SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

31    C
... ...View News by News Source

पंतप्रधान मोदींचा अयोध्येत रोड शो…भगवान राम-माता सीतेची पूजा ; थोड्याच वेळात भगवा ध्वज फडकवणार

Ram Mandir Dhwajarohan। पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी श्री राम जन्मभूमी मंदिराच्या बांधकाम पूर्णत्वाच्या निमित्ताने त्याच्या शिखरावर धर्मध्वज फडकवतील. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत पोहोचले आहेत. अयोध्येत एक भव्य रोड शो आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये मोठ्या संख्येने लोक त्यांचे स्वागत करत होते. मंदिरे महर्षी वशिष्ठ, महर्षी विश्वामित्र, महर्षी अगस्त्य, महर्षी वाल्मिकी, देवी अहल्या, निषादराज गुहा […] The post पंतप्रधान मोदींचा अयोध्येत रोड शो…भगवान राम-माता सीतेची पूजा ; थोड्याच वेळात भगवा ध्वज फडकवणार appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 25 Nov 2025 11:25 am

“त्या महिलेला सुद्धा गुन्ह्यात आरोपी करणे महत्वाचे”; अनंत गर्जे प्रकरणात रुपाली पाटलांनी स्पष्ट केली भूमिका

Rupali Patil Thombare | भाजपच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नी डॅा. गौरी पालवे गर्जे यांच्या आत्महत्या प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडवून दिली आहे. या मृत्यू प्रकरणात गर्जे कुटुंबावर गौरी यांच्या कुटुंबीयांकडून अनेक गंभीर आरोप करण्यात आले. त्यानंतर अनंत गर्जे पोलिसांना शरण आला आणि त्याला अटक केली. त्यानंतर गर्जेचे मूळ गाव […] The post “त्या महिलेला सुद्धा गुन्ह्यात आरोपी करणे महत्वाचे”; अनंत गर्जे प्रकरणात रुपाली पाटलांनी स्पष्ट केली भूमिका appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 25 Nov 2025 11:23 am

Ram Mandir Flag Hoisting Ceremony : १९१ फूट उंची आणि २२ फूट लांबीचा विक्रमी ध्वज, आज अयोध्येत पंतप्रधान मोदींच्या हस्ते ध्वजारोहण

अयोध्या : तब्बल ५०० वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अयोध्येत साकारलेल्या भव्य श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या इतिहासातील एक अत्यंत ऐतिहासिक क्षण आज (२५ नोव्हेंबर २०२५) अनुभवण्यास मिळणार आहे. कोट्यवधी रामभक्तांची श्रद्धा, संघर्ष आणि स्वप्नपूर्तीचे प्रतीक असलेला हा सोहळा अत्यंत महत्त्वाचा आहे. आज दुपारी मंदिराच्या शिखरावर 'भगवा ध्वज' फडकवला जाणार आहे. हा गौरवशाली ध्वजारोहण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते पार पडणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत हा सोहळा होत असल्याने याचे महत्त्व अधिक वाढले आहे. रामभक्तांच्या अनेक पिढ्यांनी पाहिलेले स्वप्न आज पूर्ण होत आहे. संघर्षानंतर भव्य स्वरूपात उभे राहिलेल्या या मंदिराच्या शिखरावर भगवा ध्वज फडकणे, हा केवळ धार्मिक सोहळा नसून, देशातील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक पुनरुत्थानाचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. संपूर्ण अयोध्या नगरी या ऐतिहासिक क्षणाची साक्षीदार होण्यासाठी सज-धज करून सज्ज झाली आहे.

फीड फीडबर्नर 25 Nov 2025 11:10 am

फॅशन ट्रेंडी स्वेटरची!

सौंदर्य तुझं : प्राची शिरकरहिवाळ्याची चाहूल लागताच फॅशनच्या दुनियेत एक मोठी क्रांती झालेली दिसते. सध्याच्या ट्रेंडमध्ये स्वेटशर्ट्स आणि विविध प्रकारचे स्वेटर्स हे केवळ थंडीपासून बचाव करणारे वस्त्र न राहता, तुमच्या पर्सनॅलिटीला एक स्टायलिश आणि मॉडर्न लूक देणारे फॅशन स्टेटमेंट बनले आहेत. स्ट्रीट-स्टाइलपासून ते पार्टीवेअरपर्यंत, स्वेटर्सनी आपल्या अष्टपैलू वैशिष्ट्यांमुळे तरुणाईच्या वॉर्डरोबमध्ये आपले खास स्थान निर्माण केले आहे. आरामदायी फिटिंग, आकर्षक डिझाइन्स आणि हटके प्रिंट्समुळे स्वेटशर्ट्स सध्या तुफान ट्रेंडमध्ये आहेत. या बदलत्या फॅशनमध्ये कोणता स्वेटर तुमच्यासाठी परफेक्ट ठरू शकेल, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. म्हणूनच, आम्ही येथे यंदाच्या हिवाळ्यातील सर्वात लोकप्रिय आणि ट्रेंडी स्वेटर स्टाइल्सचा सविस्तर आढावा घेतला आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, कोणताही लूक परफेक्ट बनवण्यासाठी कपड्यांची निवड तुमच्या बॉडी टाईपनुसार करणे आवश्यक असते. त्यामुळे, या लेखाच्या शेवटी आम्ही तुम्हाला कोणत्या शरीरयष्टीला कोणता स्टाइल फिट बसतो याचे मार्गदर्शनही केले आहे. चला तर मग या लेखातून पाहूया यंदाच्या थंडीत तुमचा कम्फर्ट आणि स्टाइलचा परफेक्ट बॅलन्स कसा साधायचा...१. ‘ओव्हरसाईज स्वेटर्स’चा ट्रेंडथंडीच्या दिवसांत स्वतःला उबदार ठेवण्यासाठी आणि स्टायलिश दिसण्यासाठी ओव्हरसाईज स्वेटर्स सध्या फॅशनच्या जगात धुमाकूळ घालत आहेत. या स्वेटर्सचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा सैल आणि अत्यंत आरामदायी फिट. हे स्वेटर्स कॉलेज गर्ल्सपासून ते कॅज्युअल लूक पसंत करणाऱ्या प्रत्येक महिलेसाठी परफेक्ट ठरतात. स्टाइल करताना तुम्ही ते हाय वेस्ट जीन्स आणि स्नीकर्ससोबत कॅज्युअली पेअर करू शकता, किंवा अधिक बोल्ड लूकसाठी शॉर्ट स्कर्ट आणि आकर्षक लाँग बूट्ससोबत मॅच करू शकता.२. टर्टलनेक स्वेटर्सटर्टलनेक स्वेटर्स हे थंडीच्या दिवसातील सर्वात क्लासी आणि फॅशनेबल पर्याय आहेत. यांचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे गळ्याभोवतीची उंच रचना, जी थंड हवेत मान पूर्णपणे गरम ठेवते. योग्य फिटमुळे हे स्वेटर्स शरीराला स्लिम लूक देतात. हे स्वेटर्स ऑफिस मीटिंग्ज असोत किंवा विंटर पार्टी, दोन्ही ठिकाणी परिधान करण्यासाठी योग्य आहेत.३. चंकी निट स्वेटर्सचंकी निट स्वेटर्स त्यांच्या जाड विणकामामुळे हिवाळ्यात थंडीचा कमाल बचाव करण्यासाठी सर्वोत्तम आहेत. हे स्वेटर्स त्वरित ट्रेंडी आणि लक्झरीअस लूक देतात. बाजारात सध्या केबल निट, बुबल निट आणि हँडमेड निट या स्टाइल्स खूप लोकप्रिय आहेत. हे स्वेटर्स विशेषतः प्रवास, कॅज्युअल आउटिंग किंवा विंटर पिकनिक अशा प्रसंगी वापरण्यासाठी परफेक्ट आहेत.४. स्वेटशर्ट्स-कम्फर्टमहिलांच्या सर्वात आवडत्या विंटर कॅज्युअल वेअरपैकी एक म्हणजे स्वेटशर्ट्स. यामध्ये हूडी स्वेटशर्ट हा प्रकार खूप लोकप्रिय आहे. हूडी स्वेटशर्ट्स तुमचा लूक त्वरित स्ट्रीट-स्टाइल आणि फॅशनेबल बनवतात. विशेषतः 'बॉयफ्रेंड हूडी' हा ट्रेंड आजही तरुणांमध्ये खूप लोकप्रिय आहे.५. ग्राफिक प्रिंट स्वेटशर्ट्सग्राफिक प्रिंट स्वेटशर्ट्स सध्याच्या फॅशनमधील एक लोकप्रिय आणि फंकी ट्रेंड आहे. या स्वेटशर्ट्सवर आकर्षक कोट्स, कार्टूनचे चित्र किंवा ब्रँडेड लोगो प्रिंट केलेले असतात. हे स्वेटशर्ट्स तुमचा लूक लगेचच फंकी आणि युथफूल बनवतात आणि त्यामुळेच ही एक उत्तम इंस्टाग्राम-फ्रेंडली स्टाइल म्हणून ओळखली जाते.६. विंटर को-ऑर्ड सेट्सथंडीच्या फॅशनमध्ये सध्या विंटर को-ऑर्ड सेट्स खूपच लोकप्रिय झाले आहेत. हे सेट्स म्हणजे टॉप आणि बॉटमचे पूर्ण मॅचिंग सेट असतात, ज्यामुळे ते आपोआपच स्टायलिश, मॉडर्न आणि एलिगंट लूक देतात. सध्या हे सेट्स इंस्टाग्रामवर तुफान ट्रेंडिंग आहेत.७. झिप-अप स्वेटशर्ट : स्पोर्टी लेयरिंगसाठी परफेक्टझिप-अप स्वेटशर्ट हे त्यांच्या स्पोर्टी आणि क्लीन लूकमुळे ओळखले जातात. वर्कआऊटसाठी किंवा कोणत्याही कॅज्युअल ट्रिपला जाताना हे अत्यंत उत्तम पर्याय ठरतात. याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे यात दिलेली झिप, ज्यामुळे हे स्वेटशर्ट्स टी-शर्टसोबत लेयरिंग करण्यासाठी परफेक्ट आहेत.तुमच्या बॉडी टाईपनुसार निवडा परफेक्ट विंटर स्वेटरस्लीम बॉडी असलेल्या महिलांसाठी ओव्हरसाइज स्वेटर्स, कॅट-स्लीव्ह किंवा हाय-वेस्ट जीन्ससोबत स्वेटशर्ट हा उत्तम पर्याय आहे, कारण यामुळे फिगरला व्हॉल्यूम मिळतो. कर्वी बॉडी असलेल्या महिलांसाठी टर्टलनेक, लाँग कार्डिगन किंवा वी-नेक स्वेटर निवडल्यास त्यांचा लूक अधिक स्लीक दिसतो. ज्या महिलांची उंची कमी आहे, त्यांनी क्रॉप स्वेटर, हाय-निक स्वेटर किंवा सॉलिड कलर स्वेटशर्ट निवडावेत, ज्यामुळे त्यांचे पाय अधिक लांब आणि उंची जास्त असल्याचा भास होतो.

फीड फीडबर्नर 25 Nov 2025 11:10 am

रामजन्मभूमीमध्ये मोदींचे आगमन, ध्वजारोहणाची लगबग सुरू

अयोध्या: अनेक वर्षांचे हिंदूंचे स्वप्न आज साकार होणार आहे. अयोध्येतील राम मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले असून आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते राम मंदिराच्या शिखरावर ध्वजारोहण करण्यात येणार आहे. भगवान राम आणि माता सीतेच्या विवाह पंचमीच्या अभिजित मुहूर्तावर हा ध्वज फडकवला जाणार आहे. या ध्वजारोहणासाठी पंतप्रधान मोदी अयोध्येत दाखल झाले असून समारंभापूर्वी मोदींचा रोड शो सुरू झाला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'रोड शो'ला साकेत कॉलेजच्या मुख्य प्रवेशद्वारापासून सुरुवात झाली. त्यांच्या स्वागतासाठी रामपथाच्या दोन्ही बाजूंना रांगेत उभ्या असणाऱ्या हजारो रामभक्तांनी मोदींवर पुष्पवृष्टी केली. हिंदूच्या धार्मिक भावनांना सन्मान देण्याचे महत्त्वाचे काम मोदींने केल्यामुळे अयोध्येत पुष्पवृष्टी करत त्यांचे स्वागत करण्यात आले.https://prahaar.in/2025/11/25/know-the-design-significance-and-other-details-of-the-flag-hoisted-at-the-ram-temple-in-detail/पंतप्रधान मोदी रोड शोद्वारे व्हीआयपी गेट क्रमांक ११ मधून राम मंदिरात पोहोचले असून मंदिर परिसरातील सप्तऋषी मंदिर, शेषावतार मंदिर आणि अन्नपूर्णा मंदिरात त्यांनी सर्वप्रथम दर्शन घेतले आहे. त्यानंतर ते राम लल्लाला नमस्कार करणार आहेत. मंदिरातील सर्व विधींनंतर मोदींच्या हस्ते दुपारी १२:१० ते १२:३० पर्यंतच्या शुभ मुहूर्तावर मंदिराच्या शिखरावर ध्वजारोहण करण्यात येणार आहे.

फीड फीडबर्नर 25 Nov 2025 11:10 am

कॅनडामधील भारतीय वंशाच्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी ; नागरिकत्वाचे नियम आता झाले सोपे , वाचा

Citizenship Law Bill C3। कॅनडाच्या सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. नागरिकत्वाशी संबंधित कायद्यात सुधारणा करणार आहे. वंशावळीद्वारे नागरिकत्व कायद्याबाबत संसदेत सादर केलेले विधेयक C-3 मंजूर झाले आहे. याचा अर्थ असा की हा कायदा आता लागू होणार असून या कायद्यामुळे भारतीय वंशाच्या नागरिकांना मोठा फायदा होईल अशी अपेक्षा आहे. कॅनडाच्या सरकारच्या मते, हा कायदा जुन्या […] The post कॅनडामधील भारतीय वंशाच्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी ; नागरिकत्वाचे नियम आता झाले सोपे , वाचा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 25 Nov 2025 11:08 am

धर्मध्वजा-3: राम मंदिर हजारो वर्षे कसे टिकेल:लोखंडाचा एक खिळाही नाही, फक्त दगड लावले; मूर्ती कशी बनली, दगड खाणाऱ्या कीटकाची कहाणी

अयोध्येतील राम मंदिर केवळ दगड आणि शिल्पकलेचा चमत्कार नाही, तर भारताच्या श्रद्धा, विज्ञान आणि शास्त्राची जिवंत गाथा आहे. रामलल्लाचे हे मंदिर नागर शैलीतच का बनले? दगडांपासूनच का बनवले गेले? याची पायाभरणी करताना लोखंडाचा एक खिळाही का नाही? हे हजारो वर्षे टिकणारे अभियांत्रिकी आणि शिल्पशास्त्राचे अद्भुत संगम का आहे? दगड खाणारा किडा 'विष्णू शिळे'ची ओळख कशी करून देतो, ज्यातून रामलल्लाची मूर्ती बनली आहे. वाचा मंदिर निर्मितीपासून पुढील नियोजनापर्यंतच्या सर्व प्रश्नांची उत्तरे... *** विशेष आभार- श्री राम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र ग्राफिक्स- सौरभ कुमार

दिव्यमराठी भास्कर 25 Nov 2025 10:51 am

इथियोपियाच्या ज्वालामुखीची राख भारतात पोहोचली ; अनेक उड्डाणे रद्द, परिसरात विषारी वायू

Ethiopia Volcano। इथिओपियातील अफार याठिकाणी हेली गुब्बी ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे राखेचा मोठा लोट पूर्वेकडे अरबी समुद्र आणि भारतात पसरला आहे, ज्याचा थेट भारतीय उड्डाणांवर परिणाम झाला आहे. यामुळे अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. “आम्ही सतत ऑपरेटिंग क्रूशी संपर्कात आहोत.”Ethiopia Volcano। एअर इंडियाने याविषयी एक पोस्ट करून, “आम्ही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत आणि आमच्या ऑपरेटिंग […] The post इथियोपियाच्या ज्वालामुखीची राख भारतात पोहोचली ; अनेक उड्डाणे रद्द, परिसरात विषारी वायू appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 25 Nov 2025 10:46 am

“मंत्रिपद असूनही उत्तर महाराष्ट्र तर सोडा जळगावसाठी काय केलं?”; रोहित पवारांचा भाजप नेत्याला सवाल

Rohit Pawar | राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार सातत्याने विविध मुद्यांवरुन सत्ताधाऱ्यांना जाब विचारत आहे. अलिकडेच त्यांनी जामनेरमध्ये नगर परिषद निवडणुकीसाठी अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी झालेल्या गोंधळावरुन भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला होता. एका उमेदवाराला भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते बळजबरी माघारीसाठी पकडून आणत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रोहित पवार […] The post “मंत्रिपद असूनही उत्तर महाराष्ट्र तर सोडा जळगावसाठी काय केलं?”; रोहित पवारांचा भाजप नेत्याला सवाल appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 25 Nov 2025 10:45 am

Dharmendra: शर्मिला टागोर यांच्या एका विनंतीवर धर्मेंद्र संपूर्ण रात्र शूटिंग करत राहिले!

Dharmendra: बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र जरी आता हयात नसले, तरी त्यांची सादगी, त्यांचा स्वभाव आणि त्यांच्या मनातील माणुसकी आजही सहकलाकारांच्या आणि चाहत्यांच्या आठवणीत जिवंत आहे. धर्मेंद्र यांच्या व्यक्तिमत्त्वाशी निगडित अनेक आठवणी सध्या त्यांच्या सहकलाकारांकडून शेअर केल्या जात आहेत. त्यातच अभिनेत्री शर्मिला टागोर यांनीही काही खास आणि मनाला भिडणारे किस्से सांगितले. “धर्मेंद्र कधीच बदलले नाहीत” – […] The post Dharmendra: शर्मिला टागोर यांच्या एका विनंतीवर धर्मेंद्र संपूर्ण रात्र शूटिंग करत राहिले! appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 25 Nov 2025 10:44 am

Shirur News : कालवडीवर बिबट्याचा हल्ला; एक ठार, दुसरी गंभीर जखमी; शिरुर तालुक्यातील घटना

न्हावरे :शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात बिबट्याची दहशत समोर आली आहे. येथील एमआयडीसी रोड लगत राहणाऱ्या बालाजी गायकवाड यांच्या घराबाहेर बांधलेल्या दोन जर्सी कालवडींवर बिबट्याने पहाटेच्या सुमारास हल्ला केला. या हल्ल्यात एक कालवड जागीच ठार झाली तर दुसरी गंभीर जखमी असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. येथील स्थानिक ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार एमआयडीसी रोड लगत भाऊसाहेब […] The post Shirur News : कालवडीवर बिबट्याचा हल्ला; एक ठार, दुसरी गंभीर जखमी; शिरुर तालुक्यातील घटना appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 25 Nov 2025 10:25 am

Shirur News : बाबो! शिरूर तालुक्यातील गोलेगाव येथे तब्बल 15 ते 20 फुटांचा आढळला अजगर

शिरूर : शिरूर तालुक्यातील गोलेगावच्या महाजनमळा परिसरात दरावस्ती येथे तब्बल ४० किलो वजनाचा आणि अंदाजे १५ ते २० फूट लांबीचा महाकाय अजगर आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सतिश वाखारे यांच्या शेजारील शेतात हा अजगर निवांत पडलेला दिसताच ग्रामस्थांची गर्दी झाली. यावेळी पाहणीदरम्यान समोर आले की अजगराने एक शेळी पूर्णपणे गिळल्याची घटना घडली असून त्या भागात […] The post Shirur News : बाबो! शिरूर तालुक्यातील गोलेगाव येथे तब्बल 15 ते 20 फुटांचा आढळला अजगर appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 25 Nov 2025 10:21 am

सकारात्मक सुरुवातीनंतर शेअर बाजार कोसळला ; सेन्सेक्स २१ अंकांनी तर निफ्टी २५,९४९ च्या खाली

Stock market। भारतीय शेअर बाजाराची आज आठवड्याच्या दुसऱ्या ट्रेडिंग सत्रात फ्लॅट ओपनींग झाली. मात्र, शेअर बाजार लवकरच घसरला आणि बेंचमार्क निर्देशांक बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी ५० लाल रंगात व्यवहार करू लागले. ३० शेअर्सचा बीएसई सेन्सेक्स निर्देशांक १०८.२२ अंकांनी किंवा ०.१३ टक्क्यांनी वाढून ८५,००८.९३ वर उघडला, तर एनएसई निफ्टी ५० ३९ अंकांनी किंवा ०.१५ टक्क्यांनी […] The post सकारात्मक सुरुवातीनंतर शेअर बाजार कोसळला ; सेन्सेक्स २१ अंकांनी तर निफ्टी २५,९४९ च्या खाली appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 25 Nov 2025 10:20 am

Stock Market Opening Bell : मेटल, रिअल्टी शेअर उसळले सेन्सेक्स व निफ्टीत 'या'कारणामुळे वाढ दिवसभरात 'हे'अपेक्षित!

मोहित सोमण : आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सकाळच्या सत्रात वाढ अपेक्षित आहे. जागतिक सत्रात वाढ होत असताना मुख्यतः आशिया पॅसिफिक क्षेत्रातील बाजारात रॅली होण्याची दाट शक्यता आहे. सेन्सेक्स २० अंकाने व निफ्टी ९.२५ अंकांने वाढ झाली आहे. सेन्सेक्स बँक व बँक निफ्टीत सकारात्मक संकेत मिळत आहेत त्यामुळे बाजारात सपोर्ट लेवल मिळण्यास मदत होईल. निफ्टी व्यापक निर्देशांकात मिडकॅप ५० (०.३१%),स्मॉल कॅप १०० (०.१०%) वाढ झाली आहे. निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात सर्वाधिक वाढ मेटल (०.६९%), रिअल्टी (१.०२%), मिड स्मॉल फायनांशियल सर्विसेस (०.४७%) निर्देशांकात झाली आहे.गिफ्ट निफ्टीतही किरकोळ वाढ झाली आहे. युएस बाजारातील डाऊ जोन्स (०.०४%) वगळता इतर दोन्ही एस अँड पी ५०० (१.५५%), नासडाक (२.६८%) निर्देशांकात मोठी रॅली झाली आहे. एआय व माहिती तंत्रज्ञान शेअर्समध्ये झालेल्या मोठ्या वाढीनंतर बाजारात एकूण रॅली झाली. दुसरीकडे युएस बाजारात व्याजदरात कपातीचे संकेत पुन्हा एकदा जागे झाल्याने बाजारात आज एकूणच सकारात्मकता कायम राहू शकते. किंबहुना भारतीय बाजारात एकूणच बाजारातील मजबूत फंडामेंटल व रूपयाची सुरू झालेली घौडदौड एकूणच समाधानकारक दुसरे तिमाही निकाल व स्मॉलकॅप शेअर्समध्ये रॅलीची आश्वासकता अशा विविध कारणांमुळे रॅली अपेक्षित आहे. सकाळच्या सत्रात आज आयटी शेअर्समध्ये विशेष लक्ष केंद्रित केले जाऊ शकते तसेच गुंतवणूकदारांचा बँक, मेटल, रिअल्टी शेअर्समध्ये असलेला कौल अखेरच्या सत्रातील अंतिम टप्पा ठरवण्यास कारणीभूत ठरू शकतो. एकूणच रूपयात सुधारणा व डॉलर मध्ये होत असलेल्या घसरणीचा फायदा परकीय गुंतवणूकदारांना रोख गुंतवणूक होऊ शकतो त्यामुळे रोख खरेदी काढण्यास एफआयआयला नवीन ट्रिगर नाही. त्यामुळेच बाजारात नव्या संधीची वाट गुंतवणूकदारांना पहावी लागेल असे एकंदरीत दिसत आहे.सकाळी गिफ्ट निफ्टीतील (०.१०%) वाढीसह निकेयी २२५ (०.६९%), हेंगसेंग (१.३०%), तैवान वेटेड (१.६२%), कोसपी (१.०५%), शांघाई कंपोझिट (१.०८%) निर्देशांकात मोठी वाढ झाली असून जकार्ता कंपोझिट (०.७१%), स्ट्रेट टाईम्स (०.१३%) निर्देशांकात घसरण झाली आहे. आज मात्र अस्थिरतेच्या कारणांमुळे सोन्यात मोठी वाढ झाली आहे. तर युएसने यशस्वीपणे रशिया युक्रेन यांच्यातील वादावर हस्तक्षेप सुरू केल्याने कच्च्या तेलाच्या स्पॉट फ्युचर बेटिंगमध्ये घसरण झाल्याने कच्च्या तेलाच्या दरातील दिलासा आजही कायम आहे. आजही डॉलरच्या निर्देशांकात (Dollar Index DXY) घसरण झाल्याने आज पुन्हा एकदा रुपया ४६ पैशाने वधारला आहे. आरबीआयच्या हस्तक्षेपानंतर रूपयांच्या किंमतीला स्थैर्य आले आहे ज्याचा फायदा आज शेअर बाजारातही अपेक्षित आहे.सकाळच्या सत्रात सर्वाधिक वाढ एचडीएफसी बँक (९.०९%), आयओबी (४.३५%), आरएचआय मॅग्नेस्टा (४.१४%), सफायर फूडस (४.३२%), सुमिटोमो केमिकल्स (३.३०%), वोडाफोन आयडिया (२.८१%), इंटलेक्ट डिझाईन (२.६२%) समभागात झाली आहे तर सर्वाधिक घसरण एडब्लूएल अँग्री बिझनेस (३.५५%), स्विगी (२.७९%), विशाल मेगा मार्ट (२.७५%), टीबीओ टेक (२.४६%), पीव्हीआर आयनॉक्स (२.३९%, स्टार हेल्थ इन्शुरन्स (२.०८%),साई लाईफ (१.९०%) समभागात झाली आहे.

फीड फीडबर्नर 25 Nov 2025 10:10 am

Dharmendra: धर्मेंद्र यांच्या निधनावर सायरा बानो म्हणाल्या: “ते व्हेंटिलेटरवरून हटविण्याच्या स्थितीत होते…”

Dharmendra: बॉलिवूडचे ‘ही-मॅन’ म्हणून ओळखले जाणारे धर्मेंद्र यांचे 90 व्या वाढदिवसाच्या काही दिवस आधी निधन झाले. प्रकृती अचानक खालावल्याने आलेल्या या दुःखद बातमीने संपूर्ण चित्रपटसृष्टी शोकाकुल झाली आहे. त्यांच्या सहकलाकार सायरा बानो यांनी धर्मेंद्र यांच्या निधनाबद्दल अतिशय हळवे विधान केले असून एक धक्कादायक माहिती उघड केली आहे. “ते सुधारत होते… व्हेंटिलेटरवरून हटवणार होते” – सायरा […] The post Dharmendra: धर्मेंद्र यांच्या निधनावर सायरा बानो म्हणाल्या: “ते व्हेंटिलेटरवरून हटविण्याच्या स्थितीत होते…” appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 25 Nov 2025 9:47 am

मोठी बातमी! गौरी पालवे मृत्यू प्रकरणात अनंत गर्जेंच्या वकिलांचा कोर्टात धक्कादायक दावा; नेमकं काय घडलं?

Gauri Garje Palave death case : भाजपच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नी डॅा. गौरी पालवे गर्जे यांच्या आत्महत्या प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडवून दिली आहे. या मृत्यू प्रकरणात गौरी यांच्या कुटुंबीयांकडून अनेक गंभीर आरोप गर्जे कुटुंबावर केल्याने प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहे. आरोपी अनंत गर्जे याला अटक करण्याची मागणी नातेवाईकांनी […] The post मोठी बातमी! गौरी पालवे मृत्यू प्रकरणात अनंत गर्जेंच्या वकिलांचा कोर्टात धक्कादायक दावा; नेमकं काय घडलं? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 25 Nov 2025 9:47 am

“तिजोरीच्या चाव्या तुमच्याकडे असल्या तरी, मालक आमच्याकडे”, चंद्रकांत पाटलांचे अजित पवारांना प्रत्युत्तर

Chandrakant Patil And Ajit Pawar | राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा धुरळा उडाला आहे. सत्ताधारी आणि विरोधक प्रचारात उतरले आहेत. महायुतीकडून जोरदार प्रचार सुरू झाला आहे. भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये कलगीतुरा रंगलेली असताना त्यात राष्ट्रवादी काँग्रेसची भर पडली आहे. मुख्यमंत्रीसह दोन्ही उपमुख्यमंत्री आपल्या पक्षाच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहे. याचदरम्यान, अजित पवार यांनी “तुम्ही राष्ट्रवादी […] The post “तिजोरीच्या चाव्या तुमच्याकडे असल्या तरी, मालक आमच्याकडे”, चंद्रकांत पाटलांचे अजित पवारांना प्रत्युत्तर appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 25 Nov 2025 9:45 am

राज्य, राष्ट्र आणि जगासह टॉप १० बातम्या वाचा फक्त एका क्लिकवर

तिजोरीचा मालक आपलाच-चंद्रकांत पाटील राज्याच्या तिजोरीच्या चाव्या आपल्याकडे आहेत, कुणाला निधी द्यायचा आणि कुणाला नाही हे आपल्या हाती असल्याचं वक्तव्य नुकतंच राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी केलं होतं. त्यावरुन आता चंद्रकांत पाटील यांनी टोला लगावलाय. त्यांनी याविषयी बोलताना राज्याच्या तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असू दे, तिजोरीचा मालक आपल्याकडे आहे असं वक्तव्य केलंय. तिजोरीचा मालक आपल्याकडे असल्यामुळे विकासाची […] The post राज्य, राष्ट्र आणि जगासह टॉप १० बातम्या वाचा फक्त एका क्लिकवर appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 25 Nov 2025 9:43 am

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अयोध्येत पोहोचले

ध्वजारोहण समारंभाच्या तयारीचा घेतला आढावाअयोध्या : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ काल श्री राम जन्मभूमी मंदिरात ध्वजारोहण समारंभाच्या एक दिवस आधी अयोध्येत पोहोचले. त्यांनी ध्वजारोहण समारंभाच्या तयारीचा आढावा घेतला. मुख्यमंत्र्यांनी हनुमानगढी आणि श्री राम मंदिरालाही भेट दिली.अयोध्येत पोहोचल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ प्रथम वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळावर गेले. त्यांनी परिसराची पाहणी केली आणि अधिकाऱ्यांना सर्व व्यवस्थेची माहिती दिली. तेथून मुख्यमंत्री थेट साकेत पदवी महाविद्यालयातील हेलिपॅडवर गेले. त्यांनी हेलिपॅडवरील व्यवस्थेची पाहणी केली. त्यानंतर ते हनुमानगढीला गेले, जिथे संकटमोचन हनुमानाच्या चरणी ते नतमस्तक झाले.तेथून मुख्यमंत्री श्री राम जन्मभूमी मंदिरात गेले, जिथे त्यांनी श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या अधिकाऱ्यांकडून कार्यक्रमाची तयारी आणि सुरक्षा व्यवस्थेची माहिती घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना ध्वजारोहण समारंभाच्या सूचना दिल्या. त्यांनी सुरक्षा, स्वच्छता, पाहुण्यांचे स्वागत आणि इतर बाबींसाठी प्रशासनाच्या तयारीचा आढावा घेतला आणि त्यानंतर पुढील सूचना दिल्या.

फीड फीडबर्नर 25 Nov 2025 9:30 am

प्रांजली धुमाळला २५ मीटर पिस्तूलमध्ये सुवर्णपदक

टोकियो : भारताच्या प्रांजली प्रशांत धुमाळने टोकियो येथे झालेल्या २५ व्या उन्हाळी डेफलिंपिकमध्ये २५ मीटर पिस्तूल महिलांमध्ये सुवर्णपदक जिंकले, हे तिचे दुसरे सुवर्ण आणि तिसरे पदक आहे. प्रांजलीने अंतिम फेरीत ३४ गुणांसह पूर्ण केले, जे युक्रेनच्या हॅलिना मोसिनापेक्षा दोन गुणांनी जास्त आहे, ज्याने रौप्य पदक जिंकले. जिवोन जिओनने ३० गुणांसह कांस्यपदक जिंकले, ज्याने भारताच्या अनुया प्रसादला शूटआउटमध्ये पराभूत केले, जी अखेर चौथ्या स्थानावर राहिली.प्रांजली यांनी यापूर्वी पुरुषांच्या २५ मीटर पिस्तूलमध्ये सुवर्णपदक मिळवलेल्या अभिनव देसवालसह १० मीटर एअर पिस्तूल मिश्र संघात सुवर्णपदक जिंकले होते. त्यामुळे त्यांची कामगिरी आज राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेचा विषय बनली आहे. यापुढे स्पर्धेच्या पात्रता फेरीत प्रांजलिने अव्वल स्थान पटकावले. त्यांनी जागतिक कर्णबधिर नेमबाजी स्पर्धेत मागील वर्षी स्वतःचा विक्रम मोडला व ५७३–१४ गुण मिळवले होते. अनुयाने ५६९–१५ गुण मिळवून दुसरे स्थान पटकावले होते. भारतीयडेफलिंपिक नेमबाजी संघाने ऑलिंपिकमध्ये आतापर्यंत एकूण १६ पदके जिंकली आहेत. यामध्ये सात सुवर्ण, सहा रौप्य व तीन कांस्य पदकांचा समावेश आहे.

फीड फीडबर्नर 25 Nov 2025 9:30 am

विजेत्या संघात महाराष्ट्राच्या गंगा कदमचा सिंहाचा वाटा

अंध महिला क्रिकेट विश्वचषकात भारताचा ऐतिहासिक विजयमुंबई : भारतीय अंध महिला क्रिकेट संघाने कोलंबो, श्रीलंका येथे आयोजित पहिल्या विश्वचषक स्पर्धेत इतिहास रचत अजिंक्यपद पटकावले आहे. भारतासह अमेरिका, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, नेपाळ आणि पाकिस्तान या सहा देशांच्या स्पर्धेत भारताने सर्व प्रतिस्पर्ध्यांचा दणदणीत पराभव करत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. अंतिम सामन्यात भारताने नेपाळचा पराभव करत ट्रॉफीवर आपले नाव कोरले.या सुवर्णयशात महाराष्ट्राच्या गंगा कदम हिच्या नेतृत्वगुणांचा आणि खेळातील सातत्यपूर्ण योगदानाचा मोठा वाटा आहे. मराठवाड्यातील मर्यादित आर्थिक परिस्थितीतून आलेल्या गंगा ही सात बहिणी आणि एक भाऊ असा मोठा परिवार सांभाळत आपल्या मेहनतीने राष्ट्रीय ते आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकली आहे. भारतीय संघाची उपकर्णधार म्हणून तिने आपल्या संघाला उंच भरारी घेण्यासाठी प्रेरित केले. महाराष्ट्र संघाची कर्णधार म्हणूनही तिने यापूर्वी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.गंगा कदमसह संपूर्ण संघाला शासनाकडून यथोचित सन्मान, प्रोत्साहन आणि खेळाडू म्हणून अधिकृत मान्यता मिळावी, अशी क्रीडा क्षेत्राकडून अपेक्षा व्यक्त होत आहे. महाराष्ट्र सरकारने राज्याचा गौरव वाढविणाऱ्या खेळाडूंसाठी प्रोत्साहनात्मक योजना आखल्या असल्या, तरी गंगा कदमच्या प्रकरणी तातडीने सकारात्मक पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.मुंबई ही क्रिकेटची पंढरी मानली जात असताना, अंध क्रिकेट क्षेत्रात मिळालेले हे जागतिक यश स्थानिक क्रीडा संघटनांनी आणि क्रिकेट विश्वाने अधोरेखित करणे आवश्यक असल्याचे जाणकारांचे मत आहे. राज्यातील आंतरराष्ट्रीय दर्जाचे अंध खेळाडू अधिक जोमाने पुढे यावेत यासाठी योग्य प्रोत्साहन, मान्यता आणि पुनर्वसनाच्या संधी उपलब्ध झाल्यास अनेक तरुणांना नवी प्रेरणा मिळेल.क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड ऑफ महाराष्ट्र ही संस्था मागील पंधरा वर्षांपासून अंध खेळाडूंसाठी प्रशिक्षण, निवड शिबिरे आणि विविध स्पर्धांचे आयोजन करत सातत्याने कार्यरत आहे. शासनाच्या सहकार्याची साथ लाभल्यास या खेळाडूंना अधिक व्यापक व्यासपीठ मिळून राज्याचा क्रीडा वारसा अधिक भक्कम होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

फीड फीडबर्नर 25 Nov 2025 9:30 am

अजित पवारांच्या टीकेला भाजपच्या मंत्री मेघना बोर्डीकर यांचं रोखठोक प्रत्युत्तर; ‘ते’प्रश्न उपस्थित करत थेट म्हणाल्या…

Meghana Bordikar : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रंगत आता वाढताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून सर्वच राजकीय पक्षातील नेते मंडळीकडून उमेदवारांच्या प्रचारार्थ रोड शो, प्रचार सभा घेतल्या जात आहेत. या निवडणुका कार्यकर्त्यांच्या असल्याने स्थानिक नेत्यांवर निवडणुकांची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने देखील निवडणुकीसाठी कंबर कसली असून, अजित पवार […] The post अजित पवारांच्या टीकेला भाजपच्या मंत्री मेघना बोर्डीकर यांचं रोखठोक प्रत्युत्तर; ‘ते’ प्रश्न उपस्थित करत थेट म्हणाल्या… appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 25 Nov 2025 9:12 am

व्हिएतनाममध्ये मुसळधार पावसाचा हाहाकार

हजारो लोक बेघर; ९० जणांचा मृत्यूहनोई : गेल्या काही आठवड्यांपासून व्हिएतनाममध्ये सातत्याने मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. देशाच्या अनेक भागांमध्ये प्रचंड विध्वंस झाला आहे. व्हिएतनामच्या राष्ट्रीय हवामान विभागाने भूसख्यलन, पूराचा धोका वाढण्याचा इशारा दिला आहे. सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अनेक लोक पूरात वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.मुसळधार पावसाचा लाखो लोकांना फटकामीडिया रिपोर्टनुसार, या मुसळधार पावसामुळे व्हिएतनामध्ये अनेक घरे, रस्ते पाण्याखाली गेली आहेत. अंदाजे १,८६,००० लोकांना याचा फटका बसला आहे. अनेक गुरुढोरे देखील पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत. आतापर्यंत देशाचे २ अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले असल्याचे वृत्त समोर आले आहे. तसेच ९० लोकांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आपत्तींचा धोका वाढला असून मृत्यूचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.ऑक्टोबरपासून व्हिएतनामध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. यापूर्वी बुआलोई वादळ आणि रगासा वादळाने देखील प्रचंड कहर माजवला होता. अनेक लोक छतांवर अडकले आहेत. परिस्थिती अत्यंत भयानक आहे.या मुसळधार पावसामुळे लोकांनी व्हिएतनामसाठी बुक केलेली तिकीट्स, हॉटेल्स सर्वकाही रद्द केले आहे. यामुळे व्हिएतनामचे अब्जावधी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. सध्या बाधित प्रदेशांमध्ये मदत पोहचवण्याचे काम सुरु आहे. पुरामुळे अनेक भागात बिकट परिस्थिती आहे. लोकांना मदत पुरवठा करण्यात अडथळा येत आहे. पण सरकाने बचाव संस्था आणि अग्निशमन दलाला लोकांपर्यंत आवश्यक ती मदत पोहोचवण्याचे आदेश दिले आहेत.सध्या परिस्थिती इतकी भंयकर आहे की लोकांना १९९३ च्या पुराची आठवण होत आहे. पण यंदाची परिस्थिती त्याकाळापेक्षा देखील अधिक बिकट असल्याचे स्थानिकांनी म्हटले आहे. परिस्थिती अशीच राहिली तर लोकांना अन्न संकटाचा देखील सामना करावा लागेल असे स्थानिक माध्यामंनी सांगितले आहे. सध्या पूर आणि भूस्खलनामुळे लोकांच्या स्थलांतराचे कार्य सुरु आहे.

फीड फीडबर्नर 25 Nov 2025 9:10 am

अयोध्येत आज आनंदाचे वातावरण! राम मंदिरावर फडकणार भगवा

अयोध्या: अयोध्येतील श्री राम मंदिरात आज ध्वजारोहण समारंभ होणार आहे. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशला भेट देणार आहेत. मोदींच्या हस्ते राम मंदिराच्या शिखरावर ध्वजारोहण करण्याचा कार्यक्रम पार पडणार आहे. ज्यासाठी दुपारी १२:१० ते १२:३० पर्यंतचा शुभ मुहूर्त आहे. या शुभ मुहूर्तादरम्यान पंतप्रधान ध्वजारोहण करणार आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी मंदिर परिसरात पोहोचल्यानंतर प्रथम राम लल्ला आणि राम दरबाराला भेट देतील. त्यानंतर मंदिर संकुलात उपस्थित असलेल्या संत आणि भाविकांना भेटून त्यांच्याशी संवाद साधतील. संवाद साधल्यानंतर ध्वजारोहणाच्या शुभ मुहूर्तावर ध्वजारोहण करतील. ध्वजारोहणासाठी काढण्यात आलेल्या शुभ मुहूर्तादरम्यान या कार्यक्रमाला एकूण चार मिनिटे लागतील.राम मंदिरावर फडकवण्यात येणाऱ्या ध्वजावर कोविदार वृक्ष, सूर्यवंश चिन्ह आणि ओम चिन्ह आहे. हा ध्वज फडकवण्यासाठी घेण्यात आलेल्या सरावात लष्कराची मदत देखील घेण्यात आली होती. हा ध्वज विद्युत प्रणालीने सुसज्ज असून पंतप्रधान मोदी बटण दाबून तो फडकवतील. या समारंभाच्या पार्श्वभूमीवर, अयोध्या परिसरात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.https://prahaar.in/2025/11/25/shivakumars-patience-or-siddaramaiahs-determination-signs-that-excitement-is-brewing-in-karnataka-politics/या समारंभासाठी राज्यात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सूचनेनुसार कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मोठा पोलिस दल आणि अनेक विशेष तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते फील्ड टीमपर्यंत समन्वित व्यवस्थापन सुनिश्चित करण्यात आले आहे.

फीड फीडबर्नर 25 Nov 2025 9:10 am

आजच्या सुनावणीवर ‘स्थानिक’ निवडणुकांचे भवितव्य

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे लक्षमुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षणाची मर्यादा आणि ओबीसी आरक्षणाचा प्रलंबित निकाल या दोन मुद्द्यांवर मंगळवारी (२५ नोव्हेंबर) सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी होत असून, न्यायालय काय निकाल देणार, याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून राहिले आहे. निवडणूक प्रक्रिया सुरू राहिली तर ठीक; अन्यथा निवडणुका लांबल्याच तर इच्छुकांच्या तयारीवर पाणी फिरणार असल्याने सगळेच पक्ष, इच्छुकांची धाकधूक वाढली आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायत, महानगरपालिका या स्थानिक स्वराज संस्थांचा निवडणूक कार्यक्रम सुरू झाला आहे. प्रभाग रचना, आरक्षण प्रक्रिया, मतदार याद्या तयार करणे, आदी कामे पूर्ण झाली आहेत. स्थानिक प्रशासनही जोरात कामाला लागले आहे.

फीड फीडबर्नर 25 Nov 2025 9:10 am

Dharmendra: ‘आप मेरे लिए पिता समान’…असं म्हणत, शाहरुख खानची धर्मेंद्र यांना श्रद्धांजली!

Dharmendra: दिग्गज अभिनेता धर्मेंद्र यांच्या निधनाने संपूर्ण चित्रसृष्टीवर शोककळा पसरली आहे. बॉलिवूडपासून ते दक्षिणेपर्यंत सर्वच कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. याच पार्श्वभूमीवर बॉलिवूडचे किंग खान शाहरुख खान यांनीही सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत त्यांच्यावरील प्रेम व्यक्त केले. ‘धरम जी, आपण अमर आहात’ : शाहरुख शाहरुख यांनी इंस्टाग्रामवर धर्मेंद्र यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला असून […] The post Dharmendra: ‘आप मेरे लिए पिता समान’…असं म्हणत, शाहरुख खानची धर्मेंद्र यांना श्रद्धांजली! appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 25 Nov 2025 9:07 am

जिल्हा परिषद निवडणूक पुन्हा लांबणीवर पडणार?; आरक्षणासंदर्भात आज महत्त्वाची सुनावणी

ZP Election | राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांकडून प्रचाराला वेग आला आहे. असे असतानाच राज्यात अनेक ठिकाणी आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडली गेली आहे. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. यावर आज सुनावणी होणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आरक्षणाच्या सुनावणीमुळे या निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. […] The post जिल्हा परिषद निवडणूक पुन्हा लांबणीवर पडणार?; आरक्षणासंदर्भात आज महत्त्वाची सुनावणी appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 25 Nov 2025 8:30 am

Election Staff: निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! मानधनात घसघशीत वाढ, आता ‘इतके’पैसे मिळणार

प्रभात वृत्तसेवा पुणे – लोकसभा, विधानसभा निवडणुकीकरिता नेमण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या मानधनात वाढ करण्याची सूचना केंद्रीय निवडणूक आयोगाने केली होती. त्यानुसार राज्य शासनाने या निवडणुकीकरिता निवडणूक कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ केली आहे. मतदान केंद्राध्यक्ष, पर्यवेक्षक यांना एका दिवसाकरिता साडेतीनशे रुपये इतके मानधन होते. त्यामध्ये वाढ करीत पाचशे रुपये इतके मानधन मिळणार आहे. एकदरंच निवडणूक कर्मचाऱ्यांच्या […] The post Election Staff: निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! मानधनात घसघशीत वाढ, आता ‘इतके’ पैसे मिळणार appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 25 Nov 2025 8:30 am

ठाण्यात हिवाळ्यात उष्म्याचा कहर! तापमान ३५° अंशाच्या पुढे

उष्मा आगामी दोन-तीन दिवसांत आणखी वाढण्याचे संकेतठाणे : जोमदार पावसामुळे यंदाच्या हिवाळ्यात आल्हाददायक गारवा जाणवेल, अशी अपेक्षा नागरिकांनी ठेवली होती. मात्र नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ठाण्यात उष्म्याने अक्षरशः कहर केला असून गुरुवारी शहराचा कमाल पारा ३५ अंश सेल्सियस पर्यंत नोंदवला त्यामुळे ऐन थंडीत ‘ऑक्टोबर हिट’चा तडाखा ठाणेकरांच्या अंगावर पडला आहे.गेल्या तीन-चार दिवसांपासून तापमानात सातत्याने भर पडत असून दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. ३० सेल्सियसपासून थेट ३५ पर्यंतच्या उडीनं हिवाळ्याची चाहूलच हरवली आहे.येत्या ४८ ते ७२ तासांत तापमान आणखी वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पहाटे हलकीशी थंडी आणि दुपारी डोळ्यांत आग ओकणारा उन्हाचा तडाखा ठाणेकर या विसंगत हवामानाला अक्षरशः कंटाळले आहेत. जमिनीतील ओलावा, सूर्याची तीव्रता आणि कोरडे गरम वारे, यामुळे तापमानात झपाट्याने वाढ झाली आहे. “सध्या दिसत असलेली तापमानवाढ तात्पुरती आहे. काही दिवसांत पारा खाली येऊन चांगली थंडी पडेल. जमिनीतील ओलावा आणि हवामानातील बदलांमुळे हा उकाडा वाढला आहे. असल्याचे सांगण्यात येत आहे.ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडील तापमान नोंददिनांक कमाल किमान२१ नोव्हेंबर ३३.२ २१.६२२ नोव्हेंबर ३४.२ २२.७२३ नोव्हेंबर ३४.७ २३.६२४ नोव्हेंबर ३४.८ २३.७

फीड फीडबर्नर 25 Nov 2025 8:30 am

ठाण्यात तस्कराला बेड्या; पाच कोटींचे चरस पकडले

ठाणे: पश्चिम बंगालमधून चरसची विक्री करण्यासाठी आलेल्या तस्कराला ठाणे गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. शनवर अली (३८) असे या तस्कराचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी ५ कोटी ५० लाखांचे चरस जप्त केले आहे. त्याने हे चरस एका नेपाळी व्यक्तीकडून आणल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पोलीस उपायुक्त अमरसिहं जाधब, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे,यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करत असताना साकेत रोड ते बाळकुम पाडा २ दरम्यान एक तरुण अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती वागळे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सलील भोसले यांना मिळाली. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण शिंदे व जगदीश गावित यांच्या पथकाने सापळा रचत शनवर अन्वर अली वय ३८ वर्ष याच्या मुसक्या आवळल्या. त्याची झडती घेतली असता पोलिसांना त्याच्याकडून ५०५ ग्रॅम वजनाचे दहा पाकीट चरस मिळाले. तो एवढ्या मोठ्या प्रमाणात चरस कोणाला विक्री करण्यासाठी आला होता? हे मोठे रॅकेट असल्याचा अंदाज वर्तवत पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

फीड फीडबर्नर 25 Nov 2025 8:30 am

Pune District : जेजुरीत यात्रेकरूंसाठी वाहनतळ उभारणार : जयदीप बारभाई यांची ग्वाही

पुणे : मल्हार मार्तंडाची जेजुरी नगरीत यात्रेकरू भाविकांना वाहन पार्किंग करण्यासाठी पार्किंग तळ उभारणार असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार) नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जयदीप दिलीपभाई बारभाई यांनी दिली. जेजुरी नगरपालिकेकडील असलेल्या जागा अधिकृत करून त्यावर दोन ते तीन मजली वाहन तळ उभारण्याची योजना पुणे शहराच्या धर्तीवर जेजुरी शहरात पार्किंग सुविधा उपलब्ध करणार आहे. जेजुरी शहरात […] The post Pune District : जेजुरीत यात्रेकरूंसाठी वाहनतळ उभारणार : जयदीप बारभाई यांची ग्वाही appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 25 Nov 2025 8:22 am

पीएमपीला सरकारचा ‘ठेंगा’! ई-बससाठी मंजूर ९८ कोटींपैकी ६ वर्षात मिळाले फक्त..वाचा निधी वितरणाचे वास्तव

प्रभात वृत्तसेवा पुणे – हवा प्रदूषण रोखण्यासह सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळ ( पीएमपीएमएल) कडून २०१९ मध्ये जीसीसी तत्त्वावर घेलेल्या ४९० इलेक्ट्रिक बससाठी राज्य शासनाकडून इलेक्ट्रिक वाहन धोरणानुसार इ-बसेससाठी पीएमपीला ९८ कोटींचा निधी मंजूर केला आहे. मात्र, हा निधी देताना शासनाने हात आखडता घेतला असून, आतापर्यंत केवळ ८ कोटींचा निधी पीएमपीला […] The post पीएमपीला सरकारचा ‘ठेंगा’! ई-बससाठी मंजूर ९८ कोटींपैकी ६ वर्षात मिळाले फक्त..वाचा निधी वितरणाचे वास्तव appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 25 Nov 2025 8:20 am

PMC Election: प्रभाग आरक्षणाचा तिढा सुटणार? अंतिम घोषणा ‘या’तारखेला; आयोगाकडे अहवाल सादर

प्रभात वृत्तसेवा पुणे – महापालिका निवडणुकीसाठी प्रशासनाकडून काढण्यात आलेल्या प्रभागांच्या आरक्षण सोडतीवर एकूण १८ हरकती प्राप्त झाल्या आहेत. या हरकतींची तपासणी करून त्यावर निर्णय घेतल्यानंतर अहवाल महापालिकेकडून १ डिसेंबरपूर्वी राज्य निवडणूक आयोगास पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर २ डिसेंबर रोजी अंतिम आरक्षण जाहीर केले जाणार आहे.महापालिकेच्या आगामी निवडणुका ४ सदस्यांच्या प्रभाग पद्धतीने होणार आहेत. शहरातील लोकसंख्येनुसार […] The post PMC Election: प्रभाग आरक्षणाचा तिढा सुटणार? अंतिम घोषणा ‘या’ तारखेला; आयोगाकडे अहवाल सादर appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 25 Nov 2025 8:10 am

आहे त्याच दरात, लोकलचा प्रवास होणार गारेगार!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुंबईतील युवकांना आश्वासनमुंबई : आम्ही मुंबई लोकलचे सगळे डबे वातानुकूलित करत आहोत. या लोकलचे सर्व दरवाजे आपोआप बंद होतील. त्यामुळे कोणीही लोंबकळत प्रवास करू शकणार नाही. मला इथे एक गोष्ट सांगायची आहे की, आम्ही मेट्रोइतकीच सुंदर लोकल ट्रेन मुंबईकरांना देणार आहोत. मात्र, ते करत असताना द्वितीय श्रेणी डब्याचे तिकीट एक रुपयानेही वाढवणार नाही. आताचा जो तिकीट दर आहे, त्याच दराने आम्ही मुंबईकरांना वातानुकूलित ट्रेनचे तिकीट देणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.रेल्वेमध्ये गर्दीची समस्या असून प्रवासी रेल्वेच्या दरवाजात उभे राहून लोंबकळत प्रवास करतात. मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा कायापालट होणार असल्याचे आश्वासन फडणवीस यांनी दिले.वॉटर टॅक्सीचे जाळे तयार करणारफडणवीस पुढे म्हणाले, ‘आम्ही मुंबईत वॉटर टॅक्सी सेवा देखील सुरू करत आहोत. मुंबई-अलिबाग रो-रोच्या धर्तीवर मुंबईत वॉटर टॅक्सी सुरू होतील. वॉटर टॅक्सीचे मोठे जाळे तयार केले जाणार आहे. त्यामुळे नवी मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर प्रवासी वॉटर टॅक्सीने गेट वे ऑफ इंडियाला जाऊ शकतात.’लोकलमधून दररोज ९० लाख लोकांचा प्रवासमुख्यमंत्री म्हणाले, ‘मुंबई उपनगरीय रेल्वे ही मुंबईकरांची लाइफलाइन आहे. दररोज ९० लाख लोक या लोकलने प्रवास करतात; परंतु लोकलमध्ये इतकी गर्दी असते की खरा मुंबईकरच या रेल्वेने प्रवास करू शकतो. बाहेरचा माणूस या लोकल ट्रेनमध्ये प्रवेश सुद्धा करू शकत नाही. या लोकलचा विकास करणे आवश्यक आहे. त्यामुळे आम्ही विचार केला की, सुंदर अशी मेट्रो मुंबईकरांना दिल्यानंतर आता लोकल रेल्वेचा कायापालट करणं आवश्यक आहे.’

फीड फीडबर्नर 25 Nov 2025 8:10 am

आज मंत्रिमंडळाची साप्ताहिक बैठक नाही

मुंबई : दर मंगळवारी होणारी मंत्रिमंडळाची साप्ताहिक बैठक २५ नोव्हेंबर रोजी होणार नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा ग्रामीण भागात उडालेला धुरळा व निवडणूक प्रचाराला जेमतेम पाच दिवसांचा कालावधी पाहता प्रचारसभांमध्ये कोणताही अडथळा येऊ नये यासाठी मंत्रिमंडळाची साप्ताहिक बैठक रद्द करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. सत्ताधारी महायुतीमधील तीनही पक्षांचे मंत्री प्रचारात सध्या व्यस्त आहेत. बैठकीकरता एक दिवस मुंबईत मंत्रालयात येणे व पुन्हा जाणे यामध्ये एक दिवसाचा कालावधी जाणार असल्याने ही बैठक रद्द करण्यात आली आहे.

फीड फीडबर्नर 25 Nov 2025 8:10 am

मुंबईतील कनेक्टिव्हिटीचे प्रकल्प युद्धपातळीवर पूर्ण करणार

आयआयएमयूएन आयोजित ‘युथ कनेक्ट’ कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादनमुंबई : मुंबईतील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी विविध पायाभूत प्रकल्पांची कामे आगामी पाच वर्षांत पूर्ण करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मुंबईच्या पूर्व-पश्चिम तसेच उत्तर-दक्षिण जोडणीला वेग देणार, अनेक महत्त्वाचे प्रकल्प युद्धपातळीवर पूर्ण करण्यात येणार आहेत.मुंबईतील वरळी डोम येथे इंडियाज् इंटरनॅशनल मूव्हमेंट टू युनाईट नेशन्स (आयआयएमयूएन) आयोजित ‘यूथ कनेक्ट’ कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. ते म्हणाले, सी-लिंकचा वर्सोवा-दहिसर-भाईंदरपर्यंत विस्तार, दहिसरकडील नवीन लिंक रोड, फ्री-फ्लो ब्रिजेस, तसेच विविध टनेल प्रकल्पांमुळे मुंबईतील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल. सध्या मुंबईतील ६० टक्के वाहतूक पश्चिम द्रुतगती मार्गावर असल्याने या क्षेत्राला पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहे.बीकेसी ते इतर भागांना जोडणारे बोगदे, नवीन लिंक रोड नेटवर्क, ओव्हर एक्स्प्रेसवे कनेक्शन आदी प्रकल्पांमुळे शहरातील प्रवासाचा सरासरी वेग मोठ्या प्रमाणात वाढेल. मुंबईत पूर्णत: बोगदे रस्ते तयार करण्यात येणार आहेत. पुढील पाच वर्षात मेट्रोचे संपूर्ण जाळे तयार होणार आहे. हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबईतील सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम आणि वापरण्यास सोपी बनेल. ‘मुंबई वन’ हा एकात्मिक मोबिलिटी अॅप नागरिकांसाठी वन-स्टॉप सोल्युशन असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.मुख्यमंत्री म्हणाले की, पालकांमध्ये खासगी शाळांविषयी आकर्षण वाढल्याने शासकीय व महानगरपालिका शाळांची संख्या कमी होत आहेत असे चित्र समोर आले. परंतु वास्तवात परिस्थिती बदलत आहे. महानगरपालिकांच्या शाळांना आंतरराष्ट्रीय मानकांपर्यंत नेण्याचा संकल्प असून मुंबई महानगरपालिकाकडे ती क्षमता आहे. शासकीय शाळांना योग्य प्रशिक्षण, अध्यापन पद्धती आणि पायाभूत सुविधा दिल्यास त्या खासगी शाळापेक्षा सरस ठरतील, असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.लोकशाही अधिक सक्षम आणि सर्व समावेशक करण्यासाठी युवांचा सहभाग अत्यावश्यक आहे. आजच्या लोकशाहीत युवा नागरिक फक्त दर्शक नसून स्वतःचे मत असलेले महत्त्वाचे स्टेकहोल्डर्स आहेत. युवांच्या मतांना स्थान दिल्याशिवाय लोकशाहीची प्रक्रिया पुढे जाऊ शकत नसल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, अनेक वर्षे मुंबईचे सांडपाणी थेट समुद्रात सोडले जात होते, मुंबईसारख्या महानगराचा १०० टक्के सीवेज समुद्रात टाकला जाणे योग्य नाही. त्यामुळे नियम तयार करून आता संपूर्ण मुंबईत सीवेज ट्रीटमेंट प्लांट्स उभारत आहोत. पुढील वर्षापर्यंत १०० टक्के ट्रीटेड पाणीच समुद्रात सोडले जाईल. त्याचबरोबर धारावीच्या पुनर्विकासात ३० टक्के क्षेत्र पूर्णपणे अनडेव्हलपेबल ठेवले जाणार असून त्यामुळे प्रचंड प्रमाणात ओपन आणि ग्रीन स्पेसेस निर्माण होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

फीड फीडबर्नर 25 Nov 2025 8:10 am

कस्तुरबा रुग्णालयात उभारणार १३० केव्हीचा सौर ऊर्जा प्रकल्प

दरवर्षी ११ लाख रुपयांची होणार बचतमुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने ऊर्जा बचतीच्या दृष्टिकोनातून पाऊल टाकून पर्यावरणपूरक विजेचा वापर करण्यासाठी सौर ऊर्जेचा वापर करण्यात येणार आहे. यासाठी कस्तुरबा रुग्णालयाच्या सौर ऊर्जा पॅनेल बसवण्यात येणार आहे. याठिकाणी १३० किलो व्हॅट क्षमतेचा हा प्रकल्प आहे. या सौर ऊर्जा प्रकल्पाव्दारे निर्माण होणाऱ्या विजेचा वापर रुग्णालय इमारतीच्या अंतर्गत वापरासाठी वापरली जाणार आहे. त्यामुळे रुग्णालयाच्या विद्युत बिलाच्या खर्चामध्ये बचत होणार आहे. सौर ऊर्जा प्रकल्पामधून वार्षिक सरासरी १.४०,००० युनिट्स इतकी विद्युत उर्जा निर्माण होवून वार्षिक ११ लाख २० हजार रुपयांची आर्थिक बचत होणार आहे.मुंबई महापालिकेच्या मालकीचे कस्तुरबा हे विशेष रुग्णालय आहे. सुमारे ५१५ खाटांचे हे आशिया खंडातील सर्वात मोठे संसर्गजन्य रोगावरील रुग्णालय आहे. या रुग्णालयामध्ये कावीळ, डेंग्यू, मलेरिया, गोवर, चिकनगुनिया इत्यादी आजारांवरील उपचार केले जातात. कस्तुरबा रुग्णालयात १४८ बेडची क्षमता असलेल्या इमारतीमध्ये पीसीआरलॅब, विलिगीकरण कक्ष, टीबीलॅब, यांचा समावेश आहे. या इमारतीचा एकूण विद्युत भार (कनेक्टेड लोड) ४५० केव्ही एवढा आहे. या इमारतीच्या छतावर सौर पॅनेल बसवण्यासाठी एकूण सुमारे ११४० चौ. भी. इतके क्षेत्रफळ उपलब्ध आहे.त्या अनुषंगाने छतावर सौर पॅनेल बसवून अंदाजे एकूण १३० केव्ही क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. या सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी विजय इंजिनिअरींग अँड मशिनरी कंपनीची निवड करण्यात आली आहे. येत्या सहा महिन्यांमध्ये हा प्रकल्प उभारला जाणार आहे. यासाठी सुमारे पावणे दोन कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. यांत्रिक आणि विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सौर ऊर्जा प्रकल्पामुळे वर्षाला १ लाख ४० हजार युनिट एवढी ऊर्जा निर्माण होवून रुग्णालयाच्या विजेच्या खर्चात वर्षाला ११ लाख २० हजार एवढी बचत अपेक्षित आहे.

फीड फीडबर्नर 25 Nov 2025 8:10 am

उत्तन - विरार सी लिंकचा विस्तार वाढवण बंदरापर्यंत

- एमएमआरमधील प्रवासाला येणार वेगमुंबई : महाराष्ट्र शासनाने उत्तन–विरार सी लिंक आणि तिचा वाढवण बंदरापर्यंत होणारा विस्तार मंजूर केला आहे. त्यामुळे दक्षिण मुंबई ते वसई, विरार, पालघर आणि देशातील होऊ घातलेल्या सर्वात मोठ्या खोल समुद्रातील बंदरापर्यंत १२० किमीचा पूर्णपणे प्रवेश-नियंत्रित, उच्च- गतीचा सागरी महामार्ग उभा राहणार आहे.मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) आता मोठ्या प्रवास क्रांतीच्या उंबरठ्यावर आहे. असा हाय-स्पीड किनारी मार्ग, जो प्रवास वेगवान करेल, सुरक्षितता वाढवेल आणि संपूर्ण प्रदेशाच्या विकासाला नवी चालना देईल.या कॉरिडॉरमुळे उत्तन–भाईंदर, वसई आणि विरार पट्ट्यातील विकासाला नवे दरवाजे उघडतील आणि स्थानिक नागरिकांसाठी मोठ्या संधी निर्माण होतील. सदर प्रस्ताव आता केंद्र सरकारकडे शिफारशीसाठी पाठवण्यात आला असून, या प्रकल्पाच्या माध्यमातून एमएमआरच्या सागरी विकास व कनेक्टिव्हिटीच्या नवा अध्यायाची सुरुवात झाली आहे.मुंबई–वाढवण एक्स्प्रेसवे कॉरिडॉर (एमव्हीईसी) मुंबईला तिच्या उत्तर आणि दूरच्या उपनगरांच्या अधिक जवळ आणेल तसेच लोक, उद्योग व मालवाहतूक यांना जोडणारे एक अखंड, जलद आणि आधुनिक नेटवर्क तयार करेल. या प्रकल्पाचा केंद्रबिंदू २४.३५ किमी लांबीचा उत्तन–विरार सी लिंक असून तो देशातील सर्वात लांब सेतू ठरणार आहे. ३० किमीहून अधिक कनेक्टर्स, ६ लेन्स, आपत्कालीन लेन, नेव्हिगेशन स्पॅन आणि अत्याधुनिक इंटेलिजेंट ट्रान्सपोर्ट सिस्टीम (आयटीएस) सह हा प्रकल्प वेग, सुरक्षितता आणि गतिशीलता लक्षात घेऊन उभारला जाणार आहे.मुंबई-वाढवण एक्स्प्रेसवे कॉरिडॉर पूर्ण झाल्यावर पश्चिम द्रुतगती महामार्ग, एसव्ही रोड आणि लिंक रोडवरील गर्दी मोठ्या प्रमाणावर कमी होईल. प्रवासाचा वेळ लक्षणीय घटेल. प्रदूषणात घट होईल. पर्यटन, घरकुल आणि पोर्ट-आधारित विकासाला नवी गती मिळेल. हजारो नवीन रोजगार निर्माण होतील.

फीड फीडबर्नर 25 Nov 2025 8:10 am

‘१० फूट उंच,२० फूट लांब…’आजपासून अयोध्येत फडकणार ‘रामध्वज’ ; पंतप्रधानांच्या हस्ते होणार ध्वजारोहण

Ram Temple Flag Hoisting। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्याला भेट देणार आहेत. ते आज श्री राम जन्मभूमी मंदिराच्या शिखरावर धर्मध्वज फडकवतील, ज्यामुळे त्याचे बांधकाम पूर्ण होईल. एका अधिकृत निवेदनानुसार, पंतप्रधान मंगळवारी सकाळी १० वाजता महर्षी वशिष्ठ, महर्षी विश्वामित्र, महर्षी अगस्त्य, महर्षी वाल्मिकी, देवी अहल्या, निषादराज गुहा आणि माता शबरी यांना समर्पित मंदिरे असलेल्या सप्तमंदिराला भेट […] The post ‘१० फूट उंच,२० फूट लांब…’आजपासून अयोध्येत फडकणार ‘रामध्वज’ ; पंतप्रधानांच्या हस्ते होणार ध्वजारोहण appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 25 Nov 2025 7:58 am

Pimpri : काँग्रेसला कधी सापडणार सूर? हाताला मिळेना साथ

– प्रकाश गायकर पिंपरी – महापालिका निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली आहे. असे असताना पिंपरी चिंचवड शहरातील काँग्रेस पक्षाची राजकीय परिस्थिती आणखीच चिंताजनक बनली आहे. इतर पक्षांनी निवडणुकीसाठी जौरबैठका सुरू केल्या असताना शहरातील काँग्रेस पक्षाची राजकीय परिस्थिती चिंताजनक बनली आहे. शहरात एकेकाळी भक्कम संघटनात्मक रचना, उत्साही पदाधिकारी आणि सक्रीय कार्यकर्त्यांचा ‘हात’ आज दिसेनासा झाला आहे. […] The post Pimpri : काँग्रेसला कधी सापडणार सूर? हाताला मिळेना साथ appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 25 Nov 2025 7:57 am

Pune News: जिल्हा परिषदेचा ‘मास्तरां’ना दणका! विद्यार्थ्यांची गुणवत्ता घसरली, ५ शिक्षकांना नोटीस

प्रभात वृत्तसेवा पुणे – जिल्हा परिषदेच्या वतीने ग्रामीण भागातील शाळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी मॉडेल स्कूल हा उपक्रम हाती घेतला आहे. याअंतर्गत जिल्ह्यांतील १५८ शाळांवर करडी नजर ठेवण्यात आली आहे. या शाळांमधील पाच शिक्षकांना विद्यार्थ्यांची गुणवत्ता घसरल्याने पुणे जिल्हा परिषदेकडून कारणे दाखवा नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी दिली. […] The post Pune News: जिल्हा परिषदेचा ‘मास्तरां’ना दणका! विद्यार्थ्यांची गुणवत्ता घसरली, ५ शिक्षकांना नोटीस appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 25 Nov 2025 7:45 am

नूर हुसैन भारताची 'सीमा हैदर' ठरेल का?:9 वर्षांचे प्रेम, लाहोरला पोहोचली आणि नंतर गायब झाली; पाक पोलिसांना संशय- रॉ एजंट तर नाही?

4 नोव्हेंबर 2025…भारतातून शिखांचा जत्था प्रकाश पर्व साजरा करण्यासाठी पाकिस्तानला गेला. या जत्थ्यात 1923 प्रवासी होते. ते अटारी-वाघा सीमेवरून पाकिस्तानात दाखल झाले. प्रवास फक्त 10 दिवसांचा होता. 13 नोव्हेंबरला सर्वांना पाकिस्तानमधून परत यायचे होते, पण फक्त 1922 लोकच परतले. जेव्हा इमिग्रेशन एक्झिट रेकॉर्ड्स तपासले गेले, तेव्हा जत्थ्यातून एक प्रवासी गायब असल्याचे आढळले. त्या 48 वर्षांच्या सरबजीत कौर होत्या. त्या पंजाबमधील कपूरथला येथील रहिवासी आहेत. त्यांच्या बेपत्ता झाल्याचे कळताच, भारतीय तपास यंत्रणांनी सरबजीतचे जुने रेकॉर्ड्स आणि पार्श्वभूमी तपासण्यास सुरुवात केली. त्यांच्या बेपत्ता होण्याचे कारण शोधायचे होते. तेव्हाच पाकिस्तानमधून बातमी आली की सरबजीतने लाहोरजवळच्या शेखपुरा येथील रहिवासी नासिर हुसैनसोबत लग्न केले आहे. एका व्हिडिओमध्ये सरबजीतचा कबुलीजबाबही आला, ज्यात तिने सांगितले आहे की ती नासिरला 9 वर्षांपासून ओळखते. तिने इस्लाम धर्म स्वीकारून त्याच्याशी निकाह केला आहे. तिचे नवीन नाव नूर हुसैन आहे. पाकिस्तान पोलिसांना संशय आहे की सरबजीत गुप्तहेर किंवा गुप्त एजंट तर नाही ना. यापूर्वी 2023 मध्ये पाकिस्तानची सीमा हैदर आपल्या प्रेमासाठी चार मुलांसह बेकायदेशीर मार्गाने भारतात आली होती. तिने धर्म बदलून ग्रेटर नोएडा येथील सचिन मीणाशी लग्न केले आणि तेव्हापासून ती भारतातच राहत आहे. आता प्रश्न असा आहे की, सरबजीतचे तीर्थयात्रेच्या बहाण्याने पाकिस्तानात जाणे हा एक पूर्वनियोजित कट होता का, तिची नासिरशी कधी आणि कशी ओळख झाली. पाकिस्तानपर्यंत पोहोचण्यासाठी तिला कोणी मदत केली. दैनिक भास्करने सरबजीतच्या गावकऱ्यांशी संवाद साधला. तसेच पाकिस्तानी पत्रकार, नासिरचे गावकरी आणि वकिलांशी बोलून प्रकरण समजून घेतले. वाचा संपूर्ण अहवाल… आई पाकिस्तानला गेली, आता दोन्ही मुलांची पोलीस चौकशी करत आहेतसर्वात आधी आम्ही पंजाबमधील अमानीपूर गावात सरबजीतच्या कुटुंबाशी आणि गावकऱ्यांशी बोललो. तिचे पहिले पती सुमारे दोन दशकांपूर्वी कामाच्या निमित्ताने कॅनडाला गेले आणि तिथेच स्थायिक झाले. सरबजीतला दोन मुले आहेत. पतीपासून घटस्फोट घेतल्यानंतर ती दोघांसोबत काही काळ मुक्तसर साहिबमध्ये राहिली. नंतर दोघेही कपूरथला येथील अमानीपूरमध्ये त्यांच्या आजी-आजोबांकडे वाढले. आता दोघांचीही लग्ने झाली आहेत आणि दोघांनाही प्रत्येकी एक मुलगी आहे. आम्ही सरबजीतच्या मुलांशी बोलण्याचा प्रयत्न केला पण त्यांना माध्यमांशी बोलायचे नाही. ते त्यांच्या आईबद्दलच्या बातम्यांमुळे त्रस्त आहेत. पंजाब पोलिसांमधील आमच्या सूत्रांनी सांगितले की, जेव्हा सरबजीतने पाकिस्तानात लग्न केल्याची बातमी आली, तेव्हापासून पोलीस दररोज तिच्या दोन्ही मुलांची सरबजीतबद्दल चौकशी करत आहेत. पोलीस हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत की सरबजीत किती वर्षांपासून पाकिस्तानी व्यक्तीच्या संपर्कात होती. तिने तिथे जाऊन लग्न करण्याचा निर्णय कधी घेतला. अमानीपूर गावाचे सरपंच अर्जन सिंग सांगतात, ‘मी गेल्या 20 वर्षांत सरबजीतच्या पतीला कधीही पाहिले नाही. यापूर्वी त्यांच्या दोन्ही मुलांच्या काही वादाची प्रकरणे समोर आली होती, पण गेल्या काही वर्षांपासून सर्व काही चांगले सुरू होते.’ सरबजीतला पाकिस्तानात पाठवले होतेपाकिस्तानमधून जत्था परतल्यानंतर सरबजीतच्या अनुपस्थितीची माहिती मिळाली. तेव्हाच जत्था प्रमुख बीबी गुरिंदर कौर यांनी सुलतानपूर लोधीच्या SGPC सदस्य बीबी गुरप्रीत कौर रूही यांना कळवले होते. गुरप्रीत कौर यांनीच सरबजीतच्या प्रवासाची शिफारस केली होती. गुरुप्रीत कौर यांनी सांगितले, 'सरबजीतने आपला पासपोर्ट गुरुद्वारात जमा केला होता आणि त्यांचा व्हिसा ठरलेल्या प्रक्रियेनुसारच झाला होता. आमच्याकडे जे भाविक जात आहेत, त्यांची कोणतीही पडताळणी प्रक्रिया नाही. आम्ही गावकर्‍यांना विचारूनच त्यांची पार्श्वभूमी तपासतो.' 'जेव्हा आम्हाला कळले की जथ्यातून सरबजीत कौर बेपत्ता आहेत. तेव्हा दुसऱ्या दिवशी सकाळी मी सरबजीतच्या अमानीपूर गावात जाऊन तपास केला. आम्ही गावातील सरपंच अर्जन सिंह यांच्या घरी जाऊनही चौकशी केली पण काहीही माहिती मिळाली नाही. यानंतर आम्ही सरबजीतच्या घरी पोहोचलो. त्यांच्या मुलांना त्यांच्या बेपत्ता झाल्याबद्दल सांगितले.' या घटनेनंतर शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीने ठरवले आहे की, आतापासून ते एकट्या किंवा घटस्फोटित महिलेला पाकिस्तान जत्थेदारीसाठी जाण्याची परवानगी देणार नाहीत. सरबजीतची कबुली - नासिरवर प्रेम, विचारपूर्वक लग्न केलेपाकिस्तानी मीडियानुसार, सरबजीत कौरने 4 नोव्हेंबर रोजी पाकिस्तानात पोहोचल्यानंतर शेखपुरा येथील नासिर हुसैनशी संपर्क साधला. त्यानंतर तिने शेखपुरा येथील मॅजिस्ट्रेट कोर्टात हजर राहून साक्ष दिली की, तिने नासिरसोबत स्वतःच्या इच्छेने लग्न केले आहे आणि इस्लाम स्वीकारला आहे. यासाठी तिच्यावर कोणताही दबाव नव्हता. पाकिस्तानच्या कोर्ट रेकॉर्डनुसार, इस्लाम स्वीकारल्यानंतर सरबजीतने तिचे नाव नूर ठेवले आहे. त्यांच्या लग्नाचा 18 सेकंदांचा व्हिडिओ सोशल मीडियावर आणि पाकिस्तानी मीडिया चॅनेलवर आला. यातही सरबजीत या सर्व गोष्टी मान्य करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये सरबजीत म्हणत आहे, 'मी नासिरवर प्रेम करते आणि त्यांना गेल्या 9 वर्षांपासून ओळखते. मी घटस्फोटित आहे आणि त्यांच्याशी विचारपूर्वक लग्न करत आहे.' नासिर हुसैन हा पाकिस्तानच्या पंजाबमधील शेखपुरा जिल्ह्यातील हाल मुकीन गावाचा रहिवासी आहे. तो मजुरी करत असे आणि कामासाठी सौदी अरेबियात राहून आला आहे. गावात त्याचे एक छोटेसे घर आहे. गावकऱ्यांनी सांगितले की त्यांनाही लग्नाची बातमी सोशल मीडिया आणि वर्तमानपत्रांमधूनच कळली. गावकऱ्यांचे म्हणणे आहे की, नासिरने शीख जत्थ्यासोबत आलेल्या महिलेशी लग्न करून चुकीचे काम केले. हे सर्व घडल्यापासून गावकरी आणि आजूबाजूचे लोक त्रस्त आहेत. गावात पोलिसांची ये-जा सुरू आहे. नासिरचे कुटुंब कुठे आहे? यावर त्यांनी सांगितले की, लग्नाची बातमी आल्यापासूनच घराला कुलूप आहे आणि कुटुंब गावातून गायब आहे. पोलीस गावात आले होते आणि नासिरच्या घराचा दरवाजा तोडून झडतीही घेतली. गावकऱ्यांनी सांगितले की, नासिरची प्रेमकहाणी सुमारे 8 वर्षांपूर्वीची आहे. त्याची पहिली पत्नी गावात त्याच्यासोबतच राहत होती. तिच्यापासून नासिरला तीन मुले आहेत. नासिरच्या मुलाने आपल्या मित्राला सांगितलेही होते की, त्याच्या वडिलांच्या लग्नाची चर्चा सुरू आहे. वकील म्हणाले- कायदेशीर मदतीसाठी नासिरने आधीच फी भरली होती यानंतर आम्ही सरबजीत आणि नासिरचे लग्न लावून देणारे पाकिस्तानी वकील अहमद हसन पाशा यांच्याशी बोललो. ते सांगतात, 'नासिर माझ्याकडे निकाहच्या काही दिवसांपूर्वी आला होता. तेव्हा त्याने सांगितले होते की दुसऱ्या देशात त्याची एक मैत्रीण आहे, जिला पाकिस्तानात कायदेशीर मदत मिळवून द्यायची आहे. मी त्याला माझी फी सांगितली आणि तेव्हाच त्याने फीची रक्कमही दिली होती. मी त्याला कायदेशीर मदतीसाठी लागणारी कागदपत्रे सांगितली आणि ती सर्व गोळा करण्यास सांगितले.' पाशाने पुढे सांगितले, ‘यानंतर नासिर थेट 5 नोव्हेंबरला सरबजीत कौरला घेऊन माझ्या चेंबरमध्ये पोहोचला. सरबजीतची माझ्याशी ओळख करून देताना त्याने सांगितले की ती भारतातून आली आहे. यानंतर आमच्या कायदेशीर मदतीसाठी चर्चा झाली. नासिरने हे देखील सांगितले की दोघांची ओळख सोशल मीडियाद्वारे झाली आणि ते एकमेकांना 9 वर्षांपासून ओळखतात. दोघांना लग्न करायचे आहे.’ वकिलाने पुढे सांगितले, ‘मला क्लायंटला पाकिस्तानी कायद्यानुसार कायदेशीर मदत करायची होती. मी नासिरला सरबजीतबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी विचारल्या आणि केस तयार करण्यासाठी आवश्यक असलेले कागदपत्रे मागितले.’ पाकिस्तानमध्ये सरबजीत शेखपुरापर्यंत कशी पोहोचली? यावर पाशा म्हणतात, ‘एक दिवसापूर्वी, 4 नोव्हेंबर रोजीच भारतातून शीख यात्रेकरूंचा जत्था पाकिस्तानात पोहोचला होता. सरबजीत त्याच जथ्यात आली होती. शक्यता आहे की, शीख यात्रेकरूंचा समूह ननकाना साहिबला पोहोचला असताना, सरबजीत जथ्यातून बाहेर पडून नासिरला भेटली असेल.‘ पाकिस्तान पोलिसांना संशय, सरबजीत गुप्तहेर तर नाही नासरबजीतच्या लग्नाची माहिती मिळाल्यानंतर पाकिस्तानची पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा सक्रिय झाली आहे. सूत्रांनुसार, सरबजीत पाकिस्तानात भारतीय गुप्तहेर म्हणून तर पोहोचली नाही ना, असा पोलिसांना संशय आहे. यादरम्यान पोलिसांनी अनेक ठिकाणी छापे टाकले, ज्यामुळे या प्रेमयुगुलाला त्रासही सहन करावा लागला. आम्ही या संदर्भात पाकिस्तानमधील शेखपुरा येथील एका पत्रकाराशीही बोललो. तेही लग्नाच्या बातमीला दुजोरा देतात. नाव न छापण्याच्या अटीवर ते सांगतात, ‘मी नासिर आणि सरबजीतचे लग्न लावून देणाऱ्या आणि कोर्टात अर्ज दाखल करणाऱ्या वकिलाशी बोललो. तसेच पाकिस्तानच्या पंजाब पोलिसांच्या अधिकाऱ्यांशीही बोललो आहे. सरबजीत कौर उर्फ नूर हुसैनने न्यायिक दंडाधिकारी शहबाज हसन राणा यांच्यासमोर सांगितले आहे की, ती पती नासिर हुसैनसोबत राहू इच्छिते.’ सुरुवातीला पोलिसांना सरबजीत भारताची गुप्तहेर असल्याचा संशय होता. या आधारावर तपासही करण्यात आला. पोलिसांच्या तपासणीमुळे आणि छापेमारीमुळे त्रस्त होऊन जोडपे उच्च न्यायालयात गेले. पोलिसांच्या त्रासाला कंटाळून जोडपे लाहोर उच्च न्यायालयात पोहोचलेपाकिस्तानची पंजाब पोलीस सरबजीत आणि नासिरचा सतत शोध घेत आहे. सध्या दोघेही बेपत्ता आहेत. 18 नोव्हेंबर रोजी जोडप्याने पाकिस्तानच्या लाहोर उच्च न्यायालयाचे दार ठोठावले. दोघांनी तक्रार केली की, लग्न केल्यामुळे पोलिस जोडप्याला त्रास देत आहेत. पोलिसांनी त्यांच्यावर लग्न मोडण्यासाठी दबावही आणला. तसेच, दोघांना शोधण्यासाठी शेखपुरा येथील फर्रुखाबादमध्ये बेकायदेशीरपणे छापेमारीही केली. या जोडप्याने न्यायालयात जी याचिका दाखल केली होती, त्यात सरबजीत कौरने लिहिले होते- ‘माझे पती पाकिस्तानी नागरिक आहेत आणि मी पाकिस्तानचे नागरिकत्व मिळवण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आहे.’ यानंतर लाहोर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती फारुख हैदर यांनी पोलिसांना आदेश दिले की, या विवाहित जोडप्याला त्रास देऊ नये.

दिव्यमराठी भास्कर 25 Nov 2025 7:38 am

Pune News: निवडणूक आयोगाच्या सॉफ्टवेअरने केला ‘घोळ’? प्रभागनिहाय यादीचा बोजवारा; अधिकाऱ्यांनी केले हात वर

प्रभात वृत्तसेवा पुणे : प्रारूप मतदार यादी तयार करताना निवडणूक आयोगाच्या सॉफ्टवेअरमध्ये सेक्शन चार्टची नावे चुकीची नोंदवल्यामुळे मतदारांची पळवापळवी झाल्याचा आरोप उमेदवार आणि कार्यकर्ते करत आहेत. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी मात्र ही चूक आयोगाच्या सॉफ्टवेअरमधील असल्याचे सांगत हा गोंधळ आयोगाच्या माथी मारला आहे.पालिकेने निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी जाहीर केली आहे. यादीवर एकत्रितपणे हरकत नोंदविण्यावर […] The post Pune News: निवडणूक आयोगाच्या सॉफ्टवेअरने केला ‘घोळ’? प्रभागनिहाय यादीचा बोजवारा; अधिकाऱ्यांनी केले हात वर appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 25 Nov 2025 7:30 am

Pune News : हद्द कायम केली नाही तर मोजणी थेट रद्द! भूमी अभिलेख विभागाचा ७०० प्रकरणांना अंतिम इशारा

प्रभात वृत्तसेवा पुणे – गेल्या सहा महिन्यांत वहिवाटीनुसार मोजणी केलेल्यांना हद्द कायमची मोजणी करून घेण्यासाठी भूमी अभिलेख विभागाने जिल्ह्यातील १ हजार ४०० प्रकरणांमध्ये संधी दिली होती. यातील फक्त ७०० जणांनीच हद्द कायमची मोजणी करून घेतली आहे. उर्वरित ७०० जणांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसते. यामुळे या ७०० प्रकरणांतील वहिवाट मोजणीचे नकाशे रद्द करण्याची कारवाई होणार असल्याचे […] The post Pune News : हद्द कायम केली नाही तर मोजणी थेट रद्द! भूमी अभिलेख विभागाचा ७०० प्रकरणांना अंतिम इशारा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 25 Nov 2025 7:15 am

आजचे एक्सप्लेनर:एका बटणाने राम मंदिरावर ध्वज कसा फडकवला जाईल, वादळ-पावसाने काहीही होणार नाही; त्यावरील वृक्षाची खास कहाणी

राम मंदिराच्या उद्घाटनानंतर ६७३ दिवसांनी, आता शिखरावर ध्वज फडकवण्याची तयारी आहे. २५ नोव्हेंबर रोजी दुपारी, पंतप्रधान मोदींनी बटण दाबताच, २ किलोचा भगवा ध्वज जमिनीपासून २०० फूट उंच होईल आणि फडकू लागेल. तो ४ किलोमीटर अंतरावरूनही दिसेल. तीव्र वादळातही तो सुरक्षित राहील.त्यावर कोरलेल्या सूर्य, ओम आणि कोविदार वृक्षाच्याही स्वतःच्या कथा आहेत. राम मंदिरात ध्वजारोहणाशी संबंधित सर्व महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे, जाणून घ्या... प्रश्न-1: राम मंदिरावर धार्मिक ध्वज का फडकवला जात आहे? उत्तर: कोणत्याही मंदिरावर ध्वज फडकवणे, हे दर्शवते की त्याचे बांधकाम आता पूर्ण झाले आहे. 22 जानेवारी 2024 रोजी जेव्हा राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा झाली होती, त्यावेळी मंदिराच्या शिखरासह अनेक बांधकाम कार्ये पूर्ण झाली नव्हती. त्यामुळे त्यावेळी मंदिरावर ध्वज फडकवण्यात आला नव्हता. श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा म्हणाले, ‘ध्वजारोहण हा केवळ एक उत्सव नाही, तर जगभरातील रामभक्तांसाठी हा संदेश आहे की राम मंदिराचे बांधकाम आता पूर्ण झाले आहे.’ बीएचयूचे ज्योतिषी प्रा. विनय कुमार पांडे सांगतात, ‘कोणत्याही मंदिराच्या शिखरावर ध्वज स्थापित करण्याचे गहन धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे. मंदिरावर फडकणारा ध्वज दिव्य शक्ती सक्रिय झाल्याचे संकेत देतो. ध्वजाशिवाय कोणतेही मंदिर पूर्ण मानले जात नाही.’ वाराणसीचे पंडित गजानन ज्योतकर सांगतात, 'मंदिराचा प्रत्येक भाग देवाच्या शरीराच्या अवयवांसारखा असतो. मंदिराची पहिली पायरी देवाचे पाय, गर्भगृह उदर म्हणजे पोट, खांब बाहू आणि शिखर डोळे असतात. त्याचप्रमाणे मंदिराचा ध्वज देवाचे केस असतात. म्हणून, संपूर्ण मंदिर बांधल्यानंतर शेवटी केश रुपी ध्वज लावला जातो.' प्रश्न-2: राम मंदिर आता पूर्णपणे तयार झाले आहे? उत्तर: 27 ऑक्टोबर रोजी राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने सोशल मीडियावर सांगितले की भगवान रामाचे मुख्य मंदिर आणि परिसरातील इतर 6 मंदिरांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. ही मंदिरे भगवान शिव, भगवान गणेश, भगवान हनुमान, सूर्यदेव, देवी भगवती, देवी अन्नपूर्णा आणि शेषावतार यांची आहेत. संत तुलसीदास मंदिर आणि 7 मंडप देखील तयार झाले आहेत. ट्रस्टनुसार, दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांच्या व्यवस्थेशी संबंधित सर्व कामे पूर्ण झाली आहेत. काही प्रशासकीय व्यवस्थेशी संबंधित कामे अजूनही सुरू आहेत. जसे की- 3.5 किमीची सीमा भिंत बांधणे, ट्रस्टचे कार्यालय, गेस्ट हाऊस, ऑडिटोरियम, झिरो डिस्चार्ज सीवेज कंट्रोल सिस्टम बसवणे. ती देखील डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण केली जातील. प्रश्न-3: राम मंदिरावर फडकणारा ध्वज कसा दिसतो? उत्तर: श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांच्या माहितीनुसार, ध्वज केशरी रंगाचा असेल, ज्यावर सूर्याचे चिन्ह अंकित असेल. सूर्याच्या मध्यभागी 'ॐ' लिहिलेले असेल. त्याचबरोबर कोविदार वृक्षाचे चित्रही असेल. राम मंदिराचा ध्वज अहमदाबादच्या कश्यप मेवाडा आणि त्यांच्या कारागिरांनी बनवला आहे. कश्यप मेवाडा सांगतात, ‘ते बनवण्यासाठी 25 दिवस लागले. ते तीन-स्तरीय कपड्यापासून बनवले आहे. कडांवर गोल्डन फॅब्रिक लावले आहे आणि आत अस्तरही लावले आहे. वर रेशमी कपड्याचा वापर केला आहे. जी काही चिन्हे बनवली आहेत, ते सर्व हाताने केलेले काम आहे. चिन्हे बनवण्यासाठीच 7-8 दिवस लागले.’ प्रश्न-4: ध्वजावर सूर्य, ॐ आणि कोविदार वृक्षच का बनवले आहे? उत्तर: भगवान राम सूर्यवंशी होते, त्यामुळे ध्वजावर सूर्य बनवण्यात आला आहे. BHU च्या ज्योतिष विभागाचे प्रोफेसर विनय कुमार पांडे सांगतात की ॐ ब्रह्मांडातील सर्वात शक्तिशाली आणि पवित्र मंत्र मानला जातो. सूर्यासोबत त्याचा अर्थ होतो - सृष्टी, ऊर्जा आणि दिव्यता यांचे एकत्र येणे. कोविदार वृक्षाची कथा अधिक रंजक आहे… पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या प्रेस रिलीजमध्ये लिहिले आहे की, ‘10 फूट उंच आणि 20 फूट लांब या समकोन त्रिकोणी ध्वजावर तेजस्वी सूर्याचे चिन्ह बनले आहे, जे भगवान श्रीराम यांच्या प्रकाशमानता आणि पराक्रमाचे प्रतीक आहे. सूर्याच्या मध्यभागी 'ॐ' अंकित आहे आणि सोबतच कोविदार वृक्षाचे चित्र देखील. हा पवित्र भगवा ध्वज प्रतिष्ठा, एकता आणि सांस्कृतिक सातत्याचा संदेश देतो आणि रामराज्याच्या आदर्शांना साकार करतो.’ वादळ आणि पावसाचाही राम मंदिराच्या झेंड्यावर कोणताही परिणाम नाही राम मंदिराचे शिखर: १६१ फूटध्वजस्तंभ: ४२ फूटध्वजाची उंची: १० फूटध्वजाची लांबी: २० फूट प्रश्न-5: 200 फूट उंचीवर एवढा जड ध्वज चढवण्यात आणि उतरवण्यात कसा येईल? उत्तर: ध्वज चढवण्यासाठी आणि उतरवण्यासाठी एक ऑटोमॅटिक फ्लॅग होस्टिंग सिस्टीम तयार करण्यात आली आहे, ज्याद्वारे फक्त एक बटण दाबून तो वर चढवता येईल. त्याच सिस्टीमने खालीही उतरवता येईल. ऑलिम्पिक आणि कॉमनवेल्थसारख्या अनेक खेळांमध्ये या सिस्टीमचा वापर केला जातो. वायुसेनेच्या हेलिकॉप्टरच्या मदतीने ही सिस्टीम आधीच ध्वजस्तंभावर स्थापित करण्यात आली आहे. बटण दाबल्यावर १० सेकंदात ध्वज आपोआप फडकेल ध्वज फडकवणे आणि उतरवणे यीची संपूर्ण प्रक्रिया आधीच सेट केलेली आहे, त्यामुळे पुजाऱ्यांना आत जाण्याची गरज नाही. त्यासाठी फक्त १० सेकंद लागतीत... १: बटण दाबताच, खांबावर बसवलेली मोटर सुरू होईल आणि त्याला जोडलेला ड्रम फिरू लागेल. २:ड्रमपासून खांबाच्या टोकापर्यंत एक केबल जाईल, जी ध्वजाला वरच्या दिशेने ढकलेल. ३: खांबाच्या वरच्या बाजूला एक सेन्सर असेल. जर ध्वज त्यावर आदळला तर मोटर थांबेल आणि ध्वज जागीच राहील. ४:हा ध्वज वरच्या बाजूला असलेल्या ३६० अंश फिरणाऱ्या क्लॅम्पमध्ये फडकेल. जोरदार वाऱ्यात तो अडकणार नाही. 200 फूट उंचीवर लावलेला ध्वज किती दूरून दिसू शकतो हे जाणून घेण्यासाठी आम्ही होरायझन डिस्टन्स म्हणजेच क्षितिज अंतर मोजण्याच्या फॉर्म्युल्याचा वापर केला, जो आहे √2Rh, ज्यामध्ये R पृथ्वीची त्रिज्या 6371 किमी आहे आणि h ध्वजाची उंची 200 फूट किंवा 0.061 किमी आहे. तो फॉर्म्युल्यावर ठेवल्यास... √2_6,371_0.061 होते 27.8 किमी तथापि, धुके, परिसरातील असंख्य इमारती आणि इतर नैसर्गिक कारणांमुळे, राम मंदिरावरील ध्वज नेहमीच २७ किमी अंतरावरून दिसत नाही. अयोध्येतील दैनिक भास्करच्या वृत्तानुसार, ध्वज किमान ४ किमी अंतरावरून दिसू शकतो. प्रश्न-6: ध्वजारोहणात कोणते अनुष्ठान सुरू आहेत, पंतप्रधान मोदी काय-काय करतील? उत्तर: अयोध्यामध्ये ध्वजारोहणासाठी गेल्या अनेक दिवसांपासून अनुष्ठान सुरू आहेत. 20 नोव्हेंबर रोजी 501 कलशांची भव्य यात्रा काढण्यात आली. 21 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबरपर्यंत यज्ञशाळेत कलश पूजन, वेदी आणि यज्ञ झाला. जो काशी, अयोध्या आणि दक्षिण भारतातून आलेल्या 108 पंडितांनी संपन्न केला. 25 नोव्हेंबर रोजी सकाळी हवन पूजन आणि ध्वज पूजन होईल. ध्वजारोहणाची वेळ दुपारी अभिजीत मुहूर्तानुसार ठेवण्यात आली आहे, जो श्रीराम आणि माता सीतेच्या विवाह पंचमीशी संबंधित शुभ वेळ आहे. 25 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान मोदींचा कार्यक्रम... सकाळी 10 वाजता: पंतप्रधान सप्तमंदिरात जातील. यानंतर शेषावतार मंदिराचे दर्शन घेतील.सकाळी 11 वाजता: माता अन्नपूर्णा मंदिरात दर्शन. नंतर राम दरबार गर्भगृह आणि रामलला गर्भगृहात पूजा.दुपारी 12 वाजता: श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या शिखरावर भगवा ध्वज फडकवतील. यानंतर पंतप्रधान जनसभेला संबोधित करतील. 25 नोव्हेंबर रोजीच कनक भवन, मणिरामदास छावणी, रामवल्लभाकुंज, रंगमहाल, जानकी महाल, श्रीरामहर्षण कुंज, लक्ष्मण किल्ला यासह 12 मंदिरांमधून प्रभूंच्या शोभायात्रा संपूर्ण अयोध्येत काढण्यात येतील. जी शोभायात्रा ज्या मंदिरातून सुरू होईल, तिथेच येऊन पूर्ण होईल.

दिव्यमराठी भास्कर 25 Nov 2025 7:03 am

Pune Crime : ‘कट्टा संस्कृती’रुजवणारी टोळी कोण? पोलिसांच्या तपासात आंदेकर गँगचे ‘उमरटी कनेक्शन’उघड

प्रभात वृत्तसेवा पुणे – मध्य प्रदेशातील उमरटीमधील शस्त्र निर्मीती कारखाने उधवस्त केल्यानंतर शहरातील गुन्हेगारी टोळ्या आणि उमरटीचे दररोज नव नवे कनेक्शन समोर येत आहे. उमरटीतून सर्वाधिक गावठी कट्टे खरेदी आंदेकर टोळीने केल्याचे निष्पन्न झाले आहे. या शस्त्रांचा वापर करण्याबरोबरच त्याची विक्रीही टोळीने केली आहे. यामुळे उमरटी शस्त्र तस्करी प्रकरणी आंदेकर टोळीवर गुन्हा दाखल होणार आहे. […] The post Pune Crime : ‘कट्टा संस्कृती’ रुजवणारी टोळी कोण? पोलिसांच्या तपासात आंदेकर गँगचे ‘उमरटी कनेक्शन’ उघड appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 25 Nov 2025 7:00 am

गरीब घरातील पत्नीला शिकवलं, नोकरी लावली पण..मूकबधिर पतीच्या घटस्फोटाची ही कहाणी वाचून डोळे पाणावतील

प्रभात वृत्तसेवा पुणे – सरकारी नोकरदार असलेल्या मुकबधिर तरुणाने गरीब घरातील मुलीशी लग्नगाठ बांधत तिला उच्चशिक्षित करीत सरकारी नोकरी लावली. दोघांनी मिळून संसार उभा करीत दोन मुलांना वाढवले. मात्र, सुखी संसाराच्या २० वर्षांनंतर नात्यात संशय वाढू लागला आणि एमेकांविरोधातील वाढलेल्या मतभेदांनी त्यांचे आयुष्य वेगवेगळ्या वळणांवर येऊन उभे केले. कौटुंबिक न्यायालयातील चार मध्यस्थी सत्रांनंतरही समेटाचा तो […] The post गरीब घरातील पत्नीला शिकवलं, नोकरी लावली पण..मूकबधिर पतीच्या घटस्फोटाची ही कहाणी वाचून डोळे पाणावतील appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 25 Nov 2025 6:45 am

बापरे! चिकन आणि पनीरपेक्षाही महाग झाला शेवगा; १ किलोचा दर वाचून डोळे फिरतील

प्रभात वृत्तसेवा पुणे – तिखट भाजी, सूप पासून आंबट-गोड सांबारमध्ये वापरल्या जाणारा शेवगा सध्या चांगलाच भाव खात आहे. राज्यातील शेवग्याचा हंगाम संपला असून परराज्यातून तुरळक स्वरुपात शेवगा मार्केट यार्डात दाखल होत आहे. थंडीची चाहूल लागताच सुप तसेच भाजी, सांबार तयार करण्यासाठी घरगुती ग्राहकांसह हॉटेलचालकांकडून जास्त मागणी होऊ लागल्याने शेवग्याचे भाव कडाडले आहेत. शहरात शेवग्याचा किलोचा […] The post बापरे! चिकन आणि पनीरपेक्षाही महाग झाला शेवगा; १ किलोचा दर वाचून डोळे फिरतील appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 25 Nov 2025 6:30 am

श्रद्धांजली : सिनेजगतातील एका युगाचा अस्त

– मानवेंद्र उपाध्याय सिनेसृष्टीतील जुन्या नायकांच्या मांदियाळीमध्ये आपला स्वतंत्र ठसा उमटवून चार दशकांहून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अभिनेते धर्मेंद्र यांनी जगाचा निरोप घेतला. भारतीय चित्रपटसृष्टीच्या सुवर्णयुगात काही चेहरे असे उदयास आले ज्यांनी पडद्याबरोबरच कोट्यवधी लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. ही किमया साध्य झालेल्या सुपरस्टारपैकी एक म्हणजे ज्येष्ठ अभिनेते धर्मेेंद्र. भारतीय सिनेमाचे ‘ही-मॅन’ म्हणून सन्मानाने […] The post श्रद्धांजली : सिनेजगतातील एका युगाचा अस्त appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 25 Nov 2025 6:26 am

सावधान! बिबट्याचे AI फोटो व्हायरल करताय? थेट जेलमध्ये जाल; वनविभागाचा कडक इशारा

प्रभात वृत्तसेवा पुणे – लोहगाव विमानतळ आणि औंध परिसरात दिसलेला बिबट्याने पुन्हा दर्शन दिले नसल्याचे वनविभागाने स्पष्ट केले. बिबट्याचा थर्मल ड्रोनच्या मदतीने शोध सुरू असून नागरिकांनी सतर्क रहावे असा इशारा वनविभागाने दिला आहे. विमानतळ परिसरात वनविभाग आणि हवाईदलाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी सकाळी संयुक्त पाहणी केली. रविवारी रात्री वन विभागाचे कर्मचारी आणि रेस्क्यू टीमने जेथे बिबट्या असू […] The post सावधान! बिबट्याचे AI फोटो व्हायरल करताय? थेट जेलमध्ये जाल; वनविभागाचा कडक इशारा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 25 Nov 2025 6:20 am

पुणेकरांनो सावधान! नवले पुलावरून जाताना ‘ही’चूक पडेल महागात; आजपासून नवीन नियम लागू

प्रभात वृत्तसेवा पुणे – पुणे शहर वाहतूक विभाग हद्दीतील कात्रज बाह्यवळण मार्गावरील कात्रज नवीन बोगदा ते नवले ब्रीजदरम्यान वारंवार होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक विभागाकडून नवीन आदेश जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाकडून प्राप्त अधिकाराचा वापर करून पोलीस उपआयुक्त (वाहतूक) हिम्मत जाधव यांनी दिलेल्या आदेशानुसार कात्रज बायपासवरील भूमकर ब्रीज ते नवले ब्रीज […] The post पुणेकरांनो सावधान! नवले पुलावरून जाताना ‘ही’ चूक पडेल महागात; आजपासून नवीन नियम लागू appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 25 Nov 2025 6:15 am

PMC News: महापालिकेला राज्य सरकारचा मोठा धक्का! होर्डिंग्ज शुल्काबाबतचा ‘तो’वादग्रस्त निर्णय अखेर रद्द

प्रभात वृत्तसेवा पुणे : शहरातील जाहिरात फलका (होर्डिंग्ज)च्या परवानगी शुल्काच्या दरवाढीसाठी महापालिकेने डिसेंबर २०२२ मध्ये मंजूर केलेला ठराव नगरविकास मंत्रालयाने रद्द केला आहे. जाहिरात फलकांसाठी महापालिकेने किती व कसे शुल्क आकारावे यासाठी मे २०२२ मध्ये नियमावली तयार केली आहे. या नियमावलीतील तरतुदींशी ही दरवाढ सुसंगत नसल्याचे सांगत शासनाने हा ठराव रद्द करत पालिकेस धक्का दिला […] The post PMC News: महापालिकेला राज्य सरकारचा मोठा धक्का! होर्डिंग्ज शुल्काबाबतचा ‘तो’ वादग्रस्त निर्णय अखेर रद्द appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 25 Nov 2025 6:00 am

Pune News : मोहोळांचा वाढदिवस ठरला ‘जीवनदान’! ५६ शिबिरांतून १० हजार ३३८ रक्तपिशव्यांचा विक्रम

प्रभात वृत्तसेवा पुणे – शहरात रक्ताचा तुटवडा गंभीर होत असताना पुणेकरांनी पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकीचे उत्कृष्ट उदाहरण दाखविले. खासदार आणि केंद्रीय सहकार व नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील ५६ रक्तदान शिबिरांमधून तब्बल १० हजार ३३८ रक्तपिशव्यांचे विक्रमी संकलन करण्यात आले. दरवर्षीच्या या महाअभियानाला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादाबद्दल मोहोळ यांनी कृतज्ञता व्यक्त केली. […] The post Pune News : मोहोळांचा वाढदिवस ठरला ‘जीवनदान’! ५६ शिबिरांतून १० हजार ३३८ रक्तपिशव्यांचा विक्रम appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 25 Nov 2025 5:45 am

Ghodegaon Accident: रस्ता ओलांडताना काळाचा घाला! अपघातात पाथर्डीच्या ५१ वर्षीय महिलेचा मृत्यू

प्रभात वृत्तसेवा सोनई : छत्रपती संभाजीनगर–अहिल्यानगर महामार्गावर घोडेगावजवळ रविवारी सायंकाळी झालेल्या अपघातात ५१ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे.नंदा गोरक्षनाथ नजन (रा. शिराळ, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर) असे महिलेचे नाव आहे.रविवारी सायंकाळी. 7.45 वा. सुमारास महामार्गावर असलेल्या भारत पेट्रोल पंपासमोर घोडेगाव परिसरात अपघात झाला. या अपघातात ही महिला गंभीर जखमी झाली. महिलेचा पुतण्या कानिफनाथ नजन यांनी […] The post Ghodegaon Accident: रस्ता ओलांडताना काळाचा घाला! अपघातात पाथर्डीच्या ५१ वर्षीय महिलेचा मृत्यू appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 25 Nov 2025 5:30 am

PCMC Election: मतदार एका प्रभागात आणि नाव भलत्याच ठिकाणी; मतदार यादीवरून राजकीय वातावरण तापले

प्रभात वृत्तसेवा पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी महापालिकेच्या निवडणूक विभागाने प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. या याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर घोळ असून अनेक प्रभागातील मतदार भलत्याच प्रभागामध्ये टाकण्यात आले आहेत. प्रशासनाने राजकीय हेतूने प्रेरित होत हा कारभार केला असल्याची टीका होऊ लागली आहे. यामुळे निवडणुकीपूर्वी चांगलेच वातावरण तापले असून प्रशासनाला राजकीय पक्ष आणि […] The post PCMC Election: मतदार एका प्रभागात आणि नाव भलत्याच ठिकाणी; मतदार यादीवरून राजकीय वातावरण तापले appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 25 Nov 2025 5:00 am

Khalapur Accident: पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात! भरधाव कंटेनरने ३ गाड्यांना उडवले; चालक जागीच ठार

प्रभात वृत्तसेवा खालापूर – पुणे-मुंबई दृतगती मार्गावर सोमवारी (दि. २४) पहाटे भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने जात असलेल्या कंटेनरने अचानक नियंत्रण सुटल्यामुळे समोरच्या पिकअप, ट्रक आणि चारचाकीला जोरदार धडक दिली. चार वाहनांच्या या भीषण अपघातात कंटेनरचा चालक जागीच ठार झाला असून दोन जण जखमी झाले आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, कंटेनर (एमएम ४६ एएफ ००८४) चालक रियाज अहमद […] The post Khalapur Accident: पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात! भरधाव कंटेनरने ३ गाड्यांना उडवले; चालक जागीच ठार appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 25 Nov 2025 4:45 am

लाखोंचा ‘खर्च’, शून्याचा ‘लाभ’! वडगाव मावळमधील इच्छुक उमेदवारांचा करूण आक्रोश; निवडणूक कधी?

प्रभात वृत्तसेवा वडगाव मावळ – संपूर्ण तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांबाबतची अनिश्चितता दिवसेंदिवस वाढत आहे. निवडणुका लागण्याच्या आशेवर गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर खर्च करणारे आणि जनसंपर्क मोहीम राबवणारे इच्छुक आता गंभीर अडचणीत सापडले आहेत. निवडणुका पुढे ढकलल्या जाण्याची शक्यतेवरील चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे अनेक इच्छूकांचा जीव टांगणीला लागला असून त्यांच्या मनात […] The post लाखोंचा ‘खर्च’, शून्याचा ‘लाभ’! वडगाव मावळमधील इच्छुक उमेदवारांचा करूण आक्रोश; निवडणूक कधी? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 25 Nov 2025 4:30 am

अयोध्येवर भगव्याची शोभा

आजु सफल तपु तीरथ त्यागू, आजु सफल जप जोग बिरागू, सफल सकल सुभ साधन साजू, राम तुम्हहि अवलोकत आजू...अनेक शतकांपासूनच्या या अंतर्गत भावना प्रत्यक्षात समोर आल्या. तपश्चर्येला फळ मिळाले, मन प्रसन्न झाले, श्रद्धा पूर्ण झाली. श्री अयोध्या धाम येथील श्रीराम जन्मभूमी मंदिरावर झालेला ध्वजारोहण सोहळा मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्याचा उत्सव साजरा करतो, तसेच भारतीयांची श्रद्धा, देशभक्ती आणि सांस्कृतिक मूल्यांची घोषणा आहे. हा क्षण ऐतिहासिक आहे. दीर्घकाळापासून जपलेला संकल्प आता प्रत्यक्ष वास्तुकलेत रूपांतरित झाला. लाखो भक्तांचे स्वप्न आज पूर्ण झाले. ज्यात तपश्चर्या, त्यागाची भावना सामावलेली आहे. इतिहासात अनेक संघर्ष, साम्राज्यांचे उदय, तसेच साम्राज्ये लोप पावली. श्रीरामाच्या जन्मस्थानासाठी केलेला प्रयत्न न्यायासाठी असण्यासोबत देशाच्या अस्मितेला पुन्हा जागृत करण्यासाठी होता. या शतकानुशतके चाललेल्या प्रयत्नात समाजातील प्रत्येक घटक सामील होता. संन्यासी, संत, पुरोहित, नागा, निहंग, विद्वान, विचारवंत, सामान्य कुटुंब आणि जंगल व गुहांमधील साधक या सर्वांनी जात, पंथ आणि उपासना पद्धतीच्या रेषा ओलांडून स्वतःला प्रभू श्रीरामांच्या चरणी समर्पित केले. अयोध्या धाममध्ये मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाच्या या भव्य मंदिरावर झालेल्या ध्वजारोहण सोहळ्यामधून दीर्घकाळ जोपासलेली भक्ती, संयमी संघर्ष आणि सामूहिक श्रद्धा दिसून येते. विवाह पंचमीचा हा दैवी योग या उत्सवाला आणखी पवित्र करतो. श्रीराम आणि माता जानकी यांचा विवाह झालेला मार्गशीर्ष शुद्ध पंचमी हा दिवस विवाह सोहळा आणि धर्म व निसर्गाच्या समन्वयाचे प्रतीक आहे. हा ध्वजारोहण सोहळा परंपरेला प्रबळ करतो आणि कालातीत संदेश देतो की धर्माचा नेहमी विजयी होतो आणि रामराज्याची तत्त्वे कायम टिकून राहतात. महर्षी वाल्मिकींनी रामायणात म्हटल्याप्रमाणे, 'रामो विग्रहवान धर्म' म्हणजेच प्रभू श्रीराम हे धर्माचे अवतार आहेत. हा ध्वजारोहण फक्त विधी किंवा उत्सव नाही तर ऐतिहासिक टप्पा आहे, जेथे हजारो वर्षांची सांस्कृतिक स्मृती, दशकांपासून न्यायासाठीचा संघर्ष, संतांचे तप, भक्तांचे धैर्य व राष्ट्राचा सामूहिक उत्साह एकत्र येऊन सत्याचा विजय साकारला आहे, धर्माला नवसंजीवनी दिली आहे आणि प्रभू श्रीरामाच्या जन्मस्थानी भव्य मंदिर उभारले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २२ जानेवारी २०२४ रोजी श्रीराम लल्लाच्या भव्य प्राणप्रतिष्ठेपासून अयोध्येने जागतिक स्तरावरून अभूतपूर्व लक्ष वेधले आहे. एका वर्षापेक्षा कमी कालावधीत भारत आणि परदेशातून एक कोटीहून अधिक भाविकांनी व पर्यटकांनी अयोध्येला भेट दिली. हॉटेल्स आणि धर्मशाळा पूर्णपणे भरलेल्या आहेत आणि नवीन रोजगार व व्यवसायाच्या संधींच्या माध्यमातून स्थानिक अर्थव्यवस्थेमध्ये जलद वाढ होत आहे. अयोध्या आता श्रद्धेचा आणि आर्थिक विकासाचा सुसंवादी संगम साधत जागतिक सांस्कृतिक राजधानी ठरले. पंतप्रधानांच्या दूरदर्शी मार्गदर्शनाखाली अयोध्येची त्रेता युगाप्रमाणे म्हणजेच दिव्य, भव्य आणि अभिनव अशी तुलना केली जात आहे. रस्ते, घाट, मार्ग, सुरक्षा व्यवस्था आणि सार्वजनिक सुविधांमध्ये परिवर्तन घडवून आणण्यात आला आणि त्यांना जागतिक स्तरावर मान्यता मिळाली. महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ, रामपथ, धर्मपथ, भक्तिपथ, जन्मभूमी पथ आणि सरयू नदीच्या किनाऱ्याचे संवर्धन हे या परिवर्तनाचे आधारस्तंभ बनले आहेत. जवळपास ५०,००० कोटी रुपयांच्या प्रकल्पांमुळे अयोध्येचा कायापालट होत आहे.मोक्षाचे हे शहर आता जगातील पहिले स्मार्ट आध्यात्मिक शहर म्हणून रूपांतरित केले जात आहे. लवकरच सुरू होणारे म्युझियम ऑन टेम्पल्स अयोध्येच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाला जागतिक शिक्षण केंद्रात रूपांतरित करेल. १,४०७ एकर जगेवरील नवीन अयोध्या ग्रीनफिल्ड टाऊनशिपमध्ये २०० एकर हरित जागा, सुपर-स्पेशलिटी आरोग्य केंद्र, भूमिगत उपयुक्तता यंत्रणा आणि वेलनेस हबचा समावेश आहे, जे शहराला भावी स्थिर, पर्यावरणपूरक आध्यात्मिक महानगर म्हणून आकार देत आहे.चाळीस मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प अयोध्येमधील ऊर्जेच्या गरजांची पूर्तता करत आहे. प्रभू श्रीरामाचे व्हर्च्युअल दर्शन, मेटाव्हर्स अनुभव, वैदिक वन आणि हवामान-आधारित व्यवस्थापन यंत्रणा शहराची ओळख अधिक वाढवत आहे. श्रद्धा, संशोधन, संस्कृती, तंत्रज्ञान आणि दूरदर्शी दृष्टिकोन यांना एकत्र करून अयोध्या पवित्र शहर तसेच जागतिक वारसा स्थळ म्हणून देखील उदयास येत आहे. जगातील हा पहिला धार्मिक बांधकाम प्रकल्प आहे, ज्याला ब्रिटिश सेफ्टी कौन्सिलकडून 'स्वॉर्ड ऑफ ऑनर' आणि भारताच्या नॅशनल सेफ्टी कॉन्सिलकडून सर्वोच्च सुरक्षा पुरस्कार मिळाला आहे. यामधून निदर्शनास येते की, श्रद्धा आणि भक्तीसोबत जागतिक दर्जाच्या अभियांत्रिकी आणि सुरक्षा मानकांचे पालन करण्यात आले आहे. मंदिर संकुल २.७ एकर जागेवर पसरलेले आहे, ज्यामध्ये सुमारे ५७,४०० चौरस फुटांचे बांधकाम क्षेत्र आहे. मंदिराची लांबी ३६० फूट, रुंदी २३५ फूट आणि उंची १६१ फूट आहे. या तीन मजली मंदिरात २० फूट उंचीचे मजले, ३६६ बारकाईने कोरीव काम केलेले स्तंभ (खांब), पाच मंडप, १२ भव्य प्रवेशद्वार आणि अतुलनीय कारागिरीची साक्ष देणारी विशिष्ट नागर-शैलीतील वास्तुकला आहे. मंदिराच्या तळमजल्यावर बालकराम यांचे दर्शन मिळते, तर पहिल्या मजल्यावर श्रीराम दरबारचे दिव्य दृश्य पाहायला मिळते.मंदिराच्या तटबंदीमध्ये शेषावतार मंदिर, संत तुळसीदास मंदिर, जटायू आणि खारीचे पुतळे आहेत, तर सप्त मंडपामध्ये महर्षी वसिष्ठ, महर्षी विश्वामित्र, महर्षी वाल्मिकी, अगस्त्य मुनी, निषादराज, माता शबरी आणि माता अहिल्या आहेत. विनासायास आध्यात्मिक अनुभव मिळण्याच्या खात्रीसाठी भक्त-केंद्रित सुविधा काळजीपूर्वक डिझाइन करण्यात आल्या आहेत. प्रभू श्रीरामाचे राज्य धार्मिक आदर्श असण्यासोबत त्यामधून मानवता आणि अनुशासन दिसून येते. राज्याचा आधार न्याय आहे, भीती नाही आणि राष्ट्रासाठी शासक नाही तर जनता महत्त्वाची आहे. रामराज्याची ही भावना आजही समाज, धोरणे आणि देशाच्या चारित्र्याला मार्गदर्शन करत आहे. हे मंदिर फक्त दगडी बांधकाम नाही तर त्यामध्ये भक्तांचे संघर्ष, संतांचे तप आणि समाजाचे समर्पण सामावलेले आहे. अयोध्या आता फक्त तीर्थक्षेत्र राहिलेले नाही, तर उत्साहाचे केंद्र बनले आहे. श्रीराम आता फक्त स्मरणीय नाहीत, तर अनुभव आहेत. भारत आता फक्त राष्ट्र नाही, तर राम-केंद्रित संस्कृतीचे जागृत रूप आहे. प्रभू श्रीराम यांनी दाखवलेली कर्तव्यनिष्ठता, देशभक्ती, चारित्र्य आणि नीतिमत्ता या आदर्शांपासून प्रेरणा घेत राहिल्यास मानवी संस्कृती अधिक समृद्ध होईल. हे मंदिर भक्तीचे केंद्र असण्यासोबत जीवनाचा दीपस्तंभ आहे, जो भावी पिढ्यांना आठवण करून देतो की धर्म केवळ उपासनेचा विधी नाही, तर आचरणाचा दृष्टिकोन आणि समाजाचा आधार आहे.- योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री, उत्तर प्रदेश

फीड फीडबर्नर 25 Nov 2025 4:30 am

PCMC Election: पिंपरीत काँग्रेसचा ‘ब्लॅकआऊट’? निवडणूक जवळ असतानाही पक्ष दिशाहीन, कार्यकर्ते नाराज

प्रभात वृत्तसेवा पिंपरी – महापालिका निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली आहे. असे असताना पिंपरी चिंचवड शहरातील काँग्रेस पक्षाची राजकीय परिस्थिती आणखीच चिंताजनक बनली आहे. इतर पक्षांनी निवडणुकीसाठी जौरबैठका सुरू केल्या असताना शहरातील काँग्रेस पक्षाची राजकीय परिस्थिती चिंताजनक बनली आहे. शहरात एकेकाळी भक्कम संघटनात्मक रचना, उत्साही पदाधिकारी आणि सक्रीय कार्यकर्त्यांचा ‘हात’ आज दिसेनासा झाला आहे. पक्षामध्ये […] The post PCMC Election: पिंपरीत काँग्रेसचा ‘ब्लॅकआऊट’? निवडणूक जवळ असतानाही पक्ष दिशाहीन, कार्यकर्ते नाराज appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 25 Nov 2025 4:15 am

Indapur Election: भरत शहांना नगराध्यक्ष करा, मग बघा विकास! कृषिमंत्री भरणे यांनी इंदापूरकरांना दिला ‘हा’मोठा शब्द

प्रभात वृत्तसेवा इंदापूर – इंदापूर शहर 2014 पूर्वी कसे होते आणि मी आमदार झाल्यानंतर ते किती बदलले, हे येथील जनतेलाच ठाऊक आहे. विकास केला असेल तरच आम्हाला मतदान करा, अशा शब्दांत राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूरकरांंना साथ देण्याचे आवाहन केले.इंदापूर नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार भरत शहा व सर्व 20 नगरसेवकांच्या प्रचारार्थ […] The post Indapur Election: भरत शहांना नगराध्यक्ष करा, मग बघा विकास! कृषिमंत्री भरणे यांनी इंदापूरकरांना दिला ‘हा’ मोठा शब्द appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 25 Nov 2025 4:00 am

करडे पेट्रोल पंपावर थरार! पूर्ववैमनस्यातून टोळक्याचा तरुणावर जीवघेणा हल्ला; ७ जणांवर गुन्हा दाखल

प्रभात वृत्तसेवा न्हावरे – करडे (ता. शिरूर) परिसरात भारत पेट्रोल पंपावर रविवारी (दि. २३) सायंकाळी ७:४५ च्या सुमारास पूर्ववैमनस्यातून एका तरुणावर सात जणांच्या टोळक्याने हल्ला चढवला. आरोपींनी लाथाबुक्क्या, लाकडी दांडक्यांनी तरुणाच्या डोक्यात व पाठीवर गंभीर मारहाण केली. याबाबत संकेत सुरेश गुजर (वय २१) याने शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. अजय वाळके याच्यासोबत आलेल्या […] The post करडे पेट्रोल पंपावर थरार! पूर्ववैमनस्यातून टोळक्याचा तरुणावर जीवघेणा हल्ला; ७ जणांवर गुन्हा दाखल appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 25 Nov 2025 3:45 am

Shirur Election: शिरूरच्या रस्त्यावर राष्ट्रवादीचा ‘धुरळा’! आमदार माऊली कटकेंनी थेट मैदानात उतरत फिरवलं वारं

प्रभात वृत्तसेवा शिरूर – शिरूर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार ऐश्वर्या अभिजित पाचर्णे यांच्या प्रचार जोरदार सुरू झाला असून, शिरूर-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी स्वतः मैदानात उतरून काढलेल्या पदयात्रेला शिरूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.पदयात्रेची सुरुवात बाजार समिती प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून झाली. यावेळी उमेदवार ऐश्वर्या पाचर्णे, सर्व प्रभागांतील उमेदवार, महिला […] The post Shirur Election: शिरूरच्या रस्त्यावर राष्ट्रवादीचा ‘धुरळा’! आमदार माऊली कटकेंनी थेट मैदानात उतरत फिरवलं वारं appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 25 Nov 2025 3:30 am

Shivendrasinhraje Bhosale: खासदार उदयनराजे आणि मी…; प्रचाराच्या रणधुमाळीत शिवेंद्रसिंहराजेंनी स्पष्टच सांगितलं

प्रभात वृत्तसेवा सातारा – आम्ही जनतेसाठी २४ तास उपलब्ध असतो. सातारकर नागरिकांचे सर्वप्रकारचे प्रश्न सोडवण्यासाठी खासदार उदयनराजे आणि मी, दोघेही नेहमीच प्राधान्य देतो. निवडणूक ही केवळ एक प्रक्रिया आहे. सातारकर नेहमीच आमच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले आहेत, त्यामुळे सातारकर भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांसह सर्व उमेदवारांना विजयी करतील यात तिळमात्र शंका नाही, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम […] The post Shivendrasinhraje Bhosale: खासदार उदयनराजे आणि मी…; प्रचाराच्या रणधुमाळीत शिवेंद्रसिंहराजेंनी स्पष्टच सांगितलं appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 25 Nov 2025 3:00 am

Satara Politics: बंडखोरांचे धाबे दणाणले! भाजपच्या जिल्हाध्यक्षांचा ‘तो’आदेश चर्चेत; वाचा सविस्तर

प्रभात वृत्तसेवा सातारा – सातारा जिल्ह्यातील विविध नगर पालिका, नगरपरिषदांच्या निवडणुकीत भाजपकडून ज्यांना अधिकृत एबी फॉर्म दिले आहेत, तेच पक्षाचे अधिकृत उमेदवार मानले जातील. पक्षाकडून अधिकृत उमेदवारी न मिळालेल्या काही लोकांनी अपक्ष अर्ज भरले असून अशा उमेदवारांनी प्रचार साहित्यामध्ये भाजपच्या राष्ट्रीय, राज्य तसेच जिल्हा स्तरावरील वरिष्ठ नेत्यांचे फोटो वापरल्याचे निदर्शनास आले आहे. पक्षाचे अधिकृत उमेदवार […] The post Satara Politics: बंडखोरांचे धाबे दणाणले! भाजपच्या जिल्हाध्यक्षांचा ‘तो’ आदेश चर्चेत; वाचा सविस्तर appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 25 Nov 2025 2:45 am

'ग्लोबल साऊथ'चा आवाज : भारत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल दक्षिण आफ्रिकेत झालेल्या जी-२० शिखर परिषदेत सहभाग घेऊन ग्लोबल साऊथ आपल्या उपस्थितीने आणि मुद्देसूद भाषणाने सर्व जगावर छाप सोडली. त्यांनी जगाला आरोग्य आणि सध्या गाजत असलेला आर्टिफिशल इंटलिजन्स या विषयावर जगाला मंत्र दिला. त्याचवेळी ते म्हणाले की, सुरक्षा परिषदेत सुधारणा हा विकल्प नाही तर आजच्या काळाची गरज आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून भारताला संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेचे कायम सदस्यत्व देण्यावर चर्चा होते, पण त्याबाबत अजून ठोस निर्णय अमेरिका आणि चीन आदी राष्ट्रे घेऊ शकलेली नाहीत. पण त्यापेक्षाही हे महत्त्वाचे आहे, की दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरील रामाफोसा यांनी म्हटले, अमेरिकेचा बहिष्कार असतानाही राजनैतिक तणावामुळेही जी-२० शिखर परिषद रुळांवरून घसरणार नाही. अमेरिकेचा कितीही त्रागा असला तरीही शिखर परिषद यशस्वी करण्यात दक्षिण आफ्रिकेने पुढाकार घेतला आणि अमेरिकेच्या दडपशाहीपुढे जग झुकणार नाही हे सिद्ध केले. मोदी यांनी एआयचा दुरुपयोग रोखण्यासाठी एक जागतिक समझोत्याचे आवाहन केले. मोदी यांनी शिखर परिषदेत जगापुढे प्रश्न बनून उभ्या राहिलेल्या सर्व प्रमुख समस्यांची सोडवणूक करण्याविषयी उल्लेख केला आणि नुसते उल्लेख करून ते थांबले नाहीत, तर त्यांनी यावर उपाय सांगितला. याच परिषदेत मोदी यांनी अनेक द्विपक्षीय आंतरराष्ट्रीय नेत्यांबरोबर चर्चा केली आणि त्यात फ्रेंच अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचाही समावेश होता. भारताच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा क्षण होता. अमेरिका आणि युरोपची दादागिरी यामुळे संपली असे म्हणायला हरकत नाही. कारण जी-२० ने आता जगाचे नियम बदलले आहेत. इतके दिवस जी-२० ही केवळ अमेरिकेच्या इशाऱ्यावर चालत होती. अगदी जागतिक आरोग्य संघटनेलाही अमेरिकाच आर्थिक मदत देत होती. पण आता अमेरिकेचा बहिष्कार असतानाही तिचे काहीही चालले नाही हे यातून सिद्ध झाले आहे.अगदी पूर्वीपासूनच जगातील सारे नियम धनाढ्य देश ठरवत आले आहेत आणि बाकी सारे जग त्यांच्या तालावर नाचत होते. पण आता ते दिसले नाही. ही केवळ एक बैठक नव्हती तर ग्लोबस साऊथचे शक्तिप्रदर्शन होते. ज्या दक्षिण आफ्रिकेला मोदी यांनी जी-२० चा सदस्य बनवून एक आपल्या डावपेचाची चुणूक दाखवली. त्याच दक्षिण आफ्रिकेने अमेरिकेला आणि साऱ्या श्रीमंत देशांना अस्मान दाखवले आहे. ज्या बदलाची ठिणगी मोदी यांनी पेटवली होती ती आता दक्षिण आफ्रिकेत ज्वालामध्ये रूपांतरित झाली आहे आणि त्यात पाश्चात्त्य राष्ट्रे आणि युरोप भस्मसात झाला आहे. त्याचबरोबर हेही सिद्ध झाले आहे की, जग आता सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट या पाश्चात्त्य तत्त्वावर चालणार नाही तर त्याचे स्वतःचे नियम असतील. या शिखर परिषदेतून जगाला एकच संदेश गेला आहे तो म्हणजे अमेरिका आणि युरोप आता इतरांना कुचलून पुढे जाऊ शकणार नाहीत. एकही देश यातून मागे राहिला तर जग हरेल हा संदेश या परिषदेतून जगाला देण्यात परिषद यशस्वी झाली आहे आणि मोदी यांचा हाच तर उद्देश आहे, की कोणत्याही राष्ट्राची मनमानी यापुढे भारत सहन करणार नाही. याच परिषदेत अमेरिकेचे एक दुय्यम शिष्टमंडळ सहभागी झाले होते पण त्यातून सकारात्मक दिशा दिली आहे ती म्हणजे युक्रेनशी सकारात्मक चर्चा होऊ शकते. या शिखर परिषदेतून महत्त्वाचा संदेश हा दिला गेला आहे की, सर्व महाशक्तींना असा इशारा दिला आहे की, सुधारा अथवा नष्ट व्हा. कारण सर्व जग सध्या एका धोकादायक कालखंडातून जात आहे. सर्वत्र उपासमार, युद्ध आणि असमानता यामुळे संघर्ष पेटलेला आहे. शिखर परिषदेने असा इशारा दिला आहे, की आता खूप झाले. संयुक्त राष्ट्रसंघाच्या चार्टरचा जो विनाश इतके दिवस अमेरिका आणि साथीदार देशांनी चालवला होता तो आता थांबवा. त्यांच्याकडून आता शक्तीचा उपयोग सहन केला जाणार नाही. या सर्व शक्ती संघर्षात भारताचा एक इशारा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे तो म्हणजे ड्रग दहशतवादाविरोधात मोदी यांनी दिलेली हाक आणि त्याला जागतिक राष्ट्रांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद.ड्रग संकटाशी सारे जग झुंजत आहे आणि त्यात आफ्रिकेतील देशापासून ते पाकिस्तानपर्यंतच्या देशांचा समावेश आहे. त्यामुळे या युद्धात सर्व जगाने सामील होण्याची दिलेली हाक ऐकली गेली नसती तरच नवल होते. पण हे आवाहन करतानाही ज्या दक्षिण आफ्रिकेत ही परिषद भरली होती तेथील तरुणांना मोदी यांनी आवाहन केले, की पारंपरिक ज्ञान भांडार पुढील पिढ्यांना सक्षम करण्यासाठी त्याचा वापर करेल. यात आफ्रिकेतील तरुणांना कौशल्यावर आधारित प्रशिक्षण देण्यासाठी १० लाख प्रशिक्षकांचा समूह प्रस्थापित केला जाईल आणि त्याद्वारे स्थानिक क्षमता निर्माण होतील. क्रिटिकल मिनरल्स यावर जोर देतानाच मोदी यांनी जागतिक अन्न सुरक्षेवर भर दिला आणि त्यासाठी जी-२० शिखर परिषदेचा उपयोग करून घेतला. त्याचबरोबर हवामान आणि इतरही अनेक विषयांचा उल्लेख केला. आपली सर्व चर्चा ही फलदायी झाली असे त्यांनी काल देशात परतल्यावर सांगितले. या संपूर्ण शिखर परिषदेवर मोदी यांची छाप होती आणि ज्या भारताचे नेते केवळ पूर्वी श्रोते म्हणून हजेरी लावत असत त्यांना आता महत्त्वाची भूमिका बजावण्याची संधी मिळते आहे हा भारताचा गौरव आहे आणि तो मोदी यांनीच घडवून आणला आहे. या सर्व परिषदेवर दक्षिण आफ्रिकेने हा ऐतिहासिक क्षण असल्याची प्रतिक्रिया दिली ती अगदी रास्त होती. ट्रम्प यांच्या हल्ल्यानंतर भारत, दक्षिण आफ्रिका आणि ब्राझील अधिक एकत्र आले आहेत आणि या परिषदेचा मोठा फायदा झाला आहे. ट्रम्प यांच्या आक्रमक व्यापार धोरण आणि त्याविरोधात कसा लढा द्यायचा यावर भारतासह तिन्ही देशाना मार्ग सापडण्याची शक्यता आहे. या त्रिपक्षीय गटामुळे त्यांना बहुपक्षीय व्यवस्थेत एकमेकांच्या अधिक निकट येणे आणि स्वायत्त आर्थिक एकत्रीकरण शक्य होणार आहे.

फीड फीडबर्नर 25 Nov 2025 2:30 am

Leopard Sighting: मांढरदेव परिसरात एक-दोन नव्हे, तर तब्बल इतके बिबटे फिरतायत..जाणून घ्या

प्रभात वृत्तसेवा मांढरदेव – मांढरदेवमध्ये मागील अनेक महिन्यांपासून ग्रामस्थ तसेच भाविकांना बिबट्यांचे दर्शन होत आहे. यामुळे ग्रामस्थ, प्रवासी भाविकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.मांढरदेवयाठिकाणी झुडपांचे तसेच गवताचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे याठिकाणी अनेक जंगली प्राण्यांना लपण्यासाठी जागा मिळते. म्हणून येथे मागील काही महिन्यांपासून घाटातून ये-जा करताना, माळरानावर व अनेक शेत-शिवारांमध्ये ग्रामस्थ व भाविकांना बिबट्यांचे दर्शन होत आहे. […] The post Leopard Sighting: मांढरदेव परिसरात एक-दोन नव्हे, तर तब्बल इतके बिबटे फिरतायत..जाणून घ्या appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 25 Nov 2025 2:30 am

Baramati News: ‘जा काय करायचे ते करा, मी पाणी सोडणार नाही’; ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या मुजोर उत्तराने थोपटेवाडीत संताप

प्रभात वृत्तसेवा वडगाव निंबाळकर – गेल्या अनेक दिवसांपासून पिण्याच्या पाण्यापासून ते वापराच्या पाण्यापर्यंत ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. परंतु यावर तोंडी व लेखी तक्रार ग्रामपंचायत प्रशासन, बारामती पंचायत समितीच्या प्रशासनला करूनही कुठल्याही प्रकारची कार्यवाही करताना दिसत नाही. त्यामुळे गावकऱ्यांतून संतापाची प्रतिक्रिया उमटत आहे. थोपटेवाडी गावामध्ये काही भूमिहीन कुटुंब राहत असून यांना पाण्याचा कुठलाही स्रोत […] The post Baramati News: ‘जा काय करायचे ते करा, मी पाणी सोडणार नाही’; ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या मुजोर उत्तराने थोपटेवाडीत संताप appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 25 Nov 2025 2:15 am

दोन्ही राष्ट्रवादींची युती : पालकमंत्र्यांची सुस्ती

कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील नगरपालिका व नगरपंचायतींच्या निवडणुकीत एक आश्चर्यकारक साम्य दिसत आहे, ते म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार आणि राष्ट्रवादी अजित पवार गटांची प्रमुख नगरपालिका व नगर पंचायतीत झालेली युती. राजकारणात कधीही एक न होणारे म्हणून ओळखले गेलेले विरोधक आता हातात हात घालून मैदानात उतरले आहेत. या घडामोडींनी महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हींकडे हादरे बसले आहेत. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात प्रकाश आबिटकर, सांगलीत चंद्रकांतदादा पाटील आणि साताऱ्यात शंभूराज देसाई यांच्या राजकीय असहाय्यतेबद्दल चर्चेला उधाण आले आहे.ल्हापुरात कागल नगरपालिका ही सर्वात चर्चेतील रणभूमी ठरली आहे. हसन मुश्रीफ आणि समरजीत घाटगे यांच्या ११ वर्षांच्या संघर्षावर पडदा टाकत अचानक झालेल्या शांततेने राजकीय समीकरणे बदलली. या युतीमागे अजित पवार नव्हे, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची थेट भूमिका असल्याचे मानले जाते. आता येथे या युतीविरुद्ध एकनाथ शिंदे स्वतः मैदानात उतरून नेतृत्व करणार आहेत. चंदगड येथेही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र असून हातकणंगले, शिरोळ व जयसिंगपूर येथे शिवसेनेचे राजेंद्र पाटील यड्रावकरविरुद्ध स्थानिक जुळवाजुळवीतून निर्माण झालेली समीकरणे शिंदे गटासाठीच डोकेदुखी ठरत आहेत. साताऱ्यात परिस्थिती अधिक गुंतागुंतीची आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई समर्थ असूनही जिल्ह्यात त्यांची पकड कितपत आहे याबाबत प्रश्न उपस्थित आहे. सातारा नगरपालिकेत भाजपच्या नेतृत्वाखाली शिवेंद्रराजे-उदयनराजे एकत्र येताच इतर पक्षांसाठी समीकरणे कठीण झाली आहेत. कराड नगरपालिका ही निवडणूक विशेष ठरली असून पृथ्वीराज चव्हाण यांनी ऐन वेळी मैदानात उतरून भाजपचे अतुल भोसले यांना अडचणीत आणले आहे. मलकापूर आणि पाटण येथेही दोन्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येत असून देसाईंची भूमिका संभ्रमात टाकणारी ठरत आहे.सातारा जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक देसाई हे पालकमंत्री आहेत. त्यांच्याशी जिल्ह्यातील नेत्यांचे कितपत जमते हे संशोधनाचा विषय. खुद्द पाटण या त्यांच्या बालेकिल्ल्यात नगरपालिकेची निवडणूक मात्र त्यांना नेहमीच अवघड जात असते. यावेळी देखील तशीच चिन्हे आहेत. सातारा नगरपालिका निवडणुकीत त्यांनी पॅनल उभे केले असले तरी भाजपच्या नेतृत्वाखाली दोन राजे एकत्र आल्याने आता इथे इतरांची डाळ शिजणे अवघड झाले आहे. बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या कन्येचा विवाह याच धामधुमीत होत आहे आणि त्या विवाहासाठी उदयनराजे यांना खास मुंबईत बनवलेला पोशाख घेऊन राजे भेटायला गेले. दोघांमधील स्नेहाचे व्हिडीओ विरोधकांना साताऱ्यातून दूर ढकलण्यास खूप कारणीभूत ठरू शकतात. इतके भावनिक वातावरण दोन्ही बाजूला आहे. कार्यकर्त्यांना यामध्ये चार पावले मागे यावे लागले तरी अनेकांनीही इथे स्वीकारले आहे. त्यांना बंडखोरी नाही करावी लागली आहे.कराड नगरपालिका ही राज्यातील एक चर्चेत असणारी नगरपालिका. दिवंगत पी. डी. पाटील यांच्या रूपाने ७० वर्षे त्यांच्या नावाचा धबधबा इथे कायम होता मात्र यंदा विधानसभेला पराभूत झालेल्या बाळासाहेब पाटील यांनी कराड नगरपालिकेच्या राजकारणातून स्वतःला बाजूला ठेवत आपल्या गटाला प्रथमच नगरपालिकेच्या परिघाबाहेर ठेवले आहे. आजारपणामुळे दीर्घकाळ दिल्लीत असणारे पृथ्वीराज चव्हाण या ठिकाणी नेतृत्व करणार की नाही अशी भूमिका काही मंडळींकडून मांडली जात असतानाच ऐनवेळी उतरलेल्या चव्हाण यांनी कराडमधील विरोधकांची एकजूट केली. विधानसभेला आपल्या विरोधात काम केलेल्या मंडळींना सुद्धा बरोबर घेऊन भाजपचे नेते अतुल भोसले यांना मोठ्या प्रमाणावर आव्हान निर्माण केले आहे. नगराध्यक्ष पद खुले झाल्याने येथे इच्छुकांची संख्या साताऱ्याप्रमाणेच मोठी आहे आणि बाजी कोण मारणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. विधानसभेला बाजी मारलेले अतुल बाबा यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा यांना जड जाणार की, पृथ्वीराज बाबा त्यांच्याच सहकाऱ्यांकडून अतुल बाबांना मागे रेटणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.सांगली जिल्ह्यात जत नगरपालिकेत दोन्ही राष्ट्रवादींची एकत्र चाल राजकीय वादाचे केंद्र ठरली आहे. जयंत पाटील यांच्या राजकीय अस्तित्वाला मिळालेल्या धक्क्यामुळे त्यांनी स्थानिक स्तरावर अजित पवार गटाशी तडजोड केली की, त्यांना न विचारता युती झाली, यावर चर्चा रंगली आहे. जत येथे काँग्रेस भाजपला रोखण्यासाठी सज्ज होती; मात्र राष्ट्रवादीच्या युतीमुळे समीकरणे बदलली आहेत. ईश्वरपूर आणि अष्टा येथे जयंत पाटील विरुद्ध भाजप-शिंदे गट अशी थेट लढत आहे. अण्णा डांगे पुत्र विश्वनाथ आणि आनंदराव मलगुंडे यांच्यातील थेट सामना सांगली राजकारणातील नवे वळण म्हणून पाहिला जातो. तासगावात रोहित पाटील विरुद्ध संजय पाटील हे पारंपरिक समीकरण असून शेवटच्या क्षणी दोघांत अंतर्गत तडजोडीची शक्यता व्यक्त केली जात आहे.विटा आणि आटपाडीमध्ये भाजप विरुद्ध शिंदे शिवसेना पॅनेल असून आ. गोपीचंद पडळकर यांच्या सक्रियतेमुळे या दोन्ही नगरपालिका लक्षवेधी ठरत आहेत. तीनही जिल्ह्यांत सत्ताधारी भाजप व शिंदे शिवसेनेचे पालकमंत्री परीक्षेत उतरले असले तरी जनतेचा प्रतिसाद मोठा वाटत नाही. उलट दोन्ही राष्ट्रवादींच्या अनपेक्षित एकत्रीकरणामुळे महायुतीतील तणाव उघड झाला आहे. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी दक्षिण महाराष्ट्रातील ही राजकीय चाचणी ठरणार आहे. परिस्थिती बदलली नसल्यास सत्ताधारी पक्षाला धोरणांचा पुनर्विचार करण्याशिवाय पर्याय उरणार नाही, एवढे मात्र निश्चित.- प्रतिनिधी

फीड फीडबर्नर 25 Nov 2025 2:10 am

Student Safety: आता शाळेची घंटा वाजणार ९.३० ला! बिबट्याच्या दहशतीमुळे ४ तालुक्यांत शाळांच्या वेळेत मोठा बदल

प्रभात वृत्तसेवा जांबूत – दिवाळीनंतर पिंपरखेड परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकल्यांचा बळी गेल्यानंतर प्रचंड दहशत निर्माण झाली. पालकांनी तर आपल्या मुलांना शाळेत पाठवणेच बंद केले. त्यामुळे शिक्षण खात्यासमोर मोठा पेच निर्माण झाला. शेवटी विद्यार्थ्यांचा जीव सर्वात मौल्यवान आहे… त्यांना भीतीच्या सावटातून बाहेर काढणे हीच आजची खरी जबाबदारी आहे. शिरूर–आंबेगाव–खेड–जुन्नर हा पट्टा गेल्या काही वर्षांपासून बिबट्यांच्या वाढत्या […] The post Student Safety: आता शाळेची घंटा वाजणार ९.३० ला! बिबट्याच्या दहशतीमुळे ४ तालुक्यांत शाळांच्या वेळेत मोठा बदल appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 25 Nov 2025 2:00 am

Shirur News: एकाच शाळेत वर्षानुवर्षे ठिय्या मांडणाऱ्या शिक्षकांचे ‘बोगस’कनेक्शन उघड; सवलती लाटणाऱ्यांवर ग्रामस्थ आक्रमक

प्रभात वृत्तसेवा रांजणगाव गणपती – शिरूर तालुक्यात बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांच्या आधारे मिळणाऱ्या सवलतींचा गैरवापर मोठ्या प्रमाणात वाढला असून, यामुळे शिक्षण व्यवस्थेचा तोल बिघडत आहे. काही शिक्षकांकडून संवेदनशील सवलतींचा होणारा गैरवापर आणि त्यास अधिकारीवर्गाकडून मिळणारे छुपे संरक्षण यामुळे तालुक्यातील शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे. या सवलतींचा फायदा घेत काही शिक्षक वर्षानुवर्षे घराजवळच्या किंवा सोयीच्या […] The post Shirur News: एकाच शाळेत वर्षानुवर्षे ठिय्या मांडणाऱ्या शिक्षकांचे ‘बोगस’ कनेक्शन उघड; सवलती लाटणाऱ्यांवर ग्रामस्थ आक्रमक appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 25 Nov 2025 1:45 am

Manchar Election: पक्षीय उमेदवार सुसाट, अपक्ष अजूनही ‘वेटिंग’वर; मंचर नगरपंचायत निवडणुकीत चिन्हासाठी रस्सीखेच

प्रभात वृत्तसेवा मंचर – मंचर नगरपंचायत निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू असताना पक्षीय उमेदवारांना चिन्ह मिळाल्याने त्यांनी प्रचाराला वेग दिला आहे. अपक्ष उमेदवारांना बुधवारी (दि. 26) चिन्ह मिळणार असल्याने त्यांना प्रचारासाठी चिन्ह घरोघरी पोहचवण्यासाठी कसरत करावी लागणार आहे.नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदासाठी विविध पक्षांचे उमेदवार मतदान होण्यासाठी आपापला गड मजबूत करण्यासाठी घराघरात जाऊन मतदारांना भेटू लागले आहेत. […] The post Manchar Election: पक्षीय उमेदवार सुसाट, अपक्ष अजूनही ‘वेटिंग’वर; मंचर नगरपंचायत निवडणुकीत चिन्हासाठी रस्सीखेच appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 25 Nov 2025 1:30 am

भवानीनगर हादरले! भर झोपेत महिलेच्या गळ्यातील गंठण हिसकावले; ३ लाखांचा ऐवज घेऊन चोरटे फरार

प्रभात वृत्तसेवा भवानीनगर – खताळपट्टा, ढेकळवाडी (ता. बारामती) येथील तरुण शेतकरी पार्थ अजित झारगड (वय 25) यांच्या घरी मध्यरात्री घरफोडी करून चोरट्यांनी तब्बल 3 लाख 31 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.बारामती तालुका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, झारगड कुटुंब नेहमीप्रमाणे 21 तारखेच्या रात्री 10.30 वाजता जेवण करून झोपले […] The post भवानीनगर हादरले! भर झोपेत महिलेच्या गळ्यातील गंठण हिसकावले; ३ लाखांचा ऐवज घेऊन चोरटे फरार appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 25 Nov 2025 1:15 am

Purandar News: वाल्हे ग्रामपंचायतीत पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती; सागर भुजबळ उपसरपंचपदी बिनविरोध

प्रभात वृत्तसेवा वाल्हे – पुरंदर तालुक्यातील वाल्हे येथील उपसरपंचपदी सागर मदन भुजबळ यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. यावेळी भुजबळ यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी अनिल हिरासकर यांनी त्यांची उपसरपंचपदी निवड जाहीर केली.ग्रामपंचायतीची निवडणूक दोन वर्षांपूर्वी इतिहासात पहिल्यांदाच बिनविरोध झाली होती. सरपंच म्हणून अतुल गायकवाड तर उपसरपंचपदी अमित पवार यांचीही बिनविरोध निवड […] The post Purandar News: वाल्हे ग्रामपंचायतीत पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती; सागर भुजबळ उपसरपंचपदी बिनविरोध appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 25 Nov 2025 1:00 am

Baramati News: आधी कुत्र्याचा फडशा, आता शेळीवर ताव; नीरावागजमध्ये बिबट्याचा मुक्त संचार

प्रभात वृत्तसेवा बारामती – बारामती तालुक्यातील नीरावागज परिसरात मागील काही दिवसांपासून बिबट्याचे पुन्हा एकदा दर्शन झाले असून गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावातील संतोष कुंभार यांच्या येथील सीसीटीव्हीमध्ये (दि.२३) पहाटे अंदाजे १.४५ वाजता बिबट्या स्पष्ट दिसून आला आहे. वडाच्या झाडाजवळ फिरताना त्याच्या हालचाली कॅमेऱ्यांत कैद झाल्या.गेल्या काही दिवसांत पशुधनावर हल्ल्यांची मालिका गावात बिबट्याची हालचाल […] The post Baramati News: आधी कुत्र्याचा फडशा, आता शेळीवर ताव; नीरावागजमध्ये बिबट्याचा मुक्त संचार appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 25 Nov 2025 12:45 am

Shirur news: पैसे मागायला गेले आणि धक्काच बसला! कोरेगाव भीमा येथील लॉजमध्ये तरुणाचा रहस्यमय मृत्यू

प्रभात वृत्तसेवा शिक्रापूर – कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील हॉटेल मैफिल बार लॉजिंग येथे विक्रम कणसे (वय ३६, रा. बीजवडी, ता. इंदापूर) यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. लॉजच्या रुममध्ये तो जमिनीवर बेशुद्धावस्थेत आढळला होता.विक्रम कणसे हा सायंकाळच्या सुमारास लॉजमध्ये आला होता आणि त्याने ओळखपत्र देऊन रूम बुक केली होती. मात्र, त्याने पेमेंट केले नव्हते. […] The post Shirur news: पैसे मागायला गेले आणि धक्काच बसला! कोरेगाव भीमा येथील लॉजमध्ये तरुणाचा रहस्यमय मृत्यू appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 25 Nov 2025 12:30 am

Shikrapur Crime: पोलिसांची मोठी कारवाई! तळेगाव ढमढेरे येथील जुगार अड्डा उद्ध्वस्त, दोघे जेरबंद

प्रभात वृत्तसेवा शिक्रापूर – तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील जुगार अड्ड्यावर शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने छापा टाकून कारवाई केली आहे. यात जुगार साहित्यासह रोख रक्कम जप्त करून दत्तात्रय उत्तम भुजबळ (वय ३४) आणि किसन केशव येवले (वय ४७, दोघे रा. तळेगाव ढमढेरे) या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. शिक्रापूर रस्त्यावर असलेल्या डी. एस. बार शेजारील पत्र्याच्या […] The post Shikrapur Crime: पोलिसांची मोठी कारवाई! तळेगाव ढमढेरे येथील जुगार अड्डा उद्ध्वस्त, दोघे जेरबंद appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 25 Nov 2025 12:15 am

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, २५ नोव्हेंबर २०२५

पंचांगआज मिती मार्गशीर्ष शुद्ध पंचमी शके १९४७, चंद्र नक्षत्र उत्तरा षाढा, योग गंड चंद्र राशी मकर. भारतीय सौर ४ पौष शके १९४७, मंगळवार, दि. २५ नोव्हेंबर २०२५. मुंबईचा सूर्योदय ६.५१, मुंबईचा सूर्यास्त ५.५९, मुंबईचा चंद्रोदय १०.५८, मुंबईचा चंद्रास्त १०.१०, राहू काळ ०३.१२ ते ४.३५. नागपूजन, नागदिवे, शुभ दिवस.दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)मेष : अलौकिक धाडसामुळे यशप्राप्ती मिळणार आहे.वृषभ : नोकरी-व्यवसायात अनुकूल वातावरण असणार आहे.मिथुन : अनावश्यक खर्चाला कात्री लावा.कर्क : अचानक धनलाभाच्या दृष्टीने अनुकूल काळ आहे.सिंह : प्रयत्न सफल होतील.कन्या : कामाचे स्वरूप बदलू शकते.तूळ : अडकलेले पैसे मिळतील.वृश्चिक : धार्मिकतेमध्ये रस निर्माण होईल.धनू : मन:स्तापाची शक्यता.मकर : आपले वर्चस्व वाढविण्याचा प्रयत्न करू नका.कुंभ : नोकरीबाबतच्या समस्या मिटतील.मीन : निर्णय चुकण्याची शक्यता आहे.

फीड फीडबर्नर 25 Nov 2025 12:10 am

Kabaddi World Cup 2025 : भारतीय महिला कबड्डी संघ सलग दुसऱ्यांदा विश्वविजेता! चायनीज तायपेईचा 35-28 ने उडवला धुव्वा

Indian Women Team Won Kabaddi World Cup 2025 : बांगलादेशची राजधानी ढाका येथे झालेल्या महिला कबड्डी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने चायनीज तायपेईचा ३५-२८ गुणांनी पराभव करत पुन्हा एकदा जगावर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. भारताने सलग दुसऱ्यांदा विश्वचषकावर नाव कोरलं आहे. ज्यामुळे पुन्हा एकदा महिला कबड्डीमध्ये भारताची वाढती ताकद आणि श्रेष्ठता अधोरेखित झाली आहे. […] The post Kabaddi World Cup 2025 : भारतीय महिला कबड्डी संघ सलग दुसऱ्यांदा विश्वविजेता! चायनीज तायपेईचा 35-28 ने उडवला धुव्वा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 24 Nov 2025 11:54 pm

Laxmi Ratan Shukla : ‘ही देशाची टीम आहे, कुणाच्या घरची नाही…’, शमीच्या कोचचा आगरकर-गंभीरवर थेट हल्लाबोल

Laxmi Ratan Shukla slams Agarkar Gambhir : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाचे निराशाजनक प्रदर्शन सुरू आहे. या लाजिरवाण्या कामगिरीनंतर, माजी भारतीय क्रिकेटपटू आणि मोहम्मद शमीचे प्रशिक्षक लक्ष्मी रतन शुक्ला यांनी भारतीय संघाचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आणि कोच गौतम गंभीर यांच्या निवड प्रक्रियेवर जोरदार टीका केली आहे. […] The post Laxmi Ratan Shukla : ‘ही देशाची टीम आहे, कुणाच्या घरची नाही…’, शमीच्या कोचचा आगरकर-गंभीरवर थेट हल्लाबोल appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 24 Nov 2025 11:08 pm

Alandi Police Route March: आळंदी नगरपरिषद निवडणूकीच्या अनुषंगाने पोलिसांचे शांतता संचलन

आळंदी: आगामी आळंदी नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी आज सोमवारी सकाळी ११:३० वाजेच्या दरम्यान आळंदी व दिघी पोलीस स्टेशनच्या हद्दीत रूट मार्च काढण्यात आला. सहाय्यक पोलीस आयुक्त, चाकण विभाग सचिन कदम, यांच्या प्रमुख उपस्थितीत हे संचलन झाले. आळंदी पोलीस स्टेशनपासून सुरू होऊन नगरपरिषद चौक- पीसीएमटी चौक-वाय जंक्शन- देहूफाटा- चाकण चौक- केळगाव चौक- घुंडरे आळी […] The post Alandi Police Route March: आळंदी नगरपरिषद निवडणूकीच्या अनुषंगाने पोलिसांचे शांतता संचलन appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 24 Nov 2025 11:06 pm

Gold -Silver Prices: सोन्या चांदीत चढ-उतारांची मालिका सुरूच, आज पुन्हा दर झाले कमी

नवी दिल्ली – डॉलर बळकट होत असल्यामुळे त्याचा चलन बाजार, शेअर बाजाराबरोबर सोने आणि चांदीच्या दरावरही परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. सोमवारी दिल्ली सराफात सोने आणि चांदीच्या दरात बरीच घट नोंदी केली. दिल्ली सराफात सोन्याचा दर 700 रुपयांनी कमी होऊन 1 लाख 25 हजार 400 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. तयार चांदीचा दर 1 […] The post Gold -Silver Prices: सोन्या चांदीत चढ-उतारांची मालिका सुरूच, आज पुन्हा दर झाले कमी appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 24 Nov 2025 10:36 pm

BMC Election 2025: मुंबई हातातून निसटली तर…: ‘राज ठाकरें’चा मराठी समुदायाला ‘अखेरचा’इशारा

मुंबई: आगामी मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण ढवळून निघाले असतानाच, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी मतदारांना आणि कार्यकर्त्यांना अत्यंत महत्त्वाचा इशारा दिला आहे. मनसेच्या कोकण महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना राज ठाकरे यांनी या निवडणुकीला ‘मराठी समुदायासाठीचा अखेरचा महत्त्वाचा’ लढा असे संबोधले. “हा बीएमसी निवडणुकीत जर आपण हलगर्जीपणा केला, तर मुंबई […] The post BMC Election 2025: मुंबई हातातून निसटली तर…: ‘राज ठाकरें’चा मराठी समुदायाला ‘अखेरचा’ इशारा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 24 Nov 2025 10:26 pm

काँग्रेसची मोठी कारवाई.! 7 नेत्यांची पक्षातून केली हकालपट्टी, काय आहे कारण

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएच्या शानदार विजयाने काँग्रेस आणि आरजेडीला मोठा धक्का बसला. महागठबंधनला काही जागा मिळाल्या, तर काँग्रेसने ६१ पैकी फक्त ६ जागा जिंकल्या. या दारुण पराभवानंतर काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी आणि असंतोषाची लाट उसळली आहे. आता पक्षाने मोठी कारवाई करत सात बंडखोर नेत्यांना सहा वर्षांसाठी प्राथमिक सदस्यतेवरून निलंबित केले आहे. ही कारवाई पक्षाच्या […] The post काँग्रेसची मोठी कारवाई.! 7 नेत्यांची पक्षातून केली हकालपट्टी, काय आहे कारण appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 24 Nov 2025 10:26 pm

Pune News : गुंड निकाळजेसह साथीदार अटकेत; ‘उमराटी’तून पिस्तूल खरेदी; दोन पिस्तुले जप्त

पुणे : मोबाइल मनोऱ्याच्या ठेक्याचे पैसे घेण्यासाठी तरुणाचे अपहरण करून त्याला जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या गुंड श्वेतांग निकाळजे याच्यासह साथीदारांना अटक करण्यात आली. निकाळजेकडून देशी बनावटीची दोन पिस्तुले जप्त करण्यात आली. निकाळजेने मध्यस्थांमार्फत मध्य प्रदेशातील उमराटीतून पिस्तुले खरेदी केल्याची माहिती तपासात मिळाली आहे. याप्रकरणी श्वेतांग भास्कर निकाळजे (वय ३७, रा. भीमनगर, मंगळवार पेठ), ओम संजय […] The post Pune News : गुंड निकाळजेसह साथीदार अटकेत; ‘उमराटी’तून पिस्तूल खरेदी; दोन पिस्तुले जप्त appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 24 Nov 2025 10:19 pm

Vijay Wadettiwar : “भाजपला चिंतित केल्याशिवाय स्वस्थता नाही”–विजय वडेट्टीवार

चंद्रपूर – महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येत्या काळात कॉंग्रेस पक्ष किंचित होईल, अशी टीका केली होती. त्यावरुन कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी जोरदार पलटवार केला असून त्यांनी, भाजपला चिंतीत केल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही, धर्मांधतेचे विष पेरत जाती – जाती मध्ये भांडणे लावून लोकशाहीच्या नीतिमूल्यांची गळचेपी करणाऱ्या हुकूमशाही व मनुवादी विचाराच्या भाजपला धडा शिकविण्याचे आवाहन […] The post Vijay Wadettiwar : “भाजपला चिंतित केल्याशिवाय स्वस्थता नाही” – विजय वडेट्टीवार appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 24 Nov 2025 10:13 pm

”तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असू द्या, मालक आपलाच”

कोल्हापूर: राज्याच्या तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असल्या तरी, तिजोरीचा मालक आपल्याकडेच आहे, असा स्पष्ट इशारा भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी गटाला दिला आहे. गडहिंग्लजमधील एका प्रचारसभेत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. काही दिवसांपूर्वी धाराशिवमधील सभेत बोलताना अजित पवार यांनी, “माझ्या हातात राज्याच्या तिजोरीच्या चाव्या आहेत. तुम्ही माझ्या घड्याळाच्या पाठीशी उभे राहिल्यास, […] The post ”तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असू द्या, मालक आपलाच” appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 24 Nov 2025 10:10 pm

स्वच्छ वायूसाठी युवकांची सक्रियता

महापालिकेच्यावतीने चेंबूर येथे कार्यक्रमाचे आयोजन, येत्या २८ नोव्हेंबर रोजी पार पडणार कार्यक्रममुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या वतीने, ‘स्वच्छ वायूसाठी युवकांची सक्रियता’ (उज्ज्वल भविष्यासाठी हरित जीवन) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. चेंबूर येथील विवेकानंद शैक्षणिक संस्थेच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च येथे २८ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११.३० ते दुपारी ३.३० वाजता या वेळेत हा कार्यक्रम पार पडेल.पर्यावरण व वातावरणीय बदलाच्या पार्श्वभूमीवर, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशांनुसार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनात, उपायुक्त (पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग) अविनाश काटे यांच्या देखीरेखीत विविध उपाययोजना केल्या जात आहेत. तसेच, नागरी सहभागाच्या अनुषंगाने विविध उपक्रमांचेही आयोजन केले जात आहेत.याच पार्श्वभूमीवर, केंद्रीय पर्यावरण, वने आणि वातावरणीय बदल मंत्रालयाकडून राबविण्यात येत असलेल्या राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रम (एनसीएपी) अंतर्गत केंद्र शासन, केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी कार्य मंत्रालय यांच्या सहकार्याने, अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था (एआयआयएलएसजी) यांचे रिजनल सेंटर फॉर अर्बन अँड एन्वायरमेंटल स्टडीज (आरसीयूईएस) यांच्यासह मिळून मुंबई महानगरातील महाविद्यालयांमध्ये ‘उज्ज्वल भविष्यासाठी हरित जीवन’ (ग्रीन लिव्हिंग, बेटर टुमारो) हे अभियान मुंबई महानगरपालिका राबवित आहे.याच अनुषंगाने, ‘स्वच्छ वायूसाठी युवकांची सक्रियता’ (उज्ज्वल भविष्यासाठी हरित जीवन) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे (ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गर्व्हमेंट) महासंचालक डॉ. जयराज फाटक, संचालक डॉ. अजित साळवी यांची या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती राहील.या कार्यक्रमामध्ये युवा नेतृत्व केंद्रीत राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रम (एनसीएपी), आंतरसक्रिय पर्यावरणपूरक उपक्रम; स्वच्छ वायू, शाश्वतता आणि हरित जीवनशैलींबाबत विद्यार्थ्यांचे अविष्कार, आरसीयूईएससोबत मिळून बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून केले जाणारे विविध प्रयत्न आदी बाबींवर प्रकाशझोत टाकण्यात येईल.या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी ८६५७६२२५५०/५१/५२/५४ या क्रमांकांवर संपर्क साधावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

फीड फीडबर्नर 24 Nov 2025 10:10 pm

राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसारच प्रारुप मतदार यादी केली प्रसिध्द

महापालिकेने केले स्पष्टमुंबई (खास प्रतिनिधी) : राज्य निवडणूक आयोगाने जारी केलेल्या वेळापत्रकानुसार, प्रारुप मतदार यादीची दिनांक १४ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रसिद्धी करणे अपेक्षित होते. त्यानुसार, राज्य निवडणूक आयोगाकडून महानगरपालिका प्रशासनास प्रारुप मतदार यादी प्राप्त झाल्या. त्यावर १४ नोव्हेंबर २०२५ असा तारखेचा उल्लेख होता. परंतु, यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाकडून सुधारित वेळापत्रक जारी करण्यात आले. त्यानुसार, २० नोव्हेंबर २०२५ रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्याचे आदेश महानगरपालिका प्रशासनास प्राप्त झाले.मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक-२०२५ च्या प्रारुप मतदार यादीवरील तारखेच्या अनुषंगाने प्रसार माध्यम आणि समाज माध्यमांवरुन आरोप केले जात आहेत. तथापि, हे आरोप तथ्यहीन आहेत, असे स्पष्टीकरण मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. प्रारुप मतदार यादीच्या प्रकाशित प्रतींवर १४ नोव्हेंबर २०२५ हा उल्लेख होता. मात्र, ही यादी माननीय राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार २० नोव्हेंबर २०२५ रोजीच प्रसिद्ध करण्यात आली. त्यापूर्वी ही यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध झाली नाही अथवा महानगरपालिकेच्या निवडणूक शाखेतून वितरितही करण्यात आली नाही. त्यामुळे, प्रारुप मतदार यादीवरील तारखेवरुन संभ्रम निर्माण करणे अथवा आरोप करणे तथ्यहीन आहे, असे मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात येत आहे.

फीड फीडबर्नर 24 Nov 2025 10:10 pm

'विकास आणि संस्कृतीला समान महत्त्व देत कार्य करणार'

त्र्यंबकेश्वर (प्रतिनिधी) : कुंभमेळ्यासाठी जगभरातून लाखो-कोट्यवधी भाविक नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये येणार आहेत. त्यामुळे ही नगरी स्वच्छ, सुव्यवस्थित आणि पवित्र वाटेल अशी करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. मी येथे कोणावर टीका करायला आलेलो नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘विकास भी और विरासत भी’ हा मंत्र आम्हाला मार्गदर्शक आहे. विकास आणि संस्कृती या दोन्हीला समान महत्त्व देत आम्ही काम करणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.कुंभमेळा पूर्वतयारी आणि त्र्यंबकेश्वर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथे झालेल्या सभेत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री गिरीश महाजन, ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी, बाळासाहेब सानप, माजी आमदार बबनराव घोलप, वैभव पिचड, माजी राज्यमंत्री भारती पवार, जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव, भाजपा ओबीसी जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, त्र्यंबकेश्वर नगराध्यक्ष पदाचे भाजप उमेदवार कैलास घुले यांच्यासह त्र्यंबक व इगतपुरी येथील उमेदवार उपस्थित होते.फडणवीस म्हणाले की, गोदावरी, त्र्यंबकेश्वर आणि सनातन संस्कृतीच्या वैभवाची आठवण करून देत मतदारांनी विकासाच्या ध्येयाने एकत्र येण्याची गरज आहे. पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, सांडपाणी प्रकल्प, आरोग्य आणि शिक्षण अशा मूलभूत सुविधा मजबूत करण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले. कुंभमेळ्याच्या निमित्ताने सुरू केलेल्या प्रकल्पांचा लाभ नागरिकांना संपूर्ण वर्षभर मिळणार आहे.आखाडा परिषदेचे महंत शंकरानंद सरस्वती, पालकमंत्री गिरीश महाजन, लक्ष्मण सावजी, माजी आमदार बबनराव घोलप, वैभव पिचड आणि माजी राज्यमंत्री भारती पवार यांनीही मनोगत व्यक्त केले.त्र्यंबकेश्वरमधील महंत गोरक्षनाथ, आखाड्याचे पीठाधीश्वर गणेशनाथ महाराज, निरंजनी आखाड्याचे धनंजयगिरी महाराज, भाजपा आध्यात्मिक आखाड्याचे महंत सिद्धेश्वरानंद सरस्वती, निळपर्वतावरील महंत सचिव दीपक गिरी, पंचायती महानिर्वाण आखाड्याचे सचिव रमेशगिरी महाराज, श्रीराम शक्तीपीठाचे महंत सोमेश्वरानंद सरस्वती महाराज, तेजस ढेरगे, सुयोग वाडेकर, शिखरे बंधू, पंकज धारणे यांचीही उपस्थिती होती. सभा स्थळी पोलिसांनी चौख बंदोबस्त ठेवला होता.कोणाचेही घर किंवा दुकान तोडणार नाहीत्र्यंबकेश्वरमध्ये २४ तास स्वच्छ पाणी उपलब्ध करून देणार असून उत्तम रस्ते आणि आरोग्यसेवा निर्माण करणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. विस्थापनाबाबत अफवा पसरवल्याचा आरोप करत त्यांनी सांगितले, “कुंभ किंवा विकास प्रकल्पांच्या नावाखाली कोणाचेही घर किंवा दुकान तोडले जाणार नाही. सर्वांना सोबत घेऊनच काम करणे हेच आमचे ब्रीदवाक्य आहेLIVE | त्रिंबक नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाचे भाजपा उमेदवार कैलास घुले व सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा दु. २.१५ वा. | २४-११-२०२५ त्र्यंबकेश्वर, नाशिक.@BJP4Maharashtra#Maharashtra #Trimbakeshwar #NagarParishadSabha https://t.co/OrZoHuPRy5— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 24, 2025

फीड फीडबर्नर 24 Nov 2025 10:10 pm

Sunil Gavaskar : कोलकाता पिचवर ओरड, पर्थवर मौन; गावसकरांनी उघड केले ICCचे दुटप्पी धोरण

Sunil Gavaskar on AUS vs ENG 1st test : पर्थ कसोटी केवळ दोन दिवसांत संपली, ही खेळपट्टी कसोटी सामन्यासाठी आदर्श नव्हती. मात्र कोलकाता कसोटीच्या खेळपट्टीवरून टीका करणारे समिक्षक पर्थ कसोटीच्या खेळपट्टीबाबत गप्प का, असा सवाल विक्रमादीत्य सुनील गावस्कर यांनी केला आहे. कोलकाताच्या कसोटीत वापरली गेलेली खेळपट्टी कसोटी सामन्याला अनुसरुन नव्हती, अशी टीका टीकाकारांनी केली होती. […] The post Sunil Gavaskar : कोलकाता पिचवर ओरड, पर्थवर मौन; गावसकरांनी उघड केले ICCचे दुटप्पी धोरण appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 24 Nov 2025 9:56 pm