घड्याळी तासिका तत्त्वावरील शिक्षकांच्या पुनर्नियुक्तीची मागणी
महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या अध्यक्षांचे पालिका प्रशासनाकडे निवेदननवी मुंबई : मानवतावादी दृष्टिकोन ठेवून महापालिका शाळेमध्ये काम करणाऱ्या घड्याळी तासिका तत्वावरील माध्यमिक व प्राथमिक शिक्षकांच्या पुनर्नियुक्तीचे आदेश देण्याची मागणी महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे अध्यक्ष रविंद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त कैलाश शिंदे, शिक्षण विभागाचे अतिरिक्त आयुक्त, शिक्षण विभागाचे उपायुक्त यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.महापालिका प्रशासनाच्या माध्यमिक शाळांना २०२३ साली शिक्षकांची कमतरता भासल्यानंतर पालिकेचे तत्कालिन आयुक्त यांनी शिक्षकांची जाहिरात देऊन शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी शिक्षकांची नवीन भरती केली. या शिक्षकांना महानगरपालिकेने शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी पुनर्नियुक्तीचे आदेश दिले होते.सदर शिक्षकांनी सलग दोन वर्ष महापालिका शाळेमध्ये सेवा केलेली आहे. या कालावधीत वाढत्या महागाईच्या काळात कमी वेतनामध्ये त्यांनी प्रामाणिकपणे काम केले आहे. शासकीय सुट्टी, साप्ताहिक सुट्टी अशा छोट्या आणि गणपती सुट्टी, दिवाळी सुट्टी व उन्हाळी सुट्टी या सर्व सुट्टयांमध्ये सदर शिक्षकांनी विनावेतन आपल्या कुटुंबाला व गरीब आई-वडिलांना मुंबईसारख्या शहरात सांभाळायचे काम केले आहे. या शिक्षकांना महापालिकेने दिवाळीसाठीचे सानूग्रह अनुदानही दिलेले नाही.बेरोजगारीचे भयंकर वास्तव सद्य:स्थितीत सर्वत्र आहे. अशा अवस्थेत स्वत:च्या गरीब आई-वडील व कुटुंबांना सांभाळण्यासाठी सदर जाहिरातीने भरलेले गुणवत्ताधारक शिक्षकांना येणाऱ्या शैक्षणिक वर्षांसाठी पुनर्नियुक्ती देण्यासाठी महापालिकेने स्वत:हून पुढाकार घेणे गरजेचे आहे. महापालिका प्रशासनाला शिक्षकांची गरज आहे.या शिक्षकांना महापालिका शाळेत शिकविण्याचा अनुभव आहे. महापालिका शाळा सुरु होवून काही दिवस उलटले आहेत. महापालिका शाळेत आधीच शिक्षकांची कमतरता आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणात अडचणी येऊ नयेत म्हणून पालिका प्रशासनाने तातडीने निर्णय घेणे आवश्यक आहे. हे शिक्षक गावावरुन आलेले आहेत. भाड्याच्या घरात वास्तव्य करत आहेत. त्यांना नोकरीची व महापालिकेला शिक्षकांची गरज आहे.तासिका शिक्षकांवर अन्याय होऊ नये ही आमची मागणी आहे. महापालिकेने मानवतावादी दृष्टीकोन ठेवून घड्याळी तासिका तत्वावरील माध्यमिक शिक्षकांना पुनर्नियुक्तीचे आदेश देण्याची रविंद्र सावंत यांनी महापालिका प्रशासनाकडे मागणी केली आहे.
सध्या झी मराठीवर एका ट्रेलर ने धुमाकूळ घातला आहे आणि तो ट्रेलर म्हणजे तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे यांची नवीन मालिका 'वीण दोघांतली तुटेना'. काही दिवसांपूर्वी सुबोध भावे या अभिनेत्याने 'होणार सून ती ह्या घरची' तर तेजश्री प्रधानने 'तुला पाहते रे' असं सोशल मीडियावर पोस्ट करत प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली होती.झी मराठीवर आता काही नवी मालिका येणार आणि त्यात आपले दोन्ही आवडते कलाकार दिसणार यामुळे प्रेक्षकांना भलताच आनंद झाला होता. सोशल मीडियाद्वारे त्यांच्या चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव केला जात होता. खूप दिवसांनी आपल्या आवडत्या कलाकारांना छोट्या पडद्यावर रोज पाहायला मिळणार म्हणून प्रेक्षक भलतेच खुश झाल्याच दिसत होत.https://prahaar.in/2025/06/24/kartiki-gaikwad-is-performing-her-mothers-duty-while-singing-shared-a-video-with-her-son/#google_vignetteमालिकेच्या प्रोमो विषयी सांगायचं झाल्यास यात सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान एका कॅफे मध्ये बसले आहे. त्यांची नाव अनुक्रमे समर आणि स्वानंदी अशी आहेत. यामध्ये सुबोध भावे एका जेंटलमनच्या पोशाखात सुटाबुटात असून त्याच वागणं अतिशय शिष्ट आहे आणि समोर असणारी तेजश्री प्रधान एक जबाबदार स्त्रीच्या भूमिकेत दिसते. या प्रोमो मध्ये दोघंही एकमेकांसोबत त्यांच्या लग्नाची बोलणी करायला येतात परंतु समरने सगळ आधीच ठरवल आहे हे जेव्हा स्वानंदीच्या लक्षात येत तेव्हा ती तिथून उठते आणि बाहेरच्या दिशेने निघते. तेव्हा समर तिला थांबवतो.आपल्या लग्नाबद्दल आपण काही बोललोच नाही अस म्हणतो.परंतु त्यावर स्वानंदी आपल्या लग्नाबद्दल काय बोलायच ते तर ठरलेलंच आहे अस म्हणत तथून निघून जाते. त्यानंतर दोघंही लग्न मंडपात एकमेकांच्या समोर येतात आणि एकमेकांना अंगठ्या घालतात.परंतु अंगठी घालण्याआधी स्वानंदी समरला हे लग्न ती तिच्या भावसाठी करते अस म्हणते; तर समर स्वानंदीला उद्देशून हे लग्न तो त्याच्या बहिणीसाठी करतो अस म्हणतो त्यानंतर मालिकेच नाव एका विशिष्ट लयीत वाजत. ते ऐकून आपल्याला झी मराठीच्या एक मालिकेची आठवण होते कारण 'खुलता कळी खुलेना' या मालिकेच्या टायटल ट्रॅक मधली ही ओळ आहे. नियतीने जोडी जमवली की ठरवून लग्न होत आणि न जुळवता प्रेम या मालिकेच्या टॅगलाईनवर हा प्रोमो संपतो.या मालिकेविषयी अनेक प्रतिक्रिया आता प्रेक्षकांकडून व्यक्त होताना दिसत आहेत. त्यामध्ये काहीजण ही मालिका म्हणजे 'बडे अच्छे लगते है' या हिंदी मालिकेचा रिमेक आहे असा अंदाज वर्तवत आहेत. यापूर्वी तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे या कलाकार जोडीला आपण 'Hashtag तदैव लग्नम्' या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पाहिल होत. आता ही जोडी पुनः एक नव्या प्रेमकहाणी सोबत सोशल मिडियावर प्रसिद्ध ठरणार का याकडे प्रेक्षकांच लक्ष लागून राहील आहे.
सौरव गांगुलीच्या बायोपिकमध्ये दिसणार राजकुमार राव
Rajkummar Rao | भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांची ‘दादा’ म्हणून ओळख आहे. मागील काही दिवसांपासून त्याच्या बायोपिकची चर्चा सुरू आहे. आता या चित्रपटाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. यात सौरव गांगुलीची भूमिका राजकुमार राव साकारणार असल्याचे निश्चित झाले आहे. राजकुमार राव यांनी केली पुष्टी ‘एनडीटीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत […] The post सौरव गांगुलीच्या बायोपिकमध्ये दिसणार राजकुमार राव appeared first on Dainik Prabhat .
कशी आहे शुभांशू शुक्लाची अॅक्सिओम-४ मोहीम ?
नवी दिल्ली : तब्बल ४१ वर्षांनंतर भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला अंतराळात जाणार आहे. अॅक्सिओम-४ मोहीमेंतर्गत शुभांशू शुक्ला २८ तासांचा प्रवास करुन आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पोहोचणार आहे. शुभांशू शुक्ला आणि त्याचे तीन सहकारी असे चार अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात १४ दिवस राहतील, नेमून दिलेली कामं करतील आणि परत येतील. नियोजनानुसार बुधवार २५ जून रोजी दुपारी बारा वाजून एक मिनिटाने नासाच्या केनेडी स्पेस सेंटरवरून स्पेसएक्सच्या क्रू ड्रॅगन C213 अंतराळयानाद्वारे २८ तासांच्या प्रवासाला रवाना होणार आहेत.अॅक्सिओम-४ मिशनमध्ये भारताचे शुभांशू शुक्ला तसेच पोलंड, हंगेरी आणि अमेरिकेचे अंतराळवीर आहेत. ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला हे १९८४ नंतर अंतराळात जाणारे भारताचे दुसरे राष्ट्रीय अंतराळवीर आहेत. याआधी १९८४ च्या एप्रिल महिन्यात रशियाच्या यानातून भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा अंतराळात गेले होते. यामुळे भारतीयांचे लक्ष अॅक्सिओम-४ मिशनकडे आहे.ताज्या वृत्तानुसार अंतराळवीर यानात बसले आहेत. यानाच्या प्रक्षेपणाची तयारी सुरू आहे. यान २८ तासांचा प्रवास करुन आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचेल. तिथे पोहोचताच यान आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला जोडले जाईल. ही डॉकिंगची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर यानातील अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात प्रवेश करतील.https://prahaar.in/2025/06/25/axiom-4-will-launch-into-space-today/अॅक्सिओम-४ मोहिमेला घेऊन जाणारे ड्रॅगन अंतराळयान गुरुवार, २६ जून रोजी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ४.३० वाजता आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचणार आहे. अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पोहोचल्यानंतर १४ दिवसांत ६० प्रयोग करणार आहे. प्रयोगांद्वारे वैज्ञानिक संशोधन केले जाणार आहे. पृथ्वीपासून कमी अंतरावरील कक्षेतले गुरुत्वाकर्षण या विषयाशी संबंधित संशोधन प्रामुख्याने केले जाणार आहे.शुभांशू शुक्ला हे १९८४ नंतर अंतराळात जाणारे दुसरे भारतीय अंतराळवीर असतील. तसेच ते आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जाणारे पहिले भारतीय अंतराळवीर असतील.युरोपियन स्पेस एजन्सी (ESA) प्रकल्पातील अंतराळवीर स्लावोज उझ्नान्स्की हे १९७८ नंतर अंतराळात जाणारे दुसरे पोलिश अंतराळवीर असतील.टिबोर कापू हे १९८० नंतर अंतराळात जाणारे दुसरे हंगेरियन अंतराळवीर असतील.पेगी व्हिटसन तिच्या दुसऱ्या व्यावसायिक मानवी अंतराळ मोहिमेचे नेतृत्व करणार आहेत. अमेरिकन अंतराळवीराने अंतराळात घालवलेला सर्वाधिक काळ हा तिचा सध्याचा विक्रम आहे.
तिघांना फाशी तर ७०० जणांना अटक ; इराणमध्ये मोसादच्या ‘अंडरकव्हर एजंट्स’विरुद्ध कारवाई
Iran-Israel ceasefire। इराण आणि इस्रायलमध्ये युद्धबंदी झाली असली तरी तणाव कमी झालेला नाही. इराणने आज सकाळी इस्रायलसाठी हेरगिरी आणि हत्येचा कट रचल्याच्या आरोपाखाली तीन जणांना फाशी दिली. एका वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, इराणने जारी केलेल्या निवेदनानुसार, इद्रिस अली, आझाद शोजाई आणि रसूल अहमद रसूल यांनी हत्येसाठी वापरलेली उपकरणे इराणमध्ये आणण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणातील तिन्ही आरोपींविरुद्ध खटला […] The post तिघांना फाशी तर ७०० जणांना अटक ; इराणमध्ये मोसादच्या ‘अंडरकव्हर एजंट्स’विरुद्ध कारवाई appeared first on Dainik Prabhat .
Esha Gupta : दिग्दर्शक आणि निर्माते साजिद खान यांचा हमशक्कल नावाचा चित्रपट येऊन गेला आहे. या चित्रपटाने बॅाक्स अॅाफिसवर बऱ्यापैकी कमाई केली होती. अभिनेता सैफ अली खान या चित्रपटात लीड रोलमध्ये होता. तर अभिनेत्री ईशा गुप्तानेही या चित्रपटात काम केले आहे. नुकत्याच एका मुलाखतीत ईशाने हा चित्रपट सोडणार होते, पण साजिदने मनधरणी आणि माफी मागितल्यानंतर […] The post अभिनेत्री ईशा गुप्ताचं साजिद खानसोबत कडाक्याच भांडण; हमशक्कल चित्रपटाच्या शुटिंगवेळी नेमकं काय घडलं? अभिनेत्री म्हणाली…. appeared first on Dainik Prabhat .
पाकिस्तानचा ‘तो’मेजर ठार ; भारताच्या विंग कमांडर अभिनंदनशी काय होत कनेक्शन ? वाचा
Wing Commander Abhinandan। पाकिस्तानमधून एक मोठी बातमी येत आहे. दक्षिण वझिरिस्तानमधील सरगोधा याठिकाणी टीटीपी (तहरीक-ए-तालिबान-पाकिस्तान) ने केलेल्या हल्ल्यात मेजर मोईझ अब्बास शाह नावाचे एक अधिकारी शहीद झाले आहेत. मेजर मोईज अब्बास शाह हे तेच अधिकारी आहेत ज्यांनी २०१९ मध्ये बालाकोट स्ट्राइक दरम्यान भारतीय हवाई दलाचे अधिकारी विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना पकडले होते. पाकिस्तानी लष्कराच्या […] The post पाकिस्तानचा ‘तो’ मेजर ठार ; भारताच्या विंग कमांडर अभिनंदनशी काय होत कनेक्शन ? वाचा appeared first on Dainik Prabhat .
‘भाऊ, तू तामिळनाडू कसा पोहोचशील?’अभिनेत्री स्वरा भास्कराने कुणाल कामारासोबतचा फोटो केला शेअर
Swara Bhaskar : अभिनेत्री स्वरा भास्कर हि अनेकदा तिने केलेल्या पोस्टमुळे वादात सापडत असते. तिच्या काही पोस्ट अनेकांना खटकतात तर काहींना आवडतात. नुकतेच स्वराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केल्याने पुन्हा एकदा अभिनेत्रीला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. मंगळवारी संध्याकाळी अभिनेत्री स्वरा भास्करने तिच्या इंस्टाग्रामवरूने एक पोस्ट शेअर केली. या पोस्टसोबत तिने एक फोटोही […] The post ‘भाऊ, तू तामिळनाडू कसा पोहोचशील?’ अभिनेत्री स्वरा भास्कराने कुणाल कामारासोबतचा फोटो केला शेअर appeared first on Dainik Prabhat .
“किरीट सोमय्यांनी मशिदीत जाऊ नये”; भोंग्याच्या मुद्द्यावरून अजित पवारांच्या कडक शब्दात सूचना
Ajit Pawar | मशिदींवरील अनधिकृत भोग्यांचा मुद्दा आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुस्लिम शिष्टमंडळाची बैठक पार पडली. मशिदींवरून जबरदस्तीने भोंगे उतरवले जात असल्याचा आरोप यावेळी मुस्लिम संघटनांनी केला आहे. तर किरीट सोमय्या यांच्या दबावामुळे पोलीस कारवाई करत असल्याचा दावा ही मुस्लिम संघटनांकडून करण्यात आला आहे. मुस्लिम संघटनांनी स्पष्टपणे […] The post “किरीट सोमय्यांनी मशिदीत जाऊ नये”; भोंग्याच्या मुद्द्यावरून अजित पवारांच्या कडक शब्दात सूचना appeared first on Dainik Prabhat .
अंधेरीतील आंबोली स्मशानभूमीच्या दुरुस्तीचा मार्ग मोकळा
मागील सहा महिन्यांपासून पारंपरिक दाहिनीची सेवा आहे बंदमुंबई : अंधेरी पश्चिम येथील आंबोली स्मशानभूमी मागील डिसेंबर २०२४ पासून तात्पुरत्या स्वरुपात बंद असून येथील नागरिकांना वर्सोवा आणि ओशिवरा हिंदू स्मशानभूमीत पारंपारिक दाहिनीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी जावे लागत आहे. अखेर या स्मशानभूमीच्या पारंपारिक दाहिनीच्या कामाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे या कामाला लवकरच सुरुवात केली जाणार असल्याने येथील नागरिकांना अत्यंविधीकरता होणारा त्रास कमी होणार आहे.अंधेरी पश्चिम येथील सिजर मार्गावरील आंबोली हिंदू स्मशानभुमीचे बांधकाम जुने झाल्याने संरचनात्मक सल्लागार बी. जे. मेहता आर्किटक्चरल आणि स्क्ट्रक्चरल कन्सलटंट यांच्या लेखा परिक्षक अहवालाच्या अनुषंगाने या स्मशानभूमीच्या दुरुस्तीचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार डिसेंबर २०२४पासून दुरुस्तीच्या कामांसाठी आंबोली हिंदू स्मशानभूमीतील पारंपरिक दहनकक्षाची सेवा रविवारी १ डिसेंबर २०२४ पासून बंद ठेवण्यात आली होती.दुरूस्तीची ही कामे पूर्ण झाल्यानंतर हे दहन कक्ष पुन्हा उपलब्ध करून देण्यात येईल असे प्रशासनाच्यावतीने कळण्यात आले होते. त्यामुळे येथील स्थानिकांना वेसावे (वर्सोवा) हिंदू स्मशानभूमी आणि ओशिवरा हिंदू स्मशानभूमीत पारंपरिक दाहिनीवर अंत्यसंस्कार करावे लागत आहे.मात्र, मागील सहा ते सात महिन्यांपासून दुरुस्तीच्या कामांला सुरुवात न झाल्याने काही विकासकासाठी महापालिका येथील पारंपारिक दाहिनीची सेवा बंद करत असल्याचे आरोप स्थानिकांकडून होत होते. परंतु आता खऱ्या अर्थाने या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली जाणार असून सुमारे ३ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.या कामासाठी पालिकेच्यावतीने शाह इन्फ्रा डेव्हलपमेंट्स या कंपनीची निवड केली आहे. त्यानुसारच लवकरच येथील कामाला सुरुवात होणे अपेक्षित असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. अंबोली स्मशानभूमीत पारंपारिक दाहिनीची सेवा बंद ठेवण्यात आली असली तरी नैसर्गिक वायू दाहिनी पद्धतीची अंत्यविधी सेवा कार्यरत असल्याने नागरिकांनाच याठिकाणी अंत्यविधी करता येत आहे.
रमाबाई नगरातील रहिवासी शौचालये, पाण्यापासून वंचित
तोडलेल्या शौचालयांचे काम कुर्म गतीनेमुंबई : घाटकोपर पूर्वेकडील माता रमाबाई आंबेडकर नगरातील तसेच बाजूच्या नालंदा नगरातील रहिवाशांची सोमवारपासून गेले दोन दिवस पाणी आणि शौचालये यासाठी वणवण सुरू आहे. या भागाचा पाणीपुरवठा अचानक बंद झाला. त्यामुळे पाण्याअभावी लोकांचे प्रचंड हाल झाले. दरम्यान, याबाबत पालिकेचे एन विभागातील संबंधित अधिकारीही प्रतिसाद देत नसल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत. या भागातील पाणीपुरवठा सोमवारी सकाळपासून बंद करण्यात आला होता .त्यामुळे येथील शौचालये ओस पडली होती. त्यामुळे नागरिकांची मोठी कुचंबणा आणि गैरसोय झाली. तर दुसरीकडे या भागात काही शौचालये वर्षभरापासून तोडण्यात आल्याने त्यांचीही या हालात भर पडली. मंडळवारी दुपारी काही प्रमाणात पाणीपुरवठा सुरू झाला होता. मात्र गढूळ पाणी येत असल्याने नागरिक हैराण झाले होते. अनेकांनी दुकानातून मिनरल वॉटरच्या बाटल्या विकत घेऊन आपली तहान भागवली.मात्र सर्वांनाच हे आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याच्या भावना काहीनी याबाबत बोलताना व्यक्त केल्या. याबाबत पालिकेच्या एन विभागाचे सहाय्यक पालिका आयुक्त गजानन बेल्लाळे यांच्याशी संपर्क साधला. मात्र तो न होऊ शकल्याने याबाबत त्यांच्या प्रतिक्रिया समजू शकल्या नाहीत.माता रमाबाई आंबेडकर नगरातील प्रियदर्शनी मित्र मंडळ आणि अर्चना स्टोअर्स समोरील सुलभ शौचालय हे मोडकळीस आल्याने गेल्यावर्षी १० ऑगस्टपासून बंद करून नंतर ते तोडण्यात आले. मात्र त्या ठिकाणी आता पायाभरणीही झाली आहे. बांधकाम कुर्म गतीने सुरू असून, आता त्यातील खड्ड्यात लोखंडी सळई टाकण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे हे कधी पूर्ण होणार असा सवाल रहिवासी करत आहेत. तर दुसरीकडे येथील हजारो रहिवाशांची वणवण या भागातील इतर शौचालयांकडे सुरू असल्याची माहिती नागरिकांनी दिली.
IndiaBonds.com News: IndiaBonds.com या ऑनलाइन बाँड कंपनीने पहिल्या निधी फेरीत ३२.५ कोटी उभारले
मुंबई: सेबी नोंदणीकृत ऑनलाइन बाँड प्लॅटफॉर्म प्रदाता (Online Bond Platform Provider OBPP) आणि स्थिर उत्पन्न क्षेत्रात भारतातील वेगाने वाढणाऱ्या फिनटेकपैकी एक असलेल्या IndiaBonds.com ने त्यांच्या पहिल्या बाह्य निधी फेरीत यशस्वीरित्या ३२.५ कोटी (३.७७ दशलक्ष डॉलर्स) रूपयांची उभारणी केली आहे. हा टप्पा कंपनीसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे, जी चार वर्षांहून अधिक काळ पूर्णपणे बूटस्ट्रॅप केलेली आहे.केवळ कंपनीचे संस्थापक आदिती मित्तल आणि विशाल गोयंका यांच्या वैयक्तिक भांडवलाने कंपनी चालविली जाते असे कंपनीकडून याप्रसंगी म्हटले गेले आहे. गुंतवणूक आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील मार्की वैयक्तिक गुंतवणूकदारांच्या एका निवडक गटाने (Quarated Group) या फेरीचे नेतृत्व केले, ज्यांपैकी बरेच जण आर्थिक आणि डिजिटल प्लॅटफॉर्म स्केलिंगमध्ये खोल अनुभव आणि धोरणात्मक अंतर्दृष्टी आणतात.इंडियाबॉन्ड्सचे सह संस्थापक विशाल गोएंका म्हणाले, 'आम्ही निवडक व्यक्तींमधून मित्र आणि सहकारी तयार केले आहेत जे केवळ भांडवलाचे योगदान देत नाहीत तर आमच्या स्केल-अप टप्प्यासाठी सल्ला आणि मार्गदर्शनाच्या बाबतीत विशेषतः महत्वाचे असतील. आमचे गुंतवणूकदार गुंतवणूक आणि तंत्रज्ञान उद्योगातील नेते आहेत जे सध्याच्या टप्प्याला आणि भारतातील बाँड बाजारांच्या लोकशाहीकरणात असलेल्या अफाट अप्रयुक्त क्षमतेला पाहून उत्सुक आहेत. या फेरीत आम्हाला उच्च वाढीच्या मार्गावर पुढे जाण्याची परवानगी मिळते आणि आम्ही पुढील वर्षी कधीतरी संस्थात्मक निधीकडे पाहण्याची शक्यता आहे.ते पुढे म्हणाले, 'आम्ही आमच्या क्लायंट आणि टीमचे आभार मानू इच्छितो ज्यांनी प्रत्येक हातात बाँडच्या आमच्या दृष्टिकोनासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.'इंडियाबॉन्ड्स किरकोळ आणि संस्थात्मक गुंतवणूकदारांना (Retail Investors and Institutional Investors) यांच्यासाठी कॉर्पोरेट बाँड, सरकारी सिक्युरिटीज आणि डिजिटल फिक्स्ड डिपॉझिटसह विविध निश्चित उत्पन्न उत्पादनांचा शोध घेण्यासाठी,मूल्यांकन करण्यासाठी आणि गुंतवणूक करण्यासाठी एक अखंड डिजिटल प्लॅटफॉर्म प्रदान करते. यापूर्वी IndiaBonds.com कंपनीने गुंतवणूकदारांसाठी जानेवारी महिन्यात ग्राहकांसाठी डिजिटल मुदत ठेवी (Digital Fix Deposits) हे उत्पादन लाँच केले होते. त्यामुळे ग्राहकांना थेट ऑनलाईन गुंतवणूकीसाठी तसेच आपल्या गुंतवणूकीवर परतावा (Return) मिळण्यासाठी नवीन व्यासपीठ कंपनीने तयार केले होते.२०२१ मध्ये सुरू झालेला इंडियाबॉन्ड्स हा सेबी-नोंदणीकृत ऑनलाइन बाँड प्लॅटफॉर्म प्रदाता (Provider) आहे. कंपनी कमी किमतीत, पारदर्शक आणि वापरण्यास सोपा पद्धतीने स्थिर-उत्पन्न बाजारपेठेत गुंतवणूकदारांना प्रवेश प्रदान कर तो. इंडियाबॉन्ड्स त्यांच्या ग्राहकांना बाँड गुंतवणुकीसाठी एक उपाय प्रदान करते तसेच गुंतवणूकदारांना त्यांच्या स्थिर-उत्पन्न मालमत्ता वर्गाचे मूल्य अनलॉक करण्यास सक्षम करते. अनुभवी टीम गुंतवणूकदारांना स्थिरता प्रदान करणाऱ्या, अंदाजे उत्पन्न निर्माण करणाऱ्या आणि त्यांच्या गुंतवणूक उद्दिष्टांची पूर्तता करणाऱ्या बाँड गुंतवणूक संधींच्या विस्तृत निवडीमध्ये प्रवेश करण्यास मदत करते असे कंपनीने म्हटले होते. ऑनलाइन बाँड प्लॅटफॉर्म प्रदात्यांमध्ये,इंडिया बॉन्ड्स स्थिर उत्पन्न उद्योगातील काही अभूतपूर्व नवकल्पनांमुळे एक क्रांतिकारी फिनटेक स्टार्टअप म्हणून ओळखले जाते.आर्थिक वर्ष २०२२ मध्ये त्यांनी बाँड यील्ड कॅल्क्युलेटर (Yield Calculator) लाँच करण्याची घोषणा केली होती जे कॉर्पोरेट बाँडच्या किमती आणि उत्पन्नाची गणना करण्याच्या गुंतागुंती सुलभ करून गुंतवणूकदारांना मदत करते.आर्थिक २०२१ मध्ये कंपनीने भारतातील सर्व INR मूल्यांकित बाँडची तपशीलवार माहिती सर्वसामान्यां ना मिळावी यासाठी एक व्याप क बाँड डायरेक्टरी लाँच केली होती.
महानिर्मिती राज्यात उभारणार १०७१ मेगावॅट क्षमतेचे सौरऊर्जा प्रकल्प
मुंबई: पारंपरिक ऊर्जेवरील अवलंबित्व कमी करून कार्बन उत्सर्जन घटवून शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा अखंडित वीजपुरवठा देवून शेतीची उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी शासन विविध योजना राबवित आहे. राज्यात शाश्वत विकासास चालना देण्यासाठी महानिर्मिती तर्फे १,०७१ मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्प २.० अंतर्गत लवकरच कार्यान्वित होणार आहेत. या प्रकल्पांमुळे राज्यातील तीन लाख शेतकऱ्यांना लाभ होणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. महानिर्मिती ही म.रा.वि.मं. सूत्रधारी कंपनी मर्यादित या कंपनीची संपूर्ण मालकीची उपकंपनी असून, सुमारे १३,८८० मेगावॅट क्षमतेसह भारतातील सर्वात मोठ्या राज्य-नियंत्रित विद्युत उत्पादकांपैकी एक आहे. नॅशनल थर्मल पॉवर कंपनीनंतर ही देशातील दुसऱ्या क्रमांकाची राज्य मालकीची जनरेशन कंपनी आहे.औष्णिक, वायू, जल विद्युत आणि सौर असे ऊर्जा उत्पादन क्षेत्रात वैविध्य असलेली महानिर्मिती ही कंपनी नवीकरणीय ऊर्जेचे प्रकल्प सुरू करत आहे, ज्यामुळे वीज ग्राहकांना कमी दरात वीजपुरवठा करत कार्बन उत्सर्जनात घट होण्यास मदत होणार आहे. द रॉकफेलर फाउंडेशन, इकीया फांउडेशन आणि बेझॉज अर्थ फंड यांच्या सहकार्याने स्थापन झालेली जीईएपीपी इंडिया ही संस्था विकसनशील देशांमध्ये न्याय्य, समतोल व वेगवान हरित ऊर्जेसाठी मदत करते. जीईएपीपी इंडिया ही जीईएपीपी एलएलसीची भारतीय शाखा असून, भारतात विशेषतः वितरणक्षम ऊर्जेसाठी उपयुक्त उपक्रमांची अंमलबजावणी करत आहे.या समितीमध्ये सर्व सहभागधारक यांचा समावेश असणार आहे. जीईएपीपी इंडिया (ग्लोबल एनर्जी अलायन्स फॉर पीपल अँड प्लॅने व महानिर्मितीतर्फे सेंट्रल डॅश बोर्ड तयार करण्यात येणार असून यामार्फत जमीन संपादन ते प्रकल्प उभारणी प्रगती यांचे दैनंदिन तत्वावर अवलोकन करण्यात येणार आहे. सर्व भागधारकांसाठी या डॅश बोर्ड वापराबाबतचे प्रशिक्षण देण्यात येऊन हे सौर प्रकल्प वेळेत पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. या प्रकल्पाच्या माध्यमातून रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होणार आहेत.
रॅपर टॉमी जेनेसिसचा नवीन व्हिडिओ ट्रू ब्लू रिलीज झाल्यानंतर तिच्यावर हिंदू आणि ख्रिश्चन धर्मांचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला आहे. संपूर्ण वाद आणि टॉमी जेनेसिसची कहाणी जाणून घेण्यासाठी वरील फोटोवर क्लिक करा.
Donald Trump video Release । अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दावा केला आहे की इराणवरील हल्ल्यात त्यांचे तीन अणुस्थळे यशस्वीरित्या नष्ट झाली आहेत. पेंटागॉनचे मुख्य प्रवक्ते शॉन पार्नेल यांनी म्हटले आहे की अमेरिकेने इराणच्या अणुस्थळांवर १४ ३०,००० पौंड (१३,६०७ किलो) बॉम्ब टाकले, ज्याची किंमत ४२०,००० पौंड (४ कोटी ९१ लाख रुपये) होती. मात्र, […] The post Bomb-Bomb-Bomb Iran ! डोनाल्ड ट्रम्पने शेअर केला इराणवरील हल्ल्याचा व्हिडिओ ; अमेरिकेच्या गुप्तचर अहवालात दावा फेटाळला appeared first on Dainik Prabhat .
आमिर खानच्या ‘सितारे जमीन पर’चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर जलवा; 5 दिवसांत कोटींची कमाई
Sitaare Zameen Par | बॉलीवूड अभिनेता आमिर खानचा ‘सितारे जमीन पर’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. पहिल्याच आठवड्यात या सिनेमानं चांगली कमाई केली आहे. आमिर खानचा ‘लाल सिंह चड्ढा’ हा चित्रपट सुपरफ्लॉप ठरला होता. त्यानंतर मिस्टर परफेक्शनिस्टने स्वतःला तीन वर्षे चित्रपटांपासून दूर ठेवले होते. पण आता ‘सितारे जमीन पर’ सोबत सुपरस्टारने जबरदस्त पुनरागमन केले […] The post आमिर खानच्या ‘सितारे जमीन पर’ चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर जलवा; 5 दिवसांत कोटींची कमाई appeared first on Dainik Prabhat .
Crime News : आयटी पार्क परिसरात महिला व पुरुषाचा मृतदेह सापडल्याने खळबळ
पिंपरी : मोकळ्या जागेत एका ३० वर्षीय महिला आणि ५५ वर्षीय पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे. ही घटना तळवडे आयटी पार्क परिसरातील डाऊन टाऊन हॉटेलच्या मागे बुधवार (दि. २५) सकाळी उघडकीस आली. दोघांचाही खून झाल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. मृतांची नावे मंगला सुरज टेंभरे (वय ३०, रा. अमरावती) आणि जगन्नाथ पुंडलिक सरोदे (वय ५५, […] The post Crime News : आयटी पार्क परिसरात महिला व पुरुषाचा मृतदेह सापडल्याने खळबळ appeared first on Dainik Prabhat .
कोयनानगर : दि. २५ जून राज्य शासनाच्या पर्यायी ऊर्जा आणि जलव्यवस्थापन धोरणांतर्गत, कोयना धरणाच्या डाव्या तीरावर ८० मेगावॅट क्षमतेच्या पायथा वीजगृह प्रकल्पास सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. महाराष्ट्र जलविद्युत निर्मिती कंपनी (महाजेनको) यांच्याकडून सादर करण्यात आलेल्या १०८.७८ कोटी रुपयांच्या सुधारित अंदाजपत्रकास राज्य मंत्रिमंडळाने जून २०२५ मध्ये मंजुरी दिली. या प्रकल्पाची रचना अशी आहे की, […] The post Satara News : कोयना धरणातून पूर्व भागासाठी 30 नव्हे, थेट 50 टीएमसी पाणी; ऊर्जेच्या माध्यमातून जलवाटप वाढणार! appeared first on Dainik Prabhat .
एक लाखाच्या खाली आल्या सोन्याच्या किंमती ; चांदीची चकाकी झाली कमी ; वाचा आजचे दर काय ?
Gold-silver Price Today । आज सोन्या – चांदीच्या दागिन्यांची खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. कारण आज सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. इराण आणि इस्रायलमधील युद्धबंदीमुळे पश्चिम आशियात शांततेची आशा असताना, २४ कॅरेट सोने ९९,२१० रुपये प्रति १० ग्रॅमवर व्यवहार करत आहे. एक दिवस आधी २४ जून रोजी त्याची किंमत १,००,६८० […] The post एक लाखाच्या खाली आल्या सोन्याच्या किंमती ; चांदीची चकाकी झाली कमी ; वाचा आजचे दर काय ? appeared first on Dainik Prabhat .
Crime News : शिरुर तालुक्यात विहिरीवरील मोटार चोरीला; अज्ञात व्यक्ती विरोधात पोलिसात गुन्हा दाखल
निमोणे: शिरुर तालुक्यातील निर्वी गावात एका शेतकऱ्याच्या विहिरीवरुन कंपनीची अंदाजे 10 हजार रुपये किंमतीची पाण्यातील इलेक्ट्रीक मोटार चोरीस गेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी शिरुर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शिरुर पोलीस स्टेशन येथे ओमकार अरुण शहाणे (वय 24, व्यवसाय शेती, रा. निर्वी, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी दिलेल्या […] The post Crime News : शिरुर तालुक्यात विहिरीवरील मोटार चोरीला; अज्ञात व्यक्ती विरोधात पोलिसात गुन्हा दाखल appeared first on Dainik Prabhat .
Sambhajinagar Accident : छत्रपती संभाजीनगरात भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, तिघे जागीच ठार!
संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर-जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील बिल्डा फाट्याजवळ मंगळवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास भरधाव कारने पुलावरील दुभाजकाला धडकल्याने तिघेजण जागीच ठार झाले असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर, दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.https://prahaar.in/2025/06/25/axiom-4-will-launch-into-space-today/छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी असलेले ५ जण कार (एमएच २० इ जे १५८६) ने फुलंब्रीहून छत्रपती संभाजीनगरकडे येत होते. मंगळवारी रात्री ११च्या सुमारास त्यांच्या भरधाव कारने बिल्डा गावानजीक असलेल्या पुलावरील रस्ता दुभाजकाला जोराची धडकली. त्यानंतर ही कार उलटली. यात कारमधील सय्यद मारुफ सय्यद माजेद, अरफात बागवान व रेहान सय्यद यांचा जागीच मृत्यू झाला, तर सय्यद उजेफ व शेख शारीक हे दोघे गंभीर जखमी झाले. याबाबत माहिती मिळताच फुलंब्री पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय सहाणे हे कर्मचाऱ्यांसह तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले.
मोहित सोमण: सकाळच्या सत्रात सुरूवातीलाच इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात चांगली वाढ झाली आहे.युएस,आशिया बाजाराबरोबरच गिफ्ट निफ्टीत ३० अंकाहून अधिक वाढ झाल्यानंतर बाजाराला सुरूवात चांगली लाभली आहे.तज्ञांनीही काल बाजारातील 'हिरवा' रंग कायम राहू शकतो असे सूतोवाच केले होते.याच पार्श्वभूमीवर आज सुरूवातीच्या कलात सेन्सेक्स (Sensex) निर्देशांकात ४२९.४५ अंकांने वाढ होत पातळी ८२४८९.१० पातळीवर पोहोचली आहे तर निफ्टी ५० (Nifty 50) निर्देशांक १२५.३५ अंकांने वाढत २५१६९.९५ पातळीवर पोहोचला आहे. सेन्सेक्स बँक निर्देशांकात २४३.३८ अंकाने वाढ झाली असून बँक निफ्टीत १०७.१० अंकाने वाढ झाली आहे.सेन्सेक्स मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.६१%,१.११% वाढ झाली आहे. निफ्टी मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.५२%,१.०९% वाढ झाली आहे. निफ्टी क्षेत्रीय निर्देशांक (Nifty Sectoral Indices) यामध्ये जवळपास सगळ्याच समभागात वाढ झाली आहे. सर्वाधिक वाढ ही मिडस्मॉल हेल्थकेअर (०.८७%),एफएमसीजी (०.७०%),आयटी (०.७६%), कंज्युमर ड्युरेबल्स (०.८७%), मिडस्मॉल आयटी व टेलिकॉम (०.६५%) या समभागात (Shares) झाली आहे.काल इराण व इस्त्राईल यांच्यातील युद्धाविरामामुळे बाजारातील तणाव संपूर्णपणे निवळला गेला आहे. याचे सलग दुसऱ्यांदा पडसाद अमेरिकन बाजारातही पहायला मिळाले होते. युएस बाजारातील डाऊ जोन्स (Dow Jones) हा ०.०८%, एस अँड पी ५०० (S&P500) १.११%, नासडाक (NASDAQ) १.४३% इतकी वाढ झाली होती. तर आशियाई बाजारातील गिफ्ट निफ्टी (०.४७%) सह निकेयी (Nikkei 225) हा ०.०४%, हेंगसेंग (Hengseng)०.२८%,शांघाई कंपोझिट (०. २८%) या बाजारात वाढ झाली होती. भारतीय बाजारातील मजबूत 'फंडामेंटल'चा फायदा आजही कायम राहण्याची शक्यता आहे. विशेषतः एस अँड पी ग्लोबलने भारताच्या जीडीपीचे सकारात्मक चित्रण उभारल्यानंतर तसेच क्षेत्रीय विशिष्ट शेअर्समध्ये केलेल्या चांगल्या कामगि रीनंतर तसेच आयपीओतील तुलनात्मकदृष्ट्या संमिश्र प्रतिसाद बघता बाजारातील आज तेजी अखेरपर्यंत पहायला मिळेल का हा खरा प्रश्न आहे. दुसरीकडे आजही स्मॉलकॅपमध्ये तेजी कायम असल्याने बँक निर्देशांकासोबत स्मॉलकॅपमुळे बाजाराला सपोर्ट लेवल राखण्यास मदत झाली आहे.काल सोन्याच्या व कच्च्या (Crude) तेलाच्या घसरणीनंतर बाजारातील परिस्थितीवर त्याचा सकारात्मक परिणाम झाला होता.मात्र काल युएस फेडदर रिझर्व्ह व्याजदरात कपात करण्याच्या निर्णयाला प्रतिक्षा आहे.वेट अँड वॉचचा पवित्रा बँक अध्यक्ष जेरोमी पॉवेल यांनी घेतल्याने परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची आजची भूमिकाही बाजाराच्या दृष्टीने महत्त्वाची ठरू शकते.आज सकाळच्या सत्रात ग्राविटा इंडिया (६.७१%),जनरल इन्शुरन्स (५.४८%),इंडियामार्ट (५.२६%),जेपी पॉवर (४.४४%),न्यू इंडिया इन्शुरन्स (४.०९%),नेटवेब टेक्नॉलॉजी (३.७५%),एमसीएक्स (३.१३%),रामकृष्ण फोर्ज (३.०१%),साई ला ईफ (२.८६%),आरबीएल बँक (२.०८%),सोनाटा सॉफ्टवेअर (२.६७%),कल्याण ज्वेलर्स (२.७१%),इंडियन हॉटेल्स (२.६७%), होंडाई मोटर्स (१.७२%),इन्फोऐज (१.६९%),जेएसडब्लू एनर्जी (१.३६%),टायटन कंपनी (१.२४%),आयआरए फसी (१.१८%),गोदरेज कंज्युमर प्रोडक्ट (१.१२%),बजाज हाउसिंग फायनान्स (१.११%) या समभागात वाढ झाली आहे. तर सर्वाधिक घसरण डेटा पॅटर्न (१.१४%),एलटी फूड (०.९८%),सिमेन्स (०.७७%),मुथुट फायनान्स (०.६४%),भारत इलेक्ट्रॉनिक (०.४३%),सिमेन्स एनर्जी (१.०२%),कोटक महिंद्रा (०.३०%),आयशर मोटर्स (०.४२%),एसबीआय लाईफ इन्शुरन्स (०.१४%),इंटरग्लोब एव्हिएशन (०.१४%),वेदान्ता (०.०८%),सनटीव्ही (०.४९%), युनियन बँक (०.२७%),स्विगी (०.१५%)या समभागात झाली आहे.आजच्या बाजारातील सुरूवातीच्या सत्राबद्दल भाष्य करताना जिओजित इनव्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य गुंतवणूक रणनीतीकार डॉ वी के विजयाकुमार म्हणाले की,'पश्चिम आशियाई संकटासारख्या मोठ्या आव्हानांना न जुमानता अलिकडच्या बाजारातील ट्रेंडचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची लवचिकता.भारत-पाकमधील अल्पकालीन संघर्षादरम्यानही बाजार लवचिक राहिला आहे.या लवचिकतेत एक महत्त्वाचा वाटा हा संकटादरम्यान एफआयआयने खरेदी केला आहे.वि शेष म्हणजे,संकट संपल्यानंतर कालप्रमाणेच एफआयआय विक्री करत आहेत. दुसरीकडे, म्युच्युअल फंडांमध्ये सतत येणाऱ्या प्रवाहामुळे डीआयआय बाजारात सतत खरेदीदार राहिले आहेत. एफआयआय मूल्यांकनाच्या चिंतेवर विक्री कर त असतानाही यामुळे बाजारात लवचिकता येईल. फेडचे प्रमुख जेरोम पॉवेल यांच्या ताज्या भाष्यावरून असे दिसून येते की शुल्कांवरील अनिश्चिततेमुळे चलनवाढीचा धोका आहे,म्हणूनच वर्षाच्या अखेरीस दर कपात होण्याची शक्यता आहे. गुंतवणूकदारांसमोर आता मुख्य आव्हान म्हणजे योग्य वाढ-मूल्य मिश्रण असलेले स्टॉक शोधणे कारण वाढीचे स्टॉक खूप मूल्यवान आहेत. दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी भांडवली बाजारासारख्या विभागांमधील स्टॉक,विमान वाहतूक, दूरसंचार सारख्या देशांतर्गत वापर आणि हॉटेल,ऑटोमोबाईल्स आणि दागिने यासारख्या प्रीमियम वापराचे आश्वासन आहे.'बाजारातील निफ्टीवर प्रतिक्रिया देताना जिओजित इनव्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य बाजार रणनितीकार आनंद जेम्स म्हणाले की,' २५२०० च्या पहिल्या उद्दिष्टाचा टप्पा ओलांडल्यानंतर निफ्टीने काही वेळातच माघार घेतली असली तरी,२४९४० च्या आमच्या प्रमुख इंट्राडे पिव्होटच्या वर यशस्वी बंद झाल्यामुळे आम्हाला वरच्या आशा जोपासण्यास प्रोत्साहन मिळते.असे म्हटले जात आहे की,गतीचा अभाव आहे आणि २५४६० पर्यंत थेट धक्का दिसणार नाही.२५१७० च्या पुढे जाण्यास असमर्थ असल्यास एकत्रीकरण किंवा घसरण होण्याची अपेक्षा करा'.एकूणच, आजच्या बाजारातील परिस्थितीकडे पाहता मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये तसेच बँक निफ्टीकडे बाजाराचे विशेष लक्ष असू शकते असे संकेत यानिमित्ताने मिळत आहेत.
इराण-इस्रायल युद्धबंदीवर चीनची प्रतिक्रिया ; म्हणाले,’आता आमचा विश्वासघात केला तर…’
China on Iran-Israel ceasefire। इराण आणि इस्रायलमधील १२ दिवसांच्या युद्धानंतर झालेल्या युद्धबंदीबाबत आता जगभरातून प्रतिक्रिया तीव्र झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर चीनने ,”यावेळी युद्धबंदी प्रामाणिकपणे पाळली पाहिजे आणि कोणत्याही पक्षाने फसवणूक करू नये.” असा सर्व पक्षांना स्पष्टपणे इशारा दिला आहे. संयुक्त राष्ट्रांमधील चीनचे स्थायी प्रतिनिधी फू काँग यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “आम्हाला आशा आहे […] The post इराण-इस्रायल युद्धबंदीवर चीनची प्रतिक्रिया ; म्हणाले,’आता आमचा विश्वासघात केला तर…’ appeared first on Dainik Prabhat .
Nationalist Congress Party Pune : गेल्या काही काळापासून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षात मोठ्या प्रमाणावर इतर पक्षातून पक्षप्रवेश केले जात आहेत. यामुळे पक्षातील इनकमिंक चांगलेच वाढले आहे, असे असताना दुसरीकडे मात्र पक्षातील माजी आमदारांचा एक गट नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात केली जात आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड ही दोन शहरे अजित पवार यांचा […] The post अजित दादांच्या राष्ट्रवादीतही असंतोषाचे वारे? पुण्यातील नेत्यांमध्ये नाराजीचा सूर, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण appeared first on Dainik Prabhat .
“पहिलीपासून मराठीच शिकवावी, तर हिंदी…”; अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका
Ajit Pawar | राज्यातील शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा विषयाच्या सक्तीवरुन वातावरण तापले आहे. हिंदी सक्तीच्या वाढत्या विरोधानंतर राज्य शासनाने एक पाऊल मागे घेतले आहे. त्रिभाषा सूत्रासंदर्भात साहित्यिक, भाषातज्ज्ञ आणि राजकीय नेत्यांशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील हिंदी सक्तीच्या निर्णयावरून आपली […] The post “पहिलीपासून मराठीच शिकवावी, तर हिंदी…”; अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका appeared first on Dainik Prabhat .
आजही शेअर बाजारात तुफान तेजी ! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये जोरदार उसळी ; ‘या’१० शेअर्समध्ये उच्चांकी वाढ
Stock Market । शेअर बाजारात वाढीचा कल सुरूच आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण-इस्रायल युद्धबंदीबाबत दिलेल्या वक्तव्यानंतर मंगळवारी सेन्सेक्स-निफ्टी वेगाने सुरू असल्याचे दिसून आले आणि तिसऱ्या व्यवसाय दिवशी, बुधवारी, दोन्ही निर्देशांक जोरदारपणे उघडले. एकीकडे, मुंबई शेअर बाजाराचा ३० शेअर्सचा सेन्सेक्स ४३० अंकांपेक्षा जास्त वाढीसह उघडला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही १२० अंकांपेक्षा जास्त उडी […] The post आजही शेअर बाजारात तुफान तेजी ! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये जोरदार उसळी ; ‘या’ १० शेअर्समध्ये उच्चांकी वाढ appeared first on Dainik Prabhat .
'माझा मुलगा मनोज सकाळीच उठला होता. तेवढ्यात तीन लोक त्याला बोलावण्यासाठी आले. ते म्हणाले, आपल्याला फुले आणण्यासाठी जगदलपूरला जावे लागेल. माझ्या मुलाने मला सांगितले- मी जगदलपूरला जात आहे. त्याने मला सांगितलेली ही शेवटची गोष्ट होती. मी शेवटचे त्याचे तोंडही पाहू शकलो नाही. आजही मला वाटते की तो येऊन म्हणेल- आई, मला लवकर जेवण दे.' रंभाचा मुलगा मनोज जाऊन १२ वर्षे झाली आहेत, पण जेव्हा जेव्हा तिच्या मुलाचा उल्लेख येतो तेव्हा तिचा आवाज असहाय्य वाटू लागतो. २५ मे २०१३ रोजी सुकमाच्या झीरम खोऱ्यात नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मनोजचा मृत्यू झाला. या दिवशी नक्षलवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार करून छत्तीसगड काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वासह ३२ जणांना ठार मारले. २०१३ ते २०२५ पर्यंत या हत्येचा तपास अजूनही सुरू आहे. एनआयए, सीबीआय, एसआयटी व्यतिरिक्त न्यायिक आयोगांनीही तपास सुरू ठेवला, परंतु हल्ल्याचे सत्य बाहेर आले नाही. या हल्ल्याच्या कटात हिडमा, देवा आणि बसवराजू अशी तीन नावे समोर आली होती. २१ मे रोजी सुरक्षा दलांनी अबुझहमाडच्या जंगलात बसवराजूला ठार मारले. काँग्रेस नेते झीरम हत्याकांडाला कट किंवा कॉन्ट्रॅक्ट किलिंग का म्हणतात? झीरमचे खरे मारेकरी अजूनही पकडले गेले नाहीत असे पीडित कुटुंबे का म्हणतात? 'नक्षल भागातून दिव्य मराठी' मालिकेतील या कथेत या प्रश्नांची उत्तरे आणि ४ पीडितांच्या कथा वाचा. पहिली कथा मनोजची आई म्हणाली- माझ्या मुलाच्या मृत्यूची भरपाई मला मिळाली, पण माझ्या सुनेनं ते सगळं घेतलंझीरम घाटी येथे झालेल्या हल्ल्याच्या वेळी मनोज फक्त २४ वर्षांचा होता. तो भाड्याने गाडी चालवायचा. त्याच्या कुटुंबात त्याची आई रंभा आणि धाकटा भाऊ आहे. सरकार मदतीच्या नावाखाली फक्त ३५ किलो तांदूळ देते. मनोज जी गाडी चालवत असे ती हल्ल्यात नष्ट झाली. त्यासाठी त्याला फक्त ५० हजार रुपये भरपाई मिळाली. कुटुंब दरभा येथे राहते. त्यांच्याकडे स्वतःचे घरही नाही. आपल्या मुलाच्या मृत्यूची आठवण करून देताना रंभा म्हणतात, 'मनोज आता नाहीये याची मला कल्पना नव्हती. रात्री १०:३० वाजता एक पत्रकार आला आणि म्हणाला, दीदी, हा फोटो बघ. त्यात मनोजचा मृतदेह होता. तो पाहून मी बेशुद्ध पडले.' 'जेव्हा त्याचे पार्थिव आले तेव्हा मी त्याला पाहू शकले नाही. आजही मला असे वाटते की जणू तो गाडी घेऊन येईल. मला त्याची दररोज आठवण येते. सणांच्या वेळी मला त्याची आठवण येते. त्याच्या मृत्यूनंतर आम्हाला खूप अडचणी आल्या. मनोज कुटुंबातला एकमेव कमावता होता. तेव्हा धाकटा मुलगा फक्त १४ वर्षांचा होता.' 'मनोजच्या लग्नाला फक्त दोन महिने झाले होते. सून बहुतेकदा तिच्या आईवडिलांच्या घरीच राहत असे. सरकारने प्रत्येकी ५ लाख रुपयांचे दोन आणि एकदा ३ लाख रुपयांचे चेक पाठवले होते. सुनेने ते सर्व घेतले. चेक तिच्या नावावर होते. तिने पैसे घेतले आणि परत केले नाहीत.' नक्षलवादी नेता बसवराजू एका चकमकीत मारला गेला. तुम्हाला वाटतं न्याय झाला आहे का? रंभा रागाने उत्तर देते, 'मुख्य माणूस अजूनही जिवंत आहे. तो काँग्रेसचा नेता होता. तो हल्ल्यातून कसा वाचला? आणखी दोन लोक होते. मी त्यांची नावे घेणार नाही. त्यांनी त्यांना का मारले नाही? नक्षलवादी त्यापैकी एकाला बाईकवर बसवून पोलिस स्टेशनमध्ये सोडण्यासाठी घेऊन गेले. जोपर्यंत या लोकांबद्दलचे सत्य बाहेर येत नाही तोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही.' दुसरी कथा राजकुमाराची तो मनोजसोबत गाडीत गेला आणि परतलाच नाही झीरम घाटी हत्याकांडात १७ वर्षांचा राजकुमारही मृत्युमुखी पडला. राजकुमार आणि मनोज हे चुलत भाऊ होते. मनोज काँग्रेसच्या ताफ्यात गाडी चालवत होता. राजकुमार आठवी इयत्तेत शिकत होता. राजकुमारची आई तारा हिला सरकारकडून अनुकंपा तत्वावर नोकरी मिळाली. पगार २० हजार रुपये प्रति महिना आहे. तिला सरकारकडून जमीनही मिळाली, पण तिचे घर रिकामे आहे. राजकुमार हा ताराचा एकुलता एक मुलगा होता. तारा म्हणते, 'राजकुमार कोणत्याही पार्टीत नव्हता. तो फक्त एक लहान मुलगा होता. मुलाला काय कळणार, त्याला फक्त बोलावून घेऊन गेले.' ताराला तिच्या मुलाच्या मृत्यूची बातमी एका दिवसानंतर मिळाली. ती म्हणते, 'हल्ला शनिवारी झाला. मी रविवारी त्याचा मृतदेह पाहू शकले. एक दिवस मला कोणीही काहीही सांगितले नाही.' आम्ही ताराला विचारले की बसवराजूच्या मृत्यूमुळे तिला न्याय मिळाला का? ती निराशेने म्हणाली, आपण काय करू शकतो साहेब, त्याला मारून आपल्याला काय मिळणार आहे. माझा मुलगा गेला आहे. तिसरी कथा सदा सिंह नागची मुलगा म्हणाला- झीरमच्या शहीदांच्या नावाने कॉलेज बांधले होते, पण त्यात प्रवेश मिळाला नाही जुनापाराचे सदा सिंह नाग हे काँग्रेसमध्ये होते. ते काँग्रेसच्या त्या ताफ्याचा भाग होते जो त्यांच्या गंतव्यस्थानावर पोहोचू शकले नाही. सदा सिंह यांच्या मृत्यूनंतर, त्यांच्या पत्नी उज्ज्वला यांनी एकट्याने दोन मुलांची जबाबदारी घेतली. हल्ल्यानंतर सुमारे दोन वर्षांनी, त्यांच्या मुलीला अनुकंपा तत्त्वावर सरकारी नोकरी मिळाली. ही नोकरी आता कुटुंबाचा आधार आहे. उज्ज्वला म्हणते, 'माझ्यासाठी न्याय म्हणजे भरपाई किंवा नोकरी नाही. जे गुन्हेगार अजूनही मोकाट फिरत आहेत त्यांना शिक्षा झाली पाहिजे.' उज्ज्वला गप्प बसते तेव्हा तिच्या शेजारी उभा असलेला तिचा मुलगा ज्वाला सिंह तिला पुढे घेऊन जातो. ज्वाला म्हणतो, 'जेव्हा बाबा वारले तेव्हा मी पाचवीत होतो. बाबा एका खाजगी शाळेत शिकवायचे. बाबा वारल्यानंतर घरात कोणी कमावणारा नव्हता. कसा तरी, इकडून तिकडून मदत घेऊन आईने मला शिकवले.' 'मला डॉक्टर व्हायचे आहे. मी रायपूरमध्ये NEET चे कोचिंग घेतले, पण काही गुणांनी परीक्षा हुकली. मी बस्तरमधील शहीद महेंद्र कर्मा विद्यापीठात प्रवेश घेण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी मला नकार दिला की मी दुसऱ्या विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे.' सरकारी मदतीच्या नावाखाली, ज्वालाची मोठी बहीण अमीमा हिला वसतिगृहात चौथी इयत्तेत नोकरी मिळाली आहे. अमीमाच्या शब्दात सरकारबद्दल राग आहे. अमीमा म्हणते, '१२ वर्षांनंतरही आम्हाला माहित नाही की पप्पांना कोणी आणि का मारले. न्याय मिळेल असे हजार वेळा सांगितले गेले. न्याय कुठे गेला? दरवर्षी वर्धापनदिनानिमित्त सर्वजण येतात, फुले देतात. मीडियाचे लोक प्रश्न विचारतात. दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात छापले जाते की तपास सुरू आहे, पण काहीही घडत नाही.' नक्षलवादी नेता बसवराजूच्या हत्येबद्दल अमीमा म्हणतात, 'हा न्याय नाही. खरे गुन्हेगार अजूनही बाहेर फिरत आहेत.' चौथी कथा भागीरथी नागाची मुलगी म्हणाली- तपास अजूनही सुरू आहे, हेच आश्चर्यकारक आहेभागीरथी नागा हे काँग्रेसशी संबंधित होते. त्यांचे कुटुंब जुनापरा गावात राहते. कुटुंबात त्यांची पत्नी आणि दोन मुली आहेत. मोठी मुलगी रेखा जगदलपूरमध्ये शिकते. कॅमेऱ्यासमोर न येता ती म्हणते, 'हल्ला झाला तेव्हा मी ७ व्या इयत्तेत होते. मला त्या घटनेबद्दल फारसे आठवत नाही. मला आश्चर्य वाटते की तपास अजूनही का सुरू आहे. वारंवार तेच बोलून आपल्याला काय मिळणार आहे.' आम्ही भागीरथीची पत्नी इच्छावतीशीही बोललो. संभाषण सुरू होताच तिला अश्रू अनावर झाले. ती म्हणते- जो गेला आहे तो परत येणार नाही. सरकारने आतापर्यंत कारवाई करायला हवी होती, पण ते होऊ शकले नाही. झीरम हत्याकांड: न सुटलेले प्रश्न आणि अपूर्ण तपास२०१३ च्या अखेरीस छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुका होणार होत्या. गेल्या दोन्ही निवडणुका भाजपने बहुमताने जिंकल्या होत्या. रमण सिंह मुख्यमंत्री होते. १० वर्षे विरोधी पक्षात असलेली काँग्रेस जिंकण्यासाठी प्रयत्न करत होती. पक्ष संपूर्ण राज्यात परिवर्तन यात्रा सुरू करणार होता. २५ मे रोजी सुकमा येथे परिवर्तन रॅली काढण्यात आली. रॅलीनंतर काँग्रेस नेत्यांचा ताफा सुकमाहून जगदलपूरला जात होता. त्यात सुमारे २५ वाहने होती. या वाहनांमध्ये २०० नेते आणि कार्यकर्ते होते. आघाडीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नंदकुमार पटेल, त्यांचे पुत्र दिनेश पटेल आणि कवासी लखमा होते. त्यांच्या मागे महेंद्र कर्मा आणि मलकीत सिंग गायडू यांच्या गाड्या होत्या. त्यांच्या मागे बस्तर काँग्रेसचे प्रभारी उदय मुदलियार होते. म्हणजेच छत्तीसगड काँग्रेसचे संपूर्ण वरिष्ठ नेतृत्व या ताफ्यात होते. दुपारी ३:४० वाजता हा काफिला झीरम व्हॅलीमध्ये पोहोचला. येथे नक्षलवाद्यांनी एक झाड पाडून रस्ता अडवला. वाहने थांबताच २०० हून अधिक नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला. या हल्ल्यात नंदकुमार पटेल आणि त्यांचा मुलगा दिनेश यांचा जागीच मृत्यू झाला. सुमारे दीड तास गोळीबार सुरू राहिला. संध्याकाळी ५:३० च्या सुमारास, नक्षलवादी डोंगरावरून खाली आले आणि त्यांनी प्रत्येक वाहनाची तपासणी केली. त्यापैकी एका वाहनात त्यांना सलवा जुडूम चळवळ सुरू करणारा महेंद्र कर्मा आढळला. चळवळीमुळे नक्षलवादी महेंद्र कर्माला शत्रू मानत होते. त्यांनी महेंद्र कर्माची निर्घृण हत्या केली. त्याला सुमारे १०० गोळ्या लागल्या. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, नक्षलवाद्यांनी काही नेत्यांची नावे ओळखली आणि त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. हा हल्ला पूर्ण नियोजनाने करण्यात आला. नक्षलवाद्यांनी जागा निवडण्यापासून, बॉम्ब ठेवण्यापासून ते पळून जाण्यापर्यंतची संपूर्ण तयारी केली होती. गुप्तचर संस्थांना हल्ल्याची कोणतीही कल्पना नव्हती. काँग्रेसने या हल्ल्याला राजकीय कट रचला आणि भाजप सरकारवर सुरक्षेत त्रुटी असल्याचा आरोप केला. भाजपने हे आरोप फेटाळून लावले आणि हा नक्षलवादी हल्ला असल्याचे म्हटले. हल्ल्याच्या दोन दिवसांनंतर २७ मे २०१३ रोजी हा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) सोपवण्यात आला. एनआयएने सप्टेंबर २०१४ मध्ये पहिले आरोपपत्र दाखल केले. त्यानंतर एक वर्षानंतर ऑक्टोबर २०१५ मध्ये पूरक आरोपपत्र दाखल करण्यात आले. आरोपपत्राच्या आधारे, या प्रकरणाची सुनावणी जगदलपूर एनआयए न्यायालयात अजूनही सुरू आहे. तथापि, एनआयएचा तपास अहवाल कधीही जाहीर करण्यात आला नाही. सुरक्षेतील त्रुटीची चौकशी करण्यासाठी एक आयोग स्थापन करण्यात आला, परंतु अहवाल कधीही सादर करण्यात आला नाही सुरक्षेतील त्रुटीची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने न्यायमूर्ती प्रशांत मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली एक न्यायिक आयोग स्थापन केला होता. आयोगाने २०२१ मध्ये राज्य सरकारऐवजी राज्यपालांना आपला अहवाल सादर केला. हा अहवालही आजपर्यंत बाहेर आलेला नाही. वाद वाढताच काँग्रेस सरकारने न्यायमूर्ती सतीश के. अग्निहोत्री आणि न्यायमूर्ती मिन्हाजुद्दीन यांच्या अध्यक्षतेखाली एक नवीन आयोग स्थापन केला. तथापि, उच्च न्यायालयाने तपासावर स्थगिती आणली. काँग्रेसच्या वतीने हा खटला लढणारे ज्येष्ठ वकील सुदीप श्रीवास्तव एनआयएच्या तपासावर प्रश्न उपस्थित करतात. ते म्हणतात की यात काहीतरी आहे, जे लोकांना कळू दिले जात नाही. सुदीप म्हणतात, 'एनआयए सुरुवातीला या प्रकरणाचा तपास मोठ्या माओवादी नेत्यांच्या सूचनेवरून केलेला हल्ला म्हणून करत होती. एफआयआरमध्ये नक्षलवादी नेते रामण्णा आणि गणपती यांची नावे नोंदवण्यात आली होती. एनआयए त्या दोघांनाही मास्टरमाइंड मानत होती.' 'सप्टेंबर २०१४ मध्ये जेव्हा आरोपपत्र दाखल करण्यात आले तेव्हा दंडकारण्य विशेष विभागीय समितीने हा हल्ला आखला आणि घडवून आणला असे म्हटले होते. यासाठी वरिष्ठ नेत्यांकडून परवानगी घेण्यात आली नव्हती. नंतर, एनआयएने गणपती आणि रामण्णा यांची नावे काढून टाकण्याबाबत कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही.' 'काँग्रेस नेत्यांनी आरोप केला की तपास योग्यरित्या झाला नाही. मोठ्या कटाची चौकशी झाली नाही. त्यानंतर छत्तीसगड सरकारने २०१६ मध्ये सीबीआय चौकशीसाठी अधिसूचना जारी केली. त्याच वर्षी केंद्राने ही सीबीआय चौकशी नाकारली.' '२०१८ मध्ये जेव्हा राज्यात काँग्रेस सरकार सत्तेवर आले तेव्हा त्यांनी हल्ल्याची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन केली. एनआयएने त्याला विरोध केला. दीर्घ कायदेशीर लढाईनंतर एसआयटीला चौकशी करण्याची परवानगी देण्यात आली. तोपर्यंत राज्यातील सरकार बदलले होते. या गोंधळामुळे हल्ल्याचे सत्य कधीच समोर आले नाही.' 'मे २०२० मध्ये, उदय मुदलियार यांचा मुलगा जितेंद्र मुदलियार यांनी जगदलपूरमध्ये एफआयआर दाखल केला. यामध्ये कटाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. या एफआयआरविरुद्ध एनआयए न्यायालयात गेली. कनिष्ठ न्यायालयात एनआयएची मागणी फेटाळण्यात आली. एनआयए उच्च न्यायालयात गेली.' प्रदीर्घ सुनावणीनंतर, उच्च न्यायालयाने एनआयएचे अपील फेटाळले. एनआयए सर्वोच्च न्यायालयात गेले. नोव्हेंबर २०२३ मध्ये, सर्वोच्च न्यायालयातील तत्कालीन मुख्य न्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने एनआयएचे अपील फेटाळले. यामुळे छत्तीसगड पोलिसांना झिरम हत्याकांडाची चौकशी करण्याची परवानगी मिळाली. सुदीप म्हणतात, 'सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या वेळी राज्यात काँग्रेसचे सरकार होते. एका महिन्यानंतर भाजपचे सरकार सत्तेत आले. त्यानंतर, तपासात काहीही झाले नाही.' हल्ल्यातून वाचलेल्या काँग्रेस नेत्याने सांगितले- ही कॉन्ट्रॅक्ट किलिंग बस्तर येथील काँग्रेस नेते मलकीत सिंह गायडू या हल्ल्यातून बचावले. ते छत्तीसगड काँग्रेसचे सरचिटणीस आहेत. मलकीत या हल्ल्याला कट रचून 'कॉन्ट्रॅक्ट किलिंग' असे म्हणतात. ते म्हणतात, 'नक्षलवाद्यांनी हल्ल्याचा व्हिडिओ प्रसिद्ध केला नाही किंवा जबाबदारी घेतली नाही अशी ही पहिलीच वेळ होती. म्हणूनच मी सुरुवातीपासूनच या हल्ल्याला कॉन्ट्रॅक्ट किलिंग म्हणत आहे.' मलकीत म्हणतात, 'एनआयएच्या तपासात जे समोर आले ते बाहेर आले पाहिजे. कोण दोषी आहे हे कळले पाहिजे. किंवा एसआयटीला चौकशी करण्याची परवानगी दिली पाहिजे. ही संपूर्ण घटना संशयाच्या भोवऱ्यात आहे.'
Mumbra train accident preliminary report out : ९ जून रोजी मुंब्रा रेल्वे स्थानकावर लोकल रेल्वेमधून प्रवासी खाली पडून अपघाताच्या दुर्देवी घटना घडली होती. या घटनेनंतर सर्वत्र मोठी खळबळ उडाली होती. आता या घटनेचा प्राथमिक अहवाल समोर आला असून या अहवालात घटनेचे कारण नमूद करण्यात आले आहे. या घटनेनंतर सुरुवातीला दोन्ही लोकल रेल्वे शेजारून जात असताना […] The post मुंब्रा दुर्घटनेचा प्राथमिक अहवाल समोर; दोन्ही लोकल ताशी ७५ किमी वेगाने धावत होत्या अन्…..; अपघाताला ‘तो’ प्रवासी जबाबदार? appeared first on Dainik Prabhat .
Tata Motors: टाटा मोटर्सने हॅरियर.इव्हीच्या प्रारंभिक किंमतींची घोषणा केली
मुंबई: टाटा मोटर्स (Tata Motors) या भारतातील मोठ्या चारचाकी इव्ही (EV Car)उत्पादकाने आज भारतात बनलेल्या स्वदेशी दमदार एसयूव्ही हॅरियर.इव्हीच्या प्रारंभिक किंमतींची घोषणा केली.केवळ या उद्योगातच नाही,तर जगभरात नवीन असलेली इनोव्हेशन्स आणि बॅटरी पॅकवर आजीवन वॉरंटीसह सुलभ मालकी प्रदान करण्या बाबतची हॅरियर.इव्हीने केवळ आपली विश्वासार्हता मजबूत केलेली नाही,तर सुपरकार सारखा परफॉर्मन्स,कुठेही घेऊन जाऊ शकणारी ऑफ-रोड क्षमता,आकर्षक टेक्नॉलॉजी आणि आलीशान आरामदायकता प्रदर्शित करून भविष्याची अल्टीमेट एसयूव्ही म्हणून स्वतःला प्रस्थापित केले आहे असे कंपनीकडून लाँच दरम्यान म्हटले गेले आहे.२ जुलैपासून हॅरियर.इव्हीचे बुकिंग सुरू होत आहे. रियर-व्हील ड्राइव्ह (आरडब्ल्यूडी)द्वारा संचालित प्रकारासाठीच्या प्रारंभिक किंमती २१.४९ लाखांपासून सुरु होत आहेत.हॅरियर.इव्ही अँडव्हेंचर ६५ची किंमत २१.४९ लाख रुपये,अँडव्हेंचर एस ६५ ची किंमत २१.९९ लाख रुपये,फियरलेस+ ६५ ची किंमत २३.९९ लाख रुपये, फियरलेस+ ७५ ची किंमत २४.९९ लाख रुपये आणि एम्पॉवर्ड ७५ ची किंमत २७.४९ लाख असणार आहे असे कंपनीने म्हटले आहे.हॅरियर.इव्हीच्या स्पर्धात्मक किंमती ठेवण्याच्या धोरणाविषयी टिप्पणी करताना टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडचे चीफ कमर्शियल ऑफिसर विवेक श्रीवास्तव म्हणाले,'हॅरियर.इव्ही सह एका सुपरकार प्रमाणे बेजोड परफॉर्मन्स देण्याची,कुठेही ऑफ रोड जाण्याची,आलिशान आरामदायकता देण्याची एका एसयूव्हीची खरी क्षमता उघड करण्याची आमची इच्छा आहे. हॅरियर.इव्हीमध्ये लक्षणीय असे काय आहे, तर हे वाहन या सर्वच गोष्टी प्रदान करते आणि तेही आयसीई संचालित वाहनांच्या किंमतीत आणि परफॉर्मन्स,कार्यक्षमता,टेक्नॉलॉजी आणि सुरक्षा याबाबतीत मात्र हॅरियर. इव्ही आयसीई (ICE) संचालित वाहनांना मागे टाकते.आज या वाहनाच्या किंमती जाहीर करताना आम्ही भारतात ई-मोबिलिटीला पुढे घेऊन जाण्याच्या दिशेने एक लक्षणीय पाऊल उचलत आहोत आणि त्याचबरोबर पारंपरिक आयसीई संचालित वाहनांना एक दमदार पर्याय देऊ करत आहोत.आम्हाला खात्री आहे की,हॅरियर.इव्ही एसयूव्ही या उद्योगात एसयूव्हीच्या नवीन युगाची सुरुवात करेल.या युगात वाहनाला शक्ती कुठून मिळते हे नाही,तर वाहन कशी शक्ती प्रदान करते हे महत्त्वाचे असेल.'हॅरियर.इव्हीची ठळक वैशिष्ट्ये:सुपरकारसारखा परफॉर्मन्स अनुभवापुढच्या बाजूस १५८ पीएस (११६ केडब्ल्यू)ची ड्युअल मोटर शक्ती आणि मागील बांजून २३८ पीएस (१७५ केडब्ल्यू)ड्युअल मोटर सेटअपमधून ५०४ एनएम टॉर्क६.३ सेकंदात ०-१०० किमी प्रति तास सेगमेन्ट श्रेणीतया एसयूव्हीसह कुठेही ऑफ-रोड जाण्याची क्षमताक्वॉड व्हील ड्राइव्ह सिस्टमसह अप्रतिम ऑफ-रोड अनुभवसहा टेरेन मोड असल्यावर काहीच अशक्य नाही यामुळे कुठेही बिनधास्त जाण्याचा विश्वास मिळतो असे कंपनीने म्हणणे आहे.५४० अंश सराऊंड व्ह्यू सह आसपासचे आणि खालचे देखील बघू शकतासेव्हर इंडल्जंट टेक्नॉलॉजी आणि पूर्वी कधीही नव्हती इतकी आरामदायकताअसामान्य हाताळणी आणि चालवण्याच्या कम्फर्टसाठी फ्रिक्वन्सी डिपेन्डन्ट डॅम्पिंगसह अल्ट्रा गाइड सस्पेंशनसह बेजोड आरामदायकता आणि शांती मिळवाजगातील पहिली हरमनची ३६.९ सेमी (१४.५३”) सिनेमॅटिक इन्फोटेन्मेंट स्क्रीन, जी सॅमसंग निओ क्यूएलईडीद्वारा संचालित आहे. हा जगातील पहिला निओ क्यूएलईडी ऑटोमोटिव्ह डिस्प्ले आहे,यात JBL ऑडिओ मोड आणि डॉल्बी अटमॉस सह जेबीएल ब्लॅक १० स्पीकर सिस्टम आहे,जी थिएटरमॅक्स अनुभव देतेई-व्हॅले ऑटो पार्क असिस्ट, डिजी अक्सेस डिजिटल की आणि ड्राइव्हपे सह तुमच्या हातात सुविधेचे बळमालकीच्या मुक्त अनुभवासाठी बॅटरी पॅकवर आजीवन वॉरंटी दिली आहे (*फक्त प्रथम मालक – खाजगी वैयक्तिक ग्राहकासाठीच)७५ केडब्ल्यूएच बॅटरी पॅकचे पाठबळ जे ६२७ किमीची एआरएआय प्रमाणित (पी१ + पी२) रेंज (अंदाजे ४८० किमी – ५०५ किमी सी७५ रेंज)देते१५ मिनिटांच्या चार्जिंगमध्ये २५० किमी पर्यंत रेंज जोडून जलद चार्जिंग स्पीडचा लाभ मिळवाहॅरियर.इव्ही केवळ आपल्या अत्याधुनिक क्षमता प्रदर्शित करत नाही, तर देशात बनणाऱ्या एसयूव्हीसाठी एक नवीन मापदंड (Benchmark) स्थापित करते असे कंपनीने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
बारामती : लक्षवेधी ठरलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा निकालास दिरंगाई होताना दिसत आहे. २४ तासाच्या मतमोजणीनंतर केवळ एकच फेरी झाली आहे. आज सकाळी पुन्हा दुसऱ्या फेरीची मतमोजणी सुरू करण्यात आली आहे. आज दिवसभर दुसऱ्या फेरीची मतमोजणी सुरू राहील. पहिल्या फेरी अखेर नीलकंठेश्वर पॅनलच्या १६ उमेदवारांची आघाडी तर सहकार बचाव पॅनलच्या ४ उमेदवारांनी आघाडी घेतली […] The post माळेगाव कारखाना निवडणूक: दुसऱ्या फेरीला सुरुवात; नीलकंठेश्वर पॅनलचे १६ तर सहकार बचावचे ४ उमेदवार आघाडीवर appeared first on Dainik Prabhat .
‘इराणचे युरेनियम साठे सुरक्षितच..’ ; पेंटागॉनचा गुप्त अहवाल लीक ; ट्रम्प म्हणाले,”हा ‘फेक’अहवाल”
Pentagon on US Attack। इराणच्या तीन अणु केंद्रांवर, फोर्डो, इस्फहान आणि नतान्झवर अमेरिकेचा मोठा हल्ला अयशस्वी झाला का? अमेरिकन वृत्तसंस्था सीएनएन आणि न्यूयॉर्क टाईम्सने या संदर्भात अहवाल जारी करून अमेरिकन यंत्रणेत घबराट निर्माण केली आहे. सीएनएनच्या या अहवालात,” गेल्या आठवड्यात इराणच्या तीन अणु प्रतिष्ठानांवर अमेरिकेच्या लष्करी हल्ल्यांमुळे इराणच्या अणु कार्यक्रमाची खरी आणि महत्त्वाची गोष्ट नष्ट […] The post ‘इराणचे युरेनियम साठे सुरक्षितच..’ ; पेंटागॉनचा गुप्त अहवाल लीक ; ट्रम्प म्हणाले,”हा ‘फेक’ अहवाल” appeared first on Dainik Prabhat .
निधी वाटपावरून शिवसेनेच्या मंत्र्यांचा नाराजीचा सूर; ‘या’नेत्यावर असणार मोठी जबाबदारी
Cabinet meeting : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल २४ जून रोजी मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्याच्या विकासाला चालना देणारे ८ मोठे निर्णय घेण्यात आले. मात्र, या बैठकीनंतर शिवसेनेच्या मंत्र्यांना निधी वाटपात सापत्न वागणूक दिली जात असल्याचे बोलले जात आहे. यामुळे शिवसेनेतील अनेक मंत्री नाराज असल्याची चर्चा होत आहे. […] The post निधी वाटपावरून शिवसेनेच्या मंत्र्यांचा नाराजीचा सूर; ‘या’ नेत्यावर असणार मोठी जबाबदारी appeared first on Dainik Prabhat .
Pune : एनए परवानगीही आता ऑनलाइन; ऑटो डिसीआर प्रणाली बिनशेतीशी संलग्न होणार
पुणे – बांधकाम परवानगी देतानाच गौणखनिज आणि बिनशेती (एनए) परवानगी ऑनलाइन उपलब्ध करून देण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे बिनशेती परवानगी प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि गतिमान होणार आहे. गौणखनिजची परवानगी देण्याच्या प्रक्रिया सुलभ करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेऊन स्वतंत्र पोर्टल विकसित केले आहे. त्यामुळे याबाबतच्या अडचणींसह गैरप्रकारांनाही आळा बसला आहे. आता बिनशेती परवानगीही ऑनलाइनच […] The post Pune : एनए परवानगीही आता ऑनलाइन; ऑटो डिसीआर प्रणाली बिनशेतीशी संलग्न होणार appeared first on Dainik Prabhat .
Pune District : जेजुरी देवस्थान विश्वस्त कमिटीचा मनमानी कारभार?
ग्रामस्थांचा आंदोलन इशारा : हॉस्पिटलसाठी खरेदी केलेल्या जागेवर भक्तीनिवास उभारण्याच्या कृतीला विरोध जेजुरी – कुलदैवत खंडेरायाच्या जेजुरी येथील श्री मार्तंड देवसंस्थान विश्वस्त मंडळ वादाच्या भोवर्यात अडकले असून भाविक आणि ग्रामस्थांना विश्वासात न घेता विश्वस्त मंडळ मनमानी कारभार करीत असल्याचा आरोप खांदेकरी ग्रामस्थ व माजी विश्वस्तांनी केला आहे. गोरगरीब आणि सर्वसामान्य नागरिक व भाविक यांना माफक […] The post Pune District : जेजुरी देवस्थान विश्वस्त कमिटीचा मनमानी कारभार? appeared first on Dainik Prabhat .
निधी असूनही कामे होत नसल्याची शोकांतिका –मंत्री नितीन गडकरी
पुणे – सर्वसाधारणपणे चाकोरीबाहेरची कल्पना मांडल्यास प्रशासकीय यंत्रणा ती समजून घेण्याच्या आधीच त्याला विरोध करते. आता निधीची अडचण नसून कामे गतीने होत नाहीत, ही मोठी शोकांतिका आहे, अशी खंत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. विजय केळकर यांना अर्थशास्त्र क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल २०२५ चा पुण्यभूषण पुरस्कार मंत्री […] The post निधी असूनही कामे होत नसल्याची शोकांतिका – मंत्री नितीन गडकरी appeared first on Dainik Prabhat .
Pune : बेपत्ता अल्पवयीन मुलगी जबलपूरमध्ये मृतावस्थेत
पुणे – शहरातून २५ दिवसांपूर्वी रहस्यमयरित्या गायब झालेली १४ वर्षीय मुलगी मध्यप्रदेशातील जबलपूरमध्ये मृतावस्थेत आढळली. ती ज्या तरुणाबरोबर पळून गेली होती तो तरुण नागपूर रेल्वे स्थानकावर बेशुध्दावस्थेत आढळला आहे. मुलगी मध्य प्रदेशातील नैनपूर रेल्वे स्थानकावर शहडोल-इतवारी एक्स्प्रेसमध्ये बेशुद्धावस्थेत आढळली. जबलपूरच्या व्हिक्टोरिया रुग्णालयात उपचार सुरू असताना तिचा १७ जून रोजी मृत्यू झाला. दोघे जेथे आढळले त्या […] The post Pune : बेपत्ता अल्पवयीन मुलगी जबलपूरमध्ये मृतावस्थेत appeared first on Dainik Prabhat .
Pune District : घोडनदी पात्रात पावसामुळे पाण्याची पातळी वाढली
– धोकादायक पद्धतीने नागरिक करतात मच्छीमारी मंचर – आंबेगाव तालुक्यातील घोडनदी पात्रात पावसामुळे पाण्याची पातळी वाढली असताना त्या ठिकाणी धोकादायक पद्धतीने ठाकर व इतर समाजातील नागरिक मच्छीमारी करताना दिसून येतात. पाण्याची पातळी वाढल्यानंतर गढूळ पाण्यात मासे मोठ्या प्रमाणावर सापडत असतात.त्यामुळे बहुतांशी नागरिक धोकादायक पद्धतीने मासेमारी करण्यासाठी नदीपात्रात प्रवेश करतात.यामुळे त्यांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. […] The post Pune District : घोडनदी पात्रात पावसामुळे पाण्याची पातळी वाढली appeared first on Dainik Prabhat .
पोर्शे अपघात प्रकरण : अल्पवयीनला सज्ञान ठरवून खटला चालवावा
पुणे, – कल्याणीनगर अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाने मद्य प्राशन करून भरधाव मोटार चालविली. या अपघातात दुचाकीस्वार संगणक अभियंता तरुण-तरुणीचा मृत्यू झाला. मुलाला वाचविण्यासाठी त्याचे बांधकाम व्यावसायिक वडील, आई तसेच साथीदारांनी कट रचला. ससून रुग्णालयात मुलाच्या रक्ताचे नमुने बदलले. गुन्हा गंभीर असल्याची माहिती अल्पवयीनाला माहिती होती. त्यामुळे अपघात करणाऱ्या अल्पवयीनाला सज्ञान ठरवून त्याच्याविरुद्ध खटला चालवावा, असा […] The post पोर्शे अपघात प्रकरण : अल्पवयीनला सज्ञान ठरवून खटला चालवावा appeared first on Dainik Prabhat .
Pune District : कनेरसर-पाबळ रस्ता खड्ड्यांत
अनेक छोट्या-मोठ्या अपघातांना आमंत्रण : टाव्हरे यांच्यकडून निवेदन सादर दावडी – कनेरसर येथील श्री यमाई मंदिर (पाबळ ता. शिरूर) येथील जैन मंदिर, कनेरसर येथील सेझ क्षेत्रातील कंपन्या यामुळे कनेरसर-पाबळ रस्ता नेहमी वर्दळीचा असतो. रस्त्याची रूंदी कमी, साईडपट्ट्या उखडल्या आहे. त्यात पावसामुळे खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाल्याने खड्ड्यत रस्ता की रस्त्यात खड्डा असा प्रश्न वाहनचालक व नागरिकांना […] The post Pune District : कनेरसर-पाबळ रस्ता खड्ड्यांत appeared first on Dainik Prabhat .
राज्यातील २० जिल्ह्यांत पाऊसच नाही; मराठवाडा आणि विदर्भाकडे पावसाची पाठ
पुणे– महाराष्ट्रात यावर्षी जूनमध्ये तुलनेने चांगला पाऊस झाला, अशी सामान्यपणे स्थिती असताना २० जिल्हे मात्र अजूनही तहानलेलेच आहेत. यातील बहुतांश जिल्हे मराठवाडा आणि विदर्भातील आहेत. तर, तीन जिल्हे मध्य महाराष्ट्रातील आहेत. पुणे जिल्ह्यात महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. जूनमध्ये आतापर्यंत एकूण २४८.८ मिमी पाऊस झाला आहे, जो सामान्य ११८.५ मिमी पाऊस होता. मे महिन्याच्या […] The post राज्यातील २० जिल्ह्यांत पाऊसच नाही; मराठवाडा आणि विदर्भाकडे पावसाची पाठ appeared first on Dainik Prabhat .
Pune District : लोकप्रतिनिधी आहेत तरी कुठे?
चाकण परिसरातील वाहतूक कोंडी फुटणार तरी कधी? चाकण – चाकण आणि परिसरात असणार्या कारखानदारीने बेसुमार वाढलेली वाहनांची संख्या, अपुरे रस्ते, सततची वाहतूक कोंडी, बेदरकार वाहनचालक, प्रशासन आणि प्रशासकांची सुरू असलेली गळचेपी भूमिका आणि वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे चाकणच्या मार्गांवर रोज होणार्या जीवघेण्या अपघातात एक तरी बळी जातोय तर एखादा कायमचा जायबंदी होत आहे. मात्र कोणत्याही राजकीय […] The post Pune District : लोकप्रतिनिधी आहेत तरी कुठे? appeared first on Dainik Prabhat .
Pune District : माऊलींच्या स्वागतासाठी नीरा नगरी सज्ज
ग्रामपंचायतीसह सर्व यंत्रणा तयार नीरा – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याच्या आगमनानिमित्त नीरा नगरीत जय्यत तयारी करण्यात आली आहे. ग्रामपंचायत, पोलीस प्रशासन, महावितरण, जलसंपदा व आरोग्य विभाग यांच्या संयुक्त प्रयत्नांतून नीरा गाव पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे. नीरा नदीच्या काठावर असलेल्या पालखी विसावा स्थळावर निर्जंतुकीकरण करण्यात आले असून आकर्षक विद्युत रोषणाईने संपूर्ण परिसर उजळून […] The post Pune District : माऊलींच्या स्वागतासाठी नीरा नगरी सज्ज appeared first on Dainik Prabhat .
Malegaon Election Results : राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या मतमोजणीला मंगळवारी सुरूवात झाली. मध्यरात्री दीड वाजता पहिल्या फेरीची मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाली असून आता दुपारी बारा ते एक वाजेपर्यंत संपूर्ण निकाल हाती येणार अशी शक्यता आहे. ‘ब’ वर्गातून उपमुख्यमंत्री अजित पवार हे विजयी झाले असून आतापर्यंतचे कल पाहता अजित […] The post माळेगाव निवडणूक : मतमोजणीला पुन्हा सुरूवात; अजित पवारांच्या पॅनलची आघाडी कायम, क्रॉस व्होटिंगचा फटका कोणाला बसणार? appeared first on Dainik Prabhat .
Pune : नदीला पूर आला आहे, तुम्हीच काळजी घ्या ! महापालिकेचा पुणेकरांना आवाहन
पुणे– मुठा नदीत पाणी सोडून आठ दिवस झाल्यानंतर नदीला पूर आल्याची जाणीव झालेल्या महापालिकेने पूरस्थितीत खबरदारी घेण्याचे आवाहन पुणेकरांना केले आहे. विशेष, म्हणजे या पूरस्थितीत नागरिकांच्या सुरक्षेसाठी महापालिकेने उपाययोजना राबविणे आवश्यक असताना पुणेकरांवरच सूचनांचा भडीमार करण्यात आला आहे. तर, सोसायट्यांमध्ये पाणी घुसण्याच्या घटना वाढत असल्याने सोसायटीत शिरलेले पाणी बाहेर काढण्यासाठी सोसायटीनेच मोटार पंपाची व्यवस्था आपल्या […] The post Pune : नदीला पूर आला आहे, तुम्हीच काळजी घ्या ! महापालिकेचा पुणेकरांना आवाहन appeared first on Dainik Prabhat .
Pune District : बारामतीच्या पालखी सोहळ्यात ‘संवाद वारी’प्रदर्शन
आजपासून प्रदर्शन : शासकीय योजनांचा जागर बारामती – श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासोबत पालखी मुक्कामाच्या ठिकाणी राज्य शासनाच्या विविध विभागांच्या ठळक लोककल्याणकारी योजना, उपक्रमांची माहिती देणाऱ्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय मार्फत आयोजित ‘संवाद वारी’ या चित्र प्रदर्शनाचे, एलईडी व्हॅन, कलापथक व्हॅन तसेच चित्ररथ असून तालुक्यात उंडवडी गवळ्याची पालखीतळ येथे (दि.२५) आणि बारामती शहरात नगर […] The post Pune District : बारामतीच्या पालखी सोहळ्यात ‘संवाद वारी’ प्रदर्शन appeared first on Dainik Prabhat .
मेट्रो प्रकल्पांसाठी एमएमआरडीएकडून १२००० कोटींच्या कामांना मंजुरी
मेट्रो विस्तार, स्मार्ट वाहतूक यंत्रणेला गती मिळणारमुंबई (प्रतिनिधी) : मुंबईच्या शहर वाहतूक व्यवस्थेचा कायापालट साध्य करण्याच्या दिशेने एक ऐतिहासिक पाऊल उचलत, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणने १२,००० कोटींहून अधिक किमतीच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांना मंजुरी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (अध्यक्ष, एमएमआरडीए) यांच्या नेतृत्वाखाली आणि एमएमआरडीएचे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांच्या सक्रिय पुढाकाराने ही महत्त्वाची पावले उचलण्यात आली.मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या २८४ व्या कार्यकारी समितीच्या बैठकीत, अतिरिक्त मुख्य सचिव (१) श्री असीमकुमार गुप्ता, बीएमसी आयुक्त भूषण गगराणी आणि एमएमआरडीए आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, भाप्रसे यांच्या उपस्थितीत मेट्रो मार्ग आणि अटल सेतूसह विविध महत्त्वाच्या कामांतील कत्राटांरांच्या नेमणुकीसाठी मंजुरी देण्यात आली. या कंत्राटांत प्रणाली, रोलिंग स्टॉक, नागरी कामे, ट्रॅक्शन पॉवर, एएफसी प्रणाली, डेपो पायाभूत सुविधा आणि मल्टी-मोडल इंटिग्रेशन यांचा समावेश आहे.महाराष्ट्र शासन केवळ आजच्या गरजा पूर्ण करणाऱ्या नव्हे तर भविष्यातील मागण्यांची पूर्वकल्पना घेतलेली पायाभूत सुविधा निर्माण करण्यास कटिबद्ध आहे. एमएमआरडीएकडून मंजूर झालेली ही १२,००० कोटींपेक्षा अधिक किमतीची गुंतवणूक मुंबईच्या एकात्मिक आणि समावेशक वाहतूक व्यवस्थेच्या दिशेने मोठे पाऊल आहे. या प्रकल्पामुळे आर्थिक गती, शहरी गतिशीलता आणि नागरिकांचे जीवनमान सुधारेल. असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. त्याचबरोबर एमएमआरडीएकडून झालेली ही ऐतिहासिक मंजूरी महाराष्ट्र सरकारच्या जागतिक दर्जाच्या वाहतूक पायाभूत सुविधेच्या बांधणीसाठीच्या कटिबद्धतेचा पुरावा आहे. १२,००० कोटींपेक्षा अधिक गुंतवणुकीद्वारे आम्ही एक समतोल, शाश्वत आणि आधुनिक मेट्रो नेटवर्क घडवत आहोत. अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.आयएएस एमएमआरडीए आयुक्त डॉ. संजय मुखर्जी म्हणाले, मंजूर झालेले प्रत्येक प्रकल्प हे मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेच्या एकात्मिक विकासात मोलाचा वाटा उचलेल याची खात्री करून घेतली आहे. सिस्टम्स इंटिग्रेशन, रोलिंग स्टॉक, ट्रॅक्शन पॉवर, AFC व मल्टी-मोडल इंटिग्रेशन या सर्व घटकांना जोडणारी ही कंत्राटे आम्ही ऑपरेशनल रेडिनेस लक्षात घेऊन मंजूर केली आहेत. शेवटच्या टप्प्याच्या जोडणीवर आमचा भर असून, प्रवाशांसाठी सहज, गतीशील आणि एकात्मिक वाहतूक संरचना निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
Pune District : डास निर्मूलनातील ‘बिजवडी पॅटर्न’चा मंत्रालयात ठसा
राज्यभर राबवणार योजना बिजवडी – डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया यांसारख्या जीवघेण्या आजारांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी बिजवडी (ता. इंदापूर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुश्रुत श्रेणिक शहा यांनी सुरू केलेला ‘शेड नेट पिशवी’ पथदर्शी प्रयोग आता थेट मंत्रालयाच्या पातळीवर पोहोचला आहे. या नाविन्यपूर्ण उपक्रमाला ‘बिजवडी पॅटर्न’ म्हणून मान्यता मिळाली असून, राज्यभर राबवण्याचे संकेत आरोग्य विभागाने […] The post Pune District : डास निर्मूलनातील ‘बिजवडी पॅटर्न’चा मंत्रालयात ठसा appeared first on Dainik Prabhat .
Pune District :आळेफाटा जि. प. शाळा, कालव्यात कचरा
अज्ञाताचे कृत्य ;पाणी प्रदूषण तर विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात बेल्हे – आळेफाटा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेजवळ तसेच पिंपळगाव जोगा कालव्यात अज्ञात व्यक्ती रात्रीच्या वेळी कचरा टाकणा-यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. आळेफाटा (ता. जुन्नर) येथील जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा पिंपळगाव जोगा कालव्याच्या कडेला असून, या ठिकाणी दररोज रात्री अज्ञात व्यक्ती कचरा टाकत असल्याने […] The post Pune District :आळेफाटा जि. प. शाळा, कालव्यात कचरा appeared first on Dainik Prabhat .
अकरावीचा कट ऑफ उद्या जाहीर होणार
पुणे – अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी राज्यातील १२ लाख ७१ हजार २०१ विद्यार्थ्यींनी नोंदणी केली आहे. पहिल्या कॅप फेरीचे कनिष्ठ महाविद्यालयांचे कट ऑफ गुरुवारी (दि.२६) जाहीर होणार असून विद्यार्थ्यांचे महाविद्यालय वाटपही जाहीर होईल. अकरावी प्रवेशासाठी ९ हजार ४३५ कनिष्ठ महाविद्यालयांनी नोंदणी केली आहे. विद्यार्थी प्रवेश क्षमता २१ लाख २३ हजार ७२० असून त्यापैकी कॅप फेरी साठी […] The post अकरावीचा कट ऑफ उद्या जाहीर होणार appeared first on Dainik Prabhat .
Pune District : टाळ मृदंगाच्या गजराने मांडकी दुमदुमले
समीर भुजबळ वाल्हे – व्यास आणि वाल्मिकी कोण कूळ त्यांचे । तैसेचि आमुचे सोपान म्हणे ॥ श्री संत सोपानकाका महाराजांचा पालखी सोहळा वीर, लपतळवाडी या गावांचे स्वागत स्वीकारीत मांडकी (ता.पुरंदर) येथे दुसर्या दिवसांच्या मुक्कामासाठी मंगळवारी (दि. 24) विसावला. यावेळी, टाळ-मृदंगाच्या तालावरती हातात भगवी पताका घेऊन ज्ञानोबा तुकाराम यांचा जयघोषात, अवघे मांडकी गाव दुमदुमले होते.यावेळी हजारो […] The post Pune District : टाळ मृदंगाच्या गजराने मांडकी दुमदुमले appeared first on Dainik Prabhat .
Pune: भविष्यात हेलिकाॅप्टर निर्मितीवर भर –केंद्रीय मंत्री राममोहन नायडू
पुणे– देशात हेलिकॉप्टर वाहतुकीचे क्षेत्र खूप मोठे आहे. मात्र, हेलिकाॅप्टरची संख्या तुलनेने कमी असल्यामुळे भविष्यात हेलिकाॅप्टर निर्मितीवर भर देण्यात येणार आहे. त्यासाठी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या अंतर्गंत एक स्वतंत्र संचालक नेमण्यात आले आहेत. त्यामुळे हेलिकॉप्टर, छोटे एअरक्राफ्ट क्षेत्राचा विकास होण्यास मदत होणार होईल. त्यासाठी केंद्र सरकारकडून शक्य ती मदत केली जाईल, अशी माहिती केंद्रीय विमान […] The post Pune: भविष्यात हेलिकाॅप्टर निर्मितीवर भर – केंद्रीय मंत्री राममोहन नायडू appeared first on Dainik Prabhat .
Pune District : तुकोबांचा पालखी सोहळा वरवंडमध्ये विसावला
भांडगावात विसावा : अवघा परिसर हरिनामात तल्लीन वरवंड/ पाटस – पंढरपूरच्या विठोबाचे दर्शनासाठी निघालेला वैष्णवांचा मेळावा राम कृष्ण हरीच्या जयघोषाने टाळ – मृदंगाच्या गजरात तल्लीन होत जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखी सोहळा दौंड तालुक्यातील यवत येथील मुक्काम आपटून पंधरा किलोमीटरचा पायी प्रवास करत पालखी सोहळा मुक्कामासाठी वरवंड येथे मंगळवार (दि.२४) संध्याकाळी सहाच्या सुमारास दाखल झाला […] The post Pune District : तुकोबांचा पालखी सोहळा वरवंडमध्ये विसावला appeared first on Dainik Prabhat .
Pune: पावसाळी पाण्यासाठी आता नवा आराखडा; पालिका आयुक्तांचे आदेश
पुणे: छोट्या-मोठ्या पावसाने पुणे पाण्याखाली जात असल्याने महापालिका आयुक्तांनी शहराच्या जुन्या हद्दीसाठी नवा एकात्मिक पावसाळी पाणी व्यवस्थापन आराखडा तयार करण्याच्या सूचना पथ विभागास दिल्या आहेत. त्यासाठी तातडीनं सल्लागार नेमण्याचे आदेशही दिले आहेत. विशेष म्हणजे २००७ मध्ये शहरासाठी अशाच प्रकारचा आराखडा तयार झाला होता. निधी नसल्याने पालिकेने त्याची टप्प्या टप्प्याने अंमलबजावणी केली. त्यातील अनेक कामे अर्धवट […] The post Pune: पावसाळी पाण्यासाठी आता नवा आराखडा; पालिका आयुक्तांचे आदेश appeared first on Dainik Prabhat .
Pune District : राजगुरूनगरातील महिला आक्रमक
पाण्यासाठी मोर्चा काढत मुख्याधिकार्यांना घातला घेराव राजगरूनगर – पावसाळा असताना आणि पाण्याची कमतरता नसताना राजगुरूनगर शहरातील काही भागात दिवसाआड नळाला पाणीपुरवठा होतो. यावरून संतप्त महिलांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अंबादास गर्कळ यांना मंगळवारी (दि 24) घेराव घातला. राजगुरूनगर नगरपरिषद हद्दीत महिन्यांपासून स्वच्छ व मुबलक पाणी मिळत नाही. त्यातच अलीकडे काही दिवसांपासून दिवसाआड आणि तेही कमी पाणी मिळते […] The post Pune District : राजगुरूनगरातील महिला आक्रमक appeared first on Dainik Prabhat .
२४ जून रोजी, तेल अवीवमधील लोकांना क्षेपणास्त्र हल्ल्यापूर्वी वाजणाऱ्या सायरनने जाग आली. इराण आणि इस्रायलमधील युद्धाचा हा १२वा दिवस होता. लोक बॉम्ब शेल्टरकडे धावले. आश्रयस्थानात गेल्यानंतर त्यांनी बातमी वाचली की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पहाटे ३:३२ वाजता इराण आणि इस्रायलमध्ये युद्धबंदीची घोषणा केली आहे. लोकांना आश्चर्य वाटले की ही कशी युद्धबंदी आहे. ट्रम्प यांच्या घोषणेनंतर अवघ्या एका तासाने, इराणी क्षेपणास्त्र हल्ल्यांबद्दल लोकांना सावध करण्यासाठी इस्रायलमध्ये सायरन वाजू लागले. २४ जूनची सकाळ इतर दिवसांपेक्षा वेगळी होती. सायरन दररोजप्रमाणे एकदा किंवा दोनदा नाही तर सहा वेळा ब्रेकसह वाजले. लोकांना ६ वेळा बंकरमध्ये जावे लागले. लहान मुलांसह बंकरमध्ये बसलेल्या इस्रायली लोकांना आश्चर्य वाटले की युद्धबंदीनंतरही इराणकडून क्षेपणास्त्रे कशी येत आहेत. त्याच क्षणी एक संदेश आला की आपल्याला बराच वेळ बंकरमध्ये राहावे लागेल. पुढचे तीन तास असेच गेले. मग बातमी आली की ११५ किमी अंतरावर असलेल्या बीरशेबा येथील एका निवासी इमारतीवर एक क्षेपणास्त्र पडले आहे. संपूर्ण इमारत ५ सेकंदात उद्ध्वस्त झाली. दिव्य मराठीने युद्धविरामावर इराण तसेच इस्रायलच्या लोकांशी संवाद साधला. इस्रायलच्या लोकांनी युद्धबंदीवर आनंद व्यक्त केला आणि म्हटले की युद्ध आता थांबले पाहिजे. आम्ही दोन वर्षांपासून लढून थकलो आहोत. इराणच्या लोकांनी म्हटले की अमेरिका आणि इस्रायलला धडा शिकवणे आवश्यक आहे. इराणी क्षेपणास्त्र बेअरशेबामध्ये कोसळले, ६ मजली इमारत उद्ध्वस्तदक्षिण इस्रायलमधील बेरशेबा येथील एका ६ मजली निवासी इमारतीवर इराणी बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचा हल्ला झाल्याची बातमी आली, तेव्हा आम्ही बंकरमध्ये होतो. क्षेपणास्त्र हल्ल्यात संपूर्ण इमारत उद्ध्वस्त झाली. या हल्ल्यात ५ जणांचा मृत्यू झाला. २० हून अधिक जण जखमी झाले. इमारतीच्या आजूबाजूच्या इमारतींचेही खूप नुकसान झाले आहे. सुरक्षित घर सोडण्याचा संदेश मिळताच, आम्ही तेल अवीवहून थेट बीरशेबाला निघालो. आम्ही सुमारे दीड तासात ११५ किमी अंतर कापले आणि इराणी बॅलिस्टिक क्षेपणास्त्राने ६ मजली इमारत उद्ध्वस्त केलेल्या ठिकाणी पोहोचलो. इराणी क्षेपणास्त्र इमारतीच्या अगदी मध्यभागी पडले. हा हल्ला इतका धोकादायक होता की येथे राहणारी नोआ, एक वृद्ध महिला, दोन तासांनंतरही थरथर कापत होती. उद्ध्वस्त झालेली इमारत तिच्या घराजवळ आहे. हल्ल्याच्या वेळी ती बॉम्ब निवारण केंद्रात होती. नोआ रडत रडत म्हणते, 'सकाळी ६ वाजता एक मोठा स्फोट झाला. आजूबाजूच्या सर्व इमारती हादरल्या. हा हल्ला इतका शक्तिशाली होता की भूकंप झाल्यासारखे वाटले.' एक दीर्घ श्वास घेत नोआ म्हणते, ते खूप वाईट लोक आहेत. त्यांना लोकांना मारण्याशिवाय दुसरे काहीही नको आहे. 'आम्ही लढून-लढून थकलो आहोत, युद्ध थांबले पाहिजे'आम्ही बेअरशेबामध्ये कव्हरेज करत असताना बातमी आली की उत्तर इस्रायलमध्ये सायरन अलर्ट जारी करण्यात आला आहे. इराणकडून क्षेपणास्त्रे डागण्यात आली आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या युद्धबंदीच्या घोषणेनंतर सातव्यांदा क्षेपणास्त्र अलर्ट जारी करण्यात आला. यामुळे इस्रायलच्या लोकांच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता. बीरशेबा येथे राहणारे पत्रकार एयाल म्हणतात, 'एक इस्रायली म्हणून मला वाटते की युद्धबंदी लागू केली पाहिजे, परंतु आम्हाला अजूनही उत्तर आणि दक्षिण इस्रायलकडून क्षेपणास्त्र हल्ल्यांचे अलर्ट मिळत आहेत. इस्रायल गेल्या २ वर्षांपासून युद्ध करत आहे. आता लढाई थांबली पाहिजे. इस्रायल एक बलवान देश आहे, पण तो खूप लहानदेखील आहे. आम्ही लढून थकलो आहोत.' इस्रायली सरकार असा दावा करत आहे की इस्रायलने इराणशी युद्धात आपले ध्येय साध्य केले आहे. तुम्हालाही असे वाटते का? एयाल म्हणतात, 'मला माहिती नाही. आपल्यासाठी सर्वात मोठा धोका इराणने अणुबॉम्ब मिळवणे हा होता. मला वाटते की इराण आता अणुबॉम्ब बनवण्याचे स्वप्न सोडून देईल.' 'मला आता शांतता हवी आहे, सर्व युद्धे संपवण्यासाठी. दोन वर्षांच्या लढाईनंतर, इस्रायल पूर्वीपेक्षा जास्त सुरक्षित आहे.' इराणला त्यांच्या प्रॉक्सी हमास, हिजबुल्लाह, हौथी यांच्या माध्यमातून इस्रायलमध्ये दहशत पसरवायची होती. आता ते कमकुवत झाले आहेत. सकाळी मला वाटले की सर्व काही ठीक आहे. मी अजूनही तशीच प्रार्थना करत आहे. ७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमासच्या हल्ल्यानंतर नेतन्याहू यांना एक अतिशय कमकुवत नेता म्हणून पाहिले जात होते असे इयाल यांचे मत आहे. इराणवरील इस्रायली हल्ल्यानंतर त्यांच्यासाठी पाठिंबा वाढला आहे. जर आता निवडणुका झाल्या तर नेतन्याहू पुन्हा जिंकू शकतात. 'जर इराण थांबला नाही तर तो आमचा प्रतिसाद सहन करू शकणार नाही'बीरशेबा येथे राहणारी अहाब मुलांची काळजी घेते. ती म्हणते, 'युद्धविराम फक्त ट्रम्प यांनीच जाहीर केला आहे. माझ्या पंतप्रधानांनी युद्धविरामाला मान्यता दिलेली नाही. मला वाटते की इराण सध्या युद्धविराम करू इच्छित नाही. ते सतत क्षेपणास्त्रे डागत आहे. जर इराण थांबला तर इस्रायलदेखील थांबेल. जर इराण थांबला नाही तर आपण असे काही करू शकतो जे ते सहन करू शकणार नाही.' 'आम्ही ११ दिवसांत इराणला सांगितले आहे की ते काहीही करू शकत नाही. इराणने बसून चर्चा करावी आणि शांतता प्रस्थापित करावी. मला वाटते की आमचे ऑपरेशन संपले आहे. इराणमध्ये प्रवेश करून आम्ही जे करायचे होते ते केले आहे. आम्हाला इराणकडे रासायनिक किंवा अण्वस्त्रे नसावीत अशी आमची इच्छा होती.' अहाबा पुढे म्हणतात, 'इराणवरील हल्ल्यानंतर पंतप्रधान नेतन्याहू पूर्वीपेक्षा जास्त लोकप्रिय झाले आहेत. त्यांनी जगाला दाखवून दिले आहे की इस्रायल जे काही करायचे ते करू शकते. अमेरिका आणि इतर अरब देशांनाही शांतता हवी आहे, पण ते इराणला घाबरतात.' 'इराणवर विश्वास नाही, ते सामान्य लोकांना मारत आहेत'बीरशेबा येथील रहिवासी असलेला १२ वर्षीय साहा, ज्या इमारतीवर हल्ला झाला त्या इमारतीजवळील बॉम्ब निवारण केंद्रात होता. साहा म्हणतो, 'सकाळी माझ्या आईने मला सांगितले की लढाई थांबली आहे. आता क्षेपणास्त्रे येणार नाहीत. थोड्या वेळाने सायरन वाजू लागले. आम्हाला बॉम्ब निवारण केंद्राकडे धाव घ्यावी लागली.' 'जर युद्धबंदी झाली तर ते खूप छान होईल. आम्हालाही हेच हवे आहे. मी बऱ्याच दिवसांपासून शाळेत जाऊ शकलो नाही. मला भीती संपवायची आहे, शांतता हवी आहे. मला माझ्या मित्रांसोबत पुन्हा शाळेत जाता यावे.' रशियन वंशाची इस्रायली नागरिक सिरीना बेअरशेबामध्ये बचाव कार्यात गुंतली आहे. क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर, ती तिच्या टीमसह लोकांना अन्न आणि पाणी यासह आवश्यक मदत पुरवण्यासाठी एक छावणी उभारते. सिरीना रागाने म्हणते, 'जर ही युद्धबंदी आहे, तर अशा युद्धबंदीचा काय उपयोग? यापेक्षा युद्ध चांगले होते. आम्हाला माहित होते की आम्हाला स्वतःची जास्त काळजी घ्यावी लागेल.' युद्धामुळे दोन वर्षांपासून पर्यटन ठप्प आहे, लोकांना काम नाहीजेरुसलेममध्ये राहणारा कोरेन पर्यटनात गुंतलेला आहे. गेल्या २ वर्षात त्याचे काम थांबले आहे. युद्धामुळे पर्यटन क्षेत्र ठप्प झाले आहे. पर्यटक इस्रायलमध्ये येत नाहीत. कोरेन म्हणतात, 'लोक युद्धबंदीची वाट पाहत होते. आता युद्धबंदी झाली आहे.' 'इराण, त्याच्या प्रॉक्सी हमास-हिजबुल्लाहप्रमाणे युद्धबंदी स्वीकारणार नाही आणि क्षेपणास्त्रांचा मारा करत राहील. हेच घडत आहे. आम्हाला माहिती आहे की युद्धबंदी जास्त काळ टिकणार नाही, परंतु आम्ही अजूनही आशावादी आहोत. मला वाटते की इराणने वेळ मिळवण्यासाठी युद्धबंदी केली आहे जेणेकरून ते आपले सरकार आणि सैन्य पुन्हा उभारू शकेल.' कोरेन पुढे म्हणतात, 'इस्रायलमध्ये लोकशाही आहे. येथे वेगवेगळ्या विचारसरणीचे लोक आहेत. ऑक्टोबर २०२३ मध्ये हमासच्या हल्ल्यानंतर लोक पंतप्रधान नेतन्याहूवर रागावले होते. इराणवरील हल्ल्यानंतर हे पूर्णपणे बदलले आहे. नेतन्याहू यांनी ४० वर्षांपासून इस्रायलवर असलेला धोका बऱ्याच प्रमाणात कमी केला आहे. आता इराण कदाचित अणुबॉम्ब बनवू शकणार नाही.' आता इराणच्या लोकांबद्दल बोलूया 'अमेरिका आणि इस्रायल एकमेकांना धमकावत आहेत, त्यांना चिरडून टाकण्याची गरज आहे'इराणमध्ये राहणारे संशोधन अभ्यासक सय्यद अकिब झैदी म्हणतात, 'इराणमधील लोकांना आणि नेतृत्वाला युद्धबंदीमध्ये रस नाही. याचे कारण म्हणजे युद्धाचा येथील दैनंदिन जीवनावर फारसा परिणाम झालेला नाही. इराणमधील लोकांचा असा विश्वास आहे की आपल्याला धमकावले गेले आहे आणि छळले गेले आहे.' 'या गुंडगिरीचा स्रोत चिरडून टाकला जात नाही आणि ते पुन्हा असे करण्याचे धाडस करत नाही तोपर्यंत ही लढाई सुरूच राहिली पाहिजे. सध्या लोकांच्या मनात अशा भावना आहेत. त्यांच्यात तीन भावना दिसून येतात. पहिली गोष्ट म्हणजे, त्यांना इस्रायलवर शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन टाकण्याची संधी मिळाली आहे, जी लक्ष्यावर मारा करत आहेत, याचा त्यांना आनंद आहे.' 'दुसरा आत्मा म्हणजे लढणे. त्यांना असे वाटते की त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्यांनी हल्ला केला आहे, त्यांना जितके जास्त घाबरवले जात आहे तितकेच त्यांची लढण्याची भावना वाढते. तिसरा आत्मा आशेचा आहे.' 'इराणने युद्धबंदी नाही तर थांबा असे म्हटले आहे'प्रोफेसर जमीर अब्बास जाफरी हे कोम शहरातील अल मुस्तफा आंतरराष्ट्रीय विद्यापीठात शिकवतात. ते मुंबईचे रहिवासी आहेत, परंतु गेल्या १५ वर्षांपासून इराणमध्ये आहेत. युद्ध थांबण्याबाबत ते म्हणतात, 'इस्रायलने युद्धबंदीची विनंती केली आहे. इराणने म्हटले आहे की, आम्हाला शत्रूच्या बोलण्यावर विश्वास नाही. इराण सतर्क आहे आणि प्रत्येक हल्ल्याला प्रत्युत्तर देईल.' 'इस्रायलने अनेक वेळा युद्धबंदीचा भंग केला आहे. इराणने त्यांच्या अधिकृत निवेदनात हॉल्ट हा शब्द वापरला आहे, युद्धबंदी नाही.' 'इराणच्या विजयासाठी लढा'संशोधक अभ्यासक सय्यद अकिफ झैदी म्हणतात, 'युद्धविरामानंतरही इस्रायलचे हल्ले झाले आहेत. इराणला त्याची मजबूत भूमिका जाणवत आहे. आता जे काही युद्धविराम होईल ते त्याचा विजय म्हणून नोंदवले जाईल. म्हणूनच ते युद्धविरामासाठी तयार आहे.' 'अमेरिका आणि इस्रायलमधील भीती आणि चिंता त्यांना युद्धबंदी करू देणार नाही. त्यांना वाटते की जगाला कळेल की कोणाचा हात वरचष्मा आहे. नेतन्याहू यांना देशात आणखी समस्यांना तोंड द्यावे लागेल. आता जे काही होईल ते इराणच्या बाजूनेच असेल हे निश्चित आहे.' ट्रम्प यांच्या घोषणेनंतर अडीच तासांनी युद्धबंदी तोडण्यात आलीइस्रायल-इराण युद्धादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी २४ जून रोजी सकाळी युद्धबंदीची घोषणा केली. तथापि, काही तासांतच ती मोडली. युद्धबंदी सुरू झाल्यानंतर सुमारे अडीच तासांनी इराणने इस्रायलवर ६ बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली. प्रत्युत्तरादाखल इस्रायलने इराणची राजधानी तेहरानमधील रडार साइटवर हल्ला केला. इस्रायली आर्मी रेडिओने हल्ल्याची पुष्टी केली आहे. यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना फोन करून इराणवरील हल्ला थांबवण्यास सांगितले. अल जझिराच्या वृत्तानुसार, नेतन्याहू यांनी ट्रम्प यांना सांगितले की, 'मी हल्ला थांबवू शकत नाही, कारण इराणने प्रथम युद्धबंदीचे उल्लंघन केले आणि त्याला प्रत्युत्तर देणे आवश्यक आहे.' , कथेचे योगदान: रौफ डार
अॅक्सिओम ४ आज अंतराळात झेपावणार
तांत्रिक कारणामुळे यापूर्वी ६ वेळा मोहीम ढकलली होती पुढेनवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अॅक्सिओम ४ मिशन आता २५ जून रोजी प्रक्षेपित होणार असल्याची माहिती अमेरिकन नासाकडून देण्यात आली आहे. या मिशनमध्ये भारतासोबत हंगरी आणि पोलंड या देशांचाही सहभाग आहे. हे मिशन तिन्ही देशांसाठी ऐतिहासिक मानले जात आहे. भारतासाठी हे मिशन खास आहे, कारण अनेक वर्षांनंतर एक भारतीय अंतराळात झेप घेणार आहे.अॅक्सिओम-४ मिशनचे प्रक्षेपण फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटरमधून होणार आहे. नासाने सांगितले की, ही अंतराळ मोहीम २५ जून रोज भारतीय वेळेनुसार दुपारी १२.०० वाजता स्पेसएक्सच्या फाल्कन-९ रॉकेटद्वारे प्रक्षेपित केली जाईल. मात्र, यापूर्वी या अंतराळ मोहिमेचे प्रक्षेपण अनेकवेळा पुढे ढकलण्यात आले आहे. सुरुवातीला ही मोहीम २९ मे रोजी प्रक्षेपित होणार होती परंतु तांत्रिक अडचणींमुळे ती पुढे ढकलण्यात आली.
आषाढी एकादशी दिवशी भगवान जगन्नाथाची रथयात्रा
कल्याण (प्रतिनिधी) :आषाढी एकादशीच्या दिवशी ६ जुलै रोजी कल्याणमध्ये आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघाकडून भगवान जगन्नाथाची भव्य रथयात्रा काढण्यात येणार आहे. संघटनेचे अनुयायी जगदीश माधव दास यांनी सांगितले की, रथयात्रा दुपारी ३ वाजता कल्याण पश्चिमेतील वसंत व्हॅलीच्या डी-मार्ट येथून सुरू होईल.या दरम्यान नृत्य, भजन आणि नाटक असे विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले आहेत. रात्री खारघर नवी मुंबई इस्कॉन मंदिराचे अध्यक्ष एचजी, डॉ. सूरदास प्रभू यांचे आध्यात्मिक प्रवचन होईल. अनुयायी जगदीश माधव दास म्हणाले की, रथयात्रा वायले नगर, अमृतपार्क, दुर्गाडी किला रोड मार्गे आधारवाडी चौक मार्गे माधव बैंक्वेट हॉल येथे संपेल आणि शेवटी आरतीनंतर प्रसाद वाटप केला जाईल.या रथयात्रेत सहभागी होण्याचे आवाहन करताना त्यांनी सांगितले की, भाविकांनी वेळेवर उपस्थित राहून दर्शन आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा.
१२ दिवस क्षेपणास्त्र हल्ले आणि बॉम्बस्फोटांनंतर, इराण आणि इस्रायलने अखेर यापुढे युद्ध न करण्याचा निर्णय घेतला. २४ जून रोजी सकाळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायल-इराण युद्धबंदीची घोषणा केली, परंतु त्यानंतर काही वेळातच इस्रायलने दावा केला की त्यांच्यावर इराणने हल्ला केला आहे. तर इराणने याचा स्पष्टपणे इन्कार केला. तथापि, दुपारपर्यंत दोन्ही देशांनी युद्धबंदीवर सहमती दर्शविली. इस्रायल आणि इराण युद्धबंदीसाठी कसे सहमत झाले, खामेनी आता सुरक्षित आहेत का आणि नेतन्याहूवर त्याचा काय परिणाम होईल; आजच्या एक्सप्लेनरमध्ये जाणून घ्या... प्रश्न-१: युद्धबंदीची घोषणा करताना ट्रम्प यांनी काय म्हटले?उत्तर: २४ जून रोजी पहाटे ३:३२ वाजता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 'ट्रूथ' या सोशल मीडियावर लिहिले, 'सर्वांचे अभिनंदन! इराण आणि इस्रायलमध्ये पूर्ण आणि अंतिम युद्धबंदीवर सहमती झाली आहे. युद्धबंदी ६ तासांच्या आत सुरू होईल. इराणला प्रथम ती स्वीकारावी लागेल. इस्रायलदेखील यानंतर १२ तासांत युद्धबंदी करेल. २४ तासांनंतर, युद्ध औपचारिकपणे संपल्याचा विचार केला जाईल.' यानंतर ट्रम्प यांनी एका मुलाखतीत म्हटले, ते पूर्ण झाले याचा मला आनंद आहे. बरेच लोक मरत होते, परिस्थिती आणखी वाईट होऊ शकली असती. मला वाटते की ही युद्धबंदी कायमची आहे. सकाळी १०:३८ वाजता ट्रम्प यांनी ट्रूथवर आणखी एक पोस्ट केली आणि लगेचच युद्धबंदी लागू केली. ट्रम्प यांनी लिहिले, 'युद्धबंदी आता लागू होत आहे, कृपया ती मोडू नका.' प्रश्न-२: इराण आणि इस्रायल युद्धबंदी स्वीकारण्यास तयार आहेत का?उत्तर: हो. दोन्ही देशांनी युद्धबंदीसाठी सहमती दर्शविली. ट्रम्प यांच्या पाठोपाठ इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू म्हणाले, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीने इस्रायल इराणसोबत युद्धबंदीसाठी तयार आहे. ज्या उद्देशांसाठी हल्ला करण्यात आला होता ते सर्व साध्य झाले असल्याने आम्ही इराणसोबत युद्धबंदी करत आहोत. जर इराणने युद्धबंदीचा भंग केला तर इस्रायलदेखील प्रत्युत्तर देईल, असा इशाराही नेतान्याहू यांनी इराणला दिला. इस्रायलनंतर इराणनेही युद्धबंदीची घोषणा केली. इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने एक निवेदन जारी केले, 'इराणने शत्रूला पश्चात्ताप करण्यास आणि पराभव स्वीकारण्यास भाग पाडले.' तथापि, इराणने यापूर्वी युद्धबंदी स्वीकारण्यास नकार दिला होता. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची म्हणाले होते की, 'इस्रायलसोबत अद्याप कोणताही अंतिम युद्धबंदी करार झालेला नाही. जर इस्रायलने हल्ले थांबवले तर इराणही हल्ला करणार नाही.' यानंतर काही वेळातच, इस्रायलवर ६ वेळा बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्यात आला. टाईम्स ऑफ इस्रायलच्या वृत्तानुसार, एक क्षेपणास्त्र बेरशेबा शहरातील एका इमारतीवर पडले. इस्रायलने म्हटले की इराणने युद्धबंदीचे उल्लंघन केले. तर इराणने अशा कोणत्याही हल्ल्याचा इन्कार केला. इराणने म्हटले आहे की ट्रम्प यांच्या घोषणेपूर्वी क्षेपणास्त्रे डागण्यात आली होती, त्यापैकी बहुतेक इस्रायलने पाडली होती, फक्त एक क्षेपणास्त्र वाचले, जे बेअरशेबावर पडले. तथापि, या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. प्रश्न-३: इराण आणि इस्रायलने युद्धबंदी का मान्य केली?उत्तर: युद्धबंदीचे संपूर्ण श्रेय डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला दिले. त्यांच्यामुळेच युद्ध संपले असे त्यांचे मत आहे. तथापि, याशिवाय, युद्धबंदीची ४ प्रमुख कारणे आहेत... प्रश्न-४: १२ दिवसांच्या युद्धानंतर इराण आणि इस्रायलमध्ये युद्धबंदी कशी झाली?उत्तर: सीएनएनने व्हाईट हाऊसच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा हवाला देत म्हटले आहे की, २३ जून रोजी डोनाल्ड ट्रम्प अचानक म्हणाले की आपण शांतता प्रस्थापित करणार आहोत. चला इराणी लोकांशी बोलूया. प्रश्न-५: युद्धबंदीचा अर्थ असा आहे का की दोन्ही देश आता हल्ला करणार नाहीत?उत्तर: परराष्ट्र व्यवहार तज्ज्ञ आणि निवृत्त जेएनयू प्राध्यापक ए.के. पाशा म्हणतात, 'ट्रम्प यांच्या घोषणेनंतर युद्धबंदी झाली, पण ती किती काळ टिकेल हे सांगता येत नाही. इस्रायल आणि इराण अमेरिकेच्या युद्धबंदी घोषणेवर खूश दिसत नाहीत आणि दोघांनीही म्हटले आहे की जर हल्ला झाला तर निश्चितच प्रत्युत्तर दिले जाईल. तथापि, युद्धबंदी लागू करणे आणि ती कायम ठेवणे यात फरक आहे.' जेएनयूमधील आंतरराष्ट्रीय अभ्यासाचे सहयोगी प्राध्यापक राजन कुमार म्हणाले, ट्रम्प यांच्या विधानांवरून असे दिसून येते की त्यांनी दोन्ही देशांशी चर्चा केली होती, त्यानंतर युद्धबंदी झाली. जरी इराण आणि इस्रायलनेही युद्धबंदीचे उल्लंघन केले असले तरी, जर युद्धबंदीचे पालन केले तर ते दोघांच्याही हिताचे असू शकते. पुन्हा युद्ध सुरू होण्याच्या शक्यतेबद्दल प्रो. राजन कुमार म्हणतात, 'युद्धविरामाच्या अटी काय आहेत हे कोणालाही माहिती नाही. दोन्ही देश हल्ला करणार नाहीत असा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. गाझामधील संघर्ष अजूनही सुरू असल्याने ही युद्धविराम पूर्णपणे यशस्वी होईल की नाही हे सांगणे कठीण आहे. इराण आणि इस्रायलमध्ये अद्याप कोणताही करार झालेला नाही. पुढे चर्चा होईल की नाही हेदेखील माहिती नाही.' प्रश्न-६: युद्धबंदीनंतर अयातुल्ला अली खामेनी यांच्यावर हल्ला होणार नाही का?उत्तर: १६ जून रोजी नेतान्याहू म्हणाले होते की, 'इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी यांना मारून युद्ध संपेल.' यावर प्रा. राजन कुमार म्हणाले, इस्रायलचे अंतिम ध्येय इराणमधील राजवट बदलणे होते. ते इराणचे शेवटचे शासक मोहम्मद रझा पहलवी यांचे पुत्र रझा पहलवी यांना इराणचे शासक बनवू इच्छित होते. इस्रायलदेखील त्यांच्या संपर्कात आहे. प्रो. राजन कुमार स्पष्ट करतात, 'इस्रायलला कदाचित हे समजले असेल की खामेनींना बॅलिस्टिक क्षेपणास्त्राने मारता येणार नाही. म्हणूनच त्यांनी सध्या युद्धबंदीवर सहमती दर्शवली, परंतु भविष्यात जर इस्रायलला संधी मिळाली तर ते पुन्हा खामेनींना मारून सत्ता बदलण्याचा प्रयत्न करेल.' त्याच वेळी, खामेनी शक्य तितक्या लवकर त्यांचा उत्तराधिकारी निवडण्याचा विचार करत आहेत. प्रश्न-७: युद्धबंदीनंतर इराणच्या अणुकार्यक्रमाचे काय होईल?उत्तर: इराणच्या अणुऊर्जा संघटनेचे प्रमुख मोहम्मद इस्लामी यांनी म्हटले आहे की इस्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे इराणच्या अणुकार्यक्रमाला झालेले नुकसान भरून काढले जात आहे. अमेरिकन थिंक टँक 'डिफेन्स प्रायोरिटीज' येथील मध्य पूर्व कार्यक्रमाच्या संचालक रोझमेरी कलानिक यांच्या मते, 'अमेरिकन हल्ल्यामुळे इराणला अण्वस्त्रे मिळण्याची शक्यता आणखी वाढली आहे. जर या हल्ल्यांमध्ये इराणच्या अण्वस्त्र सुविधा नष्ट झाल्या तर ते त्या अधिक वेगाने आणि ताकदीने वाढवण्याचा प्रयत्न करेल.' न्यू साउथ वेल्स विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय संबंधांचे प्राध्यापक अँथनी बर्क यांच्या मते, 'इराणकडे सध्या अण्वस्त्रे बनवण्याचे दोन मार्ग आहेत. पहिला - तो युरेनियम समृद्धीकरण सुरू ठेवू शकतो आणि रशिया किंवा उत्तर कोरियाकडून अण्वस्त्र स्फोट डिझाइन मिळवू शकतो. दुसरा - रशिया आपली काही शस्त्रे इराणला पाठवू शकतो.' प्रश्न-८: इराणसोबतच्या युद्धाच्या समाप्तीचा नेतान्याहूंवर काय परिणाम होईल?उत्तर: इराणशी झालेल्या संघर्षामुळे नेतन्याहू यांची मतपेढी वाढेल असे प्रा. राजन कुमार यांचे मत आहे. ते म्हणतात, 'इस्रायलमध्ये नेतन्याहू यांच्या विरोधात अनेक निदर्शने झाली. ते सर्वोच्च न्यायालयावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत होते, ज्याचा लोकांनी विरोध केला. आता लोकांना वाटेल की जर कोणी आपल्याला वाचवू शकत असेल तर ते नेतन्याहू आहेत. त्यांची मतपेढी वाढली आहे.' दुसरीकडे, प्रो. ए.के. पाशा यांचे मत वेगळे आहे. ते म्हणतात, 'नेतान्याहू यांचे भविष्य आता अनिश्चित आहे. त्यांना आता त्यांच्या जिवाची चिंता करावी लागेल. नेतन्याहू यांनी इराणवर हल्ला करून म्हटले की ते अणुबॉम्ब बनवत आहे. आता याची चौकशी केली जाईल. इस्रायलचे यहूदी त्यांना विचारतील की ते सत्तेत राहण्यासाठी देशाचे इतके नुकसान का करत आहेत?'
अग्रलेख : पुन्हा सीजफायरचा खेळ
सध्या सुरू असलेल्या इराण आणि इस्रायल संघर्षामध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक दोन्ही देशांमध्ये ‘सीजफायर’ म्हणजेच शस्त्रसंधी झाली असण्याची घोषणा केली होती. या घोषणेमुळे सगळ्यांनाच जरा दिलासा मिळाला होता, पण हा दिलासा फार काळ टिकला नाही. दोन्ही देशांनी शस्त्रसंधी मान्य करूनसुद्धा पुन्हा एकमेकांवर हल्ले करून त्याचा भंग केला आहे, अशी माहिती खुद्द ट्रम्प यांनीच […] The post अग्रलेख : पुन्हा सीजफायरचा खेळ appeared first on Dainik Prabhat .
लक्षवेधी : जी 7 परिषदेचे मर्यादित यश
– भालचंद्र ठोंबरे जी 7 या परिषदेच्या यशस्वीतेबाबत मत भिन्नता असली तरी भारताच्या दृष्टीने कॅनडाशी बिघडलेले संबंध सुरळीत होण्याच्या दृष्टीने बोलणी झाली आहे. जी 7 म्हणजे ग्रुप ऑफ सेव्हन. सात प्रमुख औद्योगिक विकसित राष्ट्रांचा गट. या गटात फ्रान्स, संयुक्त अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, जपान, इटली व कॅनडा आणि सदस्य नसलेला युरोपियन युनियन (युरोपमधील 27 देशांचा समूह) […] The post लक्षवेधी : जी 7 परिषदेचे मर्यादित यश appeared first on Dainik Prabhat .
– योगिता अडसरे सांगलीतील घटनेनं संपूर्ण समाजाच्या अंतर्मनाला हादरवून टाकलं आहे. शिक्षणामध्ये यश मिळवण्यासाठी मुलांना शिस्त लावणं गरजेचं आहे, हे खरेच; पण ही शिस्त जर अमानुष मारहाणीच्या स्वरूपात असेल, तर ती विकृती ठरते. पालक व मुले यांच्यात परीक्षेतील गुणांबाबत होणारा संघर्ष वाढत चालला आहे. हल्ली पालक मुलांना जन्माला येण्याच्या आधी जसे नाव काय ठेवायचे अगदी […] The post दखल : पालकत्वाचा विकृत चेहरा appeared first on Dainik Prabhat .
सौंदर्य तुझं : प्राची शिरकरप्रत्येक ऋतूनुसार आपल्याला त्वचेची काळजी घ्यावी लागते. पावसाळ्यात अनेक प्रकारच्या संसर्गाचा धोका अधिक असतो, म्हणून या ऋतूत त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. पावसाळ्यात हवेत ओलावा जास्त असतो, त्यामुळे चेहरा सारखा स्वच्छ करावा लागतो. पावसाळ्यात आजारांसोबतच त्वचेच्या समस्याही जास्त प्रमाणात उद्भवतात. या ऋतूत चेहऱ्याची योग्य पद्धतीने काळजी घेतली नाही तर, आपल्या चेहऱ्यावर पुरळ, फोड, काळे डाग पडण्याची शक्यता असते. कारण पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रतेचा परिणाम थेट त्वचेवर होतो. त्यामुळे अनेक जणींना त्वचेशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. स्किनच्या या समस्या कमी करण्यासाठी आपण त्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिम, लोशन लावतो किंवा ब्यूटी ट्रिटमेंट्स करतो. यासोबतच, पावसाळ्यात स्किनचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी योग्य आहार घेणे देखील खूप गरजेचे आहे. आज आम्ही तुम्हाला या लेखातून सांगणार आहोत पावसाळ्यात निरोगी त्वचेसाठी नेमके कोणत्या प्रकारचा आहार घ्यावा आणि कोणता आहार टाळायला हवा.असा घ्या आहार सकाळी उठल्यानंतर :- पावसाळ्यात दिवसाची सुरुवात लिंबू पाण्याने करावी. लिंबू पाण्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. याशिवाय त्वचेसाठीही ते फायदेशीर असते. अर्ध्या तासानंतर तुम्ही भिजवलेले बदाम आणि मनुका खाऊ शकता. बदाम आणि मनुका त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. नाश्ता :- पावसाळ्यात नेहमी पचायला हलका असणारा नाश्ता करावा. तुमची त्वचा निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही नाश्त्यात मूग डाळ चीला, लापशी, ओट्स असे पदार्थ तुम्ही खाऊ शकता. मिड मॉर्निंग ब्रेकफास्ट :- पावसाळ्यात आपण सहसा चहा, कॉफी किंवा भजी खाणे पसंत करतो. पण त्वचा निरोगी ठेवण्यासाठी या ऋतूत फळ आणि भाज्यांचे ज्युस पिणे अधिक फायदेशीर ठरेल. ज्यूस प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते आणि पाण्याची कमतरता दूर होते. दुपारचे जेवण :- पावसाळ्यात दुपारच्या जेवणात डाळ, भात किंवा चपाती, भाजी खाऊ शकता. दुपारच्या जेवणात सॅलडचा समावेश जरूर करावा. सॅलड त्वचेसाठी खूप फायदेशीर असते. स्नॅक्स :- पावसाळ्यात आपल्याला समोसे, पिझ्झा इत्यादी चटपटीत पदार्थ स्नॅक्स म्हणून खायला आवडतात. पण फास्ट फूड खाल्ल्याने तुमचे आरोग्य आणि त्वचा दोघांनाही हानी पोहोचते. रात्रीचे जेवण :- रात्रीचे जेवण नेहमी हलके असावे. रात्रीच्या जेवणात तुम्ही खिचडी, मूग डाळीचा डाेसा किंवा डाळ, भात तसेच चपाती आणि भाजी खाऊ शकता. फळे :- पावसाळ्यात फळांचा समावेश आवर्जून करा. जांभूळ, नासपती, आलुबुखारा, चेरी, पीच, पपई, सफरचंद आणि डाळिंब यांसारखी हंगामी फळे खाल्ल्याने जीवनसत्त्वे अ, क, अँटिऑक्सिडंट्स आणि फायबर सारख्या पोषक तत्त्वांच्या वाढत्या मागणी पूर्ण होण्यास मदत होते.पावसाळ्यात हे खाणे टाळापावसाळ्यात तेलकट व मसालेदार पदार्थ शक्य तितके खाणे टाळा. कारण त्याचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होईलच पण ते तुमच्या त्वचेसाठीही हानिकारक ठरू शकते. म्हणून, तुमची त्वचा चमकदार बनवण्यासाठी, तुमच्या आहारात जास्तीत जास्त फळे आणि आरोग्यदायी पेये समाविष्ट करा.(टीप : वरील सर्व बाबी प्रहार केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. ही माहिती केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहे. हा वैद्यकीय सल्ला, निदान किंवा उपचारांचा पर्याय नाही. अधिक तपशिलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. या लेखातील माहितीची अचूकता, विश्वासार्हता किंवा परिणामकारकतेची जबाबदारी प्रहार घेत नाही आणि कोणताही दावा करत नाही.)
गर्भधारणेपूर्व तपासणीचे महत्त्व
स्त्री आरोग्य : डॉ. स्नेहल पाटीलगर्भधारणा ही स्त्रीच्या जीवनातील एक अत्यंत महत्त्वाची व संवेदनशील प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया यशस्वी आणि आरोग्यदायी होण्यासाठी फक्त गर्भधारणेनंतर काळजी घेणे पुरेसे नसून, गर्भधारणा होण्याच्या आधीपासूनच शारीरिक व मानसिक तयारी करणे आवश्यक आहे. यासाठीच ‘गर्भधारणेपूर्व तपासणी’ किंवा ‘Preconceptional Check-up’ हा टप्पा फार महत्त्वाचा आहे. मी एक स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून याचे महत्त्व अधोरेखित करते.गर्भधारणेपूर्व तपासणी म्हणजे काय?गर्भधारणेपूर्व तपासणी म्हणजे स्त्री-पुरुष दोघांनीही गर्भधारणा करायची ठरवण्याआधी डॉक्टरांकडे जाऊन आपले आरोग्य, वैयक्तिक व कौटुंबिक इतिहास, जीवनशैली, तसेच संभाव्य आरोग्य धोक्यांची तपासणी करून घेणे. ही एक प्रकारची पूर्वतयारी आहे जी पुढील आरोग्यदायी गर्भधारणेचा पाया ठरते.गर्भधारणेपूर्व तपासणीचे घटक वैद्यकीय इतिहासाची तपासणी : तपासणी दरम्यान महिलांचा पूर्वीचा वैद्यकीय इतिहास विचारात घेतला जातो. मधुमेह, उच्च रक्तदाब, थायरॉईड, मुळव्याध, अस्थमा, मानसिक आजार इत्यादी यामुळे गर्भधारणेतील संभाव्य गुंतागुंतींचा अंदाज घेता येतो. पूर्वी गर्भपात, अपूर्ण गर्भधारणा किंवा अपत्याच्या जन्मात आलेल्या अडचणी यांचे परीक्षणही यामध्ये होते. शारीरिक तपासणी : पूर्ण शारीरिक तपासणीद्वारे स्त्रीच्या वजन, रक्तदाब, योनी संस्थेचा आरोग्य, स्तनांची स्थिती, त्वचा, हृदय व फुप्फुसे यांच्या कार्यक्षमतेचे मूल्यमापन केले जाते. काही वेळेस अंतर्गत तपासणीसुद्धा केली जाते. लैंगिक व प्रजनन इतिहास: सध्याचे मासिक पाळी चक्र, त्यातील अनियमितता, संप्रेरकांशी संबंधित लक्षणे, तसेच आधीचे गर्भपात किंवा अपत्यप्राप्तीचा अनुभव जाणून घेतला जातो. यामुळे गर्भधारणा होण्याच्या क्षमतेचा अंदाज येतो. रक्त तपासण्या :- हिमोग्लोबिनची पातळी- थायरॉईड फंक्शन (TSH)- ब्लड ग्रुप व Rh टायपिंग- थॅलेसेमिया, HIV, HBsAg, Rubella, VDRL तपासण्या- रक्तातील साखर व लिपिड प्रोफाइल लसीकरण :जर महिलेला रूबेला, टिटॅनस, किंवा हिपॅटायटिस बी विरुद्ध लस घेतलेली नसेल, तर डॉक्टर त्यासाठी सल्ला देतात. रूबेला सारख्या संक्रमणांमुळे गर्भाच्या आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो. पोषण व आहार सल्ला :फॉलिक अॅसिडचे पूरक देणे हे गर्भधारणेपूर्व काळात अत्यावश्यक असते. त्यामुळे गर्भात न्युरल ट्यूब डिफेक्ट्स (मेंदू व मेरुदंड विकृती) होण्याची शक्यता कमी होते. योग्य आहार, वजन नियंत्रण, व्यायाम याचे मार्गदर्शन दिले जाते. मानसिक व सामाजिक आरोग्य :स्त्रीच्या मानसिक आरोग्याचा गर्भधारणेवर मोठा प्रभाव असतो. नैराश्य, चिंता, वैवाहिक ताणतणाव यावर सल्ला व समुपदेशन दिले जाते. काही वेळा समुपदेशक किंवा मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेण्याची शिफारस केली जाते. जोडीदाराची तपासणी :पुरुष जोडीदाराचीही तपासणी गरजेची आहे. वीर्य तपासणी, संप्रेरक पातळी, तसेच जनुकीय इतिहासाचा अभ्यास केल्यास गर्भधारणेतील अडचणी टाळता येतात.गर्भधारणेपूर्व तपासणीचे फायदेअपत्यासाठी सुरक्षित आणि आरोग्यदायी वातावरण तयार होते.जन्मदोष किंवा गर्भाच्या वाढीतील अडचणी कमी होतात.जोडप्यांमध्ये विश्वास व समजुत वाढते.उच्च-धोका गर्भधारणेची ओळख लवकर होते आणि त्या अनुषंगाने व्यवस्थापन करता येते.आवश्यक उपचार किंवा सर्जरी (उदा. फायब्रॉइड काढणे) गर्भधारणेपूर्वीच करता येतात.निष्कर्ष : स्त्रियांनी गर्भधारणा ही नैसर्गिक प्रक्रिया असली, तरी ती यशस्वी आणि सुरक्षित होण्यासाठी डॉक्टरांचा मार्गदर्शन घेणे आवश्यक असते. गर्भधारणेपूर्व तपासणी ही केवळ आरोग्य तपासणी नसून, ती एक पुढील पिढीच्या आरोग्याची सुरुवात असते. म्हणून, प्रत्येक महिलेनं व तिच्या जोडीदारानं ही तपासणी गांभीर्याने घेणं आवश्यक आहे. सर्व निरोगी मातृत्वाच्या वाटचालीसाठी हीच पहिली पायरी असते — म्हणूनच, “गर्भधारणेपूर्व तपासणी करा, सुखद मातृत्वासाठी सज्ज व्हा!”
एसटीची सुधारणा करताना प्रवासी केंद्रस्थानी असावा
गाव तेथे रस्ता आणि रस्ता तेथे एसटी धावायला हवी, असे गेल्या अनेक दशकांपासून राज्याच्या दुर्गम भागात राहणाऱ्या गावकऱ्यांचे स्वप्न असते. राज्यातील सर्वसामान्यांना परवडणारी एसटीची सेवा आज शहरापासून ग्रामीण भागापर्यंत अव्याहतपणे सुरू आहे. पण, काळाच्या या चक्रात एसटी महामंडळाला आर्थिक विंवचनेतून जावे लागले. 'प्रवाशांच्या सेवेत' हे एसटीच ब्रीदवाक्य आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतील प्रत्येकाला प्रवासाचा आधार म्हणजे आपली लालपरी वाटते. संकटकाळात एसटी अशी कशी उपयोगी पडते याचा प्रत्यय मुंबईकरांनाही आला होता. कोरोना काळात मुंबईतील लोकल बंद करण्याचा निर्णय झाला. त्यावेळी बेस्ट बसेसच्या जोडीला एसटी महामंडळाच्या गाड्या या मुंबईतील गल्लीबोळातून धावत होत्या. औरंगाबाद, जळगावमधील वाहनचालक हे आपले गाव सोडून मुंबईकरांच्या सेवेत होते. त्यामुळे मुंबईकरांना कोरोना काळात नोकरीवर जाण्यासाठी एसटी बसेसचा उपयोग झाला होता, याची जाणीव मुंबईकरांना आहे; परंतु हीच सेवा देणारी एसटी अडचणीत का आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता मुंबईसारख्या शहरामध्ये राहणाऱ्या नागरिकांनासुद्धा आहे.एसटी महामंडळाची आर्थिक सद्यस्थिती दर्शवणारी एक श्वेतपत्रिका सोमवारी जाहीर झाली. एसटीचे एकूण महसुली उत्पन्न, खर्च, कर्ज आणि देयके किती आहेत? याबाबतचा आढावा घेणारी ती श्वेतपत्रिका होती. या श्वेतपत्रिकेत ४५ वर्षांचे अवलोकन करण्यात आले आहे. या ४५ वर्षांपैकी फक्त ८ वर्षेच महामंडळाला काही प्रमाणात नफा झाल्याचे दिसून आले आहे. उर्वरित सर्व वर्षात मोठ्या प्रमाणात तोटा झाल्याचे समोर आले आहे, त्यामुळे हा तोटा का झाला? यावर उपाययोजना काय आहे, याबाबत श्वेतपत्रिकेत नमूद केले आहे. एसटी महामंडळाने पुढील वाटचालीसाठी काही महत्त्वपूर्ण उपाययोजना सुचविलेल्या आहेत. अपघात कमी करण्यासाठी विविध उपाययोजना राबवण्यात येणार आहेत. प्रवासी व मालमत्तांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही प्रणाली बसवली जाणार आहे. सध्या सवलत नसलेल्या लांब पल्ल्याच्या प्रवाशांसाठी भाड्यात सवलत देण्याचा विचार आहे. तसेच कर्मचाऱ्यांसाठी कल्याणकारी योजना राबवण्याची योजना देखील आहे. त्याचप्रमाणे, एसटी महामंडळाच्या ताफ्यात दरवर्षी ५ हजार नवीन बसेसचा समावेश करणे, एसटी ताफ्यात भाडेतत्त्वावरील हायटेक व्होल्वो बसेसचा समावेश करणे, एसटी महामंडळाच्या जागांवर इंधन पुरवठादार कंपन्याकडून महसुली भागीदारी तत्त्वावर खासगी वाहनांसाठी किरकोळ इंधन विक्री केंद्र सुरू करणे, एसटी महामंडळाच्या जागांचा बिओटी/पीपीपी तत्त्वावर विकास करणे, प्रवासी सोयी आणि सुविधा निर्माण करणे, उत्पन्न वाढीसाठी लक्षांक निश्चित करणे, आदी उपाययोजनांचा समावेश आहे.त्याचप्रमाणे, एसटी महामंडळाने तोट्याची पाच महत्त्वाची कारणे या श्वेतपत्रिकेत सांगितली आहेत. त्यात, राज्य परिवहन महामंडळाकडे बसेसची कमतरता असल्याचा मुद्दा नमूद केला आहे. उपलब्ध असलेल्या बसेसचे आयुर्मान अधिक असणे आवश्यक आहे. अनिवार्य व तोट्यातील चलन, अनियमित भाडेवाढ, अवैध वाहतूक ही एसटी तोट्यात जाण्यास कारणीभूत ठरली आहे. श्वेतपत्रिकेनुसार, महसूल वाढीच्या काही उपाययोजनांचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामध्ये उच्च दर्जाच्या व्होल्वो बस भाडेतत्त्वावर घेतल्या जाणार आहेत. महामंडळाच्या मालकीच्या जागांवर खासगी वाहनांसाठी इंधन पंप उभारण्यात येणार असून, त्यासाठी इंधन पुरवठादारांशी महसूल वाटप करार केले जाणार आहेत. तसेच, महामंडळाच्या मालमत्ता बीओटी किंवा पीपीपी मॉडेलवर विकसित केल्या जाणार आहेत. सी-कॅटेगरी मार्गांचे बी-कॅटेगरीत व बी-कॅटेगरीचे ए-कॅटेगरीत रूपांतर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. प्रवासी सुविधांचा दर्जा उंचावणे आणि महसूल वाढीसाठी ठोस उद्दिष्टे निश्चित केली जाणार आहेत.एसटी महामंडळाकडे पूर्वी कामगार वर्ग मोठा होता. मात्र आता कामगार वर्ग ७९ हजार आहे. आधी १८ हजार ५०० गाड्या होत्या. पण नंतर काही बसगाड्या मोडकळीस आल्या. गळक्या आणि तुटक्या बसेस रस्त्यावर चालत होत्या. गेल्या १० ते १२ वर्षांत हा ग्राफ कमी होत गेला आहे. नवीन बसेस घेतल्या नाहीत. ३ ते ४ वर्षांपूर्वी जर नवीन बसेस घेतल्या असत्या तर तोटा जास्त झाला नसता, याची कबुली परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. महामंडळाचा तोटा सुमारे १० हजारांपेक्षा अधिक आहे. तो भरून काढणे कठीण आहे. त्याचे कारण २५ ते ३० हजार बसेस आहेत, त्याच्या जीवावर तोटा भरून काढणार का? हा प्रश्न आहे. ७७ वर्षांचा एसटी महामंडळाचा इतिहास आहे. गेल्या १० ते १५ वर्षांत हळूहळू ग्राफ कमी होत गेल्याचे दिसत आहे. त्यासाठी दर वर्षाला ५ हजार बसेस ताफ्यात आवश्यक आहेत. जेणेकरून एसटी महामंडळ नफ्यात राहील. पुढच्या ३ ते ४ वर्षांत एसटी तोट्यात राहणार नाही, असा विश्वास श्वेतपत्रिकेतून व्यक्त करण्यात आला आहे, ही समाधानाची बाब आहे. मात्र, एसटी महामंडळाला फायद्यात आणताना, मोक्याच्या ठिकाणी असलेले एसटी डेपो हे महामंडळाच्या ताब्यात असावेत. ते खासगी कंपन्यांच्या ताब्यात जाऊ नयेत, ही प्रवाशांची भावना आहे. डेपोची जागा ही खासगी मालकांच्या ताब्यात गेली तर, प्रवासी हे हळूहळू लालपरीपासून पोरके होण्यास सुरुवात होईल. त्यामुळे ग्रामीण भागातील एसटीचे डेपो हे आजूबाजूच्या परिसराचा विकास होण्यास कारणीभूत ठरले होते. एसटीच्या मालमत्तेची ओळख भविष्यात कायम असावी, ही एसटी प्रवाशांची माफक अपेक्षा आहे. ती पूर्ण करण्यात सरकारलाही काही अडचण नसावी.
महेश जोशीइतिहासात २५ जून हा दिवस भारताच्या दृष्टीने महत्त्वाच्या घटनेचा साक्षीदार आहे. १९७५ मध्ये या दिवशी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यामार्फत देशात आणीबाणीची घोषणा करण्यात आली होती. तिने अनेक ऐतिहासिक घटनांना जन्म दिला. इंदिरा गांधी यांनी सरकार आणि सत्तेविरोधात आवाज उठवणाऱ्या हजारो लोकांना जेलमध्ये टाकले होते. २६ जून १९७५ पासून २१ जून १९७७ या २१ महिन्यांच्या कालावधीत भारतात आणीबाणी होती. तत्कालीन राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वातील सरकारच्या शिफारशीनंतर भारतीय संविधानाच्या परिच्छेद ३५२ अंतर्गत देशात आणीबाणीची घोषणा केली होती. आणीबाणीच्या काळात लोकसभा निवडणूकही स्थगित केली गेली. इंदिरा सरकारविरुद्ध संघर्षाचा बिगुल वाजवणारे लोकनायक जयप्रकाश नारायण आणि मोरारजी देसाई यासारखे नेते तसेच सरकारवर टीका करणारे पत्रकार, समाजसेवक, विविध संघटनांचे लोक आणि विद्यार्थी यांची रवानगी तुरुंगात केली गेली होती. वृत्तपत्रांना सरकारविरोधात काहीही प्रकाशित करण्यास मज्जाव घालण्यात आला होता आणि तशी हिंमत करणाऱ्यांवर सेन्सॉरशिप लादली गेली. राजकीय महत्त्वाकांक्षा आणि सत्ता जाण्याच्या भीतीने इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी जाहीर केल्याचे म्हटले जाते. जयप्रकाश नारायण, अटलबिहारी वाजपेयी, राजनारायण यांच्यासारखे अनेक नेते इंदिरा गांधी यांच्या धोरणांचे मुख्य विरोधक होते.इंदिरा गांधींचे सचिव आर. के. धवन यांनी २५ जूनच्या सकाळी पश्चिम बंगालचे तत्कालीन मुख्यमंत्री सिद्धार्थ शंकर रे यांना फोन केला. रे कोलकत्ताऐवजी बहुतांश वेळ दिल्लीत राहत असत. धवन यांनी सिद्धार्थ शंकर रे यांना तातडीने पंतप्रधान बंगल्यावर येण्यास सांगितले. त्या वेळी सफदरजंग रोड येथे पंतप्रधान निवासस्थान होते. सिद्धार्थ शंकर रे त्वरित पंतप्रधान बंगल्यावर आले. इंदिरा गांधी आणि त्यांच्यामध्ये सुमारे दोन तास चर्चा झाली. या भेटीत इंदिरा गांधी सिद्धार्थ शंकर रे यांना म्हणाल्या, देशात अराजकतेचे वातावरण निर्माण होणार असल्याचे वाटते. आपण मोठ्या संकटात आहोत आणि याविरुद्ध लढण्यासाठी मोठे पाऊल उचलायला हवे. लोकशाही धोक्यात आहे. काही तरी कठोर, आवश्यक कारवाईची गरज आहे. देशातील कोणत्या कोपऱ्यातून कोणता नेता सरकारविरोधात आंदोलन करत आहे, याची माहिती गुप्तचर यंत्रणांकडून इंदिरा गांधींना सातत्याने दिली जात होती. त्या दिवशी इंदिरा गांधींनी सिद्धार्थ शंकर रे यांच्यासमोर जयप्रकाश नारायण यांच्या संध्याकाळी होणाऱ्या एका सभेचा उल्लेख करत म्हटले की, ते आपल्या सभेत पोलीस आणि सैन्याला शस्त्र सोडण्यास सांगणार आहेत. दुसरीकडे इंदिरा गांधी यांना अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा ‘सीआयए’चाही धोका होता. इंदिरा गांधींना माहीत होते की, त्या अमेरिकेचे माजी राष्ट्रपती रिचर्ड निक्सन यांच्या हिटलिस्टमध्ये आहेत. त्यांना भीती होती की, चिलीच्या सॅल्वाडोर अलेंडे यांच्याप्रमाणे त्यांचीही सत्तेवरून हकालपट्टी केली जाईल. १९७३ मध्ये ‘सीआयए’ने जनरल ऑगस्टो पिनोशेट यांच्या मदतीने सॅल्वाडोर अलेंडे यांची सत्तेतून हकालपट्टी केली होती. जयप्रकाश नारायण देशाला आपल्याविरोधात उभे करण्यास यशस्वी झाले तर आपल्या राजकारणासाठी हे घातक असेल, याची त्यांना कल्पना होती. आपण सत्ता सोडली तर भारत बरबाद होईल, असे त्यांना वाटत असे. तेव्हा इंदिरा गांधी सिद्धार्थ शंकर रे यांना म्हणाल्या, बाळाचा जन्म होतो, तेव्हा ते व्यवस्थित आहे की नाही हे पाहण्यासाठी आपण त्याला हलवतो. भारतालाही अशाच प्रकारे हलवण्याची गरज आहे. यानंतर एका मुलाखतीत इंदिरा गांधी म्हणाल्या होत्या, की देशाला वाचवण्यासाठी ‘शॉक ट्रीटमेंट’ची आवश्यकता आहे. सिद्धार्थ शंकर रे हे घटनात्मक बाबींचे जाणकार असल्याने इंदिरा गांधींनी त्यांना बोलावले होते; मात्र तत्कालीन कायदा मंत्री एच. आर. गोखले यांच्याकडून कोणताही सल्ला घेतला गेला नव्हता. खरे तर त्या वेळी त्यांना कोणताही सल्ला घ्यायचा नव्हता. संजय गांधी, गृह मंत्रालयाचे दुसरे सर्वात प्रभावशाली व्यक्ती ओम मेहता आणि हरियाणाचे मुख्यमंत्री बन्सीलाल यांनी एक दिवस आधीच याची सुरुवात केली होती. इतकेच नाही, तर सिद्धार्थ शंकर रे यांना बोलावण्याआधीच हे तिघे आर. के. धवन यांच्या कार्यालयात अशा लोकांची यादी तयारी करत होते, ज्यांना अटक करायची होती. या यादीत सर्वात वरच्या स्थानावर जयप्रकाश नारायण आणि मोरारजी देसाई होते. राजनारायण प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर इंदिरा गांधींना राजीनामा देऊ नका, असे सिद्धार्थ शंकर रे यांनी सांगितले होते. तसेच ते संजय गांधी यांचे निकटवर्तीयदेखील होते.त्या दिवशी इंदिरा गांधी यांनी रे यांना आपल्याला काय करावे लागेल, असे विचारले असता ते म्हणाले, मला घटनात्मक स्थिती पाहावी लागेल. यानंतर रे तिथून निघून गेले आणि भारतच नाही तर अमेरिकेचे संविधान वाचण्यात अनेक तास घालवले. यानंतर ते दुपारी साडेतीन वाजता इंदिरा गांधी यांच्या घरी आले आणि म्हणाले की, संविधानाच्या परिच्छेद ३५२ अंतर्गत देशात आणीबाणी लागू केली जाऊ शकते. संविधानात तरतूद आहे की, परकीय आक्रमण आणि अंतर्गत हिंसाचार किंवा सशस्त्र संघर्षाच्या परिस्थितीत आणीबाणी लावली जाऊ शकते. सिद्धार्थ शंकर रे यांना दोन्ही परिस्थितींमधील अंतराची योग्य माहिती होती. त्यांना माहीत होते की या वेळी आणीबाणी लागू करण्यासाठी परकीय आक्रमण हे कारण सांगता येणार नाही. रे यांनी सशस्त्र संघर्षाचा अर्थ राज्यांमधील अंतर्गत कलहाच्या रूपाने काढला. अशा प्रकारे रे आणि इंदिरा गांधी यांचे मत होते की जयप्रकाश नारायण यांनी सैन्य आणि पोलिसांनी सरकारचा आदेश मान्य न करणे हे सशस्त्र संघर्षाच्या कक्षेत येते. त्यांनी इंदिरा गांधींना अंतर्गत आणि बाह्य आणीबाणीच्या बाबतीत संपूर्ण माहिती दिली. यानंतर इंदिरा गांधींनी सिद्धार्थ शंकर रे यांना आणीबाणी लादण्याबाबत मला कॅबिनेटशी बोलायचे नाही, असे सांगितले. रे यांनी यावरही तोडगा काढला. ते इंदिरा गांधींना म्हणाले, तुम्ही राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांच्यासमोर जाल तेव्हा या संदर्भात कॅबिनेटसोबत बातचीत करण्यासाठी वेळ नव्हता, असे सांगू शकता. रे यांनी इंदिरा गांधींना हेदेखील सांगितले की, राष्ट्रपतींच्या सहमतीसाठी ज्या फाईल पाठवल्या जातात, त्यात प्रत्येकासाठी कॅबिनेटची सहमती असणे किंवा कॅबिनेटला याची माहिती असणे गरजेचे असतेच असे नाही. यानंतर इंदिरा गांधींनी सिद्धार्थ रे यांना याबाबत राष्ट्रपतींना भेटण्यास सांगितले; मात्र रे यांनी नकार दिला. ते म्हणाले की मी पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री आहे, पंतप्रधान नाही. अर्थात ते इंदिरा गांधींसोबत राष्ट्रपतींना भेटण्यासाठी गेले. इंदिरा गांधी ५.३० वाजता राष्ट्रपती भवनात पोहोचल्या. फखरुद्दीन अली अहमद इंदिरा गांधी यांच्याशी प्रामाणिक होते. इंदिरा गांधींनीच राष्ट्रपतीपदासाठी फखरुद्दीन यांच्या नावाची शिफारस केली होती. इंदिरा गांधी आणि रे यांनी त्यांना देशात आणीबाणीची आवश्यकता आणि परिच्छेद ३५२ बाबत सांगितले. कॅबिनेटला याबाबत माहिती आहे का, असे राष्ट्रपतींनी विचारले असता इंदिरा गांधी म्हणाल्या की, हे प्रकरण अतिशय तातडीचे होते आणि कॅबिनेट याला नंतर मंजुरी देऊ शकते. आणखी काही प्रश्न विचारल्यानंतर राष्ट्रपतींनी इंदिरा गांधींना आणीबाणीचा आदेश पाठवण्यास सांगितले. यानंतर इंदिरा गांधी आणि रे पंतप्रधान निवासस्थानी परतले. रे यांनी आणीबाणीच्या आदेशाबाबत पी. एन. धर यांना सांगितले. धर यांनी संपूर्ण आदेश टाईप केला आणि स्वाक्षरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवला. आणीबाणीच्या आदेशासोबत राष्ट्रपतींना उद्देशून इंदिरा गांधी यांचे पत्रही पाठवण्यात आले.२५ जून १९७५ च्या पूर्वसंध्येला इंदिरा गांधी आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धार्थ शंकर रे यांनी राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांची भेट घेऊन आणीबाणीची शिफारस केली. राष्ट्रपतींनी इंदिरा गांधींना आणीबाणीचा आदेश पाठवण्यास सांगितले. दरम्यान, इंदिराजींचे काही सहकारी लगतच्या काळात ज्यांना अटक करायची त्यांची यादी तयार करत होते. यादीत जयप्रकाश नारायण आणि मोरारजी देसाई सर्वोच्च स्थानी होते.
सुग्रास सुगरण : गायत्री डोंगरेमहाराष्ट्रीय स्वयंपाकघरात कोथिंबीर वडी ही एक झणझणीत, कुरकुरीत आणि सगळ्यांच्या आवडीची पारंपरिक डिश आहे. बहुतेक वेळा वड्या खाऊन उरतात आणि मग त्या कशा वापरायच्या, असा प्रश्न पडतो. अशावेळी आजी-आईंच्या स्वयंपाकघरातून आलेली एक सुंदर कल्पना म्हणजे – उरलेल्या कोथिंबीर वड्यांची झणझणीत उसळ! ‘उसळीतील कोंथिबीर वडी’ ही गावाकडची आणि विस्मरणात गेलेली मस्त झणझणीत रेसिपी आहे.साहित्य५-६ उरलेल्या कोथिंबीर वड्या (कापून)१ मध्यम कांदा (बारीक चिरून)२ टेबलस्पून ओले खोबरे (ऐच्छिक)१ टीस्पून आलं-लसूण पेस्ट१ टीस्पून मोहरी१/२ टीस्पून हळद१ टीस्पून लाल तिखट१ टीस्पून गोडा मसाला / गरम मसाला१ टीस्पून गूळ१ चमचा तेलमीठ चवीनुसारपाणी – १ कपकोथिंबीर सजावटीसाठीकृतीकढईत तेल गरम करून मोहरी टाका. मोहरी तडतडली की आलं-लसूण पेस्ट टाका आणि ३० सेकंद परतवा. मग त्यात बारीक चिरलेला कांदा घालून सोनेरी होईपर्यंत परतवा. हळद, तिखट, गोडा मसाला घालून नीट परतवा. १ कप पाणी आणि गूळ (ऐच्छिक आहे)घालून उकळी आणा. मीठ चवीनुसार टाका. उकळी आली की त्यात कापलेल्या कोथिंबीर वड्या घाला. मंद आचेवर ५-७ मिनिटं शिजू द्या, जेणेकरून वड्या रस्सा पिऊन मऊ होतील. वरून कोथिंबीर व खोबरं घाला. झाकण ठेवून २ मिनिटं वाफ येऊ द्या.टीप : ही उसळ थोडी पातळ ठेवली तर कोथिंबीर वड्या रस्सा छान वाटतो. हवे असल्यास थोडे भरड दाणे घालून चव अजून वाढवता येते.
मी योगिनी : डॉ. वैशाली दाबकेगील दोन लेखांत आपण शवासनामधील आदर्श शारीरिक स्थिती आणि त्याचप्रमाणे मनाच्या आधारे आणि इच्छाशक्ती, सूचनाशक्ती यांच्या आधारे शरीराच्या विविध अवयवांचं शिथिलीकरण करण्याची पद्धत सविस्तर पाहिली. अशारीतीने शरीर जेव्हा शिथिल होतं, श्वासगती नियमित होते आणि त्यामुळे मनही शांत होतं तेव्हा या आदर्श स्थितीत, शरीराच्या स्वास्थ्यासाठी आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी मनाला सकारात्मक सूचना दिल्या जातात. याच शिथिलीकरणाच्या पद्धतीला योगनिद्रा असं म्हणतात.मानवी मनाची आणि बुद्धीची ताकद प्रचंड आहे. संकल्पशक्ती, इच्छाशक्ती या मनाच्या शक्ती आहेत तर ग्रहणशक्ती, धारणाशक्ती, कल्पनाशक्ती, आज्ञाशक्ती या बुद्धीच्या शक्ती आहेत. या शक्तींना ओळखून त्यांचा योग्य कार्यांसाठी विनियोग करता येतो. परंतु नित्य जीवनामध्ये दगदगीमुळे निर्माण होणारे अनावश्यक विचार व त्यातून उत्पन्न होणारे ताणतणाव यामुळे मनाची आणि बुद्धीची ही शक्ती झाकोळून जाते. मनाच्या आणि बुद्धीच्या या शक्तींना जागृत करणं आणि त्यांचा आपल्या शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक उन्नतीसाठी युक्तीनं वापर करणं योगनिद्रेद्वारे शक्य आहे.योगनिद्रा करण्याचा क्रम पुढीलप्रमाणे : शारीरिक शिथिलीकरण - शारीरिक शिथिलीकरणाची प्रक्रिया आपण शवासन - भाग दोन या लेखात पाहिली आहे. मानसिक शिथिलीकरण - शरीर स्थिर आणि शिथिल झालं की नियमित होणाऱ्या श्वासाची जाणीव ठेवावी. श्वास नियमित आणि मंद होऊ लागला की हळूहळू मनातील विचारांची गतीही कमी होते. मन अधिक केंद्रित करण्यासाठी श्वासावर लक्ष द्यावं. श्वास घेताना जाणवणारा हवेचा गारवा आणि श्वास सोडताना जाणवणारी श्वासाची ऊब अनुभवावी. असं केल्यानं मन एकाग्र होतं आणि विचार ग्रहण करण्यास समर्थ होतं. जो विचार मनाला अशा अवस्थेत देऊ तो विचार मन पटकन् स्वीकारतं आणि म्हणूनच साधकानं सकारात्मक संकल्प करावा. संकल्प म्हणजे श्रद्धापूर्वक केलेला, सकारात्मक, दृढनिश्चयी विचार. संकल्प छोटा असावा. सतत बदलू नये. जसं - ‘माझे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य अतिशय चांगले होत आहे’ किंवा ‘मला प्रचंड आत्मविश्वास प्राप्त होत आहे’, इत्यादी. मन ग्रहणशील असताना केलेले संकल्प बाह्यमन तर स्वीकारतच परंतु असे संकल्प अंतर्मनातही झिरपतात आणि दूरगामी, सकारात्मक परिणाम करतात. अंतर्मनाचं सामर्थ्य बाह्यमनापेक्षा पुष्कळ असतं. भावनिक शिथिलीकरण - मनात संकल्पाची रुजवात केल्यानंतर आपल्याला आनंद देणाऱ्या गोष्टींवर जसं आपली आवडती देवता, आपल्यासाठी आदर्श असलेलं प्रेरणादायी व्यक्तिमत्व, सूर्योदय, सूर्यास्त, सुंदर मंदिर, घंटानादासारखे मधुर नाद, आपलं आवडतं फूल, सरोवर, समुद्र इत्यादींवर लक्ष केंद्रित करावं. या धारणेतील विषय आपल्या आवडीचा असल्यामुळे आपोआपच मनाला आनंद मिळतो. त्यामुळे भावनेच्या पातळीवर शिथिलतेचा अनुभव येतो. मात्र योगनिद्रेच्या या पातळीवर भावना उद्दीपित करणारे विषय टाळावेत. पुन्हा संकल्प - अशारीतीने हळूहळू शारीरिक, मानसिक, भावनिक शिथिलीकरण झालं की उत्साह आणि आनंदाची जाणीव होते. अशा स्थितीत सुरुवातीचा संकल्प पुन्हा एकदा करावा. काही क्षण याच अवस्थेत आनंदाचा अनुभव घ्यावा. पुन्हा श्वासावर लक्ष केंद्रितकरावं. हातापायांच्या बोटांत थोडीशी हालचाल करावी. सावकाश एका कुशीला वळावं आणि डोळे न उघडता सावकाश उठून बसावं. दोन्ही तळहात एकमेकांवर चोळून काही क्षण ते डोळ्यांवर ठेवावेत आणि सावकाश डोळे उघडावेत आणि आनंदाचा, चैतन्याचा अनुभव घ्यावा.ही संपूर्ण प्रक्रिया साधारणतः ३० ते ४० मिनिटांची असते.लाभ : योगनिद्रेचा तत्काळ जाणवणारा लाभ म्हणजे शरीर आणि मनाला मिळणारी विश्रांती आणि पर्यायाने मिळणारी शांतता आणि आनंद. या विश्रांतीमुळेच मन आणि शरीर ताजातवानं होतं, अधिक कार्यक्षम होतं. स्वाभाविकच याचा सकारात्मक परिणाम शरीराच्या मज्जासंस्था, अंत:स्त्रावीग्रंथी, रक्ताभिसरणसंस्था इत्यादी विविध संस्थांच्या कार्यावर होतो. रक्तदाब, शारीरिक आणि मानसिक ताण, डोकेदुखी, तसेच हृदयरोगावर प्रतिबंधक म्हणून योगनिद्रेचा पुष्कळ उपयोग होतो. निद्रानाश किंवा वारंवार झोपमोड होणं या समस्यांवर योगनिद्रा हा प्रभावशाली उपाय आहे. शरीर कार्यक्षम आणि मन अधिकाधिक दक्ष होतं. एखाद्या विषयावर पटकन् केंद्रित होतं. विषयाचं आकलन लवकर होतं, पटकन् निर्णय घेणं शक्य होतं. आत्मविश्वास प्राप्त होतो. शवासन आणि योगनिद्रा यांमुळे चैतन्याचा आणि आनंदाचा अनुभव येत असल्यामुळे योगाचार्य निंबाळकर या आसनाला ‘चैतन्यासन’ असे म्हणतात तर योगाचार्य श्रीकृष्ण व्यवहारे याला ‘आनंदासन’ असं म्हणतात. ही दोन्ही नावं शवासन आणि योगनिद्रेचा नेमकं स्वरूप व्यक्त करणारी आहेत.महत्त्वाचं लक्षात ठेवावं असं - आनंदासन करताना सुरवातीला आपल्या आपण मनाला सूचना देऊन शिथिल करणं जमत नाही. तेव्हा योगनिद्रेचा अभ्यास असलेल्या तज्ज्ञांच्या मदतीनं आनंदासन करावं. सूचनांचं तंत्र योग्य पद्धतीनं शिकल्यावर आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली त्याचा सराव केल्यावर स्वयंसूचनांच्या आधारे आनंदासनातील शिथिलीकरण करणं योग्य ठरेल. आनंदासन करताना सुरुवातीला झोप लागण्याची शक्यता असते. झोप लागली तर त्याबद्दल अपराधीपणाची जाणीव ठेवू नये. मात्र या प्रक्रियेत तंत्राच्या दृष्टीनं झोप लागणं ही योग्य स्थिती नाही. मनाला जागृत ठेऊन शिथिल करणं आणि सकारात्मक विचार मनामध्ये रुजवणं हे या आसनाचं उद्दिष्ट विसरू नये. पुष्कळ झोपूनही मनाला जी विश्रांती मिळत नाही ती थोडा काळ केलेल्या योगनिद्रेमध्ये मिळते हे साधकांनी लक्षात ठेवावं. योगनिद्रा ही आपल्या परंपरेने आपल्याला दिलेली अमूल्य देणगी आहे. एकही पैसा खर्च न करता पुष्कळ आणि दीर्घकालीन फल देणारं असं हे योगनिद्रेचं तंत्र आत्मसात करून नित्य आनंदी आणि चैतन्यानं परिपूर्ण राहावं.
झूठ बोले कौवा काटे, काले कौवे से डरियो…
राहुल गांधींच्या आरोपांवर मुख्यमंत्री फडणवीसांचे प्रत्युत्तरमुंबई : ‘झूठ बोले कौवा काटे, काले कौवे से डरियो…,’ या म्हणीचा वापर करत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना प्रत्युत्तर दिले आहे. महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीतील पराभवाची सल राहुल गांधींना अजूनही बोचत असून, त्यातूनच ते मतदारवाढीबाबत निराधार आरोप करत आहेत, असा टोला फडणवीस यांनी लगावला.मुख्यमंत्री फडणवीस केवळ टीका करूनच थांबले नाहीत तर, ज्या मतदारसंघांमध्ये मतदारवाढ झाली आणि तिथे काँग्रेस व मित्रपक्षांचे उमेदवारच जिंकले, अशा मतदारसंघांची आकडेवारीच त्यांनी एक्सवर पोस्ट करत जाहीर केली आहे. राहुल गांधी यांनी काही मतदारसंघांतील मतदारवाढीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत भाजपवर आरोप केले होते. या आरोपांना उत्तर देताना फडणवीस यांनी एक्स पोस्टवरून म्हटले आहे की, महाराष्ट्रात असे २५ पेक्षा जास्त मतदारसंघ आहेत, जिथे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान ८ टक्क्यांपेक्षा जास्त मतदार वाढले आणि त्यातील अनेक ठिकाणी काँग्रेसला विजय मिळाला आहे.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या एक्स पोस्टमध्ये महाराष्ट्रातील काही प्रमुख मतदारसंघांची उदाहरणे देत राहुल गांधींच्या आरोपांमधील हवाच काढून घेतली आहे. पश्चिम नागपूर येथे ७% मतदार वाढले आणि काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे विजयी झाले. उत्तर नागपूर : येथेही ७% मतदार वाढले आणि काँग्रेसचेच नितीन राऊत विजयी झाले. वडगाव शेरी (पुणे) येथे तब्बल १०% मतदार वाढले आणि शरद पवार गटाचे बापूसाहेब पठारे विजयी झाले. मालाड पश्चिम (मुंबई) येथे ११% मतदार वाढले आणि काँग्रेसचे अस्लम शेख विजयी झाले. मुंब्रा (ठाणे) येथे ९% मतदार वाढले आणि शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड विजयी झाले.काँग्रेसमधील संवादाच्या अभावावरही ठेवले बोटमहाराष्ट्राच्या दारुण पराभवामुळे तुमचे दुःख दिवसेंदिवस वाढत आहे हे मी मान्य करतो. पण तुम्ही किती काळ हवेत बाण सोडत राहणार? ही आकडेवारी सादर करण्यासोबतच भाजपने काँग्रेसमधील अंतर्गत संवादाच्या अभावावरही निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले, ‘राहुल गांधींनी असे आरोप करण्यापूर्वी किमान आपल्याच पक्षाचे आमदार अस्लम शेख, विकास ठाकरे, नितीन राऊत यांच्यासारख्या जुन्या सहकाऱ्यांशी एकदा बोलून घ्यायला हवे होते. असे केले असते, तर काँग्रेसमधील संवादाच्या अभावाचे इतके वाईट प्रदर्शन झाले नसते,’ असा खोचक सल्लाही भाजपने दिला आहे.
हुंडाबळी एक लज्जास्पद विकृती...
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळेमुलींकडून हुंडा का मागितला जातो? याची मानसशास्त्रीय कारणे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. लोभ आणि अतृप्त गरजा असणारे कुटुंब. काही व्यक्ती आणि कुटुंबांमध्ये लोभ आणि भौतिक वस्तूंची अतृप्त लालसा असते. हुंड्याच्या माध्यमातून अधिक संपत्ती, वस्तू किंवा रोख रक्कम मिळवण्याची त्यांची अपेक्षा असते. ही एक प्रकारची मानसिक विकृती असू शकते, जिथे त्यांना इतरांच्या भावनांपेक्षा स्वतःचा स्वार्थ महत्त्वाचा वाटतो. सामाजिक प्रतिष्ठा आणि तुलना याला आवास्तव महत्त्व काही कुटुंबात दिले जाते. समाजात काही ठिकाणी हुंडा घेणे हे प्रतिष्ठेचे लक्षण मानले जाते. 'अमुक कुटुंबाला एवढा हुंडा मिळाला' अशा प्रकारच्या तुलनेतून आणि सामाजिक दबावातून हुंड्याची मागणी केली जाते. ही एक प्रकारची न्यूनगंड किंवा स्वतःला श्रेष्ठ दाखवण्याची विकृत भावना असते.पुरुषांचे वर्चस्व आणि महिलांना दुय्यम स्थान ही मानसिकता अशा घटनांना कारणीभूत ठरते. ज्या समाजात पुरुषांना श्रेष्ठ आणि महिलांना दुय्यम स्थान दिले जाते, तिथे हुंड्याची प्रथा अधिक घट्ट रुजलेली दिसते. मुलाला 'कमावता' आणि मुलीला 'खर्चिक' मानले जाते. त्यामुळे मुलीच्या कुटुंबाकडून तिच्या लग्नात 'भरपाई' म्हणून हुंडा मागितला जातो. ही एक लिंगभेदावर आधारित विकृत मानसिकता आहे. परंपरा आणि रूढींचे अंधानुकरण यातून आजही समाज बाहेर यायला तयार नाही. अनेक कुटुंबांमध्ये हुंडा देणे-घेणे हे परंपरेचा भाग मानले जाते. 'आमच्या कुटुंबात असेच चालत आले आहे' असे म्हणून याचे समर्थन केले जाते. यामागे कोणताही तर्क नसतो, आधार नसतो केवळ अंधानुकरण असते. सर्वात कहर म्हणजे मुलाच्या शिक्षणावर झालेला खर्च वसूल करण्याची वृत्ती देखील हुंडा मागण्यासाठी कारण ठरत आहे. काही पालक आपल्या मुलाच्या शिक्षणावर आणि संगोपनावर झालेल्या खर्चाची वसुली म्हणून हुंड्याची मागणी करतात. ही एक प्रकारची व्यापारी वृत्ती आहे, मुलावर जितके पैसे गुंतवले गेलेत त्यातून तो आजमितीला जे काही कामावतोय, जे आयुष्य, राहणीमान जपतोय त्यात त्याची पत्नी पण सहभागी होणार आहे तर तिला हे सर्व फुकटात का मिळावं? अशी मानसिकता अनेकांना हुंडा मागायला प्रवृत्त करते. या ठिकाणी मानवीय संबंधांपेक्षा आर्थिक व्यवहार महत्त्वाचा ठरतो.हुंड्यासाठी मुलींना मानसिक आणि शारीरिक त्रास का दिला जातो? याचा विचार केल्यास लक्षात येते की, अपेक्षाभंग आणि निराशा. जेव्हा मनासारखा किंवा अपेक्षेप्रमाणे हुंडा मिळत नाही, तेव्हा काही कुटुंबे मुलीचा आणि तिच्या कुटुंबाचा छळ करण्यास सुरुवात करतात. त्यांच्या अपेक्षा पूर्ण न झाल्याने त्यांच्या मनात निराशा आणि राग निर्माण होतो, जो ते मुलीवर शारीरिक आणि मानसिक अत्याचार करून काढतात. वर्चस्व गाजवण्याची वृत्ती हा स्वभावातील दुर्गुण नव्या नवरीला त्रास द्यायला कारणीभूत असतो. सासरच्या मंडळींना नवीन आलेल्या सुनेवर आपले वर्चस्व गाजवायचे असते. हुंड्याच्या मागणीतून आणि त्यासाठी छळ करून ते तिला आपल्या नियंत्रणाखाली ठेवण्याचा प्रयत्न करतात. सासरच्या लोकांच्या मनातील असुरक्षिततेची भावना हे देखील मुख्य कारण हुंडा मागण्यासाठी कारणीभूत असते. काही वेळा सासरच्या मंडळींमध्ये, विशेषतः सासू किंवा नणंदेमध्ये, नवीन सुनेबद्दल असुरक्षिततेची भावना असू शकते. आपल्या मुलाचे किंवा भावाचे प्रेम आणि लक्ष विभागले जाईल या भीतीने ते सुनेचा छळ करतात आणि हुंडा हे त्याचे एक निमित्त बनते. आता आलेली नवीन सून आपल्या मुलाला आपल्यापासून दूर करेल, त्याला वेगळं काढेल, तो आपल्याला विचारणार नाही असे अनेक गैरसमज मनात बाळगल्यामुळे सुंनांना मानसिक त्रास दिला जातो. सामाजिक दबावाचे बळी ठरणारे कुटुंब, ज्यांना स्वतःची स्पष्ट मत अथवा स्वतंत्र विचार धारा आणि निर्णय घेण्याची ताकद नाही त्यांना समाजाच्या किंवा नातेवाइकांच्या दबावामुळे सासरची मंडळी हुंड्यासाठी तगादा लावतात किंवा छळ करतात, जरी त्यांची तशी मूळ इच्छा नसली तरी ते हुंडा घ्यायला द्यायला तयार होतात. हुंड्यामुळे होणाऱ्या त्रासातून विवाहित महिला आत्महत्या का करतात? यामागील मानसशास्त्रीय कारणे पाहिली तर लक्षात येते की, असह्यता आणि निराशा! सततचा शारीरिक आणि मानसिक छळ सहन केल्याने महिलेला प्रचंड असह्यता आणि निराशा येते. तिला असे वाटू लागते की या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग नाही. एकटेपणा आणि आधाराचा अभाव यामुळे जेव्हा महिलेला तिच्या माहेरच्यांकडून किंवा मित्र-मैत्रिणींकडून पुरेसा आधार मिळत नाही, तेव्हा ती अधिक एकटी पडते.हुंडा ही एक अत्यंत गंभीर सामाजिक समस्या आहे, ज्यामुळे अनेक महिलांना शारीरिक आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते आणि काही वेळा त्यांना आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलावे लागते. या समस्येची मानसशास्त्रीय कारणे, आत्महत्येमागील कारणे आणि यावर काय उपाययोजना करता येतील, तसेच यासाठी कोणते कायदे अस्तित्वात आहेत, याची सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.
दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, २५ जून २०२५
पंचांगआज मिती ज्येष्ठ अमावस्या शके १९४७, चंद्र नक्षत्र मृगशीर्ष योग वृद्धी चंद्र रास मिथुन. बुधवार दिनांक २५ जून २०२५. सूर्योदय ६.०२, सूर्यास्त ७.१९, चंद्रोदय नाही, चंद्रास्त ७.३२, राहू काळ १२.४० ते २.२०, ज्येष्ठ अमावास्या, दर्श अमावास्या, अमावास्या समाप्ती -सायंकाळी-४;०१.दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)मेष : आपल्या व्यापार व्यवसायाला गती येणार आहे.वृषभ : आपल्या जोडीदाराचा सहयोग मिळणार आहे.मिथुन : प्रसन्न मनाने व कामाला सुरुवात करणार आहात.कर्क : आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावयास पाहिजे.सिंह : आपल्या कार्यक्षेत्रामध्ये आपण नवीन नवीन कल्पना अमलात आणणार आहात.कन्या : घरातील वातावरण शांत ठेवण्याचा आपण प्रयत्न करणार आहात.तूळ : आपल्या कार्यक्षेत्राचा विस्तार होईल.वृश्चिक : कामामध्ये मनासारखी प्रगती होणार आहे.धनू : आपल्या कामाला गती येईल.मकर : अनपेक्षित घटनांना सामोरे जावे लागणार आहे.कुंभ : सकारात्मक विचाराने नोकरीमध्ये चांगली स्थिती निर्माण होणार आहे.मीन : आपल्या मताला प्राधान्य राहणार आहे.
IND vs ENG 1st Test: ५ शतके झळकावूनही सामना हातून गेला! शेवटच्या दिवशी इंग्लंडने मारली बाजी
इंग्लंडने टीम इंडियाचा ५ विकेट्सने पराभव करत १-० अशी आघाडी घेतली.लीड्स: हेडिंग्ले मैदानावर खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. पहिल्या आणि दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजांनी शानदार कामगिरी करत एकूण ५ शतके झळकावली, परंतु तरीही टीम इंडिया सामना वाचवू शकली नाही. इंग्लंडने चौथ्या डावात ३७१ धावांचे मोठे लक्ष्य गाठून कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास रचला. शेवटच्या दिवशी ३५२ धावा करून इंग्लंडने विजय मिळवला.यशस्वी जयस्वाल, कर्णधार शुभमन गिल आणि ऋषभ पंत यांनी पहिल्या डावात शानदार शतके केली. जयस्वालने १०१, गिलने १४७ आणि पंतने १३४ धावा केल्या. केएल राहुल (१३७) आणि ऋषभ पंत (११८) यांनीही दुसऱ्या डावात चांगली कामगिरी केली.कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या संघाची ५ शतके असूनही कसोटी सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे.टीम इंडियाने कसोटी सामन्यात दोन्ही डावात मोठी आघाडी घेत इंग्लंडसमोर ३७१ धावांचे लक्ष्य ठेवले, परंतु भारतीय गोलंदाजांना ही मोठी धावसंख्या वाचवता आली नाही. इंग्लंडने भारताविरुद्धच्या चौथ्या डावात ५ विकेट्स हातात असताना ३७१ धावांचे लक्ष्य गाठले, जे कसोटी इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक यशस्वी धावसंख्या ठरली. यापूर्वी२०२२ च्या सुरुवातीला इंग्लंडने बर्मिंगहॅममध्ये ३७८ धावांचे लक्ष्य गाठले होते, परंतु यावेळी लीड्समध्ये ३७१ धावांचा पाठलाग करणे देखील ऐतिहासिक होते.भारतीय गोलंदाजी निराशाजनक लीड्स कसोटीत जसप्रीत बुमराह वगळता टीम इंडियाच्या उर्वरित गोलंदाजांनी खूप निराशा केली. प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर इंग्लंडच्या फलंदाजांवर दबाव आणण्यात अपयशी ठरले. बुमराहने पहिल्या डावात इंग्लंड संघाचा अर्धा भाग पॅव्हेलियनमध्ये पाठवला असेल, परंतु दुसऱ्या डावात १९ षटके टाकूनही त्याला बळी मिळवता आला नाही. दुसऱ्या डावात शार्दुल ठाकूर आणि प्रसिद्ध कृष्णाने २-२ बळी घेतले, परंतु इंग्लंडला विजय मिळवण्यापासून रोखू शकले नाहीत.बेन डकेटची ऐतिहासिक खेळीइंग्लंडसाठी, सलामीवीर बेन डकेटने दुसऱ्या डावात ऐतिहासिक खेळी केली. त्याने १४९ धावा केल्या आणि संघाला विजयाचा मार्ग दाखवला. या खेळीदरम्यान, यशस्वी जयस्वालनेही डकेटला ९७ धावांवर जीवदान दिले, ज्याचा त्याने पुरेपूर फायदा घेतला. डकेट भारताविरुद्ध कसोटी सामन्याच्या चौथ्या डावात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्याने जो रूटचा १४२* धावांचा विक्रम मोडला.
IND vs ENG : डकेट-कॉलीच्या जोरावर इंग्लंडचा ऐतिहासिक विजय! ऋषभ पंतची दोन शतकं ठरली व्यर्थ
IND vs ENG England beat India by 5 wickets : बेन डकेटचे शतक आणि क्रॉली-रूटच्या अर्धशतकांच्या जोरावर इंग्लंडने पहिल्या कसोटीत भारतावर ५ विकेट्सनी ऐतिहासिक विजय नोंदवला. इंग्लंडचा लीड्सवर धावांचा पाठलाग करतानाचा हा सर्वात विजय ठरला. त्याचबरोबर पाच सामन्यांच्या मालिकेत १-० ने अशी आघाडी घेतली आहे. पहिल्या डावात आघाडी घेऊनही भारतीय संघ हा सामना जिंकू शकला […] The post IND vs ENG : डकेट-कॉलीच्या जोरावर इंग्लंडचा ऐतिहासिक विजय! ऋषभ पंतची दोन शतकं ठरली व्यर्थ appeared first on Dainik Prabhat .
आदिवासी गरोदर महिलेला डोलीतून नेण्याची नामुष्की !
ठाण्याच्या दुर्गम भागातील समस्या आजही कायमचठाणे : एकीकडे देशभर राजकीय पुढारी व भारतीय जनता स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतोय तर दुसरीकडे येथील आदिवासी जनता रस्ता, वीज,पाणी ,आरोग्य सारख्या सुविधा पासून वंचित असल्याचे वेदनादायी चित्र येथील दुर्गम भागात पहायला मिळत आहे. शहापूरातील नडगाव नजीकच्या पाड्यात एका गरोदर महिलेला रस्त्याअभावी डोलीतून अडीच कि.मी.चा प्रवास करत न्यावे लागले आहे.शहापूर तालुक्यातील नडगाव जवळील चाफेवाडी हे गाव सुमारे १०० वर्षापासून वसलेल्या शहापूर तालुक्यातील नडगाव ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात असलेल्या या पाड्यात जाण्यासाठी रस्ताच नाही. सोमवारी दुपारच्या सुमारास चाफे पाडा येथील सविता रवींद्र मुकणे या गरोदर मातेला त्रास होऊ लागल्याने तिला शहापूर उपजिल्हा रुग्णालयात न्यायचे होते. रुग्णवाहिका बोलवण्यात आली परंतु रस्ता नसल्याने रुग्णवाहिका २ किलोमीटर दूरच थांबवावी लागली गावातील महिला व पुरुष मंडळींनी गरोदर मातेला रुग्णवाहिके पर्यंत घेऊन जाण्यासाठी चादरीची डोली तयार केली .डोलीत गरोदर मातेला ठेवून तिला पाड्यातील पायावाट व पाण्याचे नाले तुडवत गरोदर मातेची डोली खांद्यावर घेत डोली रुग्णवाहिकेपर्यत आणली व त्या रुग्णवाहिकेतून गरोदर माता व काही महिला भगिनींनी १० किलोमीटरच्या शासकीय रुग्णालयाकडे कूच केली. मात्र शहापूर उपजिल्हा रुग्णालयात आणलेल्या सविता मुकणे या गरोदर मातेला रुग्णालयात आकडी आल्याने तिची प्रकृती बिघडली म्हणून तिला तात्काळ ठाणे जिल्हाधिकारी सामान्य रुग्णालय येथे पाठवण्यात आले आहे.अनेक वर्षांपासून येथील गावातील नागरिकाना दवाखाना,बाजारहाट साठी,दोन ते अडीच किलोमीटर पायी चालून डोंगर चढ उतार करीत बाजारपेठ, हॉस्पिटल गाठण्याची वेळ येत आहे.गरोदर माता असो वा अन्य गभीर आजारी त्यांना वैद्यकीय उपचारासाठी डोली करून २ किलोमीटर दूरवर पायी प्रवास करावा लागतोय. २ किमी पायी प्रवास व तिथून पुढे वाहणाने इच्छित स्थळी जाण्याची वेळ आदिवासी बांधवावर येत आहे.हे चित्र नक्की बदलणार तरी कधी असा प्रश्न यानिमित्ताने येथे उपस्थीत होत आहे.आदिवासी गावपाड्यांवरील प्रलंबित ६४ रस्त्यांपैकी ३४ रस्ते हे खाजगी जमिनीतून जातात. त्याबाबतचे अधिकार मा. तहसीलदार यांना असून त्यांनी ते वापरावेत यासाठी आम्ही प्रस्ताव दिलेला आहे. तसेच उर्वरित ३० रस्ते वनाच्या जागेतील असून १५ ठिकाणी ३/२ चे प्रस्ताव मंजूर आहेत. हे सर्व रस्ते व्हावेत यासाठी आम्ही मागील वर्षी आंदोलनही केले होते. - प्रकाश खोडका, सचिव शहापूर तालुका श्रमजीवी संघटना.
मोठं पाऊल ! राज्यात उभारणार 1071 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प; 3 लाख शेतकऱ्यांना होणार लाभ
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्याच्या ऊर्जा क्षेत्रातील भविष्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत 1071 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यास मान्यता देण्यात आली. या प्रकल्पामुळे राज्यातील 3 लाख शेतकऱ्यांना अखंडित वीजपुरवठा मिळणार असून, शेती उत्पादनक्षमता वाढण्यास चालना मिळेल. पारंपरिक ऊर्जेवर अवलंबित्व कमी […] The post मोठं पाऊल ! राज्यात उभारणार 1071 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प; 3 लाख शेतकऱ्यांना होणार लाभ appeared first on Dainik Prabhat .
Satara News : जमीन गेली; मोबदलाही नाही, ठेकेदाराच्या निकृष्ट कामावर भाजपचा हल्लाबोल
कोयनानगर : कराड-चिपळूण राज्य महामार्गाच्या रुंदीकरणामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या असूनही त्यांना अद्याप मोबदला मिळाला नाही. शिवाय, निकृष्ट दर्जाच्या रस्त्याच्या कामामुळे स्थानिकांमध्ये संताप आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने रस्त्यावर ठिय्या आंदोलन करत प्रशासन आणि ठेकेदाराच्या कारभाराविरोधात जोरदार निषेध व्यक्त केला. आंदोलनाचे नेतृत्व माजी पंचायत समिती सदस्य बबनराव कांबळे यांनी केले. यावेळी माजी सभापती राजाभाऊ शेलार, भाजप तालुकाध्यक्ष […] The post Satara News : जमीन गेली; मोबदलाही नाही, ठेकेदाराच्या निकृष्ट कामावर भाजपचा हल्लाबोल appeared first on Dainik Prabhat .
Nirmala Sitharaman : भारत मुळीच ‘टेरिफ किंग’ नाही; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले स्पष्ट
नवी दिल्ली : भारताचे आयात शुल्क सर्वसाधारण प्रमाणापेक्षा जास्त आहे. भारत या शुल्काच्या माध्यमातून अयोग्य व्यापार पद्धत अवलंबित असा अपप्रचार अमेरिकेत केला जात आहे. मात्र वस्तुस्थिती यापेक्षा उलटी आहे. भारताचे आयात शुल्क माफक आहे. भारत संतुलित पद्धतीने व्यापार करण्यासाठी प्रयत्न करीत आहे, असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केले आहे. सितारामन यांनी असेही सांगितले की, […] The post Nirmala Sitharaman : भारत मुळीच ‘टेरिफ किंग’ नाही; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले स्पष्ट appeared first on Dainik Prabhat .
मुंबईतील उद्योजकाने राम मंदिरासाठी केले १७५ किलो सोने अर्पण
मुंबई : अयोध्येतील राम मंदिराचे लोकार्पण होऊन दीड वर्ष उलटून गेले, तरी आजही अयोध्येत लाखो भाविक राम मंदिराच्या दर्शनासाठी येत आहेत. रामललासह श्रीरामांच्या भव्य राम दरबाराचे दर्शनही भाविकांना घेता येणार आहे. सन २०२५ च्या अखेरपर्यंत राम मंदिर परिसरातील सर्व कामे पूर्ण होणार असल्याचे म्हटले जात आहे. यातच मुंबईतील एका बड्या उद्योजकाने राम मंदिरासाठी तब्बल १७५ किलो सोने अर्पण केले आहे. परंतु, हे गुप्त दान केले असून, याची माहिती उघड करण्यात आलेली नाही.श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्राला आपले नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवरून एका भाविकाने महादान दिले आहे. या सोन्याची किंमत सुमारे १५० कोटींच्या घरात असल्याचे म्हटले जात आहे. उद्योजकाने दान केलेले सोने राम मंदिराच्या शिखर-कलशापासून ते दरवाजे आणि दाराच्या चौकटीपर्यंत वापरले गेले आहे.
नवी दिल्ली : अमेरिकेसह युरोपबरोबर व्यापार करणार करण्याची बोलणी सकारात्मक पातळीवर चालू असून ती अंतिम टप्प्यात आली आहे. लवकरच हे व्यापार करार करण्यात येतील असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केले आहे. व्यापार मेळयाचे उद्घाटन केल्यानंतर त्यांनी सांगितले की, भारताला जगाबरोबर संतुलित व्यापार हवा आहे. त्याचबरोबर भारताचा व्यापार 2030 पर्यंत दोन लाख कोटी डॉलरचा करण्यासाठी […] The post Nirmala Sitharaman : अमेरिका व युरोपशी व्यापार करार लवकरच करणार; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले स्पष्ट appeared first on Dainik Prabhat .
Magnet Production : मॅग्नेट उत्पादनासाठी केंद्र सरकार देणार अनुदान
नवी दिल्ली : रेअर अर्थ मॅग्नेटच्या तुटवड्यामुळे भारतातील विविध महत्त्वाच्या उद्योगांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. ही मॅग्नेटचीनकडून मिळविण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून केला जात आहे. दीर्घ पल्ल्यात या क्षेत्रात स्वावलंबी होण्याचे केंद्र सरकारने ठरविले आहे. आता केंद्र सरकार मॅग्नेट उत्पादकासाठी उत्पादन आधारित अनुदान योजना सुरू करण्याची शक्यता आहे. केंद्रीय अवजड उद्योग मंत्री एचडी कुमारस्वामी यांनी सांगितले […] The post Magnet Production : मॅग्नेट उत्पादनासाठी केंद्र सरकार देणार अनुदान appeared first on Dainik Prabhat .
कोल्हापूर : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी कोल्हापुरात राजकीय खेळी खेळत काँग्रेस, भाजप आणि ताराराणी आघाडी यांना एकाच वेळी मोठा धक्का दिला आहे. कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी दोन माजी महापौर, एक उपमहापौर आणि 20 नगरसेवकांना आपल्या शिवसेनेत सामील करून घेतले. मुंबईत शिंदे आणि कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत हा […] The post कोल्हापुरात एकनाथ शिंदेंची मोठी खेळी; एकाच वेळी काँग्रेस, भाजप अन् ताराराणी आघाडीला झटका, बडे नेते लावले गळाला appeared first on Dainik Prabhat .
rain update : महाराष्ट्रात दोन दिवस मुसळधार; समुद्रकिनाऱ्यावर जाणे टाळण्याचे आवाहन
rain update – भारतीय हवामान विभागाने पुढील दोन दिवस महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. विशेषतः मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच पुणे, घाटमाथा, सातारा, कोल्हापूर आणि मराठवाडा व विदर्भात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विदर्भ विभागात नागपूर, अमरावती, चंद्रपूर, यवतमाळ या जिल्ह्यांत मंगळवारी आणि बुधवारी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला […] The post rain update : महाराष्ट्रात दोन दिवस मुसळधार; समुद्रकिनाऱ्यावर जाणे टाळण्याचे आवाहन appeared first on Dainik Prabhat .
IND vs ENG : डकेट-क्रॉलीने भारताविरुद्ध रचला इतिहास! मोडला ७२ वर्षांचा सर्वात मोठा विक्रम
IND vs ENG Duckett Crawley Record : इंग्लंडचे सलामीवीर बेन डकेट आणि झॅक क्रॉली यांनी मंगळवारी भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात अप्रतिम फलंदाजी केली. लीड्स येथे पाचव्या आणि शेवटच्या दिवशी ३७१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ऐतिहासिक १८८ धावांची दमदार भागीदारी केली. या भागीदारीच्या जोरावर दोघांनी भारतीय गोलंदाजांचा समाचार घेत नव्या विक्रमाची नोंद […] The post IND vs ENG : डकेट-क्रॉलीने भारताविरुद्ध रचला इतिहास! मोडला ७२ वर्षांचा सर्वात मोठा विक्रम appeared first on Dainik Prabhat .
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या दुसऱ्या कार्यकाळात मंत्र्यांचे स्वीय सहाय्यक म्हणजेच पीए आणि ओएसडीच्या नियुक्ती संदर्भात सुरुवातीपासूनच कठोर भूमिका घेतली होती. त्यानंतर काही मंत्र्यांनी नाराजी देखील व्यक्त केली होती. मुख्यमंत्री कार्यालयातून मंत्र्यांच्या खासगी सचिवांना त्यांच्या मूळ विभागात जाण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, तोंडी आदेशाकडे संबंधित अधिकाऱ्यांनी कानाडोळा केला होता. मात्र आता पुन्हा […] The post Devendra Fadnavis : स्वीय सहाय्यकांनो तातडीने मूळ विभागात रुजू व्हा; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आदेश appeared first on Dainik Prabhat .
नेवासा : नेवासा नगरपंचायतमधील कार्यरत, निवृत्त आणि मयत कर्मचाऱ्यांच्या वारसांच्या विविध मागण्यांसाठी भारतीय मजदूर संघाच्या पुढाकाराने मंगळवारी बेमुदत चक्री उपोषण आणि धरणे आंदोलन करण्यात आले. कामगार अधिकाऱ्यांनी प्रस्तावित केलेल्या बैठकीच्या तोडग्याला कर्मचाऱ्यांनी सहमती दर्शविल्याने हे आंदोलन स्थगित करण्यात आले. कामगारांच्या अडचणींवर प्रकाशझोत भारतीय मजदूर संघ आणि समर्पण फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. करणसिंह घुले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली […] The post Newasa News : नेवासा नगरपंचायत कर्मचाऱ्यांचे बेमुदत उपोषण: तोडग्याला कर्मचाऱ्यांनी सहमती दर्शविल्याने आंदोलन स्थगित appeared first on Dainik Prabhat .
Rajnath Singh : शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीला राजनाथ सिंह लावणार हजेरी
नवी दिल्ली : चीनमधील किंगदाओ उद्यापासून ते २६ जून पर्यंत यंदाची शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ ) संरक्षण मंत्र्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह भारताच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करतील. या बैठकीत, संरक्षण मंत्री प्रादेशिक तसेच आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा, दहशतवादविरोधी प्रयत्न आणि शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य राष्ट्रांच्या संरक्षण मंत्रालयांमधील परस्पर सहकार्य यासह […] The post Rajnath Singh : शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीला राजनाथ सिंह लावणार हजेरी appeared first on Dainik Prabhat .
Railway ticket price : रेल्वेच्या तिकिट दरात वाढ, तत्काळ बुकिंगसाठी नवीन नियम जारी...
मुंबई : देशभरातील कोट्यावधी लोक रेल्वेने प्रवास करत असतात. रेल्वेने अनेक कालावधीनंतर भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेचे नवीन नियम १ जुलै २०२५ पासून लागू होणार आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या खिशाला कात्री लागण्याची शक्यता आहे. तसेच रेल्वेने केलेले बदल प्रवाशांच्या सोयीसाठी आहे असं रेल्वे मंत्रालयाने म्हंटलं आहे. रेल्वे मंत्रालयाने एसी, नॉन एसी, एक्सप्रेस गाड्यांमध्ये रेल्वेने १ रुपये वाढ केली आहे. तर एसी क्लासमध्ये प्रती २ रुपये किलोमीटर भाडेवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतू लांब पल्ल्याच्या धावणाऱ्या रेल्वे प्रवाशांकरीता भाडेवाढीचा परिणाम देखील होणार आहे. जर रेल्वेतून लांब पल्ल्याचा प्रवास करत असाल तर १४ रुपये जास्त मोजावे लागणार आहेत. एसी क्लाससाठी २८ रुपये मोजावे लागणार असून ५०० किलोमीटरच्या रेल्वे प्रवासासाठी भाडेवाढ होणार नाही अशी रेल्वे मंत्रालयाने माहिती दिली.तात्काळ तिकीट बुकिंगसाठी आधारकार्डाची गरज...१ जूलै २०२५ पासून तात्काळ तिकिटे बुक करण्यासाठी आधारकार्ड आवश्यक आहे. रेल्वे मंत्रालयाने यापूर्वी १० जून रोजी रेल्वे झोनला माहिती दिली. त्यामुळे दलाल आणि अनधिकृत एजंटला फटका बसणार आहे.तात्काळ तिकिट वेबसाईट आणि अॅपद्वारे बुक करता येणार...इथून पुढे तात्काळ तिकिट बुक करण्यासाठी प्रवाशांना आयआरसीटीसी (IRCTC) च्या वेबसाईट किंवा अॅपद्वारे तिकिट बुक करता येणार. म्हणजेच आधारकार्ड ओटीपी पडताळणीसाठी गरजेचे आहे.सामान्य प्रवाशांसाठी तात्काळ तिकिट बुक करता यावे यासाठी रेल्वे प्रशासनाने घेतलेला निर्णय योग्य असल्याचं प्रवाशांनी म्हटले आहे.
Nashik Rain : नाशिकमध्ये जून महिन्यात विक्रमी पाऊस; गोदावरीला आठवडाभरात दुसऱ्यांदा पूर
Nashik – यंदाच्या जून महिन्यात नाशिक शहर आणि जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसाने गेल्या दहा वर्षांतील सर्व विक्रम मोडीत काढले असून, अवघ्या महिनाभरात तब्बल 439 मिमी पावसाची नोंद झाली आहे. सलग कोसळणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील धरणांमध्ये जलसाठा झपाट्याने वाढला असून, गंगापूरसह अनेक धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे गोदावरीला आठवडाभरात दुसऱ्यांदा पूर परिस्थिती निर्माण झाल्याचे […] The post Nashik Rain : नाशिकमध्ये जून महिन्यात विक्रमी पाऊस; गोदावरीला आठवडाभरात दुसऱ्यांदा पूर appeared first on Dainik Prabhat .
Pune News : धनकवडी परिसरात गुरूवारी पाणी बंद
पुणे : आंबेगाव पठार व धनकवडी येथे स्थापत्य विषयक तातडीच्या देखभाल दुरुस्ती कामामुळे येत्या गुरुवारी (२६ जून) काही भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच शुक्रवारी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे. या भागातील पाणी पुरवठा राहणार बंद निलगिरी चौक, चिंतामणी ज्ञानपीठ ते त्रिमूर्ती […] The post Pune News : धनकवडी परिसरात गुरूवारी पाणी बंद appeared first on Dainik Prabhat .
farmers : राज्यातील ३ लाख शेतकऱ्यांना होणार फायदा; मुख्यमंत्री फडणवीसांनी थेट सांगितलं…
farmers – पारंपरिक ऊर्जेवरील अवलंबित्व कमी करून कार्बन उत्सर्जन घटवून शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा अखंडित वीज पुरवठा देऊन शेतीची उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी शासन विविध योजना राबवित आहे. राज्यात शाश्वत विकासास चालना देण्यासाठी महानिर्मितीतर्फे 1,071 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्प 2.0 अंतर्गत लवकरच कार्यान्वित होणार आहेत. या प्रकल्पांमुळे राज्यातील तीन लाख शेतकऱ्यांना लाभ होणार […] The post farmers : राज्यातील ३ लाख शेतकऱ्यांना होणार फायदा; मुख्यमंत्री फडणवीसांनी थेट सांगितलं… appeared first on Dainik Prabhat .
IND vs ENG : बेन डकेटने रचला इतिहास! लीड्स कसोटीत ‘हा’पराक्रम करणारा इंग्लंडचा ठरला पहिलाच खेळाडू
Ben Duckett Historic Century at Leeds Test : इंग्लंडचा सलामीवीर फलंदाज बेन डकेटने लीड्स कसोटी सामन्यात इतिहास रचला आहे. यापूर्वी इंग्लंडच्या कोणत्याही फलंदाजाला जे जमले नव्हते, ते बेन डकेटने करून दाखवले. भारताविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामन्यातील दुसऱ्या डावात शतक झळकावून इंग्लंडला मजबूत स्थितीत पोहोचवले. बेन डकेटने पहिल्या डावात अर्धशतक झळकावले होते, तर दुसऱ्या […] The post IND vs ENG : बेन डकेटने रचला इतिहास! लीड्स कसोटीत ‘हा’ पराक्रम करणारा इंग्लंडचा ठरला पहिलाच खेळाडू appeared first on Dainik Prabhat .