Satara News : शिवजयंतीला निघणार भव्य ‘मेगा पदयात्रा’; जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची मोठी घोषणा
Satara News : जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन बैठक संपन्न; प्रत्येक विभागाला सोपवल्या विशेष जबाबदाऱ्या, चोख बंदोबस्त आणि स्वच्छतेवर राहाणार भर.
SL vs AUS : या दणदणीत विजयासह श्रीलंकेने 'ग्रुप बी' मधून सुपर-८ फेरीसाठी आपली पात्रता निश्चित केली आहे.
राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार; २६ फेब्रुवारीला होणार औपचारिक घोषणा
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर रिक्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) राष्ट्रीय अध्यक्षपदाचा सस्पेन्स आता संपला आहे. येत्या २६ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अधिकृत घोषणा केली जाणार आहे. सोमवारी मुंबईत झालेल्या पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकीत सुनेत्रा पवार यांच्या नावावर सर्वसंमतीने शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत माध्यमांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू होत्या. मात्र, सोमवारी झालेल्या बैठकीत या विषयावर तूर्तास पडदा टाकण्यात आला आहे. विलीनीकरणाच्या संदर्भात तूर्तास कोणतीही चर्चा नको. पक्षाच्या नेत्यांनी आणि आमदारांनी या विषयावर माध्यमांसमोर कोणतेही भाष्य करू नये, अशा सूचना आमदारांना देण्यात आल्या आहेत. सध्या केवळ पक्ष संघटना वाढवणे आणि आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनावर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना नेतृत्वाने दिल्या आहेत.दरम्यान, २६ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या कार्यकारिणीच्या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष निवडीची केवळ औपचारिकता बाकी आहे. याच दिवशी पक्षाच्या पुढील वाटचालीची दिशा स्पष्ट केली जाईल. या निर्णयामुळे राष्ट्रवादीतील अध्यक्षपदावरून सुरू असलेल्या सर्व चर्चांना आता पूर्णविराम मिळणार आहे.
मुंबईच्या सभागृहनेते गणेश खणकर, विरोधी पक्षनेतेपदी किशोरी पेडणेकर
महापालिकेच्या गटनेत्यांची नावे केली महापौरांनी जाहीरमुंबई (विशेष प्रतिनिधी) :मुंबई महापालिकेत अखेर सभागृहनेते आणि विरोधी पक्षनेत्यांची अधिकृत नावे जाहीर झाली. सभागृहनेतेपदी गणेश खणकर आणि विरोधी पक्षनेतेपदी किशोरी पेडणेकर यांच्या नावाची अधिकृत घोषणा महापौर रितू तावडे यांनी सभागृहात केली. याबरोबरच प्रत्येक पक्षाच्या गटनेत्यांच्या नावाचीही अधिकृत घोषणा सभागृहात करण्यात आली.मुंबई महापालिकेच्या विशेष सभेमध्ये सभागृहनेते आणि विरोधी पक्षनेतेपदाच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. सत्ताधारी भाजपच्यावतीने गणेश खणकर यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली होती. त्यामुळे सभागृहनेतेपदासाठी त्यांच्या नावाची शिफारस पक्षाच्यावतीने करण्यात आली होती. तर उबाठा पक्ष हा विरोधीपक्ष असून या पक्षाच्यावतीने गटनेतेपदी किशोरी पेडणेकर यांची निवड करण्यात आली होती. त्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या गटनेत्यांची सभागृहनेतेपदी तर विरोधी पक्षाच्या गटनेत्याची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात येत असल्याचे सभागृहात जाहीर करण्यात आले.यानंतर शिवसेना पक्षाच्यावतीने अमेय घोले यांची गटनेतेपदी तसेच काँग्रेसच्या गटनेतेपदी अश्रफ आझमी, मनसेच्या गटनेते पदासाठी यशवंत किल्लेदार आणि एमआयएमच्या गटनेतेपदी विजय उबाळे यांच्या नावाची अधिकृत घोषणा महापालिका सभागृहात करण्यात आली. शिवसेनेचे गटनेते अमेय घोले यांच्या नावाची गटनेतेपदी निवड झाल्याचे जाहीर करताच उबाठाच्यावतीने पन्नास खोके, एकदम ओके अशाप्रकारच्या घोषणा देण्यास सुरुवात केली. याला शिवसेनेच्या तृष्णा विश्वासराव यांनी हरकत घेतली. वारंवार या घोषणा आपल्याकडून दिल्या जात असून सभागृहाचे कामकाज चांगल्याप्रकारे चालवणे हे आपले कर्तव्य आहे, पण जर विरोधकांकडून अशाप्रकारच्या घोषणा होत असतील तर खिचडीपासून डेडबॅगपर्यंतचे सर्वच आम्ही बाहेर काढून, मग आम्हाला थांबवायचे नाही असा गर्भित इशारा विश्वासराव यांनी दिला. त्यानंतरही या घोषणा सुरुच राहिल्यामुळे साहेबांचा विजय असो अशाप्रकारच्या घोषणा देण्यास सुरुवात केली.यावर महापौर रितू तावडे यांनी उबाठाच्या नगरसेवकांना समज देत सभागृहाचे काम नीट चालवण्यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे सांगितले.
सुधार समिती अध्यक्षपदाची माळ अमेय घोलेंच्या गळ्यात, तर बेस्ट समिती अध्यक्षपदी तृष्णा विश्वासराव?
मुंबई (विशेष प्रतिनिधी) :मुंबई महापालिकेच्या चार वैधानिक समित्यांपैंकी सुधार आणि बेस्ट समितीही शिवसेनेच्या वाट्याला आल्या असून सुधार समिती अध्यक्षपदी अमेय घोले आणि बेस्ट समिती अध्यक्षपदी तृष्णा विश्वासराव यांच्या नावाची चर्चा आहे. शिवसेनेकडून अनुक्रमे अमेय घोले आणि तृष्णा विश्वासराव यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. बेस्ट समिती अध्यक्षपदी तृष्णा विश्वासराव यांची वर्णी लागल्यास बेस्टच्या पहिल्या अध्यक्ष त्या ठरल्या जाणार आहेत.मुंबई महापालिकेच्या सुधार समिती आणि बेस्ट समिती सदस्यपदाची नावे महापौर रितू तावडे यांनी सभागृहात जाहीर केली. भाजपकडून सुधार समितीत तेजस्वी घोसाळकर, चंदन शर्मा यांना संधी दिली आहे. यापूर्वीचे भाजपचे या समिती वर सदस्य कायम ठेवले आहे. तर शिवसेनेकडून संध्या दोशी आणि अजित रावराणे यांनाही संधी देण्यात आली आहे.तर बेस्ट समितीमध्ये भाजपकडून आकाश पुरोहितसह संतोष मेढेकर, अजय सिंग,रमाकांत गुप्ता यांना संधी देण्यात आली आहे तर शिवसेनेने उपेंद्र सावंत आणि तृष्णा विश्वासराव यांची नियुुक्ती केली आहे.सुधार समिती :भाजप: प्रकाश गंगाधरे,अलका केरकर, शर्मा चंदन , महादेव शिवगण, दिपक (बाळा) तावडे, स्वप्ना म्हात्रे, अनिष मकवानी, तेजस्वी घोसाळकर,साक्षी दळवी,संदिप पटेलशिवसेना: अमेय घोले,संध्या दोशी, किरण लांडगे, अजित रावराणे,उबाठा: विशाखा राऊत,सचिन पडवळ, रोना रावत, विठ्ठल लोकरे, जितेंद्र वळवी, मिलिंद वैद्य, उर्मिला पांचाळकाँग्रेस: अश्रफ आझमी, राजा रहेबर खान,मेहेर हैदरमनसे : सुप्रिया दळवीएमआयएम : शबाना शेखबेस्ट समिती :भाजप: आकाश पुरोहित, सुनिल गणाचार्य, संतोष मेढेकर ,अजय सिंग ,प्रमोद वाकोडे, रमाकांत गुप्ताशिवसेना: तृष्णा विश्वासराव, उपेंद्र सावंतउबाठा: प्रविणा मोरजकर, सुनील अहिर, नितीन नांदगावकर, सचिन पाटील, सुनील मोरेकाँग्रेस:आशा कोपरकर, चंद्रकांत मचीगरएमआयएम : फैसल खान
विरोधी पक्षनेत्यालाच उबाठाने स्थायी समितीत डावलले, स्थायी आणि शिक्षण समिती सदस्यांची नावे जाहीर
मुंबई(विशेष प्रतिनिधी) :मुंबई महापालिकेच्या शिक्षण आणि स्थायी समिती सदस्यांच्या नावाची अधिकृत घोषणा सोमवारी महापालिका सभागृहात करण्यात आली आहे. मात्र, महापालिकेच्या इतिहासात प्रथमच विरोधी पक्षनेत्याला स्थायी समितीमध्ये स्थान देण्यात आलेले नाही. विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांची स्थायी समिती सदस्यपदी नियुक्ती न करता उबाठाने आजवरच्या प्रथा परंपरेलाच छेद दिला असून एकप्रकारे उबाठाने पेडणेकर यांच्यावर या माध्यमातून अविश्वासच दाखवला आहे. दरम्यान, स्थायी समिती अध्यक्षपदासाठी आता कुणाची वर्णी लागणार याकडे लक्ष असून भाजप पुन्हा एकदा प्रस्थापित व्यक्तीऐवजी नवीन चेहऱ्याला संधी देण्याची शक्यता आहे.मुंबई महापालिकेच्या शिक्षण आणि स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक येत्या २० फेब्रुवारी रोजी होणार असून यासाठी येत्या १८ फेब्रुवारी रोजी उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. या दोन्ही समित्यांवर सदस्यांची नावे प्रत्येक पक्षाच्या गटनेत्यांनी महापौरांना बंद लिफाफ्यात सादर केली. त्यानुसार या लिफाफ्यातील नावे महापौरांनी जाहीर करून त्यांची स्थायी आणि शिक्षण समितीवर नियुक्ती झाल्याचे जाहीर केले.स्थायी समिती अध्यक्षपदासाठी शिंदे, नार्वेकर, भांदिर्गे यांच्यात स्पर्धास्थायी समितीवरील सदस्यांची नावे जाहीर करण्यात आली असून भाजपने शितल गंभीर, प्रकाश दरेकर, प्रिती सातम, तेजिंदर तिवाना आदींना संधी दिली आहे. त्यामुळे भाजपच्यावतीने प्रभाकर शिंदे, ऍड मकरंद नार्वेकर आणि हरिष भांदिर्गे यांच्यात स्पर्धा आहे.महापालिकेच्या इतिहासात प्रथमच असे घडलेविरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांना उबाठाने स्थायी समिती सदस्यपदी डावलले आहे. महापालिकेत नियम नसला तरी आजवरच्या प्रथा आणि परंपरेनुसार विरोधी पक्षनेत्याला स्थायी समितीत स्थान दिले जाते. परंतु प्रथमच विरोधी पक्षनेत्याला स्थायी समितीमध्ये डावलले गेले आहे. महापौरपदाच्या कालावधीमध्ये ज्याप्रकारे पेडणेकर यांनी केलेला कारभार आणि भाजपकडून होत असलेले आरोप पाहता उबाठाने पेडणेकर यांना या महत्वाच्या समितीतून बाहेर केले असल्याचे बोलले जात आहे. आजवरच्या महापालिकेच्या इतिहासात प्रथमच घडत असले तरी मी स्वत: हे पद न घेवून या समिती सदस्यपदी पक्षाच्या एका सदस्याची वर्णी लावली असल्याचे किशोरी पेडणकर यांनी स्पष्ट केले.स्थायी समिती:भाजप: गणेश खणकर, प्रभाकर शिंदे,राखी जाधव, अॅड. मकरंद नार्वेकर, हरिष भांदिर्गे, शिवकुमार झा, शितल गंभीर, प्रकाश दरेकर, प्रिती सातम, तिवाना ताजिंदरसिंगशिवसेना: अमेय घोले,यामिनी जाधव, अंजली नाईक,डॉ सईदा खानउबाठा : श्रध्दा जाधव, यशोधर फणसे, दिपमाला बढे, लक्ष्मी भाटीया, रमाकांत रहाटे, टी जगदीश, मिनाक्षी पाटणकरकाँग्रेस: अश्रफ आझमी, तुलीप मिरांडा, अजंता यादवएमआयएम: कुरेशी जमिरीमनसे : यशवंत किल्लेदारशिक्षण समिती:भाजप: राजेश्री शिरवडकर, स्वप्ना म्हात्रे, सुषम सावंत, शिवानंद (शिवा) शेट्टी,योगिता कोळी, डॉ. नील किरीट सोमैया , रोहन राठोड, पिल्ले श्रीकला , राजपूत विक्रम , बिगर मनपा सदस्य: निखिल व्यास, योजना ठोकळेशिवसेना:अंजली नाईक, वर्षा टेंबवलकर,धनश्री भरडकर, बिगर मनपा सदस्य चंद्रावती मोरेउबाठा: अंकित प्रभू, गीता भंडारी,पुजा महाडेश्वर, चित्रा सांगळे, सोनाली साबे, प्रमोद सावंत, सोनाली साबेकाँग्रेस: कॅरेन डिमेलो, कमरजहाँ सिद्दीकी, बिगर मनपा सदस्य प्रियंका राऊत,एमआयएम : मेहजाबीन अतिक अहमदमनसे : ज्योती राजभोज
Narendra Modi : दिल्लीत ‘एआय’चा महाकुंभ; पंतप्रधान मोदींच्या हस्ते झाले उद्घाटन
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) क्षेत्रात भारताचे वाढते वर्चस्व सिद्ध करणारे इंडिया एआय इम्पॅक्ट समिट २०२६ आजपासून देशाच्या राजधानीत सुरू झाले. या परिषदेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
Pathum Nissanka Catch : श्रीलंकेच्या पथुम निस्सांकाच्या नावाचाही समावेश झाला आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका यांच्यातील 'ग्रुप बी' च्या निर्णायक सामन्यात निस्सांकाने मैदानात अशी काही किमया केली की, ज्याने प्रेक्षकांसह समालोचकही चकीत झाले.
Bangladesh: भारतीय सागरी सीमा ओलांडून घुसखोरी करणाऱ्या एका बांगलादेशी ट्रॉलवर भारतीय तटरक्षक दलाने झडप घालत २८ मच्छिमारांना ताब्यात घेतले आहे.
Sugar export: साखरेच्या विक्रमी निर्यातीमुळे ऊस शेतकर्यांची चांदी, पाहा केंद्र सरकारचा मोठा निर्णय
Sugar export: आता साखर निर्यातदार ही पाच लाख टन साखर थेट निर्यात करू शकतात. यासाठी त्यांना साखर कारखान्यांना प्रीमियम देण्याची गरज नसल्याचे या संघटनेने म्हटले आहे.
'अल्पसंख्याक समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी ठोस पावले उचला'
अल्पसंख्याक समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी ठोस पावले उचलावीत;अल्पसंख्यांक संस्था दर्जा प्रमाणपत्र प्रकरणाची सखोल चौकशी करून कठोर कारवाई करा;उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे निर्देशमुंबई - अल्पसंख्याक समाजासाठी असलेला निधी प्रत्येक घटकाला समप्रमाणात आणि पारदर्शकपणे वितरित व्हावा, तसेच विभागाचे कामकाज अधिक लोकाभिमुख व समाजाप्रती उत्तरदायी राहण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री तथा अल्पसंख्याक विकास मंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी दिल्या. तसेच शाळांना चुकीच्या पद्धतीने अल्पसंख्याक दर्जाचे प्रमाणपत्र वितरित करण्यात आलेल्या प्रकरणांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश सुनेत्रा पवार यांनी दिले.उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली अल्पसंख्याक विकास विभागाची आढावा बैठक सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी अल्पसंख्याक विकास विभागाचे सचिव रुचेश जयवंशी, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, सहसचिव मनोज जाधव, उपसचिव मि. प. शेणाॅय, अवर सचिव सारंगकुमार पाटील, अवर सचिव जहांगीर खान, अवर सचिव विशाखा आढाव तसेच अवर सचिव मेघना शिंदे उपस्थित होत्या.राज्यातील अल्पसंख्याक समुदायाच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उन्नतीसाठी शासन कटिबद्ध आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री आदरणीय दादांनी ठरवून दिलेल्या ध्येयधोरणांनुसारच विभागाची वाटचाल व्हावी. सच्चर समितीच्या शिफारशीनुसार २१ फेब्रुवारी २००८ रोजी राज्यात स्वतंत्र अल्पसंख्याक विकास विभागाची स्थापना करण्यात आली. या विभागामार्फत शैक्षणिक शिष्यवृत्ती, वसतीगृहे, मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ यांच्या कर्ज योजना, जैन आर्थिक विकास महामंडळाच्या थेट कर्ज व व्याज परतावा योजना, स्वयंसहायता बचत गट, कौशल्य विकास व पायाभूत सुविधा योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना सुनेत्रा पवार यांनी यावेळी दिल्या.मौलाना आझाद महामंडळाच्या शैक्षणिक कर्जाची मर्यादा ५ लाखांवरून २० लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आल्याचे सांगून, या योजनेचा लाभ प्रत्यक्ष गरजूंनाच मिळेल याची काटेकोर दक्षता घ्यावी, असेही सुनेत्रा पवार यांनी बजावले. तसेच राज्यातील ‘डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना’ अंतर्गत पायाभूत सुविधांचे अनुदान २ लाखांवरून १० लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आले असून, पात्र संस्थांची निवड करताना पूर्ण पारदर्शकता राखावी, असे निर्देशही सुनेत्रा पवार यांनी दिले.अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी उभारण्यात येणारी वसतीगृहे तातडीने पूर्ण करून कार्यान्वित करावीत. अल्पसंख्याक बहुल क्षेत्रातील विकासकामांसाठी वितरित होणाऱ्या निधीचे समप्रमाणात वाटप होऊन कामांचा उत्कृष्ट दर्जा राखला जावा, याची जबाबदारी विभागाने घ्यावी, असे निर्देश सुनेत्रा पवार यांनी दिले. नांदेड, सोलापूर आणि मालेगाव येथील उर्दू घरे कार्यान्वित असून, इतर प्रस्तावित उर्दू घरांची कामेही विहित मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. विभागातील रिक्त पदांमुळे प्रशासकीय कामकाजावर विपरीत परिणाम होत असल्याचे निदर्शनास आणून देत त्यांनी वक्फ मंडळातील १७९ मंजूर पदांपैकी ९६, वक्फ न्यायाधिकरणातील ३४ पैकी २५ आणि हज समितीतील १३ पैकी १० रिक्त पदे तातडीने भरण्याची कार्यवाही करावी, असे आदेश दिले. यावेळी त्यांनी संभाजीनगर विभागीय आयुक्तांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून आवश्यक त्या सूचना दिल्या. छत्रपती संभाजीनगर येथे नव्याने स्थापन करण्यात आलेल्या अल्पसंख्याक आयुक्तालयासाठी आवश्यक अधिकारी व कर्मचारी उपलब्ध करून देत आयुक्तालय सशक्त करावे, असेही सुनेत्रा पवार यांनी सांगितले.बार्टी व सारथीच्या धर्तीवर स्थापन झालेल्या ‘मार्टी’ (MRTI)च्या कामकाजाचा नियमित आढावा घेऊन प्रगती अहवाल सादर करावा. अल्पसंख्याक समाजातील बेरोजगारीचे प्रमाण लक्षात घेता तरुणांसाठी मोठ्या प्रमाणावर कौशल्यवृद्धी कार्यक्रम राबवून त्यांना रोजगारक्षम बनविण्यासाठी विभागाने सक्रिय पुढाकार घ्यावा, असे सुनेत्रा पवार यांनी नमूद केले. खारघर, नवी मुंबई येथे प्रस्तावित ‘श्री गुरु तेग बहादूर साहिबजी ३५० वा शाहिदी समागम’ कार्यक्रमाच्या आयोजनासंदर्भातील सर्व प्रशासकीय प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही यावेळी दिले.
गांधीनगर : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, युगपुरुष शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते मंगळवार १७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता गांधीनगर ( गुजरात) येथे करण्यात येणार आहे. हा पुतळा गांधीनगरमधील समस्त महाराष्ट्र समाज मंडळाच्या वतीने उभारण्यात आला आहे.केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमाला गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, उपमुख्यमंत्री हर्ष संघवी, तसेच गुजरात भाजप प्रदेशाध्यक्ष जगदीश पंचाळ आदींची उपस्थिती असेल. यावेळी पुण्यातील लोकमान्य बहुउद्देशीय सहकारी संस्था शिवाजी महाराजांच्या जीवनावरील शिवप्रताप महानाटक हे नाटक सादर करेल.महाराष्ट्र समाज मंडळाच्या वतीने उभारण्यात आलेला सदर पुतळा एकूण २० फूट उंचीचा असून पुतळ्याचे वजन ८५० किलो आहे. पुतळ्याचा चौथारा ८ फुटाचा असून ७ फुटाचा घोडा तर पाच फुटांची शिवरायांची प्रतिकृती आहे. या पुतळ्यासाठी संपूर्ण फायबर साहित्याचा वापर करण्यात आला आहे. या पुतळ्याच्या अनावरणासाठी अहमदाबाद, गांधीनगर, राजकोट, सुरत, कलोल, दोड्डासह गुजरातमधील समस्त मराठी जन उपस्थित राहणार आहेत.छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यामागे स्वराज्य, पराक्रम, राष्ट्रप्रेम आणि न्यायाचे प्रतीक म्हणून त्यांच्या स्मृती चिरंतन ठेवण्याची, तसेच भावी पिढीला प्रेरणा मिळावी अशी आमची भावना आहे. हा पुतळा शिवरायांचे नेतृत्व, दूरदृष्टी आणि मराठी अस्मितेची आठवण करून देणारे एक सांस्कृतिक व ऐतिहासिक प्रतीक म्हणून स्थापित करत आहोतच परंतु हा पुतळा अन्यायाविरुद्ध लढण्याची, प्रगत विचारांची आणि स्वदेशाभिमानाची ऊर्जा देणारा ठरेल. महाराजांचे कार्य, वीरता आणि शौर्य यांची भावी पिढीला जाणीव व्हावी, आणि त्यातून देशभक्तीची भावना निर्माण व्हावी, हा मुख्य उद्देश आहे. शिवाजी महाराजांचा हा केवळ पुतळा नसून, तो एका महान नेतृत्वाच्या विचारांचे आणि कार्याचे प्रतीक म्हणून तो आम्ही गांधीनगर मध्ये उभा करीत आहोत असे गांधीनगर मराठी समाज मंडळाचे विश्वस्त दत्ताजी पाटील यांनी सांगितले.
8th Pay Commission: ३१ डिसेंबर २०२५ किंवा त्यापूर्वी सेवानिवृत्त झालेले कर्मचारी नवीन पेन्शन सुधारणेच्या कक्षेत येतील का? या गोंधळावर आता अर्थ मंत्रालयाने संसदेत आपली भूमिका स्पष्ट केली असून, पेन्शनधारकांना मोठा दिलासा दिला आहे.
Suryakumar Yadav : पाकिस्तानचा शेवटचा फलंदाज बाद झाल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव हा कुलदीप यादववर संतापलेला पाहून चाहत्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती
केरळच्या शबरीमला मंदिरात (Sabarimala Temple) महिलांना प्रवेशाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्या राज्यातील विधानसभा निवडणूक जवळ येऊन ठेपली आहे. त्यामुळे संबंधित मुद्दा आगामी निवडणूक प्रचाराच्या केंद्रस्थानी येण्याचे संकेत मिळू लागले आहेत
Digital Currency of India: हा डिजिटल रुपया म्हणजे तुमच्या खिशातील कागदी नोटा आणि नाण्यांचे डिजिटल स्वरूप आहे. अनेकदा लोक याला बिटकॉइन किंवा यूपीआय (UPI) समजतात, परंतु हे पूर्णपणे वेगळे आहे.
ENG vs ITA : खेरच्या षटकांत सॅम करनने केलेल्या टिच्चून माऱ्यामुळे इंग्लंडने २४ धावांनी विजय मिळवत सुपर-८ फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे.
मुंबई : मुंबई – नागपूर/सावंतवाडी रोड / बनारस /गोरखपूर / समस्तीपूर /दानापूर तसेच पुणे – नागपूर /हजरत निजामुद्दीन / दानापूर दरम्यान एकूण १८६ विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत. यामध्ये ९४ होळी विशेष गाड्या आणि ९२ विशेष गाड्या यांचा समावेश आहे.तपशील पुढीलप्रमाणे:१. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – नागपूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस द्वि-साप्ताहिक विशेष (१० सेवा)ट्रेन क्रमांक 02141 द्वि-साप्ताहिक विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दर रविवार व मंगळवारी २२.०२.२०२६ ते ०८.०३.२०२६ दरम्यान ००.२० वा. सुटेल व नागपूर येथे त्याच दिवशी १५.१० वा. पोहोचेल.ट्रेन क्रमांक 02142 नागपूर येथून दर रविवार व मंगळवारी २०.०० वा. सुटेल व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी १३.३० वा. पोहोचेल.या गाड्या दिनांक २२.०२.२०२६ व २४.०२.२०२६ रोजी विशेष गाड्या (४ सेवा) आणिदिनांक ०१.०३.२०२६, ०३.०३.२०२६ व ०८.०३.२०२६ रोजी होळी विशेष (६ सेवा) म्हणून चालवण्यात येतील.संरचना: १ वातानुकुलीत द्वितीय, ६ वातानुकुलीत तृतीय, ९ शयनयान, ४ सामान्य द्वितीय व २ सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन.थांबे: दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव व वर्धा.२. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – सावंतवाडी रोड – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साप्ताहिक विशेष (४ सेवा)ट्रेन क्रमांक 01171 दि. २६.०२.२०२६ व ०५.०३.२०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दर गुरुवारी ००.२० वा. सुटेल व सावंतवाडी रोड येथे १२.३० वा. पोहोचेल.ट्रेन क्रमांक 01172 दि. २६.०२.२०२६ व ०५.०३.२०२६ रोजी सावंतवाडी रोड येथून १७.२० वा. सुटेल व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी ०३.४५ वा. पोहोचेल.या गाड्या दिनांक २६.०२.२०२६ रोजी विशेष गाड्या (२ सेवा) व दिनांक ०५.०३.२०२६ रोजी होळी विशेष (२ सेवा) म्हणून चालवण्यात येतील.संरचना: १ वातानुकुलीत द्वितीय, ६ वातानुकुलीत तृतीय, ९ शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी व २ गार्ड ब्रेक व्हॅन.थांबे: दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग व कुडाळ.३. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई) – गोरखपूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दैनिक विशेष (३२ सेवा)ट्रेन क्रमांक 01079 दैनिक विशेष दि. २१.०२.२०२६ ते ०८.०३.२०२६ दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दररोज २२.३० वा. सुटेल व गोरखपूर येथे तिसऱ्या दिवशी १०.०० वा. पोहोचेल.ट्रेन क्रमांक 01080 विशेष २३.०२.२०२६ ते १०.०३.२०२६ दरम्यान गोरखपूर येथून दररोज १४.३० वा. सुटेल व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे तिसऱ्या दिवशी ००.४० वा. पोहोचेल.या गाड्या दिनांक २१.०२.२०२६ ते ०२.०३.२०२६ विशेष गाड्या (१६ सेवा) आणि दिनांक ०१.०३.२०२६ ते १०.०३.२०२६ होळी विशेष (१६ सेवा) म्हणून चालवण्यात येतील.संरचना: १ वातानुकुलीत द्वितीय, ६ वातानुकुलीत तृतीय, ९ शयनयान, ४ सामान्य द्वितीय व २ सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन.थांबे: दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी, ओरई, कानपूर सेंट्रल, लखनौ, गोंडा, बस्ती व खलीलाबाद.४. लोकमान्य टिळक टर्मिनस – सावंतवाडी रोड – लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष (४ सेवा)ट्रेन क्रमांक 01119 विशेष दि. २६.०२.२०२६ व ०५.०३.२०२६ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथूनदर गुरुवारी २२.१५ वा.सुटेल व सावंतवाडी रोड येथे दुसऱ्या दिवशी ०९.३० वा. पोहोचेल.ट्रेन क्रमांक 01120 विशेष दि. २७.०२.२०२६ व ०६.०३.२०२६ रोजी सावंतवाडी येथून दर शुक्रवारी १७.२० वा. सुटेल व लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी ०४.०५ वा. पोहोचेल.या गाड्या दिनांक २६.०२.२०२६ व २७.०२.२०२६ रोजी विशेष गाड्या (२ सेवा) आणि दिनांक ०५.०३.२०२६ व ०६.०३.२०२६ रोजी होळी विशेष गाड्या (२ सेवा) म्हणून चालवण्यात येतील.संरचना: १ प्रथम वातानुकुलीत, ३ वातानुकुलीत द्वितीय, ७ वातानुकुलीत तृतीय, ८ शयनयान, १ पॅन्ट्री कार व २ जनरेटर कार.थांबे: ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग व कुडाळ.५. लोकमान्य टिळक टर्मिनस – बनारस – लोकमान्य टिळक टर्मिनस द्विसाप्ताहिक विशेष (८ सेवा)ट्रेन क्रमांक. 01073 द्विसाप्ताहिक विशेष दिनांक २५.०२.२०२६, २६.०२.२०२६, ०४.०३.२०२६ व ०५.०३.२०२६ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दर बुधवार व गुरुवारी १२.१५ वाजता सुटेल व बनारस येथे तिसऱ्या दिवशी ०१.१० वाजता पोहोचेल.ट्रेन क्रमांक. 01074 द्विसाप्ताहिक विशेष दिनांक २७.०२.२०२६, २८.०२.२०२६, ०६.०३.२०२६ व ०७.०३.२०२६ रोजी बनारस येथून दर शुक्रवार व शनिवारी ०६.३५ वाजता सुटेल व लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी १६.४० वाजता पोहोचेल.या गाड्या दिनांक २५.०२.२०२६, २६.०२.२०२६, २७.०२.२०२६ व २८.०२.२०२६ रोजी विशेष गाड्या (४ सेवा) आणि दिनांक ०४.०३.२०२६, ०५.०३.२०२६, ०६.०३.२०२६ व ०७.०३.२०२६ रोजी होळी विशेष गाड्या (४ सेवा) म्हणून चालवण्यात येतील.संरचना: १ वातानुकुलीत द्वितीय, ६ वातानुकुलीत तृतीय, ९ शयनयान, ४ सामान्य द्वितीय आणि २ सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन.थांबे: ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, राणी कमलापती जं., बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी, ओरई, गोविंदपुरी, फतेहपूर, सुबेदारगंज आणि वाराणसी जं. (फक्त 01073 साठी).६. लोकमान्य टिळक टर्मिनस – समस्तीपूर – लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष (४ सेवा)ट्रेन क्रमांक. 01043 साप्ताहिक विशेष दिनांक २४.०२.२०२६ व ०३.०३.२०२६ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दर मंगळवारी १२.१५ वाजता सुटेल व समस्तीपूर येथे दिवशी २३.४५ वाजता पोहोचेल.ट्रेन क्रमांक. 01044 साप्ताहिक विशेष दिनांक २६.०२.२०२६ व ०५.०३.२०२६ रोजी समस्तीपूर येथून दर गुरुवारी ०३.०० वाजता सुटेल व लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी १६.२५ वाजता पोहोचेल.या गाड्या दिनांक २४.०२.२०२६ व २६.०२.२०२६ रोजी विशेष गाड्या (२ सेवा) आणि दिनांक ०३.०३.२०२६ व ०५.०३.२०२६ रोजी होळी विशेष गाड्या (२ सेवा) म्हणून चालवण्यात येतील.संरचना: १ प्रथम वातानुकुलीत, ३ वातानुकुलीत द्वितीय, १५ वातानुकुलीत तृतीय, १ पॅन्ट्री कार आणि २ जनरेटर कार.थांबे: ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पं. दीनदयाळ उपाध्याय जं., बक्सर, आरा, दानापूर, पाटलीपुत्र, सोनपूर, हाजीपूर आणि मुजफ्फरपूर.७. लोकमान्य टिळक टर्मिनस – दानापूर – लोकमान्य टिळक टर्मिनस दैनिक विशेष (३२ सेवा)ट्रेन क्रमांक. 01143 दैनिक विशेष दिनांक २१.०२.२०२६ ते ०८.०३.२०२६ पर्यंत लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दररोज १०.३० वाजता सुटेल व दानापूर येथे दुसऱ्या दिवशी १८.४५ वाजता पोहोचेल.ट्रेन क्रमांक. 01144 दैनिक विशेष दिनांक २२.०२.२०२६ ते ०९.०३.२०२६ पर्यंत दानापूर येथून दररोज २१.३० वाजता सुटेल व लोकमान्य टिळक टर्मिनस येथे तिसऱ्या दिवशी ०७.४५ वाजता पोहोचेल.या गाड्या दिनांक २१.०२.२०२६ ते ०१.०३.२०२६ पर्यंत विशेष गाड्या (१६ सेवा) आणि दिनांक ०१.०३.२०२६ ते ०९.०३.२०२६ पर्यंत होळी विशेष गाड्या (१६ सेवा) म्हणून चालवण्यात येतील.संरचना: १ वातानुकुलीत द्वितीय, ६ वातानुकुलीत तृतीय, ९ शयनयान, ४ सामान्य द्वितीय आणि २ सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन.थांबे: ठाणे, कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पं. दीनदयाळ उपाध्याय जं., बक्सर आणि आरा.८. पुणे – नागपूर – पुणे साप्ताहिक विशेष (४ सेवा)ट्रेन क्रमांक. 01469 साप्ताहिक विशेष दिनांक २४.०२.२०२६ व ०३.०३.२०२६ रोजी पुणे येथून दर मंगळवारी १५.५० वाजता सुटेल व नागपूर येथे दुसऱ्या दिवशी ०६.३० वाजता पोहोचेल.ट्रेन क्रमांक. 01470 साप्ताहिक विशेष दिनांक २५.०२.२०२६ व ०४.०३.२०२६ रोजी नागपूर येथून दर बुधवारी ०८.०० वाजता सुटेल व त्याच दिवशी २३.३० वाजता पुणे येथे पोहोचेल.या गाड्या दिनांक २४.०२.२०२६ व २५.०२.२०२६ रोजी विशेष गाड्या (२ सेवा) आणि दिनांक ०३.०३.२०२६ व ०४.०३.२०२६ रोजी होळी विशेष गाड्या (२ सेवा) म्हणून चालवण्यात येतील.संरचना: ३ वातानुकुलीत द्वितीय, १५ वातानुकुलीत तृतीय, १ सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर व्हॅन.थांबे: उरुळी, दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा.९. पुणे – नागपूर – पुणे साप्ताहिक विशेष (४ सेवा)ट्रेन क्रमांक 01457 साप्ताहिक विशेष दिनांक २५.०२.२०२६ व ०४.०३.२०२६ रोजी पुणे येथून दर बुधवारी १५.५० वा. सुटेल व नागपूर येथे दुसऱ्या दिवशी ०६.३० वा. पोहोचेल.ट्रेन क्रमांक 01458 साप्ताहिक विशेष दिनांक २६.०२.२०२६ व ०५.०३.२०२६ रोजी नागपूर येथून दर गुरुवारी ०८.०० वा. सुटेल व पुणे येथे त्याच दिवशी २३.३० वा. पोहोचेल.या गाड्या दिनांक २५.०२.२०२६ व २६.०२.२०२६ रोजी विशेष गाड्या (२ सेवा) आणि दिनांक ०४.०३.२०२६ व ०५.०३.२०२६ रोजी होळी विशेष गाड्या (२ सेवा) म्हणून चालवण्यात येतील.संरचना: १ प्रथम वातानुकुलीत, १ वातानुकुलीत द्वितीय, २ वातानुकुलीत तृतीय, ५ शयनयान, ६ सामान्य द्वितीय व २ सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन.थांबे: उरुळी, दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धमणगाव व वर्धा.१०. पुणे – दानापूर – पुणे द्वि-साप्ताहिक विशेष (८ सेवा)ट्रेन क्रमांक 01481 द्वि-साप्ताहिक विशेष दिनांक २३.०२.२०२६ ते ०६.०३.२०२६ दरम्यान पुणे येथून सोमवार व शुक्रवारी १९.५५ वा. सुटेल व दानापूर येथे तिसऱ्या दिवशी ०८.०० वा. पोहोचेल.ट्रेन क्रमांक 01482 द्वि-साप्ताहिक विशेष दिनांक २५.०२.२०२६ ते ०८.०३.२०२६ दरम्यान दानापूर येथून बुधवार व रविवारी १०.०० वा. सुटेल व पुणे येथे दुसऱ्या दिवशी १८.१५ वा. पोहोचेल.या गाड्या दिनांक २३.०२.२०२६ ते ०१.०३.२०२६ दरम्यान विशेष गाड्या (४ सेवा) आणि दिनांक ०२.०३.२०२६ ते ०८.०३.२०२६ दरम्यान होळी विशेष गाड्या (४ सेवा) म्हणून चालवण्यात येतील.संरचना: १ वातानुकुलीत द्वितीय, ५ वातानुकुलीत तृतीय, ६ शयनयान, ४ सामान्य द्वितीय व २ सामानासह गार्ड ब्रेक व्हॅन.थांबे: दौंड कॉर्ड केबिन, अहिल्यानगर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पं. दीन दयाल उपाध्याय जं., बक्सर व आरा.११. पुणे – दानापूर – पुणे दैनिक विशेष (३२ सेवा)ट्रेन क्रमांक 01449 दैनिक विशेष दिनांक २१.०२.२०२६ ते ०८.०३.२०२६ दरम्यान पुणे येथून दररोज १५.३० वा. सुटेल व दानापूर येथे तिसऱ्या दिवशी ०२.४५ वा. पोहोचेल.ट्रेन क्रमांक 01450 दैनिक विशेष दिनांक २३.०२.२०२६ ते १०.०३.२०२६ दरम्यान दानापूर येथून दररोज ०५.०० वा. सुटेल व पुणे येथे दुसऱ्या दिवशी १८.१५ वा. पोहोचेल.या गाड्या दिनांक २१.०२.२०२६ ते ०२.०३.२०२६ दरम्यान विशेष गाड्या (१६ सेवा) आणि दिनांक ०१.०३.२०२६ ते १०.०३.२०२६ दरम्यान होळी विशेष गाड्या (१६ सेवा) म्हणून चालवण्यात येतील.संरचना: १ वातानुकुलीत द्वितीय, ५ वातानुकुलीत तृतीय, ६ शयनयान, ४ सामान्य द्वितीय व २ सामानासह गार्ड ब्रेक व्हॅन.थांबे: दौंड कॉर्ड केबिन, अहिल्यानगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पं. दीन दयाल उपाध्याय जं., बक्सर व आरा.१३. पुणे – गोरखपूर – पुणे दैनिक विशेष (३२ सेवा)ट्रेन क्रमांक 01415 दैनिक विशेष दिनांक २१.०२.२०२६ ते ०८.०३.२०२६ दरम्यान पुणे येथून दररोज ०६.५० वा. सुटेल व गोरखपूर येथे दुसऱ्या दिवशी १६.०० वा. पोहोचेल.ट्रेन क्रमांक 01416 दैनिक विशेष दिनांक २२.०२.२०२६ ते ०९.०३.२०२६ दरम्यान गोरखपूर येथून दररोज १७.३० वा. सुटेल व पुणे येथे तिसऱ्या दिवशी ०३.१५ वा. पोहोचेल.या गाड्या दिनांक २१.०२.२०२६ ते ०१.०३.२०२६ दरम्यान विशेष गाड्या (१६ सेवा) आणि दिनांक ०१.०३.२०२६ ते ०९.०३.२०२६ दरम्यान होळी विशेष गाड्या (१६ सेवा) म्हणून चालवण्यात येतील.संरचना: १ वातानुकुलीत द्वितीय, ६ वातानुकुलीत तृतीय, ९ शयनयान, ४ सामान्य द्वितीय व २ सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन.थांबे: दौंड कॉर्ड केबिन, अहिल्यानगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, राणी कमलापती, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झांसी, ओरई, कानपूर सेंट्रल, लखनौ, गोंडा व बस्ती.१४. पुणे – हजरत निजामुद्दीन – पुणे साप्ताहिक विशेष (४ सेवा)ट्रेन क्रमांक 01491 साप्ताहिक विशेष दिनांक २७.०२.२०२६ व ०६.०३.२०२६ रोजी पुणे येथून दर शुक्रवारी १७.३० वा. सुटेल व हजरत निजामुद्दीन येथे दुसऱ्या दिवशी २०.०० वा. पोहोचेल.ट्रेन क्रमांक 01492 साप्ताहिक विशेष दिनांक २८.०२.२०२६ व ०७.०३.२०२६ रोजी हजरत निजामुद्दीन येथून दर शनिवारी २१.२५ वा. सुटेल व पुणे येथे दुसऱ्या दिवशी २३.५५ वा. पोहोचेल.या गाड्या दिनांक २७.०२.२०२६ व २८.०२.२०२६ रोजी विशेष गाड्या (२ सेवा) आणि दिनांक ०६.०३.२०२६ व ०७.०३.२०२६ रोजी होळी विशेष गाड्या (२ सेवा) म्हणून चालवण्यात येतील.संरचना: २ वातानुकुलीत द्वितीय, ४ वातानुकुलीत तृतीय, ८ शयनयान, ४ सामान्य द्वितीय, १ सामानासह गार्ड ब्रेक व्हॅन व १ जनरेटर कार.थांबे: लोणावळा, कल्याण, भिवंडी रोड, वसई रोड, वापी, सुरत, वडोदरा, गोध्रा, रतलाम, शामगढ, भवानी मंडी, रामगंज मंडी, कोटा, सवाई माधोपूर, गंगापूर सिटी, भरतपूर व मथुरा जंक्शन.आरक्षण:विशेष गाडी क्रमांक 02141, 02142, 01171, 01079, 01119, 01073, 01043, 01143, 01469, 01470, 01457, 01458, 01481, 01449, 01431, 01415 व 01491 यांचे आरक्षण दिनांक १८.०२.२०२६ पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर तसेच www.irctc.co.in या संकेतस्थळावर आगाऊ आरक्षण कालावधी (ARP) अंतर्गत उपलब्ध होईल.आगाऊ आरक्षण कालावधी (ARP) नंतरच्या प्रवासासाठी आरक्षण संबंधित पुढील ARP तारखेनुसार उपलब्ध होईल.अनारक्षित डब्यांसाठी सामान्य शुल्कासह UTS प्रणालीद्वारे आरक्षण करता येईल.प्रवासी तिकीट बुकिंगसाठी RailOne ॲप डाउनलोड करू शकतात.या विशेष गाड्यांच्या थांब्यांवरील सविस्तर वेळापत्रकासाठी www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा. सदर बातमी पत्रक डॉ. स्वप्निल निला, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून जारी केले आहे.
आसावरी जगदाळे यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
विशेष बाब म्हणून पुणे महानगरपालिकेत सामावून घेण्याचा निर्णयमुंबई : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले पुण्यातील संतोष जगदाळे यांची मुलगी आसावरी जगदाळे हिला शासकीय सेवेत सामावून घेण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे मनपा आयुक्तांना दिले आहेत.पहलगाम हल्ल्यानंतर या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना आधार देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील जगदाळे कुटुंबीयांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी संतोष जगदाळे यांच्या पत्नी प्रगती जगदाळे आणि आसावरी जगदाळे यांचे सांत्वन करून या कुटुंबाला आर्थिक आधार मिळावा यासाठी आसावरीला शासकीय सेवेत सामावून घेण्याचे आश्वासन दिले होते.त्यानुसार आज शिंदे यांनी पुणे मनपा आयुक्त नवलकिशोर राम यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. यावेळी त्यांनी आसावरी हिला बोलवून तिच्याशी बोलून तिच्या शिक्षणाला समकक्ष असे पद महानगरपालिकेत निर्माण करून तिला सेवेत सामावून घेण्याचे निर्देश दिले. तसेच शासन सहानुभूतीपूर्वक हा निर्णय घेत असून विशेष बाब म्हणून तिच्या नेमणुकीला मंजुरी देण्यात येईल असेही शिंदे यांनी स्पष्ट केले. त्यानुसार लवकरच आसावरी जगदाळे हिला शासकीय सेवेमध्ये सामावून घेण्याची प्रकिया पूर्ण केली जाणार आहे.
Sunetra Pawar : सुनेत्रा पवार राष्ट्रवादीच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्ष? बैठकीत मोठा निर्णय
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (अजित पवार गट) एक महत्त्वपूर्ण नेतृत्व बदल घडत आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर नेमण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.
इंग्लंडचा इटलीवर २४ धावांनी विजय
नवी दिल्ली : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या सुपर ८ मध्येप्रवेश करणारा इंग्लंड हा चौथा संघ ठरला आहे. क गटातून वेस्ट इंडिजने आधीच पुढच्या फेरीत प्रवेश निश्चित केला होता आणि इंग्लंडने सोमवारी इटलीवर विजय मिळवून आगेकूच केली. पहिलाच वर्ल्ड कप खेळणाऱ्या इटलीने त्यांच्या प्रदर्शनाने क्रिकेट चाहत्यांचे मन मात्र जिंकले. नेपाळला पराभूत केल्यानंतर इटलीचा आत्मविश्वास कमालिचा वाढलेला पाहायला मिळाला. त्यामुळेच समोर २०३ धावांचे आव्हानात्मक लक्ष्य असूनही हा संघ डगमगला नाही. शेवटपर्यंत त्यांनी विजयासाठी जोर लावला, परंतु इंग्लंडचा अनुभव कामी आला व २४ धावांनी इटलीचा संघ पराभूत झाला.क गटातून सुपर ८ चे स्थान निश्चित करण्यासाठी मैदानावर उतरलेल्या इंग्लंडला कोलकाताच्या इडन गार्डनवर इटलीने जेरीस आणले होते. फुटबॉलच्या मैदानावर या दोन्ही देशांमधील लढती रोमहर्षक राहिल्या आहेत आणि क्रिकेटच्या मैदानावर तिच ठसन पाहायला मिळाली. नेपाळला पराभूत करून वर्ल्ड कपमधील पहिला विजय मिळवल्यानंतर इटलीचा आत्मविश्वास किती वाढलाय, हे इंग्लंडविरुद्ध पाहायला मिळाला. इंग्लंडचा निम्मा संघ त्यांनी १०५ धावांत तंबूत पाठवला होता.जॉस बटलर ( ३), जेकब बेथेल ( २३), फिल सॉल्ट ( २८), कर्णधार हॅरी ब्रूक ( १४) व टॉम बँटन ( ३०) यांना इटलीच्या गोलंदाजांनी शांत ठेवले. पण, सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या विल जॅक्सने सामना ३६० डिग्री कोनात फिरवला. त्याने २१ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले, जे ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमधील इंग्लंडकडून झालेले वेगवान अर्धशतक ठरले. त्याने इयॉन मॉर्गनचा विक्रम मोडला. जॅक्सने २२ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांसह नाबाद ५३ धावा करताना संघाला ७ बाद २०२ धावांपर्यंत पोहोचवले.इटलीच्या ग्रांट स्टीवर्ट व क्रिशन कलनगामागे यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. इटलीची सुरुवात काही खास झाली नाही. जोफ्रा आर्चरने पहिल्याच षटकात अँथोनी मोस्का ( ०) व जेजे स्मट्स ( ०) यांना बाद केले. त्यानंतर जेमी ओव्हरटनने कर्णधार हॅरी मॅनेटीला ( १२) माघारी पाठवून इटलीची अवस्था ३ बाद २२ अशी केली. आता इथून इटली काय डोकं वर काढत नाही, असे इंग्लंडला वाटले. पण, जस्टीन मोस्का व बेन मॅनेटी ही जोडी मैदानावर उभी राहिली.बेनने २२ चेंडूंत अर्धशतक ठोकले आणि इडन गार्डनचे सर्व कोपरे चौकार-षटकारांनी व्यापले. विल जॅक्सने टाकलेल्या १२ व्या षटकात मॅनेटीने ४,६,६,४ असे फटके खेचले. पण, शेवटच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नान मॅनेटी झेलबाद झाला. त्याने २५ चेंडूंत ४ चौकार व ६ षटकारांसह ६० धावांची वादळी खेळी केली. मोस्का व मॅनेटी जोडीने पाचव्या विकेटसाठी ४८ चेंडूंत ९२ धावा जोडल्या. या दोघांनी इंग्लंडच्या नाकी नऊ आणले होते. मोस्काने इंग्लंडच्या गोलंदाजांना चांगला चोप दिला, परंतु आदिल राशिदच्या गोलंदाजीवर तो फसला. मोस्का ३४ चेंडूंत ७ चौकारांसह ४३ धावांवर बाद झाला.इटलीला ३० चेंडूंत ६१ धावा हव्या होत्या आणि इंग्लंडने शेवटच्या पाच षटकांतच ७१ धावा चोपल्या होत्या. त्यामुळे इटलीसाठीही हे लक्ष्य शक्य होते. पण, सॅम कुरनने एकाच षटकात त्यांना दोन धक्के दिले. मार्कस कॅम्पोपियानो ( २) व जिएय-पिएरो मीड ( ०) हे बाद झाले. १८व्या षटकात ग्रांट स्टीवर्टने २१ धावा कुटल्या आणि सामना १२ चेंडूंत ३० धावा असा जवळ आणला. सॅम करन पुन्हा एकदा इंग्लंडसाठी संकटमोचक ठरला. त्याने १९ व्या षटकात फक्त ५ धावा देत १ विकेट घेतली. स्टीवर्ट २३ चेंडूंत २ चौकार व ५ षटकारांसह ४५ धावांची खेळी केली. करनने २३ धावांत ३ विकेट्स घेतल्या. इटलीचा संघ १७८ धावांत ऑल आऊट झाला. ओव्हरटनने तीन बळी टिपले.
२०२६ मध्ये पदवीधरांसाठी मोठी संधी; रिझर्व्ह बँकेत ६५० सहाय्यक पदांची भरती जाहीर
बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरूमुंबई : बँकिंग क्षेत्रात नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. भारतीय रिझर्व्ह बँक ने सहाय्यक पदांच्या तब्बल ६५० रिक्त जागांसाठी अधिकृत भरती जाहीर केली आहे. देशातील विविध कार्यालयांमध्ये या जागा भरल्या जाणार असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.इच्छुक उमेदवारांनी केवळ अधिकृत संकेतस्थळावरूनच ((www.rbi.org.in) अर्ज करावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे. इतर कोणत्याही माध्यमातून पाठवलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.महत्त्वाच्या तारखा जाहीरऑनलाईन अर्ज कालावधी : १६ फेब्रुवारी २०२६ ते ८ मार्च २०२६शुल्क भरण्याची अंतिम मुदत : ८ मार्च २०२६पूर्व परीक्षा (अंदाजे) : ११ एप्रिल २०२६मुख्य परीक्षा (अंदाजे) : ७ जून २०२६परीक्षेच्या तारखांमध्ये आवश्यकतेनुसार बदल करण्याचा अधिकार बँकेकडे राखीव असल्याचे नमूद करण्यात आले आहे.देशातील विविध शहरांत भरतीअहमदाबाद, बंगळुरू, भोपाळ, चंदीगड, चेन्नई, गुवाहाटी, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कानपूर, लखनऊ, कोलकाता, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, पाटणा आणि तिरुवनंतपुरम येथे या जागा भरल्या जाणार आहेत. गरजेनुसार पदसंख्येत वाढ किंवा घट होऊ शकते.पात्रता आणि नागरिकत्व निकषउमेदवार भारताचा नागरिक असावा. तसेच नेपाळ किंवा भूतानमधील नागरिक, १ जानेवारी १९६२ पूर्वी भारतात स्थायिक झालेले तिबेटी निर्वासित आणि भारतीय वंशाचे नागरिक ज्यांना भारतात कायमस्वरूपी राहण्याची परवानगी आहे, तेही पात्र ठरतील. संबंधित उमेदवारांकडे शासनमान्य प्रमाणपत्र आवश्यक राहील.वयोमर्यादा आणि सवलतीकिमान वय : २० वर्षेकमाल वय : २८ वर्षे(जन्म २ फेब्रुवारी १९९८ ते १ फेब्रुवारी २००६ दरम्यान असावा)आरक्षणानुसार सवलतअनुसूचित जाती / जमाती : ५ वर्षेइतर मागासवर्गीय : ३ वर्षेदिव्यांग : १० ते १५ वर्षेमाजी सैनिक : नियमांनुसारविधवा / घटस्फोटित महिला : ३५ ते ४० वर्षांपर्यंतबँक कर्मचारी : सेवेप्रमाणे (कमाल ३ वर्षे)शैक्षणिक अटकोणत्याही शाखेतील पदवी किमान ५० टक्के गुणांसह आवश्यक आहे. अनुसूचित जाती, जमाती आणि दिव्यांग उमेदवारांसाठी केवळ उत्तीर्ण श्रेणी ग्राह्य धरली जाईल.संगणकावर शब्द प्रक्रिया ज्ञान आवश्यक असून संबंधित राज्याची प्रादेशिक भाषा लिहिता, वाचता आणि बोलता येणे बंधनकारक राहील. संरक्षण सेवेत १५ वर्षे पूर्ण केलेल्या माजी सैनिकांसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आवश्यक आहे.निवड प्रक्रिया तीन टप्प्यांत१) पूर्व परीक्षा२) मुख्य परीक्षा३) भाषा प्राविण्य चाचणीस्थानिक भाषेचे ज्ञान तपासण्यासाठी अंतिम टप्प्यात चाचणी घेतली जाईल. या चाचणीत अपात्र ठरल्यास उमेदवाराची निवड रद्द होईल.परीक्षेचे स्वरूपपूर्व परीक्षाइंग्रजी : ३० प्रश्नगणित : ३५ प्रश्नबुद्धिमत्ता : ३५ प्रश्नएकूण : १०० प्रश्न, १०० गुणकालावधी : ६० मिनिटेमुख्य परीक्षाबुद्धिमत्ताइंग्रजीगणितसामान्य ज्ञानसंगणक ज्ञान(प्रत्येकी ४० प्रश्न, एकूण २०० प्रश्न, २०० गुण)दोन्ही परीक्षांमध्ये चुकीच्या उत्तरांसाठी गुण वजा करण्यात येणार आहेत.अर्ज शुल्कसर्वसाधारण आणि इतर मागासवर्गीय : ४५० रुपयेअनुसूचित जाती, जमाती, दिव्यांग, माजी सैनिक आणि बँक कर्मचारी : ५० रुपये शुल्क केवळ ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारले जाणार आहे.बँकिंग क्षेत्रात स्थिर आणि प्रतिष्ठेची नोकरी शोधणाऱ्या पदवीधरांसाठी ही मोठी संधी मानली जात आहे. पात्र उमेदवारांनी अंतिम मुदतीपूर्वी अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
भिवंडी महापालिका निवडणुकीत (Bhiwandi Municipal Corporation) एकाही राजकीय पक्षाला बहुमत न मिळाल्यामुळे तब्बल एक महिन्यानंतर ही कोणत्याच पक्षाच्या उमेदवाराकडून संख्याबळाचे गणित जुळून येण्यात अपयश आले आहे.
Tariq Rahman oath ceremony: या निर्णयामागे भाजपची आंतरराष्ट्रीय स्तरावरील 'ट्रंप कार्ड' चाल आणि सूक्ष्म कूटनीति असल्याचे बोलले जात आहे.
मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेता सचिन पिळगांवकर हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे अनेकदा सोशल मीडियावर ट्रोल होतात.
Pakistan fans reaction : हमीप्रमाणे भारत-पाक सामन्यानंतर पाकिस्तानात टीव्ही फुटण्याच्या बातम्या येत असतात, मात्र यावेळेस चाहत्यांच्या आक्रमकतेने सर्व मर्यादा ओलांडल्याचे चित्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हे मजबूत सरकार आहे की मजबूर सरकार? आत्मनिर्भर भारत की अमेरिका-निर्भर भारत? असा सवाल उपस्थित करत काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सूरजेवाला (Randeep Surjewala) यांनी कराराच्या अटी सार्वजनिक करण्याची मागणी करताना केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
पुणे–कोल्हापूर प्रवासाला वेग; राष्ट्रीय महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात
पुणे : पुणे आणि कोल्हापूर दरम्यानचा रस्तेप्रवास लवकरच अधिक जलद आणि सुलभ होणार असल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या देखरेखीखाली सुरू असलेल्या NH 48 या पुणे–बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरण व सुधारणा कामांना वेग आला आहे.प्रकल्पात कोणते भाग समाविष्ट?पुणे–सातारा–कराड–कोल्हापूर हा संपूर्ण मार्ग या योजनेत अंतर्भूत आहे. काही ठिकाणी रस्ता चार पदरी, तर काही भागात सहा पदरी करण्यात येत आहे. उड्डाणपूल, सेवा रस्ते आणि भूमिगत मार्ग उभारले जात आहेत. खंबाटकी घाटात नव्या बोगद्याचे काम पूर्ण झाले असून एका दिशेने वाहतूक सुरू करण्यात आली आहे.पेठ नाका ते कराड या सुमारे २७ किलोमीटरच्या टप्प्याचे काम अदानी रोड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीकडे आहे. तर पेठ नाका ते कोल्हापूर या सुमारे ४५ किलोमीटरच्या मार्गाची जबाबदारी रोडवेज सोलुशन इंडिया इन्फ्रा लिमिटेड सांभाळत आहे. कराड येथील उड्डाणपूलही लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.केव्हा पूर्ण होणार महामार्ग बहुतांश कामे शेवटच्या टप्प्यात असून जून २०२६ पर्यंत संपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. केंद्रीय मंत्रीनितीन गडकरी यांच्या पाठपुराव्यामुळे कामांना गती मिळाल्याचे सांगितले जाते. स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार काही ठिकाणी अतिरिक्त भूमिगत मार्गांना मान्यता देण्यात आली आहे.प्रवासाच्या वेळेत घटसध्या पुणे ते कोल्हापूर प्रवासाला साधारण चार ते पाच तास लागतात. मात्र काम पूर्ण झाल्यानंतर हा कालावधी अंदाजे ३ तासांपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे. यामुळे वाहनचालकांचा वेळ वाचेल, इंधन खर्चात बचत होईल आणि अपघातप्रवण ठिकाणी सुरक्षितता वाढेल.
Rajendra Dheringe Bribe Case : लाचखोर राजेंद्र ढेरिंगेच्या घरावर एसीबीचा छापा
राष्ट्रवादीचे नेते व अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयात एसीबीने छापा टाकला होता. या कारवाईत लिपीक राजेंद्र ढेरंगे (Rajendra Dheringe Bribe Case) याला ३५ हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले होते.
मुंबई :Salman Khan Films ने ‘बैटल ऑफ गलवान’च्या प्रदर्शनापूर्वी एक खास व्हिडिओ मालिका प्रदर्शित केली असून, यात खऱ्या आयुष्यातील लष्करी वीर आणि त्यांच्या कुटुंबियांचा सन्मान करण्यात आला आहे.‘बैटल ऑफ गलवान’च्या टीझरला मिळालेल्या जबरदस्त प्रतिसादानंतर Salman Khan Films प्रेक्षकांच्या मनाला सतत स्पर्श करत आहे. अलीकडेच प्रदर्शित झालेली ‘मातृभूमी’ आणि ‘मैं हूँ’ ही गीते देशभक्तीची भावना अधिक तीव्र करत असून, त्यांना सर्वत्र मोठा प्रतिसाद मिळत आहे. आता निर्मात्यांनी खऱ्या लष्करी दिग्गज आणि त्यांच्या कुटुंबियांच्या भावनिक आठवणींची खास व्हिडिओ मालिका सादर केली आहे, जी प्रत्येक सैनिकामागे उभी असलेल्या शांत पण खंबीर शक्तीला सलाम करते.हे व्हिडिओ शेअर करताना निर्मात्यांनी लिहिले, “बैटल ऑफ गलवान त्या आर्मी व्हेटरन्सच्या कुटुंबियांना सलाम करते, ज्यांनी प्रत्येक पोस्टिंग, प्रत्येक निरोप आणि प्रत्येक घरी परतण्याचा क्षण जगला आहे
टी-२० मध्ये रशीद खानचा ७०० बळींचा वर्ल्ड रेकॉर्ड!
ऐतिहासिक पराक्रम करणारा जगातील पहिला गोलंदाजमुंबई : टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये सोमवारी पहिला सामना अफगाणिस्तान व युएई यांच्यात खेळवला गेला. या सामन्यात अफगाणिस्तानच्या संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. दरम्यान पहिल्या डावात खेळत असताना संघाचा कर्णधार रशीद खानने एक विकेट घेताच टी-२० इतिहासात विश्वविक्रम आपल्या नावे केला आहे.रशीद खानच्या गोलंदाजीवर युएईचा फलंदाज मुहम्मद अरफान हिट विकेट होत बाद झाला. रशीदच्या फिरकीविरूद्ध खेळताना त्याचा तोल गेला आणि थेट विकेटवर बॅट मारली. या सामन्यातील रशीदची ही पहिली विकेट होती. यासह रशीदने टी-२० क्रिकेटमध्ये ७०० विकेट्सचा मोठा टप्पा गाठला.रशीद खान हा टी-२० इतिहासात ७०० विकेट्स घेणारा जगातील पहिला गोलंदाज ठरला आणि हा अनोखा विश्वविक्रम त्याने आपल्या नावे केला. रशीद टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटशिवाय जगभरात विविध टी-२० लीग खेळतो. जिथे त्याने आपल्या फिरकीने मैदान गाजवलं आहे आणि यासह त्याने ७०० विकेट्सचा टप्पा गाठला. रशीद खानने ५१२ टी-२० डावांमध्ये ६.५९च्या इकॉनॉमीने व १८.५०च्या उत्कृष्ट सरासरीसह ७०० विकेट्स पूर्ण केल्या. यादरम्यान त्याची उत्कृष्ट गोलंदाजी कामगिरी ही १७ धावा देत ६ विकेट्स अशी आहे.रशीद खानच्या आधी ड्वेन ब्रावोच्या सर्वाधिक विकेट्सचा विक्रम होता, जो रशीदने फार पूर्वीच आपल्या नावे करत त्याला मागे टाकलं होतं. रशीद खान आता फक्त २७ वर्षांचा असून टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्सचा मोठा आकडा रशीद गाठू शकतो, यात शंकाच नाही. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डानेही रशीद खानच्या ७००० विकेट्स पूर्ण झाल्याची पोस्ट शेअर केली आहे.टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाजरशीद खान – ७०० विकेट्सड्वेन ब्रावो – ६३१ विकेट्ससुनील नरेन – ६१३ विकेट्सइमरान ताहिर – ५७२ विकेट्सआंद्रे रसेल – ५०८ विकेट्स
अफगाणिस्तानने संयुक्त अरब अमीरातला दाखविले आसमान
ओमरझाईचे चार बळी, इब्राहिम झद्रानच्या अर्धशतकी खेळीने मिळाला विजयनवी दिल्ली : मुख्य गोलंदाज अझमतुल्ला ओमरझाईने चार षटकात अवघ्या १५ धावांमध्ये घेतलेले चार बळी व इब्राहिम झद्रान आणि सलामीवीर इब्राहिम झद्रानच्या ४१ चेंडूतील ५३ धावांची अर्धशतकी खेळी व त्यास इतर फलंदाजांनी दिलेली साथ यामुळे अफगाणिस्तानने संयुक्त अरब अमीरातचा पाच विकेट राखून विजय मिळविला.विजयासाठी १६१ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या अफगाणिस्तानचा सलामीवीर रहमानउल्ला गुरबाज हा डावातील दुसऱ्याच चेंडूवर शून्यावर बाद झाला. त्यानंतर दुसरा सलामीवीर इब्राहिम झद्रानने ४१ चेंडूत ५३ धावा करत संघाच्या धावसंख्येला आकार दिला. वनडाऊन खेळण्यासाठी आलेल्या गुलबदीन नायबने १२ चेंडूत १३ धावा करत दुसऱ्या विकेटसाठी ४० धावांच्या भागिदारीत आपले योगदान दिले. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या सेदिकुल्ला अटलने १४ चेंडूत १६ धावा, दारविश रसूलने २३ चेंडूत ३३ धावा आणि अझमतुल्ला ओमरझाईने २१ चेंडूत नाबाद ४० धावा करत संघाला विजय मिळवून दिला. मोहम्मद नबी ३ धावांवर नाबाद राहिला. अमीरातीकडून जुनैद सिद्दीकीने २३ धावांत दोन बळी, मुहम्मद अरफानने ३० धावांत दोन बळी, मुहम्मद जवादुल्लाने ३९ धावांत एक बळी घेतला.संयुक्त अरब अमीरातने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांमध्ये ९ बळी गमावत प्रति षटकामागे आठ धावांच्या सरासरीने १६० धावा केल्या. अवघ्या १३ धावांमध्ये संयुक्त अरब अमीरातचे दोन्ही सलामीवीर बाद झाल्याने शंभरच्या आत डाव संपणार असल्याची चिन्हे निर्माण झाली होती. संघाचा यष्टीरक्षक असलेला सलामीवीर आर्यांश शर्मा हा शून्यावर तर दुसरा सलामीवीर कर्णधार मुहम्मद वसीम हादेखील शून्यावर बाद झाला. त्यानंतर तिसऱ्या विकेटसाठी अलिशान शराफू आणि सोहेब खान यांनी ८४ धावांची भागिदारी करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. अलिशान शराफूने ३१ चेंडूमध्ये ४० धावा तर सोहेब खानने ४८ चेंडूमध्ये ६८ धावा करत संघाची पडझड रोखण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अमीरातची फलंदाजी गडगडली व ठराविक अंतराने विकेट पडत गेल्या. केवळ सय्यद हैदर (१३ धावा)आणि हैदर अलीच्या (१३ धावांचा) अपवाद वगळता अमीरातीच्या एकाही फलंदाजाला दोन आकडी धावसंख्या गाठता आली नाही. मुजीब उर रहमानने ३१ धावांत दोन बळी तर रशीद खानने २४ धावांत एक बळी घेत अमीरातीच्या धावसंख्येला लगाम घातला.
Gargi Sapkal : वडिलांसाठी लेक मैदानात.! हर्षवर्धन सपकाळांच्या मुलीचे टीकाकारांना जोरदार उत्तर
आपल्या वडिलांवरती होत असलेल्या टीकेला आता हर्षवर्धन सपकाळ यांची लेक गार्गी सपकाळ यांनी विरोधकांना उत्तर दिले आहे.
Assam Politics:
Harshwardhan Sapkal : सपकाळांनी भाजपला अनावश्यकपणे मुद्दा दिला; ठाकरेसेनेचा दावा
छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना टिपू सुलतानशी करून महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनी भाजपसाठी अनावश्यकपणे मुद्दा निर्माण केला आहे, असे ठाकरेसेनेने म्हटले आहे.
Karnataka Politics:
Vaibhav Suryavanshi : वैभवने परीक्षेसाठी अर्ज भरला होता, मात्र क्रिकेटच्या व्यग्र वेळापत्रकामुळे तो परीक्षेला बसू शकणार नाही.
निवृत्ती घेतलेल्याना लाभ मिळणार की नुकसान होणार?; आयोगाबाबत केंद्राचा मोठा खुलासा
नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या सेवेतून २०२५ अखेरपर्यंत निवृत्त झालेल्यांना नव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू होणार नाहीत, अशी चर्चा काही दिवसांपासून सुरू होती. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने अधिकृत भूमिका स्पष्ट करत निवृत्त कर्मचाऱ्यांच्या हक्कांबाबत कोणतीही कपात किंवा भेदभाव होणार नसल्याचे सांगितले आहे.केंद्रीय अर्थमंत्र्यांची माहितीकेंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सांगितले की सध्याचा आठवा वेतन आयोग हा केंद्रातील कर्मचारी व निवृत्तिवेतनधारकांच्या वेतनरचनेचा आणि भत्त्यांचा सर्वांगीण आढावा घेणार आहे. अर्थसंकल्प २०२५ मधील तरतुदींमुळे सध्या लागू असलेल्या पेन्शन नियमांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. नागरी तसेच संरक्षण क्षेत्रातील माजी कर्मचाऱ्यांनाही समान तत्त्वांवर लाभ लागू राहतील, असे त्यांनी स्पष्ट केले.शिफारशींसाठी तुम्ही इथे आपले मत नोंदवू शकताआयोगाच्या कामकाजासाठी शासनाने अधिकृत संकेतस्थळ सुरू केले असून नागरिक सहभागासाठी MyGov या मंचाद्वारे मते मागवण्यात येत आहेत. वेतनवाढ, भत्त्यांची पुनर्रचना, तसेच निवृत्तिवेतनातील सुधारणा याबाबत सूचना नोंदवता येणार आहेत.सहभागाची मुदतसंबंधित अभिप्राय १६ मार्चपर्यंत सादर करता येणार असून कर्मचारी, निवृत्तिवेतनधारक तसेच इच्छुक नागरिकांना प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी देण्यात आली आहे. शासनाच्या मते, जास्तीच्या सहभागामुळे आयोगाच्या शिफारशी अधिक सर्वसमावेशक ठरतील.निवृत्तिवेतनधारकांबाबत स्पष्टता३१ डिसेंबर २०२५ पूर्वी सेवामुक्त झालेल्यांनाही आयोगाच्या अंतिम शिफारशी लागू होतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. शिफारशी मंजूर झाल्यानंतर सर्वसाधारण आदेशाद्वारे त्यांची अंमलबजावणी होईल. त्यामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांच्या आर्थिक हितांवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे सरकारने अधोरेखित केले आहे. या स्पष्टीकरणानंतर कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झालेली अनिश्चितता मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
Supreme Court on Live-in Relationship: कदाचित आमचे विचार जुन्या वळणाचे असू शकतात, पण लग्नाआधी मुले आणि मुली अनोळखी असतात. अशा परिस्थितीत लग्नाआधी ते शारीरिक संबंध कसे काय ठेवू शकतात, हे आम्हाला समजत नाही, अशा शब्दांत न्यायालयाने आपले मत व्यक्त केले.
जर तुम्ही बँकेत नोकरीचे स्वप्न पाहत असाल आणि पदवी पूर्ण केली असेल, तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आली आहे.
Bangladesh PM Swearing-In Ceremony: १७ फेब्रुवारी २०२६ रोजी 'बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी' (BNP) चे अध्यक्ष तारिक रहमान पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत.
ऊर्जा सुरक्षा आणि पर्यावरण रक्षण ही लोकचळवळ व्हावी; मंत्री भरत गोगावले यांचे विधान
'सक्षम २०२५-२६' अभियानाचा समारोपमुंबई : इंधनाची बचत ही केवळ गरज नसून ती एक देशसेवा आहे. ऊर्जा सुरक्षा आणि पर्यावरण रक्षण ही आता एक लोकचळवळ झाली पाहिजे, असे प्रतिपादन फलोत्पादन, रोजगार हमी योजना आणि खार जमीन विकास मंत्री भरत गोगावले यांनी केले.केंद्र शासनाच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली देशभर राबविण्यात आलेल्या 'संरक्षण क्षमता महोत्सव (सक्षम) २०२५-२६' या महाराष्ट्र राज्य स्तरीय अभियानाचा सांगता समारंभ यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पार पडला, त्यावेळी ते बोलत होते.मंत्री गोगावले म्हणाले की, वाढते प्रदूषण ही जागतिक समस्या असून त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी नैसर्गिक आणि हरित इंधनाचा वापर वाढवणे आवश्यक आहे. कच्च्या तेलाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करून देशाचे परकीय चलन वाचवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने इंधन बचतीचे कर्तव्य पार पाडावे.सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचा पुढाकार १ ते १५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत राबविण्यात आलेल्या या अभियानाचे मुख्य घोषवाक्य ‘तेल आणि वायू वाचवा, हरित ऊर्जेचा स्वीकार करा’ असे होते. जनसामान्यांमध्ये इंधन बचतीचा संदेश पोहोचवणे, परकीय चलनाची बचत करणे आणि हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करून निसर्गाचे रक्षण करणे. या अभियानात बीपीसीएल, एचपीसीएल, आयओसी आणि गेल इंडिया यासारख्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांनी पुढाकार घेतला.विविध उपक्रमांनी गाजला महोत्सवगेल्या १५ दिवसांत राज्यात विविध स्तरांवर प्रबोधनपर उपक्रम राबवण्यात आले. यामध्ये सायकल रॅली, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, आणि वाहनचालकांसाठी विशेष तांत्रिक कार्यशाळांचा समावेश होता. या अभियानाच्या माध्यमातून शालेय विद्यार्थी, शेतकरी आणि गृहिणींपर्यंत इंधन बचतीचे तंत्र पोहोचवण्यात आले.यावेळी मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते अभियानातील विविध स्पर्धांमध्ये यशस्वी ठरलेल्या शालेय विद्यार्थ्यांचा आणि मार्गदर्शक शिक्षकांचा सन्मान चिन्ह व पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्यस्तरीय समन्वयक उमेश कुलकर्णी यांनी केले. या सोहळ्याला बीपीसीएलचे थॉमस जेम्स, एचपीसीएलचे मुकुंद जवंजल, आयओसीएलचे संतोष दैत, गेल इंडियाचे मोहम्मद शफी, मुख्य प्रबंधक दीपक वाघ, वरिष्ठ प्रबंधक रितेश जाधव यांसह तेल कंपन्यांचे अधिकारी, इंधन वितरक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन मुख्य प्रबंधक दीपक वाघ यांनी केले.
पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटनस्थळांची प्रचार प्रसिध्दी करावी; पर्यटनमंत्री शंभूराज देसाई
यंदा डोंगरी महोत्सव एप्रिल मध्येमुंबई : राज्यातील पर्यटनस्थळांची प्रचार प्रसिध्दी होण्यासाठी पर्यटन विभागाने काटेकोरपणे प्रसिद्धीचे नियोजन करावे. राज्यात, देशात व आंतरराष्ट्रीय स्तरावर राज्यातील पर्यटनस्थळांची प्रसिध्दी प्रभावीपणे करावी. डोंगरी महोत्सवाचे एप्रिल मध्ये आयोजन करावे, असे निर्देश पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.सह्याद्री अतिथीगृह येथे पर्यटन विभागाच्या विविध विषयाच्या अनुषंगाने बैठक झाली. त्यावेळी पर्यटनमंत्री शंभूराज देसाई बोलत होते. यावेळी पर्यटन विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे,पर्यटन संचालक डॉ.बी.एन.पाटील, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक निलेश गटणे उपस्थित होते.पर्यटनमंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, पर्यटन विभागातंर्गत विविध महोत्सवांचे आयोजन करण्यात येत आहे. आगामी कालावधीत डोंगरी महोत्सवाचे एप्रिल महिन्यात नियोजन करावे. या महोत्सवात स्थानिक संस्कृतीचे दर्शन घडविणारे कार्यक्रम, नामांकित कलाकारांचे सांस्कृतिक कार्यक्रम, कृषी पर्यटन, आई पर्यटन धोरणावर केंद्रित स्थानिक महिला सशक्तीकरण कार्यक्रमांचे आयोजन, गड-किल्ले दर्शन, विविध साहसी उपक्रम, पॅराग्लायडींग, पॅरामोटरिंग, रॉक क्लायबींग, सीप्लॅन राईड हे उपक्रम आयोजित करण्यात यावेत. स्थानिक ठिकाणी पर्यटनाला चालना देण्यासाठी हे उपक्रम असतील असे पहावे असे निर्देश त्यांनी दिले.पर्यटनमंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, राज्यातील ७५ पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पर्यटकांसाठी आधुनिक मुलभूत सोयी-सुविधायुक्त नमो पर्यटन केंद्र व माहिती सुविधा केंद्र स्थापन करण्याबाबत मान्यता देण्यात आली असून पहिल्या टप्प्यातील प्रतापगड, शिवनेरी, साल्हेर व रायगड येथील कामे गतीने करावीत. राज्यात नमो पर्यटन कौशल्य कार्यक्रमासाठी ७५०० प्रशिक्षणार्थ्यांपैकी प्रथम २५०० व उर्वरित ५००० प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण देण्याबाबतच्या कामाला गती देण्यात यावी, असे निर्देशही पर्यटनमंत्री देसाई यांनी दिले.
प्रवासी आणि पादचाऱ्यांसाठी अतिक्रमण हटवून रस्ते मोकळे करणार; मंत्री मंगलप्रभात लोढा
याबाबत कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पश्चिम रेल्वेचे मुख्य व्यवस्थापक विजय कुमार यांची घेतली भेटमुंबई सेंट्रल, ग्रँट रोड आणि चर्नी रोड स्थानकात लवकरच सरकते जिने, सुशोभीकरण ही होणारमुंबई : दक्षिण मुंबईतील पश्चिम रेल्वे वरील महत्वाची स्थानके लवकरच अतिक्रमण मुक्त आणि सुशोभित होणार आहेत. मुंबई सेंट्रल, ग्रांट रोड आणि चर्नी रोड स्थानकात लवकरच सरकते जिने बसवण्यात येणार असून स्थानकांचे सुशोभीकरणही करण्यात येणार आहे. कॅबिनेट मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांनी स्थानिकांसह आज चर्चगेट येथील पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयात मुख्य व्यवस्थापक श्री. विजयकुमार यांची त्यांच्या दालनात भेट घेतली. या भेटीनंतर लवकरच स्थानिकांच्या तक्रारी नुसार योग्य कार्यवाही करण्यात येणार असल्याचे कुमार यांनी सांगितले.राज्याचे कॅबिनेट मंत्री श्री मंगलप्रभात लोढा यांनी दक्षिण मुंबईतील मुंबई सेंट्रल,ग्रँट रोड आणि चर्नी रोड स्थानक परिसरातील विविध समस्यांबाबत पश्चिम रेल्वेचे मुख्य व्यवस्थापक श्री. विजयकुमार यांची भेट घेतली. मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी घुसखोरी वाढत असून अनधिकृत फेरीवाल्यांचा विळखा पडला आहे. यातले अनेक फेरीवाले बांगलादेशी रोहिंगे असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे स्थानक परिसरात अनधिकृत फेरीवाल्यावर कारवाई करावी. तसेच रस्त्यावर अनेक ठिकाणी गर्दुल्ले वावरताना दिसत आहेत. त्यामुळे प्रवाश्यांना आणि पादचार्यांनाही विनाकारण याचा उपद्रव सहन करावा लागत आहे. स्थानिकांच्या या समस्या गांभीर्याने घेऊन पश्चिम रेल्वेने याबाबत त्वरित कारवाई करावी अशी मागणी यावेळी मंत्री लोढा यांनी कुमार यांच्याकडे केली. त्याचबरोबर चर्नी रोड स्थानक ते गिरगावला जोडणारा पूल रखडला असून यातही रेल्वेने सहकार्याची भूमिका घ्यावी. त्याचबरोबर स्थानकात सरकते जिने बसवून वयोवृद्ध प्रवाश्यांना लवकरात लवकर सुविधा उपलब्ध करून द्यावी असेही मंत्री लोढा यांनी म्हटले आहे.दरम्यान, पश्चिम रेल्वेचे मुख्य व्यवस्थापक श्री. विजयकुमार यांनी समस्या जाणून घेतल्यानंतर यावर लगेचच अहवाल तयार करण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले आहेत. हा अहवाल आल्यानंतर यावर त्वरित कार्यवाही करून प्रवाश्यांच्या समस्यांचे निराकरण करू असे सांगितले. स्थानकांच्या सुशोभीकरणाच्या प्रस्ताव ही प्रलंबित असल्याचे त्यांनी मान्य केले असून लवकरात लवकर स्थानकाचा परिसर स्वच्छ आणि सुशोभित करू असे आश्वासन दिले आहे. या बैठकीला कौशिकजी शाह यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते.
नाशिक मनपाच्या स्थायी समिती सदस्यांची बिनविरोध निवड
नाशिक : नाशिक महापालिकेच्या सर्व स्थायी समिती सदस्यांची बिनविरोध निवड झाली. पक्षांच्या गटनेत्यांनी सुचवलेली नावे महापौर हिमगौरी आहेर-आडके यांना सादर करण्यात आली. जेवढ्या जागा तेवढेच उमेदवार असल्यामुळे सदस्यांची निवड बिनविरोध करण्यात आली. महापौरांनी निवड झालेल्या सदस्यांच्या घोषणेची औपचारिकता केली आणि स्थायी समितीवर नव्या सदस्यांचे स्वागत केले.महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी निवड झालेल्या सदस्यांच्या नावांची घोषणा केली. या घोषणेनुसार नाशिक महापालिकेच्या स्थायी समितीवर भारतीय जनता पक्षाच्या अर्थात भाजपच्या नऊ जणांची तर शिवसेनेच्या चार जणांची, उबाठाच्या दोन जणांची आणि राष्ट्रवादीच्या एकाची निवड झाली आहे. अपक्ष नगरसेवक मुकेश शहाणे यांना राष्ट्रवादीकडून संधी मिळाली आहे तर मनसेच्या एकमेव नगरसेविका मयुरी पवार यांना शिवसेनेकडून स्थायी समितीवर संधी मिळाली आहे.नाशिक महापालिका स्थायी समिती सदस्य भाजप : माधुरी बोलकर, नितीन निगळ, पल्लवी गणोरे, दीपाली कुलकर्णी, इंदूबाई खेताडे, आदिती पांडे, सरिता सोनवणे, जयश्री गायकवाड, मच्छिंद्र सानप शिवसेना : मयुरी पवार (मनसे), किरण गामने, राहुल दिवे, रंजना बोराडे राष्ट्रवादी काँग्रेस : मुकेश शहाणे (अपक्ष) उबाठा : योगेश गाडेकर, भारती ताजनपुरे मनसेच्या मयुरी पवार यांनी शिवसेना नगरसेवकांसोबत नोंदणी केल्यामुळे त्यांना सत्ताधारी गटाकडून संधी मिळाली आहे.
मुंबई : महाराष्ट्र विधानमंडळाच्या २०२६ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची अधिकृत दिनदर्शिका जाहीर झाली आहे. हे अधिवेशन २३ फेब्रुवारी ते २५ मार्च २०२६ या कालावधीत मुंबई येथील विधानभवनात पार पडणार आहे. राज्याचा अर्थसंकल्प कधी सादर होणार आणि महिनाभर चालणाऱ्या या अधिवेशनात नेमके कोणते महत्त्वाचे टप्पे असतील, याचा सविस्तर तपशील समोर आला आहे.अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी, सोमवार, २३ फेब्रुवारी रोजी राज्यपालांच्या अभिभाषणाची प्रत सभागृहाच्या पटलावर ठेवली जाईल, शोक प्रस्ताव मांडले जातील आणि सन २०२५-२०२६ च्या पुरवणी मागण्या सादर केल्या जातील. त्यानंतर २४ आणि २५ फेब्रुवारी रोजी राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा होईल, तर २६ व २७ फेब्रुवारीला पुरवणी मागण्यांवर चर्चा आणि मतदान होऊन २७ फेब्रुवारीला पुरवणी विनियोजन विधेयक मांडले जाईल. २८ फेब्रुवारी रोजी देखील शासकीय कामकाज सुरू राहील.https://prahaar.in/2026/02/16/3-year-old-bengaluru-boy-drowns-during-mothers-maternity-photoshoot/बजेट कधी सादर होणार ?मार्च महिन्यातील कामकाजाचा विचार करता, १ मार्च (रविवार) आणि २ मार्च रोजी बैठक होणार नाही, तर ३ मार्चला होळीनिमित्त सार्वजनिक सुट्टी असेल. या अधिवेशनातील सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे शुक्रवार, ६ मार्च २०२६ असून, या दिवशी दुपारी २:०० वाजता राज्याचा सन २०२६-२०२७ चा अर्थसंकल्प सादर केला जाईल. त्यानंतर ९ आणि १० मार्च रोजी अर्थसंकल्पावर सर्वसाधारण चर्चा होईल. १ मार्च ते १६ मार्च या कालावधीत अर्थसंकल्पीय मागण्यांवर चर्चा आणि मतदान पार पडेल, ज्यामध्ये १६ मार्च रोजी विनियोजन विधेयक सादर केले जाईल.अधिवेशनाच्या उत्तरार्धात, १९ मार्चला गुढीपाडव्याची सुट्टी असेल आणि २० मार्चला बैठक होणार नाही. २४ मार्च रोजी अंतिम आठवडा प्रस्ताव मांडला जाईल आणि २५ मार्च रोजी शासकीय कामकाजासह अधिवेशनाची सांगता होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, या संपूर्ण अधिवेशनात प्रश्नोत्तराच्या तासासाठी मंत्र्यांची पाच गटांत विभागणी करण्यात आली असून, संबंधित दिवशी त्या त्या गटातील मंत्री प्रश्नांना उत्तरे देतील. या नियोजित वेळापत्रकात कामकाजाच्या गरजेनुसार फेरफार होऊ शकतो, असे विधानसभा सचिवालयाचे सचिव जितेंद्र भोळे यांनी १० फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात नमूद केले आहे.
Pune News : राजकीय आंदोलनातील दगडफेक प्रकरणात पोलीस आयुक्तांनी भूमिका स्पष्ट करत दिले ‘हे’निर्देश
शहरात नुकत्याच झालेल्या राजकीय आंदोलनादरम्यान उद्भवलेल्या तणावपूर्ण परिस्थितीबाबत पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या घटनेला “अत्यंत दुर्दैवी” संबोधत पोलिसांनी वेळेवर मध्यस्थी करून कायदा व सुव्यवस्था राखल्याचे स्पष्ट केले.
Rashid Khan World Record : टी-२० क्रिकेटमध्ये ७०० विकेट्सचा पल्ला गाठणारा राशिद खान हा जगातील पहिला गोलंदाज ठरला आहे.
मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव (Mohan Yadav ) खंडवा जिल्ह्याच्या दौ-यावर असताना त्यांचे हेलिकॉप्टर हवेत असंतुलित झाल्याची घटना घडली.
मुंबई : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची यंदा १९ फेब्रुवारी रोजी ३९६ वी जयंती आहे. यंदा ३९६ वा शिवजयंती महोत्सव अंदमान निकोबार येथील पोर्टब्लेअर या ऐतिहासीक बेटावर साजरा होणार आहे. अंदमान निकोबार मधील शिवजयंती महोत्सवास रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थित राहणार आहेत. यंदाचा शिवजयंती महोत्सव आपण अंदमान निकोबार या ऐतिहासीक केंद्रशासीत प्रदेशात साजरा करणार असल्याची माहिती ना. रामदास आठवले यांनी दिली आहे.भारतीय स्वातंत्र्य लढयात अंदमान निकोबारचे ऐतिहासीक महत्व आहे. अंदमान निकोबार येथे स्वातंत्र्यवीर सावरकरांना काळया पाण्याची शिक्षा झाली होती. अंदमान निकोबार येथील तुरंगात ब्रिटीशांनी पारतंत्र्याच्या काळात स्वातंत्र सैनिकांना डांबुन ठेवले जात होते. अंदमान निकोबार येथे भारतीय स्वांतत्र लढयाच्या अनेक ऐतिहासीक खुणा आहेत. या ऐतिहासीक अंदमान निकोबारच्या पोर्टब्लेअर येथील मराठी मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती महोत्सव आयोजित करण्यात आला असून त्यास ना. रामदास आठवले प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती रिपब्लिकन पक्षाच्या वतीने प्रसिध्दी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मुंबईत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन
छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे; जिल्हाधिकारी आंचल गोयल यांचे आवाहनमुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त १८ व १९ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबई शहरात विविध सांस्कृतिक कार्यक्रम, नाट्यप्रयोग, पदयात्रा तसेच ऐतिहासिक वारसा जपणारे उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या कार्यक्रमांमधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य, पराक्रम आणि लोककल्याणकारी कार्याचा गौरव करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांना मुंबई शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मुंबई शहर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी केले आहे.मुंबई शहर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पदयात्रा आयोजनासंदर्भात मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे बैठक झाली. बैठकीस अतिरिक्त्त जिल्हाधिकारी बप्पासाहेब थोरात, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. शिवनंदा लंगडापुरे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.जिल्हाधिकारी आंचल गोयल म्हणाल्या, या पदयात्रेमध्ये अधिकाधिक विद्यार्थी सहभागी व्हावेत यासाठी शैक्षणिक संस्थांशी तत्काळ समन्वय साधून नियोजन करावे. राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजनामधील विद्यार्थ्यांना सहभागी करून घ्यावे. पदयात्रेत अधिकाधिक शासकीय अधिकारी, महिला, युवक आदी सहभागी व्हावेत यासाठी प्रयत्न करावेत. पोलीस विभागाने वाहतूक व्यवस्थापनाचा आराखडा करून योग्य अंमलबजावणी करावी.रवींद्र नाट्य मंदिरात “लोककल्याण राजा अर्थात शिवदर्शन” नाटक१८ फेब्रुवारी २०२६ रोजी रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथे सकाळी १०.३० वाजता “लोककल्याण राजा अर्थात शिवदर्शन” या विशेष नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जाज्वल्य इतिहासाला उजाळा देत त्यांच्या शौर्य, पराक्रम आणि लोककल्याणकारी कारभाराचे दर्शन या नाटकातून घडविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार, खासदार अनिल देसाई, आमदार महेश सावंत, मुंबई महानगरपालिकेच्या महापौर रितू तावडे, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यावेळी उपस्थित राहणार आहेत.सांस्कृतिक कार्यक्रम१९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७.०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई शहर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करण्यात येणार आहे. त्यानंतर एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई टाऊन हॉल (सेंट्रल लायब्ररी), शहीद भगतसिंग रोड, फोर्ट येथून गेट वे ऑफ इंडिया पर्यंत पदयात्रा काढण्यात येणार आहे.गेट वे ऑफ इंडिया येथे शिवरायांच्या जीवनपटावर आधारित विविध प्रयोगात्मक कला आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येणार आहेत. सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई शहर यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सोमवारी मुख्यमंत्री महिला रोजगार योजना अंतर्गत २५ लाख महिलांच्या बँक खात्यात प्रत्येकी १०,००० रुपये वर्ग केले.
दिवंगत नेते अजित पवार यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्र राजकारणात (NCP Politics) मोठी खळबळ उडाली आहे. २८ जानेवारी २०२६ रोजी मुंबईहून बारामतीकडे प्रचारासाठी जात असताना त्यांच्या चार्टर्ड विमानाचा (Learjet 45) भीषण अपघात झाला.
जिल्ह्यातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी आठवे असलेल्या 'औंढा नागनाथ मंदिर' येथे महाशिवरात्री महोत्सवानिमित्त १६० ड्रोनच्या भव्य लेझर शोचे आयोजन केले होते.
Markandey Katju X post : पाकिस्तानचा पराभव पाहून मला अतिव दुःख झाले, असे विधान करत काटजू यांनी नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण केली आहे.
Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार मुंबई दौऱ्यावर; दक्षिण मुंबईतील ‘हे’रस्ते राहणार बंद
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) उद्या, १७ फेब्रुवारी २०२६ रोजी एक दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यादरम्यान ते फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेणार आहेत.
Assam Elections 2026: आसाम प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते भूपेन बोरा यांनी आपला राजीनामा मागे घेतल्याचा दावा पक्षाचे प्रदेश प्रभारी भंवर जितेंद्र सिंह यांनी केला आहे.
Nanded Politics : नांदेडची समीकरणे बदलणार ! ‘या’बड्या नेत्याचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश
लोहा-कंधारचे माजी आमदार आणि ज्येष्ठ शेतकरी नेते शंकर अण्णा धोंडगे यांनी (Nanded Politics) हजारो समर्थकांसह शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला आहे. हा पक्षप्रवेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबईतील नंदनवन निवासस्थानी आज पार पडला.
Share Market Rise: सकाळच्या सत्रात सेन्सेक्स ८२,२७६ अंकांपर्यंत खाली घसरला होता, तर निफ्टीने २५,३७२ चा नीचांक गाठला होता. मात्र, बाजार बंद होताना सेन्सेक्स ८३,२७७.१५ वर (०.७९% वाढ) आणि निफ्टी २५,६८२.७५ वर (०.८३% वाढ) स्थिरावला.
यावर्षीच्या टी २० विश्वचषकाला दुखापतीचं ग्रहण लागलं आहे. एकाच दिवसात ३ खेळाडूंनी या स्पर्धेतून दुखापतीमुळे माघार घेतली आहे. खुद्द आयसीसीने याची माहिती दिली आहे.आयसीसीने म्हटले आहे की ऑस्ट्रेलियाचा जोश हेझलवूड, नामिबियाचा बेन शिकोंगो आणि स्कॉटलंडचा सफयान शरीफ यांनी स्पर्धेतून माघार घेतली आहे. विविध दुखापतींमुळे हे तिन्ही क्रिकेटपटू २०२६ च्या टी२० विश्वचषक स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाहीत. त्यांच्या जागी बदली क्रिकेटपटूंची घोषणाही करण्यात आली आहे.ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज हेझलवूडने पायाच्या दुखापतीमुळे अधिकृतपणे २०२६ च्या टी२० विश्वचषक स्पर्धेत खेळू शकणार नाही. ऑक्टोबर २०२५ मध्ये भारताविरुद्धच्या मालिकेदरम्यान तो जखमी झाला होता आणि त्यानंतर अॅशेस मालिकेमधूनही तो खेळू शकला नव्हता. तो टी२० विश्वचषकासाठी तंदुरुस्त होईल अशी आशा होती आणि म्हणूनच त्याला संघात स्थान देण्यात आले होते. पण तो तंदुरुस्त होऊ शकला नाही आणि त्याची जागा स्टीव्ह स्मिथने घेतली.अॅलेक्स वोल्शेंकने नामिबियाच्या संघात शिकोंगोची जागा घेतली आहे. २० वर्षीय या क्रिकेटपटूने आतापर्यंत फक्त पाच टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने २६ धावा केल्या आहेत आणि चार विकेट्स घेतल्या आहेत. त्याने ऑक्टोबर २०२४ मध्ये अमेरिकेविरुद्ध पदार्पण केले होते. १२ फेब्रुवारी रोजी भारताविरुद्धच्या सामन्यात शिकोंगोला उजव्या मांडीला दुखापत झाली होती. नामिबिया सुपर ८ च्या शर्यतीतून बाहेर पडला आहे, तर पाकिस्तानविरुद्ध एक सामना शिल्लक आहे.स्कॉटलंडने जलदगती गोलंदाज शरीफला कंबरेला दुखापत झाल्यामुळे या स्पर्धेतून बाहेर जावे लागले आहे. १२ फेब्रुवारी रोजी सराव करताना त्याला ही दुखापत झाली. स्कॉटिश संघाने शरीफच्या जागी जॅक जार्विसला संघात घेतले आहे. जार्विस संघासोबत प्रवासी राखीव क्रिकेटपटू म्हणून होता. त्याने आतापर्यंत आठ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत आणि ११ विकेट्स घेतल्या आहेत. स्कॉटलंडचे अजूनही दोन गट सामने शिल्लक आहेत.
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. थकीत कर्जदार शेतकऱ्यांची सविस्तर माहिती 'शिंदे समिती'कडे पाठवण्याच्या सूचना राज्य सरकारने सर्व बँकांना दिल्या आहेत. यामुळे येत्या ६ मार्च रोजी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात राज्यातील बळीराजाला संपूर्ण कर्जमाफी मिळणार का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.राज्यातील विविध जिल्हा बँकांमार्फत जून २०२५ पर्यंत थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांची माहिती गोळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. जिल्ह्यातील सेवा सहकारी सोसायट्या, सचिव, बँकेचे तपास अधिकारी आणि शाखाधिकारी यांच्या माध्यमातून हे संकलन सुरू आहे. या प्रक्रियेत सहनिबंधक आणि निबंधक कार्यालयातील अधिकाऱ्यांचेही सहकार्य घेतले जात आहे.राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारी ते २५ मार्च २०२६ या कालावधीत मुंबईत पार पडणार आहे. ६ मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. कर्जमाफीचा निर्णय घ्यायचा झाल्यास नेमकी किती आर्थिक तरतूद करावी लागेल, यासाठी ही अचूक आकडेवारी महत्त्वाची ठरणार आहे. प्रशासनातील सूत्रांच्या माहितीनुसार, पडताळणी पूर्ण झाल्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर अंतिम शिक्कामोर्तब होऊ शकते.शेतकऱ्यांचे डोळे अधिवेशनाकडेराज्यात गेल्या काही काळापासून नैसर्गिक आपत्ती आणि शेतीमालाच्या दरातील चढ-उतारामुळे शेतकरी अडचणीत आहे. अशा परिस्थितीत ही कर्जमाफी झाल्यास शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर या हालचालींना मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.
Rajpal Yadav Bail : मोठी अपडेट.! अभिनेता राजपाल यादव यांना जामीन मंजूर; पण.. घातली ‘ही’अट
२०१९ च्या सुरुवातीला, सत्र न्यायालयाने हा निर्णय कायम ठेवला, ज्यामुळे अभिनेत्याच्या कायदेशीर अडचणी आणखी वाढल्या. त्यानंतर राजपाल यादव यांनी दिल्ली उच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली.
Best FD Rates: गुंतवणूकदारांनी केवळ व्याजाचा दर न पाहता बँकेची विश्वासार्हता, आपली आर्थिक गरज आणि ज्येष्ठ नागरिकांना मिळणारे अतिरिक्त फायदे यांचा विचार करूनच निर्णय घ्यावा.
PM Narendra Modi: राजस्थानातील आगीत ८ जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक
नवी दिल्ली: राजस्थानच्या अलवार जिल्ह्यातील भिवाडी औद्योगिक क्षेत्रात सोमवारी एका बेकायदेशीर फटाका कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत किमान ८ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून अजूनही दोन कामगार कारखान्यात अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेवर पंतप्रधान मोदी यांच्याकडून शोक व्यक्त करण्यात आला आहे.काय म्हणाले पंतप्रधान मोदी ?पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, राजस्थानमधील भिवाडी येथील ही आगीची घटना अतिशय दुःखद आहे. ज्या कुटुंबांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्यासोबत माझ्या संवेदना आहेत. जे जखमी झाले आहेत त्यांना लवकर बरे वाटावे यासाठी मी प्रार्थना करतो.पंतप्रधानांसह मुख्यमंत्री भजनलाल शर्मा आणि माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनीदेखील शोक व्यक्त केला आहे.मुख्यमंत्री भजनलाल शर्मा म्हणाले, खुशखेडा औद्योगिक क्षेत्रातील जीवितहानी अत्यंत दुःखद आहे. मृतांच्या आत्म्यांना शांती आणि जखमींच्या लवकर बरे होण्याकरिता मी देवाकडे प्रार्थना करतो. ओम शांती.माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत म्हणाले, भिवाडी (खैरथल-तिजारा) येथील रासायनिक कारखान्यात लागलेल्या भीषण आगीत ८ जणांचा मृत्यू अत्यंत दुःखद आहे. देव मृतांच्या आत्म्यांना शांती देवो आणि जखमींना लवकर बरे होवो.ज्यावेळी ही दुर्घटना घडली, तेव्हा कारखान्यात सुमारे २५ कामगार उपस्थित होते. आगीची बातमी समजताच शेजारील कारखान्यांमधील कामगारांनी सुरक्षिततेसाठी बाहेर धाव घेतली. कारखान्याच्या मालकाने ही जागा भाड्याने दिली होती, जिथे भाडेकरू बेकायदेशीररित्या फटाके तयार करत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. कारखान्यात मोठ्या प्रमाणात साठवून ठेवलेल्या दारूगोळा आणि कार्डबोर्डमुळे एका भीषण स्फोटानंतर आग झपाट्याने पसरली. खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला असून आसपासचे कारखाने रिकामे करण्यात आले आहेत.प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, आगीदरम्यान ३ ते ४ मोठे स्फोट झाले, ज्यामुळे नागरिक आणि कामगारांमध्ये भीती निर्माण झाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तासनतास प्रयत्न केल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवले असून सध्या कुलिंग ऑपरेशन सुरू आहे.
मुंबई प्रमाणेच ठाण्याच्या विकासासाठी टीएमआरडीए ?
ठाणे : ठाणे महापालिकेत महायुतीने सत्ता स्थापन केली आहे. ठामपामध्ये ३३ प्रभाग आणि १३१ जागा आहेत. यातील ७५ जागांवर शिवसेना आणि २८ जागांवर भाजपचा विजय झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नऊ जण निवडून आले आहेत. उबाठा एका जागेवर तर इतर १२ जागांवर विजयी झाले आहेत. शिवसेनेच्या शर्मिला पिंपळोळकर यांनी महापौर तर भाजपच्या कृष्णा पाटील यांनी उपमहापौर पदाची सूत्रं स्वीकारली आहेत. या पार्श्वभूमीवर उपमहापौर कृष्णा पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून मुंबई प्रमाणेच ठाण्याच्या विकासासाठी टीएमआरडीए स्थापन करण्याची मागणी केली आहे.मुंबई आणि भोवतालच्या शहरांच्या विकासाकरिता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची अर्थात एमएमआरडीएची स्थापना करण्यात आली आहे. याच पद्दतीने आता ठाणे जिल्ह्यातील सर्व शहरांच्या आणि भोवतालच्या गावांच्या विकासाकरिता टीएमआरडीए स्थापन करण्याची मागणी कृष्णा पाटील यांनी केली आहे. अद्याप या मागणीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी उत्तर दिलेले नाही. पण या मागणीवरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. ठाणे जिल्ह्यात आणि ठाणे मनपात शिवसेनेचे वर्चस्व आहे. हे वर्चस्व कमी करण्याच्या हेतूने टीएमआरडीए स्थापन करण्याची मागणी भाजपने केल्याची चर्चा आहे. भाजपने हे आरोप फेटाळले आहेत आणि विकासाला गती देण्याच्या हेतूने टीएमआरडीएची मागणी केल्याचे सांगितले आहे.उपमहापौर कृष्णा पाटील यांनी पत्रातून प्रस्तावित केलेल्या टीएमआरडीएचे हेतू काय असतील ? शहराच्या डेव्हलपमेंट प्लॅनवर लक्ष ठेवून त्याची पारदर्शक अंमलबजावणी करणे बिल्डरधार्जिण्या निर्णयांना चाप लावणे, सामान्यांच्या हिताची गृहनिर्माण धोरणे राबवणे शहर विकास विभागातील भ्रष्टाचाराला लगाम घालून कामात पारदर्शकता आणणे अनधिकृत बांधकामे, फेरीवाल्यांचे अतिक्रमण आणि वाहतूक कोंडी यांसारख्या समस्यांवर कायमस्वरूपी उपाय शोधणे नागरी सोयीसुविधांचा दर्जा सुधारून ठाणेकरांचे जीवनमान उंचावण्यावर भर देणे
Shankar Anna Dhondge: शेतकरी नेते शंकर अण्णा धोंडगे हजारो समर्थकांसह शिवसेनेत दाखल
मुंबई : लोहा-कंधारचे माजी आमदार तथा ज्येष्ठ शेतकरी नेते शंकर अण्णा धोंडगे यांनी सोमवारी आपल्या हजारो समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबईतील ‘नंदनवन’ निवासस्थानी झालेल्या सोहळ्यात हा पक्षप्रवेश झाला. शिंदे यांनी शंकर अण्णा धोंडगे यांच्यासह त्यांच्या समर्थकांचे पक्षात स्वागत केले. धोंडगे यांच्या प्रवेशासाठी काँग्रेसकडूनही प्रयत्न झाले होते; मात्र अखेरीस त्यांनी शिवसेनेची निवड केली.यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, शिवसेना हा मालक-नोकरांचा नव्हे तर कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. मी मुख्यमंत्री असतानाही कार्यकर्ता म्हणूनच काम केले आणि पुढेही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे. जो काम करेल तो पुढे जाईल आणि कार्यकर्ता हा पक्षाचा कणा आहे; आमदार-खासदार-मंत्री कार्यकर्तेच घडवतात, असे त्यांनी सांगितले.◻️LIVE नंदनवन निवासस्थान, मुंबई ️ 16-02-2026 नांदेडचे माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांचा समर्थकांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश - लाईव्ह https://t.co/P7U3VlkMe1— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) February 16, 2026शंकरअण्णा धोंडगे यांच्या कामाचा उल्लेख करत शिंदे म्हणाले, “धोंडगे हे आयुष्यभर शेतकरी चळवळीत काम करणारे नेतृत्व आहे. शेतकऱ्यांच्या वेदना आणि समस्या त्यांनी जवळून अनुभवल्या आहेत. मराठवाड्यात त्यांनी उभी केलेली संघटनात्मक ताकद मोठी आहे. अशा अनुभवी आणि लढाऊ नेतृत्वामुळे शिवसेनेची शेतकरी बाजू आणखी मजबूत होईल.”
भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाच्या दृष्टीने भाजपचे पहिले पाऊल
शालेय वस्तूंची जेम पोर्टलवरून करा, नाहीतर डिबिटी करामुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारावर पहिला घाव घालत मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमीत साटम यांनी महापालिकेच्या खरेदी प्रणालीत आमूलाग्र बदल करण्याची मागणी केली आहे. महापालिका शाळेतील मुलांना मोफत वितरीत करण्यात येणाऱ्या शालेय वस्तूंची खरेदी केंद्र सरकारच्या जेम पोर्टलवरून त्वरीत व्हावी अशी मागणी आमदार अमीत साटम यांनी महापौर आणि महापालिका आयुक्तांकडे केली आहे. एवढेच नाहीतर महापालिकेने शालेय वस्तू वाटण्याऐवजी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (डिबिटी) चाही विचार करावा. त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या किंवा पालकांच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा करावी, अशीही सूचना आमदार साटम यांनी या निवेदनाद्वारे केली आहे.मुंबईच्या नवनिर्वाचित महापौर रितू तावडे आणि आयुक्त भूषण गगराणी यांना लिहिलेल्या पत्रात आमदार अमीत साटम यांनी असे नमूद केले की, अनेक वर्षांपासून महापालिका शालेय विद्यार्थ्यांना गणवेशापासून स्टेशनरीपर्यंत २७ विविध वस्तू मोफत वाटत आहे. सध्या या वस्तू कंत्राटदारांमार्फत खरेदी केल्या जातात. अनेकदा हे कंत्राटदार उत्पादकांकडून वस्तू घेऊन महापालिकेला वाढीव किंमतीत विकत असल्याचे निदर्शनास आल्याचे आमदार अमीत साटम यांनी म्हटले आहे.भाजप भ्रष्टाचारमुक्त प्रशासन देण्याच्या बांधिलकीचा असल्याचा पुनरुच्चार करत अमित साटम यांनी या २७ वस्तूंची थेट खरेदी केंद्र सरकारच्या जेम पोर्टलवरून करण्याची मागणी केली. तसेच यापुढे शालेय वस्तूंसह जेंडर बजेट अंतर्गत महिलांना वितरित होणाऱ्या सर्व सामग्रीची खरेदीही जेम पोर्टलवरूनच केली जावी. यामुळे महानगरपालिकेच्या निधीची मोठ्या प्रमाणावर बचत होईल, खरेदीमध्ये पारदर्शकता येईल आणि भ्रष्टाचार रोखण्यास मदत होईल. अशा पद्धतीने खरेदी केल्यास वाढीव किंमतीमध्ये महापालिकेस वस्तू देता येणार नाहीत, असे आमदार अमीत साटम यांनी सांगितले.
उद्योगांना उपयुक्त ठरणारी देशातील पहिली ' ए आय लिविंग लॅब' महाराष्ट्रात सुरुमहाराष्ट्र रतन टाटा कौशल्य विद्यापीठात मंत्री लोढा यांच्या हस्ते लॅबचा शुभारंभमुंबई :उद्योग समूह आणि लघु उद्योगांना लाभदायक ठरणारी देशातील पहिली 'ए आय लिविंग लॅब'' महाराष्ट्रात सुरु करण्यात आली आहे. राज्याचे कौशल्य विकास मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते या लॅब चे आज महाराष्ट्र राज्य रतन टाटा कौशल्य विद्यापीठाच्या मुख्यालयात उदघाटन करण्यात आले. जर्मनीच्या सहकार्याने रतन टाटा कौशल्य विद्यापीठाचा हा अभिनव उपक्रम आहे.जर्मनीच्या संसदीय राज्यमंत्री डॉ. बार्बेल कॉफ्लर,राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल, कौशल्य विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा, कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर, जर्मनीचे वाणिज्य दूत क्रिस्टॉप हेलिर ,जी आय झेड चे संचालक उल्करे एबेलींग यांच्या उपस्थित रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या (RT-MSSU) सेंट्रल हॉल येथे ‘लिव्हिंग लॅब’चे संबंधित विविध सामंजस्य करारही करण्यात आले आहेत.कौशल्य विकास मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांनी यावेळी म्हटले की, प्राचीन भारतात आपल्या उद्योगात तत्कालीन प्रगत तंत्रज्ञान वापरात असल्याची अनेक उदाहरणे आहेत. छोट्या छोट्या उद्योगांच्या जोरावरच भारत त्या काळी एक समृद्ध राष्ट्र म्हणून जगभरात व्यापार करत असे. याच स्वदेशीच्या संकल्पनेवर प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांनी कोरोना आपत्तीत जगभरातल्या ७५ पेक्षा अधिक देशांना स्वदेशी लस देऊन वैश्विक मैत्रीची भूमिका घेतली. यावर ते थांबले नाहीत तर अधिक अद्ययावत तंत्रज्ञान भारतात आणून स्वदेशी उद्योगांना चालना देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. जर्मनीच्या सहकार्याने सुरु होत असलेला ' ए आय लिविंग लॅब' हे त्याचेच द्योतक असून स्वदेशी उद्योगांना तंत्रज्ञानाची जोड मिळाल्याने प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वात भारत नक्कीच विश्वगुरू होणार असल्याचे मंत्री लोढा यांनी म्हटले. त्याचबरोबर विकासाच्या दूरदृष्टीतून राज्याला प्रगतीच्या शिखरावर पोहचवण्याचा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस प्रयत्न करत आहेत. फडणवीस यांच्याच मार्गदर्शनात कौशल्य विभागाच्या विविध योजना यशस्वीपणे राबवल्या जात असून तरुणांना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात असल्याचेही लोढा म्हणाले.मानवजातीच्या भविष्याला आकार देण्यात कृत्रिम बुद्धिमत्ता ( ए आय ) महत्त्वाची भूमिका बजावत आहे. आपण सर्वजण मिळून याचा योग्य वापर केला, तर विज्ञानातील गुंतागुंतीच्या समस्या सोडवणे, आरोग्य, शिक्षण, उद्योग आणि दैनंदिन जीवनातील अनेक अडचणी दूर करणे शक्य होईल.उद्योग क्षेत्रात ए आय मुळे मोठे बदल घडत आहेत. अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या आणि संस्था परस्पर सहकार्य करून नवीन संशोधन आणि नवकल्पना राबवत आहेत. या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत असून, लाखो व्यावसायिक आणि तज्ज्ञ यामध्ये कार्यरत असल्याचे जर्मनीच्या संसदीय राज्यमंत्री डॉ. बार्बेल कॉफ्लर यांनी यावेळी स्पष्ट केले.तर कृत्रिम बुद्धिमत्ता एक प्रकारची औद्योगिक क्रांतीच आहे, जी केवळ पर्यायी नाही तर जगभरात अत्यावश्यक बनत आहे. अर्थव्यवस्थेची रचना आणि काम करण्याच्या पद्धती यात मूलभूत बदल होत आहेत. नवीन पिढी ए आय चा प्रभाव अधिक वेगाने स्वीकारत असून आणि त्यात मोठ्या संधी पाहत असल्याचे राज्याचे मुख्य सचिव श्री.राजेश अग्रवाल यांनी सांगितले.महाराष्ट्र राज्य रतन टाटा कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू श्रीमती अपूर्वा पालकर यांनी 'AI लिविंग लॅब' चे पैलू उलगडून दाखवले. हा उपक्रम जर्मनी आणि भारत यांच्यातील कौशल्य विकास व कृत्रिम बुद्धिमत्ता ( ए आय ) क्षेत्रातील सहकार्य अधिक बळकट करणार आहे. उद्योग, विद्यापीठे आणि शासन यांना एकत्र आणून प्रत्यक्ष समस्यांवर उपाय शोधण्याचा हा अभिनव प्रयत्न आहे. ‘लिव्हिंग लॅब’ ही संकल्पना विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उद्योग क्षेत्रातील आव्हानांवर काम करण्याची संधी देते. यात विद्यार्थी, प्राध्यापक आणि उद्योग तज्ञ एकत्र येऊन अडचणींचे निदान करू शकतात , त्यांचे विश्लेषण करतात आणि व्यवहार्य उपाय सुचविण्याची कुशलता ही यामुळे वाढीस लागून देशभरातील उद्योगांना याचा लाभ होणार असल्याचे पालकर यांनी स्पष्ट केले. सध्या जर्मनीच्या सहकार्याने तिथल्या पाच कंपन्या या लॅब ला सहकार्य करणार आहेत. त्यातून तंत्रज्ञानाचे आदण प्रदान होणार आहे.जर्मनीतल्या लिपझिक विद्यापीठ, SEPT कॉम्पिटन्स आणि महाराष्ट्र राज्य रतन टाटा कौशल्य विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ' ए आय लिविंग लॅब' ' उपक्रम राबवण्यात येत असून महाराष्ट्रातील अक्युरेट इंडस्ट्रियल कंट्रोल्स लिमिटेड, लाईटेक्स इलेक्ट्रिकल, अश्विनी मॅग्नेटस आणि पीएमटी मशीन या कंपन्यांनी रतन टाटा विद्यापीठासोबत सहकार्य करण्याचा करार केला आहे. या उपक्रमातून विविध उद्योग क्षेत्रातील अडचणींवर ए आय तंत्रज्ञानाद्वारे उपाययोजना आणि पुढील आवश्यक नियोजन करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
तामिळनाडूतील परिस्थिती समजून घेण्यासाठी त्यांनी आधी त्रिशाच्या घरातून बाहेर पडावे, असे वक्तव्य केले होते. त्यामुळे हा वाद निर्माण झाला होता.
दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी दोन बोर्ड परीक्षा (Board Exam) पद्धती लागू करण्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) महत्त्वाचे स्पष्टीकरण जारी केले आहे.
Akhilesh Yadav : समाजवादी समर्थकांची नावे नियोजित पद्धतीने वगळली; अखिलेश यादव यांचा गंभीर आरोप
मतदार यादीच्या विशेष सघन पुनरावृत्ती (एसआयआर) प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा गंभीर आरोप करत समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी निवडणूक आयोगाच्या तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी केली आहे.
Assam Elections 2026: आसाम काँग्रेसमध्ये मोठा भूकंप; माजी प्रदेशाध्यक्ष भूपेन बोरा यांचा राजीनामा
Assam Elections 2026: आसाम प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष भूपेन कुमार बोरा यांनी सोमवारी (१६ फेब्रुवारी) पक्षाचा राजीनामा दिला. बोरा यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे आपले त्यागपत्र सोपवले असून, त्यात त्यांनी पक्ष नेतृत्वाकडून होत असलेल्या दुर्लक्षाचा पाढा वाचला आहे.
बंगळुरू : आपल्या दुसऱ्या बाळाच्या आगमनाची तयारी आणि त्या आनंदाचे क्षण कॅमेऱ्यात टिपण्यासाठी आईचं 'मॅटर्निटी फोटोशूट' सुरू होतं. मात्र, याच आनंदाच्या वातावरणात काळाने घाला घातला आहे. फोटोशूट सुरू असताना ३ वर्षांच्या मुलाचा पाण्याच्या कुंडात (Water Pool) पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बंगळुरूत घडली आहे.लक्ष्मीर असं मृत चिमुरड्याचं नाव असून, तो चरण आणि स्वाती यांचा मुलगा होता. मिळालेल्या माहितीनुसार, स्वाती या आठ महिन्यांच्या गरोदर आहेत. शनिवारी त्यांच्या दुसऱ्या बाळाच्या आगमनानिमित्त एका विशेष फोटोशूटचे आयोजन करण्यात आले होते. फोटोशूट सुरू असताना लक्ष्मीर जवळच खेळत होता. खेळता खेळता अचानक त्याचा पाय घसरला आणि तो तिथल्याच एका लहान कृत्रिम पाण्याच्या कुंडात पडला.https://prahaar.in/2026/02/16/bigg-boss-marathi-6-ayush-and-omkars-fight-after-eviction-viral-video-sparks-buzz/दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, फोटोशूटमध्ये सर्वजण इतके दंग होते की, लक्ष्मीर पाण्यात पडल्याचे कोणाच्याही लक्षात आले नाही. जेव्हा लोकांचे लक्ष गेले, तेव्हा खूप उशीर झाला होता. लक्ष्मीरला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.लक्ष्मीरचे वडील चरण हे नोकरीनिमित्त परदेशात होते. ते आज बंगळुरूत परतणार असल्याची माहिती मिळत आहे. ज्या वडिलांच्या स्वागतासाठी लक्ष्मीर उत्सुक होता, त्यांना आता आपल्या मुलाचा मृतदेह पाहावा लागणार आहे. या घटनेमुळे संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे. फोटोशूटच्या ठिकाणी सुरक्षिततेच्या उपाययोजना होत्या का? आणि हा प्रकार आयोजकांच्या निष्काळजीपणामुळे घडला आहे का? याचा पोलीस शोध घेत आहेत.
Devendra Fadnavis : प्रकरण समोर येताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेत संबंधित प्रमाणपत्रास स्थगिती देण्यात आली.
West Bengal Election: भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) पश्चिम बंगालमध्ये महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे. निवडणूक कर्तव्यात निष्काळजीपणा दाखवल्याबद्दल सात अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे.
मुंबई : 'बिग बॉस'च्या घरातून बाहेर पडल्यानंतरही स्पर्धकांमधील वाद निवळण्याचं नाव घेत नाहीयेत. नुकतेच स्ट्रॉंग स्पर्धक मानले जाणारे आयुष संजीव आणि करण सोनावणे घराबाहेर पडले, तर आठवड्याभरापूर्वी ओमकार राऊतचं एलिमिनेशन झालं होतं. मात्र, आता हे स्पर्धक घराबाहेर येताच त्यांच्यात भररस्त्यात हाणामारी झाल्याची धक्कादायक चर्चा सुरू झाली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून, यामध्ये ओमकार राऊत चक्क आयुष संजीवच्या अंगावर धावून जाताना दिसतोय. मला नॉमिनेट करतोस का रे! असं म्हणत ओमकारने आयुषला शिवीगाळ करत मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याचं या व्हिडिओत पाहायला मिळतंय. या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली असून, हा वाद खरा आहे की केवळ प्रसिद्धीसाठीचा स्टंट, याबाबत आता तर्कवितर्क लढवले जात आहेत.
Versova-Madh passenger jetty: वर्सोवा-मढ प्रवासी जेट्टीचा चेहरामोहरा बदलणार
- मंत्री नितेश राणे यांनी दिले घनकचरा व्यवस्थापन प्रणाली राबवण्याचे निर्देशमुंबई : वर्सोवा-मढ परिसरातील प्रवाशांची सुरक्षा आणि जेट्टी परिसरातील स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी सोमवारी प्रत्यक्ष पाहणी केली. या भागात प्रवाशांना भेडसावणाऱ्या समस्यांचा आढावा घेत, जेट्टी परिसर स्वच्छ आणि सुव्यवस्थित ठेवण्यासाठी तातडीने घनकचरा व्यवस्थापन प्रणाली राबवण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.वर्सोवा आणि मढ दरम्यान दररोज हजारो प्रवासी आणि मच्छिमार प्रवास करतात. मात्र, गेल्या काही काळापासून जेट्टी परिसरात अस्वच्छता आणि नागरी सुविधांचा अभाव असल्याच्या तक्रारी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत होत्या. या पार्श्वभूमीवर राणे यांनी या परिसराचा दौरा केला.मच्छिमार आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे स्पष्ट करत राणे यांनी जेट्टीवर प्रवाशांच्या सोयीसाठी आवश्यक त्या सुधारणा करण्याचे सुचवले. विशेषतः जेट्टी परिसरात होणार कचरा आणि अस्वच्छता रोखण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन प्रणाली राबवण्याचे निर्देश त्यांनी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.या पाहणी दौऱ्यादरम्यान महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे प्रादेशिक बंदर अधिकारी, कार्यकारी अभियंता तुषार पाटोळे, बंदर निरीक्षक जयश्री कांबळे, कनिष्ठ अभियंता स्वप्नील खरमाळे तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि इतर संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Abhishek Bachchan: ‘किंग’साठी अभिषेक बच्चनचा दमदार नवा अवतार; शाहरुखसमोर साकारणार खलनायकाची भूमिका?
अभिनेता अभिषेक बच्चन यांनी या चित्रपटासाठी पूर्णपणे नवा लुक स्वीकारला आहे. अलीकडेच ग्लोबल बिझनेस समिट 2026 दरम्यान त्यांनी स्वतः याची पुष्टी केली. त्यांनी सांगितले की, सध्या ते ‘किंग’चे शूटिंग करत असून त्यासाठीच त्यांनी हेअरस्टाइल आणि व्यक्तिमत्त्वात बदल केला आहे. मात्र, त्यांनी आपल्या भूमिकेबद्दल अधिक माहिती देणे टाळले.
Ajit Pawar : अजित पवारांच्या निधनानंतर धक्कादायक प्रकार समोर; 75 फाईल्सांना घाईघाईने मंजुरी
Ajit Pawar : अजित पवार यांच्या निधनानंतर मंत्रालयातील खळबळजनक प्रकार समोर आला आहे. अल्पसंख्याक विभागाकडून 75 शिक्षण संस्थांना घाईघाईने अल्पसंख्यांक दर्जा देण्यात आला आहे
मुंबई: दिल्ली येथील भारत मंडपम येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट’ मध्ये महिलांच्या नेतृत्वाखालील समृध्दीसाठी सर्वसमावेशक आराखडा मांडला जाणार आहे. राष्ट्रीय महिला आयोग (NCW), आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघटना (ITU) आणि संयुक्त राष्ट्र प्रशिक्षण व संशोधन संस्था (UNITAR) या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने हे सत्र आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रातील संधी, कौशल्यविकास, डिजिटल उद्योजकता आणि आर्थिक स्वावलंबन या विषयांवर विशेष भर देण्यात येणार आहे. हे सत्र १६ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ३.३० वाजता भारत मंडपम, कक्ष क्रमांक नऊ येथे होणार आहे.या समिटमध्ये राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, युनिटारच्या संचालिका (समृद्धी विभाग) मिहोको कुमामोटो, आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाच्या (आयटीयू) प्रादेशिक संचालिका (आशिया-पॅसिफिक) अत्सुको ओकुदा, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह, संगीतकार निर्माता कार्तिक शाह यांच्यासह उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी, तंत्रज्ञान तज्ज्ञ आणि महिला उद्योजिका सहभागी होणार असून महिलांच्या नेतृत्वाखालील आर्थिक प्रगतीस चालना देण्यासाठी ठोस उपाययोजना सुचविण्यात येणार आहेत. विशेषतः ग्रामीण व वंचित घटकांतील महिलांना डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सक्षम करण्यावर भर राहणार आहे.या चर्चासत्राचे उद्घाटन एआय विषयावरील विशेष व्हिडिओ सादरीकरणद्वारे होणार आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर या “आर्थिक शक्ती: सामायिक समृद्धीसाठी राष्ट्रीय अपरिहार्यता” या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. युनिटारच्या संचालिका मिहोको कुमामोटो “समावेशक आणि समृद्ध भविष्यासाठी स्थानिक क्षमता विकास” या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाच्या (आयटीयू) प्रादेशिक संचालिका अत्सुको ओकुदा या “लैंगिक डिजिटल दरी कमी करण्यासाठी महिलांचे सक्षमीकरण” या विषयावर उद्बोधन करणार आहेत. पॅनल चर्चेमध्ये विजया रहाटकर ह्या महानगरांबाहेरील महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्राधान्यक्रम, कौशल्यविकास, वित्तपुरवठा व सुरक्षिततेवरील भूमिका या विषयावर तर अत्सुको ओकुदा ह्या आशिया-पॅसिफिक अनुभवातून डिजिटल दरी कमी करण्याच्या उपाययोजना या विषयावर चर्चा करतील. तसेच ब्रिजेश सिंह हे “महिला वापरकर्त्यांसाठी सायबर धोके व सुरक्षिततेतील पोकळी” या विषयावर तर कार्तिक शाह हे “सर्जनशील क्षेत्रातील एआय संधी व आव्हाने” या विषयावर भूमिका मांडणार आहेत. परिसंवादानंतर उपस्थितांसोबत प्रश्नोत्तर सत्र होणार आहे.या चर्चासत्रात महानगरांपलीकडील महिलांना एआयच्या माध्यमातून आर्थिक सक्षमता कशी मिळवून देता येईल, महिला उद्योजिकांसाठी सायबर सुरक्षिततेतील कोणत्या त्रुटी तातडीने दूर करणे आवश्यक आहे, तसेच सर्जनशील अर्थव्यवस्थेत एआयमुळे निर्माण होणाऱ्या संधी आणि आव्हानांचा कसा सामना करावा, या मुद्द्यांवर सखोल चर्चा होणार आहे.
घराच्या गच्चीवर मोठा स्फोट, दोघांचा मृत्यू आणि दोन तरुणी जखमी
भुवनेश्वर : घराच्या गच्चीवर मोठा स्फोट झाला. स्फोटाच्या आवाजाने भोवतालचा परिसर हादरला. अनेकजण भीतीने घरांबाहेर आले. काहींनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली घटनास्थळी पोहोचताच त्यांना धक्का बसला. गच्चीत रक्त वाहत होतं. एक माणूस जमिनीवर पडला होता आणि तीन महिला जखमी अवस्थेत होत्या. ज्यांनी हे दृश्य बघितलं ते क्षणभर हादरले. नंतर स्वतःला सावरत स्थानिकांनी गच्चीवर असलेल्या चौघांना तातडीने रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तपासणी करुन जखमींपैकी पुरुषाचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. जखमी झालेल्या तीन महिलांपैकी एका महिलेचा काही तासांनंतर उपचार सुरू असताना मृत्यू झाला. इतर दोन जखमींवर उपचार सुरू आहे. स्फोट प्रकरणी पोलीस तपासाला सुरुवात झाली आहे. एनआयएनेही घटनेची दखल घेऊन स्वतंत्र तपास सुरू केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ओडिशातील भुवनेश्वरमध्ये एअरफिल्ड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुंदरपाडा आझाद नगर येथील एका घराच्या गच्चीवर चार जण क्रुड बॉम्ब अर्थात देशी बॉम्ब तयार करण्यात गुंतले होते. बॉम्ब निर्मितीत एक पुरुष आणि तीन महिला गुंतल्या होत्या. बॉम्बेची निर्मिती गुपचूप सुरू होती. कोणाला कळू नये यासाठी इमारतीच्या गच्चीवर पाण्याच्या ३ टाक्यांच्या आडोश्याला लपून बॉम्बेच्या निर्मितीचे काम सुरू होते. हे काम सुरू असताना गडबड झाली आणि एका बॉम्बचा स्फोट झाला. बॉम्ब निर्मितीसाठी आणलेल्या स्फोटकांना आग लागली. स्फोटकांच्या जवळच बसलेल्या चौघांच्या कपड्यांनी पेट घेतला.गच्चीवर झालेल्या स्फोटामुळे २६ वर्षांच्या शहनवाझ मलिक नावाच्या पुरुषाचा मृत्यू झाला. काही तासांनंतर त्याच्या आईचा ५१ वर्षीय लिजातुन बीबीचा मृत्यू झाला. शहनवाझचं लग्न तृप्तीमयी महल नावाच्या तरुणीशी ठरलं होतं. ही २३ वर्षांची तरुणी आणि तिची २७ वर्षांची मोठी बहीण अमिया या दोघी जखमी झाल्या. सध्या रुग्णालयात तृप्तीमयी महल आणि अमिया महल या दोघींवर उपचार सुरू आहेत. तब्येत स्थिर झाल्यावर डॉक्टरांच्या परवानगीने तृप्तीमयी महल आणि अमिया महल यांची कसून चौकशी करणार असल्याचे सूतोवाच पोलिसांनी केले आहे.शहनवाझ कोणत्या हेतूने बॉम्बेची निर्मिती करत होता हे अद्याप समजलेले नाही. बॉम्ब निर्मितीचा अतिरेकी कारवायांशी काही संबंध आहे का याचा तपास एनआयए करत आहे. फॉरेन्सिक तज्ज्ञांनी घटनास्थळावरुन अनेक नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत. या नमुन्यांच्या तपासणीतून प्रथमदर्शनी बॉम्बची निर्मिती योगिक हेक्साहायड्रो ट्रिनिट्रो ट्रायजीन नावाचा घटक वापरून केली जात होती, हे लक्षात आले आहे.पोलिसांच्या नोंदीनुसार शहनवाझ मलिक याची गुन्हेगारी पार्श्वभूमी होती. हत्येचा प्रयत्न, शस्त्रास्त्र प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन यांसह एकूण सात प्रकरणांमध्ये त्याच्या विरोधात गु्ह्यांची नोंद आहे. काही दिवसांपूर्वीच तो एका राजकीय वादातही सापडला होता. यामुळे बॉम्बनिर्मितीचा राजकीय वादाशी काही संबंध आहे का , याचाही तपास सुरू आहे.
महापालिकेतील भ्रष्टाचारावर भाजपचा पहिला घाव
मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमीत साटम यांचे महापौर रितू तावडे आणि आयुक्त भूषण गगरानी यांना पत्रमुंबई: महापालिकेतील भ्रष्टाचारावर पहिला घाव घालत मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमीत साटम यांनी महापालिकेच्या खरेदी प्रणालीत आमूलाग्र बदल करण्याची मागणी केली आहे. शालेय वस्तूंची खरेदी आणि जेंडर बजेट अंतर्गत होणाऱ्या वस्तूंच्या वितरणासाठी केंद्र सरकारच्या जेम (Government e-Marketplace) पोर्टलचा तातडीने अवलंब करण्याची मागणी आमदार अमीत साटम यांनी केली आहे.महापालिकेतील दीर्घकाळ चालत आलेल्या भ्रष्टाचाराविरुद्ध भाजपचा पहिला घाव आहेमुंबई महापौर रितू तावडे आणि आयुक्त भूषण गगरानी यांना लिहिलेल्या पत्रात आमदार अमीत साटम यांनी नमूद केले की, अनेक वर्षांपासून महापालिका शालेय विद्यार्थ्यांना गणवेशापासून स्टेशनरीपर्यंत २७ विविध वस्तू मोफत वाटत आहे. सध्या या वस्तू कंत्राटदारांमार्फत खरेदी केल्या जातात. अनेकदा हे कंत्राटदार उत्पादकांकडून वस्तू घेऊन महापालिकेला वाढीव किंमतीत विकतात असल्याचे निदर्शनास आल्याचे आमदार अमीत साटम यांनी म्हटले आहे.आमदार अमीत साटम यांनी भाजप भ्रष्टाचारमुक्त प्रशासन देण्याच्या बांधिलकीचा पुनरुच्चार करत या २७ वस्तूंची थेट खरेदी केंद्र सरकारच्या जेम पोर्टलवरून करण्याची मागणी केली. महापालिकेने शालेय वस्तू वाटण्याऐवजी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) चाही विचार करावा. त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या किंवा पालकांच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा करावी, असे आमदार अमीत साटम यांनी म्हटले आहे.आमदार अमीत साटम यांनी पुढे मागणी केली की, यापुढे शालेय वस्तूंसह जेंडर बजेट अंतर्गत महिलांना वितरित होणाऱ्या सर्व सामग्रीची खरेदीही जेम पोर्टलवरूनच केली जावी. यामुळे महानगरपालिकेच्या निधीची मोठ्या प्रमाणावर बचत होईल, खरेदीमध्ये पारदर्शकता येईल आणि भ्रष्टाचार रोखण्यास मदत होईल. अशा पद्धतीने खरेदी केल्यास वाढीव किंमतीमध्ये महापालिकेस वस्तू देता येणार नाहीत, असे आमदार अमीत साटम यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रस्तावित इस्रायल दौऱ्यापूर्वी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी भारताचे कौतुक केले असून भारत–इस्रायल संबंधांना भक्कम भागीदारी असे संबोधले आहे.जेरुसलेममध्ये मेजर अमेरिकन ज्यूइश ऑर्गनायझेशन्सच्या परिषदेला संबोधित करताना नेतन्याहू यांनी सांगितले की पुढील आठवड्यात भारताचे पंतप्रधान इस्रायलला भेट देणार असून दोन्ही देश सर्व प्रकारच्या सहकार्याबाबत चर्चा करतील. यावेळी नेत्याहू यांनी भारत–इस्रायल संबंधांना भक्कम भागीदारी असे संबोधले.मोदींचा दुसरा इस्रायल दौरा:पंतप्रधान मोदी यांचा इस्रायल दौऱ्याची अधिकृत तारीख जाहीर झालेली नसली तरी नवी दिल्लीतील एआय समिटनंतर ते २७-२८ फेब्रुवारीला इस्रायलला जाऊ शकतात. त्यांचा हा दौरा धोरणात्मक, संरक्षण, सायबर सुरक्षा आणि तंत्रज्ञान क्षेत्रांतील सहकार्याला नवी दिशा देऊ शकतो. मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा पहिलाच इस्रायल दौरा असेल. यापूर्वी त्यांनी २०१७ मध्ये इस्रायलला भेट दिली होती. त्या ऐतिहासिक दौऱ्यात दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंधांना २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर संरक्षण सहकार्य, शेती, जलव्यवस्थापन, सायबर सुरक्षा आणि दहशतवादविरोधी भागीदारी यांवर महत्त्वपूर्ण चर्चा झाली होती.पश्चिम आशियातील सुरक्षा परिस्थितीवर चर्चा:आगामी भेटीत दोन्ही नेते द्विपक्षीय सहकार्याबरोबरच पश्चिम आशियातील सध्याची सुरक्षा परिस्थिती आणि जागतिक मुद्द्यांवरही विचारविनिमय करू शकतात. वर्षाच्या सुरुवातीलाही दोन्ही नेत्यांमध्ये संवाद झाला होता, ज्यात गाझाशी संबंधित शांतता प्रयत्न आणि प्रादेशिक स्थैर्याबाबत चर्चा झाली. त्या वेळी पंतप्रधान मोदी यांनी न्याय्य आणि टिकाऊ शांततेसाठी भारताच्या पाठिंब्याचा पुनरुच्चार केला होता.भारत–इस्रायल संबंधांना नवी ऊर्जा मिळणार:मोदी आणि नेतन्याहू यांच्यात वैयक्तिक पातळीवरही चांगले संबंध असल्याचे मानले जाते. गेल्या काही वर्षांत दोन्ही नेत्यांनी अनेक मंचांवर एकमेकांशी मैत्री दाखवली आहे. हा संभाव्य दौरा भारत–इस्रायल संबंधांना नवी ऊर्जा देणारा ठरू शकतो. संरक्षण, तंत्रज्ञान, नवोन्मेष आणि प्रादेशिक सुरक्षा यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांत सहकार्य अधिक बळकट होण्याची अपेक्षा आहे.
Menopause Health: मेनोपॉजच्या काळात घ्या स्वतःची काळजी; योग्य आहार आणि जीवनशैलीने राहा निरोगी
आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक महिला नोकरी, व्यवसाय आणि घर या सगळ्यांची जबाबदारी सांभाळत असतात. त्यामुळे मेनोपॉजकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते. मात्र योग्य आहार आणि जीवनशैली स्वीकारली तर हा टप्पा सहज आणि निरोगीपणे पार करता येतो.
Mani Shankar Aiyar: ‘शशी थरूर पुढील परराष्ट्र मंत्री असतील’ ; ‘या’काँग्रेस नेत्याचा खळबळजनक दावा
Mani Shankar Aiyar: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी पुन्हा एकदा खळबळजनक दावा केला आहे. त्यांनी त्यांच्याच पक्षातील नेत्यांविरुद्ध नाराजी व्यक्त केली.
अलवार : राजस्थानच्या अलवार जिल्ह्यातील भिवाडी औद्योगिक क्षेत्रात सोमवारी एका बेकायदेशीर फटाका कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत किमान ८ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून अजूनही दोन कामगार कारखान्यात अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ज्यावेळी ही दुर्घटना घडली, तेव्हा कारखान्यात सुमारे २५ कामगार उपस्थित होते. आगीची बातमी समजताच शेजारील कारखान्यांमधील कामगारांनी सुरक्षिततेसाठी बाहेर धाव घेतली. कारखान्याच्या मालकाने ही जागा भाड्याने दिली होती, जिथे भाडेकरू बेकायदेशीररित्या फटाके तयार करत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. कारखान्यात मोठ्या प्रमाणात साठवून ठेवलेली दारूगोळा आणि कार्डबोर्डमुळे एका भीषण स्फोटानंतर आग झपाट्याने पसरली. खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला असून आसपासचे कारखाने रिकामे करण्यात आले आहेत. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, आगीदरम्यान ३ ते ४ मोठे स्फोट झाले, ज्यामुळे नागरिक आणि कामगारांमध्ये प्रचंड घबराट पसरली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तासनतास प्रयत्न केल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवले असून सध्या कुलिंग ऑपरेशन सुरू आहे.BREAKING Rajasthan: 7 workers killed in a chemical factory fire in Bhiwadi, rescue efforts ongoing for those trapped. - ANI pic.twitter.com/ne6simDxem— Info Room (@InfoR00M) February 16, 2026मृतांमध्ये उत्तर प्रदेश आणि बिहारच्या कामगारांचा समावेशhttps://prahaar.in/2026/02/16/suryakumar-yadav-har-har-mahadev-instagram-post-viral-after-beat-pakistan-t20-world-cup-2026/राजस्थानच्या भिवाडी औद्योगिक क्षेत्रातील भीषण आगीच्या दुर्घटनेत आतापर्यंत सात मृतदेह हाती लागले आहेत. अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी (ADM) सुमित्रा मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांच्या गस्ती पथकाला या कारखान्यातून धूर निघताना दिसला, त्यानंतर तातडीने प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली. अर्धा डझनहून अधिक अग्निशमन बंबांना तातडीने घटनास्थळी पाचारण करण्यात आले. या आगीत मृत्युमुखी पडलेले कामगार उत्तर प्रदेश आणि बिहारचे रहिवासी असल्याचे समोर आले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवले असले, तरी अजूनही दोन कामगार बेपत्ता असून त्यांचा शोध घेण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. फायर स्टेशनचे प्रभारी राजू खान यांनी सांगितले की, औद्योगिक क्षेत्रातील प्लॉट नंबर G-१, ११८ मध्ये असलेला हा कारखाना गेल्या अनेक महिन्यांपासून बंद होता. या कारखान्यात मोठ्या प्रमाणात कार्डबोर्डचा साठा करून ठेवण्यात आला होता. सोमवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास कारखान्यातून धूर निघू लागला आणि काही वेळातच आगीने भीषण रूप धारण केले. घटनेची माहिती मिळताच भिवाडी पोलीस आणि प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी तळ ठोकून आहेत.
4th Vishwa Marathi Sammelan: कुसुमाग्रजांच्या नाशिकमध्ये रंगणार चौथे विश्व मराठी संमेलन
नाशिक: जेष्ठ कवी कुसुमाग्रज यांचे वास्तव्य राहिलेल्या नाशिक शहरात चौथे विश्व मराठी संमेलन भरवण्यात येणार आहे. नाशिक शहराला साजेसे असेच चौथे विश्व मराठी संमेलन होईल. त्यासाठी सर्व नाशिककरांनी संमेलनाच्या यशस्वीतेसाठी पुढे यावे, असे आवाहन राज्याचे उद्योग, मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांनी केले.युवा पिढीसाठी विशेष उपक्रम:येत्या २७ फेब्रुवारी ते १ मार्च २०२६ या कालावधीत हे संमेलन होईल. या संमेलनानिमित्त तीन दिवस विविध कार्यक्रम होतील. त्यासाठी विविध समित्यांचे गठण करण्यात येईल. संमेलनादरम्यान मराठी भाषा व साहित्याचा विकास, जागतिकीकरणाच्या युगातील मराठीची भूमिका, तंत्रज्ञानातील मराठीचा वापर, शिक्षणातील मातृभाषेचे स्थान तसेच सांस्कृतिक वारशाचे जतन व संवर्धन या विषयांवर विविध परिसंवाद, चर्चासत्रे, व्याख्याने व संवाद सत्रांचे आयोजन करण्यात येणार आहेत. तसेच संमेलनात कविसंमेलन, सांस्कृतिक कार्यक्रम, लोककला सादरीकरणे, नाट्यप्रयोग, कथाकथन, पुस्तक प्रदर्शन, साहित्यिक संवाद तसेच युवा पिढीसाठी विशेष उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. मराठी साहित्य, कला व परंपरेचे दर्शन घडविणारी विविध प्रदर्शनेही या निमित्ताने भरविण्यात येणार आहे. जागतिक स्तरावर विखुरलेल्या मराठी भाषिकांना एकत्र आणणे, मराठी भाषा व संस्कृतीचे जतन व संवर्धन करणे तसेच नव्या पिढीत मराठीबाबत अभिमान निर्माण करणे हा या संमेलनाचा प्रमुख उद्देश असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.शहराच्या सांस्कृतिक वैभवाला साजेसा सोहळा:या संमेलनासाठी परदेशातून साहित्यिक हजर राहणार आहेत. यापूर्वीचे संमेलन पुणे येथे झाले. या संमेलनात पुस्तक आदान प्रदान हा आगळा वेगळा उपक्रम राबविण्यात आला. या संमेलनातही हा उपक्रम व्यापक स्तरावर राबविण्यात येईल. त्यासाठी नाशिककरांनी आपले योगदान द्यावे. त्यासाठी दहा रुपये वर्गणी ठेवण्यात येईल. या संमेलनाच्या मुख्य मंडपाला कवी कुसुमाग्रज नगरी असे नामकरण करण्यात येईल. अन्य दालनांना मान्यवरांची नावे देण्यात येतील. मराठी भाषा गौरव दिन आणि ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज यांच्या स्मृती दिन तसेच सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या संमेलनाला विशेष महत्व असणार आहे. शहराच्या सांस्कृतिक वैभवाला साजेसा हा सोहळा ठरणार असून नाशिकची ओळख जागतिक स्तरावर अधिक दृढ होण्यास मदत होणार आहे.संमेलनाची रूपरेषा:मराठी भाषा विभागातर्फे ३५ जणांना साहित्य पुरस्कार, विश्व मराठी संमेलनाचा साहित्य भूषण पुरस्कार व नाशिकमध्ये एक विशेष पुरस्काराचे वितरण या संमेलनात करण्यात येणार आहे. १७ फेब्रुवारी रोजी पुरस्कार्थीची नावे घोषित करण्यात येतील. संमेलन पूर्व २६ फेब्रुवारी रोजी मराठी बोलीभाषांचा उत्सव साजरा करण्यात येणार आहे व सांगता मराठीतील प्रसिद्धी नाटक आमने-सामने याने होईल. २७ फेब्रुवारी रोजी कवी कुसुमाग्रज यांच्या निवासस्थानापासून शोभायात्रेने संमेलनाचा प्रारंभ होणार आहे. सांयकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. उद्घाटनापूर्वी पुरस्कार विजेत्यांबाबत परिसंवादाचे आयेाजन केले आहे. २८ फेब्रुवारी रोजी मनाचे श्लोक, लोककला, चित्रपट कार्यशाळा, एआय व मराठी भाषा, वारकरी संप्रदाय साहित्यप्रकार असे नानाविध कार्यक्रम होणार असून प्रत्येक दिवशी कार्यक्रमाची सांगता सांस्कृतिक कार्यक्रमाने होणार असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले.
Balika Vadhu : ‘बालिका वधू’फेम अभिनेता ७ वर्षानंतर छोट्या पडद्यावर करणार कमबॅक
Balika Vadhu : शशांक एका सुपरनॅच्युरल थ्रिलर मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Sunetra Pawar: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार करणार राष्ट्रवादीच्या आमदारांशी 'वन टू वन'चर्चा
मुंबई: अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या भविष्यातील वाटचालीबाबत राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. या पार्श्वभूमीवर, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पक्षाच्या सर्व आमदारांना मुंबईत पाचारण केले असून, 'देवगिरी' या शासकीय निवासस्थानी मंगळवारी होणाऱ्या बैठकीत त्या प्रत्येक आमदाराशी 'वन टू वन' चर्चा करणार आहेत. प्रामुख्याने दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावर आमदारांची नेमकी मते काय आहेत, हे जाणून घेण्यासाठी ही महत्त्वाची बैठक होत असल्याचे समजते.पक्षाचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी या बैठकीच्या वृत्ताला दुजोरा दिला असून, सुनेत्रा पवार या आमदारांशी थेट संवाद साधणार असल्याचे स्पष्ट केले आहे. पक्षात कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी सर्व आमदारांना आणि पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेणे आवश्यक असल्याची भावना पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी व्यक्त केली होती. पुसदचे आमदार आणि राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी यावर भाष्य करताना म्हटले की, कोणताही निर्णय घेण्यापूर्वी नेतृत्वाने सल्लामसलत करणे गरजेचे आहे. हा निर्णय सामूहिक असावा आणि आम्ही आमची मते नेतृत्वाकडे स्पष्टपणे मांडू.इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांनी तर विलीनीकरणाच्या बाजूने उघड भूमिका घेतली आहे. पक्षातील ४० पैकी ३५ आमदार विलीनीकरणाच्या बाजूने आहेत. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणे, हीच अजितदादांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे मत त्यांनी व्यक्त केले. ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मात्र यासंदर्भात सावध पवित्रा घेतला आहे. सध्या प्राधान्य हे सुनेत्रा पवार यांचे नेतृत्व मजबूत करण्याला आणि त्यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्याला दिले जात आहे. विलीनीकरणाचा निर्णय सर्वस्वी त्यांच्यावर अवलंबून असेल, मात्र तो विषय अध्यक्ष निवडीनंतरच घेतला जाईल, असे भुजबळ यांनी स्पष्ट केले.शरद पवार गटाकडून सावध पावले
कोलंबो : टी-२० विश्वचषक २०२६ च्या हाय-व्होल्टेज सामन्यात भारताने पाकिस्तानचा ६१ धावांनी दारूण पराभव करत क्रिकेट विश्वात पुन्हा एकदा आपला तिरंगा अभिमानाने फडकवला आहे. कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारतीय खेळाडूंनी फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही आघाड्यांवर पाकिस्तानला निष्प्रभ केले. या विजयामुळे भारताने स्पर्धेतील आपली विजयी घोडदौड कायम राखली आहे. दरम्यान, मैदानातील विजयानंतर सोशल मीडियावरही टीम इंडियाचाच बोलबाला पाहायला मिळाला. विशेषतः कर्णधार सूर्यकुमार यादवने विजयानंतर केलेली खास पोस्ट सध्या तुफान व्हायरल होत असून, त्यातून भारतीय संघाचा आत्मविश्वास आणि खेळाडूंची जिद्द स्पष्टपणे दिसून येत आहे. या विजयामुळे जगभरातील भारतीय चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.https://prahaar.in/2026/02/16/narhari-zirwal-serious-note-taking-on-bribery-case-acb-raids-rajendra-dheringes-house/फक्त ३ शब्दांच्या कॅप्शनने सोशल मीडियावर लावली आगहर हर महादेव ️ pic.twitter.com/v2629OVGB4— Surya Kumar Yadav (@surya_14kumar) February 15, 2026भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने सोशल मीडियावर आपल्या भावना अत्यंत खास पद्धतीने व्यक्त केल्या आहेत. सामना संपल्यानंतर सूर्याने इन्स्टाग्रामवर भारतीय संघाच्या सेलिब्रेशनचे काही फोटो शेअर केले, मात्र फोटोंपेक्षाही त्याच्या कॅप्शनने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. सूर्याने केवळ ‘हर हर महादेव’ हे तीन शब्द लिहून आपला आनंद व्यक्त केला. या पोस्टनंतर अवघ्या काही मिनिटांतच सोशल मीडियावर कमेंट्स आणि लाईक्सचा महापूर आला. 'मैदानात खेळाडूंनी आणि सोशल मीडियावर कर्णधाराने मनं जिंकली', अशा प्रतिक्रिया चाहत्यांकडून येत आहेत. टीम इंडियाची ही रणनीती आणि सूर्याचा हा 'अंदाज' सध्या क्रिकेट विश्वात चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे.पाकिस्तानविरुद्ध भारताने उभारला धावांचा डोंगरटी-२० विश्वचषकाच्या मैदानात भारताने पाकिस्तानविरुद्ध आपल्या फलंदाजीचे रौद्ररूप दाखवत नवा इतिहास रचला आहे. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने विश्वचषकाच्या इतिहासातील पाकिस्तानविरुद्धची सर्वोच्च धावसंख्या उभारण्याचा पराक्रम केला. सलामीवीर ईशान किशनने ७७ धावांची स्फोटक खेळी करत भारतीय डावाचा भक्कम पाया रचला. त्यानंतर मधल्या फळीत युवा खेळाडूंचा जलवा पाहायला मिळाला. तिलक वर्मा, शिवम दुबे आणि 'फिनिशर' रिंकू सिंह यांनी पाकिस्तानी गोलंदाजांची धुलाई करत भारताला १७५ धावांच्या आव्हानात्मक धावसंख्येपर्यंत पोहोचवले. भारताच्या या सांघिक कामगिरीपुढे पाकिस्तानी गोलंदाजी पूर्णपणे हतबल झाल्याचे पाहायला मिळाले.भारतीय गोलंदाजांचा कहर१७५ धावांच्या आव्हानात्मक लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. सलामीपासूनच पाकिस्तानी फलंदाजांची तारांबळ उडाली. 'यॉर्कर किंग' जसप्रीत बुमराह आणि अष्टपैलू हार्दिक पांड्या यांनी सुरुवातीच्या काही षटकांतच पाकिस्तानच्या तीन मुख्य फलंदाजांना तंबूत धाडून विजयाचा पाया रचला. भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर पाकिस्तानचा एकही फलंदाज खेळपट्टीवर तग धरू शकला नाही. ठराविक अंतराने विकेट्स पडत गेल्यामुळे पाकिस्तानचा संपूर्ण डाव अवघ्या ११४ धावांवर आटोपला. या विजयाने भारतीय गोलंदाजीचा दबदबा पुन्हा एकदा जागतिक स्तरावर सिद्ध झाला आहे.कर्णधार सूर्याचं विधानसामन्यानंतर बोलताना सूर्या म्हणाला की, या खेळपट्टीवर १५५ धावांचे लक्ष्य देखील आव्हानात्मक ठरले असते, मात्र फलंदाजांनी १७५ धावा उभारून आम्हाला सामन्यात मोठी आघाडी मिळवून दिली. यावेळी त्याने सलामीवीर ईशान किशनचे विशेष कौतुक केले. सुरुवातीला काही महत्त्वाचे गडी बाद झाले असताना ईशानने ज्या संयमाने आणि जबाबदारीने फलंदाजी केली, तोच सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरल्याचे सूर्याने नमूद केले. या दिमाखदार विजयामुळे भारताचे 'सुपर-८' फेरीतील स्थान आता जवळपास निश्चित झाले असून टीम इंडियाचा आत्मविश्वास गगनाला भिडला आहे.

28 C