SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

28    C
...

Persimmon of My Love : पहिला रशियन सिनेमा ज्यात खच्चून भरलाय बॉलिवूडचा मसाला

नवी दिल्ली : बातमीचं हेडिंग वाचून चक्रावला असाल. पण हा एक अभिनव प्रयोग आहे. भारतात मुंबई, उदयपूर, जयपूर येथे या सिनेमाचं शूटिंग झालंय. हा एक बॉलीवूड-शैलीतील संगीतमय विनोदी सिनेमा आहे. यात 'जिमी जिमी आजा आजा' या हिंदी गाण्याचाही समावेश आहे. 'पर्सिमॉन ऑफ माय लव्ह' (Persimmon of My Love) हा सोव्हिएत काळापासूनचा पहिला मोठा रशियन-भारतीय चित्रपट सहयोग आहे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत भारतीय भूमीवर चित्रित झालेला हा पहिलाच रशियन चित्रपट आहे जो १ एप्रिल २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे.'पर्सिमॉन ऑफ माय लव्ह' या बॉलिवूडच्या मसाल्यानं खच्चून भरलेल्या रशियन सिनेमासाठी सेटवर दररोज ३५० पेक्षा जास्त कलाकार आणि क्रू काम करत होते. सिनेमात काही गर्दीच्या दृश्यांमध्ये एक हजारपेक्षा जास्त नागरिकांचाही समावेश आहे. रशियन सिनेमासाठी ही एक विशेष बाब आहे. ही भव्यता क्लासिक बॉलीवूडची आठवण करून देते.सिनेमाची कथा लहानपणीच विभक्त झालेल्या दोन भावांची आहे, एक प्रामाणिक पोलीस अधिकारी, रमाश, आणि दुसरा गुंड शामर. न्याय, कौटुंबिक रहस्ये, प्रेम आणि साहस यांची रुचकर भेळ अनुभवण्याची संधी हा सिनेमा देतो. सिनेमातील संघर्ष खुरमाडा नावाच्या एका काल्पनिक भारतीय शहरात घडतो. सिनेमासाठी रशियन विनोदी कलाकार डेमिस करिबिडिस आणि मिखाईल गलुस्त्यान यांनी भावांच्या भूमिका साकारल्या आहेत. करिबिडिस यांनीच पटकथाही लिहिली आहे. सहाय्यक कलाकारांमध्ये आदिला रागीमोवा, अल्बिना कबालिना, आर्तुर वाखा आणि सर्गेई रोस्ट यांचा समावेश आहे. भारतीय नृत्यदिग्दर्शक जय कुमार यांनी नृत्यांचे दिग्दर्शन केले आहे. तर रशियन संगीतकार झुराब मातुआ यांनी मूळ संगीत तयार केले आहे, ज्यात हिंदीतील गाण्यांचाही समावेश आहे.मुंबईतील स्टुडिओ तसेच राजस्थानमधील राजवाडे आणि किल्ले यांचा सिनेमात सुरेख वापर केला आहे. संपूर्ण कॅन्व्हास रंजक आणि रंगीत ठेवण्यावर प्रचंड भर दिल्याचे दिसते. मायवेस्टुडिओसोबत या सिनेमाची सह-निर्मिती करणाऱ्या गॅझप्रॉम-मीडिया होल्डिंगच्या उप-महासंचालक आणि टीएनटी वाहिनीच्या संचालक, टीना कंदेलाकी या पण 'पर्सिमॉन ऑफ माय लव्ह' सिनेमाला प्रेक्षक कसे स्वीकारतात हे जाणून घेण्यास उत्सुक आहेत. बॉलिवूडच्या भावना आणि संगीत आणि रशियन नाट्यशैली यांसारख्या दोन देशांच्या सर्जनशील परंपरा किती नैसर्गिकरित्या एकत्र येऊ शकतात, हे हा सिनेमा दाखवतो, असे टीना कंदेलाकी यांनी सांगितले.'लव्ह इन द बिग सिटी' आणि 'द टेमिंग ऑफ द श्रू' यांसारख्या यशस्वी चित्रपटांसाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक मारियस वेसबर्ग यांनी भारतीय टीमच्या वेगाची आणि व्यावसायिकतेची प्रशंसा केली. “बॉलिवूडच्या टीमनी ज्या व्यावसायिकतेने आणि ज्या वेगाने काम केले ते पाहून मी थक्क झालो. हा एक प्रचंड मोठा उद्योग आहे जो निर्मितीतील सर्वात मोठी आव्हाने पेलण्यास सक्षम आहे,” असे ते म्हणाले.रशियन सिनेमा फंड आणि एएसबी फिल्म व्हिलेजसह भारतीय भागीदारांच्या पाठिंब्याने तयार झालेला हा सिनेमा रशिया आणि भारत यांच्यातील तसेच ब्रिक्स देशांमधील सांस्कृतिक आणि आर्थिक संबंध अधिक दृढ होत असल्याचे दाखवून देतो. सोव्हिएत काळापासून भारतीय सिनेमांशी परिचित असलेल्या रशियन प्रेक्षकांना, बॉलीवूडचा भव्यपणा, हलका आत्म-उपहास आणि रशियन विनोदाचे हे मिश्रण एक नवीन आणि समयोचित मेजवानी वाटू शकते. 'पर्सिमॉन ऑफ माय लव्ह'चा प्रीमियर १ एप्रिल रोजी मॉस्कोमध्ये होणार आहे.

फीड फीडबर्नर 30 Mar 2026 11:10 pm

मुंबई महापालिका आयुक्तपदी अश्विनी भिडे यांचे नाव निश्चित

पहिल्या महिला आयुक्त होण्याचा मान; फडणवीस-शिंदे यांच्या बैठकीत शिक्कामोर्तबमुंबई : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या तर्क-वितर्कांना पूर्णविराम देत, मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती निश्चित झाली आहे. मुंबई महापालिकेच्या दीडशे वर्षांहून अधिक काळाच्या इतिहासात या सर्वोच्च पदावर विराजमान होणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी ठरणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात ‘वर्षा’ निवासस्थानी झालेल्या प्रदीर्घ बैठकीनंतर भिडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले, अशी माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.अश्विनी भिडे या १९९५ च्या तुकडीच्या आयएएस अधिकारी असून, सध्या त्या मुख्यमंत्री कार्यालयात अतिरिक्त मुख्य सचिव आणि 'मुंबई मेट्रो'च्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत आहेत. मेट्रो प्रकल्पांना गती देण्यात त्यांनी बजावलेल्या कामगिरीमुळे त्यांना प्रशासकीय वर्तुळात ‘मेट्रो वूमन’ म्हणून ओळखले जाते. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोन्ही नेत्यांचा भिडे यांच्या कार्यक्षमतेवर विश्वास असल्याने, आणि शहरातील पायाभूत सुविधांची आव्हाने पाहता त्यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आल्याचे समजते.मुंबई महापालिका आयुक्तपदासाठी प्रशासकीय वर्तुळातील अनेक बड्या नावांची चर्चा सुरू होती. यामध्ये प्रामुख्याने महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे, एमएमआरडीएचे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव असीम गुप्ता, म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांचा समावेश होता. मात्र, भिडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. लवकरच याबाबत अधिकृत घोषणा केली जाणार आहे.कोण आहेत IAS अश्विनी भिडे ?१९९५ च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आणि मुख्यमंत्री कार्यालयातील विद्यमान अतिरिक्त मुख्य सचिव अश्विनी भिडे यांची मुंबई महापालिका आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्या ३१ मार्च २०२६ रोजी कार्यकाळ संपणाऱ्या भूषण गागराणी यांच्याकडून पदभार स्वीकारणार आहेत. तसेच त्या मुंबई महानगरपालिकेचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला आहेत.अश्विनी भिडे या पायाभूत सुविधा प्रकल्पांमधील त्यांच्या ठाम भूमिकेसाठी ओळखल्या जातात, विशेषतः मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या (एमएमआरसीएल) माजी व्यवस्थापकीय संचालक म्हणून त्यांच्या कामाचे अनेकांनी कौतुक केले आहे.संजय मुखर्जी आणि असीम गुप्ता यांच्यासारख्या अनेक वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांचा विचार झाला पण अखेरीस अश्विनी भिडे यांची निवड झाली.अश्विनी भिडे यांच्याकडून महत्त्वपूर्ण नागरी पायाभूत सुविधा आणि शहर प्रशासनाचे प्रकल्प हाताळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. त्यांचा पूर्ण कार्यकाळ २०३० पर्यंत अपेक्षित आहे.

फीड फीडबर्नर 30 Mar 2026 11:10 pm

CSKvsRR : वैभव सूर्यवंशीच्या स्फोटक खेळीने चेन्नई विरोधात राजस्थानचा ‘रॉयल’ विजय

नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत राजस्थान रॉयल्सने नवा कर्णधार रियान परागच्या नेतृत्वात सोमवारी (३० मार्च) पहिल्या विजयाची नोंद केली आहे. घरच्या मैदानात गुवाहाटीमध्ये झालेल्या सामन्यात राजस्थानने चेन्नई सुपर किंग्स संघाला ८ विकेट्सने पराभूत केले. गोलंदाजांच्या चांगल्या कामगिरीनंतर वैभव सूर्यवंशीने स्फोटक फलंदाजी करत राजस्थानच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने राजस्थानसमोर १२८ धावांचे सोपे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग राजस्थानने १२.१ षटकात २ विकेटस गमावत १२८ धावा करत पूर्ण केला. राजस्थानकडून सूर्यवंशीने अर्धशतकी खेळी केली.राजस्थानकडून यशस्वी जैस्वाल आणि वैभव सूर्यवंशी या दोन युवा खेळाडूंनी डावाची सुरुवात केली. वैभवने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला होता, दुसऱ्या बाजूला जैस्वाल संयमी खेळ करत त्याला साथ देत होता. वैभवने चेन्नईच्या कोणत्यात गोलंदाजाला त्याच्यावर वरचढ होऊ दिले नाही. त्याने पॉवरप्लेच्या षटकांमध्ये चौकार-षटकारांची बरसात करताना १५ चेंडूतच अर्धशतक पूर्ण केले. तो राजस्थानसाठी सर्वात कमी चेंडूत अर्धशतक करणारा दुसरा खेळाडू ठरला. पहिल्या क्रमांकावर यशस्वी जैस्वाल असून त्याने २०२३ मध्ये १३ चेंडूत अर्धशतक केले होते.अर्धशतकानंतर ७ व्या षटकात वैभवला अंशुल कंबोजने बाद केले. त्याचा झेल सर्फराज खानने घेतला. वैभवने ४ चौकार आणि ५ षटकारांसह १७ चेंडूत ५२ धावांची खेळी केली. त्यानंतर ध्रुव जुरेल आणि जैस्वालने डाव पुढे नेला, पण कंबोजनेच ९ व्या षटकात जुरेलला १८ धावांवर त्रिफळाचीत केले. पण नंतर जैस्वालला कर्णधार रियान परागने साथ दिली आणि उर्वरित धावा पूर्ण करत राजस्थानला १३ व्या षटकात विजय मिळवून दिला. जैस्वाल ३६ चेंडूत ३८ धावांवर नाबाद राहिला. रियान पराग ११ चेंडूत १४ धावांवर नाबाद राहिला.तत्पुर्वी राजस्थानने नाणेफेक जिंकून चेन्नईला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले होते. पण चेन्नईचा संघ १९.४ षटकात १२७ धावांवरच सर्वबाद झाला. चेन्नईने सुरुवातीलाच संजू सॅमसन (६), कर्णधार ऋतुराज गायकवाड (६), आयुष म्हात्रे (०) आणि मॅथ्यू शॉर्ट (२) यांच्या विकेट्स स्वस्तात गमावल्या होत्या. त्यानंतर सर्फराज खान (१७) आणि कार्तिक शर्मा (१८) यांनी थोडीफार लढाईकेली. पण तेही मोठी खेळी करू शकले नाहीत. पण याविकेट्स जात असताना ८ व्या क्रमांकावरील जेमी ओव्हर्टनने एकाकी झुंज दिली आणि संघाला १२० धावांचा टप्पा पार करून दिला. तो शेवटच्या षटकात बाद झाला आणि चेन्नईचा डाव संपला. त्याने ३६ चेंडूत २ चौकार आणि २ षटकारांसह ४३ धावा केल्या. राजस्थान रॉयल्सकडून नांद्रे बर्गर, जोफ्रा आर्चर आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. ब्रिजेश शर्मा, संदीप शर्मा आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

फीड फीडबर्नर 30 Mar 2026 11:10 pm

Satara News : तासवडे एमआयडीसीत रात्री पुन्हा एकदा भीषण स्फोट; 3 किलोमीटरचा परिसर हादरला

तासवडे (ता. कराड) औद्योगिक वसाहतीतील एस के एस फाईन केमिकल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत सोमवारी (Satara News) सकाळी झालेल्या भीषण स्फोटानंतर रात्री ९.४५ वाजण्याच्या सुमारास पुन्हा एक मोठा स्फोट झाला.

दैनिक प्रभात 30 Mar 2026 10:56 pm

Cosmos Bank: कॉसमॉस बँकेचा गुजरातमध्ये विस्तार; 10 नव्या शाखांसह एकूण संख्या 193 वर

Cosmos Bank: 30 मार्च रोजी निकोल शाखेचे उद्घाटन नाबार्डचे मुख्य महाव्यवस्थापक बी.के. सिंघल, सायन्स सिटी शाखेचे उद्घाटन गुजरात स्टेट को ऑप बँकेचे अध्यक्ष अजयभाई पटेल तसेच स्पिडवेल चौक राजकोट शाखेचे उद्घाटन उत्कर्ष इस्पातचे अध्यक्ष नीरज आर्या यांच्या हस्ते करण्यात आले.

दैनिक प्रभात 30 Mar 2026 10:44 pm

Kerosene Distribution: गॅस तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर 21 राज्यांत पीडीएसमधून केरोसीन वितरणास केंद्राची तात्पुरती परवानगी

Kerosene Distribution: भारत आपल्या गरजेच्या 60% स्वयंपाकाचा गॅस आयात करतो आणि त्यातील 85 ते 90 टक्के गॅस आखातातून येतो. त्यामुळे भारतावर झालेला परिणाम सर्वात जास्त आहे.

दैनिक प्रभात 30 Mar 2026 10:37 pm

RR vs CSK : ज्याला वाढवलं, त्यानेच संपवलं! रवींद्र जडेजाने ५ चेंडूत चेन्नईची दाणादाण उडवली; धोनीच्या सैन्याची राजस्थानसमोर शरणागती

RR vs CSK : गुवाहाटीच्या खेळपट्टीवर राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांनी चेन्नईच्या फलंदाजीचे अक्षरशः लचके तोडले. विशेष म्हणजे, ज्या खेळाडूने १२ वर्षे चेन्नईची सेवा केली, त्याच रवींद्र जडेजा याने आज आपल्या जुन्या संघाचा घात केला.

दैनिक प्रभात 30 Mar 2026 10:36 pm

Pune News : भाजप युवा मोर्चाच्या मागणीला मोठे यश ! महाज्योतीकडून ऑफलाईन प्रशिक्षणाचा ऐतिहासिक निर्णय

राज्यातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेत (Pune News) महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) यांनी ऑनलाइन प्रशिक्षण बंद करून ऑफलाईन प्रशिक्षण सुरू करण्याची घोषणा केली आहे.

दैनिक प्रभात 30 Mar 2026 10:34 pm

TDS Rules: ठेवींवरील व्याजावर TDS नियम स्पष्ट; ठराविक मर्यादेपुढेच कर कपात लागू

TDS Rules: प्राप्तिकर विभागाने समाज माध्यमावर जारी केलेल्या संदेशात म्हटले आहे की नवीन प्राप्तिकर कायदा 2025 मधील कलम 402 नुसार ज्या बँकिंग कंपन्या बँकिंग नियमन कायदा 1949 नुसार कार्यरत आहेत, त्या बँकांना हा नियम सरसकट लागू होतो.

दैनिक प्रभात 30 Mar 2026 10:33 pm

Rupee: रुपया सावरण्यासाठी RBIचे नवे निर्बंध; दिवसाअखेरीस किरकोळ वाढ, दबाव कायम

Rupee: चालू आर्थिक वर्षात म्हणजे गेल्या 11 महिन्यात रुपयाचे मूल्य तब्बल दहा टक्क्यांनी कमी झाले आहे.

दैनिक प्रभात 30 Mar 2026 10:29 pm

Industrial: मॅन्युफॅक्चरिंगच्या जोरावर औद्योगिक उत्पादनात 5.2% वाढ; मार्चमध्ये घट होण्याची शक्यता

Industrial: औद्योगिक उत्पादन क्षेत्रातील 23 पैकी 14 क्षेत्रात वाढ नोंदली गेली आहे. वाहन उत्पादन 14.9 टक्क्यांनी तर भांडवली वस्तू उत्पादन 10.2 टक्क्यांनी वाढले आहे.

दैनिक प्रभात 30 Mar 2026 10:25 pm

Fiscal Deficit Rises : केंद्राची वित्तीय तूट 12.52 लाख कोटींवर; उद्दिष्टाच्या 80 टक्क्यांहून अधिक

Fiscal Deficit Rises :सरकारने आर्थिक शिस्त कायम ठेवण्याचा प्रयत्न केला असला तरी मार्च महिन्यातील आकडेवारी आखातातील युद्धामुळे काही प्रमाणात नकारात्मक राहण्याची शक्यता आहे.

दैनिक प्रभात 30 Mar 2026 10:20 pm

Pune News : अवकाळी पावसामुळे उत्तरपत्रिका भिजल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Pune News) आवारात अवेळी आलेल्या पावसामुळे शेकडो उत्तरपत्रिका भिजल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.

दैनिक प्रभात 30 Mar 2026 10:11 pm

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाला मिळणार 'टेक ऑफ', मुंबई-सिंधुदुर्ग विमान प्रवासासाठी १०० टक्के 'VGF'ला मंजुरी

मुंबई : कोकणच्या विकासाचा कणा असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी महायुती सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि सुखद निर्णय घेतला आहे. चिपी (सिंधुदुर्ग) ते मुंबई या विमान प्रवासासाठी राज्य सरकारने १०० टक्के 'व्हायबिलिटी गॅप फंडिंग'ला (VGF) प्रशासकीय आणि वित्तीय मंजुरी दिली आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे आता सर्वसामान्य कोकणवासीयालाही परवडणाऱ्या दरात विमान प्रवास करणे शक्य होणार असून, खऱ्या अर्थाने कोकणच्या पर्यटनाला 'टेक ऑफ' मिळणार आहे.केंद्र सरकारच्या 'आरसीएस-उडान' योजनेच्या धर्तीवर हा निर्णय घेण्यात आला असून, यापूर्वी सोलापूर-पुणे-मुंबई मार्गासाठीही अशाच प्रकारे १०० टक्के निधी देण्यास मान्यता देण्यात आली होती. तोच नियम मुंबई-सिंधुदुर्ग प्रवासासाठी लागू करण्यात आला आहे. त्यानुसार, ही योजना प्रत्यक्ष विमानसेवा सुरू झाल्यापासून एक वर्षासाठी किंवा केंद्र सरकारच्या योजनेत समावेश होईपर्यंत लागू राहील. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने प्रत्यक्ष विमान फेऱ्यांची गणना करूनच निधीची देयके सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे कोकणच्या विकासाला नवी दिशा मिळणार आहे. केवळ एका तासात मुंबई-सिंधुदुर्ग अंतर पार होणार असून, याचा मोठा फायदा चाकरमानी आणि व्यावसायिकांना होणार आहे. त्यामुळे चिपी विमानतळ आता खऱ्या अर्थाने गजबजलेले पाहायला मिळेल.प्रति आसन २ हजार ९९१ रुपये दर : या विमानसेवेसाठी 'मेसर्स जस्ट उडो एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड' (फ्लाय ९१) या कंपनीची निवड करण्यात आली आहे. या कंपनीला प्रति 'आरसीएस' आसनासाठी २ हजार ९९१ रुपये या दराने निधी दिला जाणार आहे. १७ मार्च २०२६ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या प्रकल्पासाठी ७ कोटी ६४ लाख २० हजार ५० रुपयांच्या वार्षिक खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे. ३० मार्च रोजी सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भातील अधिकृत शासन निर्णय निर्गमित केला.पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडून स्वागत : सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी या निर्णयाचे मनापासून स्वागत केले आहे. सिंधुदुर्गच्या अर्थव्यवस्थेला आणि पर्यटनाला गती देणारा हा क्रांतिकारी निर्णय आहे. यामुळे मुंबई-सिंधुदुर्ग विमानसेवा आता आठवड्याचे सातही दिवस सुरू राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, अशा शब्दांत त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.

फीड फीडबर्नर 30 Mar 2026 10:10 pm

नोंदणीकृत मजूर सहकारी संस्थांना विनानिविदा मुंबई महापालिकेत कामे

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :मुंबई महानगरपालिकेच्या विविध विभागांतील कामे ही नोंदणीकृत मजूर सहकारी संस्थांना विनानिविदा पद्धतीने मात्र स्पर्धात्मक पद्धतीने उपलब्ध करून देण्याबाबत बैठक सोमवारी महापौर दालनात पार पडली.महानगरपालिकेच्या प्रशासकीय विभाग इमारती, महानगरपालिकेच्या शाळा इत्यादींची देखभाल, दुरुस्ती व रंगकाम अशी कामे ही नोंदणीकृत मजूर सहकारी संस्थांना देण्यात यावीत, अशी सूचना या बैठकीत करण्यात आली. त्यावर महापौर रितू तावडे यांनी शासनाच्या धर्तीवर ही अंमलबजावणी करण्यासाठी, शासन निर्णयाच्या आधारे परिपत्रक जारी करावे. त्याचप्रमाणे , महानगरपालिका अधिनियमामध्ये सुधारणा करणे या बाबी आवश्यक असल्याचे प्रशासनाने निदर्शनास आणून दिले. त्यामुळे विहित प्रशासकीय पद्धतीने याबाबत कार्यवाही हाती घ्यावी, नोंदणीकृत मजूर सहकारी संस्थांना महानगरपालिकेची कामे मिळावीत, यासाठी सकारात्मक प्रयत्न करावेत, असे निर्देश महापौरांनी दिले.नोंदणीकृत मजूर सहकारी संस्थांना महानगरपालिकेची कामे मिळणे, मुंबईतील गरजू महिलांना स्वयंरोजगारासाठी शिलाई व घरघंटी संयंत्र खरेदीकरिता अर्थसहाय्य तसेच घाटकोपर (पूर्व) येथील माता रमाबाई आंबेडकर नगर व लगतच्या झोपडपट्टी वसाहतींचे एकत्रित पुनर्वसन करणे या तीन विषयांवर मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत महापौर दालनात सोमवारी ३० मार्च २०२६ रोजी यांची स्वतंत्रपणे संयुक्त सभा संपन्न झाली.नोंदणीकृत मजूर सहकारी संस्थांना महानगरपालिकेची कामे मिळण्यासंदर्भात संपन्न झालेल्या या बैठकीस महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं-समूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष, आमदार प्रवीण दरेकर, सभागृह नेता गणेश खणकर, स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे, आर मध्य व आर उत्तर प्रभाग समितीचे अध्यक्ष प्रकाश दरेकर, महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, संचालक (नियोजन) डॉ. प्राची जांभेकर, संचालक (विशेष अभियांत्रिकी) श्रीधर चौधरी, नगर अभियंता रामचंद्र कदम, आदींसह विविध नोंदणीकृत मजूर सहकारी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी आमदार प्रवीण दरेकर म्हणाले की, मुंबई शहर जिल्ह्यामध्ये साधारणतः ९०० मजूर सहकारी संस्था आहेत. प्रत्येक मजूर सहकारी संस्थेस सार्वजनिक बांधकाम विभाग व म्हाडा विभाग या दोन आस्थापनांमार्फत विनानिविदा १० लाख रुपये तर ई-निविदेद्वारे ५० लाख रुपयांचे एक काम या मर्यादेत स्पर्धात्मकरित्या ही कामे उपलब्ध होत आहेत. याच धर्तीवर, महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात याची अंमलबजावणी केली जावी अशी सूचना केली.गरजू महिलांना स्वयंरोजगारासाठी संयंत्र अर्थसहाय्यजेंडर बजेट अंतर्गत महिला व बालकल्याण योजनेतून मुंबईत पात्र महिलांना स्वयंरोजगारासाठी यंत्रसामुग्री खरेदीकरिता अर्थसहाय्य देण्यात येते. यामध्ये घरघंटी, शिलाई संयंत्र, मसाला कांडप याप्रकारच्या संयंत्रांचा समावेश असतो. या योजनेत मुंबईतील सर्व प्रभागांमधील काही पात्र महिला वेगवेगळ्या कारणांनी लाभापासून वंचित आहेत, त्यांना अर्थसहाय्य पुरवण्यात यावे, अशी मागणी रोहिदास लोखंडे यांनी केली होती.मुंबईतील पात्र महिलांना स्वयंरोजगारासाठी यंत्रसामुग्री खरेदीकरिता अर्थसहाय्य या विषयावर झालेल्या बैठकीस महापौरांसह महिला व बालकल्याण समिती अध्यक्ष मीनल तुर्डे, नगरसेवक रोहिदास लोखंडे, संचालक (नियोजन) डॉ. प्राची जांभेकर हे उपस्थित होते. याबाबत संचालक (नियोजन) डॉ. प्राची जांभेकर यांनी स्पष्ट केले की, आधार / पॅन कार्ड लिंक नसणे, काही महिलांचा संपर्क क्रमांक बंद असणे अथवा त्या बाहेरगावी असणे, बँकेतील पूर्ततेतील अडचणी अशा काही कारणांनी पात्र महिलांना अर्थसहाय्य मिळालेले नाही. मात्र हे प्रमाण दोन तीन टक्के इतकेच आहे. उर्वरित महिलांना अर्थसहाय्य मिळाले आहे, असे त्यांनी नमूद केले.यावर महापौर रितू तावडे यांनी निर्देश दिले की, ज्या पात्र महिला अर्थसहाय्य लाभापासून वंचित आहेत, त्यांच्यासाठी निधीची तरतूद करुन घ्यावी. तसेच, अडचणी दूर करुन, लाभापासून वंचित राहिलेल्या या महिलांना अर्थसहाय्य लवकरात लवकर देता येईल, यादृष्टिने कार्यवाही करावी.रमाबाई आंबेडकर नगर व लगतच्या झोपडपट्टी वसाहतींचे पुनर्वसन...घाटकोपर (पूर्व) येथील माता रमाबाई आंबेडकर नगर लगतच्या झोपडपट्टी वसाहतींचे एकत्रित पुनर्वसन करुन ५५० चौरस फूट क्षेत्रफळाचे घर मिळावे, या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी श्रमिक भारतीय युनियनचे अध्यक्ष रमेश जाधव, इतर पदाधिकारी व रहिवाशांच्या शिष्टमंडळाने महापौरांची आज भेट घेतली. यावेळी नगरसेवक प्रकाश गंगाधरे व संबंधित अधिकारी उपस्थित होते.शिष्टमंडळाचे तसेच अधिकाऱ्यांचे म्हणणे जाणून घेतल्यानंतर चर्चेअंती महापौर रितू तावडे म्हणाल्या की, पुनर्वसनाबाबत सर्वांचे एकमत आहे. हा परिसर व संबंधित प्राधिकरण ही बाब लक्षात घेता झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच रहिवाशांचे प्रतिनिधी या सर्वांसमवेत एक संयुक्त बैठक आयोजित करुन हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी ठोस पावले उचलणे आवश्यक आहे. त्यासाठी मी स्वतः पुढाकार घेईन. याप्रकरणी पात्र रहिवाशांना शासन निकषानुसार योग्य क्षेत्रफळाची घरे मिळाली पाहिजेत, यासाठी सकारात्मक आहे, असे महापौरांनी आश्वस्त केले.

फीड फीडबर्नर 30 Mar 2026 10:10 pm

महापालिकेच्या वृक्षप्राधिकरण समितीवर १३ सदस्यांची नियुक्ती जाहीर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणावर निवडून आलेल्या विविध पक्षांच्या १३ सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये भाजपचे ५, उबाठाचे ४, शिवसेनेचे २, काँग्रेसचे २ आणि एमआयएमच्या एक अशाप्रकारे एूण १३ सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिकास सभागृहात विविध पक्षांच्या गटनेत्यांकडून प्राप्त झालेल्या नावांची घोषणा महापौर रितू तावडे यांनी केली.मुंबई महापालिकेच्या वृक्षप्राधिकरण समितीमध्ये मुंबईतील अनेक पायाभूत प्रकल्प तसेच गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये बांधित होणाऱ्या झाडे कापून टाकण्यात अथवा त्यांचे पुनर्राेपण करण्यास मान्यता दिली जाते. या वृक्ष प्राधिकरण समितीचे अध्यक्ष हे महापालिका आयुक्त असतात आणि यामध्ये बाजार व उद्यान समिती अध्यक्ष तसेच उद्यान विभागाचे अधिक्षक हे पदसिध्द सदस्य असतात. याशिवाय या १३ सदस्यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.भाजपा : गणेश खणकर, सायली कुलकर्णी, रोहन राठोड, सिध्दार्थ शर्मा, हर्ष पटेलउबाठा : किशोरी पेडणेकर, मिलिंद वैद्य, हर्षला मोरे, प्रमोद सावंतशिवसेना : वर्षा टेंबवलकर, भास्कर शेट्टीकाँग्रेस : मोहम्मद इब्राहिम मोहम्मद इक्बाल कुरेशीएमआयएम : विजय उबाळे

फीड फीडबर्नर 30 Mar 2026 10:10 pm

विरोधी पक्षनेत्यांचा पुन्हा एकदा कांगावा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्यांना सध्या कोणत्याही मुद्दयावर आपली भूमिका मांडता येत नसल्यामुळे तसेच महत्वाच्या विषयांना हात घालता येत नसल्याने पुन्हा एकदा महापौरांकडून अपमान झाल्याचा कांगावा करण्याचे नाटक करत प्रसिध्दीझोतात राहण्याचा प्रयत्न केला. महापौर दालनातून आपल्याला बाहेर जा असे सांगण्याचा प्रयत्न केल्याचे सांगत विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी सभागृहात हरकतीच्या मुद्दयाद्वारे सर्वांचे लक्ष वेधून घेतला. परंतु पेडणेकर आणि अब्राहनी या दोन्ही नेत्यांना आपण अँटीचेंबरमध्ये सन्मानपूर्वक बसवल्यानंतरही त्या तिथून उठून जात अशाप्रकारचे चित्र निर्माण करत असल्याचे स्पष्टीकरण महापौर रितू तावडे यांनी दिले. दरम्यान, या मुद्दयावरून विरोधी पक्षांनी सभात्याग करत याचा निषेध केला असला तरी त्यांचा हरकतीचा मुद्दाच सभागृहात उठवून लावण्यात आला आहे.मुंबई महापालिका सभागृहात विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी हरकतीच्या मुद्दयाद्वारे महापौरांच्या दालनात आपला अपमान झाल्याचे सांगितले. महापौरांच्या दालनात सर्व गटनेते आणि अध्यक्षांना बैठकीसाठी बोलावले होते. त्यानुसार मी आणि अन्य पक्षाचे गटनेते त्यांच्या दालनात पाहोचलो. पण आम्ही तिथे पोहोचल्यानंतर शिवसेनेचे गटनेते अमेय घोले हे आपल्या सर्व नगरसेवकांसमवेत तिथे पोहोचले आणि त्यांनी आम्हाला काही महत्वाचे बोलायचे आहे असे सांगितले. त्यावेळी तिथे भाजपचेही सदस्य होते. त्यानंतर आम्हाला बाहेर जा असे सांगण्यात आले. त्यानंतर महापौरांनी आम्हाला अँटीचेंबरमध्ये बसायला सांगितले. हा बकायदा इन्सल्ट आहे. हा अपमान पुन्हा करू नये, पुन्हा हे सहन करणार नाही असा इशारा त्यांनी दिला.यावर शिवसेना गटनेते अमेय घोले यांनी आमच्या प्रभागातील नगरसेवकांच्या महत्वाच्या विषयावर चर्चा करायची असल्याने आत आपण तिथे बसावे असे सांगितले. पण बाहेर जा असे सांगितले नाही. त्यामुळे नक्कीच कुणाचा अपमान करण्याचा प्रयत्न नव्हता किवा केलाही नाही असे सांगण्याचा प्रयत्न केला. तर शैलेश फणसे यांनी विरोधी पक्षनेता पद हे वैधानिक असून जर त्यांचा अपमान झाला असल्याने ही सभा झटपट सभा तहकूब करावी अशी मागणी उपसूचना केली. याला काँग्रेसचे गटनेते अश्रफ आझमी यांनी पाठिंबा दिला. त्यानंतर प्रत्यक्ष सभेत चर्चेत भाग न घेता विरोधी पक्षाने याचा निषेध करत सभात्याग केला.मात्र, त्यानंतर बोलतांना महापौर रितू तावडे यांनी सभागृहात एखादा मुद्दा उपस्थित केल्यांनतर तो ऐकण्यासाठीही उपस्थित राहणे आवश्यक असते. पण विरोधकांना केवळ कांगावा करण्याची सवय आहे. त्यांना ऐकून घेण्याची सवय नाही. शीव रुग्णालयाच्या भूमीपुजन प्रसंगी झालेल्या कार्यक्रमात राजशिष्टार पाळला गेला नसल्यामुळे अमेय घोले शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांसमवेत तिथे आले आणि आम्हाला काही महत्वाच्या विषयावर बोलायचे आहे असे सांगितले. त्यावेळी तिथे विरोधी पक्षनेत्या आणि समाजवादी पक्षाच्या गटनेत्या होत्या. त्यांना अँटीचेंबरमध्ये बसण्याची सूचना केली. त्यानुसार त्या तिथे बसल्याही. परंतु काही मिनिटांनी अँटीचेंबरमधून बाहेर आल्या आणि तुमचे झाले की मी येते असे सांगत महापौर दालनाच्या बाहेर निघून गेल्या. त्यामुळे त्या केवळ विरोधी करून निघून गेले. त्यामुळे या हरकतीच्या मुद्दयात काही तथ्य नसल्याचे सांगत त्यांचा मुद्दा उडवून लावला.

फीड फीडबर्नर 30 Mar 2026 10:10 pm

यापुढे महापालिकेत ५० खोक्यांची भाषा करणाऱ्यांना मिळणार ५० ठोसे

अशासकीय शब्दांचा वापर करणाऱ्यांना आता सभागृहाबाहेरचा रस्तामुंबई (विशेष प्रतिनिधी) :मुंबई महापालिका सभागृहात यापुढे अशासकीय भाषा खपवून घेतली जाणार नाही. यापुढे जर सभागृहात ५० खोक्यांची भाषा झाल्यास त्यांना ५० ठोसे दिले जातील आणि त्यासाठी महायुतीच्या नगरसेवकांनी तयार राहावे. आज जी परिस्थिती आहे, ती भविष्यात मोठ्याप्रमाणात उद्भवेल आणि तेव्हा समारेच्या बाजुला जाण्याचीही तयार ठेवा असाही कानमंत्र सभागृहनेत्यांनी महायुतीच्या नगरसेवकांना दिला. मात्र, याचबरोबरच महापालिका सभागृहात अशासकीय शब्दांचा वापर करणाऱ्या सदस्यांवर तत्काळ कारवाई करण्याचीही मागणी करण्यात आली असून त्यादृष्टीकोनातून येत्या सभागृहांची दिशा बदलेली पहायला मिळणार आहे.मुंबई महापालिका सभागृहात विराेधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी महापौर दालनात झालेल्या अपमानप्रकरणी हरकतीचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर याचा निषेध करत सभात्याग केला. त्यानंतर सभागृहनेते गणेश खणकर यांनी सभागृहात जे वर्तन घडले ते दुर्दैवी आहे. मात्र आता भविष्यात आपल्याला मानसिक तयारी करावी लागेल. पाण्यात दगड मारायचा आणि पळ काढायचा असा प्रकार होतच राहणार. तसे खोक्याचे आरोप करत चिमटे काढणे असे प्रकार होतच राहणार. ही भाषा बरोबर नाही. पण यापुढे ५० खोक्यांचे जे भाषा करतील त्यांना ५० ठोसे देण्यासाठी तयार रहा. ही भाषा बरोबरच नाही.आज पेंग्विनचा उल्लेख केल्याशिवाय बैठक होत नाही आणि असे काैतुक करत पुढील वर्षी काहीतरी आपल्या पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न असतो.तत्पूर्वी शिवसेनेच्या नगरसेविका व स्थापत्य समिती अध्यक्षा यामिनी जाधव यांनी उबाठाच्या नगरसेवकांकडून अमेय घोले यांना उद्देशून बोलायला तोंड आहे का असे बोलत ५० खोके अशी घोषणाबाजी केली याचा समाचार घेतला. यापुढे अशासकीय शब्दांचा वापर करणाऱ्यांविरोधात त्वरीत कारवाई केली जावी अशी मागणी त्यांनी केली. पूर्वी स्थायी समितीवर नाग बसला म्हणून बोलायचे. पण स्थायी समितीवर नाग नाही तर शेषनाग असून ते या तिजोरीचे रक्षणकर्ते आहेत. पूर्वी ही स्थायी समिती कोणाच्या इशाऱ्यावर चालायची असा सवाल करत मातोश्री २ कुठल्या पैशातून बांधली असा सवाल केला. तसेच पूर्वी खोके कुठे जात होते. पूर्वी मातोश्रीवरुन आदेश आल्याशिवाय एकतरी प्रस्ताव मंजूर केला जायचा का असा सवाल केला. आमचे कुटुंब आमची जबाबदारी असे ब्रीदवाक्य घेवून फिरणऱ्या नेत्याने जेव्हा आमच्या घरावर इन्कम टॅक्स,ईडीची धाड पडली तेव्हा, तुमचे तुम्ही बघा म्हणून सांगितले. पण आमचे कुटुंब, आमची जबाबदारी सांगणाऱ्या नेत्यांनी आम्हाला वाऱ्यावर सोडले. आजच आमच्यावर एवढे खोके, तेवढे खोके म्हणून आरोप करतात, तर मग हे शोधून दाखवा ना असे आव्हान दिले. कोणत्याही परिस्थितीत सभागृहाचे पावित्र्य टिकवले गेले पाहिजे,असे सांगितले.

फीड फीडबर्नर 30 Mar 2026 10:10 pm

RR vs CSK : धोनीशिवाय चेन्नईची अवस्था बिकट! इतिहासातील ‘ती’आकडेवारी पाहून चाहते चिंतेत; माही मैदानात नसला की CSK हरतेच?

RR vs CSK : आयपीएल २०२६ चा हंगाम सुरू होण्यापूर्वीच चेन्नई सुपर किंग्स (CSK) च्या गोटात चिंतेचे वातावरण आहे, अशात पहिल्याच सामन्यात धोनीशिवाय सीएसके संघ अडचणीत आला आहे.

दैनिक प्रभात 30 Mar 2026 10:07 pm

Pune Unseasonal Rain: पुण्यात मुसळधार पावसामुळे 14 ठिकाणी झाडे कोसळली; वाहतूक विस्कळीत

Pune Unseasonal Rain: काही ठिकाणी उभ्या वाहनांचे नुकसान झाले, तर अनेक भागांत वाहतूक विस्कळीत झाली होती.

दैनिक प्रभात 30 Mar 2026 10:04 pm

West bengal election 2026: ममता बॅनर्जींचा बंडखोरांना थेट इशारा; 74 आमदारांचे पत्ते कट केल्याने खळबळ

West bengal election 2026: सत्ता टिकवण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी घेतलेला हा 'धडाकेबाज' निर्णय पक्षासाठी फायदेशीर ठरणार की बंडखोरी वाढवणारा, हे निवडणुकीच्या निकालातच स्पष्ट होईल.

दैनिक प्रभात 30 Mar 2026 9:54 pm

Amit Thackeray : अमित ठाकरेंनी घेतली सरवदे कुटुंबियांची भेट

महानगरपालिका निवडणूक काळात मनसे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांची राजकीय वैमनस्यातून हत्या झाली होती. आज दुसऱ्यांदा त्यांच्या परिवाराची अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी भेट घेतली आहे.

दैनिक प्रभात 30 Mar 2026 9:48 pm

Mystery Couple Proposal : वानखेडेवर रंगली ‘प्यारवाली लव्हस्टोरी’! MIच्या चाहत्याने KKRच्या गर्लफ्रेंडला केलं फिल्मी स्टाईल प्रपोज, पाहा VIDEO

Mystery Couple Proposal : एमआय विरुद्ध केकेआर सामन्यात स्टँडमध्ये एका 'मिस्ट्री कपल'ची फिल्मी स्टाईल लव्हस्टोरी पाहायला मिळाली, ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

दैनिक प्रभात 30 Mar 2026 9:28 pm

Lonand News : वीज कोसळून विवाहितेचा मृत्यू

Lonand News :

दैनिक प्रभात 30 Mar 2026 9:25 pm

Iran US War Update: मोठी बातमी! अमेरिका-इराण युद्धात आता भारत मध्यस्थी करणार?

Iran US War Update: आगामी काळात जर कूटनीतिक चर्चेला सुरुवात झाली, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार यात कशा प्रकारे मध्यस्थी करते, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

दैनिक प्रभात 30 Mar 2026 9:19 pm

ऐन उन्हाळ्यात महाराष्ट्रात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा कहर

पुणे, पिंपरी-चिंचवड, धुळे, नाशिकमध्ये शेतकरी चिंतातूरमुंबई : अवकाळी पावसाबाबतचा हवामान विभागाचा अंदाज बऱ्याच दिवसांनी खरा ठरला असून सोमवारी दुपारनंतर महाराष्ट्रामध्ये अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. गारपिटीचा मारा व पडणारा पाऊस यामुळे शहरी व ग्रामीण भागातील प्रत्येक जण सुरुवातीची काही मिनिटे सुखावला असला तरी अवकाळी पाऊस सतत पडू लागल्याने ठिकठिकाणी पाणी साचण्याच्या घटनांनी व शेतातील पिकांच्या नुकसानीने राज्यातील शेतकरी चिंतातूर झाला आहे.राज्यात उन्हाळ्याची तीव्रता वाढत असतानाच अचानक अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. दुपारच्या वेळेतच मुसळधार पाऊस, गारपिट आणि वादळी वाऱ्यांनी अनेक जिल्ह्यांना तडाखा दिला असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पुढील ४८ तास राज्यासाठी धोक्याचे असल्याचा इशारा देण्यात आला आहे. पुणे शहरासह भोर तालुक्यात जोरदार पाऊस आणि गारपिट झाली. उत्रौली परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा अक्षरशः सडा पडला. अचानक आलेल्या या पावसामुळे उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला असला, तरी काढणीला आलेल्या ज्वारी, गहू आणि हरभरा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.हडपसर शहराच्या पूर्व भागातील हडपसर, मांजरी आणि महंमदवाडी परिसरात दुपारी चार वाजण्याच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. सुरुवातीला आकाशात दाट ढग जमा होऊन विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. काही ठिकाणी जोरदार वाऱ्यासह सरी कोसळल्याने कामावरून घरी परतणाऱ्या चाकरमान्यांची तारांबळ उडाली. औद्योगिक वसाहत, पुणे सोलापूर महामार्ग, मांजरी, शेवाळेवाडी, साडेसतरानळी, ससाणेनगर, रामटेकडी, शंकरमठ, वैदुवाडी, महंमदवाडी परिसरातील मुख्य व अंतर्गत रस्त्यांवर सखल भागात पाणी साचले होते. खोदलेल्या रस्त्यांच्या परिसरात चिखल व पाण्याची डबकी तयार झाली. त्यातून प्रवास करताना प्रवाशांना कसरत करावी लागली.वादळी वारा व पावसामुळे मगरपट्टा रस्त्याजवळील विशाल पार्क जवळ झाड कोसळल्याची घटना घडली.जुन्नर तालुक्यात आंबा, गहू, कांदा पिकांचे मोठे नुकसान :जुन्नर शहरासह मीना नदीच्या खोऱ्यात वादळी वाऱ्यासह गारपीट व अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची धांदल उडाली. या गारपिटीने शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जवळपास एक तासाहून झालेल्या या पावसाने आंबा, गहू व कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले असून तातडीने पंचनामे करण्याची मागणी सरपंच अमोल भुजबळ, कुलदीप नायकोडी यांसह शेतकऱ्यांकडून केली जात आहे.जुन्नर तालुक्यातील आंब्याचे आगार म्हणून ओळख असलेल्या काले, येणेरे, बेलसर, वडज , दातखिळेवाडी, पारुंडे, कुसूर, चिंचोली या परिसरात झालेल्या गारपिटीमुळे तसेच वादळामुळे आंबा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे कैऱ्या मोठ्या प्रमाणात पडल्याचे दिसून आले. वादळी वारा व गारपिटीमुळे आंबा उत्पादकांच्या उरल्यासुरल्या अपेक्षांवर देखील पाणी पडले आहे. आंबा उत्पादकांचे अर्थकारण संकटात सापडले असून शासनाने आंबा उत्पादकांना दिलासा द्यावा अशी मागणी केली जात आहे.धुळे, नाशिक जिल्ह्यात गारांचा खच :धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातही अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे कांदा, मका, गहू आणि हरभरा पिकांवर परिणाम होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. नाशिकमध्येही जोरदार वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट झाली. अनेक भागांत गारांचा खच साचल्याचे चित्र दिसून आले. या अचानक आलेल्या अस्मानी संकटामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. सिन्नर परिसरातही पावसाची नोंद झाली.

फीड फीडबर्नर 30 Mar 2026 9:10 pm

Iran US War Update: अमेरिकेचा इराणला शेवटचा इशारा! “करार करा, अन्यथा ‘खर्ग आयलंड’उद्ध्वस्त करू”; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी

Iran US War Update: धमकी दिली असली तरी, ट्रम्प यांनी चर्चेद्वारे तोडगा निघण्याचे संकेतही दिले आहेत. लवकरच एक करार होणे शक्य आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

दैनिक प्रभात 30 Mar 2026 9:08 pm

Eknath Shinde Meet CM Devendra Fadanvis : मोठी बातमी ! एकनाथ शिंदे थेट CM फडणवीसांच्या भेटीला

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरून शिवसेनेचे (Eknath Shinde Meet CM Devendra Fadanvis) नेते दीपक केसरकर यांनी केलेल्या विधानामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा सुरू असतानाच, शिंदे यांनी अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.

दैनिक प्रभात 30 Mar 2026 9:01 pm

Amit Shah : काँग्रेसने नक्षलवाद संपवण्यासाठी काहीही केले नाही; अमित शहा यांची टीका

देशातील नक्षलवादाच्या भीषण समस्येला काँग्रेसचे चुकीचे धोरण जबाबदार असल्याचा थेट आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी सोमवारी लोकसभेत केला.

दैनिक प्रभात 30 Mar 2026 8:46 pm

'माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव'अभियानाला १ एप्रिलपासून प्रारंभ

मुंबई : महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आणि ग्रामीण जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा त्यांच्या उंबरठ्यावर उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ हे अत्यंत महत्त्वाकांक्षी अभियान सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या पुढाकाराने राबविण्यात येणाऱ्या या राज्यव्यापी अभियानाला १ एप्रिलपासून प्रारंभ होत आहे.हे अभियान फक्त सरकारी कार्यक्रमापुरते मर्यादित न राहता, लोकसहभागाद्वारे त्यातून एक व्यापक आरोग्य चळवळ उभी राहावी, असा राज्य शासनाचा मानस आहे. या अभियानांतर्गत प्रत्येक गाव आरोग्यसंपन्न केले जाणार आहे. या प्रस्तावित योजनेमुळे गावापासून ते राज्यस्तरावरील आरोग्य सेवांचे आणि यंत्रणांचे सक्षमीकरण होण्यास मदत होणार आहे. तसेच या उपक्रमामुळे तळागाळातील लोकांपर्यंत वैद्यकीय सेवा पोहोचणार आहेत.‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ या अभियानाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे उपचारांपेक्षा प्रतिबंधावर भर, हे आहे. ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्यविषयक सामाजिक वर्तणुकीत सकारात्मक बदल घडवून आणणे आणि त्यांच्यात आरोग्यदायी जीवनशैली रुजवणे हे या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट आहे. यामध्ये फक्त आजारांवर उपचार करण्यापेक्षा ते होऊ नयेत यासाठी सार्वजनिक स्वच्छता, शुद्ध पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन आणि पोषण यासारख्या मूलभूत घटकांवरही विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे. संसर्गजन्य आजारांसोबतच बदलत्या जीवनशैलीमुळे उद्भवणारे असंसर्गजन्य आजार, माता-बाल आरोग्य आणि मानसिक आरोग्य यासारख्या विषयांनाही या मोहिमेत सामावून घेण्यात आले आहे. या अभियानात ग्रामपंचायतीपासून ते जिल्हा परिषदेच्या आरोग्य यंत्रणा सक्रियपणे सहभागी होणार आहेत. गावागावात स्वच्छतेचा आणि आरोग्याचा जागर करून आरोग्यदायी गाव ही संकल्पना राबवण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असणार आहे.सुदृढ गावांना मिळणार ‘आरोग्यसंपन्न गाव’ किताब‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य स्तरापासून ते ग्रामपंचायत स्तरापर्यंत तीन टप्प्यांवर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय समिती ही अभियानाच्या संपूर्ण प्रक्रियेवर देखरेख ठेवणार आहे. तर आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांच्या नेतृत्वाखालील कृती समिती प्रत्यक्ष कामाचे नियोजन करणार आहे. त्याचबरोबर गाव पातळीवर आरोग्याचे मूल्यांकन करण्यासाठी विशिष्ट निकष ठरवण्यात आले आहेत. या निकषांच्या आधारे ७० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या गावांना ‘आरोग्यसंपन्न गाव’ म्हणून गौरविण्यात येणार आहे. अशा गावांना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र आणि रोख रकमेचा पुरस्कार देऊन प्रोत्साहित केले जाणार आहे. या संपूर्ण अभियानासाठी राज्य सरकारने ८०.७५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, गाव, प्राथमिक आरोग्य केंद्र यांना कोट्यवधी रुपयांपर्यंतची बक्षिसे दिली जाणार आहेत.२ ते ५ कोटींचे पुरस्कारराज्य स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करीत पहिला क्रमांक मिळवणाऱ्या जिल्हा परिषदेला ५ कोटी रुपये, दुसऱ्या क्रमांकाला ३ कोटी रुपये आणि तिसऱ्या क्रमांकासाठी २ कोटी रुपये दिले जाणार आहेत. जिल्हा परिषदेनंतर पंचायत समिती स्तरावरही प्रोत्साहनासाठी मोठ्या रक्कमेची तरतूद आहे. ज्यामध्ये पहिल्या क्रमांकाला २ कोटी, दुसऱ्या क्रमांकाला १.५ कोटी रुपये आणि तिसऱ्या क्रमांकाला १.२५ कोटी रुपये दिले जाणार आहेत.राज्य स्तरावर सर्वोत्तम ठरणाऱ्या ग्रामीण रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालयांना ७५ लाख रुपयांचा विशेष पुरस्कार दिला जाणार आहे. उपआरोग्य केंद्रांना पहिल्या क्रमांकासाठी जिल्हा आणि राज्यस्तरासाठी अनुक्रमे ५ लाख आणि २५ लाख रुपये दिले जाणार आहे. तर प्राथमिक आरोग्य केंद्रांना जिल्हा स्तरावर १० लाख आणि राज्य स्तरावर ५० लाखांचा पुरस्कार दिला जाणार आहे. त्याचबरोबर गावांनाही पहिल्या क्रमांकासाठी जिल्हा, विभाग राज्य स्तरासाठी अनुक्रमे २५ लाख, १ कोटी आणि ५ कोटी रुपयांचे पुरस्कार दिले जाणार आहेत. हे अभियान दरवर्षी १ एप्रिल ते ३१ मार्च या आर्थिक वर्षाच्या कालावधीत राबवले जाणार असल्याने, प्रत्येक वर्षी गावांना आपली कामगिरी सुधारण्याची आणि पुरस्कार मिळवण्याची संधी मिळणार आहे.

फीड फीडबर्नर 30 Mar 2026 8:10 pm

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त 'शिवशाही पुनर्वसन'प्रकल्पाला बळकटी: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या उद्देशाने शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाची स्थापना केली होती, तोच वारसा पुढे नेत झोपडपट्टीमुक्त महाराष्ट्राचे स्वप्न आम्ही पूर्ण करणार आहोत. पारदर्शकता आणि वेग ह्याला आमची प्राथमिकता असून प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी आता खाजगी विकासक आणि शिवशाही पुनर्वसन प्रकल्प यांच्यात 'विशेष संयुक्त उपक्रम' (एसपीव्ही) तयार करण्यास मान्यता देण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले.नंदनवन बंगल्यावर उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शिवशाही पुनवर्सन प्रकल्पाच्या संचालक मंडळाची बैठक झाली. त्यावेळी बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता, प्रधान सचिव नविन सोना, शिवशाही प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक कुणाल कुमार, महाव्यवस्थापक अशोक नाईकवडे आदी उपस्थित होते.यावेळी उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, मुंबईसह राज्यातील झोपडपट्टी पुनर्वसन प्रक्रियेला वेग देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून 'शिवशाही पुनर्वसन प्रकल्पा'ला बळकटी देण्याचा निर्णय घेतला आहे.प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी आता खाजगी विकासक आणि शिवशाही पुनर्वसन प्रकल्प यांच्यात 'विशेष संयुक्त उपक्रम' तयार करण्यास देखील मान्यता देण्यात आली आहे. यामुळे पुनर्वसनाचे प्रकल्प खाजगी क्षेत्रातील कौशल्याच्या मदतीने जलदगतीने पूर्ण होऊ शकतील. त्याचबरोबर रखडलेले पुनर्वसन प्रश्न मार्गी लावून सर्वसामान्यांना हक्काची घरे देतानाच शिवशाही प्रकल्प कंपनीने एमएमआरडीए, एसआरए, म्हाडा, सिडको, मुंबई महापालिका, ठाणे पालिका यासारख्या शासकीय संस्थांच्या माध्यमातून रखडलेल्या प्रकल्पांना वेग द्यावा, असे निर्देश दिले. तांत्रिक अडचणींमुळे रखडलेले प्रकल्प शिवशाही प्रकल्पात घेतले तर ते वेगाने पूर्ण होवू शकतात. शिवशाही शासकीय कंपनी असल्याने तांत्रिक अडथळ्यांवर मार्ग काढतानाच चटई निर्देशांकाचा फायदा देखील मिळू शकतो त्याने प्रकल्पाला अधिक गती मिळू शकेल.केवळ घरेच नव्हे, तर झोपडपट्टी भागातील लोकांच्या हाताला काम मिळावे यासाठी या पुनर्वसन प्रकल्पांतर्गत एमएसएमई पार्क उभारण्यात यावे. तसेच, शासनाच्या महत्त्वाकांक्षी 'लाडकी बहीण' योजनेच्या धर्तीवर महिलांसाठी 'लघु उद्योग प्रकल्प' सुरू करण्याबाबत या बैठकीत निर्णय घेण्यात आला.शिवडी येथील राहुलनगर मधील इमारत क्र. २ दुरुस्तीच्या विषयावर यावेळी चर्चा झाली. ७२ सदनिकांच्या स्ट्रक्चरल मजबुतीकरणासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला ४ कोटी रुपयांचा निधी देण्यास मंजुरी देण्यात आली. ९ खाजगी विकासकांकडे संक्रमण सदनिकांचे १४३.४४ कोटी भाडे थकीत असून वसुली सुलभ व्हावी म्हणून वार्षिक भाडेवाढ १० टक्के ऐवजी ५ टक्के करणे आणि विलंब शुल्क १६ टक्के ऐवजी ८ टक्के करण्याच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली.शिवशाही प्रकल्पाला अधिक बळकटी देण्यासाठी मनुष्यबळाची उपलब्धता व्हावी यासाठी एसआरएच्या धर्तीवर मनुष्यबळ निर्मितीचा सुधारित आराखडा सादर करण्याचे निर्देशही यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी दिले.

फीड फीडबर्नर 30 Mar 2026 8:10 pm

अशोक खरातल्या भेटल्याच्या आरोपावर काय म्हणाल्या नीलम गोऱ्हे ?

पुणे : विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी असताना नीलम गोऱ्हे राजकीय भविष्य जाणून घेण्यासाठी अशोक खरातची भेट घेतली होती, असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केला आहे. या आरोपावर अखेर नीलम गोऱ्हे यांची प्रतिक्रिया आली आहे. एक प्रसिद्धीपत्रक काढून शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी स्वत:ची बाजू मांडली आहे. माझी प्रतिमा स्फटिकाप्रमाणे स्वच्छ आणि पारदर्शी आहे, असे नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. माझ्या कामाची पद्धत आणि माझी तत्वे कधीही कोणापासून लपलेली नाहीत, असेही त्या म्हणाल्या. देवावर श्रद्धा आहे, कोणत्याही ढोंगी बाबावर नाही असे सांगत त्यांची स्वतःची बाजू मांडली.महिलांची प्रगती व्हावी, सामाजिक न्यायासाठी काम करता यावे म्हणून राजकारणात आल्याचे नीलम गोऱ्हेंनी सांगितले. प्रबोधनकारी हिंदुत्व मानते असेही त्या म्हणाल्या. एखादे राजकीय पद किंवा मंत्रिपद मिळवण्याच्या हेतूने बुवाबाजी कधीही केली नसल्याचेही त्यांनी सांगितले. अशोक खरातला भेटल्याचा आरोप त्यांनी फेटाळला.माझी सामाजिक व राजकीय कृतिशीलता, विधानपरिषदेचे उपसभापती पद आणि मंत्री दर्जा यामुळे काही मोजक्या व्यक्तींमध्ये द्वेष निर्माण झाला आहे. अधिवेशन काळातील माझे संसदीय कार्य, सातारा एस.पी. निलंबन आदेशाची अंमलबजावणी आणि निरोपाच्या वेळी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, माननीय सुनेत्रा पवार यांनी माझी जी प्रशंसा केली, ती काही हितशत्रूंना सहन झालेली नाही. विशेषतः पुणे महानगरपालिकेत ज्यांना यश मिळाले नाही, असे काही असंतुष्ट घटक माझ्याविरुद्ध हे विषारी षडयंत्र रचत आहेत, असे नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.ज्यावेळी ही बातमी आली, त्यावेळी २३ तारखेला अधिवेशन नुकतेच सुरू झाले होते. माननीय मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची 'SIT' चौकशी आधीच म्हणजे १३ मार्च रोजी जाहीर केली होती. अशा वेळी पीठासीन अधिकारी (Presiding Officer) म्हणून मी काहीही भाष्य करणे हे संसदीय नियमांनुसार चौकशीत हस्तक्षेप ठरला असता. म्हणूनच, मी अधिवेशनाच्या काळात संयम राखला. मात्र, अधिवेशन संपताच २६ तारखेला आयोजित कार्यक्रमात मी माझी कठोर भूमिका स्पष्ट केली आहे; असेही नीलम गोऱ्हे यांनी जाहीर केले.

फीड फीडबर्नर 30 Mar 2026 8:10 pm

कामगार कर्मचारी संघाची नवी मुंबई विमानतळ व्यवस्थापन समितीची कार्यकारिणी जाहीर

नवी मुंबई : अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाच्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ व्यवस्थापन समितीच्या कार्यकारिणीची भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आणि अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाचे अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी घोषणा करण्यात आली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात नवनियुक्त पदाधिका-यांना रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी चव्हाण यांनी सर्व नवनियुक्त पदाधिका-यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाचे सरचिटणीस सुहास माटे, संयुक्त सरचिटणीस रुपेश धुमाळे, संयुक्त सरचिटणीस योगेश आवळे, उपाध्यक्ष साई घोगळे, सचिव शरद येटम, कार्यकारी अध्यक्ष जितेंद्र राऊत, निशांत गायकवाड यांच्यासह कमर्चारी संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी अखिल भारतीय माथाडी संघटनेची कार्यकारिणीही घोषित करण्यात आली.पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये तळागाळातील प्रत्येक घटकाला न्याय देणे, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी शासन प्रशासन समन्वयातून सर्वांनी मिळून काम करायचे आहे. कोणावरही अन्याय होणार नाही आणि अन्याय आम्ही करणार नाही या भूमिकेतून काम करण्याची पद्धत अवलंबत न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असे रविंद्र चव्हाण याप्रसंगी म्हणाले.नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ या ठिकाणी भाजपा-प्रणित अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाने आज मान्यताप्राप्त कामगार संघटना म्हणून स्थापना केली. यासोबतच नवी मुंबई विमानतळ व्यवस्थापन समिती आणि अखिल भारतीय माथाडी संघटना यांच्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली.भाजपा प्रदेश… pic.twitter.com/5Z7Vg1Le0x— Ravindra Chavan (@RaviDadaChavan) March 30, 2026नवी मुंबई विमानतळ व्यवस्थापन समितीच्या कार्यकारिणीमध्ये संयुक्त सरचिटणीस रुपेश धुमाळे, उपाध्यक्ष किरण पवार, युहान केर्सी दोराबाजी आणि सुजित न्यायनिर्गुणे यांची तर सचिव म्हणून प्रभुदास भोईर, मुखांश नाईक, गजानन पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे . अखिल भारतीय माथाडी संघटनेची कार्यकारिणी घोषित झाली, त्यात रायगड जिल्हा अध्यक्षपदी जितेश शिंदे, भिवंडी पालघर जिल्हा उपाध्यक्षपदी सचिन जोशी, ठाणे उरण उपाध्यक्षपदी विक्रांत भोसले, दक्षिण मुंबई उपाध्यक्षपदी राहुल लहासे, वरळी विधानसभा अध्यक्षपदी शैलेश तोडकरी आणि वरळी विधानसभा सरचिटणीस पदी समीर शेख यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

फीड फीडबर्नर 30 Mar 2026 8:10 pm

ऐन उन्हाळ्यात पुण्याला पावसाने झोपडले; आयटी पार्कमध्ये साचला बर्फ

पुणे : ऐन उन्हाळयात भर दुपारी पावसाने पुण्यात हजेरी लावली. मुसळधार पाऊस, सोसाट्याचा पाऊस आणि गारपिटीने पुणेकरांना चांगलेच झोडपून काढले आहे. पुण्यातील आयटी पार्कमध्ये तर चक्क बर्फ साचला.महाराष्ट्र हवामान विभागाने राज्यात काही दिवस पावसाचे संकेत दिले आहेत. त्यामुळे नागरिकांना हवामान बदलाचा त्रास हा सहन करावा लागणार आहे. पुणे जिल्ह्यातही काही ठिकाणी अशीच परिस्थिती निर्माण झाली. दुपारी अचानक वातावरणात बदल झाला, ढग दाटून आले, सोसाट्याचा वर सुरु झाला, आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली. या कोसळधार सोबत काही ठिकाणी गारपिटही पडली.पुण्यातील हा पावसाचे अनेक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत. गारपीट , मुसळधार पाऊस, जोरदार वारे यामुळे पुणेकरांची त्रेधातिरपीट उडाली आहे. पावसामुळे काही ठिकाणी प्रचंड पाणी साचले, पुण्यातील हिंजवडी या आयटी पार्कमध्ये इतकी गारपीट झाली की पुणे नसून कुठल तरी थंड प्रदेशातील ठिकाण आहे असे भासत आहे. पुण्याच्या आयटी पार्कचा तो व्हायरल होणारा व्हिडीओ पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.पुण्यात नेमका कुठे-कुठे पाऊस पडला?पुण्यात आज (३० मार्च २०२६) दुपारी पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि भोर तालुक्यात अचानक पावसाने हजेरी लावली. बाणेर, बालेवाडी, औंध, कोथरूड आणि सिंहगड रोड परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला, तर काही ठिकाणी गारपीटही झाली.पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून नागरिकांना आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे पुढील काही तास शहर आणि परिसरात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.

फीड फीडबर्नर 30 Mar 2026 8:10 pm

Neelam Gorhe : तृप्ती देसाईंचे भोंदू खरात प्रकरणी ‘ते’आरोप खरे की खोटे? नीलम गोऱ्हे यांनी दिले स्पष्टीकरण

Neelam Gorhe : ​सत्याच्या बाजूने उभे राहून, अशा प्रकारच्या खोट्या प्रचाराने विचलित न होता माझ्या कार्याची गती यापुढेही अशीच कायम राहील, असे नीलम गोऱ्हे म्हणाल्या.

दैनिक प्रभात 30 Mar 2026 8:03 pm

Allah Ghazanfar Expensive : मुंबईचा युवा खेळाडू पदार्पणातचं ठरला महागडा, पहिल्याच सामन्यात केली नकोशा विक्रमाची नोंद

Allah Ghazanfar Expensive : वानखेडे स्टेडियमवर रंगलेल्या मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामन्यात धावांचा पाऊस पडला.

दैनिक प्रभात 30 Mar 2026 7:54 pm

Kuwait News : कुवेतमध्‍ये एका भारतीय नागरिकाचा मृत्यू

कुवेतमध्ये (Kuwait News) एका वीज आणि पाणी शुद्धीकरण प्रकल्पावर इराणने केलेल्‍या हल्‍ल्‍यात एका भारतीय नागरिकाचा मृत्‍यू झाला आहे.

दैनिक प्रभात 30 Mar 2026 7:54 pm

Tamil nadu election 2026: थलपती विजयने 30 वर्षांपासून सोबत असलेल्या ड्रायव्हरच्या मुलाला दिली उमेदवारी; भावूक व्हिडिओ व्हायरल

Tamil nadu election 2026 : सोमवारी (३० मार्च) उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर समर्थकांना संबोधित करताना विजय यांनी सत्ताधारी DMK सरकारवर जोरदार टीका केली.

दैनिक प्रभात 30 Mar 2026 7:41 pm

Maharashtra Weather Alert : भर उन्हाळ्यात अवकाळी पावसाचा कहर; शेतकऱ्यांसाठी पुढील ४८ तास धोक्याचे

मुंबई : राज्यात उन्हाळ्याची तीव्रता वाढत असतानाच अचानक अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. दुपारच्या वेळेतच मुसळधार पाऊस, गारपिट आणि वादळी वाऱ्यांनी अनेक जिल्ह्यांना तडाखा दिला असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पुढील ४८ तास राज्यासाठी धोक्याचे असल्याचा इशारा देण्यात आला आहे.पुणे शहरासह भोर तालुक्यात जोरदार पाऊस आणि गारपिट झाली. उत्रौली परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा अक्षरशः सडा पडला. अचानक आलेल्या या पावसामुळे उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला असला, तरी काढणीला आलेल्या ज्वारी, गहू आणि हरभरा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातही अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे कांदा, मका, गहू आणि हरभरा पिकांवर परिणाम होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.नाशिकमध्येही जोरदार वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट झाली. अनेक भागांत गारांचा खच साचल्याचे चित्र दिसून आले. या अचानक आलेल्या अस्मानी संकटामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. सिन्नर परिसरातही पावसाची नोंद झाली.भारतीय हवामान विभागाने जळगाव जिल्ह्यासाठी पुढील ४८ तासांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. ताशी ५० ते ६० किमी वेगाने वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.अचानक बदललेल्या हवामानामुळे शेतमालाचे मोठे नुकसान होत असून, पुढील दोन दिवस राज्यातील परिस्थिती गंभीर राहण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आणि शेतकऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

फीड फीडबर्नर 30 Mar 2026 7:30 pm

Vijay Shivtare: विजय शिवतारेंच्या आयुष्यात मुलगी बनली ‘देवदूत’; मुंबईतील ‘त्या’ऑपरेशन थिएटरमध्ये नेमकं काय घडलं?

Vijay Shivtare: गेल्या काही काळापासून आमदार विजय शिवतारे किडनीच्या विकाराने त्रस्त होते. दोन्ही मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे त्यांना नियमित डायलिसिसवर राहावे लागत होते.

दैनिक प्रभात 30 Mar 2026 7:29 pm

रामदास आठवलेंनी रिपाईंच्या कार्यकर्त्यांना सुनावले खडे बोल

मुंबई : रिपब्लिकन पक्षाची देशभर घोडदौड सुरु आहे. नागालँन्ड सारख्या राज्यात रिपब्लिकन पक्षाचे 2 आमदार निवडुन आले आहे. मणिपुरमध्ये पक्षाला 17 टक्के मतदान मिळुन पक्ष मान्यता प्राप्त झाला आहे. मुंबईत मात्र रिपाइंच्या उमेदवारांना मतदान मिळत नाही. अनेक वॉर्डात आपला पाठिंबा नसला तरी मित्र पक्षाचे उमेदवार निवडुन येतात. एकेकाळी मुंबईत रिपब्लिकन पक्षाचे 12 नगरसेवक निवडुन आले होते मुंबईचे महापौर पद ही रिपब्लिकन पक्षाला मिळाले होते. आता मुंबईतल्या कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन पक्ष कुठे आणून ठेवलाय याचे आत्मपरिक्षण करावे, अशा शब्दांत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी मुंबईतील पदाधिकारी कार्यकर्त्यांना खडे बोल सुनावले. ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी चार पावले मागे येवुन तरुण पिढीला संधी दिली पाहिजे. दलित पँथरसारखी तरुणांची फौज उभी केली पाहिजे. युती झाली नाही तरी स्वबळावर उमेदवार निवडुन आणता आले पाहिजे. केवळ बौध्दांच्या मतांवर उमेदवार निवडुन येणार नाहीत. सर्व समजाला सोबत घेवुन मुंबईत रिपब्लिकन पक्षाची मजबुत पुर्नबांधणी करा. असे आवाहन ना. रामदास आठवले यांनी रिपब्लिकन कार्यकर्त्यांना केले.चेंबुर येथील फाईन आर्ट सभागृहात रिपब्लिकन पक्षाच्या दक्षिण मध्य मुंबई जिल्हयाच्या वतीनं जिल्हाध्यक्ष संजय डोळसे यांच्या पुढाकारातुन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी सत्काराला उत्तर देतांना ना. रामदास आठवले बोलत होते. यावेळी पुज्य बौध्द धम्म गुरु डॉ. राहुलबोधी महाथेरो यांचा अमृत महोत्सवी वाढदिवसानिमीत्त केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.मी राज्यात कॅबिनेट मंत्री होतो, त्यानंतर मी तीनवेळा लोकसभेत निवडुन आलो. आता राज्यसभेत तीनवेळा निवडुन आलो आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात मी तीनवेळा राज्यमंत्री झालो आहे. मी कुणाला मागायला गेलो नाही, राजकारणात मागुन मिळत नाही. माझ्या पाठिशी गोरगरीब जनता, झोपडीवासी, दलित, बहुजन , आदिवासी सर्व महाराष्ट्राने मला ताकद दिली म्हणुन मी दिल्लीचे तख्त गाठु शकलो. राज्यात एकही असे गांव नसेल जिथे माझा संपर्क झालेला नाही. संपूर्ण देशात मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिकन पक्ष पोहचवला आहे. मला एकटयाला सत्ता नको, माझ्या सहका-यानाही सत्तेत सहभाग दिला पाहिजे मात्र माझ्या सहका-यांना सत्तेत सहभाग मिळत नाही. आपण तळागाळातील जनतेशी संपर्क ठेवून त्यांचे प्रश्न सोडवले पाहिजे. सतत लोकांचा पाठिंबा आपल्याला मिळत राहिला पाहिजे. तसे होत नाही त्यामुळे कदाचित राज्यात माझ्या सहका-यांना सत्तेत सहभाग मिळत नसेल. मुंबईत आणि राज्यात पक्षाची प्रचंड ताकद आहे. ती जागृत केली पाहिजे असे आवाहन ना. रामदास आठवले यांनी केले. मी कधीच मित्रपक्षाच्या चिन्हांवर निवडणुक लढलो नाही. आपल्या पक्षांवर आपण प्रेम केले पाहिजे. गन्ना किसान हे आपल्या पक्षाला निवडणुक चिन्ह मिळाले आहे. आपल्या पक्षाच्या चिन्हांवर निवडणुक जिंकता आली पाहिजे. त्यासाठी नियोजन करुन पक्षबांधणी करा असे आवाहन ना. रामदास आठवले यांनी केले.माझ्या भिमामुळे माझ्या कामाला येत आहे आकार,म्हणून चेंबुरमध्ये होत आहे माझा सत्कारमाझ्या आयुष्यात मी कधी मानली नाही हारकारण मी दुश्मनांवर करीत आलो वारसर्वांसाठी माझे उघडे असते दारकारण देशभरात जागी केली दलित नारअशी कविता ना. रामदास आठवले यांनी सादर केली. यावेळी या सत्कार सोहळयाचे संयोजक जिल्हाध्यक्ष संजय डोळसे, रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे, मुंबई अध्यक्ष सिध्दार्थ कासारे, सुरेश बारसिंग, फुलाबाई सोनवणे, अॅड. आशाताई लांडगे, शिलाताई अनिल गांगुर्डे, उषाताई रामलू, अभयाताई सोनवणे, भाजपचे जिल्हाध्यक्ष धिरज उबाळे, शिवसेना नगरसेविका समृध्दी काते, भाजप नगरसेविका आशा मराठे, रिपाइंचे मुंबई कार्याध्यक्ष बाळासाहेब गरुड, रिपाइंचे मुंबई सरचिटणीस विवेक पवार, अल्पसंख्यांक आघाडी मुंबई अध्यक्ष सोहेल शेख, अजित रणदिवे, रमेश गायकवाड, बाळासाहेब बनसोडे, रवि गायकवाड, सुभाष साळवे, अनिस पठाण आदि अनेक मान्यंवर यावेळी उपस्थित होते. यावेळी फाईन आर्ट सभागृह गर्दीने फुलुन गेले होते.

फीड फीडबर्नर 30 Mar 2026 7:10 pm

उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांची अण्णा बनसोडे यांच्या शिष्टमंडळाने घेतली सदिच्छा भेट..

उपराष्ट्रपती यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी चैत्यभूमी येथे येण्याचे शिष्ट मंडळाचे निमंत्रण..मुंबई : भारताचे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांची महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या शिष्टमंडळाने उपराष्ट्रपती भवन येथे सदिच्छा भेट घेतली. या भेटीत १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त चैत्यभूमी येथे उपस्थित राहण्याची विनंती उपराष्ट्रपतींना करण्यात आली. या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देत उपराष्ट्रपतींनी तत्काळ होकार दर्शवला.यावेळी त्यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून कार्यरत असताना चैत्यभूमीला दिलेल्या भेटींच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच दादर येथे सुरू असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक कामाबाबतही त्यांनी शिष्टमंडळाकडे माहिती घेतली. स्मारकाच्या कामाला अधिक गती मिळावी यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.दरम्यान, बोधगया संबंधित प्रश्नावरही शिष्टमंडळाने उपराष्ट्रपतींसोबत औपचारिक चर्चा केली. या प्रसंगी शिष्टमंडळाकडून उपराष्ट्रपतींना गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा भेट देण्यात आल्या.या भेटीत सुनील मगरे, सिद्धार्थ बनसोडे, नागसेन कांबळे, भदंत राहुल बोधी, बाळासाहेब करडक, आनंद चंदनशिवे, संजय अवसरमोल, शिल्पकार अनिल सुतार,सुबोध भारत, विजय अंभुरे आणि रामनाथ दवणे आदी उपस्थित होते.

फीड फीडबर्नर 30 Mar 2026 7:10 pm

उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांची अण्णा बनसोडे यांच्या शिष्टमंडळाने घेतली सदिच्छा भेट

नवी दिल्ली :भारताचे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांची महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या शिष्टमंडळाने उपराष्ट्रपती भवन येथे सदिच्छा भेट घेतली.या भेटीत १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त चैत्यभूमी येथे उपस्थित राहण्याची विनंती उपराष्ट्रपतींना करण्यात आली. या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देत उपराष्ट्रपतींनी तत्काळ होकार दर्शवला.यावेळी त्यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून कार्यरत असताना चैत्यभूमीला दिलेल्या भेटींच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच दादर येथे सुरू असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक कामाबाबतही त्यांनी शिष्टमंडळाकडे माहिती घेतली. स्मारकाच्या कामाला अधिक गती मिळावी यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.दरम्यान, बोधगया संबंधित प्रश्नावरही शिष्टमंडळाने उपराष्ट्रपतींसोबत औपचारिक चर्चा केली.या प्रसंगी शिष्टमंडळाकडून उपराष्ट्रपतींना गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा भेट देण्यात आल्या.या भेटीत सुनील मगरे, सिद्धार्थ बनसोडे, नागसेन कांबळे, भदंत राहुल बोधी, बाळासाहेब करडक, आनंद चंदनशिवे, संजय अवसरमोल, शिल्पकार अनिल सुतार,सुबोध भारत, विजय अंभुरे आणि रामनाथ दवणे आदी उपस्थित होते.

फीड फीडबर्नर 30 Mar 2026 7:10 pm

Shiv Sena Crisis : शिंदेच्या शिवसेनचे आमदार- खासदार आमच्या संपर्कात; ‘या’बड्या नेत्याचा मोठा दावा

शिवसेना (शिंदे गट) खासदार ज्योती वाघमारे यांनी राज्यात (Shiv Sena Crisis) लवकरच ‘ऑपरेशन टायगर’ होणार असल्याचे संकेत दिल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात पुन्हा खळबळ उडाली होती.

दैनिक प्रभात 30 Mar 2026 7:02 pm

Ajinkya Rahane Statement : ‘मी कोणालाही हे सिद्ध करण्यासाठी खेळत नाहीये’, अजिंक्य रहाणेनं टीकाकारांना दिलं सडेतोड प्रत्युत्तर

Ajinkya Rahane Statement : अजिंक्य रहाणेने आपल्या भविष्याबाबत सुरू असलेल्या सर्व अटकळ फेटाळून लावताना टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले.

दैनिक प्रभात 30 Mar 2026 6:59 pm

Donald Trump : क्युबाला रशियाकडून तेलाची मदत मिळण्यास हरकत नाही; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले स्पष्ट

क्युबाला रशियाकडून तेलाची मदत मिळण्यास काहीही हरकत नसल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी म्हटले आहे.

दैनिक प्रभात 30 Mar 2026 6:32 pm

बिकट परिस्थिती, घरची जबाबदारी, अन पोलीस भरतीच स्वप्न; नेमकं भरतीवेळी शरीर थकलं अन्...

पुणे : अनेक होतकरू तरुण सरकारी नोकरीचा पाठलाग करत असतात. नोकरी मिळवून कुटुंबाला गरीबीतून बाहेर काढण्याचं स्वप्न बघत असतात. असंच एक स्वप्न राज्यातल्या बुलढाणा जिल्ह्यातील तरुणानं बघितलं. पुरुषोत्तम भीमराव बुरकूल असं याचं नाव. (वय २३ वर्ष) हा तरुण पोलीस भरतीसाठी पुण्यात आला. कसून तयारी केली. पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं.नेमकं काय घडलं? बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव तालुक्यातील चिंचोली बुरकूल या गावातला पुरुषोत्तम भीमराव बुरकूल ( वय २३ ) पोलीस भरतीसाठी पुण्यात आला. पुण्यात पोलीस भरती प्रक्रिया नियमानुसार सुरू होती. पुरुषोत्तम या भरती प्रक्रियेत सहभागी झाला.पोलीस भरतीसाठी २८ मार्चला शारीरिक चाचणी घेण्यात आली. अनेक तरुण तरुणी आपली स्वप्न पूर्ण करण्याच्या तयारीत होते. आणि शेवटी भरती प्रक्रियेचा अत्यंत महत्वाचा टप्पा सुरू झाला. तो म्हणजे १६०० मीटर धावण्याचा, या प्रक्रियेत पुरुषोत्तम ही सहभागी झाला.पुरुषोत्तमने सुरुवातीच्या दोन फेऱ्या अत्यंत जिद्दीने पूर्ण केल्या, मात्र तिसरी फेरी धावताना त्याच्या शरीराने साथ दिली नाही. त्याचा श्वास फुलला आणि धावत असताना त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. तो धाडकन जमिनीवर कोसळला. उपस्थित पोलीस अधिकारी आणि वैद्यकीय पथकाने त्याला तात्काळ प्रथोमपचार देऊन ससून रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली.कुटुंबाचा आधार हरपलापुरुषोत्तम हा अत्यंत गरीब घरातून सरकारी नोकरीच्या आशेने पुण्याला आला होता. त्याचे वडील अनेक वर्षांपासून पॅरालिसीस या आजाराने अंथरुणाला खिळलेले होते. घरात आई आणि दोन बहिणी होत्या. वडिलांच्या आजारपणानंतर पुरुषोत्तम हा घरातला कर्ता पुरुष होता. त्याच्या अशा जाण्याने घरावर, बुरकूल गावावर शोककळा पसरली आहे. सरकारी नोकरी मिळवून वडिलांचे उपचार आणि घराला आधार द्यायचे त्याचे स्वप्न अर्धवटच राहिले. पोलीस भरतीसाठी मेहनत तर घेतली पण शरीरानेच साथ सोडली.

फीड फीडबर्नर 30 Mar 2026 6:30 pm

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाला मिळणार 'टेक ऑफ'

मुंबई-सिंधुदुर्ग विमान प्रवासासाठी १०० टक्के 'व्हिजिएफ' मंजूर; फ्लाय ९१ कंपनीची निवड, प्रति आसन २ हजार ९९१ रुपये दर निश्चितमुंबई : कोकणच्या विकासाचा कणा असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी महायुती सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि सुखद निर्णय घेतला आहे. चिपी (सिंधुदुर्ग) ते मुंबई या विमान प्रवासासाठी राज्य सरकारने १०० टक्के 'व्हायबिलिटी गॅप फंडिंग'ला (व्हिजिएफ) प्रशासकीय आणि वित्तीय मंजुरी दिली आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे आता सर्वसामान्य कोकणवासीयालाही परवडणाऱ्या दरात विमान प्रवास करणे शक्य होणार असून, खऱ्या अर्थाने कोकणच्या पर्यटनाला 'टेक ऑफ' मिळणार आहे.केंद्र सरकारच्या 'आरसीएस-उडान' योजनेच्या धर्तीवर हा निर्णय घेण्यात आला असून, यापूर्वी सोलापूर-पुणे-मुंबई मार्गासाठीही अशाच प्रकारे १०० टक्के निधी देण्यास मान्यता देण्यात आली होती. तोच नियम मुंबई-सिंधुदुर्ग प्रवासासाठी लागू करण्यात आला आहे. त्यानुसार, ही योजना प्रत्यक्ष विमानसेवा सुरू झाल्यापासून एक वर्षासाठी किंवा केंद्र सरकारच्या योजनेत समावेश होईपर्यंत लागू राहील. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने प्रत्यक्ष विमान फेऱ्यांची गणना करूनच निधीची देयके सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.राज्य सरकारच्या या निर्णयामुळे कोकणच्या विकासाला नवी दिशा मिळणार आहे. केवळ एका तासात मुंबई-सिंधुदुर्ग अंतर पार होणार असून, याचा मोठा फायदा चाकरमानी आणि व्यावसायिकांना होणार आहे. त्यामुळे चिपी विमानतळ आता खऱ्या अर्थाने गजबजलेले पाहायला मिळेल.प्रति आसन २ हजार ९९१ रुपये दरया विमानसेवेसाठी 'मेसर्स जस्ट उडो एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड' (फ्लाय ९१) या कंपनीची निवड करण्यात आली आहे. या कंपनीला प्रति 'आरसीएस' आसनासाठी २ हजार ९९१ रुपये या दराने निधी दिला जाणार आहे. १७ मार्च २०२६ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या प्रकल्पासाठी ७ कोटी ६४ लाख २० हजार ५० रुपयांच्या वार्षिक खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे. ३० मार्च रोजी सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भातील अधिकृत शासन निर्णय निर्गमित केला.पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडून स्वागतसिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी या निर्णयाचे मनापासून स्वागत केले आहे. सिंधुदुर्गच्या अर्थव्यवस्थेला आणि पर्यटनाला गती देणारा हा क्रांतिकारी निर्णय आहे. यामुळे मुंबई-सिंधुदुर्ग विमानसेवा आता आठवड्याचे सातही दिवस सुरू राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, अशा शब्दांत त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.

फीड फीडबर्नर 30 Mar 2026 6:30 pm

Kia Seltos चा जलवा! भारत NCAP क्रैश टेस्टमध्ये मिळवले ‘5 स्टार’रेटिंग; टाटाच्या ‘या’गाडीलाही टाकले मागे

Kia Seltos : १०.९९ लाख ते १९.९९ लाख रुपये (एक्स-शोरूम) या किंमतीत उपलब्ध असलेल्या या SUV ची बुकिंग २५,००० रुपयांच्या टोकन रकमेसह सुरू आहे.

दैनिक प्रभात 30 Mar 2026 6:25 pm

Rohit Sharma Dance : MI vs KKR सामन्यात दोस्तीचा विजय! जखमी अंजिक्य हसवण्यासाठी रोहितने केला भन्नाट ‘डान्स’; पाहा VIDEO

Rohit Sharma Dance : केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणे दुखापतीमुळे मैदाबाहेर जात असताना रोहित शर्माने केलेल्या कृतीने सर्वांची मने जिंकली.

दैनिक प्रभात 30 Mar 2026 6:18 pm

'आम्ही गल्लोगल्ली वर्गणी मागून नितीश यांना आमदार बनवले होते':हरनौतचा सुपुत्रच मुख्यमंत्री होईल; जाणून घ्या नितीश यांच्या राजीनाम्यावर नालंदाचे लोक काय म्हणाले

आम्हाला फक्त एवढेच हवे आहे की, ते जोपर्यंत आहेत तोपर्यंत बिहारचे मुख्यमंत्री राहावेत. जर ते गेले, तर नालंदाच्याच एखाद्या मुलाला बिहारची कमान मिळावी.- रामटहल साव, नितीश कुमार यांचे संघर्षातील साथीदार नितीश कुमार यांच्याशी ओळख आहे. त्यांच्या मुलाशी अजून ओळख नाही. त्यांच्या ओळखीचा कधीच काही फायदा झाला नाही, पण आपुलकी आहे.- सुरेश प्रसाद, नितीश यांचे सुरुवातीचे साथीदार नितीश कुमार दिल्लीला नक्की जातील, पण बिहारवर त्यांची विशेष नजर राहील. मी त्यांना सांगितले आहे. मी मरेन तेव्हा माझ्या अंत्ययात्रेत तुम्हीही सहभागी व्हाल. नितीश गेले तर बउआ (निशांत कुमार) येतील ना. ते आले की आमची कामे होतील.- सुरेंद्र, ज्यांनी नितीश यांना मोफत चहा पाजला मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याकडून या अपेक्षा त्या लोकांच्या आहेत, ज्यांच्यासोबत नितीश कधीकाळी जमिनीवर बसून भुंजा खात असत. हरनौतच्या गल्ल्यांमध्ये घाम गाळत असत. ज्यांच्या चहाच्या दुकानावर तासन्तास गप्पा मारत असत. मंडे स्पेशल स्टोरीमध्ये वाचा, नीतीश बिहारचे राजकारण सोडून दिल्लीला गेल्यावर ते लोक काय विचार करतात, ज्यांनी गावातील मुन्नाला मुख्यमंत्री बनवले. नालंदामधील नीतीश यांचे संघर्ष सहकारी त्यांच्या या निर्णयावर काय म्हणतात? कॉलेजमध्ये जमिनीवर गमछा अंथरून भुंजा खात होते नीतीश 2015 च्या एका रस्ते अपघातात हरनौतच्या रामटहल साव यांचा पाय तुटला. आता ते दिव्यांग आहेत, पण 26 मार्च रोजी जेव्हा नीतीश समृद्धी यात्रेच्या समारोपासाठी बिहारशरीफला पोहोचले, तेव्हा ते स्वतःला थांबवू शकले नाहीत. त्यांना भेटायला पोहोचले. मात्र, नीतीश यांना भेटणाऱ्यांच्या यादीतून त्यांचे नाव वगळण्यात आले. पंडालातही त्यांच्यासाठी जागा नव्हती. 73 वर्षांचे रामटहल कानू जातीचे आहेत. ते म्हणतात, ‘हे लोक आज आम्हाला नीतीश यांना भेटण्यापासून रोखत आहेत. आम्ही कधी त्यांच्यासोबत महिनेभर फिरत होतो. 70 च्या दशकात जेव्हा नीतीश हरनौतमध्ये आपली जमीन तयार करत होते, तेव्हा ना गाडी होती ना गर्दी. आम्ही गल्ली-मोहल्ल्यांसोबत नालंदा कॉलेज, किसान कॉलेज आणि पटेल कॉलेजसारख्या ठिकाणी लोकांशी मीटिंग करत होतो.’ कार्यकर्त्याच्या घरी झोपायचे नितीश, त्यांना डाळ-भात आणि कारल्याची भाजी आवडायची हरनौतच्या तिसकुरवा गावातील सुरेश प्रसाद कुर्मी जातीचे आहेत. ते म्हणाले, 'जेव्हा नितीश नेते बनण्यासाठी आले होते, तेव्हा हरनौतमध्ये भोला सिंह यांचे वर्चस्व होते. हे वर्चस्व नितीश कुमार यांनी मोडून काढले. त्यांची स्वतःची एक शैली होती.' ते म्हणाले, 'नितीश लोकांची मने जिंकण्यासाठी दिवसभर पायीच गल्लोगल्ली फिरत असत. जिथे संध्याकाळ झाली, तिथे ते एखाद्या कार्यकर्त्याच्या घरी झोपायचे. डायरीत ते आपल्या कार्यकर्त्यांची माहिती लिहून ठेवत असत. अनेक रात्री ते आमच्या घरी थांबले. कोणतीही विशेष मागणी नव्हती. त्यांना जेवणात डाळ-भात आणि कारल्याची भाजी आवडायची.' कार्यालय सुरू राहावे यासाठी ते देणगी म्हणून धान्य आणि पैसे मागत असत अवधेश सिंह आणि नितीश यांची मैत्री कॉलेजच्या दिवसांपासूनची आहे. नितीश यांच्या टाल संघर्ष समितीपासून ते जदयू पर्यंत ते सदस्य आहेत. ते म्हणतात, 'मी नितीश कुमार यांच्या प्रत्येक संघर्षात सोबती राहिलो आहे. त्यांच्यासाठी निवडणूक निधी गोळा करण्यापासून ते मुख्यमंत्री बनण्यापर्यंतचा प्रवास सोबत केला आहे.' अवधेश सिंह यांनी सांगितले, 'नितीश इतके स्वाभिमानी होते की ते कधीही कोणाकडून पैसे मागत नव्हते. अशा परिस्थितीत ऑफिसचा खर्च चालवण्याची जबाबदारी आमच्यावर होती. आम्ही गाव-गाव फिरून त्यांच्यासाठी देणग्या गोळा करत होतो. कोणी तांदूळ तर कोणी डाळ देत असे.' 'अनेक घरांकडून पैसेही मिळत असत. आम्ही सर्व देणग्या गोळा करून त्यांच्या हरनौत येथील कार्यालयात पोहोचवत होतो. याच तांदूळ-डाळीतून कार्यालयात जेवण बनवले जात असे. ज्याला जेव्हा वाटले, त्याने त्यांची मदत केली. मुन्ना सरकार तेव्हा त्यांचे मोठे आर्थिक मदतनीस होते. पैशांसोबत गाडीनेही ते त्यांची मदत करत होते.' घर चालवण्यासाठी ठेकेदारी करू इच्छित होते नीतीश अवधेश सिंह जुनी आठवण सांगताना म्हणतात, 'नीतीश दोन निवडणुका हरले होते. त्यांची पत्नी आधीच त्यांच्यावर नाराज होती. त्यांना नीतीश राजकारणात यावेत असे कधीच वाटत नव्हते. त्यांचे लग्न एका अभियंत्याशी झाले होते, त्यांना ते अभियंत्याचे काम करताना बघायचे होते.' ते म्हणाले, 'नीतीश स्वतःही धीर गमावू लागले होते. मानसिक तसेच आर्थिकदृष्ट्याही पूर्णपणे खचले होते. निवडणूक लढवण्याचे धैर्य उरले नव्हते. राजकारण सोडण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा आमची एक मित्रमंडळी होती. त्याचे प्रमुख वशिष्ठ नारायण सिंह होते. त्यांच्याशिवाय आम्ही, नीतीश कुमार, विजय कृष्ण आणि मुन्ना सरकार होतो.' ‘नितीश यांनी मंडळीत राजकारण सोडून ठेकेदारी करण्याचा प्रस्ताव ठेवला. यासाठी त्यांनी सर्व कागदपत्रे तयार केली होती. विजय कृष्णांना नितीश कुमार यांचा हा निर्णय योग्य वाटला नाही. त्यांनी त्यांची सर्व कागदपत्रे फाडून टाकली. ते म्हणाले, 'राजकारणच तुमच्यासाठी सर्वात योग्य आहे. तेच करा.’ ज्याने फुकट चहा पाजला, त्याचे कर्ज आजही फेडत आहेत अवधेश सिंह म्हणतात, ‘नितीश यांचे वडील वैद्य होते. त्यांच्या घरी बैठकीला मनाई होती. अशा परिस्थितीत मित्रमंडळीची बैठक मुन्ना सरकारच्या खताच्या दुकानावर आणि संध्याकाळी सुरोच्या चहाच्या दुकानावर होत असे. सुरो फुकट चहा पाजत असे.’ सुरेंद्र उर्फ सुरो सांगतात, ‘आमचे नाते एका दिवसाचे नाही, या मैत्रीला दशके उलटून गेली आहेत. आमची पहिली भेट 1962 मध्ये शाळेच्या दिवसांत झाली होती. 1974 ते 80 पर्यंत माझ्या चहाच्या दुकानावर रोज 20-25 लोकांची त्यांची मित्रमंडळी येत असे. मी सर्वांना फुकट चहा-लस्सी पाजत असे.’ ते म्हणाले, ‘त्यावेळी येथील स्टेशन रोड तिठ्यावर त्यांचे कार्यालय होते. ते नेते नव्हते तर बख्तियारपूरचे मुलगे होते. आमदार झाल्यानंतरही जेव्हा ते बख्तियारपूरला येत असत, तेव्हा चहा पिऊनच पाटण्याला जात असत.’ नीतीश केवळ सुखाचेच नव्हे, तर दुःखाचेही सोबती आहेत, नातवाच्या मृत्यूच्या बातमीवर आले होते अवधेश सांगतात, ‘मी कॉलेजमध्ये असताना माझ्या वडिलांची विटांची भट्टी होती. नीतीश रोज आम्हाला विटांच्या भट्टीवरून घ्यायचे आणि दिवसभर फिरल्यानंतर संध्याकाळी इथेच सोडून द्यायचे. मित्राच्या फियाट कारने आम्ही बिहारसोबत झारखंडमध्येही फिरायचो.’ ते म्हणाले, ‘नीतीश 1989 मध्ये खासदार झाले. त्यानंतर रेल्वे मंत्री आणि मुख्यमंत्री. रेल्वे मंत्री झाल्यानंतरही महिन्यातून दोनदा आमच्या घरी यायचे. मुख्यमंत्री झाल्यानंतरही येत राहिले. त्यांची तब्येत बिघडल्यापासून आमची भेट कमी झाली आहे.’ अवधेश आपल्या आयुष्यातील दुःख आठवत म्हणतात, ‘2019 मध्ये एका रस्ते अपघातात माझ्या नातवाचा मृत्यू झाला. आधी त्यांनी फोन केला आणि संपूर्ण जिल्हा प्रशासन तासाभरात माझ्या मदतीसाठी माझ्या घरी हजर झाले. दुसऱ्या दिवशी नितीश स्वतः घरी आले. एक तास थांबले. धीर दिला. वारंवार विचारत राहिले की काही गरज असेल तर सांगा. ते आले होते, यापेक्षा मला आणखी काय हवे होते?’ मित्राची शिफारस ऐकली, घाट बांधून स्वप्न पूर्ण केले नितीश कुमार यांच्या गटातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्व होते मुन्ना सरकार. सर्वजण एकत्र बख्तियारच्या शिडी घाटावर गंगा नदीत अंघोळ करत असत. नितीश आणि मुन्ना सरकारने कधीतरी बख्तियारपूरच्या शिडी घाटाला सुंदर घाट आणि पर्यटन स्थळ बनवण्याचे स्वप्न पाहिले होते. नीतीश कुमार यांनी केवळ याला आपला ड्रीम प्रोजेक्ट बनवले नाही, तर आज बख्तियारपूरचा सीढी घाट एक सुंदर पर्यटन स्थळ आहे. घाटापासून दूर गेलेल्या गंगेलाही ते त्या घाटापर्यंत घेऊन आले आहेत. याला आणखी चांगले बनवण्याच्या प्रयत्नात ते गुंतले आहेत. अवधेश कुमार म्हणतात की त्यांच्या मित्रांनी जितकी शिफारस केली, तितक्याच प्राधान्याने त्यांनी हे पूर्ण करून घेतले. मुख्यमंत्री झाल्यावरही गावाचे आमंत्रण मिळताच पोहोचतात नीतीश कुमार यांच्या कल्याणबीघा गावात आमची भेट अवधेश महतो यांच्याशी झाली. ते म्हणतात, 'नीतीश कुमार आजही एका ग्रामस्थाचे कर्तव्य बजावतात. गावात जर त्यांचे ओळखीचे लोक लग्न आणि शोक यांसारख्या कार्यक्रमांसाठी बोलावतात, तर ते नक्की येतात. कुणी जेवणाचे आमंत्रण दिले तर ते आले आहेत. अवधेश म्हणाले, 'गावाचे संपूर्ण चित्र बदलले आहे. ज्या गावात कधी रस्त्यावर गुडघ्यापर्यंत चिखल होता, आज तिथे रुंद आणि गुळगुळीत रस्ता आहे. वीज, पोलिस स्टेशन, रुग्णालय, सिंचन, खेळाचे मैदान, आयटीआय केंद्र, सर्वकाही. जे काही दिसत आहे, ते सर्व नीतीश कुमार यांच्यामुळेच आहे.' नीतीश कुमार यांच्या घरासमोरच जयेश कुमार यांचे घर आहे. त्यांचे वडील एकेकाळी नितीश कुमार यांचे जवळचे मित्र होते. ते म्हणाले, ‘2012 मध्ये त्यांनी त्यांच्या गावात सहज वसुधा केंद्र उघडले होते. त्याचे उद्घाटन करण्यासाठी नितीश कुमार स्वतः आले होते.’ जयेश कुमार यांनी सांगितले, ‘ही गोष्ट 2013 ची आहे. माझ्या वडिलांना कर्करोग झाला होता. त्यावेळी कर्करोगाच्या रुग्णांना सरकारकडून 50 हजार रुपयांची मदत मिळत होती. आम्ही अर्ज केला, पण आम्हाला फिरवले जात होते.’ ते म्हणाले, ‘तेव्हा आम्ही थेट आरोग्य विभागाच्या सचिवांकडे गेलो. त्यांना सांगितले की, आम्ही मुख्यमंत्र्यांच्या गावातील आहोत. तरीही आम्हाला त्रास दिला जात आहे. सचिवांनी अधिकाऱ्याला बोलावून फटकारले. त्यानंतर लगेचच आम्हाला पैसे मिळाले. नाहीतर आम्हाला खूप फिरवले जात होते.’

दिव्यमराठी भास्कर 30 Mar 2026 6:12 pm

Gayatri Datar : प्रसिद्ध अभिनेत्री लवकरच अडकणार विवाह बंधनात, सोशल मीडियावर शेअर केला 'हा'सुंदर व्हिडीओ

मुंबई : कलाविश्वातील अनेक कलाकार सध्या विवाहबंधनात अडकले आहेत. अशातच आता आणखी एका अभिनेत्रीचा विवाह सोहळा लवकरच पार पडणार आहे.झी मराठीवरील 'तुला पाहते रे' या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर करून गेलेली अभिनेत्री गायत्री दातार तिच्या नव्या आयुष्याची सुरुवात करणार असून लवकरच ती विवाहबंधनात अडकणार आहे. नुकताच गायत्रीनं आपल्या होणाऱ्या नवऱ्यासह काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. हे फोटो शेअर करत तिनं आपल्या प्रेमाची कबूली दिली होती. गायत्रीच्या होणार्‍या नवऱ्याचं नाव श्रीकांत चवरे असं आहे.नुकताच नाटकाच्या टीमनं गायत्रीचं केळवणं केलं असून याचा खास व्हिडिओही तिने सोशल मीडियावर शेअर केला. हा व्हिडिओ शेअर करत गायत्रीनं कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'बेस्ट केळवण.. काही बेस्ट माणसांकडून.. आपल्या आयुष्यात अशी कमी माणसं आहेत, कमी वेळात येतात आणि आपलंसं करुन टाकतात'.सिरिअल किलर नाटकाचे दिग्दर्शक, निर्माते, भाऊ कदम, तेजस, गौरी तसेच संर्पूण टीम खूप खास आहे. प्रणय तेली सर आणि तुमच्या कुटुंबाचंही आभार. केदार देसाई यांच्या कुटुंबाचंही आभार. माझ्या केळवणसाठी इतकी सुंदर तयारी केली, त्याबद्दल आभार, असं तिनं म्हटलं आहे.

फीड फीडबर्नर 30 Mar 2026 6:10 pm

येत्या तीन महिन्यांत 'पीएनजी'साठी अर्ज न केल्यास 'एलपीजी'सिलिंडर बंद

मंत्री छगन भुजबळ यांचा इशारा; व्यावसायिक वापरासाठीच्या गॅस पुरवठ्यात ५० टक्क्यांपर्यंत वाढमुंबई : राज्यातील ज्या शहरी भागांमध्ये पाइपद्वारे गॅस (पीएनजी) जोडणीची सुविधा उपलब्ध आहे, तिथे नागरिकांनी येत्या तीन महिन्यांत अर्ज करणे बंधनकारक आहे. पीएनजी वाहिनी कार्यान्वित असूनही नागरिक अर्ज करत नसल्यास, त्या भागातील घरगुती गॅस (एलपीजी) सिलिंडरचा पुरवठा बंद केला जाऊ शकतो, असा इशारा अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सोमवारी दिला.मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आखाती देशातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील इंधन पुरावठ्याबाबत सरकारची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. भुजबळ म्हणाले, जागतिक स्तरावर युद्धजन्य परिस्थिती असली, तरी भारतात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता अफवांवर विश्वास ठेवू नये. रशिया आणि व्हेनेझुएला यांसारख्या देशांकडून नियमितपणे इंधन पुरवठा होत असून, भारतीय जहाजांची ये-जा सुरू असल्याने तुटवड्याची कोणतीही शक्यता नसल्याचे भुजबळ यांनी नमूद केले.बाजारातील मागणी लक्षात घेता सरकारने व्यावसायिक वापरासाठीच्या गॅस पुरवठ्यात ५० टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. एलपीजीचा साठाही मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आला असून, पुरवठा साखळी सुरळीत ठेवण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना केल्या जात आहेत. ज्या नागरिकांनी पीएनजीसाठी अर्ज केला आहे, मात्र अद्याप त्यांच्यापर्यंत वाहिनी पोहोचलेली नाही, अशा ग्राहकांचा एलपीजी पुरवठा कोणत्याही परिस्थितीत खंडित केला जाणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.रेशनवर तीन महिन्यांचे धान्य मिळणारइंधन पुरवठ्यासोबतच रेशन धान्याबाबतही सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात धान्याचा पुरेसा साठा असून, नागरिकांना आता तीन महिन्यांचे धान्य एकाच वेळी घेण्याची मुभा देण्यात आली आहे. याशिवाय, जिथे गॅसची सुविधा कमी आहे, तिथे केरोसीन उपलब्ध करून दिले जाणार आहे. पीएनजी वाहिनी टाकण्यासाठी आता स्वतंत्र परवानग्यांची गरज भासणार नाही, सरकारच ही प्रक्रिया सुलभ करणार आहे. पीएनजी हा सुरक्षित आणि स्वस्त पर्याय असून त्याचा विस्तार करणे काळाची गरज आहे. त्यामुळे उपलब्ध सुविधा असलेल्या भागातील नागरिकांनी तातडीने अर्ज करावेत, असे आवाहन मंत्री भुजबळ यांनी केले. त्याचप्रमाणे राज्यात कोणत्याही प्रकारचा लॉकडाऊन लागू होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

फीड फीडबर्नर 30 Mar 2026 6:10 pm

Railway Accident : नागपूरजवळ मोठा रेल्वे अपघात टळला! बालाघाट-इतवारी रेल्वेची चाके रुळावरून घसरली

Railway Accident : नागपूरच्या कलमना-कामठी दरम्यान बालाघाट-इतवारी रेल्वेचा अपघात झाला आहे.

दैनिक प्रभात 30 Mar 2026 5:52 pm

Uddhav Thackeray Action Mode : उद्धव-आदित्य ठाकरे ‘ॲक्शन मोड’मध्ये; पक्षवाढीसाठी आखली ‘ही’मोठी रणनीती

पक्षातील खासदारांनी आठ दिवसांपूर्वीच प्रचारात उद्धव आणि आदित्य ठाकरे (Uddhav Thackeray Action Mode) उतरले नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती.

दैनिक प्रभात 30 Mar 2026 5:45 pm

Ajinkya Rahane Statement : अजिंक्यचं ‘ते’विधान अन् ऑस्ट्रेलियाचं प्रत्युत्तर; २५ कोटींचा कॅमेरून ग्रीन का करत नाही गोलंदाजी? जाणून घ्या

Ajinkya Rahane Statement : सामन्यानंतर पत्रकारांनी जेव्हा रहाणेला ग्रीनच्या गोलंदाजीबद्दल विचारले, तेव्हा त्याने हात झटकले, असं त्याने का केलं जाणून घेऊया.

दैनिक प्रभात 30 Mar 2026 5:43 pm

Prakash Raj : ज्येष्ठ अभिनेते प्रकाश राज यांना मातृशोक; आई स्वर्णलता यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन

स्वर्णलता या दीर्घकाळ आजारपणामुळे त्रस्त होत्या. त्यांच्या मेंदूत गाठी (ब्रेन ट्यूमर) झाल्याची माहिती स्वतः प्रकाश राज( Prakash Raj) यांनी यापूर्वी दिली होती.

दैनिक प्रभात 30 Mar 2026 5:35 pm

Maharashtra Politics : मोठी घडामोड..! १६ नगरसेवकांचं तडकाफडकी निलंबन; राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra Politics : अकोला महानगरपालिकेत महापौर शारदा खेडकर यांनी १६ नगरसेवकांना निलंबित केले आहे.

दैनिक प्रभात 30 Mar 2026 5:34 pm

२४ लाख ७३ हजार थकबाकीदार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा

३० जूनआधी प्रक्रिया पूर्ण करणार; राज्यस्तरीय बँकर्स कमिटीचा अहवाल तयारमुंबई : राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजने'च्या अंमलबजावणीला आता वेग आला आहे. राज्यस्तरीय बँकर्स कमिटीने थकबाकीदार शेतकऱ्यांचा सविस्तर अहवाल तयार केला असून, यामुळे सुमारे २४ लाख ७३ हजार ५६६ शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा झाला आहे. ३० जूनपर्यंत ही सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीची घोषणा केली होती. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी सहकार विभागाने जिल्हा मध्यवर्ती आणि राष्ट्रीयीकृत बँकांकडून थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती संकलित केली आहे. विशेष म्हणजे, केवळ पीककर्जच नव्हे, तर मध्यम व दीर्घ मुदतीच्या कर्जाचाही यात समावेश करण्यात आला असून, ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकबाकी असलेल्या पात्र शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.बँकर्स कमिटीच्या अहवालानुसार, राज्यातील १ कोटी ३३ लाख शेतकऱ्यांपैकी सुमारे २४ लाख ७३ हजार शेतकरी थकबाकीदार आहेत. त्यांच्याकडे एकूण ३५ हजार ४७७ कोटी रुपयांची थकबाकी आहे. यात सोलापूर, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, नांदेड आणि अहिल्यानगरसह एकूण १४ जिल्ह्यांमध्ये थकबाकीचे प्रमाण सर्वाधिक आहे. या शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन लाख रुपयांपर्यंतची रक्कम थेट जमा केली जाणार आहे.नेमके निकष काय?या कर्जमाफीबाबत महत्त्वाची बाब म्हणजे, फक्त थकीत पीककर्जच माफ होईल असा निकष सरकारने ठेवलेला नाही. अनेक शेतकऱ्यांचे पीककर्ज नियमित असले तरी शेतीसाठी घेतलेले मध्यम किंवा दीर्घ मुदतीचे कर्ज थकले आहे. अशा शेतकऱ्यांनाही दोन लाखांच्या मर्यादेत कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे. पीककर्ज परतफेडीची मुदत ३० जून असते, त्याआधीच ही प्रक्रिया पूर्ण करून शेतकऱ्यांना सातबारा कोरा करण्याची संधी दिली जाईल, असे सहकार विभागातील सूत्रांनी सांगितले.

फीड फीडबर्नर 30 Mar 2026 5:30 pm

Donald Trump : क्युबाला रशियाकडून तेलाची मदत मिळण्यास हरकत नाही.! डोनाल्ड ट्रम्प यांचे स्पष्टिकरण

क्युबाला रशियाकडून तेलाची मदत मिळण्यास काहीही हरकत नसल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.

दैनिक प्रभात 30 Mar 2026 5:23 pm

Rupee vs Dollar: ऐतिहासिक नीचांक! रुपया पहिल्यांदाच 95 पार; सर्वत्र चिंतेचे वातावरण

Rupee vs Dollar: चालू मार्च महिन्यात रुपयामध्ये तब्बल ४ टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. गेल्या सात वर्षांतील ही रुपयाची एका महिन्यातील सर्वात खराब कामगिरी आहे.

दैनिक प्रभात 30 Mar 2026 5:12 pm

Pakistan Foreign Minister Ishaq Dar : विदेशी पाहुण्यांच्या स्वागतावेळी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री पडले, व्हिडिओ होतोय व्हायरल

पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री इशाक डार (Ishaq Dar) इस्लामाबादमध्ये परदेशी पाहुण्यांचे स्वागत करताना अचानक पडल्याची घटना घडली. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.मध्यपूर्वेतील संकटावर चर्चा करण्यासाठी रविवारी (२९ मार्च) इस्लामाबादमध्ये आलेल्या परराष्ट्र मंत्र्यांचे स्वागत इशाक डार करत होते. यावेळी ते इजिप्तचे परराष्ट्र मंत्री बद्र अब्देलट्टी यांचे स्वागत करत असताना अचानक त्यांचा तोल गेला आणि ते घसरून खाली पडले. यानंतर सुरक्षा कर्मचारी त्यांना जमिनीवरून उचलतात. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. व्हिडिओमध्ये इशाक डार तोल जाऊन पडताना स्पष्टपणे दिसत आहेत.Ishaq Dar reportedly slipped and fell to the floor, allegedly due to heavy intoxication while meeting the FMs of other countries. pic.twitter.com/Mr4L8pA045— DesiEscobar (@DesiEsco7) March 29, 2026पाकिस्तानी (pakistan) परराष्ट्र कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत इशाक डार यांना कोणतीही दुखापत झालेली नाही आणि ते पूर्णपणे सुरक्षित आहेत. घटनेनंतर त्यांनी चार देशांच्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले, ज्यात इजिप्त, तुर्की आणि सौदी अरेबियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी सहभाग घेतला.या बैठकीत मध्यपूर्वेतील वाढता तणाव कमी करण्याच्या उपायांवर चर्चा करण्यात आली. इस्लामाबादमध्ये संभाव्य अमेरिका-इराण चर्चेच्या शक्यतांबाबतही इशाक डार यांनी उपस्थित मान्यवरांना माहिती दिली. या उपक्रमाला भेट देणाऱ्या परराष्ट्र मंत्र्यांनी पूर्ण पाठिंबा दर्शविल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.पाकिस्तानने आयोजित केलेल्या या चार-पक्षीय बैठकीत इजिप्तचे परराष्ट्र मंत्री बद्र अब्देलट्टी, तुर्कीचे परराष्ट्र मंत्री हाकान फिदान आणि सौदी अरेबियाचे परराष्ट्र मंत्री प्रिन्स फैसल बिन फरहान अल सौद सहभागी झाले होते. बैठकीनंतर पाकिस्तानी मंत्र्यांनी सांगितले की, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि लष्करी तणाव वाढण्याचा धोका कमी करण्यासाठी सर्व देशांनी एकजूट कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.

फीड फीडबर्नर 30 Mar 2026 5:10 pm

Jobs Alert : १२ वी नंतर विमानतळावर करिअरची मोठी संधी; लाखोंचं पॅकेज आणि हाय-प्रोफाईल लाईफस्टाईल, जाणून घ्या सविस्तर

मुंबई : सध्याच्या काळात विमान वाहतूक (Aviation) क्षेत्र हे जगातील सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या उद्योगांपैकी एक म्हणून समोर आले आहे. या विस्तारामुळे तरुणांसाठी रोजगाराच्या नवनवीन आणि प्रगत वाटा खुल्या झाल्या आहेत. केवळ आकर्षक पगारच नाही, तर एक प्रतिष्ठित जीवनशैली आणि व्यावसायिक प्रगती देणारे क्षेत्र म्हणून याकडे पाहिले जात आहे. या पार्श्वभूमीवर, 'एअरपोर्ट ऑपरेशन्स' हा अभ्यासक्रम करिअरला नवी दिशा देण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरत आहे. या विशेष प्रशिक्षणामुळे उमेदवारांना विमानतळावरील महत्त्वाच्या जबाबदाऱ्या हाताळण्यासाठी सक्षम केले जाते. प्रामुख्याने ग्राउंड स्टाफ ऑपरेशन्स, कॅबिन क्रू सेवा आणि ग्राहक सेवा (Customer Service) यांसारख्या विभागांमध्ये स्वतःची ओळख निर्माण करण्याची मोठी संधी या अभ्यासक्रमामुळे मिळते. उत्तम कामाचे वातावरण आणि वेगाने पदोन्नती मिळवून देणारे हे क्षेत्र धाडसी आणि महत्त्वाकांक्षी तरुणांसाठी एक 'गोल्डन चान्स' ठरत आहे. जर तुम्ही एका सुसंस्कृत आणि प्रगत करिअरच्या शोधात असाल, तर विमानतळ ऑपरेशन्सचे विविध विभाग तुमच्या स्वागतासाठी सज्ज आहेत.https://prahaar.in/2026/03/30/pakistan-foreign-minister-ishaq-dar-pakistan-foreign-minister-ishaq-dar-falls-while-welcoming-foreign-guests-video-goes-viral/ग्राउंड स्टाफकोणत्याही विमानतळावरील कामकाजाचा कणा म्हणून 'ग्राउंड स्टाफ' ओळखला जातो. प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि शिस्तबद्ध करण्यासाठी हे कर्मचारी अहोरात्र कार्यरत असतात. विमानात प्रवेश करण्यापूर्वीची महत्त्वाची प्रक्रिया जसे की, प्रवाशांचे चेक-इन करणे, त्यांना बोर्डिंग पास सुपूर्द करणे आणि प्रवासाशी संबंधित आवश्यक तांत्रिक माहिती देणे ही कामे ग्राउंड स्टाफ अत्यंत कार्यक्षमतेने पार पाडतो. विमानाची नेमकी वेळ, बोर्डिंग गेटचा क्रमांक किंवा प्रवासादरम्यान येणाऱ्या इतर कोणत्याही अडचणींबाबत प्रवाशांना तात्काळ मदत आणि मार्गदर्शन करण्याचे महत्त्वाचे कार्य हे कर्मचारी करतात. थोडक्यात सांगायचे तर, विमानतळावर पाऊल ठेवल्यापासून ते विमानात बसेपर्यंत प्रवाशांना मिळणाऱ्या उत्कृष्ट सेवेमध्ये ग्राउंड स्टाफचे योगदान अत्यंत मोलाचे असते.केबिन क्रूविमानाचा प्रवास केवळ वेगवानच नाही तर तो सुरक्षित आणि सुखद करण्याची मोठी जबाबदारी 'केबिन क्रू' सदस्यांच्या खांद्यावर असते. विमानाच्या आतील वातावरणात प्रवाशांची काळजी घेणारे हे कर्मचारी प्रवासादरम्यानचे महत्त्वाचे दुवे मानले जातात. विमान उड्डाण करण्यापूर्वी प्रवाशांना सुरक्षेचे नियम आणि आपत्कालीन परिस्थितीतील माहिती देऊन, ते प्रवाशांच्या मनातील भीती दूर करण्याचे काम करतात. केवळ सुरक्षेपुरतेच मर्यादित न राहता, प्रवाशांच्या आरामाची आणि गरजांची पूर्ण दखल केबिन क्रू घेतात. प्रवासादरम्यान उत्तम दर्जाचे जेवण, पेय आणि इतर आवश्यक सुविधा पुरवून ते प्रवाशांना घरच्यासारखा अनुभव देतात. शिस्त, हसतमुख सेवा आणि प्रसंगावधान या गुणांमुळे केबिन क्रू हे विमान वाहतूक क्षेत्रातील एक अत्यंत प्रतिष्ठित आणि आकर्षणाचे पद ठरले आहे.एअरपोर्ट ऑपरेशन स्टाफविमानतळावरील प्रत्येक हालचाल अचूक आणि वेळेवर होण्यासाठी 'एअरपोर्ट ऑपरेशन स्टाफ' पडद्यामागून महत्त्वाची भूमिका बजावत असतो. विमानतळाचे संपूर्ण कामकाज कार्यक्षमतेने सुरू आहे की नाही, यावर या पथकाचे बारीक लक्ष असते. विमानांचे सुरक्षित टेक-ऑफ (उड्डाण) आणि लँडिंग (अवतरण) यांचे काटेकोर नियोजन करणे ही या विभागाची मुख्य जबाबदारी आहे. केवळ नियोजनापुरते मर्यादित न राहता, विमानतळावरील प्रत्येक प्रक्रिया सुरक्षित आणि नियमांनुसार पार पाडली जात असल्याची खात्री हे कर्मचारी करतात. तांत्रिक सुसूत्रता आणि प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत, विमानतळावरील संभाव्य अडथळे दूर करून हवाई वाहतूक विनासायास सुरू ठेवण्यात ऑपरेशन स्टाफचा मोठा वाटा असतो.सिक्योरिटी स्टाफविमानतळावरील शिस्त आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेची संपूर्ण धुरा 'सिक्युरिटी स्टाफ' म्हणजेच सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर असते. कोणत्याही प्रकारचा धोका टाळण्यासाठी हे कर्मचारी अत्यंत सतर्कतेने आपली कर्तव्ये पार पाडतात. प्रवाशांची कसून तपासणी करणे आणि त्यांच्या सामानाची तांत्रिक उपकरणांद्वारे पडताळणी करणे, हे त्यांच्या कामाचे मुख्य स्वरूप आहे. विमानात अशा कोणत्याही संशयास्पद किंवा घातक वस्तू नेल्या जाऊ नयेत, ज्यामुळे सहप्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण होईल, याची खात्री सुरक्षा रक्षक करतात. अहोरात्र पहारा देऊन विमानतळ परिसरातील शांतता आणि सुरक्षितता कायम राखण्याचे आव्हानात्मक काम हे कर्मचारी करत असतात. त्यांच्या दक्षतेमुळेच लाखो प्रवासी निर्भयपणे आपला विमान प्रवास पूर्ण करू शकतात.टेक्निकल जॉब्सविमान वाहतूक क्षेत्रात तंत्रज्ञानाचे महत्त्व अनन्यसाधारण असून, या विभागातील 'टेक्निकल स्टाफ' अत्यंत कौशल्याने आपली जबाबदारी पार पाडत असतो. यामध्ये प्रामुख्याने विमान इंजिनिअर्स आणि एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) अधिकारी यांचा समावेश होतो. विमानांची वेळेवर देखभाल, दुरुस्ती आणि तांत्रिक सुरक्षिततेची खात्री करण्याची महत्त्वाची भूमिका इंजिनिअर्स पार पाडतात, ज्यामुळे प्रवाशांचा प्रवास निर्धोक होतो. दुसरीकडे, आकाशातील रहदारीचे नियमन करण्याचे आव्हानात्मक काम एटीसी अधिकारी करतात. उड्डाण करत असलेल्या विमानांना अचूक दिशा दाखवणे आणि त्यांच्या टेक-ऑफ व लँडिंगसाठी सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देणे, ही त्यांची मुख्य जबाबदारी असते. या तांत्रिक तज्ज्ञांच्या अचूक नियोजनामुळे आणि सतर्कतेमुळेच अत्यंत गुंतागुंतीची हवाई वाहतूक व्यवस्था सुरक्षित आणि यशस्वीरीत्या कार्यरत राहते.विमानतळ क्षेत्रातील नोकरीसाठी अर्ज कसा कराल ?विमान वाहतूक क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत, परंतु त्यासाठी योग्य मार्ग निवडणे आवश्यक आहे. विमानतळावर नोकरी मिळवण्यासाठी प्रामुख्याने अधिकृत वेबसाइट्स, सरकारी परीक्षा आणि खाजगी संस्था अशा तीन महत्त्वाच्या मार्गांचा अवलंब केला जातो. बहुतेक नामांकित विमान कंपन्या त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर रिक्त पदांची जाहिरात प्रसिद्ध करतात. इच्छुक उमेदवार तिथे ऑनलाइन अर्ज करू शकतात, ज्यानंतर मुलाखत आणि विशिष्ट कालावधीच्या प्रशिक्षणानंतर त्यांची नियुक्ती केली जाते. सरकारी पदांसाठी मात्र, भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) द्वारे आयोजित विशेष परीक्षा आणि मुलाखती उत्तीर्ण करणे अनिवार्य असते. तसेच, 'ग्राउंड स्टाफ' सारख्या पदांसाठी अनेकदा थर्ड पार्टी एजन्सीमार्फत कंत्राटी पद्धतीने भरती प्रक्रिया राबवली जाते. विशेषतः सुरक्षा विभागातील (Security Staff) नोकरीसाठी SSC सारख्या सरकारी परीक्षांमधून निवड होणे आवश्यक असते. थोडक्यात, तांत्रिक कौशल्ये आणि योग्य तयारीच्या जोरावर या प्रतिष्ठीत क्षेत्रात प्रवेश करणे आता अधिक सुलभ झाले आहे.विमानतळ क्षेत्रासाठी कशी असणार पात्रता ?विमानतळ क्षेत्रातील झळाळत्या करिअरसाठी केवळ पदवीच नाही, तर विशिष्ट कौशल्ये आणि तांत्रिक ज्ञानाची जोड असणे आवश्यक आहे. कोणत्याही शाखेतील १२ वी किंवा पदवी पूर्ण केलेले विद्यार्थी या क्षेत्रात प्रवेश करू शकतात. मात्र, 'डिप्लोमा इन एव्हिएशन हॉस्पिटॅलिटी', 'एअरपोर्ट मॅनेजमेंट' किंवा 'ग्राउंड स्टाफ सर्व्हिसेस' सारखे विशेष अभ्यासक्रम पूर्ण केल्यास निवडीची संधी अधिक वाढते. किमान १२ वी उत्तीर्ण किंवा पदवीधर असणे आवश्यक असून संगणकाचे मूलभूत ज्ञान असणे गरजेचे आहे. १२ वी किंवा पदवीसोबतच इंग्रजी भाषेवर प्रभुत्व, उत्तम संवाद कौशल्य आणि आकर्षक व्यक्तिमत्त्वाला प्राधान्य दिले जाते.इंजिनिअरिंग पदांसाठी संबंधित विषयातील अभियांत्रिकी पदवी अनिवार्य आहे. या आव्हानात्मक पदासाठी B.Sc. किंवा B.Tech. पदवी आणि प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. केवळ शैक्षणिक पदवी असून चालत नाही, तर या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास, उत्तम संवाद कौशल्य आणि शिस्तबद्ध व्यक्तिमत्त्व हे गुण उमेदवाराकडे असणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. या पात्रता पूर्ण करणाऱ्या तरुणांसाठी विमान वाहतूक क्षेत्रात प्रगतीची मोठी दारे खुली आहेत.पगार किती असणार ?विमानतळ क्षेत्र हे केवळ प्रतिष्ठेचेच नाही, तर आर्थिक प्रगतीसाठी देखील एक उत्तम पर्याय ठरत आहे. या क्षेत्रात मिळणारे वेतन हे प्रामुख्याने उमेदवाराचा अनुभव, पद आणि कामाचे स्वरूप यावर अवलंबून असते. सुरुवातीच्या स्तरापासून ते वरिष्ठ पदांपर्यंत येथे पगाराचे आकर्षक टप्पे पाहायला मिळतात. ग्राउंड स्टाफ सदस्यांना या पदासाठी साधारणपणे ₹२०,००० ते ₹४०,००० पर्यंत वेतन दिले जाते. केबिन क्रू या सदस्यांना विमान कंपन्यांनुसार केबिन क्रू सदस्यांना ₹२५,००० ते ₹१,००,००० पर्यंत आकर्षक पगार मिळतो. ऑपरेशन्स स्टाफ म्हणून विमानतळाचे व्यवस्थापन पाहणाऱ्या या कर्मचाऱ्यांना ₹३०,००० ते ₹६०,००० च्या दरम्यान वेतन मिळते. एअर ट्रॅफिक कंट्रोलर (ATC) या पदासाठी तांत्रिक आणि जबाबदारीच्या ₹४०,००० ते ₹१.५ लाख इतके उच्च श्रेणीतील वेतन दिले जाते. जसजसा कामाचा अनुभव वाढत जातो, तसतसे या क्षेत्रात वेतनासोबतच इतर भत्ते आणि सोयी-सुविधांमध्येही मोठी वाढ होते. त्यामुळेच, उत्तम आर्थिक भविष्याची स्वप्ने पाहणाऱ्या तरुणाईचा ओढा या क्षेत्राकडे वाढत आहे.

फीड फीडबर्नर 30 Mar 2026 5:10 pm

Pune–Nashik Highway Mega Project : पुणे-नाशिक महामार्गाच्या कामाला वेग; ट्रॅफिक विसरा आता प्रवास होणार वेगवान

पुणे : सततच्या ट्रॅफिकमुळे त्रस्त असलेल्या पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. पुणे ते नाशिक या मार्गावरील महत्त्वाच्या महामार्ग प्रकल्पाला गती मिळाली असून, यामुळे प्रवास अधिक वेगवान आणि सुलभ होणार आहे.८ पदरी उन्नत मार्गासह १४ लेनचा महामार्गभारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण मार्फत हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवला जात आहे. सिंगल पिलर तंत्रज्ञानाचा वापर करून उन्नत ८ पदरी मार्ग उभारण्यात येणार आहे. त्यासोबतच सध्याचा ४ पदरी रस्ता ६ पदरी करण्यात येणार आहे. परिणामी, हा संपूर्ण मार्ग तब्बल १४ पदरी होणार असून वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे.स्थानिक व जड वाहतुकीसाठी स्वतंत्र मार्गया प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे स्थानिक वाहतूक आणि अवजड वाहनांसाठी स्वतंत्र लेनची व्यवस्था केली जाणार आहे. यामुळे अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, तसेच प्रवास अधिक सुरक्षित आणि सुरळीत होईल.औद्योगिक क्षेत्रांना मोठा फायदाभोसरी, चाकण, मोशी आणि खेड या प्रमुख औद्योगिक भागांना या महामार्गामुळे वेगवान कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. विशेषतः चाकण एमआयडीसीमध्ये ये-जा करणाऱ्या हजारो कामगार आणि उद्योजकांना याचा मोठा दिलासा मिळणार आहे.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प राबवला जात असून, पिंपरी-चिंचवड आणि आसपासच्या भागाच्या विकासाला यामुळे चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. या मेगा प्रकल्पामुळे पुणे-नाशिक प्रवासाचा वेळ कमी होणार असून, वाहतुकीचा ताण कमी करत आर्थिक आणि औद्योगिक वाढीसही गती मिळणार आहे.

फीड फीडबर्नर 30 Mar 2026 5:10 pm

Famous Actor Death : मनोरंजन विश्व हादरले..! प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन; शूटिंगदरम्यान घडली मोठी दुर्घटना

Famous Actor Death : बंगाली अभिनेता राहुल अरुणोदय बॅनर्जी यांचे दिघा येथे शूटिंगदरम्यान निधन झाले आहे.

दैनिक प्रभात 30 Mar 2026 5:06 pm

Rohit Sharma Record : हिटमॅनची IPL 2026 मध्ये दमदार सुरुवात! किंग कोहलीला ‘या’बाबतीत टाकलं मागे

Rohit Sharma Record : रोहित शर्माने एका ऐतिहासिक विक्रमाला गवसणी घालत विराट कोहलीला मागे टाकले आहे.

दैनिक प्रभात 30 Mar 2026 5:05 pm

Thalapathy Vijay : विजय यांचा पेराम्बूरमधून शंखनाद ! अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल

निवडणुकीत हे लोक तुम्हाला पैसे वाटतील, ते पैसे नक्की घ्या कारण तो तुमचाच पैसा आहे.

दैनिक प्रभात 30 Mar 2026 4:49 pm

Ashok Kharat Case : भोंदूबाबाच्या ‘काळ्या’साम्राज्यात बड्या मंत्र्यांचा हात? माजी मंत्र्याच्या पत्राने नाशिकपासून दिल्लीपर्यंत खळबळ!

नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात (Ashok Kharat Case) सातत्याने नवीन माहिती आणि खुलासे समोर येत असतानाच, आता या प्रकरणात नवी खळबळ उडाली आहे.

दैनिक प्रभात 30 Mar 2026 4:49 pm

Stock Market Today: शेअर बाजारात हाहाकार! सेन्सेक्स 1636 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 10 लाख कोटी बुडाले

Stock Market Today: एकूणच आज बाजाराने गुंतवणूकदारांना मोठा धक्का दिला. जागतिक अनिश्चितता, कच्च्या तेलाचे वाढते दर आणि रुपयाची घसरण यामुळे बाजारावरील दबाव निकट भविष्यातही कायम राहण्याची शक्यता आहे.

दैनिक प्रभात 30 Mar 2026 4:29 pm

RR vs CSK : गुवाहाटीत आज ‘महायुद्ध’! रियान विरुद्ध ऋतुराज; आकडेवारी पाहून चेन्नईचे चाहते टेन्शनमध्ये, राजस्थानचं पारडं जड?

RR vs CSK : या दोन संघांमधील ऐतिहासिक 'हेड-टू-हेड' आकडेवारी जरी अटीतटीची वाटत असली, तरी अलीकडच्या काळातील रेकॉर्ड चेन्नईची झोप उडवणारा आहे.

दैनिक प्रभात 30 Mar 2026 4:28 pm

Congress MP Accident : अपघात की कट? काँग्रेसच्या खासदाराचा ‘त्या’एकाच मार्गावर तिसऱ्यांदा अपघात

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या वाहनाचा आज सकाळी नागपूरजवळ भीषण अपघात (Congress MP Accident) झाला.

दैनिक प्रभात 30 Mar 2026 4:25 pm

अखेर प्रतीक्षा संपली..! कृषिमंत्र्यांनी सांगितली कर्जमाफीची तारीख

Farm Loan Waiver : महाराष्ट्र सरकारच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेअंतर्गत २४.७३ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे.

दैनिक प्रभात 30 Mar 2026 4:18 pm

Priyanka Gandhi : अडकलेल्या भारतीयांसाठी केंद्राची योजना काय? प्रियांका गांधींचा थेट सवाल 

अशा वेळी राजकारण करण्यापेक्षा सरकारने लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी काय पावले उचलली आहेत, हे स्पष्ट करावे.

दैनिक प्रभात 30 Mar 2026 4:18 pm

हिंदू सणांवर टीका करायची राजकारणात फॅशन

सिलिंडर वादावर मंगलप्रभात लोढांचे विरोधकांना प्रत्युत्तरमुंबई : मलबार हिलमधील १६ जैन मंदिरांना उत्सवासाठी प्रत्येकी पाच गॅस सिलिंडर उपलब्ध करून देण्याची विनंती करणारे पत्र मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी राज्य सरकारला लिहिल्यानंतर, विरोधकांनी त्यावर आक्षेप घेत टीकासत्र सुरू केले. मंत्री लोढा यांनी या टीकेला प्रत्युत्तर दिले असून, हिंदू सणांच्या वेळी आणि धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनावर टीका करणे ही सध्या राजकारणात एक फॅशन झाली आहे, अशा शब्दांत संताप व्यक्त केला आहे. माझ्यावर होणारी टीका हा 'नॅरेटिव्ह'चा भाग आहे. परंतु, लोकप्रतिनिधी म्हणून भाविकांची सोय करणे हे माझे कर्तव्यच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.आपल्या भूमिकेचे समर्थन करताना लोढा म्हणाले की, माझ्या मतदारसंघात रामनवमी, साई भंडारा किंवा जैन धर्माचे कार्यक्रम हे विशेष धार्मिक उत्सव असतात. या काळात गॅसचा पुरेसा साठा नसल्यास विशेष प्रयत्न करणे गरजेचे असते. माझ्याकडे साई भंडाऱ्याचे आयोजक आणि जैन धर्मीय लोक मदतीसाठी आले होते. अशा वेळी त्यांना सिलिंडर मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे चुकीचे आहे का? आगामी काळात २ एप्रिलला हनुमान जयंती आणि १४ एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. या कार्यक्रमांसाठीही विशेष प्रयत्न करावेच लागतील, कारण ती आमदार म्हणून माझी जबाबदारी आहे, असेही त्यांनी सांगितले.राज्यात गॅसचा तुटवडा नाही आणि सरकार उत्तम काम करत आहे. केवळ मोठ्या धार्मिक कार्यक्रमांच्या वेळी तात्कालिक गरज पूर्ण करण्यासाठी प्रशासकीय स्तरावर प्रयत्न करावे लागतात. अशा विषयांवरून विनाकारण तेढ निर्माण करणे थांबवावे, असा सल्लाही त्यांनी विरोधकांना दिला. कोणाला वाद निर्माण करायचा असेल तर त्यांनी खुशाल करावा, पण मी माझ्या जबाबदारीपासून पळ काढणार नाही, असेही लोढा म्हणाले.

फीड फीडबर्नर 30 Mar 2026 4:10 pm

मुंबईच्या डब्बेवाल्यांची पाच दिवसांची सुट्टी, मुंबईकरांना करावी लागणार डब्याची सोय

मुंबई : मुंबई लाईफलाईन म्हटली की दोन गोष्टी नजरेसमोर येतात एक म्हणजे मुंबईची लोकल ट्रेन आणि दुसरी म्हणजे मुंबईचे डब्बेवाले. १३० वर्षांपासून संपूर्ण मुंबईकरांना सकाळी, दुपारी वेळेत डब्बा पोहोचवण्याचं काम हे मुंबईचे डब्बेवाले गेली अनेक वर्ष करत आले आहेत.मुंबईचे डब्बेवाले जाणार सुट्टीवरपरंतु मुंबईचे डब्बेवाले आता सुट्टीवर जाणार अशी माहिती समोर आली आहे, हिंदू कालगणनेनुसार पहिल्या चैत्र महिन्यात अनेक सण उत्सव असतात, अनेक जण आपल्या गावी आपल्या देवाच्या जत्रेसाठी जात असतात. त्यामुळेच मुंबईचे डब्बेवालेही आजपासून म्हणजे ३० मार्चपासून ४ दिवस सुट्टीवर जाणार आहेत. म्हणजे डब्बेवाले ३० मार्च २०२६ ते ४ एप्रिल २०२६ पर्यंत सेवा देऊ शकणार नाही.ग्रामदेवतेच्या उत्सवासाठी सुट्टीदरवर्षी चैत्र महिन्यात डबेवाले आपल्या मूळ गावी होणाऱ्या ग्रामदेवतेच्या वार्षिक उत्सवांना आणि जाताना उपस्थित राहण्यासाठी सहा दिवसांची सुट्टी घेतात. ही त्यांची पारंपरिक वार्षिक सुट्टी असल्याचे नमूद करत, डबेवाले असोसिएशनने सर्व ग्राहक आणि मुंबईकरांना या रजेच्या काळात डबेवाल्यांचे मानधन न कापण्याचे आवाहन केले आहे.५००० डब्बेवाल्यांची मुंबईकरांना सेवामुंबईत सुमारे ५,००० डबेवाले हे सध्या हे कार्यरत आहेत. डब्बेवाल्यांनी घेतलेल्या या सहा दिवसाच्या सुट्टीमुळे मुंबईकरांना दुपारच्या जेवणाचे थोडे हाल सोसावे लागणार तर आहेच. हा परिणाम जवळपास मुंबईतील सुमारे ८०,००० ते २ लाख नोकरदार वर्गावर होणार आहे. तोपर्यंत लोकांना स्वतःला डब्बे आणावे लागणार आहेत.

फीड फीडबर्नर 30 Mar 2026 4:10 pm

Afghanistan Floods : अफगाणिस्तानमध्ये महापूर, भूस्खलन आणि वादळामुळे १७ जणांचा मृत्यू

अफगाणिस्तानच्या काही भागांत महापूर, भूस्खलन आणि वादळी वाऱ्यांसह आलेल्या वादळामुळे गेल्या २४ तासांत १७ जणांचा मृत्यू झाला असून २६ जण जखमी झाले आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी रविवारी (२९ मार्च) दिली. या हंगामात देशात घडलेल्या तीव्र हवामानाशी संबंधित ही ताजी जीवितहानी आहे.राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रवक्ते युसुफ हम्माद यांनी एका निवेदनात सांगितले की, प्रभावित भागांचा सर्वेक्षण करणाऱ्या पथकांचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. देशातील ३४ प्रांतांपैकी १३ प्रांत मुसळधार पाऊस आणि पुरामुळे प्रभावित झाले असून त्यामध्ये प्रामुख्याने पश्चिम, मध्य आणि उत्तर-पश्चिम भागांचा समावेश आहे. स्थानिक अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, भीषण हवामानामुळे १४७ घरे पूर्णतः किंवा अंशतः उद्ध्वस्त झाली, सुमारे ८० किलोमीटर रस्ते वाहून गेले तसेच शेती जमीन आणि सिंचन कालवेही मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त झाले आहेत.यावर्षाच्या सुरुवातीला झालेल्या अतिवृष्टीसह जोरदार हिमवृष्टी आणि अचानक आलेल्या पुरांमुळे देशभरात डझनभर लोकांचा मृत्यू झाला होता. अफगाणिस्तान हा तीव्र हवामान घटनांसाठी अत्यंत संवेदनशील देश मानला जातो. हिमवृष्टी आणि मुसळधार पावसामुळे अनेकदा अचानक पूर (फ्लॅश फ्लड) निर्माण होतात, ज्यामुळे एकाच वेळी डझनभर किंवा शेकडो लोकांचा जीव जातो.याआधी २०२४ मध्ये वसंत ऋतूत आलेल्या अचानक पुरांमध्ये ३०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. अनेक दशकांपासून सुरू असलेला संघर्ष, कमकुवत पायाभूत सुविधा, अडचणीत असलेली अर्थव्यवस्था, जंगलतोड आणि हवामान बदलाचे वाढते परिणाम यामुळे अशा आपत्तींचा प्रभाव अधिक गंभीर होत आहे. विशेषतः दुर्गम भागांमध्ये, जिथे बहुतांश घरे मातीची बांधलेली असतात, तिथे अचानक पूर किंवा जोरदार हिमवृष्टीपासून संरक्षणाची साधने अत्यंत मर्यादित आहेत.

फीड फीडबर्नर 30 Mar 2026 4:10 pm

जामखेडमध्ये साकारणार भव्य ‘शेतकरी भवन’; ३२ लाखांचा पहिला हप्ता मंजूर, सभापती राम शिंदेंच्या पाठपुराव्याला मोठे यश

Jamkhed news : जामखेड बाजार समितीमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन उभारण्यासाठी शासनाने ३१.९६ लाख रुपयांचा निधी वितरित केला आहे.

दैनिक प्रभात 30 Mar 2026 3:30 pm

नवी मुंबईत ‘इस्रो शास्त्रज्ञ’ बनून फसवणूक; महिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून लाखोंची लूट

नवी मुंबई : स्वतःला इस्रो शास्त्रज्ञ असल्याचे भासवून उच्चभ्रू महिलांची फसवणूक करणाऱ्या एका भामट्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. प्रेमसंबंधांच्या आमिषाने महिलांना जाळ्यात ओढत आर्थिक आणि लैंगिक शोषण केल्याचा आरोप या प्रकरणात करण्यात आला आहे.बनावट ओळख, मोठ्या पदांचा दावामिळालेल्या माहितीनुसार, आदर्श म्हात्रे नावाचा आरोपी मूळचा नवी मुंबईतील असून तो केवळ दहावीपर्यंत शिक्षित आहे. मात्र, लग्न जुळवणाऱ्या अ‍ॅप्स आणि संकेतस्थळांवर बनावट प्रोफाइल तयार करून तो स्वतःला कधी इस्रोचा शास्त्रज्ञ, तर कधी सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ अधिकारी असल्याचे भासवत होता. या खोट्या ओळखीच्या जोरावर तो महिलांशी संपर्क साधत विश्वास संपादन करत होता.प्रेमाचे आमिष, पैशांची उकळपट्टीआरोपी उच्चशिक्षित आणि सुस्थितीत असलेल्या महिलांना लक्ष्य करत असे. डॉक्टर, इंजिनिअर, बँक अधिकारी अशा महिलांना लग्नाचे आश्वासन देत तो जवळीक वाढवत होता. त्यानंतर भावनिक गुंतवणूक वाढल्यावर विविध कारणे सांगून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळत असल्याचे तपासात समोर आले आहे.अनेक शहरांतील महिलांना जाळ्यात ओढलेही फसवणूक केवळ नवी मुंबईपुरती मर्यादित नसून ठाणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, नागपूर आणि यवतमाळ या भागांतील महिलांनाही त्याने आपल्या जाळ्यात ओढल्याचे समोर आले आहे. एका महिलेकडून घेतलेले पैसे दुसऱ्या महिलेसमोर श्रीमंती दाखवण्यासाठी वापरण्याची पद्धत तो वापरात होता.पोलीस तपासात उघडकीस आला प्रकारसंशयाच्या आधारे पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याचा हा संपूर्ण कारनामा समोर आला. अनेक महिलांनी बदनामीच्या भीतीने तक्रार देण्यास कचरल्याचेही समोर आले आहे.पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, ऑनलाइन ओळखी करताना व्यक्तीची पूर्ण खातरजमा करावी. कोणालाही बँक किंवा वैयक्तिक माहिती देऊ नये. फसवणूक झाल्यास न घाबरता तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा.

फीड फीडबर्नर 30 Mar 2026 3:30 pm

MHADA Lottery 2026 : म्हाडा मुंबई लॉटरी २०२६ जाहीर; एकूण २६४० घरांची सोडत निघणार

- २९ एप्रिल २०२६ पर्यंत अंतिम अर्ज करता येणारमुंबई : मुंबईकरांसाठी घराचे स्वप्न साकार करण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. म्हाडा (MHADA) मुंबई मंडळाने २०२६ सालातील घरांच्या लॉटरीची घोषणा केली असून, तब्बल २६४० सदनिकांसाठी सोडत काढण्यात येणार आहे.कन्नमवार नगर-विक्रोळी, पत्राचाळ-सिद्धार्थ नगर (गोरेगाव), गोराई व मागाठाणे (बोरीवली), सुभाष नगर (चेंबूर), गांधीनगर (वांद्रे), पंतनगर (घाटकोपर), गिरगाव, वडाळा, दादर, माझगाव, पवई आदी भागांतील प्रकल्पांचा या सोडतीत समावेश आहे.ऑनलाईन अर्ज प्रक्रिया आजपासून म्हणजेच सोमवार ३० मार्च २०२६ दुपारी ३ वाजल्यापासून सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम मुदत २९ एप्रिल २०२६ रात्री ११:५९ पर्यंत आहे. तर अनामत रक्कम भरण्याची अंतिम तारीख ३० एप्रिल २०२६ आहे. अंतिम सोडत १५ मे २०२६ रोजी सकाळी ११ वाजता म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.या सोडतीत विविध उत्पन्न गटांसाठी घरे उपलब्ध आहेत. अत्यल्प उत्पन्न गटासाठी १४५, अल्प उत्पन्न गटासाठी ८५८, मध्यम उत्पन्न गटासाठी १४०८ आणि उच्च उत्पन्न गटासाठी २२९ सदनिका विक्रीसाठी आहेत.अर्जदारांसाठी मोबाइल अॅप तसेच अधिकृत वेबसाइटवर अर्ज नोंदणी व पेमेंटची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अर्ज करताना आधार कार्ड, पॅन कार्ड, अधिवास प्रमाणपत्र आणि उत्पन्नाचा दाखला आवश्यक असणार आहे.दरम्यान, अर्जदारांनी कोणत्याही एजंट किंवा मध्यस्थांपासून सावध राहावे, असे आवाहन म्हाडा (MHADA) कडून करण्यात आले आहे.मुंबईतील विविध भागांमध्ये घर मिळवण्याची ही मोठी संधी असून, इच्छुकांनी वेळेत अर्ज करण्याचे आवाहन म्हाडाकडून करण्यात आले आहे.सदनिका सोडत प्रक्रियेसाठी अर्ज कुठे भरता येणार?म्हाडा मुंबई मंडळाच्या सोडतीत सहभागी होण्याकरिता IHLMS 2.0 ही संगणकीय आज्ञावली अर्जदार अँड्रॉइड (android) अथवा आयओएस (ios) या दोन्ही ऑपरेटिंग सिस्टिमवर अनुक्रमे गूगल ड्राइव्हच्या प्ले स्टोअर आणि ॲप स्टोअरमध्ये Mhada Housing Lottery System या नावे मोबाइल अॅप उपलब्ध करुन देण्यात आले आहे. तसेच अर्जदारांच्या सोयीकरिता https://housing.mhada.gov.in या म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर देखील अर्ज नोंदणी, अर्ज भरणा व पेमेंट प्रक्रिया उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोडत प्रक्रियेत सहभाग घेण्यापूर्वी अर्जदारांनी या मार्गदर्शनपर माहिती पुस्तिकेचे अवलोकन करावे, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.उत्पन्न गटनिहाय सदनिका :या सोडतीमध्ये समाविष्ट होण्याकरिता अत्यल्प उत्पन्न गटासाठी रुपये सहा लाखापर्यंत वार्षिक कौटुंबिक उत्पन्न मर्यादा आहे. अल्प उत्पन्न गटासाठी रुपये नऊ लाखापर्यंत वार्षिक कौटुंबिक उत्पन्न मर्यादा आहे. मध्यम उत्पन्न गटासाठी रुपये बारा लाखापर्यंत वार्षिक कौटुंबिक उत्पन्न मर्यादा आहे. उच्च उत्पन्न गटासाठी रुपये बारा लाखांहून अधिक वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्यांचा समावेश असणार असून या गटासाठी कमाल मर्यादा ठेवण्यात आलेली नाही. अत्यल्प उत्पन्न गटातील व्यक्ती अत्यल्प व अल्प उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात. अल्प उत्पन्न गटातील व्यक्ती अल्प व मध्यम उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात. मध्यम उत्पन्न गटातील व्यक्ती मध्यम व उच्च उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात. उच्च उत्पन्न गटातील व्यक्ती केवळ उच्च उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात.

फीड फीडबर्नर 30 Mar 2026 3:30 pm

Eknath Khadse : मोठी बातमी: खडसे पिता-कन्येवर फसवणुकीचा गुन्हा दाखल; साखर कारखान्याच्या नावाखाली जमीन हडपल्याचा आरोप!

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्या शारदा खडसे यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. जळगाव जिल्ह्यातील बोदवड पोलीस ठाण्यात या दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. साखर कारखाना उभारण्याचे प्रलोभन दाखवून शेतकऱ्यांच्या 'महार वतन' जमिनी घेतल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. शेतकऱ्यांची फसवणूक करून त्यांच्या हक्काच्या जमिनी हडप केल्याचा हा गंभीर आरोप समोर आल्याने जिल्ह्यासह राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलीस आता पुढील कायदेशीर तपास करत असून, या घटनेमुळे खडसे पिता-कन्येच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.नेमकं प्रकरण काय ?नोकरी आणि मोबदल्याचे आमिष दाखवून फसवणूकएकनाथ खडसे यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याचे मूळ २००२ सालच्या एका व्यवहारात असल्याचे समोर आले आहे. भुसावळ तालुक्यातील मानपूर शिवारातील गट क्रमांक १२२ मधील महार वतनाच्या जमिनीशी संबंधित हे जुने प्रकरण आता पुन्हा उजेडात आले आहे. चमेलाबाई तुकाराम तायडे आणि त्यांच्या वारसांच्या मालकीची ही जमीन असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. 'तापी-पूर्णा सहकारी साखर कारखाना' उभारण्याचे आमिष दाखवून ही जमीन खरेदी करण्यात आली. जमिनीच्या बदल्यात कुटुंबातील सदस्यांना कारखान्यात कायमस्वरूपी नोकरी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. योग्य मोबदला आणि नोकरी, यांपैकी कशाचीही पूर्तता न करता केवळ कागदोपत्री व्यवहार करून जमीन ताब्यात घेतल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे.कारखान्याच्या नावावर घेतलेली जमीन चक्क खडसेंच्या कन्येच्या नावावरतक्रारदार चमेलाबाई तायडे यांनी आरोप केला आहे की, त्यांच्या अशिक्षितपणाचा गैरफायदा घेऊन हा जमिनीचा व्यवहार पूर्ण करण्यात आला. केवळ ५१ हजार रुपये आगाऊ देऊन आणि सर्व वारसदारांचे अंगठे घेऊन बोदवड दुय्यम निबंधक कार्यालयात ही खरेदी प्रक्रिया पार पडली होती. ज्या जमिनीवर 'तापी-पूर्णा सहकारी साखर कारखाना' उभा राहणार होता, तिथे अनेक वर्षे उलटूनही काहीच हालचाल झाली नाही. जेव्हा २०२५ मध्ये तायडे कुटुंबाने या जमिनीच्या कागदपत्रांची पडताळणी केली, तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला. ही जमीन कारखान्याच्या नावावर नसून, ती थेट शारदा एकनाथ खडसे यांच्या वैयक्तिक नावावर असल्याचे कागदपत्रांतून स्पष्ट झाले आहे.खरेदीखतात फेरफार करून नावात खाडाखोड...११ फेब्रुवारी २०२६ रोजी जेव्हा मूळ खरेदीखताची अधिकृत प्रत तपासण्यात आली, तेव्हा त्यात धक्कादायक फेरफार झाल्याचे उघड झाले आहे. या पुराव्यामुळे या संपूर्ण प्रकरणातील संशयाची सुई आता अधिक गडद झाली आहे. मूळ कागदपत्रांमध्ये जिथे 'तापी-पूर्णा शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज' असे नाव नोंदवण्यात आले होते, तिथे खाडाखोड करून 'शारदा एकनाथ खडसे' असे नाव घुसडण्यात आल्याचे प्राथमिक तपासणीत समोर आले आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर पीडित तायडे कुटुंबाने रिपाइं (आठवले गट) जिल्हाध्यक्ष अनिल अडकमोल यांच्या नेतृत्वाखाली थेट जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन दाद मागितली आहे.एकनाथ खडसेंविरोधात गुन्हा दाखलबहुचर्चित जमीन व्यवहार प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांनी कठोर पाऊल उचलले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या चौकशीच्या आदेशानंतर, चमेलाबाई तायडे यांच्या तक्रारीवरून बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्या शारदा खडसे यांच्याभोवती कायदेशीर कचाटा अधिक घट्ट झाला आहे. या प्रकरणात केवळ खडसे पिता-कन्याच नव्हे, तर जमीन व्यवहारात मध्यस्थी करणारे सुधाकर पाटील आणि बोदवड दुय्यम निबंधक कार्यालयातील तत्कालीन अधिकारी व कर्मचाऱ्यांचाही आरोपींमध्ये समावेश करण्यात आला आहे. शासकीय कागदपत्रात फेरफार करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेचा वापर झाल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.

फीड फीडबर्नर 30 Mar 2026 3:10 pm

Middle East War : इराण-इस्रायल युद्धात भारतीय कर्मचाऱ्याचा मृत्यू, १० सैनिकही जखमी!

कुवेत सिटी : मध्य-पूर्वेतील इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष आता अधिक व्यापक आणि हिंसक बनत चालला आहे. या युद्धाची झळ केवळ स्थानिक देशांनाच नाही, तर तिथे रोजगारासाठी गेलेल्या भारतीयांनाही सोसावी लागत आहे. सोमवारी इराणने कुवेतच्या ऊर्जा क्षेत्राला लक्ष्य करून केलेल्या भीषण हल्ल्यात एका भारतीय कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. कुवेतच्या तेल आणि ऊर्जा प्रकल्पांवर झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, यामुळे कुवेत आणि इराणमधील राजनैतिक तणाव शिगेला पोहोचला आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी आणि कुटुंबाला आधार देण्यासाठी परदेशात गेलेल्या भारतीय कामगारांसाठी हे युद्ध आता 'मृत्यूचा सापळा' ठरत असल्याचे चित्र दिसत आहे. या घटनेमुळे कुवेतमधील भारतीय समुदायात भीतीचे वातावरण पसरलेलं आहे.कुवेतच्या पाणी आणि वीज प्रकल्पावर इराणचा क्षेपणास्त्र हल्लाइराण आणि कुवेत यांच्यातील संघर्ष आता टोकाला पोहोचला असून, इराणने कुवेतच्या अत्यंत संवेदनशील नागरी सुविधांना लक्ष्य केले आहे. कुवेतच्या विद्युत मंत्रालयाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, इराणकडून डागलेले एक क्षेपणास्त्र थेट एका पाणी शुद्धीकरण आणि वीज प्रकल्पावर येऊन आदळले. या भीषण हल्ल्यात प्रकल्पाच्या सेवा इमारतीत कार्यरत असलेल्या एका भारतीय नागरिकाचा जागीच मृत्यू झाला आहे. या हल्ल्यामुळे प्रकल्पाच्या इमारतीचे प्रचंड नुकसान झाले असून, संपूर्ण कुवेत शहराचा पाणी आणि वीज पुरवठा खंडित होण्याची गंभीर टांगती तलवार निर्माण झाली आहे. मंत्रालयाच्या प्रवक्त्या फातिमा अब्बास जवाहेर हयात यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला असून, इराणने केलेले हे थेट आक्रमक कृत्य आहे, असे स्पष्ट केले आहे. ऐन युद्धाच्या छायेत एका निरपराध भारतीय कामगाराचा बळी गेल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंतेचे वातावरण पसरले आहे.https://prahaar.in/2026/03/30/eknath-khadse-sharda-khadse-fraud-case-registered-bodwad-police-station-jalgaon-land-scam/कुवेतमधील मृतदेह मायदेशी आणण्यासाठी दूतावासाची धावपळसध्या भारतीय अधिकारी कुवेती प्रशासनाच्या सतत संपर्कात असून, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह लवकरात लवकर भारतात पाठवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. तसेच, संबंधित कंपनी आणि सरकारकडून पीडित कुटुंबाला योग्य ती नुकसानभरपाई मिळावी यासाठीही दूतावास पाठपुरावा करत आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच अबू धाबी येथे झालेल्या अशाच एका हल्ल्यात एका भारतीयाचा बळी गेला होता. त्या जखमा ताज्या असतानाच पुन्हा एकदा मध्य-पूर्वेतील संघर्षात एका निष्पाप भारतीयाला जीव गमवावा लागल्याने परदेशातील भारतीय कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.इराणच्या कुरापतींना कुवेतचे सडेतोड उत्तर; क्षेपणास्त्र हल्ल्यात १० सैनिक जखमीइराणने केलेल्या ताज्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर कुवेतचा संयम सुटला असून, दोन्ही देशांमधील संबंध आता टोकाला पोहोचले आहेत. या भीषण हल्ल्यात केवळ नागरी मालमत्तेचेच नुकसान झाले नाही, तर कुवेती लष्कराचे १० जवानही गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेचा तीव्र निषेध करत कुवेतने इराणवर थेट हल्लाबोल केला आहे. कुवेतचे परराष्ट्र मंत्री शेख जर्राह जाबेर अल-सबाह यांनी इराणवर गंभीर आरोप करत म्हटले आहे की, इराण जाणीवपूर्वक संपूर्ण आखाती क्षेत्रात अस्थिरता आणि अराजकता पसरवत आहे. इराण आपला राजकीय प्रभाव वाढवण्यासाठी दहशतवादी मार्गांचा अवलंब करत आहे, अशी बोचरी टीकाही त्यांनी केली. या हल्ल्यामुळे आतापर्यंत तटस्थ राहू पाहणारा कुवेत देश आता उघडपणे इराणविरोधी गटात सामील होण्याची चिन्हे आहेत. इराणच्या या आक्रमक कृत्यामुळे मध्य-पूर्वेतील युद्धाचा वणवा अधिकच पेटण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

फीड फीडबर्नर 30 Mar 2026 3:10 pm

PSL 2026 : शाहीन आफ्रिदी आणि सिकंदर रझा यांच्यावर सुरक्षा नियम तोडल्याचा गंभीर आरोप

पाकिस्तान सुपर लीग (Pakistan Super League 2026) पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. यावेळी लाहोर कलंदर्स (Lahore Qalandars) संघातील कर्णधार शाहीन आफ्रिदी (Shaheen Shah Afridi) आणि अष्टपैलू खेळाडू सिकंदर रझा (Sikandar Raza) यांच्यावर गंभीर गैरवर्तनाचे आरोप करण्यात आले आहेत.अनधिकृत व्यक्तींना प्रवेश :पंजाब पोलिसांच्या माहितीनुसार, या दोन्ही खेळाडूंनी सुरक्षा नियमांचे उल्लंघन करत चार अनधिकृत व्यक्तींना खेळाडूंच्या हॉटेलच्या मजल्यावर प्रवेश दिला. इतकेच नव्हे, तर त्या व्यक्तींना कथितरित्या त्यांच्या खोल्यांमध्ये नेण्यात आले आणि ते जवळपास तीन तास तिथेच थांबले.प्रोटोकॉलचे उल्लंघन :या घटनेमुळे हॉटेलमधील खेळाडू आणि सपोर्ट स्टाफच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. लीगचे सीईओ सलमान नसीर यांना पाठवलेल्या पत्रात पोलिसांनी स्पष्ट केले की, संबंधित पाहुण्यांना प्रवेशासाठी परवानगी नव्हती. संघाच्या संपर्क अधिकाऱ्याची विनंतीही दोन वेळा नाकारण्यात आली होती. मात्र, सुरक्षा कर्मचाऱ्यांचा विरोध असूनही पाहुण्यांना आत नेण्यात आले. सुरक्षा यंत्रणांनी या प्रकाराला “प्रोटोकॉलचे स्पष्ट उल्लंघन” असे संबोधले असून, लीग आयोजकांनी या प्रकरणाची चौकशी करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.दरम्यान, सिकंदर रझा (Sikandar Raza) याने स्पष्टीकरण देताना सांगितले की, हॉटेलमध्ये आलेले पाहुणे त्यांचे कुटुंबीय आणि जवळचे मित्र होते. त्यांनी शाहीन आफ्रिदी यांना निर्दोष ठरवत संपूर्ण जबाबदारी स्वतःवर घेतली आहे.या वादाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आधीच कडक भूमिका घेतली आहे. पश्चिम आशियातील तणाव आणि ऊर्जा बचतीच्या कारणामुळे लीगमधील काही सामने प्रेक्षकांविना खेळवले जात आहेत. तसेच खेळाडूंच्या सुरक्षेसाठी हॉटेल आणि मैदान परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.आता या प्रकरणात पुढे काय कारवाई होणार, की हा वाद सामोपचाराने मिटणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

फीड फीडबर्नर 30 Mar 2026 3:10 pm

Bigg Boss Marathi 6 : टिकीट टू फिनालेसाठी 'या'सदस्यांमध्ये हाणामारी, बिग बॉसही संतापले

मुंबई : बिग बॉस मराठी ६ सिझन वादग्रस्त ठरल्यामुळे सर्वत्र या सिझनची जोरदार चर्चा रंगली. या बिग बॉस मराठीमधील भांडणं, टास्क, हेवेदावे आणि चढाओढ यामुळे बीग बॉस मराठी ६ सीझन चांगलाच गाजला पण त्याहीपेक्षा जास्त बाहेर आल्यानंतर बिग बॉस स्पर्धकांनी केलेल्या दाव्यावरून मोठी खळबळ उडाली होती.बिग बॉस मराठी ६ सीझनचे आता काही दिवसच बाकी राहिले असून बिग बॉस आता अंतिम टप्प्यात आलं आहे. आशातच फिनाले जवळ आलं असताना स्पर्धकांमध्येटिकिट टू फिनालेसाठी चुरस वाढली आहे. नुकताच पार पडलेल्या नॉमिनेशन टास्कमध्ये घरात गोंधळ झाल्याचं पाहायला मिळणार आहे. या टास्कमुळे बिग बॉसच्या घरातील २ स्पर्धकांमधला वाद इतका वाढतो की तो हाणामारीपर्यंत पोहचतो. या दोघांवर बिग बॉसही संतापले.बिग बॉसने घरातील सदस्यांना या आठवड्यात एक वेगळा टास्क दिला. त्यानुसार स्पर्धकांना एखाद्या सदस्याचा टीव्ही फोडायचा होता. ज्या सदस्याचा टीव्ही फुटेल त्या सदस्याचं फिनालेमध्ये जाण्याचं स्वप्न तुटणार आहे.हा टास्क करताना राकेशनं विशालला नॉमिनेट करत त्याचा टीव्ही फोडला. त्यावेळी राकेश म्हणाला, माझं नावं आहे विशाल. पर्सनल लाइफबद्दल बोलणं मला चुकीचं वाटलं राकेशच्या निर्णयानंतर विशाल चांगलाच संतापला. तो म्हणाला, तू माझ्या एजबद्दल बोलतोस ते पर्सनल नाहीये का? डिवोर्स का झाला? या वक्तव्यामुळे दोघांमधला वाद अधिकच वाढला. यानंतर राकेश बाहेर येत विशालसोबत जोरदार भांडण करतो. डिवोर्स का काढतोस ? असा सवाल करत तो विशालवर संतापतो. त्यावर विशालही मागे न हटता म्हणतो तू का काढतोस? या दोघांमधील वाद इतका वाढतो की ते एकमेकांच्या अंगावर धावून जातात. काही क्षणातच परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची चिन्हं दिसू लागतात. दोघांमधील वाढता वाद पाहून घरातील इतर सदस्य लगेच मध्ये पडतात आणि त्या दोघांना शांत करण्याचा प्रयत्न करतात. सर्वजण मिळून त्यांचं भांडण सोडवतात. यावेळी बिग बॉसच्या घरात गोंधळाचं वातावरण निर्माण झालेलं असतं.दरम्यान परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं पाहून बिग बॉस तात्काळ हस्तक्षेप करतात. ते कडक शब्दांत आदेश देतात. राकेश आणि विशाल, लांब व्हा. या आदेशानंतर दोघांनाही वेगळं करण्यात येतं बिग बॉसच्या घरात आता पुढे काय घडणार हे आजच्या भागात पाहायला मिळणार आहे.

फीड फीडबर्नर 30 Mar 2026 3:10 pm

Shabbir Ahmed Lone LeT Terrorist Arrest : लष्कर-ए-तोयबाचा मास्टरमाईंड जेरबंद, लाल किल्ला हादरवण्याचा मोठा कट उधळला

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीला हादरवून सोडण्याचा दहशतवाद्यांचा कट दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अत्यंत चातुर्याने उधळून लावला आहे. लष्कर-ए-तोयबा (LeT) या प्रतिबंधित संघटनेचा अत्यंत प्रभावशाली हँडलर शब्बीर अहमद लोन याला अटक करण्यात आली असून, यामुळे एक भीषण अनर्थ टळला आहे. शब्बीर अहमद हा साधा दहशतवादी नसून, तो बांगलादेशातून भारतातील दहशतवादी हालचालींचे नियंत्रण करत होता. या अटकेमुळे पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISI कशा प्रकारे भारतीय सीमांच्या बाहेरून कट रचत आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. लोनच्या अटकेमुळे लष्कर-ए-तोयबाच्या स्लीपर सेल्सना मोठा धक्का बसला असून, आगामी काळातील अनेक धोके टळले आहेत.https://prahaar.in/2026/03/30/parth-pawar-met-raj-thackeray/लाल किल्ला आणि मेट्रोवर हल्ल्याचा कट उधळलादिल्ली पोलिसांच्या तपासात एक धक्कादायक खुलासा झाला आहे. अटक करण्यात आलेला दहशतवादी शब्बीर अहमद लोन याच्या निशाण्यावर दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ला आणि अत्यंत गर्दीची मेट्रो स्थानके होती. राजधानीत मोठी जीवितहानी आणि दहशत निर्माण करण्याचा त्याचा क्रूर मनसुबा पोलिसांच्या सतर्कतेमुळे फसला आहे. काही दिवसांपूर्वी मेट्रो परिसरात दहशतवादी पोस्टर्स लावून खळबळ माजवणाऱ्या टोळीचा मुख्य सूत्रधार शब्बीरच असल्याचे स्पष्ट झाले आहे. शब्बीर हा भारतात नसून बांगलादेशात बसून 'एनक्रिप्टेड ॲप्स'च्या माध्यमातून आपल्या हस्तकांना सूचना देत असे, जेणेकरून सुरक्षा यंत्रणांना त्याचा सुगावा लागू नये. गर्दीच्या ठिकाणांची रेकी (टेहळणी) करून तिथे भीषण साखळी स्फोट घडवून आणण्याची त्याची तयारी अंतिम टप्प्यात होती.Shabir Ahmed Lone, LeT terrorist, handler of the recently busted LeT module in Metro Poster Case, has been arrested by a team of Special Cell/NDR: Delhi Police— ANI (@ANI) March 30, 2026बनावट कागदपत्रे आणि घुसखोरांचा वापरसामोर आलेल्या माहितीनुसार शब्बीर अहमद लोणचे कार्यक्षेत्र हे बांग्लादेशातचं होते. त्या ठिकाणाहून तो बेकायदेशीरपणाने भारतामध्ये घुसून आलेल्या बांगलादेशी नागरिकांना शोधत असे. या सर्व नागरिकांचं तो ब्रेनवॉशिंग करून त्यांना जिहादच्या नावाखाली भारतामध्ये दहशदवादी कृत्य करण्यासाठी त्यांना केले जात होते. धक्कादायक खुलासा म्हणजे, या सर्व घुसखोरांना भारतामध्ये राहण्यासाठी बनावट आधारकार्ड, आणि इतर सरकारी कागदपत्रे मिळवून देण्यामध्ये शब्बीरचा मोठा कट होता. फेब्रुवारी २०२६ मध्ये पोलिसांनी पकडलेल्या ८ जणांपैकी ७ जण हे बंगदेशीचं नागरिक होते, ज्यांना शब्बीरनेच भारतात पूर्ण पाने सेट केलं होतं.मुझफ्फराबादचे ट्रेनिंग आणि हाफिज सईदचा हस्तकदिल्ली पोलिसांच्या ताब्यात असलेला लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी शब्बीर अहमद लोन हा केवळ एक मोहरा नसून, तो या संघटनेचा जुना आणि प्रगत प्रशिक्षण घेतलेला अत्यंत धोकादायक सदस्य असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्याच्या अटकेमुळे लष्करच्या जुन्या नेटवर्कचा पर्दाफाश झाला आहे. शब्बीरने पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील मुझफ्फराबाद येथील लष्कर-ए-तोयबाच्या तळावर अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचे आणि लष्करी डावपेचांचे प्रगत प्रशिक्षण घेतले होते. तो केवळ स्थानिक हस्तक नसून, जागतिक दहशतवादी हाफिज सईद आणि झकी-उर-रहमान लखवी यांच्या थेट मार्गदर्शनाखाली काम करत होता. तब्बल १९ वर्षांपूर्वी, म्हणजेच २००७ मध्येही दिल्ली पोलिसांनी त्याला एके-४७ आणि ग्रेनेड्ससह अटक केली होती. मात्र, जामिनाचा फायदा घेऊन तो बांगलादेशला पळून गेला. सीमेपलीकडे राहून त्याने पुन्हा आपले नेटवर्क सक्रिय केले आणि दिल्लीला पुन्हा एकदा लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला.स्पेशल सेलची गुप्त मोहीम यशस्वीदिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अत्यंत गोपनीयता पाळून राबवलेल्या एका धाडसी मोहिमेमुळे लष्कर-ए-तोयबाचे भारतातील एक मोठे जाळे मुळासकट उपटून टाकण्यात यश आले आहे. अनेक महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर आणि तांत्रिक पाळत ठेवल्यानंतर, दहशतवादी शब्बीर अहमद लोन याला बेड्या ठोकून पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने मोठी कामगिरी केली आहे. हे ऑपरेशन केवळ एका दिवसाचे नसून, स्पेशल सेलच्या पथकाने अनेक महिने शब्बीरच्या हालचालींवर आणि डिजिटल पावलांवर बारीक लक्ष ठेवले होते. या अटकेमुळे लष्कर-ए-तोयबाच्या भारतात तयार केलेला एक सक्रिय 'स्लीपर सेल' मॉड्यूल पूर्णपणे कोलमडले आहे. या नेटवर्कचा पर्दाफाश झाल्यामुळे भविष्यात होणारे संभाव्य भीषण दहशतवादी हल्ले रोखण्यात यंत्रणांना यश आले आहे.

फीड फीडबर्नर 30 Mar 2026 2:10 pm

Iran-US-Israel War : आखाती देशांमधील युद्धाचा गणेश मूर्तिकारांना फटका

- परदेशी मूर्ती पाठवण्यात येत आहेत अडचणीमुंबई : गणेशमूर्तींचं माहेरघर म्हणून प्रसिद्ध असलेल्या पेण येथील मूर्तिकारांना यंदा गंभीर अडचणींचा सामना करावा लागत आहे. आखाती देशांमधील तणावपूर्ण परिस्थितीचा (Iran-US-Israel War) थेट परिणाम गणेश मूर्तींच्या निर्यातीवर झाला असून जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट म्हणजेच (JNPT) बंदरात विविध मालाचे कंटेनर अडकून पडले आहेत.या परिस्थितीमुळे गणेशमूर्ती निर्यातीसाठी आवश्यक असलेल्या कंटेनरची उपलब्धता कमी झाली आहे. परिणामी, दुबई, लंडन, वेस्ट इंडीज, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंडोनेशिया, थायलंड आणि मॉरिशस यांसारख्या देशांमध्ये पाठवण्यात येणाऱ्या गणेशमूर्ती (export Ganesha idol) वेळेत पोहोचण्याची शक्यता धोक्यात आली आहे.याचा थेट फटका स्थानिक मूर्तिकारांना बसत असून त्यांच्या उत्पन्नावर परिणाम होत आहे. वाढत्या अडचणींमुळे पेणमधील या पारंपरिक व्यवसायासमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे.दरम्यान अमेरीका इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धाला एका महिन्यापेक्षा जास्त काळ उलटला असून हे युद्ध दिवसेंदिवस अधिक तीव्र होताना दिसत आहे. इराणने कुवेत सिटी जवळच्या वीज तसेच पाणी शुद्धीकरण प्रकल्पावर हवाई हल्ला केला. या हल्ल्यात एका भारतीय कामगाराचा मृत्यू झाला. कुवेतच्या वीज आणि पाणी शुद्धीकरण प्रकल्पाच्या सरकारी इमारतीचे हल्ल्यात मोठे नुकसान झाले.

फीड फीडबर्नर 30 Mar 2026 2:10 pm

Satara Chemical Factory Blast : तासवडे MIDCतील केमिकल कंपनीत भीषण स्फोट; सर्व काचा फुटल्या, १० किमीचा परिसर हादरला

कराड : सातारा जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि थरकाप उडवणारी बातमी समोर आली आहे. कराडजवळील तासवडे एमआयडीसी परिसरातील एका केमिकल कंपनीत आज भीषण स्फोट झाला. हा स्फोट इतका जबरदस्त होता की, त्याचे हादरे तब्बल १० किलोमीटरच्या परिघात जाणवले आहेत. या आवाजामुळे परिसरातील रहिवासी भयभीत झाले असून अनेक इमारतींच्या खिडक्यांच्या काचा फुटल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की, परिसरात जणू भूकंपासारखी स्थिती निर्माण झाली होती. स्फोटानंतर कंपनीला भीषण आग लागली असून धुराचे लोट लांबूनही दिसत आहेत. हा स्फोट नेमका कोणत्या तांत्रिक बिघाडामुळे किंवा रसायनांच्या प्रक्रियेमुळे झाला, याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेमुळे संपूर्ण सातारा जिल्ह्यात भीतीचे सावट पसरले आहे.आगीचे रौद्ररूप आणि धुराचे लोटतासवडे एमआयडीसीतील केमिकल कंपनीत झालेल्या भीषण स्फोटानंतर आगीने रौद्ररूप धारण केले असून, परिसरात भीतीचे मोठे सावट पसरले आहे. स्फोटाचा आवाज इतका प्रचंड होता की, सुरुवातीला आपल्याला भूकंपाचा धक्का बसला असावा, या भीतीने स्थानिक नागरिक घराबाहेर धावले. मात्र, काही वेळातच आकाशात झेपावणारे काळ्या धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाला पाहून परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आले. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन आणि अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. कंपनीत ज्वलनशील रसायनांचा मोठा साठा असल्याने आग झपाट्याने पसरली असून, ती विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.सुपा एमआयडीसीतील 'व्यंकटेश पॉली' कंपनीला भीषण आगअहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात असलेल्या सुपा औद्योगिक वसाहतीतील (सुपा घाणेगाव) एका प्लास्टिक कंपनीला आज भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. 'व्यंकटेश पॉली' नावाच्या या प्लास्टिक निर्मिती करणाऱ्या कंपनीत अचानक आग भडकल्याने परिसरात खळबळ उडाली. प्लास्टिकचा मोठा साठा असल्याने आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले आणि संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी रवाना झाल्या असून, आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. सुदैवाने, या घटनेत आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही, मात्र कंपनीतील मशिनरी आणि कच्चा माल जळून खाक झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

फीड फीडबर्नर 30 Mar 2026 2:10 pm

Iran-US War : थेट राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानावरच ड्रोन हल्ला; अमेरिका-इराण तणाव पुन्हा तीव्र

पश्चिम आशियातील संपूर्ण प्रदेशात सध्या परिस्थिती तणावपूर्ण झाली आहे. अशातच इराकच्या कुर्दिस्तानमधून (Kurdistan) एक नवीन घटना समोर आली आहे. थेट कुर्दिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानाला लक्ष्य करत मोठा ड्रोन हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यामुळे केवळ कुर्दिस्तानच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही मोठी खळबळ उडाली आहे. घटनेनंतर अमेरिका अत्यंत आक्रमक भूमिकेत दिसत आहे, तर इराणही शांत बसलेले नाही. दोन्ही देशांतील जुना वाद पुन्हा एकदा समोर आला आहे.कुर्दिस्तानमधून राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानावर हल्ल्याची बातमी समोर येताच अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने तत्काळ निवेदन जारी केले. अमेरिकेने या हल्ल्याला “भ्याड दहशतवादी कृत्य” असे संबोधत तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. तसेच कुर्दिस्तान आणि इराकच्या सार्वभौमत्व व सुरक्षेसाठी आपण ठामपणे उभे असल्याचे अमेरिकेने स्पष्ट केले. या कटामागील जबाबदार व्यक्तींना उघड करून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी अमेरिकेने इराकी प्रशासनाकडे केली आहे.या एका हल्ल्यामुळे जमिनीवर जितकी भीती निर्माण झाली नाही, त्यापेक्षा अधिक तणाव राजनैतिक पातळीवर निर्माण झाला आहे. हल्ल्यानंतर काही तासांतच अमेरिका आणि इराण यांच्यात आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली. अमेरिकन सुरक्षा अधिकाऱ्यांचा दावा आहे की या हल्ल्यामागे अशा अतिरेकी गटांचा हात आहे, ज्यांना थेट इराणकडून आर्थिक व लष्करी मदत मिळते. प्रदेशात आपला प्रभाव कायम ठेवण्यासाठी हे इराण समर्थित गट अशा प्रकारचे हल्ले करत असल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे.दुसरीकडे, इराणनेही या आरोपांवर मौन न बाळगता अमेरिकेचे दावे ठामपणे फेटाळले आहेत. इराणी परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की कोणतेही ठोस पुरावे नसताना अमेरिकेकडून इराणची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पश्चिम आशियातील स्वतःच्या अपयशांवर पडदा टाकण्यासाठी अमेरिका असे निराधार आरोप करत असल्याचेही इराणने म्हटले आहे.सध्या कुर्दिस्तानमध्ये सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर असून, हल्ल्यामागील धागेदोरे शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र एक गोष्ट स्पष्ट आहे या एका ड्रोन हल्ल्याने अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव आणि कटुता आणखी वाढली आहे.

फीड फीडबर्नर 30 Mar 2026 2:10 pm

Arpit Bala : कॉन्सर्टमध्ये प्रेक्षकावर थुंकला प्रसिध्द गायक, रागात बाटलीही फेकली, नेमकं काय घडलं?

मुंबई : आपल्या 'बरगद' या गाण्यामुळे २०२५ मध्ये रातोरात प्रसिद्ध झालेला गायक अर्पित बाला याची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा होत असून नुकताच पार पडलेल्या एका लाइव्ह कॉन्सर्टमुळे तो वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. २८ मार्च २०२६ रोजी किंग्डम क्लब अँड किचनमध्ये ज्यावेळी प्रेक्षकांमधील एका व्यक्तीनं अर्पितच्या दिशेनं स्टेजवर बाटली फेकली. त्यानंतर कॉन्सर्टमध्ये गोंधळ निर्माण झाला. रागाच्या भरात स्टेजवर उभ्या असलेल्या गायक अर्पितनं नंतर जे काही केलं त्याबद्दल त्याच्यावर जोरदार टीका होत आहेत.नेमकं काय घडलं ?या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून या व्हिडिओत अर्पित परफॉर्मन्स थांबवून प्रेक्षकांशी वाद घालताना दिसत आहे. बाटली कोणी फेकली असं अर्पित संतापून विचारतो आणि त्या व्यक्तीची ओळख पटल्यानंतर त्याचा राग अनावर झाला आणि तो थेट त्याच्यावर थुंकला. एवढच नाही तर त्यानं भडकून पुन्हा ती बाटली चक्क त्या व्यक्तीकडे फेकली. या घटनेनंतर सुरक्षा रक्षकांनी प्रेक्षकांमधील संबधित व्यक्तीला तेथून बाहेर काढले. यावेळी हे सर्व घडत असताना प्रेक्षकांमधील काहीजण टाळ्या वाजवाताना दिसून आले. त्यानंतर पुन्हा परफॉर्मन्स सुरु करण्याआधी अर्पितनं प्रेक्षकांना परत असं न करण्याच्या इशारा देतो आणि स्पष्ट करतो की अशा गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत. इथे बघा.. काय झालं? भीती निर्माण झाली...हे तुझ्या बहिणीच्या लग्नात हुंड्यात दे असं त्यानं त्या व्यक्तीला सुनावलंहा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून काहींजण अर्पितच्या या वागण्यावर टीका करत आहेत तर काहींजण त्याची बाजू घेत आहेत. प्रेक्षकाने आधी बाटली फेकून त्याला डिवचल्यानं त्याच्या राग अनावर झाला. असं म्हणत चाहते त्याची बाजू घेत आहेत.

फीड फीडबर्नर 30 Mar 2026 1:30 pm