जितेंद्र आव्हाडांचे शिवरायांविषयीचे विधान जाणीवपूर्वक - मंत्री शंभूराज देसाई
- जितेंद्र आव्हाडांना कठोर किंमत मोजावी लागेलमुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाबाबत केलेले विधान हे अनावधानाने आलेले नसून, ते पूर्णपणे जाणीवपूर्वक केलेले आहे. या निंदनीय कृत्यासाठी त्यांना कठोर किंमत मोजावी लागेल, असा इशारा पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी मंगळवारी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला.धर्मस्वातंत्र्य विधेयकावरील चर्चेदरम्यान आव्हाडांनी ऐतिहासिक संदर्भांचा विपर्यास करत शिवरायांचा अपमान केला. यावर भाष्य करताना देसाई म्हणाले की, मी स्वतः सभागृहात उपस्थित होतो. आव्हाडांच्या चेहऱ्यावरील हावभावावरून ते दिलगीर असल्याचे कोठेही जाणवत नव्हते. उलट, अध्यक्षांनी तीन वेळा निर्देश देऊनही ते मोबाईलमध्ये व्यस्त होते. त्यांना आपल्या वक्तव्याचे कोणतेही गांभीर्य नव्हते.सभागृहाचे कामकाज तहकूब झाल्यानंतरही आव्हाड माफी मागण्यास तयार नव्हते, असे देसाई यांनी सांगितले. आमची सर्वांची इच्छा त्यांना निलंबित करण्याचीच होती. मात्र, विधानसभा अध्यक्षांनी त्यांना कठोर शब्दांत समज देऊन माफी मागण्याचे निर्देश दिले. अखेर कारवाईच्या भीतीने त्यांनी शब्द मागे घेतले, असेही त्यांनी स्पष्ट केले.उपमुख्यमंत्री शिंदेंचा दिल्ली दौरा राजकीय नव्हे!उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यावरून होत असलेल्या चर्चेलाही शंभूराज देसाई यांनी पूर्णविराम दिला. संसदेचे अधिवेशन सुरू असताना शिवसेना खासदारांच्या बैठकीसाठी आणि राज्यातील प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी ते दिल्लीला गेले आहेत. जिल्हा परिषद निवडीसारख्या स्थानिक प्रश्नांसाठी दिल्लीला जाण्याची त्यांना गरज नाही, असे त्यांनी सांगितले.महायुतीचा अहवाल तयार :स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर महायुतीच्या समन्वय समितीची बैठक आद्यप झालेली नाही. राज्यभरात ज्या ठिकाणी महायुती म्हणून निवडणूक लढवली गेली नाही, त्या ठिकाणांचा रिपोर्ट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना देण्यात आलेला आहे. उदय सामंत, मी, चंद्रशेखर बावनकुळे, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ या समितीमध्ये आहे. मित्रपक्षांबद्दल समन्वय समितीमध्ये चर्चा करू, असेही देसाई यांनी सांगितले.
Chhagan Bhujbal : राज्यात गॅस टंचाईचे संकट उभे ठाकले असून, विधानपरिषदेत मंत्री छगन भुजबळांनी लवकरच मोठी घोषणा करणार असल्याचे संकेत दिले आहेत.
Salman Khan : सलमान खानच्या चित्रपटचे अचानक का बदललं? दिग्दर्शकाने केला खुलासा
Salman Khan : सलमानच्या आगामी सिनेमाचं नाव आता ‘मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस’ असणार आहे.
Rajya Sabha Majority: देशातील १० राज्यांमध्ये पार पडलेल्या राज्यसभा निवडणुकांचे अंतिम निकाल जाहीर झालेत. यामध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला मोठा विजय प्राप्त झाला आहे.
Mumbai: मुंबईत पाणीबाणी, एप्रिल-मेमध्ये परिस्थिती गंभीर होण्याची भीती
मुंबई: ऐन उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर मोठे संकट उभे राहिले आहे. १५ मार्च २०२६ पर्यंतच्या अधिकृत आकडेवारीनुसार, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील पाणीसाठा निम्यापेक्षा कमी झाला आहे. वाढत्या उष्णतेमुळे पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत असून, पालिकेच्या पाणीपुरवठा विभागावर याचा मोठा ताण येत आहे.पाणीसाठा कमी होण्याची मुख्य कारणेमुंबईत मागील काही दिवसांपासून तापमानाचा पारा ३५C च्या वर गेल्याने धरणांमधील साठा वेगाने घटत आहे. कडक उन्हामुळे तलावांमधील पाण्याचे बाष्पीभवन वाढले आहे. मार्च महिन्यात उष्णता वाढल्याने नागरिकांकडून पाण्याचा वापरही मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. यंदाचा पाणीसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत लक्षणीयरीत्या कमी असल्याने पालिका प्रशासन चिंतेत आहे.धरणांमधील सद्यस्थितीभातसा- ३,३९,५५६अप्पर वैतरणा- १,२५,४५७मध्य वैतरणा - ८१,२६८तानसा - ६०,६८३मोडक सागर- ४९,३८८विहार- १७,४८९तुळशी- ४०३८पालिकेचे पाणी जपून वापरण्याचे आवाहनमहापालिकेने अद्याप अधिकृत पाणी कपात जाहीर केली नसली तरी, एप्रिल आणि मे महिन्यात परिस्थिती अधिक बिकट होऊ शकते.पाणी जपून वापरागाडी धुण्यासाठी किंवा फरशी पुसण्यासाठी पाण्याचा अपव्यय टाळावा.गळती रोखाघरात किंवा परिसरात कुठेही नळ गळती असल्यास त्वरित दुरुस्त करावा.पाणी फेकू नकाशिळे पाणी फेकून देण्याऐवजी त्याचा झाडांसाठी किंवा इतर कामांसाठी वापर करावा.
ॲमेझॉन एअर ने आता ५ पट वेगाने डिलिव्हरी होणार
नवी दिल्ली : ॲमेझॉन एअरची ईशान्य भारतात सेवा विस्तारत असल्याची घोषणा करण्यात आली. या अंतर्गत नवीन कार्गो मार्ग हे कोलकाता आणि गुवाहटी दरम्यान सुरु करण्यात येत असून यामुळे आता या भागातील वाहतूक सुविधा आणि जोडणी अधिक सक्षम होणार आहे. त्याच बरोबर विशेष अशा हवाई क्षमते मुळे डिलिव्हरी करण्याचा वेग आणि विश्वसनीयता वाढू शकेल, ज्यामुळे ईशान्य भारतातील ॲमेझॉनची मोठ्या प्रमाणावरील उत्पादने संपूर्ण भारतातील ग्राहकांपर्यंत वेगाने आणि अधिक सातत्याने प्राप्त होऊ शकतील.या सेवेमुळे सेव्हन सिस्टर्स राज्ये म्हणजेच अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड आणि त्रिपुरा या राज्यांना एकात्मिक अशा हवाई आणि रस्ते वाहतूकीच्या नेटवर्कने जोडून या राज्यांतील डिलिव्हरीजना सहकार्य प्राप्त होईल. विशेष अशा हवाई क्षमतेला मल्टीमोडल वाहतूक सुविधांशी जोडल्यामुळे ॲमेझॉनला वाहतूकीचा वेळ कमी होण्याची अपेक्षा असून यामुळे पाच पट पर्यंत डिलिव्हरीचा वेळ कमी होणार आहे, यामुळे वैविध्यपूर्ण उत्पादने अगदी रोजच्या गरजांपासून ते स्मार्टफोन पर्यंत, ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक्स, फॅशन आणि ब्यूटी उत्पादनांसह अनेक उत्पादने ग्राहकांपर्यंत वेगाने उपलब्ध होऊ शकतील.गुवाहटीकडे जाणार्या पहिल्या ॲमेझॉन एअर फ्लाईटला नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर भारत सरकारचे नागरी उड्डयन मंत्री राम मोहन नायडू किंजरप्पू यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला यावेळी त्यांच्या सह, ॲमेझॉनच्या इंडिया अँड ऑस्ट्रेलियाच्या ऑपरेशन्सचे व्हाईस प्रेसिडेंट अभिनव सिंग, ॲमेझॉन इंडियाच्या पब्लिक पॉलिसीचे व्हीपी चेतन कुमारस्वामी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.ईशान्य भारतात २०१४ मध्ये ४ विमानतळ होते जे आता वाढून १६ झाले आहेत. यामुळे ईशान्य भारतातील राज्यांना निर्यातीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. या निमित्ताने ईशान्येतील राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होत आहे.अॅमेझॉन. इन कंपनीने २०१३ पासून भारतात सेवा देण्यास सुरुवात केली आहे. अॅमेझॉन एअर ही कंपनी देशभर मालवाहतूक सेवा देत आहे. कंपनीने आता ईशान्य भारतात विस्तार करण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. याचा ईशान्येतील राज्यांमध्ये कार्यरत व्यावसायिकांना भरपूर फायदा होईल, असा विश्वास ॲमेझॉनच्या इंडिया अँड ऑस्ट्रेलिया ऑपरेशन्सचे व्हीपी अभिनव सिंग यांनी सांगितले.
‘अलबत्या गलबत्या’ टीमच्या गाडीचा अपघात; दोन जखमी
खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात मंगळवारी सकाळी ‘अलबत्या गलबत्या’ नाट्यसंघाच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात गाडीत असलेल्या दोघांना दुखापत झाली असून त्यांच्यावर कळंबनी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बसमधील इतर सर्व जण सुरक्षित आहेत.‘अलबत्या गलबत्या’ नाटकाचा गोव्यातील प्रयोग आटपून संपूर्ण टीम मुंबईच्या दिशेने परतत होती. यावेळी भोस्ते घाट उतरत असताना त्यांच्या बसने समोर चाललेल्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. प्राथमिक माहितीनुसार, घाट उतरताना अचानक बसच्या ब्रेकमध्ये बिघाड झाल्याने हा अपघात घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे.अपघातात नाटकाचे साउंड आर्टिस्ट विलास दाते आणि बस चालक प्रकाश आव्हाड हे जखमी झाले आहेत. विलास दाते यांच्या डोक्याला मार लागून त्यांना तीन टाके घालावे लागले आहेत. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य हाती घेत जखमींना रिक्षामधून कळंबनी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
Actress Rashmika Mandana : लग्नाच्या काही दिवसानंतर लगेचच अभिनेत्री रश्मिका मंदाना कामावर रुजू झाली आहे.
Fatima Sana Shaikh And Vijay Varma : रिया चक्रवर्तीने मुंबईमध्ये आपलं दुसरं स्टोअर सुरू केलं. या खास प्रसंगी तिने बॉलिवूडमधील जवळच्या मित्र-मैत्रिणींना आमंत्रित केलं होतं. या कार्यक्रमात फातिमा सना शेख उपस्थित होती.
Dubai Airport : दुबई विमानतळ बंद : एअर इंडियाची सर्व उड्डाणे तात्पुरती रद्द; प्रवाशांमध्ये गोंधळ
पश्चिम आशियात तणाव कायम असताना, एअर इंडियाने सोमवारी (१६ मार्च) दुबईकडे जाणारी आपली सर्व उड्डाणे रद्द केली आहेत. मात्र, एअर इंडिया एक्सप्रेसची अबू धाबी, रास अल खैमाह आणि शारजाहसाठी नियोजित उड्डाणे पूर्ववत सुरू राहतील, अशी माहिती देण्यात आली आहे.एअर इंडियाने ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले आहे, “दुबईमधील उड्डाण संचालन तात्पुरते निलंबित करण्यात आले आहे. दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने येणारी आणि जाणारी सर्व उड्डाण सेवा तात्पुरती स्थगित केली आहे. त्यामुळे एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेसची दुबईकडे जाणारी व तेथून येणारी आजची सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.”दरम्यान, तिरुवनंतपुरमहून दुबईकडे जाणारे एमिरेट्स एअरलाईन्सचे एक विमान सोमवारी गंतव्य विमानतळावर सुरक्षा संबंधित घटनेची माहिती मिळाल्यानंतर परत फिरले. दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बंद झाल्यानंतर एमिरेट्सची टीआरव्ही-डीएक्सबी उड्डाण सेवा मध्य मार्गातूनच परत आली. हे विमान पुन्हा तिरुवनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षित उतरवण्यात आले.या विमानात ३५३ प्रवासी आणि १९ कर्मचाऱ्यांचा समावेश होता. हे विमान पहाटे ४.४० वाजता रवाना झाले होते आणि सकाळी ८.४० वाजता परतले. प्रवाशांना टर्मिनलमध्ये हलविण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.यापूर्वी, एमिरेट्सचेच ईके५३३ हे दुसरे उड्डाण पहाटे ४.३० वाजता कोची आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ३२५ प्रवाशांना घेऊन दुबईकडे रवाना झाले होते. मात्र, दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ अचानक बंद झाल्याने हे विमानही परत फिरले आणि कोची विमानतळावर उतरवण्यात आले.मिळालेल्या माहितीनुसार, दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात ड्रोनशी संबंधित घटनेमुळे आग लागली. या घटनेनंतर सुरक्षेच्या कारणास्तव अनेक रस्ते तात्पुरते बंद करण्यात आले आहेत. दुबई पोलिसांनी एअरपोर्ट रोड आणि एअरपोर्ट टनेल सध्या बंद असल्याचे सांगितले असून वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, परिसरात आपत्कालीन मदत आणि बचावकार्य सुरू असून वाहतूक त्या भागातून वळविण्यात आली आहे.
Siddharth Jadhav : सिद्धार्थ जाधव ८ वर्षांनी पुन्हा रंगभूमीवर; दुहेरी भूमिका साकारणार
Siddharth Jadhav : सिद्धार्थ जाधव नाटकात दुहेही भूमिका साकारणार आहे.
Fire in Pahalgam: जम्मू-काश्मीरच्या पहलगामच्या लारीपोरा भागात भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याठिकाणी तीन हॉटेल्सना भीषण आग लागली आहे.
Kerala Assembly Election : भाजपची पहिली यादी जाहीर
- केरळ विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून ४७ उमेदवारांची पहिली यादी जाहीरभारतीय जनता पक्षाने २०२६ च्या केरळ विधानसभा निवडणुकीसाठी ४७ उमेदवारांची आपली पहिली यादी जाहीर केली आहे. निवडणूक आयोगाने रविवारी (१५ मार्च) केरळ, पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी येथील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर एका दिवसात भाजपने केरळ निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली.केरळ विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या ४७ उमेदवारांच्या पहिल्या यादीत मंजेश्वर मतदारसंघातून के. सुरेंद्रन, कोझिकोड उत्तरमधून नव्या हरिदास, कांजीराप्पल्लीमधून अॅडव्होकेट जॉर्ज कुरियन, कझाकूटममधून व्ही. मुरलीधरन आणि नेमोममधून प्रदेशाध्यक्ष राजीव चंद्रशेखर यांचा समावेश आहे.नव्या हरिदास यांना कोझिकोड उत्तर येथून उमेदवारी देण्यात आली आहे. नव्या या भाजप महिला मोर्चाच्या नेत्या आहेत. त्यांनी २०२४ मध्ये केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. राहुल गांधी यांनी जागा सोडल्यानंतर पोटनिवडणूक झाली होती. नव्या यांचा पोटनिवडणुकीत पराभव झाला होता.केरळमध्ये एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. राज्यातील सर्व १४० विधानसभा जागांसाठी ९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे आणि ४ मे रोजी निकाल जाहीर होतील.
मुंबई हायकोर्टाकडून शिल्पा शेट्टीला दिलासा, फोटोबाबत कोर्टात मोठा युक्तीवाद
मुंबई: अभिनेत्री शिल्पा शेट्टीने अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. आज अभिनेत्री मोठ्या पडद्यावर पूर्वीप्रमाणे सक्रिय नसली तरी, कोणत्या न कोणत्या कारणामुळे कायम चर्चेत असते. आता देखील शिल्पा एका मोठ्या कारणामुळे चर्चेत आली आहे, शिल्पा हिच्या एका फोटोबाबत कोर्टात मोठा युक्तीवाद पार पडला. यामध्ये न्यायालयाने महत्त्वाचे आदेश देत, शिल्पा हिला मुंबई हायकोर्टाचा दिलासा दिला आहे…काही महिन्यांपूर्वी शिल्पा हिचे काही ‘डीपफेक’ व्हिडीओ व्हायरल झाले होते. जे कोर्टाने तातडीने हटवण्याचे निर्देश दिले आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून तयार करण्यात आलेले डीपफेक व्हिडिओ व फोटो संबंधित वेबसाईटवरून हटवण्यात यावेत या मागणीसाठी हायकोर्टात याचिका दाखल करणाऱ्या शिल्पा शेट्टीला मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. अभिनेत्रीच्या संबंधित डीपफेक व्हिडिओ, फोटो आणि लिंक्स ८ दिवसांच्या आत हटवण्याचे आदेश हायकोर्टाने संबंधित प्रतिवाद्यांना दिले आहेत. काही अज्ञात व्यक्ती आणि संकेतस्थळांनी संमतीशिवाय आक्षेपार्ह कंटेंट तयार केल्याने प्रतिमा मलिन होत असून खासगी आयुष्यावर गदा येत असल्याचा दावा करत शिल्पा शेट्टी हिने हायकोर्टात धाव घेतली होती. ज्यावर कोर्टाने निर्णय सुनावला आहे.न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्यासमोर शिल्पाने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घेण्यात आली. देशमुख यांनी सुनावलेल्या निर्णायानुसार, कोणत्याही व्यक्तीची, विशेषतः महिलेची प्रतिमा अशा प्रकारे मांडली जाऊ शकत नाही जेणेकरून तिच्या सन्मानाला धक्का बसेल असं स्पष्ट करत न्यायालयाने आक्षेपार्ह डीपफेक व्हिडिओ हटवण्याचे आदेश दिले आहेत. सांगायचं झालं तर, फक्त शिल्पा शेट्टीच नाही तर, झगमगत्या विश्वातील अनेक अभिनेत्रींचे ‘डीपफेक’ व्हिडीओ तयार करुन सोशल मीडियावर अपलोड करण्यात आले. ज्यामुळे अभिनेत्रींबद्दल अनेक नको त्या चर्चा सोशल मीडियावर रंगू लागल्या होत्या, अभिनेत्री रश्मिका मंदाना, आलिया भट्ट, कतरिना कैफ यांचे ‘डीपफेक’ तयार करून सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेले.यावर झगमगत्या विश्वात अनेक सेलिब्रिटींनी निषेध व्यक्त केला आहे. रश्मिका हिचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे… अशी पोस्ट सोशल मीडियावर केलेली… एवंढच नाही तर, AI ची वाईट बाजू देखील अनेक सेलिब्रिटींनी मांडलेली आहे.
Weather Update : राज्यात उष्णतेचा पारा वाढला असतानाच गुढीपाडव्याच्या मुर्हतावर पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Brunch Snacks Recipes: दुपारनंतर लागते हलकी भूक? घरच्या घरी करा हे झटपट टेस्टी ब्रंच!
Brunch Snacks Recipes घरात उपलब्ध असलेल्या साध्या पदार्थांपासूनही काही मिनिटांत चविष्ट आणि हेल्दी ब्रंच तयार करता येतो.
Rashid Khan On Pakistan Airstrike: काबूलमध्ये पाकिस्तानी हवाई हल्ल्यांमुळे झालेल्या नागरिकांच्या मृत्यूच्या वृत्तांमुळे मला खूप दुःख झालं - राशीद खान
NIA Action: देशातील मोठा दहशतवादी कट उधळला ; राष्ट्रीय तपास संस्थेकडून ७ परदेशी नागरिक ताब्यात
NIA Action: भारतात दहशतवादी कारवाया केल्याप्रकरणी सात परदेशी नागरिकांच्या मुसक्या आवळल्या असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Eid Special: पार्लरशिवाय मिळवा ईदचा ग्लो! घरच्या घरी करा हे सोपे स्किन केअर उपाय
Eid Special त्वचेवर नैसर्गिक चमक आणण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे योग्य स्किन केअर रूटीन. जर तुम्ही ईदच्या काही दिवस आधीपासूनच त्वचेची काळजी घ्यायला सुरुवात केली, तर तुमचा चेहरा आपोआप फ्रेश आणि हेल्दी दिसू लागतो.
Prajakta Mali Post : अभिनेत्री प्राजक्ता माळीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली आहे.
Jannat Jubair जन्नत जुबैरच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून तिच्या टीमने एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी सांगितले की, “जन्नत आणि अयान यांना दिवसाढवळ्या हायवेवर हिंसक प्रकाराचा सामना करावा लागला.
Iran-US-Israel War : इराणमधील भारतीय दूतावासकडून पुन्हा एकदा सूचना जारी
इराणमध्ये भू-राजकीय संकट सुरू झाल्यानंतर मध्यपूर्वेत अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी भारत सरकार तातडीने सक्रिय झाली होती. सरकारने माहिती दिली की आखाती प्रदेशातून आतापर्यंत सुमारे २०,००० भारतीय नागरिक भारतात परतले आहेत. इराणमधील भारतीय दूतावासाने यापूर्वी भारतीय नागरिकांसाठी एक अॅडव्हायजरी जारी केली होती, ज्यामध्ये दूतावासाला माहिती न देता इराणची सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करू नये, असे सांगण्यात आले होते. आता दूतावासाने पुन्हा एकदा अशीच सूचना जारी केली आहे.भारतीय दूतावासाने सांगितले आहे की सर्व भारतीय नागरिकांनी तेहरानस्थित भारतीय दूतावासाशी संपर्क साधल्याशिवाय इराणमधील कोणतीही भूप्रदेशीय (जमिनीवरील) सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करू नये.दूतावास सातत्याने भारतीय समुदायाच्या संपर्कात असून जिथे गरज आहे तिथे मदतीची व्यवस्था केली जात आहे. पूर्वसूचना किंवा समन्वयाशिवाय सीमेकडे जाणे धोकादायक ठरू शकते. जे नागरिक दूतावासाला न कळवता जमिनीमार्गे इराण सोडण्याचा प्रयत्न करतील, त्यांना राहण्याची, अन्नाची तसेच इमिग्रेशनसंबंधित गंभीर अडचणींचा सामना करावा लागू शकतो. लक्षात घ्या की इराणची सीमा पार केल्यानंतर दूतावासाकडून मदत मिळू शकणार नाही.इराणमध्ये असलेल्या सर्व भारतीय नागरिकांना विनंती करण्यात आली आहे की त्यांनी केवळ दूतावासाच्या अधिकृत सूचनांवरच विश्वास ठेवावा आणि कोणताही प्रवास सुरू करण्यापूर्वी दूतावासाशी नक्की संपर्क साधावा. कोणत्याही प्रश्नासाठी किंवा आपत्कालीन परिस्थितीत खालील हेल्पलाइन क्रमांकांवर संपर्क साधता येईल: +९८ ९१२ ८१० ९११५, +९८ ९१२ ८१० ९१०२, +९८ ९१२ ८१० ९१०९, +९८ ९९३ २१७ ९३५९ , दूतावासाने ईमेल आयडीही जारी केला आहे: cons.tehran@mea.gov.inसरकारने सांगितले की इराणमध्ये राहणारे ५५० हून अधिक भारतीय नागरिक जमिनीमार्गे आर्मेनियामध्ये पोहोचले आहेत. तसेच सुमारे ९० भारतीय नागरिक इराणमधून जमिनीमार्गे अझरबैजानमध्येही पोहोचले आहेत. या स्थलांतराची संपूर्ण व्यवस्था तेहरानस्थित भारतीय दूतावासाने केली होती. दूतावासाने नागरिकांना व्हिसा आणि आवश्यक इमिग्रेशन प्रक्रियेमध्येही मदत केली.आर्मेनियात पोहोचलेल्या ५५० नागरिकांपैकी २८४ जण धार्मिक यात्रेसाठी इराणमध्ये गेले होते. सध्या हे सर्व नागरिक या दोन्ही देशांमध्ये सुरक्षित आहेत. त्यापैकी काही जण भारतात परतले असून उर्वरित नागरिक पुढील काही दिवसांत परतण्याची शक्यता आहे. कठीण परिस्थिती असूनही तेहरानस्थित भारतीय दूतावास पूर्णपणे कार्यरत आहे. अलीकडील काळात तेहरानबाहेर असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षित शहरांमध्ये हलवण्यासाठीही दूतावासाने मदत केली आहे.
LPG crisis: देशाला मोठा दिलासा ! ‘शिवालिक’नंतर ‘नंदा देवी’आज भारतात पोहोचणार
LPG crisis: देशातील वाढत्या एलपीजी संकटाच्या पार्श्वभूमीवर काहीसा दिलासा मिळाला आहे. इराण सरकारकडून विशेष परवानगी मिळाल्यानंतर भारतीय जहाजांच्या मार्गाला मंजुरी मिळाली आहे.
Sanjay Raut : खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यावर जळजळीत शब्दांत टीका केली आहे.
pakistan airstrike in kabul : अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये झालेल्या पाकिस्तानी हवाई हल्ल्यामुळे प्रचंड विध्वंस झाला असल्याची माहिती समोर येत आहे.
Shikhar Bank scam: याप्रकरणी तपास यंत्रणेला ठोस फौजदारी पुरावे न मिळाल्याने न्यायालयाने फाईल बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
West Bengal ED Raid : पश्चिम बंगालमध्ये ईडीअँक्शन मोडवर; एकूण १० ठिकाणी छापेमारी
- अवैध कॉल सेंटरद्वारे फसवणुकीचे प्रकरणपश्चिम बंगालमध्ये अंमलबजावणी संचनालयाने (ईडी) सोमवारी (१६ मार्च) मोठी कारवाई करत राज्यातील विविध भागांमध्ये छापेमारी केली. अवैध कॉल सेंटरच्या माध्यमातून लोकांची आर्थिक फसवणूक केल्याच्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे.याबाबत अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सिलीगुडी, हावडा, बिधाननगर आणि दुर्गापूर या भागांमध्ये सुमारे १० ठिकाणी छापेमारी करण्यात आली. या प्रकरणात सुरश्री कर, सम्राट घोष आणि सुभजीत चक्रवर्ती यांची नावे समोर आली असून ईडीची पथके त्यांच्या आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या ठिकाणांवरून महत्त्वाचे पुरावे गोळा करत आहेत. या आरोपींवर कॉल सेंटरच्या माध्यमातून अनेक निरपराध लोकांना फसवून त्यांच्याकडून मोठी रक्कम उकळल्याचा आरोप आहे.सध्या जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रे आणि साहित्याची तपासणी सुरू असून या संपूर्ण फसवणूक रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी तपास यंत्रणा प्रयत्न करत आहे.दरम्यान, या प्रकरणाचा कोणताही संबंध निवडणूक निधी किंवा राजकारणाशी आहे का, याबाबत अद्याप स्पष्टता मिळालेली नाही. तपास यंत्रणा सर्व शक्यता लक्षात घेऊन प्रकरणाची चौकशी करत आहे.ही कारवाई अशा वेळी झाली आहे, जेव्हा पश्चिम बंगालमध्ये निवडणुकांचे वातावरण तापलेले आहे. निवडणूक आयोगाने नुकत्याच विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. राज्यात २३ एप्रिल आणि २९ एप्रिल रोजी २ टप्प्यांत मतदान होणार असून ४ मे रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
ORS Drink: उन्हाळ्यात जीव वाचवणारा उपाय! घरच्या घरी ORS बनवण्याची सोपी पद्धत जाणून घ्या
ORS Drink घरच्या घरी ORS बनवण्यासाठी फार कमी साहित्य लागते. त्यासाठी १ लिटर स्वच्छ पाणी, ६ चमचे साखर आणि अर्धा चमचा मीठ आवश्यक आहे. सर्वप्रथम पाणी उकळून घ्या आणि ते पूर्णपणे थंड होऊ द्या. उकळलेले पाणी वापरल्याने ते जंतूमुक्त होते आणि आरोग्यास सुरक्षित ठरते.
Rohit Pawar Tweet : आमदार रोहित पवार यांनी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांवर घणाघाती टीका करत लक्ष वेधून घेणारे ट्वीट केले आहे.
Weather Update: महाराष्ट्रातील ११ जिल्ह्यांना अलर्ट, ताशी ३० ते ५० किमी वेगाने वारे वाहणार
मुंबई: महाराष्ट्रावर ऐन उन्हाळ्यात अस्मानी संकट घोंघावत आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीला उष्णतेच्या लाटेने तडाखा दिला. तर मध्यावर वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसानं चिंता वाढवली आहे. १८ ते २० मार्चदरम्यान राज्यातील विविध ठिकाणी वादळी पाऊस, विजांचा कडकडाट आणि तुरळक ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे. काही भागांत यलो अलर्ट जारी केला असून मंगळवारचं हवामान अपडेट जाणून घेऊयात.उष्णतेच्या लाटेनंतर वादळी पाऊस विदर्भाला झोडपून काढत आहे. आज नागपूरसह 7 जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. या काळात ताशी ३० ते ५० किमी वेगाने वारे वाहतील. काही ठिकाणी गारपीट देखील होऊ शकते. दिवसाचे कमाल तापमान ३२-३८ अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहील. मराठवाड्यात देखील नांदेड, लातूर आणि धाराशिव या तीन जिल्ह्यांना मंगळवारी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. या ठिकाणी ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहतील. तसेच हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस आणि तुरळक ठिकाणी गारपीट होईल. छत्रपती संभाजीनगरसह, बीड, जालना, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांत देखील हलक्या पावसाची शक्यता आहे.मध्य महाराष्ट्रातील पुण्यासह सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यांतील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. या जिल्ह्यांत मेघगर्जनेसह तुरळक ते हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. पुण्यात ढगाळ वातावरण राहील. तर सोलापूर जिल्ह्याला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तापमान २८-३४ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जगळगाव, नंदुरबार या जिल्ह्यांत हवामान उष्ण आणि कोरडे राहील. या ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ३०-३६ अंश सेल्सिअसदरम्यान राहील. तुरळक पाऊस आणि वादळाची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे.कोकणात मंगळवारी हवामान उष्ण आणि कोरडं राहील. गेल्या काही काळात असणारी दमट हवामानाची तीव्रता कमी झाली आहे. काही ठिकाणी आकाश ढगाळ राहील. तर १८ मार्चपासून मुंबईसह कोकणात हलक्या पावसाची शक्यता आहे. बुधवार आणि गुरुवारी रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांना वादळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, महाराष्ट्रात उष्णतेची लाट, गारपीट, अकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यांचं संकट आहे. त्यामुळे काढणीला आलेली पिके आणि फळ बागांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची योग्य ती काळजी घ्यावी. तसेच नागरिकांनी देखील बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर आरोग्याची काळजी घ्यावी.
Sri Lanka fuel crisis: मध्य पूर्वेतील वाढता तणाव आणि गंभीर ऊर्जा संकटामुळे दक्षिण आशियाई देश हतबल झाले आहेत. पाकिस्ताननंतर आता श्रीलंकेलाही तीव्र इंधन तुटवड्याचा सामना करावा लागत आहे.
Healthy Drink: फक्त १ महिना दूधात ही एक गोष्ट मिसळून प्या; शरीरात दिसतील जबरदस्त बदल!
Healthy Drink दररोज एक ग्लास दूधात मखाना घालून सेवन केल्यास शरीराला अनेक फायदे मिळू शकतात. मखाना हा सहज उपलब्ध होणारा आणि पोषणमूल्यांनी भरलेला पदार्थ आहे. दूधासोबत त्याचा वापर केल्यास त्याचा परिणाम अधिक प्रभावी होतो.
Jalna Gas Cylinder: आता थेट गॅस सिलेंडरची चोरी; जालन्यात गॅस एजन्सीचे गोडाऊन फोडून 110 सिलिंडर चोरले
Jalna Gas Cylinder: रामनगर परिसरात गॅस एजन्सीच्या गोडाऊनमधून तब्बल 110 गॅस सिलिंडरची मोठी चोरी
Top 10 News: राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने दिल्ली दौऱ्यावर गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.
नवी दिल्ली : अफगाणिस्तानमधील काबूलवर पाकिस्तानी हवाई दलाने एअरस्ट्राईक केला आहे. पाकिस्तानकडून रहिवाशी परिसर आणि रुग्णालयांना लक्ष्य करण्यात आले. पाकिस्तानी हवाई दलाने रुग्णालय आमि रहिवाशी भागांवर बॉम्बचा वर्षाव केला. यामध्ये आतापर्यंत जवळपास ४०० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.पाकिस्तानी लष्कराने काबूलमधील पाच वेगवेगळ्या ठिकाणी बॉम्बहल्ला केला. यामध्ये ४०० लोकांचा मृत्यू झाला असून २५० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. काबूलमध्ये सध्या बचावकार्य जोरात सुरू असून, निवासी भाग आणि रुग्णालयाच्या ढिगाऱ्याखालून मृतदेह बाहेर काढण्याचे आणि जिवंत वाचलेल्या लोकांना सुखरूप बाहेर काढण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. पाकिस्तानी हवाई दलाने वापरलेल्या अत्यंत शक्तिशाली स्फोटकांमुळे, संरक्षण मंत्रालय आणि GDI मुख्यालयाजवळील संपूर्ण आकाश आगीच्या ज्वाळांनी व्यापून गेले होते. तसेच राष्ट्रपती भवनालगतच्या निवासी भागांतूनही आगीचे प्रचंड लोळ उठत होते.हामिद करझाई यांचा तीव्र निषेधअफगाणिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष हमिद करझाई यांनी काबुलमधील निवासी भागांवर आणि लष्करी नसलेल्या लक्ष्यांवर करण्यात आलेल्या हल्ल्यांचा तीव्र शब्दांत निषेध केला. करझाई यांनी नमूद केले की, या हल्ल्यांमुळे नागरी वस्तीमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवितहानी आणि वित्तहानी झाली आहे. त्यांनी पाकिस्तानच्या लष्करी नेतृत्वाला असा इशारा दिला की, अशा प्रकारचे हल्ले सुरू ठेवल्याने पाकिस्तानला आपली उद्दिष्टे साध्य करता येणार नाहीत; उलट, परिस्थिती अधिकच बिघडेल आणि त्याचे परिणाम अंतिमतः पाकिस्तानलाच भोगावे लागतील.तसेच जर पाकिस्तानला खरोखरच स्वतःच्या हिताचे रक्षण करायचे असेल आणि प्रादेशिक स्थिरता सुनिश्चित करायची असेल, तर त्यांनी आपल्या धोरणांचा पुनर्विचार केला पाहिजे. तसेच, त्यांनी अफगाणिस्तानसोबत संवाद आणि सहकार्याचा मार्ग स्वीकारला पाहिजे, असंही करझाई यांनी सांगितले.राशिद खानही संतापलापाकिस्तानने केकेल्या हवाई हल्ल्यानंतर अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा क्रिकेटपटू राशिद खानने संताप व्यक्त केला आहे. काबूलमध्ये पाकिस्तानी हवाई हल्ल्यांमुळे झालेल्या नागरिकांच्या मृत्यूच्या बातम्यांमुळे मला खूप दुःख झाले आहे. जाणूनबुजून किंवा चुकून, नागरिकांची घरे, शैक्षणिक सुविधा किंवा वैद्यकीय पायाभूत सुविधांना लक्ष्य करणे हा गुन्हा आहे. विशेषतः रमजानच्या पवित्र महिन्यात मानवी जीवनाची केलेली अवहेलना ही वेदनादायक आणि चिंताजनक आहे. यामुळे केवळ फूट आणि द्वेष निर्माण होईल. मी संयुक्त राष्ट्र आणि इतर मानवाधिकार संस्थांना या हल्ल्याची सखोल चौकशी करण्याचे आणि गुन्हेगारांना जबाबदार धरण्याचे आवाहन करतो. या कठीण काळात मी माझ्या अफगाण लोकांसोबत उभा आहे, अशी पोस्ट राशिद खानने केली आहे.
मुंबईत गॅस तुटवडा नाही, महापौरांनी केले 'हे'मुंबईकरांना आवाहन
मुंबई: मुंबईत गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण केल्याचे चित्र निर्माण केले जात असून ही अफवा केवळ काँग्रेस आणि उबाठाकडून केली जात असल्याचा आरोपच महापौर रितू तावडे यांनी केला आहे. मुंबईमध्ये गॅस सिलिंडरचा तुडवटा नसून ही कृत्रिम टंचाई निर्माण केली जात आहे. त्यामुळे मुंबईच्या जनतेने कोणत्याही परिस्थितीत घाबरुन जावून तासनतास गॅस सिलिंडर मिळवण्यासाठी रांगा लावू नये तसेच अधिक दराने गॅस सिलिंडरही खरेदी करू नये असे आवाहन केले आहे.मुंबईतील अनेक उपहारगृहांमध्ये गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे काहींना कोळशाच्या चुली निर्माण केल्या आहेत, तर काहींनी इलेक्ट्रीक शेगड्यांचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. तसेच काही बेकऱ्यांनी लाकडे वापरुन भट्टी चालवण्याची मागण केली आहे. याबाबत पत्रकारांशी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना महापौर रितू तावडे यांनी मुंबईत कशाप्रकारची आपत्कालिन परिस्थिती निर्माण झालेली नाही. जिथे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र निर्माण केली जाते, ती केवळ काँग्रेस आणि उबाठाच्यावतीने अफवा पसरवल्यामुळे होते. अशाप्रकारच्या अफवा पसरवल्यामुळे गॅस मिळवण्यासाठी लोक चार ते पाच तास रांगेत उभे राहून सिलिंडर मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच यासाठी अधिकही पैसे मोजण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु मुंबईमध्ये २५ दिवस आणि ग्रामीण भागात ४५ दिवसांमध्ये गॅस सिलिंडर उपलब्ध होतो. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत नागरिकांनी रांगेत उभे राहून गॅस सिलिंडर मिळवण्याचा प्रयत्न करू नये. तसेच या अफवांवर विश्वासही ठेवू नये. या अशा अफवांमुळे गॅसचा काळा बाजार होत आहे. त्यामुळे प्रसार माध्यमांनीही याची काळजी घ्यावी आणि लोकांना अशाप्रकारच्या काळा बाजार होण्यापासून रोखले जावे अशी सूचना केली. तसेच मुंबईकरांनी अशाप्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये असेही आवाहन केले.
Divyanka Tripathi लग्नाच्या जवळपास १० वर्षांनंतर त्यांच्या घरी छोट्या पाहुण्याचे आगमन होणार असल्याचे सांगितले जात आहे. सध्या दिव्यांका तिच्या प्रेग्नेंसीचा सुंदर काळ एन्जॉय करत असल्याची माहिती समोर आली आहे.
Pune News : पुणे शहरासह जिल्ह्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणारा निर्णय पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी घेतला आहे.
Laxman Hake : सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा हाती घेतल्यामुळे 6 महिन्याच्या आत विधिमंडळाचं सदस्य होणं अनिवार्य
Eknath Shinde : मोठी बातमी! अधिवेशन सुरू असतानाच एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला रवाना; कारण काय?
Eknath Shinde : राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच आज १७ मार्च रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याची मोठी माहिती समोर आली आहे.
लालपरीचा कायापालट, २२ हजार बसेस पूर्णपणे बदलणार; मंत्री सरनाईकांची माहिती
मुंबई : ग्रामीण महाराष्ट्राची लाईफलाईन मानली जाणारी लालपरी आता मोठ्या बदलाच्या दिशेने वाटचाल करत आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या म्हणजेच एसटीच्या सर्व बस येत्या काही वर्षांत पर्यावरणपूरक होणार आहेत. 2037 पर्यंत एसटीच्या ताफ्यातील सर्व २२ हजार बस पूर्णपणे इलेक्ट्रिक करण्याचे उद्दिष्ट राज्य सरकारने ठेवले आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधान परिषदेत ही महत्त्वाची माहिती दिली.प्रताप सरनाईक यांच्या माहितीनुसार, सध्या एसटी महामंडळाच्या ताफ्यात एकूण २२ हजार बस आहेत आणि त्यापैकी सुमारे ८०० बस इलेक्ट्रिक आहेत. उर्वरित सर्व बस टप्प्याटप्प्याने इलेक्ट्रिकमध्ये रूपांतरित करण्यात येणार आहेत, त्यामुळे महाराष्ट्रातील सरकारी बस सेवा पूर्णपणे इलेक्ट्रिक करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य ठरू शकते.याआधी सरकारची योजना पुढील पाच वर्षांत दरवर्षी ५ हजार डिझेल बस खरेदी करण्याची होती. मात्र पर्यावरणपूरक वाहतुकीवर भर देत सरकारने आता धोरणात बदल केला आहे. सध्या सुरू असलेल्या ८ हजार डिझेल बसेसच्या खरेदीपलीकडे भविष्यातील सर्व बस इलेक्ट्रिक असतील, यावर सरकारचा भर असणार आहे. तसेच सध्या वापरात असलेल्या डिझेल बसेसचेही इलेक्ट्रिक वाहनांमध्ये रूपांतर करण्याची योजना तयार करण्यात आली आहे.या मोठ्या प्रकल्पासाठी राज्यभरात चार्जिंग सुविधाही उभारल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे चार्जिंग स्टेशनसाठी सौर उर्जेचा वापर करण्याचा प्रस्ताव सरकारने तयार केला आहे. त्यामुळे पर्यावरणपूरक ऊर्जा वापर वाढेल आणि पारंपरिक वीज ग्रिडवरील अवलंबित्वही कमी होईल.दरम्यान, इलेक्ट्रिक वाहन राज्याला आर्थिक फायदाही होणार आहे. कर सवलत आणि टोल माफीमुळे मोठी बचत होणार आहे. सध्या इलेक्ट्रिक वाहनांना मुंबई पुणे एक्सप्रेस वे, नागपूर समृद्धी महामार्ग आणि अटल सेतू या प्रमुख मार्गांवर टोलमाफी देण्यात येणार आहे.तसेच राज्य सरकार महामार्गांवर दर २५ किलोमीटर अंतरावर चार्जिंग स्टेशन उभारण्याची योजना राबवणार आहे, त्यासाठी आवश्यक असलेल्या चार्जिंग तंत्रज्ञानाच्या अभ्यासक्रमांनाही प्रोत्साहन दिले जात आहे. दरम्यान, देशात २०४७ पर्यंत पूर्णपणे इलेक्ट्रिक मोबिलिटीचे स्वप्न साकार करण्याचा संकल्प पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडला आहे, तर राज्यातही या दिशेने पावले उचलली जात आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली २०३७ पर्यंत एसटीचा ताफा शंभर टक्के इलेक्ट्रिक करण्याचे सरकारचे ध्येय असल्याचेही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले आहे.
16 जानेवारी 2026 रोजी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सिलीगुडी येथे महाकाल महातीर्थ मंदिराचे भूमिपूजन केले. 17 एकर जागेत उभारले जाणारे हे जगातील सर्वात भव्य शिव मंदिरांपैकी एक असेल. सुमारे एक महिन्यापूर्वी, डिसेंबर 2025 मध्ये, ममता बॅनर्जी यांनी कोलकाता येथे दुर्गा अंगणचे भूमिपूजन केले होते. त्यापूर्वी सुमारे 6 महिन्यांपूर्वी, दीघा येथे पुरीच्या धर्तीवर जगन्नाथ धाम मंदिराची प्राणप्रतिष्ठा केली होती. पश्चिम बंगालच्या इतिहासात हे पहिले मंदिर आहे, ज्याची प्राणप्रतिष्ठा कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी केली आहे. मंदिराच्या निर्मितीमुळे या भागातील स्थानिक व्यवसायात वाढ झाली असल्याचा सरकारचा दावा आहे. सरकारलाही 100 कोटी रुपयांचा फायदा झाला आहे. मात्र, भाजप याला निवडणुकीतील लांगूलचालन म्हणत आहे. ममता बॅनर्जींना खुर्ची जाण्याची भीती आहे, म्हणूनच त्या मंदिरे बांधत आहेत, असे भाजपचे म्हणणे आहे. पश्चिम बंगालमध्ये 23 आणि 29 एप्रिल रोजी दोन टप्प्यांत निवडणुका होणार आहेत. निवडणुकीत ममतांच्या मंदिर राजकारणामुळे काय बदलेल, अखेर ममतांना सॉफ्ट हिंदुत्वाची गरज का पडली? दिव्य मराठीच्या टीमने दीघा येथे प्रत्यक्ष भेट देऊन हे समजून घेण्याचा प्रयत्न केला. लोक म्हणाले- मंदिरही मिळाले आणि रोजगारहीआम्ही दीघा येथील मंदिराबाहेर वस्तू विकणाऱ्या काही महिलांना भेटलो. त्या कॅमेऱ्यावर बोलण्यास कचरत होत्या, पण कॅमेरा बाजूला होताच त्या बोलण्यासाठी तयार झाल्या. यापैकी एक सुमित्रा शंख विकते. त्या म्हणतात, ‘हे मंदिर पर्यटन स्थळावर बांधले आहे. दीघा येथे वर्षभर लोक फिरायला येतात. हे मंदिर बांधल्यामुळे माझ्यासारख्या महिलांना रोजगार मिळाला आहे. मी सकाळी-संध्याकाळी दोन वेळा येते आणि वस्तू विकून घरी जाते.’ येथेच भेटलेले पारस रुइदास म्हणतात, ‘ममता बॅनर्जींनी सामान्य लोकांसाठी मंदिर बांधले आहे. लोक दीघा फिरायला येतात, तेव्हा मंदिरालाही भेट देतात.‘ निवडणुकीवर याच्या परिणामाबद्दल विचारल्यावर ते म्हणतात, ‘सरकार तर TMC चेच बनेल.’ मात्र, मंदिर राजकारणावर संजय शर्मांचे मत वेगळे आहे. ते म्हणतात- राज्यात लोकांना रोजगार नाही. मग मंदिर-मस्जिद बांधून काय होणार? लोकांना भाकरी, कपडा आणि घर पाहिजे. वस्तू आणि पैसे वाटून काही होणार नाही. इथे काम मिळणे बंद झाले आहे, कोणी याकडे लक्ष देत नाहीये. संजय रागाने म्हणतात, ‘भाजप आणि टीएमसी दोन्ही सारखेच आहेत. यांच्या मंदिर-मस्जिदच्या राजकारणाने काहीही होणार नाही.’ तर, सुगतो मंडल म्हणतात, ‘मंदिर बांधल्याने व्यवसाय वाढला आहे. स्थानिक लोकांनी अनेक छोटे-मोठे व्यवसाय सुरू केले आहेत.’ ममतांनी प्राणप्रतिष्ठा केल्यावर भाजपच्या विरोधाबद्दल सुगतो म्हणतात, ‘हे भाजपचे उत्तर प्रदेश नाही, जिथे महिलांना घराच्या चार भिंतीत ठेवले जाते. इथल्या महिला मजबूत आहेत. जर दीदी पूजा करत असतील, तर त्याला विरोध का?’ ममताची हिंदूविरोधी प्रतिमा तोडण्याचा प्रयत्नपश्चिम बंगालमध्ये मंदिर राजकारण फार जुने नाही. हे नुकतेच काही वर्षांपूर्वी सुरू झाले आहे. याबद्दल ज्येष्ठ पत्रकार विश्वंभर नेगर म्हणतात, ‘ममता बॅनर्जींवर नेहमीच मुस्लिमधार्जिण असल्याचा आरोप होत राहिला आहे. या प्रतिमेतून बाहेर येण्यासाठी त्यांनी सॉफ्ट हिंदुत्वाचा आधार घेतला आहे. मुस्लिमबहुल भाग वगळल्यास, हिंदूंनी दिलेली मतेच ठरवतात की सत्ता कोणाला मिळणार आहे.’ ‘ममता बॅनर्जींनी केवळ तीन मंदिरांचेच भूमिपूजन केले नाही, तर गंगासागरमध्ये स्नान करणाऱ्यांना नदीवर पुलाची भेटही दिली आहे. त्यांनीच पहिल्यांदा दुर्गापूजा कार्निव्हल आयोजित केला.’ पश्चिम बंगालमध्ये मंदिर राजकारणाच्या प्रवेशाबद्दल विचारले असता ते म्हणतात, ‘ममता बॅनर्जींची प्रतिमा हिंदूविरोधी राहिली आहे. याशिवाय सरकारविरोधात सत्ताविरोधी लाट आहे. ती कमी करण्यासाठीही मंदिर राजकारण केले जात आहे. पश्चिम बंगालमध्ये एका नव्या प्रकारच्या राजकारणाची सुरुवात होत आहे. ममतांच्या आधी बंगालमध्ये डाव्यांचे सरकार होते आणि त्यांच्या मुद्द्यांमध्ये धर्म कधीच नव्हता.‘ याच्या परिणामांबद्दल नेगर म्हणतात, ‘दीघामध्ये ओडिया भाषिक लोकांव्यतिरिक्त, बंगाली आणि हिंदी बोलणारे लोक राहतात. आधी लोक भगवान जगन्नाथाच्या दर्शनासाठी पुरीला जात असत, पण आता येथे फिरण्यासोबतच धार्मिक यात्राही होते. दुसरीकडे, गंगासागरमध्ये मोठ्या संख्येने हिंदी भाषिक लोक स्नान करण्यासाठी येतात. यासाठी फेरी घाटातून जावे लागते. पूल बनल्यामुळे स्थानिक लोकांना आणि भाविकांना जो फायदा होईल, त्याचा परिणाम मतांमध्ये नक्कीच दिसेल.‘ ‘मंदिरे बांधण्यापेक्षा हिंदूंना सुरक्षा देणे अधिक महत्त्वाचे’बंगालमधील मंदिर राजकारणाबाबत आम्ही कोलकाता येथील आरएसएस प्रचारक डॉ. जीशानु बसु यांच्याशीही बोललो. ते म्हणतात, ‘पश्चिम बंगालमध्ये मंदिरे बांधण्यापेक्षा हिंदूंना सुरक्षा देणे अधिक महत्त्वाचे आहे. येथे हिंदू सुरक्षित राहू शकतील की नाही हे ठरवणे महत्त्वाचे आहे, कारण त्यांच्यावर सतत अत्याचार होत आहेत.’ ममता यांनी मंदिराचे भूमिपूजन आणि प्राणप्रतिष्ठा करण्यावर जीशानु प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. ते म्हणतात, ‘संविधानिक पदावर असलेला व्यक्ती मंदिराचे भूमिपूजन करू शकत नाही.’ आम्ही विचारले की मग राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा पंतप्रधानांनी कशी केली? यावर ते म्हणतात, 'राम मंदिर कोणत्याही सरकारने नाही, तर ट्रस्टने बांधले आहे. सरकारने मंदिर किंवा मशीद काहीही बांधणे योग्य नाही. हे समाजाचे काम आहे.' 'पुरीचे जगन्नाथ मंदिर चार धामांपैकी एक आहे. अशा परिस्थितीत पश्चिम बंगालमध्ये त्याच नावाने दुसरे मंदिर बांधणे योग्य नाही. हे देशाच्या एकता आणि अखंडतेसाठीही योग्य नाही. याच कारणामुळे शंकराचार्यांनीही याचा विरोध केला. तुम्हीच विचार करा, जर कोलकाताच्या कालीघाट मंदिराच्या नावाने दुसरीकडे मंदिर बांधले, तर ते योग्य ठरेल का?' ते पुढे म्हणतात, 'पहिली गोष्ट म्हणजे मंदिराच्या नावावर राजकारण होऊ नये. हा इतिहास आणि श्रद्धेचा विषय आहे, राजकारणाचा नाही. ममता बॅनर्जींनी मंदिराचे बांधकाम आणि भूमिपूजन जर राजकीय फायद्यासाठी केले असेल, तर ते देश आणि राज्यासाठी खूप चुकीचे आहे.' 'बंगालची स्थिती अशी आहे की, उत्तर बंगालच्या विकासासाठी जो अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला आहे, त्यापेक्षा जास्त अर्थसंकल्प मदरशांसाठी आहे. हिंदू मूर्ख नाहीत, जे मंदिर बांधण्याच्या भूलथापांना बळी पडतील.' ममताला हिंदू व्होट बँकेच्या ध्रुवीकरणाची भीती बंगालमधील राजकीय वातावरणाबद्दल राजकीय तज्ज्ञ प्रभाकर मणि तिवारी म्हणतात की, भाजपच्या हिंदुत्वाला प्रत्युत्तर देण्यासाठी ममता गेल्या काही वर्षांपासून सॉफ्ट हिंदुत्वाकडे वळल्या आहेत. त्यांनी अनेक मंदिरांना भेटी दिल्या. रामनवमीच्या काळात सर्वात मोठा बदल दिसून आला, जेव्हा टीएमसीच्या लोकांनी मोठ्या उत्साहात मिरवणुका काढल्या. ते पुढे म्हणतात, ‘पश्चिम बंगालच्या राजकारणात भाजपने ममताला केवळ हिंदूविरोधीच नाही, तर सतत मुस्लिम समर्थक म्हणून प्रचार केला आहे. म्हणूनच ममता बॅनर्जींनी लोकसभा निवडणुकीच्या काही काळ आधी सॉफ्ट हिंदुत्वाचा मार्ग स्वीकारला आहे. जिथे त्यांनी व्यासपीठावरून दुर्गा चालीसाचे पठण केले आहे.‘ शेवटी ममता बॅनर्जींना सॉफ्ट हिंदुत्वाची गरज का पडली? यावर प्रभाकर म्हणतात, ‘राज्यात ममता बॅनर्जींचा स्वतःचा मतपेढी आहे, पण त्याशिवाय काही मते अशीही आहेत, ज्यांच्याशिवाय सरकार बनणे कठीण आहे. ज्याप्रमाणे अल्पसंख्याक मते ममता बॅनर्जींच्या बाजूने आहेत, त्याचप्रमाणे जर हिंदू मते भाजपसाठी एकत्र झाली तर टीएमसीसाठी अडचणीचे कारण बनेल.‘ ‘याच हिंदू मतपेढीला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी पश्चिम बंगालमध्ये टीएमसी देखील मंदिर राजकारणात उतरली आहे. याचा निवडणुकांवर किती परिणाम होईल, हे सध्या सांगणे कठीण आहे. ममता बॅनर्जींनी यापूर्वीही असे केले आहे, पण त्याचा काही विशेष परिणाम झाला नाही.‘ बंगालच्या राजकारणात यापूर्वी कधी मंदिर-मशीदची चर्चा झाली आहे का? यावर प्रभाकर म्हणतात, ‘बंगालमध्ये काँग्रेस आणि डाव्यांच्या सरकारच्या काळात असं काही दिसलं नाही.‘ राजकीय पक्ष काय म्हणत आहेत…भाजप म्हणाली- ममतांना खुर्ची जाण्याची भीती, म्हणून मंदिरं बांधत आहेतममता बॅनर्जींच्या मंदिराच्या भूमिपूजनाला भाजपने विरोध केला आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीपूर्वी 3 मंदिरांच्या भूमिपूजनावर भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते देवजीत सरकार म्हणतात, ‘या सर्व मंदिरांमध्ये ममतांनी सर्वात आधी काली मंदिरात आपली फाइल लावली, पण तिथे त्या अपयशी ठरल्या. त्यानंतर इतर मंदिरांकडे वळल्या. राज्यात लोकांपर्यंत पाणी आणि शौचालये पोहोचू शकलेली नाहीत. जनतेला सुविधा देण्याऐवजी तुष्टीकरणाचे राजकारण सुरू आहे.‘ ‘राज्यात मंदिराऐवजी शाळा आणि रुग्णालय उघडले असते तर जनतेला त्याचा फायदा झाला असता. मंदिर बांधणे हे सरकारचे काम नाही, हे काम ट्रस्टद्वारे जनतेच्या पैशातून व्हायला हवे. यावरून स्पष्ट दिसते की ममता बॅनर्जींच्या मनात सत्ता गमावण्याची भीती आहे.‘ टीएमसी म्हणाली- राजकारण करताना भाजप भगवान नारायणाचा अपमान करत आहेटीएमसीचे राष्ट्रीय प्रवक्ते रिजु दत्ता भाजपवर पलटवार करत म्हणाले, ‘जर दीदी मंदिराचे बांधकाम आणि प्राणप्रतिष्ठा करू शकत नाहीत, तर पंतप्रधान मोदींनी अयोध्येतील अपूर्ण राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा कशी केली? कारण स्पष्ट होते - लोकसभा निवडणुका. जगन्नाथ धामची प्राणप्रतिष्ठा एप्रिल २०२५ मध्ये झाली, त्यावेळी बंगालमध्ये कोणतीही निवडणूक नव्हती.‘ ‘आम्ही धर्मावरून राजकारण करत नाही आणि ते आमच्या जाहीरनाम्यातही ठेवत नाही. आमचा नारा 'आई, माती आणि माणूस' हा आहे. उलट हिंदुत्वाचे राजकारण करणाऱ्या भाजपने भगवान जगन्नाथांची निंदा केली. त्यांच्या धामाला 'अम्यूजमेंट पार्क' म्हटले आणि त्यांच्या महाप्रसादाला 'हलवा' म्हटले. स्वतःला धर्माचे ठेकेदार म्हणवणारे पक्षाचे नेते राजकारणाच्या नादात भगवान नारायणाचा अपमान करत आहेत.'
पुणे: मराठी नववर्षारंभ म्हणजेच गुढी पाडव्याचा सण अवघ्या दोन-तीन दिवसांवर येऊन ठेपला असताना गॅस टंचाईमुळे व्यवसायिक हतबल झाले आहेत. तर, घरगुती गॅसचीही टंचाई जाणवत असल्याने नागरिकांनी, ग्राहकांनी गॅस एजन्सीबाहेर रांगाच रांगा लावल्याचे चित्र दिसून येत आहे. राज्यातील गॅस टंचाईवर सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आलं असून घरगुती गॅस सिलेंडरची कुठेही कमतरता नाही, असे सांगण्यात आलंय. आता, पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी महत्त्वाची घोषणा केली असून नागरिकांनी गॅस बुकींग केल्यानंतर ९६ तासांत म्हणजेच ४ दिवसांत त्यांना गॅस घरपोच मिळणार असल्याचे जितेंद्र डुडी यांनी म्हटलंय.सरकारकडून व्यावसायिक गॅस पुरवठा बंद करण्यात आल्याने हॉटेल व्यवसायिक, खाणावळी, मेस आणि इतरही किचन उद्योगाला मोठा फटका बसला असून घरगुती गॅसचेही दर वाढविण्यात आले आहेत. अशातच, गुढी पाडव्याचा सण जवळ येऊन ठेपल्याने सध्या बाजारात गर्दी असून गॅस टंचाईमुळे नागरिक त्रस्त झाल्याचं पाहायला मिळत आहे. गॅस एजन्सीबाहेर रांगाच रांगा दिसून येतात. त्याच पार्श्वभूमीवर पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.पुण्यातील गॅस टंचाई संदर्भात महत्त्वाची बातमी समोर आली असून गॅस सिलेंडर बुकींग केल्यानंतर 96 तासात पुणेकरांना घरपोच गॅस मिळणार आहेत. पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी याबाबतचे आदेश जिल्हा प्रशासनाला व गॅस एजन्सींना दिले आहेत. मात्र, ग्राहकांकडून डिलिव्हरी कोड सांगितल्याशिवाय सिलेंडर दिला जाणार नाही. घरगुती गॅस सिलेंडरच्या वितरणाबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार नवीन नियम लागू करण्यात आला आहे. त्यानुसार, आता पुणेकरांना ९६ तासात घरपोच सिलेंडर मिळणार आहे. त्यामुळे, गॅस टंचाईत पुणेकरांना काहीस दिलासा मिळाला आहे.पुणे जिल्ह्यात घरगुती गॅस सिलिंडरचे वितरण सुरळीत आणि सुरक्षित पद्धतीने व्हावे यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पोलिस विभागाला महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गॅस सिलिंडर वितरणावेळी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी वेळोवेळी लक्ष ठेवावे. गॅस एजन्सी आणि गोदामांवर अनावश्यक गर्दी होऊ नये यासाठी संबंधित पोलिस स्टेशनने नियमित पाहणी करावी. गॅस एजन्सीकडून सिलिंडर वितरणासाठी पोलिस मदत मागितल्यास नियमानुसार मदत पुरवावी. तसेच, वितरणात अडथळा आणणे किंवा हस्तक्षेप झाल्यास संबंधितांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी महोदयांनी दिल्या आहेत.गुढी पाडव्यासाठीच्या साखरेच्या हारात दरवाढदरम्यान,यंदाच्या गुढी पाडवा सणावर गॅस टंचाईचे सावट पाहायला मिळत असून गॅस टंचाईमुळे यंदा गुढीपाडव्याच्या दिवशी लागणाऱ्या साखरेच्या माळांची किंमत ४० टक्क्यांनी वाढली आहे. मात्र, आखाती देशांतील युद्धामुळे व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळत नसल्याने लाकूड व डिझेल भट्ट्यांवर काम करावे लागत आहे. उत्पादन खर्च वाढल्याने साखर गाठींच्या हारांच्या किंमतीत सुमारे ४० टक्के वाढ झाली आहे.
Jannat Zubair Attack: अभिनेत्री जन्नत झुबैरसह भाऊ आयानवर हल्ला, दोघे जखमी; चाहत्यांना धक्का
मुंबई: टीव्ही अभिनेत्री आणि सोशल मीडिया स्टार जन्नत झुबैर रहमानी आणि तिचा भाऊ अयान झुबैर रहमानीवर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळं मनोरंजन विश्वात एकच खळबळ उडाली आहे. दोघे भाऊ-बहीण त्यांच्या कारने कुठेतरी जात होते. तेव्हा पनवेल जवळ असलेल्या हायवेवर काही लोकांनी त्यांचा पाठलाग केला आणि त्यांच्यावर मारहाण केली. हल्लेखोरांनी त्यांना अडवलं आणि धमकावल्याचं समजतं आहे. यामुळे दोघेही जखमी झाले. हा दोघांसाठी खूप भयानक अनुभव होता. दोघे भाऊ बहिण मोठ्या धक्क्यात आहेत.जन्नत झुबैरच्या टीमने याप्रकरणी एक अधिकृत माहिती शेअर केली आहे. इन्स्टाग्रामवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलंय की, जन्नत आणि अयानला खूप गंभीर परिस्थितीला सामोरं जावं लागलं. त्यांचा पाठलाग करून त्यांना मारहाण करण्यात आली. सध्या दोघेही सुरक्षित आहेत. चाहत्यांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये. पुढील अधिकृत माहितीची वाट पाहा.
सोमवार, 16 मार्च रोजी 3 राज्यांमधील 11 राज्यसभा जागांसाठी मतदान झाले. आमदारांनी मोठ्या प्रमाणात क्रॉस-व्होटिंग केले. यामुळे ओडिशात भाजपने 1 अतिरिक्त जागा जिंकली. तर बिहारमध्ये काँग्रेसचे 3 आणि आरजेडीचे एक आमदार मतदान करण्यासाठी पोहोचलेच नाहीत. यामुळे भाजपच्या शिवेश राम यांचा विजय सोपा झाला. आता राज्यसभेत एनडीएने पुन्हा एकदा बहुमत मिळवले आहे. फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये राज्यसभेत 10 राज्यांमधील 37 जागा रिक्त झाल्या होत्या, ज्यासाठी 40 उमेदवारांनी अर्ज भरले होते. यापैकी 7 राज्यांमधील 26 उमेदवार बिनविरोध निवडून आले. हरियाणा, बिहार आणि ओडिशाच्या 11 जागांवर मतदान झाले होते, ज्यात क्रॉस-व्होटिंगचा खेळ झाला. निवडणुकीनंतर आता राज्यसभेत कोणता पक्ष किती शक्तिशाली आहे, मतदानात कसा खेळ झाला आणि मोदी सरकार अधिक मजबूत कसे झाले; जाणून घेऊया एक्सप्लेनरमध्ये… राज्यसभा निवडणुकीचे मतदान कसे होते? कोणत्याही राज्यात राज्यसभेच्या जेवढ्या जागा रिक्त आहेत, त्यावर राज्याच्या आमदारांच्या संख्येनुसार मतदान केले जाते. हे सूत्र थोडे क्लिष्ट वाटू शकते, म्हणून हरियाणाच्या उदाहरणावरून समजून घ्या… बिहारमध्ये NDA ने पाचही जागा कशा जिंकल्या? बिहारमध्ये राज्यसभेच्या ५ जागा रिक्त झाल्या होत्या, ज्यासाठी ६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. एनडीएच्या वतीने भाजपचे नितीन नवीन, आरएलएम सुप्रीमो उपेंद्र कुशवाहा, जेडीयूचे नितीश कुमार आणि रामनाथ ठाकूर यांचा विजय आधीच निश्चित होता. पण भाजपच्या शिवेश राम यांच्या जागेवर पेच निर्माण झाला. खरं तर, आरजेडीच्या वतीने एडी सिंह यांनीही अर्ज भरला आणि त्यांची लढत शिवेश कुमार यांच्याशी झाली…. ओडिशा मध्ये क्रॉस व्होटिंगचा खेळ कसा झाला? ओडिशातून राज्यसभेच्या 4 जागा रिक्त झाल्या होत्या. भाजपचे मनमोहन सामल आणि सुजित कुमार यांचा विजय निश्चित होता. तर बीजेडीचे संतृप्त मिश्रा यांचाही विजय निश्चित होता. भाजप समर्थित उमेदवार दिलीप राय आणि बीजेडीचे डॉ. दत्तेश्वर होता यांच्यात लढत झाली… हरियाणात रात्री उशिरा निकाल का आले? हरियाणामध्ये राज्यसभेच्या 2 जागांसाठी निवडणुका झाल्या. भाजपने संजय भाटिया यांचा विजय आधीच निश्चित होता. तर भाजप-समर्थित सतीश नांदल आणि काँग्रेसचे कर्मवीर सिंह बौध यांच्यात लढत झाली… नियम असूनही क्रॉस-व्होटिंगवर कारवाई का होत नाही? बिहार, ओडिशा आणि हरियाणात आमदारांनी आपल्या पक्षाच्या उमेदवाराला सोडून दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराला मतदान केले. तर इथे पक्षांनी व्हिप जारी केले होते, पण राज्यसभा निवडणुकीत व्हिप लागू होत नाही. आमदार आपल्या विवेकबुद्धीने मतदान करू शकतात, पण यात एक गोम आहे. राज्यसभा निवडणुकीत खुली मतदान प्रक्रिया असते. म्हणजेच, आमदारांना मतपत्रिकेवर प्राधान्यक्रम भरल्यानंतर आपल्या पक्षाच्या निश्चित एजंटला ते दाखवावे लागते. जे आमदार असे करत नाहीत किंवा इतर कोणत्याही व्यक्तीला मतपत्रिका दाखवतात, त्यांचे मत रद्द होऊ शकते. तसेच, जे आमदार आपल्या पक्षाच्या विरोधात जातात, त्यांना पक्षातून काढून टाकण्याची तरतूद आहे. यासाठी राजकीय पक्षाला विधानसभेच्या अध्यक्षांना एक अर्ज द्यावा लागतो आणि त्या आमदाराचे सदस्यत्व रद्द केले जाते. अशा परिस्थितीत, राज्यसभा निवडणुकीत दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराला मतदान केल्यास कारवाई होत नाही, असे म्हणणे योग्य नाही. परंतु पक्ष असे करण्यापासून परावृत्त होतात. 2003 मध्ये भाजपच्या अटलबिहारी वाजपेयी सरकारने खुली मतदान प्रक्रिया (ओपन वोटिंग) ची तरतूद यासाठीच केली होती, जेणेकरून आमदार इतर पक्षांकडून पैसे घेऊन राज्यसभा निवडणुकीत मतदान करणार नाहीत. एनडीएला राज्यसभेत पुन्हा बहुमत मिळाल्यास मोदी सरकार कसे मजबूत होईल? राज्यसभेत भाजपच्या 106 खासदारांसह आता NDA च्या एकूण खासदारांची संख्या 140 झाली आहे. म्हणजेच NDA ला पुन्हा बहुमत मिळाले आहे. यामुळे केंद्रातील मोदी सरकार आणखी मजबूत होईल. कोणतेही मोठे विधेयक मंजूर करण्यासाठी आता त्यांना BJD, YSRCP किंवा अपक्ष खासदारांची गरज भासणार नाही. NDA चे खासदार यासाठी पुरेसे असतील. विरोधकांच्या वॉकआउट किंवा विरोधानंतरही विधेयके अडकणार नाहीत. खरं तर, भाजपच्या नेतृत्वाखालील NDA ला गेल्या 2 वर्षांपासून राज्यसभा आणि लोकसभेत बहुमत मिळाले आहे. निवडणूक विश्लेषक अमिताभ म्हणतात की, भारतीय लोकशाहीत राज्यसभेची निवडणूक अशा प्रकारे होते की लोकसभा आणि राज्यसभेत एकाच वेळी कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणे कठीण असते. जर एखाद्या मोठ्या पक्षाकडे बहुमत असेल, तर त्याचा फायदा असा होतो की सरकारला प्रादेशिक पक्ष किंवा अपक्ष खासदारांच्या पाठिंब्याच्या बदल्यात त्यांच्या अवाजवी मागण्यांपुढे झुकावे लागत नाही. याचे नकारात्मक पैलू देखील आहेत. जेव्हा एखाद्या एका पक्षाकडे लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही ठिकाणी बहुमत असते, तेव्हा संसदीय कामकाजात सर्वानुमतीने निर्णय घेण्याची शक्यता कमी होते. मोठा पक्ष आपल्या मनाप्रमाणे निर्णय घेतो. तो लहान आणि इतर पक्षांशी सल्लामसलत करत नाही. ही लोकशाहीसाठी निरोगी स्थिती नाही. 1989 पर्यंत काँग्रेस पक्षाकडे राज्यसभेत स्पष्ट बहुमत होते. तेव्हा बहुतेक राज्यांमध्ये काँग्रेसचेच सरकार होते. परंतु 1989 नंतरच्या सर्व सरकारांना राज्यसभेत महत्त्वाचे विधेयक मंजूर करण्यासाठी लहान पक्षांना सोबत घ्यावे लागले आहे किंवा विरोधी पक्षांसोबत मिळून सर्वानुमती साधावी लागली आहे.
PMC Abhay Yojana : अभय योजनेतून महापालिका ‘मालामाल’! ९५४ कोटी जमा, तरीही प्रशासनाचं टेन्शन का वाढलं?
PMC Abhay Yojana : अभय योजनेचा १.६४ लाख नागरिकांनी घेतला लाभ; व्याजात ७५% सवलत देऊनही ७८ टक्के थकबाकी अजूनही प्रलंबित.
Free Education for Girls : उच्च व तंत्र शिक्षणमंत्र्यांचा मान्यता रद्द करण्याचा इशारा ठरतोय कागदावरच; खासगी महाविद्यालयांकडून इतर शुल्काच्या नावाखाली वसुली सुरूच.
Transgender Welfare : सामाजिक न्याय विभागाचा पुढाकार; तृतीयपंथीयांना स्वयंरोजगारासाठी मिळणार २५ हजार ते २ लाख रुपयांपर्यंतचे अर्थसाहाय्य.
Devendra Fadnavis : वाढता खर्च आणि नागरिकांचा त्रास थांबणार; पुणे जिल्ह्यातील रिंगरोड आणि मेट्रो प्रकल्पांना मिळणार सुपरफास्ट गती.
Editorial : अग्रलेख –मसापची निवडणूक
महाराष्ट्र साहित्य परिषदेची बहुचर्चित निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊन निवडणूक निकाल जाहीर (Editorial) झाला.
PMC News : महापालिकेचा ‘तो’निर्णय अन् नगरसेवकांचा संताप; समाविष्ट गावांच्या टॅक्सचं नेमकं होणार काय?
PMC News : स्थायी समितीच्या निर्णयामुळे समाविष्ट गावांतील नागरिक अडचणीत; नगरसेवकांनी अधिकाऱ्यांचा घेतला समाचार.
Mundhwa Land Scam : कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी कंपनीकडून वारंवार मुदतवाढ, नोंदणी विभागाच्या भूमिकेकडे लक्ष.
Editorial : दखल –स्वप्ननगरीला घरघर!
सद्यःस्थिती पाहता एरवी आलिशान गाड्यांचा, सौंदर्यवतींचा आणि पार्ट्यांचा झगमगाट (Editorial) चालणार्या, पर्यटकांच्या गर्दीने बारा महिने गजबजलेल्या दुबई महानगरामध्ये इराणच्या हल्ल्यामुळे अशांततेचे साम्राज्य वाढू लागले आहे.
Property Registration : रेडी रेकनर दरवाढीच्या भीतीने नागरिकांची खरेदी-विक्रीसाठी लगबग; २६ मार्चपासूनच्या सलग सुट्ट्यांमध्येही आता दस्तनोंदणी शक्य.
Sambhaji Maharaj Punyatithi : १८ मार्च रोजी वढु बुद्रुकमध्ये पहाटेपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खा. उदयनराजे भोसले यांची विशेष उपस्थिती.
Editorial : लक्षवेधी –भारत-चीन ‘भांडवलभाई’
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळात एक महत्त्वाचा निर्णय (Editorial) घेण्यात आला आहे.
Otur Koyta Attack : ओतूर येथील श्री संत गाडगे महाराज विद्यालयातील धक्कादायक प्रकार; वार हातावर झेलल्याने विद्यार्थ्याचा जीव वाचला, ५ अल्पवयीन ताब्यात.
Baramati News : पाणीटंचाईचे भीषण चटके! ‘धरण उशाला अन् कोरड घशाला’; पश्चिम भागात पाण्यासाठी वणवण
Baramati News : मुर्टी, मुढाळे परिसरात भीषण पाणीटंचाई; प्रशासकीय अधिकारी संपर्काबाहेर असल्याने पश्चिम भागातील जनतेचा संताप अनावर.
MCOCA Arrest : यवत पोलिसांचा मोठा दणका! १० घरफोड्या उघड, मोक्कातील ‘तो’सराईत गुन्हेगार अखेर जेरबंद
MCOCA Arrest : उंब्रज आणि शिरूरमधील दोन मोक्का गुन्ह्यांत फरार असलेला मुख्य सूत्रधार पोलिसांच्या जाळ्यात; अहिल्यानगरमधील सराफालाही अटक.
Alephata News : हॉटेल व्यवसाय धोक्यात! गॅस टंचाईमुळे हॉटेल्सना टाळे; काय आहे ‘काळ्या ऑइल’चा फंडा?
Alephata News : कमर्शियल गॅस परवडेनासा झाल्याने काही हॉटेल्स कायमची बंद; काळ्या ऑइलचा वापर वाढल्याने सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर.
Ambegaon News : आंबेगाव तालुक्यात दुष्काळाच्या झळा! ‘या’तीन गावांत पाण्याचे टँकर सुरू
Ambegaon News : माळीण, पेठ, निघोटवाडीसह ८ ग्रामपंचायतींचे प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत; तीव्र पाणीटंचाईमुळे आंबेगाव पंचायत समिती ॲक्शन मोडमध्ये.
Shankar Patil Suicide : मानसिक वेदना आणि अपघाताच्या धक्क्यातून कस्तुरी प्रतिष्ठानच्या सचिवांनी संपवले जीवन; राहत्या घरी गळफास घेतल्याने परिसरात हळहळ.
PCMC Budget : महापालिकेच्या बजेटमध्ये मोठा फेरबदल! ४०० कोटींची वाढ; २५० नवीन कामांचा धडाका..पाहा
PCMC Budget : नगरसेवकांसाठी स्वतंत्र १० लाख रुपयांच्या निधीची तरतूद; मालमत्ता आणि बांधकाम करातून उत्पन्न वाढवण्याचे स्थायी समितीचे प्रशासनाला निर्देश.
PCMC News : पिंपरी-चिंचवडला मिळाले नवे कारभारी! डॉ. विजय सूर्यवंशी यांनी स्वीकारला आयुक्तपदाचा पदभार
PCMC News : प्रशासकीय कामाचा वेग वाढवण्याचा आणि नागरी सुविधा अधिक दर्जेदार करण्याचा नव्या आयुक्तांचा निर्धार.
Pimpri Chinchwad : शहरात घरखरेदीचा धमाका! पालिकेच्या तिजोरीत पैशांचा पाऊस; काय आहे मुख्य कारण?
Pimpri Chinchwad : गुढीपाडवा आणि अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर घरखरेदीत आणखी वाढीची शक्यता; रेडीरेकनरचे दर वाढण्यापूर्वी ग्राहकांचा बुकिंगकडे वाढता कल.
Food Price Hike : व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या टंचाईमुळे हॉटेलमध्ये लाकडी चुली आणि इंडक्शनचा वापर सुरू; वाढत्या खर्चामुळे खाद्यपदार्थांच्या किमतीत मोठी वाढ.
Alandi News : आळंदीकरांना मोठा दिलासा! इंद्रायणी नदीवरील ‘तो’पूल वाहतुकीसाठी अखेर खुला
Alandi News : तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत पुलाचे काम पूर्ण; पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेकडून बंदीची अधिसूचना रद्द, सर्व प्रकारच्या वाहनांना परवानगी.
Shocking News : चाकण हादरले! रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह; सीसीटीव्ही पाहून पोलीसही चक्रावले
Shocking News : सुरुवातीला खुनाचा संशय, मात्र सीसीटीव्ही फुटेज समोर येताच सत्य उघड; चाकण परिसरात नागरिकांमध्ये प्रचंड संताप.
Shashikant Shinde : कोरेगावचे पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ आणि गुन्हे शाखेच्या अंमलदारांच्या कार्यपद्धतीवरून आमदार शशिकांत शिंदे यांनी सरकारला विचारले जाब.
Phaltan Panchayat Samiti : पंचायत समितीवर प्रथमच भाजपचा झेंडा; ‘या’महिला नेत्या ठरल्या सभापती
Phaltan Panchayat Samiti : दोन्ही निंबाळकर गटांच्या चर्चेनंतर सभापतीपद भाजपकडे तर उपसभापतीपद शिवसेनेकडे देण्याचा निर्णय झाला.
Mahabaleshwar Panchayat Samiti : महाबळेश्वर तालुक्याच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच उपसभापती पद शिवसेनेच्या पदरात; शिवसैनिकांचा जल्लोष.
Khatav Panchayat Samiti : सभापती पदी कातर खटाव गणाच्या वनिता दुबळे यांची बिनविरोध निवड करून भाजपने पहिली लढाई जिंकली.
'महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक'विधानसभेत मंजूर
मुंबई : राज्यातील बेकायदेशीर धर्मांतरणाला चाप लावण्यासाठी राज्य सरकारने मांडलेले ऐतिहासिक ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक, २०२६’ सोमवारी रात्री विधानसभेत मंजूर करण्यात आले. गृहराज्य मंत्री पंकज भोयर यांनी हे विधेयक सभागृहात मंजुरीसाठी मांडले. सत्ताधारी आमदारांनी बाके वाजवून त्याचे स्वागत केले.
दिल्लीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या खासदारांची बैठक
नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या खासदारांची एक महत्त्वपूर्ण बैठक दिल्लीत पार पडली. ही बैठक खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या निवासस्थानी घेण्यात आली. यात अधिवेशनातील विविध कामकाज आणि पक्षाच्या भूमिकेवर सविस्तर चर्चा झाली.शिवसेनेच्या खासदारांनी अर्थसंकल्पीय चर्चेत पक्षाची भूमिका कशी मांडायची यावर विचारविनिमय केला. विशेषतः, सध्या सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे देशासमोर येणाऱ्या संभाव्य अडचणींवर चर्चा झाली. यात आर्थिक प्रभाव, पुरवठा साखळीतील व्यत्यय आणि इतर आव्हानांवर केंद्र सरकारच्या माध्यमातून काढण्यात येणाऱ्या उपाययोजनांवर सखोल विचारमंथन झाले.एकनाथ शिंदे यांनी बैठकीत पक्षाच्या खासदारांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, “अर्थसंकल्पीय अधिवेशन हे देशाच्या विकासासाठी महत्त्वाचे आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या धोरणांना पाठिंबा देताना शिवसेनेची भूमिका जनतेच्या हिताचीच राहील.”विरोधी पक्षाकडून विविध मुद्दे उपस्थित केले जात आहेत. केंद्र सरकारच्या विरोधात फेक नॅरेटिव्ह उभे केले जात आहे. शिवसेना एनडीएचा महत्त्वाचा घटकपक्ष असून, विरोधकांच्या खोट्या प्रचाराचा पर्दाफाश करण्यासाठी शिवसेना आक्रमक आणि रचनात्मक भूमिका घेणार असल्याचे या बैठकीतून स्पष्ट झाले आहे.
DRS Controversy : सामना संपल्यानंतर पाकिस्तान संघ व्यवस्थापनाने थेट सामनाधिकाऱ्यांची भेट घेऊन मैदानातील पंच कुमार धर्मसेना यांच्या निर्णयाविरोधात तक्रार नोंदवली आहे.
Madhuri Misal : ॲलोपॅथिकबाबत हाय कोर्टाच्या आदेशाची प्रतीक्षा; राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची माहिती
Madhuri Misal : महाराष्ट्रातील ८,००० होमिओपॅथी डॉक्टरांनी मॉडर्न फार्माकोलॉजी कोर्स पूर्ण केला आहे.
SIP Calculator: गुंतवणुकीसाठी कोणत्याही खास वेळेची वाट पाहू नका, आजच सुरुवात करा, भले ती छोटी रकमेने का असेना. रोज फक्त ८० रुपये वाचवले तरी दीर्घकालीन गुंतवणुकीतून २ कोटी रुपयांहून अधिक निधी उभारता येतो.
Nagpur Accident : नागपूरमध्ये भीषण अपघात ! पिक-अप जीप उलटून 26 जण जखमी
नागपूर जिल्ह्यात (Nagpur Accident) वर्धा नदीजवळ सोमवारी भरधाव वेगाने जाणारी एक पिक-अप जीप उलटल्याने ९ महिलांसह एकूण २६ मजूर जखमी झाले आहेत.
मुंबई: महापौरांच्या गाडीवर बसवण्यात आलेल्या लुकलुकणाऱ्या दिव्यांच्या मुद्यावर विरोधी पक्षनेत्यांनी केलेल्या आरोपांचा भाजपाचे चांगला समाचार घेतला. भाजपची सत्ता आल्यानंतर बांग्लादेशी मुस्लिम, रोहिंग्ये फेरीवाले आणि प्रस्तापित कंत्राटदारांची साखळी मोडून काढण्यासाठी जेम पोर्टवरुन निविदा निमंत्रित करण्याच्या घेतलेल्या भूमिकेमुळे विरोधकांचा थयथयाट होत आहे. त्यामुळे माजी महापौर पद भूषवलेल्या विरोधी पक्षनेत्यांकडून मुंबईच्या विकासाच्या मुद्दयावर जर आरोप झाले असते तर बरे वाटले असते, परंतु या महापौरांना साडी,घड्याळ, वेणी, फणी आणि दिवाच दिसल असल्यामुळे हे त्यांच्या वैचारिक दिवाळखोरीचे लक्षण असल्याचे सांगत महापौर रितू तावडे यांनी शेलक्या शब्दांत विरोधकांचा समाचार घेतला.मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या वाहनावर लाल दिवा तथा लुकलुकणारे दिवे, तसेच सुरक्षा व्यवस्था वाढवण्याच्या मुद्दयावर महापालिका सभागृहनेते गणेश खणकर तसेच महापौर रितू तावडे यांनी पत्रकार परिषद घेवून आरोपांचे खंडन केले. या पत्रकार परिषदेमध्ये रितू तावडे यांनी महापौरपदी विराममान झाल्यानंतर वाहन, कार्यालय तसेच कर्मचारी वर्ग प्रशासनाने उपलब्ध करून दिला आहे. त्यानुसार मला वाहन देण्यात आले असून त्यावरील लुकलुकणारे दिवे हे मी मागणी केल्यानुसार नव्हेतर प्रशासनाने वाहनासोबतच जोडून दिले होते. त्यामुळे त्यामुळे आम्हाला कुठल्याही वाहनावरील दिव्याची हौस नसून आम्ही सर्वसामान्य जनतेची कामे करणारे आहोत. याबाबतचे वृत्त आल्यांनतर मी स्वत:हून आयुक्तांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली आणि ही चूक प्रशासनाने स्वत: मान्य केली असल्याचे महापौरांनी सांगितले. तसेच ज्यांनी याप्रकारे दिवा बसवण्याची चूक केली असेल तर संबधितांवर कारवाई करण्याची सूचनाही प्रशासनाला केल्याचे त्यांनी सांगितले.आम्ही सत्तेवर आल्यापासून नागरिक आपल्या समस्या घेवून महापालिकेत येत आहेत. पण याला विरोधी पक्षनेत्या महापालिकेत बाजार भरल्याचे म्हणत आहे. त्यांच्या २५ वर्षांत सामान्य माणसांना प्रवेश नव्हता, तर कंत्राटदारांना होता आणि आता भाजपचे सरकार आल्यानंतर सर्वसामान्यांनाही आपली कामे होण्याचा विश्वास असल्यामुळे नागरिक येत आहेत. मी प्रत्येक नागरिकाला भेट असून आता त्यांची गर्दी नियंत्रण आणण्यासाठी म्हणून मी सुरक्षा व्यवस्था मागवली आहे. तो मला पिठासीन अधिकारी म्हणून अधिकार आहे. पण विरोधी पक्षनेत्यांना अधिक सुरक्षा कशाला हवी. त्यांनी का अशी मागणी केली असाही सवाल महापौरांनी केला.त्यामुळे आम्ही सत्तेवर आल्यापासून बांग्लादेशी तसेच रोहिंग्ये मुस्लिमांना हटवणे तसेच फेरीवाल्यांना हटवण्याची मोहिम हाती घेतली आहे.त्यामुळे कुठेतरी विरोधी पक्षांच्या लोकांना पोटशुळ उठला आहे. विरोधी पक्षनेत्यांनी जर रुग्णालय, शाळांसह इतर विविध समस्यांबाबत चर्चा केली असती तर मी त्यावर समोरासमोर जावून उत्तर द्यायला तयार आहे. पण त्यांची बौध्दीत क्षमता तेवढीच आहे. त्यांना फक्त घड्याळ, दिवा, वेणी, फणी आणि साडीच दिसणार असा सवाल केला.महापौर आरोग्य निधी महापौरांनी अडवला अशाप्रकारचा आरोप केला जात असला तरी प्रत्यक्षात जे अर्ज प्राप्त झाले आहेत, ते साडेचार वर्षांतील आहेत. त्यातील किती रुग्ण दाखल आहेत याची माहिती घेणे आवश्यक आहे. सध्या ३० लाख रुपयांचा निधी असला तरी प्रत्येक रुग्णाला निधी मंजूर करताना अर्जदार रुग्ण रुग्णालयात दाखल आहे का याची तपासणी करा, आणि त्यानंतरच अत्यावश्यक रुग्णांच्या आर्थिक मदतीचे अर्ज निकालात काढूया अशाप्रकारचे निर्देश संबंधित खात्याला दिले आहेत. महापौर निधी वाढवण्यासाठी आपला प्रयत्न सुरु असून हार फुले तसेच पुष्पगुच्छ यांच्यासाठी होणार खर्च या महापौर निधीत जमा होण्यासाठी क्यू आर कोडची सुविधाही देण्यात आली आहे.जेणेकरून महापौर निधी वाढवण्याचा प्रयत्न केला जाईल.सभागृहनेते गणेश खणकर यांनी यापूर्वी महापौरांच्या वाहनांवर लाल दिवा बसवण्याबाबत यापूर्वीच्या महापौरांचे काय म्हणणे याचे दाखले दिले. आम्ही ज्याप्रकारे कामाची धडका लावला आहे, त्यामुळे विरोधकांच्या उरात धडकी भरली आहे. त्यामुळे त्यांच्या मतपेटीला धक्का लागत असल्यामुळे त्यांच्याकडून अशाप्रकारचे आरोप होत आहे. पण बांग्लादेशी आणि रोहिंग्यांविरोधातील कारवाई यापुढेही सुरुच राहिल. जे फेरीवाले आहे त्यांच्यावर कारवाई होणारच आहे. आम्ही कुणाच्या दबावात येत नसून कंत्राटदारांची साखळी तोडली जात असल्यामुळे ते अस्वस्थ झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या आडून तर हा प्रयत्न होत नाही ना असा प्रश्न आम्हाला पडत असल्याचे गणेश खणकर यांनी स्पष्ट केले. आमची बांधिलकी मुंबईकरांशी आहे आणि त्यानुसारच आम्ही मुंबईकरांना सेवा देण्यासाठी काम करत राहू. राहिला मुद्दा लाल दिवा हा प्रश्न प्रशासनाशी निगडीत आहे. तो प्रश्न त्यांनी सोडवावा,असे त्यांनी सांगितले.
Ladakh: लद्दाखच्या लोकांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आमच्याकडे आंदोलन सुरू ठेवण्याशिवाय पर्याय नाही. लद्दाखचे खासदार मोहम्मद हनीफा जान हेही सोमवारी कारगिलमधील रॅलीत सहभागी झाले.
Cidco Water : नवी मुंबई आणि पनवेलमधील पाणीटंचाईवरून आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधानसभेत सिडकोला धारेवर धरले.
Shivam Dube Video : आता पुन्हा एकदा तो चर्चेत आला असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मुंबई: एस.टी. कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी राज्याचे परिवहन मंत्री तथा एस.टी. महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी विधानभवन येथे महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत कर्मचारी संघटनांनी मांडलेल्या तक्रारी व मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्या टप्प्याटप्प्याने मार्गी लावण्यासाठी प्रशासनाला आवश्यक निर्देश देण्यात आले. तसेच एसटीच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना यापुढे पत्नीसह वर्षभर मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती मंत्री सरनाईक यांनी दिली.एसटी महामंडळात कार्यरत असलेल्या सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाने चालक-वाहकांवरील कारवाई, आगार व्यवस्थापनातील अडचणी तसेच काही प्रशासकीय प्रक्रियांमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांकडे मंत्री महोदयांचे लक्ष वेधले होते. या पार्श्वभूमीवर संघाचे अध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत तसेच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत मंत्री सरनाईक यांनी सकारात्मक चर्चा केली. कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा हीच महामंडळाची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.विधानभवनातील दालनात झालेल्या या बैठकीत एस.टी. महामंडळाचे कामकाज अधिक पारदर्शक व प्रवासी तसेच कर्मचारी हिताचे करण्यावर विशेष भर देण्यात आला.३ वर्षांपेक्षा जास्त काळ एकाच ठिकाणी कार्यरत असलेल्या पर्यवेक्षक व अधिकाऱ्यांच्या बदल्या
LPG Tanker Shivalik: ‘शिवालिक’एलपीजी टँकर मुंद्रा बंदरात दाखल; ‘नंदादेवी’भारताच्या दिशेने मार्गस्थ
LPG Tanker Shivalik: जहाजबांधणी मंत्रालयाचे विशेष सचिव राजेश कुमार सिन्हा यांनी शनिवारी दिलेल्या माहितीनुसार, शिवालिक आणि नंदादेवी या दोन्ही जहाजांमध्ये मिळून ९२ हजार ७०० मेट्रिक टन एलपीजी वायू आहे.
Jitendra Awhad: जातीच्या भिंती तोडायच्या असतील तर मुलगी दुसऱ्या धर्मात द्यायला हरकत नाही, असे सांगत आव्हाड यांनी स्वतःच्या मुलीच्या लग्नाचा दाखला दिला. माझी मुलगी मी ख्रिश्चन घरात दिली. काही मिशनऱ्यांचे रस्त्यावरच्या मुलांना शाळेत आणण्याचे योगदान आहे, असे ते म्हणाले.
मृणालताई गोरे विस्तारित उड्डाणपूल एप्रिलपर्यंत होणार वाहतूकीसाठी खुला
मुंबई: मृणालताई गोरे रेल्वे उड्डाणपुलाला जोडणाऱ्या राम मंदिर रोड ते गोरेगाव पश्चिम पर्यंतच्या रिलीफ रोड पर्यंत विस्तारित पुलाच्या कामाचा खर्च तब्बल ४० कोटींनी वाढला गेला. आतापर्यंत या विस्तारित पुलाच्या वाढीव खर्च तीन वेळा वाढवला गेला आहे. २०९ कोटी रुपयांवरून या प्रकल्पाचा खर्च २४८ कोटी रुपयांवर पोहोचला गेला आहे. या पुलाचे काम आता पूर्णत्वास आले असून ३० एप्रिल २०२६ पर्यंत ही कामे पूर्ण होऊन प्रत्यक्ष वाहतुकीसाठी हा मार्ग खुला होणार आहे.महापालिकेच्या पुल विभागामार्फत या विस्तारित पुलाच्याकाम हाती घेण्यात आले आहे. या पुलाच्या कामाला २०१८ मध्ये मंजुरी प्राप्त झाली होती आणि २२ मार्च २०१९ मध्ये या कामाला सुरुवात झाली आहे. या कामासाठी एम इ पी एल - ग्यान या संयुक्त भागीदारीत कंपनीची निवड करण्यात आली होती.सुरुवातीला या प्रकल्पाची कंत्राट खर्च सुमारे २०९ कोटी रुपये एवढा होता. होती. पावसाला वगळता २४ महिन्यांचा कालावधीत हे काम पूर्ण करणे अपेक्षित होते.पण पुढे कोविडचा आजार यांमुळे काम थांबले आणि पुढे २०२३ मध्ये याचा वाढवण्याचा प्रस्ताव सादर करून विविध करांसह २०९ कोटींवरून याचा खर्च २४० कोटी रुपये एवढा करण्यास मान्यता देण्यात आली. महापालिका पूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कामाला प्रत्यक्ष सुरुवात केल्यानंतर काही तांत्रिक अडचणी व अतिरिक्त कामांची गरज निर्माण झाली. त्यामुळे प्रशासकीय मंजुरी घेऊन कंत्राट रकमेत सुधारणा करण्यात आली असून कामाचा कालावधीही वाढवण्यात आला आहे. सध्या या प्रकल्पाचे सुमारे ८० टक्के काम पूर्ण झाले असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. सुधारित कालावधीनुसार हे काम ३० एप्रिल २०२६ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.मृणाल गोरे रेल्वे उड्डाणपुलाचा मुख्य पूल २०१६ मध्ये वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. सध्या या पुलाच्या दोन्ही बाजूंना सुमारे ३९० मीटर लांबीचा ‘आर्म’ पूल उभारण्याचे काम सुरू आहे. यामुळे परिसरातील वाहतूक अधिक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. तसेच पुलाच्या बांधकामासोबत पादचारी सुविधा, रंगकाम, सुरक्षा उपाययोजना आणि ध्वनिरोधक भिंती (नॉईज बॅरिअर) उभारण्याचाही प्रस्ताव आहे.या अतिरिक्त कामांमुळे प्रकल्पाच्या खर्चात वाढ झाली असून विविध करांसह हा खर्च एकूण २४८ कोटी रुपयांवर जाऊन पोहोचला आहे.या प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर मृणालताई गोरे पुलाच्या मार्गातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
Ambadas Danve : “कापून टाकू, ठोकून काढू!”अंबादास दानवेंना मध्यरात्री जीवे मारण्याची धमकी
Ambadas Danve : शिवसेना नेते अंबादास दानवे यांना अज्ञात क्रमांकावरून सतत धमकीचे फोन येत आहेत.
Nevasa: या प्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास तपासी अंमलदार संदीप ढाकणे हे करत आहेत.
Vaibhav Suryavanshi : या कार्यक्रमात राजस्थान रॉयल्सचा माजी कर्णधार संजू सॅमसनने आयपीएलमधील उदयोन्मुख तारा वैभव सूर्यवंशी याच्याबद्दल एक मजेशीर आणि प्रेरणादायी किस्सा शेअर केला.
Jamkhed News :

30 C