PMC News: महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; निवृत्त सेवकांना मिळणार मोफत उपचार
प्रभात वृत्तसेवा पुणे – पुणे महापालिकेत २००५ नंतर सेवेत दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी सेवानिवृत्तीनंतर बंद करण्यात आलेली अंशदायी वैद्यकीय सहाय योजना पुन्हा सुरू करण्यास स्थायी समितीच्या बैठकीसह मुख्यसभेतही मान्यता देण्यात आली. त्यामुळे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोफत उपचारांचा मोठा दिलासा मिळणार आहे. महापालिकेतर्फे अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसह विद्यमान व माजी नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी आणि सेवानिवृत्त सेवकांसाठी अंशदायी वैद्यकीय […] The post PMC News: महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; निवृत्त सेवकांना मिळणार मोफत उपचार appeared first on Dainik Prabhat .
सांगलीच्या तासगावमध्ये हिंदकेसरी चंद्रहार पाटील यांनी आयोजित केलेल्या बैलगाडा शर्यतीत पहिल्या क्रमांकाचे फॉर्च्युनरचे बक्षीस जिंकून राज्यभरात चर्चेत आलेल्या 'लखन'ची सध्या सगळीकडेच हवा आहे. लखनची सगळीकडेच चर्चा सुरू असताना त्याच्याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी दिव्य मराठी थेट लखनच्या गावी पोहोचले. वाचा, मराठवाड्याच्या मातीतल्या 'लखन'च्या गावातून दिव्य मराठीने केलेला हा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट... बैलगाडा शर्यत प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रात लोकप्रिय आहे. मराठवाड्यात बैलगाडा शर्यतीची तेवढी क्रेझ नाही. मात्र छत्रपती संभाजीनगर शहरापासून जवळच असलेल्या करोडी गावातील मनोहर विश्वनाथ चव्हाण यांना बैलगाडा शर्यतीची चांगलीच आवड आहे. या आवडीतूनच त्यांना शर्यतीचे बैल जोपासण्याचा व त्यांना तयार करण्याचा छंद लागला. याच छंदातून मनोहर चव्हाण यांनी अडीच वर्षांपूर्वी हा चपळ लखन तब्बल साडेबारा लाख रुपयांना खरेदी केला. लखनची पैलवानासारखी बडदास्त खरेदी केल्यापासूनच त्यांनी लखनची एखाद्या पैलवानाप्रमाणे बडदास्त ठेवली. लखनला ते रोज गीर गायीचे 10 लिटर दूध व सुक्या-मेव्याचा दीड किलो खुराक देतात. याशिवाय लखनचा आराम व सरावाकडेही ते विशेष लक्ष देतात. मनोहर चव्हाणांच्या या कसदार प्रशिक्षणाखाली लखन चांगलाच तयार झाला व त्याने शर्यती जिंकण्याचा कित्ताच सुरू केला. गेल्या दोन वर्षांत त्याने अनेक शर्यती जिंकत सुमारे सव्वा कोटींची कमाई चव्हाण यांना करून दिली आहे. यात 1 फॉर्च्युनर, 16 दुचाकी व रोख रक्कम अशा बक्षीसांचा समावेश आहे. लखनने जिंकलेल्या पैशांतूनच चव्हाण यांनी पिकअप गाडी घेतली आहे. या गाडीतूनच लखन प्रवास करतो. चार वेळा हिंद केसरीचा मान डौलदार, उंच व चपळ असलेल्या लखनने 2024 मध्ये सातारा जिल्ह्यातील पेडगाव (ता.खटाव) येथील शर्यत जिंकत प्रथम हिंद केसरीचा मान मिळवला. त्या पाठोपाठ फलटणला झालेली स्पर्धा जिंकत डबल हिंद केसरीचा मान मिळवला. त्यानंतर सोलापूरच्या माळशिरस येथे 2025 मध्ये झालेल्या बैलगाडा शर्यतीत पुन्हा तिसऱ्यांदा हिंद केसरीचा मान आपल्याजवळच ठेवला. त्यानंतरपुण्यातील हवेली तालुक्यात असलेल्या वडकी इथे स्पर्धा जिंकत पुन्हा चौथ्यांदा हिंद केसरीचा मान आपल्याकडे ठेवला. तर सांगलीतील शर्यत जिंकण्यासाठी लखनला हिंगोलीच्या दांडेगावच्या साईनाथ कराळे यांच्या सर्ज्याची साथ लाभली आहे. लखनची क्रेझ, बघण्यासाठी गर्दी, रील्स होतात व्हायरल बैलगाडा शर्यत प्रेमींमध्ये लखनची वेगळीच क्रेझ आहे. लखन जिथे जातो तिथे त्याला बघण्यासाठी लोकांची मोठी गर्दी उसळते. तसेच सोशल मीडियावरही लखनच्या रील्स व्हायरल होत असतात. त्याच्या रील्सना मिलियन्समध्ये व्ह्यूज मिळतात. सांगलीतील शर्यत जिंकल्यानंतर वेरूळ येथे शांतिगिरी महाराजांकडून आयोजित कार्यक्रमात लखनची मिरवणूक काढण्यात आली व त्याचे रॅम्प वॉकही झाले. एवढेच नाही, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही जाहीर सभेतील भाषणात लखनचे तोंडभरून कौतुक केले. लखनच्या खुराकवर रोज चार हजार खर्च मनोहर चव्हाण म्हणाले की, लखनची आम्ही आमच्या घरातील सदस्य प्रमाणे काळजी घेतो त्याला सकाळी पाच व संध्याकाळी पाच असे दहा लिटर गीर गाईचे दूध देतो. यासह खारीक-खोबरे व सुका मेव्याचे लाडू बनवून त्याला देतो. त्याच्या खुराकवर रोज जवळपास चार हजार रुपये खर्च होतात असे ते म्हणाले. आज दीड कोटी इतकी किंमत लखनच्या किंमतीविषयी सांगताना मनोहर चव्हाण म्हणाले की, लखनला मागायची हिंमत कुणी करत नाही. मात्र आज जवळपास दीड कोटी रुपये इतकी लखनची मार्केट व्हॅल्यू आहे.
‘पुणे शहर लवकरच पुस्तकांची पंढरी ठरणार’- साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील
प्रभात वृत्तसेवा पुणे – ग्रंथ हे माणसाचे उत्तम मित्र असून, ते जीवनात आनंद आणि सुखाचा मार्ग दाखवतात. ग्रंथांशिवाय ज्ञानाला पर्याय नाही. पुणे शहर हे लवकरच पुस्तकांची पंढरी ठरणार असल्याचे मत सातारा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी शनिवारी व्यक्त केले.राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या (एनबीटी) वतीने आयोजित पुणे पुस्तक महोत्सवाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. यावेळी उच्च […] The post ‘पुणे शहर लवकरच पुस्तकांची पंढरी ठरणार’- साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील appeared first on Dainik Prabhat .
पुण्याच्या लोकअदालतीत गोंधळ; सामान्य नागरिकांचा संताप अनावर..नेमकं कारण काय?
प्रभात वृत्तसेवा पुणे – सेकंडहॅण्ड दुचाकी घेतली; पोलिसांच्या संकेतस्थळासह आरटीओत खातरजमा केली त्यावेळी दंड शून्य होता… पण अचानक ५ ते ७ हजारांचा जुना दंड अंगावर! लोकअदालतीत सवलतीच्या अपेक्षेने आलेल्या कुलदिप म्हस्के या तरूणाला मात्र नोटीस आली असेल तरच दंड भरता येईल असे उत्तर मिळाले. स्वतःहून दंड भरायला तयार असतानाही सवलत नाही आणि पोलीस प्रशासनासह न्यायालयाचा […] The post पुण्याच्या लोकअदालतीत गोंधळ; सामान्य नागरिकांचा संताप अनावर..नेमकं कारण काय? appeared first on Dainik Prabhat .
भारतीय स्वातंत्र्यलढ्यात असंख्य वीरांनी आपले सर्वस्व अर्पण केले. या वीरांनी देशाला राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिक गुलामगिरीच्या बेड्यांतुन मुक्त करण्यासाठी अविरत संघर्ष केला. या क्रांतिकारकांच्या यादीत एक असे नाव येते, जे प्रखर देशभक्ती, निर्भीड धैर्य व जनतेच्या हक्कांसाठी अट्टहासाने लढणारे होते. ते म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटील. नानांवर महात्मा गांधींच्या विचारांचा पगडा होता. पण त्यानंतरही त्यांनी आपल्या सशस्त्र क्रांतीच्या बळावर इंग्रजी राजवटीचा थरकाप उडवला. समांतर सरकार स्थापन करून स्वराज्याची प्रत्यक्ष कल्पना साकारली. त्यामुळे ते केवळ एक क्रांतिकारक नव्हते, तर जनतेच्या न्याय हक्कांचे अत्यंत प्रखर योद्धे होते. त्यांची 6 डिसेंबर रोजी नुकतीच पुण्यतिथी साजरी करण्यात आली. चला तर मग आज 'धुरंधर'मध्ये पाहूया क्रांतिसिंह नाना पाटील यांचा अंगावर शहारे आणणारा जीवनप्रवास... वडिलांच्या इच्छेखातर झाले तलाठी नाना पाटलांचा जन्म 3 ऑगस्ट 1900 रोजी सांगलीच्या बहे गावात झाला. बहे हे त्यांचे आजोळ होते. त्यांचे मूळ गाव येडेमच्छिंद्र होते. नानांच्या वडिलांचे नाव रामचंद्र पाटील असे होते. त्यांचे पूर्वज पंढरपूरच्या विठ्ठलाचे निस्सिम भक्त होते. त्यामुळे बालपणीच नानांच्या गळ्यात पांडुरंगाची माळ पडली. ते सातवी पास झाले, तेव्हा त्यांच्या वडिलांनी त्यांनी नोकरी करावी अशी इच्छा व्यक्त केली. पण त्यांच्या आजीची आपला नातू पैलवान व्हावा अशी इच्छा होती. त्यानंतर वडिलांच्या इच्छेला मान देत ते तलाठी झाले. याच काळात त्यांचे लग्न ठरले. त्यांच्या पत्नी निरक्षर होती. पण त्यांनी तिला स्वतः शिकवले. या दाम्पत्याला हौसाक्का नामक एक मुलगी झाली. भविष्यात हौसाक्कानेही स्वातंत्र्यलढ्यात योगदान दिले. सत्यशोधकी विचारांचा होता प्रभाव त्या काळात सर्वत्र सत्यशोधकी जलसे होत असत. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांचा गावोगावी प्रसार होत होता. नानांनी बालपणापासून फुलेंचे विचार ऐकले होते. त्यांच्यावर त्यांच्या विचारांचा प्रचंड प्रभाव होता. राजर्षी शाहू महाराज, भास्करराव जाधव यांनी सांगली, सातारा, कोल्हापूर या भागात पुरोगामी विचारांची पेरणी केली. नानांवर सत्यशोधक चळवळीचा प्रचंड प्रभाव होता. तलाठी म्हणून काम करताना ते सत्यशोधकी विचारांचा प्रचार करायचे, स्वातंत्र्याचे महत्त्व जनतेला पटवून द्यायचे. भास्करराव जाधव हे निवडणुकीला उभे असताना नानांनी त्यांना समर्थन दिले. त्यामुळे तत्कालीन सरकारने त्यांना तलाठी पदावरून निलंबित केले. इंग्रजांच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्यापुढे माफी मागितल्यास पुन्हा नोकरीवर परत घेण्याची अट ठेवली. पण नाना त्यांना ठामपणे म्हणाले, तुम्ही लुटारू आहात. तुम्ही जुलमी आहात. त्यामुळे तुम्ही माफी मागण्याच्या लायकीचे नाही. मराठवाड्यातून झाले होते खासदार क्रांतिसिंह नाना पाटील यांची कर्मभूमी पश्चिम महाराष्ट्र होती. पण त्यांना लोकसभेवर पाठवण्याचे काम मराठवाड्याच्या जनतेने केले. नानांचे व्यक्तिमत्त्व एखाद्या पैलवानासारखे होते. त्यांची भाषा अस्सल ग्रामीण ढंगाची होती. ते त्यांचा मुद्दा अतिशय प्रभावीपणे मांडत. नानांना 1967 ला सातारा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी भरायची होती, पण त्यांच्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाने त्यांना बीड मतदारसंघातून उभे राहण्याचा आदेश दिला. नाना बीडला निवडणूक लढवायला निघाले, तेव्हा त्यांच्याकडे एसटीच्या तिकिटालाही पैसे नव्हते. कॉम्रेड नारायण माने यांनी त्यांचे तिकीट काढले. ते त्यांच्यासोबत होते. बीडला पोहोचल्यानतंर तेथील कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. नानांनी स्वतःच्या आर्थिक अडचणींविषयी त्यांना सांगितले, तेव्हा लोकांनी वर्गणी करून त्यांची अनामत रक्कम भरली. त्यांनी रात्रीचा दिवस करून नानांचा प्रचार केला. निवडणुकीत विजयी झाल्यानंतर नाना तेथील जनतेला म्हणाले, आता 5 वर्षे मी गावाकडे जाणार नाही. तुमच्यासोबत इथेच राहणार. त्यांनी लोकांना दिलेला शब्द पाळण्यासाठी पाटोदा ग्रामपंचायतीत आपला मुक्काम ठोकला. तेथून ते लोकांचे प्रश्न सोडवू लागले. एक पत्र्याची पेटी, त्यात आईचा फोटो, दोन अंगरखे व दोन धोतरे व पांघरायला एक घोंगडे एवढेच साहित्य त्यांच्या गाठीला होते. पाटोदा गावातील त्यांचे सहकारी त्यांना दोनवेळचे जेवण पुरवत. म्हणजे पाच भाकरी व त्यासोबत भाजी किंवा चटणी. एवढ्या जेवणावरच नाना खूश असायचे. त्यांच्या पाटोदा गावच्या मुक्कामातील आठवणी इकबाल पेंटर यांनी व्यवस्थित नोंदवून ठेवल्या आहेत. जातिव्यवस्थेचा अंत करण्याचा चंग ब्रिटिश सरकारविरोधात साराबंदीसारखी चळवळ करायचा काँग्रेस पुढारी पाठिंबा देत होते. पण जमीनदारी व जातिव्यवस्थेच्या विरुद्ध आवाज उठवणारी चवळळ त्यांना परवडत नव्हती. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे 6 ऑगस्ट 1921 चे नियतकालिक सोशॅलिस्ट म्हणते, ब्राह्मणेतर चळवळ ही अर्थहीन आहे. या चळवळीची प्रेरणा एकदम संकुचित आहे. जातीय द्वेष हा तिचा मुख्य आधार आहे. या चळवळीला आर्थिक पाया नाही. क्रांतिसिंहांना हे दुःख पुढच्या जीवनात राहिले. ब्राह्मणेतर चळवळीचे जातीय शोषणाविरोधात असलेले अंग कम्युनिस्ट पक्षाला कधी दिसलेच नाही. जातिव्यवस्थेकडे आर्थिक शोषणाचे हत्यार म्हणून पक्षाने पाहिलेच नाही. क्रांतिसिंहांच्या दृष्टीने जातिव्यवस्थेचा अंत झाल्याशिवाय भारतीय क्रांतीच अशक्य होती. बा मेला, त्याला जाळला वड्याच्या काठाला नाना पाटील आधुनिक विचारांचे होते. ते एकेठिकाणी म्हणतात, बा मेला, त्याला जाळला वड्याच्या काठाला. त्याच्यासाठी पुन्हा भाताचं गोळं करुन ठिवायचं. पिंडाला कावळा शिवला पायजे. याचा अन् कावळ्याचा काय संबंध ते एक मंतर सांगणाऱ्या बामनालाच ठावं. पिंड पाडणाऱ्याने हुभं ऱ्हायचं. हात जोडायचं. कुणाला? झाडावरच्या कावळ्याला. त्याला आर्जव करायची, ये महाराजा, पिंडाला निसती टोच महान. तुझ्या मनातल्या सगळ्या इच्छा मी पुऱ्या करीन. ये, ये. कावळं कशाचं येतंय? मानसाच्या गर्दीत कशाला इल शाना कावळा. तो झाडावर बसूनच काव काव करीत ऱ्हातो. तास दोन तास मिन्त्या केल्या तरी कावळा काय पिंडाला शिवत न्हाई. मग भटती काय करतो? दरभाचा कावळा. त्यो खोटा कावळा पिंडाला शिवला की मेलेला बा जेवला. थु त्येचा. बाचं दिस संपलं की पुन्ना हायच. आपलं रान, आपली जियाबं, आपली पिकं. पिकाची राखण तर डोळ्यांत त्याल घालून कराया होवी. ज्या हातानं पिंड पाडलं त्याच हातात मग गोफन. हातं काय कावळ्याला आवतान लागत न्हाई. झुंडीच्या झुंडी उतरत्यात वलां जुंदळा खायला. मग कावळ्याला हात कोन जोडतंय? मग भिरीरी धोंडं, शिव्या. हे काय याड म्हणावं का खुळं? सारा जमाव हसू लागला. हसा हसता थबकला. वक्त्याने त्यांना समजावून सांगितले. आपूनच आपल्याला हसावं अशा या रूढी फेकून द्या, शानं व्हा. म्हार, मांगांना लांब का ठेवता? नाना पाटील अंधश्रद्धा व जातिव्यवस्थेला नामशेष करणाऱ्यासाठी कटिबद्ध असणाऱ्या सेनापतींपैकी एक होते. अस्पृश्यांवर लादलेली घाण कामे त्यांना करायला लागू नयेत यासाठी त्यांनी लढा दिला. ते त्यांच्या जीवनाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत सत्यशोधक होते. ग. दि. माडगूळकर यांनी 'मी सिंह पाहिला होता' या लेखात क्रांतिसिंहांच्या आठवणी सांगितल्या आहेत. ते क्रांतिसिंहांच्या भाषणातला एक चुटका सांगतात, अरं म्हारं, मांगं, भंगी ह्यास्नी लांब का ठेवता? ती घान काम करत्यात म्हणून? तुमचा सोताचा डावा हात सकाळी उठल्या उठल्या कसलं काम करतो? घानच नव्हं ते काम? त्येला तोडून वायलं ठिवता का? न्हाई. डावा हात घाण काम करतो, त्येला तुमी राख लावून, शाप धून काढता, त्याच हातावर मिसरी ठेवता. उजव्या हाताच्या बोटानं ती मिसरी दाताला लावता. खरं का न्हाई? पत्री सरकार अर्थात प्रतिसरकारची स्थापना नाना पाटलांनी साताऱ्यात प्रतिसरकारची स्थापना करून महाराष्ट्रातील क्रांतिकारी चळवळीत मोठे योगदान दिले. भूमिगत चळवळीच्या माध्यमातून त्यांनी प्रतिसरकारची स्थापना केली. त्यानंतर युवकांची संघटना स्थापन करून त्यांनी इंग्रजांपुढे जबरदस्त आव्हान निर्माण केले. प्रतिसरकारचे नेते म्हणून त्यांनी केलेल्या कार्यामुळेच त्यांना क्रांतिसिंह म्हणून ओळखले जाऊ लागले. या काळात सातारा, सांगली परिसरात नाना पाटलांची ब्रिटिशांवर मोठी दहशत निर्माण झाली. प्रतिसरकारला पत्री सरकार म्हणूनही ओळखले जाते. 1942 साली भारतात इंग्रज सरकार विरोधातील भारत छोडो आंदोलन आपल्या टोकाला पोहोचले होते. त्यावेळी नाना पाटलांनी साताऱ्यात आपल्या समांतर सरकारची बीजे रोवली होती. लोक त्याला पत्री सरकार म्हणून ओळखत होते. नानांनी महात्मा गांधींच्या विचारांमुळे प्रेरित होत स्वतःची सरकारी नोकरी सोडली होती. त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात स्वतःला झोकून दिले होते. ते गावोगाव फिरून लोकांना स्वदेशी उत्पादनांचे महत्त्व पटवून देत होते. त्यांनी लोकांना इंग्रजी राजवट उखडून फेकून देण्यासाठी प्रेरित केले. त्यांनी गावोगावी पत्री सरकारच्या समित्या स्थापन केल्या. या समित्या निःस्वार्थपणे व काम करत होत्या. त्यांनी परदेशी कापडांची होळी केली. नाना पाटलांच्या या आंदोलनामुळे इंग्रज परेशान झाले होते. त्यांनी नाना पाटलांना पकडून देणाऱ्यास बक्षीस देण्याची घोषणा केली. इंग्रजांनी त्यांना पकडण्यासाठी आकाशपाताळ एक केले. पण नाना भूमिगत होऊन आपले काम करत होते. ते सातत्याने इंग्र्जांविरोधात जनमानस तयार करत होते. स्वातंत्र्यसैनिक जी डी बापू लाड, शाहीर शंकरराव निकम व नानांच्या कन्या हौसाबाई पाटील यांनी आपल्या वडिलांच्या पत्री सरकारचे आंदोलन दृढतेने समर्थन केले. सावकारी व गुंडगिरी मोडून काढली पत्री सरकार स्थापन केल्यानंतर नानांनी स्वतःला सरकार म्हणून जाहीर केले. त्यांनी मावळ प्रांतातील गढ्यांतून ब्रिटिश राजवट संपली असा अंमल बसवला. त्यानंतर त्यांनी हत्यारबंदी उभी केली. भाले-बरच्या, लाठ्याकाठ्या ते बंदुकीपर्यंत अशी सर्व शस्त्रे त्यांनी गोळा केली. पैसा उभा करण्यासाठी त्यांनी इंग्रजांचे खजिने लुटले. सावकारी व मोठ्या जमीनदारांची गुंडगिरी मोडून काढली. त्यांना मदत करणाऱ्या गुंडांचा निःपात केला. शिक्षेचा एक प्रकार पत्री मारणे हा होता. अनेकांना गोळ्या घालूनही देहदंड दिला जात होता. यामुळे त्यांची जनमानसात जरब बसली होती. नाना पाटील यांनी 1944 साली महात्मा गांधींची पाचगणीस भेट घेतली. तेव्हा त्यांनी त्यांना आपल्या पत्री सरकारविषयी सांगितले. त्यावर गांधीजी म्हणाले, नाना पाटील, तुमची चळवळ माझ्या तत्त्वात बसते किंवा नाही यापेक्षा तुम्ही 1942 चा चळवळ जिवंत ठेवली, साताऱ्याने या चळवळीचे नाव राखले हे महत्त्वाचे आहे. तुम्ही बहादूर आहात. भ्याडांच्या अहिंसेपेक्षा शुराची हिंसा परवडेल असे मी मानणारा आहे. नानांच्या प्रतिसरकारच्या पोलिसांना तुफान सेना असे नाव होते. जी डी लाड हे तुफान सेनेचे फिल्ड मार्शल होते. तुफान सेनेच्या सैनिकांपुढे त्याकाळच्या अनेक नामवंतांची व्याख्याने व बौद्धिके होत असत. नाना पाटील भूमिगत असताना ज्या मंडळींकडे आश्रयाला जात असत तेव्हा ते त्यांना माझ्या जिवाचे काही बरेवाईट झाले तर मला लगेच पुरून टाका. फक्त सुरेशबाबूंना (नाथाजी लाड) सांगा. चळवळीतील इतर कुणालाही कळता कामा नये. चळवळ जिवंत राहिली पाहिजे. लोकन्यायाची प्रयोगशाळा पत्री सरकार ही केवळ सशस्त्र क्रांती नव्हती, तर ती एक लोकशाही न्यायप्रणालीची प्रयोगशाळा होती. इंग्रजी न्यायालये दूर, खर्चिक आणि अन्यायकारक होती. त्यामुळे सामान्य शेतकरी, मजूर, गरीब यांच्यासाठी न्याय म्हणजे स्वप्नच होते. या पार्श्वभूमीवर नाना पाटलांनी लोकन्यायाची संकल्पना उभी केली. त्यात गावपातळीवर समित्या स्थापन करून तक्रारी ऐकल्या जात. साक्षीदारांसमोर खुली चर्चा होत असे आणि निर्णय तात्काळ दिला जात असे. सावकारांची लुबाडणूक, जमीनदारांची दहशत, गुंडांची मस्ती यावर कठोर कारवाई केली जाई. शिक्षेचा उद्देश सूड नव्हे, तर अन्याय थांबवणे हा असे. पत्री मारणे, दंड, जाहीर माफी किंवा सामाजिक बहिष्कार अशा शिक्षांमुळे गावोगावी शिस्त निर्माण झाली. या न्यायप्रणालीला कायद्याचे शिक्कामोर्तब नव्हते, पण लोकांचा विश्वास होता. कारण हा न्याय बंद खोलीत नव्हे, तर जनतेसमोर दिला जात होता. म्हणूनच पत्री सरकारचा न्याय हा बंदुकीपेक्षा अधिक प्रभावी ठरला. धुळ्यातील खजिन्याची ऐतिहासिक लूट धुळे जिल्ह्यातील साक्री या गावात असलेल्या कचेरीत नेहमीच लाखाहून अधिकच्या रकमेचा खजिना असतो, अशी माहिती क्रांतिकारकांना मिळाली होती. जी डी बापू लाड, क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या सोबतीने धोंडिराम माळी, रघुनाथ रावळ, अप्पा पाटील, सावळा धनगर, दत्तू जाधव, ज्ञानू संतू जाधव, रावसाहेब कळके, बाळा जोशी, आदी क्रांतीकारक या योजनेत सहभागी झाले होते. हे सर्वजण लपतछपत धुळे जिल्ह्यात दाखल झाले. तिथे गेल्यानंतर त्यांना खान्देशातील डॉक्टर उत्तमराव पाटील, फकिरा देवरे, ओंकार वडजई, रामचंद्र पाटील, माधवराव देवरे, केशव वाणी, नानासाहेब ढेरे, रामदास पाटील, वामनराव पाटील, धुडकू देवरे, चिंतू देवरी आदींची साथ मिळाली. त्यातच फकिरा देवरे यांनी धुळ्याहून नंदूरबारला सर्व्हिस गाडीतून म्हणजे तत्कालीन प्रवासी वाहतुकीच्या गाडीतून इंग्रजांचा तब्बल साडेपाच लाखांचा खजिना येणार असल्याची बातमी आणली. त्यामुळे क्रांतिकारकांनी साक्री कचेरी लुटण्याचा बेत रद्द करून धुळ्याचा खजिना लुटण्याचे निश्चित केले. त्यानुसार, त्यांनी धुळे जिल्ह्यातील चिमठाणे गावापासून 4-5 किलोमीटर अंतरावर असलेल्या एका चढ्या ठिकाणी हा खजिना लुटण्याचे निश्चित केले. 14 एप्रिल 1944 रोजी ही गाडी नियोजित ठिकाणी येताना दिसली. ती थांबवण्यासाठी जी डी बापू व नागनाथअण्णा यांनी भररस्त्यातच हाणामारीचे नाटक सुरू केले. पण गाडी चालकाला शंका आली. त्याने गाडी भरधाव वेगात दामटण्यास सुरुवात केली. ही गाडी बापू व नागनाथअण्णा या दोघांनाही चिरडून गेली असती, पण ते ऐनवेळी बाजूला झाल्यामुळे वाचले. त्यानंतर त्यांनी गाडीचा पाठलाग करून ती पुढच्या चढाला रोखली. गाडीचा चालक गाडी थांबवण्यास नकार देत होता. त्यामुळे नागनाथअण्णांनी त्याच्या डोक्यात गोळी झाडली. गाडी थांबताच 5 लाख 51 हजारांची थैली घेऊन क्रांतिकारक पसार झाले. त्यांनी या रकमेचे 4 भाग व 4 तुकड्या करून वेगवेगळ्या मार्गाने दक्षिण साताऱ्याच्या दिशेने धाव घेतली. धुळे खजिन्याची लूट ही क्रांतिकारकांनी जुलमी इंग्रजांच्या छातावर मारलेला एक जीवघेणा घाव ठरला. हौसाबाईंनी सांगितली नानांची आठवण हौसाबाईंनी पत्री सरकारला शस्त्रपुरवठा करण्याचे काम केले. याविषयी त्यांनी एकेठिकाणी सांगितले होते, सांगलीच्या भवानी नगरातील ब्रिटिशांच्या पोलिस ठाण्यातील शस्त्रे लुटण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली होती. दिवसाढवळ्या शस्त्र लुटणे म्हणजे वाघाच्या जबड्यात हात घालण्यासारखे होते. पण मला हे काम फत्ते करायचे होते. मी माझ्या सहकाऱ्यांना कुणी काय करायचे हे समजावून सांगितले. त्यानंतर आम्ही पोलिस ठाणे गाठले. माझ्या एका सहकाऱ्याने माझा भाऊ असल्याचे नाटक करत मी सासरी नांदण्यास जात नाही म्हणून मला मारहाण करण्यास सुरुवात केली. माझा भाऊ मला मारत होता. आमच्या दोघांचे भांडण पोलिस ठाण्यापुढे रंगात आले होते. अखेरीस माझ्या भावाने माझ्या डोक्यात घालण्यासाठी दगड उचलला. तेवढ्यात आतले दोन पोलिसांनी येऊन त्याला रोखले. तोपर्यंत आमचे इतर सहकारी ठाण्यात घुसून बंदुका व काडतुसे घेऊन पसार झाले. पण त्यानंतरही हा आमचा कट होता हे पोलिसांच्या लक्षातही आले नाही. अशा प्रकारे आमची मोहीम फत्ते झाली. हौसाताई सर्वच गोष्टींत होत्या आघाडीवर हौसाताई इंग्रजांचे डाक बंगले, रेल्वेचे रुळ उखडणे, फोनच्या तारा तोडणे, इंग्रजांचा खजिना लुटणे आदी सर्वच गोष्टींमध्ये आघाडीवर होत्या. पत्री सरकारच्या कार्यकर्त्यांनी विविध सोंगे घेऊन इंग्रजांना जेरीस आणले होते. हौसाताई सांगत, शस्त्रे लुटताना पत्रीसरकारमधील कार्यकर्ते बाळ जोशी यांना इंग्रजांनी अटक केली. त्यांना गोव्यातील पणजी येथील तुरुंगात ठेवले. तुरुंगातील बाळ जोशींना भेटून कार्यकर्त्यांचा निरोप त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा होता. पण हा निरोप पोहोचवणार कोण? हा प्रश्न होता. कारण, पत्री सरकारवर इंग्रजांची कडक नजर होती. मी बाळ जोशींना भेटण्यास जावे असे ठरले. पण माझे 4 महिन्यांचे बाळ आजारी असल्याचे सांगत मी नकार दिला. कार्यकर्त्यांनी ही गोष्ट दादांच्या म्हणजे नाना पाटलांच्या कानावर घातली. त्यावर नाना म्हणाले, मी तिला जा ही म्हणणार नाही आणि थांबही म्हणणार नाही. पण माझी मुलगी म्हणून तिने बाप करत असलेल्या कार्याला शोभेल असे वागावे. नानांचे हे बोल ऐकताच मी माझ्या बाळाला आत्याजवळ सोडले आणि बाळ जोशीच्या भेटण्यासाठी रवाना झाले. मी माझी जबाबदारी चोखपणे बजावली. तेथून परत येताना इंग्रजांचा ससेमिरा चुकवण्यासाठी आडवाटेने आले. या मार्गात येणारी मांडवी नदीची खाडी पोहून पार केली. पुढे जंगलातून अनवाणी चालत वाट शोधत घरी परतले. मी घरी पोहोचले तेव्हा दादांनी मला मिठी मारत हंबरडा फोडला. मिरज येथे घेतला अखेरचा श्वास नाना पाटील स्वतःच्या मानापानाची पर्वा करत नव्हते. पण लोकांच्या प्रश्नांवर मात्र रान पेटवायचे. आक्रमक व्हायचे. लोकांचे प्रश्न मांडताना राज्यकर्त्यांवर टीकेची तोफ डागणआरे नाना व्यक्तिगत जीवनात मात्र फार हळवे व मायाळू होते. स्वातंत्र्यानंतर त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे नेतृत्व केले. दादासाहेब गायकवाड यांनी उभारलेल्या भूमिहिनांच्या सत्याग्रहाला मदत केली. नाना पाटील सत्यशोधक चळवळ, स्वातंत्र्यलढा, संयुक्त महाराष्ट्र आंदोलन अशा चळवळींमअध्ये ते अखेरपर्यंत कार्यरत राहिले. त्यांचे निधन मिरज येथे 6 डिसेंबर 1976 रोजी झाले. धुरंधर मालिकेतील खालील स्टोरीज वाचा... धुरंधर-53; नेल्सन मंडेला:भारताला दुसरे घर मानणाऱ्या आफ्रिकन गांधींची कहाणी; 27 वर्षे कैद भोगूनही मनात कटूता न ठेवणारा मदिबा धुरंधर-52; शकुंतला देवी:शाळेचे तोंड न पाहता संगणकाची परीक्षा पाहणाऱ्या अन् गणिताला खेळ मानणाऱ्या कानडी महिलेची जादूई कहाणी धुरंधर-51; केशवराव जेधे:ब्राह्मणेतर चळवळीचा प्रमुख चेहरा अन् सामाजिक न्यायासाठी झगडणारा ठसकेबाज दृढनिश्चयी मराठी लढवय्या धुरंधर-50; डॉक्टर सलीम अली:पक्ष्यांच्या जगाचे रहस्य उलगडून मानवाला निसर्गाच्या दिशेने जाण्यास प्रेरित करणारा पक्ष्यांचा 'चालता फिरता विश्वकोश' धुरंधर-49; सर रोनाल्ड रॉस:'साला एक मच्छर'! मलेरिया अन् डास यांच्यातील परस्पर संबंध शोधून मानवतेची सेवा करणारा थोर वैज्ञानिक धुरंधर-48; होमी जहांगीर भाभा:दगडधोंड्यांच्या भारतात अणुज्योत पेटवून अज्ञानाचा अंधःकार दूर करणारा श्रीमंत घरातला बंडखोर तरुण धुरंधर-47; बिंदेश्वरी प्रसाद मंडल:ओबीसींच्या सामाजिक न्यायाच्या इमारतीचा सर्वात मजबूत पाया रचणाऱ्या बिहारच्या जमीनदाराची कथा धुरंधर-46; कार्ल बुशबी:ना ट्रेन ना प्लेन ना बाईक, तब्बल 27 वर्षांच्या अन् 58 हजार किलोमीटरच्या पदयात्रेची अनोखी कथा जी आजही सुरूय धुरंधर-45; जाईबाई चौधरी:स्त्री जीवन फुलवणारी अन् दलित महिलांना शैक्षणिक, सांस्कृतिक संजीवणी देणारी विदर्भातील थोर सेविका धुरंधर-44; ओशो रजनीश:पापाला पुण्याचे अन् हिंसेला अहिंसेचे कपडे घालावे लागतात असे सांगत ईश्वरापूर्वी स्वतःला शोधण्याचा सल्ला देणारा थोर दार्शनिक धुरंधर-43; अमृता प्रीतम:मैं तेनु फिर मिलांगी, कित्थे? किस तरह? पता नहीं; प्रेम, वेदना अन् स्वातंत्र्याचा सूर छेडत बाईचे जगणे मांडणारी लेखिका धुरंधर-42; दगडाबाई शेळके:स्वतःच्या नवऱ्याचे दुसरे लग्न लावून मराठवाडा मुक्तिसंग्रामात स्वतःला झोकून देणारी जालन्याची 'झाशीची राणी' धुरंधर-41; यशवंत घाडगे:दुसऱ्या महायुद्धात मर्दुमकी दाखवत ब्रिटिशांकडून इटलीच्या सैनिकांना कंठस्नान घालणारा मराठी सैनिक धुरंधर-40; शाहीर अमर शेख:धग, रग, आग, धुंदी अन् बेहोशीची जिवंत बेरीज असणारा तथा 'बर्फ पेटला हिमालयाला विझवायला चला' म्हणणारा शाहीर धुरंधर-39; टी. एन. शेषन:'नेत्यांना नाश्त्यात खाणारे' तथा EC ला अभूतपूर्व ताकद अन् प्रतिष्ठा मिळवून देणारे भारताचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त धुरंधर-38; डॉ. एम एस स्वामीनाथन:उपासमारीच्या सावटाखाली झुरणाऱ्या भारताला स्वावलंबनाचे स्वप्न दाखवून ते सत्यात उतरवणारा शास्त्रज्ञ धुरंधर-37; मेजर शैतान सिंह:1962 च्या भारत - चीन युद्धात 120 जवानांच्या जोरावर शत्रूचा फडशा पाडणारा अन् पोट फाटले तरी मैदान न सोडणारा बहाद्दर धुरंधर-36; राणी वेलू नाचियार:महिलांची फौज तयार करून ईस्ट इंडिया कंपनीच्या सैनिकांना पहिल्यांदा धूळ चारणारी शिवगंगाची 'वीर मंगई' धुरंधर-35; अय्यनकाली:महिलांना छाती झाकण्याची परवानगी मिळवून देणारा अन् दलितांनी पिकवलेले धान्य चालते, मग ते का चालत नाहीत? असा प्रश्न करणारा सुधारक धुरंधर-34; जगन्नाथ शंकरशेठ:लोकांचा विश्वास जिंकणारी श्रीमंती गरिबांवर उधळणारा अन् परकियांनाही आपला वाटणारा मुंबईचा खरा शिल्पकार धुरंधर-33; अण्णाभाऊ साठे:दीड दिवस शाळेत जाऊन साहित्याचा सूर्य झालेला लोकशाहीर; जात, धन अन् धर्मदांडग्यांना आव्हान देणारा अण्णा धुरंधर-32; धीरूभाई अंबानी:गरिबीवर मात करत कोट्यवधी भारतीयांना मोठी स्वप्ने पाहण्याची प्रेरणा देणारे भारताचे एक अप्रतिम उद्योग रत्न धुरंधर-31; राजर्षी शाहू महाराज:अस्पृश्याला मानाचे पान अन् नांगरासाठी तोफा वितळवून लोखंड देणारे शाहू महाराज ग्रेट का होते? धुरंधर-30; चे गेव्हारा:अन्यायाविरोधात लढण्याची जिद्द जागवून अवघ्या जगातील क्रांतीचा चेहरा बनलेला तुमच्या 'T शर्ट'वरील क्रांतिदूत धुरंधर-29; संत कबीर:पैशांच्या मागे पळणाऱ्यांचा देव कसा? असा परखड सवाल करत समस्त मानवतेला साधेपणाचा संदेश देणारा महानायक धुरंधर-28; राणी चेन्नम्मा:स्वकियांची फंदफितुरी जमिनीत गाडून 1857 च्या सशस्त्र उठावापूर्वी इंग्रजांना धूळ चारणारी 'कर्नाटकची लक्ष्मीबाई' धुरंधर-27; अहिल्याबाई होळकर:न्यायबुद्धीने स्वतःच्या नवऱ्याला धारेवर धरत चोराच्याही पोटाचा प्रश्न सोडवणाऱ्या दूरदृष्टीच्या शासक धुरंधर-26; डॉ. जयंत नारळीकर:ब्रह्मास्त्र होते तर रामाच्या राज्यात वीज होती का? असा झोंबणारा प्रश्न करणारा भारताचा मराठमोळा शास्त्रज्ञ धुरंधर-25; मुथुलक्ष्मी रेड्डी:महिला हक्क अन् आईचे 'देवदासी'पण पाहून त्याविरोधात लढा पुकारणाऱ्या भारताच्या पहिल्या महिला आमदार धुरंधर-24; कुलदीपसिंग चांदपुरी:पाकच्या 2000 हून अधिक सैनिकांना 120 जवानांच्या बळावर धूळ चारणारा लढवय्या; '1971' ची अमर गाथा धुरंधर-23; चंद्रप्रभा सैकियानी:पडदा प्रथेवर लाथ घालून महिलांना आभाळ खुले करणारी आसामची हिरकणी; कुमारी माता झाली तरी डगमगली नाही धुरंधर-22; कर्मवीर भाऊराव पायगौंडा पाटील:महाराष्ट्राच्या मातीत शिक्षणाचा सूर्य पेरून उपेक्षितांच्या झोपडीत ज्ञानाचे पीक काढणारा खरा 'धुरंधर' धुरंधर-21; प्रबोधनकार ठाकरे:मराठी समाज मनात मोक्याच्या ठिकाणी पक्क्या गाठी मारून जातिभेदांच्या जखमांचा खोलवर शोध घेणारा बहुजन हिंदुत्त्ववादी धुरंधर-20; भीमराव रामजी आंबेडकर:चवदार तळ्याला ताळ्यावर आणणारा दलितोद्धारक अन् सामाजिक समरसतेचा खरा विवेकी शिल्पकार धुरंधर-19; जिगर मुरादाबादी:'शराब पीने दे मस्जिद में बैठ कर, या वो जगह बता जहाँ खुदा नहीं,' असे म्हणत मौलवींकडून टाळ्या पिटवून घेणारा सूफी शायर धुरंधर-18; आनंदीबाई जोशी:'पृथ्वीच्या पाठीवर हिंदुस्तान इतका दुसरा रानटी देश नाही', असे ठणकावून सांगणाऱ्या भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर धुरंधर-17; भगतसिंग:'बॉम्ब अन् पिस्तुले क्रांती आणत नाहीत, क्रांती लोकांच्या मनात जन्मते', असे ठामपणे सांगणारा 'शहीद ए आझम' धुरंधर-16; शहाजीराजे भोसले:छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याच्या संकल्पनेचे प्रेरणास्थान अन् बृहन्महाराष्ट्राची स्थापना करणारा धोरणी राजा धुरंधर-15; ई. व्ही. रामासामी:देव आहे हे सिद्ध करण्याचे आव्हान देत तर्कशुद्ध अन् निर्भय मतांद्वारे समाजात क्रांती घडवणारा भारताचा 'पेरियार' धुरंधर-14; कार्नेलिया सोराबजी:रूढी परंपरांना आव्हान देत शिक्षण, समानता अन् मानवी हक्कांसाठी अथक झगडणारी भारताची पहिली महिला बॅरिस्टर धुरंधर-13; खासेराव जाधव:बहुजन समाजाच्या खांद्यावरील निरक्षरतेचे 'जू' काढून त्यांना उच्च शिक्षणाच्या गंगेचे पाणी पाजणारा अवलिया धुरंधर-12; तंट्या भिल्ल:आदिवासींमध्ये राष्ट्रीयत्व जागवणारा 'रॉबिनहूड', थोर स्वातंत्र्यसैनिक; वाचा स्वातंत्र्य लढ्यातील संघर्षाचे सोनेरी पान धुरंधर-11; विठ्ठल सखाराम पागे:उकिरड्याला खरकटे माहिती नसल्याच्या काळात 'भूकबळी'वर नामी उपाय शोधणारा राजकारणी धुरंधर-10; मोहन हिराबाई हिरालाल:विनोबा भावेंचे 'सर्वायतन' नक्षलग्रस्त गडचिरोलीत रुजवणारा अन् गरिबांना लक्ष्मीदर्शन घडवणारा अवलिया धुरंधर-9; फातिमा शेख:सावित्रीमाईंची मैत्रीण अन् भारताची पहिली मुस्लिम शिक्षिका; फातिमा एक काल्पनिक पात्र होत्या का? तुम्हीच ठरवा धुरंधर-8; एकनाथ दगडू आवाड:बापाचा बुचडा कापून 'पोतराज' प्रथेवर घाव घालणारा पोरगा; कथित गुन्हेगारीने बदनाम झालेल्या बीडचा थोर माणूस धुरंधर-7; स्वामी विवेकानंद:मानवतेचा उत्कृष्ट प्रेमी, महान निधर्मी तत्ववेत्ता; नरेंद्रनाथ दत्त यांचे अखेरचे काही तास कसे होते? धुरंधर-6; कंदुकुरी वीरेशलिंगम पंथुलु:अंधश्रद्धेवर लाथ घालून विधवा पुनर्विवाह अन् ज्ञानाची वात पेटवणारा आंध्रचा 'लेखणी'सम्राट धुरंधर-5; भाऊराव कृष्णराव गायकवाड ऊर्फ दादासाहेब गायकवाड:दोन वेळा वाचवले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्राण धुरंधर-4; डॉ. विश्राम रामजी घोले:महिला उत्थानासाठी पेटून उठलेला सुधारक, ज्यांची 'बाहुली' ठरली स्त्री शिक्षणाची पहिली बळी धुरंधर-3; पार्वतीबाई आठवले:वैधव्य अन् परावलंबन दैवी भोग मानणारी, पण पोटच्या गोळ्याच्या काळजीने असामान्य झालेली एक निरक्षर स्त्री धुरंधर-2; बसव प्रेमानंद:अंधश्रद्धेच्या खाटेवर आजारी पडलेल्या समाजाला विज्ञानाचे औषध देऊन चमत्कारांची पुरती हवा काढणारा थोर दार्शनिक धुरंधर-1; नरहर अंबादास कुरुंदकर:विचारांची श्रीमंती वाढवणारा अन् आजच्या किर्र वैचारिक काळोखात प्रकाशवाट दाखवणारा थोर विचारवंत
प्रभात वृत्तसेवा पिंपरी – पोस्ट ऑफिसच्या फेऱ्या, लांबलचक रांगा आणि वेळखाऊ कागदोपत्री प्रक्रिया यांना आता पूर्णविराम मिळाला आहे. भारतीय डाक विभागाने सुरू केलेल्या ‘डाकसेवा 2.0’ या अत्याधुनिक मोबाइल अॅपमुळे टपाल खात्याच्या जवळपास सर्व प्रमुख सेवा थेट स्मार्टफोनवर उपलब्ध झाल्या आहेत. याचा मोठा फायदा पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना होणार आहे. ग्राहकांच्या सोयीसाठी विकसित करण्यात आलेले हे अॅप […] The post Post Office App: आता पोस्ट ऑफिसमध्ये जाण्याची गरजच नाही! मोबाईलमध्ये डाऊनलोड करा ‘हे’ ॲप..वाचा सविस्तर appeared first on Dainik Prabhat .
भरधाव वेगाचा थरार! दुचाकीवरील ताबा सुटला आणि थेट झाडावर आदळला; तरुणाचा जागीच मृत्यू
प्रभात वृत्तसेवा खालापूर – खालापूर तालुक्यातील घोडीवली-नावंढे रस्त्यावर शुक्रवारी (दि. १२) रात्री साडेनऊच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात पोसरी येथील तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. दुचाकीवरील नियंत्रण सुटून रस्त्यालगतच्या झाडाला जोरदार धडक बसल्याने ही दुर्दैवी घटना घडली.अपघातात मृत तरुणाचे नाव अनिरुद्ध खानविलकर (रा. पोसरी, ता. कर्जत) असे आहे. हा तरुण खालापूरहून पोसरीकडे जात असताना घोडीवली-नावंढे गावाच्या […] The post भरधाव वेगाचा थरार! दुचाकीवरील ताबा सुटला आणि थेट झाडावर आदळला; तरुणाचा जागीच मृत्यू appeared first on Dainik Prabhat .
Pimpri Crime: पिंपरी-चिंचवड पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’! २४ तासांत ८ पिस्तुले आणि ६ आरोपी जेरबंद
प्रभात वृत्तसेवा पिंपरी – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत मनाई आदेश लागू असतानाही बेकायदेशीर पिस्तुल बाळगणाऱ्या आरोपींवर गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने प्रभावी कारवाई करत वेगवेगळ्या तीन ठिकाणी सात पिस्तुल हस्तगत केली. तर गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने एक पिस्तुल हस्तगत केले. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. वाकड हद्दीतून एकास अटक वळुमाता […] The post Pimpri Crime: पिंपरी-चिंचवड पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’! २४ तासांत ८ पिस्तुले आणि ६ आरोपी जेरबंद appeared first on Dainik Prabhat .
Shirur News: वढू-तुळापूरचा कायापालट होणार; शासनाकडून ५३२ कोटींचा निधी मंजूर..वाचा सविस्तर
प्रभात वृत्तसेवा शिक्रापूर( शेरखान शेख ) – वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथे स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधी स्थळाच्या विकासासाठी शासनाकडून ५३२.५१ कोटी रुपयांची मोठी तरतूद करण्यात आली आहे. या विकासामुळे वढू बुद्रुकसह आजूबाजूच्या गावांना देखील मोठा फायदा होणार असून, परिसरात आर्थिक आणि उद्योग व्यवसायाला मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे. वढू बुद्रुक येथे […] The post Shirur News: वढू-तुळापूरचा कायापालट होणार; शासनाकडून ५३२ कोटींचा निधी मंजूर..वाचा सविस्तर appeared first on Dainik Prabhat .
Satara News: निकाल लांबल्याने धाकधूक वाढली! साताऱ्यातील पालिकांचे भवितव्य EVM मध्ये बंद; २१ ला फैसला
प्रभात वृत्तसेवा सातारा – डिसेंबर महिना सुरु झाला की, सर्वांना सरत्या वर्षाला निरोप देत नव वर्षाच्या स्वागताचे वेध लागतात. यंदा मात्र सातारा जिल्ह्यात 31 नव्हे 21 डिसेंबरला जल्लोष होणार आहे. कारण सातारा नगरपालिकेसह जिल्ह्यातील दहा पालिकांच्या निवडणुकीच्या निकालादिवशी अनेकांनी गुलाल उधळायची तयार केली आहे. त्यासाठी अवघे आठ दिवस उरले असल्यामुळे सर्व जणच दि. 21 डिसेंबरची […] The post Satara News: निकाल लांबल्याने धाकधूक वाढली! साताऱ्यातील पालिकांचे भवितव्य EVM मध्ये बंद; २१ ला फैसला appeared first on Dainik Prabhat .
स्नेहधारा : पूनम राणेइयत्ता आठवीचा वर्ग. वर्गात स्काऊट गाईडचा तास चालू होता. अनघा बाई परिसर स्वच्छता आणि पर्यावरण याविषयी माहिती देत होत्या.शाळा शहरात असूनही आजूबाजूला निसर्गरम्य परिसर होता. आजूबाजूला दाट जंगलही होते. शाळेला मोठे पटांगण होते. त्यामुळे बाईंनी उपक्रमही त्याच प्रकारचा निवडला होता. वर्गातील प्रत्येकी सहा-सहा विद्यार्थ्यांचे गट करण्यात आले होते. प्रत्येक गटाला सदाफुली, सोनचाफा, मोगरा, गुलाब, निशिगंधा अशी वेगवेगळ्या फुलझाडांची नावे दिली होती. प्रत्येक गटातील विद्यार्थी अत्यंत आवडीने आपले काम जबाबदारीने सांभाळत होते.शाळेच्या पटांगणात प्रत्येक गटाला जागा नेमून दिली होती. जागेमध्ये फुलझाडांची लागवड करायची. नावाप्रमाणे प्रत्येकाला त्या प्रकारची फुलझाडे आणून देण्यात आली होती. प्रत्येक विद्यार्थी अत्यंत जबाबदारीने आपले फुलझाड लावून त्याची काळजी घेत होते. आळीपाळीने प्रत्येक जण त्या झाडाला पाणी घालत होते. आजूबाजूला वाढलेले गवत काढून टाकत होते. असा नित्यक्रम जवळजवळ सात-आठ महिने चालला होता.एके दिवशी सदाफुली आणि गुलाब यावर अत्यंत सुंदर कळ्या आल्या होत्या. दोन दिवसांतच गुलाबी रंगाची मनमोहक आकर्षक फुले झाडांवर फुलली होती. विविध रंगांची फुलपाखरे त्या फुलांवर येऊन बसत होती. फूल कोणते आणि फुलपाखरू कोणते हे ओळखताही येणार नव्हते. खरंतर ज्या विद्यार्थ्यांचा गुलाब आणि सदाफुली हा गट होता त्यांना अत्यंत आनंद झाला होता. ते जणू आनंदाने नाचतच होते. आपण लावलेल्या झाडाला फूल आले याचा त्यांना अत्यंत आनंद झाला होता.ज्या मुलांच्या झाडाला फुले आली होती, असे विद्यार्थी शाळेतील शिक्षकांना आणून ते फूल दाखवत होते. दहा-पंधरा दिवसांतच इतर झाडानाही फुले येऊ लागली. मात्र मोगरा काही फुलला नाही. मोगरा या गटातील विद्यार्थ्यांना फार वाईट वाटले. त्यांनी बाईंना कल्पना दिली. बाई म्हणाल्या, थोडं थांबा. त्यांनाही फुले येतील. थोड्या दिवसांतच मोगऱ्याच्या हिरव्यागार झाडाला कळ्या येताना दिसू लागल्या. मोगरा गटाला अत्यंत आनंद झाला आणि एक दिवस हिरव्यागार पानातून पांढरा शुभ्र मोगरा वाऱ्यावर डोलू लागला. वाऱ्याच्या मंद झुळकेने मोगऱ्याचा सुगंध साऱ्या पटांगणात दरवळत होता.खरंतर प्रत्येकाने स्वकष्टाने लावलेल्या झाडावर फुले आली होती. मात्र काही दिवसांतच उमलून आलेली फुलं दोन-तीन दिवसांनी खाली गळून पडली. प्रत्येक गटातील विद्यार्थ्यांना फारच वाईट वाटले. मात्र बाईंनी विद्यार्थ्यांची समजूत काढली आणि म्हणाल्या, ‘‘मुलांनो प्रत्येकाचा उमलण्याचा आणि फुलून येण्याचा एक काळ ठरलेला असतो. जसा फुलांचा तसाच आपलाही.”पण त्या उमलण्याच्या काळात आपल्या कर्तृत्वाने इतरांना सुगंधित करणे हे फार महत्त्वाचे असते. आपण किती दिवस जगलो यापेक्षा कसे जगलो हे अत्यंत महत्त्वाचे असते. आपण या राष्ट्राचे नागरिक म्हणून ही गोष्ट सतत लक्षात ठेवायला हवी. सगळे विद्यार्थी बाईंचे बोलणे कान देऊन ऐकत होते. आपल्या हातून एका चांगल्या कामाची सुरुवात झाली याचे मुलांना अत्यंत समाधान वाटत होते. शाळेत येताना आणि शाळा सुटल्यानंतर प्रत्येक जण आपल्या झाडांना पाणी घालून, नजर टाकून नंतरच शाळेतून बाहेर निघत होते.अशा प्रकारे विद्यार्थ्यांना फुलझाडांचा लळा लागला होता. पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी विद्यार्थ्यांनी पार पाडली होती. आपला उपक्रम यशस्वी झाला हे पाहून अनघा बाईंना फार आनंद झाला होता.तात्पर्य :- पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज आहे. अशा प्रकारच्या उपक्रमातून मिळेल त्या ठिकाणी वृक्ष संवर्धन करणे अत्यंत आवश्यक आहे.
दृढ निश्चय व दुर्दम्य इच्छाशक्ती
मनस्विनी : पूर्णिमा शिंदेदोन विषयांनी माणसाची शक्ती जागृत होते. दृढ निश्चय व दुर्दम्य इच्छाशक्तीने माणूस यशापर्यंत पोहोचतो. डोमेस्थीनिस नावाचा एक ग्रीक मुलगा होता. त्याला वक्ता होण्याची इच्छा होती. तो तोतरा होता. त्यावर मात करूनही तो रोज समुद्रावर जाऊन मोठ्या आवाजात तोंडात गारगोट्या दगड ठेवून मोठ्याने ओरडत असे. वेगवेगळे आवाज काढत असे. या सरावाने त्याने त्याच्या अडचणींवर मात केली. तो जगात सर्वश्रेष्ठ महान वक्ता होऊ शकला. असेच उदाहरण आहे एकलव्याचे. जातीव्यवस्थेमुळे एकलव्याला गुरुकुल शिक्षणासाठी प्रवेश मिळाला नाही. पण रोज गुरूकडून लपून प्रशिक्षण घेऊन एकलव्य देखील धनुर्धारी झाला.कोणी काही करो. गप्पा मारो. टीव्ही, मोबाईलवर सदानकदा असो. आपण आपले ध्येय गाठायचेच! ध्येयाने झपाटलेल्या व्यक्तीला ध्येयवेडा असल्याने तेथपर्यंत पोहोचता येते. वाट पाहू नका. सुरुवात करा. कामाला लागा. सुरुवातीसाठी हवी तशी वेळ कधीच येत नाही. मग थांबायचं कशासाठी? आहे तिथून सुरुवात करा. लक्षात ठेवा स्वतःला शक्ती आपणच देत असतो आणि स्वतःची शक्ती आपणच काढून घेतो. यशस्वी होण्यासाठी “चिकाटी” महत्त्वाची. माणूस चिकाटी सोडत नाही आणि जर चिकाटी सोडली तर तो यशस्वी होणार नाही. “सातत्य” न थकता अविरतपणे, अखंड, संपूर्ण कार्याला झोकून घ्या. शारीरिक, मानसिक शक्ती एका गोष्टीवर केंद्रित करणे ही यशासाठी लागणारी पहिली अट, असे थॉमस एडिसनने म्हटले आहे. बी पेरा, खत घाला, पाणी द्या, देखभाल करा आणि करतच राहा, देत राहा. जे द्याल तेच घ्याल. हा कर्माचा सिद्धांत आहे. ध्येय निश्चितीने पुढे चला, चालत राहा, हीच यशाची गुरुकिल्ली आहे.जगात राजा छत्रपतींचे उदाहरण घ्यायचे झाले तर त्यांच्या मेहनतीला, कष्टाला पर्याय नाही. त्यांचे ध्येय, निर्णय, शौर्य, पराक्रम, नियोजन, कृती पाहता आपल्याला त्यांच्याकडून शिकण्यासारखे खूप आहे. आदर्श, मूल्य, सेवा, धर्म, राजनीती, प्रज्ञा, प्रजादक्षता, ऐक्य, आदर, अष्टप्रधान मंडळ, विकास शिस्त, संयम, एकजूट, व्यवस्थापन, सर्वसमावेशकता, समता नियोजन आणि कृती यावरून हे छत्रपती अजरामर झाले.
सातारा हादरले! जावळीच्या जंगलात मुंबई पोलिसांची धाड; शेडमध्ये जे सापडलं ते पाहून अधिकारीही चक्रावले
प्रभात वृत्तसेवा सातारा / बामणोली – जावळी तालुक्यातील सावरी येथे कोट्यवधी रुपयांचा अंमली पदार्थाच्या कच्च्या मालाचा साठा जप्त केला आहे. याप्रकरणी मुंबई क्राईम ब्रँचच्या पथकाने (युनिट 7) ओंकार दिघे याला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी चौघांना ताब्यात घेण्यात आले असून ४३ किलोचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. येथील रस्त्याचे काम करण्यासाठी असणाऱ्या कामगारांना शेड घ्यायचे निमित्त […] The post सातारा हादरले! जावळीच्या जंगलात मुंबई पोलिसांची धाड; शेडमध्ये जे सापडलं ते पाहून अधिकारीही चक्रावले appeared first on Dainik Prabhat .
प्रभात वृत्तसेवा पुसेगाव – श्री सेवागिरी महाराजांच्या ७८ व्या पुण्यस्मरणानिमित्त रविवार (दि. १४) ते बुधवार (दि. २४ डिसेंबर) दरम्यान भरणाऱ्या यात्रेचा प्रारंभ आज (दि. १४) पालखी व झेंड्याच्या मिरवणुकीने होणार असल्याचे असल्याचे मठाधिपती सुंदरगिरी महाराज व सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संतोष वाघ यांनी सांगितले. सेवागिरी मंदिरात रविवारी सकाळी आठ वाजता श्री सेवागिरी महाराजांची समाधी व […] The post Pusegaon Yatra: पुसेगाव यात्रेसाठी जाताय? थांबा! पोलिसांनी वाहतुकीत केलेत मोठे बदल; ‘असा’ असेल पर्यायी मार्ग appeared first on Dainik Prabhat .
Jejuri Election: जेजुरीत लाडक्या बहिणीने कोणाला दिलं झुकतं माप? ५३९ मते ठरवणार उमेदवारांचे भवितव्य
प्रभात वृत्तसेवा जेजुरी – जेजुरी नगरपरिषदेच्या निवडणुकीत लाडक्या बहिणीचा मतदानाचा टक्का वाढल्याचे दिसून आले. याचा नेमका फायदा कोणाला आणि तोटा कोणाला, असा प्रश्न उमेदवारांना पडला आहे. मतदानाच्या टक्केवारीत लाडक्या बहिणींनी आपल्या भाऊरायासाठी मतदानरूपी दान कोणाला दिले, याची चर्चा पुरंदर तालुक्यात सुरू झाली आहे. जेजुरीमध्ये ७५८३ पुरुष, ८२१५ महिला व इतर २ (तृतीयपंथी), असे एकूण १५ […] The post Jejuri Election: जेजुरीत लाडक्या बहिणीने कोणाला दिलं झुकतं माप? ५३९ मते ठरवणार उमेदवारांचे भवितव्य appeared first on Dainik Prabhat .
प्रभात वृत्तसेवा लोणी काळभोर – थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या १०० एकर जमिनीची कृषी उत्पन्न बाजार समितीला विक्री करण्यास सहकार विभागाने दिलेल्या परवानगीतील कायदेशीर त्रुटींमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ तपासणीचे आदेश देत खरेदी विक्री प्रक्रियेला स्थगिती दिली आहे. या संदर्भात कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रशांत काळभोर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेखी […] The post Devendra Fadnavis: यशवंत कारखान्याचा जमिन व्यवहार अडचणीत! मुख्यमंत्र्यांनी एका आदेशात फिरवली चक्रे..वाचा appeared first on Dainik Prabhat .
तंजावर येथील बृहदेश्वर मंदिर : दगडात कोरलेला वास्तुग्रंथ
विशेष : लता गुठेभारतात अनेक राज्यांमध्ये हजारो वर्षांपासून काही ऐतिहासिक वैशिष्ट्यपूर्ण वास्तू आजही सुस्थितीत उभ्या आहेत. यापैकी बहुतेक पूर्णपणे दगडांचा वापर करून बांधलेल्या आहेत. त्या वास्तू फक्त वास्तूच नाहीत तर त्या अध्यात्म, संस्कृती आणि शिल्पकलेचा सुरेख संगम त्यामधून आढळतो. त्या विज्ञानाच्या भक्कम पायावर उभ्या आहे. या वास्तूंची रचना वैशिष्ट्यपूर्ण असल्यामुळे भारतीय उज्ज्वल इतिहासाची साक्ष देतात. त्या वस्तूची रचना, कलात्मकता, इतकी सुंदर असते की पाहणाऱ्यांच्या डोळ्यांचे पारणे फिटते. आज अशाच एका वास्तूविषयी आपल्याशी सुसंवाद साधणार आहे.... या मंदिराचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश झालेला आहे.अनेक आश्चर्यापैकी एक असलेले तंजावर येथील भुवनेश्वर मंदिर. या मंदिराला बृहदेश्वर असेही म्हणतात. या लेखामध्ये या मंदिराचा इतिहास, कला-संस्कृती, धार्मिक व सामाजिक महत्व याविषयी वर्णन केले आहे. तसेच शिल्पकलेच्या अंगाने शास्त्रीयपणे विचार करून मांडणी केली आहे. या मंदिराविषयी अनेक ठिकाणी ऐकले होते, वाचले होते त्यामुळे जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली. मिळालेल्या माहितीवर आधारित हा लेख आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे.तंजावर येथील बृहदेश्वर मंदिर—ज्याला ‘राजराजेश्वर’ तसेच ‘भुवनेश्वर मंदिर’ असेही संबोधले जाते—हे एक वैश्विक वारसा आहे. इ.स. १०१० च्या दरम्यान चोल सम्राट प्रथम यांनी उभारलेले हे मंदिर केवळ धार्मिक दृष्टीनेच नव्हे तर कला, विज्ञान, स्थापत्य आणि सामाजिक संस्कृती याचा सुरेख संगम आढळतो. द्रविड वास्तुशैलीचा वापर करून बांधलेले बृहदेश्वर मंदिर आजही जगभरातील अभ्यासकांना, कलाप्रेमी व इतिहास संशोधकांना आकर्षित करत आहे.चोल साम्राज्याच्या सुवर्णकाळाची साक्ष देणारे हे मंदिर आहे. चोल वंश हा दक्षिण भारतातील सर्वात प्राचीन व प्रभावी राजवंशांपैकी एक होता हे आपण जाणतोच आहोत. राजाराज–प्रथम (इ.स. ९८५–१०१४) यांच्या काळात चोल साम्राज्याचा विस्तार दख्खनपासून श्रीलंका व बंगालच्या किनाऱ्यापर्यंत झाला होता. या विशाल सत्तेचा पराक्रम नोंदवण्यासाठी तसेच साम्राज्याची सांस्कृतिक ओळख दृढ करण्यासाठी राजराजांनी तंजावर येथे विशाल शिवमंदिर उभारण्याचा संकल्प केला कारण शिव हे चोलांचे कुलदैवत असल्यामुळे साम्राज्याच्या सर्व प्रदेशांमध्ये धार्मिक एकात्मतानिर्माण करण्यासाठी त्यांनी गावोगावी शिवालये बांधली.बृहदेश्वर हे मंदिर अतिशय भव्य-दिव्य स्वरूपात उभे केले. त्यामागची अनेक कारणे आहेत. त्यापैकी एक कारण म्हणजे चोल सैन्याच्या विजयगाथांचं स्मारक म्हणून या मंदिराचा उपयोग त्यांनी केला. दुसरे कारण म्हणजे कृषी, व्यापार व सामाजिक रचनेच्या स्थैर्यासाठी देवालय हे आर्थिक केंद्र बनवले. मंदिर हे पवित्र विचारांचे ठिकाण असल्यामुळे व तिथे सकारात्मक ऊर्जा मिळते या सर्व कारणांमुळे बृहदेश्वर मंदिर केवळ धर्मस्थळ न राहता राजकीय, आर्थिक आणि सामाजिक जीवनाचा केंद्रबिंदू बनले. अनेक कारणांसाठी बनवलेले हे मंदिर दुहेरी प्राकार प्रणालीमुळे मंदिर गावाच्या संरक्षक किल्ल्यासारखे वाटते. बृहदेश्वर म्हणजे महादेव किंवा महाशिव. शिव हे आदिशक्तीचे प्रतीकही मानले जाते. सर्वसामान्य लोकांमध्ये भुवनेश्वर नावाने प्रचलित असलेले मंदिर म्हणजेच ‘भुवनांचा ईश्वर’ ही संकल्पना प्रतिबिंबित होते.मंदिराची रचना अशी आहे, मंदिर पूर्वाभिमुख असून अत्यंत सुबक रचना असल्यामुळे त्यामध्ये अतिशय कल्पकता आढळते. मंदिराच्या प्रत्येक भाग कलात्मक तर आहेच तसेच वैशिष्ट्यपूर्णही आहे. हे मंदिर म्हणजे शिल्पकलेचा ग्रंथच म्हणावा लागेल. संपूर्ण ग्रॅनाइट दगडाचा वापर करून हे भव्य- दिव्य मंदिर बांधले आहे. अनेक किलोमीटर अंतरावर पसरलेले हे मंदिर पाहणाऱ्यांना विचार करायला लावते. मंदिराचे शिखर ६६ मीटर उंच असून भारतातील सर्वात उंच शिखरांपैकी एक आहे. यासाठी वापरलेला एकसंध ग्रॅनाइटचा कळस–शिखर सुमारे ८० टन वजनाचे आहे असे म्हटले जाते. या कळसाकडे पाहताना नकळत पहाणाऱ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे, इतक्या मोठ्या प्रचंड दगडाला इतक्या उंचीवर कसे नेले असेल? याविषयी असेही वाचायला मिळते की ६ किमी लांब उतार बनवून हत्तींंच्या साहाय्याने शिखर उचलण्यात आले असावे.प्रवेशद्वारामध्ये मुखमंडप आहे त्याला नंदीमंडप असेही म्हणतात येथे असलेली नंदीची मूर्ती सुमारे २५ टन वजनाची व एकाच दगडातून घडवलेली आहे. मंदिरात शिवलिंग असलेले गर्भगृह आहे. हे शिवलिंग ‘बृहदेश्वर’ नावाने ओळखले जाते. शिवलिंगाची उंची सुमारे ४ मीटर असून दक्षिण भारतातील मंदिरामध्ये जे शिवलिंग आहेत त्यापैकी सर्वात मोठे हे शिवलिंग आहे. संपूर्ण मंदिराची रचना ही उत्कृष्ट चोल कलाशैलीचे सर्वोच्च रूप मानले जाते. यामुळेच तेथील चोल राज्यातील कलाकार सुरेख, जिवंत कला निर्मितीसाठी जगप्रसिद्ध होते. मंदिराच्या भिंतींवर देव–देवतांचे समूह, नर्तक, संगीतकार, गण, शैव पुराणातील प्रसंग यांचे शिल्प अत्यंत सूक्ष्मतेने रेखांकित केले आहेत.शिवाचा नटराज रूप चोलकलेचे महत्त्वाचे प्रतीक. बृहदेश्वराच्या शिल्पांमध्ये नटराजाची भावविभोर मुद्रा, हाता-पायांच्या हालचाली, लयबद्धता आणि अाध्यात्मिक ऊर्जा अप्रतिमपणे साकारलेली दिसते.शिल्पांमधील अनुपात, दृष्टिमान सममिती आणि गणिती प्रमाण चोलांच्या वास्तुविद्येचे उत्कृष्ट दर्शन घडवते आहे. अनेक शिल्पांवर नृत्यांची ‘१०८ प्रकार कोरलेली आहेत, जी भरतनाट्यम व नाट्यशास्त्राच्या अभ्यासासाठी अमूल्य आहेत.मंदिराच्या अंतर्भागातील भित्तिचित्रे आजही भारतीय प्राचीन चित्रकलेचे सर्वोच्च उदाहरण मानली जातात. यामध्ये शिव–पार्वती, चोल राजांचे दैनंदिन जीवन, समारंभ, नवरात्र, अर्चनाविधी, दारूका वध, अंधकासूर मर्दन यांसारख्या पुराणकथा चित्रीत केलेल्या आहेत. ही चित्रं अतिशय सौम्य रंगांमध्ये नाजूकशा, रेषांनी अविष्कृत केलेली आहेत. इ.स. १००० च्या सुमारास रंगविलेले हे भित्तिचित्रं आजही प्रयोगशील कलांच्या दृष्टीने अद्भुत आहेत. अनेक धार्मिक सांस्कृतिक संकेत या मंदिराच्या आवारात आढळतात यापैकी शैव सिद्धांतानुसार शिव हा ‘विश्व–नियंता’, ‘अनंत’ आणि ‘नटराज’ या तीन रूपांनी प्रकट होतो. बृहदेश्वराचे स्थापत्य याच रूपसंकेतांवर प्रकाश टाकते.हे मंदिर पाहताना त्याकाळी चोल यांच्या साम्राज्यामध्ये देवपूजा, संगीत, नृत्य व वेदपठण तसेच आर्थिक व्यवहार, शेती, जलव्यवस्थापन यांचे नियमन याला किती महत्त्वाचे स्थान होते तसेच नंदी मंडपातील ध्वनी–प्रतिध्वनी आजही अभ्यासकांचे लक्ष वेधून घेतात. हे आपल्या लक्षात येते. नृत्य कला चित्रकला शिल्पकला या कलाही त्या काळामध्ये किती प्रगत होत्या याचे हे जिवंत उदाहरण पाहायला मिळते. अशाप्रकारे अनेक वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असलेले हे मंदिर पर्यटकांसाठी आकर्षण बनले आहे.
संवाद : गुरुनाथ तेंडुलकरसंत एकनाथांच्या बाबतीत असं सांगतात की एकदा एकनाथ महाराज नदीवरून स्नान करून येत असताना एक मुसलमान तरुण त्यांच्या तोंडावर थुंकला. त्या तरुणाला वाटलं की एकनाथ महाराज चिडतील, भडकतील. त्यांची शांती ढळेल. पण झालं भलतंच. एकनाथ महाराज शांतपणे पुन्हा नदीवर गेले आणि स्नान करून परतले. पुन्हा तोच प्रकार घडला. तो मुसलमान तरुण एकनाथ महाराजांच्या तोंडावर पुन्हा थुंकला. एकनाथ महाराज पुन्हा नदीवर गेले आणि शांतपणे स्नान करून आले. हा प्रकार पुन्हा घडला. पुन्हा पुन्हा घडला. एकनाथ महाराजांची शांती काही ढळली नाही. पण तो मुसलमान तरुण मात्र बेचैन झाला. चिडला.त्या मुसलमान तरुणानं चिडून थुंकायचं आणि एकनाथ महाराजांनी शांतपणे मागे वळून नदीवर जाऊन पुन्हा स्नान करायचं हा प्रकार एक-दोन नव्हे, तर तब्बल एकवीस वेळा घडला आणि बाविसाव्या खेपेला मात्र त्या तरुणाला पश्चात्ताप झाला आणि त्याने एकनाथ महाराजांचे पाय धरले.ही गोष्ट तुम्हाला नक्कीच ठाऊक असेल. मी देखील ही कथा अनेकदा वाचलीय. ऐकलीये.शाळेच्या जीवनात गोष्टीच्या तासाला, कीर्तन प्रवचनातून, अगदी मॅनेजमेंटच्या अनेक सेमिनारमधून सुद्धा... प्रत्येक वेळी एकच तात्पर्य सांगितलं जायचं.‘तुम्ही इतरांशी चांगले वागा. इतर कुणीही कितीही दुष्टपणा केला तरी त्याचा राग न करता उदार अंतःकरणाने त्याला क्षमा करा.’एकनाथ महाराजांची हीच गोष्ट कुठल्याशा सुफी संताच्या बाबतीतही घडली होती असं सांगतात. ही गोष्ट कुणाच्या बाबतीत घडली याचा तपशील महत्त्वाचा नाहीये. तो थुंकणारा मुसलमान होता की, हिंदू होता हे देखील महत्त्वाचं नाहीये. कुणीतरी एक दुर्जन एका सज्जनाच्या तोंडावर थुकला आणि त्या सज्जनाने त्याचा राग न धरता त्याला क्षमा केले. आजही ही कथा पुन्हा एका मासिकात वाचली. पण आज मात्र माझ्या मनात वेगळाच विचार आला. एका दुर्जनानं सज्जनाच्या अंगावर पुन्हा पुन्हा थुंकणं आणि त्या सज्जन माणसाने मात्र त्या दुर्जनाला पुन्हा पुन्हा क्षमा करणं हा त्या सज्जनाची क्षमाशीलता की भ्याडपणा ?कथेमध्ये शेवटी एकवीस वेळा थुंकल्यानंतर त्या दुर्जनाचे हृदय परिवर्तन झाल्याचं सांगतात. पण प्रत्यक्ष व्यवहारात मात्र...?चला जरा इतिहासाची पानं चाळूया...महम्मद घोरीने पृथ्वीराज चौहानवर अठरा वेळा स्वारी केली. रजपुतांनी केलेल्या कडव्या प्रतिकारामुळे महम्मद घोरीचा सतरा वेळा पराभव झाला. प्रत्येक खेपेस हरलेल्या घोरीला महाराज पृथ्वीराज चौहानसमोर बंदी बनवून उभं करण्यात आलं. प्रत्येक खेपेस महंमद घोरीनं दयेची भीक मागितली आणि पृथ्वीराज चौहानने उदार अंतःकरणाने त्याला क्षमा करून जिवंत सोडून दिला...हा प्रकार एक दोनदा नव्हे, तर तब्बल सतरा वेळा घडला. अठराव्या वेळी मात्र महम्मद घोरीने बाजी मारली. पृथ्वीराज चौहानचा पराभव झाला. हरलेल्या पृथ्वीराज चव्हाणला बंदी म्हणून महम्मद घोरीच्या समोर उभं करण्यात आलं आणि...
Manchar News: शहीद बाबू गेनू यांच्या स्मृतीला वंदन! कळंब आणि एकलहरे गावात प्राणज्योतीचे जंगी स्वागत
प्रभात वृत्तसेवा मंचर – हुतात्मा बाबू गेनू यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुंबई काळंबादेवी येथून आणलेल्या प्राणज्योतीचे स्वागत एकलहरे, कळंब आदी गावांमध्ये जल्लोषात आणि उत्साहात ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले.एकलहरे येथे ज्योतीचे स्वागत प्रा.वसंत भालेराव, माजी सरपंच शिवसेना तालुकाप्रमुख संतोष डोके,उपसरपंच प्रदीप शिंदे, देविदास डोके,राहुल डोके,महमंदशरीफ शेख यांच्यासह एकलहरे,शिंदेवाडी ग्रामस्थांनी केले. कळंब ग्रामपंचायत चौकात ज्योत दाखल झाल्यानंतर हुतात्मा बाबू […] The post Manchar News: शहीद बाबू गेनू यांच्या स्मृतीला वंदन! कळंब आणि एकलहरे गावात प्राणज्योतीचे जंगी स्वागत appeared first on Dainik Prabhat .
प्रभात वृत्तसेवा तळेगाव ढमढेरे – दहिवडी (ता. शिरूर) गाव आणि परिसर गेल्या काही वर्षांपासून बिबटप्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जात असून, अलीकडील काळात येथे बिबट्यांचा वावर लक्षणीयरीत्या वाढला आहे. गावाच्या हद्दीत तसेच शेतशिवारात मोठ्या प्रमाणावर ऊस लागवड असल्याने बिबट्यांना लपण्यासाठी अनुकूल वातावरण मिळत आहे. परिणामी गावातील नागरिक, शेतकरी, पशुपालक तसेच शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले […] The post Leopard News: दहिवडी परिसरात बिबट्यांचा वाढता वावर; ग्रामस्थांची ‘बीस्ट अलर्ट सिस्टीम’ बसवण्याची मागणी appeared first on Dainik Prabhat .
कोकण आयकॉन : सतीश पाटणकरमराठी रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रात अत्यंत देखणे, डॅशिंग, सदाबहार नट म्हणून रमेश भाटकर ओळखले जात. शेवटपर्यंत ते नाट्य-चित्रपटांमध्ये सक्रिय होते. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’मध्ये ते पृथ्वीराज चव्हाणांच्या भूमिकेत होते. डॉ. काशिनाथ घाणेकरांनी गाजवलेल्या ‘अश्रूंची झाली फुले’मधील लाल्याच्या भूमिकेसाठी‘नाट्यसंपदा’चे निर्माते प्रभाकर पणशीकर यांना तितक्याच तोलामोलाची रिप्लेसमेंट मिळाली ती रमेश भाटकरांच्या रूपात!घाणेकरांनी छाप पाडलेल्या भूमिकेवर आपली नाममुद्रा उमटवणे हे खचितच सोपे नव्हते; परंतु रमेश भाटकरांनी आपल्या शैलीदार अभिनयाने या भूमिकेवर आपली वेगळी मोहोर उमटविली. असे अपवादानेच घडते. मराठी प्रेक्षकांना उत्तम अभिनय करणारा नट आवडतो. मग त्याच्याकडे चारआणे रूप कमी असले तरी त्यांना चालते. रमेश भाटकर याला अपवाद होते. त्यांच्याकडे रूपाबरोबरच शैलीदार अभिनयही होता. अलीकडे त्यांचे नाटक-सिनेमे कमी झाले होते तरी ग्रामीण भागातली त्यांची क्रेझ जराही कमी झाली नव्हती. अनेक वर्षे नाट्य संमेलनातील दिंडीचे ते प्रमुख आकर्षण असत. दिंडीतील त्यांचे उत्स्फूर्त जोशिले नृत्य अनेकांच्या पायांना ताल धरायला लावीत असे. भाटकरांची अनेक रूपे होती. ते उत्तम वाचक होते. चांगले गायक होते. आपले वडील संगीतकार स्नेहल भाटकरांकडून त्यांना हा वारसा मिळाला होता. अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांना ते आवर्जून सपत्नीक हजेरी लावत. ते एक संवेदनशील कलावंत होते. ‘प्रेमाच्या गावा जावे’ या पुनरुज्जीवित नाटकाच्या एका दौऱ्यात हवा तसा प्रेक्षक प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी निर्मात्याकडून मानधन घेण्यास नकार दिला होता. गप्पांच्या मैफलीचे ते बादशहा होते.नाटक, सिनेमा आणि मालिका अशा तिन्ही माध्यमांत प्रदीर्घ काळसंचार केल्यामुळे त्यांच्यापाशी अनुभवांचे मोठे संचित होते. त्यातून ते या क्षेत्रांत येणाऱ्या नव्या मंडळींना सल्ला देत, मार्गदर्शन करीत. आपल्या व्याधीच्या दुर्धरतेची कल्पना आल्यावर कोसळून न पडता उरलेल्या दिवसांत आपल्या आवडीच्या कला क्षेत्रात जमेल तितके कार्यरत राहण्याचा त्यांनी कसोशीने प्रयत्न केला. ही खरोखरीच दुर्मीळ बाब होय. ‘आनंद’ सिनेमातील राजेश खन्ना, रमेश भाटकर यांनी आपल्या प्रत्यक्ष जगण्यातून सार्थ करून दाखविला. असे धीरोदात्तपणे वास्तवाला सामोरे जाणे क्वचितच पाहायला मिळते. माणूस व कलावंत म्हणून ते किती सखोल होते, हे त्यांच्या या अखेरच्या दिवसांत त्यांनी दाखवून दिले.आपल्या दमदार अभिनयाने रमेश भाटकर यांनी तीन दशके मराठी रंगभूमी आणि सिनेसृष्टीवर आपला दबदबा राखला. टीव्ही मालिकांमधील त्यांच्या इन्स्पेक्टरच्या भूमिका लोकांच्या विशेष पसंतीस उतरल्या होत्या. रमेश भाटकर यांनी अनेक चित्रपट, मालिकांमध्ये काम केले असले तरी रंगभूमी हे त्यांचे पहिले प्रेम होते. १९७५ साली ‘अश्रूंची झाली फुले’ नाटकात त्यांनी ‘लाल्या’ची भूमिका निभावली होती. सुरुवातीच्या काळामध्ये दूरदर्शनवरील मालिकांच्या माध्यमातून भाटकर यांचा चेहरा घराघरांमध्ये पोहोचला होता. रंगभूमी हे त्यांचे पहिले प्रेम असले तरी मालिकांनी त्यांना खऱ्या अर्थाने लोकप्रिय केले. १९९० ते २००० सालामध्ये त्यांनी अनेक मालिकांमधून अजरामर भूमिका साकारल्या. दुर्दशनवर १९९० साली प्रदर्शित झालेल्या ‘हॅलो इन्स्पॅक्टर’ आणि ‘दामिनी’ या दोन मालिकांमधील भूमिकांमुळे त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यानंतर झीटीव्हीवरील ‘कमांडर’ आणि ‘डीडी टू’वरील तिसरा डोळा या मालिकेमधील गुप्तहेराच्या भूमिकेसाठी ते आजही ओळखले जातात. यानंतरही ते ‘हद्दपार’, ‘बंदिनी’, ‘युगंधर’ या मालिकांमधूनही भाटकर छोट्या पडद्यावर दिसले. याशिवाय बी. पी. सिंग यांच्या सिर्फ ‘चार दिन’ या छोट्या टेलिफिल्ममध्येही रमेश यांनी काम केले होते. काही महिन्यांपूर्वीच ‘तू तिथे मी’ आणि ‘माझे पती सौभाग्यवती’ या मालिकांमधून त्यांनी अभिनय केला होता. आपल्या कारकिर्दीमध्ये ३० मालिकांमध्ये काम केले आहे. या मालिकांचे एकूण हजारांहून अधिक भाग प्रदर्शित झाले आहेत. १९९० च्या दशकामध्ये रामेश भाटकर हे खऱ्या अर्थाने या टीव्हीवरील हिरो होते.‘हॅलो इन्स्पेक्टर’, ‘दामिनी’ या त्यांनी अभिनय केलेल्या मालिका गाजल्या. रमेश भाटकर यांच्या माहेरची साडी या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत अनेक नवे विक्रम प्रस्थापित केले.त्यांचा जन्म ३ ऑगस्ट १९४९ ला झाला. त्यांच्या अभिनयाच्या कारकिर्दीची सुरुवात रंगभूमीवरूनच झाली. ‘केव्हा तरी पहाटे’, ‘अखेर तू येशीलच’,‘राहू केतू’, ‘मुक्ता’ ही त्यांची काही गाजलेली नाटके. १९७७ ला ‘चांदोबा चांदोबा भागलास का’ या चित्रपटाद्वारे त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी ‘अष्टविनायक’, ‘दुनिया करी सलाम’, ‘आपली माणसं’यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले.९८ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनामध्ये रमेश भाटकर यांचा ‘जीवनगौरव’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला होता. वयाची सत्तरी गाठली तरी भाटकर यांचा कामाचा उत्साह तसूभरही कमी झाला नाही.वार्धक्याच्या खुणाही त्यांच्या चेहऱ्यावर कधी दिसल्या नाहीत. खऱ्या अर्थाने ते चिरतरुण होते.
प्रभात वृत्तसेवा तळेगाव ढमढेरे – देशाचे ज्येष्ठ नेते खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या ८५ व्या वाढदिवसानिमित्त श्री राहुल दादा करपे पाटील सोशल फाउंडेशन आणि ओम रक्तकेंद्र, शिरूर यांच्या संयुक्त विद्यमाने घोलपवाडी-टाकळी भीमा (ता. शिरूर) येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला परिसरातील सर्व गावांमधील युवक आणि महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सामाजिक बांधिलकीचे […] The post Shirur News: घोलपवाडीत भव्य रक्तदान शिबिर संपन्न; राहुल करपे फाउंडेशन आणि ओम रक्तकेंद्राचा स्तुत्य उपक्रम appeared first on Dainik Prabhat .
लहानशा गोष्टी, मोठा अर्थ : शिल्पा अष्टमकरमाणूस हा विचार, भावना आणि कृती असलेला संवेदनशील प्राणी आहे. परिस्थिती, अनुभव, चांगले-वाईट प्रसंग यांमुळे त्याच्या स्वभावात आणि आयुष्यात बदल घडत जातात. म्हणूनच “माणूस बदलू शकतो” हे वाक्य केवळ शब्द नाहीत, तर जीवनाचा मूलभूत सत्य आहे. बदल हेच जगाचे वैशिष्ट्य आहे आणि मनुष्य त्याला अपवाद नाही.१. बदलाची सुरुवात – आत्मजाणिवेतूनमाणूस खऱ्या अर्थाने तेव्हाच बदलतो, जेव्हा त्याच्या मनात आत्मजाणिवा निर्माण होतात. जसे -“मी असे का वागतो?”“मी स्वतःला सुधारू शकतो का?”“माझ्यामुळे कोणाला त्रास होतोय का?”या प्रश्नांची उत्तरे शोधताना तो स्वतःकडे पाहायला शिकतो आणि सुधारणेची पहिली पायरी चढतो.अवगुण सोडिता जाती । उत्तम गुण अभ्यासिता येती । कुविद्या सोडून शिकती । शहाणे विद्या ॥एका संस्कृत सुभाषितकारांनी म्हटले आहे - “स्वभावो दुरति क्रमः” । याचा अर्थ मनुष्याचा स्वभाव बदलणं खूप कठीण आहे. अर्थात, वाईट सवयी आणि वागणं हे जीवाभावाचं असतं. पण, त्यांच्या वेळ, माणूस बदलू शकतो, योग्य संस्कार आणि प्रयत्नांनी, आपण आपल्या जीवनाला हवा तसा आकार देऊ शकतो. माणूस बदलू शकतो; परंतु बदलण्याची तीव्र इच्छा त्याच्या अंगी असली पाहिजे.अंगुलीमाल गुन्हेगार होता. त्याने शंभर माणसांची हत्या करून त्यांच्या करंगळीची माळ करून गळ्यात घालायचे ठरवले होते. त्याच्या कृत्यांमुळे गावकरी भयभीत होते. एके दिवशी भगवान बुद्ध त्याच्या भेटीस गेले. बुद्धांनी त्याला झाडाची फांदी तोडावयास सांगितली. त्यांनी फांदी तोडली. बुद्धांनी ती फांदी परत त्याला जोडायला सांगितली. ती फांदी झाडाला जोडता येणे शक्य नव्हते. तेव्हा बुद्धांनी त्याला समजावले - ज्याला जोडता येत नाही त्यांनी तोडू नये. ज्याला जीवन देता येत नाहीत्याला कोणाला मृत्यू देण्याचा अधिकार नाही.बुद्धांच्या उपदेशाने अंगुलीमाल पूर्ण बदलला. पुढील काळात तो बुद्धांचा लाडका संन्यासी झाला.माणसाने जर मनावर घेतले तर ५ - ६ वर्षांत तो स्वतःच्या स्वभावात हवा तसा बदल घडवू शकतो.२. बदलासाठी आवश्यक म्हणजे सकारात्मक विचार.मनुष्य सकारात्मक विचार स्वीकारतो तेव्हा त्याचे वागणे, बोलणे आणि निर्णय घेण्याची शैली बदलते.सकारात्मकतेमुळे -राग कमी होतो,सहनशीलता वाढते,नाती दृढ होतात,आत्मविश्वास वाढतोअशा विचारांमुळे माणूस आधीपेक्षा अधिक सक्षम आणि शांत बनतो.३. अनुभव माणसाला बदलून टाकतात.जीवनातील प्रसंग माणसाला घडवतात आणि घडवून बदलवतात.कधी एखादी चूक, कधी एखादा कठोर प्रसंग, कधी अपयश किंवा जिव्हाळ्याचे नाते -हे अनुभव मनाला ढवळून टाकतात आणि सुधारणा करण्यास भाग पाडतात.४. सवयी बदलल्या तर जीवन बदलते. माणसाचे वागणे त्याच्या सवयींवर अवलंबून असते.खराब सवयी सोडून चांगल्या सवयी अंगीकारल्या तर जीवनाचा मार्गच बदलतो. उदा. - वेळेचं नियोजन वाचनाची सवय शांतपणे विचार करून निर्णय आरोग्य राखण्याची शिस्त या सवयी व्यक्तिमत्त्वात सुंदर परिवर्तन घडवतात.५ . समाज व कुटुंबाचा प्रभावचांगले मित्र, सकारात्मक सहकारी, मार्गदर्शक शिक्षक किंवा एखादे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व माणसाला योग्य दिशेने बदलायला मदत करतात.समर्थन, कौतुक, प्रोत्साहन हे बदल टिकवतात.६. इच्छाशक्ती सर्वांत महत्त्वाचीमाणूस बदलतो कारण तो बदलायचे ठरवतो. इच्छाशक्ती, सातत्य आणि ध्येय यांमुळे कोणताही मनुष्य वाईटातून चांगल्याकडे प्रवास करू शकतो. “माणूस बदलू शकतो” हे केवळ विधान नाही - तो जीवनाचा शाश्वत संदेश आहे.बदल हा वेळ, परिस्थिती आणि इच्छाशक्ती यांचा सुंदर मिलाफ आहे.स्वतःच्या चुका मान्य करून, सकारात्मकता स्वीकारून आणि योग्य मार्गदर्शन घेऊन मनुष्य स्वतःचे आयुष्य अधिक सुंदर बनवू शकतो.म्हणूनच - बदलाची सुरुवात आपणच करू या. आणि इतरांनाही बदलण्याची संधी देऊ या.
प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफआज दुपारी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आणि माझी मैत्रीण रजनी मुलुंडला ट्रेनने गेलो. पश्चिमेकडून मुलुंडच्या रेल्वेस्टेशन बाहेर पडत होतो. अचानक रजनीला आपल्या अमेरिकेच्या भाचीचा फोन आला आणि तिच्याकडे साधारण रात्रीचा दीड वाजलेला असताना तिने का फोन केला असेल, या विचाराने तिथेच एका रिकाम्या बाकावरती बसली आणि स्वाभाविकपणे मीही तिच्या बाजूला बसलो. ती बोलण्यात मग्न होती आणि मी आसपास पाहत होतो. समोर आपल्या जुन्या वस्तू, कपडे इत्यादी ठेवण्यासाठी तिथे काही लाकडी चौकटी तयार केलेल्या होत्या. कोणी ते ठेवले आहे, कशासाठी ठेवले आहे वगैरे सगळी माहिती त्यावर व्यवस्थित लिहिली होती. इतक्यात एक बाई तिथे आली आणि तिने दोन ते तीन कप्प्यात मावेल इतके कपडे ठेवले आणि ती निघून गेली.अमेरिकेत राहणारी माणसे घराबाहेर किंवा आपल्या अंगणात आपल्याला नको असलेले फर्निचर वा वस्तू अशा रीतीने बाहेर ठेवतात आणि त्याखाली लिहितात की, कोणीही हे उचलून घेऊन जाऊ शकतो म्हणून! त्याचा उपयोग बऱ्याच जणांना होतो. आपल्याला नको असलेले सामान अशा रीतीने ज्याला गरज आहे त्याच्यापर्यंत सहज पोहोचते आणि त्याची गरज भागवली जाते ही किती छान गोष्ट आहे, असे मला नेहमी वाटायचे. मला इतका आनंद झाला की, आपल्याकडे पण त्यांच्याकडचा असा चांगला आणि समाजोपयोगी विचार इथे राबवला जातोय! माझा हा आनंद काही क्षणांसाठीच टिकला कारण त्या बाईने कपडे आणून ठेवल्यावर दीड मिनिटांच्या आत एक रेल्वे कर्मचारी तिथे आला आणि त्याने तिथले एकूण एक कपडे उचलले आणि तो तिथून रेल्वे स्टेशनवर असलेल्या कोणत्या तरी खोलीत शिरला.या प्रसंगाने मी खूप अस्वस्थ झाले. त्याच्या एकंदरीत हालचालींवरून असे लक्षात येत होते की, तो स्वतःच्या फायद्यासाठी ते उचलत असावा!मुंबईच्या कोणत्याही भागात साधारण रेल्वेस्टेशन जवळच्या रस्त्यावर जुने कपडे विकण्यासाठी उपलब्ध असतात. हा बाजार फार मोठा आहे. कुठेतरी वाचल्याचे आठवते की नव्या कपड्याच्या बरोबरीने हेही कपडे विकले जातात. त्याचे प्रमाण नवीन कपड्यांच्या पंचवीस ते तीस टक्के इतके आहे. जर हा बाजार इतका मोठा आहे, तर गरजवंतही तितक्याच मोठ्या प्रमाणात असण्याची शक्यता आहे; परंतु काही माणसांना हे कपडे वा वस्तू या गरजवंतांना मोफत द्याव्याशा वाटत असतील, तर कोण्या तरी मध्यस्थाने त्या असे तऱ्हेने हडप करणे बरोबर नाही. हे दृश्य माझ्या दृष्टीस पडले तसे ते आणखीही काही लोकांच्या दृष्टीस नक्कीच पडत असेल, असा विचार मनात आला. या गोष्टीमुळे दाता कदाचित पुढच्या वेळेस इथे कपडे आणून टाकणे बंद होऊ शकते. आपल्याला एखादी गोष्ट चुकीची वाटते तेव्हा नेमकेपणाने काय करायचे, हा प्रश्न माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या मनात निर्माण झाला. मला लहानपणीची एक गोष्ट अजूनही आठवतेय की जेव्हा कुठे ओला किंवा सुका दुष्काळ पडायचा तर त्यानंतर दोन-चार दिवसांत प्रत्येक सोसायटीच्या नोटीस बोर्डवर एक निवेदन लावलेले दिसायचे की पूरग्रस्तांसाठी, दुष्काळग्रस्तांसाठी आपल्या सोसायटीच्या दाराशी ठेवलेल्या कार्डबोर्डच्या खोक्यामध्ये आपल्या जुन्या वस्तू, कपडे इ. आणून टाकाव्यात. हे निवेदन वाचून सोसायटीतील कमीत कमी पंचवीस ते तीस टक्के रहिवासी आपले जुने कपडे आणून त्या बॉक्समध्ये टाकायचे. एक मोठा ट्रक यायचा आणि त्या बॉक्समधील वस्तू आणि सामान घेऊन जायचा. हे सामान खरंच गरजवंतांपर्यंत पोहोचते का, असा संशय काही माणसांना पडला कारण त्यांनी त्याबाबतीत काहीतरी वेगळे घडल्याचे पाहिले. ते कपडे त्याच भागात जुने कपडे विकणाऱ्या माणसांकडे सापडल्याच्या तक्रारी अनेकांनी केल्याचे आठवतेय. हे तर वापरलेल्या जुन्या वस्तूंबद्दल आणि कपड्यांबद्दल! मग मनात विचार येतो की, जेव्हा दानशूर व्यक्ती मोठ्या रकमेच्या देणग्या देतात किंवा काहीजण आपल्याकडे असलेल्या तुटपुंजा मिळकतीतूनसुद्धा एखाद्या संस्थेला मनापासून छोट्या रकमेची का होईना देणगी देण्याचा प्रयत्न करतात अशांचे पैसे गरजवंतांसाठी वापरले जातात का किंवा अशी काही यंत्रणा आहे का, जेणेकरून आपल्याला याची माहिती मिळू शकेल? देणगी या शब्दाची व्याख्या शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा जी व्याख्या मिळाली ती मी इथे देत आहे. धर्मादाय, मानवतावादी मदत किंवा एखाद्या चांगल्या कामासाठी दिलेली भेट, जी पैसे, वस्तू (अन्न, कपडे), सेवा किंवा वेळेच्या स्वरूपात असू शकते.देणगी गुप्तपणे द्यावी असे म्हटले जाते, पण अलीकडे देणगीच्या रकमेनुसार करामध्ये काही सवलतीही मिळतात. त्यामुळे देणगीदार पावती घेऊन देणग्या देतात आणि देणगीतून कोणत्याही फळाची अपेक्षा ठेवू नये, असे म्हटले जाते. अन्नदान, धनदान, श्रमदान किंवा ज्ञानदान अशा देणग्यांमुळे समाजाच्या कल्याणासाठी हातभार लागतो आणि धार्मिक, शैक्षणिक तसेच सामाजिक कार्यांना बळ मिळते!तर शेवटी काय? जेव्हा शक्य असेल तर जरूर देणगी द्यावी. अशा जगामध्ये कितीतरी संस्था आहेत ज्या केवळ देणग्यांवर चालतात. जगात चांगले-वाईट लोक असतात, चांगल्या-वाईट घटना घडत असतात त्याप्रमाणे आपण नेहमीच चांगला विचार करून, ज्या संस्थेविषयी आपल्याला खात्री आहे अशा संस्थांना तरी देणगी द्यायलाच हवी. कदाचित देणगी दिल्यामुळे आपल्या मिळकतीतला एक छोटासा हिस्सा कमी होईल, कदाचित आपला थोडासा वेळ खर्च होऊ शकेल; परंतु त्यामुळे कदाचित एखाद्या गरजवंताचे आयुष्य उभे राहील!pratibha.saraph@ gmail.com
चासकमानच्या पाण्यावरून भडका! पाचुंदकर वि. पाचुंदकर; सोशल मीडियावर श्रेयवादाचे युद्ध पेटले
प्रभात वृत्तसेवा रांजणगाव गणपती – रांजणगाव-कारेगाव जिल्हा परिषद गटात चासकमान धरणाच्या पाण्यावरून सुरू असलेल्या वादाने ऐन थंडीतही परिसरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. चासकमानचे पाणी उपलब्ध करून देण्याच्या श्रेयावरून मानसिंग पाचुंदकर आणि शेखर पाचुंदकर यांच्यात सोशल मीडियावर उघडपणे श्रेयवाद रंगला असून, या वादाला त्यांच्या समर्थक व कार्यकर्त्यांनीही आक्रमक स्वरूप दिले आहे. चासकमान धरणाचे पाणी रांजणगाव-कारेगाव […] The post चासकमानच्या पाण्यावरून भडका! पाचुंदकर वि. पाचुंदकर; सोशल मीडियावर श्रेयवादाचे युद्ध पेटले appeared first on Dainik Prabhat .
पुणे-नाशिक नवीन रेल्वे मार्ग मान्य नाही! आढळराव पाटलांचा सरकारला इशारा, प्रसंगी रस्त्यावर उतरू
प्रभात वृत्तसेवा मंचर – पुणे-नाशिक नवीन रेल्वे मार्ग माझ्यासह मतदार संघातील नागरिकांना मान्य नाही. प्रसंगी जनआंदोलन उभारू, असा इशारा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिला.लांडेवाडी (ता.आंबेगाव) येथील निवासस्थानी प्रसारमाध्यमांशी बोलताना शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले की, २००४ ला मी खेड लोकसभा मतदारसंघाचा प्रथम खासदार म्हणून निवडून आलो. त्यानंतर २००५ पासून चाकण एमआयडीसीमधील कामगारांची, मतदारसंघातील शेतकऱ्यांची, […] The post पुणे-नाशिक नवीन रेल्वे मार्ग मान्य नाही! आढळराव पाटलांचा सरकारला इशारा, प्रसंगी रस्त्यावर उतरू appeared first on Dainik Prabhat .
कथा : प्रा. देवबा पाटीलत्या दिवशीही सीता व निता या दोघी बहिणींनी शाळेतून घरी येताबरोबर आपला अभ्यास करून घेतला. नि त्या आपल्या मावशीसह गच्चीवर जाऊन बसल्या.“साबणाच्या नळीवाटे फुगे बाहेर पडतात, पण मग स्ट्रॉ च्या नळीद्वारेपेय तोंडात कसे ओढले जाते?”सीताने विचारले.“तुम्ही पिता गं अशी पेये?” मावशीने प्रश्न केला.“आई आम्हाला अशी पेये पिऊ देत नाही, तरी पण एखादवेळी बाबांजवळ हट्ट करून म्हणजे फार क्वचित पितो आम्ही.” सीताने उत्तर दिले.“पण उसाचा रस, लिंबू सरबत आम्ही बऱ्याचदा स्ट्रॉनेच पितो.” निता म्हणाली.“उसाचा रस, लिंबू सरबत ही आरोग्याला हितकारक असतात पण सॉफ्ट ड्रिंक्स असे गोंडस नाव दिलेली व चवही गोडस ‘गोड’(बोग)स गोडसट असलेली सगळी पेयं ही त्यामध्ये रसायने असल्याने आरोग्याला अपायकारक असतात तरीही सारेजण ते स्ट्रॉ च्या नळीने मोठ्या आवडीने पितात. स्ट्रॉ ची नळी ही प्लॅस्टिक किंवा कागदापासून बनवलेली असते. तिचे एक टोक पेयात बुडवतात व दुसरे टोक तोंडामध्ये घेतात. जेव्हा स्ट्रॉ च्या नळीने एखादे पेय पितात तेव्हा पिणारा तोंडाने स्ट्रॉच्या साहाय्याने ते पेय ओढून घेत असतो. पेय वर ओढतांना त्याच्या फुप्फुसांचे प्रसरण होते व त्याच्या तोंडातील हवेचा दाब कमी होतो. त्यामुळे पर्यायाने नळीच्या वरच्या रिकाम्या भागातील हवेचाही दाब कमी होतो; परंतु नळीच्या आजूबाजूच्या पेयाच्या वरच्या बाहेरच्या मोकळ्या भागावर मात्र जो बाहेरच्या हवेचा दाब असतो तो जास्त असतो. त्यामुळे ते पेय नळीमध्ये ओढले जाते कारण कोणतेही पेय वा द्रव हा जास्त दाबाकडून कमी दाबाकडे प्रवाहित होत असतो.” मावशीने स्पष्ट केले.“आणि मावशी पान खाल्ल्याने तोंडाला लाल रंग कसा येतो?” नितानेसुद्धा आपली शंका विचारली.मावशी हसत हसत म्हणाली, “आपण नागवेलीच्या पानाला थोडासा चुना लावतो व त्यावर किंचितसा कात टाकतो. ज्यावेळी आपण पान चावतो त्यापेळी आपल्या तोंडातील लाळ त्या पानात मिसळते. पान, चुना, कात व लाळ या सर्वांचा परस्परांवर परिणाम होतो व पानाचा पर्यायाने जिभेचा व तोंडाचा रंग लाल होतो.”नेहमीसारखी संध्याकाळ झाली. अंधाराने आपले हातपाय पसरविणे सुरू केले. आईच्या आवाजाने त्यांना आपल्या ज्ञानदायी गोष्टी आवरत्या घ्याव्या लागल्यात. मावशीने सांगणे बंद केले नि सतरंजीवरून उठली. तशा या दोघीही उठल्या, सतरंजीची घडी केली. निताने सतरंजी आपल्या हाती घेतली व त्याही मावशीमागे जिना उतरल्या.“माझ्या लाडक्या मुलींनो, आज दिवसा आईसोबत जरा जास्त काम उरले. त्यामुळे जरा मला थोडेसे थकल्यासारखे वाटते. तरी आपण आजची चर्चा थांबवू या का?” मावशीने विचारले.“हे काय विचारावे लागते का मावशी? तू आमची मावशी व आम्ही तुझ्या मुली. तू म्हणशील व सांगशील ते आम्ही ऐकूच.” सीता बोलली.“हो मावशी. तू म्हणतेस तसे आपण उद्या संध्याकाळी पुन्हा येऊ गच्चीवर चर्चा करण्यासाठी.” निताने सांगितले.“छान. तशा तुम्ही खूप समजदार आहेत हे मला माहीतच आहे. चला आता आपण खाली जाऊ या.” मावशी बोलली. मग त्या तिघीही मायलेकी उठल्या नि घराच्या जिन्याने खाली उतरू लागल्या.
ऑनलाइन रमीचा वाढता धोका! झटपट पैशाच्या मोहापायी घर, जमीन गहाण ठेवून कर्जाचा डोंगर
प्रभात वृत्तसेवा शिक्रापूर – ग्रामीण भागातील तरुणांसह अनेक नागरिक झटपट पैसा मिळवण्याच्या हेतूने मोबाईलच्या माध्यमातून ऑनलाइन रमी खेळण्याच्या व्यसनात अडकले आहेत. या ऑनलाइन जुगारामुळे वेळ, पैसा आणि मानसिक स्वास्थ्य हरवून तरुण बरबाद होऊ लागले असून, त्यांच्यासोबत पूर्ण कुटुंबाचे मानसिक स्वास्थ्य बिघडत असल्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर समोर येत आहेत. ऑनलाइन रमी खेळणारे लोक स्वतःच्या नावावर असलेला […] The post ऑनलाइन रमीचा वाढता धोका! झटपट पैशाच्या मोहापायी घर, जमीन गहाण ठेवून कर्जाचा डोंगर appeared first on Dainik Prabhat .
Koregaon Bhima: शौर्य दिनासाठी मोठी संधी! बार्टीतर्फे मोफत स्टॉल्स, पण अट फक्त एकच..पहा
प्रभात वृत्तसेवा शिक्रापूर – कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे १ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या विजयस्तंभ शौर्य दिनानिमित्त विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी येणाऱ्या लाखो अनुयायांसाठी पुस्तक विक्री स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी),पुणे यांच्या वतीने ग्रंथ उपलब्ध करून देण्यासाठी विजयस्तंभ स्मारकाच्या मागील बाजूस १०० हून अधिक बुक स्टॉल विनामूल्य […] The post Koregaon Bhima: शौर्य दिनासाठी मोठी संधी! बार्टीतर्फे मोफत स्टॉल्स, पण अट फक्त एकच..पहा appeared first on Dainik Prabhat .
कथा : रमेश तांबेएक होती मांजर आणि तिला होतं एक बाळ! पांढऱ्याशुभ्र रंगाचं, घाऱ्या घाऱ्या डोळ्यांचं! ते खूप खेळायचं, उड्या मारायचं, खूप धमाल करायचं. बाळाच्या आईला बाळाचं केवढं कौतुक वाटायचं.पण एके दिवशी बाळाला काय झालं कुणास ठाऊक! बाळ बसलं रुसून. आता मांजरीचं बाळ बोलेना, चालेना, दुधाला तोंड लावेना. खाऊसुद्धा खाईना! मांजरीने आपल्या बाळाला प्रेमाने जवळ घेतलं आणि विचारलं, “काय रे बाळा काय झालं तुला? तू असा रुसून का बसलास माझ्यावर? तू खात नाहीस, की काही पीत नाहीस! असं नको करू बाळा. अरे तू आजारी पडशील; मला फार काळजी वाटते बघ तुझी!”मग बाळ “लाडानंच म्हणालं, “आई गं मला ना...पिझ्झा हवा, बर्गर हवाचायनीज भेळ, वडापाव हवारोज रोज आईस्क्रीम खाणार दोन मुठी कुरकुरे खाणार!”बाळाची ही विचित्र मागणी ऐकून मांजर आश्चर्यचकित झाले. ती बाळाला म्हणाली, “अरे बाळा हे काय बोलतोयस तू. मला तर काहीच कळत नाही बघ.” मग बाळ म्हणालं, “आई गं, हे तर पदार्थ आहेत खाण्याचे. आमच्या वर्गातली कितीतरी मुलं आणतात. शाळेत मधल्या सुट्टीत एकट्यानेच गुपचूप खातात. आता जोपर्यंत हे पदार्थ मला तू देत नाहीस तोपर्यंत मी शाळेतही जाणार नाही आणि तुझ्याशी बोलणार देखील नाही!” आई म्हणाली, “अरे बाळा हे पदार्थ खाणे चांगले नाही. ते कुठे बनवलेत, कसे बनवले, त्यात काय काय मिसळले आहे कुणास ठाऊक! मी तर कधीच खाल्ले नाहीत बघ! आणि त्यासाठी खूप पैसेदेखील लागतात. हे असले पदार्थ खाल्ल्यावर आजारपणदेखील येऊ शकते.” आता बाळ हट्टालाच पेटलं, मला पिझ्झा, बर्गरच हवा! मग मात्र मांजरीचा नाईलाज झाला. तिने बाळासाठी मसालेदार पिझ्झा मागवला. बाळाने तो मिटक्या मारत खाल्ला.पुढच्या दिवशी मांजरीच्या बाळाने चायनीज भेळ मागवली. कधी कुरकुरे, तर कधी वडापाव! मांजरीला चिंता वाटू लागली. पण बाळाच्या हट्टापुढे तिला काहीच करता येईना. थोड्या दिवसातच बाळाचं पोट फुगलं. वजन इतकं वाढलं की बाळाला चालता येईना. त्यानंतर एक दिवस असा उजाडला की बाळाच्या पोटात दुखू लागलं. इतकं की ते रडू लागलं. गडबडा लोळू लागलं. शेवटी मांजरीने बाळाला डॉक्टरकडे नेलं. एक दिवस दवाखान्यात ठेवलं. तेव्हा कुठे बाळाला बरं वाटलं. पूर्ण दिवसभरात डॉक्टरने बाळाला दोन वेळा सुई टोचली, तीन-चार वेळा कडू औषध प्यायला दिलं. सात-आठ कडू कडू गोळ्या खायला दिल्या. औषधाने तर बाळाच्या तोंडाची चवच गेली. शिवाय तिथलं चव नसलेलं जेवण! हे सारं पाहून बाळ मनातून हादरलं. पिझ्झा, बर्गर खाऊन असं होत असेल तर ते न खाल्लेलं बरं; असं बाळानं मनोमन ठरवलं.घरी सोडताना डॉक्टर म्हणाले, “बाळा जर असेच बाहेरचे पदार्थ खाल्ले तर पुन्हा आजारी पडशील आणि पुढच्या वेळी पोट कापावे लागेल तुझे!” ते ऐकून बाळ खूप घाबरलं. मग मांजर आपल्या बाळाला घेऊन घरी आली. पाहते तर काय बाळाचे वर्गमित्र, बालमित्र हजर! बाळाला भेटायला. प्रत्येकाने बाळासाठी भेट आणली होती. कोणी पिझ्झा, कोणी वडापाव, तर कोणी चायनीजची भेळ! पण बाळाने नम्रपणे सांगितले, “हे असेल पदार्थ रोज खाणे चांगले नाही. तुम्ही सर्व परत घेऊन जा आणि तुम्हीसुद्धा खाऊ नका.” बाळाला आलेलं शहाणपण पाहून मांजरीचे डोळे पाणावले.
Bhor News: अचानक पेटला डोंगर! पुढे ग्रामस्थांनी जे केलं, ते पाहून तुम्हीही कराल सलाम
प्रभात वृत्तसेवा भोर – पिसावरे (ता.भोर) येथील डोंगराच्या शेजारील परिसरात अज्ञात व्यक्तींनी वणवा लावला. दरम्यान या वणव्यामुळे झाडे, झुडपे व गवत जळून खाक झाले. याचा थेट परिणाम परिसरातील वन्यजीवांवर होणार असल्याने याबाबत स्थानिक नागरिकांनी चिंता व्यक्त करीत काही ग्रामस्थ एकत्र येत झाडांच्या फांद्या तोडून, माती व पाण्याचा वापर करून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवले. ग्रामस्थांच्या […] The post Bhor News: अचानक पेटला डोंगर! पुढे ग्रामस्थांनी जे केलं, ते पाहून तुम्हीही कराल सलाम appeared first on Dainik Prabhat .
साप्ताहिक राशिभविष्य, १४ ते २० डिसेंबर २०२५
साप्ताहिक राशिभविष्य, १४ ते २० डिसेंबर २०२५उत्साहात भर पडेलमेष : कलाकार तसेच साहित्य क्षेत्रातील जातकांना प्रसिद्धीसह धनलाभाचे योग. नवीन कामे मिळतील. पूर्वी केलेल्या कामांचे फळ मिळू शकते. आपला बराचसा वेळ या सप्ताहात घरगुती कामात जाण्याची शक्यता आहे. घरातील समस्या सोडविण्याची जबाबदारी घेतल्यामुळे आपल्याला समाधान मिळेल. नोकरदारांना दिलासा मिळण्याची शक्यता. सरकारी नोकरीत कामाचे स्वरूप बदलू शकते. अतिरिक्त कार्यभार सोपविला जाण्याची शक्यता. बदलीसाठी तयार राहा. मात्र पदोन्नती व वेतनवृद्धी होऊ शकते. त्यामुळे आपल्या उत्साहात भर पडेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. काही धाडसी निर्णय घ्यावे लागतील. व्यवसायात आर्थिक मदतीची गरज भासू शकते.नियोजन सफल होईलवृषभ : अनुकूल ग्रहमानाची साथ मिळाल्यामुळे पूर्वी केलेले नियोजन आता पूर्ण आकारबद्ध रीतीने होताना दिसेल. नियोजित कामे पार पाडू शकाल. नोकरीत अनुकूल परिस्थितीचा अनुभव घ्याल. वरिष्ठांची मर्जी टिकवण्यात यश मिळेल. आपली मते इतरांना पटवून देता येतील. राहत्या घराबाबतचे प्रश्न सुटतील. व्यवसायात आपण व्यवसायिक विस्तार करू शकता. संगणक, क्रीडा क्षेत्रातील जातकांना उत्तम काळ राहील. घरामध्ये एखादा छोटासा कार्यक्रम होईल. आप्तेष्टांच्या गाठीभेटी होऊ शकतात. नातेवाईक, मित्रमंडळी भेटतील. आर्थिक बाजू भक्कम राहिल्यामुळे समाधानी व उत्साही राहाल. आरोग्य उत्तम राहील. कौटुंबिक वातावरण चांगले राहील मित्रमंडळींच्या गाठीभेटी होतील. कौटुंबिक गोष्टींकडे लक्ष द्या. विद्यार्थी प्रगती करू शकतील.
भोर नगरपालिकेची मोठी कारवाई; नॅशनल हायवेसाठी ‘या’भागातील अतिक्रमणे जमीनदोस्त होणार?
प्रभात वृत्तसेवा भोर – भोर नगरपालिकेच्या हद्दीत भोर – महाड रस्त्यावर रामबाग ते महाड नाका या दरम्यान अतिक्रमणे झालेली आहेत. यादरम्यान सद्यस्थितीला रस्त्याचे काम सुरू करावयाचे असल्याने मालमत्ताधारकांनी ही अतिक्रमणे लवकरात लवकर काढावीत, याबाबत भोर नगरपालिकेकडून नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. लवकरात लवकर अतिक्रमणे काढण्याचे आवाहन कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग, पुणे व भोर नगरपालिकेने केले […] The post भोर नगरपालिकेची मोठी कारवाई; नॅशनल हायवेसाठी ‘या’ भागातील अतिक्रमणे जमीनदोस्त होणार? appeared first on Dainik Prabhat .
Satara News: मतपेट्यांच्या गोदामावर शिंदे गटाचा वॉच! नीलेश मोरेंची रिक्षा स्वारी; केली पाहणी
प्रभात वृत्तसेवा सातारा – सातारा नगरपालिकेची मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. मतदारांचे भविष्य मतपेटीत बंद झाल्यावर औद्योगिक वसाहतीतील शासकीय गोदामात मतपेट्या ठेवण्यात आल्या. त्यावर शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा वॉच असून शिवसेनेचे उमेदवार नीलेश मोरे यांनी गुरुवारी रिक्षा स्वारी करत गोदामाची पाहणी केली. सातारा नगरपालिकेची मतदान प्रक्रिया दि. 2 डिसेंबर रोजी पूर्ण झाली. दि. 3 डिसेंबर रोजीची […] The post Satara News: मतपेट्यांच्या गोदामावर शिंदे गटाचा वॉच! नीलेश मोरेंची रिक्षा स्वारी; केली पाहणी appeared first on Dainik Prabhat .
नागपूर : 'फनेल झोन'सह मुंबईतील प्रतिबंधित क्षेत्रांच्या पुनर्विकासाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. त्यासाठी राज्य सरकारने ‘हाऊसिंग फॉर ऑल’ ही नवी योजना जाहीर केली असून, फनेल झोन, जुहू लष्करी ट्रान्समिशन स्टेशन, कांदिवली-मालाड सीओडी परिसरातील उंची आणि इतर निर्बंधांमुळे अडकलेल्या भागांत आता पूर्ण क्षमतेने पुनर्विकास शक्य होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी विधानसभेत याबाबत निवेदन केले.या योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (ईडब्ल्यूएस) ३०० चौ. फूट आणि कमी उत्पन्न गटासाठी (एलआयजी) ६०० चौ. फूटांपर्यंतच्या सदनिकांचा पुनर्विकास विनाशुल्क करता येणार आहे. यासाठी प्रोत्साहनात्मक एफएसआय (इन्सेंटिव्ह एफएसआय) उपलब्ध करून देण्यात येणार असून, मूळ जमीनमालकांचा मूलभूत एफएसआयचा हक्क अबाधित राहील. न वापरता राहिलेल्या एफएसआयला (अनकंझ्युम्ड एफएसआय) टीडीआर स्वरूपात उपलब्ध करून देण्याची तरतूद आहे, ज्यामुळे प्रकल्पांसाठी निधी उभारणी सोपी होईल. तसेच, डीसीआर ३३(७) आणि ३३(९) अंतर्गतचे विद्यमान प्रोत्साहन, प्रीमियम आणि इतर फायदे कायम राहतील.मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘या योजनेमुळे मुंबईतील सर्व पुनर्विकास प्रकल्प व्यवहार्य होतील आणि त्यांना गती मिळेल. यापूर्वी अव्यवहार्य ठरलेले प्रकल्प, जसे जुहू लष्करी परिसर आणि कांदिवली-मलाड सीओडी भागातील, आता शक्य होतील. तेथील रहिवाशांना याचा थेट फायदा होईल.’’ पुनर्विकासातील इतर अडथळे दूर करण्यासाठीही सरकार प्रयत्नशील राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.दहिसर आणि जुहूमधील रडारचे स्थलांतरपुनर्विकासातील आणखी एक मोठा अडथळा दूर करण्यासाठी दहिसर आणि जुहू (डी. एन. नगर) येथील उच्च वारंवारता रडार केंद्रे तांत्रिकदृष्ट्या योग्य ठिकाणी स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या रडारमुळे परिसरातील इमारतींच्या उंचीवर कडक निर्बंध आहेत, ज्यामुळे पुनर्विकास अशक्य झाला होता. केंद्राच्या नागरी विमान वाहतूक मंत्रालय आणि एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया (एएआय) ने दहिसरचे रडार गोराईला हलवण्यास सहमती दिली आहे. महाराष्ट्र सरकार स्थलांतराचा खर्च उचलेल आणि पर्यायी जमीन मोफत उपलब्ध करून देईल. बदल्यात, एएआय दहिसर येथील आपल्या ५० टक्के जमिनीचा वापर सार्वजनिक उद्यानासाठी करेल. जुहूच्या रडारसाठीही सरकारने एएआयच्या तांत्रिक पथकाला पर्यायी जागा सुचवली असून, पथकाची पाहणी सुरू आहे. तांत्रिक अभ्यास पूर्ण झाल्यानंतर स्थलांतराला मंजुरी मिळेल. या स्थलांतरानंतर दहिसर आणि जुहू परिसरातील पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
नागपूर : प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत नागपूर शहरात आधुनिक मासळी बाजार केंद्र उभारले जाणार आहे. आमचे नेते नितीन गडकरी नेहमी म्हणतात, की आमच्या शहरात मच्छीमार्केट, मटन मार्केट हे आधुनिक असायला हवेत. कारण, या व्यवस्था चांगल्या नसल्या, तर लोकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होतो. मी मंत्री नितेश राणे यांचे आभार मानेन, की त्यांच्या विभागाने नागपूर शहरासाठी आधुनिक मासळी बाजार तयार करण्याचा निर्णय घेतला आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.परमवीरचक्र विजेत्या सैनिकांना समर्पित 'वंदे मातरम् उद्याना'चे लोकार्पण शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत नागपूर शहरात उभारल्या जाणाऱ्या आधुनिक (घाऊक आणि किरकोळ) मासळी बाजार केंद्राचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाइन माध्यमातून करण्यात आले. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे, आमदार प्रवीण दटके यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते. या आधुनिक मासळी बाजाराचे काम जेव्हा पूर्ण होईल, तेव्हा तेव्हा विक्रेते आणि ग्राहकांना त्याचा मोठा फायदा होईल. या मार्केटला नाथूबाबा यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी आहे. त्याबाबत लवकरच निर्णय करू, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.प्रकल्पाची वैशिष्ट्ये काय?- हा आधुनिक मासळी बाजार ५ एकर क्षेत्रावर विकसित होईल. यात ३.६ ४ मीटर आकाराचे एकूण ६० घाऊक व किरकोळ विक्री गाळे, दुचाकी-चारचाकी वाहनांसाठी पुरेसे पार्किंग, प्रशासकीय ब्लॉक आणि उपहारगृह, ७ टन क्षमतेचे कोल्ड स्टोरेज, १२ ते १५ मीटर रुंद कॉंक्रिट रस्ते, वीज-पाणी पुरवठा, तसेच स्वतंत्र पुरुष-महिला प्रसाधनगृहे अशा मूलभूत सुविधा असतील. हा प्रकल्प शहरातील मासळी विक्रेत्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार असून, रस्त्यांवरील अस्वच्छता आणि अनियोजित मत्स्यविक्रीच्या समस्येवर कायमस्वरुपी तोडगा मिळणार आहे.- केंद्र व राज्य सरकारच्या संयुक्त पुरस्कृत योजनेतून हा प्रकल्प राबविला जात आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, एकूण २१.०५५८ कोटी इतका खर्च अपेक्षित आहे. यात केंद्राचा वाटा ८.९६५४ कोटी, राज्याचा ५.९७६९ कोटी आणि नागपूर महानगरपालिकेचा ६.११३५ कोटी रुपये आहे. पर्यावरणपूरक बाबींनाही यात प्राधान्य देण्यात आले आहे.- यात २० केएलडी क्षमतेचा सिव्हेज ट्रीटमेंट प्लँट, ३० केएलडीचा एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लँट, कचरा व्यवस्थापनासाठी रेंडरिंग प्लँट, पर्जन्यजल संचयन, अग्निशामक यंत्रणा, सौर ऊर्जा, सीसीटीव्ही आणि कंपाउंड वॉल यांचा समावेश आहे. या सुविधांमुळे बाजार स्वच्छ, सुरक्षित व टिकाऊ बनेल.फायदा काय होणार?सध्या नागपूरमध्ये मासळी विक्री मुख्यतः रस्त्यावर किंवा असंघटित पद्धतीने होते. त्यामुळे स्वच्छता आणि वाहतूक समस्या उद्भवतात. भाडेवाडी येथील हा आधुनिक बाजार विशेषतः पूर्व आणि दक्षिण नागपूरातील विक्रेत्यांसाठी उपयुक्त ठरेल. १० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर शहराला पहिला पूर्ण सुसज्ज मासळी बाजार मिळणार असल्याने विक्रेते व ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
नागपूर : परराज्यातून महाराष्ट्राच्या सागरी क्षेत्रात येणाऱ्या मच्छिमार नौकांमुळे राज्यातील मच्छिमारांचे आर्थिक नुकसान होते. याचा विचार करून या परराज्यातील मच्छिमारी नौकांवर कारवाई करण्यासाठी आणि किनारपट्टीची सुरक्षा भक्कम करण्याच्या दृष्टीने लवकरच १५ हाय स्पीड गस्ती नौका राज्यात दाखल होणार असल्याची माहिती मस्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी शनिवारी विधानसभेत दिली.मंत्री राणे म्हणाले की, सध्या गस्तीसाठी मत्स्यव्यवसाय विभागाकडे लाकडी बोटी आहेत. या बोटींमधून परराज्यातून आलेल्या मच्छिमार नौकांचा पाठलाग करून त्यांना पकडणे शक्य होत नाही. त्यामुळे हाय स्पीड नौका घेण्यात येत आहेत. त्याशिवाय ड्रोनच्या मदतीने गस्त घातली जात आहे. त्यामाध्यमातून परराज्यातील नौका, अवैध मासेमारी आणि इतर बेकायदेशीर गोष्टींवर नियंत्रण आणले असल्याची माहिती मस्यव्यवसाय मंत्री राणे यांनी दिली
‘या’ 10 कंपन्यांच्या बाजार मूल्यात पाच वर्षात तब्बल 46 लाख कोटी रुपयांची वाढ
मुंबई – शेअर बाजारात गेल्या पाच वर्षात एकतर्फी तेजी नसली तरी दहा कंपन्यांच्या बाजार मूल्यात या पाच वर्षात तब्बल 46 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे या कंपन्यांचे शेअर बाळगणार्यांना चांगला परतावा मिळाला आहे. 2020 ते 25 या कालावधीत उत्तम कामगिरी करणार्या या कंपन्यांमध्ये बँका, तंत्रज्ञान, इंडस्ट्रियल्स, एफएमसीजी क्षेत्रातील कंपन्या आहेत. म्हणजे विविध क्षेत्रातील […] The post ‘या’ 10 कंपन्यांच्या बाजार मूल्यात पाच वर्षात तब्बल 46 लाख कोटी रुपयांची वाढ appeared first on Dainik Prabhat .
WBBL 2025 : १० वर्षांनंतर होबार्ट हरिकेन्सने पटकावले पहिले जेतेपद! RCB प्रमाणे केला ‘डबल’धमाका
Hobart Hurricanes won maiden WBBL title 2025 : २०२५ हे वर्ष क्रिकेट विश्वासाठी अनेक वर्षांची प्रतीक्षा संपवणारे ठरले आहे. याच वर्षी जूनमध्ये आरसीबी संघाने १७ वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर प्रथमच आयपीएलचे जेतेपद पटकावले होते. त्याचप्रमाणे, आता १० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर विमेन्स बिग बॅश लीग २०२५ मध्ये होबार्ट हरिकेन्सला यश मिळाले आहे. शनिवारी १३ डिसेंबर रोजी झालेल्या ११ […] The post WBBL 2025 : १० वर्षांनंतर होबार्ट हरिकेन्सने पटकावले पहिले जेतेपद! RCB प्रमाणे केला ‘डबल’ धमाका appeared first on Dainik Prabhat .
Silver Prices: 2026 अखेरपर्यंत चांदी 2.40 लाखांवर पोहोचण्याची शक्यता; Axis सिक्युरिटीजचा अहवाल
मुंबई – मागणी जास्त आणि पुरवठा कमी या परिस्थितीमुळे चांदीचे दर शुक्रवारी दोन लाख रुपये प्रति किलो या पातळीपर्यंत गेले होते. आगामी काळातही अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता जास्त आहे. अशा परिस्थितीत 2026 च्या अखेरपर्यंत चांदीचे दर 20 टक्क्यांनी वाढवून 2 लाख 40 हजार रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही असे अॅक्सिस सिक्युरिटीज या संस्थेच्या या […] The post Silver Prices: 2026 अखेरपर्यंत चांदी 2.40 लाखांवर पोहोचण्याची शक्यता; Axis सिक्युरिटीजचा अहवाल appeared first on Dainik Prabhat .
इस्त्रायलच्या विरोधात 8 मुस्लिम देश एकवटले; यूएनआरडब्लूए कार्यालयावरील हल्ल्याचा केला निषेध
इस्लामाबाद : पाकिस्तान आणि तुर्कीसह आठ प्रमुख मुस्लिम देश एका मुद्द्यावर इस्रायलविरुद्ध एकत्र आले आहेत. त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या पॅलेस्टिनी निर्वासितांसाठीच्या मदत आणि कार्य एजन्सीला (यूएनआरडब्लूए) जोरदार पाठिंबा दर्शविला आहे आणि या संस्थेच्या कार्यालयावर इस्रायली सैन्याने केलेल्या हल्ल्याचा निषेध केला आहे. अभूतपूर्व मानवीय संकटाच्या काळात गाझामध्ये यूएनआरडब्लूएची भूमिका अतुलनीय असल्याचे या देशांनी म्हटले आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र […] The post इस्त्रायलच्या विरोधात 8 मुस्लिम देश एकवटले; यूएनआरडब्लूए कार्यालयावरील हल्ल्याचा केला निषेध appeared first on Dainik Prabhat .
मेक्सिकोने भारतीय वस्तूंवर आयात शुल्क लावले; 5% ते 50% शुल्क आकारणी होणार, भारताची विचारणा
नवी दिल्ली – लॅटिन अमेरिकेतील मेक्सिकोने शुक्रवारी एकतर्फी भारतीय वस्तूवर आयात शुल्क लावले आहे. अशा परिस्थितीत दोन्ही देशांना फायदेशीर ठरेल असे व्यापार धोरण ठरविण्याबाबत भारत सरकार मेक्सिकोशी चर्चा करीत असल्याचे सूत्रांनी सांगितले. मेक्सिकोने भारतावरील वस्तूवर आयात शुल्क लावल्यानंतर भारत आपल्या निर्यातदारांचे हितरक्षण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची शक्यता आहे. तसा अधिकार भारताने राखून ठेवला असल्याचे स्पष्ट […] The post मेक्सिकोने भारतीय वस्तूंवर आयात शुल्क लावले; 5% ते 50% शुल्क आकारणी होणार, भारताची विचारणा appeared first on Dainik Prabhat .
राजकुमार गोयल नवे मुख्य माहिती आयुक्त
नवी दिल्ली : माजी आयएएस अधिकारी राजकुमार गोयल नवे मुख्य माहिती आयुक्त म्हणून सुत्रे हाती घेतील. त्यांना सोमवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील तीन सदस्यीय समितीने गोयल यांच्या नावाची शिफारस केली. तसेच, इतर ८ माहिती आयुक्तही निश्चित केले. गोयल हे भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) १९९० च्या तुकडीचे […] The post राजकुमार गोयल नवे मुख्य माहिती आयुक्त appeared first on Dainik Prabhat .
Money-back policy: मुलांच्या भविष्यासाठी ‘मनीबॅक पॉलिसी’घ्यावी का? जाणून घ्या…
Money-back policy: गेल्या काही वर्षांत मुलांच्या शिक्षणखर्चात प्रचंड वाढ होताना दिसत आहे. शाळेतील फीपासून उच्च शिक्षणापर्यंत प्रत्येक टप्प्यावर खर्चाचा आलेख सातत्याने वर जात आहे. अशा परिस्थितीत पालकांनी मुलांच्या भविष्यासाठी योग्य आर्थिक नियोजन करणे अत्यावश्यक ठरते. या नियोजनात मनीबॅक पॉलिसी आणि म्युच्युअल फंड एसआयपी हे दोन पर्याय बहुतेक पालकांच्या चर्चेत नेहमी दिसून येतात. या दोन्ही पर्यायांचा […] The post Money-back policy: मुलांच्या भविष्यासाठी ‘मनीबॅक पॉलिसी’ घ्यावी का? जाणून घ्या… appeared first on Dainik Prabhat .
Donald Trump : अमेरिका व्हेनेझुएलावर हल्ला करणार; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली घोषणा
वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळात विविध देशांमधील किमान आठ युद्धे आपण थांबवल्याचे मोठे दावे केले असले तरी, यावेळी त्यांनी स्वतःच या युद्धात उडी घेतली आहे. ट्रम्प यांनी लवकरच व्हेनेझुएलावर जमिनीवरून हल्ला करणार असल्याची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केले. तथापि, त्यांनी तारीख स्पष्ट केली नाही. गेल्या दोन महिन्यांपासून अमेरिका आणि व्हेनेझुएलातील […] The post Donald Trump : अमेरिका व्हेनेझुएलावर हल्ला करणार; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली घोषणा appeared first on Dainik Prabhat .
Chhagan Bhujbal: शस्त्रक्रियेनंतर छगन भुजबळांचा पहिला फोटो समोर; प्रकृती स्थिर
मुंबई – राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची नुकतीच एक शस्त्रक्रिया पार पडली आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून, ते रुग्णालयात उपचार घेत आहेत. या शस्त्रक्रियेनंतर भुजबळ यांचा पहिला फोटो आज समोर आला आहे, जो राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. आज मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी […] The post Chhagan Bhujbal: शस्त्रक्रियेनंतर छगन भुजबळांचा पहिला फोटो समोर; प्रकृती स्थिर appeared first on Dainik Prabhat .
इस्लामाबाद : पाकिस्तानचे संरक्षण दल प्रमुख (सीडीएफ) झाल्यानंतर फील्ड मार्शल असीम मुनीर दररोज दर्पोक्ती करत भारताच्या विरोधात फुत्कार सोडताना दिसत आहेत. त्यांनी पुन्हा एकदा भारताविरुद्ध प्रक्षोभक विधान केले आहे. यावेळी त्यांनी भारताचे नाव घेतले नसले तरी त्यांनी अप्रत्यक्षपणे भारताच्या विरोधातच आपला मुद्दा मांडला. पाकिस्तानचे सुरक्षा दल बाह्य आणि अंतर्गत धोक्यांना तोंड देण्यासाठी पूर्णपणे तयार आहेत […] The post Asim Munir : पाकिस्तानचे सुरक्षा दल धोक्यांना तोंड देण्यासाठी सज्ज; असीम मुनीर यांनी छावणी क्षेत्रांना दिली भेट appeared first on Dainik Prabhat .
नागपूर : राज्यात जेथे शाळा तेथे शिक्षक उपलब्ध करुन दिले जाणार असून एकही शाळा शिक्षकाविना राहणार नाही, अशी ग्वाही शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी विधान परिषदेत दिली. सदस्य किरण सरनाईक यांनी अनेक शाळांमध्ये संचमान्यतेमुळे शिक्षक उपलब्ध होणार नाहीत याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. राज्यमंत्री डॉ. भोयर म्हणाले, संच मान्यतेबाबतच्या १५ मार्च २०२४ च्या शासन […] The post Pankaj Bhoyar : राज्यातील एकही शाळा शिक्षकाविना राहणार नाही; शालेय शिक्षण राज्यमंत्र्यांनी दिली ग्वाही appeared first on Dainik Prabhat .
Pune News : भूमिगत केबल कामामुळे मेलोडीना रोडवर वाहतूक बदल
पुणे : लष्कर वाहतूक विभागाच्या हद्दीत मेलोडीना रोडवरील नेहरू मेमोरियल चौक (एचपी पेट्रोल पंप) ते नवीन जिल्हा परिषद (ZP) इमारत या दरम्यान महावितरण विभागाकडून भूमिगत उच्चदाब विद्युत वाहिनी केबल टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम आज (दि. १३ डिसेंबर) रात्री ९ वाजल्यापासून सुरू होणार असून साधारणपणे १५ डिसेंबर २०२५ पर्यंत, म्हणजेच तीन दिवस […] The post Pune News : भूमिगत केबल कामामुळे मेलोडीना रोडवर वाहतूक बदल appeared first on Dainik Prabhat .
लखनऊ: लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर उत्तर प्रदेशात (यूपी) आपले ओबीसी (इतर मागासवर्गीय) आणि विशेषतः कुर्मी व्होट बँक मजबूत करण्यासाठी भाजपने मोठी खेळी केली आहे. केंद्रीय मंत्री पंकज चौधरी यांची भाजपच्या उत्तर प्रदेश प्रदेशाध्यक्षपदी निवड निश्चित झाली आहे. रविवारी अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्या नामांकनाला पाठिंबा दिल्याने ही निवड जवळपास निर्विरोध […] The post Pankaj Chaudhary: ‘या’ कारणासाठी भाजपच्या उत्तर प्रदेश प्रदेशाध्यक्षपदी केंद्रीय मंत्री पंकज चौधरी यांची निवड; लोकसभा निवडणुकीशी संबंध appeared first on Dainik Prabhat .
कृत्रिम बुद्धिमत्ता युगातील मनुष्यबळ: विश्वकर्मा विद्यापीठात पूर्व-शिखर परिषदेचे आयोजन
पुणे: कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) वेगाने बदलणाऱ्या युगात मनुष्यबळ विकासाची दिशा निश्चित करण्यासाठी शहरातील अग्रगण्य विश्वकर्मा विद्यापीठ (VU) आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या (AICTE) वतीने महत्त्वपूर्ण पूर्व-शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘कृत्रिम बुद्धिमत्ता युगातील मनुष्यबळ’ या विषयावर होणारी ही परिषद सोमवार, १५ डिसेंबर रोजी हयात इस्ता, पुणे येथे सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत […] The post कृत्रिम बुद्धिमत्ता युगातील मनुष्यबळ: विश्वकर्मा विद्यापीठात पूर्व-शिखर परिषदेचे आयोजन appeared first on Dainik Prabhat .
England Team security guard clash cameraman : ॲशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाकडून ०-२ अशी मोठी पिछाडी मिळाल्यानंतर इंग्लंडचा संघ आता ॲडलेड येथे तिसऱ्या कसोटीसाठी सज्ज होत आहे. मात्र, या महत्त्वपूर्ण सामन्यापूर्वी पाहुणा संघ एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. ब्रिस्बेन विमानतळावर इंग्लंड संघाच्या सुरक्षा कर्मचाऱ्याची आणि एका मीडिया कॅमेरा ऑपरेटरची जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली, ज्याचा व्हिडिओ सध्या […] The post AUS vs ENG : तिसऱ्या कसोटीपूर्वी हाय-व्होल्टेज ड्रामा! इंग्लंड संघाच्या सुरक्षा रक्षकाची कॅमेरामॅनशी झटापट, पाहा VIDEO appeared first on Dainik Prabhat .
MGNREGA scheme: ‘मनरेगा’योजनेत ‘हे’मोठे बदल होणार; कामगारांना काय फायदा जाणून घ्या…
नवी दिल्ली: केंद्र सरकार लवकरच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियमामध्ये (मनरेगा) मोठे बदल करण्याच्या तयारीत आहे. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्रिमंडळाने या योजनेअंतर्गत रोजगाराचे दिवस १०० वरून १२५ करण्याच्या आणि योजनेचे नाव बदलून ‘पूज्य बापू ग्रामीण रोजगार हमी अधिनियम’ (Poojya Bapu Rural Employment Guarantee Act) करण्याच्या प्रस्तावावर चर्चा केली आहे. रोजगार दिवसांमध्ये […] The post MGNREGA scheme: ‘मनरेगा’ योजनेत ‘हे’ मोठे बदल होणार; कामगारांना काय फायदा जाणून घ्या… appeared first on Dainik Prabhat .
Eknath Shinde : एकनाथ शिंदे २ महिन्यात पुन्हा मुख्यमंत्री होणार? ‘या’नेत्याची भविष्यवाणी खरी ठरणार?
Eknath Shinde : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भविष्याबाबत मोठे भाकीत वर्तवले आहे. शिंदे हे येत्या एक ते दोन महिन्यांत पुन्हा मुख्यमंत्री होतील, असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश झाले आहेत. याचा सर्वाधिक फटका […] The post Eknath Shinde : एकनाथ शिंदे २ महिन्यात पुन्हा मुख्यमंत्री होणार? ‘या’ नेत्याची भविष्यवाणी खरी ठरणार? appeared first on Dainik Prabhat .
मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी म्हणजेच शनिवारी माजी मंत्री तथा काँग्रेसचे आमदार डॉ. नितिन राऊत यांनी राज्य शासनाच्या बार्टी, सारथी आणि महाज्योती संस्थांमधील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती विहीत वेळेमध्ये मिळण्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला. यावेळी विधानसभेत उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिले. यावेळी त्यांनी सारथी आणि बार्टीच्या पी.एचडी. करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर आता मर्यादा घालणार असल्याची […] The post Ajit Pawar : सारथी-बार्टीच्या पी.एचडी. प्रवेशावर मर्यादा!; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत माहिती appeared first on Dainik Prabhat .
IPL 2026 Auction पूर्वी CSK च्या माजी खेळाडूला मोठा धक्का! बॉलिंग ॲक्शनवर गंभीर प्रश्न उपस्थित
BCCI warned IPL franchises for Deepak Hooda : आयपीएल २०२६ च्या लिलावासाठी (IPL 2026 Auction) अवघे तीन दिवस शिल्लक असताना, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) संघांना एक महत्त्वाची माहिती दिली आहे. भारताचा अष्टपैलू खेळाडू दीपक हुड्डा याच्या गोलंदाजी ॲक्शनवर अजूनही शंका असल्याने, लिलावात सहभागी होणाऱ्या संघांना याबाबत सावध करण्यात आले आहे. गेल्या वर्षी निराशाजनक कामगिरीमुळे […] The post IPL 2026 Auction पूर्वी CSK च्या माजी खेळाडूला मोठा धक्का! बॉलिंग ॲक्शनवर गंभीर प्रश्न उपस्थित appeared first on Dainik Prabhat .
रडार स्थलांतराला केंद्राची संमती; दहिसर-जुहू परिसरातील पुनर्विकासाला मिळणार गती
मुंबई : दहिसर आणि जुहू (डी.एन.नगर) येथील उच्च वारंवारता रडार केंद्रांमुळे रखडलेला पुनर्विकास मार्गी लावण्यासाठी तसेच ‘Housing for All’ या महत्त्वाकांक्षी उद्दिष्टासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे महत्त्वाचे निवेदन सादर केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर करण्यात आलेल्या या निवेदनात रडार स्थलांतर आणि नव्या गृहनिर्माण धोरणाची सविस्तर मांडणी करण्यात आली आहे.दहिसर आणि जुहू परिसरात असलेल्या उच्च वारंवारता रडार केंद्रांच्या आजूबाजूला इमारतींच्या उंचीवर मर्यादा येत असल्याने या भागांचा पुनर्विकास अडचणीत आला आहे. त्यामुळे ही रडार केंद्रे तांत्रिकदृष्ट्या योग्य असलेल्या इतर ठिकाणी स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालय, भारत सरकारआणि एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया यांनी दहिसर येथील रडार गोरेगाव येथे स्थलांतरित करण्यास संमती दर्शवली आहे.या प्रक्रियेसाठी महाराष्ट्र सरकारने स्थलांतराचा खर्च उचलण्याची तसेच पर्यायी जमीन उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली आहे. गोरेगाव येथील जमीन भारत सरकारकडे विनामूल्य हस्तांतरित केली जाणार असून, एएआय दहिसर येथील ५० टक्के जमीन सार्वजनिक बागेसाठी वापरणार आहे. एएआयच्या तांत्रिक पथकाला जुहू येथील रडारसाठीही पर्यायी जागेची पाहणी करण्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. तांत्रिक अभ्यास पूर्ण झाल्यानंतर जुहू रडार स्थलांतराच्या मंजुरीची प्रक्रिया सुरू होणार आहे.
नागपूर : राज्यातील भूजलाशयीन मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांच्या नोंदणीसाठी दि. १२ मे २०२३ च्या शासन निर्णयाला तात्काळ स्थगिती देण्यात येत असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी शनिवारी नागपुरात केली. या निर्णयामुळे राज्यभरातील भोई, ढिवर, कहार आणि मच्छीमार समाजाला मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र राज्य मच्छिमार संघर्ष कृती समिती आणि विदर्भ विभागीय मच्छिमार सहकारी संघाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'भोई, ढिवर, कहार, मच्छिमार समाजाचा आभार मेळावा' आणि 'भूजलाशयीन मच्छिमार सहकारी संस्था परिषदे'त ते बोलत होते.मत्स्यव्यवसायाला कृषीचा दर्जा मिळवून दिल्याबद्दल आणि महाराष्ट्र भूजलाशयीन मच्छिमार कल्याणकारी महामंडळ स्थापन करून ५० कोटींची तरतूद केल्याबद्दल मच्छीमार बांधवांच्या वतीने मंत्री राणेंचा भव्य सत्कार करून आभार व्यक्त करण्यात आले. यावेळी बोलताना मंत्री राणे म्हणाले, १२ मे २०२३ च्या शासन निर्णयामुळे खऱ्या मच्छिमार संस्थांना अडचणी निर्माण येत होत्या. तलावांच्या ठेक्यांवरून उद्भवलेले वाद आणि प्राथमिक संस्थांच्या कामकाजातील अडथळे लक्षात घेऊन, ही स्थगिती देण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.बोगस संस्थांवर कठोर कारवाईबोगस संस्थांबाबत कठोर भूमिका घेत मंत्री राणे म्हणाले, ज्यांच्या नावाने संस्था आहे, तेच लोक तलाव चालवताना (मासेमारी करताना) दिसले पाहिजेत. कोणाचे नाव वापरून तिसऱ्या व्यक्तीने फायदा घेतला किंवा संस्था निष्क्रिय असेल, तर मी जागेवरच त्या संस्थेची नोंदणी रद्द करेन, असा इशारा त्यांनी दिला. स्थानिक भोई आणि मच्छीमार समाजालाच तलावांचे हक्क मिळाले पाहिजेत, हीच सरकारची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आभारमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महायुती सरकार सर्वसामान्यांचे असून मच्छिमारांच्या हितासाठी कटिबद्ध आहे, असा विश्वास मंत्री राणे यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, मी फक्त कोकणातील समुद्री मच्छीमारांचाच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रातील गोड्या पाण्यातील मच्छिमारांचाही मंत्री आहे. बजेट वाढवून घेण्यापासून ते सर्व मागण्या पूर्ण होईपर्यंत मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन.\गेल्या १२ महिन्यांत फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाने मच्छीमारांसाठी अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत. गोड्या पाण्यातील मासेमारीवर विशेष लक्ष केंद्रित करून या समाजाचे उत्पन्न वाढवण्याची जबाबदारी त्यांनी माझ्यावर सोपवली असून ती मी यशस्वीपणे पूर्ण करेन, असा शब्दही त्यांनी दिला.विधानसभेत निवेदनमत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांच्या मागणीनुसार १२ मे २०२३ च्या सुधारित शासन निर्णयाला स्थगिती देण्यात आल्याची माहिती मंत्री नितेश राणे यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली. भूजलाशयीन मत्स्यव्यवसाय संस्थांनी आक्षेप घेतल्यानंतर शासनाने दखल घेऊन १२ डिसेंबर २०२५ च्या निर्णयान्वये प्राथमिक संस्था, विविध कार्यकारी संस्था, जलाशय संघ आणि जिल्हा संघांच्या नोंदणीसाठीच्या सुधारित निकषांना स्थगिती दिली आहे. यामुळे दुर्बल घटकांना संधी मिळेल आणि उत्पादन क्षमता वाढेल, असा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
बेंगळूरु: कर्नाटकमधील काँग्रेस पक्षात गेले काही महिने सुरू असलेल्या मुख्यमंत्रीपदाच्या ‘खुर्ची युद्धा’ला रामनगरचे काँग्रेस आमदार एच.ए. इक्बाल हुसैन यांच्या ताज्या विधानामुळे पुन्हा एकदा धार आली आहे. उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार (DK Shivakumar) हे ६ जानेवारी रोजी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारतील, असा खळबळजनक दावा हुसैन यांनी केला आहे, ज्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. काँग्रेसमध्ये सध्या मुख्यमंत्री […] The post कर्नाटकमध्ये राजकीय भूकंप? ‘6 जानेवारीला डीके शिवकुमार मुख्यमंत्री होतील,’ काँग्रेस आमदाराच्या दाव्याने खळबळ appeared first on Dainik Prabhat .
मुंबईत मुली बेपत्ता होण्यावर राज ठाकरेंचा सवाल; मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र
मुंबई : राज्यात विशेषतः मुंबईत मुली आणि लहान मुली बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होत असल्याचा मुद्दा उपस्थित करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. गेल्या दहा महिन्यांत राज्यात मुलींच्या अपहरणाचे तब्बल १,१८७ गुन्हे दाखल झाले असून दररोज सरासरी चार ते पाच मुली बेपत्ता होत असल्याची गंभीर बाब त्यांनी अधोरेखित केली आहे.राज ठाकरे यांनी पत्रात नमूद केले आहे की, एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार २०२१ ते २०२४ या कालावधीत लहान मुलांच्या अपहरणाच्या घटनांमध्ये जवळपास ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. लहान मुलांना पळवून त्यांना कामाला जुंपणे, भीक मागायला लावणे यासाठी आंतरराज्य टोळ्या कार्यरत असल्याचा आरोप करत, या टोळ्या इतक्या बिनधास्तपणे कशा काम करतात, असा सवाल त्यांनी सरकारला केला आहे.प्रति,श्री. देवेंद्र फडणवीस,मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य,सस्नेह जय महाराष्ट्र,एका अत्यंत महत्वाच्या आणि गंभीर विषयाकडे तुमचं लक्ष वेधून घेण्यासाठी हे लिहीत आहे. महाराष्ट्रात लहान मुलं पळवण्याचं, ती बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढतं आहे. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार जरी गेलं…— Raj Thackeray (@RajThackeray) December 13, 2025
दहिसर–जुहू रडार स्थलांतर आणि Housing for All; मुख्यमंत्री फडणवीसांकडे महत्त्वाचं निवेदन
मुंबई : मुंबईतील तील रखडलेल्या पुनर्विकासाला चालना देण्यासाठी ‘Housing for All’ अंतर्गत नवीन धोरण मांडण्यात आले आहे. फनेल झोन, जुहू मिलिटरी ट्रान्समिशन स्टेशन, कांदिवली-मालाड COD परिसर आणि संरक्षित क्षेत्रांमुळे ज्या भागांमध्ये पूर्ण क्षमतेने पुनर्विकास शक्य नव्हता, ते प्रकल्प या नव्या योजनेमुळे व्यवहार्य ठरणार आहेत.या योजनेअंतर्गत EWS घटकासाठी ३०० चौरस फूटपर्यंत मोफत FSI देण्यात येणार असून, LIG घटकासाठी ६०० चौरस फूटपर्यंत सदनिकांचे पुनर्वसन विनाशुल्क केले जाणार आहे. पुनर्विकासासाठी आवश्यक असलेला प्रोत्साहन FSI देण्यात येणार असून, मूळ जमीन मालकांचा बेसिक FSI चा हक्क अबाधित राहणार आहे. न वापरलेला FSI TDR स्वरूपात उपलब्ध करून देण्याची तरतूद करण्यात आली आहे.या धोरणामुळे बृहन्मुंबईतील सर्व पुनर्विकास प्रकल्प शक्य होण्याचा मार्ग मोकळा होणार असून, दीर्घकाळ रखडलेले जुहू मिलिटरी परिसर आणि कांदिवली-मालाड COD परिसरातील प्रकल्पही मार्गी लागण्याची शक्यता आहे. यामुळे लाखो रहिवाशांना दिलासा मिळणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
Gopichand Padalkar : ‘शरद पवारांना भारतरत्न द्या’, ‘या’खासदाराच्या मागणीची पडळकरांनी उडवली खिल्ली
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) चे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांचा नुकताच ८५ वा वाढदिवस (१२ डिसेंबर २०२५) साजरा झाला. वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला दिल्लीत आयोजित स्नेहभोजन कार्यक्रमात काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी, उद्योगपती गौतम अदाणी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक राजकीय आणि उद्योग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाने […] The post Gopichand Padalkar : ‘शरद पवारांना भारतरत्न द्या’, ‘या’ खासदाराच्या मागणीची पडळकरांनी उडवली खिल्ली appeared first on Dainik Prabhat .
ICC Ignored PAK T20 Captain : आगामी टी-२० विश्वचषक २०२६ या स्पर्धेची तयारी सुरू झाली आहे. भारत आणि श्रीलंका येथे आयोजित केल्या जाणाऱ्या या स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) नुकतेच प्रमोशन पोस्टर जारी केले. मात्र, या पोस्टरमध्ये पाकिस्तानच्या टी-२० संघाचा कर्णधार सलमान अली आगाला स्थान न मिळाल्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) तीव्र नाराजी व्यक्त केली […] The post PAK T20 Captain : टी-२० विश्वचषकापूर्वी ICCने पाकिस्तानकडे केले दुर्लक्ष, अपमान झाल्याने संतप्त PCB ने केली तक्रार appeared first on Dainik Prabhat .
American Tariff : अमेरिकेतून भारतासाठी सर्वात मोठी गुडन्यूज; टॅरिफ वॉर संपणार?
नवी दिल्ली/न्युयॉर्क : अमेरिका आणि भारत यांच्यातील व्यापारावर लादण्यात आलेल्या ५०% पर्यंतच्या उच्च आयात शुल्कावर (टॅरिफ) आता थेट अमेरिकेच्या संसदेतच विरोध सुरू झाला आहे. या विरोधात अमेरिकेतील डेमोक्रॅटिक पक्षाचे तीन हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह सरसारवले असून त्यांनी संयुक्त ठराव शुक्रवारी सादर केला आहे. यामुळे दोन्ही देशांतील व्यापार तणाव कमी होण्याची चिन्हे दिसत आहेत. सध्या अमेरिकेने भारतीय […] The post American Tariff : अमेरिकेतून भारतासाठी सर्वात मोठी गुडन्यूज; टॅरिफ वॉर संपणार? appeared first on Dainik Prabhat .
E-Pik Pahani : ई-पीक पाहणी नोंदणी चुकलेल्या शेतकऱ्यांना आता ‘या’तारखेपर्यंत नोंदणी करता येणार
नागपूर : महाराष्ट्राची ई-पीक पाहणी म्हणून ओळखली जाणारी प्रणाली शेतकऱ्यांना मोबाइल ॲप्लिकेशनद्वारे त्यांच्या पिकांची माहिती स्वतः नोंदवण्याची परवानगी देते. ई-पीक पाहणी नोंदणी चुकलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना सरकारी खरेदी केंद्रांवर आपला शेतमाल विकता यावा यासाठी त्यांना १५ जानेवारीपर्यंत ऑफलाइन प्रक्रियेद्वारे नोंदणी करण्याची परवानगी दिली जाईल, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. एखाद्या सदस्याने तातडीची सार्वजनिक बाब […] The post E-Pik Pahani : ई-पीक पाहणी नोंदणी चुकलेल्या शेतकऱ्यांना आता ‘या’ तारखेपर्यंत नोंदणी करता येणार appeared first on Dainik Prabhat .
मोहित सोमण: स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी आहे. बँकेने नुकतीच ग्राहकांना खुशखबर दिली आहे. आता तुम्ही एसबीआय (State Bank of India) ग्राहक असेल तर तुमच्या कर्जाच्या व्याजदरातील हप्त्यात कपात होणार आहे. याविषयी एसबीआयने आपल्या अधिकृत निवेदनात पुढील माहिती स्पष्ट केली. आरबीआयने पतधोरण जाहीर केल्यानंतर रेपो दरात २५ बेसिस पूर्णांकाने कपात करण्याचे स्पष्ट केले. ज्याचा फायदा आता ग्राहकांपर्यंत लवकरात लवकर ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी आरबीआयने बँकाना आदेश दिले होते. या सुचनेनुसार एसबीआयने आपल्या बेस इफेक्टसह व्याजदरात बदल केल्याचे आज स्पष्ट केले. दिनांक १५/१२/२०२५ म्हणजेच परवापासून या अधिसूचनेची अंमलबजावणी केली जाईल हे बँकेने स्पष्ट केले.नव्या माहितीनुसार, एसबीआयनेही आपल्या दरात २५ बेसिस पूर्णांकाने कपात केल्याने ईबीएलआर (External Benchmark Linked Rate EBLR) हा ७.९०% वर आला आहे. यापूर्वी हा दर ८.६५% होता. तर ओव्हरनाईट मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड (MCLR) दरात बँकेने फेरबदल केल्याने हा नवा दर ७.९०% वरून ७.८% वर आला आहे. एक दिवसासाठी ७.९०% वरून ७.८५% व एक वर्षासाठी हा दर ८.७५% वरून ८.७०% पातळीवर आला .तथापि, बँकेने इतर मुदत ठेवींवरील व्याजदर कायम ठेवले आहेत, जे ठेवी जमा करण्यावरील दबावाचे संकेत देतात.बँकेच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार, आता व्याजदर किती? त्याचा फायदा कुणाला?४४४ दिवसांच्या अमृत वृष्टी या विशिष्ट मुदत योजनेचा व्याजदर १५ डिसेंबरपासून ६.६०% वरून ६.४५% पातळीवर आला असल्याचे बँकेने स्पष्ट केले.इंडियन ओव्हरसीज बँकेने (IOB) देखील १५ डिसेंबर २०२५ पासून लागू होणाऱ्या आपल्या कर्ज दरांमध्ये कपात जाहीर केली आहे. बँकेने आपला एक्सटर्नल बेंचमार्क लोन रेट (EBLR) - विशेषतः रेपो लिंक्ड लेंडिंग रेट (RLLR) २५ बेसिस पॉइंट्सने ८.३५% वरून ८.१०% कमी केला आहे. याव्यतिरिक्त बँकेच्या मालमत्ता देय व्यवस्थापन समितीने (ALCO) तीन महिने ते तीन वर्षांपर्यंतच्या सर्व मुदतींसाठी मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स-बेस्ड लेंडिंग रेट (MCLR) मध्ये ५ बेसिस पॉइंट्सची कपात मंजूर केली आहे. या सुधारणांमुळे ज्यांचे कर्ज या बेंचमार्कशी जोडलेले आहे अशा विद्यमान आणि नवीन कर्जदारांचे समान मासिक हप्ते (EMIs) कमी इंडियन ओव्हरसिज बँकेने कमी केले असे म्हटले आहे.'गृह, वाहन आणि वैयक्तिक कर्ज घेऊ इच्छिणाऱ्या किरकोळ ग्राहकांना फायदा होईल. मध्यम लघू सूक्ष्म उद्योग (MSME) आणि कॉर्पोरेट कर्जदारांनाही त्यांच्या निधीच्या खर्चात कपात अनुभवायला मिळेल ज्यामुळे ग्राहकांच्या खेळत्या भांडवलाच्या गरजा (Working Capital Requirments) पूर्ण होतील आणि व्यवसायाच्या वाढीस मदत होईल असेही ओव्हरसीज बँकेने यावेळी नमूद केले आहे. याआधी बँक ऑफ बडोदानेही या आठवड्यात दरकपातीच्या निर्णयानंतर आपल्या मार्केट लिंक आधारित व्याजदरात ७.९०% पातळीवर कपात केली होती. यापूर्वी बँक ऑफ बडोदाने केलेल्या दरकपातीत दर ८.१५% वरून ७.९०% पातळीवर खाली आला.
बकऱ्या जंगलात सोडा, वनमंत्र्यांच्या सूचनेची अजित पवारांनी उडवली खिल्ली
नागपूर : जर बिबट्याच्या हल्ल्यात चार लोक मारले गेले, तर राज्याला १ कोटी रुपये भरपाई म्हणून द्यावे लागतात. म्हणून मी अधिकाऱ्यांना सांगितले की, मृत्यू झाल्यानंतर भरपाई देण्याऐवजी, १ कोटी रुपयांच्या बकऱ्या जंगलात सोडा, जेणेकरून बिबटे मानवी वस्तीत येणार नाहीत, असे वनमंत्री गणेश नाईक यांनी बिबट्यांना भक्ष्याच्या शोधात मानवी वस्त्यांमध्ये येण्यापासून रोखण्यासाठी वन अधिकाऱ्यांना सूचना केल्या […] The post बकऱ्या जंगलात सोडा, वनमंत्र्यांच्या सूचनेची अजित पवारांनी उडवली खिल्ली appeared first on Dainik Prabhat .
तिकीट काढूनही मेस्सीची झलक पाहायला मिळाली नाही; संतप्त चाहत्यांचा स्टेडियममध्ये तोडफोड
कोलकाता : GOAT India Tour अंतर्गत अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी १४ वर्षांनंतर भारतात आला. मेस्सीच्या आगमनामुळे फुटबॉल वेड्या कोलकात्यात उत्साहाचं वातावरण होतं आणि त्याला पाहण्यासाठी हजारो चाहते सॉल्ट लेक स्टेडियममध्ये उपस्थित होते. मात्र, मेस्सीच्या प्रत्यक्ष उपस्थितीदरम्यान अवघ्या काही मिनिटांतच परिस्थिती हाताबाहेर गेली आणि कार्यक्रम अर्धवट थांबवावा लागला.सकाळी ११.३० वाजता मेस्सी स्टेडियममध्ये पोहोचला. कडेकोट सुरक्षा व्यवस्था असतानाही मेस्सी मैदानात येताच चाहत्यांनी त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला. काही जणांनी स्टँडचे गेट तोडण्याचा प्रयत्न केला, तर मेस्सी बाहेर पडताच प्रेक्षकांमध्ये संताप उसळला. केवळ १० मिनिटे स्टेडियममध्ये थांबल्याने नाराज झालेल्या चाहत्यांनी बाटल्या फेकण्यास सुरुवात केली आणि फायबरग्लासच्या खुर्च्यांची तोडफोड केली.परिस्थिती गंभीर होताच ‘GOAT Tour’चे आयोजक व प्रवर्तक शतद्रु दत्ता यांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या मदतीने मेस्सीला तात्काळ स्टेडियममधून बाहेर काढले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांची मोठी धावपळ उडाली. यावेळी ४५०० ते १०००० रुपयांपर्यंतची तिकीटे काढलेल्या अनेक चाहत्यांचा संताप उफाळून आला.
Shashikant Shinde : बिल्डर घरे घेऊन बाहेर विकतात; शशिकांत शिंदे यांचा आरोप
मुंबई : म्हाडामध्ये एक मोठे रॅकेट कार्यरत असून, या ठिकाणी मोठा भ्रष्टाचार सुरू आहे. त्यामुळेच सर्वसामान्य नागरिकांचे नुकसान होत आहे. बिल्डर परस्पर घरे घेतात आणि ते जास्त किमतीने बाहेर विकतात, असा आरोप राष्ट्रवादी(शप) आमदार शशिकांत शिंदे यांनी केला आहे. या रॅकेटची चौकशी करावी अशी मागणी त्यांनी विधान परिषदेत केली आहे. शिंदे म्हणाले, कर्ज माफी संदर्भात […] The post Shashikant Shinde : बिल्डर घरे घेऊन बाहेर विकतात; शशिकांत शिंदे यांचा आरोप appeared first on Dainik Prabhat .
४ तहसीलदार, ४ मंडळ अधिकारी, २ तलाठी निलंबित – ९० हजार ब्रास गौण खनिज गैरव्यवहार प्रकरण – मावळ तालुक्यातील वनीकरणासाठी राखीव क्षेत्रात ९० हजार ब्रास अनधिकृत गौण खनिज उत्खनन केल्याप्रकरणी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कठोर कारवाई केली आहे. या गैरव्यवहारात दोषी आढळलेल्या चार तहसीलदार, चार मंडळ अधिकारी आणि दोन तलाठी यांना निलंबित करण्यात आले आहे. […] The post Today TOP 10 News: राज्यातील बेपत्ता मुलांच्या शोधासाठी विशेष मोहीम, तहसीलदार निलंबन, महाविस्तार अॅप, SBI व्याजदर… वाचा आजच्या टाॅप 10 बातम्या appeared first on Dainik Prabhat .
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यांत बिबट्यांनी ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागातही धुमाकूळ घातला आहे. बिबट्याच्या हल्ल्यात अनेक सर्वसामान्यांना प्राणाला मुकावे लागले असून काही जण जखमी झाले आहेत. भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ च्या कायद्यामुळे बिबट्यांविरोधात वन विभागाला ठोस पावले उचलता येत नसून या कायद्यात सुधारणा करून सूची १ मधून बिबट्याला वगळण्यात यावे, अशी आग्रही मागणी […] The post Naresh Mhaske : बिबट्यांचे हल्ले रोखण्यासाठी वन्यजीव संरक्षणमध्ये सुधारणा आवश्यक; खा. नरेश म्हस्के यांची संसदेत मागणी appeared first on Dainik Prabhat .
Ladki Bahin Yojana : आदिती तटकरेंची ‘या’लाडक्या बहिणींसाठी मोठी घोषणा
मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने राबवल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ई-केवायसी प्रक्रियेत झालेल्या चुका दुरुस्त करण्याची केवळ एकदाच संधी देण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. ही अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत आहे. योजनेच्या बहुतांश लाभार्थी […] The post Ladki Bahin Yojana : आदिती तटकरेंची ‘या’ लाडक्या बहिणींसाठी मोठी घोषणा appeared first on Dainik Prabhat .
CIDCO House Price : एकनाथ शिंदेची मोठी घोषणा ! सिडकोच्या घरासंदर्भात घेतला ‘हा’मोठा निर्णय
मुंबईसह नवी मुंबई आणि आसपासच्या भागात घरांच्या वाढत्या किमतींमुळे स्वतःचे हक्काचे घर घेणे हे अनेकांसाठी दूरच्या गोष्टी झाले आहे. आयुष्यभर मेहनत करूनही सामान्य माणूस घर खरेदी करू शकत नाही. या पार्श्वभूमीवर म्हाडा आणि सिडको सारख्या संस्था बाजारभावापेक्षा कमी दरात घरे उपलब्ध करून देतात. मात्र, म्हाडाच्या तुलनेत सिडकोची घरे नेहमीच किंचित महाग असल्याने अनेकांच्या आवाक्याबाहेर राहतात. […] The post CIDCO House Price : एकनाथ शिंदेची मोठी घोषणा ! सिडकोच्या घरासंदर्भात घेतला ‘हा’ मोठा निर्णय appeared first on Dainik Prabhat .
लाडक्या बहिणींना 'ई-केवायसी'दुरुस्तीसाठी मिळणार एकच संधी
मंत्री अदिती तटकरे; ३१ डिसेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारकनागपूर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना ई-केवायसी प्रक्रियेदरम्यान झालेल्या चुका दुरुस्त करण्यासाठी अंतिम आणि एकमेव संधी देण्यात येणार आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी शनिवारी याबाबत महत्त्वपूर्ण घोषणा केली असून, ही सुधारणा प्रक्रिया ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करणे बंधनकारक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.योजनेच्या बहुतांश लाभार्थी दुर्गम आणि ग्रामीण भागातील असल्याने ई-केवायसी करताना चुका होणे स्वाभाविक आहे. अशा चुका दुरुस्त करण्याबाबत विभागाकडे अनेक निवेदने प्राप्त झाली होती. महिला सक्षमीकरणाच्या उद्देशाने राबविल्या जाणाऱ्या या योजनेत लाभार्थींना संधी देणे गरजेचे असल्याने, ई-केवायसीमध्ये केवळ एकदाच सुधारणा करण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे.तसेच, पती किंवा वडील हयात नसलेल्या किंवा घटस्फोटित महिलांना ई-केवायसी प्रक्रिया स्वतः पूर्ण करण्यासाठी पोर्टलवर विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आवश्यक कागदपत्रे सादर करून या महिलांना योजनेचा लाभ सुरळीत मिळावा, यासाठी विभाग प्रयत्नशील आहे. ई-केवायसी प्रक्रिया अधिक सुलभ व सोपी करण्याबरोबरच जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ मिळावा, यासाठी महिला व बालविकास विभाग कटिबद्ध असल्याचे मंत्री तटकरे यांनी सांगितले. लाभार्थी महिलांनी लवकरात लवकर ladakibahin.maharashtra.gov.in या पोर्टलवर ई-केवायसी पूर्ण करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.e-KYC दुरुस्तीसाठी मिळणार एकच संधी !मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील बहुतांश लाभार्थी या दुर्गम, ग्रामीण भागातील आहेत. e-KYC प्रक्रिया करत असताना त्यांच्याकडून काही चूक होणे स्वाभाविक आहे. या चुका दुरुस्त करण्याची संधी मिळावी अशा आशयाची अनेक निवेदने विभागास प्राप्त झाली… pic.twitter.com/nT4Pw6E2QP— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) December 13, 2025
नागपूर : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनाही महाराष्ट्र शासनाची एक योजना आहे. ज्याचा उद्देश बेरोजगार तरुणांना रोजगार-भिमुख प्रशिक्षण देणे आणि त्यांना आर्थिक सहाय्य करणे आहे. यात बारावी उत्तीर्ण तरुणांना प्रशिक्षण कालावधीत दरमहा 6,000 ते 10,000 रुपयापर्यंत भत्ता मिळतो. मात्र 11 महिने प्रशिक्षण घेतल्यानंतरही कायमस्वरुपी नोकरी न मिळाल्याने तरुण-तरुणी आक्रमक झाले आहेत. चार दिवस आंदोलन केल्यानंतर […] The post मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील तरुणांचे ‘लोटांगण’; अधिवेशनात घुसण्याचा प्रयत्न, काय आहेत मागण्या? appeared first on Dainik Prabhat .
ई-पीक पाहणीतून सुटलेल्यांसाठी 'ऑफलाईन'चा पर्याय ; महसूलमंत्री बावनकुळेंचा 'मास्टरस्ट्रोक'!
१५ जानेवारीपर्यंत 'ऑफलाईन' नोंदणीची संधीउपविभागीय अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली समितीनागपूर : 'ई-पीक पाहणी'ची ऑनलाईन मुदत संपल्याने हजारो शेतकरी शासकीय खरेदी केंद्रावर आपला माल विकण्यापासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाल्याने या शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत राज्य सरकारने आता 'ऑफलाईन' पीक पाहणीची संधी उपलब्ध करून दिली आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत यासंदर्भात घोषणा केली. ज्या शेतकऱ्यांची ई-पीक पाहणी राहून गेली आहे, त्यांना आता १५ जानेवारीपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांकडे ऑफलाईन अर्ज करता येणार आहेत.आमदार विक्रम पाचपुते यांनी विधानसभेत यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. ई-पीक पाहणीसाठी तीन वेळा मुदतवाढ देऊनही अनेक शेतकरी तांत्रिक अडचणी किंवा इतर कारणांमुळे नोंदणी करू शकले नाहीत, याकडे त्यांनी लक्ष वेधले होते. ई-पीक पाहणीची नोंद सातबाऱ्यावर असल्याशिवाय 'नाफेड' किंवा शासकीय केंद्रांवर शेतमाल खरेदी केला जात नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला.यावर उत्तर देताना महसूलमंत्री बावनकुळे यांनी सांगितले की, ई-पीक पाहणीचे पोर्टल आता बंद झाले असल्याने ते पुन्हा सुरु करणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नाही. मात्र, शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून आम्ही 'ऑफलाईन' खिडकी उघडण्याचा निर्णय घेतला आहे.अशी असेल प्रक्रियाउपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली जाईल. तहसीलदार, गट विकास अधिकारी (BDO) आणि तालुका कृषी अधिकारी यांचा तीत समावेश असेल. ज्या शेतकऱ्यांची नोंदणी राहिली आहे, त्यांनी १५ जानेवारीपर्यंत या समितीकडे अर्ज करायचे आहेत. खरीप हंगाम संपला असला तरी, ही समिती तक्रारींचे निवारण करेल, प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून पंचनामा करेल आणि आपला अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करेल. जिल्हाधिकारी हा अहवाल पणन विभागामार्फत केंद्र सरकारला पाठवतील, जेणेकरून शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी करणे शक्य होईल.बोगसगिरी रोखण्यासाठी खबरदारीही सवलत केवळ खऱ्या शेतकऱ्यांसाठी असून, व्यापाऱ्यांनी याचा गैरफायदा घेऊ नये यासाठी विशेष खबरदारी घेण्याच्या सूचनाही मंत्र्यांनी दिल्या आहेत. ऑफलाईन प्रक्रियेत व्यापारी घुसखोरी करून फायदा लाटण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे समितीने काटेकोर पडताळणी करावी, असे निर्देश बावनकुळे यांनी दिले.
मुबलक घरे उपलब्ध होण्यासाठी हौसिंग स्टॉक ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधिमंडळात घोषणा
नागपूर : जुन्या लोकांना तातडीने घरे देणे तसेच नवीन प्रकल्पांकरिता मुबलक घरे उपलब्ध होण्यासाठी हौसिंग स्टॉक निर्माण करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधान परिषदेत केली. महाराष्ट्रात तसेच मुंबईमध्ये वन, कांदळवन, सीआरझेड, इत्यादी ठिकाणी मूळ स्थितीत पुनर्विकास होऊ शकत नाही. तसेच बऱ्याचशा पायाभूत प्रकल्प जसे की रस्ता रुंदीकरण, मेट्रो, पाणी व मलनिस्सारण प्रकल्प इत्यादींना जलदगतीने पुढे नेण्यासाठी पीएपीची गरज भासते.त्याचप्रमाणे समाजातील गरीब गरजू घटकांना जसे गिरणी कामगार, डब्बेवाले, माथाडी इत्यादींना घरे देण्याचे शासनाने धोरण स्विकारलेले आहे. या सर्वांना वेळेवर घरे देता याकरीता मोठ्या प्रमाणात राज्यस्तरावर हौसिंग स्टॉकची आवश्यकता लागणार आहे, आणि म्हणूनच याबाबतीत निर्णय घेण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.या सर्व घटकांना घरे देण्यासाठी शासनाच्या विविध योजनेतून उपलब्ध होणारे हौसिंग स्टॉकला एकत्रित करून त्याचा सुनियोजित प्राधान्यक्रमाने वितरण करण्याचे शासनाने धोरण ठरविले आहे. या हौसिंग स्टॉक करीता मुंबईतील ३३ (७), ३३ (९), ३३ (१२ बी) यासह विविध योजना तसेच राज्यस्तरावरील इन्क्ल्युसिव्ह हौसिंग, पीएमएवाय इत्यादी योजनांचा समावेश करण्याचा आमचा मानस आहे असेही उपमुख्यमंत्री म्हणालेखारफुटीच्या जमिनींवर अतिक्रमणे करण्याचे प्रकार घडले आहेत. कांदळवन संरक्षित राहिले पाहिजे , त्याचे जतन केले पाहिजे हे लक्षात घेऊन ग्रीन टीडीआर देण्याबाबत विचार केला जाईल असेही ते म्हणाले.
'एसआरए'इमारतींच्या देखभाल निधीत वाढ, लिफ्टसाठी सौर ऊर्जेचा वापर - राज्य सरकारचा निर्णय;
ओसी देण्यापूर्वी इमारतीवर सोलार पॅनल लावणे बंधनकारकनागपूर : महायुती सरकारने एसआरए (झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण) आणि म्हाडा पुनर्विकास प्रकल्पांतील रहिवाशांना दिलासा देणारे दोन महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. इमारतीच्या देखभाल निधीत (कॉर्पस फंड)इमारतीच्या उंचीनुसार मोठी वाढ करण्यात येणार असून, लिफ्ट आणि सामाईक भागांचा वीज खर्च कमी करण्यासाठी ओसी (ऑक्युपेशन सर्टिफिकेट) देण्यापूर्वी सोलार पॅनल बसविणे बंधनकारक करण्यात येणार असल्याची घोषणा गृहनिर्माण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी शनिवारी विधानसभेत केली.झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत उंच टॉवरमध्ये स्थलांतरित झालेल्या रहिवाशांना वाढलेला देखभाल खर्च आणि वीज बिलाचा भार सहन करावा लागत असल्याच्या समस्येवर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी विधानसभेत लक्षवेधी मांडली होती. त्यांनी निदर्शनास आणून दिले की, पूर्वीच्या ४० हजार रुपये कॉर्पस फंडच्या व्याजातून हा खर्च भागवणे कठीण झाले आहे. या लक्षवेधीला उत्तर देताना राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी जाहीर केले की, कॉर्पस फंडाची रक्कम आता इमारतीच्या उंचीनुसार वाढवली जाईल. हा बदल महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ नुसार अधिसूचना जारी करून लागू करण्यात येईल. हरकती-सूचनांवरील सुनावणी अंतिम टप्प्यात असून, लवकरच अंमलबजावणी होईल.कॉर्पस फंडाची रक्कम किती असेल?७० मीटरपर्यंत उंचीच्या इमारतीसाठी : १ लाख रुपये७० ते १२० मीटर उंचीच्या इमारतीसाठी : २ लाख रुपये१२० मीटरपेक्षा जास्त उंचीच्या इमारतीसाठी : ३ लाख रुपयेसौर ऊर्जेचा वापर अनिवार्यमंत्री भोयर यांनी सांगितले की, ग्रीन एनर्जीला प्रोत्साहन देण्यासाठी पुनर्विकास प्रकल्पांत ओसी देण्यापूर्वी इमारतीवर सोलार पॅनल बसविणे बंधनकारक करण्यात येईल. विशेषतः लिफ्ट आणि सामाईक भागांसाठी सौर ऊर्जेचा वापर अनिवार्य असेल. ओसीशिवाय ताबा देणाऱ्या विकासकांवर कठोर कारवाई होईल आणि अपूर्ण इमारतींमध्ये पजेशन दिल्यास सखोल चौकशी केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
नागपूर : मुंबईतील फनेल झोनमुळे रखडलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाला गती देण्यासाठी राज्य शासनाने तयार केलेल्या नवीन योजनेची महत्त्वपूर्ण घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानपरिषदेत केली. या योजनेमुळे मुंबईतील हजारो पुनर्विकास प्रकल्प मार्गी लागणार आहेत.मुंबई विमानतळाच्या बाजूला असलेल्या इमारतींचा फनेल झोन व इतर तांत्रिक अडथळ्यांमुळे अनेक इमारतींचा पुनर्विकास शक्य होत नव्हता. परिणामी उपलब्ध असलेला संपूर्ण चटई क्षेत्र वापरात येत नव्हते, ही अडचण दूर करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘सर्वांसाठी घरे’ धोरणांतर्गत राज्य शासनाने ही नवी योजना तयार केली आहे, असे उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.या योजनेअंतर्गत मुंबईतील सर्व पुनर्विकासयोग्य इमारतींच्या पुनर्विकासाला चालना देण्यात येणार असून, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (EWS) ३०० चौ. फुटापर्यंतचे चटई क्षेत्र विनामूल्य देण्यात येणार आहे. तसेच अल्प उत्पन्न गटासाठी (LIG) ६०० चौ. फुटापर्यंतच्या सदनिकांची पुनर्बांधणी विनाशुल्क व्हावी, यासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे.या योजनेत जमीनमालकांना त्यांच्या मूळ मालकी हक्काच्या प्रमाणात बेसिक चटई क्षेत्र देण्यात येणार आहे. संरक्षित भाडेकरूंना त्यांच्या संरक्षित क्षेत्राएवढा किंवा किमान ३० चौ. मीटर (जे अधिक असेल ते) इतके चटई क्षेत्र देण्यात येईल. तसेच अधिकृत रहिवाशांनाही त्यांच्या कायदेशीर ताब्यातील क्षेत्राएवढा किंवा किमान ३० चौ. मीटर क्षेत्रफळाइतका यापैकी जो अधिक असेल तो एफएसआय अनुज्ञेय राहणार आहे.योजनेअंतर्गत न वापरलेले चटई क्षेत्र हे टीडीआर स्वरूपात उपलब्ध करून दिले जाणार असून, त्यामुळे प्रकल्प आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य होतील. तसेच विद्यमान विकास नियंत्रण नियम ३३(७) व ३३(९) अंतर्गत मिळणारे सर्व इनसेंटिव्ह, प्रीमियम व इतर फायदे कायम राहणार असल्याचे सांगून या नव्या योजनेमुळे बृहन्मुंबई क्षेत्रातील फनेल झोन बाधित पुनर्विकास प्रकल्पांना मोठा दिलासा मिळणार असून, अनेक वर्षांपासून रखडलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होणार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.
मुख्य सचिवांवर हक्कभंग आणणार, विधानसभा अध्यक्षांचा इशारा
नागपूर : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन संपत आले, तरी आमदारांनी मांडलेल्या अनेक लक्षवेधींना अद्याप उत्तरे देण्यात आलेली नाहीत, असा मुद्दा भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी शनिवारी विधानसभेत उपस्थित केला. त्यावर १४ डिसेंबरपर्यंत (अधिवेशनाची समाप्ती होईपर्यंत) या लक्षवेधींची प्रलंबित उत्तरे दिली नाही, तर मुख्य सचिवांवर हक्कभंगाचा प्रस्ताव आणला जाईल, असा इशारा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शनिवारी दिला. सुधीर मुनगंटीवार यांनी मांडलेला मुद्दा अगदी योग्य आहे. कोणत्याही अधिकार्याला असे वाटत असेल की, विधिमंडळाच्या पीठासीन अधिकार्यांनी दिलेले निर्देश पाळणे बंधनकारक नाही, तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. उद्या सभागृहाची बैठक संपेपर्यंत सभागृहाच्या पटलावर प्रलंबित लक्षवेधींची उत्तरे आली नाहीत, तर मुख्य सचिवांवर हक्कभंगाची कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.
नागपूर : मुंबईबाहेर गेलेला चाकरमानी पुन्हा मुंबईत परतला पाहिजे, हीच स्व. बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती आणि ती पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. विधान परिषदेत गृहनिर्माण क्षेत्रासंदर्भात निवेदन देताना त्यांनी मुंबईकरांसाठी, विशेषतः मध्यमवर्गीय आणि गिरणी कामगारांसाठी अनेक क्रांतिकारी निर्णय जाहीर केले आहेत. यामध्ये प्रामुख्याने ओसी (OC) नसलेल्या इमारती, पागडी सिस्टिम, विमानतळ परिसर (फनेल झोन) आणि गिरणी कामगारांच्या घरांबाबत महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या आहेत.ओसी नसलेल्या इमारतींना 'अभय', दंडात मोठी सवलतमुंबईत अनेक इमारतींचे बांधकाम करताना काही नियमांचे उल्लंघन झाल्याने त्यांना ओसी (Occupancy Certificate) मिळालेली नाही. अशा सुमारे २० हजार इमारती असून त्यात लाखो कुटुंबे राहतात. या रहिवाशांना मोठा दिलासा देत शिंदे यांनी 'सुधारित अभय भोगवटा' योजनेला मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे रहिवाशांना आता दुप्पट मालमत्ता कर भरावा लागणार नाही. तसेच, ओसी मिळाल्यामुळे घरांवर कर्ज मिळणे सोपे होईल आणि घराला बाजारभावाप्रमाणे योग्य किंमत मिळेल. रेडीरेकनरच्या दरात ५० टक्के सवलत देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पहिल्या ६ महिन्यांत येणाऱ्या अर्जांना कोणताही दंड आकारला जाणार नाही. आता संपूर्ण सोसायटीची वाट न पाहता, एखादी वैयक्तिक व्यक्तीही ओसीसाठी अर्ज करू शकते आणि तिला ती मिळेल.'पुढील काही वर्षांत मुंबई पागडीमुक्त होणार'जुन्या मुंबईची ओळख असलेल्या पागडी पद्धतीबाबतही सरकारने ठोस पावले उचलली आहेत. पागडी संदर्भात नवीन नियमावली तयार करण्यात येत असून, यात भाडेकरू आणि घरमालक या दोघांनाही एफएसआय (FSI) देण्यात येणार आहे. उंची किंवा इतर तांत्रिक कारणांमुळे एफएसआय वापरता आला नाही, तर त्याबदल्यात टीडीआर (TDR) देण्याची तरतूद करण्यात आली आहे. सध्या २८ हजार प्रकरणे प्रलंबित असून ती निकाली काढण्यासाठी 'फास्ट ट्रॅक कोर्ट' स्थापन केले जाईल. यामुळे पुढील काही वर्षांत मुंबई पूर्णपणे पागडीमुक्त होईल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.विमानतळ परिसर (फनेल झोन) आणि संरक्षण क्षेत्राला दिलासाविमानतळ परिसरातील 'फनेल झोन'मुळे अनेक इमारतींना उंची वाढवता येत नाही. येथे पंतप्रधानांची 'सबको घर' ही योजना प्रभावीपणे राबवली जाणार आहे. EWS (आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक) आणि LIG (अल्प उत्पन्न गट) विभागातील सदनिका धारकांना एफएसआय दिला जाईल. ही योजना इतर योजनांशी क्लब करून राबवली जाईल, ज्यामुळे प्रकल्प व्यवहार्य होतील आणि लोकांचा फायदा होईल. तसेच, संरक्षण क्षेत्राला लागून असलेल्या जमिनींवरील रखडलेल्या प्रकल्पांवरही याच पद्धतीने काम केले जाईल.गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न मार्गीगिरणी कामगारांच्या घरांबाबत माहिती देताना शिंदे म्हणाले की, १ लाख गिरणी कामगार घरांसाठी पात्र ठरले आहेत. या घरांची किंमत १५ लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. क्लस्टर योजना वेगाने पूर्ण करण्यासाठी जेव्ही (Joint Venture) पद्धतीचा अवलंब केला आहे. ज्या कामगारांनी यास मान्यता दिली नाही, त्यांच्यासाठी वेगळा पर्यायही खुला ठेवला आहे. गेल्या ३ वर्षांपासून रखडलेल्या अनेक विकासकामांना चालना दिली असून, प्रस्थापित चौकटीबाहेर जाऊन निर्णय घेतल्यामुळेच हे शक्य झाल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.
IND vs SA : गंभीर-पंड्या यांच्यात ड्रेसिंग रूममध्ये जोरदार खडाजंगी? व्हायरल व्हिडिओने खळबळ!
Gautam Gambhir Hardik Pandya Video Viral : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताला ५१ धावांनी मानहानिकारक पराभव पत्करावा लागला, ज्यामुळे ही मालिका १-१ अशी बरोबरीत आली आहे. पंजाबमधील मुल्लानपूर येथे झालेल्या या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी मोठ्या प्रमाणात धावा दिल्या आणि त्यानंतर फलंदाजांची कामगिरीही सुमार राहिली. गंभीर-पंड्या यांच्यात […] The post IND vs SA : गंभीर-पंड्या यांच्यात ड्रेसिंग रूममध्ये जोरदार खडाजंगी? व्हायरल व्हिडिओने खळबळ! appeared first on Dainik Prabhat .
कोलकाता: जगप्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीच्या कोलकाता येथील साल्टलेक स्टेडियममधील कार्यक्रमादरम्यान झालेल्या मोठ्या गोंधळानंतर पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे. या कार्यक्रमाचा मुख्य आयोजक सताद्रु दत्ता याला पोलिसांनी विमानतळावरून (airport) अटक केली आहे. पश्चिम बंगालचे पोलीस महासंचालक (DGP) राजीव कुमार यांनी या घटनेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच, ज्या प्रेक्षकांनी […] The post Lionel Messi: मेस्सीच्या कार्यक्रम गोंधळाप्रकरणी मोठी कारवाई: मुख्य आयोजकांना अटक, तिकिटांचे पैसे परत करणार, नेमके काय घडले? appeared first on Dainik Prabhat .
नागपूर : महाराष्ट्रासाठी २०२६ पर्यंत १.५० लाख कोटी रुपयांच्या रस्ते कामांना मंजुरी देण्यात आली असल्याची माहीती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. ही कामे पुढील तीन महिन्यांत सुरू होतील, असे त्यांनी विधान भवनाच्या परिसरात पत्रकारांशी बोलताना सांगितले. मंत्री गडकरी हे विधान परिषदेच्या शताब्दी सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी विधिमंडळात आले होते. गडकरी म्हणाले, महाराष्ट्र […] The post Nitin Gadkari : महाराष्ट्रासाठी 1.50 लाख कोटींच्या रस्ते कामांस मंजुरी; मंत्री नितीन गडकरींनी दिली माहिती appeared first on Dainik Prabhat .
Devendra Fadnavis : मनरेगावरून फडणवीसांची काँग्रेसवर टीका; म्हणाले…
नागपूर : मनरेगाचे नामांतर करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर टीका केली. केंद्रीय मंत्रिमंडळाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्याचे (मनरेगा) नाव बदलून पूज्य बापू ग्रामीण रोजगार योजना असे करण्याच्या विधेयकाला मंजुरी दिली आहे. या अंतर्गत कामाच्या दिवसांची संख्या सध्याच्या १०० दिवसांवरून १२५ दिवसांपर्यंत वाढवली जाणार आहे. मनरेगाचे […] The post Devendra Fadnavis : मनरेगावरून फडणवीसांची काँग्रेसवर टीका; म्हणाले… appeared first on Dainik Prabhat .
…तर उद्या मुख्य सचिवांवर हक्कभंग आणणार; राहुल नार्वेकरांचा इशारा
मुंबई : राज्याच्या विधीमंडळाचे अधिवेशनात सदस्यांनी मांडलेल्या अनेक लक्ष्यवेधी सूचनांची उत्तर अद्याप प्रलंबित असल्याने भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी चिंता व्यक्त केली. त्यावरती विधानसभा अध्यक्षांनी प्रतिसाद देत कारवाईचा इशारा दिला. उद्या सभागृहाची बैठक संपेपर्यंत जर लक्ष्यवेधींची प्रलंबित उत्तरे दिली नाहीत, तर मुख्य सचिवांवर हक्कभंगाचा प्रस्ताव आणला जाईल, असा इशारा नार्वेकरांनी दिला आहे. मुनगंटीवार यांनी लक्ष्यवेधींच्या […] The post … तर उद्या मुख्य सचिवांवर हक्कभंग आणणार; राहुल नार्वेकरांचा इशारा appeared first on Dainik Prabhat .
केंद्रीय मंत्री शिवराज सिंह यांना पाकिस्तानकडून धोका: गृह मंत्रालयाकडून सुरक्षा वाढवली
नवी दिल्ली : केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांना पाकिस्तानच्या गुप्तचर संस्था आयएसआय (ISI) कडून मोठा धोका असल्याची माहिती समोर आली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाला शिवराज सिंह चौहान यांच्यावर हल्ल्याबाबत गुप्तचर इनपुट मिळाल्यानंतर, शुक्रवारी उशिरा रात्री तातडीने भोपाळ आणि दिल्ली येथील त्यांच्या निवासस्थानांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भोपाळमधील 74 बंगला परिसरातील बी-8 निवासस्थानाच्या […] The post केंद्रीय मंत्री शिवराज सिंह यांना पाकिस्तानकडून धोका: गृह मंत्रालयाकडून सुरक्षा वाढवली appeared first on Dainik Prabhat .
मुंबई झोपडपट्टीमुक्तीसाठी सरकारचे मोठे पाऊल!
मुंबईत ५० एकरपेक्षा मोठ्या भूखंडांवर राबवणार 'क्लस्टर रिडेव्हलपमेंट'; पहिल्या टप्प्यात १७ प्रकल्पांची निवड उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधान परिषदेत घोषणा एसआरए अभय योजनेला ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ एसआरए प्रकल्प तक्रार जलद निपटाऱ्यासाठी एजीआरसीची संख्या वाढविणार म्हाडाच्या ओसीसाठीच्या अभय योजनेला देखील १ वर्षाची मुदतवाढनागपूर : योजनेच्या पहिल्या टप्प्यात मुंबईतील अँटॉप हिल, कृष्ण नगर आणि केतकीपाडा (बोरिवली), गोपीकृष्ण नगर (दहिसर),ओशिवरा, गोवंडी, चित्ता कॅम्प (ट्रॉम्बे), चेंबूर, टागोर नगर (विक्रोळी), विक्रोळी पार्कसाईट, भांडुप या १७ प्रमुख ठिकाणांची निवड करण्यात आली आहे. यामुळे मुंबईतील लाखो झोपडपट्टीवासीयांना मोठा दिलासा मिळणार आहे. यासंदर्भात निवेदन करताना उपमुख्यमंत्री. शिंदे म्हणाले, मुंबईतील ५० एकर किंवा त्यापेक्षा मोठ्या खाजगी, शासकीय किंवा निमशासकीय जमिनींवर आता एकत्रितपणे पुनर्विकास केला जाणार आहे. छोट्या-छोट्या एसआरए प्रकल्पांऐवजी आता संपूर्ण परिसराचा कायापालट करण्यासाठी ही योजना राबवली जाईल.या महत्त्वाकांक्षी योजनेला राज्य मंत्रिमंडळाने ७ ऑक्टोबर २०२५ रोजी मान्यता दिली असून, १३ नोव्हेंबर २०२५ रोजी याबाबतचा शासन निर्णयही जारी करण्यात आला असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. हे प्रकल्प रखडू नयेत आणि जलदगतीने पूर्ण व्हावेत, यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला असून एमएमआरडीए, सिडको, एमआयडीसी, एमएसआरडीसी, म्हाडा आणि मुंबई महानगरपालिका या शासकीय संस्थांच्या मदतीने 'जॉइंट व्हेंचर' तत्त्वावर हे प्रकल्प उभारले जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले. प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात आणखी काही प्रकल्प हाती घेतले जाणार असून त्यामुळे मुंबईचा चेहरामोहरा बदलण्यास आणि सुनियोजित शहरे वसण्यास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले.एसआरए अभय योजने'ला ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढमुंबईतील हजारो झोपडीधारकांसाठी दिलासा देताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी झोपडी खरेदी-विक्रीच्या तांत्रिक अडचणीत अडकलेल्या नागरिकांसाठी 'एसआरए अभय योजने'ची मुदत आता डिसेंबर २०२६ पर्यंत वाढविण्याची घोषणा केली. अनेक झोपडीधारकांनी आपल्या झोपड्यांची खरेदी-विक्री किंवा हस्तांतरण केले होते. मात्र, नियमानुसार या नवीन झोपडीधारकांचे नाव 'अंतिम परिशिष्ट-२' मध्ये (पात्र झोपडीधारकांच्या यादीत) समाविष्ट करण्याची कोणतीही तरतूद नव्हती. यामुळे हजारो गरीब कुटुंब हक्काच्या घरापासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली होती. त्यामुळे राज्य शासनाने १ ऑक्टोबर २०२४ रोजी 'अभय योजना' लागू केली होती. सुरुवातीला ही योजना ३ महिन्यांसाठी होती नंतर तिला मार्च २०२५ पर्यंत मुदतवाढ दिली होती. यासोबतच म्हाडाच्या ओसी साठीच्या अभय योजनेला देखील सध्या सुरू आहे. १ वर्षाची मुदतवाढ देण्याची घोषणा उपमुख्यमंत्र्यांनी केली.एसआरए प्रकल्पाच्या तक्रार निपटाऱ्यासाठी एजीआरसीची संख्या वाढविणारझोपडपट्टी पुनर्विकासाशी संबंधित तक्रारींचे निवारण करण्यासाठी असलेल्या 'एपेक्स ग्रीव्हन्स रिड्रेसल कमिटी'ची (AGRC) संख्या वाढविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयाची घोषणा उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केली.सद्यस्थितीत २१०३ प्रकरणे प्रलंबित असून त्यांचा जलद गतीने निपटारा करण्यासाठी एजीआरसीची संख्या वाढविण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुंबई महापालिकेच्या लिज प्लॉटवर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची जी घरं बांधलेली आहेत त्याकरिता नवीन योजना आणण्याचे निर्देश महापालिकेला दिले असल्याची घोषणा देखील उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केली.
४ गुंठ्याचे ४० गुंठे करणाऱ्यांवर गुन्हे दाखल महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत घोषणानागपूर : बाडापोरखण ता. डहाणू (जि. पालघर) येथील जमिनीच्या ४ गुंठ्याचे परस्पर ४० गुंठे करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी संबंधित तलाठी आणि मंडल अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत दिली.संतोष कोटनाके तलाठी तर मंडल अधिकाऱ्याचे नाव ज्योत्सना जमजाळ मंडल अधिकारी आहेत. तसेच, निवृत्त झाल्यानंतरही कंत्राटी पद्धतीने त्याच कार्यालयात काम करणाऱ्या आणि गैरव्यवहारांना खतपाणी घालणाऱ्या अधिकाऱ्यांची माहिती घेऊन त्यांना तात्काळ हटवण्यात येईल, असे आश्वासनही महसूलमंत्र्यांनी सभागृहात दिले.शिवसेना आमदार सुनील प्रभू यांनी यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री बावनकुळे बोलत होते. यावेळी झालेल्या चर्चेत आमदार भास्कर जाधव आणि योगेश सागर यांनी लक्षवेधीवरील चर्चेत सहभाग घेतला.नेमका घोटाळा काय?डहाणू परिसरात जमिनीचे भाव गगनाला भिडले असताना, जानकीबाई (१९८६ चा फेरफार) यांच्या जमिनीच्या नोंदीमध्ये फेरफार करून राजेंद्र राऊत यांनी तलाठी आणि मंडळ अधिकारी यांच्याशी संगनमत केले. यातून ४ गुंठे जमिनीचे क्षेत्र ४० गुंठे दाखवण्यात आले. इतकेच नव्हे, तर या जागेवर बोगस झाडे लागवडही दाखवण्यात आली. या गंभीर प्रकरणाची दखल घेत तलाठी संतोष कोटणाके आणि मंडल अधिकारी ज्योत्सना जमजाळ हिला निलंबित करण्यात आले आहे. तसेच या प्रकरणात सहभागी असणाऱ्यांवर आणि लाभार्थींवर गुन्हे दाखल करण्यात आल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.'प्रशासन उशिरा जागे झाले'आ. भास्कर जाधव यावेळी म्हणाले, विधिमंडळात प्रश्न उपस्थित करण्यासाठी ३० दिवस आधी सूचना द्यावी लागते. सदस्यांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर जिल्हाधिकारी आणि प्रशासन जागे झाले आणि त्यांनी नोटीस बजावली. ४ गुंठ्याचे ४० गुंठे करण्याचे धाडस केवळ तलाठी करू शकत नाही, त्याला वरिष्ठ अधिकाऱ्यांचेही अभय असते, असा आरोप जाधव यांनी केला. यावर उत्तर देताना मंत्र्यांनी या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन प्रांत किंवा तहसीलदार यांचा सहभाग आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्याचे संकेत दिले.निवृत्त अधिकाऱ्यांच्या 'टोळी'ला चापआ. योगेश सागर यांनी एका गंभीर मुद्द्याकडे लक्ष वेधले. अनेक ठिकाणी निवृत्त झालेले तलाठी, सर्कल आणि इतर अधिकारी यांना कंत्राटी पद्धतीने त्याच कार्यालयात पुन्हा कामावर घेतले जाते. हे अधिकारी माहितीचा गैरवापर करून जमिनींचे वाद आणि घोटाळे निर्माण करतात. यावर महसूलमंत्री बावनकुळे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, पालघर, ठाणे, रायगड, नवी मुंबई, नाशिक, पुणे, संभाजीनगर आणि नागपूर यांसारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये आणि लगतच्या भागात निवृत्त अधिकाऱ्यांना पुन्हा त्याच ठिकाणी नेमले असेल, तर त्यांची चौकशी करून त्यांना तात्काळ कामावरून कमी करण्यात येईल, अशी घोषणा केली.
ना घरका ना घाटका ! ट्रम्पविरोधात युएसमध्येच असंतोष, एच१बी व्हिसा निर्णयावर फेडरल न्यायालयात धाव
मुंबई: ना घरका ना घाट का अशी परिस्थिती डोनाल्ड ट्रम्प यांची झालेली दिसते. भारतासह इतर देशावर देशहिताच्या नावाखाली टॅरिफ वाढवत मनमानी केली. यानंतर ट्रम्प प्रशासनाकडून एच १ बी व्हिसावरही भरमसाठ वाढ करत १००००० डॉलर आकारल्याने परदेशातून येत असलेल्या कर्मचाऱ्यांवर व कंपन्यावर याचा मोठा परिणाम झाला आहे.२००० ते ५००० डॉलर शुल्कवाढीविरोधात न्यायालयात अपील केले. यावर न्यायालय आपले मत लवकरच मांडू शकते.याचा मागील अध्याय म्हणून मोठ्या प्रमाणात देशांतर्गतच नागरिकांनी व संस्थांनी याला विरोध करत टॅरिफ शुल्कवाढ कमी करण्याची मागणी केली होती व न्यायालयात याचिकाकर्ते गेले होते. यावर अद्याप अंतरिम निर्णय बाकी असला तरी पुन्हा एकदा ट्रम्प प्रशासनाला घरचा आहेर मिळवावा आहे. आज युएसमधील कायदे बनवणाऱ्या धोरणकर्त्यांनीच कायद्याला विरोधात न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. अमेरिकेतील एकूण २० राज्यांनी या शुल्कवाढीला विरोध करत फेडरल न्यायालयात धाव घेतली आहे. हा केवळ भारत व इतर देशांचा प्रश्न नसून अमेरिकेतील अर्थव्यवस्थेशीही निगडित आहे असे मत मांडले आहे. त्यामुळे ट्रम्प प्रशासनाने वाढविलेल्या थेट करवाढीचा विरोध स्थानिक प्रशासनाने मोठ्या प्रमाणात सुरु केला. तंत्रज्ञान, शिक्षण, हेल्थकेअर, आयटी अशा अनेक क्षेत्रांत या फी वाढीचा मोठा फटका बसल्याने वाढत्या आर्थिक खर्चाचा भार कंपन्यांवर आला. परिणामी कंपन्यांच्या कामकाजावर परिणाम होणार असल्याने नाईलाजास्तव कंपन्यांनी न्यायालयात ट्रम्प यांच्याविरोधात दरवाजे ठोठावले.उपलब्ध माहितीनुसार, कॅलिफोर्नियाचे ॲटर्नी जनरल रॉब बोंटा यांच्या कार्यालयाने म्हटले आहे की, ट्रम्प प्रशासनाला ही फी लादण्याचा अधिकार नाही. त्यांनी सांगितले की, हे फेडरल कायद्याचे उल्लंघन आहे कारण तो कायदा केवळ व्हिसा कार्यक्रमांच्या प्रशासनाचा खर्च भागवण्यासाठीच शुल्क आकारण्याची परवानगी देतो. बोंटा यांनी पुढे सांगितले की, १००००० डॉलर्सच्या शुल्कामुळे शिक्षण आणि आरोग्यसेवांसारख्या अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांवर अनावश्यक आर्थिक भार पडेल ज्यामुळे कामगारांची कमतरता अधिकच वाढेल आणि सेवांमध्ये कपात होण्याची शक्यता निर्माण होईल. ट्रम्प प्रशासनाच्या आदेशानुसार, जोपर्यंत प्रायोजक कंपन्या १००००० डॉलर्सचे शुल्क भरत नाही, तोपर्यंत नवीन एच-१बी व्हिसा धारकांना अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही.अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, या धोरणाचा सध्याच्या एच-१बी व्हिसा धारकांवर किंवा ज्यांनी २१ सप्टेंबरपूर्वी अर्ज केला आहे, त्यांच्यावर परिणाम होणार नाही. ट्रम्प प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार हे शुल्क राष्ट्रपतींच्या अधिकारांचा कायदेशीर वापर आहे आणि त्याचा उद्देश एच-१बी कार्यक्रमाचा गैरवापर रोखणे हा आहे. मात्र एच-१बी प्रणालीमुळे अमेरिकन कामगारांची जागा कमी पगाराच्या परदेशी कामगारांनी घेतली जाते.मात्र कंपन्यांचे याविषयी मत वेगळे आहे. त्यांच्या मते देशातील कुशल कामगारांची कमतरता भरून काढण्यासाठी या कार्यक्रमाची आवश्यकता आहे. त्याला केवळ परकीय कामगारावर जबाबदारी ढकलून चालणार नाही. आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्योग लॉबीस्ट आणि यूएस चेंबर ऑफ कॉमर्स, कामगार संघटना आणि नियोक्ते यांच्यासह एका गटानेही या शुल्काविरुद्ध खटले दाखल केले आहेत. पुढील आठवड्यात वॉशिंग्टन, डी.सी. येथे न्यायालयातील सुनावणी अपेक्षित आहे असे म्हटले जाते.तत्पूर्वी ट्रम्प यांनी फेडरल स्थलांतर कायद्यांतर्गत हा आदेश जारी केला गेला असल्याने अमेरिकेच्या हिताचे रक्षण करण्यासाठी परदेशी नागरिकांच्या प्रवेशावर निर्बंध घालण्याचा अधिकार असल्याचे ट्रम्प प्रशासनाला असल्याचे सरकारी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले होते राज्यांच्या या कायदेशीर आव्हानाचा परिणाम कुशल परदेशी कामगारांवर अवलंबून असलेल्या अमेरिकन कंपन्यांसाठी आणि संपूर्ण एच-१बी व्हिसा प्रणालीसाठी गंभीर ठरू शकतो.

23 C