Satara news: दुर्गम भागाला ‘कनेक्टिव्हिटी’बुस्टर! सांडवली रस्त्यावर उभे राहणार दोन मजबूत पूल
प्रभात वृत्तसेवा सातारा – दुर्गम, डोंगराळ भागातील दळणवळण अधिक सुकर, सुरक्षित आणि निर्धोक होण्यासाठी विविध रस्त्यांवरील पुलांच्या बांधकामाला सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्राधान्य दिले आहे. सातारा तालुक्यातील प्रजिमा 29 ते सांडवली रस्त्यावर नवीन दोन पूल बांधण्यासाठी ना. शिवेंद्रसिंहराजे यांच्या पाठपुराव्यातून 9 कोटी 66 लाख 73 हजार रुपये निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. […] The post Satara news: दुर्गम भागाला ‘कनेक्टिव्हिटी’ बुस्टर! सांडवली रस्त्यावर उभे राहणार दोन मजबूत पूल appeared first on Dainik Prabhat .
DJ ban: आंधळी ग्रामपंचायतीचा धडाकेबाज निर्णय; सामाजिक वातावरण बिघडवणाऱ्या डीजेला गावात पूर्ण बंदी
प्रभात वृत्तसेवा दहिवडी – सामाजिक वातावरण बिघडवणार्या मिरवणूकीतील डीजेवर आंधळी गावाच्या हद्दीत बंदी घालण्याचा ऐतिहासिक ठराव ग्रामसभेत पारित करण्यात आला. सरपंच दादासाहेब काळे यांच्या संकल्पनेतून डीजे वाजविण्यास बंदी घालण्याचा विषय ग्रामसभेसमोर आणला. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान काळात आंधळी ग्रामपंचायतीचा डीजे बंदीचा अभिनव निर्णय माण तालुक्यात चर्चेत आला आहे. ध्वनी प्रदुषण, मर्यादा ओलांडून कर्णकर्कश आवाज, शारीरिक […] The post DJ ban: आंधळी ग्रामपंचायतीचा धडाकेबाज निर्णय; सामाजिक वातावरण बिघडवणाऱ्या डीजेला गावात पूर्ण बंदी appeared first on Dainik Prabhat .
प्रभात वृत्तसेवा कोयनानगर – आज भूकंपग्रस्तांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याचवेळी भूकंपग्रस्तांच्या नोंदी डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देण्यासाठी क्यूआर कोडचे लोकार्पण करण्यात आले. त्यामुळे दाखले, स्थलांतर नोंदी, जमीन- जुमल्याचे विवरण आणि पुनर्वसनाशी संबंधित महत्त्वाचे दस्तऐवज आता मोबाइलवर सहज तपासता येतील. भूकंपग्रस्तांच्या हक्कांचे संरक्षण, नोंदींचे अचूक व्यवस्थापन आणि भविष्यातील प्रशासकीय प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी हा उपक्रम […] The post Koynanagar news: आता सरकारी कार्यालयात खेट्या मारण्याची गरज नाही; कोयना भूकंपग्रस्तांसाठी आली ‘ही’ हायटेक सुविधा appeared first on Dainik Prabhat .
दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १२ डिसेंबर २०२५
पंचांगआज मिती मार्गशीर्ष कृष्ण अष्टमी शके १९४७.चंद्र नक्षत्र उत्तरा फाल्गुनी. योग प्रीती. चंद्र राशी सिंह १०.२१ पर्यंत नंतर कन्या,भारतीय सौर २१ मार्गशीर्ष शके १९४७.शुक्रवार दिनांक १२ डिसेंबर २०२५ .मुंबईचा सूर्योदय ०७.०१, मुंबईचा सूर्यास्त ०६.०२ मुंबईचा चंद्रोदय ०१.१८ उद्याची, मुंबईचा चंद्रास्त १२.५६ , राहू काळ ११.०९ ते १२.३१.उत्तम दिवसदैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)मेष : महत्त्वाची कामे पार पाडू शकाल.वृषभ : आर्थिक आवक चांगली राहील.मिथुन : गृहसौख्य चांगले राहील.कर्क : वादाचे प्रसंग येतील ते टाळा.सिंह : आपले नियोजन उत्तम होईलकन्या : अडचणींचे प्रमाण कमी राहील.तूळ : विशेष कार्यक्रमाला उपस्थित राहाल.वृश्चिक : कार्यक्षेत्र विस्तारेल.धनू : महत्त्वाची कामे खर्चिक ठरतील.मकर : विनाकारण खरेदीचा मोह आवरा.कुंभ : इतरांच्या भानगडीत पडू नका.मीन : कौटुंबिक शांतता पाळा.
Satara accident: अंगावर काटा आणणारा अपघात! ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचे चाक डोक्यावरून गेले अन्…
प्रभात वृत्तसेवा सातारा – पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाच्या सेवा रस्त्यावर हॉटेल फर्नसमोर टॅक्टरच्या ट्रॉलीचे चाक डोक्यावरून गेल्याने सारिका दीपक सुतार (वय 27, रा. संगम माहुली, ता. सातारा) या विवाहितेचा जागीच मृत्यू झाला.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सारिका सुतार या दुचाकीवरून गुरुवारी सकाळी 11.30 च्या सुमारास क्लासला निघाल्या होत्या. त्या महामार्गाच्या सेवा रस्त्यावरुन जात असताना, समोरून टॅक्टर-ट्रॉली […] The post Satara accident: अंगावर काटा आणणारा अपघात! ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचे चाक डोक्यावरून गेले अन्… appeared first on Dainik Prabhat .
India vs South Africa T20: डी कॉकच्या वादळी खेळीच्या जोरावर द. आफ्रिकेचा भारतावर 51 धावांनी विजय
प्रभात वृत्तसेवा मुल्लानपूर (न्यू चंदीगड) – सलामीवीर क्विंटन डी कॉकने केलेल्या वादळी खेळीच्या बळावर दक्षिण आफ्रिकेने भारताला ५१ धावांनी नमवत ५ सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. आफ्रिकेने दिलेल्या २१४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा डाव १९.१ षटकांत सर्वबाद १६२ धावांवर मर्यादित राहिला. लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. पहिल्याच षटकात सलामीवीर शुभमन […] The post India vs South Africa T20: डी कॉकच्या वादळी खेळीच्या जोरावर द. आफ्रिकेचा भारतावर 51 धावांनी विजय appeared first on Dainik Prabhat .
शिरूर: समाधान इचके यांना ‘आदर्श शेतकरी पुरस्कार’ प्रदान
शिरूर – आनंदी युनिव्हर्स फाउंडेशन आयोजित ‘आदर्श शेतकरी पुरस्कार सोहळा २०२५’ पं. जवाहरलाल नेहरू सभागृह, पुणे येथे उत्साहात संपन्न झाला. या भव्य सोहळ्यात शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील तरुण व प्रगतिशील शेतकरी समाधान श्रीरंग इचके यांना ‘आदर्श शेतकरी पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार आनंदी युनिव्हर्स फाउंडेशनचे अध्यक्ष गणेश रामदास विटकर, रुद्रायणी अॅग्रो […] The post शिरूर: समाधान इचके यांना ‘आदर्श शेतकरी पुरस्कार’ प्रदान appeared first on Dainik Prabhat .
नेवासा: अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपीस 20 वर्षे तुरुंगवास
नेवासा- अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी नेवासा विशेष जिल्हा न्यायालयाने वरखेड येथील देवा उर्फ देविदास शेषराव उर्फ शशिकांत कुंढारे (वय २३) या आरोपीस २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. १८ ऑक्टोबर २०२१ रोजी अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली होती. आरोपी कुंढारे याने तिला फूस लावून पळवून नेले आणि ती अल्पवयीन (वय १५ वर्षांपेक्षा […] The post नेवासा: अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपीस 20 वर्षे तुरुंगवास appeared first on Dainik Prabhat .
Akhilesh Yadav : अखिलेश यादवही ठेवणार लाडक्या बहिणींवर भिस्त!
लखनौ : निवडणुकांमध्ये सध्या महिलांसाठीच्या आर्थिक योजनांचा मोठा बोलबाला आहे. अशात समाजवादी पक्षाचे (सप) अध्यक्ष अखिलेश यादव यांचीही भिस्त लाडक्या बहिणींवर राहणार असल्याचे सूचित झाले. मागील काही वर्षांत विविध राज्यांत विधानसभा निवडणुका झाल्या. त्या निवडणुकांमध्ये महिलांना रोख रक्कम उपलब्ध करणाऱ्या योजना निर्णायक ठरल्याचे दिसून आले. आता पुढील काळात आणखी काही राज्यांच्या निवडणुका होतील. सप प्रमुख […] The post Akhilesh Yadav : अखिलेश यादवही ठेवणार लाडक्या बहिणींवर भिस्त! appeared first on Dainik Prabhat .
बिबट्याला ‘पाळीव’चा दर्जा द्या.! रवी राणा यांची मागणी
नागपूर – गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांनी राज्यात उच्छाद घातला आहे. हे बिबटे शेतात, मानवी वस्तीत अगदी शहरी भागातील वसाहतींमधून मुक्त संचार करू लागले आहेत. तसेच या बिबट्यांनी केलेल्या हल्ल्यात अनेकांचा मृत्यूही झाला आहे. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या बिबट्यांचा प्रश्न सध्या नागपूरमध्ये सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही चांगलाच गाजत आहे. त्यातच आता […] The post बिबट्याला ‘पाळीव’चा दर्जा द्या.! रवी राणा यांची मागणी appeared first on Dainik Prabhat .
‘या’कारणामुळे रुपया पोहोचला 90.33 रुपये प्रति डॉलरवर; आज गाठली नवी निचांकी पातळी
मुंबई – भारताची स्थूल अर्थव्यवस्था बळकट असूनही भारत अमेरिकेदरम्यानचा व्यापार करार खोळंबल्यामुळे रुपयावरील दबाव वाढत चालला आहे. अशा परिस्थितीत गुरुवारी रुपयाचा भाव 39 पैशांनी कमी होऊन 90.33 रुपये प्रति डॉलर या नव्या निचांकी पातळीवर गेला. या अगोदर अमेरिकेबरोबरचा व्यापार करार डिसेंबर मध्ये होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. मात्र एकूण परिस्थिती पाहता हा करार डिसेंबरमध्ये […] The post ‘या’ कारणामुळे रुपया पोहोचला 90.33 रुपये प्रति डॉलरवर; आज गाठली नवी निचांकी पातळी appeared first on Dainik Prabhat .
मुंबई – नोव्हेंबर महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये झालेली गुंतवणूक 21 टक्क्यांनी वाढून 29,911 कोटी रुपये इतकी झाली आहे. त्या अगोदर तीन महिन्यांमध्ये इक्विटी म्युच्युअल फंडातील गुंतवणूक शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे कमी झाली होती. मात्र आता गुंतवणूकदारांचा शेअर बाजाराबाबत आशावाद वाढला असल्याचे दिसून येते. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया या संस्थेने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, नोव्हेंबर महिन्यात […] The post Equity mutual funds: इक्विटी म्युच्युअल फंडात गुंतवणूक वाढली; नोव्हेंबर महिन्यात 29,911 कोटी रुपयाचा ओघ appeared first on Dainik Prabhat .
पु. ना. गाडगीळ आणि सन्स फॉर्च्युनच्या यादीत
पुणे – भारताच्या रिटेल क्षेत्रातील एक प्रतिष्ठित आणि ऐतिहासिक ब्रँड म्हणून नावाजलेल्या पु. ना. गाडगीळ आणि सन्सने पुन्हा एकदा आपली गुणवत्ता, विश्वास आणि सातत्यपूर्ण प्रगती सिद्ध केली आहे. देशातील सर्वात मानाच्या यादींपैकी एक असलेल्या र्ऋेीीींपश 500 खपवळर यादीत तिसर्यांदा स्थान मिळवण्याचा बहुमान कंपनीने प्राप्त केला आहे. 2021, 2024 आणि आता 2025 या तिन्ही वर्षांत सलग […] The post पु. ना. गाडगीळ आणि सन्स फॉर्च्युनच्या यादीत appeared first on Dainik Prabhat .
World Inequality Report 2026: भारतामध्ये उत्पन्न आणि संपत्तीची असमानता विक्रमी स्तरावर पोहोचली असल्याची धक्कादायक माहिती ‘वर्ल्ड इनइक्वालिटी रिपोर्ट २०२६’ मधून समोर आली आहे. देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील (नॅशनल इनकम) ५८% हिस्सा केवळ शीर्ष १०% श्रीमंत लोकांच्या हातात एकवटला आहे. याच्या उलट, देशातील खालच्या ५०% लोकसंख्येला या राष्ट्रीय उत्पन्नापैकी केवळ १५% हिस्सा मिळतो. संपत्तीची असमानता अधिक […] The post World Inequality Report 2026: देशातील श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी वाढली; ‘वर्ल्ड इनइक्वालिटी रिपोर्ट’ मधून धक्कादायक वास्तव समोर appeared first on Dainik Prabhat .
हे बंगाल आहे, उत्तर प्रदेश नाही.! ‘भीती दाखवण्याचा प्रयत्न चालणार नाही’–ममता बॅनर्जी
कोलकाता – कोलकात्यातील गीता पठण कार्यक्रमात दोन मांसाहारी खाद्यविक्रेत्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. हे पश्चिम बंगाल आहे, उत्तर प्रदेश नाही. अशा धमक्या, हिंसा आणि धर्माच्या नावावर दडपशाही येथे चालणार नाही, असे ममता बॅनर्जी यांनी ठाम शब्दांमध्ये सांगताना, धर्माचा खरा अर्थ संरक्षण आहे, विभागणे नाही. गीता हे राजकारणाचे हत्यार […] The post हे बंगाल आहे, उत्तर प्रदेश नाही.! ‘भीती दाखवण्याचा प्रयत्न चालणार नाही’ – ममता बॅनर्जी appeared first on Dainik Prabhat .
Goa Club Fire : गोव्यातील नाईटक्लब अग्निकांडातील फरार लुथरा बंधूंना थायलंडमध्ये अटक
Goa Club Fire : गोव्यातील भीषण अग्नितांडवानंतर देशाबाहेर पलायन करणारे नाइटक्लबचे मालक लुथरा बंधूंना थायलंडमध्ये ताब्यात घेण्यात आले. त्यांना आता भारतात आणण्याच्या प्रक्रियेला गती देण्यात आली आहे. गोव्यातील नाइटक्लबमध्ये ६ डिसेंबरची मध्यरात्र उलटल्यानंतर भीषण आग लागली. त्यामध्ये २५ जण मृत्युमुखी पडले. दुर्घटनेनंतर नाइटक्लबचे मालक गौरव आणि सौरभ लुथरा हे बंधू देशाबाहेर पसार झाल्याचे समोर आले. […] The post Goa Club Fire : गोव्यातील नाईटक्लब अग्निकांडातील फरार लुथरा बंधूंना थायलंडमध्ये अटक appeared first on Dainik Prabhat .
कोथरूड गोळीबार प्रकरण; गुंड नीलेश घायवळ फरार घोषित
पुणे – कोथरूड गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी आणि बनावट कागदपत्रांद्वारे पारपत्र मिळवून लंडनला पळालेल्या कुख्यात गुंड नीलेश घायवळ याला पुण्यातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने फरार घोषित केले आहे. न्यायाधीश के. पी. जैन-देसर्डा यांनी हा निर्णय सुनावला. किरकोळ वादातून तरुणावर गोळीबार केल्यानंतर घायवळ परदेशात पळून गेला होता. ब्रिटन उच्चायुक्तालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार तो सध्या ९० दिवसांच्या व्हिजिटर व्हिसावर […] The post कोथरूड गोळीबार प्रकरण; गुंड नीलेश घायवळ फरार घोषित appeared first on Dainik Prabhat .
CM फडणवीसांचं पुणेकरांना मोठं गिफ्ट ! ३२,५२३ कोटींच्या २२० प्रकल्पांना मंजुरी
नागपूर – महाराष्ट्र सरकारने वेगाने विस्तारत असलेल्या पुणे महानगर प्रदेशाच्या नागरी गरजांना प्रतिसाद देत ३२,५२३ कोटी रुपये खर्चाच्या तब्बल २२० विकास प्रकल्पांना हिरवा कंदील दिला आहे. नागपूरमधील विधान भवन परिसरात झालेल्या पुणे महानगर नियोजन समितीच्या पाचव्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार, तसेच अनेक आमदारांच्या उपस्थितीत या […] The post CM फडणवीसांचं पुणेकरांना मोठं गिफ्ट ! ३२,५२३ कोटींच्या २२० प्रकल्पांना मंजुरी appeared first on Dainik Prabhat .
IND vs SA : अर्शदिप सिंहच्या नावावर झाला ‘हा’नकोसा विक्रम
IND vs SA : न्यू चंदीगडच्या मुल्लानपूर स्टेडिअममध्ये भारत आणि साऊथ आफ्रिका यांच्यात आज दुसरा टी20 सामना खेळवला जात आहे. या सामन्यात भारताचा स्टार बॉलर अर्शदिप सिंहच्या नावावर एक नकोसा विक्रम झाला आहे. त्याने या सामन्यात 13 बॉलची ओव्हर टाकली. या ओव्हरमध्ये त्याने 7 व्हाईट टाकले होते.हि ओव्हर पाहून गौतम गंभीरने डोक्यावर हात मारून घेतला. […] The post IND vs SA : अर्शदिप सिंहच्या नावावर झाला ‘हा’ नकोसा विक्रम appeared first on Dainik Prabhat .
पीएम नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात फोनवर संवाद; काय झाली चर्चा?
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी दूरध्वनीवर महत्त्वपूर्ण चर्चा केली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या चर्चेत भारत-अमेरिका व्यापक जागतिक रणनीतिक भागीदारीत झालेल्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. पंतप्रधान मोदी यांनी ‘एक्स’ सोशल मीडियावर पोस्ट करत या चर्चेविषयी माहिती दिली. त्यांनी लिहिले, “अध्यक्ष ट्रम्प यांच्यासोबत अतिशय सौहार्दपूर्ण आणि महत्त्वपूर्ण चर्चा झाली. आम्ही […] The post पीएम नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात फोनवर संवाद; काय झाली चर्चा? appeared first on Dainik Prabhat .
शिक्षकांसाठी मोठी बातमी! TET परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी ‘ही’अंतिम मुदत
नागपूर: राज्यातील शाळांमध्ये पहिली ते आठवीसाठी नियुक्त असलेल्या आणि ज्यांचा सेवाकाळ पाच वर्षांहून अधिक शिल्लक आहे, अशा शिक्षकांना टीईटी (TET) परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत मुदत आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी गुरुवारी विधानसभेत दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या १ सप्टेंबर २०२५ च्या आदेशानुसार ही मुदत देण्यात आली आहे. या निर्णयाविरुद्ध फेरविचार […] The post शिक्षकांसाठी मोठी बातमी! TET परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी ‘ही’ अंतिम मुदत appeared first on Dainik Prabhat .
Ajit Pawar : शेतकऱ्यांसाठी केंद्राकडून 29 हजार कोटींची मागणी; अजित पवारांनी दिली माहिती
नागपूर : राज्य सरकारने यावर्षी अवकाळी पाऊस आणि पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी केंद्राकडून २९,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त निधीची मागणी केली आहे, अशी माहीती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली. पवार यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांवरील चर्चेदरम्यान हे विधान केले आहे. पवार म्हणाले, आम्ही राज्यातील अवकाळी पाऊस आणि पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना आधीच […] The post Ajit Pawar : शेतकऱ्यांसाठी केंद्राकडून 29 हजार कोटींची मागणी; अजित पवारांनी दिली माहिती appeared first on Dainik Prabhat .
पारंपरिक कोल्हापुरी कौशल्याला प्राडाची आधुनिक साथ
मुंबई : भारतीय पारंपरिक चर्मकला कोल्हापुरी चपलांचा वारसा जगभर पोहोचवण्यासाठी जागतिक ब्रॅन्ड प्राडा, लिडकॉम (संत रोहिदास चर्मउद्योग आणि चर्मकार विकास महामंडळ) आणि लिडकार (डॉ. बाबू जगजीवनराम चर्मउद्योग विकास महामंडळ) यांच्यात सामंजस्य करार झाला. मुंबईतील इटालियन वाणिज्य दूतावासात, इटली–भारत व्यापारी परिषदेनिमित्त या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. शतकांपासून वापरात असलेल्या पारंपरिक चप्पल निर्मितीच्या पद्धती, प्राडाच्या आधुनिक व समकालीन डिझाईन शैली या माध्यमातून चप्पल विकसित केल्या जात आहेत. पारंपरिक कौशल्य आणि आधुनिक लक्झरी फॅशनच्या मदतीने पारंपारिक कोल्हापुरी कौशल्याला प्राडाची आधुनिक साथ मिळणार आहे. विशेष चप्पला फेब्रुवारी २०२६ मध्ये प्राडाच्या ४० विक्री केंद्रांमध्ये तसेच अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होईल.या उपक्रमासाठी महाराष्ट्र शासनाचे ठोस पाठबळ लाभले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचे सक्रिय मार्गदर्शन मिळाले आहे. हा करार प्रधान सचिव तथा लिडकॉमचे अध्यक्ष डॉ. हर्षदीप कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि लिडकॉमच्या व्यवस्थापकीय संचालक प्रेरणा देशभ्रतार यांच्या धोरणात्मक नियोजनामुळे शक्य झाला आहे.सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट म्हणाले, या कराराने भारतातील अनेक कारागीर, व्यावसायिक आणि उद्योजकांचा फायदा होणार आहे. या विशेष संकलनातून भारतीय कारागिरांच्या कलेला नवी दिशा मिळणार असून आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांच्या कौशल्याची ओळख अधिक दृढ होणार आहे. लिडकॉमच्या व्यवस्थापकीय संचालक प्रेरणा देशभ्रतार म्हणाल्या, पारंपरिक कला जपणाऱ्या कारागिरांच्या पिढ्यांचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांच्या कौशल्याला जागतिक पातळीवर योग्य ओळख देण्यासाठी ही भागीदारी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. यात एक जागतिक ब्रँड थेट महाराष्ट्र आणि कर्नाटकातील कारागिरांसोबत काम करत असल्याने त्यांच्या या कौशल्याला एक ओळख मिळेल आणि कलेचे पूर्ण श्रेय या कारागिरांना मिळेल.लिडकारच्या व्यवस्थापकीय संचालक संचालिका डॉ. के. एम. वसुंधरा म्हणाल्या, कोल्हापुरी चपलांची परंपरा म्हणजे महाराष्ट्र–कर्नाटकातील चप्पलकारांचे शतकांपासूनचे संचित कौशल्य या सहकार्यामुळे प्रशिक्षण, रोजगार आणि जागतिक संधींची विस्तृत दारे उघडणार आहेत.प्राडा समूहाच्या सामाजिक उत्तरदायित्व विभागाचे प्रमुख लोरेंझो बर्टेली म्हणाले, ही भागीदारी म्हणजे सांस्कृतिक आदानप्रदानाची नवी ओळख आहे. भारतीय कारागिरांच्या अतुलनीय कलेला आधुनिक जगात योग्य स्थान देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.चपलांच्या कलेक्शनच्या माध्यमातून भारतीय कारागिरीचा 'प्राडा मेड इन इंडिया इन्स्पायर्ड बाय कोल्हापुरी चप्पल्स' प्रकल्पाचा आराखडा, अंमलबजावणी आणि त्या संदर्भातील मार्गदर्शक तत्वे या करारात नमूद करण्यात आली आहेत. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील पारंपरिक कोल्हापुरी चपला तयार करणाऱ्या कुशल कारागिरांच्या साह्याने या चपला भारतात बनवल्या जातील. या चपला बनवण्याच्या पारंपरिक पद्धती आणि प्राडाच्या समकालीन डिझाइन्स तसेच प्रीमिअम दर्जाच्या मटेरिअलच्या साह्याने या कलेक्शनच्या माध्यमातून भारतातील संपन्न वारसा आणि आधुनिक लक्झ्यरी फॅशनची अभिव्यक्ती यात एका नवा संवादाला सुरुवात केली जाणार आहे. पारंपरिक कोल्हापुरी चपला महाराष्ट्रातील चार जिल्हे (कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर) आणि कर्नाटकातील चार जिल्हे (बेळगावी, बागलकोट, धारवाड, बिजापूर) २०१९ या आठ जिल्ह्यांमध्ये बनवल्या जातात. मध्ये कोल्हापुरी चपलांना जिओग्राफिकल इंडिकेशन (जीआय) टॅग देण्यात आल्याने त्यांची अस्सलता जपली गेली आणि त्यांचे सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित झाले.
AI Prediction : IPL ऑक्शनमध्ये ‘या’ खेळाडूवर लागणार सर्वात मोठी बोली; AI ने वर्तवली भविष्यवाणी
AI Prediction : आयपीएल 2026 स्पर्धेला काही महिन्यात सुरुवात होणार आहे. त्या अगोदर मिनी ऑक्शन होणार आहे. त्यामुळे ऑक्शनआधी एकच चर्चा रंगली आहे, ती म्हणजे या ऑक्शनमध्ये कोणत्या खेळाडूवर मोठी बोली लागणार. बीसीसीआयच्या नियमानुसार या ऑक्शनमध्ये (AI Prediction) कुठल्याही परदेशी खेळाडूवर १८ कोटींहून अधिकची बोली लागू शकत नाही. यादरम्यान या ऑक्शनमध्ये कोणत्या खेळाडूवर विक्रमी बोली […] The post AI Prediction : IPL ऑक्शनमध्ये ‘या’ खेळाडूवर लागणार सर्वात मोठी बोली; AI ने वर्तवली भविष्यवाणी appeared first on Dainik Prabhat .
आंबा, काजू, मत्स्य व्यवसायाला चालना मिळणार; तरुणांना गावातच रोजगार उपलब्ध होईल – मंत्री नितेश राणेनागपूर: वैभववाडी-कोल्हापूर रेल्वे मार्गाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला अखेर हिरवा कंदील मिळाल्याबद्दल मंत्री नितेश राणे यांनी सत्ताधारी पक्षाच्या निर्णयाचे जोरदार स्वागत केले आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्र आणि विशेषतः कोकण विभागाच्या विकासाची गती वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राणे यांनी या प्रकल्पाला 'महाराष्ट्रासाठी घेतलेला गेम चेंजर निर्णय' असे संबोधले.मंत्री नितेश राणे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वे मार्ग हा केवळ एक रेल्वे मार्ग नसून, तो कोकणच्या विकासाची दारं उघडणार आहे. या निर्णयामुळे कोकणचा आणि महाराष्ट्राचा वेगवान विकास साधता येणार आहे.कोकणातील अर्थव्यवस्थेला मिळणार बळराणे यांनी यावेळी या प्रकल्पाचे कोकणातील अर्थव्यवस्थेवर होणारे सकारात्मक परिणाम स्पष्ट केले. ते म्हणाले, या रेल्वे मार्गामुळे आंबा व्यवसाय, काजू व्यवसाय आणि मत्स्य व्यवसायाला मोठी चालना मिळणार आहे. दळणवळण सोपे आणि स्वस्त झाल्याने कोकणातील उत्पादने थेट मोठी बाजारपेठ गाठू शकतील.सिंधुदुर्गच्या तरुणांसाठी विशेष संधीया प्रकल्पामुळे कोकणातील तसेच नाशिकमधील युवकांसाठी रोजगाराच्या विशेष संधी निर्माण होतील, असेही नितेश राणे यांनी नमूद केले. ते म्हणाले, आता गावातच राहून रोजगार निर्माण करण्याची संधी मिळेल. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुण कुठल्याही आव्हानाला सामोरे जाऊन या विकासात पुढे जाईल, यात शंका नाही.उद्धव ठाकरे यांना आज माझ्याकडून सुट्टीनितेश राणे यांनी या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त करताना उपरोधिकपणे उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. ते म्हणाले, कोकणच्या विकासाचा हा निर्णय पाहता, मी माझ्याकडून आज उद्धव ठाकरे यांना सुट्टी देतो! वैभववाडी-कोल्हापूर रेल्वे मार्गाला हिरवा कंदील मिळाल्याने सिंधुदुर्गसह संपूर्ण कोकणात आनंद व्यक्त होत असून, या निर्णयामुळे अनेक दशकांची मागणी पूर्ण झाली आहे.
कोकणासाठी सोनेरी दिवस; महाराष्ट्र सरकार उभारणार वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेमार्ग
मंत्री नितेश राणेंनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार; सिंधुदुर्ग जिल्ह्यात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणारनागपूर : अवघे कोकण ज्या क्षणाची वाट पाहत होते, तो सोनेरी दिवस अखेर उजाडला आहे. बहुप्रतिक्षित वैभववाडी ते कोल्हापूर रेल्वेमार्ग महाराष्ट्र सरकारमार्फत उभारण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. मत्सव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी गुरुवारी या निर्णयाबाबत विधानसभेत निवेदनाद्वारे माहिती दिली. रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांनी या रेल्वे मार्गाबाबत केंद्र आणि राज्य सरकारकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता.या निर्णयाबद्दल नागपूर विधान भवनात माध्यमांशी संवाद साधतना मंत्री नितेश राणे म्हणाले, वैभववाडी ते कोल्हापूर असा रेल्वे मार्ग राज्य शासनामार्फत करण्याचा निर्णय आणि त्यासंबंधीत कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. हा निर्णय केवळ कोकणासाठी नव्हे, तर महाराष्ट्रासाठी गेमचेंजर ठरणार आहे. या रेल्वे मार्गामुळे विकासाची असंख्य दालने उघडणार आहेत. प्रामुख्याने कृषी आणि मत्स्य उत्पादनांच्या वाहतुकीला चालना मिळेल. पर्यटनात वाढ, पूर आणि भुस्खलनाच्या काळात दळणवळणाची पर्यायी सुविधा म्हणून हा मार्ग उपयुक्त ठरेल. याची भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती राणे यांनी दिली.खा. नारायण राणे यांच्या प्रयत्नांना यश - नितेश राणेमंत्री नितेश राणे म्हणाले, या एका निर्णयामुळे महाराष्ट्र आणि कोकण आर्थिक विकासाच्या दिशेने अतिशय गतिमान पद्धतीने वाटचाल करेल. या रेल्वेमार्गासाठी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे यांनी सातत्याने राज्य आणि केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला होता. त्यांचे यात मार्गदर्शन लाभले. आमदार निलेश राणे यांनीही याबाबत पाठपुरावा केला होता.या एका निर्णयामुळे रोजगाराच्या मोठ्या संधी सिंधुदुर्ग जिल्ह्यात तयार होतील. मनिऑर्डर संस्कृती कोकणात वर्षानुवर्षे सुरू होती, कोकणातील तरुण नोकरी आणि व्यवसायासाठी मुंबई, पुण्याकडे जायचे, ते या निर्णयामुळे रोजगाराच्या दृष्टीकोनातून गावाकडे परत येण्याचा विचार सुरू करतील, असा माझा ठाम विश्वास आहे, असे नितेश राणे म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या या निर्णयाचा मी बंदरे विकास मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मनापासून स्वागत करतो, असे त्यांनी सांगितले.टाईमबाऊंड पद्धतीने प्रकल्प पूर्ण करण्याचा मानसमंत्री नितेश राणे यांनी सांगितले की, टाईमबाऊंड पद्धतीने हा रेल्वेमार्ग पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे. जेणेकरून रोजगार, पर्यटन आणि उद्योगवृद्धी जलदगतीने होऊ शकेल. कोकणातील आंबा, काजू, मत्स्य उत्पादने, दुग्धजन्य पदार्थांची आयात-निर्यात सोपी होईल. जयगड, रेडी बंदराशी कनेक्टीव्हीटी मिळणार असल्याने विकासाचे मार्ग खुले होतील. दरडोई उत्पन्नात वाढ होईल.आज सिंधुदुर्ग जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न अडीच लाख रुपये आहे, ते साडेचार ते पाच लाखापर्यंत नेण्याचा आमचा मानस आहे. त्यासाठी हा प्रकल्प अतिशय महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला हा निर्णय आणि आजचा दिवस कोकणच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल. खासदार नारायण राणे, आमदार निलेश राणे यांच्यासह आम्ही यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आमची मागणी आज पूर्ण केली, असे नितेश राणे यांनी सांगितले.देशातील सर्वात मोठे शिपयार्ड महाराष्ट्रात होणारराज्याला लाभलेला ७२० किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा, निर्माणाधीन वाढवण बंदर आणि सागरी क्षेत्रातील अपार संधी लक्षात घेता २०२६ मध्ये देशातील सर्वात मोठे शिपयार्ड महाराष्ट्रात उभारावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दिले. विधान भवन स्थित मंत्रीपरिषद सभागृहात आयोजित बैठकीत बंदरे विकास विभागाचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. यावेळी मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे उपस्थित होते.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, देशातील सर्वात मोठे शिपयार्ड करण्यासाठी विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करावा. यासाठी जागेची निश्चिती करण्यात यावी. जयगड, आंग्रे, रेडी व विजयवाडा बंदरांचा विकास करण्यासाठी वैभववाडी ते कोल्हापूर रेल्वेमार्ग तयार करावा. या मार्गासाठी राज्य शासनाच्या आर्थिक सहभागाची तरतूद करण्यात यावी. वाढवण बंदर ते नाशिकपर्यंत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ महामार्ग करीत आहे. या महामार्गाच्या दोन्ही बाजूला प्रभावित क्षेत्र लक्षात घेऊन विकासाचे नियोजन करावे.बंदर असलेल्या परिसराच्या विकासाचे महत्त्व लक्षात घेता या ठिकाणी उद्योग करण्यास गुंतवणूकदारांना आकर्षित करावे. या परिसरात औद्योगिक विकास करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ व बंदरे विभाग यांच्या समन्वयातून कंपनी स्थापन करावी. निर्माण होत असलेले वाढवण बंदर लक्षात घेता मोठी बंदरे आणि संबंधित परिसराचा विकास करण्यासाठी विशेष नियोजन प्राधिकरण निर्माण करावे.वॉटर मेट्रो प्रकल्पासाठी इलेक्ट्रिक बोटीमुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पासाठी बोटी पूर्णपणे इलेक्ट्रिकवर असाव्यात. सुरुवातीला हायब्रीड मॉडेल उपयोगात आणावे, नवीन बोटिंची खरेदी करावी. कोचीपेक्षाही मोठा मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्प असला पाहिजे, या पद्धतीने प्रकल्प पूर्णत्वास न्यावा, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. प्रस्तावित मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्प महाराष्ट्रात सध्या ३६ प्रवासी मार्गांमधून वर्षाला १.८० कोटी प्रवाशांची वाहतूक केली जाते. मुंबई महानगर प्रदेशात २१ प्रवासी मार्ग असून याद्वारे १ कोटी ६० लाख प्रवाशांची वर्षाला ये- जा होते. प्रस्तावित मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पांतर्गत २१ टर्मिनलची निर्मिती करण्यात येऊन २०० नॉटिकल माइल मार्ग निर्माण करण्यात येतील. या प्रकल्पाचा विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे.
कोल्हापुरी कौशल्याला प्राडाची आधुनिक साथ.! लिडकॉम आणि लिडकार यांच्यात सामंजस्य करार
मुंबई : भारतीय पारंपरिक चर्मकला कोल्हापुरी चपलांचा वारसा जगभर पोहोचवण्यासाठी जागतिक ब्रॅन्ड प्राडा, लिडकॉम (संत रोहिदास चर्मउद्योग आणि चर्मकार विकास महामंडळ) आणि लिडकार (डॉ. बाबू जगजीवनराम चर्मउद्योग विकास महामंडळ) यांच्यात सामंजस्य करार झाला. मुंबईतील इटालियन वाणिज्य दूतावासात, इटली–भारत व्यापारी परिषदेनिमित्त या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. शतकांपासून वापरात असलेल्या पारंपरिक चप्पल निर्मितीच्या पद्धती, प्राडाच्या आधुनिक व […] The post कोल्हापुरी कौशल्याला प्राडाची आधुनिक साथ.! लिडकॉम आणि लिडकार यांच्यात सामंजस्य करार appeared first on Dainik Prabhat .
Rahul Gandhi : अमित शहा मानसिक दबावाखाली आहेत; राहुल गांधींची टीका
नवी दिल्ली : लोकसभेतील भाषणावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा निशाणा साधला. शहा मानसिक दबावाखाली आहेत. ती बाब संसदेने अनुभवली. तर, संपूर्ण देशाने पाहिली, अशी टिप्पणी त्यांनी केली. लोकसभेत बुधवारी निवडणूक सुधारणांवर चर्चा झाली. त्यावेळी शहा यांनी विरोधकांकडून केल्या जाणाऱ्या मतचोरीच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले. चर्चेदरम्यान शहा आणि राहुल […] The post Rahul Gandhi : अमित शहा मानसिक दबावाखाली आहेत; राहुल गांधींची टीका appeared first on Dainik Prabhat .
नागपूर : राज्यात आगामी महानगरपालिका निवडणुकांचे वारे वाहू लागले असतानाच, शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्या संभाव्य युतीबाबत आज एक मोठी राजकीय घडामोड घडणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात आज रात्री नऊ वाजता मुंबईत एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे.या बैठकीत प्रामुख्याने मुंबई, ठाणे आणि राज्यातील इतर काही महत्त्वाच्या महानगरपालिकांमध्ये शिवसेना-भाजप युतीने एकत्र निवडणूक लढायची की नाही, यावर सविस्तर चर्चा होणार आहे. दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांमध्ये जागावाटप आणि युतीच्या फॉर्म्युल्यावर सखोल विचारमंथन होण्याची शक्यता आहे.
‘लाडकी बहीण’योजनेतील ‘या’लाभार्थ्यांकडून सरकार पैसे वसूल करणार; मंत्री आदिती तटकरे यांची मोठी घोषणा
मुंबई: महाराष्ट्रात ऑगस्ट २०२४ मध्ये सुरू झालेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील अपात्र लाभार्थ्यांकडून राज्य सरकार पैसे परत घेणार आहे. महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी विधानसभेत लेखी उत्तर देताना ही महत्त्वपूर्ण घोषणा केली. या योजनेच्या छाननीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. पात्र नसलेल्या महिलांसोबतच १४,२९८ पुरुषांनी आणि १,५२६ सरकारी कर्मचाऱ्यांनी योजनेचा लाभ […] The post ‘लाडकी बहीण’ योजनेतील ‘या’ लाभार्थ्यांकडून सरकार पैसे वसूल करणार; मंत्री आदिती तटकरे यांची मोठी घोषणा appeared first on Dainik Prabhat .
स्वरराज श्रीकांत ठाकरे हाजिर हो.! ‘त्या’मारहाण प्रकरणी राज ठाकरे न्यायालयात हजर; काय घडलं पाहा…
Raj Thackeray – मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे 2008 मधील कल्याण रेल्वे स्थानकावरील मारहाणप्रकरणी ठाणे सत्र न्यायालयात हजर झाले. न्यायाधीश कुलकर्णी यांच्या दालनात आरोपींची नावे एकामागोमाग एक पुकारली जात होती. त्याच यादीत स्वरराज श्रीकांत ठाकरे हे नाव आले. नाव पुकारल्यानंतर ठाकरे यांनी शांतपणे मान हलवत होकार दिला. या प्रकरणाची पुढील सुनावणी 16 डिसेंबरला निश्चित करण्यात […] The post स्वरराज श्रीकांत ठाकरे हाजिर हो.! ‘त्या’ मारहाण प्रकरणी राज ठाकरे न्यायालयात हजर; काय घडलं पाहा… appeared first on Dainik Prabhat .
महसूली सुनावण्याचे अधिकारी राज्यमंत्री, सचिवांनाही!
विभागातील १३ हजार अपीलांच्या निपटाऱ्यासाठी मार्ग मोकळामामलतदार न्यायालय अधिनियमन सुधारणा विधेयक विधानसभेत मंजूर'तारीख पे तारीख' बंद होणार ? सर्व खटले ९० दिवसांत निकाली काढण्याचे महसूलमंत्र्यांचे आश्वासनमुंबई : महसूल विभागातील प्रलंबित खटल्यांचा वाढता डोंगर आणि उच्च न्यायालयाचे निर्देश या पार्श्वभूमीवर, महसूलमंत्र्यांचे अर्धन्यायिक अधिकार राज्यमंत्री आणि सचिव (अपील) यांना प्रदान करणारे 'महाराष्ट्र जमीन महसूल संहिता सुधारणा विधेयक २०२५' विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आले. या विधेयकामुळे आता महसूल मंत्र्यांकडील अपीलांची सुनावणी राज्यमंत्री आणि सचिवांना घेता येणार आहे.महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे विधेयक मांडताना सांगितले की, सध्या महसूल विभागाकडे १३ हजारांहून अधिक अर्धन्यायिक प्रकरणे प्रलंबित आहेत. उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने दिलेल्या निकालानुसार, केवळ नियम करून मंत्र्यांचे अधिकार इतरांना देता येत नाहीत, त्यासाठी कायद्यातच बदल करणे आवश्यक होते. त्यामुळेच हे विधेयक आणले गेले आहे.पुढील अधिवेशनापर्यंत 'टाईम टेबल' ठरणारमहसूलमंत्री बावनकुळे यांनी एक मोठी घोषणा केली. ते म्हणाले, नायब तहसीलदार ते मंत्रीस्तरावरील अपील ९० दिवसांच्या आतच निकाली काढण्यासाठी नियोजन आम्ही करत आहोत. मार्चच्या अधिवेशनापर्यंत याबाबत कायद्यात आवश्यक त्या सुधारणा करून हे प्रकरण 'तारीख पे तारीख' न होता तीन महिन्यांत निकाली काढले जातील.आमदारांनी उपस्थित केलेले महत्त्वाचे मुद्देया विधेयकावर चर्चा करताना विरोधी पक्षांच्या सदस्यांनी काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले. आमदार भास्कर जाधव म्हणाले,जर मंत्र्यांचे अधिकार राज्यमंत्र्यांना देण्यासाठी कायदा करावा लागत असेल, तर हा नियम केवळ महसूल विभागालाच का? इतर विभागांच्या मंत्र्यांचे काय? हा निर्णय सामान्य प्रशासन विभागाने (GAD) एकत्रितपणे घ्यायला हवा होता. तसेच, राज्यमंत्र्यांना अधिकार देताना त्यांच्यावर कोणत्या मर्यादा असतील, हे स्पष्ट होणे आवश्यक आहे.आमदार जयंत पाटील, विजय वडेट्टीवार,अभिजीत पाटील यांनीही चर्चेत भाग घेतला. पाटील म्हणाले, मंत्रालयातच नाही, तर खालच्या स्तरावरही हजारो खटले प्रलंबित आहेत. वडेट्टीवार म्हणाले, ९० दिवसांचा नियम करून चालणार नाही, तर त्याची अंमलबजावणी महत्त्वाची आहे. अखेरीस, महसूल मंत्र्यांनी मार्चमध्ये सर्वसमावेशक सुधारणा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले.
मुंबईकरांसाठी मोठी भेट, ओसी नसलेल्या २० हजार इमारतींना मिळणार दिलासा
दहा लाखांपेक्षा जास्त मुंबईकरांना फायदासुधारीत भोगवटा अभय योजनेची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून घोषणानागपूर : गेल्या काही वर्षांपासून भोगवटा प्रमाणपत्र ('ओसी') अभावी कायदेशीर अडचणी आणि आर्थिक भुर्दंड सोसणाऱ्या मुंबईकरांसाठी राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. मुंबईतील सुमारे २० हजार इमारतींना नियमित करण्यासाठी 'सुधारीत भोगवटा अभय योजना' लागू करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली. याचा फायदा वर्षानुवर्षे ओसीपासून वंचित दहा लाखांपेक्षा जास्त मुंबईकरांना मिळेल.विधानसभेत निवेदनाद्वारे माहिती देतांना उपमुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. ते म्हणाले गेल्या साडेतीन वर्षांपासून महायुती सरकार मुंबईचा कायापालट करत आहे. मुंबईबाहेर गेलेल्या मूळ मुंबईकरांना पुन्हा सन्मानाने आणण्यासाठी आणि येथे वास्तव्यास असलेल्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी सरकार ठोस पावले उचलत असल्याचे त्यांनी सांगितले.२० हजार इमारती आणि १० लाख मुंबईकरांना लाभमुंबईत अशा जवळपास २० हजार इमारती आहेत ज्यांच्या मूळ मंजूर आराखड्यात किरकोळ बदल केल्यामुळे त्यांना ओसी मिळू शकलेली नाही. ओसी नसल्याने या इमारतींमधील रहिवाशांना दुप्पट मालमत्ता कर, पाणीपट्टी आणि मलनिःसारण कर भरावा लागतो. या योजनेमुळे सुमारे अडीच लाखांपेक्षा जास्त कुटुंबांना आणि १० लाखांपेक्षा जास्त नागरिकांना थेट फायदा होणार आहे. अनेक गृहनिर्माण संस्था या योजनेसाठी शासनाकडे पाठपुरावा करत होत्या, त्यांच्या मागण्या मान्य करून सरकारने मोठा दिलासा देत असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.या योजनेमुळे मुंबईकरांना ओसी नसल्यामुळे भरावा लागणारा दुप्पट मालमत्ता कर भरावा लागणार नाही. घरांच्या खरेदी-विक्रीसाठी बँकांकडून कर्ज मिळणे सुलभ होईल. घरांना योग्य भाव मिळत नव्हता, आता खरेदी-विक्रीला चालना मिळून योग्य किंमत मिळेल. पुनर्विकासात आता नागरिकांना त्यांच्या संपूर्ण क्षेत्राचा लाभ घेता येईल, जे आधी केवळ मंजूर नकाशापुरते मर्यादित होते त्याचबरोबर महापालिकेच्या कायदेशीर कारवाईची टांगती तलवार आता दूर होईल, असेही त्यांनी सांगितले.या योजनेअंतर्गत प्रस्ताव सादर करताना, नियमानुकूल करावयाच्या क्षेत्रासाठी (अतिरिक्त चटई क्षेत्र/फंजिबल क्षेत्र) अधिमूल्य (Premium) आकारताना रेडीरेकनरच्या प्रचलित दरात थेट ५०% सवलत दिली जाणार आहे. विशेष म्हणजे, पहिल्या सहा महिन्यांत जे प्रस्ताव येतील त्यांना कोणताही दंड आकारला जाणार नाही. मात्र, ६ महिने ते १ वर्ष या काळात येणाऱ्या प्रस्तावांना प्रचलित दराच्या ५० टक्के दंड आकारला जाईल.केवळ संपूर्ण इमारतच नाही, तर एखाद्या इमारतीमधील केवळ एका सदनिकाधारकाला वैयक्तिकरित्या ओसी हवी असल्यास, त्यासाठी स्वतंत्र कार्यप्रणाली सुरू करण्याच्या सूचना महापालिकेला देण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले. या योजनेचा लाभ केवळ रहिवासी इमारतींनाच नाही, तर अनधिकृत बांधकामांच्या यादीत अडकलेल्या हॉस्पिटल आणि शाळांना देखील मिळणार आहे, ज्यामुळे आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रालाही मोठा दिलासा मिळेल.मुंबईच्या धर्तीवर राज्यातील अन्य महापालिकांमध्ये सुद्धा या धोरणाची अंमलबजावणी करण्याचा शासनाचा मानस असून, त्याबाबत सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना नगरविकास विभागाला देण्यात आल्या आहेत, असेही श्री. शिंदे यांनी स्पष्ट केले. मुंबईकरांनी या सुधारीत अभय योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
Bribe News : 16 हजारांची लाच घेतल्याप्रकरणी तिघांना अटक; आरोपींमध्ये महापालिका कर्मचाऱ्यांचा समावेश
ठाणे : एका बेकायदेशीर बांधकामावरची कारवाई टाळण्यासाठी १६ हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या दोन कर्मचाऱ्यांसह तीन जणांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.राजेश कदम (४३), एमबीएमसीच्या अतिक्रमणविरोधी विभागातील लिपिक सुहास केणी (५५), संजय भोला (४७) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची ओळख आहे. महापालिकेच्या दोन्ही कर्मचाऱ्यांनी २०,००० रुपयांची लाच मागितली होती, नंतर ती वाटाघाटी […] The post Bribe News : 16 हजारांची लाच घेतल्याप्रकरणी तिघांना अटक; आरोपींमध्ये महापालिका कर्मचाऱ्यांचा समावेश appeared first on Dainik Prabhat .
पाकिस्तानच्या संसदेत सभापतींना रोख रक्कम मिळाली, १२ खासदारांनी १० नोटांसाठी उड्या मारल्या
इस्लामाबाद : पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीत एक अजब घटना घडली. या घटनेवर हसावे की पाकिस्तानच्या खासदारांच्या वर्तनाची कीव करावी असा प्रश्न निर्माण झाला आहे. सभापती अय्याज सादीक यांनी सभागृहात उपस्थित सदस्यांना काही नोटांच्या स्वरुपात रोख रक्कम दाखवली. हे पैसे कोणाचे असा प्रश्न सादीक यांनी सभागृहाला विचारला. सभापतींच्या हातात मोठी रोख रक्कम बघून अनेक खासदारांनी लगेच हात वर केले. रोख रकमेवर दावा सांगितला. हा प्रकार बघून सादिक म्हणाले, जेवढ्या नोटा आहेत त्या पेक्षा जास्त हात वर आले आहेत. यामुळे पैसे कोणालाही देत नाही, माझ्या ताब्यात ठेवतो... हे सांगितल्यानंतर सादीक यांनी नोटा आपल्या ताब्यात ठेवल्या. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर आला तेव्हा तो लगेच व्हायरलही झाला.
संसदेत ई-सिगारेट वादाने खळबळ; अनुराग ठाकूर यांच्या आरोपांवर टीएमसीची जोरदार प्रतिक्रिया
नवी दिल्ली : संसदेत सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान लोकसभेत ई सिगारेट या एका मुद्द्यावरून गदारोळ निर्माण झाला. भाजपचे खासदार अनुराग ठाकूर यांनी सभागृहात ई-सिगारेट ओढल्याचा गंभीर मुद्दा उपस्थित केला. कोणाचेही नाव न घेता त्यांनी थेट टीएमसीच्या एका खासदाराकडे इशारा केला, आणि त्यानंतर सभागृहात काही वेळ दबावाचे वातावरण निर्माण झाले.ठाकूर म्हणाले की, लोकसभा ही देशाची प्रतिष्ठीत जागा आहे. कोट्यवधी लोकांचे लक्ष इथल्या कामकाजावर असते, आणि अशा परिस्थितीत कोणतीही अनुचित कृती घडणे ही केवळ नियमभंगाची गोष्ट नाही, तर संसदीय व्यवस्थेच्या प्रतिष्ठेला धक्का आहे. त्यांनी या विषयावर गंभीरपणे कारवाई करण्याची मागणी केली. गरज भासल्यास संबंधित प्रकरणाची चौकशी व्हावी, जेणेकरून अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.ठाकूर यांच्या वक्तव्याने खळबळ उडाली आणि सर्वांचे लक्ष लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला काय भूमिका घेणार याकडे होते.अखेर लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला बोलू लागले. संसदेत कोणालाही कोणत्याही प्रकारची विशेष मुभा दिलेली नाही. प्रतिबंधित वस्तूंचा वापर करणाऱ्यांवर नियमांनुसार कठोर कारवाईच होईल, असे बिर्ला म्हणाले.संसदेसमोर देश उभा आहे. सार्वभौम लोकशाहीचे सर्वोच्च व्यासपीठ म्हणून वागणूक ठेवणे ही प्रत्येक सदस्याची जबाबदारी आहे. कुणीही नियमांचे उल्लंघन करताना आढळल्यास संसदीय परंपरेनुसार कठोर निर्णय घेण्यात येतील. सदस्यांनी सदनाची प्रतिष्ठा जपावी आणि शिस्तीचे पालन करावे, असे बिर्ला म्हणाले.ई-सिगारेट म्हणजे काय आणि भारतात यावर बंदी का?ई-सिगारेट किंवा व्हेपिंग डिव्हाइस हे बॅटरीने चालणारे उपकरण असते. यात निकोटीन किंवा विविध रसायनयुक्त द्रव गरम करून वाफ तयार केली जाते, जी वापरणारा व्यक्ती इनहेल करतो. बाहेरून पाहता हे धूम्रपानासारखे वाटतेभारत सरकारने २०१९ मध्ये ई-सिगारेटवर संपूर्ण बंदी घातली. कारण हे उपकरण कमी वेळात तरुण आणि विशेषतः शालेय विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय होत होते. आरोग्यावर दीर्घकालीन दुष्परिणामांची शक्यता, फुफ्फुसांच्या आजारांचा धोका आणि निकोटीनच्या व्यसनात वाढ ही महत्त्वाची कारणे सरकारने बंदी घालताना नमूद केली.तज्ज्ञांचे मत आहे की, ई-सिगारेटला तंबाखूपेक्षा ‘सेफ’ पर्याय म्हणून दाखवले जात होते, प्रत्यक्षात त्यातील रसायनांचे दुष्परिणाम अधिक गंभीर ठरू शकतात. या पार्श्वभूमीवर पूर्णपणे बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला होता.आता काय होऊ शकते ?संसदेत उचललेल्या या मुद्द्याची चौकशी होण्याची शक्यता आहे. संसदेतील कॅमेऱ्यांचे फूटेज, सुरक्षा रेकॉर्ड किंवा इतर पुरावे यांची तपासणी होऊ शकते. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात या निमित्ताने पुन्हा खडाजंगी होण्याची शक्यता आहे. हिवाळी अधिवेशनात आधीच चर्चेचे अनेक विषय प्रलंबित असताना, या वादाने राजकीय तापमान अधिकच वाढले आहे.
मराठवाड्यातील ७० हजार कुटुंबांना हक्काचे घर
'मदत माश' जमिनीच्या मोफत नियमितीकरणाचा मार्ग मोकळा'वर्ग-२' च्या जमिनी आता होणार 'वर्ग-१'महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत घोषणाहैदराबाद इनामे व रोखे अनुदाने रद्द सुधारणा विधेयक एकमताने मंजूरनागपूर : छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांतील आणि चंद्रपूरच्या राजुरा भागातील सुमारे ७० हजार कुटुंबांना आज मोठा दिलासा मिळाला आहे. मराठवाड्यातील हजारो कुटुंबांच्या डोक्यावर टांगती तलवार असलेल्या 'मदत माश' इनामी जमिनींचा प्रश्न अखेर निकाली निघाला.या जमिनींवरील निवासी घरे नियमित करण्यासाठी आता कोणताही नजराणा भरावा लागणार नाही. ती घरे मोफत नियमित करून रहिवाशांना जमिनीचे 'वर्ग-१' मालकी हक्क देणारे 'हैदराबाद इनामे व रोख अनुदाने रद्द करण्याबाबत (सुधारणा) विधेयक, २०२५' (विधेयक क्र. १०१) विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आले.विधानसभेत मांडण्यात आलेल्या या विधेयकावर जयंत पाटील, अर्जून खोतकर, विजय वडेट्टीवार, देवराव भोंगळे, किशोर पाटील, बालाजी कल्याणकर, चंद्रदीप नरके, भास्कर जाधव, शेखर निकम, मनिषा चौधरी, सुरेश धस, कैलास पाटील यांनी चर्चेत सहभागी होत महत्वपूर्ण मुद्दे मांडले. कशा आहे नवीन सुधारणा?महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधेयक मांडताना स्पष्ट केले की, १९५४ च्या कायद्यानुसार या जमिनी भोगवटादार वर्ग-२ (नवीन व अविभाज्य शर्ती) म्हणून गणल्या जात होत्या. त्यामुळे या जमिनींवर कर्ज मिळत नव्हते किंवा त्या हस्तांतरित करता येत नव्हत्या. यापूर्वी अशा जमिनी नियमित करण्यासाठी चालू बाजारभावाच्या ५० टक्के किंवा ५ टक्के रक्कम भरावी लागत होती, ज्यामुळे नागरिक पुढे येत नव्हते. मात्र, आता मंजूर झालेल्या विधेयकानुसार, जर एखाद्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय निवासी कारणासाठी जमिनीचा वापर केला असेल आणि त्याबाबतचे खरेदीखत किंवा नोंदणीकृत दस्तऐवज सादर केल्यास, कोणताही नजराणा न आकारता ती जमीन नियमित केली जाईल. तसेच, संबंधित जमीनधारकास 'भोगवटादार वर्ग-१' चा दर्जा मिळेल, ज्यामुळे त्यांना पूर्ण मालकी हक्क प्राप्त होतील.देवस्थानच्या जमिनी लाटण्याचा प्रकार नाही ना?'चर्चेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) गटनेते जयंत पाटील यांनी शंका उपस्थित केली. ते म्हणाले, हे विधेयक केवळ काही मूठभर लोकांसाठी किंवा विकासकांसाठी आहे का? देवस्थानांच्या जमिनी लाटून त्या विकल्या गेल्या आहेत, त्यांना अभय देण्यासाठी हा घाट घातला जात आहे का? हे विधेयक देवस्थान जमिनींना लागू होणार नाही, हे स्पष्ट करावे.त्यावर उत्तर देताना महसूलमंत्र्यांनी देवस्थानशी याचा काहीच संबंध नसल्याचे स्पष्ट केले. हे विधेयक केवळ 'मदत माश' इनामापुरते मर्यादित आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगरमधील ९७ गट, जालन्यातील १०, परभणी, नांदेड, हिंगोली, लातूर, धाराशीव आणि चंद्रपूरमधील राजुरा येथील १० गटांचा समावेश आहे.कोकण आणि मुंबईसाठीही आश्वासक निर्णयचर्चेत भाग घेताना भास्कर जाधव (शिवसेना-उबाठा) यांनी कोकणातील मच्छिमारांच्या जमिनींचा प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, मच्छिमार अनेक पिढ्यांपासून तिथे राहतात, पण जमीन त्यांच्या नावावर नाही. त्यांनाही हैदराबाद इनामाप्रमाणे न्याय द्यावा. तर आमदार मनीषा चौधरी यांनी मुंबईतील कोळीवाडे आणि गावठाणांच्या सीमांकनाचा मुद्दा मांडला. यावर उत्तर देताना महसूलमंत्र्यांनी कोकणातील बांधकामांना गावठाणाचा दर्जा देण्यासाठी आणि मुंबईतील प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी सकारात्मक पावले उचलण्याचे आश्वासन दिले.
Sarkari Yojana: केंद्र सरकार देणार गरोदर महिलांना 5000 रुपयांची मदत; अर्ज कसा करायचा, जाणून घ्या
Sarkari Yojana: केंद्र सरकारने देशातील गर्भवती महिला आणि नवमातांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण योजना सुरू केली आहे, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना (PM Matru Vandana Yojana – PMMVY) असे या योजनेचे नाव आहे. या योजनेद्वारे, पहिल्यांदा गर्भवती होणाऱ्या महिलांना सरकारकडून ५,००० रुपये आर्थिक मदत दिली जाते. ही मदत महिलांना त्यांच्या गर्भधारणेदरम्यान आणि बाळाच्या जन्मानंतर पोषण आणि आरोग्य […] The post Sarkari Yojana: केंद्र सरकार देणार गरोदर महिलांना 5000 रुपयांची मदत; अर्ज कसा करायचा, जाणून घ्या appeared first on Dainik Prabhat .
Kirti Vardhan Singh : दोन लाख भारतीयांनी सोडले नागरिकत्त्व; परराष्ट्र राज्यमंत्र्यांनी दिली माहिती
नवी दिल्ली : भारतीय नागरिकत्व सोडणाऱ्यांची संख्या तुलनेने कमी झाली आहे. गेल्या वर्षी २,०६,००० भारतीयांनी त्यांचे नागरिकत्व सोडले. हा गेल्या तीन वर्षातील सर्वात कमी आकडा आहे. राज्यसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात, परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की २०२२ पासून भारतीय नागरिकत्व सोडणाऱ्यांची संख्या कमी होत आहे. राज्यसभेचे खासदार प्रकाश करैत यांनी गेल्या पाच वर्षांत भारतीय नागरिकत्व सोडणाऱ्या लोकांची […] The post Kirti Vardhan Singh : दोन लाख भारतीयांनी सोडले नागरिकत्त्व; परराष्ट्र राज्यमंत्र्यांनी दिली माहिती appeared first on Dainik Prabhat .
मुंबईत 45 कोटींचे ड्रग्ज, सोने आणि हिरे जप्त; 12 जणांना अटक
मुंबई – ३ ते १० डिसेंबर दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर केलेल्या कारवाईत मुंबई सीमा शुल्क विभागाने तस्करी होत असलेले एकूण ४५ कोटी रुपये किमतीचा हायड्रोपोनिक गांजा, सोने आणि हिरे जप्त केले आहेत. याप्रकरणी १२ प्रवाशांना अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे, कस्टम्सच्या अधिकाऱ्यांनी नऊ प्रवाशांना ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडून ३७.२६ कोटी रुपये […] The post मुंबईत 45 कोटींचे ड्रग्ज, सोने आणि हिरे जप्त; 12 जणांना अटक appeared first on Dainik Prabhat .
Indian Railways – २०२५ हे वर्ष भारतीय रेल्वेसाठी मोठ्या बदलांचे वर्ष ठरले. या वर्षी, भारतीय रेल्वेने प्रवाशांची सुरक्षा, सुविधा आणि तांत्रिकदृष्ट्या तिकीट प्रणाली मजबूत करण्यासाठी अनेक नियम लागू केले. भारतीय रेल्वेने या वर्षी टप्प्याटप्प्याने विविध श्रेणींच्या ट्रेन्सचे भाडे वाढवले. शिवाय, लोकांना बऱ्याच काळापासून तत्काळ रेल्वे तिकिटे बुक करण्यात अडचणी येत होत्या. हे लक्षात घेऊन, बनावट […] The post Indian Railways : रेल्वे तिकिटांच्या किमतींपासून ते…; भारतीय रेल्वे विभागाने २०२५ मध्ये केले ‘हे’ सर्वात मोठे बदल appeared first on Dainik Prabhat .
इम्रान खान यांचे निकटवर्तीय, ISI चे माजी प्रमुख फैज हमीद यांना 14 वर्षांचा कठोर कारावास
इस्लामाबाद : पाकिस्तानच्या गुप्तचर संस्था इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स (ISI) चे माजी प्रमुख आणि माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे निकटवर्तीय मानले जाणारे लेफ्टनंट जनरल (निवृत्त) फैज हमीद यांना लष्करी न्यायालयाने (मिलिट्री कोर्ट) १४ वर्षांच्या कठोर कारावासाची शिक्षा सुनावली आहे. पाकिस्तानच्या लष्करी माध्यम शाखा इंटर-सर्व्हिस पब्लिक रिलेशन्स (ISPR) ने गुरुवारी ही माहिती दिली. जनरल हमीद यांच्याविरुद्ध फील्ड जनरल […] The post इम्रान खान यांचे निकटवर्तीय, ISI चे माजी प्रमुख फैज हमीद यांना 14 वर्षांचा कठोर कारावास appeared first on Dainik Prabhat .
‘SIR’साठी अंतिम मुदत वाढली! सहा राज्यांना दिलासा; उत्तर प्रदेशातील मतदारांना 31 डिसेंबरपर्यंत संधी
नवी दिल्ली: निवडणूक आयोगाने (ECI) सहा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील मतदार यादी विशेष सघन पुनरिक्षण ‘एसआयआर’ (Special Intensive Revision) प्रक्रियेअंतर्गत कागदपत्रे जमा करण्याची अंतिम मुदत वाढवली आहे, ज्यामुळे या भागातील मतदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रक्रियेअंतर्गत कागदपत्रे जमा करण्याची अंतिम तारीख जी पूर्वी 11 डिसेंबर होती, ती आता थेट 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात […] The post ‘SIR’ साठी अंतिम मुदत वाढली! सहा राज्यांना दिलासा; उत्तर प्रदेशातील मतदारांना 31 डिसेंबरपर्यंत संधी appeared first on Dainik Prabhat .
BCCI AGM 2025 : भारतीय क्रिकेट बोर्ड (BCCI) ची 31 वी वार्षिक सर्वसाधारण बैठक 22 डिसेंबर रोजी पार पडणार आहे. यावेळी सर्वात जास्त चर्चा टीम इंडियाचे वरिष्ठ खेळाडू रोहित आणि विराट कोहली यांच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टची आहे. या दोघांनी मागच्या वर्षी टेस्ट आणि T20 फॉर्मॅटमधून निवृत्ती घेतली आहे.सध्या ते फक्त वनडे खेळताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत […] The post BCCI AGM 2025 : विराट -रोहितच्या पगारात कपात? गिलचं काय होणार? बीसीसीआयच्या वार्षिक सभेत होणार मोठा निर्णय appeared first on Dainik Prabhat .
आमदार सुरेश धसांकडुन कर्जत-जामखेड मतदारसंघाचा उल्लेख…. अन् रोहित पवार संतापले !
जामखेड : विधानसभेत भाजपचे आमदार सुरेश धस यांनी सभागृहात बोलताना जामखेडचा बदनामीकारक उल्लेख केला होता. यासंदर्भात आमदार रोहित पवार यांनी तातडीने तालुका अध्यक्षांना विनंती करून संबंधित बदनामीकारक उल्लेख रेकॉर्डवरून काढण्याची विनंती केली आणि ती विनंती अध्यक्ष महोदयांनी मान्य केली. रोहित पवार म्हणाले, कर्जत जामखेड ही पुण्यभूमी असून इथल्या मातीची बदनामी कोणीही केली तरी ती कदापि […] The post आमदार सुरेश धसांकडुन कर्जत-जामखेड मतदारसंघाचा उल्लेख…. अन् रोहित पवार संतापले ! appeared first on Dainik Prabhat .
अमित शहांनी मला हिंदुत्व शिकवू नये – उद्धव ठाकरे – ‘कोण होतास तू.., भ्रष्टाचाऱ्यांना पांघरूणात घेतलेस तू’ – शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाला हजेरी लावली. त्यानंतर पत्रकार परिषद घेत त्यांनी सध्या सुरू असलेल्या अधिवेशनावर भाष्य केले. तसेच या अधिवेशनातून विदर्भासाठी काय मिळाले? असा सवालही त्यांनी उपस्थित […] The post Today TOP 10 News: पार्थ पवारांवर अद्याप का गुन्हा नाही?, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले स्पष्टीकरण… वाचा आजच्या टाॅप 10 बातम्या appeared first on Dainik Prabhat .
तुमच्या जिल्ह्याची निवडणूक होणार की रखडणार ? सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे राज्याचं लक्ष
मुंबई : राज्यातील नगर परिषद आणि नगर पालिका निवडणुका झाल्यानंतर आता जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिका निवडणुकांकडे लक्ष वेधले गेले आहे. या निवडणुका मिनी विधानसभेसारख्या ठरणार असल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. राज्यातील २९ महापालिकांसोबत १२ जिल्हा परिषदांच्या निवडणुका घेण्याबाबत हालचाली सुरू आहेत. मात्र उर्वरित जिल्हा परिषदांबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.सर्वोच्च न्यायालयाने ५० टक्के आरक्षण मर्यादा काटेकोरपणे पाळण्याचे आदेश दिल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने नवीन निर्णय प्रक्रिया सुरू केली आहे. आरक्षण मर्यादा प्रकरणी दाखल याचिकांवर सुप्रीम कोर्ट २१ जानेवारीला अंतिम निर्णय देणार आहे.पूर्वीच्या नियोजनानुसार, तीन टप्प्यांत निवडणुका घेण्याची तयारी होती. पहिल्या टप्प्यात नगर परिषद-नगर पालिका निवडणुका झाल्या. दुसऱ्या टप्प्यात ३२ जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या, तर तिसऱ्या टप्प्यात २९ महापालिका निवडणुका घेण्याचा मानस होता. मात्र, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा न्यायालयीन वादात गेल्यानंतर संपूर्ण चित्र बदलले.ओबीसी समाजाला २७ टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयावर आक्षेप नोंदवल्याने आणि सर्वोच्च न्यायालयाने ५० टक्क्यांपर्यंतच आरक्षण मर्यादा ठेवण्याचे निर्देश दिल्यानंतर अनेक जिल्ह्यांमध्ये निवडणूक प्रक्रिया स्थगित ठेवावी लागली. त्यामुळे आयोगाने सावधगिरीचा उपाय म्हणून पुढील आदेशांपर्यंत निवडणुका न घेण्याचा निर्णय घेतला आहे.जिल्हा परिषद निवडणुकीचं काय?राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकांसह १२ जिल्हा परिषदांमध्ये मतदानाची तयारी सुरू केली आहे. मात्र, २० जिल्हा परिषद आणि ८८ पंचायत समित्यांच्या निवडणुका सुप्रीम कोर्टाच्या आगामी निकालावर अवलंबून राहणार आहेत.निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सांगितले की, ज्या ठिकाणी आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा जास्त आहे, तिथे निवडणूक प्रक्रिया सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतरच सुरू होऊ शकते.विशेष बाब म्हणजे नागपूर आणि चंद्रपूर महानगरपालिकांबाबत न्यायालयाने वाढीव आरक्षणासह निवडणुका घेण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे सर्व महापालिका निवडणुका एकत्रितपणे घेण्याची शक्यता मजबूत झाली आहे.कोणत्या जिल्ह्यांमध्ये निवडणुका स्थगित?खालील २० जिल्ह्यांमध्ये आरक्षण मर्यादा ५० टक्क्यांपेक्षा जास्त झाल्याने निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत—ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, हिंगोली, नांदेड, अमरावती, अकोला, वाशीम, बुलडाणा, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली.तसेच अहिल्यानगर, जालना आणि बीड जिल्हा परिषदेच्या निवडणुका देखील स्थगित करण्यात आल्या आहेत.कोणत्या जिल्ह्यांत लवकरच होणार निवडणुका?ज्या जिल्ह्यांमध्ये आरक्षण ५० टक्के मर्यादेत आहे, त्या जिल्ह्यांत निवडणूक प्रक्रिया पुढे सरकणार आहे.यामध्ये — रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या जिल्हा परिषदांचा समावेश आहे.या १२ जिल्ह्यांमधील १२५ पंचायत समित्यांमध्येही निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे
Smriti Mandhana : टीम इंडियाची स्टार क्रिकेटपटू आणि वर्ल्ड विजेती खेळाडू स्मृती मानधना हिने काही दिवसांपूर्वी म्युझिक कंपोझर पलाश मुच्छलसोबत लग्न तुटल्याचं जाहीर केल्यानंतर ती पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर आली आहे. ती पुन्हा एकदा जोमाने कामाला लागली आहे. मैदानात उतरून सराव करताना दिसत आहे. यावेळी तिने भारताची कर्णधार हरमनप्रीतची गळाभेटही घेतली होती.त्यामुळे लग्न तुटल्याच्या घटनेनंतर ती पहिल्यांदा […] The post Smriti Mandhana : लग्न तुटल्यानंतर स्मृती मानधना पहिल्यांदाच माध्यमांसमोर; ‘तिला’ भेटताच मारली मिठी (Video) appeared first on Dainik Prabhat .
Amit Shah | Devendra Fadnavis | Uddhav Thackeray : तमिळनाडूमधील द्रविड मुन्नेत्र कळघम (DMK) पक्षाच्या खासदारांनी मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जी. आर. स्वामीनाथन यांच्याविरोधात महाभियोग चालवण्याची औपचारिक मागणी करत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे प्रस्ताव सादर केला आहे. हा प्रस्ताव मंगळवारी (९ डिसेंबर) सादर करण्यात आला. भारताच्या राज्यघटनेतील अनुच्छेद १२४ आणि २१७ अंतर्गत न्यायमूर्तींवर महाभियोग […] The post कोण होतास तू, काय झालास तू..? अमित शाहांची लोकसभेतून उद्धव ठाकरेंवर आगपाखड, ‘त्या’ स्वाक्षरीवरून फडणवीसांनी डिवचले… appeared first on Dainik Prabhat .
Satara News : बॉम्बे रेस्टॉरंट ब्रिजखाली भीषण अपघात; दुचाकीस्वार महिला जागीच ठार
सातारा : सातारा पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर बॉम्बे रेस्टॉरंट ब्रिजजवळ आज दुपारी एक भीषण अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात दुचाकीस्वार महिला जागीच ठार झाली असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मयत महिलेचे नाव सारिका दीपक सुतार (वय अंदाजे२५ वर्ष) असल्याचे समजत आहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. या दुर्घटनेमुळे वाहतूक […] The post Satara News : बॉम्बे रेस्टॉरंट ब्रिजखाली भीषण अपघात; दुचाकीस्वार महिला जागीच ठार appeared first on Dainik Prabhat .
Share Market Today: अमेरिकेच्या केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्हने (Federal Reserve) व्याजदरात कपात केल्यामुळे जागतिक बाजारातील सकारात्मक वातावरणाचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही दिसून आला. गुरुवारी (11 डिसेंबर 2025) सलग तीन दिवसांची घसरण थांबवत बाजार तेजीसह बंद झाला. प्रमुख निर्देशांकांमध्ये 0.50 टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवली गेली. तीस शेअर्सचा समावेश असलेला बीएसई सेन्सेक्स 426.86 अंकांनी म्हणजेच 0.51 टक्क्यांनी […] The post Share Market Today: तीन दिवसांनंतर परतली तेजी; सेन्सेक्स 427 अंकांनी वधारला, वाढीमागील कारणे जाणून घ्या… appeared first on Dainik Prabhat .
Technology | Apple 2026 Launch device list : २०२५ हे वर्ष Apple साठी एक महत्त्वाचे वर्ष राहिले आहे. या वर्षी कंपनीने त्यांच्या iPhone १७ मालिकेत अनेक बदल केले आहेत, ज्यात नवीन iPhone Air लाँच करणे समाविष्ट आहे. परंतु Apple कडे २०२६ साठी आणखी खास योजना आहेत. पुढच्या वर्षी, कंपनी केवळ चार, पाच किंवा सहा उत्पादनेच […] The post Apple 2026 Launch device list : ‘Apple’ प्रेमींसाठी आनंदाची बातमी.! नवीन वर्षात एक-दोन नाही तब्बल १२ उत्पादने लाँच होणार appeared first on Dainik Prabhat .
Pune Police: वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांचे निधन
पुणे : पुणे पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले (वय ५५) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी आणि दोन मुलगे असा परिवार आहे. पोलीस निरीक्षक भोसले हे गेल्या काही वर्षांपासून कर्करोगाने ग्रस्त होते. भोसले पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक होते. गुन्हे शाखेत नियुक्तीस असताना भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक गंभीर गुन्ह्याचा तपास […] The post Pune Police: वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांचे निधन appeared first on Dainik Prabhat .
Ramesh Vaidya : माजी रणजीपटू रमेश वैद्य यांचे निधन
नाशिक : क्रीडा विश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. नाशिक जिल्ह्याने महाराष्ट्र रणजी संघाला अनेक क्रिकेटपटू दिले आहेत. त्यापैकी एक असलेले माजी रणजीपटू रमेश वैद्य यांचे आज मुंबई येथे निधन झाले. ते ७७ वर्षाचे होते. नाशिक जिल्ह्याचे ते प्रसिद्ध अष्टपैलू डावखुरे क्रिकेटपटू होते. क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतरदेखील त्यांनी नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेला तसेच युवा खेळाडूंना […] The post Ramesh Vaidya : माजी रणजीपटू रमेश वैद्य यांचे निधन appeared first on Dainik Prabhat .
गोव्यातील नाईट क्लब आग प्रकरण ;अखेर लुथरा ब्रदर्सना अटक
गोव्यातील बिर्च बाय रोमिओ लेन नाईट क्लबमध्ये लागलेल्या आगीत २५ जणांचा मृत्यू झाला होता.ज्या रात्री ही घटना घडली,त्याच रात्री या क्लबचे मालक गौरव आणि सौरभ लुथरा देश सोडून थायलंडला पळून गेले.या दोघांना आता तिथे ताब्यात घेण्यात आलं आहे. याआधी गोवा पोलिसांनी नाईट क्लबच्या पाच कर्मचाऱ्यांना आणि व्यवस्थापकांना अटक केली आहे.आग प्रकरणाचा तपास सुरू असताना गोवा पोलिसांना दिसून आलं की सात डिसेंबर रोजी मध्यरात्री १.१७ वाजता ‘मेक माय ट्रिप’ या अॅपवरून थायलंडला जाणाऱ्या विमानाची तिकिटं बुक करण्यात आली होती.त्यावेळी आपत्कालीन पथकं क्लबमध्ये अडकलेल्या लोकांना वाचवण्यात व्यस्त होती. एकीकडे अग्निशमन दल आग विझवण्यासाठी आणि तिथे अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी धडपडत असताना दुसरीकडे लुथरा बंधू देश सोडून पळून जाण्याच्या तयारीत होते.तर लुथरा बंधू फरार नव्हते, ते बिझनेस ट्रिपला गेले होते,अशी बाजू त्यांच्या वकिलांनी मांडली होती. दिल्लीच्या एका न्यायालयाने लुथरा बंधूंना अटकेपासून अंतरिम संरक्षण देण्यास नकार दिला.लुथरा ब्रदर्सच्या वकिलांनी कोर्टात असाही दावा केला की ते दोघं फक्त क्लबचे परवानाधारक होते. क्लबचं दैनंदिन कामकाज कर्मचारी हाताळत होते.क्लबला सहा डिसेंबर रोजी मध्यरात्री आग लागली होती आणि अवघ्या काही क्षणांतच त्या आगीने संपूर्ण क्लबला वेढलं होतं. याप्रकरणी आठ दिवसांत चौकशी अहवाल तयार होईल. राज्य सरकारने पीडितांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई देण्यास सुरुवात केली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली होती. तसंच सर्व मनोरंजन स्थळांवर सुरक्षेची तपासणी कडक केली जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
प्रकाश महाजन भाजपच्या वाटेवर? मुख्यमंत्र्यांची घेतली भेट
नागपूर : मनसेतून नुकतेच बाहेर पडलेले ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन यांनी गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रामगिरी निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर महाजन यांनी भाजप प्रवेशाबाबत सूचक विधान करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीबाबत विचारले असता प्रकाश महाजन म्हणाले, “त्यांच्याकडे माझे वैयक्तिक काम होते. मुख्यमंत्र्यांशी पारिवारिक संबंध आहेत.” यावेळी त्यांनी भाजपमध्ये नुकतेच प्रवेश केलेल्या वैभव खेडेकर यांचे कौतुक करताना म्हटले, “वैभव खेडेकर भाजपमध्ये खूप आनंदी आहे. माझ्या पाल्याचा आनंद पाहण्यासाठी आलो आहे. वैभव कमळाकडे गेला, त्यामुळे मी खूश आहे. भाजपचा पराभव झाला की आम्हाला वाईट वाटते. नाते जुने आहे. मी कधीही भाजपविरोधात काम केलेले नाही. आता भाजपने ठरवायचे आहे.” असे सूचक विधान त्यांनी केले.मी राज ठाकरेंना घाबरत नाही – प्रकाश महाजनमहाजन म्हणाले, “मनसे हिंदुत्वापासून दूर जात आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर पक्षाने माघार घेतली. यामुळेच मी बाहेर पडलो. मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा माणूस आहे. हे मी कधी लपवले नाही. मी शाखेतही जातो. मी राज ठाकरेंना घाबरत नाही, संघ विचारांचा माणूस आहे”, असेही त्यांनी सांगितले.
अंडरवर्ल्डमध्ये नव्या डॉनची एन्ट्री ; तपासात धक्कादायक खुलासे
मुंबई : अंडरवर्ल्डच्या जगतात मोठी हालचाल सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत. मुंबईपासून परदेशापर्यंत जाळं पसरवलेल्या दाऊद इब्राहिमच्या साम्राज्यावर आता नव्या गँगस्टरच्या उदयानं सावली पडत असल्याची चर्चा रंगू लागली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणांनी लॉरेन्स बिश्नोई गँगच्या कारवायांचा आढावा घेतल्यानंतर गुन्हेगारी जगतात नवीन समीकरणं निर्माण होत असल्याचं दिसत आहे.अनमोल बिश्नोईने एनआयए चौकशीत दिलेल्या माहितीत लॉरेन्स बिश्नोई गँगची पोहोच, आर्थिक सामर्थ्य आणि गुन्हेगारी मॉडस ऑपरेन्डीबाबत अनेक महत्त्वाचे खुलासे झाले आहेत. या गँगचे ऑपरेशन भारताबरोबरच २५-२६ देशांपर्यंत पसरले असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. सोशल मीडियाचा वापर, व्हर्च्युअल नंबरद्वारे धमकावणे आणि कॉन्ट्रॅक्ट किलिंगच्या माध्यमातून या गँगने आपली गुन्हेगारी रचना उभी केल्याचे तपासात दिसत आहे.दाऊद इब्राहिम आणि बिश्नोई गँगची तुलना का?D-कंपनीचे जाळे प्रामुख्याने मुंबई, आखाची देश, दुबई, पाकिस्तान आणि युरोपच्या काही भागांवर मर्यादित होते. सोन्याची तस्करी, रिअल इस्टेट, ड्रग्स आणि अवैध वसुली या माध्यमातून दाऊदचे साम्राज्य उभे राहिले. पण १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटानंतर दाऊदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात आले आणि त्याच्या नेटवर्कवर आंतरराष्ट्रीय एजन्सींचे लक्ष केंद्रित झाले.लॉरेन्स गँगचे व्याप्ती वेगळीलॉरेन्स बिश्नोई गँगचे ऑपरेशन सध्याच्या डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित असल्याचे दिसते. कॅनडा, अमेरिका, थायलंड, कंबोडिया, पोर्तुगाल, रशिया यांच्यासह अनेक देशांमध्ये या गँगची उपस्थिती आढळल्याचे तपासात समोर येत आहे. फिल्म आणि मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांनाही या गँगने लक्ष्य केले असल्याचे प्रकरणांवरून उघड झाले आहे. काही घटनांमध्ये धमक्या देऊन आर्थिक उकळ काढण्याचा मार्ग अवलंबल्याचे आरोप आहेत.अनमोल बिश्नोईच्या चौकशीत या गँगचे काही घटक सीमापार दहशतवादी संघटनांशी संपर्कात असल्याचेही प्राथमिक तपासातून समोर आले आहे. गँगची एकूण आर्थिक उलाढाल अंदाजे १००० कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तपास यंत्रणांच्या मते, दोन्ही गँग्सच्या कामकाजाची पद्धत भिन्न असली तरी लॉरेन्स बिश्नोई गँगच्या वाढत्या परदेशी संपर्कामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
मोहित सोमण: युएस फेडरल रिझर्व्ह व्याजदरात झाल्यानंतर आज तीन सत्रांच्या घसरणीनंतर आज वाढ झाली आहे. इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात अखेरच्या सत्रात सेन्सेक्स ४२६.८६ अंकाने उसळत ८४८१८.१३ पातळीवर स्थिरावला असून निफ्टी १४०.५५ अंकाने उसळत २५८९८.५५ पातळीवर स्थिरावला आहे. त्यामुळे निफ्टीला २५९०० च्या पातळी आसपास जाण्यास यश आले आहे. सेन्सेक्स बँक ३३८ व बँक निफ्टीत २४९ अंकांनी वाढ झाल्याने बाजारात दिवसभरात तेजीचे स्थैर्य कायम राहिले असून अस्थिरता निर्देशांक (VIX Volatility Index) ४.६९% कोसळला होता. मिडकॅप निर्देशांकासह ऑटो, आयटी, मेटल, कंज्यूमर ड्युरेबल्स, हेल्थकेअर, मिड स्मॉल फायनांशियल सर्विसेस शेअर्समध्ये झालेल्या वाढीचा फायदा बाजारात झाला असला तरी मिडिया, तेल व गॅस निर्देशांकात किरकोळ घसरण झाली. एकूणच रूपयातील निचांकी घसरण, वाढती डॉलर पातळी, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी फेड दर कपातीमुळे काढून घेतलेली गुंतवणूक व तेलाच्या व कमोडिटी बाजारातील रिकव्हर झालेल्या किंमती, भारतीय मजबूत फंडामेंटल व टेक्निकल पोझिशनआधारे शेअर बाजारात आज वाढ नोंदवली गेली आहे.मात्र तज्ञांच्या मते, युएस बाजारातील २५ बेसिस दरकपात भारतीय बाजारात काय प्रमाणात प्रभावित करेल हे आगामी युएस बाजारातील मायक्रो डेटातील आकडेवारीवर स्पष्ट होईल मात्र कपातीचे परिणाम दीर्घकालीन राहिल्यास भारतीय सराफा बाजारातील व शेअर बाजारातील गुंतवणूकीत प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. मात्र जगातील आंतर बाह्य वातावरणाचा अंदाज घेता वर्षभरात आरबीआय रेपो दर कपात करू शकते. बँक ऑफ बडोदाने प्रकाशित केलेल्या अहवालानुसार रेपो दर ५% पातळीपर्यंत खाली घसरू शकतो ज्याचा फायदा निर्यातदासह घरगुती बाजारपेठेला होईल. मात्र चलववाढ हा देखील प्रमुख चिंतेचा मुद्दा आहे. मेक्सिकोनेही भारतावर ५०% अतिरिक्त शुल्क लावल्याने त्याचा प्रतिकूल परिणाम ऑटोमोबाईल व इतर औद्योगिक क्षेत्रात होणार असला तरी हा बाजार भारतीय बाजारात लक्ष केंद्रित करू शकतो.याखेरीज गुंतवणूकदारांनी रशिया-युक्रेन शांतता चर्चेकडे लक्ष पुन्हा एकदा केंद्रित केल्याने कमोडिटी किंमती शिथील होऊ शकतात कारण व्हेनेझुएलाच्या किनाऱ्याजवळ अमेरिकेने मंजूर केलेला टँकर जप्त केल्यामुळे होणाऱ्या संभाव्य परिणाम आधारे आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमती कमी झाल्या. आतापर्यंत, जप्तीचा बाजारावर कमीत कमी परिणाम झाला आहे परंतु पुढील वाढ कच्च्या तेलाच्या किमतीत मोठ्या प्रमाणात अस्थिरता निर्माण करु शकतो. दुसरीकडे आज मिडकॅप शेअर्समध्ये वाढ कायम असून बाजार तज्ञांच्या मते मिड व स्मॉल कॅप शेअर्समध्ये प्राईज करेक्शन झालेले असून येणाऱ्या वर्षांमध्ये या शेअर्समध्ये गुंतवणूकीत चांगला परतावा मिळू शकतो.आशियाई बाजारातील अखेरच्या सत्रात तज्ञांच्या विश्लेषणाप्रमाणेच घसरणीकडे अधिक झोकला गेला आहे. अखेरच्या सत्रात गिफ्ट निफ्टी (०.६८%) सह स्ट्रेट टाईम्स (०.२०%), वगळता इतर सर्व शेअर बाजारात नुकसान झाले आहे. सर्वाधिक घसरण निकेयी २२५ (०.८०%), तैवान वेटेड (१.३४%), सेट कंपोझिट (०.३०%) निर्देशांकात झाली आहे. युएस बाजारातील सुरूवातीच्या कलात एस अँड पी ५०० (०.६८%), नासडाक (०.३६%) निर्देशांकात झाली असून घसरण डाऊ जोन्स (०.१४%) निर्देशांकात झाली आहे.आज अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ ओला इलेक्ट्रिक (६.७६%),नाटको फार्मा (५.७७%), डीसीएम श्रीराम (५.५६%), डिक्सन टेक्नॉलॉजी (५.१६%), व्होडाफोन आयडिया (५.९४%), केफीन टेक्नॉलॉजी (४.८९%), एसईएमई सोलार होल्डिंग्स (४.५८%), बीएसई (४.५४%), रेलटेल कॉर्पोरेशन (४.२०%), कायनेस टेक (३.८८%) समभागात झाली असून सर्वाधिक घसरण सिमेन्स इंजिनिअरिंग (३.०३%), सोभा (२.८२%), एमआरपीएल (२.५८%), वालोर इस्टेट (२.५२%), पीटीसी इंडस्ट्रीज (२.०८%), सुप्रीम इंडस्ट्रीज (१.९१%), गोदरेज इंडस्ट्रीज (१.८१%),टीबीओ टेक (१.५३%) समभागात झाली आहे.आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले आहेत की,'अमेरिकेतील महागाईच्या उच्च दरादरम्यान फेडने अपेक्षित २५-बीपीएस दर कपात केल्यानंतर देशांतर्गत बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात तेजी आली. अमेरिकेतील १० वर्षांच्या उत्पन्नात घट झाल्याने भविष्यातील एफआयआयच्या बहिर्गमनात घट झाल्याचे दिसून येते, ज्यामुळे भावनांना चालना मिळाली. अपेक्षित मजबूत मागणीमुळे ऑटो क्षेत्राने उत्कृष्ट कामगिरी केली, तर खर्च वाढण्याच्या शक्यतेमुळे आयटीने जोर पकडला. याउलट, एआय चालित मूल्यांकन आणि वाढत्या जपानी उत्पन्नाबद्दलच्या चिंतेमुळे इतर आशियाई बाजारपेठांमध्ये विक्रीचा दबाव जाणवला, ज्यामुळे एकूण देशांतर्गत भावनांवर नकारात्मक परिणाम झाला.'
Arunachal Pradesh : अरुणाचल प्रदेशात भीषण अपघात; ट्रक खोल दरीत कोसळला, २२ कामगारांचा मृत्यू
Arunachal Pradesh | Road accident : अरुणाचल प्रदेशातील अंजाव जिल्ह्यात गुरुवारी एक भीषण रस्ता अपघात घडला. चकलागम परिसरात मजुरांना घेऊन जाणारा ट्रक डोंगरावरून खोल दरीत कोसळला. त्यात एकूण २२ कामगार होते, जे सर्वजण या अपघातात मृत्युमुखी पडले. मिळालेल्या माहितीनुसार, यापैकी १९ कामगार आसाममधील तिनसुकिया जिल्ह्यातील गिलापुक्री टी इस्टेटचे रहिवासी होते. घटनास्थळी सध्या बचाव कार्य सुरू […] The post Arunachal Pradesh : अरुणाचल प्रदेशात भीषण अपघात; ट्रक खोल दरीत कोसळला, २२ कामगारांचा मृत्यू appeared first on Dainik Prabhat .
ED Raid Ratnagiri: राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे निकटवर्तीय आणि रत्नागिरी जिल्ह्यातील मोठे उद्योजक सचिन पाकळे यांच्या कात उत्पादन करणाऱ्या कारखान्यांवर आज (गुरुवारी) सकाळी सक्तवसुली संचालनालयाने (ED) अचानक धाड टाकल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील कारखान्यांवर ही कारवाई करण्यात आली असून, यामुळे राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, […] The post ED Raid Ratnagiri: उद्योगमंत्र्यांच्या निकटवर्तीयाच्या कारखान्यावर ईडीची धाड; राजकीय वर्तुळात मोठी खळबळ appeared first on Dainik Prabhat .
मुख्यमंत्री निधी वादात! अंबादास दानवेंच्या ‘कंजूष’टीकेला CMOचं जोरदार प्रत्युत्तर
मुंबई : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी जमा झालेल्या मुख्यमंत्री सहायता निधीच्या (CM Fund) खर्चावरून महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलाच गदारोळ माजला आहे. माजी विधानपरिषद सभापती अंबादास दानवे यांनी आरटीआयमधील आकडेवारीचा हवाला देत, निधीत १०० कोटी जमा असताना केवळ ७५ हजार रुपये खर्च झाल्याचा दावा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ‘कंजूष प्रमुख’ असल्याची टीका केली होती. या टीकेला आता […] The post मुख्यमंत्री निधी वादात! अंबादास दानवेंच्या ‘कंजूष’ टीकेला CMOचं जोरदार प्रत्युत्तर appeared first on Dainik Prabhat .
Kedarnath : केदारनाथमध्ये थंडीचा कडाका.! बर्फवृष्टीमुळे पारा उणे १३ अंशांपर्यंत घसरला
Kedarnath – सक्रिय पश्चिमी विक्षोभ (वेस्टर्न डिस्टर्बन्सेस) आणि वातावरणाच्या वरच्या थरांमध्ये वाहणारा जोरदार वारा यामुळे उत्तर भारतातील हवामानाचे स्वरूप पूर्णपणे बदलले आहे. हिमालयीन राज्यांमध्ये पाऊस आणि हिमवृष्टीमुळे मैदानी भागात तापमानात मोठी घट झाली आहे. तीव्र थंडीसह धुके वाढले आहे आणि अनेक ठिकाणी किमान तापमान सामान्यपेक्षा कमी झाले आहे. उत्तराखंडमधील केदारनाथच्या उंच पर्वतांमध्ये बर्फवृष्टीमुळे पारा उणे […] The post Kedarnath : केदारनाथमध्ये थंडीचा कडाका.! बर्फवृष्टीमुळे पारा उणे १३ अंशांपर्यंत घसरला appeared first on Dainik Prabhat .
२०२२ नंतर प्रथमच आज रूपयात 'उच्चांकी'घसरण तर डॉलर दोन महिन्यातील निचांकी घसरणीनंतर सावरला
मोहित सोमण: आज युएस फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपातीची घोषणा झाल्यानंतर रूपयांची विक्रमी पातळीवर घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय चलन विनिमयात रूपया ९०.४२ प्रति डॉलर या निचांकी पातळीवर (All time Low) पातळीवर गेला. ज्याचा फटका आज शेअर बाजारातही काही प्रमाणात बसला आहे. डॉलरवरील दबाव घसरल्याने रूपयांच्या तुलनेत डॉलरच्या मागणीत आणखी वाढ झाल्याने रूपयाचे मोठ्या प्रमाणात अवमूल्यन झाले आहे. त्यामुळे दिवसभरात रूपया ९०.२० ते ९०.३६ पातळीवर व्यवहार करत आहे. फेड दरकपातीनंतर बाँडमध्येही वाढ झाल्याने रूपयावर एक प्रकारे दबाव निर्माण झाला असल्याने परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी आपली रोख विक्री वाढवल्याने रॅली मर्यादित झाली आहे.सकाळी रूपयात घसरण झाली असली तरी तज्ञांच्या मते सुरूवातीच्या सत्रावरील प्रतिकार दिसून आल्याने रूपया वाढ रोखली गेली असली तरी डॉलरमधील दबाव घसरल्याने अखेर रूपया निर्णायक स्थितीत घसरला आहे. बुधवारी अमेरिकन फेडने मोठ्या प्रमाणात अपेक्षित दर कपात केली असून २५ बेसिसने ही कपात केली ज्यामध्ये व्याजदर ३.५० ते ३.७५% प्रमाणात निश्चित झाला आहे. फेडने पतधोरण निर्णय जाहीर केल्यानंतर तज्ञांच्या मतानुसारच, सुरुवातीला त्यांच्या कमी आक्रमक दृष्टिकोनामुळे डॉलरवर दबाव निर्माण झाला होता मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने रूपयात दबाव आशियाई चलनांमध्ये मिश्र व्यवहार झाले आणि डॉलर निर्देशांक जवळजवळ दोन महिन्यांच्या निचांकी पातळीवरून किंचित सावरला असून रूपयात २०२२ नंतर प्रथमच सर्वाधिकघसरणझालीआहे.२०२२ नंतर प्रथमच रुपयाच्या मूल्यात वार्षिक घसरणीचे कारण महु पोर्टफोलिओ प्रवाहातील कमकुवतपणापासून ते भारतीय निर्यातीवरील अमेरिकेच्या वाढत्या व्यापार शुल्कापर्यंत भारताच्या बाह्य क्षेत्रासमोरील आव्हानाचा दबाव चलनावर पडला होता. बाह्य वातावरणाचा अंतर्गत वातावरणापेक्षा अधिक फटका रूपयावर पडला. आज अखेरच्या सत्रात आशियाई चलनांमध्येही मिश्र व्यवहार झाले, तर फेडच्या दर निर्णयानंतर डॉलर निर्देशांक जवळजवळ दोन महिन्यांच्या नीचांकी पातळीवर घसरल्यानंतर काही तोटा भरून काढला. याविषयी बोलताना,'अनेक स्टॉप-लॉस (रुपयाच्या) विक्रमी नीचांकी पातळीवर सुरू झाले आणि नजीकच्या काळात चलन घसरणीच्या ट्रेंडमध्ये राहण्याची शक्यता आहे. पुढील पातळी ९०.७० आहे, असे एचडीएफसी सिक्युरिटीजचे परकीय विनिमय संशोधन विश्लेषक दिलीप परमार माध्यमांनाम्हणालेआहेत.
राज ठाकरेंना कोर्टाकडून एक महिन्याची डेडलाईन… पण कशासाठी? कोर्टात काय घडलं?
ठाणे : रेल्वे भरतीत उत्तर भारतीयांना जास्त संधी मिळते असा आरोप करत मनसेने ठाण्यात गडकरी रंगायतन चौकात एक सभा घेतली. या सभेत मनसेप्रमुख राज ठाकरे यांना तलवार भेट देण्यात आली. ही तलवार म्यानातून काढून उपस्थितांना दाखवण्यात आली. राज ठाकरे यांनी रेल्वे भरती प्रकरणात अशी वक्तव्ये केली होती ज्यामुळे तणाव निर्माण झाल्याचा आरोप करत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात कल्याण कोर्टात खटला दाखल करण्यात आला होता.आता हा खटला ठाणे कोर्टात वर्ग करण्यात आला आहे.या खटल्याची न्यायमूर्ती अभिजीत कुलकर्णी यांच्या दालनात सुनावणी झाली.राज ठाकरे यांच्यासह या खटल्यातील इतर आरोपी असलेले सात जण कोर्टात उपस्थित होते. मनसेच्या वरिष्ठ फळीतील नेते नितीन सरदेसाई,अभिजीत पानसे आणि अविनाश जाधव हे देखील कोर्टात हजर होते.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना सुनावणी दरम्यान न्यायालयाने थेट विचारणा केली,“तुम्हाला गुन्हा कबूल आहे का?” प्रश्नावर राज ठाकरे यांनी कोणताही संभ्रम न ठेवता,“मला गुन्हा कबूल नाही,” असे स्पष्ट उत्तर दिले.राज ठाकरे यांनी गुन्हा कबूल नसल्याचे सांगितल्यानंतर,हे प्रकरण लवकरात लवकर निकाली काढण्याच्या दृष्टीने न्यायाधीशांनी सूचक टिप्पणी केली.न्यायमूर्ती अभिजीत कुलकर्णी यांनी राज ठाकरे यांना उद्देशून अत्यंत महत्त्वाचे विधान केले.तुम्ही सहकार्य करा, एक महिन्यात हे प्रकरण संपेल. तुम्हाला यापुढे यायची गरजही लागणार नाही.”तसेच, सहकार्य मिळाल्यास हे प्रकरण जून महिन्यापर्यंत निश्चितपणे संपवता येईल,असे कोर्टाने नमूद केले.यावेळी राज ठाकरे यांच्या कायदेशीर बाजूचे प्रतिनिधित्व ॲड. सयाजी नांगरे आणि ॲड. राजेंद्र शिरोडकर यांनी केले.
Anna Hazare: ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे उपोषणाला बसणार; मुख्यमंत्र्यांना पत्र, काय आहे मागणी?
अहिल्यानगर: ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hajare) यांनी लोकायुक्त कायद्याच्या अंमलबजावणीसाठी पुन्हा एकदा उपोषणाचे हत्यार उपसले आहे. महाराष्ट्र सरकारने विधानसभेत (२८ डिसेंबर २०२२) आणि विधानपरिषदेत (१५ डिसेंबर २०२३) लोकायुक्त विधेयक मंजूर करूनही तब्बल दोन वर्षे त्याची अंमलबजावणी न झाल्याने अण्णांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. भ्रष्टाचारमुक्त भारतासाठी लढा देणाऱ्या अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […] The post Anna Hazare: ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे उपोषणाला बसणार; मुख्यमंत्र्यांना पत्र, काय आहे मागणी? appeared first on Dainik Prabhat .
Pune news : वन विभागाच्या निवृत्त कर्मचाऱ्यांवर ‘शैक्षणिक अटीं’च्या नावाखाली अन्याय!
Pune news : महाराष्ट्र वन विभागाच्या निवृत्त कर्मचाऱ्यांनी त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी शासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही, ‘शैक्षणिक अटीं’चे कारण देत त्यांना दुसऱ्या लाभापासून वंचित ठेवले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कर्मचाऱ्यांनी संविधानाचे नियम, १९७६ चे सेवा प्रवेश नियम, २००९ चे वेतनश्रेणी अधिनियम, आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाचे विविध आदेश असे ठोस पुरावे सादर करूनही, सामान्य […] The post Pune news : वन विभागाच्या निवृत्त कर्मचाऱ्यांवर ‘शैक्षणिक अटीं’च्या नावाखाली अन्याय! appeared first on Dainik Prabhat .
प्रा.अमितकुमार शेलार यांना सोलापूर विद्यापीठामार्फत पीएच.डी. पदवी बहाल
माळेगाव – शिवनगर विद्या प्रसारक मंडळाचे तंत्रज्ञान व अभियांत्रिकी महाविद्यालय, माळेगाव बु. येथील यांत्रिकी अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक प्रा. अमितकुमार रामचंद्र शेलार यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामार्फत विद्यापीठीय डॉक्टर पदवी (पीएच.डी.) बहाल करण्यात आली आहे. ही माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदीप शहा यांनी दिली. प्रा. शेलार यांनी “एच-१३ स्टीलच्या रासायनिक संरचनेत विविध मिश्रधातू घटकांची भर […] The post प्रा.अमितकुमार शेलार यांना सोलापूर विद्यापीठामार्फत पीएच.डी. पदवी बहाल appeared first on Dainik Prabhat .
महाराष्ट्रात ६ महिन्यांत ७८१ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; केंद्र सरकारच्या अहवालाने गंभीर वास्तव उघड!
नागपूर : महाराष्ट्राच्या शेती क्षेत्रातील गंभीर समस्या पुन्हा एकदा विधिमंडळात उघड झाली आहे. राज्यात गेल्या सहा महिन्यांत (एप्रिल ते सप्टेंबर २०२३/२४) तब्बल ७८१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक आकडेवारी शासनाने लेखी उत्तरात मान्य केली आहे. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय गुन्हे अहवाल २०२३ नुसार, देशातील सरासरी प्रत्येक दोन आत्महत्यांमध्ये १ आत्महत्या महाराष्ट्रातील शेतकऱ्याची असल्याची अत्यंत गंभीर बाब समोर आली आहे, ज्यामुळे कृषी क्षेत्रातील संकट अधिक गडद झाल्याचे स्पष्ट होते.विदर्भ आणि मराठवाड्यात सर्वाधिक बळीशेतकरी आत्महत्यांचे प्रमाण महाराष्ट्रातील दोन प्रमुख विभागांमध्ये सर्वाधिक आहे, विदर्भामध्ये एकूण २९६ शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि मराठवाडामध्ये एकूण २१२ शेतकऱ्यांच्या आत्महत्या या आकडेवारीवरून हे स्पष्ट होते की, अनुक्रआत्महत्यामे कापूस आणि सोयाबीन पिकांवर अवलंबून असलेल्या या दोन्ही विभागांमध्ये आर्थिक ताण आणि नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी सर्वाधिक त्रस्त आहेत.संकट रोखण्यासाठी सरकारी उपाययोजनाशेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या रोखण्यासाठी शासन विविध उपाययोजना करत असल्याचे लेखी उत्तरात नमूद करण्यात आले आहे. या उपाययोजनांमध्ये खालील बाबींचा समावेश आहे:१.उत्पादनांना योग्य भाव: शेतमालाला योग्य भाव मिळवून देणे.२.सिंचन सुविधा वाढ: सिंचनाच्या सोयीसुविधांमध्ये वाढ करणे.३.नुकसान भरपाई: पीक, शेतजमिनी तसेच पशुधनाच्या नुकसानीची भरपाई तात्काळ देणे.४.तात्काळ मदत: शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत वाटप करणे.५.समुपदेशन केंद्रे: आत्महत्येच्या विचारांपासून परावृत्त करण्यासाठी समुपदेशन केंद्र संचालित करणे.समस्येचे मूळ आणि आव्हानदेशात कृषी उत्पादनात मोठे योगदान देणाऱ्या महाराष्ट्रात ही परिस्थिती कायम राहणे हे प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे. कृषी तज्ज्ञांच्या मते, कर्जबाजारीपणा, निसर्गाचा लहरीपणा (अतिवृष्टी/दुष्काळ), शेतमालाला योग्य वेळी व योग्य बाजारभाव न मिळणे आणि शासकीय योजनांची अपुरी अंमलबजावणी ही आत्महत्यांमागील प्रमुख कारणे आहेत. येणाऱ्या काळामध्ये शेतकरी आत्महत्या रोखल्या जातात की नाही हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
इंडिगोकडून १०० विमाने आज रद्द, मात्र इंडिगोकडून सेवा पूर्ववत झाल्याच्या दाव्यासह नुकसानभरपाईही जाहीर
मोहित सोमण: इंडिगो एअरलाईन्सने (Interglobe Aviation Limited) कंपनीने आज बंगलोर चेन्नई यासह एकूण १०० विमाने रद्द केली असल्याचे प्रसारमाध्यमांनी स्पष्ट केली असली तरी इंडिगो विमानाने आज प्रेस स्टेटमेंट रिलीज करुन इंडिगो एअरलाईन्स पूर्ववत सुरु झाल्याचे स्पष्ट केले. 'सारख्या तारखेला गेल्या ३ दिवसात एकही विमान रद्द झाले नसल्याचे कंपनीने म्हटले असून, '९ डिसेंबर पासून कंपनीचे विमानसेवा पूर्ववत सुरू होईल' असे कंपनीने आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे कंपनीच्या माहितीनुसार आज किमान १९५० विमाने चालवली जातील. आज दुपारी ३ वाजेपर्यंत कंपनीचे सीईओ पीटर इलिबर्स यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश डीजीसीए (Department of Civil Aviation DGCA) विभागाने दिले आहेत. त्यामुळे रिपोर्टनुसार कंपनी झालेल्या प्रकाराबद्दल सविस्तर माहिती डीजीसीएला देऊ शकते. तसेच इंडिगो या व्यत्ययांची मुख्य कारणे आणि त्यावर उपाययोजना करण्यासाठी उचललेली पावले स्पष्ट करेल.यामध्ये उड्डाणे पूर्ववत करण्याच्या प्रगतीचा, वैमानिक आणि केबिन क्रूसाठीच्या भरती योजनांचा, रद्द झालेल्या प्रवाशांना परतावा, अडकलेले सामान परत करण्याचा, प्रवाशांशी वेळेवर संवाद साधण्याचा आणि रद्द झालेल्या उड्डाणांमुळे प्रभावित झालेल्या प्रवाशांच्या पुनर्वाहतुकीच्या व्यवस्थेतील प्रश्नांचा समावेश आहे. गेल्या आठवड्याच्या मध्यापासून उड्डाणे रद्द होण्याचे सत्र सुरू असल्याने डीजीसीए आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालय दोघेही विमान कंपनीसोबत नियमित बैठका घेत आहेत. ज्याचा फटका विमान उड्डाण करत असलेल्या प्रवाशांना अद्याप सुरू आहे.इंडिगो देशातील सर्वात मोठी देशांतर्गत उड्डाण सेवा देणारी कंपनी आहे. या एव्हिऐशन कंपनीचे हवाई क्षेत्रातील बाजार हिस्सा (Market Share) भारताच्या देशांतर्गत बाजारपेठेत एकूण ६५% आहे. दररोज २३०० पेक्षा जास्त उड्डाणे चालवणाऱ्या इंडिगोच्या सुधारित कपातीमुळे आता दररोजच्या देशांतर्गत उड्डाणांची संख्या १९५० पेक्षा कमी होईलदरम्यान, इंडिगोचे बोर्ड अध्यक्ष विक्रम सिंग मेहता यांनी विमान कंपनीने हे संकट स्वतःच निर्माण केले किंवा सुधारित फ्लाइट ड्युटी टाइम लिमिटेशन (FDTL) नियमांवर सरकारवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला हे दावे त्यांनी सपशेल फेटाळून लावले आहे. आज बंगलोर चेन्नई सारख्या ठिकाणी विमाने रद्द झाली तरी सारख्या तारखेची नव्या विमानांची उड्डाणे आज एकदाही रद्द झाली नाही असा दावा कंपनीने प्रसिद्धीपत्रकातून केला. या विषयी बोलताना,'इंडिगो आपल्या कामकाजाला सातत्याने बळकटी देत आहे आणि दररोज आपल्या सेवांमध्ये सुधारणा करत आहे, ज्यामुळे आता आमच्या नेटवर्कमधील सर्व १३८ गंतव्यस्थानांना सुरळीत जोडणारी १९०० हून अधिक विमानांची उड्डाणे होत आहेत. कार्यान्वयनातील उत्कृष्टतेप्रती असलेल्या आमच्या वचनबद्धतेमुळे कार्यक्षमतेत लक्षणीय वाढ झाली आहे आणि आमची वेळेवर सेवा देण्याची कामगिरी (ऑन-टाइम परफॉर्मन्स) पुन्हा एकदा सर्वोच्च औद्योगिक मानकांवर पोहोचली आहे.' अशी अधिकृत प्रतिक्रियाकंपनीनेदिली.कंपनीने आणखी काय प्रसिद्धीपत्रकातम्हटले?'आमच्या ग्राहकांची काळजी घेणे हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. याचाच एक भाग म्हणून, कामकाजात झालेल्या व्यत्ययानंतर, आम्ही रद्द झालेल्या विमानांसाठी सर्व आवश्यक परतावे सुरू केले आहेत, त्यापैकी बहुतेक रक्कम तुमच्या खात्यांमध्ये आधीच जमा झाली आहे आणि उर्वरित रक्कम लवकरच जमा होईल. जर बुकिंग ट्रॅव्हल पार्टनर प्लॅटफॉर्मद्वारे केले असेल, तर तुमच्या परताव्यासाठी आवश्यक कार्यवाही देखील सुरू करण्यात आली आहे. आमच्या सिस्टीममध्ये तुमच्याकडे संपूर्ण तपशील नसल्यामुळे, आम्ही तुम्हाला विनंती करतो की तुम्ही customer.experience@goindigo.in वर आम्हाला लिहा, जेणेकरून आम्ही तुम्हाला त्वरित मदत करणे सुरू ठेवू शकू.इंडिगोला खेदाने हे मान्य करावे लागत आहे की, ३/४/५ डिसेंबर २०२५ रोजी प्रवास करणारे आमचे काही ग्राहक काही विमानतळांवर अनेक तास अडकून पडले होते आणि गर्दीमुळे त्यापैकी अनेकांना गंभीर त्रास झाला. आम्ही अशा गंभीरपणे प्रभावित झालेल्या ग्राहकांना १०००० रुपयांचे ट्रॅव्हल व्हाउचर देऊ. हे ट्रॅव्हल व्हाउचर पुढील १२ महिन्यांसाठी कोणत्याही भविष्यातील इंडिगो प्रवासासाठी वापरले जाऊ शकतात.ही भरपाई विद्यमान सरकारी मार्गदर्शक तत्त्वांनुसार असलेल्या वचनबद्धतेव्यतिरिक्त आहे, ज्यानुसार, ज्या ग्राहकांची विमाने सुटण्याच्या २४ तासांच्या आत रद्द झाली होती, त्यांना इंडिगो विमानांच्या ब्लॉक टाइमनुसार ५००० ते १०,००० रुपयांची भरपाई देईल. इंडिगोमध्ये, आम्ही तुमच्याकडून अपेक्षित असलेला अनुभव सुरक्षित, सुरळीत आणि विश्वासार्ह पुन्हा पूर्ववत करण्यासाठी वचनबद्ध आहोत. तुम्हाला पुन्हा सेवा देण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद.'
नागपूर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर वनविभागात वन्यप्राणी बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांमुळे निर्माण झालेल्या गंभीर संकटावर आज विधिमंडळात चर्चा झाली. सरकारने लेखी उत्तरात दिलेल्या माहितीनुसार, सन २००१ पासून नोव्हेंबर २०२५ पर्यंत बिबट्याच्या हल्ल्यात एकूण ५५ व्यक्तींचा मृत्यू झाला असून १५० व्यक्ती गंभीर जखमी झाल्या आहेत. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये मोठी भीती पसरली आहे. याच कालावधीत, बिबट्याने पाळीव पशुधनाचेही मोठे नुकसान केले आहे. २००१ पासून नोव्हेंबर २०२५ पर्यंत २७ हजार ९५२ पशुधनाचा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यात झाल्याची धक्कादायक आकडेवारी शासनाने सादर केली आहे.बिबट्यांच्या नियंत्रणासाठी महत्त्वपूर्ण उपाययोजनाया वाढत्या हल्ल्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी शासनाने महत्त्वाच्या उपाययोजना करण्याची माहिती दिली आहे, केंद्र सरकारने प्रायोगिक तत्त्वावर बिबट्यांची नसबंदी करण्यास परवानगी दिली आहे. या अनुषंगाने पुढील कार्यवाही सुरू करण्यात येत आहे. बिबट्यांना बंदिस्त करण्यासाठी वनविभागाकडून पिंजऱ्यांची संख्या वाढवण्यात येणार आहे. जे बिबटे बंदिस्त केले जातील, त्यांचे राज्यातील इतर प्राणी संग्रहालये किंवा संरक्षित क्षेत्रांमध्ये सुरक्षितपणे स्थानांतरण केले जाईल. माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्र तसेच राज्यातील इतर केंद्रांचे विस्तारीकरण करून त्यांची क्षमता वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. बिबट्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी आणि हल्ल्यांची पूर्वसूचना देण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आधारित कॅमेरे आणि अनोइडर्स मशिन बसवण्याची उपाययोजनाही करण्यात येणार आहे.जुन्नर वनविभाग आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांचे जीव व पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी या उपाययोजनांची अंमलबजावणी किती प्रभावी ठरते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
लोकलच्या दारात उभे राहणे म्हणजे निष्काळजीपणा नव्हे; हायकोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय
मुंबई : स्वप्नांची दुनिया आणि मायानगरी असलेल्या मुंबईत प्रत्येक जण आपली स्वप्न पूर्ण करायला येत असतो. आणि बघता बघता मुंबईतच कायमच वास्तव्य करतो. यामुळेच मुंबईची लोकसंख्या वाढत आहे. मुंबई आणि मुंबईच्या लोकलवर लोकांचा बोजा वाढत चालला आहे. त्यामुळेच प्रत्येकाला मुंबईच्या लोकलचे धक्के खावे लागत आहेत.लोकलमधून पडून अनेक अपघात झाले आहेत. अनेक जण जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. लोकलच्या दारात उभे राहणे म्हणजे निष्काळजीपणा नसून प्रवाशांच्या सुरक्षिततेची जबाबदारी रेल्वेची असल्याचे स्पष्ट करत कोर्टाने रेल्वे प्रशासनाची भूमिका फेटाळली आहे.हायकोर्टाने रेल्वे अपघातात मृत्यू पावलेल्या प्रवाशाच्या कुटुंबाला देण्यात आलेली भरपाई कायम ठेवली असून, भरपाईपासून सुटका मिळावी हा रेल्वेचा दावा नाकारला आहे. मृत प्रवासी स्वतःच्या निष्काळजीपणामुळे अपघाताला जबाबदार असल्याचा रेल्वेचा युक्तिवाद कोर्टाने ग्राह्य धरला नाही. न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांच्या एकलपीठाने दिलेल्या या निकालाने गर्दीच्या वेळी दारात उभे राहण्याची प्रवाशांची अपरिहार्यता मान्य केली आहे.काय आहे प्रकरण?२८ ऑक्टोबर २००५ रोजी पश्चिम रेल्वेमार्गावर भाईंदर ते मरीन लाइन्सदरम्यान एका प्रवाशाचा लोकलमधून पडून मृत्यू झाला. त्यानंतर कुटुंबीयांनी भरपाईची मागणी केली होती. रेल्वे प्राधिकरणाने नुकसानभरपाई मंजूर केली, मात्र केंद्र सरकारने या निर्णयाला हायकोर्टात आव्हान दिले.हायकोर्टाचे निरीक्षण मुंबई लोकलमध्ये पिक अवर्समध्ये इतकी गर्दी असते की दाराजवळ उभे राहण्याशिवाय प्रवाशांकडे दुसरा पर्याय नसतो. त्यामुळे दारात उभे राहणे हा निष्काळजीपणाचा प्रकार मानता येत नाही. गर्दीमुळे तोल जाऊन प्रवासी रेल्वेतून पडला, तर ती अयोग्य घटना म्हणून गणली जाणार नाही. अपघातग्रस्ताकडे पास आणि ओळखपत्र असल्याचे कागदपत्रांमधून स्पष्ट झाले आहे. अपघाताच्या दिवशी पास विसरणे शक्य असल्याने त्यावरून भरपाई नाकारणे योग्य नाही. प्रवाशांच्या सुरक्षिततेची जबाबदारी रेल्वेची असून, उपनगरी लोकलची वास्तविक परिस्थिती लक्षात घेणे आवश्यक आहे.हायकोर्टाच्या या निर्णयामुळे उपनगरी प्रवाशांना दिलासा मिळाला असून रेल्वेच्या सुरक्षिततेविषयीच्या जबाबदारीकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे.
नाशिकच्या तपोवनमध्ये वृक्ष तोडीला सुरुवात; 300 झाडं तोडली, पर्यावरणप्रेमी नाराज
Nashik Tapovan | नाशिकच्या तपोवनमध्ये पर्यावरणप्रेमींचा विरोध डावलून ही वृक्षतोड करण्यात येत आहे. 2027 साली नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार असून तपोवनमध्ये साधुग्राम बांधण्याची योजना आहे. या साधुग्रामसाठी तपोवनमधील जवळपास 1800 झाडं तोडावी लागणार आहेत. पर्यावरणप्रेमींसह काही राजकीय नेते मंडळी आणि अभिनेते सयाजी शिंदे यांनी वृक्षतोडीला ठामपण विरोध केला आहे. पण सरकार आपल्या निर्णयावर ठाम आहे. […] The post नाशिकच्या तपोवनमध्ये वृक्ष तोडीला सुरुवात; 300 झाडं तोडली, पर्यावरणप्रेमी नाराज appeared first on Dainik Prabhat .
Alia Bhatt : अभिनेत्री आलिया भटचा बॅालीवूड इंडस्ट्रीमधील टॉप अभिनेत्रींमध्ये समावेश होतो. तिच्या अभिनयाने ती नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकत आली आहे. आता आलिया भट हिच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. तिचा आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे. रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये गोल्डन ग्लोब्स होरायझन पुरस्काराने आलियाला सन्मानित करण्यात आले आहे. हॅालीवूड […] The post आलियाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मान! अभिनेत्रीने पुरस्कार स्वीकारल्यानंतर व्यक्त केल्या भावना म्हणाली… appeared first on Dainik Prabhat .
इंडिगोची मोठी घोषणा ! प्रवाशांना देणार १० हजाराच्या भरपाईसह ट्रॅव्हल व्हाउचर
Indigo customers compensation। इंडिगोची उड्डाणे रद्द झाल्यामुळे प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात प्रवाशांना सर्वाधिक समस्यांना सामोरे जावे लागले, कारण या काळात इंडिगोच्या शेकडो उड्डाणे रद्द करण्यात आली. त्यामुळे प्रवाशांचेही मोठे आर्थिक नुकसान झाले. त्यानंतर डीजीसीएने एअरलाइनवर कडक कारवाई केली आहे. आता इंडिगोने ३, ४ आणि ५ डिसेंबर रोजी मोठ्या प्रमाणात […] The post इंडिगोची मोठी घोषणा ! प्रवाशांना देणार १० हजाराच्या भरपाईसह ट्रॅव्हल व्हाउचर appeared first on Dainik Prabhat .
गोलमाल 5 ची स्टारकास्ट ठरली! ‘या’दोन प्रसिद्ध अभिनेत्रींची नव्या भागात एन्ट्री
Golmaal 5 : प्रसिद्ध बॉलीवूड निर्माता-दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या अॅक्शन चित्रपटांसह कॅामेडी चित्रपटांची देखील प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात. गोलमाल या कॅामेडी चित्रपटाने रोहित शेट्टीला एक वेगळी ओळख मिळवून दिली. त्याने अनेक यशस्वी चित्रपट केले आहेत. सध्या गोलमाल ५ चित्रपटाच्या तयारीत रोहित व्यस्त आहे. सिंघम अगेननंतर प्रेक्षक या कॉमेडी फ्रँचायझीची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता या […] The post गोलमाल 5 ची स्टारकास्ट ठरली! ‘या’ दोन प्रसिद्ध अभिनेत्रींची नव्या भागात एन्ट्री appeared first on Dainik Prabhat .
अमेरिकेन उपखंडात भारताला आणखी एक मोठा झटका - मेक्सिको भारतावर ५०% टॅरिफ कर लादणार
मुंबई: भारताला आणखी एक झटका बसला आहे. युएसकडून ५०% आकारल्या गेलेल्या टॅरिफनंतर आता मेक्सिको देशाने भातावर ५०% टॅरिफनंतर शुल्क लावण्याचे ठरवले आहे. यासंबंधीची माहिती देशाने आपल्या अधिकृत निवेदनात दिली असून लवकरच हा अतिरिक्त कर लागू होणार आहे. मेक्सिको युएस- मेक्सिको, कॅनडा करार (USMCA) कराराचा भाग असल्याने मेक्सिकोने आपले अतिरिक्त कर लावण्याचे धोरण लागू केले आहेत. लॅटिन अमेरिकन बाजारांवर लक्ष ठेवणाऱ्या भारतातील विश्लेषकांसह इतरांचा असा विश्वास आहे की, मेक्सिकोचे हे अचानक घेतलेले संरक्षणवादी धोरण पुढील वर्षी होणाऱ्या USMCA (युनायटेड स्टेट्स-मेक्सिको-कॅनडा करार) च्या पुनरावलोकनापूर्वी अमेरिकेकडून आलेल्या दबावाशी जवळून संबंधित आहे. याची अंमलबजावणी करण्यासाठी मेक्सिको केवळ भारतच नाही तर चीन, व इतर आशियाई देशावर अतिरिक्त कर लावण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे याचा फटका आगामी काळात अमेरिका खंडात व्यापार करणाऱ्या भारतीय निर्यातदारांवर पडू शकतो.डंपिग विरोधात कारवाई करण्यासाठी व स्थानिक व्यापाऱ्यांना दिलासा देण्यासाठी निर्यातवरील करार वाढवण्याचा निर्णय मेक्सिकोने केला आहे. निर्यातदारांना नव्या धोरणाचा अधिक फटका बसेल कारण गेल्या काही वर्षात मेक्सिको व भारताचा व्यापार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आर्थिक वर्ष २०२० मधील ४.२५ अब्ज युएस डॉलरवरून आर्थिक वर्ष २०२४ पर्यंत हा व्यापार ६.५% वाढत ८.९८ अब्ज डॉलरवर पोहोचला होता. या निर्णयाचा परिणाम भारत व मेक्सिको यांच्या निर्यातीतील कार, ऑटोमोबाईल पार्ट, प्लास्टिक, स्टील, कापड टेक्सटाईल उद्योग अशा उद्योगांना अधिक प्रमाणात बसणार आहे. भारत सर्वाधिक प्रमाणात ऑटोमोबाईल, केमिकल्स, फार्मा, अँल्युमिनियम या वस्तूंची निर्यात मेक्सिकोला करतो. अमेरिकेला लागून असलेल्या या देशात या अतिरिक्त शुल्क वाढीचा तोटा छोट्या व मध्यम आकाराच्या निर्यातदारांना अधिक प्रमाणात होऊ शकतो. खासकरून भारतीय निर्यातदारांसाठी शुल्क रचनेत अधिक चढउतार होऊ शकतात.एका महत्त्वपूर्ण धोरणात्मक बदलामध्ये, मेक्सिकोच्या सिनेटने एका नवीन शुल्क प्रणालीला मंजुरी दिली आहे. त्यामुळे या नव्या कायद्यानुसार मेक्सिकोसोबत औपचारिक व्यापार करार नसलेल्या देशांमधून आयात केल्या जाणाऱ्या १४०० हून अधिक उत्पादनांवरील शुल्क, काही प्रकरणांमध्ये ५०% वाढवण्यात आले आहे ज्यात भारताचाही समावेश आहे.युएसने घेतलेल्या चीनवरील निर्णयाशी संलग्न राहून राष्ट्राध्यक्ष क्लॉडिया शिनबाम यांचे सरकार चिनी वस्तूंबाबत वॉशिंग्टन सारखीच भूमिका घेतली आहे. यामुळे पोलाद आणि ॲल्युमिनियमसारख्या मेक्सिकोच्या स्वतःच्या निर्यातीवर परिणाम करणाऱ्या अमेरिकेच्या व्यापक शुल्कांमध्ये सूट मिळण्यास मदत होईल, अशी आशा सरकारला आहे.मेक्सिकोच्या अर्थ मंत्रालयाला अपेक्षा आहे की, या नवीन शुल्कांमुळे पुढील वर्षी जवळपास ५२ अब्ज पेसो (१९००० कोटी) अतिरिक्त महसूल मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या निधीतून मेक्सिको सरकारला आपली वित्तीय तूट कमी करण्यासाठी आवश्यक असल्याचे म्हटले गेले. सिनेटने घेतलेल्या निर्णयानंतर मेक्सिकोतही स्थानिक ऑटो समूहांनी विशेषतः या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. देशाच्या सिनेटने बनवलेला हा कायदा मेक्सिकोच्या अर्थ मंत्रालयाला गैर-मुक्त व्यापार करार (Non Free Trade Agreement FTA) असलेल्या देशांवरील शुल्कांमध्ये इच्छेनुसार सुधारणा करण्याचे व्यापक अधिकार देतो. मेक्सिकोच्या या कृतीमुळे उत्तर अमेरिकेत संरक्षणवादाकडे होत असलेल्या व्यापक बदलावर शिक्कामोर्तब या निमित्ताने झाले.
मुख्यमंत्री सहायता निधीतून केवळ 75 हजार रुपये शेतकऱ्यांना दिल्याची माहिती चुकीची
मुख्यमंत्र्यांकडून स्पष्टोक्ती; अंबादास दानवे यांना दिले उत्तरनागपूर : देवेंद्र फडणवीस हे दानशूर राज्याचे कंजूष प्रमुख ठरले आहेत. मुख्यमंत्री सहायता निधीत कोट्यवधी रुपये जमा होत असताना, ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना केवळ 75 हजार रुपयांची मदत दिली गेली, असा आरोप उबाठाचे माजी आमदार अंबादास दानवे यांनी गुरुवारी केला. त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले असून, ही माहिती चुकीची असल्याचे स्पष्ट केले आहे.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “अंबादास दानवेजी, एकट्या ऑक्टोबर महिन्यातील आकडेवारी देऊन निव्वळ गैरसमज निर्माण होतात. याशिवाय ही माहिती सुद्धा चुकीची आहे. अशी चुकीची माहिती का देण्यात आली, याचीही चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्यात दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.”मुख्यमंत्री सहायता निधीतून ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या तीन महिन्यांत एकूण ६१ कोटी ५१ लाख ६९८ रुपये वितरित करण्यात आले आहेत. हा निधी दैनंदिन पातळीवर खर्च होत असल्याने रक्कम सातत्याने वाढत राहते. फक्त एका महिन्याची माहिती देऊन निष्कर्ष काढणे चुकीचे आहे. शिवाय, शेतकऱ्यांना मदत केवळ मुख्यमंत्री सहायता निधीतूनच दिली जात नाही, तर मदत आणि पुनर्वसन विभागासह विविध खात्यांमार्फतही मोठ्या प्रमाणात मदत दिली जाते. आतापर्यंत विशेष पॅकेजमधून १४ हजार कोटींहून अधिक रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली असून, ही प्रक्रिया सुरूच आहे, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.काय म्हणाले अंबादास दानवे?दरम्यान, अंबादास दानवे यांनी आरोप केला की, “देवेंद्र फडणवीस हे दानशूर राज्याचे कंजूष प्रमुख ठरले आहेत. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी लोकांनी मुख्यमंत्री सहायता निधीत ऑक्टोबर महिन्यात अब्जावधी रुपये पाठवले. पण राज्याच्या प्रमुखांनी खर्च केले मात्र ७५ हजार रुपये. हा पैसा अडचणीतील लोकांना मदत देण्यासाठी आहे. सरकारला बहुदा हा त्यांच्या उद्योजक मित्रांनी दिलेला इलेक्शन फंड वाटतो आहे का?”
बंगलोर: मायक्रोसॉफ्टने आपल्या ऐतिहासिक १७.५ अब्ज डॉलर गुंतवणूक भारतात एआय व क्लाऊड तंत्रज्ञान सुविधा विकसित करण्यासाठी जाहीर केल्यानंतर आता मायक्रोसॉफ्टकडून कॉग्निझंट, इन्फोसिस, टाटा, विप्रो या भारतातील दिग्गज आयटी कंपन्यांशी हातमिळवणी करण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार आता मायक्रोसॉफ्ट भारतात आपल्या कंपनीचे प्रत्येकी ५०००० एजेंटिक एआय लायसन्स संबंधित कंपन्याना देणार असून एकूण २ लाखांहून अधिक लायसन्स कंपनी भारतात लागू करणार आहे.या माध्यमातून कंपनी मायक्रोसॉफ्ट ३६५ कोपायलट तैनात करतील यातील भागीदारी व सहकार्यामुळे उद्योगांमध्ये एआय आधारे चालणारे विविध उपक्रम चालवताना उत्पादकता, कार्यक्षमता आणि सुलभता वाढवता येणार आहे असे कंपनीने आपल्या म्हटले आहे. तांत्रिकदृष्ट्या कोर ऑपरेशन्समध्ये एआयचा समावेश करून या संस्था फ्रंटियर फर्म्स बनत आहेत केवळ एआय स्वीकारत नाहीत तर डिलिव्हरी, विक्री, वित्त, एचआर आणि ग्राहक सहभाग यासारख्या कार्यांमध्ये ही तंत्रज्ञान प्रणाली सामील होते. ऑपरेशन्सच्या केंद्रस्थानी एआय असल्याने, या कंपन्या उत्पादकता, नवोपक्रम आणि एंटरप्राइझ परिवर्तनासाठी नवीन बेंचमार्क स्थापित करत आहेत असेही कंपनीने करार घोषित करताना म्हटले आहे.भागीदारीतील महत्वाचे मुद्दे -एंटरप्राइझ-स्केल जनरेटिव्ह एआय, लाखो लोकांसाठी व्यवसाय ऑपरेशन्स आणि कर्मचाऱ्यांच्या अनुभवांमध्ये परिवर्तन आणणारजगातील सर्वात मोठ्या कोपायलट पैकी एक असलेल्या, इन्फोसिस एआयला दैनंदिन कार्यप्रवाहात मदत त्यामुळे ज्यामुळे योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढते आणि क्लायंट डिलिव्हरी वाढते.गिटहब कोपायलट टीममध्ये कोडिंगचे लोकशाहीकरण करत आहे, जलद विकास आणि नावीन्यपूर्णता सक्षम करत आहे, टीसीएस २८१०००+ सहभागींचा समावेश असलेल्या जागतिक हॅकाथॉनचे आयोजन करत आहे.विप्रोने मायक्रोसॉफ्ट क्लाउड आणि गिटहब तंत्रज्ञानात २५०००+ कर्मचाऱ्यांना अपस्किल केले.
ई-सिगारेटवरून संसदेत गोंधळ! अनुराग ठाकूर यांचे तृणमूल काँग्रेसच्या खासदारावर आरोप ; सभागृहात गोंधळ
Anurag Thakur on smoking allegation। भाजप खासदार अनुराग ठाकूर यांनी सभागृहात ई-सिगारेट ओढण्याचा गंभीर मुद्दा उपस्थित केल्याने लोकसभेचे हिवाळी अधिवेशन गदारोळात गेले. त्यांनी कोणत्याही खासदाराचे नाव घेतले नाही, परंतु या मुद्द्याचा संबंध तृणमूल काँग्रेसच्या खासदाराशी असल्याचे स्पष्ट झाले. संसदीय कामकाजादरम्यान अशा प्रकारच्या कृती केवळ नियमांच्या विरुद्ध नसून सभागृहाच्या शिष्टाचारालाही धक्का पोहोचवतात, असे अनुराग ठाकूर यांनी […] The post ई-सिगारेटवरून संसदेत गोंधळ! अनुराग ठाकूर यांचे तृणमूल काँग्रेसच्या खासदारावर आरोप ; सभागृहात गोंधळ appeared first on Dainik Prabhat .
महाराष्ट्र आणि गुजरात सीमेवरील वाद पुन्हा समोर; पालघरच्या तलासरीत गुजरातच्या घुसखोरीचा दावा
Maharashtra-Gujarat Border| महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांच्या सीमेवरील वाद वाढण्याची शक्यता आहे. पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यात वेवजी गावात गुजरातची घुसखोरी सुरू असल्याचा दावा गावकऱ्यांनी केला आहे. मागील २५-३० वर्षापासून याठिकाणी सीमावाद असून वेवजी ग्रामस्थांनी केलेल्या आरोपामुळे महाराष्ट्र गुजरात सीमावाद पुन्हा उफाळून आला आहे. महाराष्ट्र राज्यातील तलासरी तालुक्यातील वेवजी व गुजरात राज्यातील उंबरगाव तालुक्यातील सोलसुंबा येथील हद्दीच्या […] The post महाराष्ट्र आणि गुजरात सीमेवरील वाद पुन्हा समोर; पालघरच्या तलासरीत गुजरातच्या घुसखोरीचा दावा appeared first on Dainik Prabhat .
Pune District : सरपंच पदावरून हकालपट्टी: कर्तव्यपालनात कसूर केल्याने विभागीय आयुक्तांचा निर्णय
भोर : कर्तव्य पालनात जाणीवपूर्वक कसूर व हलगर्जीपणा केल्याबद्दल विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी ग्रामपंचायत संगमनेर (ता. भोर, जि. पुणे) च्या सरपंच श्रीमती सायली महेंद्र साळुंके यांना त्यांच्या उर्वरित कालावधीसाठी सरपंच व सदस्य पदावरून काढून टाकण्याचा आदेश दिला आहे. हा आदेश ८ डिसेंबर २०२५ रोजी देण्यात आला. संगमनेर येथील रहिवासी हनुमंत राजाराम गायकवाड आणि […] The post Pune District : सरपंच पदावरून हकालपट्टी: कर्तव्यपालनात कसूर केल्याने विभागीय आयुक्तांचा निर्णय appeared first on Dainik Prabhat .
Sarah Arjuna : ‘धुरंधर’ चित्रपट प्रदर्शित होऊन आठवडा झाला आहे. मात्र, अजूनही चित्रपटाची क्रेझ कमी झालेली नाही. प्रेक्षक चित्रपटाचे भरभरून कौतुक करीत असून, बॅाक्स अॅाफिसवर चांगली कमाई चित्रपट करत आहे. चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षक सोशल मीडियावर व्यक्त होत आहेत. पोस्ट लिहून कलाकार मंडळी देखील चित्रपटाविषयी भरभरून बोलताना दिसत आहेत. आता धुरंधरमधील अभिनेत्री सारा अर्जुनने चित्रपटाच्या दिग्दर्शकासाठी […] The post ‘धुरंधर’च्या अभिनेत्रीकडून दिग्दर्शकाचं तोंडभरून कौतुक; आदित्य धरनही दिला खास रिप्लाय, सारा अर्जुनची पोस्ट चर्चेत! appeared first on Dainik Prabhat .
Myanmar Civil War। म्यानमारमध्ये सध्या गृहयुद्धाने कहर केला आहे. १० डिसेंबरच्या रात्री, राखीन राज्यातील एका रुग्णालयात हवाई हल्ला झाला. ज्यामध्ये ३० जण ठार झाले असून सुमारे ७० जण जखमी झाले असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, बंडखोर गट अरकान आर्मीचे सैनिक रुग्णालयात उपचार घेत होते किंवा लपून बसले होते असे म्हटले जात होते. म्यानमारच्या लष्कराने […] The post म्यानमारमध्ये गृहयुद्धाचा कहर! रुग्णालयावरील हवाई हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू ; जगाचे ‘या’ देशाकडे लक्ष का आहे ? appeared first on Dainik Prabhat .
धनंजय बोडकेनाशिकमध्ये १९८० सालापासून दर १२ वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा भरतो. त्याला युनेस्कोच्या जागतिक वारशाचा दर्जा लाभला आहे. त्या धर्तीवर केंद्र सरकारच्या पर्यटन विभागाने शहराचा आयकॉनिक स्थळात समावेश केला आहे. त्यामुळे त्या दृष्टीने नाशिक शहरात अनेक विकासकामांना वेग आला आहे. २०२७ साली नाशिकमध्ये भरणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी अंदाजे पाच लाख साधू- महंत येण्याची शक्यता आहे.जीडीपीच्या निकषावर भारतातील अव्वल १४ शहरांमध्ये नाशिकचे नाव अभिमानाने घेतले जाते. विकसनशील क्षमता, हवामान, औद्योगिक व पर्यटन क्षेत्रातील प्रगती यामुळे नाशिक आज देशाच्या आर्थिक नकाशावर आपली स्वतंत्र ओळख निर्माण करत आहे. येत्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने या शहराचा चेहरा–मोहरा अधिक वेगाने बदलणार आहे. या महत्त्वाच्या धार्मिक सोहळ्यामुळे शहरात अनेक मूलभूत सुविधा उभारल्या जाणार आहेत. यात प्रमुख्याने रिंग रोड, त्र्यंबक दर्शन पथ, रामकाल पथ, गोदाकाठी अद्ययावत सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प (एसटीपी) यांसारख्या विकासकामांचा समावेश आहे. कुंभमेळ्यात नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये एकूण २५ हजार कोटींची कामे प्रस्तावित आहेत. प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक–त्र्यंबकेश्वर या चार ठिकाणी दर १२ वर्षांनी कुंभमेळा भरतो. प्रत्येक कुंभमेळ्याच्या काळात त्या त्या शहराचा सर्वांगीण विकास होतो, ही परंपरा पाहायला मिळते. काही महिन्यांपूर्वी झालेल्या प्रयागराज कुंभमेळ्याचे उदाहरण घ्यायचे झाले, तर तेथील अर्थव्यवस्था लाखो भाविकांच्या आगमनामुळे प्रचंड गतीमान झाली. पर्यटन, हॉटेल, परिवहन या सर्व क्षेत्रांमध्ये विकासाची लाट उसळली. यासोबतच पायाभूत सुविधा उभारण्यावरही मोठा खर्च करण्यात आला. याच धर्तीवर आता नाशिक व त्र्यंबकेश्वर या दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू होणार आहेत.तपोवन परिसरात काही विदेशी (परकीय) झाडे तोडण्याच्या निर्णयाविरोधात मागील काही आठवड्यांपासून पंचवटीमध्ये राज्यभरातील पर्यावरणप्रेमी आंदोलन करत आहेत. पर्यावरण संवर्धन हा नक्कीच महत्त्वाचा मुद्दा आहे; परंतु या आंदोलनातून खऱ्या वृक्षसंवर्धनापेक्षा राजकीय प्रेम अधिक प्रकर्षाने दिसून आले आहे, असे चित्र जाणवते. कारण विरोध केवळ झाडतोडीपुरता नसून, निर्णय कुंभमेळा मंत्र्यांनी घेतल्यामुळे विरोधी पक्ष व संबंधित संघटनांकडून राजकीय टीका अधिक केल्या जात असल्याचे दिसत आहे. आंदोलन लोकशाहीचा हक्क असून पर्यावरणाचे रक्षण महत्त्वाचेच आहे; मात्र विकासकामांवर थेट परिणाम होईल असे आंदोलन शहराच्या भविष्यास बाधक ठरू शकते. अधिकारी निर्णय घेताना असुरक्षित राहतील, विकासाची गती मंदावेल असा धोका व्यक्त केला जात आहे. नाशिकच्या प्रगतीला गालबोट लागू नये, ही सर्व नाशिककरांचीच अपेक्षा आहे. त्यामुळे या प्रश्नावर समोपचाराने मार्ग काढणे आवश्यक आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे ७ ते ८ हजार कोटी रुपयांची रिंग रोड उभारली जाणार आहे. हे प्रकल्प केवळ वाहतुकीसाठीच नाही तर शहराच्या दीर्घकालीन प्रगतीसाठीही मोठेपाऊल आहे.रिंग रोड पूर्ण झाल्यानंतर पुढील २५–३० वर्षांची वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर सुटण्याची शक्यता आहे. यातील काही जणांना विलंब जरी झाला, परंतु ते मंजूर असल्याने सिंहस्थानंतर देखील पूर्ण होणार आहे. विकासकामांमुळे नाशिकच्या औद्योगिक विकासाला चालना मिळेल, पर्यटन क्षेत्रात गुंतवणूक वाढेल, नवीन रोजगार निर्मिती होईल, शहरातील प्रदूषणात घट होईल, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिक व त्र्यंबकेश्वर केवळ धार्मिक केंद्र म्हणून नव्हे तर सुव्यवस्थित, आधुनिक आणि प्रगत शहर म्हणून विकसित होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू करत आहेत. हा बदल केवळ शासनाचा नव्हे, तर सर्व नाशिककरांचा सामूहिक सहभागाने पूर्ण होणारा विकास आहे.या संपूर्ण पार्श्वभूमीवर मुंबई-आग्रा महामार्ग (एनएच-३) अगदी दोन कुंभमेळ्यांआधी नाशिकच्या बाहेर होता, पण अलीकडच्या पंधरा-वीस वर्षांत तो शहरातूनच जातोय. नाशिकचा प्रसिद्ध १७ किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल याच परिसरात आहे. द्वारका चौकातून कन्नमवार पूल ओलांडल्यावर उजवीकडे अनेक मंदिरं-मठांचे कळस दिसतात. तेच प्रसिद्ध तपोवन. या परिसरातच कपिला आणि गोदावरीचा संगम आहे. ज्याच पाणी सांडपाण्याचे पाइप सोडल्यानं प्रदूषित झालं आहे. २०००च्या आसपास या परिसरात मोजून तीन-चार इमारती, शेतकऱ्यांची घरं आणि एक-दोन मठ-महंतांचे आश्रम होते. २००३च्या कुंभमेळ्याच्या वेळी इथे रस्त्यांपासून अनेक पायाभूत सोयी-सुविधा उभारल्या गेल्या. २०१५च्या कुंभमेळ्यात साधुग्राम ३५० एकरवर होतं आणि २.५ लाख साधूंसाठी ते पुरेसं होतं. नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गाच्या दोन्ही बाजूंना, मुख्य तपोवनाकडे जाताना राहुट्या उभारण्यात आल्या होत्या. आता २०२७ च्या कुंभमेळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नाशिकच्या सर्व विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांची मुंबईत बैठक झाली. यावेळी नाशिक विभागीय अधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी ७ हजार ७६७ कोटी रुपयांच्या आराखड्याचं सादरीकरण केलं. या सादरीकरणात, साधूंची संध्या गेल्या वेळपेक्षा चार पटींनी वाढणार असल्याने साधुग्रामसाठी अधिक जागा लागणार असल्याचं स्पष्ट झालं.कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तपोवनात साधुग्रामसाठी ३५० एकरपेक्षा जास्त जागा देण्यास जागा मालकांचा विरोध आहे; परंतु महापालिकेने ५० टक्के टीडीआर व ५० टक्के रोख स्वरूपात मोबदला देण्याचा प्रस्ताव शेतकऱ्यांनी फेटाळला आहे. ज्या भागात अधिक रेडिरेकनरचे दर आहेत, त्यानुसारच संपूर्ण मोबदला रोख स्वरूपातच देण्यात यावा, अशी शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली. तपोवनात साधुग्रामसाठी ३५० एकरवर आरक्षण टाकण्यात आले आहे. त्यातील ९७ एकर जागा महापालिकेने ताब्यात घेतली आहे. उर्वरित जागा मोबदला देऊन ताब्यात घेण्यासाठी महापालिकेने सुमारे २८० स्थानिक शेतकऱ्यांना नोटीस पाठवल्या. त्या अानुषंगाने महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभागृहात शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी झालेल्या सुनावणीत शेतकऱ्यांचे समाधान झाले नाही. त्यामुळे याबाबत पुढील काही दिवसांत तोडगा निघेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
युएस आयटी कंपनी विकत घेतल्यानंतरही टीसीएस शेअर १% पातळीवर कोसळला
मोहित सोमण: टीसीएसने युएसमधील मध्यम आकाराची आयटी कंपनी कोस्टल क्लाऊड लिमिटेड कंपनीचे ७०० दशलक्ष डॉलर्सला अधिग्रहण केले आहे. तरीही कंपनीच्या शेअर्समध्ये १% पर्यंत घसरण झाली आहे. सकाळपासून कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी व मंदी या दोन स्तरात स्थित्यंतर होत असताना एक्सचेंज फायलिंगमध्ये अधिग्रहणाविषयी स्पष्ट केल्यानंतरही कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे. त्यामुळे कंपनीचा शेअर १२.१५ वाजता ०.५६% घसरत ३१८७.४० रूपये प्रति शेअरवर व्यवहार करत आहे. सुरूवातीच्या कलात शेअर्समध्ये ०.१० ते ०.२०% पातळीवर वाढ झाली होती मात्र अस्थिरतेच्या कारणांमुळे कंपनीच्या शेअरला चांगल्या बातमीनंतरही घसरण पहावी लागत आहे. झालेल्या डीलमधील माहितीनुसार, टीसीएसने अस्तित्वात असलेल्या व थकलेल्या देयकासह ७०० दशलक्ष डॉलर्सला या कोस्टल क्लाऊड कंपनीचे अधिग्रहण केले आहे.उपलब्ध माहितीनुसार, टीसीएस कंपनीच्या युएसमधील उपकंपनी लिस्ट एंगेज मिडको (ListEngage MidCo) कंपनीच्या मार्फत हा करार केला गेला आहे. कंपनीने याबद्दलची माहिती एक्सचेंजला कळवली असून अंतिम मोहोर नियामकांकडून मिळणार आहे. उपलब्ध रिपोर्टनुसार कोस्टल क्लाऊड कंपनीने १३२ दशलक्ष डॉलर्सचा महसूल मिळवला असून सप्टेंबर २०२५ पर्यंत १४१ दशलक्ष डॉलर्सचा महसूल मिळवला आहे. उपलब्ध माहितीनुसार, टीसीएस २००४ साली सूचीबद्ध झाली तेव्हापासून घेतलेल्या मोठ्या निर्णयापैकी एक निर्णय म्हणून ओळखला जातो. यापूर्वी ऑक्टोबर महिन्यात टीसीएसने सध्याची उपकंपनी लिस्ट एंगेज मिडको कंपनी ७२.८ दशलक्ष डॉलर्सला खरेदी केली होती.२०१२ मध्ये स्थापन झालेली आणि फ्लोरिडा युएस मधील कंपनी कोस्टल क्लाउड ही जागतिक स्तरावरील मोठ्या 'प्युअर-प्ले' सेल्सफोर्स भागीदारांपैकी एक समजली जाते. ही कंपनी ४०० हून अधिक ग्राहकांना सेवा देते.क्लाउड, सेल्स क्लाउड, मार्केटिंग क्लाउड, रेव्हेन्यू आणि सीपीक्यू क्लाउड आणि कॉमर्स क्लाउडसह सेल्सफोर्स इकोसिस्टममधील सल्ला, अंमलबजावणी आणि व्यवस्थापित सेवांमध्ये या आयटी संबंधित उत्पादनात कंपनी विशेषज्ञ आहे. टीसीएस शेअर गेल्या ५ दिवसात १.७३% घसरला असला तरी महिन्यात कंपनीच्या शेअर्समध्ये ४.५९% वाढ झाली आहे. वर्षभरात कंपनीच्या शेअर्समध्ये २२.५१% घसरण झाली आहे.
दहा दिवस झाले, तरी देशात हवाई प्रवास क्षेत्रात झालेला घोळ संपायची चिन्हं दिसत नाहीत. 'आता निदान पंधरा दिवसांत तरी हा घोळ निस्तरा' असं काकुळतीने सांगण्याची वेळ केंद्र सरकारवरच आली आहे! 'इंडिगो' ही आज देशातील अग्रगण्य विमान कंपनी आहे. देशाच्या विमान वाहतूक क्षेत्राचा ६५ टक्के वाटा या कंपनीकडे आहे. टाटांकडे २७ टक्के वाटा आहे. उरलेल्या टक्क्यात अन्य तीन-चार कंपन्या आहेत. 'इंडिगो'ने आपल्या व्यवहार कुशलतेने हवाई वाहतूक क्षेत्रावर मक्तेदारी मिळवली हे ठीक; पण एवढं महत्त्वाचं स्थान मिळाल्यावर त्याबरोबर काही कर्तव्य आणि जबाबदाऱ्याही येतात याची जाणीव त्या कंपनीला नाही. जेव्हा देशाच्या एखाद्या क्षेत्राच्या ६५ टक्के वाट्यावर आपण अधिराज्य गाजवतो, तेव्हा एका अर्थाने देशातल्या त्या क्षेत्राची सर्वाधिक जबाबदारी आपल्या खांद्यावर आलेली असते; कर्तव्यात चुकलो, तर त्या देशाची प्रतिमा खराब होतेच. पण, ज्यांनी आपल्याला मुक्त संधी आणि प्रोत्साहन दिलं, त्यांनाही आपण जनतेसमोर उघडं पाडतो याचा विसर 'इंडिगो'च्या व्यवस्थापनाला पडलेला दिसतो. अनेक क्षेत्र सरकारने खासगी उद्योगांना मुक्त करून दिली असून त्यांचे व्यवहार हे आता पूर्णपणे 'बाजारा'वर; म्हणजेच स्पर्धेवर सोडून दिले आहेत. खासगी उद्योगांचं सेवा व्यवस्थापन, वित्त व्यवस्थापन, कर्मचाऱ्यांबाबतचं धोरण यात सरकार फार हस्तक्षेप करू शकत नाही. त्यामुळेच 'इंडिगो'ने लाखो प्रवाशांचं जगणं वेठीला धरूनही सरकार त्यांच्यावर अद्याप काही कारवाई करू शकलेलं नाही. वाहतूक क्षेत्राची नियामक संस्था म्हणून देशात 'नागरी विमान वाहतूक महासंचालनालय' आहे. पण, हे महासंचालनालयच बेसावध राहिल्याने हा अभूतपूर्व गोंधळ निर्माण झाला असून आता कारवाई करायची तर आधी कोणावर करावी, असा प्रश्न सरकारला पडला आहे. 'इंडिगो'ने बेजबाबदारपणा केला आहेच. पण, विमान वाहतूक क्षेत्रातल्या कंपन्या आपल्या जबाबदाऱ्या नीट पार पाडताहेत की नाही, याची खातरजमा करण्यासाठी जी नियामक यंत्रणा आहे, तिनेच डोळेझाक केली असल्याने सरकारची पंचाईत झाली आहे. झालेला घोळ लवकर निस्तरला नाही आणि त्यातून राष्ट्रीय संपत्तीचं नुकसान झालं, या आरोपाखाली पंधरा दिवसांनंतर सरकारला कदाचित कारवाई करता येईल!कोणतंही वाहन संकेत आणि नियम न पाळता चालवणं धोक्याचंच असतं. विमान विशेष धोक्याचं. कारण, ते अधांतरी तीस-पस्तीस हजार फुटांवरून उडत असतं. अगदी शे-दोनशे फुटांवर त्यात काही अडचण, संकट आलं तरी मदत करता येणं अशक्य असतं. त्यामुळे, विमानाची देखभाल नेहमीच खूप काटेकोरपणे केली जाते. वैमानिकाचं प्रशिक्षण खूप खडतर असतं. त्यांना नियमांचं, मार्गदर्शक सूचनांचं खूप काळजीपूर्वक पालन करावं लागतं. आपली बौद्धिक, मानसिक आणि शारीरिक तंदुरुस्ती सतत सिद्ध करावी लागते. विमान कंपनीसाठी, कंपनीच्या व्यवस्थापनासाठी, वाहतूक व्यवस्थापनासाठी- राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही पातळ्यांवर असंख्य तपशीलवार कडक नियम आहेत. त्यांची छाननी, फेरआखणी सातत्याने होत असते. विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये आता मध्यमवर्गीयांची संख्या वाढली असली, तरी आजही विमान प्रवाशांची प्रतिष्ठा ही अन्य कोणत्याही साधनांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांपेक्षा उच्च श्रेणीतलीच मानली जाते. त्यामुळे, जगभर त्यांची विशेष काळजी घेतली जाते. वैमानिक, हवाई सेवक आणि सेविकांच्या प्रशिक्षणाकडे, त्यांच्या वर्तणुकीकडे, मिळकतीकडे विशेष लक्ष दिलं जातं. भारतात गेल्या पंधरा वर्षांत तीन मोठे विमान अपघात झाले. त्यात शेकडो बळी गेले. यातल्या एका अपघातात 'वैमानिकाचा थकवा' हे कारण पुढे आल्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयात एक याचिका दाखल झाली. त्या याचिकेवर विचार करताना न्यायालयाने महासंचालनालयाला काही निर्देश दिले. त्यावरून वैमानिकांच्या विश्रांतीचे तास आठवड्याला ३६ वरून सलग ४८ केले गेले. रात्रपाळीच्या, दिवसाच्या कामाच्या तासांतही बदल झाले. या सगळ्या गोष्टींची अंमलबजावणी अनिवार्य होती. सरकारचे नवे नियम अमलात आणायचे, तर वैमानिकांची संख्या वाढवावी लागणार, हे उघड होतं. १८ महिन्यांपूर्वीच याबाबतची स्पष्टता येऊनही 'इंडिगो' गेलं दीड वर्ष काहीही न करता तशीच बसून राहिली. सरकारची कुठलीच गोष्ट गंभीरपणे घ्यायची नसते, या गैरसमजाचे ती शिकार झाली. 'सब चल जाता है' या राष्ट्रीय रोगाने तिचा घात केला. त्याची शिक्षा लाखो प्रवाशांना भोगावी लागली. सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं राहावं लागलं.'इंडिगो' पाठोपाठ देशात या क्षेत्रात दुसऱ्या क्रमांकावर 'टाटां'ची 'एअर इंडिया' आहे. त्यांच्याकडे बरीच जुनी विमान असल्याने अनेक जायबंदी आहेत. अनेक विमानं दुरुस्ती-देखभालीसाठी जमिनीवरच उभी असतात. अन्य कंपन्या छोट्या असल्याने त्यांना आहेत त्या वैमानिकांमध्ये विमान सेवा चालवणं शक्य झालं. 'इंडिगो'ला ते शक्य नव्हतं. पण, आपली मक्तेदारी इतकी आहे, की आपलं कोण काय बिघडवणार? देशात गोंधळ उडाला, तर सरकारच अडचणीत येईल. ते आपोआप आपलेच नियम शिथिल करेल, याची खात्री त्यांना होती. झालंही तसंच. देशभर हाहाकार उडूनही या कंपनीच्या व्यवस्थापनाने सुरुवातीचे दोन-तीन दिवस त्याची अजिबात दखल घेतली नाही. प्रवाशांना ढिम्मपणे उलट उत्तरं देत होते. वर वाढत्या तिकीट दरांचा फायदा उपटण्याचा प्रयत्नही केला. सरकारने कान पकडेपर्यंत कंपनी पूर्ण बेफिकीर होती. आता ते कितीही आश्वासनं देत असले, तरीही त्या मुदतीत त्यांना परिस्थिती नियंत्रणात आणणं शक्य नाही. वैमानकांची भरती ही इतकी सहज प्रक्रिया नसते. सरकारने माघार घेतलीच आहे. यावरून धडा घेऊन सरकारनेच आता आपल्या एकूण हवाई प्रवासी धोरणाचा पुनर्विचार करण्याची गरज आहे. प्रवाशांचे हक्क त्यात केंद्रस्थानी असतील, असं पाहिलं तर या पुढच्या काळात असे घोळ होणार नाहीत आणि ते अपराधी भावाने निस्तरावेही लागणार नाहीत.
भारतीय ऋषी : डॉ. अनुराधा कुलकर्णीयोगेन चित्तस्य पदेन वाचां,मलं शरीरस्य च वैद्यकेन।योऽपाकरोत् तं प्रवरं मुनीनां,पतंजलिं प्रांजलिरानतोऽस्मि।।“चित्तशुद्धीसाठी योगसूत्रे लिहिणाऱ्या, वाणीशुद्धीसाठी पाणिनींच्या व्याकरणशास्त्रावर महाभाष्य लिहिणाऱ्या, शरीरशुद्धीसाठी चरकसंहितेवर संस्करण करणाऱ्या मुनिश्रेष्ठ पतंजलींना प्रणाम” असे भोजराजाने पतंजलींचे वर्णन केले आहे. भोजराजाप्रमाणे चक्रपाणी नावाच्या दुसऱ्या एका विद्वानाने पतंजलीमुनींचे खालीलप्रमाणे वर्णन केले आहे,पातञ्जलमहाभाष्यचरकप्रतिसंस्कृतैः।मनोवाक्कायदोषाणां हन्त्रे ऽहिपतये नमः।।अर्थ : योगसूत्रे, महाभाष्य आणि चरकसंहितेचे प्रतिसंस्करण या तीन कृतींनी अनुक्रमे मन, वाणी आणि देह यांच्या दोषांचा निरास करणाऱ्या पतंजलींना माझा नमस्कार असो. पतंजलींना भगवान शेषाचा अवतार मानतात. गोणिका नावाची एक स्त्री सूर्याला अर्घ्य देत होती. पृथ्वीवर अवतार घेण्यासाठी शेषनाग सूक्ष्म रूपाने तिच्या ओंजळीत पडले. गोणिकेने ओंजळीतले पाणी खाली टाकताच ते बालकरूपाने तिच्यासमोर उभे राहिले. तेव्हा तिने त्यांना आपला पुत्र मानून उचलून घेतले आणि ओंजळीतून पतन पावले म्हणून त्याचे नाव पतंजली ठेवले, अशी त्यांच्या जन्माबद्दल आख्यायिका आहे. पतंजलींनी बाल्यावस्थेतच अध्ययनाला सुरुवात केली. त्यांनी तप करून शिवाला प्रसन्न केले. शिवाने त्यांना पदशास्त्रावर भाष्य लिहिण्यास सांगितले. तेव्हा पतंजलींनी चिदंबरक्षेत्री पाणिनींच्या व्याकरणावरील अष्टाध्यायांवर व कात्यायनाची वार्तिके यांच्यावर विस्तृत भाष्य लिहिले. त्यालाच महाभाष्य म्हणतात. या महाभाष्याची भाषा अतिशय पांडित्यपूर्ण असूनही सहजसुंदर आहे. वाक्शक्ती विश्वव्यवहाराची सर्वप्रमुख आधार आहे. शब्दाच्या स्फोटवाद या सिद्धान्ताचा पाया पतंजलींनी रचला. ज्याच्यापासून अर्थ फुटतो, म्हणजेच अर्थाची प्रतीती होते, तो स्फोट होय. अल्पजीवी असा ध्वनिरूप शब्द ऐकल्याने अर्थाचा बोध होत नसून तो अविनाशी व अविभाज्य अशा वाक् तत्त्वामुळे म्हणजेच स्फोटामुळे होतो, वर्ण हे चिरंतर स्फोटाचा केवळ अविष्कार करतात. अशा रीतीने पतंजलींनी व्याकरणातील सूक्ष्मातिसूक्ष्म रहस्ये या भाष्यात उलगडली असून शब्दाच्या व्यापकतेवर प्रकाश टाकला आहे.वेदव्यासांना ज्याप्रमाणे “भगवान व्यास” असे संबोधिले जाते तसेच पतंजलींचाही उल्लेख करतानाही “भगवान पतंजली’’ असे म्हटले जाते. पतंजलींची योगसूत्रे सुविख्यात आहेत. भारतीय अध्यात्माची जी महत्त्वाची ग्रंथसंपदा आहे, त्यात सांख्य, योग, न्याय, वैशेषिक, पूर्व मीमांसा व उत्तरमीमांसा या सहा दर्शनांवरील सूत्रग्रंथांचाही समावेश होतो. त्यातील योगदर्शनाची सूत्रे पतंजलींनी लिहिली आहेत. आत्म्याचा परमात्म्याशी ज्या मार्गाने योग म्हणजेच संबंध जुळून येतो, त्या उपासनामार्गावर भगवान पतंजली आपल्या योगसूत्रांद्वारे साधकाला व्यवस्थित घेऊन जातात. त्यांनी आपल्या सूत्रांतून सांगितलेली योगाची यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी ही आठ अंगे इतकी अचुक आहेत की, त्यांना पूर्णपणे अनुसरणारा साधक ध्येय, ध्याता, ध्यान या त्रिपुटीला भेदणाऱ्या असंप्रज्ञात समाधीपर्यंत बरोबर जाऊन पोचतो.योगश्चित्तवृत्तिनिरोध :चित्तवृत्तींचा निरोध म्हणजे योग, अशी योगाची अचूक व्याख्या पतंजली करतात. या चित्तवृत्तींचे अतिशय बारीकसारीक, सांगोपांग वर्णन पतंजलींनी केले आहे आणि त्यांचा निरोध करण्यासाठी जी साधने लागतात त्यांचेही सूक्ष्म विवेचन ते करतात. पतंजली वैदिक धर्म तसेच संस्कृत भाषेचे तसेच आर्यावर्ताचे अभिमानी होते. त्यांना मोक्षाइतकेच ऐहिक अभ्युदयाचे महत्त्व वाटत होते. या ऐहिक संपन्नतेसाठीच त्यांनी निरामय शरीर, स्वाधीन मन आणि प्रभुत्व गाजविणारी वाचा यांचा आपल्या अनमोल ग्रंथांद्वारे पुरस्कार केला आणि अखेर कैवल्यप्राप्ती हेच साध्य ते मानतात.पुरुषार्थशून्यानां गुणानां प्रतिप्रसवः कैवल्यं स्वरूपप्रतिष्ठा वा चितिशक्तिरिति ।। योगसूत्रे ४.३४प्रखर योगसाधना करणारा योगी अखेर अशा उन्नत भूमिकेला पोहोचतो की त्याच्यासाठी धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे सर्व पुरुषार्थ कृतार्थ झालेले असतात. त्याला मिळविण्यासारखे काहीही राहत नाही, ज्या आत्मस्वरूपाच्या अनुभूतीसाठी त्याची साधना चालू असते, ते आत्मस्वरूपच तो होतो. हीच पुरुषार्थशून्यता होय. या अवस्थेत सत्त्व, रज, तम या त्रिगुणांचा लय होऊन पुरुष स्वस्वरूपात प्रतिष्ठित होतो, असा सिद्धान्त भगवान पतंजलींनी मांडला आहे.प्रकृतीहून मी पुरुष वेगळा आहे, हा विवेक उत्पन्न होणे हाच मोक्ष, असे सांख्यदर्शनाप्रमाणे योगदर्शनातही मानले आहे आणि सांख्यदर्शनाप्रमाणेच योगदर्शनातही पुरुष म्हणजे आत्मे अनेक मानले आहेत. म्हणून भगवान व्यासांनी योगदर्शनातील त्या अनेकत्वाचे आपल्या उत्तरमीमांसेत खंडन केले आहे. मात्र भगवान पतंजलींनी आखून दिलेल्या अष्टांगयोगाचा सर्वांनीच गौरव केला आहे. कारण योग हे ब्रह्मज्ञानाकडे घेऊन जाणारे महत्त्वाचे साधन आहे.चरकसंहितेचे मूळ नाव आत्रेयसंहिता असे होते. या संहितेचा उपदेशक अत्रिपुत्र पुनर्वसू व ग्रंथकर्ता अग्निवेश आणि प्रतिसंस्कारक चरक हे होत. चरक ही कृष्णयजुर्वेदाची एक शाखा होती. तिच्या अनुयायांनाही चरक म्हणत. हे चरक सामान्यतः आयुर्वेदज्ञ होते. पतंजली याच शाखेचे असल्याने त्यांनाही चरक म्हणत. पतंजली हे आयुर्वेदाचार्य होते. त्यांनी केलेले चरकसंहितेचे पुनर्संस्करण पातंजल वार्तिक या नावाने प्रसिद्ध आहे. पतंजलींना आयुर्वेदाची चांगली माहिती होती, हे त्यांच्या महाभाष्यावरून कळून येते. पतंजलीमुनींना चिकित्सा व रसायनशास्त्राचे आचार्य मानले जाते. रसायनाशास्त्रात त्यांनी अभ्रक, धातुयोग व लोहशास्त्र यांचा परिचय करून दिला. मानवी जीवनाला आखीवरेखीव आकार देऊन आत्मौन्नतीप्रत घेऊन जाणाऱ्या भगवान पतंजलींना शतशः नमन...!anuradha.klkrn@gmil.com
ऋतुराज : ऋतुजा केळकरहेतू शुद्ध असेल,तर कर्म फुले...मन निर्मळ असेल, तर जीवन खुले...द्वेष नसेल, तर प्रेम उमले...भगवंतप्राप्तीचा मार्ग सहज मिळे...पहाटेच्या मंद वाऱ्याबरोबर येणाऱ्या प्राजक्ती गंधात माझ्या बकुळ लेखणीतून हे शब्द स्वामींच्या चरणी झरले आणि अचानक एक असीम शांतता मनात अवतरली. त्या क्षणी जाणवले की, ‘जीवनाचे खरे सौंदर्य बाह्य कृतीत नसून तिच्या मागील हेतूत आहे.’ मनुष्याच्या प्रत्येक कृतीला एक बाह्यरूप असते. ती कृती समाजमान्य असू शकते, आकर्षक असू शकते, कधीकधी भव्यतेने नटलेली असते. लोकांच्या नजरेत ती कृती आदर्श ठरू शकते, तिच्या बाह्य सौंदर्यामुळे लोक तिचे कौतुक करू शकतात. पण त्या कृतीचे खरे मूल्य तिच्या बाह्यरूपात नसून तिच्या मागील हेतूत दडलेले असते. हेतू हा कृतीचा आत्मा आहे. जर हेतू अशुद्ध असेल, स्वार्थी असेल, दुष्ट विचारांनी प्रेरित असेल, तर कृती कितीही सुंदर दिसली तरी ती निकृष्ट ठरते. बाह्य आकर्षणाची लोकांना भुरळ पडू शकते, पण परमेश्वराच्या दृष्टीने अशा कृतीला किंमत नसते. कारण, देव मनातील भाव पाहतो, हेतू ओळखतो.उलट, कृती साधी असली तरी हेतू शुद्ध असेल, तर ती परमेश्वराला प्रिय होते. साध्या कृतीतही जर अंत:करणाची निर्मळता असेल, प्रेम आणि करुणा असेल, तर ती कृती तेजस्वी ठरते. जणू साध्या मातीच्या दिव्यात शुद्ध तेल भरले तर तो दिवा अंधार दूर करतो तसेच, साध्या कृतीत शुद्ध हेतू असेल, तर ती कृती जीवन उजळवते. म्हणूनच बाह्यरूपाकडे पाहून कृतीचे मूल्यमापन करणे चुकीचे आहे. खरे मूल्य हेतूत आहे. हेतू शुद्ध असेल तर कृती परमेश्वराला प्रिय होते, समाजाला प्रेरणा देते आणि जीवनाला तेज देते. हेतू अशुद्ध असेल तर कृती कितीही भव्य असली तरी ती व्यर्थ ठरते. शेतकरी जेव्हा आपल्या शेतात बीज पेरतो, तेव्हा त्याच्या मनात एक आशा असते हे बीज उगवेल, अंकुरेल, वाढेल आणि अखेरीस भरघोस पीक देईल पण, जर बीज निकृष्ट असेल, तर शेतकरी कितीही मेहनत करीत राहिला किंवा त्याने कितीही घाम गाळला तरी, त्याचे श्रम व्यर्थ ठरतात. जमिनीची सुपीकता, पाणी, सूर्यप्रकाश हे सर्व घटक असले तरी बीजाची गुणवत्ता निकृष्ट असेल, तर पीक कधीच सोन्यासारखे चमकू शकत नाही. उलट, बीज शुद्ध असेल तर साध्या जमिनीतही ते अंकुरते, वाढते आणि शेतकऱ्याच्या कष्टांना सुवर्णमूल्य देते.त्याचप्रमाणे दिवा कितीही सुंदर, आकर्षक किंवा कलात्मक असला तरी त्यातले तेल अशुद्ध असेल, तर त्याचा प्रकाश मंदावतो, धुरकट होतो आणि अंधार दूर करण्याऐवजी वातावरण गढूळ करतो पण, तेल जर शुद्ध असेल तर साधा मातीचा दिवा देखील तेजस्वी प्रकाश देतो, अंधार दूर करतो आणि मनाला शांतता देतो. दिव्याचे सौंदर्य त्याच्या बाह्यरूपात नसून त्याच्या अंतर्गत शुद्धतेत आहे. यातून एकच सत्य समोर येते ते म्हणजे कृतीचे खरे सौंदर्य तिच्या बाह्यरूपात नसून तिच्या हेतूत आहे. बीज शुद्ध असेल तर पीक उत्तम येते, तेल शुद्ध असेल, तर प्रकाश तेजस्वी होतो तसेच, हेतू शुद्ध असेल तर कृती उजळते. बाह्य आकर्षण, भव्यता किंवा दिखावा यांना फारसे महत्त्व नसते तर खरे मूल्य हे त्या कृतीच्या मागील अंत:करणात आहे.मनुष्याच्या जीवनातही हेच तत्त्व लागू होते. कृती कितीही मोठी, समाजमान्य किंवा लोकांना भुरळ घालणारी असली तरी तिचा हेतू स्वार्थी, अशुद्ध किंवा दुष्ट असेल तर मग ती कृती निकृष्ट ठरते. उलट, कृती साधी असली तरी हेतू शुद्ध असेल तर ती परमेश्वराला प्रिय होते आणि जीवनाला तेज देते. म्हणूनच हेतूचे पावित्र्य हेच जीवनाचे खरे सौंदर्य आहे.मानवी न्यायालय पुराव्यावर निर्णय देते. पुरावा अपूर्ण असेल तर सत्य दडपले जाते. पण परमेश्वराच्या न्यायालयात पुराव्याची गरज नसते. देव मनातील हेतू ओळखतो आणि त्यावरच निवाडा करतो. म्हणूनच मन शुद्ध ठेवणे हेच खरे धर्म आहे. भक्ती ही केवळ बाह्य आचार नसून अंत:करणाची शुद्धता आहे.जर भक्तीचा हेतू ऐहिक सुखे मिळवणे असे असेल, तर ती भक्ती अपूर्ण ठरते. पण भक्तीचा हेतू भगवंतप्राप्ती असेल म्हणजेच, मुक्तीशिवाय दुसरी इच्छा नसावी, तेव्हाच ती भक्ती शुद्ध व खरी ठरते. भक्ती करताना अंत:करणात द्वेष असता कामा नये. कारण, प्रत्येक जीव हा भगवंताचेच रूप आहे. द्वेष केला तर तो भगवंताचा केला असे ठरते. प्रेम, करुणा आणि पावित्र्य हेच भक्तीचे खरे अलंकार आहेत.जीवनातील प्रेरणा देखील हेतूतच आहे. नावाडी कितीही मोठ्या जहाजात बसला तरी दिशा चुकीची असेल, तर किनाऱ्याला पोहोचत नाही. वाद्य महागडे असले तरी सूर शुद्ध नसतील, तर संगीत निकृष्ट ठरते. तसेच जीवनात कृती कितीही मोठी असली तरी हेतू शुद्ध नसेल तर ती व्यर्थ ठरते. हेतू शुद्ध ठेवणे म्हणजेच जीवनाला योग्य दिशा देणे. मनुष्याच्या जीवनात हेतू हा आत्म्याचा दीप आहे. कृती हा त्याचा प्रकाश आहे. दीप शुद्ध असेल तर प्रकाश तेजस्वी होतो. हेतू शुद्ध असेल तर कृती उजळते. म्हणूनच जीवनाचा खरा आधार हेतूचे पावित्र्य आहे. भक्ती असो वा कर्म, समाजसेवा असो वा साधे दैनंदिन कार्य सर्व कृतींचे मूल्य हेतूत आहे. हेतू शुद्ध असेल तर जीवन फुलते, प्रेम उमलते आणि भगवंतप्राप्ती निश्चित होते.जीवनाचा खरा पाया हेतूत आहे. कृती ही त्याची बाह्य अभिव्यक्ती आहे. हेतू शुद्ध असेल तर साधी कृतीदेखील तेजस्वी ठरते आणि समाजाला प्रेरणा देते. म्हणूनच प्रत्येक कृतीपूर्वी मनाचा आरसा पाहणे आवश्यक आहे. अंत:करण निर्मळ असेल तर जीवन खऱ्या अर्थाने फुलते.मनुष्याच्या कृतीला बाह्यरूप असते, पण तिचे मूल्य हेतूत दडलेले असते. हेतू शुद्ध असेल तर कृती परमेश्वराला प्रिय होते आणि जीवनाला दिशा मिळते. हेतू अशुद्ध असेल तर कृती कितीही भव्य असली तरी ती व्यर्थ ठरते. म्हणूनच जीवनात शुद्ध हेतू हा सर्वात मोठा आधार आहे.मनुष्याच्या जीवनात हेतू हा आत्म्याचा दीप आहे आणि कृती हा त्याचा प्रकाश आहे. दीप शुद्ध असेल तर प्रकाश तेजस्वी होतो. हेतू शुद्ध असेल तर कृती उजळते. भक्ती असो वा कर्म, समाजसेवा असो वा साधे दैनंदिन कार्य-सर्व कृतींचे मूल्य हेतूत आहे. हेतू शुद्ध असेल तर जीवन फुलते, प्रेम उमलते आणि भगवंतप्राप्ती निश्चित होते.
जीवन संगीत : सद्गुरू वामनराव पैहे जग सुखी व्हावे व आपले हिंदुस्थान हे राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे या संकल्पपूर्तीसाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. हे प्रयत्न म्हणजे जीवनविद्येच्या समाजोपयोगी राष्ट्रहीतप्रेरक तत्त्वज्ञानाचा प्रचार व प्रसार ! या ज्ञानाचा जितका अधिक प्रचार व प्रसार होईल, समाज तेवढा अधिक सुखी होईल व राष्ट्र प्रगतीपथावर जाईल. आज माणसाकडे इतके अज्ञान आहे की, माणूस हा एक अज्ञानी प्राणी आहे, असे म्हटले तरी अतिशयोक्ती होणार नाही. आज ही इतके अज्ञान आहे की सावकाराने कशावरही अंगठा घेतला तरी लोक देतात याचा परिणाम पिढ्यांपिढ्या त्या सावकाराच्या घरात गुलामगिरी करावी लागते. अशा अनिष्ट गोष्टी सतत घडत आहेत. याला प्रतिबंध म्हणून हे अज्ञान दूर व्हायला पाहिजे. जीवनविद्या हे अज्ञान दूर करण्याचाच प्रयत्न करते. अज्ञान कशाचे आहे, असे विचारलं तर मी उलट प्रश्न विचारेन, अज्ञान कशाचे नाही? लोकांकडे देवाबद्दल, धर्माबद्दल, संस्कृती, नियती, पाप पुण्य, सुख दुःख याबद्दल अज्ञानच आहे. अगदी जेवायचे कसे याबद्दलही लोकांमध्ये अज्ञान आहे. भोजन ही किती साधी गोष्ट आहे, पण आज नीट भोजन कसे करायचे हे किती लोकांना माहीत आहे? नामस्मरण नामस्मरण म्हणतात, पण नामस्मरण म्हणजे काय? स्मरण करायचे? नामाचे स्मरण करायचे की देवाचे स्मरण करायचे की इतर कोणाचे स्मरण करायचे? असे अनेक प्रश्न निर्माण होतात. शरीराबद्दल किती ज्ञान आहे? तिथेदेखील सखोल ज्ञान नाहीच, पण वरवरचे ही ज्ञान नाही. मनाबद्दल किती लोकांना ज्ञान आहे. मन आहे हे ही लोकांना ठाऊक नाही. सुशिक्षित असो किंवा अशिक्षित, तुम्ही कुणालाही विचारा मन म्हणजे काय? तर ते त्यांना नीट सांगता येणार नाही. आपण मनाचा उल्लेख करतो, आज माझ्या मनात नाही, आज माझा मूड नाही, मी मनात आणेन तर तसे करेन, असा आपण आपल्या मनाचा उल्लेख करतो पण त्याबद्दल आपल्याला काहीच माहिती नाही. प्राण किती महत्वाचा आहे, पण या प्राणाबद्दल काय माहित आहे. आपल्याला काहीही माहित नाही. लोक सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत विचार करीत असतात पण विचारांबद्दल किती लोकांना माहित आहे. चांगले विचार केले की चांगले होते व वाईट विचार केले की वाईट होते हे किती लोकांना ठाऊक आहे. म्हणजे अज्ञान किती आहे. अंधश्रद्धा येते कुठून? अज्ञानातून ! अविचार येतेय कुठून? अज्ञानातून. असमाधान येते कुठून? अज्ञानातून. असुया येते कुठून? अज्ञानातून. अहंकार येतो कुठून? अज्ञानातून. म्हणजे अज्ञानाच्या पोटी काय आहे, याची कल्पना केली तर या अज्ञानाच्या पोटात ब्रह्मांडे भरलेली आहेत. अनंत कोटी ब्रह्मांडे या अज्ञानाच्या पोटात आहेत. म्हणून राष्ट्रप्रगतीसाठी, समाजहितासाठी, समाजातील सर्व घटकांचे भले होण्यासाठी हा अज्ञानाचा पडदा दूर होऊन, ज्ञानाचा प्रकाश सर्वदूर पसरायलाच हवा आणि यासाठीच जीवनविद्या मिशन कटिबद्ध व कार्यरत आहे.
Jaya Bachchan Vs Shatrughan Sinha | ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन अनेकदा आपल्या स्पष्ट वक्तव्यामुळे चर्चेत असतात. कायम त्या पापाराझींवर संतापल्याचे पाहायला मिळाले आहे. ज्याचे व्हिडिओ सोशल मिडियावरही व्हायरल झाले आहेत. जया बच्चन यांनी काही दिवसांपूर्वी पापाराझी यांच्या कपड्यांवर मोठं वक्तव्य केलं होतं. ज्यानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. यानंतर अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी […] The post “तुम्ही सगळे चांगले दिसता, चांगली पँट देखील घालता”; जया बच्चन ‘त्या’ विधानावरुन शत्रुघ्न सिन्हांचा टोला appeared first on Dainik Prabhat .

24 C