IPL Auction : यंदाच्या आयपीएल लिलावामध्ये लागू होणार टाय ब्रेकर नियम; जाणून घ्या या नियमाबद्दल…
आयपीएल 2026 स्पर्धेसाठी मिनी लिलाव प्रक्रिया 16 डिसेंबर 2026 रोजी पार पडणार आहे. या लिलावाला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. सध्या रिलीज केलेल्या खेळाडूंनंतर केकेआर आणि सीएसकेच्या ताफ्यात सर्वाधिक रक्कम शिल्लक आहे. तर मुंबई इंडियन्सकडे सर्वात कमी 2.75 कोटी रुपये शिल्लक आहेत. मात्र यंदाच्या लिलावात एका नियमाने क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साह निर्माण होणार आहे. हा […] The post IPL Auction : यंदाच्या आयपीएल लिलावामध्ये लागू होणार टाय ब्रेकर नियम; जाणून घ्या या नियमाबद्दल… appeared first on Dainik Prabhat .
कात्रज–कोंढवा रस्ता लवकर पूर्ण करणार, कोंढवा मेट्रोने शहराशी जोडणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुणे : कात्रज-कोंढवा मार्गाचे काम लवकरात पूर्ण करण्यात येईल, मेट्रोच्या माध्यमातून कोंढव्याचा भाग इतर भागाशी जोडण्यात येईल. शिवाजी नगर ते येवलेवाडी मेट्रोमार्गाला मान्यता, स्वारगेट ते कात्रज मेट्रोमार्ग कोंढव्यापर्यंत आणणे आणि पुरंदर विमानतळाशी जोडणारी प्रस्तावित मेट्रोच्या माध्यमातून या भागाला जोडण्यात येईल,असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. श्री भैरवनाथ ग्रामविकास मंडळाच्यावतीने कोंढवा बु. येथे उभारण्यात […] The post कात्रज–कोंढवा रस्ता लवकर पूर्ण करणार, कोंढवा मेट्रोने शहराशी जोडणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस appeared first on Dainik Prabhat .
घरोघरी म्युच्युअल फंड पोहोचवण्यासाठी NCDEX व्यासपीठाला इक्विटी गुंतवणूकीसाठी सेबीची मान्यता
मोहित सोमण: नॅशनल कमोडिटी अँड डेरिएटिव एक्सचेंज (NCDEX) कंपनीला म्युच्युअल फंड गुंतवणुक प्राप्त करण्यासाठी सेबीने (Security Exchange Board of India SEBI) तत्वतः मान्यता दिल्याचे आज घोषित केले आहे. कंपनीने आज ही घोषणा करताना इक्विटी व इक्विटी बेंचमार्क डेरिएटिव गुंतवणूक गोळा करण्याची मान्यता प्राप्त केल्याने याचा फायदा गुंतवणूकदारांनाही होणार आहे. खासकरून ग्रामीण व निमशहरी भागात इक्विटी गुंतवणूकीत वाढ होण्यासाठी काही प्रयोजन म्हणून कंपनीने ही योजना आखली होती. अद्याप टीयर ४, टीयर ३ शहरांत अपेक्षित वाढ इक्विटी अथवा म्युच्युअल फंड गुंतवणुकीत नाही यासाठी हे पाऊल उचलताना कंपनीने हे पाऊल उचलले. एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार,' प्रस्तावित प्लॅटफॉर्मचा उद्देश, विशेषतः ग्रामीण आणि निमशहरी भागांमध्ये कमी रकमेच्या सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) सारख्या वैशिष्ट्यांद्वारे म्युच्युअल फंड गुंतवणुकीची पोहोच वाढवणे हा आहे. तसेच, अतिरिक्त व्यवसायाची संधी देऊन सध्याच्या ट्रेडिंग सदस्यांना पाठिंबा देणे आणि इक्विटी सेगमेंट सुरू होण्यापूर्वी कॅश-मार्केटचा आधार (Base) तयार करणे हा देखील याचा उद्देश आहे.' असे म्हटले.एनसीडीईएक्स (NCDEX) कंपनीची उपकंपनी (Subsidiary) असलेल्या एनसीएएल (National Commodity Clearing Limited NCCL) कंपनी ही म्युच्युअल फंड सबस्क्रिप्शन व क्लिअरिंग या मूलभूत गोष्टीसाठी जबाबदार असणार आहेत. यापूर्वी नोव्हेंबर महिन्यात एनसीडीईएक्सवर या शेतकी कमोडिटीचा व्यासपीठावर म्युच्युअल फंडाचे वितरण इलेक्ट्रॉनिक्स माध्यमातून करण्यासाठी नियामकांनी मान्यता दिली होती. आता थेट गुंतवणूकदारांना या म्युच्युअल फंडात गुंतवणूक या व्यासपीठावर करता येणार आहे असे समजत आहे.यापूर्वीही ऑगस्ट महिन्यात एनसीडीईएक्सने आपल्या सेवांचा विस्तार करण्याच्या आणि भारतातील मुख्य प्रवाहातील प्रमुख स्टॉक एक्स्चेंजशी थेट स्पर्धा करण्याच्या योजनेचा भाग म्हणून डेरिव्हेटिव्ह्जसह इक्विटी-संबंधित उत्पादनांमध्ये ट्रेडिंग सुरू करण्यासाठी प्राथमिक मंजुरी सेबीकडून मिळवली होती. २००३ साली या कमोडिटी व कमोडिटी डेरिएटिव व्यासपीठाची स्थापना झाली होती. एनसीडीईएक्स (NCDEX) हे सेबी नियंत्रित स्टॉक एक्स्चेंज असून भारतातील सर्वात आघाडीचे कृषीविषयक कमोडिटी एक्सचेंज बाजार हणून ओळखले जातो.याविषयी माध्यमांना प्रतिक्रिया देताना एनसीडीईएक्सचे एमडी आणि सीईओ डॉ. अरुण रास्ते म्हणाले आहेत की,' इक्विटी लाँच होण्यापूर्वी म्युच्युअल फंड प्लॅटफॉर्म लाँच करणे हा एक धोरणात्मक आणि वेळेवर घेतलेला निर्णय आहे. नवीन गुंतवणूकदारांसाठी म्युच्युअल फंड हे सर्वात सोपा आणि सुरक्षित सुरुवातीचा पर्याय आहे आणि आमचा विश्वास आहे की येथूनच भारताचा इक्विटी प्रवास सुरू होतो. एनसीडीईएक्सचे म्युच्युअल फंड प्लॅटफॉर्म ग्रामीण आणि व निमशहरी भागातील बचतीला चालना, वाढती उत्पादकता व नियंत्रित गुंतवणूक मार्गांमध्ये रूपांतरित करण्यासाठी व इक्विटीमध्ये अधिक सहभागासाठी एक चांगला मार्ग तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. कमी रकमेच्या एसआयपी आणि सुरक्षित एक्सचेंज आधारित पायाभूत सुविधांसह हे आम्हाला भारतासाठी बहु-मालमत्ता (Mutli Asset) व्यासपीठ प्रदान करण्याच्या दिशेने एक पाऊल आहे.
अखेर प्रतीक्षा संपली! मुंबई, पुणे, नागपूरसह २९ शहरांत 'इलेक्शन'चा धुराळा; निकाल कधी ? वाचा सविस्तर
मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या आणि राज्याच्या राजकारणाचे लक्ष वेधून घेतलेल्या राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा बिगुल अखेर वाजलं आहे. राज्य निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेत या निवडणुकांचा अधिकृत कार्यक्रम जाहीर केला असून, आजपासूनच संबंधित क्षेत्रांत आचारसंहिता लागू झाली आहे. येत्या १५ जानेवारीला मतदान होणार असून दुसऱ्याच दिवशी म्हणजेच १६ जानेवारीला निकाल जाहीर केला जाईल.प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर मार्ग मोकळाओबीसी आरक्षणाच्या कायदेशीर पेचामुळे या निवडणुका गेल्या ५ ते ७ वर्षांपासून प्रलंबित होत्या. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानंतर आणि राज्य सरकारला ३१ जानेवारी २०२६ ची मुदत दिल्यानंतर आयोगाने वेगाने हालचाली केल्या आहेत. यापूर्वी २ डिसेंबरला नगरपरिषदांच्या निवडणुका पार पडल्या, आता महानगरांचा नंबर लागला आहे.निवडणुकीची ठळक वैशिष्ट्ये आणि नियम:या निवडणुकांसाठी १ जुलै २०२५ ची मतदार यादी ग्राह्य धरण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून ही यादी आल्याने त्यात नावे वगळण्याचे अधिकार राज्य आयोगाला नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे. एकूण ३ कोटी ४८ लाख मतदार हक्क बजावतील. राज्यात ३९,१४७ केंद्रे असतील, त्यापैकी एकट्या मुंबईत १०,१११ केंद्रे असतील. यावेळी उमेदवारी अर्ज केवळ 'ऑफलाईन' (Offline) पद्धतीने स्वीकारले जातील. ज्या उमेदवारांकडे सध्या जात वैधता प्रमाणपत्र (Caste Validity) नाही, त्यांना निवडून आल्यानंतर ६ महिन्यांत ते सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे. मुंबई महापालिकेत एक सदस्यीय वॉर्ड असेल (मतदाराला १ मत), तर उर्वरित २८ महापालिकांत बहुसदस्यीय प्रभाग पद्धती (१ ते ५ सदस्य) असल्याने मतदारांना त्यानुसार मतदान करावे लागेल.https://www.youtube.com/watch?v=WZ8k5KlQ3asनिवडणूक आयोगाने दिलेली महत्त्वाची माहिती मतदारयाद्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा घोळ नाही. जो काही थोडाफार घोळ होता, त्यात सुधारणा केली आहे. छापील मतदारयाद्या राजकीय पक्षांना आजच्या आज दिल्या जातील. मतदानाच्या ४८ तास आधी प्रचार तोफा थंडावणार दुबार मतदारांबाबत दोन दिवसांपूर्वी राजकीय पक्षांसोबत बैठक झालेली आहे. त्यात त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले आहे. दुबार मतदार हे महानगरपालिका निहाय केवळ पाच टक्के ते वीस टक्के आढळून आले आहेत. मुंबईत सात टक्के दुबार मतदार आढळलेले आहेत. नागपूर महानगरपालिकेत पन्नास टक्क्यांची आरक्षण मर्यादा ओलांडली गेली आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या कोणत्याही परिस्थितीत सर्व महानगरपालिकांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्यामुळे आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या पालिकांच्या निवडणुका देखील होतील. मात्र या निवडणुका सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम आदेशाच्या अधीन असतील.महापालिकेच्या निवडणुकीचे वेळापत्रक कसं असेल? मतदानाची तारीख - १५ जानेवारी मतदानाचा निकाल - १६ जानेवारी २७ महापालिकांची मुदत संपली आहे. यासोबत जालना आणि इचलकरंजी या दोन नवीन महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत.या महापालिका निवडणुकांसाठी १ जुलै २०२५ रोजीची मतदान यादी ग्राह्य धरण्यात येणार आहे. ही यादी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आली असल्याने त्यामध्ये नावे वगळण्याचे अधिकार राज्य आयोगाला नाहीत असं स्पष्ट करण्यात आलं आहे. एकूण मतदार - ३.४८ कोटी एकूण मतदार केंद्र - ३९,१४७ मुंबईसाठी मतदार केंद्र - १०,१११ कंट्रोल यूनिट - ११,३४९ बॅलेट यूनिट - २२,०००या ठिकाणी निवडणूक होणारमुंबई विभागमुंबईनवी मुंबईठाणेकल्याण-डोंबिवलीवसई-विरारभिवंडीपनवेलमीरा भाईंदरउल्हासनगरपश्चिम महाराष्ट्रपुणे विभागपिंपरी-चिंचवडकोल्हापूरसांगलीसोलापूरइचलकरंजीउत्तर महाराष्ट्रनाशिक विभागअहिल्यानंगरधुळेजळगावमालेगावमराठवाडा विभागलातूरनांदेड-वाघाळापरभणीजालनाछत्रपती संभाजीनगरविदर्भनागपूरअकोलाअमरावती
मोहित सोमण:सलग दुसऱ्यांदा सोन्याने प्रचंड मोठी उसळी घेतली आहे. मोठ्या प्रमाणातील अस्थिरतेचा फटका सोन्यातील दबावात परावर्तित झाल्याने सोन्यातील रॅली आजही कायम राहिली आहे. एकाच सत्रात १ पातळीहून अधिक सोने उसळल्यने सोन्याचे दर २ महिन्यातील उच्चांकावर पोहोचले आहेत. 'गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात १४७ रूपयांनी, तर २२ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात १३५ व १८ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात १११ रूपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे प्रति ग्रॅम दर २४ कॅरेटसाठी १३५३८, २२ कॅरेटसाठी १२४१० रूपयांवर, १८ कॅरेटसाठी १०१५४ रुपयांवर पोहोचले. तर प्रति तोळा किंमतीत २४ कॅरेटमागे १४७० रूपये, २२ कॅरेटमागे १३५० व १८ कॅरेटमागे १११० रूपये दर वाढले. त्यामुळे प्रति तोळा दर २४ कॅरेटसाठी १३५३८०, २२ कॅरेटसाठी १२४१००, १८ कॅरेटसाठी १०१५४० रुपयांवर पोहोचले आहेत. केवळ एकाच सत्रात सोन्यात १% हून अधिक वाढ भारतीय कमोडिटी बाजारात (Mutli Commodity Exchange MCX) झाली आहे. संकेतस्थळावरील उपलब्ध माहितीनुसार, मुंबईसह भारतातील प्रमुख शहरातील सोन्याचे प्रति ग्रॅम सरासरी दर २४ कॅरेटसाठी १३६५३, २२ कॅरेटसाठी १२५१५, १८ कॅरेटसाठी १०४४० रूपयांवर पोहोचले आहेत.संध्याकाळपर्यंत भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये सोने निर्देशांकात १.१५% उसळले आहे. त्यामुळे दरपातळी १३५१५७ रूपयांवर व्यवहार करत आहे. जागतिक पातळीवर पाहिल्यास संध्याकाळपर्यंत सोन्याच्या निर्देशांकात १% वाढ झाली असून युएस गोल्ड स्पॉट निर्देशांकात ०.८५% वाढ झाल्याने प्रति डॉलर दरपातळी ४३३८.९२ औंसवर पोहोचली आहे. युएस भारत व्यापारी धोरणातील अद्याप अनिश्चितता, रूपयांची प्रति डॉलर ९०.७३ पातळीवर सुरु असलेली विक्रमी पातळी या कारणामुळे भारतीय सराफा बाजारात सोन्यात सातत्याने वाढ होत आहे. दुसरीकडे काही प्रमाणात डॉलर निर्देशांकात सातत्याने वाढ होत असताना सोन्याचे दर स्थिर होत होते. मात्र तुलनात्मकदृष्ट्या डॉलर निर्देशांकात किरकोळ घसरणीमुळे सोन्यावरील दबाव वाढला. याच कारणामुळे सोने आज आणखी महाग झाले आहे.जागतिक बाजारात युएस फेडरल रिझर्व्ह व्याजदरात २५ बेसिसने कपात झाली होती भारतातही आरबीआयने २५ बेसिसने कपात केल्याने व्याजदर आटोक्यात आले. फेड दर ३.५० ते ३.७५% पातळीवर व रेपो दर ५.५०% पातळीवर सुरु असल्याने परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक सातत्याने अस्थिरतेत काढून घेतली. या काढलेल्या गुंतवणूकीमुळे रूपयाची मागणी व महत्व कमी झाल्याने रूपया निचांकी पातळीवर घसरला. दरम्यान डॉलरच्या बास्केटमध्ये सातत्याने वाढ झाल्याने पुढील लक्ष गुंतवणूकदारांचे सोन्यासह रूपयावरही असणार आहे असे दिसते. विशेषतः युएस बाजारातील उद्या सीपीई व पेरोल रोजगार आकडेवारी जाहीर होणार असल्याने दिवसभरात सोने अस्थिर होते.आता पुढे काय?सोन्याच्या हालचालींवर विश्लेषण करताना एलकेपी सिक्युरिटीजचे वरिष्ठ तांत्रिक विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले आहेत की,'आंतरराष्ट्रीय स्पॉट सोन्याच्या किमती ४३६० डॉलरच्या पातळीकडे वाढल्याने सोन्याचे दर आणखी वाढले, ज्यामुळे देशांतर्गत बाजारात मोठी तेजी दिसून आली. एमसीएक्समध्ये सोन्याने जागतिक तेजीचे प्रतिबिंब दाखवत सुमारे १७०० रूपयांची मोठी वाढ नोंदवली आणि १३५२५० च्या जवळ एक नवीन विक्रमी उच्चांक गाठला. सुरक्षित गुंतवणुकीच्या वाढलेल्या मागणीमुळे आणि आगामी अमेरिकन आर्थिक आकडेवारीबद्दलच्या अपेक्षांमुळे ही वाढ झाली. या आठवड्यात नॉन-फार्म पेरोल्स आणि कोअर PCE (Personal Consumption Expenditure CPE) किंमत निर्देशांक जाहीर होणार असल्याने लक्ष आता अमेरिकेच्या मॅक्रो आर्थिक संकेतांवर केंद्रित झाले आहे, ज्यामुळे बाजारात अस्थिरता कायम राहण्याची शक्यता आहे. सोन्याचे दर आता १३३००० ते १३६४५०० या उच्च श्रेणीत व्यवहार करताना दिसत आहेत.'यासह घसरलेल्या रूपयावरही भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले आहेत की,' भारत-अमेरिका व्यापार करारातील विलंब आणि परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांकडून सुरू असलेल्या विक्रीमुळे रुपयावर दबाव राहिल्याने, रुपया २८ पैशांनी कमकुवत होऊन ९०.७० वर पोहोचला. सोने आणि चांदीच्या वाढलेल्या किमतींमुळे आयात बिलावर आणखी परिणाम झाला असून, त्यामुळे रुपयाची कमजोरी वाढली आहे. नजीकच्या काळात रुपया ९०.०० ते ९१.२५ रुपयांच्या मर्यादेत व्यवहार करण्याची शक्यता आहे.'
पुणे : मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या आणि अद्यापही अपूर्ण असलेल्या कात्रज–कोंढवा रस्त्याने सोमवारी आणखी एक निष्पाप बळी घेतला. इस्कॉन मंदिराजवळील धोकादायक आणि काम सुरू असलेल्या या रस्त्यावर दुचाकी व कंटेनरचा भीषण अपघात होऊन शिक्षिकेचा जागीच मृत्यू झाला. पतीचे १५ वर्षांपूर्वी निधन झालेल्या या महिलेच्या अपघाती मृत्यूमुळे तिची मुलगी पूर्णपणे पोरकी झाली आहे. खडीमशीन चौकाकडून कात्रजच्या […] The post अपूर्ण रस्ता ठरतोय मृत्यूचा सापळा; कात्रज–कोंढवा रोडवर शिक्षिकेचा कंटेनरखाली येऊन दुर्दैवी मृत्यू, मुलगी पोरकी appeared first on Dainik Prabhat .
IPL Auction 2026 : आयपीएल ऑक्शन कधी, कुठे आणि किती वाजता पार पडणार? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
IPL Auction 2026 : इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल 2026 च्या मिनी-ऑक्शनची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. आयपीएलमधील सर्वच्या सर्व १० संघ आपल्या स्क्वॉडला अधिक मजबूत करण्यासाठी सर्वोत्तम प्लेयर्सच्या शोधात आहेत. यंदाच्या आयपीएल लिलावात भरल्या जाणाऱ्या 77 स्लॉट्ससाठी सर्व फ्रँचायझींकडे मिळून तब्बल 237.55 कोटी इतकी रक्कम उपलब्ध आहे. तर परदेशी खेळाडूंसाठी 27 जागा शिल्लक आहेत. […] The post IPL Auction 2026 : आयपीएल ऑक्शन कधी, कुठे आणि किती वाजता पार पडणार? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स appeared first on Dainik Prabhat .
मोठी बातमी! 29 महापालिकांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला; 15 जानेवारीला मतदान…पहा महत्वाच्या तारखा
मुंबई – राज्य निवडणूक आयोगाची आज सोमवारी (दि. 15 डिसेंबर) दुपारी चार वाजता पत्रकार परिषद झाली. यावेळी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी महापालिका निवडणुकांची घोषणा केली. वाघमारे यांनी सांगितले की, बृहन्मुंबई महापालिकेत 1 सदस्यीय प्रभाग आहे. त्यामुळे येथील मतदारांना 1 मत द्यावे लागेल. 28 महापालिका या बहुसदस्यीय आहेत. बहुतांश महापालिकांत एका प्रभागात 4 उमेदवार […] The post मोठी बातमी! 29 महापालिकांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला; 15 जानेवारीला मतदान… पहा महत्वाच्या तारखा appeared first on Dainik Prabhat .
जुन्नर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात आठ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू
जांबुत : बिबट सफारीचे स्वप्न पाहिलेल्या जुन्नर तालुक्यात देखील बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र थांबायला तयार नसल्याचे दिसून येत आहे. पारगाव तर्फे आळे येथे सोमवारी (दि. १५) दुपारी बारा वाजेच्या सुमारास कांदा काढणीचे काम सुरू असताना शेताच्या बांधावर बसलेल्या एका आठ वर्षीय मुलावर दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला केला आणि त्याला ऊसाच्या शेतात ओढून नेले. या […] The post जुन्नर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात आठ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू appeared first on Dainik Prabhat .
Shafali Verma : शफाली वर्माला ICC कडून सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू पुरस्कार जाहीर
Shafali Verma : ICC कडून प्रत्येक महिन्यातील सर्वोत्तम महिला आणि पुरुष क्रिकेटपटूला प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार देण्यात येतो. त्यानुसार नोव्हेंबर २०२५ महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूंच्या पुरस्काराची घोषणा आज करण्यात आली. भारताच्या शफाली वर्माला हा प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार देण्यात आला. भारताची युवा फलंदाज शफाली वर्माने नोव्हेंबरमध्ये महिला वनडे वर्ल्ड कप २०२५ स्पर्धेतील अंतिम सामना […] The post Shafali Verma : शफाली वर्माला ICC कडून सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू पुरस्कार जाहीर appeared first on Dainik Prabhat .
गौरी गर्जे मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट; पती अनंत गर्जेला पुन्हा एसआयटीकडून अटक
मुंबई : भाजपच्या आमदार आणि मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नी गौरी गर्जे यांच्या मृत्यू प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे. या प्रकरणात पती अनंत गर्जे याला विशेष तपास पथकाने पुन्हा अटक केली आहे.काही दिवसांपूर्वी गौरी गर्जे यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती. उच्चशिक्षित महिला आणि राजकीय वर्तुळाशी संबंधित व्यक्तीची पत्नी असल्याने या घटनेची राज्यभर चर्चा झाली होती. प्रकरण उघडकीस आल्यानंतर वरळी पोलिसांनी अनंत गर्जे याला अटक केली होती.गौरी गर्जे मृत्यू प्रकरणाच्या तपासासाठी राज्य सरकारने विशेष तपास पथकाची स्थापना केली. हिवाळी अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी स्थापन करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता एसआयटीकडून थेट कारवाई करत अनंत गर्जे याला दुसऱ्यांदा अटक करण्यात आली आहे.
खलनायक अक्षय खन्नाच्या भूमिकेचा जलवा, ‘धुरंधर’ने मोडले ‘छावा’-‘पुष्पा २’चे रेकॉर्ड
मुंबई : ‘छावा’ आणि ‘पुष्पा २’नंतर बॉक्स ऑफिसवर पुन्हा एकदा मोठा भूकंप घडवणारा सिनेमा म्हणजे ‘धुरंधर’. आदित्य धर दिग्दर्शित या चित्रपटाने अवघ्या दहा दिवसांत कमाईचे सगळे जुने आकडे मागे टाकले असून रविवारी झालेली कमाई तर ऐतिहासिक ठरली आहे.‘धुरंधर’ने केवळ कमाईचे रेकॉर्ड मोडले नाहीत, तर हिंदी सिनेमातील पारंपरिक हिरो-व्हिलनचं समीकरणही बदलून टाकलं आहे. चित्रपटाचा नायक रणवीर सिंग असला, तरी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे ते खलनायकाची भूमिका साकारणारा अक्षय खन्ना. त्याचा थरारक आणि प्रभावी अभिनय हा सिनेमाचा सर्वात मोठा यूएसपी ठरत आहे. ‘धुरंधर’साठी दुसरा रविवार विशेष ठरला. रिलीजच्या दहाव्या दिवशी चित्रपटाने भारतात तब्बल ५८.२० कोटी रुपयांची नेट कमाई केली. हिंदी सिनेसृष्टीतील आतापर्यंतची ही सर्वाधिक रविवारची कमाई मानली जात आहे.चित्रपटाच्या कमाईचा आलेख पहिल्या दिवसापासून सातत्याने वरच चढत गेला. पहिल्या आठवड्यात सोमवारपासूनच रोजच्या कमाईत वाढ होत गेली. मंगळवार, बुधवार आणि त्यानंतर दुसऱ्या आठवड्यातही हीच गती कायम राहिली. दुसऱ्या आठवड्यातील शुक्रवार, शनिवार आणि रविवारी ‘धुरंधर’ने पुन्हा एकदा रेकॉर्डब्रेक कमाई नोंदवली.या यशामागे केवळ भव्य अॅक्शन किंवा दिग्दर्शन नाही, तर अक्षय खन्नाचा धडाकेबाज खलनायकाचा रोल हे मोठं कारण ठरत आहे. सोशल मीडियावर हिरोपेक्षा खलनायकाचीच अधिक चर्चा रंगताना दिसत आहे. अनेक प्रेक्षक अक्षय खन्नाचा अभिनय पाहण्यासाठी पुन्हा पुन्हा थिएटरमध्ये जात आहेत. याच कारणामुळे ‘धुरंधर’ने ‘छावा’ आणि ‘पुष्पा २’सारख्या मोठ्या चित्रपटांनाही कमाईत मागे टाकल्याचं स्पष्ट झालं आहे.दुसऱ्या आठवड्यात सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत ‘धुरंधर’ अव्वल स्थानी पोहोचला आहे. ‘छावा’ने दुसऱ्या आठवड्यात १४०.७२ कोटींची कमाई केली होती, तर ‘पुष्पा २’ने हिंदीत १२८ कोटींचा टप्पा गाठला होता. हे दोन्ही रेकॉर्ड आता ‘धुरंधर’ने मोडीत काढले आहेत.
मोहित सोमण: आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात अखेरच्या सत्रात घसरण झाली आहे. विशेषतः सकाळच्या घसरणीनंतर हा संकेत कायम असतानाही दुपारपर्यंत बाजाराने पुन्हा मोठ्या पातळीवर रिकव्हरी केल्याचे स्पष्ट दिसून आले. तांत्रिकदृष्ट्या ही घसरण कायम राहिल्याने सेन्सेक्स ५४.३० अंकाने घसरत ८५२१३.३६ व निफ्टी १९.६५ अंकाने घसरत २६०२७.३० पातळीवर स्थिरावला आहे. विशेषतः आज गुंतवणूकदारांनी सततच्या परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी सुरु ठेवलेल्या विक्रीचा परिणाम म्हणून आपल्या गुंतवणूकीत सावधगिरी राखली आहे. तसेच आपल्या खरेदीत नियंत्रण आणले तरी मजबूत फंडामेंटलचा टेक्निकल अंडरकरंट कायम राहिल्याने शेअर्स अखेरच्या सत्रात समाधानकारक पातळीवर रिबाऊंड झाल्याने दिसून आले.दुसरीकडे युएस भारत यांच्यातील नसलेल्या अपेक्षित ट्रिगरसह रूपयात झालेल्या महाविक्रमी घसरणीचा फटका मात्र निश्चितपणे बसला आहे. सेन्सेक्स बँक व बँक निफ्टीतही चांगल्या पद्धतीने रेपो दरातील कपातीचा परिणाम म्हणून सुधारणा झाल्याने आज किरकोळ वाढीसह हे निर्देशांक बंद झाले. याव्यतिरिक्त व्यापक निर्देशांकातील विशेष म्हणजे सकाळच्या मिडकॅप मधील जागा घसरणीने घेतली असून स्मॉलकॅप शेअर्समध्ये वाढलेल्या गुंतवणूकीमुळे हा निर्देशांक तेजीत कायम राहिल्याचा कयास बांधला जात आहे. यासह स्मॉलकॅप १०० (०.२१%), स्मॉलकॅप २५० (०.३६%) निर्देशांकात घसरण झाली असून निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात सर्वाधिक वाढ मिडिया (१.७९%), आयटी (०.२९%), पीएसयु बँक (०.४६%), एफएमसीजी (०.६९%) निर्देशांकात झाली असून सर्वाधिक घसरण ऑटो (०.९१%), फार्मा (०.३९%), हेल्थकेअर (०.२९%), फायनांशियल सर्विसेस एक्स बँक (०.५%) निर्देशांकात झाली आहे.समाधानकारक बाब म्हणजे सकाळी ५% पेक्षा अधिक पातळीवर व्यवहार करत असलेला अस्थिरता निर्देशांक (VIX Volatility Index VIX) १.४०% पातळीवर पोहोचला. हेवी वेट शेअर्समध्ये झालेली पडझड अखेरच्या सत्रात रिबाऊंड झाल्याने बाजाराला फायदा झाला. एचडीएफसी, अँक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, टाटा मोटर्स शेअर्समध्ये घसरण झाली असून रिलायन्स इंडस्ट्रीज, इन्फोसिस, डिक्सन टेक्नॉलॉजी, हिंदुस्थान युनिलिव्हर, हिंदुस्थान कॉपर यांसारख्या शेअर्समध्ये वाढ झाली. जागतिक बाजारात पाहता अखेरच्या सत्रात आशियाई बाजारातील गिफ्ट निफ्टी (०.१७%) सत्र. हेंगसेंग (१.४८%), कोसपी (०.८७%), शांघाई कंपोझिट (०.५५%) निर्देशांकात घसरण झाली असून वाढ केवळ स्ट्रेट टाईम्स (०.०६%), सेट कंपोझिट (१.५२%) निर्देशांकात झाली आहे. युएस बाजारातील सुरूवातीच्या कलात डाऊ जोन्स (०.५२%) बाजारात वाढ झाली असून एस अँड पी ५०० (१.०७%), नासडाक (१.७२%) निर्देशांकात झाली आहे.अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ प्राज इंडस्ट्रीज (१०.०९%), टीआरआयएल (९.३१%), एथर एनर्जी (६.२२%), आरती इंडस्ट्रीज (५.४२%), एनबीसीसी (५.३१%), उषा मार्टिन (४.७४%), कजारिया सिरॅमिक (४.३०%), गोदावरी पॉवर (३.६०%) निर्देशांकात झाली असून सर्वाधिक घसरण पीटीसी इंडस्ट्रीज (३.८८%), सीसीएल प्रोडक्ट (३.५३%), बीएसई (३.१५%), आदित्य बिर्ला कॅपिटल (३.०७%), आदित्य बिर्ला फॅशन (२.८८%), न्यू इंडिया अँन्शुरन्स (२.७५%), एचडीएफसी एएमसी (२.५३%), वोडाफोन आयडिया (२.४९%), एम अँड एम (१.९५%) समभागात झाली आहे.आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले आहेत की,'परदेशी निधीचा सतत होणारी जावक (Outflow) आणि कमकुवत रुपया यामुळे बाजारपेठा मर्यादित कक्षेत राहिल्या आहेत, आणि भारत-अमेरिका व्यापार कराराबाबत स्पष्टता येईपर्यंत चलन अस्थिरता कायम राहण्याची शक्यता आहे. आर्थिक आणि राजकोषीय वाढीच्या घटकांच्या पाठिंब्याने, आर्थिक वर्ष २०२६ च्या उत्तरार्धात कमाईत सुधारणा होण्याच्या अपेक्षांमुळे बाजारातील भावना स्थिर होण्यास मदत होत आहे. पुढे जाऊन, बाजाराची गती मूल्यांकनावर आधारित न राहता, कमाईवर आधारित असेल अशी अपेक्षा आहे.गुंतवणूकदार अमेरिकेतील ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) महागाई आणि बेरोजगारीच्या आकडेवारीसह महत्त्वाच्या आर्थिक निर्देशकांची देखील वाट पाहत आहेत, जे जागतिक तरलतेच्या अपेक्षा आणि २०२६ साठीच्या व्याजदर दृष्टिकोनाला आकार देतील.'
तेजस्वी घोसाळकरांच्या भाजप प्रवेशानंतर सासरे विनोद घोसाळकर भावूक; म्हणाले, अभिषेक असता तर…
मुंबई : शिवसेना (उबाठा) नेते व माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या सून व माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी सोमवारी भाजपमध्ये प्रवेश केला. यानंतर त्यांचे सासरे विनोद घोसाळकर यांनी एका मराठी वृत्त वाहिनीशी सवांद साधला. यावेळी भावूक होत त्यांचा कंठ दाटून आला आणि डोळे पाणावले. ते म्हणाले, अभिषेक असता तर हा प्रश्न आला नसता. अभिषेक आणि […] The post तेजस्वी घोसाळकरांच्या भाजप प्रवेशानंतर सासरे विनोद घोसाळकर भावूक; म्हणाले, अभिषेक असता तर… appeared first on Dainik Prabhat .
नागपूर – राज्यात स्मार्ट मीटर बसवण्याचा निर्णय केंद्र शासनाच्या योजनेंतर्गत घेण्यात आला आहे. सामान्य घरगुती ग्राहकांना प्रीपेड मीटर लावले जाणार नाहीत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले. प्रश्नोत्तराच्या तासात विधानसभा सदस्य भास्कर जाधव आणि रईस शेख यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सुरुवातीला प्रत्येक ग्राहकाला प्रीपेड स्मार्ट मीटर लावण्याचा […] The post घरगुती वीज ग्राहकांना मोठा दिलासा: ‘तो’ निर्णय बदलला; स्मार्ट, प्रीपेड मीटरबाबत मुख्यमंत्री फडणवीसांचे मोठे विधान appeared first on Dainik Prabhat .
वीज कंत्राटी कामगारांना १३ वर्षांनी न्याय
आंदोलनांना यश, २,२८५ कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरीअलिबाग : वीज मंडळातील कंत्राटी कामगारांच्या दीर्घ प्रतीक्षेला अखेर न्याय मिळाला असून, तब्बल १३ वर्षांच्या सततच्या लढ्यानंतर औद्योगिक न्यायालयाने राज्यातील २,२८५ कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याचे आदेश दिले आहेत. २०१२ पासूनची वेतन तफावतही भरून काढण्याचे स्पष्ट निर्देश न्यायालयाने वीज मंडळाला दिले आहेत.२०१२ मध्ये वीज मंडळातील कंत्राटी कामगारांनी कायम नोकरीची मागणी करीत आंदोलन, निवेदने, न्यायालयीन लढा अशा विविध मार्गांनी संघर्ष सुरू केला होता. अनेकांच्या जीवनातील अनिश्चितता या दीर्घ कालावधीत वाढली. कायदेशीर प्रक्रियेदरम्यानलकाही कामगारांचे निधन झाले, तर काही निवृत्त झाले; मात्र न्यायालयाने मयत व निवृत्त कामगारांच्या कुटुंबीयांनाही योग्य भरपाई द्यावी असा महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे. या ऐतिहासिक निर्णयानंतर उरण तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यातील वीज कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. उरणमधील कामगारांनी एकमेकांना पेढे भरवत आनंदोत्सव साजरा केला. दीर्घकाळाच्या अनिश्चिततेनंतर मिळालेल्या या न्यायामुळे अनेक कुटुंबांची आर्थिक भविष्याविषयीची काळजी दूर झाली आहे. वीज कंत्राटी कामगार संघटनांनी न्यायालयाच्या आदेशाचे स्वागत करीत, हा न्याय आमच्या संघर्षाचा विजय आहे असे म्हटले आहे. अनेक वर्षे कंत्राटी पद्धतीत काम करताना भोगलेल्या अडचणींचा आता शेवट होईल, अशी प्रतिक्रिया कामगारांनी दिली.न्यायालयीन आदेशानुसार वीज मंडळाने लवकरच कायमस्वरूपी नेमणुका प्रक्रिया सुरू करणे, २०१२ पासूनची वेतन तफावत अदा करण्याची योजना जाहीर करणे, मयत/निवृत्त कामगारांच्या कुटुंबीयांना भरपाई देणे या सर्व महाराष्ट्रातील कंत्राटी कामगारांसाठी हा निर्णय प्रक्रिया पूर्ण कराव्या लागणार आहेत. महत्त्वाचा टप्पा मानला जात असून, भविष्यातील कामगार धोरणांवरही याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. निश्चित वेतन, पेन्शन सुविधांचा लाभन्यायालयाच्या निर्णयामुळे महाराष्ट्रातील २,२८५ कंत्राटी कामगारांच्या भविष्यास सुरक्षितता मिळाली आहे. कायमस्वरूपी नोकरीमुळे कामगारांना निश्चित वेतन, निवृत्तीवेतन निधी (पेंशन/पीएफ), वैद्यकीय सुविधा, नोकरीतील स्थैर्य हे सर्व आता उपलब्ध होणार आहेत.
मोहित सोमण: भारतासाठी आणखी एक उत्साहाचा क्षण बाजारात साजरा केला जात आहे. कारण नोव्हेंबर महिन्यात भारताच्या व्यापारी तूटात घसरण होऊन अस्थिरतेच्या काळात निर्यातीत गेल्या १० वर्षांतील सर्वाधिक वाढ नोंदवली आहे. इयर ऑन इयर बेसिसवर वित्तीय तूट ऑक्टोबर महिन्यातील ४१.६८ अब्ज डॉलर तुलनेत नोव्हेंबर महिन्यात २४.५३ अब्ज डॉलरने घसरली आहे. तसेच मर्चंडाईज निर्यातही १० वर्षातील सर्वोच्च पातळीवर पोहोचली. गेल्या नोव्हेंबर तुलनेत या नोव्हेंबरमध्ये इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) ६४.०५ अब्ज डॉलरवरून वाढत ७३.९९ अब्ज डॉलर या रेकोर्ड ब्रेक पातळीवर वाढ नोंदवली आहे.यासह एकूणच वित्तीय तूटीतही झालेली घसरण ही सोने, तेल, कोळसा इत्यादी कमोडिटीतील आयातीत घसरण झाल्याने नोंदवली गेली आहे. यासह वाढलेल्या व्यापारातील लक्षणीय वाढीमुळे निर्यात नोव्हेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात वाढली. अस्थिरतेच्या काळातही व्यापार निर्यात इयर ऑन इयर बेसिसवर ३१.९४ अब्ज डॉलरवरून नोव्हेंबर महिन्यात ३८.९४ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. सहाजिकच आयातीत इयर ऑन इयर बेसिसवर ६३.८७ अब्ज डॉलरवरून ६२.५५ अब्ज डॉलरवर घसरण झाली. आकडेवारीनुसार सेवा क्षेत्रातील आयातीत मात्र किरकोळ वाढ झाली आहे. गेल्या वर्षाच्या १७.२५ अब्ज डॉलर तुलनेत ही वाढ नोव्हेंबर महिन्यात १७.९६ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. मात्र यातील निष्कर्षानुसार आयातीत वाढ झाली असली तरी सजावट क्षेत्राने इयर ऑन इयर बेसिसवर ३२.११ अब्ज डॉलरवरून ३५.८६ अब्ज डॉलरवर वाढ (Growth) नोंदवली आहे.मर्चंटडाईज आयातीत इयर ऑन इयर बेसिसवर ६२.६६ अब्ज डॉलर तुलनेत या नोव्हेंबरमध्ये ६३.८७ अब्ज डॉलरवर वाढ नोंदवली आहे. यासह सरकारने दिलेल्या माहितीनुसार, चीनमधील निर्यातीत मोठ्या प्रमाणात भारताने वाढ नोंदवली आहे. ही वाढ एप्रिल ते नोव्हेंबर २०२५ मध्ये झाली असून गेल्या वर्षीच्या याच तिमाहीतील तुलनेत वाढ झाल्याचेही सरकारने स्पष्ट केले. महिन्यातील आधारे (Month on Month MoM) ही वाढ एप्रिल महिन्यातील १.३९ अब्ज डॉलर तुलनेत १.६२ अब्ज डॉलरवर वाढ झाली. जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील वाढ मात्र १.३४ अब्ज डॉलर व १.२१ अब्ज डॉलरवर मर्यादित राहिल्याचे आकडेवारीत म्हटले आहे.एकूणच या अहवालातील माहितीवर भाष्य करताना वाणिज्य विभागाचे सचिव राजेश अग्रवाल म्हणाले आहेत की,'आमची विक्रमी निर्यात ३८.१३ अब्ज डॉलर्स झाली आहे, जी गेल्या १० वर्षांतील सर्वाधिक आहे. नोव्हेंबर महिन्यात आम्ही कधीही ३८ अब्ज डॉलर्सचा आकडा पार केला नव्हता.तसेच, एक सकारात्मक बाब म्हणजे आयातीत १.८८% घट झाली आहे. आयातीचा एक कल असतो, जो सामान्यतः सकारात्मक असतो, परंतु या महिन्यात तो -१.८% आहे. याकडे लक्ष द्यावे लागेल असेही ते म्हणाले आहेत.केवळ वस्तूंच्या व्यापारातील तूट गेल्या वर्षीच्या ३१.९२ अब्ज डॉलर्सवरून कमी होऊन २४.५३ अब्ज डॉलर्सवर आली आहे. त्यामुळे या महिन्यासाठी ही एक चांगली बातमी आहे. या मोठ्या वाढीमागील प्रमुख कारणे पाहिल्यास,तपशीलवार सादरीकरणात अधिक माहिती दिली जाईल, परंतु त्यापैकी काही म्हणजे अभियांत्रिकी क्षेत्रात २३.८% वाढ, इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या निर्यातीत ३९% वाढ आणि रत्न व आभूषणे क्षेत्रात २७.८% वाढ आहे असे सचिव राजेश अग्रवाल यांनी यावेळी नमूद केले.
हनुमंत विद्यामंदिर शाळेची मान्यता रद्द !
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष भोवलेगणेश पाटील पालघर : शाळेत यायला उशीर झाल्याने विद्यार्थ्यांना उठाबशा काढण्याची शिक्षा देणे, वसईच्या श्री हनुमंत विद्यामंदिर शाळेला चांगलेच भोवले आहे. एका विद्यार्थिनीच्या मृत्यूमुळे या शाळेच्या चौकशीसाठी केलेल्या तपासणीत अनेक गंभीर बाबी समोर आल्या आहेत. या शाळेत असलेली शैक्षणिक गुणवत्ता दर्जाहीन असल्याचे तसेच शाळा व्यवस्थापनाकडून विद्यार्थी हितास बाधा पोहोचविण्यात आल्याचे स्पष्ट झाल्यामुळे या शाळेची हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही माध्यमाची मान्यता सन २०२५- २६ अखेर रद्द करण्यात आली आहे. याबाबतचा आदेश शासनाच्या शालेय व क्रीडा विभाग मंत्रालयाने शनिवारी काढला आहे.वसईच्या सातिवली परिसरात मनरादेवी एज्युकेशन संस्था कांदिवली पूर्व, मुंबईद्वारा संचालित श्री हनुमंत विद्यामंदिर (हिंदी व इंग्रजी माध्यम) शाळा आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांना शाळेत यायला उशीर झाल्याने या शाळेत शिकविणाऱ्या एका शिक्षिकेने उठाबशा काढण्याची शिक्षा काही विद्यार्थ्यांना दिली होती.त्यानंतर तब्येत खालावल्याने इयत्ता सहावीमध्ये शिकणाऱ्या काजल (अंसिका) गौड या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या शाळेची इमारत अनधिकृत असल्याचे आणि शाळेमध्ये इयत्ता नववी आणि दहावीचे अनधिकृत वर्ग भरत असल्याचे देखील समोर आले होते. विद्यार्थ्यांना उठाबशा काढण्याची शिक्षा देणाऱ्या शिक्षिकेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तसेच पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी या सर्व प्रकरणाची दखल घेत वसई प्रभारी गटशिक्षण अधिकारी पांडुरंग गलांगे, वसईतील वालिव केंद्र प्रमुख कैलास चव्हाण आणि वसई पंचायत समिती विस्तार अधिकारी (शिक्षण) राजेंद्र उबाळे यांना निलंबित केले आहे. कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका या तीनही अधिकाऱ्यांवर लावण्यात आला आहे. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी प्राथमिक शिक्षणाधिकारी सोनाली मातेकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक पाटील आणि समितीने केली आहे.या समितीने दिलेल्या अहवालानंतर शिक्षण संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडे ४ डिसेंबर रोजी सुनावणी घेण्यात आली. सुनावणीनंतर संबंधित शाळेची मान्यता काढून घेण्याबाबतची शिफारस शिक्षण संचालकांकडून शासनाला करण्यात आली होती. त्यानुसार शासनाच्या शालेय व क्रीडा विभाग मंत्रालयाचे कार्यसन अधिकारी प्रमोद कदम यांनी या शाळेच्या हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही माध्यमांची मान्यता सन २०२५- २६ अखेर रद्द करण्यात येत असल्याचा आदेश १३ डिसेंबर रोजी काढला आहे. अखेर शासन निर्णय धडकलादुसऱ्या शाळेत होणार विद्यार्थ्यांचे समायोजन :या शाळेत अनधिकृतरीत्या सुरू असलेल्या इयत्ता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांचे समायोजन नजीकच्या शाळेत गेल्या महिन्यातच करण्यात आले आहे. शाळेची मान्यता सन २०२५ - २६ अखेर रद्द करण्यात आल्याने आता पुढील शैक्षणिक सत्रासाठी इयत्ता पहिली ते आठवीच्या जवळपास ४०० विद्यार्थ्यांची समायोजन मे २०२६ मध्ये जवळच्या शाळांमध्ये करण्यात येणार आहे.‘आरटीई’चे नियम न पाळल्याचा शाळा व्यवस्थापनावर ठपकाबालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ (आर. टी. ई.) मधील तरतुदीनुसार विहित केलेली मानके व प्रमाणके यांची पूर्तता श्री हनुमंत विद्यामंदिर शाळेने केलेली नाही. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या हिताला बाधा पोहोचविण्याचे कृत्य केल्याचा ठपका देखील या शाळा व्यवस्थापनावर ठेवण्यात आला आहे. शाळेची जागा व इमारत याबाबत अधिकृत परवानगी कागदपत्र सादर न केल्याने शाळेची इमारत अनधिकृत असल्याचे आणि इयत्ता ९ वी आणि १० वीचे वर्ग या शाळेने अनधिकृतरीत्या घेतल्याचे सुद्धा शासनाच्या निदर्शनास आले आहे.बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ नुसार विद्यार्थ्यांना शारीरिक व मानसिक शिक्षा देण्यास प्रतिबंध आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना उठाबशा काढण्याची शिक्षा देण्याची गंभीर दखल घेत शासनाने या शाळेची मान्यता रद्द केली आहे. आता या शाळेमधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी योग्य उपाययोजना करण्यावर भर राहणार आहे. - मनोज रानडे, (भा.प्र.से.) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पालघर.
जिल्ह्यात सिकलसेल आजाराबाबत जनजागृती
पाच लाखांहून अधिक नागरिकांची सिकलसेल तपासणीपालघर : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत जिल्ह्यात सिकलसेल आजाराबाबत जनजागृती वाढविणे, आजाराचे लवकर निदान करून रुग्णांना वेळेवर उपचार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सिकलसेल जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात सन २०२१ पासून आतापर्यंत एकूण ५ लाख १४ हजार ९३४ नागरिकांची सिकलसेल तपासणी करण्यात आली असून त्यामध्ये १२ हजार ४२१ सिकलसेल वाहक तसेच ९७५ सिकलसेलग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. या सर्व रुग्णांची माहिती सिकलसेल पोर्टलवर ऑनलाईन नोंदविण्यात आली असून त्यांना शासनामार्फत मोफत औषधोपचार, आवश्यकतेनुसार रक्तपुरवठा व समुपदेशन सेवा दिल्या जात आहेत. तसेच पात्र रुग्णांना संजय गांधी निराधार योजना अंतर्गत आर्थिक मदतही दिली जात आहे.सिकलसेल हा अनुवांशिक आणि रक्तपेशींशी संबंधित आजार असून तो आई-वडिलांकडून अपत्यांमध्ये संक्रमित होतो. या आजारामध्ये लाल रक्तपेशी विळ्याच्या आकाराच्या व ताठर बनतात. या विकृत रक्तपेशी रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण करतात, परिणामी संबंधित अवयवांतील रक्तपुरवठा खंडित होऊन रुग्णांना तीव्र आणि असह्य वेदना सहन कराव्या लागतात. याचा डोळे, प्लीहा, यकृत, त्वचा तसेच इतर अवयवांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. सिकलसेल आजारावर संपूर्ण उपचार उपलब्ध नसला तरी योग्य वेळी तपासणी, नियमित उपचार, समतोल आहार आणि वैद्यकीय सल्ल्याचे पालन केल्यास आजारावर प्रभावी नियंत्रणठेवता येते.वाहक–वाहक, वाहक–रुग्ण किंवा रुग्ण–रुग्ण यांच्यात विवाह झाल्यास होणारे अपत्य सिकलसेल वाहक किंवा रुग्ण होण्याची शक्यता अधिक असते, त्यामुळे विवाहपूर्व सिकलसेल तपासणी करणे अत्यंत आवश्यक आहे, असे आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सिकलसेल आजाराची लक्षणे म्हणून रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होणे, हात-पाय सुजणे, भूक मंदावणे, सांधेदुखी, लवकर थकवा येणे, चेहरा निस्तेज दिसणे, लहान बालकांमध्ये वारंवार जंतुसंसर्ग होणे तसेच शरीर पिवळसर होणे ही लक्षणे दिसून येतात. अशा लक्षणांकडे दुर्लक्ष न करता तातडीने तपासणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी सिकलसेल तपासणी करून घ्यावी व या जनजागृती सप्ताहात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष चौधरी यांनी केले आहे.
नवी दिल्ली: सध्या व्यापारी अस्थिरतेत छोट्या व मध्यम आकाराच्या व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणात आरबीआयने दिलासा दिला आहे. मौद्रिक धोरणाचे हस्तांतरण सुधारण्याच्या उद्देशाने आरबीआयने निश्चित रक्कम व्याजाऐवजी आता एमएसएमईंना (Micro Small Medium Enterprises MSME's) यांना कर्जे देताना बँकाना हे कर्ज बाह्य बेंचमार्कशी जोडण्याचा सल्ला दिला आहे. प्रस्तुत माहिती सरकारने संसदेच्या हिवाळी अधिवेशनात दिली असून यात बाह्य बेंचमार्क प्रणाली अंतर्गत कर्जांसाठी रिसेट क्लॉज तीन महिन्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. म्हणजेच नव्या नियमानुसार कर्जाविषयी करार करताना आता बँकाना निश्चित व्याजदर न ठेवता बाजाराची आर्थिक प्रगती, कर्जदारांने वेळेला केलेली परतफेड,कर्जदाराची आर्थिक स्थिती पाहता फ्लोटिंग व्याजदर आकारता येऊ शकेल. जेणेकरून बँक व कर्जदार दोघांनाही नियंत्रित फ्लोटिंग व्याजदरासह सुरळित व्यवहार पुढे सुरू ठेवता येणे शक्य होईल.यापुढे बाह्य बेंचमार्क-आधारित व्याज प्रणालीचा लाभ विद्यमान कर्जदारांना उपलब्ध करून देण्यासाठी व बँकांना परस्पर सहमतीच्या अटींनुसार स्विचओव्हरचा पर्याय प्रदान करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यावर अंतिम शिक्कामोर्तब अद्याप करण्यात आलेले नाही. याचे मुख्य कारण म्हणजे देशांतर्गत उत्पादनात कोणताही प्रकारचा व्यत्यय येऊ नये यासाठी सरकार एमएसएमईंना सूट आणि शिथिलता देऊन आर्थिक गुणवत्ता नियंत्रण आदेश (QCOs) लागू करणार आहे. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी लोकसभेत दिलेल्या लेखी उत्तरात पुढील माहिती सांगितली आहे.भारत सरकार, आपल्या भारतीय मानक ब्युरो (BIS), ग्राहक व्यवहार विभागामार्फत संबंधित मंत्रालयांनी जारी केलेले गुणवत्ता नियंत्रण आदेश (QCOs) टप्प्याटप्प्याने लागू करण्याची शक्यता या निमित्ताने व्यक्त केली जात आहे. यामध्ये उत्पादन कायम राखण्यास मदत करताना क्रेडिट क्वालिटी व नियंत्रण कायम राखण्यासाठी हे पाऊल सरकार उचलू शकते. या धोरणात विशेषतः एमएसएमईंना सूट/शिथिलता दिली जाऊ शकते जेणेकरून अशा आदेशांमुळे देशांतर्गत उत्पादनात कोणताही व्यत्यय येणार नाही.या तरतूदीत काही प्रमुख शिथिलता आणि सवलतींमध्ये सूक्ष्म आणि लघु उद्योगांसाठी (MSMEs) अतिरिक्त वेळेचा समावेश आहे. सूक्ष्म उद्योगांसाठी सहा महिन्यांची मुदतवाढ आणि लघु उद्योगांसाठी तीन महिन्यांची मुदतवाढ यांचा समावेश असू शकतो. म्हणजेच उत्पादक व निर्यातदारांना आयातीतील वस्तू आणण्याची असलेली मर्यादा शिथिल करण्यात आली आहे. या सवलती देशांतर्गत उत्पादकांनी निर्यातभिमुख असलेली उत्पादने तयार करण्यासाठी केलेल्या आयातीला आणि संशोधन व विकासाच्या उद्देशाने २०० युनिट्सपर्यंतच्या आयातीला मान्यता मिळू शकते.यातील प्रभावी तारखेपासून सहा महिन्यांच्या आत जुन्या साठ्याची (अंमलबजावणीपूर्वी उत्पादित किंवा आयात केलेला) विल्हेवाट लावण्याची तरतूद करण्यात आहे असे सरकारने यावेळी स्पष्ट केले. याशिवाय एमएसएमई युनिट्ससाठी अंतर्गत प्रयोगशाळा ठेवण्याची अट ऐच्छिक करण्यात आली आहे अशी माहितीही मंत्र्यांनी संसदेला दिली आहे.याव्यतिरिक्त सरकारने एमएसएमईसाठी म्युच्युअल क्रेडिट गॅरंटी योजना (MCGS-MSME) जाहीर केली आहे, जी क्रेडिट गॅरंटी सुनिश्चित करते विशेषतः आवश्यक उपकरणे आणि यंत्रसामग्री खरेदी करण्यासाठी अशा युनिट्सना कर्ज मिळवणे सोपे होते. अनुसूचित (Schedule) व्यावसायिक बँकांना एमएसई (सूक्ष्म आणि लघु उद्योग) क्षेत्रातील युनिट्सना १० लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी तारण सुरक्षा स्वीकारू नये असे याशिवाय नव्या माहितीनुसार अनिवार्य करण्यात आले आहे ज्याचा लाभ एमएसएमई व्यापाऱ्यांना होणार आहे असे म्हटले जाते.
Dr. Ramvilas Vedanti। अयोध्या राम मंदिर चळवळीतील एक प्रमुख व्यक्ती आणि माजी खासदार डॉ. रामविलास दास वेदांती यांचे निधन झाले आहे. मध्य प्रदेशातील रेवा येथे त्यांचे निधन झाले. त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. वृत्तानुसार, त्यांचे पार्थिव मध्य प्रदेशहून अयोध्येत आणले जाईल, जिथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी माजी […] The post राम मंदिर आंदोलनाशी संबंधित डॉ. रामविलास वेदांती यांचे निधन ; मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांकडून दुःख व्यक्त appeared first on Dainik Prabhat .
Mahima Chaudhry: १९९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री महिमा चौधरी यांनी नुकताच त्यांच्या आयुष्यातील एका भीषण अपघाताचा अनुभव सांगितला आहे. या अपघातामुळे त्यांना खूप त्रास सहन करावा लागला होता, असं त्यांनी सांगितलं. अजय देवगनसोबत काम करत असताना हा अपघात झाला होता आणि त्यात त्यांच्या चेहऱ्यात काचांचे तब्बल ६७ सूक्ष्म तुकडे घुसले होते. महिमा चौधरी यांनी शाहरुख […] The post Mahima Chaudhry: ‘माझ्या चेहऱ्यात काचांचे ६७ तुकडे घुसले होते…’; भीषण अपघाताचा अनुभव सांगताना भावूक झाली महिमा चौधरी appeared first on Dainik Prabhat .
‘मनरेगा’मधून ‘महात्मा गांधीं’चे नाव काढले जाणार ; ‘या’नव्या नावाने नवीन विधेयक तयार
New Employment Bill। केंद्र सरकार ग्रामीण रोजगार धोरणात मोठा बदल करण्याची तयारी करत असल्याचे समोर येत आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (मनरेगा) रद्द करण्याचा आणि ग्रामीण रोजगारासाठी नवीन कायदा आणण्याचा प्रस्ताव समोर आला आहे. या संदर्भातील विधेयकाच्या प्रती लोकसभा खासदारांना वाटण्यात आल्या आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, हे विधेयक संसदेच्या चालू हिवाळी अधिवेशनात […] The post ‘मनरेगा’मधून ‘महात्मा गांधीं’चे नाव काढले जाणार ; ‘या’ नव्या नावाने नवीन विधेयक तयार appeared first on Dainik Prabhat .
कोंढवा : अतिशय संथगतीने काम सुरु असलेल्या कात्रज- कोंढवा मार्गावर इस्कॉन मंदिराच्या जवळ सोमवारी सकाळी दुचाकी व कंटेनरचा अपघात झाला. या अपघातामध्ये दुचाकीवरील शिक्षिका महिलेचा वाहतुक कोंडीमुळे वेळेत मदत न मिळाल्याने अति रक्तस्त्राव झाल्याने मृत्यू झाला. कात्रज- कोंढवा रस्त्याचे काम गेल्या अनेक वर्षापासून सुरू असून हा रस्ता अद्यापपर्यंत अपूर्ण आहे. या रस्त्यावर आतापर्यंत मोठं मोठे […] The post ‘याला जबाबदार कोण?’ कात्रज-कोंढवा मार्गावर अपघात; वाहतुक कोंडीमुळे वेळेत मदत न मिळाल्याने महिलेचा मृत्यू appeared first on Dainik Prabhat .
ठाणे-बोरिवली भुयारीकरणाला मार्चपासून सुरुवात
ठाणे : ठाणे-बोरिवली दुहेरी बोगद्याच्या कामाअंतर्गत ठाण्याच्या लॉन्चिंग शाफ्ट येथे 'नायक' नावाच्या टनेल बोअरिंग मशीनच्या (टीबीएम) जोडणीचे काम सुरू आहे. टीबीएमची जोडणी पूर्ण करून मार्च २०२६ मध्ये ठाण्याकडून बोरिवलीच्या दिशेने भुयारीकरणाच्या कामाला सुरुवात करण्याचे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) नियोजन आहे.या दुहेरी बोगद्याचे काम मे २०२८ पर्यंत पूर्ण करून हा बोगदा वाहतूक सेवेत दाखल करण्यात येणार आहे. हा बोगदा वाहतूक सेवेत दाखल झाल्यास ठाणे ते बोरिवली अंतर केवळ १२ मिनिटांत पार करता येणार आहे. दुहेरी बोगद्याच्या कामासाठी चार टीबीएम यंत्रांचा वापर करण्यात येणार असून या टीबीएमची बांधणी चेन्नईतील ‘हेरेनकनेट’ कंपनीत केली जात आहे.यापैकी दोन टीबीएम मुंबईत दाखल झाले असून पहिल्या टीबीएमचे नाव 'नायक' आहे. नायक' टीबीएम ठाण्यातून बोरिवलीच्या दिशेने भुयारीकरण करणार आहे. या टीबीएमच्या जोडणीचे काम सध्या ठाणे लॉन्चिंग शाफ्ट येथे सुरू आहे. ही जोडणी पूर्ण करून मार्च २०२६ मध्ये भुयारीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती एमएमआरडीएतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. अंदाजे ११० सुट्ट्या भागांमध्ये टीबीएम आणण्यात आले असून सुट्ट्या भागांची जोडणी झाल्यानंतर ते भूगर्भात सोडण्यात येणार आहेत.दुसऱ्या टीबीएमचे नाव 'अर्जुन' असून हे टीबीएम बोरिवलीच्या लाॅन्चिंग शाफ्टमध्ये सोडण्यात येणार आहे. बोरिवली आणि ठाणे प्रवासाचे अंतर कमी करण्यासाठी एमएमआरडीएने एकूण सहा मार्गिकांचा ११.८ किमी लांबीचा ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्प हाती घेतला. यात १०.२५ किमी लांबीचे दोन बोगदे असणार असून हे बोगदे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणार आहेत. हा प्रकल्पासाठी अंदाजे १८ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित असून हा प्रकल्प पूर्ण होऊन प्रवासी वाहतुकीस खुला झाल्यास ठाणे-बोरिवली अंतर केवळ १२ मिनिटांत पार करता येणार आहे. यामुळे ठाणे, बोरिवलीतील वाहतूक कोंडी दूर होणार आहे.
धक्कादायक! गुंडांनी केला थेट पोलिसांवर हल्ला, मुंबईतील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
कांदिवली: मुंबईच्या कांदिवलीमधून एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कर्तव्य बजावण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर काही स्थानिक गुंडांनी थेट हल्ला करत त्यांना मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, यामुळे मुंबईतील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या प्रकारातून स्थानिक गुंडांना पोलिसांचा कोणताही धाक राहिलेला नाही, हेच अधोरेखित होते.मिळालेल्या माहितीनुसार, कांदिवली पश्चिमेकडील एकता नगर परिसरात दोन गटांमध्ये मारामारी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या घटनेमध्ये सहभागी असलेल्या लोकांना ताब्यात घेण्यासाठी आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले तेव्हा स्थानिक गुंडांनी पोलिसांना सहकार्य करण्याऐवजी उलट त्यांच्यावरच हल्ला केला. या घटनेच्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमधून काही गुंड पोलिसांशी वाद घालताना आणि थेट त्यांच्यावर हात उचलताना स्पष्टपणे दिसून येत आहेत. ज्यात काही गुंडांनी थेट पोलिसांची कॉलर पकडून त्यांच्या वर्दीवर हात टाकला.https://prahaar.in/2025/12/15/as-soon-as-the-session-ended-the-bjp-dealt-a-blow-to-the-uddhav-thackeray-faction-tejasvi-ghosalkar-left-the-party/घडलेल्या घटनेनंतर कांदिवली पोलीस तात्काळ अॅक्शन मोडमध्ये आले. परिसरातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी त्यांनी त्वरित मोठा बंदोबस्त तैनात केला. तसेच, अतिरिक्त पोलीस फौजफाटा बोलावून एकता नगर आणि आसपासच्या भागामध्ये कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. दरम्यान, या हल्ल्यात सहभागी असलेल्या आरोपींविरोधात पोलिसांनी कठोर पावले उचलायला सुरुवात केली आहेत. या घटनेचा अधिक तपास सुरू असून, दोषींवर कडक कारवाई करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
ठाणेकरांच्या अंतर्गत प्रवासाला मिळणार गती
ठाणे वर्तुळाकार मेट्रोसाठी २२३ कोटींची निविदाठाणे : ठाणे अंतर्गत वर्तुळाकार मेट्रो प्रकल्पासाठी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (महामेट्रो) २२३.७० कोटींची निविदा जाहीर केली आहे. याअंतर्गत डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, मानपाडा, डोंगरीपाडा, विजय नागरी, वाघबीळ, वॉटरफ्रंट या उन्नत मेट्रो स्थानकांचे बांधकाम होणार आहे.ठाणे अंतर्गत वर्तुळाकार मेट्रो २९ किमीची मार्गिका असून त्यावर २२ स्थानके आहेत. पहिल्या टप्प्यात ६ किमीच्या टप्प्यातील ६ स्थानकांचे काम पूर्ण केले जाणार आहे. एकूण मार्गिकेतील २६ किमी मार्गिका उन्नत स्वरुपाची आहे. रेल्वे स्थानकाजवळील दोन मेट्रो स्थानके भूमिगत असतील. ठाण्यातील वागळे इस्टेट, घोडबंदर, कोलशेत, साकेत, इत्यादी महत्त्वाच्या अंतर्गत भागांना ही मेट्रो जोडेल. यामुळे ठाणेकरांचा अंतर्गत प्रवास सुलभ होणार आहे.ठाणे मेट्रो मुंबईच्या मेट्रो ४ आणि मेट्रो ५ मार्गिकांना जोडल्यामुळे ठाणे ते मुंबई आणि ठाणे ते कल्याण मेट्रो प्रवास शक्य होईल. २०४५ पर्यंत या मेट्रोतून दैनंदिन ८ लाख ७० हजार प्रवासी प्रवास करतील असा अंदाज आहे. राज्य आणि केंद्र शासनाच्या संयुक्त भागीदारीतून उभा राहणारा हा प्रकल्प १२ हजार २०० कोटींचा आहे. हा प्रकल्प ठाण्याच्या वाढत्या लोकसंख्येसाठी शाश्वत, स्वच्छ आणि कार्यक्षम सार्वजनिक वाहतूक पर्याय ठरेल. यामुळे रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी होईल, इंधन बचत होईल आणि हरितगृह वायू उत्सर्जनात घट होईल. विद्यार्थी, नोकरदार आणि दैनंदिन प्रवाशांसाठी ही मेट्रो जलद, स्वस्त आणि पर्यावरणपूरक प्रवासाचा नवा पर्याय ठरेल.
महावितरणने एका झटक्यात फेडले १२ हजार कोटींचे कर्ज
मुंबई : देशातील सर्वात मोठी वीज वितरण कंपनी असलेल्या महावितरणने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या १२,८०० कोटी रुपयांच्या कर्जाची मुदतीपूर्वी एकाच हफ्त्यात नुकतीच परतफेड केली. अन्य वित्तीय संस्थेकडून कमी व्याज दराचे कर्ज उभारून तसेच स्वनिधीतून ही परतफेड केली असून त्यामुळे व्याजाच्या रकमेत मोठी बचत होईल, अशी माहिती अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली.मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महावितरणला आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्याची सूचना केली असून त्यादृष्टीने कंपनीवरील कर्जाचा बोजा हलका करण्यासाठी यशस्वी पावले टाकण्यात आली. महावितरणने विविध टप्प्यांवर स्टेट बँकेकडून एकूण १२,८०० कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यासाठी ८.६५ टक्के ते ९.२५ टक्के दराने व्याज द्यावे लागत होते. त्याऐवजी अन्य वित्तीय संस्थेकडून ७,१०० कोटी रुपये कर्ज ८.२५ टक्के इतक्या कमी व्याजदराने उभारून महावितरणने स्टेट बँकेचे ७,१०० कोटी रुपयांचे कर्ज फेडले. त्या खेरीज महावितरणने स्वनिधीतून ५,६३४ कोटी रुपयांचे स्टेट बँकेचे कर्ज फेडले.महावितरणने स्टेट बँकेचे कर्ज घेताना आपल्या दहा सर्कलमधील महसूल तारण म्हणून ठेवला होता. या सर्कलमध्ये वार्षिक तीस हजार कोटी रुपयांचा महसूल आहे. स्टेट बँकेचे सर्व कर्ज फेडल्यामुळे हा महसूल तारणमुक्त होईल. त्या आधारे कंपनीला ५०,००० कोटी रुपयांपर्यंतचा निधी माफक व्याजदरात कर्जरुपाने उभा करता येईल.महावितरणची पत वाढविणारे पाऊल- महावितरणने एकाच हफ्त्यात स्टेट बँकेच्या १२,८०० कोटी रुपयांच्या कर्जाची मुदतपूर्व परतफेड करण्यामुळे कंपनीची वित्तीय बाजारातील पत वाढली आहे. ही घडामोड गुंतवणूकदारांचा विश्वास वाढविणारी आहे. कंपनीसाठी भविष्यात खासगी किंवा सार्वजनिक बाँड उभारायचे झाल्यास त्यासाठीही इतक्या मोठ्या कर्जाची परतफेड करणे उपयुक्त ठरणारे आहे. आगामी काळात महावितरणला शेअर बाजारात सूचिबद्ध करण्याच्या दृष्टीनेही ही कर्जाची परतफेड महत्त्वाची आहे.
मुंबई : राज्य निवडणूक आयोगाची आज (१५ डिसेंबर) पत्रकार परिषद (State Election Commission Maharashtra) होणार आहे. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे आज सायंकाळी ४ वाजता ही पत्रकार परिषद पार पडणार आहे. या पत्रकार परिषदेत राज्यातील प्रलंबित महानगरपालिका निवडणुकांचा (Municipal Corporation Election २०२५) कार्यक्रम जाहीर होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. जर आज निवडणुका जाहीर झाल्या, तर राज्यात आजपासूनच आचारसंहिता लागू होऊ शकते. त्यामुळे सायंकाळी ४ वाजता निवडणूक आयोग नेमकी काय घोषणा करतो आणि राज्यातील राजकीय वातावरण कसे बदलते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.\राज्यातील प्रलंबित असलेल्या २९ महापालिका, तसेच नगरपालिका, जिल्हा परिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला मोठा दिलासा देत निवडणुका घेण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. मात्र, ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी न्यायालयाने ३१ जानेवारी २०२६ ही अंतिम मुदत निश्चित केली आहे. न्यायालयाच्या या आदेशानंतर आता राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी वेगाने तयारी सुरु केली असून, प्रशासकीय पातळीवर हालचालींना वेग आला आहे.कोणत्या २९ महापालिकेची निवडणूक होणार? (Municipal Corporation Election २०२५)१.अहिल्यानगर महानगरपालिका २.अकोला महानगरपालिका ३.अमरावती महानगरपालिका ४. भिवंडी निजामपूर महानगरपालिका ५. बृहन्मुंबई महानगरपालिका ६. चंद्रपूर महानगरपालिका ७. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका८. धुळे महानगरपालिका ९. इचलकरंजी महानगरपालिका १०. जळगाव महानगरपालिका ११. जालना महानगरपालिका १२. कल्याण डोंबिवली महानगरपालिका १३. कोल्हापूर महानगरपालिका १४. लातूर महानगरपालिका १५. मालेगाव महानगरपालिका १६. मीरा भाईंदर महानगरपालिका १७. नागपूर महानगरपालिका १८. नांदेड वाघाळा महानगरपालिका १९. नाशिक महानगरपालिका २०. नवी मुंबई महानगरपालिका २१. पनवेल महानगरपालिका २२. परभणी महानगरपालिका २३. पिंपरी चिंचवड महानगरपालिका २४. पुणे महानगरपालिका २५. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका २६. सोलापूर महानगरपालिका २७. ठाणे महानगरपालिका २८. उल्हासनगर महानगरपालिका २९. वसई विरार महानगरपालिका
अधिवेशन संपताच भाजपचा उबाठाला दणका; तेजस्वी घोसाळकरांनी सोडली साथ
मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन संपताच भाजपने उबाठाला दणका दिला आहे. मुंबईतील उबाठाच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी सोमवारी भाजपचा झेंडा हाती घेतला. दादर येथील भाजप कार्यालयात मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम आणि आमदार प्रवीण दरेकर यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला.तेजस्वी घोसाळकर यांनी पक्षप्रवेशानंतर भावनिक प्रतिक्रिया देताना सांगितले की, प्रभागातील विकासकामे पूर्ण करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. मी २०१७ मध्ये शिवसेनेतून नगरसेविका म्हणून निवडून आले होते. आता भाजपमध्ये प्रवेश करताना खूप दुःख होत आहे, कारण ज्यांनी मला ओळख दिली त्यांची साथ सोडणे कठीण आहे. पण विकासाची कामे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून हा निर्णय घेतला, असे त्या म्हणाल्या. तसेच, फेब्रुवारी २०२४ मध्ये झालेल्या पती अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येच्या प्रकरणाचा सीबीआय तपास जलदगतीने व्हावा आणि कुटुंबाला न्याय मिळावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.https://prahaar.in/2025/12/15/veteran-music-composer-o-p-nayyar-has-been-posthumously-awarded-the-mohammed-rafi-lifetime-achievement-award/कोण आहेत तेजस्वी घोसाळकर?तेजस्वी घोसाळकर या उबाठाच्या माजी नगरसेविका आहेत. २०१७ च्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत वॉर्ड क्रमांक १ (दहिसर) मधून त्या विजयी झाल्या होत्या. त्या माजी नगरसेवक दिवंगत अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तथा माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या सूनबाई आहेत. अभिषेक घोसाळकर हे मुंबई बँकेचे संचालक होते. फेब्रुवारी २०२४ मध्ये त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर प्रवीण दरेकर यांच्या नियंत्रणातील मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत तेजस्वी यांची संचालक म्हणून नियुक्ती झाली आहे.
CJI Surya Kant । वृंदावनमधील श्री बांके बिहारी मंदिरात व्हीआयपी दर्शन आणि पूजेबाबत सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय घेतला आहे. देवतेला विश्रांती घेण्याची परवानगी नाही. जेव्हा सामान्य भाविक दर्शन घेऊ शकत नाहीत तेव्हा मोठ्या प्रमाणात शुल्क भरणाऱ्यांसाठी विशेष पूजा आयोजित केली जाते यावरून सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी महत्वाचे विधान केले आहे. मुख्य न्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमाल्य […] The post “देवाला एक मिनिटही विश्रांती घेऊ देत नाही अन् श्रीमंतांना…,” ; बांके बिहारी मंदिराच्या दर्शन वेळेवर सरन्यायाधीश स्पष्टच बोलले appeared first on Dainik Prabhat .
निलेश साबळे आणि भाऊ कदमचे दणक्यात पुनरागमन; पुन्हा झी मराठीवर झळकणार
Nilesh Sable-Bhau Kadam | झी मराठीवरील ‘चला हवा येऊ द्या’ ह्या कार्यक्रमाला मोठी पसंती मिळाली. डॉ. निलेश साबळेने या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले होते. यानंतर ‘चला हवा येऊ द्या’च्या नव्या पर्वामध्ये सूत्रसंचालन अभिनेता अभिजीत खांडकेकरने केलं. मात्र आता निलेश साबळेच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. निलेश साबळे पुन्हा झी मराठीवर झळकण्यासाठी सज्ज झाला आहे. विशेष म्हणजे भाऊ […] The post निलेश साबळे आणि भाऊ कदमचे दणक्यात पुनरागमन; पुन्हा झी मराठीवर झळकणार appeared first on Dainik Prabhat .
WPI Inflation: घाऊक महागाईत नोव्हेंबरमध्ये घसरण 'ही'आकडेवारी जाहीर
मोहित सोमण: सरकारने काही क्षणापूर्वी घाऊक किंमत महागाई आकडेवारी जाहीर केली. सरकारच्या वाणिज्य व उद्योग मंत्री मंत्रालयाच्या अंतर्गत आर्थिक सल्लागार विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, नोव्हेंबर महिन्यात इयर ऑन इयर बेसिसवर ०.३२% घसरण झाली आहे. प्रामुख्याने महागाईतील घसरण ही अन्नधान्याच्या किंमतीत झालेल्या घसरणीसह मिनरल ऑईल, क्रूड (कच्चे तेल), पेट्रोलियम, नॅचरल गॅस, इलेक्ट्रिसिटी, खनिजे व धातूंच्या प्राथमिक उत्पादन किंमतीतील घसरणीमुळे झाल्याचे आकडेवारीत स्पष्ट करण्यात आले आहे. महिन्यातील आधारावर पाहिल्यास (MoM) ०.७१% घसरण घाऊक महागाईत (Wholesale Price Index WPI) झाल्याचेही आकडेवारी दिसून आले. माहितीनुसार, महिना आधारे इंधन व उर्जा (-२.२७%), यासह उत्पादित वस्तू (Manufactured Products) मधील (१.३३%) घसरणीमुळे एकूणच वेटेज असलेल्या या निर्देशांकात घसरण नोंदवली गेली असून अन्नधान्यातील महागाईत तर महिन्यातील आधारावर -२.६०% घसरण झाल्याचे स्पष्ट झाले.उपलब्ध माहितीनुसार, प्राथमिक उत्पादनातील घाऊक किंमत महागाईत मात्र ऑक्टोबर महिन्यातील १८८.२ पातळीतील तुलनेत नोव्हेंबर महिन्यात १९२.१ पातळीवर वाढ झाली आहे. जी २.०७% प्रमाणात आकडेवारीनुसार नोंदवली गेली. यासह मिनरल (४.५०%), अन्नधान्य (२.५०%), व बिगरअन्न उत्पादन वस्तू (१.२८%), नॅचरल गॅस (१.६२%) पातळीवर घसरण झाली.अन्नधान्य निर्देशांकातील वेटेज सर्वाधिक वेटेज असलेल्या प्राथमिक वस्तू गटातील 'खाद्यपदार्थ' आणि उत्पादित वस्तू गटातील 'खाद्य उत्पादने' यांचा समावेश असलेला अन्न निर्देशांक ऑक्टोबर महिन्यात २०२५ मधील १९२.० वरून नोव्हेंबर, २०२५ मध्ये १९५.० पर्यंत वाढला आहे. घाऊक किंमत निर्देशांक (WPI) अन्न निर्देशांकावर आधारित महागाईचा दर इयर ऑन इयर बेसिसवर ऑक्टोबर २०२५ मधील -५.०४% वरून नोव्हेंबर, २०२५ मध्ये -२.६०% पर्यंत वाढला आहे.यापूर्वी सप्टेंबर २०२५ महिन्यासाठी एकूण अंतिम घाऊक किंमत निर्देशांक आणि महागाईचा दर अनुक्रमे १५५.० आणि ०.१९% होता. यावर्षीपासून शासनाने महागाई दर आधारासाठी २०११-२०१२ घोषित केले आहे. यापूर्वी घाऊक महागाईचा आधार वर्ष २००४-०५ होते. परवा घोषित झालेल्या महागाईत किरकोळ वाढ झाली होती. प्रामुख्याने रिटेल अन्नधान्यातील महागाईव व मागणीत वाढ झाल्याने ही दरपातळी वाढली. परंतु आता घाऊक महागाईत घसरण झाल्यानंतर आरबीआयच्या रेपो दरातील कपातीमुळे ग्राहकांच्या उपभोगात (Consumption आणखी वाढ अपेक्षित केली जात आहे. आरबीआयच्या नवीन भाकीतानुसार आर्थिक वर्ष २०२६ साठी जीडीपी दरवाढ ६.८% वरून ७.३% पातळीवर सुधारित वाढ करण्यात केली आहे.
प्रवाशांचा संताप ! 'इंडिगो'विरुद्ध सामूहिक भरपाईची मागणी
नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोला सध्या गंभीर संकटाचा सामना करावा लागत आहे. विमानांच्या वेळापत्रकात आलेल्या प्रचंड गोंधळामुळे प्रवाशांचे हाल सुरूच आहेत. अनेक उड्डाणांमध्ये तासनतास विलंब, अचानक रद्द होणारी उड्डाणे आणि प्रवाशांवरील वाईट वागणूक या घटनांमुळे कंपनीची प्रतिमा मोठ्या प्रमाणात धोक्यात आली आहे.या इंडिगो एअरलाईन्सच्या समस्यांमुळे संतप्त झालेले जवळपास ८२९ प्रवासी एकत्र येऊन इंडिगोविरुद्ध न्यायालयात भरपाईसाठी सामूहिक खटला दाखल करण्याची तयारी करत आहेत. या खटल्याचे नेतृत्व हवाई वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञ आणि ग्राहक संरक्षण वकील डॉ. सुधीर शुक्ला करणार आहेत. शुक्ला यांनी सांगितले की, प्रवाशांना झालेल्या नुकसानीसाठी योग्य न्याय मिळावा आणि कंपनीला आपली जबाबदारी समजावी, यासाठी हा सामूहिक दावा दाखल केला जात आहे.गेल्या काही महिन्यांपासून इंडिगोचे विमान वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. अचानक विमान रद्द होणे आणि प्रवाशांना बोर्डिंगपासून वंचित ठेवणे हे नित्याच्या घटनांमध्ये रूपांतरित झाले आहे. प्रवाशांना वेळेवर आणि योग्य माहिती दिली जात नसल्याने, ग्राहक सेवा विभागाकडूनही अपेक्षित सहकार्य मिळत नाही, अशी अनेक तक्रारी प्रवाशांकडून समोर येत आहेत.
एक हजार कोटी रुपयांच्या आंतरराष्ट्रीय सायबर फसवणुकीमागे ४ चिनी नागरिक
सीबीआयच्या आरोपपत्रात मोठा खुलासानवी दिल्ली : केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय)ने १७ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. ज्यात चार चिनी नागरिकांचा समावेश आहे. आरोपपत्रात ५८ कंपन्यांचेही नाव आरोपी म्हणून आहे. हे सर्व जण आंतरराष्ट्रीय सायबर फसवणुकीच्या नेटवर्कमध्ये सहभागी असल्याचा आरोप आहे. त्यांच्यावर शेल कंपन्या तयार करून एक हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त ऑनलाइन फसवणूक केल्याचा आरोप आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.ऑक्टोबरमध्ये या सायबर फसवणुकीच्या नेटवर्कचा पर्दाफाश करण्यात आला. तपासकर्त्यांनी एक संघटित नेटवर्क उघड केले, जे फसवे कर्ज अर्ज, बनावट गुंतवणूक योजना, पॉन्झी योजना आणि बहुस्तरीय मार्केटिंग मोटेल, बनावट पार्टी-टाइम जॉब ऑफर आणि ऑनलाइन गेमिंगसह विविध प्रकारच्या फसवणुकीत गुंतलेले होते.तपास यंत्रणेच्या अंतिम अहवालानुसार, या गटाने १११ शेल कंपन्यांद्वारे विविध खात्यांमध्ये बेकायदेशीर निधी लाँडर केला आणि म्युल अकाउंट्सद्वारे अंदाजे एक हजार कोटी रुपये हस्तांतरित केले. यापैकी एका खात्याला अल्पावधीत १५२ कोटी रुपये मिळाले. सीबीआयने म्हटले आहे की, बनावट संचालक, बनावट किंवा दिशाभूल करणारी कागदपत्रे, बनावट पत्ते आणि व्यावसायिक उद्देशांचे खोटे वर्णन वापरून या बनावट कंपन्या तयार केल्या गेल्या होत्या. सीबीआयच्या प्रवक्त्याने सांगितले की, या बनावट कंपन्यांचा वापर बँक खाती आणि पेमेंट गेटवे खाती उघडण्यासाठी केला जात होता याद्वारे, गुन्ह्यातून मिळणारे उत्पन्न विविध खात्यांमध्ये जलद गतीने हस्तांतरित केले जात होते.
रूपया ९१ रूपयांच्या जवळ पोहोचला,डॉलरच्या तुलनेत रूपयात 'महाविक्रमी'घसरण 'या'कारणांमुळे!
मोहित सोमण: आज रूपया- डॉलर अस्थिरतेच्या गोंधळात पुन्हा एकदा रूपया आणखी एकदा निंचाकी (All time Low) पातळीवर पोहोचला. सातत्याने युएस फेड व्याजदरातील कपातीच्या निर्णयानंतर डॉलर पातळीत दबाव कमी झाल्याने इतर देशांच्या चलनाच्या बास्केटमध्ये मोठी घसरण झाली आहे. याचा विशेष फटका भारतीय रूपयाला बसल्याने गुंतवणूकदार आणखी हवालदील झाले. आज सत्र सुरुवातीलाच रूपया डॉलरच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात कोसळल्याने रूपया थेट ९१.५५ या पातळीवर घसरला असताना दुपारी १२.३० वाजेपर्यंत रूपया ९०.७२ या महाविक्रमी पातळीवर कोसळला. शेअर बाजारातही शुक्रवारी १११४ कोटींची रोख विक्री परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी केली. सोन्यात काही प्रमाणात आलेली स्थिरताही डॉलरच्या वाढत्या किंमतीमुळे भारतीय स्थिर होती. मात्र आज डॉलरमध्ये काही प्रमाणात किंमतीत तेजीत घसरण झाल्याने व स्थिरता आल्याने सोन्याच्या जागतिक किंमतीत दबाव निर्माण झाला.प्रसिद्ध अहवालानुसार आतापर्यंत रूपया आर्थिक वर्ष २०२५ पर्यंत इयर ऑन इयर बेसिसवर ५.५% कोसळला आहे.यावर्षी रूपयांच्या अस्थिरतेमुळे परदेशी गुंतवणूकदारांनी शेअर व भांडवली बाजारातून १८ अब्ज डॉलरची गुंतवणूक काढून टाकली ज्याचा फटका एक्सचेंज विनिमयात बाजारात बसत आहे. खासकरुन व्याजदरातील कपातीनंतरही भारत व युएस यांच्यातील द्विपक्षीय करारावर अद्याप निश्चितता नसल्याने गुंतवणूकदारही अस्वस्थ आहेत. ज्याचा आणखी तोटा रूपयात दिसला.मागील आठवड्यात आरबीआयच्या पतधोरण समितीच्या बैठकीतील निकालात आरबीआयने रेपो दरात कपात केल्याचे घोषित केले होते ज्यामुळे रेपो दर आता ५.५०% वर आला. याखेरीज आरबीआयने १००००० कोटींची गुंतवणूक सरकारी बाँड खरेदीसह जाहीर केली आहे. यामध्ये बाजारात तरलता (Liquidity) वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असताना बाह्य वातावरणाचा परिणाम म्हणून रूपया घसरत आहे. यावर्षीच्या अखेरीस भारत व युरोपियन युनियन यांच्यातील करार निश्चित होईल असे म्हटले जाते. यासह भारताच्या व्यापार तूटीत (Trade Deficit) वाढ झाल्याने विनिमयावर याचा दबावही कायम राहिला.बाजारातील तज्ञ संस्था व फॉरेक्स सल्लागार संस्था आयएफए ग्लोबलने,'मध्यम मुदतीत डॉलरच्या कमकुवतपणामुळे रुपयाची कामगिरी खालावलेलीच राहू शकते. पुढील ६ आठवड्यांमध्ये आम्हाला ८९.६०-९०.६० ही पातळी अपेक्षित आहे' असे म्हटले आहे.रुपया कमकुवत होत असल्याने, आयातदार त्यांच्या जोखमीपासून संरक्षण मिळवण्यासाठी घाई करत आहेत, ज्यामुळे डॉलरची मागणी वाढत आहे. त्याच वेळी निर्यातदार चांगल्या विनिमय दराच्या आशेने डॉलरची विक्री थांबवत आहेत. या असंतुलनामुळे रुपयावर आणखी दबाव येत आहे असे म्हटले जाते. रुपयामधील तीव्र चढउतार रोखण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) वेळोवेळी हस्तक्षेप केल्याचे मानले जात आहे.त्यामुळे असे मानले जाते की जोपर्यंत भारत-अमेरिका व्यापार करारावर ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत रूपयातील अस्थिरता कायम राहू शकते. याच कारणामुळे वाढलेल्या हेजिंगचा परिणामही बाजारात होऊ शकतो. बाजार तज्ञांनी म्हटल्याप्रमाणे व्यापार संबंधित काही सकारात्मक घडामोडी होत असल्याने अधूनमधून आधार मिळू शकतो. सध्या रुपया ८९.५० ते ९१.०० या विस्तृत मर्यादेत व्यवहार करेल अशी अपेक्षा आहे.
पंकज चौधरी उत्तर प्रदेश भाजपचे नवे अध्यक्ष
लखनऊ : उत्तर प्रदेश भाजपच्या नव्या प्रदेशाध्यक्षपदासाठी रविवारी केंद्रीय वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांच्या नावाची घोषणा झाली. १३ डिसेंबर रोजी झालेल्या नामांकन प्रक्रियेत केवळ पंकज चौधरी यांचेच नामाकन दाखल झाल्याने ते बिनविरोध निवडून आले. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या उपस्थितीत लखनऊ येथे त्यांच्या नावाची औपचारिक घोषणा करण्यात आली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांचे स्वागत केले.
पंतप्रधानासाठी ‘अपमानास्पद’शब्द वापरावरून संसदेत गोंधळ ; सोनिया गांधींनी माफी मागावी, भाजपची मागणी
BJP on sonia gandhi। काँग्रेसच्या रॅलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध अपशब्दांचा वापर झाल्याने आज संसदेत गोंधळ उडाला. आज सकाळी दोन्ही सभागृहे सुरू होताच तहकूब करण्यात आली. भाजप खासदार किरेन रिजिजू यांनी लोकसभेत हा मुद्दा उपस्थित करत म्हटले की, हे लज्जास्पद आहे आणि काँग्रेस नेतृत्वाने माफी मागावी “अशी मागणी त्यांनी केली. पुढे रिजिजू म्हणाले, “आम्ही या […] The post पंतप्रधानासाठी ‘अपमानास्पद’ शब्द वापरावरून संसदेत गोंधळ ; सोनिया गांधींनी माफी मागावी, भाजपची मागणी appeared first on Dainik Prabhat .
खाजगी कोचिंग क्लासमध्ये रक्तरंजित थरार! लेक्चर सुरू असतानाच विद्यार्थ्याचा निर्घृण खून
रामचंद्र सोनवणे राजगुरुनगर : शहरात आज सकाळी घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. कोर्ट रस्त्यानजिक असलेल्या संस्कार कोचिंग क्लासेस या खाजगी कोचिंग क्लासमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचे लेक्चर सुरू असतानाच, त्याच वर्गातील एका विद्यार्थ्याने आपल्या मित्रावर धारदार हत्याराने गळा चिरून त्याचा निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना घडली. समोर आलेल्या माहितीनुसार, आज सकाळी सुमारे ९ […] The post खाजगी कोचिंग क्लासमध्ये रक्तरंजित थरार! लेक्चर सुरू असतानाच विद्यार्थ्याचा निर्घृण खून appeared first on Dainik Prabhat .
महापालिका निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता; आयोगाची आज पत्रकार परिषद
Municipal Corporation Election | राज्य निवडणूक आयोगाची आज महत्त्वाची पत्रकार परिषद होणार आहे. त्यानुसार राज्यातील २९ महापालिका निवडणुकीची घोषणा आज होण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची तयारी जळपास पूर्ण झाली असून, येत्या २४ तासांमध्ये महापालिका निवडणुकीच्या घोषणेसोबच आचारसंहिता लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महापालिका निवडणुका एकाच टप्प्यात आज सायंकाळी 4 वाजता होणाऱ्या पत्रकार […] The post महापालिका निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता; आयोगाची आज पत्रकार परिषद appeared first on Dainik Prabhat .
ज्येष्ठ संगीतकार ओ. पी नय्यर यांना मरणोत्तर मोहम्मद रफी जीवन गौरव पुरस्कार जाहीर
मंत्री आशिष शेलार यांची घोषणा; गायिका उत्तरा केळकर यांना मोहम्मद रफी पुरस्कारमुंबई: हिंदीमधील अजरामर गाण्यांना चाली देऊन संगीत जगतात आपले अढळ स्थान निर्माण करणाऱ्या ज्येष्ठ संगीतकार ओ. पी. नय्यर यांना यावर्षीचा मरणोत्तर मोहम्मद रफी जीवन गौरव पुरस्कार, तर सुप्रसिध्द गायिका उत्तरा केळकर यांना सन २०२५ चा मोहम्मद रफी पुरस्कार देण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी आज केली आहे.आशिष शेलार यांच्या स्पंदन या संस्थेतर्फे मोहम्मद रफी यांच्या वाढदिवसादिवशी त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ दरवर्षी एका संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ कलावंताला जीवन गौरव व मोहम्मद रफी पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. पुरस्काराचे हे १९ वे वर्ष असून एक लाख रूपयांचा धनादेश स्मृतीचिन्ह आणि शाल श्रीफळ असे जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप असून, ५१ हजार रूपयांचा धनादेश आणि मानचिन्ह असे रफी पुरस्काराचे स्वरूप आहे. रफी यांच्या जयंतीनिमित्त २४ डिसेंबरला दरवर्षी हा पुरस्काराचा शानदार सोहळा रंगशारदा येथे पार पडतो.https://prahaar.in/2025/12/15/black-magic-performed-on-bulls-participating-in-a-race-this-act-of-superstition-was-discovered-in-a-crematorium-in-kolhapur/रंगशारदामध्ये २४ डिसेंबरला वितरणवांद्रे पश्चिम रंगशारदा येथे २४ डिसेंबर रोजी दरवर्षी प्रमाणे हा पुरस्कार वितरण सोहळा संध्याकाळी ६.०० वा. सुरू होणार असून मान्यवरांच्या हस्ते यावर्षी या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. यापूर्वी संगीतकार हृदयनाथ मंगेशकर, गीतकार आनंदजी, गायक अमीत कुमार यांच्यासह ज्येष्ठ गायिका आशा भोसले, सुरेश वाडकर, शमशाद बेगम, संगितकार रवी, शैलेंद्र सिंग, नौशाद अली, पॅरेलाल, सुमन कल्याणपूर, अनुराधा पौडवाल, खय्याम, मरणोत्तर श्रीकांत ठाकरे, अशा विविध मान्यवर कलावंतासह ख्यातनाम निवेदक अमिन सयानी यांनांही यापुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
मोहित सोमण: आजचे टॉप स्टॉक जाणून घेऊयात एका क्लिकवर! मजबूत फंडामेंटल व टेक्निकल पोझिशनआधारे जेएम फायनांशियल इन्स्टिट्युशनल सिक्युरिटीज (JMFL) व मोतीलाल ओसवालने (Motilal Oswal Financial Services) या ब्रोकरेज कंपन्यांनी चांगल्या रिटर्न्ससाठी काही शेअर खरेदीसाठी सुचवले आहेत. जाणून घेऊयात कुठले शेअर खरेदी करावे ते पुढीलप्रमाणे -जेएम फायनांशियल इन्स्टिट्युशनल सिक्युरिटीज -१) Hindalco Industries- ब्रोकरेज कंपनीने या शेअरची खरेदी कारण राखण्यासाठी (Maintain Buy) बाय कॉल दिला असून ब्रोकरेजने लक्ष्य किंमत (Target Price) ९५५ रूपयांचे गुंतवणूकदारांना दिले आहे. जेएमएफएलने चाकण येथील प्रकल्पाला भेट दिली आहे. कंपनीकडून वाढलेल्या तांत्रिक प्रगतीआधारे कंपनीवर सकारात्मक मत नोंदवले. ब्रोकरेजच्या मते, कंपनीने आपल्या उत्पादनातील ऑटोमेशनमध्ये मोठ्या प्रमाणात पातळी वाढवली आहे. यामध्ये हिंदाल्कोची औद्योगिक उत्पादकता वाढली असून कंपनी महिंद्राची एकमेक पुरवठादार (Supplier) म्हणून आपले स्थान अढळ राखण्यासाठी यशस्वी ठरली.यासह त्रैमासिक LME-संबंधित किंमत निर्धारण (LME सरासरी अधिक रूपांतरण प्रीमियम) आणि कोणत्याही नवीन ओईएम (Original Equipment Manufacturer OEM) ला सामील करून घेण्यासाठी कंपनीने चांगली कामगिरी केली. १५-२०% अंतर्गत परतावा दराची (IRR) किमान मर्यादा कंपनीची वाढली असून ब्रोकरेज मते ही आणखी वाढीची शक्यता डिसेंबरपर्यंत वर्तवली जात आहे. क्षमता विस्तारामुळे (सुमारे ८० हजार वरून १ लाख युनिट्सपर्यंत) ही वाढ होणार असून मार्च २०२७ पर्यंत दुसऱ्या टप्प्याच्या तयारीमुळे, तसेच स्टेनलेस स्टीलऐवजी ॲल्युमिनियममध्ये १४-१५ अतिरिक्त घटक बदलण्यात OEM कंपन्यांच्या स्वारस्यामुळे ही वाढ अधोरेखित होते असे कंपनीने म्हटले. यासह कंपनीच्या पॅकेजिंग, ऑटोमोटिव्ह, HVAC फिनस्टॉक आणि औद्योगिक मूल्य साखळ्यांमध्ये हिंदाल्कोचे स्थान आणखी मजबूत होते. त्यामुळेच कंपनीच्या शेअर्समध्ये खरेदीची शिफारस आम्ही कायम ठेवतो असे ब्रोकरेजने म्हटले.२) TBO Tek- या कंपनीच्या शेअर्समध्येही ब्रोकरेजने बाय कॉल दिला असून लक्ष्य किंमत १९२० रूपये प्रति शेअर निश्चित केली आहे. ब्रोकरेजने दिलेल्या माहितीप्रमाणे, दुबईमध्ये झालेल्या TBO च्या पहिल्या गुंतवणूकदार बैठकीत लक्झरी ट्रॅव्हल मार्केटमधील कंपनीच्या जागतिक वितरणातील सामर्थ्यावर आणि उत्कृष्ट पुरवठादार संबंधांवर लक्ष केंद्रित करण्यात आले. या टुरिझम कंपनीच्या सीईओ यांनी स्पष्ट केले की, प्रीमियम एअरलाइन्स, हॉटेल्स आणि सल्लागारांसोबतच्या या धोरणात्मक भागीदारीमुळे एक उच्च दर्जाची सेवा देणारी ऑफर शक्य होते. ज्यामुळे ऑनलाइन ट्रॅव्हल एजन्सी (OTAs) आणि बेड बँक्सच्या तुलनेत कंपनीला फायदा मिळतो. प्रस्थापित बाजारपेठांमधील 'कन्सोर्टिया' संबंधांचे महत्त्व हा देखील चर्चेचा एक महत्त्वाचा मुद्दा होता. यासह ब्रोकरेजने आपल्या अहवालात TBO ने तंत्रज्ञानातील काही अलीकडील गुंतवणुकींवरही प्रकाश टाकला आहे ज्यामुळे ती स्पर्धात्मक प्लॅटफॉर्मपेक्षा स्वतःला वेगळे ठरवू शकते आणि खर्चही अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थापित करू शकत आहे. एकूणच, व्यवस्थापनाने नमूद केले की, तंत्रज्ञानातील मोठ्या गुंतवणुकी आणि विशेष पुरवठादार नेटवर्कच्या जोरावर TBO लक्झरी ट्रॅव्हल क्षेत्रातील संधी साधण्यासाठी सुसज्ज आहे. ब्रोकरेजने दिलेल्या माहितीनुसार, नजीकच्या काळातील अंदाज साधारणपणे ब्रोकरेज कायम आहे. असे असले तरी डिसेंबर २०२६ पर्यंतच्या अंदाजानुसार लक्ष्य किंमत (TP) वाढवून १९२० रुपये ब्रोकरेजने वाढवली आहे.मोतीलाल ओसवाल फायनांशियल सर्विसेस -१) Amber Enterprises- मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज कंपनीने अंबर एंटरप्राईजेस शेअर खरेदी करण्याचा सल्ला गुंतवणूकदारांना दिला असून कंपनीच्या मते या शेअर्समध्ये २१% संभाव्य (Upside Potential) असून लक्ष्य किंमत ६६२६ रूपये प्रति शेअर ठेवण्यात आली असल्याचे स्पष्ट केले. ब्रोकरेजने कंपनीने अंबर एंटरप्राईजेस कंपनीच्या व्यवस्थापनाशी चर्चा केली होती. त्यातील निष्कर्षातील माहितीनुसार, कंपनीच्या उत्पादनाच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. तसेच कंपनीच्या इलेक्ट्रॉनिक्स विभागाच्या कामगिरीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आगामी काळात ब्रोकरेजने दिलेल्या माहितीनुसार, व्यवस्थापनाने रेल्वे उत्पादन व्यवस्थापनात मोठ्या प्रमाणात सुधारणा होईल अशी आशा या आर्थिक वर्षात व्यक्त केली आहे.तसेच आरएसी (RAC) उद्योगावर सध्या रेटिंग मानकांमधील बदलाचा परिणाम निश्चितच झाला आहे असे ब्रोकरेजने म्हटले. यामुळेच कंपनीच्या खर्च आणि उत्पादनांच्या किमती वाढल्या आहेत. या उद्योगावर तांब्याच्या किमतींमधील तीव्र वाढीचाही परिणाम झाला आहे, ज्याचा भार ग्राहकांवर एका तिमाहीच्या विलंबानंतरच टाकला जाऊ शकतो. आर्थिक वर्ष २६ मध्ये, अंबरला आरएसी (RAC) सेगमेंटमध्ये १०-१५% आणि इलेक्ट्रॉनिक्स सेगमेंटमध्ये ३५-४०% वार्षिक वाढीची अपेक्षा आहे. ब्रोकरेजने म्हटले आहे की,आम्ही आमचे मार्जिनचे अनुमान कमी करत आहोत आणि आर्थिक वर्ष २६/२७/२८ साठी आमचे अंदाज १०%/९%/५% ने कमी करत आहोत. सुधारित DCF-आधारित दोन वर्षांच्या फॉरवर्ड लक्ष्य किंमत ८००० रुपये (पूर्वी ८४०० रुपये) सह 'बाय' (BUY) रेटिंग कायम (Maintain Buy) ठेवले आहे असेही अहवालाने अंतिमतः म्हटले आहे.२) Simens- कंपनीच्या शेअर्समध्ये ब्रोकरेजने बाय कॉल दिला असून ३१४५ रूपये (Common Market Price CMP) खरेदीसह ३% संभाव्य वाढीसह लक्ष्य किंमत ३२५० रूपये प्रति शेअर दिली आहे. ब्रोकरेजने दिलेल्या माहितीनुसार कंपनीने (SIEM) आपल्या विश्लेषकांचा बैठकीत स्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चर सेगमेंटमध्ये चांगल्या वाढीचा कल आणि लोकोमोटिव्हची डिलिव्हरी सुरू झाल्यामुळे मोबिलिटी सेगमेंटसाठी महसूल वाढ आणि मार्जिन प्रोफाइलमध्ये सुधारणेची शक्यता अधोरेखित केली आहे. तसेच सरकारकडून, विशेषतः रेल्वेकडून, मिळणाऱ्या ऑर्डर्सच्या वेळेबद्दल आणि खाजगी भांडवली खर्चाच्या पुनरुज्जीवनाबद्दल अनिश्चितता मात्र अद्याप कायम आहे असे अहवालात ब्रोकरेजने म्हटले. अहवालातील माहितीनुसार, मोतीलाल ओसवालने म्हटले आहे की,'डिजिटल इंडस्ट्रीजमधील कमी मार्जिन लक्षात घेऊन आम्ही आमचे अंदाज 18MFY26E/12MFY27E/12MFY28E साठी १%/४%/४% ने कमी केले आहेत. आम्हाला FY24 (सप्टेंबर अखेर) FY28 (मार्च-अखेर) या कालावधीत महसूल/ईबीटा (EBITDA) / करोत्तर नफा (PAT) अनुक्रमे मध्ये ११%/ १३%/८% च्या पातळीवर सीएजीआरने (Compound Annual Growth Rate CAGR) ने वाढ अपेक्षित आहे.ब्रोकरेजने आपल्या अहवालात म्हटले आहे की आम्ही 45x Dec’27E कमाईवर आधारित, ३२५० (पूर्वीच्या ३३५० वरून) सुधारित लक्ष्य किमतीसह स्टॉकवरील आमचे 'न्यूट्रल' रेटिंग कायम ठेवतो. व्यापक भांडवली खर्चाचे पुनरुज्जीवन आणि मार्जिनमधील सुधारणा हे कमाई आणि मूल्यांकनाच्या रेटिंगसाठी प्रमुख चालक (Catlayst) असतील असे अहवालाने आपल्या निरीक्षणात नोंदवले.३) Endurance Technologies- ब्रोकरेजने कंपनीच्या शेअरला बाय कॉल दिला असून १५% अपसाईड संभाव्य वाढीसह २६४१ रुपये सीएमपीला खरेदी करण्याचा सल्ला ब्रोकरेजने दिला असून कंपनीने या शेअरची लक्ष्य किंमत ३०५० रुपयांवर निश्चित केली आहे. आपल्या अहवालातील निरिक्षणात नोंदवल्या माहितीनुसार, कंपनीला मिळालेल्या नव्या ऑर्डर मुळे आर्थिक स्थिती मजबूत होण्याची शक्यता आहे.अहवालातील माहितीनुसार ब्रोकरेजने एंड्युरन्स टेक्नॉलॉजीजच्या (ENDU) व्यवस्थापनाशी त्यांच्या प्रमुख विभागांच्या भविष्यातील दृष्टिकोनाबद्दल चर्चा केली आहे. त्यातील निरीक्षणातील माहितीनुसार सर्व दुचाकी वाहनांवर एबीएस (ABS) अनिवार्य करण्याच्या शिफारशीवर सरकारकडून स्पष्टतेची कंपनी वाट पाहत असली तरी१) बिडकिन येथील नवीन अलॉय व्हील प्लांट; २) ड्युअल-चॅनल एबीएस आणि चेन्नईमधील नवीन ब्रेक सुविधा; आणि ३) इन्व्हर्टेड फ्रंट फोर्क्स व्यवसाय या कारणामुळे कंपनीच्या कामगिरीत मजबूत होण्याची शक्यता आहे. यासह ब्रोकरेज मते, ही कारणे भविष्यात चारचाकी वाहनांतील वाढीचा एक चालक (Catlayst) म्हणून काम करू शकतो. कंपनी या विभागाचे योगदान सध्याच्या ३०% वरून ४५% पर्यंत वाढवण्यावर लक्ष केंद्रित करत आहे.यासह अहवालानुसार, कंपनीने यापूर्वीच डाय कास्टिंग्ज, ब्रेक्स आणि ट्रान्समिशनमध्ये ऑर्डर मिळवल्या आहेत आणि सस्पेंशनमधील पहिल्या ऑर्डरच्या प्रतीक्षेत आहे. याव्यतिरिक्त, कंपनीने संलग्न विभागांमध्ये क्षमता विकसित केली आहे, आणि सोलर डॅम्पर्स, बॅटरी पॅक असेंब्ली आणि ॲल्युमिनियम फोर्जिंगसाठी पुरवठा लवकरच सुरू होण्याची अपेक्षा आहे. स्टोफरलेच्या अधिग्रहणामुळे आणि नवीन ऑर्डर मिळाल्यामुळे, प्रतिकूल व्यापक आर्थिक वातावरण असूनही ब्रोकरेज मते, युरोपीय व्यवसायात स्थिर वाढ अपेक्षित आहे. त्यामुळे दिलेल्या माहितीत ब्रोकरेजने म्हटले आहे की,'आम्ही आर्थिक वर्ष २५-२८ दरम्यान एकत्रित महसूल (Consolidation) /ईबीटा (EBITDA)/ करोत्तर नफ्यात (PAT) मध्ये सुमारे १६%/१७%/१६% च्या सीएजीआरचा (CAGR) अंदाज लावतो .ब्रोकरेज कंपनीने ३०५० रुपयांच्या लक्ष्य किंमतीसह 'बाय' (BUY) कॉल रेटिंग कायम राखतो असे म्हटले.
२ वर्षीच्या चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला फाशीच ; राष्ट्रपतींनी दयेची याचिका फेटाळली
Jalna mercy petition। राज्यात 2012 साली घडलेल्या अत्यंत अमानुष घटनेतील दोषी आरोपीची दयेची याचिका राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अखेर नामंजूर केली आहे. जालनाच्या या प्रकरणात दोन वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार व नंतर हत्या केल्याबद्दल आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. राष्ट्रपतिपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर मुर्मू यांनी फेटाळलेली ही तिसरी दयेची याचिका ठरली आहे. या […] The post २ वर्षीच्या चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला फाशीच ; राष्ट्रपतींनी दयेची याचिका फेटाळली appeared first on Dainik Prabhat .
शिवागाळ केल्याने मित्रांकडूनच मित्राची हत्या; भानावर येताच दोन्ही आरोपींचे आत्मसमर्पण
बारामती – दारूच्या नशेत असलेल्या दोन मित्रांनी तिसऱ्या मित्राचा निर्घृण खून केल्याची घटना मोरगाव रोड येथे घडली. नशेतून भानावर आल्यावर दोन्ही आरोपींनी थेट पोलीस स्टेशन गाठले. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. शहरातील जुन्या मोरगाव रोड येथे तीन मित्र दारू पीत बसले होते. किरकोळ कारणावरून त्यांच्यात शिवीगाळ झाली. त्यानंतर त्याचे रूपांतर भांडणात झाले. अविनाश उर्फमाऊली […] The post शिवागाळ केल्याने मित्रांकडूनच मित्राची हत्या; भानावर येताच दोन्ही आरोपींचे आत्मसमर्पण appeared first on Dainik Prabhat .
घरगुती ग्राहकांसाठी प्रीपेड मीटर नाही : मुख्यमंत्री
नागपूर : राज्यात स्मार्ट मीटर बसवण्याचा निर्णय केंद्र शासनाच्या योजनेंतर्गत घेण्यात आला आहे. मात्र, सामान्य घरगुती ग्राहकांना प्रीपेड मीटर लावले जाणार नाहीत, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी रविवारी विधानसभेत दिली. प्रश्नोत्तराच्या तासात मुख्यमंत्री म्हणाले, सुरुवातीला प्रत्येक ग्राहकाला प्रीपेड स्मार्ट मीटर लावण्याचा प्रस्ताव होता. मात्र, त्यावर मोठ्या प्रमाणात आक्षेप नोंदवण्यात आल्याने राज्य शासनाने टप्प्याटप्प्याने अंमलबजावणीचा निर्णय घेतला. पहिल्या टप्प्यात फिडर मीटर आणि डिस्ट्रीब्युशन मीटर बसवण्यात आले असून, सध्या शासकीय कार्यालये व आस्थापनांमध्येच प्रीपेड स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत. सामान्य ग्राहकांसाठी मात्र पोस्टपेड स्मार्ट मीटरच बसवले जात आहेत.स्मार्ट मीटर स्वीकारणाऱ्या ग्राहकांच्या वीजबिलात १० टक्के सवलत देण्यात आली असल्याने आतापर्यंत स्मार्ट मीटरमुळे नागरिकांना प्रत्यक्ष लाभ झाला आहे. स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना मोबाईल अॅपच्या माध्यमातून तासागणिक वीज वापराचा तपशील मिळतो, त्यामुळे वापराची पडताळणी करणे सोपे झाले आहे. याशिवाय २४ तास तक्रार निवारण व्यवस्था उपलब्ध असून, आतापर्यंत पाच वेगवेगळ्या कंपन्यांनी बसवलेल्या स्मार्ट मीटरमध्ये केवळ एक टक्क्यांपेक्षा कमी त्रुटी आढळल्या आहेत. पुढील पाच वर्षे स्मार्ट मीटर पोस्टपेड स्वरूपातच राहणार असून, प्रीपेड मीटर सक्तीचा कोणताही निर्णय झालेला नाही. विधानसभा सदस्यांनी मांडलेल्या सूचनांचा विचार केला जाईल, असे आश्वासनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.
मोहित सोमण: कोरोना रेमिडीज आयपीओचे आज जबरदस्त प्रिमियम दरात सूचीबद्ध (Listing) झाले आहे. सकाळी सत्राच्या सुरुवातीलाच शेअर ३८% प्रिमियम दराने यशस्वी ठरला. मूळ प्राईज बँड १०६२ तुलनेत ३८% प्रति शेअर दरासह शेअर १४७० रूपयांना सूचीबद्ध झाला. ८ ते १० डिसेंबर दरम्यान उपलब्ध असलेल्या आयपीओला (IPO) १३७.०४ पटीने सबस्क्रिप्शन मिळाले होते. ११ डिसेंबरला पात्र गुंतवणूकदारांना समभागाचे वाटप (Allotment) करण्यात आले. आज १५ डिसेंबरला शेअर सूचीबद्ध झाला आहे. किरकोळ गुंतवणूकदारांना किमान १४८६८ रूपये गुंतवणूक करणे आयपीओसाठी अनिवार्य करण्यात आले होते. या फार्मा उत्पादन कंपनीला एकूण १४४.५४ पटीने सबस्क्रिप्शन मिळाले होते ज्यामध्ये किरकोळ अथवा रिटेल गुंतवणूकदारांकडून ३०.३९ पटीने, पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून २९३.८० पटीने, विना संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून २२०.१८ पटीने सबस्क्रिप्शन मिळाले. कंपनीच्या महसूलात इयर ऑन इयर बेसिसवर आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये १८% वाढ झाली असून करोत्तर नफ्यात (PAT) ६५% वाढ नोंदवली गेली.शेअर सूचीबद्ध होण्यापूर्वी शेवटची ग्रे मार्केट किंमत (GMP) ३२.२५% होती. या अपेक्षेलाही मागे टाकत दमदार पदार्पण शेअरने बाजारात केले आहे. एकूण ६५५.३७ कोटी बूक व्हॅल्यु मूल्यांकन असलेल्या या आयपीओत नवीन शेअर भांडवल ऑफर करण्यात आले नव्हते तर संपूर्ण आयपीओत ०.६२ कोटीचे शेअर गुंतवणूकदारांसाठी दाखल झाले होते. आयपीओपूर्वी कंपनीने अँकर गुंतवणूकदारांकडून १९४.८६ कोटी निधी प्राप्त केला होता.ऑगस्ट २००४ मध्ये स्थापन झालेली कोरोना रेमेडीज लिमिटेड ही महिला आरोग्यसेवा, हृदयरोग, वेदना व्यवस्थापन, मूत्रविज्ञान आणि इतर उपचारात्मक क्षेत्रांमध्ये उत्पादने विकसित करणारी, उत्पादन करणारी आणि विपणन करणारी एक औषध कंपनी आहे. उपलब्ध माहितीनुसार ३० जून २०२५ पर्यंत, कंपनीच्या वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओमध्ये महिला आरोग्यसेवा, हृदयरोग-मधुमेह, वेदना व्यवस्थापन, मूत्रविज्ञान आणि मल्टीस्पेशालिटी फार्मास्युटिकल्स ,जीवनसत्त्वे/खनिजे/पोषण, गॅस्ट्रोइंटेस्टाइनल आणि श्वसन यासारख्या उपचारात्मक क्षेत्रांमध्ये ७१ ब्रँड समाविष्ट आहेत.
Sara Arjun: ‘छोटी ऐश्वर्या’ सारा अर्जुनचा ग्लॅमरस जलवा; काळ्या गाऊनमधील लूकने चाहते झाले फिदा
Sara Arjun: बॉलिवूडमध्ये पदार्पण करताच अवघ्या २० वर्षांच्या सारा अर्जुनने आपल्या अदांनी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच तिची झलक पाहून तिला ‘छोटी ऐश्वर्या’ म्हणून ओळख मिळाली होती. आता मोठ्या पडद्यावर मुख्य नायिकेच्या भूमिकेत दिसल्यानंतर ती सोशल मीडियावरही जोरदार चर्चेत आहे. सारा अर्जुनने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करणाऱ्या ‘धुरंधर’ चित्रपटातून हिरोईन म्हणून डेब्यू […] The post Sara Arjun: ‘छोटी ऐश्वर्या’ सारा अर्जुनचा ग्लॅमरस जलवा; काळ्या गाऊनमधील लूकने चाहते झाले फिदा appeared first on Dainik Prabhat .
‘छडी लागे छमछम’बंद ! विद्यार्थ्यांना शारीरिक आणि मानसिक शिक्षा दिल्यास होणार थेट कारवाई
Education Department | मागील काही काळापासून शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना होणारी मारहाण, मानसिक छळ या घटना सातत्याने समोर येत आहेत. अलीकडेच वसई येथील एका शाळेतील सहावीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेत उशिरा आल्याने शिक्षा म्हणून शंभर उठाबशा करायला लावल्या यातच तिचा मृत्यू झाला. या प्रकाराची सरकारने दखल घेत वसई येथील या शाळेची नोंदणी रद्द केली. त्यानंतर आता शालेय […] The post ‘छडी लागे छमछम’ बंद ! विद्यार्थ्यांना शारीरिक आणि मानसिक शिक्षा दिल्यास होणार थेट कारवाई appeared first on Dainik Prabhat .
Mohammad Mukeem Letter। काँग्रेस पक्षाने ओडिशाचे माजी आमदार मोहम्मद मुकीम यांना पक्षविरोधी कारवायांचे कारण देत पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वातून काढून टाकले आहे. हा निर्णय अखिल भारतीय काँग्रेस समितीने (एआयसीसी) घेतला आहे. ओडिशा प्रदेश काँग्रेस समितीने (ओपीसीसी) हा आदेश जारी केला आहे. पक्षविरोधी कारवायांच्या तक्रारीनंतर मुकीम यांना काढून टाकण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहे. सोनिया गांधींना पत्र लिहिल्यानंतर […] The post “तीन वर्षांपासून राहुल गांधींना भेटलो नाही…” ; सोनिया गांधींना पत्र लिहिल्यानंतर मुकीम यांची हकालपट्टी appeared first on Dainik Prabhat .
जून 2024 मध्ये टी20 विश्वचषक जिंकल्यानंतर राहुल द्रविडचा मुख्य प्रशिक्षक म्हणून अडीच वर्षांचा कार्यकाळ संपला. बीसीसीआयने गौतम गंभीरला नवीन प्रशिक्षक बनवले, ज्याने 2 महिन्यांपूर्वीच केकेआरला आयपीएल विजेतेपद मिळवून दिले होते. गेल्या 17 महिन्यांत टीम इंडियाने मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आशिया कप जिंकला, तर घरच्या मैदानावर दोन कसोटी मालिका गमावण्याचा लाजिरवाणा विक्रमही केला. या काळात टीम इंडियासोबत प्रशिक्षक गौतम गंभीरचे अनोखे प्रयोग वादात राहिले. गौतम गंभीर टीम इंडियाला उद्ध्वस्त करत आहेत का, मंडे मेगा स्टोरीमध्ये 5 निकषांवर संपूर्ण विश्लेषण… **** ग्राफिक्स: द्रगचंद्र भुर्जी आणि अंकित द्विवेदी
Health Tips: हिवाळ्यात रोज सकाळी कोमट पाणी प्या; पचन सुधारेल, सर्दी-खोकल्यातूनही मिळेल दिलासा
Health Tips: हिवाळ्यात बहुतेक लोक सकाळची सुरुवात चहा किंवा कॉफीने करतात. मात्र आरोग्यतज्ज्ञांच्या मते, सकाळी उठल्यावर कोमट पाणी पिणे ही एक सोपी, स्वस्त आणि अत्यंत फायदेशीर सवय आहे. आयुर्वेद आणि आधुनिक विज्ञान दोन्हीही याला चांगली सवय मानतात. सकाळी कोमट पाणी प्यायल्याने शरीराचे आतले तापमान हळूहळू वाढते. त्यामुळे पचनसंस्था सक्रिय होते आणि शरीरातील घाण (टॉक्सिन्स) बाहेर […] The post Health Tips: हिवाळ्यात रोज सकाळी कोमट पाणी प्या; पचन सुधारेल, सर्दी-खोकल्यातूनही मिळेल दिलासा appeared first on Dainik Prabhat .
हिंगोली : पोतरा शिवारात सलग चौथ्या दिवशी बिबट्याचा वावर; पिंजऱ्याजवळ येऊनही बिबटे निसटले
शिवशंकर निरगुडे हिंगोली : जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील पोतरा शिवारात दोन शेळ्या, एका वासराची शिकार केलेल्या बिबट्याचा चौथ्या दिवशी याच भागात वावर असल्याचे दिसून आले. या ठिकाणी एका एका कुत्र्याची शिकार केल्याचे सोमवारी दि १५ सकाळी स्पष्ट झाले. तर ट्रॅप कॅमेऱ्यामध्ये दोन बिबटे आल्याचे दिसून आले, मात्र ते पिंजऱ्यात गेलेच नाहीत. आता त्यांना पिंजऱ्यात जेरबंद करण्यासाठी […] The post हिंगोली : पोतरा शिवारात सलग चौथ्या दिवशी बिबट्याचा वावर; पिंजऱ्याजवळ येऊनही बिबटे निसटले appeared first on Dainik Prabhat .
सोन्याच्या किमतीत मोठी वाढ ; आज किती दर वाढले?, जाणून घ्या
Gold Price Today। देशांतर्गत वायदा बाजारात सोन्याच्या किमतीत आज वाढ दिसून येत आहे. सोमवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर एक्सपायर असलेले सोन्याचे वायदा १,३४,२०४ रुपये (प्रति १० ग्रॅम) वर उघडले. शेवटच्या ट्रेडिंग दिवशी, MCX वर सोने १,३३,६२२ रुपयांवर बंद झाले होते. आज सकाळी १०:१० वाजता एक्सपायर असलेले सोने MCX वर १,३४,६६९ रुपयांवर व्यवहार करत होते, […] The post सोन्याच्या किमतीत मोठी वाढ ; आज किती दर वाढले?, जाणून घ्या appeared first on Dainik Prabhat .
Uddhav Thackeray | मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे निकटवर्तीय माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या सूनबाई, ठाकरेंचे पक्षाचे दिवंगत माजी नगरसेवक यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आज दादरच्या वसंत स्मृतीमध्ये तेजस्वी घोसाळकर यांचा भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश […] The post ठाकरे गटाच्या महिला नेत्याचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’; भाजपची वाट धरत शेअर केली भावनिक पोस्ट; ‘नाती बदलू शकतात, पण…’ appeared first on Dainik Prabhat .
बदलापूर: महाराष्ट्रातील बदलापूर येथे तीन वर्षांपूर्वी मृत्युमुखी पडलेल्या काँग्रेस महिला पदाधिकारी नीरजा आंबेकर यांच्या मृत्यूबाबत धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. नीरजा यांचा कथित मृत्यू नैसर्गिक असल्याचे दाखवण्यात आले होते. पोलीस तपासात सुद्धा हेच सत्य असल्याचे सांगितले होते. मात्र नीरजाचे पती रूपेश आंबेकर यांनी हा पूर्वनियोजित खून केल्याचे उघड झाले आहे. काँग्रेस महिला नेत्या नीरजा आंबेकर यांच्या मृत्यूनंतर तीन वर्षांनी हा खळबळजनक खुलासा समोर आल्याने सर्वांना धक्का बसला आहे.नीरजा आंबेकर यांच्या हत्येतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे त्यांच्या मृत्यूवेळी आत्महत्या किंवा नैसर्गिक मृत्यू असे भासवण्यासाठी विषारी सापाचा वापर करणे. आरोपी ऋषिकेश चाळकेने दिलेल्या जबाबानुसार, हत्या करण्याची पद्धत अत्यंत क्रूर आणि नियोजित होती. आरोपीने नीरजाच्या घरातील स्वयंपाकघरात एका पोत्यात विषारी साप आधीच लपवून ठेवला होता. यानंतर नीरजाचे पती रूपेशने पायांना मालिश करण्याच्या बहाण्याने तिला हॉलमध्ये झोपवले. सर्पप्रेमी असलेला आरोपी चेतन दुधानेने पोत्यातून साप बाहेर काढला आणि ऋषिकेश चाळकेला दिला. त्यानंतर, नीरजाला डाव्या घोट्याजवळ सापाने तीन वेळा चावा घेतल्याने तिचा मृत्यू झाला.हा खून झाल्यानंतर, संपूर्ण प्रकरण नैसर्गिक मृत्यू असल्याचे घोषित करण्यात आले आणि पोलिसांनी फक्त एडीआर (अपघाती मृत्यू अहवाल) दाखल केला. तीन वर्षांनंतर, जेव्हा सत्य समोर आले, तेव्हा पोलिसांनी नीरजा यांचा पती रूपेश आंबेकर, चेतन दुधाणे, कुणाल चौधरी आणि ऋषिकेश चाळके या आरोपींना अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, खोटे मृत्युपत्र देणाऱ्या डॉक्टरांचीही चौकशी केली जाईल असे पोलिसांनी सांगितले आहे.https://prahaar.in/2025/12/15/good-news-for-home-buyers-cidco-has-significantly-reduced-house-prices-learn-the-details/प्रकरण कसे आले समोर?काही दिवसांपूर्वी बदलापूरमध्ये एका तरुणावरती जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. यातील मुख्य आरोपी ऋषिकेश चाळके याला पोलिसांनी अटक केली होती. पोलीस उपनिरीक्षक राजेश गज्जल हे या प्रकरणाचा तपास करत असताना, चौकशीदरम्यान ऋषिकेशला 'तू आणखी काय-काय केलं आहेस?' असा प्रश्न विचारला. तेव्हा ऋषिकेशने बोलता बोलता तीन वर्षांपूर्वीच्या एका हत्येचा खुलासा केल्यावर हा धक्कादायक प्रकार समोर आला.
पालिका निवडणुकीच्या घोषणाची शक्यता ते ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला; जाणून घ्या TOP 10 News
१. महापालिका निवडणुकांची घोषणा आज होण्याची शक्यता राज्य निवडणूक आयोगाची आज महत्त्वाची पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेमध्ये राज्यातील प्रलंबित असलेल्या २९ महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून या निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागले होते. जर आज आयोगाने घोषणा केली तर आजपासूनच राज्यात आचारसंहिता लागू होऊ शकते, अशी माहिती समोर […] The post पालिका निवडणुकीच्या घोषणाची शक्यता ते ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला; जाणून घ्या TOP 10 News appeared first on Dainik Prabhat .
Vidya Balan: दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत वयाच्या ७५व्या वर्षीही तितक्याच जोमाने काम करताना दिसतात. सध्या ते त्यांच्या बहुचर्चित चित्रपट ‘जेलर २’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. अशातच या चित्रपटाबाबत एक मोठी आणि उत्सुकता वाढवणारी बातमी समोर आली आहे. दिग्दर्शक नेल्सन दिलीपकुमार यांच्या दिग्दर्शनाखाली २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जेलर’ चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर […] The post Vidya Balan: रजनीकांत यांच्या ‘जेलर २’मध्ये विद्या बालनची एन्ट्री; ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार चित्रपट appeared first on Dainik Prabhat .
पंतप्रधान मोदी ३ देशांच्या दौऱ्यावर होणार रवाना ; जाणून घ्या वेळापत्रक
PM Modi। पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारपासून जॉर्डन, इथिओपिया आणि ओमान या तीन देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. पंतप्रधान मोदी सोमवारी जॉर्डनला राजे अब्दुल्लाह द्वितीय बिन अल हुसेन यांच्या निमंत्रणावरून पोहोचतील. हाशेमाइट किंगडमच्या त्यांच्या दोन दिवसांच्या दौऱ्यादरम्यान, पंतप्रधान मोदी राजे अब्दुल्लाह द्वितीय बिन अल हुसेन यांची भेट घेतील आणि भारत-जॉर्डन संबंधांच्या सर्व पैलूंचा आढावा घेतील, तसेच प्रादेशिक […] The post पंतप्रधान मोदी ३ देशांच्या दौऱ्यावर होणार रवाना ; जाणून घ्या वेळापत्रक appeared first on Dainik Prabhat .
शिवाजीनगर येथे झाड कोसळले; कोणतीही जीवितहानी नाही
पुणे : शिवाजीनगर येथील शिमला ऑफिस परिसरात मध्यरात्री अचानक मोठे झाड कोसळल्याची घटना घडली. या घटनेमुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. माहिती मिळताच पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी चैन सॉ, कुऱ्हाड आदी उपकरणांच्या सहाय्याने झाडाच्या मोठ्या फांद्या कापून झाड बाजूला केले. सुमारे काही वेळातच रस्ता पूर्णपणे वाहतुकीसाठी खुला करण्यात […] The post शिवाजीनगर येथे झाड कोसळले; कोणतीही जीवितहानी नाही appeared first on Dainik Prabhat .
Pune : कात्रज–कोंढवा रस्त्यावर कंटेनर-स्कूटरचा अपघात; महिला जखमी
पुणे – कात्रज–कोंढवा रोडवरील गगन उन्नती इमारतीसमोरील डायव्हर्शनच्या ठिकाणी आज सकाळी साडेसातच्या सुमारासकंटेनर आणि होंडा स्कूटर यांच्यात अपघात झाला. कंटेनर क्रमांक TG 08 V 3323 च्या मागील चाकाखाली स्कूटर आल्याने हा अपघात घडला. या अपघातात स्कूटरवरून प्रवास करणाऱ्या महिलेच्या पायाला दुखापत झाली आहे. तिला तात्काळ स्थानिक नागरिकांच्या मदतीने उपचारासाठी भारतीय हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. […] The post Pune : कात्रज–कोंढवा रस्त्यावर कंटेनर-स्कूटरचा अपघात; महिला जखमी appeared first on Dainik Prabhat .
VI Share Today: वीआय शेअर गगनाला! सर्वोच्च न्यायालयाच्या दिलाश्यानंतर सुसाट शेअर तेजीतच सुरू
मोहित सोमण: सर्वोच्च न्यायालयाने वीआयला मोठा दिलासा दिला आहे. सुनावणीत केंद्र सरकारला वीआयसाठी एजीआर थकबाकीवर पुनर्विचार करण्याचे आदेश दिल्याने कंपनीच्या गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात सुटकेचा निःश्वास टाकला आहे. प्रामुख्याने केंद्र सरकार कंपनीचे ८३००० कोटी रूपयांची थकबाकी असलेले एजीआर (Adjusted Gross Revenue AGR) स्थगिती देऊ शकते. यामध्ये व्याजदरासहित रकमेचा समावेश आहे. टेलिकॉम विभागाने (Department of Telecommunication DoT) विभागाने कंपनीच्या वोडाफोन आयडिया यांच्या विलीनीकरणानंतर कंपनीच्या स्पेक्ट्रम व लायसन्स फी प्रलंबित असताना कंपनीची आर्थिक स्थिती खालावली होती. या वादातून प्रकरण सुप्रीम कोर्टात गेले होते.त्यामुळे सरकारला आता मोठ्या प्रमाणात लवचिकता मिळाली असून सरकार हप्ता हप्त्यांत ही रक्कम विना व्याजासह भरण्याची सवलत मिळणार आहे. मात्र जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, अद्याप टेलिकॉम विभाग (DoT) आणि टेलिकॉम कंपन्यांचे नियामक मंडळ ट्राय (TRAI) यांच्यातील वाद सोडवला गेला नसल्याने यात आणखी काही घडामोडी घडू शकतात.टेलिकॉम कंपनीचा महसूल व नफा घसरत असताना एप्रिलमध्ये, कंपनीच्या सीईओंनी दूरसंचार सचिवांना पत्र लिहून असे सुचवले होते की जर कंपनीला एजीआर मुद्द्यावर सरकारकडून वेळेवर पाठिंबा मिळाला नाही तर ती कंपनी (VI) आर्थिक वर्ष २६ नंतर काम करू शकणार नाही. त्यानंतर केंद्र सरकारने कंपनीला नोटीस बजावली होती. मात्र न्यायालयात वोडाफोन आयडिया (VI) सुनावणीत यश मिळवल्यानंतर सरकार आता कंपनीच्या कामकाजातून मिळणाऱ्या महसूलातून ६ टप्यात (6 Installments) माध्यमातून हे एजीआर थकबाकी वसूल करू शकते. खरं तर या प्रकरणामुळे कंपनीच्या २० कोटी सबस्क्राईबरला दिलासा मिळाला होता. गेल्या वर्षीच्या सुनावणीदरम्यान सरकारने वीआय, एअरटेल, जिओ कंपन्यांना विना टेलिफोन सुविधा (OTT) व इतर सुविधावरील महसूलातून एजीआर थकबाकी चुकण्याचे सांगितले होते यावर टेलिकॉम कंपन्यांनी विरोध केला होता. आता ६ टप्यात अँरियर भरल्यानंतर कंपनीला नवीन २५००० कोटींची भांडवली गुंतवणूक कंपनीच्या पुनः जिवित करण्यासाठी मदत होणार आहे. सध्या भारत सरकारच वोडाफोन आयडिया कंपनीच्या एकूण भागभांडवलापैकी ४८.९९% हिस्सा (Stake) ग्रहण करतो.डिसेंबरच्या सुरुवातीला, प्रसारमाध्यमांनी दिलेल्या एका अहवालानुसार, केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले की,'दूरसंचार विभाग व्होडाफोनकडून औपचारिक विनंतीची वाट पाहत आहे. व्होडाफोन आयडियाच्या प्रस्तावाचे मूल्यांकन केल्यानंतर सरकार शिफारस करेल. तसेच ते म्हणाले आहेत की,'मंत्रालय सध्या न्यायालयाने निश्चित केलेल्या कायदेशीर मर्यादांची तपासणी करत आहे.न्यायालयाच्या निर्णयाचे मूल्यांकन या दृष्टिकोनातून करणे आवश्यक आहे की काय केले जाऊ शकते आणि काय केले जाऊ शकत नाही. आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची मर्यादा ओलांडू शकत नाही.'सरकार पुढील काही आठवड्यांत आपले मूल्यांकन पूर्ण करून शिफारसी जारी करू शकते आणि मदत पॅकेजचे तपशील वर्षाच्या अखेरीस जाहीर होण्याची शक्यता आहे असे त्यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते.दरम्यान २०१९ च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार कंपनीला थकबाकी भरावी लागेल. एजीआर महसूल माफी मिळणार नसल्याचे तेव्हाच स्पष्ट झाले असले तरी आता टप्प्यात भरण्याची सवलत न्यायालयाने दिली आहे. ज्यामध्ये दूरसंचार कंपन्यांनी स्पेक्ट्रम आणि परवाना शुल्कासारखे वैधानिक देयके त्यांच्या समायोजित (Adjusted) एकूण महसुलावर आधारित भरावी लागतील ज्यात त्यांच्या गैर-दूरसंचार उत्पन्नाचाही (Non Telecom Revenue) समावेश आहे, असा दूरसंचार विभागाचा (DoT) दृष्टिकोन न्यायालयाने कायम ठेवला होता.तज्ञांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, आगामी मदत पॅकेज अंतर्गत व्होडाफोन आयडियाची (Vi) थकबाकीची रक्कम निश्चित केली जाईल आणि भविष्यात त्यावर कोणतेही व्याज आकारले जाणार नाही. भारती एअरटेलला तिचे हप्ते नियोजित वेळापत्रकानुसार भरावे लागतील, कारण ही मदत केवळ व्होडाफोन आयडियासाठी आहे.यापूर्वी व्होडाफोन आयडियाने एजीआरची देणी देण्यास असमर्थता दर्शविली आहे आणि सरकारकडे मदत मागितली असताना सरकारने आपले शेअर होल्डिंग वाढवले होते. देशातील क्रमांक ३ असलेली वीआयमध्ये सरकार सर्वात मोठे भागभांडवलधारक आहे. मदतीचे स्वरूप म्हणून सरकारने कंपनीची काही पूर्वीची देणी समभागांमध्ये (Converted into Equity) रूपांतरित केली आहेत. गेल्या महिन्यात सर्वोच्च न्यायालयानेही केंद्राला रोखीच्या संकटात सापडलेल्या या दूरसंचार कंपनीच्या संपूर्ण एजीआर दायित्वांसाठी एक विशेष पॅकेज तयार करण्यास परवानगी दिली होती.आदित्य बिर्ला समूह आणि यूकेच्या व्होडाफोन ग्रुप पीएलसीकडे या दूरसंचार कंपनीमध्ये अनुक्रमे ९.५०% आणि १६.०७% हिस्सा आहे.त्यामुळे नव्या योजनेनुसार समभागांची यशस्वी विक्री झाल्यास सरकारचा हिस्सा कमी होईल ज्यामुळे केंद्राला अतिरिक्त देणी समभागांमध्ये रूपांतरित करण्याचा पर्याय मिळेल आणि कंपनीला आणखी दिलासा मिळू शकतो असे म्हटले जात आहे.कंपनीच्या भविष्यातील कामगिरीसाठी हा मोठा दिलासा मानला जात असल्याने गुंतवणूकदारांनी शेअरला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. यावर सरकार लवकरच काहीतरी निश्चित भूमिका घेऊ शकते ज्यामुळे कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी अद्याप कायम राहू शकते. सकाळच्या सत्रात एकदम सुरूवातीला ९% उसळला असून १२.१० रूपये प्रति शेअरवर इंट्राडे उच्चांकावर (All time High) पोहोचला होता. कंपनीचा शेअर सकाळी १० वाजेपर्यंत ०.४३% उसळत ११.६९ रूपयांवर व्यवहार करत आहे. गेल्या ५ दिवसात कंपनीचा शेअर १४.७३% उसळला असून गेल्या महिनाभरात ६.८६% व वर्षभरात ४६.१८% उसळला होता.
काठापुर खुर्द परिसरातील बिबट्याला अखेर जेरबंद; वनविभागाला यश
जांबुत – शिरूर तालुक्यातील काठापुर खुर्द परिसरातील शेतकरी संतोष दशरथ वाव्हळ यांचे शेतात वनविभागाकडून लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात 7 वर्षीय मादी संवर्गातील बिबट्याला सोमवारी (दि. १५) रोजी पहाटे वनविभागाकडून जेरबंद करण्यात आले. मागील दोन महिन्यापासून या भागात बिबट्याचे वास्तव्य नेहमीच स्थानिकांच्या निदर्शनास येत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. काठापुर खुर्द येथे सरपंच सिमा थिटे […] The post काठापुर खुर्द परिसरातील बिबट्याला अखेर जेरबंद; वनविभागाला यश appeared first on Dainik Prabhat .
घर खरेदी करणाऱ्यांसाठी खूशखबर! सिडकोने केली घरांच्या किमतीमध्ये लक्षणीय घट, जाणून घ्या सविस्तर
नवी मुंबई: जर तुम्ही घर खरेदी करायचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी खूश खबर आहे. कारण सिडकोने माझ्या पसंतीचे सिडकोचे घर ही योजना जाहीर केली होती. या योजनेंतर्गत २६ हजार घरं आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गटाकरिता विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली होती. ही घरं नवी मुंबईतील वाशी, बामणडोंगरी, खारकोपर, खारघर (प), खारघर (पू), तळोजा, मानसरोवर, खांदेश्वर, पनवेल आणि कळंबोली नोडमध्ये उपलब्ध होती. या योजनेसाठी घरांच्या किंमती जाहीर झाल्यानंतर अनेकांनी अर्ज मागे घेतली. तर काहींनी घराची लॉटरी लागल्यावरही रद्द केले होते. या पार्श्वभूमीवर आता सिडकोने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सिडकोने घरांच्या किंमतींमध्ये दहा टक्के घट केली असून पून्हा संधी दिली आहे. तसेच लॉटरी विज्येत्यांपैकी घर रद्द केलेल्यांनाही एक संधी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.सिडकोने जाहीर केलेल्या माझ्या पसंतीचे सिडकोचे घर या योजनेमध्ये अगदी २५ लाखांपासून ते ९७ लाखांपर्यंत घरं उपलब्ध होती. या घरांच्या किंमती आता १० टक्क्यांनी कमी होणार आहेत. म्हणजेच २५ लाखाचे असलेले घर आता अडीच लाखांनी कमी होणार आहे. म्हणजेच हे घर आता २२ लाख ५० हजारांना मिळणार आहे. शिवाय जर हे घर आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गमध्ये असेल तर पंतप्रधान आवास योजनेंतर्गत अडीज लाखांची सबसीडीदेखील मिळणार आहे. ज्यामुळे हे घर २० लाखात मिळणार आहे. सिडकोच्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.https://prahaar.in/2025/12/15/relief-for-navi-mumbai-residents-the-railways-fulfill-their-promise-of-more-trains-and-a-new-station/आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गातील कळंबोली बस डेपो येथे विक्रीस असलेली घर सर्वात महाग होती. ज्याची किंमत साधारणत: ४२ लाखांच्या घरात होती. पण आता १० टक्के किंमत कमी झाल्यानंतर हेच घर आता ३६ लाखात मिळणार आहे. शिवाय यावर अडीच लाखांची सबसीडी लागू झाल्यानंतर त्याची किंमत ३४ लाखांपर्यंत झाली आहे. त्यामुळे या वर्गातील लॉटरी धारकांना त्याचामोठा दिलासा मिळणार आहे. तर खारघर बस डेपो मध्ये याच वर्गातील घरांची किंमत ४८ लाखांपर्यंत होती. हे घर ही नव्या किंमतीनुसार जवळपास ४३ ते ४४ लाखापर्यंत मिळणार आहे. इथेसुद्धा अडीच लाखांची सबसीडी लागू होणार आहे.सिडकोने १० टक्के दर कमी केल्यामुळे अल्प उत्पन्न गट आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गातील घरे लक्षणीयरीत्या अधिक परवडणारी ठरणार आहेत. विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गातील घर खरेदीदारांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मिळणाऱ्या अडीज लाखांच्या अनुदानासोबतच १० टक्के स्वस्त किंमतींचा एकत्रित लाभ मिळणार आहे. त्यामुळे एकूण आर्थिक भार कमी होऊन घर घेणे अधिक सुलभ होणार आहे. तसेच, या योजनेच्या १९ फेब्रुवारी २०२५ रोजी काढलेल्या सोडतीमध्ये यशस्वी ठरलेल्या परंतु घरे परत केलेल्या अर्जदारांना देखील सुधारित अटींनुसार पुन्हा एकदा योजनेत सहभागी होण्याची संधी देण्यात येणार आहे. त्यासाठी या अर्जदारांना वाटप झालेले घर निश्चित करण्यासाठी १० दिवसांची मुदत देण्यात आली आहे. या मुदती दरम्यान संबंधित अर्जदारांना https://cidcohomes.com या संकेतस्थळाला भेट देऊन प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.
Stock Market Crash। परदेशी शेअर बाजार गोंधळाच्या स्थितीत आहेत. जपानचा निक्केई, हाँगकाँगचा हँग सेंग आणि दक्षिण कोरियाचा कोस्पी हे सर्व निर्देशांक तीव्र घसरणीसह व्यवहार करत आहेत. आठवड्याच्या पहिल्या व्यापार दिवशी आशियाई बाजारांमध्ये झालेल्या या भीतीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही झाला आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक घसरले आणि रेड झोनमध्ये उघडले. बीएसईच्या ३० पैकी अठ्ठावीस […] The post जपान, हाँगकाँगपासून कोरियापर्यंत हाहाकार ! सेन्सेक्स आणि निफ्टी उघडताच कोसळले ; ‘या’ शेअर्समध्ये मोठी घसरण appeared first on Dainik Prabhat .
पुतिन मायदेशी परतल्यानंतर आता भारताची ३०० वस्तूंची यादी तयार ; काय आहे प्लॅन? वाचा
India-Russia Relationship। भारत आणि रशियाचे संबंध दीर्घकाळापासून मैत्रीपूर्ण आहेत, ज्याचा त्यांच्या व्यापारावर परिणाम होतो आणि आता त्यांचा विस्तार करण्याचा विचार केला जात आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, भारताने अभियांत्रिकी, औषधनिर्माण, कृषी आणि रसायनांमधील सुमारे ३०० उत्पादने ओळखली आहेत, ज्यामुळे भारतीय निर्यातदारांना रशियन बाजारपेठेत त्यांची उपस्थिती वाढवण्याची महत्त्वपूर्ण संधी मिळेल” असे म्हटले आहे. भारत […] The post पुतिन मायदेशी परतल्यानंतर आता भारताची ३०० वस्तूंची यादी तयार ; काय आहे प्लॅन? वाचा appeared first on Dainik Prabhat .
बिहार निवडणुकीच्या निकालानंतरच नितीन नवीन यांना राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष बनवण्याची तयारी सुरू झाली होती. 202 जागांच्या प्रचंड बहुमताने सत्तेत आलेल्या भाजपने आता येथूनच एक मोठे व्यक्तिमत्त्व शोधायला सुरुवात केली होती. निवडणूक प्रचारादरम्यान नितीन नवीन यांच्या वचनबद्धतेने पक्षाच्या शीर्ष नेतृत्वाचे लक्ष वेधून घेतले. शीर्ष नेतृत्वाने जेव्हा नाव पुढे केले, तेव्हा संघानेही नकार दिला नाही. प्रस्तावात नितीन नवीन यांची कार्यक्षमता, लोकांशी असलेले संबंध, संघटनेची चांगली समज यांची उदाहरणे दिली होती. त्याचबरोबर बिहारमधील विजय, छत्तीसगडमधील व्यवस्थापनाचाही उल्लेख होता. नितीन नवीन यांना अध्यक्षपदापर्यंत पोहोचवण्यात RSS च्या दोन शीर्ष नेत्यांचे आणि क्षेत्राच्या प्रभारींचे सहकार्य मानले जात आहे. विशेष अहवालात वाचा, संघ आणि मोदी-शाह यांनी नितीन नवीन यांना का निवडले…। बिहारमध्ये RSS ची पकड शहरी भागांमध्ये आहे. पाटणा, गया, मुझफ्फरपूर, भागलपूर यांसारख्या शहरांमध्ये संघाच्या शाखा बऱ्याच काळापासून लागत आहेत. नितीन नवीन यांची राजकीय ओळखही याच शहरी भागातून तयार झाली आहे. पाटणासारख्या शहरात जिथे मध्यमवर्ग, व्यापारी आणि व्यावसायिक मते निर्णायक आहेत, तिथे संघाची वैचारिक उपस्थिती भाजपसाठी आधार बनते. नितीन नवीन यांच्या राजकारणात आक्रमकता कमी, संयम, संवाद आणि संघटना जास्त दिसते. याच व्यवहारामुळे नितीन सतत संघाच्या जवळ येत गेले. सूत्रांनुसार, बिहार निवडणुकीनंतरच नितीन नवीन यांचे नाव जवळपास निश्चित झाले होते. उत्तर प्रदेशच्या प्रदेशाध्यक्षांचा निर्णय व्हायचा होता, त्यामुळे उशीर झाला. 2 मुद्द्यांमध्ये RSS नितीन नवीन यांच्या नावावर का सहमत झाला 1. ‘डाउन टू अर्थ’ प्रतिमा: संघाच्या विस्तारासाठी उपयुक्त संघाशी संबंधित नेत्यांबद्दल एक गोष्ट सांगितली जाते - ते लो प्रोफाइल राहतात, पण काम मात्र सातत्याने करतात. नितीन नवीन यांची प्रतिमा देखील अशीच काहीशी बनली आहे. ते सोशल मीडियावर अतिसक्रिय नसतात आणि मोठ्या राजकीय वादांमध्येही वक्तव्ये करत नाहीत. त्यांची ओळख अशा नेत्याची आहे, जो कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधतो, सार्वजनिक व्यासपीठांवर संतुलित भाषा वापरतो आणि सत्तेत असतानाही स्वतःला वेगळे ठेवत नाही. ही शैली भाजपमध्ये संघ-समर्थित नेत्यांमध्ये सामान्य मानली जाते. याचा फायदा असा होतो की नेता विरोधापेक्षा जास्त स्वीकारार्हता मिळवतो. 2. पब्लिक कनेक्ट: सेवा आणि पोहोचचे राजकारण संघाच्या राजकारणाचा एक मोठा आधार सेवाकार्य राहिला आहे. आपत्कालीन परिस्थिती, सामाजिक कार्यक्रम, धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम - या सर्वांमध्ये स्वयंसेवकांची भूमिका असते. नितीन नवीन यांच्या राजकीय प्रवासातही हे तत्व दिसते. पाटण्याच्या शहरी भागात ते नागरिक समस्यांवर हस्तक्षेप करताना दिसले, प्रशासनाशी संवाद साधत राहिले आणि कार्यकर्त्यांद्वारे अभिप्राय घेत राहिले. याच कारणामुळे त्यांना केवळ 'निवडणुकीतील चेहरा' न म्हणता 'लोकांशी जोडलेला नेता' म्हटले जाते. 5 मुद्द्यांमध्ये मोदी-शाह यांनी का निवडले 1: मोदी-शाह यांचे आज्ञाधारक, हाताळण्यास सोपे नितीन नवीन हे पक्षाच्या सूचना 'पण-परंतु' न करता जशाच्या तशा लागू करणारे नेते आहेत. बिहार सरकारमध्येही ते समन्वय साधून चालतात जेणेकरून कोणी नाराज होऊ नये. त्यांचे सर्व पक्षांमध्ये चांगले संबंध आहेत. नितीन बहुतांश काळ बिहारमध्येच राहिले आहेत. यामुळे त्यांची ओळख देशभरात नाही. राजकीय विश्लेषक अभिरंजन कुमार म्हणतात, 'नितीन नवीन यांची उंची अशी नाही की ते मोदी-शाह यांच्या मर्जीशिवाय कोणताही निर्णय घेऊ शकतील. ते कोणताही निर्णय घेतील तो त्यांच्या हिशोबानेच घेतील. असे म्हणा की ते आज्ञाधारक नेत्याच्या भूमिकेत राहतील.' राजकीय विश्लेषक प्रियदर्शी रंजन म्हणतात, 'नवीन यांची एक खासियत अशीही आहे की ते महत्त्वाकांक्षी नाहीत. त्यांना जेवढे मिळते तेवढ्यात समाधान मानणारे नेते आहेत. अशा परिस्थितीत ते शीर्ष नेतृत्वासाठी आव्हान ठरू शकत नाहीत.' 2: लो प्रोफाइल नेते, कधीही भेटू शकतात 5 वेळा आमदार आणि 3 वेळा मंत्री असूनही नवीन खूप लो-प्रोफाइल नेते आहेत. त्यांना भेटणे कार्यकर्त्यांपासून ते नेत्यांपर्यंत सर्वांसाठी सोपे असते. कोणताही व्यक्ती रात्र असो वा दिवस, कधीही त्यांना भेटू शकतो. राजकीय विश्लेषक प्रियदर्शी रंजन म्हणतात, ‘नितीन नवीन खूप मनमिळाऊ नेते आहेत. ओळखीशिवायही ते लोकांना सहज भेटतात. कार्यकर्त्यांसाठी त्यांचे दार 24 तास उघडे असते. त्यांचे वडीलही खूप मनमिळाऊ नेते होते.’ नवीन यांचे संपूर्ण कुटुंब RSS च्या जवळचे राहिले आहे. ते सध्या 45 वर्षांचे आहेत. त्यांना पुढे करून भाजपने युवा पिढीला पुढे आणले आहे. 3ः ओबीसींना सत्ता, फॉरवर्डना पक्ष यावेळीही भाजपने पक्ष आणि सत्तेत ओबीसी-फॉरवर्ड संयोजनाची पुनरावृत्ती केली आहे. जेपी नड्डा ब्राह्मण समाजातून येतात. त्यांच्या जागी पक्षाने कायस्थ समाजातून येणाऱ्या नबीन यांना आणून फॉरवर्ड-ओबीसी संयोजनाला मजबूत केले आहे. मोदी ओबीसी समाजातून येतात, अशा परिस्थितीत पक्षाची कमान फॉरवर्ड (उच्चवर्णीय) समाजाला दिली आहे. प्रियदर्शी रंजन म्हणतात, ‘भाजपने योग्य रणनीतीनुसार समीकरण साधले आहे. त्यांना माहीत आहे की आपल्या मूळ मतदारांना कसे जपायचे. भाजप जेव्हा शून्य होता, तेव्हा त्याची ताकद फॉरवर्ड (उच्चवर्णीय) होते. आता जेव्हा तो आपल्या शिखरावर आहे, तेव्हा त्यांना सोडू इच्छित नाही.’ 4ः नबीन यांच्या मदतीने बंगाल आणि ईशान्य भारत या दोघांनाही साधले नबीन हे बिहारचे पहिले नेते आहेत, ज्यांना भाजपने मोठी जबाबदारी दिली आहे. हा मोठ्या रणनीतीचा भाग असू शकतो. पक्षाचे लक्ष पूर्वेकडील म्हणजेच बंगाल आणि ईशान्य भारताला साधण्यावर आहे. 5: छत्तीसगड निवडणूक जिंकवली छत्तीसगड विधानसभा निवडणुकीपूर्वी नितीन नवीन यांना छत्तीसगडचे प्रभारी बनवण्यात आले होते. काँग्रेसचा मजबूत गड असलेल्या या राज्यात सरकार स्थापन करण्यात नितीन नवीन यांची महत्त्वाची भूमिका होती. त्यांनी अनेक मोठे संघटनात्मक बदल केले होते, ज्याचा फायदा भाजपला मिळाला. नितीन नवीन यांनी एका बाजूला बूथ स्तरावर मजबूत कार्यकर्ते नेटवर्क तयार केले. दुसऱ्या बाजूला मोहल्ला बैठका, छोटे कार्यक्रम आणि वैयक्तिक संपर्काद्वारे पक्षाची प्रतिमा मजबूत केली. हेच काम त्यांना बिहार-बंगाल आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये करायचे आहे.
आजपासून अमेरिका भारतीयांवर करणार कारवाई? ; H-1B आणि H-4 व्हिसासाठी करावा लागणार गोपनीयतेचा त्याग
American Visa। अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने H-1B आणि H-4 व्हिसा अर्जदारांसाठी सोशल मीडिया प्रोफाइल पडताळणी अनिवार्य केली आहे. हा नवीन नियम आजपासून लागू होत आहे. पूर्वी, ही पडताळणी फक्त F, M आणि J व्हिसावरील विद्यार्थी आणि एक्सचेंज अभ्यागतांसाठी लागू होती. आता, ती H-1B (कुशल कामगार) व्हिसावरील आणि H-4 व्हिसावरील त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसाठी वाढविण्यात आली आहे. सोशल […] The post आजपासून अमेरिका भारतीयांवर करणार कारवाई? ; H-1B आणि H-4 व्हिसासाठी करावा लागणार गोपनीयतेचा त्याग appeared first on Dainik Prabhat .
विक्रमगडमधील १५० आदिवासी मुलांनी अनुभवली मुंबई; सनदी तसेच आयपीएस अधिकाऱ्यांनी केले मार्गदर्शन
मुंबई (प्रतिनिधी):आजवर कधीही रेल्वेने प्रवास न केलेल्या आणि मुंबईही न पाहिलेल्या पालघर जिल्ह्यातील विक्रमगड येथील ओंदे येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील १५० आदिवासी भागातील विद्यार्थ्यांनी प्रथमच मुंबई अनुभवली. ग्रामीण व आदिवासी समुदाय जनसंपर्क कार्यक्रम अंतर्गत काश फाऊंडेशनच्यावतीन मुंबई शैक्षणिक व एक्स्पोजर टूर आयोजित केली. सनदी अधिकारी निधी चौधरी, निवृत्त सनदी अधिकारी विवेक अत्रेय,आयपीएस अधिकारी डॉ. प्रविण मुंडे, सीमाशुल्क विभागाचे अधिकारी समीर वानखेडे आदींनी या आदिवासी मुलांना संबोधित करत मार्गदर्शन केले.काश फाउंडेशन, मुंबई यांनी झेविअर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च आणि नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट , केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय यांच्या सहयोगाने हा दौरा आयोजित केला होता. या विद्यार्थ्यांनी पालघर येथून फ्लाइंग राणी एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण केल्यानंतर मुंबई सेंट्रल येथे उतरल्यानंतर सर्वांनी प्रथम गिरगाव चौपाटी येथे भेट देऊन समुद्रकिनाऱ्याचे सौंदर्य अनुभवले. यानंतर विद्यार्थ्यांनी “समावेशक या विषयावरील २०वी राष्ट्रीय कार्यशाळेत सहभाग नोंदवला. त्यानुसार नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट यांच्या २१व्या आंतरराष्ट्रीय परिसंवादात सहभाग घेतला. यात थायलंडचे कॉन्सुल जनरल, इजिप्तच्या कॉन्सुल जनरल, अर्जेंटिनाच्या डेप्युटी कॉन्सुल जनरल, तसेच भारतातील अधिकारी तज्ज्ञांनीही विद्यार्थ्यांना संबोधित केले.https://prahaar.in/2025/12/15/the-municipal-corporation-will-maintain-accurate-records-of-the-stray-dog-population/नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट (एनजीएमए), मुंबई यांच्या संचालिका निधी चौधरी यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना करिअर घडविण्यासाठी मार्गदर्शनपर आणि प्रेरणादायी संदेश दिला. भारताच्या समृद्ध आधुनिक कलाविश्वाचा अनुभव घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी एनजीएमए ला अवश्य भेट द्यावी, असेही आवाहन केले. आजची तरुण पिढी संधींनी भरलेल्या अशा महत्त्वाच्या टप्प्यावर उभी आहे, असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना जिज्ञासा जपा, शिकत रहा आणि नवनवीन गोष्टी आत्मसात करा, असे आवाहन माजी सनदी अधिकारी विवेक अत्रेय यांनी केले. काश फाऊंडेशनचे प्राध्यापक डॉ. अवकाश जाधव यांनी “सरदार वल्लभभाई पटेल यांची विलक्षण परंपरा” या विषयावर मुख्य व्याख्यान दिले.
चेंबूरमधील हंडोरेंच्या बालेकिल्ल्याला आरक्षणाचा फटका, हंडोरे कुटुंबाशिवाय असणार काँगेसचा उमेदवार?
शिवसेनेला विधानसभेत खाते खोलण्याची संधीमुंबई (सचिन धानजी):मागील पाच ते सहा निवडणुकांमध्ये चेंबूरमधील एकाच प्रभागातून सातत्याने चंद्रकांत हंडोरे आणि त्यांची पत्नी निवडून येत आहे. परंतु यंदा प्रथमच हंडोरे यांना आपल्या घरात नगरसेवक टिकवून ठेवण्यासाठी हा प्रभाग शिल्लक राहिलाच नाही. हंडोरे कुटुंबाकडे मागील अनेक वर्षांपासून असणारा प्रभाग क्रमांक १५० हा ओबीसी महिला आरक्षित झाल्याने हंडोरे कुटुंबाला अन्य प्रभागाचा शोध घेण्याची वेळ आली आहे, तसेच आपला गड राखण्यासाठी कुटुंबातील अन्य सदस्यांचा किंवा मर्जीतील पदाधिकाऱ्यांला निवडणूक रिंगणात उतरवण्याची वेळ येणार आहे. त्यामुळे या चेंबूर विधानसभेतून मनसेच्या वाट्याला एखादी जागा लागू शकते, तर शिवसेनेचा आमदार असले तरी त्यांच्याकडे पाच पैंकी दोन जागा जाण्याची शक्यता आहे.चेंबूर विधानसभेत मागील दोन विधानसभांमध्ये शिवसेनेचे प्रकाश फातर्पेकर हे निवडून येत असले तरी दोन शिवसेना स्वतंत्र झाल्यानंतर या प्रभागातून उबाठाचे तुकाराम काते हे निवडून आले आहेत. त्यामुळे चेंबूरमध्ये शिवसेनेचा आमदार निवडून आला असला तरी भाजपाच्यावतीने तीन जागा लढवल्या जाण्याची शक्यता आहे. चेंबूर विधानसभेत काँग्रेसचा एक, भाजपा दोन आणि उबाठाचे दोन अशाप्रकारे पाच नगरसेवक निवडून आलेले आहेत. परंतु प्रभाग क्रमांक १५०ची जागा भाजपा आपल्याकडे घेवून रिपाइंला देण्याची शक्यता आहे. शिवसेनेसाठी प्रभाग क्रमांक १५३ आणि प्रभाग क्रमांक १५५ हे दोनच प्रभागांचे पर्याय असून एकही नगरसेवक या विधानसभेत नसल्याने या प्रभागात विजय मिळवून शिवसेनेला आपले खाते उघडण्याची संधी प्राप्त झाली आहे.लोकसभेत चेंबूर विधानसभेतून झालेले मतदानअनिल देसाई उबाठा : ६१,३५५राहुल शेवाळे, शिवसेना : ५८,४७७चेंबूर विधानसभेतील मतदानतुकाराम काते, शिवसेना : ६३,१९४प्रकाश फातर्पेकर, उबाठा : ५२,४८३आनंद जाधव, वंचित : ८,८५४माऊली थोरवे, मनसे : ७,८२०दिपकभाऊ निकाळजे, रिपाइं: ७,४४०प्रभाग क्रमांक १५० (ओबीसी महिला)हा प्रभाग यापूर्वी खुला झाल्याने या मतदार संघातून काँग्रेसच्या तिकीटावर माजी महापौर आणि माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्या पत्नी संगीता हंडोरे या निवडून आल्या होत्या. परंतु, यंदा या प्रभागात ओबीसी महिला आरक्षण पडल्याने याठिकाणी प्रथमच काँग्रेसच्यावतीने हंडोरे यांच्या घरातील कोणीही उमेदवान नसेल असे बोलले जात आहे. चेंबूरमधील काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे हा चेहरा असल्यामुळे आरक्षणाच फटका त्यांना बसला आहे. त्यामुळे काँग्रेसच्यावतीने हंडोरे यांच्या पत्नी संगीता या आता प्रभाग क्रमांक १५५मध्ये जिथे एससी महिला आरक्षित झाला आहे, तिथे जाण्याची वेळ आली आहे. त्यामुळे हंडोरे आपल्या पत्नीला प्रभाग १५५मधून उमेदवारीसाठी इच्छुक असले तरी आपल्या बालेकिल्ल्यात म्हणजे प्रभाग १५०मध्ये कोणाला उतरवतात हा प्रश्न जनतेला पडला आहे. या प्रभागात हंडोरे यांची ताकद पाहता यंदा मात्र आरक्षणामुळे त्यांच्या कुटुंबातील अगदी जवळची व्यक्ती कुणी निवडणूक रिंगणात उतरण्याची दाट शक्यता नसल्याचे बोलले जात आहे. मात्र, या प्रभागात काँग्रेसचे प्राबल्य असून हा प्रभाग शिवसेनेला सोडला जावू शकतो. परंतु याठिकाणी शिवसेना किंवा भाजपा तसेच उबाठाकडेही तुल्यबळ उमेदवार नाही. त्यामुळे भाजपाकडे ही जागा जाईल आणि ही जागा रिपाइं आठवले गटासाठी सोडली जावू शकते असेही बोलले जात आहे.प्रभाग क्रमांक १५२ (अनुसूचित जाती )हा प्रभाग पुन्हा एक अनुसचित जातीकरता आरक्षित झाला आहे. त्यामुळे या प्रभागातून निवडून आलेल्या भाजपाच्या आशा मराठे यांचा वॉर्ड शाबूत राहिला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भाजपाच्यावतीने आशा मराठे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे. त्यामुळे या प्रभागातून उबाठाकडून पुन्हा उमेदवाराचा शोध सुरु झाला आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक १५५मधील माजी नगरसेवक श्रीकांत शेट्ये यांना या प्रभागातून निवडणूक लढवण्यासाठी विनंती केली जात आहे. त्यामुळे या प्रभागात उबाठाच्यावतीने श्रीकांत शेट्ये यांच्या उमेदवारीची चर्चा आहे. मात्र, त्यांनी ही उमेदवारी नाकारल्यास पुन्हा एकदा डॉ सोनाली साळवे यांना निवडणूक रिंगणात उतरवावे लागणार आहे. त्यामुळे उबाठा विरुध्द भाजपा अशीच लढत याठिकाणी होणार आहे. सुमारे १४०० मतांनी आशा मराठे यांचा सन २०१७मध्ये निवडून आल्या होत्या. पण आता हा मतदार संघ भाजपाने एवढा बांधला की उबाठाला आता मागील वेळेपेक्षा अधिक मतदानही घेता येणार नाही अशी स्थिती आहे.प्रभाग क्रमांक १५२ (ओबीसी महिला)हा प्रभाग पूर्वी ओबीसी होता, परंतु आबीसी महिला राखीव झाल्याने या प्रभागातून निवडून आलेल्या उबाठाचे नगरसेवक अनिल पाटणकर यांना घरी बसण्याची वेळ आली आहे. हा प्रभाग ओबीसी महिला राखीव झाल्याने अनिल पाटणकर यांनी उबाठाच्यावतीने आपली पत्नी मिनाक्षी पाटणकर यांना निवडणूक रिंगणात उतरवण्याचा विचार केला आहे. तर हा प्रभाग शिवसेनेच्या वाट्याला जाणार असून चेंबूरचे आमदार तुकाराम काते हे आपल्या मोठ्या सुनेला या माध्यमातून निवडणूक रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे. काते यांचे ज्येष्ठ पुत्र तुषार यांची पत्नी तन्वी काते ही या प्रभागातून इच्छुक आहेत. त्यामुळे या प्रभागात काते विरुध्द पाटणकर अशी लढत होण्याची दाट शक्यता आहे. मात्र, काँग्रेसकडून कुणाही ठोस उमेदवाराचे नाव पुढे आलेले नाही. अनिल पाटणकर हे पूर्वी काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आले होते, पण त्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि शिवसेनेकडून पोटनिवडणूक लढवून ते विजयी झाले होते.त्यानंतर शिवसेनेकडून ते विजयी झाले होते. पण शिवसेना फुटल्यानंतर ते उबाठा शिवसेनेतच राहिले. अनिल पाटणकर हे तब्बल ७८६७ मतांनी विजयी झाले होते.त्यामुळे या प्रभागात पाटणकर यांनी मजबूत पाय रोवलेले असल्याने शिवसेनेला हा उबाठाचा गड फोडण्यासाठी मोठी शर्थीची लढाई द्यावी लागणार आहे.प्रभाग क्रमांक १५४(सर्वसाधारण)हा प्रभाग पुन्हा एकदा खुलाच राहिल्याने भाजपचे विद्यमान नगरसेवक महादेव शिवगण यांच्यासमोरे उमेदवारीचे मोठे आहे. प्रभाग पुन्हा खुला झाल्याने महादेव शिवगण हे प्रबळ दावेदार असले तरी या प्रभागातून टिळक नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे राहुल वाळुंज, भूपेन लालवानी यांचीही इच्छुक म्हणून नावे पुढे सारली जात आहेत. त्यामुळे भाजपा कुणाला उमेदवारी देणार हे स्पष्ट नाही. तर उबाठातही उमेदवारीबाबत स्पर्धा आहे. मागील निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर गेलेले उबाठाचे शेखर चव्हाण हे पुन्हा इच्छुक आहेत. तर त्यांच्यासोबत निलेश गवळीही इच्छुक आहे. तर काँग्रेसकडूनही उमेदवाराचे नाव निश्चित किंवा चर्चेतून ऐकायला मिळत नाही. तर काँग्रेसच्यावतीने राजेंद्र माहुलकर यांचेही नाव चर्चेत आहे.शिवगण यांनी सन २०१७मध्ये तब्बल २४१० मतांनी विजय मिळवला होता. त्यामुळे राजेंद्र माहुलकर निवडणूक लढवल्यास याठिकाणी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.प्रभाग क्रमांक १५५( अनुसूचित जाती महिला)हा प्रभाग यापूर्वी अनुसूचित जाती करता राखीव होता, परंतु यावेळी तो अनुसूचित जाती महिला याकरता राखीव झाला आहे. त्यामुळे या प्रभागातून विजयी झालेले उबाठाचे श्रीकांत शेट्ये यांना घरी बसवण्याची वेळ आली आहे. या प्रभाग अनुसूचित जाती महिलाकरता राखीव झाल्याने श्रीकांत शेट्ये हे पत्नी वर्षा शेट्ये यांना निवडणूक रिंगणात उतरवण्याच्या विचारात आहेत. मात्र हा प्रभाग एस सी महिलाकरता राखीव झाल्याने हंडोरे यांच्या पत्नी संगीता हंडोरे याठिकाणाहून इच्छुक असल्याचे ऐकायला मिळत आहे. या प्रभागातून श्रीकांत शेट्ये २८१४ मतांनी विजयी झाले होते आणि दुसऱ्या क्रमांकावर कांग्रेसचे नगराळे होते. त्यांनी ५१९९ मते मिळवली होती. काँग्रेससाठी हा मतदार संघ पुरक असल्याने संगीता हंडोरे यांच्या नावाची या प्रभागातून चर्चा ऐकायला मिळत आहे. मात्र, शिवसेना आणि भाजपाकडून या प्रभागातील इच्छुक नाव पुढे आलेले नसून नक्की या प्रभागावर कोण दावा करतो याचीच उत्सुकता जनतेला आहे.
नवी मुंबईकरांना दिलासा; रेल्वेकडून अधिक गाड्या आणि नवीन स्थानकाचे आश्वासन पूर्ण
नवी मुंबई: बेलापूर/नेरूळ–उरण मार्गावरील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. बेलापूर/नेरूळ–उरण मार्गावर पाच अतिरिक्त रेल्वे फेऱ्या सुरू करण्यात येणार आहेत. काही दिवसांपूर्वी याबाबत रेल्वे प्रशासनाने आश्वासन दिले होते. अतिरिक्त रेल्वे सेवेमुळे बेलापूर/नेरूळ–उरण मार्गावरील प्रवाशांना गर्दीच्या प्रवासापासून दिलासा मिळणार आहे. या नवीन गाड्या आणि विस्तारित वेळेमुळे प्रवाशांचा प्रवास आता जलद आणि अधिक सोयीचा होणार आहे.A promise fulfilled.From tomorrow 5 additional pairs of trains will ply between Belapur/Nerul–Uran section also 2 new stations Targhar and Gavan on Uran lines will be operationalised.• Targhar – Located near the upcoming Navi Mumbai International Airport will add significant…— Central Railway (@Central_Railway) December 14, 2025रेल्वेच्या या अतिरिक्त सेवेतील महत्त्वाची गोष्ट म्हणजे अतिरिक्त गाड्यांसोबतच, या मार्गावर दोन नवी रेल्वे स्थानकं सुरू करण्यात येणार आहेत. ज्यात तारघर आणि गव्हाण या दोन स्थानकांचा समावेश आहे. यापैकी तारघर हे महत्त्वाचे स्थानक समजले जाते. कारण तारघर स्थानक थेट नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जवळ आहे. त्यामुळे विमानतळाकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही मोठी सोय ठरणार आहे.https://prahaar.in/2025/12/15/the-reservation-policy-has-impacted-handores-stronghold-in-chembur-will-the-congress-candidate-be-someone-other-than-a-member-of-the-handore-family/रेल्वेच्या या अतिरिक्त सेवेमुळे बेलापूर/नेरूळ–उरण मार्गावर आता एकूण ५० गाड्या धावणार आहेत. ज्यासाठी १०० कोटी खर्च करण्यात आला आहे. नव्या लोकल गाड्यांमुळे लोकलचे वेळापत्रक बदलले जाणार आहे. त्यानुसार आता उरण मार्गावर प्रवाशांना रात्री उशिरापर्यंत सेवा मिळणार आहे. उरणहून पहिली ट्रेन सकाळी ५ वाजून ३५ मिनिटांनी तर शेवटची रेल्वे रात्री १० वाजून ५ मिनिटांनी सुटणार आहे. तर बेलापूरहून शेवटची रेल्वे रात्री १० वाजून १५ मिनिटांनी सुटणार आहे.
भटक्या कुत्र्यांच्या संख्येची अचूक माहिती महापालिका ठेवणार
संख्येचे व्यवस्थापन करणारी प्रणाली महापालिकेकडून विकसितमुंबई (सचिन धानजी):मुंबईतील भटक्या श्वानांच्या संख्येचे व्यवस्थापन करण्यादृष्टीकोनातून महापालिकेच्यावतीने एआय तंत्रज्ञान प्लॅटफॉर्म विकसित करण्यात आला आहे. या प्लॅटफॉर्मच्या मदतीने भटक्या कुत्र्यांबाबतचा तपशील मिळू शकणार आहे. या प्रणालीचा वापर महापालिकेचे शेल्टरस, एनजीओ, पशु काळजीवाहक, पशु वैद्य इत्यादींना एकत्र जोडण्यासाठी व भटक्या कुत्र्यांची माहिती गोळा करण्यासाठी महत्वाची ठरणार आहे.मुंबईमध्ये सध्या भटक्या कुत्र्यांचा मुद्दा मोठ्या प्रमाणात चर्चेत असून गोरेगाव पश्चिम येथे एका भटक्या कुत्र्यांने आठ ते दहा जणांवर बिबट्या स्टाईलने हल्ला करत त्यांच्या तोंडाचे लगदे काढण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या हल्लेखोर भटक्या कुत्र्यांचा शोध घेण्यासाठी दोन दिवस पी दक्षिण विभागासह पशु वैद्यकीय विभागाचे पथक तळ ठोकून होते. भटक्या कुत्र्यांचीही नसबंदी करूनही त्यांची संख्या आणि त्यांचा उपदव्याप वाढत असला तरी प्राणीप्रेमी संस्थेपुढे कारवाई करण्यास महापालिका प्रशासन हतबल ठरत आहे. याच दृष्टीकोनातून भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण केल्यानंतरही ही संख्या वाढत असल्याने या वाढत्या संख्येचे व्यवस्थापन करण्याच्यादृष्टीकोनातून महापालिकेने एक ए आय तंत्रज्ञान प्लॅटफॉर्म प्रणाली विकसित केली आहे. महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाने या प्रणालीद्वारे १० हजार भटक्या कुत्र्यांचे व्यवस्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ११ महिन्यांच्या कालावधीसाठी या प्रणालीचा वापर करण्यात येणार असून पुढील तीन वर्षांची देखभाल करण्यासाठी प्रायोगिक तत्वावर पावणे दोन कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. ही प्रणाली स्टार्टअप मार्फत तयार केलेली आहे. यासाठी इंडिकेअर एआय सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची निवड करण्यात आली आहे.महापालिका अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार स्माईल कौन्सिल बिझनेस इन्क्यूबेशन सेंटरच्या माध्यमातून तयार होणारी विविध उत्पादने, सेवा व सुविधा यांना प्रोत्साहन देण्यासाठी निविदा न मागवता प्रायोगिक तत्वावर खरेदी व वापरात आणण्यास मंजुरी प्राप्त झाली आहे. स्माईल कौन्सिलच्या या तुकडीमध्ये इंडिकेअर एआय सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड या इक्युवेटीचा सामावेश करण्यात आला आहे. या नवउदमीं इंडीकेअर एआय सोल्यूशन्य प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने भटक्या श्वानांच्या संख्येचे व्यवस्थापन करण्यास मदत करण्यासाठी एआय तंत्रज्ञान प्रणाली विकसित केलेली आहे.
Sydney shooting। ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्ये बोंडी बीचवर झालेल्या सामूहिक गोळीबारात एका नागरिकाच्या धाडसाने अनेकांचे जीव वाचवले आहे. अहमद अल अहमद असे त्याचे नाव आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अहमद एका निःशस्त्र बंदूकधारी व्यक्तीवर मागून हल्ला करत, त्याची रायफल हिसकावून घेत त्याला जमिनीवर ढकलत असल्याचे दाखवण्यात आले आहे. या धाडसी कृत्याबद्दल त्याचे देशभर कौतुक केले जात […] The post दोन गोळ्या लागल्यावरही त्याने दहशतवाद्याकडून बंदूक हिसकावली ; कोण आहे सिडनीचा हा धाडसी अहमद अल अहमद? वाचा सविस्तर appeared first on Dainik Prabhat .
शिउबाठाला मोठा धक्का! ऐन निवडणूकीच्या तोंडावर तेजस्वी घोसाळकर यांचा राम राम
मुंबई: आगामी महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने सर्वच पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांमध्ये इनकमिंग आणि आऊटगोईंग सुरू आहे. दरम्यान उबाठा गटाला मोठा धक्का बसला आहे. कारण, ठाकरे गटाच्या नेत्या तेजस्वी घोसाळकर यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला असून आज त्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.गेल्या अनेक दिवसांपासून तेजस्वी घोसाळकर या पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. काही महिन्यांपूर्वी त्यांनी राजीनामाही दिला होता. त्यानंतर मातोश्रीवर बोलावून त्यांची समजूत काढण्यात आली होती. अखेर तेजस्वी घोसाळकर यांनी ठाकरे गटाला राम राम ठोकला आहे. उबाठानंतर त्यांनी आता सत्ताधारी पक्ष भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे.कोण आहे तेजस्वी घोसाळकर?तेजस्वी घोसाळकर या शिवसेनेचे माजी नगरसेवकर अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तर माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या सूनबाई आहेत. अभिषेक घोसाळकर हे मुंबई बँकेचे संचालक होते. फेब्रुवारी २०२४ मध्ये त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यानंतर काही महिन्यांपूर्वीच तेजस्वी घोसाळकर यांची मुंबई बँकेच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती. तेव्हापासून त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा रंगल्या होत्या.दरम्यान, आज सकाळी १० वाजता वसंत स्मृती येथे हा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष, आमदार अमित साटम यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर उबाठासाठी हा मोठा धक्का आहे.
प्रभात वृत्तसेवा पुणे – सोशल मीडियावर झालेल्या ओळखीचे प्रेमात रूपांतर होऊन पुण्यातील दोन अल्पवयीन मुली कोणालाही न सांगता थेट राजस्थानात पोहोचल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. काळेपडळ पोलिसांनी तातडीने कारवाई करत तब्बल ३३०० किलोमीटरचा पाठलाग करून दोन्ही मुलींना सुखरूप पुण्यात परत आणले. याप्रकरणी दोघा आरोपींना अटक करून त्यांच्यावर पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या […] The post इन्स्टाग्रामवरील प्रेम पडलं महागात! पुण्यातून थेट राजस्थान गाठलं, पण पुढे जे झालं ते वाचून धक्का बसेल appeared first on Dainik Prabhat .
प्रभात वृत्तसेवा पुणे – मुळशी परिसरात कुंपणाच्या तारेत अडकलेल्या बिबट्याची रविवारी सकाळी सुखरूप सुटका करून त्याला पुण्यातील रेस्क्यू वन्यजीव ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये हलविण्यात आले. सध्या बिबट्याची सखोल वैद्यकीय तपासणी आणि आवश्यक उपचार करण्यात येणार आहेत.रविवारी सकाळी सुमारे ११ वाजता कुंपणात बिबट्या अडकल्याची माहिती माहिती वन विभागाला मिळाली. त्यानंतर वन विभागाने रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्टच्या पथकाला तात्काळ […] The post Leopard Rescue: अंगावर काटा आणणारा प्रसंग! कुंपणात अडकलेल्या बिबट्याची सुटका कशी झाली? पाहा संपूर्ण घटनाक्रम appeared first on Dainik Prabhat .
'बस्तरमध्ये नक्षलवादी आता उखडले आहेत. नक्षलविरोधी अभियानाच्या यशाची गाथा लिहिण्याच्या अगदी जवळ फोर्स आहे. मात्र, १५ वर्षांपूर्वी आमच्यासाठी सर्वात मोठा प्रश्न हा होता की जवान बस्तरच्या घनदाट जंगलात कसे प्रवेश करतील? नक्षलवाद्यांच्या बालेकिल्ल्यात पोलीस ठाणी कशी बांधली जातील? असे रस्ते कसे बनतील ज्यामुळे जवान कमी वेळेत लांबचा पल्ला गाठू शकतील?' 'किल्लेवजा पोलीस ठाणी आणि रस्त्यांसाठी सरकारने निधी तर जारी केला होता, पण प्रश्न हा होता की ते कोण बांधणार? एकावर एक निविदा काढण्यात आल्या, पण छत्तीसगडमधील एकही कंत्राटदार पोलीस ठाणी बांधण्यासाठी किंवा रस्ते बांधण्यासाठी पुढे आला नाही. सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) आणि अगदी सीमा रस्ते संघटनेने (BRO) देखील हात वर केले होते.' २०१२च्या डिसेंबरमध्ये पोलीस कॉर्पोरेशन हाऊसचे नवीन अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारणारे डी.एम. अवस्थी सांगतात की, पोलीस ठाणी आणि रस्ते बांधण्याचे काम खूप कठीण झाले होते. ते न करण्याचा पर्यायही नव्हता. १७ वेळा निविदा काढल्यानंतरही जेव्हा कोणताही अर्ज आला नाही, तेव्हा आम्ही ही निविदा राज्याबाहेरील लोकांसाठीही खुली केली. सर्वात आधी हे आव्हान उत्तर प्रदेशातील गोरखपूरचे रहिवासी भाजप नेते राजीव मिश्रा यांनी स्वीकारले. ते जिल्हा भाजप अध्यक्ष होते आणि आमदारकीची निवडणूकही लढले होते. त्यांनी बस्तरमधील सर्वात कठीण पोलीस ठाणी बांधण्याचे पहिले कंत्राट घेतले. नक्षलवाद्यांचा गड असलेल्या विजापूर आणि सुकमामध्ये हे काम किती आव्हानात्मक होते, हे दैनिक भास्करच्या टीमने ही पोलीस ठाणी बांधण्याची जबाबदारी घेणाऱ्या कंत्राटदारांशी बोलून समजून घेतले. पोलीस ठाणे बांधण्यासाठी 17 वेळा निविदा काढल्या, पण कोणीही पुढे आले नाहीकेंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यासाठी 31 मार्च 2026 ची अंतिम मुदत निश्चित केली आहे. नक्षलविरोधी मोहीम याच्या जवळ पोहोचली आहे. हे सर्व कसे शक्य झाले, हे समजून घेण्यासाठी आम्ही छत्तीसगडचे माजी डीजीपी आणि पोलीस गृहनिर्माण महामंडळाचे अध्यक्ष राहिलेल्या डीएम अवस्थी यांच्याशी बोललो. जे बस्तरमध्ये रस्ते बांधणीची संपूर्ण कहाणी सांगतात. ते म्हणतात, '2010 मध्ये ताडमेटलाची घटना घडली. यात नक्षलवाद्यांनी 78 जवानांना घेरून ठार केले होते. राणीबोदलीमध्ये गाढ झोपेत असलेल्या जवानांना मारण्याची घटना घडली. त्या दिवसांत नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात जवानांचा मृत्यू होणे ही रोजचीच बाब झाली होती.' 'आमचे एसपी विनोद चौबे यांना ठार मारण्यात आले. या अशा घटना होत्या, जेव्हा पाणी डोक्यावरून गेले होते. केंद्र सरकारने नक्षलग्रस्त राज्यांसाठी एक निधी जारी केला. यातून तटबंदीयुक्त पोलीस ठाणी आणि रस्ते बांधायचे होते. आदेशही जारी झाला होता.' '2010 मध्ये अर्थसंकल्प मंजूर झाला. या कामात एकच अडचण येत होती की बस्तरमध्ये रस्ते आणि पोलीस ठाणी बांधण्यासाठी कंत्राटदार कुठून आणायचे, कारण छत्तीसगडमधील कोणताही ठेकेदार कंत्राट घेण्यासाठी तयार नव्हता.' छत्तीसगडबाहेरील लोकांसाठी निविदा उघडण्यात आली, तेव्हा कंत्राटदार मिळालेडीएम अवस्थी पुढे म्हणतात, '2012 डिसेंबरमध्ये मला पोलीस गृहनिर्माण मंडळाचे अध्यक्ष बनवण्यात आले. रस्ते आणि पोलीस ठाण्यांची कामे करण्याची जबाबदारी मिळाली. मी विभागाला सांगितले की छत्तीसगडमधील कोणताही कंत्राटदार पुढे येणार नाही. आम्हाला इतर राज्यांतील कंत्राटदारांसाठी निविदा उघडाव्या लागतील. मंजुरी मिळाली. आम्ही यूपी, बिहार, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशच्या वर्तमानपत्रांमध्ये निविदेची जाहिरात केली.' 'मी वैयक्तिक पातळीवरही काही कंत्राटदारांशी संपर्क साधला. त्यात एक श्रीवास्तवजी होते, ते रेल्वेचे कंत्राट घेत असत. आता त्यांचे पूर्ण नाव आठवत नाही, पण त्यांनीच मला गोरखपूरमधील एक कंत्राटदार राजीव मिश्राजी यांचे नाव दिले. राजीव भाजपचे जिल्हास्तरीय नेते होते. त्यांनी आमदारकीची निवडणूकही लढवली होती. मी त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना निविदेसाठी (टेंडरसाठी) तयार केले.' आम्ही विचारले की ते सहज तयार झाले का? यावर डीएम अवस्थी म्हणतात, सहजासहजी तयार झाले नाहीत कारण भीती तर सगळ्यांनाच होती. ही 2013 सालची गोष्ट होती. राजीव खूप बोलणी केल्यानंतर तयार झाले. त्यांना सुरुवातीला 5 पोलीस ठाण्यांचे कंत्राट देण्यात आले. पोलीस ठाण्यांनंतर काही किलोमीटर रस्त्याचेही कंत्राट देण्यात आले. ‘ही आमच्यासाठी आशेची पहिली किरण होती. राजीव मिश्रा यांनी आपले काम वेळेवर पूर्ण केले. 2015 मध्ये आम्हाला रस्ते बनवताना पुन्हा अडचणी आल्या. तेव्हा आम्हाला प्रमोद राठोड नावाचे एक कंत्राटदार भेटले. योगायोगाने तेही यूपीचेच होते. रायबरेलीमध्ये त्यांचे वडिलोपार्जित घर होते. तरीही ते छत्तीसगडमध्ये बऱ्याच काळापासून बांधकाम करत होते. आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला. सुरुवातीला तेही कचरले, पण नंतर तयार झाले.’ एकूण किती पोलीस ठाणी बांधायची होती? उत्तर मिळाले, ‘75 पोलीस ठाणी बांधायची होती. यापैकी 50-55 पोलीस ठाणी बस्तरमध्ये बांधायची होती. याच पोलीस ठाण्यांच्या आणि येथील रस्त्यांच्या बांधकामात अडचणी होत्या.’ कंत्राटदार म्हणाले- सर्वात मोठा धोका बिजापूरमधील बेदरे पोलीस ठाणे होतेबस्तरमध्ये पोलीस ठाणी आणि रस्ते बांधणारे कंत्राटदार, गोरखपूरचे राजीव मिश्रा म्हणतात, 'डीएम अवस्थी यांच्याशी माझी भेट झाली आणि चर्चा झाली. त्यांनी आम्हाला हे धोकादायक काम करण्यास सांगितले. सुरुवातीला 3 पोलीस ठाणी बांधायला दिली, जी बस्तरमध्ये होती. तथापि, ती इतकी धोकादायक नव्हती. त्यानंतर दोन पोलीस ठाण्यांचे बांधकाम व्हायचे होते.' 'बेदरेचे नाव आजही आठवते. हे बिजापूरमध्ये बांधायचे होते आणि दुसरे सुकमामध्ये. अवस्थीजी (पोलीस कॉर्पोरेशनचे अध्यक्ष) म्हणाले- आम्ही तुम्हाला पथक देऊ. मी म्हणालो की, तुम्ही आम्हाला मारू इच्छिता का? मी माझ्या पद्धतीने काम करून घेईन. जवानांसोबत गेलो तर मृत्यू निश्चित आहे.' ते पुढे म्हणतात, 'मी छत्तीसगडच्या वेगवेगळ्या भागांमध्ये यापूर्वीही काम केले होते. मी त्यांच्याशी संपर्क साधला आणि विचारले की सुकमा आणि बिजापूरमध्ये त्यांचे कोणी नातेवाईक राहतात का. काही लोक भेटले आणि त्यांच्याकडून काम करून घेतले, जेणेकरून मी त्यांच्यात मिसळून जाऊ शकेन.' कधी कोणती धमकी किंवा धोका जाणवला का? यावर राजीव म्हणतात, 'यासाठी मोठी रणनीती आखावी लागली. मी कधीही बांधकाम स्थळावर राहत नव्हतो. ना कधी थेट घटनास्थळी पोहोचत होतो. गाड्या बदलून-बदलून जात होतो. मग मला आणखी एक काम सोपवण्यात आले. ते आणखी कठीण होते. आता बेदरेमध्ये पोलीस ठाण्यासमोर 5 किलोमीटर रस्ता बनवण्याची जबाबदारी मिळाली. नक्षलवादी रस्त्यांच्या पूर्णपणे विरोधात होते. थोडा वेळ लागला, पण ते कामही पूर्ण केले.' तुम्हाला कधी नक्षलवाद्यांची भीती वाटली नाही का, जर त्यांनी हल्ला केला असता तर? राजीव उत्तरात म्हणतात, 'त्यावेळी हल्ले तर सामान्य गोष्ट होती, पण गोरखपूरचा माणूस घाबरतो का?' तुम्ही तेव्हा भाजपमध्ये कोणत्या पदावर होता? उत्तर मिळाले- 'मी त्यावेळी भाजपचा जिल्हाध्यक्ष होतो. त्याआधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (RSS) मंडल अध्यक्ष होतो. आता तब्येत ठीक नसल्यामुळे सक्रिय राजकारणात नाही.' बस्तरमध्ये रस्ते बांधणारे कंत्राटदार म्हणाले...पिस्तूल नेहमी जवळ ठेवत असे, जर नक्षलवाद्यांनी पकडले तर स्वतःला मारून घेईनयानंतर आम्ही रायबरेलीच्या प्रमोद राठोड यांच्याशी बोललो. त्यांनी बस्तरमध्ये रस्त्यांचे जाळे विणले. त्यांनी नक्षलवाद्यांच्या गडावर रस्ते बांधण्याबद्दलच्या धोकादायक पण रंजक गोष्टी सांगितल्या. ते सांगतात, 'बस्तरमध्ये एक रस्ता आहे ज्याला 'इंजरम भेजी' रस्ता म्हणतात. हा सुकमामध्ये आहे. बुर्कापाल हल्ला असो, ताडमेटला किंवा रानीबोदली हल्ला. हे सर्व याच रस्त्याच्या आसपास झाले होते.' '2015-16 मध्ये इथे 20 किलोमीटर लांब रस्त्यापैकी 13 किलोमीटरचे कंत्राट आम्हाला मिळाले. आम्हाला हा रस्ता बनवायला 2 वर्षे लागली. 2018 मध्ये जाऊन काम पूर्ण होऊ शकले.' आम्ही विचारले, 13 किलोमीटरचा रस्ता बनवायला 2 वर्षांचा वेळ? राठोड म्हणतात, 'किती दिवसांत रस्ता बनेल, हा प्रश्न नव्हता. प्रश्न हा होता की हा रस्ता बनवण्यासाठी कोणी कंत्राट घेईल का?' 'त्यानंतर याच रस्त्याला पुढे 6 किलोमीटरपर्यंत वाढवण्यासाठी आणखी एक कंत्राट मिळाले. आम्ही तेही पूर्ण केले. हा परिसर कुख्यात नक्षलवादी रमन्नाचा होता. फक्त 20 किलोमीटर दूर त्याची सासरवाडी होती.' मग कंत्राट घेताना भीती वाटली नाही का? उत्तर मिळालं, 'भीती का वाटणार नाही, पण मग वाटलं की कोणीतरी हे काम करणारच आहे तर मग मी का नाही?' ते हसत म्हणाले, 'तेव्हा मी नेहमी माझ्यासोबत एक पिस्तूल ठेवत असे की जर नक्षलवाद्यांनी हल्ला केला तर आधी सामना करेन. जर वाटलं की त्यांच्या हाती सापडेन तर स्वतःला गोळी मारेन. मला नक्षलवाद्यांच्या हातून मरण पत्करणं मान्य नव्हतं.' तुम्ही नक्षलवाद्यांच्या निशाण्यावर तर आलाच असाल? 'हो, नक्षलवाद्यांनी जेव्हा भिंतींवर माझ्या नावाचे पोस्टर लावले होते आणि धमकी दिली होती. तेव्हा मी कोणतंही कायमस्वरूपी ठिकाण बनवू शकत नव्हतो. बनवलं असतं तर हल्ला निश्चित होता. मी अनेक ठिकाणं बदलली.' घरातून एका गाडीत बसायचो, मग वाटेत दुसरी गाडी, मग तिसरी गाडी बदलून साइटवर पोहोचायचो, जेणेकरून जर कोणी बातमीदार लागला असेल तर नक्षलवाद्यांपर्यंत खरी बातमी पोहोचू नये. कोंटाकडे जायचे असेल तर आधी जगदलपूरला जायचो, मग परत येऊन कोंटाला परत यायचो. लालगढला शहराशी जोडणारा धोकादायक महामार्ग बनवलाराठोड पुढे सांगतात, '2018-19 मध्ये 'दोरनापाल जगरगुंडा' येथे सुमारे 76 किलोमीटर लांबीचा रस्ता बनवण्याचे कंत्राट घेतले. हा दुसरा सर्वात धोकादायक रस्ता होता. तुम्ही बघू शकता की, जेवढे मोठे हल्ले झाले, ते सर्व याच्या आसपासच झाले होते. 2015 पासून 2018 पर्यंत इंजरम भेजी रोडच्या आसपास 40 पेक्षा जास्त हल्ले झाले. ही गोष्ट अधिकृत आकडेवारी देखील सांगते.' 'हा रस्ता बनवताना 2018 मध्ये माझी 13 वाहने (ट्रॅक्टर, हायवा आणि रस्ता बनवण्यासाठी वापरली जाणारी इतर वाहने) नक्षलवादी हल्ल्यांमध्ये जाळण्यात आली. 15-20 IED आणि प्रेशर कुकर बॉम्ब तर रोज रस्ता बनवताना पुलाखाली आणि वळणांवर मिळत होते. त्यामुळे बांधकामालाही उशीर झाला.' 'जो रस्ता बनणार होता, तिथे आधी सुरक्षा दलाचे डॉग येऊन 2-3 तास जागेची तपासणी करत. मग तिथे सापडलेले प्रेशर बॉम्ब किंवा IED निकामी करत किंवा त्यांना दूर नेऊन नष्ट करत. आमच्या ट्रॅक्टरखाली अनेकदा बॉम्ब आणि IED येऊन फुटत होते. अनेकदा आमचे सहकारी जखमीही झाले. हा रस्ता अजूनही पूर्ण झालेला नाही. 10-12 किलोमीटरचे काम बाकी आहे.' राठोड म्हणतात, 'जगदलपूर ते कोंटापर्यंत महामार्ग होता. 3 कंत्राटदारांना आळीपाळीने कंत्राट देण्यात आले, पण कोणीही ते पूर्ण करू शकले नाही. मग हे कंत्राट मला देण्यात आले. मी आणि माझ्या दोन साथीदार कंत्राटदारांनी मिळून ते जवळजवळ पूर्ण केले आहे.' तुम्ही हे सर्व कसे व्यवस्थापित केले? 'आम्ही एक रणनीती बनवली होती. पहिली गोष्ट म्हणजे आम्ही साइटवर जास्त वेळ थांबत नव्हतो. जेव्हाही आम्ही तिथून निघायचो, तेव्हा मार्ग बदलून निघायचो. ज्या गाडीत बसून तिथून निघायचो, ती गाडी थोड्याच वेळात सोडून द्यायचो, मग दुसरी आणि मग थोड्या अंतरावर तिसरी गाडी बदलायचो. प्रत्येक वेळी आमच्यासोबत जवान असायचे.'
कॅन्सर रुग्णांसाठी संजीवनी! महापालिकेच्या पेट स्कॅन सेंटरचे आज लोकार्पण..वाचा सविस्तर
प्रभात वृत्तसेवा पुणे – कर्करोगाचे निदान करणाऱ्या आणि महापालिकेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या देशातील पहिल्या पेट स्कॅन सेंटरचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी (दि. १५) होणार आहे. माजी खासदार दिवंगत गिरीश बापट यांचे नाव या सेंटरला देण्यात येणार आहे. महापालिकेच्या माध्यमातून सुरू होत असलेला देशातील अशा स्वरुपाचा हा पहिलाच प्रकल्प आहे. भाजपचे शहराध्यक्ष धीरज […] The post कॅन्सर रुग्णांसाठी संजीवनी! महापालिकेच्या पेट स्कॅन सेंटरचे आज लोकार्पण..वाचा सविस्तर appeared first on Dainik Prabhat .
13 डिसेंबर रोजी कोलकाता येथील सॉल्ट लेक स्टेडियममध्ये इंडिया टूरवर आलेल्या लिओनेल मेस्सीचे 50,000 चाहते हजारो रुपयांची तिकिटे घेऊन त्याची वाट पाहत होते. येथे मीडिया आणि VVIP लोकांनी मेस्सीला घेरले. प्रचंड गर्दीमुळे मेस्सी फक्त 22 मिनिटे थांबून निघून गेला आणि कार्यक्रम रद्द करावा लागला. संतप्त चाहत्यांनी स्टेडियममधील खुर्च्या, कार्यक्रमाचे बॅनर-होर्डिंग्ज तोडले. यानंतर मेस्सी राहुल गांधींना भेटला, तेलंगणाच्या CM रेवंत रेड्डींसोबत फुटबॉल सामना खेळला आणि 15 डिसेंबर रोजी PM मोदींनाही भेटणार आहे. अखेर कोण आहे लिओनेल मेस्सी, ज्याच्यासाठी भारतात इतकी क्रेझ आहे, जग त्याला GOAT का म्हणते, आजच्या एक्सप्लेनरमध्ये आपण संपूर्ण कथा जाणून घेऊया... 4 वर्षांच्या मेस्सीला आजीच्या सांगण्यावरून पहिला सामना खेळायला मिळाला लिओनेल मेस्सीचा जन्म 24 जून 1987 रोजी अर्जेंटिनाच्या रोझारियो शहरात झाला होता. इटालियन वंशाचे हे कुटुंब फारसे श्रीमंत नव्हते. वडील जॉर्ज मेस्सी रोझारियोमधील एका स्टील फॅक्टरीत व्यवस्थापक होते. आई सेलिया कुचिटिनी चुंबक बनवण्याच्या कारखान्यात क्लीनर म्हणून काम करत होती. घरात मेस्सीचे दोन मोठे भाऊ रॉड्रिगो आणि माटियास आणि एक लहान बहीण मारिया सोल होती. जॉर्ज स्थानिक पातळीवर 'क्लब ग्रँडोली' नावाचा एक फुटबॉल क्लबदेखील चालवत होते. 4 वर्षांच्या मेस्सीला त्याच्या वयामुळे आणि खूप लहान उंचीमुळे मैदानावर दुर्लक्षित केले जात होते. एक दिवस 'ग्रँडोली'च्या एका सामन्यापूर्वी संघात एक खेळाडू कमी होता. मेस्सीच्या आजी सेलियाने प्रशिक्षक म्हणजेच मेस्सीच्या वडिलांना मेस्सीला संघात घेण्यास सांगितले. जॉर्ज यांनी संकोच करत मेस्सीला संधी दिली. त्या सामन्यात 4 वर्षांच्या मेस्सीने जो खेळ दाखवला, त्यामुळे सर्वजण आश्चर्यचकित झाले. 2000 मध्ये आजीच्या मृत्यूनंतर, मेस्सी आजपर्यंत प्रत्येक गोल केल्यानंतर त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी आपली बोटे आकाशाकडे वर करतो. ग्रोथ हार्मोनचा आजार, नॅपकिनवर साइन झाला पहिला करार मेस्सी जेव्हा 7 वर्षांचा झाला, तेव्हा त्याला रोझारियोच्या स्पोर्ट्स क्लब 'न्यूवेल्स ओल्ड बॉईज'च्या यूथ अकादमीमध्ये प्रवेश मिळाला. येथे मेस्सी ज्या संघाचा भाग बनला, त्याचे नाव त्याच्या जन्माच्या वर्षावरून 'द मशीन ऑफ 87' असे ठेवण्यात आले आहे. रोझारियो फुटबॉल असोसिएशनच्या अहवालानुसार, मेस्सीने या क्लबकडून खेळताना 176 सामन्यांमध्ये 234 गोल केले. मेस्सी जेव्हा 10 वर्षांचा झाला, तेव्हा त्याला ग्रोथ हार्मोन डेफिशियन्सी (GHD) बद्दल माहिती मिळाली. त्याचे शरीर वाढीसाठी पुरेसे हार्मोन बनवत नव्हते. वयानुसार शरीर वाढत राहावे यासाठी हार्मोन थेरपी सुरू करण्यात आली. दररोज रात्री एक महागडे इंजेक्शन घ्यावे लागत होते. त्याचा मासिक खर्च सुमारे 1000 अर्जेंटिनियन पेसो होता. जॉर्ज आपल्या विमा पॉलिसीतून फक्त 2 वर्षांपर्यंत मेस्सीवर उपचार करू शकले. 'न्यूवेल्स ओल्ड बॉईज'नेही उपचाराचे वचन देऊन माघार घेतली. बाकीच्या क्लब्सनीही मदत करण्यास नकार दिला. त्यावेळी स्पेनचा प्रसिद्ध फुटबॉल क्लब 'FC बार्सिलोना' उदयोन्मुख फुटबॉलपटूंवर लक्ष ठेवत असे आणि त्यांना संधी देत असे. 2000 मध्ये, 13 वर्षांच्या वयात मेस्सी ट्रायलसाठी बार्सिलोनाच्या युवा अकादमी 'ला मासिया'मध्ये पोहोचला. अकादमीचे संचालक कार्ल्स रेक्सेक मेस्सीला खेळताना पाहून समजले की हा मुलगा असाधारण आहे. ट्रायलनंतर, बार्सिलोनाच्या बोर्डला मेस्सीवर निर्णय घेण्यास विलंब होत होता. जॉर्ज मेस्सीच्या उपचारांबद्दल चिंतित होते, अस्वस्थ होऊन त्यांनी सांगितले की ते परत अर्जेंटिनाला जातील. 14 डिसेंबर 2000 रोजी, रेक्साच आणि मेस्सीचे वडील एका टेनिस क्लबच्या रेस्टॉरंटमध्ये भेटले. रेक्साच यांच्याकडे त्यावेळी अधिकृत कागदपत्रे नव्हती, त्यामुळे त्यांनी एका कागदी नॅपकिनवर लिहिले की बार्सिलोना मेस्सीला करारबद्ध करेल आणि त्याच्या उपचाराचा खर्च उचलेल. हा 'नॅपकिन करार' आजही फुटबॉलच्या जगात प्रसिद्ध आहे. या करारामुळे मेस्सी वडिलांसोबत स्पेनला आला आणि बार्सिलोनाच्या 'ला मासिया' अकादमीमध्ये सामील झाला. परदेशी खेळाडू असल्यामुळे सुरुवातीला मेस्सीला फक्त मैत्रीपूर्ण सामन्यांमध्ये खेळण्याची परवानगी होती. मेस्सी खूप लाजाळू होता आणि स्पॅनिश बोलू शकत नव्हता. तो एकटा खोलीत फुटबॉलशी बोलत असे. क्लबमध्ये एक वर्ष घालवल्यानंतर, फेब्रुवारी 2002 मध्ये त्याला रॉयल स्पॅनिश फुटबॉल फेडरेशन (RFEF) मध्ये प्रवेश मिळाला. आता तो सर्व स्पर्धांमध्ये खेळू शकत होता. 14 वर्षांचा असताना ग्रोथ हार्मोन थेरपी पूर्ण झाल्यानंतर मेस्सी बार्सिलोनाच्या 'बेबी ड्रीम टीम'मध्ये सामील झाला आणि 2002-03 च्या सत्रात 'कॅडेट्स A' साठी 30 सामन्यांमध्ये 36 गोल करून तो टॉप स्कोअरर बनला. यानंतर 2004 मध्ये बार्सिलोना यूथ टीमसाठी त्याने यूथ कपच्या फायनलमध्ये 2 गोल केले. यावेळी त्याच्या चेहऱ्यावर दुखापतीमुळे प्रोटेक्टिव्ह मास्क लावलेले होते. याच काळात त्याला इंग्लंडच्या आर्सेनल फुटबॉल क्लबकडून ऑफर मिळाली, परंतु मेस्सीने बार्सिलोनाची साथ सोडली नाही. बार्सिलोनासाठी पहिली प्रोफेशनल मॅच सब्स्टिट्यूट म्हणून खेळला मेस्सीने 17 वर्षांचा असताना बार्सिलोनासाठी आपल्या प्रोफेशनल कारकिर्दीतील पहिली मॅच खेळली. एका खेळाडूच्या दुखापतीमुळे, सब्स्टिट्यूट म्हणून मेस्सीला संधी मिळाली, परंतु तो फक्त 8 मिनिटे मैदानावर राहिला. सीनियर टीमसोबत ट्रेनिंगदरम्यान बार्सिलोनाचा स्टार खेळाडू रोनाल्डिन्हो मेस्सीच्या तंत्राने प्रभावित झाला आणि म्हणाला की त्याला विश्वास आहे की 16 वर्षांचा हा मुलगा त्यांच्यापेक्षाही चांगला खेळाडू बनेल. रोनाल्डिन्हो लवकरच मेस्सीचा मित्र बनला आणि त्याला 'छोटा भाऊ' म्हणू लागला. 2004 मध्ये, त्याच्या पहिल्या वाढदिवशी, मेस्सीने 2010 पर्यंत बार्सिलोनासोबत वरिष्ठ खेळाडू म्हणून 150 दशलक्ष युरोचा करार केला. मे 2005 मध्ये, मेस्सीने त्याच्या व्यावसायिक कारकिर्दीतील पहिला गोल केला. 17 वर्षे, तीन महिने आणि 22 दिवसांचा मेस्सी स्पॅनिश क्लब 'अल्बासेटे' विरुद्ध गोल करून बार्सिलोनाकडून कोणत्याही अधिकृत स्पर्धेत गोल करणारा सर्वात कमी वयाचा खेळाडू बनला. 2006-07 दरम्यानही मेस्सीने बार्सिलोनासाठी 36 सामन्यांमध्ये 17 गोल केले. तो गोल ज्यानंतर मेस्सी 'मॅराडोनाचा वारसदार' बनला 2007 मध्ये मेस्सीने स्पॅनिश लीगमध्ये स्पॅनिश क्लब 'गेटाफे' विरुद्ध एक शानदार गोल केला. मेस्सीने आपल्या संघाकडून अर्ध्या मैदानातून फुटबॉल हवेत उचलला, 60 मीटरपेक्षा जास्त धावला आणि 4 डिफेंडर्सना ड्रिबल करून पार केले. यानंतर गोलकीपरलाही चकमा दिला आणि गोल केला. असाच गोल 1986 च्या विश्वचषकात मेस्सीचे आदर्श आणि अर्जेंटिनाच्या राष्ट्रीय संघाचे कर्णधार 'डिएगो मॅराडोना' यांनी इंग्लंडविरुद्ध केला होता, ज्याला 'गोल ऑफ द सेंच्युरी' म्हटले गेले. यानंतर मेस्सीला 'मॅराडोनाचा उत्तराधिकारी' म्हटले जाऊ लागले. 2008-09 च्या सत्रापासून मेस्सी 10 नंबरची जर्सी घालून खेळतो. या सत्रात त्याने बार्सिलोनासाठी 'कोपा डेल रे', नंतर 'ला लीगा' आणि त्यानंतर चॅम्पियन्स लीगचे विजेतेपद जिंकले आणि स्पॅनिश फुटबॉलच्या इतिहासात पहिल्यांदाच तिहेरी विजेतेपद पटकावणारा खेळाडू बनला. 2008 मध्ये पेप गार्डिओला बार्सिलोनाचे नवीन प्रशिक्षक बनले, त्यांनी मेस्सीला सेंटर-फॉरवर्डऐवजी मैदानावर उजव्या बाजूने खेळायला सुरुवात केली, ज्याला 'फॉल्स 9' म्हटले जात होते. या नवीन पोझिशनने मेस्सीला अधिक धोकादायक बनवले आणि क्लबने 2009 मध्ये ऐतिहासिक 'सिक्स-ट्रेबल' म्हणजेच एका कॅलेंडर वर्षात 6 मोठे खिताब जिंकले. याच वर्षी मेस्सीला पहिल्यांदा फुटबॉल जगातील सर्वात मोठा खिताब 'बॅलन डी'ओर' मिळाला. 2012 पर्यंत त्याला चार वेळा हा खिताब मिळाला. फुटबॉलच्या आजपर्यंतच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडले होते. फायनलमध्ये पराभवामुळे निवृत्तीचा निर्णय, चाहत्यांच्या विरोधामुळे पुनरागमन 2014च्या फुटबॉल विश्वचषकाच्या फायनलमध्ये अर्जेंटिनाला जर्मनीकडून पराभव पत्करावा लागला. याव्यतिरिक्त, 'कोपा अमेरिका' लीगच्या सलग 3 फायनलमध्ये म्हणजेच 2007, 2015 आणि 2016 मध्ये पराभव झाल्यानंतर मेस्सी खचून गेला. 2016 च्या कोपा अमेरिका फायनलमध्ये चिलीविरुद्ध हरल्यानंतर, निराश झालेल्या मेस्सीने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली. तो म्हणाला, 'हे माझ्यासाठी नाही. मी चार फायनल खेळलो आहे, हे दुःखद आहे.' यानंतर संपूर्ण अर्जेंटिनात त्याच्या निर्णयाविरुद्ध मोठ्या प्रमाणावर निदर्शने झाली, लाखो लोकांनी त्याला संघात परत येण्याचे आवाहन केले. दबावाखाली मेस्सीने आपली निवृत्ती मागे घेतली. तो म्हणाला की तो आपल्या देशावर प्रेम करतो आणि रिकाम्या हाताने परत येऊ इच्छित नाही. अर्जेंटिनाच्या सर्व स्पर्धा जिंकून मेस्सी बनला GOAT GOAT चा अर्थ आहे - ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम. 17 ऑगस्ट 2005 रोजी मेस्सीने हंगेरीविरुद्ध अर्जेंटिनाच्या वतीने आपली पहिली आंतरराष्ट्रीय मॅच खेळली होती. तेव्हापासून सलग 15 वर्षे त्याने उत्कृष्ट खेळ दाखवला आणि जगातील अव्वल खेळाडूंमध्ये आपले स्थान कायम राखले. मेस्सीने 2012 मध्ये एका सत्रात सर्वाधिक 91 गोल करण्याचा विक्रम केला. त्यानंतर आतापर्यंत 6 'ला लीगा', 5 'कोपा डेल रे' आणि 2 चॅम्पियन्स लीग जिंकल्या. बार्सिलोनासाठी त्याने आतापर्यंत सर्वाधिक 672 गोल केले आहेत. मेस्सीला मॅराडोनाचा उत्तराधिकारी मानले जात होते. मेस्सीच्याच काळातील पोर्तुगालचा खेळाडू रोनाल्डो आणि मेस्सीला जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटू सिद्ध करण्याबद्दल चर्चा सुरू होती. मात्र, दोघांमध्ये एक उणीव होती - खरं तर GOAT त्याला म्हणतात, जो आपल्या देशासाठी आणि स्वतःसाठी सर्व किताब जिंकतो. मेस्सीची कारकीर्द सुरू होण्यापूर्वी अर्जेंटिनाने 1978 आणि 1986 मध्ये दिएगो मॅराडोनाच्या नेतृत्वाखाली विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर 36 वर्षे अर्जेंटिनासाठी किताब जिंकण्याची कमतरता राहिली. नंतर संघाचा कर्णधार मेस्सीने अर्जेंटिनाला 2021 मध्ये कोपा अमेरिका आणि डिसेंबर 2022 मध्ये फिफा विश्वचषक जिंकवून GOAT म्हणवण्याची शेवटची अडचणही दूर केली. मेस्सी अटॅकिंग मिडफिल्डर म्हणून खेळत होता. त्याने संघासाठी केवळ स्वतःच गोल केले नाहीत, तर त्याला गोल असिस्ट करणारे म्हणजेच इतर खेळाडूंना फुटबॉल पास करून गोल घडवून आणणारे जगातील सर्वात सक्षम खेळाडूंपैकी एक मानले जाते. ऑगस्ट 2021 मध्ये आर्थिक समस्यांमुळे मेस्सीने बार्सिलोना सोडून फ्रान्सचा फुटबॉल क्लब पॅरिस सेंट-जर्मेन (PSG) जॉईन केला. नोव्हेंबर 2022 मध्ये त्याला विक्रमी आठव्यांदा बॅलन डी'ओर मिळाला. नंतर 2023 मध्ये मेस्सीने PSG सोडून अमेरिकन मेजर लीग सॉकर क्लब 'इंटर मियामी' मध्ये सामील झाला. जेव्हा मेस्सीवर तीन महिन्यांची बंदी घालण्यात आली नेदरलँड्सविरुद्धच्या एका सामन्यादरम्यान मेस्सीने नेदरलँड्सच्या खेळाडू वूट वेघॉर्स्टला मैदानावर म्हटले, 'तू काय बघतोयस बोबो (मूर्ख मुला), तुझी नजर कोणावर आहे? येथून जा.' नंतर मेस्सीने यावर स्पष्टीकरण दिले, परंतु संघाला वाटले की मेस्सीला शांत ठेवण्याची गरज आहे, कारण आगामी विश्वचषकाची तयारी सुरू होती. 2019 मध्ये कोपा अमेरिका कप दरम्यान व्हेनेझुएला विरुद्धच्या सामन्यात मेस्सीने पहिल्यांदा अर्जेंटिनाच्या राष्ट्रगीताचे गायन केले होते. हे संकेत होते की त्याच्यासोबत काहीतरी नवीन घडत आहे. यानंतर उपांत्य फेरीत ब्राझीलने अर्जेंटिनाला हरवले. ब्राझीलचे तत्कालीन राष्ट्रपती जायर बोल्सोनारो हाफ टाइम दरम्यान मैदानात उतरले आणि ब्राझीलचे चाहते 'मितो-मितो' म्हणजेच 'बेस्ट-बेस्ट' ओरडत होते. ब्राझीलपेक्षा चांगली टीम असूनही, अर्जेंटिनाच्या हातून पेनल्टी शूटआउटच्या दोन संधी निसटल्या. अर्जेंटिनाची टीम खूप निराश होती. टीमला वाटत होते की व्हिडिओ पाहणाऱ्या रेफरीने त्यांच्या बाजूने निर्णय द्यायला हवा होता. यादरम्यान मेस्सीने मैदानाजवळ येऊन म्हटले, ‘मला वाटत नाही की फेडरेशन या प्रकारच्या रेफरींबद्दल काही करेल, कारण सर्व काही ब्राझीलच्या नियंत्रणात आहे.’ यानंतर दक्षिण अमेरिकेतील फुटबॉल प्रशासकीय संघटना CONMEBOL ने मेस्सीवर 3 महिन्यांसाठी बंदी घातली. त्यानंतर चिलीविरुद्धच्या सामन्यात मेस्सीला एका विरोधी खेळाडूशी वाद घातल्याच्या आरोपावरून मैदानाबाहेर काढण्यात आले. अर्जेंटिनाच्या संघाकडून खेळताना मेस्सीला रेड कार्ड दाखवण्याची ही दुसरी वेळ होती. मेस्सीने बेस्ट फ्रेंडच्या चुलत बहिणीशी लग्न केले मेस्सी 2008 पासून त्याची बालपणीची मैत्रीण अँटोनेला रोक्कुझोसोबत रिलेशनशिपमध्ये होता. ती त्याचा बेस्ट फ्रेंड लुकास स्काल्गियाची चुलत बहीण होती. 2009 मध्ये दोघांनी त्यांचे नाते सार्वजनिक केले. मेस्सी म्हणतो की ते अँटोनेलासोबत मोठे झाले आहेत. अँटोनेला सध्या तिचा चाइल्ड फॅशन ब्रँड 'एनफेंस' चालवते आणि ती एक इन्फ्लुएन्सर देखील आहे. 30 जून 2017 रोजी मेस्सी आणि ॲन्टोनेलाने त्यांच्या मूळ गावी रोझारियो येथे लग्न केले. चाहत्यांसाठी मोठ्या पडद्यावर या समारंभाचे स्क्रीनिंग करण्यात आले. आर्जेन्टिनामध्ये या लग्नाला 'वेडिंग ऑफ द सेंच्युरी' असे म्हटले जाते. मेस्सी आणि ॲन्टोनेलाला लग्नापूर्वीच दोन मुलगे होते - थियागो आणि माटेओ. लग्नानंतर 2018 मध्ये तिसरा मुलगा सिरोचा जन्म झाला. मेस्सीचे संपूर्ण कुटुंब त्याच्या करिअरचे आणि वैयक्तिक आयुष्याचे व्यवस्थापन करते. वडील जॉर्ज 14 वर्षांच्या असल्यापासून त्याचे व्यवस्थापक म्हणून काम करत आहेत. भाऊ रॉड्रिगो दैनंदिन वेळापत्रक आणि प्रसिद्धी सांभाळतो, मोठा भाऊ माटियास आणि आई 'लिओ मेस्सी फाउंडेशन' चालवतात. मेस्सी आपल्या कुटुंबाच्या खूप जवळ आहे आणि अनेकदा पार्ट्यांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतो. त्याला मोकळ्या वेळेत मुलांसोबत व्हिडिओ गेम्स खेळायला आणि चित्रपट पाहायला आवडते. त्याच्याकडे 'फ्रेंच मास्टिफ हल्क' आणि 'गोल्डन रिट्रीव्हर' जातीचे दोन कुत्रे देखील आहेत. प्रायव्हेट जेट, 15 लक्झरी कार आणि कोट्यवधींची घड्याळे मेस्सीची एकूण संपत्ती सुमारे ₹7,055 कोटी आहे. त्याच्याकडे 'गल्फस्ट्रीम V' नावाचे एक लक्झरी प्रायव्हेट जेट आहे, जे त्याने 2018 मध्ये खरेदी केले होते. मेस्सी अनेकदा या जेटने प्रवास करतो. मेस्सीला गाड्यांचाही शौक आहे. त्याच्याकडे 'फेरारीपासून मर्सिडीज'पर्यंत एकूण 15 लक्झरी गाड्या आहेत. मेस्सीकडे फ्लोरिडा, मियामी, बार्सिलोना, रोझारियो येथे घरे आणि मालमत्ता आहेत. तो सध्या त्याच्या फ्लोरिडा येथील घरात राहतो. 'जेकब अँड कंपनी'ने मेस्सीसाठी एक खास घड्याळ डिझाइन केले, ज्याची किंमत दीड कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. याशिवाय त्याच्याकडे अनेक घड्याळे आहेत. मेस्सीच्या इंडिया टूरदरम्यान काय वाद झाला? 13 डिसेंबर रोजी मेस्सी भारताच्या 4 शहरांमध्ये आपल्या 'GOAT इंडिया टूर'साठी 14 वर्षांनंतर भारतात पोहोचला. यापूर्वी तो 2011 मध्येही कोलकात्याच्या सॉल्ट लेक स्टेडियममध्ये अर्जेंटिनाकडून व्हेनेझुएलाविरुद्ध मैत्रीपूर्ण सामना खेळण्यासाठी आला होता. कोलकाता इव्हेंटची तिकिटे 3,500 ते 12,000 रुपयांपर्यंत होती. मेस्सी सकाळी 11:15 वाजता स्टेडियममध्ये पोहोचला. वेळापत्रकानुसार, 45 मिनिटांचा कार्यक्रम होता. तो मैदानावर फिरून चाहत्यांचे अभिवादन करत होता, त्याचवेळी व्हीआयपी लोक, स्थानिक नेते आणि सुरक्षारक्षकांनी त्याला अशा प्रकारे घेरले की चाहते त्याला नीट पाहू शकले नाहीत. फक्त 22 मिनिटे थांबून मेस्सीची टीम त्याला घेऊन स्टेडियमबाहेर गेली. मेस्सी गेल्याने चाहते संतापले आणि स्टेडियममध्ये तोडफोड करू लागले. सुमारे 2 तास चाहत्यांनी पाण्याच्या बाटल्या आणि स्टेडियमच्या खुर्च्या उपटून मैदानावर फेकल्या. शेकडो चाहते बॅरिकेड्स तोडून मैदानावर घुसले. सायंकाळपर्यंत X वर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये सकाळी 8 वाजल्यापासून आलेले चाहते आयोजकांना जबाबदार धरत होते. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ट्विट केले, 'मी मेस्सी आणि चाहत्यांची मनापासून माफी मागते. हे गैरव्यवस्थापन धक्कादायक आहे. चौकशी समिती स्थापन केली जाईल, तिकिटाचे पैसेही परत मिळतील.' कार्यक्रमाचे मुख्य आयोजक सताद्रू दत्ता यांना कोलकाता विमानतळावरून अटक करण्यात आली. या घटनेनंतर मेस्सी राहुल गांधी आणि नंतर हैदराबादमध्ये तेलंगणाच्या मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना भेटले. मेस्सी 15 डिसेंबर रोजी पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांना भेटणार आहे. यानंतर अरुण जेटली स्टेडियममध्ये एका मोठ्या कार्यक्रमासह मेस्सीचा भारताचा दौरा समाप्त होईल.
EVM Machine Rules: निवडणुकीपूर्वी मोठी खळबळ! आता मतदान यंत्रावर राष्ट्रीय पक्षांनाच अग्रक्रम? वाचा..
प्रभात वृत्तसेवा पुणे – यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील उमेदवारांची नावे अद्याक्षरांच्या क्रमानुसार मतदान यंत्रांवर घेतली जात होती. आता यामध्ये बदल करण्याच्या हालचाली शासन स्तरावर सुरू असून, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांप्रमाणेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक लढविणाऱ्या राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांना मतदान यंत्रावर पहिले स्थान मिळणार आहे. त्यानंतर राज्य स्तरावरील पक्षातील उमेदवारांचे नाव असणार आहे. लवकरच निवडणूक […] The post EVM Machine Rules: निवडणुकीपूर्वी मोठी खळबळ! आता मतदान यंत्रावर राष्ट्रीय पक्षांनाच अग्रक्रम? वाचा.. appeared first on Dainik Prabhat .
पुण्यात पुस्तकांचा पूर! कोट्यवधींची उलाढाल आणि तरूणाईची झुंबड; तुम्ही अजून भेट दिली नाही का?
प्रभात वृत्तसेवा पुणे – राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीने फर्गसन महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या पुणे पुस्तक महोत्सवाला नागरिकांनी पहिल्या दोन दिवसांतच उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. या दोन दिवसांत तब्बल दीड लाखांपेक्षा अधिक पुस्तकप्रेमींनी महोत्सवाला भेट देऊन पुस्तक खरेदीचा मनमुराद आनंद लुटला. परिणामी काही कोटींची उलाढाल झाल्याची माहिती महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे यांनी दिली.महोत्सवाचे शनिवारी […] The post पुण्यात पुस्तकांचा पूर! कोट्यवधींची उलाढाल आणि तरूणाईची झुंबड; तुम्ही अजून भेट दिली नाही का? appeared first on Dainik Prabhat .
पुणेकरांना हुडहुडीपासून दिलासा? पण ‘या’भागात पारा अजूनही ७ अंशावर! वाचा वेधशाळेचा अंदाज
प्रभात वृत्तसेवा पुणे – शहरासह जिल्ह्यातील किमान तापमानात एक अंशाने वाढ झाल्यामुळे मागील आठवडाभरापासून कडाक्याच्या थंडीने गारठलेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. रविवारी (दि. १४) हवेली परिसरात सर्वात कमी ७.३ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. तर अन्य परिसरात किमान तापमान ९ अंशाच्या पुढे नोंदविले गेले. त्यामुळे थंडीचा जोर काहीसा कमी झाला आहे. मागील आठ ते […] The post पुणेकरांना हुडहुडीपासून दिलासा? पण ‘या’ भागात पारा अजूनही ७ अंशावर! वाचा वेधशाळेचा अंदाज appeared first on Dainik Prabhat .
PMC Election: पुण्यात ठाकरे गट आणि मनसे एकत्र? महापालिकेसाठी ठरला ‘हा’मोठा फॉर्म्युला..
प्रभात वृत्तसेवा पुणे – अगामी पुणे महापालिका निवडणुकीला आपण एकत्र लढायचे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीत घडलेलो सैनिक आहोत. त्यामुळे सर्वांनी एकजूट दाखवत महापालिकेवर पुन्हा विजय मिळवायचा, असा निश्चय पुणे शहर शिवसेना उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये करीत, जे आपल्याबरोबर येतील त्यांना घेऊन पुढे जायचे असेही एकमताने ठरल्याचे शिवसेना आणि मनसे पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात […] The post PMC Election: पुण्यात ठाकरे गट आणि मनसे एकत्र? महापालिकेसाठी ठरला ‘हा’ मोठा फॉर्म्युला.. appeared first on Dainik Prabhat .
पुणेकरांसाठी मोठी बातमी! शहराचा चेहरामोहरा बदलणार? वाचा ३ हजार कोटींचा ‘मेगा’प्लॅन’
प्रभात वृत्तसेवा पुणे – केंद्र आणि राज्य सरकारसह पुणे महापालिकेच्या वतीने आखलेल्या सुमारे ३,०६३ कोटी रुपयांच्या विकासकामांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी (दि. १५) एकाचवेळी पायाभरणी होत आहे. यात प्रामुख्याने पाणीपुरवठा, सांडपाणी प्रक्रिया, रस्ते विकास, आरोग्य, शालेय शिक्षण, सुशासन या विभागांचा समावेश आहे. यातील काही महत्त्वाच्या प्रकल्पांमुळे शहराचा कायापालट होईल, असा विश्वास पुणे महापालिकचे […] The post पुणेकरांसाठी मोठी बातमी! शहराचा चेहरामोहरा बदलणार? वाचा ३ हजार कोटींचा ‘मेगा’ प्लॅन’ appeared first on Dainik Prabhat .
BJP Pune: भाजपच्या इच्छुकांच्या मुलाखतीचे सत्र पूर्ण; पक्षाकडून २३०० हून अधिक अर्ज भरून सादर
प्रभात वृत्तसेवा पुणे – आगामी महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षातर्फे रविवारी सुमारे १२०० इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या आणि भाजपच्या इच्छुकांच्या मुलाखतीचे सत्र पूर्ण झाले. त्यानंतर रविवारी सायंकाळपासून सोमवारी मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमाच्या तयारीवर भर देण्यात आला. दरम्यान, सोमवारच्या कार्यक्रमात इतर पक्षातील बड्या पदाधिकाऱ्यांसह माजी नगरसेवकांचे प्रवेश होणार की नाही, ही बाब गुलदस्त्यातच ठेवण्यात आली आहे.भारतीय […] The post BJP Pune: भाजपच्या इच्छुकांच्या मुलाखतीचे सत्र पूर्ण; पक्षाकडून २३०० हून अधिक अर्ज भरून सादर appeared first on Dainik Prabhat .
प्रभात वृत्तसेवा पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या जल्लनिसारण विभागाच्या वतीने क्षेत्रीय कार्यालयानुसार जलनिस्सारण वाहिन्या (ड्रेनेज लाईन) दुरुस्त व देखभाल करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. यामध्ये ठराविक ठेकेदाराला डोळ्यासमोर ठेवून अटी व शर्ती टाकण्यात आल्या आहेत. तसेच काही ठेकेदारांनी सर्वात कमी दर दिल्याने कामाच्या गुणवत्तेवर शंका उपस्थित केली जात आहे. तत्कालीन आयुक्त शेखर सिंह यांनी […] The post PCMC News: ड्रेनेज विभागाचा अजब कारभार! ‘त्या’ एका अटीमुळे बाकीचे ठेकेदार बाद; कोणाला मिळतेय रेड कार्पेट? appeared first on Dainik Prabhat .
मावळ हादरले! शिरगाव मध्ये ५ वर्षीय मुलीचे अपहरण आणि खून..नराधम पोलिसांच्या ताब्यात
प्रभात वृत्तसेवा पिंपरी – मावळ तालुक्यातील शिरगाव येथे एक धक्कादायक घटना रविवारी (दि. १४ डिसेंबर) रोजी सकाळी उघडकीस आली. एका पाच वर्षीय मुलीचे तिच्या घराजवळ राहणाऱ्या व्यक्तीने चॉकलेटच्या आमिषाने अपहरण केले. त्या मुलीचा खून करून तिचा मृतदेह फेकून दिला. दरम्यान, तिच्यावर लैंगिक अत्याचार करून खून केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. समीर कुमार मंडल (वय […] The post मावळ हादरले! शिरगाव मध्ये ५ वर्षीय मुलीचे अपहरण आणि खून..नराधम पोलिसांच्या ताब्यात appeared first on Dainik Prabhat .
Share Market Fraud: ५९ लाख रुपये पाण्यात! शेअर बाजाराच्या नादाने तरुणाची मोठी फसवणूक
प्रभात वृत्तसेवा पिंपरी – शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक केल्यास आकर्षक परतावा मिळेल, असे आमिष दाखवून दोन व्यक्तींची तब्बल ५९ लाख २५ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत वाकड येथे घडली.अक्षय दीपक पंजाबी (वय ३०, रा. वाकड) यांनी शनिवारी (दि. १३) याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संकेत […] The post Share Market Fraud: ५९ लाख रुपये पाण्यात! शेअर बाजाराच्या नादाने तरुणाची मोठी फसवणूक appeared first on Dainik Prabhat .
‘प्रभात’च्या बातमीचा दणका! सासवड आगाराचे अधिकारी थेट वाल्हे उड्डाणपुलावर..पाहा काय घडले
प्रभात वृत्तसेवा वाल्हे – ‘दैनिक प्रभात’ मध्ये उड्डाणपुलावरून जाणाऱ्या एसटी रोखल्या’ या मथळ्याखाली रविवार (दि.१४) वृत्त प्रसिद्ध होताच सासवड आगारा व्यवस्थापनाकडून वाल्हे (ता. पुरंदर) येथील उड्डाणपुलावर दुपारपासून सायंकाळपर्यंत थांबून उड्डाणपुलावरून येणाऱ्या एसटी बस सेवा रस्त्यावरून जाण्यास सांगून पुन्हा उड्डाणपुलावरून आल्यास, कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. यावेळी सासवड आगारातील वाहतूक निरीक्षक जयेश साळुंखे, वाहतूक […] The post ‘प्रभात’च्या बातमीचा दणका! सासवड आगाराचे अधिकारी थेट वाल्हे उड्डाणपुलावर..पाहा काय घडले appeared first on Dainik Prabhat .
प्रभात वृत्तसेवा पळसदेव – राज्यात सध्या शेतकरी कर्जमाफी मिळेल याची जोरदार चर्चा सुरू असून, सहकारी सोसायट्यांनी शेतकऱ्यांकडून कागदपत्रे मागवण्यास सुरुवात केल्यामुळे कर्जमाफीची आशा बळावली आहे. राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी नुकतेच शेतकऱ्यांना योग्य ती कर्जमाफी मिळेल असे वक्तव्य केले होते, ज्यामुळे या चर्चेला आणखी उधाण आले आहे. सहकारी सोसायट्या शेतकऱ्यांकडून आधार कार्ड, पॅन कार्ड, […] The post Dattatray Bharne: कर्जमाफीबाबत मोठी अपडेट समोर; कृषी मंत्र्यांच्या ‘या’ विधानाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत appeared first on Dainik Prabhat .
Gas Cylinder Blast: जावळेवाडी गॅस सिलिंडरचा स्फोट! एक युवक भाजला, घराचे मोठे नुकसान
प्रभात वृत्तसेवा राजगुरुनगर – खेड तालुक्यातील जावळेवाडी-मंदोशी येथे शनिवारी (दि.१३) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट होऊन एक युवक भाजला. तसेच संबंधित घराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मात्र, घटनेला दोन दिवस उलटूनही अद्याप पंचनामा न झाल्याने तसेच गॅस एजन्सीचे प्रतिनिधी, गॅस कंपनीचे अधिकारी, ग्रामसेवक व तलाठी यांनी घटनास्थळी भेट न दिल्याने पीडित […] The post Gas Cylinder Blast: जावळेवाडी गॅस सिलिंडरचा स्फोट! एक युवक भाजला, घराचे मोठे नुकसान appeared first on Dainik Prabhat .

32 C