राष्ट्रवादीत घडामोडींना वेग; शरद पवारांचा दिल्ली दौरा अचानक रद्द, पुण्याला रवाना
मुंबई : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या हालचालींच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आपला दिल्ली दौरा अचानक रद्द केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना वेग आला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी दिल्लीला जाण्याचे नियोजन असतानाच त्यांनी हा निर्णय घेतला असून, ते मुंबईहून पुण्याकडे रवाना झाले आहेत.शरद पवार सोमवारी रात्री मुंबईत होते. दिल्ली दौरा रद्द केल्यानंतर त्यांचा आजचा मुक्काम पुण्यात राहणार असून, त्यानंतर ते बारामतीला जाण्याची शक्यता आहे. बारामतीत पुढील दोन ते तीन दिवस त्यांचा मुक्काम असण्याची माहिती आहे. दिल्ली दौरा अचानक का रद्द करण्यात आला, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या नियुक्तीबाबत चर्चा सुरू असताना हा दौरा रद्द झाल्याने अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे.दरम्यान, राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा कारभार हाती घेतला. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतण्यासाठी त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. सुनेत्रा पवार यांच्या राज्यसभेचा कार्यकाळ आणखी दोन वर्षे शिल्लक होता, त्यांची मुदत ४ जुलै २०२८ रोजी संपणार होती. मात्र, ही जागा राखून ठेवण्याऐवजी सहा वर्षांची पूर्ण मुदत असलेल्या राज्यसभेच्या जागेवर पार्थ पवार यांना पाठवले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही जागा लवकरच भरली जाण्याची शक्यता असून, त्यासाठी पार्थ पवार यांनी मोर्चेबांधणी सुरू केल्याची माहिती आहे.अजित पवार यांच्या निधनानंतर पार्थ पवार आणि जय पवार हे दोघेही राजकारणात अधिक सक्रिय होतील, असा अंदाज वर्तवला जात होता. यापूर्वी बारामतीतील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात या दोघांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. आता अजित पवार यांच्या निधनामुळे त्यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी आली आहे. एकीकडे सुनेत्रा पवार राज्याrashtrawadi त उपमुख्यमंत्री म्हणून सूत्रे सांभाळतील, तर पार्थ पवार दिल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतिनिधित्व करतील, अशी शक्यता व्यक्त होत आहे. या संदर्भात पक्षाच्या बैठकीत पार्थ पवार यांनी वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केल्याची माहिती आहे. पार्थ यांनी यापूर्वी २०१९ मध्ये मावळ मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र, त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.
राम चरणच्या आगामी पेड्डी या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. अशातच त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. मेगा पॉवर स्टार राम चरण आणि त्याची पत्नी उपासना कामिनेनी कोनिडेला हे जुळ्या बाळांचे पालक झाले आहेत. या आनंदाच्या क्षणाचा उत्साह पेड्डी चित्रपटाच्या संपूर्ण टीममध्येही पाहायला मिळत आहे.या खास प्रसंगी चित्रपटाचे निर्माते वेंकट सतीश किलारू आणि दिग्दर्शक बुच्ची बाबू सना यांनी राम चरणचे मनापासून अभिनंदन केले. सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या एका फोटोमध्ये दोघेही राम चरणला फुलांचा गुलदस्ता देताना दिसत आहेत. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे— “#Peddi चे निर्माते वेंकट सतीश किलारू आणि दिग्दर्शक बुच्ची बाबू सना यांनी मेगा पॉवर स्टार राम चरणला जुळ्या बाळांच्या आगमनानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या. कुटुंबाला भरभरून आनंद आणि प्रेमाच्या शुभेच्छा.”https://www.instagram.com/p/DUN7Ah8E8sV/?igsh=MW5qeHQxeWk5NG03NA==उल्लेखनीय म्हणजे पेड्डी हा राम चरणच्या बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. चित्रपटाच्या घोषणेनंतरपासूनच प्रेक्षकांमध्ये याबाबत मोठी उत्सुकता आहे. चित्रपटातील पहिले गाणे ‘चिकिरी चिकिरी’ रिलीज होताच ते सुपरहिट ठरले असून, त्यामुळे चित्रपटाची लोकप्रियता आणखी वाढली आहे.बुच्ची बाबू सना यांच्या लेखन व दिग्दर्शनाखाली तयार होत असलेल्या पेड्डी मध्ये राम चरण मुख्य भूमिकेत झळकणार आहे. त्याच्यासोबत शिवराजकुमार, जान्हवी कपूर, दिव्येंदू शर्मा आणि जगपती बाबू यांच्याही महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत. वेंकट सतीश किलारू निर्मित हा चित्रपट 27 मार्च 2026 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
IND vs PAK : पाकिस्तान नेहमीप्रमाणे यू-टर्नघेईल; सुनील गावस्कर यांची पाकिस्तानवर टीका
मुंबई: टी-२० विश्वचषकापूर्वी पाकिस्तान सरकारने भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. १५ फेब्रुवारी रोजी कोलंबो येथे होणाऱ्या गट फेरीच्या सामन्यात पाकिस्तानचा भारताशी सामना होणार होता. मात्र आयसीसीने म्हणजेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने बांगलादेशला स्पर्धेतून बाहेर काढल्यानंतर पाकिस्तान सरकारने हा निर्णय घेतला आहे.आयसीसीचा पाकिस्तानला थेट इशारा:पीसीबीने स्पष्ट केलं की, पाकिस्तान संघ टी-२० वर्ल्ड कपमध्ये सहभागी होईल, मात्र १५ फेब्रुवारी रोजी भारताविरुद्ध होणारा सामना खेळणार नाही. या निर्णयामुळे संपूर्ण स्पर्धेच्या नियोजनावर पाणी फेरलं असून, आयसीसीने यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आयसीसीने पीसीबीला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील,असा थेट इशाराही दिला आहे.भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांना पाकिस्तान यू-टर्न घेईल असे वाटते. मात्र तरीही पाकिस्तानने १५ फेब्रुवारी रोजी भारताविरुद्धच्या टी-२० विश्वचषक सामन्यावर बहिष्कार टाकला तर आयसीसीने त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करावी असे आवाहन देखील गावस्कर यांनी केले आहे.काय म्हणाले सुनील गावस्कर ?या सर्व प्रकरणावर बोलतांना सुनील गावस्कर यांनी पाकिस्तान लवकरच 'यू-टर्न' घेईल असे सांगितले. मला असं वाटतं की पुढील चार-पाच दिवसांत, जेव्हा संपूर्ण जगभरातून आणि पाकिस्तानच्याच माजी खेळाडूंच्याही प्रतिक्रिया येतील तेव्हा पाकिस्तान नेहमीप्रमाणे यू-टर्न घेईल. यात नवीन काय आहे? आपल्या सर्वांना माहित आहे की पाकिस्तानचे क्रिकेटपटू निवृत्त होतात आणि नंतर चार दिवसांनी ते आपली निवृत्ती मागे घेतात आणि म्हणतात की 'आमच्या चाहत्यांनी आम्हाला अधिक खेळायला सांगितले'. हे पुन्हा घडू शकते,मात्र जर त्यांनी आपला निर्णय कायम ठेवला तर आयसीसीने त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी. अशा शब्दांमध्ये सुनील गावस्कर यांनी आपले मत मांडले.
मुंबई : भारतीय बॉक्स ऑफिसवर कमाईचे सर्व विक्रम मोडीत काढणाऱ्या 'धुरंधर' चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच निर्मात्यांनी आज 'धुरंधर २' (Dhurandhar: The Revenge) चा एक अत्यंत थरारक आणि रक्ताने माखलेला नवीन पोस्टर प्रदर्शित केला आहे. या पोस्टरमध्ये रणवीर सिंह पावसात उभा असून, लाल प्रकाशामुळे तो रक्ताच्या वर्षावात भिजल्याचा भास होत आहे. रणवीरने हा पोस्टर शेअर करताना आता बिघडण्याची वेळ आली आहे अशी कॅप्शन दिली असून, यामुळे चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
Supreme Court on Meta: व्हॉट्सअॅप आणि मेटा गोपनीयता धोरण प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने अतिशय कठोर भूमिका घेतली आहे.
Rakul Preet Singh: अभिनेत्री रकुल प्रीत सिंह हिने बॉलिवूड इंडस्ट्रीत सुरू असलेल्या पेड पीआर (पैसे देऊन केलेला प्रचार) संस्कृतीबाबत स्पष्टपणे मत मांडले आहे. काही कलाकार आपल्या कामामुळे नाही, तर पडद्यामागे होणाऱ्या प्रचारामुळे चर्चेत राहतात, यावर तिने थेट भाष्य केलं.
Dhurandhar 2 Teaser Release : रणवीर सिंहचा रौद्रवतार! धुरंधर 2 चा जबरदस्त टीझर रीलीज
Dhurandhar 2 Teaser Release : धुरंधर २ चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून, टीझरने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
US-India Trade Deal: मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून भारत-अमेरिका मुक्त व्यापार कराराचे कौतुक
मुंबई: भारत युरोप मुक्त व्यापार करारानंतर आता भारत अमेरिका या दोन देशांमध्ये मुक्त करार झाला आहे. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याची माहिती दिली आहे. मोदी यांनी सोमवारी (२ फेब्रुवारी) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून झालेल्या संभाषणानंतर ही घोषणा केली. विशेष म्हणजे या करारामुळे अमेरिकेने भारतावर लावलेल्या टॅरिफ मध्ये मोठी कपात झाली आहे. त्यामुळे टॅरिफ आता २५% वरून १८% झाला आहे.अनेक महिन्यापासून भारत आणि अमेरिकेत व्यापारी तणाव वाढला होता. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनमानी कारभारासमोर भारतानं मोठं आव्हान उभं केलं. अखेर अमेरिका आणि भारतात गेल्या काही दिवसांपासून लांबलेला व्यापारी करार सोमवारी रात्री निश्चित झाला. या कराराची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर चर्चा करून केली.या कराराचे (US-India Trade Deal) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले आहे. एक्सवर पोस्ट करून त्यांनी या कराराचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे.मैत्रीचा एक नवीन अध्याय!भारत आणि अमेरिकेमधील ऐतिहासिक व्यापार करार हा खऱ्या अर्थाने मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मैत्रीचा विजय आहे. जागतिक व्यापारासाठी सुद्धा हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण क्षण आहे.जगातील प्रमुख निर्यात करणाऱ्या… https://t.co/cOSEDXoVWp— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 2, 2026मैत्रीचा एक नवीन अध्याय!भारत आणि अमेरिकेमधील ऐतिहासिक व्यापार करार हा खऱ्या अर्थाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मैत्रीचा विजय आहे. जागतिक व्यापारासाठी सुद्धा हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण क्षण आहे. जगातील प्रमुख निर्यात करणाऱ्या अर्थव्यवस्थांमध्ये भारताला आता अमेरिकेकडून प्राधान्य टॅरिफ दर मिळणार आहे. यातून भारत-अमेरिका मैत्रीच्या नव्या युगाची सुरुवात झाली आहे. हा करार भारतीय व्यावसायिकांसाठी अनेक नूतन आणि उत्साहवर्धक संधींचे द्वार खुले करेल आणि ही दोन्ही देशांसाठी फायदेशीर अशी बाब ठरेल. महाराष्ट्र हे कायम निर्यातीत अग्रेसर असलेले राज्य आहे. त्यामुळे हा करार आपल्या राज्यातील व्यवसायासाठी नवे क्षितिज खुले करेल. डेटा सेंटर्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि क्रांतिकारी आधुनिक तंत्रज्ञानामध्ये महाराष्ट्राला मोठी गुंतवणूक प्राप्त होईल. अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कराराचे कौतुक केले आहे.
Nanded: नांदेडमधील धक्कादायक प्रकार, स्वत:च्या स्वार्थासाठी पित्याने काढला मुलीचा काटा
नांदेड: राजकारणाच्या हव्यासामुळे धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदाची निवडणूक लढवण्यासाठी आडकाठी ठरणाऱ्या आपल्या सहा वर्षांच्या चिमुकलीची पित्यानेच हत्या केल्याची घटना समोर आली आहे. नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील एका व्यक्तीने हे क्रूर कृत्य केले असून आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे.नेमकं घडलं काय?नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील केरुड गावातील रहिवासी असलेला आरोपी आपल्या गावात केशकर्तनालय चालवतो. त्याला तीन अपत्ये होती, दोन मुलगे आणि एक मुलगी होती. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत त्याला सरपंचपदासाठी निवडणूक लढवण्याची तीव्र इच्छा होती. पण, महाराष्ट्र निवडणूक कायद्यातील 'दोन अपत्यांच्या' अटीमुळे तो अपात्र ठरत होता. ही अट पूर्ण करण्यासाठी त्याने आपल्या सहा वर्षांच्या मुलीचा संपवण्याचे ठरवले.पित्याने दिली गुन्ह्याची कबुलीमिळालेल्या माहितीनुसार, २९ जानेवारी रोजी आरोपीने आपल्या मुलीला दुचाकीवर बसवून तेलंगणातील निझामाबाद जिल्ह्याच्या दिशेने नेले. तिथे एका निर्जन स्थळी असलेल्या कालव्यात त्याने मुलीला जिवंत फेकून दिले. काही दिवसांनी स्थानिकांना कालव्यात मुलीचा मृतदेह आढळल्यानंतर त्यांनी तातडीने पोलिसांना बोलावले. निझामाबाद पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन तपास सुरु केला. पोलिसांनी मुलीचा फोटो सोशल मीडियावर आणि आसपासच्या परिसरात प्रसारित केला. मुखेडमधील काही नागरिकांनी मुलीची ओळख पटवल्यानंतर पोलिसांनी पित्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर त्याने निवडणुकीसाठी मुलीची हत्या केल्याची कबुली दिली.महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी दोनपेक्षा जास्त अपत्ये असल्यास उमेदवार निवडणूक लढवण्यास अपात्र ठरतो. म्हणजेच तो निवडणूक लढवू शकत नाही. ही तांत्रिक अडचण दूर करण्यासाठी एका पित्याने स्वतःच्या रक्ताच्या नात्याला संपवल्याने संपूर्ण महाराष्ट्रात संताप व्यक्त होत आहे. सध्या आरोपी पोलीस कोठडीत आहे. तसेच पोलीस घटनेचा तपास करत आहेत.
US Tariff Cut India: भारतासाठी आनंदाची बातमी आली समोर आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेकडून भारतावर कर कपात करण्याची घोषणा केली. सोमवारी रात्री ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक लांबलचक पोस्ट शेअर केली
Chhagan Bhujbal : “विमान अचानक पलटी कसे झाले, काहीतरी गडबड आहे”; छगन भुजबळांनी व्यक्त केली शंका
Chhagan Bhujbal : अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत नाशिक येथील शोकसभेत बोलताना छगन भुजबळ यांनी मोठी शंका उपस्थित केली आहे.
Dhurandhar The Revenge : रणवीर सिंगचा खतरनाक लुक; पहिलं पोस्टर रिलीज
Dhurandhar The Revenge : १२.१२ या वेळेने चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण केली
Devdas and Tere Naam Returning to Big Screens: बॉलिवूडचे दोन मोठे सुपरस्टार शाहरूख खान आणि सलमान खान यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेले त्यांचे गाजलेले चित्रपट ‘तेरे नाम’ आणि ‘देवदास’ पुन्हा एकदा सिनेमागृहात री-रिलीज होणार आहेत.
Chhatrapati Sambhajinagar News: हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड असल्याचे लक्षात येताच, सुरक्षेच्या कारणास्तव तात्काळ उड्डाण रद्द करण्यात आले.
Manjusha Nagpure : चर्चेतल्याच नावाला मिळाली संधी! पुण्याच्या महापौर पदी मजुंषा नागपुरे
Manjusha Nagpure : पुणे महापालिकेवर बिनविरोध म्हणून निवडून आलेल्या नगरसेविका मंजुषा नागपुरे यांची महापौर पदावर निवड झाली आहे.
जोकोविचला नमवत कार्लोसची ऑस्ट्रेलियन ओपनला गवसणी
मेलबर्न : ऑस्ट्रेलियन ओपन २०२६च्या पुरुष एकेरी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्पेनच्या युवा खेळाडू कार्लोस अल्कारेजने इतिहास रचला. त्याने अंतिम फेरीत दिग्गज टेनिसपटू नोवाक जोकोविचला पराभवाची धूळ चारली. ही स्पर्धा चौथ्या सेटपर्यंत चालली. पहिल्या सेटमध्ये जोकोविचने बाजी मारली. मात्र त्यानंतर सलग तीन सेटमध्ये कार्लोस अल्काराज सरस ठरला. हा सामना अल्कारेजने ३-१ ने जिंकला. अल्कारेजने २-६, ६-२, ६-३, ७-५ ने नोवाकला नमवले. कार्लोसने पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियन ओपन किताब जिंकला आणि कॅरियर ग्रँड स्लॅम पूर्ण केलं. कार्लोस अल्कारेजचा हा सातवा ग्रँड स्लॅम किताब आहे. अल्कारेजने वयाच्या २२ व्या वर्षी ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन, विंबलडन आणि यूएस ओपन किताब जिंकला. त्याने २०२३,२०२४ मध्ये विंबलडन, २०२४,२०२५ मध्ये फ्रेंच ओपन, २०२२ मध्ये यूएस ओपन आणि २०२६ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन जिंकला. अशी कामगिरी सर्वात लहान वयातील पुरूष टेनिसपटू ठरला. अल्कराजने ८८ वर्षांनंतर डॉन बजचा विक्रम मोडला. कार्लोस अल्कारेजला ऑस्ट्रेलियन ओपन विजयानंतर बक्षिसाच्या रूपाने २.७५ मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास २५ कोटी २१ लाख रुपये मिळाले. ही ऑस्ट्रेलियन ओपन इतिहासातील सर्वात मोठी बक्षिसी रक्कम आहे. तर नोवाकला उपविजेता म्हणून जवळपास १३ कोटी रुपये मिळाले.
मुंबई: भारत युरोप मुक्त व्यापार करारानंतर आता भारत अमेरिका या दोन देशांमध्ये मुक्त करार (US-India Trade Deal) झाला आहे. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याची माहिती दिली आहे. मोदी यांनी सोमवारी (२ फेब्रुवारी) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून झालेल्या संभाषणानंतर ही घोषणा केली. विशेष म्हणजे या करारामुळे अमेरिकेने भारतावर लावलेल्या टॅरिफ मध्ये मोठी कपात झाली आहे. त्यामुळे टॅरिफ आता २५% वरून १८% झाला आहे.या करारामुळे भारतीय बाजारपेठेत आज सकाळपासून मोठी उलथापालथ सुरू झाली आहे. अमेरिकेने टॅरिफ कमी केल्याने भारतीय निर्यातदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. याचे सकारात्मक पडसाद शेअर बाजारात उमटले आहेत. त्यामुळे आज (मंगळवार ३ फेब्रुवारी) सकाळपासून शेअर बाजारात मोठी उसळी पाहायला मिळत आहेत. तर दुसरीकडे मात्र सोने आणि चांदीचे भावही वाढले आहेत.प्रतितोळा तब्बल साडेचार हजारांची वाढ :सध्याच्या दरानुसार, एक किलो चांदीचा दर (Silver rates) तब्बल २० हजारांच्या आसपास वाढला होता. त्यामुळे एक किलो चांदीचा दर अडीच लाखांच्या पार गेला. तर गेल्या काही दिवसांत भावात प्रचंड चढउतार झाल्याने चर्चेत असलेल्या सोन्याचा भावही (Gold rates) आज वधारला आहे. आज बाजार उघडताच सोन्याचा दर प्रतितोळा तब्बल साडेचार हजार रुपयांनी वधारला. यामुळे सध्या १० ग्रॅम सोन्याचा भाव १ लाख ४८ हजार रुपयांच्या पातळीवर जाऊन पोहोचला आहे.
Marathi Actress : ‘चाफा आणि तो…’; ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीने दिली प्रेमाची कबुली
Marathi Actress : छोट्या पडद्यावरील एका अभिनेत्रीने चाहत्यांबरोबर आनंदाची बातमी शेअर केली आहे.
Sharad Pawar : शरद पवार हे दिल्ली दौऱ्यावर जाणार होते. मात्र, त्यांनी आपला दिल्ली दौरा अचानक रद्द केल्याची माहिती समोर आली आहे.
दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचा परीक्षेपूर्वी ताण हटणार !
यवतमाळ : दहावी आणि बारावीच्या परीक्षा फेब्रुवारी-मार्च महिन्यांत होत आहे. विद्यार्थ्यांच्या अभ्यास व परीक्षेसंदर्भातील अडचणी, शंका किंवा समस्या दूर करण्यासाठी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने तज्ज्ञ समुपदेशकांची नियुक्ती केली आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वी योग्य मार्गदर्शन मिळावे, तणावमुक्त होता यावे या उद्देशाने हे समुपदेशन केंद्र स्थापन करण्यात आले आहे.बारावीची परीक्षा १० फेब्रुवारीपासून तर दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या तयारीसाठी तज्ज्ञ समुपदेशकांची मदत घेता येईल. विद्यार्थ्यांनी परीक्षेला सकारात्मक मानसिकतेने आणि तयारीसह सामोरे जाणे आवश्यक आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून विद्यार्थ्यांना परीक्षेसंदर्भातील शंका मिटविण्यासाठी तज्ज्ञ समुपदेशकांचे संपर्क क्रमांकही जाहीर करण्यात आले आहेत.यासाठी राज्य बोर्डाने ही हेल्पलाइन सुविधा सुरू केली आहे. दहावीच्या परीक्षेसंदर्भात माहिती व मार्गदर्शनासाठी (०२२-२७८९३७५६) तर बारावीच्या परीक्षेसंदर्भात माहिती व मार्गदर्शनासाठी (०२२-२७८८१०७५) हे क्रमांक दिले आहेत.
Jay Pawar : 'काश वेळ थांबली असती...'; आपल्या वडिलांसाठी लिहलेली जय पवार यांची भावुक पोस्ट व्हायरल
राज्याच्या राजकारणातील एक शिस्तप्रिय, धडाडीचे आणि अत्यंत कार्यक्षम नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला. पहाटेपासून कामाचा धडाका लावणारे आणि जनसामान्यांच्या समस्या तत्काळ मार्गी लावणारे 'दादा' आता आपल्यात नाहीत, यावर कोणाचाही विश्वास बसत नाहीये. त्यांच्या या अकाली एक्झिटने राजकीय वर्तुळात मोठी उलथापालथ झाली.अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन आपल्या राजकीय दौऱ्यांना त्यांनी सुरुवात देखील केली. मात्र पवार कुटुंबीय अजूनही या धक्क्यातून पूर्णपणे सावरलेले नाही. सध्या अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांची एक पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.तुमची खूप आठवण येतेय...जय पवार यांनी आपल्या व्हॉटसअॅप स्टेटसला वडिलांसोबतचे दोन फोटो ठेवले आहेत. यासोबत जय पवार यांनी काही मजकूरही लिहला आहे. यामध्ये म्हटले आहे की, तुमची खूप आठवण येतेय. डॅड काश वेळ थांबली असती, मी तुम्हाला घट्ट मिठीत घेऊन आयुष्यभर तसाच राहिलो असतो. मिसिंग यू अ लॉट डॅड!, असे जय पवार यांनी म्हटले. जय पवार यांच्या या स्टेटसचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
Rohit Shetty : मुंबईत दिग्दर्शक रोहित शेट्टी राहत असलेल्या इमारतीवर गोळीबाराची घटना घडली. चार आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, चौकशी दरम्यान मोठी माहिती समोर आली आहे.
Healthy Diet: हिवाळ्यात प्रोटीनसाठी आहारात घ्या या भाज्या, आरोग्याला मिळतील अनेक फायदे
Healthy Diet: हिवाळ्यात शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यासाठी आणि स्नायू बळकट करण्यासाठी प्रोटीन खूप गरजेचे असते. अनेकांना प्रश्न पडतो की थंडीच्या दिवसांत प्रोटीनसाठी कोणत्या भाज्या खाव्यात. तज्ज्ञांच्या मते हिरवी मटार, ब्रोकली, पालक आणि मशरूम या भाज्या हिवाळ्यासाठी उत्तम ‘सुपरफूड’ आहेत.
US-India Trade Deal: काही महिन्यांच्या अनिश्चिततेनंतर आणि वाढत्या व्यापार दबावानंतर, अमेरिका आणि भारत यांच्यातील दीर्घकाळापासून प्रलंबित असलेला व्यापार करार अखेर सोमवारी रात्री अंतिम झाला.
अर्थसंकल्पातून पालघरसाठी विकासाची ‘महा-भेट’ : खासदार डॉ. सवरा
पालघर : केंद्रीय अर्थसंकल्पात पालघर जिल्ह्यासाठी विकासाचे नवीन दरवाजे उघडले आहेत. या बजेटमध्ये पालघरच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर देण्यात आला असून, महिलांपासून मच्छीमारांपर्यंत आणि शेतकऱ्यांपासून तरुणांपर्यंत सर्वांसाठीच अर्थसंकल्पात आनंदाची बातमी आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलणार असल्याचे मत खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी व्यक्त केले आहे.जिल्ह्यातील मुलींना सुरक्षा आणि शिक्षण: देशाची आणि जिल्ह्याची प्रत्येक मुलगी सुरक्षित वातावरणात शिकेल, याची खात्री करण्यासाठी जिल्ह्यात सुसज्ज 'गर्ल्स हॉस्टेल' उभारले जाणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणात येणारे अडथळे दूर होतील. गावातील महिलांनी बनवलेल्या वस्तूंना आणि हस्तकलेला आता हक्काची बाजारपेठ मिळणार आहे. महिलांची उत्पादने शहरात आणि जागतिक स्तरावर विकण्यासाठी शी मार्ट उघडले जातील. यामुळे पालघरच्या महिलांच्या हाताला काम आणि खिशात पैसा येईल. तसेच पालघर जिल्ह्याची ओळख असलेल्या काजू आणि नारळाला आता ‘जागतिक ब्रँड’ म्हणून विकसित केले जाईल. सरकारने यासाठी विशेष तरतूद केली असून, यामुळे आपल्या शेतकऱ्यांचा माल जगभरात पोहोचेल आणि त्यांना त्यांच्या कष्टाचा योग्य मोबदला मिळेल. तरुणांच्या हाताला काम मिळावे आणि नवीन उद्योग सुरू व्हावेत, यासाठी सरकारने १०,००० कोटी रुपयांचा स्वतंत्र निधी तयार केला आहे. यातून तरुणाना नवीन स्टार्टअप्स आणि नोकऱ्यांच्या संधी उपलब्ध होतील.मच्छीमार बांधवांना मोठा दिलासा : समुद्रकिनारी वसलेल्या मच्छीमारांसाठी सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. आता मच्छीमार बांधवांनी पकडलेल्या मासळीवर त्यांना कोणताही टॅक्स किंवा ड्युटी द्यावी लागणार नाही. यामुळे मत्स्य व्यवसायात मोठी वाढ होईल. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील जुन्या आणि बंद पडलेल्या कारखान्यांना पुन्हा चालू करण्यासाठी २०० जुन्या औद्योगिक वसाहतींना पुनरुज्जीवित केले जाईल. यामुळे पालघरमधील तारापूर, बोईसर, वाडा, कुडुस या सारख्या औद्योगिक क्षेत्राला पुन्हा 'अच्छे दिन' येतील. हा अर्थसंकल्प पालघरच्या विकासाला नवी दिशा देणारा ठरेल, असा विश्वास खासदार डॉ. सवरा यांनी व्यक्त केला जात आहे.
पाण्याच्या टाकीत मानवी हाडांचा सापळा
वसईच्या माणिकपूर गावातील घटनावसई : वसईच्या माणिकपूर येथील एका चाळीच्या रिकाम्या पाण्याच्या टाकीत पुरुषाच्या हाडांचा सापळा आढळल्याने खळबळ उडाली आहे. ही टाकी वापरात नव्हती. अनेक वर्षांपासून मृतदेह टाकीत असल्याने मृतदेहांच्या हाडांचा सापळा झाला आहे. मृतदेहाची ओळख पटविण्याचे हाडे न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. माणिकपूर पोलिसांनी अपमृत्यूचा गुन्हा दाखल केला असून त्या दृष्टीने तपास सुरू करण्यात आला आहे.वसई पश्चिमेच्या माणिकपूर गावातील फडबाव शेजोळ येथे बारकुल्या नावाची दुमजली चाळ आहे. गावातील आल्मेडा नामक महिलेच्या मालकीची ही चाळ आहे. या चाळीत एकूण १० खोल्या आहेत. वसई स्थानकात व्यवसाय करणारे फेरीवाले या चाळीत राहतात. दरम्यान, या दुमजली चाळीच्यावर गच्ची (टॅरेस) आहे. टॅरेसवर जुनी पाण्याची टाकी आहे. मात्र ती कधी वापरात नव्हती. त्यामुळे पाण्याची टाकी तोडण्याचा निर्णय चाळ मालकाने घेतला. २९ जानेवारीपासून ब्रेकर मशीनच्या सहाय्याने टाकी पाडण्याचे काम सुरू होते.३१ जानेवारी रोजी संध्याकाळी साडेचारच्या सुमारास टाकीच्या उत्तर बाजूची भिंत अर्धवट तोडण्यात आली. त्यावेळी कामगारांना मानवी हाडांचे तुकडे आणि कवटी आढळळी. त्वरीत माणिकपूर पोलिसांना पाचारण करण्यात आले. संपूर्ण टाकीची पाहणी केली असता कवटी, हाडांचे अनेक तुकडे, शर्ट, पॅण्ट आढळून आले. हाडांचा सापळा तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत (फॉरेन्सिक लॅब) पाठविण्यात आला आहे. प्रथमदर्शनी पुरुषाच्या हाडांचा सापळा आहे. हे स्पष्ट झाले आहे.मानवी सापळा अनेक वर्ष जुना : सुरेश आल्मेडा (४६) हे चाळीची देखभाल दुरुस्ती करतात. ही चाळ ३० वर्षे जुनी असून माझ्या मावशीची आहे. पाण्याची टाकी बांधली होती मात्र ती वापरात नव्हती. पालिकेच्या नळाचे पाणी भाडेकरू वापरत होते असे ते म्हणाले. टॅरेसवर कुणी जात नव्हते. दोन वर्षांपासून टॅरेसचे गेट बंद होते. टाकीत हा मृतदेह असला तरी कधीही कसल्याही प्रकारची दुर्गंधी कुणाला आली नव्हती असेही आल्मेडा यांनी सांगितले. सध्या माणिकपूर पोलिसांनी या प्रकरणाची कलम १९४ अन्वये अपमृत्यूची नोंद केली आहे. या चाळीत फेरीवाले राहतात. हा मृतदेह देखील ३५ ते ४० वर्षांच्या फेरीवाल्याचा असल्याची शक्यता आहे. आम्ही मागील ५ वर्षांतील बेपत्ता इसमांची माहिती तपासत आहोत असे या प्रकरणाचे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक हरिष पाटील यांनी सांगितले. या मानवी हाडांजवळ आढळलेल्या एका शर्टावर टेलरचे लेबल आहे.
भारत युरोप मुक्त व्यापार करारानंतर आता भारत अमेरिका या दोन देशांमध्ये मुक्त करार झाला आहे. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याची माहिती दिली आहे. मोदी यांनी सोमवारी (२ फेब्रुवारी) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून झालेल्या संभाषणानंतर ही घोषणा केली. विशेष म्हणजे या करारामुळे अमेरिकेने भारतावर लावलेल्या टॅरिफ मध्ये मोठी कपात झाली आहे. त्यामुळे टॅरिफ आता २५% वरून १८% झाला आहे.अनेक महिन्यापासून भारत आणि अमेरिकेत व्यापारी तणाव वाढला होता. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनमानी कारभारासमोर भारतानं मोठं आव्हान उभं केलं. अखेर अमेरिका आणि भारतात गेल्या काही दिवसांपासून लांबलेला व्यापारी करार सोमवारी रात्री निश्चित झाला. या कराराची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर चर्चा करून केली.Wonderful to speak with my dear friend President Trump today. Delighted that Made in India products will now have a reduced tariff of 18%. Big thanks to President Trump on behalf of the 1.4 billion people of India for this wonderful announcement.When two large economies and the…— Narendra Modi (@narendramodi) February 2, 2026माझ्यासाठी हा मोठ्या आनंदाचा क्षण - डोनाल्ड ट्रम्पट्रम्प यांनी ट्रुथ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर भावना मांडल्या. ट्रम्प म्हणाले की; आज सकाळी भारताचे पंतप्रधान मोदी यांच्याशी माझी चर्चा झाली, हा माझ्यासाठी मोठ्या आनंदाचा क्षण आहे. माझ्या चांगल्या मित्रांपैकी ते एक आहेत. ते एक सन्मानिय आणि शक्तिशाली नेते आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या मैत्री, आदर आणि त्यांच्या विनंतीवरून आम्ही लागलीच प्रभावाने अमेरिका आणि भारत यांच्यातील व्यापारी कराराला मंजूरी दिली. त्यातंर्गत टॅरिफ २५ टक्क्यांहून १८ टक्के करण्यात आला आहे.
नागपूर : शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) एका २६ वर्षीय निवासी डॉक्टरने सोमवारी सकाळी एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. या धक्कादायक घटनेमुळे नागपूरच्या वैद्यकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. मृत डॉक्टर हा नेत्ररोग विभागात कार्यरत होता आणि त्याने नुकताच पदव्युत्तर (PG) अभ्यासासाठी प्रवेश घेतला होता. सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात शोककळा पसरली आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही, मात्र एका तरुण आणि होतकरू डॉक्टरच्या अशा जाण्याने त्याच्या सहकारी डॉक्टरांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. गणेशपेठ पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून घटनेचा सखोल तपास सुरू केला आहे.https://prahaar.in/2026/02/03/bjp-pune-mayor-bjp-confirms-candidate-for-the-post-of-pune-mayor/रुजू होऊन आठवडाही झाला नाही अन्न...बुलढाणा येथील रहिवासी असलेले २६ वर्षीय तरुण निवासी डॉक्टर ऋत्विक सागर ठाकूर यांच्या आत्महत्येच्या वृत्ताने नागपूर मेडिकलसह वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. ऋत्विक यांनी मुंबईतील प्रसिद्ध के.ई.एम. रुग्णालयातून आपले वैद्यकीय शिक्षण (MBBS) पूर्ण केले होते. त्यांचे दोन्ही पालकही डॉक्टर असून, ऋत्विक यांनी नुकताच २७ जानेवारी २०२६ रोजी नागपूर मेडिकलच्या नेत्ररोग विभागात पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतला होता. नेत्ररोग विभागाचे प्रमुख डॉ. दिलीप उमरे यांच्या युनिटमध्ये कार्यरत असलेले ऋत्विक सोमवारी हॉस्पिटलमध्ये गैरहजर होते. त्यामुळे डॉ. उमरे यांनी त्यांच्या वडिलांशी संपर्क साधला. वडिलांनी वारंवार फोन करूनही ऋत्विकने प्रतिसाद न दिल्याने संशय बळावला. अखेर त्यांनी ज्या हॉटेलमध्ये ऋत्विक थांबले होते, तिथल्या व्यवस्थापनाला माहिती दिली. हॉटेल कर्मचाऱ्यांच्या हाकेलाही प्रतिसाद न मिळाल्याने पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला, तेव्हा ऋत्विक यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. घटनेची माहिती मिळताच गणेशपेठ पोलिसांनी घटनास्थळ गाठले. प्राथमिक तपासात कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही. त्यामुळे अवघ्या काही दिवसांपूर्वीच प्रवेश घेतलेल्या या तरुण डॉक्टरने टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत.तरुण डॉक्टरच्या आत्महत्येने वैद्यकीय वर्तुळात मोठी खळबळशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) एका तरुण निवासी डॉक्टरने सोमवारी सकाळी गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पदव्युत्तर शिक्षणाचे (PG) स्वप्न उराशी बाळगून नुकताच प्रवेश घेतलेल्या या २६ वर्षीय डॉक्टरच्या अकाली निधनाने वैद्यकीय क्षेत्रात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे. हा डॉक्टर नेत्ररोग विभागात कार्यरत होता. सोमवारी सकाळी शहरातील एका हॉटेलमध्ये त्याने टोकाचे पाऊल उचलले. ही घटना उघडकीस येताच सहकारी डॉक्टरांमध्ये आणि मेडिकल परिसरात शोककळा पसरली आहे. अभ्यासू आणि तरुण सहकाऱ्याच्या अशा अचानक जाण्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप समोर आले नसून, गणेशपेठ पोलिसांनी या प्रकरणाची नोंद केली आहे. पोलीस सध्या विविध अंगांनी तपास करत असून लवकरच या घटनेचा उलगडा होण्याची शक्यता आहे.डॉक्टर पालकांचा एकुलता एक आधार हरपलाबुलढाणा येथील मूळ रहिवासी आणि नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (GMC) निवासी डॉक्टर ऋत्विक सागर ठाकूर (२६) यांनी सोमवारी सकाळी एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. विशेष म्हणजे, ऋत्विक यांनी केवळ ७ दिवसांपूर्वीच, म्हणजेच २७ जानेवारी २०२६ रोजी नेत्ररोग विभागात पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतला होता. ऋत्विक यांचे दोन्ही पालक व्यवसायाने डॉक्टर असून, त्यांनी स्वतः मुंबईतील नामांकित के.ई.एम. रुग्णालयातून एमबीबीएस (MBBS) पूर्ण केले होते. उच्च शिक्षणासाठी ते नागपुरात डॉ. दिलीप उमरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत होते. सध्या कॉलेजच्या वसतिगृहात जागा मिळेपर्यंत ते गणेशपेठ बसस्थानकाजवळील एका हॉटेलमध्ये मुक्कासाला होते. सोमवारी ऋत्विक कर्तव्यावर हजर न झाल्याने विभागप्रमुख डॉ. उमरे यांनी त्यांच्या वडिलांशी संपर्क साधला. वडिलांनी केलेल्या वारंवार फोनला ऋत्विकने प्रतिसाद न दिल्याने संशय बळावला. अखेर हॉटेल व्यवस्थापनाच्या मदतीने आणि पोलिसांच्या उपस्थितीत रूमचा दरवाजा तोडला असता, ऋत्विक यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेमुळे संपूर्ण वैद्यकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली असून, गणेशपेठ पोलीस आत्महत्येच्या कारणांचा शोध घेत आहेत.
१.९३ लाख कोटींचा महसूल, सरकारला मोठा दिलासानवी दिल्ली : वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) संकलनाच्या आकडेवारीने सरकारला दिलासा दिला आहे. जानेवारी महिन्यात जीएसटी महसूलात लक्षणीय वाढ नोंदवली गेली असून, आयातीवरील करात झालेल्या वाढीमुळे एकूण संकलन ६.२ टक्क्यांनी उंचावले आहे. यामुळे कराचे आकडे ₹१.९३ लाख कोटींवर पोहोचले आहेत. दुसरीकडे, कर परताव्यात ३.१ टक्क्यांची घट झाली असून, ते ₹२२,६६५ कोटी इतके राहिले आहेत.या महिन्यात निव्वळ जीएसटी महसूलात ७.६ टक्क्यांची वाढ होऊन तो सुमारे ₹१.७१ लाख कोटींवर गेला आहे. विशेषतः तंबाखू उत्पादनांमधून मिळणाऱ्या कर संकलनात बदल दिसून येतो. जानेवारी २०२५ मध्ये हे संकलन ₹५,७६८ कोटी इतके होते, तर त्याच कालावधीत ते ₹१३,००९ कोटी इतके नोंदवले गेले होते. हे बदल लक्झरी, हानिकारक आणि व्यसनाधीन वस्तूंवर आकारल्या जाणाऱ्या उपकराच्या पार्श्वभूमीवर घडले आहेत. कार आणि तंबाखू उत्पादनांसारख्या वस्तूंवर अशा प्रकारचे कर लादण्यात आले आहेत, ज्यामुळे महसूल वाढीलाहातभार लागला आहे. सरकारने गेल्या वर्षी २२ सप्टेंबरपासून जीएसटी दरांमध्ये मोठी कपात केली आहे. सुमारे ३७५ वस्तूंच्या दरात घट करून त्या अधिक परवडणाऱ्या करण्यात आल्या आहेत.यामुळे ग्राहकांना लाभ झाला असला तरी, महसूल संकलनावर काही प्रमाणात परिणाम झाल्याचे दिसते. पूर्वी लक्झरी आणि हानिकारक वस्तूंवर व्यापकपणे उपकर लागू होता, परंतु आता तो मुख्यत्वे तंबाखू आणि त्यासंबंधित उत्पादनांपुरता मर्यादित करण्यात आला आहे.कर संकलन ४.८ टक्क्यांनी वाढतरीही, जानेवारीत देशांतर्गत व्यवहारांमधून कर संकलन ४.८ टक्क्यांनी वाढून ₹१.४१ लाख कोटी झाले आहे. त्याचप्रमाणे, आयातीवरील महसूल १०.१ टक्क्यांनी उंचावून ₹५२,२५३ कोटी इतका झाला आहे. हे आकडे अर्थव्यवस्थेतील सकारात्मक बदल दर्शवतातआणि कर संकलन प्रक्रियेची कार्यक्षमता दाखवतात.
सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता केल्यास २५० पासून २५ हजार दंड, नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई
मुंबई : मुंबई महानगरपालिकेकडून घनकचरा आणि स्वच्छता विषयक जागृता निर्माण केली जात आहे. यामध्ये कचरा निर्माण करणारे घटक, विविध आस्थापना, कचराविषयक सेवा प्रदाता, घनकचरा व्यवस्थापन, साठवणूक, वितरण व प्रक्रिया, या बाबत नियमावलींचा समावेश आहे. नागरिक किंवा आस्थापनांनी यासंदर्भातील नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.या अंतर्गत, सार्वजनिक स्थळी थुंकल्यास २५०, कचरा टाकल्यास ५००, ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण न केल्यास २०० रूपये, विनापरवाना राडारोडा वाहतूक केल्यास थेट २५ हजार रुपये दंड आकारण्यात येईल. महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या निर्देशांनुसार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनात, उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर यांच्या देखरेखीखाली कार्यक्षेत्रातील परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी नियमितपणे कार्यवाही केली जाते. यासह वेळोवेळी विशेष स्वच्छता मोहीम आणि उपक्रमांचे आयोजन केले जाते. याच पार्श्वभूमीवर, हा उपविधी जारी करण्यात येत आहे. मुंबईत घनकचऱ्याचे प्रभावीपणे व्यवस्थापन करण्यासाठी महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून अविरतपणे प्रयत्न केले जात आहेत असं अश्विनी जोशी यांनी सांगितले.नागरी घनकचऱ्याची साठवणूक आणि वितरण, उत्पादक, महानगरपालिका प्रशासन, प्रतिनिधी आणि कंत्राटदार यांची जबाबदारी व कर्तव्ये, वस्तू पुनर्प्राप्ती सुविधा (एमआरएफ), घनकचरा, जैव-वैद्यकीय कचरा, ई-कचरा, बांधकाम व पाडकाम राडारोडा, प्लास्टिक कचरा आदींसंदर्भात सविस्तर नियमावलीचा समावेश आहे. विविध आस्थापना, नागरिक तसेच संबंधित सर्वांनी मुंबई अधिक स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी प्रयत्न करावे. आपले घर, परिसर आणि अन्य सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा. उपविधीतील सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करुन महानगरपालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन देखील डॉ. अश्विनी जोशी यांनी केले.
Stock Market Today: भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करार झाला आहे.अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ट्विटर सोशल अकाउंटवर याबाबत मोठी घोषणा केली आहे.
विकास गोगावले पहिल्यांदाच निवडणुकीच्या मैदानात
रायगड : राज्यातील राजकारणात लक्षवेधी ठरणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत महाड तालुक्यातील नाडगावतर्फे बिरवाडी मतदारसंघातून यंदा रंगतदार लढत पाहायला मिळणार आहे. मंत्री भरत गोगावले यांचे सुपुत्र आणि युवा सेनेचे सचिव विकास गोगावले यांनी पहिल्यांदाच निवडणुकीच्या रणांगणात उतरून आपल्या राजकीय कारकिर्दीची दमदार सुरुवात केली आहे. तरुण नेतृत्व, स्थानिक पातळीवरील मजबूत संपर्क आणि कार्यकर्त्यांचा वाढता पाठिंबा यामुळे या उमेदवारीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.प्रचाराचा नारळ फोडताच मतदारसंघात शिवसेनेचे वातावरण अधिकच बळकट होत असल्याचे चित्र दिसत आहे. विविध गावांमध्ये सभा, भेटीगाठी आणि संवाद यात्रांच्या माध्यमातून विकास गोगावले थेट मतदारांपर्यंत पोहोचत आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या प्रचाराला सुरुवात होताच राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश करत गोगावले यांच्या उमेदवारीला पाठिंबा दर्शवला आहे. या घडामोडींमुळे मतदारसंघातील राजकीय समीकरणे वेगाने बदलत असल्याची चर्चा सुरू आहे. दुसरीकडे या मतदारसंघात राष्ट्रवादी-भाजप युतीकडून नीलेश महाडिक यांना उमेदवारी देण्यात आली असून, त्यामुळे ही लढत प्रतिष्ठेची मानली जात आहे.मात्र वाढता जनसंपर्क, तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि होत असलेले पक्ष प्रवेश यामुळे आपला विजय निश्चित असल्याचा ठाम विश्वास उमेदवार विकास गोगावले यांनी व्यक्त केला. विकासाच्या मुद्द्यावर आधारित निवडणूक लढवत मतदारसंघाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले. एकूणच नव्या दमाच्या नेतृत्वामुळे नाडगावतर्फे बिरवाडी जिल्हा परिषद मतदारसंघातील निवडणूक अधिकच उत्सुकतेची ठरत असून, या लढतीकडे संपूर्ण रायगड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
अर्थसंकल्पातून कोकणच्या आर्थिक विकासाला नवी दिशा
काजू, नारळ, मत्स्योद्योगाला भरीव निधीसुभाष म्हात्रे अलिबाग : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रविवारी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात कोकणातील कृषी, पर्यटन, बंदर विकास, मत्स्योत्पादन तसेच पायाभूत सुविधांसाठी भरीव निधी उपलब्ध करून दिल्याने कोकणवासीयांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. या अर्थसंकल्पामुळे कोकणच्या आर्थिक विकासाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.कोकणच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या काजू व नारळ उत्पादकांसाठी विशेष कृषी प्रोत्साहन पॅकेजअंतर्गत महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे आणि काजू-नारळाचे जागतिक स्तरावर ब्रँडिंग व्हावे, हा यामागचा मुख्य उद्देश असल्याचे अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.मत्स्योद्योग व किनारपट्टी विकासासाठी १० हजार कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आल्याने कोकणातील मच्छीमारांसाठी ही दिलासादायक बाब ठरली आहे. पुढील पाच वर्षांत मत्स्योत्पादन व मत्स्यव्यवसायात आमूलाग्र बदल घडून येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. मासे पकडण्यापासून विक्रीपर्यंत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून संपूर्ण साखळी मजबूत केली जाणार आहे. देशभरातील ५०० जलाशयांच्या एकात्मिक विकासातून कोकणातील जलाशयांना लाभ होणार असून, मत्स्यपालन, साठवणूक व विक्रीसाठी स्टार्टअप्स आणि महिला बचत गटांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. कोल्ड स्टोरेज, मासे उतरविण्याची केंद्रे आणि प्रक्रिया क्लस्टर उभारण्यावर भर देण्यात आल्याने कोकणातील मच्छीमारांचा दीर्घकालीन प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. कोकणात मोठ्या प्रमाणात मिळणाऱ्या कोळंबी आणि इतर सीफुडवर प्रक्रिया करण्यासाठी विशेष क्लस्टर विकसित केले जातील, तसेच श्रीम फीड (चीन फिड)वरील आयता शुल्कात सवलत कायम ठेवल्याने उत्पादनाचा खर्च कमी होण्यासाठी मदतहोणार आहे.काजू, नारळ बागायतदारांना दिलासा :काजू उत्पादकांसाठी विशेष तरतुदी करण्यात आलेल्या असून, यासाठी १० हजार कोटींचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. कोकणात काजूवर प्रक्रिया करण्यासाठी छोटे आणि मध्यम प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी ५० टक्क्यांपर्यंत सबसिडी जाहीर करण्यात आली. आफ्रिकन देशांतून कच्च्या काजूवरील आयात शुल्काची पुनर्रचना करण्यात येणार आहे, जेणेकरून स्थानिक कोकणी काजूला बाजारात जास्त किंमत मिळेल. वेंगुर्लासारख्या संशोधन केंद्रांना अधिक निधी देऊन काजूचे अधिक उत्पादन देणाऱ्या नवीन जाती विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे. नारळापासून केवळ खोबरेच नव्हे, तर नीरा, व्हिनेगर आणि कोकोपिट यासारखी उप-उत्पादने तयार करणाऱ्या उद्योगांना आर्थिक मदत दिली जाणार आहे, तसेच कमी उत्पादन देणाऱ्या नवीन जाती विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे.
BJP Pune Mayor: पुणे महापौर पदासाठी भाजपकडून उमेदवार निश्चित
पुणे: पुणे महापालिकेच्या महापौरपदाबाबतची उत्सुकात शिगेला पोहोचली आहे. त्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर आज म्हणजेच मंगळवार ३ फेब्रुवारी रोजी भाजप पक्षाकडून महापाैर पदासाठीच्या उमेदवारांची नावं जाहीर होणार आहेत.भाजपाकडून तीन नावे अंतिम :पुणे महापालिकेचे महापाैरपद पदरात पाडून घेण्यासाठी मोठी रस्सीखेच सुरू असल्याचे बघायला मिळत आहे. अशातच आज भाजपाकडून तीन नावे अंतिम अर्ज भरण्यापूर्वी जाहीर करण्यात येणार आहेत. पुणे महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी भाजपच्या प्रदेशाध्यक्षांसह वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत तीन नावे निश्चित करण्यात आली. आज महापौर पदासाठी अर्ज दाखल करण्यापूर्वीच भाजपाकडून अंतिम नाव जाहीर होण्याची शक्यता आहे.भाजपचा ११९ जागांवर विजय :भाजपाने ११९ जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे पालिकेत भाजपाचाच महापौर होणार आहे हे निश्चित झालं आहे. सर्वसाधारण महिला गटासाठी महापौर पदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर भाजपामधील सर्वसाधारण गटातील इच्छुक महिला नगरसेवकांकडून जोरदार मोर्चा बांधणी सुरू झाली होती. आज महापौर व उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत.
कोट्यवधींचा शिक्षण कर वसूल; शाळा हस्तांतरण मात्र रखडलेलेच
महापालिकेत शिक्षण समिती व सभापती नसण्याची परंपरा कायम राहणारगणेश पाटील विरार : महापालिकेची स्थापना होऊन १६ वर्षांचा प्रदीर्घ कालावधी लोटल्यावरही महापालिकेची एकही शाळा नाही, असे चित्र राज्यातील एकमेव महापालिकेत पाहायला मिळते. ते म्हणजे वसई-विरार येथे. अवघ्या काही तासानंतर या शहराचे नवे महापौर, उपमहापौर निवडले जातील. त्यानंतर काही दिवसातच स्थायी समिती, सभापती, विरोधी पक्षनेता आणि विविध विषय सभापती निवडले जातील. मात्र सामान्य नागरिकांकडून कोट्यवधी रुपयांचा शिक्षण कर वसूल केला जात असताना या महापालिकेची एकही शाळा नसल्याने, यावेळी सुद्धा महापालिकेत ना शिक्षण समिती स्थापन केली जाणार आहे, ना शिक्षण सभापती निवडले जाणार आहेत. त्यामुळे हे वास्तव प्रत्यक्षात कधी बदलणार याकडे करदात्या नागरिकांचे लक्ष लागले आहेवसई-विरार महापालिकेची स्थापना २००९ मध्ये करण्यात आली. मात्र पालिका क्षेत्रात असलेले जिल्हा परिषदेचे ३ प्राथमिक आरोग्य केंद्र, १२ उपकेंद्र आणि ११७ शाळा अद्यापही जिल्हा परिषदेकडेच आहेत. शाळा, आरोग्य केंद्रांच्या सर्व आस्थापना मालमत्तांसह महापालिकेकडे हस्तांतरण करण्याची मागणी अनेक वर्षांपासून करण्यात आली आहे.मात्र शासन स्तरावरून यासंदर्भात ठोस निर्णय घेण्यात येत नव्हता. वसई आणि नालासोपारा या दोन्ही मतदारसंघाच्या आजी माजी आमदारांनी प्रत्येक अधिवेशनात हस्तांतरणाचा मुद्दा लावून धरला. दरम्यान, गेल्यावर्षी पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वसई-विरार पालिकेशी निगडित विषयांबाबत लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची विशेष आढावा सभा घेतली. या बैठकीतच जिल्हा परिषदेच्या ११७ शाळा, ३ प्राथमिक आरोग्य केंद्र व १२ उपकेंद्र पालिकेला हस्तांतर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.त्यानुसार जिल्हा नियोजन समितीमध्ये पालिका क्षेत्रातील आरोग्य केंद्र व उपकेंद्र पालिकेला हस्तांतरित करणे आणि त्यानंतर तेथील मनुष्यबळ घेऊन पालघर जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या ग्रामीण भागात तितकेच प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र स्थलांतरित करण्यास समितीची मंजुरी घेण्यात आली आहे, तर जिल्हा परिषदेच्या ११७ शाळा वसई-विरार महापालिकेला हस्तांतरित करण्यासाठी यापूर्वीच जिल्हा नियोजन समितीची मंजुरी घेण्यात आली आहे. त्यामुळे शाळा आणि आरोग्य केंद्रे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया जिल्हा परिषदेने सुरू केली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी ग्रामविकास विभागाच्या प्रधान सचिवांना या संदर्भातील प्रस्ताव मान्यतेसाठी सादर केला आहे.वसई-विरार महापालिका क्षेत्रातील ११७ शाळा तसेच सोपारा, निर्मळ आणि चंदरसार येथील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि नायगाव, सांडोर, उमेळा, निर्मळ, चंदनसार, पेल्हार, बोळींज, चिखलडोंगरी, गोखिवरे, ज्यूचंद्र, सातिवली आणि वालीव ही १२ आरोग्य उपकेंद्र विनामूल्य वसई-विरार महापालिकेला हस्तांतरित करण्यासाठी ग्रामविकास विभागाच्या प्रधान सचिवांकडून मान्यता मागण्यात आली आहे.शाळा, आरोग्य केंद्रांच्या जमीन, मालमत्तांचे मूल्य १५० कोटीग्रामविकास विभागाच्या २० जुलै १९९९ च्या शासन परिपत्रकानुसार जिल्हा परिषद मालकीच्या जमीन किंवा इमारती नगर परिषद , नगरपालिका किंवा महापालिकेला हस्तांतरित करायच्या असल्यास त्या मालमत्तांचे मूल्य ठरवून ते संबंधित यंत्रणेकडून वसूल करावे असा नियम आहे. जिल्हा परिषदेने ११७ शाळा, व १५ आरोग्य केंद्रांच्या मालमत्ताचे मूल्यांकन काढले असता अंदाजित १५० कोटी रुपये निघाले आहे. त्यामुळे १५० कोटी रुपये वसई-विरार महापालिकेकडून मिळाल्यानंतरच शाळा व आरोग्य केंद्रांच्या हस्तांतरण पालिकेला करण्याची भूमिका जिल्हा परिषद प्रशासनाने घेतली होती. मात्र १६ जुलै २०२५ रोजी मुख्यमंत्र्यांचे अध्यक्षतेखाली पावसाळी अधिवेशना दरम्यान मंत्रालयात झालेल्या बैठकीत सदर सर्व मालमत्ता व जमीन महापालिकेला विनामूल्य देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ग्रामविकास विभागाच्या प्रधान सचिवांना याबाबत मान्यता देण्यासाठी प्रस्ताव सादर केला आहे. ‘ॲक्शन प्लॅन’ तयार करण्यासाठी आमदार नाईक यांचा पुढाकार : मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतरही शाळा हस्तांतरणाबाबत पालिकेकडून योग्य कारवाई होत नसल्याने, आमदार राजन नाईक यांनी ९ सप्टेंबर २०२५ रोजी पालिका आयुक्तांना पत्र दिले. तसेच मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीचे इतिवृत्त आयुक्तांना देऊन, शाळा हस्तांतरणासाठी त्वरित ॲक्शन प्लॅन तयार करण्याच्या सूचना नाईक यांनी पालिका आयुक्तांना केल्या आहेत. शिक्षकांसाठी ८० टक्के अनुदान आणि जिल्हा परिषदेच्या शाळा पालिकेला विनामूल्य हस्तांतरण करण्याबाबतचा प्रस्ताव या सह आवश्यक सर्व बाबींचा ॲक्शन प्लॅन तयार करण्याबाबत पालिका आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांनी प्रशासनाला निर्देश दिले आहेत. त्या आनुषंगाने प्रशासनाने संबंधित सर्व माहिती सादर केली आहे.शिक्षण कराच्या नावाखाली कोट्यवधींची वसुली : महापालिका क्षेत्रात राहणाऱ्या कर दात्यांकडून शिक्षण कराच्या नावाखाली दरवर्षी कोट्यवधी रुपये वसूल केले जातात. निवासी मालमत्ताधाराकडून एकूण कर मूल्यांच्या २ ते ६ टक्के आणि वाणिज्यिक मालमत्ताधारकांकडून ४ ते १२ टक्के शिक्षण कर दरवर्षी घेण्यात येतो. आता महापालिकेची तिसरी सार्वत्रिक निवडणूक पार पडली. त्यामुळे किमान येत्या शैक्षणिक वर्षापासून जिल्हा परिषदेकडे शाळा आणि आरोग्य केंद्र महापालिकेच्या ताब्यात असावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. त्याचप्रमाणे महापालिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी शिक्षण समिती आणि शिक्षण सभापती असावेत, अशी मागणी देखील नागरिकांकडून केली गेली आहे.
रस्त्यावर थुंकल्यास, कचरा टाकल्यास होणाऱ्या दंडाच्या रकमेत वाढ
महापालिकेने नव्याने स्वच्छता उपविधी तयारदंडाची रक्कमेची आकारणी २ फेब्रुवारीपासून अमलातमुंबई : मुंबई महानगरपालिकेकडून घनकचरा (व्यवस्थापन आणि हाताळणी), स्वच्छता आणि स्वच्छताविषयक उपविधी - २०२५ जारी करण्यात येत आहे. यामध्ये कचरा निर्माण करणारे घटक, विविध आस्थापना, कचराविषयक सेवा प्रदाता; घनकचरा व्यवस्थापन, साठवणूक, वितरण व प्रक्रिया, आदींबाबत नियमावलींचा समावेश आहे. नागरिक किंवा आस्थापनांनी यासंदर्भातील नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. या अंतर्गत, सार्वजनिक स्थळी थुंकल्यास , कचरा टाकल्यास , ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण न केल्यास तसेच , विनापरवाना राडारोडा वाहतूक केल्यास आकारण्या येणाऱ्या दंडाच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे. याची आकारणी २ फेब्रवारीपासून झाली आहे.मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशांनुसार, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनात, उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर यांच्या देखरेखीखाली मुंबईतील परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी नियमितपणे कार्यवाही केली जाते. यासह वेळोवेळी विशेष स्वच्छता मोहीम आणि उपक्रमांचे आयोजन केले जाते. याच पार्श्वभूमीवर, ही स्वच्छता उपविधी जारी करण्यात येत आहे.मुंबईतील घनकचऱ्याचे प्रभावीपणे व्यवस्थापन करण्यासाठी महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून अविरतपणे प्रयत्न केले जात आहेत. याच अनुषंगाने, मुंबई महानगरात निर्माण होणाऱ्या किंवा आणल्या जाणाऱ्या ओल्या व सुका कचऱ्याचे वर्गीकरण व प्रक्रिया यासंबंधी सर्व बाबींचे नियमन करण्याच्या हेतुने तसेच केंद्र शासनाच्या पर्यावरण, वन व वातावरणीय बदल विभागाने जारी केलेल्या घनकचरा व्यवस्थापन नियम, २०१६ च्या पार्श्वभूमीवर, मुंबईमहानगरपालिकेकडून घनकचरा (व्यवस्थापन आणि हाताळणी), स्वच्छता आणि स्वच्छताविषयक उपविधी -२०२५ जारी करण्यात येत असल्याचे अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी स्पष्ट केले.उपविधीतील नियम कचरा निर्माण करणारे सर्व व्यक्ती, सार्वजनिक व खासगी ठिकाण; निवासी, व्यापारी, वाणिज्यिक, व्यावसायिक, औद्योगिक, शासकीय, निमशासकीय, प्रशासकीय, शैक्षणिक, धार्मिक, मनोरंजनात्मक, सामाजिक तसेच इतर सर्व प्रकारच्या वापराच्या स्थळांसाठी लागू असतील.विविध प्रकारच्या २१ उपविधींबाबत दंडात्मक कारवाई अशी असेल (कंसात दंडाची रक्कम रुपयांमध्ये )रस्ते / गल्ल्या / पदपथ / बाग / सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे ( ५००),थुंकणे ( २५०),खुल्या आणि सार्वजनिक जागांवर आंघोळ ( ३००),लघवी करणे (५००),शौच करणे (५००),मोकळ्या जागी व सार्वजनिक ठिकाणी प्राणी किंवा पक्ष्यांना खाद्य देणे (५००),सार्वजनिक ठिकाणी भांडी / कपडे/ इतर कोणत्याही वस्तू धुणे (३००),वाहन धुणे (५००),अंगण स्वच्छ न ठेवणे (एकाच जागेच्या मालकांसाठी / रहिवाशांसाठी (५००) आणि इतरांसाठी (१५००),कचरा वर्गीकरण न करता व स्वतंत्र डब्यांमध्ये साठवून न ठेवता सुपूर्द केल्यास पहिल्या गुन्ह्यासाठी (वैयक्तिक २०० आणि मोठ्या प्रमाणात कचरा निर्मिती करणाऱ्यांसाठी १०००),अनधिकृत किंवा नियुक्त नसलेल्या ठिकाणी बांधकाम व पाडकाम कचरा अस्ताव्यस्तपणे टाकणे (प्रतिवाहन २०,०००),विनापरवाना बांधकाम व पाडकाम कचऱ्याची वाहतूक करणे (प्रतिवाहन २५,०००),सुका कचरा स्वतंत्रपणे वेगळा करून न देणे (२००),बागेतील कचरा व झाडांची छाटणी निर्दिष्ट केल्याप्रमाणे न करणे (२००),व्यावसायिक कारणांसाठी / मोठ्या प्रमाणात कचरा जाळणे (१०,०००);मासे, कुक्कुटपालन आणि मांसविषयक कचरा स्वतंत्रपणे वर्गीकरण करुन न देणे (७५०),कंटेनर/कचरा टोपली/ कचरापेटी नसलेले विक्रेते /फेरीवाल्यांसाठी (७५०),कचरा स्वतंत्रपणे वर्गीकरण करुन न देणारे विक्रेते/ फेरीवाले (७५०),घरासमोरील गटार (घराचा नाला) स्वच्छ न ठेवणे (५००),पाळीव प्राण्यांनी कचरा पसरवणे/शौच करणे (१०००),सार्वजनिक मेळावा/ कार्यक्रमानंतर ४ तासांच्या आत स्वच्छता न करणे (स्वच्छता ठेव जप्त करणे) या उपविधींचा समावेश आहे.
मुंबई, पुणे आणि नागपूर ही महाराष्ट्राची महत्त्वाची शहरे आणि येथेच सर्वाधिक प्रकल्प येत आहेत. त्यामुळे या केंद्रांना आर्थिक मदत दरवर्षी म्हणजे या केंद्रांची उर्जितावस्था आणून महाराष्ट्राला आणखी उंचीवर नेऊन ठेवण्यासारखे आहे.केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला कर विनियोजनातून राज्याला ९८ हजार ३०६ कोटी रुपये मिळतील असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले, हे यासाठी महत्त्वाचे आहे. कारण आदित्य ठाकरे आणि विरोधी पक्षांनी केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काहीच मिळाले नाही असे रडगाणे लावले. त्याला उत्तर म्हणून फडणवीस यांचे विधान आणि संबंधित आकडेवारी महत्त्वाची आहे. ही रक्कम २०२५-२६ च्या अर्थसंकल्पातून मिळणाऱ्या रकमेपेक्षा २० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. तरीही आदित्य ठाकरे म्हणतात त्यामागे केवळ भाजपचा द्वेष आणि स्वतःला सत्ता मिळाली नाही ही खंत आहे, दुसरे काही नाही. महाराष्ट्राला इतकेच नव्हे, तर पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये जे १२.२ लाख कोटी रुपये गुंतवले जाणार आहेत त्यामध्येही महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे. मुंबई, पुणे आणि नागपूर येथील प्रस्तावित विकासकेंद्रांना पुढील पाच वर्षांत ५ हजार कोटी रुपये मिळणार. मुंबई, पुणे आणि नागपूर हे महाराष्ट्राची महत्त्वाची शहरे आणि येथेच सर्वाधिक आस्थापना आणि विविध प्रकल्प येत आहेत. त्यामुळे या केंद्रांना आर्थिक मदत दरवर्षी म्हणजे या केंद्रांची उर्जितावस्था आणून महाराष्ट्राला आणखी उंचीवर नेऊन ठेवण्यासारखे आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस किंवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे म्हणतात महाराष्ट्राला खूप काही दिले आहे हे सत्य आहे. फडणवीस यानी सांगितले त्याप्रमाणे मुंबई, पुणे आणि हैदराबाद या हायस्पीड कॉरिडॉरमुळे महाराष्ट्राच्या विकासाला तर चालना मिळेलच, पण मराठवाडा आणि इतर जे मागास भाग आहेत त्यांच्या विकासाला हातभार लागणार आहे. हायस्पीड रेल्वेमुळे १७० किमीचा प्रवास अवघ्या ४८ मिनिटांत पूर्ण होणार.काँग्रेस नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अर्थसंकल्पावर टीका करताना म्हटले, की सुधारणांपेक्षा देखाव्याला प्राधान्य दिले. पण विरोधक म्हणून त्यांची टीकेत काही तथ्य नाही. कारण केंद्राने महाराष्ट्राला आणि देशाला भरपूर काही दिले. महाराष्ट्राला केवळ हायस्पीड रेल्वेच नव्हे, तर अर्थसंकल्पीय तरतुदीमुळेही लाभ होणार आहे. त्यातून महाराष्ट्राचा विकास साध्य होईल. उदाहरणार्थ ग्रामीण रस्त्यांसाठी ३७८ कोटी रुपये मिळणार आहेत, तर इकॉनॉमिक क्लस्टरसाठी २८३ कोटी रुपये आणि पाटबंधारे कामांसाठी २०७ कोटी रुपये. नियोजित शहरीकरण आणि उद्योग तसेच उद्योजकतेला प्राधान्य या द्वारे हा अर्थसंकल्प राज्याच्या शाश्वत विकासासाठी पाया मजबूत करत आहे. विरोधी पक्षांनी राज्याला या अर्थसंकल्पातून काय मिळाले असा सवाल केला. पण त्यांच्या माहितीसाठी ही आकडेवारी सांगणे आवश्यक आहे, की ९८ हजार ३०६ कोटी रुपये मिळाले. यातून महाराष्ट्राची वाटचाल आणखी गतिमान होईल यात शंका नाही. विकसित भारत बनवण्याचे जे पंतप्रधान मोदी यांचे लक्ष्य आहे त्या दिशेने जाणारा हा अर्थसंकल्प भक्कम आहे. उद्योगांना प्रोत्साहन आणि गुंतवणूक आणि रोजगार निर्मिती यांना अर्थसंकल्पात देण्यात आलेले महत्त्व हे शाश्वत वाढीसाठी ठोस पाया आहे. पायाभूत क्षेत्रासाठी १२ लाख कोटी रुपयांची तरतूद ही महाराष्ट्राला मिळालेली भेट. त्याशिवाय कृषी, मत्स्य उत्पादनासाठी ५०० तलाव आणि पशुसंवर्धन यासाठी भरीव तरतुदी यामुळे ग्रामीण महाराष्ट्राचे चित्र नक्कीच पालटेल. एकूण महाराष्ट्राला या अर्थसंकल्पातून एक लाख कोटी रुपयांचा लाभ मिळणार आणि यामुळे विरोधकांचे विशेषतः आदित्य ठाकरे यांचे म्हणणे आहे, की महाराष्ट्राला काही मिळाले नाही ते असत्य आहे आणि विरोधक डोके शहामृगासारखे वाळूत खूपसून बसत आहेत असे दिसते. महाराष्ट्रावर टीका होत आहे. कारण महाराष्ट्र राष्ट्रीय खजिन्यात जास्तीत जास्त भर टाकतो आणि तरीही त्याकडे दुर्लक्ष केले जाते ही टीका सर्वथा गैरलागू आहे. शेतकऱ्यांना पुरेसा पाठिंबा नाही अशी टीका होते, पण अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी नारळ, काजू आणि इतर पीक उत्पादक शेतकऱ्यांसाठी बरेच काही आहे. शेतकऱ्यांसाठी काही नाही असे म्हटले तर मत्स्य तलाव, इतर पिकांसाठी अनुदान वगैरे तरतुदी आहे. हा अर्थसंकल्प पूर्ण महाराष्ट्रविरोधी आहे ही उबाठाच्या खासदाराने केलेली टीका ही अत्यंत चुकीची म्हणून विचारात न घेण्याजोगी आहे.विदर्भ आणि मराठवाड्याला अर्थसंकल्पात झुकते माप देण्यात आले नसले तरीही त्या भागाचा कायापालट व्हावा अशी हायस्पीड योजना दिली, पण सर्वात कहर म्हणजे एमएसएमई क्षेत्राला प्रचंड तरतूद करूनही विरोधक त्या क्षेत्राला काही नाही म्हणून बोंब ठोकत आहेत, ही बाब निश्चितच लांच्छनास्पद आहे. खरे तर हा अर्थसंकल्प विकसित भारताकडे पाऊल टाकणारा दमदार अर्थसंकल्प आहे असे फडणवीस म्हणाले. पण विरोधक म्हणतात ते खरे मानले तरीही या अर्थसंकल्पात १२ लाख कोटींची गुंतवणूक शेती, पशुपालन आणि मत्स्य शेती या क्षेत्रांत होणार आहे हे सत्य आहे. हे कसे नाकारता येईल. औद्योगिक सवलतींमुळे मराठवाडा आणि विदर्भ यांसारखे भाग विकासाच्या मार्गावर चालणार. ग्रोथ हबसाठी ५ हजार कोटी रुपये आणि प्रत्येक पाच वर्षांत ही योजना ही अत्यंत महत्त्वाची आहे. हा अर्थसंकल्प शेती आणि ग्रामीण विकासाला सर्वात महत्त्व देणारा आहे. जेथे ५९ टक्के ग्रामीण रोजगार आणि ४० टक्के सकल मूल्यवर्धित शेतीतून येते, तेथे कोणतेही सरकार शेतीकडे दुर्लक्ष करू शकणार नाही. देशांतर्गत आकडेवारीशिवाय महाराष्ट्राची आकडेवारीही अर्थसंकल्पात महाराष्ट्राला खूप काही देऊन गेली. काही अभ्यासकांचे आक्षेप बरोबर आहेत. एक म्हणजे शेतीसाठी त्यातल्या त्यात कमी तरतुदी आहेत आणि घर बांधणीसाठी फारसे काही मिळालेले नाही. करव्यवस्था जुनीच ठेवली. पण त्यापेक्षा महाराष्ट्राला काहीच मिळाले नाही हा आक्षेप बरोबर नाही. महाराष्ट्राला अर्थसंकल्पाने बरेच काही दिले.
दक्षिण महाराष्ट्रातील वस्त्रोद्योगाला पुन्हा उभारीचे स्वप्न
अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वस्त्रोद्योग क्षेत्राच्या आधुनिकीकरणावर आणि जागतिक स्पर्धेत भारताला पुढे नेण्यासाठी विविध योजना जाहीर केल्या. या योजनांच्या माध्यमातून उत्पादन क्षमता वाढवणे, रोजगार निर्मिती करणे आणि निर्यातीला चालना देण्यावर भर देण्यात आला आहे. महात्मा गांधी ग्राम स्वराज योजनेअंतर्गत खादी, हातमाग आणि हस्तकला क्षेत्राला विशेष प्रोत्साहन देण्याची घोषणा केली. या निर्णयामुळे भारतीय पारंपरिक उत्पादनांना जागतिक बाजारपेठेत प्रवेश सुलभ होणार असून, ग्रामीण भागातील कारागिरांना मोठा फायदा होणार.वार्तापत्र दक्षिण महाराष्ट्रगतवर्षीच्या तुलनेत जवळपास दुप्पट म्हणजेच १० हजार कोटी रुपयांची आर्थिक तरतूद, पाच टप्प्यांतील (५ एफ) एकात्मिक कार्यक्रम, हातमाग-हस्तकला प्रोत्साहन, राष्ट्रीय धागा धोरण, टेक्स्ट-इको युनिव्हर्सिटी आणि शाश्वत वस्त्रोद्योगासाठी नव्या योजना अशा महत्त्वाच्या घोषणांमुळे यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पाचे दक्षिण महाराष्ट्रातील वस्त्रोद्योग क्षेत्रातून स्वागत होत आहे. अमेरिकेच्या कर धोरणांमुळे अडचणीत सापडलेल्या भारतीय वस्त्रोद्योगाला या उपाययोजनांमुळे नवी दिशा मिळेल आणि निर्यातीचे दालन अधिक खुले होईल, अशी अपेक्षा उद्योगजगताकडून व्यक्त केली जात आहे. कोल्हापूर सांगली सोलापूर जिल्ह्यामध्ये वस्त्रोद्योगाचे केंद्राच्या धोरणावर अवलंबून असणारे भवितव्य त्याच्या अर्थसंकल्पाने थोडे उजळ दिसू लागले आहे. अमेरिकेच्या टॅरीफ धोरणाबरोबरच अनेक स्थानिक मुद्द्यांमुळे सुद्धा या व्यवसायाला घरघर लागली आहे. इथल्या उद्योजक व्यावसायिक कामगार आणि इतर घटकांनीच केवळ विचार करून या क्षेत्राचे भले होणार नव्हते. पण, याबाबत अधिकची पावले तोपर्यंत त्याला भवितव्य दिसत नव्हते. देशातील वस्त्रोद्योग हा जागतिक बाजारपेठेतील चढ-उतार, कच्च्या मालाच्या किमती, आंतरराष्ट्रीय व्यापार धोरणे आणि देशांतर्गत खर्चवाढ अशा अनेक कारणांमुळे दबावाखाली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी मागणी गेल्या काही महिन्यांपासून विविध वस्त्रोद्योग संघटनांनी लावून धरली होती. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात या मागण्यांची दखल घेतल्याचे स्पष्ट दिसते. मागील वर्षी सुमारे साडेपाच हजार कोटींची तरतूद असताना यंदा ती थेट १० हजार कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. यामुळे रोजगारनिर्मिती, निर्यातवाढ आणि उद्योगातील गुंतवणूक वाढीस चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.वस्त्रोद्योगात गुंतवणूक वाढावी आणि संपूर्ण मूल्यसाखळी सक्षम व्हावी यासाठी ‘५ एफ’ धोरण जाहीर करण्यात आले आहे. कापूस ते धागा, धागा ते कारखाना, कारखाना ते फॅशन, फॅशन ते विदेश आणि विदेशातील बाजारपेठ असा हा पाच टप्प्यांचा एकात्मिक कार्यक्रम आहे. कृषी उत्पादनापासून थेट आंतरराष्ट्रीय विक्रीपर्यंतची साखळी मजबूत करण्याचे उद्दिष्ट या धोरणामागे आहे. दक्षिण महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकरी, सूतगिरण्या, यंत्रमाग, प्रोसेसिंग युनिट्स आणि रेडिमेड वस्त्र उद्योगाला याचा थेट फायदा होण्याची शक्यता आहे. रेशीम, लोकर, ताग, मानवनिर्मित तंतू आणि नव्या काळातील आधुनिक तंतू या सर्वांमध्ये स्वावलंबन साधण्यासाठी ‘राष्ट्रीय धागा योजना’ जाहीर करण्यात आली आहे. यासोबतच मेगा टेक्स्टाईल पार्क स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला असून त्यामुळे आधुनिक पायाभूत सुविधा, मोठी गुंतवणूक आणि रोजगारनिर्मितीला चालना मिळेल. ग्रामीण भागात खोलवर रुजलेल्या राष्ट्रीय हातमाग व हस्तकला क्षेत्राला महात्मा गांधी ग्राम स्वराज्य उपक्रमाच्या एकात्मिक प्रणालीत समाविष्ट करण्याचा निर्णय घेतल्याने विणकर व कारागिरांना मोठा दिलासा मिळणार आहे. जागतिक स्तरावर स्पर्धात्मक व शाश्वत वस्त्रनिर्मितीसाठी ‘टेक्स-इको इनिशिएटिव्ह’ सुरू करण्याची घोषणा हीदेखील भविष्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. वस्त्रोद्योग विस्तार व रोजगार योजनेअंतर्गत क्लस्टर आधुनिकीकरण, तंत्रज्ञान सुधारणा आणि सामायिक चाचणी सुविधा उभारल्यास उत्पादनक्षमता वाढून मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होईल, असे मत राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांनी व्यक्त केले आहे. मात्र, त्याचबरोबर विकेंद्रित यंत्रमाग, सूतगिरण्या, सायझिंग, प्रोसेसिंग युनिट्स आणि गारमेंट हाऊस यांच्यासाठी स्वतंत्र व लक्ष केंद्रीत धोरणाची गरज असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. दक्षिण महाराष्ट्रात ही विकेंद्रित यंत्रणा मोठ्या प्रमाणात असल्याने त्याकडे दुर्लक्ष होता कामा नये, असे उद्योगतज्ज्ञांचे म्हणणे आहे. वस्त्रोद्योगासाठी जाहीर करण्यात आलेल्या पंचसूत्री कार्यक्रमामुळे उद्योगवाढीला आणि निर्यातीला नवी गती मिळेल, असा विश्वास इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.विस्तार योजना आणि तंत्रज्ञान सुधारणा यामुळे उद्योजकांना आधुनिकीकरणाच्या मार्गावर नेण्यास मदत होणार असल्याने अर्थसंकल्पाचे स्वागत केले जात आहे. एकूणच, कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली, सोलापूर आदी दक्षिण महाराष्ट्रातील वस्त्रोद्योग केंद्रांना या अर्थसंकल्पातून पुन्हा उभारी मिळण्याचे स्वप्न दिसू लागले आहे. योग्य अंमलबजावणी आणि विकेंद्रित क्षेत्रालाही समान न्याय मिळाल्यास हा परिसर पुन्हा एकदा देशातील वस्त्रोद्योगाचा कणा ठरेल, अशी आशा व्यक्त होत आहे. दक्षिण महाराष्ट्राला मुंबई-पुणे, पुणे-हैदराबाद हाय-स्पीड रेल्वे, शहर आर्थिक क्षेत्र, १ लाख कोटी शहरी आव्हान निधी, एमएसएमई प्रोत्साहन, गिग वर्कर्स सुरक्षा अशा प्रकारे लाभ मिळेल.या भागातील अनेक गाव आणि शहरांचा समावेश होत आहे. लक्षात घेता दक्षिण महाराष्ट्राला अधिक वेगवान बनवणारे ठरत आहेत. गोव्याला आणि कोकणाला आयआयटी विस्तार, वैद्यकीय पर्यटन, नारळ योजना, मत्स्यव्यवसाय प्रोत्साहन. बेळगावला कृषी योजना, रेल्वे प्रकल्प. कोकण व पश्चिम महाराष्ट्राला बंदर जोडणी, काजू-कोको योजना, जलमार्ग विकास यांचा फायदा होईल आणि त्याचा प्रभाव दक्षिण महाराष्ट्रावर आपोआप पडेल. एकूणच या भागात पायाभूत सुविधा, रोजगार, कृषी वृद्धीला चालना मिळेल.- प्रतिनिधी
भिवंडीत श्वानदंश झालेल्या मुलाचा मृत्यू
भिवंडी : श्वानदंश झालेल्या १२ वर्षीय हमीद खान याचा उपचारादरम्यान मृत्यूची घटना भिवंडीत घडली आहे. १० जानेवारीला ईदगाह परिसरात खेळताना श्वानाने हल्ला करून जखमी केले होते. रेबिजची लस देण्यात आली होती. ३१ जानेवारीला उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयात दाखल केले. २८ जानेवारी रोजी पुन्हा दाखल करण्यात आले आणि कस्तुरबा रुग्णालयात पाठवण्यात आले. आमदार रईस शेख यांनी प्रशासनावर गंभीर आरोप करत, वेळेत व योग्य उपचार न झाल्यामुळे मुलाचा जीव गेल्याचा दावा करत दोषींवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. रुग्णालय प्रशासनाने हमीदला रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला देण्यात आला होता; मात्र कुटुंबीयांनी त्याला घरी नेले. नंतर उशिरा तो गंभीर अवस्थेत परत आला. उपचार करण्यात आले, त्याचा मृत्यू झाला, असे रुग्णालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
अलिबाग पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेना-शेकाप लढत
१४ जागांसाठी ४२ उमेदवार रिंगणातअलिबाग : अलिबाग पंचायत समिती निवडणुकीसाठी १४ जागांसाठी ४२ उमेदवार रिंगणात आहेत. २०१७ साली झालेल्या निवडणुकीत शेकापने अलिबाग पंचायत समितीवर वर्चस्व ठेवले होते. २०२६ च्या अलिबाग पंचायत समिती निवडणुकीत शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार) यांची युती झाली नसल्याने ते वेगवेगळे लढत आहेत. अनेक गणातून तिन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकलेले असले, तरी अलिबाग पंचायत समितीची खरी लढत ही शिवसेना आणि शेकाप या दोन पक्षात होणार आहे. त्यामुळे अलिबाग पंचायत समिती शेकाप राखणार की शिवसेना खेचून आणणार, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.अलिबाग पंचायत समितीच्या १४ गणांसाठी निवडणूक होत आहे. महायुती घटक पक्ष हे वेगवेगळे लढत आहेत. शेकाप, उबाठा आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष महाविकास आघाडीतून लढत आहेत. शिवसेनेने १४, शेकाप १३, भाजप ८, राष्ट्रवादी (अजित पवार) २, उबाठा गट १, काँग्रेसने १ जागेवर उमेदवार उभे केले आहेत. तीन अपक्षही निवडणूक रिंगणात उतरले आहेत. १४ जागांसाठी ४२ उमेदवार निवडणूक लढवत आहेत.वैजाळी, शहापूर, आंबेपूर, रुईशेत भोमोली, आवास, किहीम, थळ, वरसोली, चेंढरे, आक्षी, रेवदंडा, चौल, कावीर आणि रामराज असे १४ पंचायत समिती गण आहेत. अलिबाग पंचायत समितीवर झेंडा फडकविण्यासाठी सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी केली आहे. उमेदवारांच्या गणांत जोरदार प्रचार सुरू आहे. प्रत्यक्ष मतदार भेटीवर उमेदवारांचा जोर आहे. जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या प्रियदर्शनी पाटील यंदा चेंढरे गणातून भाजपतर्फे लढत आहेत, तर इतर उमेदवार हे नवखे आहेत. महेश गुरव हे २०१७ मध्ये आक्षी गणातून पराभूत झाले होते. ते पुन्हा तेथून उबाठा गटाकडून रिंगणात उतरले आहेत. रेवदंडा गणातून २०१७ साली विजयी झालेले भाजपचे उदय काठे यंदाही निवडणुकीला सामोरे जात आहेत.अलिबाग पंचायत समिती गणांमध्ये आरपारची लढाई : वैजाळी - शिवसेना राष्ट्रवादी (अजित पवार) भाजप शेकाप. शहापूर - शिवसेना राष्ट्रवादी (अजित पवार) भाजप शेकाप. आक्षी - शिवसेना राष्ट्रवादी (अजित पवार) भाजप शेकाप. आंबेपूर - भाजप शिवसेना शेकाप. रुईशेत - भोमोली - भाजप शिवसेना शेकाप. चेंढरे – शिवसेना भाजप शेकाप. रेवदंडा - भाजप शिवसेना शेकाप चौल - भाजप शिवसेना शेकाप. कावीर - भाजप शिवसेना शेकाप. आवास - शिवसेना शेकाप किहीम - शिवसेना शेकाप थळ - शिवसेना शेकाप वरसोली - शिवसेना शेकाप रामराज - शिवसेना शेकापनिवडणुकीतील पक्षीय बलाबल : शिवसेना – १४ शेकाप -१३ भाजप - ८ अपक्ष – ३ राष्ट्रवादी (अजित पवार गट) – ३ उबाठा – १ कॉग्रेस - १
रायगड जिल्हा परिषद निवडणुकीत नव्या चेहऱ्यांची कसोटी
१४ माजी सदस्य रिंगणात; ५९ जागांसाठी रंगतदार लढाई अलिबाग : उमेदवारी अर्ज माघारीनंतर रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. जिल्हा परिषदेच्या ५९ जागांसाठी रंगतदार लढाई होत असून, २०१७ साली झालेली निवडणूक लढवून विजयी झालेले १४ सदस्य यंदा पुन्हा निवडणुकीला सामोरे जात आहेत. मागच्यावेळी पती निवडून आलेल्या तीन जागांवर पत्नी निवडणूक लढत असून, पत्नी निवडून आलेल्या सहा जागांवर यंदा पती निवडणूक लढवत आहेत.रायगड जिल्हा परिषदेच्या २०१७ साली विजयी झालेल्या सात सदस्यांनी यंदा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे. त्यामुळे उर्वरित माजी सदस्यांना मतदार पुन्हा संधी देणार का, याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. रायगड जिल्हा परिषदेची निवडणूक जाहीर झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे मतदान व मतमोजणी तारीख बदलेली असून, मतदान व मतमोजणी दोन दिवस पुढे गेली आहे. ७ फेब्रुवारीला मतदान, तर ९ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे दोन दिवस उमेदवारांना प्रचारासाठी अधिकचे मिळाले आहेत. जिल्ह्यात सोयीनुसार युती, आघाडी करण्यात आलेली असून, रायगड जिल्हा परिषदेवर झेंडा फडकविण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसल्याने जिल्हा परिषदेवर कोण आपले वर्चस्व प्रस्तापित करणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.रायगड जिल्हा परिषद २०१७ च्या निवडणुकीत शेकापचे २३, शिवसेना १८, राष्ट्रवादी काँग्रेस १२, भाजप आणि काँग्रेस प्रत्येकी ३ असे ५९ सदस्य निवडून गेले होते. मात्र नऊ वर्षांत राजकीय परिस्थिती बदललेली आहे. ‘शेकाप’चे आलेले २३ सदस्य हे सध्या इतर पक्षात गेल्याने शेकापला नव्या चेहऱ्यांना संधी द्यावी लागली आहे. या नवतरुण उमेदवारांना मतदार स्वीकारतात का हे मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे. मागच्यावेळी निवडून आलेले सुधाकर घारे, मोतीराम ठोंबरे, नरेश पाटील, रवींद्र देशमुख, सुरेश खैरे, आस्वाद पाटील, बबन मनवे हे यंदाच्या निवडणुकीपासून लांब राहिले आहेत. यंदाच्या निवडणुकीत मागच्यावेळी निवडून आलेले १४ जण पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात नशीब अजमावत आहेत. त्यामुळे मतदार त्यांना पुन्हा संधी देणार का, हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे.मागील निवडणुकीतील पक्षीय बलाबलशेकाप - २३शिवसेना – १८राष्ट्रवादी काँग्रेस – १२भाजप - ३काँग्रेस - ३माजी सदस्य पुन्हा आजमावणार नशीबनारायण डामसे, नीलिमा पाटील, प्रभाकर म्हात्रे, रिना घरत, सुश्रूता पाटील, चित्रा पाटील, दिलीप भोईर, मानसी दळवी, सुरेंद्र म्हात्रे, राजश्री मिसाळ, किशोर जैन, गीता जाधव, स्वाती नवगणे, चंद्रकांत कळंबे हे पुन्हा नशीब आजमावत आहेत.
Ajit Pawar : अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर त्यांची ओळख घड्याळावरून पटली असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, पोलीस तपासात मोठी माहिती समोर आली आहे.
मनसेच्या अनेक उमेदवारांचा उबाठामुळे पराभव?
राज ठाकरेंसमोर मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून 'उबाठा'बाबत तक्रारींचा पाढामुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर मनसेच्या अंतर्गत असंतोषाला उघडपणे वाट मोकळी करून देणारी महत्त्वाची बैठक सोमवारी वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये पार पडली. या बैठकीत पराभूत उमेदवार आणि वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासमोर ‘उबाठा’ गटाबाबतच्या तक्रारी मांडत, अपेक्षित सहकार्य न मिळाल्याचा आरोप केला.बैठकीत उपस्थित उमेदवारांनी सांगितले की, मुंबईतील अनेक वॉर्डांमध्ये उबाठा गटाची मते मनसेकडे वळली नाहीत. निवडणुकीदरम्यान उबाठा गटाने प्रत्यक्ष प्रचारात सक्रिय सहभाग न घेतल्यामुळे मनसेच्या उमेदवारांचा पराभव झाल्याचा दावा करण्यात आला. अनेक मतदारसंघांमध्ये मनसेचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर राहिले असून, थोड्या फरकाने विजय हुकल्याची खंत पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. त्यावर राज ठाकरे यांनी उमेदवारांनाच सवाल करत, युती असली तरी स्थानिक पातळीवर तुमची स्वतःची तयारी किती होती, असा थेट प्रश्न उपस्थित केला. केवळ युतीवर अवलंबून राहून निवडणूक जिंकता येत नाही, असेही ते म्हणाल्याचे समजते.बैठकीत मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनीही आपली भूमिका मांडली. जागावाटपाच्या वेळी मनसेला ताकदीचे वॉर्ड मिळाले नसल्याचा परिणाम निकालांवर झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ज्या वॉर्डांमध्ये मनसेची पकड भक्कम होती, त्या वॉर्डांऐवजी तुलनेने कमजोर मतदारसंघ देण्यात आल्यामुळे उमेदवारांना मोठा संघर्ष करावा लागल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.माध्यमांशी बोलणे टाळले : बैठकीनंतर राज ठाकरे यांनी माध्यमांशी बोलणे टाळले. मात्र, मुंबईत मनसे भाजपसोबत जाणार नाही, एवढे स्पष्ट करत ते निघून गेले. तर, मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही बैठक पूर्णतः अंतर्गत असल्याचे सांगितले. बैठकीतील चर्चेचा तपशील कॅमेऱ्यासमोर सांगता येणार नाही, असे म्हणत त्यांनी उबाठा गटाबाबत प्रतिक्रिया देणे टाळले.
वाहन पार्किंगमुळे अग्निशमन वाहनांना होतो अडथळा
अनधिकृत वाहने उभी करणाऱ्यांविरोधात होणार एफआयआरमुंबई : मुंबईतील नागरिकांच्या जीवित संरक्षणाची जबाबदारी पार पाडणाऱ्या, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई अग्निशमन दलाच्या बचाव कार्यात अनधिकृत वाहन पार्किंगमुळे अडथळे निर्माण होत असल्याचे वारंवार निदर्शनास येत आहे. या पार्श्वभूमीवर, आगीच्या किंवा आपत्तीच्या घटनास्थळी शीघ्र प्रतिसाद देण्यात अडथळा निर्माण झाल्यास संबंधित वाहनमालकांवर पोलिस स्थानकात थेट प्रथम खबरी अहवाल अर्थात एफआयआर (फर्स्ट इन्फर्मेशन रिपोर्ट) नोंदविण्यात येणार आहेत.मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ.अश्विनी जोशी यांनी संबंधित कारवाईबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत. याबाबत महानगरपालिका आयुक्तांच्या दालनात झालेल्या चर्चेनंतर हे निर्देश देण्यात आले आहेत. या संदर्भात महानगरपालिका प्रशासनाकडून आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.मुंबई महानगरपालिकेचे मुंबई अग्निशमन दल हे मुंबईतील नागरिकांसह, प्राणी, पक्ष्यांच्या जीविताचे तसेच वित्ताचे आगीच्या दुर्घटना तसेच अन्य नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीपासून संरक्षण करण्याचे कर्तव्य बजावत असते. मात्र, हे काम करत असताना मागील काही वर्षापासून असे अनुभवास येत आहे की, मुंबई महानगरात रस्त्यांच्या कडेला नागरिकांद्वारे अनेक प्रकारची वाहने अनधिकृतरित्या उभी (पार्क) केलेली असतात. अशाप्रकारच्या वाहनांमुळे प्रत्यक्ष दुर्घटनास्थळी शीघ्र प्रतिसाद देण्यास किंवा पोहोचण्यासाठी येणाऱ्या अडथळ्यांमुळे अग्निशमन व विमोचनाचे कार्य करतांना अनेक अडचणी येतात व ते कार्य प्रभावीपणे राबविता न आल्याने जीवित व वित्त हानीचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढू शकते. ही बाब अतिशय गंभीर आहे.मुंबईतील अनेक रस्त्यांच्या कडेला नागरिकांकडून अनधिकृतरित्या वाहने उभी (पार्क) केली जातात. जेव्हा एखादा आपत्तीप्रसंग उद्भवतो तेव्हा मुंबई अग्निशमन दलाच्या वाहनांना घटनास्थळी वेळेत पोहोचणे अथवा प्रत्यक्ष कार्यवाही करताना अडचणी येतात. परिणामी जीवित व वित्तहानीचे प्रमाण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे.याप्रकाराची मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी प्रखरतेने गंभीर दखल घेतली आहे. आगीच्या किंवा आपत्तीच्या ठिकाणी जीवितहानी, वित्तहानी अथवा जखमींचे प्रमाण लक्षणीय असेल आणि अनधिकृतरित्या उभ्या (पार्क) केलेल्या वाहनांमुळे अग्निशमन व विमोचन कार्यात विलंब झाल्याचे आढळून आल्यास, संबंधित अग्निशमन वाहनावरील अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने अग्निशमनाचे कार्य पूर्णपणे संपल्यानंतर बचावकार्यात अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनाचे नोंदणी क्रमांकासह छायाचित्रे काढून वरिष्ठांच्या परवानगीने संबंधित पोलिस ठाण्यात तक्रार प्रथम खबरी अहवाल अर्थात एफआयआर (फर्स्ट इन्फर्मेशन रिपोर्ट) नोंदविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामुळे अनधिकृतरित्या वाहन पार्क करण्यास प्रतिबंध होवून नागरिकांमध्ये जागृती निर्माण होईल व दुर्घटनास्थळी मुंबई अग्निशमन दलास शीघ्र प्रतिसाद देता येईल. मदत कार्यातील विलंब टळेल. तसेच मुंबई अग्निशमन दलास विमोचन कार्य प्रभावीपणे राबविता येईल.तक्रार आल्यास पोलिसांकडे वर्ग करणारमुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेल्या या कारवाईमुळे मुंबईतील नागरिकांकडूनही अनधिकृत पार्किंगबाबत मुंबई अग्निशमन दलाकडे तक्रार येण्याची दाट शक्यता आहे. त्याबाबत मुंबई महानगरपालिका प्रशासनाने कार्यप्रणाली ठरविली आहे. अशाप्रकारच्या अनधिकृत पार्किंगबाबत जर नागरिकांनी तक्रार केली, तर संभाव्य तक्रार संबंधित पोलिस ठाणे, वाहतूक पोलिस विभाग व संबंधित विभाग कार्यालयाकडे योग्य कारवाईसाठी वर्ग करून तक्रारदारास माहिती देण्याचे निर्देशही मुंबई अग्निशमन दलास देण्यात आले आहेत.रवींद्र अंबुलगेकर, प्रमुख अग्निशमन अधिकारी
महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक येत्या ११ फेब्रुवारीला?
मुंबई : मुंबईचा महापौर कोण होणार? महापौरपदाची निवडणूक कधी होणार याबाबत उत्सुकता असताना ही निवडणूक येत्या ११ फेब्रुवारी रोजी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यासाठी येत्या शुक्रवारी उमेदवारी अर्ज सादर करण्याची मुदत असेल.मुंबई महापालिकेच्या भाजप, शिवसेना आणि समाजवादी पक्षांच्या नगरसेवकांची कोकण भवनातील नोंदणी प्रक्रिया सोमवारी पार पडलेली असून पुढील नोंदणीची प्रक्रियाची महापालिका सचिव विभागात पार पडणार आहे. त्यामुळे येत्या मंगळवारी सचिव कार्यालयात नगरसेवकांची उर्वरीत नोंदणीची प्रक्रिया पार पडल्यानंतर मंगळवारी महापौर आणि उपमहापौर निवडणुकीचा कार्यक्रम प्रसिध्दीला दिला जाणार आहे. त्यानुसार निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांना या निवडणुकीचा कार्यक्रम त्यांच्या घरी पाठवला जाणार आहे. त्यामुळे बुधवारी महापौर आणि उपमहापौर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर येत्या ११ फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे. मात्र, आंगणेवाडीच्या जत्रेकरता बहुसंख्य नगरसेवक जात असल्यामुळे जर ११ तारखेला निवडणुकीची तारीख निश्चित झाल्यास येत्या शुक्रवारी ०६ फेब्रुवारी रोजी महापौर आणि उपमहापौर पदाच्या उमेदवारांचे अर्ज सादर करण्याची मुदत असेल. त्यामुळे महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज सादर झाल्यानंतर प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी १५ मिनिटे आधी अर्ज मागे घेण्याची संधी उमेदवाराला दिली जाणार आहे.महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक ही आवाजी पध्दतीने हात उंचावून केली जाणार आहे. या महापौर आणि उपमहापौर पदासाठी पिठासीन अधिकारी म्हणून महापालिका आयुक्त भूषण गगराणी हे कामकाज सांभाळणार आहेत.आंगणेवाडी जत्रेला नगरसेवक मुकणार?महापौर आणि उपमहापौर पदासाठी येत्या ११ फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार असल्याचा कार्यक्रम जाहीर झाल्यास सर्व पक्षांकडून आपल्या नगरसेवकांना मुंबई न सोडण्याचा व्हिप लागू होण्याची शक्यता आहे. परंतु आंगणेवाडीच्या जत्रेला बहुतांशी नगरसेवक जात असल्यामुळे त्यांना या व्हिपमुळे जाता येणार नाही. त्यामुळे या निवडणुकीसाठी जर पक्षाने अशाप्रकारचा व्हिप काढल्यास नवनिर्वाचित नगरसेवकांना आंगणेवाडीच्या जत्रेला मुकावे लागणार असल्याचे बोलले जात आहे.
महाराष्ट्रासाठी रेल्वेची २३ हजार कोटी रुपयांची विक्रमी अर्थसंकल्पीय तरतूद
मुंबई : रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय तरतुदीबाबत सोमवारी माहिती देताना सांगितले की, सन २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी २३ हजार ९२६ कोटी रुपयांची विक्रमी तरतूद करण्यात आली आहे.ही रक्कम २०१४-१५ ते २०१९-२० या काळात महाराष्ट्राला दरवर्षी दिलेल्या सरासरी १,१७१ कोटी रुपयांच्या तरतुदीपेक्षा जवळपास २० पट जास्त आहे. अर्थसंकल्पात सात हाय-स्पीड रेल प्रकल्पांची घोषणा करण्यात आली आहे, त्यापैकी २ नवीन बुलेट ट्रेन कॉरिडॉर महाराष्ट्रात आहेत. मुंबई-पुणे: ४८ मिनिटे, पुणे-हैदराबाद: १ तास ५५ मिनिटे (२ तासांच्या आत) यांचा समावेश आहे.पायाभूत सुविधांमध्ये १ लाख ७० हजार ०५८ कोटी रुपयांची एकूण कामे प्रगतीपथावर आहेत. या मोठ्या गुंतवणुकीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात रेल्वे मार्ग निर्मिती, स्थानकांचा पुनर्विकास आणि सुरक्षा वाढवण्याच्या कामांचा समावेश आहे. अमृत स्टेशन योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील १३२ स्थानकांचा संपूर्ण पुनर्विकासासाठी निवड करण्यात आली आहे.प्रीमियम ट्रेन सेवांच्या संचालनामुळे राज्यातील प्रवासाची कार्यक्षमता नवीन उंचीवर पोहोचली असून वंदे भारत एक्सप्रेस(१२ जोड्या),अमृत भारत एक्सप्रेस(५ जोड्या) यांचा समावेश आहे. महाराष्ट्रामध्ये रेल्वे जाळ्याचा वेगाने विस्तार झाला आहे. सन २०१४ पासून, अंदाजे २,४०० किमी लांबीचे रेल्वे मार्ग बांधण्यात आले आहेत. हे मलेशियाच्या संपूर्ण रेल्वे जाळ्यापेक्षा जास्त आहे.रस्ते सुरक्षा सुधारण्यासाठी १,२२८ उड्डाणपूल आणि भुयारी मार्ग बांधले आहेत. ४९७१ आरकेएम मार्गावर कवच प्रणाली मंजूर आहे, त्यापैकी ५७६ आरकेएमवर ती आधीच कार्यान्वित करण्यात आली आहे आणि ३६१७ आरकेएमचे काम/निविदा प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती वैष्णव यांनी दिली.
Ladki Bahin Yojana : “लाडकी बहिण योजनेला अजितदादांचे नाव द्या”; अमोल मिटकरींची मागणी
Ladki Bahin Yojana : दुसरीकडे, कात्रज दूध संघाला 'अजितदादा पवार' नाव देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
Top 10 news : गरीब शेतकऱ्यांची सरकारकडून कर्जमाफी केली जाणार आहे. शेतकरी कर्जमाफीचा दिलेला शब्द सरकार नक्की पाळेल,
Skincare Tips: तुळशीच्या पानांत दडले आहे सौंदर्याचं रहस्य; ७ दिवसांत कमी होतील मुरुमे आणि डाग
Skincare Tips: स्वच्छ, तेजस्वी आणि निरोगी त्वचा ही सगळ्यांचीच इच्छा असते. मात्र प्रदूषण, ताणतणाव आणि बदलती जीवनशैली यामुळे मुरुम, डाग-धब्बे आणि त्वचेचा निस्तेजपणा वाढतो. अशा वेळी आपण एक घरगुती, स्वस्त आणि सुरक्षित उपाय वापरू शकतो तो म्हणजे तुळस.
Vijay Vadettiwar : काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाबाबत भाष्य करताना मोठा दावा केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
Jay Pawar on Ajit Pawar : ‘डॅड…काश वेळ थांबली असती’; जय पवारांची अजितदादांच्या आठवणीत भावुक पोस्ट
Jay Pawar on Ajit Pawar : अजित दादांचे सुपुत्र जय पवार यांनी सोशल मीडियातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
मेट्रो-२ बी वरील मंडाले-चेंबूर टप्पा एप्रिलपासून सुरू
मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) जाहीर केले आहे की, मेट्रो लाईन २ बी वरील मंडाले-चेंबूर या मार्गावर मेट्रो सेवा एप्रिलपासून सुरू होण्याची शक्यता आहे. यामुळे मुंबईतील पूर्व-पश्चिम मेट्रो कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकले जाणार आहे.सध्या मेट्रो लाईन २ बी वरील सेवा मांडळे-डायमंड गार्डन या टप्प्यापुरती मर्यादित आहे. चेंबूर मेट्रो स्थानकाचा समावेश झाल्यानंतर हा मार्ग वाढवण्यात येणार आहे. मंडाले (मानखुर्द) ते चेंबूर दरम्यान थेट मेट्रो धावणार आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, या टप्प्यासोबतच चेंबूर स्थानक सुरू करता यावे यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, चेंबूर स्थानकाचे सुमारे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित बांधकाम, चाचण्या आणि आवश्यक सुरक्षा प्रमाणपत्र प्रक्रिया एप्रिलपूर्वी पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. सर्व मंजुरी मिळाल्यानंतर या मार्गावर प्रवासी सेवा सुरू केली जाईल.प्रवाशांना लवकरात लवकर दिलासा मिळावा यासाठी मेट्रो लाईन २ बी टप्प्याटप्प्याने सुरू केली जात आहे. तर उर्वरित मार्गांवरील काम सुरूच राहणार आहे. ही मेट्रो लाईन मुंबईच्या पूर्व उपनगरांतील प्रमुख निवासी आणि व्यावसायिक भागांमधील कनेक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणात सुधारेल. तसेच रस्ते वाहतूक आणि उपनगरी रेल्वेवरील ताणही कमी करेल. अधिकाऱ्यांच्या मते, टप्प्याटप्प्याने मेट्रो सुरू करण्याच्या धोरणामुळे, उर्वरित काम सुरू असतानाच नागरिकांना मेट्रो नेटवर्कचा लाभ मिळू शकणार आहे.
मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प येत्या २०ते २३ फेब्रुवारीला?
महापालिका प्रशासनाला नव्या स्थायी समिती अध्यक्षांची प्रतीक्षामुंबई : मुंबई महापालिकेचा सन २०२६-२७चा अर्थसंकल्प यंदा पाच फेब्रुवारी रोजी मांडला जाणार नसून यंदा हा अर्थसंकल्प येत्या २० ते २३ फेब्रुवारी रोजी मांडला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थायी समिती अध्यक्षांची निवड झाल्यानंतर महापालिका आयुक्त डॉ भूषण गगराणी हे नवनियुक्त स्थायी समिती अध्यक्षांना महापालिकेचा अर्थसंकल्प सादर करतील,अशी माहिती मिळत आहे.मुंबई महापालिकेचा सन २०२५-२६चा ७४ हजार ४२७ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प यापूर्वी प्रशासक डॉ भूषण गगराणी यांनी मांडला होता. परंतु आता महापालिका निवडणूक प्रक्रिया पार पडून नगरसेवकांची निवड झाली आहे. त्यामुळे नगरसेवक निवडीची प्रक्रिया पूर्ण झाली असली तरी प्रत्यक्षात महापौरपदाची निवडणूक लांबल्याने स्थायी समिती अध्यक्षांचीही निवड लांबणीवर पडली आहे. त्यामुळे आजवरच्या परंपरेनुसार ५ फेब्रुवारीपूर्वी महापालिकेचा आगामी अर्थसंकल्प सादर होणे आवश्यक असते, त्यानुसार आगामी सन २०२६-२७चा अर्थसंकल्प कुणाला सादर करावा यावरून निर्माण झालेल्या तिढ्यावर महापालिका प्रशासक डॉ भूषण गगराणी यांनी याबाबत अधिनियमांमध्ये कुठेही स्पष्टता नसल्याने स्थायी समिती अध्यक्षांची निवड झाल्यानंतरच अर्थसंकल्प सादर करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यानुसार येत्या ५ फेब्रुवारीपूर्वी महापालिकेचा अर्थसंकल्प सादर केला जाणार नसून स्थायी समिती अध्यक्षांची निवड झाल्यानंतरच म्हणजे येत्या २० ते २३ फेब्रुवारी दरम्यान कधीही अर्थसंकल्प सादर केला जावू शकतो,अशी माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे महापालिकेच्या अर्थसंकल्पाचा आकडा ७४,४२७ कोटी रुपयांपर्यंत असला तरी भविष्यात याचा कितीही काटकसर केली तरी वाढलाच जाण्याची शक्यता आहे. महापालिकेने सुमारे २ लाख ३३ हजार कोटींहून अधिक विकास प्रकल्पांची कामे हाती घेतली आहेत. ही कामे सुरु असून त्यातील काही कामे पूर्णत्वास तर काही प्रगतीपथावर असल्याने यासाठी होणारा खर्च लक्षात घेता या आकार वाढला जाण्याची शक्यता आहे. मात्र, हा खर्च वाढला जाणार असला तरी भविष्यात महसूलाच्या दृष्टीकोनातून अधिक विचार होण्याचीही शक्यता असल्याने महापालिकेच्यावतीने करवाढ आणि दरवाढीचा तसेच अन्य मार्गाने महसूल वाढण्याचा विचार महापालिका प्रशासनाला करावा लागणार असल्याचेही समजते.
मुंबई महापालिकेने अखेर हिंमत दाखवली
मोहमद अली मार्गावरील अनधिकृत फेरीवाल्यांसह पदपथावरील वाढीव बांधकामांवर हातोडामुंबई : मुंबईतील अलेक भागांमधील फेरीवाल्यांसह अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आल्यानंतर हिंमत असेल तर भेंडीबाजार, मोहमद अली रोडवरील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करून दाखवा असे महापालिकेला सुनावणाऱ्या मुंबईकरांना आज महापालिकेने तिथेही कारवाई करून आम्ही मनात आणले तर कुठेही कारवाई करू शकतो हे दाखवून दिले आहे. मुंबई महापालिकेच्या बी विभागाच्यावतीने अत्यंत गजबजलेले व्यापारी रस्ते म्हणून ओळखल्या जाणा-या मोहम्मद अली मार्ग आणि इब्राहिम मर्चंट मार्ग परिसरातील पदपथांवरील अनधिकृत वाढीव बांधकामांवर सोमवारी २ फेब्रुवारी रोजी कारवाई करण्यात आली.मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉ अश्विनी जोशी यांच्या निर्देशानुसार तसेच परिमंडळ एकच्या उपायुक्त पदी नियुक्त झालेल्या चंदा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली बी विभागाच्या सहायक आयुक्त योगेश देसाई यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.मोहम्मद अली मार्ग हा भेंडीबाजार, मशीद बंदर आणि भायखळा परिसराला जोडणारा प्रमुख रस्ता आहे. इब्राहिम मर्चंट मार्ग हा रस्ता नागदेवी आणि मांडवी परिसराच्या जवळ आहे. हे दोन्ही रस्ते व्यापारी दृष्टीने आणि रहदारीच्या दृष्टिने खूप महत्त्वाचे आहेत. या दोन्ही मार्गावरील पदपथांवर अनधिकृत वाढीव बांधकामे आढळून आली होती. तसेच, या परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांनीही दुकाने उभी केल्याचे निदर्शनास आले होते. यामुळे, वाहनचालकांना मार्गक्रमण करण्यास तसेच पादचाऱयांना पदपथांवर चालण्यास अडथळा निर्माण होत होता.याच पार्श्वभूमीवर, मुंबई महानगरपालिकेच्या ‘बी’ प्रशासकीय विभागाकडून निष्कासनाची मोहीम हाती घेण्यात आली. या अंतर्गत, या परिसरातील अनधिकृत फेरीवाले, पदपथांवरील अनधिकृत वाढीव बांधकामांचे निष्कासन करण्यात आले. ७ अनधिकृत दुकाने हटविण्यात आली. तसेच, १२ ओटे, पत्र्याचे लोखंडी शेड, १० बोलार्ड, २ बेवारस वाहनांवर कारवाई करण्यात आली. अतिक्रमण निर्मूलनाची ०४ वाहने, ०२ जेसीबी आणि अन्य संयंत्राच्या सहाय्याने हटवण्यात आले. या कारवाईदरम्यान महानगरपालिकेचे ४० अधिकारी - कर्मचारी यांच्यासह पुरेसा पोलिस बंदोबस्त नेमण्यात आला होता. या कारवाईबद्दल स्थानिक नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. आगामी काळातही अनधिकृत / वाढीव बांधकामांविरोधात नियमितपणे कारवाई सुरूच राहील, असे महानगरपालिका प्रशासनाकडून कळविण्यात येत आहे.
वैभववाडी तालुक्यात उबाठाला खिंडार
मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थित कोकिसरे येथील असंख्या कार्यकर्ते भाजपमध्ये दाखलवैभववाडी : कोकिसरे येथील उबाठाचे पदाधिकारी दत्ताराम गुरव यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत वैभववाडी येथे हा पक्षप्रवेश पार पडला. दत्ताराम गुरव व कार्यकर्त्यांचा प्रवेश उबाठासाठी मोठा धक्का मानला जात आहे. नितेश राणे यांनी सर्व प्रवेश करणाऱ्यांचे भाजपमध्ये स्वागत केले.प्रवेश करणाऱ्यांमध्ये कोकिसरे माजी ग्रामपंचायत सदस्य मोहन पोरलेकर, कुंभारवाडीचे अध्यक्ष सदानंद खेडेकर, माजी ग्रामपंचायत सदस्य अनिता कुडाळकर, दीपक निळेकर, तुकाराम गुरव, सखाराम गुरव, संदीप सावंत, रमेश कुडाळकर, विठोबा कुडाळकर, संतोष कुडाळकर, मंगेश कुडाळकर, प्रकाश कुडाळकर, अनंत पेडकलकर, संजय पेडकलकर, सूर्यकांत खेडेकर, अशोक निळेकर, अनंत खेडेकर, प्रकाश राऊत, नारायण कोरलेकर, सुशांत सांगवेकर, सुरेखा खेडेकर, रोहिणी खेडेकर, वैशाली पेडकलकर, सविता गुरव, चैत्राली गुरव, निकिता कोरलेकर, माधवी पेंडकलकर, शुभांगी कुडाळकर, दिव्या गुरव, अंजनी खेडेकर, वनिता कुडाळकर, शैलेंद्र गायकवाड, शांताराम खेडेकर, संदीप समजिसकर, प्रतिक्षा समजिसकर, रवींद्र कोरलेकर, रेखा पोरलेकर, कृष्णा सावेकर, योगिता सावेकर, वनिता सावेकर, नम्रता खेडेकर, भूपेंद्र लिंगायत व असंख्य कार्यकर्त्यांचा समावेश आहे.वैभववाडी भाजपा कार्यालय समोरील पटांगणावर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नितेश राणे यांची सभा पार पडली. याप्रसंगी हा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी मंडल अध्यक्ष सुधीर नकाशे, दिलीप रावराणे, भालचंद्र साठे, जयेंद्र रावराणे, नासीर काझी, शारदा काबळे, प्राची तावडे व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संगमेश्वर तालुक्यात तीन जि. प. गटांत होणार हायहोल्टेज लढती
साडवली गटात माजी राज्यमंत्री रवींद्र माने यांची प्रतिष्ठा पणालानीलेश जाधव देवरूख : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून या निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. संगमेश्वर तालुक्यातही या निवडणुकांच्या प्रचाराचा धुरळा उडत आहे. तालुक्यातील तीन जि. प. गटांत हायहोल्टेज लढती होणार आहेत. यामध्ये कोसुंब, कसबा आणि साडवली या जि. प. गटात काँटे की टक्कर होणार आहे. साडवली गटात माजी राज्यमंत्री रवींद्र माने व माजी जि. प. अध्यक्षा रश्मी कदम, कोसुंब गटात माजी आमदार सुभाष बने व कसबा गटात शिवसेना शिंदे गटाचे सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.तालुक्यात सात जिल्हा परिषद गट आहेत. यामध्ये साडवली, कोसुंब, कसबा, कडवई, दाभोळे, मुचरी, धामपूरतर्फे संगमेश्वर यांचा समावेश आहे. साडवली गटातून उबाठाच्या नेहा रवींद्र माने व भाजपच्या रूपाली रूपेश कदम, कोसुंब गटातून भाजपचे प्रमोद अधटराव, शिवसेनेचे रोहन सुभाष बने व उबाठाच्या मुग्धा जागुष्टे, कसबा गटातून शिवसेनेच्या रचना राजेंद्र महाडिक व उबाठाच्या विशाखा कुवळेकर, कडवई गटातून भाजपचे विनोद म्हस्के व उबाठाचे संतोष थेराडे, दाभोळे गटातून शिवसेनेचे विलास चाळके व वंचितच्या विरश्री बेटकर, मुचरी गटातून शिवसेनेच्या माधवी गीते, उबाठाच्या ललिता तांबे, धामापूरतर्फे संगमेश्वर गटातून राष्ट्रवादी (अजित पवार गट)चे सुशिल भायजे व उबाठाचे सहदेव द बेटकर यांच्यामध्ये प्रामुख्याने लढत होणार आहे. या सात गटापैकी साडवली, कोसुंब व कसबा या तीन गटांमध्ये हायहोल्टेज लढत होणार आहे. साडवली गटातील उमेदवार नेहा माने या माजी राज्यमंत्री रवींद्र माने यांच्या पत्नी आहेत. तसेच त्या यापूर्वी जि. प. सदस्य म्हणून निवडून आल्या आहेत.
शिवसेनेच्या गटनेतेपदी अमेय घोले
मुंबई : मुंबई महापालिकेत शिवसेनेच्या गटनेतेपदी तरुण आणि अभ्यासू नगरसेवक अमेय घोले यांची निवड करण्यात आली. महापालिका मुख्यालयात पार पडलेल्या बैठकीत अमेय घोले यांचे नाव गटनेतेपदासाठी जाहीर करण्यात आले. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला जे २९ नगरसेवक निवडून येत जे यश लाभले त्यासाठी या बैठकीत ठराव मांडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले. त्यानंतर दुपारी कोंकण आयुक्तांकडे शिवसेनेकडून कायदेशीर बाबींची पूर्तता करून गट नोंदणी करण्यात येणार असल्याचे माजी खासदार राहुल शेवाळे यांनी सांगितले.अमेय घोले हे वडाळा येथील प्रभाग क्रमांक १७८ मधून निवडून आले असून त्यांनी यापूर्वी महापालिका आरोग्य समितीचे अध्यक्षपद भूषवले आहे. तसेच इतर समित्यांचेही सदस्यत्व भूषवलेले आहे. एकेकाळी माजी मंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय होते आणि तत्कालिन शिवसेनेच्या युवा सेनेचे कोअर कमिटीचे ते खजिनदार होते. युवा सेनेच्या जडणघडणीत त्यांचा मोठा हातभार होता. तसेच तरुण आणि अभ्यासू नगरसेवक असल्याने महापालिकेतील त्यांच्या पक्षाची भूमिका ते समर्थपण मांडू शकतील या भावनेने त्यांच्यावर गटनेतेपदाची जबाबदारी सोपवलेली आहे. दरम्यान, शिवसेनेच्या २९ नगरसेवकांची नोंदणी कोकण विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात पार पडली असून शिवसेनेला सहयोगी गट म्हणून राष्ट्र्वादी काँग्रेसच्या तिन्ही नगरसेवकांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची सहयोगी गट म्हणून नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केली जात आहे.
भाजपच्या महापालिका गटनेतेपदी गणेश खणकर
मुंबई : मुंबई महापालिकेत भाजपच्या गटनेतेपदी दहिसर येथील प्रभाग क्रमांक ३ मधून निवडून आलेले आणि मुंबई भाजपचे प्रवक्ते गणेश खणकर यांची निवड करण्यात आली. भाजपच्या महापालिका गटनेतेपदी आणि अर्थात सभागृहनेतेपदी गणेश खणकर यांची निवड होणार असल्याचे पहिले वृत्त दैनिक प्रहारने प्रसिद्ध केले होते. हे भाकीत अखेर खरे ठरले असून सोमवारी कोकण विभागीय आयुक्त कार्यालयांत भाजपच्या ८९ नगरसेवकांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. मंगळवारी महापालिका सचिव कार्यालयातील पुढील प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.मुंबईतील निवडून आलेले भाजपचे ८९ नगरसेवकांची बैठक महापालिका मुख्यालयात पार पडली. या बैठकीत भाजपच्या मुंबई महापालिका गटनेतेपदी गणेश खणकर यांची निवड करण्यात आली.यावेळी, भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, भाजपचे माजी खासदार मनोज कोटक, आमदार पराग आळवणी आणि भाजपचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते.खणकर यांनी उबाठाचे सौरभ विनोद घोसाळकर यांचा पराभव केला आहे. खणकर हे भाजपचे प्रवक्त ते महामंत्री असल्याने त्यांचे वक्तृत्व,अभ्यासूवृत्ती आणि शांत स्वभाव लक्षात घेऊन पक्षाने त्यांच्यावर गटनेतेपदाची जबाबदारी सोपवली आहे. खणकर हे सन २०१७मध्ये महापालिकेत स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्त झाले होते. त्यानंतर काही वर्षांतच त्यांना या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. महापालिकेत त्यांनी बेस्ट आणि आरोग्य समित्यांमध्ये सदस्यत्व भूषवले होते. संघ स्वयंसेवक असलेले खणकर यांनी १९९२ पासून भाजपचे बुथ प्रमुख म्हणून कामाला सुरुवात केली होती. उत्तर मुंबई जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्षपदापासून ते आता मुंबई भाजपचे महामंत्री आणि पक्ष प्रवक्ते व नगरसेवक अशाप्रकारची पदे त्यांनी भूषवली आहेत.
Shankar Mandekar : कासारसाई ते हिंजवडी... राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात मांडेकरांचा दौरा; सुनेत्रा पवारांच्या माध्यमातून प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन.
Child Labor : सावधान! आता बालमजुरी महागात पडणार; मालकांविरुद्ध थेट फौजदारी गुन्हा आणि मोठा दंड
Child Labor : बालमजुरी कायमस्वरूपी हद्दपार करण्यासाठी महसूल आणि पोलीस प्रशासन सज्ज; मुक्त केलेल्या बालकांचे होणार पुनर्वसन आणि शिक्षण.
Pune News : संचेती चौकातील कोंडी फुटणार; महापालिकेचा मास्टर प्लॅन तयार; ‘हा’नवा पूल बदलणार चित्र
Pune News : महापालिकेकडून गणेशखिंड रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी या रस्त्यावर पुणे विद्यापीठ चौकात बहुमजली उड्डाणपूल उभारण्याचे काम सुरू आहे.
बांगलादेशमध्ये माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे सरकार कोसळल्यानंतर 18 महिन्यांनी निवडणुका होणार आहेत. 12 फेब्रुवारी रोजी मतदान होईल. या निवडणुका हिंदूंवरील सततचे हल्ले आणि भारतविरोधी भावनांच्या छायेत होत आहेत. इस्लामिक कट्टरपंथी पक्ष जमात-ए-इस्लामी आणि बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी यांच्यात ही लढाई आहे. बांगलादेशातील परिस्थिती सांगण्यासाठी दिव्य मराठीचे रिपोर्टर वैभव पळणीटकर राजधानी ढाका येथे आहेत. यापूर्वी दिव्य मराठीने इस्रायल, लेबनॉन, सीरिया आणि नेपाळमध्ये जाऊन कव्हरेज केले आहे. उद्या, म्हणजेच 4 फेब्रुवारीपासून तुम्हाला बांगलादेशातील ग्राउंड झीरोमधून विशेष अहवाल, सत्तेचा दावेदार कोण आहे, अल्पसंख्याकांची परिस्थिती आणि राजकारणातील महत्त्वाच्या व्यक्तींच्या मुलाखती मिळतील. तर, वाचत आणि पाहत राहा दिव्य मराठी ॲप…
Pune News : महालक्ष्मी चरणी सोन्या-चांदीचे अर्पण! भाविकांच्या सोबतीने पार पडला वर्धापनदिन सोहळा
Pune News : राजस्थानच्या जगद्गुरूंच्या हस्ते सोन्या-चांदीची फुले अर्पण; श्री महालक्ष्मी मंदिर संस्थानच्या ४२ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन.
PMC News : अभियांत्रिकी संवर्गात खांदेपालट! महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांचे आदेश
PMC News : अनिरुद्ध पावसकर यांची शहर अभियंतापदी बढती; पथ विभाग आणि वाहतूक नियोजनाची धुरा आता राजेश बनकर यांच्याकडे.
बलुचिस्तानमधील परिस्थिती पाकिस्तानच्या नियंत्रणाबाहेर जात आहे. 31 जानेवारी रोजी ‘बलुच लिबरेशन आर्मी’च्या दहशतवाद्यांनी बलुचिस्तानमधील 12 जिल्ह्यांमध्ये पाकिस्तानी सरकारी कार्यालये आणि लष्करी तळांवर सर्वात मोठा लक्ष्यित हल्ला केला होता. यात BLA च्या फिदायीन महिलांचाही समावेश आहे. BLA चे म्हणणे आहे की जोपर्यंत बलुचिस्तानला पाकिस्तानपासून स्वातंत्र्य मिळत नाही, तोपर्यंत हल्ले सुरू राहतील. सोशल मीडियावर ‘बलुचिस्तान रिपब्लिक’ आणि ‘बलुचिस्तान इंडिपेंडन्स’ सारखे कीवर्ड ट्रेंड करत आहेत. अखेर बलुचिस्तानचे लोक पाकिस्तानपासून स्वातंत्र्य का घेऊ इच्छितात, पाकिस्तानने बेकायदेशीरपणे ताबा मिळवला होता का, या संघर्षामुळे चीन आणि अमेरिकेसाठी काय चिंता आहे; आजच्या एक्सप्लेनरमध्ये जाणून घेऊया… प्रश्न-1: बलुच लिबरेशन आर्मी आणि पाकिस्तान सेना यांच्यात काय संघर्ष सुरू आहे? उत्तर: पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात 31 जानेवारीपासून बलुच लिबरेशन आर्मी म्हणजेच BLA च्या दहशतवाद्यांनी ऑपरेशन 'हॅरोफ'चा दुसरा टप्पा सुरू केला. बलुची भाषेत हॅरोफचा अर्थ 'काळे वादळ' असा होतो. यादरम्यान पोलीस स्टेशन, चेक पॉइंट, लष्कराचे प्रशिक्षण तळ, बँक, बाजारपेठ, सरकारी कार्यालये आणि इमारतींवर बॉम्ब आणि गोळ्यांनी एकाच वेळी हल्ले करण्यात आले. साऊथ एशिया टेररिझम पोर्टलनुसार, बलुच दहशतवाद्यांनी क्वेटा, ग्वादर, मस्तुंग, नोशकी, दलबांदिन, खारान, पंजगुर, तुम्प आणि पसनी यांसारख्या 12 जिल्ह्यांमध्ये 48 हून अधिक ठिकाणांना लक्ष्य केले. 30 हून अधिक सरकारी इमारतींवर लक्ष्यित हल्ले करण्यात आले. सुमारे 20 वाहनांना आग लावण्यात आली. BLA नुसार, या हल्ल्यांमध्ये पाकिस्तानी सेना, पोलीस आणि गुप्तचर संस्थांचे 84 जवान मारले गेले आणि 18 जणांना ओलीस ठेवण्यात आले. या हल्ल्यांमध्ये अनेक महिलांनीही बंदूक घेऊन लढा दिला होता. BLA ने याचे व्हिडिओदेखील जारी केले आहेत. प्रत्युत्तरादाखल पाकिस्तान आर्मीने 40 तासांचे ऑपरेशन चालवले. बलुचिस्तान प्रांताचे मुख्यमंत्री सरफराज बुगती यांनी सांगितले की, या दरम्यान सैन्याने सुमारे 145 दहशतवाद्यांना ठार केले. BLA च्या दाव्याच्या उलट, बुगती यांनी सांगितले की, हल्ल्यांमध्ये पोलीस आणि आर्मीचे 17 जवान आणि 31 सामान्य नागरिक मारले गेले. या भागात अजूनही आर्मी आणि पोलिसांचे जवान तैनात आहेत. मात्र, BLA चे प्रवक्ते जियांद बलोच यांनी बुगतीचे दावे फेटाळून लावत सांगितले की, हल्ल्यात BLA चे केवळ 7 दहशतवादी मारले गेले, ज्यात 4 असे दहशतवादी होते ज्यांनी पाकिस्तानच्या लष्करी तळांमध्ये घुसून आत्मघाती हल्ले केले होते. BLA ने 2024 मध्ये ‘हॅरोफ फेज-1’ सुरू केले होते, तेव्हा बहुतेक लक्ष्य पाकिस्तानी सैन्य आणि पोलिसांचे तळ होते, आता फेज-2 मध्ये हल्ल्याची व्याप्ती वाढली आहे. BLA चा दावा आहे की 2025 मध्ये त्यांनी पाकिस्तानी सैन्य आणि पोलिसांच्या ठिकाणांवर एकूण 521 हल्ले केले आहेत. 11 मार्च रोजी BLA ने पाकिस्तानची जाफर एक्सप्रेस ट्रेन हायजॅक केली होती. BLA ने 200 हून अधिक पाकिस्तानी सैनिकांना ओलीस ठेवल्याचा दावा केला होता. दुसरीकडे, 14 मे रोजी बलुचिस्तानच्या अनेक जिल्ह्यांमध्ये डझनभर ठिकाणी लक्ष्यित हल्ले करण्यात आले होते. प्रश्न-2: बलोच आर्मीकडून आत्मघाती हल्ला करणाऱ्या महिला कोण आहेत? उत्तर: पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांच्या म्हणण्यानुसार, बलुचिस्तानमध्ये झालेल्या हल्ल्यांपैकी दोन हल्ल्यांमध्ये महिलांचाही समावेश होता. BLA ने ऑपरेशन हेरोफ फेज-2 मध्ये सहभागी असलेल्या दोन महिला दहशतवाद्यांचे फोटोही प्रसिद्ध केले आहेत. या दोन्ही फिदायीन हल्लेखोर म्हणजेच आत्मघाती हल्लेखोर होत्या... 21 व्या वाढदिवशी BLA मध्ये सामील झालेली आसिफा पाकिस्तान सैन्याला भित्री म्हणणारी हवा बलोच प्रश्न-3: पाकिस्तान या हल्ल्यांबाबत भारतावर काय आरोप करत आहे? उत्तर: मुख्यमंत्री सरफराज बुगती यांनी क्वेट्टा येथे पत्रकारांशी बोलताना बलुचिस्तानवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना ‘फितना-अल-हिंदुस्तान’ असे संबोधले. पाकिस्तान सरकार या शब्दाचा वापर पाकिस्तानातील ‘भारत-समर्थित दहशतवादा’साठी करते. पाकिस्तानी लष्करानेही निवेदन जारी करून म्हटले आहे की, ‘क्वेट्टा, ग्वादर, मस्तुंग आणि नोशकी जिल्ह्यांमध्ये जवळपास एकाच वेळी झालेले हल्ले भारत-समर्थित दहशतवाद्यांनी केले आहेत. पाकिस्तानचे म्हणणे आहे की या कारवायांचा उद्देश मोठ्या प्रमाणावर अस्थिरता पसरवणे हा होता.’ बुगतीने असाही दावा केला की मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांचे मृतदेह सुरक्षा यंत्रणांकडे आहेत आणि त्यात काही अफगाण नागरिकही सामील आहेत. ‘भारत-समर्थित दहशतवादी’ सुरक्षा दलांना ओलीस ठेवून क्वेटा शहराच्या मध्यभागी पोहोचण्याची योजना आखत होते, पण ते यशस्वी होऊ शकले नाहीत.’ तथापि, भारताने हे आरोप स्पष्टपणे फेटाळून लावले आहेत. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले, ‘भारत, पाकिस्तानचे सर्व आरोप पूर्णपणे निराधार आणि तथ्यहीन मानून फेटाळून लावतो. भारतावर अशा प्रकारचे आरोप करणे ही पाकिस्तानची जुनी रणनीती आहे, जेणेकरून ते आपल्या अंतर्गत अपयशांवरून आणि समस्यांवरून लक्ष विचलित करू शकेल.’ जयस्वाल पुढे म्हणाले की पाकिस्तानने आरोप करण्याऐवजी बलुचिस्तानच्या लोकांच्या जुन्या मागण्यांकडे लक्ष दिले पाहिजे. त्यांनी पाकिस्तानच्या दमन आणि क्रूरतेच्या रेकॉर्डचा उल्लेख केला आणि म्हणाले की हे कोणापासून लपलेले नाही. प्रश्न-4: बलुचांच्या लढाईचा चीन-अमेरिकेवर काय परिणाम? उत्तर: बलुचिस्तानमध्ये वाढता संघर्ष चीन आणि अमेरिकेची चिंता वाढवत आहे, कारण येथे दोन्ही देशांची मोठी गुंतवणूक अडकलेली आहे... अमेरिकेने बलुचिस्तानमध्ये 11 हजार कोटी रुपये गुंतवले बलुचिस्तानमधून जातो चीनचा CPEC प्रकल्प परराष्ट्र धोरण तज्ज्ञ मायकल कुगेलमन यांच्या मते, ‘या हल्ल्यामुळे असा संदेश जातो की बलुचिस्तानच्या नैसर्गिक संसाधनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या सर्वांनी सतर्क राहिले पाहिजे, ज्यात व्हाईट हाऊसचे अधिकारी देखील समाविष्ट आहेत. BLA च्या मुख्य तक्रारींपैकी एक ही आहे की स्थानिक संसाधनांचे बाहेरील लोकांकडून शोषण केले जात आहे.’ प्रश्न-5: पाकिस्तान आणि बलुचिस्तान यांच्यातील संघर्षाची कहाणी काय आहे? उत्तर: बलुचिस्तानचा मोठा भाग थंड वाळवंट आहे. सध्याचे बलुचिस्तान तीन देशांमध्ये पसरलेले आहे. यात पाकिस्तानचा बलुचिस्तान प्रांत, इराणचा सिस्तान-बलुचिस्तान प्रांत आणि एक छोटा भाग अफगाणिस्तानात आहे. पाकिस्तानच्या ताब्यातील बलुचिस्तानचा पाकिस्तानसोबतचा संघर्ष 1947 मध्ये भारत-पाक फाळणीच्या वेळीच सुरू झाला होता... बलुचिस्तान आज पाकिस्तानमधील सर्वात मोठे राज्य आहे आणि 44 टक्के भूभाग व्यापतो. असे असूनही येथे संपूर्ण पाकिस्तानच्या केवळ 6% लोकसंख्या राहते. बलुचिस्तान तेल, सोने, तांबे आणि इतर खाणींनी समृद्ध आहे. या संसाधनांचा वापर करून पाकिस्तान आपल्या गरजा पूर्ण करतो. असे असूनही हा प्रदेश सर्वात मागासलेला आहे. BLA ने आतापर्यंत बलुचिस्तानच्या परिसरात शेकडो हल्ले केले आहेत. त्यांची मागणी आहे की बलुचिस्तानला स्वतंत्र देशाचा दर्जा मिळावा. पाकिस्तानने या भागातून आपले सैन्य मागे घ्यावे आणि बलुचिस्तानच्या संसाधनांवरील त्याचे नियंत्रण संपुष्टात यावे. BLA चे म्हणणे आहे की पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISI आणि सैन्य, दहशतवादी संघटना ISIS प्रमाणे बलुच लोकांवर क्रूर हल्ले करतात. व्हॉइस फॉर बलुच मिसिंग पर्सन्स (BVMP) नुसार, गेल्या 15 वर्षांत पाकिस्तानी सैन्याने 7,000 हून अधिक बलुच लोकांना गायब केले आहे. त्यांना मारण्यात आले आहे किंवा त्यांना अशा ठिकाणी कैद केले आहे, ज्याची कोणालाही माहिती नाही. प्रश्न-6: पाकिस्तान भारतावर बलुच लोकांना मदत केल्याचा आरोप का करतो? उत्तर: थेटपणे भारत, बलुचिस्तानच्या बाबतीत कोणताही हस्तक्षेप करत नाही. मात्र, बलुच नेते पाकिस्तानविरुद्धच्या त्यांच्या लढाईत भारताचे समर्थन आणि मदत इच्छितात. भारत-पाक यांच्यातील जुन्या तणावामुळे BLA भारताला एक मित्र म्हणून पाहते. बलुच नेते असे म्हणत आले आहेत की जर भारताने पाकिस्तानवर निर्णायक हल्ला केला, तर BLA पश्चिम सीमेवरून पाकिस्तानवर हल्ला करेल. बलुच नेते मीर यार बलुच यांनी अनेकदा पाकिस्तानपासून स्वातंत्र्याच्या लढाईत भारताकडे मदत मागितली आहे. अलीकडील संघर्षादरम्यान, मीर यांनी सोशल मीडियावर लिहिले, 'बलुचिस्तानमध्ये लोक रस्त्यावर उतरले आहेत. हा त्यांचा राष्ट्रीय निर्णय आहे की बलुचिस्तान पाकिस्तान नाही. जग आता शांत राहू शकत नाही. आम्ही 11 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांनी या प्रदेशातून माघार घेतल्यावरच आमच्या स्वातंत्र्याची घोषणा केली होती.' मीर यांनी भारतीयांना आवाहन करत म्हटले की, 'भारतीय बुद्धिजीवींना विनंती आहे की बलुचांना पाकिस्तानचे लोक म्हणू नका. आम्ही पाकिस्तानी नाही तर बलुचिस्तानी आहोत.' मीर यार PoK बाबत भारताच्या भूमिकेचेही समर्थन करतात. मीर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले, 'जगाने पाकिस्तानला सांगितले पाहिजे की त्याने तत्काळ PoK सोडावे, जेणेकरून ढाकामध्ये त्याच्या 93 हजार सैनिकांनी केलेल्या आत्मसमर्पणाप्रमाणे त्याला पुन्हा एकदा लाजिरवाण्या परिस्थितीचा सामना करावा लागू नये.' दुसरीकडे, भारत थेट स्वतंत्र बलुचिस्तानच्या मागणीचे समर्थन करत नाही, परंतु तो म्हणतो की पाकिस्तानने बलुचिस्तानच्या लोकांच्या मागण्या ऐकल्या पाहिजेत. अनेक परदेशी मीडिया रिपोर्ट्समध्ये असेही म्हटले आहे की भारत बलुचिस्तानच्या लोकांना आर्थिक मदत करतो.
Pune Police : ड्रंक अँड ड्राइव्ह करणाऱ्यांची खैर नाही; पोलीस आयुक्तांनी स्वतः घेतली ‘तळीरामांची’शाळा
Pune Police : वर्षभरात ६ हजार तळीरामांवर कारवाई; आता दर आठवड्याला पोलीस मुख्यालयात 'या' गुन्हेगारांना हजेरी बंधनकारक.
देशात अर्थमंत्र्यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर आणि त्याच्या बर्या वाईट परिणामावर चर्चा सुरू असतानाच आज संसदेत एक नवीनच वादंग उभे राहिले आणि त्यातून सरकार आणि राहुल गांधी यांच्यात नवीन संघर्ष उभा राहिलेला पाहायला मिळाला.
PMC Tax Proposal : महापालिकेचा धक्कादायक प्रस्ताव; २५० कोटींच्या उत्पन्नासाठी लाखो नागरिकांवर बोजा
PMC Tax Proposal : प्रशासकीय खर्चावर नियंत्रण ठेवा, प्रामाणिक करदात्यांना लुटू नका; नाना भानगिरे यांची आयुक्तांकडे मागणी.
चीनने जगाला त्याच्या पुरवठासाखळीच्या जाळ्यात अडकवले आहे. 2025 मधेच चीनने जगाशी एक ट्रिलियन डॉलरपेक्षा जास्त व्यापारी सरप्लस कमावला. जगाने कितीही प्रयत्न केले, तरी या सापळ्यातून सुटका होत नाही.
PMC Mayor Election : भाजपकडे ११९ जागांचे स्पष्ट बहुमत; तरीही महापौर आणि उपमहापौर पदासाठी विरोधकांच्या हालचालींना वेग.
लक्षवेधी : बँकांमध्ये कोणते बदल होणार?
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी 2026-27 या वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला. मात्र या अर्थसंकल्पामुळे शेअर बाजाराची निराशा झाली आहे. यापूर्वी अनेकदा शेअर बाजाराची अशाप्रकारे निराशा होऊन बाजार कोसळला आहे.
Electric Shock Death : वीजपंप सुरू करण्यासाठी घोडनदीवर गेलेल्या शेतकरी तरुणाचा वीज वाहक खांबाच्या तारेला विजेचा धक्का बसून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
Pune ZP Election : दुष्काळात स्वखर्चाने टँकर आणि कोरोनात रेशन; पाबळ-केंदूर गटात विकास गायकवाडांचा वैयक्तिक जनसंग्रह भाजपच्या पथ्यावर पडणार?
Pune ZP Election : हवेलीत निवडणुकांचा ‘हायटेक’पॅटर्न! पारदर्शकतेसाठी अत्याधुनिक आयटी सेल कार्यान्वित
Pune ZP Election : निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुलभ करण्यासाठी हवेलीत स्वतंत्र 'कम्युनिकेशन रूम' आणि आयटी सेलची स्थापना.
Paud Panchayat Samiti : कोमल वाशिवले यांना महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Paud Panchayat Samiti : गेल्या नऊ वर्षांच्या कामाची शिदोरी आणि महिलांच्या सक्षमीकरणाचा निर्धार; कोमल वाशिवले निवडणूक मैदानात सज्ज.
Shankar Mandekar : अजितदादांनी दिलेल्या उमेदवाराला विजयी करा; आमदार शंकर मांडेकरांचे आवाहन
Shankar Mandekar : विक्रम खुटवड आणि तृप्ती खुटवड यांच्या प्रचारासाठी जोगवडीत जनसागर; आमदार शंकर मांडेकरांनी मांडले विकासाचे व्हिजन.
Somatane Phata Accident : तळेगाव दाभाडे परिसरात अपघातांचे सत्र सुरूच; सोमटणे फाट्यावर दुचाकीस्वाराचा भीषण अंत झाल्याने परिसरात शोककळा.
PCMC Mayor : पिंपरी पालिकेत भाजपची एकहाती सत्ता, पण उपमहापौर पदासाठी पेच; वैशाली काळभोर विरुद्ध शर्मिला बाबर असा होणार सामना.
Charholi Suicide Case : रिअल इस्टेट व्यावसायिकाच्या पत्नीवर ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने पती-पत्नीत तीव्र वाद झाले. या तणावातून ३९ वर्षीय कुमार ऐश्वर्य यांनी विष प्राशन केले.
PCMC Mayor : पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्तेचा सोपान चढताना भाजपमधील अंतर्गत वाद उफाळून आला आहे.
Pimpri Chinchwad Crime : मोई येथील स्क्रॅप सेंटरमध्ये चालत होता वाहने तोडण्याचा 'खेळ'; एका आरोपीला अटक केल्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे.
BJP NCP Alliance : राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेत वाटा देण्याबाबत भाजप सकारात्मक; प्रशांत शितोळेंनी व्यक्त केली पक्षाची भूमिका.
Mahabaleshwar Election : महायुतीमधील तिन्ही पक्षांचा एकमेकांविरोधात शड्डू; मकरंद पाटलांची सत्ता टिकवण्याची धडपड तर शिंदे गटाचा सुरुंग लावण्याचा प्रयत्न.
Shashikant Shinde : कोरेगाव पोलीस निरीक्षकांच्या पक्षपाती कारभाराविरोधात आमदार शशिकांत शिंदे आक्रमक; अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली.
दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार ०३ फेब्रुवारी २०२६
पंचांगआज मिती माघ कृष्ण द्वितीय शके १९४७. चंद्र नक्षत्र मघा. योग शोभन,चंद्र राशी सिंह भारतीय सौर १४ माघ शके १९४७.मंगळवार दिनांक ३ फेब्रुवारी २०२६.मुंबईचा सूर्योदय ०७:१२, मुंबईचा सूर्यास्त १८:३२, मुंबईचा चंद्रोदय ०८.०३ मुंबईचा चंद्रास्त ०८.०९ , राहू काळ ०३.४२ ते ०५.०७.चांगला दिवसदैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)
Satara ZP Election : औंध गटात राष्ट्रवादी काँग्रेसचा गड अभेद्य ठेवावा; मनिषाताई फडतरे यांचे आवाहन
Satara ZP Election : गाव तिथे हायटेक शाळा आणि वाडी तिथे आरोग्य सुविधा; मनिषाताईंनी व्यक्त केला भविष्यातील कामांचा संकल्प.
गर्दी कमी होणार? मुंबई लोकलमध्ये एसी ट्रेन वाढणार ; लवकरच धावणार १५ डब्ब्यांची लोकल
मुंबई : मुंबई लोकलमधील प्रचंड गर्दी आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने मोठी आणि ठोस पाऊले उचलली आहेत. येत्या काही वर्षांत मुंबईकरांचा प्रवास अधिक सुरक्षित, आरामदायी आणि आधुनिक होणार असून, सन २०२९ पर्यंत तब्बल २३८ वातानुकूलित लोकल ट्रेन सेवेत दाखल होणार आहेत. त्याचबरोबर १५ डब्यांच्या लोकल ट्रेन येत्या जून महिन्यापासून धावण्याची शक्यता आहे.मुंबई लोकल ही शहराची जीवनवाहिनी मानली जाते. मात्र, दररोज वाढणारी प्रवासी संख्या, अपघात आणि असुविधांमुळे प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारने रेल्वे पायाभूत सुविधांवर भर देण्याचा निर्णय घेतला असून, नुकत्याच सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील रेल्वे नेटवर्कसाठी मोठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.जूनपर्यंत १५ डब्यांच्या लोकल रुळांवरप्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी आणि क्षमतेत वाढ करण्यासाठी १५ डब्यांच्या लोकल सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सेवेसाठी आवश्यक असलेले फलाट वाढवण्याचे काम सध्या वेगाने सुरू आहे. मुंबई विभागातील ३४ रेल्वे स्थानकांवर फलाटांचे विस्तारीकरण केले जात असून, जून महिन्यापर्यंत ही कामे पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे.मार्चपासून सेफ्टी डोअर लोकलची चाचणीप्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेत, दोन सेफ्टी डोअर असलेल्या लोकल ट्रेन मार्च महिन्यापर्यंत ट्रायल बेसिसवर सुरू केल्या जाणार आहेत. या उपक्रमामुळे धावत्या लोकलमधून पडण्याच्या घटना रोखण्यास मदत होईल, असा रेल्वे प्रशासनाचा विश्वास आहे.२०२९ पर्यंत २३८ एसी लोकलमुंबईकरांच्या प्रवासाला गारवा देण्यासाठी २०२९ पर्यंत २३८ एसी लोकल ट्रेन सेवेत आणण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे गर्दीच्या वेळेतही प्रवास अधिक सुखकर होण्याची अपेक्षा आहे. याशिवाय, पूर्व आणि पश्चिम रेल्वे मार्गांमध्ये कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी विशेष कॉरिडॉर विकसित केला जाणार असून, मालवाहतुकीलाही चालना मिळणार आहे
ठाण्यातील भव्य त्रिमंदिर भाविकांसाठी खुले; तीन दिवसांच्या प्राणप्रतिष्ठेनंतर दर्शनास सुरुवात
ठाणे : ठाणे शहरात उभारण्यात आलेले भव्य त्रिमंदिर अखेर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. तीन दिवस चाललेल्या प्राणप्रतिष्ठा विधीनंतर हे मंदिर सर्वसामान्य भक्तांसाठी दर्शनासाठी खुले झाले असून, ठाण्यातील नवे अध्यात्मिक केंद्र म्हणून या मंदिराकडे पाहिले जात आहे. मुंबई महानगर प्रदेशातील हे सर्वात मोठे त्रिमंदिर मानले जात आहे.ठाणे पश्चिमेकडील बाळकूम–साकेत रोड परिसरात सुमारे १.५ एकर क्षेत्रफळावर या त्रिमंदिराची उभारणी करण्यात आली आहे. महावीर जैन ट्रस्ट आणि दादा भगवान फाउंडेशन यांच्या संकल्पनेतून हे मंदिर साकारले असून, धार्मिक समन्वय आणि सर्वधर्मीय ऐक्याचा संदेश देणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे.या त्रिमंदिरात एकाच व्यासपीठावर विविध धर्मांचे आराध्य दैवत विराजमान करण्यात आले आहेत. यामध्ये *जैन धर्माचे श्री सीमांधर स्वामी, शैव धर्माचे भगवान शिव, तसेच वैष्णव परंपरेतील भगवान कृष्ण यांच्यासह एकूण २५ पूजनीय देवतांची स्थापना करण्यात आली आहे. विविध धर्मांमधील निपक्षपातीपणा आणि समतेची भावना जपण्याचा प्रयत्न या मंदिररचनेतून दिसून येतो.मंदिराच्या स्थापत्यशैलीकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. हे मंदिर जयपूर येथून आणलेल्या पांढऱ्या संगमरवरी दगडापासून बांधण्यात आले असून, त्याची कलात्मक रचना भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे. मंदिरातील प्रमुख आकर्षण असलेल्या श्री सीमांधर स्वामी यांच्या मूर्तीची उंची सुमारे १३ फूट असून, तिचे वजन अंदाजे १८ हजार किलो असल्याची माहिती देण्यात आली आहे.हे त्रिमंदिर केवळ श्रद्धेचे केंद्र नसून सामाजिक समता, धार्मिक सलोखा आणि अध्यात्मिक शांततेचे प्रतीक आहे. मंदिर सुरू झाल्याने ठाणे शहरातील भाविकांमध्ये समाधान व्यक्त केले जात असून, पुढील काळात हे ठिकाण अध्यात्मिक पर्यटनाचेही महत्त्वाचे केंद्र ठरणार आहे.
४ दशकांची प्रतीक्षा संपणार; कोल्हापूर–कोकण रेल्वेने जोडले जाणार
कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला थेट रेल्वेने जोडणाऱ्या कोल्हापूर–वैभववाडी रेल्वे मार्गाचा मार्ग अखेर मोकळा होत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. अनेक दशकांपासून चर्चेत असलेला हा प्रकल्प प्रत्यक्षात येण्याच्या टप्प्यावर पोहोचला असून, २०२७ पासून कामाला सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हा मार्ग कार्यान्वित झाल्यानंतर कोल्हापूरसह कोकणातील नागरिकांसाठी प्रवास अधिक सुलभ होणार आहे.केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वे क्षेत्रासाठी मोठी तरतूद करण्यात आली असून, त्यातील लक्षणीय निधी महाराष्ट्रासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. या निधीतून कोल्हापूर–वैभववाडी रेल्वे मार्गासाठी केंद्र सरकारकडून आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. राज्य सरकारही आपल्या वाट्याचा निधी देण्यास तयार असल्यामुळे, भूसंपादन प्रक्रियेला लवकरच गती मिळणार असल्याची माहिती मिळाली आहे.कोल्हापूरला कोकण रेल्वेशी जोडण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने करण्यात येत होती. या प्रकल्पाला पूर्वीच तत्त्वतः मान्यता मिळाली असून' सर्वेक्षण, सविस्तर प्रकल्प अहवाल आणि प्रशासकीय मंजुरी अशा टप्प्यांतून हा प्रस्ताव पुढेही गेला होता. मात्र विविध कारणांमुळे प्रत्यक्ष अंमलबजावणीला विलंब होत गेला.येणारा रेल्वे मार्ग कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर, पन्हाळा आणि गगनबावडा तालुक्यांतून जात कोकणातील वैभववाडीपर्यंत पोहोचणार आहे. या मार्गाची एकूण लांबी सुमारे 108 किलोमीटर इतकी असेल. प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर जमीन संपादन करावे लागणार असून, त्यासाठी स्वतंत्र निधीची तरतूद करण्यात येणार आहे.या प्रकल्पाचा एकूण खर्च सुमारे ६,३०० कोटी रुपये इतका आहे. केंद्र आणि राज्य सरकार प्रत्येकी ५० टक्के खर्च उचलणार आहेत.या मार्गावर डोंगराळ भागातून रेल्वे नेण्यासाठी अनेक अभियांत्रिकी कामे प्रस्तावित आहेत. यामध्ये मोठ्या संख्येने बोगदे, उड्डाणपूल तसेच छोटे-मोठे पूल उभारले जाणार आहेत. सर्वात लांब बोगद्याची लांबी काही किलोमीटरची असणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी या मार्गावर एकूण दहा रेल्वे स्थानके उभारण्याचा प्रस्ताव आहे.हा रेल्वे मार्ग पूर्ण झाल्यानंतर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील अंतर कमी होणार असून, वाहतूक वेळ व खर्चात बचत होण्याची शक्यता आहे. यासोबतच व्यापार, पर्यटन, कृषी वाहतूक आणि स्थानिक उद्योगांना चालना मिळेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. प्रकल्प पूर्ण होण्यासाठी सुमारे साडेचार ते पाच वर्षांचा कालावधी लागेल, असे नियोजन करण्यात आले आहे.
Sunil Gavaskar Statement : पाकिस्तानच्या भारत बहिष्कारावर भारताचे माजी खेळाडू सुनील गावस्कर संतापले असून आयसीसीला कारवाई करण्याचा सल्ला दिला आहे.

33 C