Ravi Shastri : ‘बुमराहला वापरण्याची अक्कल नाही!’रवी शास्त्रीचा अप्रत्यक्ष अजित आगरकरला सणसणीत टोला
Ravi Shastri slams Ajit Agarkar for bumrah workload : टीम इंडियाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह (वय ३१) हा तिन्ही फॉरमॅटमधील महत्त्वाचा खेळाडू आहे. त्याने आपल्या शानदार गोलंदाजीने भारताला अनेक विजय मिळवून दिले आहेत. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून त्याची कामगिरी लौकिकाला साजेशी झालेली नाही. या पार्श्वभूमीवर, त्याच्या वर्कलोड मॅनेजमेंटची चर्चा क्रिकेट वर्तुळात जोरदार सुरू आहे. अशात […] The post Ravi Shastri : ‘बुमराहला वापरण्याची अक्कल नाही!’ रवी शास्त्रीचा अप्रत्यक्ष अजित आगरकरला सणसणीत टोला appeared first on Dainik Prabhat .
पुढच्या वर्षी डॉ. आंबेडकरांच्या स्मारकाचे लोकार्पण : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : आज ६ डिसेंबर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर येथील चैत्यभूमीवर बाबासाहेबांच्या अनुयायांचा जनसागर उसळला आहे. महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून मोठ्या संख्येने आंबेडकरांचे अनुयायी चैत्यभूमीवर दाखल झाले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक नेत्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले. यावेळी इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक कधी पूर्ण होईल याचे […] The post पुढच्या वर्षी डॉ. आंबेडकरांच्या स्मारकाचे लोकार्पण : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस appeared first on Dainik Prabhat .
नवी दिल्ली – भारताला वेगात विकसित व्हायचे असेल तर कर्मचार्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात काम करावे या विषयावर देशात चर्चा चालू आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राईट टू डिस्कनेक्ट विधेयक खासगी पातळीवर राज्यसभेत सादर केले आहे. कामाचा कालावधी संपल्यानंतर कर्मचार्यांना मोबाईल किंवा इंटरनेटच्या माध्यमातून संपर्क साधू नये, असा युक्तिवाद या विधेयकात मांडण्यात आलेला […] The post खासदार सुप्रिया सुळे यांनी कर्मचार्यांच्या हक्कासंदर्भात घेतला पुढाकार; ‘राईट टू डिस्कनेक्ट’ विधेयक संसदेत सादर appeared first on Dainik Prabhat .
गुजरातचे दरडोई उत्पन्न तीन लाखांच्या पुढे; ‘असा’घडला चमत्कार
नवी दिल्ली – गुजरातचा विकासदर वेगाने वाढत आहे. अशा परिस्थितीत 2023- 24 च्या मूल्यांकनानुसार गुजरातमधील दरडोई उत्पन्न तीन लाखाच्या पुढे गेले आहे. महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशासह इतर राज्यांना गुजरातने दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत मागे टाकले असल्याचे दिसून येते. गुजरात सरकारने यासंदर्भात जार केलेल्या माहितीत म्हटले आहे की, गुजरातचे दरडोई उत्पन्न आता 3 लाख 957 रुपये इतकी […] The post गुजरातचे दरडोई उत्पन्न तीन लाखांच्या पुढे; ‘असा’ घडला चमत्कार appeared first on Dainik Prabhat .
महायुतीत तणाव..! सत्यजित कदमांनी राष्ट्रवादीवर डागली तोफ, म्हणाले.. आताच भूमिका..
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात लोकसभा व विधानसभा निवडणूकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून शिंदेसेनला अपेक्षित मदत झालेली नाही. महानगरपालिकेच्या निवडणूकीत कॉंग्रेस व राष्ट्रवादी एकमेकांशी संधान साधतात. त्यामुळे शिवसेनेचा नगरसेवक निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले जात नाहीत. आगामी महापालिका निवडणूकीच्या वेळीही राष्ट्रवादीची अशीच भूमिका असेल तर ते योग्य ठरणारे नाही. त्यामुळे राष्ट्रवादीने आताच आपली भूमिका स्पष्ट करावी, […] The post महायुतीत तणाव..! सत्यजित कदमांनी राष्ट्रवादीवर डागली तोफ, म्हणाले.. आताच भूमिका.. appeared first on Dainik Prabhat .
अमेरिकन शिष्टममंडळ येणार भारतात: पुढील आठवड्यात व्यापार करारावर तीन दिवसांची चर्चा
नवी दिल्ली – सूत्रांचा हवाला देऊन वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीप्रमाणे दहा डिसेंबर रोजी अमेरिकेचे व्यापार सिष्टममंडळ भारतात येणार आहे. यावेळी शिष्टमंडळ पातळीवर तीन दिवसाची चर्चा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येतात. जानेवारीपूर्वी किमान प्राथमिक स्वरूपाचा व्यापार करार दोन्ही देशात व्हावा यासाठी फेब्रुवारी महिन्यापासून प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र यामध्ये अनेक वेळा अडथळे आले आहेत. सूत्रानी सांगितले की […] The post अमेरिकन शिष्टममंडळ येणार भारतात: पुढील आठवड्यात व्यापार करारावर तीन दिवसांची चर्चा appeared first on Dainik Prabhat .
उद्धव ठाकरे यांच्यानंतर कोण होणार होते मुख्यमंत्री ? नितेश राणेंनी केला गौप्यस्फोट
पिंपरी : ‘विधानसभेच्या २०१९ मधील निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांनी बेईमानी करून काँग्रेस सोबत जाऊन सरकार स्थापन केले. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला. उद्धव ठाकरे हे एकनाथ शिंदे यांना आयुष्यात कधीच मुख्यमंत्री करणार नव्हते आणि हे एकनाथ शिंदे यांनाही माहिती होते. उद्धव ठाकरे यांच्यानंतर रश्मी ठाकरे नंतर आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होणार असे ठरले होते; असा गौप्यस्फोट मंत्री नितेश राणे यांनी केला.चिंचवड देवस्थान ट्रस्ट, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि चिंचवड ग्रामस्थांच्या वतीने आयोजित श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी महाराज यांच्या ४६४ व्या संजीवन समाधी सोहळ्याचे उद्घाटन मंत्री राणे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. खासदार श्रीरंग बारणे, आमदार शंकर जगताप, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव, विश्वस्त जितेंद्र देव, केशव विद्वांस, ॲड. राजेंद्र उमाप आणि ॲड. देवराज डहाळे यावेळी उपस्थित होते.भाजप अॅनाकोंडा आहे. तो अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला गिळंकृत करेल या उद्धव ठाकरे यांच्या आरोपाबाबत विचारले असता मच्छरानं असं दुसऱ्याला बोलू नये, असे नितेश राणे म्हणाले. शिउबाठा ही काँग्रेसची ढ टीम असल्याचेही नितेश राणे म्हणाले.उद्धव ठाकरे यांनी २०१९ मध्ये बेईमानी करून काँग्रेस सोबत जाऊन सरकार स्थापन केले. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले. उद्धव ठाकरे हे एकनाथ शिंदे यांना आयुष्यात कधीच मुख्यमंत्री बनवणार नव्हते, हे शिंदे यांनाही माहिती होते. उद्धव ठाकरे यांच्यानंतर रश्मी वहिनी आणि आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होणार असे ठरले होते. त्यामुळे भाजपने काय केले हे शिंदे यांना माहिती होते. तब्बल १०५ आमदार असतानाही देवेंद्र फडणवीस यांनी त्याग करून उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले होते. उद्धव ठाकरे यांनी जो मान दिला नाही, तो भाजपने एकनाथ शिंदे यांना दिला’ असे मंत्री नितेश राणे म्हणाले.कोणत्याही देवस्थानच्या जागेवर अतिक्रमण होत असेल लँड जिहादचा प्रयत्न सुरू असेल तर खपवून घेणार नाही. यासाठी आवश्यक ती काळजी प्रशासनाने घ्यावी, असे निर्देश मंत्री नितेश राणेंनी दिले.लोकसभा निवडणुकीनंतर निर्माण झालेल्या वातावरणात महाराष्ट्रातल्या हिंदूंनी हिंदुत्ववादी महायुती सरकार निवडून दिल्याचंही मंत्री नितेश राणे म्हणाले.
बंगळुरू : कर्नाटकमधील कॉंग्रेस सरकारविरोधात अविश्वास ठराव आणला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी विरोधकांना म्हणजे भाजप-जेडीएस युतीला चॅलेंज दिले. अविश्वास ठरावाला सामोरे जाण्याची सरकारची तयारी असल्याचे त्यांनी म्हटले. कर्नाटक कॉंग्रेसमध्ये नुकताच कथित सत्तासंघर्ष रंगला. सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी.के.शिवकुमार यांच्यात नेतृत्वावरून रस्सीखेच सुरू असल्याचे चित्र समोर आले. त्यातून राजकीय संभ्रम निर्माण […] The post Siddaramaiah : अविश्वास ठरावाला सामोरे जाण्याची सरकारची तयारी; सिद्धरामय्या यांचे भाजप, जेडीएसला चॅलेंज appeared first on Dainik Prabhat .
Pune Crime : चंदननगरमध्ये चाकूने वार करून तरुणाचा खून
पुणे : वैमनस्यातून एका युवकावर चाकूने वार करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना चंदननगर भागातील राजमाता जिजाऊ ऑक्सिजन पार्क परिसरात शनिवारी सायंकाळी घडली. हल्लेखोरांनी युवकाबरोबर असलेल्या एका मित्रावर वार केले. ही घटना उघडकीस आल्यानंतर चंदननगर भागात घबराट उडाली. लखन बाळू सकट (वय १८, रा. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत, चंदननगर) असे खून झालेल्याचे नाव आहे. टोळक्याने […] The post Pune Crime : चंदननगरमध्ये चाकूने वार करून तरुणाचा खून appeared first on Dainik Prabhat .
IND vs SA : रोहित-यशस्वीचा धमाका! २५ वर्षांपूर्वीचा सचिन-गांगुलीचा विक्रम मोडला!
Rohit Yashaswi Partnership break 25 year old : भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा तिसरा एकदिवसीय सामना ९ गडी राखून जिंकत ही मालिका २-१ ने नावावर केली. भारताला विजयासाठी २७१ धावांचे आव्हान मिळाले होते, जे रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल या सलामीच्या जोडीने केलेल्या उत्कृष्ट भागीदारीमुळे सहज गाठता आले. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी १५५ धावांची विक्रमी भागीदारी […] The post IND vs SA : रोहित-यशस्वीचा धमाका! २५ वर्षांपूर्वीचा सचिन-गांगुलीचा विक्रम मोडला! appeared first on Dainik Prabhat .
महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात प्रथमच असं घडलं; दोन्ही सभागृहांत…
नागपूर: महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवार ८ डिसेंबरपासून नागपूर येथे सुरू होत आहे. मात्र, राज्याच्या राजकीय इतिहासात प्रथमच विधानसभा आणि विधान परिषद अशा दोन्ही सभागृहांमध्ये अधिकृत विरोधी पक्षनेता नसणार आहे. या अभूतपूर्व परिस्थितीमुळे अधिवेशनातील कामकाजावर आणि सरकारच्या जबाबदारीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षनेतेपदाचा नियम काय सांगतो? विरोधी पक्षनेता हा दर्जा प्राप्त होण्यासाठी सभागृहातील एकूण […] The post महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात प्रथमच असं घडलं; दोन्ही सभागृहांत… appeared first on Dainik Prabhat .
Omar Abdullah : मॅडम, आम्हाला पैसेही पाठवा…! उमर अब्दुल्लांचे सीतारामन यांना साकडे
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी अर्थकारणावरून जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांची प्रशंसा केली. त्याबद्दल उमर यांनी आभार मानले. मॅडम, आम्हाला पैसेही पाठवा, असे निर्मळ साकडेही त्यांनी घातले. दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात देशातील विविध नेते सहभागी झाले. त्यावेळी बोलताना सीतारामन यांनी जम्मू-काश्मीरच्या अर्थव्यवस्थेविषयीही भाष्य केले. केंद्रीय राजवटीच्या काळात जम्मू-काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला गती मिळाली. […] The post Omar Abdullah : मॅडम, आम्हाला पैसेही पाठवा…! उमर अब्दुल्लांचे सीतारामन यांना साकडे appeared first on Dainik Prabhat .
Dhurandhar Movie: सुपरस्टार रणवीर सिंह अभिनीत ‘धुरंधर’ चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला असून बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने २७ कोटींहून अधिक कमाई केली आहे. आता प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाचे असे वेड पसरले आहे की, तिकीट खिडक्यांबाहेर प्रेक्षकांची प्रचंड गर्दी झाली आहे. रणवीर सिंह आणि सारा अर्जुन यांची प्रमुख भूमिका असलेला ‘धुरंधर’ रिलीज होताच […] The post ‘धुरंधर’ ठरला रणवीरच्या करिअरमधील सर्वात मोठा ओपनिंग चित्रपट: तोडले अनेक रेकॉर्ड, वीकेंडमध्ये 247 शो हाऊसफुल appeared first on Dainik Prabhat .
महाराष्ट्रात अपघातांचा कहर; एकाच दिवशी १३ ठार, ३० हून अधिक जखमी, कुठे –कुठे घडले अपघात?
Accident News :महाराष्ट्रात शनिवारी (दि. ६ डिसेंबर २०२५) विविध अपघातांत १३ जणांचा मृत्यू झाला, तर ३० हून अधिक जण जखमी झाले. परभणी, गोंदिया, लातूर, जळगाव, रायगड आणि लोणावळा येथे या दुर्दैवी घटना घडल्या. मृतांमध्ये महिलांचाही समावेश आहे. परभणीत ३ ठार, २ गंभीर जखमी परभणी-वसमत महामार्गावर रहाटी जवळ स्विफ्ट डिझायर व क्रेटा कारची समोरासमोर भीषण टक्कर […] The post महाराष्ट्रात अपघातांचा कहर; एकाच दिवशी १३ ठार, ३० हून अधिक जखमी, कुठे – कुठे घडले अपघात? appeared first on Dainik Prabhat .
IND vs SA India beat South Africa by 9 wickets : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेचा अंतिम सामना विशाखापट्टणम येथे पार पडला. या अंतिम आणि निर्णायक सामन्यात यशस्वी जैस्वालच्या शतकाच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेचा ९ विकेट्सनी दारुण पराभव केला. यासह तीन सामन्यांची मालिका २-१ ने खिशात घातली. प्रथम भारतीय संघाने आफ्रिकेला […] The post IND vs SA : जैस्वालच्या शतकाने डी कॉकच्या खेळीवर फेरलं पाणी, निर्णायक लढतीत टीम इंडियाचा दणक्यात विजय! appeared first on Dainik Prabhat .
Kisan Khodde : खेळातून देशाचे उज्ज्वल भविष्य अन् निरोगी पिढी घडवा : किसन खोडदे
शिरूर : यशवंतराव चव्हाण कला व क्रीडा महोत्सव अंतर्गत बीटस्तरीय स्पर्धा दिनांक 3 व 4 डिसेंबर रोजी महागणपती ग्लोबल स्कूल रांजणगाव गणपती या ठिकाणी संपन्न झाल्या. स्पर्धेची सुरुवात शिरूर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी बाळकृष्ण कळमकर यांनी क्रीडाज्योत प्रज्वलन करून केली. स्पर्धेचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य स्वाती पाचुंदकर यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य विक्रम […] The post Kisan Khodde : खेळातून देशाचे उज्ज्वल भविष्य अन् निरोगी पिढी घडवा : किसन खोडदे appeared first on Dainik Prabhat .
पुण्यात पोलीस हवालदारानं मुलीच्या पहिल्या वाढदिवशी उचललं टोकाचं पाऊल
पुणे : 'तुझा पहिला वाढदिवस दणक्यात साजरा करायचा होता पण मी पोलीस खात्यात नोकरी करतो, वरिष्ठ मला त्रास देतात. यामुळे इच्छा असूनही मी तुला वेळ देऊ शकत नाही' या शब्दात स्वतःच्या वेदना व्यक्त करत पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील यवतचे पोलीस हवालदार निखिल रणदिवे बेपत्ता झाले आहेत. त्यांनी चिठ्ठीत यवतचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या त्रासाला कंटाळून हे पाऊल उचलत असल्याचे नमूद केले आहे.यवतचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे व्हॉट्सअॅप स्टेटस टाकून पोलीस हवालदार निखिल रणदिवे बेपत्ता झाले होते.हवालदार निखिल रणदिवे यांची बदली यवतहून शिक्रापूर येथे झाली होती. पण या बदली आदेशाची अंमलबजावणी करण्यास पोलीस निरीक्षक नारायण देशमुख टाळाटाळ करत होते; असेही चिठ्ठीत नमूद आहे.हवालदार निखिल रणदिवे कुठे आहेत हे जाणून घेण्यासाठी पुणे ग्रामीणचे पोलीस ठिकठिकाणी शोध घेत आहेत. यवतचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांची विभागीय चौकशी करावी आणि दोषी आढळल्यास नियमानुसार कारवाई करावी, अशीही मागणी जोर धरू लागली आहे.
‘SIR’प्रक्रियेत राजस्थानची बाजी; मतदार यादीचे 100% डिजिटायझेशन पूर्ण करणारे ठरले देशातील पहिले राज्य
जयपूर: ‘स्पेशल इंटेंसिव्ह रिव्हिजन’ (SIR) प्रक्रियेअंतर्गत मतदार यादीचे (Voter List) १०० टक्के डिजिटायझेशन (Digitisation) राजस्थानने (Rajasthan) यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे. SIR प्रक्रिया सुरू असलेल्या 12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये राजस्थानने अशी कामगिरी करणारे पहिले राज्य होण्याचा मान मिळवला आहे. सामूहिक प्रयत्नांचे यश – राजस्थानचे मुख्य निवडणूक अधिकारी (Chief Electoral Officer) नवीन महाजन यांनी या यशाबद्दल […] The post ‘SIR’ प्रक्रियेत राजस्थानची बाजी; मतदार यादीचे 100% डिजिटायझेशन पूर्ण करणारे ठरले देशातील पहिले राज्य appeared first on Dainik Prabhat .
D.K. Shivakumar : डीके शिवकुमार यांना नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीकडून नोटीस
बेंगळुरू : कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांना नॅशनल हेराल्ड प्रकरणात नोटीस बजावण्यात आली असून हा प्रकार धक्कादायक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हे माझ्यासाठी धक्कादायक आहे. मी सर्व तपशील अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) दिले होते. ईडीने मला आणि माझ्या भावाला बोलावले होते. आम्ही सर्व माहिती दिली होती. आमच्या संस्थेत काहीही चूक नाही; काँग्रेस सदस्य म्हणून आम्ही त्याचे […] The post D.K. Shivakumar : डीके शिवकुमार यांना नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीकडून नोटीस appeared first on Dainik Prabhat .
Abhishek Sharma : अभिषेक शर्मा भारताचा नवा सिक्सर किंग! रोहित-विराटलाही जे जमलं नाही, ते करुन दाखवलं
Abhishek Sharma Sixes record in 2025 : टीम इंडियात ‘हिटमॅन’ म्हणून ओळख रोहित शर्माची असली, तरी आता त्याच धर्तीवर तुफान फटकेबाजी करणारा अभिषेक शर्मा हा क्रिकेटमधील नवा ‘हिटमॅन’ म्हणून उदयास येत आहे. अभिषेकने एका नव्या विक्रमासह हे सिद्ध केले आहे. टी-20 क्रिकेटच्या एका कॅलेंडर वर्षात 100 पेक्षा जास्त षटकार मारणारा तो पहिला भारतीय फलंदाज बनला […] The post Abhishek Sharma : अभिषेक शर्मा भारताचा नवा सिक्सर किंग! रोहित-विराटलाही जे जमलं नाही, ते करुन दाखवलं appeared first on Dainik Prabhat .
यवत : पुणे जिल्ह्यातील दौंड मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यवत पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी निखिल रणदिवे यांने आपल्या व्हाट्सअपवर स्टेटस ठेऊन अचानक बेपत्ता झाला आहे. बेपत्ता होण्यापूर्वी त्याने व्हाट्सअप वर आपले स्वतःचा आणि मुलीचा फोटो ठेऊन त्याखाली दिदी तुला वाढदिवसाच्या पहिल्या आणि शेवटच्या शुभेच्छा असं लिहून आपला फोन बंद केला आहे. या […] The post Police Constable Missing Case : मुलीच्या वाढदिवशी स्वतःचीच श्रद्धांजली पोस्ट करून पोलीस कर्मचारी बेपत्ता; वरिष्ठ अधिकाऱ्यावर गंभीर आरोप appeared first on Dainik Prabhat .
उड्डाणं रद्द, तिकीटदर वाढले; हवाई प्रवासातील गोंधळावर सरकारची मोठी कारवाई
नवी दिल्ली : इंडिगोच्या तांत्रिक आणि व्यवस्थापकीय अडचणींमुळे मागील काही दिवसांपासून देशात मोठे विमान प्रवास संकट निर्माण झाले आहे. शेकडो उड्डाणं रद्द झाल्याने हजारो प्रवासी अडचणीत सापडले आहेत. देशाच्या हवाई सेवांमध्ये इंडिगोचा सुमारे ६५ टक्के हिस्सा असल्याने या विस्कळीतपणाचा सर्वाधिक फटका सामान्य प्रवाशांना बसला आहे.उड्डाणं रद्द झाल्यानंतर अनेक प्रवासी इतर कंपन्यांकडे वळू लागले. याच पार्श्वभूमीवर काही एअरलाईन्सनी तिकीट दर वाढवण्यास सुरुवात केली, ज्यामुळे प्रवाशांचा मनस्ताप आणखी वाढला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये म्हणून नागरी उड्डाण मंत्रालयाने तातडीने हस्तक्षेप करत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.मंत्रालयाने हवाई वाहतूक विस्कळीत झालेल्या सर्व मार्गांवर ‘फेअर कॅप’ लागू केला आहे. या निर्णयामुळे कोणत्याही एअरलाईनला ठरवलेल्या मर्यादेपेक्षा जास्त तिकीट दर आकारता येणार नाहीत. प्रवाशांच्या अडचणीचा गैरफायदा घेण्याच्या प्रयत्नांना आळा घालण्यासाठी ही तरतूद करण्यात आली असल्याचे मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. इंडिगोच्या नव्या ऑपरेशनल नियमांची पुरेशी तयारी न झाल्याने गेल्या दोन-तीन दिवसांत अनेक उड्डाणं रद्द झाली, तर बरीच उड्डाणं विलंबाने निघाली. या स्थितीत इतर कंपन्यांकडे प्रवासी वाढले आणि काही मार्गांवरील तिकिटांचे दर अचानक वाढले. याची गंभीर दखल घेत मंत्रालयाने नियामक अधिकारांचा वापर करत कमाल तिकीट मर्यादा निश्चित केली आहे.मंत्रालयाने सर्व कंपन्यांना अधिकृत आदेश पाठवले असून, परिस्थिती पूर्णपणे सुरळीत होईपर्यंत हा फेअर कॅप लागू राहणार आहे. कोणत्याही एअरलाईनला या नियमाविरुद्ध तिकीट विक्री करण्यास परवानगी नसेल, असेही आवर्जून सांगण्यात आले आहे.
माजी लोकसभाध्यक्षांना 'ब्रह्मभूषण'पुरस्कार जाहीर
मुंबई : माजी लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांना 'ब्रह्मभूषण’ २०२५ पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कार वितरण सोहळा बुधवार १० डिसेंबर २०२५ रोजी दादर पश्चिम येथील ब्राह्मण सेवा मंडळाच्या सभागृहात होणार आहे.सुमित्रा महाजन या इंदूरच्या माजी खासदार आहेत. त्यांनी २०१४ ते २०१९ या कालावधीत लोकसभेचे अध्यक्षपद अत्यंत कुशलतेने आणि यशस्वीरित्या सांभाळले होते. या उल्लेखनीय कार्यासाठीच त्यांना भारत सरकारने पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरविले होते. आता माजी लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांना 'ब्रह्मभूषण’ २०२५ पुरस्काराने गौरविले जाणार आहे. या सोहळ्यास माजी खासदार आणि भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्त्रबुद्धे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. पुरस्कार वितरण सोहळा बुधवार १० डिसेंबर २०२५ रोजी संध्याकाळी सात वाजता दादर पश्चिम येथील भवानी शंकर रोडवरच्या ब्राह्मण सेवा मंडळाच्या तळमजल्यावरील सभागृहात होणार आहे.ब्राह्मण सेवा मंडळ या संस्थेने २०१६ या शतकमहोत्सवी वर्षापासून समाज जीवनाशी निगडित विविध क्षेत्रांपैकी दरवर्षी एक क्षेत्र निवडून त्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या ज्ञातीतील मान्यवर व्यक्तींपैकी एकाचा 'ब्रह्मभूषण’ पुरस्कार देऊन गौरव करण्यास सुरुवात केली. 'ब्राह्मण सेवा मंडळा'ने प्रथम २०१६ साली 'ब्रह्मभूषण पुरस्कार' इतिहासकार आणि महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे यांना प्रदान केला. त्यानंतर २०१७ सालचा हा पुरस्कार भारतीय सेनेत कार्यरत असलेले लेफ्ट जनरल डॉ. डी. बी. शेकटकर यांना प्रदान केला गेला होता.जेष्ठ वैद्यकीय आणि न्युक्लिअर मेडीसीन व न्युक्लिअर कार्डीओलॉजीचे भारतातील प्रणेते डॉ. रामचंद्र दत्तात्रय लेले यांना २०१८ साली प्रदान केला. तर २०१९ साली खगोल भौतिकशास्त्रज्ञ डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांना प्रदान करण्यात आला.
फॉलोअर्सच्या शर्यतीत मुलांचं बालपण धोक्यात, सुधा मूर्तींची सरकारकडे महत्त्वाची मागणी
नवी दिल्ली : इंटरनेटवर आज असंख्य रील्स आणि व्हिडिओ पाहायला मिळतात ज्यात लहान मुलांचा थेट कंटेंट म्हणून वापर केला जातो. अनेकजण आपल्या मुलांचे फोटो आणि व्हिडिओ अशा पद्धतीने अपलोड करतात की जणू ते कोणत्या कमर्शियल शो चा भाग आहेत. पालकांना यामुळे आर्थिक फायदा मिळत असला, तरी या प्रक्रियेमुळे मुलांच्या निरागस बालपणावर गदा येत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.राज्यसभेच्या सदस्य सुधा मूर्ती यांनी या ट्रेंडवर गंभीर चिंता व्यक्त केली. त्यांनी केंद्र सरकारने अशा प्रकारे मुलांचा सोशल मीडिया कंटेंट म्हणून वापर करून पैसे कमावणाऱ्यांविरोधात नियम तयार करावेत, अशी मागणी केली, जेणेकरून देशाचं भविष्य असलेल्या मुलांचं रक्षण होईल. हा मुद्दा मांडताना त्यांनी फ्रान्ससह इतर विकसित देशांमधील बालकांच्या कायद्यांचा उल्लेख केला. सुधा मूर्ती म्हणाल्या, “मुलं आपलं भविष्य आहेत. त्यांना चांगलं मूलभूत शिक्षण, खेळ आणि विविध उपक्रमांत प्रतिभा विकसित करण्याची संधी मिळायला हवी.”इंटरनेटवर फॉलोअर्स वाढवण्याची स्पर्धासुधा मूर्ती म्हणाल्या, “सोशल मीडिया आज अत्यंत लोकप्रिय झाला असला, तरी त्याचे काही नकारात्मक परिणामही आहेत.” फॉलोअर्स वाढवण्याच्या धडपडीत अनेक पालक आपल्या लहान मुलांचे वेगवेगळ्या वेशभूषेत,फोटो-व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करतात, , जेणेकरून त्यांच्या १० हजार, ५ लाख किंवा १० लाख फॉलोअर्सपर्यंत संख्या वाढेल. मला माहित आहे की यामुळे पालकांना आर्थिक लाभ मिळतो; पण याचा मुलांच्या मनोवृत्तीवर दीर्घकालीन परिणाम होतोसुधा मूर्ती पुढे म्हणाल्या की , वेळेत नियम न केल्यास पुढील काळात मुलांसाठी मोठ्या समस्या निर्माण होऊ शकतात. “या प्रक्रियेमुळे मुलं आपली निरागसता गमावतील. त्यांच्या मानसिक विकासावर परिणाम होईल. ते सामाजिक उपक्रम, खेळ किंवा व्यवस्थित शिक्षणाची पद्धत शिकू शकणार नाहीत,”अॅड्स आणि चित्रपट क्षेत्रात मुलांच्या सहभागावर नियंत्रण ठेवणाऱ्या केंद्र सरकारच्या उपायांचे कौतुक करत , जाहिराती, चित्रपटातील बालकलाकार यांसाठी कडक नियम आहेतच पण इंटरनेट प्लॅटफॉर्मवर अशा नियंत्रणाची गरज आहे असे त्यांनी स्पष्ट केले.
Who is the Owner of IndiGo: इंडिगोचे मालक कोण आणि त्यांची संपत्ती किती? जाणून घ्या..
Who is the Owner of IndiGo: देशभरात इंडिगोचे संकट वाढत चालले आहे. आज सलग पाचव्या दिवशी शेकडो इंडिगो फ्लाइट रद्द करण्यात आल्या आणि असंख्य फ्लाइट्स उशिरा सुरू झाल्या. इंडिगोच्या फ्लाइट रद्द झाल्यामुळे प्रवाशांचा संताप वाढत असून आता त्यांचा संयम सुटत चालला आहे. राहुल भाटिया हे इंडिगोचे सह-संस्थापक आहेत आणि ते एअरलाइनची मूळ कंपनी इंटरग्लोब एव्हिएशनचे […] The post Who is the Owner of IndiGo: इंडिगोचे मालक कोण आणि त्यांची संपत्ती किती? जाणून घ्या.. appeared first on Dainik Prabhat .
नवी दिल्ली : काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी वैवाहिक बलात्काराला गुन्हा ठरवणाऱ्या विधेयकासह तीन विधेयके लोकसभेत सादर केली. लग्नानंतरही एखाद्या महिलेचा आपल्या शरीरावर पूर्ण अधिकार असला पाहिजे आणि कायद्याने हे मान्य केले पाहिजे. भारताने आपल्या संवैधानिक मूल्यांचे पालन केले पाहिजे असे थरूर यांनी म्हटले आहे. केरळमधील तिरुअनंतपुरम येथील खासदार असणाऱ्या थरूर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील […] The post Shashi Tharoor : वैवाहिक बलात्काराला गुन्हा ठरवणाऱ्या विधेयकासह ‘ही’ 2 विधेयके शशी थरूर यांच्याकडून सादर appeared first on Dainik Prabhat .
Rohit Sharma Complete 20,000 Runs in International Cricket News : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा वनडे सामना विशाखापट्टणम येथे खेळला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाचा दिग्गज खेळाडू रोहित शर्माने एक मोठी कामगिरी केली आहे. रोहित शर्मा शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 20,000 धावा पूर्ण केल्या आहेत. तो ही कामगिरी करणारा चौथा भारतीय खेळाडू ठरला आहे. […] The post Rohit Sharma : रोहित शर्माचा मोठा पराक्रम! आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा ठरला चौथा भारतीय appeared first on Dainik Prabhat .
‘आयकर आणि जीएसटीप्रमाणे सीमा शुल्कही होईल सुलभ’; अर्थमंत्र्यांची घोषणा
नवी दिल्ली: केंद्र सरकारने (Central Government) आता देशातील सीमा शुल्क (Custom Duty) प्रणालीला अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज शनिवारी स्पष्ट केले की, सीमा शुल्क प्रणालीचा कायापालट करणे हा सरकारचा पुढील मोठा सुधारणा अजेंडा असेल. या सुधारणांमुळे लोकांना नियमांचे पालन करणे ओझे वाटणार नाही, असेही त्यांनी […] The post ‘आयकर आणि जीएसटीप्रमाणे सीमा शुल्कही होईल सुलभ’; अर्थमंत्र्यांची घोषणा appeared first on Dainik Prabhat .
राज्यात ४४८ निरीक्षकांच्या पदोन्नतीची प्रक्रिया सुरू; नाशिकचे २० अधिकारी स्पर्धेत
नाशिक : नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील सात आणि जिल्ह्यातील तेरा पोलीस निरीक्षकांना सहायक आयुक्तपदी बढती मिळणार आहे. राज्यातील विविध पोलीस संवर्गातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती देण्याचा मार्ग मोकळा झाल्याने पोलीस महासंचालक कार्यालयाने राज्यातील ४४८ निरीक्षकांची यादी केली आहे. डिसेंबरमध्ये कारकीर्दीची तपासणी झाल्यानंतर नववर्षात पात्र निरीक्षकांना सहायक आयुक्तपदी पदोन्नती मिळू शकते. तर नाशिकमधील शालार्थ आयडी […] The post राज्यात ४४८ निरीक्षकांच्या पदोन्नतीची प्रक्रिया सुरू; नाशिकचे २० अधिकारी स्पर्धेत appeared first on Dainik Prabhat .
‘स्पेशल 26’स्टाईलने 1 किलो सोनं लुटलं, पण ‘दिल्ली पोलिसां’मुळे चोर 72 तासांत जेरबंद
नवी दिल्ली: बॉलिवूड चित्रपट ‘स्पेशल 26’ मधून प्रेरणा घेऊन दिल्लीतील करोल बाग येथे ज्वेलरी वर्कशॉपवर बनावट रेड टाकून १ किलोपेक्षा अधिक सोनं लुटणाऱ्या टोळीला दिल्ली पोलिसांनी अवघ्या ७२ तासांत पकडण्यात यश मिळवलं आहे. या थरारक आंतरराज्य पाठलागात पोलिसांनी सुमारे १२०० किलोमीटरचा प्रवास करून ५ आरोपींना अटक केली आहे. फिल्मी स्टाईल लूट: २७ नोव्हेंबर २०२५ रोजी […] The post ‘स्पेशल 26’ स्टाईलने 1 किलो सोनं लुटलं, पण ‘दिल्ली पोलिसां’मुळे चोर 72 तासांत जेरबंद appeared first on Dainik Prabhat .
Reliance Power : रिलायन्स पॉवरविरुद्ध ईडीकडून आरोपपत्र दाखल
नवी दिल्ली : उद्योगपती अनिल अंबानी यांच्या रिलायन्स पॉवर लिमिटेड आणि इतर 10 जणांविरुद्ध अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल करत आरोपपत्र दाखल केले आहे. 2024 मधील एका बनावट बँक गॅरंटीशी संबंधित प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. ही गॅरंटी सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (एसईसीआय) कडून एक टेंडर मिळवण्यासाठी जमा करण्यात […] The post Reliance Power : रिलायन्स पॉवरविरुद्ध ईडीकडून आरोपपत्र दाखल appeared first on Dainik Prabhat .
ट्रम्प प्रशासनाचे नवे धोरण अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांसाठी गैरसोयीचे
वॉशिंग्टन डीसी : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन हे दोन दिवस भारताच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात अनेक महत्त्वाचे करार झाले. यामुळे अस्वस्थ झालेल्या अमेरिकेने आता एक नवे धोरण राबवण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रम्प प्रशासनाने तयार केलेल्या नव्या धोरणामुळे एच वन बी व्हिसा घेऊन अमेरिकेत गेलेल्या अनेक भारतीयांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.अमेरिकेच्या सिटीझनशिप अँड इमिग्रेशन सर्व्हिसेसने केलेल्या घोषणेनुसार आता एम्प्लॉयमेंट ऑथोरायझेशन डॉक्युमेंट्सची कमाल वैधता कमी करण्यात येणार आहे. देशाची अंतर्गत सुरक्षा मजबूत करण्यासाठी तसेच संभाव्य धोके कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. नव्या नियमानुसार अमेरिकेमध्ये ज्याला काम करण्याची इच्छा आहे किंवा ज्याने अमेरिकेकडे तशी परवानगी मागितली आहे, अशा व्यक्तीची आता कडक आणि वारंवार तपासणी होणार आहे. ज्यामुळे जर एखाद्या व्यक्तीपासून देशाला धोका असेल तर त्याची माहिती आधीच मिळेल असे अमेरिकेचे म्हणणे आहे.अमेरिकेच्या नव्या धोरणाचा सर्वाधिक प्रतिकूल परिणाम एच वन बी व्हिसा घेऊन अमेरिकेत गेलेल्या अनेक भारतीयांवर होणार आहे. नवे धोरण अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या अनेक भारतीयांसाठी धोक्याची घटा ठरू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.
मोहित सोमण: आज चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सलग तिसऱ्यांदा चांदीत मोठी वाढ झाली असल्याने चांदी आज प्रति किलो ३००० रूपयांनी वाढली असून गेल्या तीन दिवसात ६००० रूपयांनी वाढ झाली आहे. तर एका आठवड्यात चांदी ८३०० रुपयांनी वाढली आहे. तर महिन्यात चांदीच्या दरातही २०% वाढ झाली असून आगामी काळातही तज्ञांच्या मते बाजारात फेरबदल अपेक्षित होऊन चांदी एका नव्या पातळीवर जाऊ शकते. युएस फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपातीची अपेक्षा असल्याने व आंतरराष्ट्रीय स्तरावरील चांदीच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने चांदी दरपातळी आजही महागली आहे. 'गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार चांदीच्या प्रति ग्रॅम दरात आज ३ रूपयांनी वाढ झाली असून प्रति किलो दर ३००० रुपयांनी वाढल्याने प्रति ग्रॅम दर १९० व प्रति किलो दर १९०००० रुपयांवर पोहोचली आहे. मुंबईसह भारतातील प्रमुख शहरातील चांदीचे सरासरी प्रति १० ग्रॅम दर १९०० तर प्रति किलो दर १९०००० रूपयांवर पोहोचले आहेत.भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये (Multi Commodity Exchange MCX) चांदीच्या निर्देशांकात संध्याकाळपर्यंत २.७९% वाढ झाल्याने दरपातळी १८३१०० रूपयांवर पोहोचली आहे. जागतिक बाजारातील सिल्वर फ्युचर निर्देशांकात संध्याकाळपर्यंत २.७२% वाढ झाली आहे. पुढील आठवड्यात युएस फेडरल रिझर्व्ह व्याजदरातील निर्णय युएस फेड गव्हर्नर जेरोमी पॉवेल जाहीर करतील. बाजार तज्ञांच्या मते ही दरकपात झाल्यास त्याचा मोठा फायदा बाजारात होईल दरम्यान तत्पूर्वी सोन्याच्या व चांदीच्या दरात चढ उतार मोठ्या प्रमाणात राहू शकते. खासकरून युएस बाजारातील घसरलेल्या रोजगार आकडेवारीनंतर पीसीई आकडेवारी अद्याप प्रलंबित आहे. त्यामुळे पीसीई (Personal Consumption Expenditure PCE) आकडेवारी जाहीर झाल्यानंतर कमोडिटी बाजारातील पुढील दिशा स्पष्ट होईल. भूराजकीय घडामोडींचाही परिणाम होत असल्याने प्राईज करेक्शन पुढील आठवड्यात अपेक्षित असले तरी अस्थिरतेचा फटका चांदीच्या दरात बसत आहे. आज डॉलर किरकोळ घसरण अथवा सपाट स्थितीत कायम असल्याने गुंतवणूकदारांनी आपल्या होल्डिंग्समध्ये वाढ केल्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा विविध कारणांमुळे आज चांदी महागली.चांदीच्या किमतीतील दीर्घकालीन वाढीचा विचार केल्यास एमसीएक्सवरील स्पॉट प्राईस फक्त एका वर्षात ९८% वाढून ८९९१३ रुपयांवरून १७७८८६ रुपयांवर पोहोचली. उपलब्ध माहितीनुसार, दोन वर्षांत किंमत १३३% आणि ३ वर्षांत जवळजवळ १८२% वाढली असून एका दशकात चांदीच्या किमती ४१९% वाढल्या आहेत.नवीन गुंतवणूकदारांसाठी तज्ञ काय म्हणाले?नवीन गुंतवणूकदार हळूहळू एका लहान टप्प्यात गुंतवणूक करू शकतात जेणेकरून भविष्यातील कोणत्याही वाढीचा फायदा घेता येईल आणि अचानक किमतीच्या वेळी प्रवेश गुंतवणूकदारांना करण्याचा धोकाटाळतायेईल.
Nashik News : आम्हीपण झाडे कशी तोडतात ते पाहू, मनसेचा सरकारला थेट इशारा
नाशिक : साधुग्रामच्या नावाखाली शासकीय यंत्रणेने खोटा विकास व जमीन लाटण्यासाठी वृक्षांचा बळी देण्याचा घाट घातला असून सरकार जर वृक्षतोडीवर ठाम असेल तर आम्ही देखील झाडे कशी तोडली जातात ते पाहू, असा थेट इशारा शनिवारी मनसे चित्रपटसेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी दिला. यावेळी तपोवनच्या बाहेर मनसेच्या वतीने आंदोलन करताना जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. तपोवनमधील […] The post Nashik News : आम्हीपण झाडे कशी तोडतात ते पाहू, मनसेचा सरकारला थेट इशारा appeared first on Dainik Prabhat .
IND vs SA : ‘गो बॅक!’रोहितने DRS वरुन कुलदीपची घेतली फिरकी, पाहा मजेशीर VIDEO
Rohit Sharma Video Viral : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना विशाखापट्टणम येथे खेळला जात आहे. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा डाव 47.5 षटकांत 270 धावांवर रोखला. दरम्यान सामन्यातील रोहित शर्मा आणि ४ विकेट्स घेणाऱ्या कुलदीपचा एक मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत आहे. […] The post IND vs SA : ‘गो बॅक!’ रोहितने DRS वरुन कुलदीपची घेतली फिरकी, पाहा मजेशीर VIDEO appeared first on Dainik Prabhat .
Sandeep Gaikwad : माजी नगरसेवक संदीप गायकवाड हा रोहित पवारांचाच कार्यकर्ता; ‘या’भाजप नेत्याचा आरोप
जामखेड : नृत्यांगना दिपाली पाटील मृत्यू प्रकरणातील आरोपी माजी नगरसेवक संदीप गायकवाड हे २०१६ साली राष्ट्रवादीकडून निवडून आले होते. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ते रोहित पवारांसोबत होते. त्यानंतर २०२४ विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या उपस्थितीत त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. तेव्हापासून ते राष्ट्रवादीतच आहेत. त्यांचा भाजपशी दूरदूरपर्यंत संबंध नाही. गायकवाड यांच्या पत्नीने नगरपरिषद निवडणुकीत ऐनवेळी भाजपकडून […] The post Sandeep Gaikwad : माजी नगरसेवक संदीप गायकवाड हा रोहित पवारांचाच कार्यकर्ता; ‘या’ भाजप नेत्याचा आरोप appeared first on Dainik Prabhat .
Sandeep Gaikwad : संदिप गायकवाड भाजपाचा असल्याचे एक नाही तर हजार पुरावे : विजयसिंह गोलेकर
जामखेड : नृत्यांगना दिपाली पाटील हिच्या मृत्यू प्रकरणी जामखेड पोलिसांनी अटक केलेला आरोपी माजी नगरसेवक संदिप गायकवाड हा भाजपचाच असून याचे एक नाही तर हजार पुरावे उपलब्ध आहेत. परंतु अंगलट आले की दुसऱ्यावर ढकलायचं आणि स्वतः मात्र ‘मी नाही त्यातली अन् कडी … आतली’ अशी भूमिका घ्यायची ही भाजपाची वृत्ती असल्याचा पलटवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी […] The post Sandeep Gaikwad : संदिप गायकवाड भाजपाचा असल्याचे एक नाही तर हजार पुरावे : विजयसिंह गोलेकर appeared first on Dainik Prabhat .
IndiGo Crisis: देशातील सर्वात मोठी विमान कंपनी असलेल्या इंडिगोच्या (IndiGo) गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या अभूतपूर्व परिचालन संकटामुळे (Operational Crisis) प्रवाशांची होणारी लूट थांबवण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने हस्तक्षेप केला आहे. नागरी उड्डयन मंत्रालयाने (MoCA) आपल्या नियामक अधिकारांचा वापर करत सर्व प्रभावित हवाई मार्गांवरील विमान भाड्याची कमाल मर्यादा (Fare Cap) निश्चित केली आहे. कंपन्या प्रवाशांकडून निश्चित […] The post IndiGo Crisis: प्रवाशांची लूट थांबणार, सरकारने निश्चित केले विमान तिकीट; जाणून घ्या किती अंतरासाठी किती रुपये… appeared first on Dainik Prabhat .
डॉ.आंबेडकर महाविद्यालयात “प्रज्ञा”विशेष अंकाचे प्रकाशन
पुणे – पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या येरवडा येथील डॉ.आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालय व बुद्धिस्ट सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन सभा घेण्यात आली. यावेळी महाविद्यालयाच्या “प्रज्ञा” या विशेष अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष डॉ.डी.जी. देशकर, पाहुणे माजी प्राचार्य डॉ. आर.एम. मिसाळ, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य […] The post डॉ.आंबेडकर महाविद्यालयात “प्रज्ञा” विशेष अंकाचे प्रकाशन appeared first on Dainik Prabhat .
Today TOP 10 News: महाराष्ट्रातील उपमुख्यमंत्रीपद रद्द होणार? वाचा आजच्या टाॅप 10 बातम्या…
महाराष्ट्रातील उपमुख्यमंत्रीपद रद्द होणार? – उद्धव ठाकरेंच्या मागणीने शिंदे-पवारांचं वाढलं टेन्शन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारला ५ डिसेंबर रोजी एक वर्ष पूर्ण झालंय. यातच आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकारकडे एक मोठी मागणी केली आहे. महायुती सरकारला सत्तेत येऊन एक वर्ष पूर्ण झालं आहे तरी देखील विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेतेपद […] The post Today TOP 10 News: महाराष्ट्रातील उपमुख्यमंत्रीपद रद्द होणार? वाचा आजच्या टाॅप 10 बातम्या… appeared first on Dainik Prabhat .
Chandrakant Patil : महापालिकांच्या निवडणूका युती म्हणून लढणार : मंत्री चंद्रकांत पाटील
कोल्हापूर : नगरपालिका व नगरपंचायती निवडणूकांचे क्षेत्र हे व्यापक प्रमाणात असल्याने, येथील स्थानिक नेत्यांना त्यापातळीवर युती करण्याचे अधिकार देण्यात आले होते. आता मात्र राज्यातील ३० महानगरपालिकांच्या निवडणूका होणार आहेत, या निवडणूका आम्ही महायुती म्हणून एकत्रित स्वरुपात लढणार आहोत. यासाठी लवकर शिंदेसेनेचे एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे अजित पवार यांच्याशी चर्चा करण्यात येणार आहे, अशी माहिती उच्च व […] The post Chandrakant Patil : महापालिकांच्या निवडणूका युती म्हणून लढणार : मंत्री चंद्रकांत पाटील appeared first on Dainik Prabhat .
Bhim Singh : भाजप खासदार भीम सिंह यांनी सादर केले खाजगी विधेयक; केली ‘ही’मोठी मागणी
नवी दिल्ली : भाजप खासदार भीम सिंह यांनी राज्यसभेत सादर केलेल्या खाजगी सदस्य विधेयकामुळे देशाच्या राजकारणात एक नवीन वाद निर्माण झाला आहे. या विधेयकात संविधानाच्या प्रस्तावनेतून धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी हे शब्द काढून टाकण्याची मागणी करण्यात आली आहे. खासदार सिंह म्हणतात की आणीबाणीच्या काळात लोकशाही प्रक्रियेशिवाय हे शब्द जोडले गेले होते आणि आता ते काढून टाकणे […] The post Bhim Singh : भाजप खासदार भीम सिंह यांनी सादर केले खाजगी विधेयक; केली ‘ही’ मोठी मागणी appeared first on Dainik Prabhat .
दिल्लीत राज ठाकरेंच्या नातवाचे पंतप्रधान मोदींनी केले लाड
नवी दिल्ली : दिल्लीत राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यांच्या मेव्हण्याचे डॉ. राहुल बोरुडे यांचे लग्न झाले. डॉ. राहुल बोरुडे हे अमित ठाकरे यांची पत्नी मिताली ठाकरे यांचे भाऊ आहेत. डॉ. राहुल बोरुडे यांच्या विवाह सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अनेक राजकीय मंडळी उपस्थित होती. यामुळेच या विवाह सोहळ्याकडे अनेकांचे लक्ष वेधले गेले.डॉ. राहुल बोरुडे यांच्या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने मनसे प्रमुख राज ठाकरे दोन दिवस दिल्लीत होते. यामुळे पंतप्रधान मोदी यांची लग्न सोहळ्यातील उपस्थिती चर्चेचा विषय झाली. लग्नाला उपस्थित राहण्याच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याशी चर्चा केल्याचे वृत्त आहे. पण या घटनेचा एकही फोटो अथवा व्हिडीओ अद्याप प्रसिद्ध झालेला नाही. बैठकीची माहिती गुप्त ठेवण्यात आली आहे.लग्न सोहळ्याला पंतप्रधान मोदी येताच थेट स्टेजवर गेले. बोरुडे दांपत्याला त्यांनी भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यानंतर बोरुडे दांपत्यासह फोटोसाठी पंतप्रधान मोदी उभे होते त्याचवेळी स्टेजवर अमित ठाकरे कडेवर मुलाला घेऊन आले. राज ठाकरेंचा नातू अमित ठाकरेंच्या कडेवर होता. अमित ठाकरे पंतप्रधान मोदींच्या शेजारी उभे राहिले. यानंतर फोटो काढण्यात आला. अमित ठाकरे जेव्हा स्टेजवर आले त्यावेळी पंतप्रधान मोदींनी स्मितहास्य केले आणि राज ठाकरेंच्या नातवाचे किआनचे हळूच गाल ओढून त्याचे लाड पुरवले.डॉ. राहुल बोरुडे यांच्या विवाह सोहळ्याला पंतप्रधान मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, भाजपचे वरिष्ठ नेते, सर्वोच्च न्यायालयाचे निवडक न्यायाधीश आणि काही दिग्गज नेते उपस्थित होते.
भारताने दक्षिण आफ्रिकेचा डाव ४८ व्या षटकात गुंडाळला, जिंकण्यासाठी हव्या २७१ धावा
विशाखापट्टणम : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात विशाखापट्टणम येथे निर्णायक एकदिवसीय सामना सुरू आहे. हा सामना जिंकणारा संघ मालिका २-१ अशी जिंकणार आहे. याआधी कोलकाता आणि गुवाहाटी येथे जिंकत दक्षिण आफ्रिकेने भारताविरूद्धची कसोटी मालिका २-० अशी जिंकली. यानंतर एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत रांचीमध्ये भारताचा आणि रायपूरमध्ये दक्षिण आफ्रिकेचा विजय झाला. यामुळे आता विशाखापट्टणम जिंकून भारत कसोटी मालिकेतल्या पराभवाचा वचपा काढतो की नाही याकडे अनेक क्रिकेटप्रेमींचे लक्ष आहे.विशाखापट्टणमच्या सामन्यात नाणेफेक जिंकून भारताने गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम गोलंदाजी करणाऱ्या भारताने दक्षिण आफ्रिकेचा डाव ४८ व्या षटकात गुंडाळला. दक्षिण आफ्रिकेने ४७.५ षटकांत सर्वबाद २७० धावा केल्या. भारताला जिंकण्यासाठी ५० षटकांत २७१ धावा करायच्या आहेत. भारताकडून कुलदीप यादव आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येकी चार विकेट घेतल्या तर अर्शदीप आणि रवींद्र जडेजाने प्रत्येकी एक विकेट घेतली.दक्षिण आफ्रिकेकडून क्विंटन डी कॉकने १०६, रायन रिकेलटनने शून्य, टेम्बा बावुमाने ४८, मॅथ्यू ब्रीट्झकेने २४, एडेन मर्करामने एक, डेवॉल्ड ब्रेव्हिसने २९, मार्को जॅनसेनने १७, कॉर्बिन बॉशने नऊ, केशव महाराजने नाबाद २०, लुंगी न्गिडीने एक, ओटनील बार्टमनने तीन धावांचे योगदान दिले.कुलदीपने डेवॉल्ड ब्रेव्हिस, मार्को जॅनसेन, कॉर्बिन बॉश, लुंगी न्गिडी या चौघांना तर प्रसिद्ध कृष्णाने क्विंटन डी कॉक, मॅथ्यू ब्रीट्झके, एडेन मर्कराम, ओटनील बार्टमन यांना बाद केले. अर्शदीपने रायन रिकेलटनला तर रवींद्र जडेजाने टेम्बा बावुमाला बाद केले.
Mitchell Starc : मिचेल स्टार्कचा गाबा कसोटीत ‘डबल’धमाका: 12 वर्षांनंतर ॲशेसमध्ये केला मोठा पराक्रम
Mitchell Starc Ashes Double Heroics : ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कसाठी ॲशेस मालिका एखाद्या स्वप्नाप्रमाणे ठरत आहे. पर्थमध्ये 10 विकेट्स घेऊन ऑस्ट्रेलियाला दणदणीत विजय मिळवून दिल्यानंतर, गाबा (ब्रिस्बेन) येथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीतही स्टार्कचे जादू पाहायला मिळत आहे. पहिल्या डावात 6 विकेट्स घेतल्यानंतर त्याने फलंदाजीतही योगदान देत एक खास पराक्रम केला आहे. मिचेल स्टार्कचा ॲशेसमध्ये […] The post Mitchell Starc : मिचेल स्टार्कचा गाबा कसोटीत ‘डबल’ धमाका: 12 वर्षांनंतर ॲशेसमध्ये केला मोठा पराक्रम appeared first on Dainik Prabhat .
पुणे महापालिका निवडणुकीपूर्वी ठाकरे गटाला बूस्ट; माजी नगरसेवकासह बड्या नेत्यांच्या हाती मशाल
पुणे : आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू झाले आहे. पुण्यातील माजी नगरसेवक सुनील गोगले यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह ठाकरे गटात प्रवेश करत हाती मशाल घेतली आहे. यामुळे ठाकरे गटाची पुणे महापालिकेतील ताकद वाढण्याची शक्यता आहे. कोण-कोण घेतली मशाल? पुण्यातील माजी नगरसेवक सुनील गोगले, भाजप […] The post पुणे महापालिका निवडणुकीपूर्वी ठाकरे गटाला बूस्ट; माजी नगरसेवकासह बड्या नेत्यांच्या हाती मशाल appeared first on Dainik Prabhat .
Sonia Gandhi : नेहरुंना बदनाम करणे हाच सत्ताधाऱ्यांचा मुख्य उद्देश आहे; सोनिया गांधी यांची टीका
नवी दिल्ली : स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना बदनाम करणे हा आजच्या सत्ताधाऱ्यांचा मुख्य उद्देश आहे यात शंका नाही. त्यांचे ध्येय केवळ त्यांना मिटवणे नाही तर प्रत्यक्षात ज्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक पायावर आपले राष्ट्र स्थापन झाले आहे आणि बांधले गेले आहे ते नष्ट करणे आहे, असे प्रतिपादन काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया […] The post Sonia Gandhi : नेहरुंना बदनाम करणे हाच सत्ताधाऱ्यांचा मुख्य उद्देश आहे; सोनिया गांधी यांची टीका appeared first on Dainik Prabhat .
प्रियाकां चोप्राच्या बहिणीने स्वीकारला इस्लाम धर्म ?
मुंबई : हॉलिवूड आणि बॉलिवूडमध्ये चमकलेली अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिच्या दोन बहिणीही मनोरंजनविश्वात चमकत असतात. प्रियांकाची बहीण परिणीतीने निवडक चित्रपटांत काम केल्यानंतर आम आदमी पार्टीच्या राज्यसभा खासदार राघव चढ्ढा सोबत लग्न केले आहे तर मनारा चोप्रा बॉलिवूडमध्ये नशीब आजमावत आहे. मनारा बिग बॉसमध्येही सहभागी झाली होती. बिग बॉसच्या बंगल्यातून बाहेर आल्यानंतरही सोशल मीडियातील विविध पोस्टमुळे मनारा सतत चर्चेत असते. अलिकडेच मनाराने निवडक फोटो आणि व्हिडीओ अपलोड केले आहेत. यामुळे मनाराने इस्लाम धर्म स्वीकारल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.
Neha Singh Rathore : गायिका नेहा सिंग राठोड यांना धक्का ! कोर्टाने ‘ती’याचिका फेटाळली
लखनौ : पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील कथित आक्षेपार्ह टिप्पणी प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने भोजपुरी गायिका आणि युट्यूबर नेहा सिंग राठोड यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. एप्रिलमध्ये नेहा सिंग राठोड यांनी केलेल्या वक्तव्यावरून या वर्षाच्या सुरुवातीला लखनौच्या हजरतगंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अशाच प्रकारच्या आरोपांसाठी संपूर्ण उत्तर प्रदेशात गायिकेविरुद्ध अनेक एफआयआर दाखल […] The post Neha Singh Rathore : गायिका नेहा सिंग राठोड यांना धक्का ! कोर्टाने ‘ती’ याचिका फेटाळली appeared first on Dainik Prabhat .
Quinton de Kock : क्विंटन डी कॉकचा कहर! भारताविरुद्ध शतक ठोकत वर्ल्ड रेकॉर्डसह केले अनेक विक्रम
Quinton de Kock century create record : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना विशाखापट्टणम येथे खेळला जात आहे. भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेसाठी सलामी द्यायला आलेल्या क्विंटन डी कॉकने शानदार शतकी खेळी पाहायला मिळाली, ज्यामुळे त्याने अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर केले. […] The post Quinton de Kock : क्विंटन डी कॉकचा कहर! भारताविरुद्ध शतक ठोकत वर्ल्ड रेकॉर्डसह केले अनेक विक्रम appeared first on Dainik Prabhat .
IndiGo flight operations crisis: देशातील सर्वात मोठी विमान कंपनी असलेल्या ‘इंडिगो’ला (IndiGo) सध्या गंभीर परिचालन (Operations) संकटाचा सामना करावा लागत आहे. गेल्या चार दिवसांत पुणे, मुंबई, दिल्ली, बंगळुरू आणि हैदराबादसह देशातील प्रमुख विमानतळांवरून 1000 हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आल्याने हजारो प्रवाशांचे हाल झाले आहेत. नेमके काय घडले? या अभूतपूर्व संकटाचे मुख्य कारण ‘नागरी विमान […] The post IndiGo flight operations crisis: ‘तो’ नवीन नियम अन् 4 दिवसांत 1000 हून अधिक उड्डाणे रद्द; खरे कारण जाणून घ्या, चूक कोणाची? appeared first on Dainik Prabhat .
रांची : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी देशभरातील आदिवासी समुदायांना एकत्र राहण्याचे आवाहन केले आणि इशारा दिला की अन्यथा ते नामशेष होऊ शकतात. त्यांनी त्यांच्या मुद्द्याला बळकटी देण्यासाठी मोठे मासे लहान माशांना खातात ही म्हण वापरली. जनगणनेत आदिवासी समुदायाला त्यांचे योग्य स्थान कधीच मिळणार नाही, असे प्रतिपादन करून सोरेन म्हणाले की, इथून पुढे आदिवासींसमोरील आव्हाने […] The post Hemant Soren : मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी आदिवासी समुदायांना एकत्र राहण्याचे आवाहन करत दिला ‘हा’ इशारा appeared first on Dainik Prabhat .
मुंबई : शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला कायद्याच्या कचाट्यात पकडले आहे. महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण होऊनही विधानसभा व विधानपरिषद या दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेतेपद अद्याप रिक्त असल्याचा मुद्दा उपस्थित करत उद्धव ठाकरेंनी थेट उपमुख्यमंत्रीपद रद्द करण्याची मागणी केली आहे. संविधानात उपमुख्यमंत्री पदाची तरतूदच नाही. जर तुम्ही आम्हाला कायदे दाखवणार असाल, […] The post राज्यातील उपमुख्यमंत्रीपद रद्द होणार? कोणाची विकेट पडणार? ठाकरेंनी सरकारला कायद्याच्या कचाट्यात पकडलं appeared first on Dainik Prabhat .
तज्ज्ञांकडून आरबीआयच्या पावलाचे स्वागत- एचएसबीसी ग्लोबल रिसर्च इन्व्हेसमेंटचा अहवालातून दुजोरा
मुंबई: एचएसबीसी ग्लोबल रिसर्च इन्व्हेसमेंटने दिलेल्या अहवालानुसार, वित्तीय पतधोरण समितीने जाहीर केलेल्या व्याजदर कपातीच्या तज्ज्ञांकडून निर्णयाचे स्वागत करण्यात आल्याचे आपल्या अहवालात नमूद केले. काल तीन दिवसीय वित्तीय पतधोरण समितीची बैठक पार पडली ज्यानंतर गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी २५ बेसिस पूर्णांकाने कपात घोषित केली. त्यामुळे ५.५०% वरून ५.२५% रेपो दर झाल्याने मोठ्या प्रमाणात कपातीचा फायदा ग्राहक केंद्रित बाजारात जाणवू शकतो. प्रामुख्याने कर्जाच्या मागणीत व पुरवठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ अपेक्षित असल्याने बाजारातील तरलता (Liquidity) बाजारात मोठ्या प्रमाणात वाढू शकते.तज्ञांच्या मते यामुळे क्रेडिट वाढ अपेक्षित आहे. याविषयी बोलताना अहवालात हे देखील स्पष्ट आहे की यामुळे बाजारात १.४५ लाख ट्रिलियन रूपयांची तरलता वाढू शकते. त्यांनी आपल्या अहवालात उल्लेख केल्याप्रमाणे,'आरबीआयने २५ बेसिस पॉइंट्स रेपो दरात कपात केल्याने त्यांच्या कडक भूमिकेमुळे आर्थिक वर्ष २७ मध्ये वाढ कमकुवत झाल्यास आणखी सवलती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे, तर परकीय चलनातील घसरणीमुळे निर्यात स्पर्धात्मकता सुधारू शकते असे एका अहवालात म्हटले आहे.आरबीआयने बाजारात अतिरिक्त तरलता वाढवण्यासाठी १ ट्रिलियन रुपयांच्या ओपन मार्केट ऑपरेशन्स खरेदी आणि ३ वर्षांच्या डॉलर- रुपये व ५ अब्ज डॉलर्सच्या खरेदी-विक्री स्वॅपच्या योजना जाहीर केल्या होत्या. यावर एचएसबीसीने म्हटले आहे की त्यांचे महागाईचे अंदाज आरबीआयच्या तुलनेत सुमारे ५० बेसिस पॉइंट्स कमी आहेत. आर्थिक वर्ष २७ मधील पहिल्या तिमाहीत (H1FY27) कमी राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. आम्हाला वाटते की सध्या वाढ मजबूत आहे, परंतु वित्तीय कडकपणा, कमकुवत निर्यात आणि जीएसटी वाढीतील घट यामुळे मार्च तिमाहीपर्यंत ती मंदावेल. आर्थिक असहिष्णुतेच्या जगात वित्तीय धोरण कडक राहील आणि वाढीला आधार देण्याची जबाबदारी आरबीआयवर येईल असे अहवालात म्हटले आहे.आरबीआयने महागाईचा अंदाज कमी केला, वाढ कमी होऊ शकणाऱ्या क्षेत्रांवर चर्चा केली आणि पुरेशी तरलता सुनिश्चित केली असे अहवालात म्हटले आहे. केंद्रीय बँकेचे धोरण कमकुवत होते कारण त्यांनी आर्थिक वर्ष २६ आणि आर्थिक वर्ष २७ च्या पहिल्या सहामाहीसाठी चलनवाढीचा अंदाज अनुक्रमे ६० बीपीएस आणि ५० बीपीएसने कमी केला आणि आर्थिक वर्ष २६ साठी जीडीपीचा अंदाज ७.३% वाढवला आहे. 'तरलतेबाबत बोलताना डिसेंबरमध्ये आरबीआय १.४५ ट्रिलियन रुपयांचा निधी देत आहेच असे गव्हर्नरने नमूद केले आहे. गरज पडल्यास आणखी निधी उपलब्ध करून दिला जाऊ शकतो' असे अहवालात नमूद केले आहे.अर्थव्यवस्थे च्या वाढीला चालना देण्यासाठी आरबीआय एमपीसी सदस्यांनी एकमताने रेपो दर २५ बेसिस पॉइंट्सने कमी करून ५.२५% करण्याचा निर्णय घेतला. विश्लेषकांनी सांगितले की, रेपो दर कमी करण्याचा आरबीआयचा निर्णय हा कमी चलनवाढीमुळे निर्माण झालेल्या आर्थिक जागेचा वापर करून वापराला चालना देण्यासाठी आणि विकास चक्राला बळकटी देण्यासाठीकेलाजातआहे.
नवी दिल्ली: देशातील सर्वात मोठी विमान कंपनी असलेल्या ‘इंडिगो’च्या विस्कळीत सेवेचा फटका हजारो प्रवाशांना बसत असतानाच, केंद्र सरकारने शनिवारी मोठा दिलासादायक निर्णय घेतला आहे. इंडिगोच्या रद्य झालेल्या उड्डाणांमुळे अनेक मार्गांवर गगनाला भिडलेल्या विमान भाड्यावर (Airfare) सरकारने आता कमाल मर्यादा (Upper Limit) निश्चित केली आहे. इतकेच नव्हे, तर रद्द झालेल्या विमानांच्या प्रवाशांचे पैसे (Refund) रविवारी रात्री […] The post IndiGoच्या उड्डाण संकटामुळे सरकार ‘ॲक्शन मोड’मध्ये; विमान भाड्यावर मर्यादा, रिफंडसाठी उद्या रात्रीपर्यंतची मुदत appeared first on Dainik Prabhat .
Suryakumar Yadav breaks Aditya Tare’s record : भारतीय टी-20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव सध्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत खेळत आहे. मुंबई आणि केरळ यांच्यात झालेल्या सामन्यात सूर्याने 25 चेंडूंमध्ये 32 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली, पण तो मुंबईला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला आणि मुंबईला 15 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, सूर्याने आपल्या […] The post Suryakumar Yadav : सूर्याचा मोठा धमाका! मिळवला नंबर-१ चा मुकुट, टी-२० मध्ये केला ‘हा’ ऐतिहासिक पराक्रम appeared first on Dainik Prabhat .
राज्याचे खरे मुख्यमंत्री अमित शाह; फडणवीस केवळ रबर स्टॅम्प
नागपूर : महायुती सरकारला सत्तेत येऊन आज एक वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्य सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. गेल्या एका वर्षात महाराष्ट्राला विकासाऐवजी अराजकता, द्वेष, जाती-जातीतील संघर्ष, कायदा व सुव्यवस्थेचे लक्तर लटकलेले चित्र आणि सरकारी जमिनींची विक्री पाहायला मिळाली, असे घणाघाती आरोप त्यांनी केले. हे वर्ष महाराष्ट्रासाठी […] The post राज्याचे खरे मुख्यमंत्री अमित शाह; फडणवीस केवळ रबर स्टॅम्प appeared first on Dainik Prabhat .
आरबीआयच्या गोट्यातून नवी बातमी - फिनो पेमेंट बँकेला स्मॉल फायनान्स बँकेचा दर्जा प्राप्त
मोहित सोमण आरबीआयच्या नव्या निर्देशानुसार फिनो पेमेंट बँकेला (Fino Payments Bank) स्मॉल फायनान्स बँकेचा (SFB) दर्जा मिळाला आहे. आरबीआयने आपल्या परिपत्रकात संबंधित माहिती दिली असून 'इन प्रिन्सिपल' परवानगी दिल्याचे म्हटले आहे. जी बँक आरबीआयच्या तरतूदीनुसार रहिवाशी (Resident) चालवतात व ५ वर्ष पूर्ण करतात त्यांना हा दर्जा प्रदान होतो. आरबीआयने २७ नोव्हेंबरला हा दर्जा ठरण्यासाठी नियमावली प्रकाशित केली होती. त्या निकषांवर ही अंतरिम मंजुरी देण्यात आली आहे.आरबीआयच्या नियमावलीनुसार, निवासी /व्यावसायिक (भारतीय नागरिक), एकट्याने किंवा संयुक्तपणे, प्रत्येकी ज्यांना वरिष्ठ स्तरावर बँकिंग आणि वित्त क्षेत्रात किमान १० वर्षांचा अनुभव आहे आणि खाजगी क्षेत्रातील कंपन्या आणि संस्था, ज्या रहिवाशांच्या मालकीच्या आणि नियंत्रित आहेत (वेळोवेळी सुधारित केलेल्या FEMA Foreign Exchange Management Act) नियम आणि नियमांमध्ये परिभाषित केल्याप्रमाणे आणि किमान पाच वर्षांच्या कालावधीसाठी त्यांचे व्यवसाय चालवण्याचा यशस्वी ट्रॅक रेकॉर्ड असलेले लघु वित्त बँका (Small Finance Bank) स्थापन करण्यासाठी प्रवर्तक म्हणून पात्र असतात.माहितीनुसार, रहिवाशांच्या नियंत्रणाखाली असलेल्या आणि पाच वर्षांचे कामकाज पूर्ण केलेल्या विद्यमान पेमेंट बँका (PBs) देखील विविध अधिकाऱ्यांच्या सर्व कायदेशीर आणि नियामक आवश्यकतांचे पालन केल्यानंतर व त्यांनी या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले असल्यास त्या लघु वित्त बँकांमध्ये रूपांतरित होण्यास पात्र आहेत असे आरबीआयने यापूर्वी स्पष्ट केले आहे. बँकेच्या कामगिरीत सुधारणा झाल्याने ही मंजुरी मिळाली आहे. यापूर्वी ऑक्टोबर २०२५ मध्ये बँकेला आरबीआयने ५.८८ लाखांचा दंड ठोठावला होता. एका कर्मचाऱ्याने केलेल्या घोटाळ्याप्रकरणी याची माहिती तत्काळ आरबीआयला न कळवल्याने बँकेला दंड भरावा लागला. त्यामुळे फिनो बँकेला आता आपला ३६० डिग्री पोर्टफोलिओ वाढवण्यासाठी संधी मिळणार असून बँक फूल सर्विस' बँक म्हणून ऑपरेशनल असणार आहे.जून २०१७ मध्ये फिनो बँकेची स्थापना केली गेली होती तर डिसेंबर २०२३ मध्ये बँकेने स्मॉल फायनान्स बँक बनण्यासाठी आरबीआयकडे अर्ज केला होता त्यावर आज आरबीआयकडून शिक्कामोर्तब झाले आहे. या इन प्रिन्सिपल मंजूरी अंतर्गत १८ महिन्यात आवश्यक असलेले अनुपालनातील तरतूद (Regulatory Provision) बँकेला करावी लागणार आहे. आरबीआयच्या तरतूदीनुसार बँकेच्या किमान २५% शाखा या बँकिंग क्षेत्राची उपलब्धता नसलेल्या ग्रामीण भागात असाव्यात. रिझर्व्ह बँकेच्या मंजुरीला त्यांच्या मागील कामगिरीचे प्रमाणीकरण म्हणत फिनो पेमेंट्स बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ऋषी गुप्ता म्हणाले आहेत की,'हे पाऊल तंत्रज्ञान-आधारित वित्तीय सेवा प्रदान करण्याची, डिजिटल पेमेंटचा विस्तार करण्याची आणि मजबूत अनुपालन मानके राखण्याची बँकेची क्षमता पुष्टी करते. तत्वतः मंजुरी मिळाल्यापासून एका वर्षाच्या आत फिनो आपले कर्ज देण्याचे काम सुरू करेल अशी अपेक्षा आहे.'बँकेचे सध्याचे बाजारी भांडवल (Market Capitalisation) २६१८.४७ कोटी रुपये आहे. यंदा दुसऱ्या तिमाहीत बँकेला इयर ऑन बेसिसवर गेल्या वर्षीच्या तिमाहीतील तुलनेत यंदा २७.४% घसरून १५.४% वर घसरला आहे. बँकेच्या उत्पन्नातही इयर ऑन इयर बेसिसवर १२.०१% घसरण झाली आहे. सरासरी ठेवीत (Average Deposits) ३६% वाढ झाल्याने ते या तिमाहीत २३०६ कोटींवर पोहोचले. बँकेच्या घोषणेनंतर गुंतवणूकदारांनी मोठा प्रतिसाद दिल्या कारणांमुळे थेट ३.१३%% उसळत ३१३ रुपये प्रति शेअरवर व्यवहारकरतहोता.
भारत-चीन सीमेजवळ मोस्ट वॉन्टेड महिला वाघ तस्कराला अटक
गंगटोक : मोस्ट वॉन्टेड महिला वाघ तस्कर यांगचेन लाचुंगपा अखेर तपासयंत्रणांच्या जाळ्यात अडकली आहे. भारत-चीन सीमेजवळ करण्यात आलेल्या कारवाईत तिला पकडण्यात आले. गेल्या दहा वर्षांपासून देशातील तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील व्याघ्रतस्करीच्या अनेक प्रकरणांत तिचा शोध सुरू होता. मध्यप्रदेश व्याघ्र धडक पथक आणि नवी दिल्ली येथील वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरो यांनी संयुक्त कारवाई करून २ डिसेंबर रोजी उत्तर सिक्कीममधील लाचुग येथे यांगचेनला ताब्यात घेतले. या भागात तापमान उणे सात अंशांपर्यंत घसरले असतानाही पथकाने रचलेल्या सापळ्यात ती सापडली. तपासयंत्रणांना तिचा मागोवा अनेक महिन्यांपासून लागत नव्हता.यांगचेन मूळची तिबेटची असून भारतात दिल्ली आणि सिक्कीममध्ये राहते. तिला २०१७ मध्ये पहिल्यांदा अटक झाली होती. पण जामिनावर सुटताच ती फरार झाली आणि त्यानंतर तिचा शोध अधिकच कठीण झाला. तिच्या अटकेनंतर गंगटोकमधून ट्रान्झिट वॉरंट मिळवण्याची प्रक्रिया सुरू असून तिला लवकरच मध्यप्रदेशमध्ये आणण्यात येणार आहे. मध्यप्रदेश व्याघ्र धडक पथकाने आतापर्यंत ३१ शिकारी आणि तस्करांना अटक केली आहे. यांगचेनच्या अटकेमुळे व्याघ्रतस्करीच्या अनेक प्रकरणांबाबत नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे.
बहरीनमध्ये जय पवारांचा विवाह; ‘झिंगाट’वर अजितदादा-रोहित पवार यांचा ठेका
बहरीन : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा विवाहसोहळा बहरीनमध्ये संपन्न झाला. या सोहळ्याला ४०० पाहुणे उपस्थित होते. सोहळ्याची राज्यभर चर्चा सुरू असताना, लग्नातील अजित पवार आणि त्यांचा पुतण्या रोहित पवार यांचा संयुक्त नृत्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.जय पवार यांचा साखरपुडा काही दिवसांपूर्वी पुण्यातील फार्महाऊसवर झाला होता. त्यानंतर संगीत आणि हळदीचे कार्यक्रम शुक्रवारी आयोजित करण्यात आले, तर शनिवारी मुख्य विधी संपन्न झाले. वरात निघाल्यानंतर अजित पवार, त्यांची भगिनी आणि पुतणे रोहित पवार यांनी ‘सैराट’ चित्रपटातील ‘झिंगाट’ गाण्यावर ठेका धरत नाच केलाकडक आणि शिस्तप्रिय प्रतिमा असलेले अजित पवार यांना लेकाच्या लग्नात नाचताना पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर राजकीय मतमतांतर निर्माण झालं असलं तरी कुटुंबातील नाते अबाधित असल्याचे चित्र या नृत्यातून दिसले. रोहित पवार यांनी काका अजित पवारांसोबतची उपस्थिती आणि सहभाग यामुळे पुन्हा एकदा पवार कुटुंब एकत्र दिसलं.विवाह सोहळ्यात शरद पवार, सुप्रिया सुळे, श्रीनिवास पवार आणि शर्मिला पवार अनुपस्थित राहिल्याने चर्चांना उधाण आले. मात्र संसदेच्या हिवाळी अधिवेशनामुळे त्यांना उपस्थित राहणे शक्य झाले नाही, अशी माहिती समोर आली आहे.
मुंबईच्या विलेपार्ले परिसरात आढळली बेवारस बॅग, पोलीस तपासाला सुरुवात
मुंबई : दिल्लीत लाल किल्ल्याजवळ कारबॉम्बचा स्फोट करण्यात आला होता. ही घटना ताजी असतानाच मुंबईत विलेपार्ले स्थानकाजवळ एक बॅग बेवारस स्थितीत आढळली. या बॅगबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली आहे. घटनास्थळी पोलीस पथक पोहोचले आहे.विलेपार्ले पूर्व येथे दिनानाथ नाट्यगृहाजवळ उतरणाऱ्या पुलावर अर्थात पब्लिक ब्रिजवर एक बॅग बेवारस स्थितीत आढळली. पोलिसांनी ही बॅग तपासली. बॅगेत बॉम्बसदृश्य वस्तू आढळल्यामुळे बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाला अर्थात बीडीडीएसला (Bomb Detection and Disposal Squad or BDDS) बोलावण्यात आले. खबरदारीचा उपाय म्हणून भोवतालचा परिसर रिकामा करण्यात आला आहे. चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. बीडीडीएसचे पथक तपासणी करेल आणि धोकादायक वस्तू आढळल्यास ती निकामी करेल, अशी माहिती पोलिसांनी प्रसारमाध्यमांना दिली.नागरिकांनी कुठेही बेवारस स्थितीत वस्तू आढळल्यास त्याबाबतची माहिती पोलिसांना द्यावी पण परस्पर त्या वस्तूला हात लावू नये; असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
महापरिनिर्वाण दिनी नामांतराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर; सत्ताधाऱ्यांची सकारात्मक प्रतिक्रिया
मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर स्थानकाच्या नामांतराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाही ‘दादर स्टेशनचे चैत्यभूमी स्टेशन’ असे नामकरण करण्याची मागणी पुढे आली आहे. या वेळी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ नरेंद्र जाधव यांनी दादर मेट्रो स्थानकाला ‘चैत्यभूमी’ हे नाव देण्याची औपचारिक मागणी केली आहे.नरेंद्र जाधव यांनी आज सकाळी चैत्यभूमीवर उपस्थित राहून बाबासाहेबांना अभिवादन केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखोंच्या संख्येने अनुयायी मुंबईत आले असून यावर्षीही १५ ते २० लाख लोकांच्या उपस्थितीची शक्यता आहे. चैत्यभूमी परिसरात पुस्तकांचे मोठे प्रदर्शन भरले असून सुमारे चार कोटी रुपयांची विक्री होणार असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला.मुंबई महानगरपालिकेने केलेल्या व्यवस्थेचे कौतुक करताना नरेंद्र जाधव यांनी इंदू मिल येथील आंबेडकर स्मारकाचे काम वेगाने करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने समन्वय समिती स्थापन करावी, अशी मागणी केली. तसेच आंबेडकरी जनतेच्या वतीने दादर मेट्रो स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देण्याची मागणी त्यांनी केली.नरेंद्र जाधव यांच्या मागणीवर सत्ताधारी तसेच विरोधकांकडूनही सकारात्मक प्रतिक्रिया उमटल्या आहेत. शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रस्तावाचे स्वागत केले आणि गेल्या अनेक वर्षांपासून दादर स्थानकाच्या नामांतराचा मुद्दा प्रलंबित असल्याची आठवण करून दिली. तर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीही चैत्यभूमीवर उपस्थित राहून बाबासाहेबांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आणि नरेंद्र जाधव यांनी केलेल्या मागणीवर मुख्यमंत्री सकारात्मक निर्णय देतील, असा विश्वास व्यक्त केला.
मोहित सोमणआज डॉ बाबासाहेब आंबेडकर ६९ वा महानिर्वाण दिन आहे. खरच समाजाला संपूर्णपणे बाबासाहेब आंबेडकर समजलेत का? त्यांचे संविधान आणि मूलभूत तत्वे या व्यतिरिक्त केलेले आर्थिक, सामाजिक परिवर्तन, अर्थव्यवस्थेवरील त्यांचा व्यासंग कळलय का? यावर कधी चर्चा होईल का? हा प्रमुख मुद्दा आहे. १९७० सालचा काळ त्या कालावधीत दलित समाजावर अन्याय अत्याचाराविरोधात बंडखोर तरूणांनी एकत्र येत दलित पँथरची निर्मिती केली.परंतु त्यामागे केवळ आक्रमक नाही तर सामंजस्याने तोडगा काढण्याचीही भूमिका होती. पँथरची आक्रमकता लोकांनी लक्षात घेतली पण त्यांचे परिवर्तनवादी विचार किती लोकांनी आत्मसात केले हा खरा कळीचा मुद्दा आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात हेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबतीत हेच झाले. एखाद्या जागतिक अर्थतज्ज्ञाला लाजवेल इतके मोठे अर्थव्यवस्थेवर काम डॉक्टरांनी केले. परंतु त्याचा संदर्भ ठराविक बुद्धीजीवी वर्ग वगळता किती लोकांनी स्विकारला हा संशोधनाचा विषय आहे.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रचंड अभ्यास अर्थशास्त्राचा केला होता. व्यापक अर्थशास्त्रातील संदर्भासहीत स्पष्टीकरणासह डॉक्टरांनी तरूण वयात अॅडमिनिस्ट्रेशन अँड फायनान्स ऑफ दि ईस्ट इंडिया कंपनी दि इव्होल्यूशन ऑफ प्रोव्हिन्शियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया आणि दि प्रॉब्लेम ऑफ द रुपी: इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्यूशन अशी जागतिक दर्जाची अर्थव्यवस्थेवर लिहिली आहेत. त्यांचा मायक्रो व मॅक्रो अर्थव्यवस्थेवर दांडगा अभ्यास होता. विपुल लेखन करताना समाज तत्कालीन सामाजिक परिस्थिती, तत्कालीन अर्थसंदर्भ, भविष्यवादी अर्थव्यवस्था यांची सांगड घालत यावर विशाल लेखन त्यांनी केले.खूप कमी जणांना माहिती असेल की देशातील सर्वात मोठे अर्थतज्ज्ञ म्हणून ज्यांची ओळख आहे असे डॉ अमर्त्य सेन हे डॉ आंबेडकरांना अर्थशास्त्रातील आपले गुरु मानतात यातच सगळं आलं! एक ब्रेडवर दिवसरात्र अभ्यास करत उच्चविद्याविभूषित झालेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना केवळ एका समाजाचे नेते म्हणून संबोधित करणे हे योग्य नाही ते भारतीयांचे नेते होते त्याहूनही ते देशाचे सु़धारक होते.त्यासाठी आणखी एक पार्श्वभूमी महत्वाची ठरली. परदेशी शिक्षणासाठी गेल्यानंतर बाबासाहेबांनी कोलंबिया विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात डबल एम.ए. पीएच.डी. आणि लंडन विद्यापीठातून (सध्याच्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स) एमएससी डी.एस्सी या पदव्या मिळवल्या होत्या. अर्थशास्त्रामध्ये पीएच.डी. आणि अर्थशास्त्रामध्ये दोनदा डबल डॉक्टरेट मिळवणारे डॉ. आंबेडकर हे पहिले भारतीय व पहिले दक्षिण आशियाई व्यक्ती झाले. विशेष म्हणजे डी.एस्सी ही डॉक्टरेट पदवी मिळवणारे बाबासाहेब हे पहिले व्यक्ती आहेत तसेच डी.एस्सी. पदवी लंडन विद्यापीठातून मिळवणारे आतापर्यंतचे एकमेव भारतीय झाले.ब्रिटिश कालखंडातील प्रादेशिक वित्तीय व्यवस्थेचा विकास (दि इव्हॉल्युशन ऑफ प्रोविन्शियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया) हा त्यांच्या पीएच.डी.चा विषय होता. ज्यांना डॉक्टरांचे मार्गदर्शक म्हटलं जातं ते अर्थशास्त्रज्ञ प्रा. सेलिगमन यांनी डॉक्टरांच्या प्रस्तावनेत लिहिलेय की डॉ. 'आंबेडकरांचा प्रबंध वस्तुनिष्ठ असून आणि त्यांच्या स्वतःच्या देशात घडून येत असलेल्या महत्त्वपूर्ण स्थित्यतरांचे (घटनांचे) निःपक्षपाती विश्लेषण त्यात आहे. त्यांच्या अभ्यासातून निघणारे निष्कर्ष हे इतर देशांनाही लागू होणारे आहेत.'डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा त्यांच्या एकूणच अभ्यासातील प्रथम विषय हा अर्थशास्त्रच होता. परंतु दुर्दैवाने त्याचा उल्लेख अग्रक्रमाने अद्याप केला जात नाही. भारतातील पुराण काळातील समृद्धी,भेदभाव, वाढणारी विषमता, परकीयांचा विस्तारवादी आर्थिक दृष्टीकोन, भारताची आगामी झेप अशा अनेक गोष्टीवर डॉक्टरांनी विस्तृत लिहिलेले आहे. खरं तर त्यांचे प्रबंध आज पाठ्यपुस्तकात असण्याची गरज आहे. अद्याप त्यांचा उल्लेख केवळ घटनेचे शिल्पकार म्हणून करत त्यांना मर्यादित करण्याचा प्रयत्न करत आहोत असे वाटते. त्यामुळे त्यांना मर्यादित करणे हे त्यांच्या विचारांचा अपमान ठरेल.भूमिहीन मजूर, लहान जमिनी, खोतीपद्धती, महारवतन, सामुदायिक शेती, जमीन महसूल आणि जमीनदारशाहीचे उच्चाटन या विषयावर त्यांनी विपुल लेखन केले. खासकरुन हुकूमशाही व सामंतशाही या कालावधीनंतर नव्या काळातही अस्पृश्य समाजात केवळ बहुतांश भूमिहीन मजुरांचाच भरणा अधिक होता. उत्पन्नाचा आवश्यक स्त्रोत नसल्याने सरकार दरबारी काय उपाययोजना केली पाहिजे याची माहिती डॉक्टरांनी आपल्या प्रबंधनात दिली होती. उद्योगांचे राष्ट्रीयीकरण, सर्वसामान्यांचे आर्थिक प्रश्न, अर्थकारणाची उत्क्रांती, धान्याचा प्रश्न, समाजवाद, सामाजिक समता या विषयांवरही त्यांनी प्रासंगिक लिखाण केले होते.विद्यापीठात असताना पदवी परीक्षेसाठी त्यांनी जे प्रबंध लिहिले यात त्या मुद्यांच्या प्रकर्षानं आढळतो.आरपीआय स्थापन करण्यापूर्वी स्वतंत्र मजूर पक्ष, अखिल भारतीय शेड्यूल कास्ट फेडरेशन पक्षाची पायाभरणी त्यातूनच झाली. तत्कालीन सामाजिक विषयाचे अभ्यासक म्हणतात,'निवडणुकीच्या वेळचे जाहीरनामे आणि भारतीय घटनेवरील भाषणात त्यांनी अर्थाचे विकेंद्रीकरण, राष्ट्रीयकरण, आर्थिक समता, व औद्योगिक विकास या विषयावर भर दिला होता.त्यांच्या लेखणीतून जमीनीचे प्रश्न चलनविषयक प्रश्न, सार्वजनिक प्रश्न असे विभागले गेले होते.ब्रिटिश सरकारला १९४७ साली त्यांनी भारताच्या आर्थिक विकासाची योग्य धोरणे कोणती हे सांगितले होते. अत्युच्च उत्पादन क्षमतेचा विचार करून लोकांच्या आर्थिक जीवनाचे नियोजन करणे तसेच खासगी उत्पादकांना कोणतीही आडकाठी न करता आणि संपत्तीचे समान वाटप होईल अशारीतीने आर्थिक नियोजन करणे हे सरकारचे दायित्व आहे असे त्यांनी नमूद केले होते. डॉ. आंबेडकरांच्या म्हणण्यानुसार, 'आर्थिक लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी आर्थिक धोरण आणि कार्यक्रम हे राज्य घटनेचे अविभाज्य भाग असले पाहिजेत' दुर्दैवाने अर्थकारणापेक्षा राजकारणाला या देशात अधिक महत्व आहे.प्राथमिक साधनांचे खासकरून शेतीचे मोठ्या उद्योगांचे राष्ट्रीयीकरण, प्रत्येक नागरिकासाठी सक्तीची विमा योजना आणि आर्थिक प्रगतीला हातभार लावण्यासाठी खासगी उद्योजकांना वाव देण्याच्या आवश्यकतेचा अंतर्भाव असायला हवा असे आंबेडकर म्हणत कसत. म्हणूनच हे कार्यक्रम शाश्वत होण्यासाठी त्यांना राज्य घटनेत मूलभूत गोष्टींचा दर्जा असायला हवा यासाठी त्यांनी केवळ पुस्तकी नाही तर प्रत्यक्ष अर्थकारणाची तिजोरी सरकारने कश्या प्रकारे उपयोगात आणली पाहिजे यासाठी संविधानात विशेष तरतूद केली आहे. त्यांच्या मते या तरतुदीमुंळे राज्यकर्त्यांना नैतिक जबाबदारी पार पाडणे आवश्यक असेल. अशा कार्यक्रमांना विरोध असलेला राजकीय पक्ष सत्तेवर आला तरी त्याला हे कार्यक्रम रद्द करता येणार नाहीत. या योजनेला डॉ. आंबेडकरांनी 'घटनात्मक शासकीय समाजवाद' (कॉन्स्टिट्युशनल स्टेट सोशॅलिझम) असे नाव दिले होते.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्यभर सत्याची कास धरली. यापूर्वी पुढाऱ्यांनी त्यांचा कायम राजकारणासाठी उपयोग केला. राजकारण सुधारण्यासाठी त्यांनी शासकीय परिचलनात अर्थशास्त्रीय व्याख्या वापरण्यास सुरुवात केली ज्याचा फायदा आजतागायत जागतिकीकरणानंतरही होत आहे.आज रुपयात मोठ्या प्रमाणात चढउतार सुरू आहे. पण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी १९२३ मध्ये रूपयाची गंभीर दखल घेतली होती. मार्च १९२३ मध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स सारख्या प्रतिष्ठित संस्थेत द प्रोब्लेम ऑफ रूपी नावाचा २५१ पानांचा शोध प्रबंध सादर केला होता. आंबेडकरांनी भारताच्या राष्ट्रीय चलनाशी व रुपयाशी संबंधित समस्या स्पष्ट करण्याचा प्रयत्न या प्रबंधातून केला होता. औद्योगिक क्षेत्रातील विकासालर लिहिताना कारखान्यातील उत्पादनांचा व्यापार सुलभ करण्यासाठी विनिमय दर खूप जास्त ठेवण्याच्या ब्रिटिश डावपेचाविरुद्ध त्यांनी त्या कालावधीत युक्तिवाद केला होता.उपलब्ध माहितीनुसार, याच १९२३ सालात त्यांनी अर्थशास्त्रात २९ इतिहासात ११, समाजशास्त्रात सहा, तत्वज्ञानात पाच, मानववंशशास्त्रात चार, राज्यशास्त्रात तीन अभ्यासक्रम पूर्ण केले होते. याशिवाय, त्यांनी फ्रेंच आणि जर्मन भाषेत प्रत्येकी एक प्राथमिक अभ्यासक्रम देखील घेतला. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स (LSE) मधून विज्ञानात डॉक्टरेट केली आणि ती त्यांना १९२३ मध्ये प्रदान करण्यात आली.आंबेडकरांच्या मते, ब्रिटीश राजवटीच्या राजकोषीय धोरणांमध्ये न्यायाचा अभाव होता. कराचा भार श्रीमंतांऐवजी अधिक गरिबांवर पडला आणि सार्वजनिक खर्च हा उच्चभ्रूंच्या विशेषाधिकारांना आणि उघड उपभोगाला कायम ठेवण्यासाठी केंद्रित होता. म्हणजेच जमीनदार वर्ग आणि सरकारी अधिकाऱ्यांना सार्वजनिक कल्याणाऐवजी त्यांनी निदर्शनास आणून दिले की ब्रिटीशांच्या उधळपट्टी धोरणांमुळे आणि सदोष कर धोरणांमुळे, कर आकारणीचा पायाच या कारणास्तव ढासळत होता आणि महसूल संकलनातील तूट होण्याचे हे एक प्रमुख कारण होते. त्यासाठी त्यांनी हे बदल करण्यासाठी राजकारणात प्रवेश घेतला असला तरी त्यांची राजकीय कारकीर्द पाहता त्यांनी सत्याची कास सोडली नाही.काँग्रेस चळवळीतील अनेक मतभेद असतानाही तत्कालीन सामाजिक स्थितीचा आढावा घेत दुरदृष्टीने त्यांनी प्रथम राष्ट्रीय व सामाजिक, आर्थिक न्याय यांची कास कधी सोडली नाही. आज त्यांचे स्मरण जयंती अथवा मी महानिर्वाण दिनी होते पण त्यांचे एकूणच सामाजिक काम आभाळाएवढे होते त्यामुळे डॉक्टरांविषयी बोलताना निश्चितच वाटते की डॉक्टरांची न्यायी वृत्ती व आर्थिक दुरदृष्टी पाहता समाजाला यामध्ये खूप काही शिकण्यासारखे आहे. त्यांचा व्यासंग अफाट होता. त्यामुळे त्यांच्या विचारांचे आचरण करण्यासाठी प्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकर समजून घेतले पाहिजे त्यासाठी गत्यंतर नाही.समाजात आज गरज आहे ती समानतेची, बदललेल्या अर्थकारणाला सामोरे जात सकारात्मक होण्याची, ती गरज नक्कीच डॉक्टरांच्या प्रबंध वाचनानंतर मिळेल. तूर्तास या महामानवाला कोटी कोटी प्रणामवअभिवादन!
चूक इंडिगोची, कारवाई निश्चित; विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांचा इशारा
Indigo Airline | तांत्रिक बिघाड, कर्मचाऱ्यांची कमतरता आणि नवीन FDT (Flight Duty Time) नियमांमुळे देशभरात शेकडो इंडिगो विमाने रद्द होत आहेत किंवा उशिराने धावत आहेत. प्रवाशांना होणाऱ्या त्रासामुळे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पीटर एल्बर्स यांनी जाहीरपणे माफी मागितली आहे. त्यांनी १० ते १५ डिसेंबरपर्यंत विमानांची सेवा पूर्णपणे सामान्य होईल, अशी आशा व्यक्त केली आहे. […] The post चूक इंडिगोची, कारवाई निश्चित; विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांचा इशारा appeared first on Dainik Prabhat .
DDLJ Turns 30: बॉलिवूडच्या इतिहासात कायमस्वरूपी कोरलेलं नाव म्हणजे ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’. या आयकॉनिक चित्रपटाने यंदा ३० वर्षे पूर्ण केली. या खास निमित्ताने शाहरुख खान आणि काजोल लंडनमध्ये एक ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार ठरले. लेस्टर स्क्वेअर येथे ‘राज आणि सिमरन’चा कांस्य पुतळा अनावरण करताना किंग खान आणि काजोल भावुक झाले. भारतीय सिनेमासाठी अभूतपूर्व सन्मान लेस्टर […] The post DDLJ Turns 30: लंडनमध्ये झळकणार ‘राज–सिमरन’; DDLJ ला ३० वर्ष पूर्ण, पुतळा अनावरणावेळी भावुक झाले शाहरुख–काजोल appeared first on Dainik Prabhat .
सोनम कपूरने फ्लॉन्ट केला बेबी बंप; काळ्या साडीत इव्हेंटला हजेरी लावत वेधलं साऱ्यांचे लक्ष
Sonam Kapoor | बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर दुसऱ्यांदा आई होणार आहे. अलीकडेच सोनमने सोशल मीडियावर बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचा फोटो पोस्ट केला होता. त्यानंतर तिने एका इव्हेंटला हजेरी लावली. आपल्या फॅशनमुळे ओळखली जाणाऱ्या सोनमने पुन्हा एकदा या इव्हेंटमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतले. इव्हेंटमधील सोनमचे काही व्हिडीओ आणि फोटो समोर आले आहेत. ज्याला प्रेक्षकांची मोठी पसंती […] The post सोनम कपूरने फ्लॉन्ट केला बेबी बंप; काळ्या साडीत इव्हेंटला हजेरी लावत वेधलं साऱ्यांचे लक्ष appeared first on Dainik Prabhat .
बारामती : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय शालेय किकबॉक्सिंग क्रीडा स्पर्धांचे आयोजन तालुका क्रीडा संकुल, आमगाव येथे करण्यात आले. दिनांक 4 डिसेंबर ते 5 डिसेंबर या कालावधीत पार पडलेल्या या स्पर्धांना राज्यभरातून अनेक प्रतिभावान खेळाडूंनी मोठ्या उत्साहात सहभाग […] The post Pune District : कौतुकास्पद! ज्ञानसागरच्या सोहेलचा शासकीय राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेत महाराष्ट्रात दुसरा क्रमांक appeared first on Dainik Prabhat .
शिल्पा शिरोडकरचा ‘बिग बॉस १९’ फेम मराठमोळ्या प्रणीत मोरेला पाठिंबा
‘बिग बॉस’ हिंदीची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. हा कार्यक्रम शेवटच्या टप्प्याकडे आला आहे. ‘बिग बॉस’मधून अलीकडेच मालती चहरची एक्झिट झाली. त्यानंतर आता ‘बिग बॉस’च्या घरात प्रणीत मोरे, गौरव खन्ना, अमाल मलिक, फरहाना भट्ट, तान्या मित्तल हे स्पर्धक आहेत.‘बिग बॉस’च्या घरात आता शेवटचे काही दिवस राहिले असून या स्पर्धकांपैकी कोण ‘बिग बॉस’ची ट्रॉफी पटकावणार याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये असल्याचे पाहायला मिळतेय; तर सध्या सोशल मीडियावर प्रेक्षकांसह कलाकार मंडळीही त्यांच्या आवडत्या स्पर्धकाला पाठिंबा देत आहेत.अभिनेत्री शिल्पा शिरोडकर, जिने ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वात सहभाग घेतला होता तिने आता ‘बिग बॉस’बद्दल एक्सवर ट्वीट करत तिच्या आवडत्या स्पर्धकाला पाठिंबा दिला आहे. तिने यावेळी या पोस्टमधून म्हटलं की, “मला माहितीये प्रत्येकाचा कोणीतरी आवडता स्पर्धक आहे. पण, माझ्यासाठी फक्त एकच पर्याय आहे, तो म्हणजे प्रणीत मोरे. मला असं खूप मनापासून वाटतं की तो एकमेव असा स्पर्धक आहे, जो सातत्याने खरा वागला आहे. आपणही त्यांच्याबरोबरच स्वत:ला रिलेट करतो, जे खूप खरे वाटतात आणि तो अगदी तसाच आहे.जर तुम्हालाही माझ्यासारखंच वाटत असेल तर प्लीज त्याला वोट करा. आपण सगळे मिळून वोट करून त्याला जिंकवू या.”
टर्निंग पॉइंट : युवराज अवसरमलविनोद रत्ना हा नव्या पिढीचा लेखक, अभिनेता व दिग्दर्शक आहे. ‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय’ हे त्याचं व्यावसायिक नाटक रंगमंचावर आलेलं आहे. जिगीषा क्रिएशन हे नाटक सादर करीत आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने आयोजित केलेल्या राज्य नाट्य परिषदेच्या स्पर्धेत या नाटकाने सर्व विभागातील पारितोषिके पटकावली.विनोदचे बालपण पुण्यातील भोर तालुक्यात गेले. यवत त्याचे गाव; परंतु त्याचे बालपण भोर तालुक्यात गेले. जिल्हा परिषद शाळेत त्याचे पाचवीपर्यंत शिक्षण झाले, शाळेत वक्तृत्व स्पर्धेत त्याने भाग घेतला होता. त्यात त्याला बक्षीस देखील मिळाले होते. त्यानंतर भोरमधील राजा रघुनाथराव भोरमधून त्याचे बारावीपर्यंत शिक्षण झाले. अकरावीत असताना त्याने काठीन घोंगडं गाण्यावर नृत्य केले होते. गरवारे रात्र कॉलेजमध्ये वर्षातून एकदा गॅदरिंगचा कार्यक्रम होत असतो. त्यामध्ये प्रत्येक वर्षी त्याने नाटकात काम केले. त्याच्या मैत्रिणीचा एक मित्र होता, जो नाटकात कामे करीत होता, त्याच्यासोबत त्याने काम केले. भरत भोईटे या पुण्यातील दिग्दर्शकासोबत बॅकस्टेज काम केले, त्यांच्या 'शहाणे शहाणे दीड शहाणे' नाटकात त्याने अभिनय देखील केला. रंगमंचावर तो गेल्यावर त्याचे कौतुक झाले. हे क्षेत्र त्याला आवडू लागले. त्याने या क्षेत्रामध्ये करिअर करण्याचा निश्चय केला. सुरुवातीला तीन ते चार वर्षे त्याने अनेक ठिकाणी हलक्या दर्जाची कामे केली.एकदा तो नाटक पाहायला गेला, ते नाटक त्याला आवडले नाही. नंतर त्याने ठरवले की आपणच दर्जेदार नाटके प्रेक्षकांना दिली पाहिजेत. नंतर त्याने स्वतः नाटक लिहिले व सागर पवारने दिग्दर्शित केले. ते दोन अंकी नाटक त्याने केले. त्या नाटकाला पारितोषिके मिळाली. बायको भेटेल का हे नाटकाचे नाव होते. नंतर ते नाटक थांबलं. नंतर त्याने पाच एकांकिका केल्या. यशोदा, लगीन, शिट्टी, बॉईज शुद्ध शाकाहारी, चिरंजीव परफेक्ट बिघडलाय. या साऱ्याना भरपूर बक्षिसे मिळाली.'चिरंजीव परफेक्ट बिघडलाय 'या एकांकिकेच्या वेळी परीक्षक म्हणून दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी होते. त्यांना ते खूप आवडले. नंतर त्याचे दोन अंकी नाटकात रूपांतर करण्यात आले. हा एक वेगळा विषय प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. या नाटकामध्ये तीन पात्र आहेत. श्रेयस जोशी, वैभव रंधवे, समृद्धी कुलकर्णी ह्यांनी ती साकारली आहेत. आजच्या नात्यावर भाष्य करणारी गोष्ट आहे. प्रत्येकातल्या घरातील विषय आहे.प्रत्येकाला आपला वाटणारा विषय आहे. लेखन करताना सुरुवातीला खूप मोठा विषय वाटत होता. तो प्रेक्षकांना कसा चांगला वाटेल याचा विचार केला गेला आहे. नवीन विषय आणून रंगभूमी समृद्ध करण्याचा प्रयत्न आहे. हे नाटक प्रेक्षकांना हसवेल तेवढेच रडवेल देखील. चंद्रकांत कुलकर्णींनी प्रायोगिक व व्यावसायिक नाटकातील फरक विनोदला सांगितला. त्याच भरपूर मार्गदर्शन त्याला लाभले. 'शहाणे शहाणे दीड शहाणे' हे नाटक त्याच्या जीवनातले टर्निंग पॉइंट ठरले. आताचे नाटक चिरंजीव परफेक्ट बिघडलाय हे नाटक देखील तो त्याच्या जीवनातील टर्निंगपॉइंट मानतो.'चिरंजीव परफेक्ट बिघडलाय’ या नाटकामुळे त्याची खऱ्या अर्थाने लेखक व दिग्दर्शक म्हणून ओळख प्रेक्षकांपुढे आलेली आहे. सध्याच्या तरुण पिढीचे, वर्तमानकाळातील या नाटकाने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. या नाटकासाठी लेखक व दिग्दर्शक विनोद रत्नाला हार्दिक शुभेच्छा!
इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची विराटला ७ वर्षांनी संधी
मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना ६ डिसेंबर रोजी विशाखापट्टणम येथे खेळला जाणार आहे. मालिका सध्या १-१ अशी बरोबरीत असल्याने दोन्ही संघांसाठी हा सामना ‘करो या मरो’चा आहे. या सामन्यात सर्वांचे लक्ष विराट कोहलीवर असेल. सलग दोन सामन्यांमध्ये शतके झळकावून विराट कोहलीने हे सिद्ध केले आहे की फॉर्ममध्ये असताना जगातील कुठलाही गोलंदाज त्याच्यापुढे फिकाच पडतो. तशातच मालिकेतील शेवटच्या सामन्यात विराटला सात वर्षांपूर्वीचा पराक्रम पुन्हा करण्याची संधी आहे.विराट कोहलीने मालिकेची सुरुवात १३५ धावांच्या शानदार खेळीने केली होती. त्यामुळे भारतीय संघाला विजय मिळाला. दुसऱ्या सामन्यातही त्याने १०२ धावांचे शतक झळकावले, पण संघाला पराभव पत्करावा लागला. सलग दोन शतकांसह तो आता अशा टप्प्यावर आहे, जिथे आणखी एक शतक त्याला क्रिकेट इतिहासात एक खास स्थान मिळवून देईल. त्याच्याकडे एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतकांची हॅटट्रिक करण्याची संधी आहे. विराटने त्याच्या संपूर्ण एकदिवसीय कारकिर्दीत फक्त एकदाच सलग तीन शतके झळकावली आहेत. त्याने २०१८ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध ही कामगिरी केली होती. आता पुन्हा अशीच कामगिरी केल्यास ही त्याची कारकिर्दीतील शतकांची दुसरी हॅटट्रिक ठरेल. आतापर्यंत फक्त पाकिस्तानच्या बाबर आझमनेच दोनदा ही कामगिरी केली आहे. जर विराटने ही कामगिरी केली, तर तो या खास क्लबचा दुसरा खेळाडू ठरेल.विशाखापट्टणममधील खेळीकडे लक्ष : २०१८ मध्ये जेव्हा विराट कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्ध शतकांची हॅटट्रिक केली होती, तेव्हा त्यापैकी एक शतक विशाखापट्टणममध्ये आले होते. विशाखापट्टणममध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात त्याने नाबाद १५७ धावा केल्या होत्या. आता सात वर्षांनंतर विराटला दक्षिण आफ्रिकेविरूद्धचा तिसरा एकदिवसीय सामना याच विशाखापट्टणमच्या मैदानात खेळणार आहे.
आयपीएलमध्ये विदेशी खेळाडूंना मिळणार केवळ १८ कोटीच!
लिलावापूर्वीच बीसीसीआयच्या नियमांचा अनेक खेळाडूंना फटकामुंबई : आयपीएल २०२६ च्या मिनी लिलावाची सध्या तयारी चालू आहे. आगामी आयपीएल लिलाव १६ डिसेंबरला होणार आहे. पुढील लिलावापूर्वी, बीसीसीआयने विदेशी खेळाडूंसाठी एक नवीन नियम लागू केला आहे, ज्यामुळे मिनी-लिलावात विकल्या जाणाऱ्या खेळाडूंना मोठा धक्का बसला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आता मिनी लिलावात मोठी कमाई करणाऱ्या खेळाडूंसाठी एक वेगळा नियम आणला आहे.आयपीएल स्पर्धेत विदेशी खेळाडूंनी अचानक माघार घेऊ नये आणि तसे केल्यास त्यांच्यावर दोन वर्षांची बंदी लागू शकते, असा निर्णय गेल्यावर्षी आणला गेला. खेळाडूंनी स्पर्धेतून अचानक माघार गेल्याचा परिणाम फ्रँचायझींवर झाल्याची तक्रार मालकांनी केली होती. त्यानंतर बीसीसीआयने हे पाऊल उचलले. यानंतर आता विदेशी खेळाडूंसाठी एक नवा नियम समोर आला आहे.काही विदेशी खेळाडू महालिलावात भाग घेणे टाळतात. त्याऐवजी, ते मिनी लिलावात त्यांची नावे सादर करतात. खरे तर, महालिलावामध्ये फ्रँचायझी त्यांचे संघ तयार करण्यासाठी करतात. या छोट्या लिलावात, फ्रँचायझी त्यांच्या संघातील रिक्त जागा भरून काढण्याचा प्रयत्न करतात. यामुळे, ते स्टार विदेशी खेळाडूंवर कोट्यवधी रुपये खर्च करतात. सर्व फ्रँचायझींनी याबद्दल बीसीसीआयकडे तक्रार केली आहे. आता बीसीसीआयने असा नियम केला आहे की विदेशी खेळाडूंना मिनी लिलावात १८ कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळू शकणार नाही. समजा जर खेळाडूंवर २५ ते ३० कोटींची बोली लागली तरी त्यांना फक्त १८ कोटी रुपये पगार मिळेल.
‘लग्नपंचमी’च्या निमित्ताने ग्लॅमरस अमृता खानविलकर प्रथमच रंगभूमीवर
‘चंद्रमुखी’ आता ‘सूर्यजा’च्या भूमिकेत!मराठी रंगभूमीवरची दोन सर्जनशील, संवेदनशील आणि बहुमुखी कलावंत मधुगंधा कुलकर्णी आणि निपुण धर्माधिकारी प्रथमच एकत्र येत ‘लग्नपंचमी’हे नवीन नाटक नवीन वर्षाच्या सुरुवातीला रंगभूमीवर घेऊन येत असल्याने रसिकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. ही उत्सुकता आता आणखी वाढणार आहे, कारण मराठी-हिंदी चित्रपटसृष्टी व टेलिव्हिजन, ओटीटी या क्षेत्रांमधील आघाडीची अभिनेत्री अमृता खानविलकर या नाटकात मध्यवर्ती भूमिकेत सूर्यजाच्या व्यक्तिरेखेत दिसणार आहे. म्हणजेच ‘चंद्रमुखी’ आता ‘सूर्यजा’च्या भूमिकेत दिसणार आहे. या नाटकाच्या माध्यमातून ती नाट्यसृष्टीत पदार्पण करत आहे. ‘लग्नपंचमी’ हा लग्नातील विरोधाभास, भावना, विनोद आणि नात्यांचा बहुरंगी प्रवास अत्यंत मनमोकळ्या पद्धतीने मांडणारा नवीन मराठी प्रयोग नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अमृताच्या चाहत्या वर्गाला या नाटकाची उत्सुकता नक्कीच लागून राहणार आहे.अमृताने हे नाटक करायचे का ठरवले, याबद्दल बोलताना, ती म्हणते, “मी नाटकात काम करीन असे माझ्या कधी मनातही आले नव्हते. शिवाय मला काही चांगली, आकर्षक संधीही आतापर्यंत मिळाली नव्हती. कोणत्याही नाटकासाठी मोठ्या प्रमाणावर तयारी आणि कटिबद्धता लागते. मोठ्या प्रमाणावर सराव लागतो आणि विविध शहरांमधील प्रयोग कित्येक महिने करावे लागतात. मला ते करणे कठीण वाटत होते.”‘लग्नपंचमी’बद्दल बोलताना ती म्हणाली की, नाटकाचा विषय आणि या नाटकाची टीम यांच्यामुळे या नाटकाकडे मी आकर्षित झाले. “एलिझाबेथ एकादशी, वाळवी यांसाख्या चित्रपटांची लेखिका मधुगंधा कुलकर्णी यांनी माझा विचार या नाटकासाठी केला हीच माझ्यासाठी मोठी गोष्ट होती. मला त्यांच्याबरोबर आणि या नाटकाचे दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी यांच्याबरोसबर काम करायचेच होते.” ती म्हणते.
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथील स्मारकाचे ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम नियोजित पद्धतीने सुरळीत पार पडले तर पुढील महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे आपण लोकार्पण करु, असे वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील चैत्यभूमीवर उसळलेल्या भीमसागराला संबोधित करताना त्यांनी हे विधान केले. यावरून देवेंद्र फडणवीस यांना पुढच्या वर्षभरात इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे लोकार्पण करण्याचा मानस असल्याचे दिसते.पुतळा संघर्ष समितीच्या मागणीमुळे नव्या सरकारने म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच नव्याने समन्वय समिती स्थापन केली होती. येत्या पावसाळ्यापर्यंत पुतळ्याचा ढाचा उभारण्याचे नियोजन आहे. यानंतर पुतळ्याच्या उभारणीत अडचणी न उद्भवल्यास पुढच्या महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाचे लोकार्पण होऊ शकणार आहे, असे स्मारक समितीकडून सांगण्यात आले आहे. सध्या स्मारकाचे ५० % काम झाले असून पुतळ्याची उभारणी हे प्रकल्पातील आव्हान आहे. शंभर फुटाचा पायथा आणि साडे तीनशे फूट उंच पुतळा असे एकंदरीत भव्य स्मारक असणार आहे. या स्मारकातील प्रवेशद्वार इमारत, संशोधन केंद्र, वाचनालय, प्रेक्षागृह, वाहनतळाची ५० टक्के स्ट्रक्चरल कामे झाली आहेत.https://prahaar.in/2025/12/06/bharat-ratna-dr-babasaheb-ambedkar-gave-a-constitution-that-bound-the-diversity-of-the-country-together-governor-acharya-devvrat/पुतळ्याबाबतही पॅनेल कास्टिंगचे काम सध्या पूर्ण झाले आहे. शंभर फूट उंचीच्या स्मारक इमारतीच्या विस्तीर्ण चौथऱ्यावर साडे तीनशे फूट उंचीचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा कांस्य धातूचे आवरण असलेला पुतळा उभारला जाणार आहे. पुतळ्याच्या पायथ्याचे काम सुरू असून सहा हजार टन पोलाद लागणार आहे. त्यापैकी १४०० टन पोलाद आले असून, ६५० टनांचे फॅब्रिकेशन पूर्ण झाले आहे. कांस्य धातूच्या आवरणाचे कामही सुरु असून पुतळ्याच्या दोन्ही बुटांच्या पॅनेल कास्टिंगचे काम पूर्ण झाले आहे. त्यावरील शिलाई, लेस हुबेहूब दिसत आहे.
पेड पब्लिसिटीवर भडकली यामी गौतम
दिग्दर्शक आदित्य धरची पत्नी आणि लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमने इंडस्ट्रीमध्ये चालत असलेल्या ‘पेड मार्केटिंग’च्या संस्कृतीवर कडाडून टीका केली आहे. या संदर्भात तिनं थेट सोशल मीडिया पोस्ट शेअर केली आहे. आजकाल चित्रपट चांगला दिसावा म्हणून पैसे देऊन फेक पब्लिसिटी करण्याचा ट्रेंड वाढत चालला असल्याचं तिनं या पोस्टमधून म्हटलं आहे. यामी म्हणते, “अनेक दिवसांपासून मला एक गोष्ट सांगायची होती आणि आज मला वाटतं की ती बोलायलाच हवी. चित्रपटाच्या मार्केटिंगच्या नावाखाली पैसे देऊन ‘हाइप’ निर्माण करण्याचा जो ट्रेंड सुरू झाला आहे, तो खूपच चुकीचा आहे. नाहीतर ‘ते’ सतत नकारात्मक गोष्टी लिहीत राहतात. तेही चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच… आणि जोपर्यंत तुम्ही ‘त्यांना’ पैसे देत नाही, तोपर्यंत तो दबाव तसाच सुरू राहतो, ही सरळसरळ वसुलीच आहे.” पुढे ती म्हणते, “हा ट्रेंड म्हणजे एक राक्षस आहे, जो शेवटी सगळ्यांनाच खाणार आहे. गेल्या पाच वर्षांत ‘सक्सेस’च्या नावाखाली किती गोष्टी लपवल्या गेल्या आहेत, जर त्या उघड झाल्या तर अनेकांसाठी ते अवघड होईल. साऊथमध्ये अशा गोष्टी करण्याची कोणाची हिंमत होत नाही, तिथली इंडस्ट्री अनेक विषयांवर एकत्रपणे उभी राहते. म्हणूनच मी कलाकारांना आवाहन करते की हे थांबवा.
Priyanka Chopra : कल्की २८९८ एडी २ या चित्रपटातून अभिनेत्री दीपिका पदुकोण बाहेर पडल्यानंतर बॅालिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा या चित्रपटाचा भाग असेल अशी चर्चा आहे. मात्र, मीडिया रिपोर्ट्नुसार, निर्मात्यांना प्रियंकाला चित्रपटात साइन करण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे. याबाबत आता एक मोठी माहिती समोर आली आहे. २०२४ मध्ये दीपिका पदुकोण “कल्की २८९८ एडी” चित्रपटात […] The post कल्कीच्या सिक्वलमध्ये देसी गर्लच्या नावाची जोरदार चर्चा! ‘या’ अभिनेत्रींची नावंही आघाडीवर; दीपिकाची जागा कोण घेणार? appeared first on Dainik Prabhat .
प्रभादेवीतील साई सुंदरनगर, कामगारनगरमधील नाल्यांचे बांधकाम होणार
नाल्याच्या रुंदीकरण कामासाठी कंत्राटदाराची नियुक्तीमुंबई : मुंबईतील प्रभादेवी येथील साई सुंदरनगर, कामगारनगर-२ व इतर सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पातील अस्तित्वात असलेल्या पर्जन्य जलवाहिनीचे रुंदीकरण करून त्यांचे बांधकाम केले जाणार आहे. या नाल्याच्या रुंदीकरणाचे काम महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात येत असून महापालिकेने यासाठी विकासक असलेल्या स्कायलार्क बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची निवड केली आहे. या नाल्याचे रुंदीकरण करण्यासाठी तब्बल सुमारे ५० कोटी रुपये खर्च केले जाणार आहे.साई सुंदरनगर सहकारी गृहनिर्माण संस्था या झोपडपट्टी पुनर्विकास योजनेस प्रथमतः १९९८ साली झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणामार्फत मंजुरी देण्यात आली होती. अंतिम भूभाग क्र १०७८ मधील एकूण १७२७४.२२ चौ.मी. एवढ्या क्षेत्रावरील भूभागावर झोपडपट्टी पुनर्वसन योजना मंजूर केली.ड्रेनेज आणि रस्त्याच्या संपूर्ण कामाचा खर्च ७५ टक्के महापालिका आणि २५ टक्के सोसायटी तथा कंत्राटदार या प्रमाणात वाटून घेतला जाईल आणि २५ टक्के महापालिकेने ठरवल्याप्रमाणे महापालिकेला आगाऊ ठेव म्हणून द्यावी असे निश्चित करण्यात आले होते. सन १९९८ साली मुळ मंजूर झोपडपट्टी पुनर्वसन योजनेमध्ये लगतच्या वेगवेगळ्या अनुक्रमे ९ गृहनिर्माण संस्था कालांतराने समाविष्ट करून मुळ झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचे क्षेत्र वेळोवेळी वाढविण्यात आले आहे. अलीकडेच कामगार नगर-२ व माहिम नगर विकास योजना क्र. ४ मधील अंतिम भूभाग क्र. १०७८ वरील शिव सम्राट गृहनिर्माण संस्था या योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे.डॉ. ऍनी बेझंट रस्ता येथील सुमारे ८०० मी. लांबीच्या रस्त्याचे व नाल्याचे काम यात अंतर्भूत होते. राज्य शासनाच्या सन २००५ रोजीच्या अधिसूचनेमध्ये समाविष्ट असलेल्या नाल्याचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. तर नाल्याच्या कामासाठी एकूण खर्चाच्या ८४.२१ कोटीपैकी ६३.५५ कोटी रुपये एवढी रक्कम आजतागायत खर्च करण्यात आली आहे.दरम्यान, कामगार नगर-२ या झोपडपट्टीतील अस्तित्वातील नाला वळवून शिवडी वरळी उन्नत मार्गाच्या खांब क्र. ८४ ते खांब क्र. ८८ यांच्या रेषेत करण्याची विनंती एमएमआरडीएला एसआरएच्या अधिकाऱ्यांनी केली होती. त्यानुसार अस्तित्वातील नाला वळवताना जुन्या नाल्याचे बांधकाम हे शिवडी वरळी उन्नत मार्गाच्या रेषेत करताना खांबाच्या पायाभोवती सुरक्षित अंतर ठेवून करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.नव्याने समाविष्ट कामगार नगर-२ मधील एसआरए प्रकल्पामध्ये सुमारे २००० झोपड्या बाधित असून त्यांना नवीन इमारतीमध्ये त्यांना सामावून घ्यायचे आहे. या झोपडी धारकांनी अस्तित्वात असलेल्या नाल्यावर अतिक्रमण केले आहे. त्यामुळे नाल्याची देखभाल आणि नाल्यातील गाळ काढणे शक्य होत नाही.तसेच नाला धोकादायक स्थितीत असल्याने त्याची दुरुस्ती व पुर्नबांधणी करणे आवश्यक आहे. हा नाला हिंदमाता मार्केट व दादर पुर्वेकडील पावसाळी पाण्याचा विसर्ग होण्यासाठी महत्वाचा आहे. त्यामुळे या नाल्यावरील अतिक्रमण हटवून त्यांचे रुंदीकरण करण्यासाठी महापालिकेने संबंधित कंत्राटदारांचीच निवड करून त्यांच्यामार्फत करण्याचा निर्णय घेतला आहे. या नाल्याच्या रुंदीकरणासाठी सुमारे ४९.३५ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.
चैत्यभूमीवर गर्दी टाळण्यासाठी दादरमधील वाहतुकीत बदल
मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर गर्दी लक्षात घेता वाहतूक पोलिसांनी दादरमधील विविध मार्ग बंद केले आहेत. त्या आनुषंगाने ५ ते ७ डिसेंबर या कालावधीत दादरमधील वीर सावरकर मार्ग, रानडे रोड, एस. के. बोल रोड, ज्ञानेश्वर मंदिर यासह विविध मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. तसेच, वाहनचालक, प्रवाशांची कोंडी होऊ नये, यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करण्यात आले आहेत.महापरिनिर्वाण दिनानिमित्त पालिकेने गर्दी नियंत्रणासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. चैत्यभूमी व आसपासच्या परिसरातील रस्त्यांवरील वाहतुकीत ७ डिसेंबरपर्यंत बदल करण्यात आले आहेत. त्याअंतर्गत स्वातंत्रवीर सावरकर मार्ग सिध्दीविनायक मंदिर जंक्शनपासून हिंदूजा हॉस्पिटलपर्यंत वाहतुकीसाठी बंद राहील. त्याशिवाय रानडे रोड, ज्ञानेश्वर मंदिर, जांभेकर महाराज रोड, केळुस्कर रोड दक्षिण आणि केळुस्कर रोड उत्तर, एम. बी. राऊत मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. वांद्रे -वरळी सागरी उड्डाणपुल मार्गे (सी लिंक) दक्षिण मुंबईकडे प्रस्थान करण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.या रस्त्यांवर ‘नो पार्किंग झोन’स्वातंत्रवीर सावरकर मार्ग, ज्ञानेश्वर मंदिर रोड, जांभेकर महाराज रोड, रानडे रोड, केळूस्कर रोड दक्षिण आणि उत्तर, एम. बी. राऊत रोड, पांडुरंग नाईक मार्ग, एन. सी. केळकर रोड, डॉ. वसंतराव जे. राथ मार्ग हा स्वातंत्रवीर सावरकर मार्ग ते अमेगो हॉटेलपर्यंत, एस. एच. पळरकर मार्ग हा स्वातंत्रवीर सावरकर मार्ग ते मिलरनीयम बिल्डींगपर्यंत, डी. एस. बाबरेकर मार्ग हा सूर्यवंशी हॉल जंक्शन ते व्हिजन क्रेस्ट बिल्डींगपर्यंत, किर्ती कॉलेज लेन मार्ग किर्ती कॉलेज सिग्नल ते मीरामार सोसायटीपर्यंत, काशीनाथ धुरु रोड काशीनाथ धुरू जंक्शन ते आगार बाजार सर्कलपर्यंत, एल. जे. रोड शोभा हॉटेल ते गडकरी जंक्शनपर्यंत, कटारिया मार्ग गंगाविहार जंक्शन, शोभा हॉटेल ते आसावरी जंक्शनपर्यंत, राजगृह परिसराच्या बाजूचा हिंदु कॉलनी रोड क्र. १ ते रोड क्र.५ पर्यंत, लखमशी नप्पु रोड शुभम हॉटेल ते रुईया कॉलेज, दडकर मैदानापर्यंत.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या दूरदृष्टीमुळे भारत जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था -- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदादरच्या चैत्यभूमी येथे ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादनमुंबई: भारत हा विविधतेने नटलेला देश आहे.इतक्या मोठ्या राष्ट्रात एकता, न्याय व समतेची संघटित भावना दृढ करण्यासाठी संविधान निर्माण करणे हे अत्यंत मोठे व ऐतिहासिक कार्य होते. देशाच्या सामाजिक विविधतेत सर्वांना एकत्र आणणारे आणि समान अधिकार प्रदान करणारे संविधान भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राष्ट्राला दिले, असे प्रतिपादन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केले. मुंबईतील दादरच्या चैत्यभूमी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेबांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, माजी मंत्री संजय बनसोडे, आमदार कालिदास कोळंबकर,आमदार चित्रा वाघ, आमदारअमितसाटम, माजी खासदार तथा महाराष्ट्र राज्य त्रिभाषा धोरण समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र जाधव, माजी खासदार राहुल शेवाळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकर, मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी, कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे, समन्वय समितीचे उपाध्यक्ष महेंद्र साळवे आदींसह समाजाच्या सर्वक्षेत्रातील मान्यवर तसेच डॉ. बाबासाहेबांचे अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.राज्यपाल आचार्य देवव्रत म्हणाले, कोणत्याही राष्ट्रात युगपुरुष जन्माला येतात तेव्हा सामाजिक न्यायाची चळवळ बळकट होते. असे युगपुरुष व्यक्तिमत्त्व जगातून गेले तरी त्यांचे विचार व कार्य जनतेच्या अंत:करणात सदैव जिवंत राहतात, त्यातूनच बाबासाहेब अमर आहेत. कठोर परिस्थितीतून शिकून त्यांनी संपूर्ण समाजाचा भविष्यकाळ बदलण्यासाठी शिक्षणाला सर्वात मोठे शस्त्र मानले. एक सुशिक्षित व्यक्ती संपूर्ण घराचे, समाजाचे आणि देशाचे भविष्य बदलू शकतो हा संदेश त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून दिला.भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या दूरदृष्टीमुळे भारत जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्राच्या प्रगतीचा पाया घातल्याचे नमूद करून बाबासाहेबांच्या दूरदृष्टीमुळे आज भारत जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था ठरला असून लवकरच तिसऱ्या क्रमांकावर झेप घेणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, ऊर्जा सुरक्षेच्या क्षेत्रात डॉ. आंबेडकरांचे योगदान अधोरेखित करताना त्यांनी सांगितले की, राष्ट्रीय विद्युत ग्रीडची संकल्पना भारताने बाबासाहेबांमुळे वेळेत स्वीकारली. त्यातून देश ऊर्जा क्षेत्रात स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करत आहे. भारतीय लोकशाहीची भक्कम पायाभरणी आणि सामान्य जनतेच्या हक्कांचे रक्षण हे बाबासाहेबांच्या संविधानामुळेच शक्य झाले.समाजात विषमता दूर करून समता, बंधुता आणि सर्वांना समान संधी देणारे संविधान देशाला दिले. ज्ञानाच्या बळावर त्यांनी समाजात समतेची जाणीव दृढ केली जगातील सर्वोत्तम संविधान भारताकडे असून प्रत्येक प्रश्नाचे उत्तर याच संविधानात मिळते, असे त्यांनी नमूद केले.आगामी काळात चैत्यभूमी परिसरातील स्मारक विकासाची कामे पूर्ण करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.महामानव बाबासाहेबांचे विचार राष्ट्राला मार्गदर्शक- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाची निर्मिती करून देशाच्या लोकशाहीला दृढ पाया दिला. त्यांनी उभारलेला संघर्ष हा मानवमुक्तीचा, समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुता प्रस्थापित करण्याचा होता, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा ही बाबासाहेबांनी जगाला दिलेली त्रिसूत्री आजही समाज परिवर्तनासाठी मार्गदर्शक असल्याचे त्यांनी नमूद केले. न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या चार मूल्यांवर आधारित संविधान तयार करून तळागाळातील वंचित व दुर्बल घटकांना सशक्त करण्याचे ऐतिहासिक कार्य डॉ. आंबेडकरांनी केले, असेही उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.सर्वप्रथम भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून डॉ. बाबासाहेबांना अभिवादन केले. यावेळी राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते सर्व भिक्खूंना चिवरदान देण्यात आले. त्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने आयोजित छायाचित्र प्रदर्शनास मान्यवरांनी भेट दिली. यावेळी चैत्यभूमीवर हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र राज्य त्रिभाषा धोरण समितीचे अध्यक्ष डॉ नरेंद्र जाधव यांनी सर्व मान्यवरांना संविधानाची प्रत दिली.
गोरेगाव-सांताक्रूझ दरम्यान आज रात्रकालीन ब्लॉक
मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक नाहीमुंबई : पश्चिम रेल्वेवर ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीचे काम करण्यासाठी शनिवारी ते रविवारी सकाळी ००.३० ते दुपारी ४.३० पर्यंत गोरेगाव आणि सांताक्रूझ स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गांवर चार तासांचा जंबो ब्लॉक घेण्यात येणार आहे. गोरेगाव आणि सांताक्रूझ स्थानकांदरम्यान सर्व जलद मार्गावरील गाड्या धीम्या मार्गावर धावतील. रविवारी पश्चिम रेल्वे उपनगरीय विभागात दिवसा ब्लॉक राहणार नाही.महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने रविवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस–कल्याण मुख्य मार्ग तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस– पनवेल हार्बर मार्गासह ट्रान्स-हार्बर व पोर्ट मार्गावर मध्य रेल्वेचा साप्ताहिक मेगा ब्लॉक घेण्यात येणार नाही. सर्व मार्गांवरील नियमित उपनगरी सेवा रविवारी लागू असलेल्या वेळापत्रकानुसारच चालू राहतील.
कलासक्त कलाकारांच्या ऊन-पावसाची कथा ...
राजरंग : राज चिंचणकरनाट्यसृष्टीत प्रायोगिक व व्यावसायिक असे दोन प्रवाह असल्याचे साधारणतः मानले जाते. पण त्याही पलीकडे अजून एक रंगभूमी या क्षेत्रात अस्तित्त्वात आहे मात्र तिचा प्रचार आणि प्रसार फार झालेला नाही. ही रंगभूमी म्हणजे 'दिव्यांग रंगभूमी'. काही नाट्यवेडी मंडळी सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून या रंगभूमीसाठी काम करत आहेत. दिव्यांग कलाकारांना घेऊन काही वेगळे प्रयोग करण्याचे प्रयत्नही यातून होत असतात. कलाक्षेत्रात कार्यरत असलेला नेपथ्यकार डॉ. सुमित पाटील हा अशाच दिव्यांग कलाकारांना घेऊन नाटक करण्यासाठी कायम प्रयत्नशील असतो. आता 'ऊन पाऊस' हे नाटक घेऊन तो रंगभूमीवर आला आहे. जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग अमर हिंद मंडळातर्फे आयोजित करण्यात आला. या नाटकाचे लेखन सारिका येवले-ढेरंगे हिने केले असून, दिग्दर्शन व नेपथ्याची जबाबदारी डॉ. सुमित पाटील याने सांभाळली आहे. हे नाटक विजू माने रंगभूमीवर सादर करत आहेत. शीतल तळपदे यांची प्रकाशयोजना आणि अपर्णा गुराम यांची वेशभूषा या नाटकाला लाभली आहे. योगिता तांबे व कविकिरण पाटील हे कलाकार या नाटकात भूमिका रंगवत आहेत. या नाटकाच्या निमित्ताने कलासक्त कलाकारांच्या ऊन-पावसाची कथा रंगभूमीवर साकार झाली आहे.दिव्यांग कलाकारांच्या आयुष्याचे प्रतिबिंब म्हणावे, अशा पद्धतीने हे नाटक लिहिले गेले आहे. त्या दृष्टीने 'ऊन पाऊस' या नाटकाची लेखिका सारिका येवले-ढेरंगे तिच्या या लेखनाविषयी बोलताना म्हणते, हे नाटक लिहिताना, दोनच कलाकार माझ्याकडे आहेत, असे सुमित पाटील मला म्हणाला होता आणि त्यांच्यावर आपण काही लिहू शकतो का, असे त्याने विचारले होते. त्यामुळे दिव्यांग कलाकार डोळ्यांसमोर होतेच. मग त्यानंतर आस्तिक-नास्तिक या विषयावर आमची चर्चा झाली. वास्तविक हे सर्व करताना खूप मर्यादा होत्या. दोन पात्रे, दिव्यांग कलाकार आणि त्यातही आस्तिक-नास्तिक हा विषय; यामुळे हे एक आव्हान होते. हे लेखन ठरवूनच केलेले आहे. दोन पात्रांना घेऊन काय करता येईल, हा विचार यामागे होता. वास्तवात म्हटले तर तो माझाच प्रवास आहे. नास्तिकतेपासून आस्तिकतेकडे झालेला आणि मला असे वाटले की तो सर्वांपर्यंत पोहोचायला हवा. हे नाटक सुद्धा नास्तिकतेकडून आस्तिकतेकडे जाणारा प्रवास करते. महत्त्वाचे म्हणजे आयुष्य जगताना आपला दृष्टिकोन कसा असायला हवा, हे सर्वकाही हे नाटक सांगते. आपला आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बरोबर आहे का, हे तपासून पाहण्यासाठी सर्वांनी हे नाटक पाहावे, असे मला वाटते.'ऊन पाऊस' हे नाटक रंगभूमीवर आणताना या टीमला अनेक आव्हाने पेलावी लागली असणार यात शंका नाही. या नाटकाचा दिग्दर्शक डॉ. सुमित पाटील याच्याशी या नाटकाबद्दल 'राजरंग' कॉलमसाठी चर्चा करत असताना त्याने एकूणच दिव्यांग रंगभूमी, दिव्यांग कलाकार आणि त्या संदर्भाने येणाऱ्या काही महत्त्वाच्या मुद्द्यांना स्पर्श केला. त्याच्याशी साधलेला हा विशेष संवाद...'ऊन पाऊस' हे एक वेगळ्या धाटणीचे नाटक घेऊन तू रंगभूमीवर आला आहेस. हे नाटक करावे असे का वाटले?जे दिव्यांगांच्या आयुष्यात खूप वेगवेगळे प्रश्न असतात. आपल्यासमोर फक्त त्यांचे प्रश्न येतात; त्यांची उत्तरे कधीच येत नाहीत. पण मला असे वाटते की याची उत्तरे त्यांच्याकडेच असतात आणि ते जर पॉझिटिव्हिटली वागले तर त्यांचा स्वतःच्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलेल. यातून त्यांच्यापुढे जे प्रश्न आहेत, ते सुटत जातील. समजा जर ते प्रश्न त्या-त्या वेळेला सुटले तर नक्कीच त्यांना त्यातून पुढे जाता येईल आणि त्यांना पुढे काहीतरी गाठता येईल; असे जेव्हा मी या नाटकातल्या दोघांबरोबर काम करायचे ठरवले तेव्हा वाटले. या नाटकात योगिता तांबे आणि कविकिरण पाटील हे कलाकार काम करत आहेत. योगिता पूर्णतः दृष्टीहीन आहे आणि कविकिरण पाटील हा पूर्णतः पाय नसलेला कलाकार आहे. मला असे वाटते की या दोघांमध्ये ज्या उणीवा आहेत; त्या त्यांनी नाटकात त्याकडे बघण्याच्या दृष्टिकोनातून बदलून टाकलेल्या आहेत.या नाटकाची निर्मिती प्रक्रिया कशा पद्धतीची होती?हे नाटक लिहिण्याची सारिका येवले-ढेरंगे हिच्यासोबत जेव्हा प्रक्रिया सुरू झाली होती; तेव्हा मी आणि सारिका वेगवेगळ्या सार्वजनिक गणपतींच्या मंडपांत भेटत होतो. कारण तेव्हा मी गणपती मंडपांत सेट लावत होतो. मुळातच मी अशाप्रकारचे सेट लावत असताना आणि सामाजिक विषयांवर बोलत असताना, सारिका तिथे येत होती. सेट लावताना ती बघत होती आणि त्यातून आम्ही आस्तिक-नास्तिक हा विषय घेतला. यातून सकारात्मकता आणि नकारात्मकता कशी असते, हे दाखवण्याचा प्रयत्न करत गेलो. हे सर्व जेव्हा सुरू होते; तेव्हा मला असे वाटत होते की आमचे दोघे कलाकार वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत. योगिता विविध प्रकारची वाद्ये वाजवते आणि कविकिरण लेखक व गीतकार आहे. त्यामुळे या दोघांच्या अॅबिलिटीना घेऊन या नाटकाची गुंफण सुरू झाली. मला असे वाटते की त्यांच्या वाट्याला येणाऱ्या गोष्टी जगासमोर आणण्यासाठी कला हेच एक माध्यम आहे; ज्यातून ते लोकांसमोर व्यक्त होऊ शकतात, लोकांसमोर येऊ शकतात.दिव्यांग रंगभूमीचे सध्याचे स्थान काय?गेल्या अनेक वर्षांपासून दिव्यांग रंगभूमी पूर्णपणे बंद झालेली आहे. ही रंगभूमी पुन्हा सुरू व्हावी, यासाठी गेली अनेक वर्षे मी प्रयत्न करत आहे. यासाठी मी सतत नवीन नाटक करण्याचा प्रयत्न करत असतो. यंदाचे आमचे नाटक आहे 'ऊन पाऊस'.या नाटकाचे कथासूत्र काय आहे?आपल्या आयुष्यातही ऊन आणि पाऊस असतो. खूप पाऊस आला तरी आपल्याला उन्हाची गरज भासते आणि खूप ऊन आले तरीपण पावसाची गरज भासते. या दोन्ही गोष्टी एकमेकांसाठी जशा पूरक आहेत; तशाच त्या आयुष्यासाठीही पूरक आहेत, हे दाखवून देणारे वेगळ्या पद्धतीचे हे नाटक आहे. दिव्यांग रंगभूमीसाठी काहीतरी योगदान असण्याच्या भावनेतून हे नाटक आम्ही केले आहे.दिव्यांग रंगभूमीसाठी नाटक करताना कोणता विचार करावा लागतो?आपल्याकडे जी काही थिएटर्स आहेत, त्यात दिव्यांगांसाठी एक्सेसिबिलिटी नाही. एक्सेसिबिलिटी हा सगळीकडे असणारा प्रॉब्लेम आहे; म्हणजे आम्ही कुठल्याही थिएटरला गेलो; तर तिथे कुठेच रॅम्प नसतात. त्यामुळे आमची व्हीलचेअर सेटवर नेणे म्हणजे ती उचलूनच न्यावी लागते. पण याविषयी आम्ही जागृती करायला सुरुवात केली आहे. त्याचबरोबर फोल्डेबल रॅम्प सुद्धा आम्ही बनवायला सुरुवात केली आहे. ज्या थिएटर्समध्ये आम्ही जातो; तिथे आम्ही एखादा रॅम्प घेऊन जातो आणि नंतर तो तिथेच सोडून देतो.कारण आमच्या नंतरही तिथे कोणी दिव्यांग कलाकार आले, तर त्याचा त्यांना उपयोग व्हावा. त्यामुळे अशी ऍक्सेसिबिलिटी पसरवणे हे सुद्धा आमचे उद्दिष्ट आहे. हे महत्त्वाचे काम आहे आणि नाटकाच्या माध्यमातून ते होत राहणार आहे.या कलाकारांसोबत काम करताना कोणती आव्हाने असतात? असे नाटक बसवताना आव्हाने असतातच. कलाकाराने किती पावले पुढे जायचे आहे, किती पावले मागे यायचे आहे किंवा बाजूला सरकायचे आहे तसेच सेट कसा आहे याबद्दलची माहिती कलाकारांना द्यावी लागते. त्यांना सेटवर प्रत्यक्ष बसवून आम्हाला ते सर्व शिकवावे लागते. जे दृष्टिहीन कलाकार असतात, त्यांना आम्हाला सर्वकाही काठीच्या जोरावर शिकवावे लागते किंवा काही ठिकाणी आम्ही धाग्यांचा वापर करतो. त्याप्रमाणे कलाकारांना सेटचा अंदाज येतो. त्यामुळे मला असे वाटते की, ही एक शिकवण्याची प्रोसेस आहे, तसेच ती अॅक्सेसिबिलिटीची सुद्धा प्रोसेस आहे आणि हे आम्ही सगळेजण मिळून करत असतो. त्यातूनच हे सर्वकाही घडत जाते.
पुण्यात ‘पुनीत बालन क्रिकेट अकॅडमी’ची घोषणा; क्रिकेटपटूंसाठी सुवर्णसंधी
पुणे – युवा उद्योजक पुनीत बालन यांनी ‘पुनीत बालन क्रिकेट अकॅडमी’ची पुण्यात घोषणा केली असून उदयोन्मुख क्रिकेटपटूंसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध केली आहे. ही अकॅडमी म्हणजे बीसीसीआय स्तरावरील देशातील सर्वात मोठा खासगी क्रिकेट सेटअप ठरणार आहे. जागतिक दर्जाच्या प्रशिक्षणाची ही व्यवस्था तरुण खेळाडूंना व्यावसायिक क्रिकेटकडे नेणारा भक्कम मार्ग ठरेल, असा विश्वास अकॅडमीचे मालक पुनीत बालन यांनी […] The post पुण्यात ‘पुनीत बालन क्रिकेट अकॅडमी’ची घोषणा; क्रिकेटपटूंसाठी सुवर्णसंधी appeared first on Dainik Prabhat .
काँग्रेसमधील अंतर्गत वाद पुन्हा समोर; शशी थरूर यांच्यावर पवन खेरांकडून टीका, म्हणाले “हा खेळ…”
Shashi Tharoor | रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर होते. यादरम्यान शुक्रवारी ५ डिसेंबर रोजी राष्ट्रपती भवनात रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या स्वागतार्थ डिनरचे आयोजन करण्यात आले होते. या डिनरला विरोधी पक्षातून काँग्रेस नेते शशी थरूर यांनाच निमंत्रण देण्यात आले होते आणि ते निमंत्रण त्यांनी स्वीकारलं. पण त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे […] The post काँग्रेसमधील अंतर्गत वाद पुन्हा समोर; शशी थरूर यांच्यावर पवन खेरांकडून टीका, म्हणाले “हा खेळ…” appeared first on Dainik Prabhat .
Dr Babasaheb Ambedkar: ६ डिसेंबर म्हणजे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, समाज सुधारक आणि जगभरातील वंचितांसाठी आशा निर्माण करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथीचा दिवस. हा दिवस महापरिनिर्वाण दिन म्हणून संपूर्ण देशात, विशेषतः महाराष्ट्रात, अत्यंत भावपूर्ण वातावरणात पाळला जातो. महापरिनिर्वाण दिनाचा ऐतिहासिक संदर्भ 6 डिसेंबर 1956 रोजी बाबासाहेबांचे दिल्ली येथे महापरिनिर्वाण झाले. त्यानंतर 7 डिसेंबरला मुंबईतील चैत्यभूमी […] The post Dr Babasaheb Ambedkar: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांप्रती कृतज्ञतेचा दिवस! सोशल मीडियावर खास संदेश लिहून करा अभिवादन… appeared first on Dainik Prabhat .
शैक्षणिक सहली, लग्नसमारंभांसाठी 'लालपरी'सुसाट
खासगी वाहनांपेक्षा एसटीतून होणार पारदर्शक आणि सुरक्षित प्रवासस्वप्नील पाटील पेण : नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या दरम्यान अनेक शैक्षणिक सहली आणि त्यातच लग्नसमारंभाचा सीजन असल्याने या दोन महिन्यात एसटीच्या प्रासंगिक कराराच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात बुकिंग होत असते. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील रायगड विभागाची एसटी प्रासंगिक कराराच्या माध्यमातून सुसाट धावत असून नोव्हेंबर महिन्यात एसटीच्या रायगड विभागाच्या ९४ बसेस बुक झाल्या. या बुकिंगच्या माध्यमातून एसटीने महिनाभरात ३६५७७ किमीचा प्रवास करून प्रवाशांची तसेच विद्यार्थी आणि समारंभातील कुटुंबीयांची सेवा केली आहे. त्यामुळे खासगी वाहनांपेक्षा एसटीच्या माध्यमातून आपला प्रासंगिक करार करून पारदर्शक आणि सुरक्षित प्रवास यापुढे देखील प्रवाशांनी करावा असे आवाहन रायगड विभाग नियंत्रक डॉ. सुहास चौरे यांनी प्रवाशांना केले आहे. महाराष्ट्राला लाभलेली धार्मिक संस्कृती, गडकिल्ले आणि कोकण किनारपट्टीवर असणारी असंख्य पर्यटन स्थळे यामुळे अनेक शैक्षणिक सहली अशा ठिकाणी प्रामुख्याने जात असतात. त्यातच याच दरम्यान सुरू असणारे लग्न समारंभ आणि इतर कार्यक्रमांसाठी लांबचा आणि असंख्य प्रवाशांचा प्रवास असेल तर एकावेळी अनेक गाड्या नेण्यापेक्षा अनेक कुटुंब एसटी सोबत प्रासंगिक करार करून आपला सुखाचा प्रवास करत असतात. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील या प्रासंगिक कराराच्या माध्यमातून रायगडाची एसटी सुसाट धावताना दिसत आहे. नोव्हेंबर महिन्यात रायगड जिल्ह्यातील आठ आगारांच्या माध्यमातून एसटीच्या ९४ गाड्या बुक झाल्या असून सवलतीच्या ५४, तर विनासवलतीच्या ४० बसेस बुक झाल्या आहेत. तर या ९४ बसेसने सवलतीच्या माध्यमातून २५२८९ किलोमीटर आणि विनासवलतीच्या माध्यमातून ११,२८८ असा एकूण ३६,५७७ किमीचा प्रवास केला असल्याने रायगड विभागाच्या एसटीला प्रासंगिक कराराच्या माध्यमातून असणारी पसंती सहजपणे लक्षात येते. ...असा आहे एसटीचा प्रासंगिक करार फायदेशीर परवडणारा खर्च, प्रतिव्यक्ती खर्च कमी, इंधन, चालक, मानधन, टोल, पार्किंग यांचा स्वतंत्र खर्च नाही . अनुभवी चालक, नियमित वाहन तपासणी, सरकारी नियमांचे पालन, सुरक्षित आणि विश्वसनीय प्रवास कायदेशीर आणि विश्वास, सरकारी संस्था असल्याने फसवणूक नाही, परवानगी, विमा, फिटनेस सर्व कायदेशीर व अद्ययावत . सर्वांना एकत्र नेण्याची सोय, एसटी वर्क शॉप आणि डेपो सर्वत्र असल्याने तांत्रिक बिघाड झाल्याने सेवा. जलद मिळते, खासगी वाहन बिघडल्यास पर्यायी वाहन मिळणे कठीण. प्रवाशांसाठी विमा संरक्षण उपलब्ध, अपघात, अडचणी, जबाबदारी ठरलेली असते. अधिकृत दरसूची, पावती व करारपत्र, ऑनलाइन तसेच डेपोवार सोपा करार.खासगी वाहनांपेक्षा सरकारी संस्था असणाऱ्या आणि गरिबांच्या खिशाला परवडणाऱ्या एसटीचा प्रवास हा प्रवाशांच्या दृष्टिकोनातून नेहमीच फायदेशीर ठरला आहे. एखादी सहल किंवा लग्नसमारंभारखा एखादा कौटुंबिक कार्यक्रम असेल तर त्यासाठी देखील एसटीचा अधिकृत आणि पारदर्शक करार करून एसटीचाच प्रवास करा आणि आपला सुखकर तसेच आर्थिक बचत करून प्रवास करा. - डॉ. सुहास चौरे ( विभाग नियंत्रक - रायगड )
Prashant Jagtap : नुकत्याच झालेल्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये महायुती स्वबळावर लढली. मात्र, या निवडणुकांत महाविकास आघाडीचे अस्तित्व उरले आहे का नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. स्थानिक निवडणुकीत विचित्र प्रकाराच्या आघाड्या आणि युत्या झाल्या. पण चर्चा ही सर्वात जास्त महायुतीमधील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची झाली. या निवडणुकीनंतर आता सर्वांना महापालिका निवडणुकांचे वेध […] The post दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? शरद पवारांनी शशिकांत शिंदेंना फोन फिरवला अन्…; प्रशांत जगताप यांनी चित्रचं स्पष्ट केलं appeared first on Dainik Prabhat .
Pune : धानोरीत रविवारी मॅरेथॉन स्पर्धा; पर्यावरण संवर्धनाचा दिला जाणार संदेश
पुणे : धानोरी परिसरात पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी रविवारी सकाळी मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे मुख्य संयोजक माजी नगरसेवक अनिल उर्फ बॉबी टिंगरे असून माता जिजाऊ प्रतिष्ठानच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या स्पर्धेला केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, आयुक्त नवल किशोर राम तसेच वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. मॅरेथॉनसाठी आतापर्यंत […] The post Pune : धानोरीत रविवारी मॅरेथॉन स्पर्धा; पर्यावरण संवर्धनाचा दिला जाणार संदेश appeared first on Dainik Prabhat .
अभिनेत्री सारा खानने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ
Sara Khan | अभिनेत्री सारा खान ५ डिसेंबर रोजी दुसऱ्यांदा विवाह बंधनात अडकली आहे. तिने ४ वर्षांनी लहान असलेल्या क्रिश पाठकसोबत विवाह केला आहे. या लग्नात राजीव ठाकूर, नगमा आणि आवेज दरबार, सृष्टी रोडे, फलक नाज, किंशुक महाजन, जैद दरबार आणि गौहर खान या सेलिब्रिटींनी हजेरी लावली. मात्र ‘रामायण’ फेम क्रिशचे वडील सुनील लहरी लग्नाला […] The post अभिनेत्री सारा खानने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ appeared first on Dainik Prabhat .
Pune News : पुणे-मुंबई रेल्वे मार्गावर उद्या (७ डिसेंबर २०२५) मेगाब्लॉग असल्याने विविध एक्सप्रेस गाड्या तसेच पुणे-लोणावळा लोकलच्या काही फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वेच्या पुणे विभागाने लोणावळा-कल्याण विभागात आर अँड डी अप आणि डाउन लाईन्स विस्तारणासाठी आणि अप यार्डमध्ये एक अतिरिक्त लाईन घेण्यासाठी ६ आणि ७ डिसेंबर रोजी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक जाहीर […] The post पुणे-मुंबई दरम्यान उद्या मेगाब्लॉक! विविध एक्सप्रेस रद्द; पुणे लोणावळा लोकलच्या काही फेऱ्या बंद राहणार जाणून घ्या… appeared first on Dainik Prabhat .
'कैरी'सिनेमातून सिद्धार्थ जाधव आणि सायली संजीवची निखळ मैत्री १२ डिसेंबरला येणार स्क्रीनवर
सिद्धार्थ जाधव आणि सायली संजीवची ‘कैरी’मधील मनाला भिडणारी दोस्ती, दोघांचा इमोशनल बॉण्ड ठरणार लक्षवेधीमैत्री करणं आणि ती निभावणं हे फार कमी लोकांच्या आयुष्यात असतं. पण असे बरेच मित्र असतात जे त्यांच्या मैत्रीला जगतात आणि मदतीला हात पुढे करतात. बरेचदा हीच मैत्री आपल्या मित्र-मैत्रिणीच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरते. अशीच मैत्री आता सिद्धार्थ जाधव आणि सायली संजीव यांच्या आगामी 'कैरी' चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. सिद्धार्थ नेहमीच त्याच्या कलाकार मित्रांबरोबर धमाल करताना दिसतो. आता सिद्धार्थचा हाच मैत्री जपणारा स्वभाव 'कैरी' चित्रपटातून मोठ्या स्क्रीनवरही पाहायला मिळणार आहे.सिद्धार्थ जाधव आणि सायली संजीव यांच्यातील स्पेशल बॉण्डिंगची झलक 'कैरी' सिनेमाच्या ट्रेलर, गाण्यातून पाहायला मिळालीच आहे. आपल्या विनोदी स्वभावाने नेहमीच साऱ्यांना खळखळवून हसवणारा सिद्धार्थ या चित्रपटात सायलीला आनंद देताना दिसतोय. इतकंच नाहीतर दोघांचा इमोशनल बॉण्डही पाहायला मिळाला. मित्र म्हणून तो सायलीच्या पाठीशी तिच्या सुख-दुःखात खंबीरपणे उभा असलेला दिसला. या ट्रेलरनंतर सिद्धार्थ खऱ्या आयुष्यात जसा आहे तसाच सिनेमात वावरताना दिसत असल्याची चर्चा रंगली आहे.https://prahaar.in/2025/12/06/on-the-occasion-of-the-diamond-jubilee-year-of-the-constitution-the-cultural-affairs-department-pays-tribute/चित्रपटात आता सायली-सिद्धार्थची मैत्री कशी रंगत आणणार हे पाहणं रंजक ठरणार आहे. कैरी सिनेमात सायली-शशांकची लव्हेबल केमिस्ट्री जितकी भावतेय त्याहून दुप्पट सायली-सिद्धार्थची मैत्री पसंतीस पडत आहे. सिद्धार्थसह काम करण्याबाबत बोलताना सायली म्हणाली, मला एकूणच या चित्रपटात काम करताना धमाल आली. पण सिद्धार्थने ही धमाल अधिक रंगतदार केली. सिद्धार्थ खूप जॉली आहे हे सर्वांनाच माहित आहे, आणि सिनेमातही तो अगदी शेवटपर्यंत तसाच होता. आम्ही दोघांनी खरंच खूप एन्जॉय केलं.
मुलुंड कचराभूमीतील कचरा विल्हेवाट प्रकल्पाला फेब्रुवारी २०२६ची मुदत
कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे ६८ टक्के काम पूर्णमुंबई : मुलुंड कचराभूमीतील कचऱ्याच्या डोंगरांची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावून जमीन पुनर्प्राप्त करण्यासाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली. जून २०२५ ची मुदत हुकली असून आता कंत्राटदाराला फेब्रुवारी २०२६ ची मुदत देण्यात आली आहे. कचराभूमीतील कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे ६८ टक्के काम झाले आहे. पालिकेच्या क्षेपणभूमीची क्षमता संपत आल्यामुळे या क्षेपणभूमी शास्त्रोक्त पद्धतीने बंद करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे पालिकेने मुलुंड कचराभूमी बंद करण्याचे ठरवले आहे. मात्र प्रकल्पाचे काम धीम्यागतीने सुरू आहे. या कचराभूमीवर गेल्या अनेक वर्षांपासून साठलेल्या कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावून जमीन पुनर्प्राप्त करण्यासाठी पालिकेने जून २०१८ मध्ये कंत्राटदार नेमून कार्यादेशही दिला होता.कार्यादेश दिल्यानंतरही बराच काळ या कचराभूमीवर कचरा स्वीकारला जात होता. विविध परवानग्यांमुळे प्रत्यक्ष प्रकल्प सुरू होण्यास विलंब झाला होता. त्यातच करोना व टाळेबंदीमुळे मनुष्यबळ नसल्यामुळे या प्रकल्पाच्या कामाला उशीर झाला होता. त्यामुळे तीन वर्षांत या कामाने वेग घेतला नव्हता. टाळेबंदीनंतर प्रकल्पाच्या कामाला वेग आला. मात्र टाळेबंदी व तौक्ते वादळामुळे प्रकल्पाचे काम रखडले. त्यामुळे सहा वर्षांच्या या प्रकल्पाला एक वर्षांची मुदत वाढवून देण्यात आली होती. जून २०२५ मध्ये या कामाची वाढीव मुदत संपली असली तरी अद्याप प्रकल्पाचे केवळ ६८ टक्के काम झाले असून ३२ टक्के काम बाकी आहे. त्यामुळे या प्रकल्पाला आता फेब्रुवारी २०२६ ची मुदत देण्यात आली आहे.या कचराभूमीवर एकूण ७० लाख टन कचरा आहे. त्यापैकी आतापर्यंत ४८ लाख मेट्रीक टन कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आली आहे. तर अद्याप २१ लाख मेट्रीक टन कचरा शिल्लक आहे. सध्या दर दिवशी साडेआठ ते नऊ हजार मेट्रीक टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जात आहे.२४ हेक्टर जागा खुली होणारप्रक्रिया केलेला कचरा टाकून झाल्यानंतर शहराला २४ हेक्टर खुली जागा प्राप्त होईल. या जागेचा वापर कशासाठी करावा याबाबत विविध राजकीय पक्षांनी विविध मागण्या केल्या आहेत. या जागेवर गोल्फ कोर्स बनविण्याची मागणी आमदार मिहीर कोटेचा यांनी केली होती.डिसेंबर २०१८ पासून कचरा टाकणे बंदमुंबई महानगरपालिकेने डिसेंबर २०१८ मध्ये मुलुंड कचराभूमी बंद करण्यासाठीdisposalकंत्राटदार म्हणून नियुक्त केले आहे. या प्रकल्पाचा खर्च सहा वर्षांच्या कालावधीसाठी ७३१ कोटी रुपये आहे. डिसेंबर २०१८ पासून या ठिकाणी कचरा टाकणे बंद केले आहे. मुलुंड कचराभूमी १९६७ पासून २०१८ पर्यंत सुरू होती.

27 C