PCMC Election : पिंपरी-चिंचवडमध्ये सत्तापालटासाठी ‘मविआ’चा ॲक्शन प्लॅन तयार! बैठकांचे सत्र सुरू
प्रभात वृत्तसेवा पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरामध्ये सत्ता बदल करण्यासाठी महाविकास आघाडीने जोर-बैठका सुरू केल्या आहेत. बैठकांचे सत्र सुरू झाले असून इच्छुकांच्या मुलाखती आणि पॅनेल जुळवणी करण्यास सुरूवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सोबत येईल तेव्हा येईल, तो निर्णय वरिष्ठ घेतील मात्र, स्थानिक पातळीवर तीनही पक्षांने तयारी सुरू केली आहे. सन २०१७ च्या […] The post PCMC Election : पिंपरी-चिंचवडमध्ये सत्तापालटासाठी ‘मविआ’चा ॲक्शन प्लॅन तयार! बैठकांचे सत्र सुरू appeared first on Dainik Prabhat .
प्रभात वृत्तसेवा पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी ६ नोव्हेंबरला प्रसिद्ध करण्यात येणार होती. मात्र, तो कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने ४ नोव्हेंबरला अचानक बदलला. त्यामध्ये १४ नोव्हेंबरला मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल, असे नमूद होते. मात्र, राज्य निवडणूक आयोगाने गुरुवारी (दि. १३) रात्री परत मतदार याद्यांच्या प्रसिद्धीचे वेळापत्रक बदलले असून, आता प्रारूप […] The post PCMC Election : मतदार यादीची प्रतीक्षा वाढली, आता ‘या’ तारखेला होणार प्रसिद्ध, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक appeared first on Dainik Prabhat .
Pune News : कात्रज चौकात फ्रोजन चिकन वाहतूक करणाऱ्या टेम्पोला अचानक आग
कात्रज : कात्रज चौकात रात्री पावणे नऊच्या सुमारास उड्डाणपुलाखाली फ्रोजन चिकन वाहतूक करणाऱ्या टेम्पोला अचानक आग लागल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. कात्रजहून नवले पुलाकडे जात असलेला हा टेम्पो अचानक थांबला आणि काही क्षणातच बोनेटमधून ज्वाळा बाहेर पडू लागल्या. घटनेची माहिती मिळताच कात्रज अग्निशामक दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि शर्थीने प्रयत्न […] The post Pune News : कात्रज चौकात फ्रोजन चिकन वाहतूक करणाऱ्या टेम्पोला अचानक आग appeared first on Dainik Prabhat .
IND A vs UAE : जितेश शर्माने केला कहर! अवघ्या एकाच षटकात ठोकल्या तब्बल ‘इतक्या’धावा
Jitesh Sharma explosive Batting : आशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धेत भारत ‘अ’आणि यूएई यांच्यातील सामन्यात भारतीय युवा फलंदाजांनी धमाकेदार प्रदर्शन केले. सलामीवीर वैभव सूर्यवंशीने धडाकेबाज शतक झळकावले, तर भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेल्या जितेश शर्माने शानदार अर्धशतक झळकावले. या दोघांच्या विस्फोटक फलंदाजीमुळे भारतीय संघ २९७ धावांचा मोठा स्कोर उभारण्यात यशस्वी झाला. जितेश शर्माने एकाच षटकात कुटल्या […] The post IND A vs UAE : जितेश शर्माने केला कहर! अवघ्या एकाच षटकात ठोकल्या तब्बल ‘इतक्या’ धावा appeared first on Dainik Prabhat .
बिहार निकालाचा सकारात्मक परिणाम; सलग चौथ्या दिवशी निर्देशांकात वाढ
मुंबई : गुंतवणूकदारांना सध्या अनेक गुंतागुंतीच्या मुद्याचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत शेअर बाजारात खरेदी- विक्रीच्या लाट येत आहेत. बिहारसारख्या मोठ्या राज्यात भाजपाचे सरकार येणार असल्यामुळे काही प्रमाणात खरेदी होऊन निर्देशांकामध्ये वाढ होण्यास मदत झाली. जागतिक नकारात्मक परिस्थितीमुळे सकाळी निर्देशांक अर्धा टक्क्यापर्यंत कोसळले होते. मात्र नंतर बिहार निवडणुकीचे निकाल बाहेर आल्यानंतर खरेदी वाढून निर्देशांकात […] The post बिहार निकालाचा सकारात्मक परिणाम; सलग चौथ्या दिवशी निर्देशांकात वाढ appeared first on Dainik Prabhat .
नगरपरिषद व नगरपंचायती निवडणुकांसाठी ऑनलाईनसोबत ऑफलाईन नामनिर्देशनपत्रेही स्वीकारणार
पुणे : राज्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रे आता ऑनलाईनबरोबरच ऑफलाईन पद्धतीनेही सादर करता येणार आहेत. संगणक प्रणालीत अडचणी येत असल्याने आणि उमेदवारांना समान संधी मिळावी म्हणून राज्य निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. १५ ते १७ नोव्हेंबर २०२५ या तीनही दिवसांत, रविवार सुट्टीच्या दिवशीही, दररोज सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० या वेळेत […] The post नगरपरिषद व नगरपंचायती निवडणुकांसाठी ऑनलाईनसोबत ऑफलाईन नामनिर्देशनपत्रेही स्वीकारणार appeared first on Dainik Prabhat .
विशाखापट्टणम : फक्त गुंतवणूक आकर्षित करून उपयोग नाही तर उद्योगांना भारतात काम करणे सुलभ व्हावे यासाठी अनावश्यक नियम रद्द करण्याची मोहीम केंद्र सरकारने राबविली आहे. या अंतर्गत आतापर्यंत अनावश्यक दीड हजार कायदे रद्द करण्यात आले. त्याचबरोबर 42,000 नियम संपुष्टात आणले आहेत अशी माहिती केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी दिली. भारतीय उद्योग महासंघाने […] The post Piyush Goyal : उद्योगांना भारतात काम करणे सुलभ होण्यासाठी अनावश्यक नियम रद्द केले; मंत्री पियुष गोयल यांनी दिली माहिती appeared first on Dainik Prabhat .
Bihar Election Result 2025 : लालू यादव यांचे ज्येष्ठ पुत्र तेजप्रताप यादव यांचा दारूण पराभव
Bihar Election Result 2025 : लालू प्रसाद यादव यांचे ज्येष्ठ पुत्र आणि माजी मंत्री तेजप्रताप यादव यांचाही पराभव झाला आहे. या पराभवामुळे त्यांच्या राजकीय कारकिर्दीलाही मोठा धक्का बसलाआहे. तेजप्रताप यादव यांनी जनशक्ती जनता दल या पक्षाची स्थापना केली होती. ते स्वतः महुआ विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीला उभे राहिले होते. मात्र या मतदारसंघात त्यांना पराभवाचे तोंड पाहावे […] The post Bihar Election Result 2025 : लालू यादव यांचे ज्येष्ठ पुत्र तेजप्रताप यादव यांचा दारूण पराभव appeared first on Dainik Prabhat .
Ngozi Okonjo-Iweala : भारताने सुधारणांचे जागतिक नेतृत्व करावे; जागतिक व्यापार संघटनेचे भारताला आवाहन
विशाखापट्टणम : जागतिक व्यापार संघटनेच्या जागतिक व्यापारावरील सुधारणांचे बदललेल्या परिस्थितीत भारताने नेतृत्व करण्याची गरज असल्याचे मत जागतिक व्यापार संघटनेच्या प्रमुख गोझी ओकांझो यांनी व्यक्त केले आहे. भारताची या क्षेत्रात नेतृत्व करण्याची क्षमता असल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय उद्योग महासंघाने भारत आणि युरोपियन महासंघादरम्यान सहकार्य परिषदेचे आयोजन केले आहे. या परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की, भारत सध्या […] The post Ngozi Okonjo-Iweala : भारताने सुधारणांचे जागतिक नेतृत्व करावे; जागतिक व्यापार संघटनेचे भारताला आवाहन appeared first on Dainik Prabhat .
Jasprit Bumrah Calls Bavuma Short Prince Reacts : कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेचा पहिला सामना खेळला जात आहे. या सामन्याच्या पहिल्याच दिवशी भारताने प्रभावी कामगिरी करत दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव १५९ धावांवर संपुष्टात आणला. या दरम्यान, भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाला ‘बुटका’ असे म्हटल्याचा एक […] The post IND vs SA : ‘यावर चर्चा होणार नाही…’, बुमराहने बावुमाबद्दल केलेल्या वादग्रस्त टिप्पणीवर आफ्रिकेच्या कोचची पहिली प्रतिक्रिया appeared first on Dainik Prabhat .
आंध्र प्रदेशात साडेतीन लाख कोटींची गुंतवणूक; 1.26 लाख नवीन रोजगार निर्माण होणार
विशाखापट्टणम : गुंतवणूकदारांचा पुन्हा एकदा आंध्र प्रदेशकडे ओढा वाढू लागला आहे. मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखाली या राज्याने एक विक्रम प्रस्थापित करत फक्त एका दिवसात 35 प्रमुख सामंजस्य करारांवर स्वाक्षरी केली. यामुळे राज्यात 3.65 लाख कोटींच्या गुंतवणुकीचा मार्ग मोकळा झाला असून 1.26 लाख नवीन नोकर्या निर्माण होणार आहेत. देशांतर्गत आणि परदेशी कंपन्यांनी या करारांमध्ये […] The post आंध्र प्रदेशात साडेतीन लाख कोटींची गुंतवणूक; 1.26 लाख नवीन रोजगार निर्माण होणार appeared first on Dainik Prabhat .
CSMT परिसरात सापडलेल्या त्या बॅगेत नेमकं काय सापडलं ?
मुंबई : देशातील प्रमुख शहरांमध्ये सुरक्षेची परिस्थिती अधिक ताणलेली असताना, मुंबईत आज पुन्हा एकदा संशयास्पद वस्तूमुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) जवळ बस डेपो परिसरात एक लाल रंगाची बेवारस बॅग आढळल्याची माहिती मिळताच सुरक्षा यंत्रणा तातडीने सक्रिय झाल्या. काही क्षणातच पोलीस कर्मचारी आणि बीडीडीएस पथकाने परिसर सील करत तपासणी केली.बॅगेत नेमकं काय सापडलं?तपासणीदरम्यान बॉम्ब शोधक पथकाने बॅग काळजीपूर्वक उघडली असता, त्यात फक्त कपडे, टॉवेल, काही वह्या व पुस्तकं आणि काही कागदपत्रे आढळली. स्फोटक पदार्थ किंवा कोणतीही धोकादायक सामग्री सापडली नसल्याची खात्री मिळाल्यानंतर अधिकाऱ्यांनी परिसर पुन्हा सामान्य लोकांसाठी खुला केला. दोन तासांहून अधिक काळ तणावात असलेल्या प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला.https://youtube.com/shorts/YF4lvsg6V8g?si=THRHByIECvs_GHbyबीडीडीएस पथकाचे अधिकारी सचिन जाधव यांनी सांगितले की, प्राथमिक प्रतिसाद म्हणून ही तपासणी करण्यात आली. घटनास्थळी पोहोचताच आम्ही बॅगची सुरक्षितपणे तपासणी केली. परंतु बागेत कोणताही घातक पदार्थ नव्हता, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच सुरुवातीच्या अहवालात आलेल्या काही तफावतींची पोलिसांकडून पडताळणी केली जात असल्याची माहितीही त्यांनी दिली.दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटानंतर, मुंबई पोलिसांनी शहरातील महत्वाच्या ठिकाणी सुरक्षा वाढवली आहे. गेटवे ऑफ इंडिया, हाजी अली, मरीन ड्राइव्ह, सिद्धिविनायक मंदिर, महालक्ष्मी मंदिर तसेच प्रमुख रेल्वे स्थानकांवर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.रेल्वे स्थानकांवर बॅगा, वाहनांची तपासणी आणि CCTV च्या माध्यमातून सतत देखरेख सुरू आहे. प्रवाशांची हालचाल सुरळीत असली तरी सुरक्षा दलांची उपस्थिती पूर्वीपेक्षा लक्षणीयरीत्या वाढलेली दिसत आहे.पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा हालचाल ताबडतोब १०० क्रमांकावर कळवण्याचे आवाहन केले आहे. तसेच सोशल मीडियावर कोणत्याही अप्रमाणित माहितीचे प्रसारण टाळावे, अशी विनंतीही करण्यात आली आहे.
पोटनिवडणुकांमध्ये भाजपचा दोन जागांवर विजय
नवी दिल्ली : देशातील सात राज्यांतील आठ विधानसभा मतदारसंघामधे झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी झाली. भाजप आणि काँग्रेसने प्रत्येकी दोन तर आम आदमी पार्टी, झारखंड मुक्ती मोर्चा, मिझो नॅशनल फ्रंट आणि पीपल्स डेमाक्रॅटिक पार्टी यांनी प्रत्येकी एक जागा जिंकली.जम्मू कश्मीरमधल्या नागरोटा मतदारसंघात देवयानी राणा, तर ओडिशातल्या नवपाडा मतदारसंघात जय ढोलकिया हे भाजपाचे उमेदवार निवडून आले. तेलंगणात हैद्राबादमधल्या ज्युबेली हिल्स मतदारसंघातून नवीन यादव, राजस्थानमधल्या अंता मतदारसंघात प्रमोद जैन भाया हे काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले. बडगाममधे जम्मू काश्मीर पीपल्स डेमॉक्रॅटिक पार्टीचे आगा सईद मुन्तजिर मेहदी, मिझोरममधे दाम्पा इथं मिझो नॅशनल फ्रंटचे डॉ. आर लालथंगलियाना, पंजाबच्या तरणतारण मतदारसंघात आम आदमी पार्टीचे हरमीत सिंग संधू, तर झारखंडच्या घाटशिला मतदारसंघात झारखंड मुक्तिमोर्चाचे सोमेश चंद्र सोरे निवडून आले आहेत.
बिहारमधील विजयानंतर बोलले पंतप्रधान मोदी, सर्वपक्षीय नेत्यांचे आणि नागरिकांचे मागितले सहकार्य
नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये एनडीएने मिळवलेल्या विजयाचा उत्सव आज दिल्लीत रंगला. निकाल स्पष्ट होताच भाजपच्या मुख्यालयात कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आणि या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना आणि देशाला संबोधित केले.एनडीएच्या भक्कम कामगिरीनंतर आयोजित कार्यक्रमात मोदी यांनी बिहारमधील नागरिकांचे मनापासून आभार मानले. मतदारयादीच्या दुरुस्तीसाठी निवडणूक आयोगाने सुरू केलेल्या मोहिमेला सर्वपक्षीय सहकार्य मिळावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. त्यांनी विरोधकांवरही टोला लगावत मतदारांच्या जागरूकतेचे कौतुक केले.मोदी म्हणाले की, “या वेळी दोन टप्प्यात मतदान झाले, पण कुठेही पुनर्मतदानाची वेळ आली नाही. हे शांततापूर्ण मतदानासाठी प्रयत्न करणाऱ्या अधिकाऱ्यांचे, सुरक्षा दलांचे आणि जागरूक मतदारांचे यश आहे. देशाला तुमचा अभिमान वाटतो.”पंतप्रधानांनी सांगितले की बिहारने मतदारयादी सुधारण्याच्या उपक्रमाला मोठा प्रतिसाद देऊन लोकशाहीची पवित्रता जपली आहे. “आता प्रत्येक राजकीय पक्षाने बूथवर संघटनांना सक्रिय करून हे काम पुढे न्यायला हवे. जेणेकरून देशभरात मतदारयादी अधिक पारदर्शक बनेल,” असे ते म्हणाले.मोदी म्हणाले, “लोकशाहीची जननी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बिहारने आज पुन्हा एकदा खोट्या राजकारणाला धडा शिकवला. जनतेने स्पष्ट संदेश दिला आहे की जामिनावर बाहेर असलेल्या नेत्यांना ते साथ देणार नाहीत.”ते पुढे म्हणाले, “आज भारत खऱ्या सामाजिक न्यायासाठी मतदान करत आहे, जिथे प्रत्येक कुटुंबाला समान संधी, सन्मान आणि विकासाचा मार्ग खुला आहे. फक्त तात्पुरते खुश करणे नाही, तर लोकांच्या मनात खरी समाधानाची भावना निर्माण करणे हेच जनतेला अपेक्षित आहे.बिहारमधील कथाकथित ‘जंगलराज’चा उल्लेख करताना मोदी म्हणाले, “हा विजय त्या माताभगिनींचा आहे ज्यांनी त्या काळात भीतीचे दिवस पाहिले आहेत, आणि त्या तरुणांचा आहे ज्यांचे भविष्य हिंसाचाराने प्रभावित झाले होते. आता बिहार विकासाच्या दिशेने धावत आहे आणि ही प्रगती थांबणार नाही.”
Bihar Election 2025 | Rahul Gandhi : बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांवर काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “बिहारमधील कोट्यवधी मतदारांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. त्यांनी महागठबंधनावर दाखवलेला विश्वास महत्त्वाचा आहे. बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक आहे. सुरुवातीपासूनच निष्पक्ष न राहिलेल्या निवडणुकीत आम्हाला विजय मिळवता आला नाही. ही लढाई संविधान आणि लोकशाहीच्या संरक्षणाची आहे. […] The post Bihar Election 2025 : “बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक आहे..”; निवडणुकीच्या निकालांवर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया appeared first on Dainik Prabhat .
Bihar Election : बिहारमध्ये एनडीएला बहार; संख्याबळात थेट २०० पार
पाटणा : अत्यंत प्रतिष्ठेच्या बनलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत बहारदार कामगिरी करत एनडीएने बिहारची सत्ता राखली. सत्ताधाऱ्यांच्या त्सुनामीत विरोधकांची महाआघाडी शब्दश: भुईसपाट झाली. एनडीएने तीन-चतुर्थांश बहुमत मिळवत बिहारच्या सत्तेवरील पकड आणखी मजबूत केली. एकूण २४३ जागा असणाऱ्या विधानसभेत सत्ताधारी आघाडीने थेट २०० चा पल्ला पार केला. सत्ताधाऱ्यांनी मिळवलेल्या घवघवीत, निर्णायक विजयाच्या तडाख्याने विरोधकांचे सत्तेचे स्वप्न भंगले. […] The post Bihar Election : बिहारमध्ये एनडीएला बहार; संख्याबळात थेट २०० पार appeared first on Dainik Prabhat .
Space Station : अंतराळ स्थानकात अडकलेले चीनचे अंतराळवीर पृथ्वीवर सुखरुप परतले
बीजिंग : अंतराळातील काही कचरा अंतराळ यानाला धडकल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून अंतराळ स्थानकातच अडकून पडलेले चीनचे ३ अंतराळवीर आज पृथ्वीवर सुखरुप परतले. शेन्झोउ-२१ अंतराळयानाचे रिटर्न कॅप्सूलमधून चेन डोंग, चेन झोंगरुई आणि वांग जी या अंतराळवीरांना घेऊन उत्तर चीनच्या इनर मंगोलिया स्वायत्त प्रदेशातील डोंगफेंग लँडिंग साइटवर उतरले, असे चीनच्या अंतराळ संस्थेने सांगितले. हे तिन्ही अंतराळवीर ५ […] The post Space Station : अंतराळ स्थानकात अडकलेले चीनचे अंतराळवीर पृथ्वीवर सुखरुप परतले appeared first on Dainik Prabhat .
Ashok Chavan : नांदेडमध्ये अशोक चव्हाण एकाकी! चिखलीकरांकडून हेमंत पाटील यांचे समर्थन
नांदेड : नगर परिषद व नगर पंचायतींचा बिगूला वाजला आहे. येत्या २ डिसेंबरला या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार असून इच्छूकांनी आपले उमेदवारी अर्ज भरण्यास देखील सुरुवात केली आहे. नांदेडमध्ये अजूनही भारतीय जनता पार्टीने कोणताही युतीचा प्रस्ताव दिला नसल्याचे राष्ट्रवादी अजित पवार पक्षातील माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी म्हटले आहे. दरम्यान, शिवसेनेचे आमदार हेमंत […] The post Ashok Chavan : नांदेडमध्ये अशोक चव्हाण एकाकी! चिखलीकरांकडून हेमंत पाटील यांचे समर्थन appeared first on Dainik Prabhat .
बिहारमधील गंगा वाहत पश्चिम बंगालला जाते; नेमकं काय म्हणाले मोदी?
Bihar Election : बिहारमधील गंगा वाहत पुढे पश्चिम बंगालला जाते. आगामी काळात आम्ही पश्चिम बंगालमधील जंगलराज संपवू, असे सूचक विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. बिहारमधील विजयानंतर नवी दिल्लीतील भाजप मुख्यालयातून त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. नरेंद्र मोदी म्हणाले, बिहारच्या प्रत्येक घरात आज मखान्याची खीर बनवली जाईल. निवडणुकीच्या निकालाने अशरक्षः विरोधकांचा सुपडा साफ केला आहे. […] The post बिहारमधील गंगा वाहत पश्चिम बंगालला जाते; नेमकं काय म्हणाले मोदी? appeared first on Dainik Prabhat .
Bihar Election 2025 : राष्ट्रवादीच्या 15 उमेदावांराना पराभवाचा धक्का !
Bihar Election 2025 : राष्ट्रीय राजकारणावर दूरगामी प्रभाव टाकू शकणाऱ्या आणि देशाच्या राजकारणाची दिशा ठरवण्याच्यादृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. यामध्ये एनडीएने बहुमताचा आकडा सहज पार केला. मात्र, महाराष्ट्रामध्ये महायुतीमध्ये सत्तेत असणाऱ्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांना पराभवाचा धक्का बसला असून जवळपास सर्वच उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. […] The post Bihar Election 2025 : राष्ट्रवादीच्या 15 उमेदावांराना पराभवाचा धक्का ! appeared first on Dainik Prabhat .
बिहारची तरुण आमदार होणार २५ वर्षांची मैथिली ठाकूर, निवडणुकीत ११,७३० मतांनी विजयी
Biharelection2025 : बिहार विधानसभा निवडणुकीत दरभंगा जिल्ह्यातील अलीनगर मतदारसंघाने या वेळी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कारण पहिल्यांदाच राजकीय मैदानात उतरलेल्या लोकप्रिय गायिका मैथिली ठाकूरला भाजपने उमेदवारी दिली होती. मतमोजणी सुरू झाल्यापासून मैथिलीच्या मतदारसंघात काय होणार याकडे अनेकांचे लक्ष होते.बिहारमधील अलीनगर मतदारसंघातून भाजपने गायिका मैथिली ठाकूरला उमेदवारी दिली. मैथिली विरोधात RJDने बिनोद मिश्राला उमेदवारी दिली. जनसुराज पक्षाने बिप्लब कुमार चौधरी याला उमेदवारी दिली होती. अलीनगर मतदारसंघासाठी एकूण १२ उमेदवार मैदानात उतरले होते.अलीनगर विधानसभा मतदारसंघात मतमोजणीच्या एकूण २५ फेऱ्या झाल्या, भाजपच्या मैथिली ठाकूरने एकूण ८४ हजार ९१५ मते मिळवली. मैथिलीचा विधानसभेच्या निवडणुकीत ११ हजार ७३० मतांनी विजय झाला. या निवडणुकीत राष्ट्रीय जनता दलाच्या अर्थात आरजेडीच्या बिनोद मिश्रा यांना एकूण ७३ हजार १८५ मते मिळाली. त्यांचा या निवडणुकीत ११ हजार ७३० मतांनी पराभव झाला. विजयी झालेली मैथिली ठाकूर ही अवघ्या २५ वर्षांची आहे. ती बिहारची तरुण आमदार म्हणून लवकरच विधानसभेत आमदारकीची शपथ घेणार आहे.
पाटणा : बिहार विधानसभेच्या निकालांत एनडीएला मोठं यश मिळाल्यानंतर देशभरात भाजप कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण निर्माण झालं आहे. बिहारच्या जनतेनं स्पष्ट बहुमत देत एनडीए सरकारला मार्ग मोकळा करून दिला आहे. या विजयावर महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मोठा निशाणा साधला आहे.फडणवीस म्हणाले की, “बिहारच्या नागरिकांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला आहे. लोकांनी विकासाला मत दिलं आहे. या वेळची स्थिती २०१० मधील विक्रमालाही मागे टाकेल.” चिराग पासवान, मांझी, उपेंद्र कुशवाहा आदी मित्रपक्षांनाही जनतेनं मोठा प्रतिसाद दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.काँग्रेस आणि राहुल गांधीने देशभरात चालवलेल्या प्रचारावर बोलताना फडणवीस म्हणाले की, “सतत घटनात्मक संस्थांवर टीका करणे, सरकारच्या कार्यपद्धतीवर बिनबुडाचे आरोप करणे, या सर्व गोष्टींमुळेच काँग्रेसची अवस्था दिवसेंदिवस दयनीय होत चालली आहे. राहुल गांधी ज्या पद्धतीने आरोपांच्या राजकारणात मग्न आहेत, त्याचा परिणाम निवडणुकांमध्ये दिसत आहे. बिहारमध्ये तर काँग्रेसच्या इतिहासातील सर्वात कमी आकडा नोंदवला गेलाय.”राहुल गांधींनी मांडलेल्या ‘व्होट चोरी’च्या मुद्द्यावर त्यांनी व्यंगात्मक भाष्य करत, लोकांचा पूर्ण विश्वास मोदी आणि नितीश कुमार यांच्या नेतृत्वावर असल्याचं सांगितलं. तसेच काँग्रेस आणि इतर महाआघाडीने आता गंभीर आत्मपरीक्षण करायला हवं, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.फडणवीस यांनी सांगितलं की, “बिहारच्या निवडणुकांत जातीय समीकरणं किंवा इतर मुद्द्यांपेक्षा विकास आणि सुशासन यांनाच लोकांनी प्राधान्य दिलं. मागील काळात जिथे थोडी नाराजी दिसत होती, यावेळी मात्र प्रो-इन्कम्बन्सीची लाट होती. आम्हाला १६० जागा मिळणार अशी अपेक्षा होती, परंतु त्याहीपेक्षा मोठा विजय मिळाला.”या निकालांनंतर मुख्यमंत्रीपदाबाबत प्रश्न उपस्थित होत असताना फडणवीस यांनी स्पष्ट केलं की, “हा निर्णय आमचे वरिष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि पक्षाचे राष्ट्रीय नेतृत्व तसेच नितीश कुमार हे एकत्रितपणे घेतील. मुख्यमंत्री कोण होणार यावर वक्तव्य करण्याचा अधिकार मला नाही.” अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
घाटकोपर झुणझुणवाला महाविद्यालय ते अंधेरी-घाटकोपर जोड मार्गाच्या रुंदीकरणाचा मार्ग खुला
आणखी ३७ बांधकामांवर महापालिकेची कारवाईमुंबई (खास प्रतिनिधी) : घाटकोपर येथील झुणझुणवाला महाविद्यालय ते अंधेरी-घाटकोपर जोड मार्गाच्या (एजीएलआर) रुंदीकरणामुळे बाधित होणाऱ्या ३७ बांधकामांवर महानगरपालिकेच्या ‘एन’ विभाग कार्यालयाच्या वतीने शुक्रवारी १४ नोव्हेंबर २०२५रोजी कारवाई करून ते सर्व बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली.मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशांनुसार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनात, उपायुक्त (परिमंडळ-६) संतोषकुमार धोंडे यांच्या देखरेखीखाली, सहायक आयुक्त (एन विभाग) डॉ. गजानन बेल्लाळे यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.घाटकोपर (पश्चिम) येथील रेल्वे स्थानकाला समांतर असलेल्या झुणझुणवाला महाविद्यालय ते अंधेरी-घाटकोपर जोड मार्गादरम्यान रस्ता रुंदीकरणाचे काम महानगरपालिकेच्या वतीने हाती घेण्यात आले आहे. या रुंदीकरणाच्या कामात रस्त्यालगत असलेल्या काही बांधकामांमुळे अडथळा निर्माण झाला होता. या रस्त्याच्या बांधकामामुळे बाधित झालेली ३७ बांधकामे शुक्रवारी तोडण्यात आले.घाटकोपर येथील झुणझुणवाला महाविद्यालय ते अंधेरी-घाटकोपर जोड मार्गाच्या (एजीएलआर) रुंदीकरणामुळे बाधित होणाऱ्या २४ बांधकामांवर महानगरपालिकेच्या ‘एन’ विभाग कार्यालयाच्या वतीने गुरुवारी १३ नोव्हेंबर २०२५ रोजी कारवाई करण्यात आली होती. ही सर्व बांधकामे जमिनदोस्त करण्यात आली.
दक्षिण आफ्रिका सर्वबाद १५६, भारत एक बाद ३७
कमी प्रकाशामुळे खेळ पहिल्या दिवसाचा खेळ लवकर संपवला कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला शुक्रवारपासून सुरूवात झाली आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ लवकर संपवण्यात आला आहे. खराब सूर्यप्रकाशामुळे पंचांनी काही वेळ सामना सुरू ठेवला, पण हिवाळा असल्याने लवकर अंधार पडतो. त्याचप्रमाणे अंधार पडू लागल्याने खेळ लवकर बंद करण्यात आला.जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीपुढे आफ्रिकेच्या खेळाडूंनी सपशेल शरणागती पत्करली. बुमराहच्या या नेत्रदिपक गोलंदाजीमुळे भारताने दक्षिण आफ्रिकेचा डाव १५६ धावांमध्ये गुंडाळला. बुमराहला अन्य गोलंदाजांनी चांगली साथ दिली. बुमराने त्याच्या कसोटी कारकिर्दीत १६ व्यांदा एका डावात पाच बळी घेतले. मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. अक्षर पटेलने एक विकेट घेतली, तर सलामीवीर एडेन मार्करामने सर्वाधिक ३१ धावा केल्या. भारताने दक्षिण आफ्रिकेला १५६ धावांवर सर्वबाद केल्यानंतर फलंदाजी करताना २० षटकांत १ बाद ३७ धावा केल्या आहेत. यशस्वी जैस्वाल बाद झाल्यानंतर केएल राहुल व वॉशिंग्टन सुंदरने संघाचा डाव सावरला. ईडन गार्डन्स स्टेडियमवर कर्णधार टेम्बा बावुमाने नाणेफेक जिंकली आणि फलंदाजीचा निर्णय घेतला, परंतु संघाने पहिल्या तासातच आपले सलामीवीर गमावले. टी ब्रेकपर्यंत आठ फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले होते. शेवटच्या सत्राच्या तिसऱ्या षटकात जसप्रीत बुमराहने सायमन हार्मर आणि केशव महाराज यांना बाद केले, ज्यामुळे दक्षिण आफ्रिकेला १५९ धावांवर बाद केले. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने १ बाद ३७ धावा केल्या होत्या. केएल राहुल १३ आणि वॉशिंग्टन सुंदर ६ धावांवर नाबाद राहिले. सलामीवीर यशस्वी जैस्वाल १२ धावांवर बाद झाला, त्याला मार्को यान्सनने बोल्ड केले.जसप्रीत बुमराहचा विक्रम या डावात ५ गडी बाद करताच बुमराहच्या नावे मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. बुमराहने कसोटी क्रिकेटमध्ये १६ वेळेस एकाच डावात ५ गडी बाद करण्याचा पराक्रम केला आहे. यासह त्याने भारताचे माजी गोलंदाज भागवत चंद्रशेखर यांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. भारतीय संघासाठी खेळताना आर अश्विनने ३७ वेळा, अनिल कुंबेळेंनी ३५ वेळा, हरभजन सिंगने २५ वेळा, कपिल देव यांनी २३ वेळा ५ गडी बाद करण्याचा पराक्रम केला आहे. यासह बुमराहच्या नावे आणखी एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. २०१९ मध्ये बांगलादेशविरूद्ध झालेल्या डे-नाईट कसोटी सामन्यात गोलंदाजी करताना ईशांत शर्माने गोलंदाजी करताना पहिल्याच दिवशी ५ गडी बाद करण्याचा पराक्रम केला होता. त्याआधी कसोटी क्रिकेटमध्ये गोलंदाजी करताना डेल स्टेनने २००८ मध्ये खेळताना हा विक्रम आपल्या नावे केला होता. दरम्यान ६ वर्षांनंतर भारतात गोलंदाजी करताना, पहिल्याच दिवशी ५ गडी बाद करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो अव्वल स्थानी पोहोचला आहे.कुलदीपची संघातून रिलीज करण्याची मागणीकुलदीप यादवने बीसीसीआयकडे सुट्टी मिळावी अशी विनंती केली आहे. या महिन्याच्या अखेरीस कुलदीप यादव लग्न करणार असून याकरता त्याने सुट्टीसाठी अर्ज केला आहे. भारत आणि पाकिस्तानमधील तणावामुळे इंडियन प्रीमियर लीग नियोजित तारखेपेक्षा उशिरा संपल्यामुळे त्याचं लग्न पुढे ढकलावं लागलं होतं. कुलदीपने नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यासाठी सुट्टीची विनंती केली आहे. भारत २२ नोव्हेंबरपासून गुवाहाटीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसरा कसोटी सामना खेळणार आहे, तर दोन्ही संघांमधील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला ३० नोव्हेंबरला रांचीमधून सुरूवात होणार आहे. कुलदीपच्या सुट्टीवर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही.
मुंबईत मागील वर्षभरात कृष्ठरोगाचे ६२० नवीन रुग्ण
येत्या १७ नोव्हेंबर ते २० डिसेंबर पर्यंत कृष्ठरोग शोध अभियान, सुमारे ४९ लाख नागरिकांची होणार तपासणीमुंबई (खास प्रतिनिधी) : ‘राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम’ च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार वर्ष २०३० पर्यत कुष्ठरोग निर्मूलनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी कुष्ठरोग रुग्ण लवकरात लवकर शोधून औषधोपचाराखाली आणण्यासाठी महानगरपालिकेमार्फत विशेष अभियान राबविण्यात येणार आहे.मागील वर्षभरात म्हणजे सन २०२४-२५ मध्ये मुंबईत एकूण ६२० नवीन कुष्ठरुग्णांचे निदान करण्यात आले. यापैकी ९६ रुग्ण मुंबईत ६ महिन्यापेक्षा कमी कालावधी साठी वास्तंव्यास होते. निदान झालेल्या सर्व कुष्ठरुग्णांवर उपचार सुरु करण्यात आल्याचा दावा महापालिका आरोग्य विभागाने केला आहे.मुंबईत सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे १७ नोव्हेंबर २०२५ ते २ डिसेंबर २०२५ या कालावधीत ‘कुष्ठरोग शोध अभियान’ राबविण्यात येणार आहे. अभियानाच्या माध्यमातून एकूण ९ लाख ८६ हजार घरांतील अंदाजित ४९ लाख नागरिकांची तपासणी मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या अभियानादरम्यान आढळलेल्या नवीन कुष्ठरुग्णांची नोंदणी करण्यात येईल. त्यांना नजिकच्या महानगरपालिका आरोग्य केंद्रे, दवाखाने येथे मोफत उपचाराकरिता संदर्भित केले जाईल. मुंबईत कुष्ठरोग शोध तपासणी मोहीम अंतर्गत शेवटच्या घटकापर्यंत पोहचत नागरिकांची तपासणी करावी. कुष्ठरोग प्रसाराची साखळी खंडित करण्यासाठी नागरिकांनीही अभियानामध्ये सक्रियपणे सहभागी व्हावे, असे आवाहन मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले आहेत.कुष्ठरोगाचे असांसर्गिक कुष्ठरोग व सांसर्गिक कुष्ठरोग असे दोन प्रकार असून बहुविध औषधोपचार पद्धतीने कुष्ठरोग पूर्णपणे बरा होतो. कुष्ठरोगाच्या प्रकाराप्रमाणे ‘एम. डी. टी.’ चे औषध असांसर्गिक रुग्णास ६ महिने व सांसर्गिक रुग्णास १ वर्ष एवढ्या कालावधीसाठी देण्यात येते. या रोगाची लक्षणे दिसल्यास नागरिकांनी निदानासाठी जवळच्या महानगरपालिका तसेच शासकीय रुग्णालयात संपर्क साधावा. घरोघरी आरोग्य तपासणीसाठी येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.कुष्ठरोगाची लक्षणे व उपचार पद्धतीकुष्ठरोगामध्ये रूग्णांच्या त्वचेवर फिकट / लालसर बधीर चट्टा/ चट्टे येणे,जाड बधीर तेलकट चकाकणारी त्वचा,कानाच्या पाळ्या जाड होणे,तळहातावर व तळपायावर मुंग्या येणे, बधीरपणा,हाताची व पायाची बोटे वाकडी होणे
फास्टटॅग नसलेल्या वाहनचालकांना आजपासून दुप्पट पैसे मोजावे लागणार
यूपीआयद्वारे पेमेंट करणाऱ्यांना १.२५ पट जास्त रकमेचा दंडमुंबई : नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया (एनएचएआय) ने देशभरातील राष्ट्रीय महामार्ग आणि एक्सप्रेसवेवरील सुमारे १,१५० टोल प्लाझावर 'फास्टटॅग वार्षिक पास' सुविधा नुकतीच सुरू केली आहे. स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर सुरू झालेल्या या नवीन पासला खरेदीदारांकडून अतिशय जबरदस्त प्रतिसाद मिळाला. केवळ एका दिवसात १.४ लाख लोकांनी हा पास खरेदी केला. या अभूतपूर्व प्रतिसादानंतर, एनएचएआयने एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. या घोषणेनुसार, १५ नोव्हेंबरपासून, ज्या वाहनांमध्ये फास्टटॅग नसेल आणि वाहन चालकांनी ऑनलाईन पेमेंट केले तर त्यांना टोल शुल्काच्या केवळ १.२५ पट रक्कम आकारली जाईल.ऑनलाईन कॅश पेमेंट पद्धतीमुळे विशेषतः नॉन-फास्टटॅग वापरकर्त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यापैकी अनेक प्रवासी महामार्ग आणि एक्सप्रेसवेवरील टोल भरण्यासाठी यूपीआय किंवा इतर डिजिटल पेमेंट पद्धतींवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असतात. सध्याच्या नियमानुसार, ज्यांच्याकडे वैध फास्टटॅग नाही, त्यांना रोखीने व्यवहार केल्यास मानक टोल रकमेच्या दुप्पट (दोन पट) शुल्क भरावे लागते. मात्र, १५ नोव्हेंबरपासून लागू होणाऱ्या सुधारित टोल रचनेमुळे नॉन-फास्टटॅग वापरकर्त्यांना यूपीआय वापरताना केवळ नियमित शुल्काच्या १.२५ पट रक्कम भरावी लागेल. यामुळे त्यांचा आर्थिक भार कमी होईल आणि देशात डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन मिळेल.या नवीन शुल्क धोरणाचे उद्दिष्ट आणि गरज स्पष्ट करताना मंत्रालयाने म्हटले आहे की, ‘नॅशनल हायवे फी (दरांचे निर्धारण आणि वसुली) नियम, २००८ मध्ये करण्यात आलेली ही सुधारणा, कार्यक्षम टोल वसुलीसाठी आणि टोल प्लाझावरील गर्दी कमी करण्यासाठी तंत्रज्ञानाचा लाभ घेण्याच्या भारत सरकारच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. सुधारित नियमांमुळे डिजिटल पेमेंटचा अवलंब वाढेल, टोल ऑपरेशन्समध्ये पारदर्शकता वाढेल आणि राष्ट्रीय महामार्गावरील वापरकर्त्यांचा एकूण अनुभव लक्षणीयरीत्या सुधारेल.’नवीन अधिसूचनेची आजपासून अंमलबजावणीकेंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने एक उदाहरण देऊन हे स्पष्ट केले आहे. जर एखाद्या वाहनाला वैध फास्टटॅगद्वारे १००/- इतके शुल्क भरावे लागत असेल, तर ते शुल्क रोखीने भरल्यास २००/- होईल आणि यूपीआयद्वारे भरल्यास ते १२५/- असेल. हा सुधारणा राष्ट्रीय महामार्ग वापरकर्त्यांसाठी प्रवासाची सुलभता वाढवणे, टोल वसुलीच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणणे आणि शुल्क संकलन प्रक्रिया मजबूत करणे या उद्देशाने करण्यात आली आहे. ही नवीन अधिसूचना १५ नोव्हेंबर, २०२५ पासून अंमलात येईल.
Pune News : वाघोलीत मुख्यमंत्र्यांच्या विश्वासू सहकार्याच्या भेटीने खळबळ
वाघोली : वाघोली तालुका हवेली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तथा खासदार सुप्रिया सुळे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रामकृष्ण सातव पाटील यांच्या घरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आमदार श्रीकांत भारतीय यांनी सहकुटुंब भेट दिल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. खराडी, चंदननगर, वाघोली परिसरात सध्या वाघोली चे माजी उपसरपंच […] The post Pune News : वाघोलीत मुख्यमंत्र्यांच्या विश्वासू सहकार्याच्या भेटीने खळबळ appeared first on Dainik Prabhat .
Kolhapur News : कोल्हापुरात भाजपचा स्वबळाचा नारा.! देवेंद्र फडणवीस करणार उमेदवारांची घोषणा
Kolhapur | Devendra Fadnavis । Election News – कोल्हापूर जिल्ह्यातील १० नगरपरिषदा आणि ३ नगरपंचायतींच्या आगामी निवडणुकांसाठी भाजपने पक्ष कार्यालयात एकदिवसीय मॅरेथॉन बैठकीत ६ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये आजरा नगरपंचायत, चंदगड, शिरोळ, हुपरी, कुरुंदवाड आणि पेठवडगाव या नगरपरिषदा स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पक्षाच्या या धोरणात्मक निर्णयामुळे […] The post Kolhapur News : कोल्हापुरात भाजपचा स्वबळाचा नारा.! देवेंद्र फडणवीस करणार उमेदवारांची घोषणा appeared first on Dainik Prabhat .
बिहारमध्ये एनडीएचा ऐतिहासिक विजय, भाजप सर्वात मोठा पक्ष
पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएचा ऐतिहासिक विजय झाला. भारतीय जनता पार्टी (BJP) बिहारमध्ये सर्वात मोठा पक्ष झाली. आतापर्यंत जाहीर झालेल्या निकालांनुसार भारतीय जनता पार्टी ६४ जागांवर जिंकली आणि २६ जागांवर आघाडीवर आहे. जनता दल युनायटेड (JDU) ४७ जागांवर जिंकली आणि ३७ जागांवर आघाडीवर आहे. लोकजनशक्ती पार्टी (रामविलास पासवान) ११ जागांवर जिंकली आणि ८ जागांवर आघाडीवर आहे. हिंदुस्तानी अवाम मोर्चा सेक्युलर (HAMS) २ जागांवर जिंकली आणि ३ जागांवर आघाडीवर आहे. बिहार विधानसभेच्या २४३ पैकी २०२ जागांवर एनडीए विजयी किंवा आघाडीवर आहे. भाजपच्या नेतृत्वात एनडीएने विरोधकांचा धुव्वा उडवला. बिहारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकासाचे मॉडेल आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे सुशासनाचे मॉडेल लोकप्रिय झाले. जनतेची या दोन्हीला पसंती लाभली. पंतप्रधान मोदींनी जंगलराजच्या मुद्यावरुन थेट लालूप्रसाद यादव आणि राष्ट्रीय जनता दलाला लक्ष्य केले तर राज्य सरकारने निवडणुकीच्या काही दिवस आधीच कल्याणकारी योजनांचा पाऊस पाडला. याचा एनडीएला निवडणुकीत फायदा झाला. मराठा चेहरा, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची पार्श्वभूमी, पक्षनिष्ठा यामुळे महाराष्ट्रातले नेते असलेल्या विनोद तावडे यांना राष्ट्रीय राजकारणात संधी मिळाली. राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून विनोद तावडेंनी संघटनात्मक पातळीवर पक्षाचे काम प्रभावीरित्या केले. एनडीएच्या ऐतिहासिक विजयात विनोद तावडे यांचीही महत्त्वाची भूमिका आहे. त्यांना भाजप नेते धर्मेंद्र प्रधान यांचीही उत्तम साथ लाभली. या जोडगोळीने बिहारमध्ये भाजपला तळागाळापर्यंत पोहोचवले. लोकगायिका मैथिली ठाकूर यांना भाजपमध्ये आणण्यात विनोद तावडेंनी महत्त्वाची भूमिका बजावली. या सर्व प्रयत्नांला यश लाभले. बिहारमध्ये भाजपने अभूतपूर्व असे यश मिळवले.
अजित पवारांवर आली नामुष्की, स्वप्न अपूर्णच राहिले
पाटणा : आधी राष्ट्रीय पक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस मोदींच्या नेतृत्वात भाजपचा प्रभाव वाढल्यामुळे प्रादेशिक पक्ष झाला. आता पंतप्रधान मोदींच्या मार्गदर्शनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस प्रादेशिक पक्ष म्हणून कार्यरत आहे. अजित पवार राष्ट्रवादीला पुन्हा एकदा राष्ट्रीय पक्ष हा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहे. याच प्रयत्नांचा भाग म्हणून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी विविध राज्यांच्या विधानसभा निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने बिहार विधानसभेच्या १४ जागांवर उमेदवार उभे केले. पण या सर्व उमेदवारांचा पराभव झाला. बिहारमध्ये झालेल्या पराभवामुळे राष्ट्रीय पक्ष होण्याचे अजित पवारांचे स्वप्न अपूर्णच राहिले. तांत्रिकदृष्ट्या आजही राष्ट्रवादी काँग्रेस प्रादेशिक पक्ष म्हणून कार्यरत आहे.नारकटियागंज, नौटन, पिंप्रा, मनिहारी, पारसा, सोनेपूर, महुआ, राघोपूर, बाखरी, अमरपूर, पाटना साहिब, मोहानिया, सासाराम, दिनारा या मतदारसंघात राष्ट्रवादीनं उमेदवार दिले होते. यातील एकाही उमेदवाराला छाप पाडता आलेली नाही. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसची कामगिरी चांगली आहे. पण राज्याबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसला अपेक्षित यश मिळवणे जमलेले नाही. आता बिहारमधील दारुण पराभवामुळे राष्ट्रीय पक्ष होण्याच्या अजित पवारांच्या स्वप्नांना पुन्हा सुरुंग लागला आहे.
Prashant Kishor : इतरांच्या विजयातील हिरो स्वत: ठरले झिरो! प्रशांत किशोर फॅक्टर ठरला निष्प्रभ
पाटणा : निवडणूक रणनीतीकार म्हणून मोठा लौकिक प्राप्त करणारे प्रशांत किशोर बिहारच्या राजकारणात सक्रिय झाले. त्याआधी रणनीतीकार म्हणून ते इतर विविध पक्षांच्या विजयाचे हिरो ठरले. मात्र, स्वत:च्या राजकीय पदार्पणात ते झिरो ठरले. मोठा गाजावाजा झालेला प्रशांत किशोर फॅक्टर निष्प्रभ ठरल्याचे समोर आले. बिहार निवडणुकीला यावेळी तिरंगी लढतीचे स्वरूप प्राप्त होण्याची शक्यता प्रारंभी व्यक्त करण्यात आली. […] The post Prashant Kishor : इतरांच्या विजयातील हिरो स्वत: ठरले झिरो! प्रशांत किशोर फॅक्टर ठरला निष्प्रभ appeared first on Dainik Prabhat .
भाजप महाराष्ट्र प्रदेशच्या संचालन समिती राज्य संपर्क समन्वयकपदी रामकृष्ण वेताळ
यशवंतनगर : महाराष्ट्रात होणाऱ्या आगामी नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती व महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्यावतीने प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली प्रदेश संचालन समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीच्या कृषी क्षेत्र संपर्क समन्वयकपदी रामकृष्ण वेताळ यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. राज्यभरात होणाऱ्या नगरपालिका, जिल्हा परिषद, […] The post भाजप महाराष्ट्र प्रदेशच्या संचालन समिती राज्य संपर्क समन्वयकपदी रामकृष्ण वेताळ appeared first on Dainik Prabhat .
यशवंतनगर : यशवंतनगर येथील सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याने २०२५-२६ ऊस गळीत हंगामासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति मेट्रिक टन ३,५०० रुपये एवढा ऊस दर जाहीर केला आहे. हा दर राज्यातील इतर कारखान्यांच्या तुलनेत सरस असल्याने कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. ते म्हणाले, “सह्याद्रि कारखाना नेहमीच शेतकऱ्यांच्या […] The post Satara News : 2025-26 हंगामासाठी सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याकडून ऊसाला 3,500 रुपये प्रति टन दर जाहीर appeared first on Dainik Prabhat .
IND A vs UAE : वैभव सूर्यवंशीच्या स्फोटक खेळीने वेधलं लक्ष! अवघ्या इतक्या चेंडूत ठोकलं वादळी शतक
Vaibhav Suryavanshi Record Century in IND A vs UAE Match : भारताचा युवा सलामीवीर फलंदाज वैभव सूर्यवंशीने पुन्हा एकदा आपल्या स्फोटक फलंदाजीने धुमाकूळ घातला आहे. त्याने चौकार आणि षटकारांची बरसात करत प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांना अक्षरशः हतबल केले. वैभवने फक्त ३२ चेंडूत धडाकेबाज शतक झळकावले. त्याची ही विक्रमी खेळी आशिया कप राइजिंग स्टार्स स्पर्धेत यूएईविरुद्धच्या सामन्यात […] The post IND A vs UAE : वैभव सूर्यवंशीच्या स्फोटक खेळीने वेधलं लक्ष! अवघ्या इतक्या चेंडूत ठोकलं वादळी शतक appeared first on Dainik Prabhat .
N.Chandrababu Naidu : देशाचा पंतप्रधान मोदींवर विश्वास; चंद्राबाबू नायडूंनी व्यक्त केले मत
हैदराबाद : बिहारमधील मतमोजणीच्या ट्रेण्डवरुन असे दिसून येते की, मतदारांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास आहे. जनतेचा पंतप्रधान मोदींवर इतर कोणत्याही नेत्यापेक्षा जास्त भरवसा आहे, असे प्रतिपादन आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी म्हटले आहे. बिहार निवडणुकीतील मतमोजणीचे कल हे राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएच्या वाट्याला जात आहेत. त्यामुळे देशभर आनंदाचे वातावरण आहे, असेही नायडू म्हणाले. […] The post N.Chandrababu Naidu : देशाचा पंतप्रधान मोदींवर विश्वास; चंद्राबाबू नायडूंनी व्यक्त केले मत appeared first on Dainik Prabhat .
“२५ वर्षे मुंबई महापालिका लुटली” अमित साटमांचा ठाकरेंवर अप्रत्यक्ष वार
मुंबई : बिहार विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर भाजपचा आत्मविश्वास आणखी वाढला असून आता पक्षाने थेट मुंबई महापालिका निवडणुकांकडे मोर्चा वळवला आहे. “बिहारमध्ये दिसले ते फक्त झलक होती, खरी लढाई मुंबईत आहे,” अशा शब्दांत मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी निवडणूक रणधुमाळीची सुरुवात केली. यावेळी त्यांनी ठाकरे बंधूवर जोरदार टीका केली.साटम म्हणाले की, मुंबईकरांच्या पैशावर डल्ला मारणे, संपत्तीची लूट करणे आणि महापालिकेचा गैरवापर करणे, हे गेल्या गेल्या २५ वर्षांत सत्ताधाऱ्यांचे काम होते. “महापालिकेवर राज्य करणारे हे डाकू आहेत,” असा थेट आरोप करत त्यांनी नाव न घेता ठाकरे कुटुंबावर हल्ला चढवला. त्यांनी स्पष्ट केलं की, “मुंबई महापालिका ही कोणाच्याही घराण्याची जागीर नाही; मुंबईकरांची सेवा करण्यासाठी ही व्यवस्था आहे,” असे ते म्हणाले.राहुल गांधी व आदित्यवरही टीकाबिहारमधील विजयाबद्दल बोलताना साटम म्हणाले, “विरोधक पराभव झाला की वोटचोरी म्हणतात आणि जिंकले की लोकशाही आठवते. बिहारने दाखवून दिलं की देशाचा ‘पप्पू’ कोण.” त्यांनी पुढे महाराष्ट्रातील परिस्थितीवर भाष्य करत, “महाराष्ट्राचा पप्पू कोण आहे हे सांगायची गरज नाही. लवकरच त्यांनाही धडा शिकवू,” असे म्हटले, आणि नाव न घेता आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला. “कोण कोणासोबत येतंय यापेक्षा ११ वर्षांत मुंबईचा विकास कोणी केला, बीडीडी चाळ पुनर्विकासांतून ५५० चौ.फु. घर कोण देतंय, आणि मराठी भाषेला अभिजात दर्जा कोणी मिळवून दिला, हे अधिक महत्त्वाचं,” असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.
‘राम-लीला’ला १२ वर्षे: रणवीर सिंगच्या उत्कटतेने आणि रूपांतराने घडवलेला आयकॉनिक ‘राम’
मुंबई : रणवीर सिंगने साकारलेल्या ‘राम’ या अविस्मरणीय पात्राने प्रेम, अभिनय आणि सिनेमातील तीव्रतेची नव्याने व्याख्या केली, त्या आयकॉनिक भूमिकेला आज १२ वर्षे पूर्ण झाली आहेत.बारा वर्षांपूर्वी संजय लीला भन्साळींचा गोलियों की रासलीला राम-लीला प्रदर्शित झाला. रंगांची उधळण, दमदार संगीत आणि खोल भावविश्व यांनी सजलेल्या या चित्रपटाच्या केंद्रस्थानी होता रणवीर सिंगचा ‘राम’, एक असा नायक जो आधुनिक भारतीय सिनेमातील सर्वात स्मरणीय ठरला.रणवीरसाठी राम-लीला हा केवळ चित्रपट नव्हता, तर एक संपूर्ण रूपांतर होतं. त्याने प्राणप्रतिष्ठा केलेला ‘राम’ हा आग आणि आत्मा यांचं अप्रतिम मिश्रण होता—कटाक्षात ओढ, संवादात ठामपणा आणि प्रत्येक कृतीत जणू धगधगणारी भावना. त्याचा अभिनय साकारलेला नव्हता, तो अनुभवलेला होता. उत्कटता, शारीरिकता आणि करिष्मा यांचा सहज संगम त्याच्या या भूमिकेमुळेच अधिक ठळकपणे दिसला.चित्रपटाची रंगतदार दृश्यशैली, लक्षात राहणारे संगीत आणि रणवीर–दीपिकामधील न मिटणारी केमिस्ट्री यांमुळे राम-लीला एक प्रेक्षकप्रिय घटना बनली. पण या साऱ्यांना जिवंतपणा दिला तो रणवीरच्या अनियंत्रित, मनस्वी उर्जेने.आज, राम-लीला ला १२ वर्षे पूर्ण होत असताना, ‘राम’ हे पात्र प्रेम, बंडखोरी आणि सिनेमाई तेजाचे शाश्वत प्रतीक म्हणून उभे आहे. भन्साळी आणि रणवीर यांच्या पुढील दमदार सहकार्यासाठी हा चित्रपट पाया ठरला आणि रणवीर सिंगच्या ‘रूपांतरकला’च्या प्रवासाची सुरुवात इथूनच झाली.
Fastag : फास्टॅग नियमात मोठा बदल; ‘या’चुकीसाठी द्यावे लागतील दुप्पट पैसे, जाणून घ्या..
Fastag : महामार्गावरून गाडी चावणाऱ्या प्रत्येक वाहनचालकासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. उद्या, १५ नोव्हेंबर २०२५ पासून राष्ट्रीय महामार्गांवरील टोल प्लाझावर टोल पेमेंटचे नियम पूर्णपणे बदलणार आहेत. केंद्र सरकारने डिजिटल पेमेंटला चालना देण्यासाठी आणि टोल संकलन प्रक्रियेत पारदर्शकता वाढवण्यासाठी ‘नॅशनल हायवेज फी रूल्स, २००८’ मध्ये तिसऱ्या दुरुस्तीचे अधिसूचन जारी केली आहे. हा बदल फास्टॅग सिस्टमला […] The post Fastag : फास्टॅग नियमात मोठा बदल; ‘या’ चुकीसाठी द्यावे लागतील दुप्पट पैसे, जाणून घ्या.. appeared first on Dainik Prabhat .
Bihar Election Result: बिहारमध्ये भाजप JDU शिवाय सरकार स्थापन करणार? जाणून घ्या संपूर्ण समीकरण
पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत असून, भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) शानदार विजयाकडे वाटचाल करत आहे. निवडणूक आयोगाच्या (ईसीआय) ट्रेंडनुसार, एनडीएला २०० हून अधिक जागांवर आघाडी मिळाली असून, बहुमताचा आकडा (१२२) मोठ्या फरकाने ओलांडला आहे. भाजप एकट्याने ९६ जागांवर आघाडीवर असून, तो सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. दुसरीकडे, महागठबंधन मात्र केवळ […] The post Bihar Election Result: बिहारमध्ये भाजप JDU शिवाय सरकार स्थापन करणार? जाणून घ्या संपूर्ण समीकरण appeared first on Dainik Prabhat .
Bihar Election 2025 : बिहार विधानसभा निवडणूक २०२५ ची मतमोजणी सध्या सुरु असून, आतापर्यंतचे कल एनडीएच्या बाजूने दिसत आहेत. आतापर्यंतचे ट्रेंड्स पाहता, एनडीए २०३ जागांच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे चित्र आहे, तर महागठबंधन केवळ ३४ जागांवर आघाडीवर आहे. या विजयी आघाडीवर भाजपने देशभरात जल्लोष साजरा केला असून, विरोधकांनी मात्र जोरदार टीका केली आहे. निवडणुकीच्या ट्रेंडनुसार […] The post Bihar Election Results : बिहार निवडणुकीतील अभूतपूर्व विजयानंतर मोदी थोड्याच वेळात कार्यकर्त्यांना संबोधित करणार appeared first on Dainik Prabhat .
Bihar Election 2025 | Tejashwi Yadav : बिहारच्या निवडणुकीत भाजपा आणि नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड पक्षाने प्रत्येकी 101 जागांवर उमेदवार दिले होते. तर चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टीसह एनडीएतील इतर मित्रपक्षांसाठी 41 जागा सोडण्यात आल्या होत्या. त्यापैकी भाजपाने 90 हून अधिक जागांवर तर जेडीयूने 80 पेक्षा जास्त जागावर आघाडी घेतली आहे. लोक […] The post Tejashwi Yadav : अखेरपर्यंत थरार.! भाजपची टक्कर फेल; तेजस्वी यादवांचा गड सुरक्षित, राघोपूरमध्ये ‘कमबॅक’ appeared first on Dainik Prabhat .
Sri lanka team security video viral : श्रीलंका क्रिकेट संघ सध्या पाकिस्तान दौऱ्यावर वनडे मालिका खेळत आहे. मात्र, इस्लामाबादमध्ये झालेल्या एका भीषण बॉम्बस्फोटामुळे या दौऱ्यावर भीतीचे सावट पसरले आहे. या स्फोटात १२ जणांचा मृत्यू झाला होता. दहशतवादी हल्ल्याच्या भीतीच्या वातावरणातही श्रीलंकेच्या खेळाडूंना संपूर्ण मालिका खेळण्यास भाग पाडण्यात आले आहे. यामुळे पाकिस्तान सरकारने संघाला अभूतपूर्व आणि […] The post PAK vs SL : बॉम्बस्फोटानंतर पाकिस्तानमध्ये दहशत! श्रीलंकेच्या संघाला पंतप्रधानांसारखी सुरक्षा, VIDEO व्हायरल appeared first on Dainik Prabhat .
Bihar Election 2025 : बिहार विधानसभा निवडणूक २०२५ ची मतमोजणी सध्या सुरु असून, आतापर्यंतचे कल एनडीएच्या बाजूने दिसत आहेत. आतापर्यंतचे ट्रेंड्स पाहता, एनडीए २०३ जागांच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे चित्र आहे, तर महागठबंधन केवळ ३४ जागांवर आघाडीवर आहे. या विजयी आघाडीवर भाजपने देशभरात जल्लोष साजरा केला असून, विरोधकांनी मात्र जोरदार टीका केली आहे. निवडणुकीच्या ट्रेंडनुसार […] The post Bihar Election 2025 : बिहार निवडणुकीतील अभूतपूर्व विजयानंतर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया, ट्विट करत म्हणाले…. appeared first on Dainik Prabhat .
Ladaki Bahin Yojana : १ कोटींहून अधिक लाडक्या बहीणींची ई-केवायसी; पुन्हा मुदतवाढ मिळणार?
मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील ई-केवायसी प्रक्रियेला लाभार्थी महिलांकडून प्रतिसाद मिळत आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 1 कोटीपेक्षा अधिक महिलांनी त्यांची ई-केवायसी प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली आहे. ई-केवायसीची अंतिम मुदत 18 नोव्हेंबर जवळ आलेली असताना, सरकारने या मुदतीत वाढ करण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. आदिती तटकरे यांनी […] The post Ladaki Bahin Yojana : १ कोटींहून अधिक लाडक्या बहीणींची ई-केवायसी; पुन्हा मुदतवाढ मिळणार? appeared first on Dainik Prabhat .
Newasa News : सोशल मीडियात पाहुणे कलाकार झाले इच्छुक उमेदवारांचे मुलाखतकार!
नेवासे: नेवासे नगरपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीने शहरात जोर धरला असताना, इच्छुक उमेदवार कमी वेळेत जनतेत लोकप्रिय होण्यासाठी विविध युक्त्या आणि उपक्रम राबवत आहेत. मात्र, याच संधीचा गैरफायदा घेत सोशल मीडियातील काही पाहुणे कलाकार आणि स्वयंघोषित पत्रकार फेसबुक, व्हॉट्सॲप सारख्या प्लॅटफॉर्मचा वापर करून उमेदवारांना आपल्या जाळ्यात ओढत आहेत. हे ‘चालते-बोलते पत्रकार’ उमेदवारांच्या मनसुब्यांची माहिती काढून ती सोशल […] The post Newasa News : सोशल मीडियात पाहुणे कलाकार झाले इच्छुक उमेदवारांचे मुलाखतकार! appeared first on Dainik Prabhat .
पुण्यातील नवले पुल अपघात ते बिहार निवडणुक निकाल; वाचा आजच्या टॉप १० बातम्या, एका क्लीकवर…
1) पुण्यातील नवले पुल अपघातात अख्य कुटुंबचं ठरलं बळी; देवदर्शन करून परतताना काळाची झडप पुण्यातील नवले पुलावर अपघातांचे सत्र काही केल्या थांबायचे नाव घेत नाही आहे, गेल्या काही वर्षात अनेक मोठे अपघात या ठिकाणी झाले आहे. अनेकांनी आपले जीव येथे झालेल्या अपघातात गमावलेले आहेत. कालची संध्याकाळ भीषण अपघाताची ठरली. नवले पुलावरील विचित्र अपघातात आठ जणांना […] The post पुण्यातील नवले पुल अपघात ते बिहार निवडणुक निकाल; वाचा आजच्या टॉप १० बातम्या, एका क्लीकवर… appeared first on Dainik Prabhat .
Jasprit Bumrah Controversial Comment on Temba Bavuma : भारत आणि दक्षिण आफ्रिका दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात ईडन गार्डन्सवर आमनेसामने आहेत. या सामन्याच्या पहिल्या दिवशी जसप्रीत बुमराहने गोलंदाजीत तर चमकलाच, पण त्याचं एक वाक्य सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ज्यामध्ये बुमराहने दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाबद्दल ‘विवादास्पद’ टिप्पणी केली आहे. पहिल्या दिवशी दक्षिण […] The post IND vs SA : जसप्रीत बुमराहची ‘वादग्रस्त’ टिप्पणी चर्चेत! टेम्बा बावुमाला ‘बुटका’ म्हणाल्याचा VIDEO होतोय व्हायरल appeared first on Dainik Prabhat .
Bihar Election Result : बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या पहिल्या अधिकृत निकालात राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) ने धडाकेबाज सुरुवात केली आहे. जनता दल युनायटेड (JDU) चे उमेदवार महेश्वर हजारी यांनी कल्याणपूर मतदारसंघात ३८,५८६ मतांच्या प्रचंड मताधिकाराने विजय मिळवला आहे. त्यांनी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी लेनिनवादी) लिबरेशनचे […] The post Bihar Election Result : बिहारचा पहिला अधिकृत निकाल समोर; JDU च्या ‘या’ उमेदवाराने मारली बाजी; भाजपसह मित्रपक्षांचेही मोठे यश appeared first on Dainik Prabhat .
Uddhav Thackeray : भाजपाचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! थेट नगराध्यक्षपदाचा उमेदवारच लावला गळाला
मुंबई : महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा झाली असून, राज्य निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला आहे. येत्या २ डिसेंबरला २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींसाठी मतदान होणार असून, ३ डिसेंबरला निकाल जाहीर होईल. नामांकन प्रक्रिया १० नोव्हेंबरला सुरू होईल आणि १७ नोव्हेंबरला संपेल. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली असून, पक्षांतरांना […] The post Uddhav Thackeray : भाजपाचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! थेट नगराध्यक्षपदाचा उमेदवारच लावला गळाला appeared first on Dainik Prabhat .
मोहित सोमण: आज जागतिक अस्थिरतेच्या काळात किरकोळ दिलासा मिळाल्याने आज सोन्यात मोठी घसरण झाली असून चांदीत मात्र किरकोळ वाढ झाली आहे. जागतिक पातळीवरील युएस बाजारातील फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपातीची वाढलेली आशा, जागतिक भूराजकीय परिस्थितीतील अनुकुलता, व स्पॉट बाजारात सोन्याच्या गुंतवणूकीतील मागणी घटल्याने जागतिक सोन्याच्या दरात आज दिवसभरात घसरण कायम होती. भारतीय सराफा बाजारातही दिवसभरात मोठी घसरण झाली आहे.' गुड रिटर्न्स ' संकेतस्थळावरील माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात १६१ रूपये, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात १४५ रूपये, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ११९ रुपये घसरण झाली आहे. त्यामुळे प्रति ग्रॅम दर २४ कॅरेटसाठी १२७०४ रूपये, २२ कॅरेटसाठी ११६४५ व १८ कॅरेटसाठी ९५२८ रूपयांवर पोहोचले आहेत.संकेतस्थळावरील माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा किंमतीत १६१० रूपये, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा किंमतीत १४५० रूपये, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा किंमतीत ११९० रूपयांनी घसरण झाली आहे. त्यामुळे प्रति तोळा दर २४ कॅरेटसाठी १२७००० रूपये, २२ कॅरेटसाठी ११६४५० रूपये, १८ कॅरेटसाठी ९५२८० रुपयांवर पोहोचले आहेत. माहितीनुसार, मुंबईसह भारतातील प्रमुख शहरातील सोन्याचे प्रति ग्रॅम सरासरी दर २४ कॅरेटसाठी १२७०४, २२ कॅरेटसाठी ११७४०, १८ कॅरेटसाठी ९७९० रूपयावर पोहोचले आहेत. भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये (Multi Commodity Exchange MCX) सोन्याच्या निर्देशांकात संध्याकाळपर्यंत १.२३% घसरण झाली असून दरपातळी १२५१९४ रूपयांवर पोहोचले आहेत.जागतिक पातळीवरील गोल्ड फ्युचर निर्देशांकात संध्याकाळपर्यंत संध्याकाळपर्यंत १.१०% घसरण झाली असून जागतिक सोन्याचा मानक (Gold Standard Rate) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या युएस गोल्ड स्पॉट दरात संध्याकाळपर्यंत ०.६४% घसरण झाली आहे. त्यामुळे प्रति डॉलर दरपातळी ४१४३.५४ औंसवर गेली आहे. आज डॉलरच्या तुलनेत रूपयात ३ पैशाने किरकोळ घसरण झाली त्यामुळे सोन्याच्या निर्देशांकात त्याचा फारसा प्रभाव पडला नाही किंबहुना जागतिक पुरवठा साखळीत सोन्याच्या स्थिर व सुरक्षित गुंतवणूक समजल्या जाणाऱ्या सोन्याच्या गुंतवणूकीत आज घसरण झाल्याने बाजाराचे दर नियंत्रित झाले आहेत. मुख्यतः डिसेंबर महिन्यात युएस फेडरल रिझर्व्ह व्याजदरात ५० बेसिसवर कपातीची व भारतीय बाजारात रेपो दरात कपातीची शक्यता वर्तवली जात असताना ग्राहकांच्या उपभोगातही मोठी वाढ झाली असली तरी अस्थिरतेचा तोंडावर सोन्याच्या गुंतवणूकीत मोठी वाढ झाली होती. मात्र हा पॅटर्न आता बदलून मागणीत घसरण सुरू झाली आहे.आज सोन्याच्या दरात दिवसभरात घसरण झाली असली तरी ती संध्याकाळनंतर वाढीत बदलायची शक्यता तज्ञ दर्शवत आहेत कारण फेड दरावर कुठलीही निश्चितता नसल्याने बाजारात अस्थिरता कायम आहे. काही तज्ञांच्या मते ५० बेसिस पूर्णांकाने तर काही तज्ञांच्या मते ही २५ पूर्णांक होऊ शकते असे असताना गुंतवणूकदारांना सावधगिरीचा इशारा दिला जात आहे.सोन्याच्या टेक्निकल पोझिशनवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले आहेत की,'काल संध्याकाळी झालेल्या विक्रीनंतर सोन्याचे भाव कमकुवत राहिले, कारण फेडरल रिझर्व्ह सदस्यांनी सुचवले आहे की नवीन आर्थिक डेटाच्या अभावामुळे पुढील दर कपातीला विलंब होऊ शकतो, त्यामुळे सोन्याच्या भावात मंदी आली. डॉलर निर्देशांक मजबूत झाला, ज्यामुळे सोन्यावर अतिरिक्त दबाव निर्माण झाला. या आठवड्याच्या १२७००० रूपयांच्या उच्चांकावरून किमती १२५६०० रूपयांवर घसरल्या परंतु तरीही आठवड्यातून सुमारे ४% वाढ झाली आहे. सोने १२४००० ते १२७५०० रूपयांच्या श्रेणीत अस्थिर राहण्याची अपेक्षा आहे.'चांदीच्या दरात मात्र वाढ दिवसभरात कायमचांदीच्या दरात मात्र आज वाढ झाली आहे. विशेषतः कमकुवत कामगार बाजाराच्या आकडेवारीनंतर अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून लवकरच दर कपात होण्याची अपेक्षा वाढली असली तरी आज चांदीच्या किमती ४.७९% ने वाढून १६२०९१ वर स्थिरावल्या आहेत. वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, ADP आकडेवारी पाहता अमेरिकेतील खाजगी उद्योजक अथवा कंपन्यानी ऑक्टोबरच्या अखेरीस दर आठवड्याला सरासरी ११२५० नोकऱ्यांची कपात केली आहे ज्यात आज अमेझॉनचा भर पडला. असलेली परिस्थिती सुधारण्यासाठी फेड डिसेंबरमध्ये दर कमी करू शकेल असे मत बाजारात चलतीत आहे.मात्र बाजारातील सहभागी आता २५-बेसिस-पॉइंट कपातीची शक्यता ६८% दर्शवितात जी पूर्वी ६२% होती, तर युएस फेडचे गव्हर्नर स्टीफन मिरन यांनी ५०-बेसिस-पॉइंट कपात करण्याच्या मोठ्या आवाहनामुळे तेजीच्या भावनेला आणखी गती मिळाली. दिवसभ रात चांदीच्या स्पॉट फ्युचर बाजारात मागणी वाढल्याने चांदी आज किरकोळ उसळली. 'गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, चांदीच्या प्रति ग्रॅम दरात आज ०.१० रूपयांनी वाढ झाली असून प्रति किलो दरात १०० रूपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे प्रति ग्रॅम दर १७३.१० रुपये व प्रति किलो दर १७३१०० रुपयांवर पोहोचले आहेत. संकेतस्थळावरील माहितीनुसार, मुंबईसह भारतातील प्रमुख शहरातील चांदीचा प्रति १० ग्रॅम सरासरी दर १७३१ रूपये, तर प्रति किलो दर १७३१०० रूपयांवर व्यवहार करत आहे. कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये चांदीच्या निर्देशांकात संध्याकाळपर्यंत आज १.७९% घसरण झाल्याने दरपातळी १५९५५९ रुपयांवर गेली आहे.जागतिक पातळीवरील सिल्वर फ्युचर निर्देशांकात संध्याकाळपर्यंत १.६७% घसरण झाली असून कमकुवत कामगार बाजार आकडेवारीनंतर अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून लवकरच दर कपातीची अपेक्षा वाढल्याने चांदीच्या किमती ४.७९% ने वाढून १६२०९१ पातळीवर स्थिरावल्या.
Bihar Election 2025 । Kunal Kamra : बिहार विधानसभा निवडणूक २०२५ ची मतमोजणी सध्या सुरु असून, आतापर्यंतचे कल एनडीएच्या बाजूने दिसत आहेत. आतापर्यंतचे ट्रेंड्स पाहता, एनडीए २०० जागांच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे चित्र आहे, तर महागठबंधन केवळ ३९ जागांवर आघाडीवर आहे. या विजयी आघाडीवर भाजपने देशभरात जल्लोष साजरा केला असून, विरोधकांनी मात्र जोरदार टीका केली […] The post Bihar Election 2025 : “ते तिथेही भाजपा सरकार स्थापन करेल…”; कुणाल कामराची निवडणूक आयुक्तांवर जोरदार टीका appeared first on Dainik Prabhat .
Bihar Election 2025 : बिहार निवडणुकीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी दिली ‘ही’प्रतिक्रिया
ठाणे: देशभराच्या नजरा लागलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. यात भाजपा, जनता दल (युनायटेड) आणि लोजपा (रामविलास) यांसारख्या एनडीए घटक पक्षांनी एकत्रितपणे २०६ जागांवर आघाडी मिळवली आहे. दुसरीकडे, महागठबंधनला अपेक्षेपेक्षा कमी यश मिळाले असून, त्यांना केवळ मर्यादित जागांवरच समाधान मानावे लागले. या विजयानंतर एनडीएतर्फे देशभरात जल्लोष सुरू झाला आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री […] The post Bihar Election 2025 : बिहार निवडणुकीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया appeared first on Dainik Prabhat .
मोहित सोमण:आज अखेर सकारात्मक नकारात्मकतेवर भारी पडल्याने आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात अखेरच्या सत्रात वाढ झाली आहे. एनडीएचा दणदणीत विजय झाल्यासह भारतातील मजबूत फंडांमेंटल, रेपो दरातील कपातीची आश्वासकता, जागतिक अनुकल आर्थिक परिस्थिती, स्मॉलकॅप सह वित्तीय शेअर्समध्ये झालेली वाढ या बहुढंगी कारणांमुळे शेअर बाजारात किरकोळ वाढ झाली आहे. सेन्सेक्स ८४.११ अंकाने उसळत ८४५६२.७८ पातळीवर व निफ्टी ३०.९० अंकांने उसळत २५९१०.०५ पातळीवर स्थिरावला आहे. अखेर सेन्सेक्स व निफ्टीत वाढ होण्यास निफ्टी व्यापक निर्देशांकात स्मॉलकॅप १०० (०.३८%), स्मॉलकॅप १०० (०.३८%), फायनांशियल सर्विसेस (०.३५%), मिडकॅप सिलेक्ट (०.२८%) निर्देशांकात वाढ झाली असून निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात अखेरच्या सत्रात हेल्थकेअर (०.४२%), एफएमसीजी (०.५७%), पीएसयु बँक (१.१७%) निर्देशांकात सर्वाधिक वाढ झाली आहे. मात्र दुसरीकडे आयटी 'सेल ऑफ' झाल्याने बाजारातील रॅली मर्यादित राहिली आहे.जागतिक अस्थिरता कायम असताना बिहार विधानसभा निवडणुकीने शेअर बाजारात आज चार चांद लावले. त्यामुळेच बाहेरची अस्थिरता 'न्यूट्रल' करण्यात बँक निर्देशांकासह क्षेत्रीय निर्देशांकाने विशेष कामगिरी केली असल्याने निफ्टीला २५९१०.०५ पातळी गाठण्यात यश आले आहे. निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात सर्वाधिक घसरण आयटी (१.०३%), मेटल (०.८९%), ऑटो (०.५२%) निर्देशांकात झाली आहे.अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ इपका लॅब्स (१३.६४%), टीआरआयएल (९.९९%), मुथुट फायनान्स (९.८०%), एचबीएल इंजिनिअरिंग (७.९३%), ज्यूब्लिंएट फूडस (७.२९%), गार्डन रीच (५.३६%), इंजिनियर्स इंडिया (५.१३%), गोदावरी पॉवर (५.११%), बजाज होल्डिंग्स (४.९९%) समभागात झाली आहे.अखेरच्या सत्रात सर्वाधिक घसरण प्रिमियर एनर्जीज (५.९६%), वालोर इस्टेट (५.२९%), सोनाटा सॉफ्टवेअर (३.९२%), जीएमडीसी (३.६२%), अपोलो टायर्स (३.३९%), सुप्रीम इंडस्ट्रीज (३.१९%), गोदरेज अँग्रोवेट (३.०२%), अकुम्स ड्रग्स (२.९९%), इंटलेक्ट डिझाईन (२.७४%), इन्फोसिस (२.५३%) निर्देशांकात झाली आहे.आजच्या बाजारातील अखेरच्या सत्रावर विश्लेषण करताना अशिका इन्स्टिट्युशनल इक्विटीजने म्हटले आहे की,'भारतीय बाजारांचा सत्र घसरणीसह संपला, बेंचमार्क निफ्टी एका मर्यादित श्रेणीत व्यवहार करत होता. निर्देशांकाने दिवसभरात २५,८७९ पातळीचा उच्चांक आणि २५७४० पातळीचा नीचांक नोंदवला, जो दिवसभर मर्यादित दिशात्मक पूर्वाग्रह दर्शवितो. क्षेत्रनिहाय, सार्वजनिक क्षेत्रातील बँका, सीपीएसई, फार्मा, मीडिया आणि एफएमसीजी निर्देशांकांमध्ये ताकद दिसून आली, तर आयटी, धातू, ऑटो, उत्पादन आणि कमोडिटी निर्देशांकांमध्ये लक्षणीय कमकुवतपणा दिसून आला. सध्या सुरू असलेल्या बिहार निवडणुकीच्या निकालांनी एक घटक जोडला. डेरिव्हेटिव्ह्ज विभागात, मुथूटफिन, बीडीएल, आयचरमोट, आयआयएफएल आणि व्होल्टासमध्ये ओपन इंटरेस्ट बिल्डअप दिसून आला, जो या काउंटरमध्ये सक्रिय सहभाग दर्शवितो. निफ्टी निर्देशांकासाठी, २५९०० आणि २६००० स्ट्राइकने सर्वोच्च कॉल ओआय ठेवला, तर २५७०० आणि २५८०० स्ट्राइकने सर्वोच्च पुट ओआय पाहिला, जो प्रमुख प्रतिकार (Main Resistance) दर्शवितो.'
ईडन गार्डन्समध्ये बुमराहचा ‘फायर-फाईव्ह’; दक्षिण आफ्रिका पहिल्याच दिवशी मैदानाबाहेर
कोलकाता : भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने ईडन गार्डन्सवर रंगलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला जोरदार धक्का दिला. बुमराहच्या ५ विकेट्सच्या कमाल खेळीमुळे पाहुण्या दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव फक्त १५९ धावांवर संपला. भारताने पहिल्या दिवशीच सामन्यात पूर्ण पकड मिळवली.दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, पण सलामीवीरांची अर्धशतकी भागीदारी संपल्यावर भारताचा वेगवान गोलंदाज बुमराहने खेळावर मजबूत पकड केली. त्याने केशव महाराज, रिकलटन, वियान मुल्डर यांसारख्या महत्त्वाच्या फलंदाजांना मैदानावरून बाद केले.बुमराहच्या पाच विकेट्सव्यतिरिक्त भारताच्या इतर गोलंदाजांची कमालमोहम्मद सिराज: २ विकेट्सकुलदीप यादव: २ विकेट्सअक्षर पटेल: १ विकेटया गोलंदाजांच्या उत्कृष्ट परफॉर्मन्समुळे दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव फक्त ५५ षटकांत संपला.सुरुवातीच्या अर्धशतकी भागीदारीनंतर दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी टिकून राहण्याचा प्रयत्न केला, मात्र भारताच्या गोलंदाजांच्या ताणाखाली कोणताही फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही. मार्करमनं केलेल्या ३१ धावा संघात सर्वोच्च ठरल्या.पहिल्या दिवशी भारताचे सामन्यावर संपूर्ण नियंत्रण राहिले, आणि जसप्रीत बुमराहच्या आघाडीखाली टीम इंडियाने सामन्यात दमदार सुरुवात केली आहे. आता पुढील दिवसांमध्येही भारताने हा दबदबा कायम ठेवणे अपेक्षित आहे.
Supriya Sule : खासदार सुप्रिया सुळेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, भेटीचं कारण जगजाहीर...
मुंबई : देशभरात सध्या बिहार विधानसभा निवडणुकीची (Bihar Assembly Election) प्रचंड रणधुमाळी सुरू आहे. बिहारमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रचार आणि सतत घडणाऱ्या राजकीय घटनांमुळे या निवडणुकीने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. सध्या समोर येत असलेल्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, बिहारमध्ये एनडीए आघाडी मिळवू शकते, असे चित्र दिसत आहे. या निकालांचा प्रभाव केवळ बिहारपुरता मर्यादित न राहता महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणावरही जाणवत आहे. याच पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे वर्षा बंगल्यावर दाखल झाल्या आहेत. त्यांच्या या भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चांना प्रचंड वेग आला आहे. आगामी घडामोडींवर यामुळे नवे समीकरण तयार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.सुप्रिया सुळेंनी गाठला वर्षा बंगलाखासदार सुप्रिया सुळे यांनी आज शुक्रवारी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या 'वर्षा' बंगल्यावर अचानक भेट दिल्याने राजकीय वर्तुळात तात्काळ चर्चांना आणि तर्कवितर्कांना उधाण आले होते. मात्र, आता या भेटीमागील खरे आणि खासगी कारण समोर आले आहे. सकाळी अचानक झालेल्या या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. ही भेट राजकीय स्वरूपाची नसून, एका घरगुती समारंभाचे निमंत्रण देण्यासाठी होती. खासदार सुप्रिया सुळे या युगेंद्र पवार यांच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका देण्यासाठी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी आल्या होत्या. त्यामुळे, ही भेट राजकीय स्वरूपाची नव्हती, हे स्पष्ट झाले आहे. राजकीय मतभेद बाजूला ठेवून, सामाजिक संबंध जपत सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांना लग्नाचे निमंत्रण दिल्याचे या भेटीतून दिसून येते.मतांचे विभाजन का झाले, याचा अभ्यास हवा : सुप्रिया सुळेंखासदार सुळे यांनी बिहारमधील निकालांकडे गंभीरपणे पाहण्याची आवश्यकता व्यक्त केली. निवडणुकीत महाविकास आघाडीला अपेक्षित यश न मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी विश्लेषण करण्याची गरज सांगितली, बिहारमध्ये नेमकं काय झालं आहे, हे आम्ही पाहिलं पाहिजे. निकालाचा पूर्ण उलघडा (Analysis) केला पाहिजे. सुप्रिया सुळे यांनी यावेळी निवडणुकी दरम्यानच्या अनेक घटकांचा अभ्यास करण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट केले. आमचा प्रचार, मतदारांपर्यंत पोहोचलेले म्हणणे आणि इतर अनेक बाबी तपासल्या पाहिजेत, असे मत त्यांनी व्यक्त केले. त्या पुढे म्हणाल्या की, पुढच्या दोन ते तीन दिवसांमध्ये आमच्या मतांचं विभाजन का झालं, याबाबत माहिती कळून येईल. खासदार सुळे यांच्या या विधानावरून, बिहारमधील निवडणुकीतील अपयशाची कारणे शोधून पुढील निवडणुकांसाठी योग्य रणनीती आखण्याची तयारी विरोधकांनी सुरू केल्याचे स्पष्ट होते.https://prahaar.in/2025/11/14/nitish-kumar-10th-time-cm-bihar-election-result-10-thousand-transfer-women-account/तातडीने ‘सुरक्षा ऑडीट’ होण्याची गरजपुणे-बेंगळूरु राष्ट्रीय महामार्गावरील नवले पुलावर नुकत्याच झालेल्या भीषण अपघातावर खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या अपघाताबाबत मत व्यक्त करताना त्यांनी अपघात रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. खासदार सुळे यांनी या अपघाताला अतिशय दुर्दैवी म्हटले आहे. या घटनेत काही नागरिक मृत्युमुखी पडले तर अनेक जण जखमी झाले. यापूर्वीही येथे झालेल्या अपघातांमध्ये जीवितहानी झाली आहे, असे सांगत त्यांनी या मार्गाच्या गंभीर समस्येकडे लक्ष वेधले. जीवितहानी रोखण्यासाठी नऱ्हे ते रावेत या मंजूर असलेल्या एलिव्हेटेड मार्गासह इतर एलिव्हेटेड मार्गांचे काम तातडीने सुरू करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. यासोबतच, रस्ते सुरक्षेबाबत सातत्याने जनजागृती करण्याची तसेच शहरांच्या जवळून जाणाऱ्या रस्त्यांचे तातडीने 'सुरक्षा ऑडिट' (Safety Audit) होण्याची गरज असल्याचे मत त्यांनी मांडले. खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना साकडे घातले आहे: माझी नितीनजी गडकरी यांना नम्र विनंती आहे की, कृपया आपण नऱ्हे ते रावेत दरम्यानच्या एलिव्हेटेड मार्गाचे काम तातडीने सुरु करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला द्याव्या. यासह रस्ते सुरक्षेच्या उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यासाठी मोहिम हाती घ्यावी. वारंवार होणारे अपघात आणि त्यामुळे होणारी जीवितहानी रोखण्यासाठी सरकारने कठोर पाऊले उचलावीत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
Bihar Election 2025 – पूर्वी आम्ही गोऱ्यां साहेबांशी लढलो, आता आम्ही मत चोरांशी लढू. मत चोरांनी त्यांचे सिंहासन सोडावे. पंतप्रधान मोदी ज्याला पसंती देतील तो जिंकेल, जो मोदी पसंती देतील तो हरेल, असे निवडणुकीचे सध्याचे चित्र आहे, असे प्रतिपादन काँग्रेस नेते पवन खेडा यांनी केले आहे. बिहारचे निकाल आश्चर्यकारक नाहीत, असेही ते म्हणाले. बिहार विधानसभा […] The post Bihar Election 2025 : “मत चोरांनी त्यांचे सिंहासन सोडावे…”; बिहार निवडणुकीच्या निकालावर काँग्रेसची संतप्त प्रातिक्रिया appeared first on Dainik Prabhat .
Mohammed Shami traded to Lucknow Super Giants : आयपीएल २०२६ साठी जय्यत तयारी सुरू झाली आहे. आगामी हंगाम सुरू होण्यास अजून वेळ असला तरी, खेळाडूंच्या रिटेन्शन यादीची अंतिम मुदत (१५ नोव्हेंबर) आता काही तासांवर आली आहे. या दरम्यान, संघांमध्ये आपापसात ‘ट्रेडिंग’ सुरू आहे. अनेक खेळाडूंच्या अदलाबदलीची चर्चा असली तरी, शार्दुल ठाकूरच्या ट्रेडची अधिकृत घोषणा झाली […] The post Mohammed Shami : ट्रेडिंग विंडोमध्ये मोठा धमाका! शमीने सनरायझर्स हैदराबादला ठोकला रामराम, आता ‘या’ संघात दाखल appeared first on Dainik Prabhat .
Saalumarada Thimmakka : पद्मश्री पुरस्कार विजेत्या सालूमरदा थिमक्का यांचे निधन
प्रसिद्ध पर्यावरणवादी आणि पद्मश्री पुरस्कार विजेत्या सालूमरदा थिमक्का यांचे आज १४ नोव्हेंबर २०२५ रोजी वयाच्या ११४ व्या वर्षी निधन झाले. इंग्रजी वृत्तसंस्थांच्या माहितीनुसार, थिमक्का काही दिवसांपासून आजारी होत्या आणि बेंगळुरूमधील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. तिथेच त्यांनी अंतिम श्वास घेतला. ३० जून १९११ रोजी तुमकूर जिल्ह्यातील गुब्बी तालुक्यात जन्मलेल्या थिमक्का यांना ग्रामीण कर्नाटकात […] The post Saalumarada Thimmakka : पद्मश्री पुरस्कार विजेत्या सालूमरदा थिमक्का यांचे निधन appeared first on Dainik Prabhat .
बिहारमध्ये भाजपचा दणका: मुख्यमंत्री कोण होणार? आता एनडीएचा 'हा'मोठा निर्णय!
तावडे म्हणाले, 'वॅकन्सी' नव्हती, हा जातीच्या पलीकडचा विजय!पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने मिळवलेल्या दणदणीत विजयानंतर आता सगळ्यांचे लक्ष पुढील निर्णयांकडे लागले आहे. या ऐतिहासिक विजयाची धुरा सांभाळणाऱ्या भाजपचे बिहार प्रभारी विनोद तावडे यांनी नवी दिल्लीत माध्यमांशी बोलताना महत्त्वाची माहिती दिली आहे. तावडे म्हणाले की, बिहारमध्ये मुख्यमंत्री कोण होणार, याचा निर्णय एनडीएचे पाच घटक पक्ष एकत्र बसून घेतील.विनोद तावडे यांनी स्पष्ट केले की, भाजपने राजस्थान, मध्य प्रदेश किंवा महाराष्ट्रात कधीही मुख्यमंत्र्यांचा चेहरा आधी जाहीर केला नव्हता. बिहारच्या निवडणुकीतही हीच रणनीती कायम होती. विशेष म्हणजे, विरोधकांकडून नितीशकुमार आजारी असल्याचे सांगून त्यांच्याविरोधात प्रचार करण्याचा डाव होता. मात्र, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवडणुकीपूर्वीच 'बिहारमध्ये मुख्यमंत्रीपदाची कोणतीही वॅकन्सी नाही,' असे स्पष्ट करून विरोधकांच्या या खेळीला प्रभावीपणे निष्प्रभ केले होते, असे तावडे म्हणाले.आकडेवारी काय सांगते? हा विकास आणि समन्वयाचा विजयया निवडणुकीत एनडीएने ऐतिहासिक विजय नोंदवला आहे. भाजपला ९४, जदयू (जेडीयू) ला ८४, राष्ट्रीय जनता दलला २५, लोकजनशक्ती पार्टी (रामविलास) ला १९, एमआयएमला ६, राष्ट्रीय लोक मोर्चाला ४, हम पार्टीला ५ आणि काँग्रेसला २ जागांवर आघाडी मिळाली आहे. तसेच, सीपीआय २ जागांवर पुढे आहे. विनोद तावडे यांनी या विजयाचे श्रेय विकासाला, तसेच मित्रपक्षांमधील उत्तम संवाद आणि समन्वयाला दिले.नितीशकुमारांचे पुनरागमन आणि 'टीम बिहार'ची मेहनततावडे यांनी या विजयामागची भूमिका अधिक स्पष्ट केली. नितीशकुमार यांनी भाजप सरकार सोडून जेव्हा लालू प्रसाद यांच्या राष्ट्रीय जनता दलासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता, तेव्हा केंद्रीय नेतृत्त्वाने बिहार हे 'महत्त्वाचे राज्य' असल्याचे सांगून तावडेंना विशेष लक्ष देण्यास सांगितले होते. 'बिहार हे राजकारणासाठी खूप अवघड राज्य आहे,' अशी कबुली देत तावडे म्हणाले की, त्यांनी नितीशकुमार यांनी युती का सोडली, याचा अभ्यास केला. 'इंडी' आघाडीने त्यांची केलेली फसवणूक आणि त्यामुळे त्यांना पुन्हा एनडीएमध्ये परत आणण्याचा पक्षाने प्रयत्न केला. 'टीम म्हणून आम्ही काम केले आणि बिहारच्या जनतेने जातीच्या पलीकडे जाऊन विकासाला मतदान केले, हेच आमचे सर्वात मोठे यश आहे,' असे त्यांनी नमूद केले.संवाद, समन्वय आणि यशस्वी टॅगलाईनआघाडीच्या राजकारणात 'प्रामाणिक संवाद' खूप महत्त्वाचा असतो. जनता दल युनायटेड, चिराग पासवान यांची पार्टी, आणि जीतनराम मांझी यांची हम पार्टी या सर्व मित्रपक्षांसोबत भाजपचा सातत्याने संवाद होता. हा संवाद लोकसभा निवडणूक आणि जागावाटप या दोन्ही वेळी उपयोगी पडला. तावडे यांनी सांगितले की, एनडीएने जिल्हावार बैठका आणि संमेलनं घेऊन कार्यकर्त्यांना एकत्र आणले. 'रफ्तार पकड चुका है बिहार' (बिहारने वेग पकडला आहे) ही टॅगलाईन एनडीएच्या विजयात महत्त्वाची ठरली. तावडे म्हणाले की, बिहारला जातीच्या राजकारणातून बाहेर काढण्यासाठी विकासाचा मुद्दा महत्त्वाचा होता आणि ही टॅगलाईन विकासाची गती दर्शवते.विरोधकांच्या टीकेला स्पष्ट उत्तरभाजप मित्रपक्षांना संपवतो, ही विरोधकांची टीका तावडे यांनी साफ फेटाळून लावली. 'उत्तर प्रदेश असो, कर्नाटक असो किंवा आंध्र प्रदेश-तेलंगणा, जिथे युती आहे, तिथे मित्रपक्ष कायम आहेत,' असे तावडे यांनी ठामपणे सांगितले. तसेच, प्रशांत किशोर यांच्या टीकेला सुरुवातीपासूनच उत्तर द्यायचे नाही, हे ठरवले होते, त्यानुसार काम केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
Akhilesh Yadav : उत्तर प्रदेशात एसआयआर प्रभावहीन राहील; अखिलेश यादव यांनी दिला इशारा
लखनौ : बिहारमध्ये विशेष सघन पुनरावलोकन अर्थात एसआयआर प्रभावहीन राहील. हा खेळ आता पश्चिम बंगाल, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि इतरत्र शक्य होणार नाही. निवडणूक जिंकण्यासाठीचा हा एक कट असल्याचे आता उघड झाले आहे. आम्ही त्यांना हा खेळ आता खेळू देणार नाही, असे प्रतिपादन समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी केले आहे. बिहार निवडणूक निकालांमधील ट्रेंडमुळे […] The post Akhilesh Yadav : उत्तर प्रदेशात एसआयआर प्रभावहीन राहील; अखिलेश यादव यांनी दिला इशारा appeared first on Dainik Prabhat .
Bihar Election 2025 | mokama anant singh : मोकामा विधानसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. जेडीयूचे उमेदवार आणि सध्या तुरुंगात असलेले ‘अनंत सिंह‘ यांच्या समर्थकांनी त्यांच्या सुटकेची आशा व्यक्त करणारी पोस्टर्स शहरात ठिकठिकाणी लावली आहेत. ‘जेल का फाटक टूटेगा, हमरा शेर छूटेगा’ असा संदेश असलेली ही पोस्टर्स राजकीय वर्तुळात मोठी चर्चा निर्माण करत आहेत. […] The post Bihar Election 2025 : जेल का फाटक टूटेगा, हमरा शेर छूटेगा.! तुरुंगात असलेल्या ‘छोटे सरकारच्या’ घरी मतमोजणीआधीच विजयाचा जल्लोष सुरु appeared first on Dainik Prabhat .
मुंबई : ‘इंडियन आयडॉल’च्या ताज्या विकेंड एपिसोडमध्ये प्रेक्षकांना संगीत, भावना आणि प्रेरणेचा एक सुंदर मेळ अनुभवायला मिळाला. कारण या भागात साजरा करण्यात आला होता फरहान अख्तरच्या करिअरचा २५ वर्षांचा गौरव सोहळा. अभिनेता, दिग्दर्शक, लेखक आणि गायक अशा विविध रूपांत त्याने बॉलिवूडमध्ये निर्माण केलेल्या ओळखीचे सेलिब्रेशन करण्यासाठी हा विशेष एपिसोड ठेवण्यात आला.या सेलिब्रेशनसाठी फरहान अख्तरची पत्नी आणि सिंगर-होस्ट शिबानी अख्तर यांनीही मंचावर हजेरी लावली. स्पर्धकांच्या परफॉर्मन्सचा आनंद घेताना त्यांचं लक्ष सर्वाधिक वेधून घेतलं डोंबिवलीच्या दमदार गायिका अंशिकाने. या सीझनमध्ये तिच्या नैसर्गिक गायकीने, ऊर्जा आणि स्टेजवरील आत्मविश्वासाने ती सातत्याने चर्चेत राहत आहे.अंशिकाच्या जोशपूर्ण सादरीकरणानंतर भारावून गेलेली शिबानी म्हणाली, “रॉक ऑन पुन्हा बनवायचा झाला तर तूच होशील बँडची लीडर!” त्यांच्या या वक्तव्याने सेटवर उत्साहाचं वातावरण पसरलं. हे फक्त कौतुक होतं की रॉक ऑनच्या संभाव्य पुढील भागाचा संकेत, यावर चर्चा रंगली असली तरी अंशिकाच्या मेहनतीला मिळालेला हा मोठा सन्मान आहे.हा एपिसोड केवळ फरहान अख्तरच्या प्रवासाचा उत्सव नव्हता, तर त्यांच्या कलाकृतींनी भारतीय चित्रपटसृष्टी आणि संगीतविश्वावर टाकलेल्या प्रभावाची आठवणही करून देणारा होता. दिल चाहता है पासून रॉक ऑन!! पर्यंत, फरहानने तरुणाईच्या भावना, स्वप्नं आणि क्रिएटिव अभिव्यक्तीला नवी दिशा दिली आहे.दरम्यान, अंशिका या सीझनमधील सर्वात उत्साही आणि ताकदवान गायिका म्हणून उदयास येत असून जज आणि सेलिब्रिटी गेस्ट सतत तिच्या प्रतिभेचे कौतुक करताना दिसत आहे. या विशेष एपिसोडमधील शिबानींच्या प्रशंसेनंतर तिच्या प्रवासाला आणखी वेग मिळेल, असे दिसते.रॉक ऑनचा सिक्वेल होणार की नाही याची निश्चित माहिती नसली तरी, ‘इंडियन आयडॉल’च्या मंचावर अंशिकासाठी हा क्षण नक्कीच एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. सध्याचा सीझन उत्तम टॅलेंट, मनाला भिडणारे परफॉर्मन्स आणि नव्या कलाकारांच्या आशा-आकांक्षांना नवी दिशा देत आहे.
आता कॅनडा व भारत व्यापारी भागीदार होणार? नवी दिल्ली येथे महत्वाची द्विपक्षीय चर्चा संपन्न
प्रतिनिधी: वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आणि कॅनडाचे निर्यात प्रोत्साहन आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आर्थिक विकास मंत्री मनिंदर सिद्धू यांनी नवी दिल्ली येथे महत्वाची बैठक पार पाडली आहे. दोन्ही देशातील द्विपक्षीय व्यापार संबंधावर प्रकाश टाकून एकमेकांना सहकार्य करण्यासाठी नव्या अपेक्षित उपाययोजना यावर विस्तृत चर्चा झाली आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, व्यापार आणि गुंतवणूक (MTDI) वरील ७ व्या मंत्रीस्तरीय संवादाचे आयोजन केले गेले आहे. त्यामुळे आज सिद्धू यांचा ११ ते १४ नोव्हेंबरचा भारत दौरा आज संपणार आहे.दरम्यान दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी कॅनडातील काननास्किस येथे झालेल्या जी७ शिखर परिषदेच्या वेळी झालेल्या बैठकीत चर्चा केली होती. १३ ऑक्टोबर रोजी परराष्ट्र मंत्र्यांनी दिलेल्या संयुक्त निवेदनावरही ही चर्चा आधारित होती ज्यामध्ये भारत-कॅनडा आर्थिक संबंधांचा आधारस्तंभ म्हणून व्यापाराला अधोरेखित करण्यात आले होते.२०२४ मध्ये २३.६६ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचलेल्या द्विपक्षीय व्यापारातील मजबूत वाढीबद्दल दोन्ही मंत्र्यांनी समाधान व्यक्त केले आहे. त्यामध्ये सध्या असय असलेल्या ८.९८ अब्ज डॉलर्सचा दोन्ही देशांमधील व्यापार व्यापार समाविष्ट आहे. इयर ऑन इयर बेसिसवर या व्यापारात यंदा मागील वर्षाच्या तुलनेत १०% वाढ नोंदवली गेली आहे.तसेच प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, खुल्या आणि अंदाजे अथवा भविष्यातील संभाव्य गुंतवणूकीसाठी आवश्यक असलेल्या अनुकूल वातावरणाकरता त्यांच्या वचनबद्धतेची पुष्टी करताना मंत्र्यांनी सखोल सहकार्यासाठी प्राधान्य क्षेत्रावर अधिक प्राध्यान्यक्रमावर ठेवला आहे.महत्त्वाचे म्हणजे ऊर्जा संक्रमण आणि पुढील पिढीच्या औद्योगिक वाढीसाठी महत्त्वाचे असलेले महत्त्वाचे खनिजे आणि स्वच्छ ऊर्जेतील दीर्घकालीन भागीदारी आणि एरोस्पेस आणि दुहेरी-वापर तंत्रज्ञानातील वाढीव सहकार्य, कॅनडाच्या भारतातील स्थापित कामकाजाचा फायदा घेणे आणि भारताच्या विमान वाहतूक बाजारपेठेचा जलद विस्तार यांचा चर्चेत समावेश होता.माहितीनुसार, दोन्ही बाजूने चालू जागतिक पुरवठा साखळीतील व्यत्ययांचा आढावा घेतला गेला असून व्यापारातील अधिक लवचिकतेच्या गरजेवर सहमती दर्शविली आहे. शाश्वत आर्थिक स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी त्यांनी वैविध्यपूर्ण आणि विश्वासार्ह पुरवठा साखळींचे महत्त्व अधोरेखित यावेळी केले असल्याचे सांगितले जात आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत आणि कॅनडा पुढील वर्षाच्या सुरुवातीला व्यापार आणि गुंतवणूक भागधारकांसोबत मंत्रीस्तरीय चर्चा सुरू ठेवू शकते.
बिहार विधानसभा निवडणूक 2025 च्या मतमोजणी प्रक्रियेला वेग आला असून, सुरुवातीचे कल एनडीएच्या बाजूने स्पष्टपणे दिसत आहेत. दुपारपर्यंतचे ट्रेंड्स पाहता, एनडीएला २०० जागांवर आघाडी मिळाली असून, त्यांची वाटचाल बहुमताच्या पलीकडे असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे, महागठबंधन अवघ्या ३९ जागांवर आघाडीवर असून, त्यांना मोठा धक्का बसला आहे. या निवडणुकीत राष्ट्रीय पक्षाचा दर्जा परत मिळवण्याच्या आशेने उतरलेल्या अजित […] The post Bihar Election 2025 Result : बिहार निवडणुकीत अजित पवारांचा धुव्वा ! उमेदवारांचे डिपॉझिटही जप्त होणार? appeared first on Dainik Prabhat .
IND vs SA : जसप्रीत बुमराहची कमाल! वसीम अक्रमला मागे टाकत SENA राष्ट्रांविरुद्ध रचला नवा इतिहास
Jasprit Bumrah 5 wicket haul records in IND vs SA : भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव अवघ्या १५९ धावांवर संपुष्टात आला. दक्षिण आफ्रिकेला २०० चा आकडाही गाठू न देण्यात भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहचा (Jasprit Bumrah) सिंहाचा वाटा होता. बुमराहने एकट्याने दक्षिण आफ्रिकेच्या निम्मे फलंदाज बाद केले. त्याने १० पैकी ५ विकेट्स […] The post IND vs SA : जसप्रीत बुमराहची कमाल! वसीम अक्रमला मागे टाकत SENA राष्ट्रांविरुद्ध रचला नवा इतिहास appeared first on Dainik Prabhat .
शिरूर मध्ये बिबट्याचा हैदोस; दैनंदिन कामकाजाच्या वेळा बदला, कर्मचारी वर्गाची मागणी
जांबुत : शिरूरच्या बेट भागात मागील महिनाभरात बिबट्याने हौदोस माजवला आहे. जांबूत आणि पिंपरखेड परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात महिनाभरात तीन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. या हल्ल्यांपैकी दोन हल्ले हे दिवसाढवळ्या झाल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली असून शिरूर, आंबेगाव, जुन्नर, खेड तालुक्यासह जवळपास राज्यातील अनेक भागात बिबट्याच्या भीतीचे सावट निर्माण झाले आहे. मागील पंधरा दिवसांपूर्वी […] The post शिरूर मध्ये बिबट्याचा हैदोस; दैनंदिन कामकाजाच्या वेळा बदला, कर्मचारी वर्गाची मागणी appeared first on Dainik Prabhat .
Bihar Election 2025 : बिहार निवडणुकीच्या निकालावर धीरेंद्र शास्त्रींनी दिली ‘ही’प्रतिक्रिया
बिहार विधानसभा निवडणूक २०२५ ची मतमोजणी सध्या सुरु असून, आतापर्यंतचे कल एनडीएच्या बाजूने दिसत आहेत. आतापर्यंतचे ट्रेंड्स पाहता, एनडीए २०० जागांच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे चित्र आहे, तर महागठबंधन केवळ ३९ जागांवर आघाडीवर आहे. या विजयी आघाडीवर भाजपने देशभरात जल्लोष साजरा केला असून, विरोधकांनी मात्र जोरदार टीका केली आहे. बागेश्वर धामचे पीठाधीश्वर आचार्य धीरेंद्र कृष्ण […] The post Bihar Election 2025 : बिहार निवडणुकीच्या निकालावर धीरेंद्र शास्त्रींनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया appeared first on Dainik Prabhat .
जांबुत : पिंपरखेड (शिरूर ) येथे इयत्ता सातवीत शिकत असलेला तेरा वर्षीय रोहन विलास बोंबे याचा बिबट्याच्या हल्ल्यात झालेल्या दुर्दैवी मृत्यूमुळे परिसरात मोठा उद्रेक झाला होता. या घटनेने संतप्त ग्रामस्थांनी केलेल्या तीव्र आंदोलनामुळे अखेर शासन स्तरावरून बिबट्या संदर्भात ठोस उपाययोजना करण्याचे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या पार्श्वभूमीवर, रोहनची आठवण कायम राहावी यासाठी, माजी आमदार अशोक […] The post बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या रोहनच्या नावाने वाचनालय, माजी आमदार अशोक पवारांकडून ५० हजारांची मदत appeared first on Dainik Prabhat .
रायसिन विष बनवणाऱ्या सैयदचा पाकिस्तानशी संबंध उघड
ड्रोनद्वारे आणले शस्त्र, आयएसकेपीशी फोनवर संपर्कअहमदाबाद : प्रसादात विष कालवून लक्षावधी लोकांचा बळी घेण्याचे षडयंत्र रचणाऱ्या डॉ. अहमद सैयद आणि त्याच्या सहकाऱ्यांना गुजरात एटीएसने अटक केलीय. तपासात समोर आले आहे की हे तिन्ही जण पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना आयएसकेपीशी जोडलेले होते. डॉ. सईदने विष बनवण्याची आणि पाकिस्तानमधून ड्रोनद्वारे शस्त्र मागवल्याचे कबुल केले आहे.गुजरात एटीएसने हैदराबादच्या डॉ. अहमद सईद याच्यासह ३ संशयितांना ताब्यात घेतले होते. या सर्वांवर देशात राहून भारताविरुद्ध दहशतवादी कट रचल्याचा आरोप आहे. यापैकी सर्वात धोकादायक कट डॉ. सईदचा होता. तो मंदिरातील प्रसाद आणि पाण्यात विष मिसळून एकाच वेळी लाखो लोकांना मारण्याची तयारी करत होता. यासाठी डॉ. सईद रायसिन नावाचे प्राणघातक विष बनवत होता. आता त्याचे धागेदोरे पाकिस्तानपर्यंत पोहोचले आहेत. गुजरात एटीएसच्या तपासात उघड झाले की डॉ. सईदसह सर्व ३ संशयित पाकिस्तानच्या दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेट ऑफ खुरासान प्रॉव्हिन्सशी (आयएसकेपी) संबंधित होते.डॉ. अहमद सईद, आझाद शेख आणि मोहम्मद सलीम खान हे तिघेही आयएसकेपीसाठी बराच काळ भारतात सक्रिय होते. ते एरंडीच्या तेलापासून अत्यंत घातक विष तयार करत होते. हे विष अन्नपदार्थांमध्ये, पेयांमध्ये किंवा वायूच्या स्वरूपातही वापरता येते.डॉ. सईद हा ६ भावंडांमध्ये सर्वात धाकटा आहे. त्याने आपल्या कुटुंबीयांना अनेक वर्षांपासून अंधारात ठेवले होते. एमबीबीएस पूर्ण झाल्यानंतर त्याने सर्वांना सांगितले होते की तो गुजरातमध्ये व्यवसाय करतो. परंतु व्यवसायाच्या आड लाखो भारतीयांवर भीषण हल्ला करण्याचा कट तो रचत होता.गुजरात एटीएसच्या तपासात असेही उघड झाले की डॉ. सईद बऱ्याच काळापासून आयएसकेपीचा हँडलर अबू खलीजा याच्याशी फोनवर संपर्कात होता. त्याने पाकिस्तानमधून ड्रोनद्वारे राजस्थानच्या सीमेवर ३ पिस्तुले आणि ३० काडतुसे मागवली होती. आयएसकेपीने ती डॉ. सईदपर्यंत पोहोच केली. या शस्त्रसाठ्याबाबत मिळालेल्या गुप्त माहितीनुसार एटीएसने डॉ. सईद हत्यारे घेऊन परतताना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. कठोर चौकशीत त्याने आपला गुन्हा कबूल केला.
धर्मेंद्र यांच्या प्रकृतीविषयी अफवा: IFTDA अध्यक्ष अशोक पंडित यांची पापाराझींविरोधात तक्रार
मुंबई : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या आरोग्याविषयी गेल्या काही दिवसांत पसरलेल्या अफवांनी वातावरण तापले आहे. माध्यमांवर त्यांच्या प्रकृतीविषयी अनेक अप्रमाणित बातम्या, व्हिडिओ आणि चुकीच्या अपडेट्स व्हायरल झाल्यानंतर परिस्थिती अधिकच गंभीर झाली. काही माध्यमांनी तर त्यांच्या मृत्यूची खोटी माहितीही पसरवली, ज्यामुळे चाहत्यांमध्ये गोंधळ आणि चिंतेची लाट निर्माण झाली.या वाढत्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशनचे (IFTDA) अध्यक्ष अशोक पंडित यांनी काही पापाराझी आणि डिजिटल मीडिया हँडलर्सविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील जाधव यांना दिलेल्या पत्रात त्यांनी माध्यमांच्या बेजबाबदार वर्तनावर कठोर शब्दांत टीका केली.तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे काही मीडिया प्रतिनिधींनी धर्मेंद्र यांच्या निवासस्थानाच्या आवारात परवानगीशिवाय प्रवेश केला आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे व्हिडिओ चित्रीत केले. हे व्हिडिओ सोशल मीडियावर सनसनाटी निर्माण करण्यासाठी आणि नफा मिळवण्यासाठी प्रसारित करण्यात आले, असा आरोप तक्रारीत आहे.अशोक पंडित यांनी या घटनेला “अमानवी, अनैतिक आणि भारतीय संविधानातील कलम २१ अंतर्गत हमी दिलेल्या गोपनीयतेच्या अधिकाराचे सरळ उल्लंघन” केले असल्याचे म्हटले आहे. त्यांनी पोलिसांना विनंती केली आहे की अशा गैरजबाबदार वर्तन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करून भविष्यात अशा घटनांवर अंकुश ठेवावा.या घटनेमुळे सेलिब्रिटींच्या गोपनीयतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
भारताच्या डिजिटल अॅक्सेसिबिलिटी अहवालात प्रमुख वेबसाइट क्षेत्रांमध्ये 'मूलभूत'अडथळे कायम!
मुंबई: नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात 'भारत डिजिटल फर्स्ट' कार्यक्रमाच्या चौथ्या आवृत्तीत हा अहवाल लाँच करण्यात आला. हा बीबी१०० अभ्यास अहवाल सरकार, इ कॉमर्स, शिक्षण, आरोग्यसेवा, बातम्या, प्रवास आणि पर्यटन, मनोरंजन आणि एअरलाइन्स मधील वेबसाइट्सना रँक करतो. नॅशनल सेंटर फॉर प्रमोशन ऑफ एम्प्लॉयमेंट फॉर डिसेबल्ड पीपल (NCPEDP) च्या भागीदारीत बॅरियरब्रेकने केलेल्या एका नवीन राष्ट्रीय अभ्यासात असे आढळून आले आहे की भारतातील सर्वाधिक भेट दिलेल्या वेबसाइट्सपैकी एक लक्षणीय संख्या अपंग लोकांसाठी प्रवेश करण्यायोग्य नाही.असे असताना तयग BB100 स्टेट ऑफ डिजिटल अॅक्सेसिबिलिटी इन इंडिया २०२५ ने देशातील सर्वाधिक भेट दिलेल्या संकेतस्थळापैकी १०० संकेतस्थळाचे विश्लेषण केले आणि प्रत्येक होम पेजवर सरासरी ११६ अॅक्सेसिबिलिटी त्रुटी आढळल्या. मनोरंजन (२८५.२), प्रवास आणि पर्यटन (१४४.३) आणि ई कॉमर्स (१२१.५) क्षेत्रात सर्वाधिक त्रुटी दर आढळून आले असे अहवालात यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे.बॅरियरब्रेकच्या संस्थापक आणि सीईओ शिल्पी कपूर म्हणाल्या आहेत की,'आपण अपंगत्व समावेशनाला धर्मादाय संस्था म्हणून पाहणे थांबवले पाहिजे. जेव्हा आपण वेबसाइट्स, अँप्स आणि डिजिटल सेवा डिझाइन करतो ज्या सर्वांना वापरता येतील, तेव्हा आपण केवळ समानताच नव्हे तर सर्वांसाठी चांगली उत्पादने तयार करतो. डिजिटल सुलभता लागू झाल्यावर भारताच्या लोकसंख्येच्या एका मोठ्या भागाला फायदा होईल हे आपण लक्षात ठेवले पाहिजे.'
बिहारमध्ये काँग्रेसची अत्यंत निराशजनक कामगिरी; AIMIM ठरला वरचढ; किती जागांवर घेतली आघाडी?
Bihar Election 2025 | बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. सध्याच्या ट्रेंड नुसार, एनडीएने आघाडी घेतली आहे. २४३ जागांचे सुरूवातीचे कल समोर आले आहेत. त्यामध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजप ८५ जागांवर आघाडीवर आहे, तर नितीश कुमार यांचा जेडीयू ७६ जांगावर आघाडीवर आहे. तर काँग्रेसने 61 जागांवर निवडणूक लढवली. त्यातील 4 जागांवरच […] The post बिहारमध्ये काँग्रेसची अत्यंत निराशजनक कामगिरी; AIMIM ठरला वरचढ; किती जागांवर घेतली आघाडी? appeared first on Dainik Prabhat .
‘ताठ कणा’ मध्ये दिसणार उमेश आणि दिप्तीची जोडी
मुंबई : सिनेसृष्टीतील प्रत्येक कलाकाराची आपली एक वेगळी इमेज आहे. प्रत्येकजण एखाद्या वैशिष्ट्यपूर्ण भूमिकेसाठी ओळखला जातो. पण हेच कलाकार जेव्हा अनपेक्षितपणे एखाद्या वेगळ्या भूमिकेत दिसतात तेव्हा सर्वांच्याच अपेक्षा उंचावतात. नेहमीच वेगळ्या धाटणीचे तसंच आशयघन चित्रपटांच्या शोधात असणारे अभिनेता उमेश कामत आणि अभिनेत्री दिप्ती देवी हे दोन कलाकार ‘ताठ कणा’ या चित्रपटात एका वेगळ्या रूपात प्रेक्षकांना भेटणार आहेत. जगप्रसिद्ध शल्यचिकित्सक डॉ. प्रेमानंद रामाणी यांचा जीवनपट उलगडून दाखविणाऱ्या ‘ताठ कणा’ या आगामी मराठी चित्रपटातून हे दोघे पहिल्यांदाच जोडीच्या रूपाने प्रेक्षकांसमोर येत आहेत. हा चित्रपट २८ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. ‘प्रज्ञा क्रिएशन्स’चे विजय मुडशिंगीकर व ‘स्प्रिंग समर फिल्मस’चे करण रावत यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाचे लेखन श्रीकांत बोजेवार यांनी केले असून दिग्दर्शक गिरीश मोहिते आहेत.उमेश कामत या चित्रपटात डॉ. प्रेमानंद रामाणी यांच्या भूमिकेत दिसणार असून नवऱ्याच्या पाठीशी ठामपणे उभी राहणाऱ्या पत्नीची व्यक्तिरेखा दिप्ती देवी साकारणार आहेत. डॉ.रामाणी यांच्यासारख्या ऋषीतुल्य व्यक्तिमत्वाची भूमिका मला करायला मिळाली ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट असल्याचे, उमेशने सांगितले. डॉ. रामाणी यांच्या पाठीशी सदैव उभ्या असणाऱ्या त्यांच्या पत्नीची संयमी भूमिका या चित्रपटात मला करायची संधी मिळाली याचा खूप आनंद आहे, असे दिप्ती देवी ने सांगितले.धैर्य, चिकाटी, ध्यास आणि प्रयत्न यांचा अनोखा संगम म्हणजे डॉ रामाणी. त्यांच्या या अनोख्या आणि नाट्यपूर्ण प्रवासाची कहाणी म्हणजेच ‘ताठ कणा’. आपलं यश पैशात न मोजता रूग्णाच्या हास्यात समाधान शोधणाऱ्या एका ध्येयवेड्या डॉक्टरची कहाणी म्हणजेच ‘ताठ कणा’ हा चित्रपट.या चित्रपटाचे छायांकन कृष्णकुमार सोरेन व संकलन निलेश गावंड यांचे आहे. कलादिग्दर्शनाची जबाबदारी महेश कुडाळकर यांनी सांभाळली आहे. संगीत अविनाश-विश्वजीत यांचे आहे. प्रशांत पवार कार्यकारी निर्माते आहेत. प्रोडक्शन कंट्रोलर जितेंद्र भोसले आहेत.‘ताठ कणा’ हा चित्रपट २८ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.
ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल काळाच्या पडद्याआड
मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. अनेक पिढ्यांना भुरळ घालणाऱ्या सुवर्णकाळातील दिग्गज अभिनेत्री कामिनी कौशल यांचे ९७व्या वर्षी निधन झाले. अलीकडेच त्या आमिर खानच्या लाल सिंह चड्ढा मध्ये आणि कबीर सिंहमध्ये शाहिद कपूरच्या आजीच्या भूमिकेत झळकल्या होत्या.कामिनी कौशल या १९४० च्या दशकातील अत्यंत प्रभावशाली अभिनेत्रींपैकी एक होत्या. १९४७ आणि १९४८ या सलग दोन वर्षांमध्ये बॉक्स ऑफिस इंडियाच्या सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये त्या पहिल्या क्रमांकावर होत्या. २०२२ मध्ये आउटलुक इंडियाने प्रसिद्ध केलेल्या ‘७५ सर्वोत्तम अभिनेत्रींच्या यादीतही त्यांना मानाचा दर्जा मिळाला.कामिनी कौशल यांचा जन्म १६ जानेवारी १९२७ रोजी लाहोर येथे झाला. त्यांनी अगदी लहान वयात ऑल इंडिया रेडिओवर कार्यक्रम करायला सुरुवात केली होती. लाहोरच्या गव्हर्नमेंट कॉलेजमधून इंग्रजी साहित्यात बीए (ऑनर्स) पूर्ण केल्यानंतर, १९४६ मध्ये चेतन आनंद यांनी नीचा नगरमधून त्यांना हिंदी चित्रपटांत पदार्पणाची संधी दिली.करिअरच्या कालावधीत दो भाई, नदिया के पार, जिद्दी, शबनम, उपकार, पूरब और पश्चिम, रोटी कपड़ा और मकानसह अनेक हिट चित्रपटांमध्ये त्यांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या. त्यांनी दिलीप कुमार, राज कपूर यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबतही पडद्यावर काम केले होते.कौटुंबिक परिस्थितीमुळे त्यांच्या वैयक्तिक आयुष्याला वेगळे वळण लागले. आपल्या बहिणीच्या निधनानंतर तिच्या मुलांचा सांभाळ करण्यासाठी त्यांनी १९४८ मध्ये मेहुणे बी.एस. सूद यांच्याशी विवाह केला.शहीद (१९४८) चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान कामिनी कौशल आणि दिलीप कुमार यांच्यात जवळीक निर्माण झाली होती. दिलीप कुमार यांना त्यांच्याशी विवाह करायची इच्छा होती, पण दोन्ही कुटुंबांच्या विरोधामुळे हे नाते तुटले.धर्मेंद्र यांच्या पहिल्या को-स्टारधर्मेंद्र यांचा चित्रपट ‘शहीद’ मध्ये कामिनी कौशल त्यांच्या पहिल्या को-स्टार होत्या. धर्मेंद्र यांनी स्वतः सोशल मीडियावर एक फोटो शेअर करून, “माझ्या आयुष्यातील पहिला चित्रपट शहीद ची हिरोईन कामिनी कौशल यांची पहिली भेट… दोघांच्या चेहऱ्यावर हसू… एक प्रेमळ ओळख” असे लिहिले होते.
WPI Index: ऑक्टोबर महिन्यात घाऊक किंमत महागाई निर्देशांकात १.२१% इतकी प्रचंड घसरण 'या'कारणांमुळे
प्रतिनिधी: ऑक्टोबर महिन्यात घाऊक किंमत निर्देशांकात (Wholesale Price Index WPI) १.२१% घसरण झाली आहे. विशेषतः डाळी, भाजीपाल्याची किंमतीत घसरण झाल्याने ही घाऊक महागाईत (Inflation) मध्ये घसरण झाल्याचे सरकारी आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. माहितीनुसार, ऑक्टोबर महिन्यात गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यातील २.७५% तुलनेत इयर ऑन इयर बेसिसवर १.२१% घसरण झाली आहे.'ऑक्टोबर २०२५ मध्ये महागाईचा नकारात्मक दर प्रामुख्याने अन्नपदार्थ, कच्चे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, वीज, खनिज तेल आणि मूलभूत धातूंचे उत्पादन इत्यादींच्या किमतीत घट झाल्यामुळे आहे' असे उद्योग मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे. WPI आकडेवारीनुसार सप्टेंबरमध्ये ५.२२% तुलनेत ऑक्टोबरमध्ये अन्नपदार्थांमध्ये घसरण ८.३१% होती, ज्यामध्ये कांदा, बटाटा, भाज्या आणि डाळींच्या किमतीत घट झाली आहे.भाज्यांमध्ये, ऑक्टोबरमध्ये घसरण ३४.९७% झाली असून जी सप्टेंबरमध्ये २४.४१% होती. डाळींमध्ये ऑक्टोबरमध्ये घसरण १६.५०% झाली असून बटाटा आणि कांद्यात अनुक्रमे ३९.८८% आणि ६५.४३% घसरण झाली होती असे आकडेवारीत स्पष्ट झाले आहे. उत्पादनात उत्पादनांच्या (Manufacturing) बाबतीत महागाई १.५४% आली, जी सप्टेंबरमध्ये तिमाही बेसिसवर २.३३% कमी झाली आहे.इंधनाच्या बाबतीत सप्टेंबरमध्ये २.५८% असलेल्या इंधन आणि वीज दरात २.५५% नकारात्मक चलनवाढ किंवा घसरण दिसून आल्याचे सरकारी अहवालात म्हटले गेले आहे. नुकत्याच झालेल्या (२२ सप्टेंबरपासून) वस्तू आणि सेवा कर (GST) दरकपातीमुळे प्रामुख्याने घाऊक किंमत निर्देशांकात ही घसरण अपेक्षित होती. कर दर सुसूत्रीकरणाचा भाग म्हणून दैनंदिन वापराच्या मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या वस्तूंवरील जीएसटी दर कमी करण्यात आले होते.वस्तूंच्या किमती कमी करणाऱ्या कर कपाती आणि गेल्या वर्षीच्या अनुकूल चलनवाढीच्या आधारामुळे घाऊक आणि किरकोळ महागाई दोन्ही कमी झाल्या आहेत असे आकडेवारीत स्पष्ट झाले आहे. गेल्या आठवड्यात जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबरमध्ये किरकोळ महागाई ०.२५% सर्वकालीन नीचांकी पातळीवर होती, जीएसटी दर कपातीमुळे ही घसरण झाली आहे. माहितीनुसार, सप्टेंबरमध्ये किरकोळ किंवा ग्राहक किंमत निर्देशांक महागाई १.४४% होती. किरकोळ महागाई लक्षात घेणाऱ्या रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) गेल्या महिन्यात रेपो दर ५.५% स्थिर ठेवण्यात आला होता. किरकोळ आणि घाऊक किंमत निर्देशांकातील महागाईतील घट यामुळे ३-५ डिसेंबर रोजी होणाऱ्या पुढील पतधोरण आढावा बैठकीत व्याजदर कमी करण्यासाठी आरबीआयवर दबाव येईल असे तज्ञांचे मत आहे.
पटणा : बिहार निवडणुकीच्या निकालांवरून स्पष्ट झाले आहे की एनडीएने राज्यात प्रचंड बहुमत मिळवून सत्ता पुन्हा मिळवली आहे. या निकालानंतर, नितीश कुमार १०व्या वेळेस बिहारचे मुख्यमंत्री होण्याच्या मार्गावर आहेत. भारतीय राजकारणात एखाद्या नेत्याला सार्वजनिक जीवनात इतका दीर्घकाळ जनतेचा पाठिंबा मिळणे अत्यंत दुर्मिळ आहे, आणि नितीश कुमार यांनी हे वेगळेपण साध्य केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली बिहारमध्ये अनेक विकासकामे आणि धोरणात्मक योजना राबवल्या गेल्या आहेत. त्यांच्या १०व्या कार्यकाळात महिलांसाठी १०,००० रुपयांचे रोख हस्तांतरण हे एक महत्त्वाचे टप्पा ठरले असून, हे धोरण सामाजिक समावेशकतेकडे त्यांनी दिलेला एक महत्वाचा संदेश मानले जात आहे.https://prahaar.in/2025/11/14/nda-in-power-in-bihar-bjp-is-the-largest-party/नितीश कुमार यांच्यासाठी महिला मतदार ठरल्या 'गेमचेंजर'https://youtu.be/6TfsloI0d2o?si=bzMoYh55hDKOPoGWबिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीएसाठी महिला मतदारांचा पाठिंबा अत्यंत निर्णायक वळण ठरला आहे. महिलांच्या खात्यात थेट ₹१०,००० जमा करण्याच्या योजनेमुळे त्यांचा नितीश कुमार यांच्यावरील विश्वास अधिक बळकट झाला आणि विरोधकांची निवडणुकीतील रणनीती कमकुवत झाली. गेल्या महिन्यात २६ तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या महत्त्वाकांक्षी योजनेचा अक्षरशः शुभारंभ झाला. यावेळी त्यांनी सुरुवातीला ७५ लाख महिला लाभार्थ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी ₹१०,००० रुपये थेट हस्तांतरित केले. पुढे या योजनेच्या लाभार्थ्यांचा आकडा १५ दशलक्षांवर (१.५ कोटी) पोहोचला. बिहार एनडीएने या योजनेला 'मुख्यमंत्री महिला रोजगार योजना' असे नाव दिले आहे. नितीश सरकारने जाहीरपणे दावा केला की, महिलांना स्वयंरोजगाराला चालना देण्यासाठी आणि त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. निवडणुकीच्या निकालातून हे स्पष्ट झाले की, महिला मतदारांनी या योजनेला मोठा प्रतिसाद दिला, ज्यामुळे नितीश कुमार यांच्या नेतृत्वाला निवडणुकीत मोठा फायदा मिळाला१.५ कोटी महिलांच्या खात्यात १०,००० रुपये२९ ऑगस्ट २०२५ रोजी, निवडणुकीच्या अगदी आधी, नितीश कुमार मंत्रिमंडळाने या योजनेला मान्यता दिली. त्यानंतर विरोधकांनी सरकारवर मतांची खरेदी करण्याचा आरोप केला. परंतु निवडणूक निकालांवरून असे दिसून येते की या योजनेने नितीश कुमार सरकारविरुद्धच्या सत्ताविरोधी घटकाला उलटे केले. नितीशची योजना निवडणुकीत गेम चेंजर ठरली. या योजनेअंतर्गत, १.५ कोटी महिलांच्या खात्यात १०,००० रुपये हस्तांतरित करण्यात आले. बिहारमध्ये अंदाजे ३.६ कोटी महिला मतदार आहेत. महिला रोजगार योजनेचा फायदा १.५ कोटी महिलांना झाला, ज्यामुळे एनडीएला फायदा झाला. या निवडणुकीत एकूण महिला मतदारांपैकी ७१ टक्क्यांहून अधिक महिलांनी मतदान केले, ज्यामुळे एनडीएला फायदा झाला. जर हा १०,००० रुपयांचा निधी १.५ कोटी महिलांच्या खात्यात गेला, तर त्याचा अप्रत्यक्षपणे अंदाजे ४ ते ५ कोटी कुटुंबांवर परिणाम झाला. अशाप्रकारे, १०,००० रुपये मिळालेल्या महिलांनीच नव्हे तर त्यांच्या कुटुंबातील इतर महिलांनीही एनडीएला मतदान केले. असे म्हणता येईल की या योजनेमुळे नितीश कुमार आणि भाजपला लक्षणीय मतांचा वाटा मिळाला.'मतांची खरेदी' आरोपांना महिला मतदारांचे उत्तरनिवडणुकीच्या अगदी थोड्याच कालावधीपूर्वी, २९ ऑगस्ट २०२५ रोजी नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळाने या योजनेला तातडीने मान्यता दिली होती. या वेळेमुळे विरोधकांनी सरकारवर 'मतांची खरेदी' करण्याचा आरोप केला होता. मात्र, निवडणूक निकालांवरून हे स्पष्ट झाले की, या योजनेने सरकारविरुद्ध असलेला 'सत्ताविरोधी घटक' (Anti-incumbency Factor) उलटा फिरवला आणि नितीश कुमार यांची योजना 'गेम चेंजर' ठरली. ही योजना फक्त वैयक्तिक महिलांनाच नव्हे, तर मोठ्या लोकसंख्येवर प्रभाव पाडणारी ठरली. या योजनेअंतर्गत १.५ कोटी महिलांच्या खात्यात प्रत्येकी ₹१०,००० रुपये हस्तांतरित करण्यात आले. बिहारमध्ये अंदाजे ३.६ कोटी महिला मतदार आहेत. यातील १.५ कोटी महिलांना थेट फायदा झाला. ₹१०,००० चा निधी १.५ कोटी महिलांच्या खात्यात गेल्यामुळे, याचा अप्रत्यक्षपणे अंदाजे ४ ते ५ कोटी कुटुंबांवर आर्थिक परिणाम झाला. या निवडणुकीत एकूण महिला मतदारांपैकी ७१ टक्क्यांहून अधिक महिलांनी मतदानाचा हक्क बजावला, ज्यामुळे एनडीएला थेट फायदा झाला. यामुळे, ज्या महिलांना थेट ₹१०,००० मिळाले, त्यांनीच नव्हे तर त्यांच्या कुटुंबातील इतर महिलांनीही मोठ्या संख्येने एनडीएला मतदान केले. यामुळे नितीश कुमार आणि भाजपला लक्षणीय मतांचा वाटा मिळाला, असे निश्चितपणे म्हणता येईल.महिलांसाठी नितीश कुमारांची आर्थिक व सामाजिक योजनांचा दीर्घ इतिहासनितीश कुमार यांच्या सरकारने महिलांसाठी चालू केलेल्या योजनेत महिलांना १०,००० रुपयांचे रोख वितरण केले जाते, जे कर्ज नाही, म्हणजे त्याची परतफेड करावी लागत नाही. या रकमेचा उद्देश महिलांच्या रोजगाराच्या संधी निर्माण करणे हा आहे. सरकारने स्पष्ट केले आहे की, जर महिलांनी या १०,००० रुपयांचा उपयोग करून यशस्वीरित्या व्यवसाय किंवा रोजगाराच्या संधी निर्माण केल्या, तर त्यांना अतिरिक्त २ लाख रुपयांचे कर्ज मिळेल. महिलांच्या हितासाठी नितीश कुमार यांनी गेल्या अनेक वर्षांपासून विविध योजना राबवल्या आहेत. यामध्ये, मोफत सायकली वितरण, दारूबंदी, शिष्यवृत्ती योजना, पंचायत जागांमध्ये ५०% आरक्षण, सरकारी नोकऱ्यांमध्ये ३५% आरक्षण, यावेळी नितीश कुमार यांनी १०,००० रुपयांची रोख भेट फक्त जाहीरच केली नाही, तर प्रत्यक्षातही वितरित केली, ज्यामुळे महिलांसह ‘ट्रस्ट चेन’ तयार होण्यास मदत झाली आणि मोठ्या प्रमाणात मतदानात सहभाग वाढला.मुख्यमंत्रीपदाची धुरा १०व्यांदाबिहारच्या राजकारणात नितीश कुमार हे सर्वात अनुभवी आणि दीर्घकाळ सेवा देणारे मुख्यमंत्री म्हणून ओळखले जातात. आतापर्यंत नितीश कुमार नऊ वेळा बिहारचे मुख्यमंत्री झाले आहेत आणि आता त्यांचा दहावा कार्यकाळ सुरू होण्याची वाट पाहत आहे. नितीश कुमार यांचा एकूण कार्यकाळ २० वर्षांपेक्षा जास्त आहे, जे भारतातील मुख्यमंत्री पदासाठी एक महत्त्वाचा विक्रम आहे. त्यांनी पहिला कार्यकाळ ३ मार्च २००० रोजी सुरुवात केली, जे अल्पकाळासाठी सात दिवसांचे होते. त्या अल्पसंख्याक सरकारात ते राजीनामा देऊन बाहेर पडले. मार्च २००५ मध्ये त्यांनी पुन्हा सत्तेत प्रवेश केला, आणि नोव्हेंबर २००५ मध्ये पूर्ण बहुमताने सत्ता मिळवली. २०१० मध्ये नितीश कुमार तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. २०१४ मध्ये त्यांनी भाजपपासून स्वतःचे वेगळेपण जाहीर केले. २०१५ मध्ये महाआघाडीच्या प्रचंड विजयामुळे त्यांनी पुन्हा मुख्यमंत्रीपद धारण केले. २०१७ मध्ये ते महाआघाडीपासून वेगळे झाले आणि एनडीएमध्ये सामील झाले. २०२० च्या निवडणुकीत ते पुन्हा मुख्यमंत्री झाले. २०२२ मध्ये त्यांनी एनडीए सोडून महाआघाडीसह सत्ता सांभाळली. जानेवारी २०२४ मध्ये, त्यांनी पुन्हा महाआघाडी सोडून भाजपमध्ये सामील होऊन नवव्यांदा मुख्यमंत्रीपद स्वीकारले. आता बिहारसाठी नितीश कुमार १० वा मुख्यमंत्रीपद पार पाडण्याची तयारी करत आहेत, ज्यामुळे राज्याच्या राजकारणात त्यांचा अनुभव आणि नेतृत्व खूप महत्त्वाचे ठरणार आहे.
महत्वाच्या पदांवर अनुभवी नेतृत्व; विविध समाजघटकांसाठी स्वतंत्र संपर्क प्रमुखकेशव उपाध्ये, नवनाथ बन यांच्यावर ‘आरोप पत्र प्रमुख’ आणि ‘मीडिया संपर्क’ची दुहेरी जबाबदारीमुंबई : भारतीय जनता पार्टी–महाराष्ट्रने आगामी महापालिका, नगर परिषद, नगर पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणूक २०२५ साठी महत्त्वाची प्रदेश संचालन समिती जाहीर केली आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या स्वाक्षरीने जारी झालेल्या या यादीत २३ पदांसाठी जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत.समन्वयक म्हणून माधवी नाईक यांची नियुक्ती करण्यात आली असून, सहसमन्वयक म्हणून विक्रांत पाटील यांची निवड झाली आहे. जाहिरनामा प्रमुख म्हणून विश्वास पाटील यांना जबाबदारी देण्यात आली आहे.निवडणूक कार्यक्रम, प्रचार, महिला, युवा, सामाजिक, सहकार, कृषी अशा सर्व विभागांसाठी स्वतंत्र प्रमुख नेमण्यात आले आहेत. विविध समाजघटकांपर्यंत पोहोचण्यासाठी ही समिती महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास भाजपने व्यक्त केला आहे.निवडणूक साहित्य, वितरण, मीडिया आय.टी., कारभार, कार्यालयीन समन्वय यांसाठी देखील अनुभवी कार्यकर्त्यांची नेमणूक करण्यात आली आहे.भाजपने घोषणा केलेली ही समिती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत पक्षाची रणनीती मजबूत करण्यासाठी निर्णायक मानली जात आहे.
लिबर्टी जनरल इन्शुरन्सने भारतात सिक्युरिटी विमा व्यवसाय सुरू केला
मुंबई: प्रथमच लिबर्टी जनरल इन्शुरन्स लिमिटेडने आज भारतात सिक्युरिटी इन्शुरन्स अधिकृत लाँचिंगची घोषणा केली आहे. कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की देशाच्या बांधकाम आणि पायाभूत सुविधांच्या वित्तपुरवठा परिसंस्थेला बळकटी देण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल ठरणार आहे असे म्हटले. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, लिबर्टी म्युच्युअल इन्शुरन्सच्या ग्लोबल सिक्युरिटी विभागातील शतकाहून अधिक अनुभवाचा फायदा घेत हे लाँचिंग भारतीय बाजारपेठेत जागतिक दर्जाची अंडररायटिंग विषयी शिस्त जोखमीची परंपरा व जागतिक पद्धतीसह सक्षम आंतरराष्ट्रीय क्षमता आणते आहे. या विमा लाँच दरम्यान कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की ,'आरआयडीएआय (IRDAI) बँक हमींना पर्याय म्हणून सिक्युरिटी उत्पादने सक्षम करत असल्याने लिबर्टीचा प्रवेश पायाभूत सुविधा क्षमता वाढवण्याच्या, कंत्राटदारांवरील तरलतेचा दबाव कमी करण्याच्या आणि अधिक वैविध्यपूर्ण जोखीम-हस्तांतरण फ्रेमवर्क तयार करण्याच्या भारताच्या महत्त्वाकांक्षेला समर्थन देतो.' असे म्हटले.उपलब्ध माहितीनुसार, भारतातील लिबर्टीच्या सिक्युरिटी पोर्टफोलिओमध्ये बिड बॉन्ड्स, परफॉर्मन्स बॉन्ड्स, अँडव्हान्स पेमेंट बॉन्ड्स, रिटेन्शन बॉन्ड्स, वॉरंटी बॉन्ड्स आणि शिपबिल्डिंग रिफंड गॅरंटीज यांचा सेवांचा समावेश आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, ही कंपनी भारतातील पहिली ऑफर आहे. त्यामुळे ही उत्पादने जागतिक मानकांचे प्रतिबिंब आहेत आणि कंत्राटदार, विकासक आणि सरकारी संस्थांच्या गरजा पूर्ण करतात. लिबर्टीच्या सिक्युरिटी मॉडेलला प्लेसमेंट तज्ञ, ब्रोकर्स आणि मोठ्या पायाभूत सुविधा भागधारकांना समाविष्ट करणाऱ्या भागीदार परिसंस्थेचे (Ecosystem) समर्थन आहे.लाँचिंगच्या वेळी बोलताना लिबर्टी जनरल इन्शुरन्स लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पूर्णवेळ संचालक पराग वेद म्हणाले आहेत की,'भारत पायाभूत सुविधांच्या विस्ताराच्या परिवर्तनात्मक टप्प्यात प्रवेश करत आहे आणि सिक्युरिटी इन्शुरन्समध्ये क्षमता अनलॉक करण्याची, रोख प्रवाह सुलभ करण्याची आणि सर्व आकारांच्या कंत्राटदारांना वाढण्यास सक्षम करण्याची क्षमता आहे. लिबर्टी म्युच्युअल सिक्युरिटीच्या जागतिक कौशल्यासह आणि मजबूत क्षमतांसह, आम्ही भारतात एक मजबूत, विश्वासार्ह आणि सहयोगी सिक्युरिटी परिसंस्था तयार करण्यासाठी वचनबद्ध आहोत. हे लाँच आमचा उद्देश प्रतिबिंबित करते .लोकांना आजचा स्वीकार करण्यास आणि आत्मविश्वासाने उद्याचा पाठलाग करण्यास मदत करणे.'लिबर्टी जनरल इन्शुरन्स लिमिटेडच्या प्रोडक्ट अँड अंडररायटिंग (कमर्शियल लाईन्स अँड रीइन्शुरन्स) च्या अध्यक्षा गिशा जॉर्ज म्हणाल्या आहेत की,'आमचा सिक्युरिटी प्रस्ताव लिबर्टीचा जागतिक अनुभव आणि भारताच्या बाजारपेठेतील वास्तव एकत्र आणतो. आम्ही मजबूत अंडररायटिंग फ्रेमवर्क, मजबूत ऑपरेशनल तयारी आणि भागीदार-केंद्रित मॉडेल तयार केले आहे जेणेकरून निर्बाध स्वीकार सुनिश्चित होईल. आमचे लक्ष जबाबदार वाढ, बाजार शिक्षण आणि कंत्राटदार, दलाल आणि सरकारी संस्थांसह सर्व भागधारकांसह विश्वास निर्माण करण्यावर आहे.'भारत पायाभूत सुविधांवर खर्च वाढवत असताना, हमी यंत्रणेत विविधता आणण्यात भांडवल लॉकअप कमी करण्यात आणि प्रकल्प प्रशासन सुधारण्यात स्युअरी इन्शुरन्स महत्त्वाची भूमिका बजावेल अशी अपेक्षा कंपनीने यावेळी वक्त केली.माहितीनुसार, लिबर्टी म्युच्युअल इन्शुरन्स फॉर्च्यून १०० संस्था जी २८ देशांमध्ये कार्यरत आहे आणि कंपनीचे ४०००० हून अधिक कर्मचारी आहेत, स्युअरीमधील त्याच्या प्रमाण आणि कौशल्यासाठी जागतिक स्तरावर संस्था ओळखली जाते. त्याचा ग्लोबल स्युअरी व्यवसाय ६० हून अधिक देशांमध्ये बाँड बाजारात असून २० देशांमध्ये विशेष अंडररायटिंग टीम, एक समर्पित जागतिक सेवा केंद्र आणि अंडररायटिंग सुविधा कंपनी पुरवते.लिबर्टी जनरल इन्शुरन्स लिमिटेड (LGI) ही समिट एशिया इन्व्हेस्टमेंट होल्डिंग्ज पीटीई लिमिटेड व लिबर्टी म्युच्युअल इन्शुरन्स ग्रुपची एक समूह कंपनी जगभरात ९०० हून अधिक कार्यालये असलेली, एनम सिक्युरिटीज आणि डायमंड डीलट्रेडची संयुक्त कंपनी आहे. एलजीआयने २०१३ मध्ये व्यापक किरकोळ, व्यावसायिक आणि औद्योगिक विमा उपाय प्रदान करण्याच्या उद्देशाने कामकाज सुरू केले. कंपनीकडे २८ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ९५ पेक्षा अधिक ठिकाणी उपस्थिती असलेली ११०० पेक्षा अधिक कर्मचारी संख्या आहे. तिच्या भागीदार नेटवर्कमध्ये सुमारे ६००० पेक्षा अधिक रुग्णालये आणि ६१०० हून अधिक ऑटो सेवा केंद्रे आहेत. कंपनी आरोग्य आणि वैयक्तिक अपघात विमा, कार आणि दुचाकी विमा, कर्मचारी भरपाई विमा, व्यावसायिक विमा, अभियांत्रिकी विमा, सागरी विमा, दायित्व विमा, मालमत्ता विमा व तत्सम सेवा प्रदान करते.
NDA च्या विक्रमी विजयाचा उत्सव ; पंतप्रधान सायंकाळी ६ वाजता भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधणार
Modi on Election Result। बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीए पुन्हा एकदा ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल करत आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी ६ वाजता दिल्लीतील भाजप मुख्यालयात पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.. भाजप आणि जद(यू) युतीच्या नेतृत्वाखालील बिहार विधानसभा निवडणुकीच्या सुरुवातीच्या ट्रेंडनंतर, दोन्ही पक्षांचे कार्यालय आनंदाने भरले होते. कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या तालावर नाच केला, […] The post NDA च्या विक्रमी विजयाचा उत्सव ; पंतप्रधान सायंकाळी ६ वाजता भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधणार appeared first on Dainik Prabhat .
Kamini Kaushal: बॉलिवूडवर दुःखाचा सावट पसरलं आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ आणि प्रतिष्ठित अभिनेत्री कामिनी कौशल यांचे वयाच्या ९८व्या वर्षी निधन झाले. त्या गेल्या काही वर्षांपासून वयोमानानुसार उद्भवलेल्या आजारांशी झुंज देत होत्या. कुटुंबातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कौशल कुटुंब लो-प्रोफाईल ठेवत असून सध्या पूर्ण गोपनीयता ठेऊ इच्छित आहेत. १९४६ मध्ये केलेलं पदार्पण २४ फेब्रुवारी १९२७ रोजी जन्मलेल्या […] The post Kamini Kaushal: दिग्गज अभिनेत्री कामिनी कौशल यांचे ९८व्या वर्षी निधन; त्या धर्मेंद्र यांच्या पहिल्या को-स्टार होत्या appeared first on Dainik Prabhat .
बिहारमध्ये २० वर्षांची सत्ताविरोधी लाट मोडून काढत, एनडीए प्रचंड बहुमताने सरकार स्थापन करण्याच्या तयारीत आहे. भाजपने १०१ जागा लढवल्या आणि ८७ जागा जिंकल्या, म्हणजेच त्यांचा स्ट्राइक रेट ८६% आहे. आता, भाजपने बिहारमध्ये मोठ्या भावाची भूमिका स्वीकारली आहे. दरम्यान, जेडीयू ७६ जागांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. दुपारी १२:३० वाजेपर्यंत, एनडीए १८९ जागांवर आघाडीवर आहे, गेल्या वेळेपेक्षा ६४ जागांनी वाढ. दरम्यान, महाआघाडीची संख्या ११० वरून ५० जागांवर घसरली आहे, जी मागील वेळेच्या निम्म्यापेक्षा कमी आहे. एनडीएने राहुल-तेजस्वी यांच्या १२ पैकी पाच बालेकिल्ले उद्ध्वस्त केले आहेत. या १२ जागा आरजेडी आणि काँग्रेसने सलग तीन विधानसभा निवडणुकीत जिंकल्या होत्या. एनडीएने महाआघाडीकडून ७७ जागा हिसकावून घेतल्या आहेत. बिहारमध्ये भाजप नंबर वन पक्ष कसा बनला? एनडीएने दोन तृतीयांश जागा जिंकल्या आणि महाआघाडी मागे पडली याचे कारण काय? भास्करच्या एक्सप्लेनरमधील डेटा आणि तथ्यांसह जाणून घ्या. सर्वप्रथम, हे ३ आकडे, जे जाणून घेणे महत्त्वाचे आहे... बिहारमध्ये एनडीएच्या दणदणीत विजयाचे ५ प्रमुख घटक... १. 'महिला रोजगार योजने'मुळे एनडीएला महिला मतदारांचा पाठिंबा मिळविण्यात मदत झाली २. चिरागच्या मदतीने, जेडीयूने गेल्या वेळी गमावलेल्या २१ जागा जिंकल्या ३. जंगलराजची कहाणी यशस्वी झाली, तर एसआयआर-मतचोरीचा मुद्दा मागे पडला ४. महाआघाडी जागावाटपात अडकली, ८ ठिकाणी एकमेकांविरोधात लढले ५. पंतप्रधान मोदींनी १४ सभा घेतल्या; डझनभर मंत्री, मुख्यमंत्री आणि चार भोजपुरी स्टार्सनी प्रचार केला ,
Bihar Election 2025 | बिहार विधानसभा निवडणुकीचा अंतिम निकाल आज स्पष्ट होणार आहे. मोजणीच्या सुरुवातीच्या कलांमध्ये एडीएला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे दिसत आहे. तर महागठबंधनला अपयश मिळताना दिसत आहे. यावरून सध्या बिहारमध्ये भाजपकडून मोठा जल्लोष साजरा केला जात आहे. समोर येत असलेल्या या निकालांवर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी काँग्रेसवर घणाघात केला आहे. अंबादास […] The post Bihar Election 2025 : ‘बिहारच्या पराभवाची किंमत काँग्रेसला महाराष्ट्रात चुकवावी लागेल…’; ठाकरे संतापले ! appeared first on Dainik Prabhat .
“माझं यश दिसतयं, पण विजयाचं सर्टिफिकेट….”; मैथिली ठाकूर यांची आघाडी घेताच प्रतिक्रिया समोर
Maithili Thakur | अलीनगर विधानसभेतील भाजप उमेदवार मैथिली ठाकूर विरुद्ध आरजेडी उमेदवार विनोद मिश्रा यांच्यातील लढत चर्चेत आहे. भाजपनं अलीनगर मतदारसंघातून गायिका मैथिली ठाकूर यांना उमेदवारी दिली. लोकप्रिय गायिका मैथिली ठाकूर 25 वर्षांची असून, त्या पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. तर मैथिली यांच्या विरोधात निवडणुकीच्या मैदानात विनोद मिश्रा अलीनगरमधील स्थानिक उमेदवार आहेत. बिहार निवडणूक निकालांमधील […] The post “माझं यश दिसतयं, पण विजयाचं सर्टिफिकेट….”; मैथिली ठाकूर यांची आघाडी घेताच प्रतिक्रिया समोर appeared first on Dainik Prabhat .
Raveena Tandon : प्रसिद्ध अभिनेत्री रवीना टंडनने नेहमीच वेगळ्या धाटणीच्या भूमिका केलेल्या आहेत. ९० दशकात रवीनाने बॅालिवूड इंडस्ट्रीत पदार्पण केल्यानंतर अनेक सिनेमात मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली. तिने अनेक अभिनेत्रीच्या स्पर्धेत स्वतःला टिकून ठेवले. आजही रवीना अनेक चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका साकारताना दिसते. आता तिच्या आगामी चित्रपटाबाबत एक अपडेट समोर आली असून, एका आव्हानात्मक भूमिकेत रवीना टंडन […] The post अभिनेत्री रवीना टंडनच्या वाट्याला आव्हानात्मक भूमिका! ‘माँ वंदे’ चित्रपटात दिसणार; कथा ऐकून झाली भावनिक appeared first on Dainik Prabhat .
Nitish Kumar post। बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. सध्या ट्रेंड सुरू आहेत. नितीश कुमार पुन्हा एकदा विजयी झाले आहेत. त्यांचा पक्ष, जनता दल (युनायटेड) सुमारे ८१ जागांवर आघाडीवर आहे. दरम्यान, जेडीयूने सोशल मीडियावर नितीश कुमार मुख्यमंत्री झाल्याबद्दल पोस्ट केली, परंतु काही वेळातच त्यांनी ती पोस्ट डिलीट केली. जेडीयूच्या एक्स हँडलवर नितीश कुमार यांचा […] The post “नितीश मुख्यमंत्री होते, आहेत आणि राहतील…” ; जेडीयूने केलेली ‘ती’ पोस्ट लगेच केली डिलीट ; चर्चांना उधाण appeared first on Dainik Prabhat .
अदानी समुह आंध्रप्रदेशात १ लाख कोटींची गुंतवणूक करणार ! करण अदानींचे मोठे वक्तव्य
प्रतिनिधी: अदानी समुह येत्या १० वर्षात १ लाख कोटींची गुंतवणूक आंध्रप्रदेशात करणार आहे असे वक्तव्य उद्योगपती व गौतम अदानी यांचे पुत्र करण अदानी यांनी केली आहे. 'यापूर्वीच आम्ही ४०००० कोटींची गुंतवणूक केली आहे उर्वरित १० वर्षात १ लाख कोटींची गुंतवणूक करणार आहोत ' असे म्हणत अदानी समुहाच्या महत्वाकांक्षा या निमित्ताने अधोरेखित केल्या. विशाखापट्टणम येथे आयोजित केलेल्या ३० व्या सीआयआय पार्टनरशिप समिट २०२५ कार्यक्रमात ते बोलत होते. करण अदानी यांनी आंध्र प्रदेशात गुंतवणूक करण्यासाठी अदानी समुह कटीबद्ध असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच आम्ही यापूर्वीही पोर्ट, लॉजिस्टिक्स, इन्फ्रास्ट्रक्चर, रिन्यूऐबल एनर्जी, सिमेंट अशा विविध क्षेत्रात ४०००० कोटींची गुंतवणूक केली असल्याचे अदानी म्हणाले आहेत.समुह राज्यात गुंतवणूकीसाठी कटिबद्ध असल्याचे सांगत त्यांनी पुढे म्हटले आहे की,'अदानी समूहाचा आंध्र प्रदेशवरील विश्वास नवीन नाही. आम्ही फक्त गुंतवणुकीबद्दल बोलत नाही, तर तो दाखवून देतो. आतापर्यंत, आम्ही बंदरे, लॉजिस्टिक्स, सिमेंट, पायाभूत सुविधा आणि अक्षय ऊर्जा क्षेत्रात ४०००० कोटींहून अधिक गुंतवणूक केली आहे. आणि आम्ही तिथेच थांबत नाही आहोत. पुढील १० वर्षांत, आम्ही बंदरे, डेटा सेंटर, सिमेंट आणि ऊर्जा व्यवसायात १ लाख कोटी रुपयांची अतिरिक्त गुंतवणूक करण्याची योजना आखत आहोत' असे ते म्हणाले.समूहाने विविध क्षेत्रात गुंतवणूक योजनेची रूपरेषा आखली आहे. माहितीनुसार येत्या १००००० कोटी रुपयांची गुंतवणूक बंदरे, सिमेंट, डेटा सेंटर, ऊर्जा आणि प्रगत उत्पादनासाठी केली जाणार आहे.करण अदानी म्हणाले की, हा मोठा प्रयत्न आंध्र प्रदेशच्या वाढीच्या क्षमतेवरील कंपनीच्या मजबूत दीर्घकालीन विश्वासाचे प्रतिबिंब आहे. याशिवाय करण अदानी यांनी प्रस्तावित विझाग टेक पार्कद्वारे डिजिटल पायाभूत सुविधांसाठी १५ अब्ज डॉलर्सच्या दृष्टिकोनाचेही अनावरण या निमित्ताने केले आहे.या प्रकल्पात गुगलसोबत भागीदारीत जगातील सर्वात मोठ्या ग्रीन-पॉवर्ड हायपरस्केल डेटा-सेंटर इकोसिस्टमपैकी एक विकसित करणे समाविष्ट आहे, जे विशाखापट्टणमला जागतिक तंत्रज्ञान आणि डेटा हब म्हणून स्थान देण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. त्यांनी पुढे सांगितले की आंध्र प्रदेशातील अदानी समूहाच्या कार्यामुळे आधीच एक लाखाहून अधिक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत. विविध क्षेत्रांमध्ये नियोजित नवीन प्रकल्पांसह, समूहाला येत्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीची अपेक्षा आहे, ज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत होईल.करण अदानी यांनी आंध्र प्रदेशच्या नेतृत्वाचे कौतुक केले आणि मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांना 'एक संस्था आणि आंध्र प्रदेशचे मूळ सीईओ' असे संबोधले असल्याचे प्रसारमाध्यमांनी आपल्या वृत्तात म्हटले. विशाखापट्टणम दोन दिवसांच्या सीआयआय पार्टनरशिप समिटचे आयोजन केले गेले आहे.आंध्र प्रदेश सरकारचा हा एक प्रमुख कार्यक्रम असून तो राज्याच्या विकासाला गती देण्यात महत्त्वाची भूमिका बजावण्यास सज्ज आहे माहितगारांनी प्रसारमाध्यमांना म्हटले आहे.राज्य अधिकाऱ्यांच्या मते, या कार्यक्रमादरम्यान सुमारे १० लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार होण्याची सरकारला अपेक्षा आहे.शुक्रवारी सुरू झालेल्या या शिखर परिषदेत ५० हून अधिक देशांचे ३००० हून अधिक प्रतिनिधी सहभागी झाले होते, ज्यात मंत्री, राजनयिक, जागतिक सीईओ, उद्योग नेते आणि प्रमुख आंतरराष्ट्रीय संघटनांचे प्रतिनिधी यांचा समावेश होता. शिखर परिषदेच्या एक दिवस आधी, राज्य सरकारने मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांच्या उपस्थितीत ३.६५ लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले होते, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येण्याची अपेक्षा राज्यात वाढली आहे.
दुबई ते भारत ड्रग्सचे जाळे; बॉलीवूड - राजकारणी यांचे ड्रग्स कनेक्शन
मुंबई : अडीचशे कोटी रुपयांच्या एमडी ड्रग्स घोटाळ्यात मुख्य आरोपी म्हणून अटक करण्यात आलेल्या मोहम्मद सलीम सुहेल शेखने चौकशीत हादरवून टाकणारा खुलासा केला आहे. देश-विदेशात अनेक प्रसिद्ध बॉलीवूड कलाकार आणि काही राजकीय व्यक्तींसाठी खास ड्रग्स पार्ट्या आयोजित केल्याची माहिती त्याने दिली आहे.या पार्टींमध्ये अभिनेत्री श्रद्धा कपूर, तिचा भाऊ सिद्धार्थ कपूर, निर्माता-दिग्दर्शक अब्बास–मस्तान, माजी आमदार झिशान सिद्दीकी, अभिनेत्री नोरा फतेही, इन्फ्लुएन्सर ओरी उर्फ ओरहान, दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरचा मुलगा अलीशाह पारकर, तसेच रॅपर लोका यांचा सहभाग असल्याचा दावा करण्यात आला आहे.सलीम शेखला संयुक्त अरब अमिरातीमध्ये अटक करून भारतात आणण्यात आले होते. गुरुवारी त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. कोठडी वाढवून मागताना पोलिसांनी चौकशीदरम्यान त्याच्याकडून समोर आलेली ही संवेदनशील माहिती न्यायालयाला दिली.मुंबई पोलिसांनी कुर्ला येथून परवीन बानो गुलाम शेख या महिलेला १६ फेब्रुवारी २०२४ रोजी तब्बल २५ कोटी रुपयांच्या मेफेड्रॉनसह पकडले होते. या अटकेनंतर अमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्यांची साखळी एकामागोमाग एक उघडकीस येत गेली. तपास वाढत गेला तसे चित्र आणखी धक्कादायक होत गेले. आतापर्यंत या प्रकरणात १५ जणांना अटक झाली असून, एमडीचे ड्रग्स ची किंमत जवळपास २५० कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे.परवीनला मिरा रोड येथील साजिद मोहम्मद आसिफ शेख हा ड्रग्ज पुरवत असल्याचे स्पष्ट झाले. त्याच्या चौकशीत या संपूर्ण रॅकेटचा सूत्रधार सलीम शेख असल्याचा उलगडा झाला. सलीम दुबईत बसून महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये मेफेड्रॉन उत्पादन व वितरणाचे जाळे चालवत होता. कच्चा मालही विविध राज्यांतून मागवला जात असल्याचे निष्पन्न झाले.या रॅकेटचा माग काढताच त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली आणि यूएई पोलिसांनी त्याला ताब्यात घेत भारतात सुपूर्द केले. चौकशीत सलीमने ड्रग्ज पुरवठ्यासह स्वतःही ड्रग्ज सेवन केल्याची कबुली दिली आहे.सलीमने आयोजित केलेल्या ड्रग्स पार्ट्या मुंबई, गोवा आणि दुबई येथील लक्झरी लोकेशन्सवर झाल्याची माहिती समोर आली आहे. विशेषतः विदेशातील पार्ट्यांमध्ये एमडीऐवजी चरस आणि कोकेनचा पुरवठा केल्याचा दावा चौकशीत करण्यात आला आहे.या प्रकरणी पोलीस सखोल तपास करत असून लवकरच आणखी काही प्रसिद्ध नावे समोर येण्याची शक्यता आहे.
बिहारमध्ये एनडीए प्रचंड विजयासह सरकार स्थापन करत आहे. दुपारी १ वाजेपर्यंत, एनडीए १९९ जागांवर आघाडीवर आहे. भाजप ९० जागांवर, जेडीयू ७९ जागांवर आणि त्यांचे मित्रपक्ष २८ जागांवर आघाडीवर आहेत. पहिल्यांदाच, भाजप बिहारमध्ये सर्वात मोठा पक्ष बनला आहे. गेल्या २५ वर्षांत भाजप तिसऱ्यांदा एनडीएमधील सर्वात मोठा पक्ष बनला आहे. यापूर्वी २००० आणि २०२० मध्ये भाजप पहिल्या क्रमांकावर होता. गेल्या चार निवडणुकांमध्ये नितीश प्रत्येक वेळी मुख्यमंत्री बनले आहेत, परंतु जेव्हा जेव्हा जेडीयूला कमी जागा मिळाल्या आहेत तेव्हा तेव्हा सरकारमध्ये भाजपचे वर्चस्व वाढले आहे. भाजपच्या बिग बीचे ५ परिणाम: ३ पैकी २ तज्ञांचे म्हणणे आहे की भाजपचा मुख्यमंत्री होऊ शकेल परिणाम १. ज्येष्ठ पत्रकार हर्षवर्धन त्रिपाठी आणि अरविंद मोहन या दोन तज्ज्ञांच्या मते, भाजप मुख्यमंत्रिपदाची खुर्ची व्यापू शकते. नितीश कुमार निवृत्त होऊ शकतात. परिणाम २. जेडीयूला उपमुख्यमंत्री पद मिळू शकेल. भाजप गृह, अर्थ, आरोग्य आणि महसूल ही खाती घेऊ शकेल. परिणाम ३. भाजप नवीन धोरणे बनवणे, कोणतीही मोठी योजना सुरू करणे, नवीन विधेयके आणणे इत्यादी महत्त्वाचे निर्णय घेईल. परिणाम ४. बिहार सरकारसाठी महत्त्वाचे निर्णय दिल्लीतून घेतले जातील. उदाहरणार्थ, जेडीयूने नियमांपासून वेगळे होऊन वक्फ विधेयकाला पाठिंबा दिला. परिणाम ५. सध्या, केंद्रात भाजपकडे स्वतःचे बहुमत नाही. जेडीयू हा त्यांचा भागीदार आहे. बिहारमध्ये भाजपची मजबूत उपस्थिती केंद्रातही त्यांची ताकद वाढवेल. तथापि, ज्येष्ठ पत्रकार अरुण पांडे यांचा असा विश्वास आहे की नितीश कुमार मुख्यमंत्री असतील. भाजपला बदनामी करायची नाही, परंतु तरीही ते सरकारवर वर्चस्व गाजवेल. २००० पासून आतापर्यंत सरकारवर कोणाचे वर्चस्व आहे हे ग्राफिकवरून समजून घेऊया... २००० च्या विधानसभा निवडणुका: भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला, पण नितीश यांना मुख्यमंत्री बनवण्यात आले २००५ च्या विधानसभा निवडणुका: जेडीयू हा सर्वात मोठा पक्ष होता, मुख्यमंत्री आणि सभापती देखील त्यांच्या पक्षाचे होते २०१० च्या विधानसभा निवडणुका: जेडीयू पुन्हा सर्वात मोठा पक्ष, मुख्यमंत्री आणि सभापती देखील त्याच पक्षाचे २०१५ विधानसभा निवडणूक: नितीश कुमार महाआघाडीत सामील, २ वर्षांनी एनडीएमध्ये परतले २०२० च्या विधानसभा निवडणुका: नितीश कुमार मुख्यमंत्री झाले, पण सरकारवर भाजपचे वर्चस्व
मुंबई प्रतिनिधी: अनिल अंबानी यांच्याकडून अंमलबजावणी संचालनालयकडून बजावण्यात आलेल्या नोटीशीला उत्तर देण्यात आले आहे. 'आम्ही ईडीला संपूर्णपणे सहकार्य करू' असे ईडीला उद्योगपती अनिल अंबानी यांच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. दरम्यान प्रवक्त्याने प्रसारमाध्यमांवर खंत व्यक्त करत कंपनीवर प्रसारमाध्यमांनी 'तथ्यहीन' रिपोर्टिंग छापल्याचा आरोप केला आहे. कंपनीवर मनी लॉन्ड्रिंग कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झालेली नाही तर फेमा (Foregin Exchange Management Act FEMA) अंतर्गत नोटीस बजावण्यात आली असल्याचे प्रवक्त्याने सांगितले. त्यामुळे पत्रकारांनी जनतेची दिशाभूल केल्याचे कंपनीने म्हटले.कंपनीने निवेदनात म्हटले आहे की, अनिल अंबानी संपूर्णपणे ईडीशी सहकार्य करत आहेत. तसेच व्हर्च्युअली ईडीच्या चौकशीला सामोरे जाऊ शकतात' असे म्हटले आहे. तसेच अनिल अंबानी कुठल्याही प्रश्नांची उत्तरे देण्यास सहकार्य करतील असेही कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे.प्रवक्त्यांनी नेमक्या शब्दात अधोरेखित केले आहे की,'ईडीची नोटीस केवळ फेमा (परकीय चलन व्यवस्थापन कायदा) चौकशीशी संबंधित आहे आणि मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्या (पीएमएलए) अंतर्गत कोणत्याही चौकशीशी संबंधित नाही, कारण योग्य पडताळणीशिवाय मीडियाच्या काही भागांनी चुकीच्या पद्धतीने श्रेय दिले आहे.'तसेच निवेदनात म्हटले आहे की,'अनिल डी अंबानी यांना ईडी समन्स फेमा चौकशीशी संबंधित आहे, पीएमएलएशी नाही, कारण मीडियाने तथ्यांचा कोणताही अभ्यास न करता चुकीच्या पद्धतीने श्रेय दिले आहे.'त्यात ईडीच्या ३ नोव्हेंबर २०२५ च्या मीडिया रिलीजचा संदर्भ देण्यात आला होता ज्यामध्ये म्हटले होते की हे प्रकरण जयपूर-रींगस महामार्ग प्रकल्पाशी संबंधित आहे, हा खटला १५ वर्षे जुना आहे, २०१० चा आहे आणि रस्त्याच्या कंत्राटदाराशी संबंधित मुद्द्यांशी संबंधित आहे. अनिल अंबानी यांच्या भूमिकेचे स्पष्टीकरण देताना प्रवक्त्याने सांगितले की त्यांनी एप्रिल २००७ ते मार्च २०२२ दरम्यान रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये गैर-कार्यकारी संचालक म्हणून काम केले होते आणि कंपनीच्या दैनंदिन कामकाजात कधीही सहभागी नव्हते. अंबानी सध्या कंपनीच्या बोर्डाचे सदस्य नाहीत असेही प्रवक्त्याने म्हटले आहे.निवेदनात असे म्हटले आहे की 'अनिल डी अंबानी हे रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या मंडळाचे सदस्य नाहीत. त्यांनी एप्रिल २००७ ते मार्च २०२२ पर्यंत सुमारे पंधरा वर्षे कंपनीत काम केले, फक्त एक गैर-कार्यकारी संचालक म्हणून, आणि कंपनीच्या दैनंदिन व्यवस्थापनात कधीही सहभागी नव्हते.'
श्रेया घोषालच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये चेंगराचेंगरी! ओडिसाच्या बाली यात्रेला गालबोट
ओडिसा: सुप्रसिद्ध भारतीय गायिका श्रेया घोषालचा ओडिसा कटक येथे १३ नोव्हेंबरला लाईव्ह कॉन्सर्ट आयोजित केला होता. ओडीसातील बाली यात्रा महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमानिमित्ताने श्रेयाचा कॉन्सर्ट पाहण्यासाठी अनेक चाहत्यांनी गर्दी केली होती. यावेळी श्रेयाने डोला रे डोला, चिकनी चमेली, मस्तानी हो गई आणि मनवा लागे सारख्या तिच्या सुरेल गाण्यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. मात्र यावेळी एक दुर्घटना घडली आणि संपूर्ण यात्रेला गालबोट लागले.श्रेयाचा लाईव्ह कॉन्सर्ट पाहण्यासाठी बाली यात्रेत मर्यादेच्या बाहेर गर्दी जमा झाली होती. यामुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली आणि या दुर्घटनेत काहीजण जखमी झाले. कटकच्या जिल्हा प्रशासन अधिकाऱ्यांनी सांगितलं की, श्रेया घोषाल परफॉर्म करण्यासाठी स्टेजवर आली तेव्हा कॉन्सर्टला आलेला जमाव स्टेजवर धावला आणि गोंधळ निर्माण झाला. यामुळे श्रेयाचा कॉन्सर्ट काही वेळासाठी थांबवावा लागला. मात्र काही वेळातच पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आणि कॉन्सर्ट पुन्हा सुरू झाला. श्रेया घोषालची कटकमध्ये सादरीकरण करण्याची ही पहिलीच वेळ होती.https://prahaar.in/2025/11/14/ind-vs-sa-1st-test-three-south-african-batsmen-in-the-pavilion-jasprit-bumrah-takes-two-wickets/दरम्यान, श्रेया घोषाल सध्या 'इंडियन आयडॉल' या कार्यक्रमाचे परीक्षण करत असून तिच्यासोबत या शोमध्ये विशाल दादलानी आणि बादशाहसुद्धा आहेत.

28 C