पाकचे जनरल असीम मुनीर यांना पाकमध्ये अभूतपूर्व अधिकार देण्यात आले आहेत आणि त्यामुळे त्यांना आयुष्यभर घटनेद्वारा घटनात्मक सुरक्षितता प्रदान करण्यात आली आहे. पाकमधील २७ व्या घटनादुरुस्तीद्वारे मुनीर यांना हे अनिर्बंध अधिकार आणि कवच प्रदान करण्यात आले. हा निर्णय पाकमधील लोकशाही संपुष्टात आणणारा तर आहेच पण तेथील जी काही थोडीफार लोकशाही अस्तित्वात आहे तीही संपवण्याचा प्रयत्न आहे. देशातील सत्ता समतोल ढासळवण्याचा हा प्रयत्न आहे आणि तो पाकमधील घटनेद्वारा करण्यात आला आहे. अध्यक्ष असिफ अली झरदारी ज्यांनी या घटनादुरुस्तीवर सही केली ते लोकशाहीचे पुरस्कर्ते असल्याबद्दल त्यांची ख्याती नाही. झरदारी यांची ख्याती लोकशाहीच्या स्थैर्याला नख लावण्यासाठी आणि भ्रष्टाचार करण्यासाठीच आहे. पण यापेक्षा गंभीर बाब या घटनादुरुस्तीत ही आहे, की त्यामुळे संसदेच्या अधिकारांवर गदा येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे नवीन सरकार स्थापन करण्याबाबत जे घटनात्मक अधिकार आहेत त्यांना कात्री लावण्यात आली आहे. त्याशिवाय मुनीर यांना अनिर्बंध अधिकार देतानाच त्यांच्याकडे संरक्षण, लष्कर आणि नौदलाचे संपूर्ण कमांड देण्यात आले, हा धोका आहे. कारण मुनीर आता पाकचे सर्वसत्ताधीश बनू शकतात. याचा अर्थ पूर्वी पाकच्या लष्करप्रमुखांकडे काही अधिकार होते, आता संपूर्ण अधिकार आले आहेत. पाकिस्तान हे नेहमीच लष्करशहांच्या राजवटींनी त्रस्त झाले आहे. १९४७ पासून पाक लष्करी राजवटीच्या अमलाखालीच सर्व काळ होते. जनरल अयुब खान, जनरल याह्या खान आणि नंतर जनरल झिया उल हक यांच्या एकामागोएक राजवटींनी पाकला सदा आपल्या हुकूमशाहाखाली ठेवले आहे.पाकमध्ये जो नेता सत्तेवर येतो तो तेथील लष्करशहाच्या आपण ब्ल्यू आईड बॉय कसे राहू याच चिंतेत आपली वर्षे घालवतो. इम्रान खान काही काळ तेथील लष्करी राजवटीचे ब्ल्यू आईड बॉय होते. त्यानंतर त्यांच्यावर लष्कराची खप्पा मर्जी झाली आणि आज ते तुरुंगात आहेत. मुनीर हे अनिर्बंघ सत्ताधारी झाले. त्यामुळे ते काय करणार हे स्पष्ट आहे. ते सर्वप्रथम जी काही पाकमध्ये लोकशाही आहे तिला नख लावणार हे उघड आहे. पाकमध्ये लोकनियुक्त सरकारांना सत्तेवर राहाता येते जोपर्यंत तेथील लष्करप्रमुखांची परवानगी असेल तोपर्यंतच हे पाकचं वास्तव आहे. त्यामुळे पाकमध्ये हायब्रीड सरकार असते. म्हणजे नागरी नेते आणि लष्करप्रमुख आणि त्यांचे साथीदार यांच्यात सत्ता वाटून घेतली जाते. हाय ब्रीड पॉवर याचा अर्थ खरी सत्ता लष्कराच्या हातात असते आणि त्यामुळे लोकशाही तेथे रुजू शकत नाही हा फार मोठा धोका आहे. या पॉवर शेअरिंग करारात महत्त्वाची खाती म्हणजे परराष्ट्र धोरण, राष्ट्रीय सुरक्षा आणि आर्थिक निर्णय हे लष्करशहांकडे असतात. त्यामुळे लोकशाहीला केवळ आभासी स्वरूप येते. या व्यवस्थेत सर्वात मोठा दोष म्हणजे लोकशाहीची गळचेपी केली जाते. वारंवार आपण पाकमध्ये हे पाहिले आहे आणि त्याच्याविरोधात कुणी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला तर त्याचा आवाज दाबून टाकला जातो. पाकमधील प्रख्यात मानवी हक्क कार्यकर्त्या अस्मा जहांगीर यांनी पाकिस्तानी लष्करी राजवटीच्या विरोधात सातत्याने आवाज उठवला आणि त्यांनी लष्करशाहीने नागरी राजवटीत कसा वारंवार हस्तक्षेप केला त्याविरोधात आंदोलन पुकारले. लोकशाहीच्या त्या पुरस्कर्त्या होत्या. पण आता मुनीर यांच्या अनिर्बंध अधिकाराने त्यांच्यासारख्या कुणाचेच काहीच चालणार नाही हे सत्य आहे. या घटनादुरुस्तीमुळे मुनीर यांचे वर्चस्व झिया उल हक यांच्या सत्तेच्या पलीकडे जाऊ शकते. आठव्या घटनादुरुस्तीमुळे झिया उल हक यांना अनिर्बंध अधिकार प्राप्त झाले होते. पण आता मुनीर हे तर सर्वात शक्तिशाली पाकचे लष्करशहा होतील. हा सर्व जगातील लोकशाहीवाद्यांना धोका आहे. तसेच या बदलांमुळे नागरी अधिकार आणि न्यायपालिका यांच्या अधिकारात कपात करण्यात आली आहे. पाकच्या लष्करशहांना पाकच्या घटनेने संपूर्ण संरक्षण दिले असले तरीही पाकच्या जनतेला आणि लोकशाही प्रक्रियेला हा फार मोठा धोका आहे. अगदी साधा सोपा अर्थ सांगायचा, तर असीम मुनीर यांच्या ताब्यात सत्तेचे संपूर्ण केंद्रीकरण होणार आहे. ते आयुष्यभर पाकचे फील्ड मार्शल राहतील. इतकेच नव्हे तर त्यांना खटल्यांपासून आणि अटकेपासूनही मुक्तता मिळणार आहे.आता मुनीर याचे अधिकार अनिर्बंध वाढणार असल्याने साहजिकच भारताला मोठा धोका आहे. तसे तर मुनीर भारताविरोधात काही करू शकत नाहीत. ऑपरेशन सिंदूरच्या वेळेस मुनीर यांची सत्ता किती दुबळी आहे हे सिद्ध झाले आहे. पण ते अतिरेक्यांना हातात धरून भारताला ताप देऊ शकतात. त्यामुळे भारताला आता फार सावध राहावे लागणार आहे. पाकमध्ये कोणताही निर्णय हा भारताला डोळ्यासमोर ठेवूनच घेतलेला असतो. हे विसरून चालणार नाही. पाकचे लष्करशहा आणि आयएसआय यांसारख्या संघटना ज्यांना भारतात दहशतवादी हल्ले घडवू्न वारंवार येथे अस्थिरता निर्माण करायची आहे, त्यांना हा मोठा बूस्ट मिळेल, कारण मुनीर यांच्या अनिर्बंध सत्तेमुळे या संधटनेला मोठाच हातभार लागेल. भारताला सावध राहावे लागणारच आहे पण पाकच्या जनतेने या घडामोडींकडे सावधपणे पाहण्याची गरज आहे. कारण अंतिमतः त्यांच्यावरच हे संकट येणार आहे. कोणताही लष्करशहा प्रथम जनतेला आकर्षित करतोच आणि नंतर आपली नखे बाहेर काढतो. हिटलर आणि मुसोलिनी किंवा पाकमधील कोणताही लष्करशहा यांनी हेच केले होते. त्यामुळे भारतापेक्षाही जास्त धोका पाकच्या सामान्य जनतेला जास्त आहे. या घटनादुरस्तीमुळे मुनीर यांना आण्विक असेट्सवर हक्क मिळाले आहेत. हा तर भारताला जास्त धोका आहे. कारण भारत आज जरी अण्वस्त्र सज्ज असला तरीही कुणाच्या हाती ही अण्वस्त्रे पडतील आणि ते कुणाविरोधात त्यांचा वापर करतील यावर काहीही धरबंद उरणार नाही. पाकमधील सत्ता समतोल संपूर्ण बदलला आहे आणि तो संपूर्ण लष्कराच्या हातात गेला आहे. हाच या बाबतीतील सर्वात मोठा दोष आहे. पाकमधील घटनात्मक व्यवस्था आता सशस्त्र दलाकडून दिली जाईल, ही बाब सर्व जगाला धोकादायक आहे.
प्रभात वृत्तसेवा बारामती – राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचा बारामती शहरातील विरोध संपवण्याचा प्रयत्न आहे. पाठीमागच्या वेळी विरोधक असलेले आता त्यांचे उमेदवार असल्याचे दिसून येत आहे. विरोधक असणे गरजेचे आहे. त्यामुळे लोकशाही जिवंत राहते. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून बारामती नगर परिषदेची निवडणूक ताकदीने लढविले जाईल, असे मत युगेंद्र पवार यांनी व्यक्त केले. बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीत […] The post Baramati Politics : अजित पवार गटाचा विरोध संपविण्याचा प्रयत्न – युगेंद्र पवारांचे अजितदादांना थेट आव्हान,म्हणाले.. appeared first on Dainik Prabhat .
Shikrapur News : शिक्रापुरात आढळली चक्क चार पायांची कोंबडी ; पाहण्यासाठी प्राणीमित्रांची झुंबड
प्रभात वृत्तसेवा शिक्रापूर – येथे एका चिकनच्या दुकानात चक्क चार पायांची कोंबडी आढळून आल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. हे दुर्मिळ दृश्य पाहण्यासाठी अनेक प्राणी पक्षी मित्र गर्दी करत आहेत.शिक्रापूर येथील सिकंदर शेख यांचा चिकन व्यवसाय असून, सकाळी दुकान उघडून कोंबड्यांना खाद्य टाकत असताना त्यांना अचानक एका कोंबडीला जादा पाय असल्याचे दिसून आले. त्यांनी तातडीने […] The post Shikrapur News : शिक्रापुरात आढळली चक्क चार पायांची कोंबडी ; पाहण्यासाठी प्राणीमित्रांची झुंबड appeared first on Dainik Prabhat .
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला वाघाचा आधार लाभला!
चांदोलीच्या जंगलात तीन वाघ कॅमेऱ्यात कैद झाले तरी त्यांचे वास्तव्य येथे नाही या सत्यावर उपाय शोधत ताडोबा-अंधारीतून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाकडे ‘तारा’ या वाघिणीचे हस्तांतर या आठवड्यात झाले. हा दक्षिण महाराष्ट्राच्या जंगलांना मिळालेला नवजीवनाचा श्वास ठरू शकतो. तो तसाच ठरावा ही महाराष्ट्राच्या वन खात्याकडून अपेक्षा आहे.गेली अनेक वर्षे वाघांशिवाय पडझड अनुभवत असलेल्या चांदोली-कोयना पट्ट्याला या एका ऑपरेशनने नवी दिशा दिली आहे. पश्चिम घाटाच्या या दगडी कड्याकपारीत वाघ या शिखर-भक्षकाचा अभाव हा केवळ पर्यावरणीय मुद्दा नव्हता, तर संपूर्ण पर्यावरण व्यवस्थेचा तोलच ढासळलेला होता. जंगलाची पुनरुत्पादन क्षमता कमी झाली होती. ‘तारा’चे आगमन हा या तुटलेल्या साखळीला पुन्हा एकत्र जोडण्याचा टप्पा आहे. वाघ असल्यावर जंगलातील प्रत्येक प्रजातीला नैसर्गिकरीत्या आपली मर्यादा कळते. त्या त्या प्राण्यांचा वेग, हालचाल आणि जीवनशैली सुधारते आणि त्यामुळे हळूहळू जंगलाची आरोग्यवस्था जोर पकडते. सह्याद्रीचा हा फायदा थेट सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांपर्यंत पोहोचू लागेल. वाघ म्हणजे पर्यटनाचा आत्मा. दशकभरापासून चांदोली राष्ट्रीय उद्यानाच्या नावाला वैभव होते, पण वास्तवाचा त्याला आधार नव्हता. पर्यटकांना सफारीची भावना असूनही वाघ दिसत नसल्याने चांदोली आणि कोयना पट्टा पर्यटकांच्या यादीत मागे पडत होता. तारा आल्यावर पर्यटकांचा कल पुन्हा जंगलाकडे वळेल, याचा थेट फायदा स्थानिक होमस्टे, हस्तकला, ग्रामीण पर्यटन मार्गदर्शक आणि खाद्यपदार्थ उत्पादकांना होईल. सह्याद्रीत येणारा प्रत्येक पर्यटक हा स्थानिक अर्थव्यवस्थेच्या चक्राला हातभार लावणारा महत्त्वाचा दुवा आहे. त्यामुळे तेथील गावकऱ्यांना रोजगाराच्या नव्या शक्यता निर्माण होतात. पर्यावरण शिक्षण, ईको-ट्रेल्स, बर्डिंग गाइड्स, स्थानिक स्वयंसहाय्यता गट यांना यामुळे नवे दार उघडते; परंतु ‘तारा’ची गोष्ट फक्त पर्यटनाभोवती फिरत नाही.सह्याद्रीत कोयना, वारणा, कृष्णा खोऱ्यांतील जलस्रोत हे या हिरव्यागार कड्यांच्या आरोग्यावर अवलंबून आहेत. जंगल दाट असेल तर पावसाचे पाणी हळूहळू जमिनीत मुरते आणि पुढे नद्यांना नियमित प्रवाह देत राहते. पण गेल्या काही वर्षांत जंगल नष्ट होत गेल्याने पाण्याची अनियमितता वाढली. सांगली, कोल्हापूरसारख्या जिल्ह्यांमध्ये दरवर्षी पूरस्थिती तीव्र होत गेली. वाघ आल्यावर जंगलातील अतिक्रमण आणि बेकायदेशीर चराईवर प्रशासनाची नजर वाढते. वाघ असलेल्या क्षेत्रात लोक जाणीवपूर्वक सावध राहतात जंगलावर अधिक नियंत्रण ठेवले जाते. यामुळे जलस्रोतांचे दीर्घकालीन संरक्षण होते आणि नैसर्गिक नियंत्रण मिळते. हवामान बदलामुळे पावसाची स्वरूपे अधिक आक्रामक होत असताना अशा स्थिर जंगलाची गरज अधिकच वाढली आहे. या प्रकल्पाचा विस्तारित परिणाम कोकण आणि उत्तर कर्नाटकापर्यंतही जाणवेल. सह्याद्री, अंबोली, दांडेली हा नैसर्गिक प्राणी कॉरिडॉर इतिहासात जिवंत होता; पण शहरीकरण, रस्ते, खाणी, विद्युत प्रकल्प यांनी त्याच तुकडे-तुकडे केले. ‘तारा’सारखे वाघ स्थलांतरित झाल्यावर या कॉरिडॉरकडे पुन्हा एकदा शास्त्रीय दृष्टीने पाहण्याची गरज निर्माण होते. वाघांची ये-जा होत असेल तर हत्ती, गवा, अस्वल, वनकुत्रा यांच्या हालचालीही सुव्यवस्थित राहतात. जैवविविधता फक्त वाघावर अवलंबून नसली तरी वाघ हा त्या विविधतेचा मुख्य सूचक असतो. कोकणातील जंगलांवर खाणकाम किंवा अनियोजित रस्त्यांचे दडपण वाढले की अशा वाघ प्रकल्पांमुळे पर्यावरणीय अनुमतीच्या निकषांत काटेकोरपणा येतो. मात्र या प्रकल्पात धोकेही कमी नाहीत. वाघाला हवा असलेला अखंड जंगल पट्टा आज अनेक भागांत तुटलेला आहे. चांदोली, कोयना, राधानगरीला जोडणारा पट्टा अजूनही अनेक ठिकाणी अरुंद किंवा व्यत्यय आणणारा आहे. गावांची वाढ, व्यावसायिक शेती, जंगल रस्ते या सगळ्यामुळे वाघाला फिरण्यासाठी हवी असलेली शांतता कमी होते.मानवी-वन्यजीव संघर्षाची शक्यता वाढते. जनावरांवर हल्ले झाले तर स्थानिक लोकांचा विरोध उफाळू शकतो. म्हणूनच जलद आणि सन्मान्य पद्धतीने भरपाई देणारी यंत्रणा, सतत जनजागृती आणि गावकऱ्यांचा थेट सहभाग हे तीन स्तंभ अनिवार्य आहेत, तर दुसरीकडे, सह्याद्रीत शिकार प्राणी पुरेसे नसल्यास वाघ टिकू शकणार नाही. ताडोबात विपुल असलेले सांबर-गवा सह्याद्रीत कमी प्रमाणात दिसतात, त्यामुळे शास्त्रीय पद्धतीने त्यांच्या वाढीकडे लक्ष द्यावे लागेल. या सगळ्यांवर शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे राजकीय इच्छाशक्ती. प्रशासनातील सातत्य नसले तर अशा प्रकल्पाचे भवितव्य धोरण बदलांमध्ये अडकते. तरीही एक गोष्ट निर्विवाद आहे, वाघाचे आगमन म्हणजे निसर्गाचा आत्मविश्वास परत येणे. वाघ असताना जंगलातील वृक्षांचे पुनरुज्जीवन अधिक वेगाने होते, कारण शाकाहारी प्राण्यांचा ताण कमी होतो. दाट जंगलाने कार्बन शोषण वाढते आणि हवामान बदलाचे दडपण कमी करण्याची नैसर्गिक क्षमता वाढते. झरे आणि ओहोळ पुन्हा जिवंत होतात. पक्षी, साप, कासव, कीटक, औषधी वनस्पती यांची संख्या वाढते. हे सर्व मिळून एक मजबूत परिसंस्था तयार करते आणि ही परिसंस्था हवामान बदलाच्या संकटात माणसाला आधार देणारी सर्वात शक्तिशाली ढाल आहे. ऑपरेशन ‘तारा’ हे म्हणून केवळ एका वाघिणीचे स्थानांतरण नसून संपूर्ण सह्याद्रीचा पुनर्जन्म आहे. दक्षिण महाराष्ट्राच्या पर्यावरणीय आणि आर्थिक भविष्यातील सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे प्रकल्पाला मिळणारा लोकसहभाग, वैज्ञानिक व्यवस्थापन आणि राजकीय बांधिलकी. वाघाचे पाऊल सातारा, सांगली, कोल्हापूरच्या मातीत पुन्हा उमटले तर तो निसर्गाचा विजय असेल आणि हवामान बदलाच्या अंधाऱ्या भावी दिवसांना तोंड देण्यासाठी या प्रदेशाला वाघाच्या रूपाने मिळालेला सर्वात मोठा मित्र असेल. फक्त तो मित्र जंगलातच राहिला पाहिजे माणसांच्या घरापर्यंत त्याला येऊ न देणे ही जबाबदारी वन विभागाची!
हिंजवडीत पुन्हा काळाचा घाला! वडिलांच्या डोळ्यांदेखत डंपरखाली येऊन तरुणीचा मृत्यू, चालक फरार
प्रभात वृत्तसेवा हिंजवडी – हिंजवडी व आसपासच्या परिसरात अवजड वाहने कर्दनकाळ ठरत आहेत. सोमवारी एका डंपरच्या चाकाखाली आल्याने आणखी एका तरुणीचा मृत्यू झाला. ही घटना पुनावळे येथील कोलते पाटील लाइफ रिपब्लिक हाऊसिंग सोसायटीच्या प्रवेशद्वाराजवळ दुपारी दीडच्या सुमारास घडली. वडिलांसमोर मुलीच्या दुर्दैवी मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तन्वी सिद्धेश्वर साखरे (२०,रा. हिंजवडी) असे अपघातात मृत्यूमुखी […] The post हिंजवडीत पुन्हा काळाचा घाला! वडिलांच्या डोळ्यांदेखत डंपरखाली येऊन तरुणीचा मृत्यू, चालक फरार appeared first on Dainik Prabhat .
PCMC Election : मतदानासाठी नागरिकांमध्ये जनजागृती वाढवा – आयुक्त श्रावण हर्डीकर
प्रभात वृत्तसेवा पिंपरी – आगामी महापालिका निवडणुकीच्या तयारी निमित्त शहरातील मतदान केंद्रांची स्थळनिश्चिती, निवडणूक कक्ष अधिकाऱ्यांची नेमणूक, मतदान केंद्रांची सुविधा, अपंगजनांसाठी सोयी, मतदान कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, ईव्हीएमची सुरक्षितता, मतदार यादी अद्ययावत करणे, प्रभागांतील आवश्यक पायाभूत दुरुस्ती, प्रारूप मतदार यादीतील बदल आणि मतदानासाठी नागरिकांमध्ये जनजागृती वाढवण्याचे तसेच तक्रार निवारण यंत्रणा सक्षम करण्याचे निर्देश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी […] The post PCMC Election : मतदानासाठी नागरिकांमध्ये जनजागृती वाढवा – आयुक्त श्रावण हर्डीकर appeared first on Dainik Prabhat .
प्रभात वृत्तसेवा पिंपरी ( प्रकाश गायकर ) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. महायुतीमध्ये मिठाचा खडा पडला असून यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे पिंपरी पालिकेसाठी भाजप, शिवसेना आणि आरपीआय यांची युती होईल, असे वाटत असतानाच आता भाजप शिवसेनेलाही सोबत घेण्याच्या तयारीत नसल्याचे कळते. एकनाथ […] The post पिंपरी-चिंचवडमध्ये महायुतीला मोठा सुरुंग! राष्ट्रवादीनंतर आता भाजपही शिवसेनेला धक्का देण्याच्या तयारीत? appeared first on Dainik Prabhat .
चीनशी करारामुळे अमेरिकेचा जीव भांड्यात!
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात अलीकडेच करार झाला. दोन महासत्तांचे प्रमुख सहा वर्षांनंतर भेटले. वादग्रस्त मुद्दे बाजूला ठेवून सध्याच्या तातडीच्या प्रश्नांतून त्यांनी मार्ग काढला. दोन महासत्तांत झालेल्या वाटाघाटींनी जगाने सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. अर्थात या करारातून पहिल्या क्रमांकाची महासत्ता दुसऱ्या क्रमांकाच्या महासत्तेपुढे नमली, असा अर्थ काढला जात आहे.अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग सहा वर्षांनी भेटले आणि दोन्ही महासत्तांमधील बैठक महत्त्वाची होती. संपूर्ण जगाचे या बैठकीवर लक्ष ठेवले होते. हे नेते अलीकडेच दक्षिण कोरियातील बुसान विमानतळावर भेटले आणि त्यांची बैठक शंभर मिनिटे चालली. बैठकीपूर्वीच ट्रम्प यांना बैठक यशस्वी होईल, असा विश्वास होता. त्यामागे कारणही तसेच होते. अमेरिकेला चीनबरोबर वाटाघाटी करून ‘रेअर अर्थ मॅग्नेट’च्या आयातीचा आणि सोयाबीनच्या निर्यातीचा प्रश्न सोडवणे जास्त महत्त्वाचे होते. अमेरिकेच्या शेतकऱ्यांचा तसेच तंत्र उद्योगाचा मोठा दबाव ट्रम्प यांच्यावर होता. दोन महासत्तांच्या प्रमुखांच्या भेटीनंतर अमेरिकेच्या अध्यक्षांनी मोठी घोषणा केली. त्यात म्हटले होते, की चीनमधून येणाऱ्या वस्तूंवरील एकूण सरासरी शुल्क ५७ टक्क्यांवरून ४७ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे, की अमेरिकेने चीनवर अनेक वेळा शुल्क लादले आहे. रागाच्या भरात ट्रम्प यांनी हे शुल्क जाहीर केले. ट्रम्प यांच्या मागील कार्यकाळात स्टीलवर १९ टक्के, एप्रिल २०२५ मध्ये दहा टक्के बेसलाइन शुल्क, फेंटानिलवर २० टक्के शुल्क आणि इतर शुल्क समाविष्ट होते. अशा प्रकारे अमेरिकेने चीनवर सरासरी ५५ टक्के शुल्क लादले होते. ऑगस्ट २०२५ मध्ये वाढून ते ५७ टक्के झाले. तथापि, दोन्ही नेत्यांमधील बैठकीनंतर, चीन आता सरासरी ४७ टक्के शुल्काच्या अधीन असेल. जिनपिंग यांच्याशी बोलल्यानंतर, ट्रम्प यांनी घोषणा केली, की चीनवर लादलेले फेंटानिलशी संबंधित शुल्क वीस टक्क्यांवरून दहा टक्क्यांपर्यंत कमी केले जात आहे. परिणामी अमेरिकेचा जीव भांड्यात पडला असल्यास नवल नाही.ट्रम्प यांच्या शुल्क कपातीच्या बदल्यात जिनपिंग आता अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणात सोयाबीन खरेदी करण्यास सहमत झाले आहे. चर्चेबाबतच्या इतर तपशिलामध्ये टिकटॉक कराराबाबत चर्चेचा कोणताही उल्लेख नव्हता. दोन्ही नेत्यांनी सांगितले, की ते युद्ध संपवण्यासाठी एकत्र काम करतील. दोन्ही बाजूंनी व्यापार आणि सहकार्यावर महत्त्वाचे करार केले. शी जिनपिंग फेंटानिल दरवाढ थांबवण्यासाठी कठोर परिश्रम करतील आणि अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यांवर पुढील निष्कर्ष लवकरच घोषित केले जातील. ‘रेअर अर्थ मॅग्नेट’वर दरवर्षी चर्चा केली जाईल. या करारानंतर इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिक वाहने आणि संरक्षण उत्पादनासाठी आवश्यक असलेल्या साहित्यांचा जागतिक प्रवेश स्थिर करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल पुढे पडले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी दुर्मीळ पृथ्वी खनिजांबाबत करार केला असल्याचे जगाला सांगत जणू सुटकेचा नि:श्वास सोडला. ट्रम्प यांनी सांगितले, की चीनने पुढील वर्षासाठी अमेरिकेला ‘रेअर अर्थ मॅग्नेट’ पुरवण्यास सहमती दर्शवली आहे. ट्रम्प यांनी असेही जाहीर केले, की फेंटानिल (एक अमली पदार्थ)साठी चीनवरील कर दहा टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासह, अमेरिकेचा चीनवरील एकूण करभार आता ५७ टक्क्यांवरून ४७ टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे. ‘जिनपिंग हे खूप कठोर वाटाघाटी करणारे आहेत, ही चांगली गोष्ट नाही,’ असे ट्रम्प यांनी सांगितले. या भेटीच्या निमित्ताने अमेरिका आणि चीनमधील सर्व वाद मिटले, असे त्यांनी सांगितले.याच सुमारास ट्रम्प आणि शी यांनी रशिया-युक्रेन संघर्ष सोडवण्यासाठी सहकार्यावरही चर्चा केली. अमेरिकेच्या अध्यक्षांनी सांगितले, की त्यांच्या संभाषणात तैवानचा मुद्दा आला नाही. हे लक्षात घेण्यासारखे आहे, की चीनने नेहमीच तैवानवर दावा केला आहे. अमेरिकेने मुख्य भूमी चीनपासून दूर असलेल्या या बेटाच्या स्वायत्ततेला पाठिंबा दिला आहे. म्हणूनच, चीनचे जिनपिंग ट्रम्प यांच्यासमोर तैवानचा मुद्दा उपस्थित करतील, अशी अपेक्षा होती. ट्रम्प आणि जिनपिंग यांच्यात सहा वर्षांनंतर भेट झाली. त्यांच्यात झालेली चर्चा आणि बैठकीचे एकूण निष्कर्ष पाहता जिनपिंग यांनी अमेरिका तसेच ट्रम्प यांना दाती तृण धरून शरण यायला लावले, असा अर्थ होतो. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तसेच भारतावर ट्रम्प वारंवार टीका करत असताना भारताने कठोर उत्तर दिले नाही; परंतु चीनने ट्रम्प यांना सातत्याने कठोर उत्तर देऊन आपल्या अटींवर अमेरिकेला शरण यायला भाग पाडले. गेल्या सहा महिन्यांमध्ये हे दुसऱ्यांदा घडले आहे. अमेरिकेच्या ‘टॅरिफ वॉर’ला चीनने अमेरिकेचे नाक दाबून उत्तर दिले. ‘रेअर अर्थ मॅग्नेट’च्या निर्यातीवर बंधने आणली. त्याचा परिणाम अमेरिकेवर झाला. ‘रेअर अर्थ मॅग्नेट’बाबत जगात चीनची मक्तेदारी आहे. अन्य देश ही मक्तेदारी मोडीत काढण्याचा आता प्रयत्न करत असले, तरी ते एका दिवसात साध्य होणार नाही. ट्रम्प यांना त्याची जाणीव झाली असावी. चीन जगभरातील ‘रेअर अर्थ मॅग्नेट’चे ७० टक्के उत्पादन नियंत्रित करते. चीनने त्याला जागतिक शक्ती संतुलनाचे शस्त्र बनवले आहे. यामुळेच ट्रम्प यांना तडजोड करण्यास भाग पडले.अमेरिकेचे संरक्षण आणि ऊर्जा-केंद्रित तंत्रज्ञान उद्योग या खनिजांशिवाय काम करू शकत नाही. अमेरिकेच्या सुप्रसिद्ध एफ-३५ लढाऊ विमानात ४१८ किलो ‘रेअर अर्थ मॅग्नेट’ वापरले जाते. त्याचप्रमाणे, अमेरिकन नौदलाच्या आर्ले बर्क डीडीजी ५१ विनाशिकेत २,६०० किलो ‘रेअर अर्थ मॅग्नेट’ वापरले जाते. अमेरिकेच्या संरक्षणक्षेत्रातही हेच घडते. इतर उद्योगांनाही त्यांच्याशिवाय संघर्ष करावा लागतो. इलेक्ट्रिक वाहनांपासून स्मार्टफोनपर्यंत सर्व काही ‘रेअर अर्थ मॅग्नेट’शिवाय अशक्य आहे. अमेरिकेची ही दुखरी नस चीनने दाबल्यामुळेच ट्रम्प चीनशी व्यापार करार करण्यासाठी पुढे आले. अमेरिकेच्या ‘चिप युद्ध’ आणि ‘टॅरिफ वॉर’ला उत्तर म्हणून चीनने हे पाऊल उचलले. चीनने म्हटले होते, की त्यांच्या ‘रेअर अर्थ मॅग्नेट’ वापरणाऱ्या कोणत्याही कंपनी किंवा देशाला त्यांची परवानगी घ्यावी लागेल. या पार्श्वभूमीवर ट्रम्प आणि जिनपिंग यांच्यात सहा वर्षांनंतर बैठक झाली. दोन्ही देशांमधील व्यापार कराराच्या चौकटीअंतर्गत चीनने अमेरिकेला दुर्मीळ पृथ्वी खनिजांच्या निर्यातीवरची बंदी किमान एक वर्षासाठी पुढे ढकलण्याचे संकेत दिले आहेत. चिनी वस्तूंवर ट्रम्प यांनी लादलेली प्रस्तावित शंभर टक्के आयात शुल्क आता टळली आहे. ही घोषणा महत्त्वपूर्ण आहे. त्या बदल्यात चीन अमेरिकेकडून सोयाबीनची पुन्हा खरेदी सुरू करणार आहे आणि ‘रेअर अर्थ मॅग्नेट’वरील निर्यात बंदी किमान एक वर्षासाठी पुढे ढकलण्यास तयार आहे.सरत्या काळामध्ये चीनने ‘रेअर अर्थ मॅग्नेट’चे उत्पादन आणि शुद्धीकरण याबाबत जगभरात धाक निर्माण केला. उर्वरित जग अमेरिकेच्या ‘टॅरिफ वॉर’पुढे झुकले; परंतु चीन अविचल राहिला. यामुळे काही ‘रेअर अर्थ मॅग्नेट’ आणि कायमस्वरूपी चुंबक श्रेणीतील उत्पादनावरील निर्यात नियंत्रणे वाढली. संरक्षण, इलेक्ट्रिक वाहने, स्वच्छ सौर ऊर्जा उत्पादने आणि उच्च-तंत्रज्ञान उद्योगांवर याचा लगेचच परिणाम झाला. अमेरिकेने चीनच्या वर्चस्वापासून मुक्त होण्याचा प्रयत्न केला नाही किंवा करत नाही, असे नाही. ट्रम्प यांनी युक्रेनशी केलेल्या करारात आपल्यासाठी ‘रेअर अर्थ मॅग्नेट’ना सुरक्षित करण्याकडे लक्ष केंद्रित केले होते. ट्रम्प हे या खनिजांचा पुरवठा सुरक्षित करण्यासाठी आशिया दौरा करत आहेत. जपान, मलेशिया, व्हिएतनाम आणि कंबोडियासोबतचे त्यांचे करार या संदर्भातील महत्त्वपूर्ण उदाहरणे म्हणून पाहिले जाऊ शकतात. तथापि, या घटकांच्या अंमलबजावणीसाठी बराच वेळ आणि पैसा लागेल. ही परिस्थिती लक्षात घेऊन चीनने ट्रम्प यांना त्यांच्या व्यापार धोरणांबाबत माघार घेण्यास भाग पाडले. परिणामी, अमेरिकेकडे दुसरा पर्याय नाही, ती चीनला दुखावू शकत नाही हे नव्याने सिद्ध झाले. या घडामोडींमधून जागतिक व्यापार आणि राजकारण नवा धडा घेऊशकणार आहे.- प्रा. जयसिंग यादव
प्रभात वृत्तसेवा पिंपरी – दोन किलो सोने कमी किमतीत देण्याचे आमिष दाखवून दोन चोरट्यांनी १२ लाख ९५ हजार रुपये घेत एकाची फसवणूक केली. ही घटना ताजणे मळा, च-होली परिसरात उघड झाली आहे.याबाबत एका भाजी व्यवसायिकाने रविवारी (दि. १६) याबाबत दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दोन अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. हि […] The post Pimpri Crime : स्वस्तात सोनं घेणं पडलं महागात! पिंपरी-चिंचवडमध्ये भाजी विक्रेत्याला १३ लाखांना गंडवलं appeared first on Dainik Prabhat .
प्रभात वृत्तसेवा सातारा : सातारा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाचा उमेदवार कोण, या प्रश्नाचे उत्तर अनेक राजकीय घडामोडीनंतर अखेर सातारकरांना मिळाले. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे समर्थक, जनता सहकारी बँकेचे चेअरमन आणि माजी उपनगराध्यक्ष अमोल मोहिते यांना भाजपची नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. शिवेंद्रसिंहराजे यांच्या उपस्थितीत मोहिते यांनी ए, बी फॉर्मसह उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी […] The post Satara Politics : शिवेंद्रसिंहराजेंनी शब्द खरा केला,अमोल मोहिते सातारच्या नगराध्यक्षपदाचे भाजपचे उमेदवार appeared first on Dainik Prabhat .
Rahimatpur : रहिमतपूरच्या राजकारणात मोठा ट्विस्ट! शिवसेनेचे वासुदेव माने आता सुनील माने यांच्यासोबत
प्रभात वृत्तसेवा रहिमतपूर – रहिमतपूर नगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज वाटपावरून महायुतीमध्ये चांगलेच बिनसले असून माजी नगराध्यक्ष वासुदेव माने यांनी आपला सवतासुबा कायम ठेवत राष्ट्रवादी अजित दादा गटाचे सुनील माने यांच्याबरोबर युती केली आहे. या नाट्यमय घडामोडीमुळे भाजपमधील नाराजी नाट्य अजून समोर येत आहे. रहिमतपूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सुनील माने यांच्या विरोधात सौ. चित्रलेखा माने कदम, […] The post Rahimatpur : रहिमतपूरच्या राजकारणात मोठा ट्विस्ट! शिवसेनेचे वासुदेव माने आता सुनील माने यांच्यासोबत appeared first on Dainik Prabhat .
ठाणे रुग्णालयाच्या पाडकामात आढळली शेकडो वर्षे दडलेली शिल्पकला
कोरीव प्रतिमा असलेल्या प्राचीन शिल्पांनी सर्वसामान्यांत उत्सुकताठाणे : इतिहासाच्या पाऊलखुणा आजही जुन्या ठाण्याचे अस्तित्व दाखवून देत आहेत. शहर स्मार्ट सिटीच्या दिशेने वेगाने झेपावत असताना, अनेक वारशाच्या खुणा काळाच्या पडद्याआड जात आहेत. शहरीकरणाच्या ओघातच प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या पाडकामात पगडी घातलेल्या संताची कोरीव प्रतिमा असलेले प्राचीन दगड सापडल्याने ठाणेकरांमधली उत्सुकता प्रचंड वाढली आहे. पाडकामात प्राचीन संत, शिष्य व नर्तिका यांचे कोरीव दगड आढळले आहेत. नवीन आधुनिक मनोरुग्णालय उभारण्याच्या कामात अनेक जुन्या इमारती हटविण्यात येत आहेत. याच प्रक्रियेत अनेक वर्षे बंद अवस्थेत असलेल्या एका बंगल्याचे पाडकाम सुरू होते. त्या पाडकामादरम्यान हा सुंदर कोरीव कलेचा नमुना प्रकाशात आला आणि कामगारांपासून अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांच्या नजरा त्याच्यावर खिळल्या.सुमारे अडीज ते ३ फूट उंच आणि सव्वा ते दीड फूट रुंद असलेल्या या दगडावर अत्यंत सूक्ष्मतेने केलेली शिल्पकला दिसून येते. डोक्यावर पगडी घातलेले संत, त्यांच्या शेजारी उभा असलेला शिष्य आणि बाजूला उभी असलेली नर्तिका अशा तिन्ही प्रतिमा अतिशय प्राचीन कलाशैलीत साकारलेल्या आहेत. प्राथमिक अंदाजानुसार हा दगड भरपूर जुना असण्याची शक्यता आहे. या परिसराच्या इतिहासाशी संबंधित कोणतीही नोंद रुग्णालय प्रशासनाकडे उपलब्ध नसल्याने, या दगडाचा नेमका उगम, काळ आणि सांस्कृतिक संदर्भ जाणून घेण्यासाठी अभ्यास करण्याची मागणी जोर धरत आहे. ठाणेकरांच्या मते, अशा मौल्यवान कलावस्तू आजच्या विकासाच्या काळात सापडणे ही दुर्मीळ संधी असून, या ठेव्याचे तात्काळ जतन करणे अत्यावश्यक आहे. रुग्णालय परिसरात यापूर्वीही ब्रिटिशकालीन मुखवट्यांचे दगड बांधकाम पडताना दिसून आले. या जागेत अजूनही अनेक ऐतिहासिक अवशेष दडलेले असण्याची शक्यता अधिक बळावली आहे. शहराचा विकास आणि इतिहासाचा वारसा या दोन गोष्टींची सांगड घालून जुन्या वस्तुंचे जतन करावे अशी मागणी जोर धरते आहे.
प्रभात वृत्तसेवा सातारा – नगरपालिका अन् नगरपंचायतींच्या निवडणुका तसेच आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितींच्या निवडणुकांसाठी सुरभी भोसले यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या साथीने मतपेरणीसाठी सुरुवात केली आहे. त्यामुळे वाई मतदारसंघातील निवडणुकांमध्ये मोठी चुरस पहायला मिळणार आहे.मतदारसंघातील वाई, पाचगणी आणि महाबळेश्वर या पालिकांसाठी निवडणुका होत आहेत. त्यासाठी मंत्री मकरंद पाटील यांच्या गटाकडून सत्ता राखण्यासाठी जोरदार […] The post Satara Politics : वाईच्या राजकारणात नवा ट्विस्ट! मंत्री जयकुमार गोरेंच्या एन्ट्रीने मकरंद पाटील गटात खळबळ? appeared first on Dainik Prabhat .
दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, १८ नोव्हेंबर २०२५
पंचांगआज मिती कार्तिक कृष्ण त्रयोदशी शके १९४७, चंद्र नक्षत्र स्वाती योग आयुष्यमान, चंद्र राशी तूळ, भारतीय सौर २७ मार्गशीर्ष शके १९४७, मंगळवार, दि. १८ नोव्हेंबर २०२५. मुंबईचा सूर्योदय ६.४७, मुंबईचा सूर्यास्त ५.५९, मुंबईचा चंद्रोदय ५.५१, मुंबईचा चंद्रास्त ४.३३ पीएम, राहू काळ ३.११ ते ४.३५. शिवरात्री.दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)मेष : अचानक धनलाभ होऊ शकतो.वृषभ : प्रिय व्यक्तीच्या सहवासात दिवस घालवता येईल.मिथुन : आरोग्य उत्तम राहील.कर्क : महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावी.सिंह : नोकरीत उत्तम स्थिती राहील.कन्या : कुटुंबात सुवार्ता येतील गुरुकृपा लाभेल.तूळ : अडचणींवर यशस्वी मात कराल.वृश्चिक : कामे मार्गी लावण्यासाठी इतरांची मदत घ्यावी लागेल.धनू : कुटुंबासाठी खरेदी करू शकाल.मकर : बेरोजगारांना रोजगार मिळेल.कुंभ : काहींना प्रवासाचे योग येतील.मीन : आपली मते इतरांवर लादण्याचा प्रयत्न करू नका.
'महा-देवा’ उपक्रमाद्वारे ग्रामीण खेळाडूंचा आंतरराष्ट्रीय स्तरावर विकास
टायगर श्रॉफ पाच वर्षांसाठी ब्रँड अॅम्बेसेडरमुंबई (प्रतिनिधी): राज्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागातील फुटबॉल खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली क्षमता सिद्ध करण्यासाठी राज्य सरकारने ‘महा-देवा’ फुटबॉल प्रतिभा विकास उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमामुळे गावागावातील फुटबॉलपटूंना जागतिक व्यासपीठ उपलब्ध होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग, महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्रा) आणि बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ यांच्यात सामंजस्य कराराला स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या वेळी नाहर ग्रुपचे संस्थापक आणि अध्यक्ष सुखराज नाहर यांनी व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाउंडेशनला एक कोटी रुपयांचे अनुदान जाहीर केले.महत्त्वाकांक्षी ‘महा-देवा’ उपक्रमाला अधिक बळ मिळाले असून टायगर श्रॉफ यांनी पाच वर्षांसाठी या मोहिमेचे ब्रँड अॅम्बेसेडर होण्यास सहमती दर्शविली आहे. राज्यातील मुला-मुलींत असलेल्या फुटबॉल प्रतिभेची ओळख करून त्यांना तांत्रिक प्रशिक्षण, शिक्षण आणि परदेशातील संधी उपलब्ध करून देणे हा उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. डब्लूआयएफएच्या स्काऊटिंग नेटवर्कद्वारे ३० मुले आणि ३० मुलींची निवड करून त्यांना उच्च दर्जाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.या उपक्रमाशी जागतिक दर्जाचे फलंदाज लिओनेल मेस्सी जोडले जाण्याची प्रक्रियाही सुरू असल्याचे मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी यांनी सांगितले. त्यामुळे ‘महा-देवा’ला आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिष्ठा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.या कार्यक्रमाच्या प्रसारासाठी डिजिटल मोहीमा, जनजागृती कार्यक्रम आणि सार्वजनिक उपक्रम राबविले जाणार आहेत. सर्व प्रचार सामग्री टायगर श्रॉफ यांच्या मंजुरीनंतरच प्रसिद्ध केली जाईल, अशी माहिती बैठकीत देण्यात आली. या उपक्रमामुळे राज्यातील फुटबॉल संस्कृतीला नवी दिशा मिळेल आणि तरुण खेळाडूंना मोठ्या संधी, मार्गदर्शन आणि प्रेरणा मिळेल, असा आशावाद मुख्यमंत्री फडणवीस यांनीव्यक्तकेला.
मुंबईत CNGचा तुटवडा का निर्माण झाला, कधीपासून सुरळीत होणार पुरवठा? महत्त्वाची अपडेट आली समोर
मुंबई : मुंबईतील एका सीएनजी पाईपलाईनमध्ये बिघाड झाल्याने त्याचा इंधन पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. यामुळे मुंबईत सीएनजी पंपांवर ऑटोरिक्षा, टॅक्सी आणि इतर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. वडाळा येथील गॅस पुरवठा थांबल्यामुळे मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील काही सीएनजी स्टेशन बंद होते. यामुळे शहरातील लोकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. महानगर गॅस लिमिटेडने सांगितले […] The post मुंबईत CNGचा तुटवडा का निर्माण झाला, कधीपासून सुरळीत होणार पुरवठा? महत्त्वाची अपडेट आली समोर appeared first on Dainik Prabhat .
मुंबई : शेअर बाजारात गुंतवणूक करणार्या गुंतवणूकदारांची संख्या पुढील तीन ते पाच वर्षात दुप्पट करण्याचा मनोदय शेअर बाजार नियंत्रक सेबीचे तुहिनकांत पांडे यांनी व्यक्त केला. यासंदर्भात देशभरात सेबीने पाहणी केलेलेल्या नागरिकातील 20 टक्के नागरिकांनी आगामी काळात शेअर बाजारात कोणत्यातरी माध्यमातून गुंतवणूक करण्याचा मनोदय जाहीर केला आहे. सध्या भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करणार्या गुंतवणूकदारांची संख्या दहा […] The post शेअर बाजारात गुंतवणूक करणार्या गुंतवणूकदारांची संख्या दुप्पट करणार; सेबीचे तुहिनकांत पांडे यांनी व्यक्त केला मानस appeared first on Dainik Prabhat .
पुरुषांच्या ‘या’घाणेरड्या सवयी महिलांसाठी ठरतात घातक; कधी-कधी नातं तुटण्यापर्यंत वाढतात वाद !
Relationship । Lifestyle : भारतीय समाजात आजही विवाहाला आयुष्यभर टिकणारे, एक पवित्र नाते मानले जाते. मात्र आधुनिक काळात घटस्फोटाचे प्रमाण लक्षणीय वाढताना दिसते. यामागे विविध कारणे असू शकतात. अनेकदा नात्यातील गोष्टी वेळेवर आणि शांतपणे सोडविल्या जात नाहीत, त्यामुळे पती-पत्नी वेगळे होण्याचा निर्णय घेतात. काही लहान चुका नकळत घडतात आणि त्या नात्यात दरी निर्माण करतात, हे […] The post पुरुषांच्या ‘या’ घाणेरड्या सवयी महिलांसाठी ठरतात घातक; कधी-कधी नातं तुटण्यापर्यंत वाढतात वाद ! appeared first on Dainik Prabhat .
भारत अमेरिकेकडून 22 लाख टन एलपीजी खरेदी करणार
नवी दिल्ली : भारतातील तेल कंपन्यांनी अमेरिकेतील कंपन्यांबरोबर 2026 मध्ये 2.2 दशलक्ष टन एलपीजी खरेदी करण्याचा करार केला आहे. दोन्ही देश व्यापार संतुलित करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. या प्रयत्नांचा भाग म्हणून हा करार करण्यात आला आहे. भारत हा अमेरिकेला निर्यात जास्त व आयात कमी करतो असा आरोप अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेला आहे आणि […] The post भारत अमेरिकेकडून 22 लाख टन एलपीजी खरेदी करणार appeared first on Dainik Prabhat .
लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी प्रक्रियेस ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदतवाढ
मुंबई - मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील महिलांची ई-केवायसी प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर सुरू असताना, अलिकडे काही जिल्ह्यांमध्ये उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्ती, महिलांनी उपस्थित केलेल्या अडचणी लक्षात घेता. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली ई-केवायसी करण्याची दिनांक १८ नोव्हेंबर २०२५ पर्यंत निर्धारित अंतिम मुदत वाढवून आता ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत करण्याचा निर्णय शासनाने घेतल्याची माहिती राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.अलीकडील नैसर्गिक आपत्तीमध्ये अनेक कुटुंबांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच काही महिलांच्या पती किंवा वडिलांचे निधन झाल्यामुळे संबंधित आधार क्रमांकावर ओटीपी प्राप्त होणे अशक्य झाले आहे. अशा परिस्थितीत अपूर्ण ई-केवायसी प्रक्रियेस मुदतवाढ देणे आवश्यक आहे.तसेच, ज्या पात्र महिलांच्या पती किंवा वडील हयात नाहीत किंवा ज्या महिला घटस्फोटित आहेत अशांनी स्वतःची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून संबंधित मृत्यू प्रमाणपत्र, घटस्फोट प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयाचा आदेश यांची सत्यप्रत सादर करणे आवश्यक राहील.
रायगड जिल्ह्यात नगरसेवक पदांसाठी ९०० उमेदवारी अर्ज
अलिबाग (प्रतिनिधी) : रायगड जिल्ह्यातील दहा नगर परिषदांच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सोमवारी (१७) रोजी शेवटच्या दिवसापर्यंत नगरसेवक पदांसाठी एकुण ९०० उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. नगराध्यक्ष पदासाठी ५९ उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली.खोपोलीत ३१ जागांसाठी नगरसेवक पदासाठी १८८, नगराध्यक्ष पदासाठी सात अर्ज,अलिबागमध्ये २० जागांसाठी नगरसेवक पदासाठी ७५, नगराध्यक्ष पदासाठी सहा अर्ज,श्रीवर्धनमध्ये २० जागांसाठी नगरसेवक पदासाठी ६८ व नगराध्यक्ष पदासाठी पाच अर्ज,मुरुड-जंजिरामध्ये २० जागांसाठी नगरसेवक पदासाठी ७४ अर्ज, नगराध्यक्ष पदासाठी पाच अर्ज,रोह्यामध्ये २० जागांसाठी नगरसेवक पदासाठी ७८ अर्ज, नगराध्यक्ष पदासाठी तीन अर्ज,महाडमध्ये २० जागांसाठी नगरसेवक पदासाठी ७४, नगराध्यक्ष पदासाठी सात अर्ज.पेणमध्ये २४ जागांसाठी नगरसेवक पदासाठी १०३, नगराध्यक्ष पदासाठी पाच अर्ज.उरणमध्ये २१ जागांसाठी नगरसेवक पदासाठी ७८, नगराध्यक्ष पदासाठी नऊ अर्ज.कर्जतमध्ये २१ जागांसाठी नगरसेवक पदासाठी ९२, नगराध्यक्ष पदासाठी आठ अर्ज.माथेरानमध्ये २० जागांसाठी नगरसेवक पदासाठी ७०, नगराध्यक्ष पदासाठी चार अर्ज दाखल झाले आहेत.
सिंहगड कॉलेज कॅम्पसमधील हुक्का पार्लरवर पोलिसांची धाड; तीन जणांवर गुन्हा दाखल
पुणे : भारती विद्यापीठ पोलिसांनी सिंहगड कॉलेज कॅम्पसमधील पायगुडे इमारतीतील एका फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या अवैध हुक्का पार्लरवर कारवाई करत तिघांना अटक केली. ही कारवाई १५ नोव्हेंबर २०२५ रोजी गोपनीय माहितीच्या आधारे करण्यात आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सहायक पोलिस निरीक्षक गणेश मोहीते, पोलिस उपनिरीक्षक निलेश मोकाशी व अंमलदार पेट्रोलिंगला असताना त्यांना कॅम्पस परिसरात अवैध हुक्का पुरवला […] The post सिंहगड कॉलेज कॅम्पसमधील हुक्का पार्लरवर पोलिसांची धाड; तीन जणांवर गुन्हा दाखल appeared first on Dainik Prabhat .
अमेरिकेशी कराराच्या शक्यतेमुळे शेअर बाजारात खरेदी; सलग सहाव्या दिवशी निर्देशांक वाढले
मुंबई : भारताची स्थूल अर्थव्यवस्था बळकट असण्याबरोबरच दुसर्या तिमाहीतील कंपन्यांचे ताळेबंद चांगलेच नफादायक आहेत. त्यातच भारत -अमेरिका व्यापार करार लवकरच होण्यासंदर्भात अनेक सकारात्मक घडामोडी घडत आहेत. त्यामुळे गेल्या आठवड्यापासून शेअर बाजारात खरेदीचे वातावरण आहे. परिणामी सलग सहाव्या दिवशी शेअर बाजार निर्देशांक वाढण्यास मदत झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 388 अंकांनी वाढून 84,950 अंकावर बंद […] The post अमेरिकेशी कराराच्या शक्यतेमुळे शेअर बाजारात खरेदी; सलग सहाव्या दिवशी निर्देशांक वाढले appeared first on Dainik Prabhat .
दिल्ली टू श्रीनगर…’टेरर’फैक्टर ! जसीर बिलालला श्रीनगरमधून अटक; हल्ल्याच्या नियोजनात सक्रिय सहभाग
Delhi Red Fort News – दिल्ली येथे झालेल्या स्फोट प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेला (एनआयए) अजून एक यश मिळाले असून आत्मघातकी बॉम्बर डॉ. उमरच्या एका सहकाऱ्याला श्रीनगरमधून अटक करण्यात आली आहे. जसीर बिलाल वाणी उर्फ दानिश असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून तो काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील काझीगुंड भागातील रहिवासी आहे. एनआयएच्या तपासामध्ये धक्कादायक खुलासे समोर आले […] The post दिल्ली टू श्रीनगर…’टेरर’ फैक्टर ! जसीर बिलालला श्रीनगरमधून अटक; हल्ल्याच्या नियोजनात सक्रिय सहभाग appeared first on Dainik Prabhat .
कुठे काका विरुद्ध पुतण्या, तर कुठे दादा, भावजयी रणांगणात
नगर परिषद निवडणुकीत ‘घर घर की कहानी’ गाजणारमुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्याने सगळीकडे लगबग सुरू आहे. सोमवारी २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींसाठी अर्ज भरण्यासाठी शेवटची तारीख होती. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. बऱ्याच ठिकाणी एकाच घरातील उमेदवार आमने-सामने आले आहेत. काही ठिकाणी काका-पुतणे तर काही ठिकाणी सख्या जावांनी एकमेकींच्या विरोधात अर्ज भरले आहेत.अखेरच्या दिवशी सिंधुदुर्गात इच्छुकांची धावपळसिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, मालवण, वेंगुर्ले नगरपरिषद तर कणकवली नगरपंचायतीची निवडणूक रणधूमाळी आता ऐन रंगात आली आहे. सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी सर्वच इच्छूकांची धावपळ उडाली होती. वेंगुर्ले नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटच्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी ३ तर नगरसेवक पदासाठी २२ उमेदवारी अर्ज दाखल झाले. शेवटच्या दिवसापर्यंत थेट नगराध्यक्ष पदासाठी एकूण ८ तर २० नगरसेवक पदासाठी ११३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. सावंतवाडी नगरपरिषदेत नगराध्यक्ष पदाकरिता ११ आणि नगरसेवक पदाकरिता ११४ असे मिळून एकूण १२५ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. मालवण नगरपरिषदेतील नगराध्यक्षपदासाठी ६ तर नगरसेवक पदासाठी ७६ जणांनी अर्ज दाखल केले आहेत. कणकवली नगरपंचायत निवडणूकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर १७ नगरसेवक पदासाठी एकूण ५६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.शिराळा येथे काका विरुद्ध पुतणे लढतसांगलीतील शिराळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष निवडणुकीत काका विरुद्ध पुतणे अशी थेट लढत होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी आमदार मानसिंगराव नाईक आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी आमदार शिवाजीराव नाईक यांनी युती केली आहे. राष्ट्रवादीच्या या युतीकडून शिराळा नगराध्यक्षाचे उमेदवार म्हणून अभिजीत विजयसिंह नाईक यांनी अर्ज दाखल केला आहे. भाजप आमदार सत्यजित देशमुख, भाजप जिल्हा अध्यक्ष सम्राट महाडिक व शिवसेनेकडून नगराध्यक्ष पदासाठी पृथ्वीसिंग भगतसिंग नाईक यांना उमेदवारी मिळाली असून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे आता शिराळ्यात काका अभिजीत विजयसिंह नाईक विरूद्ध पुतण्या पृथ्वीसिंग भगतसिंग नाईक अशी लढत पहायला मिळणार आहे.संगमनेरमध्ये आमदारांची प्रतिष्ठा पणालासंगमनेर नगरपालिकेतही अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांच्या पत्नी मैथिली तांबे यांनी नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महायुतीचे आमदार अमोल खताळ यांच्या भावजयी सुवर्णा खताळ यांनी महायुतीच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या निवडणुकीत आमदार सत्यजित तांबे आणि आमदार अमोल खताळ यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.रायगडच्या उरणमध्ये मनसे महाविकास आघाडीतउरण नगरपालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि मनसेची युती झाली आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्ष, ठाकरेंची सेना, काँग्रेस आणि मनसेची उरण नगरपालिकेसाठी आघाडी झाली आहे. प्रचाराच्या पोस्टरवर महाविकास आघाडीच्या नेत्यासोबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचाही फोटो आहे. एकट्या भाजप विरुद्ध महाविकास आघाडी आणि मनसे उरण नगरपालिकेच्या मैदानात उतरली आहे. उरण नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी महायुतीतील घटक पक्षाला सोबत न घेता भाजप स्वतंत्र लढणार आहे. महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीच्या भावना घाणेकर नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढणार आहेत.कागलमध्ये कट्टर विरोधक एकत्रराष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे समरजित घाटगे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री हसन मुश्रीफ कट्टर विरोधक कागल नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी एकत्र आल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत टोकाचा संघर्ष केलेल्या या दोन नेत्यांमध्ये समेट घडविण्यात भाजपाच्या राज्यातील प्रमुख नेत्यांने पुढाकार घेतला आहे. त्यामुळे समरजित घाटगे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून निवडणूक न लढता राजर्षी शाहू आघाडी मार्फत निवडणूक लढवणार आहेत. नगराध्यक्ष पदासाठी एकूण २८ तर नगरसेवक पदासाठी २१४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले.
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभव तरी इंडिया WTC Final मध्ये पोहोचणार; काय आहे समीकरण?
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला. या पराभवाचा फटका टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट्स टेबलमध्ये बसला. या पराभवानंतर टीम इंडियाची पॉईंट्स टेबलमध्ये चौथ्या स्थानी घसरण झाली. त्यामुळे टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचणार का? याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. भारताने या सत्रात आतापर्यंत 8 मॅच खेळल्या आहेत, ज्यात त्यांनी 4 मॅच जिंकल्या असून 3 मॅच […] The post IND vs SA : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभव तरी इंडिया WTC Final मध्ये पोहोचणार; काय आहे समीकरण? appeared first on Dainik Prabhat .
मोठी बातमी..! लाडकी बहीण योजनेच्या e-KYC ला मुदतवाढ, ‘या’तारखेपर्यंत करता येणार ई केवायसी
मुंबई : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या ज्या महिलांचे ई केवायसी अद्याप झालेले नाही त्यांच्यासाठी आता महत्त्वाची बातमी आहे. या योजनेच्या ई केवायसी प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे. या आधी 18 नोव्हेंबर पर्यंत ई केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले होते. आता त्यासाठी 31 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती महिला आणि बालविकास […] The post मोठी बातमी..! लाडकी बहीण योजनेच्या e-KYC ला मुदतवाढ, ‘या’ तारखेपर्यंत करता येणार ई केवायसी appeared first on Dainik Prabhat .
भारत-चीन संबंधांमध्ये सकारात्मक बदल; लष्करप्रमुखांनी दिली महत्वाची माहिती
नवी दिल्ली : भारत-चीन सीमावर्ती तणावाबाबत गेले काही महिने सकारात्मक घडामोडी घडत असल्याचे लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी स्पष्ट केले. दोन्ही देशांतील राजकीय आणि लष्करी स्तरावरील संवाद वाढल्यामुळे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील परिस्थितीत हळूहळू सुधारणा जाणवत आहे.मागील एका वर्षात पूर्व लडाखमधील एलएसीवर वातावरणात मोठा सकारात्मक बदल दिसून आला आहे. ऑक्टोबर २०२४ पासून भारत-चीनमधील व्यापक राजकीय चर्चांमुळे परस्पर समन्वय अधिक प्रभावी झाला आहे. “जेव्हा राजकीय मार्गदर्शन स्पष्ट असते, तेव्हा त्याचा फायदा सैन्यदलांनाही होतो,” असे जनरल द्विवेदी यांनी सांगितले.मागील वर्षभरात सीमारेषेवर १,१०० बैठकांचे आयोजन झाले, म्हणजे जवळजवळ रोज तीन बैठका. पूर्वी चर्चा फक्त कॉर्प्स कमांडर स्तरावर होत असत, परंतु आता संवादाचा स्तर खाली आणून बटालियन आणि कंपनी कमांडरपर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यामुळे अनेक तांत्रिक किंवा क्षेत्रीय प्रश्न स्थानिक स्तरावरच सुटतात आणि वरीष्ठ पातळीवर पोहोचण्याची गरज पडत नाही, असेही जनरल द्विवेदी यांनी सांगितले.जरी महत्त्वपूर्ण निर्णय उच्चस्तरीय बैठकीतच घेतले जातात, तरीही स्थानिक अधिकाऱ्यांच्या संवादामुळे दोन्ही बाजूंमध्ये अधिक लवचिकता निर्माण झाली आहे. चीनला जर कोणतेही बांधकाम करायचे असेल तर ते आगाऊ कळवतात. भारतीय बाजूकडून हरकत नोंदवल्यास ते बांधकाम तत्काळ थांबवतात किंवा हटवतात. “सीमेवर परस्पर सहकार्य समाधानकारक स्तरावर आहे,” असे जनरल द्विवेदी म्हणाले.मणिपूरमध्ये पुन्हा स्थैर्य परत येत असल्याचे जनरल द्विवेदी यांनी सांगितले. लोकांचा आत्मविश्वास वाढताना दिसत असल्याने, आगामी काही दिवसांत सर्व काही सुरळीत राहिले तर राष्ट्रपती मणिपूरचा दौरा करण्याची शक्यता आहे. समुदायांमध्ये संवाद वाढला तर बदल आणखी गतीने घडेल, असेही जनरल द्विवेदी म्हणाले.शेजारी राष्ट्रांमधील अस्थिरतेचा भारतावर परिणाम होतो. म्यानमारमधून आलेल्या निर्वासितांची भारत काळजी घेत आहे आणि त्यांनी स्वेच्छेने आपल्या देशात परतावे अशी अपेक्षा आहे. परंतु दहशतवादी गटांनी अनियंत्रित भूभागाचा वापर भारताविरुद्ध करण्याचा प्रयत्न केल्यास ते कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाही, आणि त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असे जनरल द्विवेदी यांनी ठामपणे सांगितले.
अनगरमध्ये भाजपचा एकहाती विजय! १७ पैकी १७ उमेदवार बिनविरोध निवडून
अनगर : मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायतीमध्ये स्थानिक राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळाली आहे. भाजपने सर्व १७ नगरसेवक पदे बिनविरोध जिंकत प्रभावी ताकद दाखवली; परंतु नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत अनपेक्षित वळण आल्याने या परिसरातील राजकीय समीकरणे पुन्हा बदलली आहेत.सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायतीत भाजपच्या १७ पैकी १७ उमेदवारांनी कोणतीही स्पर्धा नसताना विजय मिळवला असून अधिकृत घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी लवकरच करणार आहेत. या विजयानंतर भाजप नेते राजन पाटील यांच्या समर्थकांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर मोठा जल्लोष केला.नगराध्यक्षपदासाठी मात्र थेट सामना रंगणार आहे. भाजपच्या प्राजक्ता पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उज्वला थिटे यांनी या पदासाठी अर्ज केले आहे. त्यामुळे अनगरसोबतच सोलापूर जिल्ह्यात या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.राज्यातील २४६ नगरपरिषद आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी मतदान २ डिसेंबर रोजी पार पडणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील ११ नगरपरिषद आणि १ नगरपंचायतीतही याच दिवशी मतदान होईल. मतमोजणी दुसऱ्या दिवशी, म्हणजे ३ डिसेंबर रोजी होणार असून निकाल जाहीर होतील.अनगर नगरपंचायतीचा आज अंतिम निकाल स्पष्ट झाला. दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत होती; मात्र इतर कोणत्याही पक्षाचा किंवा अपक्षाचा उमेदवार पुढे न आल्याने भाजपचे सर्व १७ उमेदवार निवडून आले. हे सर्व उमेदवार राजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुकीच्या मैदानात उतरले होते.नगराध्यक्ष पदही बिनविरोध व्हावे, अशी भाजपची इच्छा होती. राजन पाटील यांनी यासाठी सर्व तयारीही केली होती. पण शेवटच्या क्षणी समीकरणे बदलली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उज्वला थिटे यांनी पहाटेच नगरपंचायत कार्यालयात जाऊन आपले नामांकन दाखल केले. त्यामुळे भाजपचा नगराध्यक्ष बिनविरोध निवडून आणण्याचा डाव फसला असून आता दोन्ही पक्षांमध्ये थेट लढत होणार आहे.
मिठी मारण्याचा बिझनेस! फक्त ५ मिनिटांसाठी ६०० रुपये!
चीनच्या मोठ्या शहरांमध्ये सध्या एक नवीन आणि वेगळा सोशल ट्रेंड खूप चर्चेत आहे. त्याचे नाव आहे 'मॅन मम'. या ट्रेंडमध्ये फिट आणि तरुण पुरुष महिलांना पैसे घेऊन मिठी देतात. ही मिठी फक्त काही वेळेसाठी असते आणि ती गैर-रोमँटिक असते. ही सेवा सुरक्षित आणि मर्यादित वेळेची असते. एका 'हग' सेशनसाठी २० ते ५० युआन (म्हणजे साधारणपणे २५० ते ६०० रूपये घेतले जातात. सोशल मीडियावर या ट्रेंडची खूप चर्चा आहे आणि दररोज शेकडो पोस्ट व्हायरल होत आहेत.एका चिनी कॉलेज विद्यार्थिनीने सोशल मीडियावर लिहिले की, ती तणावामुळे खूप थकून गेली होती. त्यावेळी तिने एका मित्राला मिठी मारली आणि तिला खूप आराम वाटला. तिने आपला हा अनुभव ऑनलाइन शेअर केला आणि आश्चर्य म्हणजे तिच्या पोस्टवर १ लाखांहून अधिक कमेंट्स आल्या. लोकांनी लगेच 'हग थेरपी' बद्दल बोलणे सुरू केले. काही आठवड्यांतच ही कल्पना चॅट ग्रुप्समधून बाहेर पडून पैशांनी मिळणारी सेवा बनली आणि तिची लोकप्रियता वाढली.५ मिनिटांची मिठी, खर्च ₹६००!'मॅन मम' ला चॅट ॲप्सद्वारे बुक केले जाते. ५ मिनिटांच्या सेशनसाठी २० ते ५० युआन लागतात. या भेटी सहसा सार्वजनिक ठिकाणी होतात, जसे की पार्क, मेट्रो स्टेशन किंवा शॉपिंग मॉल. काही पुरुष तर '५ मिनिटांसाठी ५० युआन' असे बोर्ड घेऊन रस्त्यावर उभे राहिलेले दिसतात. यामुळे हे स्पष्ट होते की ही सेवा आता एका लहान-मोठ्या व्यवसायात बदलली आहे.चीनमधील महिला सांगतात की, जास्त काम, थकवा, एकटेपणा आणि सततचा तणाव यामुळे त्या त्रस्त असतात. अशा वेळी काही मिनिटांची मिठी त्यांना हलके आणि तणावमुक्त वाटण्यास मदत करते. या अनुभवामुळेच या सेवेची मागणी वाढत आहे. एका महिलेने सांगितले की, तीन तास जास्त काम केल्यानंतर मिळालेली मिठी तिच्यासाठी तणाव अचानक कमी करणारी होती. हे सेशन पूर्णपणे भावनिक आणि सुरक्षित असल्याने महिलांचा यावर विश्वास बसला आहे.तज्ञ काय सांगतात?तज्ञांच्या मते, हा ट्रेंड चीनच्या तरुणांमधील वाढता एकटेपणा, नोकरीची अनिश्चितता, जास्त राहण्याचा खर्च आणि अभ्यासाचा तणाव यांसारख्या गंभीर समस्या दर्शवतो. ऑनलाइन जगात हजारो मित्र असूनही लोक वास्तविक जीवनात खूप एकटे पडले आहेत. त्यामुळेच 'मॅन मम' सारखे ट्रेंड येत आहेत.
Donald Trump : “रशियाशी व्यवसाय करणाऱ्या देशावर निर्बंध घालणार”; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
Donald Trump – रशियाबरोबर कोणताही व्यवसाय करणाऱ्या देशावर कठोर निर्बंध घालण्यात येतील, असा गंभीर इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. रशियावर आणखी कठोर निर्बंध घालण्यासाठी रिपब्लिकन सदस्यांकडून ट्रम्प प्रशासनावर मोठा दबाव आणला जाऊ लागला आहे. रशिया आणि व्लादिमीर पुतीन यांच्यावर अमेरिकेच्या संसदेकडून निर्बंध घालण्याची वेळ आली आहे का? असे पत्रकारांनी विचारले असता अशी […] The post Donald Trump : “रशियाशी व्यवसाय करणाऱ्या देशावर निर्बंध घालणार”; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा appeared first on Dainik Prabhat .
'भाजप काँग्रेसचा सर्वाधिक आमदारांचा विक्रम मोडणार'
नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशानंतर, देशभरात भाजपच्या आमदारांची संख्या वाढली आहे. भाजपला मिळालेल्या आमदारांची ही आतापर्यंतची मोठी संख्या आहे. देशभरातील विविध राज्यांमध्ये विधानसभेच्या जागा जिंकून भाजपने आपले स्थान सातत्याने मजबूत केले आहे. पक्षाचे नेते अमित मालवीय यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर शेअर केलेल्या पोस्टमध्ये भाजपच्या चढत्या आलेखाबद्दल माहिती दिली. पुढील दोन वर्षांत भाजपच्या देशभरातील आमदारांची एकूण संख्या १८०० च्या पुढे जाण्याची शक्यता आहे, असा विश्वास अमित मालवीय यांनी व्यक्त केला.देशात इंदिरा गांधींची लाट होती त्या काळात १९८५ मध्ये काँग्रेसने २०१८ आमदारांचा टप्पा गाठला होता. ही देशातल्या काँग्रेस आमदारांची सर्वोच्च संख्या होती. हा विक्रम एक दिवस भारतीय जनता पार्टी नक्की मोडीत काढेल, असाही विश्वास अमित मालवीय यांनी व्यक्त केला.BJP is now at its highest-ever strength in State Assemblies and the momentum is only growing.At this pace, the BJP will comfortably cross the 1800-seat mark in the next two years.For comparison, Congress touched its peak of around 2018 seats in 1985, riding on a massive… pic.twitter.com/6huvSTJc95— Amit Malviya (@amitmalviya) November 17, 2025
बारामती नगर परिषदेसाठी राष्ट्रवादीकडून जुन्या नव्यांचा ताळमेळ; तरुण चेहऱ्यांना संधी
बारामती : बारामती नगर परिषदेची निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून नगराध्यक्ष तसेच नगरसेवक पदासाठी कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आज अखेर शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. सर्व समावेशक उमेदवार देत जुन्या नव्यांचा ताळमेळ उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी साधला आहे. यंदाच्या निवडणुकीत तरुण चेहऱ्यांना मोठ्या प्रमाणात संधी देण्यात […] The post बारामती नगर परिषदेसाठी राष्ट्रवादीकडून जुन्या नव्यांचा ताळमेळ; तरुण चेहऱ्यांना संधी appeared first on Dainik Prabhat .
Pune Gramin : शरदवाडीच्या सरपंचपदी पुष्पा गांजे बिनविरोध
जांबुत : जांबुत (ता. शिरूर) ग्रामपंचायत मधून विभाजन झालेल्या शरदवाडी ग्रामपंचायतच्या सरपंचपदी पुष्पा गांजे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीबद्दल परिसरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. आधीच्या काळात निवडून आलेल्या सरपंच हरिभाऊ सरोदे यांनी आपला राजीनामा सादर केल्यानंतर शुक्रवार (दि. १४) रोजी पार पडलेल्या निवड प्रक्रियेसाठी पुष्पा गांजे यांचा एकमेव नामनिर्देशन अर्ज आला होता. […] The post Pune Gramin : शरदवाडीच्या सरपंचपदी पुष्पा गांजे बिनविरोध appeared first on Dainik Prabhat .
पुणे : स्वतःचे एक सुंदर, आलिशान घर असावे हे प्रत्येकाचेच स्वप्न असते. आता हेच स्वप्न सत्यात उतरले आहे. सुवर्ण खरेदीच्या परंपरेला पुढे चालवण्यासाठी गेल्या 200 वर्षापासून शुद्धतेचा वारसा जपणारे चंदुकाका सराफ ज्वेल्स नेहमी आपल्यासाठी आकर्षक ऑफर्स घेऊन येतात. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर आयोजित केलेल्या ‘ग्रँड फेस्टिव्ह ऑफर’ सह 2 BHK फ्लॅट जिंकण्याची सुवर्णसंधी यावेळी ग्राहकांना देण्यात आली […] The post ‘चंदुकाका सराफ ज्वेल्सतर्फे’ 2 BHK फ्लॅट मेगा ड्रॉचा भाग्यवान विजेता जाहीर; सांगलीच्या नूतन माने ठरल्या विजेत्या ! appeared first on Dainik Prabhat .
Tejashwi Yadav : तेजस्वी यादव यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड; आरजेडीच्या बैठकीत मोठा निर्णय
बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला मोठ्या प्रमाणात यश मिळाले. मुख्यमंत्री नीतीश कुमार दहाव्या टर्मसाठी शपथ घेतील, तर भाजपने प्रथमच बिहार कक्षेत सर्वाधिक ८९+ जागा मिळवल्या. दुसरीकडे, राष्ट्रीय जनता दल (आरजेडी)-नेतृत्वाखालील महागठबंधन (आरजेडी-काँग्रेस-लेफ्ट) ला केवळ ३५ जागांपुरते मर्यादित राहावे लागले. हा त्यांचा २०१० नंतरचा सर्वात मोठा पराभव आहे. आरजेडीला फक्त ३२ जागा मिळाल्या, तर काँग्रेसला ४ आणि […] The post Tejashwi Yadav : तेजस्वी यादव यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड; आरजेडीच्या बैठकीत मोठा निर्णय appeared first on Dainik Prabhat .
‘भारताने तात्काळ शेख हसीना यांना बंगालादेशच्या स्वाधीन करावे’; युनूस सरकारने पुन्हा केली मागणी
Sheikh Hasina | Bangladesh – भारत सरकारने बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना आणि तत्कालिन गृहमंत्री असदुझ्झमान खान कमाल यांना त्ताकाळ बंगालादेशच्या स्वाधीन करावे, अशी मागणी बांगलादेशातील हंगामी सरकारने केली आहे. विशेष न्यायाधिकरणाने या दोघांना फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर लगेचच युनूस यांच्या सरकारने ही मागणी केली आहे. भारताने तात्काळ या दोन्ही दोषींना बांगलादेशच्या स्वाधीन करावे, असे परराष्ट्र […] The post ‘भारताने तात्काळ शेख हसीना यांना बंगालादेशच्या स्वाधीन करावे’; युनूस सरकारने पुन्हा केली मागणी appeared first on Dainik Prabhat .
पुणेकरांनो लक्ष द्या..! अर्ध्याहून अधिक शहरात गुरूवारी पाणी बंद
पुणे : महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून पर्वती, वडगाव, लष्कर, वारजे आणि संबंधित पंपिंग स्टेशनांमध्ये येत्या गुरूवारी ( दि. २०) रोजी दिवसभर विद्युत, पंपिंग, फ्लोमीटर बसविणे, बटरफ्लाय वॉल्व्ह तपासणी, कोअर कटिंग व इतर तातडीच्या देखभाल-दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. या कामांमुळे खडकवासला धरणातून शहरात येणारा संपूर्ण पाणीपुरवठा गुरुवारी सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत पूर्णपणे बंद […] The post पुणेकरांनो लक्ष द्या..! अर्ध्याहून अधिक शहरात गुरूवारी पाणी बंद appeared first on Dainik Prabhat .
Pune Crime News : भरदिवसा थरकाप उडवणारा खून; तरुणाला कोयत्याने मारहाण करून दगडाने ठेचलं अन्...
पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून, येथील कायदा आणि सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शहरात एकापाठोपाठ एक अनेक हत्याकांड घडले आहेत, ज्यात काही ठिकाणी भरदिवसा खून झाल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. या सर्व हत्यासत्रामुळे पुणे शहरातील कायदा आणि सुव्यवस्था रसातळाला गेल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून आणि नागरिकांकडून केला जात आहे. या गंभीर परिस्थितीत, आता पुण्यात आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील सिंहगड कॉलेज (Sinhagad College) परिसरात भरदिवसा एका व्यक्तीची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घडल्या प्रकाराची माहिती मिळताच पोलीस यंत्रणा तात्काळ घटनास्थळी दाखल झाली आहे आणि या प्रकरणाचा अधिक तपास सुरू करण्यात आला आहे. मात्र, शहरात दिवसाढवळ्या घडणाऱ्या या हत्यांकांडामुळे पोलीस यंत्रणा नेमके काय करत आहे? आणि कायद्याचा धाक राहिलेला नाही, असा दावा नागरिक उघडपणे करत आहेत. या ताज्या हत्याकांडामुळे पुणे शहरात सध्या तणावाची स्थिती निर्माण झाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.https://prahaar.in/2025/11/17/while-hasina-was-sentenced-to-death-here-people-took-to-the-streets-in-dhaka-watch-the-video/नेमकं प्रकरण काय?पुणे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी एक अत्यंत धक्कादायक आणि क्रूर घटना सिंहगड कॉलेज परिसरात समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कॉलेज परिसरातील एका इमारतीजवळ २० वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेतील क्रौर्याची परिसीमा गाठणाऱ्या तपशीलानुसार, हल्लेखोरांनी सर्वप्रथम या तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केला. त्यानंतर, त्यांनी दगडाने ठेचून त्याचा खून केल्याचे समोर आले आहे. भरदिवसा झालेल्या या भयंकर हत्याकांडामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीती आणि तणावाचे वातावरण आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस यंत्रणेने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला आहे. फॉरेन्सिक टीमही तात्काळ घटनास्थळी दाखल झाली असून, हत्येच्या ठिकाणाहून सर्व महत्त्वाचे पुरावे गोळा करण्यात आले आहेत. पोलिसांनी सध्या या प्रकरणातील आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास पथके तयार केली असून, लवकरच आरोपींना पकडण्यात यश येईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.मृत आणि आरोपींवरही गंभीर गुन्हे दाखलपुण्यातील सिंहगड कॉलेज परिसरातील कृष्णकुंज सोसायटीमध्ये घडलेल्या तरुणाच्या निर्घृण हत्याकांडाबाबत पुणे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी अधिकृत माहिती दिली आहे. या माहितीनुसार, खून झालेल्या तरुणाचे नाव तौफीर शेख आहे. पोलिसांनी दिलेल्या तपशीलानुसार, तौफीर शेख याला पाच व्यक्तींनी एकत्र येऊन अगोदर जबर मारहाण केली आणि त्यानंतर त्याला दगडाने ठेचून ठार मारण्यात आले. या घटनेतील काही आरोपी अल्पवयीन (Juvenile) असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात धक्कादायक माहिती उघड झाली आहे की, हल्ल्यातील काही आरोपींनी याआधीही गुन्हे केल्याच्या तक्रारी पोलिसांकडे आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, खून झालेल्या तौफीर शेख याच्याविरोधातही एकूण चार गंभीर गुन्हे दाखल आहेत. विशेषतः, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात मृत तरुणाविरोधात खुनाचा गुन्हा दाखल झालेला आहे. या पार्श्वभूमीवर, पोलीस तपासामध्ये एक मोठी शंका उपस्थित केली जात आहे: तौफीर शेख याचा काटा 'बदला' (Revenge) म्हणून तर काढण्यात आलेला नाही ना? पोलीस सध्या याच दिशेने अधिक तपास करत आहेत, जेणेकरून या टोळीयुद्धासारख्या घटनेमागील नेमके कारण उघड होईल.
नागपुरात शिवसेना स्वबळावर लढणार, भाजपचे सूचक मौन!
नागपूर : नेत्यांच्या निवडणुकीत कार्यकत्यांनी जीवाचे रान केल्यानंतर आता कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडल्याची नाराजी अनेक जण व्यक्त करत आहे. सोमवार, १७ नोव्हेंबर हा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता .इच्छुक उमेदवारांना चर्चेत गुंतवून शेवटपर्यंत रस्सीखेच करून अखेर जिल्ह्यात जवळपास महायुती तुटली आणि मविआघाडीत बिघाडी झाली. महायुतीत शिवसेनेने सर्व नगराध्यक्ष व नगरसेवक पदाचे उमेदवार घोषित केले. भाजपकडून संबंधितांना तशा सूचना दिल्या गेल्या. राष्ट्रवादी अजित पवार गटाचा अपेक्षाभंग झाला. राष्ट्रवादीने शेवट पर्यंत प्रतीक्षा केली. ठाकरे गटाला कुठेही स्कोप मिळाला नाही. परिणामी, आता सर्वच पक्ष एकमेकांविरुद्ध निवडणुकीच्या रिंगणात उभे ठाकले आहेत, असे चित्र जवळजवळ स्पष्ट आहे.नेत्यांच्या निवडणुकीत कार्यकत्यांनी जीवाचे रान केल्यानंतर आता कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडल्याची नाराजी अनेक जण करत आहेत. सोमवार, १७ नोव्हेंबर हा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता फार फार तर नगराध्यक्षपदाचे उमेदवार अधिकृत होतील. नगरसेवकाबद्दल अद्यापही साशंकताच आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत विजय मिळावा, यासाठी मताचे एकत्रित समीकरण करून बड्या नेत्यांनी त्यांची राजकीय जमीन सुपीक केली. आता कार्यकर्त्यांची वेळ आल्यानंतर तुम्ही तुमचे पाहून घ्या, आम्ही कायम तुमच्या सोबत आहोत, अशी भूमिका घेत सर्वच राजकीय पक्षांनी शेवटपर्यंत कार्यकर्त्यांना रखडवत ठेवल्याचे दिसून येत आहे. त्यातही अनेक पक्षांनी आपलीच हवा असल्याचा दावा करीत नेत्यांच्याही पुढे २ पावले टाकून विजय पक्का! असे चित्र निर्माण केल, त्यामुळे आता सर्वच नेते हतबल दिसत आहे.भारतीय जनता पक्षभाजपचे जिल्हाध्यक्ष आनंदराव राऊत यांच्याशी अनेकदा संपर्क करण्यात आला. महायुतीबाबत काय, यावर त्यांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र, सातत्याने संपर्कानंतरही त्यांनी प्रतिसाद दिला नाही.शिवसेनाआमचे सर्व उमेदवार ठरले आहेत. २७ नगराध्यक्षपदाचे तसेच नगरसेवकपदांचे उमेदवारही तयार आहेत. संबंधितांना एबी फॉर्मही दिले. पक्षनेतृत्वाला याची माहिती दिली, यादीतील उमेदवारांची नावे सोमवारी जाहीर करू.-आ. कृपाल तुमाने, संपर्कप्रमुख, रामटेक लोकसभाराष्ट्रवादी काँग्रेसमहायुतीसाठी प्रयत्न केले, चर्चाही केली. मौद्यात शिवसेना शिंदे गटासोबत काही जागांवर निर्णय झाला आहे. भाजपकडून प्रतिसाद मिळत नाही. चर्चा सुरूच आहे. परंतु इच्छुकांचा आग्रह वाढला आहे.-डॉ. राजाभाऊ टांकसाळे, जिल्हाध्यक्ष, राकाँ अजित पवार गटशिवसेना उबाठा८८ महाविकास आघाडीबाबत चर्चा सुरू आहे. जागावाटपावर चर्चा केली जात आहे. काँग्रेस किती जागा सोडेल, त्याबाबत जाणून घेतले जात आहे. जागेचा तिढा सुटू शकेल.-उत्तम कापसे, जिल्हाप्रमुख, (ठाकरे गट)भारतीय राष्ट्रीय काँग्रेस८८ पक्षाने स्थानिक पातळीवर अधिकार दिले आहेत, स्थानिक नेते त्यांना आवश्यक ते निर्णय घेऊ शकतात, पक्षनेतृत्वाने तशा सूचना केल्या आहेत. प्रत्यक्ष परिणामाची जाण त्यांना असते.-अश्विन बैस, जिल्हाध्यक्षराष्ट्रवादी शरद पवार गट८८ राष्ट्रवादीला आपाठी हवी होती, तशी चर्चाही केली. परंतु समाधान न झाल्याने इतर समविचारी पक्षाला सोबत घेतले. उमेदवारांची चाचपणी सुरू आहे.- प्रवीण कुटे पाटील, जिल्हाध्यक्ष
महायुतीची शक्यता तपासा, पण मित्रपक्षांशी लढाई नको, मुख्यमंत्री फडणवीसांचे स्थानिक नेत्यांना आवाहन
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर येथील भाजपच्या नव्या विभागीय कार्यालयाच्या उद्घाटनावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक नेतृत्वाला स्पष्ट संदेश दिला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत जिथे जमेल तिथे महायुती करण्याचा प्रयत्न करा, पण काही ठिकाणी महायुती न झाल्यास समोरचे पक्ष विरोधक नसून मित्रपक्ष आहेत, हे लक्षात ठेवूनच निवडणूक लढा, असा सूचक इशारा त्यांनी यावेळी दिला.नगरपालिका, जिल्हा परिषद आणि महानगरपालिका या तिन्ही पातळ्यांवर भाजप भक्कम कामगिरी करेल आणि पालिका निवडणुकीत विरोधकांचा पराभव निश्चित आहे; असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.“विरोधक जमिनीवर नाहीत, म्हणूनच त्यांची अवस्था बिकट”विरोधी पक्ष जनतेत जात नाहीत आणि मतचोरी किंवा ईव्हीएमसारखे मुद्दे उचलून गोंधळ करतात; पण कोर्टात किंवा निवडणूक आयोगासमोर एकही ठोस पुरावा देऊ शकत नाहीत. त्यामुळे आगामी स्थानिक निवडणुकांत त्यांची अशीच पडझड होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. छत्रपती संभाजीनगर शहराच्या पाणीपुरवठा योजनेत पूर्वीच्या सरकारने अडथळे आणल्याचा आरोपही त्यांनी केला. उद्धव ठाकरे मराठवाड्यात आल्यावर सभांना प्रतिसाद नव्हता, लोकांचा विश्वास गमावल्यामुळेच लोक त्यांच्याकडे जात नाहीत, अशी टीकाही मुख्यमंत्र्यांनी केली.छत्रपती संभाजीनगर वेगाने औद्योगिक केंद्र म्हणून विकसित होत असून टोयोटा, किर्लोस्कर, जेएसडब्ल्यू यांसारख्या कंपन्यांची मोठी गुंतवणूक येत आहे. इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात हे शहर देशाचे ‘कॅपिटल’ ठरणार असून हजारो रोजगार निर्माण होतील, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. समृद्धी महामार्ग, एअरपोर्टसाठी मंजूर ७४० कोटी, तसेच मनमाड–छत्रपती संभाजीनगर मार्गाच्या प्रगतीबाबतही त्यांनी माहिती दिली.नवीन कार्यालय उभारण्यात मंत्री अतुल सावे यांनी केलेल्या प्रयत्नांचा फडणवीसांनी विशेष उल्लेख केला. जमीन मिळवण्यापासून सर्व परवानग्या घेऊन कार्यालय उभारण्यापर्यंत त्यांनी सातत्याने मेहनत घेतली. अनिल मकरिये यांनी दोन वर्षे दिलेल्या वेळेबद्दल त्यांचा सत्कारही करण्यात आला.नवीन कार्यालयात केबिन्स, मोठे सभागृह, बोर्ड रूम, वॉर रूम, डायनिंग हॉल आदी सुविधा उपलब्ध आहेत. मात्र, इमारत नव्हे तर त्या कार्यालयातून लोकांच्या समस्या किती सुटतात यावर पक्षाची ताकद अवलंबून असते, अशी आठवण फडणवीसांनी पदाधिकार्यांना करून दिली.
फाशीच्या शिक्षेवर बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीनांची प्रतिक्रिया
ढाका - बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना युनुस सरकारने स्थापने केलेल्या आंतरराष्ट्रीय गुन्हे प्राधिकरणाने मोठा दणका दिला आहे. बांग्लादेशमध्ये ऑगस्ट २०२४ मध्ये हिंसाचार उफाळला होता. यादरम्यान हसीना यांनी निशस्त्र आंदोलकांवर गोळीबार करण्याचा आदेश दिल्याचा आरोप होता. याच प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान हसीना यांनी 'मानवतेविरूद्ध गुन्हा' केल्याचे म्हणत प्राधिकरणाने हसीना यांना दोषी ठरवले आहे. त्यांना थेट मृत्यूदंडाची (फाशीची) शिक्षा सुनावण्यात आली आहे. यावर आता शेख हसीना यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी प्राधिकरणाने त्यांच्यावर केलेले आरोप फेटाळले आहेत.शेख हसीना म्हणाल्या की, त्यांना किंवा त्यांच्या आवामी लीग पक्षाला बाजू मांडण्याची योग्य संधी प्राधिकरणाने दिलेली नाही. यासोबतच त्यांनी प्राधिकरणावर पक्षपातीपणाचा आरोपही केला आहे. प्राधिकरणाने विद्यमान प्रशासनासाठी सार्वजनिकरित्या सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला आहे, असा गंभीर आरोप हसीनांनी केला आहे.हसीना पुढे म्हणाल्या, 'आंतरराष्ट्रीय गुन्हे प्राधिकरणात (ICT) माझ्याविरोधात करण्यात आलेले सर्व आरोप मी फेटाळून लावते. गतवर्षी जुलै ऑगस्ट मध्ये राजकीय विभाजनात दोन्ही बाजूंनी झालेल्या सर्व मृत्यूंसाठी मी शोक व्यक्त करते. यादरम्यान मी किंवा पक्षाच्या कोणत्याही नेत्याने आंदोलकांना मारण्याचे आदेश दिले नव्हते.'हसीना आपली भूमिका मांडत म्हणाल्या की, मला माझी बाजू मांडण्यासाठी योग्य ती संधी देण्यात आलेली नाही. तर माझ्या अनुपस्थितीत माझ्या पसंतीच्या वकिलांना देखील माझी बाजू मांडण्याची संधी मिळालेली नाही. हसीना यांनी पुढे प्राधिकरणावर जोरदार टीका देखील केली आहे. त्या म्हणाल्या, 'नाव ICT असे असूनही ते काही आंतरराष्ट्रीय नाही, तर ते निष्पक्षही नाहीत.'
स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक थांबणार का? सुप्रीम कोर्टातून मोठी बातमी
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या प्रक्रियेत ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टाने रविवारी (१७ नोव्हेंबर) राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाला कठोर इशारा दिला आहे. न्यायमूर्ती सूर्या कांत आणि ज्योमल्या बाघची यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले की, ‘कोर्टाच्या अधिकारांची परीक्षा घेऊ नका. ५० टक्क्यांची आरक्षण मर्यादा ओलांडता येणार नाही. २०२२ च्या जे.के. बांठिया आयोगाच्या […] The post स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक थांबणार का? सुप्रीम कोर्टातून मोठी बातमी appeared first on Dainik Prabhat .
Saudi Arabia Bus Accident : दुर्दैवी घटना.! सौदी अरबमध्ये भीषण अपघात; ४५ भारतीयांचा होरपळून मृत्यू
Saudi Arabia Bus Accident – सौदी अरेबियाला हज यात्रेसाठी गेलेल्या भारतीयांवर काळाने घाला घातला आहे. मक्काहून मदीनाकडे जाताना भारतीय प्रवाशांच्या बसला एका डीझेल टँकरने जोरात धडक दिली. ही दुर्घटना मध्यरात्री दीड वाजता घडली. बसमधील सर्वजण झोपेत असतानाच काळाने घाला घातला अन् क्षणात परिसरात हाहाकार उडाला. बसमधील ४५ जणांचा होरपळून मृत्यू झाला. मृतांमधील सर्वाधिक भाविक हे […] The post Saudi Arabia Bus Accident : दुर्दैवी घटना.! सौदी अरबमध्ये भीषण अपघात; ४५ भारतीयांचा होरपळून मृत्यू appeared first on Dainik Prabhat .
Congo : कॉंगोमध्ये भीषण दुर्घटना ! पूल कोसळून 32 जणांचा मृत्यू
बुकावू (कॉंगो) : कॉंगोच्या अग्नेयेकडील एका खाणीवरील पूल कोसळल्यामुळे किमान ३२ जण ठार झाले आहेत. स्थानिक सरकारी अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. लुआलाबा प्रांतातील मुलोंदो येथील कालांदो खाणीवरील हा पूल शनिवारी अचानक कोसळला. पुलावर प्रचंड गर्दी झाल्याने हा पूल कोसळला असल्याचे मानले जाते आहे. या भागात सध्या संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे या भागात भूस्खलनाचा धोका […] The post Congo : कॉंगोमध्ये भीषण दुर्घटना ! पूल कोसळून 32 जणांचा मृत्यू appeared first on Dainik Prabhat .
Eknath Shinde : राजकारणात फक्त बाळासाहेब ठाकरे ब्रँड; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा दावा
ठाणे : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त अदरांजली वाहत, राजकारणात बाळासाहेब ठाकरे हेच एकमेव निश्चित ठाकरे ब्रँड राहिले असल्याचा दावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. भाईंदर येथे बाळासाहेब ठाकरे आर्ट गॅलरीच्या उद्घाटनप्रसंगी शिंदे बोलत होते. शिवसेना(उबाठा)प्रमुख उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता शिंदे म्हणाले, काही लोक ठाकरे ब्रँडचा वापर करत आहेत. पण, फक्त एकच ब्रँड […] The post Eknath Shinde : राजकारणात फक्त बाळासाहेब ठाकरे ब्रँड; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा दावा appeared first on Dainik Prabhat .
Amit Thackeray : राज ठाकरेंच्या घरात वाढलोय, गुन्हा दाखल झाला तर चांगलंच : अमित ठाकरे
मुंबई : नवी मुंबईतील नेरूळ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात फेब्रुवारी २०२४ पासून उद्घाटनाविना धूळ खाणाऱ्या ४६ लाखांच्या पुतळ्याचे अनावरण मनसे नेते अमित ठाकरे यांनी रविवारी (१६ नोव्हेंबर) परवानगी न घेता केले. या घटनेवर नवी मुंबई पोलिसांनी अमित ठाकरे आणि ७० मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला असून, अमित यांनी याबाबत अभिमान व्यक्त केला आहे. त्याचवेळी, […] The post Amit Thackeray : राज ठाकरेंच्या घरात वाढलोय, गुन्हा दाखल झाला तर चांगलंच : अमित ठाकरे appeared first on Dainik Prabhat .
नवी दिल्ली : बांधकाम आणि बेकायदेशीर वृक्षतोडीमुळे कॉर्बेट व्याघ्र प्रकल्पाला झालेल्या पर्यावरणीय नुकसानाची पुनर्प्राप्ती करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी उत्तराखंड राज्याला दिले. सरन्यायाधीश भूषण गवई, न्या. विनोद चंद्रन आणि न्या. एनव्ही अंजारिया यांच्या खंडपीठाने आदेश दिले की राज्याचे मुख्य वन्यजीव रक्षक, केंद्रीय अधिकारप्राप्त समिती (सीईसी) शी सल्लामसलत करून, तज्ञ समितीच्या शिफारशींनुसार कॉर्बेट व्याघ्र प्रकल्पाच्या पुनर्संचयनासाठी […] The post कॉर्बेट व्याघ्र प्रकल्पातील नुकसानीची पुनर्प्राप्ती करा; सर्वोच्च न्यायालयाचे उत्तराखंड सरकारला निर्देश appeared first on Dainik Prabhat .
बांगलादेशच्या राजकारणात सध्या ऐतिहासिक आणि अनेकदिशात्मक राजकीय चढ-उतार दिसून येत आहेत. देशाच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने (ICT-BD) सोमवारी मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे. हसीना यांच्या कारकिर्दीतील गंभीर आरोपांवर, विशेषतः मानवतेविरुद्धचे गुन्हे (Crimes Against Humanity) सिद्ध ठरल्याने हा अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय देण्यात आला आहे. न्यायाधिकरणाचे तीन-सदस्यीय खंडपीठ, ज्याचे नेतृत्व मुख्य न्यायाधीश गोलम मुर्तुजा मोझुमदर यांनी केले, त्यांनी हा निकाल दिला. न्यायाधिकरणाने स्पष्ट केले की, माजी पंतप्रधान हसीना २०२४ च्या जुलै-ऑगस्ट महिन्यात विद्यार्थी नेतृत्वाखालील जनआंदोलन दडपण्याच्या कारवाईत सहभागी होत्या. निकालपत्रात नमूद केल्याप्रमाणे, शेख हसीना यांनीच या आंदोलन दडपण्याचे प्रत्यक्ष आदेश दिले होते आणि त्या किलोसंचलनात नेतृत्व (Leading the campaign of killings) करत होत्या. म्हणजेच, विद्यार्थी आंदोलकांवरील गोळ्या-गोळीबाराच्या मागे त्या प्रमुख व्यक्ती होत्या, हे न्यायाधिकरणाने स्पष्टपणे नमूद केले. बांगलादेशच्या ६० वर्षांहून अधिक वर्षांच्या राजकीय इतिहासातील हा एक अभूतपूर्व निर्णय मानला जात आहे, ज्यामुळे देशाच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे.माजी गृहमंत्री आणि पोलिस प्रमुखही आरोपीमाजी पंतप्रधान शेख हसीना यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावताना आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने (ICT-BD) अत्यंत गंभीर निरीक्षणे नोंदवली आहेत. न्यायालयाच्या निर्णयानुसार, हसीनाने हे हिंसक आदेश केवळ तोंडी दिले नाहीत, तर त्यासाठी हवाई वाहने, हेलिकॉप्टर, ड्रोन आणि विविध घातक शस्त्रांचा वापर करण्यात आला. या कृतीतून देशभरात मोठ्या प्रमाणावर मृत्यू आणि हिंसा पसरली, असे न्यायालयाने ठामपणे नमूद केले आहे. शेख हसीना यांच्यावर न्यायालयात पाच वेगवेगळे आरोप सिद्ध झाले आहेत, ज्यात खून, प्रयत्न खून, यातनादायक वर्तन (Torture) आणि इतर मानवी हक्कांचे उल्लंघन (Human Rights Violations) यांचा समावेश आहे. या खटल्यात हसीना यांच्यासोबत त्यांचे दोन मोठे सहकारीदेखील दोषी ठरले आहेत: माजी गृहमंत्री असदुज्जमान खान कमाल आणि माजी पोलिस प्रमुख चौधुरी अब्दुल्ला अल-मामुन. तथापि, एका महत्त्वपूर्ण घडामोडीत, अल-मामुन यांना मृत्युदंडापासून सवलत मिळाली आहे, कारण त्यांनी तपासात पूर्ण सहयोग केला आणि ते “स्टेट विटनेस” (सरकारी साक्षीदार) बनले. या संपूर्ण निकालामुळे बांगलादेशच्या राजकारणात आणि प्रशासकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटले आहेत.https://prahaar.in/2025/11/17/ousted-bangladesh-pm-sheikh-hasina-sentenced-to-death-for-crimes-against-humanity/शेख हसीनांना शिक्षा होताच ढाकामध्ये 'हिंसाचाराचा भडका'!
ICRA Report: दुसऱ्या तिमाहीत जीडीपीत ७.८% वरून ७% किरकोळ घसरण होणार - अहवाल
प्रतिनिधी: भारतीय अर्थव्यवस्थेविषयी एक महत्वपूर्ण अहवाल आयसीआरए (Investment Information and Credit Ratings Agency of India) संस्थेने प्रदर्शित केला आहे. एप्रिल ते जून महिन्यातील ७.८% जीडीपी विस्तार दुसऱ्या तिमाहीत ७% वेगाने वाढू शकतो असे म्हटले. प्रामुख्याने सेवा क्षेत्रात काहीशी कामगिरी थंडावली आहे.'सेवा क्षेत्रातील कमी विस्तार या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत ९.३% आर्थिक वर्ष २०२६ च्या दुसऱ्या तिमाहीत ७.४% वर तर कृषी क्षेत्र - ३.७% वरून ३.५% पातळीवर जाईल असा अंदाज संस्थेने व्यक्त केला आहे. औद्योगिक क्षेत्राच्या बाबतीत कामगिरीतील वाढीपेक्षा ही वाढ जास्त होण्याची शक्यता आह. माहितीनुसार, पाच तिमाहींमध्ये जीडीपीत ६.३.% व ७.८% इतका उच्चांक गाठेल असे आयसीआरएने आपल्या अहवालात म्हटले आहे.अहवालातील अंदाजात निव्वळ अप्रत्यक्ष कर (नाममात्र अटींमध्ये तिमाहीत वार्षिक आधारावर घटू शकतात यामुळे आर्थिक वर्ष २०२६ च्या पहिल्या तिमाहीत ९.५% वाढ झाल्यानंतर, अप्रत्यक्ष करांमध्ये घट होऊन -५.२% झाली होती तर त्याच्या अनुदानांमध्ये -७.३% वरून -४.६% इतकी घट झाली. मागील तिमाहीत सकारात्मक (१८ बीपीएस) राहिल्यानंतर वाढ राहिली असताना आर्थिक वर्ष २०२६ पातळी च्या दुसऱ्या तिमाहीत जीडीपी आणि जीव्हीए (Gross Value Added GVA) वाढीमधील तफावत १० बीपीएसवर परत येण्याची अपेक्षा आहे असे संस्थेने आपल्या अहवालात म्हटले आहे.या अहवालाबाबत भाष्य करताना,'सरकारी खर्चात कमी वार्षिक वाढ आर्थिक वर्ष २०२६ च्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत आर्थिक वर्ष २०२६ च्या दुसऱ्या तिमाहीत जीडीपी आणि जीव्हीए वाढीच्या गतीवर परिणाम करेल' असे आयसीआरएच्या मुख्य अर्थशास्त्रज्ञ, संशोधन आणि आउटरीच, आदिती नायर म्हणाल्या आहेत.'तथापि, सणासुदीच्या हंगामाच्या सुरुवातीशी संबंधित इन्व्हेंटरी स्टॉकिंग, जीएसटी-तर्कीकरणामुळे (Gst Rationalisation) वाढलेली व्हॉल्यूम पिकअप आणि टॅरिफच्या आधी अमेरिकेत निर्यात वाढल्याने उत्पादन क्षेत्राच्या कामगिरीला चालना मिळण्याची अपेक्षा आहे आणि चार तिमाहींच्या अंतरानंतर उद्योगाच्या जीव्हीए वाढीला सेवांपेक्षा जास्त मदत होईल' असेही त्या म्हणाल्या आहेत.वाढीच्या पातळीवर असताना सकल भांडवली खर्चाचा (Gross Capital Expenditure ) वाढीचा दर आर्थिक वर्ष २०२६ च्या दुसऱ्या तिमाहीत ३०.७% (आर्थिक वर्ष २०२५ च्या दुसऱ्या तिमाहीत १०.३०% पर्यंत कमी झाला, जो आर्थिक वर्ष २०२६ च्या पहिल्या तिमाहीत ५२.०% होता (आर्थिक वर्ष २०२५ च्या पहिल्या तिमाहीत -३५.०% होता.)त्याच वेळी मासिक सरासरी भांडवली खर्च (Capital Expenditure) इयर ऑन इयर बेसिसवर पहिल्या तिमाहीत ९१७ अब्ज रुपयांवरून दुसऱ्या तिमाहीत १०१९ अब्ज रुपयांवर पोहोचला, असे अहवालात नमूद केले आहे. सरासरी मासिक भांडवली खर्च आर्थिक वर्ष २०२६ च्या पहिल्या तिमाहीत ३७८ अब्ज रुपयांवरून दुसऱ्या तिमाहीत ५४४ अब्ज रुपयांवर पोहोचला, जो सरकारच्या पातळीच्या जवळपास अर्धा आहे, असेही अहवालात नमूद केले आहे.
७७१२ कोटींच्या ECMS योजनेला सरकारचा ग्रीन सिग्नल जम्मू काश्मीरातही मोठी गुंतवणूक होणार
प्रतिनिधी: केंद्र सरकारने केलेल्या नव्या घोषणेनुसार, सरकारने ७७१२ कोटींच्या ईसीएमएस (Electronic Compenent Manufacturing Scheme ECMS) योजनेला मान्यता दिली आहे. त्यामुळे भारतात इलेक्ट्रॉनिक उत्पादनाला प्रचंड मोठ्या स्तरावर चालना मिळणार आहे. या योजनेत २४९ कंपन्यांनी इंसेटिव प्राप्त करण्यासाठी अर्ज केले होते त्यातील १७ कंपन्यांच्या अर्जाला सरकारने मान्यता दिली असे आयटी विभागाचे सेक्रेटरी एस क्रिष्णन यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे. यावेळी आयटी व तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णवही पत्रकार परिषदेत उपस्थित होते. प्रामुख्याने भारतातील विकासापासून वंचित असलेल्या विभागनिहाय क्षेत्रात सरकारने विशेष लक्ष घालण्याचे ठरवले असून अगदी जम्मू काश्मीर सारख्या विभागांचा समावेश या योजनेत असेल. मान्य झालेल्या अर्जात जम्मू काश्मीरचा समावेश असून उर्वरित महाराष्ट्र, कर्नाटक, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, तमिळनाडू या राज्यांचाही समावेश या अर्ज प्रकियेत होता.आयटी सेक्रेटरी एस क्रिष्णन पुढे म्हणाले आहेत की, जागतिक कंपन्या त्यांच्या पुरवठा साखळ्यांमध्ये (Global Supply Chain) मध्ये विविधता आणण्याचा प्रयत्न करत असताना भारताची इलेक्ट्रॉनिक्स मूल्य साखळी अधिक खोलवर नेणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. त्यांनी पुढे सांगितले की, या बदलासाठी भारत एक मजबूत गंतव्यस्थान बनण्यासाठी चांगल्या स्थितीत आहे. तसेच याखेरीज कृष्णन म्हणाले की, भारताने इलेक्ट्रॉनिक्स घटकांमध्ये खोलवर रुजलेली स्पर्धात्मकता निर्माण करावी हे सुनिश्चित करणे हे उद्दिष्ट आहे, जेणेकरून भविष्यात वाढत्या कामगार खर्चामुळे उद्योग पलायन होणार नाही. वैविध्यपूर्ण आणि लवचिक जागतिक मूल्य साखळींचा अविभाज्य भाग बनण्याचे उद्दिष्ट आहे. त्यांनी पुढे सांगितले की, ECMS कंपन्यांना मोबाइल-फोन-केंद्रित उत्पादनाच्या पलीकडे जाऊन ऑटो इलेक्ट्रॉनिक्स, वैद्यकीय इलेक्ट्रॉनिक्स, ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स आणि औद्योगिक इलेक्ट्रॉनिक्समध्ये विस्तार करण्यास प्रोत्साहित करते.'केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाचे दीर्घकालीन यश तीन स्तंभांवर अवलंबून आहे. मजबूत डिझाइन टीम, उत्पादनांमध्ये सातत्यपूर्ण सहा-सिग्मा गुणवत्ता आणि जागतिक मानके पूर्ण करण्यास सक्षम भारतीय पुरवठादारांचे एक मजबूत नेटवर्क यांचा समावेश असेल.केंद्र लवकरच या क्षेत्राच्या वाढत्या कामगार गरजांना पाठिंबा देण्यासाठी एक समर्पित कौशल्य आराखडा सादर करेल.संकेतस्थळावरील माहितीनुसार १ मे २०२५ रोजी मंत्रिमंडळाने २२९१९ कोटी रुपयांच्या खर्चासह मंजूर केलेल्या ईसीएमएस योजनेत २४९ अर्ज आले आहेत ज्यांची गुंतवणूक ११५३५१ कोटी रुपयांची असणार आहे.माहितीनुसार, मंजूर झालेल्या १७ अर्जामध्ये १० प्रस्तावांमध्ये एक्वस कंझ्युमर प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड १५०० कोटी रुपये गुंतवणूक करणार असल्याची कटिबद्धता कंपनीने सरकारला दिली असून आ ७६६९ कोटी रुपयांचे उत्पादन अपेक्षित आहे असे सरकारने पत्रकार परिषदेत नमूद केले.इतर माहितीप्रमाणे, मंजूर झालेल्या इतर कंपन्यांमध्ये सिक्युअर सर्किट्स, टीई कनेक्टिव्हिटी इंडिया ६१२ कोटी, जबिल सर्किट ९५७ कोटी झेटेफॅब व झेटेकेम ५५ कोटी, मायक्रोपॅक ५४ कोटी, असक्स सेफ्टी कंपोनेंट्स, युनो मिंडा २६४ कोटी रुपये एटी अँड एस इंडिया, एचआय-क्यू, इन्फोपॉवर टेक्नॉलॉजीज, सिरमा मोबिलिटी २५० कोटी, आणि १११ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह जम्मू आणि काश्मीरस्थित मीना इलेक्ट्रोटेक यांचा समावेश आहे असे आयटी विभागाने निवेदनात स्पष्ट केले.मंजुरीमुळे भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षमतेत मोठ्या प्रमाणात वाढ होणार असून पायाभूत सुविधेसह उद्योगांचा प्रोडक्टलाईनमध्ये जागतिक गुंतवणूकदारांचा व पुरवठादारांचा विश्वास वाढणार आहे.
गडचिरोलीत नगराध्यक्षपदाचा सामना ठरला, प्रणोती निंबोरकर विरुद्ध कविता पोरेड्डीवार आमनेसामने
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील तीन नगरपालिकांच्या निवडणूक प्रक्रियेला गेल्या काही दिवसांपासून चांगलाच वेग आला असून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीवरून राजकीय वातावरण तापले आहे. अखेर अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी सर्वांत मोठा उलटफेर पाहायला मिळाला.गडचिरोली नगर परिषदेत नगराध्यक्षपद हे सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव असल्याने भाजपमध्ये महिला पदाधिकाऱ्यांत प्रचंड उत्सुकता होती. उमेदवारीसाठी भाजप महिला जिल्हाध्यक्षा आणि माजी नगराध्यक्षा योगिता पिपरे, जिल्हा महामंत्री गीता हिंगे, तसेच प्रणोती सागर निंबोरकर आणि रीना सतीश चिचघरे अशी चार नावे चर्चेत होती.सुरुवातीला रीना चिचघरे यांचे नाव आघाडीवर असल्याचे सकाळपासून बोलले जात होते. मात्र दुपारी १ नंतर परिस्थितीत अचानक बदल झाला आणि शेवटच्या क्षणी पक्षाने ए.बी. फॉर्म प्रणोती सागर निंबोरकर यांच्याकडे वळवला. त्यामुळे पक्षांतर्गत सुरू असलेली चुरस एका क्षणात संपुष्टात आली.प्रणोती निंबोरकर यांचा मुकाबला काँग्रेसच्या कविता सुरेश पोरेड्डीवार यांच्याशी होणार आहे. अर्ज दाखल करण्यासाठी भाजप, काँग्रेससह विविध पक्षांनी मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन केल्याने पालिकेच्या परिसरात मेळाव्याचे वातावरण निर्माण झाले होते. गर्दीमुळे काही वेळ वाहतुकीलाही खोळंबा झाला.
Sheikh Hasina : पंतप्रधान पदापासून थेट फाशीच्या उंबरठ्यावर; शेख हसीना यांची हादरवून टाकणारी कहाणी !
Sheikh Hasina – बांगलादेशच्या पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांच्यासाठी गेला सव्वा वर्षाचा कालखंड अत्यंत विपरीत परिस्थितीचा होता. या १५ महिन्यांत त्यांना देशाच्या पंतप्रधानपदावरून पायउतार व्हायला लागले. देशातून परागंदा होऊन भारतात आश्रय घ्यावा लागला आणि आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयाचा खटलाही त्यांच्यावर तालवला गेला. आता याच न्यायाधिकरणाने हसीना यांना मानवताविरोधी गुन्ह्यांच्या आरोपांमध्ये दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली आहे. […] The post Sheikh Hasina : पंतप्रधान पदापासून थेट फाशीच्या उंबरठ्यावर; शेख हसीना यांची हादरवून टाकणारी कहाणी ! appeared first on Dainik Prabhat .
Ravindra Jadeja : रवींद्र जडेजाने रचला इतिहास ! WTC मध्ये ‘ही’कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू
भारतीय क्रिकेट संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात ३० धावांनी दारुण पराभवाला (Ravindra Jadeja) सामोरे जावे लागले. ईडन गार्डन्स मैदानावर खेळलेल्या या रोमांचक लो-स्कोअरिंग सामन्यात दक्षिण आफ्रिकेने १२४ धावांचे लक्ष्य दिले, पण भारत ९३ धावांवर ऑल आऊट झाला. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली. हा त्यांचा भारतातील मातीवर १५ वर्षांनंतरचा पहिला कसोटी […] The post Ravindra Jadeja : रवींद्र जडेजाने रचला इतिहास ! WTC मध्ये ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू appeared first on Dainik Prabhat .
Pune News : विश्वकर्मा विद्यापीठात पर्यायी विवाद निराकरण आणि आरोग्य क्षेत्र परिषद 2025 चे आयोजन
पुणे : भारताच्या आरोग्य क्षेत्रात वाढत्या कायदेशीर गुंतागुंतीच्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर, तसेच त्वरित, संवेदनशील आणि तज्ज्ञ-आधारित विवाद निराकरणाची गरज लक्षात घेता, पुण्यातील अग्रगण्य विद्यापीठ, विश्वकर्मा विद्यापीठाच्या विधी विभागाने कायदा व आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांना एका मंचावर आणत पर्यायी विवाद निराकरण (एडीआर) आणि आरोग्यक्षेत्र परिषद २०२५ चे आयोजन केले. या परिषदेमध्ये आरोग्य क्षेत्रातील विवादांमध्ये एडीआरचे वाढते महत्त्व आणि […] The post Pune News : विश्वकर्मा विद्यापीठात पर्यायी विवाद निराकरण आणि आरोग्य क्षेत्र परिषद 2025 चे आयोजन appeared first on Dainik Prabhat .
‘धुरंधर’चा रनटाईम १८५ मिनिटे ? रणवीरच्या कारकिर्दीतील सर्वात लांब चित्रपट
मुंबई : धुरंधरच्या ट्रेलरने सध्या प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच वाढवली आहे. हा ट्रेलर १२ नोव्हेंबर रोजी लाँच होणार होता; मात्र काही कारणांमुळे पुढे ढकलून आता १८ नोव्हेंबरला तो प्रेक्षकांसमोर येणार आहे.सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, धुरंधरची कथा मोठी आणि गुंतागुंतीची आहे. रणवीर सिंगच्या व्यक्तिरेखेचा प्रवास हा चित्रपटाचा केंद्रबिंदू आहे, मात्र इतर कलाकारांच्याही भूमिका कथेत महत्त्वाच्या आहेत. दिग्दर्शक आदित्य धर यांनी प्रत्येक दृश्य प्रभावी आणि प्रेक्षकांना गुंतवून ठेवणारे असावे, यावर विशेष भर दिला आहे.सध्या धुरंधरचा अंतिम रनटाईम ३ तासांपेक्षा अधिक आहे, अंदाजे ३ तास ५ मिनिटे. अंतिम कालावधी आदित्य धर, Jio Studios आणि B62 Studios यांच्या कडून पुढील १० दिवसांत निश्चित केला जाईल.” लांबी आणखी कमी होते की अशीच कायम राहते, हे लवकरच स्पष्ट होईल.जर हा कालावधी कायम ठेवला गेला, तर ‘धुरंधर’ हा रणवीर सिंगच्या कारकिर्दीतील सर्वात लांब चित्रपट ठरेल. यापूर्वी दिल धडकने दो (२०१५) हा त्याचा सर्वात लांब चित्रपट होता, ज्याचा कालावधी २ तास ५१ मिनिटे होता. त्यानंतर रॉकी और रानी की प्रेम कहानी (२०२३) – २ तास ४८ मिनिटे, ८३ (२०२१) आणि पद्मावत (२०१८) – प्रत्येकी २ तास ४३ मिनिटे. तर रणवीरचा सर्वात कमी लांबीचा चित्रपट किल दिल (२०१४) हा असून त्याचा रनटाईम फक्त १ तास ५७ मिनिटे होता.रणवीर सिंहसोबत धुरंधरमध्ये संजय दत्त, अक्षय खन्ना, आर. माधवन, अर्जुन रामपाल आणि सारा अर्जुन झळकणार आहेत. ट्रेलर लॉन्च कार्यक्रमाला संपूर्ण टीम उपस्थित राहणार असून, संजय आणि अक्षय यांचा यात समावेश नसणार आहे.
Bihar Election 2025 | Chirag Paswan : बिहार विधानसभा निवडणूक 2205 मध्ये एनडीएने प्रचंड विजय मिळवला असून महागठबंधनला मोठा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे, लोक जनशक्ति पार्टी (रामविलास पासवान), एलजेपी (आर) ने या निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या नेतृत्वाखालील ही पार्टी बिहारमध्ये चौथी सर्वात मोठी आणि […] The post Bihar Election 2025 : ‘मोदींचे हनुमान’ होणार बिहारचे उपमुख्यमंत्री? चिराग पासवान यांना मिळणार मोठी जबादारी appeared first on Dainik Prabhat .
पुण्यात खळबळ..! सिंहगड रोडवर अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला, परिसरात भीतीचं वातावरण
पुणे : पुण्यातील सिंहगड रोडवर अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. वडगाव पुलाजवळील ओढ्यात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला होता. शहरातील दुसरी घटना घडल्यामुळे शहरवासीयांमध्ये खळबळ उडाली आहे. सिंहगड रोडवरील कॅनलजवळ एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला असून, या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. प्राथमिक माहितीप्रमाणे, हा मृतदेह अनेक दिवसांपासून या ठिकाणी […] The post पुण्यात खळबळ..! सिंहगड रोडवर अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला, परिसरात भीतीचं वातावरण appeared first on Dainik Prabhat .
मोहित सोमण: बाळू फोर्ज कंपनीने आपला तिमाही निकाल जाहीर केला आहे. कंपनीने आपल्या एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, या तिमाहीत कंपनीला इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) एकत्रित निव्वळ नफ्यात ३५.५०% वाढ नोंदवली आहे. गेल्या वर्षीच्या तिमाहीतील ४८ कोटींच्या तुलनेत या तिमाहीत ६५.०४ कोटींवर निव्वळ नफा कंपनीला प्राप्त झाला. माहितीनुसार, कंपनीच्या कामकाजातून मिळणाऱ्या महसूलात (Revenue from Operations) इयर ऑन इयर बेसिसवर गेल्या वर्षीच्या तुलनेतील २२.२९ कोटींच्या तुलनेत या तिमाहीत उत्पन्न २९.९५ कोटींवर वाढले आहे. तर ईबीटा (EBITDA) मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर गेल्या तिमाहीतील २९.३% तुलनेत या तिमाहीत २७.६% वाढ झाली आहे.कंपनीच्या करोत्तर नफ्यात (Profit after tax PAT) गेल्या वर्षीच्या ४.८ कोटींच्या तुलनेत या तिमाहीत ६.५ कोटींवर वाढ झाली आहे. कंपनीच्या करोत्तर नफा मार्जिनमध्येही इयर ऑन बेसिसवर २१.३% वरून २३.५% वाढ झाली असल्याचे निकालात स्पष्ट झाले आहे. कंपनीच्या ईपीएस (Earning per share EPS) गेल्या वर्षीच्या ४.५५ रूपये तुलनेत या तिमाहीत ६.०८ रुपये वाढ नोंदवली आहे.निकालावर भाष्य करताना,' आर्थिक वर्ष २६ च्या दुसऱ्या तिमाहीत ऑपरेशन्समधून मिळणारा महसूल २९९५ दशलक्ष रुपये होता, जो वर्षभराच्या तुलनेत ३४.४% जास्त होता. तिमाहीसाठी ईबीटा (EBITDA)८२८ दशलक्ष रुपये होता, ज्याचा EBITDA मार्जिन २७.६% होता, तर करोत्तर नफा (PAT) ६५० दशलक्ष रुपये होता, जो २१.५% होता. आर्थिक वर्ष २६ च्या पहिल्या तिमाहीत, ऑपरेशन्समधून मिळणारा महसूल ५३२७ दशलक्ष रुपये होता, जो आर्थिक वर्ष २५ च्या पहिल्या तिमाहीपेक्षा ३३.८% जास्त होता, ज्यामध्ये ईबीटा (EBITDA) १५५१ दशलक्ष रुपये आणि करोत्तर नफा (PAT) १२६१ दशलक्ष रुपये होता.ही कामगिरी स्थिर अंमलबजावणी आणि बालू फोर्जच्या एकात्मिक उत्पादन प्लॅटफॉर्मच्या सतत मजबूतीकरणाचे प्रतिबिंबित करते.कर्नाटकमधील हत्तरगी येथील ग्रीनफील्ड सुविधा नियोजित पद्धतीने प्रगती करत आहे व आमच्या चालू विस्तारात केंद्रस्थानी आहे. प्लांट एकाच सेटअप अंतर्गत कॅप्टिव्ह फोर्जिंग आणि प्रिसिजन मशीनिंग एकत्रित करतो, ज्यामुळे कार्यक्षमता आणि आउटपुट सुधारतो. २५-टन क्लोज्ड-डाय फोर्जिंग हॅमर, ८०००-टन मेकॅनिकल प्रेस आणि ऑटोमेटेड मशीनिंग लाईन्सचे कमिशनिंग वेळापत्रकानुसार सुरू आहे. पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर, एकूण फोर्जिंग आणि मशीनिंग क्षमता अनुक्रमे १५०००० टन आणि ८०००० टन प्रति वर्षापर्यंत वाढेल.संरक्षण विभाग हा एक प्रमुख मुद्दा आहे. दरवर्षी ३६०००० शेल क्षमतेसह एम्प्टी शेल उत्पादनासाठी समर्पित फोर्जिंग आणि मशीनिंग लाइन व्यावसायिकीकरण टप्प्यात आहे. कंपनीला आघाडीच्या भारतीय संरक्षण कंपन्यांकडून विक्रेत्यांच्या मंजुरी मिळाल्या आहेत आणि तोफखाना, चिलखती वाहने आणि इंजिन घटकांमध्ये नवीन उत्पादने जोडणे सुरू आहे, ज्यामुळे भारताच्या संरक्षण उत्पादन परिसंस्थेत तिची भूमिका मजबूत होते. आम्ही फोर्जिंग आणि मशीनिंगमध्ये ऑपरेशन्स वाढवत असताना शिस्तबद्ध अंमलबजावणी आणि क्षमता तयारीवर लक्ष केंद्रित करत आहोत. हत्तर्गी सुविधा आमचा पूर्णपणे एकात्मिक उत्पादन आधार मजबूत करेल आणि जटिल, उच्च-मूल्य अनुप्रयोगांना सेवा देण्याची आमची क्षमता सुधारेल. संरक्षण उत्पादन व्यावसायिकीकरण टप्प्यात प्रवेश करत असताना आणि क्षमता विस्तार ट्रॅकवर असताना, बालू फोर्ज स्केल, तंत्रज्ञान आणि ग्राहक विविधीकरणाद्वारे वाढीच्या पुढील टप्प्यात चालण्यासाठी निर्विवादपणे तयार आहे.'प्रेह्लाद सिंग चांडोक यांनी स्थापन केलेली बालू फोर्ज इंडस्ट्रीज लिमिटेड ही एक अभियांत्रिकी कंपनी आहे. जागतिक उद्योगांमध्ये आवश्यक असलेल्या बनावट आणि तयार मशीनचे घटक वितरीत करते. कंपनीच्या पोर्टफोलिओ उत्पादनात १ किलो ते १००० किलो आणि ३ मीटर लांबीपर्यंतचा व्यापक उत्पादनांचा समावेश आहे ऑटोमोटिव्ह, औद्योगिक वाहने, अर्थमूव्हिंग उपकरणे, पवन ऊर्जा, एरोस्पेस, संरक्षण, तेल आणि वायू, रेल्वे, सागरी आणि शेतीमध्ये या घटकांतून प्रयोग करणे शक्य होते. पूर्णपणे एकात्मिक (Integrated) फोर्जिंग आणि मशीनिंग क्षमतांचा समावेश आहे. कर्नाटकातील बेळगाव येथे ४६+ एकर कॅम्पसमध्ये पसरलेल्या प्उत्पादन सुविधांसह कंपनीचा प्रकल्प आहे. यामध्ये हायड्रॉलिक हॅमर आणि फोर्जिंग प्रेससह सुसज्ज, आणि समर्पित इनहाऊस टूल रूम, मेटलर्जिकल लॅबचाही समावेश आहे.
जामनेर नगराध्यक्षपदासाठी मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन निवडणुकीच्या रिंगणात!
जामनेर : राज्यातील तब्बल २४६ नगरपरिषद आणि ४२ नगरपंचायतींसाठी २ डिसेंबरला मतदान होणार आहे त्याच अनुशंघाने नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता.जामनेरच्या नगराध्यक्ष पदासाठी मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी तसेच भाजपच्या उमेदवार साधना महाजन यांनी आज कार्यकर्त्यां समवेत शक्ती प्रदर्शन करत मोठ्या जल्लोषात उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान अर्ज भरल्यानंतर माध्यमांशी संवाद करतेवेळी शहरात आम्ही अनेक विकास कामे केली आहेत तसेच अपूर्ण राहिलेले कामे पूर्ण करण्यासाठी आम्हाला पुन्हा जनतेने संधी दिली की, सगळी कामे आम्ही त्वरित पूर्ण करू. तसेच विरोधकांची आव्हाने आम्ही पेलवणार कारण आमच्याकडे विकासाचे मुद्दे आहेत तसेच राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने उत्तम नेतृत्व आहे. त्यांच्या मार्फत शहराचा विकास करण्यासाठी जास्तीत जास्त निधी कसा आणता येईल यासाठी नेहमीच प्रयत्न करू असे आश्वासनही दिले.
पुणे स्टेशनला दिलासा! एक्स्प्रेस गाड्यांसाठी हडपसर नवे टर्मिनल
पुणे : पुण्यातून प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी आहे. पुणे जंक्शनवरील वाढत्या गर्दीवर उपाय म्हणून रेल्वे प्रशासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून, आता दोन प्रमुख गाड्यांच्या सुटण्याचे आणि पोहचण्याचे टर्मिनल पुण्याहून थेट हडपसर स्थानकात हलवण्यात आले आहे. यामुळे पुणे स्टेशनचा ताण कमी होणार असून हडपसर परिसरातील प्रवाशांना अधिक सुविधा उपलब्ध होणार आहेत.रेल्वेच्या निर्णयानुसार पुणे–नांदेड–पुणे एक्स्प्रेस आणि पुणे–हरंगुळ–पुणे एक्स्प्रेस या गाड्या २६ जानेवारीपासून हडपसर येथूनच सुटतील आणि तिथेच परत येतील.हडपसरचे नवे टर्मिनल आधुनिक सोयींसह सज्जअमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत उभे केलेले हडपसरचे हे नवे टर्मिनल पुण्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. सुमारे १३५ कोटींच्या खर्चातून करण्यात आलेल्या या प्रकल्पात खालील सुविधा उभारण्यात आल्या आहेत.६०० मीटर लांबीचे अप व डाउन प्लॅटफॉर्म, ज्यावर २४ डब्यांच्या गाड्यांचे थांबे शक्यजुन्या मालवाहतूक मार्गांचे रूपांतर आणि नवीन मालवाहतूक कॉरिडॉरआधुनिक स्टेशन इमारत आणि विस्तारित सर्क्युलेटिंग एरियावाढीव पार्किंग सुविधाप्लॅटफॉर्म क्रमांक १, २ आणि ३ चे काम पूर्णलवकरच उपलब्ध होणाऱ्या सुविधा: लिफ्ट, एस्केलेटर, १२ मीटर रुंद फुटओव्हर ब्रिज, रूफ प्लाझा आणि निवासगृहहडपसर टर्मिनल कार्यान्वित झाल्याने पूर्व पुण्यातील प्रवाशांना प्रवासासाठी अधिक सोयी मिळतील आणि पुणे जंक्शनवरील ताण लक्षणीयरीत्या कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.गाड्यांचे सुधारित वेळापत्रकहडपसर–हजूर साहेब नांदेड–हडपसर एक्सप्रेस (दैनिक)गाडी क्रमांक 17629हडपसर–हजूर साहेब नांदेड एक्स्प्रेस२६ जानेवारीपासून दररोज रात्री ९:५० वाजता हडपसरहून सुटणारगाडी क्रमांक 17630हजूर साहेब नांदेड–हडपसर एक्स्प्रेसदररोज पहाटे ४:३५ वाजता हडपसर येथे आगमनहडपसर–हरंगुळ–हडपसर एक्स्प्रेसगाडी क्रमांक 01487हडपसर–हरंगुळ एक्स्प्रेससकाळी ६:२० वाजता हडपसरहून सुटणारगाडी क्रमांक 01488हरंगुळ–हडपसर एक्स्प्रेसरात्री ८:४५ वाजता हडपसरला पोहचणार
मोहित सोमण:आज अखेर फुजियामा पॉवर सिस्टिम लिमिटेड (Fujiyama Power System Limited) म्हणजेच फुजियामा सोलार आयपीओला सबस्क्राईब करण्याचा शेवटचा दिवस होता. आज तिसऱ्या दिवशी आयपीओला एकूण २.१४ पटीने सबस्क्राईब केला गेला आहे. त्यामुळे १३ ते १७ नोव्हेंबर या कालावधीतील ८२८ कोटी बूक व्हॅल्यु असलेल्या आयपीओला एकूण एकूण २.१५ पटीने सबस्क्रिप्शन म्हणजेच बिडिंग प्राप्त झाले आहे. दुसऱ्या दिवशी कंपनीच्या आयपीओला ४०% बिडिंग (बोली) मिळाली होती. एकूण २५४८६८४२ शेअर उपलब्ध असताना ५४८१७६२० पटीने बिडिंग शेअर्समध्ये प्राप्त झाले आहे. २१६ ते २२८ रूपये प्रति शेअर प्राईज बँड निश्चित करण्यात आला होता. एकूण आयपीओसाठी ३.६३ कोटी शेअर पब्लिक इशूसाठी उपलब्ध केले गेले होते. त्यापैकी १.२६ शेअर किरकोळ गुंतवणूकदारांसाठी (Retail Investors), १.८० कोटी शेअर पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (QIB), ०.५४% वाटा विना संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (NII) उपलब्ध होता. एकूण शेअरपैकी २६३१५७८९ शेअरचा वाटा फ्रेश इशूसाठी उपलब्ध होता तर ऑफर फॉर सेल (OFS) साठी १ रूपये दर्शनी मूल्य (Face Value) असलेल्या २२८ कोटी मूल्यांकनाचे शेअर (१ कोटी) विक्रीसाठी उपलब्ध होते.आयपीओने आयपीओपूर्वीच २४६.९० कोटी अँकर गुंतवणूकदारांकडून उभारले होते. किरकोळ गुंतवणूकदारांना किमान १४८२० रूपयांची गुंतवणूक (६५ शेअर) अनिवार्य करण्यात आली होती. पात्र गुंतवणूकदारांना समभागाचे वाटप (Allotment) १८ नोव्हेंबरपर्यंत होईल तसेच २० नोव्हेंबरला कंपनी बाजारात सूचीबद्ध (Listed) होणार आहे. पवन कुमार गर्ग, योगेश दुवा, सुनिल कुमार हे कंपनीचे प्रवर्तक (Promoter) आहेत.२०१७ मध्ये स्थापन झालेली फुजियामा पॉवर सिस्टम्स लिमिटेड रूफटॉप सोलर उद्योगात उत्पादनात गुंतलेली आहे. सौर ऊर्जा सोलूशन पुरवणारी कंपनी ऑन-ग्रिड, ऑफ-ग्रिड आणि हायब्रिड सोलर सिस्टीमचा या सुविधाही पुरवते. पर्यायी ओईएम (Original Equipment Manufacturers OEMs) OEM वरील ग्राहकांचा अवलंब कमी करण्यासाठी कंपनीने ५२२ हून अधिक SKU चा विस्तृत उत्पादन पोर्टफोलिओ डिझाइन केला आहे, ज्यामध्ये सोलर इन्व्हर्टर, पॅनेल आणि बॅटरी यांचा समावेश आहे.कंपनीवला ७२५ हून अधिक वितरक व ५५४६ डीलर्स आणि १,१०० विशेष फ्रँचायझीं दुकानांसह विस्तृत वितरण नेटवर्कद्वारे ग्राहकांना सेवा देते. ग्राहकांच्या गरजा समजून घेण्यासाठी आणि कस्टमाइज्ड सोलर सिस्टीम पुरवण्यासाठी कंपनी प्रयत्न करते. याव्यतिरिक्त कंपनी सोलर PCU, ऑफ-ग्रिड, ऑन-ग्रिड आणि हायब्रिड इन्व्हर्टर, सोलर पॅनेल, PWM चार्जर, इतर बॅटरी चार्जर, लिथियम-आयन आणि ट्यूबलर बॅटरी, ऑनलाइन आणि ऑफलाइन UPS सिस्टम, सोलर मॅनेजमेंट युनिट्स आणि चार्ज कंट्रोलर्ससह विस्तृत उत्पादन श्रेणी ऑफर करते.कंपनीच्या चार उत्पादन सुविधा ग्रेटर नोएडा, उत्तर प्रदेश, परवाणू, हिमाचल प्रदेश, हरियाणा आणि दादरी, उत्तर प्रदेश येथे कार्यरत आहेत.कंपनीला यापूर्वी आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर ६७% कोटी महसूलात वाढ झाली असून कंपनीने करोत्तर नफ्यात इयर ऑन इयर बेसिसवर २४५% वाढ नोंदवली होती. जून तिमाहीत कंपनीच्या उत्पन्नात मात्र घसरण झाली. मार्च तिमाहीतील तुलनेत या तिमाहीत कंपनीच्या उत्पन्नात ५९७.७९ कोटींवर घट झाली आहे तर कंपनीच्या ईबीटा (EBITDA) गेल्या तिमाहीतील २४८.५२ कोटींच्या तुलनेत या तिमाहीत १०५.८९ कोटीवर घसरण झाली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या आयपीओतील मिळणाऱ्या निधीचा वापर कंपनी रतलाम मध्यप्रदेश या ठिकाणी नवा प्रकल्प उभारणीसाठी, थकबाकी चुकती करण्यासाठी, अँडव्हान्स पैसे देण्यासाठी, व इतर दैनंदिन कामकाजासाठी करण्यात येणार आहे. कंपनीच्या मुळ प्राईज बँड किंमतीपेक्षा आज ग्रे बाजारात कंपनीच्या शेअर्समध्ये ०.४४% वाढ झाली आहे. त्यामुळे एकंदर कल पाहता कंपनीचा शेअर ६५ रूपये प्रिमियमसह सूचीबद्ध होऊ शकतो.
Uddhav Thackeray : अनपेक्षित धक्का ! बीएमसी निवडणुकीआधी ‘या’संघटनेचा उद्धव ठाकरेंना ‘जय महाराष्ट्र’
मुंबई : मुंबई महानगरपालिका (बीएमसी) निवडणुकीची (Uddhav Thackeray) तारीख जाहीर होण्यास काही दिवस बाकी असले तरी राजकीय पक्षांनी रणनीती ठरविण्यास सुरुवात केली आहे. विविध संघटना आणि मतदारगटांचा पाठिंबा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, या निवडणुकांच्या तोंडावर शिवसेना (ठाकरे गट) ला मोठा धक्का बसला आहे. मुंबई डबेवाला असोसिएशनने ठाकरे गटाकडून २०१७ च्या निवडणुकीतील आश्वासने न पाळल्याचा […] The post Uddhav Thackeray : अनपेक्षित धक्का ! बीएमसी निवडणुकीआधी ‘या’ संघटनेचा उद्धव ठाकरेंना ‘जय महाराष्ट्र’ appeared first on Dainik Prabhat .
Kolhapur Accident – राज्यात काही दिवसांपासून सातत्याने अपघाताचे सत्र सुरू असून कोल्हापुरातही भीषण दुर्घटना घडली आहे. हा अपघात कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर घडला आहे. ऊस वाहतूक करणा-या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत सैन्य २ तरूणांचा जागीच मृत्यू झाला आहे. पारस परीट (वय २१) आणि सुरेश उंड्रीकर (वय २१) अशी मृत युवकांची नावे आहेत. दोघेही अंबर्डे […] The post Kolhapur Accident : राज्यात अपघाताचे सत्र सुरूच.! कोल्हापुरातील भीषण अपघातात सैन्य २ तरूणांचा जागीच मृत्यू appeared first on Dainik Prabhat .
राज्यात आणखी ५०० कोटींचा घोटाळा ते शेख हसीना यांना फाशी, वाचा आजच्या टॉप १० बातम्या
१) राज्यात आणखी एक ५०० कोटींचा घोटाळा मुंबईतील गोवंडी येथे बीएमसीने सार्वजनिक निधीतून तब्बल ५०० कोटी रुपये खर्चून उभारलेले ५८० खाटांचे अत्याधुनिक मल्टी-स्पेशालिटी रुग्णालय आता खासगीकरणाच्या गर्तेत ढकलले जाण्याच्या प्रयत्नात आहे, असा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. या प्रकरणात त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर बोट ठेवले आहे. अंजली दमानिया यांनी […] The post राज्यात आणखी ५०० कोटींचा घोटाळा ते शेख हसीना यांना फाशी, वाचा आजच्या टॉप १० बातम्या appeared first on Dainik Prabhat .
Azam Khan : दोन पॅनकार्ड प्रकरणात आझम खान दोषी; पिता-पुत्रांना प्रत्येकी 50 हजारांचा दंड
रामपूर : समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आझम खान पुन्हा एकदा चर्चेत आले असून सोमवारी रामपूर न्यायालयाने माजी आमदार अब्दुल्ला आझम यांच्याशी संबंधित असलेल्या दोन पॅनकार्ड प्रकरणामध्ये अब्दुला व आझम खान यांना दोषी ठरवताना, प्रत्येकी 50 हजारांचा दंड ठोठावला आहे. न्यायालयातील कामकाजानंतर दोघांनाही पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. हा निकाल आझम खान यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या 104 […] The post Azam Khan : दोन पॅनकार्ड प्रकरणात आझम खान दोषी; पिता-पुत्रांना प्रत्येकी 50 हजारांचा दंड appeared first on Dainik Prabhat .
डंपरच्या चाकांनी घेतला आणखी एका तरुणीचा जीव; आरोपी चालक फरार
पिंपरी – जांबे परिसरातील सावंत पार्क चौकात झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरून जाणाऱ्या २० वर्षीय तरुणीचा डंपरच्या चाकाखाली येऊन मृत्यू झाला. अवजड वाहनांमुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या वाढतच चालली आहे. विशेषत: हिंजवडी व आसपासच्या परिसरात हे प्रकार सातत्याने घडत असून महिलांचा बळी गेला. या अपघातानंतर डंपर चालक वाहनासह फरार झाला आहे. ही घटना सोमवारी (दि. १७) दुपारी […] The post डंपरच्या चाकांनी घेतला आणखी एका तरुणीचा जीव; आरोपी चालक फरार appeared first on Dainik Prabhat .
वैभववाडीत मंत्री नितेश राणे यांचा उबाठाला मजबूत धक्का
आखवणे व भोम गावातील दोन शाखाप्रमुखांसह असंख्य कार्यकर्ते भाजपात दाखलवैभववाडी : वैभववाडी परिसरात राजकीय हालचालींना वेग आला असून उबाठाच्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत झालेल्या या भव्य पक्षप्रवेश सोहळ्यामुळे भाजपाने वैभववाडीमध्ये आपली ताकद आणखी वाढवली आहे.या कार्यक्रमात उबाठाचे आखवणे शाखाप्रमुख रवींद्र गुरव, भोम शाखाप्रमुख संतोष नारायण पडवळ, महिला शाखाप्रमुख संजीवनी गुरव, तसेच राजेश गुरव, संदीप पाटेकर, मंगेश गुरव, संदीप गुरव आणि अन्य अनेक कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. मंत्री नितेश राणे यांनी या सर्वांचे पक्षात स्वागत केले. या प्रवेशामुळे उबाठाला मोठा धक्का बसला असून भाजपासाठी हा महत्त्वाचा राजकीय विजय मानला जात आहे.कार्यक्रमावेळी किशोर कांबळे, श्रीधर फोंडके, ज्ञानेश्वर फोंडके, सुशील कदम, उदय पांचाळ, शांतिनाथ गुरव यांच्यासह भाजपाचे अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या घडामोडीमुळे वैभववाडीतील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसू लागली असून आगामी काळात भाजपाची ताकद अधिक बळकट होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
Tata Sierra 2025 : टाटा मोटर्सने आपल्या लोकप्रिय SUV ‘सिएरा’ला अत्यंत आधुनिक आणि प्रीमियम रूपात पुन्हा सादर केले आहे. 90 च्या दशकात घराघरात ओळख निर्माण केलेली ही SUV आता आधुनिक तंत्रज्ञान, सुरक्षितता आणि शानदार डिझाइनसह मार्केटमध्ये परत येत आहे. कंपनी ही नवी सिएरा 25 नोव्हेंबर 2025 रोजी लाँच करणार असून तिची अंदाजित किंमत 11 लाख […] The post आली रे आली.! 90 च्या दशकातील लोकप्रिय ‘Tata Sierra’ पुन्हा मार्केटमध्ये आली; किंमत आणि फीचर्स एकदा पाहाच appeared first on Dainik Prabhat .
SUN TV Network QResults: कंपनीच्या निव्वळ नफ्यात १७.१७% घसरण तर विक्रीत २९.८६% वाढ
मोहित सोमण: सनटिव्ही टीव्ही नेटवर्कने आज आपला तिमाही निकाल जाहीर केला आहे. कंपनीला इयर ऑन इयर बेसिसवर कामकाजातून मिळणाऱ्या महसूलात (Revenue from Operations) गेल्या वर्षीच्या तिमाहीतील १२५६.७९ कोटींच्या तुलनेत या तिमाहीत ११६७.९९ कोटी वाढ झाली आहे. तर कंपनीच्या निव्वळ करोत्तर नफ्यात (Net Profit after tax PAT) इयर ऑन इयर बेसिसवर ३९८.१७ कोटींच्या तुलनेत या तिमाहीत मात्र ३२९.७९ कोटीवर घसरण झाली आहे. म्हणजेच ही घसरण १७.७% होती.याखेरीज कंपनीच्या निकालातील माहितीनुसार, कंपनीच्या निव्वळ विक्रीत इयर ऑन इयर बेसिसवर २९.८६% वाढ झाली असून गेल्या वर्षीच्या तिमाहीतील ९००.१६ कोटींच्या तुलनेत या तिमाहीत ११६८.९९ कोटींवर वाढ नोंदवली. कंपनीच्या ईबीटा (EBITDA) गेल्या वर्षीच्या तुलनेत ६९२.९६ कोटी तुलनेत २७.१८% वाढत या तिमाहीत ८८१.३१ कोटींवर वाढला आहे.कंपनीच्या ईपीएस (Earning per share EPS) मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर गेल्या वर्षीच्या तिमाहीतील १०.३९ रूपयावरून या तिमाहीत ९ रुपयांवर घसरण झाली आहे. कंपनीच्या एकूण उत्पन्नात (Total Comprehensive Income) इयर ऑन इयर बेसिसवर गेल्या वर्षीच्या तिमाहीतील ३९८.२० कोटी तुलनेत या तिमाहीत ३२९.७८ कोटीवर घसरण झाली.
Rajasthan Royals : राजस्थानने जुना हुकमी एक्का बोलवला ! ‘या’खेळाडूची केली हेड कोचपदी नियुक्ती
Rajasthan Royals New head Coach : आयपीएलचा पहिला विजेता राजस्थान रॉयल्स (आरआर) सध्या मोठ्या संकटकाळातून वाटचाल करत आहे. २०२५ च्या आयपीएलमधील निराशाजनक कामगिरीनंतर संघाने अनेक महत्त्वाचे बदल केले आहेत. मॅचविनर जॉस बटलरला रिलीज केल्यानंतर झालेल्या टीकेचा सामना करताना कॅप्टन संजू सॅमसनला चेन्नई सुपर किंग्जकडे ट्रेड केलं, तर टीम इंडियाला टी-२० वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या माजी […] The post Rajasthan Royals : राजस्थानने जुना हुकमी एक्का बोलवला ! ‘या’ खेळाडूची केली हेड कोचपदी नियुक्ती appeared first on Dainik Prabhat .
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवण्यात आले आहे. बांगलादेश आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने (ICT) सोमवारी त्यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. हसीना गेल्या वर्षी ढाका सोडून भारतात आल्या आणि तेव्हापासून त्या दिल्लीतील एका सुरक्षित घरात राहत आहेत. भारत आता शेख हसीनांना बांगलादेशला परत सोपवेल का, नाही तर काय होईल, शेख हसीनांकडे कोणते पर्याय आहेत; दिव्य मराठी एक्सप्लिनेरमध्ये ६ महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे… प्रश्न १: बांगलादेशी न्यायाधिकरणाचा निर्णय स्वीकारण्यास भारत कायदेशीररित्या बांधील आहे का? उत्तर: भारत आणि बांगलादेशने २०१३ मध्ये प्रत्यार्पण करारावर स्वाक्षरी केली, ज्यामध्ये दोन्ही देशांमधील गुन्हेगारांची देवाणघेवाण करण्याची तरतूद आहे. या करारानुसार, एखाद्या गुन्हेगाराचे प्रत्यार्पण फक्त तेव्हाच केले जाईल, जेव्हा... या आधारावर, भारताने २०२० मध्ये शेख मुजीबुर रहमान यांच्या हत्येतील आरोपी असलेल्या दोन दोषींना बांगलादेशला हद्दपार केले. तथापि, या कराराला दोन प्रमुख बाहेर पडण्याचे दरवाजे देखील आहेत... १. राजकीय गुन्ह्यांसाठी तरतूद कराराच्या कलम ६ नुसार, जर गुन्हा राजकीय मानला गेला तर भारत प्रत्यार्पणास नकार देऊ शकतो. तथापि, खून, नरसंहार आणि मानवतेविरुद्धचे गुन्हे या कलमातून वगळण्यात आले आहेत. आयसीटीने या गंभीर आरोपांवर हसीना यांना दोषी ठरवले आहे. त्यामुळे, संपूर्ण प्रकरण राजकीय असल्याचा दावा भारत करू शकत नाही. २. निष्पक्ष सुनावणी झाली नाही. कराराच्या कलम ८ अंतर्गत, जर आरोपीच्या जीवाला धोका असेल, त्याला निष्पक्ष सुनावणी मिळाली नसेल किंवा न्यायाधिकरणाचा उद्देश न्यायालयीन नसून राजकीय असेल, तर भारत प्रत्यार्पणास नकार देऊ शकतो. भारत हे सहजपणे दाखवून देऊ शकतो, कारण… माजी भारतीय राजदूत अजय बिसारिया यांच्या मते, भारत कोणत्याही परिस्थितीत शेख हसीना यांना बांगलादेशात परत पाठवणार नाही. भारताने त्यांना राजकीय आश्रय दिला आहे. आशियातील हसीना यांच्यासाठी भारत सर्वात सुरक्षित ठिकाण आहे. जर भारताने त्यांना परत पाठवले, तर बांगलादेशमध्ये अस्थिरता वाढेल, जी आणखी धोकादायक असेल. प्रश्न २: जर भारताने शेख हसीनांना परत करण्यास नकार दिला तर काय होईल? उत्तर: यात, दोन परिस्थिती उद्भवू शकतात... १. बांगलादेशशी संबंध बिघडतील, राजनैतिक दबाव कायम राहील. भारत त्यांच्या न्यायालयीन निर्णयाचा आदर करत नाही, असा दावा ढाका करत राहू शकतो. राजनैतिक वक्तृत्व वाढेल. परंतु संबंध तोडणे कठीण आहे, कारण बांगलादेश व्यापार आणि ऊर्जा पुरवठ्यासह अनेक गोष्टींसाठी भारतावर अवलंबून आहे. २. तणाव वाढून धोरणात्मक बदल होऊ शकतो. जर ढाका चीन आणि पाकिस्तानशी आणखी जुळवून घेत असेल, तर भारतासाठी ही एक अतिशय धोकादायक परिस्थिती असेल. पाकिस्तानी युद्धनौका आधीच बांगलादेशात पोहोचल्या आहेत. युनूस ग्रेटर बांगलादेश नकाशा हातात धरलेले दिसले, ज्यामुळे भारत-बांगलादेश व्यापार युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली. यामुळे भारत ईशान्येपासून बंगालच्या उपसागरापर्यंत असुरक्षित होईल. तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, भारतासाठी सर्वात सुरक्षित पर्याय म्हणजे शेख हसीनांना तिसऱ्या देशात पाठवणे. यामुळे हसीनांची सुरक्षितता सुनिश्चित होईल आणि थेट भारत-ढाका संघर्ष टाळता येईल. काही संभाव्य देशांमध्ये युएई, यूके, कॅनडा आणि नेदरलँड्स यांचा समावेश आहे. तथापि, प्रश्न कायम आहे: हे देश यावेळी शेख हसीनांना आश्रय देतील का? प्रश्न ३: बांगलादेश परतण्याच्या प्रश्नावर शेख हसीना काय सूचित करत आहेत? उत्तर: शेख हसीना ऑगस्ट २०२४ मध्ये बांगलादेश सोडून भारतात आल्या. त्यांनी सांगितले की, एक हिंसक जमाव पंतप्रधानांच्या निवासस्थानी घुसला होता आणि त्यांच्या जीवाला धोका होता. अलीकडील मुलाखतींमधून तीन वेगळे सूर उघड होतात... १. आयसीटी चाचणी एक बनावट २. जर तुम्हाला आयसीसीमध्ये खटला चालवायचा असेल तर ते करा; मी तयार आहे. ३. 'मी परत येईन, पण लोकशाही परत येईल तेव्हाच' प्रश्न ४: हसीनांना शेवटी कोणत्या आरोपांवर शिक्षा झाली? उत्तर: हसीनांवर ५ आरोपांखाली खटला सुरू होता... आरोप १: खून, खुनाचा प्रयत्न, छळ. आरोपपत्रानुसार, हसीनांनी पोलिस आणि अवामी लीगला नागरिकांवर हल्ला करण्यास प्रवृत्त केले आणि हिंसाचार थांबवण्यात अयशस्वी ठरले. आरोप २: विद्यार्थी निदर्शकांना दडपण्यासाठी हसीनांनी प्राणघातक शस्त्रे, हेलिकॉप्टर आणि ड्रोन वापरण्याचे आदेश दिले. आरोप ३: १६ जुलै रोजी बेगम रोकेया विद्यापीठातील विद्यार्थी अबू सय्यदच्या हत्येशी संबंधित. आरोपात असा आरोप आहे की, हसीना आणि इतरांनी हत्येचे आदेश दिले, कट रचला आणि त्यात सहभागी झाले. आरोप ४: ५ ऑगस्ट रोजी ढाक्यातील चांखरपुल येथे सहा नि:शस्त्र निदर्शकांची हत्या करण्यात आली. या हत्या थेट हसीना यांनीच केल्या होत्या, त्यांना चिथावणी दिली होती, त्यांना मदत केली होती आणि कट रचला होता, असा आरोप आहे. आरोप ५: या आरोपात पाच निदर्शकांना गोळ्या घालून ठार मारण्याचा आणि एकाला जखमी करण्याचा आरोप आहे. त्या पाच बळींचे मृतदेह जाळण्यात आल्याचा आणि एका निदर्शकाला जिवंत जाळण्यात आल्याचा आरोप आहे. ढाका येथील आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने त्यांना हत्येसाठी चिथावणी देणे आणि हत्येचे आदेश देणे या आरोपाखाली दोषी ठरवले. जुलै २०२४ च्या विद्यार्थी निदर्शनांदरम्यान झालेल्या हत्याकांडांचा सूत्रधार त्यांना घोषित केले. न्यायाधिकरणाने दुसरे आरोपी, माजी गृहमंत्री असदुज्जमान खान यांनाही १२ जणांच्या हत्येचा दोषी ठरवले आणि त्यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. दरम्यान, तिसरा आरोपी, माजी आयजीपी अब्दुल्ला अल-मामुन याला पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. मामुन हा सरकारी साक्षीदार बनला आहे. न्यायालयाने हसीना आणि असदुज्ज्झमान कमाल यांच्या मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले. शिक्षा जाहीर होताच, कोर्टरूममध्ये उपस्थित असलेल्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. प्रश्न ५: शेख हसीना यांच्याकडे आता कोणते पर्याय आहेत? उत्तर: बांगलादेश आयसीटीकडून शिक्षा झाल्यानंतर शेख हसीना यांच्याकडे अजूनही अनेक कायदेशीर आणि राजकीय पर्याय आहेत. कायदेशीर पर्याय राजकीय पर्याय प्रश्न ६: संयुक्त राष्ट्र किंवा आयसीसी या प्रकरणात भूमिका बजावू शकतात का? उत्तर: या प्रकरणात संयुक्त राष्ट्र आणि आयसीसीची भूमिका मर्यादित आहे. संयुक्त राष्ट्र थेट न्यायालयाचा निर्णय रद्द करू शकत नाही. तथापि, ते मानवी हक्क उल्लंघनांची चौकशी करू शकते, खटल्याच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करू शकते किंवा आयसीसीकडे प्रकरण पाठवू शकते. हसीना स्वतः आयसीसीकडे खटला दाखल करण्यास तयार आहे. जर आयसीसीला खटल्यात अनियमितता आढळली, तर भारत त्या निर्णयाचा आधार घेऊन हसीना यांना परत करण्यास नकार देऊ शकतो. तज्ञांचा असा विश्वास आहे की, भारत कोणताही निर्णय घाईघाईने घेणार नाही. भारताचे मौन ही एक रणनीती आहे. भारत निष्पक्ष खटल्यातील कमतरता अधोरेखित करेल. संशोधन: आकाश कुमार
Delhi Temperature : थंडी एवढी, की हाडे गोठली.! दिल्लीमध्ये थंडीने तीन वर्षांचा विक्रम मोडला
Delhi Temperature : राजधानी दिल्लीमध्ये नोव्हेंबर महिन्यातच थंडीत मोठी वाढ जाणवू लागली आहे. यंदा थंडीने तीन वर्षांचा विक्रम मोडला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दिल्लीतील किमान तापमान 9 अंश सेल्सियसपर्यंत खाली उतरले, जे सामान्यापेक्षा तब्बल 4.5 अंशांनी कमी आहे. यापूर्वी 2022 मध्ये नोव्हेंबर महिन्यात किमान तापमान 7.3 अंश सेल्सियस नोंदवले गेले होते. दिल्लीमध्ये मोडले […] The post Delhi Temperature : थंडी एवढी, की हाडे गोठली.! दिल्लीमध्ये थंडीने तीन वर्षांचा विक्रम मोडला appeared first on Dainik Prabhat .
Vaibhav Suryavanshi Reaction Viral : रायझिंग आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान ए यांच्यातील रोमांचक सामना रविवारी खेळला गेला. दुर्दैवाने भारताला या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला, पण या सामन्यातून पुन्हा एकदा चर्चेत आला तो भारताचा १४ वर्षीय युवा सनसनाटी फलंदाज वैभव सूर्यवंशी! पहिल्या सामन्यातील शतकानंतर पुन्हा तुफान बॅटिंग आधीच पहिल्या सामन्यात धडाकेबाज शतक ठोकून […] The post Vaibhav Suryavanshi Reaction : पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात अंपायरसोबत वाद मात्र सगळीकडे चर्चा वैभव सूर्यवंशीच्या रिॲक्शनची ( Video) appeared first on Dainik Prabhat .
राज्यात आणखी एक ५०० कोटींचा घोटाळा; अजित पवारांवर ठेवलं बोट, अंजली दमानियांच्या आरोपाने खळबळ
मुंबई : गोवंडी येथे बीएमसीने सार्वजनिक निधीतून तब्बल ५०० कोटी रुपये खर्चून उभारलेले ५८० खाटांचे अत्याधुनिक मल्टी-स्पेशालिटी रुग्णालय आता खासगीकरणाच्या गर्तेत ढकलले जाण्याच्या प्रयत्नात असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. या प्रकरणात त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर बोट ठेवले आहे. अंजली दमानिया यांनी म्हटले आहे की, “हा पूर्णपणे जनतेचा पैसा […] The post राज्यात आणखी एक ५०० कोटींचा घोटाळा; अजित पवारांवर ठेवलं बोट, अंजली दमानियांच्या आरोपाने खळबळ appeared first on Dainik Prabhat .
भारताची ताकद आणखी वाढणार.! शत्रुचे ड्रोन हवेतच नष्ट करण्याची प्रणाली लवकरच लष्करात दाखल होणार
नवी दिल्ली – ऑपरेशन सिंदूरला उत्तर म्हणून पाकिस्तानी सैन्याने भारताविरुद्ध मोठ्या प्रमाणात ड्रोनचा वापर केला होता. या पार्श्वभूमीवर भारतीय सशस्त्र दल शत्रूच्या ड्रोनविरुद्ध आता आपली क्षमता वाढवत आहेत. यासाठी लष्कर आणि हवाई दल १६ स्वदेशी ड्रोन डिटेक्शन अँड इंटरडिक्शन सिस्टीम्स साठी ऑर्डर देत आहेत. ही प्रणाली दोन किलोमीटर अंतरावरून लेसर बीमने शत्रूच्या ड्रोनना लक्ष्य करण्यास […] The post भारताची ताकद आणखी वाढणार.! शत्रुचे ड्रोन हवेतच नष्ट करण्याची प्रणाली लवकरच लष्करात दाखल होणार appeared first on Dainik Prabhat .
RCF Q2RESULTS: राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायजरचा तिमाही निकाल जाहीर इयर बेसिसवर नफ्यात ३३.४% वाढ
मोहित सोमण: राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायजर लिमिटेड (आरसीएफने RCF) आपला तिमाही निकाल जाहीर केला आहे. पीएसयु कंपनी एसआरएफला या तिमाहीत इयर ऑन इयर बेसिसवर १४०.६१ कोटींचा निव्वळ नफा प्राप्त झाला आहे. गेल्या वर्षीच्या तिमाहीतील १०६.३६ कोटींच्या तुलनेत यंदा ३३.४% वाढ झाल्याने हा १४०.६१ कोटींचा एकत्रित निव्वळ नफा (Consolidated Net Profit) मिळाला आहे. कामकाजातून मिळणाऱ्या महसूलात (Revenue from Operations) इयर ऑन इयर बेसिसवर गेल्या वर्षीच्या ४२८९.५६ कोटींच्या तुलनेत या तिमाहीत ५२९२.५८ कोटीने वाढ झाली असल्याचे एक्सचेंज फायलिंगमध्ये कंपनीने स्पष्ट केले. तिमाहीतील निकालानुसार, एकत्रित उत्पन्न (Consolidated Income) इयर ऑन इयर बेसिसवर गेल्या वर्षीच्या ७४.४५ कोटींच्या तुलनेत या तिमाहीत ११४.०९ कोटींवर पोहोचले आहे.तिमाही निकालानुसार, कंपनीच्या एकत्रित करोत्तर नफ्यात (Consolidated Profit after tax PAT) इयर ऑन इयर बेसिसवर गेल्या वर्षीच्या ७८.६० कोटींच्या तुलनेत यंदा १०५.६९ कोटींवर वाढ झाली आहे. ईपीएस (Earning per share EPS) इयर ऑन इयर बेसिसवर गेल्या वर्षीच्या तुलनेतील १.४३ रूपये तुलनेत यंदा १.९१ रूपयावर वाढ झाली आहे. कंपनीच्या ठेवीत (Reserves) मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर गेल्या वर्षीच्या तिमाहीतील ४०७०.८१ कोटींच्या तुलनेत या तिमाहीत ४३७०.१७ कोटींवर वाढ झाली आहे. तर कंपनीच्या एकत्रित करपूर्व नफ्यात (Consolidated Net Profit Before Tax PBT) इयर ऑन इयर बेसिसवर गेल्या वर्षीच्या तिमाहीतील १०६ कोटींच्या तुलनेत या तिमाहीत १४०.९५ कोटींवर वाढ नोंदवली आहे.सेगमेंटनुसार विचार केल्यास खतांच्या (Fertilizers) महसूलात महिना बेसिसवर (Month on Month MoM) गेल्या तिमाहीतीवल २१४३.९७ कोटीवरून या तिमाहीत २९४६.९७ कोटींवर वाढ नोंदवली. इंडस्ट्रियल केमिकल्स महसूलात मात्र तिमाही बेसिसवर गेल्या तिमाहीतील ३८२.७५ कोटीवरून या तिमाहीत ३२८.४९ कोटींवर घसरण झाली आहे. कंपनीच्या नफा मार्जिनमध्येही इयर ऑन इयर बेसिसवर गेल्या वर्षीच्या तिमाहीतील १.८३% वरून या तिमाहीत २% वाढ नोंदवली आहे. तर कंपनीच्या ऑपरेटिंग मार्जिनमध्ये गेल्या वर्षीच्या तिमाहीतील ३.१३% तुलनेत या तिमाहीत ४.८१% वाढ नोंदवली आहे.भारत सरकारने फर्टिलायझर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड आणि नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेडची पुनर्रचना केल्यामुळे कंपनी १९७८ मध्ये अस्तित्वात आली. भारत सरकारने फर्टिलायझर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड आणि नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेडची पुनर्रचना केल्यामुळे १९७८ मध्ये कंपनी अस्तित्वात आली. राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड (आरसीएफ) ही एक भारतीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे जी खते आणि औद्योगिक रसायनांचे उत्पादन आणि विपणन (Marketing) करते. कंपनीचे ७५% इक्विटी भागभांडवल (Stake) भारत सरकारकडे आहे. कंपनी ट्रॉम्बे आणि थाल येथे दोन मुख्य युनिट चालवते, युरिया आणि कॉम्प्लेक्स फर्टिलायझर्ससह विस्तृत उत्पादनांचे उत्पादन करते आणि ऑगस्ट २०२३ पर्यंत 'नवरत्न' दर्जा कंपनीला मिळाला असून कॉर्पोरेट कार्यालय मुंबईत आहे.
बांगलादेशच्या न्यायालयाचा निर्णय, शेख हसीना दोषी
ढाका : बांगलादेशच्या पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांच्याविरोधात बांगलादेश आंतरराष्ट्रीय लवाद या देशांतर्गत स्थापन केलेल्या आंतरराष्ट्रीय लवादाने निर्णय दिला आहे. जुलै महिन्यातील बंडासाठी लवादाने सर्वस्वी शेख हसीना याच दोषी असल्याचा निर्णय दिला आहे. आंदोलन करत असलेल्या निरपराध नागरिकांवर गोळीबार करण्याचे आदेश दिल्याप्रकरणी लवादाने शेख हसीना यांना दोषी ठरवले. लवादाने पदच्युत पंतप्रधान शेख हसीना आणि तत्कालीन गृहमंत्री असदुज्जमां खान कमाल यांना दोषी ठरवून फाशीची शिक्षा ठोठावली. लवादात पुरावा म्हणून एक ऑडिओ फाईल सादर करण्यात आली. फोनवरुन शेख हसीना गोळीबार करण्यासाठी आदेश देत असल्याचे या फाईलमधील आवाजावरुन सिद्ध होईल, असे सांगत वकिलाने लवादात ऑडिओ सादर केला. काही अधिकाऱ्यांनी लवादात साक्ष देऊन शेख हसीना यांनी कोणत्या वेळी, कशा प्रकारे, काय आदेश दिले याची सविस्तर माहिती दिली. अखेर लवादाने शेख हसीना यांना दोषी ठरवत शिक्षा दिली. शेख हसीना यांचा आदेश मानवाधिकारांचे उल्लंघन आहे, हे एक अमानवी कृत्य आहे; असेही मत लवादाने नमूद केले. मानवाधिकार आयोगाच्या अहवालाचा आधार घेत लवादाने हे मतप्रदर्शन केले. लवादाने ४५८ पानांच्या निकालपत्राद्वारे त्यांचा निकाल दिला. या निकालाद्वारे लवादाने शेख हसीना यांना दोषी ठरवले. शेख हसीना २०२४ च्या जानेवारीपासून हुकुमशहा होण्याच्या दिशेने वाटचाल करत होत्या. त्यांनी जानेवारी २०२४ मध्ये विरोधकांना चिरडले. नंतर विद्यार्थी रस्त्यावर उतरले. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर शेख हसीना यांनी आदेश दिल्यानंतर गोळीबार झाला. यात निरपराध नागरिकांचा, विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला; ही बाब नमूद करत लवादाने शेख हसीना यांना दोषी ठरवले.युनुस सरकारने पदच्युत पंतप्रधान शेख हसीना, तत्कालीन गृहमंत्री असदुज्जमां खान कमाल आणि माजी पोलीस महानिरीक्षक चौधरी अब्दुल्ला अल-मामून यांना आरोपी केले होते. या आरोपींविरोधात लवादापुढे सुनावणी झाली. आयत्यावेळी माजी पोलीस महानिरीक्षक चौधरी अब्दुल्ला अल-मामून यांनी शेख हसीना यांच्या विरोधात माफीचा साक्षीदार होण्याचा निर्णय घेतला. यानंतर सुनावणी झाली. काही अधिकाऱ्यांनी आधीच लवादात साक्ष देऊन शेख हसीना यांनी कोणत्या वेळी, कशा प्रकारे, काय आदेश दिले याची सविस्तर माहिती दिली. या सर्व साक्षी पुराव्यांची दखल घेऊन लवादाने शेख हसीना यांना दोषी ठरवले. मुख्य न्यायाधीश मुर्तजा यांच्या अध्यक्षतेखालील लवादात न्यायाधीश मोहम्मद शफीउल आलम महमूद आणि न्यायाधीश मोहम्मद मोहितुल हक एनाम चौधरी आहेत. या तीन न्यायाधीशांच्या लवादाने शेख हसीना यांना दोषी ठरवले. शेख हसीना यांनी शांततामय मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर हेलिकॉप्टरमधून बॉम्ब वर्षाव करण्याचा आदेश दिलेला असं सुद्धा लवादाने आपल्या निकालात म्हटलं आहे.
मलायका अरोराने ट्रोल करणाऱ्यांना दिले सडेतोड उत्तर
Malaika Arora |बॉलीवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही तिच्या प्रोफेशनल आणि पर्सनल आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. अरबाज खानसोबतचा घटस्फोट, अर्जुनसोबतचं अफेअर-ब्रेकअप किंवा कपड्यांवरुन मलायकाला अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. अलीकडेच तिला गाण्यातील डान्स स्टेपवरुन देखील ट्रोल करण्यात आले होते. मात्र सतत होणाऱ्या या मलायकाने ट्रोलिंगवर प्रतिक्रिया दिली आहे. एका मुलाखतीत मलायका म्हणाली, “ट्रोल करणारे नेहमी […] The post मलायका अरोराने ट्रोल करणाऱ्यांना दिले सडेतोड उत्तर appeared first on Dainik Prabhat .
आधी सत्तापालट, नंतर एकामागून एक प्रकरणं…मोहम्मद युनूसने शेख हसीनांना टार्गेट करत देशावर मिळवला ताबा
Mohammad Yunus target Sheikh Hasina। आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने (ICT) आज बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मानवतेविरुद्धच्या कथित गुन्ह्यांसाठी दोषी ठरवले. भारतात राहणाऱ्या माजी पंतप्रधानांविरुद्ध २२७ हून अधिक खटले दाखल आहेत. शेख हसीना यांच्या अनुपस्थितीत आयसीटी ही शिक्षा सुनावत आहे, ज्याचे थेट प्रक्षेपण केले जात आहे. सकाळी ११ वाजता सुरू होणारी शिक्षेची प्रक्रिया उशिरा सुरू […] The post आधी सत्तापालट, नंतर एकामागून एक प्रकरणं… मोहम्मद युनूसने शेख हसीनांना टार्गेट करत देशावर मिळवला ताबा appeared first on Dainik Prabhat .
दिलासा मिळणार की हिरमोड होणार? लाडकी बहीण योजनेच्या E-KYCसाठी उरले अवघे काही तास…
Ladki Bahin Yojana | लाडकी बहीण योजनेत सर्व लाभार्थी महिलांना केवायसी करणे अनिवार्य केले आहे. जर तुम्ही केवायसी केले नाही तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही. यासाठी १८ नोव्हेंबर म्हणजे उद्यापर्यंत मुदत देण्यात आली आहे. आता केवायसी करण्यासाठी लाडक्या बहिणींकडे अवघे काही तास शिल्लक आहेत. सध्या राज्यात २.३५ कोटी महिला लाभ घेत आहेत. यातील १.३ […] The post दिलासा मिळणार की हिरमोड होणार? लाडकी बहीण योजनेच्या E-KYCसाठी उरले अवघे काही तास… appeared first on Dainik Prabhat .
Aditi Pohankar : ओटीटी माध्यमावरील लोकप्रिय ठरलेल्या ‘आश्रम’ या वेबसिरीजमध्ये अभिनेता बॉबी देओलच्या अभिनयाचे खूप कौतुक करण्यात आले. या वेबसिरीजमध्ये अभिनेत्री अदिती पोहनकरने हिने देखील आपल्या कामाची दखल घ्यायला प्रेक्षकांना भाग पडले. या सिरीजचे तिन्ही सीझन प्रेक्षकांना प्रचंड आवडले असून आता लवकरच चौथा सीझनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान, अभिनेत्री अदिती पोहनकर हिने एका मुलाखतीत […] The post ‘आश्रम’फेम अभिनेत्रीने बॅाबीचं तोंडभरून केलं कौतुक; ‘ती’ आठवण शेअर करत म्हणाली “कोविड दरम्यान आम्ही खूप वेळ…” appeared first on Dainik Prabhat .
Sheikh Hasina। आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसिना यांना दोषी ठरवले आहे आणि त्यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे. सुमारे ४०० पानांमध्ये लिहिलेला हा निकाल न्यायमूर्ती गुलाम मुर्तझा यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने दिला. सुनावणीदरम्यान, न्यायाधिकरणाने म्हटले आहे की त्यांनी मानवाधिकार संघटना आणि इतर अनेक संस्थांकडून आलेल्या अहवालांचा सखोल विचार केला आहे, ज्यामध्ये सर्व […] The post मोठी बातमी ! शेख हसीना यांना मृत्युदंडाची शिक्षा ; बांगलादेश आयसीटीने मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये ठरवले दोषी appeared first on Dainik Prabhat .
पुनावाला फिनकॉर्पवर आयकर विभागाची कारवाई! १६.३९ लाखांचा दंड आकारला कंपनी म्हणते,'आमच्यावर....
मोहित सोमण: पुनावाला फिनकॉर्प लिमिटेड (Poonawala Fincorp Limited) एनबीएफसी कंपनीला आयकर विभागाकडून १६३९७५० लाख रूपये दंड भरण्यासाठी नोटिस बजावण्यात आली आहे. कंपनीने आपल्या एक्सचेंज फायलिंगमध्ये संबंधित माहिती दिली आहे. लिस्टिंग ऑबलिगेशन अँड डिस्क्लोजर रिकवायरमेंट रेग्युलेशन २०१५ कायद्यातील तरतुदीनुसार ही नोटीस आयकर विभागाने कंपनीला बजावली आहे. याबद्दल माहिती देताना कंपनीने नेमक्या शब्दात म्हटले आहे की,'शीर्ष दिलेल्या विषयाच्या संदर्भात, आम्ही हे कळवू इच्छितो की हे प्रकरण कंपनीच्या अधिग्रहणापूर्वीच्या आर्थिक वर्ष २०१८-१९ कालावधीशी संबंधित आहे. आम्हाला १६ नोव्हेंबर २०२५ रोजी आयकर आयुक्त (अपील) कडून प्राप्तिकर कायदा, १९६१ च्या कलम २७०अ अंतर्गत १६३९५७० रुपये दंड आकारण्याचा आदेश मिळाला आहे. आदेशाची प्रत परिशिष्ट १ मध्ये येथे जोडली आहे.आम्ही तुम्हाला कळवू इच्छितो की कंपनीने नेहमीच प्रशासन आणि नियामक आणि वैधानिक बाबींचे पालन करण्यासाठी उच्च मानके राखली आहेत. आम्ही या मानकांचे (Standards) पालन करण्यास वचनबद्ध आहोत.'आर्थिक वर्ष २०२१ मध्ये रायजिंग सन होल्डिंग्स यांनी मॅगमा फिनकॉर्पचे अधिग्रहण केले होते. त्यानंतर या कंपनीचे नव्याने नाव पुनावाला फिनकॉर्प ठेवण्यात आले होते. रायजिंग सन होल्डिंग्स ही उद्योगपती अदर पुनावाला यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहे. त्यांनी मॅगमा कंपनीतील ६०% भागभांडवल (Stake) खरेदी करून या कंपनीचे नियंत्रण मिळवले होते. या अधिग्रहणापूर्वी आर्थिक वर्ष २०१८-१९ साली आयकर कायदा १९६१ मधील कलम २५० अनुसार एकूण कर रकमेच्या ५०% रक्कम दंड (१६३९५७० लाख) आयकर विभाग आयुक्तांनी कायम ठेवला असल्याचे कंपनीने आपल्या एक्सचेंज फायलिंगमध्ये नमूद केले आहे. कंपनीच्या माहितीनुसार, १६ नोव्हेंबर म्हणजेच काल कंपनीला ही नोटीस ईमेलद्वारे मिळाली असल्याचे कंपनीने स्पष्ट केले.आयकर विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार,आर्थिक वर्ष २०१८-१९ च्या सुधारित कर विवरणपत्रात दावा केलेल्या ९३८४००० रुपयांच्या शिक्षण उपकर कपातीची परवानगी नाकारल्यामुळे हा दंड आकारण्यात आला' असे स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, 'याचा कंपनीच्या कामकाजात कुठलाही परिणाम होणार नाही' असे स्पष्ट करण्यात आले आहे.
भारताने पहिल्यांदाच अमेरिकेसोबत केला ‘हा’करार ; जाणून घ्या त्याचा काय परिणाम?
India US LPG Deal। अमेरिकेने वाढत्या शुल्कामुळे भारत आणि अमेरिकेतील व्यापारी संबंधांमधील तणाव आता हळूहळू कमी होताना दिसत आहे. अमेरिकेसोबत व्यापार करार होण्याची अपेक्षा असताना, भारताने पहिल्यांदाच अमेरिकेसोबत दीर्घकालीन एलपीजी आयात करारावर स्वाक्षरी केली आहे. अशा करारामुळे देशाची ऊर्जा सुरक्षा मजबूत होईल आणि जागतिक अनिश्चिततेमध्ये पुरवठा स्रोतांमध्ये विविधता आणण्याची संधी मिळेल” असे सरकारकडून सांगण्यात आले […] The post भारताने पहिल्यांदाच अमेरिकेसोबत केला ‘हा’ करार ; जाणून घ्या त्याचा काय परिणाम? appeared first on Dainik Prabhat .
Amit Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते अमित ठाकरे यांच्यासह ७० मनसैनिकांवर नेरूळ पोलिसांनी जमावबंदी उल्लंघन आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याच्या कलमांत गुन्हा दाखल केला आहे. नवी मुंबईतील नेरूळ येथील राजीव गांधी उड्डाणपुलाजवळ उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनारूढ पुतळा चार महिन्यांपासून अनावरणाच्या प्रतिक्षेत तसाच झाकून ठेवलेल्या अवस्थेत होता. अमित ठाकरे यांनी कार्यकर्त्यांसह आवाज उठवत […] The post राजपुत्राची गर्जना! “तर भविष्यातही असे…”; गुन्हा दाखल होताच मनसे नेते अमित ठाकरे आक्रमक, थेट शब्दांत म्हणाले… appeared first on Dainik Prabhat .
स्टेट बँकेने रचला नवा इतिहास: आज बाजार भांडवल ९ ट्रिलियन पार केले, ठरली पहिली पीएसयु बँक 'यासाठी'
मोहित सोमण: आज एसबीआयने (State Bank of India SBI) मोठी ऐतिहासिक कामगिरी बजावली आहे. बँकेच्या इतिहासात पहिल्यांदाच बँकेच्या बाजार भांडवलात (Market Capitalisation) ९ ट्रिलियन रूपयांची पातळी पार केली आहे. त्यामुळे ९ ट्रिलियन पातळी पार केलेली ६ वी भारतीय संस्था (Organisation) ठरली आहे. आज कंपनीच्या शेअर्समध्ये दुपारी १२.१३ वाजेपर्यंत ०.५४% वाढ होत ९७४.१० रूपये प्रति शेअरवर हा समभाग व्यवहार करत होता. पीएसयु बँक श्रेणीत हा आकडा पार करणारी प्रथम बँक एसबीआय ठरली आहे. यापूर्वी एचडीएफसी व आयसीआयसीआय या बड्या खाजगी बँकांनी हा टप्पा पार केला आहे.देशातील सर्वात मोठी बँक म्हणून ओळखली जात असलेल्या एसबीआय (State Bank of India SBI) आपला तिमाही निकाल ४ नोव्हेंबरला जाहीर केला होता. बँकेच्या फंडांमेंटल मध्ये जबरदस्त वाढ झाल्याचे आकडेवारीतून दिसून आले होते. बँकेच्या निव्वळ नफ्यात इयर ऑन इयर बेसिसवर ६.४% वाढ झाली असून बँकेच्या निव्वळ व्याज उत्पन्नात (Net Interest Income NII) ३.२८% वाढ नोंदवली गेली होती. प्रामुख्याने बँकेच्या असेट क्वालिटीतही मोठी सुधारणा झाली होती. गेल्या वर्षीच्या तिमाहीतील २०२९४ कोटींच्या तुलनेत या तिमाहीत ९% घसरण होत निव्वळ एनपीए (Net Non Performing Assets NPA) १८४६० कोटीवर पोहोचला होता. त्यामुळे निकालानंतर शेअर ५२ आठवड्यातील निचांकी (All time Low) ६७९.६५ पातळीवरून रिबाऊंड होत आज शेअरने ९७६.०० रूपये प्रति शेअर पातळी पार केली आहे. आकडेवारीनुसार ४४% सुधारणा या शेअर्समध्ये झाली असून बँकेच्या आर्थिक स्थितीत मोठी सुधारणा झाली होती.सध्या अस्तित्वात असलेल्या पाच भारतीय कंपन्यांचे बाजारमूल्य ९ ट्रिलियन पेक्षा अधिक आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक, भारती एअरटेल, टाटा कन्सल्टन्सी, सर्विसेस आणि आयसीआयसीआय बँक हे ₹९ ट्रिलियन पेक्षा जास्त बाजारमूल्य असलेल्या कंपन्यांच्या यादीत आधीपासून समाविष्ट आहेत तर बँकेच्या श्रेणीत एचडीएफसी बँक (१५.२५ ट्रिलियन) आणि आयसीआयसीआय बँक (९.८३ ट्रिलियन) यांचा समावेश होता आता त्यात एसबीआयची भर पडली आहे.
मोहित सोमण:आज टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकलचा शेअर मोठ्या अंकांनी कोसळला. बाजाराच्या सुरूवातीलाच टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकलचा (TMPV) शेअर थेट ७.२७% कोसळला आहे. कंपनीच्या कमकुवत तिमाही निकालासह कमजोर पद्धतीने झालेली सूचीबद्धता (Listing), टाटाची फ्लॅगशिप मोटर कंपनी 'जग्वार' कंपनीचा कमकुवत तिमाही निकाल व यापूर्वी झालेल्या कंपनीच्या आयटी सिस्टीमवर झालेला सायबर हल्ला या विविध कारणांमुळे आज कंपनीच्या शेअरला घसरत्या किंमतीचा सामना करावा लागला. दुपारी १२.३९ वाजेपर्यंत कंपनीच्या शेअर्समध्ये ४.३७% घसरण होत ३७४.५० रूपये प्रति शेअरवर व्यवहार करत असल्याने शेअर रिकव्हर होत असला तरी गुंतवणूकदारांना पहिल्या सत्रात फटका बसला आहे.यापूर्वी जेएलआर (Jaguar) कंपनीने इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) ईबीटा १३०० कोटीने घसरला आहे. तर कंपनीच्या महसूलात १४% इतके प्रचंड नुकसान होत ते ७२३५० कोटींवर घसरले होते. नुवामा ब्रोकिंग संस्थेने कंपनीच्या भाकीतात आगामी काळात ईबीटा (EBITDA) आणखी ५ ते ८% घसरू शकते असे म्हटले आहे. ब्रोकरेजने दिलेल्या नकारात्मक कौलानंतर शेअरमधील सेल ऑफ मोठ्या प्रमाणात वाढल्याने शेअर्समध्ये घसरण सुरू आहे. दरम्यान ते हळूहळू रिकव्हर होत असल्याचे आज बाजारात पाहायला मिळत आहे. तिमाहीत कंपनीला ५०० मिलियन डॉलरचे या तिमाहीत सायबर हल्ल्यात झाले होते. याचा फटका युकेच्या अर्थव्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात बसला होता. कंपनीच्या प्रगतीवर याचा नकारात्मक परिणाम झाला असून कंपनीच्या उत्पादनात २८.६% घसरण झाली होती.या मुद्यावर प्रसारमाध्यमांशी भाष्य करताना फायनान्शियल ऑफिसर पीबी बालाजी यांनी व्यवसायासाठी हा एक कठीण काळ होता. तथापि, सायबर घटनेतून आणखी मजबूत बाहेर पडण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. विलय पूर्ण झाल्यामुळे, जेएलआर आणि देशांतर्गत पीव्ही व्यवसाय दोन्ही या आगामी उद्योगाद्वारे भविष्यातील महत्त्वपूर्ण संधींचा फायदा घेण्यासाठी सज्ज आहेत' असे ते म्हणाले. बालाजी पुढे म्हणाले की जागतिक मागणी कमी झाली असली तरी, देशांतर्गत बाजारपेठेत सुधारणा होण्याची सुरुवातीची चिन्हे दिसून आली आहेत.
नितीश कुमारांनी राज्यपालांची भेट घेतली पण राजीनामा दिला नाही ; कॅबिनेट मंत्र्यांनी दिले ‘हे’कारण
Nitish Kumar। बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर तीन दिवसांनी म्हणजे आज जनता दल (संयुक्त) नेते नितीश कुमार यांनी राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांची भेट घेतली. मात्र, त्यांनी अद्याप राजीनामा दिलेला नाही. राजभवनात जाण्यापूर्वी नितीश कुमार यांनी सरकारची अंतिम मंत्रिमंडळ बैठक घेतली. बैठकीत मंत्रिमंडळ बरखास्त करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. मंत्रिमंडळ बैठक संपल्यानंतर ते राजभवनात […] The post नितीश कुमारांनी राज्यपालांची भेट घेतली पण राजीनामा दिला नाही ; कॅबिनेट मंत्र्यांनी दिले ‘हे’ कारण appeared first on Dainik Prabhat .
Rasha Thadani : अभिनेत्री रवीना टंडनची मुलगी राशा थडानी आता बॉलिवूडनंतर तेलुगू चित्रपटसृष्टीतही धुमाकूळ घालण्यास सज्ज आहे. राशाने तेलूगू चित्रपटाबद्दल एक खास पोस्ट शेअर केली आहे. ‘आझाद’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये तिने पदार्पण केले. तिने ‘ओये अम्मा’ या गाण्याने सर्वांची मने जिंकली होती. आता तिने आपला मोर्चा साऊथ चित्रपटसृष्टीकडे वळवला असून, सोशल मीडियावर नव्या तेलूगू चित्रपटाची घोषणा […] The post रवीना टंडनच्या मुलीला मिळाली मोठी संधी! तेलुगू चित्रपटसृष्ट्रीत करणार धमाकेदार एन्ट्री; पोस्ट शेअर करत म्हणाली… appeared first on Dainik Prabhat .

25 C