SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

32    C
... ...View News by News Source

कृत्रिम बुद्धिमत्ता आणि कृषी क्षेत्रातील जागतिक आणि गुंतवणूक शिखर परिषद महाराष्ट्रात

मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकऱ्याला जागतिक तंत्रज्ञानाची माहिती व्हावी, नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर शेतीमध्ये व्हावा. ‘महाराष्ट्र कृषी-कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण २०२५-२०२९’ धोरणातंर्गत ‘जागतिक कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद आणि गुंतवणूकदार शिखर संमेलन’(एआय फॉर अॅग्री २०२६) ही परिषद २२ आणि २३ फेब्रुवारी रोजी मुंबईत जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित करण्यात आली आहे. कृषी क्षेत्रातील जागतिक तज्ज्ञ, कृषी आणि संलग्न क्षेत्रातील नवे स्टार्टअप, गुंतवणूकदार, वित्तीय संस्था यामध्ये सहभागी होणार आहेत, अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर कक्ष येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव विकास चंद्र रस्तोगी, कृषी आयुक्त सूरज मांढरे उपस्थित होते. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, महाराष्ट्राच्या कृषी विकासाच्या प्रवासात महत्त्वाचा टप्पा मानली जाणारी एआय फॉर अॅग्री २०२६ ही जागतिक परिषद येत्या २२ आणि २३ फेब्रुवारी रोजी मुंबईत जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित करण्यात आली आहे. एआय फॉर ॲग्री ही परिषद वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, एफएओ, युएनडीपी, आयएफएडी, वर्ल्ड बँक समूह, आशियाई विकास बँक (एडीबी), इंटरनॅशनल क्रॉप्स रिसर्च इन्सिटीट्यूट फॉर दी सेमी ॲरीड ट्रापीक्स (आयसीआयएसएटी), भारतीय विज्ञान संस्था (आयआयएससी), एम.एस.स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशन (एमएसएसआरएफ) जागतिक व राष्ट्रीय भागीदारांच्या सहकार्याने आयोजित करण्यात येत आहे. राज्यात जाहीर करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र कृषी-कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण २०२५-२०२९’ च्या अंमलबजावणीकडे टाकलेले हे महत्त्वाचे पाऊल आहे. या एआय धोरणाच्या निर्मितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले, तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दूरदृष्टीतून शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्याची प्रेरणा मिळाली. कृषी आणि संलग्न क्षेत्रातील नवे स्टार्टअप, गुंतवणूकदार, वित्तीय संस्था आदींसाठी एक व्यासपीठ म्हणून परिषदेचा उपयोग करून घेता येईल, असे त्यांनी सांगितले.महाकृषि कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण २०२५-२०२९कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या माध्यमातून डेटा-आधारित परिसंस्था निर्माण करण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र शासनाने महाकृषि कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण २०२५-२०२९ जाहीर केले आहे. हे धोरण कृषी आणि संलग्न क्षेत्रांमध्ये ‘एआय’चा प्रत्यक्ष शेतीमध्ये वापर करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे. या धोरणांतर्गत महा एजीएक्स (महाराष्ट्र कृषी डेटा एक्सचेंज), एआय-सक्षम ट्रेसिबिलिटी प्रणाली, एआय आधारित भू-स्थानिक बुद्धिमत्ता इंजिन, शेतकरी-केंद्रित एआय सल्ला मंच-महाविस्तार या डिजिटल पायाभूत सुविधा विकसित केल्या जात आहेत. या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी संस्थात्मक केंद्र म्हणून कृत्रिम बुद्धिमत्ता व अॅग्रीटेक नाविन्यता केंद्र कार्यरत असून, शासनाने पहिल्या टप्प्यात रुपये 500 कोटींच्या निधीला मान्यता दिली आहे.एआय फॉर ॲग्री २०२६एआय फॉर ॲग्री २०२६ कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित, समावेशक, हवामान-संवेदनशील आणि शेतकरी-केंद्रित कृषी परिवर्तनाला चालना देणारे हे एक प्रमुख जागतिक व्यासपीठ आहे. २२ व २३ फेब्रुवारी २०२६ रोजी जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, बांद्रा-कुर्ला संकुल, मुंबई येथे ‘एआय अॅग्री २०२६’ चे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये धोरणकर्ते,आंतरराष्ट्रीय संस्था,शास्त्रज्ञ, शैक्षणिक संस्था, तंत्रज्ञान क्षेत्रातील नेते, स्टार्टअप्स, गुंतवणूकदार, शेतकरी उत्पादक संस्था तसेच शेतकरी समुदायाचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. ही परिषद डेटा-आधारित आणि तंत्रज्ञान-सक्षम कृषी परिसंस्था निर्माण करण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावणार आहे. संयुक्त राष्ट्राने २०२६ हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष घोषित केले आहे त्यामुळे शेतीमध्ये महिला शेतकऱ्यांची भूमिका यामध्ये महत्वाची आहे त्यांच्यासाठीही या परिषदेमध्ये माहितीपूर्ण संवादसत्र आयोजित करण्यात येणार आहेत.विविध चर्चासत्रांचे आयोजनएआय फॉर ॲग्रीमध्ये दोन दिवस विविध चर्चासत्रांचे आयोजन केले जाणार आहे. यामध्ये कृषी व अन्न प्रणाली परिवर्तनासाठी प्रगत कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान, महिला शेतकऱ्यांसाठी समावेशक कृत्रिम बुद्धिमत्ता : सक्षमीकरण, समता आणि नेतृत्व, ॲग्री एआयसाठी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा: डेटा, विश्वास, ट्रेसिबिलिटी आणि प्लॅटफॉर्म्स, ॲग्री एआय मधील गुंतवणूक : बाजारपेठा आणि विस्तारक्षम नवोन्मेष, जागतिक वैज्ञानिक सहकार्य आणि एआय फॉर ॲग्री संशोधन नेटवर्क, कृत्रिम बुद्धिमत्तेचा जबाबदार वापर, धोरणात्मक मार्ग आणि जागतिक प्रशासन याविषयाचा समावेश %

फीड फीडबर्नर 11 Feb 2026 5:30 pm

Kiren Rijiju : राहुल गांधींचे भाषण म्हणजे असत्याचा डोलारा, शब्द न् शब्द हटवणार; किरेन रिजीजू यांचा आक्रमक पवित्रा

लोकसभेत केंद्रीय अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेल्या भाषणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी सुरी आहे.

दैनिक प्रभात 11 Feb 2026 5:25 pm

१२ फेब्रुवारी रोजी भारत बंद; शाळा, महाविद्यालय, कार्यालय... जाणून घ्या या दिवशी काय सुरु अन् काय बंद ?

मुंबई : विविध कामगार संघटनांनी १२ फेब्रुवारी रोजी देशव्यापी संपाची हाक दिल्याने दैनंदिन व्यवहारांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नव्या कामगार कायद्यांविरोधात आणि काही आर्थिक धोरणांच्या निषेधार्थ हा बंद पुकारण्यात आला आहे.संपामध्ये देशातील १० प्रमुख केंद्रीय ट्रेड युनियनचा सहभाग असून INTUC, AITUC, HMS, CITU यांसह इतर संघटनांनी कामगारांच्या हक्कांबाबत चिंता व्यक्त केली आहे. नव्या लेबर कोडमुळे नोकरीची सुरक्षितता कमी होईल, कंपन्यांना कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचे स्वातंत्र्य वाढेल आणि किमान वेतन तसेच सामाजिक सुरक्षेवर परिणाम होईल, असा आरोप संघटनांनी केला आहे.मुख्य मागण्याचारही नवीन कामगार कायदे रद्द करणे, काही प्रस्तावित विधेयके मागे घेणे आणि मनरेगा अधिक बळकट करणे या प्रमुख मागण्या पुढे करण्यात आल्या आहेत. तसेच ग्रामीण रोजगार हमी योजनांबाबतही संघटनांनी आक्षेप नोंदवला आहे.काय सुरू, काय बंद?संपामुळे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे. काही बँक कर्मचारी संघटनांनी संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, रिझर्व्ह बँक किंवा संबंधित बँकांकडून अधिकृत सुट्टी जाहीर करण्यात आलेली नाही.शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्याबाबत कोणताही राष्ट्रीय स्तरावरील आदेश देण्यात आलेला नाही. काही राज्यांत, विशेषतः केरळ, कर्नाटक आणि ओडिशा येथे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे स्थानिक परिस्थितीनुसार शैक्षणिक संस्था व कार्यालयांवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.नागरिकांनी प्रवास किंवा बँक व्यवहारांपूर्वी संबंधित विभागाकडून अद्ययावत माहिती तपासून घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

फीड फीडबर्नर 11 Feb 2026 5:10 pm

आधी हत्या आणि मग मृतदेहासोबत अनेक किलोमीटरचा प्रवास; हवालदाराने केले असे काही....

नवी मुंबई : नवी मुंबईतील एका धक्कादायक घटनेने सामान्य नागरिक आणि चक्क पोलिसही चक्रावून गेले आहेत. एका हवालदाराने एका पुरुषाची हत्या करून तब्बल १९१ किलोमीटर प्रवास करून जाळल्याची घटना घडली आहे.नेमकं घडलं काय ? नवी मुंबईतील रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यातील एका पोलीस हवालदाराने सातारा जिल्ह्यात लोणंद परिसरात रागाच्या भरात एका तरुणाची हत्या केली. हवालदाराला आपल्या पत्नीवर संशय आला होता. आपल्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याचे त्याच्या लक्षात आले. याचकारणावरून त्या दोघांमध्ये प्रचंड वाद सुरु होते. म्हणून पोलिसाने पत्नीच्या प्रियकराला एकांतात बोलावून त्याचा काटा काढला. रागाच्या भरात कायद्याचे रक्षण करणाऱ्या हवालदारानेच असे कृत्य केल्याने नवी मुंबई पोलीस दलात खळबळ उडाली आहे.गुन्हा कसा उघडकीस आला ? हत्या केल्यानंतर आरोपी हवालदाराने मृतदेह कारमध्ये चालकाच्या शेजारच्या सीटवर बसवला, कोणाला संशय येऊ नये म्हणून मृतदेह जिवंत माणसाप्रमाणे बसवून त्याने नवी मुंबई ते सातारा असा १९१ किलोमीटरचा प्रवास केला. ६ फेब्रुवारी रोजी लोणंदमधील सुखेड परिसरात पोहोचवल्यावर त्याने मृतदेह एका विहिरीत टाकून तो जाळण्याच्या प्रयत्न केला, मात्र मृतदेह अर्धवट जळालेल्या स्थितीत राहिल्याने स्थानिकांच्या हा प्रकार लक्षात आला.सीसीटीव्ही आणि मोबाईल लोकेशनमुळे हत्येचा छडालोणंद पोलिसांनी अत्यंत हुशारीने या तांत्रिक पद्धतींचा आधार घेऊन हत्येचा तपास केला. महामार्गावरील टोलनाके आणि सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी आरोपीच्या वाहनाचा मागोवा घेतला. तेव्हा ही गाडी मुंबईवरु आल्याचे कळले. संशय बळावल्यानंतर नवी मुंबईतून पोलिसांनी हवालदार भिसे याला ताब्यात घेतला.

फीड फीडबर्नर 11 Feb 2026 4:10 pm

मुंबईला जागतिक दर्जाचं फिनटेक केंद्र बनवणार - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

महायुतीला कौल देऊन मुंबईकरांनी विकासाला स्वीकारलंमुंबई : बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त बाळासाहेबांची स्वप्नं पूर्ण करण्याबरोबर मुंबईला जागतिक दर्जाचं फिनटेक केंद्र बनवणार, अशी ग्वाही शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मुंबई महापालिकेत महायुतीचे महापौर रितू तावडे आणि उपमहापौर संजय घाडी यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारला. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते.उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मागील २५ वर्ष मुंबईकर विकासापासून वंचित होते, मात्र महायुतीचे सरकार आल्यानंतर मागील साडेतीन वर्षात मुंबईच्या विकासाला चालना दिली. महायुतीच्या आश्वासनांवर, वचनांवर मुंबईकरांनी विश्वास ठेवला. महायुतीला कौल देऊन मुंबईकरांनी विकासाला स्वीकारलं, असे ते म्हणाले. महायुतीच्या महापौर रितू तावडे आणि उपमहापौर संजय घाडी दोघेही अनुभवी आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईला जागतिक दर्जाचे फिनटेक हब बनवण्याचा स्वप्न पाहिले आहे. या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी जे जे आवश्यक असेल ते ते देण्याचे काम सरकार करेल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त बाळासाहेबांची स्वप्नं पूर्ण करण्याचे काम महायुती सरकार करेल. झोपडपट्टीमुक्त मुंबई, एसआरए, क्लस्टरच्या माध्यमातून ४० लाख मुंबईकरांना हक्काची घरं याची सुरुवात यापूर्वीच झाली आहे, असे ते म्हणाले. खड्डेमुक्त मुंबई, प्रदूषणमुक्त मुंबई, भ्रष्टाचारमुक्त तसेच ड्रग्जमुक्त मुंबई, मुंबईकरांना शुद्ध पिण्याचे पाणी देण्याबाबत महायुती कटिबद्ध आहे, असे ते म्हणाले.

फीड फीडबर्नर 11 Feb 2026 4:10 pm

Rahul Gandhi Speech: “अमेरिकन अटींवर तडजोड करणे लज्जास्पद,”; राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल

Rahul Gandhi Speech: आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा १० वा दिवस आहे. लोकसभेच्या कामकाजादरम्यान विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे भाषण सुरू आहे. राहुल गांधी यांनी आपल्या भाषांत देशाच्या आर्थिक मुद्द्यावर भाष्य केले.

दैनिक प्रभात 11 Feb 2026 3:05 pm

शिवसेनेच्या खासदारांनी घेतली भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष नितिन नवीन यांची भेट

नवी दिल्ली : भारतीय जनता पार्टीचे नवनियुक्त राष्ट्रीय अध्यक्ष नितिन नवीन यांची आज दिल्लीत भाजपच्या राष्ट्रीय कार्यालयात शिवसेना संसदीय गटनेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या खासदारांनी भेट देत शुभेच्छा दिल्या.यावेळी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, शिवसेना मुख्य प्रवक्ते खासदार नरेश म्हस्के, खासदार रवींद्र वायकर, खासदार संदीपान भुमरे, खासदार मिलिंद देवरा, प्रवक्त्या शायना एनसी हे मान्यवर यावेळी उपस्थित होते.भेटी दरम्यान संसदेमध्ये सुरु असलेले अधिवेशन आणि केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील स्थिती या विषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. नितिन नवीन यांनी यावेळी एनडीएचे घटक पक्ष म्हणून नेहमी शिवसेनेच्या पाठिशी खंबिर उभे राहण्याचा शब्द शिवसेनेच्या सर्व खासदारांना दिला.

फीड फीडबर्नर 11 Feb 2026 2:30 pm

H1B Visa: अमेरिकेत नोकरी शोधण्याचे स्वप्न भांगणार? ; H1B व्हिसा कार्यक्रम बंद करण्याची योजना

H1B Visa: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या जवळच्या एका कायदेकर्त्याने एक विधेयक मांडले आहे, जे भारतीयांसाठी एक मोठा धक्का आहे. ट्रम्पच्या रिपब्लिकन पक्षाचे सदस्य असलेले काँग्रेसमन ग्रेग स्टीब यांनी परदेशी कामगारांसाठीचा H1B व्हिसा कार्यक्रम रद्द करण्यासाठी एक्झाइल कायदा मांडला.

दैनिक प्रभात 11 Feb 2026 2:26 pm

एस.टी. प्रवासाचा नवा डिजिटल युगारंभ; सवलतधारकांसाठी ‘NCMC’ स्मार्ट कार्डची अनिवार्यता --- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या म्हणजेच एसटीच्या प्रवासात आता तंत्रज्ञानाची नवी पहाट उगवली आहे. रोख व्यवहारांच्या पलीकडे जाऊन, पारदर्शकता आणि सोयीस्कर सेवा देण्याच्या उद्देशाने एस.टी. महामंडळाने ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ (NCMC) प्रणाली लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.यापुढे विविध सामाजिक सवलतींचा लाभ घेण्यासाठी हे स्मार्ट कार्ड अनिवार्य असणार आहे.मंत्री सरनाईक म्हणाले की, ही केवळ तांत्रिक सुधारणा नसून, प्रवाशांच्या विश्वासाला डिजिटल बळ देणारे पाऊल आहे. सवलतींची अचूक नोंद, पारदर्शक प्रतिपूर्ती आणि रोखविरहित व्यवहार या तिन्ही गोष्टी एका कार्डमध्ये सामावल्या जाणार आहेत.या प्रकल्पासाठी महामंडळाने मे. ईबिक्स टेक्नोलॉजिस लि. आणि NSDL पेमेंट्स बँक यांच्याशी करार केला असून, लवकरच सर्व आगारांमध्ये नोंदणी मोहीम सुरू होणार आहे.कोणाला मिळणार NCMC कार्ड?या नव्या योजनेत समाजातील विविध घटकांचा समावेश करण्यात आला आहे:✓ विद्यार्थी: शालेय व तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या ‘सरल’ क्रमांकाशी जोडलेले कार्ड दिले जाईल.✓ ज्येष्ठ नागरिक व महिला: अमृत ज्येष्ठ नागरिक, सर्वसाधारण ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना आधार संलग्न कार्ड मिळेल.✓ दिव्यांग प्रवासी: UDID क्रमांक जोडून विशेष सुविधा असलेले कार्ड.✓ पुरस्कारार्थी व पत्रकार: स्वातंत्र्यसैनिक, अधिस्वीकृतीधारक पत्रकार आणि राज्यस्तरीय पुरस्कार विजेत्यांना विभागीय कार्यालय येथील मुख्यालय आगारा मार्फत वितरण.कार्डची वैशिष्ट्ये – प्रवासात स्मार्ट सोय१) किंमत: नवीन कार्ड १९९ रुपये (GST सह). जुने स्मार्ट कार्ड जमा केल्यास १४९ रुपयांत उपलब्ध.२) वॉलेट मर्यादा: किमान १०० रुपये; ५० रुपयांच्या पटीत रिचार्ज.३) रिचार्ज सुविधा: ईटीआयएम मशीन, अधिकृत संकेतस्थळ, मोबाईल ॲप किंवा नियुक्त एजंटकडून सहज रिचार्ज.४)नोंदणीसाठी व्यापक यंत्रणा: ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या सोयीसाठी ३००० हून अधिक अधिकृत एजंट नियुक्त करण्यात आले आहेत.५) बसस्थानकांवरच नोंदणीची प्रक्रिया पार पडणार असल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांनाही मोठा दिलासा मिळणार आहे.एस.टी.चा हा निर्णय म्हणजे परंपरागत प्रवास व्यवस्थेला डिजिटल स्पर्श देणारा टप्पा आहे. तिकीट हातात आणि सुट्या पैशांची चिंता या जुन्या गोष्टी आता इतिहासजमा होत आहेत. नव्या युगात, एका स्मार्ट कार्डच्या स्पर्शाने प्रवास अधिक सुलभ, सुरक्षित आणि पारदर्शक होणार आहे. असे प्रतिपादन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले.

फीड फीडबर्नर 11 Feb 2026 2:10 pm

सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या जिल्हा वार्षिक योजनेसाठी निधी वाढवून मिळावा; मंत्री छगन भुजबळ यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई: जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना सन २०२५-२६ साठी ९०० कोटी रुपयांची तरतूद होती. सन २०२६ - २७ साठी ही ६९१.९० कोटी रुपये मर्यादा शासनाने कळवली आहे. म्हणजे पुढील वर्षासाठी २०९ कोटी नियतव्यय कमी करण्यात येणार आहे. मात्र आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्याचा निधी कमी करू नये, शासकीय यंत्रणांकडून अधिक ६४२ कोटी इतकी वाढीव निधीची मागणी आहे. त्यानुसार ६९१.९० अधिक ६४२ अशी एकूण १३३३.९० कोटी इतकी तरतूद करण्यात यावी, अशी मागणी राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे.जिल्हा वार्षिक योजना सन २०२६-२७ चे प्रारूप आराखडे अंतिम करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री तथा मंत्री, वित्त व नियोजन, महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थान येथे नाशिक जिल्ह्याची ऑनलाइन पद्धतीने बैठक पार पडली. या बैठकीस मंत्री छगन भुजबळ, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे ही उपस्थित होते. या बैठकीत त्यांनी मागणी केली.बैठकी दरम्यान मंत्री भुजबळ यांनी सांगितले की, सन २०२५-२६ या वर्षासाठी नाशिक जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत ९०० कोटी इतकी तरतूद करण्यात आली होती. मात्र सन २०२६-२७ साठी प्रस्तावित तरतूद ६९१.९० कोटी इतकी मर्यादा कळवण्यात आली आहे.जिल्ह्याचा वेगाने होत असलेला विकास, नाशिक जिल्ह्यातून मिळणारा सर्वाधिक महसूल,वाढती लोकसंख्या आणि विविध विभागांकडून प्राप्त झालेल्या वाढीव मागण्या लक्षात घेता निधी कमी करू नये असे त्यांनी बैठकीत स्पष्ट केले.नाशिक जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी नाशिक कलाग्राम आणि गंगापूर धरण येथील सी प्लेन बाबत लवकर कार्यवाही करण्याची त्यांनी मागणी केली. तसेच सन २०२५-२६ या आर्थिक वर्षातील मंजूर निधीचा आढावा घेताना त्यांनी प्रशासनाला निधी खर्चाच्या प्रक्रियेला गती देण्याच्या सूचना दिल्या. सर्व योजनांच्या सर्व प्रशासकीय मान्यता तातडीने देण्यात याव्या तसेच मार्च अखेर पर्यंत १००टक्के निधी खर्च होईल याची दक्षता जिल्हा प्रशासनाने घ्यावी, असे त्यांनी स्पष्ट निर्देश दिले.नाशिक जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन सकारात्मक भूमिका घेईल, अशी अपेक्षा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली.शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी शाळा खोल्यांची दुरुस्ती आणि वर्गखोल्यांसाठी वाढीव निधीची मागणी केली.

फीड फीडबर्नर 11 Feb 2026 2:10 pm

Devendra Fadanvis : 'अस्सल मराठी चेहरा आणि दांडगा अनुभव'; रितू तावडेंच्या निवडीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले; बाळासाहेबांना ज्या प्रकारचं...

मुंबई : अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या सर्वोच्च पदी अखेर भाजपच्या रितू तावडे विराजमान झाल्या आहेत. आज त्यांनी पालिकेच्या महापौर पदाचा अधिकृत कार्यभार स्वीकारला. त्यांच्यासोबतच शिवसेनेचे (शिंदे गट) संजय घाडी यांनीही उपमहापौर म्हणून आपल्या पदाची सूत्रे हाती घेतली. पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दोन्ही नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे स्वागत करत त्यांच्याकडे कार्यभार सोपवला. महापालिका सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांच्या जोरदार घोषणाबाजीने वातावरण तापलेले असतानाच हा पदग्रहण सोहळा पार पडला. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः उपस्थिती लावली होती. महायुतीच्या नेत्यांनी रितू तावडे आणि संजय घाडी यांचे अभिनंदन करत आगामी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.https://prahaar.in/2026/02/11/all-6-stanzas-of-vande-mataram-now-must-for-all-govt-events-schools-what-centres-new-guidelines-say/मुंबईला मिळाला 'अस्सल मराठी चेहरा' : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसपदभार स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, नवनियुक्त महापौर, उपमहापौर आणि सर्व पदाधिकारी मिळून मुंबई महापालिकेला एक नवी प्रगतीशील दिशा देतील. सामान्य मुंबईकरांनी जे विश्वासाने महायुतीला निवडून दिले आहे, त्यांची सर्व स्वप्ने पूर्ण करण्याचे काम ही नवी टीम करेल, असा आम्हाला ठाम विश्वास आहे. महापौर रितू तावडे यांच्या रूपाने मुंबईला एक अनुभवी आणि अस्सल मराठी चेहरा मिळाला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या निवडीचे स्वागत केले. शिवसेना-भाजप महायुतीचे हे यश मुंबईकरांनी दाखवलेल्या विश्वासाचे प्रतीक असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. पदग्रहण सोहळ्यानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, निवडणूक काळात मी आणि एकनाथ शिंदे यांनी मुंबईकरांकडे 'लोकाभिमुख' आणि 'पारदर्शी' प्रशासनासाठी मते मागितली होती. जनतेने दिलेल्या प्रतिसादानुसारच आज महायुतीचे दोन्ही शिलेदार पदावर विराजमान झाले आहेत. रितू तावडे यांनी यापूर्वीही मुंबईकरांच्या समस्यांवर नेहमीच आक्रमक भूमिका घेतली आहे, त्यामुळे त्यांच्या अनुभवाचा फायदा शहराच्या विकासासाठी निश्चितपणे होईल. राज्य सरकारने मुंबईच्या विकासाचा जो भव्य कार्यक्रम हाती घेतला आहे, तो आता महानगरपालिकेच्या माध्यमातून अधिक प्रभावीपणे राबवला जाईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. रितू तावडे आणि उपमहापौर संजय घाडी यांच्या नेतृत्वाखाली मुंबई महापालिका पुन्हा एकदा सामान्य जनतेसाठी काम करणारी संस्था ठरेल, अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली.बाळासाहेबांना अपेक्षित असं प्रशासन देणारउपमहापौर संजय घाडी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. संजय घाडी हे शिवसेनेचे अत्यंत जुने, जाणते आणि अनुभवी शिवसैनिक आहेत. त्यांच्या दीर्घ अनुभवाचा फायदा मुंबईच्या कारभाराला गती देण्यासाठी निश्चितपणे होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष जवळ येत आहे. याचे औचित्य साधून मुख्यमंत्री म्हणाले की, बाळासाहेबांना ज्या प्रकारचं लोकाभिमुख आणि मुंबईकरांच्या हिताचं प्रशासन अपेक्षित होतं, अगदी तसंच प्रशासन या महापालिकेच्या माध्यमातून देण्याचा आमचा प्रयत्न असेल. नवीन महापौर आणि उपमहापौर ही जोडी बाळासाहेबांच्या विचाराने पालिकेचा गाडा हाकतील, असेही त्यांनी नमूद केले. मी आणि एकनाथ शिंदे पूर्ण ताकदीने या टीमच्या पाठीशी उभे आहोत. आम्ही जी 'नवी मुंबई' घडवण्याचे स्वप्न पाहत आहोत, त्या विकासाला गती देण्याचे काम महापालिका पदाधिकारी करतील, असे आश्वासन त्यांनी दिले. सामान्य मुंबईकरांच्या प्रलंबित समस्या आणि त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार आणि महानगरपालिका आता हातात हात घालून काम करणार असल्याचे स्पष्ट संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

फीड फीडबर्नर 11 Feb 2026 2:10 pm

अजित पवारांच्या मृत्यूचे राजकारण करू नका! - मुख्यमंत्र्यांचा सल्ला; कोणाकडे पुरावे असतील तर त्यांनी तपास यंत्रणांकडे द्यावेत

मुंबई : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाबाबत तर्कवितर्क न लढवता, सखोल चौकशी पूर्ण होऊ द्यावी. कोणीही या दुर्दैवी घटनेचे राजकारण करू नये, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी व्यक्त केले. या अपघाताबाबत कोणाकडे काही पुरावे किंवा मुद्दे असतील, तर त्यांनी ते संबंधित तपास यंत्रणांकडे सादर करावेत, असेही त्यांनी नमूद केले.मुंबई महापालिका मुख्यालयाबाहेर माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. अजित पवार यांच्या अपघाती निधनाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केलेल्या संशयावर मुख्यमंत्र्यांनी भाष्य केले. ते म्हणाले, रोहित पवार यांनी काय वक्तव्य केले, हे मी थेट ऐकले नसले तरी त्यांनी काही प्रेझेंटेशन केले असल्याची माहिती आहे. विविध माध्यमे व नागरिकांनी उपस्थित केलेल्या शंकाच त्यांनी मांडल्या असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.अजित पवार हे महाराष्ट्राचे लाडके व वरिष्ठ नेतृत्व होते. त्यामुळे त्यांच्या अपघाताची पूर्ण, सखोल व निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे, ही मागणी रास्त असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. मीच सर्वप्रथम केंद्र सरकारला पत्र लिहून योग्य चौकशीची मागणी केली होती. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांनी विशेष चौकशी समिती स्थापन केल्याचे पत्रही पाठवले असून सध्या तपास सुरू आहे, अशी माहिती त्यांनी दिली.चौकशी पूर्ण होण्यापूर्वी तर्कवितर्क मांडल्यास लोकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो, असे सांगत त्यांनी भारतीय तपास यंत्रणांवर अविश्वास दाखवू नये, असे आवाहन केले. देशातील डीजी एव्हिएशन सेफ्टी हे सर्वोच्च कार्यालय असून आतापर्यंतच्या सर्व विमान अपघातांची चौकशी त्यांनीच केली आहे. याशिवाय सीआयडीचा समांतर तपास सुरू असून डीजीसीएचीही चौकशी सुरू आहे. अपघातग्रस्त विमानातील ब्लॅकबॉक्स सापडला आहे. शिवाय विमानाचे आवश्यक भाग जप्त करण्यात आले असून पायलट व एटीसीमधील संवाद डिजिटाईज स्वरूपात उपलब्ध आहे. अपघातस्थळावरील नमुने न्यायवैद्यक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.देशातील तपास यंत्रणांवर शंका नको - फडणवीस- भारताच्या तपास यंत्रणा आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असून अनेक देशांकडून भारतीय अधिकाऱ्यांना चौकशीसाठी निमंत्रित केले जाते. त्यामुळे त्यांच्यावर अविश्वास दाखवण्याचे कारण नाही. भावनेच्या भरात काही विधाने झाली असतील; मात्र देशाच्या यंत्रणांवर शंका घेऊ नये, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.- अजित पवार यांच्या दुर्दैवी मृत्यूचे राजकारण करू नये, असे आवाहन करत मुख्यमंत्री म्हणाले की, त्यांच्या अपघाती निधनाचे सत्य बाहेर यावे, अशी सर्वांचीच इच्छा आहे आणि ते निश्चितपणे समोर येईल, असा मला विश्वास आहे. कोणाकडे काही मुद्दे किंवा शंका असतील, तर त्यांनी ते डीजी सेफ्टीकडे पाठवावेत. शंका व्यक्त करणे चुकीचे नाही; मात्र त्याचा राजकीय हेतूने वापर होऊ नये, याची प्रत्येकाने काळजी घ्यावी, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

फीड फीडबर्नर 11 Feb 2026 2:10 pm

राज ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदींना घाबरले; माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा टोला

मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी मुंबईत केलेल्या उद्बोधनावर राज ठाकरे यांनी टीका केली. त्यानंतर भाजपसह संघ वर्तुळातून राज यांच्या विधानाचा कठोर शब्दांत समाचार घेतला जात आहे. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देखील राज यांच्या विधानाचा खरपूस समाचार घेत, सरसंघचालकांच्या उद्बोधनाला आलेले मान्यवर नव्हे, तर राज ठाकरेच नरेंद्र मोदींना जास्त घाबरत आहेत, असा टोला लगावला.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुंबईतील कार्यक्रमात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी संघाची भूमिका, कार्यपद्धती आणि समाजातील योगदान याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होती. त्यामुळे या कार्यक्रमाची देशभरात चर्चा झाली. या कार्यक्रमानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर लांबलचक पोस्ट लिहून टीका केली. कार्यक्रमाला आलेली मंडळी संघप्रेमापोटी नव्हती, तर सरकारच्या दबावामुळे किंवा भीतीमुळे आली होती, असा आरोप त्यांनी केला. यापूर्वी अशा कार्यक्रमांना कोणी का उपस्थित राहिले नव्हते, असा सवाल उपस्थित करत ही उपस्थिती संघासाठी नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भीतीपोटी असल्याचे त्यांनी म्हटले.राज ठाकरे यांच्या या भूमिकेवर भगतसिंह कोश्यारी यांनी तिखट प्रतिक्रिया दिली. संघाच्या कार्यक्रमाला लोक मोदींना घाबरून आले नव्हते. उलट राज ठाकरेच नरेंद्र मोदींना जास्त घाबरत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. राज ठाकरे यांनी मोदींना घाबरू नये, तर त्यांच्या जवळ जावे, असा सल्लाही त्यांनी दिला. मोदींसाठी सर्व जनता समान आहे, असे सांगताना कोश्यारी यांनी प्रभू राम आणि त्यांच्या प्रजेचा दाखला दिला. ज्या पद्धतीने रामाला सर्व प्रजा समान होती, त्याचप्रमाणे मोदींसाठीही सर्व नागरिक समान आहेत, असे ते म्हणाले. राज ठाकरे माझे ‘लहान भाऊ’ आहेत. ते वाणीने कडक असले तरी चांगले नेते असल्याचेही त्यांनी नमूद केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्मभूमीत राहणाऱ्यांनी घाबरण्याचे कारण नसल्याचे सांगत, चुकीचे काम करण्यास घाबरावे; मात्र व्यक्तींना घाबरू नये, असा सल्लाही भगतसिंह कोश्यारी यांनी दिला.

फीड फीडबर्नर 11 Feb 2026 2:10 pm

Mardani 3 Box Office : मर्दानी 3 ची बॅाक्स अॅाफिसवर दमदार कामगिरी! 12 व्या दिवशी ‘इतक्या’कोटींची केली कमाई

Mardani 3 Box Office :मर्दानीच्या तिसऱ्या भागाला देखील प्रेक्षक आणि समीक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

दैनिक प्रभात 11 Feb 2026 1:20 pm

Money Laundering Case: मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने अनिल अंबानींसह पत्नीला बजवाले समन्स

Money Laundering Case: एसबीआय बँक घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अनिल अंबानी आणि त्यांच्या पत्नी टीना अंबानी यांना नवीन समन्स जारी केले आहेत.

दैनिक प्रभात 11 Feb 2026 1:05 pm

Pune News : पावसाळापूर्व कामे ३० एप्रिलपर्यंत पुर्ण करावीत; महापौरांचे प्रशासनाला आदेश

Pune News : मुळा-मुठा नदी सुधार प्रकल्पाच्या सध्याच्या प्रगतीचा आणि पावसाळ्यातील सुरक्षेचा सविस्तर अहवाल तीन दिवसांत महापौर कार्यालयात सादर करण्याचे निर्देश

दैनिक प्रभात 11 Feb 2026 12:58 pm

Subhedar Teaser : लाला हमसे ना भिडियो! अनिल कपूर पुन्हा अॅक्शन अवतारात; सुभेदाराचा दमदार टीझर आऊट

Subhedar Teaser :ज्येष्ठ अभिनेते अनिल कपूर पुन्हा एकदा त्यांच्या अॅक्शन अवतारामध्ये परतले असून, सुभेदार या आगामी चित्रपटात दमदार भूमिकेत दिसणार आहेत.

दैनिक प्रभात 11 Feb 2026 12:52 pm

Bhagat Singh Koshyari: “राज ठाकरे नरेंद्र मोदींना जास्तच घाबरले, पण त्यांनी…”; भगतसिंग कोश्यारींचा राज ठाकरेंना खोचक टोला

Bhagat Singh Koshyari : राज ठाकरे हे नरेंद्र मोदींना जास्तच घाबरले आहेत, पण घाबरलं नाही पाहिजे, असे विधान माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले आहे.

दैनिक प्रभात 11 Feb 2026 12:47 pm

Pune: भाजपाने पुण्यात उचललं कठोर पाऊल; ६९ बंडखोर सहा वर्षांसाठी निलंबित, 'या'मोठ्या नेत्यांचा समावेश

पुणे : नुकत्याच राज्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांमध्ये अनेक घडामोडी घडल्याचे दिसून आले. अनेक उमेदवारांना पक्षाने उमेदवारी न दिल्याने त्यांनी अधिकृत उमेदवारांच्या विरोधात अर्ज दाखल केला. आता पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरुद्ध निवडणूक लढवणाऱ्या बंडखोरांववर भाजपाने कारवाई केली आहे. पुण्यातील ६९ कार्यकर्त्यांना सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला.भाजपच्या अधिकृत उमेदवारांविरोधात अपक्ष किंवा इतर पक्षांच्या माध्यमातून निवडणूक लढवणाऱ्या कार्यकर्त्यांवर पक्षशिस्तीचा भंग केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. संबंधितांना पक्षातून सहा वर्षांसाठी दूर ठेवण्यात येणार असून, या कालावधीत त्यांना कोणतीही संघटनात्मक जबाबदारी किंवा पद दिले जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. पक्षशिस्त भंग करणाऱ्यांबाबत कोणतीही सहानुभूती दाखवली जाणार नाही, असा ठाम संदेश पक्षाने दिला आहे. भविष्यातही कुठल्याही पदाधिकारी किंवा कार्यकर्त्याने पक्षविरोधी भूमिका घेतल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, अशी सूचना शहराध्यक्षांनी केली आहे. या निर्णयामुळे स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे. तसेच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने संघटनात्मक शिस्त अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे मानले जात आहे.याबाबतचे पत्र देखील समोर आले असून पत्रात सर्व ६९ जणांची नावे असून त्यांच्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची सही आहे. या पत्रामध्ये लिहलंय की, भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री, रविंद्रजी चव्हाण साहेब यांच्या आदेशानुसार भारतीय जनता पार्टीच्या विरोधात निवडणूक लढविलेल्या कार्यकर्त्यांचे पुढील सहा वर्षाकरिता पार्टीमधून निलंबन करण्यात आले आहे. पक्षशिस्त भंग करणाऱ्यांबाबत कोणतीही सहानुभूती न दाखवण्याचा निर्धार पक्षाने स्पष्ट केला आहे. दरम्यान, पक्षातील कुठल्याही पदाधिकारी किंवा कार्यकर्त्याने पक्षविरोधी भूमिका घेतल्यास त्यांच्यावरही कठोर कारवाई केली जाईल, असे सूचनाही जिल्हाध्यक्षांनी केल्या आहेत.सदरील कार्यवाही ही तात्काळ लागू करण्यात येत आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी.भाजपमधून हकालपट्टी केलेल्या ६९ जणांची नावे1. श्री धनंजय जाधव2. श्री चंद्रकांत पाटे3. सौ कादंबरी साळवी4. श्री जितेंद्र टकले5. श्री किशोर तरवडे6. श्री अमोल बालवडकर7. श्री सोमनाथ गुंड8. सौ मानसी सोमनाथ गुंड9. सौ अनिता तळाठी10. सौ पल्लवी गाडगीळ11. श्री दत्ता भगत12. श्री विनोद मोहिते13. श्री रमेश भंडारी14. श्री समाधान शिंदे15. श्री मधुकर मुसळे16. श्री प्रकाश डोरे17. श्री बाळासाहेब सानवडे18. सौ मंजू वाघमारे19. सौ प्रीती वालकर20. श्री संदीप लोणकर21. सौ स्मिता गायकवाड22. श्री संतोष शिंदे23. श्री युवराज कुञ्जेकर24. श्री इफ्तियाज मोमीन25. श्री अप्पणा दादावाडकर26. श्री पुरुषोत्तम अप्पणा दादावाडकर27. अभिजीत उपाध्ये28. सौ छाया गवळी29. श्री नवल कुसाळ30. श्री समीर पठाण31. श्री प्रणव मोरे32. श्री योगेश सूर्यवंशी33. सौ अर्चना योगेश सूर्यवंशी34. सौ नलिनी मोरे35. सौ संगिता ठोसर36. श्री अनिल मेमाणे37. श्री नितीन मारकड38. श्री सतीश मारकड39. सौ वर्षा मारकड40. श्री रुपेश धुले41. श्री बापू पोकळे42. श्री किरण वाळुंज43. श्री अमोल रायकर44. श्री संदीप पोकळे45. मोहिनी देवकर46. रितेश रासकर47. सचिन दशरथ दांगट48. सुरेंद्र कांबळे49. श्री संदीप जन्हाड50. सौ सुनीता गलांडे51. श्री किशोर वाघमारे52. श्री विजय चौगुले53. श्री अकबर पठाण54. श्री राजू साखरे55. सौ ऐश्वर्या जाधव56. श्री जितेंद्र जगताप57. श्री प्रविण खेडकर58. सौ स्मिता खेडकर59. सौ उज्वला गोडे60. श्री बाळासाहेब घोडके61. श्री सुरेश धनगर62. सौ स्वाती धनगर63. सौ सुवर्णा भरेकर64. सौ पल्लवी केदारी65. श्री राहुल रामे66. श्री हरीष परदेशी67. श्री बंडू जाधव68. सौ नीता थोरवे69. श्री प्रीतम नागापुरे

फीड फीडबर्नर 11 Feb 2026 12:30 pm

Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ ; वाचा आजचा भाव काय ?

Gold Silver Price Today: सोने आणि चांदीच्या किमती काल घसरण झाल्यानंतर पुन्हा एकदा आज वाढताना दिसत आहेत. आज बाजार उघडताच सोने १५८,११७ रुपयांवर पोहोचले. मात्र त्यानंतर सोन्याचे दर थोडे कमी झाले आहेत.

दैनिक प्रभात 11 Feb 2026 12:29 pm

Shreyash Talpade : राजपाल यादवनंंतर आता प्रसिद्ध मराठमोळा अभिनेता अडचणीत; फसवणुकीचा गुन्हा दाखल, नेमंक प्रकरण काय?

Shreyash Talpade : मराठमोळा अभिनेता श्रेयश तळपदे पुन्हा एकदा एका प्रकरणामुळे चर्चेत आला असून, त्याच्यासह १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक प्रभात 11 Feb 2026 12:21 pm

India Map: व्यापार कराराच्या दरम्यान अमेरिकेने रंग बदलले ; भारताच्या ‘त्या’नकाशाची पोस्ट केली डिलीट

India Map: अमेरिकेच्या व्यापार प्रतिनिधी कार्यालयाने (USTR) एक मोठा बदल केला आहे. ज्यामध्ये पाकव्याप्त काश्मीर (PoK) आणि अक्साई चीन हे भारताचा भाग असणारा नकाशा पोस्ट करण्यात आला होता.

दैनिक प्रभात 11 Feb 2026 12:10 pm

आंगणेवाडीचा भक्तीमय सोहळा उत्साहात संपन्न

सिंधुदुर्ग: 'कमलपदी तव नमितो माते जयजय भराडी देवी...... जय जय भराडी देवी......!' असा ध्वनीक्षेपकावर चालु असलेला देवीचा गजर, आणि महाप्रसादाचा सोहळा पाहण्यासाठी देवालयाच्या प्रांगणाबाहेर उसळलेली भक्तांची गर्दी असाच नजारा सोमवारी रात्री आंगणेवाडीत पहावयास मिळाला. महाप्रसाद ताटे लावण्याच्या कार्यक्रमासाठी ९.५० वाजता बंद झालेली दर्शन रांग पुन्हा रात्री १ नंतर चालू झाली. सकाळच्या सत्रा बरोबरच सायंकाळी भाविकानी उच्चांकी गर्दी अनुभवली. मंगळवारी सुद्धा भाविकांच्या गर्दीने आंगणेवाडी यात्रा परिसर फुलुन गेला होता. प्रती पंढरपुर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व नवसाला पावणाऱ्या आंगणेवाडीच्या श्री भराडी देवीच्या यात्रोत्सवाची सांगता मंगळवारी सायंकाळी उशिरा उत्साहात झाली. दरम्यान भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कुटुंबिया समवेत रात्री भराडी मातेचे दर्शन घेतले. यावेळी कल्याण जिल्हा अध्यक्ष नंदू परब, भाजप जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, बंड्या सावंत आदी उपस्थित होते. विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, प्रांत ऐश्वर्या काळुशे, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ मोहन दहिकर यांनी मंगळवारी आई भराडीचे दर्शन घेतले.दोन दिवसात आंगणेवाडीत सुमारे आठ लाख भाविकांनी देवीचे दर्शन घेतले. मंदिर परिसरातील दर्शन रांगांमधील भाविकांचा ओघ मंगळवारी सायंकाळनंतर चालूच होता. मंगळवारी आंगणे ग्रामस्थानी देवीचे दर्शन घेऊन ओट्या भरल्या. आंगणे कुटुंबीय आंगणेवाडी यांनी देवीच्या भक्तांसाठी मंगळवारी सुद्धा सायंकाळपर्यंत नवस बोलणे, फेडणे व ओटी भरणे आदी विधी देवीच्या आशीर्वादाने चालू ठेवले होते.महाप्रसादाच्या सोहळ्याने मंदिर प्रांगण बहरलेयात्रोत्सवातील महत्वाचा असा महाप्रसादाची ताटे लावण्याचा कार्यक्रम शनिवारी रात्री ९.५० वा. सुरु झाला. प्रथम मानकऱ्यांची प्रसादाची ताटे देवीच्या प्रांगणात सवाष्ण महिलांकडून डोक्यावरुन आणण्यात आली. यानंतर सर्व ग्रामस्थांच्या घरात बनवलेली महाप्रसादाची ताटे लावण्याचा कार्यक्रम पाहण्यासाठी देवीच्या प्रांगणात भक्तानी गर्दी केली होती. ताटे लावणे कार्यक्रम दरम्यान आंगणेवाडीतील सवाष्ण महिलांचा मेळाच देवालयाच्या मागील प्रांगणात भरला होता.सोमवारी उत्तर रात्री गर्दीचा ओघ वाढलासायंकाळनंतर भाविकांची गर्दी उत्तरोत्तर वाढत गेली. रात्री बारानंतर तर देवालयाच्या बाहेरील परिसरात रस्त्यावरुन चालणे अवघड बनले होते. यात्रेच्या दोन दिवसात लाखो रुपयांची उलाढाल झाली. मनोरंजनाच्या खेळण्यांच्या भागात बच्चे कंपनीची गर्दी झाली होती. यात्रोत्सवात सेवा दिलेल्या शासनाच्या सर्व विभागांचे अधिकारी, कर्मचारी यांचे यावेळी आंगणे कुटुंबिय आंगणेवाडी यांच्या वतीने विशेष आभार मानण्यात आले. मोड जत्रेत शेतीची अवजारे व गृहपयोगी साहित्य खरेदी करण्यासाठी गर्दी झाली होती. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या बचतगटांच्या स्टॉलना चांगला प्रतिसाद मिळाला. गेले दोन दिवस दुरवरुन आलेल्या भक्तगणांमुळे आंगणेवाडी परिसर फुलुन गेला होता.भाविकांना मिळाले विनाविलंब दर्शनएकूण नऊ रांगांद्वारे दर्शन व्यवस्था आंगणे कुटुंबियांच्या वतीने केल्याने तसेच योग्य नियोजनामुळे भाविकांना काही वेळातच देवीचे दर्शन मिळत होते. कुठलीही दर्शन रांग खोळंबलेली दिसून येत नव्हती. ठिकठिकाणी लावलेल्या ४८ सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या सहाय्याने स्वागत कक्षामधून बाबु आंगणे, बाळा आंगणे यांच्याकडून वेळोवेळी सूचना देण्यात येत होत्या. सदर व्यवस्था आंगणे कुटुंबीय व रोहन व्हिडीओ कॉम्प्युटेक मुंबईचे अनंत आंगणे यांच्या वतीने करण्यात आली होती. सायंकाळनंतर आकर्षक विद्युत रोषणाईने सर्व परिसर उजळून निघाला होता.आंगणेवाडीत आज स्वच्छता अभियानयात्रेनिमित्त येणाऱ्या लाखो भाविकांकडून तसेच व्यापाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होतो. कोणत्याही प्रकारची रोगराई पसरु नये यासाठी परिसरातील शाळा व कॉलेजच्या मुलांकडून तसेच नगरपरिषद सफाई कर्मचारी यांच्याकडून आज आंगणेवाडी परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. इच्छुक शाळांना मंडळाचे कार्याध्यक्ष बाळा आंगणे यांना संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. प्रशासनाच्या वतीने सुद्धा स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. एसटीच्या वतीने मसुरे, कणकवली, मालवण आदी. आंगणेवाडीतील हंगामी स्टँडवरून प्रवाशांना सेवा देण्यात आली.आंगणे कुटुंबीयांनी मानले आभारआंगणेवाडी कुटुंबियांच्या वतीने मुंबई मंडळाचे अध्यक्ष छोटू आंगणे यानी यात्रोत्सव यशस्वितेबद्दल पोलीस प्रशासन, वीज वितरण, महसूल, सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य विभाग तसेच देवी भराडीच्या भक्तांचे आभार मानले. पंढरपूर येथील रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी स्वयंसेवक म्हणून जबाबदारी पार पाडली.यात्रोत्सव यशस्वीतेसाठी अध्यक्ष छोटू आंगणे, सचिव काका आंगणे, उपाध्यक्ष आनंद आंगणे, बाळा आंगणे, मधुकर आंगणे, बाबू आंगणे, सतीश आंगणे, दत्ता आंगणे, अनंत आंगणे, दिनेश आंगणे, नंदू आंगणे, सुनील आंगणे, सुधा आंगणे, प्रसाद आंगणे, महेश आंगणे, प्रसाद आंगणे, समीर आंगणे, बाब्या आंगणे, रघुनाथ आंगणे, पंकज आंगणे, आबा आंगणे, प्रसाद मंगेश आंगणे, संकेत आंगणे, जयेश आंगणे, आबा आंगणे, विजय चव्हाण, बंडू चव्हाण, तनुराज आंगणे, कुणाल आंगणे, देवेंद्र आंगणे, जितेंद्र आंगणे, जयेश आंगणे, दया आंगणे, सचिन आंगणे, महेश आंगणे, श्री राणे आदींनी परिश्रम घेतले.

फीड फीडबर्नर 11 Feb 2026 12:10 pm

Sunetra Pawar: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्लीत; पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेतली भेट

Sunetra Pawar: सुनेत्रा पवार आज उपराष्ट्रपतींची भेट घेऊन राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा देणार आहेत.

दैनिक प्रभात 11 Feb 2026 11:58 am

Supriya Sule post : रेवती अन् सारंगचा एकत्रित फोटो; सुप्रिया सुळेंकडून लग्नाची अधिकृत घोषणा; पोस्टमध्ये नेमकं काय म्हणाल्या?

Supriya Sule post : खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून रेवती आणि सारंग यांच्या विवाहाची अधिकृत घोषणा केली आहे.

दैनिक प्रभात 11 Feb 2026 11:49 am

Teacher File: ५० वर्षे, ९ देश अन् ८९ अल्पवयीन…एप्सटिननंतर आता फ्रान्सची ‘टीचर फाईल’समोर ; जर्मनी, स्वित्झर्लंडपासून भारतापर्यंत जोडले गेले तार

Teacher File: अमेरिकन लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टाईन सध्या जगभरात जोरदार चर्चेचा विषय आहे. एपस्टाईन फाइल्समध्ये अनेक देशांतील प्रमुख राजकारणी आणि उद्योजकांची नावे आहेत. यामुळे अनेक राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी राजीनामा दिला.

दैनिक प्रभात 11 Feb 2026 11:42 am

Mumbai-Pune ExpressWay : चक्क भाजलेल्या हातांनी रोखला मृत्यू! पेरूच्या खुट्टीनं टळला मोठा अनर्थ; एक छोटी चूक अन् १० किमीचा परिसर झाला असता खाक

मुंबई : मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर नुकत्याच झालेल्या महाभीषण वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. तब्बल ३२ तास हजारो नागरिक अन्नापाण्याविना महामार्गावर अडकून पडले होते. या घटनेनंतर प्रशासकीय नियोजनाचा पुरता फज्जा उडाल्याची टीका सर्वच स्तरांतून होत असतानाच, आता या प्रकरणामागील एक धक्कादायक आणि तितकीच महत्त्वाची माहिती समोर येत आहे.'प्रोपोलिन' वायू गळतीमुळे एक्स्प्रेस वे ठप्पमुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर झालेली अभूतपूर्व वाहतूक कोंडी ही केवळ तांत्रिक बिघाड नसून एका भीषण संकटाची चाहूल होती. या महामार्गावर प्रोपोलिन वायू वाहून नेणाऱ्या टँकरचा भीषण अपघात झाला आणि त्यातून धोकादायक वायूची गळती सुरू झाली. हा वायू अत्यंत ज्वलनशील असल्याने संपूर्ण महामार्ग जणू काही स्फोटकाच्या ढिगाऱ्यावर उभा होता. ही भीषण दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने दोन्ही बाजूंची वाहतूक थांबवली, ज्यामुळे प्रवाशांना ३२ तास ताटकळत राहावे लागले. या घटनेत टँकर चालकाचे शौर्यही समोर आले आहे. प्रोपोलिन हा वायू उणे -२० ते -२३ अंश सेल्सिअस इतक्या नीचांकी तापमानात असतो. गळती रोखण्यासाठी चालकाने स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता हाताने प्रयत्न केला, ज्यामध्ये त्याचे दोन्ही हात गंभीररीत्या भाजले गेले आहेत. जर ही गळती वेळीच नियंत्रणात आली नसती किंवा मदतकार्यात थोडीही चूक झाली असती, तर एक्स्प्रेस वेवर मोठा अग्निकांड घडून अनेकांच्या जीवावर बेतले असते. सुरक्षिततेच्या कारणास्तव अपघातस्थळापासून एक किलोमीटरचा परिसर रिकामा करण्यात आला होता. प्रशासनाच्या या कठोर निर्णयामुळे प्रवाशांना त्रास झाला असला, तरी एका महाविनाशकारी दुर्घटनेचा धोका टळला आहे.https://prahaar.in/2026/02/11/political-turmoil-in-delhi-deputy-chief-minister-sunetra-pawar-to-meet-modi-shah-while-rohit-pawar-is-also-in-the-capital/'पेरूच्या लाकडाने' वाचवले हजारो प्राणतांत्रिक यंत्रणा हतबल झाल्या असताना, तज्ज्ञांनी पेरूच्या झाडाच्या लाकडापासून तयार केलेल्या खुट्टीचा (Wooden Plug) वापर करून ही गळती रोखली आणि एक मोठा अनर्थ टाळला. टँकरचा 'मेन व्हॉल्व' तुटल्यामुळे अत्यंत ज्वलनशील वायूचा विसर्ग वेगाने सुरू होता. उणे तापमानामुळे लोखंडी अवजारे वापरणे कठीण होते, अशा वेळी तज्ज्ञांनी पेरूच्या लाकडाची निवड केली. हे लाकूड मऊ आणि लवचिक असते, जे प्रोपोलिनसारख्या कमालीच्या थंड संपर्कात आल्यावर आकुंचन पावण्याऐवजी फुगते आणि छिद्रात घट्ट बसते. ज्याप्रमाणे वाईनच्या बाटलीला लाकडी बुच लावून हवा बंद केली जाते, अगदी त्याच धर्तीवर ही 'पेरूची खुट्टी' व्हॉल्वमध्ये बसवण्यात आली. तब्बल ३६ तासांच्या अथक परिश्रमानंतर आणि या विशेष ऑपरेशननंतर वायू गळती पूर्णपणे थांबवण्यात यश आले.२२ टन गॅसचा स्फोट झाला असता तर घाट हादरला असताज्या टँकरचा अपघात झाला, त्यामध्ये तब्बल २२ टन प्रोपोलिन वायू साठवलेला होता. तज्ज्ञांच्या मते, जर या वायूचा स्फोट झाला असता, तर अपघातस्थळापासून तब्बल १० किलोमीटरपर्यंतचा परिसर पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असता. यामुळे केवळ महामार्गच नव्हे, तर संपूर्ण घाट परिसर एका मोठ्या संकटात सापडला असता. प्रोपोलिन वायूचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तो 'वासरहित' असतो, त्यामुळे त्याची गळती होत असल्याचे सहजासहजी लक्षात येत नाही. हा वायू मानवी शरीरात गेल्यास श्वासोच्छवासात अडथळा निर्माण करून जीवघेणा ठरू शकतो. तसेच, अत्यंत ज्वलनशील असल्याने कोणत्याही छोट्याशा ठिणगीमुळे याचा मोठा भडका उडू शकला असता.गॅस ट्रान्सफर आणि पेट्रोल लाईनचा धोकाटँकरमधील २२ टन ज्वलनशील वायू आणि जमिनीखालून वाहणारे पेट्रोल यामुळे हा संपूर्ण परिसर एका 'लाईव्ह बॉम्ब'वर उभा होता. जीवावरचं संकट आणि तीन टप्प्यांतील थरार अपघाग्रस्त टँकर हलवणे हे एक मोठे आव्हान होते. त्यातील वायूचे वजन कमी केल्याशिवाय तो हलवणे अशक्य होते. त्यामुळे बचाव पथकाने अत्यंत जोखमीचे पाऊल उचलत तीन टप्प्यांत गॅस ट्रान्सफर करण्याचे काम हाती घेतले. वायू गळती आणि पेट्रोल लाईनचा वाढता धोका लक्षात घेता, तिथे काम करणारा प्रत्येक कर्मचारी आपला जीव मुठीत धरून कर्तव्यावर होता. एखादी छोटीशी चूक केवळ कर्मचाऱ्यांचाच नव्हे, तर १० किमी परिसराचा घास घेऊ शकली असती. आधुनिक यंत्रणा जिथे हतबल ठरल्या, तिथे पेरूच्या लाकडाच्या नैसर्गिक गुणधर्माचा वापर करून गळती रोखण्यात आली. या एका छोट्या खुट्टीमुळे हजारो प्रवाशांचे प्राण वाचले.

फीड फीडबर्नर 11 Feb 2026 11:30 am

Drishyam 3 Film : अक्षय खन्ना दृश्यम ३ मधून बाहेर; ‘या’सुपरस्टार अभिनेत्याची होणार एन्ट्री

Drishyam 3 Film : अक्षय खन्नाने दृश्यम ३ चित्रपट सोडल्यानंतर आता त्यामध्ये दक्षिणेतील एका अभिनेत्याची एन्ट्री झाली आहे.

दैनिक प्रभात 11 Feb 2026 11:20 am

State Budget Session : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला 23 फेब्रुवारीपासून सुरूवात; 6 मार्चला अर्थसंकल्प मांडला जाणार

State Budget Session : राज्याचा अर्थसंकल्प ६ मार्च रोजी सादर केला जाणार असून, हे अधिवेशन २५ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे.

दैनिक प्रभात 11 Feb 2026 11:16 am

Jaykumar Gore: जयकुमार गोरेंच्या आरोपामुळे राजकीय वातावरणात खळबळ, जिल्हा परिषद जिंकणाऱ्या भाजपच्या माजी आमदाराच्या हत्येचा कट...

सोलापूर : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूका नुकत्याच पार पडल्या आहेत. या निवडणुकीनंतर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत. अशातच आता ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी गंभीर आरोप केला आहे. माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते यांच्या हत्येचा कट रचला गेल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला होता, असाही आरोप गोरे यांनी केला आहे. यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे.पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूरमध्ये पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केला आहे. ते म्हणाले की, माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते यांच्या हत्येचा कट रचला गेला होता. जे मला गुंड म्हणत आहेत, ते सर्वात मोठे गुंड आहेत. माळशिरसमध्ये बघा कुठल्या पद्धतीचं वातावरण आहे. अनेक कार्यकर्त्यांना मारहाण झाली. ज्या पद्धतीचे भाजपला मत मिळाली आहे. ते बघून भाजप कार्यकर्त्यांना मारहाण आणि दमदाटी झाली. त्याठिकाणी माजी आमदार राम सातपुते यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. आणि त्यातून त्यांच्या खुनाचा कट होता असा गंभीर आरोप गोरे यांनी केला.तसेच, राम सातपुते यांच्यावर कोण हल्ला करणार होते, या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत. हा कट कोणी रचला होता ते भविष्यात पोलीस तपासात समोर येईल, याबाबत कोण गुंडा आहे. हे समोर येईलच त्यानंतर आपण चर्चा करू' असंही गोरे म्हणाले.पराभव झाल्यानंतर कारण सांगण्याची मला सवय नाही. पराभव का झाला याचं विश्लेषण मी करणार नाही. मात्र, झालेला पराभव स्वीकारतो. सोलापूरकडे लक्ष होतं, त्यामुळे साताऱ्याकडे दुर्लक्ष झालं हे खरं आहे. केवळ दुर्लक्ष होणे हे एकमेव पराभवाचे कारण नाही. असे अनेक पराभवाचे धक्के स्वीकारलेले आहेत. या धक्क्यातून मार्ग काढून पुढे जाण्याचा नेहमी प्रयत्न करतो. राजकारणातून प्रत्येक जण असा पराभव होऊन जातो. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगितलं आहे, पराभव हा अंतिम नसतो आणि विजयी अंतिम नसतो. कामात सातत्य असले पाहिजे' अशी प्रतिक्रियाही गोरेंनी दिली.'अजित पवारांच्या विमान अपघाताची चौकशी झाली पाहिजे'रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात चौकशी झाली पाहिजे, हे मत मांडलं आहे. चौकशी झालीच पाहिजे, असं आमचं मत आहे. त्या विमान अपघाताची चौकशी सुरू आहे. ब्लॅक बॉक्स मिळालेला आहे. त्यामुळे त्याबाबतीत अधिकच बोलणं योग्य नाही. चौकशीसाठी कुठली एजन्सी असली पाहिजे. याचा निर्णय सुरक्षा एजन्सी घेतील. सुरक्षा यंत्रणा राज्य आणि केंद्र सरकार ठरवतील' असंही गोरे म्हणाले.

फीड फीडबर्नर 11 Feb 2026 11:10 am

Sunetra Pawar : दिल्लीत राजकीय खलबतं! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मोदी-शाहांच्या भेटीला, तर रोहित पवारही राजधानीत

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणाचे केंद्र आज मुंबईहून देशाची राजधानी दिल्लीत सरकले आहे. राज्याच्या नवनियुक्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काल आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारून मंत्रिमंडळ बैठकीला हजेरी लावली आणि त्यानंतर त्या तडक दिल्लीला रवाना झाल्या. आज त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. सुनेत्रा पवार यांच्या या दौऱ्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला असून राष्ट्रवादी काँग्रेससाठी आजचा दिवस अत्यंत निर्णायक मानला जात आहे. दुसरीकडे, शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार देखील सध्या दिल्लीतच तळ ठोकून आहेत. अजित पवार यांच्या अपघाताबाबत काल मुंबईत बोलताना रोहित पवारांनी हा अपघात नसून १०० टक्के घातपाती प्रयत्न आहे, असा खळबळजनक आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर आज दुपारी १२ वाजता रोहित पवार दिल्लीत पत्रकार परिषद घेणार आहेत. कालच्या गंभीर आरोपानंतर आज ते दिल्लीतून नेमका कोणता नवा गौप्यस्फोट करतात, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे लागले आहेत. एका बाजूला सत्तेतील वाटा आणि दुसऱ्या बाजूला आरोपांच्या फैरी, यामुळे दिल्लीतील या घडामोडींनी राज्याच्या राजकारणात मोठी उत्सुकता निर्माण केली आहे.https://prahaar.in/2026/02/11/political-atmosphere-is-in-a-state-of-turmoil-due-to-jaykumar-gores-allegations/मोदी-शाहांच्या भेटीत 'विलीनीकरणा'वर चर्चा होणार?महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सध्या दिल्ली दौऱ्यावर असून आजचा दिवस राज्याच्या राजकारणासाठी अत्यंत वादळी ठरण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांचा हा पहिलाच दिल्ली दौरा असून, आज त्या महत्वपूर्ण भेटीगाठी घेणार आहेत. थोड्याच वेळात त्या प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी जाणार असून, त्यानंतर सकाळी ११ वाजता संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतील. यानंतर त्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचीही भेट घेणार असून, या दोन्ही भेटींमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या संभाव्य विलीनीकरणाबाबत महत्त्वाची चर्चा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. या दौऱ्यातील सर्वात मोठी घडामोड म्हणजे उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांची भेट. सूत्रांच्या माहितीनुसार, सुनेत्रा पवार आज आपल्या राज्यसभा खासदारकीचा राजीनामा उपराष्ट्रपतींकडे सुपूर्द करू शकतात. उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्या खासदारकी सोडण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. याशिवाय त्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचीही भेट घेणार आहेत. आज रात्रीच त्या पुन्हा मुंबईला रवाना होणार असल्या तरी, दिवसभरातील या हाय-प्रोफाइल भेटीगाठींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला कोणती नवीन दिशा मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेअजित पवारांच्या अपघातावरून नव्या गौप्यस्फोटाची शक्यतामहाराष्ट्रातील राजकीय संघर्षाची ठिणगी आता देशाच्या राजधानीत पडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते रोहित पवार आज दिल्लीत एक महत्त्वाची पत्रकार परिषद घेणार असून, त्यांच्या भूमिकेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. काल मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी अजित पवार यांच्या विमान अपघातावर गंभीर संशय व्यक्त करत प्रश्नांची सरबत्ती केली होती. हा निव्वळ अपघात नसून घातपात आहे, असा खळबळजनक दावा केल्यानंतर, आज दिल्लीतून ते या प्रकरणाचा पुढील भाग उघड करण्याची शक्यता आहे.

फीड फीडबर्नर 11 Feb 2026 11:10 am

vande mataram: गृह मंत्रालयाकडून ‘वंदे मातरम्’गाण्याबद्दल मार्गदर्शक तत्त्वे जारी ; कधी कुठे आणि किती गायचे ? वाचा सविस्तर माहिती

vande mataram: केंद्रीय गृह मंत्रालयाने राष्ट्रगीत 'वंदे मातरम' बद्दल मार्गदर्शक तत्वे जारी केले आहेत. त्यात सहा श्लोकांचे 'वंदे मातरम' अनिवार्य केले आहे. त्यात 'वंदे मातरम' कधी गायचे, किती गायचे, कुठे आणि कसे गायचे याची माहिती दिली आहे.

दैनिक प्रभात 11 Feb 2026 11:07 am

Mumbai Mayor News: मुंबई महापालिकेत ४४ वर्षांनंतर भाजपाचा महापौर; रितू तावडे महापौरपदी आज विराजमान होणार

Mumbai Mayor News : महापौरपदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षाच्या वतीने कोणीही अर्ज भरला नसल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार, हे स्पष्ट आहे.

दैनिक प्रभात 11 Feb 2026 10:45 am

Pune BJP : मोठी बातमी! पुणे शहरातील 69 बंडखोर सहा वर्षांसाठी निलंबित; भाजपचे कठोर पाऊल, अनेक बड्या नेत्यांचा समावेश

Pune BJP : भाजपने पक्षविरोधी भूमिका घेतलेल्या तसेच बंडखोरी केलेल्या ६९ जणांवर निलंबनाची कारवाई केली आहे.

दैनिक प्रभात 11 Feb 2026 10:39 am

Social Media use: भारतात सोशल मीडिया वापरासाठी येणार वयाची मर्यादा? ; ‘या’नेत्याचे केंद्रीय मंत्र्यांना पत्र

Social Media use: देशातील मुलांमध्ये सोशल मीडियावरील वाढत्या डिजिटल व्यसनाबद्दल आणि त्यांच्या ऑनलाइन सुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त करताना तेलुगू देसम पक्षाचे (टीडीपी) नेते लवू कृष्णा देवरायलू यांनी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहिले आहे .

दैनिक प्रभात 11 Feb 2026 10:34 am

Bhandara News : ताई तुझ्या धैर्याला सलाम! घरी वडिलांचे पार्थिव अन् लेकीने दिला बारावी इंग्रजीचा पेपर, वडिलांचे ते शब्द आठवले अन्…

Bhandara News : वडिलांचे शब्द तिला आठवत होते आणि जड अंतकराने जान्हवी परीक्षा केंद्रावर पोहचली.

दैनिक प्रभात 11 Feb 2026 9:33 am

India US Trade Deal: भारत-अमेरिका करारावर ट्रम्प प्रशासनाचा यू-टर्न ; Fact sheet जारी केल्यानंतर त्यात केला ‘हा’बदल

India US Trade Deal: अमेरिकेने भारत-अमेरिका व्यापार कराराशी संबंधित Fact sheet त शांतपणे सुधारणा केली आहे. व्हाईट हाऊसने दस्तऐवज प्रसिद्ध केल्यानंतर फक्त एका दिवसात, त्यातील शब्द आणि काही अटी बदलण्यात आल्या.

दैनिक प्रभात 11 Feb 2026 9:31 am

शिवसेनेचे चाणक्य... राहुल शेवाळे आणि अमेय घोलेंकडून उबाठासह एमआयएमचा गेम

मुंबई (सचिन धानजी) : मुंबई महापालिकेत भाजप आणि शिवसेना महायुतीने एकत्रपणे गट तयार करण्याची रणनिती सुरु असतानाच शिवसेनेने भाजपसोबत एकत्रपणे गटनोंदणी न करता स्वतंत्रपणे नोंदणी करतानाच सभागृहातील एक स्वीकृत नगरसेवक आणि समित्यांमधील एक सदस्य संख्या वाढवून घेतली. शिवसेनेने भाजपसोबतच्या गटनोंदणीची प्रक्रिया न मानता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेण्याचा करिष्मा दाखवला आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांसह शिवसेनेने एकत्रपणे गटनोंदणी केल्याचे प्रमाणपत्रच महापालिकेला प्राप्त केले आहे. यामुळे सभागृहातील एमआयएमचा एक वाढला जाणारा स्वीकृत नगरसेवक कमी होत असून तो शिवसेनेच्या वाट्याला जात आहे. तसेच समित्यांमध्येही शिवसेनेचाही एक सदस्य वाढत आहे. अर्थात शिवसेनेने हा करिष्मा केला आहे तो माजी खासदार राहुल शेवाळे आणि गटनेते अमेय घोले यांच्या चाणक्यनितीने. महापालिकेत शिवसेनेसाठी हे दोन्ही नेते चाणक्य ठरलेले पहायला मिळत आहे.मुंबई महापालिकेत भाजपचे ८९ आणि शिवसेनेचे २९ नगरसेवक निवडून आल्यानंतर सभागृहांमध्ये भाजपच्या वाट्याला ४, उबाठाच्या वाट्याला ३, शिवसेनेच्या वाट्याला १, काँग्रेसच्या वाट्याला १ आणि एमआयएमच्या वाट्याला १ अशाप्रकारे स्वीकृत नगरसेवकांचा कोटा होता. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शप)चा एक अशाप्रकारे चारही नगरसेवकांना आपल्या गळाला लावून त्यांचा पाठिंबा शिवसेनेने मिळवला आणि आता त्यांना आपल्या गटात सामील करत आपला कोटाही वाढवला. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या चारही नगरसेवकांचा पाठिंबा मिळवत शिवसेनेने आपला गट बनवल्यामुळे महापालिका सभागृहातील शिवसेनेचा कोटा वाढला आणि जिथे त्यांचा एक स्वीकृत नगरसेवक जाणार होता, तिथे आता त्यांचे दोन सदस्य जाणार आहेत. हा स्वीकृत नगरसेवक एमआयएमचा होणार होता, तो आता शिवसेनेच्या वाट्याला येणार आहे.एवढेच नाही तर स्थायी समिती, शिक्षण समिती, सुधार समिती तसेच बेस्ट समितीसह विशेष समित्यांमध्ये शिवसेनेची सदस्य संख्या एकने वाढली आहे. मात्र, ही संख्या वाढल्यामुळे उबाठाची सदस्य संख्या एकनेही कमी होत आहे. त्यामुळे स्वीकृत नगरसेवकांमध्ये एमआयएमच्या वाट्याला जाणारा एक नगरसेवक आणि समित्यांमध्ये उबाठाचा प्रत्येक एक सदस्य कमी करण्याची रणनिती शिवसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे आणि त्यांचे गटनेते अमेय घोले यांनी आखली होती. त्याला अखेर यश आले असून दोन्ही काँग्रेसच्या नगरसेवकांचा एकत्रपणे शिवसेनेसोबत गटनोंदणीचे पत्रच कोकण विभागीय आयुक्तांकडून महापालिका सचिवांना पाठवण्यात आले आहे. त्यामुळे अखेर यावर शिक्कामोर्तब झाल्यामुळे शिवसेनेचे सभागृहात दोन स्वीकृत नगरसेवक जाणार आहेत. तर समित्यांमध्ये एक सदस्य वाढला जाणार आहे. त्यामुळे स्वीकृत नगरसेवकपदी राष्ट्रवादी काँग्रेसमधील कुणाची वर्णी लावून समित्यांमधील सदस्य शिवसेना आपल्याकडे घेते का? की स्वीकृत नगरसेवक आपल्याकडे घेवून समित्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना सामावून घेतले जाते का याकडे सर्वांचे लक्ष असेल.

फीड फीडबर्नर 11 Feb 2026 9:30 am

Vadgaon Maval : मावळात नव्‍या राजकीय पर्वाची सुरुवात ? काँग्रेसच्या वर्चस्वापासून राष्ट्रवादीच्या एकहाती सत्तेपर्यंत…

Vadgaon Maval : मावळ पंचायत समिती-जिल्हा परिषदेचा रंजक इतिहास! एकेकाळी एकछत्र राज्‍य करणाऱ्या काॅंग्रेस-भाजपकडे आज एकही सदस्‍य नाही

दैनिक प्रभात 11 Feb 2026 9:17 am

Pimpri News : स्थायीच्‍या अध्यक्षपदासाठी देव पाण्यात; नगरसेवकांमध्ये चुरस

Pimpri News : तिजोरीच्या चाव्या कोणाला मिळणार, याकडे शहराचे लक्ष -

दैनिक प्रभात 11 Feb 2026 9:11 am

Weather Update: महाराष्ट्रातील वातावरणात बदल, कोकण ते विदर्भापर्यंत पुन्हा अलर्ट, ११ फेब्रुवारीला कसं असेल हवामान?

मुंबई: महाराष्ट्रात फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात हवामानात बदल दिसून येत आहे. हिवाळी थंड आता बऱ्याच प्रमाणात कमी झाली असून दिवसेंदिवस उष्णता वाढत चालली आहे. ११ फेब्रुवारी रोजी राज्यभर हवामान कोरडे राहणार आहे. तसेच सकाळी सौम्य गारवा आणि दुपारी उष्णता जाणवेल. चला तर मग आजचं हवामान अपडेट जाणून घेऊयात.आज मुंबईसह परिसरात थंडी जवळपास पूर्णपणे नाहीशी झाली आहे. सकाळी फारसा गारवा जाणवणार नाही आणि दुपारी उकाडा जाणवेल. हवामान कोरडे आणि निरभ्र राहील. कमाल तापमान सुमारे ३२ ते ३५ अंश सेल्सिअसदरम्यान राहील, तर किमान तापमान २३ ते २५ अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. पुढील काही दिवसात ही उष्णतेची तीव्रता अशीच राहणार आहे.पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि आसपासच्या भागांमध्ये सकाळी थोडा गारवा जाणवेल, मात्र दुपारी सूर्यप्रकाशामुळे वातावरण चांगलेच तापलेले राहील. मंगळवारच्या तुलनेत आज तापमान अधिक राहील. कमाल तापमान ३२ ते ३४ अंश सेल्सअसदरम्यान आणि किमान तापमान १८ ते २२ अंश सेल्सिअसदरम्यान असेल. एकंदरीत हवामान कोरडे आणि उबदार राहील.मराठवाडा व विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णता अधिक जाणवेल. ग्रामीण भागात सकाळी सौम्य गारवा असेल, पण दुपारच्या वेळेत उकाडा वाढलेला राहील. कमाल तापमान ३३ ते ३६ अंश सेल्सिअसदरम्यान तर किमान तापमान १८ ते २१ अंश सेल्सिअसदरम्यान राहील. हवामान पूर्णपणे कोरडे राहील. एकंदरीत १९ फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात हवामान कोरडे, निरभ्र आणि उष्ण राहील. थंडीचा प्रभाव आता फारसा उरलेला नाही. मंगळवारच्या तुलनेत आज तापमान जास्त राहील आणि पुढील काही दिवसांतही उष्णतेतील वाढ कायम राहील.

फीड फीडबर्नर 11 Feb 2026 9:10 am

Pune ZP Election Results : जिल्हा परिषद अध्यक्षपदी कोणाची वर्णी? राष्‍ट्रवादी काँग्रेसच्या निर्णयाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष

Pune ZP Election Results : पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला घवघवीत यश मिळाले आहे. निवडणुकीत ७३ पैकी ५१ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवित जिल्हा परिषदेवर एकहाती सत्ता मिळविली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून अध्यक्षपदाची संधी कोणाला मिळणार, याकडे लक्ष लागले आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद पुढील अडीच वर्षांसाठी सर्वसाधारण गटासाठी आहे. त्यामुळे पक्षात इच्छुकांची संख्याही मोठी […]

दैनिक प्रभात 11 Feb 2026 9:06 am

Pune District : उत्रौलीत राष्ट्रवादीचा बालेकिल्ला सपाट; संग्राम थोपटे यांच्या संघटन कौशल्याचा विजय, शिवतरे यांच्या विरोधात कौल

Pune District : प्रचाराच्या शेवटच्या दिवसांपर्यंत माजी आमदार संग्राम थोपटे, स्वरूपा थोपटे यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांना बळ देत शिवतरे यांचा बालेकिल्ला उद्धवस्त केला. हा पराभव शिवतरे यांच्यासाठी जिव्हारी लागणारा ठरला आहे.

दैनिक प्रभात 11 Feb 2026 9:00 am

Top 10 news: राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, भारतात सोशल मीडिया वापरासाठी येणार वयाची मर्यादा ?, अशा टॉप १० बातम्या वाचा एका क्लिकवर

Top 10 news: राज्य विधिमंडळाचे मुंबईत होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज 23 फेब्रुवारी ते 25 मार्च 2026 पर्यत निश्चित करण्यात आले आहे. 6 मार्च रोजी अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे, असा निर्णय कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

दैनिक प्रभात 11 Feb 2026 8:59 am

Pune District : अजित पवारांचे विचार आजही जिवंत; आमदार शंकर मांडेकर यांनी व्यक्त केला विश्वास

Pune District : याच विश्वासाचा प्रत्यय जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या निकालातून आला असून जनतेने पक्षाला मोठा कौल दिला आहे, असे मत आमदार शंकर मांडेकर यांनी व्यक्त केले.

दैनिक प्रभात 11 Feb 2026 8:51 am

Pune District : पिरंगुट झेडपी गटात ‘गड आला, पण सिंह गेला’

Pune District : नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव असलेल्या पिरंगुट-भूगाव जिल्हा परिषद गटात पंचरंगी लढत झाली.

दैनिक प्रभात 11 Feb 2026 8:44 am

Pune District : मिनी विधानसभेला मागील अपयश धुवून काढले; आंबेगावात दिलीप वळसे-पाटील यांचे निर्विवाद वर्चस्व

Pune District : या निवडणुकीत मात्र वळसे पाटील यांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या जागांवर बहुमत मिळवून आपले निर्विवाद वर्चस्व आंबेगाव तालुक्यावर अधोरेखित केले आहे.

दैनिक प्रभात 11 Feb 2026 8:38 am

School Ground : ५० लाखांचे मैदान की भंगार डेपो? येरवड्यात विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ

School Ground : शाळा प्रशासन व महापालिकेचा हलगर्जीपणा

दैनिक प्रभात 11 Feb 2026 8:36 am

Pune District : संपले इलेक्शन, आता जपा रिलेशन! निवडणुकीमुळे दुरावलेली नाती जोडण्यासाठी पुढाकार

Pune District : मात्र, आता निवडणूक प्रक्रिया पूर्ण होताच संपले इलेक्शन आता जपा रिलेशन अशा आशयाच्या पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्यांनी सर्वत्र धुमाकूळ घातला आहे.

दैनिक प्रभात 11 Feb 2026 8:31 am

Pune District : तळेगाव ढमढेरे-रांजणगाव सांडस गटात भाजपची सरशी

Pune District : दीपाली गव्हाणे यांचे डिग्रजवाडी गाव एकजुटीने मैदानात उतरले होते, तर शेवटच्या टप्प्यात एक गाव एक उमेदवार समितीच्या वतीने सुनील ढमढेरे व मार्तंड ढमढेरे यांनी दिलेला पाठिंबा सकारात्मक ठरला.

दैनिक प्रभात 11 Feb 2026 8:26 am

Pune Metro : पुणे मेट्रो फेज२च्या स्थानकांसाठी निविदा

Pune Metro : हडपसर ते लोणी काळभोर, सासवड मार्गिकेचे होणार नियोजन

दैनिक प्रभात 11 Feb 2026 8:25 am

Pune District : जिल्ह्यात 9 पंचायत समित्या राष्ट्रवादीकडे; भोरमध्ये टाय: दौंडमध्ये भाजप, जुन्नर शिवसेनेकडे, तर खेड ठाकरे गटाकडे

Pune District : जिल्ह्यात जिल्ह्यात 9 पंचायत समित्या राष्ट्रवादीकडे आल्या असून दौंड, जुन्नर आणि खेडमधील आमदारांनी आपले गड राखले असून येथे आपल्या विचारांचा सभापती बसवता येणार आहे.

दैनिक प्रभात 11 Feb 2026 8:18 am

Nilesh Nikam: विरोधी पक्षनेतेपदी राष्ट्रवादीचे निलेश निकम

Nilesh Nikam: महापौर मंजुषा नागपुरे यांनी सोमवारी निकम यांना विरोधी पक्ष नेतेपदी निवड झाल्याचे अधिकृत पत्र दिले.

दैनिक प्रभात 11 Feb 2026 8:10 am

Pune District : राष्ट्रवादीच्या डॉ. गायत्री खळदकर यांचा दणदणीत विजय

Pune District : याठिकाणी सारिका दिवेकर या स्थानिक पातळीवरील आणि डॉ. गायत्री खळदकर यांच्या प्रतिष्ठेची निवडणूक या गटाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते.

दैनिक प्रभात 11 Feb 2026 8:09 am

Pune News: पालिकेची राज्य शासनाकडे ३ हजार कोटींची थकबाकी

Pune News: पालिकेला निधी मिळण्यासाठी आमदारांनी जोर लावावा-सजग नागरी मंच

दैनिक प्रभात 11 Feb 2026 8:04 am

Akluj News : माळशिरसमध्ये मोहिते-पाटील-जानकर गटाची सरशी

Akluj News : माजी सभापती वैष्णवीदेवी मोहिते-पाटील यांनी यशवंतनगर पंचायत समिती गणातून तब्बल 5729 मतांची आघाडी घेत दणदणीत विजय मिळवला.

दैनिक प्रभात 11 Feb 2026 8:03 am

Indapur News : काटी-लाखेवाडीत श्रीमंत ढोले यांचा ऐतिहासिक विजय; अजितदादांच्या कार्याला मतदारांचे अभिवादन

Indapur News : राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत पोपट ढोले यांनी तब्बल १३ हजारांहून अधिक मताधिक्याने या गटात ऐतिहासिक विजय नोंदवला.

दैनिक प्रभात 11 Feb 2026 7:57 am

भारत टॅक्सी ॲपमुळे चालक का नाराज आहेत:ओला-उबरला टक्कर देण्याचे स्वप्न तुटणार का, प्रतीक्षा शुल्क आणि कमी भाड्यामुळे समस्या

तुम्ही ओला-उबर किंवा रॅपिडोमधून कॅब बुक करून प्रवास केला असेलच. 5 फेब्रुवारी रोजी दिल्लीत देशातील पहिली को-ऑपरेटिव्ह कॅब सेवा 'भारत टॅक्सी ॲप' सुरू झाली. याचे संपूर्ण भाडे चालकाकडे जाईल, कारण हे कोणत्याही कंपनीचे ॲप नाही, तसेच यात कोणत्याही एका व्यक्तीची किंवा कंपनीची मालकी असणार नाही. यात चालकच मालक आहे. भाडे परवडणारे आहे. पाऊस किंवा पीक अवर्समध्येही भाडे वाढणार नाही, असाही दावा करण्यात आला आहे. या दाव्यांची पडताळणी करण्यासाठी आणि सेवा अनुभवण्यासाठी दिल्लीतील दैनिक भास्करच्या टीमने भारत टॅक्सी ॲप डाउनलोड केले. इतर कॅबच्या तुलनेत भाडे कमी मिळाले. एकाच ठिकाणासाठी उबरच्या तुलनेत याचे भाडे 14-15 रुपये कमी होते. तर ओलाच्या तुलनेत सुमारे 138 रुपये कमी दिसले. सेवा पाहण्यासाठी 7 फेब्रुवारी रोजी आम्ही कॅब बुक केली. बुकिंगनंतर प्रतीक्षा वेळ आधी 7 मिनिटे होती, नंतर ती वाढत जाऊन 12-13 मिनिटे झाली. दोनदा बुकिंग कन्फर्म झाली, पण कॅब आली नाही. शेवटी दोन्ही वेळा राइड रद्द झाली. यानंतर कॅब न मिळण्याचे कारण जाणून घेण्यासाठी आणि भारत टॅक्सी ॲपचा अनुभव समजून घेण्यासाठी आम्ही काही चालकांना भेटलो. ड्रायव्हर्स म्हणाले- राइड मिळत आहेत पण दर खराब आहेतशिवराज सिंह बुलंदशहरचे रहिवासी आहेत. गेल्या 10 वर्षांपासून ते कॅब चालवत आहेत. त्यांनी 25 दिवसांपूर्वी भारत टॅक्सी ॲप इन्स्टॉल केले, पण योग्य दर मिळत नसल्यामुळे ते राइड घेत नाहीत. शिवराज म्हणतात, ‘मी आतापर्यंत फक्त एकच राइड घेतली आहे. यात वेळेची काळजी घेतली गेली नाही. फक्त किलोमीटर नाही, तर एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी किती वेळ लागतो, त्यानुसारही पैसे मिळायला हवेत. जर अंतर कमी असेल पण वाहतूक कोंडीमुळे जास्त वेळ लागत असेल तर CNG जास्तच जळेल. मी भारत टॅक्सी ॲपही उघडे ठेवतो, पण हे इतर ॲप्सच्या तुलनेत कमी पैसे देत आहे.‘ ‘यावर राइड्स देखील बहुतेक अशाच ठिकाणी मिळत आहेत, जिथे ड्रायव्हर्सना जायचे नसते किंवा अशा ठिकाणी जिथे जास्त वाहतूक कोंडी किंवा गर्दी असते. जर हे ॲप यशस्वी झाले आणि इतर कंपन्यांचे मार्केट खराब झाले, तर आम्हाला कुठे बंधुआ मजूर बनवले जाऊ नये. आमच्याकडून मनमानी दराने टॅक्सी चालवली जाऊ नये. कारण हे तर आम्हाला आत्तापासूनच दर देत नाहीत.‘ इतर कॅब कंपन्यांबद्दल विचारल्यावर शिवराज म्हणतात, ‘सध्या ज्या कंपन्या सबस्क्रिप्शन घेऊन काम करत आहेत, त्यांचे कमिशन देखील 20 टक्क्यांपर्यंत बसते. भारत टॅक्सी जोपर्यंत योग्य दर देणार नाही, तोपर्यंत ड्रायव्हर्स कमिशन दिल्यानंतरही त्याच कंपन्यांच्या कॅब चालवतील.‘ भाडे खूप कमी, हे अंतर आणि वेळेनुसार निश्चित व्हावेत्याचप्रमाणे महेश कुमार देखील 20 दिवसांपासून भारत टॅक्सी ॲप वापरत आहेत, पण ते देखील दरांवर समाधानी नाहीत. महेश म्हणतात, ‘पीक टाइममध्ये याचा दर वाढत नाही. अंतर आणि वेळ दोन्हीनुसार दर निश्चित व्हायला हवा. सध्या दर 16-17 रुपये प्रति किलोमीटर आहे. कधीकधी तो कमी देखील होतो. आम्हाला 25 रुपये प्रति किलोमीटरनुसार भाडे मिळायला हवे.‘ ‘कोणालाही टॅक्सी चालवायची नसते. आम्ही नाइलाजाने टॅक्सी चालवतो. आता खाजगी कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कमी भाडे दाखवतील, तर ते त्यांच्याकडेच जातील. माझी इच्छा आहे की सरकारने सर्वांसाठी एक दर निश्चित करावा. आमचे भाडे आम्हाला सरकारने मिळवून द्यावे.‘ महेशला दिवसभरात भारत टॅक्सीकडून फक्त 4-5 बुकिंग मिळतात. ओला-उबर सारख्या कंपन्यांच्या त्रुटींवर ते म्हणतात, ‘या कंपन्या आता सबस्क्रिप्शन घेऊन काम करून घेत आहेत. कधीकधी योग्य दर मिळतो पण त्यानंतर 8 ते 10 रुपये प्रति किलोमीटर भाडेच देतात. या कंपन्यांनी चालकांना खूप लुटले आहे. भारत टॅक्सी आमच्या भविष्यासाठी आहे ही चांगली गोष्ट आहे, पण भाडे योग्य मिळायला हवे.’ हे आमचं ॲप पण कमी पैशात कोण काम करेलअजित मिश्रा दिल्लीत ॲपद्वारे ऑटो चालवतात. गेल्या दीड-दोन महिन्यांपासून ते भारत टॅक्सी ॲपही वापरत आहेत. ते म्हणतात की आधी कमी पिकअप मिळत होते, पण लॉन्च झाल्यानंतर बुकिंग वाढत आहे. आम्ही विचारले, आतापर्यंत किती राइड्स घेतल्या? यावर अजित म्हणतात, 'आतापर्यंत फक्त दोनच राइड्स घेतल्या, कारण दर खूप कमी आहेत.' 'प्रत्येक व्यक्तीला पैसे हवे असतात. जो चांगले पैसे देतो, आम्ही त्याच्याकडेच जातो. भारत टॅक्सी कधीकधी मीटरपेक्षाही कमी भाडे देत आहे. आधी दिल्ली सरकारनेही असेच एक मॉडेल सुरू केले होते, पण ते (पूछो ॲप) भ्रष्टाचाराला बळी पडले. ड्रायव्हरला कोणताही फायदा झाला नाही.' भारत टॅक्सीमध्ये सुधारणा करण्याबाबत अजित म्हणतात, 'आम्ही याला आमचे ॲप मानत आहोत. 30 रुपये बेसिक्स व्यतिरिक्त प्रति किलोमीटर 11 रुपये मिळायला हवेत. जर आम्ही ट्रॅफिकमध्ये उभे असलो, तर त्या वेटिंग टाइमचेही पैसे मिळायला हवेत. जर हे मिळाले तर आम्हाला भारत टॅक्सीची कोणतीही अडचण नाही. बुकिंग मिळत आहे पण कमी दरांमुळे राइड घेऊ शकत नाही आहोत. आम्ही फक्त एवढीच आशा करू शकतो की पुढे काहीतरी चांगले होईल.' आशु खान वेगवेगळ्या टॅक्सी ॲप्सद्वारे बाईक सेवा देतात. गेल्या दोन महिन्यांपासून ते भारत टॅक्सीचाही वापर करत आहेत. आशु म्हणतात, ‘जे लोक वापरत होते, त्यांच्याकडूनच मला या ॲपबद्दल कळले. फरक एवढाच आहे की, इतर ॲप्सच्या तुलनेत पूर्ण पैसे मिळतात. कोणतेही कमिशन नाही. तर इतर कंपन्या 25 ते 30% पर्यंत कमिशन घेतात. जर 100 रुपयांची राइड मिळाली, तर माझ्याकडे फक्त 75-80 रुपये येतात.’ मात्र, आशु म्हणतात की, त्यांना अजूनही भारत टॅक्सीद्वारे फक्त 3-4 राइड्स मिळत आहेत. तर इतर कंपन्यांच्या बुकिंग्स दिवसभर मिळतात. याबद्दल अधिक लोकांना कळले तर आम्हालाही याचा फायदा होईल. गाड्यांवर आणि ऑटोवर जाहिराती छापून याचा प्रचार करायला हवा. तज्ज्ञ: प्री-पेड टॅक्सीप्रमाणे सरकारने भाडे निश्चित करावेइंडियन फेडरेशन ऑफ ॲप बेस्ड ट्रान्सपोर्ट वर्कर्स (IFAT) चे राष्ट्रीय सरचिटणीस शेख सलाउद्दीन 'भारत टॅक्सी'ला एक चांगला उपक्रम मानतात, मात्र त्यांना काही चिंताही आहेत. सलाउद्दीन म्हणतात, ‘सर्वात मोठे आव्हान भाडे आहे. सरकारने सर्वांसाठी (खाजगी कॅब कंपन्यांसह भारत टॅक्सी) एक भाडे निश्चित केले पाहिजे. जे भाडे असेल, ते खूप कमीही नसावे आणि खूप जास्तही नसावे.‘ ‘सरकारने सर्व संघटनांसोबत एक बैठक घेतली पाहिजे. यानंतर आपापल्या राज्यांनुसार दर निश्चित केले पाहिजेत, तेव्हाच भारत टॅक्सीसारखे मॉडेल यशस्वी होऊ शकेल. जसे मोठ्या शहरांमध्ये प्री-पेड टॅक्सीचे भाडे सरकार निश्चित करते, त्याच प्रकारची प्रणाली तयार झाली पाहिजे.‘ भारत टॅक्सीच्या आव्हानांवर सलाउद्दीन म्हणतात की, प्लॅटफॉर्म कंपन्यांकडे (खाजगी कॅब कंपन्या) जास्त पैसा आहे, पण जेव्हा त्या कंपन्यांना चालकांनीच मोठे केले आहे, तर ते भारत टॅक्सीला मोठे का करू शकत नाहीत.‘ प्रचाराची गरज जेणेकरून मोठ्या कंपन्यांचे ग्राहक शिफ्ट होतीलपरिवहन क्षेत्रावर संशोधन करणारे बासुदेव बर्मन देखील सलाउद्दीनच्या मतांचे समर्थन करतात. ते म्हणतात की सध्या मोठ्या कंपन्यांचा जो ग्राहक वर्ग तयार झाला आहे, त्याला कसे शिफ्ट केले जाईल, हे मोठे आव्हान असेल. बर्मन म्हणतात, ‘आम्हाला आता असे कळत आहे की भारत टॅक्सीचे भाडे इतर कंपन्यांच्या तुलनेत थोडे जास्त आहे. यामुळे विश्वास निर्माण करणे आणि ग्राहक मिळवणे हे एक आव्हान आहे. सरकारनेच पुढाकार घेऊन यावर चालक आणि ग्राहकांचा विश्वास निर्माण करावा लागेल. या बाजाराचे नियमन करण्याची गरज आहे. जोपर्यंत निश्चित भाड्यावर कॅब चालणार नाही, तोपर्यंत खाजगी कंपन्या मनमानी करत राहतील.‘ कॅब मार्केटमध्ये येणाऱ्या बदलांवर बर्मन म्हणतात, ‘खाजगी कॅब कंपन्यांनी तर आधीच आपली रणनीती बदलली आहे. आता त्या कमिशनऐवजी सबस्क्रिप्शनच्या मॉडेलवर आल्या आहेत. बहुतेक ड्रायव्हर्स आता प्रत्येक राइडवर कमिशन देत नाहीत. कंपन्या ड्रायव्हरला एका निश्चित वेळेसाठी सबस्क्रिप्शन देत आहेत.‘ ‘या तुलनेत भारत टॅक्सीच्या प्रचारासाठी सरकारला पुढे यावे लागेल कारण त्यांच्याकडे संसाधने आहेत. यामुळेच भारत टॅक्सीचा विस्तार होऊ शकतो. स्वतः ड्रायव्हर्स हे काम करू शकत नाहीत.‘ देशात 2 लाख कोटी रुपयांचे टॅक्सी मार्केटहे खरे आहे की कॅब कंपन्या आधी फक्त कमिशन मॉडेलवर काम करत होत्या. प्रत्येक राइडच्या भाड्यावर कंपन्या 15 ते 30% पर्यंत कमिशन घेत असत. तथापि, आता सर्व कंपन्या सबस्क्रिप्शन मॉडेलवर काम करत आहेत. म्हणजेच, महिना, आठवडा किंवा दिवसाच्या हिशोबाने निश्चित सबस्क्रिप्शन रक्कम दिल्यानंतर ड्रायव्हर प्रत्येक राइडचे पूर्ण भाडे स्वतःकडे ठेवू शकतात. उदाहरणार्थ, उबर एका दिवसाच्या सबस्क्रिप्शनसाठी १२९ रुपये घेत आहे. यानंतर, कॅब चालकाला दिवसभराच्या कमाईवर कोणतेही कमिशन द्यावे लागणार नाही. त्याचप्रमाणे, ओलामध्ये एका दिवसाचे सबस्क्रिप्शन १४९ रुपयांचे आहे. या रिचार्जमुळे दिवसभराचे भाडे चालकाकडे जाईल. इतर कंपन्याही हेच मॉडेल वापरत आहेत. मार्केट रिसर्च कंपनी मॉर्डर इंटेलिजन्स (Mordor Intelligence) च्या अहवालानुसार, जानेवारी २०२६ मध्ये भारताचे एकूण टॅक्सी मार्केट २ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. यामध्ये ६५% हिस्सा ॲप-आधारित कॅब कंपन्यांचा आहे. म्हणजेच सुमारे १.३१ लाख कोटी रुपये. यामध्येही प्रामुख्याने उबर, ओला आणि रॅपिडोचा मार्केट शेअर सर्वात मोठा आहे. येत्या काही वर्षांत ॲप-आधारित राइडचे मार्केट आणखी वाढणार आहे. भारत टॅक्सीचे सीईओ म्हणाले- दर नेहमी सारखाच असेलभारत टॅक्सीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) विवेक पांडे सांगतात की, अॅपशी सध्या 4 लाखांहून अधिक ड्रायव्हर्स जोडले गेले आहेत. तर सुमारे 13 लाख ग्राहक जोडले गेले आहेत. सुमारे 2-3 लाख लोक दररोज भारत टॅक्सी अॅपवर येऊन शोध घेत आहेत. ड्रायव्हर्सना होणाऱ्या फायद्यांवर विवेक म्हणतात, ‘सर्व ड्रायव्हर्सना हळूहळू सामाजिक सुरक्षेशी संबंधित योजनांच्या अंतर्गत आणले जाईल, जसे की- आयुष्मान योजना, मुद्रा योजना. त्यांना शून्य कमिशन व्यतिरिक्त या सर्वांचा फायदा मिळेल. कधीही कोणाची आयडी ब्लॉक केली जाणार नाही, त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जाईल कारण बोर्ड सदस्यांमध्ये ड्रायव्हर्सही आहेत.’ ‘दुसरी बाजू ग्राहकांची आहे. त्यांना योग्य दरात कॅब मिळेल. असे होणार नाही की जास्त ग्राहक मिळवण्यासाठी आज दर कमी करतील आणि नंतर वाढवतील.‘ संतुलित दर ठेवून ग्राहक मिळवण्याचा प्रयत्नबाजारातील स्पर्धेबद्दल विवेक म्हणतात, ‘आम्ही सध्या ड्रायव्हर्सना विनंती करत आहोत की दरांबद्दल काळजी करू नका कारण आम्हाला अजून ग्राहक मिळवायचे आहेत. दर जास्त केले तर ग्राहक येणार नाहीत. त्यामुळे आम्ही कुठेही दावा करत नाही की भारत टॅक्सी सर्वात स्वस्त आहे.‘ ‘आम्ही एक संतुलित किंमत ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत. ग्राहकांनाही आवाहन आहे की त्यांनी याचा वापर करावा, याचे पैसे कोणत्याही कंपनीकडे किंवा परदेशी देशांमध्ये जात नाहीत. मोठ्या कंपन्या अमर्यादित काळापर्यंत सवलत देऊन बुकिंग घेणार नाहीत, यामुळे त्यांचा व्यवसायही चालणार नाही.‘ ‘एका वर्षाच्या आत मोठ्या शहरांमध्ये भारत टॅक्सी उपलब्ध होईल आणि तीन वर्षांत ही सेवा संपूर्ण देशात सुरू होईल.‘ ड्रायव्हर्स 'मालक' बनण्यावर ते म्हणतात, ‘कोणताही ड्रायव्हर ५०० रुपयांपर्यंतचे जास्तीत जास्त ५ शेअर्स खरेदी करू शकतो. उद्या जर कंपनीला नफा झाला, तर त्यात ड्रायव्हरचाही वाटा असेल. तसेच इन्शुरन्ससाठीही खूप कमी पैसे द्यावे लागतील.‘ महिला ड्रायव्हर्सबद्दल विवेक म्हणतात की, सध्या त्यावर काम सुरू आहे, जेव्हा एकाच वेळी अनेक महिला ड्रायव्हर्स उपलब्ध होतील तेव्हा हा पर्यायही खुला केला जाईल. जर आताच हा पर्याय खुला केला आणि ग्राहकाला ड्रायव्हर मिळाली नाही तर अडचण होईल. सर्वांसाठी एकसमान दराच्या मागणीवर विवेक म्हणतात की, वाहतूक हा राज्य सरकारांचा विषय आहे, जर सरकारने भाडे निश्चित केले तर आम्ही त्याचे नक्कीच पालन करू.

दिव्यमराठी भास्कर 11 Feb 2026 7:55 am

Pune News : स्थायीसाठी धक्कातंत्र की चर्चेतील नावे?; भाजप कोअर कमिटीची आज बैठक

Pune News : अध्यक्षपदाबाबतचे चित्र शुक्रवारी स्पष्ट होणार

दैनिक प्रभात 11 Feb 2026 7:54 am

छत्रपती संभाजीनगरात १२ वीच्या इंग्रजी पेपरदरम्यान मोठा गैरप्रकार उघड

छत्रपती संभाजीनगर: जिल्ह्यातील राष्ट्रीय उच्च माध्यमिक विद्यालय, जैतापूर येथे इयत्ता १२ वीच्या इंग्रजी पेपरदरम्यान मोठा गैरप्रकार उघड झाला आहे. परीक्षा केंद्रावरील सीसीटीव्ही फुटेज आणि उत्तरपत्रिकांच्या झेरॉक्स प्रतींच्या आधारे तब्बल १९ पर्यवेक्षक आणि केंद्रसंचालकांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे. या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.दक्षता समितीचे अध्यक्ष तथा छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित आणि विभागीय बोर्डाचे अध्यक्ष अनिल साबळे यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) श्रीमती अश्विनी लाठकर यांच्या नेतृत्वाखाली भरारी पथकाने संपूर्ण तपास पूर्ण केला.दिनांक १० फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या इंग्रजी पेपरदरम्यान काही विद्यार्थी एकमेकांच्या उत्तरपत्रिकांकडे पाहून नक्कल करत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर परीक्षा केंद्रावरील सीसीटीव्ही फुटेजची सखोल तपासणी करण्यात आली. फुटेजमध्ये विद्यार्थ्यांच्या हालचाली स्पष्ट दिसून आल्या असून, गैरप्रकार सिद्ध झाल्याने प्रशासनाने तात्काळ कारवाई केली.१९ जणांविरुद्ध कठोर कारवाईया प्रकरणात परीक्षा केंद्र संचालकासह एकूण १९ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. जिल्हा परिषद कर्मचारी असलेल्या पर्यवेक्षक शिक्षक आणि तिथल्या पथकातील अधिकाऱ्यांविरुद्ध निलंबनाचे प्रस्ताव दाखल करण्यात आले आहेत. इतर संस्थांशी संबंधित कर्मचाऱ्यांवर संस्थांतर्गत शिस्तभंगात्मक तसेच कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

फीड फीडबर्नर 11 Feb 2026 7:10 am

‘निवडणुकीत हिजाब ओढतात, म्हणून महिलांना तिकीट नाही’:जमात नेते म्हणाले- हिंदू आमचे बंधू, सरकार स्थापन झाल्यास भारतासोबतचे वाद संपवू

बांगलादेशमध्ये उद्या म्हणजेच 12 फेब्रुवारी रोजी निवडणुका आहेत. 13 वर्षांच्या बंदीनंतर जमात-ए-इस्लामी पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहे. कट्टरपंथी पक्ष मानल्या जाणाऱ्या जमातने शेवटची निवडणूक 2008 मध्ये लढवली होती. जमातने यावेळी एका हिंदू उमेदवाराला उभे केले आहे, तर कोणत्याही महिलेला तिकीट दिलेले नाही. दिव्य मराठीशी बोलताना जमातचे निवडणूक प्रभारी एहसान-उल-जुबैर म्हणतात की, पुरुषांसाठी निवडणूक लढणे जेवढे सोपे असते, तेवढे महिलांसाठी नसते. विरोधक त्यांच्यावर हल्ला करतात, हिजाब काढतात. सुरक्षा हा मोठा मुद्दा आहे. म्हणून सर्व महिलांना निवडणूक लढायची नाही. त्यांनी भारतासोबतचे संबंध, संविधानातील बदलांसाठी होत असलेले जनमत संग्रह आणि हिंदूंवर होत असलेल्या हिंसाचारावरही उत्तरे दिली. वाचा संपूर्ण मुलाखत… प्रश्न: जर जमात सत्तेत आली, तर भारतासोबतचे संबंध कसे असतील?उत्तर: आम्ही सन्मान आणि प्रतिष्ठेच्या आधारावर इतर देशांशी संबंध ठेवू इच्छितो. गेल्या 16 वर्षांत जे लोक सत्तेत होते, त्यांनी बांगलादेशच्या परराष्ट्र धोरणाला पूर्णपणे एका देशावर केंद्रित केले होते. हे बांगलादेशच्या सन्मान आणि प्रतिष्ठेला धरून नव्हते. आम्ही शेजाऱ्यांशी पुन्हा संबंध प्रस्थापित करू इच्छितो. भारतासोबत आमचे अनेक प्रश्न आहेत, जसे की तीस्ता बॅरेज, सीमेवरील हत्या आणि 54 नद्यांच्या पाण्याची वाटणी. भारत वरच्या बाजूचा देश असल्यामुळे पाणी अडवतो. यामुळे बांगलादेशचे खूप नुकसान होते. येथे दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण होत आहे. या समस्या परस्पर सामंजस्याने सोडवल्या पाहिजेत. प्रश्न: बांगलादेशात अल्पसंख्याकांवरील हिंसाचाराच्या घटना वाढल्या आहेत. याची काय कारणे आहेत? उत्तर: आम्ही आमच्या लोकांना बहुसंख्य-अल्पसंख्य अशा गटांमध्ये विभागले नाही. जे येथे जन्माला आले आहेत, ते देशाचे नागरिक आहेत. शेख हसीना यांच्या राजवटीत अनेक घटना घडल्या. त्यांचा वापर आमच्या आणि विरोधकांच्या विरोधात करण्यात आला. नंतर हे सिद्ध झाले की त्या खऱ्या नव्हत्या. गेल्या 17-18 महिन्यांत ज्या घटना घडल्या, त्यांची कारणे धार्मिक नसून राजकीय आहेत. आम्ही कोणत्याही घटनेचे समर्थन केले नाही. आम्ही त्यांचा निषेध केला आणि सांगितले की सरकारने चौकशी करून दोषींना कायद्यासमोर आणावे. आम्ही कायदा हातात घेण्याचे समर्थन करत नाही. प्रश्न: तुम्ही खुलना-1 जागेवरून हिंदू उमेदवार कृष्णा नंदी यांना उभे केले आहे. ही निवडणूक जिंकण्याची रणनीती आहे की तुम्हाला खरोखरच सर्वांना सोबत घेऊन जायचे आहे?उत्तर: आम्ही अनेकदा प्रयत्न केले, पण बांगलादेशातील राजकीय परिस्थिती अस्थिर होती. 2014 मध्ये आम्हाला निवडणूक लढवू दिली नाही. 2018 मध्ये रातोरात निवडणूक झाली. 2024 मध्येही आम्हाला निवडणूक लढवू दिली नाही. या वर्षी आम्ही चर्चेनंतर एक उमेदवार उभा करू शकलो. ज्या जागांवर जमात-ए-इस्लामी आणि BNP ला निवडणूक लढवू दिली नाही, तिथे खरंच निवडणूक झालीच नाही. आता परिस्थिती अनुकूल असल्यामुळे आम्हाला निवडणूक लढवण्याची संधी मिळत आहे. एका गैर-मुस्लिम उमेदवाराने इच्छा व्यक्त केली, आम्ही त्याला तिकीट दिले. प्रश्न: 10% हिंदू लोकसंख्या असलेल्या देशात फक्त एकच हिंदू उमेदवार, हे कसे योग्य आहे?उत्तर: जर आणखी लोकांना इच्छा असेल तर आम्ही त्यांनाही तिकीट देऊ. आम्ही पाहतो की उमेदवाराकडे संसदेसाठी योग्य क्षमता असावी, तो भ्रष्ट नसावा, मग तो मुस्लिम असो वा गैर-मुस्लिम. आम्ही त्याची वैयक्तिक इच्छा देखील पाहतो. आम्ही ढाका विद्यापीठाच्या निवडणुकीत एका विद्यार्थ्याला तिकीट दिले होते. त्याच्या समुदाय आणि कुटुंबाने त्याला रोखले, तरीही तो निवडणूक लढला आणि जिंकला. सुरक्षेच्या कारणांमुळे अनेकदा समुदाय किंवा कुटुंबाकडून अडचणी येतात. आम्ही एखाद्याला निवडतो, तो संमती देतो, आम्ही त्याचे नामांकन करतो आणि तो जिंकेल अशी अपेक्षा करतो. प्रश्न: जमातवर 1971 मध्ये बांगलादेशच्या स्वातंत्र्य चळवळीला दडपण्याचा आणि पाकिस्तानला साथ दिल्याचा डाग आहे, तो कसा पुसला जाईल?उत्तर: अवामी लीगने आपल्या राजकारणात या मुद्द्यांचा वापर केला. आमच्या विरोधात त्यांच्याकडे सांगण्यासारखे काही नव्हते, म्हणून त्यांनी हे सर्व केले. ते आम्हाला राजकारणात हरवू शकले नाहीत, तेव्हा त्यांनी कायदे आणि न्यायाधिकरणे (ट्रिब्युनल्स) तयार केली. हे नंतर चुकीचे सिद्ध झाले. आमच्या एका नेत्याला बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयाने निर्दोष मुक्त केले. संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेऊन सांगितले की हा इतिहासातील सर्वात वाईट खटला होता. इंग्लंडच्या सर्वोच्च न्यायालयानेही हेच सांगितले. आता हे स्पष्ट झाले आहे की या आरोपांमागे राजकारण होते. प्रश्न: जमातवर धर्माच्या आधारावर भेदभावाचे आरोप होतात, हिंसाचारातही नाव आले आहे. यावर काय म्हणाल?उत्तर: हिंदू, ख्रिश्चन, बौद्ध, सर्व या देशाचे नागरिक आहेत. आम्ही सर्व मिळून देश घडवू इच्छितो. प्रत्येक आपत्तीत आम्ही धर्म पाहिला नाही, माणुसकी पाहिली. 5 ऑगस्ट 2024 नंतर सर्व धर्मांच्या प्रार्थनास्थळांची सुरक्षा केली. आम्ही त्यांना आश्वासन दिले की कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही. प्रश्न: जमातने एकाही महिलेला तिकीट दिले नाही. असे का?उत्तर: बांगलादेशच्या एकूण मतदारांमध्ये निम्म्या महिला आहेत. बांगलादेशच्या समाजात महिलांसाठी काही निश्चित नियम, परंपरा आणि मान्यता आहेत. प्रत्येक देशाचा सामाजिक, आर्थिक, राजकीय इतिहास आणि परंपरा असतात. त्यानुसारच त्या देशाचे राजकारण आणि व्यवस्था चालते. जमात-ए-इस्लामीमध्ये सुमारे 40% महिला आहेत. तळागाळातील कार्यकर्त्यांपासून ते संघटनेत वरपर्यंत सर्वत्र महिलांचा सहभाग आहे. त्यांना सर्वत्र सन्मान मिळतो. मर्यादेत राहून संघटना चालवण्याची संधी मिळते. कोणत्याही महिलेने राजकारण करावे किंवा निवडणूक लढावी किंवा नाही, हा तिचा वैयक्तिक आणि कौटुंबिक निर्णय असतो. आम्ही कोणत्याही महिलेवर निवडणूक लढण्यासाठी दबाव टाकत नाही. तरीही, युनियन परिषद आणि उपजिला परिषदेत आमच्या महिला प्रतिनिधी राहिल्या आहेत. त्यांनी चांगल्या प्रकारे जबाबदारी पार पाडली आहे. संसदेतही 2001 आणि 1991 मध्ये आमच्या महिला सदस्य होत्या. त्यांनी चांगले काम केले आहे. प्रश्न: तुम्ही म्हणताय की स्त्रिया आणि पुरुषांमध्ये फरक नाही, मग काही स्त्रियांना तरी तिकीट द्यायला पाहिजे होतं ना?उत्तर: आम्ही प्रयत्न केले आहेत. पुरुषांसाठी जे सोपे आहे, ते स्त्रियांसाठी नाही. 11 डिसेंबर रोजी निवडणुकीच्या तारखेची घोषणा झाली होती. दुसऱ्याच दिवशी ढाका-8 जागेवरून निवडणूक लढण्याची तयारी करत असलेल्या शरीफ उस्मान हादी यांना दिवसाढवळ्या गोळ्या घालून ठार मारण्यात आले. चार दिवसांपूर्वी आमच्या पक्षाशी संबंधित एका नेत्याची शेरपूरमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली. याशिवाय, जेव्हा आमच्या महिला कार्यकर्त्या निवडणुकीत काम करत असतात, तेव्हा दुसऱ्या पक्षाचे कार्यकर्ते त्यांच्यावर हल्ला करतात. त्यांचा हिजाब काढतात. त्यांचे सामान हिसकावून घेतात. त्यांना त्रास देतात. महिलांची सुरक्षा हा मोठा मुद्दा आहे. त्यामुळे सर्व महिलांना निवडणूक लढवायची नसते. त्या राजकारण करतील की नाही, हा त्यांचा निर्णय आहे. आम्ही कोणावरही दबाव टाकत नाही. आमचे मत आहे की, जर वातावरण अधिक चांगले केले, तर भविष्यात महिला निवडणुकीत जास्त सहभाग घेतील. प्रश्न: बांगलादेशात दोन महिला पंतप्रधान राहिल्या आहेत, मग महिलांसाठी कोणतेही काम कसे कठीण असू शकते?उत्तर: दोघांनी गेल्या 30 वर्षांत दोन पक्षांचे नेतृत्व केले आणि पंतप्रधान बनल्या. पुढेही कोणतीही महिला येऊ शकते. यामध्ये बांगलादेशच्या संविधानात कोणतीही अडचण नाही. संसदेत बहुमत मिळवणारा पक्ष ठरवेल की त्याचा नेता कोण असेल. प्रश्न: बांगलादेशातील लोकांकडे इतर पर्यायही आहेत, मग ते जमातसारख्या कट्टर पक्षाला का निवडतील?उत्तर: प्रत्येक पक्षाचे स्वतःचे धोरण आणि विचारधारा असते. लोक नेत्यांचे वर्तन, क्षमता, नेतृत्व पाहून योग्य व्यक्ती आणि योग्य पक्षाची निवड करतील. आम्हाला आशा आहे की बांगलादेश जमात-ए-इस्लामीला पाठिंबा मिळेल. प्रश्न: बांगलादेशमध्ये निवडणुकीसोबत जनमत संग्रहही होत आहे. जर पुन्हा संविधान बनवण्याची वेळ आली, तर ते इस्लामिक कायद्यांनुसार बनवले जाईल का?उत्तर: 12 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीकडून लोकांना खूप अपेक्षा आहेत. 2014, 2018 आणि 2024 मध्ये झालेल्या तिन्ही निवडणुका देशाच्या अपेक्षा पूर्ण करू शकल्या नाहीत. उलट, निवडणुकीच्या नावाखाली मस्करी झाली होती. यावेळी निवडणुकीसोबतच जनमत संग्रहही होईल. आम्ही दीर्घ विचारमंथनानंतर जुलै चार्टर तयार केले आहे. यात सुधारणेचे अनेक प्रस्ताव समाविष्ट आहेत. आम्ही अपेक्षा करत आहोत की बांगलादेशचे सुमारे 13 कोटी मतदार यात सहभागी होतील. बांगलादेश जमात-ए-इस्लामी हा लोकशाही आणि इस्लामी तत्त्वांनुसार काम करणारा पक्ष आहे. हा बांगलादेशच्या लोकांसाठी सर्वात मोठी आशा बनला आहे. शेख हसीना सरकारच्या काळात जमातवर खूप अत्याचार झाले. यामुळे जमात-ए-इस्लामीसाठी लोकांमध्ये भावना, आशा आणि समर्थन वाढले आहे. आम्ही लोकांसोबत राहिलो, त्यांची मदत केली. लोकांसोबत उभे राहणे हे नेहमीच आमचे धोरण राहिले आहे. म्हणून, आगामी निवडणुकीत जमात जनतेच्या पाठिंब्याने चांगल्या स्थितीत राहील अशी आम्हाला अपेक्षा आहे. प्रश्न: नवीन संविधानात काय-काय बदल होऊ शकतात?उत्तर: बांगलादेशात आम्ही संविधानासाठी लढा दिला आहे. गेल्या दीड वर्षांपासून देशात अंतरिम सरकार आहे. त्यासोबत राष्ट्रीय सुधार आयोग आणि जातीय ऐकमत्य कमिशन नावाचे दोन आयोग स्थापन झाले. यांच्या माध्यमातून अनेक सुधारणा करण्यात आल्या. या सुधारणांच्या आधारावर नवीन संविधान बनत आहे. बांगलादेश आता त्याच आधारावर चालेल. जनमतसंग्रहात एकूण 48 कलमे बदलतील. बांगलादेशचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्यात अधिकारांची विभागणी होईल. सध्या सर्व अधिकार पंतप्रधानांकडे आहेत. अशी परिस्थिती आता राहणार नाही. काही अधिकार राष्ट्रपतींना मिळतील. पंतप्रधानांचा कार्यकाळ जास्तीत जास्त 10 वर्षांचाच असेल. जर जनमतसंग्रहात 'होय' च्या बाजूने जास्त मते पडली, तर त्याच आधारावर बांगलादेश आणि सरकारे चालतील. हे लोकांच्या अपेक्षांनुसार असेल. प्रश्न: जर एखाद्या पक्षाला बहुमत मिळाले नाही, तर निवडणुकीनंतर जमात कोणासोबत जाईल?उत्तर: तेव्हा परिस्थितीनुसार निर्णय घेऊ. यापूर्वीही बांगलादेशात आघाडीची सरकारे होती. 1991 मध्ये आम्ही BNP ला पाठिंबा दिला, 2001 मध्ये सरकारमध्ये होतो. यात कोणतीही अडचण नाही.

दिव्यमराठी भास्कर 11 Feb 2026 6:50 am

आजचे एक्सप्लेनर:राहुल गांधींच्या भेटीनंतर लोकसभेत दिसले नाहीत अध्यक्ष ओम बिर्ला; अविश्वास प्रस्तावाची नोटीस सादर, खुर्ची जाणार का?

9 फेब्रुवारी 2026 रोजी लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले- '1 तासापूर्वी आम्ही स्पीकर साहेब (ओम बिर्ला) यांच्याकडे गेलो होतो. त्यांनी आम्हाला वैयक्तिकरीत्या वचन दिले होते की मला अर्थसंकल्पापूर्वी काही मुद्द्यांवर बोलण्याची परवानगी दिली जाईल. आता तुम्ही तुमच्या शब्दावरून फिरत आहात. तर मला त्या मुद्द्यांवर बोलू दिले जाईल की नाही.' त्यावेळी अध्यक्षस्थानी ओम बिर्ला नसून, भाजप खासदार संध्या राय विराजमान होत्या. त्यांनी राहुल गांधींना बोलण्याची परवानगी दिली नाही. संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, स्पीकरने असे कोणतेही वचन दिले नाही. त्यानंतर सभागृह स्थगित करण्यात आले. 10 फेब्रुवारी रोजी जेव्हा सभागृह पुन्हा सुरू झाले, तेव्हा लोकसभेत स्पीकर ओम बिर्ला दिसले नाहीत. मात्र, विरोधी पक्षाच्या 118 खासदारांनी त्यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्तावाची नोटीस दिली आहे. अखेर स्पीकरला पदावरून हटवण्याची प्रक्रिया काय आहे, बहुमत नसतानाही विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव का आणला आणि खरंच ओम बिर्ला यांची खुर्ची धोक्यात आहे का; जाणून घेऊया आजच्या एक्सप्लेनरमध्ये... प्रश्न 1: लोकसभेत अध्यक्षांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव कोण आणि का आणत आहे? उत्तर: लोकसभेत 118 विरोधी खासदारांनी अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्तावाची नोटीस दिली आहे. यात काँग्रेस व्यतिरिक्त समाजवादी पक्ष, DMK, शिवसेना (UBT), NCP-SP आणि RJD चे खासदार सामील आहेत. मात्र, TMC आणि इतर काही प्रादेशिक पक्षांनी अद्याप पाठिंब्याची घोषणा केलेली नाही. काँग्रेस खासदार जयराम रमेश यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, ‘लोकसभेत विरोधकांचा आवाज सातत्याने दाबला जात आहे, आणि अध्यक्षांची भूमिका निष्पक्ष राहिलेली नाही. त्यामुळे आमच्याकडे अविश्वास प्रस्ताव आणण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाही.’ अध्यक्ष ओम बिर्ला यांनी लोकसभा महासचिव उत्पल कुमार सिंह यांना नोटीसची चौकशी करून आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. अविश्वास प्रस्तावाच्या नोटीसमध्ये विरोधकांनी अध्यक्षांवर 4 मुख्य आरोप लावले आहेत... 1. राहुल गांधींना बोलू दिले नाही: 2 फेब्रुवारी रोजी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते राहुल गांधींना त्यांचे भाषण पूर्ण करू दिले नव्हते. 2. विरोधी खासदारांचे निलंबन: 3 फेब्रुवारी रोजी 8 लोकसभा खासदारांना संपूर्ण अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले होते. 3. भाजप खासदारांवर कारवाई नाही: 4 फेब्रुवारी रोजी भारतीय जनता पक्षाच्या एका खासदाराला भारताच्या दोन माजी पंतप्रधानांबद्दल वैयक्तिक वादग्रस्त टिप्पणी करण्यापासून रोखण्यात आले नव्हते. आमच्या विनंतीनंतरही त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. विरोधकांचा रोख निशिकांत दुबे यांच्याकडे होता. 4. काँग्रेस खासदारांवर पंतप्रधानांवर हल्ल्याचा आरोप: 5 फेब्रुवारी रोजी काँग्रेसच्या खासदारांवर खोटे आरोप लावण्यात आले होते. अविश्वास प्रस्तावाच्या नोटिशीमध्ये या दिवशी ओम बिर्ला यांचे संपूर्ण विधान लिहिण्यात आले आहे. यात त्यांनी म्हटले होते की, 'माझ्याकडे खात्रीशीर माहिती आली होती की काँग्रेस पक्षाचे अनेक सदस्य माननीय पंतप्रधानांच्या आसनापर्यंत पोहोचून कोणतीही अप्रिय घटना करू शकतात. हे टाळण्यासाठी मी पंतप्रधानांना विनंती केली की त्यांनी सभागृहात येऊ नये.' राहुल गांधींनी सोमवारी लोकसभेबाहेर स्पीकरविरोधात जे काही बोलले, तेव्हापासूनच वाटत होते की विरोधक स्पीकरविरोधात अविश्वास प्रस्ताव आणू इच्छितात. राहुल गांधी म्हणाले, 'मला सभागृहात बोलू दिले नाही. आमच्या खासदारांना निलंबित करण्यात आले. मला पुस्तकाचा हवाला देऊन बोलण्यापासून रोखण्यात आले, पण त्यांचे खासदार पुस्तकाचा हवाला देऊन बोलत राहिले. त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. आमच्या खासदारांवर पंतप्रधानांवर हल्ला केल्याचा आरोप लावण्यात आला.' प्रश्न 2: लोकसभा अध्यक्षांना पदावरून हटवण्याची संपूर्ण प्रक्रिया काय आहे? उत्तर: घटनेच्या कलम 94 (C) अंतर्गत लोकसभेचे सदस्य अध्यक्षांविरुद्ध ठराव मंजूर करून त्यांना पदावरून हटवू शकतात. घटनेत याला ‘पदावरून काढण्याचा संकल्प’ (Resolution of Removal) असे म्हटले जाते. हा ठराव साध्या बहुमताने मंजूर होतो… 50 खासदारांच्या स्वाक्षरीने अविश्वास प्रस्ताव दिला जातो नोटिशीच्या तपासणीनंतर चर्चेची तारीख निश्चित केली जाते अध्यक्ष (स्पीकर) अध्यक्षस्थान भूषवत नाहीत प्रस्तावावर चर्चा अर्ध्याहून अधिक खासदारांच्या मतांनी प्रस्ताव मंजूर होतो प्रस्ताव मंजूर न होण्याचा परिणाम प्रश्न 3: ओम बिर्ला यांची खुर्ची धोक्यात आहे का? उत्तर: लोकसभेत सध्या काँग्रेसकडे 99 जागा आहेत. जर इंडिया आघाडीतील सर्व मित्रपक्षांनी त्यांना पाठिंबा दिला, तरीही त्यांच्याकडे 235 खासदार होतील. लोकसभेत एकूण 543 खासदार आहेत. जर सर्व सदस्य उपस्थित राहिले, तर प्रस्ताव मंजूर करण्यासाठी इंडिया आघाडीला 272 खासदारांची आवश्यकता असेल. म्हणजेच, अध्यक्षांना हटवण्यासाठी आवश्यक संख्याबळ विरोधकांकडे नाही. प्रश्न 4: बहुमत नसतानाही विरोधक अध्यक्षांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव का आणत आहेत? उत्तर: सभागृहात बहुमत नसतानाही अनेकदा विरोधी पक्ष अविश्वास प्रस्ताव आणतात. ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक आदेश रावल यांच्या मते, हे जनतेला संदेश देण्याचे राजकारण आहे. अध्यक्षांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव आणून विरोधकांना देशाला हे सांगायचे आहे की लोकसभा अध्यक्ष पक्षपातीपणा करत आहेत. ते विरोधी पक्षांचे ऐकत नाहीत आणि विरोधी पक्षनेत्यांना संसदेत बोलू देत नाहीत. पुरेसे संख्याबळ नसतानाही ते त्यांच्या विरोधात आवाज उठवत आहेत, असा संदेश विरोधक देशाला देत आहेत. राजकीय तज्ज्ञ अमिताभ तिवारी म्हणतात की, विरोधी पक्ष एकत्र येऊनही अविश्वास प्रस्ताव मंजूर करू शकत नाहीत. तथापि, जर अविश्वास प्रस्तावावर मतदान झाले, तर तो विरोधी पक्षांचा एक ऐतिहासिक राजकीय निर्णय मानला जाईल. यामुळे जनतेमध्ये संदेश जाईल की, लोकसभा अध्यक्ष सरकारची बाजू घेत आहेत आणि विरोधक त्याविरुद्ध आवाज उठवत आहेत. तथापि, हा अविश्वास प्रस्ताव लोकसभा अध्यक्षांपेक्षा काँग्रेसची अधिक कसोटी आहे, कारण काही विरोधी पक्षांच्या खासदारांनी अविश्वास प्रस्तावाला अद्याप समर्थन दिलेले नाही. मध्य प्रदेश विधानसभेचे माजी मुख्य सचिव भगवानदेव इसराणी यांच्या मते, अविश्वास प्रस्तावामुळे INDIA आघाडीची परीक्षा होणे निश्चित आहे. INDIA आघाडीकडे 235 जागा आहेत. यापैकी TMC सारखे काही पक्ष अद्याप अविश्वास प्रस्तावासाठी तयार नाहीत. अशा परिस्थितीत हे पाहणे महत्त्वाचे ठरेल की, काँग्रेसच्या 99 खासदारांव्यतिरिक्त INDIA आघाडीचे किती खासदार एकजूट आहेत. यातून आघाडीची ताकदही कळेल. प्रश्न 5: टीएमसी विरोधी पक्षात असूनही, अविश्वास प्रस्ताव आणण्यात सोबत का नाही? उत्तर: तृणमूल काँग्रेस म्हणजेच टीएमसीने अद्याप अविश्वास प्रस्तावाला थेट पाठिंबा दिलेला नाही. खरं तर, टीएमसीला असं वाटतं की आधी काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी आपल्या मागण्या स्पष्टपणे लेखी स्वरूपात सादर कराव्यात. टीएमसीचे खासदार अभिषेक बॅनर्जी म्हणाले की, जर अध्यक्षांनी दोन-तीन दिवसांत या मागण्यांवर कोणतीही कारवाई केली नाही, तर टीएमसी अविश्वास प्रस्तावावर स्वाक्षरी करेल. त्यांनी सांगितले की, टीएमसीच्या मुख्य तक्रारी खासदारांना निलंबित करणे, विरोधी पक्षनेत्यांना बोलू न देणे आणि महिला खासदारांवर खोटे आरोप लावण्याबाबत आहेत. अभिषेक बॅनर्जी म्हणाले की, लोकसभा काल दुपारी 2 वाजता पूर्ण दिवसासाठी स्थगित करण्यात आली होती, तर ती फक्त 1-2 तासांसाठी स्थगित करता आली असती. टीएमसी खासदारांना सभागृह योग्यरित्या चालावे असे वाटते, परंतु त्यासाठी अध्यक्षांना कारवाई करावी लागेल. राजकीय तज्ज्ञ आदेश रावल म्हणतात की, टीएमसीने अनेकदा संसदेत इंडिया आघाडीला साथ दिली नाही. ती बहुतेक मुद्द्यांवर विरोधकांपासून वेगळी राहते. जर SIR चा मुद्दा वगळला, तर असा कोणताही दुसरा विषय मिळत नाही ज्यात तिने विरोधकांना साथ दिली असेल. गौतम अदानींच्या मुद्द्यावरही टीएमसीने नेहमीच स्वतःला विरोधकांपासून वेगळे ठेवले आहे. त्यांचे मत आहे की टीएमसीचे स्वतःचे राजकारण आहे आणि ती काँग्रेसच्या मुद्द्यांना पुढे नेऊ इच्छित नाही. लोकसभेत टीएमसीचे एकूण 29 खासदार आहेत. अशा परिस्थितीत, अविश्वास प्रस्तावासाठी लोकसभेत विरोधकांच्या संख्याबळाचे गणित पाहिले तरी, टीएमसीने समर्थन दिले किंवा नाही दिले तरी फारसा फरक पडताना दिसत नाही. कारण टीएमसी खासदारांच्या पाठिंब्यानंतरही विरोधक अविश्वास प्रस्ताव मंजूर करू शकत नाहीत. प्रश्न 6: ओम बिर्ला यांना धनखड यांच्याशी का जोडले जात आहे? उत्तर: ओम बिर्ला यांच्या आधी 2024 मध्ये विरोधकांनी तत्कालीन उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणला होता. तेव्हाही विरोधकांनी त्यांच्यावर पक्षपाताचा आरोप केला होता. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले होते की, सभापती राज्यसभेत शाळेच्या मुख्याध्यापकांसारखे वागतात. विरोधी पक्षाचा खासदार 5 मिनिटे भाषण देतो, तेव्हा ते त्यावर 10 मिनिटे टिप्पणी करतात. मात्र, हा प्रस्ताव फेटाळण्यात आला होता. तेव्हाही विरोधकांकडे धनखड यांना पदावरून हटवण्यासाठी बहुमत नव्हते आणि आताही ओम बिर्ला यांना हटवण्यासाठी बहुमत नाही. दोन्ही प्रकरणांमध्ये अविश्वास प्रस्ताव हा सरकारविरोधात निषेध नोंदवण्याचा एक मार्ग होता. मात्र, 22 जुलै 2025 रोजी जगदीप धनखड यांनी खराब प्रकृतीचे कारण देत पदाचा राजीनामा दिला होता. त्याच्या एक दिवस आधी त्यांनी राज्यसभेत न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या विरोधात महाभियोग प्रस्ताव स्वीकारला होता.

दिव्यमराठी भास्कर 11 Feb 2026 6:37 am

अग्रलेख : केरळ पॅटर्न

देशातील सर्वात साक्षर राज्य असलेल्या केरळने शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये एक नवा पॅटर्न आणला आहे, ज्याचे अनुकरण देशातील इतर राज्यांनी करायलाही हरकत नाही. केरळ राज्य सरकारचा वार्षिक अर्थसंकल्प नुकताच सादर झाला.

दैनिक प्रभात 11 Feb 2026 6:00 am

लक्षवेधी : कर्जउभारणीचा वाढता बोजा

भारतावर कर्जाचा बोजा वाढतच चालला आहे. अर्थव्यवस्थेत पैशाची चणचण असताना, सरकार प्रचंड कर्जे घेत आहे. बाजरपेठेच्या दृष्टीने हे चांगले लक्षण नाही.

दैनिक प्रभात 11 Feb 2026 5:30 am

हवामान : हिमालयात बर्फाचा दुष्काळ

हवामान बदलाचे दुष्परिणाम हिमालयीन भागातही होत आहेत. या परिसरात पूर्वीच्या तुलनेत हिमवृष्टीचे प्रमाण कमी होत आहे. बहुतांश पर्वतांवरचा बर्फ कमी झाला आहे. तो केवळ टोकावरच दिसत आहे.

दैनिक प्रभात 11 Feb 2026 5:00 am

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ११ फेब्रुवारी २०२६

पंचांगआज मिती माघ कृष्ण कृष्ण नवमी शके १९४७. चंद्र नक्षत्र अनुराधा १०.५३ पर्यंत नंतर ज्येष्ठा योग व्याघात चंद्र राशी वृश्चिक. भारतीय सौर २१ माघ शके १९४७. बुधवार- दिनांक ११ फेब्रुवारी २०२६. मुंबईचा सूर्योदय ०७.०९, मुंबईचा सूर्यास्त ०६.३६, मुंबईचा चंद्रोदय ०३.०३ उद्याची , मुंबईचा चंद्रास्त ०१.०९ , राहू काळ १२.५२ ते ०२.१८.श्री रामदास नवमी,११ पर्यन्त चांगलादैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)

फीड फीडबर्नर 11 Feb 2026 12:30 am

मुंबईच्या महापौर, उपमहापौरपदाची आज निवडणूक

तब्बल ४४ वर्षांनंतर भाजपचा महापौर मुंबई महापालिकेत विराजमान होणारमुंबई (विशेष प्रतिनिधी) :मुंबईचा महापौर आणि उपमहापौरपदासाठी मंगळवारी ११ फेब्रुवारी रोजी होत असून प्रतिस्पर्धी पक्षाकडून कुणीही या पदांसाठी उमेदवारी अर्ज न भरल्याने ही निवडणूक बिनविरोध घोषित झाली आहे. त्यामुळे या निवडणूक निकालाची औपचारिकता मंगळवारी पार पडणार आहे. तब्बल ४४ वर्षांनंतर भाजपचा महापौर मुंबई महापालिकेत विराजमान होणार आहे. या निवडणुकीत महापालिका आयुक्त डॉ भूषण गगराणी हे पिठासीन अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. विशेष म्हणजे महापौर निवडीच्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमहापौर एकनाथ शिंदे हे स्वत: उपस्थित राहून याचि देही याची डोळा पाहून या क्षणाचे साक्षीदार होणार आहेत.मुंबई महापालिकेत भाजपचे सर्वांधिक म्हणजे ८९ नगरसेवक निवडून आले असून महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचे २९ अधिक राष्ट्रवादी काँग्रेसचे ४ अशाप्रकारे ३३ नगरसेक आहेत. त्यामुळे भाजप शिवसेना महायुतीचे संख्याबळ हे १२२ एवढे होत आहे. महायुतीच्यावतीने महापौरपदासाठी भाजप नगरसेविका रितू तावडे आणि उपमहापौरपदासाठी शिवसेनेेचे संजय घाडी यांनी आपले उमेदवारी अर्ज महापालिका सचिव यांना सादर केले. परंतु उबाठाच्यावतीने कुणीही आपले अर्ज भरलेले नाहीत. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार आहे.या निवडणुकीची प्रक्रिया ही केवळ औपचारिकता राहणार असून पिठासीन अधिकारी म्हणून डॉ भूषण गगराणी हे काम पाहणार आहेत. यावेळी स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महापालिका सभागृहातील प्रेक्षागॅलरी बसून ही निवड प्रक्रिया न्याहाळणार आहेत.महापौर निवडीनंतर होणार नाही आनंदोत्स्वमहापौर आणि उपमहापौर यांच्या निवडीनंतर महापालिका मुख्यालयाबाहेर ढोलताशे आणि फटाक्यांची आतषबाजी केली होती, तसेच कार्यकर्ते नाचत गुलाल उधळत आनंदोत्सव साजरा करत असतो. परंतु राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे महापौर तसेच उपमहापौरपदाच्या निवडणुकीनंतर कोणत्याही प्रकारचा जल्लोष तसेच आनंदोत्सव केला जाणार नाही. महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणुकीनंतर अजित पवार यांच्या निधनामुळे अत्यंत साधेपणाने नवनिर्वाचित महापौर व उपमहापौरांचे स्वागत केले जाणार असल्याचे भाजपच्या नेत्यांनी स्पष्ट केले आहे.

फीड फीडबर्नर 11 Feb 2026 12:30 am

PAK vs USA : पाकिस्तानचा सलग दुसरा विजय! उस्मानच्या फिरकीसमोर अमेरिका नतमस्तक! शुभमची अर्धशतकी झुंज ठरली अपयशी

PAK vs USA : टी-२० विश्वचषक २०२६ च्या १२ व्या सामन्यात पाकिस्तानने अमेरिकेवर (USA) ३२ धावांनी मात केली.

दैनिक प्रभात 10 Feb 2026 11:13 pm

Equity mutual funds: गुंतवणूकदारांनी फिरवली पाठ? सलग दुसऱ्या महिन्यात इक्विटी फंड घसरले; आता फेब्रुवारीत काय होणार?

Equity mutual funds: जानेवारी महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंडात झालेली गुंतवणूक सलग दुसर्‍या महिन्यात कमी होऊन 24,028 कोटी रुपये इतकी झाली आहे.

दैनिक प्रभात 10 Feb 2026 10:48 pm

Babar Azam Record : बाबर आझमने साकारली विश्वचषकातील सर्वात वेगवान खेळी, टीकाकारांना बॅटनेच दिले चोख प्रत्युत्तर

Babar Azam Record : सातत्याने संथ फलंदाजीसाठी टीकेचा धनी ठरणाऱ्या बाबर आझमने आज आपल्या शैलीत बदल करत विश्वचषकाच्या इतिहासातील आपली सर्वात वेगवान खेळी साकारली

दैनिक प्रभात 10 Feb 2026 10:35 pm

Ram Satpute : ‘राम सातपुतेंच्या हत्येचा कट? मंत्र्यांच्या आरोपाने खळबळ

Ram Satpute : सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी माजी आमदार राम सातपुते यांच्या हत्येचा कट रचला गेल्याचा खळबळजनक आरोप केला आहे.

दैनिक प्रभात 10 Feb 2026 10:32 pm

lifestyle : रात्री झोपण्यापूर्वी बिछाना व्यवस्थित करणे का महत्त्वाचे ठरते? तुमच्या आयुष्यावर काय परिमाण घडतो? पाहा….

रात्री झोपताना ज्याप्रमाणे बिछाना व्यवस्थित करणे अपेक्षित असते. तसेच सकाळी उठल्यावर देखील पहिले काम म्हणजे बिछाना व्यवस्थित करणे हेच असले पाहिजे.

दैनिक प्रभात 10 Feb 2026 10:30 pm

मुंबई महापालिकेने आणखी १० मोठ्या मालमत्ता कर थकबाकीदारांची नावे केली जाहीर

तब्बल १०० कोटींच्या आसपास आहे थकीत कराची रक्कममुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या मालमत्ता कराची थकीत रक्कम न भरणाऱ्या २० मोठ्या थकबाकीदारांची नावे जाहीर केल्यानंतर आता मुंबई महापालिकेने आणखी दहा मोठ्या थकबाकीदारांची नावे जाहीर केली आहे. या सर्व थकबाकीदारांकडे सुमारे १०० कोटी रूपयांची वसुली प्रलंबित आहे.मालमत्‍ताकर भरणा करण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करणाऱ्या तसेच पुरेशी आर्थिक क्षमता असूनही मालमत्ता कराचा भरणा न करणाऱ्या मोठ्या थकबाकीदारांविरोधात महानगरपालिकेने कठोर भूमिका घेतली आहे. मुंबई महानगरपालिका अधिनियमातील कलम २०३ अन्वये अशा थकबाकीदारांना जप्तीची नोटीस बजावण्यात येत आहे. तसेच निर्धारित कालावधीत थकबाकी रक्कम भरली नाही तर संबंधित मालमत्तेवर जप्तीची तसेच पुढील टप्प्यात लिलावाची कारवाई करण्यात येणार आहे.महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या निर्देशांनुसार आणि सहआयुक्‍त (कर निर्धारण व संकलन) विश्‍वास शंकरवार यांच्‍या मार्गदर्शनाखाली मुंबईतील मालमत्ताधारकांकडून करसंकलन करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सर्व संबंधितांनी दिलेल्या मुदतीत करभरणा करावा आणि दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई टाळावी, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून वेळोवेळी केले जात आहे. तरीही, कर भरणा करण्यास टाळाटाळ करणा-यांवर कठोर कारवाई करण्यास प्रशासनाने सुरुवात केली आहे.महानगरपालिकेच्या कर निर्धारण व संकलन विभागाने आर्थिक वर्ष २०२५ - २६ मध्ये १ एप्रिल २०२५ पासून ते ४ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत ५,४२६ कोटी ८१ लाख रुपयांचा मालमत्ता कर वसूल केला आहे. तसेच, पुढील दोन महिन्यांसाठी मालमत्ता कर वसुलीच्या दृष्टीने व्यापक मोहीम हाती घेण्यात आली आहे.त्‍या दृष्‍टीने विविध पातळ्यांवर कार्यवाही सुरू आहे.१० फेब्रुवारी २०२६ रोजी कर भरण्यासाठी पाठपुरावा केलेल्या ‘टॉप टेन’ मालमत्ता धारकांची यादी कमला मिल्‍स् (जी दक्षिण विभाग) - १२ कोटी ०१ लाख ६५ हजार ८५० रुपये सुमेर कॉर्पोरेशन चांदिवली फार्म्‍स् (एल विभाग) - ११ कोटी ९८ लाख ८३ हजार १४४ रुपये ट्रान्‍सकॉन शेठ क्रिएटर्स (पी उत्‍तर विभाग) - ११ कोटी ९८ लाख ४७ हजार १३१ रुपये फोरमोस्‍ट रिऍल्‍टर्स प्रायव्‍हेट (एच पूर्व विभाग) - ११ कोटी ९१ लाख ०७ हजार ५६२ रुपये श्री साई ग्रुप (के पश्चिम विभाग) - ११ कोटी ३१ लाख ७५ हजार ७१७ रुपये अॅकाॅर्ड बिल्‍डर्स (एल विभाग) - ११ कोटी २० लाख ४५ हजार ४२९ रुपये सुमेर कॉर्पोरेशन चांदिवली फार्म्‍स् (एल विभाग) - १० कोटी ६३ लाख ०५ हजार २८६ रुपये आमीर पार्कस् ऍण्‍ड ऍम्‍युझमेंट प्रायव्‍हेट लिमिटेड (पी दक्षिण विभाग) - ९ कोटी ५६ लाख १८ हजार ९७९ रुपये इम्तियाज अब्‍दुल गफार ( के पश्चिम विभाग) - २ कोटी ५४ लाख ५४ हजार ६८५ रुपये अमीनुल्‍लाह जहिदुल्‍लाह (एच पश्चिम विभाग) - २ कोटी ५१ लाख ३० हजार ४३७ रुपये

फीड फीडबर्नर 10 Feb 2026 10:30 pm

IT Ministry New rules : 20 फेब्रुवारीपासून बदलणार तुमचे सोशल मीडिया; AI फोटो, व्हिडीओ वापरणाऱ्यांसाठी आले कडक नियम

IT Ministry New rules: या नव्या नियमांनुसार, कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर करून तयार केलेले वास्तववादी (Photorealistic) फोटो किंवा व्हिडिओवर स्पष्टपणे 'लेबल' लावणे आता अनिवार्य असणार आहे.

दैनिक प्रभात 10 Feb 2026 10:18 pm

कोस्टल रोडवर ऐकू येणार जय हो

मार्गिकेवर विशेष संगीत पट्ट्यांमुळे वाहनचालकांना अनोखा अनुभवमुंबई (विशेष प्रतिनिधी) :वाहतूक कोंडी विरहित, वेगवान आणि सुखकर प्रवासाची साक्ष ठरलेल्या मुंबईतील धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज किनारी मार्गावर (मुंबई कोस्टल रोड) वाहनचालकांसाठी एक आगळावेगळा आणि अभिमानाचा अनुभव देणारी अभिनव संगीत संकल्पना प्रत्यक्षात आली आहे. या रस्त्यावर विशेष तंत्रज्ञानयुक्त संगीत पट्टे बसविण्यात आले आहेत. या संगीत मार्गावरील (मेलोडी रोड) पट्ट्यांवरून वाहन गेल्यावर स्लमडॉग मिलेनियर चित्रपटातील ‘जय हो’ हे गाणे ऐकू येणार आहे. हा जगातील पाचवा आणि भारतातील पहिलाच प्रयोग आहे. महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवार, ११ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १२.३० वाजता या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ होणार आहे. माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या संकल्पनेतून हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला आहे.मुंबई महानगरपालिकेने उभारलेल्या मुंबई किनारी रस्त्यावर नरिमन पॉईंट कडून वरळीकडे जाणाऱ्या उत्तरमार्गिकेवर हा अभिनव प्रयोग साकारण्यात आला आहे. वरळीकडे जाणाऱ्या भूमिगत बोगद्यातून बाहेर पडल्यानंतर दुभाजकाला लागून असलेल्या पहिल्या मार्गिकेवरून ५०० मीटर पुढे संगीत पट्टे बसविण्यात आले आहेत. या पट्ट्यांवरून ताशी ७० ते ८० किलोमीटर वेगाने वाहन नेल्यास जय हो या गीताची धून वाहनात बसून ऐकू येते. रस्त्याच्या पृष्ठभागावर ठराविक अंतरावर आणि विशिष्ट आकारात पट्टे बसविण्यात आले आहेत. वाहन ठराविक वेगात या पट्ट्यांवरून गेल्यावर चाकांच्या घर्षणातून निर्माण होणाऱ्या ध्वनीलहरींवर ‘जय हो’ गाण्याची धून बसविण्यात आली आहे. हा अनुभव वाहनाच्या आत बसलेल्या प्रवाशांना स्पष्टपणे जाणवणार आहे. भूमिगत बोगद्यात वाहन असतानाच चालकांना संगीतमार्गाची माहिती व्हावी यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून ५०० मीटर, १०० मीटर आणि ६० मीटर अंतर आधीच संगीत मार्गाबाबतचे सूचनाफलक लावण्यात आले आहेत.असा आहे ‘संगीत‘/मेलडी रोड’रस्त्यावर ठराविक अंतरावर व विशिष्ट मोजमापात खोबणी किंवा पट्टे तयार केले आहेत. वाहन ठराविक वेगात त्या पट्ट्यांवरून गेले, की चाकांच्या घर्षणातून संगीतासारखा ध्वनी निर्माण होतो. यालाच ‘म्युझिकल रोड’ किंवा ‘मेलडी रोड’ असे म्हटले जाते.भारतातील पहिलाच प्रयोगया अभिनव संकल्पनेचा प्रसार सन २००७ मध्ये जपानमध्ये झाला. जपानमधील अभियंता शिझुओ शिनोडा यांनी बुलडोझरच्या साहाय्याने रस्त्यावर काम करत असताना हा ध्वनी परिणाम शोधून काढला. पुढे याच प्रयोगातून ‘मेलडी रोड’ ही संकल्पना विकसित झाली. आतापर्यंत हंगेरी, जपान, दक्षिण कोरिया, संयुक्त अरब अमिराती येथे असे प्रयोग करण्यात आले आहेत. भारतातील हा पहिलाच प्रयोग आहे.

फीड फीडबर्नर 10 Feb 2026 10:10 pm

NATO Arctic Sentry Mission : नाटो आर्क्टिक सेंट्री मिशन सुरू करणार

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युरोपियन मित्र राष्ट्रांमध्ये ग्रीनलँडवरून निर्माण झालेल्या तणावानंतर, उत्तर अटलांटिक करार संघटना अर्थात नाटो (NATO Arctic Sentry Mission) येत्या काही दिवसांत आर्क्टिकमध्ये त्यांची देखरेख आणि लष्करी मालमत्ता वाढवू शकेल अशी मोहीम सुरू करण्याची अपेक्षा आहे.

दैनिक प्रभात 10 Feb 2026 10:04 pm

Actor Rajpal Yadav: “ना पैसा उरला, ना मित्र राहिले…”; प्रसिद्ध अभिनेता राजपाल यादवने केलं तिहार तुरुंगात आत्मसमर्पण

Actor Rajpal Yadav: ५ कोटी रुपयांच्या चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने राजपालचा वाढीव वेळेचा अर्ज फेटाळल्यानंतर त्याला अखेर तुरुंगाची वाट धरावी लागली.

दैनिक प्रभात 10 Feb 2026 9:51 pm

Purandar International Airport : पुरंदर विमानतळ प्रकल्पाला राज्य शासनाची मान्यता

Purandar International Airport : पुण्यातील पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळाने अधिकृत मंजुरी दिली आहे.

दैनिक प्रभात 10 Feb 2026 9:48 pm

Mumbai : धक्कादायक..! मुंबईत भरदिवसा महिलेची गोळ्या घालून हत्या

Mumbai – मुंबईतील गोवंडी परिसरात मंगळवारी दुपारी एका १९ वर्षीय महिलेची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. पोलिसांच्या माहीतीनुसार, रस्त्यावरून जात असताना महिलेवर गोळीबार करून हल्लेखोर पळून गेले आहेत. महीलेला जखमी अवस्थेत जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, परंतु दाखल करण्यापूर्वीच तिला मृत घोषित करण्यात आले, असे अधिकाऱ्याने सांगितले. महिलेचे नाव उघड करण्यात आले नाही. सीसीटीव्ही फुटेजवरून […]

दैनिक प्रभात 10 Feb 2026 9:43 pm

Ravindra Waikar : भारतीय रेल्वेमध्ये कोकण रेल्वेचे विलिनीकरण करा; खासदार रविंद्र वायकर यांनी लोकसभेत मांडला प्रस्ताव

केरळ, कर्नाटक आणि गोवा या राज्यानंतर महाराष्ट्र शासनानेही कोकण रेल्वेच्या भारतीय रेल्वेमध्ये विलिनीकरणास मान्यता दिली आहे. यामुळे केंद्र सरकारने विलीनीकरणाचा निर्णय तातडीने घ्यावा.

दैनिक प्रभात 10 Feb 2026 9:41 pm

NZ vs UAE : न्यूझीलंडच्या सलामीवीरांचा वर्ल्ड रेकॉर्ड! बटलर-हेल्सचा विक्रम मोडत युएईवर १० विकेट्सनी दणदणीत विजय

NZ vs UAE : न ॲलन आणि टिम सीफर्ट या जोडीने टी-२० विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या भागीदारीचा विक्रम आता आपल्या नावावर केला आहे.

दैनिक प्रभात 10 Feb 2026 9:28 pm

“अजितदादांचे स्वप्न पूर्ण झाले!”इंदापूरमध्ये नव्या औद्योगिक वसाहतीचा मार्ग मोकळा; हजारो तरुणांना मिळणार रोजगार

Indapur MIDC : इंदापूर तालुक्यातील रत्नपुरी मळा येथील १,००० एकर जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे (MIDC) हस्तांतरित करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.

दैनिक प्रभात 10 Feb 2026 9:28 pm

Speaker Om Birla : ओम बिर्लांचा तडकाफडकी निर्णय; लोकसभा अध्यक्षांनी सोडली खुर्ची

Speaker Om Birla: जोपर्यंत या नोटीसीवर कोणताही अंतिम निर्णय होत नाही, तोपर्यंत लोकसभेच्या कामकाजाचे अध्यक्षपद भूषवणार नाही आणि सदनापासून दूर राहू, असा मोठा निर्णय ओम बिर्ला यांनी घेतला असल्याचे सूत्रांकडून समजते.

दैनिक प्रभात 10 Feb 2026 9:26 pm

Hingoli News : सिरसम गावाला पाणी द्या..! महिलांचे जिल्हाधिकारी कार्यालय येथे ठिय्या आंदोलन

केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी 'हर घर नळ, जलजीवन मिशन' योजना ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला २०२४ पर्यंत नळाद्वारे शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी राबवली जात आहे.

दैनिक प्रभात 10 Feb 2026 9:20 pm

पुणे पोलिसांचा ट्रिपल सीटस्वारांना दणका! एकाच दिवसात १,४५४ वाहनांवर कारवाई; लाखो रुपयांचा दंड वसूल

Pune Traffic Police : पुणे शहर वाहतूक पोलिसांनी नियम मोडणाऱ्या दुचाकीस्वारांविरोधात विशेष मोहीम राबवून १,४५४ ट्रिपल सीट वाहनांवर कारवाई केली आहे.

दैनिक प्रभात 10 Feb 2026 9:04 pm

Raj Thackeray : तुम्ही हिंदुत्व शिकवू नये.! राज ठाकरेंचा मोहन भागवतांवर निशाणा

भागवतांनी हिंदुत्व शिकवू नये. जेव्हा हिंदूंवर हल्ला होतो तेव्हा मनसे हिंदू म्हणून जे काही करू शकते ते करेल. आम्ही जे चुकीचे आहे ते चुकीचे म्हणतो.

दैनिक प्रभात 10 Feb 2026 9:03 pm

Farmer Strike: 12 फेब्रुवारीला भारत बंद! दिल्ली पुन्हा वेढणार? अमेरिकन व्यापार कराराने पेटली संघर्षाची ठिणगी

Farmer Strike: संयुक्त किसान मोर्चा (SKM) आणि ऑल इंडिया किसान सभा (AIKS) यांसह अनेक शेतकरी संघटनांनी या कराराला तीव्र विरोध दर्शवत १२ फेब्रुवारी २०२६ रोजी देशव्यापी संप आणि आंदोलनाची हाक दिली आहे.

दैनिक प्रभात 10 Feb 2026 8:52 pm

Robbery: माजी नायब तहसीलदारांच्या घरावर सशस्त्र दरोडा; 7 तोळे सोने, रोकड लंपास

Robbery: ५ अज्ञात दरोडेखोरांनी सुमारे ७ तोळे सोने, रोख रक्कम आणि मोबाईल असा एकूण ४ लाख ३७ हजार २०० रुपयांचा ऐवज लुटून नेला.

दैनिक प्रभात 10 Feb 2026 8:33 pm