प्रभात वृत्तसेवा पुणे – शहरातील खड्डेमुक्त अभियानात निकृष्टपणे केलेले काम दोन अभियंते, तसेच ठेकेदाराला चांगलेच भोवले आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत महापालिका आयुक्तांनी वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाचे कनिष्ठ अभियंता अमित हेरकर आणि उपअभियंता विनायक शिंदे यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय हे काम करणाऱ्या जय शिवशंकर कन्स्ट्रक्शन या ठेकेदारास १ लाख रुपयांचा दंड […] The post PMC News : आयुक्तांचा दणका! निकृष्ट खड्डे दुरुस्ती भोवली, दोन अभियंते निलंबित, ठेकेदाराला लाखोंचा दंड appeared first on Dainik Prabhat .
बिबट्याच्या दहशतीमुळे मोठा निर्णय! अहिल्यानगरच्या ६०० गावांमधील शाळांची वेळ बदलली
प्रभात वृत्तसेवा पुणे – अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निर्देशानंतर, जिल्हाधिकाऱ्यांनी अहिल्यानगरमधील ज्या गावांमध्ये अलिकडच्या काळात बिबट्या संघर्षाची नोंद झाली आहे, त्या गावांमध्ये शाळांच्या वेळा बदलण्याचे आदेश जारी केले आहेत.अहिल्यानगरमधील ६०० गावांमधील शाळांसाठी आदेश जारी करण्यात आला असून, त्याच्या अंमलबजावणीला १८ नोव्हेंबरपासून सुरुवात झाली आहे. याविषयी अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी ही माहिती दिली. […] The post बिबट्याच्या दहशतीमुळे मोठा निर्णय! अहिल्यानगरच्या ६०० गावांमधील शाळांची वेळ बदलली appeared first on Dainik Prabhat .
Pune News : “स्वस्थ भारतासाठी निसर्गोपचार आवश्यक,”राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी दिला मोलाचा सल्ला
प्रभात वृत्तसेवा पुणे – निसर्गोपचार, आयुर्वेद, पूर्वीची जीवनशैली, नैसर्गिक शेती, जीवनमूल्यांचा अंगीकार केल्यास स्वस्थ भारत बनू शकतो, असा विश्वास राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी व्यक्त केला. यासाठी निसर्गोपचार वैद्यक, संशोधक, प्राध्यापक, विद्यार्थी महत्त्वाची भूमिका बजावतील, असेही ते म्हणाले.राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेतर्फे येवलेवाडीतील निसर्गग्राम येथे आठव्या निसर्गोपचार दिनी ते बोलत होते. या वेळी केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव, […] The post Pune News : “स्वस्थ भारतासाठी निसर्गोपचार आवश्यक,” राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी दिला मोलाचा सल्ला appeared first on Dainik Prabhat .
Z.P Election : नारायणगाव गटात पक्षांची भूमिका गुलदस्त्यात, पण इच्छुकांच्या भेटीगाठी सुरू
प्रभात वृत्तसेवा नारायणगाव – जिल्हा परिषद निवडणुकीची अधिकृत घोषणा झालेली नसली तरी नारायणगाव-वारुळवाडी जिल्हा परिषद गटात इच्छुकांनी मतदारांच्या भेटीगाठी घेऊन प्रचारास सुरुवात केली आहे. काही उमेदवारांनी आपण केलेली विकासकामे आणि भविष्यातील योजनांची माहितीपत्रके छापून मतदारांपर्यंत पोहोचवणे सुरू केले आहे. या गटात आतापर्यंत एकाही राजकीय पक्षाने अधिकृत उमेदवारी जाहीर केलेली नाही. परंतु, इच्छुक उमेदवारांच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर […] The post Z.P Election : नारायणगाव गटात पक्षांची भूमिका गुलदस्त्यात, पण इच्छुकांच्या भेटीगाठी सुरू appeared first on Dainik Prabhat .
Malegaon : ‘पॅनेल उभे करतोस काय?’माळेगावात शरद पवार गटाच्या नेत्यावर प्राणघातक हल्ला
प्रभात वृत्तसेवा बारामती – बारामती नगरपरिषद आणि माळेगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीमुळे राज्यात चर्चा सुरू असतानाच, माळेगावात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे शहराध्यक्ष नितीन तावरे यांना बुधवारी (दि. १९) सायंकाळी मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे माळेगावातील राजकीय वातावरण तापले आहे.मारहाणीमागे राजकीय कारणे असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.माळेगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी एकूण १० अर्ज दाखल झाले […] The post Malegaon : ‘पॅनेल उभे करतोस काय?’ माळेगावात शरद पवार गटाच्या नेत्यावर प्राणघातक हल्ला appeared first on Dainik Prabhat .
इंदापुरात ‘महाभारत’! भरणेंचा विकासाचा ‘मास्टरस्ट्रोक’की पाटील-गारटकरांची नवी आघाडी ठरणार वरचढ?
प्रभात वृत्तसेवा इंदापूर – इंदापूर नगरपरिषद निवडणुकीने तालुक्यातील राजकीय वातावरणाला अक्षरशः उकळी आणली आहे. यंदाची निवडणूक केवळ उमेदवारांची नसून, दोन भिन्न राजकीय शक्तींच्या वैचारिक, संघटनात्मक आणि प्रतिष्ठेच्या आमनेसामने झुंजीची बनली आहे.एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी राष्ट्रवादीचा त्याग करून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि भाजप नेते प्रवीण माने यांना एकत्र आणत ‘कृष्णा-भीमा विकास आघाडी’ […] The post इंदापुरात ‘महाभारत’! भरणेंचा विकासाचा ‘मास्टरस्ट्रोक’ की पाटील-गारटकरांची नवी आघाडी ठरणार वरचढ? appeared first on Dainik Prabhat .
Manchar Election : मंचर राजकारण तापलं! महायुती-मविआ दोन्ही आघाड्यांमध्ये गोंधळ, बंडखोरांचे फावणार?
प्रभात वृत्तसेवा मंचर – मंचर नगरपंचायतीची पहिलीच निवडणूक होत असल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस –भाजप विरुद्ध शिवसेना, अशी लढत रंगण्याचे संकेत आहेत. तर, दुसरीकडे महाविकास आघाडीत शरदचंद्र पवार पक्षाची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (उबाठा) यांनी एकत्र येत आघाडीची घोषणा केली आहे. काँग्रेस आय पक्षाने स्वतंत्र भूमिका घेतल्याने राजकीय समीकरणे अधिकच जटील […] The post Manchar Election : मंचर राजकारण तापलं! महायुती-मविआ दोन्ही आघाड्यांमध्ये गोंधळ, बंडखोरांचे फावणार? appeared first on Dainik Prabhat .
Bhor News : पारवडीत नेमकं काय घडलं? बेपत्ता महिलेचा मृतदेह विहिरीत आढळल्याने परिसरात खळबळ
प्रभात वृत्तसेवा नसरापूर – भोर तालुक्यातील पारवडी गावातील अलका किसन लिमण या महिलेचा मृतदेह शेतातील विहिरीत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सकाळपासून त्या बेपत्ता असल्याने नातेवाईक व गावकरी यांनी शोधमोहीम सुरू केली होती. शोध लागल्यावर हवेली आपत्ती व्यवस्थापन पथकाला बोलावण्यात आले. खबर देणारे लहु बापुराव लिमण (वय 35) यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते आणि त्यांचे चुलत […] The post Bhor News : पारवडीत नेमकं काय घडलं? बेपत्ता महिलेचा मृतदेह विहिरीत आढळल्याने परिसरात खळबळ appeared first on Dainik Prabhat .
Indapur News : अतिक्रमण हटवण्यासाठी शेतकरी कुटुंबं रस्त्यावर, तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण
प्रभात वृत्तसेवा इंदापूर – रुई (पिंपळाचा मळा) येथील मारकड, पारेकर आणि चोरमले कुटुंबीयांनी गट क्रमांक ४१६ मधील आपल्या कायदेशीर हिश्याप्रमाणे जमीन मिळावी, तसेच अतिक्रमण तात्काळ हटवावे, या ठाम मागणीसाठी सोमवार (दि. १७) पासून इंदापूर तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास सुरू केले आहे. महसूल विभागाकडून गेल्या काही वर्षांपासून केवळ आश्वासने मिळत असल्याने संतप्त शेतकरी शेवटचा उपाय म्हणून […] The post Indapur News : अतिक्रमण हटवण्यासाठी शेतकरी कुटुंबं रस्त्यावर, तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण appeared first on Dainik Prabhat .
Alandi News : भाविकांसाठी आनंदाची बातमी! पांडुरंगाची पालखी आज थोरल्या पादुका मंदिरात मुक्कामी
प्रभात वृत्तसेवा आळंदी – श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर यांच्यावतीने विठ्ठल महाराज वासकर यांच्या नियंत्रणाखाली पंढरपूर ते आळंदी ते पंढरपूर या मार्गावरील वारीच्या परतीच्या प्रवासात श्रीपांडुरंगरायांचा पालखी सोहळा आज (दि. २०) रोजी श्रीज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर, वडमुखवाडी येथे मुक्कामी विसावणार आहे. ही माहिती देवस्थानचे संस्थापक अध्यक्ष ॲड. विष्णू तापकीर यांनी दिली. श्रीपांडुरंगरायांच्या पालखी सोहळ्याचे […] The post Alandi News : भाविकांसाठी आनंदाची बातमी! पांडुरंगाची पालखी आज थोरल्या पादुका मंदिरात मुक्कामी appeared first on Dainik Prabhat .
प्रभात वृत्तसेवा शिरूर – शिरूर नगरपरिषद निवडणुकीसाठी मंगळवारी (दि. १८) झालेल्या छाननीमध्ये नगराध्यक्षपदासाठी दाखल झालेले सर्व नऊ अर्ज वैध ठरले आहेत, तर नगरसेवकपदासाठीच्या एकूण १९३ अर्जांपैकी पाच अर्ज अवैध ठरले आहेत. यामुळे आता अर्ज माघारीच्या दिवसाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नगराध्यक्षपद इतर मागासवर्ग प्रवर्गातील महिलेसाठी राखीव असल्याने ही स्पर्धा अधिक चुरशीची होणार आहे. आमदार माऊली […] The post Shirur election : शिरूरमध्ये महायुतीत उभी फूट! भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना स्वतंत्रपणे भिडणार, निवडणूक चुरशीची appeared first on Dainik Prabhat .
पुणे जिल्ह्यात बिबटांचा कहर! गेल्या ५ वर्षांतील धक्कादायक आकडेवारी समोर..जाणून घ्या
प्रभात वृत्तसेवा शिक्रापूर – सध्या पुणे जिल्ह्यातील शिरूर, जुन्नर, खेड आणि आंबेगाव या तालुक्यांमध्ये बिबट्यांच्या हल्ल्यांमध्ये वाढ झाली असून, बिबट-मानव संघर्ष मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ऊसाचे क्षेत्र मोठे असल्याने आणि पीक दोन-दोन वर्षे शेतात उभे राहत असल्याने, बिबटे या पिकांमध्येच प्रजनन करून आपला अधिवास बनवत आहेत.गेल्या पाच वर्षांत या तालुक्यांमध्ये बिबट्यांच्या हल्ल्यात २२ नागरिकांचा आणि […] The post पुणे जिल्ह्यात बिबटांचा कहर! गेल्या ५ वर्षांतील धक्कादायक आकडेवारी समोर..जाणून घ्या appeared first on Dainik Prabhat .
प्रभात वृत्तसेवा राहू – राहू बेट परिसरात दिवाळी पूर्वीची व आत्ताची सकाळची शैक्षणिक गुणवत्ता यात मोठा फरक दिसून येत आहे.”पदवीधर शिक्षक”च्या गोंडस नावाखाली प्रत्येक शाळेतील एक एक शिक्षक कमी करण्यात आला आहे. त्यामुळे “आधीच उल्हास,त्यात फाल्गुन मास”या म्हणी प्रमाणे फक्त दिवस भरविण्याचे काम चालू आहे. उदाहरणच घ्यावे झाले तर बेट परिसरातील टाकळी येथील सातवीपर्यंत असलेल्या […] The post Daund News : बेट परिसरात मराठी शाळांच्या गुणवत्तेचे तीन तेरा; पदवीधर सारख्या कारणाखाली शिक्षकांची संख्या रोडावली appeared first on Dainik Prabhat .
निवडणुका जाहीर होईपर्यंत नकली डरकाळ्या फोडणाऱ्या उबाठाला प्रत्यक्ष मैदान दिसू लागताच कसा घाम फुटला आहे, हे गेल्या दोन-चार दिवसांतल्या त्यांच्या प्रयत्नांतून, त्यांच्या मुखपत्रांच्या माध्यमांतून दिसू लागलं आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत आपलं पुरतं वस्त्रहरण होणार हे ओळखून त्यांनी पूर्वीच मोठ्या प्रयासाने मनसेला मनवलं आणि आपल्याबरोबर घेतलं. मनसेसोबत येताच यांनी यांच्याच बाजूने दर दोन दिवसांनी एकीची ग्वाही द्यायला सुरुवात केली. 'आम्ही एकत्र आलो आहोत, ते एकत्र राहण्यासाठीच', हे पालुपद दोन-चार कार्यक्रमांत लावून त्यांनी उरल्यासुरल्या शिवसैनिकांना रोखण्याचे प्रयत्न केले. बेजान नेतृत्वामुळे हिंमत हरलेल्या शिवसैनिकांना शिवसेनेच्या उंबऱ्याआड रोखण्याचा तो प्रयत्नही फारसा यशस्वी झाला नाही. त्यामुळे, दिवाळीचं निमित्त साधून कौटुंबिक स्नेहसंमेलनाचे देखावे करण्यात आले. कोणतीही दुरावलेली कुटुंबं एक होत असतील, तर ती चांगलीच गोष्ट आहे. पण, तुमची कुटुंबं म्हणजेच तुमचे पक्ष नव्हेत. सैनिकांच्या कुटुंबांचा विचार कोणी करायचा? संपूर्ण पक्ष म्हणजेच कुटुंब असण्याचे वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाचे दिवस कधीच सरले. आता शिवसैनिकाला पोरकं करून, त्याला झिडकारून 'माझे कुटुंब हीच माझी जबाबदारी'चे दिवस सुरू झाल्याने उबाठाच्या ताकदीला इतकी उतरती कळा लागली आहे, की प्रत्येक निवडणुकीत त्यांचं अधिकाधिक वस्त्रहरण होत चाललं आहे. येत्या मुंबई, ठाणे, कल्याण, भिवंडी, विरार, नवी मुंबई या महामुंबईतल्या महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी निवडणूक लढवतील असे उमेदवारही त्यांना मिळायला तयार नाहीत, अशी परिस्थिती झाल्यानंतर आता 'महाविकास आघाडी'चं कातडं पांघरून त्याआड लाज झाकण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. काँग्रेसने स्वतंत्र निवडणूक न लढवता 'आघाडी'त राहावं आणि 'आघाडी' म्हणूनच निवडणूक लढवावी, यासाठी विविध मार्गांनी वेगवेगळे युक्तिवाद केले जात आहेत.उबाठाची ही केविलवाणी स्थिती व्हायला जबाबदार तेच आहेत. ते आणि त्यांच्या प्रवक्त्यांची मुद्दाम वक्तव्यं. मनसेला सोबत आणण्याचं मिशन मोठ्या प्रयासाने यशस्वी केल्यानंतर जणू 'घोडं गंगेत न्हालं' या आनंदात त्यांनी आघाडीतल्या इतर पक्षांच्या दिशेने लाथा झाडायला सुरुवात केली. उबाठाच्या प्रवक्त्यांनी तर जुलै महिन्यात सातत्याने 'महाराष्ट्रात आता आघाडीची गरज राहिलेली नाही', 'मनसे आणि उबाठा सोबत असतीलच. इतरांनी आपापल्या भूमिकांचा विचार करावा' यासारखी वक्तव्यं केली होती. काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी तीच वक्तव्यं लक्षात घेऊन आता महापालिका निवडणुकीसाठी 'एकला चलो रे'ची भूमिका घेतली आहे. जुलैपासूनच्या बातम्यांची कात्रणं दाखवून त्यांनी त्यांच्या दिल्लीतल्या नेत्यांनाही त्यासाठी राजी केलं आहे. काँग्रेसने स्वतंत्रपणे निवडणुका लढवण्याची भाषा सुरू केली, तेव्हा आघाडीतल्या कोणत्याच पक्षाने ती गांभीर्याने घेतली नाही. मनसेची हिंदी भाषिकांविरोधातली, अल्पसंख्याक समुदायांविरोधातली भूमिका जगजाहीर असल्याने महाराष्ट्रात मनसेला आघाडीत घेतलं, त्यांच्याबरोबर बसलो, तर बिहारच्या निवडणुकीत त्याचा फटका बसेल, या विचाराने काँग्रेसचे नेते ही विधानं करत असतील. बिहारची निवडणूक झाली की, त्यांची भाषा आपोआप बदलत जाईल, असा उबाठा आणि मनसेचा विश्वास होता. पण, तो सपशेल फसलेला दिसतो. बिहारमध्ये भुईसपाट होऊनही काँग्रेसच्या इथल्या नेत्यांचा आत्मविश्वास जराही कमी झालेला दिसत नाही! स्वतंत्र लढण्याच्या विचारांवर ते ठाम दिसताहेत. बिहारमधल्या दारुण पराभवानंतर महाविकास आघाडीतले अन्य घटक पक्ष काँग्रेसची किंमत कमी करणार, जागा वाटपात त्यांना दुय्यम स्थान देणार. असं दुय्यम स्थान घेऊन वाटाघाटीत सहभागी होण्याऐवजी आपणच 'एकला चलो रे'चा नारा द्यावा आणि अन्य पक्षांना मनधरणी करायला लावावी; त्यातून आपलं महत्त्व वाढवून घ्यावं, असा काँग्रेसचा डाव असल्याचं काही जण मानतात. त्यामुळे, काँग्रेसच्या या भूमिकेवर अन्य सगळे पक्ष म्हणूनच मौन बाळगून आहेत. घायकुतीला आला आहे, तो फक्त उबाठा. काँग्रेसने खरोखरच असा काही निर्णय घेतला आणि तो प्रत्यक्षात आणला, तर आपल्या नव्या मतपेढीला खिंडार पडेल; आपला संसार उघड्यावर येईल, अशी भीती त्यांना सतावू लागली आहे. 'विचारसरणी', 'वारसा', 'संस्कृती' या सगळ्या बाबींवर नंतर विचार करू. भाजपला रोखण्यासाठी आधी निवडणुकीत एकत्र राहू, अशी काकुळतीची भाषा त्यामुळेच त्यांनी सुरू केली आहे.लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने मुस्लीम मतं मिळवली. विधानसभा निवडणुकीवेळी 'लाडक्या बहिणीं'नी पारडं फिरवलं. आता इतक्या महिन्यांनंतर ते पूर्ण फिरलं आहे. पण म्हणतात ना, 'बुडत्याला काठीचा आधार'. ही मतं अजूनही आपल्या बाजूने आहेत, या गैरसमजात उबाठा आहे. काँग्रेस स्वतंत्र लढली, तर या मतांत विभागणी होईल, त्याचा फायदा महायुतीला; विशेषतः भाजपला मिळेल आणि उबाठाच्या ताकदीचा भोपळा फुटेल!! ते होऊ नये, यासाठी त्यांना काँग्रेस कसंही करून बरोबर हवी आहे. काँग्रेसला हे कळत नाही असं नाही. इतर वेळी नाकाने कांदे सोलणाऱ्यांचं नाक रगडायची हीच वेळ आहे, हे ओळखलेल्या काँग्रेसने त्यामुळेच 'धर्मनिरपेक्षतेच्या मूल्यांशी तडजोड करता येणार नाही' हा राग आळवायला सुरुवात केली आहे. मनसेला बरोबर घेतलं, तर लोकसभेवेळची मतं दूर जातात आणि नाही घेतलं, तर मराठी मतं दूर जातात, अशा कात्रीत सध्या उबाठा सापडला आहे. नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीत त्यांचं कुठेच एक धोरण दिसत नाही. पक्ष संघटनेवर कुणाचंच नियंत्रण नाही. स्थानिक पातळीवर जो जे करेल, त्याला मैदान मोकळं आहे. पक्ष त्यांच्याच हाती, अशी अवस्था आहे. त्यामुळे, निष्ठावान शिवसैनिकांनी स्थानिक पातळीवर अनेक ठिकाणी आपलं अस्तित्व, पक्ष संघटनेची प्रतिष्ठा टिकवण्यासाठी स्थानिक पातळीवर आपापली गणितं जुळवली आहेत. दुबळ्या नेतृत्वाला त्यांना 'मम म्हणण्या'शिवाय दुसरा पर्याय नाही. नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुका निम्म्यावर आल्या, तरी ज्यांना आपल्या उमेदवारांची नक्की संख्या माहीत नाही, आपल्या पक्षाने किती ठिकाणी किती जणांबरोबर कशी युती केली आहे ते माहीत नाही, ते भारतीय जनता पक्षाच्या शिस्त आणि नियोजनबद्ध निवडणूक रणनीतीला कसं तोंड देणार?
Satara election : साताऱ्यात भाजपने उघडलं विजयाचं खातं; आशा पंडित ठरल्या बिनविरोध नगरसेविका
प्रभात वृत्तसेवा सातारा – नगरपालिका निवडणुकीत भाजपने विजयी सुरुवात केली असून प्रभाग 20 अ मधून पक्षाच्या उमेदवार आशा किशोर पंडित बिनविरोध निवडून आल्या आहेत.उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया दि. 17 रोजी झाली. निवडणूक कर्मचारी काल पहाटेपासून पाच वाजेपर्यंत अर्ज छाननीच्या कामात व्यस्त होते. प्रभाग 20 अ मधून आशा पंडित यांचाच एकमेव अर्ज दाखल झाला होता. […] The post Satara election : साताऱ्यात भाजपने उघडलं विजयाचं खातं; आशा पंडित ठरल्या बिनविरोध नगरसेविका appeared first on Dainik Prabhat .
Wai municipal election : वाईच्या सर्वांगीण विकासासाठी दिले सक्षम उमेदवार –मंत्री मकरंद पाटील
प्रभात वृत्तसेवा वाई – वाई नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार) उमेदवार निवड प्रक्रियेत वाई शहराला दिशा देणारे नेतृत्व देण्याचा भर दिला आहे. शहराचा सर्वांगीण विकास हेच ध्येय ठेवून सर्व उमेदवार काम करतील, अशी ग्वाही मदत व पुर्नवसन मंत्री ना. मकरंद पाटील यांनी दिली.गंगापूर येथील काळभैरवनाथ मंदिरात पक्षाच्यावतीने उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मंत्री […] The post Wai municipal election : वाईच्या सर्वांगीण विकासासाठी दिले सक्षम उमेदवार – मंत्री मकरंद पाटील appeared first on Dainik Prabhat .
नाशिकमध्ये आघाडी आणि युतीतही खो!
जिल्ह्यात महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्ष आमने-सामने आले आहेत. भाजप पाच ठिकाणी स्वतंत्र निवडणूक लढवत आहे. महाविकास आघाडीमधील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) आणि शिवसेना(उबाठा)हे पक्ष तीन ठिकाणी एकमेकांविरोधात आहेत. भाजप आणि शिंदेसेना हे दोन पक्ष तीन ठिकाणी, तर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) एकत्रितपणे दोन ठिकाणी लढत आहेत. याशिवाय, काही ठिकाणी शिंदेसेना व राष्ट्रवादी काँग्रेस (अ.प.) एकत्रित आले आहेत. एका ठिकाणी तर शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) एकत्र आले आहेत. जिल्ह्यातील इगतपुरी, ओझर, सिन्नर, सटाणा आणि चांदवड या पाच नगर परिषदांमध्ये भाजप स्वतंत्रपणे लढत आहे. त्यांच्या विरोधात महायुतीमधील शिंदेसेना व राष्ट्रवादी काँग्रेस (अ.प.) हे पक्ष रिंगणात उतरले आहेत. काही ठिकाणी शिंदेसेना व राष्ट्रवादी एकत्रितपणे भाजपच्या विरोधात असल्याचे चित्र असून, काही ठिकाणी हे दोन्ही पक्ष एकमेकांसमोर आले आहेत. इगतपुरीमध्ये भाजपच्या विरोधात शिंदेसेना व राष्ट्रवादी (अ.प.) हे एकत्रितपणे लढत आहेत. महाविकास आघाडीचे घटक पक्षही येथे एकत्रित लढत देत आहेत. नांदगावमध्ये भाजप आणि शिंदेसेना एकत्र असून, राष्ट्रवादी काँग्रेस (अ.प.) त्यांच्या विरोधात उभा ठाकला आहे. भगूरमध्ये भाजपने राष्ट्रवादीच्या (अ.प.) गटाशी हातमिळवणी केली आहे. येथे उबाठासेनेला मनसेने साथ दिली आहे. तसेच शिंदेसेनाही स्वतंत्रपणे लढत आहे. त्यामुळे येथील लढत ही चुरशीची ठरणार आहे. मनमाडच्या नगर परिषदेमध्ये भाजपने शिंदेसेना आणि रिपाइंला आपल्या साथीला घेतले आहे. या युतीला राष्ट्रवादी काँग्रेस (अ.प.) आणि उबाठासेनेचे उमेदवार विरोधात आहे. मनमाड शहरामध्ये रिपाइंची ताकद आहे. त्यामुळे या युतीचा लाभ किती मिळणार हे बघितले जात आहे. येवला शहरामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अ.प.) एकत्र असून, येथे शिंदेसेनेने राष्ट्रवादीच्या (श.प.) गटाला सोबत घेतले आहे. त्यामुळे वेगळेच समीकरण रंगणार आहे. त्यामुळे येवल्यातील लढतीकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.जिल्ह्यातील त्र्यंबक, सिन्नर, सटाणा आणि चांदवड या चार ठिकाणी सर्वच पक्ष एकमेकांना शह देत आहेत. येथे सर्व पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढण्याला प्राधान्य दिले आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अ.प.) आणि शिंदेसेना यांनी आधी युती जाहीर केली होती. मात्र, ऐनवेळी ही युती तोडत शिंदेसेनेने स्वतंत्रपणे उमेदवार दिल्याने निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. उमेदवारी मिळाली नाही ते अपक्ष म्हणून आपली उमेदवारी कायम ठेवण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वत्र चुरशीच्या लढती होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत देखील त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.येवला, सिन्नर, मालेगावला भाजपची ताकद वाढलीयेवल्यात उबाठा नेते, माजी आमदार मारुती पवार आणि संभाजी पवार, तर मालेगावमधील ज्येष्ठ नेते माजी आ. अपूर्व हिरे यांच्यापाठोपाठ अद्वय हिरे यांनीही भाजपमध्ये प्रवेश केल्याने दोन्ही तालुक्यात पक्षाची ताकद वाढली आहे. येवल्यात माणिक शिंदे यांनी आ. किशोर दराडे यांना साथ दिली आहे. काही दिवसांपूर्वीच सिन्नरमधून विद्यमान खासदार राजाभाऊ वाजे यांचे चुलते, माजी नगर अध्यक्ष हेमंत वाजे आणि युवा नेते उदय सांगळे यांनी आपल्या समर्थकांसह भाजपची वाट धरल्याने नगर परिषद पाठोपाठ जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी भाजपचा रस्ता सोपा झाला असल्याचे बोलले जात आहे.ओझर, पिंपळगावकडे लक्षओझरला प्रथमच नगर परिषदेच्या निवडणुकीला सामोरे जात असलेल्या ओझरमध्ये सर्वच पक्ष स्वतंत्रपणे लढत आहेत. त्यामुळे येथे बहुरंगी लढतीकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहेत. पिंपळगाव बसवंत येथे भाजप व शिंदेसेना एकत्र असून, त्याच्यापुढे राष्ट्रवादी काँग्रेस (अ.प.) तसेच काँग्रेस उमेदवार रिंगणात आहेत.स्थानिक पातळीवर निर्णयराज्यात जरी सत्ताधारी महायुती आणि महाआघाडी असली तरी स्थानिक पातळीवर वेगळा निर्णय घेण्यात आला. जिल्ह्यात अनेक ठिकाणी महायुती आणि आघाडी न झाल्यामुळे याचा परिणाम आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांवर देखील होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे; परंतु निवडणुकीनंतर मात्र पुन्हा महायुती आणि महाविकास आघाडी होऊन आम्हीच नंबर एक असा पुन्हा दावा केला जाऊ शकतो.- धनंजय बोडके
प्रभात वृत्तसेवा वाई – वाईच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेना (एकनाथ शिंदे गट) नगरपरिषदेच्या निवडणुकीत उतरली असून ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या ब्रीदवाक्याने काम करण्याचा संकल्प पक्षाने यावेळी व्यक्त केला. वाई नगरपरिषदेच्या निवडणुकीनिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष विकास शिंदे यांनी ही माहिती दिली. यावेळी सातारा जिल्हा उपसंघटक याेगेश फाळके, विधानसभा प्रमुख प्रताप […] The post Wai election : वाई नगरपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेचा स्वबळाचा नारा; भाजपकडून प्रतिसाद न मिळाल्याने निर्णय appeared first on Dainik Prabhat .
Karad News : आमदार मनोज घोरपडेंची मोठी घोषणा, ‘कराड उत्तर’वर्षभरात दुष्काळमुक्त होणार
प्रभात वृत्तसेवा नागठाणे – कराड उत्तर मतदारसंघातील प्रत्येक शेतकर्याच्या शेतीस पाणी देऊन, त्याचे जीवन समृद्घ होण्यासाठी मी कटिबद्ध असून, पाणी प्रश्नावर मोठे काम सुरू आहे, अशी ग्वाही आमदार मनोज घोरपडे यांनी दिली.उरमोडी प्रकल्पांतर्गत गणेशवाडी उपसा सिंचन योजनेचे भूमिपूजन करंजोशी (गणेशवाडी) येथे आमदार मनोज घोरपडे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. राजेंद्र ढाणे, श्रीरंग गोरे, […] The post Karad News : आमदार मनोज घोरपडेंची मोठी घोषणा, ‘कराड उत्तर’ वर्षभरात दुष्काळमुक्त होणार appeared first on Dainik Prabhat .
Medha election : मेढ्याचं राजकारण तापलं! २८ उमेदवारांचा पत्ता कट, पण दोन अर्जांनी वाढवली धाकधूक
प्रभात वृत्तसेवा मेढा – मेढा नगरपंचायत निवडणुकीत सदस्यपदांसाठी दाखल 102 उमेदवारी अर्जांपैकी 74 अर्ज मंगळवारी (दि. 18) झालेल्या छाननीमध्ये वैध ठरले, तर 28 अर्ज अवैध ठरले. नगराध्यक्षपदासाठी दाखल झालेल्या 11 पैकी 10 अर्ज वैध ठरले आहेत. पूजा वारागडे यांच्याकडे भाजपचा ए, बी फॉर्म नसल्याने त्यांचा अर्ज अवैध ठरवण्यात आला.प्रभाग 3 मधील शिवसेनेच्या उमेदवार द्रौपदा मुकणे […] The post Medha election : मेढ्याचं राजकारण तापलं! २८ उमेदवारांचा पत्ता कट, पण दोन अर्जांनी वाढवली धाकधूक appeared first on Dainik Prabhat .
बिहार विधानसभेच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांनी ज्या प्रमाणात मोठमोठी आश्वासने दिली, पैशाची खैरात केली, त्या तुलनेत विरोधकांकडे देण्यासारखे काहीच नव्हते. गेल्या दोन दशकांपासून बिहारच्या सत्तेत असलेल्या नितीशकुमार यांच्याविरोधात काही प्रमाणात नाराजी, संयुक्त जनता दल आणि भाजपमध्ये झालेली बंडखोरी समोर येऊनही नितीशकुमार यांचीच पुन्हा मुख्यमंत्री म्हणून निवड का झाली हे जाणून घेतले पाहिजे.काँग्रेस आता देशव्यापी पक्ष राहिलेला नाही. प्रादेशिक पक्षापेक्षाही तो दुबळा झाला आहे. अशा परिस्थितीत मित्रपक्ष प्रभावी असलेल्या राज्यांमध्ये काँग्रेसने दुय्यम भूमिका घेतल्यास अधिक यश मिळू शकते. तामिळनाडूमध्ये ते सिद्ध झाले आहे; परंतु उत्तर आणि पश्चिम भारतात काँग्रेस अजूनही नमते घ्यायला तयार नाही. काँग्रेसची रणनीती आखणारा ‘थिंक टँक’ नेमका कुठे आहे, असा प्रश्न गेल्या दशकापासून वारंवार पडतो आहे. बिहारसारख्या मोठ्या राज्यात निवडणुकीला सामोरे जाताना महाआघाडीमध्ये समन्वय असायला हवा होता; परंतु तो नव्हता. आपली मतपेढी कोणती आहे, याचा काँग्रेसला विसर पडला आहे. मागच्या वेळी फक्त १५ जागा जिंकणाऱ्या मुकेश साहनी यांना उपमुख्यमंत्रीपदाचे उमेदवार घोषित करण्यात आल्यामुळे महाआघाडीचे नुकसान झाले. ६१ जागांवर निवडणूक लढवणारे काँग्रेस नेते आणि समर्थक केवळ निराश झाले नाहीत, तर अनेक जागांवर निर्णायक भूमिका बजावणारे मुस्लीम आणि दलितदेखील निराश झाले. १४३ जागांवर निवडणूक लढवणाऱ्या राष्ट्रीय जनता दलाने ५२ म्हणजेच सुमारे ३६ टक्के यादव उमेदवार उभे केले. त्यामुळे इतर ओबीसी जातींमध्ये, विशेषतः ईबीसींमध्ये नकारात्मक संदेश गेला. यादव-मुस्लीम बहुसंख्य असलेल्या राष्ट्रीय जनता दलाला इतर समुदायांना अधिक तिकिटे देऊन आपला आणि महाआघाडीचा पाठिंबा वाढवण्याचा प्रयत्न करता आला असता. युती आणि जागावाटपाच्या माध्यमातून ‘एनडीए’ सर्व समुदायांना प्रतिनिधित्व देण्याचा संदेश देण्यात यशस्वी झाली; परंतु महाआघाडीला ते करण्यात अपयश आले. तेजस्वी यादव ‘जंगलराज’च्या ओझ्यातून स्वतःला मुक्त करण्यात अपयशी ठरले आणि त्याच्या पुनरावृत्तीचा धोका निर्माण करून, ‘एनडीए’ पुन्हा एकदा जिंकली.‘एनडीए’च्या व्यासपीठावरून, लालू कुटुंबाला ‘महाभ्रष्ट’(महान भ्रष्ट कुटुंब) म्हटले जात असे. कारण जवळपास संपूर्ण कुटुंब भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये कायदेशीर आरोपांना सामोरे जात आहे. निवडणुकीत अनेक मुद्दे भूमिका बजावत असले, तरी कायदा आणि सुव्यवस्था तसेच भ्रष्टाचार हे मुद्दे जनतेवर थेट परिणाम करतात. म्हणून मतदार सामान्यतः या मुद्द्यांवर तडजोड करत नाही. तेजस्वी यांनी नितीशकुमार यांच्यासोबतच्या महाआघाडी सरकारच्या काळात देण्यात आलेल्या नोकऱ्यांचे श्रेय घेतले. यामुळे ते तरुणांचे आवडते झाले असते; परंतु ते मुख्यमंत्र्यांना त्या श्रेयापासून वंचित ठेवू शकत नव्हते. कर्नाटक, तेलंगणा आणि हिमाचल प्रदेशमध्ये चाचणी केलेल्या ‘गॅरंटी कार्ड’वर काँग्रेस जोर देऊ इच्छित होती; परंतु तेजस्वी ‘राग-नोकरी’चा जयजयकार करत राहिले.निवडणुकीच्या राजकारणात राज्य-दर-राज्य मोफत देणग्या निर्णायक ठरत आहेत. निवडणुकीच्या अगदी आधी नितीशकुमार यांनी अनेक लोकप्रिय घोषणा केल्या. त्यात सव्वा कोटींहून अधिक महिलांच्या बँक खात्यात प्रत्येकी दहा हजार रुपये जमा करण्यात आले. तेजस्वी यांनीही लोकप्रिय आश्वासने दिली; परंतु ट्रॅक रेकॉर्ड चांगला असल्याने नितीश यांचा विजय झाला. लोकांनी नवे सरकार आणण्यापेक्षा सध्याच्या सरकारवर विश्वास ठेवणे पसंत केले. तेजस्वी आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी आपले ब्लूप्रिंट पूर्णपणे स्पष्ट करण्यात अयशस्वी ठरले. ‘एनडीए’चे अनुसरण करून त्यांनी महाआघाडीचा विस्तार केला; परंतु एकसंध प्रतिमा सादर करण्यात अयशस्वी झाले.तेजस्वी यांनी महाआघाडीच्या जाहीरनाम्याला ‘तेजस्वी प्रणव’ असे नाव देऊन स्वतःला प्रोजेक्ट करण्यावर लक्ष केंद्रित केले. ते महाआघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा नैसर्गिक चेहरा होते; परंतु काँग्रेसकडून मंजुरीला विलंब झाल्याचा नकारात्मक परिणाम झाला. महाआघाडीतले दोन प्रमुख पक्ष असलेले राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस, निवडणूक प्रचारादरम्यान एकत्र येण्यापेक्षा एकमेकांशी स्पर्धा करताना अधिक दिसले. राहुल गांधी यांनी आपला पाठिंबा वाढवण्यासाठी ‘ईबीसी’वर लक्ष केंद्रित करणारा दहा कलमी अजेंडा जाहीर केला होता; परंतु तेजस्वी यांच्या जाहीरनाम्यात त्याला फारसे महत्त्व दिले गेले नाही. जागावाटपापासून जाहीरनामा आणि निवडणुकीच्या मुद्द्यांपर्यंत महाआघाडी गोंधळलेली दिसली.वस्तुत: बिहार अचानक गरीब राज्य बनलेले नाही. नितीश यांच्या राजवटीत स्थलांतर सुरू झाले नाही. शिवाय, आजही ‘जंगलराज’ हा निवडणुकीचा मुद्दा ठरला; जो गेल्या वीस वर्षांमध्ये परिस्थिती सुधारल्याचे दिसत असूनही स्पष्ट मुद्दा बनला. महाआघाडीच्या वतीने राहुल यांनी ‘मत चोरी’वर लक्ष केंद्रित केले. मतदान हक्क यात्रेनंतर जवळजवळ दोन महिने बिहारमधून त्यांची अनुपस्थितीदेखील प्रश्न उपस्थित करत राहिली. निकालांवरून दिसून येते, की जनतेच्या न्यायालयाने मतचोरीचे आरोप फेटाळून लावले आहेत. नितीशकुमार यांच्या वीस वर्षांच्या राजवटीत झालेला महाआघाडीचा दारुण पराभव त्यांच्या मनोबलाला धक्का देणारा आणि त्यांच्या भविष्यावर शंका निर्माण करणारा आहे.गेल्या निवडणुकीमध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयाला आलेला राष्ट्रीय जनता दल यावेळी त्याच्या आकाराच्या निम्म्यापेक्षा कमी झाला आहे, तर दलितांचा आधार असलेला लोकजनशक्ती पक्ष (आर) काँग्रेसपेक्षाही मोठा झाला आहे. स्पष्टपणे, महाआघाडीसाठी हा मोठ्या संकटाचा क्षण आहे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी पुन्हा एकदा सिद्ध केले, की काँग्रेस पक्षातील अंतर्गत कलह, कमकुवत संघटना आणि नेतृत्वातील विसंगती यामुळे पक्ष सतत खाली खेचला जात आहे. राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी निवडणूक क्षेत्रात कोणतेही प्रयत्न सोडले नाहीत; परंतु हे कठोर परिश्रम मतदारांना एक मजबूत राजकीय संदेश देण्यात अपयशी ठरले. परिणामी, काँग्रेस पुन्हा एकदा बिहारच्या लोकांच्या विश्वासाला सार्थ ठरण्यात अपयशी ठरली. बिहार काँग्रेस अध्यक्ष आणि प्रभारी कृष्णा अल्लावारू यांच्या कार्यशैलीबद्दल निवडणुकीपूर्वीच महाआघाडीमध्ये असंतोष निर्माण झाला होता. तिकीट वाटप, जागानिवड आणि स्थानिक गतिमानता समजून घेण्यातील कथित अपुरेपणामुळे राष्ट्रीय जनता दल-काँग्रेस संबंध ताणले गेले.जागा वाटपादरम्यान संघटन किंवा प्रभावी ग्राउंड नेटवर्क नसतानाही काँग्रेस आपल्या वाट्यापेक्षा जास्त जागा मिळवत असल्याचे राष्ट्रीय जनता दलाने वारंवार सूचित केले. म्हणूनच काँग्रेस महाआघाडीमध्ये कमकुवत ठरली. राष्ट्रीय जनता दलामध्ये काँग्रेसी विचारांच्या मतांचे हस्तांतरण करू शकत नाही किंवा युतीला कोणतेही अतिरिक्त फायदे देऊ शकत नाही, असा समज दृढ झाला. तिकीट वाटपावरून होणारा वाद, स्थानिक पातळीवरील गोंधळ आणि निवडणुकीदरम्यान उद्भवणाऱ्या तक्रारींमुळे महाआघाडीची एकता बिघडली. मतदान अधिकार यात्रेदरम्यान काँग्रेस नेतृत्व आणि जमिनीवरील कार्यकर्त्यांशी अपेक्षित संबंध यामध्ये संतुलन दिसले नाही. राहुल आणि प्रियंका गांधी यांनी बिहारमध्ये डझनभर सभा घेतल्या; परंतु या सभा स्थानिक मुद्द्यांपेक्षा मोदी यांच्यावर टीकेसाठीच होत्या. बिहारचे राजकारण जातीय रचना, प्रादेशिक असंतोष आणि स्थानिक नेतृत्वाच्या प्रभावावर अवलंबून आहे. काँग्रेस नेतृत्व पुन्हा एकदा जमिनीवरील हे वास्तव खोलवर समजून घेण्यात अपयशी ठरला. काँग्रेस नेत्यांचा एक मोठा वर्ग कबूल करतो, की सर्वोच्च नेतृत्वाला जमिनीवरील वास्तवाची माहिती नाही. याच रणनीतीची वारंवार पुनरावृत्ती केली जाते. तथापि, बिहारमधील निवडणुका स्थानिक धोरणे, जातीय समीकरणे आणि नेत्याच्या वैयक्तिक विश्वासार्हतेवर लढल्या जातात. हा संपर्क तुटणे हा काँग्रेसचा सर्वात मोठी कमकुवतपणा बनला आहे. बिहारमध्ये काँग्रेसचा पराभव नवीन नाही; परंतु या वेळी तो जास्तच नामुष्कीजनक आहे.- अजय तिवारी
पाचगणीत राजकीय घमासान! नगराध्यक्षपदासाठी ८ उमेदवार रिंगणात, तर नगरसेवकपदासाठी १२९ अर्ज
प्रभात वृत्तसेवा पाचगणी – पाचगणी नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी रंगतदार स्थितीत आली असून २० जागांसाठी तब्बल १२९ अर्ज दाखल झाल्याने निवडणूक चुरशीची होणार ही निश्चित झाले आहे. आज पालिका सभागृहात अर्जाची छाननी करण्यात आली. यावेळी नगराध्यक्षपदासाठी १२ तर नगरसेवकपदासाठी ११६ नामनिर्देशापत्रे पात्र ठरली. त्यामुळे अध्यक्षपदासाठी आता ८ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे अध्यक्षपदासाठी बहुरंगी लढत रंगणार आहे. […] The post पाचगणीत राजकीय घमासान! नगराध्यक्षपदासाठी ८ उमेदवार रिंगणात, तर नगरसेवकपदासाठी १२९ अर्ज appeared first on Dainik Prabhat .
Matheran Election : भाजप शिवसेना युतीचा प्रचार वेगात; २१ उमेदवारांसह जोरदार शक्तीप्रदर्शन
प्रभात वृत्तसेवा माथेरान – आगामी नगरपरिषद निवडणुकीत भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या युतीने प्रचाराची धुरा हाती घेतली आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर युतीचीच आघाडी शहरात स्पष्टपणे दिसत आहे. घरोगरी भेटी, सोशल मीडिया मोहीमा, लहान-मोठ्या बैठका आणि संघटनात्मक जाळ्याचा प्रभावी वापर करत युती मतदारांपर्यंत वेगाने पोहोचत आहे.या निवडणुकीत १० पुरुष आणि १० महिला असे २० नगरसेवक उमेदवार आणि […] The post Matheran Election : भाजप शिवसेना युतीचा प्रचार वेगात; २१ उमेदवारांसह जोरदार शक्तीप्रदर्शन appeared first on Dainik Prabhat .
PCMC Election : महापालिकेचे आरक्षण पन्नाशीच्या आत; माजी नगरसेवकांसह इच्छुकांची चिंता मिटली
प्रभात वृत्तसेवा पिंपरी – राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांपेक्षा जास्त होणार नाही, याची दक्षता घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने राज्य शासनाला सुचित केले आहे. मात्र, राज्यात काही ठिकाणी ही मर्यादा ओलांडल्याने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. याबाबत न्यायालयाने राज्य सरकार व निवडणूक आयोगावर ताशेरे ओढले आहे. ज्या ठिकाणी ही मर्यादा ओलांडली […] The post PCMC Election : महापालिकेचे आरक्षण पन्नाशीच्या आत; माजी नगरसेवकांसह इच्छुकांची चिंता मिटली appeared first on Dainik Prabhat .
PCMC News : महापालिकेतील ५० जणांच्या पदाेन्नती रखडल्या
प्रभात वृत्तसेवा पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे तत्कालीन आयुक्त शेखर सिंह यांची अचानक बदली झाल्यामुळे पालिकेतील २५ संवर्गातील ५० अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पदाेन्नती रखडल्या आहेत. त्यामुळे या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे नुकसान हाेत असून लवकरात-लवकर पदाेन्नती मिळावी, अशी अपेक्षा कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे.महापालिकेचे तत्कालीन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांची ७ ऑक्टाेबर राेजी नाशिक कुंभमेळा आयुक्त म्हणून बदली झाली. महामेट्राेचे व्यवस्थापकीय […] The post PCMC News : महापालिकेतील ५० जणांच्या पदाेन्नती रखडल्या appeared first on Dainik Prabhat .
दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, २० नोव्हेंबर २०२५
पंचांगआज मिती कार्तिक अमावस्या नंतर मार्गशीर्ष शके १९४७, चंद्र नक्षत्र विशाखा, योग शोभन, चंद्र राशी वृश्चिक, भारतीय सौर २९ मार्गशीर्ष शके १९४७, गुरुवार दि. २० नोव्हेंबर, २०२५. मुंबईचा सूर्योदय ६.४८, मुंबईचा सूर्यास्त ५.५९, मुंबईचा चंद्रोदय नाही. मुंबईचा चंद्रास्त ५.५२, राहू काळ १.४७ ते ३.११, कार्तिक अमावास्या, अमावास्या समाप्ती दुपारी १२.१६.दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)मेष : महत्त्वाच्या कामांना गती मिळेल.वृषभ : कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहणार आहे.मिथुन : कामात यश लाभेल, मानसिक उत्साह वाढेल.कर्क : जिद्द व चिकाटी वाढेल.सिंह : हातातील कामे वेगाने पूर्ण कराल.कन्या : कौटुंबिक सुख मिळेल.तूळ : स्पर्धकांवर मात करता येईल.वृश्चिक : नावलौकिक मिळेल.धनू : नियम पाळणे हितकारक ठरेल.मकर : महत्वाच्या कामात समस्या उत्पन्न होण्याची शक्यता आहे.कुंभ : दिवस आनंदात जाईल.मीन : सकारात्मक विचार कराल.
Delhi bomb blast case: दहशतवादी डॉक्टरांच्या नेटवर्कचा पर्दाफाश, २० हून अधिक अटक
नवी दिल्ली : दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात १० नोव्हेंबरला झालेल्या भयंकर बॉम्बस्फोटानंतर दिल्लीमध्ये दहशतवादाच्या घटनेला नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणी सुरक्षा यंत्रणांनी २० हून अधिक दहशतवादी आणि त्यांच्याशी संबंधित व्यक्तींना अटक केली आहे. बॉम्बस्फोटात सहभागी असलेले दहशतवादी डॉक्टर आणि त्यांचे सहकारी, त्यांच्या कृत्यांमुळे देशभरात चिंतेचं वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणातील जमा झालेले पुरावे आणि तपासातून, या दहशतवादी जाळ्याचे सर्व धागेदोरे उलगडत आहेत.मुख्य अटकेतील आरोपी: डॉ. उमर उन नबी – आत्मघाती बॉम्बर, जो लाल किल्ला परिसरातील बॉम्बस्फोटात सहभागी होता. त्याचे कनेक्शन जैश-ए-मोहम्मदशी होते. डॉ. शाहीन – जैश-ए-मोहम्मदच्या महिला शाखेची प्रमुख, जी महिला दहशतवादी भरती करण्याचे काम करत होती. डॉ. मुझम्मिल शकील – दहशतवादी मॉड्यूलचा सदस्य, जो पुलवामामध्ये सक्रिय होता आणि त्याच्या घरातून मोठ्या प्रमाणात शस्त्रे जप्त करण्यात आली. आमिर रशीद अली – कार पुरवणारा, ज्याने दिल्ली बॉम्बस्फोटात वापरलेली आय-२० कार पुरवली होती.दिल्ली बॉम्बस्फोटाच्या घटनेमध्ये मुख्य सूत्रधार असलेला डॉ. उमर उन नबी, जो जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख सदस्य आहे, त्याच्या इशाऱ्यावर विविध हल्ल्यांची योजना आखली गेली होती. उमरने सुमारे एक वर्ष काश्मीर आणि श्रीनगरमध्ये हल्ल्यांच्या तयारीत वेळ घालवला. त्याच्या मागे असलेल्या दहशतवादी मॉड्यूलला एक-एक करून उघडकीस आणले जात आहे.नॅशनल इन्क्वायरी एजन्सी (NIA) आणि दिल्ली पोलिसांनी १० हून अधिक व्यक्तींना अटक केली आहे, ज्यात त्याच्याशी संबंधित लोक, मदत करणारे मौलवी, तसेच जैशच्या महिला शाखेतील सदस्यांचा समावेश आहे. त्यात हापूरच्या मेडिकल कॉलेजमधील सहाय्यक प्राध्यापक डॉ. फारुख उमर याचा देखील समावेश आहे, ज्याने या दहशतवादी नेटवर्कसाठी कार्य केले. त्याच्या लॉकरमधून शस्त्रसाठा जप्त करण्यात आला.या बॉम्बस्फोटाच्या तपासात आणखी काही संशयितांना अटक केली आहे. यामध्ये जम्मू आणि काश्मीरमधील डॉक्टर आणि सहाय्यक कर्मचारी यांचा समावेश आहे. काश्मीरमधील अनंतनाग येथील डॉ. आदिल अहमद याच्या बँक लॉकरमधून एके-४७ रायफल जप्त केली गेली. त्याने जैश-ए-मोहम्मदच्या कटात सहभागी असल्याचे कबूल केले आहे.डॉ. शाहीन, जी जैश-ए-मोहम्मदच्या महिला शाखेची प्रमुख होती, तिला अटक केल्यानंतर, सुरक्षा यंत्रणांनी खुलासा केला आहे की, ती महिला दहशतवादी भरण्याचे कार्य करत होती. ती 'जमात उल मोमिनत' या गुप्त महिला गटाची प्रमुखही होती, जी रात्री उशिरा व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून आपली योजना आखत होती.दिल्ली बॉम्बस्फोटाच्या प्रकरणात अल फलाह विद्यापीठाचा उल्लेख महत्त्वपूर्ण ठरला आहे. हे विद्यापीठ, जे अनेक दहशतवादी डॉक्टरांच्या नेटवर्कचे केंद्र बनले होते. विशेषतः, डॉ. शाहीन आणि डॉ. मुझम्मिल शकील यांच्या सहकार्याने, अल फलाह विद्यापीठ दहशतवादाच्या योजनांचे केंद्र बनले होते.पोलिस आणि सुरक्षा यंत्रणा या प्रकरणी अजून तपास सुरू आहेत. हल्ल्यांचे सूत्रधार आणि त्यांचे साथीदार अजूनही पोलीसांच्या रडारवर आहेत, आणि पुढील कारवाईची वाट पाहिली जात आहे. याव्यतिरिक्त, अशा प्रकारच्या दहशतवादी नेटवर्क्सला रोखण्यासाठी कडक सुरक्षा उपाय आणि चाचण्या अधिक प्रभावी बनवण्याचे निर्देश दिले गेले आहेत.दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात ज्या दहशतवादी नेटवर्कने आपली योजना अंमलात आणली, ते त्यांचे एक जटिल आणि गुप्त नेटवर्क सिद्ध झाले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने ही एक मोठी घरे होती, ज्यात एकाच वेळी विविध लोकं, डॉक्टर, आणि अतिरेकी सहभागी झाले होते. यामध्ये सहभागी असलेल्या प्रत्येकाच्या अटकेनंतर, दिल्लीतील सुरक्षा यंत्रणांना मोठे यश मिळाले आहे, तरीही अजूनही या नेटवर्कचा संपूर्ण पर्दाफाश होण्यासाठी अधिक तपास आवश्यक आहे.दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात उघडकीस आलेले दहशतवादी नेटवर्क हे सुरक्षेच्या दृष्टीने एक मोठे आव्हान ठरले, ज्यात डॉक्टर, सामान्य नागरिक आणि अतिरेकी यांचा समावेश होता. या सर्वांच्या अटकेनंतर दिल्ली सुरक्षा यंत्रणेला मोठे यश मिळाले आहे, तरीही या संपूर्ण नेटवर्कचा पूर्ण तपास आणि उलगडा करण्यासाठी अजूनही काम सुरू आहे.
Israel : इस्रायलबरोबर व्यापार कराराचा प्रयत्न; 60 सदस्यीय शिष्टमंडळ इस्रायलला जाणार
नवी दिल्ली : भारत आणि इस्रायल दरम्यान मुक्त व्यापार करार करण्याची बोलणी चालू आहे. या बोलणीचा आढावा घेण्यासाठी वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्यासह 60 जणांचे शिष्टमंडळ तीन दिवसाच्या इस्रायल भेटीवर जाणार आहे. फक्त मुक्त व्यापार करारच नाही तर इस्रायल आणि भारत दरम्यान गुंतवणुकीची आणि तंत्रज्ञानाची देवाण-घेवाण वाढावी यासाठीही प्रयत्न करण्यात येणार आहेत. दोन्ही देशांदरम्यान या […] The post Israel : इस्रायलबरोबर व्यापार कराराचा प्रयत्न; 60 सदस्यीय शिष्टमंडळ इस्रायलला जाणार appeared first on Dainik Prabhat .
Cough syrups seized : ९३ हजार कफ सिरप जप्त; २ कोटींचा भलामोठा रॅकेट उघड
वाराणसी : उत्तर प्रदेश अन्न सुरक्षा आणि औषध प्रशासन आणि पोलिसांनी मिळून एका मोठ्या कोडिन-आधारित कफ सिरपच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. हे सिरप नशेशी संबंधित कामांसाठी वापरले जात होते. वाराणसी हे या रॅकेटचे मुख्य केंद्र होते. या कारवाईत तब्बल ९३ हजार बाटल्यांसह २ कोटी रुपयांचा मुद्दमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, कोडिन-आधारित कफ सिरपच्या गैरवापरामुळे […] The post Cough syrups seized : ९३ हजार कफ सिरप जप्त; २ कोटींचा भलामोठा रॅकेट उघड appeared first on Dainik Prabhat .
अमित शाहांशी बोलले एकनाथ शिंदे, महायुतीतला संघर्ष टाळण्यासाठी केली चर्चा
नवी दिल्ली : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. ही बैठक सुमारे ४५ मिनिटे चालली, या बैठकीत राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर सखोल चर्चा झाली. सूत्रांच्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्याकडे राज्यातील काही राजकीय घडामोडींबद्दल नाराजी व्यक्त केली आणि काही तक्रारी मांडल्या.एकनाथ शिंदे यांनी बैठक दरम्यान हे स्पष्ट केले की, काही नेत्यांची कार्यशैली आणि स्वार्थी वागणूक युतीसाठी धोका निर्माण करत आहे. युतीतल्या सदस्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप टाळावे, असे त्यांनी सुचवले. शिंदे यांच्या मते, राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी उत्तम वातावरण निर्माण झाले आहे, पण काही नेत्यांच्या कृतीमुळे ते वातावरण खराब होऊ शकते, आणि त्यामुळे विरोधकांना फायदा होऊ शकतो.शिंदे यांनी सांगितले की, युतीच्या विजयाच्या घोडदौडीत काही अनावश्यक अडथळे निर्माण होऊ नयेत. मीडियात येणाऱ्या उलटसुलट बातम्या आणि चर्चांमुळे कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ निर्माण होतोय. त्यामुळे जनतेत संभ्रम निर्माण होतो आहे. यासाठी, शिंदे यांनी आपल्या सहकाऱ्यांना आणि युतीतील इतर नेत्यांना संयमाने वागण्याचे आवाहन केले.मुख्यमंत्र्यांनीदेखील युतीतील अंतर्गत प्रवेश टाळण्याच्या बाबतीत आपला ठाम भूमिका घेतली आहे, आणि एकत्रितपणे योग्य आणि सामंजस्यपूर्ण वागणूक ठेवणे आवश्यक असल्याचे सांगितले.
आरोग्य क्षेत्रावरील खर्च वाढवा; अर्थ मंत्रालयाकडे आरोग्य क्षेत्रातील कंपन्यांची मागणी
नवी दिल्ली : भारतात सरकारकडून आरोग्य क्षेत्रावर फार कमी खर्च केला जातो. हा खर्च वाढवून राष्ट्रीय उत्पन्नाच्या किमान 2.5% होण्याची गरज आहे. त्याचबरोबर आरोग्यविषयक पूर्व तपासणीला चालना मिळावी यासाठी काही कर सवलती आवश्यक आहेत असे निवेदन आरोग्य क्षेत्राने अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर अर्थ मंत्रालयाला सादर केले आहे. करोनानंतर खरेतर या क्षेत्रावरील खर्च वाढण्याची गरज होती. मात्र अजूनही […] The post आरोग्य क्षेत्रावरील खर्च वाढवा; अर्थ मंत्रालयाकडे आरोग्य क्षेत्रातील कंपन्यांची मागणी appeared first on Dainik Prabhat .
अनुसूचित जातीच्या विविध रिक्त्त पदांच्या भरतीचा अनुशेष भरा!
महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगाचे मुंबई महानगरपालिकेला निर्देशमुंबई (खास प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिका मुख्यालय येथे बुधवारी १९ नोव्हेंबर २०२५ रोजी बैठक पार पडली. या बैठकीत महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील अनुसूचित जातीच्या विविध रिक्त्त पदांच्या भरतीचा अनुशेष भरून काढावा तसेच पदोन्नतीचे विषय तातडीने मार्गी लावण्यात यावेत, असे निर्देश अडसूळ यांनी प्रशासनाला या बैठकीदरम्यान दिले.महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य सचिव गोरक्ष लोखंडे, महानगरपालिकेचे उपायुक्त (सामान्य प्रशासन) किशोर गांधी, उपायुक्त (विशेष अभियांत्रिकी) यतीन दळवी, उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर, संचालक (अभियांत्रिकी सेवा व प्रकल्प) (अतिरिक्त कार्यभार) पुरूषोत्तम माळवदे तसेच विविध विभागांचे प्रमुख याप्रसंगी उपस्थित होते.महानगरपालिकेने आर्थिक दुर्बल घटकांवर विविध योजनांच्या माध्यमातून केलेला खर्च, अनुसूचित जातींसाठी प्राप्त होणारा निधी याबाबतचा आढावा यावेळी आयोगाकडून घेण्यात आला. तसेच लाड पागे समिती, अनुकंपा तत्वावरील प्रकरणांची माहिती या बैठकीत घेण्यात आली.स्वच्छता कामगारांसाठीच्या आश्रय योजनांचा आढावा घेण्यात आला. तसेच स्वच्छता कामगारांना कायमस्वरूपी घरे उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने केलेल्या उपाययोजनांचा आढावा आयोगामार्फत घेण्यात आला. अनुसूचित जातीसाठी महानगरपालिकेमार्फत राबविण्यात येणाऱ्या संपूर्ण योजनांची माहिती आयोगाने जाणून घेतली. तसेच दलित वस्तीत मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या नागरी सेवासुविधांचा आढावा आयोगामार्फत घेण्यात आला.
वांद्रे आणि खार पश्चिम भागात रविवारी कमी दाबाने पाणी पुरवठा
मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता विभागामार्फत वांद्रे पश्चिम येथील पाली हिल जलाशयाच्या इनलेटवरील व्हॉल्व्ह दुरूस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. शनिवारी २२ नोव्हेंबर २०२५ रोजी मध्यरात्री १ वाजेपासून पहाटे ५ वाजेपर्यंत हे दुरूस्ती कामकाज अपेक्षित असून दुरूस्ती पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल. मात्र, या दुरुस्तीमुळे ‘एच पश्चिम’ विभागातील काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करावा व काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.एच पश्चिम’ अर्थात वांद्रे आणि खार पश्चिम विभागातील नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. दुरुस्तीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरावे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून पुढील ४ ते ५ दिवस पाणी उकळून - गाळून प्यावे असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.या भागात होणार कमी दाबाने पाणीपुरवठाखार दांडपाडा, गजधरबंध झोपडट्टीचा काही भाग, खार पश्चिमेचा काही भाग (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ - सकाळी ६.३० ते ८.३० वा.) (वेळेत बदल नाही) (कमी दाबाने पाणीपुरवठा)कांतवाडी परिसराचा काही भाग, पालीनाका, पाली गावठाण, शेरली, राजन व माला गावाचा काही भाग (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ - सकाळी १०.०० ते दुपारी २.०० वा.) (वेळेत बदल नाही) (तुलनेने कमी दाबाने पाणीपुरवठा)खारदांडा काेळीवाडा, दांडपाडा, च्युइम गावठाण, गजदरबंध झोपडट्टीचा काही भाग, खार पश्चिमेचा काही भाग (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ - सायंकाळी ५.३० ते रात्री १०.०० वा.) (विस्तारित तास) (कमी दाबाने पाणीपुरवठा)हनुमान नगर, लक्ष्मी नगर, युनियन उद्यान मार्ग क्रमांक १ ते ४, पालीहिल आणि च्युइम गावाचा काही भाग (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ - दुपारी २.०० ते सायंकाळी ५.०० वा.) (वेळेत बदल नाही) (कमी दाबाने पाणीपुरवठा).‘एच पश्चिम’ विभागातील नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. दुरुस्तीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरावे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून पुढील ४ ते ५ दिवस पाणी उकळून - गाळून प्यावे, महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
मुंबई महापालिका मुख्यालय २० ते २५ मिनिटे अंधारात
शॉर्टसर्कीटमध्ये बिघाड झाल्याने वीज पुरवठा खंडितकोट्यवधीचा अर्थसंकल्प, पण महापालिका मुख्यालयात लिफ्टच्या विजेची बॅकअप यंत्रणेचा अभावमुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिका मुख्यालयात तब्बल १५ ते २० मिनिटे बत्ती गुल झाली असून वीज पुरवठा खंडित झाल्याने मुख्यालय इमारतीतील विस्तारीत इमारतीतील प्रवेशद्वार क्रमांक सात येथील उदवाहनात (लिफ्ट) पाच ते सहा जण अडकले होते. लिफ्टचे चालक आणि महापालिका सुरक्षा अधिकारी व जवानांनी तातडीने चावीद्वारे लिफ्टचे दरवाजे उघडून सर्वांची सुटका केली. विशेष म्हणजे लिफ्टकरता स्वतंत्र वीजेचा पुरवठा करण्यासाठी इर्न्व्हटरच्या माध्यमातून बॅकअप सेवा असणे आवश्यक आहे. परंतु, सुमारे ७५ हजार कोटींचा अर्थसंकल्प असलेल्या महापालिकेला आपल्या मुख्यालयातील इमारतीत लिफ्टकरता बॅकअप यंत्रणा बसवता येत नाही.त्यामुळे अशाप्रकारे लिफ्टमध्ये अडकून कुणाचा जीव गेल्यानंतर प्रशासन जागे होणार का असा सवाल उपस्थित होत आहे.मुंबई इमारत मुख्यालयाच्या विस्तारीत इमारतीत दुपारी ३ वाजून ५० मिनिटांनी वीज पुरवठा खंडित झाला. त्यानंतर हा पुरवठा ४ वाजून १२ मिनिटांनी सुरळीत झाला. मात्र, वीज पुरवठा खंडित झाल्याने लिफ्टमध्ये काही जण अडकले गेले. त्यामुळे सुरक्षा विभागाचे अधिकारी आणि जवानांनी लिफ्ट चालकांसह सर्व मजल्यांवर जावून अडकलेल्यांचा शोध घेतला. त्यावेळी प्रवेशद्वार क्रमांक ७ येथील लिफ्टमध्ये तळ मजला आणि पहिला मजला या दरम्यान लिफ्ट अडकली गेली होती. त्यामुळे सात ते आठ मिनिटांमध्ये लिफ्टचा दरवाजा उघडण्यात यश आले. यामध्ये चार ते पाच जण अडकले होते आणि त्यात ८५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचाही समावेश होता . जे हयातीचा दाखला देण्यासाठी तथा त्याचा अर्ज घेण्यासाठी महापालिकेत आले होते. हे ज्येष्ठ नागरिक महापालिकेच्या माध्यमिक शाळेतील निवृत्त मुख्याध्यापक होते. त्यानंतर बाहेर काढल्यानंतर सर्व लिफ्टची तपासणी करून झाल्यानंतर सव्वा चार वाजात वीज पुरवठा सुरळीत झाला.महापालिका मुख्यालयातील विस्तारीत इमारतीच्या तळघरात असलेल्या वीज सबस्टेशनमध्ये शॉर्ट सर्कीट झाल्यामुळे हा विजेचा पुरवठा खंडित झाल्याची माहिती मिळत आहे. बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी हा पुरवठा सुरळीत केला असला तरी मुंबईतील अनेक इमारतींमध्ये लिफ्टकरता पर्यायी विजेचा पुरवठा करण्यासाठी बॅकअप यंत्रणा बसवली जाते, किंवा अचानक लिफ्ट बंद झाल्यास लिफ्ट मजल्यावर येवून थांबते अशाप्रकारची कोणतीही यंत्रणा नसल्याने जर वेळीच अडकलेल्यांना बाहेर न काढल्यास तथा विलंब झाल्यास कुणाच्या जीवावर बेतू शकते.आमदार प्रसाद लाड यांची अंधारात चढले मजलेभाजपचे नेते आणि आमदार प्रसाद लाड हे काही कारणास्तव महापालिका मुख्यालयातआले होते. पण त्याचवेळी वीज पुरवठा खंडित झाल्याने त्यांना अंधारात चालतच दोन मजले चढत अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांच्या कार्यालयात जावे लागले. याच दरम्यान अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांना बाहेर जायचे होते. परंतु, वीज पुरवठा खंडित झाल्याने त्यांना कार्यालयातच थांबावे लागले. त्यानंतर वीज पुरवठा सुरळीत झाल्यानंतर पाच मिनिटांनी त्या लिफ्टमधून खाली उतरल्या
मुंबई महापालिकेच्या दुकाने आस्थापना विभागातील रिक्त पदे भरणार
सुविधाकारांची ४८ रिक्तपदे खात्यांतर्गत लिपिकांमधून भरणारऑनलाईन परीक्षेसाठी आयबीपीएस संस्थेची निवडमुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या दुकाने व आस्थापना खात्यातील सुविधाकार पदाची ४८ रिक्तपदे भरण्यात येणार असून ही सर्व पदे कार्यकारी सहायक अर्थात लिपिक किंत तत्सम कर्मचाऱ्यांमधून खात्यांतंर्गत भरण्यात येणार आहे. यासाठी लवकरच ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यामुळे लवकरच यासाठी लिपिक पदांवरील कर्मचाऱ्यांकडून अर्ज मागवून ही निवड प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. या ऑनलाईन परीक्षेसाठी आयबीपीएस या कंपनीची निवड करण्यात आली आहे.मुंबईतील विविध खात्यांमधील तसेच विभागांमधील क आणि ड संवर्गातील कोट्यातील पदे सरळसेवेने भरण्याबाबत एकत्रित मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर कोट्यातील पदे सरळसेवेने भरताना स्पर्धा परीक्षा प्रक्रिया टीसीएस,आयबीपीएस या कंपनीच्रूा माध्यमातून ऑनलाईज अर्ज मागवून केली जात आहे.दुकाने आणि आस्थापना खात्यातील निरिक्षकांची अनेक पदे रिक्त असून सुविधाकार संवर्गातीलही अनेक पदे रिक्त आहेत. त्या सुविधाकार संवर्गातील तब्बल ४८ पदे रिक्त असून ही पदे भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागवून वस्तूनिष्ठ ऑनलाईन परीक्षा घेण्यासाठी संस्थेची निवड करण्यात आली आहे. या ऑनलाईन परीक्षेसाठी आयबीपीएस या संस्थेची नेमणूक करण्यात आली. या ऑनलाईन परीक्षेसाठी सुमारे अर्ज प्राप्त होतील असा अंदाज आहे.
Adani Group : अदानी करणार जयप्रकाश असोसिएट्सची खरेदी
नवी दिल्ली : अदानी समूहाने अडचणीत असलेल्या जयप्रकाश असोसिएट्सला खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या समूहाला कर्ज दिलेल्या संस्थांनी आदानी समूहाला ही कंपनी खरेदी करण्यास काही हरकत नाही असे सांगितले आहे. ही प्रक्रिया बोलीच्या माध्यमातून पूर्णत्वास जात आहे. अदानी समूहासह दालमिया सिमेंट, वेदांत समूहाने जयप्रकाश असोसिएटसाठी बोली बोलली होती. कर्ज देणार्या संस्थांची 89% मते […] The post Adani Group : अदानी करणार जयप्रकाश असोसिएट्सची खरेदी appeared first on Dainik Prabhat .
इस्रायलकडून लेबेनॉनमधील छावणीवर हल्ला; १३ जण ठार
बैरुत (लेबेनॉन) – इस्रायलने मंगळवारी रात्री लेबेनॉनमधील शरणार्थ्यांच्या छावणीवर जोरदार हवाई हल्ला केला. या हल्ल्यामध्ये किमान १३ जण ठार झाले आहेत आणि अनेक जण जखमी झाले आहेत. लेबेनॉनच्या दक्षिणेकडील अईन एल- हिलवेह या अत्यंत दाटीवाटीच्या भागात पॅलेस्टिनी शरणार्थ्यांसाठी ही छावणी सुरू करण्यात आली होती. जवळपास वर्षभरापुर्वी इस्रायल आणि लेबेनॉनमदील हिज्बुल्लाहमध्ये युद्धबंदी करार झाल्यापासून इस्रायलने केलेला […] The post इस्रायलकडून लेबेनॉनमधील छावणीवर हल्ला; १३ जण ठार appeared first on Dainik Prabhat .
मुंबई : कंपन्यांनी चांगले ताळेबंद जाहीर करण्याबरोबरच दुसर्या तिमाहीतील भारताचा विकासदर 7 % पेक्षा जास्त राहण्याची शक्यता आता गृहीत धरण्यात येत आहे. अमेरिकेसोबतचे मतभेद संपुष्टा देण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे अमेरिकेला निर्यात करणार्या कंपन्यांच्या शेअरच्या भावात बरीच वाढ झाली आहे. त्यात माहिती तंत्रज्ञान कंपन्यांचा जास्त समावेश आहे. अशा परिस्थितीत बुधवारी शेअर बाजाराचे निर्देशांक बर्याच प्रमाणात वाढले. […] The post Share Market : देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांकडून खरेदी; आयटी क्षेत्रातील तेजीमुळे शेअर बाजार निर्देशांक उंचावले appeared first on Dainik Prabhat .
Bangladesh : बांगलादेशातील स्थिती हळूहळू पुर्वपदावर; मात्र तणाव अद्याप कायम
Bangladesh – बांगलादेशमध्ये बुधवारी शांतता होती पण तणाव कायम होता. सुरक्षा दलांनी प्रमुख शहरांमध्ये कडक पहारा ठेवला होता. ढाका आणि इतर प्रमुख शहरी केंद्रांमध्ये वाहतूक प्रवाह आणि दैनंदिन व्यवहार हळूहळू सामान्य होण्याचे संकेत दिसत आहेत, सलग दुसऱ्या दिवशी हिंसाचाराची कोणतीही घटना घडली नाही. तथापि अवामी लीगने बुधवारपासून तीन दिवसांच्या देशव्यापी आंदोलन, निदर्शने आणि प्रतिकाराच्या आवाहनाच्या […] The post Bangladesh : बांगलादेशातील स्थिती हळूहळू पुर्वपदावर; मात्र तणाव अद्याप कायम appeared first on Dainik Prabhat .
इंदुरीकर महाराज झाले नेटकऱ्यांच्या टीकेचे धनी
मुंबई : आपल्या खास शैलीत कीर्तन आणि समाजप्रबोधन करणारे इंदुरीकर महाराज आपल्या मुलीच्या साखरपुड्यात केलेल्या अमाप उधळपट्टीमुळे चर्चेत आले आहेत. समाजप्रबोधन आणि कीर्तन सांगणाऱ्या या महाराजांचे वार्षिक उत्पन्न किती असेल याबद्दल सर्वत्र चर्चा सुरु आहे.इंदुरीकर महाराज कर्ज काढून लग्न सोहळ्यावर खर्च करू नका, असा सल्ला देतात. पण त्यांनीच स्वतःच्या मुलीच्या म्हणजेच ज्ञानेश्वरी इंदुरीकरच्या साखरपुड्यावर अफाट खर्च केला. यावरुन सोशल मीडियात इंदुरीकर महाराज ट्रोल होत आहेत. या घडामोडीवर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.काही जण इंदुरीकर महाराजांनी केलेल्या खर्चावर टीका करत आहेत तर काही जण इंदुरीकर महाराजांचे खर्चासाठी समर्थन करत आहेत. कर्ज काढून लग्न सोहळे करू नयेत या मताचे महाराज आहेत असे त्यांच्या समर्थानात बोलणाऱ्यांचे मत आहे. महाराजांची आर्थिक परिस्थिती ही भक्कम असल्यामुळे त्यांनी खर्च केला असेही त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे महाराजांचे उत्पन्न नक्की आहे तरी किती हा प्रश्न सध्या सगळ्यांच्याच मनात आहे.सध्या सोशल मीडियात फिरत असलेल्या एका व्हिडिओचा आधार घेत महाराजांचं वार्षिक उत्पन्न हे जवळपास सात कोटींच्या घरामध्ये आहे. तसेच महाराजांच्या एका किर्तनाचं मानधन जवळपास पन्नास हजारांच्या आसपास असल्याची माहिती समोर येत आहे. सतत होणाऱ्या टीकेमुळे महाराजांनी तीव्र संताप व्यक्तकेलाआहे.
भाजपमधील वाढत्या इनकमिंगमुळे शिवसेनेत अस्वस्थता, एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना
मुंबई : महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राजकीय पक्ष मोर्चेबांधणी करत आहेत. या निवडणुकांसाठी प्रत्येक पक्ष ताकद वाढवण्याच्या प्रयत्नात आहे. यामुळे भाजपमध्ये इनकमिंग वाढले आहे आणि इतर पक्षांमधून आऊटगोईंग सुरू आहे. भाजपमधील वाढत्या इनकमिंगमुळे शिवसेनेत असंतोष वाढू लागला आहे.शिवसेनेतला असंतोष टोकाला जाण्याची शक्यता आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेने भाजप विरोधात स्वबळाची तयारी सुरू केली आहे. दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना या पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे तातडीच्या दिल्ली दौऱ्यावर रवाना झाले आहेत. एकनाथ शिंदे दिल्लीत भाजपच्या सर्वोच्च नेत्यांची भेट घेऊन त्यांची बाजू मांडण्याची शक्यता आहे.निवडणुकीसाठी राजकीय पक्ष तयारी करत असतानाच शिवसेना आणि भाजप यांच्यात तणाव वाढण्यास सुरुवात झाली आहे. कल्याण-डोंबिवलीमध्ये स्थानिक पातळीवर शिवसेनेने भाजपला थेट युती तोडण्याचा अल्टिमेटम दिला आहे.निवडणूक कार्यक्रमानुसार महाराष्ट्रात २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींसाठी २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान होणार आहे. मतमोजणी ३ डिसेंबर २०२५ रोजी होणार आहे. एकूण ६,८५९ जागांसाठी मतदान होणार आहे. राज्यातील २८८ नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदासाठी थेट पद्धतीने निवडणूक होईल. सध्या राज्यातील २८८ नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जांची छाननी सुरू आहे. ही प्रक्रिया सुरू असतानाच महायुतीतली धुसफूस वाढली आहे. दुसरीकडे मविआतसुद्धा राजकीय मारामारी जोर धरू लागली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबईत शिउबाठाला वगळून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. दोन्ही पक्षांनी मनसेला मविआत घेणार नसल्याची ठाम भूमिका घेतली आहे.बिहारमधील शपथविधीला फडणवीस आणि अजित पवार जाणारबिहारमध्ये गुरुवार २० नोव्हेंबर २०२५ रोजी नितीश कुमार सरकारचा शपथविधी सोहळा आहे. या सोहळ्याला महाराष्ट्रातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत. एकनाथ शिंदे या सोहळ्याला उपस्थित असतील की नाही हे अद्याप समजलेले नाही. एनडीएतील इतर घटक पक्षांचे सर्वोच्च नेते तसेच एनडीएचे सर्व मुख्यमंत्री नितीश कुमार सरकारच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित असतील.
महापौर भाजपचाच होईल, नरेंद्र पवार यांचे स्पष्ट विधान
मुंबई : राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांनंतर महापालिका निवडणुकांचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे, तर दुसरीकडे, कल्याण-डोंबिवली महापालिकेतील सत्ता संघर्ष अधिक तीव्र होत आहे. भाजप आणि शिवसेनेत महापौर पदावर वर्चस्व मिळवण्यासाठी जोरदार स्पर्धा सुरु आहे. याचदरम्यान, भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी एक विधान करून शिंदे गटाला डिवचले आहे.भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी कल्याण-डोंबिवली महापालिकेत महापौर भाजपचाच होईल,असे ठामपणे सांगितले. पवार म्हणाले, आमचं संघटन मजबूत आहे आणि युती झाली तरीही महापौर भाजपचाच होईल. आम्ही जास्त नगरसेवक निवडून आणू आणि आमच्या संघटनेची ताकद निश्चितच महापौर पद मिळवून देईल. युतीच्या संभाव्य घटकांनी एकत्र लढल्यास महायुतीचा महापौर असणार, तर भाजप एकट्याने लढल्यासही त्यांची संघटना त्यांना विजय मिळवून देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.नरेंद्र पवार यांनी भाजपमध्ये होणाऱ्या पक्ष प्रवेशांवरही भाष्य केलं. त्यानुसार, भाजपचा प्रभाव वाढत आहे कारण केंद्र आणि राज्यात सत्ताधारी पक्ष आहे. डोंबिवलीत आमचे संघटन बळकट आहे. त्यामुळे इतर पक्षांच्या नाराज कार्यकर्त्यांना आमच्या पक्षात सामील होण्याची संधी मिळते, असे पवार म्हणाले. माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांची भाजपमध्ये दाखल होण्याची प्रक्रिया चालू असल्याचे पवार यांनी सांगितले. त्यानुसार, शिवसेना, मनसे, काँग्रेस आणि अन्य पक्षांचे कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत कारण त्यांना इतर पक्षांमध्ये आदर आणि कामाची संधी मिळत नाही.महायुतीतील अंतर्गत पक्षांतरावर पवार यांनी सांगितले की, आमच्या पक्षाचे नाराज कार्यकर्ते शिवसेनेत जातात, तर शिवसेनेचे कार्यकर्ते आमच्याकडे येतात. हे सर्व एकाच घरातले सदस्य आहेत. महायुतीतील दोन पक्षांतील गतीचं हे स्वरूप आहे आणि यामुळे आमची ताकद वाढली आहे. त्याचबरोबर, युती होईल न होईल, विकास निधी आणि सत्तास्थापनासाठी या दोन्ही पक्षांचे एकत्रित काम सुरू राहील, असे पवार यांनी स्पष्ट केले.
Crime News : धक्कादायक ! शिक्षिकांच्या जाचाला कंटाळून विद्यार्थ्याची आत्महत्या
नवी दिल्ली : देशाच्या राजधानीमध्ये दहावीतील मराठी विद्यार्थ्यांने मेट्रो समोर उडी घेऊन आत्महत्या केली. दिल्लीतील सेंट कोलंबस शाळेच्या प्राचार्या आणि शिक्षिकांच्या जाचाला कंटाळून दहावीत शिकत असलेल्या मराठी विद्यार्थ्याने मंगळवारी आत्महत्या केली. या आत्महत्येमुळे शैक्षणिक क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. शौर्य पाटील असे विद्यार्थ्याचे नाव आहे. शिक्षिकांनी मानसिक छळ केल्यामुळे आपण आत्महत्या करीत आहोत, असे शौर्यने […] The post Crime News : धक्कादायक ! शिक्षिकांच्या जाचाला कंटाळून विद्यार्थ्याची आत्महत्या appeared first on Dainik Prabhat .
“कटाच्या मुख्य सूत्रधाराचा सरकारकडून बचाव”; मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंवर निशाणा
Manoj Jarange | Dhananjay Munde – माझ्या घातपाताचा कट रचणा-या मुख्य सूत्रधारालाच सरकार चौकशीपासून आणि अटकेपासून बचाव करत असेल तर मला अशा सरकारचे पोलीस संरक्षण नको अशा अत्यंत कठोर शब्दांत मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. जरांगे यांनी बुधवारी अर्ज देऊन जालना पोलिस अधीक्षकांकडे आपले पोलीस संरक्षण […] The post “कटाच्या मुख्य सूत्रधाराचा सरकारकडून बचाव”; मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंवर निशाणा appeared first on Dainik Prabhat .
पुणे : बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या बारामती शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर अज्ञात समाजकंटकांनी प्राणघातक हल्ला केला. ही घटना निवडणूक लढवण्याच्या रागातून घडल्याचा आरोप होत आहे. या हल्ल्याने खळबळ उडाली असून, बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी सोशल […] The post मोठी बातमी..! शरद पवारांच्या राष्ट्रवादी शहराध्यक्षाला मारहाण; अनगरनंतर बारामतीत राजकारण तापलं, सुप्रिया सुळे संतापल्या appeared first on Dainik Prabhat .
मुंबईतील कुर्ला परिसरात गॅस पाइपलाइन गळतीमुळे लागली आग
मुंबई : कुर्ला पश्चिमे येथील विनोबा भावे नगरमधील एलआयजी कॉलनीच्या मागे असलेल्या मुबारक इमारतीत दुपारी गॅस पाइपलाइनमधून गळती झाली. या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही.महानगर गॅस लिमिटेडच्या (एमजीएल) गॅस पाइपलाइनमध्ये गळती होऊन, मुबारक इमारतीच्या तळमजल्यावर अचानक आग लागली. गॅसच्या गळतीमुळे आग लागल्याने परिसरात मोठा धूर पसरला, आणि नागरिकांमध्ये घबराट पसरली.घटनेची माहिती मिळताच, अग्निशमन दलाच्या तातडीच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. आणि आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.घटनास्थळी किमान चार अग्निशमन दलाच्या गाड्या आणि इतर बचाव यंत्रणा तैनात करण्यात आल्या होत्या. तसेच, महानगर गॅस लिमिटेडचे तज्ज्ञ देखील हजर होते.गॅस पाइपलाइनमधील गळती त्वरित थांबवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना राबवण्यात आल्या.गॅस पाइपलाइन गळतीमुळे आग लागण्याच्या घटना मुंबईसारख्या शहरी परिसरात घडत असतात. गॅस कंपन्या आणि अन्य संबंधित विभागांनी यापुढे अशा घटनांमध्ये जलद प्रतिसाद देण्यासाठी अधिक प्रभावी उपाययोजना तयार कराव्यात अशी भावना व्यक्त केली जात आहे.
नाशिकमध्ये भाजपचा ‘चक्रव्यूह’ सक्रिय; महाजनांच्या खेळीने भुसे अडचणीत
नाशिक : नाशिकच्या पालकमंत्री पदाचा पेच अजूनही कायम असला, तरी आता स्थानिक निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर नाशकातले वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी भाजपने मित्रपक्षांतील मत्तब्बर नेत्यांच्या नाड्या आवळण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी मंत्रीमंडळ बैठकीत झालेल्या खडाजंगीनंतर भाजपने, नाशकात आक्रमक भूमिका घेताना, जोरदार इनकमिंगला चालना देण्यास सुरुवात केली आहे. दादा भुसेंमुळे पालकमंत्री पदापासून वंचित राहिलेल्या गिरीश महाजनांनी आता, भुसेंभोवतीच […] The post नाशिकमध्ये भाजपचा ‘चक्रव्यूह’ सक्रिय; महाजनांच्या खेळीने भुसे अडचणीत appeared first on Dainik Prabhat .
China Warning : जपानने तैवानबाबतचे वक्तव्य मागे घ्यावे; अन्यथा…चीनने दिला इशारा
बीजिंग : जपानच्या पंतप्रधान सनाइ ताकाइची यांनी केलेले तैवानबद्दलचे वक्तव्य मागे घेतले नाही, तर प्रतिबंधक उपाययोजना कराव्या लागतील, असा इशारा चीनने बुधवारी दिला. ताकाइची यांच्या वक्तव्यावरून दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेला तणाव कमी करण्याच्या उद्देशाने दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांमध्ये काल बीजिंगमध्ये चर्चा झाली. मात्र त्यातून कोणताही तोडगा निघू न शकल्यानंतर चीनने हा इशारा दिला आहे. ताकाइची यांनी […] The post China Warning : जपानने तैवानबाबतचे वक्तव्य मागे घ्यावे; अन्यथा… चीनने दिला इशारा appeared first on Dainik Prabhat .
नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीतून पीडितांच्या न्यायाची हमी
मुंबई : ब्रिटिशकालीन फौजदारी कायद्यांमध्ये डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील पुरावे गृहीत धरण्याची तरतूद नव्हती. त्यामुळे पुरावे नष्ट करून अनेक गुन्ह्यांमधील आरोपी सुटत होते. परिणामी, विविध गुन्ह्यांमधील पीडितांना न्यायासाठी बऱ्याच कालावधीसाठी प्रतीक्षाच करावी लागायची. आता मात्र केंद्र शासनाने लागू केलेल्या नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीमुळे पीडितांना विशिष्ट कालावधीत न्यायाची हमी मिळत असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला.आझाद मैदानावर नवीन फौजदारी कायद्यांच्या आधारित पाच दिवशीय प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर , कौशल्य उद्योजकता व रोजगार मंत्री मंगल प्रभात लोढा, मुख्य सचिव राजेश कुमार, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव इक्बाल सिंग चहल, पोलीस महासंचालक रश्मि शुक्ला उपस्थित होते.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ब्रिटिशांनी भारतावर राज्य करण्यासाठी भारतीय दंड संहिता, फौजदारी प्रक्रिया संहिता आणि भारतीय पुरावा कायदा तयार केले होते. हे जवळपास १२५ ते १५० वर्षे जुने कायदे आहेत. भारताच्या प्रगतीसाठी किंवा येथील पीडितांना जलद गतीने न्याय मिळवून देण्याची व्यवस्था या कायद्यांमध्ये नव्हती. मात्र ही व्यवस्था या नवीन कायद्यांच्या निर्मितीने बदलून आरोपींना कठोर शासन आणि पीडितांना न्याय देणारी केली आहे. लोकशाहीत निवडून गेलेले सरकार हे जनतेचे ' ट्रस्टी' असून शासक नसते. त्यानुसार या कायद्यांची निर्मिती करण्यात आली आहे. नवीन कायदे हे शिक्षेपेक्षा न्यायावर जास्त भर देणारे आहे.२०१३ मध्ये राज्याचा गुन्हे सिद्धता दर ९ टक्के होता, तो आता ५३ टक्क्यांवरती आला आहे. हा दर निश्चितच ९० टक्क्यांपर्यंत नेण्याची क्षमता या नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीत आहे. शासनाने १४ शासन निर्णयामधून पोलीस दलात सुधारणा केल्या आहेत. पोलीस दलाचे नियुक्ती नियम आणि नवीन आकृतीबंध करण्यात आला आहे. नवीन आव्हानांना सज्ज असणारे पोलीस दल निर्माण करण्यात येत आहे. मागील काही वर्षात ५० हजार पेक्षा जास्त पदभरती करण्यात आली आहे. आपले पोलीस दल देशात क्रमांक एकचे आहे, ते आता जगातही अव्वल करण्याचा प्रयत्न असणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सायबर गुन्हेगारीचे नवीन आव्हान आहे. राज्यात देशातील सर्वात चांगली सायबर लॅब राज्यात आहे. मागील काही दिवसात सायबर बुलिंग पासून ६० पेक्षा जास्त मुलींना वाचविण्यात यश आले आहे. न्याय सहाय्यक मोबाईल व्हॅन्स च्या माध्यमातून पुराव्यांचे पारदर्शकरित्या पडताळणी करण्यात येत आहे. नवीन तंत्रज्ञानामुळे न्याय सहाय्यक प्रयोगशाळांकडे असलेल्या नमुन्यांची ' पेंडन्सी' पण कमी होत आहे. नवीन फौजदारी कायद्यांमध्ये कुठल्याही पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा नोंद करण्याची सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे गुन्हा करून दुसऱ्या राज्यांमध्ये पळून जात गुन्हेगार आता सुटू शकणार नाही. इ एफआयआर नोंदविण्याची सुविधाही नागरिकांसाठी उपलब्ध आहे.या प्रदर्शनात गुन्हा नोंदविण्यापासून ते आरोपींना शिक्षा होईपर्यंत प्रात्यक्षिकांच्या स्वरूपात अत्यंत चांगली माहिती देण्यात आली आहे. अशा पद्धतीचे प्रदर्शने महसूल विभागांच्या ठिकाणी त्यानंतर जिल्हास्तरावर आयोजित करण्याच्या सूचनाही यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या.समाजातील विकृत मानसिकतेला कठोर शिक्षेची नवीन फौजदारी कायद्यांमध्ये ताकद - उपमुख्यमंत्री अजित पवारकाळानुरूप नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पुरावे सुरक्षित ठेवून गुन्हेगारांना कारागृहापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था या नवीन फौजदारी कायद्यांनी निर्माण केली आहे. नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीतून समाजामध्ये असलेल्या विकृत मानसिकतेला कठोर शिक्षा करण्याची ताकद निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, गतिशील न्यायदानासाठी व पारदर्शकता वाढावी याकरिता नवीन फौजदारी कायद्यांमध्ये विविध तरतुदी आहेत. डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक पुरावे ग्राह्य धरून गुन्हेगाराला शिक्षा देण्याची व्यवस्था या कायद्यांमध्ये आहे. महिला, बालके यांच्या सुरक्षाविषयक महत्त्वपूर्ण तरतुदी असून संविधानात स्वातंत्र्य, समता आणि न्याय या मूलभूत तत्त्वांची सुसंगत हे कायदे आहेत. कुठल्याही कायद्याची उपयुक्तता ही त्याच्या अंमलबजावणीवर अवलंबून असते, या प्रदर्शनातून हे कायदे शिकण्याची संधी आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट देऊन आपला सहभाग नोंदवावा , असे आवाहनही अजित पवार यांनी केले.प्रदर्शनाचे फीत कापून उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर प्रदर्शनामध्ये मुख्य नियंत्रण कक्ष, न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय यांचा कक्ष, न्याय वैद्यक व विषशास्त्र विभाग यांचा कक्ष, पोलीस ठाणे, अभियोग संचालनालय यांचा कक्ष, नगर दिवाणी व सत्र न्यायालय, उच्च न्यायालय आणि मध्यवर्ती कारागृह आदी दालनांच्या माध्यमातून नवीन फौजदारी कायद्यांच्या कलमांवर आधारित प्रात्यक्षिकाचे सादरीकरण मुख्यमंत्र्यांसमोर करण्यात आले.
Nitish Kumar : बिहारमध्ये पुन्हा नितीश राज.! मुख्यमंत्र्याचा उद्या शपथविधी
Nitish Kumar : अखेर बिहारमधला सस्पेन्स संपला असून उद्या गांधी मैदानावर नितीश कुमार हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. या समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थिती लावणार आहेत. त्यापूर्वी, आज एनडीएची महत्वाची बैठक पार पडली. यात नितीश कुमार यांना विधीमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवडले गेले आहे. म्हणजेच, नितीश कुमार मुख्यमंत्री होणार, यावर आज अखेर शिक्कामोर्तब करण्यात […] The post Nitish Kumar : बिहारमध्ये पुन्हा नितीश राज.! मुख्यमंत्र्याचा उद्या शपथविधी appeared first on Dainik Prabhat .
शिरूर नगराध्यक्ष पदाचे सर्व अर्ज वैध, नगसेवक पदाचे पाच अर्ज अवैध, आता माघारीकडे लक्ष
शिरूर : शिरूर नगरपरिषद निवडणुकीत मंगळवारी (दि. १८) झालेल्या छाननीत नगराध्यक्षपदाचे दाखल झालेले सर्व नऊ अर्ज वैध ठरले आहेत. तर नगरसेवकपदासाठीच्या एकूण १९३ अर्जांपैकी पाच अर्ज अवैध ठरले आहेत. यामुळे आता माघारीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नगराध्यक्षपद हे इतर मागासवर्ग प्रवर्गातील महिलेसाठी राखीव असल्याने स्पर्धा अधिक चुरशीची होणार आहे. छाननी प्रक्रियेत पाच अर्ज बाद निवडणूक […] The post शिरूर नगराध्यक्ष पदाचे सर्व अर्ज वैध, नगसेवक पदाचे पाच अर्ज अवैध, आता माघारीकडे लक्ष appeared first on Dainik Prabhat .
सध्या बांगलादेशचा संघ राजधानी ढाका येथील शेरे बांगला नॅशनल स्टेडियममध्ये आयर्लंडविरूद्ध दुसरा कसोटी सामना खेळत आहे. या सामन्यापूर्वी बांगलादेशच्या एका खेळाडूने इतिहास रचला आहे. सामन्याच्या सुरुवातीलाच बांगलादेशचा अनुभवी यष्टीरक्षक-फलंदाज मुशफिकुर रहीमने ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. हि कामगिरी करणारा तो बांगलादेशचा पहिलाच खेळाडू ठरला आहे. मुशफिकुर रहीमने रचला इतिहास आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात खेळल्यानंतर मुशफिकुर रहीमने १०० […] The post Mushfiqur Rahim : मुशफिकुर रहीमने रचला इतिहास ! कसोटीमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा ठरला बांगलादेशचा पहिलाच खेळाडू appeared first on Dainik Prabhat .
Saudi Arabia : सौदी अरेबियातच होणार ‘त्या’४५ भारतीयांचे अंत्यसंस्कार; कुटुंबीयांनी दिली मंजूरी
Saudi Arabia – सौदी अरेबियातील बस अपघातात मृत्युमुखी पडलेल्या भारतीयांचे अंत्यसंस्कार मक्का आणि मदिनाजवळ केले जाणार आहेत. सौदी अरेबियामध्ये आता मृतांवर अंत्यसंस्कार करण्याची तयारी सुरू झाली आहे. सौदी सरकार सर्व मृतांवर अंत्यसंस्कार करेल. सौदी अरेबियाच्या नियमांनुसार धार्मिक यात्रेदरम्यान जर एखाद्या भाविकाचा मृत्यू झाला, तर त्याचा मृतदेह हा त्याच्या मायदेशी पाठवला जात नाही. आता बस अपघातातील […] The post Saudi Arabia : सौदी अरेबियातच होणार ‘त्या’ ४५ भारतीयांचे अंत्यसंस्कार; कुटुंबीयांनी दिली मंजूरी appeared first on Dainik Prabhat .
शिंदोडी येथील जनाबाई दुर्गे यांचे निधन
न्हावरे : शिंदोडी (ता. शिरुर) येथील जनाबाई ज्ञानदेव दुर्गे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, सुन, मुलगी, जावई, नातवंडे, असा परीवार आहे. शिंदोडी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे उपाध्यक्ष विठ्ठल दुर्गे यांच्या त्या मातोश्री होत. Join our WhatsApp Channel The post शिंदोडी येथील जनाबाई दुर्गे यांचे निधन appeared first on Dainik Prabhat .
“मला फरक पडणार नाही, पण संघावर आल्यावर मी…”; अखेर पिट्या भाईने संस्कारच काढले !
Ramesh Pardeshi | Raj thackeray : ‘मुळशी पॅटर्न’ या सुपरहिट मराठी चित्रपटाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला ‘पिट्या भाई’ म्हणजेच अभिनेते रमेश परदेशी यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. मनसे चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष असलेल्या परदेशी यांनी पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज […] The post “मला फरक पडणार नाही, पण संघावर आल्यावर मी…”; अखेर पिट्या भाईने संस्कारच काढले ! appeared first on Dainik Prabhat .
एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीदरबारी ते राजन पाटलांचा माफीनामा, वाचा आजच्या टॉप १० बातम्या
ओपन चॅलेंजनंतर राजन पाटलांचा माफीनामा मोहोळ तालुक्यातील अनगर नगर पंचायत निवडणुकीसाठी भाजपाकडून माजी आमदार राजन पाटील यांच्या सूनबाई प्राजक्ता अजिंक्यराणा पाटील यांना उमेदवारी देण्यात आलीय. प्राजक्ता पाटील या निवडणुकीत निवडून येणार हे जवळपास स्पष्ट झाल्यानंतर पाटील कुटुंब, त्यांचे समर्थक व भाजपा कार्यकर्त्यांनी नगर पंचायत कार्यालयाबाहेर जल्लोष केला. यावेळी राजन पाटील यांचे चिरंजीव विक्रांत ऊर्फ बाळराजे […] The post एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीदरबारी ते राजन पाटलांचा माफीनामा, वाचा आजच्या टॉप १० बातम्या appeared first on Dainik Prabhat .
देशातील २७२ मान्यवरांचे खुले पत्र, पत्रातून राहुल गांधींचा जाहीर निषेध
नवी दिल्ली : २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपासून काँग्रेसची निवडणुकीतील पराभवाची रेषा सातत्याने खाली उतरते आहे. विविध प्रयत्नांनंतरही काँग्रेसला विजय मिळवता आलेला नाही. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी वोटचोरीचा मुद्दा उपस्थित केला आणि निवडणूक आयोग तसेच मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप केले. राहुल गांधींच्या या आरोपांवर देशभरातील बुद्धीवंतांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यानंतर २७२ नामवंत विचारवंतांनी एक खुलं पत्र लिहित, राहुल गांधी यांच्या आरोपांवर कडवट प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या पत्रात, बुद्धीवंतांनी म्हटले आहे की, आम्ही भारतीय लोकशाहीवर होणाऱ्या हल्ल्यांमुळे चिंतित आहोत. त्यांनी असेही सांगितले की, राजकीय मंडळी लोकांचे मन भडकवण्याऐवजी तथ्यहीन आरोप करून फुकटचे राजकारण करत आहेत.या पत्रामध्ये बुद्धीवंतांनी निवडणूक आयोगावर झालेल्या आरोपांवर आपली नाराजी व्यक्त केली. त्यांनी म्हटले की, आता निवडणूक आयोगासारख्या महत्त्वाच्या संस्थेवर आरोप करून त्याची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. याशिवाय, भारतीय सैन्याच्या शौर्याबद्दल शंका उपस्थित करणे, न्यायव्यवस्थेची निष्पक्षता आणि संसद व घटनात्मक पदांवर बसलेल्या व्यक्तींविषयी शंका घेणे हे लोकशाहीसाठी घातक ठरू शकते. बुद्धीवंतांनी निवडणूक आयोगाच्या इमानदारीची आणि प्रतिष्ठेची वकिली केली असून, संस्थेने षडयंत्रकारकांच्या विरोधात तडजोड न करता आपली इमाने आणि प्रतिष्ठा जपणे आवश्यक असल्याचे सांगितले.सामाजिक आणि राजकीय असंतोषाचा सामना करत असताना, याप्रकारचे आरोप देशाच्या राजकीय व लोकशाही प्रक्रियेवर नकारात्मक प्रभाव टाकू शकतात, असे बुद्धीवंतांचे मत आहे.
World Record : सध्या न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात वनडे सिरीज सुरु आहे. 3 वनडे मॅचच्या या सीरिजमध्ये न्यूझीलंडने सलग दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून 2-0 ने हि मालिका आपल्या नावावर केली आहे. वेस्ट इंडिजचा या सीरिजमध्ये पराभव झाला असला तरी त्यांचा कर्णधार शाय होपसाठी मात्र हि सिरीज अविस्मरणीय ठरली आहे. कारण या सीरिजमधील दुसऱ्या सामन्यात […] The post World Record : विराट-रोहितला जे जमलं नाही ते ‘या’ पठ्ठ्याने केलं; आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रचला नवा इतिहास appeared first on Dainik Prabhat .
बाब सिद्दीकी यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार अनमोल बिश्नोई अमेरिकेतून हद्दपार ! दिल्लीत केली अटक
Anmol Bishnoi | Baba Siddique : गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी मुख्य सूत्रधार ठरलेला गँगस्टर अनमोल बिश्नोई याला राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए)ने बुधवारी दिल्लीत अटक केली. अमेरिकेतून हद्दपार करून त्याला भारतात परत पाठवण्यात आले होते. अनमोल हा सध्या तुरुंगात असलेल्या कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ असून तो […] The post बाब सिद्दीकी यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार अनमोल बिश्नोई अमेरिकेतून हद्दपार ! दिल्लीत केली अटक appeared first on Dainik Prabhat .
सम्राट चौधरींना 'मोठा माणूस'म्हणून संबोधून भाजपने खेळली नवी खेळी
बिहार : बिहार निवडणुकीत सम्राट चौधरी यांच्यावर लावण्यात आलेल्या असंख्य आरोपांनंतरही भाजपने त्यांच्यावर विश्वास वर्तवला आहे. भाजपने बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांना ‘मोठा माणूस’ (big man) म्हणून पुढे आणण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय केवळ बिहारच्या राजकारणासाठीच नव्हे, तर उत्तर प्रदेशातील ओबीसी व जातीय राजकारणातील धोरणात्मक हेतूंसाठी देखील महत्वाचा ठरू शकतो अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली.सम्राट चौधरी हे केवळ उपमुख्यमंत्री नाहीत तर, ते बिहार विधानसभेतील भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते देखील आहेत. सम्राट यांना उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्त करून, भाजपने असा संदेश दिला आहे की, ते बिहारमध्ये स्वतःचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा तयार करत आहेत. तारापूर मतदारसंघातील विजय आणि विधानसभेतील त्यांच्या संघटन नेतृत्वामुळे त्यांना अधिक बळ मिळाले आहे. त्यामुळे भाजप नितीश कुमार यांच्यावर अवलंबून नाही असा इशाराच जणू भाजपनं दिलेला आहे.बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभेवेळी, देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी तारापूर विधानसभा मतदारसंघातील सभेत जनतेला संबोधित करताना आवाहन केले होते की, बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांना मतदान करा आणि त्यांना विजयी करा. जर सम्राट चौधरी जिंकले तर, मोदी त्यांना खूप मोठा व्यक्ती बनवतील . शहा यांच्या विधानानंतर, सम्राट चौधरी बिहारचे मुख्यमंत्री होऊ शकतात असा विश्वास वर्तवला जात होता.काय आहे उत्तर प्रदेश कनेक्शन?ओबीसी मतदारांचा फोकस आहे की, भाजपा सम्राट चौधरी यांना एक स्टार प्रचारक (star campaigner) म्हणून ओबीसी सभांमध्ये आणू शकते, विशेषतः उत्तर प्रदेशात, जिथे OBC मतदार महत्त्वाचे आहेत.भौगोलिक धोरण : उत्तर प्रदेशाच्या काही जिल्ह्यात (जसे की देवरिया, गाजीपुर) या अशा जागा आहेत जिथे कुशवाहा आणि अन्य OBC समाजांचे प्रमाण जास्त आहे.राजकीय लाभ : भाजपा चौधरी यांचा वापर करून उत्तर प्रदेशातील पिछडलेल्या जमातींमध्ये एकता निर्माण करू शकते आणि आपल्या मतदारसंघाचा विस्तार वाढवू शकेल.बिहारचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचा प्रमुख ओबीसी चेहरा सम्राट चौधरी यांचा हल्लीच तारापूरमधील विजय केवळ बिहारमध्ये एनडीएची पकड मजबूत करत नाही तर, २०२७ च्या उत्तर प्रदेश (यूपी) विधानसभा निवडणुकीसाठी महत्त्व देखील देतो. कुशवाह (कोएरी) समुदायाचे असलेले सम्राट चौधरी भाजपसाठी ओबीसी एकीकरणाचे प्रतीक बनले असून उत्तर प्रदेशमध्ये, जिथे ओबीसी मतदार (४०%) निवडणूक समीकरण ठरवतात, सम्राटचा प्रभाव बिहारमधून सीमावर्ती भागात पसरू शकतो असा अंदाज दिल्लीतील भाजप नेतृत्वाला असल्याची शक्यता वर्तवलीजातआहे.
मोहित सोमण: गेले ४ दिवस घसरणीला ब्रेक लागला असून आज सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सोन्याच्या दराने आज रिबाऊंड करत मोठ्या पातळीवर उडी घेतली आहे. आकडेवारीची अनिश्चितता, युएस फेडमधील वक्तव्ये, घसरलेली मागणी या कारणामुळे घसरलेले सोने पुन्हा उसळले आहे. 'गुड रिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, सोन्याच्या २४ कॅरेट प्रति ग्रॅम दरात १२० रूपये, २२ कॅरेट प्रति ग्रॅम दरात ११० रूपये, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ९० रूपयांनी वाढ झाली. परिणामी प्रति ग्रॅम दर २४ कॅरेटसाठी १२४८६ रूपये, २२ कॅरेटसाठी ११४४५ रूपये, १८ कॅरेटसाठी ९३६४ रुपयांवर पोहोचले आहेत. २४ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा दरात १२०० रूपये, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा दरात ११०० रूपये, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा दरात ९०० रूपयांनी वाढ झाली. त्यामुळे प्रति तोळा दर २४ कॅरेटसाठी १२४८६० रूपये, २२ कॅरेटसाठी ११४४५० रूपये, १८ कॅरेटसाठी ९३६४० रुपयांवर पोहोचला आहे.मुंबईसह भारतातील प्रमुख शहरातील सोन्याचे प्रति ग्रॅम सरासरी दर २४ कॅरेटसाठी आज १२४८६ रूपये, २२ कॅरेटसाठी ११६०० रूपये, १८ कॅरेटसाठी ९६८५ रूपयांवर पोहोचले आहेत. भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये (Multi Commodity Exchange MCX) सोन्याच्या दरात संध्याकाळपर्यंत १.१२% वाढ झाली असून दरपातळी १२४०१९ रूपयांवर गेली आहे. जागतिक पातळीवरील गोल्ड फ्युचर निर्देशांकात संध्याकाळपर्यंत १.२५% वाढ झाली असून जागतिक मानक (Standard) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या युएस गोल्ड स्पॉट दरात संध्याकाळपर्यंत १.२४% वाढ झाली आहे.प्रामुख्याने डिसेंबर महिन्यात अपेक्षित फेडरल व्याजदरात कपात जवळ असल्याने, तसेच कमकुवत कामगार आकडेवारी व आगामी संभाव्य कमकुवत आकडेवारी यामुळे व्याजदरात कपात होईल आणि दिलासा मिळेल या आशेने सोन्याच्या दरात आज वाढ झाली आहे. इतरही दिवसभरात विश्लेषकांच्या वक्तव्यांमुळेही आज बाजारात प्रभाव टाकला. सुरक्षित गुंतवणूक म्हणून लोकांनी अचानक पुन्हा एकदा गुंतवणूक वाढवल्याने गोल्ड स्पॉट दरात मागणी वाढली आणि आशियाई बाजारातही या प्रभावासह जपानसह इतर देशांत भांडवली खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ सुरू झाल्याने सकारात्मक जपली गेली आणि अंतिमतः सोन्यात वाढ झाली आहे.चांदीतही वाढ कायम !आज सलग दुसऱ्यांदा चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. प्रामुख्याने औद्योगिक क्षेत्रातील चांदीच्या मागणीत वाढ, युएस फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपातीची शक्यता, मागणीत झालेली वाढ या कारणामुळे वाढ झाली आहे. खरं तर काल संध्याकाळी सोन्याच्या दरात घसरण सुरू झाली होती. मात्र आज दुपारपर्यंत डॉलरमध्ये घसरण झाल्याने चांदीच्या वाढीला बळ मिळाले आहे.कमकुवत लेबर आकडेवारीनंतर गव्हर्नर वॉलर यांनी पुन्हा एकदा २५ बेसिस पॉइंट्स दर कपात करण्याची गरज व्यक्त केली होती. कारण भरतीतील घसरण, मंदावलेली वेतन वाढ आणि कमकुवत ग्राहक भावना यांचा समावेश त्यांच्या वक्तव्यात होता. तज्ञांच्या मते, भारतातील लग्नाच्या हंगामात भौतिक मागणी वाढली आहे, तर संभाव्य अमेरिकन टॅरिफबद्दलच्या चिंतेमुळे जागतिक बाजारपेठेत अस्वस्थता वाढली आहे ज्यामुळे सोन्याच्या व चांदीच्या गुंतवणूकीत वाढ सुरू झाली आहे.गुड रिटर्न्स संकेतस्थळावरील माहितीनुसार, चांदीच्या प्रति ग्रॅम दरात ६ रुपये व प्रति किलो दरात ६००० रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे प्रति ग्रॅम दर १६८ व प्रति किलो दर १६८००० रूपयांवर गेले आहेत. भारतीय सराफा बाजारात चांदीचे प्रति ग्रॅम सरासरी १० ग्रॅम दर आज १६२० रूपये व प्रति किलो दर १६८००० रुपयांवर गेले आहेत. जागतिक सिल्वर फ्युचर निर्देशांकात संध्याकाळपर्यंत २.७६% वाढ झाली आहे.
नितीश कुमारच बिहारचे मुख्यमंत्री; NDA च्या बैठकीत शिक्कामोर्तब, 10व्यांदा घेणार शपथ
Bihar Election : बिहारमधील नवीन एनडीए सरकारचा शपथविधी सोहळा उद्या (20 नोव्हेंबर) पाटण्यातील ऐतिहासिक गांधी मैदानावर होणार आहे. त्यापूर्वी, आज NDA ची महत्वाची बैठक पार पडली, या बैठकीत नितीश कुमार यांना विधीमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवडण्यात आले आहे. म्हणजेच, नितीश कुमार मुख्यमंत्री होणार, यावर आज अखेर शिक्कामोर्तब झालय. भाजप नेते सम्राट चौधरी यांनी नितीश कुमार […] The post नितीश कुमारच बिहारचे मुख्यमंत्री; NDA च्या बैठकीत शिक्कामोर्तब, 10व्यांदा घेणार शपथ appeared first on Dainik Prabhat .
Pune News : महात्मा गांधी निसर्गोपचार केंद्रात ‘राष्ट्रीय निसर्गोपचार दिन’संपन्न !
पुणे – ऊरळीकांचन येथील महात्मा गांधी निसर्गोपचार केंद्रात दि.१८ नोव्हेंबर रोजी आठवा ‘राष्ट्रीय निसर्गोपचार दिन’ साजरा करण्यात आला. इंडियन नॅचरोपॅथी अँड योगा ग्रॅज्युएट्स मेडिकल असोसिएशन ने या दिनाचे आयोजन केले होते. १८ नोव्हेंबर या दिवशी १९४५ साली महात्म्य गांधींनी राष्ट्रीय निसर्गोपचार फेडरेशनची स्थापना केली होती. या दिवसाचे औचित्य म्हणून राष्ट्रीय निसर्गोपचार दिन देशभर साजरा केला […] The post Pune News : महात्मा गांधी निसर्गोपचार केंद्रात ‘राष्ट्रीय निसर्गोपचार दिन’ संपन्न ! appeared first on Dainik Prabhat .
Rohit Sharma : रोहित शर्माला मोठा झटका ! ‘या’खेळाडूची वनडे रॅकींगमध्ये अव्वल स्थानी झेप
भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि ‘हिटमॅन’ म्हणून ओळखला जाणारा रोहित शर्मा याला आयसीसी वनडे फलंदाजांच्या क्रमवारीत मोठा धक्का बसला आहे. न्यूझीलंडचा आक्रमक फलंदाज डेरिल मिचेलने रोहितला मागे टाकत पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे. साऊथ आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला 30 नोव्हेंबर 2025 पासून सुरुवात होणार असताना रोहितला हा झटका बसला आहे. रोहित शर्मा याने आपला […] The post Rohit Sharma : रोहित शर्माला मोठा झटका ! ‘या’ खेळाडूची वनडे रॅकींगमध्ये अव्वल स्थानी झेप appeared first on Dainik Prabhat .
क्विक हीलने टोटल सिक्युरिटी व्हर्जन२६ लाँच सायबर क्राईमपासून आता संपूर्ण मुक्ती मिळणार
मुंबई: क्विक हील टेक्नॉलॉजीज लिमिटेड या जागतिक सायबरसुरक्षा उपाययोजना प्रदाता कंपनीने आज क्विक हील टोटल सिक्युरिटी व्हर्जन२६ च्या लाँचची घोषणा केली आहे. जगभरातील लाखो व्यक्तींच्या डेटाचे संरक्षण करताना गोपनीयता संरक्षण व आर्टिफिशियल इंटेलिजन्सला एकत्र करत भारतातील युजरला रोजच्या धोक्यापासून संरक्षण प्रदान करण्यासाठी ही नवी आवृत्ती जाहीर केली गेली असल्याचे कंपनीने लाँच दरम्यान स्पष्ट केले आहे. एकीकडे तंत्रज्ञान वाढत असताना दुसरीकडे सायबर घोटाळ्यांची प्रकरणेही दुपटीने वाढत आहेत. वाढती गरज लक्षात घेता सर्वसमावेशक सायबर धोके व फसवणूक प्रयत्नांविरोधात डिजिटल संरक्षण (Cyber Security) साठी कंपनीने नव्या अपग्रेडसह ही आवृत्ती जाहीर केली आहे.व्हर्जन२६ चे लाँचचे टाईमिंगही महत्वाचे ठरेल आहे. अनेक अहवालातील माहितीनुसार वेळोवेळी फसवणूकीची प्रकरणे समोर आली असताना जेथे गोपनीयता नागरिकांसाठी सर्वात मोठा चिंतेचा विषय बनला आहे. रिपोर्टनुसार ८५% भारतीयांचा वैयक्तिक डेटा आधीच ऑनलाइन लीक झाला आहे व सायबरगुन्हेगार प्रतिमिनिट १.५ लाख रूपयांपेक्षा अधिक नुकसान करत आहेत. हे पाहता क्विक हील टोटल सिक्युरिटी व्हर्जन२६ या वाढत्या आव्हानांला सामोरे जाण्यासाठी नवी सेवा बाजारात आणण्यासाठी कंपनीने कंबर कसली आहे.या लाँचबाबत मत व्यक्त करत क्विक हील टेक्नॉलॉजीज लिमिटेडचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक डॉ संजय काटकर म्हणाले आहेत की,'क्विक हील टोटल सिक्युरिटी व्हर्जन२६ सायबरसुरक्षेच्या भविष्यामधील आमच्या धाडसी पुढाकाराला सादर करते. आम्ही भारतातील वापरकर्त्यांच्या संरक्षणाच्या ३० वर्षांना साजरे करत असताना ओळखले आहे की, जोखीम क्षेत्र सतत बदलत आहे. आजच्या आव्हानांचे निराकरण करण्यासाठी पारंपारिक अँटीव्हायरस संरक्षणापेक्षा अधिक मागणी आहे, जेथे एकाच सोल्यूशनमध्ये गोपनीयता, एआय आधारे संरक्षण आणि फसवणूक प्रतिबंधाचे संयोजन असलेल्या सर्वसमावेशक दृष्टिकोनाची आवश्यकता आहे. व्हर्जन२६ सह आम्ही त्या कटिबद्धतेचे पालन करत आहोत. गोडीपडॉटएआय, एसआयए आणि अँटीफ्रॉडडॉटएआयचे एकीकरण यामधील आमच्या गुंतवणूकीमधून वापरकर्त्यांना दररोज सामना कराव्या लागणाऱ्या वास्तविक विश्वातील आव्हानांबाबत आम्हाला असलेली सखोल माहिती दिसून येते. हे लाँच सुरक्षित डिजिटल भारत घडवण्याप्रती आमच्या कटिबद्धतेला दृढ करते, जेथे प्रत्येक नागरिक परिपूर्ण आत्मविश्वास आणि समाधानासह डिजिटल अर्थव्यवस्थेमध्ये सहभाग घेऊ शकतो.' असे म्हटले आहेत.भविष्यसूचक आर्टिफिशियल इंटेलिजन्ससह प्रगत गोपनीयता टूल्सचे एकीकरण शक्तिशाली संरक्षण परिसंस्था (Ecosystem) तयार करते असा दावा कंपनीने केला आहे. धोक्यांना नुकसान करण्यापूर्वीच थांबवते व युजरचे त्यांनी आतापर्यंत सामना न केलेल्या धोक्यांपासून संरक्षण करते असा दावाही कंपनीने आपल्या नव्या उत्पादनाबाबत बोलताना दिला आहे.क्विक हील टोटल सिक्युरिटी व्हर्जन२६ एसआयए (सिक्युरिटी इंटेलिजण्ट असिस्टण्ट) सह बाजारात आली आहे. हे एआय आधारित सुरक्षा सहाय्यक प्रत्येक डेक्स्टॉप अँटीव्हायरस सॉफ्टवेअरमध्ये डिझाइन करण्यात आले आहे. एसआयए सोप्या भाषेमध्ये सुरक्षेबाबत सूचना देत आणि त्यांचे निराकरण करत वापरकर्त्याच्या अनुभव सुकर करते असे कंपनीने म्हटले याशिवाय युजर फ्रेंडली, मानवी संवादाच्या माध्यमातून क्रमाक्रमाने प्रात्यक्षिक व जलद सोल्यूशन्स देते असे कंपनीने म्हटले. ज्यामुळे संभ्रम दूर होऊन मानवाला योग्य निर्णय घेता येणे आता सोपे होणार आहे.क्विक हील टेक्नॉलॉजीज लिमिटेडचे भविष्यसूचक धोका ओळखणारे तंत्रज्ञान गोडीपडॉटएआय हे प्रगत इंजिन लाखो धोक्यांना ओळखते आणि दररोज विकसित होत हल्ल्यांना होण्यापूर्वी थांबवते.व्हर्जन२६ चे सुधारित डार्क वेब मॉनिटरिंग २.० युजरसाठी संवेदनशील माहितीचे संरक्षण करण्यासाठी डार्क वेबचा वापर करणार आहे. त्यामुळेच आपोआपपणे ईमेल पत्त्यांना ओळखणाऱ्या युजरला आता त्यांच्या डिजिटल ओळखीचा गैरवापर, फसवणूक आणि आर्थिक नुकसानापासून सतत संरक्षण केले जात असल्याची शाश्वती मिळणार आहे.अँटीफ्रॉडडॉटएआय आता क्विक हील टोटल सिक्युरिटी व्हर्जन२६ मध्ये एकीकृत (Integrated) करण्यात आल्याचे कंपनीने आपल्या फिचर्स विषयी स्पष्ट केले आहे हे वैशिष्ट्य खासकरून फसवी अँप्स, वेबसाइट्स, फसव्या यूपीआयमधील विनंत्या आणि बँकिंग फसवणूक करणाऱ्या कॉल्सना अचूकतेसह ब्लॉक करते. युजर फिशिंग लिंक्स व संदेशांवर क्लिक करण्यापूर्वी फसव्या लिंकला आता ओळखू शकतो.
राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढणार; शिवसेना-भाजपची डोकेदुखी वाढणार?
सुजय विखे पाटील यांनी जागा देऊनही शिवसेना-भाजपने आम्हाला डावलले - राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार यांचा थेट आरोपसंगमनेर : संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीत महायुती म्हणून लढण्याची तयारी असतानाही स्थानिक शिवसेना आणि भाजपच्या नेतृत्वाने गोंधळ घालून राष्ट्रवादी काँग्रेसला पद्धतशीरपणे डावलले असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार यांनी केला आहे. यामुळे संतप्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने आता नगराध्यक्षपदासह नगरसेवकपदाच्या जागा स्वबळावर लढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. राष्ट्रवादीच्या या निर्णयामुळे संगमनेरमधील शिवसेना आणि भाजपची डोकेदुखी वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत महायुतीच्या जागावाटपाबद्दल बैठक झाली होती. या बैठकीत डॉ. विखे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला किती जागा द्यायच्या, याबाबत स्पष्ट सूचना दिल्या होत्या आणि जागा देण्यास सहमती दर्शवली होती. मात्र, त्यानंतर येथील स्थानिक शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांनी जाणीवपूर्वक गोंधळ घातला आणि डॉ. सुजय विखे पाटील यांनी जागा देऊनही राष्ट्रवादी काँग्रेसला महायुतीमध्ये समाविष्ट करून घेण्यात आले नाही. डॉ. विखे पाटील यांच्यासारख्या मोठ्या नेत्याने शब्द दिला असतानाही स्थानिक शिवसेना आणि भाजपने आम्हाला डावलले असून शिवसेना व भाजपा उमेदवारांचे अर्ज भरत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कोणत्याही प्रकारचा संपर्क करण्यात आला नाही असे थेट आरोप कपिल पवार यांनी केले आहेत.महायुतीच्या बैठकीत ठरलेल्या गोष्टींना येथील शिवसेना-भाजपच्या नेत्यांनी केराची टोपली दाखवल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे कोणत्याही परिस्थितीत युती होणार नाही, असा पवित्रा घेत, आम्हाला आमच्या पक्षाचे अस्तित्व आहे त्यामुळे आम्हाला लढायचं आहे. संगमनेर नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदाच्या जागा ताकदीने स्वबळावर लढवणार असल्याचे ठामपणे सांगितले आहे.दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर मैदानात उतरल्याने महायुतीच्या मतांचे विभाजन होण्याची दाट शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्णय शिवसेना-भाजप युतीच्या विजयाच्या समीकरणांवर थेट परिणाम करेल.एकंदरीत, राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलेल्या या आक्रमक भूमिकेमुळे संगमनेर नगरपालिकेची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असून, या निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांना आता स्वबळावर उतरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा सामना करावा लागणार आहे.आमदार सत्यजित तांबे यांनी सेवा समितीच्या उमेदवारांना मतदान करायला लावले आणि जर निवडणुकीनंतर त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला, तर आम्ही कोणाकडे जायचे ? असा प्रश्न एक विशिष्ट समाज दबक्या आवाजात करत असल्याने या चर्चेमुळे संगमनेरच्या राजकारणात एक प्रकारे संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.
मुंबईतील चारकोप परिसरात दिवसाढवळ्या गोळीबार, एक जण गंभीर जखमी
मुंबई : मुंबईतील चारकोप परिसरात आज दुपारी २ वाजता गोळीबार झाला. या गोळीबारात एक व्यक्ती जखमी झाला असून त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले आहे. गोळीबाराची ही घटना दिवसाढवळ्या घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे आणि नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.दुचाकीवरून आलेल्या एका अज्ञात व्यक्तीने केलेल्या गोळीबारात फ्रेडी डिलिम्स नावाच्या व्यक्तीच्या पोटात २ गोळ्या लागल्या. कांदिवलीच्या ऑस्कर रुग्णालयात जखमीवर उपचार सुरु आहे.गोळीबाराची माहिती मिळताच स्थानिक पोलिस घटनास्थळी पोहोचले असून ते याबाबत सखोल तपास करत आहेत. पोलिसांनी घटनास्थळी सुरक्षेचे कडेकोट व्यवस्थापन केले असून आरोपींचा शोध सुरू केला आहे. गोळीबाराचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.चारकोप परिसर एक वर्दळीचा भाग आहे आणि इथे वाजवी प्रमाणात रस्त्यावर वाहनांची वर्दळ असते. दिवसाच्या उजेडात अशी हिंसक घटना घडल्यामुळे नागरिकांमध्ये मोठी भीती पसरली आहे.
मुंबई : राज्यात सत्ताधारी महायुतीत (Mahayuti) सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जागावाटपावरून महायुतीत वादाची ठिणगी पडली असून, या वादाचा भडका बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत पाहायला मिळाला. नाराजी व्यक्त करण्यासाठी शिवसेनेच्या शिंदे गटाच्या सर्वच मंत्र्यांनी या मंत्रिमंडळ बैठकीकडे पाठ फिरवली होती. या शक्तिप्रदर्शननंतर लगेचच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मंत्र्यांसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि महायुतीतील आपली तीव्र नाराजी व्यक्त केली. नाराजी दूर करण्यासंदर्भात दोन्ही नेत्यांकडून चर्चा झाली असली, तरी शिंदे गटाचे समाधान झाले नसल्याचे संकेत मिळत आहेत. कारण, फडणवीस यांच्या भेटीनंतर अवघ्या दोनच दिवसांनी म्हणजेच आज, एकनाथ शिंदे थेट दिल्लीसाठी रवाना झाले. दिल्लीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची भेट घेतली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने आणि महायुतीतील जागावाटपावरून निर्माण झालेल्या तणावावर या दोन नेत्यांमध्ये निर्णायक चर्चा झाली. या दिल्लीवारीमुळे महायुतीतील राजकीय घडामोडींना आता वेग आला आहे.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या दिल्लीत दाखल झाले आहेत. दिल्लीत त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह वरिष्ठ भाजप नेत्यांची भेट घेऊन राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील वादावर चर्चा केली. दिल्लीतील भेटीगाठी संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बिहार दौऱ्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या दौऱ्याला विशेष महत्त्व आहे, कारण बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे यांनी बिहारमध्ये जाऊन दोन सभा घेतल्या होत्या. बिहारमध्ये एनडीए आघाडीच्या विजयाबद्दल अभिनंदन करण्यासाठी एकनाथ शिंदे बिहारला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. हा दौरा राष्ट्रीय स्तरावर एनडीएच्या घटकांशी असलेले आपले संबंध अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने महत्त्वाचा ठरू शकतो. महायुतीतील वाद आणि जागावाटपाच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, एकनाथ शिंदे यांचा दिल्ली आणि त्यानंतरचा बिहार दौरा राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.https://prahaar.in/2025/11/19/affair-with-mother-brother-mama-pushed-from-the-train-in-vasai-mumbai/बैठकीत शिंदे गटाच्या मंत्र्यांची वाढती नाराजीराज्याच्या सत्ताधारी महायुतीमध्ये सध्या अंतर्गत कलह टोकावर पोहोचला असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवसेना शिंदे गटाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वाढती नाराजी घेऊन दिल्लीला रवाना झाल्याचे कळताच, राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी घटना घडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तातडीने वर्षा निवासस्थानी गुप्त बैठक पार पडली. विश्वासनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत प्रामुख्याने शिवसेना पक्षातील (शिंदे गट) मंत्री आणि एकनाथ शिंदे यांची वाढत असलेली नाराजी कशी दूर करायची, यावर सविस्तर चर्चा झाली. एवढेच नाही, तर एकनाथ शिंदे यांची नाराजी वाढत गेलीच, तर पुढील राजकीय पाऊल काय असावे या संभाव्य परिस्थितीवर देखील दोन्ही नेत्यांनी विचारविनिमय केला. त्यामुळे, महायुतीत तीनही पक्षांमध्ये आलबेल नसल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. राजकीय वातावरण तापलेले असताना, शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांनी मात्र नाराजीच्या चर्चांवर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. आमच्यात कुठलीही नाराजी नाही, कुटुंब म्हटल्यावर थोडं फार होतच असतं, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले होते. तर एकनाथ शिंदे यांनी दिल्लीला रवाना होण्यापूर्वी या नाराजीच्या चर्चांवर बोलणे पूर्णपणे टाळले होते.
Noida : तोतया ‘रॉ’ अधिकाऱ्याला नोएडातून अटक; अनेक बनावट कागदपत्रे केली जप्त
Noida – नोएडाच्या उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्स टीमने मंगळवारी उशीरा ग्रेटर नोएडाच्या सूरजपूर भागात रॉ ऑफिसर असल्याचे भासवणाऱ्या एका व्यक्तीला अटक केली. त्याच्याकडून अनेक बनावट कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. कागदपत्रांमध्ये दोन बनावट ओळखपत्रे, विविध बँकांचे २० चेकबुक, दिल्ली पोलिसांचे बनावट पडताळणी पत्र, 8 क्रेडिट/डेबिट कार्ड, एक डायरी, १७ वेगवेगळ्या नावांचे करार, 5 पॅन […] The post Noida : तोतया ‘रॉ’ अधिकाऱ्याला नोएडातून अटक; अनेक बनावट कागदपत्रे केली जप्त appeared first on Dainik Prabhat .
साबरमती तुरुंगात कैद्यांचा आयसिसच्या दहशतवाद्यावर हल्ला; हल्ल्याचा हेतू अस्पष्ट
अहमदाबाद : गुजरातच्या साबरमती तुरुंगात तीन कैद्यांनी तेथील उच्च सुरक्षा कक्षात बंद असलेल्या आयसिस दहशतवादी डॉ. अहमद मोहिउद्दीन सय्यदवर हल्ला केला. हा हल्ला तुरुंगातील कैदी अनिल खुमान, शिवम वर्मा आणि अंकित यांनी केला असून या हल्ल्यात त्याच्या डोळ्याला आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली असून जखमी दहशतवाद्याला तातडीने अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे तिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी हल्ल्यात सहभागी असलेल्या तिन्ही कैद्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.हल्ला तुरुंगाच्या अत्यंत सुरक्षेसाठी प्रसिद्ध असलेल्या कक्षात घडला, ज्यामुळे सुरक्षेच्या उपाययोजनांमध्ये सुधारणा केली जात आहे. घटनेनंतर तुरुंग प्रशासनाने त्वरित कार्यवाही करत त्या कैद्याला इतर कैद्यांच्या समूहापासून वेगळं केले. हल्ल्यातील आरोपी कैदी तुरुंगातीलच दहशतवादी गटाशी संबंधित असू शकतात, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.हल्ल्याचे कारण काय?सुरक्षेच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, हल्ला करणाऱ्या कैद्यांचा मुख्य उद्देश त्यांना आयसिस संघटनेसाठी 'भरती' करणाऱ्या आणि दहशतवादी कारवायांसाठी प्रेरित करणाऱ्या कैद्याला शारिरीक इजा पोहोचवणं हा होता.तुरुंगाच्या सुरक्षेत सुधारणाया घटनेनंतर तुरुंग प्रशासनाने त्वरित तुरुंगातल्या सुरक्षेच्या उपाययोजनांचा आढावा घेण्याचे काम सुरू केले आहे. तुरुंगात सुरक्षेसाठी अधिक CCTV कॅमेरे आणि गुप्त गस्तीसाठी अतिरिक्त सुरक्षा अधिकारी तैनात करण्याचा निर्णय घेण्यातआलाआहे.
मुंबई : वसईतील सातवली परिसरात अपहरण झालेल्या मुलीच्या मृत्यूप्रकरणी पोलिस तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. भाचीसोबत प्रेमसंबंध असलेल्या मामानेच तिचा जीव घेतल्याचे निष्पन्न झाले असून आरोपी मामाला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला वसई न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. मुंबईजवळील वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणीच्या बेपत्ता होण्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील प्रेमसंबंधांचा आणि नात्याचा तपशील समोर आल्याने घटनेचे गांभीर्य वाढले आहे.https://prahaar.in/2025/11/19/parineeti-chopra-raghav-chadha-reveal-their-baby-boys-name-share-meaning-and-first-glimpse-in-instagram-post/पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेपत्ता झालेली पूजा हिचे तिच्या सख्ख्या मामासोबत गेल्या वर्षभरापासून प्रेमसंबंध होते. या अनैतिक संबंधातून पूजा मामासोबत लग्न करण्यासाठी सतत तगादा लावत असल्याचे प्राथमिक चौकशीत उघड झाले आहे. अपहरण की पलायन? या लग्नावरून दोघांमध्ये अनेक वेळा वादही झाल्याची माहिती समोर आली आहे. पूजा घरातून बेपत्ता झाल्यानंतर, १६ नोव्हेंबर रोजी तिच्या आईने वळीव पोलिस ठाण्यात अपहरणाची फिर्याद दाखल केली. पूजा घरातून अचानक बेपत्ता झाल्यामुळे कुटुंबीयांनी तिच्या सुरक्षेबाबत मोठी चिंता व्यक्त केली आहे. या गंभीर घटनेची नोंद होताच वळीव पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे. प्रेमसंबंध आणि त्यानंतर लग्नावरून झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, पोलीस या घटनेचा गांभीर्याने तपास करत असून, तरुणीचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.भाईंदर-वसई दरम्यान वेगात असलेल्या लोकल ट्रेनमधून भाचीला ढकललेपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी, पूजा, शनिवार, १६ नोव्हेंबर रोजी आपले घर सोडून वसईच्या वालीव गावराई पाडा परिसरात सुरक्षा रक्षकाची नोकरी करणाऱ्या आपल्या मामाकडे आली होती. १७ नोव्हेंबर रोजी दुपारी मामा आणि भाची चर्चगेट–विरार फास्ट लोकलमध्ये एकत्र प्रवास करत होते. भाईंदर आणि वसई यांच्या दरम्यान गाडी वेगात असताना दोघांमध्ये लग्नावरून तीव्र वाद झाला. या वादाचा शेवट अत्यंत भयावह ठरला, आरोपी मामा याने भाचीला अचानक ट्रेनमधून ढकलून दिले. खाली पडून पूजा जागीच ठार झाली. या घटनेच्या वेळी ट्रेनमध्ये उपस्थित असलेल्या काही सावध प्रवाशांनी तत्काळ आरोपी मामाला पकडले आणि त्याला वसई रोड रेल्वे पोलिसांच्या (GRP) ताब्यात दिले. पूजा बेपत्ता असल्याने तिच्या आईने वालीव पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा नोंदवला होता. त्यामुळे, रेल्वे पोलिसांनी पुढील कारवाईसाठी आरोपी मामाला वालीव पोलिसांकडे सुपूर्द केले आहे. अनैतिक संबंधातून झालेल्या वादातून घडलेल्या या क्रूर कृत्यामुळे परिसरात संतापाचे वातावरण आहे.
Eknath Shinde : एकनाथ शिंदे तडकाफडकी दिल्लीदरबारी…; काल कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार, आज राजधानीत हजेरी
Eknath Shinde – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी तडकाफडकी दिल्लीला रवाना झाले. राज्यात भाजप आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष वाढलेला असताना शिंदे दिल्लीत जावून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. शिंदेसेनेच्या मंत्र्यांनी काल कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार घातला होता. त्यानंतर शिंदेंचे मंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले. भाजपकडून शिंदेसेनेच्या माजी नगरसेवकांना पक्षप्रवेश दिला जात असल्याने शिंदेंच्या […] The post Eknath Shinde : एकनाथ शिंदे तडकाफडकी दिल्लीदरबारी…; काल कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार, आज राजधानीत हजेरी appeared first on Dainik Prabhat .
Gadchiroli News : शस्त्रे टाकुन मुख्य प्रवाहात या; आत्मसमर्पण केलेल्या भूपतीचे कार्यकर्त्यांना आवाहन
गडचिरोली : आत्मसमर्पण केलेला माओवादी भूपतीने आपल्या सीपीआय (माओवादी)च्या सहकार्याना सशस्त्र संघर्ष सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन केले. आंध्र प्रदेशातील चकमकीत प्रमुख नक्षलवादी कमांडर हिडमा यांच्या मृत्युनंतर भूपतीने हे आवाहन केले. गेल्या काही दिवसांपासून आम्हाला चकमकींच्या बातम्या येत आहेत. ही एक अतिशय चिंताजनक बाब आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो की, आम्ही सुमारे दीड महिन्यांपूर्वी सशस्त्र […] The post Gadchiroli News : शस्त्रे टाकुन मुख्य प्रवाहात या; आत्मसमर्पण केलेल्या भूपतीचे कार्यकर्त्यांना आवाहन appeared first on Dainik Prabhat .
पुणे : ज्ञानेश्वरी उत्तर भारतीय वाचकांपर्यंत पोहोचावी, तिचा प्रचार, प्रसार व्हावा या उद्देशाने ‘ज्ञानेश्वरी लालित्य’ हा ग्रंथ लिहिला असून ज्याप्रमाणे रामचरितमानस घराघरात पोहोचले तसे जिथे जिथे उत्तर भारतीय नागरिक असतील, अवधी भाषा माहिती असलेले नागरिक असतील तेथे तेथे ही हिंदी भाषेतील ज्ञानेश्वरी पोहोचेल असा विश्वास उत्तरप्रदेश सरकारच्या हिंदी समिती प्रमुख डॉ. अमिता दुबे यांनी व्यक्त […] The post रामचरितमानस प्रमाणे हिंदी ज्ञानेश्वरी देखील घराघरात पोहोचेल; हिंदी समिती प्रमुख डॉ. अमिता दुबे यांचे प्रतिपादन appeared first on Dainik Prabhat .
उद्या, २० नोव्हेंबर रोजी नितीश कुमार १० व्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. बिहार विधानसभेत पहिल्यांदाच नंबर वन पक्ष बनूनही, भाजपने नितीश कुमार यांना मुख्यमंत्री म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेतला. भाजपने त्यांचे दोन उपमुख्यमंत्री, सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा यांनाही रिपीट केले आहे. भाजपने नितीश यांना मुख्यमंत्री का केले ते ४ मुद्द्यांमध्ये समजून घ्या... आधी निवडणूक निकाल जाणून घ्या... एनडीए (नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स) ने २४३ पैकी २०२ जागा जिंकल्या, म्हणजेच एकूण जागांपैकी तीन-चतुर्थांश जागा. यापैकी भाजपने ८९, जेडीयूने ८५, एलजेपी (आर) ने १९, एचएएमने ५ आणि आरएलएमने ४ जागा जिंकल्या. महाआघाडी ३५ जागांवर कमी झाली. १: नितीश यांच्या नावावर जिंकले २: भाजपकडे नितीशपेक्षा मोठा चेहरा नाही भाजपकडे संपूर्ण राज्यात एकही ओळखता येणारा चेहरा नाही. पक्षाला चेहरा नसल्याने नितीश कुमार हेच एकमेव पर्याय आहेत. ३: ईबीसी मतदारांचे स्थलांतर होण्याचा धोका ४: केंद्र सरकारमधील नितीश घटक
केंद्र सरकारची स्वच्छता मोहीम, रेशन यादीतून काढली २.२५ कोटी अपात्र नावं!
मुंबई : केंद्र सरकारद्वारे समाजातील गरीब कुटुंबांना योग्य अन्न पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी रेशन योजना लागू केली आहे. याअंतर्गत, रेशन दुकानांमध्ये गरीब कुटुंबियांना तांदूळ, गहू आणि इतर धान्य व इतर वस्तू स्वस्त दरात दिले जातात. जरी ही योजना मुख्यत: अत्यल्प उत्पन्न गटांसाठी असली तरी, काही अपात्र व्यक्तींनी देखील याचा फायदा घेतला होता. अशा अपात्र लाभार्थ्यांविरुद्ध केंद्र सरकारने कठोर कारवाई सुरू केली आहे. गेल्या काही महिन्यांतच २.२५ कोटी लोकांची नावे रेशन यादीतून वगळण्यात आली आहेत. सरकारचा दावा आहे की या कारवाईमुळे गरजू लोकांपर्यंतच मोफत धान्य पोहोचेल.अपात्र लाभार्थ्यांमध्ये अनेकांची आर्थिक स्थिती चांगली असल्याचे निष्पन्न झाले आहे. काहींकडे महागडी चारचाकी गाडी, काहींचं मासिक उत्पन्न सरकारी मर्यादेपेक्षा जास्त तर काही कंपन्यांचे संचालक होते. यामध्ये असेही लोक होते ज्यांचा मृत्यू झाल्यानंतर देखील त्यांची नावं रेशन यादीत राहिली होती. अशा प्रकारे, अपात्र लाभार्थ्यांनी वर्षानुवर्षे मोफत धान्य घेतले होते.केंद्रीय अन्न मंत्रालयाने आधार कार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र, वाहन नोंदणी कागदपत्रे यांची तपासणी केली आणि त्यावर आधारित अपात्र लाभार्थ्यांची यादी राज्य सरकारकडे दिली. राज्य सरकारने त्वरित कारवाई करत अपात्र लाभार्थ्यांची नावं रेशन यादीतून काढून टाकली. यासोबतच, ही प्रक्रिया सतत सुरू राहणार आहे आणि अपात्र लोकांची नावं आणखी वगळली जातील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.रेशन कार्ड वितरण, पात्रतेची तपासणी आणि गरजूंना यादीत समाविष्ट करणे या सर्व कार्यांची मुख्यतः राज्य सरकारकडे जबाबदारी आहे. केंद्र सरकार फक्त धान्य पुरवठा आणि मार्गदर्शन करते. सध्या, देशभरात ८१ कोटींहून अधिक लोक राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचा लाभ घेत आहेत.अंत्योदय योजना अंतर्गत कुटुंबांना दरमहा ३५ किलो धान्य दिले जाते, तर प्राधान्य कुटुंबांत प्रत्येक सदस्याला ५ किलो गहू किंवा तांदूळ मिळतच राहणार आहे. सरकारचे आश्वासन आहे की ही स्वच्छता मोहीम संपलेली नाही आणि भविष्यात अधिक अपात्रांची नावे रेशन यादीतून वगळली जातील, जेणेकरून गरजू लोकांपर्यंतच या योजनांचा लाभ पोहोचेल.
पीएम किसान हप्ता अडकला? जाणून घ्या कारण आणि उपाय
मुंबई : देशभरातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा २१ वा हप्ता जरी करण्यात आला असून, लाखो लाभार्थ्यांच्या खात्यात निधी जमा होण्यास सुरुवात झाली आहे. तरीही काही शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम पोहोचली नसेल, तर त्यासाठी संपर्काची योग्य माहिती सरकारने उपलब्ध करून दिली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १९ नोव्हेंबर रोजी तामिळनाडूतील कोइम्बतूर येथून या हप्त्याचे वितरण सुरू केले. सुमारे अठरा हजार कोटी रुपये डीबीटीद्वारे देशभरातील ९ कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवण्यात आले आहेत.जर तुम्ही लाभार्थी यादीत असल्याची खात्री असूनही २१ वा हप्ता मिळाला नसेल, तर मदतीसाठी पुढील मार्गांचा वापर करू शकता:संपर्कासाठी हेल्पलाइनई-मेल: pmkisan-ict@gov.inहेल्पलाईन क्रमांक: 155261, 1800-11-5526 (टोल-फ्री), 011-23381092या माध्यमातून तुम्हाला अर्ज व हप्ता संबंधित समस्या, सुधारणा आणि मार्गदर्शन मिळू शकते.तुमचा हप्ता आला नसेल तर काय करावे ?अधिकृत वेबसाइटला भेट द्या: pmkisan.gov.inशेतकरी कॉर्नर मध्ये जाऊन लाभार्थी स्थिती (Beneficiary Status) निवडा.तुमचा आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक किंवा नोंदणी क्रमांक टाकून हप्त्याची स्थिती तपासा.नोंदणी क्रमांक माहित नसल्यास नो युअर रजिस्ट्रेशन नंबर पर्याय वापरून तो मिळवू शकता.कॅप्चा व OTP भरल्यानंतर तुम्हाला पैसे का आले नाहीत याची अचूक माहिती दिसेल.काय आहेत पैसे थांबण्याची कारणे?eKYC पूर्ण नसणेबँक खात्यातील त्रुटी किंवा खाते–आधार लिंक नसणेअर्ज करताना दिलेली चुकीची माहितीआधार क्रमांक किंवा खाते क्रमांकातील तांत्रिक विसंगतीवरील त्रुटी दुरुस्त केल्यानंतर पुढील हप्त्यापासून तुमच्या खात्यात पैसे नियमित येऊ लागतील.योजनेअंतर्गत २१ व्या हप्त्याचे पैसे जमा झाल्याची माहिती शेतकऱ्यांच्या नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर संदेशाद्वारे देखील पाठवण्यात येत आहे.
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि आम आदमी पार्टीचे नेते राघव चड्ढा (Raghav Chaddha) हे साधारण एका महिन्यापूर्वी आई-बाबा झाले आहेत. नुकताच, या सेलिब्रिटी कपलने आपल्या लाडक्या मुलाचा पहिला महिना पूर्ण झाल्याच्या निमित्ताने चाहत्यांना एक खास भेट दिली आहे. १९ नोव्हेंबर रोजी परिणीती आणि राघव यांचा मुलगा एक महिन्याचा झाला. यानिमित्ताने दोघांनी इंस्टाग्रामवर एक सुंदर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी आपल्या बाळाच्या चिमुकल्या पावलांचा फोटो पोस्ट करत, त्याचं नामकरण केल्याचा खास उलगडा केला आहे. बाळाच्या नावामागचं सुंदर आणि अर्थपूर्ण तत्वज्ञान देखील त्यांनी चाहत्यांना समजावून सांगितले आहे.मुलाच्या नावामागे खास अर्थ
२२ वस्तूत अद्याप अपेक्षित जीएसटी दरकपात नाही? यासाठी सरकार अँक्शन मोडवर
प्रतिनिधी: सरकारने जीएसटी दरात कपात केल्यापासून मोठ्या प्रमाणात वस्तूंच्या किंमतीत घसरण होत आहे. वृत्तसंस्थेने रिपोर्ट केलेल्या आकडेवारीनुसार, ५४ मधील ३० वस्तूंवरील किंमतीवर सरकारने लक्ष घातल्याने मोठ्या प्रमाणात वस्तूंच्या किंमतीत घसरण झाली आहे. उर्वरित वस्तूंच्या किंमतीत अद्याप अपेक्षित घसरण न झाल्याने ही घसरण होण्यासाठी सरकार विशेष खबरदारी बाळगत आहे. जीएसटी परिवर्तन व जीएसटी तर्कसंगतीकरणानंतर खरा फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचवणे अपेक्षित आहे. याचाच संदर्भ घेत सरकारने मोठ्या प्रमाणात आपले लक्ष खालच्या स्तरावर केंद्रीत केल्याने वस्तूंच्या किंमतीत कपात झाल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. २२ सप्टेंबरपासून ५४ वस्तूंच्या किंमतीत घसरण झाली आहे. बटर, तूप, पावडर, साबण, व इतर एफएमसीजी वस्तूंच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात घसरण झाली. २२ सप्टेंबरला अधिकृतपणे जीएसटी नवे दर लागू करण्यात आले. त्याप्रमाणे आधीचे स्लॅब रद्द करून ५ व १८% हे दोन जीएसटी दर निश्चित करण्यात आले. आता वह्या,केसांचे तेल, टूथपेस्ट, दुचाकी इत्यादी वस्तूंच्या दरात कपात अपेक्षित असताना या संबंधित २२ वस्तूंच्या दरात अपेक्षित घसरण झाली नाही असे प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. त्यामुळे उर्वरित वस्तूंच्या दरकपातीचा फायदा ग्राहकांपर्यंत मिळावा यासाठी सरकारने प्रयत्न सुरु केले.जीएसटी दर कपात करण्यापूर्वी आणि नंतर संवेदनशील वस्तूंवरील जीएसटी दराच्या देखरेखीवरील सरकारी आकडेवारीनुसार, विविध झोनद्वारे नोंदवलेल्या सरासरी किमतीच्या आधारावर अन्नपदार्थांच्या किमतीत अपेक्षेपेक्षा जास्त घट दिसून आली, ज्यामध्ये सुकामेवा, चीज, कंडेन्स्ड मिल्क, जॅम, टोमॅटो केचप, सोया मिल्क ड्रिंक आणि पिण्याच्या पाण्याची बाटली (२० लिटर) यांचा समावेश आहे. २२ सप्टेंबरपासून या वस्तूंवरील जीएसटी १२% वरून ५% कमी करण्यात आला आहे. उपलब्ध माहितीनुसार या बटरच्या बाबतीत तथापि किमतींमध्ये आणखी घट होण्याची शक्यता आहे. बटरवर १२-१८% कर आकारला जात होता सरकारच्या माहितीनुसार तो ५% कमी करण्यात आला आहे. सरकारी अंदाजानुसार,अपेक्षित घट ६.२५-११.०२% दरम्यान आहे, तर प्रत्यक्षात घट ६.४७% आहे असे वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीत म्हटले.शनिवारी पत्रकारांना माहिती देताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या की, जीएसटी दर कपातीचा फायदा किमती कमी झाल्यामुळे ग्राहकांना मिळाला आहे. ज्या वस्तूंच्या किमती विभागाच्या अंदाजानुसार नाहीत, त्यांच्यासाठी सीतारमण म्हणाल्या,'त्या थोड्या अधिक कमी कराव्या लागू शकतात ज्यासाठी आम्ही त्यांच्या (कंपन्यांसह) काम करू', अन्नपदार्थांमध्ये, तूप, चॉकलेट, बिस्किटे आणि कुकीज, कॉर्नफ्लेक्स, आईस्क्रीम आणि केकमध्ये अपेक्षेपेक्षा कमी किमतीत कपात दिसून आली.२२ सप्टेंबरपासून शाम्पू, टूथब्रश, टॅल्कम आणि फेस पावडर यासारख्या प्रसाधनगृहांच्या किमतीत अपेक्षेपेक्षा जास्त घट झाली आहे, तर केसांचे तेल, टूथपेस्ट, शेव्हिंग क्रीम आणि आफ्टर-शेव्ह लोशनच्या किमतीत अपेक्षेपेक्षा कमी घट झाली आहे.त्याचप्रमाणे, चष्मा, कॉन्टॅक्ट लेन्स, भूमिती बॉक्स, रंग बॉक्स, इरेजर, एसी मशीन आणि टीव्ही सेट आणि टेबल आणि स्वयंपाकघरातील वस्तूंच्या किमतीत अपेक्षेपेक्षा जास्त घट झाली आहे.व्यायाम आणि नोटबुक,पेन्सिल, क्रेयॉन, शार्पनर, थर्मामीटर आणि मॉनिटर्ससाठी जीएसटी विभागाच्या अंदाजानुसार कपात अपेक्षेपेक्षा कमी होती.
जुन्नर : पुणे जिल्ह्याच्या जुन्नर (Junner) आणि उत्तर पुणे परिसरात बिबट्यांच्या (Leopard) संख्येत सातत्याने वाढ होत आहे, ज्यामुळे बिबट्या आणि मानव यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. याच पार्श्वभूमीवर, या संघर्षावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारसह वन विभागाने 'तात्काळ उपाययोजनांचा मेगा प्लॅन' तयार केला आहे. बिबट्यांची वाढती संख्या आणि त्यामुळे होणारे हल्ले नियंत्रित करण्यासाठी या प्लॅनमध्ये कठोर पाऊले उचलली जात आहेत. यात प्रामुख्याने खालील उपायांवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. बिबट्यांची संख्या नैसर्गिकरित्या नियंत्रित करण्यासाठी बिबट मादीची नसबंदी करण्यावर भर दिला जाणार आहे. माणिकडोह बिबट निवारा केंद्रात यासाठीची तयारी अंतिम टप्प्यात आहे. वारंवार हल्ले करणाऱ्या आणि मानवासाठी धोकादायक ठरलेल्या नरभक्षक बिबट्यांना ठार करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. मानवी वस्तीत वारंवार वावरणाऱ्या बिबट्यांना तात्काळ जेरबंद (Trap and Capture) करून सुरक्षित स्थळी हलवले जाईल. जुन्नर वनपरिक्षेत्रातील सहायक वनसंरक्षक स्मिता राजहंस यांनी दिलेल्या माहितीनुसार, बिबट्यांची वाढती संख्या रोखण्यासाठी आणि संघर्षावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारने वनविभागाला विशेष सूचना दिल्या आहेत. या योजनेचा भाग म्हणून, उत्तर पुणे जिल्ह्यात दोन नवीन रेस्क्यू सेंटर्सची (Rescue Centres) उभारणी देखील केली जाणार आहे. या उपाययोजनांमुळे बिबट्या-मानव संघर्षावर नियंत्रण मिळवता येईल, अशी अपेक्षा वनविभागाने व्यक्त केली आहे.https://prahaar.in/2025/11/19/india-first-vande-bharat-sleeper-train-to-launch-next-month-big-update-on-bullet-train/शस्त्रक्रिया नाही, 'डार्ट'ने दिली जाणार लसपुणे आणि उत्तर महाराष्ट्रात बिबट्यांच्या वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण झालेल्या मानवी संघर्षावर नियंत्रण मिळवण्यासाठी वन विभागाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. बिबट्यांची संख्या नियंत्रित करण्यासाठी बिबट मादीची नसबंदी (Sterilization) ही योजना तातडीची उपाययोजना म्हणून हाती घेण्यात येत आहे, ज्याला केंद्र सरकारने (MoEFCC) देखील मान्यता दिली आहे. वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बिबट मादीची नसबंदी करताना शल्यक्रिया (Surgery) न करता 'इम्युनो-गर्भनिरोधक' (Immuno-contraceptive) पद्धतीचा वापर केला जाणार आहे. या आधुनिक पद्धतीत डार्टद्वारे लस दिली जाईल, असे वनसंरक्षक स्मिता राजहंस यांनी स्पष्ट केले. तथापि, ही मोहीम वन विभागासाठी एक मोठे आव्हान असणार आहे. कारण, सध्या बिबट्याच्या मादीने पिल्लांना जन्म दिला असल्याने, नसबंदीसाठी योग्य वेळ साधणे आणि मादीला सुरक्षितपणे बेशुद्ध (Anesthetize) करणे महत्त्वाचे आहे. या संवेदनशील शस्त्रक्रियेसाठी सुसज्ज यंत्रणा, अत्याधुनिक उपकरणे आणि वन्यजीव तज्ज्ञ डॉक्टरांची एक विशेष टीम आवश्यक आहे. बिबट मादीची नसबंदी केल्यानंतर, तिला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे. नसबंदीचा परिणाम तपासण्यासाठी आणि पुनरुत्पादनाची प्रक्रिया थांबेल याची खात्री करण्यासाठी किमान तीन वर्षे तिच्यावर बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे.माणिकडोह केंद्राची क्षमता वाढवणारपुणे आणि उत्तर महाराष्ट्रातील बिबट्या-मानव संघर्षावर नियंत्रण मिळवण्यासाठी वन विभागाने पायाभूत सुविधा वाढवण्याची तयारी सुरू केली आहे. बिबट्यांना सुरक्षितपणे पकडणे, त्यांच्यावर उपचार करणे आणि यशस्वी पुनर्वसन करण्यासाठी ही क्षमता वाढवणे अत्यावश्यक आहे. वन विभागाच्या माहितीनुसार, जंगल परिसरात बिबट्यांच्या उपचार आणि पुनर्वसनासाठी दोन ठिकाणी नवीन निवारा केंद्रे उभारली जाणार आहेत. तसेच, जुन्नर येथील सुप्रसिद्ध माणिकडोह बिबट निवारा केंद्राची क्षमता देखील लक्षणीयरीत्या वाढविण्यात येणार आहे. बिबट रेस्क्यू ऑपरेशन्सना गती देण्यासाठी आणि अचूकता आणण्यासाठी आधुनिक साधने मोठ्या प्रमाणात वाढविण्यात येणार आहेत. यामध्ये ट्रँक्युलायझिंग गन, हाय-पॉवर टॉर्च, ट्रॅप कॅमेरे आणि ड्रोन (Drone) यांसारख्या अत्याधुनिक उपकरणांचा समावेश आहे. तसेच, बिबट्यांना पकडण्यासाठी पिंजऱ्यांची संख्या देखील वाढवली जाणार आहे. बिबट्यांशी संबंधित आपत्कालीन परिस्थितीत त्वरीत प्रतिसाद देण्यासाठी, वनविभागाचे प्रशिक्षित मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात वाढविण्यात येणार आहे. या उपाययोजनांमुळे बिबट्यांच्या संदर्भातील व्यवस्थापन अधिक प्रभावी होईल, अशी अपेक्षा आहे.नरभक्षक बिबट्याला ठार मारण्यासाठी केंद्राची परवानगी बंधनकारकपुण्यात बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर, नरभक्षक बिबट्यांना ठार मारण्याच्या प्रक्रियेतील कायदेशीर अडथळे आणि वन विभागासमोरील आव्हाने समोर आली आहेत. बिबट्याने मनुष्यावर हल्ला केल्यानंतर किंवा ठार मारल्यानंतर, त्वरित त्या बिबट्याचा शोध घेणे आणि त्याला जेरबंद करणे हे वन विभागाचे प्राथमिक उद्दिष्ट असते. मात्र, जर बिबट नरभक्षक (Man-eater) असल्याचे सिद्ध झाले आणि त्याला जेरबंद करणे शक्य झाले नाही, तर त्याला ठार करण्यासाठी वन विभागाला केंद्र सरकारकडून (Central Government) परवानगी मिळवणे बंधनकारक आहे. सध्या बिबट्याला वन्यजीव संरक्षण कायद्याच्या 'शेड्यूल १' मध्ये टाकण्यात आले आहे. 'शेड्यूल १' मध्ये बिबट्याला सर्वोच्च संरक्षण असल्यामुळे, त्याला ठार मारणे अत्यंत कठीण असते आणि यासाठी केंद्राची विशेष परवानगी आवश्यक असते. या समस्येवर कायदेशीर तोडगा काढण्यासाठी, राज्य सरकारने बिबट्याला 'शेड्यूल १' मधून 'शेड्यूल २' मध्ये टाकण्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवला आहे. बिबट्या 'शेड्यूल २' मध्ये समाविष्ट झाल्यास, नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याची प्रक्रिया काही प्रमाणात सोपी होऊ शकते, ज्यामुळे मानवी वस्तीतील धोका त्वरित कमी करण्यास मदत होईल.मानव-बिबट संघर्ष रोखण्यासाठी AI आणि ड्रोनचा वापरबिबट्यांना जेरबंद करण्यासाठी आणि बिबट्या-मानव संघर्षावर नियंत्रण आणण्यासाठी ११ कोटी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामुळे वन विभागाला आधुनिक साधने आणि पायाभूत सुविधा उपलब्ध होतील. या 'टेक-प्लॅन' मध्ये ड्रोन सर्वेक्षण (Drone Surveillance) आणि एआय-आधारित (AI-based) इशारा प्रणाली (Alert System) चा वापर करण्यात येत आहे. या तंत्रज्ञानामुळे बिबट्यांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवता येईल आणि बिबट्या मानवी वस्तीत शिरताच तातडीने अलर्ट मिळेल, ज्यामुळे दुर्घटना टाळता येतील. बिबट्याशी होणारा संघर्ष कमी करण्याचा एक महत्त्वाचा उद्देश म्हणजे शेतकऱ्यांचे रात्री शेतात जाणे टाळणे हा आहे. यासाठी बिबट प्रवण क्षेत्रात शेतीसाठी दिवसा थ्री-फेज विद्युत पुरवठा करण्याची योजना आखली आहे. दिवसा वीज मिळाल्याने शेतकरी रात्रीच्या वेळी शेतात जाणे टाळतील आणि त्यामुळे बिबट्यांसोबत होणारा त्यांचा सामना कमी होईल.वनविभाग आणि राज्य सरकार 'युद्धपातळी'वर कामालाबिबट-मानव संघर्षावर नियंत्रण मिळवण्यासाठी वनविभाग आणि राज्य सरकारने 'युद्धपातळीवर' काम सुरू केले आहे. दोन्ही बाजूंचे (मानव आणि बिबट) नुकसान टाळणे आणि परिसरातील नागरिकांना सुरक्षितता प्रदान करणे, हे या व्यापक मोहिमेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. या मोहिमेत तात्काळ आणि दीर्घकालीन उपाययोजनांवर भर देण्यात आला आहे. बिबट्यांची वाढती लोकसंख्या नियंत्रित करण्यासाठी बिबट मादीची इम्युनो-गर्भनिरोधक पद्धतीद्वारे नसबंदी तात्काळ हाती घेण्यात येत आहे. बिबट्यांना पकडणे, उपचार करणे आणि त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी माणिकडोह केंद्रासह इतर दोन नवीन रेस्क्यू सेंटर्सची क्षमता वाढवली जात आहे. बिबट्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन सर्वेक्षण (Drone Survey) आणि एआय-आधारित (AI-based) इशारा प्रणालीचा वापर सुरू करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने मंजूर झालेल्या ११ कोटी २५ लाख रुपयांच्या निधीमुळे या उपाययोजनांना गती मिळाली आहे. वन विभाग आणि राज्य सरकार एकत्रितपणे काम करून, हा संघर्ष लवकरात लवकर नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
शुभमन गिलच्या तब्येतीमध्ये सुधारणा, मात्र दुसरा कसोटी सामना खेळणार का?
कोलकाता: कोलकातामधील ईडन गार्डन्सवर झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान भारतीय कर्णधार शुभमन गिलच्या मानेला दुखापत झाली होती. त्यामुळे तो कसोटीच्या पहिल्या सामन्यात फारसा दिसला नाही. सामना झाल्यानंतर शुभमनला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जिथून त्याला दाखल केल्याच्या दुसऱ्या दिवशी डिस्चार्ज मिळाला. बीसीसीआयने याबाबत ट्विटद्वारे माहिती दिली आहे.बीसीसीआयने ट्विटमध्ये सांगितले की, शुभमन वैद्यकीय उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी तो १९ नोव्हेंबरला संपूर्ण संघासोबत गुवाहाटीला जाणार आहे. बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाकडून त्याच्यावर सतत देखरेख ठेवली जात असून उपचारांनुसार दुसऱ्या कसोटीतील त्याच्या सहभागाबाबत निर्णय घेतला जाईल. यामुळे शुभमन दुसऱ्या कसोटीमध्ये दिसणार की नाही? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.https://prahaar.in/2025/11/19/guwahati-will-host-its-first-ever-test-match-what-will-be-indias-strategy-to-defeat-south-africa/दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, जर शुभमन गिल खेळला नाही तर त्याची जागा कोण घेणार? कोलकातातील ईडन गार्डन्सवर झालेल्या पराभवानंतर टीम इंडियाने जोरदार सरावाला सुरूवात केली आहे. ज्यात साई सुदर्शनने सराव करताना घाम गाळला आणि गिलच्या जागी या खेळाडूला संधी मिळण्याची शक्यता दिसली. मात्र आता गौतम गंभीर काय निर्णय घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
गॅब्रिएल इंडिया लिमिटेडच्या शेअर्समध्ये ९% तुफान वाढ
मोहित सोमण:गॅब्रिएल इंडिया लिमिटेडचा शेअर आज मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आज सकाळच्या सत्रात कंपनीचा शेअर ८% पेक्षा अधिक पातळीवर उसळला आहे. सेबीने कंपनीच्या कॉर्पोरेट संरचनेला (Corporate Restructuring) मान्यता दिल्याने कंपनीच्या शेअरला गुंतवणूकदारांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. कंपनीच्या शेअर्समध्ये दुपारी १.३२ वाजेपर्यंत ८.९४% उसळला असून प्रति शेअर किंमत १०७० रूपयांवर पोहोचली आहे. ३० जूनला कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत या स्कीम ऑफ अरेजमेंट अंतर्गत हा संरचना प्रस्ताव मंजूर झाला होता. त्याला एनएसई एक्सचेंजकडून 'ना हरकत' प्रमाणपत्र (Non Objection Certificate) मिळाल्याचे कंपनीने आपल्या एक्सचेंज फायलिंगमध्ये स्पष्ट केले आहे.प्रस्तावित एकत्रित योजना आणि एकत्रीकरण ही सेबीच्या नियम ११ (Composite Scheme of Amalgamation and Arrangement - Listing Obligations and Disclosure Requirements) २०१५ नियमाच्या तरतुदींचे पालन करेल असे कंपनीने आपल्या एक्सचेंज निवेदनात स्पष्ट केले आहे.नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) आणि बीएसई (BSE) एशिया इन्व्हेस्टमेंट्समध्ये विलीनीकरणा साठी आणि एशिया इन्व्हेस्टमेंट्सच्या ऑटोमोटिव्ह उपक्रमाचे गॅब्रिएल इंडियामध्ये विलीनीकरण करण्यासाठी कंपनीला 'ना हरकत' पत्र जारी केल्यानंतर कंपनीच्या शेअर खरेदीचा उत्साह अधिकच वाढला आहे. कंपनीचे सध्याचे बाजार भांडवल (Market Capitalisation) १५२६७.९१ कोटी रुपये आहे. गेल्या ५२ आठवड्यात कंपनीच्या शेअर १३८६.४५ रूपये प्रति शेअरवर उच्चांकी (All time High) वर पोहोचला असून ३८७.०५ रूपये प्रति शेअरवर शेअर यापूर्वी निचांकी पातळीवर (All time Low) पातळीवर पोहोचले आहेत.कंपनीच्या नव्या निर्णयानुसार, अँकेमको इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे एशिया इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये विलीनीकरण होणार असून ऑटोमोटिव्ह व्यवसाय असलेल्या एशिया इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेडमधून हा व्यवसाय वेगळा करत तो गॅब्रिएल इंडिया लिमिटेडकडे हस्तांतरित केला जाणार आहे. काल मात्र ऑटो कंपोनेंट आणि इक्विपमेंट क्षेत्रातील स्मॉलकॅप कंपनी असलेल्या गॅब्रिएल इंडियाच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली होती. दिवसभरात कंपनीच्या शेअर्समध्ये ७.३९% घट झाली होती. काल इंट्राडे लो दिवसात१,०७७.७ रुपयांचा निचांकी पातळीवर घसरला होता गाठला आहे, गेल्या पाच दिवसांत गॅब्रिएल इंडिया शेअर तोट्यात होता ज्यामुळे या कालावधीत एकूण १४.१३% ची घसरण झाली आहे. मात्र आज शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे.
Arti Singh Supports Pranit More | ‘बिग बॉस सीझन १९’ शो अधिक रंजक होत आहे. यातील स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेला मोठी लोकप्रियता मिळत आहे. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री व ‘बिग बॉस’ची एक्स स्पर्धक आरती सिंगनं प्रणित मोरेला सपोर्ट केला आहे. तिने त्याच्या खेळाचे देखील कौतुक केले आहे. आरती सिंग बॉलिवूड बबल टेली या इन्स्टाग्राम पेजवरून […] The post ‘बिग बॉस सीझन १९’मधील प्रणित मोरेला लोकप्रिय अभिनेत्रीने दिला पाठिंबा; म्हणाली “तोच विजेता झाला पाहिजे” appeared first on Dainik Prabhat .
“आवडो न आवडो, पण…”; शेफाली शाहने व्यक्त केले प्ररखड मत म्हणाली “आम्हा कलाकारांच्या आयुष्याचा…”
Shefali Shah : आम्हा कलाकारांच्या आयुष्याचा सोशल मीडिया हा अविभाज्य भाग झाला आहे. आम्हाला ते आवडो न आवडो, पण आम्हाला त्या माध्यमावर हजेरी लावावी लागते. नुसती हजेरी नाही तर ‘आम्ही कसे कालसुंसगत आहोत’ हेदेखील पटवून द्यावं लागतं. काही वर्षांपूर्वी आधी कलाकार आणि नंतर त्यांच्या ‘पब्लिसिटी’चा मुद्दा यायचा. आता कलाकार राहिले मागे आणि ‘पब्लिसिटी’ हा मुद्दा […] The post “आवडो न आवडो, पण…”; शेफाली शाहने व्यक्त केले प्ररखड मत म्हणाली “आम्हा कलाकारांच्या आयुष्याचा…” appeared first on Dainik Prabhat .
“भारताला हिंदू राष्ट्र घोषित करणे आवश्यक….” ; RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
RSS Mohan Bhagwat। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी गुवाहाटी येथे एका कार्यक्रमात बोलताना एक मोठे विधानकेले आहे. त्यांच्या या विधानाची सध्या सगळीकडे चर्चा आहे. त्यांनी याठिकाणी, “ज्याला भारताचा अभिमान आहे तो हिंदू आहे. ” असे म्हटले आहे. भागवत यांनी हिंदू धर्माचे वर्णन केवळ धार्मिक नाही तर एक सभ्यता ओळख म्हणून देखील केली आहे. […] The post “भारताला हिंदू राष्ट्र घोषित करणे आवश्यक….” ; RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान appeared first on Dainik Prabhat .
Stocks to Sell Today: आज खरेदीऐवजी 'हे'३ शेअर लवकरात लवकर विकण्याचा जेएम फायनांशियल कंपनीचा सल्ला
प्रतिनिधी: जेएम फायनांशियल इन्स्टिट्युशनल सिक्युरिटीज सर्विसेसकडून तीन शेअर विकण्याचा 'सेल कॉल' आलेला आहे. हे शेअर्स पुढीलप्रमाणे -१) KNR Construction- जेएम फायनांशियलने कंपनीने केएनआर कन्स्ट्रक्शन कंपनीच्या शेअरला विकण्याचा सल्ला देण्यात आला आहे. १६५ रूपये प्रति शेअर लक्ष्य किंमतीसह विकण्याचा सल्ला दिला आहे.२) Aechean Chemical Industries - कंपनीच्या शेअरला जेएम फायनांशियलकडून विकण्याचा सल्ला दिला गेला आहे. कंपनीने या शेअरला सेल कॉल दिला असून ५५० रूपये प्रति शेअर लक्ष्य किंमतीसह हा शेअर विकण्याचा सल्ला दिला आहे.३) Greenpanel Industries Limited- ग्रीन पॅनेल इंडस्ट्रीजचा शेअर कंपनीकडून विकण्याचा सल्ला दिला गेला आहे. २७० रूपये प्रति शेअर लक्ष्य किंमतीसह हा शेअर विकण्याचा सल्ला जेएम फायनांशियल सर्विसेसकडून दिला गेला आहे.
गुवाहाटीत पहिल्यांदाच होणार कसोटी सामना! दक्षिण आफ्रिकेच्या पराभवासाठी काय असणार भारताची रणनीती ?
गुहावटी: भारतीय संघाला पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून हार पत्कारावी लागली. फिरकीपटूंसाठी फायदेशीर असलेल्या कोलकातातील इडन गार्डन या खेळपट्टीवर टीम इंडियाची खेळी कमी पडली. मात्र आता भारतीय संघाला ही मालिका गमावायची नसेल तर कोणत्याही स्थितीत दुसरा कसोटी सामना जिंकावाच लागणार आहे. भारताचा दक्षिण आफ्रिकेविरूद्धचा दुसरा कसोटी सामना गुहावटीमध्ये होणार आहे.भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिकेविरूद्धचा दुसरा आणि अंतिम सामना २२ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. दुसरा कसोटी सामना गुवाहाटीत होणार असून पहिल्या सामन्यापेक्षा काही मिनिटं आधी दुसर्या सामन्याला सुरुवात होणार आहे. कोलकातात पहिल्या कसोटी सामन्याला सकाळी ९ वाजून ३० मिनिटांनी सुरुवात झाली होती. मात्र कोलकाताच्या तुलनेत गुवाहाटीत ३० मिनिटांआधी नाणेफेक आणि सामना सुरु होणार आहे. या पार्श्वभूमीवर अंदाजे ९ वाजता सामना सुरु होणार आहे. तर त्याआधी ८ वाजून ३० मिनिटांनी टॉस होईल.https://prahaar.in/2025/11/19/nda-ministers-numbers-in-bihar-assembly-confirmed-but-there-is-a-dilemma-for-the-speakers-post/कसोटी सामन्यांमध्ये आतापर्यंत आधी लंच ब्रेक आणि नंतर टी ब्रेक होतो. मात्र गुवाहाटीत यंदा ही परंपरा बदलणार असून आधी टी ब्रेक आणि नंतर लंच ब्रेक होणार आहे. कसोटी सामन्यांच्या इतिहासात लंचआधी टी ब्रेक होण्याची ही पहिलीच वेळ ठरणार आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुवाहाटीत पहिल्यांदाच कसोटी सामना होणार आहे. त्यामुळे चाहते गुवाहाटीतील पहिल्या कसोटी सामन्यासाठी सज्ज आहेत.भारतीय संघावर पहिल्या सामन्यातील पराभवामुळे जोरदार टीका करण्यात आली. त्यामुळे आता भारतीय संघ कसोटीचा दुसरा सामना जिंकून दक्षिण आफ्रिकेसोबत बरोबरीचा हिशोब करण्यासाठी मैदानात उतरणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पहिल्या पराभवानंतर भारतीय संघ या सामन्यात कोणत्या रणनितीने मैदानात उतरते? याची उत्सूकता क्रिकेट चाहत्यांना लागून आहे.
Nayantara : साऊथ चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे नयनतारा. तिने साऊथच्या अनेक मोठ्या कलाकारांबरोबर स्क्रिन शेअर केली आहे. नुकताच अभिनेत्रीने तिचा ४१ वा वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसाच्या निमित्ताने नयनतारा हिच्या पत्नीने तिला अत्यंत महागडे गिफ्ट दिले आहे. त्यामुळे यंदाचा वाढदिवस अभिनेत्रीसाठी खूपच खास ठरला आहे. अभिनेत्री नयनताराला तिचा पती […] The post नयनताराचा आनंद गगणात मावेना! यंदाचा वाढदिवस ठरला खास; पत्नीने थेट ‘इतक्या’ कोटींची आलिशान कार दिली भेट appeared first on Dainik Prabhat .
“जर तैवानवर हल्ला झाला तर…” ; पंतप्रधान ताकाची यांच्या इशाऱ्यानंतर जपान-चीनमध्ये तणाव
China Japan Tension। जपान आणि चीनमधील राजकीय अविश्वास हा दीर्घकाळापासून आहे, परंतु जपानच्या नवीन पंतप्रधानाची निवड झाल्यापासून संबंध एका नवीन पातळीवर पोहोचले आहेत. जपानी पंतप्रधान साने ताकाची यांनी संसदेत बोलताना, “जर चीनने तैवानविरुद्ध लष्करी कारवाई केली तर ते जपानच्या अस्तित्वाला थेट धोका निर्माण करेल आणि टोकियोला प्रत्युत्तरात्मक लष्करी कारवाई करण्यास भाग पाडले जाऊ शकते.” असे […] The post “जर तैवानवर हल्ला झाला तर…” ; पंतप्रधान ताकाची यांच्या इशाऱ्यानंतर जपान-चीनमध्ये तणाव appeared first on Dainik Prabhat .
अमोल कोल्हेंचे छोट्या पडद्यावर दमदार कमबॅक; ‘अरुंधती’सोबत झळकणार मुख्यभूमिकेत
Mi Savitribai Jotirao Phule | ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले‘ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. डॉ. अमोल कोल्हे यांची निर्मिती असणाऱ्या या मालिकेचा पहिला प्रोमो 18 नोव्हेंबर रोजी रिलीज झाला. यात स्वत: अमोल कोल्हे या मालिकेत महात्मा ज्योतिबा फुले यांची भूमिका साकारत असून अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर सावित्रीबाईंच्या भूमिकेत झळकणार आहे. विशेष म्हणजे स्टार […] The post अमोल कोल्हेंचे छोट्या पडद्यावर दमदार कमबॅक; ‘अरुंधती’सोबत झळकणार मुख्यभूमिकेत appeared first on Dainik Prabhat .

24 C