesh bidkar : पुणे महानगरपालिका (PMC) निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपने पहिले पाऊल टाकले आहे. पक्षाने अधिकृत उमेदवार यादी जाहीर न करता निवडक उमेदवारांना थेट फोन करून उमेदवारी अर्ज भरण्याची परवानगी दिली. यामुळे अनेक इच्छुकांमध्ये धावपळ आणि नाराजी दिसून आली, तर ज्यांना तिकीट मिळाले त्यांचा आनंद गगनात मावेना असा झालाय. भाजपकडून पुण्यातील प्रथम अधिकृत उमेदवारी […] The post तिकीट मिळताच अत्यानंद! गुडघ्यावर बसून चंद्रकांत पाटलांच्या पायावर डोकं ठेवून घेतले आशीर्वाद appeared first on Dainik Prabhat .
BMC Election : ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात शिंदेंचे शिलेदार ठरले; आता लढत होणार रंगतदार
काही वर्षांपूर्वी मुंबई शहर शिवसेनेचा बालेकिल्ला मानले जायचे. बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) निवडणुकीत प्रत्येक वॉर्डातून शिवसेनेचे उमेदवार सहज विजयी होत असत. मात्र, गेल्या १५ वर्षांत मुंबईचे राजकीय चित्र पूर्णपणे बदलले आहे. नारायण राणे आणि राज ठाकरे हे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर पालिका निवडणुका चुरशीच्या होऊ लागल्या. मागील काही निवडणुकांत शिवसेनेला सत्तेसाठी इतर पक्षांची मदत घ्यावी लागली होती. […] The post BMC Election : ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात शिंदेंचे शिलेदार ठरले; आता लढत होणार रंगतदार appeared first on Dainik Prabhat .
मुंबई वाचवण्यासाठी मतभेद बाजूला ठेवा, एकजुटीने काम करा; राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आदेश
मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीत दोन्ही पक्षांची युती विजयी होण्यासाठी मतभेद बाजूला ठेवून मुंबई वाचवण्यासाठी ठाकरेसेनेसोबत एकजुटीने काम करा, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आवाहन केले आहे. रंगशारदा सभागृहात राज ठाकरे आपल्या पक्ष कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते. काही लोक मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचे स्वप्न पाहत आहेत. त्यासाठी योजना आखल्या जात आहेत. मुंबईला […] The post मुंबई वाचवण्यासाठी मतभेद बाजूला ठेवा, एकजुटीने काम करा; राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आदेश appeared first on Dainik Prabhat .
Share Market Today: भारतीय शेअर बाजाराने सोमवार, २९ डिसेंबर रोजी वर्षाच्या शेवटच्या ट्रेडिंग आठवड्याची सुरुवात मोठ्या घसरणीसह केली. विदेशी गुंतवणूकदारांनी केलेली सततची विक्री आणि कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ यामुळे गुंतवणूकदारांच्या उत्साहावर विरजण पडले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ‘सेन्सेक्स’ सुमारे ३४६ अंकांच्या म्हणजेच ०.४१ टक्क्यांच्या घसरणीसह ८४,६९५.५४ च्या पातळीवर बंद झाला. दुसरीकडे, राष्ट्रीय शेअर बाजाराचा […] The post Share Market Today: शेअर बाजारात वर्षाच्या शेवटच्या आठवड्याची निराशाजनक सुरुवात; गुंतवणूकदारांचे 1.89 लाख कोटी रुपये बुडाले appeared first on Dainik Prabhat .
‘हक़’च्या यशानंतर यामी गौतम धरचं मन जिंकणारं वक्तव्य
या वर्षी दमदार अभिनय आणि मोठ्या पडद्यावर लक्षात राहणाऱ्या क्षणांनी भरलेल्या सिनेमांमध्ये एक नाव सातत्याने वेगळं ठरलं आहे, आणि ते म्हणजे यामी गौतम धर. हक़च्या माध्यमातून अभिनेत्रीने केवळ वर्षातील सर्वात प्रभावी चित्रपटांपैकी एक दिला नाही, तर भारतीय सिनेमातील सर्वोत्तम कलाकारांमध्ये आपली जागाही पक्की केली. हक़ ला जिथे समीक्षकांकडून भरभरून प्रशंसा मिळाली, तिथेच हा चित्रपट देशभरातील प्रेक्षकांच्या मनाला भिडणारी एक भावनिक कथा ठरला.चित्रपटाला मिळणाऱ्या प्रतिसादांवर अलीकडे दिलेल्या एका मुलाखतीत यामी म्हणाली, “हक़ हा माझ्या करिअरमधील सर्वाधिक कौतुक मिळालेल्या चित्रपटांपैकी एक आहे आणि ज्यांनीही हा चित्रपट पाहिला आहे, त्यांनी सांगितलं की तो त्यांना मनापासून स्पर्श करून गेला. मला खूप वैयक्तिक आणि भावनिक असे अनेक संदेश मिळाले आहेत. मला मनापासून वाटतं की याचं श्रेय सगळ्यांनाच जातं. ही कधीच एका व्यक्तीची गोष्ट नसते, ना एखाद्याचा एकट्याचा प्रवास किंवा यश असतं, आणि मी ह्याच विचाराने काम करते. त्यामुळे मी कधीच असं म्हणू शकत नाही की हा फक्त माझा चित्रपट होता किंवा हे फक्त माझं यश होतं.”ही साधेपणाची भावना हक़ च्या आत्म्यालाच प्रतिबिंबित करते — असा चित्रपट जो लक्ष वेधण्यासाठी गोंगाट करत नाही, तर शांतपणे खोल ठसा उमटवतो. समीक्षकांनी यामीच्या संयमित अभिनयाची, भावनांची सखोल समज आणि आतून साकारलेल्या अभिनयाची विशेष प्रशंसा केली आहे, आणि याला या वर्षातील सर्वात मजबूत महिला-केंद्रित भूमिकांपैकी एक मानलं आहे. केवळ कथा किंवा दिग्दर्शनासाठीच नव्हे, तर ज्या प्रामाणिकपणे आणि विश्वासाने यामीने आपली भूमिका साकारली आहे, त्यासाठीही भरभरून कौतुक झालं आहे.आपल्या भूमिकेशी असलेल्या नात्याबद्दल बोलताना ती म्हणाली, “मला या विषयावर खूप विश्वास होता. या पात्राबद्दल माझी जी समज होती, तिच्या भावना, तिचा प्रवास कसा असू शकतो, हे सगळं मी मनापासून समजून घेण्याचा प्रयत्न केला. चित्रपटात कल्पना आणि वास्तव यांचा संगम असला, तरी तो प्रत्येकासाठी सोपा आणि आपलासा वाटावा हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं, जेणेकरून तो पाहणारा कुठलाही माणूस — तो कुठल्याही जेंडर, समुदाय, जात किंवा पार्श्वभूमीचा असो — स्वतःला त्याच्याशी जोडू शकेल.”हा विश्वास पडद्यावर स्पष्टपणे दिसून येतो. हक़मध्ये यामी कथा पुढे जाऊ देते आणि कधीही तिच्यावर हावी होत नाही. ती संवादांइतकाच शांततेवरही विश्वास ठेवते. चित्रपटात तिचे अनेक प्रभावी संवाद आणि मोनोलॉग्स आहेत, पण काही असे भावनिक प्रसंगही आहेत जिथे तिचे डोळेच सगळं काही सांगून जातात. गेल्या काही वर्षांत सातत्याने प्रभावी भूमिका साकारल्यानंतर हक़ हा तिच्या कलात्मक प्रवासातील एक असा टप्पा वाटतो, जो पूर्णत्वाला गेलेला आहे — आत्मविश्वासाने भरलेला, बेधडक आणि कथाकथनाशी खोलवर जोडलेला. जसं-जसं 2025 पुढे सरकत आहे, तसं हे अधिकाधिक स्पष्ट होत चाललं आहे की जेव्हा लक्षात राहणाऱ्या, मनाला भिडणाऱ्या आणि भावनिक करणाऱ्या अभिनयाची गोष्ट येते, तेव्हा त्या अर्थाने हे वर्ष यामी गौतम धरचं आहे.
मोहित सोमण:आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात अखेरच्या सत्रात घसरण झाली आहे. सकाळची तात्पुरती झलक म्हणून सुरुवातीची रॅली दुपारी घसरणीत बदलली आहे. सेन्सेक्स ३४५.९१ अंकाने घसरत ८४६९५.५४ पातळीवर व निफ्टी १००.२० अंकांने घसरत २५९४२.१० पातळीवर स्थिरावला आहे. सेन्सेक्स व निफ्टी बँक निर्देशांकात घसरण कायम राहिली असून मिड व स्मॉल कॅप शेअर्समध्येही घसरण झाल्याने सेन्सेक्स ८४४१० व निफ्टी २६००० पातळी राखण्यास असमर्थ ठरले आहे. यासह निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकातील केवळ वाढ मिडिया, एफएमसीजी, पीएसयु बँकेत कायम राहिली असून उर्वरित शेअर्समध्ये घसरण झाली आहे. सर्वाधिक घसरण आयटी, ऑटो, फार्मा, हेल्थकेअर, ऑटो निर्देशांकात झाली आहे. व्यापक निर्देशांकातही स्मॉलकॅप १००, स्मॉलकॅप ५० निर्देशांकात घसरण झाली आहे.आज सकाळी शेअर बाजारात किरकोळ वाढीनंतर जागतिक अस्थिरतेचा फटका म्हणून मोठ्या प्रमाणात बाजारात सेल ऑफ झाले आहे. परिणामी मध्यसत्रात शेअर बाजार ५०० अंकापेक्षा अधिक पातळीवर घसरत नंतर तुलनात्मकदृष्ट्या मोठ्या प्रमाणात सावरले आहे. विशेष उल्लेख म्हणजे अस्थिरता निर्देशांक (VIX Volatility Index) हा ६.२२% राहिला आहे. युएस व्हेनेझुएला यांच्यातील द्वंद्व तसेच युएस बाजारातील कपातीची वाढवेली शक्यता ज्यामुळे वाढलेला डॉलर, तसेच घरगुती गुंतवणूकदारांनी दाखवलेली सावधगिरी, नफा बुकिंग, सेल ऑफ अशा संमिश्रित प्रतिसादामुळे शेअर बाजारात अनास्था कायम राहिली असून तसेच आशियाई बाजारातील बहुतांश निर्देशांकात वाढ झालेली असूनही क्षेत्रीय निर्देशांकातील अनास्था आज विशेष जाणवली आहे. खासकरून सकाळच्या सत्रातील आयटी शेअर्समध्ये झालेली वाढ घसरणीत बदलल्याने बाजाराला सपोर्ट लेवल राखण्यासही अपयश आले आहे.आशियाई बाजारातील अखेरचे सत्र संमिश्र स्तरावर पोहोचले आहे. गिफ्ट निफ्टी (०.४२%) सह अनेक इतर निर्देशांकात घसरण झाली ज्यामध्ये सर्वाधिक घसरण हेंगसेंग (०.७४%), निकेयी २२५ (०.६६%), सेट कंपोझिट (०.४२%), निर्देशांकात झाली असून सर्वाधिक वाढ जकार्ता कंपोझिट (१.२३%), शांघाई कंपोझिट (०.०४%), तैवान वेटेड (०.८८%) निर्देशांकात झाली आहे. युएस बाजारातील सुरूवातीच्या कलात डाऊ जोन्स (०.१२%) बाजारात वाढ झाली असून उर्वरित एस अँड पी ५०० (०.०३%), नासडाक (०.०७%) निर्देशांकात घसरण झाली आहे.अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ एमएमटीसी (१०.०१%), एचईजी (७.२३%), एचएफसीएल (५.५०%), एससीआय (४.०१%), मदर्सन वायरिंग (३.७४%), इमामी (३.४०%) समभागात झाली असून सर्वाधिक घसरण आयआरएफसी (५.४५%), रेल विकास (५.२५%), क्राफ्ट्समन ऑटो (४.७२%), डिक्सन टेक्नॉलॉजी (३.८२%), किर्लोस्कर ऑईल (३.७२%), आयएफसीआय (३.७१%), अनंतराज (३.७१%), रिलायन्स पॉवर (३.३९%), फिनोलेक्स केबल्स (३.२६%) समभागात झाली आहे.आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना अशिका इन्स्टिट्युशनल इक्विटीजने म्हटले आहे की,'आजच्या सत्रात भारतीय शेअर बाजारात तीव्र विक्रीचा दबाव दिसून आला, ज्यामुळे प्रमुख निर्देशांक महत्त्वाचे आधार स्तर टिकवून ठेवण्यात अयशस्वी ठरला. निफ्टी निर्देशांकाने २६१०६ पातळीचा दिवसाचा उच्चांक गाठला, परंतु त्यानंतर विक्रीचा दबाव वाढला, ज्यामुळे निर्देशांक घसरून २५९२४ पातळीच्या इंट्राडे नीचांकी पातळीवर पोहोचला आणि २६००० पातळीचा महत्त्वाचा तांत्रिक व मानसिक आधार निर्णायकपणे तोडला. क्षेत्रीय पातळीवर, मीडिया आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकिंग शेअर्सनी सापेक्ष ताकद दाखवली आणि ते तेजीमध्ये व्यवहार करत होते, ज्यामुळे त्यांनी व्यापक बाजारापेक्षा चांगली कामगिरी केली. याउलट, रिअल्टी, आयटी, हेल्थकेअर, ऊर्जा आणि फार्मा क्षेत्रातील शेअर्समध्ये लक्षणीय कमजोरी दिसून आली आणि ते संपूर्ण सत्रात दबावाखाली राहिले. आज नंतर जाहीर होणाऱ्या भारताच्या औद्योगिक आणि उत्पादन उत्पादन आकडेवारीच्या प्रतीक्षेत बाजारातील सहभागींनी मोठ्या प्रमाणात सावध भूमिका घेतली होती, ज्यामुळे नजीकच्या काळातील आर्थिक दृष्टिकोनाबद्दल संकेत मिळण्याची अपेक्षा आहे.या सत्रात चांदी आकर्षणाचे केंद्रबिंदू राहिली. एमसीएक्सवर २५४८५३ पातळीचा उच्चांक गाठल्यानंतर, चांदीच्या किमतींमध्ये नफावसुली झाली आणि त्यात सुमारे १.३८% ची घट झाली, ज्यामुळे मौल्यवान धातूंच्या क्षेत्रात सावध भावना दिसून आली. डेरिव्हेटिव्ह्जच्या आघाडीवर, बाजाराची स्थिती स्पष्टपणे मंदीचे संकेत देत होती, ज्यात १६० शेअर्सच्या घसरणीच्या तुलनेत केवळ ५२ शेअर्समध्ये वाढ झाली. अल्केम लॅबोरेटरीज, एनएमडीसी, सेल,पेट्रोनेट एलएनजी आणि कमिन्स इंडिया यांसारख्या शेअर्समध्ये ओपन इंटरेस्टमध्ये लक्षणीय वाढ दिसून आली, जे या शेअर्समध्ये वाढलेल्या डेरिव्हेटिव्ह व्यवहारांचे संकेत देते. निफ्टी ऑप्शन्स सेगमेंटमध्ये, २६००० आणि २६१०० स्ट्राइक किमतींवर सर्वाधिक कॉल ओपन इंटरेस्ट होता, तर पुट बाजूला, २५९०० आणि २६००० स्ट्राइकवर सर्वाधिक ओपन इंटरेस्ट होता, जे बाजारातील सहभागींनी लक्ष ठेवलेल्या महत्त्वाच्या पातळ्या अधोरेखित करते.'आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले आहेत की,' बाजारात पुढील तेजीसाठी आवश्यक घटकांची कमतरता दिसत आहे आणि बहुतेक गुंतवणूकदार सुट्टीच्या मनःस्थितीत असल्याने, नजीकच्या काळात बाजारात स्थिरीकरणाचा टप्पा येण्याची शक्यता आहे. २०२६ साठीचा दृष्टिकोन सकारात्मक असला तरी, आता लक्ष आगामी तिसऱ्या तिमाहीच्या निकालांवर आणि अमेरिकेसोबतच्या व्यापार कराराबाबतच्या स्पष्टतेवर केंद्रित होण्याची अपेक्षा आहे. जागतिक व्यापारातील अनिश्चितता आणि रुपयाच्या घसरणीच्या वातावरणात, गुंतवणूकदार त्यांच्या तुलनेने अधिक सुरक्षिततेसाठी आणि मजबूत कमाईच्या स्पष्टतेसाठी लार्जकॅप शेअर्सना प्राधान्य देण्याची शक्यता आहे.'आजच्या बाजारातील निफ्टीवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे वरिष्ठ तांत्रिक विश्लेषक रूपक डे म्हणाले आहेत की,'सत्रादरम्यान निर्देशांकात नफावसुली दिसून आली, ज्यामुळे बाजारात घसरण झाली. डेरिव्हेटिव्ह्जच्या आघाडीवर, निर्देशांक या पातळीच्या खाली घसरल्याने २६००० पीई पुट रायटर्सनी आपली पोझिशन स्क्वेअर ऑफ केली. निर्देशांक २१ ईएमएच्या (Exponential Moving Average EMA) खाली गेल्याने बाजाराचा कल कमकुवत झाला आहे; याव्यतिरिक्त, त्याने मागील वाढीपैकी ५०% पेक्षा जास्त घसरण नोंदवली आहे, ज्यामुळे अलीकडील तेजीच्या टिकाऊपणाबद्दल शंका निर्माण झाली आहे. घसरणीच्या बाजूने, २५९०० वर आधार पातळी आहे, तर तेजीच्या बाजूने, २६००० ची पातळी सुरुवातीचा अडथळा म्हणून काम करण्याची शक्यता आहे.'
उबाठा – मनसेचे मुंबईत बारा वाजणार, भाजपचा घणाघात
मुंबई : उबाठा गट, संजय राऊत यांच्यापाठोपाठ मनसे कडूनही हिरव्या मतांसाठी लांगुलचालन चालू झाले आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत या उबाठा - मनसेच्या तथाकथित आघाडीचे बारा वाजणार अशी बोचरी टीका भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली. जे स्वत: राहुल गांधी यांचे तळवे चाटतात, सोनिया गांधी यांची गुलामी करतात ते आज शिवसेनेवर बूट चाटण्याची टीका करतात हे हास्यास्पद आहे. दुस-यांवर टीका करण्याआधी जरा आरशात पहा असा खोचक सल्लाही त्यांनी संजय राऊतांना दिला. थैलीचे राजकारण कोण करते हे जनतेला माहीत आहे. संजय राऊत हेच अशा राजकारणात दंग असतात. थैल्या भरणाऱ्या आणि तिजोरी भरणाऱ्यांचा हिशोब जनतेला उत्तमपणे माहिती आहे. पत्राचाळ घोटाळ्यासह इतर घोटाळ्यांचा हिशोब द्या असे आव्हान बन यांनी दिले. सच्च्या कार्यकर्त्याला डावलून उमेदवारी न देता भावाला उमेदवारी देऊन घराणेशाहीचे राजकारण राऊत करतात असे शरसंधानही त्यांनी केले. उद्धव ठाकरे आता पहाटे चारपर्यंत जागून काही जनतेवर उपकार करत नाही आहेत. मुख्यमंत्री होते तेव्हा झोपा काढत होते आणि फेसबुक लाइव्ह करण्यात धन्यता मानत होते असा प्रहार बन यांनी केला.भाजपा गुन्हेगारांना पाठीशी घालत नाहीनवाब मलिक मुंबई महापालिका निवडणुकीत नेतृत्व करणार असतील भाजपा साथ देणार नाही हे पक्षाने आधीच स्पष्ट केले आहे याचा पुनरुच्चार करत बन म्हणाले की, कोणत्याही गुन्हेगाराच्या पाठीशी भाजपा उभी राहत नाही. मुंबईचा विकास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे करू शकतात आणि जनतेचा पाठिंबाही भाजपा- शिंदे शिवसेनेला मिळणार आहे.सर्वसामान्य कार्यकर्त्याचा सन्मान राखणारी भाजपाभाजपामध्ये एका विशिष्ट घराण्यात जन्माला आले तरच उमेदवारी किंवा संधी मिळते असे नाही तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांना उचित संधी नेहमी दिली जाते. “माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला मानखुर्द प्रभाग क्रमांक 135 ची उमेदवारी दिल्याबद्दल भाजपाचे मनापासून आभार” या शब्दांत बन यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मानखुर्दची जनता भाजपाच्या विकासाच्या राजकारणाच्या बाजूने उभी राहील असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला.
Shivsena Leader : राज्यातील विविध महानगरपालिकांच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर झाल्याने राजकीय पक्षांच्या (Shivsena Leader) हालचालींना वेग आला आहे. युती आणि आघाड्यांसाठीच्या बैठकांना गती मिळाली असून, नेतेमंडळी मोर्चेबांधणीच्या कामात व्यस्त झाली आहेत. अशा पार्श्वभूमीवर अमरावती शहरातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सुरू असलेल्या जागावाटपाच्या चर्चेदरम्यान शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आनंदराव अडसूळ यांची प्रकृती […] The post Shivsena Leader : जागा वाटपाची चर्चा सुरू असताना शिवसेनेच्या ‘या’ नेत्याची प्रकृती खालावली; तातडीने रुग्णालयात दाखल appeared first on Dainik Prabhat .
मुखवट्यामागील गडद रहस्य ‘केस नं. ७३’
प्रत्येक चेहऱ्यावर एक मुखवटा असतो आणि या मुखवट्यामागे असतात सुखदुःखाच्या असंख्य मानवी भावभावना.. ज्या आपल्याला कधीच दिसत नाही, आणि सोबत मुखवट्यामागे दडलेली अनेक रहस्य..!! या मुखवट्यामागचा खरा चेहरा समोर आला कि आपणही चक्रावून जातो... अशीच एक चक्रावून टाकणारी कथा घेऊन येत आहे ‘केस नं. ७३’.ना चेहरा, ना निमित्त, चार खून, शून्य पुरावे.... अशा टॅगलाईनसह आलेल्या ‘केस नं. ७३’ चित्रपटाचे मोशन पोस्टर आपल्यासमोर असंख्य प्रश्न उभं करतं. लायलॅक मोशन पिक्चर्स आणि डस्क स्टुडिओज निर्मित ‘केस नं. ७३’ हा मराठी चित्रपट नवीन वर्षात जानेवारीमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन डॉ. मिलिंद मुक्तेश्वर आपटे यांनी केले असून चित्रपटाची निर्मिती शर्वरी सतीश वटक, डॉ. मिलिंद मुक्तेश्वर आपटे यांनी केली आहे. सहनिर्माते प्रविण अरुण खंगार आहेत. अशोक शिंदे, राजसी भावे, शैलेश दातार, नंदिता पाटकर, पियुष आपटे अशी तगडी स्टारकास्ट चित्रपटात दिसणार आहे. चित्रपटातील प्रत्येक प्रसंग एक नवं गूढ उलगडतो आणि प्रत्येक उत्तरामागे आणखी खोल प्रश्न उभे करतो.‘हा केवळ रहस्यमय चित्रपट नाही, तर प्रेक्षकांच्या विचारांना आव्हान देणारी कथा आहे. प्रत्येक प्रेक्षक या कथेत स्वतःचं वेगळं सत्य शोधेल, असं मत दिग्दर्शक डॉ.मिलिंद मुक्तेश्वर आपटे यांनी व्यक्त केलं. ‘मराठी चित्रपटसृष्टीतला रहस्यपटांचा दर्जा आणखी उंचावण्याचा आमचा प्रयत्न आहे.’ ‘केस नं. ७३’ प्रेक्षकांना एक वेगळाच सिनेमॅटिक अनुभव देईल, असा विश्वास निर्माते शर्वरी सतीश वटक, डॉ. मिलिंद मुक्तेश्वर आपटे यांनी व्यक्त केला.चित्रपटाची पटकथा डॉ. ऋचा अमित येनुरकर यांची आहे. मंदार चोळकर यांनी चित्रपटाची गीते लिहिली असून संगीत आणि पार्शवसंगीताची जबाबदारी अमेय मोहन कडू यांनी सांभाळली आहे. छायांकन निनाद गोसावी यांचे आहे.रहस्य, थरार आणि अनपेक्षित वळणांनी भरलेली ‘केस नं. ७३’ कोणाच्या चेहऱ्यावरचा मुखवटा काढणार ? हे पहाणं रंजक ठरणार आहे.
ठाण्यात गावदेवी मातेचा पालखी सोहळा
ठाणे : ठाणे पूर्व भागातील आई चिखलादेवी (गावदेवी) मातेचा पालखी सोहळा पौष पौर्णिमेमध्ये दिनांक ०२ जानेवारी २०२६ संपन्न होणार आहे. आगरी कोळी बांधवांची कुलदैवत कोपरीची ग्रामदैवत म्हणून आई चिखलादेवीची ओळख आहे. या कोपरी परिसराची ग्रामदैवत असलेल्या चिखलादेवीचा पालखी सोहळा आगरी कोळी आणि कोपरी परिसरातील रहिवाश्यांच्यावतीने दिमाखात साजरा केला जातो.ग्रामदैवत असलेल्या चिखलादेवीच्या मंदिराला १०० वर्षांपेक्षा मोठी ऐतिहासिक परंपरा आहे. देवीच्या पालखी सोहळ्याचे यंदाचे २० वे वर्ष आहे. या पालखी सोहळ्यामध्ये भजन, कीर्तन, वेगवेगळ्या वेशभूषा करून लहान मुले तसेच महिलावर्ग मोठ्या प्रमाणात सहभागी होतात. पालखी सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे या सोहळ्यामध्ये येथील नागरिक एकच रंगाचे कपडे परिधान करून या सोहळ्यात सामील होतात. यंदाचा पालखी सोहळ्याचा रंग लाल आहे. भाविकांनी या सोहळ्यास आवर्जून भेट द्यावी असे आवाहन सोहळा समितीने केले आहे.
शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील बेट भागात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजण्यापूर्वीच राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी कंबर कसली असून, धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आडून खुलेआम राजकीय शक्तिप्रदर्शन सुरू झाले आहे. यामुळे बेट भागात सध्या ‘जागरण-गोंधळा’च्या नावाखाली राजकीय धांदल उडताना दिसत आहे. ‘होम मिनिस्टर’ […] The post शिरूरच्या बेट भागात ‘धार्मिक’ कार्यक्रमांतून राजकीय शक्तिप्रदर्शन; निवडणुकांपूर्वीच इच्छुकांची रणधुमाळी appeared first on Dainik Prabhat .
Girija Oak : “तुझ्यासारखी आई आणि स्त्री…”; गिरिजा ओकने आईसाठी लिहली खास पोस्ट
मराठी तसेच हिंदी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री गिरिजा ओक सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते. ती वारंवार आपल्या दैनंदिन जीवनातील क्षण, कामाचे अपडेट्स आणि वैयक्तिक आठवणी चाहत्यांसोबत शेअर करत असते. अलीकडेच तिचा निळ्या साडीतील एका मुलाखतीतील फोटो व्हायरल होऊन ‘नॅशनल क्रश’ म्हणून चर्चेत आली होती. त्यानंतर आता गिरिजाने आपल्या आईच्या वाढदिवसानिमित्त इंस्टाग्रामवर खास पोस्ट शेअर केली आहे. […] The post Girija Oak : “तुझ्यासारखी आई आणि स्त्री…”; गिरिजा ओकने आईसाठी लिहली खास पोस्ट appeared first on Dainik Prabhat .
शहापूर-घोटी-विशाखापट्टणम राज्यमार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर
नेवासा: नगर जिल्ह्यातील दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या शहापूर-घोटी-विशाखापट्टणम (राज्यमार्ग क्र. ५०) या मार्गाला आता ‘राष्ट्रीय महामार्ग’ म्हणून मान्यता मिळाली आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी यासाठी पाठपुरावा केला होता. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या संदर्भात सकारात्मक निर्णय घेत सर्वेक्षणाचे आदेश दिले आहेत. हा मार्ग अकोले, संगमनेर, श्रीरामपूर, नेवासा आणि शेवगाव […] The post शहापूर-घोटी-विशाखापट्टणम राज्यमार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर appeared first on Dainik Prabhat .
Smriti Mandhana broke own world record : भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार आणि रन-मशीन स्मृती मानधना हिने क्रिकेट विश्वात आपला दबदबा निर्माण केला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या चौथ्या टी-२० सामन्यात स्मृतीने केवळ ८० धावांची वादळी खेळीच केली नाही, तर महिला क्रिकेटच्या इतिहासातील एक असा विक्रम प्रस्थापित केला आहे, जो आजवर कोणालाही जमलेला नाही. स्वतःचाच मोडला वर्ल्ड रेकॉर्ड […] The post Smriti Mandhana : स्मृतीचा ‘विराट’ प्रताप! स्वतःचाच वर्ल्ड रेकॉर्ड मोडत रचला अभूतपूर्व इतिहास; जगातील पहिलीच खेळाडू appeared first on Dainik Prabhat .
शिरूर – शिरूर तालुक्यातील गणेगाव दुमाला येथील म्हसोबा वाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मालकीच्या जागेवर शेतकरी सदाशिव भोसले यांनी बेकायदेशीरपणे नांगरणी करून अतिक्रमण केले असून, शाळेच्या पिण्याच्या पाण्याच्या बोअरचेही मोठे नुकसान केले आहे. तसेच विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी असलेला एकमेव रस्ता कंपाउंड टाकून बंद करण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. सदर व्यक्तीने शालेय […] The post शिरूर: गणेगाव दुमाला येथे जिल्हा परिषद शाळेच्या जागेवर अतिक्रमण; विद्यार्थ्यांचा रस्ता बंद, ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा appeared first on Dainik Prabhat .
EPFO खातेदारांसाठी मोठा दिलासा: देशभरात ‘सिंगल-विंडो सर्व्हिस’, कुठल्याही कार्यालयातून PFचे काम शक्य
नवी दिल्ली : नोकरी करणाऱ्या कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) एक अत्यंत दिलासादायक बातमी दिली आहे. पीएफशी संबंधित कामांसाठी आता खातेधारकांना ठराविक कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. केंद्र सरकार लवकरच ‘सिंगल-विंडो सर्व्हिस’ सुरू करणार असून, याद्वारे पीएफ खातेधारक देशातील कोणत्याही ईपीएफओ कार्यालयातून आपले काम पूर्ण करू शकतील. पासपोर्ट केंद्रांच्या धर्तीवर होणार विकास […] The post EPFO खातेदारांसाठी मोठा दिलासा: देशभरात ‘सिंगल-विंडो सर्व्हिस’, कुठल्याही कार्यालयातून PFचे काम शक्य appeared first on Dainik Prabhat .
MNS Candidate List : मनसेचा पहिला उमेदवार जाहीर; राज ठाकरेंनी AB फॉर्म देताच उमेदवाराचा कंठ दाटला
MNS Candidate List : मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या तयारीत राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) पहिले पाऊल टाकले आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी स्वतः मुंबईतील नेते यशवंत किल्लेदार यांना AB फॉर्म प्रदान केला आहे. हा मनसेच्या उमेदवार याद्यांमधील पहिला अधिकृत AB फॉर्म मानला जात आहे. वॉर्ड क्रमांक १९२ (दादर परिसर) मधून यशवंत किल्लेदार उमेदवारी […] The post MNS Candidate List : मनसेचा पहिला उमेदवार जाहीर; राज ठाकरेंनी AB फॉर्म देताच उमेदवाराचा कंठ दाटला appeared first on Dainik Prabhat .
Jamkhed News : स्थानिक गुन्हे शाखेची नान्नज येथे मोठी कारवाई; ‘एवढ्या’किंमतींची देशी दारू जप्त
जामखेड : स्थानिक गुन्हे शाखेने जामखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत नान्नज परिसरात छापा टाकून एकूण १ लाख ६८ हजार ९६० रुपये किंमतीची देशी दारू जप्त केली आहे. याप्रकरणी मुख्य आरोपी तुषार विठ्ठल जगताप (वय ३२, रा. शिवाजीनगर, जामखेड) याला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक […] The post Jamkhed News : स्थानिक गुन्हे शाखेची नान्नज येथे मोठी कारवाई; ‘एवढ्या’ किंमतींची देशी दारू जप्त appeared first on Dainik Prabhat .
हिंदवी पाटील आणि सुरेखा कुडची गाजवणार लावणीचा फड
लावणी म्हणजे महाराष्ट्राची शान... उत्तम संगीत आणि नखरेल अदाकारीने सजलेली लावणी रसिकांना घायाळ केल्याशिवाय राहत नाही. आपल्या लावणी नृत्याने अवघ्या महाराष्ट्रावर भूरळ घालणारी लोकप्रिय लावणी नृत्यांगना हिंदवी पाटील आणि प्रसिद्ध अभिनेत्री, नृत्यांगना सुरेखा कुडची एकत्र लावणीचा फड गाजवताना दिसणार आहेत. ‘जब्राट’ या आगामी मराठी चित्रपटात या दोघींची एक फक्कड लावणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. येत्या ६ फेब्रुवारीला तारा करमणूक निर्मित प्रगती कोळगे दिग्दर्शित ‘जब्राट’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.या लावणीची झलक नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. हिंदवी पाटील आणि अभिनेत्री सुरेखा कुडची यांच्या ठसकेबाज लावणीची जुगलबंदी यात पाहायला मिळत आहे. ही लावणी सादर करताना आम्ही आनंद घेतला हाच आनंद रसिकांना ही मिळेल असा विश्वास या दोघींनी व्यक्त केला.किती सावरू पुन्हा पुन्हा कशा झाकू या खाणाखुणा नाही बिचाऱ्या पदराचा या गुन्हाया डॉ.जयभीम शिंदे लिखीत शब्दांना हिंदवी पाटील आणि सुरेखा कुडची यांनी आपल्या मोहक अदाकारीने झक्कास रंग भरले आहेत. बेला शेंडेच्या स्वरातील या लावणीला डॉ.जयभीम शिंदे यांनी ठेका धरायला लावणारं संगीत दिलं आहे. या बहारदार लावणीचं नृत्यदिग्दर्शन आशिष पाटील यांनी केले आहे.‘जब्राट’ चित्रपटाचे निर्माते अनिल अरोड़ा, गोविंद मोदी, प्रगती कोळगे आहेत. छायांकन अनिकेत खंडागळे यांचे, तर सहाय्यक असोशीएट चार्लेस गोम्स हे आहेत. वेशभूषा युगेशा ओमकार यांची आहे. बेला शेंडे, आर्या आंबेकर, वैशाली माडे, नंदेश उमप, डॉ. जयभीम शिंदे, अनुराग जगदाळे, स्वराज्य भोसले, राजनंदिनी मगर, स्वाती शिंदे यांचा स्वरसाज चित्रपटातील गाण्यांना लाभला आहे.
मोहित सोमण: सोन्याचांदीच्या दरात आज तुफान घसरण झाली आहे. मोठ्या प्रमाणात जागतिक कमोडिटी बाजारपेठेत अस्थिरता वाढल्याने सोन्याचांदीच्या दरात मोठी घसरण झाली. सोन्याच्या तुलनेत डॉलर निर्देशांकात वाढ झाल्याने काही पातळीवर सलग सहा वेळा वाढलेल्या सोन्याचांदीला आज ब्रेक मिळाला ज्याचे पुनर्वसन घसरणीत झाले. 'गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात २०२ रूपयाने, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात १८५ रुपयाने, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात १५२ रुपयाने घसरण झाली. परिणामी प्रति ग्रॅम दर २४ कॅरेटसाठी १४०४० रूपये, २२ कॅरेटसाठी १२८७० रूपये, १८ कॅरेटसाठी १०५३० रूपयांवर पोहोचले आहेत. २४ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा किंमतीत २०२० रूपयाने, २२ कॅरेट प्रति तोळा किंमतीत १८५० रूपयाने, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा किंमतीत १२५० रूपयाने घसरण झाली आहे. त्यामुळे प्रति तोळा दर २४ कॅरेटसाठी १४०४०० रूपये, २२ कॅरेट सोन्याचा प्रति तोळा दर १२८७०० रूपये, १८ कॅरेटसाठी १०५३०० रूपयांवर पोहोचला आहे. मुंबईसह भारतातील प्रमुख शहरातील सोन्याचे प्रति ग्रॅम सरासरी दर २४ कॅरेटसाठी १४०४० रूपये, २२ कॅरेटसाठी १२८७० रूपये, १८ कॅरेटसाठी १०५३० रूपयांवर पोहोचले आहेत.भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये (Mutli Commodity Exchange MCX) सोन्याचा निर्देशांक २.५९% घसरण झाल्याने दरपातळी २३३५७५ रूपयांवर पोहोचली आहे. जागतिक स्तरावरील गोल्ड फ्युचर निर्देशांकात १.४५% घसरण झाल्याने दरपातळी ४४८७.६० डॉलर प्रति औंसवर पोहोचली आहे. जागतिक स्तरावरील मानक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या युएस गोल्ड स्पॉट दरात दुपारपर्यंत १.४७% घसरण झाल्याने दरपातळी प्रति डॉलर ४४६५.४० औंसवर गेली आहे.सोन्यात घसरण का झाली?सोन्यात आज प्राईज करेक्शन झाले आहे. सलग सहा सत्रात नव्या उच्चांकानंतर जागतिक अस्थिरता असतानाही युएस राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व युक्रेन राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्यात चर्चा झाल्याने बाजारात सकारात्मकता भावना व्यक्त केल्या गेल्या. चार वर्ष सुरू असलेल्या रशिया युक्रेन यांच्यातील युद्धाला मध्यस्थी करून मार्ग काढू अशा आशयाचे वक्तव्य ट्रम्प यांनी केल्याने कमोडिटी बाजारातील अस्थिरतेला किरकोळ दिलासा मिळाला. दरम्यान डॉलरच्या निर्देशांकातही मोठी वाढ झाली असल्याने सोन्याच्या निर्देशांकात दबाव कमी झाला. दुसरीकडे युएस बाजारातील तिसऱ्या तिमाहीतील आर्थिक आकडेवारी अपेक्षेहून अधिक पातळीवर वाढल्याने बाजारातील आत्मविश्वास वाढला गेला होता. यासह गोल्ड फ्युचर निर्देशांकातील व्यापारही मर्यादित झाल्याने मागणी घसरली. यासह युएस बाजारातील फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपातीत संमिश्र मतप्रवाह असताना तिसऱ्या मजबूत जीडीपी आकडेवारीमुळे पुन्हा दरकपातीचे वेध गुंतवणूकदारांना लागले आहे. ए आय तंत्रज्ञानाच्या शेअरने चांगली कामगिरी केल्यानंतर कमोडिटीतील अस्थिरता तूर्तास कमी झाली.१९७९ नंतर सोन्याने सर्वोच्च पातळी गाठल्यानंतर सोने कालपर्यंत ७०% अधिक पातळीवर इयर टू डेट (YTD) व्यवहार करत होते. तिसऱ्या तिमाहीत अमेरिकेची आर्थिक वाढ लवचिक राहिली असून जीडीपी (सकल देशांतर्गत उत्पादन Gross Domestic Product) मागील कालावधीपेक्षा अधिक वेगाने वाढले असताना लेबर मार्केटमध्ये (श्रम बाजाराच्या) निर्देशकांनी नोकरी निर्मिती सुरू असल्याचे मात्र हळूहळू मंदावत असल्याचे संकेत दिले. धोरणकर्त्यांमध्ये मतभेद असूनही महागाई कमी होत असल्याने आणि रोजगाराची परिस्थिती नरमल्याने, बाजारपेठा २०२६ मध्ये दोन व्याजदर कपातीची शक्यता गृहीत धरत आहेत.अमेरिकेने व्हेनेझुएलाशी संबंधित तेल टँकरवर नाकेबंदी केल्यानंतर भूराजकीय जोखमींमुळे सुरक्षित गुंतवणुकीच्या मागणीला आणखी चालना मिळाली असून देखील बाजारातील गुंतवणूकीला काही काळ स्थैर्यता मिळाली असून गुंतवणूकदारांनी ईटीएफ व सोन्याच्या गुंतवणूकीत आपले नफा बुकिंग देखील वाढवले आहे.चांदीच्या दरातही मोठी घसरण कायम !चांदीच्या दरातही आज मोठी घसरण झाली आहे. 'गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार चांदीच्या प्रति ग्रॅम दरात आज ४ रूपयांनी, तर प्रति किलो दरात ४००० रुपयांनी घसरण झाली आहे. त्यामुळे प्रति ग्रॅम दर २५८ तर प्रति किलो दर २५८००० पातळीवर स्थिरावला आहे. आज चांदीत मोठी घसरण होऊनसुद्धा चांदीने आपली २५५००० पातळी कायम राखण्यासाठी यश मिळवले आहे. मोठ्या प्रमाणात दरकपातीच्या वाढलेल्या शक्यता जाग्या झाल्या असताना दुसरीकडे सुधारित जीडीपी आकडेवारीमुळे गुंतवणूकदारांनी सिल्वर स्पॉट व्यवहारात घसरण केली असल्याचे दिसून येत आहे. सोन्याप्रमाणे डॉलर निर्देशांकात वाढ झाल्याने चांदीतील दबाव कमी झाला आहे.मात्र भूराजकीय तणावामुळे बाजारातील भावनांना आणखी पाठिंबा मिळाला असताना अमेरिकेने निर्बंध घातलेल्या व्हेनेझुएलाच्या तेल टँकरवर नाकेबंदी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पहाटेपर्यंत चांदीतही दबाव कायम होता मात्र १ तासात उच्चांकी पातळीवरून चांदीने २१००० ते २२००० रूपये प्रति किलो घसरण केली होती. चांदीतील अस्थिरता मोठ्या प्रमाणात वाढली असल्याने हा पट्टा चांदीला बसला आहे. कमोडिटी बाजारात जोखीम वाढली असताना व्यवहार व मागणी कमी झाल्याने पुन्हा एकदा चांदीचे दर स्थिरावले आहेत. या वर्षात आतापर्यंत, चांदीच्या किमतीत जवळपास १४९% वाढ झाली आहे ज्याला पुरवठ्यातील संरचनात्मक कमतरता, मजबूत औद्योगिक मागणी आणि अमेरिकेने त्याला एक महत्त्वपूर्ण खनिज म्हणून घोषित करणे या घडामोडींमुळे चांदीला आज सपोर्ट लेवल मिळाली आहे. यासह आणखी एक परिणामकारक घडामोड म्हणजे चीन बाजारातील चांदीचा साठा एका दशकातील नीचांकी पातळीवर पोहोचल्याने पुरवठ्यासंबंधीच्या चिंता अधिक तीव्र झाल्या आहेत.अखेरच्या सत्रात मुंबईसह भारतातील प्रमुख शहरातील चांदीचे प्रति १० ग्रॅम सरासरी दर २५८० प्रति किलो दर २५८००० रूपयांवर पोहोचले आहेत. भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये चांदीच्या निर्देशांकात संध्याकाळपर्यंत २.५९% घसरण झाल्याने दरपातळी २३३५७५ पातळीवर घसरण झाली.
आजचे Top Stock Picks: मोतीलाल ओसवालकडून 'हे'२ शेअर खरेदी करण्याचा गुंतवणूकदारांना सल्ला
प्रतिनिधी: मोतीलाल ओसवाल फायनांशियल सर्विसेसने दोन शेअर खरेदीचा सल्ला दिला आहे. जाणून घेऊयात आजचे ब्रोकरेजच्या मते, कुठले शेअर गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर ठरतील ते पुढीलप्रमाणे -१) Coforge - कोफोर्ज शेअरला ब्रोकरेजने बाय कॉल दिला असून १६७३ रूपये प्रति शेअर या सामान्य खरेदी किंमतीसह (Common Market Price CMP) ४९% अपसाईड हा शेअर जाऊ शकतो म्हणजेच उसळू शकतो असे ब्रोकरेजने म्हटले असल्याने त्यांनी २५०० रूपये प्रति शेअर लक्ष्य किंमत (Target Price TP) या शेअरला दिली आहे.ब्रोकरेजच्या मते या शेअर्समध्ये का वाढ अपेक्षित?ब्रोकरेजने विश्वास व्यक्त करत म्हटले आहे की कोफोर्जची मजबूत कार्यान्वित ऑर्डर बुक आणि विविध क्षेत्रांमध्ये ग्राहकांचा वाढलेला लवचिक खर्च (Flexibile Expenditure) त्याच्या सेंद्रिय व्यवसायासाठी शुभ संकेत आहे. या अधिग्रहणामुळे कोफोर्जची हाय-टेक आणि हेल्थकेअर क्षेत्रांमधील उपस्थिती विस्तारली आहे, तथापि आम्ही अद्याप एन्कोराचे आकडे आमच्या मूल्यांकनात समाविष्ट केलेले नाहीत. आम्ही कोफोर्जला एक संरचनात्मकदृष्ट्या मजबूत मध्यम-स्तरीय कंपनी म्हणून पाहतो, जी विक्रेता एकत्रीकरण/खर्च कपातीचे सौदे आणि डिजिटल परिवर्तनाचा फायदा घेण्यासाठी सुस्थितीत आहे. आम्ही कोफोर्जचे मूल्यांकन ३२ पट (संभाव्य घट विचारात घेऊन) आर्थिक वर्ष २०२८ (FY28E) ईपीएस (EPS) नुसार करतो ज्याचे लक्ष्य किंमत २५०० रूपये प्रति शेअर आहे, जे ४९% संभाव्य वाढ दर्शवते.आम्ही खरेदीची शिफारस कायम ठेवतो.२) Apollo Tyres- अपोलो टायर्स कंपनीच्या शेअरला ५०६ रूपये सीएमपीसह बाय कॉल दिला असून ब्रोकरेज मते हा शेअर १९% अपसाईड वाढीने उसळले असे म्हटले आहे. त्यामुळे कंपनीने लक्ष्य किंमत ६०० रूपये प्रति शेअर इतकी निश्चित केली आहे.ब्रोकरेजच्या मते या शेअर्समध्ये का वाढ अपेक्षित?भारतातील मागणी उत्साहवर्धक असली तरी, युरोपमध्ये ती मंदच राहिली आहे. दुसरीकडे, नजीकच्या काळात भारतातील प्रचारावरील खर्चामुळे नफ्याच्या वाढीवर मर्यादा येण्याची शक्यता आहे. एन्शेडे येथील पुनर्रचनेमुळे आर्थिक वर्ष २०२७ (FY27) च्या दुसऱ्या सहामाहीपासून नफ्यात फायदा होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे, आम्ही सुधारित आधारावर आर्थिक वर्ष २५-२८ (FY25-28E) या काळात कंपनीच्या (APTY) च्या कमाईमध्ये २२% सीएजीआर (Compound Annual Growth Rate CAGR) वाढीचा अंदाज लावत आहोत. १६.३x/१४.३ FY27E/FY28E चे मूल्यांकन आकर्षक दिसत आहे, विशेषतः प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या तुलनेत आम्ही APTY साठी आमचे 'बाय' रेटिंग कायम ठेवत आहोत आणि लक्ष्य किंमत ६०० रुपये (१८x सप्टेंबर'२७E एकत्रित ईपीएस (Earning per share EPS नुसार मूल्यांकित) निश्चित करत आहोत.
पॅन-आधार लिंक नसेल तर काय होईल? जाणून घ्या सविस्तर माहिती
मुंबई : आजकाल आधारकार्ड आणि पॅनकार्ड याचा वापर सर्वच लहान मोठ्या आर्थिक कामात केला जातो. बँक खात्यांपासूनन ते शेअर बाजार, म्युचल फंड, आणि केवायसी अप्र्यन्त प्रत्येक ठिकाणी पण कार्ड आवश्यक आहेच. त्याचबरोबर आधार कार्डही हा सरकारी आणि वैयक्तिक कामाचा एक महत्वाचा भाग बनला आहे. याच कारणास्तव, सरकारने पॅनकार्डला आधाराशी लिंक करणे आवश्यक केले आहे.पॅनकार्ड आधारकार्डशी लिंक करण्याची शेवटची तारीखजर तुमचे पॅनकार्ड अद्याप आधारशी लिंक नसेल, तर तुमच्याकडे आता फारसा वेळ शिल्लक नाही. सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे की ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत पॅन आणि आधार लिंक करणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया वेळेत पूर्ण न केल्यास १ जानेवारी २०२६ पासून अनेक महत्त्वाची आर्थिक कामे अडचणीत येऊ शकतात.पॅन आधार लिंक आवश्यकइनकम टॅक्स वेबसाइटनुसार १ जुलै २०१७ किंवा त्यापूर्वी पॅन मिळवणाऱ्याना आधारही लिंक करणे बंधनकारक आहे, ही सुविधा सर्व वैयक्तिक करदात्यांसाठी उपलब्ध आहे मग ते ई फायलिंग पोर्टलवर नोंदणीकृत असोत किंवा नसोत. नवीन पॅनसाठी आधार-आधारित पडताळणी आधीच आवश्यक आहे.पॅन-आधार कसा जोडायचा, शिकण्याचा सोपा मार्ग पॅन आणि आधार लिंक करण्यासाठी तुम्हाला इन्कम टॅक्स ई-फायलिंग पोर्टलवर जावे लागेल. तिथे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला प्रोफाइल सेक्शनमध्ये आधार लिंक करण्याचा पर्याय मिळेल. येथे तुम्हाला पॅन आणि आधार क्रमांक टाकून पुढे जावे लागेल आणि ई-पे टॅक्सद्वारे निश्चित शुल्क भरावे लागेल. पैसे भरल्यानंतर पोर्टलला भेट देऊन आधार आणि पॅन लिंक करता येईल. पॅन-आधार लिंक स्टेटस कसे तपासावे तुम्हाला पॅन आधारशी लिंक आहे की नाही हे माहित नसेल तर घाबरण्याची गरज नाही. इनकम टॅक्स वेबसाइटवर आधार स्टेटस लिंक करण्याच्या पर्यायावर जा आणि पॅन आणि आधार क्रमांक प्रविष्ट करा. सबमिट करताच स्टेटस स्क्रीनवर दिसेल. येथे आपण तीनपैकी एक संदेश पाहू शकता: दुवा दिलेला, दुवा साधलेला नाही किंवा सध्या प्रक्रियेत आहे.पॅन आणि आधार तपशील जुळत नसल्यास काय करावे?अनेक वेळा नाव, जन्मतारीख किंवा लिंगाच्या फरकामुळे लिंक करण्यात अडचण येते. अशा परिस्थितीत, यूआयडीएआयच्या संकेतस्थळाला भेट देऊन आधारचा तपशील दुरुस्त केला जाऊ शकतो. पॅन माहिती दुरुस्त करण्यासाठी प्रोटीन किंवा यूटीआयआयटीएसएल वेबसाइटचा वापर केला जाऊ शकतो. जर अद्याप समस्या असेल तर जवळच्या पॅन सर्व्हिस सेंटरवर बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन केले जाऊ शकते.
‘या’अटीवरच आईने लग्न करण्यास परवानी दिली; अक्षयच्या पत्नीचा वाढदिवसाच्या दिवशी मोठा खुलासा
Twinkle Khanna : बॅालिवूड अभिनेता अक्षय कुमार चित्रपटांमुळे प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसतो. मात्र, त्याची पत्नी अभिनेत्री ट्विंकल खन्ना चित्रपटात दिसत नाही. अक्षयसोबत लग्न केल्यानंतर अभिनेत्रीने आपला सिनेप्रवास थांबवला आणि मोर्चा लेखनाकडे वळवला. तिने लिहिलेली काही पुस्तके खूप लोकप्रिय झाली आहेत. अनेकांची ती आवडती लेखिका झाली आहे. ट्विंकने १९९५ मध्ये बरसात या चित्रपटातून बॅालिवूड इंडस्ट्रीत पदार्पण […] The post ‘या’ अटीवरच आईने लग्न करण्यास परवानी दिली; अक्षयच्या पत्नीचा वाढदिवसाच्या दिवशी मोठा खुलासा appeared first on Dainik Prabhat .
Unnao Rape Case। भाजपचे हकालपट्टी केलेले नेते आणि माजी आमदार कुलदीप सिंह सेंगर यांच्या शिक्षेला स्थगिती देण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. पीडितेच्या कुटुंबाने आता या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. पीडितेच्या कुटुंबाने सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले. पीडितेच्या आईने न्यायालयाचे आभार मानले. पीडितेच्या आईने न्यायालयाचे आभार मानत, “त्यांना फाशी देण्यात यावी. तुम्ही गरिबांना हाकलून लावत […] The post कुलदीप सिंग सेंगरच्या शिक्षेला स्थगितीनंतर पीडित कुटुंबाची पहिली प्रतिक्रिया समोर ; वाचा काय म्हणाले ? appeared first on Dainik Prabhat .
‘किरण राव’ची झाली शस्त्रक्रिया; फोटो शेअर करत डॅाक्टरांचे मानले आभार, नेमकं काय झालं होतं?
Kiran Rao : अभिनेता आमिर खानची एक्स पत्नी किरण रावला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिच्यावर नुकतीच शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. सोशल मीडियावर याबद्दलची एक पोस्टही तिने शेअर केली आहे. या पोस्टमध्ये किरणने स्वतःचे फोटो शेअर केले आहेत. किरण रावची अपेंडिक्स सर्जरी करण्यात आली आहे. किरण रावने हॉस्पिटलमधून तिचे हेल्थ अपडेट्स पोस्टद्वारे शेअर केले आहेत. […] The post ‘किरण राव’ची झाली शस्त्रक्रिया; फोटो शेअर करत डॅाक्टरांचे मानले आभार, नेमकं काय झालं होतं? appeared first on Dainik Prabhat .
तळीरामांची मज्जाच मज्जा; अवघ्या १८ रुपयांत बिअर, जाणून घ्या कुठे मिळेल ?
व्हिएतनाम : नववर्षाच्या स्वागतासाठी देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. नववर्षाच्या पूर्वसंध्येला पार्टी, सेलिब्रेशन आणि मित्रमंडळींसोबत जल्लोषाची तयारी सुरू झाली आहे. या सगळ्यात बिअरप्रेमींची संख्या मोठी असते. मात्र, गेल्या काही काळात बिअरच्या किमतींमध्ये झालेल्या वाढीमुळे अनेकांच्या खिशावर ताण आला आहे. अशातच नववर्षाआधी तळीरामांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. अवघ्या १८ ते २५ रुपयांत बिअरचा आस्वाद घेता येतो, असं ऐकल्यावर अनेकांना आश्चर्य वाटेल. मात्र हे शक्य आहे आणि तेही एका विशिष्ट देशात.जगातील अनेक देशांमध्ये मद्यावर मोठ्या प्रमाणात कर आकारला जातो. मात्र व्हिएतनाममध्ये याचं चित्र पूर्णपणे वेगळं आहे. व्हिएतनाममध्ये स्थानिक पातळीवर तयार केली जाणारी ‘बिया होई’ नावाची बिअर जगातील सर्वात स्वस्त बिअर मानली जाते. विशेष म्हणजे या देशात पिण्याच्या पाण्याच्या बाटलीची किंमत साधारण १०० रुपयांच्या आसपास असते, तर बिअरचा एक ग्लास अवघ्या १८ ते २५ रुपयांना मिळतो. त्यामुळे इथे पाण्यापेक्षा बिअर स्वस्त असल्याचे चित्र पाहायला मिळते.‘बिया होई’ ही बिअर प्रामुख्याने तांदळापासून तयार केली जाते. या बिअरमध्ये अल्कोहोलचे प्रमाण फक्त २ ते ३ टक्के इतके असते. ही बिअर बाटल्यांमध्ये पॅक न करता थेट पिंपातून विकली जाते, हे तिचे खास वैशिष्ट्य आहे. महत्त्वाचे म्हणजे सरकारकडून या बिअरवर कोणताही अतिरिक्त कर आकारला जात नाही. उत्पादन खर्च कमी आणि स्थानिक विक्रीवर भर असल्यामुळे तिची किंमत अत्यंत कमी राहते. ही बिअर दररोज ताजी तयार करून लगेच विकली जाते. त्यामुळे व्हिएतनामला भेट देणाऱ्या पर्यटकांनी या बिअरला पहिली पसंती दिली आहे.दरम्यान, मद्याच्या किमतींचा विचार केला तर कतार, आइसलँड आणि नॉर्वे यांसारख्या देशांमध्ये मद्यावर कडक निर्बंध आणि जड कर आहेत. कतारमध्ये एका पिंट बिअरसाठी साधारण ९३० ते ११०० रुपये मोजावे लागतात. याउलट व्हिएतनाम, मेक्सिको आणि जमैका यांसारख्या देशांनी पर्यटनाला चालना देण्यासाठी मद्याचे दर तुलनेने कमी ठेवले आहेत. भारतातही गोव्यात मद्यावर अत्यल्प कर असल्यामुळे तिथे बिअर स्वस्त मिळते. त्यामुळे नववर्षाच्या काळात गोव्यात तळीरामांची मोठी गर्दी पाहायला मिळते.
Supreme Court on Aravalli Range। अरवली प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने मोठा हस्तक्षेप करत २० नोव्हेंबरच्या आपल्याच आदेशाला स्थगिती दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार, दिल्ली, राजस्थान, हरियाणा आणि गुजरात सरकारला नोटीसा बजावल्या आहेत. पुढील सुनावणीपर्यंत समितीच्या शिफारशी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. तसेच उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचे निर्देश देखील दिले आहेत. सर्वोच्च न्यायालय २१ जानेवारी रोजी या […] The post अरवली प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडून स्वतःच्या निर्णयाला स्थगिती ; “खाणकाम थांबेल की सुरू राहील?”, सरकारला केला सवाल appeared first on Dainik Prabhat .
'एसटी सोबत, स्वस्त सफर'! सुट्ट्यांसाठी एसटी महामंडळाची खास ऑफर, जाणून घ्या सविस्तर
मुंबई: ख्रिसमस आणि नववर्षाच्या सुट्टांसाठी तुमच्याकडे परवडणारा प्लॅन नाही म्हणून तुम्ही घरी बसून आहात का? तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण एसटी महामंडळाने फिरणाऱ्या हौशींसाठी खास घोषणा केली आहे. ज्यात 'पैसे कमी, प्रवास जास्त' अशी मस्त ऑफर आहे. सुट्टी म्हणजे फक्त घरात बसून झोपा काढणे नाही, तर अनुभवांची शिदोरी जमवणे असते. हेच ओळखून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळानं पुन्हा एकदा ‘आवडेल तिथे प्रवास’ ही खास योजना जाहीर केलीय. या योजनेत प्रवाशांना चार किंवा सात दिवस महाराष्ट्रातच नाही, तर परराज्यातही एसटीने मुक्तपणे प्रवास करता येणार आहे. यापूर्वी एसटी महामंडळाने ही योजना दिवाळी सुट्ट्यांमध्ये आणली होती. या योजनेतील खास गोष्ट म्हणजे प्रवासासाठी लागणारे पासचे दर मोठ्या प्रमाणात कमी करण्यात आलेत. ही योजना साध्या बसपासून शिवशाही आणि ई-शिवाईपर्यंत सर्वांना लागू आहे.महामंडळाच्या या योजनेत ५ ते १२ वर्षांच्या मुलांना ५० टक्के सवलत, तर तरुण वयोगटासाठी ६० ते ७५ टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात आली आहे. चार दिवसांच्या पाससाठी प्रौढांसाठी दरही ठरलेत. ज्यातून दिसून येते की दरात किती कपात केली आहे. प्रौढांसाठी साध्या बसचा जुना दर आहे १,८१४ तर नवीन दर आहे १,३६४ रुपये. शिवशाही बसचा जुना दर २,५३३ तर नवीन दर आहे १,८१८ रुपये. ई- शिवाई जुना बस दर आहे २,८६१ तर नवीन दर आहे २,०७२ इतका. तर ५ ते १२ वर्षांपर्यंतच्या मुलांसाठीचे प्रवास दरही ठरले आहेत. लहानग्यांसाठी साध्या बसचा जुना दर ९१० असून नवीन दर ६८५ रुपये आहे. तर शिवशाही बसचा जुना दर १२६९ असून नवीन दर ९११ रुपये आहे. तसेच ई- शिवाई बसचा जुना दर १,४३३ होता आणि योजनेमध्ये तो १,०३८ झाला आहे.https://prahaar.in/2025/12/29/the-uddhav-thackeray-group-has-given-ab-forms-to-42-candidates/सात दिवसांच्या साध्या बसपाससाठी प्रौढांना जुना दर ३,१७१ होता. तर नवीन दर २,६३८ रुपये इतका आहे. शिवशाही बसचा जुना दर ४,४२९ तर नवीन दर ३,१७५ रुपये आहे. ई- शिवाई बसचा जुना दर ५,००३ तर नवीन दर ३,६१९ रुपये आहे. तर ५ ते १२ वर्षांपर्यंतच्या मुलांना सात दिवसांसाठी साध्या बसचा जुना दर १,५८८ तर नवीन दर १,१९४ रुपये असून शिवशाही बसचा जुना दर २,२१७ रुपये, तर नवीन दर १,५९० रुपये इतका आहे. तसेच ई- शिवाई बसचा जुना दर २,५०४ तर नवीन दर १,८१२ रुपये इतका आहे.ही योजना म्हणजे फक्त सवलत नाही, तर लोकांना प्रवासाकडे पुन्हा वळवण्याचा एसटीचा सकारात्मक प्रयत्न आहे. तेव्हा सुट्टी मोजा आणि एसटीसोबत ‘आवडेल तिथे प्रवासा’च्या तयारीला लागा. कारण आता फिरणे लक्झरी नाही तर परवडणारे झाले आहे.
ठाण्यात राज ठाकरेंचे मनसैनिक निवडणुकीच्या रिंगणात; मनसेची पहिली यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
Thane Municipal Corporation Election : आज सकाळपासूनच मुंबईसह राज्यातील महत्वाच्या सर्वच महापालिकांच्या उमेदवारांच्या नावांच्या याद्या समोर येत आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असल्याने राजकीय पक्षांनी उमेदवारांना एबी फॅार्मचे वाटप सुरू केले आहे. ठाण्यात महाविकास आघाडी म्हणून राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मनसैनिक मैदानात उतरविण्याचे ठरवले असून, ठाणे महापालिकेसाठी मनसेने उमेदवारांची […] The post ठाण्यात राज ठाकरेंचे मनसैनिक निवडणुकीच्या रिंगणात; मनसेची पहिली यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी? appeared first on Dainik Prabhat .
इंडोनेशियात नर्सिंग होमला भीषण आग ; आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू
Indonesia Nursing Home Fire। इंडोनेशियातील एका नर्सिंग होममध्ये भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये १६ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. तपास पथके सध्या घटनास्थळी दाखल झाली असून कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. स्थानिक अधिकाऱ्यांनी याविषयी माहिती दिली. याविषयी बोलताना अधिकाऱ्यांनी,”इंडोनेशियन पोलिस उत्तर सुलावेसी प्रांताची राजधानी असलेल्या मनाडो […] The post इंडोनेशियात नर्सिंग होमला भीषण आग ; आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू appeared first on Dainik Prabhat .
उबाठा गटाने ४२ जणांना दिले एबी फॉर्म
मुंबई: महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. आता दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकांसाठी राजकीय पक्षांची तयारी सुरू आहे. ज्यात राज्यातील महानगर पालिकांसाठी १५ जानेवारी, २०२६ साठी मतदान होणार असून १६ जानेवारीला निकाल लागणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारांना अर्ज करण्यासाठी ३० डिसेंबर ही शेवटची तारीख आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांनी बैठकांचा सपाटा लावला असून हळूहळू उमेदवार जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. ज्यात काहीवेळा पूर्वी भाजपने मुंबई महानगरपालिकेसाठी पहिली यादी जाहीर केली होती. तर आता शिउबाठाने ४२ जणांना एबी फॉर्म देत उमेदवार निश्चित केले आहेत.ठाकरे सेनेकडून मुंबईत एबी फॉर्म देण्यात आलेल्या उमेदवारांची यादी :१) प्रभाग क्रमांक ३ – रोशनी गायकवाड२) प्रभाग क्रमांक २९ – सचिन पाटील३) प्रभाग क्रमांक ४० – सुहास वाडकर४) प्रभाग क्रमांक ४९ – संगीता सुतार५) प्रभाग क्रमांक ५४ – अंकित प्रभू६) प्रभाग क्रमांक ५७ – रोहन शिंदे७) प्रभाग क्रमांक ५९ – शैलेश फणसे८) प्रभाग क्रमांक ६० – मेघना विशाल काकडे माने९) प्रभाग क्रमांक ६१ – सेजल दयानंद सावंत१०) प्रभाग क्रमांक ६२ – झीशान चंगेज मुलतानी११) प्रभाग क्रमांक ६३ – देवेंद्र (बाळा) आंबेरकर१२) प्रभाग क्रमांक ६४ – सबा हारून खान१३) प्रभाग क्रमांक ६५ – प्रसाद आयरे१४) प्रभाग क्रमांक ८९ – गितेश राऊत१५) प्रभाग क्रमांक ९३ – रोहिणी कांबळे१६) प्रभाग क्रमांक ९५ – हरी शास्त्री१७) प्रभाग क्रमांक १०० – साधना वरस्कर१८) प्रभाग क्रमांक १०५ – अर्चना चौरे१९) प्रभाग क्रमांक १११ – दीपक सावंत२०) प्रभाग क्रमांक ११७ – श्वेता पावसकर२१) प्रभाग क्रमांक ११८ – सुनीता जाधव२२) प्रभाग क्रमांक १२० – विश्वास शिंदे२३) प्रभाग क्रमांक १२३ – सुनील मोरे२४) प्रभाग क्रमांक १२४ – सकीना शेख२५) प्रभाग क्रमांक १२७ – स्वरूपा पाटील२६) प्रभाग क्रमांक १३७ – महादेव आंबेकर२७) प्रभाग क्रमांक १३८ – अर्जुन शिंदे२८) प्रभाग क्रमांक १४१ – विठ्ठल लोकरे२९) प्रभाग क्रमांक १४२ – सुनंदा लोकरे३०) प्रभाग क्रमांक १४८ – प्रमोद शिंदे३१) प्रभाग क्रमांक १५० – सुप्रदा फातर्फेकर३२) प्रभाग क्रमांक १५५ – स्नेहल शिवकर३३) प्रभाग क्रमांक १५६ – संजना संतोष कासले३४) प्रभाग क्रमांक १६४ – साईनाथ साधू कटके३५) प्रभाग क्रमांक १६७ – सुवर्णा मोरे३६) प्रभाग क्रमांक १६८ – सुधीर खातू वार्ड३७) प्रभाग क्रमांक २०६ – सचिन पडवळ३८) प्रभाग क्रमांक २०८ – रमाकांत रहाटे३९) प्रभाग क्रमांक २१५ – किरण बालसराफ४०) प्रभाग क्रमांक २१८ – गीता अहिरेकर४१) प्रभाग क्रमांक २२२ – संपत ठाकूर४२) प्रभाग क्रमांक २२५ – अजिंक्य धात्रक
डिफेन्स व मरीन शेअर्समध्ये आज वाढ 'या'प्रमुख दोन कारणांमुळे!
मोहित सोमण: सकाळच्या सत्रात डिफेन्स स्टॉक्समध्ये तुफान वाढ झाली आहे. सकाळी सत्राच्या सुरुवातीलाच संरक्षण क्षेत्रातील शेअर उसळल्याने निफ्टी डिफेन्स इंडेक्स थेट १% उसळला होता. दुपारी १२.१९ वाजेपर्यंत ०.२०% उसळत ७७९५.९० पातळीवर व्यवहार करत आहे. प्रसारमाध्यमांनी आज डीएससी बैठक होणार असल्याचे वृत्त दिल्याने आज शेअर बाजारात संरक्षण कंपनीच्या शेअर्समध्ये वातावरण निर्मिती झाली आहे. त्यामुळे आज या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. डीएसी (Defence Acquisition Council DAC) काऊन्सिलची बैठक केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत झाली आहे. आगामी धोरणात्मक निर्णय म्हणून येणाऱ्या भूराजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर संरक्षण खरेदीत मोठ्या प्रमाणात वाढ करण्याचे ठरवले गेल्याने या कंपन्यांना मोठ्या प्रमाणात ऑर्डर मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या बैठकीत ८०००० कोटींच्या या डीलला मान्यता दिली गेल्याचे प्रसारमाध्यमांनी सांगितले.गेल्या दोन महिन्यांपासून डिफेन्स इंडेक्सने चांगल्या प्रमाणात रिकव्हरी केल्याचे आपण पाहिले होते. आगामी बैठकीत यावर अंतिम मोहोर लागेल. याशिवाय पायाभूत सुविधा उभारणीसाठी शिपबिल्डिंग कंपनीच्या शेअर्समध्येही आज मोठ्या प्रमाणात वाढ झाली. प्रामुख्याने घरगुती मरिन इंडस्ट्रीजला मोठ्या प्रमाणात चालन देण्यासाठी सरकारने ४४७०० कोटींच्या योजनेला मान्यता दिल्याने भारतातील लॉजिस्टिक्स परिसंस्थेला (Logistics Ecosystem) अप्रत्यक्षपणे फायदा होणार आहे.सकाळच्या सत्रात डिफेन्स व मरिन शेअर असलेल्या माझगाव डॉकचा शेअर ३% पेक्षा अधिक प्रमाणात तर भारत डायनामिक्स २%, हिंदुस्थान एरोनॉटिक्स (१%), स्वान डिफेन्स अँड हेवी इंडस्ट्रीज (५%), कोचीन शिपयार्ड (१%) या शेअर्समध्ये चांगली वाढ झाली आहे. दरम्यान डेटा पँटर्न, सोलार इंडस्ट्रीज इंडिया,पारस डिफेन्स या शेअर्समध्ये किरकोळ घसरण किंबहुना दुपारपर्यंत घसरण झाली आहे. तर दुसऱ्या घडामोडीत मरिन इंडस्ट्रीजला सरकारने मोठ्या प्रमाणात चालना दिल्यामुळे शेअरला मोठा फायदा झाला.परवा बंदर, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाने (MoPSW) शनिवारी विकासनिधीची घोषणा केली होती जहाजबांधणीचे दोन प्रमुख उपक्रम हाती घेणार आहे ते म्हणजे जहाजबांधणी वित्तीय सहाय्य योजना (SBFAS) आणि जहाजबांधणी विकास योजना (SbDS) असून जहाजबांधणी वित्तीय सहाय्य योजनेअंतर्गत, सरकार प्रत्येक जहाजासाठी १५-२५% पर्यंत आर्थिक सहाय्य देण्यासाठी सुमारे २४७३६ कोटी रुपये खर्च करेल अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.१९८९८ कोटी रुपयांच्या खर्चासह जहाजबांधणी विकास योजना, संस्थांना दीर्घकालीन क्षमता निर्माण करण्यास मदत करेल. ही योजना कंपन्यांना ग्रीनफिल्ड जहाजबांधणी प्रकल्प बांधण्यासाठी तसेच विद्यमान ब्राउनफिल्ड प्रकल्पांचा विस्तार आणि सुधारणा करण्यासाठी मदत करेल.याविषयी आणखी अधिकृत निवेदनात दरम्यान, 'एसबीडीएस अंतर्गत, ग्रीनफिल्ड जहाजबांधणी क्लस्टर्सना सामान्य समुद्री कंपन्यांसाठी १००% भांडवली आधार मिळेल' असे म्हटले आहे.सरकारने प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोद्वारे दिलेल्या माहितीनुसार, ही योजना लहान सामान्य, मोठ्या सामान्य आणि विशेष जहाजांसाठी श्रेणीबद्ध सहाय्य प्रदान करते. या योजनेत जहाजबांधणी उपक्रमातून रचनात्मक सुधारणा करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय जहाजबांधणी मिशनची स्थापना करण्याची तरतूद आहे. ही योजना कंपन्यांना नवीन ग्रीनफिल्ड जहाजबांधणी प्रकल्प उभारण्यासाठी तसेच विद्यमान ब्राऊनफिल्ड प्रकल्पांच्या विस्तार आणि सुधारणेसाठी सहाय्य प्रदान करणार आहे. त्यामुळे या मरिन व हेवी इंडस्ट्रीज शेअर्समध्ये आज वाढ झाली आहे. सकाळच्या सत्रात १% पेक्षा वाढलेला गार्डनरीच शीप बिल्डर्स मात्र दुपारनंतर किरकोळ घसरला आहे.
प्रभासने केलं संजय दत्तच तोंडभरून कौतुक; ‘ती’आठवण शेअर करत म्हणाला “चित्रपटाच्या डबिंगच्या वेळी…”
Prabhas : दाक्षिणात्य अभिनेता प्रभासच्या हॉरर-फँन्टसी ‘द राजा साब’ चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकताच चित्रपटाच्या निमित्ताने हैदराबाद इथे आयोजित कार्यक्रमात अभिनेता प्रभासने बॅालिवूड अभिनेता संजय दत्तचे तोंडभरून कौतुक केले. या कार्यक्रमाला बॅालिवूड अभिनेत्री निधी अग्रवाल देखील उपस्थित होती. हैदराबादमध्ये झालेल्या चित्रपटाच्या प्री-रिलीज कार्यक्रमात सुपरस्टार प्रभास चित्रपटाविषयी बोलत असताना त्याने संजय दत्तचे कौतुक केले. […] The post प्रभासने केलं संजय दत्तच तोंडभरून कौतुक; ‘ती’ आठवण शेअर करत म्हणाला “चित्रपटाच्या डबिंगच्या वेळी…” appeared first on Dainik Prabhat .
सर्वोच्च न्यायालयाकडून कुलदीप सेंगरला मोठा झटका ; दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती
Supreme Court on Unnao Rape Case। उन्नाव बलात्कार प्रकरणातील आरोपी माजी आमदार कुलदीप सिंह सेंगर यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. न्यायालयाने दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने नुकतीच त्यांची शिक्षा स्थगित केली होती. मात्र, त्यानंतरही सेंगर तुरुंगातून बाहेर येऊ शकलेले नाहीत. कारण सेंगर बलात्कार पीडितेच्या वडिलांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा […] The post सर्वोच्च न्यायालयाकडून कुलदीप सेंगरला मोठा झटका ; दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती appeared first on Dainik Prabhat .
'नवीन वर्षासाठी राजकारण्यांसाठी पार्टी आयोजित करतो. देशी, विदेशी मुलींसोबत मनोरंजनाची पूर्ण व्यवस्था असते. ते असेच दरवेळी आमची आठवण काढत नाहीत. त्यांनाही माहीत आहे की, आम्ही त्यांच्या आवडीनुसार सर्व काही देतो. तुम्हालाही राजकारण्यांसाठी मुली हव्या असतील तर मिळतील. आमच्याकडे सुरक्षा रक्कम जमा करा, मग त्या २४ तासांसाठी तुमच्या असतील. तुम्ही काहीही करा, कोणतीही मनाई नसेल, न्यूड डान्ससोबत मजा करून देऊ. फक्त सुरक्षिततेची जबाबदारी तुमची असेल. वय, फिगर आणि सौंदर्यानुसार पैसे लागतील. ' हा दावा नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी नेत्यांसाठी मुलींची व्यवस्था करणाऱ्या एजंटचा आहे. बिहारमधील अनेक जिल्ह्यांतून माहिती मिळाल्यानंतर, भास्करच्या तपास पथकाने पाटणा ते नेपाळ सीमेपर्यंत राजकारण्यांसाठी १५० मुलींचा सौदा केला. रिपोर्टर्सनी १२ पेक्षा जास्त एजंट्सशी बोलणी केली. ज्यापैकी ६ एजंट्सनी भास्करच्या गुप्त कॅमेऱ्यावर मुलींचा सौदा केला. ऑपरेशन डर्टी सेलिब्रेशनच्या भाग-१ मध्ये राजकारण्यांचे नवीन वर्षाचे सेलिब्रेशन बघा आणि वाचा..। आम्हाला राजकारण्यांसाठी नवीन वर्षाच्या 'डर्टी सेलिब्रेशन'च्या तयारीची माहिती मिळाली. यानंतर भास्करची तपास टीम असे इव्हेंट आयोजित करणाऱ्या एजंटच्या शोधात लागली. अनेक दिवसांच्या तपासानंतर पाटणामध्ये आमची विशाल नावाच्या एजंटशी भेट झाली. विशाल नेपाळमधून मुलींना आणून पाटणा आणि मुझफ्फरपूरमध्ये पुरवठा करतो. विशालने मुलींच्या पुरवठ्याचा आणि संपूर्ण प्रणालीचा खुलासा केला. विशालने हे देखील उघड केले की तो मागणीनुसार थायलंडमधूनही मुलींना बिहारमध्ये बोलावतो. रिपोर्टर - मुली मिळतील का, नवीन वर्षासाठी राजकारण्यांसाठी हव्या आहेत? विशाल - हो, मिळतील, किती हव्या आहेत? रिपोर्टर - किती मिळतील? विशाल - माझ्याकडे सध्या 40 मिळतील. रिपोर्टर - नवीन वर्षासाठी नेत्यांसाठी वेगवेगळ्या शहरांमध्ये कार्यक्रम करायचे आहेत. विशाल - सर्व होईल, दिवसा की रात्री? मी नेत्यांसाठी यापूर्वीही पार्ट्या आयोजित केल्या आहेत, अजूनही अनेक नेत्यांचे डीलर संपर्कात आहेत. रिपोर्टर - मला तर सर्व मुली रात्रीच हव्या आहेत. विशाल - होईल, काही टेन्शन नाही. रात्री आणि दिवसा मुलींची व्यवस्था होईल. रिपोर्टर - काही समस्या येणार नाही ना? विशाल - नाही भाऊ, कधी आणि कुठे पाहिजे, तुम्ही फक्त एवढे सांगा. रिपोर्टर - रात्रीसाठी पाहिजे, पार्टी करायची आहे, मुझफ्फरपूर, मोतिहारी आणि पाटणामध्ये पाहिजे. विशाल - सगळीकडे होऊन जाईल, तिकडे बेतियामध्ये म्हणाल तर तिथेही व्यवस्था होऊन जाईल. रिपोर्टर - बेतियाला जाता का? विशाल - हो, जातो, नेपाळमधून मुली येतात, तर त्यांना आणण्यासाठी रक्सौलपर्यंत जातो. एजंट म्हणाला- जशी मुलगी तसा दर, मुली सर्व काही करतील एजंट विशालने संवादात अनेक खुलासे केले. विशालच्या मते, मुलींचा दर त्यांच्या फिगर आणि वयानुसार ठरतो. कोणत्याही दराची मुलगी घेऊन जा, तुम्हाला जे हवे ते सर्व ती करेल. तुम्ही पैसे दिले तर २४ तास ती तुमचे प्रत्येक म्हणणे ऐकेल, तुम्हाला जे काही हवे असेल ते सुरक्षिततेची काळजी घेऊन सर्व काही करेल. रिपोर्टर - मुलींचा चार्ज काय असेल? विशाल - जशी मुलगी असेल, तसा चार्ज असेल. रिपोर्टर - कुठली मुलगी असेल? विशाल - तुम्ही सांगितल्यास नेपाळची मुलगीही देऊ. रिपोर्टर - दर तर पसंतीनंतर सांगाल ना? विशाल - व्हॉट्सॲपवर फोटो पाठवून देईन, पसंतीनंतर चार्ज सांगू. रिपोर्टर - मुलींचा दर कसा ठरतो? विशाल - वय, फिगर म्हणजे जशी प्रोफाइल, तसा चार्ज असेल, जेवढी सुंदर, तेवढा चार्ज. रिपोर्टर - नेत्यांसोबत पार्टी करायला काही अडचण नाही ना? विशाल - नाही, काही अडचण नाही, तुम्ही मध्यस्थ म्हणून काम करत असाल तर काय अडचण आहे. रिपोर्टर - तुमच्या बाजूने किंवा मुलीच्या बाजूने काही अडचण तर नाही ना? विशाल - नाही नाही, मला सांगा, मी मुलीला समजावून सांगेन की तिला कसे खूश करायचे. आम्ही यापूर्वी नेत्यांकडे पाठवले आहे. विशाल - पार्टी कधी करायची आहे, दिवसा की रात्री? रिपोर्टर - दिवसा नाही, रात्रीची पार्टी आहे. विशाल - बघा, आम्ही थायलंडच्या मुलीही आणल्या होत्या, ज्यांच्या प्रत्येक कामासाठी 35 ते 40 हजार रुपये घेतले. रिपोर्टर - बघा, तेच आहे, नेत्यांना आवडायला पाहिजे. विशाल - तुम्हाला माझ्याकडून जे फ्रेश मिळेल, ते तुम्हाला संपूर्ण पाटणामध्ये कुठेही मिळणार नाही. भारतात नेपाळी मुलींचा पुरवठा करणारे एजंट तपासादरम्यान, नेपाळमधून राजकारण्यांना मुलींचा पुरवठा करणाऱ्या अनेक एजंट्सची माहिती मिळाली. नेपाळी मुलींच्या भारतात होणाऱ्या पुरवठ्याची साखळी समजून घेण्यासाठी आम्ही नेपाळ सीमेला लागून असलेल्या रक्सौलला पोहोचलो. सीमा ओलांडल्यावर आम्हाला साहिल नावाच्या एका एजंटचा नंबर मिळाला. साहिलने फोनवर बोलून काही मुलींचे फोटो पाठवले. साहिलने सांगितले की, ऑनलाइन पेमेंट करा आणि वीरगंजला जा, तिथे सर्व व्यवस्था केली जाईल. नेपाळमध्ये 100 किमी आत भास्करचा तपास साहिलशी बोलल्यानंतर आम्ही भारतीय सीमा ओलांडून रक्सौलहून नेपाळच्या वीरगंजला पोहोचलो. खूप शोध घेतल्यानंतर एका एजंटचा नंबर मिळाला. त्याने नेपाळमधील १०० किलोमीटर आत असलेल्या हेटौडा येथे बोलावले. येथे पोहोचल्यानंतर हे समजले की येथूनच बहुतेक नेपाळी मुलींना बिहारमधील रक्सौलमार्गे भारतात देहव्यापारासाठी आणले जाते. येथील मुलींना जास्त मागणी असते, कारण त्या सुंदर तर असतातच, पण मोठ्या सहजतेने त्या आपल्या अदांनी लोकांना खूशही करतात. येथे आम्हाला गोपाल नावाच्या एका एजंटबद्दल माहिती मिळाली. खूप तपासणीनंतर त्याचा मोबाईल नंबरही मिळाला. तपासात हे स्पष्ट झाले की नेपाळमधील एजंट्स अनोळखी लोकांशी लवकर कोणताही व्यवहार करत नाहीत. ते मुलींनाही अनोळखी लोकांच्या बुकिंगवर पाठवत नाहीत. म्हणून तपास पथकाने विश्वास वाढवून व्यवहार करण्याचा प्रयत्न केला. नेपाळमधील हेटौडाजवळ गोपालशी बोलल्यानंतर आम्हाला नेपाळी मुलींच्या व्यवहाराबद्दल अनेक माहिती मिळाली. नवीन वर्षासाठी नेपाळमध्येही मोठी तयारी सुरू असल्याचे समजले. भारतात बहुतेक मुलींचा पुरवठा करणारे एजंट रक्सौल सीमेवरील परिसरातच राहतात. तपासादरम्यान नेपाळमध्ये अभिषेक नावाच्या एजंटचा नंबर मिळाला, त्यानंतर भेटीत नेपाळी मुलींचा संपूर्ण व्यवहार ठरला. रिपोर्टर - (फोनवर) तुम्हाला भेटायचे आहे, कधी आणि कुठे येऊ? अभिषेक - काय काम आहे? रिपोर्टर - भेटून बोलूया का? अभिषेक - आता ये, बोलूया. रिपोर्टर - मी सध्या वीरगंजमध्ये आहे, यायला वेळ लागेल. अभिषेक - ठीक आहे, तुम्ही आरामात या, मी वाट पाहीन. (नेपाळमधील हेटौडा बस स्टँडवर रिपोर्टरची अभिषेकसोबत डील) रिपोर्टर - आम्हाला मुली हव्यात, न्यू इयर पार्टीसाठी. अभिषेक - मी समजलो, एन्जॉय करण्यासाठी आला आहात. रिपोर्टर - नाही, आम्हाला 31 तारखेच्या रात्रीसाठी अनेक मुली हव्यात. अभिषेक - काय-काय करायचं आहे? रिपोर्टर - भारतात घेऊन जायचं आहे, तिथे नेत्यांसोबत 31 तारखेला राहायचं आहे. अभिषेक - नेत्यांकडून काय काय करून घ्यायचं आहे? रिपोर्टर - न्यूड डान्स आणि एन्जॉय करायचं आहे, बाकी तुम्ही सर्व समजत असालच. अभिषेक - समजलो, नेत्यांसोबत बसायचं आहे. रिपोर्टर - अरे, बसायचं नाहीये, डान्स करायचा आहे आणि पूर्णपणे एन्जॉय करायचं आहे. अभिषेक - हो, त्यालाच बसणे म्हणतात. रिपोर्टर - सात मुली पाहिजेत, होईल ना? अभिषेक - हो, होईल, काही अडचण नाही. इथे बोलता येणार नाही, थोडं बाजूला चला. रिपोर्टर - ठीक आहे. अभिषेक - व्हॉट्सॲपवर बोलून घ्या, मुली येतील. एका रात्रीसाठी 6000 रुपये भारतीय लागतील. रिपोर्टर - चांगल्या मुली पाहिजेत, तुम्हाला माहीतच आहे राजकारण्यांची पसंती काय असते. अभिषेक - उत्तम मुली मिळतील, डोंगरावरील मुलगी मिळेल. (अभिषेकने खुणावून सांगितले) रिपोर्टर - पैसे दिले जातील, पण टॉप क्लास मुली पाहिजेत. अभिषेक - या सर्व मुली इथल्या नाहीत, डोंगरावरील आहेत, मूळच्या डोंगरावरील. रिपोर्टर - काही अडचण नाही ना, नेत्यांसोबत राहावे लागेल. अभिषेक - काही अडचण नाही, तुम्ही माझ्याशी बोला, काही अडचण येणार नाही. 9 वर्षांपासून मुलींचा व्यवहार, शेकडो नेत्यांना मजा करवली नेपाळी डोंगराळ मुलींचा व्यवहार करणारा एजंट अभिषेकने दावा केला की, तो 9 वर्षांपासून अशा मुलींचा भारतात पुरवठा करत आहे. एक-दोन नव्हे तर शेकडो नेत्यांना त्याने मजा करवली आहे. तो बऱ्याच काळापासून नेपाळच्या डोंगराळ भागातील मुलींच्या संपर्कात आहे, ज्या अनेकदा भारतात जाऊन आल्या आहेत. अभिषेकने सांगितले की, काही लोक नवीन येतात आणि पळून जातात. माझे घर तर तुम्ही पाहिलेच आहे. आपली एकदा मैत्री झाली की, पुढे कोणतीही अडचण येणार नाही. रिपोर्टर - नेत्यांकडे जाण्यात आणि न्यूड डान्समध्ये काही अडचण नाही ना? अभिषेक - अरे, काही अडचण नाही. तुम्ही पैसे दिले तर एक दिवस आणि एक रात्रीसाठी ती तुमची झाली. रिपोर्टर - म्हणजे पेमेंट केले तर 24 तासांसाठी जे हवे ते करेल ना? अभिषेक - हो, हो, होऊन जाईल, तुम्ही काय करणार. संभाषणादरम्यानच अभिषेकने सुनीता लामा नावाच्या एका मुलीला बोलावले. अभिषेकने सुनीताशी नेपाळी भाषेत बोलून आमची मागणी तिला सांगितली. सुनीताने सांगितले की, या लोकांना थांबवा, मी मुलगी दाखवून देईन. सुनीताने दावा केला की एकाहून एक सरस मुलगी देईल जी कुठेही मिळणार नाही. रिपोर्टर - आम्हाला 31 डिसेंबरच्या रात्रीसाठी 7 मुली हव्या आहेत. सुनीता - होऊन जाईल, एका रात्रीचे 7000 नेपाळी रुपये लागतील. रिपोर्टर - याशिवाय दुसरे काही द्यावे लागणार नाही ना? सुनीता - येण्या-जाण्यासाठी 2000 वेगळे द्यावे लागतील. रिपोर्टर - भाडे तर तुम्हालाच व्यवस्थापित करायला हवे. सुनीता - हे जोखमीचे काम आहे, त्यामुळे पैसे जास्त लागतीलच. रिपोर्टर - मुलींसोबत कोणी जाईल का? सुनीता - तुम्ही ॲडव्हान्स द्या, बाकी कसे जायचे ते आम्ही सांगू. रिपोर्टर - ॲडव्हान्स दिल्यानंतर काही अडचण तर येणार नाही ना? सुनीता - नाही, अभिषेकला तर माहीत आहे, भारतात व्हीआयपींसोबत इतके काम होते. रिपोर्टर - अशीच मुलगी हवी आहे जी पाहुण्यांना खूश करेल. सुनीता - अशाच मुली आहेत, तुमचे पाहुणे खूश होतील. डान्सपासून ते प्रत्येक गोष्टीत त्यांना खूश करतील. नेपाळमध्ये तपास करत असताना माहिती मिळाली की, सीमा ओलांडल्यानंतर मुलींना मुझफ्फरपूरला नेले जाते. या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी आम्ही मुझफ्फरपूरला पोहोचलो. नेपाळमध्ये आम्हाला मुझफ्फरपूरच्या चतुर्भुज स्थान येथील रहिवासी रुपेशबद्दल माहिती मिळाली होती. तो नेपाळमधील एजंट्सना भेटून मुलींची खरेदी-विक्री करतो. मुझफ्फरपूरमध्ये तासन्तास चौकशी केल्यानंतर आमची रुपेशशी भेट झाली. सुरुवातीला रुपेश बोलणे टाळत होता, पण जेव्हा त्याला सांगितले की, काही नेत्यांच्या पार्टीबद्दल चर्चा आहे, तेव्हा तो डीलसाठी तयार झाला. रुपेशने दावा केला की, त्याच्याकडे व्हीआयपी लोकांसाठी एकाहून एक सरस मुली आहेत. रिपोर्टर - 31 डिसेंबरसाठी मुलींची व्यवस्था करायची आहे? रूपेश - इथेच राहायचं आहे, की बाहेर कार्यक्रम आहे? पूर्ण रात्रीचा आहे का? रिपोर्टर - पूर्ण रात्रीचा प्लॅन आहे, पाटण्याला पाठवावं लागेल. रूपेश - नाही, पाटण्याला जाणार नाहीत, आम्ही इथेच बुक करू, इथेच मजा करा, इथे सुरक्षित आहे. रिपोर्टर - मुझफ्फरपूरमध्ये कुठे? रूपेश - इथेच आमची रूम आहे, आतमध्ये डिस्को बनत आहे, 31 तारखेची तयारी चालू आहे. रिपोर्टर - मुलींचा काय दर आहे, कशा पाठवता? रूपेश - एका मुलीचे 4 ते 5 हजार रुपये लागतील. रिपोर्टर - किती तासांचा कार्यक्रम चालेल? रूपेश - रात्रभर, खाणे-पिणे एक्स्ट्रा लागेल. रिपोर्टर - वेगळ्याने काही एक्स्ट्रासाठी काय आहे? रूपेश - जर रूम घ्यायची असेल तर एका रूमचे वेगळे 500 लागतील. रिपोर्टर - व्हीआयपी लोकांसाठी गाडीची काय व्यवस्था आहे? रूपेश - वेगळ्या ठिकाणी लपवून लावले जाईल. रिपोर्टर - म्हणजे रात्री न्यूड डान्स होईल? रूपेश - हो, होईल, इथेच सर्व काही होईल. रिपोर्टर - बाहेरची कोणतीही व्यवस्था नाही, तुम्ही जेवढे पैसे सांगाल तेवढे मिळतील. रूपेश - नाही, 31 तारखेसाठी बाहेरची कोणतीही व्यवस्था नाही, सर्व काही इथेच होईल. रिपोर्टर - एका मुलीचे किती सांगितले आहे? रूपेश - 5000 रुपये सांगितले आहेत. रिपोर्टर - काही सवलत? रूपेश - त्या वेळेनुसार सर्व काही होईल. रिपोर्टर - त्या वेळी जास्त सांगितले तर काय होईल? रूपेश - एखादी मुलगी 2000 ची आहे, एखादी 5000 ची, तर एखादी 20 हजारची पण आहे. रिपोर्टर - अशी मुलगी पण आहे का? रूपेश - सर्व आवडीची गोष्ट आहे, बाजूला बघून घ्या, जशी मुलगी उभी आहे, तशीच मिळेल. रिपोर्टर - नेते लोक आहेत, तर समजतच असाल, उत्तमपैकी उत्तम असायला पाहिजे. रूपेश - काही अडचण नाही, अशा-अशा मुली आहेत की नेतेही खुश होतील. रिपोर्टर - सुंदर असायला पाहिजे? रूपेश - डान्सपासून ते प्रत्येक कामात खुश करतील. नेपाळमध्ये तपास करत असताना आम्हाला अभिषेककडून राजचा नंबर मिळाला होता. राज नेपाळमधील डोंगराळ भागातील मुलींना पाटण्याला आणतो. अभिषेकने सांगितले की राज मोतिहारीचा रहिवासी आहे, जो त्याचा मित्र बनला आहे. रिपोर्टरने फोनवर राजशी बोलणे केले. यावेळी राजने सांगितले की तो नेत्यांच्या 31 तारखेच्या नाईट पार्टीसाठी न्यूड डान्ससाठी मुलींचा पुरवठा करत आहे. संभाषणादरम्यान, अभिषेकने अनेकदा रिपोर्टरला कॉन्फरन्समध्ये घेऊन राजशी फोनवर बोलणे करून दिले होते. राजने सांगितले की तो सध्या बाहेर आहे, पण ज्या ग्रेडची मुलगी हवी असेल, त्या सर्व पाटण्यात मिळतील. राजने फोनवरच रिपोर्टरसोबत पूर्ण डील केली आहे. रिपोर्टर - तुमच्याशी जे बोलणे झाले होते, मुलींच्या न्यूड डान्ससाठी, तोच प्लॅन सेट करायचा होता. राज - हो, होऊन जाईल, किती मुली पाहिजेत? रिपोर्टर - 7 ते 8 मुली पाहिजेत. राज - होऊन जाईल, तुम्हाला ॲडव्हान्स द्यावा लागेल. रिपोर्टर - तुम्हाला कळतंय ना, नेत्यांचा कार्यक्रम आहे, त्यांना मजा करायची आहे. राज - हो, समजतोय, किती वेळेसाठी पाहिजे? रिपोर्टर - पूर्ण रात्रीसाठी पाहिजे, मौजमजेसोबत सगळं होऊन जावं. राज - एका मुलीसाठी 32 हजार द्यावे लागतील. रिपोर्टर - यात काय काय असेल? राज - पूर्ण रात्रभर मुली तुमच्यासोबत असतील, न्यूड डान्स होईल आणि तुम्हाला जे पाहिजे ते सर्व होईल. रिपोर्टर - डान्समध्ये कोणते कोणते डान्स असतील? राज - तुम्हाला जसे पाहिजे तसे नाचवा, तुमच्या पाहुण्यांसमोर सर्व काही ओपन असेल. रिपोर्टर - न्यूड डान्स होईल ना? राज - सर्व काही, तुम्हाला जे पाहिजे ते करून घ्या. रिपोर्टर - मुली चांगल्या आहेत ना? राज - हे एका दिवसाचे काम नाही, चांगल्या मुली मिळतील. अनेक नेत्यांना त्यांनी खुश केले आहे. रिपोर्टर - याशिवाय आणखी काय व्यवस्था होईल? राज - मी फक्त मुली देऊ शकतो, याशिवाय मी कोणतीही व्यवस्था करू शकत नाही. एजंट म्हणाला - रात्रभर न्यूड नाचवा. संभाषणादरम्यान राज म्हणाला की तुम्ही रात्रभर न्यूड नाचवा, काही अडचण नाही. ही अशी मुलगी नाही जी थकून जाईल. अशा अनेक पार्ट्यांमध्ये पाहुण्यांना थकून टाकणाऱ्या आहेत. ती सामान्य नाही, दिसायला सुंदर आहे, तिला एकदा पाहून कोणाचेही मन डोलून जाईल. एजंटने हॉटेलपासून ते सर्व प्रकारच्या व्यवस्था सेट करण्याचा करार केला. रिपोर्टर - जागेचे कसे होईल? राज - जागा तुम्ही केली तर जास्त चांगले आहे, नाहीतर मी हॉटेल करून देईन. रिपोर्टर - हॉटेलमध्ये काही अडचण येणार नाही ना? राज - कोणतीही अडचण येणार नाही. रिपोर्टर - स्थानिक आहेत की बाहेरच्या मुली आहेत? राज - स्थानिकही आहेत आणि बाहेरच्याही आहेत, बंगालच्याही चालतील. नेत्यांसाठी रशियन न्यूड डान्सरची तयारी तपासादरम्यान असे समोर आले की न्यूड डान्ससाठी सर्वाधिक परदेशी मुलींना बोलावले जाते. अनेक एजंट्सनी न्यूड डान्ससाठी परदेशी मुलगी देण्याची तयारी दर्शवली. एजंट राजने तर डीलदरम्यान सांगितले की तो व्हीआयपी लोकांसाठी न्यूड डान्सच्या व्यवस्थेत परदेशी मुलीच देतो. रिपोर्टरने राजला सांगितले की परदेशी मुलगी असेल तर जास्त चांगले होईल, यावर राजने सांगितले की रशियन मुली मिळतील, पण त्यांचे पैसे तासाप्रमाणे द्यावे लागतील. रशियनसाठी एका तासाचे 8 हजार रुपये लागतील. जितके तास वाढतील, तितके प्रति तास 8 हजार रुपये बिलात जोडले जातील. आता तुम्ही डान्स करा किंवा दुसरे काही करा, पैसे तेच द्यावे लागतील जे आधीच ठरले असतील. राजने रिपोर्टरचा व्हॉट्सॲप नंबर घेतला आणि न्यूड डान्ससाठी देशी आणि विदेशी मुलींचे फोटो पाठवले. जेव्हा रिपोर्टरने राजला विचारले की न्यूड डान्समध्ये काही अडचण तर येणार नाही ना, तेव्हा राजने दावा केला की हा पहिला कार्यक्रम नाही. अनेक व्हीआयपी लोकांसाठी हे सर्व केले आहे. नेत्यांसाठी अनेक कार्यक्रम केले आहेत. राजने खात्रीने सांगितले, कोणतीही अडचण येणार नाही. सर्व आधीच केलेले आहे, कुठेही कोणती अडचण येत नाही. पाहुणा आनंदी होऊन जाईल, उलट मुलीवर पैसे उधळेल. मुझफ्फरपूरमध्ये तपासणीदरम्यान एजंट मुन्नाचा मोबाईल नंबर मिळाला. मुलींच्या व्यवहारासोबत संपूर्ण कार्यक्रमाची सेटिंग करण्याबाबत मुन्नाने अनेक सौदे केले. मुन्नाने दावा केला की, जेवढ्या मुली हव्या असतील, तेवढ्यांची तो व्यवस्था करेल. मुन्नाच्या म्हणण्यानुसार, तो अशा मुलींची व्यवस्था करेल ज्या नेत्यांना पूर्णपणे संतुष्ट करतील. न्यूड डान्सपासून ते पूर्णपणे संतुष्ट करेपर्यंत प्रशिक्षित मुली देण्याबद्दल त्याने सांगितले. रिपोर्टर - राजकारण्यांची पार्टी करायची आहे, मुली पाहिजेत? मुन्ना - माझ्याकडे १७ मुली आहेत, तुम्हाला जेवढ्या पाहिजेत तेवढ्या मिळतील. रिपोर्टर - कुठल्या मुली आहेत? कुठे मिळतील? मुन्ना - सर्व बाहेरच्या मुली आहेत, जिथे सांगाल तिथे जातील. रिपोर्टर - पाटणा आणि मुझफ्फरपूरमध्ये नेत्यांसाठी कार्यक्रम करायचा आहे, न्यूड डान्सची पार्टी आहे. मुन्ना - होईल, सर्व प्रकारच्या मुली आहेत. रिपोर्टर - कुठल्या मुली आहेत? मुन्ना - मुंबईच्या आहेत, कोलकाता, दिल्ली आणि मुझफ्फरपूरच्या मुली आहेत. रिपोर्टर - तुमच्याकडे परदेशी मुली पण आहेत का? मुन्ना - बाहेरच्या मुलींनाच घ्या, यात कोणालाही अडचण येणार नाही. रिपोर्टर - स्थानिक मुलींमुळे अडचण येते का? मुन्ना - अनेकदा स्थानिक मुलींचे ओळखीचे लोक येतात, ज्यामुळे अडचण येते. रिपोर्टर - होय, हा धोका तर आहे. मुन्ना - यामुळे वेळ वाया जातो आणि मूडही खराब होतो. रिपोर्टर - फोटो वगैरे पाठवून द्या. मुन्ना - सर्व काही पाठवून देईन, 31 तारखेची बुकिंग सुरू झाली आहे. रिपोर्टर - व्हीआयपी लोकांसाठी किती बुकिंग झाली आहे? मुन्ना - खूप झाली आहे, लवकर करून घ्या, नाहीतर सर्व मुली बुक होतील. रिपोर्टर - मुझफ्फरपूरमध्ये तुम्ही काय-काय सुविधा देऊ शकता? मुन्ना - फक्त मुली देऊ शकतो, बाकीची सर्व व्यवस्था तुम्हालाच करावी लागेल. रिपोर्टर - डान्स प्रोग्राम होईल ना? मुन्ना - होय, होईल. सर्व काही होईल, फक्त तुम्ही योजना करा. डर्टी सेलिब्रेशन पार्ट-2 मध्ये उद्या बघा आणि वाचा सीमा पार नेपाळमध्ये भारतीयांच्या नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनची तयारी. कशी एक लाख रुपये प्रति लिटर दारू आणि बार बालांसोबत मजा केली जाईल. भारतीयांच्या मागणीमुळे हॉटेल लॉज फुल्ल..!
वर्षाअखेरीस अॅपल युजरसाठी धमाल ऑफर, विजय सेल्सद्वारे 'अॅपल डेज सेल'ची सुरूवात
२८ डिसेंबर २०२५ ते ४ जानेवारी २०२६ पर्यंत अॅपल शॉपिंग बोनान्झामुंबई: विजय सेल्स या भारतातील प्रमुख इलेक्ट्रॉनिक्स ओम्नी-चॅनेल रिटेल साखळीने आपल्या १६० हून अधिक रिटेल आऊटलेट्समध्ये तसेच ऑनलाइन वेबसाइट www.vijaysales.com वर २८ डिसेंबर २०२५ पासून बहुप्रतिक्षित अॅपल डेज सेल सुरू केला आहे. हा सेल ४ जानेवारी २०२६ रोजी समाप्त होईल. या ऑफर अंतर्गत ग्राहकांना या उत्पादनावर विशेष सुट मिळणार आहे. नवीन आयफोन्स, मॅकबुक्स, आयपॅड्स, वॉचेस्, एअरपॉड्स अशा डिवाईसेसचा समावेश असल्याचे विजय सेल्सने यावेळी स्पष्ट केले आहे.विजय सेल्सचे संचालक निलेश गुप्ता म्हणाले आहेत की,'आम्हाला पुन्हा एकदा अॅपल डेज सेल घेऊन येण्याचा आनंद होत आहे. सूट व्यतिरिक्त हा सेल अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे एक प्रकारे सादरीकरण आहे.ज्यामध्ये ग्राहकांना अविश्वसनीय मूल्य मिळते. अद्वितीय डिल्स व एक्स्चेंज बोनससह आम्ही अॅपलप्रेमींना या निमित्ताने त्यांचे डिवाईसेस अपग्रेड करण्याची आणि स्टाइलमध्ये नवीन वर्षाची सुरूवात करण्याची संधी देत आहोत.'कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ग्राहकांसाठी विजय सेल्स आयफोन १७ खरेदीवर ३००० रूपयांचे मायव्हीएस रिवॉर्ड्स लॉयल्टी पॉइण्ट्स देणार आहे. स्टोअरमध्ये पुढील खरेदीवर अधिक सूटचा आनंद घेण्यासाठी हे पॉइण्ट्स रिडिम करता येऊ शकतात. विशेष बँक ऑफर्सचाही विजय सेल्सचा अॅपल डेज सेलमध्ये समावेश असणार आहे. अत्याधुनिक अॅपल तंत्रज्ञानाचा अनुभव घेण्याची महत्त्वाकांक्षा असलेल्या ग्राहकांसाठी हा सेल बारकाईने डिझाइन करण्यात आला आहे असे कंपनीने म्हटले.नवीन युजरसाठी नवीन आयफोन एअर, आयफोन १७, आयफोन १७ प्रो किंवा आयफोन १७ प्रो मॅक्स खरेदी करायचा असेल तर या उत्पादनावर पण लाभ मिळणार आहे. पूर्वीचे मॉडेल्स खरेदी करण्याची इच्छा असलेल्यानांही आयफोन १६, आयफोन १६ प्लस, आयफोन १६ई, आयफोन १५ देखील अत्यंत आकर्षक दरांमध्ये उपलब्ध आहेत असे कंपनीने म्हटले.आणखी कशावर सुट असेल?आयफोन्स, मॅकबुक्स, वॉचेस इत्यादींवर आकर्षक सूट व्यतिरिक्त अॅपल डेज सेलदरम्यान अॅपल अॅक्सेसरीज- चार्जर्स, केबल्स, पेन्सिल्स आणि केसेस देखील आकर्षक दरांमध्ये उपलब्धऑफर कुठे मिळू शकेल?निवडक अॅपल डिवाईसेसचे प्रात्यक्षिक व ओपन युनिट्स स्टोअर्समध्ये, तसेच www.vijaysales.com वर विशेष किमतींमध्ये उपलब्ध आहेत. हे स्पेशल युनिट्स मर्यादित प्रमाणात उपलब्ध आहेत आणि पुरवठा असेपर्यंत 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' या तत्त्वावर देण्यात येतील. स्टोअर्समध्ये अॅपलकेअर+ किंवा प्रोटेक्ट+ सह अॅपल कार सर्विसेसचा आनंद घेत नवीन खरेदी केलेल्या अॅपल डिवाईसेसचे ग्राहक डिव्हाईस सिक्युअर करू शकणार आहेत.विजय सेल्स अॅपल डिवाईसेसची खरेदी केल्यास प्रोटेक्ट+ योजनेवर जवळपास २०% सूट देखील देत आहे यामुळे नवीन खरेदी केलेले डिवाईसेस सुरक्षित राहण्याची खात्री मिळेल.अॅपल डिवाईसेस खरेदीसाठी आयसीआयसीआय व इतर निवडक बँकेचे कार्डधारक त्यांच्या खरेदींवर जवळपास १०००० रूपयांच्या त्वरित सूटचा आनंद घेऊ शकतात.विजय सेल्स ग्राहकांना विजय सेल्स स्टोअर्समध्ये आणि vijaysales.com वर जवळपास १०००० रूपयांचा एक्स्चेंज बोनस देत आहे.मायव्हीएस लॉयल्टी प्रोग्राम अंतर्गत ग्राहकांना स्टोअर्समध्ये व ईकॉमर्स वेबसाइटवर खरेदीसाठी ०.७५% लॉयल्टी पॉइण्ट्स देतो. प्रत्येक मिळवलेल्या पॉइण्टचे मूल्य स्टोअर्समध्ये रिडम्प्शनच्या वेळी एक रूपया असेल असे कंपनीने म्हटले.
Chitrangada Singh : अभिनेत्री चित्रांगदा सिंहने बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारलेल्या आहेत. सध्या चित्रांगदा तिच्या “रात अकेली है: द बन्सल मर्डर” या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला असून, चांगला प्रतिसाद प्रेक्षकांकडून चित्रपटाला मिळत आहे. चित्रपटातील चित्रांगदाने साकारलेल्या भूमिकेचे कौतुक केले जात आहे. याशिवाय चित्रांगदा सलमान खानसोबतच्या तिच्या आगामी ‘बॅटल ऑफ गलवान’ […] The post “तुमच्या मार्गात अनेक लोकं…”; ‘त्या’ गोष्टीवर चित्रांगदाने व्यक्त केले मत म्हणाली “त्यामुळे इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला…” appeared first on Dainik Prabhat .
“नेहरूंची ‘ती’कागदपत्रे गांधी कुटुंबांनी परत करावी” ; गजेंद्र सिंह शेखावतांची मागणी
Gajendra Singh Shekhawat। भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूयांच्याशी संबंधित वैयक्तिक कागदपत्रे पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालयातून (पीएमएमएल) हरवलेले नाहीत तर २००८ मध्ये गांधी कुटुंबाला रीतसर परत करण्यात आली. केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी याची पुष्टी केली. त्यांनी हरवलेल्या कागदपत्रांना राष्ट्रीय वारसा म्हणत ते सार्वजनिक अभिलेखागारात परत करण्याची मागणी केली. शेखावत यांनी जयराम रमेश यांना सोनिया […] The post “नेहरूंची ‘ती’ कागदपत्रे गांधी कुटुंबांनी परत करावी” ; गजेंद्र सिंह शेखावतांची मागणी appeared first on Dainik Prabhat .

27 C