श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात न्यूझीलंडचा विजय
कोलंबो : आर. प्रेमदासा स्टेडियम येथे आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमधील सुपर ८ फेरीतल्या श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात न्यूझीलंडचा ६१ धावांनी विजय झाला. या सामन्यात नाणेफेक जिंकून श्रीलंकेने गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडने २० षटकांत सात बाद १६८ धावा केल्या. धावांचा पाठलाग करणाऱ्या श्रीलंकेला २० षटकांत आठ बाद १०७ धावा करणेच जमले. न्यूझीलंडचा रचिन रवींद्र सामनावीर झाला, त्याने श्रीलंकेच्या चार फलंदाजांना बाद केले तसेच न्यूझीलंडसाठी ३२ धावांचे योगदान दिले.श्रीलंकेची हाराकिरीन्यूझीलंडने दिलेल्या आव्हानाला सामोऱ्या जात असलेल्या श्रीलंकेच्या फलंदाजांनी हाराकिरी केली. त्यांचा एक फलंदाज शून्यावर बाद झाला तर पाच फलंदाजांनी १० पेक्षा कमी धावा केल्या. पथुम निस्सांकाने शून्य, कुसल मेंडिसने ११, चरिथ असलंकाने ५, पवन रथनायकेने १०, कामिंडू मेंडिसने ३१, दासुन शनाकाने ३, दुषण हेमंथने ३, डुनिथ वेलागेने २९, दुष्मंथ चामीराने नाबाद ७, महेश थीकशनने नाबाद १ धावांचे योगदान दिले. न्यूझीलंडकडून रचिन रवींद्रने ४, मॅट हेन्रीने २, मिचेल सँटनरने १ आणि ग्लेन फिलिप्सने १ विकेट घेतली. मॅट हेन्रीने दोन पैकी एक निर्धाव षटक टाकले आणि फक्त ३ धावा देत सलामीवीर पथुम निस्सांकाला शून्य धावांवर त्रिफळाचीत केले तसेच चरिथ असलंकाला पाच धावांवर डॅरिल मिशेलकरवी झेलबाद केले.https://prahaar.in/2026/02/25/sri-lankas-disappointing-start-as-they-chase-down-new-zealands-challenge/न्यूझीलंडची फलंदाजीप्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडकडून कर्णधार मिचेल सँटनरने सर्वाधिक ४७ धावा केल्या. त्याने २६ चेंडूत ४ षटकार आणि २ चौकार मारले. किवींकडून टिम सेफर्टने ८, फिन ऍलनने २३, रचिन रवींद्रने ३२, ग्लेन फिलिप्सने १८, डॅरिल मिशेलने ३, मार्क चॅपमनने शून्य, मिचेल सँटनरने ४७, कोल मॅककोन्चीने नाबाद ३१ धावा केल्या. श्रीलंकेकडून महेश थीकशनने ४ षटकांत ३० धावा देत ३ बळी घेतले तर दुष्मंथा चामीराने ४ षटकांत ३८ धावा देत ३ बळी घेतले. डुनिथ वेलागेने ४ षटकांत २७ धावा देत एक बळी घेतला.
Zilla Parishad Politics : भाजप-राष्ट्रवादी एकत्र; शिंदेसेनेला डच्चू? सत्तेचा नवा फॉर्म्युला
Zilla Parishad Politics : रायगड जिल्हा परिषदेत भाजपने शिंदेसेनेला बाजूला सारत अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी हातमिळवणी केल्याची चर्चा आहे.
Assam
Stock Market: कृत्रीम बुद्धिमत्तेचा आयटी कंपन्यांच्या कामकाजावर नकारात्मक प्रभाव पडण्याच्या शक्यतेमुळे गुंतवणूकदारांनी गेल्या काही आठवड्यात माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या शेअरची एकतर्फी विक्री केली.
Hanumant Pawar : काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांना पोलीस संरक्षण
Hanumant Pawar : पुणे पोलिसांनी काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांना पोलीस संरक्षण (गनमॅन) दिले आहे
US Income Tax: अमेरिकेने लावलेले आयात शुल्क परदेशी कंपन्या भरतील. यामुळे आधुनिक जगातील प्राप्ती कर संकल्पना अमेरिकेसाठी संपुष्टात येईल.
मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; तिघे जखमी, दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान
रायगड : माणगाव पोलीस ठाणे हद्दीत मुंबई-गोवा महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात तिघे जखमी झाले असून दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना ढालघर फाटा येथे घडली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे रा. कामेरी, ता. वाळवा, जि. सांगली येथील असून ते त्यांच्या ताब्यातील आयशर ३०१८ टेम्पो (क्र. एमएच १० डीटी ८३२७ ) हा सांगली ते अलिबाग असा मुंबई-गोवा महामार्गावरून माणगावच्या दिशेने चालवीत होते. अपघातस्थळी पोहोचताच समोरून येणारी मारुती सुझुकी वॅगनर (क्र. एमएच ०४ एचएफ ५६१३ ) ही कार अचानक रस्त्याच्या विरुद्ध दिशेला आली.सदर कार चालक (रा. ठाणे) याने वाहन अविचाराने, हयगयीने व बेदरकारपणे चालवून रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष केल्याने कार थेट टेम्पोवर आदळली. या धडकेत कारमधील चालकासह अन्य दोन प्रवाशांना किरकोळ व गंभीर स्वरूपाच्या दुखापती झाल्या. जखमींना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच माणगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तत्काळ पंचनामा करून वाहतूक सुरळीत केली.या प्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात गु.र.नं. ५३ /२०२६ अन्वये मोटार वाहन अधिनियम १९८८ चे कलम १८४ तसेच भा.न्या.स. कलम २८१ , १२५ (अ), १२५ (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सफौ/निमकर करीत आहेत.या अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वेगमर्यादा व सुरक्षित वाहनचालना याबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम पाळून दक्षतेने वाहन चालवावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
न्यूझीलंडने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेची निराशाजनक सुरुवात
कोलंबो : आर. प्रेमदासा स्टेडियम येथे आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमधील सुपर ८ फेरीतला श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड हा सामना सुरू आहे. या सामन्यात न्यूझीलंडने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेची निराशाजनक सुरुवात झाली.नाणेफेक जिंकून श्रीलंकेने गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडने २० षटकांत सात बाद १६८ धावा केल्या. धावांचा पाठलाग करणाऱ्या श्रीलंकेला पहिल्या पाच षटकांत दोन धक्के बसले. सलामीवीर पथुम निस्सांका पहिल्याच चेंडूवर बाद झाला. मॅट हेन्रीने त्याला शून्यावर त्रिफळाचीत केले. नंतर तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर मॅट हेन्रीनेच चरिथ असलंकाला डॅरिल मिशेलकरवी झेलबाद केले. चरिथ असलंका नऊ चेंडूत फक्त पाच धावा करून परतला.याआधी प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडकडून कर्णधार मिचेल सँटनरने सर्वाधिक ४७ धावा केल्या. त्याने २६ चेंडूत ४ षटकार आणि २ चौकार मारले. किवींकडून टिम सेफर्टने ८, फिन ऍलनने २३, रचिन रवींद्रने ३२, ग्लेन फिलिप्सने १८, डॅरिल मिशेलने ३, मार्क चॅपमनने शून्य, मिचेल सँटनरने ४७, कोल मॅककोन्चीने नाबाद ३१ धावा केल्या. श्रीलंकेकडून महेश थीकशनने ४ षटकांत ३० धावा देत ३ बळी घेतले तर दुष्मंथा चामीराने ४ षटकांत ३८ धावा देत ३ बळी घेतले. डुनिथ वेलागेने ४ षटकांत २७ धावा देत एक बळी घेतला.
Solar energy sector shares: ट्रम्प प्रशासनाने भारतीय सौर ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांच्या उत्पादनावर भरमसाठ शुल्क लावले असले तरी त्याचा भारतातील कंपन्यांच्या कामकाजावर किंवा महसुलावर कसलाही परिणाम होणार नसल्याचे या कंपन्यांनी स्पष्ट केले आहे.
Woman Missing : राज्यातून दररोज सरासरी 132 महिला बेपत्ता; महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
राज्यातील महिला आणि बालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून बेपत्ता (Woman Missing) होणाऱ्या महिलांच्या आकड्यांनी धडकी भरवली आहे. एका वर्षात तब्बल 48 हजार 278 महिला बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली.
GCC: अमेरिकन कंपन्यांनी भारतात केली ‘इतकी’मोठी गुंतवणूक; आकडा ऐकून थक्क व्हाल!
GCC: अमेरिकेतील कंपन्या जीसीसीसाठी भारतात प्रयत्न करीत असताना युरोप आणि ब्रिटनमधून मॅन्युफॅक्चरिंग, बीएफएसआय, अभियांत्रिकी इत्यादी क्षेत्रातील कंपन्या कार्यालयासाठी या शहरातील जागा भाड्याने घेण्याचे प्रमाण वेगाने वाढत आहे.
काँग्रेसला मोठा धक्का; दोन सख्ख्या भावांचा पक्षाला रामराम, ‘या’पक्षात करणार प्रवेश
Maharashtra Politics News : चंद्रपूर जिल्ह्यातील काँग्रेसचे मोठे नेते अविनाश वारजुकर आणि सतीश वारजुकर यांनी पक्षाचा राजीनामा दिला असून ते आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
ST employees: एसटी कर्मचाऱ्यांच्या खात्यात थकीत वेतनवाढीचा हप्ता जमा; शासनाने केली 100 कोटींची तरतूद
ST employees: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती; राज्य शासनाकडून १०० कोटींचा निधी तातडीने उपलब्ध
Rohit Pawar : अखेर ! व्हीएसआर व्हेंचर्सविरुद्ध तक्रार दाखल; रोहित पवारांच्या मागणीची घेतली दखल
बारामती येथे झालेल्या विमान अपघातात तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूबाबत व्हीएसआर व्हेंचर्स आणि त्यांच्या संचालकांविरुद्ध आमदार रोहित पवार यांनी केलेल्या तक्रारीवरून मुंबई पोलिसांनी तक्रार दाखल केली.
...तरच भारत सेमी फायनल खेळू शकेल
मुंबई : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये सुपर ८ फेरीचे सामने सुरू आहेत. ग्रुप एक मध्ये वेस्ट इंडिज (धावगती +५,३५०) पहिल्या, दक्षिण आफ्रिका (धावगती +३,८००) दुसऱ्या, भारत (धावगती -३,८००) तिसऱ्या आणि झिम्बाब्वे (धावगती -५.३५०) चौथ्या क्रमांकावर आहे. वेस्ट इंडिजने झिम्बाब्वे विरुद्धचा सामना १०७ धावांनी तर दक्षिण आफ्रिकेने भारताविरूद्धचा सामना ७६ धावांनी जिंकला आहे. आता गुरुवार २६ फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सामना होणार आहे. हा सामना दक्षिण आफ्रिकेने जिंकला आणि भारताने त्याच दिवशी संध्याकाळी सात वाजताच्या सामन्यात झिम्बाब्वेचा पराभव केला तर भारताच्या सेमी फायनल खेळण्याच्या आशा जिवंत राहतील. भारताला झिम्बाब्वेविरुद्ध जिंकल्यानंतर रविवार १ मार्च रोजी वेस्ट इंडिज विरुद्धची मॅच पण जिंकावी लागेल. वेस्ट इंडिजचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभव तसेच भारताचा झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज या दोन संघांविरुद्ध विजय झाला तर टीम इंडिया सेमी फायनलमध्ये खेळू शकेल. यातील एखादा निकाल वेगळा लागला तरी भारताचे सेमी फायनल खेळण्याचे स्वप्न धूसर होण्याची शक्यता आहे.टीम इंडियाला सेमीफायनलमध्ये आपली जागा निश्चित करण्यासाठी झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागेल. त्याचबरोबर भारतीय संघाची हीदेखील इच्छा असेल की, दक्षिण आफ्रिकेच्या संघाने सुपर ८ मधील आपले सर्व सामने जिंकावेत, अन्यथा गणित बिघडू शकते. भारताने याआधी २०२४ मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वात आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकप जिंकला होता.
अनिल अंबानींचे मुंबईतील करोडो रुपयांचे निवासस्थान ईडीकडून जप्त
मुंबई : रिलायन्स अनिल धीरूभाई अंबानी ग्रुपचे (रिलायन्स एडीए ग्रुप) चेअरमन अनिल अंबानी यांचे अॅबोड निवासस्थान अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जप्त केले आहे. मनी लाँडरिंग विरोधी कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. याची किंमत ₹३,७१६ कोटी आहे, अशी माहिती मिळत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील पाली हिल परिसरात हे भव्य ६६ मीटर उंच आणि १७ मजली आहे. त्यांच्या समूह कंपनी, रिलायन्स कम्युनिकेशन्सशी (आरकॉम) संबंधित बँक फसवणूक प्रकरणाच्या संदर्भात बहुमजली घर जप्त करण्यासाठी मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) तात्पुरता आदेश जारी करण्यात आला आहे. अंबानी दुसऱ्या फेरीच्या चौकशीसाठी येथील तपास संस्थेसमोर हजर राहण्याची अपेक्षा आहे. ऑगस्ट २०२५ मध्ये त्यांनी ईडीसमोर पहिल्यांदा साक्ष दिली होती. मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पीएमएलए) त्यांचा जबाब नोंदवण्यात आला. नवीन आदेशामुळे या प्रकरणात जप्त केलेल्या मालमत्तेचे एकूण मूल्य अंदाजे १५,७०० कोटी रुपयांवर पोहोचले आहे.अनिल अंबानींसाठी हा एक मोठा धक्का आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते व्यवसायात अडचणीत आहेत. ईडीच्या या कारवाईमुळे त्यांच्या अडचणी आणखी वाढू शकतात.मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी त्यांच्या आणि रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेडच्या बँक खात्यांना फसवे म्हणून वर्गीकृत करण्याच्या कार्यवाहीला स्थगिती देणारा एकल न्यायाधीशांचा अंतरिम आदेश रद्द केला. मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंखर यांच्या खंडपीठाने डिसेंबर २०२५ मध्ये दिलेल्या एकल खंडपीठाच्या अंतरिम आदेशाविरुद्ध तीन सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि अकाउंटिंग कन्सल्टन्सी फर्म बीडीओ इंडिया एलएलपी यांनी दाखल केलेल्या अपीलांना परवानगी देताना हा निर्णय दिला.
Haryana Secretariat: घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. चंदीगड पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून, याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
केंद्र सरकारने नव्याने लागू केलेल्या जी-रामजी योजनेच्या अंमलबजावणीबाबत राज्य सरकारने भूमिका स्पष्ट केली आहे. या योजनेची राज्यात अंमलबजावणी करताना जुन्या सर्व संबंधित योजनांचा त्यात समावेश केला जाईल.
मुंबई महापालिकेचा महसूल वाढवण्यासाठी प्रशासनाचा पुढाकार
ग्रीन ब्राँड्ससह सदनिकांची विक्री, करमणूक शुल्क, भूखंडाचा लिलावातून वाढवणार महसूलाची रक्कममुंबई (विशेष प्रतिनिधी) :शाश्वत विकासासाठी महानगरपालिका बाँडस् निर्गमित करण्याबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून केंद्रीय अर्थमंत्री यांनी अर्थसंकल्प २०२६ मध्ये अमृत २.० मिशन अंतर्गत अनुदानासह एकाच वेळी निर्गमित केलेल्या ११,००० कोटीच्या महानगरपालिका बाँड करता १०० कोटी एवढे अनुदान जाहीर केले आहे . महानगरपालिकेने क्रेडीट रेटींग एजन्सी नियुक्त करण्याची प्रक्रिया यापूर्वीच सुरु केली असून शाश्वत विकासाकरिता निधी उपलब्ध करण्यासाठी महानगरपालिका ग्रीन बाँडस् निर्गमित करण्याची पुढील प्रक्रिया सुरु करण्यात असल्याची घोषणा महापालिका आयुक्त डॉ भूषण गगराणी यांनी केली आहे .मुंबई महानगरपालिकेने ग्रीन बाँडस निर्गमित करण्याचे योजिले आहे. हा उपक्रम भारताच्या शाश्वत विकास उहिष्टांशी तसेच नेट झिरो या ध्येयाशी सुसंगत असून मुंबईच्या वातावरण कृती आराखड्याची अंमलबजावणी सुलभ होईल. यामुळे, पर्यावरणीय, सामाजिक व प्रशासकीय या बाबींवर लक्ष केंद्रीत करणारे संस्थात्मक गुंतवणूकदार आकर्षित होतील,असे आयुक्तांनी नमुद केले आहे.भाडेतत्वावरील भूखंडावरील पुनर्विकासाच्या अतिरिक्त एफएसआयमधून महसूलमुंबई महानगरपालिकेच्या मक्त्याने दिलेल्या भूभागावरील इमारतींच्या पुनर्विकासातून अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) / हस्तांतरणीय विकास हक्क (टीडीआर) / फंजिबल चटई क्षेत्र निर्देशांक (फंजिबल एफएसआय) यापोटी निवासी वापरासाठी घेतले जाणारे एक वेळ अधिमूल्य ५ टक्के वरुन ७.५ टक्के तसेच अनिवासी वापरासाठी १० टक्के वरुन १२.५ टक्के इतके वाढविण्यात आले आहे. ही सुधारणा केल्यामुळे महापालिकेचा महसूल वाढला जात असून यामुळे महानगरपालिकेच्या मक्त्याने दिलेल्या भूभागाच्या पुनर्विकासातून मोठ्या प्रमाणात महसूल प्राप्त होणे अपेक्षित आहे. , सन २०२५-२६ मध्ये, प्रचलित धोरणाच्या तुलनेत २६ कोटी एवढा अतिरिक्त महसूल प्राप्त झाला आहे.सदनिका विक्रीतून ११५० कोटींची अपेक्षाविकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली २०३४ अंतर्गत निवासी सदनिकांची ऑनलाईन सोडत प्रणालीद्वारे महानगरपालिकेला ४२६ सदनिका प्राप्त झाल्या आहेत. म्हाडाच्या धर्तीवर, अत्यल्प व अल्प उत्पन्न गटाकरिता सदर सदनिका ऑनलाईन सोडत प्रणालीद्वारे विक्री करण्यात येणार आहे . ऑनलाईन सोडत यशस्वीरित्या पार पडली असून त्यानंतरचे वाटप व विक्रीची प्रक्रिया सुरु आहे. या सोडत निकालांनुसार, एकूण २,१५१ पात्र अर्जदारांपैकी ३७३ अर्जदारांना यशस्वी/विजेते ठरविण्यात आले असून ३६२ अर्जदारांची निवड करुन त्यांना प्रतिक्षा यादीत ठेवण्यात आले आहे. सदनिकांची विक्री करण्यासाठी ऑनलाईन सोडत पद्धतीचा उपक्रम राबविण्याची मुंबई महानगरपालिकेमधील ही पहिलीच वेळ आहे. यामधून सन २०२५-२६ च्या सुधारित अंदाजामध्ये सुमारे १३०० कोटी आणि सन २०२६-२७ च्या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये ₹१०० कोटी एवढा महसूल प्राप्त होण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे परवडणाऱ्या घरांच्या उद्दीष्टाला चालना देण्याबरोबरच महानगरपालिकेच्या आर्थिक विकासाला योगदान मिळेल. असा विश्वास व्यक्त केला. महानगरपालिकेला अंदाजे २९६ सदनिका प्राप्त होणे अपेक्षित आहे. या सदनिका विद्यमान धोरणानुसार खुल्या बाजारात विक्री करुन त्यामधून सुमारे ११५० कोटी इतका अतिरिक्त महसूल प्राप्त होणे अपेक्षित आहे.भाडेतत्वावरील भूखंड लिलावातून १३४८ कोटी रुपयांचा महसूलमहानगरपालिकेने छत्रपती शिवाजी महाराज मंडई, मुंबई व अस्फाल्ट प्लांट, वरळी येथील भूखंडांच्या अनुक्रमे ३६९ कोटी रुपये व ७८३ कोटी रुपये एवढ्या किंमतीच्या लिलावाची प्रक्रिया पूर्ण केली आहे. . या व्यतिरिक्त, लोअर परळ विभागातील भू.क्र.१५४६ या मुंबई महानगरपालिकेच्या भूखंडाचा १३४८ कोटी रुपये एवढ्या मूळ तथा आधारभूत किंमतीने लिलाव करण्याकरिता निविदा प्रसारित करण्यात आली असल्याचे आयुक्तांनी नमुद केले आहे.इन्फ्रास्ट्रक्चर इंव्हेंस्टमेंट ट्रस्टमुंबई हानगरपालिकेचा आपल्या महसूल निर्माण करणाऱ्या मालमत्तांचे मुद्रिकरण करूनइन्फ्रास्ट्रक्चर इंव्हेंस्टमेंट ट्रस्टच्या माध्यमातून महत्वाच्या भांडवली प्रकल्पांसाठी निधी उभारण्याचा मानस आहे. याद्वारे रस्ते, महानगरपालिका मंडया, वाहनतळ, व्यावसायिक जागा इत्यादी उत्पन्न देणाऱ्या पायाभूत मालमत्तांचे मालकत्व व संचलन करुन या माध्यमातून कर्ज न वाढवता किरकोळ तसेच संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून निधी उभारला जाईल. हा निधी नवीन मालमत्तेची खरेदी, विद्यमान कर्जाची परतफेड व प्रगतीपथावरील मोठे भांडवली प्रकल्प पूर्ण करण्यासाठी वापरण्यात येईल.करमणूक कराची आठ वर्षांनंतर होणार आकारणीमहाराष्ट्र करमणूक शुल्क अधिनियमात केलेल्या सुधारणेच्या अनुषंगाने, यापूर्वी राज्य शासनाकडून आकारला जाणारा करमणूक कर तथा शुल्क गोळा करण्याची जबाबदारी स्थानिक प्राधिकरणांवर सोपविण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत करमणूक शुल्कातून दिलेली सूट ही १६ सप्टेंबर २०१७ पासून ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत सुरु ठेवण्यात आली आहे. या सवलतीच्या कालावधीनंतर मुंबई महानगरपालिकेमार्फत करमणूक कर वसूल करण्याबाबत अधिसुचना निर्गमित करण्याबाबतचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाकडे सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावास शासनाची मान्यता प्राप्त झाल्यानंतर, अधिसूचना प्रसिध्द होईल त्या तारखेपासून करमणूक शुल्काची वसूली करण्यात येईल.,असे आयुक्तांनीआपल्या अर्थसंकल्पीय भाषणात नमूद केले.
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विधानभवन येथे जावे विनोदाच्या गावाया कार्यक्रमाचे विशेष आयोजन
श्रेष्ठ लेखकांच्या साहित्यकृतींचे अभिवाचनलोकसेवेचा लोकजागर ग्रंथाचे प्रकाशनमुंबई : महाराष्ट्र विधानमंडळातील मध्यवर्ती सभागृहात यंदाच्या मराठी भाषा गौरव दिनी म्हणजेच २७ फेब्रुवारी, २०२६ रोजी जावे विनोदाच्या गावा या विशेष कार्यक्रमाचे आयोजन तसेच वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्रातर्फे संपादित लोकसेवेचा लोकजागर या ग्रंथाचे प्रकाशन होणार आहे. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज तथा वि.वा.शिरवाडकर यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषेची गौरवशाली परंपरा जपण्यासाठी व तिचे संवर्धन करण्यासाठी मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातर्फे दिनांक २७ फेब्रुवारी, २०२६ रोजी सकाळी १०.०० ते ११.४५ यावेळेत जावे विनोदाच्या गावा या कार्यक्रमाचे संयोजन मा. प्रा. राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधानपरिषद, मा. ॲड. राहुल नार्वेकर, अध्यक्ष महाराष्ट्र विधानसभा, मा. डॉ. नीलम गोऱ्हे, उप सभापती महाराष्ट्र विधानपरिषद आणि मा. श्री अण्णा बनसोडे, उपाध्यक्ष महाराष्ट्र विधानसभा यांच्या संकल्पनेनुसार करण्यात आले आहे.याप्रसंगी वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्रातर्फे संपादित लोकसेवेचा लोकजागर या ग्रंथाचे प्रकाशन माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते आणि सर्व महनीय व्यक्तींच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मा. उप मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, मा. उप मुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार, मा. संसदीय कार्य मंत्री श्री. चंद्रकांत (दादा) पाटील, मा. मराठी भाषा मंत्री श्री. उदय सामंत, विधिमंडळ मराठी भाषा समिती प्रमुख श्री. आशुतोष काळे यांच्या सन्मान्य उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे.जावे विनोदाच्या गावा या कार्यक्रमात अभिजात मराठी साहित्यातील विनोदाचे दालन उलगडले जाईल त्याचप्रमाणे आचार्य अत्रे व पु.ल. देशपांडे : विनोदाची दोन शिखरे या विषयावर वक्ते मिलिंद जोशी, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद हे संवाद साधतील. कार्यक्रम संकल्पना उत्तरा मोने यांची असून केदार शिंदे, हृषिकेश जोशी, श्रीरंग भावे, अदिती प्रभुदेसाई, धनश्री दामले यांचा अभिवाचक आणि गायक म्हणून सहभाग असेल. मराठीतील श्रेष्ठ लेखकांच्या अभिजात साहित्याचे यावेळी अभिवाचन तसेच मराठी गीतांचे सादरीकरण यावेळी होईल. या कार्यक्रमास दोन्ही सभागृहांचे सन्माननीय सदस्य, अधिवेशन वार्तांकनासाठी उपस्थित पत्रकार अशा सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातर्फे करण्यात आले आहे
कॅबिनेट मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांनी मानले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे आभारब्रिटिशांच्या आठवणी पुसून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे बेलासीस पुलाला नावदक्षिण मुंबईतील बेलासिस पुलाचे नाव बदलण्यासाठी मंत्री लोढा यांनी केला होता पाठपुरावामुंबई : राज्याचे कौशल्य विकास तथा मुंबईचे सह पालकमंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांच्या प्रयत्नांना यश आले असून दक्षिण मुंबईतील बेलसिस पुलाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी घेतला आहे. यासंदर्भात मंत्री लोढा यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत.ब्रिटिशांच्या खुणा सांगणाऱ्या या पुलाचे नाव मेजर जनरल जॉन बेलासिस असे होते. हे नाव बदलण्यासाठी मंत्री लोढा यांनी सातत्याने मुंबई महापालिकेकडे तसेच राज्य सरकारकडे पाठपुरावा केला होता. मुख्यमंत्री फडणवीस यांनीही या मागणीला मान्यता देऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा सन्मान केला आहे.मोडकळीला आलेल्या या पुलाची पुनर्बांधणी आता पूर्ण झाली असून माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते गुरुवार २६ फेब्रुवारी रोजी ऑनलाईन या पुलाचे उद्घाटन होणार आहे. यासंदर्भात आनंद व्यक्त करताना मंत्री लोढा म्हणाले की, आदरणीय प्रधानमंत्री श्री नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार भारताच्या वसाहतकालीन भूतकाळाची आठवण करून देणाऱ्या पाऊलखुणा पुसून भारतीयत्वाचा सन्मान करणारे आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये महानगरपालिकेने मुंबईतील जुना कोर्नॅक पूल ‘सिंदूर ब्रिज’ असे नामांतरित केले होते. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर भारताने दिलेल्या प्रत्युत्तरार्थ राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’च्या स्मरणार्थ हे नामकरण करण्यात आले होते, अशी माहिती ही मंत्री लोढा यांनी दिली. दरम्यान, कौशल्य विभागानेही राज्यातील सर्व आयटीआयला थोर संत आणि महापुरुषांची नावे देण्याचा निर्णय आधीच घेतला असून त्याची अंमलबजावणी सुरू आहे.
मोठी घडामोड..! राज्यसभेसाठी भाजपचं धक्कातंत्र? बीडच्या ‘या’महिला नेत्याचं नाव चर्चेत
Maharashtra BJP : महाराष्ट्रातील ७ राज्यसभा जागांसाठी १६ मार्च रोजी निवडणूक होत असून भाजपच्या कोअर कमिटी बैठकीत प्रीतम मुंडे यांच्या नावाची चर्चा झाली आहे.
Yashwant Bank scam: मोठा घोटाळा! सातारा जिल्ह्यातील भाजप नेत्याला 2 मार्चपर्यंत पोलीस कोठडी
Yashwant Bank scam: दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने शेखर चरेगांवकर यांना २ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या अटकेमुळे सहकार क्षेत्रात आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
Narendra Modi : पंतप्रधान दबावाखाली काम करत आहेत; ‘या’नेत्याचा मोठा दावा
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी पहिल्यांदाच एकतर्फी भारत-अमेरिका व्यापार करार मंजूर केला होता आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दबावाखाली भारताने रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करणे थांबवण्याचे मान्य केले होते.
Nilesh Rane : “मुंबई -गोवा महामार्ग पूर्ण करावा”–निलेश राणे
राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणात ४,४७८कोटी रुपये रस्ते विकासासाठी उल्लेख आहे.
भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय
पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच केलेल्या एक दाव्यामुळे संपूर्ण प्रकरणाला एक नवे वळण मिळाले आहे.पुणे जिल्ह्यातल्या भिगवणमध्ये एका तरुणीचे अपहरण केल्याचा दावा केला जात होता, विशेष म्हणजे या मुलीचं लग्न दोन दिवसांवर असताना तिचं अपहरण झाल्याची माहिती समोर आली होती. लग्नाची खरेदी करुन ही तरुणी आपल्या आई आणि भावासोबत घरी जात असताना तिचं अपहरण करण्यात आलं, यावेळी तिच्या आईच्या आणि भावाच्या डोळ्यात मिरची पूड देखील टाकण्यात आली असा दावा करण्यात येत होता. या प्रकरणी हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक भूमिका घेत न्यायालयीन चौकशी ची मागणी केली. नंतर या मुलीचा एक व्हिडीओ समोर आला , ज्या व्हिडीओमध्ये बोलताना या मुलीनं मोठा दावा केला होता. मी सबंधित मुलासोबत माझ्या मर्जीने पळून आले, आमचे प्रेमसंबंध आहेत, असं या मुलीने व्हिडीओमध्ये म्हटलं होतं. त्यानंतर ते दोघेही पोलिसांसमोर हजर झाले. माझे अपहरण झाले नसून आमचे एकमेकांवर प्रेम आहे, मी माझ्या मर्जीने आल्याचे तरुणीने सांगितले होते.इंदापूर न्यायालयात सुनावणी दरम्यान मुलीची आई देखील कोर्टात उपस्तिथ होती. मला माझी मुलगी द्या... अशी गयवया केली परंतु मुलीने आईकडे न पाहता आपल्या प्रियकराकडे गेली.याप्रकरणी आता मोठा ट्विस्ट समोर आला आहे, मुलगी आईसोबत जाण्यास तयार नसल्याने हिंदुत्ववादी संघटनेनें आक्रमक पवित्र घेतला. संतप्त नागरिकांनी पुणे - सोलापूर - राष्ट्रीय महामार्ग रोखून तीव्र आंदोलन केले. प्रियकराच्या अटकेची मागणी होऊ लागली. भिगवण बंद ची हाक देण्यात आली. गावकऱ्यांनी न्यायालयाला मुलीला सुधारगृहात ठेवण्याची मागणी केली. सुधारगृहात पाच दिवस राहिल्यानंतर पुन्हा कोर्टात सुनावणी झाली. त्यावेळी मुलीला कोणाकडे जायचे असा प्रश्न पुन्हा विचारला असता अचानक मुलीने प्रियकराकडे न जाता आईकडे जाण्याची ईच्छा व्यक्त केली. त्यामुळे लोक चक्रावून गेले आहेत.
रेल्वे मार्ग शिर्डीमार्गे वळवल्यास हा अडथळा दूर होऊ शकतो का, यावरही आता विचार मंथन सुरू झाले आहे.
भाजपला धक्का..! महिला मोर्चा प्रमुखांचा बविआत जाहीर प्रवेश
Maharashtra Politics : वसई-विरार भाजपला मोठा धक्का बसला असून महिला मोर्चा प्रमुख ॲड. साधना धुरी यांनी बहुजन विकास आघाडीत (बविआ) प्रवेश केला आहे.
'मराठी भाषा गौरव दिन'आणि 'मराठी राजभाषा दिन'यात फरक काय ?
मुंबई : दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी 'मराठी भाषा गौरव दिन' आणि १ मे रोजी 'मराठी राजभाषा दिन' साजरा करतात. ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी अर्थात २७ फेब्रुवारी रोजी 'मराठी भाषा गौरव दिन' साजरा करतात. महाराष्ट्र या राज्याची स्थापना १ मे १९६० रोजी झाली आणि मराठी भाषिकांचे राज्य असलेल्या महाराष्ट्रात १ मे १९६५ पासून दरवर्षी महाराष्ट्र दिनी अर्थात १ मे रोजी मराठी राजभाषा दिन अर्थात मराठी भाषा दिन किंवा 'मराठी राजभाषा दिन' साजरा करतात.'मराठी राजभाषा दिन' साजरा करण्याबाबतचा निर्णय १९६५ मध्ये तत्कालीन वसंतराव नाईक सरकारने घेतला होता. महाराष्ट्राची राजभाषा मराठी असेल असेही वसंतराव नाईक सरकारने जाहीर केले. 'मराठी राजभाषा अधिनियम १९६४' हा ११ जानेवारी १९६५ रोजी प्रसिद्ध झाला. हाच अधिनियम पुढे कायदा म्हणून १९६६ पासून अंमलात आला.मातृभाषेचा गौरव दिनकुसुमाग्रजांची मराठी साहित्य क्षेत्रात नाटककार, कथाकार, कांदबरीकार, कवी आणि समीक्षक म्हणून ख्याती आहे. मराठीचा सन्मान वाढविण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांनी मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले. याच कारणामुळे त्यांच्या सन्मानार्थ २७ फेब्रुवारी रोजी 'मराठी भाषा गौरव दिन' साजरा करतात.
Bill Gates : बिल गेट्स यांनी दिलगिरी व्यक्त करत केला ‘हा’मोठा खुलासा
लैंगिक व्यवहारातील दोषी दलाल जेफ्री एपस्टीन याच्याशी असलेले संबंध उघड झाल्यामुळे अमेरिकेतील तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी उद्योजक आणि अब्जाधीश बिल गेट्स (Bill Gates) यांनी गेट्स फौंडेशनमधील आपल्या कर्मचाऱ्यांची माफी मागितली आहे.
सरकारी योजनांचा लाभ देणाऱ्या रुग्णालयांचा होणार गौरव
मुंबई : विविध योजनांमधून महानगरपालिकेच्या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या रुग्णसेवांवरील खर्चाच्या प्रतिपूर्तीकरिता शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून जे रुग्णालय जास्तीत जास्त प्रमाणात प्रतिपूर्तीची रक्कम प्राप्त करतील त्यांना विशेष प्रोत्साहन देऊन गौरविण्यात येईलअशाप्रकारची घोषणा महापालिका आयुक्त डॉ भूषण गगराणी यांनी व्यक्त केली.मुंबई महापालिकेच्या आरोग्य खात्यासाठभ् २०२६-२७ च्या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये महसुली अर्थसंकल्पांतर्गत एकूण १५२३७.०९ कोटी रुपये व भांडवली अर्थसंकल्पांतर्गत २२१९.७१ कोटी रुपये एवढी तरतूद करण्यात आली आहे. आरोग्य व्यवस्थेतील निरंतर प्रयत्नांद्वारे आम्ही केवळ आजारांवर उपचार करत नसून भविष्याकरिता अधिक निरोगी व आनंदी मुंबई घडवित आहोत असे गगराणी यांनी स्पष्ट केले.रुग्णालयीन नागरी सुविधा केंद्र उभारणीरुग्णालयाच्या आवारामध्ये रुग्णा व रुग्णांच्या नातेवाईकांकरिता विविध मुलभूत सुविधा जसे की स्नानगृह, शौचालय, यांत्रिक धुलाई सेवा, इत्यादी सुविधा सीएसआर मार्फत उभारण्यात येणार आहे. त्यांचे प्रचलन पे अँड पार्कच्या ' धर्तीवर करण्यात येईल. या उपक्रमाच्या क्रॉस सबसिडी मधून रुग्णालयामधील सर्व शौचालयांची सफाई मानकांच्या निकषानुसार करण्यात येईल. त्यामुळे रुग्णालयाच्या आवारामध्ये रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांकरिता उत्तम दर्जाच्या सुविधा उपलब्ध होतील,असा विश्वास गगराणी यांनी व्यक्त केला.जेनेरिक मेडिकल स्टोअर्सएनएसीओएफ संचालित संचलित जेनरिक मेडिकल स्टोअर्स मुंबई महानगरपालिकेच्या धोरणानुसार, नागरिकांना परवडणारी व गुणवत्तापूर्ण नॉन-शेड्युल औषधे उपलब्ध करून देण्यासाठी शहरातील ५० निवडक ठिकाणी नॅशनल ऍग्रीकल्चर को ऑपरेटीव्ह मार्केटींग फेडरेशन ऑफ इंडिया अर्थात एनएसीओएफ संचलित जेनरिक मेडिकल स्टोअर्स सुरु करण्यात येणार आहेत. या उपक्रमामुळे रुग्णांचा औषधांवरील खर्च कमी होईल आणि वाजवी व विश्वासार्ह नागरी आरोग्य सुविधांचे बळकटीकरण होईल.
कधी आहे नृसिंह द्वादशी ? त्या दिवशी नेमके काय करावे ?
भगवान विष्णूचा चौथा अवतार म्हणजेच भगवान नृसिंह यांची द्वादशी ही यंदा शुक्रवार २७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी दहा वाजून ३२ मिनिटांनी सुरू होत आहे आणि शनिवार २८ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री आठ वाजून ४३ मिनिटांनी संपेल. यामुळे यंदा नृसिंह द्वादशी ही शनिवार २८ फेब्रुवारी २०२६ रोजी साजरी केली जाईल. याच दिवशी नृसिंह द्वादशीचा उपवास असेल. रविवार १ मार्च २०२६ रोजी नृसिंह द्वादशीटा उपवास सोडला जाईल. उपवास सोडण्यासाठी १ मार्च रोजी सकाळी सहा वाजून २१ मिनिटांपासून ते सकाळी आठ वाजून ४१ मिनिटांपर्यंतचा काळ हा शुभ आहे.मनापासून केलेले नृसिंह द्वादशीचे व्रत लाभदायी ठरते. असे सांगतात की, हे व्रत केल्यामुळे जीवनातील भीती, चिंता आणि अडथळे दूर होतात. धाडस करण्यासाठी हिंमत वाढते. आत्मविश्वास वाढतो. जीवनात सकारात्मक ऊर्जा येते. शत्रूचा बंदोबस्त करण्यासाठी सामर्थ्य लाभते. माणूस मानसिकदृष्ट्या कणखर होतो.व्रत कसे करावे ?नृसिंह द्वादशीच्या दिवशी सूर्योदयाच्या आधी उठावे. स्नान करुन धूत वस्त्र अथवा सोवळे नेसावे. नृसिंहाच्या प्रतिमेची अथवा मूर्तीची प्रतिष्ठापना करून पूजा करावी. यानंतर, विष्णू सहस्रनाम,नृसिंह स्तोत्र, भगवान विष्णूची आरती, भगवान नृसिंहाची आरती करावी. देवाला प्रसाद दाखवून नंतर सर्वांना वाटावा आणि देवाचे स्मरण करत ग्रहण करावा.श्रीनृसिंहाची आरतीकडकडिले स्तंभ गडगडिलें गगन।अवनी होत आहे कंपायमान।तडतडलीं नक्षत्रे पडताती जाण।उग्ररूपें प्रगटे सिंहवदन।। १ ।।जय देव जय देव जय नरहरिराया।आरती ओवाळू महाराजवर्या।जय देव जय देव ।।एकविस स्वर्गमाळा डळमळली कैसी।ब्रह्मयाच्या वाटे अभिनव चित्तासी।चंद्रसूर्य दोनी लोपति प्रकाशीं।कैलासीं शंकर दचके मानसीं।। २ ।।जय देव जय देव जय नरहरिराया।आरती ओवाळू महाराजवर्या।जय देव जय देव ।।थरथरती त्या जटा जिव्हा लळलळित।तीक्ष्ण नखांनीं दैत्य तो विदारीत।अर्धांगी कमलजा शिरीं छाया धरित।माधवदासा स्वामी नरहरि शोभत।। ३ ।।जय देव जय देव जय नरहरिराया।आरती ओवाळू महाराजवर्या।जय देव जय देव ।।अस्वीकरण / Disclaimer : माहिती संकलित आहे. प्रयोग करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणे हिताचे.
देवनार येथे कचऱ्यापासून वीज निर्मितीचा प्रकल्प जून २०२६ पासून होणार सुरु
मुंबई : मुंबईतील देवनार डम्पिंग ग्राऊंडवरील येथे ६०० टन प्रतिदिन महानगरपालिका घन कचऱ्यापासून ७ मेगावॅट वीज निर्मिती प्रकल्पाच्या बांधकाम व उभारणीचे काम प्रगतीपथावर आहे. या प्रकल्पाचे काम पूर्ण होऊन आता जून २०२६ पर्यंत हा प्रकल्प कार्यान्वित होणे अपेक्षित असल्याचे महापालिका आयुक्त डॉ भूषण गगराणी यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात विश्वास व्यक्त केला.मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन खात्यांतर्गत हाती घेण्यात येणाऱ्या प्रकल्प कामांसाठी सन २०२५-२६ च्या सुधारित अंदाजामध्ये ३६४.६२ कोटी रुपयांची तरतूद केली आहे आणि सन २०२६-२७ च्या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये ५८०.८२ कोटी एवढी तरतूद करण्यात आली आहे.मुलुंड क्षेपणभूमी येथे जमीन पुनः प्रापण करणेमुलुंड डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्याची विल्हेवाट लावून जमिन पुनर्प्राप्त करण्याचे काम सुरु असून ३०. जून २०२५ पर्यंत समारे ४८.१३ लाख मेट्रीक एवढ्या जुन्या साठलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करुन त्याची विल्हेवाट लावण्यात आली. तर मार्च २०२६ पर्यंत उर्वरित सुमारे २२ लाख मेट्रीक टन कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावून डम्पिंग ग्राऊंडची सुमारे २४ हेक्टर जागा पुनः प्राप्त करण्यात येणर आहे.देवनार क्षेपणभूमी येथे बायो - सीएनजी प्रकल्पमुंबई महानगरपालिकेने देवनार डम्पिंग ग्राऊंडवर बायो-सीएनजी प्रकल्प उभारण्यासाठी महानगर गॅस लिमिटेड यांच्यासोबत सामंजस्य करार (एमओयू) केला आहे. सद्यस्थितीत, ५०० टन प्रतिदिन नागरी घन कचऱ्यापर्यंतच्या संबंधीच्या मंजूरीची प्रक्रिया सुरु आहे. हा प्रकल्प ऑक्टोबर २०२७पर्यंत कार्यान्वित होणे अपेक्षित असल्याचे गगराणी नमुद केले.बांधकाम व निष्कासन कचरा प्रकल्पमुंबई महानगरपालिकेने डायघर व दहिसर येथे बांधकाम व निष्कासन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रत्येकी ६०० टन प्रतिदिन क्षमतेचे दोन प्रकल्प उभारले आहेत. या प्रकल्पांतर्गत नोव्हेंबर २०२५ पर्यंत २.३० लाख मे.टन पेक्षा जास्त बांधकाम व निष्कासन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात आली आहे.देवनार क्षेपणभूमी येथे जैविक-शुद्धीकरणमुंबई महानगरपालिकेने देवनार डम्पिंग ग्राऊंड येथे १८५ लाख मेट्रीक टन एवढ्या जुन्या साठलेल्या कचऱ्याचे जैव-शुद्धीकरण करण्यासह खोदकामाद्वारे प्रक्रियायुक्त विलगीकरण केलेल्या साहित्याची विल्हेवाट लावून एकूण ११० हेक्टर जागा पुनःप्रापण करण्याचे काम हाती घेतले आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च ३०३५.५५ कोटी रुपये एवढा इतका असून मार्च २०२९ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित आहे.घन कचरा व्यवस्थापन प्रक्रियेचे आधुनिकीकरण आणि तांत्रिक सुधारणाविभागाची कार्यक्षमता वाढविण्यासाठी आणि आधुनिक कचरा व्यवस्थापन पध्दतींशी सुसंगत राहण्यासाठी, मुंबई महानगरपालिकेने वर्सोवा आणि गोराई येथील कचरा हस्तांतरण केंद्रांचे व्यापक आधुनिकीकरण करण्यात येणार आहे . हे काम जानेवारी २०२८ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.
अक्खा महाराष्ट्र सुन्न..! भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू; २ चिमुकल्यांचा समावेश
Ahilyanagar Accident News : अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर-संगमनेर रस्त्यावर खंडाळा गावाजवळ कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे.
President Draupadi Murmu: यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण, आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव, संत गजानन महाराज संस्थानचे विश्वस्त निळकंठ शिवशंकर पाटील, हरिहर निळकंठ पाटील यांच्यासह आयुष मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
मुंबई : युनिव्हर्सल फुटपाथ पॉलिसी' अंतर्गत अधिक पादचारी अनुकूल व दिव्यांग अनुकूल पदपथ निर्माण करण्यावर महानगरपालिका आता भर देत असून त्यानुसार, शहर, पूर्व व पश्चिम उपनगरांमध्ये काही विद्यमान पदपथांची सुधारणा व दर्जेनतीचे काम प्रायोगिक तत्वावर हाती घेण्यात येणार असल्याची घोषणा महापालिका आयुक्त डॉ भूषण गगराणी यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात केली.मुंबई महापालिकेच्यावतीने रस्ते विभागासाठी सन २०२५-२६ च्या सुधारित अंदाजामध्ये ६००० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून आगामी सन २०२६-२७ च्या अर्थसंकल्पीय अर्थसंकल्पात ६८७५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मुंबईतील सुमारे २,११८ कि.मी. रस्त्यांच्या जाळ्यांचे जबाबदारीने देखभाल व परिरक्षण केले जाते. मुंबई ही देशाचा आर्थिक कणा आणि जागतिक चेहरा असल्याने, आंतरराष्ट्रीय मानकांनुसार शाश्वत, टिकाऊ व पर्यावरणस्नेही रस्ते पायाभूत सुविधा बनविण्याच्या दिशेने सातत्याने पावले टाकत आहे.७०० कि.मी. लांबीच्या रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्याचे काम दोन टप्प्यात हाती घेण्यात आलेले आहे. त्यापैकी, ३४२ कि.मी. रस्त्यांचे काँक्रीटीकरण पूर्ण करण्यात आले असून उर्वरित रस्त्यांची कामे प्रगतीपथावर आहेत. अद्यापपर्यंत, सुमारे १,५६६ कि.मी. रस्ते/रस्त्यांच्या बाजूच्या पट्टयांची सिमेंट काँक्रीटमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. टप्पा-१ मधील ७५ टक्के आणि टप्पा-२ मधील ५० टक्के कामे पूर्ण झाली आहेत. टप्पा-१ मे २०२६ पर्यंत आणि टप्पा-२ डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजिले आहे.वाहतूक कोंडी सोडविण्याकरिता उपाययोजनारस्त्यावरील ६५ ठिकाणी सशुल्क वाहनतळे कार्यान्वित असून त्यांची एकूण वाहनक्षमता ८,२५८ एवढी आहे. याव्यतिरिक्त, ३७ ठिकाणी सार्वजनिक वाहनतळांच्या देखभालीसाठी कामे नेमून देण्यात आली आहेत.. त्यांची एकूण वाहनक्षमता २९,७६९ एवढी आहे.भूमिगत वाहनतळश्री. सिध्दिविनायक गणपती मंदिराच्या सभोवतालच्या परिसराचे सौंदर्याकरण आणि उन्नतीचे काम तीन टप्प्यात करण्याचे नियोजित आहे. पहिल्या टप्पातील इतर कामांसोबतच तळपरात २ मजले भूमिगत वाहनतळ सुविधा उभारण्याच्या कामाचांही समावेश आहे. या भूमिगत वाहनतळ संकल्पना प्रथमतः जी/उत्तर विभागामध्ये राबविण्यात येणार असून त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर विभागातही ही संकल्पना राबविण्यातत येणार आहेस्मार्ट वाहनतळ प्रकल्पमुंबईमध्ये सुव्यवस्थित वाहतूक आणि नागरिकाभिमुख वाहनतळ व्यवस्था निर्माण करण्यासाठी, बृहन्मुंबई महानगरपालिका स्मार्ट वाहनतळ प्रकल्प राबविणार आहे. सद्यस्थितीत, या प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया प्रगतीपथावर आहे. या उपक्रमांतर्गत, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील भागांसाठी मोबाईल पार्किंग अॅप्लिकेशर विकसित करण्यात येणार असून ज्याद्वारे नागरिकांना घरबसल्या मोबाईलवर आपल्या इच्छित स्थळी जाण्यापूर्वी पार्किंगची जागा विशिष्ट वेळेसाठी आगाऊ आरक्षित करण्याचे सुविधा उपलब्ध होणार आहे. हा प्रकल्प सार्वजनिक खाजगी भागिदारी (पीपीपी) तत्वावर राबविण्यात येणार असून त्यामुळे मुंबई महानगरपालिकेवर कोणताही आर्थिक भार येणार नाही तसेच कंत्राटदाराकडून टक्केवारीनुसार महसुलामधील हिस्सा प्राप्त होणार आहे. प्रारंभी, या प्रकल्पाची अंमलबजावणी ५३० नविन वाहतळांवर करण्यात येणार आहे. पुढील टप्प्यांत इतर ऑन स्ट्रीट व ऑफ स्ट्रीट वाहनतळांचाही समावेश करण्याची तरतूद असल्यामुळे प्रवाशांच्या सोयीमध्ये वाढ होईल.
Ahilyabai Holkar : अहिल्यादेवींचा वारसा जपण्यात सरकार अपयशी; ‘या’नेत्याची सरकारवर टीका
उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (Ahilyabai Holkar) यांनी बांधलेला ऐतिहासिक मणिकर्णिका घाट तेथील सरकारने तोडला असून, महाराष्ट्र सरकारने तातडीने यात हस्तक्षेप करून हा घाट पुन्हा पूर्ववत बांधून घ्यावा, अशी मागणी पाटील यांनी विधान सभेत चर्चेदरम्यान केली.
Maharashtra Political : साताऱ्यात भाजपच्या माजी मंत्र्याला अटक; राज्याच्या राजकारणात खळबळ
Maharashtra Political : सातारा पोलिसांनी भाजप नेते आणि राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांना अटक केली आहे.
Purchase of new land : नवीन जमीन खरेदीदारांना मिळणार दिलासा ! ‘या’अटी शिथिल होणार
१ फेब्रुवारी २०१९ च्या निकषामुळे नवीन जमीन खरेदीदार शेतकरी पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभापासून (Purchase of new land) वंचित राहत असल्याचा मुद्द्याकडे आमदार समाधान आवताडे यांनी विधानसभेत लक्ष वेधले.
Todays Top 10 News: पवार कुटुंबात नवे फेरबदल, सरकारी पगारवाढ, मुंबईचा ८० हजार कोटींचा अर्थसंकल्प आणि विजय-रश्मिकाचे लग्न; वाचा आजच्या १० महत्त्वाच्या बातम्या.
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन
मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन करण्यात येणार आहे. हा प्रकाशन सोहळा नाशिक येथील मराठा विद्या प्रसारक समाजाचे के.टी.एच.एम. महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आला आहे.मंडळाच्या स्थापनेपासून ‘पुस्तक प्रकाशन’ हे मुख्य उद्दिष्ट ठेवून गंभीर, वैचारिक, संशोधनपर आणि मौलिक विषयांवरील ग्रंथनिर्मिती सातत्याने केली जात आहे. खासगी प्रकाशकांकडून सहसा प्रकाशित न होणारे उच्च दर्जाचे संशोधनात्मक ग्रंथ प्रकाशित करण्याची जबाबदारी मंडळ पार पाडत आहे. आजवर मंडळाने ७३० हून अधिक ग्रंथ प्रकाशित केले असून दरवर्षी मराठी भाषा गौरव दिनी नव्या ग्रंथांचे प्रकाशन करण्याची परंपरा जपली आहे.संत, साहित्य, इतिहास आणि संगीताचा वैविध्यपूर्ण पट :यंदाच्या ४२ ग्रंथांमध्ये विविध क्षेत्रांतील महत्त्वपूर्ण साहित्याचा समावेश आहे. वारकरी परंपरेतील संतश्रेष्ठ संत तुकाराम महाराज यांच्या ‘तुकारामबावांच्या अभंगाची गाथा’ या ग्रंथाचा समावेश विशेष उल्लेखनीय आहे. तसेच अंजली मालकर लिखित ‘हिंदुस्थानी अभिजात संगीताचा इतिहास’ (पूर्वार्ध व उत्तरार्ध) या दोन खंडांत तेराव्या शतकापासून स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंतच्या संगीत प्रवासाचा अभ्यासपूर्ण आढावा घेण्यात आला आहे.मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्यावरील ‘दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर – कर्तृत्वाचा एक शोध’ हे तीन खंड प्रकाशित होत असून, त्यातील तिसऱ्या खंडात त्यांनी प्रथम मुद्रित केलेली ‘ज्ञानेश्वरी’ समाविष्ट आहे.‘शिवशक्ती संप्रदायाची लोक-गान परंपरा’, ‘महाराष्ट्राचे शिल्पकार विद्वत्तेचा महामेरु डॉ. सी. डी. देशमुख’, ‘मराठीतील रहस्य-रंजनप्रधान लोकप्रिय कादंबरी परंपरा आणि प्रवाह’, तसेच ओडिसी नृत्यशैलीवरील ‘ओद्रमागधी ते ओडिसी नृत्य – एक प्रवास’ हेही ग्रंथ प्रकाशित होत आहेत.साहित्यिक परिचय मालिका:१९४० ते १९९० या कालखंडातील महत्त्वाच्या साहित्यिकांवर आधारित परिचयात्मक ग्रंथमालिकेतील ग्रंथांचाही समावेश आहे. यात पु. ल. देशपांडे, नामदेव ढसाळ, विंदा करंदीकर, अण्णाभाऊ साठे, नारायण सुर्वे आदी साहित्यिकांच्या जीवन व साहित्याचा मागोवा घेण्यात आला आहे.तसेच ‘रायगडची जीवनकथा’ या ग्रंथाचे आठवे पुनर्मुद्रण प्रकाशित होत असून या ग्रंथाला वाचकांचा मोठा प्रतिसाद लाभला आहे.नवलेखकांना संधी :मंडळाच्या ‘नवलेखक अनुदान’ योजनेअंतर्गत यंदा १९ नवोदित लेखकांची पुस्तके प्रकाशित होत आहेत. काव्य, कथा, कादंबरी, नाटक, ललितगद्य आणि बालवाङ्मय अशा विविध साहित्यप्रकारांतील ही पुस्तके असून नवोदितांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा मंडळाचा हा उपक्रम विशेष उल्लेखनीय आहे.ग्रंथ ऑनलाईनही उपलब्ध :मंडळाचे सर्व ग्रंथ https://sahitya.marathi.gov.in या संकेतस्थळावर विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच शासकीय मुद्रणालय व खाजगी वितरकांकडेही अत्यल्प दरात हे ग्रंथ उपलब्ध आहेत. वाचकांच्या भरघोस प्रतिसादामुळे अनेक ग्रंथांचे पुनर्मुद्रण करावे लागत असल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले.मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने आयोजित या प्रकाशन सोहळ्यामुळे मराठी साहित्य-संस्कृतीच्या जतन व संवर्धनाला मोठी चालना मिळणार आहे.
Karad Congress Protest : भाजपविरोधात युवक काँग्रेस रस्त्यावर; कराडामध्ये जोरदार घोषणाबाजी
Karad Congress Protest : युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब यांची अटक आणि प्रवक्ते हनमंत पवार यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ कराडमध्ये तीव्र आंदोलन करण्यात आले.
Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतला ‘हा’मोठा निर्णय; बैठकीमध्ये झालं एकमत
अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेऊन इतिहास रचला आहे.
Mumbai - BEST bus - school students या योजनेमुळे हजारो विद्यार्थ्यांना दररोजच्या प्रवासासाठी सुरक्षित आणि सुलभ पर्याय उपलब्ध होणार आहे. विशेषतः लांबच्या उपनगरांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना मोठा आधार ठरणार आहे.
गुणवंत विद्यार्थ्यांसाठी १०० टक्के शिष्यवृत्तीमुंबई : महाराष्ट्रातील गुणवंत विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या उच्च शिक्षणाच्या अधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि ब्रिस्टॉल विद्यापीठ मुंबई कॅम्पस प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात विधानभवन येथे सामंजस्य करार करण्यात आला.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सामंजस्य कराराच्यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, ब्रिस्टॉल विद्यापीठाच्या कुलगुरू व अध्यक्षा प्रा.एव्हलिन वेल्च, ब्रिस्टॉल विद्यापीठाच्या मुख्य संचालन अधिकारी लुसिंडा पार, संचालक ज्युलिया हॉल, मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विन दामेरा आदी उपस्थित होते.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ब्रिस्टॉल विद्यापीठासारख्या जागतिक कीर्तीच्या संस्थेसोबत करार होणे ही अभिमानाची बाब आहे. या सहकार्यामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या आणि त्यासाठी सक्षम असलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना मोठी संधी उपलब्ध होणार आहे. शासन आणि अकॅडेमिया एकत्र आले तर आपण नक्कीच उज्ज्वल भविष्य निर्माण करू शकतो, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.गुणवंत विद्यार्थ्यांना उच्च प्रतीचे शिक्षणया करारानुसार ‘मुख्यमंत्री व ब्रिस्टॉल विद्यापीठ शिष्यवृत्ती योजना’ संयुक्तपणे विकसित व राबविण्यात येणार आहे. सामाजिक व आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना उच्च प्रतीचे शिक्षण मिळावे, हा या योजनेमागील प्रमुख उद्देश आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पदवी अभ्यासक्रमाच्या संपूर्ण कालावधीसाठी 100 टक्के शिक्षण शुल्क माफ करण्यात येईल. या शिष्यवृत्तीचा संपूर्ण खर्च ब्रिस्टॉल विद्यापीठ मुंबई कॅम्पसकडून उचलण्यात येणार आहे.
मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे
- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणेमुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय भीम-जय मीम’च्या वल्गना करणारे राजकीय पक्ष निवडणुकीनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विसरतात आणि केवळ ‘जय मीम’च उरते. संविधानाच्या कुठल्या पानावर महानगरपालिकेत नमाज पठण करण्याची अनुमती आहे, याचे कागद त्यांनी मला दाखवावे, अशा परखड शब्दांत मंत्री नितेश राणे यांनी मालेगाव महानगरपालिकेतील नमाजपठणाच्या प्रकारावर जोरदार प्रहार केला. हे धर्मांधांचे ‘जिहाद’चेच रूप आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. ते विधानभवनात पत्रकारांशी बोलत होते.तर आम्ही प्रत्येक महानगरपालिकेत भगवद्गीता वाचू :आमदार नितेश राणे म्हणाले की, महानगरपालिकेत तुम्ही विकास करण्यासाठी निवडून गेला आहात की इस्लामचा प्रसार करण्यासाठी ? नमाज पडण्यासाठी मशिदींना काय टाळी लागली आहेत का ? हे ‘जिहाद’ नाही, तर काय आहे ? जर उद्या आम्ही प्रत्येक महानगरपालिकेत भगवद्गीता वाचायला प्रारंभ केला, तर या ‘हिरव्या सापांनी’ तोंड उघडू नये. तुम्ही नमाज पडला तर चालते; पण हिंदूंनी काही केले की लगेच ‘हिंदू-मुस्लिम वाद’ उकरून काढला जातो.मदरसे हे केवळ दहशतवादांचे अड्डे :सिंधुदुर्ग जिल्ह्यात मदरशात लहान मुलांना मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. मदरसे हे केवळ दहशतवादांचे अड्डे असून तिथे देशविरोधी कृत्ये घडवली जातात. इस्लामिक राष्ट्रांमध्ये कुणी भगवद्गीता शिकवण्याची अनुमती देईल का ? मग आम्हीच मदरशांचे लाड का करायचे ? मदरशांमध्ये कधी शस्त्रास्त्रे सापडतात, तर कधी मुलांचे शोषण होते. मशिदीत कुराण शिकवा; पण धर्मांधतेचे धडे देणारे स्वतंत्र मदरसे कशाला हवेत ? महाराष्ट्रातील सर्व मदरसे तातडीने बंद करण्यात यावेत, अशी मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे. मदरशात मुलांना मारहाण करणार्या मुल्ला-मौलवी यांना चेतावणी देताना नितेश राणे म्हणाले की, मी त्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. त्यांना असा काही धडा शिकवीन की, पुन्हा हात उचलताना ते १० वेळा विचार करतील. हे जिहादी मानसिकतेचे लोक केवळ हिंसाच जाणतात.
या नवीन एअरलेस टायरमध्ये त्याच्या पूर्ववर्तीपेक्षा अनेक लक्षणीय सुधारणा आहेत, ज्यामुळे ते आणखी चांगले झाले आहे.
Bhigwan Case Update : भिगवण येथील चर्चेत असलेल्या प्रेमप्रकरण आणि कथित अपहरण प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.
Corruption News: बड्या अधिकाऱ्याच्या घरी सापडले 4 कोटींचे घबाड; राज्यात खळबळ
Corruption News:
माजी भारतीय क्रिकेटपटू शिखर धवन आणि त्यांच्या माजी पत्नी आयशा मुखर्जी यांच्यातील घटस्फोट (Shikhar Dhawan Divorce Case) प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.
बीएमसीसोबत चर्चा करून मार्केटच्या पुनर्विकासावर तोडगा काढण्याचेमुंबई : लोकमान्य टिळक महापालिका मार्केटच्या प्रस्तावित पुनर्विकासामुळे मच्छीमार व मासळी विक्रेत्यांच्या उपजीविकेवर होणाऱ्या परिणामांच्या पार्श्वभूमीवर मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी आज कोळी बांधवांची स्वतंत्र बैठक घेतली. या बैठकीत अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे पदाधिकारी, मासळी विक्रेते व संबंधित प्रतिनिधी उपस्थित होते. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या समन्वयातून लोकमान्य टिळक महापालिका मार्केटमधील कोळी बांधवांच्या समस्यांवर तोडगा काढण्याचे आश्वासन यावेळी मंत्री श्री राणे यांनी दिले.लोकमान्य टिळक महापालिका मार्केट प्रामुख्याने मच्छीमार व मासळी विक्रेत्यांच्या व्यवसायाशी संबंधित आहे. येथे ५११ परवानाधारक व्यवसायी असून त्यापैकी १९९ मासे विक्रेते आहेत. सर्वसाधारण व्यावसायिक क्लस्टर पुनर्विकास केल्यास त्यांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम होण्याची भीती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.कोळी बांधवांनी या मार्केटसाठी स्वतंत्रपणे पुनर्विकास योजना राबवावी, तसेच पुनर्विकासाच्या काळात स्वच्छता, निचरा, पाणीपुरवठा, साठवण व्यवस्था आदी मूलभूत सुविधांची हमी द्यावी, अशी मागणी केली. या विषयावर मंत्री श्री राणे यांनी हस्ताक्षेप करून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घ्यावी अशी विनंती कोळी बांधवानी यावेळी केली. त्यावर मंत्री श्री राणे यांनी कोळी बांधवांच्या समस्या समजून घेत बृहन्मुंबई महानगरपालिकेसोबत तातडीने चर्चा करून या विषयावर योग्य तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. महानगरपालिका आयुक्त तसेच महापौर यांच्याशी या विषयावर चर्चा करून योग्य तो समन्वय साधण्याचे निर्देश श्री राणे यांनी अधिकाऱ्यांना दिले. कोळी समाजाच्या हिताला बाधा न येता पुनर्विकासाचा मार्ग काढला जाईल, तसेच मच्छीमार व मासळी विक्रेत्यांचे हक्क सुरक्षित ठेवण्यास प्राधान्य दिले जाईल, असेही आश्वासन श्री राणे यांनी यावेळी कोळी बांधवांना दिले.
काजू उत्पादक शेतकऱ्याला जगवण्यासाठी आयात शुल्कात २० टक्क्यांची वाढ करा - आमदार निलेश राणे
- निलेश राणे यांची विधानसभेत मागणी; अमली पदार्थ, गो-हत्या आणि बेकायदा वृक्षतोडीवरून धरले धारेवरमुंबई : कोकणातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना सावरण्यासाठी कच्च्या काजूवरील आयात शुल्कात किमान २० टक्क्यांची वाढ करावी, अशी मागणी कुडाळ-मालवण मतदारसंघाचे शिवसेना आमदार निलेश राणे यांनी बुधवारी (२५ फेब्रुवारी) विधानसभेत केली. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान त्यांनी काजू उत्पादकांचे प्रश्न, बेकायदा वृक्षतोड, गो-हत्याबंदी आणि वाढते अमली पदार्थ रॅकेट आदी मुद्द्यांवरून सरकार आणि प्रशासनाला धारेवर धरले.निलेश राणे यांनी कोकणातील काजू उत्पादकांची दयनीय अवस्था अधोरेखित करताना सांगितले की, अनेक युवक नोकरी सोडून काजू उत्पादनात आले. मात्र, आफ्रिकन काजूच्या आयातीमुळे कोकणातील काजू उत्पादक रसातळाला चालला आहे. आफ्रिकन देशांतून आयात होणारा कच्चा काजू स्थानिक काजूमध्ये मिसळला जात असून त्यामुळे बाजारभाव कोसळले आहेत. २०१० पर्यंत काजूवरील आयात शुल्क १८ टक्के होते; ते आता केवळ २.५ टक्क्यांवर आले आहे. परिणामी, स्थानिक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असून त्यांना वाचवण्यासाठी आयात शुल्कात किमान २० टक्क्यांची वाढ करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. नजिकच्या गोवा राज्यात काजू प्रति किलो १७० रुपये दिले जातात. त्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यात निर्णय व्हावा, अशी आग्रही मागणी त्यांनी यावेळी केली.आमदार निलेश राणे यांनी यावेळी वनविभागाच्या दुटप्पी भूमिकेवर टीकास्त्र सोडले. एकीकडे झाडे लावा, असे सांगायचे आणि त्याचवेळी झाडे तोडून जंगल साफ करायला परवानगी द्यायची. परिणामी जंगले रिक्त होऊ लागली आणि प्राणी शेतात, गावात शिरू लागले. याचा परिणाम शेतीवर होऊ लागला. वनविभागाचे अधिकारी हे अमराठी असतात, कोकणी माणूस त्यांच्याशी संपर्क कसा साधणार, असा सवालही त्यांनी केला. विधानभवन, मुंबई.महाराष्ट्र विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२६ | दिवस तिसरा. pic.twitter.com/CcwPJjllHW— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) February 25, 2026महाराष्ट्रात गो-हत्या बंदी कायदा अस्तित्वात असूनही त्याची कडक अंमलबजावणी होत नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. हिस्ट्रीशीटर आणि सराईत गुन्हेगारांवर ‘मकोका’ लावण्याचे आश्वासन देण्यात आले होते; मात्र अद्याप एकावरही अशी कारवाई का झाली नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. उलट गो-रक्षकांवरच गुन्हे दाखल होत असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.सिंधुदुर्ग अमली पदार्थांच्या विळख्यात :सिंधुदुर्ग जिल्हा हा गोवा राज्याच्या सीमेवर असल्याने तेथे अमली पदार्थांची तस्करी मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे निलेश राणे निदर्शनास आणून दिले. शाळकरी मुलांचा ‘कुरिअर’ म्हणून वापर केला जात असून ड्रग्जच्या ओव्हरडोजमुळे तरुणांचे मृत्यू होत असल्याचे त्यांनी सांगितले. केवळ छापे टाकण्यापेक्षा या रॅकेटचे मुख्य सूत्रधार शोधून कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. याशिवाय, पंचनामे रखडल्यामुळे पीक नुकसानीची मदत शेतकऱ्यांना अद्याप मिळालेली नसल्याचा मुद्दाही त्यांनी सभागृहात उपस्थित केला.मुंबई-गोवा महामार्ग कधी पूर्ण होणार ?आमदार निलेश राणे म्हणाले, राज्यपालांच्या अभिभाषणात ४ हजार ४७८कोटी रुपये रस्ते विकासासाठी देण्यात आल्याचा उल्लेख आहे. त्यापैकी आठशे ते हजार कोटी रुपये खर्च करून कित्येक वर्षे रखडलेला मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण करावा, अशी आग्रही मागणी त्यांनी केली. मुंबई-गोवा महामार्गचे काम रायगड-रत्नागिरी दरम्यान केवळ १०० कि.मी.बाकी आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
मुंबई : महाराष्ट्र राज्यामध्ये २०२५ या एकाच वर्षात तब्बल ४१ वाघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती वनमंत्र्यांनी विधानसभेत लेखी उत्तराद्वारे सादर केली आहे. या मृत्यूंच्या कारणांचा आढावा घेतल्यास असे दिसून येते की, २८ वाघांचा मृत्यू नैसर्गिक कारणांनी झाला असला तरी, उर्वरित १३ वाघांचा बळी हा मानवी हस्तक्षेप आणि अपघातांमुळे गेला आहे; यात ८ वाघ विविध अपघातांमध्ये, ४ वाघ विजेचा धक्का लागल्याने, तर १ वाघ शिकारीमुळे दगावला आहे.या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सरकारने रेल्वे आणि रस्ते अपघात रोखण्यासाठी वनक्षेत्रातील प्रस्तावित प्रकल्पांमध्ये वन्यप्राण्यांच्या सुरक्षित वावरासाठी अंडरपास व ओव्हरपास बांधण्याचे निर्देश दिले आहेत, तसेच रेल्वेचा वेग ताशी ४० किमीपर्यंत मर्यादित ठेवण्याच्या सूचनाही केल्या आहेत. शिकारीच्या संकटाचा सामना करण्यासाठी 'विशेष व्याघ्र संरक्षण दल' सक्रिय करण्यात आले असून, वनपरिक्षेत्र स्तरावर खबऱ्यांची जाळी, बिनतारी यंत्रणा आणि तपासणी नाक्यांद्वारे कडक पाळत ठेवली जात आहे. याशिवाय, वाघांच्या भ्रमणमार्गावर कॅमेरा ट्रॅप बसवणे, पंधरवड्यातून एकदा त्यांच्या अस्तित्वाचा मागोवा घेणे आणि पाणवठ्यांवरील विषप्रयोगासारख्या घटना रोखण्यासाठी नियमित गस्त घालणे अशा उपाययोजना राबविल्या जात आहेत.व्याघ्र प्रकल्पांवर मोठ्या प्रमाणात खर्च होत असतानाही वाघांचे होणारे मृत्यू ही पर्यावरणाच्या दृष्टीने गंभीर बाब असून, मानव-वन्यजीव संघर्ष रोखणे आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने त्यांच्या नैसर्गिक अधिवासाचे रक्षण करणे, हेच खऱ्या अर्थाने संपूर्ण जंगलव्यवस्थेच्या संरक्षणासाठी अत्यावश्यक आहे.
DA Hike: राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ जाहीर
DA Hike: वाढीव भत्त्याचा लाभ जुलै २०२५ पासून लागू होणार
स्त्री-भ्रूणहत्या प्रकरणी राज्यभरात धडक मोहिम राबवणार - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर
मासिक पाळीदरम्यान महिलांना सुट्टी देण्यासंदर्भात समिती नेमून अभ्यास करणारमुंबई : स्त्री-भ्रूणहत्याप्रकरणी सरकार गंभीर आहे. राज्य शासनाच्या वतीने दर तीन महिन्याला प्रत्यक्ष तपासणी करून दोषींवर कारवाई करीत आहोत. तरीदेखील संपूर्ण राज्यभरात तपासणीची एक धडक मोहिम राबवू, अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी (२५ फेब्रुवारी) विधानसभेत लक्षवेधीला उत्तर देताना दिली.जितेंद्र आव्हाड, हेमंत ओगले, बाबासाहेब देशमुख, नमिता मुंदडा, नितीन राऊत, प्रशांत बंब आदी आमदारांनी या चर्चेत सहभाग घेतला. मंत्री प्रकाश आबिटकर आपल्या उत्तरात म्हणाले की, एका अहवालानुसार, राज्यात एक हजार पुरुषांमागे मुलींचे प्रमाण ९१३ आहे. लातूर, वर्धा, गडचिरोली, गोंदिया जिल्ह्यात मुलींचे जन्मप्रमाण पुरुषांपेक्षा जास्त आहे. मात्र, काही जिल्ह्यांमध्ये अजूनही काम करणे गरजेचे आहे. हे काम प्रभावीपणे करण्यासाठी सर्वे, सूचना आणि तिथल्या अधिकाऱ्यांसोबत देखरेख करून निश्चितपणे चांगले काम करू. जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकारी यांना सूचना देऊन या संदर्भातील सध्या असलेल्या कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल.जितेंद्र आव्हाड यांनी स्त्रीभ्रूणहत्या हे पातक आहे, जे डॉक्टर यामध्ये दोषी असतील त्यांच्यावर मकोका लावा, अशी मागणी केली. यावर मंत्री प्रकाश आबिटकर यांनी गर्भधारणापूर्व आणि प्रसूतीपूर्व निदान तंत्र कायदा (पीसीपीएनडीटी) कायद्यातील कलमांमध्ये सुधारणा करणार असल्याचे सांगितले. तसेच सरकारच्या वतीने सातत्याने याबाबतचा आढावा घेणे सुरु आहे. २०२३-२४ मध्ये ७५, २०२४-२५ मध्ये ९४ आणि आता जानेवारीपर्यंत ९० स्टिंग ऑपरेशन केले असून यातील दोषींवर कारवाई केली आहे. एकूण ६२७ न्यायालयीन प्रकरणांत १२९ जणांना शिक्षा झाली आहे. याबाबत अजूनही जागृकता होण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत, असेही त्यांनी सांगितले.मासिक पाळीत महिला कर्मचाऱ्यांना सुट्टी मिळणार ?प्रसूतीपूर्व लिंगनिदान रोखण्यासाठी कायद्याची कठोरपणे अमलबजावणी सुरू आहे. दोषी डॉक्टरांची सनद रद्द करण्याचे १९३ प्रस्ताव मेडिकल काऊन्सिलकडे पाठविली असून अनेकांच्या सनदा रद्दही झाल्या आहेत. या कायद्यातील कलमे अधिक कठोर करण्याचा निश्चित विचार करण्यात येईल. तसेच मासिक पाळीच्या काळात महिलांना सुट्टी देता येईल का, गर्भलिंग निदान प्रकरणात मकोका लावता येईल का, याबाबत विधि व न्याय विभागाकडून सल्ला घेण्यात येईल, अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी यावेळी दिली.खबरीला १ लाख रूपयांचे बक्षिस - मंत्री आबिटकरबेकायदा गर्भजललिंग तपासणी करणाऱ्या केंद्रांची माहिती देण्यासाठी खबरीला १ लाख रूपयांचे बक्षिस ठेवण्यात आले आहे. त्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येते. तसेच मकोका लावता येऊ शकतो का हे तपासण्यासाठी विधि व न्याय विभागाचा सल्ला घेण्यात येईल असे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी स्पष्ट केले.तसेच, राज्यात दर हजारी स्त्री-पुरूष गुणोत्तरात काही जिल्ह्यात चांगल्या प्रकारे वाढ होत आहे. यात लातूर जिल्हा पुढे असून तिथे स्त्री-पुरूष गुणोत्तर १२६५ इतके आहे. वर्धा ११७३, धाराशिव १०५०, गडचिरोली १०९३ आणि गोंदिया येथे १०५० इतके गुणोत्तर असल्याचे मंत्री आबिटकर यांनी सांगितले.
डिझेल खरेदी निविदा प्रक्रिया पूर्ण पारदर्शक होणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची ग्वाही
- डिझेल खरेदीत हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाहीमुंबई : एसटी महामंडळाच्या डिझेल खरेदीसंदर्भातील निविदा प्रक्रियेत कोणताही हस्तक्षेप सहन केला जाणार नाही, असा कडक इशारा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिला. काही कंपन्यांकडून माध्यमांमध्ये चुकीच्या बातम्या पसरवून निविदा प्रक्रिया प्रभावित करण्याचा प्रयत्न होत असल्याचे निदर्शनास आले असून, अशा प्रयत्नांना अजिबात भीक घातली जाणार नसल्याचे प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले.काय म्हणाले प्रताप सरनाईक ?मंत्री सरनाईक म्हणाले, सध्या एसटी महामंडळाला दररोज सरासरी १० लाख ८७ हजार लिटर डिझेलची गरज भासते. हे डिझेल प्रामुख्याने Indian Oil Corporation Limited आणि Bharat Petroleum Corporation Limited या कंपन्यांकडून खरेदी केले जाते. घाऊक ग्राहक म्हणून एसटीला या कंपन्याकडून प्रति लिटर २ रुपये ७० पैसे सवलत देत असत, संबंधित कंपनीची बैठक घेऊन या सवलती मध्ये ३० पैसे वाढवून घेतले. त्यामुळे महामंडळाची वर्षाकाठी १० ते १२ कोटीची बचत होऊ लागली. तथापि,३ रुपयांची सवलत मिळत असली, तरी इतर राज्य परिवहन महामंडळांना यापेक्षा अधिक सवलत मिळत असल्याचे अभ्यासातून स्पष्ट झाले आहे.मध्यप्रदेश, राजस्थान व उत्तर प्रदेश परिवहन महामंडळाला याच कंपन्यांनी ४ रुपये पेक्षा जास्त सवलत देऊ केली आहे. एवढंच नाही तर आंध्र प्रदेश परिवहन महामंडळाला तब्बल ५ रुपये ५० पैसे सवलत मिळत आहे.यामागील कारण म्हणजे इतर राज्यांनी राबवलेली स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया. त्याच धर्तीवर एसटीनेही डिझेल खरेदीसाठी स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. या निविदा प्रक्रियेला मुदतवाढ मिळवण्यासाठी यापैकी एका कंपनीने न्यायालयात धाव घेतली होती. परंतु माननीय न्यायालयाने देखील निविदा प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. अशा प्रकारे वेळकाढूपणा करणे, माध्यमातून चुकीच्या बातम्या पेरून निविदा प्रक्रिया प्रभावित करण्याचे केविलवाणे प्रयत्न संबंधित कंपन्यांनी थांबवले पाहिजेत,असा सज्जड दम परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. तसेच डिझेल खरेदीची निविदा प्रक्रियेत पारदर्शकता आणि नियमबद्धता याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.सध्या एसटी महामंडळावर सुमारे १२ हजार कोटी रुपयांचा संचित तोटा आहे. वर्षाकाठी डिझेल खरेदीवर सुमारे ३,४०० कोटी रुपये खर्च होतात. लवकरच ८ हजार नव्या डिझेल बसेस ताफ्यात दाखल होणार असल्याने हा खर्च अंदाजे ४,७०० कोटींपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत डिझेल दरात केवळ १ रुपयांची घट झाली, तरी वर्षाकाठी सुमारे ५० ते ५५ कोटी रुपयांची बचत होऊ शकते. अर्थात, हा महामंडळासाठी मोठा आर्थिक दिलासा ठरू शकतो.“एसटीची आर्थिक शिस्त आणि पारदर्शकता अबाधित ठेवणे ही आमची प्राथमिकता आहे. निविदा प्रक्रिया नियमांनुसार आणि निष्पक्षपणे राबवली जाईल,” असे मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले की, तसेच एसटीच्या हिताशी कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.
पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा मार्ग बदलणार; मुख्यमंत्र्यांची परिषदेत माहिती
मुंबई : बहुप्रतिक्षित पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाबाबत मोठी तांत्रिक अडचण निर्माण झाली असून, आता या रेल्वेचा मार्ग बदलावा लागणार आहे. केंद्र सरकारच्या बफर झोनच्या आक्षेपामुळे सध्या हा प्रकल्प रखडला असून, पर्यायी मार्गासाठी तज्ज्ञांची समिती नेमली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधान परिषदेत दिली.बफर झोनचा तांत्रिक अडथळापुणे-नाशिक रेल्वे मार्ग ज्या भागातून प्रस्तावित आहे, तिथे ३२ देशांच्या सहभागाची एक महत्त्वाची खगोलशास्त्रीय 'ऑब्झर्व्हेटरी' (GMRT) आहे. या ऑब्झर्व्हेटरीचा विशिष्ट बफर झोन असून, तिथून रेल्वे नेल्यास तांत्रिक अडथळे येऊ शकतात, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वतः दिल्लीत जाऊन सादरीकरण केले, तरीही बफर झोनचा मुद्दा महत्त्वाचा असल्याने जुन्या मार्गाला परवानगी नाकारण्यात आली आहे. या तांत्रिक पेचातून मार्ग काढण्यासाठी राज्य सरकार आता केंद्र सरकारशी चर्चा करून अत्यंत अनुभवी तांत्रिक कन्सल्टंटची नियुक्ती करणार आहे. ही समिती पुढील तीन ते चार महिने ऑब्झर्व्हेटरीच्या परिसराचा सखोल अभ्यास करेल. रेल्वे मार्गात कमीत कमी बदल करून जास्तीत जास्त गावे कशी जोडली जातील, यावर हा अहवाल लक्ष केंद्रित करेल. हा अहवाल आल्यानंतरच प्रकल्पाचा अंतिम मार्ग निश्चित होईल.शिर्डीचा पर्याय आणि स्थानिक विरोधकेंद्राने सुरुवातीला 'वाया शिर्डी' असा पर्यायी मार्ग सुचवला होता. मात्र, या मार्गामुळे प्रवासाचा वेळ साधारण ३० ते ३१ मिनिटांनी वाढणार असल्याने अनेक स्थानिक लोकप्रतिनिधींनी याला विरोध दर्शवला आहे. त्यामुळेच आता लोकभावना लक्षात घेऊन तांत्रिकदृष्ट्या व्यवहार्य अशा तिसऱ्या मार्गाचा शोध घेतला जाणार आहे.लोकप्रतिनिधींचा पुढाकारआमदार सत्यजीत तांबे यांनी यासंदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. GMRT ने कोणताही थेट आक्षेप नोंदवलेला नसल्याचा दावा तांबे यांनी केला, तसेच या प्रकल्पाबाबत स्थानिक जनता आणि कृती समित्यांमध्ये मोठा संभ्रम असल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, महारेल ही केंद्र आणि राज्याची संयुक्त कंपनी असल्याने तिला स्वतंत्र निर्णयाचे अधिकार नाहीत, त्यामुळे केंद्राची तांत्रिक मंजुरी अनिवार्य आहे. पुढील चार ते पाच महिन्यांच्या कालावधीत समितीचा अहवाल आल्यावरच पुणे-नाशिक रेल्वेच्या नव्या रुळांची दिशा स्पष्ट होणार आहे.
Piyush Goyal : “राहुल गांधी नकारात्मक राजकारणाचे पोस्टर बॉय…”; पियुष गोयल यांचा घणाघाती हल्ला
केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी आज काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली.
धक्कादायक..! माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवाचा मृत्यू; राज्यात खळबळ
Soren Grandson Death : झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन यांचा २२ वर्षीय नातू वीर सोरेन याचा मनालीमध्ये संशयास्पद मृत्यू झाला आहे.
Bhigwan News : गोपीचंद पडळकर, संग्राम जगताप अडचणीत? ‘हे’प्रकरण भोवणार?
Bhigwan News : भिगवण येथील कथित अपहरण प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. मुलीने स्वतः पोलिसांसमोर हजर होत आपण स्वइच्छेने गेल्याचे सांगितले आहे.
Iran Helicopter Crash : लष्करी हेलिकॉप्टर कोसळून चौघांचा मृत्यू
अमेरिकेसोबत सुरू असलेल्या भीषण तणावाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (२४ फेब्रुवारी) इराणच्या मध्य भागात एक लष्करी हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडली. मध्य इराणमधील फळ आणि भाजीपाला बाजारात हे हेलिकॉप्टर कोसळले असून या दुर्घटनेत किमान ४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.इराणी राज्य दूरदर्शननुसार हा अपघात इराणची राजधानी तेहरानपासून सुमारे ३३० किलोमीटर दक्षिणेस असलेल्या इस्फहान प्रांतातील दोर्चेह शहरात झाला. इराणी वायुसेनेचा हवाई तळ इस्फहानजवळ स्थित आहे. इस्फहान हे इराणमधील प्रमुख अणुस्थळांपैकी एक मानले जाते. जून महिन्यात युनायटेड स्टेट ने इस्राइल - इराण युद्धादरम्यान याच अणुस्थळावर हल्ला केला होता. तसेच फोर्दो आणि नतान्झ या अणुस्थळांवरही बॉम्बहल्ले करण्यात आले होते.4 people have been confirmed dead following a helicopter crash at a vegetable market in Dorcheh district of Khomeini Shahr, Iran’s Isfahan province.The helicopter was affiliated with the Army & was being used for training purposes at the time of the incident. pic.twitter.com/RQUVLpRbcq— Iran's Today (@Iran) February 24, 2026राज्य दूरदर्शनच्या माहितीनुसार हे लष्करी हेलिकॉप्टर प्रशिक्षण उड्डाणावर असताना दुर्घटनेचा शिकार झाले. या अपघातात वैमानिक आणि सहवैमानिक यांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर बाजार परिसरात हेलिकॉप्टरचे अवशेष आणि धुराचे लोट दिसत असल्याचे दृश्य समोर आले आहे. इराणची अर्ध-सरकारी वृत्तानुसार, बाजारात उपस्थित असलेल्या आणखी दोन व्यक्तींचाही या अपघातात मृत्यू झाला. गेल्या आठवड्याभरात इराणमध्ये घडलेली ही दुसरी मोठी दुर्घटना आहे.काही दिवसांपूर्वी इराणच्या पश्चिमेकडील हमदान शहराजवळ एक एफ-४ लढाऊ विमान कोसळले होते, ज्यात एका वैमानिकाचा मृत्यू झाला होता. इराणला प्राणघातक विमान दुर्घटनांचा इतिहास आहे. पाश्चात्य निर्बंधांमुळे विमानांच्या सुट्या भागांचा पुरवठा मोठ्या प्रमाणावर कमी झाला आहे. त्यामुळे इराण सरकार आणि व्यापारी विमान कंपन्या दोन्ही जुन्या हेलिकॉप्टर आणि विमानांच्या ताफ्यावर अवलंबून आहेत.
कलियुग! ८५ वर्षीय पणजीला लुटणारा पणतूच निघाला चोर; शिरूर पोलिसांनी ३ दिवसांत आवळल्या मुसक्या
Shirur Crime News : शिरूर तालुक्यातील जांबूत येथे ८५ वर्षीय वृद्ध महिलेला लुटणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
मुंबई: राज्य शासनाने राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ करण्याचा अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अधिकृत घोषणा वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी आज विधान परिषदेत एका विधायक निवेदनाद्वारे केली. मुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांच्या हिताचा विचार करून हा सकारात्मक निर्णय घेतला असून, यामुळे आता राज्याचा महागाई भत्ता ५५ टक्क्यांवरून वाढून ५८ टक्के झाला आहे.थकबाकी आणि अंमलबजावणीचे स्वरूपशासनाच्या या निर्णयानुसार, महागाई भत्त्यातील ही वाढ १ जुलै २०२५ पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात येणार आहे. कर्मचाऱ्यांना जुलै २०२५ ते ऑक्टोबर २०२५ या चार महिन्यांच्या कालावधीतील थकबाकीची रक्कम मार्च २०२६ च्या वेतनासोबत अदा केली जाईल. तसेच, नोव्हेंबर २०२५ ते जानेवारी २०२६ या दरम्यानच्या कालावधीतील थकबाकीबाबत शासन लवकरच स्वतंत्र आदेश निर्गमित करणार आहे. या नियोजित निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक वर्षाच्या अखेरीस मोठा आर्थिक लाभ मिळणार आहे.लाभार्थी आणि कुटुंबांना मिळणारे आर्थिक बळया निर्णयाचा थेट लाभ राज्यातील सुमारे ५.९६ लाख कार्यरत शासकीय कर्मचाऱ्यांना आणि ८.१२ लाख निवृत्तीवेतनधारकांना (पेंशनर्स) मिळणार आहे. अशा प्रकारे एकूण १४ लाखांहून अधिक कुटुंबांना या वाढीमुळे मोठा आधार मिळणार असून वाढत्या महागाईच्या काळात त्यांच्या क्रय शक्तीत (Purchasing Power) वाढ होणार आहे. शासनाच्या या संवेदनशील निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या आर्थिक सुरक्षिततेचा प्रश्न सुटण्यास मदत होईल आणि त्यांच्या कुटुंबांना मोठा दिलासा लाभेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.शासनाची भूमिका आणि कर्मचारी संघटनांचे स्वागतनिवेदन सादर करताना वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी सांगितले की, राज्य शासन आपल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी आणि आर्थिक सुरक्षिततेसाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे. हा निर्णय शासनाची कर्मचाऱ्यांप्रती असलेली सकारात्मक आणि संवेदनशील वृत्ती अधोरेखित करतो. दरम्यान, राज्यभरातील विविध कर्मचारी संघटना आणि निवृत्तीवेतनधारकांनी या निर्णयाचे उत्स्फूर्त स्वागत केले असून, मुख्यमंत्री आणि वित्त विभागाचे आभार मानले आहेत.
मुंबई ते विजयदुर्ग रो रो सेवा १ मार्चपासून सुरू होणार
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात मुंबई आणि कोकणाला जलवाहतुकीच्या माध्यमातून जोडण्यासाठी राज्य शासनाने जलवाहतूक सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. यासाठी नियोजन सुरू आहे. सुरक्षेचे आवश्यक ते उपाय करून, पुरेशी खबरदारी घेऊन रविवार १ मार्च २०२६ पासून मुंबई ते विजयदुर्ग रो रो सेवा सुरू करत आहोत, अशी घोषणा राज्याचे मत्स व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी केली. लवकरच मुंबई ते रत्नागिरी, मुंबई ते महाड अशा विविध मार्गांवर जलवाहतूक सुरू करण्याचे नियोजन सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.मुंबई ते विजयदुर्ग या रो रो सेवेच दर आणि वेळापत्रक या संदर्भातली माहिती अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे. तिकिटांचे बुकिंग ऑनलाईन पद्धतीने सुरू आहे आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.शिमोगोत्सवासाठी मुंबईतून कोकणात जाण्यासाठी रो रो हा एक सुरक्षित आरामदायी आणि वेगवान प्रवासाचा पर्याय उपलब्ध आहे. नागरिक याला सकारात्मक प्रतिसाद देत आहेत आणि यापुढेही उत्साहवर्धक प्रतिसाद असेल असे दिसत आहे. रो रो सेवेच्या माध्यमातून मुंबईला अन्य राज्यांबरोबर जोडण्याचे काम आणि पर्यटन, रोजगार आणि कृषी क्षेत्राला चालना देण्याचे काम होणार आहे.रो रो सेवेमुळे मुंबई ते कोकण प्रवास वेगाने करता येईल. वेळेची बचत होण्यास मदत होईल. आंबा, काजू, मासेमारी व्यवसायाला चालना मिळेल. पर्यटन आणि रोजगाराला मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन मिळेल. पर्यावरणपूरक विकास हाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा हेतू आहे. हा हेतू साध्य करण्यासाठीचा प्रयत्न म्हणून रो रो सेवेचे नियोजन सुरू असल्याची माहिती मंत्री नितेश राणे यांनी दिली.
अक्षय कुमार–प्रियदर्शन पुन्हा एकत्र; ‘रामजी आके भला करेंगे’ टीझरमध्ये पीक कॉमेडीची झलक
भूत, धमाल आणि ओजी स्वॅग: ‘भूत बंगला’मधील ‘रामजी आके भला करेंगे’ गाण्याचा टीझर रिलीजमुंबई : भूत बंगला हा २०२६ मधील सर्वात बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक ठरत असून, तब्बल चौदा वर्षांनंतर बॉलिवूडमधील दोन दिग्गज — अक्षय कुमार आणि प्रियदर्शन — पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. बालाजी मोशन पिक्चर्सच्या बॅनरखाली साकारलेल्या या चित्रपटाने या जोडीच्या कल्ट कॉमेडी चित्रपटांवर वाढलेल्या प्रेक्षकांमध्ये जबरदस्त उत्सुकता निर्माण केली आहे.या चर्चेला अधिक रंग चढवत, निर्मात्यांनी चित्रपटातील पहिले गाणे ‘रामजी आके भला करेंगे’चा टीझर प्रदर्शित केला आहे. या टीझरमध्ये प्रेक्षकांना अपेक्षित असलेल्या भन्नाट कॉमेडी आणि धमालपणाची झलक पाहायला मिळते. अक्षय कुमार त्यांच्या जुन्या, अस्सल आणि एनर्जेटिक अंदाजात दिसत असून, ते का बॉलिवूडमधील सर्वाधिक एंटरटेनिंग कलाकारांपैकी एक मानले जातात याची पुन्हा एकदा आठवण करून देतात.हे पेप्पी आणि हाय-एनर्जी गाणे व्हायब्रंट व्हिज्युअल्स, कॅची बीट्स आणि अक्षयच्या सिग्नेचर कॉमिक टाइमिंगने भरलेले आहे. प्रीतम यांनी संगीतबद्ध केलेले आणि कुमार यांनी लिहिलेले हे गाणे देव नेगी यांनी गायले आहे. तसेच मेलो डी यांनी लिहिलेला आणि सादर केलेला रॅप सेगमेंट या गाण्याला अधिक खास बनवतो — असे गाणे जे तुम्ही सहज स्किप करू शकणार नाही!हा टीझर केवळ एका गाण्याची झलक नाही, तर एका दिग्गज क्रिएटिव्ह जोडीच्या दमदार पुनरागमनाचा संकेत आहे. ‘भूत बंगला’मधून अक्षय कुमार आणि प्रियदर्शन पुन्हा एकदा त्यांची ओळखीची कॉमिक धमाल मोठ्या पडद्यावर आणण्यास सज्ज आहेत. हा चित्रपट प्रेक्षकांना जुन्या आठवणी, भरपूर हशा आणि दीर्घकाळापासून वाट पाहत असलेला बिग-स्क्रीन मनोरंजनाचा अनुभव देण्याचे आश्वासन देतो.बालाजी टेलीफिल्म्स लिमिटेडच्या डिव्हिजन असलेल्या बालाजी मोशन पिक्चर्स आणि Cape of Good Films यांच्या संयुक्त विद्यमाने सादर होत असलेल्या या चित्रपटात अक्षय कुमारसोबत वामीका गब्बी, परेश रावल, तब्बू आणि राजपाल यादव हे कलाकार झळकणार आहेत.प्रियदर्शन यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटाची निर्मिती अक्षय कुमार, शोभा कपूर आणि एकता आर कपूर यांनी केली आहे. ‘भूत बंगला’ हा चित्रपट दहा एप्रिल २०२६ रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.
BMC Budget 2026 : मुंबई महापालिका 36 हजार कोटींच्या ठेवी मोडणार, काय आहे कारण?
BMC Budget 2026 : मुंबई महापालिकेने २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी ८०,९५२ कोटींचा विक्रमी अर्थसंकल्प सादर केला आहे.
मुंबई : मुलांमध्ये वाढत चाललेल्या डिजिटल व्यसनाबाबत आणि त्याचा होणारा दुष्परिणाम लक्षात घेता याबाबत अभ्यास तसेच उपाययोजना सूचवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक तज्ज्ञांची टास्क फोर्स नियुक्त करण्यात आली असून पुढील अधिवेशनाच्या आत याबाबतचा अहवाल सादर करु, अशी माहिती राज्याचे माहिती तंत्रज्ञान मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी आज विधान परिषदेत दिली.विधान परिषद सदस्य निरंजन डावखरे, संजय केणेकर यांनी यांनी लक्षवेधी उपस्थितीत करुन मुलांमध्ये वाढलेले डिजिटल व्यसन व त्याचे दुष्परिणाम याकडे सरकारचे लक्ष वेधले होते. या चर्चेत आमदार प्रविण दरेकर, चित्रा वाघ, भाई् जगताप, उमा खापरे आदी आमदार सहभागी झाले होते. या लक्षवेधीमध्ये तरुण आणि अल्पवयीन मुलांमध्ये सोशल मीडिया व्यसनाचे वाढते धोके अधोरेखित करण्यात आले होते. गेमिंग अँप व मुलांसाठी सोशल मीडिया वापरावर वयोमर्यादा ठरविणे तसेच अल्पवयीनांना उद्देशून असलेल्या डिजिटल जाहिरातींवर निर्बंध आणण्याची शिफारस करण्यात येणार काय याबाबत प्रश्न यावेळी लक्षवेधीमध्ये उपस्थितत करण्यात आले होते.या लक्षवेधीवर उत्तर देताना, मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी सांगितले की, माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव विरेंद्र सिंह यांना याबाबत तज्ञांचा टाक्स फोर्स नियुक्त करण्याचे निर्देश लेखी पत्राद्वारे दि. २ फेब्रुवारी २०२६ रोजी दिले आहेत. राज्यात १८ वर्षांखालील सुमारे चार कोटी मुले असून त्यापैकी जवळपास 3 कोटी मुले १५ वर्षांखालील आहेत. त्यामुळे त्यांच्या मानसिक व शारीरिक आरोग्याचा प्रश्न हा अत्यंत गंभीर सार्वजनिक महत्त्वाचा विषय आहे. त्यामुळे याबाबत शासन गंभीर आहे, असे मंत्री शेलार यांनी सांगितले. याबाबत दोन्ही सभागृहाच्या सदस्यांची समिती स्थापन करुन याबाबत चर्चा करु, असेही मंत्री शेलार यांनी सांगितले.राज्यासाठी या विषयाचा सर्वांगीण अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञांचा कार्यदल स्थापन करण्यात येणार असून या कार्यदलामध्ये शिक्षणतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, बालसमुपदेशक, तंत्रज्ञान तज्ज्ञ, व्यवस्थापन तज्ज्ञ, डॉक्टर, कायदेतज्ज्ञ तसेच संबंधित शासकीय विभागांचे अधिकारी यांचा समावेश असणार आहे.● मुलांचे संरक्षण आणि सुरक्षितता● मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम● डिजिटल प्लॅटफॉर्मचा संतुलित व जबाबदार वापर● शिक्षण आणि एकूण विकासावर होणारा परिणाम● सांस्कृतिक आणि कौटुंबिक घटक● लिंगनिहाय फरक● ग्रामीण आणि शहरी परिस्थितीतील भेद● सर्व उत्पन्न गटांचा समावेश● उत्पादकता आणि व्यापक आर्थिक परिणाम● मुलांच्या डिजिटल सुरक्षिततेसाठी अस्तित्वात असलेल्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चौकटींचा आढावाया सगळ्या मुद्यांवर ही टाक्स फोर्स अभ्यास करणार आहे.दरम्यान, रिस्पॉन्सिबल नेटिझम या संस्थेने केलेल्या अभ्यासाचा दाखला मंत्री शेलार यांनी आपल्या उत्तरात दिला. या अभ्यासात असे दिसून आले की, जागतिक गेमिंग बाजारपेठ आज २०० अब्ज डॉलर्सहून अधिक मूल्याची आहेमोबाईल गेम्स डाउनलोड करण्याच्या बाबतीत भारत जगात पहिल्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात स्मार्टफोनचा वाढता वापर यामुळे २०२७ पर्यंत हा देशांतर्गत उद्योग ८.६ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. या अभ्यासा नुसार महाराष्ट्रातील शहरी आणि ग्रामीण भागातील मुलांमध्ये 'गेमिंग डिसऑर्डर' (गेमिंगचे व्यसन) मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे दिसून आले आहे . महाराष्ट्रातील ५ सेंटर मधे येणाऱ्या मुलांच्या केसेस मधे प्रत्येक १० केसेस मधे ३ केसेस गेमिंग च्या व्यसनांच्या आहेत . विविध शाळांमध्ये घेतलेल्या Internet Dependency Scale मधे ४०% मुलांना moderate ते severe गेमिंग व्यसन जाणवते आहे .मानसिक परिणाम: मुलांमध्ये चिडचिडेपणा वाढणे, शैक्षणिक प्रगतीत घट होणे, 'फँटम व्हायब्रेशन सिंड्रोम' (सतत फोन वाजत असल्याचा भास होणे) आणि सामाजिक अलिप्तता. अति गेमिंगचा थेट संबंध मानसिक चिंता (Anxiety) आणि नैराश्याशी (Depression) येतो.'टेक-नेक' (मानेचे विकार), डोळ्यांवर येणारा ताण, झोपेचे चक्र बिघडणे आणि शारीरिक हालचाल कमी झाल्यामुळे वाढलेला लठ्ठपणा यांसारख्या समस्या वाढत आहेत.यासाठी शासन धोरणात्मक पातळीवर जो विचार करीत आहे त्याबाबत माहिती देताना मंत्री ॲड आशिष शेलार यांनी सांगितले की,• गेमिंग प्लॅटफॉर्मसाठी कडक 'वय पडताळणी' (e-KYC) लागू करणे• भारतीय स्थित गेमिंग रेटिंग बॅाडी स्थापन करणे, अल्पवयीन मुलांसाठी गेममध्ये 'टाइम-आउट' फीचर्स आणि रोजच्या खेळाच्या वेळेवर मर्यादा घालणे अनिवार्य करणे.• जुगारासारख्या स्वरूपाच्या 'लूट बॉक्सेस'वर (Loot Boxes) नियंत्रण मिळवणे.• शैक्षणिक पातळीवर (Educational Level):• 'डिजिटल हायजीन'चा (डिजिटल स्वच्छता) SCERT महाराष्ट्र अभ्यासक्रमात समावेश करणे.• सरकारी शाळांमध्ये 'स्क्रीन-फ्री सॅटरडे' (स्क्रीनमुक्त शनिवार) उपक्रम सुरू करणे.• मुलांमधील डिजिटल व्यसनाची सुरुवातीची लक्षणे ओळखण्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षित करणे.• आरोग्य पातळीवर (Health Level):• डिजिटल व्यसनमुक्तीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अथवा जिल्हा स्तरावर 'सायबर वेलनेस सेंटर ' स्थापन करणे.• राज्य आरोग्य योजनांतर्गत 'गेमिंग डिसऑर्डर'चा मानसिक आरोग्य प्राधान्य म्हणून समावेश करणे.• गेमिंगच्या जाहिरातींवर 'सुरक्षा वैधानिक इशारा'याबाबत शासन विचार करीत आहे. तसेच या गेमध्ये जे गेम बध्दीला चालना देणारे आहेत त्यांची स्पर्धा घेऊन प्रोत्साहन देण्यात येईल असेही त्यांनी नमूद केले. तर याबाबत कायदा करण्याचा अधिकार हा केंद्र सरकारच्या अखत्यारित येत असून केंद्र सरकार याबाबत अत्यंत गांभिर्याने विचार करीत आहे. आपल्या टाक्स फोर्सच्या अभ्यासात जर कायदद्यातील बदला बाबत काही सूचना आल्या तर त्या शिफारशी केंद्र सरकारला कळविण्यात येतील, असेही मंत्री शेलार यांनी सांगितले.
BMC Budget 2026 : मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ८०,९५२ कोटी रुपयांचा
करमणूक शुल्क, फेरीवाल्यांना क्यूआर प्रमाणपत्र आणि निधीसाठी महापालिका बाँड्स काढणारमहापालिका आयुक्त डॉ भूषण गगराणी यांनी स्थायी समिती अध्यक्षांना सादर केला अर्थसंकल्पमुंबई (सचिन धानजी)मुंबई महापालिकेचा सन २०२६-२७ अर्थसंकल्प सादर करण्यात आला असून तब्बल ८०,९५२.५६ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प महापालिका आयुक्त डॉ भूषण गगराणी यांनी नवनिर्वाचित स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांना सादर केला. तब्बल ८९.८४ कोटी रुपये शिलकीच्या या अर्थसंकल्पात महापालिका आयुक्त डॉ भूषण गगराणी यांनी मुंबईतील फेरीवाल्यांना क्यू आर कोड प्रमाणपत्र देण्याची घोषणा करतानाच मुंबईकरांवर कोणत्याही प्रकारची करवाढ, दरवाढ आणि शुल्क वाढ लादलेली नाही. मात्र, सन २०१७ पासून बंद झालेल्या करमणूक शुल्काची आकारणी करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. तसेच शाश्वत विकासाकरता निधी उपलब्ध करण्यासाठी महापालिका ग्रीन बॉँड्स काढण्याची कार्यवाही करेल अशाप्रकारचा सुतोवाच केले आहे.मुंबई महापालिकेचा सन २०२६-२७च्या शिक्षण विभागाचा अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे यांनी शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांना तर स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांना महापालिक आयुक्त डॉ भूषण गगराणी यांनी सादर केला. यावेळी महापालिका अतिरिक्त आयुक्त डॉ अश्विनी जोशी, डॉ विपीन शर्मा, अभिजित बांगर , अविनाश ढाकणे, उपायुक्त (वित्त) प्रशांत गायकवाड, प्रमुख लेखापाल देसाई, उपप्रमुख लेखापाल (अर्थसंकल्प)अरुण जाधव आदी उपस्थित होते.चालू अर्थसंकल्प हा ७४ हजार ४०० कोटींचा मांडण्यात आला होता तो सुधारीत करून त्याचे आकारमान ६७.५१५.४० कोटी रुपये करण्यात आले. आणि आगामी अर्थसंकल्पाचे आकारमान या सुधारीत अर्थसंकल्पाच्या तुलनेत १९.३५ टक्क्यांनी वाढवून ८०,९५२.५६कोटी रुपयांवर नेवून ठेवले आहे. यामध्ये भांडवली खर्चाकरता ४८,१६४.२८कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर महसुली करता ३२,६९८.४४कोटी रुपये खर्च होणार आहे. आगामी आर्थिक वर्षांत १३,७६५.७४ कोटी रुपये इतका निधी तात्पुरत्या अंतर्गत हस्तांतरणद्वारे दर्शवला आहे. तर १४, २९४ कोटी रुपयांचा निधी हा विशेष निधी तथा राखीव निधीतून वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे अर्थस्ंकल्पाचा आकडा हस्तांतरण निधी व विशेष निधीच्या अंतर्गत कर्जाच्या आधारे वाढवण्यात आला आहे.महापालिका आयुक्तांनी या अर्थसंकल्पात महसूल वाढीवर भर देतानाच जकातीपोटी करावयाच्या भरपाईसाठी अनुदान सहायपोटी १५.५५०.०२ कोटी रुपये, विकास नियोजन खात्याकडून १२,०५०कोटी रुपयांचा महसूल प्रस्ताविला आहे. मालमत्ता कराचा महसूल ७,००० कोटी रुपयांवर प्रस्तावित केले आहे. गुंतवणुकीवर व्याजातून २५७२.२३कोटी रुपये, जल आणि मलनि:सारण करातून ३५७८. २६कोटी रुपयांचे महसूल अपेक्षित मानला आहे. याशिवाय अग्निशमन दलाकडून शुल्कापोटी ८७२.००कोटी रुपये, परवाना विभागाकडून ३८१ कोटी रुपये, शासनाकडील थकबाकीची रक्कम १४६१ कोटी रुपये अशाप्रकारे महसूल वाढीचे स्त्रोत दर्शवले आहेत..मागील वर्षीपर्यंत २ लाख ३३ हजार कोटींच्या पायाभूत प्रकल्प कामांना मंजुरी दिलेली होती, आता ही रक्कम वाढून आता २ लाख ४४ हजार ५५२ एवढी झाली आहे.नवीन योजना :युनिव्हर्सल फुटपाथ पॉलिसी अंतर्गत अधिक पादचारी अनुकूल व दिव्यांग अनुकूल पदपथ निर्माण करणारभूमिगत वाहनतळ, स्मार्ट वाहनतळवायू प्रदुषण नियंत्रणाच्या उपाययोजनाकचऱ्याचे उगमस्थानी विलगीकरणकृत्रिम बुध्दीमत्तेचा अर्थात एअाय वापर करून विकासकामांचा कल अभ्यासएआय कोचमुंबईच्या प्रवेशमार्गावर भव्य प्रवेशद्वार आणि घड्याळ मनोराअशाप्रकारे केली आहे विकासकामांसाठी तरतूद :बेस्ट अनुदान : १००० कोटी रुपयेशिक्षण विभाग : ४२४० कोटी रुपयेघनकचरा व्यवस्थापन विभाग : ५७८०.४१ कोटी रुपयेपर्जन्य जलवाहिनी विभाग : २६८६. ०२ कोटी रुपयेकोस्टल रोड प्रकल्प : ९८२ कोटी रुपयेरस्ते आणि वाहतूक विभाग : ८५०८ कोटी रुपयेपूल विभाग : ९८५२ कोटी रुपयेआरोग्य विभाग : १९३५ कोटी रुपयेप्रमुख रुग्णालये : २४७५ कोटी रुपयेवैद्यकीय महाविद्यालये : ५८३कोटी रुपयेविशेष रुग्णालये : २९२ कोटी रुपयेजल अभियंता विभाग : ४२७९ कोटी रुपयेपाणी पुरवठा प्रकल्प खाते : ६५२९ कोटी रुपयेमलनि:सारण प्रचालन विभाग : २२०५ कोटी रुपयेमलनि:सारण प्रकल्प खाते : ४३४ कोटी रुपयेमलनि:सारण प्रकल्प कामे : ६६६४ कोटी रुपयेनगर अभियंता विभाग : ३३९५ कोटी रुपयेविकास नियोजन विभाग : २९४३ कोटी रुपयेउद्यान आणि प्राणिसंग्रहालय : ८०० कोटी रुपये
मुंबई : येत्या १६ मार्च रोजी महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ७ जागांसाठी रणधुमाळी उडणार आहे. सध्याचे संख्याबळ पाहता, या निवडणुकीत महायुतीचे वर्चस्व स्पष्टपणे दिसून येत आहे. ७ पैकी ६ जागा महायुतीच्या खिशात जाण्याची शक्यता असून, यामध्ये भाजपने सर्वाधिक ४ जागांवर आपला दावा ठोकला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांना प्रत्येकी १ जागा मिळण्याची चिन्हे आहेत.याउलट, महाविकास आघाडीच्या वाट्याला केवळ १ जागा येताना दिसत आहे. मविआमध्ये एका जागेवरून सध्या जोरदार खलबतं सुरू आहेत. उद्धव ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांमध्ये या एका जागेसाठी रस्सीखेच सुरू आहे. ही जागा कोणाला द्यायची, यावर अद्याप एकमत झालेले नाही. विशेष म्हणजे, या जागेचा निर्णय घेताना केवळ राज्यसभेचा विचार न करता, भविष्यातील राजकीय गणितेही मांडली जात आहेत.राज्यसभेच्या निवडणुकीनंतर अवघ्या दोन महिन्यांत, म्हणजेच मे महिन्यात विधान परिषदेच्या ९ जागा रिक्त होणार आहेत. त्यामुळे मविआचे घटक पक्ष आता 'पॅकेज डील'च्या मानसिकतेत आहेत. ज्या पक्षाला राज्यसभेची संधी मिळणार नाही, त्यांना विधान परिषदेत झुकते माप देऊन समतोल साधण्याचा प्रयत्न सुरू आहे. थोडक्यात, राज्यसभेची ही निवडणूक आगामी विधान परिषद निवडणुकीची नांदी ठरणार असून, दोन्ही निवडणुकांचे जागावाटप एकमेकांशी घट्ट जोडलेले आहे.'हे' ९ सदस्य १३ मे २०२६ रोजी होणार निवृत्त उद्धव ठाकरे - शिवसेना नीलम गोऱ्हे - शिवसेना अमोल मिटकरी - राष्ट्रवादी शशिकांत शिंदे - राष्ट्रवादी राजेश राठोड - काँग्रेस प्रवीण दटके - भाजपा गोपीचंद पडळकर - भाजपा रणजितसिंह मोहिते पाटील - भाजपा रमेश कराड - भाजपागोपीचंद पडळकर आणि प्रवीण दटके हे २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत निवडून आल्याने त्यांच्या विधान परिषदेच्या जागा आता रिक्त झाल्या आहेत. परिणामी, भाजपा या जागांवर आपल्या निष्ठावान कार्यकर्त्यांना किंवा नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची दाट शक्यता आहे. दुसरीकडे, रणजितसिंह मोहिते पाटील यांचे पक्षातील सध्याचे संबंध पाहता, त्यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याबाबत राजकीय वर्तुळात साशंकता व्यक्त केली जात आहे. महाविकास आघाडीमध्ये विशेषतः शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गोटात मोठी उत्सुकता आहे. खुद्द उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेची जागा रिक्त होत आहे, त्यामुळे ते पुन्हा सभागृहात दिसणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार आदित्य ठाकरे यांनी पक्षासाठी एका जागेचा विशेष आग्रह धरला आहे. ही जागा नेमकी कोणाला मिळणार आणि ठाकरे स्वतः रिंगणात उतरणार का, याबाबत अद्याप सस्पेन्स कायम आहे.विधानसभेचे संख्याबळ आणि जागांचे गणित :सध्याच्या विधानसभा रचनेनुसार (भाजपा १३२, शिंदेसेना ५७, सुनेत्रा अजित पवार गट ४०) महायुतीचे पारडे अत्यंत जड आहे. विरोधी पक्षात उद्धवसेना (२०), काँग्रेस (१६) आणि शरद पवार गट (१०) यांचे संख्याबळ मर्यादित असल्याने, ९ जागांपैकी बहुतांश जागांवर महायुतीचा विजय सुकर दिसत आहे. सपा, जनसुराज्य आणि इतर अपक्षांच्या पाठिंब्यामुळे सत्ताधाऱ्यांचे संख्याबळ विधान परिषदेत आणखी वाढणार हे निश्चित आहे. तर दुसरीकडे, विरोधकांना आपल्या अस्तित्वासाठी एकाकी झुंज द्यावी लागणार आहे.
पुढील अधिवेशनाच्या आत याबाबत अहवालदोन्ही सभागृहाच्या सदस्यांची समिती स्थापन करणारमुंबई : मुलांमध्ये वाढत चाललेल्या डिजिटल व्यसनाबाबत आणि त्याचा होणारा दुष्परिणाम लक्षात घेता याबाबत अभ्यास तसेच उपाययोजना सूचवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक तज्ज्ञांची टास्क फोर्स नियुक्त करण्यात आली असून पुढील अधिवेशनाच्या आत याबाबतचा अहवाल सादर करु, अशी माहिती राज्याचे माहिती तंत्रज्ञान मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी आज विधान परिषदेत दिली.विधान परिषद सदस्य निरंजन डावखरे, संजय केणेकर यांनी यांनी लक्षवेधी उपस्थितीत करुन मुलांमध्ये वाढलेले डिजिटल व्यसन व त्याचे दुष्परिणाम याकडे सरकारचे लक्ष वेधले होते. या चर्चेत आमदार प्रविण दरेकर, चित्रा वाघ, भाई् जगताप, उमा खापरे आदी आमदार सहभागी झाले होते.या लक्षवेधीमध्ये तरुण आणि अल्पवयीन मुलांमध्ये सोशल मीडिया व्यसनाचे वाढते धोके अधोरेखित करण्यात आले होते. गेमिंग अँप व मुलांसाठी सोशल मीडिया वापरावर वयोमर्यादा ठरविणे तसेच अल्पवयीनांना उद्देशून असलेल्या डिजिटल जाहिरातींवर निर्बंध आणण्याची शिफारस करण्यात येणार काय याबाबत प्रश्न यावेळी लक्षवेधीमध्ये उपस्थितत करण्यात आले होते.या लक्षवेधीवर उत्तर देताना, मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी सांगितले की, माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव विरेंद्र सिंह यांना याबाबत तज्ञांचा टाक्स फोर्स नियुक्त करण्याचे निर्देश लेखी पत्राद्वारे दि. २ फेब्रुवारी २०२६ रोजी दिले आहेत.राज्यात १८ वर्षांखालील सुमारे चार कोटी मुले असून त्यापैकी जवळपास ३ कोटी मुले १५ वर्षांखालील आहेत. त्यामुळे त्यांच्या मानसिक व शारीरिक आरोग्याचा प्रश्न हा अत्यंत गंभीर सार्वजनिक महत्त्वाचा विषय आहे. त्यामुळे याबाबत शासन गंभीर आहे, असे मंत्री शेलार यांनी सांगितले. याबाबत दोन्ही सभागृहाच्या सदस्यांची समिती स्थापन करुन याबाबत चर्चा करु, असेही मंत्री शेलार यांनी सांगितले.राज्यासाठी या विषयाचा सर्वांगीण अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञांचा कार्यदल स्थापन करण्यात येणार असून या कार्यदलामध्ये शिक्षणतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, बालसमुपदेशक, तंत्रज्ञान तज्ज्ञ, व्यवस्थापन तज्ज्ञ, डॉक्टर, कायदेतज्ज्ञ तसेच संबंधित शासकीय विभागांचे अधिकारी यांचा समावेश असणार आहे.● मुलांचे संरक्षण आणि सुरक्षितता● मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम● डिजिटल प्लॅटफॉर्मचा संतुलित व जबाबदार वापर● शिक्षण आणि एकूण विकासावर होणारा परिणाम● सांस्कृतिक आणि कौटुंबिक घटक● लिंगनिहाय फरक● ग्रामीण आणि शहरी परिस्थितीतील भेद● सर्व उत्पन्न गटांचा समावेश● उत्पादकता आणि व्यापक आर्थिक परिणाम● मुलांच्या डिजिटल सुरक्षिततेसाठी अस्तित्वात असलेल्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चौकटींचा आढावाया सगळ्या मुद्यांवर ही टाक्स फोर्स अभ्यास करणार आहे.दरम्यान, रिस्पॉन्सिबल नेटिझम या संस्थेने केलेल्या अभ्यासाचा दाखला मंत्री शेलार यांनी आपल्या उत्तरात दिला. या अभ्यासात असे दिसून आले की, जागतिक गेमिंग बाजारपेठ आज २०० अब्ज डॉलर्सहून अधिक मूल्याची आहेमोबाईल गेम्स डाउनलोड करण्याच्या बाबतीत भारत जगात पहिल्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात स्मार्टफोनचा वाढता वापर यामुळे २०२७ पर्यंत हा देशांतर्गत उद्योग ८.६ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. या अभ्यासा नुसार महाराष्ट्रातील शहरी आणि ग्रामीण भागातील मुलांमध्ये 'गेमिंग डिसऑर्डर' (गेमिंगचे व्यसन) मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे दिसून आले आहे . महाराष्ट्रातील ५ सेंटर मधे येणाऱ्या मुलांच्या केसेस मधे प्रत्येक १० केसेस मधे ३ केसेस गेमिंग च्या व्यसनांच्या आहेत . विविध शाळांमध्ये घेतलेल्या Internet Dependency Scale मधे ४०% मुलांना moderate ते severe गेमिंग व्यसन जाणवते आहे .मानसिक परिणाम: मुलांमध्ये चिडचिडेपणा वाढणे, शैक्षणिक प्रगतीत घट होणे, 'फँटम व्हायब्रेशन सिंड्रोम' (सतत फोन वाजत असल्याचा भास होणे) आणि सामाजिक अलिप्तता. अति गेमिंगचा थेट संबंध मानसिक चिंता (Anxiety) आणि नैराश्याशी (Depression) येतो.'टेक-नेक' (मानेचे विकार), डोळ्यांवर येणारा ताण, झोपेचे चक्र बिघडणे आणि शारीरिक हालचाल कमी झाल्यामुळे वाढलेला लठ्ठपणा यांसारख्या समस्या वाढत आहेत. यासाठी शासन धोरणात्मक पातळीवर जो विचार करीत आहे त्याबाबत माहिती देताना मंत्री ॲड आशिष शेलार यांनी सांगितले की,• गेमिंग प्लॅटफॉर्मसाठी कडक 'वय पडताळणी' (e-KYC) लागू करणे• भारतीय स्थित गेमिंग रेटिंग बॅाडी स्थापन करणे, अल्पवयीन मुलांसाठी गेममध्ये 'टाइम-आउट' फीचर्स आणि रोजच्या खेळाच्या वेळेवर मर्यादा घालणे अनिवार्य करणे.• जुगारासारख्या स्वरूपाच्या 'लूट बॉक्सेस'वर (Loot Boxes) नियंत्रण मिळवणे.• शैक्षणिक पातळीवर (Educational Level):• 'डिजिटल हायजीन'चा (डिजिटल स्वच्छता) SCERT महाराष्ट्र अभ्यासक्रमात समावेश करणे.• सरकारी शाळांमध्ये 'स्क्रीन-फ्री सॅटरडे' (स्क्रीनमुक्त शनिवार) उपक्रम सुरू करणे.• मुलांमधील डिजिटल व्यसनाची सुरुवातीची लक्षणे ओळखण्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षित करणे.• आरोग्य पातळीवर (Health Level):• डिजिटल व्यसनमुक्तीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अथवा जिल्हा स्तरावर 'सायबर वेलनेस सेंटर ' स्थापन करणे.• राज्य आरोग्य योजनांतर्गत 'गेमिंग डिसऑर्डर'चा मानसिक आरोग्य प्राधान्य म्हणून समावेश करणे.• गेमिंगच्या जाहिरातींवर 'सुरक्षा वैधानिक इशारा'याबाबत शासन विचार करीत आहे. तसेच या गेमध्ये जे गेम बध्दीला चालना देणारे आहेत त्यांची स्पर्धा घेऊन प्रोत्साहन देण्यात येईल असेही त्यांनी नमूद केले. तर याबाबत कायदा करण्याचा अधिकार हा केंद्र सरकारच्या अखत्यारित येत असून केंद्र सरकार याबाबत अत्यंत गांभिर्याने विचार करीत आहे. आपल्या टाक्स फोर्सच्या अभ्यासात जर कायदद्यातील बदला बाबत काही सूचना आल्या तर त्या शिफारशी केंद्र सरकारला कळविण्यात येतील, असेही मंत्री शेलार यांनी सांगितले.
'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य
नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील पुरुष गेला आहे. हे दु:ख पाच कुटुंबातील लोकांच आहे. ही वेळ दुसर्या कोणावर येऊ नये ही पांडुरंगाकडे प्रार्थना करते. अशा घटना घडत असतील तर तपासणी झाली पाहिजे असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा तथा महासंसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांनी नवी दिल्ली येथे पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले आहे.सुप्रियाताई सुळे बोलताना म्हणाल्या की,रोहित पवार, जय पवार यांनी हा विषय लावून धरला. हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब आहे. ही एक सुरुवात आहे. मला हा पहिला रिपोर्ट आहे अस वाटतं. विमान वाहतूक मंत्री हे व्यवस्थित तपास करण्याच्या सूचना देतील. रोहित पवार यांच्या भावना समजू शकते.आमच्या घरात सगळे अस्वस्थ झाले आहेत.अजून पूर्ण रिपोर्ट पुढे येऊ द्या, असे सुप्रियाताई सुळे यांनी बोलताना सांगितले आहे.सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की,10 दिवसात संसद अधिवेशन सुरू होईल तेंव्हा हा मुद्दा उपस्थित करू, सगळ्या कंपन्या नियमाने चालवली पाहिजे. सगळ्याच विमानाचं ऑडिट झालं पाहिजे. काल परवा झारखंडमधे देखील असच विमान कोसळलं, पुढचे आठ दिवस वाट पाहू. सध्या चौकशी सुरु आहे, त्यामुळं आता अंतिम निर्णयवर येणे योग्य नाही. सगळ्या कंपन्या नियमाने चालवली पाहिजे. कोणाच्या मनमानी चालणार नाही,दादांचा अपघात, झारखंड अपघात, विमान वाहतूक मंत्री यावर सविस्तर चर्चा आणि सरकारचं स्टेटमेंट आलं पाहिजे, अशी मागणी सुप्रियाताई सुळे यांनी केली आहे.सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की, आदरणीय शरद पवार साहेबांना आज पुण्याच्या रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून ते आता मुंबईला रवाना होणार आहेत. मुंबईत त्यांच्या फॅमिली डॉक्टरांकडून रुटीन चेकअप केले जाईल. प्रकृतीच्या कारणास्तव पुढील २-३ दिवस ही प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे. आदरणीय शरद पवार साहेब यांनी पुन्हा एकदा संसदेत प्रतिनिधित्व करावे, अशी तीव्र भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे ,पवार साहेबांवर जनतेचे आणि कार्यकर्त्यांचे अलोट प्रेम असून, त्यांनी पुन्हा राज्यसभेवर जावे ही सर्वांचीच इच्छा आहे.कालच माननीय शशिकांत शिंदे आणि माननीय जयंत पाटील यांनी उद्धवजी ठाकरे यांची वेळ मागितली होती. महाविकास आघाडीतर्फे आदरणीय शरद पवार साहेब यांना 'संमतीचा उमेदवार' म्हणून पाठवण्यासाठी राष्ट्रवादीने प्रयत्न सुरू केले आहेत.मी स्वतः शिवसेना (UBT) नेते संजय राऊत आणि अनिल देसाई यांना विनंती केली आहे की, सर्वांची इच्छा असेल तर आदरणीय साहेबांना सर्वांनी मिळून राज्यसभेवर पाठवूया.यासाठी आम्ही महाविकास आघाडीतील मित्रपक्षांना प्रेमाने विनंती केली आहे ,गरज पडली तर मी दिल्लीत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशीही बोलेन,असेही सुप्रियाताई सुळे म्हणाल्या.पुढे बोलताना सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की, मी ओम बिर्लाजी यांचे मनःपूर्वक आभार मानते, एवढी मोठी जबाबदारी आणि विश्वास त्यांनी माझ्यावर दाखवला, अनेक आम्ही विरोधी पक्षातील माझ्या सहकाऱ्यांना ऑपरेशन सिंदूर होतं तेव्हाही आम्हाला संधी दिली होती, आणि आमचंही एक मत आहे, आदरणीय शरद पवार साहेबांनी नेहमीच आम्हाला सांगितले आहे की, देशाच्या हिताच जेव्हा असतं, तेव्हा आपले सगळे मत मनभेद, सगळं बाजूला ठेवून, देशाच्या हितासाठी आपण एकत्र काम करायचं, जे हे मैत्रीची ग्रुप बनवलेत त्याच्यावरती आम्ही देशाच्या वतीने अनेक देशासोबत चर्चासत्र करणार आहोत, आणि अर्थातच त्याची पहिली नोट ही आलेली आहे, पुढे काम कसं राहील,त्याचे बेसिक कसे असेल हे आम्हाला पार्लमेंटरी ऑफिसर मिनिस्टर किंवा सरकारकडून आम्हाला आलेलं नाही ,अजून त्यातील स्कोप काय आहे,किती वेळ द्यावा लागेल,काय अपेक्षित आहे,पण अर्थातच परराष्ट्र मंत्रालयाच्या माध्यमातून भारत सरकारच्या वतीने आम्हाला सगळ्यांनाच जर भारताचं इमेज असेल, त्याच्याबरोबर काम करायचं असेल, म्हणजे सोशल असेल,पॉलिटिकल असेल, किंवा बिजनेस पॉलिसी असेल, या सगळ्यांसाठी जर सगळे खासदार मिळून चांगलं करू पाहता, मला असे वाटते त्याचे आपण सगळ्यांनी मिळून देशाच्या हितासाठी स्वागत केले पाहिजे, आणि मी जाहीरपणे भारत सरकारचे आणि ओम बिर्लांजीचे मनःपूर्वक आभार मानते, तेवढी मोठी जबाबदारी त्यांनी माझ्यावर दिली आहे, असे सुप्रियाताई सुळे यांनी बोलताना सांगितले आहे.
गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण जगात एपस्टाईन फाइल्समुळे गोंधळ उडाला आहे. अशातच या फाइल्समध्ये नाव आलेल्या एका पंतप्रधानांनी चक्क आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.नॉर्वेचे माजी पंतप्रधान थोरबजॉर्न जगलंड यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्यावर जेफ्री एपस्टीन यांच्यासोबत भ्रष्टाचाराशी संबंधित संबंध असल्याचे आरोप आहेत. जगलंड हे नॉर्वेजियन नोबेल समितीचे माजी अध्यक्ष तसेच युरोप परिषदेचे माजी महासचिव राहिले आहेत. अधिकृतरीत्या गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर ही घटना घडल्याचे सांगितले जाते. दोष सिद्ध झाल्यास त्यांना १० वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. दरम्यान जगलंड यांनी कोणतेही गैरकृत्य केल्याचे नाकारले आहे. त्यांनी एपस्टीनसोबतचे संबंध “चुकीचा निर्णय” असल्याचे म्हटले असून, तपासात पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.अमेरिकेच्या न्याय विभागाच्या कागदपत्रांमधून जगलंड आणि एपस्टीन यांच्यातील संबंध उघड झाल्याचे सांगितले जाते. त्यानुसार, जगलंड आणि त्यांच्या कुटुंबीयांनी पॅरिस, न्यूयॉर्क आणि पाम बीच येथील एपस्टीनच्या मालमत्तांना भेट दिली होती. तसेच एपस्टीनच्या खासगी बेटावर – लिटल सेंट जेम्स – भेटीचा विचारही झाल्याचे म्हटले जाते.असेही म्हटले जाते की, एपस्टीन यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांसारख्या उच्चस्तरीय व्यक्तींशी भेटी घडवून आणण्यासाठी तसेच काही आर्थिक योजनांना चालना देण्यासाठी जगलंड यांची मदत मागितली होती. संवादामध्ये जगलंड यांना “नोबेल बिग शॉट” असे संबोधण्यात आल्याचेही नमूद आहे. जगलंड यांनी राजनैतिक आणि मानवाधिकार क्षेत्रात प्रभाव टाकला, तर एपस्टीन यांनी आलिशान सुविधा, भेटवस्तू, प्रवास आणि कर्जाच्या ऑफर दिल्याचा आरोप आहे.यानंतर नॉर्वेच्या अधिकाऱ्यांनी एपस्टीनकडून कथित लाभ घेतल्याप्रकरणी जगलंड यांच्यावर गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. नॉर्वेची आर्थिक गुन्हे तपास संस्था ओकोक्रिम यांच्या नेतृत्वाखाली तपास करण्यात आला. त्यांच्या ओस्लो येथील निवासस्थानी तसेच इतर मालमत्तांवर छापे टाकण्यात आले.या तपासात जगलंड यांनी आपल्या अधिकृत पदाचा गैरवापर करून अनुचित लाभ घेतला का, याचा शोध घेतला जात आहे. युरोप परिषदेकडून तपास पुढे नेण्यासाठी त्यांची राजनैतिक प्रतिकारशक्ती काढून टाकण्यात आली आहे.जगलंड १९९६ ते १९९७ या काळात नॉर्वेचे पंतप्रधान होते. त्यांनी परराष्ट्र मंत्री म्हणूनही काम केले. ते २००९ ते २०१५ या कालावधीत नॉर्वेजियन नोबेल समितीचे अध्यक्ष होते आणि २००९ ते २०१९ या काळात युरोप परिषदेचे महासचिव म्हणून कार्यरत होते.
मुंबईत २७,२८ फेब्रुवारीला पीएम विश्वकर्मा प्रदर्शन व व्यापार मेळावा
मुंबई: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी उत्पादनांच्या वापराचे केलेले आवाहन तसेच पीएम विश्वकर्मा योजनेच्या प्रसारासाठी केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने मुंबईत २७ आणि २८ फेब्रुवारीला छोट्या उद्योजकांच्या वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामीण कारागिरांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि सर्व कारागिरांचे उत्पादन अधिकाधिक लोकांपर्यंत जाण्यासाठी हे प्रदर्शन असून नागरिकांनी वस्तू खरेदी कराव्यात, असे आवाहन महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती (राज्यमंत्री दर्जा) रवींद्र साठे यांनी पत्रकार परिषदेत केले.साठे यांनी सांगितले की, केंद्र सरकारचे सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय (एमएसएमई) आणि महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ यांच्या सहकार्याने हे प्रदर्शन सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय, यांचे कार्यालय, घाटकोपर-अंधेरी लिंक रोड, साकीनाका, अंधेरी (पूर्व) येथे होणार आहे. हे प्रदर्शन आणि मेळावा सकाळी १० ते संध्याकाळी ८ या वेळेत सर्वांसाठी खुले राहणार आहे.पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत महाराष्ट्रात आतापर्यंत ८ प्रदर्शनांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच कारागीर व शिल्पकारांच्या उत्पादनांच्या विपणन व ब्रँडिंगसंदर्भात जनजागृती करण्यासाठी ३४ एकदिवसीय कार्यशाळाही आयोजित करण्यात आल्या आहेत. या प्रदर्शनात १०० स्टॉलद्वारे ग्रामीण भागातील छोट्या कारागिरानी तयार केलेल्या बांबू हस्तकला, फर्निचर साहित्य, तयार कपडे, मातीची भांडी (कुंभारकाम), दागिने तसेच इतर पारंपरिक हस्तकला उत्पादने ठेवण्यात येणार आहेत. खादी म्हणजे केवळ कापड नव्हे, यामध्ये छोट्या उद्योजकांनी तयार केलेल्या विविध वस्तू आहेत. मुंबईतील नागरिक, उद्योजकांनी प्रदर्शनास भेट देऊन स्वदेशी उत्पादनांची खरेदी करून स्थानिक कारागिरांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन रविंद्र साठे यांनी केले आहे.प्रदर्शनाचे उद्घाटन २७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांच्या हस्ते होणार असून मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी गीतांजली बाविस्कर उपस्थित राहणार असल्याची माहिती एमएसएमईचे संचालक मिलिंद बारापात्रे यांनी दिली.पीएम विश्वकर्मा योजनेत महाराष्ट्राचा तिसरा क्रमांकप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दोन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या पीएम विश्वकर्मा योजनेत महाराष्ट्रने तिसरा क्रमांक पटकावला. आतापर्यंत २७ लाख अर्ज प्राप्त झाले. तीन लाख उमेदवारांनी नोंदणी यशस्वी केली, त्यापैकी अडीच लाख जणांना प्रमाणित करून दोन लाख उमेदवारांना १८ प्रकारातील ट्रेडनिहाय प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये राज्याचा देशात तिसरा क्रमांक आल्याची माहिती सभापती रवींद्र साठे यांनी दिली. अधिक माहितीसाठी एमएसएमईचे उपसंचालक सुनील खुजनरे मुंबई (मो. ८३०८४०९०१९) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
'रो-रो'च्या माध्यमातून महत्त्वाचे जिल्हे आणि राज्ये मुंबईशी जोडणार - मंत्री नितेश राणे यांची माहिती
जलमार्गांचे जाळे उभारण्याची मुख्यमंत्र्यांची संकल्पना सत्यात उतरवणारमुंबई : शिमग्याच्या निमित्ताने कोकणात जाणाऱ्या नागरिकांचा रो-रो सेवेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. भविष्यात रो-रोच्या माध्यमातून मुंबईला अन्य जिल्हे आणि राज्यांसोबत जोडून पर्यटन, रोजगार आणि कृषी क्षेत्राला चालना देण्याचा प्रयत्न राहील, अशी माहिती मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिली.विधानभवन परिसरात माध्यमांशी बोलताना मंत्री नितेश राणे म्हणाले की, महाराष्ट्रात जलवाहतूक सुरु करावी, हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. २०१४ ते २०१९ मध्ये त्यांच्याकडे बंदरे खाते असताना त्यांनी काही प्रकल्पांना चालना देत, नव्या संकल्पना मांडल्या होत्या. मुंबई आणि कोकणाला जलवाहतुकीच्या माध्यमातून जोडणे ही त्यांचीच संकल्पना आहे. आता त्यांच्या नेतृत्वाखाली या संकल्पना सत्यात उतरवण्याची सुरुवात आम्ही केली आहे.\येत्या १ मार्च पासून मुंबई आणि कोकणाला जलमार्गाने जोडण्याचा पहिला टप्पा सुरू करीत आहोत. मुंबई ते विजयदुर्ग असा हा पहिला मार्ग असेल. येत्या काळात मुंबई ते रत्नागिरी, मुंबई ते महाड असे असंख्य मार्ग वाढवणार आहोत. मुंबई ते विजयदुर्ग या बोटीबाबतची संपूर्ण माहिती वेबसाईटवर उपलब्ध असून, तिकीटची बुकिंगसुद्धा सुरू झाली आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून परवानगी मिळाल्यावर चाचणी केल्यानंतरच रो-रो सेवा सुरू करीत आहोत. प्रवाशांच्या आरोग्याची काळजी घेत १ मार्चपासून बोटीवर डॉक्टरांची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती मंत्री राणे यांनी दिली.महापालिकेत विकासासाठी गेले की, धर्म वाढवण्यासाठी?मालेगाव महापालिकेत नमाज पठण करतानाच्या व्हायरल व्हिडिओवर बोलताना मंत्री नितेश राणे म्हणाले की, निवडणुकीआधी असे लोक 'जय मीम, जय भीम' बोलतात पण निवडणुकीनंतर फक्त 'जय मीम'च राहते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ते विसरतात. संविधानाच्या कुठल्या पानावर नगरपालिका किंवा महानगरपालिकेत नमाज पठणास परवानगी आहे? तुम्ही तिथे विकास करण्यासाठी निवडून गेलात की, धर्म वाढवण्यासाठी? हा जिहाद नाही का? नमाज पठण करण्यासाठी मशिदी बंद पडल्यात का? आम्ही उद्या आमच्या हिंदू राष्ट्रात प्रत्येक महापालिकेत भागवतगीता वाचणे सुरू करतो. मग हिरव्या सापांनी तोंड उघडू नये, असा इशाराही त्यांनी दिला.मदरसे म्हणजे आतंकवादी घडवण्याचे अड्डेमदरसे हवेत कशाला? हे मदरसे म्हणजे आतंकवाद्यांचे अड्डे आहेत. ते आतंकवादी घडवतात. आम्ही कुठल्या इस्लामिक राष्ट्रामध्ये अशा शाळा उघडून भगवतगीता शिकवणे सुरु केले? इस्लामिक राष्ट्रांमध्ये त्याची परवानगी आहे का? मग आम्ही कशाला यांचे लाड करायचे? कुराण शिकवण्यासाठी तुमच्या मशिदी आहेत, मग मदरसे कशाला हवेत? महाराष्ट्रातील सगळे मदरसे बंद करा, याबाबत मी मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे, असेही मंत्री राणे यांनी सांगितले.लवकरच ताकदीचा लव्ह जिहादविरोधी कायदा आणणारकेरला स्टोरी-२ या चित्रपटात सत्य दाखवण्यात आले आहे. लव्ह जिहादच्या नावाने ज्याप्रकारे हिंदू माता-भगिनींचे आयुष्य उद्धवस्थ करण्याचा प्रयत्न हे जिहादी करतात, ते सत्य यात दाखवले आहे. मी स्वत: असंख्य पीडित कुटुंबियांना भेटलो आहे. त्यामुळे जोपर्यंत जिहाद संपत नाही आणि लव्ह जिहाद थांबत नाही तोपर्यंत केरला स्टोरी १, २, ३, ४, ५ असे चित्रपट येत राहणार. अशा चित्रपटांना विरोध करण्यापेक्षा जिहाद करणे थांबवा. ज्या देशात राहता त्या देशाचा सन्मान करणे शिका. ज्याप्रमाणे उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये ताकदीचा लव्ह जिहाद आणि धर्मांतरविरोधी कायदा आहे तसाच ताकदीचा आणि हिंदु बहिणींना संरक्षण देणारा कायदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार आणणार आहे, असेही मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.
Block OTT apps: डिजिटल मनोरंजनाच्या नावाखाली अश्लील सामग्री प्रदर्शित करणाऱ्या प्लॅटफॉर्मवर सरकारने पुन्हा एकदा मोठी कारवाई केली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने अलीकडेच पाच ओटीटी प्लॅटफॉर्मवर पूर्णपणे बंदी घातली आहे.
चालू आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या तिसऱ्या तिमाहीचे (ऑक्टोबर-डिसेंबर) सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) आकडे २७ फेब्रुवारी रोजी जाहीर होतील. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय आता एका नवीन मालिकेवर आधारित जीडीपी आकडे जाहीर करेल.अधिकृत सूत्रांनी सांगितले की केंद्र सरकार २७ फेब्रुवारीपासून जीडीपी मोजण्याची एक नवीन पद्धत लागू करत आहे. केंद्र सरकारने २०११-१२ पासून जीडीपी आकड्यांसाठी आधार वर्ष बदलून २०२२-२३ केले आहे. ग्राहक किंमत निर्देशांक (सीपीआय) वर आधारित किरकोळ महागाईनंतर, जीडीपी आकड्यांसाठी आधार वर्ष २०२२-२३ असेल, ज्यामध्ये दुहेरी चलनवाढ आणि अचूकतेसाठी ५००-६०० वस्तू वापरल्या जातील.याशिवाय, सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाकडून २७ फेब्रुवारी रोजी २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी जीडीपीचा दुसरा आगाऊ अंदाज जाहीर होण्याची अपेक्षा आहे. यामध्ये नवीन डेटा आणि सुधारणांचा समावेश असेल. त्यामुळे, पहिल्या आणि दुसऱ्या तिमाहीतील सर्व जुने आकडे देखील नवीन आधार वर्ष २०२२-२३ नुसार बदलू शकतात.हे लक्षात घेण्यासारखे आहे की राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या (एनएसओ) गेल्या महिन्यात जाहीर झालेल्या पहिल्या आगाऊ अंदाजानुसार, चालू आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी वास्तविक जीडीपी वाढीचा दर ७.४ टक्के असण्याचा अंदाज आहे, तर मागील आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी जीडीपी वाढीचा दर ६.५ टक्के होता. मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या ताज्या अहवालात, स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) ने चालू आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या तिसऱ्या तिमाहीत देशाचा वास्तविक जीडीपी वाढीचा दर ८.१ टक्के असण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
राज्यसभेसाठी शरद पवारांची मनधरणी सुरू
- उबाठा आणि काँग्रेसची कोंडी; जयंत पाटील, शशिकांत शिंदे, सुप्रिया सुळेंचा पुढाकारमुंबई : शरद पवार गटाला बाजूला ठेवून उबाठा आणि काँग्रेस राज्यसभा निवडणुकीसाठी वाटाघाटी करीत असताना, पवारांच्या शिलेदारांनी त्यांची कोंडी करण्यास सुरुवात केली आहे. संख्याबळ नसतानाही राज्यसभेची एक जागा पदरात पाडून घेण्याची आयती संधी हातून जाऊ नये, यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. प्रकृतीच्या कारणास्तव निवडणूक लढण्यास अनुकूल नसतानाही शरद पवार यांनीच रिंगणात उतरावे, यासाठी त्यांची मनधरणी सुरू करण्यात आली आहे. जयंत पाटील, शशिकांत शिंदे आणि सुप्रिया सुळे यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे.महाविकास आघाडीच्या (मविआ) गणितानुसार राज्यसभेची एक जागा जिंकणे शक्य आहे. मविआकडे एकूण ४६ मते (उबाठा २०, काँग्रेस १६ आणि पवार गट १०) असल्याने ही जागा सहज मिळू शकते. सुरुवातीला या जागेसाठी शरद पवार यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, प्रकृती अस्वास्थ्य आणि वयोमान लक्षात घेता त्यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिल्याने समीकरणे बदलली. पवार गटाला बाजूला ठेवून उबाठा गट आणि काँग्रेसने वाटाघाटी सुरू केल्या.दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या भवितव्याचा फैसला निकट असताना अशा महत्त्वाच्या टप्प्यावर पवारांनी सक्रिय राजकारणातून दूर राहणे योग्य ठरणार नाही, अशी भूमिका पवार गटातील वरिष्ठ नेत्यांनी घेतली आहे. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “शरद पवार यांनीच राज्यसभा लढवावी, ही आमची भूमिका आहे. मी आणि जयंत पाटील काँग्रेसशी चर्चा करणार असून उद्धव ठाकरे यांचीही भेट घेणार आहोत.”शरद पवार आज मुंबईत दाखल होणार असून पुढील तपासण्यांसाठी ते ब्रिच कॅन्डी रुग्णालयात जाणार आहेत. त्यानंतर काही दिवस विश्रांती घेणार असल्याची माहिती आहे. दुपारी जयंत पाटील त्यांची भेट घेणार असून त्यानंतर ठाकरे यांची भेट घेऊन पवारांच्या उमेदवारीबाबत भूमिका मांडली जाणार असल्याचे समजते.सुप्रिया सुळेंची संपर्क मोहीम :सुप्रिया सुळे यांनीही राज्यसभेसाठी शरद पवारांच्या उमेदवारीला पाठिंबा मिळवण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. “रुबी रुग्णालयातून त्यांना डिस्चार्ज मिळाला असून ते मुंबईला येत आहेत. सर्वांचा आग्रह आहे की त्यांनीच राज्यसभेवर जावे. जयंत पाटील आणि शशिकांत शिंदे यांनी ठाकरे यांच्याकडे वेळ मागितली आहे. मी संजय राऊत आणि यांच्याशी संपर्क साधला आहे. दिल्लीत काँग्रेसच्या वरिष्ठांनाही भेटणार आहे,” असे सुळे यांनी सांगितले. एकमताने निर्णय व्हावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.आज मविआची बैठक :आज विधानभवनात महाविकास आघाडीच्या आमदारांची बैठक होणार असून राज्यसभा निवडणुकीवर चर्चा होण्याची शक्यता आहे. उबाठा गटाकडून आदित्य ठाकरे हे एक जागा आपल्या पक्षाला मिळावी, यासाठी आग्रही असल्याची माहिती आहे. मात्र, मविआकडून शरद पवार यांच्या नावाचीच जोरदार चर्चा सुरू असल्याने अंतिम निर्णयाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
Attack on Lawrence Bishnoi lawyer: दिल्लीतील काश्मिरी गेटमधील मरघाट वाले हनुमान मंदिराजवळ काल रात्री काही अज्ञात हल्लेखोरांनी एका कारला लक्ष्य करत अनेक राउंड गोळीबार केला.
CJI on NCERT: NCERT च्या आठवीच्या पाठ्यपुस्तकात न्यायिक भ्रष्टाचार या विषयावरील प्रकरणाचा समावेश करण्याच्या मुद्द्यावर लवकर सुनावणी करण्याचे आश्वासन सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे.
Katrina Kaif : कतरिना कैफ आई झाल्यानंतर पहिल्यांदाच कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
Katrina Kaif : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आई झाल्यानंतर पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर दिसली. प्रेग्नंसी दरम्यान कतरिनाने कॅमेरापासून दूर राहणं पसंत केलं होतं. डिलिव्हरीनंतरही ती कुठे दिसली नव्हती. आता आई झाल्यानंतर इतक्या महिन्यांनी कतरिना पहिल्यांदाच कॅमेरासमोर आली आहे. कतरिनाने 7 नोव्हेंबर 2025 ला गोंडस मुलाला जन्म दिला. कतरिना आणि विकी कौशलच्या मुलाचे नाव विहान असे आहे. आई […]
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ऑपरेशन सिंदूर संदर्भात एक मोठे विधान केले आहे. जर मी नसतो तर या सिंदूर ऑपरेशनमध्ये पाकिस्तानी पंतप्रधानांचा मृत्यू झाला असता. असं विधान ट्रम्प यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.नेमकं काय म्हणाले ट्रम्प ?डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की त्यावेळी म्हणजेच ऑपरेशन सिंदूरच्या वेळी परिस्थिती वेगाने बिघडत होती आणि ती नियंत्रणाबाहेर जाऊ शकली असती. जर त्यांनी हस्तक्षेप केला नसता तर त्याचे परिणाम भयानक झाले असते असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. त्यावेळी पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सुरक्षेलाही धोका होता असेही त्यांनी सांगितले.'लाखो जीव वाचले' :ट्रम्प यांनी त्यांच्या निवेदनात असाही दावा केला की त्यांच्या राजनैतिक पुढाकारांमुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी टाळता आली. त्यांनी सांगितले की त्यांच्या वाटाघाटी आणि हस्तक्षेपामुळे अंदाजे ३५ दशलक्ष लोकांचे जीव वाचले. त्यांनी असाही दावा केला आहे की भारत आणि पाकिस्तान यांच्यातील ही परिस्थिती अणु संघर्षाकडे जात होती, परंतु ती वेळीच रोखण्यात आली.अमेरिका के राष्ट्रपति डोनल्ड ट्रैप ने दावा किया है कि साल 2025 में भारत-पाकिस्तान के बीच हुए सैन्य तनाव के दौरान उनकी कूटनीतिक पहल ने पाकिस्तान के प्रधानमंत्री शाहबाज़ शरीफ़ की जान बचाई। ट्रंप का कहना है कि अगर उन्होंने हस्तक्षेप नहीं किया होता तो हालात बेहद गंभीर हो सकते थे।… pic.twitter.com/VkNzUG44JO— anjunirwan (@anjn) February 25, 2026राजनयिकतेने एक मोठे संकट टाळले :ट्रम्प यांच्या मते, त्यांनी दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्यासाठी संवादाचा मार्ग स्वीकारला आणि यामुळे परिस्थिती हळूहळू सामान्य होऊ लागली. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या दाव्याला इतर देशांनी अधिकृतपणे दुजोरा दिलेला नसला तरी, ट्रम्प यांचे विधान आंतरराष्ट्रीय राजकारणात चर्चेचा विषय बनले आहे.
मुंबईहून मिरा भाईंदर ते वसई-विरार दरम्यानचा प्रवास होणार सुसाट
मुंबई: मुंबई शहरातून बरीच लोक अनेक उपनगरात कामानिमित्ताने जात असतात. ज्यात मुंबई ते पालघर जाणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे त्या ठिकाणचा प्रवास सुखकर होण्यासाठी एमएमआरडीएने कंबर कसली आहे.मुंबई महानगर क्षेत्राचा कायापालट होणारजर तुम्हीही मुंबईतून वसई-विरारला जाणार आहात तर हा प्रवास आता अतिशय सोपा आणि कमी वेळात पार होणार आहे पण हे कसे आणि कधीपासून शक्य होईल ते जाणून घ्या.सध्या दहिसर ते मिरा-भाईंदरदरम्यान सुरू असलेल्या एमएमआरडीएच्या मेट्रो ९ मार्गिकेचा विस्तार आता मिरा-भाईंदर ते वसई-विरार असा मेट्रो १३ मार्गिकेद्वारे केला जाणार आहे. अनेक वर्षे केवळ कागदावर असलेला हा प्रकल्प आता प्रत्यक्षात येण्याच्या मार्गावर आहे.काय बदल होणार?एमएमआरडीएच्या १६० व्या बैठकीत मेट्रो १३ च्या सुधारित आराखड्याला मान्यता देण्यात आली. नव्या आराखड्यानुसार या मार्गिकेची लांबी २५.०३ किमी असणार आहे. यापूर्वी ती २३ किमी प्रस्तावित होती. वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील प्रवासीसंख्या लक्षात घेऊन मार्गात बदल करण्यात आले आहेत.कामाला कधी होणार सुरुवात?आता हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठवला जाणार आहे. मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.कोणत्या प्रवाशांना फायदा होणार?मेट्रो २, २बी, ९ आणि १३ या मार्गिका एकमेकांशी जोडल्या गेल्यास मानखुर्द ते वसई-विरार असा सलग मेट्रो प्रवास शक्य होणार आहे. त्यामुळे वसई-विरारकरांचे मेट्रोचे स्वप्न लवकरच पूर्ण होण्याची आशा निर्माण झाली आहे.
मुंबई : मुंबईतील वाढते वायू प्रदूषण आणि बांधकामाच्या ठिकाणी पायदळी तुडवले जाणारे नियम यावर आज विधान परिषदेत गांभीर्याने चर्चा झाली. शिवसेना (ठाकरे गट) नेते अनिल परब यांनी वांद्रे पूर्व येथील मुंबई उच्च न्यायालयाच्या इमारतीचे काम करताना प्रदूषण नियंत्रण नियमावलीचे (Dust Mitigation Norms) उल्लंघन होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला.पंकजा मुंडे यांचे उत्तर: 'चुकीची आकडेवारी पसरवू नका'या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले की, मुंबईत सध्या मेट्रो आणि विविध इमारतींची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात डेब्रिज (बांधकाम कचरा) निर्माण होत आहे. येत्या ३ ते ६ महिन्यांत डेब्रिजवर प्रक्रिया करण्यासाठी बैठक घेऊन एक ठोस प्लॅन तयार केला जाईल. त्यांनी नमूद केले की, काही लोक विकासाला विरोध करण्यासाठी प्रदूषणाची चुकीची आकडेवारी सादर करत आहेत. नागरिकांनी आणि लोकप्रतिनिधींनी MPCB ची अधिकृत आकडेवारी पाहावी. भाई जगताप यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुंडे यांनी सांगितले की, मी स्वतः कोस्टल हायवेवरून जात असताना धुळीचे लोट पाहिले आणि तिथे तात्काळ नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत.या चर्चेत हस्तक्षेप करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील प्रदूषण रोखण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणार असल्याचे सांगितले. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, मुंबई महापालिकेला (BMC) IoT (Internet of Things) आणि AI (Artificial Intelligence) वर आधारित 'डायनॅमिक मॉनिटरिंग सिस्टीम' तयार करण्याचे आदेश दिले आहेत. जोपर्यंत मानवी हस्तक्षेपाऐवजी तंत्रज्ञानाचा वापर होत नाही, तोपर्यंत बांधकामांच्या ठिकाणचे १०० टक्के मॉनिटरिंग शक्य नाही. सरकारी असो वा खाजगी, प्रत्येक बांधकामावर या सिस्टीमद्वारे लक्ष ठेवले जाईल.
Child Nutrition: नवजात बालकाचा योग्य आहार : पहिले सहा महिने फक्त आईचे दूधच सर्वोत्तम!
Child Nutrition आईने या काळात स्वतःचा आहार चौरस आणि पौष्टिक ठेवणे आवश्यक आहे. आईचा आहार चांगला असेल तर दुधाचा दर्जा उत्तम राहतो आणि बाळाचे पोषण योग्य प्रकारे होते. त्यामुळे बाळ बाळसेदार वाढते आणि आईचे वजनही नियंत्रणात राहते.
Diabetes-Obesity Awareness लठ्ठपणा आणि मधुमेह यांचा अतिशय जवळचा संबंध आहे. हे एका नाण्याच्या दोन बाजूंप्रमाणे आहेत. जवळपास ५० टक्क्यांहून अधिक रुग्णांमध्ये या दोन्ही समस्या एकत्र आढळतात. या धोकादायक संयोजनाला “मेटाबॉलिक कॉम्बिनेशन” असे म्हटले जाते.
Arijit Singh : गायनातून निवृत्ती घेतलेल्या अरिजीत सिंहची चाहत्यांसाठी भावूक पोस्ट
Arijit Singh : करिअरच्या शिखरावर असताना अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे जगभरातील अरजित सिंगचे चाहते निराश झाले होते.
8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत ‘या’राज्याने दिली गुड न्यूज ; कोण-कोण होणार यातून बाहेर ?
8th Pay Commission: आसामने आठव्या वेतन आयोगाबाबत पुढाकार घेतला आहे, ज्यामुळे जवळपास सात लाख कर्मचारी आणि पेन्शनधारकांना आनंदाची बातमी मिळाली आहे.
मुंबई: मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाचा स्वतंत्र अर्थसंकल्प बुधवारी सकाळी शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांना अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे यांनी सादर केला. ४२४८.०८ कोटी रुपयांचा हा अर्थसंकल्प असून असून चालू शैक्षणिक वर्षापेक्षा सुमारे ३०० कोटी रुपयांनी याचा आकार वाढवण्यात आला आहे. शिक्षणातील दरी साधण्यासाठी आणि प्रत्येक बालकास शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आम्ही वचनबद्ध असल्याचे ग्वाही या अर्थसंकल्पीय भाषणात व्हावे अविनाश ढाकणे यांनी दिली आहे.राष्ट्रीय छात्र सेना हा उपक्रममुंबई महापालिकेच्या इयत्ता आठवी व इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांसाठी एनसीसी पथकाची ॲडिशनल डायरेक्टर जनरल ऑफ एनसीसी यांच्याकडे करण्यात येणार आहे. तसेच आगामी शैक्षणिक वर्षात शारीरिक शिक्षण विभागामार्फत राष्ट्रीय छात्र सेना हा उपक्रम सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी या अर्थसंकल्पीय भाषणात नमूद केले आहे.आणखी ४० शाळांमध्ये खगोलशास्त्रीय प्रयोगशाळाराष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत महापालिकेच्या ५५ शाळांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर खगोलशास्त्रीय प्रयोगशाळा उभारणीचे काम पूर्ण झाले असून सन २०२६-२७ मध्ये आणखी ४० शाळांमध्ये खगोलशास्त्रीय प्रयोगशाळा स्थापन करण्यात येणार आहेत.इंग्रजी भाषा प्रयोगशाळामुंबई महापालिकेच्या शाळांमधील इयत्ता आठवी ते इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांकरीता २७९ इंग्रजी भाषा प्रयोगशाळा स्थापन करण्याचे काम सुरू आहे यासाठी ३. ८७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे.
व्यवस्थापन केंद्र स्थापन करण्यासाठी मेडट्रॉनिक इंडियासोबत ग्लेनेगल्स हॉस्पिटलसोबत काम करणार
मेडट्रॉनिक या आरोग्यसेवा तंत्रज्ञानामधील जागतिक अग्रणी कंपनीने आज ग्लेनेगल्स हॉस्पिटल, मुंबईसोबत सहयोगाची घोषणा केली. या सहयोगांतर्गत विशेष रेनल डिनर्व्हेशन थेरपी केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. अनियंत्रित उच्च रक्तदाबाच्या वाढत्या आव्हानाचे निराकरण करण्यासाठी आणि अनियंत्रित उच्च रक्तदाबाच्या प्रभावी व्यवस्थापनाला चालना देण्यासाठी हा सहयोग करण्यात आला आहे.उच्चरक्तदाब हे जगभरातील अकाली मृत्यूचे प्रमुख कारण आहे . जागतिक स्तरावर आणि भारतात हृदयविकाराशी संबंधित आजार आणि मृत्यूदरासाठी हा आजार मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहे . डॉक्टरांसमोर असलेले प्रमुख आव्हान म्हणजे रुग्णांमध्ये उच्चरक्तदाब नियंत्रित ठेवण्याबाबत असलेल्या जागरूकतेचा अभाव, जे अनियंत्रित उच्चरक्तदाबाचे महत्त्वपूर्ण कारण आहे.या भागीदारीबद्दल बोलताना, मेडट्रॉनिक इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि उपाध्यक्ष मनदीप सिंग कुमार म्हणाले, अनियंत्रित उच्च रक्तदाब हे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी काळजीमध्ये वाढणारे आणि अनेकदा अपरिचित आव्हान आहे आणि त्याचा वाढता भार काळजी कशी दिली जाते याचे पुनर्मूल्यांकन करण्याची तातडीची गरज अधोरेखित करतो. ग्लेनेगल्स हॉस्पिटलसोबतची आमची भागीदारी जागरूकता वाढविण्यासाठी आणि त्याच्या निदान आणि व्यवस्थापनासाठी अधिक समन्वित, संरचित दृष्टिकोन सक्षम करण्यासाठी त्यांच्या क्लिनिकल टीमसोबत जवळून काम करून वास्तविक जगात परिणाम देण्यावर केंद्रित आहे. या सहकार्याचे उद्दिष्ट जटिल आणि अनियंत्रित उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांसाठी सुधारित रक्तदाब नियंत्रण आणि चांगले दीर्घकालीन परिणामांना समर्थन देणे आहे. मेडट्रॉनिकमध्ये, आमचे ध्येय वेदना कमी करणे, आरोग्य पुनर्संचयित करणे आणि आयुष्य वाढवणे आहे आणि अशा प्रकारचे सहकार्य त्या वचनबद्धतेचे केंद्रबिंदू आहे.या सहकार्याबद्दल बोलताना, ग्लेनिगल्स हॉस्पिटल, मुंबईचे सीईओ डॉ. बिपिन चेवाले म्हणाले, उशीरा निदान, विखंडित काळजी आणि विसंगत पाठपुरावा यामुळे उच्च रक्तदाब व्यवस्थापनाला आव्हाने मिळत आहेत. मेडट्रॉनिकसोबत भागीदारी केल्याने ग्लेनिगल्स हॉस्पिटलला क्लिनिकल कौशल्य, प्रगत तंत्रज्ञान आणि रुग्ण-केंद्रित काळजी मार्ग एकत्रित करून अनियंत्रित उच्च रक्तदाबासाठी अधिक संरचित आणि समन्वित दृष्टिकोन स्वीकारण्यास सक्षम करते. हे सहकार्य दीर्घकालीन रक्तदाब नियंत्रण साध्य करण्यावर आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी गुंतागुंतीचा धोका कमी करण्यावर केंद्रित आहे, ज्यामुळे अनियंत्रित उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांसाठी परिणाम सुधारतात.या सहयोगाच्या माध्यमातून दोन्ही सहयोगींचा एकीकृत केअर उपचार सुविधा निर्माण करत आणि वैद्यकीय क्षमता वाढवत गुंतागुंतीच्या व अनियंत्रित उच्चरक्तदाबाचे उत्तम व्यवस्थापन करण्याचा मनसुबा आहे. हॉस्पिटलच्या बहुआयामी टीम्स व रूग्णांसाठी उपलब्ध उच्च सुविधा रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्यास अवघड जाणाऱ्या रूग्णांचे दीर्घकाळापर्यंत सर्वांगीण व्यवस्थापन करतात. मेडट्रॉनिक पुरावा-आधारित तंत्रज्ञानांमधील त्यांचा अनुभव आणि क्लिनिशियन्ससाठी सुरू असलेले वैद्यकीय शिक्षण प प्रशिक्षणाच्या माध्यमातून या प्रयत्नाला पाठिंबा देते, तसेच प्रगत उपचार मार्गांमध्ये मदत करते. यामुळे उपचार पद्धती प्रगत करण्यास आणि पर्यायाने रुग्णांचे आरोग्य सुधारण्यास व ज्यांना रक्तदाब नियंत्रणात अडथळे येतात अशा रुग्णांचे सर्वांगीण व्यवस्थापन सुनिश्चित करण्यास मदत होते.या केंद्राचा उच्चरक्तदाबाच्या परिणामांबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा मनसुबा आहे. अनियंत्रित उच्चरक्तदाबाबद्दल रुग्णांना शिक्षित करण्यात हे केंद्र महत्त्वाची भूमिका बजावेल, ज्यामध्ये जीवनशैलीतील बदल, औषधे वेळेवर घेणे आणि रेनल डिनर्व्हेशन थेरपीसारख्या प्रगत उपचार पर्यायांची उपलब्धता यांसारख्या गोष्टींचा समावेश असेल.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज म्हणजेच बुधवार २५ फेब्रुवारी रोजी सकाळी दोन दिवसांच्या इस्रायल दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. हा त्यांचा दुसरा इस्रायल दौरा आहे. पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, विशेषतः अमेरिका आणि इराणमधील बिघडत चाललेल्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर, भारत-इस्रायल धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. यावेळी पंतप्रधान मोदी इस्रायली संसदेलाही संबोधित करतील.I will be undertaking a State Visit to Israel today and tomorrow. Our nations share a robust and multifaceted Strategic Partnership. Ties have significantly strengthened in the last few years. I will be holding talks with PM Netanyahu, in which we will discuss ways to strengthen…— Narendra Modi (@narendramodi) February 25, 2026असा असेल मोदींचा दोन दिवसीय इस्रायल दौरा :इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी २६ - २७ फेब्रुवारी २०२६ रोजी इस्रायलला अधिकृतपणे भेट देणार आहेत. या भेटीदरम्यान, पंतप्रधान मोदी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांची भेट घेतील. दोन्ही नेते भारत-इस्रायल धोरणात्मक सहयोगाने झालेल्या महत्त्वपूर्ण प्रगतीचा आढावा घेतील आणि विज्ञान तंत्रज्ञान, नवोन्मेष, संरक्षण, सुरक्षा, कृषी, जल व्यवस्थापन, व्यापार आणि अर्थव्यवस्था आणि लोकांमधील देवाणघेवाण यांच्यासह सहकार्याच्या विविध क्षेत्रांतील आगामी संधींवर विचार विनिमय करतील. उभय देशांतील नेत्यांकडून परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर दृष्टिकोनांची देवाणघेवाण होण्याची अपेक्षा आहे.Honoured by the gesture. Looking forward to addressing the Knesset later today. @KnessetENG https://t.co/0PaG9Nutmy— Narendra Modi (@narendramodi) February 25, 2026दीर्घकालीन धोरणात्मक भागीदारीला दुजोरा :पंतप्रधान इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष आयझॅक हर्झोग यांचीही यावेळी भेट घेतील. या भेटीमुळे उभय देशांमधील सघन आणि दीर्घकालीन धोरणात्मक भागीदारीला दुजोरा मिळेल तसेच समान आव्हानांचा आढावा घेण्याची तसेच दोन्ही देशांच्या लोकशाहींमधील मजबूत भागीदारीसाठी तसेच त्यांचे सामायिक दृष्टिकोन साध्य करण्याच्या दिशेने होणाऱ्या उद्दिष्टांशी पुनश्च उजाळा देण्याची संधी मिळणार आहे.

27 C