SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

28    C
... ...View News by News Source

IPL 2026 तब्बल ६७ दिवस चालणार, २६ मार्च ते ३१ मे दरम्यान क्रिकेट सामने होणार

मुंबई : आयपीएल २०२६ तब्बल ६७ दिवस चालणार आहे. बीसीसीआयने जाहीर केलेल्या तारखांनुसार आयपीएल २०२६ ची सुरुवात २६ मार्च २०२६ रोजी होईल आणि समारोप ३१ मे २०२६ रोजी होणार आहे. अबुधाबी येथे आयपीएल २०२६ साठी मंगळवारी मिनी ऑक्शन अर्थात छोटा लिलाव झाला. यावेळी सर्व फ्रँचायझींना अर्थात संघ व्यवस्थापनांना आयपीएल २०२६ च्या तारखांची औपचारिक माहिती देण्यात आली. बीसीसीआयने अद्याप आयपीएल २०२६ चा सविस्तर कार्यक्रम जाहीर केलेला नाही पण स्पर्धा ६७ दिवस चालणार असल्याची कल्पना दिली आहे. आयपीएलचा १९ वा हंगाम भारत आणि श्रीलंकेत ७ फेब्रुवारी ते ८ मार्च दरम्यान होणाऱ्या पुरुषांच्या टी-२० विश्वचषकाच्या समाप्तीनंतर सुमारे तीन आठवड्यांनी सुरू होईल आणि तो दोन महिन्यांहून अधिक काळ चालेल.आयपीएल 2026 च्या मिनी ऑक्शनमध्ये कोणत्या टीमनं आत्तापर्यंत कोणत्या खेळाडूला खरेदी केलं आहे ते पाहू CSK : प्रशांत वीर, कार्तिक शर्मा, अकेल हुसेन, मॅट शॉर्ट, अमन खान, सर्फराज खान, राहुल चहर, मॅट हेन्री, झॅक फोल्कस DC :अकिब नबी, डेव्हिड मिलर, बेन डकेट, पथूम निशांका, लुंगी एन्गिडी, साहिल पारीख, पृथ्वी शॉ, कायले जेमिन्सन. पी. राज GT :अशोक शर्मा, जेसन होल्डर, ल्यूक वुड, टॉम बँटन KKR :कॅमेरुन ग्रीन, मथीशा पथिराना, तेजस्वी सिंह, फिन एलन, प्रशांत सोळंकी, कार्तिक त्यागी, राहुल त्रिपाठी, टीम सैफर्ट, मुस्तफिजूर रहमान, रचिन रविंद्र, आकाशदीप LSG :मुकल चौधरी, एनरिक नॉर्किया, वहिंदू हसरंगा, नमन तिवारी, जोश इंग्लिस MI :क्विंटन डी कॉक, दानिश मालेवार, मोहम्मद इजहार, अथर्व अंकोलकर, मयांक रावत PBKS: कूपर कोनली, बेन द्वारशुईस, प्रवीण दुबे, विशाल निषाद RR :रवी बिश्नोई, सुशांत शर्मा, विग्नेश पत्तूर, यश राज पुंजा, रवि सिंह, अ‍ॅडम मिल्ने, कुलदीप सेन RCB :व्यंकटेश अय्यर, जेकब डफी, मंगेश यादव, जॉर्डन कॉक्स, कनिष्क चौहान, विकी ओस्तवाल SRH :शिवांग कुमार , सलिल अरोरा, साकिब हुसेन, करण फुलेत्रा, लियाम लिव्हिंगस्टोन, अमन राव, जॅक एडवर्डस

फीड फीडबर्नर 17 Dec 2025 9:30 pm

अफगाण-पाकिस्तानमध्ये तणाव वाढणार ! तालिबान बंद करणार पाकिस्तानचे पाणी

काबूल : पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील सीमेवरील तणाव वाढत असून आता अफगाणिस्तानने पाकिस्तानमध्ये जाणाऱ्या नद्यांचे पाणी रोखण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पाकिस्तानला पश्‍चिमेकडून येणाऱ्या नद्यांचे पाणी मिळू शकणार नाही. यामुळे दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. अफगाणिस्तानच्या नांगरहार प्रांतातून जाणाऱ्या कुनार नदीचे पात्र दुसरीकडे वळवण्याचे तालिबानी प्रशासनाने ठरवले आहे. ही नदी सीमा ओलांडून […] The post अफगाण-पाकिस्तानमध्ये तणाव वाढणार ! तालिबान बंद करणार पाकिस्तानचे पाणी appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 17 Dec 2025 9:21 pm

अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत; न्यायालयाचा मोठा निर्णय

भंडारा : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे तुमसर-मोहाडीचे आमदार राजू कारेमोरे यांना पोलिसांना अश्लील शिवीगाळ केल्याच्या प्रकरणात भंडारा जिल्हा सत्र न्यायालयाने दोषी ठरवले आहे. मात्र, न्यायालयाने त्यांना आणि त्यांच्या चार सहकाऱ्यांना लोकप्रतिनिधी म्हणून चांगली प्रतिमा असल्याचे नोंदवत, पुढील दोन वर्षे शिस्तीत राहण्याच्या तंबीसह सुटका केली आहे. न्यायाधीश भारती काळे यांनी दिलेल्या निकालात आमदार कारेमोरे यांना […] The post अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत; न्यायालयाचा मोठा निर्णय appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 17 Dec 2025 9:17 pm

P. Chidambaram : “महात्मा गांधींचे नाव पुसून टाकण्याचा प्रयत्न”–पी. चिदंबरम

नवी दिल्ली – महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्याचे (मनरेगा) नाव बदलणे हे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची दुसऱ्यांदा हत्या करण्यासारखे आहे अशी टीका कॉंग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी केली. मनरेगा अंतर्गत, सरकार ग्रामीण भागात १०० दिवसांच्या कामाची हमी देते आणि काम न मिळाल्यास बेरोजगारी भत्ता देखील देते. नवीन विधेयकात १०० […] The post P. Chidambaram : “महात्मा गांधींचे नाव पुसून टाकण्याचा प्रयत्न” – पी. चिदंबरम appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 17 Dec 2025 9:16 pm

धुक्यात हरवली लखनऊची टी ट्वेंटी

लखनऊ : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील आजचा लखनऊ येथे होणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाली सात वाजता सामना सुरू होणार होता. पण दाट धुक्यामुळे सामना अद्याप सुरू झालेला नाही. सध्या मालिकेत भारताने २-१ अशी आघाडी घेतली आहे. उर्वरित सामन्यांमध्ये काय होणार याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष आहे.भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा कटकचा टी ट्वेंटी सामना १०१ धावांनी आणि धरमशाला येथील टी ट्वेंटी सामना सात विकेट राखून जिंकला. दक्षिण आफ्रिकेने चंदिगड येथील टी ट्वेंटी सामना ५१ धावांनी जिंकला. आता लखनऊ आणि अहमदाबाद येथे प्रत्येकी एक टी ट्वेंटी सामना होणार आहे. या दोन सामन्यांत काय होते याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष आहे.

फीड फीडबर्नर 17 Dec 2025 9:10 pm

Boston : बोस्टनमध्ये प्राध्यापकाची गोळ्या घालून हत्या

ब्रुकलिन : मॅसेच्युसेटस इन्स्टिट्युट ऑफ टेक्नोलॉजीतील एका प्राध्यापकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याचे उघड झाले आहे. बोस्टन जवळ घरात घुसून ही हत्या करण्यात आली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. नुनो एफजी लॉरेएरो असे हत्या करण्यात आलेल्या ४७ वर्षीय प्राध्यापकाचे नाव असून ते भौतिकशास्त्र, आण्विक विज्ञान आणि अभियांत्रिकीचे प्राध्यापक होते. सोमवारी रात्री ब्रुकलिन येथील त्यांच्या घरातच त्यांना […] The post Boston : बोस्टनमध्ये प्राध्यापकाची गोळ्या घालून हत्या appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 17 Dec 2025 9:04 pm

ब्रेक फेल झाल्यामुळे एक्सप्रेस वेवर अपघात, ट्रकचा झाला चेंदामेदा

रायगड : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर बुधवारी मोठा अपघात झाला. सिमेंट ब्लॉक घेऊन जात असलेला ट्रक थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या कॉलमला धडकला. ब्रेक फेल झाल्यामुळे ट्रक अनियंत्रित झाला आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या कॉलमला धडकला. हा अपघात एवढा जोरदार होता की, ट्रक चालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेमुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.अपघात बुधवारी संध्याकाळी साडेचारच्या सुमारास झाला. पुणे बाजूकडून मुंबईकडे सिमेंटचे ब्लॉक घेऊन जाणारा ट्रक एक्सप्रेस वेवरील किलोमीटर ४५/५०० जवळ, अमृतांजन पुलाजवळ पोहोचला. त्यावेळी ब्रेक निकामी झाल्यामुळे ट्रक अनियंत्रित झाला आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या कॉलमला धडकला. वेगाने जात असलेला ट्रक कॉलमला धडकल्यामुळे मोठा अपघात झाला.अपघातात सिमेंट ब्लॉक घेऊन जात असलेल्या ट्रकचा पुरता चेंदामेंदा झाला. या अपघातात ट्रक चालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला.अपघातामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. वाहतूक पोलिसांनी आय.आर.बी.ची आपत्कालीन टीम, अपघातग्रस्तांसाठीचे मदत पथक, सामाजिक कार्यकर्ते यांच्या सहकार्याने ट्रक हटवला आणि रस्त्याच्या कडेला नेला. अपघातग्रस्त वाहन हटवल्यानंतर वाहतूक हळूहळू पूर्ववत झाली.

फीड फीडबर्नर 17 Dec 2025 8:10 pm

पाचगणीत लाखोंचे कोकेन जप्त, १० जणांना अटक

पाचगणी : सातारा जिल्ह्यातील पाचगणी हे महाराष्ट्रातले थंड हवेचे लोकप्रिय पर्यटनाचे ठिकाण आहे. याच पाचगणीत लाखो रुपयांचे कोकेन जप्त करण्यात आले. कोकेन प्रकरणी पोलिसांनी दहा जणांना अटक केली आहे. पाचगणी पोलिसांनी एकूण पाच लाख रुपयांचे कोकेन जप्त केले आणि दहा जणांना अटक केली आहे. तसेच पोलिसांनी स्कोडा, एमजी हेक्टर कार, मोबाईलसह ४२ लाख ८५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पण जप्त केला आहे.साताऱ्यातील जावळी तालुक्यातील सावरी गावात अलीकडेच एमडी ड्रग्जची फॅक्टरी उध्वस्त करण्यात आली होती. त्यानंतरच पाचगणीत कोकेन विक्री करणारे रॅकेट पोलिसांनी पकडले. पोलिसांनी पकडलेले दहा जण हे मुंबईतील रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत.महम्मद नावेद सलिम परमार (रा. भेंडी बाजार, मुंबई), सोहेल हशद खान (रा. पी.बी. मार्ग, मुंबई), महम्मद रिझवान अन्सारी, वासिल हमीद खान, अली अजगर सादिक राजकोटवाला (रा. नागपाडा, मुंबई), महम्मद साहिल अन्सारी (रा. शिलाजी टॉवर, मुंबई सेन्ट्रल), जिशान इरफान शेख (रा. भायखळा, मुंबई), सैफ अली कुरेशी (रा. मज्जीद गल्ली, मुंबई), महम्मद उबेद सिद्दिकी (रा. भेंडीबजार, मुंबई) आणि राहिद मुख्तार शेख (रा. ग्रॅन्ट रोड, मुंबई) या सर्वांना पोलिसांनी पकडले आहे. पाचगणीतल्या ड्रग्स रॅकेटचा मुंबईशी असलेला संबंध जाणून घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

फीड फीडबर्नर 17 Dec 2025 8:10 pm

Cabinet decisions : गड-किल्ल्यांप्रमाणेच राज्य संरक्षित स्मारक परिसरातील अतिक्रमणे रोखण्यासाठी समिती

मुंबई : राज्यातील गड-किल्ल्यांप्रमाणेच राज्य संरक्षित स्मारकांच्या ठिकाणांवरील अतिक्रमणे रोखण्यासाठी सांस्कृतिक कार्य मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.या निर्णयानुसार सांस्कृतिक कार्य विभागाच्या २० जानेवारी २०२५ च्या शासन निर्णयातील गड-किल्ल्यांवरील अतिक्रमणे काढण्याबाबतच्या तरतुदींची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. यामध्ये आता राज्य संरक्षित स्मारकांचाही समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.राज्यातील सर्व गड-किल्ले तसेच राज्य संरक्षित स्मारकांवरील अतिक्रमणे काढून टाकण्यासाठी व भविष्यातील अतिक्रमणे रोखण्यासाठी राज्यस्तरीय समिती गठित करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. समितीचे सांस्कृतिक कार्य मंत्री अध्यक्ष असतील. तर समितीमध्ये महसूल मंत्री, ग्रामविकास मंत्री, पर्यटन मंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री, वन मंत्री, बंदरे व विकास मंत्री तसेच संबंधित विभागांचे सचिव, प्रधान सचिव किंवा अपर मुख्य सचिव यांचा समावेश असणार आहे.राज्यस्तरीय समितीमध्ये चार निमंत्रित सदस्यांचा समावेश करण्यास तसेच प्रत्येक जिल्ह्यात गठीत करण्यात येणाऱ्या जिल्हास्तरीय समितीमध्ये चार अशासकीय सदस्यांचा समावेश करण्यासही मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. हे अशासकीय सदस्य गड-किल्ले व राज्य संरक्षित स्मारकांचे अभ्यासक असावेत किंवा संरक्षण व संवर्धनाच्या क्षेत्रात कार्यरत असलेली व्यक्ती अथवा स्वयंसेवी संस्था असावी, अशी अट ठेवण्यात आली आहे.जिल्ह्यातील गड-किल्ले व राज्य संरक्षित स्मारकांवरील अतिक्रमणे रोखणे व ती काढून टाकण्याची कारवाई संबंधित जिल्हाधिकारी यांना त्या-त्या जमिनीच्या मालकीच्या विभागाच्या समन्वयाने करावी लागणार आहे. तसेच यासाठीचा खर्च जिल्हा नियोजन व विकास निधीमधून करता येणार आहे.जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत उमेदवारी अर्जाबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय अंतिममहाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या अधिनियम, १९६१ च्या कलम १४ (२) मध्ये सुधारणा करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका वेळेत आणि कालबद्धरितीने व्हाव्यात या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या अधिनियमातील कलम १४ मध्ये, पोट-कलम (२) अंतर्गत उमेदवारी अर्ज स्वीकारणाऱ्या किंवा स्वीकारण्यास नकार देणाऱ्या निवडणूक अधिकाऱ्याच्या निर्णयाविरुद्ध जिल्हा न्यायालयासमोर अपील दाखल करता येत होते. मात्र विविध जिल्हा न्यायालयांमध्ये वेगवेगळ्या कालावधीसाठी अशी अनेक अपीले प्रलंबित राहत असल्याने निवडणुका कालबद्धरित्या घेणे शक्य होत नसल्याने हा निर्णय घेण्यात आला. याबाबत राज्य निवडणूक आयोगाने शासनास या तरतुदी वगळण्याबाबतचा प्रस्ताव शासनास पाठविला आहे. त्या अनुषंगाने राज्य शासनास अशा निवडणुकांबाबत नियम करता येतील, तसेच उमेदवारी अर्ज स्वीकारणाऱ्या किंवा स्वीकारण्यास नकार देणाऱ्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचा निर्णय अंतिम असेल, अशी कलमे यात समाविष्ट करण्यात आली आहे. याबाबत महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या (सुधारणा) अध्यादेश, २०२५ काढण्यास बैठकीत मंजूरी देण्यात आली.

फीड फीडबर्नर 17 Dec 2025 8:10 pm

IND vs SA : शुबमन गिल चौथ्या सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर? ‘या’खेळाडूला मिळाली संधी

Shubman Gill rule out IND vs SA 4th T20I : लखनौमधील सामन्याला धुक्यामुळे उशिरा सुरू होणार आहे. साडेआठ वाजता पंच मैदानाची पाहणी करुन सामना सुरु करण्याचा निर्णय घेतील. या चौथ्या टी-२० सामन्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघात मोठे फेरबदल पाहायला मिळाले आहेत. शुबमन गिलला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर केले आहे. त्याच्या जागी संजू सॅमसनचा संघात समावेश करण्यात आला […] The post IND vs SA : शुबमन गिल चौथ्या सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर? ‘या’ खेळाडूला मिळाली संधी appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 17 Dec 2025 8:04 pm

Dharmendra : ‘धुरंधर’मुळे धर्मेंद्र यांच्या शेवटच्या सिनेमाचं प्रदर्शन पुढे ढकललं; आता ‘या’दिवशी होणार प्रदर्शित

Ikkis Release Date Changed | Dharmendra : रणवीर सिंग, अक्षय खन्ना आणि संजय दत्त यांचा “धुरंधर” हा चित्रपट सध्या धुमाकूळ घालत आहे. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट असाधारणपणे चांगला कामगिरी करत आहे. अवघ्या १२ दिवसांत या चित्रपटाने जगभरात ६३४ कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाच्या प्रभावी कामगिरीमुळे, दिवंगत महान अभिनेते धर्मेंद्र यांचा शेवटचा चित्रपट “इक्कीस” […] The post Dharmendra : ‘धुरंधर’ मुळे धर्मेंद्र यांच्या शेवटच्या सिनेमाचं प्रदर्शन पुढे ढकललं; आता ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 17 Dec 2025 7:50 pm

पाचगणीत कोकेन तस्करीचा भांडाफोड; १० जणांना अटक, ४२ लाखांचा मुद्देमाल जप्त

पाचगणी : पाचगणी शहरात कोकेन तस्करीचा मोठा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी मध्यरात्री छापा टाकून तब्बल १० संशयितांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून कोकेन सदृश अंमली पदार्थ, दोन आलिशान चारचाकी वाहने व मोबाईल हँडसेट असा एकूण सुमारे ४२ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पाचगणी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना १७ […] The post पाचगणीत कोकेन तस्करीचा भांडाफोड; १० जणांना अटक, ४२ लाखांचा मुद्देमाल जप्त appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 17 Dec 2025 7:48 pm

IND VS PAK : पाकिस्तानने तडकाफडकी ‘हा’निर्णय घेत भारताला दिला मोठा धक्का ! भारताच्या भूमिकेकडे सगळ्यांचे लक्ष

पहलगामधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान (IND VS PAK) यांच्यातील संबंध फिस्कटले होते. ते अद्यापही पूर्ववत झालेले नाहीत. पहलगामधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले होते. यानंतर दोन्ही देशांत युद्धजन्य स्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर भारत आणि पाकिस्तान अशा दोन्ही देशांनी एकमेकांविरोधात कठोर निर्णय घेतले होते. पाकिस्तानने घेतला मोठा निर्णय दोन्ही देशांनी एकमेकांचे विमान आपल्या […] The post IND VS PAK : पाकिस्तानने तडकाफडकी ‘हा’ निर्णय घेत भारताला दिला मोठा धक्का ! भारताच्या भूमिकेकडे सगळ्यांचे लक्ष appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 17 Dec 2025 7:43 pm

संसदेत ई-सिगारेट ओढणारा तो खासदार कोण? पहा व्हायरल व्हिडिओ

नवी दिल्ली: संसदेच्या पवित्र सभागृहात लोकशाहीच्या मूल्यांची जपणूक होणे अपेक्षित असताना, एका खासदाराने चक्क ई-सिगारेट (Vape) ओढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भाजप नेते अमित मालवीय यांनी तृणमूल काँग्रेसचे (TMC) खासदार कीर्ती आझाद यांच्यावर हा खळबळजनक आरोप केला असून, त्यासंबंधीचा एक व्हिडिओ पुरावा म्हणून सादर केला आहे. या प्रकारामुळे आता राजकीय वर्तुळात वादाला तोंड फुटले […] The post संसदेत ई-सिगारेट ओढणारा तो खासदार कोण? पहा व्हायरल व्हिडिओ appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 17 Dec 2025 7:36 pm

भारतातील १४० कोटी नागरिकांना पुरस्कार समर्पित.! इथिओपियाचा सवोर्च्च नागरी पुरस्कार पंतप्रधान मोदींना प्रदान

अदिस अबाबा, (इथिओपिया) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मंगळवारी इथिओपिनाचे पंतप्रधान अबी अहमद अली यांच्या हस्ते द ग्रेट ऑनर निशान ऑफ इथियोपिया हा इथिओपियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. मंगळवारी अद्दिस इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरमध्ये झालेल्या विशेष समारंभात पंतप्रधान मोदींना प्रदान करण्यात आला. भारत आणि इथिओपिया दरम्यानची भागीदारी अधिक समर्थ करण्याकामी दिलेल्या योगदानाबद्दल आणि जागतिक […] The post भारतातील १४० कोटी नागरिकांना पुरस्कार समर्पित.! इथिओपियाचा सवोर्च्च नागरी पुरस्कार पंतप्रधान मोदींना प्रदान appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 17 Dec 2025 7:20 pm

Tata Sierraने सर्व रेकाॅर्ड मोडले! पहिल्याच दिवशी बुक झाल्या ‘इतक्या’गाड्या

Tata Sierra SUV: टाटा मोटर्सची बहुप्रतिक्षित ‘टाटा सिएरा’ (Tata Sierra SUV) पुन्हा एकदा भारतीय रस्त्यांवर राज्य करण्यासाठी सज्ज झाली आहे. १६ डिसेंबरपासून या एसयूव्हीची अधिकृत बुकिंग सुरू झाली आणि पहिल्याच दिवशी या गाडीने लोकप्रियतेचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. अवघ्या २४ तासांत ७०,००० हून अधिक ग्राहकांनी २१,००० रुपयांचे टोकन रक्कम भरून आपली सिएरा बुक केली […] The post Tata Sierraने सर्व रेकाॅर्ड मोडले! पहिल्याच दिवशी बुक झाल्या ‘इतक्या’ गाड्या appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 17 Dec 2025 7:20 pm

AUS vs ENG : ॲशेसमध्ये ‘टेक्निकल’राडा! आऊट असूनही दिले ‘नॉट आऊट’; कंपनीनेही मान्य केली चूक, पाहा VIDEO

Alex Carey Controversy Video Viral : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील प्रतिष्ठित ‘ॲशेस’ मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात एका मोठ्या वादाला तोंड फुटले आहे. अ‍ॅडलेड ओव्हलवर सुरू असलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक-फलंदाज अ‍ॅलेक्स कॅरी याच्या विकेटवरून तंत्रज्ञानाचा असा काही गोंधळ उडाला की, क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी विचित्र घटना पाहायला मिळाली. या विकेटचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत […] The post AUS vs ENG : ॲशेसमध्ये ‘टेक्निकल’ राडा! आऊट असूनही दिले ‘नॉट आऊट’; कंपनीनेही मान्य केली चूक, पाहा VIDEO appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 17 Dec 2025 7:14 pm

फडणवीसांच्या भाषणाआधी भाजप उमेदवाराच्या ऑफिसवर गोळीबार

अंबरनाथ : ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथमधील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार पवन वाळेकर पॅनल क्रमांक चार यांच्या कार्यालयावर गोळीबार झाला. ही मंगळवार आणि बुधवार दरम्यान मध्यरात्री घडली. या प्रकरणी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फूटेज जप्त केले आहे. पोलीस तपास सुरू आहे.अंबरनाथ पश्चिम भागातील शंकर मंदिर परिसरात पवन वाळेकर यांचं कार्यालय आहे. या कार्यालयावर गोळीबार झाला. गोळीबार करुन भाजपच्या उमेदवाराला आणि त्याच्या समर्थकांना घाबरवण्याचा हेतू असावा अशी शक्यता व्यक्त होत आहे.दुचाकीवरुन आलेल्या दोन अज्ञातांनी कार्यालयाच्या समोर उभे राहून तीन - चार फैरी झाडल्या. आवाज ऐकून कार्यालयातले सुरक्षा रक्षक बाहेर आले त्यावेळी सुरक्षा रक्षकांच्या दिशेने गोळीबार करत आलेले दोघे पळून गेले. गोळीबारात कोणीही जखमी झालेले नाही. जीवितहानी झालेली नाही. पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेजच्या मदतीने तपास सुरू केला आहे. स्थानिकांनी गोळीबार करणाऱ्यांच्या अटकेची मागणी केली आहे.फडणवीसांच्या भाषणाआधी गोळीबारराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी संध्याकाळी अंबरनाथमध्ये एक सभा घेतील असे आधीच जाहीर झाले होते. ही सभा होण्याच्या आधी मध्यरात्री अंबरनाथमधील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या कार्यालयावर गोळीबार झाल्यामुळे या घटनेमागील राजकीय संदर्भ पोलीस तपासत आहेत.Ambernath | अंबरनाथमध्ये भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार..#prahaarshorts #marathinews #prahaarnewsline #maharashtranews #narendramodi #india #viralvideo #devendrafadnavis #bjp #amernath pic.twitter.com/ZBachvf6ZY— Prahaar Newsline (@PrahaarNewsline) December 17, 2025

फीड फीडबर्नर 17 Dec 2025 7:10 pm

Raid on Balbharati’s Printing Press : बालभारतीच्या प्रिंटिंग प्रेसवर धाड; हजारो बनावट पाठ्यपुस्तके जप्त

नागपूर : महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ (बालभारती) यांच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी नागपूर येथील एका प्रिंटिंग प्रेसवर छापा टाकून हजारो पाठ्यपुस्तके बेकायदेशीरपणे छापली जात असल्याचे उघड केले. हिंगणा एमआयडीसी परिसरातील दिगडोह येथील प्रतिभा प्रिंटिंग प्रेसमध्ये बनावट पुस्तके छापली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. बालभारतीचे उत्पादन अधिकारी राजेश पोटदुखे यांनी सांगितले […] The post Raid on Balbharati’s Printing Press : बालभारतीच्या प्रिंटिंग प्रेसवर धाड; हजारो बनावट पाठ्यपुस्तके जप्त appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 17 Dec 2025 7:08 pm

दिल्लीतील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी सुप्रिम कोर्टाचा मोठा निर्णय; ‘या’सर्व गाड्यांना दिल्लीत ‘नो एन्ट्री’

नवी दिल्ली: राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील (Delhi-NCR) हवेची गुणवत्ता खालावल्याच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. न्यायालयाने आपल्या १२ ऑगस्टच्या जुन्या आदेशात बदल करत, दिल्ली-एनसीआरमधील जुन्या गाड्यांवरील कारवाईचा मार्ग मोकळा केला आहे. मात्र, यामध्ये BS-IV (BS-4) आणि त्यापुढील मानके असलेल्या वाहनांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. नेमका निर्णय काय? सरन्यायाधीश सूर्यकांत, […] The post दिल्लीतील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी सुप्रिम कोर्टाचा मोठा निर्णय; ‘या’ सर्व गाड्यांना दिल्लीत ‘नो एन्ट्री’ appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 17 Dec 2025 7:08 pm

केरळ चित्रपट महोत्सवात १९ चित्रपटांच्या प्रदर्शनाला नकार.! शशी थरूर म्हणतात, “भारताची प्रतिमा धोक्यात…”

Kerala Film Festival | Shashi Tharoor – काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी केरळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (आयएफएफके) संदर्भात सुरू असलेल्या वादाचे वर्णन दुर्दैवी घटना असे केले आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने अनेक चित्रपटांना प्रदर्शनाची परवानगी नाकारल्याच्या पाश्‍र्वभूमीवर त्यांनी आपले मत मांडले. माध्यमांशी बोलताना थरूर म्हणाले, ही एक दुर्दैवी घटना आहे. आपल्याकडे चित्रपट संस्कृतीचा आदर […] The post केरळ चित्रपट महोत्सवात १९ चित्रपटांच्या प्रदर्शनाला नकार.! शशी थरूर म्हणतात, “भारताची प्रतिमा धोक्यात…” appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 17 Dec 2025 7:01 pm

धनंजय मुंडे भाजपात प्रवेश करणार? जवळच्या व्यक्तीचा गौप्यस्फोट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

मुंबई : राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी वाढल्या असतानाच राष्ट्रवादी (अजित पवार गट) नेते तथा माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या दिल्ली दौऱ्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. कोकाटे यांच्याविरोधात नाशिक सत्र न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले असून, त्यांच्या मंत्रिपदावर संकट निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे दिल्लीत असल्याच्या बातम्या आणि करुणा मुंडे […] The post धनंजय मुंडे भाजपात प्रवेश करणार? जवळच्या व्यक्तीचा गौप्यस्फोट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 17 Dec 2025 7:00 pm

Chitra Wagh : ऐन निवडणुकीत वाद उफाळणार; चित्रा वाघ यांना ‘ते’वक्तव्य महागात पडणार

राज्य आयोगाकडून २९ महापालिका निवडणुकींची घोषणा करण्यात आली आहे. १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे तर १६ जानेवारीला मतमोजणी पार पडणार आहे. तर दुसरीकडे नगर परिषदेची निवडणूकही सुरू आहे. या निवडणुकीसाठी राजकीय पक्षातील नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. सध्या पंढरपूरच्या मंगळवेढ्यात रणधुमाळी सुरु आहे. मंगळवेढा नगर परिषदेतील भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी भाजप महिला नेत्या चित्रा वाघ […] The post Chitra Wagh : ऐन निवडणुकीत वाद उफाळणार; चित्रा वाघ यांना ‘ते’ वक्तव्य महागात पडणार appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 17 Dec 2025 6:42 pm

महापालिका निवडणूक जाहीर होताच राज्यातील पहिली सभा सुरु, कोणत्या पक्षाने मारली आघाडी?

कोल्हापूर : राज्यातील प्रमुख महानगरपालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्षांच्या प्रचाराला वेग आला आहे. यात सर्वात आघाडीवर राहत वंचित बहुजन आघाडीने (VBA) कोल्हापूरातून मोर्चेबांधणी सुरू केली आहे. दसरा चौक परिसरात आज (१७ डिसेंबर २०२५) वंचित बहुजन आघाडीची भव्य विजयी संकल्प महासभा सुरू झाली असून, ही राज्यातील निवडणूक जाहीर झाल्यानंतरची पहिली मोठी राजकीय सभा मानली जात […] The post महापालिका निवडणूक जाहीर होताच राज्यातील पहिली सभा सुरु, कोणत्या पक्षाने मारली आघाडी? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 17 Dec 2025 6:40 pm

‘MCA’मेंस कॉर्पोरेट स्पर्धा २०२५-२६: पुनीत बालन क्रिकेट अकॅडमीचा दणदणीत विजय; कपील सन्सवर ८९ धावांनी मात

पुणे – एमसीए मेंस कॉर्पोरेट शिल्ड टूर्नामेंट २०२५-२६ अंतर्गत खेळल्या गेलेल्या क्रिकेट सामन्यात ‘पुनीत बालन क्रिकेट अकॅडमी’च्या संघाने दमदार फलंदाजी आणि शिस्तबद्ध गोलंदाजीच्या जोरावर कपील सन्स संघावर ८० धावांनी दणदणीत विजय मिळवला. पुण्यातील स्वारगेट येथील नेहरू स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या पुनीत बालन क्रिकेट अकॅडमीने निर्धारीत ५० षटकांत तब्बल ४०४ […] The post ‘MCA’मेंस कॉर्पोरेट स्पर्धा २०२५-२६: पुनीत बालन क्रिकेट अकॅडमीचा दणदणीत विजय; कपील सन्सवर ८९ धावांनी मात appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 17 Dec 2025 6:39 pm

रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा! आता 10 तास आधीच समजणार सीट कन्फर्म झाली की नाही; रेल्वेचा नवा ‘चार्टिंग नियम’लागू

नवी दिल्ली: देशातील कोट्यवधी रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. ऐनवेळी तिकीट कन्फर्म न झाल्यामुळे होणारी प्रवाशांची ओढाताण थांबवण्यासाठी भारतीय रेल्वेने आता आपल्या ‘चार्टिंग सिस्टम’मध्ये मोठा बदल केला आहे. या नव्या नियमानुसार, प्रवाशांना आता ट्रेन सुटण्याच्या १० तास आधीच त्यांची सीट कन्फर्म झाली आहे की नाही, याची माहिती मिळणार आहे. यामुळे ज्या प्रवाशांचे तिकीट वेटिंगवरच राहिले […] The post रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा! आता 10 तास आधीच समजणार सीट कन्फर्म झाली की नाही; रेल्वेचा नवा ‘चार्टिंग नियम’ लागू appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 17 Dec 2025 6:39 pm

खुशखबर! 2026 मध्ये खाजगी क्षेत्रात सरासरी 9% पगारवाढीचे संकेत; ‘या’क्षेत्रांत होणार पैशांचा पाऊस

नवी दिल्ली: महागाई आणि बदलत्या जागतिक अर्थव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर, खाजगी क्षेत्रातील नोकरदारांसाठी २०२६ हे वर्ष सुखावह ठरण्याची शक्यता आहे. २०२६ मध्ये खाजगी कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगारात सरासरी ९ टक्क्यांपर्यंत वाढ करू शकतात, असा अंदाज एका ताज्या अहवालात वर्तवण्यात आला आहे. विशेष म्हणजे, कंपन्या आता केवळ ठराविक पगारवाढीवर लक्ष न देता, कर्मचाऱ्यांचे कौशल्य आणि कामगिरीवर आधारित बोनस […] The post खुशखबर! 2026 मध्ये खाजगी क्षेत्रात सरासरी 9% पगारवाढीचे संकेत; ‘या’ क्षेत्रांत होणार पैशांचा पाऊस appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 17 Dec 2025 6:31 pm

आनंदाची बातमी.! १ जानेवारी २०२६ पासून ‘या’इंधनाच्या किंमती होणार कमी; कोणाला मिळणार थेट लाभ?

CNG – PNG price : येत्या नवीन वर्षात (२०२६) सर्वसामान्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. १ जानेवारी २०२६ पासून सीएनजी (CNG) आणि घरगुती पीएनजी (PNG) च्या किमतींमध्ये घट होणार आहे. पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस रेग्युलेटरी बोर्डाने (PNGRB) नवीन ‘युनिफाईड टॅरिफ’ धोरण जाहीर केले असून, यामुळे गॅसच्या दरात मोठी कपात होणार आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना […] The post आनंदाची बातमी.! १ जानेवारी २०२६ पासून ‘या’ इंधनाच्या किंमती होणार कमी; कोणाला मिळणार थेट लाभ? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 17 Dec 2025 6:26 pm

Yashasvi Jaiswal : धक्कादायक! यशस्वी जैस्वाल रुग्णालयात दाखल; मुंबई-राजस्थान सामन्यानंतर अचानक बिघडली प्रकृती

Yashasvi Jaiswal Hospitalised : टीम इंडियाचा धडाकेबाज सलामीवीर यशस्वी जैस्वाल याला मंगळवारी ‘एक्यूट गॅस्ट्रोएन्टेरिटिस’च्या (पोटाचा गंभीर त्रास) त्रासामुळे तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुण्यात सुरू असलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये मुंबईने राजस्थानचा पराभव केल्यानंतर काही तासांतच जैस्वालची प्रकृती बिघडली. ‘एक्यूट गॅस्ट्रोएन्टेरिटिस’ असल्याचे निदान – मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानविरुद्धच्या सामन्यानंतर यशस्वीच्या पोटात तीव्र कळा येऊ लागल्या. […] The post Yashasvi Jaiswal : धक्कादायक! यशस्वी जैस्वाल रुग्णालयात दाखल; मुंबई-राजस्थान सामन्यानंतर अचानक बिघडली प्रकृती appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 17 Dec 2025 6:25 pm

Gold-Silver Price: चांदीचा ऐतिहासिक उच्चांक; पहिल्यांदाच 2 लाखांचा टप्पा पार, सोन्याच्या दरातही मोठी वाढ

Gold-Silver Price: जागतिक बाजारपेठेतील घडामोडी आणि देशांतर्गत वाढत्या मागणीमुळे मौल्यवान धातूंच्या किमतींनी आज नवा इतिहास रचला आहे. बुधवारी चांदीच्या दरात ७,३०० रुपयांची प्रचंड वाढ होऊन चांदीने पहिल्यांदाच २ लाख रुपये प्रति किलोचा टप्पा ओलांडला. चांदीसोबतच सोन्याच्या दरातही ६०० रुपयांची वाढ झाल्याने सणासुदीच्या आणि लग्नसराईच्या काळात ग्राहकांच्या खिशाला मोठी कात्री लागणार आहे. ऑल इंडिया सराफा असोसिएशनने […] The post Gold-Silver Price: चांदीचा ऐतिहासिक उच्चांक; पहिल्यांदाच 2 लाखांचा टप्पा पार, सोन्याच्या दरातही मोठी वाढ appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 17 Dec 2025 6:22 pm

पिंपरी चिंचवड महाापालिका निवडणूक २०३४ केंद्रांवर १० हजार कर्मचारी राबणार

पिंपरी : निवडणूक कामकाजासाठी महापालिका प्रशासनाने आठ क्षेत्रीय कार्यालयांच्या माध्यमातून भक्कम यंत्रणा उभी केली आहे. एकूण ८ निवडणूक निर्णय अधिकारी आणि २४ सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. संपूर्ण निवडणूक प्रक्रियेसाठी ८ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये सुमारे १४ हजार अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. याशिवाय, मतदान प्रक्रियेसाठी ८ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयनिहाय […] The post पिंपरी चिंचवड महाापालिका निवडणूक २०३४ केंद्रांवर १० हजार कर्मचारी राबणार appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 17 Dec 2025 6:16 pm

मुंबईला मागे सारत स्टार्टअप उद्योगनिर्मितीत बंगलोरचा डंका! देशात स्वयंनिर्मित उद्योजक म्हणून दिपिंदर गोयल नंबर १

IDFC FIRST Private Banking and Hurun India अहवालातील ताजी माहितीमोहित सोमण: गेल्या ७ वर्षात भारतीय स्टार्टअप इकोसिस्टिम मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आकड्यात सांगायचे झाल्यास आर्थिक वर्ष २०२४ पर्यंत ही संख्या १३६ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. या इकोसिस्टीममध्ये सर्वाधिक वाटा बंगलोरचा असून आयडीएफसी फर्स्ट प्रायव्हेट व हुरून इंडिया टॉप २०० सेल्फमेड आंत्रप्रिन्यूअर्स ऑफ द मिलेनिया २०२५ अहवालातील माहितीनुसार, यंदाही स्टार्टअपचे हब म्हणून बंगलोरने मुंबईलाही मागे टाकता आपला प्रथम क्रमांक कायम राखला आहे. प्रामुख्याने २०० कंपन्यांच्या या स्व मेहनतीने कुठलीही पार्श्वभूमी नसताना स्वतःचे औद्योगिक अधिराज्य निर्माण करणाऱ्या कंपन्याचा सर्व्ह करण्यात आला. त्यानुसार क्रमांक १ वर राधाकृष्ण दमानी यांना मागे टाकत दिपिंदर गोयल (इटर्नल लिमिटेड:झोमॅटो) यांनी पहिल्यांदाच प्रथम पटकावला असून ३.२० लाख कोटींचे साम्राज्य त्यांनी उभे केले असल्याचे अहवालात म्हटले आहे. याखेरीज दुसरा क्रमांक (एव्हेन्यू सुपरमार्ट चा लिमिटेड: डीमार्टचे मालक राधाकृष्ण दमानी) यांचा जाहीर केला गेला आहे. नुकत्याच वादात अडकलेली इंटरग्लोब एव्हिऐशन लिमिटेडचे (इंडिगो) राहुल भाटिया, राकेश गंगवाल यांचा तिसऱ्या क्रमांकावर यादीत समावेश करण्यात आला आहे.आर्थिक वर्ष २००० नंतर स्थापन झालेल्या भारतातील २०० सर्वात मौल्यवान कंपन्यांच्या यादीची ही तिसरी आवृत्ती आहे. या यादीत कंपन्यांना त्यांच्या मूल्यानुसार (Market Capitalisation) क्रमवारी लावली जाते, जी सूचीबद्ध कंपन्यांसाठी बाजार भांडवलीकरण आणि सूचीबद्ध नसलेल्या कंपन्यांसाठी मूल्यांकन (Valuation) म्हणून ओळखली जाते. अहवालातील माहितीनुसार, ही यादी केवळ भारतात मुख्यालय असलेल्या कंपन्यांची असून राज्य मालकीच्या कंपन्या आणि परदेशी कंपन्यांच्या उपकंपन्या समाविष्ट नाहीत असेही अहवालाने स्पष्ट केले.बंगलोरने आपले अढळ स्थान कायम ठेवले असून तब्बल ८८ उद्योजक (Entrepreneurs) बंगलोरमध्ये असल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. एकूणच अहवालातील आकडेवारीनुसार, या संबंधित यादीतील २०० मूल्यवान कंपन्यांची एकूण उलाढाल ४२ लाख कोटीची आहे. बंगलोर नंतर मुंबई (८३), नवी दिल्ली (५२) यांचा क्रमांक लागतो.या यादीवर भाष्य करताना हुरुन इंडियाचे संस्थापक आणि मुख्य संशोधक अनास रहमान जुनैद म्हणाले आहेत की,' आयडीएफसी फर्स्ट प्रायव्हेट आणि हुरुन इंडियाच्या 'टॉप २०० सेल्फ-मेड आंत्रप्रेन्योअर्स ऑफ द मिलेनिया २०२५' यादीमध्ये भारतातील स्वयंनिर्मित उद्योजकांचा अर्थव्यवस्थेवरील असाधारण प्रभाव दिसून येतो, ज्यांचे एकूण व्यावसायिक मूल्य ४६९ अब्ज डॉलर्स आहे. हे भारताच्या ३०० सर्वात मौल्यवान कौटुंबिक व्यवसायांच्या मूल्याच्या एक चतुर्थांश इतके आहे, जरी त्यांची स्थापना गेल्या २५ वर्षांत झाली आहे, तर त्या तुलनेत कौटुंबिक व्यवसायांचे सरासरी वय ७३ वर्षे आहे. २०२० नंतर स्थापन झालेल्या पाच कंपन्यांचे एकत्रित मूल्य आता ७८००० कोटी रुपये आहे. हे उद्योजक विकासाला चालना देत आहेत आणि राष्ट्र उभारणीत योगदान देत आहेत, तसेच या वर्षी कर्मचाऱ्यांचे फायदे ५४००० कोटी रुपयांवरून ५७२०० कोटी रुपयांपर्यंत वाढले आहेत, जे लोकांवरील त्यांची गुंतवणूक दर्शवते.' असे म्हटले.पहिल्या तिघांवर भाष्य केल्यास गुरुग्राम-स्थित फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म 'इटरनल'चे संस्थापक दीपेंद्र गोयल यांनी, आयडीएफसी फर्स्ट प्रायव्हेट आणि हुरुन इंडियाच्या 'टॉप २०० सेल्फ-मेड आंत्रप्रेन्योअर्स ऑफ द मिलेनिया २०२५' यादीत प्रथमच अव्वल स्थान पटकावले आहे. अहवालातील दाव्यानुसार त्यांच्या कंपनीचे मूल्यांकन ३.२ लाख कोटी रुपये असून गेल्या वर्षाच्या तुलनेत त्यात २७% वाढ झाली आहे. इटर्नल आता भारतातील ८०० हून अधिक शहरांमध्ये कार्यरत आहे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही विस्तारली आहे. हा फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म फूड डिलिव्हरी व्यतिरिक्त झोमॅटो गोल्डसारख्या सबस्क्रिप्शनवर आधारित सेवा देतो.क्लाउड-किचन भागीदारीद्वारे नवनवीन उपक्रम देखील राबवत आहे.लोकप्रिय एफएमसीजी चेन असलेल्या अव्हेन्यू सुपरमार्ट्सचे मालक व अनुभवी गुंतवणूकदार राधाकिशन दमानी ३ लाख कोटी रुपयांच्या मूल्यांकनासह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा मूल्यांकन १३% घसरले आहे. दमानी यांनी २००० साली डीमार्टची स्थापना केली होती आणि कमी किमतीच्या दर्जेदार मॉडेलसाठी ओळखली जाणारी भारतातील सर्वात मोठी सुपरमार्केट साखळी उभारली होती. अव्हेन्यू सुपरमार्ट्सने आर्थिक वर्ष २०२५ मध्ये ५९४८२ कोटी रुपयांचा महसूल नोंदवला होता तर अहवालातील दाव्यानुसार, दमानी हे भारतातील सर्वात प्रसिद्धीपासून दूर राहणारे असले तरी पण धोरणात्मक गुंतवणूकदारांपैकी एक आहेत. इंटरग्लोब एव्हिएशनचे सह-संस्थापक राहुल भाटिया आणि राकेश गंगवाल यांनी या वर्षी २.२ लाख कोटी रुपयांच्या मूल्यांकनासह पहिल्या तीनमध्ये स्थान मिळवले आहे. इंडिगोची मूळ कंपनी असलेल्या इंटरग्लोब एव्हिएशनचे भारतातील विमान वाहतूक बाजारात ६५% पेक्षा जास्त देशांतर्गत बाजारातील वाटा आहे. या अहवालातील निरीक्षणात म्हटल्याप्रमाणे एअरलाइनने आंतरराष्ट्रीय स्तरावर आक्रमकपणे विस्तार केला आहे आणि जैवइंधनाची चाचणी करणे व कार्यक्षम असलेल्या इंधन विमानांचा वापर करण्याचा उपक्रमही त्यांनी सुरु केला होता.आणखी काही मनोरंजक माहिती -सर्वांत तरुण प्रथम पाच उद्योजक -१) कैवल्य वोहरा वय २२ झेप्टो (क्विक कॉमर्स कंपनी)२) आदित पलिचा वय २३ झेप्टो३) शाश्वत नकरानी - वय २७ भारत पे ( फिनटेक कंपनी)४) माणिक गर्ग- वय ३०, सात्विक ग्रीन एनर्जी - अक्षयउर्जा निर्मिती कंपनी५) हार्दिक कोथिया - वय ३० - रायझन सोलार- (सोलार कंपनी)पहिल्या ५ महिला उद्योजक-१) फाल्गुनी नायर- नायका - अद्वैता नायर - नायका२) नेहा बन्सल - लेन्सकार्ट३) रूची कलरा - ऑफ बिझनेस४) कविता सुब्रमण्यम - अपस्टॉक्स५) रूची दिपक- एको जनरल इन्शुरन्सअतिरिक्त माहिती -पेटीएम आणि लेन्सकार्टने IDFC FIRST Private & Hurun India च्या 'टॉप २०० सेल्फ-मेड एंटरप्रेन्योअर्स ऑफ द मिलेनिया २०२५' च्या पहिल्या दहामध्ये प्रवेश दरम्यान, रेझरपे आणि झिरोधा शीर्ष १० मधून बाहेरIDFC FIRST Private & Hurun India च्या 'टॉप २०० सेल्फ-मेड एंटरप्रेन्योअर्स ऑफ द मिलेनिया २०२५' मधील सर्व कंपन्यांचे एकत्रित मूल्य २०२५ मध्ये ४२ लाख कोटी रुपये (४६९ अब्ज डॉलर्स) गेल्या वर्षीच्या ३६ लाख कोटी रुपयांवरून ४३१ अब्ज डॉलर्सवर वाढले (१५% वाढ)भारतातील स्वनिर्मित उद्योजकांमध्ये जलद संपत्ती निर्मिती होत आहेIDFC FIRST Private & Hurun India च्या 'टॉप २०० सेल्फ-मेड एंटरप्रेन्योअर्स ऑफ द मिलेनिया २०२५' च्या या आवृत्तीत १०२ नवीन संस्थापक आणि ५३ नवीन कंपन्यांचा समावेश'सेल्फ-मेड एंटरप्रेन्योअर्स ऑफ द मिलेनिया २०२५' द्वारे स्थापन केलेल्या अब्ज-डॉलर कंपन्यांची संख्या १२८ आहे, जी गेल्या वर्षीच्या १२१ वरून वाढली.अहवालात सर्वात मोठी झेप घेणाऱ्यांमध्ये कारट्रेड टेकचे विनय संघी यांचा समावेश आहे, जे ८८ स्थानांनी चढून ११७०० कोटी रुपयांच्या मूल्यांकनावर पोहोचलेसमाविष्ट झालेल्या ५३ नवीन कंपन्यांपैकी २९ कंपन्या (५५%) सार्वजनिकरित्या सूचीबद्ध (Listed) आहेत तर २४ कंपन्या (४५%) स्टार्टअप इकोसिस्टममधून पुढे आल्या आहेत.अहवालात सर्वाधिक टक्केवारी वाढ नोंदवणाऱ्या शीर्ष ३ कंपन्यांमध्ये अँथम बायोसायन्सेस (२७३% वाढ, ४५२०० कोटी रुपये), ग्रो (१४८% वाढ, ६२,१०० कोटी रुपये) आणि जंबोटेल (१४७% वाढ, ८,९०० कोटी रुपये) यांचा समावेशIDFC फर्स्ट प्रायव्हेट आणि हुरुन इंडियाच्या 'टॉप २०० सेल्फ-मेड आंत्रप्रेन्योअर्स ऑफ द मिलेनिया २०२५' मध्ये समाविष्ट असलेल्या कंपन्यांनी एकत्रितपणे ८०३० कोटी रुपयांचा प्रत्यक्ष कर (Direct Tax) भरला जो गेल्या वर्षीच्या ४५७० कोटी रुपयांपेक्षा जास्तअहवालात समाविष्ट असलेल्या २०० कंपन्यांमधील एकूण ४०६ संस्थापक, गेल्या वर्षीच्या तुलनेत ३८८ पेक्षा जास्त वाढली.अहवालातील समाविष्ट असलेल्या १५७ हून अधिक कंपन्यांच्या प्रमुख कंपनी मूल्यांमध्ये वाढ झाली आहे ज्यात ५३ नवीन कंपन्यांचा समावेशसमाविष्ट असलेल्या कंपन्या सुमारे ८ लाख लोकांना रोजगार देतातयादीमध्ये नायकाच्या फाल्गुनी नायर आणि अद्वैता नायर यांचे महिला उद्योजकांमध्ये आपले नेतृत्व कायमया यादीत एकूण २० महिला उद्योजकांचा समावेश ज्यांच्या कंपन्यांचे एकत्रित मूल्य ३.३ लाख कोटी रुपयेसर्वात तरुण महिला उद्योजिका नायकाची सह-संस्थापक अद्वैता नायर आहे, जिचे वय ३४ वर्षे आहे.अहवालानुसार, अव्हेन्यू सुपरमार्ट्स ९०२८० कर्मचाऱ्यांसह सर्वाधिक नोकरीच्या संधी निर्माण करणारी कंपनी म्हणून आघाडीवरत्यानंतर इंटरग्लोब एव्हिएशन ४२८८७ कर्मचाऱ्यांसह आणि जना स्मॉल फायनान्स बँक २५३८१ कर्मचाऱ्यांसह दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावरसर्वाधिक महसूल मिळवणाऱ्या कंपन्यांमध्ये इंटरग्लोब एव्हिएशन ८४०९८ कोटी रुपयांसह अव्हेन्यू सुपरमार्ट्स ५९४८२ कोटी रुपयांसह आणि इटरनल २१३२० कोटी रुपयांसह आघाडीवरसर्वाधिक नफा कमावणाऱ्या कंपन्यांमध्ये इंटरग्लोब एव्हिएशन ७,२५८ कोटी रुपयांसह, अव्हेन्यू सुपरमार्ट्स २७०७ कोटी रुपयांसह आणि ग्रोव १८२४ कोटी रुपयांसह आघाडीवरकर्मचारी लाभांवर सर्वाधिक गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांमध्ये इंटरग्लोब एव्हिएशन ७४७३ कोटी रुपयांसह, पेटीएम ३२८८ कोटी रुपयांसह आणि इटर्नल २५५८ कोटी रुपयांसह आघाडीवरआर्थिक सेवा क्षेत्रात ४७ कंपन्यांसह अव्वल स्थानी आहे, त्यानंतर सॉफ्टवेअर आणि सेवा (२८), आरोग्यसेवा (२७), आणि किरकोळ विक्री (२०) यांचा क्रमांक लागतो. विशेष म्हणजे, १८९ कंपन्यांमध्ये, यादीतील जवळपास ९५% कंपन्यांमध्ये बाह्य गुंतवणूकदार आहेत, तर उर्वरित कंपन्यांनी स्वतःच्या भांडवलावर व्यवसाय सुरू केला आहे.

फीड फीडबर्नर 17 Dec 2025 6:10 pm

अहमदाबादमधील १० शाळांना बॉम्बने उडवण्‍याची धमकी; ई-मेलमध्ये अमित शहा आणि गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई यांचाही उल्लेख

Ahmedabad | bomb – गुजरातमध्‍ये गेल्या काही दिवसांत अनेक सरकारी कार्यालयांना ई-मेलद्वारे बॉम्बस्फोटाची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे. अशातच बुधवारी सकाळी अहमदाबादमधील १० शाळांना बॉम्बच्या धमक्या मिळाल्यामुळे परिसरात घबराट पसरली. धमकीचे ईमेल मिळाल्यानंतर पोलिसांनी शाळांची झडती घेतली. परंतु त्यांना कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. याबाबत अधिक माहिती अशी की, या ईमेलमध्ये दुपारी १:११ वाजता बॉम्बस्फोट […] The post अहमदाबादमधील १० शाळांना बॉम्बने उडवण्‍याची धमकी; ई-मेलमध्ये अमित शहा आणि गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई यांचाही उल्लेख appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 17 Dec 2025 6:04 pm

Maharashtra Politics : निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का ! प्रज्ञा सातव यांच्यानंतर ‘हा’नेता सोडणार साथ

मुंबई : सध्या महानगरपालिकांचे बिगुल वाजलं आहे. १५ जानेवारीला मतदान होणार आहे तर १६ जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे. यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. कल्याण डोंबिवलीत काँग्रेस पक्षाला एकामागोमाग एक मोठे धक्के बसत आहेत. माजी जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर अवघ्या काही तासांतच काँग्रेसचे माजी ब्लॉक अध्यक्ष विमल ठक्कर यांनीही […] The post Maharashtra Politics : निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का ! प्रज्ञा सातव यांच्यानंतर ‘हा’ नेता सोडणार साथ appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 17 Dec 2025 6:00 pm

Today TOP 10 News: धनंजय मुंडे मंत्री होणार?, क्रीडामंत्र्यांविरूद्ध अटक वॉरंट, अजित पवारांचा ‘मास्टरस्ट्रोक, बॅंकेवर निर्बंध…वाचा आजच्या टाॅप 10 बातम्या

धनंजय मुंडे पुन्हा मंत्री होणार? अमित शहांची घेतली भेट – नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने सदनिका घोटाळ्याप्रकरणी राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्या 2 वर्षांच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले आहे. यामुळे कोकाटेंचे मंत्रिपद जाणार हे जवळपास निश्चित झाले आहे. आता माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे नाव पुन्हा एकदा मंत्रिपदाच्या शर्यतीत आले आहे. धनंजय मुंडे यांनी आज केंद्रीय गृहमंत्री […] The post Today TOP 10 News: धनंजय मुंडे मंत्री होणार?, क्रीडामंत्र्यांविरूद्ध अटक वॉरंट, अजित पवारांचा ‘मास्टरस्ट्रोक, बॅंकेवर निर्बंध… वाचा आजच्या टाॅप 10 बातम्या appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 17 Dec 2025 6:00 pm

एकनाथ शिंदेच्या भावावर 145 कोटींचे गंभीर आरोप ? शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, जिथे ड्रग्स सापडले..

मुंबई : शिवसेना (उबाठा)च्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सख्ख्या भावाच्या नावाने सातारा जिल्ह्यातील ड्रग्स प्रकरणात खळबळजनक आरोप केले आहेत. सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील सावरी गावात मुंबई क्राइम ब्रांचने १३ डिसेंबर रोजी छापा टाकून मेफेड्रोन ड्रग्सची निर्मिती करणारी युनिट उद्ध्वस्त केली होती. यात सुमारे ११५ कोटी रुपये किमतीचे ड्रग्स व कच्चा माल […] The post एकनाथ शिंदेच्या भावावर 145 कोटींचे गंभीर आरोप ? शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, जिथे ड्रग्स सापडले.. appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 17 Dec 2025 5:42 pm

National Onion Center : नाशिकमध्ये राष्ट्रीय कांदा केंद्र स्थापन करणार; राज्य कांदा उत्पादक संघटनेचा मोठा निर्णय

नाशिक : शेतकऱ्यांना महत्त्वाच्या कांदा पिकाच्या उत्पादनावर, त्याच्या किंमतीवर आणि व्यापाराच्या निर्णयांवर अधिक नियंत्रण मिळावे या उद्देशाने राज्य कांदा उत्पादक संघटना एक राष्ट्रीय कांदा केंद्र स्थापन करणार आहे. हे केंद्र नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील जाईगाव येथे सुरुवातीला दोन एकर जागेवर स्थापन केले जाईल आणि भविष्यात विस्ताराला वाव असेल, असे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भरत दिघोळे यांनी […] The post National Onion Center : नाशिकमध्ये राष्ट्रीय कांदा केंद्र स्थापन करणार; राज्य कांदा उत्पादक संघटनेचा मोठा निर्णय appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 17 Dec 2025 5:40 pm

Varun Chakaravarthy : फिरकीचा जादूगर वरुण ठरला नंबर-१! बुमराहला मागे टाकत कोणालाच न जमलेला केला पराक्रम

Varun Chakaravarthy broke Jasprit Bumrah Record : भारतीय फिरकीपटू वरुण चक्रवर्ती सध्या टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या फिरकीची जादू दाखवत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत केलेल्या प्रभावी कामगिरीमुळे वरुणने आयसीसी गोलंदाजी क्रमवारीत केवळ अव्वल स्थानच राखले नाही, तर आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम ८१८ रेटिंग पॉइंट्स मिळवले आहेत. यासह त्याने जसप्रीत बुमराहला मागे टाकण्याचाही पराक्रम केला आहे. वरुणने […] The post Varun Chakaravarthy : फिरकीचा जादूगर वरुण ठरला नंबर-१! बुमराहला मागे टाकत कोणालाच न जमलेला केला पराक्रम appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 17 Dec 2025 5:32 pm

Walmik Karad : वाल्मिक कराडला कोर्टाचा दणका ! दोन्ही बाजुंनी काय करण्यात आला युक्तिवाद?

बीड : मस्साजोग (जि. बीड) सरपंच संतोष देशमुख यांची मागच्या वर्षी आरोपींकडून (Walmik Karad) निर्घृणपणे हत्या करण्यात आली होतो. या हत्येने संपूर्ण देशात आणि राज्यात खळबळ उडाली होती. या हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार म्हणून वाल्मिक कराडचे नाव समोर आले आहे. गेल्या काही दिवसापासून वाल्मिक कराड निवडणुकांअगोदर बाहेर येणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र आता मुंबई उच्च […] The post Walmik Karad : वाल्मिक कराडला कोर्टाचा दणका ! दोन्ही बाजुंनी काय करण्यात आला युक्तिवाद? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 17 Dec 2025 5:10 pm

राष्ट्रवादीच्या माणिकराव कोकाटेंना अटक होणार ?

मुंबई : नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने अटक वॉरंट काढल्यानंतर मंत्री माणिकराव कोकाटे यांनी जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली. पण उच्च न्यायालयाने तातडीच्या सुनावणीस नकार दिला. यामुळे माणिकराव कोकाटेंच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे. उच्च न्यायालयात कोकाटेंच्या प्रकरणाची पुढील सुनावणी शुक्रवार १९ डिसेंबर २०२५ रोजी होणार आहे. दरम्यान नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाच्या निकालाती प्रत मिळताच विधीमंडळ कार्यालय माणिकराव कोकाटे यांची आमदारकी रद्द करण्याबाबत नियमानुसार निर्णय घेणार आहे.शासकीय कोट्यात येणाऱ्या सदनिका गैरव्यवहार प्रकरणात मंत्री माणिकराव कोकाटे यांना २ वर्षांचा तुरुंगवास आणि १० हजार दंडाची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. प्रथम वर्ग न्यायालयानं कोकाटे यांना ठोठावलेली शिक्षा जिल्हा सत्र न्यायालयानं कायम ठेवली आहे. न्यायालयानं कोकाटे यांच्या अटकेचे आदेश काढलेले आहेत. आता अटक झाल्यास कोकाटेंची आमदारकी रद्द होऊ शकते. कोकाटे सध्या मुंबईतील लिलावती रुग्णालयात उपचार घेत आहेत. यामुळे पोलिसांनी अद्याप त्यांना अटक केलेली नाही.कायद्यानुसार एखाद्या लोकप्रतिनिधीला दोन किंवा त्याहून अधिक वर्षांची शिक्षा झाल्यास त्याचं पद रद्द होतं. त्यामुळे कोकाटे यांची आमदारकी रद्द होण्याची शक्यता आहे. न्यायालयाच्या निकालाची पत्र प्राप्त झाल्यावर विधीमंडळ कार्यालय त्यांचा निर्णय घेणार आहे. अद्याप विधीमंडळाला निकालाची प्रत मिळालेली नाही.विधानसभेची निवडणूक जिंकल्यामुळे २०२४ मध्ये पुन्हा एकदा महायुती सत्तेत आली. या सरकारमध्ये कृषीमंत्री झालेल्या कोकाटेंचे पद काही महिन्यांनी बदलण्यात आले. सध्या कोकाटे क्रीडामंत्री आहेत. पण ज्या प्रकरणात कोकाटेंना दोषी ठरवण्यात आले आहे ते प्रकरण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आघाडी सरकार असतानाच्या काळातले आहे. या प्रकरणात दोषी ठरल्यामुळेच कोकाटेंच्या अडचणी वाढल्या आहेत.कोकाटेंच्या भेटीला धनंजय मुंडेलिलावती रुग्णालयात असलेल्या माणिकराव कोकाटेंची राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी भेट घेतली. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप समजलेल नाही. पण कोकाटेंच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार असतानाच धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांची भेट झाली. यामुळे कोकाटेंचे पुढे काय होणार यावरुन तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

फीड फीडबर्नर 17 Dec 2025 5:10 pm

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, मग आमदारकी तरी वाचणार का? वाचा सविस्तर

Manikrao Kokate : बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिकेचा लाभ घेण्याच्या प्रकरणात राज्याचे क्रीडामंत्री तथा अजित पवार यांच्या पक्षाचे आमदार माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांना जिल्हा सत्र न्यायालयाकडून दोषी ठरवण्यात आले आहे. त्यांना दोन वर्षांची शिक्षा व ५० लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. यामुळे त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. सत्र न्यायालयाच्या या निर्णयानंतर आता […] The post Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, मग आमदारकी तरी वाचणार का? वाचा सविस्तर appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 17 Dec 2025 5:07 pm

Share Market : शेअर बाजार सलग तिसऱ्या दिवशी घसरला, ‘या’शेअर्समुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान

Share Market Closing 17 December, 2025: भारतीय शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरणीचे सत्र कायम राहिल्याने गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. सोमवार आणि मंगळवारनंतर बुधवारीही बाजार लाल निशाणीवर बंद झाला. बीएसई सेन्सेक्स १२०.२१ अंकांच्या (०.१४%) घसरणीसह ८४,५५९.६५ अंकांवर स्थिरावला, तर एनएसई निफ्टीमध्ये ४१.५५ अंकांची (०.१६%) घसरण होऊन तो २५,८१८.५५ अंकांवर बंद झाला. यापूर्वी मंगळवारी बाजाराला मोठा […] The post Share Market : शेअर बाजार सलग तिसऱ्या दिवशी घसरला, ‘या’ शेअर्समुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 17 Dec 2025 4:58 pm

Eknath Shinde : “महायुती विरोधकांना नेस्तनाबूत करून भगवा फडकवणार”–एकनाथ शिंदे

Eknath Shinde– शिवसेना पक्ष आपल्या मित्रपक्षांसह विरोधकांना नेस्तनाबूत करेल आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर राज्यातील महानगरपालिकांवर भगवा ध्वज फडकवेल, असा विश्‍वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. शिंदे हे ठाण्यात शिवसेना गटप्रमुखांच्या मेळाव्याला संबोधित करत होते. शिंदे म्हणाले, शिवसेनेकडे धनुष्यबाणाचे चिन्ह, बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी एक स्पष्ट दृष्टी आहे. हे सरकार […] The post Eknath Shinde : “महायुती विरोधकांना नेस्तनाबूत करून भगवा फडकवणार” – एकनाथ शिंदे appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 17 Dec 2025 4:55 pm

Prithvi Shaw : पृथ्वी शॉचे आयपीएल लिलावात हार्टब्रेक ते होमकमिंग: इन्स्टा स्टोरीने घेतला असा यू-टर्न!

Prithvi Shaw insta story viral during IPL Auction 2026 : आयपीएल २०२६ च्या मिनी ऑक्शनमध्ये मंगळवारी नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. महाराष्ट्र संघाचा आक्रमक सलामीवीर पृथ्वी शॉ याच्यासाठी हा लिलाव एखाद्या ‘रोलर कोस्टर राईड’सारखा ठरला. सुरुवातीला दोन फेऱ्यांमध्ये कोणत्याही संघाने रस न दाखवल्यामुळे अनसोल्ड राहिलेल्या शॉला अखेरच्या टप्प्यात त्याच्या जुन्या संघाने म्हणजेच दिल्ली कॅपिटल्सने ताफ्यात सामील […] The post Prithvi Shaw : पृथ्वी शॉचे आयपीएल लिलावात हार्टब्रेक ते होमकमिंग: इन्स्टा स्टोरीने घेतला असा यू-टर्न! appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 17 Dec 2025 4:50 pm

Manikrao Kokate : अटक वॉरंट जारी ! आता माणिकराव कोकाटेंकडे काय आहेत पर्याय?

Manikrao Kokate : बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिकेचा लाभ घेण्याच्या प्रकरणात राज्याचे क्रीडामंत्री तथा अजित पवार यांच्या पक्षाचे आमदार माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांना जिल्हा सत्र न्यायालयाकडून दोषी ठरवण्यात आले आहे. त्यांना दोन वर्षांची शिक्षा व ५० लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. कोकाटे (Manikrao Kokate)यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. त्यांना कोणत्याही क्षणी अटक […] The post Manikrao Kokate : अटक वॉरंट जारी ! आता माणिकराव कोकाटेंकडे काय आहेत पर्याय? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 17 Dec 2025 4:41 pm

Maharashtra Cabinet Decision : राज्य मंत्रिमंडळ बैठकीत २ सर्वात मोठे निर्णय; महापालिका निवडणुका जाहीर होताच घोषणा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामविकास आणि सांस्कृतिक कार्य विभागाशी संबंधित दोन मोठे निर्णय घेण्यात आले. विशेष म्हणजे, पुढील काही आठवड्यांत जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका होण्याची शक्यता असतानाच हे निर्णय घेण्यात आले आहेत. मंत्रिमंडळाचे […] The post Maharashtra Cabinet Decision : राज्य मंत्रिमंडळ बैठकीत २ सर्वात मोठे निर्णय; महापालिका निवडणुका जाहीर होताच घोषणा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 17 Dec 2025 4:41 pm

AQI: दिल्लीत सरकारी आणि खाजगी संस्थांमध्ये 50% वर्क फ्रॉम होम अनिवार्य; बांधकाम मजुरांना 10 हजारांची मदत

नवी दिल्ली: दिल्लीतील हवेची गुणवत्ता कमालीची खालावल्याने (AQI) गंभीर श्रेणीत पोहोचल्याने दिल्ली सरकारने प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी अत्यंत कठोर पाऊले उचलली आहेत. ‘ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅन’ (GRAP) च्या तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यातील उपाययोजनांतर्गत, दिल्लीतील सर्व सरकारी आणि खाजगी संस्थांमधील ५० टक्के कर्मचाऱ्यांसाठी ‘वर्क फ्रॉम होम’ अनिवार्य करण्यात आले आहे. कामगार मंत्री कपिल मिश्रा यांनी या निर्णयाची […] The post AQI: दिल्लीत सरकारी आणि खाजगी संस्थांमध्ये 50% वर्क फ्रॉम होम अनिवार्य; बांधकाम मजुरांना 10 हजारांची मदत appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 17 Dec 2025 4:35 pm

Stock Market Closing Bell: शेअर बाजारात घसरणच-आयटी,पीएसयु बँक, मेटल शेअर्समध्ये मात्र वाढ

मोहित सोमण:आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात अखेरच्या सत्रात घसरण झाली. प्रामुख्याने शेअर बाजारातील चढउतार आजही कायम राहिल्याने अखेरच्या सत्रात सेन्सेक्स १२०.११ अंकाने घसरत ८४५५९.६५ पातळीवर स्थिरावला असून निफ्टी ४१.५५ अंकाने घसरत २५८१८.५५ पातळीवर स्थिरावला आहे. मोठ्या प्रमाणात युएस भारत व्यापारी करारावर अस्थिरता, भूराजकीय अस्थिरता, डॉलरच्या निर्देशांकातील वाढ, मोठ्या प्रमाणात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी काढून घेतलेली गुंतवणूक अशा विविध कारणांमुळे घसरण झाली असूनही मजबूत फंडामेंटलसह घरगुती गुंतवणूकदारांनी वाढवलेल्या मजबूत गुंतवणूकीमुळे काही प्रमाणात बाजारात आधार मिळाला. बँक निर्देशांकातही किरकोळ घसरण कायम असली तरी पीएसयु बँक निर्देशांकातील जबरदस्त वाढ झाल्याने बँक निर्देशांकात किरकोळ घसरण झाली. याशिवाय मिड व स्मॉल कॅप शेअर्समध्येही घसरण कायम राहिल्याने बाजाराला सपोर्ट लेवल मिळाली नाही. दरम्यान पीएसयु बँक, आयटी, मेटल, फार्मा निर्देशांकात वाढ झाली इतर निर्देशांकात घसरण झाली आहे. सर्वाधिक घसरण मिडिया, रिअल्टी, हेल्थकेअर, केमिकल्स, फायनांशियल सर्व्हिसेस एक्स बँक या निर्देशांकात झाली.अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ इंडिया सिमेंट (७.८८%), इंद्रप्रस्थ गॅस (५.०८%), किर्लोस्कर ऑईल (४.४३%), रिलायन्स पॉवर (३.१२%), आदित्य बिर्ला फॅशन (२.९९%), एम अँड एम फायनांशियल सर्विसेस (२.९६%), कॅनरा बँक (२.०७%) समभागात झाली असून सर्वाधिक घसरण अक्झो नोबेल (१३.६५%), सारेगामा इंडिया (६.६०%),आयओबी (६.२१%), एचबीएल इंजिनिअरिंग (४.६४%), डेटा पँटर्न (३.४४%), कोचिंग शिपयार्ड (३.६९%),प्राजइंडस्ट्रीज (३.६५%), कोलगेट पामोलीव (३.५८%), जीएमडीसी (३.५७%) समभागात झाली आहे.आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले आहेत की,'जागतिक बाजारपेठेतील संकेत संमिश्र आहेत. जपानी रोखे उत्पन्नात वाढ होत आहे, त्यामुळे इक्विटी मूल्यांकनांवर दबाव आणि तरलता कमी होत असल्याचे दिसून येते, तर अमेरिकन कामगारांच्या मऊ आकडेवारीमुळे मंदीच्या चिंता वाढतात आणि अधिक अनुकूल फेडच्या अपेक्षा बळकट होतात. स्थानिक पातळीवर, रुपया स्थिर करण्यासाठी आरबीआयच्या प्रयत्नांमुळे दर-संवेदनशील क्षेत्रांना आधार मिळाला आहे. परदेशी गुंतवणूकदार निधी काढून घेत आहेत आणि उदयोन्मुख बाजारपेठा संघर्ष करत आहेत, तर विकसित अर्थव्यवस्था मजबूत आहेत, हे दर्शविते की गुंतवणूकदार उदयोन्मुख बाजारपेठांबद्दल अधिक सावध होत आहेत. चलन स्थिरता तात्पुरती दिलासा देत असली तरी, जागतिक अनिश्चितता आणि सतत परकीय विक्रीमुळे वाढीची शक्यता मर्यादित राहते, ज्यामुळे बाजारपेठा मंदीच्या पूर्वाग्रहाकडे झुकतात.'

फीड फीडबर्नर 17 Dec 2025 4:30 pm

ऐन निवडणुकीत एकनाथ शिंदे अडचणीत, भावाच्या रिसॉर्टमध्ये 145 कोटींचं ड्रग्ज सापडलं? अंधारेंचा खळबळजनक आरोप

मुंबई : शिवसेना (उबाठा)च्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सख्ख्या भावाच्या नावाने सातारा जिल्ह्यातील ड्रग्स प्रकरणात खळबळजनक आरोप केले आहेत. सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील सावरी गावात मुंबई क्राइम ब्रांचने १३ डिसेंबर रोजी छापा टाकून मेफेड्रोन ड्रग्सची निर्मिती करणारी युनिट उद्ध्वस्त केली होती. यात सुमारे ११५ कोटी रुपये किमतीचे ड्रग्स व कच्चा माल […] The post ऐन निवडणुकीत एकनाथ शिंदे अडचणीत, भावाच्या रिसॉर्टमध्ये 145 कोटींचं ड्रग्ज सापडलं? अंधारेंचा खळबळजनक आरोप appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 17 Dec 2025 4:25 pm

Manikrao Kokate : कोकाटे यांचे मंत्रिपद जाणार कि राहणार? कायद्यात काय आहे तरतूद? जाणून घ्या

Manikrao Kokate : बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिकेचा लाभ घेण्याच्या प्रकरणात राज्याचे क्रीडामंत्री तथा अजित पवार यांच्या पक्षाचे आमदार माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांना जिल्हा सत्र न्यायालयाकडून दोषी ठरवण्यात आले आहे. त्यांना दोन वर्षांची शिक्षा व ५० लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. यामुळे त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. सत्र न्यायालयाच्या या निर्णयानंतर आता […] The post Manikrao Kokate : कोकाटे यांचे मंत्रिपद जाणार कि राहणार? कायद्यात काय आहे तरतूद? जाणून घ्या appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 17 Dec 2025 4:18 pm

मोठी बातमी - जीएसटी तर्कसंगतीकरण गॅसमध्येही प्रभावीपणे लागू 'इतक्या'रुपयांनी गॅस स्वस्त होणार!

मुंबई: जीएसटी तर्कसंगतीकरणाचा फायदा ग्राहकांना परावर्तित करण्यासाठी सरकारने आणखी एक पाऊल उचलले आहे. त्याचाच भाग म्हणून १ जानेवारी २०२६ पासून सीएनजी, पीएनजी गॅसच्या किंमती २ ते ३ रूपयांच्या पातळीवर कमी होणार आहेत. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळाने (PNGRB) जाहीर केलेल्या दर तर्कसंगतीकरणावर आधारित किंमतीतील पुनः रचना जानेवारी २०२६ पासून लागू होणार आहे. त्यामुळे देशभरातील ग्राहकांना कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (CNG) आणि घरगुती पाईप नॅचरल गॅस (PNG) च्या कमी झालेल्या किमतींचा फायदा होणार आहे. पीएजीआरबीचे (PNGRB) सदस्य ए के तिवारी यांनी प्रसारमाध्यमांना संबंधित विषयी माहिती दिली आहे. त्यांनी बोलताना सांगितले की, नवीन एकत्रित दर रचनेमुळे राज्य आणि लागू करांनुसार ग्राहकांना प्रति युनिट २-३ रुपयांची बचत होईल.कारण या जीएसटी तर्कसंगतीकरणा अंतर्गत विभागीय रचना बदलण्यात आल्याने नियामक मंडळाने झोनची संख्या तीनवरून दोनवर आणून दर रचना सुलभ केली आहे. आर्थिक वर्ष २०२३ मध्ये जाहीर केलेल्या पूर्वीच्या प्रणालीनुसार, दर तीन अंतरावर आधारित झोनमध्ये विभागले गेले होते,२०० किलोमीटरपर्यंतच्या अंतरासाठी ४२ रुपये, ३००-१२०० किलोमीटरसाठी ८० रुपये आणि १,२०० किलोमीटरपेक्षा जास्त अंतरासाठी १०७ रुपये. होते आता ३ वरून २ झोनची संख्या केल्याने त्याचा लाभ ग्राहकांना होईल. 'आम्ही दरांमध्ये तर्कसंगतीकरण केले आहे. तीन झोनऐवजी आता दोन झोन असतील आणि पहिला झोन देशभरातील CNG आणि घरगुती PNG ग्राहकांना लागू होईल' असे तिवारी यांनी स्पष्ट केले.माहितीनुसार, झोन १ साठीचा एकत्रित दर आता ५४ रुपये निश्चित करण्यात आला आहे, जो पूर्वीच्या ८० आणि १०७ रुपयांच्या दरांपेक्षा कमी आहे. सरकारच्या या तर्कसंगत दराचा फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचवला गेला पाहिजे या आदेशाचे पालन करण्यासाठी नियामक मंडळ याच्या पालनावर सक्रियपणे लक्ष ठेवेल असे तिवारी बोलताना म्हणाले.'या व्यवसायात ग्राहक तसेच ऑपरेटर या दोघांच्याही हितामध्ये संतुलन राखणे ही आमची भूमिका आहे,' असे तिवारी यांनी पुढे सांगितले. सीएनजी व पीएनजी पायाभूत सुविधांच्या विस्ताराबद्दल बोलताना तिवारी म्हणाले की, संपूर्ण देशाला कव्हर करण्यासाठी परवाने देण्यात आले आहेत, ज्यात सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (PSUs), खाजगी कंपन्या आणि संयुक्त उपक्रमांचा समावेश आहे. विशेषतः सीएनजी व घरगुती पीएनजी वापरासाठी अनुदानित आणि तर्कसंगत गॅस पुरवण्याच्या सरकारच्या प्रयत्नांमुळे देशभरात नैसर्गिक वायूच्या वापरात वाढ होण्याची अपेक्षा आहे,आणि भारतातील नैसर्गिक वायूच्या वापरासाठी सीजीडी(City Gas Distribution) क्षेत्राला प्राथमिक वाढीचा घटक समजले जाते. याशिवाय अनेक राज्यांनी मूल्यवर्धित कर (VAT) देखील कमी केल्याने अंतिमतः याचा प्रत्यक्ष लाभ ग्राहकांना होणार आहे.

फीड फीडबर्नर 17 Dec 2025 4:10 pm

नराधमास मरेपर्यंत जन्मठेप, सोलापूर जिल्हा न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय, दंड भरला नाही तर.

सोलापूर जिल्हा न्यायालयाने १३ वर्षीय बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला कठोर शिक्षा सुनावली आहे. शीतपेयात गुंगीच औषध घालून तेरा वर्षीय बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमास मरेपर्यंत जन्मठेपची शिक्षा सुनावण्यात आली आहे.सोलापूर : सोलापूर जिल्हा न्यायालयाने एका १३ वर्षीय बालिकेवरील अत्याचार प्रकरणी आरोपीला आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.आरोपीने शीतपेयात गुंगीचं औषध घालून पीडित बालिकेला बेशुद्ध केले आणि लैंगिक अत्याचार केला होता.याप्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात जुलै २०१९ मध्ये गुन्हा दाखल झाला होता.विकास दिगंबर शिंदे(वय ५० वर्षे) असे आरोपीचे नाव आहे.शीतपेयात गुंगीच औषध टाकून केला होता अत्याचारआरोपी विकास शिंदें याने जून आणि जुलै २०१९ च्या दरम्यान 13 वर्षाच्या पीडितेस त्याच्या घरात बोलवून खाऊसाठी पैसे देतो,असे आमिष दाखवले होते.आरोपी विकास शिंदे हा पीडीत बालिकेच्या अज्ञानपणाचा गैरफायदा घेवून तिच्यावर वेळोवेळी शारीरीक आणि लैंगिक अत्याचार करत होता.आरोपीने पीडितेला शीतपेय थम्सअपमध्ये गुंगीचं औषध पाजले होते.शीतपेय पिल्यानंतर पीडीतेला चक्कर आली आणि त्या अवस्थेत त्याने पीडीतेवर अत्याचार केले.तसेच कोणाला सांगितले तर जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती.अल्पवयीन पीडितेवर सतत दोन महिने लैंगिक अत्याचार केल्याने पीडिता गर्भवती राहीली होती.ही बाब पीडितेच्या आईच्या लक्षात आल्यानंतर तिने पीडितेला त्याबाबत विचारणा केली तेव्हा,पीडितेने आरोपी विकास शिंदे याने तिच्या सोबत लाडूचे आमिष दाखवून आणि काहीतरी प्यायला देवून तिच्यावर शारीरीक आणि लैंगिक अत्याचार केल्याचे सांगितले.यानंतर पीडितेच्या आईने फौजदार चावडी पोलीस ठाणे येथे ताबडतोब फिर्याद दाखल केली होती.कोर्टात पीडितेच्या आईची आणि डॉक्टरांची साक्ष महत्वाची ठरलीसदर खटल्यात डी.एन.ए.रिपोर्ट आणि पीडितेचे वय 13 वर्षे इतके लहान असताना आरोपीने तिच्यासोबत लैंगिक अत्याचार केला.पीडितेला काहीतरी गुंगीकारक पेय पाजून तिच्यावर अत्याचार केला,असा सरकार पक्षाच्या वतीने सरकारी वकिलांनी युक्तीवाद केला होता.या खटल्याच्या चौकशी दरम्यान न्यायालयात सरकार पक्षाकडून एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले.यामध्ये पीडिता, फिर्यादी, डॉक्टर यांची साक्ष महत्वाची ठरली.

फीड फीडबर्नर 17 Dec 2025 4:10 pm

मराठवाड्यात काँग्रेसला मोठा हादरा; आमदार प्रज्ञा सातव भाजपच्या वाटेवर?

हिंगोली – हिंगोली जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता असून, काँग्रेसच्या बड्या नेत्या आणि दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या पत्नी आमदार डॉ. प्रज्ञा सातव लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, हा पक्षप्रवेश निश्चित मानला जात असून, यामुळे मराठवाड्यात काँग्रेसला मोठा हादरा बसण्याचे संकेत मिळत आहेत. राजकीय हालचालींना वेग – […] The post मराठवाड्यात काँग्रेसला मोठा हादरा; आमदार प्रज्ञा सातव भाजपच्या वाटेवर? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 17 Dec 2025 4:07 pm

मोठी बातमी..! धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिपद मिळणार? दिल्लीत हालचालींना वेग

मुंबई : राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. सदनिका घोटाळा प्रकरणात नाशिक जिल्हा न्यायालयाने त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. यामुळे कोकाटे यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता निर्माण झाली असून, त्यांच्या मंत्रीपदासह आमदारकीवरही टांगती तलवार आहे. मंगळवारी नाशिक सत्र न्यायालयाने सदनिका घोटाळा प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली दोन वर्षांची […] The post मोठी बातमी..! धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिपद मिळणार? दिल्लीत हालचालींना वेग appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 17 Dec 2025 4:06 pm

उद्योग संकृतीत मानवीय बदल का खुणावतोय? २०२६ सालचे वर्कप्लेस अधिक बुद्धिमान आणि मानवकेंद्रित असेल

मुंबई: सध्या माहिती तंत्रज्ञान व समावेशन ही यशस्वी त्रिसुत्री असताना मानव संसाधनात यांचा प्रभावीपणे वापर मोठ्या प्रमाणात वाढल्याचा दावा एका अहवालाने केला. मानव संसाधनातील या बदलांमुळे मोठ्या प्रमाणात कंपनीच्या कामकाजात नवा बदल होताना दिसतो. कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence AI), भारतात व जगभरात नव्याने विकसित होत असलेले नवे कामगार नियम (New Labour Code) आणि कर्मचाऱ्यांच्या वाढत्या अपेक्षा यांचे एकत्रीकरण किंवा बदल कंपन्यांच्या कामकाजात येत्या वर्षात संस्था वेतन, कर्मचारी व त्यांची कामगिरी यांचे व्यवस्थापन कसे करतील यावर अवलंबून असू शकते असे मूल्यमापन अहवालात करण्यात आले आहे. ह्यूमन कॅपिटल मॅनेजमेंट (HCM) सोल्यूशन्समध्ये स्पेशलिटी असलेली मानव संसाधन (HR) व तंत्रज्ञान कंपनी एडीपी (ADP) कंपनीच्या माहितीनुसार, आर्थिक वर्ष २०२६ सालचे भारताचे कामकाज अधिकाधिक बुद्धिमान होऊ शकते असे अहवालाचे म्हणणे आहे. तसेच हे ज्ञानाशी संबंधित परिवर्तन एकमेकांशी जोडलेले आणि मानवकेंद्रित असेल असेही अहवालाने स्पष्ट केले.बदललेल्या कर्मचारी वेतन प्रणालीचे आधुनिकीकरण करणाऱ्या अनुपालन (Compliance) तसेच या भांडवली निधीत गुंतवणूक करणाऱ्या आणि कर्मचाऱ्यांच्या आर्थिक कल्याणाला प्राधान्य देणाऱ्या संस्था भविष्यातील मानव संसाधनातील अनिश्चिततांना सामोरे जाण्यासाठी अधिक चांगल्या स्थितीत असतील असा निष्कर्ष अहवालाने काढला आहे. पुढील वर्ष भारताच्या संस्थांना संधी आणि गुंतागुंत दोन्ही मुद्यांनी युक्त असलेल्या परिस्थितीला सामोरे जावे लागणार असा दावा अहवालाने केला.सतत स्पर्धात्मक वातावरणात मानव संसाधनाला कौशल्य (Skills) हे नवीन चलन (Growth Driver) बनत आहेत असे अहवालाने स्पष्ट केले. तंत्रज्ञानातील ऑटोमेशनमुळे काम करण्याच्या पद्धतीत बदल होत आहे आणि कर्मचारी अशा कामाच्या अनुभवाची अपेक्षा करत आहेत जो उत्पादकता आणि वैयक्तिक कल्याण (Personal Wellbeing) या दोन्हींना आधार देईल असे एडीपीने म्हटले.याविषयी भाष्य करताना,'अशा परिस्थितीत, सहानुभूती, सुव्यवस्थित रचना आणि चपळाईने प्रतिसाद देणाऱ्या संस्थाच स्पर्धेत पुढे राहू शकतील' असे एडीपी इंडिया आणि दक्षिण-पूर्व आशियाचे व्यवस्थापकीय संचालक राहुल गोयल म्हणाले.भविष्यातील वर्कस्पेसची पुन: व्याख्या करणारे तीन घटक म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), अनुपालनाची गुंतागुंत आणि कर्मचाऱ्यांच्या बदलत्या अपेक्षा हे आहेत असे कंपनीने अहवालात म्हटले. यावर आधारित एडीपीच्या संशोधन डेटानुसार, जवळपास ३५% भारतीय व्यवसाय पुढील दोन ते तीन वर्षांत एचआर (HR) आणि पेरोल नवोपक्रमासाठी (Payroll Initiative), कृत्रिम बुद्धिमत्तेचा अवलंब करणे हा प्राथमिक केंद्रबिंदू मानतात. याविषयी अधिक माहिती देताना,'जसजसे उद्योग विस्तारतील, तसतसे ऑटोमेशन मोठ्या प्रमाणावरील, नियमांवर आधारित प्रक्रिया हाताळेल, ज्यामुळे एचआर संघांना निर्णय-आधारित निर्णय आणि कर्मचारी प्रतिबद्धतेवर लक्ष केंद्रित करण्यास वेळ मिळेल' असे अहवालाने नमूद केले. मात्र अहवालानुसार, पुढे होणारी कठोर नियामक तपासणी आणि कामगार व्याख्येतील अपेक्षित बदलांमुळे,अचूक वेळ व योग्य व्यवस्थापन ही एक प्रमुख कार्यात्मक प्राथमिकता बनेल असे अहवालात म्हटले.'फ्यूचर ऑफ पे इन इंडिया २०२५' अहवालानुसार, मोठ्या संख्येने भारतीय संस्थांना नियामक बदलांशी जुळवून घेणे कठीण जात आहे ज्यामुळे हे पुढील वर्षासाठी एक महत्त्वाचे लक्ष केंद्रित कंपन्यांना करावे लागेल. आर्थिक वर्ष २०२६ मध्ये,श कल्याणाचे उपक्रम पारंपरिक आरोग्य लाभांच्या पलीकडे विस्तारतील. या उपक्रमात मानसिक आरोग्य समुपदेशन, आर्थिक नियोजन, काळजीवाहू संसाधने आणि तणाव व्यवस्थापन, लवचिकता निर्माण करणे आणि वैयक्तिक संतुलन राखण्यावरील संरचित कार्यक्रमांचा समावेश असेल असेही अहवालाने म्हटले आहे.आणखी काही अहवालातील ठळक मुद्देभारताच्या वास्तवानुसार हायब्रीड कार्यप्रणाली विकसित होऊ राहतीलअनेक कंपन्या लहान शहरांमधील नावलौकिक मिळवण्यासाठी 'हब-अँड-स्पोक' दृष्टिकोन स्वीकारतीलआर्थिक वर्ष २०२६ मध्ये, परस्परावलंबी वेतन आधारित स्लिप्स, डिजिटल पे वॉलेट्स आणि कमावलेल्या वेतनापर्यंत पोहोचण्याची (earned wage access) सुविधा लोकप्रिय होतील.एडीपी अहवालातील आव्हाने -भारतात लवचिक वेतन प्रणालींचा (Flexible Salary System) अवलंब मर्यादित आहे, सध्या केवळ सुमारे ३०% कामगिरी-आधारित मोबदला आणि मागणीनुसार वेतन यांसारख्या मॉडेल्ससाठी कंपन्या प्रयत्न करत आहेत.

फीड फीडबर्नर 17 Dec 2025 3:30 pm

मोदींची कबर खोदण्याची स्वप्न पाहणाऱ्या काँग्रेसची कबर जनता खोदेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें

काँग्रेसची टीका देश प्रेमातून नाही पाकिस्तान प्रेमातूनपृथ्वीराज चव्हाणांच्या दाव्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा जोरदार प्रहारमुंबई : देशावर दहशतवादी हल्ले होत असताना, भारतीय लष्कर दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करत असताना आणि संपूर्ण देश एकजुटीने उभा असताना काँग्रेसचे नेते मात्र पाकिस्तानची भाषा बोलत असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कबर खोदण्याची भाषा करणाऱ्यांची कबर देशाची जनता खोदेल,” असा थेट, प्रहार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसवर केला.राहुल गांधी, पृथ्वीराज चव्हाण आणि पी. चिदंबरम यांच्या भूमिकेवर टीका करताना शिंदे म्हणाले की, लष्कराच्या कारवाईवर प्रश्न विचारणे म्हणजे थेट जवानांचे मनोबल खच्चीकरण करणे आहे असे शिंदे म्हणाले.पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने राबवलेल्या ऑपरेशन ‘सिंदूर’ अंतर्गत दहशतवाद्यांचे तळ अचूकपणे उद्ध्वस्त करण्यात आले. ही कारवाई अत्यंत प्रिसाईज असून कोणतेही नागरी नुकसान झाले नाही. या कारवाईमुळे भारताची लष्करी ताकद आणि राजकीय इच्छाशक्ती जगासमोर पुन्हा एकदा ठळकपणे समोर आली आहे, असे शिंदे म्हणाले.या संपूर्ण मोहिमेत लष्करी जवानांच्या पाठीशी पंतप्रधान नरेंद्र मोदी खंबीरपणे उभे राहिले. “खून आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही,” हा संदेश मोदी सरकारने पाकिस्तानला आणि संपूर्ण जगाला दिला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.मात्र, या शौर्यपूर्ण कारवाईनंतर काँग्रेसच्या नेत्यांकडून करण्यात आलेली वक्तव्ये देशविघातक असल्याचा आरोप शिंदे यांनी केला. “ही टीका देशप्रेमातून नाही, तर पाकिस्तानप्रेमातून होत आहे. काँग्रेस नेत्यांची विधाने पाकिस्तानमध्ये हेडलाईन बनत आहेत, हे अत्यंत लाजिरवाणे आहे,” असे ते म्हणाले.“२६/११ च्या वेळी काँग्रेस सरकारने जर सडेतोड उत्तर दिले असते, तर आज देशाला पुन्हा पुन्हा अशी किंमत मोजावी लागली नसती,” असा टोला त्यांनी लगावला.“अब गोली का जवाब गोली से,” असे सांगत शिंदे यांनी स्पष्ट केले की, पाकिस्तानविरोधातील ही कारवाई संपूर्ण देशाच्या आत्मसन्मानाशी जोडलेली आहे. देश, लष्कर आणि पंतप्रधानांविरोधात गरळ ओकणाऱ्यांना जनता कधीही माफ करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.शेवटी, पहलगाममध्ये निष्पाप नागरिकांच्या हत्येचे जशास तसे उत्तर भारतीय लष्कराने दिल्याचे सांगत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लष्कराला सलामी दिली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे अभिनंदन केले.

फीड फीडबर्नर 17 Dec 2025 3:10 pm

गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती, मंत्री नितेश राणेंची माहिती

मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णयमुंबई : महाराष्ट्राचे वैभव असलेल्या ऐतिहासिक गडकिल्ल्यांच्या संरक्षणासाठी महायुती सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मंत्रिमंडळ बैठकीत गडकिल्ल्यांवरील अतिक्रमणे हटविण्यासाठी विशेष समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, या समितीचे सह-अध्यक्ष म्हणून महसूल मंत्री, वन मंत्री आणि मत्स्यव्यवसाय तथा बंदरे मंत्री यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती मंत्री नितेश राणे यांनी दिली.मंत्रिमंडळ बैठकीनंतर मंत्री राणे यांनी मंत्रालयात माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी या निर्णयाची सविस्तर माहिती देताना सांगितले की, गडकिल्ल्यांवरील अतिक्रमणे हटविण्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आली आहे. मी स्वतः या समितीचा सदस्य आहे. काही ठिकाणी थडगी उभी करून हिरवी चादर टाकली जाते. अशी थडगी किंवा अनधिकृत बांधकामे हटवायला गेले की लोक जमा होतात. अनेक वेळा अशा ठिकाणी हत्यारेही सापडली आहेत. इतिहास पुसण्याचे काम जिहादी मानसिकतेच्या लोकांकडून होत आहे. आमच्या गडकिल्ल्यांवर कोणाची वाकडी नजर खपवून घेणार नाही”, असा इशारा त्यांनी दिला.ते पुढे म्हणाले, “आताच हिरवी चादर गुंडाळली नाही, तर उद्या ते कोणाला ऐकणार नाहीत. हिंदू राष्ट्रात हिरवी चादर हटविण्यासाठी कोणाचा हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही. उद्यापासून या दिशेने कारवाई सुरू होईल. आमच्या समितीत छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदुत्व या विषयावर तडजोड न करणारे लोक आहेत”, असेही त्यांनी स्पष्ट केले.मुंबईचा डीएनए हिंदुत्वमंत्री राणे यांनी मुंबई महापालिका निवडणुकीवरही भाष्य केले. ते म्हणाले, “मुंबईचा डीएनए हिंदुत्व आणि महादेव आहे. ‘आय लव्ह पाकिस्तान’ बोलणारे येथे चालणार नाहीत. महादेवावर प्रेम करणारी आणि त्यांच्या विचारांवर चालणारी व्यक्तीच मुंबईची महापौर होईल. आम्हाला मुंबईत घाण ठेवायची नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्व आणि मुंबई वाचवली. ते विकले गेले नाहीत”, असेही नितेश राणे यांनी सांगितले.पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्याचा समाचारमाजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी ऑपरेशन सिंदूर केलेल्या वक्तव्याचा मंत्री नितेश राणे यांनी समाचार घेतला. ऑपरेशन सिंदूर राबवले गेले तेव्हा पहिल्या अर्ध्या तासातच भारताचा पराभव झाला होता. त्यामुळे आपल्या वायुदलाची विमाने उडाली नाहीत. जर कुठल्याही सीमेवर आपली विमाने उडाली असती तर पाकिस्तानने ती पाडली असती, असे वादग्रस्त वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे. याबाबत मंत्री राणे म्हणाले, “पृथ्वीराज चव्हाण यांना सांगा, विषय निघून गेलेला आहे. काँग्रेस पाकिस्तानची भाषा बोलणारा पक्ष आहे, यात नवीन काही नाही. पाकिस्तानचे हिरवे झेंडे मिरवणुकीत फिरवले जात होते, हे आम्ही विसरलेलो नाही”, असे प्रत्युत्तर त्यांनी दिले.

फीड फीडबर्नर 17 Dec 2025 3:10 pm

मिशोचा शेअर २०% उसळला शेअर का वाढतोय? मग कारण वाचा

मोहित सोमण:मिशोचा शेअर सुसाट वेगात पळत आहे. युबीएस या ब्रोकरेजने कंपनीच्या शेअरला सकारात्मक प्रतिसाद आपल्या अहवालात दिल्यानंतर शेअर २०% पेक्षा अधिक इंट्राडे उच्चांकावर उसळला असल्याने मूळ आयपीओ प्राईज बँड असलेल्या १११ रुपयांच्या तुलनेत २०% उसळल्याने २१६.३४ रूपये प्रति शेअरवर व्यवहार करत आहे. त्यामुळे शेअरला चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळत असल्याचे या निमित्ताने स्पष्ट झाले. ब्रोकरेजने दिलेल्या अहवालात कंपनीच्या फंडामेंटल आर्थिक स्थितीत चांगलीच सुधारणा झाल्याचे म्हटले होते. कंपनीच्या खेळत्या भांडवलात सुधारणा झाली असून कंपनीचा रोख प्रवाह (Cash Flow) सुधारला असल्याचे अहवालात नमूद केल्याने गुंतवणूकदारांनी कंपनीच्या शेअर्समध्ये खरेदी वाढवली होती.एकीकडे बँक ऑनलाईन उद्योगाच्या आर्थिक स्थिती मंदावली असताना तसेच रोख प्रवाहात घसरण सुरू असताना मिशोने मात्र आपली वाढ कायम राखण्यात यश मिळवले असल्याचे अहवालात ब्रोकरेजने म्हटले होते. कंपनीच्या आर्थिक स्थितीवर बोलतान कंपनीच्या विश्लेषकांनी म्हटले की,'मिशोचे मॉडेल नेट मर्चेंडाईज व्हॅल्यू (NMV) सीएजीर (Compound Annual Growth Rate CAGR) FY25-30e पेक्षा ३०% आहे. मार्जिन (CM) आणि समायोजित ईबीटा (Adjusted EBITDA मार्जिन) यांचा सर्वाधिक वाटा आहे. कंपनीचा दोन्ही बाबतीत एनएमव्ही (Merchandise Value NMV) FY30e पर्यंत अनुक्रमे ६.८% आणि ३.२% पर्यंत पोहोचेल.' असे कंपनीने निरिक्षणात नोंदवले आहे.अहवालातील निष्कर्षानुसार, ब्रोकरेजचा अंदाज आहे की आर्थिक वर्ष २५-३० पर्यंत कंपनीचे NMV ३०% CAGR ने वाढेल. त्याच कालावधीत वार्षिक व्यवहार वापरकर्ते (Average Transction User ATUs) १९९ दशलक्ष वरून ५१८ दशलक्ष पर्यंत वाढतील आणि वार्षिक ऑर्डर बूक ९.२ वरून १४.७ पर्यंत वाढेल असे म्हटले. ब्रोकरेज मते, कंपनीने लॉजिस्टिक्स कार्यक्षमता इकोसिस्टममध्ये हस्तांतरित केल्यामुळे सरासरी ऑर्डर मूल्ये (AOVs) २४७ वरून २३३ रूपयांपर्यंत कमी होतील असे अंतिमतः म्हटले. एकूणच कंपनीचा शेअर गेल्या ५ दिवसात २६.८९% उसळला होता.कंपनीचे बाजार भांडवल सध्या ९७६३७.०८ कोटी रुपये आहे. १० डिसेंबर कंपनीचा शेअर सूचीबद्ध झाला होता तेव्हा कंपनीचे बाजार भांडवल ७३००० कोटी रुपयांपेक्षा जास्त होते. त्यामुळे गेल्या केवळ सहा ट्रेडिंग सत्रांमध्ये मिशोच्या बाजार भांडवलात (Market Capitalisation) जवळपास २५००० कोटी रुपयांची वाढ झाली आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म मिशोचा ५४२१ कोटी मूल्यांकन असलेल्या आयपीओला एकूण ७९ पट अधिक सबस्क्रिप्शन मिळाले होते. सध्या हा शेअर त्याच्या सूची मूल्यापेक्षा सुमारे ३२% उसळला आहे.

फीड फीडबर्नर 17 Dec 2025 3:10 pm

लिलावानंतर मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ आहे तरी कसा, पाहा खेळाडूंची संपूर्ण यादी..

दुबई :आयपीएलचा लिलाव अखेर पार पडला.या लिलावात मुंबई इंडियन्सच्या संघाने चाणाक्ष खेळी केली.मुंबई इंडियन्सकडे जास्त पैसे नव्हते,पण तरीही त्यांना फार कमी पैशांत जबरदस्त खेळाडू आपल्या ताफ्यात दाखल केले आहेत. मुंबई इंडियन्सच्या संघाकडे लिलावासाठी तीन कोटी रुपयेही नव्हते.त्यामुळे मुंबईला या लिलावात नामांकित खेळाडू घेता आले नाही,पण तरीही मुंबईच्या संघाने यावेळी आपल्याकडे असलेल्या कमी पैशांतही चांगल्या खेळाडूंना संघात स्थान दिले आहे.दक्षिण आफ्रिकेचा धडाकेबाज फलंदाज आणि यष्टीरक्षक क्विंटन डीकॉकला त्यांनी आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले,पण त्यासाठी फक्त त्यांनी एक कोटी रुपयेच खर्च केले.त्यानंतर मुंबईच्या संघाने महाराष्ट्राच्या दानिश मालिवारलाही आपल्या ताफ्यात सामील केले आहे.त्याचबरोबर अथर्व अंकोलेकर, मयंत रावत आणि मोहम्मद इझहार यांनाही मुंबईने आपल्या संघात दाखल केले आहे.आयपीएल २०२६ लिलावात मुंबई इंडियन्सने खरेदी केलेल्या खेळाडूंची संपूर्ण यादी:क्विंटन डी कॉक (१ कोटी रुपये), दानिश मालेवार (३० लाख रुपये), मोहम्मद इझहार (३० लाख रुपये), अथर्व अंकोलेकर (३० लाख रुपये), मयंक रावत (३० लाख रुपये).राखून ठेवलेले खेळाडू:हार्दिक पांड्या, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, रायन रिकलटन, रॉबिन मिन्झ, मिचेल सँटनर, कॉर्बिन बॉश, नमन धीर, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, अल्लाह गफनझार, अश्वनी कुमार, दीपक चहर, विल जॅक्स, रघु शर्मा, राज अंगद बावा.देवाण घेवाण करून संघात घेतलेले खेळाडू:शेर्फेन रदरफोर्ड (गुजरात टायटन्स संघाकडून), मयंक मार्कंडे (केकेआर संघाकडून), शार्दुल ठाकूर (लखनौ सुपर जायंट्स संघाकडून).

फीड फीडबर्नर 17 Dec 2025 2:10 pm

रितेश देशमुखचा ‘राजा शिवाजी’मधील लुक समोर; ‘या’खास दिवशी सिनेमा होणार रिलीज

Riteish Deshmukh | अभिनेता रितेश देशमुखचा ‘राजा शिवाजी’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यात रितेश स्वत: छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय बॉलीवूडचे लोकप्रिय कलाकार या सिनेमात झळकणार आहेत. नुकतेच या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले. रितेशने मागे तळपता सूर्य आणि समोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या लूकमधला फोटो पोस्ट करत लिहिले, “क्षणभर थांबलेला सूर्य…मावळतीचा मावळ..पण […] The post रितेश देशमुखचा ‘राजा शिवाजी’मधील लुक समोर; ‘या’ खास दिवशी सिनेमा होणार रिलीज appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 17 Dec 2025 1:29 pm

घरगुती गुंतवणूकदारांना रुपयाचा सुखद दिलासा! रूपयांचे एका सत्रात १% पातळीवर जोरदार पुनरागमन 'ही' आहे कारणमीमांसा

मोहित सोमण: भारतीय बाजारातील घरगुती गुंतवणूकदारांनी वाढवलेली मोठी खरेदी व आरबीआयने डॉलर रूपया विनिमयात चालू केलेली आक्रमक विक्री या कारणामुळे रूपया थेट जवळपास १% निचांकी पातळीवरून वधारला आहे. त्यामुळे सकाळी रुपया ९०.९६ वरून ९०.१८ पातळीवर व्यवहार करत होता त्यामुळे डॉलरच्या तुलनेत रूपया उसळल्याने व सावरल्याने ही पोकळी भरून काढल्याने डॉलरच्या तुलनेत रुपया दुपारी १२.०८ वाजेपर्यंत ९०.३२ पातळीवर व्यवहार करत आहे. मोठ्या प्रमाणात सुरूवातीच्या विनिमयात (Exchange) आरबीआयने आपले हस्तक्षेपाची हत्यार बाहेर काढल्यानंतर डॉलरच्या विक्रीमुळे डॉलरमधील मागणी घसरली. सकाळी डॉलर निर्देशांकात किरकोळ वाढ कायम राहिल्याने पुन्हा काही प्रमाणात रूपया पुन्हा एकदा १५ ते १७ पैशानी घसरला असला तरी विक्रमी निचांकी पातळीवरून रुपयांत सुधारणा झाली आहे.गेल्या काही दिवसांपासून तज्ञांच्या मते विनिमय व्यापारात आरबीआयने डॉलर सेल ऑफला सुरूवात केलेले नव्हते. तरीही प्रलंबित असलेल्या या कार्यवाहीला सुरूवातीला रूपयात सुधारणा झाली आहे. यासह शेअर बाजारातही आज घरगुती गुंतवणूकदारांनी वाढवलेल्या गुंतवणूकीमुळे त्याचा फायदा बाजारात होत आहे. दरम्यान अद्याप युएसमधील घरसलेली पेरोल आकडेवारीमुळे डॉलर व कमोडिटीतील अस्थिरता कायम राहू शकते.एका अहवालानुसार बुधवारी केलेला हा हस्तक्षेप ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमधील हस्तक्षेप नुकताच केलेला नसून यापूर्वीही ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात रिझर्व्ह बँकेने डॉलर विक्रीतून हस्तक्षेप विनिमयात केला होता. गरज पडल्यास जेव्हा रुपयामधील सततच्या एकतर्फी हालचालींना तोंड देण्यासाठी रिझर्व्ह बँकेने आतापर्यंत नजीकच्या काळात तीन प्रसंगी आक्रमकपणे हस्तक्षेप केला होता.उपलब्ध माहितीनुसार, रिझर्व्ह बँकेने स्पॉट आणि नॉन डिलिव्हरेबल फॉरवर्ड (NDF) या दोन्ही बाजारांमध्ये मोठ्या प्रमाणावर डॉलर्सची विक्री केली आहे. ज्यामुळे दिवसाच्या व्यवहारादरम्यान तीव्र उलथापालथ झाली. बँकांनी रिझर्व्ह बँकेच्या कठोर हस्तक्षेपाची पुनरावृत्ती होण्याच्या धोक्याकडे लक्ष वेधण्यास सुरुवात केली होती.यापूर्वी बाजारातील रुपयांच्या दरात सातत्याने घसरण झाली. तीव्र तेजीपूर्वी परदेशी निधीचा सतत बाह्य जावक (Outflow) आणि भारत-अमेरिका व्यापार करारावरील अद्याप न झालेली स्पष्टता यामुळे डिसेंबर महिन्यात भारतीय रुपयातील दबाव वाढल्याने रूपया जवळपास २% घसरला आहे. बाजारातील रूपयांच्या या खराब कामगिरीचा फटका गुंतवणूकदारांना बसला आहे. या घसरणीमुळे रुपया आशियातील सर्वात खराब कामगिरी करणारा प्रमुख चलन बनला होता.उपलब्ध माहितीनुसार, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी इक्विटी गुंतवणूकीमधून सुमारे १८ अब्ज डॉलर्स काढून घेतले आहेत. या निधी काढण्यामुळे रुपयावरील ताण सातत्याने वाढला आहे. अमेरिकेने लावलेले ५०% शुल्क निर्यातदारांच्या डॉलरच्या आवकेला धोका निर्माण करत आहे. त्याचवेळी वाढत्या आयातीमुळे डॉलरची मागणी अद्यापही कायम आहे असे बाजार तज्ञांचे मत आहे.

फीड फीडबर्नर 17 Dec 2025 1:10 pm

भर संसदेत महिला खासदार एकमेकींशी भिडल्या...

मेक्सिकोतील संसदेत हाणामारी झाली आहे.याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण जगाचे लक्ष मेक्सिकोकडे वळले आहे.एका कायद्यातील सुधारणांवर चर्चा सुरू असताना हा गोंधळ झाला.यात सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील महिला खासदारांमध्ये तुफान हाणामारी झाली.विरोधी पक्ष नॅशनल अॅक्शन पार्टी (PAN)च्या महिला खासदारांनी सत्ताधारी पक्षावर नियमांचे उल्लंघन केल्यचा आरोप केला.या नेत्यांना असा दावा केला की सत्ताधारी मोरेना पक्षाने बहुमताच्या जोरावर नियमांचे उल्लंघन केले आहे.यामुळे सुरुवातीला दोन्ही पक्षांमध्ये वाद झाला आणि नंतर हाणामारी झाली.महिला खासदारांचा व्हिडिओ व्हायरलया घटनेच्या व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की,दोन्ही पक्षांच्या महिला खासदार एकमेकांना हाणामारी करताते, तर काही एकमेकांना कोपराने मारत आहेत,त्याच बरोबर काही नेत्या एकमेकांचे केसही ओढताना दिसत आहेत.या घटनेनंतर,एका पॅन पक्षाने पत्रकार परिषद घेतली आणि आरोप केला की आमच्या पक्षाने शांततेत निषेध केला होता,परंतु सत्ताधारी पक्षाने बळजबरीने नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला.त्यामुळे वाद झाला.नॅशनल अॅक्शन पार्टीच्या एका महिला सदस्याने घटना लज्जास्पद आणि लोकशाही नियमांविरुद्ध असल्याचे म्हटले आहे.सभागृहात झालेल्या या गोंधळानंतर विरोधी पक्षाच्या खासदारांनी सभात्याग केला.त्यामुळे सत्ताधारी पक्षाने विरोधकांशिवाय चर्चा सुरू सुरू ठेवले.मोरेना पक्षाने प्रत्युत्तर देत म्हटले की, चर्चेदरम्यान विरोधी पक्ष आपली बाजू मांडू शकला नाही,या पक्षाने बाजू मांडण्याऐवजी हिंसाचाराचा अवलंब केला.त्यामुळे हा वाद झाला

फीड फीडबर्नर 17 Dec 2025 1:10 pm

सौदी अरेबियामध्ये एका वर्षात ३४० लोकांना फाशी देण्यात आली

सौदी अरेबियाने या वर्षी आतापर्यंत ३४० लोकांना मृत्युदंड दिला आहे.ही संख्या गेल्या वर्षीच्या ३३८ च्या विक्रमाला मागे टाकली आहे.सौदी अरेबियामध्ये फाशीची संख्या वाढतच आहे,ज्यामध्ये अनेक अल्पवयीन आणि ड्रग्ज गुन्ह्यांचे आरोपींचा समावेश आहे.सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान देशासाठी सुधारणावादी प्रतिमा मांडत आहेत,परंतु अलीकडील आकडेवारी वेगळीच गोष्ट सांगते.मानवाधिकार संघटनांकडून मिळालेला डेटासौदी गृह मंत्रालयाच्या मते,हत्येसाठी मक्कामध्ये अलिकडेच तीन लोकांना फाशी देण्यात आली. मानवाधिकार संघटनांकडून मिळालेल्या डेटामध्ये थोडा फरक आहे.अलाकस्ट, अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल आणि रिप्रीव्हच्या मते,२०२४ मध्ये सौदी अरेबियामध्ये ३४५ लोकांना फाशी देण्यात आली.यूकेस्थित अलक्स्ट या संस्थेच्या कार्यकर्त्या नदीन अब्दुलअझीझ म्हणाल्या की,हे आकडे सौदी अरेबियाचा जगण्याच्या अधिकाराकडे दुर्लक्ष आणि संयुक्त राष्ट्रांच्या तज्ञांकडून वारंवार केलेल्या आवाहनांना सातत्याने दुर्लक्ष दर्शवतात.त्या पुढे म्हणाल्या की,अनेकदा घाईघाईने आणि योग्य खटल्यांशिवाय फाशी देण्यात आली.अनेकांना छळण्यात आले आणि कबुली देण्यास भाग पाडण्यात आले.ज्यांना फाशी देण्यात आली त्यात गुन्ह्यांच्या वेळी अल्पवयीन मुले होती.ड्रग्जशी संबंधित प्रकरणांमध्ये अधिक फाशीया वर्षी सर्वाधिक २३२ फाशी ड्रग्जशी संबंधित प्रकरणांमध्ये देण्यात आल्या.याव्यतिरिक्त,दहशतवादासाठी अनेक लोकांना फाशी देण्यात आली.सौदी अरेबियाची दहशतवादाची व्याख्या व्यापक आणि अस्पष्ट आहे.आंतरराष्ट्रीय कायदा फक्त जाणूनबुजून हत्यासारख्या सर्वात गंभीर गुन्ह्यांसाठी फाशीची शिक्षा देण्याचे आदेश देतो, म्हणूनच ड्रग्जच्या प्रकरणांमध्ये फाशीची शिक्षा आंतरराष्ट्रीय स्तरावर टीका झाली आहे.अलिकडच्या काही महिन्यांत,सौदी अरेबियाने गुन्ह्यांच्या वेळी अल्पवयीन असलेल्या दोन मुलांना फाशी दिली.आंतरराष्ट्रीय मानवाधिकार कायद्याने अल्पवयीन मुलांना फाशी देण्यास मनाई केली आहे.२०२० मध्ये,सौदी अधिकाऱ्यांनी अल्पवयीन मुलांना फाशीपासून वाचवण्याचे आश्वासन दिले होते,परंतु अलिकडच्या वर्षांत अनेक प्रकरणांमध्ये हा नियम लागू करण्यात आला नाही.अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनलच्या मते,२०२२,२०२३ आणि २०२४ मध्ये चीन आणि इराणनंतर सौदी अरेबिया तिसऱ्या क्रमांकावर आहे.सौदी अरेबियामध्ये फाशीची वाढती संख्या आणि अल्पवयीन मुलांना फाशी देणे आंतरराष्ट्रीय मानवी हक्कांबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित करते.

फीड फीडबर्नर 17 Dec 2025 1:10 pm

“सूरज बडजात्या माझ्याकडे आले अन्…”; ‘अशी’मिळाली ‘मैंने प्यार किया’चित्रपटाची अॅाफर, भाग्यश्रीने सांगितली आठवण

Bhagyashree : ९० च्या दशकात आलेल्या ‘मैंने प्यार किया’ या चित्रपटामुळे रातोरात स्टार बनलेली अभिनेत्री भाग्यश्री दीर्घकाळाच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सिनेसृष्टीत परतली असून, तिने काही चित्रपटांमध्ये काम केले आहे. नुकत्याच एका न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने तिच्या सिनेसृष्टीतील पदार्पणाविषयी मनसोक्त गप्पा मारल्या. यावेळी बोलताना तिने मैंने प्यार किया चित्रपटाची अॅाफर कशी मिळाली याविषयीची आठवण सांगितली. […] The post “सूरज बडजात्या माझ्याकडे आले अन्…”; ‘अशी’ मिळाली ‘मैंने प्यार किया’ चित्रपटाची अॅाफर, भाग्यश्रीने सांगितली आठवण appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 17 Dec 2025 1:01 pm

पंतप्रधान मोदींचे पहिल्या इथिओपिया दौऱ्यात संसदेत भाषण ; म्हणाले,”इथिओपिया ही शूरांची भूमी …”

Narendra Modi in Ethiopia। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या पहिल्या इथिओपियाच्या दौऱ्यावर आहेत. काल इथिओपियाचे पंतप्रधान अबी अहमद अली यांनी त्यांना देशाचा सर्वोच्च सन्मान,‘द ग्रेट ऑनर निशान ऑफ इथियोपिया’ प्रदान केला. दरम्यान , आज पंतप्रधान मोदींनी इथिओपियाच्या संसदेला संबोधित केले. ते म्हणाले, “ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. हा केवळ माझा सन्मान नाही, तर देशाचा सन्मान […] The post पंतप्रधान मोदींचे पहिल्या इथिओपिया दौऱ्यात संसदेत भाषण ; म्हणाले,”इथिओपिया ही शूरांची भूमी …” appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 17 Dec 2025 12:57 pm

Homemade Toner: हिवाळ्यात घरीच तयार करा टोनर, फक्त १० रुपयांत! त्वचा राहील मऊ आणि ताजीतवानी

Homemade Toner: हिवाळ्यात त्वचा लवकर कोरडी आणि खरबरीत होते. त्यामुळे त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी टोनरचा वापर खूप महत्त्वाचा असतो. बाजारात मिळणारे टोनर महाग असतात आणि काही वेळा त्यामधील केमिकल्स त्वचेला नुकसानही करतात. अशा वेळी घरगुती टोनर हा स्वस्त, सुरक्षित आणि प्रभावी पर्याय ठरू शकतो. विशेष म्हणजे हा टोनर तुम्ही फक्त १० रुपयांत तयार करू शकता. घरच्या […] The post Homemade Toner: हिवाळ्यात घरीच तयार करा टोनर, फक्त १० रुपयांत! त्वचा राहील मऊ आणि ताजीतवानी appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 17 Dec 2025 12:55 pm

“पापाराझींना काही बोललात, तर…”; राखी सावंतचा जया बच्चन यांना इशारा

Rakhi Sawant | बॉलीवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांनी पापाराझींबद्दल केलेल्या वक्तव्याची सर्वत्र चांगलीच चर्चा झाली. यावरून त्यांच्यावर टीका देखील करण्यात आली. अशातच आता राखी सावंतने यावर प्रतिक्रिया दिली आहे. राखी सावंत एका नव्या लुकमध्ये थेट निळा ड्रम घेऊन कॅमेऱ्यासमोर आली होती. तेव्हा तिने जया बच्चन यांच्यावर हल्लाबोल केला. ‘जयाजी माझ्या पॅप्सना काही बोलू नका, […] The post “पापाराझींना काही बोललात, तर…”; राखी सावंतचा जया बच्चन यांना इशारा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 17 Dec 2025 12:50 pm

“तेजस्वी यादव, नववी नापास, बेपत्ता…” ; भाजपच्या पोस्टने बिहारमध्ये खळबळ

BJP on Tejashwi Yadav। बिहारमधील निवडणूक निकालांनी पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. निवडणुकीपूर्वी, आरजेडी आणि काँग्रेसने पोस्टर्स आणि एआय व्हिडिओद्वारे भाजपवर निशाणा साधला होता. आता, निवडणूक निकालानंतर काही महिन्यांनी, भाजपने आपला खेळ पुन्हा सुरू केला आहे. भाजपने बिहारमधील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांचे पोस्टर प्रसिद्ध केले आहे.यामध्ये असा दावा केला आहे कि तेजस्वी यादव बेपत्ता […] The post “तेजस्वी यादव, नववी नापास, बेपत्ता…” ; भाजपच्या पोस्टने बिहारमध्ये खळबळ appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 17 Dec 2025 12:44 pm

कौटुंबिक आघात : मनावर साचलेला भावनिक त्रास

कौटुंबिक आघात किंवा फॅमिली ट्रॉमा म्हणजे असा भावनिक आणि मानसिक त्रास, जो एका पिढीतून दुसऱ्या पिढीत संक्रमित होतो किंवा कुटुंबातील एखाद्या अत्यंत तणावपूर्ण घटनेमुळे निर्माण होतो आणि कुटुंबातील सर्व सदस्यांना दीर्घकाळ प्रभावित करतो. हा आघात एका व्यक्तीपुरता मर्यादित नसून तो संपूर्ण कुटुंबाच्या कार्यप्रणालीवर आणि सदस्यांच्या परस्पर संबंधांवर परिणाम करतो. कौटुंबिक आघात म्हणजे काय, त्याचे स्वरूप, कारणे, लक्षणे आणि उपाययोजना याबद्दल आपण या लेखात माहिती घेणार आहोत.कौटुंबिक आघात म्हणजे वर्षानुवर्षे जमा झालेला आणि वारंवार अनुभवलेला मानसिक आणि भावनिक त्रास होय. कौटुंबिक आघात हा प्रकार आपण दोन मुख्य प्रकारांमध्ये समजावून घेऊ शकतो. आंतर-पिढीगत हा आघात एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे नकळतपणे हस्तांतरित होतो. उदाहरणार्थ, जर पालकांनी बालपणात मोठा आघात म्हणजे युद्ध, दुष्काळ, गंभीर भेदभाव अनुभवला असेल, तर त्याचे भावनिक आणि वर्तणुकीचे परिणाम ते नकळतपणे त्यांच्या मुलांच्या संगोपनात आणतात. तीव्र कौटुंबिक आघात म्हणजे कुटुंबातील एखाद्या मोठ्या आणि अचानक आलेल्या संकटातून निर्माण होणारा आघात. कुटुंबातील एखाद्या सदस्याचा अचानक मृत्यू, कुटुंबातील कोणाचेही ऐकापेक्षा अधिक लग्न झालेली असणे, घरातील कोणीही गुपचूप कोणाला न कळवता अथवा पळून जावून लग्न केलेले असणे, एकमेकांमध्ये सावत्र अथवा भेदभाव असणारे नातेसंबंध तसेच पती-पत्नीमध्ये अत्यंत तणावाचे वैवाहिक संबंध असणे, कुटुंबात कोणतीही अविवाहित व्यक्ती असणे, तरुण वयात वैधव्य आलेले महिला पुरुष असणे, अचानक पती-पत्नी विभक्त झालेले असणे, घरातील कोणाचेही विवाहबाह्य संबंध विकोपाला गेलेले असणे, कोणाची आत्महत्या अथवा गंभीर अपघात, अचानक आलेले अपंगत्व, नैसर्गिक आपत्ती, दीर्घ कालीन गंभीर आजार, तुरुंगवास, घातपात, बलात्कार, अपहरण, खून, दिवाळखोरी, घटस्फोट यांसारख्या घटना कौटुंबिक आघाताला कारणीभूत ठरतात. व्यसन आणि मानसिक आजार जसे की कुटुंबातील एखाद्या सदस्याला दारूचे/अमली पदार्थांचे व्यसन असणे किंवा गंभीर मानसिक आजार असणे. कुटुंबातील कोणत्याही व्यक्ती मध्ये गैरवर्तन, पिळवणूक, हिंसाचार लहानपणी घरातील कोणासोबत झालेले असणे, बालपणात झालेले भावनिक, मानसिक अगदी शारीरिक दुर्लक्ष म्हणजेच आजारपणात योग्य सोयी-सुविधा, देखभाल मिळालेली नसणे सुद्धा खूप मोठा भाग आहे, ज्याचा पूर्ण कुटुंबावर परिणाम होत असतो. अनेकदा गंभीर नुकसान जसे की कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचा मृत्यू किंवा मालमत्तेचे मोठे नुकसान झालेले असणे, चोरी, दरोडा यांसारख्या घटना, मोठ्या प्रमाणात कर्जबाजारीपणा, अपरिहार्य परिस्थितीमुळे कुटुंबातील लोकांचे स्थलांतर होणे यामुळे मानसिकतेवर खूप परिणाम झाल्याचे पाहायला मिळते. संपूर्ण कुटुंबाने राहण्याचे ठिकाण बदलल्यामुळे सहन करावे लागलेले सांस्कृतिक धक्के किंवा संघर्ष आयुष्यात मोठी पोकळी निर्माण करतात. त्याचप्रमाणे वारंवार घरातील लोकांचे एकमेकांशी होणारे संघर्ष, कुटुंबातील सदस्यांमध्ये कायमस्वरूपी आणि न सुटणारे तीव्र वाद अशी परिस्थिती असल्यास पूर्ण कुटुंब सतत तणावात असते. अनेकदा मोठ्या कुटुंबात एकमेकांपासून खूप महत्त्वाचे निर्णय लपवून ठेवले जातात त्यामुळे जेव्हा ते सत्य समोर येते तेव्हा नात्यात दरी निर्माण होते.कौटुंबिक आघाताची लक्षणे काय आहेत यासंबंधी जाणून घेणे पण आवश्यक आहे. कौटुंबिक आघात व्यक्ती आणि संपूर्ण कुटुंबाच्या स्तरावर अनेक प्रकारे दिसून येतो. यातून गेलेल्या व्यक्तींमध्ये दिसणारी लक्षणे अभ्यासल्यास लक्षात येते की, भावनिक अस्थिरता जसे की तीव्र चिंता, भीती, नैराश्य आणि सतत अपराधीपणाची भावना अशा कुटुंबातील लोकांमध्ये असते. स्वतःचे नातेवाईक अथवा सामाजिक संबंध, इतर नातेसंबंध हाताळताना या लोकांना खूप अडचणी येतात. इतरांवर विश्वास ठेवण्यात अडचण, भावनिक संबंध जोडण्यास भीती वाटणे, अति-आसक्ती दाखवणे, पटकन अति आंधळा विश्वास ठेवणे असे प्रकार या कुटुंबातील लोकांना सतावतात. खूपदा हे लोकं व्यसनाधीनता, स्वतःला इजा पोहोचवणे किंवा धोकादायक वर्तन करणे, आत्महत्यांचे प्रयत्न अशा गोष्टी करतात. या लोकांच्या शारीरिक तक्रारीबद्दल बोलायचे झाल्यास कोणतेही वैद्यकीय कारण नसताना सतत डोकेदुखी, पोटदुखी किंवा तीव्र थकवा या लोकांमध्ये पाहायला मिळतो. खूप मोठ्या प्रमाणात विसंवाद जसे की भावनिकरीत्या बधिर होणे, संदर्भहीन बोलणे, भूतकाळातील घटनांपासून स्वतःला वेगळे ठेवणे यावर ही लोकं ठाम राहतात. कुटुंबामध्ये दिसणारी लक्षणे जर पाहिली तर एकमेकांमधील संवादाचा अभाव अशा ठिकाणी कायम असतो. गुप्तता आणि रहस्ये यांनी भरलेले आयुष्य अशी कुटुंब जगतात. यांसारख्या कुटुंबात भूतकाळात घडलेल्या अनेक अनाकलनीय घटना, गूढ गुपित माहिती असल्याचे कळते. त्या व्यक्तीला जेव्हा सत्य परिस्थिती समजते तेव्हा ती पूर्णपणे कोलमडून जाते. सतत कठोर भूमिका घेत राहणे म्हणजेच कुटुंबातील सदस्य अनावश्यकपणे कठोर नियम पाळतात किंवा प्रत्येकाने ठरलेल्या 'भूमिकेत' राहणे अपेक्षित असते. अखंड संघर्ष करत राहणे या लोकांच्या अंगवळणी पडते. आपण लढवय्ये आहोत, आपली कोणाशी तरी सतत लढाई सुरू आहे, स्पर्धा सुरू आहे अशी या लोकांची मानसिकता असते. काही कारणे नसतानाही कुटुंबात सतत तणाव आणि भांडणे होत राहणे, गैरसमज असणे, अबोला असणे याचेच लक्षण आहे. कुटुंबातील सदस्यांना भावनिक संकटाच्या वेळी एकमेकांकडून योग्य आधार अथवा मार्गदर्शन मिळत नाही. जो तो त्याचं पाहून घेईल आपण मधे पडायचं नाही या विचारसरणीचे लोक अशा कुटुंबात तयार होतात. अशी कुटुंब सतत एकमेकांना दोषी ठरवणे, आरोप-प्रत्यारोप करत राहणे, खरं खोटं, चूक बरोबर ठरवणे या चक्रात अडकून पडतात.कौटुंबिक आघातावरील उपाययोजना आपल्याला माहिती असणे क्रमप्राप्त आहे. कौटुंबिक आघात बरा करणे ही एक दीर्घ जास्त काळ चालणारी प्रक्रिया आहे; परंतु योग्य उपाययोजनांनी सकारात्मक बदल घडवून आणता येतो. व्यावसायिक मदत घेणे हा पहिला टप्पा यातून बाहेर पडायला मदत करू शकतो. टप्प्याटप्प्याने समुपदेशन घेणे, मानस शास्त्रातील तज्ज्ञ सुद्धा यावर उपाययोजना करू शकतात. कौटुंबिक चिकित्सा कोणत्याही आघातावर मात करण्यासाठी हा सर्वोत्तम उपाय आहे. यात थेरपिस्ट संपूर्ण कुटुंबाला एकत्र आणून सुरक्षित वातावरणात संवाद साधण्यास मदत करतात. कुटुंबातील सदस्यांनी एकमेकांना दोष न देता, आघातामुळे होणारे दुःख आणि भावना सुरक्षितपणे व्यक्त करायला शिकणे, स्वतःचा त्रास योग्य पद्धतीने बोलून दाखवणे, सीमा निश्चित करणे गरजेचे आहे. कुटुंबातील प्रत्येकाच्या वैयक्तिक गरजा आणि मर्यादांचा आदर करणे, प्रत्येकाला पुरेसं स्वातंत्र्य देणे, आपसात आदरभाव असणे अशावेळी अपेक्षित असते. आत्म-काळजी आणि आधार तसेच भावनिक नियमन म्हणजे माइंडफुलनेस आणि योगासारख्या तंत्रांनी तीव्र भावनांवर नियंत्रण मिळवायला शिकल्यास अशा किचकट परिस्थितीमधून मार्ग निघू शकतो. याबरोबरच स्वतःची काळजी घेणे, पुरेशी झोप, पौष्टिक आहार आणि नियमित व्यायामावर लक्ष केंद्रित करणे, ध्यानधारणा करणे, आध्यात्मिक कल वाढवणे, सकारात्मक विचार करणे पण गरजेचे असते. पिढीजात आघात मोडणे सुद्धा खूप महत्त्वाचे आहे. जागरूकता म्हणजेच आधीच्या पिढीतील आघात आणि त्याचे तुमच्या वर्तणुकीवर होणारे परिणाम ओळखणे, नवे आदर्श निर्माण करणे त्यासाठी जुन्या आणि नकारात्मक कौटुंबिक पद्धतींना ओळखून त्याऐवजी अधिक आरोग्यदायी आणि सकारात्मक वागणुकीचे नवीन आदर्श कुटुंबात स्थापित करणे खूप उपयोगी ठरते. शक्यतो नवीन पिढीच्या हातात कुटुंबातील सूत्र देणे, नवीन पिढीला पुरेसे निर्णय स्वातंत्र्य देऊन, त्यांना विश्वासात घेऊन, समाजातील चांगली उदाहरणे घेऊन त्यानुसार नवीन पिढी आपल्या कुटुंबाला अशा आघातातून बाहेर काढू शकते. बुरसटलेले जुनाट विचार, तोच तोचपणा, चुकीच्या समजुती, वाईट सवयी, चालीरीती खोडून नवीन उमेद आणि ऊर्जा घराला देण्यासाठी नवीन पिढीने प्रयत्नशील असणे गरजेचे आहे. कौटुंबिक आघात ओळखणे आणि त्यावर काम करणे हे कुटुंबासाठी एक मोठे आव्हान असले तरी, यामुळे कुटुंबातील संबंध अधिक मजबूत होतात आणि भविष्यातील पिढ्यांना या वेदनेतून मुक्त करण्याचा मार्ग मिळतो.- मीनाक्षी जगदाळे

फीड फीडबर्नर 17 Dec 2025 12:30 pm

“मत न दिल्यास लाडकी बहीण योजना बंद पडेल”; असा प्रचार सुरू असल्याचा भाजपचे माजी महानगरअध्यक्षांचा आरोप

Ladki Bahin scheme | भाजपचे माजी महानगर अध्यक्ष डॉ. अशोक ओळंबे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरुन गंभीर आरोप केला आहे. ‘आम्हाला निवडून दिले नाही तर लाडकी बहिणीचा १५०० रूपयांचा निधी बंद होईल, असे म्हणत भाजपकडून मतदारांना ब्लॅकमेलिंग केले जात असल्याचे अशोक ओळंबे यांनी म्हंटले आहे. अकोल्यात भाजपच्या माजी नगरसेवकांकडून ‘मत न दिल्यास लाडकी बहीण योजना […] The post “मत न दिल्यास लाडकी बहीण योजना बंद पडेल”; असा प्रचार सुरू असल्याचा भाजपचे माजी महानगरअध्यक्षांचा आरोप appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 17 Dec 2025 12:20 pm

Preity Zinta Tweet Dhurandhar: ‘धुरंधर’ पाहून प्रीती झिंटा भावुक, म्हणाली…हा चित्रपट नाही तर प्रत्येक देशभक्तासाठी प्रेमपत्र!

Preity Zinta Tweet Dhurandhar: वर्षाच्या शेवटी प्रदर्शित झालेला देशभक्तीवर आधारित चित्रपट ‘धुरंधर’ सध्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. बॉक्स ऑफिसवर ३०० कोटींचा टप्पा पार केलेल्या या चित्रपटाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. आता या यादीत अभिनेत्री प्रीती झिंटा यांचाही समावेश झाला आहे. प्रीती झिंटाने नुकताच थिएटरमध्ये ‘धुरंधर’ पाहिला. चित्रपट पाहिल्यानंतर तिने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर […] The post Preity Zinta Tweet Dhurandhar: ‘धुरंधर’ पाहून प्रीती झिंटा भावुक, म्हणाली… हा चित्रपट नाही तर प्रत्येक देशभक्तासाठी प्रेमपत्र! appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 17 Dec 2025 12:14 pm

मृणालच्या ड्रेसिंग स्टाईलवर चाहते फिदा! रॅम्प वॅाक करतानाचा व्हिडीओ व्हायरल

Actress Mrunal Thakur : अभिनेत्री मृणाल ठाकूर हि तिच्या सहजसुंदर अभिनयासाठी परिचित आहे. ती मराठी खूप सुंदर बोलते. सोशल मीडियावरचा तिचा वावरही कायम असतो. ती कुठे लाँग टूरवर गेली की, त्याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करत असते. तसेच मृणालची स्वतःची अशी एक ड्रेसिंग स्टाईल आहे, ज्या स्टाईलमुळे ती नेहमी चर्चेच्या केंद्रस्थानी असते. नुकतेच एका फॅशन इव्हेंटमध्ये […] The post मृणालच्या ड्रेसिंग स्टाईलवर चाहते फिदा! रॅम्प वॅाक करतानाचा व्हिडीओ व्हायरल appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 17 Dec 2025 12:11 pm

भारत-तुर्कस्तानचा परस्परांना शह

प्रा. जयसिंग यादवभारतासोबतच्या संबंधांमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, तुर्की इतर देशांशीही संबंध मजबूत करत आहे. पाकिस्तानला तुर्कीचा पाठिंबा सर्वश्रुत असला, तरी बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका, मालदीवसारख्या देशांमध्ये त्याचा वाढता प्रभाव भारतासाठी चिंतेचा विषय बनला आहे. या प्रयत्नांना तोंड देण्यासाठी भारत ग्रीस, सायप्रस आणि अर्मेनियासारख्या तुर्कीच्या प्रतिस्पर्ध्यांशी आपली भागीदारी मजबूत करण्यावर भर देत आहे.पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर हल्ला केला. ‘ऑपरेशन सिंदूर’अंतर्गत पाकिस्तानमधील शंभरहून अधिक दहशतवाद्यांना यमसदनी धाडले. पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. जगभरांतून पाकिस्तानच्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यात आला. फक्त तुर्कस्तानसह काही मूठभर पाकिस्तानधार्जिण्या देशांचा काय तो अपवाद. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळी तुर्कस्तानने पाकिस्तानला ड्रोन पुरवले. तेव्हापासून भारत आणि तुर्कीमधील संबंधांमध्ये बिघाड वाढला. पाकिस्तानने या संघर्षादरम्यान भारतीय लष्करी तळ आणि नागरी क्षेत्रांना लक्ष्य करण्यासाठी तुर्कीने पुरवलेल्या ड्रोनचा वापर केला. या ड्रोनमध्ये असीस्गार्ड आणि सोंगर सारख्या मॉडेल्सचा समावेश होता. नंतर भारताने या मुद्द्यावर तुर्कीकडे चिंता व्यक्त केली. तुर्की गेल्या अनेक वर्षांपासून पाकिस्तानला एफ-१६ फायटिंग फाल्कन जेट आणि बायरक्तर ड्रोन पुरवत आहे. तुर्की हा केवळ पाकिस्तानचा दुसरा सर्वात मोठा शस्त्रास्त्र पुरवठादार देश नाही, तर त्याच्या जवळच्या मित्रांपैकी एक आहे. भारतासाठी दीर्घकाळापासून चिंता असलेल्या काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानला त्याने सातत्याने पाठिंबा दिला आहे. लष्करी उपकरणे पुरवण्याव्यतिरिक्त तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगान यांनी मे महिन्यातील संघर्षादरम्यान पाकिस्तानला समर्थन दिले. या तणावातच भारत २९ ऑक्टोबर रोजी दिल्ली येथे आयोजित तुर्कीच्या राष्ट्रीय दिन समारंभापासून दूर राहिला. त्यानंतर लगेचच मीडिया रिपोर्टसनुसार, नोव्हेंबरमध्ये, तुर्कीने अमेरिकेची अपाचे हेलिकॉप्टर भारताला मिळण्यातही अडथळा आणला. त्यांना त्यांच्या हवाई हद्दीतून उड्डाण करण्याची परवानगी नाकारली.भारताच्या शेजाऱ्यांसोबत तुर्कीच्या वाढत्या संरक्षण कारवाया हिंदी महासागर प्रदेशावरील वाढत्या लक्षाचे प्रतिबिंब आहेत. भारताच्या जवळच्या मानल्या जाणाऱ्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना बांगलादेशमध्ये सत्तेवरून घालवल्यानंतर तुर्कीने मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारशी लष्करी संबंध अधिक मजबूत केले आहेत. ३ नोव्हेंबर रोजी तुर्कीच्या संसदीय शिष्टमंडळाला भेटल्यानंतर, युनूस म्हणाले की, बांगलादेश आपल्या लोकांसाठी नवीन संधी उघडण्यासाठी तुर्कीसोबत काम करण्यास तयार आहे. बांगलादेश तुर्कीकडून अनेक लष्करी उपकरणे खरेदी करण्यासाठी चर्चा करत आहे. त्यात बायरक्तार टीबी-२ ड्रोन, टीआरजी-३०० रॉकेट सिस्टीम आणि ओटोकर तलपर लाईट टँक यांचा समावेश आहे. लष्करी बातम्या देणाऱ्या बांगलादेशी वेबसाइटनुसार, बांगलादेश तुर्कीकडून ‘शिपर’ लांब पल्ल्याच्या हवाई संरक्षण प्रणाली खरेदी करण्याचा विचार करत आहे. काही भारतीय माध्यमांच्या वृत्तांनुसार, वाटाघाटी आधीच सुरू आहेत. बांगलादेश पारंपरिकपणे शस्त्रास्त्रांसाठी चीनवर अवलंबून राहिला असला, तरी तो आता तुर्कीकडून शस्त्रे खरेदी करत आहे. बांगलादेश २०२२ मध्ये तुर्कीचा सर्वोच्च शस्त्रास्त्र खरेदीदार बनला.बांगलादेशसोबतच्या वाढत्या मैत्री संबंधामुळे तुर्कीला बंगालच्या उपसागरात एक धोरणात्मक उपस्थिती मिळाली आहे. त्यामुळे काळ्या समुद्रापासून हिंदी महासागरापर्यंत त्याचा प्रभाव वाढतो. नोव्हेंबर २०२३ मध्ये मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइझ्झू यांनी पदभार स्वीकारल्यानंतर इस्तंबूलला पहिली भेट दिली. त्यानंतर मालदीव या आणखी एका हिंदी महासागरीय राष्ट्राशी तुर्कीने सहकार्य वाढले. यावर्षी मार्चमध्ये तुर्कीने मालदीवला स्वदेशी विकसित सशस्त्र ड्रोन दिले. त्यानंतर एप्रिलमध्ये तुर्कीने एक जुने नौदल जहाजदेखील भेट दिले. यापूर्वी, जानेवारी २०२४ मध्ये मालदीवने त्यांच्या विशेष आर्थिक क्षेत्राचे निरीक्षण करण्याची घोषणा केली. तुर्कीकडून लष्करी ड्रोन खरेदी करण्यासाठी ३७ दशलक्ष डॉलरचा करार करण्यात आला. २२ ते २७ जुलैदरम्यान इस्तंबूल येथे झालेल्या संरक्षण मेळाव्यात तुर्कीने भारताच्या आणखी एका शेजारी देशाशी, श्रीलंकेशी सहकार्य करार केला. जूनच्या सुरुवातीला तुर्की नौदल युद्धनौका कोलंबोमध्ये बंदिस्त होती. श्रीलंकेने तिचे वर्णन ‘वाढत्या संरक्षण सहकार्याचे प्रतीक’ असे केले होते. गेल्या आठवड्यात जोहान्सबर्ग येथे झालेल्या जी-२० शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी अंगोलाचे अध्यक्ष जोआओ लोरेन्को यांच्याशी हस्तांदोलन केले आणि एर्दोगान यांनी जर्मन चान्सलर फ्रेडरिक मर्झ यांच्याशी हस्तांदोलन केले; परंतु मोदी आणि एर्दोगन यांच्यात एकाच व्यासपीठावर असूनही राजशिष्टाचार म्हणूनही हस्तांदोलन झाले नाही. या देहबोलीतून दोन देशांमधील बिघडलेल्या संबंधाचे चित्र स्पष्ट होत होते.भारतीय माध्यमांच्या एका गटाचे म्हणणे आहे की, लष्करी सहकार्य मजबूत करण्याव्यतिरिक्त तुर्की भारताच्या शेजारी आपली गैर-लष्करी उपस्थिती आणि प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. तुर्कीच्या परराष्ट्र मंत्रालयाने ऑगस्ट २०१९ मध्ये आशियाई देशांसोबत सहकार्य वाढवण्याच्या उद्देशाने ‘आशिया : एक नवीन उपक्रम’ची घोषणा केली. तुर्कीच्या सरकार समर्थक येनी सफाक वृत्तपत्रात २९ मे रोजी प्रकाशित झालेल्या एका वृत्तात असेही म्हटले आहे की, दक्षिण आशियातील तुर्कीचा वाढता प्रभाव भारतासाठी चिंतेचा विषय बनला आहे. ‘फर्स्ट पोस्ट’ या भारतीय वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या एका भाष्यात म्हटले आहे की, एर्दोगान इस्लामिक जगाचा नेता बनण्याचा प्रयत्न करत आहेत. पाकिस्तान हा तुर्कीचा कनिष्ठ भागीदार असून यातील वैचारिक स्पर्धेत सहभागी आहे. तुर्की बांगलादेशमध्ये अनेक उच्चस्तरीय संवादांमध्ये सक्रिय आहे. यामध्ये इस्लामी पक्ष ‘जमात-ए-इस्लामी’शी संपर्कदेखील समाविष्ट आहे. भारतीय गुप्तचर सूत्रांचा हवाला देत सीएनएन-न्यूज१८ च्या एका अहवालात दावा करण्यात आला आहे की, तुर्की गुप्तचर संस्था बांगलादेशमधील इस्लामी गटांना, विशेषतः कट्टरपंथी ‘जमात-ए-इस्लामी’ला आर्थिक आणि लॉजिस्टिक सहाय्य करत आहे. तुर्की त्यांच्या ‘टीआयकेए’ या सरकारी मदत एजन्सीद्वारे बांगलादेशमधील रोहिंग्या निर्वासितांना महत्त्वपूर्ण मदत करत आहे.नेपाळमध्ये तुर्की सरकारच्या निधीतून चालणाऱ्या ‘आयएचएच’ या स्वयंसेवी संस्थेने कार्याचा विस्तार केला आहे. ते अल्पसंख्याक मुस्लीम लोकसंख्येसाठी मशिदी, मदरसे आणि इस्लामिक केंद्रांच्या बांधकामासाठी निधी देत आहे. तुर्कीची कार्यपद्धती दुहेरी असल्याचे दिसून येते. ती वैचारिक प्रभावासाठी मानवतावादी संपर्काचा वापर करत असतानाच राजकीय किंवा धोरणात्मक हेतूंसाठी वापरता येणारे आंतरराष्ट्रीय नेटवर्क तयार करत आहे. भारतीय मुख्य प्रवाहातील माध्यमांनी सूचित केले आहे की, भारत सरकार तुर्कीचे प्रतिस्पर्धी ग्रीस, सायप्रस आणि आर्मेनिया यांच्याशी भागीदारी करण्यावर पुन्हा भर देत आहे. दक्षिण आशियाच्या सुरक्षा क्षेत्रात तुर्कीचा अनपेक्षित प्रवेश भारताला असणाऱ्या धोक्याच्या गणितात बदल घडवत आहे. तुर्की आता दूरचा निरीक्षक राहिलेला नाही. तो सक्रिय अडथळा निर्माण करणारा देश बनला आहे. ‘आयएनएस त्रिकंद’ने १७-१८ सप्टेंबर रोजी ग्रीक नौदलाच्या जहाजांसह नौदल सराव केला. २४ सप्टेंबर रोजी सायप्रस नौदलासोबत असाच एक सराव झाला. हे संयुक्त सराव तुर्कीसाठी अडचणी निर्माण करू शकतात. शेजारी ग्रीसशी तुर्कीचे दीर्घकाळापासूनचे वैर आहे. तुर्कीच्या प्रतिस्पर्ध्यांसोबत नौदलाच्या सहभागाचा संदर्भ देत भारत पूर्व भूमध्यसागरीय आणि दक्षिण काकेशसमध्ये निर्णायकपणे आपली उपस्थिती दर्शवत आहे, तो तुर्कीच्या प्रादेशिक प्रभावाला धोरणात्मक प्रतिसाद देण्याचे संकेत देतो, असे एका वृत्तात म्हटले आहे.तुर्की आणि भारताचे व्यापारी संबंध मध्यम स्वरूपाचे आहेत; परंतु अलीकडेच तुर्कीविरुद्धच्या निदर्शनांमुळे आणि प्रवास निर्बंधांमुळे यावर परिणाम झाला आहे. भारतातील तुर्की गुंतवणुकीचाही आढावा घेतला जात आहे. राष्ट्रीय हितसंबंधांवर परिणाम झाल्यास तुर्की कंपन्यांना प्रकल्पांमधून काढून टाकले जाऊ शकते. सायप्रसच्या उत्तरेकडील भागावरील नियंत्रणावरून तुर्कीशी संघर्ष करणाऱ्या सायप्रसच्या सार्वभौमत्वाला आणि एकतेला भारत पाठिंबा देतो. त्यामुळे दोन देशांच्या व्यूहरचना परस्परांना शह-काटशह देणाऱ्या आहेत, हे स्पष्ट होते.

फीड फीडबर्नर 17 Dec 2025 12:10 pm

ग्रामीण भारताची ताकद

दी लेडी बॉस : अर्चना सोंडेपट्मादेवीभारतातील असंख्य आईसारखं तिला देखील वाटायचं आपल्या मुलांनी पोषक आहार घ्यावा. पोषक आहाराच्या सेवनाने आपली मुले सुदृढ असावीत. मात्र आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने ते शक्य नव्हतं. त्यात हा प्रदेश डोंगराळ. ना शेती करू शकत ना कोणती नोकरी. पण एक व्यवसाय तिला खुणावत होता तो म्हणजे दुग्धव्यवसाय. मात्र तो कसा सुरू करायचा हे काही ठाऊक नव्हतं. मात्र हाच तिच्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट ठरला. आपल्यासारख्या गरजू स्त्रियांना तिने एकत्र आणले. बचत गट स्थापन केला. त्या माध्यमातून अनेक महिलांना रोजगार मिळवून दिला. ही गोष्ट आहे उत्तराखंडच्या पट्मादेवीची.उत्तराखंडच्या डोंगराळ राज्यातील उत्तरकाशी जिल्ह्यातील बजलरी गावात आपले पती आणि मुलांसह पट्मादेवी राहते. २०१० मध्ये तिच्यासह नऊ जणांनी एकत्र येऊन एक बचत गट स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्यांना वाटले की, बचतगटाच्या माध्यमातून काही उपक्रम सुरू करणे उपयुक्त ठरेल. ज्यामुळे त्यांना उत्पन्न मिळू शकेल. आता या सगळ्याजणी उत्तराखंडमधील एक प्रमुख दूध पुरवठादार कंपनी असलेल्या आंचल डेअरीचे सदस्य आहेत.आंचल डेअरीची सुरुवात हिमालयन अॅक्शन रिसर्च सेंटर (एचएआरसी)च्या मदतीने करण्यात आली. एचएआरसी ही डेहराडून-स्थित एक स्वयंसेवी संस्था आहे. बजलारी, पमाडी, नारियुम्का आणि मांडा या चार गावांमधील एकूण ४० महिला दुग्ध व्यवसायात उतरल्या. पट्माच्या गावातून, त्यांच्या बचत गट सदस्यांसह १६ महिला आंचल डेअरीमध्ये सामील झाल्या. त्यांनी एचएआरसीद्वारे मदत केलेल्या स्थानिक बँकेकडून कर्ज घेतले. सुरुवातीला, बँकेने प्रत्येकी १५,००० रुपयांचे कर्ज दिले. जर या महिलांनी ही रक्कम निर्धारित वेळेत परत केली, तर त्यांना अधिक पैसे दिले जातील अशी अट देखील घातली गेली. या महिलांनी १५ महिन्यांमध्ये दरमहा १,००० रुपये परत केले. आठ महिला सदस्यांनी कर्ज घेतले होते. प्रत्येकीने संपूर्ण कर्जाच्या रकमेतून एक गाय खरेदी केली होती.जानेवारी २०११ मध्ये या महिलांनी दुसरे कर्ज घेतले. यावेळी कर्जाची रक्कम होती ३०,००० रुपये. पुन्हा एकदा, प्रत्येक महिलेने एक गाय खरेदी केली. पट्माची पहिली गाय एका दिवसात सुमारे आठ लीटर दूध देत असे. यापैकी तीन लीटर ती कुटुंबासाठी ठेवत असे तर उरलेले पाच लीटर दूध १८-२० रुपये प्रति लीटर दराने ती विकत असे. पट्माची सहकारी सदस्या सारदा देवीचा अनुभव बोलका आहे. ती म्हणते, “माझ्यासारख्या ज्या महिलांना पूर्वी उत्पन्नाचा कोणताही स्रोत नव्हता, त्यांच्यासाठी औषधे खरेदी करणे, घर दुरुस्ती करणे, मुलांच्या शाळेची फी आणि कपडे यांसारख्या घरगुती खर्चासाठी दूध विकून मिळणारे पैसे खूप उपयुक्त ठरतात.” हा दुग्ध उपक्रम एचएआरसीच्या कार्यक्रमाचा एक भाग आहे, ज्यामुळे ग्रामीण महिला शेतकऱ्यांना पर्यायी रोजगाराचे मार्ग निर्माण होतात. गेल्या काही वर्षांपासून हवामान बदलामुळे त्यांच्या जमिनीतून कमी उत्पन्न मिळत आहे.२०११ मध्ये, या स्वयंसेवी संस्थेने जिल्ह्यातील ग्रामीण महिलांना सूक्ष्म उद्योगांसाठी संधी निर्माण करण्यास मदत केली, ज्यामध्ये दुग्ध व्यवसाय, फुलशेती, शिवणकाम, विणकामासाठी हस्तकला यासाठी विविध स्वयं सहाय्यता गट स्थापन केले.एचएआरसीचे महेंद्र सिंह कुंवर यांना समजले की, समाजात महिलांचा सामाजिक दर्जा कमी आहे. त्याविषयी जागरूकता सुद्धा कमी होती. याउलट पुरुषांचे रोख रकमेवर नियंत्रण होते. म्हणून, महेंद्र कुंवर यांनी गट व्यवस्थापन, संघर्ष निराकरण, निर्णय घेणे, आर्थिक व्यवस्थापन, सूक्ष्म उद्योग विकास आणि विपणन कौशल्ये या विषयांमध्ये कठोर क्षमता बांधणी प्रशिक्षणाद्वारे महिला गटांचे संघटन आणि बळकटीकरण करण्यावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला.महिलांना सुलभ ठिकाणी स्थापन केलेल्या वेगवेगळ्या प्रक्रिया युनिट्समध्ये प्रशिक्षण देण्यात आले. १९६ महिलांच्या मुलाखतींवर आधारित एचएआरसीच्या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, जेव्हा महिलांनी बँकांमध्ये गट कर्जासाठी अर्ज केला तेव्हा त्यांना कर्ज मिळणे सोपे झाले. आकडेवारीवरून असेही दिसून येते की, महिलांच्या कर्जाच्या वाढत्या उपलब्धतेमुळे त्यांचे आर्थिक योगदान घरगुती पातळीवर दिसून आले आहे. आता या महिला कुटुंबाच्या विविध आर्थिक उपक्रमांमध्ये योगदान देत आहेत.कोणी घर बांधण्यासाठी पुढाकार घेत आहे, कोणी मुलांचे लग्न करून देत आहे. कोणी महिला आपल्या मुलाला किंवा आपल्या जोडीदाराला दुकान व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत करत आहे, तर काहीजणी आपल्या कुटुंबाची आरोग्य सेवा आणि मुलांचे शिक्षण पाहत आहे. काही महिलांनी तर स्वत:चे व्यवसाय सुरू केले आहेत. आज पट्मा देवीची मुले शाळेत जाण्यापूर्वी पराठे- दूध असा पोषक आहार घेतात. चांगल्या शाळेत जातात. खरं तर शहरातील लोकांना ही कामगिरी क्षुल्लक वाटेल. मात्र अनेक पिढ्या घरचा उंबरठा न ओलांडलेल्या महिलांसाठी स्वतःच्या पायावर उभे राहणे ही क्रांतिकारी गोष्ट आहे. पट्मा देवी आणि तिच्या महिला सहकारी सर्वार्थाने लेडी बॉस आहेत.

फीड फीडबर्नर 17 Dec 2025 12:10 pm

अर्धा प्याला रिकामा, की भरलेला

माेरपीस : पूजा काळेनाण्याच्या दोन बाजू समजून घेतल्या, तर दोन्ही तेवढ्याच महत्त्वाच्या वाटतात. तसंच काहीसं या पेल्याबद्दल बोलता येईल. मानसशास्त्रीय अभ्यास करताना अर्ध्या पेल्याचं उदाहरण दिल जातं. प्रथम दृष्टीला किंवा तुमच्या नजरेला काय दिसतं हे महत्त्वाचं असतं; परंतु दृष्टीपेक्षा दृष्टिकोन महत्त्वाचा असल्याने एखाद्या गोष्टीमागची कारणमीमांसा शास्त्रीयदृष्ट्या पटण्याजोगी असावी. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असल्याने प्रत्येकाचा दृष्टिकोन इथं वेगळा असू शकतो. त्यांच्या प्रतिक्रिया सरळ, विचित्र, बिनविचारी असू शकतात. मुळात तुमची विचारधारा इथं महत्त्वाची असल्याने धारेला धार आणत दिलं गेलेलं स्पष्टीकरण हे शंभर टक्के न्याय देणारं असावं, त्यात कुठेही उथळपणा किंवा बोथटपणा नसावा. जे जे वाटतं ते ते थेट बोलण्यापूर्वी समृद्ध विचारांची जुळणी करत उजळणी केलेली केव्हाही उत्तम म्हणावी लागेल. एक उदाहरण देताना मला नेहमी जाणवलेली एक गोष्ट इथं नमूद कराविशी वाटते. आजकाल कुठल्याही विषयावर थेट निशाणा साधणारे नेटकरी एखाद्या घटने वा अनुभवाचे तीनतेरा वाजवतात. जगात असलेली सगळी अक्कलहुशारी यांच्याकडे असल्यासारखी अक्कल पाजळतात. कुणाच्या खासगी गोष्टीत नको एवढे नाक खुपसून त्यांच जगणं सळो की पळो करतात. एखाद्या घटनेशी संबंधित ऊहापोह करून समोरच्याला जेरीस आणतात. याचा अर्थ समजायला आणि समजवायला गेलं, तर आगपाखड करून समजवणाऱ्याची बुद्धी काढतात. समाजभान नावाची गोष्ट आपण विसरत चालले आहोत. उचलली जीभ लावली टाळ्याला असं करणं म्हणजे बुद्धी गहाण टाकल्यासारखं होय. ज्याची सुरुवात आणि शेवट एका पातळीवर येऊन संपतो. वैचारिक पातळीचा अभाव, अज्ञानाचा राक्षस, संकुचित दूरदृष्टी यामुळे नेटकरी थेट निशाणा साधतात. सद्यस्थितीत माणसं एकमेकांना समजून न घेता नकारात्मक विचारांचं मोहोळ उडवताना दिसतात जे फार वाईट आणि समाजघातक आहे. आता पेल्याबद्दल विचार करू.अर्धा प्याला रिकामा की भरलेला यावर महत्त्वाचं विधान करण्यापूर्वी स्वत:च्या सदसदविवेकबुद्धीला जोर देऊन विचार करावा. अर्धा प्याला रिकामा की भरलेला यावर भाष्य करायचं झालं तर, सुखदुःखरूपी आयुष्याच्या पायवाटेत अनुभवायला आलेले प्रसंग, त्यातून तुम्हाला प्राप्त झालेले अगाध ज्ञान आणि त्या ज्ञानाचा तुमच्यावर झालेला योग्य तो परिणाम पाहता या पेल्याचं विवेचन करता येईल. पेला रिकामा की भरलेला यापेक्षा त्यातून प्रतीत होणारा समाज आणि त्यावर आधारित समाजमन प्रत्ययाला येईल. ग्लासाच्याप्रतिमेत माणसाचं प्रतिबिंब, त्याच्या सवयी, लकबी, आचार- विचार यांचं प्रतिनिधित्व करताना दिसतात.सकारात्मक विचारांच्या आवर्तनात असे दिसून येईल की, ग्लास केवळ पाण्यानेचं नाही, तर हवेनेही भरलेला आहे. थोडक्यात त्याला पूर्ण भरलेला म्हणता येईल. पण ज्यांच्यापाशी नकारात्मकता आहे त्यांना तो अर्धा पाण्याने भरलेला दिसेल. मला विचाराल तर, तो जे आहे ते म्हणजे तटस्थ न्युट्रल म्हणजे सर्वसमावेशक असेल. फार फार तर यात तहान महत्त्वाची आहे. कारण जे पाणी मला उपलब्ध झालंय. ते माझ्यासाठी त्यावेळी खूप महत्त्वाचं आहे. माझ्या तहानेची गरज अर्ध्या ग्लासाने भागत असेल, तर मला हा प्रश्न पडणार नाही. कारण मी माझी गरज समजून घेतलेली असेन. दुसरं माझा स्वभाव जो छोट्या-छोट्या गोष्टींत सुख-समाधान मिळवण्याचं कौशल्य माझ्यात राखतो आणि तिसरं म्हणजे समाजभान. समाजात वावरताना जाणीवपूर्वक नीतीमूल्यांची गाठ बांधून घेतली की, मनाला वेसण घालण्याचं काम आपसूक होतं.संत तुकाराम महाराज म्हणतात, बळ बुद्धी वेचुनिया शक्ती। उदक चालवावे युक्ती।... पाण्याचा वापर युक्तीने करा. हा मंत्र कोणत्याही काळाला लागू पडेल असा आहे. थोडक्यात जगण्याचा आनंद घेताना जगा आणि जगू द्या हा मंत्र आजमावता आला पाहिजे. सोशल मीडियाच्या काळात अनेक मतंमतांतर असू शकतात. यात आपली काय भूमिका असावी हा वस्तुपाठ आहे. ठेविले अनंते तैसेची रहावे, चित्ती असू द्यावे समाधान। या संत वचनात थोडासा बदल करून मी असे म्हणेन की, ठेविले अनंते ऊत्कर्ष साधावे, चित्ती असू द्यावे समाधान। परिस्थितीशी सामना करताना, आनंदाचं परिमाण शोधताना, घडलेले कष्ट माझ्या ठायी एवढे रुजलेत की, अर्धा पाण्याचा ग्लास समाधानानं अमृत म्हणून ओठी लावेन. यात अंतिम सत्य एकच असेल, त्यागापेक्षा तृप्तीतली विरक्ती महत्त्वाची.

फीड फीडबर्नर 17 Dec 2025 12:10 pm

गांधी घराण्याचे निष्ठावंत दिवंगत राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव भाजपमध्ये प्रवेश करणार! निवडणुकीच्या तोंडावर भाजपचा काँग्रेसला दणका

हिंगोली: गांधी घराण्याचे निष्ठावंत दिवंगत राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. प्रज्ञा सातव यांचा १८ डिसेंबर रोजी भाजप प्रवेश होणार आहे. स्वर्गीय राजीव सातव यांच्या निधनानंतर काँग्रेसकडून प्रज्ञा यांची विधानपरिषदेवर वर्णी लावण्यात आली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांनी गटबाजीला कंटाळून निर्णय घेतल्याची चर्चा आहे. राजीव सातव हे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे अत्यंत जवळचे आणि निष्ठावंत नेते होते. मात्र, कोरोना महामारीत अकाली निधनाने त्यांची राजकीय प्रवास कायमचा थांबला.प्रज्ञा सातव यांच्या पक्ष प्रवेशामुळे भाजपने काँग्रेसला तगडा झटका दिला असल्याची चर्चा आहे. हिंगोलीच्या राजकारणात एकेकाळी मोठे नाव असलेले माजी खासदार दिवंगत राजीव सातव हे नाव उच्चारले की विरोधकांच्या माना झुकायच्या. गोड वाणी, सुसंघटित संगठन, कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे नेतृत्व या जोरावर राजीव सातव यांनी हिंगोलीला काँग्रेसचा अभेद्य किल्ला बनवला. पण कोविडने सातव यांना हिरावून नेले आणि त्यानंतर पक्षाला उतरती कळा लागली.कोण आहेत प्रज्ञा सातव? डॉ. प्रज्ञा सातव या दिवगंत काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या पत्नी आहेत. राजीव सातव हे २०१४ ते २०१९ दरम्यान हिंगोलीचे खासदार होते. गांधी घराण्याच्या अत्यंत जवळचे असलेल्या राजीव सातव यांचे २०२१ मध्ये आजारपणामुळे निधन झाले. यानंतर त्यांच्या पत्नी प्रज्ञा सातव या महाराष्ट्र राज्य काँग्रेस समितीच्या उपाध्यक्ष असून सध्या विधान परिषदेच्या आमदार आहेत. काँग्रेस नेते शरद रणपिसे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर २०२१ साली विधानपरिषदेवर त्यांची बिनविरोध निवड झाली होती. प्रज्ञा सातव या पहिल्यांदा २०२१ मध्ये पोटनिवडणुकीत बिनविरोध निवडून आल्या होत्या. त्यानंतर २०२४ मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसकडून दुसऱ्यांदा विधानपरिषदेवर निवडून आल्या असून २०३० पर्यंत त्यांचा कार्यकाळ आहे.कोण होते राजीव सातव?राजीव सातव राहुल गांधी यांच्या अत्यंत विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक म्हणून ओळखले जात होते. २०१४ च्या मोदी लाटेत महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाचे केवळ दोन खासदार निवडून आले होते. त्यामध्ये राजीव सातव यांचा समावेश असल्याने ते प्रचंड चर्चेत आले होते. त्यानंतर राजीव सातव यांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्तुळात स्वत:चे स्थान निर्माण केले. सातव यांनी पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, विधानसभा सदस्य, लोकसभा सदस्य, राज्यसभा सदस्य म्हणून काम केले. तर युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस, गुजरातचे प्रभारी आणि काँग्रेस कार्य समितीचे सदस्य अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या होत्या.

फीड फीडबर्नर 17 Dec 2025 12:10 pm

मराठीच्या लढ्यातील ‘जागल्या’

मायभाषा : डॉ. वीणा सानेकरएका कार्यक्रमात खूप दिवसांनी डॉ. प्रकाश परब यांना ऐकण्याचा योग आला. मराठी साहित्य आणि भाषेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रकाश परब सर हे नाव माहीत नाही असे होणे शक्य नाही. व्याकरणाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रकाश परब यांचे पुस्तक कायम मार्गदर्शक ठरले. चर्चासत्र आणि परिसंवादातून सर कायम ठाम भूमिका मांडत आले आहेत. भाषा नियोजन हा सरांचा खास भाषाविषयक अभ्यासाचा विषय. साहित्याचा अभ्यास म्हणजे भाषेचा अभ्यास नव्हे, हा विचार मांडणाऱ्या सरांनी चौकटीबद्ध अभ्यासक्रमांच्या पलीकडे जाऊन मराठीशी निगडीत वेगवेगळे अभ्यासक्रम तयार करण्याची गरज वेगवेगळ्या महाविद्यालयांत जाऊन आवर्जून मांडली. मराठीच्या अभ्यासक्रमांना व्यवसायांच्या संधींशी जोडणे गरजेचे आहे हे गेली अनेक वर्ष सर आपल्या भाषणांतून आणि लेखनातून स्पष्ट करीत आहेत.सर स्वतः निवृत्तीपर्यंत मुंबईतील वझे महाविद्यालयात मराठीचे विभागप्रमुख होते. मराठी विभागांना लागलेली उतरती कळा हा त्यांच्या चिंतेचा विषय होताच, पण मराठीच्या विद्यार्थ्यांना आपण अर्थार्जनाच्या वेगवेगळ्या संधी उपलब्ध करून देऊ शकलो नाही, तर आपण त्यांचे अपराधी ठरू अशी त्यांची रास्त धारणा राहिली आहे.मुलुंड येथील एका कार्यक्रमात ते बोलत असताना सरांनी जे विचार व्यक्त केले ते अतिशय महत्त्वाचे आहेत. म्हणून त्यातले काही मुद्दे समोर ठेवते आहे. “आपल्या भाषेची चिंता करणाऱ्या व्यक्तीची आपल्या समाजात टवाळकी केली जाते. कारण चंद्र, सूर्य आहेत तोवर आपल्या भाषेला काहीही होणार नाही, अशी भाकिते करण्यात लोक मग्न राहिले.ज्या ज्या देशांनी आपल्या भाषेची शक्ती ओळखून मातृभाषेवर आधारित शिक्षण दिले त्यांची प्रगती अधोरेखित करण्याजोगी आहे. आर्थिक यश हेच जीवनाच्या केंद्रस्थानी आले. समाज ज्ञानार्थी असण्यापेक्षा पोटार्थी अधिक झाला. भाषिक जाणीव असलेला समाज तर आता जवळपास उरला नाही.मातृभाषेत शिक्षण घेणे थांबवून आज आपण दुय्यम दर्जाच्या निर्मितीवर समाधान मानत आलो. आज दिसणाऱ्या सांस्कृतिक भणंगीकरणाची चिकित्सा करणे गरजेचे आहे. स्थानिक भाषा शिकण्याची फळे आज जगभरातील लोक चाखत आहेत पण आपण मात्र ‘इंग्रजी ही एकच भाषा शिका. कारण तीच जगाची भाषा आहे ’ या प्रचाराला बळी पडत आहोत.परब सर वर्षानुवर्षे तळमळीने बोलत नि लिहीत आहेत. इतकेच नाहीत तर मराठीच्या लढाईत सरांचे स्थान मोठे आहे. आपण नुसत्या बनावटी श्रीमंतीला भुलून सांस्कृतिक अधःपात ओढवून घेत आहोत, ही जाणीव करून देणारा ‘जागल्या’ ही परब सरांची ओळख आहे.

फीड फीडबर्नर 17 Dec 2025 12:10 pm

अक्झो नोबेलचा शेअर धडाड! इंट्राडे १५% कोसळला 'या'कारणामुळे

मोहित सोमण: अक्झो नोबेल इंडिया लिमिटेड (Akzo Nobel India Limited) कंपनीचे शेअर आज जोरदार कोसळले आहेत. एका प्रसारमाध्यमांनी दिलेल्या सुत्रांच्या वृत्ताच्या आधारे शेअर मधील वाढलेल्या नकारात्मक प्रतिसादामुळे शेअरमधील सेल ऑफ वाढले असून मागणी घसरल्याने शेअर थेट १५% कोसळला असल्याने ३०८० रूपये प्रति शेअर व्यवहार करत होता. सकाळी ११.३० वाजेपर्यंत कंपनीच्या शेअर्समध्ये १२.७७% घसरण झाल्याने प्रति शेअर किंमत ३१६१.३० रूपयांवर व्यवहार करत आहे. काल एका आघाडीच्या वृत्तवाहिनीने कंपनीने ब्लॉक डील केल्याचे अहवालात म्हटले असल्याचे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर शेअर मोठ्या संख्येने कोसळला. माहितीनुसार अद्याप खरेदी व विक्रीदार यांची माहिती समोर आली नसली तरी ३१५९ रूपये प्रति शेअरसह १६३८.५ कोटीचे हे डील झाल्याचे सांगण्यात आले आहे.अहवालातील आणखी एका माहितीनुसार, १२९०.६ रूपये फ्लोअर प्राईजसह ३१५० रूपये प्रति शेअर असा सौदा झाल्याचे सांगण्यात येत आहे. ज्यामध्ये खरेदीदारांना १३% प्रति शेअर सवलत देण्यासहित हा व्यवहार झाला असल्याचे अहवालात म्हटले जात आहे. कंपनीच्या प्रमोटरनी ९% हिस्सा या सौद्यासहित विकण्याचे ठरवले होते असे अहवालात म्हटले आहे. उपलब्ध माहितीनुसार, डिसेंबर महिन्यात जेएसडब्लू पेंटस कंपनीने या अक्झो कंपनीचे ६०.७% इतका प्रभावी हिस्सा खरेदी केला होता ज्यामुळे व्यवस्थापनाचे नियंत्रण जेएसडब्लूकडे आले होते.यापूर्वी शेवटच्या सप्टेंबर तिमाहीत कंपनीला इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) ९७ कोटी तुलनेत वाढत १६८२ कोटीवर पोहोचला होता. मात्र महसूलात मात्र १५% घसरण झाल्याने महसूल १८७४ कोटीवर पोहोचला होता. कंपनीच्या नफ्यातील शीर्ष (Topline) वाढ झाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले होते. तसेच कंपनीच्या खर्चातही इयर ऑन इयर बेसिसवर ८६० कोटीवरुन ७४५ कोटींवर घसरण झाली होती.गेल्या ५ दिवसात शेअर १०.९९% घसरला असून एक महिन्याच्या कालावधीत शेअर ५.०८%% घसरला आहे. वर्षभरात कंपनीच्या शेअर्समध्ये ११.३५% घसरण झाली होती. अक्झो नोबल प्रामुख्याने केमिकल्स उद्योगात कार्यरत आहे.

फीड फीडबर्नर 17 Dec 2025 12:10 pm

ABC juice in Winter: हिवाळ्यात प्या ‘ट्रिपल एबीसी जूस’…चेहरा उजळेल, केसही होतील मजबूत

ABC juice in Winter: हिवाळ्याचा मौसम सुरू झाला की शरीराला जास्त पोषणाची गरज असते. या दिवसांत थंडीमुळे आजारपण वाढतेच, शिवाय त्वचा कोरडी पडते आणि केसांवरही वाईट परिणाम दिसू लागतो. अशा वेळी नैसर्गिक आणि पोषक पदार्थांचे सेवन खूप फायदेशीर ठरते. हिवाळ्यात तुम्ही रोज ‘ट्रिपल एबीसी जूस’ प्यायला सुरुवात केली, तर चेहरा आणि केसांवर त्याचा चांगला परिणाम […] The post ABC juice in Winter: हिवाळ्यात प्या ‘ट्रिपल एबीसी जूस’… चेहरा उजळेल, केसही होतील मजबूत appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 17 Dec 2025 11:48 am

“नॅशनल हेराल्ड प्रकरण गांधी कुटुंबाला त्रास देण्यासाठी…” ; काँग्रेस अध्यक्षांचा सरकारवर हल्लाबोल

mallikarjun kharge। नॅशनल हेरॉल्डशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीच्या आरोपपत्राची दखल घेण्यास विशेष न्यायालयाने नकार दिला होता. न्यायालयाच्या या निर्णयानंतर, विरोधी काँग्रेस पक्ष आता आक्रमक झाला आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राज्यसभा खासदार अभिषेक मनु सिंघवी यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारवर जोरदार हल्ला चढवला. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी द्वेषातून खटले दाखल केले जात […] The post “नॅशनल हेराल्ड प्रकरण गांधी कुटुंबाला त्रास देण्यासाठी…” ; काँग्रेस अध्यक्षांचा सरकारवर हल्लाबोल appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 17 Dec 2025 11:44 am

माणिकराव कोकाटेंच्या अडचणीत वाढ; कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

Manikrao Kokate | राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. त्यांना आता कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने शासकीय कोट्यातील सदनिका गैरव्यवहार प्रकरणी त्यांची दोन वर्षे कारावास आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा कायम ठेवत, त्यांच्या अटकेचे निर्देश दिले आहेत. यामुळे त्यांची आमदारकी आणि […] The post माणिकराव कोकाटेंच्या अडचणीत वाढ; कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 17 Dec 2025 11:24 am

सर्वात मोठी बातमी! ऐन निवडणुकीच्या धामधुमीत काँग्रेसला मोठा धक्का; महिला आमदार हाती कमळ घेणार?

Pragya Satav : राज्याच्या राजकारणातून एक सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेसचे स्वर्गीय नेते राजीव सातव यांच्या पत्नी आमदार प्रज्ञा सातव या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. ऐन निवडणुकाच्या काळात काँग्रेस पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. उद्या १८ डिसेंबर रोजी त्या आपल्या हाती कमळ घेणार असल्याचे सांगण्यात आले आहे. […] The post सर्वात मोठी बातमी! ऐन निवडणुकीच्या धामधुमीत काँग्रेसला मोठा धक्का; महिला आमदार हाती कमळ घेणार? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 17 Dec 2025 11:19 am

शेअर बाजारात सुधार ! सेन्सेक्स १७६ अंकांनी वधारला, निफ्टीने २५,९१६ ओलांडले

Stock Market Today। भारतीय शेअर बाजाराने आज आठवड्यातील तिसऱ्या व्यवहार दिवसाची सुरुवात सकारात्मक पद्धतीने केली. प्रमुख बेंचमार्क निर्देशांक, बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी ५०, हिरव्या रंगात उघडले. ३० शेअर्सचा बीएसई सेन्सेक्स निर्देशांक १७६.४० अंकांनी म्हणजेच ०.२१ टक्क्यांनी वाढून ८४,८५६.२६ वर पोहोचला, तर एनएसई निफ्टी ५० ४२.३० अंकांनी म्हणजेच ०.१६ टक्क्यांनी वाढून २५,९०२.४० वर उघडला. सकाळी […] The post शेअर बाजारात सुधार ! सेन्सेक्स १७६ अंकांनी वधारला, निफ्टीने २५,९१६ ओलांडले appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 17 Dec 2025 11:13 am

FSSAI संस्थेचे राज्यांना अन्न भेसळीविरोधी युद्धपातळीवर निर्देश,धाडसत्र सुरु होणार!

मुंबई: मोठ्या प्रमाणात अन्नातील घातक पदार्थाची भेसळ सुरू असताना सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. भारताच्या अन्न विभागाची सर्वोच्च अधिकार असलेली संस्था फूड सेफ्टी अथोरिटी ऑफ इंडिया (FSSAI) संस्थेने प्रत्येक राज्य व केंद्रशासित प्रदेशांतील सरकारांना संपूर्ण राज्यभरात धडक कारवाईचे आदेश दिले आहेत. संबंधित सरकारी विभाग व पथकांना 'स्पेशल ड्राईव्ह' या मोहिमेअंतर्गत अशा संशयी व अस्वच्छ विघातक अथवा भेसळयुक्त पदार्थ विक्रेते, भेसळ दूध विक्री करणाऱ्यावर छापा टाकण्याचे निर्देश (Directives) दिले असून मोठ्या प्रमाणात सरकारकडून हे 'क्रॅकडाऊन' असणार आहे. प्रसारमाध्यमांना सुत्रांनी संबंधित माहिती दिली असून लवकरच या ऑपरेशनला सुरुवात होणार आहे.इतकेच तर संस्थेने फूड सेफ्टी कंप्लायन्स सिस्टिम (FOSCOS) या प्रणाली अंतर्गत वेळोवेळी बदल लागू करुन त्यांचे रिपोर्टिंग संस्थेला करण्याचे निर्देश दिले. या प्रणालीअंतर्गत वेळोवेळी भेसळ संबंधित बाजारातील परिस्थितीवर लक्ष ठेवले जाऊन रियल टाईम बेसिसवर त्याचा अहवाल विभागाकडे सादर केला जाईल. यासह विविध राज्यराज्यातील अन्न सुरक्षा व पुरवठा याविषयी सहकार्य वाढवण्यासाठी काही मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली आहेत. २००६ साली झालेल्या अन्न सुरक्षा व मानक कायदा (Food and Safety Standards Act 2006) अंतर्गत ग्राहकांच्या हिताचे रक्षणाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी सरकार विशेष प्रयत्न करणार आहे. खासकरून यातील उपायोजना त्वरीत लागू करत प्रभावी अंमलबजावणी या कायद्याची केली जाणार आहे अशी प्राथमिक माहिती पुढे आली आहे.अलीकडेच सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यांतील सणासुदीच्या काळात दुग्धजन्य पदार्थांच्या खपात वाढ होत असल्याने भेसळ रोखण्यासाठी आणि अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी संस्था (FSSAI)ने विशेष पाळत आणि अंमलबजावणी मोहीम जाहीर केली होती. संस्थेने अधिकाऱ्यांना आता संवेदनशील ठिकाणांवर आणि महत्त्वाच्या जागांवर लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश दिले आहेत. यापूर्वीही'फूड सेफ्टी ऑन व्हील्स' (FSWs) या फिरत्या अन्न-चाचणी प्रयोगशाळा प्रमुख बाजारपेठांमध्ये तैनात करण्यात आल्या होत्या.

फीड फीडबर्नर 17 Dec 2025 11:10 am

लोणार सरोवराबाबत चिंतेची बाब; सरोवरात वाढतेय पाण्याची पातळी

बुलढाणा: पर्यटक आणि शास्त्रज्ञांचे आकर्षण केंद्र असलेल्या महाराष्ट्रातील जगप्रसिद्ध लोणार सरोवरातील पाण्याच्या पातळीत दिवसेंदिवस प्रचंड वाढ होत आहे. गेल्या सहा महिन्यांपासून सरोवरातील पाण्याची पातळी वाढत असल्याने चिंतेची बाब निर्माण झाली आहे. दरम्यान सुमारे पन्नास हजार वर्षांपूर्वी उल्कापाताने निर्माण झालेल्या या खाऱ्या पाण्याच्या सरोवरात कमळजा देवीचे मंदिर आता १५ फूट पाण्यात बुडाले आहे. महत्त्वाचे म्हणजे सरोवरातील कमळजा देवीचे मंदिर, जे कधीच पाण्याखाली गेले नव्हते, आता पूर्णपणे बुडाले आहे.गेल्या सहा महिन्यांपासून खाऱ्या पाण्याच्या लोणार सरोवरातील पाण्याच्या पातळीत प्रचंड वाढ होताना दिसत असल्याने चिंतेची बाब निर्माण झाली आहे. यावर संशोधन होणे गरजेचे आहे, असे सरोवर अभ्यासक सचिन कापूरे यांनी सांगितले. तसेच जिल्ह्यातील पर्यावरणप्रेमींनी पुरातत्व विभागाकडे पुढाकार घेण्याची मागणी केली आहे. या निर्माण झालेल्या कुतूहलाबाबत पुरातत्व विभागाने पुढाकार घेऊन निष्कर्ष काढावा अशी मागणी निसर्ग प्रेमी श्रीकांत भुसारी यांनी केली आहे. जिल्ह्यातील सामान्य नागरिक आणि ज्येष्ठ नागरिकही या बदलामुळे आश्चर्यचकीत झाले आहेत.https://prahaar.in/2025/12/17/whose-voice-will-resonate-at-shivaji-park-for-the-election-rally-the-ruling-party-and-the-opposition-are-both-insistent-on-the-same-date/सरोवराच्या पाण्याची पातळी का वाढत आहे, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. विश्वप्रसिद्ध असलेल्या या सरोवराच्या अभ्यासासाठी परदेशातून असंख्य पर्यटक आणि वैज्ञानिक येतात. पण खऱ्या पाण्याच्या या सरोवरात मासे का मिळत आहेत, पाण्याची पातळी का आणि कुठून वाढत आहे, हे रहस्य अजूनही गुलदस्त्यात आहे. या संवेदनशील विषयावर सखोल संशोधन करण्याची तीव्र गरज आहे. मात्र, संबंधित पुरातत्व विभागाकडून याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे, ही खेदाची बाब आहे.

फीड फीडबर्नर 17 Dec 2025 11:10 am

नागपूर-गोवा शक्तिपीठ होणारच

सुधारित आराखडा अंतिम मंजुरीसाठी राज्य सरकारकडेमुंबई : नागपूर ते गोवा प्रवास अतिजलद करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्ग बांधण्यात येणार आहे. शक्तिपीठ महामार्गाला सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग येथील स्थानिकांचा तीव्र विरोध आहे. या विरोधाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या निर्देशानुसार अखेर एमएसआरडीसीने शक्तिपीठच्या संरेखनात मोठे आणि महत्त्वाचे बदल केले आहेत.८०३ किमीच्या महामार्गातील अंदाजे २८० किमीच्या संरेखनात बदल करण्यात आला आहे. सुधारित संरेखनानुसार आता ८०३ किमीचा महामार्ग थेट ८४० किमीचा झाला आहे. राज्यातील हा आतापर्यंतचा सर्वाधिक लांबीचा महामार्ग ठरणार असून सुधारित संरेखनाचा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी आठवड्याभरात राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार आहे.एमएसआरडीसीने मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला कोकणाशी जोडण्यासाठी शक्तिपीठ महामार्ग बांधण्याचा निर्णय घेतला आहे. ८०३ किमीचा हा महामार्ग राज्यातील १२ जिल्ह्यातून जाणार होता. नागपूर, वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, लातूर, बीड, धाराशीव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधूदुर्ग असे हे जिल्हे आहेत.या जिल्ह्यातील महत्त्वाच्या धार्मिक स्थळापर्यंत पोहोचणे या महामार्गामुळे सोपे होणार आहे. त्यामुळे या मार्गाला शक्तिपीठ महामार्ग नाव देण्यात आले आहे. या महामार्गाच्या कामाअंतर्गत संयुक्त मोजणीचे काम सध्या सुरू आहे. तर ६० टक्के संयुक्त मोजणी पूर्ण झाली आहे. पण आता मात्र महामार्गातील संरेखनात मोठा बदल करण्यात आला आहे. कोल्हापूर, सांगली आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिकांच्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर एमएसआरडीसीने संरेखनात बदल केला आहे.सुधारित संरेखनानुसार चंदगड, आजरा परिसरात अंदाजे १० किमीने महामार्गाची लांबी वाढली आहे, तर साताऱ्यासह इतर भागांचा समावेश केल्याने महामार्गाची लांबी अंदाजे २५ किमीने वाढली आहे. त्यामुळे ८०३ किमीचा महामार्ग आता अंदाजे ८४० किमीचा झाल्याचेही सूत्रांनी सांगितले.दरम्यान नवीन संरेखनाचे काम पूर्ण झाले आहे. तेव्हा आठवड्याभरात नवीन महामार्गाच्या संरेखनाचा प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठविला जाणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.साताऱ्यातल्या काही भागांतून महामार्ग जाणारएमएसआरडीसीतील विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ८०३ किमीतील अंदाजे २८० किमीच्या संरेखनात बदल करण्यात आला आहे. सोलापूरपासून पुढीलच्या संरेखनात बदल करण्यात आला आहे. तर आता या महामार्गात सातारा जिल्हा समाविष्ट करण्यात आला असून साताऱ्यातली काही भागातून महामार्ग जाणार आहे. तसेच चंदगड, आजरा येथून महामार्ग नेण्यात येणार असून आधी सांगली, कोल्हापूरमधील ज्या भागातून महामार्ग जाणार होता तिथून हा महामार्ग आता जाणार नाही.

फीड फीडबर्नर 17 Dec 2025 11:10 am

वारकरी संप्रदायाचा सर्वोच्च बहुमान; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 'संत एकनाथ महाराज वारकरी सेवा गौरव पुरस्कार'जाहीर

पैठण : वारकरी संप्रदायामध्ये अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणारा आणि पैठण येथील श्री संत एकनाथ महाराज संस्थानकडून दिला जाणारा पहिला ‘शांतिब्रह्म संत श्री एकनाथ महाराज वारकरी सेवा गौरव पुरस्कार’ राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाहीर करण्यात आला आहे. वारकरी संप्रदाय आणि अध्यात्मिक क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल हा सन्मान करण्यात येत असल्याचे संस्थानने स्पष्ट केले आहे.ऐतिहासिक सोहळा आणि पुरस्कार वितरणहा पुरस्कार सोहळा दिनांक ९ मार्च २०२६ रोजी, श्रीक्षेत्र पैठण येथे नियोजित आहे. या दिवशी संत श्री एकनाथ महाराजांचा पावन समाधी सोहळा (नाथषष्ठी) असल्याने पैठणमध्ये भक्तीचा महापूर लोटलेला असतो. याच भक्तीमय वातावरणात आणि लाखो भाविकांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदे यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. संत श्री एकनाथ महाराज संस्थान आणि संत एकनाथ महाराज पालखी सोहळा समिती यांनी एका अधिकृत पत्राद्वारे या पुरस्काराची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे, संस्थान व पालखी सोहळा समिती यांच्या वतीने दिला जाणारा हा पहिलाच पुरस्कार असून, त्याची सुरुवात एकनाथ शिंदे यांच्या सन्मानाने होत आहे, ही विशेष बाब मानली जात आहे.https://prahaar.in/2025/12/17/a-matter-of-concern-regarding-lonar-lake-the-water-level-in-the-lake-is-rising/वारकरी सेवेचा गौरवउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारकरी संप्रदाय, महाराष्ट्राची संत परंपरा आणि अध्यात्मिक क्षेत्राच्या वाढीसाठी सातत्यपूर्ण आणि प्रेरणादायी योगदान दिले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत संस्थानने त्यांची या सर्वोच्च पुरस्कारासाठी निवड केली आहे. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी सुमारे पाच लाखांहून अधिक वारकरी उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.यापूर्वीही मिळाले आहेत मानाचे पुरस्कारवारकरी संप्रदायाकडून एकनाथ शिंदे यांचा गौरव होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्यांना ‘भक्त शिरोमणी संत नामदेव महाराज पुरस्कार’ आणि ‘श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले आहे. आता पैठण संस्थानच्या या पुरस्कारामुळे त्यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

फीड फीडबर्नर 17 Dec 2025 11:10 am

Nephrocare IPO Listing Update: नेफ्रोकेअर हेल्थ सर्विसेस आयपीओचे अनपेक्षित दमदार लिस्टिंग ८.७० प्रिमियम प्रति शेअरसह बाजारात सूचीबद्ध

मोहित सोमण: नेफ्रोकेअर हेल्थ सर्विसेस (Nephrocare Health Services Limited) कंपनी आज शेअर बाजारात सूचीबद्ध (Listed) झाली आहे. ८७१.३९ कोटी बूक व्हॅल्यु असलेल्या आयपीओचे आज ८.७०% प्रिमियमसह अनपेक्षितपणे दमदार लिस्टिंग झाले आहे. प्रति शेअर मूळ प्राईज बँड असलेल्या ४६० बदली प्रति शेअर ४९० रूपयांला सूचीबद्ध झाला आहे. कंपनीच्या आयपीओची शेवटची जीएमपी (Grey Market Price GMP) ८.०४% अधिक प्रिमियम होती. त्याहून अधिक चांगला प्रतिसाद मिळाल्याने शेअरचे यशस्वी लिस्टिंग झाले आहे. १० ते १२ डिसेंबर दरम्यान हा आयपीओ बाजारात दाखल झाला होता. १५ डिसेंबरला आयपीओचे वाटप (Allotment) पात्र गुंतवणूकदारांना निश्चित करण्यात आले होते. आज १७ डिसेंबरला शेअर बीएसई व एनएसईवर सूचीबद्ध (Listed) करण्यात आलेला आहे. आयपीओपूर्वी कंपनीने २६०.२६ कोटी रूपये अँकर गुंतवणूकदारांकडून प्राप्त केले होते.कंपनीला एकूण १४.०८ पटीने सबस्क्रिप्शन मिळाले होते. पब्लिक इशूपैकी २.३६ वेळा रिटेल गुंतवणूकदारांकडून, २६.८२ पटीने पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून, २४.७७ पटीने विना संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून सबस्क्रिप्शन आयपीओला मिळाले. एकूण आयपीओतील ३५३.७५ कोटी रुपयांचा फ्रेश इशू असून उर्वरित ५१७.६४ कोटी मूल्यांकनांचे शेअर ऑफर फॉर सेल (OFS) साठी उपलब्ध होते.२०१० मध्ये स्थापन झालेली नेफ्रोकेअर हेल्थ सर्व्हिसेस लिमिटेड ही हेल्थकेअर कंपनी असून कंपनी भारत आणि निवडक आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमधील क्लिनिक्सच्या विस्तृत जाळ्याद्वारे संपूर्ण डायलिसिस सेवा प्रदान करते. ही कंपनी निदान, हेमोडायलिसिस, घरगुती आणि मोबाईल डायलिसिस, आणि आरोग्य कार्यक्रम यांसारख्या सेवा देते. उपलब्ध माहितीनुसार, ३० सप्टेंबर, २०२५ पर्यंत, नेफ्रोकेअरची ५१९ क्लिनिक्स कार्यरत होती. त्यापैकी ५१ क्लिनिक्स फिलिपाइन्स, उझबेकिस्तान आणि नेपाळमध्ये होती. यामध्ये उझबेकिस्तानमधील जगातील सर्वात मोठ्या डायलिसिस क्लिनिकचा समावेश आहे. भारतात, कंपनीची २१ राज्ये आणि ४ केंद्रशासित प्रदेशांमधील २८८ शहरांमध्ये उपस्थिती होती. एकूण क्लिनिकपैकी सुमारे ७७.५३% क्लिनिक्स टियर २आणि टियर ३ शहरांमध्ये होती.विक्रम वुपला, बेसेमर व्हेंचर पार्टनर्स ट्रस्ट, एडोरास इन्व्हेस्टमेंट होल्डिंग्स पीटीई. लिमिटेड, हेल्थकेअर पॅरेंट लिमिटेड, इन्व्हेस्टकॉर्प प्रायव्हेट इक्विटी फंड II (2) आणि इन्व्हेस्टकॉर्प ग्रोथ अपॉर्च्युनिटी फंड हे कंपनीचे प्रवर्तक (Promoter) आहेत. आर्थिक बाजू पाहिल्यास, कंपनीच्या महसूलात इयर ऑन इयर बेसिसवर ३४% वाढ आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये झाली असून करोत्तर नफ्यात (PAT) ९१% वाढला आहे. तिमाही बेसिसवर (QoQ), मार्च २०२५ मधील ७६९.९२ कोटींच्या तुलनेत सप्टेंबर महिन्यात ४८३.९७ कोटींवर घसरण झाली. कंपनीच्या करोत्तर नफ्यात तिमाही बेसिसवर ६७.१० कोटीवरुन १४.२३ कोटींवर घसरण झाली आहे. ईबीटाही तिमाही बेसिसवर घसरला असून मार्च तिमाहीतील १६६.६४ कोटी तुलनेत सप्टेंबर तिमाहीत ११०.३१ कोटींवर घसरला आहे.

फीड फीडबर्नर 17 Dec 2025 11:10 am

नवी मुंबई विमानतळाची तिसऱ्या धावपट्टीकडे वाटचाल

सिडकोकडून सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरूनवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दीर्घकालीन विकासाच्या दृष्टीने सिडकोने विमानतळावर तिसरी समांतर धावपट्टी उभारण्याच्या दृष्टीने सविस्तर तांत्रिक व व्यावसायिक व्यवहार्यता तपासण्यासाठी सल्लागार नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी पात्र व नामांकित एकल संस्था अथवा संयुक्त भागीदार संस्थांकडून निविदा जारी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.सिडको प्रशासनाकडून या माध्यमातून भविष्यातील प्रवासी व माल वाहतुकीचा अंदाज, पायाभूत सुविधांची गरज, आर्थिक व्यवहार्यता, पर्यावरणीय बाबी तसेच दीर्घकालीन विमान वाहतूक मागणी लक्षात घेऊन तिसऱ्या धावपट्टीची आवश्यकता आणि उपयुक्तता तपासली जाणार आहे. दरम्यान, २०३७ नंतरच्या दीर्घकालीन विमान वाहतूक मागणीचा विचार करता नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर तिसरी धावपट्टी उभारण्याचा पर्याय सध्या तपासण्यात येत आहे. सुमारे १,१६० हेक्टर क्षेत्रफळावर विकसित होत असलेला हे आंतरराष्ट्रीय विमानतळ दरवर्षी ९० दशलक्ष प्रवासी आणि ३.२ दशलक्ष टन माल वाहतूक हाताळण्यासाठीच्या क्षमतेचा आहे.या विमानतळाची रचना दोन समांतर व स्वतंत्र धावपट्ट्यांसह करण्यात आली असून, चार परस्पर जोडलेल्या प्रवासी टर्मिनल्सचा यामध्ये समावेश आहे. त्यातच नवी मुंबई विमानतळाचा विकास पाच टप्प्यांत केला जात असून, पहिला व दुसरा टप्पा पूर्ण झाला आहे.या विमानतळाहून देशांतर्गत विमानसेवा २५ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर तिसऱ्या धावपट्टीचा अभ्यास हा राज्यातील विमान वाहतूक क्षेत्राच्या भविष्यासाठी महत्त्वाचा टप्पा मानला जात असून, मुंबई महानगर प्रदेशाच्या वाढत्या आर्थिक व औद्योगिक गरजांना चालना देणारा ठरणार आहे.नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दीर्घकालीन विकासाच्या दृष्टीने सिडकोने घेतलेला हा निर्णय सिडकोच्या दूरदृष्टीपूर्ण पायाभूत सुविधा नियोजनाची साक्ष देणारा आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा परिसराच्या दीर्घकालीन विकासाच्या गरजांनुसार सातत्याने विकसित होत राहील, याची खात्री करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.- विजय सिंघल, व्यवस्थापकीय संचालक, सिडको

फीड फीडबर्नर 17 Dec 2025 11:10 am

मोखाड्यात अवैध स्फोटकांची विक्री तेजीत

मोखाडा : मोखाड्यात गेले काही महिने स्फोटकांची विक्री बंद झाली होती; परंतु गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा स्फोटकांची विक्री होत असून नागरिक मासेमारी करण्यासाठी या भू सुरुंग स्फोटकांचा वापर करत असल्याचे दिसून येत आहेत. यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत किंवा गंभीर दुखापती होत आहेत; परंतु अशी जीवघेणी स्फोटके काही खेड्यात सर्रासपणे विक्री केली जात असताना ही विक्री करणाऱ्यांवर कारवाई होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. काही ग्रामीण भागात मासेमारी करताना सुरक्षित जाळ्यांचा किंवा कायदेशीर पद्धतींचा वापर करण्याऐवजी, काही लोक धोकादायक आणि स्फोटकांसारख्या अवैध वस्तूंचा वापर करत आहेत. या पद्धतीमुळे जास्त मासे मिळतील अशी त्यांची अपेक्षा असते, पण यात प्रचंड धोका आहे.अशा धोकादायक पद्धती वापरताना अनेक अपघात घडले आहेत. स्फोटकांचा अयोग्य वापर केल्याने अनेकांनी आपले हात गमावले आहेत, तर काही तरुणांना आपले जीवही गमवावे लागले आहेत. या घटना असूनही, काही ठिकाणी ही धोकादायक पद्धत अजूनही सुरू असल्याचे दिसून येते.नागरिकांच्या मते, या धोकादायक पद्धतींचा वापर आणि काही ठिकाणी अवैध वस्तूंची विक्री होत असल्याची माहिती असूनही प्रशासनाकडून पुरेशी कारवाई होत नाहीये. अशा अवैध कामांवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत.सुरक्षित मासेमारीचे महत्त्वमासेमारी हा उदरनिर्वाहाचा एक मार्ग असू शकतो, पण तो सुरक्षित आणि कायदेशीर मार्गानेच व्हायला हवा. केवळ जास्त फायद्यासाठी किंवा माशांच्या हव्यासापोटी आपला आणि आपल्या कुटुंबाचा जीव धोक्यात घालणे अत्यंत चुकीचे आहे. संबंधित प्रशासकीय आणि पोलीस यंत्रणांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन अवैध पद्धतींवर नियंत्रण आणणे आवश्यक आहे, जेणेकरून अशा दुर्घटना थांबतील आणि लोकांचे जीव वाचतील.

फीड फीडबर्नर 17 Dec 2025 11:10 am