SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

30    C
...

Political News : शिंदेंच्या ‘ऑपरेशन टायगर’ची पहिली शिकार? ठाकरेंच्या ‘फायरब्रँड’नेत्याची भाजपशी जवळीक!

महाराष्ट्राच्या राजकारणात (Political News) पुन्हा एकदा ऑपरेशन टायगरची चर्चा जोरात सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील खासदारांना फोडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे.

दैनिक प्रभात 13 Apr 2026 4:16 pm

Pune Crime : धक्कादायक ! शरीरात दैवी शक्तीचा वास असल्याचं भासवून महिलेवर अत्याचार

पुणे : पुण्यामधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील स्वारगेट परिसरात एका भोंदूबाबानं चक्क अंगात देवी शक्ती असल्याचं भासवून एका विवाहित महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.आरोपीनं केवळ अत्याचारच केला नाही, तर पीडित महिलेकडून तब्बल ५० लाख रुपये देखील उकळले आहेत. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी औदुंबर मनोहर गडदे याचा शोध सुरु आहे.मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही कौटुंबिक वादामुळे पतीपासून वेगळी राहत होती. तिच्या याच मानसिक परिस्थितीचा आणि असहायतेचा फायदा आरोपी औदुंबर गडदे यानं घेतला.आपण 'देवऋषी' असून आपल्या अंगात दैवी शक्ती असल्याचं त्यानं महिलेला पटवून दिलं. एवढेच नव्हे तर आरोपीनं पीडितेवर विश्वास संपादन केल्यानंतर तिला स्वारगेट परिसरातील एका लॉजवर बोलावलं आणि तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला. त्यानंतर या आरोपीनं तिला रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे नेलं आणि तिथेही तिच्यावर अत्याचार केल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे.https://prahaar.in/2026/04/13/pune-municipal-corporation-submit-a-detailed-clarification-regarding-the-restructuring-of-regional-offices/आरोपीनं अत्याचारासोबतच पीडितेला ५० लाखांचा गंडा देखील घातला. आपल्यासोबत फसवणूक आणि अत्याचार झाल्याचं लक्षात येताच महिलेनं धाडस करून पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणी स्वारगेट पोलिसांनी आरोपी औदुंबर मनोहर गडदे विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. सध्या हा आरोपी फरार असून त्याचा शोध सुरु आहे.

फीड फीडबर्नर 13 Apr 2026 4:10 pm

Stock Market: ‘या’ 3 कारणांचा भारतीय शेअर बाजारावर परिणाम; सेन्सेक्स 702 अंकांनी घसरला, निफ्टी 23,842 वर बंद

Stock Market: इराण-अमेरिका यांच्यातील विसंवाद आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती जोपर्यंत शांत होत नाहीत, तोपर्यंत शेअर बाजारात अस्थिरता कायम राहण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

दैनिक प्रभात 13 Apr 2026 4:06 pm

Congress Crisis : काँग्रेसला मोठा धक्का! ‘या’बड्या नेत्याचा राजीनामा; अंतर्गत वाद चिघळले

Congress Crisis : कर्नाटक काँग्रेसचे अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष के. अब्दुल जब्बार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

दैनिक प्रभात 13 Apr 2026 3:57 pm

Congress News : आगामी 3 दिवसांच्या विशेष अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून थ्री-लाईन व्हीप जारी

संसदेच्या आगामी तीन दिवसांच्या विशेष अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने (Congress News) आपल्या सर्व लोकसभा खासदारांना व्हीप जारी केला आहे.

दैनिक प्रभात 13 Apr 2026 3:47 pm

Baramati By-election: सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराचा माळेगाव बुद्रुकमध्ये मंगळवारी शुभारंभ

Baramati By-election: सकाळी ९ वाजता गावातील भैरवनाथ मंदिरात नारळ वाढवून प्रचाराला सुरुवात केली जाणार आहे.

दैनिक प्रभात 13 Apr 2026 3:42 pm

Asha Bhosle : आशा भोसलेंच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेताना रेश्मी ठाकरे, सचिन तेंडुलकरला अश्रु अनावर

Asha Bhosle : ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख, गायिका अनुराधा पौडवाल, अभिनेता रितेश देशमुख यांनीही आशा भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

दैनिक प्रभात 13 Apr 2026 3:22 pm

Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या मुद्द्यावर व्हान्स यांना बनवले बळीचा बकरा ? ; ‘त्या’विधानांनी चर्चांना उधाण

Donald Trump: जगाची कोंडी करणाऱ्या अमेरिका इस्रायल आणि इराण यांच्यात सुरु असलेल्या युद्धावर काही तरी तोडगा निघेल अशी शक्यता होती

दैनिक प्रभात 13 Apr 2026 3:17 pm

Government Recruitment : सरकारी भरती प्रक्रियेत मोठे बदल

मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय; रिक्त पदे भरण्यासाठी 'यूपीएससी'च्या धर्तीवर नवा आराखडामुंबई : ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ या संकल्पनेला मूर्तरूप देण्यासाठी राज्य सरकारने सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत नोकरभरती प्रक्रियेत ऐतिहासिक सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासकीय सेवेतील रिक्त पदांचा अनुशेष भरून काढण्यासाठी आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) माध्यमातून भरल्या जाणाऱ्या संवर्गांची संख्या ५३ वरून थेट १५३ पर्यंत वाढवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) धर्तीवर भरती प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी 'महाजॉब्स' पोर्टलद्वारे 'निपुण सेतू' हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवण्यावरही बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले.या नवीन सुधारणांमुळे संयुक्त परीक्षा योजनेमध्ये अनेक नवीन सेवांचा समावेश होईल, ज्याचा मोठा फायदा स्पर्धा परीक्षा देणाऱ्या राज्यातील लाखो उमेदवारांना होणार आहे. याशिवाय आरोग्य आणि पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठीही सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. राज्यातील वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सी (जायका) कडून ३ हजार ७०८ कोटी रुपयांचे वित्तीय साहाय्य घेण्यास सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. याचसोबत, महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या अधिनियमात सुधारणा करून सदस्यांची नियुक्ती आता निवडणुकीऐवजी शासनाकडून थेट नामनिर्देशन पद्धतीने करण्याचा महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे.मच्छिमारांच्या सोयी-सुविधांसाठी ६१ कोटीराज्यातील सागरी जिल्ह्यांमध्ये मासेमारी करणाऱ्या मच्छिमारांना मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. नाबार्डच्या ग्रामीण पायाभूत विकास निधी अंतर्गत या कामांसाठी ६१ कोटी २४ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. यामुळे बंदरांचा विकास आणि मासळी साठवणुकीच्या सुविधा अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे.https://prahaar.in/2026/04/13/noida-employees-protest-protest-over-salary-hike-turns-violent-police-vehicles-overturned-stone-pelting-begins-at-company/प्रादेशिक असमतोल दूर करण्याचा प्रयत्नराज्यातील प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी नियोजन विभागाने नीति आयोगाच्या आकांक्षित जिल्हा कार्यक्रमात हिंगोली, जालना, पालघर, बीड, धुळे आणि परभणी या सहा जिल्ह्यांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. यामुळे आता राज्यातील एकूण १७७ तालुक्यांमध्ये सर्वांगीण विकासाच्या योजनांना गती मिळणार आहे.https://prahaar.in/2026/04/13/chief-ministers-relief-fund-major-relief-for-patients-these-changes-coming-soon-to-the-scheme/मुंबईत खासगी कौशल्य विद्यापीठाला मंजुरीकौशल्य विकासाला चालना देण्यासाठी मुंबईत ‘आयईएस स्किल टेक’ या खासगी कौशल्य विद्यापीठाच्या स्थापनेला मंजुरी देण्यात आली. नगरविकास क्षेत्रात बदलापूरमधील मंजूर विकास आराखड्यातील स्टेडियमचे आरक्षण बदलून, चार एकर जमीन वीज उपकेंद्रासाठी टाटा पॉवर कंपनीला हस्तांतरित करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

फीड फीडबर्नर 13 Apr 2026 3:10 pm

Pune Municipal Corporation : पुणे महापालिका क्षेत्रीय कार्यालय पुनर्रचनेचा सविस्तर खुलासा सादर करा

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश; सुनेत्रा पवार यांच्या पत्राची दखल, प्रभाग समित्यांच्या सत्तासंतुलनावरून पुणे पालिकेला विचारणामुंबई : पुणे महानगरपालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांच्या पुनर्रचनेमुळे प्रभाग समित्यांमधील सत्तासंतुलन बिघडत असल्याच्या तक्रारीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या संदर्भात थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून राष्ट्रवादी काँग्रेसवर अन्याय होत असल्याचा आरोप केला होता. या पत्राची तातडीने दखल घेत, मुख्यमंत्र्यांनी पुणे महानगरपालिकेकडे या प्रकरणाचा सविस्तर खुलासा मागवला असून नगरविकास विभागाला वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.https://prahaar.in/2026/04/13/ashok-kharat-case-inside-game-in-shaktipeeth-highway-bhondu-baba-ashok-kharat-accused-of-land-purchase-scam/पुणे महानगरपालिकेमध्ये सध्या १५ क्षेत्रीय कार्यालये कार्यरत असून, प्रशासनाने नुकतीच त्यांची नव्याने रचना केली आहे. मात्र, या पुनर्रचनेनंतर राजकीय गणिते बदलल्याचा दावा सुनेत्रा पवार यांनी आपल्या पत्रात केला आहे. विशेषतः वडगाव शेरी आणि येरवडा या भागात राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अधिक संख्येने निवडून आले असतानाही, नव्या रचनेमुळे संबंधित प्रभाग समित्यांचे अध्यक्षपद भाजपच्या पारड्यात गेल्याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. हा बदल अन्यायकारक असून यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकशाही समतोल बिघडत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली होती.https://prahaar.in/2026/04/11/appreciating-swadeshi-skill-development-department-is-the-first-in-the-state-to-take-help-from-swadeshi-consulting-companies/मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची दखल घेत, महापालिका आयुक्तांनी या रचनेचा आधार काय होता आणि तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे सत्तासंतुलनात तफावत निर्माण झाली आहे का, याचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल शासनाला सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. नगरविकास विभागालाही या संदर्भात लक्ष घालण्यास सांगण्यात आले असून, महापालिकेकडून येणाऱ्या अहवालानंतर शासन स्तरावर या पुनर्रचनेत काही बदल केले जाणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

फीड फीडबर्नर 13 Apr 2026 3:10 pm

Asha Bhosle Music Academy : मुंबईत होणार ‘आशा भोसले संगीत अकॅडमी’

मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय; वांद्रे-अंधेरी दरम्यान जागेचा शोध घेण्यासाठी म्हाडाला आदेशमुंबई : ज्येष्ठ पार्श्वगायिका पद्मविभूषण आशा भोसले यांच्या निधनानंतर, त्यांनी व्यक्त केलेली एक मोठी इच्छा पूर्ण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुंबईत राज्य सरकारच्या वतीने ‘आशा भोसले संगीत अकॅडमी’ स्थापन करण्यात येणार असून, मंत्रिमंडळाच्या सोमवारी झालेल्या बैठकीत या प्रस्तावावर मोहोर उमटवण्यात आली. वांद्रे ते अंधेरी दरम्यान या अकॅडमीसाठी हक्काची जागा उपलब्ध करून देण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला दिले आहेत.https://prahaar.in/2026/04/13/asha-bhosle-funeral-mumbai-police-ready-to-bid-farewell-to-asha-bhosle-important-changes-in-traffic-will-be-made/आशा भोसले यांनी आपल्या हयातीत राज्य सरकारकडे मुंबईत एका जागतिक दर्जाच्या संगीत अकॅडमीसाठी मागणी केली होती. वांद्रे आणि अंधेरी दरम्यानच्या परिसरात यासाठी जागा मिळावी, अशी त्यांची आग्रही विनंती होती. सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंत्री प्रताप सरनाईक यांनी आशाताईंच्या स्मारकाचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर भाष्य करताना मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, केवळ पारंपरिक स्मारक उभारण्यापेक्षा आशाताईंनी स्वतः दिलेला संगीत अकॅडमीचा प्रस्ताव पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.https://prahaar.in/2026/04/13/asha-bhosle-the-singing-career-and-awards-of-the-empress-of-melody-asha-bhosle/या निर्णयानुसार, संगीत क्षेत्रातील नवोदित कलाकारांना प्रशिक्षण देण्यासाठी ही अकॅडमी मैलाचा दगड ठरणार आहे. या प्रकल्पासाठी योग्य जागेचा शोध घेण्याची जबाबदारी म्हाडाकडे सोपवण्यात आली आहे. वांद्रे ते अंधेरी या पट्ट्यात शासकीय भूखंड उपलब्ध करून देऊन तिथे अत्याधुनिक सुविधांनी सज्ज अशी ही वास्तू उभारली जाईल.

फीड फीडबर्नर 13 Apr 2026 3:10 pm

Kanjur Marg to Badlapur Metro : लवकरच धावणार शहरातील सर्वात लांब मेट्रो; बदलापूरकरांना होणार फायदा

मुंबई : संपूर्ण मुंबईत मेट्रो आपले जाळे विणत चाललं आहे, त्यामुळे मुंबईकरांचा दररोजचा प्रवास हा सुखकर आणि सोयीस्कर होतो आहे. अनेक ठिकाणी जलद गतीने जाणे हे मेट्रोमुळे शक्य झाले आहे. त्यातच आता लवकरच शहरातील सर्वात लांब मेट्रो मार्गिका आकार घेणार आहे, त्यामुळेच कांजूर मार्ग ते बदलापूर मेट्रो १४ प्रकल्पासाठी नव्या सल्लागार तज्ज्ञाची नेमणूक करण्यात आली आहे.शहरातील सर्वाधिक लांब मेट्रो मार्गिका मेट्रो १४ मार्गिकेच्या उभारणीसाठी पुन्हा नव्याने प्रकल्प अहवालाचे पुनर्विलोकन केले जाणार आहे. यापूर्वीही या मेट्रोचा अहवाल तयार करण्यात आला होता. आता त्या अहवालाची समीक्षा केली जाणार आहे. बदलापूर परिसरातून अनेक प्रवासी मुंबईत नोकरीसाठी येतात, त्यामुळे नोकरदार वर्गाला आणि लाखो प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई अशा विविध मेट्रो प्रकल्पांना जोडणारी ही एकमेव मेट्रो मार्गिका असणार आहे.https://prahaar.in/2026/04/13/chief-ministers-relief-fund-major-relief-for-patients-these-changes-coming-soon-to-the-scheme/ठाणे - भिवंडी मेट्रोचे काम मेट्रो ५ आणि कल्याण ते तळोजा १२ या मेट्रोचे काम वेगाने सुरु आहे. मेट्रो १४ मुळे कल्याण पलीकडच्या शहरातील प्रवाशांना लाभ होणार आहे. कांजूर मार्ग ते बदलापूर दरम्यान धावणारी ही मेट्रो वेगाने मार्गी लावण्यासाठी एमएमआरडीएने प्रकल्प अहवाल पुनविर्लोनासाठी निविदा मागवल्या आहेत.लाखो प्रवाशांना होणार फायदा झपाट्याने विकास होणाऱ्या बदलापूर परिसरातील लाखो प्रवाशांना मुंबईत जाण्यासाठी सध्या तरी उपनगरीय रेल्वेशिवाय कोणताही पर्याय उपलब्ध नाही. त्यामुळे प्रचंड गर्दीचा सामना करत मुंबईत येणाऱ्या नोकरदारांना ही मेट्रो म्हणजे वरदान ठरणार आहे.https://prahaar.in/2026/04/13/hardik-pandya-hat-trick-in-mumbais-defeat-hardik-pandyas-captaincy-criticized-by-veteran-players-and-everyone-around/असा असेल मार्ग कांजूर मार्ग ते ज्युवेली गाव, बदलापूरमार्गाची लांबी : ४३. ६९प्रस्तावित स्थानकांची संख्या : २४ ( कांजूर ,मार्ग येथे एक भूमिगत स्थानक )मेट्रोची रचना : सहा डब्यांची गाडीकमाल वेग : ९० किमी प्रति तासवाहतुकीचा सरासरी वेग : ५५ किमी प्रतितास

फीड फीडबर्नर 13 Apr 2026 2:30 pm

Noida Employees Protest : पगारवाढीवरून सुरु झालेल्या आंदोलनाने घेतले हिंसक वळण; पोलिसांची वाहने उलथवून टाकली तर कंपनीवर तुफान दगडफेक सुरु

- एकाच वेळी ६ कंपन्यांतील कामगारांचे आंदोलन सुरुउत्तर प्रदेश मधील नोएडा येथे वेतनवाढीच्या मागणीसाठी कारखाना कामगारांनी केलेल्या आंदोलनाने आज (सोमवार १३ एप्रिल) हिंसक रूप धारण केले आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, विविध औद्योगिक युनिट्समधील मोठ्या संख्येने कामगार एकत्र येत पगारवाढीच्या प्रलंबित मागणीसाठी निदर्शने करत होते. आंदोलनादरम्यान कामगारांनी जोरदार घोषणाबाजी केली. मात्र काही आंदोलनकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत मालमत्तेची तोडफोड केली, दगडफेक केली आणि एका वाहनाला आग लावली.सध्या ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याने परिस्थिती तणावपूर्ण असली तरी नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र पोलिसांनी कर्मचाऱ्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फेकण्यात आल्या. ही घटना नोएडा फेज २ मध्ये घडली.https://prahaar.in/2026/04/13/asha-bhosle-funeral-mumbai-police-ready-to-bid-farewell-to-asha-bhosle-important-changes-in-traffic-will-be-made/मुख्यमंत्र्यांनी दिले कडक कारवाईचे आदेश : दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी अधिकाऱ्यांना कडक कारवाईचे निर्देश दिले आहेत. कामगारांना भडकवणाऱ्या असामाजिक घटकांविरोधात कठोर पावले उचलण्याचे देखील आदेश देण्यात आले आहेत.

फीड फीडबर्नर 13 Apr 2026 2:10 pm

Solapur News : झाडाला बांधलेली दोरी सुटली आणि... सख्ख्या भावंडांवर काळाचा घाला

सोलापूर : सोलापूर तालुक्यातील औज मंद्रूप परिसरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. अंकलगी वस्तीवरील शेततळ्यात बुडून २ सख्ख्या भाऊ-बहि‍णीचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर संपूर्ण सोलापुरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ही घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील कारकल येथे घडली आहे. श्रवण संतोषकुमार अंकलगी (वय १५) व श्रावणी संतोषकुमार अंकलगी (१०), असं मृत्यू झालेल्या बहीण-भावाचं नाव आहे.मृत्यू झालेल्या बहीण-भावाचे वडिल संतोषकुमार अंकलगी यांचं काही वर्षापूर्वी अपघातात निधन झालं. त्यानंतर आई उषा संतोषकुमार अंकलगी या दोन्ही मुलांबरोबर कारकल येथील शेतात राहत होते.नेमकं काय घडलं ?रविवारी म्हणजेच १२ एप्रिल २०२६ रोजी उषा अंकलगी या कामानिमित्त सोलापूरला गेल्या होत्या. मुलगा श्रवण हा शाळेला सुट्टी असल्यानं विंचूरवरून घरी कारकलला आला होता. दुपारी दीडच्या दरम्यान श्रवण आणि श्रावणी शेततळ्यात पोहण्यासाठी गेले यावेळी शेततळ्यातून बाहेर पडता यावं, यासाठी त्यांनी झाडाला दोरी बांधून ती कमरेला बांधली होती. मात्र, दुर्दैवानं झाडाला बांधलेली दोरी सुटली आणि दोघेजण पाण्यात बुडू लागले. पण, त्यावेळी त्यांना वाचविण्यासाठी कोणीच नव्हते.नात,नातू शेततळ्यात जाऊन खूप वेळ झाले तरी त्याचा पोहण्याचा आवाज येत नसल्यानं आजी महादेवी कोळी शेततळ्याकडे गेल्या असता श्रवण आणि श्रावणी पाण्यात बुडाल्याचे दिसले. आजीने आरडाओरडा केला. त्यांचा आवाज ऐकून विद्यानंद वालीकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी शेजारील मल्लिकार्जुन सोनगी, महादेव कांबळे आणि वालीकर या तिघांनी शेततळ्यात उडी घेऊन श्रवण व श्रावणी यांना बाहेर काढलं.दोन्ही चिमुकले बेशुद्धावस्थेत आढळून आले. उपचारासाठी मंद्रप ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं . याचा अधिक तपास पोलिस हवालदार विठ्ठल बिराजदार हे करीत आहेत.या घटनेमुळे अंकलगी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. काही वर्षांपूर्वीच या मुलांच्या वडिलांचे अपघाती निधन झाले होते. वडील नसल्यामुळे आई आणि आजीने मोठ्या कष्टाने या दोन्ही मुलांचा सांभाळ केला होता. मात्र, काळाने घाला घातल्यानं दोन्ही मुले एकाच वेळी हिरावली गेली. या घटनेमुळे औज मंद्रूपसह संपूर्ण दक्षिण सोलापूर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

फीड फीडबर्नर 13 Apr 2026 2:10 pm

PM Modi on Women Empowerment : ‘महिलांच्या सहभागामुळे आपली लोकशाही अधिक मजबूत होईल’ ; ‘नारी शक्ती वंदन अभियाना’विषयी पंतप्रधानांची प्रतिक्रिया

PM Modi on Women Empowerment : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील 'नारी शक्ती वंदन अभियान' कार्यक्रमात महिलांचा राजकीय सहभाग बळकट करण्याच्या गरजेवर भर दिला.

दैनिक प्रभात 13 Apr 2026 1:31 pm

Hardik Pandya : मुंबईच्या पराभवाची हॅट्रिक; हार्दिक पंड्याच्या कॅप्टनशीवर दिग्गज खेळाडूंसह चहुबाजुंनी टीका

मुंबई : RCB ने वानखेडेच्या ऐतिहासिक मैदानावर दमदार खेळ करत Mumbai Indians ला १८ धावांनी पराभूत केले. या पराभवामुळे मुंबई इंडियन्सच्या नावावर सलग तिसरा पराभव नोंदवला गेला असून संघाची स्थिती पॉईंट टेबलमध्ये खालावली आहे. कर्णधार हार्दिक पंड्या Hardik Pandya याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला, मात्र आरसीबीच्या फलंदाजांनी तो पूर्णपणे चुकीचा ठरवला. त्यामुळे पुन्हा एकदा पंड्याच्या कॅप्टनशीवर दिग्गजांकडून टीका होत आहे.अनेक आंतरराष्ट्रीय दिग्गज खेळाडू असणाऱ्या आणि कागदावर सर्वात मजबूत संघांपैकी एक असलेल्या मुंबईने शेवटचे आयपीएल विजेतेपद २०२० मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली जिंकले होते. त्यानंतर हार्दिक पंड्या २०२४ मध्ये गुजरात टायटन्सकडून एका मोठ्या ट्रेडद्वारे मुंबईच्या संघात सामील झाला. गुजरातच्या संघाला त्याने २०२२ मध्ये त्यांच्या पहिल्या हंगामात विजेतेपद मिळवून दिले होते. मात्र गेल्या हंगामात आणि आताच्याही चालू हंगामात मुंबईच्या खराब कामगिरीमुळे हार्दिकच्या कॅप्टनशीवर अनेकांकडून टीका होता आहे.भारताचा माजी फलंदाज श्रीकांत यांनी मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याला नेतृत्वाची सूत्रे स्वतःहून सूर्यकुमार यादवकडे सोपवण्याचे आवाहन केले आहे. आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना, श्रीकांत यांनी हार्दिक, रोहित आणि सूर्या यांच्यासह संघ व्यवस्थापनाला एकत्र येऊन भविष्यासाठी एक स्पष्ट आराखडा ठरवण्याचे आवाहन केले. त्यांनी नेतृत्वाची परिस्थिती विचित्र असल्याचे म्हटले आणि विश्वचषक विजेते कर्णधार रोहित व सूर्यकुमार हे हार्दिकच्या नेतृत्वाखाली खेळत असल्याचे निदर्शनास आणून दिले.श्रीकांत यांनी पुढे सांगितले की, सध्या संघात नेतृत्वाबाबत “विचित्र परिस्थिती” निर्माण झाली आहे, कारण दोन टी२० विश्वचषक विजेते कर्णधार रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव हे हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळत आहेत. त्यांच्या मते, व्यवस्थापनाने या परिस्थितीवर तातडीने तोडगा काढणे गरजेचे आहे.https://prahaar.in/2026/04/12/gujarat-secures-second-consecutive-victory-thanks-to-buttler-and-gill-lucknow-crumbles-before-gujarats-bowling-attack/त्यांनी पुढे असे सुचवले की, या वर्षी सूर्यकुमार यादवला कर्णधार म्हणून संधी देऊन पाहावी, ज्यामुळे संघाच्या कामगिरीत बदल होतो का हे तपासता येईल. अधिकृत बदल लगेच जाहीर करण्याची गरज नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.श्रीकांत यांच्या मते हार्दिक चांगला कर्णधार आहे, मात्र संघाच्या हितासाठी त्याने स्वतः पुढाकार घेऊन नेतृत्व सूर्यकुमार यादवकडे सोपवण्याचा विचार करावा. “हार्दिकने स्वतः पुढे येऊन ‘सूर्याने नेतृत्व करावे आणि मी त्याला साथ देईन’ असे म्हटले, तर हा प्रश्न सहज सुटू शकतो,” असेही त्यांनी नमूद केले.तसेच भारतीय संघाचा माजी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) याने देखील कर्णधार हार्दिक पंड्याच्या गोलंदाजीतील निर्णयांवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. आपल्या यूट्यूब चॅनलवरील व्हिडिओमध्ये बोलताना अश्विनने २०२४ मधील हैद्राबाद आणि बंगळुरू यांच्या सामन्याचा संदर्भ देत काही महत्त्वाच्या चुकांकडे लक्ष वेधले.अश्विनने सांगितले की त्या सामन्यात रजत पाटीदारने फिरकी गोलंदाज मयंक मार्कंडे (Mayank Markande) याच्यावर जोरदार हल्ला करत चार षटकार ठोकले होते. त्यानंतरही मुंबई इंडियन्सने (MI) पाटीदारच्या फलंदाजीचा विचार न करता मार्कंडेला पुन्हा गोलंदाजी दिली, हा निर्णय योग्य नव्हता.https://prahaar.in/2026/04/12/bcci-to-investigate-rajasthan-royals-manager/“पाटीदार फिरकीविरुद्ध अत्यंत आक्रमक फलंदाज आहे, हे माहित असूनही त्याला मार्कंडे दिला गेला, हा स्मार्ट निर्णय नव्हता,” असे अश्विन म्हणाला. त्याने पुढे सांगितले की पाटीदारने त्याच गोलंदाजाविरुद्ध पुन्हा एकदा सुरुवातीपासूनच जोरदार फटकेबाजी केली.या सामन्यात मार्कंडेने दोन षटकांत तब्बल ४० धावा दिल्या, तर दुसरा फिरकीपटू मिचेल सँटनर (Mitchell Santner) यालाही ४३ धावा मोजाव्या लागल्या. एकूणच मुंबईच्या फिरकी गोलंदाजांनी सहा षटकांत ८३ धावा दिल्याने सामन्याचे चित्र बदलले, असे अश्विनने नमूद केले.त्याच्या मते, अशा चुकीच्या गोलंदाजी बदलांमुळे संघाला २१० आणि २४० धावांमधील फरक सहन करावा लागतो, जो अखेरीस सामन्याचा निकाल ठरवतो.

फीड फीडबर्नर 13 Apr 2026 1:30 pm

Mukhyamantri Sahayata Nidhi : रुग्णांसाठी मोठा दिलासा, मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजनेत लवकरच होणार 'हे'बदल

मुंबई : मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षासाठी आता ऑनलाईन प्रणाली सुरू करण्यात येणार आहे. या नवीन प्रणालीमुळे वैद्यकीय मदतीसाठी अर्ज मंजुरीची प्रक्रिया अवघ्या ८ तासांत पूर्ण होणार असून, लवकरच रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रणालीचं उद्घाटन करण्यात येणार आहे.नव्या व्यवस्थेनुसार रुग्णाला स्वतंत्रपणे अर्ज करण्याची गरज राहणार नाही. संबंधित रुग्णालयच रुग्णाची कागदपत्रे तपासून अर्ज थेट मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाकडे पाठवणार आहे. त्यामुळे प्रक्रिया अधिक सोपी आणि जलद होणार आहे. तसेच, रुग्णालयात आवश्यक कागदपत्रे सादर केल्यानंतर पुढील सर्व प्रक्रिया प्रशासनाच्या माध्यमातून पार पडणार असल्यानं रुग्ण आणि नातेवाईकांची धावपळ कमी होईल.या नवीन ऑनलाईन प्रणालीमुळे अर्ज मंजुरीची प्रक्रिया वेगवान होणार असून सर्व कागदपत्रे पूर्ण आणि नियमांनुसार असल्यास केवळ ८ तासांत मंजुरी दिली जाणार आहे. त्यामुळे गंभीर रुग्णांना तातडीनं आर्थिक मदत मिळून उपचारांना गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.मदत कक्षामध्ये रुग्णस्नेही बदल करण्यात आले असून संपूर्ण प्रक्रिया डिजिटल करण्यात आली आहे. यामुळे पारदर्शकता वाढेल आणि विलंब टाळता येईल. रुग्णालय प्रशासन, मदत कक्ष आणि शासन यांच्यातील समन्वय अधिक प्रभावी होणार असल्यानं सेवा अधिक सक्षम होईल.गेल्या आर्थिक वर्षात राज्यातील ४० हजार ७७६ रुग्णांना एकूण ३३३ कोटी ६ लाख ८१ हजार ५०० रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली असून या आकडेवारीवरून या योजनेचा मोठ्या प्रमाणावर लाभ होत असल्याचं स्पष्ट होतं.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर ही प्रणाली संपूर्ण राज्यात प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी नागरिकांना १८०० १२३ २२११ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन केलं आहे.या ऑनलाईन प्रणालीमुळे वैद्यकीय मदत मिळवण्याची प्रक्रिया अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक होणार असून यामुळे गरजू रुग्णांना वेळेवर उपचार मिळून त्यांच्या अडचणी मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होईल.

फीड फीडबर्नर 13 Apr 2026 1:30 pm

Share Market Today: ट्रम्प यांच्या नव्या धमक्यांमुळे शेअर बाजारात खळबळ ; सेन्सेक्स १६०० हून अधिक अंकांनी घसरला

Share Market Today: इराणमधील युद्ध संपवण्यासाठी इस्लामाबादमध्ये तेहरान आणि अमेरिका यांच्यातील चर्चा अयशस्वी झाल्यामुळे आणि कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे आज भारतीय शेअर बाजार घसरणीसह उघडला.

दैनिक प्रभात 13 Apr 2026 1:15 pm

Baby Care: बाळांच्या डोळ्यात काजळ लावणं सुरक्षित आहे का? जाणून घ्या डॉक्टरांचा स्पष्ट सल्ला

Baby Care काजळ लावताना वापरलेली बोटे किंवा स्टिक स्वच्छ नसल्यास त्यातून बॅक्टेरिया डोळ्यात जाऊ शकतात. यामुळे डोळ्यांना इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो. कंजक्टिव्हायटिस (डोळे येणे) सारख्या समस्या उद्भवू शकतात.

दैनिक प्रभात 13 Apr 2026 1:15 pm

Mumbai Local : आता पश्चिम रेल्वेचा प्रवास होणार अधिक सोयीस्कर, लवकरच या स्थानकांवर धावणार 15 डब्यांची लोकल

मुंबई : पश्चिम रेल्वेचा प्रवास लवकरच अधिक सोयीस्कर होणार आहे. पश्चिम रेल्वेवरील विरार ते डहाणूदरम्यान १९९४ मध्ये उपनगरीय विभाग जाहीर झाल्यानंतर १६ एप्रिल २०१३ रोजी डहाणू-विरार-चर्चगेट बारा डब्यांची लोकल सेवा सुरू झाली होती. सध्या विरार-चर्चगेटदरम्यान १५ डब्यांच्या लोकल धावत असून आता लवकरच डहाणू ते चर्चगेट १५ डब्यांची सेवा सुरू करण्यासाठी स्थानकांवर आवश्यक बदल युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहेत. यामध्ये 'कॉमन स्टॉप मार्क' तसेच प्रथम वर्ग, महिला आणि दिव्यांग डब्यांसाठी दिशादर्शक उभारण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे.पश्चिम रेल्वेच्या सार्वजनिक बांधकाम (पीडब्ल्यूडी) विभागामार्फत सफाळा, केळवा रोड, पालघर, उमरोळी, बोईसर, वाणगाव आणि डहाणू रोड स्थानकांवर १५ डब्यांच्या गाड्या नेमक्या कुठे थांबतील यासाठी 'कॉमन स्टॉप मार्क' बसवण्याचं काम सुरू असून सफाळा स्थानकात फलाट क्रमांक १ वर सध्याच्या १२ डब्यांच्या थांब्यापासून उत्तर दिशेला सुमारे ६६ मीटर अंतरावर, तर फलाट क्रमांक २ वर विद्यमान मार्किंगपासून सुमारे १५ मीटर अंतरावर नवीन मार्क उभारले जात आहेत.केळवा रोड स्थानकातही फलाट क्रमांक १ वर सुमारे ६६ मीटर अंतरावर हे काम सुरू असून पालघर स्थानकातील फलाट क्रमांक ३ वर उत्तर दिशेला सुमारे ६६ मीटर अंतरावर १५ डब्यांच्या लोकलसाठी मार्क उभारले जात आहेत. उमरोळी स्थानकात फलाट क्रमांक १ च्या उत्तर टोकाकडे, तर बोईसर स्थानकात फलाट क्रमांक १ वर सुमारे ४० मीटर अंतरावर हे काम अंतिम टप्प्यात आहे. वाणगाव स्थानकात फलाट क्रमांक २ वर सुमारे ६६ मीटर अंतरावर मार्किंग सुरू आहे.https://prahaar.in/2026/04/12/groundbreaking-ceremony-for-the-magathane-goregaon-120-foot-d-p-road-project/डहाणू रोड स्थानकात फलाट क्रमांक २ च्या डाउन दिशेला तसेच फलाट क्रमांक ३ वर नवीन कॉमन स्टॉप मार्क उभारण्याचं काम सुरू आहे. या सर्व कामांनंतर प्रथम वर्ग, महिला आणि दिव्यांग डब्यांसाठी दिशादर्शकही बसवले जाणार आहेत. फलाटांवर प्रवाशांना पद पुलांचा उपयोग सोयीस्कर होईल, याचा विचार करूनच स्टॉप मार्क निश्चित केले जात असल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले.यासंदर्भात सर्व स्थानक अधीक्षकांना सूचना देण्यात आल्या असून दरम्यान, १० ते ११ एप्रिलदरम्यान हे काम पूर्ण करण्याचं नियोजन होतं. पण, १२ एप्रिलपर्यंतही काम पूर्ण झालं नसल्यानं डहाणू-चर्चगेट १५ डब्यांची सेवा किमान आठवडाभर लांबण्याची शक्यता आहे.

फीड फीडबर्नर 13 Apr 2026 1:10 pm

उबाठा आमदार पुत्राचे संस्कार, माजी उपमहापौरांना बसवले मागच्या रांगेत

मुंबई (विशेष प्रतिनिधी)मुंबई महापालिकेत उबाठाचे आमदार सुनील प्रभू यांनी महापालिका अतिरिक्त आयुक्तांसोबत घेतलेल्या बैठकीत चक्क उपमहापौरांने मागे बसवले. मात्र,एका बाजुला ज्येष्ठ नगरसेवक असलेले आणि उपमहापौरपद भूषवलेले ऍड सुहास वाडकर यांना मागच्या खुर्चीवर बसवतानाच आमदार पुत्र नगरसेवकाने मात्र पहिल्या खुर्चीवर बसवून आपले संस्कार दाखवून दिले आहेत. विशेष म्हणजे माजी उपमहापौर मागच्या खुर्चीवर असलेले असताना आणि आपला मुलगा जो प्रथमच नगरसेवक म्हणून निवडून आला ते पहिल्या खुर्चीवर बसलेला असतानाही आमदार सुनील प्रभू यांनीही लक्ष दिले नाही.त्यामुळे आमदार आपल्या मुलाला अधिक प्रमोट करण्यासाठी निष्ठावान आणि ज्येष्ठ नगरसेवकांकडे दुर्लक्ष करत आहेत का असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे खरोखरच पाण्याच्या समस्येबाबत बैठक होती की मुलाची अतिरिक्त आयुक्तांसोबत ओळख करून देण्यासाठी तसेच त्यांना सहकार्य करण्याच्या सूचना देण्यासाठी ही बैठक होती असाही सवाल उपस्थित होत आहे.दिंडोशी मधील नागरिकांना गेल्या अनेक दिवसांपासून भेडसावणाऱ्या पाणी टंचाई, दूषित पाणीपुरवठा आणि कमी दाबाने येणारे पाणी या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी उबाठा आमदार सुनील प्रभू यांनी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांच्यासोबत विशेष बैठक आयोजित केली होती.यावेळी बैठकीत युवासेना कार्यकारणी सदस्य व नगरसेवक अंकित प्रभू, नगरसेवक तुळशीराम शिंदे, माजी उपमहापौर व नगरसेवक सुहास वाडकर, नगरसेविका योगिता कदम, विधानसभा संघटक प्रशांत कदम, उपविभागप्रमुख प्रदीप निकम, शाखाप्रमुख मोहन परब, रमेश कळंबे, रामचंद्र पवार यांच्यासह महानगरपालिकेचे संबंधित वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.परंतु महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांसोबत पाण्यासह विभागातील विविध विषयांबाबत बैठक घेताना आपल्या पक्षाचे माजी उपमहापौर तसेच ज्येष्ठ नगरसेवक असलेले ऍड सुहास वाडकर यांना मागच्या खुर्चीवर बसवण्यात आल्याचे छायाचित्रातून दिसून येत आहे. महापालिका मुख्यालयात ही बैठक असल्यामुळे आमदारांनी माजी उपमहापौरांनी पुढे बसवून आपल्या नगरसेवक मुलाला मागे बसवण्याची सूचना करणे आवश्यक होते. तसेच प्रभू यांनी तसे केले नाही आणि त्यांचे पुत्रे अंकित यांनी उपमहापौरांऐवजी आपणच पुढे बसून आपले संस्कार दाखवून दिले.सुनील प्रभू हे महापालिकेत निवडून आल्यानंतर त्यांनी सभागृहाचे कामकाज न्याहाळून तसेच सभा शास्त्र समजून घेण्यावर भर दिला होता. परंतु त्यांच्याकडील विषय मांडण्याची हातोटी तसेच वक्तृत्व पाहून तत्कालिन सभागृहनेते दिगंबर कांडरकर यांनी त्यांना संधी देत पुढे आणले आणि त्याच जोरावर सुनील प्रभू यांनी सभागृहनेते तसेच महापौरपद भूषवले होते. परंतु, प्रभू यांचे पुत्र अंकित यांच्याकडून वरिष्ठांचा सन्मान राखला जात नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. महापालिका सभागृहात विरोधी पक्षनेते आणि सभागृहनेत्यांनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवल्यामुळे त्यांच्या हाताला पकडून ते सध्या हवेतील झोके घेत असल्याचेही बोलले जात आहे.

फीड फीडबर्नर 13 Apr 2026 1:10 pm

Kalyan-Ahilyanagar Highway Accident : कल्याण अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार तर एक गंभीर जखमी

कल्याण-अहिल्यानगर (Kalyan-Ahilyanagar Highway Accident) महामार्गावर आज म्हणजेच सोमवार १३ एप्रिल रोजी अत्यंत भीषण अपघात घडला. या अपघातात एका ईको कार आणि सिमेंट मिक्सर ट्रकची समोरासमोर जोरदार धडक झाली. या दुर्घटनेत ८ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.ईको कारचा पूर्णपणे चक्काचूर :मिळालेल्या माहितीनुसार, अपघाताची (Kalyan-Ahilyanagar Highway Accident) तीव्रता इतकी होती की ईको कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला. धडक इतकी जोरदार होती की कारमधील प्रवाशांना बाहेर पडण्याची कोणतीही संधी मिळाली नाही. मृतांमध्ये कल्याण ते मुरबाड दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.स्थानिक नागरिकांकडून मदतकार्य सुरु :अपघाताचा (Kalyan-Ahilyanagar Highway Accident) आवाज होताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि स्थानिक पोलीस प्रशासनही घटनास्थळी दाखल झाले. नागरिकांच्या मदतीने कारमध्ये अडकलेल्या मृतदेहांना बाहेर काढण्यात आले, तर गंभीर जखमी व्यक्तीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.प्राथमिक तपासानुसार हा अपघात (Kalyan-Ahilyanagar Highway Accident) महामार्गावरील एका पुलावर घडल्याचे सांगितले जात आहे. सध्या पोलिसांकडून मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. तसेच या अपघाताचे नेमके कारण शोधण्यासही सुरुवात झाली आहे. या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

फीड फीडबर्नर 13 Apr 2026 1:10 pm

Kalyan-Ahilyanagar Highway Accident: कार आणि सिमेंट मिक्सर ट्रकची समोरासमोर धडक; भीषण अपघातात ८ जणांचा मृत्यू

Kalyan-Ahilyanagar Highway Accident : अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि स्थानिक पोलीस प्रशासनही घटनास्थळी दाखल झाले.

दैनिक प्रभात 13 Apr 2026 12:58 pm

Glass Skin Tips: महागडे प्रॉडक्ट्स विसरा! रोज ‘हे’पाणी प्या आणि मिळवा ‘ग्लास स्किन’चा नैसर्गिक ग्लो

Glass Skin Tips प्रत्येकाला स्वच्छ, नितळ आणि चमकदार त्वचा हवी असते, ज्याला ‘ग्लास स्किन’ असेही म्हटले जाते. ही त्वचा मिळवण्यासाठी बाह्य उपचारांबरोबरच शरीराच्या आतल्या आरोग्याकडे लक्ष देणेही तितकेच महत्त्वाचे आहे. पुदिना हा उन्हाळ्यात सहज मिळणारा आणि गुणकारी घटक आहे, जो त्वचेच्या अनेक समस्यांवर उपाय म्हणून काम करतो.

दैनिक प्रभात 13 Apr 2026 12:41 pm

पं. हृदयनाथ मंगेशकरांचे भाषण अन् भावविवश आशाताई

'स्वरस्वामिनी आशा' या पुस्तकाचे प्रकाशन विले पार्लेतील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात राष्ट्रीय सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते झाले. त्यावेळी पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या भाषणाने आशाताईं भावूक झाल्या. खान्देशची राजधानी ठाणेरे गावात ८-९ वर्षांच्या आशाताई आणि मी भाकरी, तिखट तेल या अन्नावर अनेक वर्षे जगलो. आशाताई सगळ्यात सुदृढ, मीनाताई कृश, माझा एक पाय कृश, मीनाताई, दीदी मुंबईत पण घरातली सगळी कामे आशाताईला करायला लागायची आणि मला सांभाळणे, माझे सगळे ती करायची, आईही करणार नाही, ते आशाताई करायची. काही ऋण, उपकार आपल्याला फेडता येत नाहीत, त्यातले हे ऋण आहेत, अशा शब्दात ज्येष्ठ गायक व संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांनी आपल्या बहिणीबद्दलचे ऋण व्यक्त केले. यावेळी आशाताई भावूक झाल्याचे पहायला मिळाले.साडी, टिकली आणि फुलंआशा भोसले यांच्या स्टाइलमध्ये काही गोष्टी कायम असायच्या. वेगवेगळ्या प्रकारच्या पारंपरिक साड्या, कपाळावर मोठी टिकली आणि कोणतीही हेअर स्टाइल असो त्यात फुलं माळलेली असायचीच. हा त्यांचा सिग्नेचर लूक त्यांनी देश-विदेशातील प्रत्येक मंचावर अभिमानाने सादर केला. मोत्यांच्या माळा, सोने किंवा डायमंड ज्वेलरीसोबत त्यांच्या हातात दिसणारे खास ब्रेसलेटही त्यांच्या स्टाइलचा भाग बनले.इंदूरच्या खाद्य संस्कृतीवर विशेष प्रेमइंदूरचे रहिवासी असलेले नातेवाईक मनोज बिनवाले यांच्या मते, आशाताईंना सिहोरच्या शरबती गव्हाच्या पोळ्या खूप आवडत होत्या आणि त्या अनेकदा इंदूरहून गहू मागवत असत. इंदूरच्या खाद्यसंस्कृतीशी त्यांचे विशेष प्रेम होते. सराफाच्या खाऊ गल्लीतील गुलाबजाम, रबडी आणि दहीवडे त्यांना खूप आवडत होते. बालपणी त्या सराफा चौपाटीला जात असत.

फीड फीडबर्नर 13 Apr 2026 12:30 pm

Crude Oil : जागतिक बाजारात खळबळ! होर्मुज तणावाचा परिणाम; कच्च्या तेलाचे दर १०४ डॉलरच्या पुढे, जागतिक बाजार हादरला

मुंबई : पश्चिम आशियातील वाढत्या तणावाचा थेट परिणाम कच्च्या तेलाच्या किमतींवर दिसू लागला आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चा निष्फळ ठरल्याने तसेच होर्मुज सामुद्रधुनीत नाकेबंदीची शक्यता निर्माण झाल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर झपाट्याने वाढले आहेत.सोमवारी सुरुवातीच्या व्यवहारात ब्रेंट क्रूडचा दर सुमारे ८ टक्क्यांनी वाढून १०४ डॉलर प्रति बॅरलच्या पुढे गेला. तर यूएस बेंचमार्क वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट (WTI) क्रूडमध्येही ८.६ टक्क्यांची उसळी पाहायला मिळाली. सध्या ब्रेंट क्रूड सुमारे १०२.३ डॉलर प्रति बॅरल, तर WTI क्रूड १०४.२ डॉलर प्रति बॅरल या पातळीवर व्यवहार करत आहे.https://prahaar.in/2026/04/12/google-pay-launches-pocket-money-feature-now-safe-digital-transactions-are-possible-from-children-to-seniors/अमेरिकेने होर्मुज सामुद्रधुनीकडे जाणाऱ्या जहाजांवर निर्बंध घालण्याचे संकेत दिल्यानंतर बाजारात अनिश्चितता वाढली आहे. होर्मुज हा जागतिक तेल वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा मार्ग असल्याने येथे कोणतीही अडचण निर्माण झाल्यास त्याचा थेट परिणाम जागतिक पुरवठ्यावर होतो.तज्ज्ञांच्या मते, परिस्थिती पुन्हा संघर्षविरामापूर्वीच्या पातळीवर पोहोचत आहे. इराण दररोज सुमारे २ दशलक्ष बॅरल तेल निर्यात करत होता. मात्र, होर्मुज मार्ग बंद झाल्यास खाडीतील देशांच्या निर्यातीवर मोठा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे जागतिक स्तरावर तेलटंचाई आणि दरवाढीचा धोका वाढला आहे.

फीड फीडबर्नर 13 Apr 2026 12:30 pm

दुसरा जन्म मिळाला तर, पुन्हा आशा भोसलेच व्हायला आवडेल का?

गायिका आशा भोसले यांना एकदा मुलाखतीमध्ये विचारलेले की, दुसरा जन्म मिळाला तर तुम्हाला आशा भोसलेच व्हायला आवडेल का? यावर त्या म्हणालेल्या, “हो… मला पुढच्या जन्मातही आशा भोसलेच व्हायला आवडेल. या जन्मात माझ्या राहिलेल्या गोष्टी पुढच्या जन्मात मी नक्की पूर्ण करेन. काय माहितीये, शिक्षण.… मला शिक्षण कमी मिळालं, त्यामुळे फॉरेनमध्ये माझं गाणं गेलं नाही.मला असं वाटतं की, आपलं गाणं मी फॉरेनला नेलं असतं आणि ते खूप हिट झालं असतं. अशा खूप गोष्टी आहेत, ज्या कराव्याशा वाटतात; त्या सर्व मी माझ्या दुसऱ्या जन्मात जाऊन पूर्ण करेन.” या उत्तरानंतर आशा भोसले यांनी त्यांच्या लग्नाबद्दलही वक्तव्य केलं होतं. “अशा खूप गोष्टी आहेत, ज्या मी दुसऱ्या जन्मात पूर्ण करेन”, हे म्हटल्यानंतर त्या लगेच, “पण मी लग्न करणार नाही…”, असं म्हणाल्या होत्या. शेवटची ओळ म्हटल्यानंतर आशा भोसले स्वत:च मोठ्याने हसल्या होत्या.वय हे फक्त एक आकडा आहेआशा भोसले यांनी त्यांच्या ९० व्या वाढदिवशी दुबईमध्ये एका संगीत मैफिलीत सादरीकरण केले. या कार्यक्रमाबाबत मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत आशा भोसले म्हणाल्या - वय हे फक्त एक आकडा आहे. वय वाढते, पण हृदय नेहमीच तरुण राहते. या वयातही मी उभी आहे, गाणी गात आहे आणि अजूनही माझ्या मुलांसाठी जेवण बनवत आहे.कामासोबतच कुटुंब ही माझी पहिली प्राथमिकता होती. आयुष्यात मी खूप अडचणींचा सामना केला आहे. मी एकटीने तीन मुलांना वाढवले आणि त्यांची लग्ने केली. मी कामावरून पळून घरी येऊन जेवण बनवायचे, पण याचा माझ्या कामावर कधीच परिणाम झाला नाही. या सर्व गोष्टी सर्वांना माहिती आहेत, म्हणूनच सगळे मला ताई म्हणतात.

फीड फीडबर्नर 13 Apr 2026 12:30 pm

US Israel Iran War: होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून इराण आरपारच्या भूमिकेत ; ट्रम्पच्या धमकीचीही उडवली खिल्ली

US Israel Iran War: इस्लामाबादमधील 'शांतता चर्चा' फिस्कटल्यानंतर अमेरिका आणि इराणमधील तणाव पुन्हा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दैनिक प्रभात 13 Apr 2026 12:26 pm

अनेक दिग्गजांनी वाहिली ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना श्रद्धांजली

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झालं आहे. त्यांना शनिवारी (११ एप्रिल) कार्डिॲक अरेस्टनंतर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलं होतं. आशा भोसले या फुफ्फुसाचा आजार आणि वयोमानानुसार येणाऱ्या इतर आजारांशीही झुंज देत होत्या. 'मल्टी ऑरगन फेल्युअर'मुळे त्यांचं निधन झाल्याचं डॉ. समदानी यांनी सांगितलं. आज दुपारी ४ वाजता शिवाजी पार्कच्या स्मशानभूमीमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील, अशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी दिली. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनाने भारतीय संगीतविश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनानंतर विविध क्षेत्रांतून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे...आशाताईंनी गाणी अजरामर केलीभारतीय संगीतविश्वातील प्रसिद्ध आणि दिग्गज व्यक्तिमत्त्व, पद्मविभूषण गायिका आशा भोसले यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या जाण्याने भारतीय संगीत क्षेत्राचं कधीही भरून न निघणारं नुकसान झालं आहे, अशी भावना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. आपल्या विलक्षण प्रतिभेच्या जोरावर आशाजींनी संगीताच्या क्षितिजावर स्वतंत्र ओळख निर्माण केली. नया दौर, तीसरी मंजिल, हरे रामा हरे कृष्णा, उमराव जान यांसह इजाजत आणि रंगीला यांसारख्या काळानुसार बदलणाऱ्या अनेक गाजलेल्या चित्रपटांतील गाणी त्यांनी आपल्या स्वरांनी अजरामर केली. प्लेबॅक गायिका म्हणूनही त्यांनी अनेक संस्मरणीय गाणी दिली. संगीत क्षेत्रातील त्यांचे 'स्वर' आणि मोलाचे योगदान पिढ्यान्पिढ्या स्मरणात राहील. ईश्वर त्यांच्या दिवंगत आत्म्यास शांती देवो आणि कुटुंबीयांना धैर्य प्रदान करो. ॐ शांती.- नितीन गडकरी, वाहतूक मंत्रीसुरांची ‘सम्राज्ञी’ काळाच्या पडद्याआडज्येष्ठ गायिका आशाताई भोसले यांच्या निधनाने संगीत क्षेत्रातील एका सुवर्णयुगाचा अंत झाला असून सुरांची ‘सम्राज्ञी’ काळाच्या पडद्याआड गेली आहे. आशाताई भोसले यांच्या आवाजात विलक्षण माधुर्य, विविधता आणि भावनांची अप्रतिम अभिव्यक्ती होती. हिंदी, मराठीसह विविध भारतीय भाषांमधील हजारो गाण्यांमधून त्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. आशाताई भोसले यांचा संगीत प्रवास म्हणजे कठोर परिश्रम, सातत्य आणि कलेप्रति असलेल्या निष्ठेचे प्रतीक आहे. त्यांनी अनेक पिढ्यांतील श्रोत्यांना आपल्या सुरांनी मंत्रमुग्ध केले. त्यांच्या जाण्याने भारतीय संगीतसृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे. आपल्या दीर्घ आणि यशस्वी कारकिर्दीत आशाताई भोसले यांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. आशाताईंच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबियांना आणि असंख्य चाहत्यांना झालेले हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, अशी प्रार्थना करते.- सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्रीआशाजींनी भारतीय संगीताला नव्या उंचीवर नेलेमधुर आवाज आणि अतुलनीय गायनाचे मूर्तिमंत स्वरूप असलेल्या आशा भोसलेंनी दशकानुदशके भारतीय संगीताला नव्या उंचीवर नेले. त्यांचा आवाज म्हणजे केवळ सुरांचा संगम नाही, तर भावनांचे एक असे अव्यक्त बंधन आहे, जे शब्दांत मांडता येणार नाही. त्यांनी गायलेली गाणी कायम अशीच गुंजत राहतील. हा क्षण त्यांच्या कुटुंबासाठी, कलाविश्वाशी संबंधित प्रत्येकासाठी आणि लाखो चाहत्यांसाठी अत्यंत भावनिक आहे. हे कधीही भरून न निघणारं नुकसान आहे. मी कुटुंबीयांप्रती माझ्या मनःपूर्वक संवेदना व्यक्त करतो. माता सरस्वती त्यांच्या दिवंगत आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो. ओम शांती.- पियुष गोयल, वाणिज्य मंत्रीजगण्यातील श्रीमंती गमावलीभोगल्या दु:खाचे आनंदी गाणे गाण्याची ताकद असलेल्या... जय शारदे.. वागेश्वरी ची प्रार्थना गाणाऱ्या... कॅब्रे, लावणी, भक्ती गीत, ओवी आणि अभंगासह भावगीत, चित्रपट गीत ही विलक्षण ताकदीने गाणाऱ्या... भाषेची बंधने तोडून २० पेक्षा जास्त भाषेत गाणाऱ्या... स्वतःच्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक संकटाला लिलया हरवणाऱ्या... आणि भाऊबीजेला “सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती...” अशी अजरामर ओवाळणी गाणाऱ्या आशाताई गेल्या. माझ्यासाठी तर माझी प्रिय बहिण मी आज गमावली... साक्षात सरस्वतीच्या वीणेची झंकारआज शांत झाली. मला भाऊ म्हणून उदंड प्रेम त्यांनी दिले. मी आज काय गमावले हे शब्दात सांगता येणार नाही...माझ्या जगण्यातील श्रीमंती मात्र आज गमावली...- आशिष शेलार,सांस्कृतिक कार्य मंत्रीभारतीय संगीतविश्वात एक मोठी पोकळी निर्माण झालीज्या काळात स्त्रियांनी घराबाहेर पडून आपली ओळख निर्माण करणे कठीण होते, त्या काळात आशाताईंनी आपल्या आवाजाच्या जोरावर जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवला. सहा दशकांहून अधिक काळ त्यांनी आपल्या सुरेल आणि भावपूर्ण गायनाने संपूर्ण देशाला मंत्रमुग्ध केले. विविध भाषांमधील त्यांच्या असंख्य गाण्यांनी पिढ्यानपिढ्या रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. त्यांच्या आवाजातील जादूने प्रत्येक गाणे अधिक अर्थपूर्ण आणि भावनिक बनले. आज त्यांच्या जाण्याने भारतीय संगीतविश्वात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या सुरांची आठवण आणि त्यांनी दिलेला अमूल्य ठेवा सदैव आपल्याला प्रेरणा देत राहील. - रितु तावडे, महापौर'आशाताई' -दि लास्ट एम्पररराज ठाकरे यांनी आपल्या श्रद्धांजली संदेशात आशा भोसले यांना “दि लास्ट एम्परर” असे संबोधत त्यांच्या संगीत प्रवासाचे वर्णन केले. त्यांनी लता मंगेशकर आणि आशा भोसले यांची तुलना जागतिक कलाकार लिओनार्डो दा विंची आणि मायकलॅन्जलो यांच्याशी केली. लता मंगेशकर आणि आशा भोसले या दोन्ही बहिणींनी भारतीय चित्रपट संगीताला एक नवं रूप दिलं. त्यांच्या मते, या दोघींनी मिळून भारतीय संगीताच्या ‘रेनेसाँस’ युगाला आकार दिला. “काही वर्षांपूर्वी लतादीदी गेल्या आणि आज आशाताईही आपल्यातून निघून गेल्या. भारतीय संगीताच्या सुवर्णकाळाचा शेवटचा महत्त्वाचा अध्याय आज संपला. पण आशाताईंचा आवाज आणि त्यांचा अलौकिक प्रवास कायम आपल्या सोबत राहील” अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या. - राज ठाकरे, मनसे प्रमुखखाणं आणि गाणं हे दोन आवडीचे विषयमी त्यांच्याशी १९७८ पासून गप्पा मारतोय. देशातील विविध शहरांसह परदेशातील सुमारे २२ सविस्तर मुलाखती मी त्यांच्या घेतल्या आहेत. तसेच वर्तमानपत्रांकरता वेगळ्या मुलाखती घेतल्या आहेत. त्यांच्याशी बोलत असताना एक आपुलकी, आत्मीयता होती. मी हे कधीच विसरणे शक्य नाही. नेहमी असेच वाटले की, आपण घरातील माणसांबरोबरच बोलतोय. १९७८ मध्ये मी प्रथम आशाताईंबरोबर सविस्तर बोललो. सर्वांत प्रसिद्ध गायिकांपैकी एक असणाऱ्या आशाताईंबरोबर प्रथम कसं बोलायचं, असा प्रश्न होता; पण त्या अत्यंत आपुलकीने म्हणाल्या, चल आपण गप्पा मारूया. त्यामुळे त्यांची सविस्तर मुलाखत घेणे अगदी सोपे झाले. त्या गाणं मस्त गुणगुणायच्या. खाणं आणि गाणं हे दोन आवडीचे विषय होते.- सुधीर गाडगीळ, ज्येष्ठ मुलाखतकारआशा ताई, तुमची खूप आठवण येईलधन्यवाद ताई, आमचं आयुष्य तुमच्या प्रेमळपणाने, आणि अविस्मरणीय संगीताने भरून टाकल्याबद्दल. आशा ताई, तुमची खूप आठवण येईल.- सचिन तेंडुलकर,माजी कर्णधारगाण्यातून कायम आपल्यासोबत असतील 'सर्वांसाठी आजचा दिवस खूप दुःखद आहे. आशा भोसले आज आपल्यात नाहीत, यावर विश्वास बसत नाहीये. संगीतक्षेत्रातील त्यांचं योगदान शब्दात मांडूच शकत नाही. आशाताई त्यांच्या आवाजातून आणि गाण्यातून कायम आपल्यासोबत असतील.- शंकर महादेवन, गायकचंद्र उगवेल का आता आकाशात ?“चंद्र उगवेल का आता आकाशात ? चांदणे तसेच बरसेल का? ही फक्त एक व्यक्ती नव्हती हा फक्त एक आवाज नव्हता. आपल्या आयुष्याचा भाग होता आणि आहे.आपल्या घरातल्या छोट्या मुलीपासून ते आजीपर्यंत सगळ्यांच्या भावना व्यक्त करणारा आवाज.- सलील कुलकर्णी, संगीतकार

फीड फीडबर्नर 13 Apr 2026 12:10 pm

Asha Bhosle : स्वरस्वामिनी आशा भोसले यांची गायन कारकीर्द आणि पुरस्कार

- आपल्या आवाजाने सात दशके चित्रपटसृष्टीवर राज्य केले. वयाच्या १० व्या वर्षी पहिले गाणे गाणाऱ्या आशा यांची गायन कारकीर्द ८२ वर्षांची होती, ज्यात त्यांनी १२ हजारांहून अधिकगाणी गायली.- आशा भोसले यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. त्यांना २००८ मध्ये पद्मविभूषण, २००० मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार आणि दोनदा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांना १९८१ आणि १९८६ मध्ये सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार मिळाला होता. त्यांना सात वेळा फिल्मफेअर पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते.१९९६ मध्ये, त्यांना ‘रंगीला’ चित्रपटासाठी फिल्मफेअर विशेष पुरस्कार मिळाला होता. २००१ मध्ये, त्यांना फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार आणि २००२ मध्ये, ‘लगान’ चित्रपटासाठी आयफा पुरस्कार मिळाला होता. याव्यतिरिक्त, त्यांना १९८७ मध्ये ‘नाईटिंगेल ऑफ एशिया’ पुरस्कार, २००० मध्ये ‘सिंगर ऑफ द मिलेनियम’ (दुबई) आणि २००२ मध्ये ‘बीबीसी जीवनगौरव पुरस्कार’ मिळाला.नवीन गायिकांना संधी मिळावी यासाठी त्यांनी १९७९ मध्ये या पुरस्कारासाठी नामांकन मिळाल्यावर आपले नाव मागेघेतले होते.- मोहम्मद रफी यांच्यासोबत ९०० हून अधिक गाणी गायली- आशाजींनी रफी साहेबांसोबत सर्वाधिक ९०० युगलगीते गायली आहेत. 'नया दौर' आणि 'तिसरी मंजिल' सारख्या चित्रपटांमधील गाणी आजही कल्टक्लासिक आहेत.- १९५० पासून सुरू होऊन १९८७ मध्ये किशोर दा यांच्या निधनापर्यंत ही जोडी सुपरहिट राहिली. दोघांनी ६०० हून अधिक गाणी एकत्र गायली.- लता मंगेशकर यांच्यासोबत ८० च्या आसपास अविस्मरणीय गाणी गायली. यामध्ये 'मन क्यों बहका रे बहका' (उत्सव) या गाण्याचा समावेश आहे.- आर.डी. बर्मन (पंचम दा) यांच्यासाठी ५०० हून अधिक गाणी गायली. त्यांनी आशा यांच्या आवाजाला कॅबरे, जॅझ आणि रॉक संगीतासाठी घडवले.- ओ.पी. नय्यर साहेबांनी फक्त आशा यांनाच आपला मुख्य आवाज बनवले. दोघांनी मिळून ३०० हून अधिक गाणी तयार केली.

फीड फीडबर्नर 13 Apr 2026 12:10 pm

Athiya Shetty : सुनील शेट्टीची लेक अथियाची आशा भोसलेंसाठी श्रद्धांजली पोस्ट; एका चुकीमुळे ट्रोल

Athiya Shetty: अनेकांनी आथिलाला तिचा 'बेजबाबदारपणा' म्हणत पोस्ट करण्यापूर्वी तिला नीट तपासणी करण्याचा सल्ला दिला

दैनिक प्रभात 13 Apr 2026 11:42 am

Asha Bhosle: आशा भोसले-ओ. पी. नय्यर यांची गाजलेली जोडी; लता मंगेशकरांना डावलत घडवली हिट गाण्यांची मालिका

Asha Bhosle आशा भोसले या भारतीय संगीत क्षेत्रातील अत्यंत यशस्वी आणि बहुआयामी गायिका आहेत. त्यांनी सहा दशकांहून अधिक काळ गाण्याच्या क्षेत्रात काम करत हजारो गाणी सादर केली आहेत.

दैनिक प्रभात 13 Apr 2026 11:37 am

Gold and silver prices : इराण-अमेरिका तणाव वाढला; सोन्या-चांदीच्या दरात मोठी चढ-उतार

मुंबई : पाकिस्तानच्या इस्लामाबाद (Islamabad) येथे झालेली इराण (Iran) आणि अमेरिका (America) यांच्यातील शांतता चर्चा निष्फळ ठरल्याने जागतिक तणाव पुन्हा वाढला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी होर्मुज सामुद्रधुनीच्या नाकाबंदीचे आदेश दिल्याची चर्चा असून, इराणविरोधात आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घडामोडींचा परिणाम आता आर्थिक क्षेत्रावरही दिसून येत आहे.सोन्याच्या दरात घसरण :आठवड्याच्या सुरुवातीलाच भारतात सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. नवी दिल्ली (New Delhi) येथे २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,५२,९८० रुपये असून, मुंबईमध्ये (Mumbai) तो १,५२,८३० रुपये आहे. मात्र गेल्या आठवड्यात सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाली होती.https://prahaar.in/2026/04/13/iran-us-peace-treaty-iran-holds-america-responsible-for-failure-of-peace-talks/चेन्नई (Chennai) येथे सोनं सर्वाधिक महाग असून २४ कॅरेटसाठी १,५४,१०० रुपये दर आहे. पुणे आणि बंगळुरू येथे दर मुंबईसारखाच आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्डचा भाव प्रति औंस४,७७७.१७ डॉलर्सवर पोहोचला आहे.चांदीच्या किमतीतही घसरण :दरम्यान, चांदीच्या किमतीतही घसरण झाली असून प्रति किलो दर २,५९,९०० रुपयांवर आला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा दर प्रति औंस ७५.९१ डॉलर्स आहे. गेल्या काही महिन्यांत मोठी वाढ झाल्यानंतर सध्या सोन्या-चांदीच्या दरात सतत चढ-उतार सुरू आहेत.

फीड फीडबर्नर 13 Apr 2026 11:30 am

आशाताईंची सांगीतिक श्रीमंती!

उत्तरा केळकर ज्येष्ठ गायिकाएक कलाकार म्हणून आशाताई प्रचंड थोरच, पण एक व्यक्ती म्हणून कसे जगायचे हेही त्यांच्याकडून शिकण्यासारखे होते. आशाताईंनी संगीतक्षेत्रावर गेली ऐंशी वर्षे राज्य केले. त्याच वेळी त्यांचा मनमिळाऊ पण कणखर स्वभावही लोकांची मने जिंकत होता. आयुष्यातील चढउतारांमुळे येणाऱ्या कटुतेला थारा न देता कलेच्या पूजनामध्ये आयुष्य खर्चिल्यामुळे आशाताई आज थोर गायकांच्या पंगतीमध्ये जाऊन बसल्या. त्यांची आठवण जागवणारा लेख.कोणत्याही कलाकाराच्या कारकीर्दीचा आलेखाचा परीघ फार मोठा असतो. त्यातच आशा भोसलेंसारख्या असामींची कारकीर्द एका लेखात बसवणे जवळपास अशक्यच; तरीही एखादे वेळी लहान तोंडी मोठा घास घेत आपल्या गुरुस्थानी असणाऱ्या कलावंताबाबत लिहिण्याची संधी मिळते. आशाताईंना नव्वद वर्षे पूर्ण होत असताना त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळाली होती. आपल्यापैकी अनेकांचे आयुष्यच उणेपुरे ७५ वर्षांचे असते.आशाताईंची तर कारकीर्दच तितकी! आपल्यातील प्रत्येकानेच आशाताईंच्या गाण्यांचा आस्वाद घेतला. त्यांच्या सुरांनी कधी आनंद दिला तर कधी डोळा पाणी आणले! एखाद्या कलाकाराच्या गायकीने संपूर्ण देशाच्या मनात घर होऊ शकते हे आपण याची देही याची डोळा अनुभवले ते आशाताईंमुळे. आशाताईंच्या जन्माने संगीत क्षेत्र श्रीमंत झाले. त्यांच्या गायकीबद्दल लिहावे तितके कमी आहे, पण एक व्यक्ती म्हणून आशाताईंचे समोर आलेले पैलू उलगडायचा हा प्रामाणिक प्रयत्न.आजपर्यंत विविध कारणांमुळे आशाताईंना भेटण्याचा योग आला. त्यातून त्यांच्या दिलखुलास आणि प्रेमळ व्यक्तीमत्त्वातील अनेक बारकावे समोर आले. आशाताईंबद्दल सगळ्यात विशेष बाब म्हणजे त्या अजूनही तरुण आहेत. त्या दिसतात तरुण, राहतात तरुण; पण त्यांच्या आचरणात शेवटपर्यंत चिरतरुण भाव पहायला मिळाले. नुकतीच त्यांच्या मागील वर्षीच्या वाढदिवसाची व्हिडीओ क्लिप बघत होते तेव्हा हे प्रकर्षाने जाणवले.त्यातच आशाताई नव्वदाव्या वाढदिवसाच्या निमित्ताने दुबईमध्ये कार्यक्रम करणार आहेत हे तेव्हा समजले तेव्हा मी अचंबित झाले होते! वयाची नव्वदी गाठणार म्हटल्यावर थकलेल्या, घरात झोपून राहिलेल्या व्यक्ती डोळ्यासमोर येतात. पण आशाताईंनी जणू ‘म्हातारपणा’ची व्याख्याच बदलली. आशाताई शेवटपर्यंत एकदम टापटीप राहत, ग्रेसफुल दिसत. नव्वद वर्षांची एवढी उत्साही व्यक्ती मी कधी पाहिली नाही.त्यांची स्मरणशक्ती शेवटपर्यंत खूप चांगली होती. त्यांना प्रत्येक गाण्याच्या ओळी आठवतात. त्याचबरोबर विविध गाण्यांच्या रेकॉर्डिंगच्या वेळी घडलेले किस्से, गंमतीजमतीही त्यांना व्यवस्थित आठवत.एका व्हिडीओमध्ये ‘मी इंडस्ट्रीमधील शेवटची मुघल आहे’ असे त्या म्हणाल्या. तेव्हा हे विधान किती खरे आहे याची क्षणार्धात प्रचिती आली. त्यांनी इंडस्ट्रीमधील बदलाचे वारे लीलया झेलले आहेत.मूळ गाण्यांची नजाकत जपण्यापासून रिमिक्सच्या जमान्यापर्यंत त्यांनी संगीतक्षेत्रात झालेला प्रत्येक बदल अगदी जवळून अनुभवला. संगीतक्षेत्राशी निगडीत प्रत्येक कलाकार, संगीतकार, गीतकार यांच्या कारकीर्दीमधील चढउतार आशाताईंनी खूप जवळून बघितले. त्यातील अनेकांना वेळप्रसंगी प्रोत्साहन दिले. मलाही कारकीर्दीच्या सुरुवातीला आशाताईंनी खूप प्रोत्साहन दिले होते. माझे त्यांच्याशी सलोख्याचे संबंध होते. मध्यंतरी एकदा आशाताईंवर लिहायची संधी मिळाली.तेव्हा मी लिहिलेला लेख फोनवर वाचून दाखवते असे म्हटल्यावर त्यांनी साफ नकार दिला. ‘माझ्यासमोर बसून लेख वाचून दाखवायचास’ असा आग्रह धरत मला घरी बोलावले! नंतर विविध कारणांमुळे त्यांच्याकडे जाणे-येणे होत राहिले, हे माझे भाग्यच.आशाताईंकडून सगळ्यात प्रकर्षाने शिकण्यासारखी बाब म्हणजे जगण्यामागची प्रेरणा! आजवरच्या आयुष्यात त्यांच्यावर संकटांचा डोंगर कोसळला. डोळ्यांदेखत दोन मुले देवाघरी गेली. आर्थिक स्थैर्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागला. लक्ष्मीचा वरदहस्त असला तरी वयानुसार आलेल्या समस्या कोणाला चुकल्या आहेत? वयाची नव्वदी गाठूनही प्रत्येक समस्येला हसतमुखाने सामोरे जाणे त्यांच्याकडून शिकण्यासारखे होते, असे मला वाटते.‘सलाम’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने आशाताईंकडून खूप काही शिकायला मिळाले. आशाताईंच्या कारकीर्दीवर अवलंबून असलेल्या या कार्यक्रमासाठी अर्थातच त्यांची परवानगी घेतली. परवानगीसोबत त्यांनी वरदहस्तही दिला असे म्हणायला हरकत नाही. आशाताईंनी गायलेली गाणी म्हणण्याचा प्रयत्न करणे हा गळ्याचा व्यायाम आहे, या विधानाशी प्रत्येकच गायक सहमत असेल. पूर्वीच्या गाण्यांमधील गोडवा आणि नजाकत आता कुठे तरी हरवली आहे, असे वाटल्यावाचून रहावत नाही.पूर्वी गाण्यांच्या चालीमध्ये काही अवघड जागा असत. त्या जागा गायकांची खासियत म्हणून ओळखल्या जात. आशाताईंचे संपूर्ण गाणेच अशा जागांनी भरलेले असे. सध्या चांगल्या कसदार चालींचे प्रमाण कमी झाले आहे. काही नाविन्यपूर्ण प्रयोग होत आहेत, पण प्रमाण फारच कमी आहे. त्यामुळे अशा वेळी जुन्या गाण्यांच्या चाली, संगीतकार, गायक-गायिका यांच्याविषयी कृतज्ञता वाटत राहते. आशाताईंनी मिळालेल्या प्रत्येक गाण्याचे सोने केले. एखाद्या सुमार चालीचे गाणेही वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवण्याचे सामर्थ्य त्यांच्याकडे होते.त्यांची गाणी गाताना गळ्याचा आणि कलेचाही व्यायाम होतो. त्यामुळे मी ‘सलाम’ या कार्यक्रमामध्ये आशाताईंची गाणी म्हणण्याचा भाबडा प्रयत्न केला. त्यांनी गायलेली गाणी हीसुद्धा एक मोठी शिकवणी आहे, हे गाताना समजते. त्यांनी अजरामर केलेली गाणी शंभर टक्के परफेक्ट आहेत, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. त्यातील एक टक्का गायकी आत्मसात करता आली तरी कार्यक्रमाची फलश्रुती झाल्यासारखे वाटेल! याच कार्यक्रमाविषयी चर्चा करताना आशाताईंचा उदात्तपणा समोर आला.त्यांनी कार्यक्रमात प्रचंड रस दाखवला. नेहमीप्रमाणे मला प्रोत्साहन दिले. कार्यक्रमासाठी गाण्यांची निवड करतानाही त्यांचा सक्रीय सहभाग होताच. निवड प्रक्रियेमध्ये त्यांच्या आवडीची गाणी घेण्याचा आग्रहसुद्धा होता. एखादे गाणे कार्यक्रमात का घेतले नाही, असेही त्या हक्काने विचारत.एकदा सहज बोलता बोलता त्यांनी कार्यक्रमाला यायची इच्छा असल्याचेही बोलून दाखवले होते. पण प्रेक्षकांना आशाताईंची गाणी म्हणून दाखवणे आणि खुद्द ताईंसमोर त्यांची गाणी गाण्याचा प्रयत्न करणे यामध्ये हिमतीची तफावत असल्याचे तेव्हा प्रकर्षाने जाणवले. त्याचबरोबर त्यांचे मन किती मोठे आणि निरभ्र आहे याचीही प्रचिती आली. आभाळाएवढे काम करूनही मंगेशकर कुटुंबीयांमध्ये अहंकाराला थारा दिसला नाही.अत्यंत मनमिळाऊ कुटुंबामधील आशाताईसुद्धा ममतेने विचारपूस करत तेव्हा आयुष्यात काही कमावण्यामध्ये यशस्वी झाल्यासारखे वाटे. त्यामुळेच त्यांच्याकडे जाताना कधीच कोणताही संकोच वाटला नाही. ‘सलाम’ कार्यक्रमाचा पंचविसावा भाग झाल्यानंतर नतमस्तक होऊन आशीर्वाद घेण्यासाठीही त्यांच्या घरी गेले होते. केव्हाही आशाताईंकडे गेल्यावर खाद्यपदार्थांची रेलचेल असते. एका अन्नपूर्णेप्रमाणे आदरातिथ्य करण्यामध्ये त्यांचा हात कोणीही धरू शकणार नाही.त्यांच्या दिलखुलास स्वभावामुळे प्रत्येक भेटीनंतर अनुभव श्रीमंत वाटते. त्यांच्या सहवासात खुललेल्या आल्हाददायक आठवणींची पोतडी नेहमीच सोबत राहील.आशाताईंच्या भेटीविषयी बोलताना एक प्रसंग आवर्जून लिहावासा वाटतो. त्यांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर मी भेटायला गेले होते. आपल्या मुलाचे अकाली जाणे हा एका आईसाठी किती जीवघेणा प्रसंग! पण तरीही त्या रडत नव्हत्या.‘मुलाच्या विरहामध्ये रडायचे नाही असे मी ठरवले आहे’ हे आम्हाला सांगताना त्यांनी धीर कुठून आणला असेल? एकदा सहजच भेटायला गेले असता त्या खोलीत एका पंजाबी गाण्याचा रियाज करत बसल्या होत्या. कसला रियाज करता आहात, असे विचारले असता त्यांनी मिश्किलपणे सांगितले, ‘अगं, माझा पंजाबमध्ये कार्यक्रम आहे. तिथल्या प्रेक्षकांना आवडेल यासाठी पंजाबी गाण्याने सुरुवात करेन म्हणते! त्याचाच रियाज करत बसले आहे.’त्यांच्या या उत्तराने अवाक् झाले. या वयातही कलेप्रती एवढे समर्पण क्वचितच पहायला मिळते. त्यांच्या लाइव्ह कार्यक्रमांमध्ये उत्साहाचा झरा वाहत असायचा. कार्यक्रमामध्ये गाण्यांदरम्यान साडी बदलणे असो कवा चाहत्यांच्या फर्माइशीला न्याय देणे असो, एवढा उत्साह त्यांच्यामध्ये कुठ्न येतो हे समजण्यासाठी आपला सारा जन्मच अपुरा पडेल! आता तर ती संधीही नाही.

फीड फीडबर्नर 13 Apr 2026 11:30 am

Asha Bhosle Funeral : आशा भोसले यांना अखेरचा निरोप देण्यासाठी मुंबई पोलीस सज्ज; वाहतुकीत होणार महत्त्वाचे बदल

- शिवाजी पार्क स्मशानभूमीत आज अंत्यसंस्कार, मुंबईत कडेकोट बंदोबस्तमुंबई : भारतीय संगीतविश्वातील दिग्गज गायिका आशा भोसले (Asha Bhosle) यांच्या निधनाने देशभरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर आज, सोमवारी दुपारी ४ वाजता शिवाजी पार्क (Shivaji Park) येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार पार पडणार आहेत.या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस (Mumbai Police) आणि महानगरपालिका (Brihanmumbai Municipal Corporation) यांनी व्यापक तयारी केली आहे. अंत्यदर्शनासाठी मोठ्या संख्येने चाहत्यांची गर्दी अपेक्षित असल्याने सुरक्षेची कडेकोट व्यवस्था करण्यात आली आहे.मुंबई पोलीस आणि पालिका सज्ज :जी-उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त विनायक विस्पुते यांनी अंत्यसंस्कार स्थळाची पुष्टी केली आहे. यापूर्वी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) आणि रतन टाटा (Ratan Tata) यांच्या अंत्यसंस्कारावेळी केलेल्या नियोजनाचा अनुभव लक्षात घेऊन प्रशासन सज्ज झाले आहे.सर्वसामान्य नागरिकांना अंत्यदर्शन सुलभ व्हावे आणि व्हीआयपींच्या हालचालींमुळे अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी स्वतंत्र कॉरिडॉरचीही व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय, वाहतुकीतही काही महत्त्वाचे बदल करण्यात आले असून नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.https://prahaar.in/2026/04/13/melody-queen-asha-bhosale/वाहतूक आणि नागरी सुविधांचे नियोजन:अंत्यदर्शन घेताना होणारी गर्दी लक्षात घेता प्रशासनाने वाहतुकीत महत्त्वाचे बदल केले आहेत:- आज दुपारी ४ वाजता अंत्यसंस्कार पार पडतील.- स्वांतत्र्यवीर सावरकर मार्ग आणि दादर-माहीमला जोडणाऱ्या लेडी जमशेटजी रोडवर वाहतुकीचे निर्बंध असतील.- कोहिनूर प्लाझा पब्लिक पार्किंगचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.- रस्त्यावरील पार्किंगवर पूर्णपणे बंदी असेल. मात्र, परिसरातील रहिवाशांच्या पार्किंगला परवानगी दिली जाईल.- मोठी गर्दी अपेक्षित असली तरी परिसरातील इतर नागरी सेवा विस्कळीत होणार नाहीत, याची काळजी पालिकेने घेतली आहे.सकाळी आणि रात्री फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना शिवाजी पार्क परिसरात नेहमीप्रमाणे प्रवेश मिळेल. संपूर्ण मुंबई आज आपल्या लाडक्या आवाजाला अखेरचा निरोप देण्यासाठी सज्ज झाली असून पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

फीड फीडबर्नर 13 Apr 2026 11:30 am

Sambhaji Chhatrapati : पाठ्यपुस्तकातून मराठा साम्राज्याचा पराक्रम पुसण्याचा प्रयत्न? संभाजीराजे संतापले; थेट केंद्र सरकारला पत्र

Sambhaji Chhatrapati : मराठा साम्राज्याचा नकाशा पुन्हा समाविष्ट करावा, छत्रपती संभाजीराजे यांचे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पत्र

दैनिक प्रभात 13 Apr 2026 11:16 am

Asha Bhosle: शेकडो पुरस्कार, हजारो गाणी… तरीही आशा भोसले यांची ‘ही’इच्छा राहिली अधुरी

Asha Bhosle इतक्या मोठ्या यशानंतरही त्यांच्या मनात एक खंत कायम होती. त्यांना लहानपणी व्यवस्थित शिक्षण घेण्याची संधी मिळाली नव्हती. विशेषतः इंग्रजी भाषा शिकता न आल्याची खंत त्यांनी अनेक वेळा व्यक्त केली होती.

दैनिक प्रभात 13 Apr 2026 11:14 am

ग्रॅच्युइटी मिळणार, पण महागाई वाढणार!

महेश देशपांडेआजवर पाच वर्षांपेक्षा कमी काळ नोकरीमध्ये असणाऱ्यांना ग्रॅच्युइटीचा फायदा मिळत नव्हता; पण आता अशा लोकांना एक वर्षाच्या सेवेनंतरही ग्रॅच्युइटी मिळू शकेल. दरम्यान, अमेरिका-इस्राईल विरुद्ध इराण युद्धामुळे महागाई आणखी वाढणार आहे. याच सुमारास सरकारी कंपन्यांनी सीएनजीच्या दरांमध्ये वाढ केली नसली तरी खासगी कंपन्यांच्या सीएनजी दरामध्ये वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे.गेल्या काही दिवसांमध्ये युद्धाच्या बातम्यांमुळे सर्वत्र नकारात्मक वातावरण असताना नोकरदारांच्या दृष्टीने एक चांगली बातमी समोर आली. आजवर पाच वर्षांपेक्षा कमी काळ नोकरीमध्ये असणाऱ्या नोकरदारांना ग्रॅच्युइटीचा फायदा मिळत नव्हता; पण आता एक वर्षाच्या सेवेनंतरही त्यांना ग्रॅच्युइटी मिळू शकेल. ही बातमी सकारात्मक असली तरी युद्धाच्या दुष्परिणामांच्या बातम्या येतच आहेत. अमेरिका-इस्राईल विरुद्ध इराण युद्धामुळे महागाई आणखी वाढणार असून सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसणार आहे. याच सुमारास सरकारी कंपन्यांनी सीएनजीच्या दरांमध्ये वाढ केली नसली तरी खासगी कंपन्यांच्या सीएनजी दरात वाढ झल्याचे पहायला मिळत आहे.नवीन ‘लेबर कोड’नुसार ग्रॅच्युइटीच्या नियमांमध्ये मोठा बदल करण्यात आला असून आता फक्त एका वर्षाची सेवा पूर्ण केल्यानंतरही कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटी मिळणार आहे. याआधी यासाठी किमान पाच वर्षांची अट होती. नवीन नियमांनुसार ‘फिक्स्ड टर्म एम्प्लॉयी’ (एफटीई) म्हणजेच ठराविक कालावधीसाठी कॉंट्रॅक्टवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता थेट कंपनीच्या पेरोलवर घेतले जाणार आहे. यामुळे त्यांना कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांप्रमाणेच पगार, सुट्ट्या आणि भत्ते मिळणार आहेत. पेमेंट ऑफ गॅच्युईटी ॲक्ट, १९७२ नुसार पाच वर्षांची सेवा पूर्ण केल्यावरच ग्रॅच्युइटी मिळत होती; मात्र आता ‘एफटीई’ कर्मचाऱ्यांसाठी ही अट शिथिल करण्यात आली आहे.एखाद्या कर्मचाऱ्याचे कॉंट्रॅक्ट एक वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास त्या कालावधीप्रमाणे ग्रॅच्युइटी मिळणार आहे. ‘नवीन लेबर कोड’नुसार, कर्मचाऱ्यांच्या एकूण ‘सीटीसी’ मधील किमान ५० टक्के रक्कम मूळ पगार असणे आवश्यक आहे. एचआरए, ट्रॅव्हल अलाउन्स यासारखे भत्ते ५० टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास अतिरिक्त रक्कम मूळ पगारामध्ये जोडली जाईल. त्यामुळे मूळ पगार वाढेल आणि त्याचा थेट फायदा ग्रॅच्युइटी आणि ‘पीएफ’ वर होईल. नवीन नियमांनुसार, कर्मचाऱ्याने नोकरी सोडल्यानंतर किंवा कॉंट्रॅक्ट संपल्यानंतर कंपनीला ४८ तासांच्या आत ‘फुल अँड फायनल सेटलमेंट’ (एफ अँड एफ) करावी लागणार आहे.यामध्ये ग्रॅच्युइटी आणि इतर थकबाकीचा समावेश असेल. याआधी ही प्रक्रिया ३० ते ६० दिवस चालायची. हे बदल विशेषतः ‘प्रोजेक्ट-बेस्ड’ किंवा अल्पकालीन कॉंट्रॅक्टवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी करण्यात आले आहेत. त्यांना कामाचा योग्य मोबदला मिळावा आणि पाच वर्षांची प्रतीक्षा करावी लागू नये, हा यामागचा उद्देश आहे.दरम्यान, इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यामध्ये वाढत चाललेल्या तणावाचा परिणाम आता थेट सामान्य नागरिकांच्या खिशावर दिसू लागला आहे.कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये झालेली वाढ, रुपयाचे अवमूल्यन आणि पुरवठा साखळीतील अडथळे यामुळे महागाईचा दबाव वाढत असून, त्याचा सर्वप्रथम फटका दैनंदिन वापराच्या वस्तूंना बसणार आहे. प्रत्यक्षात फास्ट-मूव्हिंग कन्झ्युमर गुड्स (एफएमसीजी) क्षेत्र सध्या दुहेरी संकटाचा सामना करत आहे. एकीकडे कच्च्या मालाचा खर्च वाढत आहे, तर दुसरीकडे लॉजिस्टिक्स आणि पॅकेजिंगचा खर्चही झपाट्याने वाढत आहे. ‘नुवामा इन्स्टिट्यूशनल इक्विटीज’च्या अहवालानुसार सध्याची परिस्थिती कायम राहिल्यास २०२६-२७ च्या पहिल्या तिमाहीपासून कंपन्या उत्पादनांच्या किमती किमान तीन ते चार टक्क्यांनी वाढवू शकतात.या दरवाढीमागील सर्वात मोठा घटक म्हणजे कच्चे तेल. साबण, शॅम्पू, डिटर्जंट, बिस्किट यांसारख्या उत्पादनांचे पॅकेजिंग प्लास्टिकमध्ये मोठ्या प्रमाणात केले जाते आणि प्लास्टिकचे मूळ पेट्रोलियममध्ये असल्यामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या की पॅकेजिंगचा खर्च थेट वाढतो. त्याचबरोबर कारखान्यांमधून बाजारपेठेत माल पोहोचवण्याचा वाहतूक खर्चही वाढला आहे. जहाजांचे भाडे, कंटेनरचे दर आणि विमा प्रीमियम यामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. सध्या कंपन्या जुन्या साठ्याच्या आधारे किमती स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत.साधारणपणे कंपन्यांकडे ३० ते ४५ दिवसांचा कच्चा माल आणि तयार मालाचा साठा उपलब्ध असतो. त्यामुळे २०२६-२७ या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीमध्ये या वाढीचा परिणाम मर्यादित राहण्याची शक्यता आहे; मात्र हा साठा संपताच कंपन्यांसाठी दरवाढ करणे अपरिहार्य ठरणार आहे. या परिस्थितीचा परिणाम केवळ ‘एफएमसीजी’ क्षेत्रापुरता मर्यादित राहणार नाही. भारत मोठ्या प्रमाणावर खाद्यतेल आयात करतो आणि ते प्रामुख्याने समुद्री मार्गाने येते.आंतरराष्ट्रीय तणावामुळे पुरवठा साखळी खंडित झाली, तर खाद्यतेलाच्या किमतीतही मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्वयंपाकघराचा खर्चही वाढणार आहे. हीच परिस्थिती कायम राहिल्यास येत्या काही महिन्यांमध्ये साबण, तेल, पॅकेज्ड अन्नपदार्थ, पेये अशा जवळपास सर्वच आवश्यक वस्तू महाग होऊ शकतात. याचा सर्वाधिक फटका मध्यम आणि निम्न उत्पन्न गटातील कुटुंबांना बसणार आहे. त्यांना घरगुती खर्च सांभाळणे अधिक कठीण होईल. एकूणच, हा प्रश्न आता केवळ आंतरराष्ट्रीय राजकारणापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर भारतासारख्या आयातनिर्भर देशासाठी गंभीर आर्थिक आव्हान ठरत आहे.परिस्थिती लवकर न सुधारल्यास महागाईचा हा दबाव आणखी तीव्र होऊन देशातील खप, उद्योग आणि सामान्य नागरिकांच्या जीवनशैलीवर एकाच वेळी परिणाम दिसून येईल.दुसरीकडे, देशातील खासगी कंपन्यांनी सीएनजीच्या दरात वाढ केल्याने इंधन महागाईचा फटका आता नागरिकांना बसू लागला आहे. अलीकडील घडामोडींमध्ये अदानी गॅस, टोरेंट गॅस आणि थक गॅस या कंपन्यांनी वेगवेगळ्या भागांमध्ये सीएनजी दर वाढवले आहेत.याउलट सरकारी कंपन्यांनी मात्र दरवाढ टाळल्याचे दिसून येत आहे.w देशातील विविध भागांमध्ये कार्यरत असलेल्या खासगी सिटी गॅस वितरकांनी एप्रिलच्या सुरुवातीपासून सीएनजीच्या किमतीत प्रति किलो एक ते चार रुपयांची वाढ केली आहे. ही वाढ देशांतर्गत नैसर्गिक वायूच्या दरवाढीनंतर करण्यात आली असून, त्याला आंतरराष्ट्रीय बाजारातील तेल आणि वायूच्या वाढत्या किमती कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे.‘अदानी गॅस’ने गुजरातमध्ये सीएनजीच्या किमतीत प्रति किलो दीड रुपयांची वाढ केली आहे. इतर खासगी कंपन्यांच्या तुलनेत ही वाढ कमी मानली जात आहे. दुसरीकडे ‘टोरेंट गॅस’ने राजस्थानसह इतर बाजारपेठांमध्ये सीएनजी दर प्रति किलो अडीच रुपयांनी वाढवले आहेत. याचबरोबर ‘थक गॅस’ने सर्वाधिक दरवाढ केली असून उत्तर आणि दक्षिण भारतातील बाजारपेठांमध्ये सीएनजीच्या कमती प्रति किलो अडीच ते चार रुपयांनी वाढवल्या आहेत. ही वाढ सध्या सर्वाधिक मानली जात आहे.दरम्यान, सरकारी कंपन्यांनी सीएनजी दरात कोणतीही वाढ केलेली नाही. दिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात कार्यरत असलेल्या ‘इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड’ने खासगी कंपन्यांच्या पावलावर पाऊल न ठेवता दर स्थिर ठेवले आहेत. तसेच ‘इंडियन ऑईल कॉर्पोरेशन’कडूनही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर सुमारे ११० डॉलर प्रति पपाच्या पातळीवर पोहोचले आहेत. त्यामुळे येत्या काळात इंधन दरवाढीचा दबाव कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आखातात युद्धाचे ढग वारंवार दाटत किंवा विरळ होत असून संघर्ष कधी थांबणार हे स्पष्ट होत नसल्यामुळे इंधनाच्या दरवाढीची स्थिती गंभीर होत आहे.

फीड फीडबर्नर 13 Apr 2026 11:10 am

युद्ध आणि मौल्यवान धातूंचे घसरते भाव

उदय पिंगळे२८ फेब्रुवारी २०२६ ला सुरू झालेल्या इराण-अमेरिका संघर्षामुळे पारंपरिकपणे ‘सुरक्षित गुंतवणूक’ (safe haven) म्हणून सोन्याकडे मोठा ओघ अपेक्षित होता. जागतिक इतिहासात, युद्ध म्हणजे सोन्याची मागणीत वाढ असे मानले जाते. त्यानुसार सोन्याचे भाव उत्तरोत्तर वाढत असताना बरोबर एक महिन्यात मार्च २०२६ अखेरीस बाजारात एक आश्चर्यकारक परिस्थिती दिसत आहे, ती म्हणजे दिवसेंदिवस युद्ध अधिक तीव्र होत असतानाही सोने आणि चांदीच्या किमती घसरत आहेत. सोन्याच्या भावावर प्रभाव पाडणारेघटक -●आंतरराष्ट्रीय भाव : सोन्याचे भाव प्रामुख्याने लंडन मेटल एक्सचेंज आणि न्यूयॉर्क मर्कंटाइल एक्सचेंजवर मागणी आणि पुरवठा यावर (COMEX) ठरतात, जिथे ते औंस (ounce) साठी युएस डॉलर (USD) मध्ये मोजले जातात.●भारतातील किंमत कशी ठरते?आयात शुल्क (Import Duty): भारत मोठ्या प्रमाणात सोने आयात करतो. त्यावर लागणारे सीमा शुल्क (Customs Duty) आणि इतर करांचा मोठा वाटा असतो.●चलन विनिमय दर (Currency Exchange Rate): डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत झाल्यास, भारतात सोने महाग होते.●स्थानिक मागणी : सण, लग्नसराई किंवा गुंतवणुकीसाठी (ETF, Sovereign Gold Bond) मागणी वाढल्यास भाव वाढतात.भाव बदलण्याचे मुख्य कारण :●महागाई (Inflation): महागाई वाढल्यास गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे वळतात, ज्यामुळे दर वाढतात.●मध्यवर्ती बँका : आरबीआय (RBI) किंवा इतर देशांच्या बँका सोन्याची खरेदी करतात, तेव्हाही भाव वधारतात.●स्थानिक बाजार : स्थानिक सराफ असोसिएशन किंवा 'बुलीयन असोसिएशन' जागतिक दरांवर आधारित दररोज सकाळी सोन्याचे ताजे दर निश्चित करतात, ज्यामध्ये वस्तू आणि सेवाकरांचा (GST) समावेश होतो.जर तुम्ही या क्षणी सोन्या-चांदीत फार मोठ्या वाढीची अपेक्षा करत असाल तर सध्याची उपलब्ध आकडेवारी वेगळीच कथा सांगते. सन २०२६ दोन परस्परविरोधी पद्धतीने सोन्याच्या भावात तेजी मंदी दिसून आली. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी संघर्ष सुरू झाल्यानंतर सुरुवातीला सोन्याने अपेक्षेप्रमाणे वाढ दर्शवली आणि अनेक आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचले पण ही वाढ टिकली नाही. यानंतर सोन्याच्या घसरणीची मालिका सुरू होऊन मार्चच्या मध्यात सलग सहा सत्रांत झालेली घसरण ही सन २०२४ नंतरची सर्वात खराब कामगिरी होती.घसरणीचा प्रमाण पाहिले असता जानेवारीच्या अखेरीस सोन्याचा भाव जवळपास $५,६००/- औस होता तेथून सुमारे २७% घसरून $४,०९८/-औस (२३ मार्च) याच काळात चांदीच्या भावातील अस्थिरता पाहिली असता चांदीत ४०% पेक्षा अधिक घसरण झाली ती $१२० वरून $६५–$७० पर्यंत खाली आली.सन २०२६ मध्ये सोने-चांदी सारखे मौल्यवान धातू अपयशी ठरत आहेत? याची प्रमुख कारणे अशी-●कच्चा तेलाच्या वाढत्या किमती (Energy Hedge)- या कालावधीत होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्याचा परिणाम म्हणून ब्रेंट क्रूड ४०% पेक्षा जास्त वाढून $११०/barrel च्या वर गेल्याने गुंतवणूकदारांनी सोने सोडून ऊर्जा क्षेत्रात त्यांची गुंतवणूक वळवली आहे.●फेडकडून व्याजदर कपातीची अपेक्षा कमी- फेडचे Higher for Longer धोरण असूनव्याजदर ३.५%–३.७५% वर कायम ठेवले आहेत. सोने/चांदीत यातील गुंतवणूकीवर व्याज मिळत नाही (non-yielding assets)या उलट उच्च बाँड उत्पन्नामुळे गुंतवणूकदार अमेरिकन ट्रेझरीकडे वळले आहेत.●मजबूत अमेरिकन डॉलर (DXY) - डॉलर सुरक्षित गुंतवणूक म्हणून मजबूत झाला असून जागतिक बाजारात सोने महाग झाल्याने सोन्याची मागणी कमी झाल्याने त्याचा किमतींवर दबाव आला आहे.●असाधारण वाढ - या धातूंच्या किंमती यापूर्वी वाढत होत्याच पण सन २०२५ मध्ये सोने ६५% आणि चांदी १५०% वाढली त्यातील वाढीचा दर हा साधारण नव्हता. त्यामुळे सरकारला सुवर्ण सर्वभोम रोखे मागे घ्यायला लागले. गेल्या वर्षभरात भावांमधे असाधारण वाढ झाल्याने संस्थात्मक गुंतवणूकदारांनी नफा वसुली चालू केली. चांदीवर दुहेरी दबाव होता. औद्योगिक मागणी कमी होण्याची भीती वाढली. यामुळे त्यांच्या दारात कुठेतरी स्थिरता येणे आवश्यक होते.या सर्वांतून, गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची शिकवण अशी आहे की, परिस्थिती महत्त्वाची असते. युद्धासोबत व्याजदर बदलतात आणि चलनावरही परिणाम करतात त्यामुळे रोकड सुलभतेची व्याख्या बदलते. कधी कधी रोख पैशाची गरज सुरक्षिततेपेक्षा मोठी ठरते. सोने हे गुंतवणुकीचे एक साधन आहे, कवच नाही. त्यामुळे आता सोने आणि चांदी घ्यावी का? असा प्रश्न पडू शकतो. अनेक वर्षांच्या अनुभवातून एवढ्या मोठ्या प्रमाणात भावात झालेली घसरण येणाऱ्या काळातील मोठ्या तेजीच्या ट्रेंडमधील सुधारणा सुद्धा असू शकते. त्यामुळे सोन्या चांदीतील गुंतवणूक करण्याची रणनीती अशी असावी,●जर दीर्घकालीन दृष्टिकोनातून तुम्ही नव्याने गुंतवणूक करणार असाल तर एकरकमी गुंतवणूक टाळा. ती हळूहळू अथवा टप्याटप्याने करा.●जर तुम्ही आधीच गुंतवणूक केली असेल तर सध्या खाली आलेले भाव पाहून घाबरून विक्री करू नका.●आपल्या गुंतवणूक संचातील ५-१०% भाग सोन्यामध्ये राहील हे पहा.कारण, सन २०२६ अखेरपर्यंत सोन्याचा भाव $६,०००/औस पेक्षा जास्त असेल, असा जगभरातील प्रमुख बँकर्सचा अंदाज आहे.थोडक्यात पण महत्वाचे,● सन २०२६ मध्ये युद्ध असूनही सोन्याचे भाव का घसरत आहेत?तेलाच्या किमतीत वाढ, उच्च बाँड उत्पन्न आणि सन २०२५ मधील नफा-वसुली यामुळे सोन्याची घसरण होत आहे.●चांदी गुंतवणुकीसाठी योग्य आहे का?हो, दीर्घकालीन दृष्टीने चांगली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, ५जी सुविधा आणि सौर ऊर्जेच्या मागणीत सातत्याने वाढ होत आहे. चांदीसाठी $६५–$७५हा खरेदीचा महत्त्वाचा स्तर मानला जातो.●सन २०२६ मध्ये डॉलरचा सोन्यावर काय परिणाम होऊ शकेल?या वर्षभरात डॉलर अधिक मजबूत झाला तर सोने महाग होईल, त्यामुळे सोन्याची जागतिक मागणी कमी होऊ शकते आणि किमतींवर मर्यादा येऊ शकते. तरीही नक्की काय होईल आणि त्याचे काय परिमाण होतील यांचे अंदाज बांधता येत नसल्याने मौल्यवान धातूंमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.मुंबई ग्राहक पंचायतEmail : mgpshikshan@gmail.com

फीड फीडबर्नर 13 Apr 2026 11:10 am

टाटा मोटर्स लिमिटेड...

डॉ. सर्वेश सुहास सोमणटाटा मोटर्स (Tata Motors Limited) ही केवळ एक ऑटोमोबाईल कंपनी नसून ती भारताच्या औद्योगिक प्रगतीचे आणि जागतिक स्तरावरील भारतीय महत्त्वाकांक्षेचे प्रतीक आहे. टाटा समूहाचा एक महत्त्वाचा भाग असलेली ही कंपनी आज प्रवासी वाहने, व्यावसायिक वाहने आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या (EV) बाजारपेठेत आघाडीवर आहे.१. जागतिक विस्तार : जॅग्वार लँड रोव्हर (JLR) खरेदीटाटा मोटर्सच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाचा वळण बिंदू म्हणजे २००८ मध्ये फोर्ड कंपनीकडून 'जॅग्वार' (Jaguar) आणि 'लँड रोव्हर' (Land Rover) या दोन आलिशान ब्रँड्सची खरेदी. सुरुवातीला अनेक जागतिक विश्लेषकांनी या करारावर टीका केली होती, मात्र रतन टाटा यांच्या दूरदृष्टीमुळे या ब्रँड्सनी टाटा मोटर्सला जागतिक नकाशावर एक प्रबळ स्थान मिळवून दिले.२. उत्पादन श्रेणी (Product Portfolio)टाटा मोटर्सचे कामकाज प्रामुख्याने तीन विभागांत विभागलेले आहे :व्यावसायिक वाहने (Commercial Vehicles) : ट्रक, बसेस आणि पिकअप व्हॅन्समध्ये टाटा मोटर्स भारताचा 'मार्केट लीडर' आहे. यामध्ये ७ टन ते ५५ टनांपर्यंतचे विविध मॉडेल्स उपलब्ध आहेत.प्रवासी वाहने (Passenger Vehicles) : गेल्या काही वर्षांत टाटा मोटर्सने आपल्या गाड्यांच्या डिझाईन आणि गुणवत्तेत आमूलाग्र बदल केले आहेत. टियागो, अल्ट्रोज़, पंच, नेक्सन, हैरियर आणि सफारी Tiago, Altroz, Punch, Nexon, Harrier, Safari यांसारख्या गाड्यांनी बाजारात मोठी पकड निर्माण केली आहे.इलेक्ट्रिक वाहने (Electric Vehicles): 'टाटा ईव्ही' (Tata EV) ही सध्या भारतातील ईव्ही सेगमेंटमधील सर्वात मोठी कंपनी आहे. Nexon EV, Punch EV आणि Tiago EV मुळे भारतातील ईव्ही क्रांतीला मोठी चालना मिळाली आहे.३. भविष्यातील वाटचाल आणि आव्हानेईव्ही मिशन : २०३० पर्यंत आपल्या एकूण विक्रीपैकी ५०% वाटा इलेक्ट्रिक वाहनांचा असावा, असे कंपनीचे उद्दिष्ट आहे.Avinya आणि Curvv: टाटा मोटर्स आता 'अविन्या' (Avinya) सारख्या नवीन प्लॅटफॉर्मवर काम करत आहे, जे जागतिक दर्जाच्या इलेक्ट्रिक गाड्यांसाठी डिझाइन केलेले आहे.पर्यायी इंधन: हायड्रोजन इंधन आणि सीएनजी (CNG) सेगमेंटमध्येही कंपनी आपले पाय घट्ट रोवत आहे.शेअरची सध्याची किंमत (एप्रिल २०२६)टाटा मोटर्स (Passenger/JLR): १० एप्रिल २०२६ च्या क्लोजिंगनुसार, या शेअरची किंमत साधारण ₹३४२ - ₹३४३ च्या दरम्यान आहे.TMLCV (Commercial Vehicles): नवीन सूचीबद्ध झालेल्या या कंपनीच्या शेअरची किंमत सध्या ₹४४४.५५ च्या आसपास असून १० एप्रिलला यात ४.४५% ची वाढ दिसून आली.अलीकडील कामगिरी आणि निकाल (Q4 FY26)विक्रमी विक्री: मार्च २०२६ मध्ये संपलेल्या चौथ्या तिमाहीत (Q4) टाटा मोटर्सने प्रवासी वाहन श्रेणीत २ लाख युनिट्सचा टप्पा पहिल्यांदाच ओलांडला असून यात ३७% वार्षिक वाढ झाली आहे.EV क्षेत्रात मोठी उडी: इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत वार्षिक ५९% इतकी प्रचंड वाढ नोंदवली गेली आहे.नफा: विश्लेषकांच्या मते, कंपनीचा अंदाजित तिमाही नफा ₹६,००० ते ₹८,५०० कोटींच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे.(सूचना : लेखकाची तसेच त्यांच्या जवळच्या नातेवाइकांची लेखात सुचवित असलेल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणतीही गुंतवणूक नाही किंवा सुचविलेल्या कंपन्यांशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून कंपनीकडून कोणतेही मानधन किंवा भेटवस्तूघेतलेली नाही.)samrajyainvestments@gmail.com

फीड फीडबर्नर 13 Apr 2026 11:10 am

Iran on America: अमेरिकेने होर्मुझच्या नाकेबंदीची घोषणा करताच इराणकडून ‘गणितीय’धमकी ; फोटो शेअर करत म्हणाले,”..याची किंमत…”

Iran on America: पाकिस्तानमधील शांतता चर्चा अयशस्वी झाल्यानंतर, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीवर नाकेबंदी जाहीर केली,

दैनिक प्रभात 13 Apr 2026 11:09 am

US Central Command: चर्चा फिस्कटल्यानंतर ट्रम्प ऍक्शन मोडमध्ये ; इराणला घालणार समुद्री वेढा, आजपासून पूर्णपणे नाकेबंदी

US Central Command: इस्लामाबादमध्ये अमेरिका आणि इराण यांच्यात झालेल्या अयशस्वी चर्चेनंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी कठोर पावलं उचलायला सुरुवात केली आहे.

दैनिक प्रभात 13 Apr 2026 10:44 am

Asha Bhosle : विलक्षण योगायोग! लता दीदी आणि आशा ताईंच्या निधनामध्ये अजब साम्य; पाहून सर्वच झाले थक्क!

Asha Bhosle And Lata Mangeshkar : एक विलक्षण साम्य म्हणजे, आशा भोसले यांचे निधन झाले तेव्हाही त्यांचे वय 92 वर्षेच होते.

दैनिक प्रभात 13 Apr 2026 10:44 am

मुकुल चौधरीला क्रिकेटर बनवण्यासाठी वडील तुरुंगात गेले:सर्वात फास्ट बॉल टाकणारा अशोक शर्मा शेती करू लागला होता; IPL मधील 7 उदयोन्मुख स्टार्सचे किस्से

राजस्थानची राजधानी जयपूरपासून 80 किमी दूर रामपुरा गाव. अक्षय आणि अशोक नावाचे दोन भाऊ घराच्या अंगणात नेहमी क्रिकेट खेळत असत. मोठ्या भावाचा चेंडू कधी धाकट्याच्या छातीवर लागायचा तर कधी डोक्यावर. बदला घेण्यासाठी अशोकने वेगवान चेंडू फेकण्याचा खूप सराव केला. काही वर्षांतच त्याच्या गोलंदाजीची भीती संपूर्ण परिसरात पसरली. घरात पैशांची चणचण होती. वडील शेती करून आणि वर्तमानपत्रे विकून महिन्याला फक्त 10 हजार रुपये कमवत होते. म्हणून ते फक्त एका मुलालाच अकॅडमीत पाठवू शकत होते. मोठ्या भावाने सांगितले - तू खेळ. अशोकने जयपूरच्या अरावली क्रिकेट अकॅडमीत प्रवेश घेतला. तिथे प्रशिक्षक विवेक यादव खूप मदत करत होते. कोविड-19 मध्ये प्रशिक्षकाचा मृत्यू झाला, तेव्हा अशोकने अकॅडमी आणि क्रिकेट दोन्ही सोडून दिले. वडिलांसोबत शेतात वेळ घालवू लागला. त्याच अशोक शर्माने IPL च्या या हंगामातील सर्वात वेगवान चेंडू फेकला आहे. वेग - 154.2 किमी/तास. IPL 2026 ने अजून 25% प्रवासच पूर्ण केला आहे आणि अशोक शर्मासारखे अनेक उदयोन्मुख तारे समोर आले आहेत; मंडे मेगा स्टोरीमध्ये अशाच 7 खेळाडूंच्या ऐकलेल्या-न ऐकलेल्या रंजक कथा... ***** ग्राफिक्स: दृगचंद्र भुर्जी आणि अजित सिंग

दिव्यमराठी भास्कर 13 Apr 2026 10:40 am

Asha Bhosle : आशा भोसलेंना मृत्यूची चाहूल? शेवटची इन्स्टा पोस्ट व्हायरल

मुंबई : जेष्ठ गायिका आशा भोसले (Asha Bhosle) यांच्या निधनाने भारतीय संगीतविश्वाला मोठा धक्का बसलाआहे. १२ एप्रिल २०२६ रोजी वृद्धापकाळाने आशा भोसले यांचं निधन झालं. प्रकृती अस्वस्थ झाल्याने त्यांना ब्रीच कँडी हॉस्पिटल (Breach Candy Hospital) येथे दाखल करण्यात आलं होतं. उपचार सुरू असतानाच प्रकृती खालावली आणि वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे.निधनानंतर आशाताईंची शेवटची सोशल मीडिया पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे. १८ मार्च रोजी केलेल्या या पोस्टमध्ये त्यांनी ‘The Shadowy Light’ या गाण्याच्या माध्यमातून जीवन, प्रवास आणि मोक्ष याबद्दल अत्यंत भावनिक विचार मांडले होते. वाराणसी आणि पवित्र गंगा नदीच्या किनाऱ्यावरच्या अनुभवातून जीवनाचा खरा अर्थ उमजल्याचं त्यांनी या पोस्टमध्ये लिहिलं होतं.https://prahaar.in/web-story/asha-bhosle-and-her-famous-songsया पोस्टमध्ये त्यांनी जीवनप्रवासाची तुलना एका नदीशी करत “संगीत हाच माझा नावाडी आहे” असं म्हटलं होतं. जन्म, नातेसंबंध, संगीताप्रती निष्ठा आणि कर्तव्यांचा उल्लेख करत, शेवटी या प्रवासातून ‘मोक्ष’ मिळेल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली होती. त्यांच्या या शब्दांकडे चाहते आता ‘पूर्वाभास’ म्हणून पाहत आहेत. आशाताईंना आपल्या मृत्यूची चाहूल लागली होती का अशा चर्चा आता रंगू लागल्या आहेत.

फीड फीडबर्नर 13 Apr 2026 10:10 am

Iran-US Peace Treaty : शांतता चर्चेच्या अपयशासाठी इराणने अमेरिकेला धरले जबाबदार

पाकिस्तानच्या इस्लामाबादमधील निष्फळ झालेल्या चर्चेनंतर, इराणने म्हटले आहे की, वाटाघाटी अजून संपलेल्या नाहीत. अमेरिकेसोबतच्या संवादाचे दरवाजे बंद झाले आहेत, या चर्चा इराणी सरकारने अधिकृतपणे फेटाळून लावल्या आहेत. इराणी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी म्हटले आहे की, खेळ अजून संपलेला नाही आणि दोन्ही पक्ष अजूनही चर्चेसाठी तयार आहेत. हे विधान अशा वेळी आले आहे, जेव्हा इस्लामाबादमधील चर्चा जागतिक स्तरावर 'अडथळा' म्हणून पाहिली जात आहे.https://prahaar.in/2026/04/11/iran-us-peace-treaty-tensions-peak-before-peace-talks-iranian-delegation-arrives-in-pakistan-reminding-of-that-action-by-america/इराणी प्रवक्त्याने यावर जोर दिला की, अनेक दशकांचा अविश्वास आणि अलीकडील तणाव पाहता, एकाच बैठकीत सर्व काही सुटेल अशी अपेक्षा करणे व्यर्थ आहे. बघाई यांच्या मते, तेहरान आणि वॉशिंग्टन अनेक मुद्द्यांवर सहमत झाले आहेत, तरीही दोन-तीन महत्त्वाच्या बाबींवर तीव्र मतभेद कायम आहेत. इराणने सूचित केले आहे की ते वाटाघाटीची प्रक्रिया पूर्णपणे संपवण्याच्या बाजूने नाही.https://prahaar.in/2026/04/12/nari-shakti-vandan-sammelan-prime-minister-narendra-modi-to-interact-with-accomplished-women-through-the-nari-shakti-vandan-sammelan/इराणी माध्यमांशी बोलताना, इस्माईल बघाई यांनी कबूल केले की या चर्चा अत्यंत कठीण परिस्थितीत होत आहेत. ते म्हणाले, ४० दिवसांच्या लादलेल्या युद्धानंतर या चर्चा झाल्या. अशा परिस्थितीत, वातावरणात अविश्वास आणि संशय असणे स्वाभाविक आहे. इराणने स्पष्ट केले आहे की, वाटाघाटींचे यश आता पूर्णपणे 'विरोधी पक्षा'वर, म्हणजेच अमेरिकेवर अवलंबून आहे. इराणचा युक्तिवाद आहे की, जोपर्यंत अमेरिका इराणचे कायदेशीर हक्क आणि हितसंबंध मान्य करत नाही, तोपर्यंत अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचणे कठीण होईल.

फीड फीडबर्नर 13 Apr 2026 9:30 am

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना आदिती तटकरेंचे आवाहन; नव्याने नोंदणी प्रक्रिया बंद, पण ईकेवायसी…

Ladki Bahin Yojana : महिला मोबाईलवरून स्वतः ईकेवायसी करू शकतात किंवा जवळील अंगणवाडी सेविकांची मदत घेऊ शकतात

दैनिक प्रभात 13 Apr 2026 9:13 am

IPL 2026 MI vs RCB : वानखेडेवर RCBचा जल्लोष तर मुंबई इंडियन्सने केली पराभवाची 'हॅट्रिक'

मुंबई : RCB ने वानखेडेच्या ऐतिहासिक मैदानावर दमदार खेळ करत Mumbai Indians ला १८ धावांनी पराभूत केले. या पराभवामुळे मुंबई इंडियन्सच्या नावावर सलग तिसरा पराभव नोंदवला गेला असून संघाची स्थिती पॉईंट टेबलमध्ये खालावली आहे. कर्णधार हार्दिक पंड्या Hardik Pandya याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला, मात्र आरसीबीच्या फलंदाजांनी तो पूर्णपणे चुकीचा ठरवला.आरसीबीकडून फील सॉल्ट (Phil Salt) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांनी तुफानी सुरुवात केली. पॉवरप्लेमध्ये दोघांनी ७१ धावा केल्या आणि १० षटकांत ११५ धावांची भागीदारी उभारली. सॉल्टने ३६ चेंडूत ७८ धावांची आक्रमक खेळी करत मुंबईच्या गोलंदाजांची धुलाई केली. तर कोहलीने ३८ चेंडूत ५० धावा करत संयमी अर्धशतक झळकावले.https://prahaar.in/2026/04/10/ipl-2026-points-table-rajasthan-royals-on-top-after-15-matches-these-4-teams-are-leading-the-playoff-race/यानंतर कर्णधार रजत पाटीदारने मैदानात येताच चौकार-षटकारांची आतषबाजी केली. त्याने केवळ २० चेंडूत ५३ धावा करत डावाला वेग दिला. शेवटी टीम डेव्हिडने १६ चेंडूत नाबाद ३४ धावा करत आरसीबीला २४२ धावांपर्यंत पोहोचवले.२४२ धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात चांगली झाली. रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि रयान रिकेल्टन यांनी संघाला गती दिली, मात्र रोहित दुखापतीमुळे रिटायर्ड हर्ट झाला. त्यानंतर सूर्यकुमार यादव (Suyash Sharma) याने सलग धक्के देत सामना आरसीबीकडे झुकवला.सूर्या (३३), हार्दिक पांड्या (४०) यांनी प्रयत्न केले, पण आरसीबीच्या गोलंदाजीसमोर मुंबईचा डाव २२२ धावांवरच थांबला. त्यामुळे मुंबईला १८ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.

फीड फीडबर्नर 13 Apr 2026 9:10 am

Pandharpur Acid attack : धक्कादायक! पंढरपुरात तरुणीवर अॅसिड हल्ला; आरोपी फरार

- राज्यात वाढत्या अत्याचारांमुळे नागरिकांचा संतापराज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. एकीकडे अशोक खरात प्रकरणामुळे संतापाची लाट उसळलेली असतानाच, दुसरीकडे अहिल्यानगरमधील अॅसिड हल्ल्याचे प्रकरण अद्याप ताजे असतानाच आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पंढरपूर (Pandharpur) येथे एका तरुणीवर अॅसिड हल्ला झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.शिर्डी तालुक्यातील अॅसिड हल्ल्यातील आरोपी अद्याप पोलिसांच्या ताब्यात आलेला नाही, त्यातच पंढरपुरातील या नव्या घटनेने नागरिकांमध्ये संताप वाढला आहे. २१ वर्षीय वैष्णवी भागवत असे पीडित तरुणीचे नाव असून, अज्ञात इसमाने तिच्यावर अॅसिडसदृश द्रव फेकल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तिला तातडीने शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा पंढरपूर दौरा सुरू असतानाच ही घटना घडल्याने प्रशासनातही खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. मात्र, आरोपी अद्याप फरार असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.https://prahaar.in/2026/04/07/new-twist-in-ashok-kharat-case-after-ias-two-senior-women-police-officers-are-being-discussed/घटनेनंतर पीडितेच्या नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली. “आम्हाला फोन आला आणि आम्ही पेट्रोल पंपाजवळ पोहोचलो, तेव्हा माझ्या मुलीवर अॅसिड टाकल्याचं समजलं. अशा प्रकारचे कृत्य कुणावरही होऊ नये,” असे भावनिक आवाहन पीडितेच्या आईने केले.दरम्यान, जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील वरकटणे येथे आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. धनगर समाजातील मेंढपाळ आणि एका महिलेला काठीने मारहाण करण्यात आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

फीड फीडबर्नर 13 Apr 2026 8:30 am

Asha Bhosle Funeral : सुरसम्राज्ञी आशा भोसलेंच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार; मुख्यमंत्री फडणवीस, राज ठाकरेंसह बॉलीवूड कलाकारांंनी घेतलं अंत्यदर्शन

Asha Bhosle Funeral : आशा भोसलेंच्या पार्थिवावर आज दुपारी ४ वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार

दैनिक प्रभात 13 Apr 2026 8:16 am

Ashok Kharat Case : शक्तिपीठ महामार्गात ‘इनसाइडर गेम’? भोंदूबाबा अशोक खरातवर जमीन खरेदीत घोटाळ्याचे आरोप

नाशिकचा वादग्रस्त भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) व त्याची पत्नी कल्पना खरात यांनी उत्तर सोलापूर तालुक्यात जमीन खरेदी केल्याची बाब उघडकीस आली आहे. प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाच्या मार्गात ही जमीन येत असल्याने अतिरिक्त मोबदला मिळवण्याच्या उद्देशाने ही जमीन खरेदी केल्याचा आरोप केला जात आहे.उत्तर सोलापूर तालुक्यातील कळमण येथे खरातने सुमारे ४ हेक्टर ४८ आर (११ एकरहून अधिक) जमीन खरेदी केली आहे. शासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी असलेल्या संपर्कामुळे महामार्गाच्या रेखांकनाची माहिती आधीच मिळाल्याच्या आधारेच त्यांनी (Ashok Kharat) ही जमीन घेतल्याचा दावा स्थानिकांकडून केला जात आहे.https://prahaar.in/2026/04/12/we-will-bring-fresh-talent-within-the-ncp-to-the-forefront-sunetra-pawar-announces/महामार्गासाठी जमीन संपादित होताना अधिक मोबदला मिळावा यासाठी खरातने दहा ते बारा फूट उंचीची आंब्याची झाडे आणून लावल्याची माहिती समोर आली आहे. तसेच भूसंपादन मोबदला प्रक्रियेत जास्त भरपाई मिळवून देणाऱ्या डाळिंब पिकाची नोंदही उताऱ्यावर करून घेतल्याचे सांगितले जात आहे.या प्रकारामुळे रस्ते प्रकल्पातील भूसंपादन प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर घोटाळे होत असल्याची चर्चा सुरू झाली असून, या प्रकरणात संबंधितांना मदत करणारे अधिकारी कोण, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहे.

फीड फीडबर्नर 13 Apr 2026 8:10 am

Maharashtra Government : राज्य सरकारचा मोठा निर्णय! आता डिसेंबरपर्यंत ६०% निधी खर्च करणे बंधनकारक

Maharashtra Government : लाभार्थ्यांचे आधार लिंकिंग आणि ईसीएस द्वारे पेमेंट अनिवार्य; प्रशासकीय विभागांना शिस्त लावण्यासाठी वित्त विभागाने कडक पावले उचलली आहेत.

दैनिक प्रभात 13 Apr 2026 7:00 am

Pune Crime : भोंदूगिरीचा धक्कादायक प्रकार! ‘त्या’बाबाने महिलेकडून ५० लाख उकळले अन्..संतापजनक कृत्य

Pune Crime : पुण्यात पुन्हा एकदा भोंदूगिरीचा संतापजनक प्रकार समोर; पाच वर्षांपासून पीडितेची आर्थिक आणि शारीरिक पिळवणूक.

दैनिक प्रभात 13 Apr 2026 6:45 am

आजचे एक्सप्लेनर:का झाली नाही इराण-अमेरिका डील, इच्छा असूनही होर्मुझ उघडू शकत नाही का इराण की पुन्हा युद्धाची तयारी; जाणून घ्या संपूर्ण कहाणी

पाकिस्तानमध्ये इराण-अमेरिका यांच्यात 21 तास चाललेली चर्चा अनिर्णित राहिली. अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे.डी. व्हेन्स म्हणाले, 'अमेरिका कोणत्याही कराराशिवाय परत फिरत आहे. ही इराणसाठी आणखी वाईट बातमी आहे. आम्ही त्यांना सर्वोत्तम ऑफर देऊन जात आहोत. आता ते मानतात की नाही हे पाहणे महत्त्वाचे आहे.' तर इराणचे म्हणणे आहे की अमेरिकेच्या अटी गरजेपेक्षा जास्त कठोर आहेत. त्यामुळे करार होऊ शकला नाही. शेवटी दोन्ही देशांच्या अटी काय होत्या, खरी अडचण कुठे होती आणि आता पुन्हा युद्ध सुरू होईल का, हे आजच्या एक्सप्लेनरमध्ये जाणून घेऊया... प्रश्न-1: करारासाठी इराण आणि अमेरिकेच्या काय-काय मागण्या होत्या?उत्तर: 8 एप्रिल रोजी इराण-अमेरिका यांच्यात युद्धविरामाच्या घोषणेपूर्वी 25 मार्च रोजी अमेरिकेने पाकिस्तानमार्फत इराणला कराराचा एक आराखडा पाठवला होता. ट्रम्प यांनी दावा केला होता की इराण यापैकी बहुतेक मागण्यांवर सहमत आहे. तर इराणने या मागण्यांना जास्त आणि अयोग्य ठरवले होते. त्यासोबतच आपल्या 10 मागण्यांचा एक आराखडा दिला होता. आधी अटी पाहा… तज्ज्ञांच्या मते, दोन्ही देशांनी करारासाठी मोठ्या मागण्या केल्या होत्या. अमेरिकेच्या इन्स्टिट्यूट ऑफ ग्लोबल अफेअर्समधील फेलो सहेर खान म्हणतात, 'दोन्ही देश जास्तीत जास्त मागण्या करून हे दाखवू इच्छित होते की त्यांनी युद्ध जिंकले आहे.' पाकिस्तानमधील अमेरिकेचे माजी राजदूत कॅमरून मंटर म्हणाले, 'हे निश्चित आहे की दोन्ही पक्ष आक्रमक भूमिका घेतील आणि इतक्या मोठ्या मागण्या करतील की एक व्यावहारिक आणि दीर्घकाळ टिकणारा करार अत्यंत कठीण होईल.' प्रश्न-2: कोणत्या मागण्यांवरून संघर्षामुळे अमेरिका-इराण करार होऊ शकला नाही?उत्तर: काही अहवालांनुसार, अमेरिका, इराणवरील निर्बंध हटवण्यासाठी आणि गोठवलेले पैसे सोडण्यासाठी सहमत झाले होते. जेडी व्हेन्स यांच्या 'करार झाला नाही' या निवेदनानंतर इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बगाई यांनीही सांगितले की, अमेरिका आणि इराण यांच्यात अनेक मुद्द्यांवर करार झाला होता, परंतु 2-3 महत्त्वाच्या मुद्द्यांवर मतभेद होते. दोन्ही देशांच्या नेत्यांच्या निवेदनानुसार आणि तज्ज्ञांच्या मते, 3 मोठ्या मुद्द्यांवर कोणतीही सहमती होऊ शकली नाही.. 1. इराणचा अणु कार्यक्रम थांबवणे 2. होर्मुझच्या सामुद्रधुनीवर कोणाचे नियंत्रण राहील 3. लेबनॉन युद्धविरामात सामील आहे की नाही प्रश्न-३: तर आता होर्मुझसारख्या मुद्द्यांवर समझोत्याची आशा नाही का?उत्तर: या मुद्द्यावर तज्ज्ञांचे मत संमिश्र आहे… इस्लामाबाद पॉलिसी रिसर्च इन्स्टिट्यूटचे रिसर्च डायरेक्टर रशीद वली म्हणतात की दोन्ही पक्ष युद्धातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत आहेत, परंतु दोघांच्या अटींमध्ये खूप मोठा फरक आहे. अमेरिकन विश्लेषक ॲरॉन डेव्हिड मिलर म्हणतात की, इराणकडे अमेरिकेपेक्षा जास्त पर्याय आहेत. त्याच्याकडे समृद्ध युरेनियम आहे. तो आपल्या भूगोलाला शस्त्र बनवू शकतो आणि अजूनही होर्मुझला नियंत्रित करत आहे. त्यामुळे त्याला कोणतीही घाई नाही.' सीएनएनच्या पत्रकारांनी इस्लामाबादमधून रिपोर्टिंग करताना सांगितले की, अमेरिका आणि इराणच्या नेत्यांच्या स्वभावात फरक होता. वेन्सला त्वरित तोडगा हवा होता, तर इराणला दीर्घकाळ चर्चा करायची होती.' इन्स्टिट्यूट ऑफ पीस अँड डिप्लोमसीच्या विश्लेषणानुसार, 'इराणसाठी युरेनियमचे संवर्धन हा त्याच्या राष्ट्रीय प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. त्याचा क्षेपणास्त्र कार्यक्रम त्याच्या संरक्षणासाठी आवश्यक आहे. त्यामुळे अमेरिकेसोबत या मुद्द्यावर कोणतीही अर्थपूर्ण सहमती होणे अत्यंत कठीण आहे.' वॉशिंग्टनमध्ये उपस्थित पत्रकार जॉन हेंड्रेन यांच्या मते, 'वेन्स अमेरिकेला परतले याचा अर्थ असा नाही की चर्चा संपली आहे. ही दूरूनही सुरू राहू शकते.' याशिवाय, होर्मुझबाबत एक व्यावहारिक समस्यादेखील आहे. न्यूयॉर्क टाइम्सने अमेरिकन अधिकाऱ्यांच्या हवाल्याने सांगितले आहे की, इराणने लहान बोटींद्वारे होर्मुझमध्ये जे सुरुंग पेरले आहेत, ते आता तो स्वतः काढू शकत नाही. इराणला या सुरुंगांचे अचूक स्थान माहिती नाही. त्यामुळे जहाजे जाण्यासाठी त्याने एक अरुंद मार्ग उघडला आहे. सुरुंग पेरणे सोपे असते, पण ते काढणे कठीण असते. अधिकाऱ्यांच्या मते, 'इराणने प्रत्येक सुरुंगाच्या स्थानाचा रेकॉर्ड ठेवला होता की नाही, हे स्पष्ट नाही. जरी त्याच्याकडे हा रेकॉर्ड असला तरी, ते पाण्याच्या प्रवाहात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून जाऊ शकतात. अमेरिकेकडेही ते काढण्याची पूर्ण क्षमता नाही.' प्रश्न-4: इराण-अमेरिका करार न होण्यामागे इस्रायल आहे का?उत्तर: इस्रायलला भीती आहे की, जर अमेरिकेशी करार झाला, तर इराणला अणुकार्यक्रमात सवलत मिळू शकते. म्हणूनच नेतन्याहू यांना वाटते की लेबनॉनवरील हल्ल्यामुळे युद्धविराम तुटावा आणि इराणवर पुन्हा अमेरिकेचे हल्ले सुरू व्हावेत. याशिवाय, इस्रायलला यावरही आक्षेप आहे की युद्धविरामाच्या निर्णयापासून आणि त्यानंतर अमेरिका-इराणच्या चर्चेपासूनही त्याला दूर ठेवण्यात आले. युद्धविरामानंतर इस्रायलचे विरोधी पक्षनेते यायर लॅपिड म्हणाले, 'आमच्या संपूर्ण इतिहासात असे राजकीय नुकसान कधीही झाले नाही. आमच्या राष्ट्रीय सुरक्षेसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर निर्णय घेण्यात आले, परंतु इस्रायल त्या निर्णयांच्या टेबलाजवळही नव्हते.' अमेरिकन थिंक टँक सूफान सेंटरच्या विश्लेषणानुसार, 'लेबनॉनचा मुद्दा जरी अमेरिका-इराण कराराच्या बाहेर असला तरी, लेबनॉनवरील इस्रायली हल्ले तणाव वाढवणारे पाऊल मानले जातील. हा इस्रायलचा इराण आणि त्याच्या हिजबुल्लाहसारख्या सहयोगींमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न आणि कराराच्या चर्चेपासून दूर ठेवण्याचा प्रतिसाद आहे.' प्रश्न-5: तर आता पुन्हा इराणवर हल्ला होईल का?उत्तर: जेडी वान्स यांनी आशा व्यक्त केली आहे की इराण अमेरिकेच्या अटींवर तयार होईल. ते म्हणाले, 'आम्ही एक अतिशय सोपा प्रोटोकॉल आणि कराराची प्रक्रिया घेऊन जात आहोत. हा आमचा शेवटचा आणि सर्वोत्तम प्रस्ताव आहे. आता हे पाहायचे आहे की इराणी हे मान्य करतात की नाही.' व्हाईट हाऊसच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की पुढील पाऊल राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ठरवतील. ट्रम्प यांनी सोशल मीडियावर एक लेख शेअर केला आहे, ज्यात म्हटले आहे की, 'जर इराण अटी मान्य करत नसेल, तर अमेरिका त्याच्यावर सागरी नाकेबंदी लादू शकते आणि खार्ग बेटावर हल्ला करू शकते.' अहवालात म्हटले आहे की ट्रम्प यांनी व्हेनेझुएलासमोरही हीच रणनीती वापरली आहे. न्यूयॉर्क टाइम्सनुसार, ट्रम्प यांच्यासमोर दोन कठीण मार्ग आहेत - इराणसोबत लांब आणि कठीण चर्चा सुरू ठेवणे. किंवा पुन्हा युद्धाकडे जाणे.' तर नेतान्याहू यांनी सांगितले आहे की इराणवरील त्यांची लष्करी कारवाई अजूनही सुरू राहील. इस्त्रायलचे लक्ष्य इराणला अणुबॉम्ब बनवण्यापासून रोखणे हे आहे. इराणनेही एका निवेदनात अमेरिकेला धमकी दिली आहे. असे म्हटले आहे की इराण, अमेरिका-इस्त्रायलच्या गुन्ह्यांना कधीही माफ करणार नाही.

दिव्यमराठी भास्कर 13 Apr 2026 6:37 am

Teacher Training : शिक्षकांनो तयार व्हा! मे महिन्याच्या सुटीत मिळणार ‘या’वर्गांच्या नव्या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण

Teacher Training : जिल्हा आणि तालुकास्तरावर ६० शिक्षकांची एक बॅच; प्रशिक्षणासाठी राज्य शैक्षणिक संशोधन परिषदेचा पुढाकार.

दैनिक प्रभात 13 Apr 2026 6:15 am

अग्रलेख : अष्टपैलू सुराचा अस्त

ज्येष्ठ गायिका आशा भोसले (Asha Bhosle) यांच्या निधनामुळे भारतीय संगीतसृष्टीतील एका अष्टपैलू सुराचा अस्त झाला आहे.

दैनिक प्रभात 13 Apr 2026 6:00 am

Bangladeshi Girls Escape : पुण्यात खळबळ! १० बांगलादेशींसह १३ तरुणी फरार; रेस्क्यू फाऊंडेशनमधील थरारक घटना

Bangladeshi Girls Escape : संस्थेच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह; काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, दोन तरुणींना ताब्यात घेण्यात यश.

दैनिक प्रभात 13 Apr 2026 6:00 am

SPPU News : पुणे विद्यापीठात खळबळ! उच्च शिक्षणमंत्र्यांची ‘त्या’सदस्यांना कडक तंबी; कुलगुरूंची खुर्चीही धोक्यात?

SPPU News : अधिकार मंडळाच्या मर्यादा ओळखा आणि प्रतिष्ठा राखा; कुलसचिव नियुक्तीचा तिढा आणि ढासळती शिस्त यावरून मंत्र्यांचा कडक इशारा.

दैनिक प्रभात 13 Apr 2026 5:45 am

Katraj Kondhwa Road : कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरणाला वेग! आयुक्तांनी स्वतः केली पाहणी; भूसंपादनासाठी मोठी तरतूद

Katraj Kondhwa Road : पहिल्या टप्प्यात ५२ हजार चौ.मी. क्षेत्राचे संपादन होणार; १२९ मिळकतदारांना मिळणार मोबदला, प्रस्तावाला लवकरच अंतिम मंजुरी.

दैनिक प्रभात 13 Apr 2026 5:30 am

दिल्ली वार्ता : अधिवेशनाचा फायदा कुणाला?

पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूत मतदान होण्याच्या दहा दिवस आधी महिला आरक्षण विधेयक लागू करण्यासाठी संसदेचं (Parliamentary Session) तीन दिवसाचं खास अधिवेशन बोलाविण्यात आलं आहे.

दैनिक प्रभात 13 Apr 2026 5:30 am

Society Redevelopment : जुनी इमारत पाडणे आता सोपे नाही! महापालिकेच्या नव्या नियमावलीमुळे सोसायट्यांची डोकेदुखी वाढली

Society Redevelopment : पुनर्विकासाच्या प्रक्रियेत पाडकामासाठी महापालिकेने प्रथमच निश्चित केली कार्यपद्धती; स्ट्रक्चरल ऑडिटपासून नाहरकत पत्रांपर्यंत कागदपत्रांचा डोंगर.

दैनिक प्रभात 13 Apr 2026 5:15 am

चर्चेत : आता पुढे काय?

पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या लष्करी संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे झालेल्या त्रिपक्षीय चर्चेमधून (Editorial) काहीच निष्पन्न न झाल्याने आगामी कालावधीमध्ये पुन्हा एकदा हा लष्करी संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

दैनिक प्रभात 13 Apr 2026 5:00 am

Sanaswadi Accident : शेगडी विक्रीसाठी आले अन जीवाला मुकले; सणसवाडीत काळजाचा थरकाप उडवणारा अपघात

Sanaswadi Accident : शेगडी विक्रीचा व्यवसाय आटोपून फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडले, मात्र भरधाव वाहनाच्या धडकेत इंदापूरच्या दोन नातेवाईकांचा जागीच मृत्यू.

दैनिक प्रभात 13 Apr 2026 4:45 am

Sunetra Pawar : ‘बारामतीसह राज्याची जबाबदारी घ्यायला मी सज्ज!’; सुनेत्रा पवारांनी कण्हेरीतून फुंकले प्रचाराचे रणशिंग

Sunetra Pawar : अजितदादांनी घातलेला विकासाचा पाया अधिक मजबूत करण्यासाठी सुनेत्रा पवार सरसावल्या; कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष होणार नाही अशी दिली ग्वाही.

दैनिक प्रभात 13 Apr 2026 4:30 am

Victoria Lake : दौंड-बारामतीतील ८ गावांचा पाणीपुरवठा धोक्यात; व्हिक्टोरिया तलावाने गाठला तळ; फक्त १८% पाणी शिल्लक

Victoria Lake : ऐतिहासिक व्हिक्टोरिया तलावातील पाणीसाठा १८ टक्क्यांवर; वरवंड परिसरातील शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर.

दैनिक प्रभात 13 Apr 2026 4:15 am

Dairy Farming : पौष्टिक अन् चवदार! मुरघासाने बदलले दुग्धव्यवसायाचे गणित; काय आहे नेमकी प्रक्रिया?

Dairy Farming : मका पिकापासून बनवला जातोय मुरघास; ६५% चारा खर्च कमी होणार, उन्हाळ्यातही जनावरे राहणार सुदृढ.

दैनिक प्रभात 13 Apr 2026 4:00 am

Baramati Vs Indapur : इंदापूरची तरुणाई पदव्या घेऊन बेरोजगार! बारामती ‘हायटेक’झाली, मग आपला तालुका मागे का?

Baramati Vs Indapur : खाजगी संस्थांची हजारो रुपयांची फी अन् जिल्हा परिषद शाळांची खालावलेली गुणवत्ता; इंदापूरच्या पालकांसमोर मोठे आर्थिक संकट.

दैनिक प्रभात 13 Apr 2026 3:45 am

Banana Farmers : जुन्नरचा बळीराजा संकटात! ६ लाखांचा खर्च अन् २ लाखांची कमाई; केळी उत्पादकांचे कंबरडे मोडले

Banana Farmers : निर्यात धोरण आणि हमीभावासाठी सरकारकडे साकडे; वेळीच मदत न मिळाल्यास शेतकरी कर्जबाजारी होण्याची भीती.

दैनिक प्रभात 13 Apr 2026 3:30 am

Mahatma Phule Jayanti : राजगुरूनगरमध्ये साहित्याचा जागर! ४० कवींच्या लेखणीतून घुमली महात्मा फुलेंची क्रांतीगाथा

Mahatma Phule Jayanti : क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी निमित्त राजगुरूनगरमध्ये ४० कवींनी मांडली सामाजिक प्रबोधनाची गाथा.

दैनिक प्रभात 13 Apr 2026 3:15 am

Chakan MIDC : चाकण एमआयडीसीला घरघर! गॅस सिलेंडर २ हजारांवर; कामगारांनी धरली गावची वाट

Chakan MIDC : इंधन दरवाढ आणि गॅस टंचाईमुळे चाकण औद्योगिक क्षेत्रात मनुष्यबळाची ३० ते ४० टक्के कमतरता; उत्पादनावर गंभीर परिणाम.

दैनिक प्रभात 13 Apr 2026 3:00 am

Pavana Dam Water Level : पिंपरी-चिंचवडकरांनो, पाणी जपून वापरा! पवना धरणात फक्त ४४% पाणी; शहरावर पाणी कपातीचे संकट

Pavana Dam Water Level : पवना धरणातील पाणीसाठा ४४.९२ टक्क्यांवर; वाढत्या उष्णतेमुळे पाण्याचे बाष्पीभवन वेगाने, प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा.

दैनिक प्रभात 13 Apr 2026 2:15 am

Kamshet News : कामशेतमधील स्वागत धोकादायक कमान हटवली, पण सुशोभीकरणाचा प्रश्न सुटला का?

Kamshet News : जीर्ण अवस्थेमुळे नागरिकांच्या सुरक्षेला गंभीर धोका; संभाव्य अपघात टाळण्यासाठी ग्रामपंचायतीने अखेर कमान काढली.

दैनिक प्रभात 13 Apr 2026 1:45 am

Youth Drug Addiction : मावळच्या तरुणाईला व्यसनाचा विळखा; दुर्गम भागातील ‘ते’धक्कादायक वास्तव समोर..वाचा

Youth Drug Addiction : शिक्षण आणि संस्कृतीच्या माहेरघरात व्यसनाधीनतेचा कर्करोग; मद्य, गुटखा आणि अंमली पदार्थांच्या आहारी जाताहेत महाविद्यालयीन तरुण.

दैनिक प्रभात 13 Apr 2026 1:30 am

PCMC 52 Crore Scam : पिंपरी पालिकेत खळबळ! चौकशीचा फास आवळला; मुख्य वित्त अधिकारी सक्तीच्या रजेवर

PCMC 52 Crore Scam : मागील तीन वर्षांतील सर्व संशयास्पद व्यवहारांची होणार चौकशी; मुख्य लेखा परीक्षक प्रमोद भोसले यांच्याकडे सोपवला अतिरिक्त पदभार.

दैनिक प्रभात 13 Apr 2026 1:15 am

PCMC News : आयुक्तांचा दणका! दोन अभियंते तडकाफडकी निलंबित; बड्या अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस

PCMC News : बोगस उपसूचनांच्या आधारे ५२ कोटींची देयके दिल्याचे प्रकरण ताजे असतानाच अनधिकृत बांधकामांकडे दुर्लक्ष केल्याने दोन अधिकारी निलंबित.

दैनिक प्रभात 13 Apr 2026 1:00 am

Railway Theft : रेल्वे प्रवाशांनो सावधान! सिग्नल यंत्रणेत बिघाड करून महिलांना लूटले; थरारक घटना उघड

Railway Theft : सिग्नल यंत्रणेत बिघाड करून रेल्वे थांबवली; अंधाराचा फायदा घेत चोरट्यांनी महिला प्रवाशांचे दागिने आणि मोबाईल लांबवले.

दैनिक प्रभात 13 Apr 2026 12:45 am

Health Schemes : मुख्यमंत्री सहाय्यता निधी मिळवणं झालं सोपं; ‘हे’दोन नंबर सेव्ह करा, काम फत्ते होईल

Health Schemes : मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या प्रस्तावांसाठी मंत्रालय आणि जिल्हा स्तरावर समन्वयकांची नियुक्ती; मकरंद पाटील यांचा पुढाकार.

दैनिक प्रभात 13 Apr 2026 12:30 am

Bhuinj Police : भुईंजमध्ये बुलेटस्वारांचा माज उतरवला! पोलिसांच्या एका ‘धडाक्या’ने उडाली मोठी खळबळ

Bhuinj Police : शाळा-महाविद्यालय परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या हुल्लडबाजांना चाप; पोलिसांनी ११ दुचाकींचे बेकायदेशीर सायलेन्सर काढले.

दैनिक प्रभात 13 Apr 2026 12:15 am

MI vs RCB : आरसीबीने मुंबईला त्यांच्याच घरात केलं चारीमुंड्या चित, शेर्फेन रदरफोर्डची झुंज ठरली अपयशी

MI vs RCB : आयपीएल २०२६ मध्ये मुंबई इंडियन्स संघाला सलग तिसऱ्या सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे.

दैनिक प्रभात 13 Apr 2026 12:01 am

बटलर - गिलमुळे गुजरातचा सलग दुसरा विजय, लखनौने गुजरातच्या गोलंदाजीपुढे गुडघे टेकले

लखनौ : इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत गुजरात टायटन्सने रविवारी लखनौ सुपर जायंट्सला त्यांच्या घरच्या मैदानात पराभूत केले आहे. गुजरातने ७ विकेट्सने विजय मिळवत सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. गुजरातने गेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला केवळ १ धावेने पराभूत केल्यानंतर या सामन्यात मात्र दणदणीत विजय मिळवला. गुजरातने आता ४ सामन्यांपैकी २ सामने जिंकल्याने त्यांचे ४ गुण झाले आहेत. गुजरातच्या या विजयात शुभमन गिल, जॉस बटलर आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी मोलाचा वाटा उचलला.गुजरातने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. गुजरातच्या गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत लखनौच्या धडाकेबाज फलंदाजांना रोखले. लखनौच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. या सामन्यात लखनौने १६५ धावांचे लक्ष्य गुजरात समोर ठेवले होते. हे लक्ष्य गुजरातने १८.४ षटकात ३ विकेट्स गमावत सहज पूर्ण केले. गुजरातकडून शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांनी डावाची सुरुवात केली. त्यांनी सुरुवात चांगली केली होती. त्यांच्यात ४५ धावांची भागीदारी झालेली होती, पण ६ व्या षटकात सुदर्शनला १५ धावांवर दिग्वेश राठीने आवेश खानच्या हातून झेलाबाद केले. पण त्यानंतर गुजरातचा डाव गिलसह जॉस बटलरने समर्थपणे सांभाळला. या दोघांनी एकमेकांची साथ देताना चांगली भागीदारी केली. त्यांच्या भागीदारीने गुजरातच्या विजयाचा पाया रचला. त्यांनी अर्धशतकेही पूर्ण केली. पण त्यांची ८४ धावांची भागीदारी अखेर १५ व्या षटकात प्रिन्स यादवने तोडली. त्याने गिला यष्टीरक्षक रिषभ पंतच्या हातून झेलबाद केले. गिलने ४० चेंडूत ५६ धावा केल्या. त्याच्या पुढच्याच षटकात मोहम्मद शमीने जॉस बटलरचा अडथळा दूर केला. बटलरचा अफलातून झेल एडेन मार्करमने घेतला. बटलरने ३७ चेंडूत ६० धावांची खेळी केली, ज्यात त्याने ११ चौकार मारले. पण तोपर्यंत गुजरातसमोरील समीकरण सोपे झाले होते. उर्वरित धावा वॉशिंग्टन सुंदर आणि राहुल तेवतिया यांनी पूर्ण केल्या. वॉशिंग्टन सुंदरने १३ चेंडूत नाबाद २१ धावा केल्या, तर राहुल तेवतियाने ८ चेंडूत नाबाद १० धावा केल्या.तत्पुर्वी, लखनौने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ८ बाद १६४ धावा केल्या होत्या. लखनौकडून एडेन मार्करमने २१ चेंडूत ३० धावांची खेळी केली. पण बाकी कोणालाही २० धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. परंतु, ७ फलंदाजांनी १० धावांचा आकडा पार केला. त्यामुळे लखनौली १६० धावांचा टप्पा पार करता आला. गुजरातकडून प्रसिद्ध कृष्णाने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या आहेत. अशोक शर्माने २ विकेट्स घेतल्या. मोहम्मद सिराज आणि कागिसो रबाडा यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

फीड फीडबर्नर 12 Apr 2026 11:10 pm

Virat Kohli Record : विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड! गेल-बाबरला मागे टाकत बनला टी-२० क्रिकेटचा नवा सम्राट

Virat Kohli Record : विराट कोहलीने सलामीवीर फिल सॉल्टसोबत पहिल्या विकेटसाठी १२० धावांची शतकीय भागीदारी करत इतिहास रचला आहे.

दैनिक प्रभात 12 Apr 2026 11:03 pm

Maratha Protest : मराठा आंदोलकांवरील ८१ ‘गंभीर’गुन्हे मागे घेण्यास सरकारचा नकार; कारवाई सुरूच राहणार

Maratha Protest : मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान दाखल झालेल्या १५०९ गुन्ह्यांपैकी ८२८ गुन्हे मागे घेतले आहेत

दैनिक प्रभात 12 Apr 2026 10:47 pm

Karnataka News : बेळगावमध्ये इंजिनीअरच्या घरावर छापा ! सापडले कोट्यवधींचं घबाड

कर्नाटकच्या (Karnataka News) बेळगावमध्ये एका इंजिनीअरच्या घरात अफाट संपत्ती असल्याचे उघडकीस आले आहे.

दैनिक प्रभात 12 Apr 2026 10:37 pm

Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातची सोलापुरातही ११ एकर जमीन; SIT तपासात धक्कादायक खुलासे

Ashok Kharat Case : अशोक खरातने सोलापूरच्या कळमण गावात ११ एकर जमीन २.४० कोटींना खरेदी केल्याचे उघड झाले आहे.

दैनिक प्रभात 12 Apr 2026 10:36 pm

स्वर नभांगणातील लखलखता तारा निखळला...

स्वरसम्राज्ञी, स्वरमोहिनी, स्वररागिणी की स्वरसंमोहिनी?कोणत्या नावाने तुज उद्गारावे,स्वर आशेचे कोणत्या नभातून बरसावे?महाराष्ट्र भूषण, पद्मविभूषण, भारतीयांच्या हृदयातील सूरनक्षत्र—गझल, भक्तीभावगीत, कॅब्रे-सीनेगीत, नाट्यगीत, बालगीत, लावणी वा बंदिश! कशी वर्णावी थोरवी यांची?सारेच ‘भाव’ गीताचे केले यांनी पवित्र.मंगेशकरी पंचस्वरातील अखंड झळाळणारे हे सूरनक्षत्र!आपल्या मधाळ आवाजाने गेली आठ दशके रसिकहृदयावर राज्य करणाऱ्या भारतातील आघाडीच्या पार्श्वगायिका म्हणजे आशा भोसले—आज आपल्यात नाहीत, यावर विश्वास बसत नाही. त्यांचा जन्म १९३३ साली संगीतसूर्य मास्टर दीनानाथ आणि शुद्धमती मंगेशकर यांच्या पोटी झाला. लता, मीना, आशा, उषा, हृदयनाथ या पंचरत्नांपैकी एक रत्न म्हणजे आशा भोसले.या पाचही भावंडांनी अल्पवयातच गायन कारकीर्द सुरू केली. अवघ्या दहाव्या वर्षी ‘चुनरिया’ या चित्रपटासाठी हंसराज बहल यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली पार्श्वगायन करून आशाताईंनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. परिश्रमाची तयारी, जिद्द आणि प्रतिभा यांच्या बळावर त्यांनी हिंदुस्तानी अभिजात संगीतात आपले वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण केले.ओ. पी. नय्यर, आर. डी. बर्मन आणि सुधीर फडके या संगीतकारांसोबत त्यांची कारकीर्द गाजली व स्थिरावली. त्यांचे लहान भाऊ बाळासाहेब म्हणजे पं. हृदयनाथ मंगेशकर यांची गीते आशाताईंच्या जीवनातील अजरामर ठरली.‘एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी’ गाणाऱ्या आशाताईंनी जगातील कोणते संगीत गायले नाही? जीवनातले कोणते दुःख सहन केले नाही? दोन्ही प्रश्नांची उत्तरे एकच—सगळी दुःखे पचवून त्या सगळे काही गायल्या आणि संगीतजगतातील सर्वोच्च ‘ग्रॅमी’ पुरस्कार मिळवून भारतातच नव्हे, तर जगात लोकप्रिय गायिका ठरल्या.भोगले जे दुःख, ज्याला सुख म्हणावे लागले,एवढे मी भोगले की मज हसावे लागले. सुरेश भटांनी लिहिलेल्या या दोन ओळी आशाताईंची संपूर्ण जीवनकहाणी सांगतात. कोणी म्हणते वीस हजार, कोणी म्हणते तीस हजार—जन्माला आल्यापासून आतापर्यंत जितके दिवस त्या जगल्या, तितकी गीते त्यांनी गायली! त्यांच्या बालपणापासून आतापर्यंत घडलेले सारे काही कथा-कादंबरीतील कल्पनारम्य चमत्कारासारखे भासते. सारी कटू सत्ये पचवून स्वरतेजाची झळाळी घेऊन त्या अखंड तळपत राहिल्या. आपल्या मराठी वा हिंदी लोकप्रिय संगीतासोबत त्यांनी रवींद्रसंगीत, नजरुल गीते, लोकगीते, पॉप असे सर्व प्रकार गाऊनही पुन्हा पुन्हा मराठीवर प्रेम करत मराठीच बनून राहिल्या. आवाजातून अभिनय करता येतो, हे त्यांनी चित्रपटसृष्टीला शिकवले. उत्कटता, मार्दवता, आर्जवता, रौद्रता, सात्त्विकता, अट्टाहास—अशा सर्व भावना साभिनय गाण्यातून व्यक्त करणाऱ्या एकमेव द्वितीया म्हणजे आशाताई!रेडिओच्या जमान्यापासून मोबाईलच्या जमान्यापर्यंत सर्व माध्यमांतून स्वतःला सातत्याने अद्ययावत ठेवून रसिकप्रिय ठरणाऱ्या आशाताईंनी आठ दशके संगीतसेवा केली. ‘नाच रे मोरा’, ‘चंदाराणी’, ‘एक झोका’ अशा बालगीतांतून बालभाव व्यक्त करणाऱ्या आशाताई, जेव्हा जिवलगाचा आर्त सूर लावतात तेव्हा विरहिणी होतात; ‘उषःकाल होता होता’ गातात तेव्हा क्रांतिकारी भासतात; ‘दिन तैशी रजनी’ गातात तेव्हा संतत्व ल्यालेली ज्ञानदेव माऊली भासतात; आणि ‘रुपेरी वाळूत’ गातात तेव्हा मादक प्रेयसीचा स्वर अविष्कार होतो. ‘तरुण आहे रात्र अजुनी’ ही गझल फक्त आशाताईंसाठीच संगीतबद्ध केली आहे असे वाटते—इतके चढ-उतार, ताना आणि संथ ठहराव असलेली सुरावट बाळासाहेबांनी म्हणजेच पं. हृदयनाथांनी रचलेली आहे.त्यांचे वडील संगीतसूर्य मास्टर दीनानाथांची ‘प्रेम सेवा शरण’, ‘युवती मना दारुण’, ‘विलोपले’, ‘शूरा मी वंदिले’, ‘रवी मी’ अशी नाट्यगीते गाऊन त्यांनी वडिलांच्या गायकीची ही ‘मर्मबंधातली ठेव’ जगाला दाखवून दिली. पं. भीमसेन जोशींसोबतचे ‘रस बरसन अमृत वीणा’ (जोग रागावर आधारित) असो, डॉ. वसंतराव देशपांडे यांच्यासोबतचे ‘ही कुणी छेडिली तार’ असो, गझलनवाज उस्ताद गुलाम अलींसोबत गायिलेल्या ‘मिराज-ए-गजल’मधील अनवट गझला असोत, अथवा उस्ताद अली अकबर खान यांच्या सरोद वादनासह सादर केलेल्या तानसेनांच्या पारंपरिक बंदिशी—हे सर्व अचंबित करणारे आहे.लहानपणीची हट्टी, लढवय्या मुलगी; सहनशील पत्नी; अखंड ममत्वाचा झरा असलेली आई; बाणेदार, स्वाभिमानी मराठी स्त्री; खंबीर, हुशार, चतुर आणि दूरदृष्टी असलेली व्यावसायिक; तसेच कुटुंबावर—विशेषतः आपल्या लहान भावावर म्हणजेच बाळासाहेबांवर जीवापाड प्रेम करणारी बहीण—म्हणजे आशाताई. सर्वगुणसंपन्न, सामान्य लोकांना सातत्याने असामान्यत्वाचा परीसस्पर्श देणारी, नेणीवेपलीकडचे आयुष्य जगणारी, अंतर्बाह्य दैवत्व लाभलेली सत्शील व्यक्ती म्हणजे आशाताई.चहुकडे पसरलेल्या सागरातील कोणती लाट हातात मावेल किंवा नजरेत ठरेल? जसे हे अशक्य, तसे त्यांच्या गाण्यांची संपूर्ण दखल एका लेखात घेणे अशक्य आहे. इतके प्रचंड त्यांनी गाऊन आपल्या संस्कृतीला अलौकिक केले आहे. सज्जाद, नौशाद, ओ. पी. नय्यर, खय्याम, आर. डी. बर्मन अशा जुन्या संगीतकारांपासून अलीकडील युवा संगीतकारांपर्यंत असंख्य कलाकारांसाठी त्या अविरत गात राहिल्या.‘दिल चीज क्या है’ हे गीत त्यांच्या तोंडून ऐकताना त्याचे संगीतकार खय्यामजीसुद्धा भारावून जात असत—तर सर्वसामान्य रसिकांची अवस्था काय असेल!हिंदी चित्रपटसृष्टीतील कॅब्रे गीतांना आशाताईंचा स्वर लाभणे आणि हेलनसारख्या नर्तिकेच्या आयुष्याला सोन्याचा स्पर्श मिळणे म्हणजे जणू एखाद्या सौभाग्यवतीने पैठणी परिधान करण्याइतके सुंदर आहे. ‘उमराव जान’ चित्रपटातील ठुमरी अंगाने गायलेल्या गझलांनी रेखा या अभिनेत्रीची प्रतिमा बदलून टाकली. नलिनी जयवंत, मधुबाला, नूतन, तनुजा अशा शेकडो अभिनेत्रींना आवाज देत वयाच्या ८७व्या वर्षी ‘माई’ या चित्रपटात स्वतः अभिनेत्रीही बनल्या. त्यांचा जीवनप्रवास जगातील सर्वांसाठी—विशेषतः नवपिढीसाठी—प्रेरणादायी आहे. ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं? तुझ्या माझ्या लेकराला घरकुल नवं’—असे संसारासाठी, मुलाबाळांसाठी आयुष्यभर गायले, असे त्या सांगतात. कित्येक हसरी, रोमँटिक गाणी त्यांनी रडत-रडत गायली; पण स्वरांत दुःख दाखवले नाही—गीताचा भाव जपला. वैयक्तिक खडतर आयुष्य सांभाळत त्यांच्या सामाजिक व व्यावसायिक आयुष्यातील उलाढाली थक्क करणाऱ्या आहेत.‘मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश,माझ्याकडे देव माझा पाहतो आहे’—हे आयुष्यभर गाणाऱ्या आशाताई आज देवाकडे गेल्या... त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. ॐ शांती.विजयालक्ष्मी मणेरीकर (लक्ष्मीमंगेश) कवयित्री, गायिका

फीड फीडबर्नर 12 Apr 2026 10:30 pm

Ashok Kharat Case : चिंचोक्यांपासून खडे बनवणारा व्यावसायिक एसआयटीच्या रडारवर

नाशिक : बाजारात सुमारे १०० रुपये किलो दराने मिळणाऱ्या चिंचोक्यांपासून आकर्षक खडे तयार करून ते ‘मंत्रबद्ध’ असल्याचे भासवून भोंदू अशोक खरात भाविकांना लाखो रुपयांना विक्री करत होता. यात खरातला मदत करणारा नाशिकरोड येथील व्यावसायिक आता रडारवर आला असून, त्याची एसआयटी कडून चौकशी होणार असल्याचे समजते. दरम्यान खरातची पोलिस कोठडी संपल्याने सोमवारी (दिनांक १३) न्यायालयात ऑनलाईन सुनावणी होणार असल्याचे समजते.महिलांवरील लैंगिक अत्याचारांसह कोट्यवधींची संपत्ती उभी करणाऱ्या भोंदू अशोक खरात याचे नवनवीन कारनामे एसआयटीच्या तपासातून समोर येत आहेत.. नाशिकरोड परिसरातील या व्यावसायिकाकडे खरात चिंचोके देत असे. त्यापासून महागडे आणि आकर्षक दिसणारे खडे तयार करून देत असे. त्यानंतर खरात हे खडे आपल्या संपर्कातील भाविकांना त्यांच्या आर्थिक स्थितीनुसार हजारो ते लाखो रुपये वेगवेगळ्या किमतीत विकत असे.खरातने उत्तर सोलापूर तालुक्यातील कळमण शिवारात ११ एकर जमीन खरेदी केल्याची माहितीही तपासातून पुढे आली आहे. ही जमीन प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गासाठी संपादनात येण्याची शक्यता होती. अधिक मोबदला मिळावा यासाठी त्या जमिनीत आंबा आणि डाळिंबाची लागवड केल्याचेही उघड झाले आहे. प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, पंढरपूर, मोहोळ, उत्तर सोलापूर आणि बार्शी तालुक्यांतून जाणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर, वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संगनमत करून महामार्गाच्या रेखांकनाची माहिती खरातने मिळवली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.कल्पना खरातचा चौफेर शोध सुरूच : अशोक खरातने रणजित ब्रह्मचारी कोल्हाळ यांच्या मालकीची ११ एकर जमीन २८ मार्च २०२४ रोजी स्वतःच्या तसेच पत्नी कल्पना खरात यांच्या नावे खरेदी केल्याची नोंद कळमण येथील महसुली दप्तरी असल्याचे समजते. दुसरीकडे कल्पना खरात अद्याप गायब असून, पोलिसांकडून चौफेर शोध सुरू आहे.

फीड फीडबर्नर 12 Apr 2026 10:30 pm

Sunetra Pawar : राष्ट्रवादीतील नव्या दमाच्या लोकांना पुढे आणणार, सुनेत्रा पवारांची घोषणा

'कार्यकर्त्याला विश्वासात घेऊनच पुढील दिशा ठरविणार'बारामती : आगामी काळात विकासकामे आणि संघटनात्मक बांधणी करताना प्रत्येक कार्यकर्त्याला विश्वासात घेऊनच पुढील दिशा ठरविली जाईल. कार्यकर्त्यांनी केवळ सतरंज्या उचलायच्या नाहीत, या भावनेला पूर्णविराम देत प्रत्येकाला सन्मान दिला जाईल. नव्या दमाच्या सक्षम लोकांना पुढे आणण्यासाठी ठोस निर्णय घेऊन त्यांना कामाची संधी उपलब्ध करून दिली जाईल, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसची आगामी रणनीती स्पष्ट केली. कन्हेरी येथे मारुती रायाचे दर्शन घेऊन बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराचा शुभारंभ नारळ फोडून करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री पवार बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या, बारामतीची पोटनिवडणूक ही ऐतिहासिक जबाबदारी आहे. ती माझ्यासह बारामतीकरांवर देखील आहे. दोन महिन्यांपूर्वी नियतीचा क्रूर खेळ झाला. दादा आपल्याला सोडून गेले, त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी अलोट जनसागर लोटला.यावेळी संपूर्ण देशाला दादा काय चीज होते ते समजले. दादांच्या विमान अपघातात विखुरलेले कागदपत्रे त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत असणाऱ्या कार्यमग्नतेचीच साक्ष दिली. दादांनंतर मी घेतलेली जबाबदारी महिला म्हणून पार पाडू शकेल का, असा संशय अनेकांना होता. मात्र, ‘दादां’च्या आशीर्वाद रुपाने ही जनता माझ्यामागे उभी राहिली, मला लढण्याचे बळ दिले. राज्याला पहिले महिला धोरण देणाऱ्या परिवाराची मी सून आहे. महिला म्हणून कोणीही माझ्या कामाचे मूल्यांकन करू नये, असे मला वाटते. दादांच्या निधनानंतर तालुक्यातील यात्रा, जत्रा, उरुस अत्यंत साधेपणाने साजरे झाले. त्यामुळे बारामतीकरांचे नेत्यांविषयी असणारे अपार प्रेम, श्रद्धा दिसून आले. बारामतीकरांच्या या विश्वासाला पात्र राहून ‘दादां’च्या स्वप्नातील बारामती घडविण्यासाठी पूर्ण ताकतीने काम करेन, अशी ग्वाही देते, असे उपमुख्यमंत्री पवार म्हणाल्या.यावेळी भाषण करताना अजितदादांच्या आठवणींनी मंत्री आदिती तटकरे यांचे डोळे पाणावले. यावेळी आमदार सुनील शेळके, दिलीप वळसे पाटील, सना मलिक, विश्वास देवकाते, भाजपचे अविनाश मोटे आदींची भाषणे झाली. यावेळी जय पवार, रुतुजा पवार, माजी मंत्री संजय बनसोडे, आमदार शंकर मांडेकर, पृथ्वीराज जाचक, वीरधवल जगदाळे, दिगंबर दुर्गाडे, सचिन सातव, किरण गुजर आदी उपस्थित होते.

फीड फीडबर्नर 12 Apr 2026 10:30 pm

Ayush Shetty Silver Medal : आयुष शेट्टीचा ऐतिहासिक पराक्रम! ६० वर्षांनंतर आशिया चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचत पटकावलं रौप्य पदक

Ayush Shetty Silver Medal : आयुष शेट्टीने आशिया चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचत ६० वर्षांचा वनवास संपून रौप्य पदकावर नाव कोरलं.

दैनिक प्रभात 12 Apr 2026 10:23 pm

US-Israel-Iran War : अमेरिका-इराण संघर्ष पेटला.! होर्मूझवर हल्ल्याची ट्रम्प यांची धमकी; जागतिक तेल पुरवठा धोक्‍यात

अमेरिका-इराण यांच्‍यातील चर्चा निष्‍फठ ठरल्‍यानंतर हा तणाव आता एका अत्यंत धोकादायक वळणावर पोहोचला आहे.

दैनिक प्रभात 12 Apr 2026 10:16 pm