नागावमधील बिबट्या आता आक्षी साखरेत!
बिबट्याच्या हल्ल्यात दोन जण जखमीनांदगाव मुरुड : नागावमधून वनखात्याच्या कर्मचारी व ग्रामस्थांना चकवा दिलेला बिबट्या आता आक्षी- साखर गावात पोहोचला असून शुक्रवारी सकाळच्या शांततेत त्याने अचानक दहशत पसरवली. नागाव परिसरातून पसार झालेल्या बिबट्याने आक्षी साखर गावातील आनंद कामतप्रसाद निषाद (मूळ – चांदा, उत्तर प्रदेश; सध्या – आक्षी, साखर, तालुका अलिबाग, जिल्हा रायगड) आणि मुव्वला लोकांथाम (मूळ – जीमंगळवाडी, श्रीकाकुलम, आंध्र प्रदेश; सध्या – आक्षी, साखर, तालुका अलिबाग, जिल्हा रायगड) यांच्यावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात दोघेही किरकोळ जखमी झाले असून त्यांना अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.आनंद कामतप्रसाद यांचे उपहारगृह आक्षी साखर येथील जेट्टीजवळ आहे. सकाळी ५ वाजता त्यांनी उपहारगृहात साफसफाई सुरू केली होती. बटाटे साफ करत असताना बिबट्याने त्याच्यावर अचानक हल्ला केला. मुव्वला लोकांथाम त्याच्या दुकानात शिंपी काम करत असताना सकाळी त्यांच्यावर मागून हल्ला झाला. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी बिबट्याचे दर्शन जेट्टीजवळ झाले. नागरिकांनी तातडीने वन विभागाला पाचारण केले. मात्र, घटनास्थळी फक्त दोन वन कर्मचारी दाखल झाले, त्यामुळे प्रभावी कारवाई होण्यास विलंब झाला.त्यानंतर वन विभागाने तातडीने पिंजरे, गस्ती पथके आणि आवश्यक साधनसामग्री आणण्याचे आदेश दिले आहेत. हा बिबट्या सतत ठिकाण बदलत असल्याने त्याला पकडणे आव्हानात्मक ठरत आहे. स्थानिकांना सकाळी लवकर आणि सायंकाळी उशिरा एकटे फिरण्यास टाळण्याचे, तसेच घराबाहेर सावधगिरीने हालचाल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, नागाव व आक्षी परिसरातील मानववस्तीच्या जवळ वन्यजीवांचे हालचाली वाढल्यामुळे अशा हल्ल्यांचा धोका कायम राहतो. नागावमधील मागील काही दिवसांपासून हा बिबट्या सक्रिय होता आणि तिथे सहा नागरिकांवर हल्ला करून त्याने त्यांना जखमी केले आहे.वन विभागाच्या अधिकृत सूत्रांनी सांगितले की, बिबट्याला पिंजऱ्यात आणण्यासाठी मोठ्या पथकासह लवकरच शोध मोहीम राबवली जाईल. परिसरात नियमित गस्त ठेवून बिबट्याच्या हालचालींचे निरीक्षण करण्याचे आदेशही दिले आहेत.
Raj Thackeray | मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीत राज्यभरात लहान मुलं आणि मुली बेपत्ता होण्याच्या गंभीर प्रश्नावर लक्ष वेधले आहे. यावरून त्यांनी राज्य सरकारसह केंद्र सरकावरही हल्लाबोल केला आहे. याशिवाय संसदेत वंदे मातरमच्या चर्चेसाठी 10 तास खर्च करणाऱ्या केंद्र सरकारला मातांचा आक्रोश ऐकू येत असेल असं वाटत नाही, अशा शब्दांत […] The post “अधिवेशनात उत्तरं द्यायला मंत्री सभागृहात नाही अशी परिस्थिती”; राज ठाकरेंनी ‘वंदे मातरम्’च्या चर्चेवरूनही सुनावले appeared first on Dainik Prabhat .
मेट्रो सिनेमा भुयारी मार्गात हवा खेळती राहणार
सचिन धानजीमुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने बांधण्यात आलेल्या मेट्रो सिनेमा भुयारी मार्गातील हवा खेळती राहावी यासाठी आता अत्याधुनिक स्वयंचलित श्वासावरोध बचाव प्रणाली अर्थात ऑटोमेटीक सफोकेशन रिमोअल सिस्टीम बसवण्यात येणार आहे. या प्रणालीमुळे हवेतील कार्बनडायक्साईडचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये मेट्रो भुयारी मार्गातून जाताना गुदमरल्यासारखे वाटणार नाही.मुंबई महापालिकेच्यावतीने मेट्रो सिनेमा समोर रस्ता ओलांडण्यासाठी भुयारी मार्ग बनवण्यात आला आहे. मात्र, या भुयारी मार्गात नैसगिक वायूविजनाची सुविधा नसल्याने यातून ये-जा करताना पादचाऱ्यांना गुदमरल्यासारखे वाटते. तसेच भूमिगत मार्ग असल्याने कार्बन डायॉक्साईडचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे याठिकाणी बुरशी, फंगल, मायक्रोबियल इत्यादींची वाढ होत आहे. हा सब वे जुन्या डिझाईनप्रमाणे बांधल्याने यातून होणारी गर्दी लक्षात काही प्रमाणात गुदमरल्यासारखी परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे आतील बाजूची नागरिकांची रहदारीमुळे पादचाऱ्यांना मळमळ, सिक बिल्डींग सिंड्रोम इत्यादी व्याधी निर्माण होत आहेत. त्यामुळे या सब वेवर गोंधळ निर्माण होण्याचा धोका वाढला असल्याची माहिती पाहणी अहवालातून समोर आली आहे.मेट्रो सिनेमा भुमिगत बोगदा जुना व भूमिगत असल्याने त्यात बांधकामात्मक कोणतेही मोठे बदल करता येवू शकत नाही. त्यामुळे नैसर्गिक वायू विजनाची प्रणाली बसवण्याचा निर्णय महापालिकेच्या यांत्रिक व विद्युत विभागाने घेतला आहे. या प्रणालीद्वारे हवेतील कार्बन डायऑक्साईड अर्थात सीओटू, बुरशी, फंगल इत्यादी घटक काढून टाकले जातील.ही यांत्रिक प्रणाली आवश्यक असल्यास अग्निशमन सेन्सर प्रणालीशीही जोडली जाऊ शकते. असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या प्रणालीद्वारे एका टोकाकडून हवा सोडून दुसऱ्या टोकाकडून बाहेर टाकली जाईल, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, या प्रणालीसाठी सुमारे दीड कोटी रुपये खर्च केले जाणार असून यासाठी ओमेक्स कंट्रोल सिस्टीमची निवड करण्यातआली आहे.
कल्याण ते नवी मुंबई विमानतळापर्यंतचा प्रवास जलद होणार
डोंबिवली एमआयडीसी मेट्रो स्टेशनजवळ १०० वा यू - गर्डरची यशस्वीरीत्या उभारणीमुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (एमएमआरडीए) उभारल्या जात असलेल्या मुंबई मेट्रो लाईन- १२ (कल्याण ते तळोजा) या प्रकल्पाने आणखी एक मोठी कामगिरी साध्य केली आहे. शिळफाटा रोडवरील डोंबिवली एमआयडीसी मेट्रो स्टेशनजवळ १०० वा यू-गर्डर यशस्वीरीत्या लाँच करण्यात आला असून प्रकल्पाच्या बांधकामात हा अत्यंत महत्वाचा टप्पा आहे. यामुळे प्रकल्पाला आणखी वेगमिळणार आहे.सुमारे २३.५७ किमी लांबीचा हा उन्नत मार्ग १९ मेट्रो स्थानकांद्वारे कल्याण, डोंबिवली, तळोजा आणि पुढे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला हरित,अखंड आणि जलद पद्धतीने जोडणार आहे. माध्यमातून ठाणे ते नवी मुंबईदरम्यान अधिक स्वच्छ, सुलभ आणि पर्यावरणपूरक गतिशीलतेचा मार्ग मोकळा होणार आहे. तसेच कळवा ते तळोजा परिसरातील ट्रान्झिट–ओरिएंटेड विकासालाही चालना मिळणार आहे. कळवा-शिळफाटा-तळोजा मार्गाला समांतर धावणारा हा कॉरिडॉर तब्बल ७ किमी एमएसआरडीसी फ्लायओव्हरच्या एकत्रित रचनेसह उभा राहत आहे. यात कोळेगावजवळील १०० मीटर मोकळा स्पॅन, महत्त्वाच्या रेल्वे आणि आरओबी क्रॉसिंग्ज तसेच २१ - २३ मीटर उंचीवरील उन्नत स्थानके अशा अभियांत्रिकी कौशल्याच्या अनेक विशेष स्पॅनचा या प्रकल्पात समावेश असेल.दरम्यान, या प्रकल्पाच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण इंटरचेंज सुविधांद्वारे प्रवासी खालील मार्गांशी सहज जोडले जातील. कळवा येथे मेट्रो लाईन ५, हेडूतने येथे मेट्रो लाईन १४, अमनदूत येथे नवी मुंबई मेट्रो लाईन १ तसेच कळवा जंक्शनला सेंट्रल रेल्वेशी थेट एफओबीद्वारे जोडले जाणार आहे. हा प्रकल्प मे २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे.मेट्रो १२ चा महत्वाचा टप्पा पूर्ण आत्तापर्यंतची प्रगती : कल्याण - मानपाडा सर्व्हे व अलाइनमेंट पूर्ण. पहिला पाईल, पियर कॅप आणि यु- गर्डर यशस्वीरीत्या कास्ट आणि उभारणी. पूर्ण क्षमतेसाठी बॅचींग प्लांट सुरू. प्रमुख भागांवर नागरी कामे आणि पियर बांधकाम वेगाने सुरू. पत्रीपूल व अमनदूत परिसरात भूमी संपादन व पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू.विशेष स्पॅन ५४ मी - एपीएमसी कल्याण मार्केट. ५६ मी - रीजेन्सी अनंतम चौक. ६५ मी (२ स्पॅन) - सेंट्रल रेल्वे आरओबी, पत्रीपूल. ७५ मी - तळोजा आरओबी (स्टील स्ट्रक्चर). १०० मी - विरार ते अलिबाग मल्टीमोडल कॉरिडॉर, कोळेगाव.
ठाण्यात आणखी चार दिवस ५० टक्के पाणीकपात
ठाणे : ठाणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे बंधारा येथून टेमघर जलशुद्धीकरण केंद्राकडे पाणी वाहून आणणारी १०००मि. मी. व्यासाची जलवाहिनी कल्याण फाटा येथील महानगर गॅसच्या कामांमध्ये दुसऱ्या ठिकाणी पुन्हा नादुरुस्त झाली आहे. या जलवाहिनी दुरुस्तीच्या कामासाठी अजून चार दिवस वेळ लागण्याची शक्यता आहे. यामुळे ठाणे शहरात होणारा पाणीपुरवठा कमी झाला असून शहरांमध्ये ५० टक्के पाणी कपात लागू करण्यात येत आहे. १५ डिसेंबर पर्यंत प्रत्येक भागास कमी प्रमाणात पाणीपुरवठा होईल.
मोहित सोमण:बिगर भाजप राज्यात यंदा सर्वाधिक वाढ ग्राहक महागाईत झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आकडेवारीनुसार,सर्वाधिक महागाई यंदा इयर ऑन इयर बेसिसवर केरळ, कर्नाटक, जम्मू काश्मीर, तामिळनाडू, पंजाब राज्यात झाली आहे. तर महाराष्ट्रात नोव्हेंबर महिन्यात तर महागाईत घसरण झाली. इयर ऑन इयर बेसिसवर ही घसरण गेल्या नोव्हेंबर महिन्यातील १९७.७ आकड्यांचा तुलनेत या नोव्हेंबर महिन्यात १९७.० पातळीवर घसरण झाली आहे. सांख्यिकी व अंमलबजावणी मंत्रालयाने (Ministry of Statistics and Implementation) ही आकडेवारी जाहीर केली. तसेच या आकडेवारीतील माहितीनुसार, आर्थिक परिस्थिती सुधरूढ असली तरी नोव्हेंबर महिन्यात यंदा ग्राहक किंमत महागाईत (Consumer Price Index CPI) गेल्या महिन्याच्या तुलनेत ०.७१% वाढ नोंदवली गेली. ही हेडलाईन इन्फ्लेशन म्हणजेच महागाई वाढलेल्या भाजीपाला व अन्नधान्याच्या किंमतीत किरकोळ वाढ झाल्याने झाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले. मास, मासे, इंधन, अंडी, भाज्या, मसाले यांच्यातील किंमतीत झालेल्या वाढीचा परिणाम म्हणून ही ४६ बेसिस पूर्णांकाने (BPS Points) झाली आहे. गेल्या बँक ऑक्टोबरपासून ते नोव्हेंबर महिन्यापर्यंत ही वाढ १११ बेसिस पूर्णांकाने अन्न महागाईत (Food Inflation) झाल्याचे स्पष्ट झाले. तरीही गेल्या महिन्यात महागाईत आठ महिन्यातील सर्वाधिक घसरण झाल्याचा परिणाम म्हणून यावेळी महागाई नियंत्रित दरात वाढल्याचे स्पष्ट झाले.याशिवाय ग्रामीण भागातील व शहरी भागातील महागाईतही किरकोळ वाढ झाली आहे. ग्रामीण भागातील हेडलाईन इन्फ्लेशन (शीर्ष) महागाईत ऑक्टोबर महिन्यातील -०.२५% तुलनेत यंदा मात्र ०.१०% वाढ झाली आहे. ग्रामीण भागातील ग्राहक अन्न महागाईत (Consumer Food Inflation Index CFPI) महिन्याच्या आधारावर मात्र घसरण झाली आहे. नोव्हेंबरमध्ये ही आकडेवारी -४.०५% असून ती ऑक्टोबर महिन्यात -४.८५% होती. शहरी भागात महागाईतही वाढ झाली असून नोव्हेंबर महिन्यात ती ०.८८% वरून १.४०% पातळीवर वाढली आहे.इंधनाच्या बाबतीतही वाढ झाली आहे ज्यामध्ये नोव्हेंबर महिन्यात ती २.३२% झाली आहे जी ऑक्टोबर महिन्यात १.९८% होती. शिक्षणाच्या बाबतीत इयर ऑन इयर बेसिसवर नोव्हेंबर महिन्यातील महागाई दर ३.३८% घसरण झाली आहे जी ऑक्टोबर महिन्यात ३.८१% होती. एनएसओ (National Statistics Office NSO) किंमतींचा डेटा NSO, MoSPI च्या फील्ड ऑपरेशन्स विभागाच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांद्वारे साप्ताहिक वेळापत्रकानुसार वैयक्तिक भेटी देऊन, सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमधील निवडक ११८१ गावे आणि १११४ शहरी बाजारांमधून गोळा केला जातो. नोव्हेंबर महिन्यात, संस्थेने १००% गावे आणि ९८.४७% शहरी बाजारांमधून किमतीचे नमुने गोळा करून विश्लेषण केल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. यामध्ये नोंदवलेल्या बाजारनिहाय किमती ग्रामीण भागासाठी ८९.०८% आणि शहरी भागासाठी ९२.४४% होत्या असे म्हटले.
Anmol Bishnoi | कुख्यात गँगस्टर अनमोल बिश्नोईबाबत गृह मंत्रालयाने एक महत्त्वपूर्ण आदेश जारी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी अनमोल बिश्नोईला मागच्या महिन्यात अमेरिकेतून प्रत्यार्पण करुन भारतात आणण्यात आलं. अनमोल बिश्नोई कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ आहे. गँगस्टर अनमोल बिश्नोईचा एक वर्षापर्यंत कोणत्याही एजन्सीला ताबा मिळणार नाही. गृह मंत्रालयाने कोणत्याही […] The post गँगस्टर अनमोल बिश्नोईबाबत गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय; आता पोलिसांना ‘हे’ पाऊल उचलता येणार नाही… appeared first on Dainik Prabhat .
राहुल गांधींसोबतच्या बैठकीला शशी थरूर अनुपस्थित
काँग्रेसच्या महत्वपूर्ण बैठकांना वारंवार गैरहजरनवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि तिरुवनंतपुरम येथील खासदार शशी थरूर यांच्या राजकीय भूमिकेबाबत गेल्या काही काळापासून अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. थरूर हे गुरुवारी राहुल गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या काँग्रेसच्या लोकसभा खासदारांच्या बैठकीला अनुपस्थित राहिले. थरूर यांच्या अनुपस्थितीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. मात्र या बैठकीला अनुपस्थित राहण्याबाबत थरूर यांनी पूर्वकल्पना दिली होती, असे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या बैठकीला काँग्रेसचे आणखी एक ज्येष्ठ नेते आणि चंडिगडचे खासदार मनीष तिवारी हेसुद्धा अनुपस्थित होते.थरूर हे काल रात्री कोलकाता येथे प्रभात खेतान फाऊंडेशनने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाला उपस्थित होते, असे त्यांच्या एक्सवरील टाईमलाईनमधून दिसत आहे. थरूर हे गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसच्या महत्त्वपूर्ण बैठकांना वारंवार अनुपस्थित राहत असल्याचे दिसून येत आहे. याआधी काही दिवसांपूर्वी शशी थरूर काँग्रेसच्या एका धोरणात्मक बैठकीला दांडी मारली होती. मात्र मी या बैठकीला जाणीवपूर्वक अनुपस्थित राहिलो नव्हतो, तर त्यावेळी मी केरळमधून येणाऱ्या विमानात होतो, असे शशी थरूर यांनी स्पष्ट केले होते.सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या त्या बैठकीला थरूर हे अनुपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले गेले होते. त्याआधी एसआयआरच्या मुद्द्यावर झालेल्या काँग्रेसच्या बैठकीलाही थरूर यांनी प्रकृती अस्वस्थ्याचा हवाला देत दांडी मारली होती.
Amit Shah : बॅालीवूडचे ‘ही मॅन’ ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनानंतर सिनेसृष्टीतील कलाकारांसह राजकीय क्षेत्रातील अनेक नेत्यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. नुकतेच नवी दिल्लीत खासदार आणि ज्येष्ठ अभिनेत्या हिमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्यासाठी प्रार्थना सभेचे आयोजन केले होते. या सभेला बॅालीवूडमधील कलाकारांसह राजकीय नेत्यांनीदेखील हजेरी लावली होती. या प्रार्थना सभेत बोलताना हिमा मालिनी भावूक झाल्या […] The post “धर्मेंद्र यांनी त्यावेळी पत्रही लिहिले, फोनही केला कारण…”; अमित शाह यांनी प्रार्थना सभेत सांगितली ‘ती’ आठवण appeared first on Dainik Prabhat .
करतात काय रात्रीच्या वेळी मुली Google वर सर्च ; धक्कादायक अहवालाने तुम्हीही हादराल
या गोष्टी मुली रात्रीच्या वेळी गुगलवर सर्च करताना दिसत असल्याचं ही समोर आलं आहे.मुंबई : 'गुगल ईयर इन सर्च २०२५ 'अहवालाने जगभरातील इंटरनेट विश्वात मोठी चर्चा घडवून आणली आहे. या अहवालानुसार, रात्री १० वाजल्यापासून ते पहाटे ४ वाजेपर्यंतच्या वेळेत महिलांनी विशेषतः १८ ते ३५ वयोगटातील मुलींनी केलेल्या सर्च डेटा समोर आला आहे. रात्रीच्या या वेळात महिलांच्या सर्चची संख्या ४० टक्क्यांनी वाढली आहे. महिलांच्या सर्च करण्याच्या गोष्टी पाहून तुम्हीही अवाक झाल्याशिवाय राहणार नाही.रात्रीच्या वेळेतील टॉप ट्रेंड्स१) AI बॉयफ्रेंड चॅट : AI च्या जगात आता आपण AI वर काहीही सर्च करू शकतो परंतु , एकटेपणा दूर करण्यासाठी आणि मनातील भावना व्यक्त करण्यासाठी मुली मोठ्या प्रमाणात AI चा वापर करत आहेत . यामध्ये धक्कादायक गोष्ट अशी की २५ टक्के मुली या खऱ्या संबंधांपेक्षा AI चॅटला प्राधान्य देत असल्याचे आढळले आहे. ही गोष्ट सर्वांनाच विचार करायला भाग पाडणारी आहे. शिवाय ती तेवढीच धक्कादायक ही समजली जाते.२ ) झोप न येण्यावर घरगुती उपाय : 'इन्सोम्निया' अर्थात निद्रानाशावर नैसर्गिक उपाय शोधण्यात ५५ टक्के वाढ झाली आहे. ताणामुळे झोप न येण्याच्या समस्येमुळे अनेक मुली घरगुती उपचार शोधत आहेत. परिणामी फार्मसी डिलिव्हरीच्या ऑर्डर्स दुप्पट झाल्या आहेत. बऱ्याच्या मुली शांत झोप कशामुळे येते या गोष्टी गुगलवर सर्च करत असताना दिसल्या आहेत.३) स्किनकेअर रूटीन : गुगल सर्चमध्ये ब्युटी ट्रेंडमध्ये ७० टक्के वाढ झाली आहे. रात्रीच्या वेळी स्क्रीनसमोर जास्त वेळ घालवल्यामुळे त्वचेची काळजी घेण्यासाठी 'मॅजिक ॲसिड' किंवा विशिष्ट उत्पादनं सर्च केली जात आहेत. त्वचेची काळजी कशी घेतली जावी. त्यासाठी काय करणं गरजेचं आहे. त्याचे उपाय काय आहेत. त्यासाठी कोणती प्रॉडक्ट वापरणे गरजेचे आहे या गोष्टी मुली रात्रीच्या वेळी गुगलवर सर्च करताना दिसत असल्याचं ही समोर आलं आहे.इतर गुगल सर्च याशिवाय, नाश्ता रेसिपीज, फॅशन हॅक्स, ज्योतिष, मेंटल हेल्थ चेक-अप आणि व्हायरल मिम्स हे विषयही रात्रीच्या सर्चमध्ये आघाडीवर राहिले. जोतिष पाहाणाऱ्या मुलींची ही संख्या त्यात जास्त आहे. हा अहवाल महिलांच्या बदललेल्या जीवनशैली आणि मानसिक आरोग्याच्या गरजांवर प्रकाश टाकतो असं म्हणायला काही हरकत नाही.
मालवणी महोत्सवातून अर्थप्राप्ती
रवींद्र तांबेकोकणातील मालवणी महोत्सव प्रामुख्याने मुंबई, ठाणे, पुणे इत्यादी जिल्ह्यांत स्थानिक नेते आयोजित करतात. यामुळे कोकणातील दशावताराला सुद्धा चांगले दिवस आलेले आहेत. मात्र त्यांच्या अनुदानात वाढ होणे गरजेचे आहे. कोकणी माणूस कोकणची संस्कृती जोपासण्याचा प्रयत्न करतो. ज्या ठिकाणी मालवणी महोत्सव आयोजित करण्यात येतो.कोकणातील मालवणी महोत्सवाचा विचार करता इतर जिल्ह्यात मागील ३५ वर्षांपासूनचे आयोजन केले जाते. यामुळे कोकणातील मालवणी संस्कृती, विविध खाद्यपदार्थ आणि दशावतार नागरिकांपर्यंत पोहोचवून रिकाम्या हाताना काम व रोख उत्पन्न मिळते. यातून कोकणच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळत आहे. तेव्हा आयोजित करण्यात येणाऱ्या मालवणी महोत्सवासाठी नागरिक मोठ्या संख्येने आकर्षित कसे होतील त्या दृष्टीने प्रयत्न व्हायला हवे. तसेच स्टॉलधारकांनासुद्धा सवलती मिळायला हव्यात. यामुळे कोकणी खाद्यपदार्थ अगदी कमी किमतीत लोकांना मिळू शकतात. याचा परिणाम खाद्यपदार्थांना मागणी वाढल्याने चांगल्याप्रकारे अर्थप्राप्ती होऊ शकते.मालवणी महोत्सव हा कोकणापुरता मर्यादित राहिला नसून आता कोकणाबाहेर जाऊन आपल्या संस्कृतीचे दर्शन देत आहे. त्यामुळे कोकणातील खाद्यपदार्थांची चव देशविदेशातील नागरिकांना चाखायला मिळत आहे. यामुळे इथल्या खाद्यपदार्थांना बऱ्यापैकी चांगले दिवस आलेले दिसतात. मालवणी महोत्सवामुळे स्थानिक लोकांना रोजगार मिळत असून त्यांना चांगले उत्पन्न मिळत आहे. त्यामुळे कोकणच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळत आहे. तेव्हा हंगामात महोत्सव आयोजित न करता वर्षातून किमान तीन ते चार वेळा मालवणी महोत्सव आयोजित करण्यात यावा. म्हणजे अधिक आर्थिक बळ मालवणी महोत्सवातून कोकणी माणसाला मिळेल. यातूनच कोकणी माणसाला चांगल्याप्रकारे अर्थप्राप्ती होऊन आपला आर्थिक विकास साधू शकतात. यासाठी कोकणातील कोकणी माणसाने आपापसातील वाद बाजूला सारून मालवणी महोत्सवामध्ये सहभागी झाले पाहिजे.कोकणात पर्यटन महोत्सवाबरोबर मालवणी महोत्सव सुद्धा कोकण विकासाचे योग्य पाऊल समजले जात आहे. त्यामुळे बऱ्यापैकी अर्थप्राप्ती कोकणी माणसाला होत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, स्थानिक लोकांच्या रिकाम्या हातांना काही दिवस काम मिळत असून, महाराष्ट्र शासनाच्या महसुलात वाढ होत आहे. वाहतूकधारांना सुद्धा त्याचा चांगला फायदा होत आहे. ही समाधानाची बाब असली तरी त्यांना शासनस्तरावर पुरेसे अनुदान मिळणे गरजेचे आहे. प्रामुख्याने मालवणी महोत्सव केव्हा सुरू झाला हे निश्चितपणे सांगता येत नसले तरी मागील २८ वर्षे हा मालवणी महोत्सव दरवर्षी ऑक्टोबर/नोव्हेंबरमध्ये बोरिवलीतील भोसले मैदानाच्या प्रांगणात सुरू असतो. सन २०२५ साली बोरिवलीमध्ये मालवणी महोत्सव आयोजित करण्यात आलेला होता. त्याचे २८ वे वर्षे होते. तसेच मुंबईमध्ये विविध ठिकाणी मालवणी महोत्सव ऑक्टोबर ते मे महिन्यात आयोजित करण्यात येतो. यामध्ये कोकणी संस्कृती व कोकणातील खाद्यपदार्थ विक्रीसाठी ठेवण्यात येतात. जवळजवळ एका ठिकाणी दहा ते बारा दिवस महोत्सव सुरू असतो. मात्र, त्याचे भाडे दीड ते दोन हजार रुपये एका स्टॉलमागे असते. काही ठिकाणी कोकणातील उद्योजकाकडून भाडे घेत नाहीत. मात्र, येण्या-जाण्याचा वाहतूक खर्च, टोल आणि हमालीमुळे खाद्यपदार्थांचे दर वाढवावे लागतात. त्यामुळे कोकणात जी खाज्याची पुडी पंचवीस रुपायाला मिळते त्या पुडीला सत्तर ते ऐंशी रुपये द्यावे लागतात. असे असले तरी बऱ्याच वेळा पावसाचे सावट किंवा अचानक पाऊस आल्याने मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे कोकणी माणसाबरोबर आयोजक सुद्धा चिंतेत असतात. अशा वेळी त्यांना नुकसानभरपाई म्हणून शासकीय स्तरावर आर्थिक मदत मिळणे गरजेचे असते. ज्या ठिकाणी मालवणी महोत्सव आयोजित करण्यात येतो, त्या ठिकाणच्या महानगरपालिकेला महसूल द्यावा लागतो. तशी त्यांनी सुद्धा नुकसानभरपाई दिली पाहिजे. कारण त्यांचीच परवानगी घेऊन त्यांनाच अनामत रक्कम भरावी लागते. तेव्हा त्यांनी स्टॉल व इतर सुविधा सुद्धा चांगल्या प्रकारे दिल्या पाहिजेत. जेणेकरून माल सुरक्षित राहिला पाहिजे. तसेच मालवणी महोत्सवाची जाहिरात करायला हवी. म्हणजे मोठ्या प्रमाणात नागरिक येऊ शकतात.कोकणातील मालवणी महोत्सव प्रामुख्याने मुंबई, ठाणे, पुणे इत्यादी जिल्ह्यांत कोकणातील स्थानिक नेते आयोजित करतात. यामुळे कोकणातील दशावताराला चांगले दिवस आलेले आहेत. मात्र त्यांच्या अनुदानात वाढ होणे गरजेचे आहे. कोकणी माणूस कोकणची संस्कृती जोपासण्याचा प्रयत्न करतो. ज्याठिकाणी मालवणी महोत्सव आयोजित करण्यात येतो, त्याठिकाणी कोकणातील एका मंदिराची प्रतिकृती तयार केली जाते. पारंपरिकरीत्या गाऱ्हाणे घालून उद्धाटन करण्यात येते. कोकणातील पारंपरिक वाजंत्री आपली कला उत्तम प्रकारे सादर करतात. मंदिरात पालखी ठेवण्यात येते. दर दिवशी रात्री आठ वाजता दशावतार नाट्यप्रयोग सादर केले जातात. त्यात मंदिराच्या तिन्ही बाजूने कोकणी संस्कृती आणि खाद्यपदार्थांची मेजवानी उपलब्ध असते. यामध्ये समुद्रातील मासे आणि विविध गोड पदार्थ स्टॉल्समध्ये विक्रीसाठी ठेवले जातात. यात कोंबडी वडे लोक आवडीने खातात. तर लहान मुले तळलेल्या माशांवर ताव मारतात. त्यानंतर सुखी मासळी, कडकडे लाडू, मालवणी खाजा, कुळदाचे पीठ, कोकम, उकडे तांदूळ इत्यादींची विक्री झाल्याने रोख पैसा मिळतो. यामध्ये पारंपरिक हस्तकलेच्या माध्यमातून तयार केलेल्या बांबूच्या वस्तूंना बऱ्यापैकी मागणी असते. त्यात सावंतवाडीच्या लाकडी खेळण्यांना चांगले दिवस येत आहेत. याचा परिणाम पारंपरिक कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळत आहे. यात मालवणी मसाला भाव खात आहे. यामुळे नागरिकांची संख्या महोत्सवामध्ये वाढत आहे. याचा फायदा कोकणातील व स्थानिक हॉटेल्सधारक, छोटे स्टॉलधारक व इतर व्यवसायिक यांच्या रोख उत्पन्नात वाढ होत आहे. तेव्हा मालवणी महोत्सवाला अधिक गती येण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणे गरजेचे आहे. कारण कोकणातील मालवणी महोत्सव हा केवळ सांस्कृतिक महोत्सव नसून कोकणच्या अर्थव्यवस्थेला चांगली गती देणारा महोत्सव असल्याने मालवणी महोत्सवातून अर्थप्राप्ती होणार आहे. त्यासाठी मालवणी महोत्सवाला शासनस्तरावर प्रोत्साहन मिळणे तितकेच आवश्यक आहे.
देशात २०२७ मध्ये डिजीटल जनगणना
११ हजार ७१८ कोटी रुपयांची तरतूद दोन टप्प्यांत होणार जनगणना एप्रिल ते डिसेंबर सात महिन्यांचा कालावधी फेब्रुवारी २०२७ मध्ये लोकसंख्या गणनानवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत २०२७ मध्ये होणाऱ्या जनगणनेसाठी तब्बल ११ हजार ७१८ कोटी रुपयांचे बजेट मंजूर करण्यात आले आहे. विशेष म्हणजे देशात पहिल्यांदाच डिजीटल जनगणना होणार आहे. यासाठी तब्बल ३० लाख कर्मचाऱ्यांना कामाला लावले जाणार आहे.केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शुक्रवारच्या पत्रकार परिषदेत २०२७ मध्ये देशात जनगणना होणार असल्याचे जाहीर केले.ही जनगणना दोन टप्प्यांत होणार असल्याचे रेल्वेमंत्री वैष्णव यांनी सांगितले. पहिल्या टप्प्यात हाऊसिंग लिस्ट आणि हाऊसिंग जनगणना होणार आहे. ही जनगणना २०२६ मध्ये एप्रिल ते डिसेंबरपर्यंत पूर्ण केली जाईल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्येची गणना होणार आहे. ही लोकसंख्या गणना फेब्रुवारी २०२७ मध्ये होईल.अश्विनी वैष्वण यांनी जनगणनेचे डिजीटल डिझाईन डेटा सुरक्षा लक्षात घऊन तयार केल्याचे सांगितले. भारताची जनगणना ही देशातील लोकसंख्या, सेन्सस, सामाजिक, आर्थिक स्थिती, देशातील संसाधनांचे वितरण याचे मोठ्या स्तरावर केलेले सर्वेक्षण असते. भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अख्त्यारीतील रजिस्ट्रार जनरल आणि सेन्सस कमिश्नर यांच्याद्वारे ही मोहीम संचालित केली जाते. ही जनगणना नोंदणी पारदर्शक राहणार आहे.स्थलांतर आणि निवासावरही लक्ष केंद्रितयापूर्वी सरकारने लोकसभेला कळवले होते की, जनगणना २०२७ मध्ये नागरिकांचे सध्याच्या निवासस्थानावरील राहण्याचा कालावधी आणि स्थलांतराचे कारण यासंबंधीचे प्रश्न देखील समाविष्ट असतील. गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी एका लेखी उत्तरात सांगितले होते की, गणनेच्या कालावधीत व्यक्ती जिथे आढळेल, त्या ठिकाणी तिची माहिती गोळा केली जाईल. स्थलांतरित कामगार आणि तात्पुरत्या रहिवाशांची गणना करण्यासाठी काही विशेष तरतूद केली जात आहे का, या प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी हे स्पष्ट केले. जनगणनेत प्रत्येक व्यक्तीचे जन्मस्थान आणि अखेरचे निवासस्थान यावर आधारित स्थलांतराचे आकडे गोळा केले जातात. सध्याच्या निवासस्थानावरील राहण्याचा कालावधी आणि स्थलांतराचे कारण याबाबतची माहितीही गोळा केली जाईल, असे त्यांनी सांगितले.जातीची माहिती कशी विचारली जाईल? जातीची गणना कशी केली जाईल याबद्दल माहिती देताना अश्विनी वैष्णव म्हणाले, जनगणना कशी होणार, कोणते प्रश्न विचारले जाणार आणि ती मागील जनगणनेपेक्षा कशी वेगळी असेल, यासंबंधी जनगणना कायद्यांतर्गत लवकरच एक राजपत्र अधिसूचना जारी केली जाईल. महत्त्वाचे म्हणजे या जनगणनेमध्ये जात सांगणे अनिवार्य असणार नाही, असे मंत्री वैष्णव यांनी सांगितले. वेगवेगळ्या धर्मांच्या जातींची गणना होईल का, तसेच गोत्र आणि जातींमध्ये फरक कसा केला जाईल, यांसारख्या प्रश्नांची उत्तरे या अधिसूचनेत मिळतील. या सर्व गोष्टींवर सखोल विचारमंथन करून निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले. तसेच, जी व्यक्ती चुकीचे आकडे देईल, त्यांच्यासाठीही आवश्यक ती व्यवस्था करण्यात आली आहे. लोकांच्या खासगी माहितीची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी संपूर्ण डिजिटल जनगणना प्रणाली तयार केली जात आहे.
विधिमंडळ अधिवेशनातून नागपूरकरांच्या हाती काय?
अविनाश पाठकविदर्भात कापूस आणि सोयाबीन या पिकांच्या हमीभावाचा प्रश्न कायम ऐरणीवर असतो. यंदा देखील सभागृहात हा प्रश्न चर्चेला आला, तेव्हा विरोधी सदस्यांसोबतच सत्ताधारी सदस्य चांगलेच आक्रमक झाले होते. दोन्ही बाजूच्या सदस्यांनी चांगलाच गदारोळ केला. शेवटी विरोधी सदस्यांनी या मुद्द्यावर अध्यक्षांच्या आसनासमोरील मोकळ्या जागेत येऊन चांगलीच घोषणाबाजी केली होती. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी एका खासगी वृत्तवाहिनीने आयोजित एका कार्यक्रमात काँग्रेसचे विधानसभेतील गटनेते विजय वडेट्टीवार वेगळ्या विदर्भाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावेळी पत्रकारांनी भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारले असता विदर्भाचा मुद्दा अजूनही आमच्या अजेंड्यावर आहे असे उत्तर दिले. मग दुसऱ्या दिवशी विधानसभेत पुन्हा एकदा हा प्रश्न उपस्थित केला गेला.दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात सोमवारपासून सुरू झाले आहे. त्यामुळे गेल्या शुक्रवारपासूनच खाशी मंडळी नागपुरात यायला सुरुवात झाली होती. विधिमंडळाचे अधिवेशन म्हणजे अर्धे सरकार मुंबईहून नागपूरला आणावे लागते. ही सर्व सरकारी मंडळी इथे येऊन स्थिरावली आणि त्यांनी आपापली कार्यालये व्यवस्थित लावली.महाराष्ट्राच्या स्थापनेपूर्वी विदर्भ हा तत्कालीन मध्य प्रांताचा एक भाग होता. त्यावेळी नागपूर ही मध्य प्रांताची राजधानी होती. त्या काळात विदर्भाचे वेगळे राज्य व्हावे म्हणून विदर्भवादी पक्ष आग्रही होते. मात्र तत्कालीन राजकीय सोयीसाठी विदर्भ महाराष्ट्राला जोडला गेला. त्यामुळे त्यावेळी नागपूरचे महत्त्व कमी होऊ नये म्हणून दरवर्षी चार आठवड्यांचे एक अधिवेशन नागपुरात घेतले जावे असे ठरवण्यात आले. सुरुवातीला काही वर्षे चार आठवड्यांचे अधिवेशन झाले सुद्धा. नंतर मात्र हळूहळू कालावधी कमी होत गेला. यावेळी तर फक्त एकच आठवड्याचे अधिवेशन होणार असे निश्चित झाले. यामुळे वैदर्भियांमध्ये प्रचंड नाराजी असल्याचे दिसते. स्थानिक वृत्तपत्रांनी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या मुलाखती छापून या असंतोषाला वाचा फोडली होती. मात्र, सरकार एकच आठवड्यात अधिवेशन गुंडाळण्यावर ठाम होते. या नागपूरच्या अधिवेशनात विदर्भ आणि मराठवाड्यातील प्रश्नांवरच चर्चा व्हावी असे अपेक्षित असते. अधिवेशन एकच आठवड्यात गुंडाळले जाणार याबाबत मुख्यमंत्र्यांना विचारले असता त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या आचारसंहितेचे कारण असल्याचे सांगून सारवासारव केली. या अधिवेशनात जास्तीत जास्त विदर्भ आणि मराठवाड्याचे प्रश्न आम्ही चर्चेला घेणार असेही त्यांनी ठणकावून सांगितले.काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी अधिवेशन सात दिवसांतच का गुंडाळता असा सवाल सत्ताधाऱ्यांना केला. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुम्ही विधानसभा अध्यक्ष असताना तीन वर्षांत विदर्भात किती दिवस कामकाज केले असा प्रश्न विचारून नानांना निरुत्तर केले. शेवटी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जर कामकाज आटोपले नाही तर अधिवेशनाचा कालावधी निश्चित वाढवू असे सांगून नानांना शांत केले होते.सध्या राज्यात नागरी वस्त्यांमध्ये वन्य प्राण्यांचे आक्रमण हा मुद्दा गाजतो आहे. विधानसभेत सुद्धा हा मुद्दा चांगलाच गाजला. ठिकठिकाणी नागरी वस्त्यांमध्ये बिबट्यांचे आक्रमण होताना दिसते आहे. मंगळवारी नागपुरातच पारडी नावाच्या वस्तीत एका घरात बिबट्या शिरला होता. त्याने तिथे काही जणांना जखमी केले. यावेळी वनमंत्री गणेश नाईक यांनी बिबटे नागरी वस्तीत येऊ नये म्हणून जंगलात एक कोटी रुपयांच्या शेळ्या सोडण्याची संकल्पना मांडली. त्यावर सभागृहात आणि सभागृहाबाहेर टीका झाली. बिबटे पकडण्यावरून वेगवेगळ्या आमदारांनी वेगवेगळे सल्ले द्यायला सुरुवात केली होती हे विशेष.बिबट्यांसोबतच बेवारस मोकाट कुत्र्यांचा मुद्दा विधानसभेत चांगलाच गाजला. शहरात मोकाट कुत्री जनसामान्यांना कसा कसा उपद्रव देतात यावर सर्वच आमदारांनी आपले अनुभव सांगितले. सरकारतर्फे यावर उपाययोजना केली जाईल असे सांगितले. ज्यावेळी बिबट्यांचा मुद्दा चर्चेला आला. त्यावेळी जे सरकार कुत्र्यांना पकडू शकत नाहीत ते बिबट्यांना काय पकडणार अशी टीका आमदार जयंत पाटील यांनी सभागृहात केली.विदर्भात कापूस आणि सोयाबीन या पिकांच्या हमीभावाचा प्रश्न कायम ऐरणीवर असतो. यंदा सभागृहात हा प्रश्न चर्चेला आला, तेव्हा विरोधी सदस्यांसोबतच सत्ताधारी सदस्य आक्रमक झाले. दोन्ही बाजूच्या सदस्यांनी चांगलाच गदारोळ केला. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी एका खासगी वृत्तवाहिनीने आयोजित एका कार्यक्रमात काँग्रेसचे विधानसभेतील गटनेते विजय वडेट्टीवार वेगळ्या विदर्भाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावेळी पत्रकारांनी भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारले असता विदर्भाचा मुद्दा अजूनही आमच्या अजेंड्यावर आहे असे उत्तर दिले. मग दुसऱ्या दिवशी विधानसभेत पुन्हा एकदा हा प्रश्न उपस्थित केला गेला. विदर्भाचे वेगळे राज्य होणार का या विषयावर विदर्भ विरोधक आणि विदर्भ समर्थक यांच्यात चांगल्याच शाब्दिक चकमकी घडल्या होत्या.राज्यातील मागास भागासाठी गठीत करण्यात आलेली वैधानिक विकास मंडळे २०२० पासून थंडावस्त्यात पडली आहेत. या वैधानिक विकास मंडळांना राष्ट्रपतींकडून दर पाच वर्षांसाठी मुदतवाढ दिली जात असते. २०२० मध्ये या वैधानिक विकास मंडळांची मुदत संपल्यावर तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारने या मंडळांना मुदतवाढ देण्याचा प्रस्तावच पाठवला नाही. त्यामुळे मंडळे पुनर्गठीत झालीच नाहीत. या अधिवेशनात भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी हा प्रश्न उपस्थित करत सरकारला चांगलेच धारेवर धरले. वैधानिक विकास मंडळांच्या माध्यमातून मागास भागांचा विकास करण्यासाठी निधी उपलब्ध होऊ शकतो. मात्र ती गठीत न झाल्यामुळे विदर्भ मराठवाडा आणि कोकण या भागांचा विकास मंदावला, अशी टीका त्यांनी केली.नागपुरात अधिवेशन म्हटले की, अधिवेशनावर विविध संघटनांचे मोर्चे येणे हे एक नित्य नैमित्तिक कर्म असते. यंदा देखील बरेच मोर्चे विधानसभेवर आले. हे वार्तापत्र लिहीत असताना देखील दोन मोर्चे विधानसभेवर धडकलेले आहेतच. मात्र यंदा दरवर्षीच्या तुलनेत मोर्चाचा जोर कमी होता असे ऐकायला मिळाले. हे मोर्चे साधारणपणे व्हेरायटी चौकातून विधानभवनाकडे येतात. त्यावेळी गोवारी शहीद स्मारकाजवळ हे मोर्चे अडवले जातात. मात्र तिथे मोर्चेकऱ्याना नैसर्गिक विधी करण्यासाठी कोणतीही सोय नव्हती. तसेच पिण्याच्या पाण्यासाठी देखील कोणतीही सोय नव्हती अशा तक्रारी करण्यात आल्या. विशेषतः तिथे मोर्चातील महिलांची फारच गैरसोय झाल्याचे बोलले जात होते. अधिवेशन म्हटले की मोर्चे येणारच. मग मोर्चेकरांसाठी प्रशासनाने आवश्यक त्या सोयी-सुविधा पुरवायला हव्यात. मात्र इथे प्रशासन कुठेतरी कमी पडले असे बोलले जात होते. एकूणच या अधिवेशनाच्या निमित्ताने सरकारी तिजोरीतून जवळजवळ ५०० कोटी रुपयांचा खर्च होतो. मात्र त्यातून वैदर्भियांच्या हाती काय लागते हा प्रश्न संशोधनाचाच विषय ठरेल.
प्रयत्न करूनही काही प्रश्न जेव्हां सुटत नाहीत, तेव्हां त्यावर तात्पुरती उपाययोजना करून प्रश्न बाजूला सारावा लागतो. तात्पुरत्या उपाययोजना सुरू असतात, त्यातून बऱ्याचदा प्रश्नाची दखल घेतल्याचा दिलासाही मिळतो, पण मूळ जखम तशीच भळभळत राहते. तिचं दुःख कमी होत नाही. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा प्रश्न नेमका असाच झाला आहे. आत्महत्या थांबत नाहीत, त्यांची तीव्रताही कमी होत नाही. उपाययोजना म्हणून पॅकेज, व्यक्तिगत आर्थिक मदत, उत्तम बियाणं, खतांत सवलत-असं बरंच काही केलं गेलं. अडचणीतल्या शेतकऱ्याच्या मानसिक आधारासाठी तज्ज्ञांना घेऊन काही प्रयोगही केले गेले. बीड जिल्ह्यात ‘मानवलोक’सारख्या संस्थेने ‘आशाताईं’सारख्या समुपदेशिका घडवल्या. प्रयोग यशस्वी झाले. काही आत्महत्या रोखल्या गेल्याही. पण, त्याने एकूण आत्महत्यांच्या प्रमाणात घट झाल्याचं दिसलं नाही. वेगवेगळ्या उपायांनंतरही त्यात फारसा फरक नाही. नागपूरला सुरू असलेल्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात गुरुवारी विधान परिषदेत सरकारकडून जी आकडेवारी दिली गेली, ती याचीच पुष्टी करणारी आहे. गेल्या नऊ महिन्यांत राज्यात ७८१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. सर्वात जास्त आत्महत्या विदर्भात, नागपूर विभागात( २९६) असून त्यानंतर मराठवाडा (२१२) आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंद अहवालात प्रसिद्ध झालेली आकडेवारी पाहिली, तर देशात शेतकऱ्यांच्या जितक्या आत्महत्या झाल्या, त्यातल्या ५० टक्के एकट्या महाराष्ट्रात आहेत. राज्यात एकूण ६ हजार ६६९ आत्महत्यांची नोंद आहे. त्यातल्या ४ हजार १५० आत्महत्या जमीन मालक शेतकऱ्यांच्या, तर २ हजार ५१९ भूमिहीन शेतमजुरांच्या आहेत. गेल्या चाळीसेक वर्षांपासून शेतकऱ्यांच्या आत्महत्या ठळकपणे चर्चेत असून त्यात सुरुवातीपासूनच विदर्भ आणि मराठवाडा आघाडीवर आहे. विदर्भ-मराठवाड्यातील या दु:स्थितीच्या कारणांचा विविध अंगांनी अभ्यास केला गेला. त्यात शेतीतील अडचणींबरोबरच अन्य कौटुंबिक, सामाजिक कारणं-दबाव, चालीरीती यांचाही विचार झाला. त्यांचे निष्कर्ष आपल्यासमोर आहेत. ते सर्वमान्यही आहेत. पण, त्यातल्या एकेका कारणाला लक्ष्य करून त्यासाठी प्रबोधनात्मक कामाला म्हणावा तसा जोर लागल्याचं दिसत नाही. सरकारच्या औपचारिक यंत्रणांकडून यावर इलाज होईल, असं वाटत नाही.शेतीतल्या अडचणींचा विचार करताना पूर्वी शेतमालाच्या बाजारभावाचा विषय सर्वप्रथम समोर यायचा. काही शेतमालांचे भाव आधारभूत किमतीच्या टेकूने सरकारला विशिष्ट पातळीवर सांभाळता येतात. पण, भाजीपाला किंवा फळांसारख्या नाशवंत मालासाठी हे शक्य होत नाही. ज्या मालाला आधारभूत किमतीचा थोडाबहुत उपाय आहे, तिथेही मालाचा अपेक्षित दर्जा आणि यंत्रणेतल्या गैरव्यवहारांचे अडथळे आहेतच. त्यामुळे, जिथे बाजारभावाची शाश्वती देता येत नाही, तिथे शेतीतील गुंतवणुकीचा खर्च कमी करण्यासाठी मदत देऊन झाली. पण, त्याचाही काही उपयोग झालेला दिसत नाही. मानवनिर्मित कारणं दूर करण्याचा किंवा बाजार व्यवस्थेच्या अंतर्गत असणाऱ्या समस्यांना उत्तरं शोधण्याचा प्रयत्न गेली अनेक वर्षं सुरू असूनही त्याला यश येत नसताना आता माणसाच्या नियंत्रणापलीकडच्या बाबींची शेतीवर आक्रमणं सुरू झाली आहेत. गेली काही वर्षं महाराष्ट्राला एकाच वेळी दुष्काळ आणि अतिवृष्टी या दोन्ही नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावं लागतं आहे. वातावरणीय बदलांचा हा परिणाम आहे. जगात ज्या देशांना वातावरणीय बदलांच्या दुष्परिणामांना सामोरं जावं लागतं आहे, त्यात भारत नवव्या क्रमांकावर आहे! गेली काही वर्षं हिमालयापासून केरळपर्यंत आणि पश्चिम किनारपट्टीपासून पूर्व किनारपट्टीपर्यंत ढगफुटी, चक्रीवादळांचा रतीब सुरू आहे. किनारपट्टीवरच्या शेतीबरोबरच मच्छीमारांचं मोठं नुकसान होतं आहे. जगातल्या तीन अब्जांपेक्षा जास्त लोकसंख्या (सुमारे ४० टक्के) गेली ३० वर्षं तीव्र वातावरणीय बदलांनी वारंवार उद्ध्वस्त होते आहे. ही लोकसंख्या ज्या अकरा देशांत आहे, त्यातच भारत नववा आहे. कृषीप्रधान भारताला या अस्थिर वातावरणाचा विचार करून आपल्या कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल करावे लागणार आहेत. त्याची जाणीव आपल्याकडे आता दिसू लागली आहेत. धोरणात्मक पातळीवर त्याच्या पर्यायांची भाषा बोलली जाऊ लागली आहे. केवळ चर्चेत न ठेवता याबाबतच्या उपाययोजना लवकर प्रत्यक्ष आणल्या नाहीत, तर येत्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा आकडा भयावह होण्याची भीती आहे.महाराष्ट्रातल्या शेतीवर आणखी एक गंभीर संकट आलं आहे. ते आहे, वन्य प्राण्यांचं. चर्चा जरी हिंस्र प्राण्यांची होत असली, तरी खरं संकट वन्य प्राण्यांचंच आहे. त्याची जाणीव अजून महाराष्ट्राला तितकीशी दिसत नाही. कोकण आणि गडचिरोलीत हत्ती; रानडुक्करं, माकडं, हरणं, निलगाई शेतीचं मोठं नुकसान करत आहेत. कोल्हे, लांडगे, मुंगूस, साळींदरं गावागावांत सर्रास दिसू लागली आहेत. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हरणं, काळवीटं, सांबरांनी शेतीची वाट लावली आहे. मोर, उंदीर, अस्वलं, पक्षांचे थवे राज्याच्या वेगवेगळ्या भागांत शेतात हैदोस घालत आहेत. या सगळ्याच्या परिणामी यानंतर विशिष्ट कीटक, किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता तज्ज्ञ वर्तवत आहेत. चर्चा फक्त बिबट्यांची आहे. पण जंगलं साफ केल्यामुळे ही सगळी वन्य मंडळी शेतात उतरली आहेत. त्यांनीही शेतकरी कावला आहे. उद्याच्या आत्महत्यांना ही नवी कारणंही कारणीभूत ठरतील, इतकी ती गंभीर आहेत. उद्याच्या आत्महत्या रोखण्यासाठी त्याची गांभीर्याने आजच दखल घेतली पाहिजे.
मुंबईत चार नव्या पोलीस स्टेशनची निर्मिती होणार
मुंबई : दिवसेंदिवस गुन्हेगारी ही वाढत चालली आहे. या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आता राज्य सरकारने मोठं पाऊल उचललं आहे. मुंबईमध्ये आता ४ नवीन पोलीस स्टेशन उभारली जाणार आहेत. चारही पोलीस स्टेशनला मंजुरी देण्यात आली आहे. मुंबई पोलीस आयुक्त यांच्या अखत्यारित नवीन चार पोलीस स्टेशन, दोन नवीन परिमंडळ आणि तीन सहायक पोलीस आयुक्त विभागास मंजुरी मिळाली आहे. राज्याच्या गृहखात्याने हा निर्णय घेतला आहे.गृह खात्याकडून मिळाली मंजुरी१) महाराष्ट्र नगर पोलीस ठाणे२) गोळीबार पोलीस ठाणे३) मढ मार्वे पोलीस ठाणे४) असल्फा पोलीस ठाणेअशी एकूण चार नवीन पोलीस स्टेशन असणार आहेत. सध्याच्या पोलीस आयुक्तालयांतर्गत १३ परिमंडळ आहेत. याची पुनर्रचनाकरुन दोन नवीन परिमंडळ कार्यरत करणार आहेत. त्याचसोबत तीन नवीन सहायक पोलीस आयुक्त विभाग निर्माण होणार आहेत. या नव्या व्यवस्थेमुळे स्थानिक नागरिकांना दिलासा मिळणार आहे. गुन्हेगारांवर वचक बसण्यास मदत होणार आहे.
मुंबईसह राज्यातल्या २९ महापालिकांसाठी कधी होणार मतदान ?
मुंबई : महापालिका निवडणुकांची प्रतिक्षा अखेर संपण्याच्या मार्गावर आहे.नगर परिषद निवडणुका पार पाडल्यानंतर आता राज्याचे लक्ष महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीकडे लागले आहे. मुंबई, ठाण्यासह राज्यातील २९ महापालिका निवडणुकांचे काउंटडाऊन सुरू झाले आहे.सात-आठ वर्ष रखडलेल्या या निवडणुकांची घोषणा १५ डिसेंबर नंतर कधीही होऊ शकते , अशी विश्वसनीय माहिती समोर आली आहे. निवडणुकीच्या घोषणेसोबच आचारसंहिता लागू होईल आणि निवडणूक प्रक्रियेला वेग येईल. आगामी १५ डिसेंबर रोजी राज्यातील १०० हून अधिक मोठ्या प्रकल्पांचे भूमिपूजन आणि उद्घाटन होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळेच १५ डिसेंबरनंतर निवडणूक आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आणखी वाढली आहे.राज्यातील २९ महानगरपालिकांपैकी नागपूर आणि चंद्रपूर येथे ओबीसी आरक्षण ५० टक्क्यांहून अधिक आहे. मात्र उर्वरित २७ महानगरपालिका निवडणुकांसाठी मार्ग खुला झाला असल्याचे संकेत आधीच निवडणूक आयोगाकडून देण्यात आले होते. त्यामुळे आता पुढील आठवड्यातील निवडणूक आयोगाच्या निर्णयावर सगळ्यांचे लक्ष आहे.महापालिकांसाठी कधी होणार मतदान?सर्वोच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारी २०२६ पर्यंत राज्यातल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे यावेळी निवडणूक प्रक्रिया वेगाने पूर्ण केली जाईल. याआधी २०१७ मध्ये निवडणुकीची घोषणा आणि मतदान यात दोन महिन्यांचे अंतर होते.
Meghna Gulzar Birthday: संवेदनशील विषयांची ताकद बनलेल्या मेघना गुलजार कोण आहेत?
Meghna Gulzar Birthday: बॉलिवूडमधील संवेदनशील आणि प्रभावी दिग्दर्शिकांमध्ये मेघना गुलजार यांचं नाव अग्रक्रमाने घेतलं जातं. साध्या, सरळ पण मनाला भिडणाऱ्या कथा पडद्यावर मांडणं हीच त्यांच्या चित्रपटांची खरी ताकद आहे. त्यांच्या सिनेमांमध्ये भडक ड्रामा नसतो, तर वास्तव आयुष्यातील भावना, वेदना आणि सत्य प्रामाणिकपणे दाखवलेलं दिसतं. आज, १३ डिसेंबर रोजी मेघना गुलजार आपला ५२वा वाढदिवस साजरा करत […] The post Meghna Gulzar Birthday: संवेदनशील विषयांची ताकद बनलेल्या मेघना गुलजार कोण आहेत? appeared first on Dainik Prabhat .
पाकिस्तानला पुतिन यांनी दाखवली जागा, शहबाज शरीफ भेट घेण्यासाठी आले पण घडलं भलतचं
Putin-Shehbaz Meeting | रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या भारत दौऱ्याकडे अमेरिकेसह सर्व जगाचे लक्ष लागले होते. यानंतर आता व्लादीमीर पुतिन यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांना चांगलीच अद्दल घडवली आहे. तुर्कमेनिस्तानमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचा अपमान करण्यात आला आहे. शहबाज शरीफ पुतिन यांची भेट घेण्याच्या प्रतीक्षेत ४० मिनिटे बसून राहिले, तरीही पुतिन भेटायला आले […] The post पाकिस्तानला पुतिन यांनी दाखवली जागा, शहबाज शरीफ भेट घेण्यासाठी आले पण घडलं भलतचं appeared first on Dainik Prabhat .
अकोला : नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचा निकाल २१ डिसेंबर या दिवशी जाहीर होणार आहे. त्यानंतर महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या निकालअगोदरच उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. अकोल्यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनाला मोठा खिंडार पडले असून, शिवसेना शहरप्रमुखासह माजी नगरसेवक आणि पदाधिकारी अशी एकूण मिळून १६ जणांनी ठाकरेंची […] The post शिंदेंनी करेक्ट कार्यक्रम केला! महापालिका निवडणुकीआधी ठाकरेंना मोठा धक्का; १६ नेत्यांच्या हाती ‘धनुष्यबाण’ appeared first on Dainik Prabhat .
Pune News: संतूरच्या सुरांनी मंत्रमुग्ध आणि सतारने लावलं वेड; सवाईच्या तिसऱ्या दिवशी दिग्गजांची मैफल
प्रभात वृत्तसेवा पुणे – संतूर, सतार आणि गायनाने सवाईचा तिसरा दिवस रंगतदार झाला. युवा संतूरवादक सत्येंद्रसिंह सोलंकी यांचे बहारदार संतूरवादन आणि त्यानंतर श्रीनिवास जोशी यांनी गायलेला राग पूरिया, अणुरेणिया थोकडा । तुका आकाशा एवढा.. हा सादर केलेला अभंग, उस्ताद शुजात खाँ यांची सतार आणि विदुषी अश्विनी भिडे-देशपांडे यांचे गायन यांनी सूरांची बहार आणली. आर्य संगीत […] The post Pune News: संतूरच्या सुरांनी मंत्रमुग्ध आणि सतारने लावलं वेड; सवाईच्या तिसऱ्या दिवशी दिग्गजांची मैफल appeared first on Dainik Prabhat .
नागपूर : राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेतून आदेश देत चार तहसीलदार, चार मंडल अधिकारी आणि दोन तलाठी अशा एकूण दहा शासकीय अधिकाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन केले. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात वनीकरणासाठी राखीव असलेल्या क्षेत्रात झालेल्या ९० हजार ब्रास अनधिकृत गौण खनिज उत्खननाप्रकरणी हा निर्णय घेण्यात आला आहे.तलाठी दीपाली सनगर आणि गजानन सोटपल्लीवार, मंडल अधिकारी संदीप बोरकर, माणिक साबळे, अजय सोनवणे आणि रमेश कदम यांच्यासह तहसीलदार जोगेंद्र कटियार, मनजीत देसाई, मधुसूदन बारगे, विक्रम देशमुख अशी निलंबित केलेल्या अधिकाऱ्यांची नावं आहेत. या अधिकाऱ्यांना निलंबित केल्याचं महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत जाहीर केलं. निलंबित केलेल्या अधिकाऱ्यांवर ९० हजार ब्रास जादा उत्खननासाठी गुन्हा दाखल करणे, दंड आकारणी करणे, सातबारा उताऱ्यावर नोंदी घेणे आणि दंड न भरल्यास व्याजासह वसूल करण्याचा आदेशही बावनकुळे यांनी दिला.राज्याच्या महसूल विभागाने मावळ तालुक्यातील गट क्रमांक ३६, ३७ आणि ३८ मध्ये खाणपट्टे मंजूर केले होते. इथे गौण खनिजाचं उत्खनन करण्यास परवानगी दिली होती. मात्र गट क्रमांक ३५, ४१, ४२ आणि ४६ या गट क्रमांकांवरही गौण खनिजाचे तात्पुरत्या स्वरूपाचं उत्खनन झाले. याशिवाय परवानगीपेक्षा ९० हजार ब्रास अधिक उत्खनन झाल्याचे ईटीएस मोजणीत निष्पन्न झाले आहे. याबाबत मावळचे आमदार सुनील शेळके यांनी विधानसभेत लक्षवेधी मांडली होती. यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणात दोषी आढळलेल्या दहा अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली. तसेच पुढील तीन महिन्यात या निलंबित अधिकाऱ्यांच्या सहभागाबद्दल अहवाल तयार केला जाईल. त्यानंतर पुढील अधिवेशनात यावर निर्णय घेतला जाणार आहे.
पुणे विमानतळावर हायवोल्टेज ड्रामा! ८० फुटांच्या बोगद्यात बिबट्याला कसं पकडलं? वाचा
प्रभात वृत्तसेवा पुणे – एप्रिलपासून पुणे विमानतळ परिसरात फिरणाऱ्या एका प्रौढ नर बिबट्याला गुरुवारी रात्री (११ डिसेंबर) पुणे वनविभाग, रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट, हवाईदल-विमानतळ प्रशासनाने एकत्रित प्रयत्नातून पकडले.हा बिबट्या २८ एप्रिल रोजी पहिल्यांदा विमानतळावर धावपट्टीनजीक दिसला. त्यानंतर तो गुरुवारपर्यंत विमानतळ परिसरातील भूमिगत बोगदे, दाट झुडपे आणि कमी मानवी हालचाली असलेल्या भागांत फिरत राहिला. विमानतळाचा विस्तृत, संवेदनशील […] The post पुणे विमानतळावर हायवोल्टेज ड्रामा! ८० फुटांच्या बोगद्यात बिबट्याला कसं पकडलं? वाचा appeared first on Dainik Prabhat .
BJP Pune: भाजपच्या तिकीटासाठी रस्सीखेच! आजपासून मुलाखतींचा धडाका; माजी नगरसेवकांचं टेन्शन वाढलं
प्रभात वृत्तसेवा पुणे : महापालिकेच्या संभाव्य निवडणुकीची चाहूल लागताच भाजपने उमेदवार निवड प्रक्रियेला वेग दिला आहे. पक्षाकडून निवडणूक लढविण्यासाठी अर्ज सादर केलेल्या इच्छुकांच्या आज ( शनिवार्फ) तसेच उद्या ( रविवारी) मुलाखती घेतल्या जाणार आहेत. पक्षाकडे आता पर्यंत १६५ जागांसाठी सुमारे दोन हजार ३५० कार्यकर्त्यांनी निवडणूक लढविण्यासाठी अर्ज केले आहेत. अर्ज करणाऱ्यांत माजी नगरसेवकांसह, इतर काही […] The post BJP Pune: भाजपच्या तिकीटासाठी रस्सीखेच! आजपासून मुलाखतींचा धडाका; माजी नगरसेवकांचं टेन्शन वाढलं appeared first on Dainik Prabhat .
प्रभात वृत्तसेवा पुणे – विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा अधिकाधिक वेळ राज्य स्तरावरील बैठका आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये जात असल्यामुळे त्यांच्या मूळ कामावर आणि क्षेत्रीय भेटीवर परिणाम होत असल्याने राज्य शासनाने आणि प्रत्यक्ष बैठका आयोजित करण्यासंदर्भात मोठे आणि महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. त्यानुसार कोणत्याही मंत्र्यांना जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यालयाबाहेर बैठकीसाठी बोलवता येणार नाही, अशा […] The post आता मंत्र्यांनाही घ्यावी लागणार परवानगी! अधिकाऱ्यांना बैठकीला बोलावण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांचा ‘हा’ कडक नियम appeared first on Dainik Prabhat .
PMC Election: मनसेचे इच्छुकही सुसाट! युतीच्या चर्चेदरम्यान पहिल्याच दिवशी ४०९ इच्छुकांचे अर्ज
प्रभात वृत्तसेवा पुणे – पुण्यात मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युतीबाबत चर्चा सुरू होण्याच्या मार्गावर आहेत. तर दुसरीकडे मनसेकडून महापालिका निवडणुका मनसेच्या तिकिटावर लढण्यासाठी तयार असलेल्या इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात आले होते. शुक्रवारी पहिल्याच दिवशी मनसेचे सुमारे ४०९ अर्ज कार्यकर्त्यांकडून घेण्यात आले आहेत. त्यामुळे मनसेकडूनही लढण्यासाठी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते तयार असल्याचे चित्र आहे.मनसेच्या स्थापनेनंतर […] The post PMC Election: मनसेचे इच्छुकही सुसाट! युतीच्या चर्चेदरम्यान पहिल्याच दिवशी ४०९ इच्छुकांचे अर्ज appeared first on Dainik Prabhat .
Pune Weather: पुणेकर गारठले! शहरात किमान तापमान ७ अंशांवर; पाहा कुठे, किती थंडी?
प्रभात वृत्तसेवा पुणे – शहरासह जिल्ह्यात थंडीचा पारा स्थिर असून, मागील चार दिवसांपासून सुरू झालेल्या कडाक्याच्या थंडीने पुणेकर गारठले आहेत. शुक्रवारी (दि. १२) पाषाण येथे सर्वात कमी ७.७ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. जिल्ह्यातील किमान तापमानात एक अंशाने वाढ झाली असली तरी थंडीचा कडाका कायम असून, बारामती येथे आज ८.१ अंश सेल्सिअस किमान तापमान […] The post Pune Weather: पुणेकर गारठले! शहरात किमान तापमान ७ अंशांवर; पाहा कुठे, किती थंडी? appeared first on Dainik Prabhat .
पहिल्याच दिवशी विश्वविक्रम! पुणे पुस्तक महोत्सवाची सुरुवातच दणक्यात, अमेरिकेचा ‘तो’विक्रम मोडला
प्रभात वृत्तसेवा पुणे – राष्ट्रीय पुस्तक न्यासाने (एनबीटी) आयोजित केलेल्या पुणे पुस्तक महोत्सवाची सुरुवात शुक्रवारी विश्वविक्रमाच्या नोंदीने झाली. लार्जेस्ट डिस्प्ले ऑफ पोस्टर्स हा विश्वविक्रम गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये प्रस्थापित केला. तसेच पुणेकरांनी भारतातील बोलीभाषा आणि आदिवासी शब्दांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला आहे.हा विश्वविक्रम भगवान बिरसा मुंडा यांच्या कार्याला आदरांजली असल्याचे मत तज्ज्ञांनी यावेळी व्यक्त केले. […] The post पहिल्याच दिवशी विश्वविक्रम! पुणे पुस्तक महोत्सवाची सुरुवातच दणक्यात, अमेरिकेचा ‘तो’ विक्रम मोडला appeared first on Dainik Prabhat .
PMC Election: पुढील आठवड्यात निवडणुकीची घोषणा? स्थायी समितीच्या बैठकीत ९० प्रस्तावांचा धडाका
प्रभात वृत्तसेवा पुणे : पुढील आठवडयात कोणत्याही दिवशी केली राज्य निवडणूक आयोग महापालिका निवडणुकीची घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे, देखभाल, दुरूस्ती, नवीन विकासकामांचे प्रस्ताव मान्य करण्यासाठी स्थायी समितीत पालिका प्रशासनासह ठेकेदारांनी शुक्रवारी गर्दी केल्याचे पहायला मिळाले. ही गर्दी एवढ्या मोठया प्रमाणावर वाढली की पालिकेच्या सुरक्षा रक्षकांना त्यात हस्तक्षेप करत ठेकेदार तसेच इतरांना बाहेर काढावे लागले. […] The post PMC Election: पुढील आठवड्यात निवडणुकीची घोषणा? स्थायी समितीच्या बैठकीत ९० प्रस्तावांचा धडाका appeared first on Dainik Prabhat .
खासगी ट्रॅव्हल्सला धक्का? शाळांनी फिरवली पाठ, एसटीला पसंती देण्याचं ‘हे’आहे मोठं कारण
प्रभात वृत्तसेवा पुणे – शैक्षणिक सहलीसाठी नवीन बस उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतल्यानंतर शाळा-महाविद्यालयांकडून एसटीच्या नवीन बसची मागणी वाढली आहे. परिणामी राज्यात नोव्हेंबर महिन्यात जवळपास २ हजार २४३ बस सहलीसाठी दिल्या असून, त्यातून एसटीला अकरा कोटीचे उत्पन्न मिळाले आहे. त्यामध्ये पुणे जिल्ह्यात १२३ बस देण्यात आले आहेत. शालेय सहलींना एसटी महामंडळाकडून बसेस उपलब्ध करून दिल्या […] The post खासगी ट्रॅव्हल्सला धक्का? शाळांनी फिरवली पाठ, एसटीला पसंती देण्याचं ‘हे’ आहे मोठं कारण appeared first on Dainik Prabhat .
अमेरिकेसोबतच्या व्यापार कराराबाबतची अनिश्चितता कायम असताना आता मेक्सिकोने भारतासह आशियातील प्रमुख उदयोन्मुख अर्थव्यवस्थांवर लागू केलेल्या वाढीव आयातशुल्कांच्या निर्णयाने जागतिक व्यापाररचनेच्या किलकिल्या होऊ लागलेल्या संकल्पनांना नवा तडा गेला आहे. 2026च्या सुरुवातीपासून अमलात येणार्या या शुल्कवाढीचा परिघ आणि तीव्रता लक्षात घेतल्यास हा निर्णय केवळ आर्थिक संरक्षणवादाचा परिचित आविष्कार म्हणता येणार नाही. त्यामागे वर्तमानातील भू-राजकीय तणावांची पार्श्वभूमी असल्याचे […] The post अग्रलेख : मेक्सिकोचा तडाखा appeared first on Dainik Prabhat .
Pune News: ३ हजार कोटींची मतपेरणी? मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार ६० वेगवेगळ्या प्रकल्पांचे उद्घाटन
प्रभात वृत्तसेवा पुणे – ऐन महापालिका निवडणुकांच्या तोंडावर महापालिकेच्या तब्बल ३ हजार कोटींच्या ६० हून अधिक प्रकल्पांचे उद्घाटन, तसेच भूमिपूजन येत्या सोमवारी (दि. १५) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते केले जाणार आहे. विधिमंडळाचे नागपूर येथील हिवाळी अधिवेशन संपताच पुढील आठवड्यात निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता असल्याने हा कार्यक्रम लगेचच सोमवारी होणार आहे. या कार्यक्रमांच्या निमित्ताने भाजपकडूनही […] The post Pune News: ३ हजार कोटींची मतपेरणी? मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार ६० वेगवेगळ्या प्रकल्पांचे उद्घाटन appeared first on Dainik Prabhat .
पुणेकरांसाठी मोठी बातमी! पीएमआरडीएचा ‘डीपी’रद्द; आता ६०० गावांचा विकास होणार ‘या’नव्या प्लॅननुसार
प्रभात वृत्तसेवा पुणे – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (पीएमआरडीए) विकास आराखडा (डीपी) रद्द झाल्याने आता प्राधिकरणाने रस्त्यांचे जाळे आणि पायाभूत सुविधा उभारण्याचा आराखडा म्हणजे स्ट्रक्चर प्लॅन (संरचना आराखडा) तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. प्राधिकरणाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे प्राधिकरणामध्ये आता डीपीऐवजी स्ट्रक्चर प्लॅन करण्याचा मार्ग मोकळा […] The post पुणेकरांसाठी मोठी बातमी! पीएमआरडीएचा ‘डीपी’ रद्द; आता ६०० गावांचा विकास होणार ‘या’ नव्या प्लॅननुसार appeared first on Dainik Prabhat .
Election Officers: विभागीय आयुक्तांकडून महापालिका निवडणुकीसाठी 30 अधिकाऱ्यांची नियुक्ती
प्रभात वृत्तसेवा पुणे – आगामी पुणे आणि पिंपरी- चिंचवड महापालिका निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार विभागीय आयुक्तांनी निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्यानुसार पुणे महापालिकेसाठी 15 क्षेत्रीय कार्यालयांसाठी 15 निवडणूक निर्णय अधिकारी आणि 15 सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे आदेश दिले आहेत. पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी […] The post Election Officers: विभागीय आयुक्तांकडून महापालिका निवडणुकीसाठी 30 अधिकाऱ्यांची नियुक्ती appeared first on Dainik Prabhat .
तामिळनाडूमध्ये एका मंदिर आणि दर्ग्याच्या जुन्या वादावर निकाल देणाऱ्या उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदावरून हटवले जाऊ शकते. न्यायमूर्ती स्वामिनाथन यांनी तामिळनाडूच्या DMK सरकारला आदेश दिला की हिंदूंना मंदिर परिसराजवळ एका स्तंभावर दिवा प्रज्वलित करण्याची परवानगी द्यावी. सरकारने निकाल मानला नाही, तेव्हा CISF जवानांच्या देखरेखीखाली हिंदूंना दीपोत्सव साजरा करण्याची परवानगी दिली. यावर वाद निर्माण झाला आणि 107 विरोधी खासदारांनी लोकसभेत महाभियोगाची नोटीस देऊन न्यायाधीशांवर हिंदू समुदायाची बाजू घेतल्याचा आणि धर्मनिरपेक्षतेच्या विरोधात काम केल्याचा आरोप केला. अखेर मंदिर-दर्गा वादाची संपूर्ण कहाणी काय आहे, न्यायाधीशांनी खरोखरच हिंदूंच्या बाजूने निकाल दिले आहेत का, महाभियोग प्रस्तावावर पुढे काय होईल; हे जाणून घेऊया आजच्या एक्सप्लेनरमध्ये... प्रश्न-1: न्यायमूर्ती स्वामीनाथन यांच्या विरोधात 107 विरोधी खासदार महाभियोग का आणू इच्छितात?उत्तर: तामिळनाडूतील सत्ताधारी पक्ष DMK च्या खासदार कनिमोझी, सपा खासदार अखिलेश यादव आणि काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांच्यासारख्या 107 विरोधी खासदारांनी 9 डिसेंबर रोजी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना एक नोटीस पाठवली. त्यात मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायाधीश जी.आर. स्वामीनाथन यांच्या विरोधात महाभियोग प्रस्ताव आणून त्यांना पदावरून हटवण्याची मागणी केली. खासदारांनी नोटीसची प्रत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनाही दिली आहे. नोटीसमध्ये संविधानाच्या अनुच्छेद 217 आणि 124 अंतर्गत न्यायमूर्ती स्वामीनाथन यांच्या विरोधात महाभियोग आणण्यासाठी 3 आधार सांगितले आहेत: खरं तर, न्यायमूर्ती स्वामीनाथन यांनी तामिळनाडूच्या मदुराईमध्ये एका टेकडीवर बांधलेल्या मुरुगन (कार्तिकेय) मंदिराच्या आणि दर्ग्याच्या प्रकरणात हिंदूंच्या बाजूने निकाल दिला होता. मुस्लिम पक्षाच्या विरोधादरम्यान, न्यायाधीशांनी मंदिराच्या अधिकाऱ्यांना कार्तिकई दीपम उत्सवादरम्यान परिसरात असलेल्या एका स्तंभावर दिवा लावण्याची परवानगी दिली होती. या आदेशानंतर तामिळनाडूमध्ये राजकीय तणाव निर्माण झाला. प्रश्न-2: मदुराईच्या मंदिर आणि दर्ग्यातील वादाचे संपूर्ण प्रकरण काय आहे?उत्तर: तमिळनाडूतील मदुराईपासून फक्त 10 किलोमीटर दूर तिरुपरंकुरुनम नावाचा डोंगर आहे. येथे भगवान मुरुगन म्हणजेच कार्तिकेय यांचे एक मंदिर आहे. याला 'तिरुपरंकुरुनम मुरुगन कोइल' किंवा सुब्रमण्य स्वामी मंदिर म्हणतात. हे मंदिर आठव्या शतकात पल्लव राजवंशाच्या काळातील मानले जाते. लोककथा अशी आहे की येथे देव आणि असुरांमध्ये युद्ध झाले होते. मंदिराच्या टेकडीच्या शिखरावर एक 16 फुटांचा प्राचीन स्तंभ देखील आहे. या स्तंभाला परिसरातील हिंदू कोडिमरम म्हणजेच धर्मस्तंभ म्हणतात. याच्या खाली वार्षिक कार्तिकई दीपम उत्सव होत असे. हिंदूंच्या दाव्यानुसार, हा स्तंभ मुरुगन मंदिराचा भाग आहे, जिथे प्राचीन काळापासून भक्त एक मोठा दिवा प्रज्वलित करतात. टेकडीच्या एका भागावर सूफी परंपरेचे पालन करणाऱ्या योद्धा सिकंदर शाहची दर्गा आहे. 13 व्या शतकात विजयनगर साम्राज्याच्या हिंदू राजासोबत झालेल्या युद्धात सिकंदर शाहचा मृत्यू झाला होता. अशी मान्यता आहे की राजाने सिकंदर शाहला मानणाऱ्यांना टेकडीवर त्यांची दर्गा बनवण्याची परवानगी दिली. तेव्हापासून 'सिकंदर बादुशा दर्गा' मदुराईची एक ओळख बनली आहे. या दर्ग्यावर हिंदू लोकही जाऊन दोरा बांधत असत. अनेक मुस्लिम मंदिराचेही दर्शन करत असत. 90च्या दशकात दर्ग्याची देखरेख करणाऱ्यांनी शिखरावर दिवा लावण्याच्या उत्सवावर आक्षेप घेण्यास सुरुवात केली आणि दिवा लावण्याची परंपरा बंद झाली. यानंतर मंदिर विरुद्ध दर्गा असा वाद सुरू झाला, जो अजूनही सुरू आहे: राज्य सरकार या दाव्याच्या विरोधात होते, परंतु याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती स्वामीनाथन यांनी मंदिरावर दिवा लावण्याची परवानगी दिली. यानंतर तणाव वाढला. प्रश्न-3: न्यायमूर्ती स्वामीनाथन यांनी या प्रकरणात काय आदेश दिला होता?उत्तर: 1 डिसेंबर रोजी मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाचे न्यायमूर्ती स्वामीनाथन यांनी या प्रकरणावर 49 पानांचा निकाल दिला. त्यात त्यांनी तामिळनाडू सरकारच्या हिंदू धार्मिक आणि धर्मादाय एंडोमेंट्स विभागाला 1920 च्या आदेशाचा हवाला देत मंदिरात दिवा प्रज्वलित करण्याचा आदेश दिला. न्यायमूर्ती स्वामीनाथन यांनी आपल्या निकालात म्हटले आहे की, 'दिवा लावण्याची प्रथा प्राचीन आहे आणि ती मुस्लिम भावना दुखावणारी नाही. जरी हा परंपरेचा मुद्दा नसला तरी, दिवा लावून शिखरावर मंदिराचा अधिकार दर्शवणे आवश्यक आहे. मशिदीचे विश्वस्त यथास्थिती भंग करत आहेत. मंदिराच्या व्यवस्थापनाने आपल्या मालमत्तेवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न रोखण्यासाठी सतर्क राहिले पाहिजे.' प्रश्न-4: न्यायालयाच्या आदेशानंतर वाद का निर्माण झाला?उत्तर: जेव्हा न्यायालयाच्या आदेशाचे पालन झाले नाही, तेव्हा 3 डिसेंबर रोजी न्यायालयाने अवमाननेची नोटीस जारी केली आणि हिंदू भक्तांना CISF जवानांच्या देखरेखीखाली मंदिरात दिवा लावण्याची परवानगी दिली. न्यायालयाने याला प्रतीकात्मक पण आवश्यक पाऊल असल्याचे सांगत म्हटले की, आदेशाचे पालन न करणे हे लोकशाहीच्या मृत्यूची घंटा वाजवण्यासारखे असेल. हा निकाल येताच टेकडीवर गर्दी उसळली. हिंदू संघटनांचे लोक आणि पोलिसांमध्ये झटापटही झाली, ज्यात अनेक लोक जखमी झाले. यादरम्यान CISF ने अर्जदार आणि त्यांच्यासोबतच्या इतर लोकांना टेकडीवर चढवले आणि दिवा लावला. याउलट DMK चे म्हणणे होते की हे भाजपचे षडयंत्र आहे. रिपोर्ट्सनुसार, टेकडीवर दर्गा आणि मंदिर दोन्हीचे अधिकारी दिवा लावण्यावर सहमत होते, परंतु स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांनी सुरक्षेच्या नावाखाली ते थांबवले. 4 डिसेंबर रोजी उच्च न्यायालयाने आदेशाविरुद्ध दाखल केलेल्या याचिका फेटाळून लावल्या. यानंतर DMK सरकारने तणावाच्या धोक्यामुळे आदेश लागू करण्यास नकार दिला. सरकारने सर्वोच्च न्यायालयातही याचिका दाखल केली आहे. सर्वोच्च न्यायालय या प्रकरणाची सुनावणी करण्यास सहमत झाले आहे. यादरम्यान, 9 डिसेंबर रोजी विरोधी खासदारांनी न्यायाधीश स्वामीनाथन यांच्या विरोधात महाभियोगाची नोटीस दिली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 50 हून अधिक निवृत्त न्यायाधीशांनीही न्यायमूर्ती स्वामीनाथन यांच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. प्रश्न-5: तर काय महाभियोग लावून न्यायमूर्ती स्वामीनाथन यांना पदावरून हटवता येते?उत्तर: संविधानाच्या कलम 124 नुसार, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना केवळ राष्ट्रपतीच पदावरून हटवू शकतात. यासाठी संसदेत महाभियोग प्रस्ताव आणावा लागतो: न्यायमूर्ती स्वामीनाथन यांच्या प्रकरणात प्रस्ताव लोकसभेत मांडण्यात आला आहे, त्यामुळे तो तेव्हाच मंजूर होईल जेव्हा लोकसभेच्या एकूण 543 सदस्यांपैकी किमान 272 खासदार त्याचे समर्थन करतील. त्याचबरोबर मतदानाच्या दिवशी उपस्थित असलेल्या खासदारांपैकी दोन तृतीयांश खासदार प्रस्तावाच्या बाजूने मतदान करतील. मात्र, सध्या विरोधकांकडे केवळ 234 खासदारांचेच समर्थन आहे. प्रश्न-6: जर न्यायाधीशांविरुद्ध महाभियोग आला, तर त्यांचा निकाल रद्द होईल का?उत्तर: उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी दिलेला निकाल हा कोणत्याही एका व्यक्तीचा निकाल नसून, तो न्यायालयाचा निकाल असतो. फक्त न्यायाधीशांविरुद्ध महाभियोग प्रस्ताव मंजूर झाल्याने तो बदलत नाही. निकाल बदलण्यासाठी न्यायालयात एक पुनरावलोकन याचिका (रिव्ह्यू पिटीशन) दाखल करावी लागेल, त्यानंतर न्यायालय स्वतःच निकाल बदलू शकते. याशिवाय न्यायालय स्वतःहून दखल घेऊनही निकाल बदलू शकते. सध्या प्रशासनाने मंदिरात दिवा लावण्यावर बंदी घातली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील आशिष कुमार पांडे यांच्या मते, 'हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात गेले आहे. सर्वोच्च न्यायालय या प्रकरणाशी संबंधित सर्व याचिकांवर सुनावणी करून नवीन निकाल देऊ शकते किंवा न्यायमूर्ती स्वामीनाथन यांच्या निकालाची अंमलबजावणी करू शकते. त्यांच्याविरुद्धच्या महाभियोगाच्या प्रक्रियेचा या प्रकरणावर कोणताही परिणाम होणार नाही.' प्रश्न-7: न्यायमूर्ती स्वामीनाथन यांनी याच प्रकारचे इतर निकाल दिले आहेत का?उत्तर: 1968 मध्ये तामिळनाडूच्या तिरुवरूर येथे जन्मलेले न्यायमूर्ती स्वामीनाथन 28 जून 2017 रोजी मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनले. यापूर्वी 2014 मध्ये त्यांची भारताचे सहाय्यक सॉलिसिटर जनरल म्हणून नियुक्ती झाली होती. 30 नोव्हेंबर 2025 च्या कार्यप्रदर्शन अहवालानुसार, त्यांनी गेल्या 8 वर्षांत आतापर्यंत 73 हजारांहून अधिक निकाल दिले आहेत. DMK आणि काँग्रेस न्यायमूर्ती स्वामीनाथन यांच्यावर हिंदूंचा पक्ष घेतल्याचा आरोप करतात. तर के. अण्णामलाई आणि तेजस्वी सूर्या यांसारखे भाजप नेते म्हणतात की न्यायमूर्ती स्वामीनाथन आपल्या निकालांद्वारे जुन्या परंपरांचे रक्षण करतात. या प्रकारच्या अनेक प्रकरणांमुळे न्यायमूर्ती स्वामीनाथन अनेकदा वादात सापडले आहेत: ----------- संशोधन सहकार्य: प्रथमेश व्यास -----------
Alandi Crime: आळंदीत दर्शनाला आलेल्या दोन वृद्धांचे अपहरण; अपहरणकर्त्यांची मागणी ऐकून पोलीसही हादरले
प्रभात वृत्तसेवा पिंपरी – आळंदी येथे दर्शनासाठी आलेल्या दोन ज्येष्ठ नागरिकांचे अपहरण करून अज्ञात आरोपीने त्यांच्या नातेवाईकांकडे २ लाख रुपयांची खंडणी मागितली आणि धमकावले. ही घटना मंगळवारी (९ डिसेंबर) दुपारी चार वाजता चाकण चौक, आळंदी येथे घडली. याबाबत सदानंद दगडु गायकवाड (३५, रिसोड, वाशीम) यांनी गुरुवारी (दि. ११) आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. […] The post Alandi Crime: आळंदीत दर्शनाला आलेल्या दोन वृद्धांचे अपहरण; अपहरणकर्त्यांची मागणी ऐकून पोलीसही हादरले appeared first on Dainik Prabhat .
Pimpri Crime: अमेरिकेत पैसे पाठवण्याच्या बहाण्याने १५.७५ लाखांची फसवणूक
प्रभात वृत्तसेवा पिंपरी – मुलाला शिक्षणासाठी अमेरिकेत तातडीने पैसे पाठवण्याच्या बहाण्याने एका इसमाने एका व्यक्तीचा विश्वास संपादन करून आरटीजीएसद्वारे १५ लाख ७५ हजार रुपये स्वतःच्या बँक खात्यावर ट्रान्सफर करून घेतले आणि व्यक्तीची फसवणूक केली. ही घटना ३० ऑगस्ट रोजी चिखली प्राधिकरण येथे घडली. याप्रकरणी अमित आण्णासाहेब रोहमारे (५५, चिखली प्राधिकरण) यांनी गुरुवारी (दि. ११) चिखली […] The post Pimpri Crime: अमेरिकेत पैसे पाठवण्याच्या बहाण्याने १५.७५ लाखांची फसवणूक appeared first on Dainik Prabhat .
PCMC Election: आरपीआय आठवले गटाने मागवले उमेदवारी अर्ज; ‘या’तारखेपर्यंत मुदत
प्रभात वृत्तसेवा पिंपरी – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) या पक्षाच्या वतीने पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी अर्ज मागविण्यास सुरूवात करण्यात आली आहे. शनिवार (दि. १३) पासून वाकड येथील पक्ष कार्यालयात अर्ज स्वीकारण्यात येणार आहे अशी माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) कडून उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात होणार असल्याची माहिती शहराध्यक्ष कुणाल वाव्हळकर यांनी दिली. रिपब्लिकन […] The post PCMC Election: आरपीआय आठवले गटाने मागवले उमेदवारी अर्ज; ‘या’ तारखेपर्यंत मुदत appeared first on Dainik Prabhat .
लव्ह, लँड आणि आता ‘कॉस्मेटिक जिहाद’? नागपूर अधिवेशनात महेश लांडगेंनी मांडला धक्कादायक मुद्दा
प्रभात वृत्तसेवा पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात मार्च- 2025 मध्ये पाकिस्तान बनावटीच्या सौंदर्य प्रसाधनांचा मोठा साठा जप्त झाल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली होती. हा मुद्दा हिवाळी अधिवेशनातही उपस्थित झाला. भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित करत म्हटले की, पिंपरी-चिंचवड शहरात पाकिस्तानी बनावटीची सौंदर्य प्रसाधने विक्रीसाठी येणे हा मुद्दा राष्ट्रसुरक्षेच्या दृष्टीने गंभीर आहे. शत्रू घराच्या […] The post लव्ह, लँड आणि आता ‘कॉस्मेटिक जिहाद’? नागपूर अधिवेशनात महेश लांडगेंनी मांडला धक्कादायक मुद्दा appeared first on Dainik Prabhat .
Pune Crime: लग्नाचं वचन दिलं, पण घडलं भलतंच! पुण्यातील महिलेसोबत तरुणाने केलं धक्कादायक कृत्य
प्रभात वृत्तसेवा पुणे – विवाहाच्या आमिषाने महिलेवर बलात्कार करुन तिची समाजमाध्यमात छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी देऊन दहा लाखांची खंडणी मागितली आहे.आरोपीने महिलेला धमकावून तिच्याकडून एक लाख २२ हजार रुपये घेतले. याप्रकरणी वाघोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी वीरेन धीरजकुमार रणशृंगारे ( ३३, रा. बुधवार पेठ, सोलापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार […] The post Pune Crime: लग्नाचं वचन दिलं, पण घडलं भलतंच! पुण्यातील महिलेसोबत तरुणाने केलं धक्कादायक कृत्य appeared first on Dainik Prabhat .
Pimpri Crime: रेकॉर्डब्रेक कारवाई! एकाच वेळी ४ टोळ्यांवर मोक्का; कुख्यात गुंडांची यादी जाहीर
प्रभात वृत्तसेवा पिंपरी – चऱ्होली येथे व्यावसायिकाच्या डोक्यात गोळ्या घालून ठार केल्याच्या गुन्ह्यात फरार असलेला आरोपी माजी नगरसेवक किसन तापकीरसह सहा जणांच्या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोका) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या टोळीसह चिखली मधील अनिरुद्ध जाधव, एमआयडीसी भोसरी मधील राहुल लोहार, दिघी मधील विक्रांत देवकुळे या टोळ्यांवर देखील मोकाची कारवाई केली […] The post Pimpri Crime: रेकॉर्डब्रेक कारवाई! एकाच वेळी ४ टोळ्यांवर मोक्का; कुख्यात गुंडांची यादी जाहीर appeared first on Dainik Prabhat .
प्रभात वृत्तसेवा पिंपरी – महाराष्ट्र राज्यातील लाखोंच्या संख्येने असलेल्या घरेलू कामगार यांचे अनेक प्रश्न आहेत दिवसभर राबणाऱ्या कष्टकरी महिलांना घरेलू कामगार कल्याणकारी मंडळाच्या तर्फे न्याय, लाभ देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू त्यासाठी लवकरच मुंबई येथे संबंधित अधिकारी, विभाग संघटनेचे पदाधिकारी यांचेसमवेत लवकरच मुंबईत बैठक आयोजित करू, असे आश्वासन महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी आज दिले. […] The post Pimpri News: घरेलू कामगारांचे प्रश्न मार्गी लागणार? विधानसभा उपाध्यक्ष बनसोडे लवकरच मुंबईत बैठक घेणार appeared first on Dainik Prabhat .
शिंदवणे घाटात रात्रीचा थरार! राँग साईडने आलेल्या टेम्पोने दुचाकीला १०० मीटर फरफटत नेले
प्रभात वृत्तसेवा उरुळी कांचन – जेजुरी-उरुळी कांचन रस्त्यावरील शिंदवणे (ता. हवेली) येथील हद्दीत टेम्पोने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. वाकवस्ती परिसरात गुरुवारी (दि.11) रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर टेम्पोचालक वाहन सोडून फरार झाला आहे. त्याचे नाव अद्याप समजू शकले नाही. त्याच्यावर उरुळी कांचन […] The post शिंदवणे घाटात रात्रीचा थरार! राँग साईडने आलेल्या टेम्पोने दुचाकीला १०० मीटर फरफटत नेले appeared first on Dainik Prabhat .
Pune Nashik Railway: पुणे-नाशिक रेल्वेवरून वाद पेटला; मंचरमध्ये नागरिकांनी मांडली ‘ही’ठाम भूमिका
प्रभात वृत्तसेवा मंचर – पुणे–नाशिक महामार्गालगतच्या खेड, आंबेगाव, जुन्नर, संगमनेर, सिन्नर व नाशिक परिसरातील नागरिकांनी जुन्या ठरावीक मार्गानेच पुणे–नाशिक रेल्वे प्रकल्प व्हावा, अशी ठाम मागणी केली आहे. या संदर्भात सर्व आमदार व खासदारांनी राजकीय पक्षांचे जोडे बाजूला ठेवून एकत्रितपणे, संघटित लढा उभारण्याची वेळ आली असल्याचे नागरिकांचे मत आहे. रेल्वेमार्ग बदलल्यास प्रवास, व्यापार, उद्योग, कृषी उत्पन्न […] The post Pune Nashik Railway: पुणे-नाशिक रेल्वेवरून वाद पेटला; मंचरमध्ये नागरिकांनी मांडली ‘ही’ ठाम भूमिका appeared first on Dainik Prabhat .
Alandi News: आळंदीच्या कचरा डेपोला पुन्हा आग! धुराने नागरिक हैराण, प्रशासनाला जाग येणार कधी?
प्रभात वृत्तसेवा आळंदी – आळंदीमधील कचरा डेपोला पुन्हा आग लागल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे साम्राज्य दिसत आहे. अश्या अवस्थेतच मोकाट जनावरे कचरा खात असल्याचे दिसून येत आहे. खत निर्मिती साठी असलेल्या ठिकाणी प्लास्टिक गोण्या व इतर कचरा टाकला जात आहे.डेपोच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ तसेच मध्यभाग व इतर ठिकाणचा कचरा जळालेल्या अवस्थेत आहे. गेल्या काही महिन्यांपासून डेपो […] The post Alandi News: आळंदीच्या कचरा डेपोला पुन्हा आग! धुराने नागरिक हैराण, प्रशासनाला जाग येणार कधी? appeared first on Dainik Prabhat .
दौंडमध्ये भलताच प्रकार! भर सभेतून पदाधिकारी पळाले, संतप्त गावकऱ्यांनी ग्रामपंचायतीला ठोकले टाळे
प्रभात वृत्तसेवा मलठण – दौंड तालुक्यातील राजेगाव येथील ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त करत थेट ग्रामपंचायत कार्यालयालाच टाळे ठोकले. विशेष म्हणजे, तहकूब ग्रामसभेमध्ये जमा-खर्चाचा हिशेब विचारला असता सरपंच आणि ग्रामसेवकाने माहिती देण्याऐवजी सभेतून पळ काढल्याने हा प्रकार घडला. जोपर्यंत त्यांना २०२३ ते २०२५ या कालावधीतील संपूर्ण जमा-खर्चाची माहिती मिळत नाही, तोपर्यंत कार्यालय उघडले जाणार […] The post दौंडमध्ये भलताच प्रकार! भर सभेतून पदाधिकारी पळाले, संतप्त गावकऱ्यांनी ग्रामपंचायतीला ठोकले टाळे appeared first on Dainik Prabhat .
गुलाबी थंडीत राजकारण ‘हॉट’! पूर्व हवेलीत झेडपी निवडणुकीसाठी सोशल मीडियावर जोर
प्रभात वृत्तसेवा लोणी काळभोर – फेसबुक, ट्विटर, व्हॉटस ॲप व इन्स्टाग्राम सारख्या सोशल मीडियाचा जोरदारपणे वापर करून २०१४ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपचे सरकार केंद्रात सत्तारूढ झाल्यापासून दिल्लीपासून गल्ली पर्यंतच्या सर्वच राजकीय नेत्यांना सोशल मीडियाचे महत्त्व समजले. आगामी काळात राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार आहेत. निवडणुकीपूर्वीच सोशल मीडियाचा प्रभाव दिसून येत […] The post गुलाबी थंडीत राजकारण ‘हॉट’! पूर्व हवेलीत झेडपी निवडणुकीसाठी सोशल मीडियावर जोर appeared first on Dainik Prabhat .
Daund News: यवत पोलीस ठाण्यात नेमकं चाललंय काय? बेपत्ता कर्मचारी परतला, पण वाद अजूनही पेटलेलाच
प्रभात वृत्तसेवा यवत – यवत (ता. दौंड) येथील पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या त्रासाला कंटाळून पोलीस कर्मचारी निखिल रणदिवे हे गायब झाले होते. ते (दि.१०) रात्री उशिरा आपल्या घरी परतले. यावर अखेर पडदा पडला. मात्र, आंबेडकरी चळवळीचे नेते पंकज धिवार यांनी पत्र देत आंदोलनाची हाक दिली. तत्पूर्वीच रणदिवे घरी आले असल्याची माहिती समोर […] The post Daund News: यवत पोलीस ठाण्यात नेमकं चाललंय काय? बेपत्ता कर्मचारी परतला, पण वाद अजूनही पेटलेलाच appeared first on Dainik Prabhat .
नीरा परिसरात खाकी वर्दीचा धाक संपला? अवैध वाळू माफिआंची मुजोरी; थेट अधिकाऱ्यावरच हल्ला
प्रभात वृत्तसेवा नीरा – अवैध वाहतूक करणाऱ्या उन्माद झालेल्या वाहनचालकांनी महसूल कर्मचाऱ्यावरच हल्ला करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार जेजुरी पोलीस ठाणे हद्दीतील गुळुंचे येथे घडला. दोन जणांविरोधात जेजुरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मौजे थोपटेवाडी हद्दीत अवैध क्रशर वाहतूक करत असलेल्या डंपरवर कारवाई करण्यासाठी जात असलेल्या महसूल विभागातील ग्राम महसूल अधिकारी शरद […] The post नीरा परिसरात खाकी वर्दीचा धाक संपला? अवैध वाळू माफिआंची मुजोरी; थेट अधिकाऱ्यावरच हल्ला appeared first on Dainik Prabhat .
प्रभात वृत्तसेवा वाल्हे – मागील आठवड्यात सलग दोन-तीन दिवस पहाटे धुके पडत होते. यानंतर वातावरणात अनेक बदल होऊन दररोज पहाटे धुके, दिवसभर ढगाळ वातावरण, दव, उन्हाची कमतरता, कडाक्यांची थंडी आदी वातावरणातील बदलाने कांदा उत्पादन, तसेच रब्बी हंगामातील बहुतांश पिकांवर किडीचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढले आहे. दीड महिन्यांपासून वातावरणातील विविध बदल पिकांवर विविध रोगराईला निमंत्रण देत आहोत. […] The post Walhe News: पांढऱ्या धुक्याने केला घात! कांदा उत्पादकांवर मोठं संकट; महागड्या औषधांचा खर्च परवडणार का? appeared first on Dainik Prabhat .
Bhor News: आस्कवडी गाव दुमदुमणार! काळूबाई देवीच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त ‘ही’आहे खास तयारी
प्रभात वृत्तसेवा विंझर – आस्कवडी (गोरड म्हसवली) ता. भोर येथील ग्रामदैवत आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या काळूबाई देवीच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त आस्कवडी (गोरड म्हसवली) गावात उत्साहाचे आणि भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. यावर्षीचा वर्धापन दिन अधिक भक्तीपूर्ण आणि भव्यदिव्य पद्धतीने साजरा करण्यासाठी काळूबाई सेवा मंडळ आणि काळूबाई भाविक मंडळातर्फे जोरदार तयारी अंतिम टप्प्यात आहे. […] The post Bhor News: आस्कवडी गाव दुमदुमणार! काळूबाई देवीच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त ‘ही’ आहे खास तयारी appeared first on Dainik Prabhat .
Vijay Stambh Abhivadan: कोरेगाव भीमासाठी प्रशासनाचा ‘मेगा प्लॅन’तयार; वाचा सविस्तर नियोजन
प्रभात वृत्तसेवा शिक्रापूर – कोरेगाव भीमा (ता. शिरुर) सह पेरणे फाटा येथे एक जानेवारी २०२६ रोजी होणारा विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम शासकीय यंत्रणानी सर्व संघटनांना विश्वासात घेवून यशस्वी करावा आणि कार्यक्रमास येणाऱ्या अनुयायींची गैरसोय होणार नाही, या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने नियोजन करावे, असे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले. एक जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या कोरेगाव भीमा […] The post Vijay Stambh Abhivadan: कोरेगाव भीमासाठी प्रशासनाचा ‘मेगा प्लॅन’ तयार; वाचा सविस्तर नियोजन appeared first on Dainik Prabhat .
पौडमध्ये पार्किंगचा ‘बट्ट्याबोळ’! तहसीलला जायचं तर गाडी लावायची कुठे? नागरिकांचा सवाल
प्रभात वृत्तसेवा पौड – मुळशी तालुक्याच्या मुख्य प्रशासनिक केंद्र असलेल्या पौड येथील तहसील कार्यालय, पंचायत समिती, ग्रामीण रुग्णालय आणि नुकतेच सुरू झालेल्या दिवाणी–फौजदारी न्यायालय परिसरात पार्किंगची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. शासकीय कार्यालयांच्या आवारात वाहन पार्किंगस बंदी करण्यात आल्याने विविध कामांसाठी आलेल्या नागरिकांना रस्त्याच्या कडेला वाहन उभे करण्याशिवाय पर्याय राहत नाही. याचा थेट परिणाम वाहतूक […] The post पौडमध्ये पार्किंगचा ‘बट्ट्याबोळ’! तहसीलला जायचं तर गाडी लावायची कुठे? नागरिकांचा सवाल appeared first on Dainik Prabhat .
Bhor Election: भोरकरांची उत्सुकता शिगेला! निकालाला उरले फक्त ९ दिवस; कोणाचं नशीब उघडणार?
प्रभात वृत्तसेवा भोर (दत्तात्रय बांदल) – भोर नगरपालिकेसाठी २ डिसेंबरला मतदान झाले असून मतमोजणी दुसऱ्या दिवशी म्हणजे 3 डिसेंबरला होणार होती. परंतु अचानक उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मतमोजणी २१ डिसेंबरला घेण्याचा निर्णय घेतला. मतमोजणीसाठी आता अवघे ९ दिवस शिल्लक राहिल्याने नगराध्यक्ष व नगरसेवक उमेदवारांसह नागरिकांमध्ये निकालाची उत्सुकता लागली आहे. थंडीचा कडाका वाढला असून पोलिसांना मात्र […] The post Bhor Election: भोरकरांची उत्सुकता शिगेला! निकालाला उरले फक्त ९ दिवस; कोणाचं नशीब उघडणार? appeared first on Dainik Prabhat .
भवानीनगरमध्ये तणाव! ‘छत्रपती’कारखान्यासमोरून पालखी मार्ग नेण्यास सक्त विरोध
प्रभात वृत्तसेवा भवानीनगर – श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्यासमोरील रस्ता व पुलाचे काम सणसरपर्यंत श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे काम सध्या चालू आहे. ते काम करू दिले जाणार नसल्याचा निर्णय ग्रामस्थ, पदाधिकारी यांनी एकमताने घेऊन हा रस्ता कारखान्याच्या बाजूने (बायपास) करण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. सणसर येथे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये बैठक घेण्यात आली. […] The post भवानीनगरमध्ये तणाव! ‘छत्रपती’ कारखान्यासमोरून पालखी मार्ग नेण्यास सक्त विरोध appeared first on Dainik Prabhat .
नागपूर अधिवेशनात मोठी मागणी! ‘या’प्रसिद्ध अध्यात्मिक गुरुंना द्या महाराष्ट्र भूषण; आमदार खताळ आग्रही
प्रभात वृत्तसेवा संगमनेर – सामाजिक, आध्यात्मिक आणि जनकल्याणकारी कार्यासाठी प्रसिद्ध असलेल्या जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्र महाराज यांना राज्य शासनाने ‘महाराष्ट्र भूषण’ या राज्यातील सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविण्याची मागणी आमदार अमोल खताळ यांनी नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात केली आहे. नरेंद्र महाराज यांनी समाजजागृती, व्यसनमुक्ती, शिक्षण, संस्कारवर्धन, आरोग्य, गौसंवर्धन आणि मानवसेवा अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य […] The post नागपूर अधिवेशनात मोठी मागणी! ‘या’ प्रसिद्ध अध्यात्मिक गुरुंना द्या महाराष्ट्र भूषण; आमदार खताळ आग्रही appeared first on Dainik Prabhat .
Satara News: ‘बाय गं’असं काय आहे या कादंबरीत? साताऱ्यातील लेखिकेला एकामागून एक पाच मोठे पुरस्कार
प्रभात वृत्तसेवा सातारा – प्रसिद्ध लेखिका विद्या पोळ जगताप यांनी लिहिलेल्या ‘बाय गं’ कादंबरीला मराठी साहित्य विश्वातील मानाचे समजले जाणारे पाच पुरस्कार मिळाले आहेत.महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेचा उत्कृष्ट कादंबरीसाठीचा ‘उत्तम बंडू तुपे पुरस्कार’ मसापचे अध्यक्ष मिलिंद जोशी यांच्या हस्ते आणि मसापचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी आणि महामंडळाच्या कार्यवाह सुनीताराजे पवार यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. […] The post Satara News: ‘बाय गं’ असं काय आहे या कादंबरीत? साताऱ्यातील लेखिकेला एकामागून एक पाच मोठे पुरस्कार appeared first on Dainik Prabhat .
प्रभात वृत्तसेवा सातारा – राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोकण व कोल्हापूर विभागीय मंडळाने संयुक्तपणे विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून बोर्ड परीक्षेच्या उत्तरपत्रिकांचे अचूकपणे लेखन कसे करावे, या विषयावर मार्गदर्शन करणारे व्हिडिओ तयार करण्यासाठी मंडळाने शिक्षकांसाठी अभिनव व्हिडिओ निर्मिती स्पर्धा आयोजित केली आहे. ‘बोर्ड परीक्षेचा राजमार्ग, सूत्रबद्ध नियोजनातून यशाकडे’ या कृतीकार्यक्रमांतर्गत आयोजित […] The post Satara News: कोकण आणि कोल्हापूर बोर्डाचा ‘मास्टरस्ट्रोक’; विद्यार्थ्यांसाठी सुरू केलाय ‘हा’ खास उपक्रम appeared first on Dainik Prabhat .
Satara Crime: फक्त ४८ तास घर बंद आणि..; चोरट्यांनी साधला डाव, व्यावसायिकाला मोठा धक्का
प्रभात वृत्तसेवा सातारा – शहरातील करंजे (सातारा) येथील व्यावसायिकाच्या घरातून मंगळवार दि. 9 रोजीच्या मध्यरात्री अज्ञाताने पावणेचार लाखांचे दागिने व रोख रक्कम लंपास केली आहे. याप्रकरणी व्यावसायिक अभिजित हिरालाल दोशी (वय 50) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अभिजित दोशी दोन दिवस फिरायला परराज्यात गेले होते. घर बंद असल्याने चोरट्यांनी […] The post Satara Crime: फक्त ४८ तास घर बंद आणि..; चोरट्यांनी साधला डाव, व्यावसायिकाला मोठा धक्का appeared first on Dainik Prabhat .
सातारकरांनो सावधान! शहरात पुन्हा सक्रिय झालीय ‘ती’टोळी; एकाच दिवसात ३ महिलांना गंडा
प्रभात वृत्तसेवा सातारा – शहरात एका दिवसात तीन वृद्ध महिलांना तोतया पोलिसांनी हजारो रुपयांचा गंडा घातला. पोलीस असल्याचे सांगत विश्वास संपादन करुन सोन्याचे दागिने हातचलाखी करुन नेले. याप्रकरणी शाहूपुरी व सातारा शहर पोलीस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. शहरातील कमानी हौद येथे बुधवार दि. 10 रोजी दुपारच्या सुमारास मंगल सदानंद वंजारी (वय 66, रा. […] The post सातारकरांनो सावधान! शहरात पुन्हा सक्रिय झालीय ‘ती’ टोळी; एकाच दिवसात ३ महिलांना गंडा appeared first on Dainik Prabhat .
मोदी सरकार मनरेगा योजनेचे नाव बदलणार; ‘हे’असणार नवं नाव
नवी दिल्ली : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्याशी (मनरेगा) संबंधित योजनेला नवे नाव मिळणार आहे. त्या योजनेचे नामकरण पूज्य बापू ग्रामीण रोजगार योजना असे केले जाणार आहे. त्याविषयीच्या विधेयकाला शुक्रवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. मनरेगा योजनेंतर्गत देशाच्या ग्रामीण भागांत आर्थिक वर्षातील किमान १०० दिवसांच्या रोजगाराची हमी देण्यात आली. आता कामाचे दिवस वाढवून १२५ […] The post मोदी सरकार मनरेगा योजनेचे नाव बदलणार; ‘हे’ असणार नवं नाव appeared first on Dainik Prabhat .
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील पोतरा तेलंगवाडी परिसरात शुक्रवारी (ता. १२) सकाळी बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्या दगावल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी व शेतमजूरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कळमनुरी तालुक्यातील पोतरा तेलंगवाडी शिवारातील शेतकरी काशीराम मोदे यांच्या शेतातील आखाड्यावर बांधलेल्या दोन शेळ्यांवर रात्रीच्या वेळी बिबट्याने हल्ला केला. सकाळी काशीराम शेतात गेले […] The post कळमनुरी तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्या दगावल्या; वन विभागाचे शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन appeared first on Dainik Prabhat .
Vaibhav Suryavanshi Rection on Sledging : भारतीय अंडर-१९ संघाने सध्या सुरू असलेल्या आशिया कपमध्ये आपल्या मोहिमेची शानदार सुरुवात केली आहे. यूएईविरुद्धचा पहिला सामना भारताने तब्बल २३४ धावांच्या मोठ्या फरकाने जिंकत जोरदार विजयी सलामी दिली. या विजयात सलामीवीर वैभव सूर्यवंशीच्या ऐतिहासिक खेळीने सर्वाधिक लक्ष वेधले. वैभवने या सामन्यात १७१ धावांची अविस्मरणीय खेळी करत सर्वांची मने जिंकली. […] The post Vaibhav Suryavanshi : ‘मला मागून कोणी काही बोलले तरी…’, स्लेजिंगबद्दलच्या प्रश्नावर वैभव सूर्यवंशीच्या उत्तराने जिंकली सर्वांची मनं appeared first on Dainik Prabhat .
मेक्सिकोच्या आयात शुल्कामुळे निर्यातदारांसमोर नवा पेच
नवी दिल्ली – अमेरिकेला होणारी निर्यात कमी झाल्यामुळे निर्यातदारासमोर अडचणी निर्माण झाल्या असतानाच भारतातील विविध उद्योगाकडून मोठ्या प्रमाणात आयात करणार्या मेक्सिकोने भारतीय आयातीवर शुल्क लावल्यामुळे निर्यात कमी होण्याचा धोका वाढला आहे. ऑटोमोटिव्ह कंपोनंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे महासंचालक विनी मेहता यांनी सांगितले की, मेक्सिकोत बरेच वाहन उत्पादन प्रकल्प आहेत. या प्रकल्पातून अमेरिकेला निर्यात होत असते. […] The post मेक्सिकोच्या आयात शुल्कामुळे निर्यातदारांसमोर नवा पेच appeared first on Dainik Prabhat .
Silver price: चांदीचा दर शुक्रवारी 5,100 रुपयांनी वाढून 1 लाख 99 हजार 500 रुपये प्रति किलोवर
नवी दिल्ली – अमेरिकेच्या फेडरल रिझवनेे काल व्याजदरात पाव टक्के कपात केल्यानंतर सोने आणि चांदीचे दर नव्या उच्चांकी पातळीवर जात आहेत. जागतिक बाजारात या दोन धातूचा दर वाढत आहे. त्याचबरोबर रुपयाच्या अवमूल्यनामुळे भारताला या दोन धातूची आयात महागात पडत आहे. अशा परिस्थितीत भारतामध्ये या दोन धातूचे दर आणखी वाढत आहेत. दिल्ली सराफात चांदीचा दर शुक्रवारी […] The post Silver price: चांदीचा दर शुक्रवारी 5,100 रुपयांनी वाढून 1 लाख 99 हजार 500 रुपये प्रति किलोवर appeared first on Dainik Prabhat .
रशियाकडून खनिज तेल आयात पाच महिन्यांच्या उच्चांकावर; जानेवारीपासून कमी होण्याची शक्यता
नवी दिल्ली – नोव्हेंबर महिन्यात भारताने रशियाकडून केलेली खनिज तेलाची आयात चार टक्क्यांनी वाढवून 2.6 अब्ज युरो इतकी झाली आहे. हा पाच महिन्याचा उच्चांक आहे. दरम्यान भारताने ऑस्ट्रेलियाला शुद्ध इंधनाची निर्यात वाढविल्याची माहिती समोर आली आहे. सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अँड क्लीन इयर या संस्थेने उपलब्ध केलेल्या माहितीनुसार भारत अजूनही रशियाकडून खनिज तेल खरेदी […] The post रशियाकडून खनिज तेल आयात पाच महिन्यांच्या उच्चांकावर; जानेवारीपासून कमी होण्याची शक्यता appeared first on Dainik Prabhat .
लाचखोर पोलीस निरीक्षक ACB च्या जाळ्यात; १ लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले, पोलीस दलात मोठी खळबळ
यवतमाळ : अवधूतवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नरेश रणधीर (वय ५२) यांना एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) आज रंगेहाथ अटक केली आहे. तक्रारदाराच्या १० लाख रुपयांच्या वसुली प्रकरणात मदत करण्याच्या मोबदल्यात त्यांनी ३ लाख रुपयांची लाच मागितली होती. या कारवाईमुळे यवतमाळ पोलिस दलात संताप आणि खळबळ उडाली असून, ठाणेदाराविरुद्ध गुन्हा दाखल […] The post लाचखोर पोलीस निरीक्षक ACB च्या जाळ्यात; १ लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले, पोलीस दलात मोठी खळबळ appeared first on Dainik Prabhat .
नागपूर : विधान परिषदेत आ.मिलिंद नार्वेकर यांनी समृद्धी महामार्गावर वारंवार होणाऱ्या अपघातात नागरिकांच्या होणाऱ्या मृत्यूबाबत मांडलेल्या लक्षवेधीमध्ये मेघना बोर्डीकर साकोरे ,राज्यमंत्री यांनी शासनाच्या वतीने समृद्धी महामार्गावर केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली त्यांनतर झालेल्या चर्चेत स्वच्छतागृहांची दयनीय अवस्था उघडकीस आल्यानंतर विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सभापती स्थानावरून शासनास तातडीचे आणि स्पष्ट निर्देश दिले. “सध्याची कार्यरत असणारी स्वच्छतागृहे आणि स्नॅक्स सेंटर आहेत का? असतील तर मग ती गूगलवर टाकली आहेत का? ती टाकली नसतील तर एका महिन्याच्या आत गूगलवर उपलब्ध करून देण्यात यावीत. कारण पाट्या नाहीयेत, कुठे थांबायचे कळत नाही आणि जिथे जावे तिथे स्वच्छतागृह बंद असते. त्यामुळे गूगलवर लोकेशन तातडीने उपलब्ध करण्यात यावे, ” असे निर्देश डॉ. गोऱ्हे यांनी दिले.लक्षवेधी प्रश्न मांडताना विधानपरिषद सदस्य चित्रा वाघ यांनी समृद्धी महामार्गावरील स्वच्छतागृहांची अत्यंत बिकट परिस्थिती सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. विशेषतः सिन्नरजवळील ‘हिरकणी कक्ष’ म्हणून दाखविण्यात आलेल्या स्वच्छतागृहात स्वच्छतेचा पूर्ण अभाव असून ते गोडाऊनसारखे वापरले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महामार्गावरील अनेक स्वच्छतागृहे बंद, अस्वच्छ किंवा वापरण्यायोग्य नसल्याने महिला, ज्येष्ठ नागरिक, डायबिटीक रुग्ण आणि सर्वसामान्य प्रवाशांना गंभीर गैरसोयींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी नमूद केले.यावेळी विधानपरिषद सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी महाराष्ट्र विधानपरिषद नियम १०१ अंतर्गत दिलेली लक्षवेधी सूचना क्र. ४१२ सभागृहात वाचून दाखवली. या लक्षवेधीमध्ये त्यांनी समृद्धी महामार्गावरील वाढत्या अपघातांची धक्कादायक आकडेवारी, मूलभूत सुविधांचा अभाव, पर्यटन हंगामात वाढणारी गर्दी आणि महामार्गावरील सुरक्षा व सोयींविषयी उपस्थित झालेले प्रश्न नमूद केले.या लक्षवेधींना उत्तर देताना शासनाने माहिती दिली की, समृद्धी महामार्गावरील नियोजित २९ सोयी-सुविधांपैकी २२ ठिकाणी इंधन स्थानके, स्नॅक्स सेंटर आणि स्वच्छतागृहांसह सेवा सुरू आहेत. तसेच २१ ठिकाणी एकूण ४२० एफआरपी स्वच्छतागृहे उपलब्ध असून त्यांच्या देखभालीसाठी स्वतंत्र कंत्राटदार नेमले आहेत. काही ठिकाणी तात्पुरती हॉटेल व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे आणि उर्वरित सुविधांचे काम जलदगतीने सुरू असल्याचेही सरकारने स्पष्ट केले.मात्र उत्तर समाधानकारक असले तरी प्रत्यक्ष स्थिती वेगळी असल्याचे लक्षात घेत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शासनाला ठाम शब्दांत निर्देश देताना नमूद केले की, “सध्या प्रत्यक्षात कार्यरत असणारी स्वच्छतागृहे गूगलवर दिसत नाहीत. त्यामुळे प्रवाशांना कुठे थांबायचे ते कळत नाही. एका महिन्यात सर्व लोकेशन्स गूगलवर दर्शविण्यात यावीत. स्वच्छता, सुरक्षा आणि सुविधा तातडीने उपलब्ध कराव्यात.”
मोठी बातमी..! पुण्यातील उत्खनन गैरव्यवहार प्रकरणी चार तहसीलदारांसह दहा जण निलंबित
पुणे : पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात वनीकरणासाठी राखीव असलेल्या क्षेत्रात झालेल्या ९० हजार ब्रास अनधिकृत गौण खनिज उत्खननाप्रकरणी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कठोर भूमिका घेतली. या गैरव्यवहारात दोषी आढळलेल्या चार तहसीलदार, चार मंडल अधिकारी आणि दोन तलाठी अशा नऊ जणांचे निलंबन करण्यात आले. परवानगीपेक्षा ९० हजार ब्रास अधिक उत्खनन झाल्याचे ईटीएस मोजणीत निष्पन्न झाले असून, […] The post मोठी बातमी..! पुण्यातील उत्खनन गैरव्यवहार प्रकरणी चार तहसीलदारांसह दहा जण निलंबित appeared first on Dainik Prabhat .
पुणे – राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या (एनबीटी) वतीने आयोजित होणाऱ्या पुणे पुस्तक महोत्सवाची सुरुवात उद्घाटनाच्या पूर्वसंध्येला एका भव्य विश्वविक्रमाच्या नोंदीने झाली. ‘लार्जेस्ट डिस्प्ले ऑफ पोस्टर्स’ हा विश्वविक्रम गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये प्रस्थापित करून पुणेकरांनी भारतातील बोलीभाषा आणि आदिवासी शब्दांना मुख्य प्रवाहात आणण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. हा विश्वविक्रम म्हणजे खऱ्या अर्थाने भगवान बिरसा मुंडा यांच्या थोर कार्याला […] The post भगवान बिरसा मुंडा यांना खास अभिवादन: पुणे पुस्तक महोत्सवाचा श्रीगणेशा विश्वविक्रमाने, ‘लार्जेस्ट डिस्प्ले ऑफ पोस्टर्स’चा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये समावेश appeared first on Dainik Prabhat .
India U19 beat UAE U19 by to 243 run : सलामीवीर वैभव सूर्यवंशीने केलेल्या दमदार १७१ धावांच्या खेळीच्या बळावर भारताने १९ वर्षाखालील आशिया चषक स्पर्धेत संयुक्त अरब अमिराती संघाला २३४ धावांनी नमवत स्पर्धेतील पहिल्या विजयाची नोंद केली. प्रथम फलंदाजी करताना भारताने ४३३ धावांचा डोंगर उभारला होता. प्रत्युत्तरात संयुक्त अरब अमिराती संघाचा डाव निर्धारित ५० षटकांत […] The post IND U19 vs UAE U19 : वैभव सूर्यवंशीच्या शतकाने उडवला यूएईचा धुव्वा! टीम इंडियाची २३४ धावांनी विजयी सलामी appeared first on Dainik Prabhat .
सोलापुरात उसाच्या दरावरुन शेतकरी आक्रमक
सोलापूर : सोलापूर शहराजवळील सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या समोर गुरुवारी दुपारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन केले. ऊस गाळप हंगाम सुरू होऊन एक महिना उलटला तरीही एकही सहकारी साखर कारखान्याने ऊस दर जाहीर केलेला नाही. या कारणावरुन शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. सोलापूर जिल्ह्यात सुमारे 38 साखर कारखाने असूनही शेतकऱ्यांना आपले हक्क मिळत नसल्याची तक्रार ऊस […] The post सोलापुरात उसाच्या दरावरुन शेतकरी आक्रमक appeared first on Dainik Prabhat .
IndiGo flight : इंडिगोचे चार उड्डाण निरीक्षक निलंबित
नवी दिल्ली – इंडिगोच्या ऑपरेशनल संकटाच्या ११ व्या दिवशी, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने एक मोठे पाऊल उचलले आहे. या अंतर्गत, डिजिसीएने चार उड्डाण निरीक्षकांना निलंबित केले आहे. दुसरीकडे, इंडिगोचे सीईओ पीटर एल्बर्स दुसऱ्यांदा डिजीसीएसमोर हजर झाले. भारताची सर्वात मोठी आणि जगातील पाचवी सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगो गेल्या काही दिवसांपासून सर्वात कठीण काळातून जात आहे. […] The post IndiGo flight : इंडिगोचे चार उड्डाण निरीक्षक निलंबित appeared first on Dainik Prabhat .
Police Bribe News: पोलिस निरीक्षकाला 1 लाख रुपयाची लाच स्वीकारताना रंगेहात अटक; काय आहे प्रकरण?
अमरावती: अवधुतवाडी येथील पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नरेश रणधीर यांना एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे. या कारवाईमुळे पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे. रणधीर यांच्यावर त्यांच्याच अवधुतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. राज्यात सरकारी अधिकारी यांनी लाच स्वीकारण्याच्या प्रकरणांमध्ये […] The post Police Bribe News: पोलिस निरीक्षकाला 1 लाख रुपयाची लाच स्वीकारताना रंगेहात अटक; काय आहे प्रकरण? appeared first on Dainik Prabhat .
भोगवटादार वर्ग-२ जमिनींवरील 'गहाण शुल्क'वसुलीला कायदेशीर संरक्षण २००९ पासूनची आकारणी वैध ठरणार
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत मांडलेले विधेयक संमत'महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (दुसरी सुधारणा आणि विधिग्राह्यीकरण) विधेयक, २०२५'नागपूर : राज्यातील भोगवटादार वर्ग-२ च्या जमिनी अकृषिक कारणासाठी बँकांकडे गहाण ठेवताना आकारल्या जाणाऱ्या गहाण शुल्काला कायदेशीर संरक्षण प्राप्त करून देणारे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत मांडले.'महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (दुसरी सुधारणा आणि विधिग्राह्यीकरण) विधेयक, २०२५' असे या विधेयकाचे नाव असून, यामुळे २००९ पासून वसूल करण्यात आलेले शुल्क आता कायदेशीर ठरणार आहे. यावर विधानसभेत झालेल्या चर्चेत आमदार योगेश सागर, अभिजीत पाटील आणि हिरामण खोसकर यांनी भाग घेतला.विधेयकाची पार्श्वभूमी व उच्च न्यायालयाचा निर्णयभोगवटादार वर्ग-२ च्या जमिनी धारकांनी जर आपली जमीन शेतीव्यतिरिक्त इतर कारणांसाठी बँका किंवा वित्तीय संस्थांकडे गहाण ठेवली, तर त्यावर 'गहाण शुल्क' आकारण्याबाबत राज्य शासनाने २७ फेब्रुवारी २००९ रोजी शासन निर्णय काढला होता. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका याचिकेवर सुनावणी देताना, कायद्यात तरतूद नसताना केवळ शासन निर्णयाद्वारे असे शुल्क आकारणे अवैध असल्याचे सांगत संबंधित तरतूद रद्द ठरवली होती.न्यायालयाच्या या निर्णयामुळे निर्माण झालेली कायदेशीर अडचण दूर करण्यासाठी आणि १९६६ च्या जमीन महसूल संहितेत आवश्यक ती सुधारणा करण्यासाठी शासनाने हे विधेयक आणले आहे.विधेयकातील ठळक बाबी :पूर्वलक्षी प्रभावाने अंमलबजावणी : या विधेयकानुसार, भोगवटादार वर्ग-२ च्या जमिनींवर २७ फेब्रुवारी २००९ पासून आकारण्यात आलेले गहाण शुल्क हे कायदेशीर मानले जाईल. यासाठी १९६६ च्या कायद्यात कलम ३६ मध्ये सुधारणा करण्यात आली आहे.शुल्काची वसुली वैध : २००९ पासून आजपर्यंत शासनाने किंवा महसूल अधिकाऱ्यांनी वसूल केलेले गहाण शुल्क वैध मानले जाईल. या कालावधीतील वसुली बेकायदेशीर होती या कारणास्तव न्यायालयात कोणताही दावा दाखल करता येणार नाही किंवा भरलेले शुल्क परत मागता येणार नाही.बँका आणि वित्तीय संस्थांचा समावेश : भोगवटादार वर्ग-२ ने आपली जमीन सहकारी संस्था, स्टेट बँक ऑफ इंडिया, तत्सम नवीन बँका किंवा महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ यांच्याकडे अकृषिक कारणास्तव गहाण ठेवल्यास हे शुल्क लागू होईल.दराचे अधिकार शासनाकडे : गहाण शुल्काचे दर ठरविण्याचे अधिकार राज्य शासनाला राहतील आणि ते सर्वसाधारण किंवा विशेष आदेशाद्वारे निश्चित केले जातील.राज्याच्या तिजोरीवर कोणताही अतिरिक्त बोजा न टाकता, आधीच वसूल केलेल्या रकमेला कायदेशीर संरक्षण देण्यासाठी आणि पुढील वसुली सुरळीत ठेवण्यासाठी हे विधेयक मंजूर करण्यात येत असल्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
मुद्रांक शुल्क वादाबाबत उच्च न्यायालयाऐवजी थेट राज्य शासनाकडे अपील
विधानसभेत सुधारणा विधेयक एकमताने मंजूर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत मांडले विधयेकनागपूर : मुद्रांक शुल्काशी संबंधित वादांमध्ये सर्वसामान्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य विधिमंडळाने घेतला आहे. 'महाराष्ट्र मुद्रांक (दुसरी सुधारणा) विधेयक २०२५' विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आले असून, यामुळे आता मुद्रांक शुल्काच्या वादात नागरिकांना उच्च न्यायालयात धाव घेण्याऐवजी थेट राज्य शासनाकडे अपील करण्याची सुलभ संधी उपलब्ध होणार आहे.महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे विधेयक (सन २०२५ चे विधानसभा विधेयक क्रमांक १०३) विधानसभेत मांडले. या विधेयकावर चर्चा करताना आमदार भास्कर जाधव आणि अतुल भातखळकर यांनी आपली मते मांडली, त्यानंतर सभागृहाने हे विधेयक एकमताने मंजूर केले.नेमका बदल काय?chandraसध्याच्या 'महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम, १९५८' मधील तरतुदींनुसार, मुख्य नियंत्रक महसूल प्राधिकारी यांनी दिलेल्या आदेशाविरुद्ध केवळ उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करूनच दाद मागता येत होती. यामुळे उच्च न्यायालयावर खटल्यांचा भार वाढत होता आणि पक्षकारांचा न्यायालयीन खर्चही वाढत असे. तसेच, न्यायालयात प्रकरणे प्रलंबित राहिल्यामुळे शासचाचा महसूल मोठ्या कालावधीसाठी अडकून पडत असे.यावर उपाय म्हणून या सुधारणा विधेयकाद्वारे अधिनियमात नवीन 'कलम ५३ब' समाविष्ट करण्यात आले आहे. या नव्या तरतुदीनुसारमुख्य नियंत्रक महसूल प्राधिकाऱ्याच्या आदेशाने व्यथित झालेली कोणतीही व्यक्ती आता आदेश मिळाल्यापासून ६० दिवसांच्या आत राज्य शासनाकडे अपील दाखल करू शकेल.या अपिलासाठी एक हजार रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे. राज्य शासन दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेऊन त्यावर योग्य तो निर्णय देईल आणि हा निर्णय अंतिम असेल.विधेयकाचे उद्दिष्टया सुधारणेमुळे उच्च न्यायालयातील प्रलंबित खटल्यांची संख्या कमी होईल आणि सामान्य नागरिकांचा वेळ व पैसा वाचेल, असा विश्वास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. तसेच, शासनाचा अडकलेला महसूल लवकर मोकळा होण्यास मदत होईल, असेही या विधेयकाच्या उद्देश व कारणांच्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. या विधेयकामुळे कलम ३२ क आणि कलम ५३ मध्येही अनुषंगिक सुधारणा करण्यात आल्या आहेत. नागरिकांना जलद न्याय मिळावा आणि प्रशासकीय कार्यवाही सुलभ व्हावी, या हेतूने हे विधेयक महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
शेत रस्त्याच्या वादात मिळणार 'मोफत'पोलीस संरक्षण
उपविभागीय अधिकाऱ्यांनाही अधिकार सोपविण्याची तरतूदविलंब टाळण्यासाठी इमेल द्वारे पाठविण्यात येणार नोटीस • विधेयक विधानसभेत एकमताने करण्यात आले मंजूरनागपूर : शेत रस्ते आणि वहिवाटीच्या प्रश्नांवर जलद गतीने नोटीस बजावणे आणि त्यावर निर्णय घेणे शक्य होणार असून, अर्जदार शेतकऱ्यांना आता मोफत पोलीस संरक्षण मिळणार आहे. राज्य शासनाने 'मामलतदार न्यायालय (सुधारणा) विधेयक, २०२५' विधानसभेत एकमताने मंजूर केले. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे विधेयक मांडले.विलंब टाळण्यासाठी ई-मेलद्वारे नोटीस मामलतदार न्यायालय अधिनियम, १९०६ मध्ये कामकाजाच्या वेळी नोटीस बजावण्याच्या प्रक्रियेत स्पष्टता नव्हती, ज्यामुळे अनेकदा न्यायालयीन प्रक्रियेला विलंब होत असे. अपूर्ण पत्ते किंवा पक्षकारांनी नोटीस नाकारल्याने वेळेचा अपव्यय होत असे. यावर उपाय म्हणून, नवीन विधेयकात 'कलम १४अ' समाविष्ट करण्यात आले आहे. यापुढे नोटिसा पोस्टाने किंवा 'इलेक्ट्रॉनिक मेल' सेवेद्वारे देखील बजावता येणार आहेत. जर वरील मार्गांनी नोटीस देणे शक्य नसेल, तर संबंधित जमिनीच्या गावात किंवा सार्वजनिक ठिकाणी नोटीस डकवून ती बजावली असल्याचे मानले जाईल.शेत रस्त्यासाठी मोफत पोलीस संरक्षणशेतकऱ्यांच्या दृष्टीने या विधेयकातील सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे कलम २१ मध्ये करण्यात आलेली सुधारणा होय.शेत रस्ते किंवा वहिवाटीच्या मार्गाच्या वापराच्या प्रकरणांमध्ये, मामलतदाराने दिलेल्या निर्णयाचे पालन करण्यास जर अतिक्रमण करणाऱ्या शेतकऱ्याने कसूर केली, तर अर्जदारास 'मोफत पोलीस संरक्षण' पुरविणे आता अनिवार्य करण्यात आले आहे. यापूर्वी अंमलबजावणीमध्ये अडचणी येत होत्या, त्या आता दूर होऊन शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळवून देणे सुलभ होणार आहे. अधिकार व्याप्तीत वाढ या विधेयकाद्वारे कलम २३ मध्येही सुधारणा करण्यात आली असून, जिल्हाधिकारी आणि 'डेप्युटी कलेक्टर' यांच्यासोबतच आता 'उपविभागीय अधिकारी' यांनाही अधिकार सोपविण्याची तरतूद करण्यात आली आहे.विधानसभेत विधेयकाचे स्वागतमहसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे विधेयक मांडल्यानंतर सभागृहात यावर सविस्तर चर्चा झाली. यावेळी आमदार भास्कर जाधव, अभिमन्यू पवार, संजय गायकवाड, अभिजीत पाटील, राघवेंद्र पाटील, राजेश पवार आणि राजकुमार बडोले यांनी या विधेयकावर आपली मते मांडली. शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करणाऱ्या आणि न्यायालयीन प्रक्रियेला गती देणाऱ्या या विधेयकाला सर्व सदस्यांनी पाठिंबा दिला, आणि अखेर हे विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले. या सुधारणांमुळे मामलतदार न्यायालयाचे कामकाज अधिक पारदर्शक आणि जलद होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
Ashish Nehra on Shubman Gill Form : गुजरात टायटन्सचे मुख्य प्रशिक्षक आशिष नेहरा हे कर्णधार शुबमन गिलच्या सध्याच्या फॉर्मवर होत असलेल्या घाईगडबडीतील टीकेमुळे नाराज आहेत. नेहरा यांनी स्पष्ट केले आहे की, टी-२० सारख्या अस्थिर फॉरमॅटमध्ये केवळ दोन सामन्यांच्या कामगिरीवरून एखाद्या खेळाडूला बाहेरचा रस्ता दाखवणे, हे निष्कर्ष काढण्याच्या वाढत्या प्रवृत्तीचे लक्षण आहे. आशिया चषकादरम्यान टी-२० आंतरराष्ट्रीय […] The post Ashish Nehra : ‘पर्याय हवेत तर वॉशिंग्टन सुंदरलाही सलामीला पाठवा…!’, गिलच्या फॉर्मवरून भडकले कोच नेहरा appeared first on Dainik Prabhat .
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानातून गावांच्या समृद्धीची दिशा मिळेल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान शीर्षक गीत लोकार्पण कार्यक्रमनागपूर : राज्यात मागील काही दिवसात झालेल्या पूर परिस्थितीमुळे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या अंमलबजावणीत अडथळा निर्माण झाला होता. मात्र आता नव्याने अभियानाला सुरुवात करण्यात आली असून या अभियानाच्या अंमलबजावणीतून गावांच्या समृद्धीची दिशा मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. विधान भवन येथील मंत्रिपरिषद सभागृहात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान शीर्षक गीत लोकार्पण कार्यक्रम पार पडला. यावेळी दूरदृश्य प्रणालीद्वारे या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सरपंच, ग्रामविकास अधिकारी, गटविकास अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्गदर्शन केले. यावेळी ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे उपस्थित होते.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मागील दहा वर्षात राज्यामध्ये कुठल्याही अभियानाची यशस्वीता बघितली, तर त्यामध्ये लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचे निदर्शनास येते. कुठलेही अभियान लोकसहभागाशिवाय यशस्वी होत नाही. जलयुक्त शिवार अभियान हे त्याचे मूर्तीमंत उदाहरण आहे. जलयुक्त शिवार अभियानामुळे जलसाक्षरता वाढून राज्य जलसंपन्न होण्यास मदत झाली. जलयुक्त शिवार अभियानाच्या अंमलबजावणीतून महाराष्ट्र ' रोल मॉडेल' म्हणून देशात पुढे आले. यासोबतच नरेगा ११ कलमी कार्यक्रम, मागेल त्याला शेततळे अभियान यशस्वीपणे राबविण्यात आले.गावाच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबविण्यात येत आहे. लोकसहभागातून हे अभियान यशस्वी करावे. ग्रामपंचायत डिजिटल, स्वयं अर्थपूर्ण असाव्यात, तसेच गावांचा पर्यावरणपूरक विकास करण्यात यावा, यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान महत्त्वाचे ठरणार आहे. ग्रामसभांना या अभियानासाठी सहकार्य करणारे कलाकार उपस्थित राहणार आहेत, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. अभियानाच्या अंमलबजावणीतून गावांमध्ये समृद्धीची स्पर्धा निर्माण होईल. त्यामुळे सर्व ग्रामपंचायतींनी अभियानात सक्रिय सहभाग घेऊन अभियान यशस्वी करावे, असे आवाहनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केले.ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी अभियानाची पार्श्वभूमी सांगितली. ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाला अभिनेते भारत गणेशपुरे, संदीप पाठक, पृथ्वीक प्रताप, अभिनेत्री शिवाली परब, विभागाचे अधिकारी उपस्थित होते.थोडक्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान..ग्रामीण भागात स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून काम करणाऱ्या ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद यांच्या स्तरावर केंद्र, राज्य शासनाच्या सर्व योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी स्पर्धा व्हावी, या स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या पंचायतराज संस्थांना प्रोत्साहन देऊन त्यांची कार्यक्षमता वाढावी, यासाठी तालुका, जिल्हा, महसूल विभाग व राज्य अशा चार स्तरांवर स्पर्धात्मक स्वरुपात सन 2025-26 या वर्षापासून “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” राबविण्यात येत आहे.ग्रामपंचायत सक्षम, सुशासनयुक्त, जलसमृद्ध, स्वच्छ व हरित गाव निर्माण करणे, मनरेगा व इतर योजनांशी अभिसरण, उपजिविका विकास व सामाजिक न्याय, लोकसहभाग व श्रमदान माध्यमातून लोकचळवळ हे या अभियानाचे मुख्य घटक आहेत. या अभियानांतर्गत विविध स्तरांवर पुरस्कार दिले जाणार आहेत.
नवी दिल्ली: भारताच्या आर्थिक क्षेत्रात एक महत्त्वाचा आणि मोठा बदल घडवणारा निर्णय घेण्यात आला आहे. देशातील सर्वात जुना स्टॉक एक्सचेंज असलेल्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) ने भारतीय डाक विभाग (India Post) सोबत एक महत्त्वपूर्ण करार (MoU) केला आहे. या करारानुसार, टपाल खात्याचे कर्मचारी आणि एजंट आता प्रशिक्षण घेऊन प्रमाणित म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्यूटर म्हणून काम करणार […] The post पोस्टमन आता MF डिस्ट्रीब्युटर! गावागावात पोहोचणार ‘म्युच्युअल फंड’ सेवा; BSE – India Postमध्ये ऐतिहासिक करार appeared first on Dainik Prabhat .
Copra MSP: सुक्या खोबऱ्याच्या उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; केंद्र सरकारने वाढवला भाव
नवी दिल्ली: केंद्र सरकारने कोपरा अर्थात सुक्या खोबऱ्याच्या उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि दिलासादायक घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक कॅबिनेट समितीने (CCEA) 2026 च्या हंगामासाठी कोपराच्या किमान आधारभूत किमतीत (MSP) वाढ करण्यास नुकतीच मंजुरी दिली आहे. या निर्णयानुसार, मिलिंग कोपरासाठी 2026 च्या हंगामाकरिता 12,027 रुपये प्रति क्विंटल इतका एमएसपी […] The post Copra MSP: सुक्या खोबऱ्याच्या उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; केंद्र सरकारने वाढवला भाव appeared first on Dainik Prabhat .
महायुतीतून राष्ट्रवादीला डच्चू ? कोल्हापूरात शिंदेसेना तर इचलकरंजीत भाजप आक्रमक
कोल्हापूर : कोल्हापूर व इचलकरंजी या महापालिकेच्या निवडणुका महायुतीच्या झेंड्याखाली लढवण्याचा निर्धार केला असला तरी दुसरीकडे अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसला डावलण्याच्या हालचाली सुरू आहेत. एकनाथ शिंदे शिवसेनेच्या मेळाव्यात विधानसभा निवडणुकीवेळी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसने मदत केली नसल्याचा आरोप करून राष्ट्रवादीला बाजूला सारण्याचा मुद्दा ठळकपणे मांडण्यात आला. इचलकरंजी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने परस्पर उमेदवार जाहीर केल्याने महायुतीत […] The post महायुतीतून राष्ट्रवादीला डच्चू ? कोल्हापूरात शिंदेसेना तर इचलकरंजीत भाजप आक्रमक appeared first on Dainik Prabhat .
RCB Chinnaswamy Stadium Ban Lifted IPL 2026 : आयपीएलच्या १९ व्या (IPL 2026) हंगामासाठी १६ डिसेंबरला अबू धाबी येथे लिलाव होणार असतानाच, गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (RCB) संघासाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. आगामी हंगामात आरसीबीचे होमग्राऊंड बदलले जाणार अशी चर्चा होती. त्यामुळे त्यांचे सामने पुण्यात खेळवले जातील अशी दाट शक्यता होती. मात्र, आता […] The post RCB : आरसीबीच्या चाहत्यांसाठी IPL 2026 पूर्वी मोठी बातमी! होम ग्राऊंड पुणे असणार की बंगळुरु? झालं स्पष्ट appeared first on Dainik Prabhat .
नवाब मलिकांचे नेतृत्व भाजपला कदापि मान्य नाही, अमित साटम यांचा इशारा
नागपूर: आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. भारतीय जनता पक्षाचे आमदार आणि मुंबई भाजपाचे अध्यक्ष अमित साटम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला (अजित पवार गट) नवाब मलिक यांच्या मुद्द्यावरून थेट इशारा दिला आहे. नवाब मलिक यांचे नेतृत्व भाजपला कदापि मान्य नाही, असे स्पष्ट करत साटम यांनी युतीबाबत भाजपची भूमिका रोखठोकपणे मांडली आहे.काय म्हणाले अमित साटम?आज नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अमित साटम यांनी मुंबई महापालिका निवडणुकीच्या संदर्भात भाजपची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, जर मुंबई महापालिका निवडणूक लढवताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेतृत्व नवाब मलिक यांच्याकडे सोपवले जाणार असेल, तर भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादीसोबत कोणत्याही प्रकारची युती करणार नाही.युतीसाठी भाजपची अटसाटम यांनी पुढे स्पष्ट केले की, आमचा विरोध राष्ट्रवादी काँग्रेसला नसून केवळ नवाब मलिक यांच्या नेतृत्वाला आहे. जर नवाब मलिक नेतृत्व करणार नसतील आणि पक्षाची धुरा दुसऱ्या कोणाकडे असेल, तर युती करण्यासाठी आमचा कोणताही विरोध नाही, असे साटम यांनी नमूद केले.मलिकांशी संबंध ठेवणार नाहीनवाब मलिक यांच्यावर असलेल्या गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर भाजपने त्यांच्यापासून अंतर राखले आहे. यावर बोलताना साटम म्हणाले, नवाब मलिक यांचे नेतृत्व भारतीय जनता पक्षाला कदापि मान्य नाही. तसेच मलिक यांच्याशी कोणत्याही प्रकारचे संबंध भारतीय जनता पक्ष ठेवणार नाही.निर्णय राष्ट्रवादीचा, भूमिका भाजपचीराष्ट्रवादी काँग्रेसने नेतृत्व कोणाकडे द्यावे, हा त्यांचा अंतर्गत प्रश्न असल्याचे साटम यांनी मान्य केले. कोणाकडे नेतृत्व द्यायचे हा राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्णय आहे, पण आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली आहे, असे सांगत साटम यांनी चेंडू आता राष्ट्रवादीच्या कोर्टात टोलावला आहे.
सभागृहात मंत्री येत नसतील, तर त्यांच्यावर बिबटे सोडा - सुधीर मुनगंटीवार
नागपूर : गेल्या दोन दिवसांपासून विधानसभेत मंत्री आाणि संबंधित विभागांचे सचिव उपस्थित नसल्याचा मुद्दा विधानसभेत उपस्थित होत असताना, शुक्रवारी भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनाही असाच अनुभव आला. मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरून आणि घरकुल योजनेच्या रखडलेल्या निधीवरून मुनगंटीवार यांनी सभागृहात आक्रमक होत सरकारला धारेवर धरले. ‘सभागृहात मंत्री येत नसतील, तर त्यांच्यावर बिबटे सोडा, हे धंदे आता बंद करा’, अशा शब्दांत मुनगंटीवार यांनी आपला संताप व्यक्त केला.विधानसभेत सभागृहात अर्धा तास चर्चा सत्रात मुनगंटीवार बोलण्यासाठी उभे राहिले असता संबंधित विभागाचे मंत्री सभागृहात उपस्थित नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. यावरून त्यांचा पारा चढला. त्यांनी तालिका अध्यक्षांना सुनावले की, मंत्री महोदयांना सभागृहात आणण्याचे दायित्व आमचे नसून ते तुमचे आहे. आमदार उपस्थित असतांना मंत्री अनुपस्थित रहातात. हे आता चालणार नाही, असे ते म्हणाले.भारत माता माझी आई, डोके ठेवायला जागा नाही!चंद्रपूर जिल्ह्यातील ‘यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजने’च्या विमुक्त जाती आणि भटक्या जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना घरकुलाचे लाभ देण्यावरून रखडलेल्या निधीवरून मुनगंटीवार अधिकच आक्रमक झाले. ‘भारत माता माझी आई; पण डोक ठेवायला जागा नाही’, अशी गरिबांची अवस्था झाली आहे. मुंबईत असलेल्यांसाठी सरकारकडे ११ लाख कोटी रुपये आहेत; पण आमच्या चंद्रपूरमधील तुटक्या-फुटक्या घरात रहाणार्या गरिबांसाठी लागणारे ९६ कोटी ३६ लाख रुपये मिळत नाहीत. ज्या अधिकार्यांमुळे ही परिस्थिती ओढवली आहे, त्यांनी कोरड्या विहिरीत जीव दिला पाहिजे, अशा तिखट शब्दांत त्यांनी टीका केली.बिरबलाची खिचडी शिजेल; पण तुमचा निधी येणार नाही!सरकारच्या कारभारावर टीका करतांना मुनगंटीवार म्हणाले की, या योजनेचा एक हप्ता मिळाल्यावर दुसर्या हप्त्यासाठी गरिबांना चातक पक्ष्याहून अधिक वाट पहावी लागते. कापूसकोंड्याची गोष्ट संपेल, बिरबलाची खिचडी शिजेल, चिऊताई दरवाजा उघडेल; पण तुमचा निधी काही येत नाही. अधिकार्यांनी लिहून दिलेली उत्तरे वाचू नका, तर निधी कधी देणार ते स्पष्ट सांगा, असा थेट जाब त्यांनी मंत्री अतुल सावे यांना विचारला.चंद्रपूरला १०० टक्के निधी त्वरित देऊ - मंत्री अतुल सावे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी परखड शब्दांमध्ये घरकुल योजनेविषयीची आपली तक्रार मांडल्यानंतर ओबीसी मंत्री अतुल सावे यांनी ‘निधी लवकरात लवकर दिला जाईल’, असे आश्वासन दिले. ते म्हणाले की, पुरवणी मागण्यांमध्ये या योजनेसाठी ३०० कोटी रुपये संमत झाले आहेत. चंद्रपूरला विहीत १०० टक्के निधी त्वरित दिला जाईल. आपण नवीन घरकुल ‘पंतप्रधान आवास योजने’च्या माध्यमातून देत आहोत; पण आधीच्या घरकुल योजनेसाठी आपण ३०० कोटी रुपयांची व्यवस्था केली आहे. त्वरित त्यावर कार्यवाही होईल, असे उत्तर त्यांनी दिले.
बहराइच: उत्तर प्रदेशातील बहराइच शहरात गेल्या वर्षी दुर्गा विसर्जनाच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या हिंसाचार आणि रामगोपाल मिश्रा यांच्या हत्येप्रकरणी न्यायालयाने गुरुवारी निर्णय दिला आहे. सुमारे १४ महिने चाललेल्या सुनावणीनंतर, अप्पर सत्र न्यायाधीश (ADJ) यांच्या न्यायालयाने या प्रकरणातील मुख्य आरोपी सरफराज याला फाशीची शिक्षा सुनावली आहे. याचबरोबर, सरफराजचे वडील आणि दोन भावांसह एकूण नऊ अन्य दोषींना जन्मठेप सुनावण्यात […] The post बहराइच दुर्गा विसर्जन हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी सरफराजला फाशीची शिक्षा, 9 जणांना जन्मठेप, तिघांची निर्दोष मुक्तता appeared first on Dainik Prabhat .
‘पगडी’पद्धत म्हणजे नेमके काय? मुंबईतील लाखो रहिवाशांना राज्य सरकारचा मोठा दिलासा
मुंबई: मुंबईतील जुन्या आणि धोकादायक ‘पगडी’ इमारतींमध्ये राहणाऱ्या लाखो लोकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. अनेक वर्षांपासून पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या या इमारतींच्या आड येणारे सगळे अडथळे आता दूर होणार आहेत. महाराष्ट्र सरकारने मुंबईतील ‘पगडी सिस्टीम’ (भाडेकरू पद्धत) टप्प्याटप्प्याने संपुष्टात आणण्याची घोषणा केली आहे. यासाठी राज्य सरकार लवकरच नवे आणि स्पष्ट नियम लागू करणार […] The post ‘पगडी’ पद्धत म्हणजे नेमके काय? मुंबईतील लाखो रहिवाशांना राज्य सरकारचा मोठा दिलासा appeared first on Dainik Prabhat .
वर्षभरात राज्यात पापलेटच्या उत्पादनात ३ हजार ५५ मेट्रिक टनांची वाढ
मंत्री नितेश राणेंची माहिती; कायदेशीर बाबींचे काटेकोर पालन करूनच मासेमारीला परवानगीमुंबई : राज्यात पापलेट (सिल्वर पॉम्फ्रेट) मत्स्य उत्पादनात लक्षणीय वाढ नोंदवली गेली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ३ हजार ५५ मेट्रिक टनांची वाढ झाली असून, हे संवर्धनात्मक उपाययोजनांचे यश असल्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.शुक्रवारी विधानसभेत निवेदन करताना मंत्री नितेश राणे म्हणाले, “सोशल मीडियावर पापलेट उत्पादनाबाबत निर्माण झालेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर ही माहिती देत आहोत. राज्य सरकारने ५ सप्टेंबर २०२३ रोजी सिल्वर चांदेरी पापलेटला ‘राज्य मासा’ म्हणून घोषित केले आहे. या प्रजातीचे जतन, सागरी परिसंस्थेचे संरक्षण आणि भावी पिढ्यांसाठी मत्स्यसाठा टिकवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला.”त्यांनी पुढे सांगितले की, शाश्वत मासेमारीसाठी लहान माशांची पकड रोखण्याच्या उद्देशाने २ नोव्हेंबर २०२३ रोजी ५४ प्रजातींसाठी किमान कायदेशीर आक्रमण निश्चित केले आहे. यात पापलेटचाही समावेश असून त्याचे किमान कायदेशीर आक्रमण १३४ मिमी टीएल ठरवण्यात आले आहे. त्यामुळे फक्त १३४ मिमीपेक्षा मोठ्या पापलेटचीच मासेमारी कायदेशीर राहील. दरवर्षी १ जून ते ३१ जुलै राज्याच्या समुद्रकिनारी मासेमारी पूर्णपणे बंद ठेवली जाते. तसेच, मत्स्यप्रजनन आणि परिसंस्थेच्या पुनरुज्जीवनासाठी राज्यात १८२ ठिकाणी कृत्रिम रीफ (भिंती) उभारण्यात आल्या आहेत. यात पालघर जिल्ह्यात ३७ आणि ठाणे जिल्ह्यात १० कृत्रिम रीफचा समावेश आहे.उत्पादनाच्या आकडेवारीबाबत बोलताना मंत्री राणे यांनी सांगितले की, २०२३-२४ या आर्थिक वर्षात राज्यात १३ हजार ३३३ मेट्रिक टन पापलेटचे उत्पादन झाले होते, तर २०२४-२५ मध्ये ते वाढून १६ हजार ३८८ मेट्रिक टन झाले आहे. म्हणजेच एका वर्षात ३ हजार ५५ मेट्रिक टनांची थेट वाढ नोंदवली गेली. “कायदेशीर बाबींचे काटेकोर पालन करूनच पापलेटची मासेमारी करण्यास परवानगी आहे. सरकार पापलेट संवर्धनाबाबत अत्यंत सकारात्मक असून, सतत नवे उपाय योजत आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
विधिमंडळात प्रवेशासाठी पासेसची दीड हजारात विक्री?; चौकशीचे आदेश
नागपूर : नागपुरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात अभ्यागतांना प्रवेश देणारे पास दीड हजार रुपयांत विकले जात आहेत, असा गंभीर आरोप शिवसेना आमदार हेमंत पाटील यांनी शुक्रवारी विधान परिषदेत केला. या प्रकारांमुळे दहशतवादीही सहज आत शिरू शकतात, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश तालिका सभापती कृपाल तुमाने यांनी दिले आहेत.गेल्या वर्षी काही आमदारांच्या तक्रारीनंतर अभ्यागतांसाठी दररोजचे प्रवेश पास देण्यावर बंदी घालण्यात आली होती. तसेच विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनीही हिवाळी अधिवेशन सुरू होताच सर्व सदस्यांना पासशिवाय कोणालाही विधानभवन परिसरात आणू नये, असे स्पष्ट निर्देश दिले होते. मात्र अधिवेशनाच्या पहिल्याच दोन दिवसांत २३ आमदारांनी विनापास लोकांना आत नेल्याचे उघड झाले होते.आता हिवाळी अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी (१२ डिसेंबर) शिवसेना आमदार हेमंत पाटील यांनी थेट विधान परिषदेत हा मुद्दा उपस्थित करीत खळबळ उडवून दिली. ते म्हणाले, “माझ्या कार्यकर्त्यांकडे आमदारांचे पत्र असूनही त्यांना पास मिळाले नाहीत आणि ते दिवसभर बाहेर उभे होते. पण बाहेर दीड हजार रुपये देऊन पास मिळत आहेत. ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. अशा पद्धतीने विधिमंडळाची सुरक्षा धोक्यात आली आहे. दीड हजारात पास मिळत असेल तर दहशतवादी कधीही आत येऊ शकतो. कुणी पैसे घेऊन हे पास जारी केले, याची चौकशी व्हावी”, अशी मागणी त्यांनी केली.हेमंत पाटील यांच्या आरोपानंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनीही आक्रमक भूमिका घेतली. ते म्हणाले, “अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीच मर्यादित पास देण्याचे सांगितले होते. मात्र आज विधिमंडळ परिसरात एवढी गर्दी आहे की नीट चालता येत नाही. हे सगळे लोक आत कसे आले? इतक्या मोठ्या प्रमाणात पास कुणी आणि का जारी केले?”असे सवाल त्यांनी केले. दोन्ही आमदारांच्या मागणीनंतर तालिका अध्यक्ष कृपाल तुमाने यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
Eknath Shinde : “लोकशाही हे पवित्र मंदिर आहे आणि सर्वसामान्य जनता हेच माझे दैवत आहे”–एकनाथ शिंदे
Eknath Shinde : सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन वेळप्रसंगी कायदा व लालफितीत न अडकता आवश्यकतेनुसार कायदे बदलण्याची तयारी लोकप्रतिनिधींनी ठेवावी यासाठी संविधानाच्या माध्यमातून मिळालेल्या आयुधांचा वापर करावा, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केले. विधानपरिषद सभागृहात राष्ट्रकुल संसदीय मंडळातर्फे लोकप्रतिनिधींची मतदार संघांप्रती असलेली जबाबदारी आणि त्यासाठी सभागृहाच्या माध्यमातून उपलब्ध असलेले संविधानीक व्यासपीठ या विषयावर […] The post Eknath Shinde : “लोकशाही हे पवित्र मंदिर आहे आणि सर्वसामान्य जनता हेच माझे दैवत आहे” – एकनाथ शिंदे appeared first on Dainik Prabhat .
वेगळ्या विदर्भाची मागणी पूर्ण होऊ शकत नाही; उद्धव ठाकरेंची ठाम भूमिका
नागपूर : वेगळ्या विदर्भाची मागणी पूर्ण होऊ शकत नाही. विदर्भ हा महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्र हा विदर्भाचा आहे. तो पूर्ण महाराष्ट्राचाच भाग आहे. सध्याचे मुख्यमंत्री हे संपूर्ण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. मात्र ते विदर्भातून येतात, तरी देखील वेगळ्या विदर्भाचा मुद्दा निघत असेल तर आता महाराष्ट्र अखंड ठेवणार की तुकडे होणार हे सरकारने स्पष्ट करावे, अशी स्पष्ट व […] The post वेगळ्या विदर्भाची मागणी पूर्ण होऊ शकत नाही; उद्धव ठाकरेंची ठाम भूमिका appeared first on Dainik Prabhat .

24 C