SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

31    C
... ...View News by News Source

फिजिक्सवाला गुंतवणूकदारांना बाजारात धोका एका दिवसात १०००० कोटी बाजार भांडवल खल्लास! दोन दिवसांत २३% शेअर कोसळला

मोहित सोमण: फिजिक्सवाला शेअरमध्ये दोन दिवसात २३% घसरण झाली आहे. काल शेअर ८% आज १५% कोसळला आहे. प्रामुख्याने कंपनीच्या भविष्यातील संभाव्य धोक्यांवर विश्लेषकांनी भाष्य केल्याने, गुंतवणूकदारांनी नकारात्मक कौल दिल्याने, व कंपनीच्या आयपीओत अवास्तव पद्धतीने किंमत वाढवत ती काही घटकांकडून कोसळवली गेली असा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे तीन सत्रातच कंपनीचे बाजार भांडवल १०००० कोटी रुपयांनी कोसळले आहे. परवा कंपनीचे आयपीओतील शेअर ३३% प्रिमियम दरासह बाजारात सूचीबद्ध (Listed) झाले होते. त्यानंतर एक दिवस कंपनीच्या शेअरमध्ये वाढ झाल्याने ४४% पर्यंत मूळ प्राईज बँडपेक्षा शेअरमध्ये वाढ नोंदवली गेली होती. मात्र कालपासून पुन्हा एकदा शेअरमध्ये घसरण सुरू झाली आहे.प्रामुख्याने कंपनीच्या समोर असलेली भविष्यातील आव्हाने, संमिश्र फंडामेंटल मधील वाढ, भविष्यातील धोके अशा विविध कारणांमुळे विश्लेषकांनी आयपीओत 'हाईप' तयार करण्यात आली असे स्पष्ट केल्याने बाजारात शेअरला मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे ते आता ३५२८९ कोटींच्या आसपास पोहोचले आहे. असे असले तरी मूळ किमतीपेक्षा शेअर अद्यापही ३०% प्रिमियम दराच्या आसपास व्यवहार करत आहे.यापूर्वी विश्लेषकांनी आयपीओत वाटप (Allotment) केले गेलेल्या गुंतवणूकदारांना आंशिक नफा बुक करण्याचा आणि उर्वरित शेअर्स मध्यम मुदतीच्या वाढीसाठी धारण करण्याचा सल्ला दिला होता आणि प्रति शेअर १३० रुपये स्टॉप लॉस दिला गेला होता. दुपारी १.०९ वाजेपर्यंत फिजिक्सवाला शेअर १३.६९% कोसळत १२३.६६ रूपयांवर व्यवहार करत आहे.उपलब्ध माहितीनुसार कंपनीने आर्थिक वर्ष २०२५ च्या महसुलात ५१% वाढ होऊन ३०३९ कोटी रुपये आणि निव्वळ नफा २४३ कोटी रुपये प्राप्त केला असून आर्थिक वर्ष २४ मध्ये ११३१ कोटी रुपयांचा तोटा झाला होता. ईबीटा (EBITDA) मार्जिन ६.७% पर्यंत पोहोचले होते. तरीही संचयी तोटा कायम असून कंपनीने आणखी आर्थिक वर्ष २०२६ च्या पहिल्या तिमाहीत १२७ कोटी रुपयांचा तोटा नोंदवला होता.या पब्लिक इश्यूमध्ये ३१००.७१ कोटी रुपयांचा नवीन इश्यू आणि ३८० कोटी रूपयांचे शेअर ओएफएस (Offer for Sale OFS) विक्रीसाठी उपलब्ध होते. आयपीओत एकूण १.९२ पट सबस्क्राइब मिळाले होते. ज्यामध्ये पात्र संस्थात्मक खरेदीदारांकडून २.८६ पट मागणी वाढली तर किरकोळ गुंतवणूकदारांनी १.१४ पट सबस्क्राइब केले, तर विना संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून (NII) सहभाग ०.५१ पट सबस्क्राइब झाला होता. कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून ३.७१ पटीने मजबूत सबस्क्रिप्शन मिळाले होते.अलख पांडे आणि प्रतीक बूब यांनी स्थापन केलेले फिजिक्सवाला कंपनीचे जून २०२५ पर्यंत १.३७ कोटी सबस्क्राइबर्स होते तर आकडेवारीनुसार ४.४६ कोटी पेड युजर व ३०३ अभ्यास केंद्रांसह YouTube चॅनेल सबस्क्राईबरमध्येही भर पडली होती.

फीड फीडबर्नर 20 Nov 2025 2:10 pm

हार्दिक पांड्या आणि महिका शर्मा पुन्हा चर्चेत; व्हायरल फोटोंनी वाढवल्या अफवा

मुंबई : टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर हार्दिक पांड्या आणि अभिनेत्री महिका शर्मा सध्या सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांच्या अफेअरच्या चर्चा सुरू झाल्या, दोघांचे एकत्र फोटो व्हायरल होऊ लागले. हार्दिक आणि महिका एकत्र फिरताना दिसू लागल्यापासूनच चाहत्यांमध्ये त्यांच्या नात्यावरून संशय व्यक्त केला जात होता.यातच आता हार्दिकने आपल्या इन्स्टाग्रामवर ‘बिग 3’ नावाने तीन फोटो शेअर केले, ज्यात महिका, त्याचा मुलगा अगस्त्य आणि त्याचा पाळीव कुत्रा दिसत आहेत. या फोटोंमध्ये हार्दिक आणि महिका एकमेकांच्या जवळ दिसत असल्याने चाहत्यांचा गोंधळ आणखी वाढला आहे.साखरपुड्याच्या चर्चांना उधाणएका फोटोने तर साखरपुड्याच्या चर्चांना चांगलीच हवा दिली आहे. त्या फोटोमध्ये दोघे एकत्र प्रार्थना करताना दिसतात आणि महिकाच्या बोटातील रिंगने साऱ्यांचे लक्ष गेले.आणखी एका फोटोमध्ये हार्दिक महिकाच्या गालावर किस करताना दिसतोय, तर काही फोटोमध्ये हे कपल पारंपारिक पोशाखात पूजा करताना दिसले. मात्र दोघांनीही या अफवांवर अद्याप काही भाष्य केलेले नाही.हार्दिक आणि महिकाची जवळीक कशी वाढली?नताशा स्टॅनकोविकपासून विभक्त झाल्यानंतर हार्दिक आणि महिकामधील जवळीक वाढू लागली. हार्दिक आणि नताशाचे लग्न तब्बल चार वर्ष टिकले असून दोघांना अगस्त्य नावाचा मुलगा आहे. पण त्यांनी २०२४ मध्ये त्यांनी दोघांच्या सहमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला.घटस्फोटानंतर काही दिवस हार्दिकचे नाव अभिनेत्री जास्मिन वालियाशी जोडले गेले होते. मात्र त्या चर्चांना पूर्णविराम मिळाला जेव्हा हार्दिकने महिकाच्या वाढदिवशी तिच्यासोबतचे फोटो शेअर केले. यापूर्वीही हे जोडपे सुट्टीसाठी एकत्र गेलेले फोटो शेअर करून चर्चेत आले होते. ऑक्टोबर महिन्यात दोघे मुंबई विमानतळावर दिसले, तेव्हाच ते पहिल्यांदा चर्चेत आले.महिका शर्मा विषयी२४ वर्षीय महिका शर्मा ही मॉडेल आणि अभिनेत्री असून फॅशन आणि फिटनेसविषयीचे कंटेंट सोशल मीडियावर शेअर करते. रॅपर रागाच्या म्युझिक व्हिडिओमधून ती चर्चेत आली. तिने ऑरलँडो वॉन आइन्सीडेल यांच्या ‘इनटू द डस्क’ आणि ओमंग कुमार दिग्दर्शित ‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपटात लहान भूमिका केल्या आहेत. महिकाने अनेक नामांकित डिझायनर्ससाठी मॉडेलिंग केले आहे. ती लीन सिक्स सिग्मा ब्लॅक बेल्ट सर्टिफाइड असून अॅडव्हान्स योगा इन्स्ट्रक्टरचे प्रशिक्षणही तिने घेतले आहे.

फीड फीडबर्नर 20 Nov 2025 2:10 pm

मुंबईत बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार ; कारमध्ये झाडल्या गोळ्या

मुंबई : मुंबईत भर दुपारी एक धक्कादायक घटना घडली आहे. कांदिवली चारकोप परिसरातील एका व्यावसायिकांवर हल्ला झाला. व्यावसायिक कारमध्ये बसलेला असताना गोळ्या झाडण्यात आल्या असून त्यात दोन गोळ्या व्यावसायिकाच्या पोटात लागल्याची माहिती आहे या हल्ल्यात व्यावसायिक गंभीर जखमी झाला आहे. फ्रेंडी दिलीमा भाई असे गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या व्यवसायिकाचे नाव आहे. कांदिवली चारकोप परिसरात असलेल्या बंदर पाखाडी येथील पेट्रोल पंपासमोर बुधवारी दुपारी ही घटना घडली होती.मिळलेल्या माहितीनुसार, फ्रेंडी दिलीमा भाई हे कारमध्ये बसलेले होते, त्याचवेळी दोघांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. दोन तीन राऊंड फायर करण्यात आले. दोन गोळ्या फ्रेंडी भाई यांच्या पोटात घुसल्या. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या घटनेत ते गंभीर जखमी झाल्याची महती पोलिसांनी दिली.फॉरेन्सिक पथकालाही घटनास्थळी बोलावण्यात आले होते. सध्या पोलीस गोळीबार करून फरार झालेल्या आरोपींचा शोध घेत आहेत.

फीड फीडबर्नर 20 Nov 2025 2:10 pm

Kalyan Crime News : धक्का लागला अन्...हिंदी-मराठी'वाद जीवावर! ४-५ जणांकडून कल्याणच्या अर्णव खैरेला बेदम मारहाण, घरी येऊन जीवन संपवलं

कल्याण : कल्याण पूर्व येथील तिसगाव नाका परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अर्णव खैरे (Arnav Khaire) नावाच्या एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. अर्णव हा तरुण नेमका कोणत्या महाविद्यालयात शिकत होता आणि त्याने हे टोकाचे पाऊल का उचलले, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा करण्यात आला आहे. अर्णव खैरे याने आत्महत्या का केली, यामागील नेमके कारण आणि इतर तपशील जाणून घेण्यासाठी पोलीस सखोल तपास करत आहेत. या दुर्देवी घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये आणि विशेषतः विद्यार्थी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.https://prahaar.in/2025/11/20/cm-nitish-kumar-oath-ceremony-today-only-rupees-21-thousand-in-cash-13-cows-no-house-in-his-name-at-patna-how-much-is-nitish-kumar-wealth/नेमकं काय घडलं?कल्याण पूर्व येथील तिसगाव नाका परिसरातील महाविद्यालयीन विद्यार्थी अर्णव खैरे याच्या आत्महत्येमागील कारण अत्यंत धक्कादायक आणि हृदय हेलावून टाकणारे आहे. लोकल ट्रेनमधील वादातून झालेल्या मारहाणीमुळे मानसिक तणावाखाली येऊन अर्णवने टोकाचे पाऊल उचलल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्णव खैरे हा मुलुंड येथे कॉलेजला जात असताना ट्रेनमध्ये धक्का लागला. यातून हिंदी-मराठी बोलण्यावरून काही तरुणांशी त्याचा जोरदार वाद झाला. या वादामुळे चिडलेल्या चार ते पाच जणांनी अर्णवला बेदम मारहाण केली. लोकल ट्रेनमध्ये झालेल्या या मारहाणीमुळे मानसिक तणावात असलेल्या अर्णव खैरे याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या दुर्देवी घटनेमुळे मराठी तरुणांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला आहे. रेल्वेतील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे अर्णवला मारहाण करणाऱ्या आरोपींचा शोध युद्धपातळीवर घेतला जात आहे. या प्रकरणातील आरोपींना लवकरच अटक करून कठोर शिक्षा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

फीड फीडबर्नर 20 Nov 2025 2:10 pm

आकडेवारीच समोर - परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या भारतातील गुंतवणूकीत १४ महिन्यातील नवा उच्चांक प्रस्थापित

प्रतिनिधी: भारतीय शेअर बाजारात टेक्निकल व फंडामेंटलदृष्ट्या मोठ्या प्रमाणात तेजी दिसत आहे. युएस बाजारात घसरणीचा कौल असताना व्याजदरात कपात होईल का याविषयीही संभ्रमाचे वातावरण आहे अशातच भारतीय बाजारातील फायदा लेवरेज करण्यासाठी नोव्हेंबर महिन्यापर्यंत परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातील आपल्या रोख गुंतवणूकीत मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या सहामाहीत परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (FPIs)भारतीय सिक्युरिटीजमधील त्यांची होल्डिंग्ज पहिल्यांदाच चौदा महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर (All time High) पोहोचवली आहे. पोहोचली, जरी याच काळात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FIIs) शेअर्सची विक्री सुरू ठेवली असली तरीसुद्धा एनएसडीएलने दिलेल्या आकडेवारीनुसार, नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरा दिवसांत परदेशी गुंतवणूकदार (FPIs) च्या मालमत्ता गुंतवणूक ८१.५३ ट्रिलियन रुपयांवर पोहोचल्या आहे. सप्टेंबर 2024 नंतरची ही सर्वोच्च पातळी आहे असे एनएसडीएलने म्हटले.एफपीआयकडून यापैकी ७४.२८ ट्रिलियन रुपये इक्विटीमध्ये गुंतवले गेले असून तर उर्वरित रक्कम कर्ज आणि हायब्रिड इन्स्ट्रुमेंट्समध्ये ठेवण्यात आल्याचा निष्कर्ष अहवालात नोंदवण्यात आला आहे. परकीय गुंतवणूकीत वाढ अशा वेळी झाली जेव्हा भारतीय बाजारपेठा मजबूत होत होत्या असेही अहवालात नमूद करण्यात आले. एकूणच महिन्याच्या पहिल्या सहामाहीत त्यांनी सुमारे ३१६६ कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली परंतु सुमारे २६९३ कोटी रुपयांचे कर्ज खरेदी केले आहे.ऑक्टोबरमध्ये झालेल्या जोरदार खरेदीनंत या महिन्यात हा बदल झाला आहे जेव्हा एफआयआयंनी शेअर्समध्ये १०२८५ कोटी रुपयांपेक्षा जास्त आणि कर्जात १६१२४ कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. क्षेत्रनिहाय आकडेवारीनुसार, प्रवाहात तीव्र फरक दिसून आला. होता असेही अहवालात म्हटले आहे.उपलब्ध माहितीनुसार,ऑक्टोबरमध्ये व्यापक बीएसई( BSE) मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकांनी अनुक्रमे ४.७% आणि ३.२% वाढ नोंदवली केली. यापूर्वी एकूण भागभांडवल जास्त असूनही, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी बाजारात सावधगिरी बाळगली होती‌विश्लेषकांचे म्हणणे आहे की भारत-अमेरिका व्यापार तणाव कमी होण्याची अपेक्षा, मजबूत कॉर्पोरेट कमाई आणि स्थिर आर्थिक परिस्थितीमुळे भारतीय शेअर्सना नवीन आधार मिळत आहे. धोरणात्मक उपाययोजनांमुळे वाढीला पाठिंबा मिळत असल्याने एफआयआय विक्रीचा दबाव आणखी कमी होऊ शकतो असे त्यांचे मत आहे. जीएसटी दरात कपात, जूनमध्ये रेपो दरात मोठी कपात आणि एस अँड पीने भारताच्या सार्वभौम रेटिंगमध्ये सुधारणा करणे यासारख्या अलीकडील पावलांमुळे आत्मविश्वास वाढण्यास मदत झाली आहे. तज्ञांचे म्हणणे आहे की येत्या काही महिन्यांत हे घटक भारतीय बाजारपेठेत अधिक परदेशी गुंतवणूकीला प्रोत्साहन देऊ शकतात.नोव्हेंबरच्या पहिल्या सहामाहीत सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही १.५% पातळीवर वाढले होते. विशेषतः ऑक्टोबरपासूनची दोन्ही बेंचमार्क निर्देशांकांनी प्रत्येकी ४.५% वाढ नोंदवली होती.अहवालातील माहितीनुसार, आयटी शेअर्समध्ये सर्वात जास्त एफआयआयचा परतावा (Returns) दिसून आला, ज्यामध्ये ४८७३ कोटी रुपयांचा निधी बाहेर गेला. ग्राहक सेवांमधून सुमारे २९१८ कोटी रुपयांची रक्कम काढून घेण्यात आली, तर आरोग्यसेवा आणि वीज या प्रत्येकी क्षेत्रांमधून सुमारे २५०० कोटी रुपयांची रक्कम काढून घेण्यात आली होती. एफएमसीजी आणि वित्तीय सेवांमध्येही सुमारे २००० कोटी रुपयांची रक्कम काढून घेण्यात आली. ग्राहकोपयोगी वस्तू, सेवा, रसायने आणि ऑटोमोबाईल्ससह इतर क्षेत्रातून कमी प्रमाणात पैसे काढले गेले आहेत.

फीड फीडबर्नर 20 Nov 2025 2:10 pm

“राज्यपाल, राष्ट्रपतींना न्यायालय कोणत्याही वेळ मर्यादेने बांधू शकत नाही” ; सुप्रीम कोर्टाच्या संविधान पीठाने निर्णय बदलला

Presidential Reference। सर्वोच्च न्यायालयाने राज्यपाल आणि राष्ट्रपती यांच्या अधिकारांबाबत विशेषत: राज्य विधिमंडळाने पारित केलेल्या विधेयकांवर निर्णय घेण्याबाबत वेळ मर्यादा निर्धारित केली जाऊ शकत नाही, असे सांगितले आहे. तसेच राज्यपालांनी विधेयके प्रलंबित ठेवू नयेत, असे सांगितले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या 5 सदस्यीय संविधान पीठाने सर्वसंमतीने हा निर्णय दिला आहे. या निर्णयानुसार राज्य विधानसभांनी पारित केलेल्या विधेयकांना राज्यपाल […] The post “राज्यपाल, राष्ट्रपतींना न्यायालय कोणत्याही वेळ मर्यादेने बांधू शकत नाही” ; सुप्रीम कोर्टाच्या संविधान पीठाने निर्णय बदलला appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 20 Nov 2025 1:50 pm

Accident News : ताम्हिणी घाटात भीषण अपघात; थार दरीत कोसळून ४ जणांचा मृत्यू

पुणे/रायगड: पुणे-माणगाव मार्गावरील ताम्हिणी घाटात एक अत्यंत दुर्दैवी अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. घाटातील एका अवघड वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने एक थार (Thar) गाडी सुमारे ५०० फूट खोल दरीत कोसळून भीषण अपघाताची घटना घडली आहे. या भीषण अपघातात चार जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. अपघातस्थळी दरीत कोसळलेल्या गाडीचा व मृतदेहांचा ड्रोनच्या माध्यमातून शोध घेण्यात […] The post Accident News : ताम्हिणी घाटात भीषण अपघात; थार दरीत कोसळून ४ जणांचा मृत्यू appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 20 Nov 2025 1:28 pm

नितीशकुमारांनी घेतली १० व्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ ; २६ मंत्र्यांमध्ये कोणाचा समावेश ? वाचा

Bihar NDA government। बिहारमध्ये नवीन एनडीए सरकार स्थापन झाले आहे. जनता दल (युनायटेड) चे सर्वेसर्वा नितीश कुमार यांनी पाटण्यातील ऐतिहासिक गांधी मैदानावर झालेल्या भव्य शपथविधी समारंभात विक्रमी १० व्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल मोहम्मद आरिफ खान यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. नितीश कुमार यांच्यासोबत त्यांच्या नवीन मंत्रिमंडळातील २६ मंत्र्यांनीही शपथ घेतली. यामध्ये […] The post नितीशकुमारांनी घेतली १० व्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ ; २६ मंत्र्यांमध्ये कोणाचा समावेश ? वाचा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 20 Nov 2025 1:19 pm

अंधेरी रेल्वे स्टेशनवरील धर्मांतराचा सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल ; पोलीस तपासात आली भलतीच माहिती समोर

मुंबई : सोशल मीडियावर अंधेरी रेल्वे स्टेशनवर धर्मांतर सुरु असल्याचा दावा करणारा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. अंधेरी रेल्वे स्टेशन लव्ह जिहाद आणि धर्मांतराचा नवीन अड्डा झाला आहे' असा दावा करत हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात आला. मात्र पोलिसांच्या तपासानंतर संपूर्ण प्रकरणाची खरी पार्श्वभूमी समोर आली असून व्हिडिओमध्ये केलेले दावे पूर्णतः खोटे असल्याचे स्पष्ट झाले आहेत.काय होता नक्की व्हिडीओएका प्रवाशाने अंधेरी रेल्वे स्थानकावर एक मुलगी प्लॅटफॉर्मवर बसलेली आणि तिच्या बाजूला एक वयस्कर माणूस काही मंत्रोउच्चार सदृश करत असल्याचे व्हिडीओ यामध्ये दिसत आहे . आणि हेच दृश्य सोशल मीडियावर व्हायरल करून त्याचा धर्मांतराशी संबंध जोडण्यात आला. आणि हा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला गेला, तो व्हायरल झाला आणि वातावरण तापले.पोलिसांकडून तातडीची दाखलव्हिडिओ व्हायरल होताच अंधेरी जीआरपी आणि आरपीएफने तत्काळ तपास सुरू केला. व्हिडिओतील दोन्ही व्यक्तींचा शोध घेण्यात आला आणि काही तासांतच त्यांना ताब्यात घेऊन जबाब नोंदवण्यात आला.तपासात काय समोर आले? मुलगी आणि वयस्कर पुरुष दोघांचाही कोणताही ख्रिश्चन धर्माशी संबंध नाही. दोघेही जैन हिंदू धर्मीय असून एकमेकांचे परिचित आहेत. वयस्कर नागरिक त्या मुलीला जपानी मेडिटेशन तंत्र शिकवत होते. त्यांच्या मते, हा कोणताही धार्मिक विधी नव्हता आणि धर्मांतराशी तर काहीही संबंध नव्हताच.मुलीची पोलिसांकडे तक्रारव्हिडिओला चुकीचा अर्थ लावून त्याचा प्रसार केल्याने आपली बदनामी होत असल्याचे मुलीने पोलिसांना सांगितले. तसेच, व्हिडिओ शूट करून खोटी माहिती पसरवणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाईची मागणी करत तिने अंधेरी जीआरपीकडे औपचारिक तक्रार दिली आहे.

फीड फीडबर्नर 20 Nov 2025 1:10 pm

अनिल अंबानी यांच्या आणखी १४०० कोटींची मालमत्ता जप्त ईडीकरून आणखी एक धक्कादायक कारवाई

मुंबई: उद्योगपती अनिल अंबानी यांची आणखी १५०० कोटींची मालमत्ता अंमलबजावणी संचनालय (Enforcement ED) संस्थेने जप्त केली आहे. यापूर्वी त्यांची कथित घोटाळ्याप्रकरणी ७५०० कोटी रूपयांच्या मालमत्तेची जप्ती करण्यात आली होती आता एकूण ९००० कोटींची ही जप्ती करण्यात आली आहे. सध्या अनिल अंबानी व अनिल अंबानी यांच्या रिलायन्स समुहाला अनेक अडचणीला तोंड द्यावे लागत आहे. मनी लॉन्ड्रिंग कायद्याअंतर्गत त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. मात्र कंपनीकडून ही एका जुन्या परकीय चलन व्यवस्थापना कायद्याअंतर्गत (Foreign Exchange Management Act FEMA) चौकशी सुरू असल्याचे म्हटले होते. मात्र नियामकांनी (Regulatory Authorities) अनिल अंबानी यांच्या कर्ज निधी उभारणीत व त्यांच्या विनियोगात अनियमितता आढळून आली होती. त्याचाच पुढील अध्याय म्हणून अनिल अंबानी यांच्यावर नवी कारवाई करण्यात आली आहे.३ नोव्हेंबरला दिलेल्या आदेशानुसार, ७५०० कोटींच्या जप्तीची घोषणा करण्यात आली होती ज्यात आणखी १४०० कोटींच्या मालमत्तेची भर पडली आहे. रिलायन्स कम्युनिकेशन (Rcom), रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड (RHFL), रिलायन्स पॉवर (Reliance Power) या अनिल अंबानी यांच्या समुहातील कंपन्यांनी विविध बँकांकडून घेण्यात आलेल्या कर्ज निधीचा वापर उद्देशित कारणासाठी न वापरता तो गैरप्रकार करत शेल कंपनीमार्फत वळवण्यात आला असा आरोप ईडी व सीबीआयने यापूर्वी केला होता. त्यातील १६६९४ कोटींचे कर्ज अद्याप फेडले गेले नसल्याने बँकांनी अनिल अंबानी व समुहाने घेतलेल्या कर्जांना 'फ्रॉड' घोषित करण्यात आले होते. मात्र अनिल अंबानी यांच्या प्रवक्त्यांनी सारे आरोप फेटाळून हे जुने प्रकरण असल्याचे म्हणत पत्रकारांनी चुकीची माहिती देत दिशाभूल केल्याचे म्हटले होते.आरोपातील माहितीनुसार,१३६०० कोटींची फेरफार करण्यात आली होती. त्यातील १२६०० कोटींचा वापर आपल्या संस्थांसह संबंधित संस्थांमध्ये गुंतवले असल्याचे नियामकांनी आपल्या आरोपपत्रात म्हटले होते. ३१ ऑक्टोबरला ईडीने पीएमएलए (Prevention on Money Laundering Act PMLA) कायद्याअंतर्गत अनिल अंबानी यांच्या ठिकाणी धाडी टाकल्या होत्या व कंपनीच्या ४२ पेक्षा अधिक ठिकाणी छापेमारी करत या मालमत्ता जप्त केल्या होत्या. ३ नोव्हेंबरच्या नव्या प्रसिद्धीपत्रकात दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण अधिकच चर्चेत असून नव्या घडामोडींच्या माहितीच्या आधारे ईडीने आणखी १४०० ते १५०० कोटींच्या मालमत्तेवर धाड टाकली आहे.

फीड फीडबर्नर 20 Nov 2025 1:10 pm

CM Nitish Kumar Bihar : CM नितीश कुमारांकडे फक्त २१ हजारांची रोख रक्कम! पाटण्यात नावावर घर नाही, तरीही नितीश कुमार यांची एकूण संपत्ती किती?

पाटणा : बिहारच्या राजकारणाला गेल्या दोन दशकांपासून एकच चेहरा व्यापून राहिला आहे, तो म्हणजे नितीश कुमार यांचा. ते आता १० व्यांदा मुख्यमंत्री पदावर येण्याचा अनोखा विक्रम करणार आहेत. त्यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत अनेक चढ-उतार पाहिले असले तरी, ते सातत्याने राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिले आहेत. राजकीय यश आणि सत्तेचा मोठा काळ उपभोगूनही नितीश कुमार यांच्या साधेपणाची चर्चा नेहमीच होते. गेल्या दोन दशकांपेक्षा जास्त काळ ते बिहारच्या सत्तेच्या केंद्रस्थानी आहेत, तरीही त्यांच्याकडे फारमोठी संपत्ती नसल्याचे समोर आले आहे. मुख्यमंत्री होण्यापूर्वी नितीश कुमार यांनी अनेकवेळा आमदार, खासदार आणि अगदी केंद्रात मंत्री म्हणूनही काम केले आहे. असे असले तरी, त्यांच्या जीवनशैलीत कोणताही मोठा फरक पडला नाही. त्यांची राहणीमान आजही अगदी साधे आणि सोपे आहे. या साधेपणामुळेच नितीश कुमार यांनी बिहारच्या जनतेमध्ये एक वेगळे आणि आदराचे स्थान निर्माण केले आहे.https://prahaar.in/2025/11/20/video-of-religious-conversion-at-andheri-railway-station-goes-viral-on-social-media-police-investigation-reveals-wrong-information/प्रत्येक वर्षी सार्वजनिक करतात संपत्तीचे विवरणबिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे केवळ आपल्या साधेपणामुळेच नव्हे, तर राजकीय पारदर्शकतेच्या नियमांमुळेही ओळखले जातात. त्यांनी बिहारमध्ये एक महत्त्वपूर्ण नियम लागू केला आहे, ज्यानुसार प्रत्येक मंत्र्याला त्याच्या संपत्तीचे विवरण दरवर्षी सार्वजनिक करणे अनिवार्य आहे. या नियमाचे पालन स्वतः नितीश कुमार हे दरवर्षी करतात. बिहार सरकारच्या संकेतस्थळानुसार, गेल्या वर्षी ३१ डिसेंबर रोजी दिलेल्या विवरणानुसार, मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याकडे एकूण चल-अचल संपत्ती जवळपास १.६५ कोटी रुपये इतकी आहे. दोन दशकांहून अधिक काळ राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी असूनही, त्यांची संपत्ती अत्यंत नियंत्रित असल्याचे दिसून येते. नितीश कुमार यांनी लागू केलेल्या या नियमानुसार, मंत्र्यांना त्यांच्या संपत्तीचे विवरण सादर करताना खालील गोष्टींचा समावेश करणे बंधनकारक आहे, कमाईचा स्त्रोत, त्यांच्यावरील कर्ज, वर्षभरातील व्यवहाराचे विवरण पत्र यामुळे बिहारच्या राजकारणात पारदर्शकता टिकून राहण्यास मदत झाली आहे.साधी जीवनशैली असलेल्या नितीश कुमार यांच्याकडे जमीन नाही, पण...बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे आपल्या साधेपणामुळे राजकारणात ओळखले जातात. दरवर्षी संपत्तीचे विवरण सार्वजनिक करण्याच्या त्यांच्या नियमानुसार, त्यांच्याकडील चल संपत्तीचे तपशील समोर आले आहेत. नितीश कुमार यांच्याकडे फोर्ड इकोस्पोर्ट ही एकच कार आहे. रोख रकमेबद्दल बोलायचे झाल्यास, त्यांच्याकडे २१,०५२ रुपये इतकी रोख रक्कम उपलब्ध आहे. विविध बँकांमध्ये त्यांची एकूण ६०,८११.५६ रुपये इतकी रक्कम जमा आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, नितीश कुमार यांच्या संपत्तीत १३ गायी आणि १० वासरं यांचाही समावेश आहे. या सर्व संपत्तीची एकूण किंमत जवळपास १६,९७,७४१.५६ रुपये इतकी आहे. दोन दशकांहून अधिक काळ राज्याच्या मुख्यमंत्रिपदावर राहिलेल्या नितीश कुमार यांची ही संपत्ती, त्यांचा साधेपणा आणि पारदर्शकतेचा नियम अधोरेखित करते.दिल्लीत फ्लॅट, बिहारमध्ये जमीननितीश कुमार यांच्या अचल संपत्तीत सर्वात महत्त्वाची मालमत्ता म्हणजे दिल्लीतील द्वारका परिसरात असलेला त्यांचा एक फ्लॅट आहे. हा फ्लॅट सुमारे १००० चौरस फुटाचा असून, तो त्यांनी २००४ मध्ये खरेदी केला होता. सध्या याच सदनिकेला त्यांच्या अचल संपत्तीत सर्वाधिक किंमत आहे. या सदनिकेशिवाय त्यांच्याकडील अचल संपत्तीची एकूण किंमत जवळपास १.४८ कोटी रुपये इतकी आहे. नितीश कुमार यांनी जाहीर केलेल्या २०१९ च्या विवरणानुसार, त्यांची एकूण संपत्ती जवळपास १.६४ कोटी रुपये इतकी होती. त्यांच्या या संपत्तीचा तपशील, राजकीय जीवनातील त्यांची साधेपणा आणि पारदर्शकता अधोरेखित करतो.नितीश कुमार १० व्यांदा घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ७५ वर्षीय नितीश कुमार यांनी १० व्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यासोबतच ते देशात सर्वाधिक वेळा मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याचा विक्रम करणाऱ्या नेत्यांपैकी एक ठरले आहेत. शपथविधीचा हा भव्य सोहळा पाटणा येथील गांधी मैदानावर आयोजित करण्यात आला होता. या महत्त्वाच्या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः उपस्थित होते. पंतप्रधानांच्या उपस्थितीमुळे या सोहळ्याचे महत्त्व आणखी वाढले. सोहळ्याला राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर जनसमुदायाची गर्दी जमली होती. नितीश कुमार यांच्यासोबत आज दोन उपमुख्यमंत्री आणि २० आमदारांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली. या नव्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीमुळे बिहारमध्ये राजकीय स्थिरता आणि नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. या शपथविधीमुळे नितीश कुमार यांचा बिहारच्या राजकारणातील दबदबा पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे.

फीड फीडबर्नर 20 Nov 2025 1:10 pm

Geyser Safety Tips: गीजर सुरक्षितपणे वापरण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स : हिवाळ्यात या चुका टाळा, मोठ्या अपघातांपासून रहा दूर

Geyser Safety Tips: थंडी वाढली की घराघरांत गीजरचा वापरही वाढतो. पण गीजर वापरताना अनेकजण नकळत काही चुका करतात आणि यामुळे गंभीर अपघात होऊ शकतात. तज्ज्ञांच्या मते गीजरशी संबंधित सुमारे 70% अपघात हे चुकीच्या पद्धतीने वापर, खराब इंस्टॉलेशन आणि दुर्लक्ष यामुळे होतात. या चुका वेळेवर लक्षात येत नाहीत आणि मोठा धोका निर्माण करतात. येथे अशा ६ […] The post Geyser Safety Tips: गीजर सुरक्षितपणे वापरण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स : हिवाळ्यात या चुका टाळा, मोठ्या अपघातांपासून रहा दूर appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 20 Nov 2025 1:09 pm

‘खडसे सोईंचं राजकारण करतात’; गुलाबराव पाटलांचा घणाघात; ‘तो’प्रश्न उपस्थित केल्याने चर्चांना उधाण म्हणाले…

Gulabrao Patil : जळगाव जिल्ह्यातील राजकारणाचा पारा चांगलाच तापला आहे. स्थानिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाषणे गाजवली जात आहेत. एकमेकांवर टीका केली जात आहे. शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे एकनाथ खडसे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. खडसे सोईंचे राजकारण करत असल्याची टीका गुलाबराव पाटील यांनी केली आहे. मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणूक लढण्यासाठी शेवटच्या […] The post ‘खडसे सोईंचं राजकारण करतात’; गुलाबराव पाटलांचा घणाघात; ‘तो’ प्रश्न उपस्थित केल्याने चर्चांना उधाण म्हणाले… appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 20 Nov 2025 12:55 pm

मुन्नाभाई का कमाल ! चिमुकल्याच्या डोळ्याजवळची जखम डॉक्टरने फेविक्विक चिकटवली ; चौकशीचे दिले आदेश

Fevikwik on the injury। मेरठमधील एका डॉक्टरचा धक्कादायक निष्काळजीपणा समोर आला आहे. एका अडीच वर्षांच्या मुलाच्या डोळ्याच्या दुखापतीवर अशा पद्धतीने उपचार करण्यात आले की त्याबद्दल ऐकणाऱ्या सर्वांनाच आश्चर्य वाटले. मुलाला टाके घालावे लागले होते, परंतु डॉक्टरांनी जखमेवर पाच रुपयांचे फेविकॉल लावले असा आरोप आहे. परिणामी, मुलाला रात्रभर वेदना होत राहिल्या आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्या रुग्णालयात […] The post मुन्नाभाई का कमाल ! चिमुकल्याच्या डोळ्याजवळची जखम डॉक्टरने फेविक्विक चिकटवली ; चौकशीचे दिले आदेश appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 20 Nov 2025 12:51 pm

एसीएमई सोलारकडून १०० मेगावॅट पवन ऊर्जा प्रकल्पातील पुढील १६ मेगावॅटचा दुसरा टप्पा सुरू

गुरुग्राम: एसीएमई सोलर होल्डिंग्ज लिमिटेडने गुजरातमधील सुरेंदरनगर येथे असलेल्या त्यांच्या १०० मेगावॅट पवन ऊर्जा प्रकल्पापैकी अतिरिक्त १६ मेगावॅट प्रकल्प कार्यान्वित केला असल्याचे त्यांनी आपल्या रेग्युलेटरी फायलिंगमध्ये म्हटले आहे. यापूर्वी प्रकल्पाचा पहिला टप्पा ऑक्टोबर महिन्यात सुरू झाला होता. २८ मेगावॅटच्या पहिल्या टप्प्यातील प्रकल्प सुरु झाल्यानंतर आता पुढील विस्तारीत प्रकल्पाचे काम सुरू झाले असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. गुजरात एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी (GDA) आणि पश्चिम गुजरात विज कंपनी लिमिटेड (PGVL) अधिकाऱ्यांनी प्रकल्प सुरू झाल्याची साक्ष दिली असून अधिकृतपणे या प्रकल्पाची पुष्टीही केली गेली असल्याचे कंपनीने म्हटले.कंपनीने दिलेल्या माहितीनुसार,लवकरच औपचारिक प्रमाणपत्र जारी केले जाण्याची अपेक्षा आहे. नुकत्याच कार्यान्वित झालेल्या प्रकल्पाची क्षमता टप्प्याटप्प्याने (Phase Wise) कार्यान्वित होणाऱ्या १०० मेगावॅटपैकी ४४ मेगावॅटवर पोहोणार आहे. या टप्प्यामुळे एसीएमई सोलरची एकूण कार्यान्वित क्षमता आता २९३४ मेगावॅटपर्यंत वाढली आहे.अलीकडेच, वीज खरेदी करार (PPA) अंतर्गत फोर्स मॅज्योर इव्हेंट्सना मान्यता मिळाल्यानंतर, गुजरात वीज नियामक आयोगाने (GERC) या प्रकल्पाला त्याच्या शेड्यूल्ड कमर्शियल ऑपरेशन डेट (SCOD) मध्ये वाढ दिली. सुधारित एससीओडी (SCOD) तारीख ५ मार्च २०२६ आहे आणि अधिकृत माहितीप्रमाणे पहिल्या दोन टप्प्यात ४४ मेगावॅट क्षमतेसह हा प्रकल्प लवकर कार्यान्वित करण्यात आला आहे.या पवन ऊर्जा प्रकल्पाला पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन (PFC) द्वारे वित्तपुरवठा करण्यात आला आहे आणि SANY च्या ४ मेगावॅट टर्बाइन तैनात करून इन-हाऊस ईपीसी (EPC) द्वारे बांधण्यात आले आहे. प्रकल्पातून निर्माण होणारी वीज ACME इको क्लीन आणि गुजरात ऊर्जा विकास निगम लिमिटेड यांच्यात स्वाक्षरी केलेल्या २५ वर्षांच्या वीज खरेदी कराराद्वारे (PPA) विकली जाईल. एसईएमई सोलार होल्डिंग्ज लिमिटेड ही अक्षय ऊर्जा (Renewable Energy) कंपनी आहे. सौर, पवन, साठवणूक, FDRE आणि हायब्रिड सोल्यूशन्सचा वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओ आहे आणि त्याची ऑपरेशनल क्षमता २९३४ मेगावॅट असून ४४५६ मेगावॅटची बांधकाम करण्याजोगी क्षमता असल्याचे कंपनीने यापूर्वीच स्पष्ट केले होते.

फीड फीडबर्नर 20 Nov 2025 12:30 pm

Huma Qureshi: OTT विश्वातील नवी ‘राणी’! प्रियंका–दीपिकाच्या चर्चेतही ओटीटीवर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री

Huma Qureshi: बॉलीवूडमध्ये मोठ्या बजेटच्या चित्रपटांभोवतीच बहुधा चर्चा फिरत असते. मात्र, या गदारोळात ओटीटी प्लॅटफॉर्मवर एका अभिनेत्रीने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. लोकप्रियता दीपिका पादुकोण आणि प्रियंका चोप्रा यांच्या चित्रपटांभोवती केंद्रित असताना हुमा कुरैशीने मात्र ओटीटीवर सलग दोन मोठ्या मालिकांमधून आणि एका चित्रपटातून प्रभावी उपस्थिती नोंदवली आहे. दिल्लीतील सुरुवात, मुंबईत मिळवलेले […] The post Huma Qureshi: OTT विश्वातील नवी ‘राणी’! प्रियंका–दीपिकाच्या चर्चेतही ओटीटीवर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 20 Nov 2025 12:29 pm

ठरलं तर मग ! डिसेंबरमध्ये धावणार पहिली ‘वंदे भारत स्लीपर ट्रेन’ ; चाचणीनंतर ‘हे’बदल केले

Vande Bharat Sleeper Train। वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी,”देशातील पहिल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये किरकोळ सुधारणा सुरू आहेत. या सुधारणांनंतर (रेट्रोफिटिंग) ही ट्रेन डिसेंबरमध्ये प्रवाशांसाठी सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. रेल्वे मंत्र्यांनी याविषयी बोलताना,”पहिल्या ट्रेनच्या चाचणी दरम्यान, काही किरकोळ समस्या आढळून आल्या, विशेषतः […] The post ठरलं तर मग ! डिसेंबरमध्ये धावणार पहिली ‘वंदे भारत स्लीपर ट्रेन’ ; चाचणीनंतर ‘हे’ बदल केले appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 20 Nov 2025 12:28 pm

मुंबईतला जन्म, अमेरिकेत शिक्षण, मराठी बोलण्यावरून ट्रोल; भाजपकडून नगराध्यक्षपदाच्या उमेदवार श्रद्धा सावंत भोसले कोण?

Shraddha Bhosale : कोकणातील सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीची सध्या जोरदार चर्चा होती आहे. शिवसेना आणि भाजपने स्वबळावर निवडणुका लढण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय येथील वातावरण चांगलेच तापले आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत दिसणाऱ्या सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजप पक्षाकडून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्रद्धा सावंत भोसले चर्चेत आल्या आहेत. त्यांनी नुकतेच […] The post मुंबईतला जन्म, अमेरिकेत शिक्षण, मराठी बोलण्यावरून ट्रोल; भाजपकडून नगराध्यक्षपदाच्या उमेदवार श्रद्धा सावंत भोसले कोण? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 20 Nov 2025 12:20 pm

डिसेंबर २०२६ पर्यंत सेन्सेक्स १०७००० पातळी पार करणार - मॉर्गन स्टॅनले

प्रतिनिधी: अर्थशास्त्रातील नव्या संचरनेसह अर्थव्यवस्थेतील व शेअर बाजारातील तेजीचे नवे संकेत मिळत असल्याचे 'इंडिया स्ट्रॅटेजी' या नव्या अहवालात मॉर्गन स्टॅनले जागतिक गुंतवणूक रिसर्च संस्थेने म्हटले आहे. 'सेन्सेक्स डिसेंबर २०२६ पर्यंत १०७००० पातळी पार करेल व बेस लाईन टार्गेट किमान ९५००० पातळी असेल' असे अहवालात म्हटले गेले आहे. आर्थिक वर्ष २०२५-२८ या कालावधीत कंपाऊंड ग्रोथ (वाढ) इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) १९% वाढेल असे म्हटले गेले आहे. घरगुती गुंतवणूकदारांनी आपल्या पोर्टफोलिओतील वाढवलेली गुंतवणूक स्थितप्रज्ञच राहिल व आहे त्याच वेगात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची गुंतवणूक न राहता ती मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते. दरम्यान संस्थेचे विश्लेषक रिधम देसाई, नयंत पारेख यांनी नाममात्र वाढीत (Nominal Growth) व कॉर्पोरेट उत्पन्नात मजबूत वाढ पुन: प्राप्तीसाठी मधल्या सायकल मंदीनंतर झालेले धोरणात्मक बदल वाढ करतील असे स्पष्ट केले आहे.गेल्या काही दिवसांपासून आरबीआयच्या, बँकिंगच्या, वित्त मंत्रालयाने केलेल्या सकारात्मक धोरणात्मक बदलांचा परिणाम आर्थिक निकालात भविष्यात होऊ शकतो. रेपो दरासह सीआर आर दरात (Cash Reserve Ratio CRR), जीएसटी दरातील कपात इत्यादी मुद्दे अर्थकारणातील वाढीसाठी व अंतिमतः शेअर बाजारातील वाढीसाठी मूलभूत ठरतील असा निष्कर्ष अहवालात काढण्यात आला आहे. 'चीनसोबतच्या संबंधांमध्ये होणारी घसरण आणि चीनची घुसखोरीविरोधी मोहीम या तेजीच्या मिश्रणात भर घालत आहे. भारत-अमेरिका व्यापार करारामुळे भावना आणखी वाढतील. अशाप्रकारे, कोविडनंतरचा भारताचा आक्रमक मॅक्रो सेटअप आता उलगडत आहे'असेही मॉर्गन स्टॅनलीने एका अहवालात नमूद केले आहे.'आमच्या बेस केसमध्ये, येत्या आठवड्यात भारत आणि अमेरिका यांच्यातील टॅरिफ परिस्थितीवर तोडगा निघण्याची अपेक्षा आहे. आम्ही अल्पकालीन व्याजदरांमध्ये आणखी २५ बेसिस पॉइंट्स (bps) कपात आणि सकारात्मक तरलता वातावरण हे चलनविषयक धोरणासाठी बेस केस म्हणून वापरतो' असे नयंत पारेख व अहवालात मॉर्गन स्टॅनलीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य भारतीय इक्विटी स्ट्रॅटेजिस्ट रिधम देसाई यांनी लिहिले आहे.अहवालात पुढे म्हटले आहे की,भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार परिस्थितीत घट, आर्थिक वर्ष २५-२८ मध्ये सेन्सेक्सच्या कमाईचा दर वार्षिक १५% राहू शकतो मात्र आर्थिक वर्ष २६ मध्ये बाजारातील कमी झालेली वाढ आणि खराब मॅक्रो इकॉनॉमिक परिस्थिती विशेषतः भूराजकीय परिस्थिती दर्शविणारे इक्विटी मल्टीपल डीरेट मधील घटक देसाईंच्या मते बाजारातील घसरण वाढवू शकतात आणि डिसेंबर २०२६ पर्यंत सेन्सेक्स सध्याच्या पातळीपासून सुमारे १०% कमी होऊन ७६००० पातळीवर बेसलाईनवर पोहोचू शकतात असे म्हटले आहे.तेजीच्या बाबतीत (३०% शक्यता Upside) धरल्यास प्रति बॅरल तेल $६५ पेक्षा कमी राहिल्यास रिफ्लेशन धोरणांमुळे मजबूत वाढ होईल आणि जागतिक व्यापार तणाव कमी होईल असे गृहीत धरले तर सेन्सेक्सचे लक्ष्य १०७००० पातळीवर ठेवले आहे. आर्थिक वर्ष २५-२८ मध्ये उत्पन्न वाढ दरवर्षी १९% वाढण्याची अपेक्षा आहे.' असेही अहवालाने नमूद केले आहे.तर मंदीबाबत भाकीत नोंदवताना, 'मंदीच्या बाबतीत (२०% Downside शक्यता), सेन्सेक्सचे लक्ष्य ७६००० आहे, प्रति बॅरल $१०० पेक्षा जास्त तेलाचा समावेश, मॅक्रो स्थिरता राखण्यासाठी आरबीआयचे कडक नियमन, अमेरिकेच्या मंदीसह जागतिक मंदी, भारत-अमेरिका व्यापार संबंध बिघडणे आणि इक्विटी मल्टीपलचे डी-रेटिंग अशा गोष्टीचा परिणाम होऊ शकतो या परिस्थितीत, आर्थिक वर्ष २५-२८ मध्ये सेन्सेक्सच्या उत्पन्नात दरवर्षी १५% वाढ होण्याचा अंदाज आहे, तर आर्थिक वर्ष २६ मध्ये वाढ कमकुवत होईल.' असे म्हटले आहे.

फीड फीडबर्नर 20 Nov 2025 12:10 pm

सहकारी संस्थांना ९२५०० कोटींचा निधी वितरित - अमित शहा

नवी दिल्ली: एनसीडीसीने गेल्या आर्थिक वर्षात सहकारी संस्थांना ९२५०० कोटी रुपये वितरित केले आहेत' असे वक्तव्य केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी केले आहे. आर्थिक २०२०-२१ च्या पातळीपेक्षा जवळजवळ निधी चौपट दिला गेला आहे असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाच्या (NCDC) ९२ व्या सर्वसाधारण परिषदेच्या बैठकीत बोलत होते.एका अधिकृत निवेदनानुसार, शहा म्हणाले की या मंत्रालयाच्या स्थापनेनंतर सहकारी क्षेत्रात अभूतपूर्व प्रगती झाली आहे.त्यांनी सांगितले की एनसीडीसी या परिवर्तनाचा प्रमुख पाया म्हणून उदयास आला आहे. 'सहकार चळवळीद्वारे शेतकरी, ग्रामीण कुटुंबे, मच्छीमार, लघु उत्पादक आणि उद्योजकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे आणि स्वावलंबी होण्याच्या दिशेने देशाच्या प्रयत्नांमध्ये सहकार महत्त्वाची भूमिका बजावत आहे' असेही शहा म्हणाले आहेत.सहकारी संस्थांना सक्षम करण्यासाठी आणि त्यांना आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या एनसीडीसीने २०२०-२१ मध्ये २४७०० कोटी रुपयांवरून २०२४-२५ मध्ये ९५२०० कोटी रुपयांपर्यंत एकूण वितरण वाढवले आहे असे सरकारी आकडेवारी सांगते. याचप्रमाणे विकसित भारत या उद्दिष्टाकडे नेण्यासाठी अमित शहा यांनी यावेळी सहकार्य (Co Operation) हे विकासाचे प्रभावी माध्यम असल्याचे म्हटले. यावेळी त्यांनी नमूद केले आहे की, भारताला विकसित अर्थव्यवस्था बनवण्यासाठी सहकार्य हे एक उत्कृष्ट मॉडेल आहे कारण ते ग्रामीण भागात सहभाग आणि उपजीविकेच्या संधी सुनिश्चित करते. आकडेवारीनुसार, गेल्या चार वर्षांत, एनसीडीसीने ४०% अधिक सीएजीआर (Compound Annual Growth Rate CAGR) नोंदवला आहे महत्वाची बाब म्हणजे यावेळी एनसीडीला शून्य निव्वळ एनपीए (Non Performing Assets NPA,k दर राखण्यास यश आले आहे. यामुळे कोणी कर्ज बुडवले नाही हे देखील स्पष्ट होते. नुकत्याच प्रकाशित झालेल्या माहितीनुसार, संस्थेला तब्बल ८०७ कोटी रुपयांचा सर्वाधिक निव्वळ नफा मिळाला आहे.एनसीडीसीने डीसीसीबी, राज्य सहकारी बँका आणि राज्य विपणन महासंघांद्वारे दुग्धव्यवसाय, अन्न प्रक्रिया, वस्त्रोद्योग आणि विपणन क्षेत्रात प्रभावीपणे काम केले आहे असे शहा यांनी स्पष्ट केले.महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये खोल समुद्रात मासेमारीसाठी ट्रॉलर्स खरेदी करण्यासाठी देण्यात आलेल्या आर्थिक सहाय्यामुळे ब्लू इकॉनॉमीला चालना मिळाली आहे आणि मासेमार समुदायाला, विशेषतः महिलांना, आर्थिकदृष्ट्या सक्षम केले आहे, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी शहा यांनी सहकारावर अधिक भर देत ते म्हणाले की नफा वाढवण्यासाठी साखर आणि दुग्धजन्य क्षेत्रात वर्तुळाकार अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन दिले पाहिजे.सहकारी साखर कारखान्यांचे आधुनिकीकरण करण्यासाठी देण्यात आलेल्या १००० कोटी रुपयांच्या सरकारी अनुदानावर आधारित, एनसीडीसीने ५६ साखर कारखान्यांना इथेनॉल प्लांट, सह-उत्पादन आणि खेळत्या भांडवलासाठी आतापर्यंत १०००५ कोटी रुपये वितरित केले आहेत.३१ जुलै २०२५ रोजी मंजूर झालेल्या २००० कोटी रुपयांच्या सरकारी अनुदानाच्या आधारित माहितीनुसार, एनसीडीसी दुग्धव्यवसाय, पशुधन, मत्स्यव्यवसाय, साखर, कापड, अन्न प्रक्रिया, साठवणूक, शीतगृह, कृषी आणि महिला सहकारी संस्थांना सवलतीच्या दरात दीर्घकालीन आणि कार्यरत भांडवल कर्ज देण्यासाठी २०००० कोटी रुपये जमवत आहे. सहकारी विकास, कृषी, ग्रामीण पायाभूत सुविधा आणि संबंधित क्षेत्रांना वित्तपुरवठा करण्यासाठी धोरणे आणि मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यासाठी जबाबदार असलेली एनसीडीसी देशातील सर्वोच्च संस्था आहे.

फीड फीडबर्नर 20 Nov 2025 12:10 pm

इस्रायलचा गाझावर पुन्हा हल्ला ; २५ जणांचा मृत्यू तर ७० हून अधिक जखमी

Israel attack on Gaza। इस्रायल आणि गाझा यांच्यातील संघर्ष कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. इस्रायलने सलग दुसऱ्या दिवशी गाझावर हल्ला केला. इस्रायलच्या संरक्षण दलांनी गाझा शहर आणि खान युनूसवर हल्ला केला, ज्यामध्ये २५ लोक ठार झाले आणि ७७ जण जखमी झाले. त्याअगोदर इस्रायली सैन्याने दक्षिण लेबनॉनमधील पॅलेस्टिनी निर्वासित छावणीवर हवाई हल्ले केले. एका वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, […] The post इस्रायलचा गाझावर पुन्हा हल्ला ; २५ जणांचा मृत्यू तर ७० हून अधिक जखमी appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 20 Nov 2025 12:07 pm

शिक्षकांचा जाच असह्य झाला अन्…; दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने जीवन संपवलं, सुसाईड नोटमध्ये मन सुन्न करणारे शब्द

Shaurya Pradeep Patil : देशाची राजधानी दिल्लीत घडलेल्या एका घटनेमुळे महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. दिल्लीतील राजेंद्र प्लेस मेट्रो स्टेशनवरून प्लॅटफॅार्मवर उडी मारून दहावीत शिकणाऱ्या १६ वर्षांच्या विद्यार्थ्यांने आपले आयुष्य संपवले आहे. ही घटना १८ नोव्हेंबर रोजी दुपारी अडीच वाजता घडली. शौर्य प्रदीप पाटील असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. दिल्लीतील सेंट कोलंबस शाळेतील […] The post शिक्षकांचा जाच असह्य झाला अन्…; दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने जीवन संपवलं, सुसाईड नोटमध्ये मन सुन्न करणारे शब्द appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 20 Nov 2025 11:51 am

अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी! सर्व गुन्ह्यांची होणार सखोल चौकशी

नवी दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येतील मुख्य सूत्रधार अनमोल बिश्नोईला भारताने ताब्यात घेतले आहे. अनमोल हा लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ आहे. खोट्या पासपोर्टच्या आधारे तो अमेरिकेत वास्तव्य करत होता. त्याला आता अमेरिकेमधून भारताने ताब्यात घेतले आहे. १९ नोव्हेंबर रोजी आयजीआय विमानतळावर एनआयए आणि दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाच्या कडक सुरक्षेत त्याला थेट पटियाला हाऊस कोर्टात नेण्यात आले. जिथे न्यायालयाने त्याला कोठडी सुनावली आहे.२०२२ पासून बनावट पासपोर्टवर अमेरिकेत लपून बसलेल्या अनमोलवर १८ हून अधिक गंभीर प्रकरणांचे आरोप आहे. ज्यात बाबा सिद्दीकी आणि पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाची हत्या, सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये गोळीबार आणि परदेशातून ऑनलाइन धमक्या यांचा समावेश आहे. तो अमेरिकेतून गुन्हेगारी कारवाया आणि खंडणी रॅकेट चालवत होता.अनमोलच्या बाबतीत असा युक्तिवाद करण्यात आला आहे की, त्याची कोठडीत चौकशी करणे आवश्यक आहे कारण तो अनेक गंभीर प्रकरणांमध्ये आणि आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी नेटवर्कमध्ये सामील आहे. एनआयए अनमोल बिश्नोईविरुद्ध न्यायालयात तपशीलवार आरोप सादर करत आहे, ज्यामध्ये दहशतवादी सिंडिकेट चालवणे, खंडणी, शस्त्रास्त्र पुरवठा आणि परदेशी नेटवर्क चालवणे यासारख्या कारवाया समाविष्ट आहेत.https://prahaar.in/2025/11/20/mulund-is-100-bjp-not-a-single-ward-will-go-to-shiv-sena/तर अनमोल बिश्नोईच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले की एनआयएकडे आधीच सर्व पुरावे आहेत. त्यामुळे कोठडीची आवश्यकता नाही. अनमोल तपासात पूर्ण सहकार्य करणार असून पळून जाण्याची कोणतीही शक्यता नाही. त्यामुळे त्याला कोठडी नको अशी मागणी वकिलांनी न्यायालयाकडे केली आहे. पर्यायी, त्यांनी असा युक्तिवाद केला की जर कोठडी मंजूर झाला तर डीके बसूच्या अटकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले पाहिजे.न्यायालयाचा निर्णयन्यायालयाने मान्य केले की आरोप अत्यंत गंभीर असून खटल्याची व्याप्ती खूप मोठी आहे. न्यायालयाने अनमोलला त्याची भाषा, अटक मेमो आणि वैद्यकीय तपासणीबद्दल प्रश्न विचारले आणि संपूर्ण कायदेशीर प्रक्रियांचे पालन करण्यात आल्याची पुष्टी केली. आरोपीने न्यायालयात सांगितले की त्याला हिंदी आणि इंग्रजी समजते आणि त्याला अटक मेमोची प्रत मिळाली आहे. त्यानंतर, न्यायालयाने आरोपीला ११ दिवसांसाठी एनआयए कोठडीत पाठवले.

फीड फीडबर्नर 20 Nov 2025 11:10 am

मुंबईतील १० पैकी जवळपास ९ एसएमबी एआयला प्राधान्‍य देतात: लिंक्‍डइन संशोधन

मुंबई: मुंबईतील लघु व मध्‍यम आकाराचे व्‍यवसाय (एसएमबी) त्‍यांच्‍या आतापर्यंतच्‍या सर्वात आत्‍मविश्वासपूर्ण दशकामध्‍ये प्रवेश करत आहेत. नवीन लिंक्‍डइन (LinkedIn) संशोधनामधून निदर्शनास येते की, मुंबईतील १० पैकी जवळपास ९ (८९%) एसएमबी एआय अवलंबनामध्‍ये गुंतवणूक करत आहेत किंवा एआय अवलंबनाचे नियोजन करत आहेत. तंत्रज्ञान प्रयोगावरून पायाभूत सुविधेपर्यंत पोहोचले आहे. यासोबत, ८७% एसएमबी धोरणकर्त्‍यांना पुढील १२ महिन्‍यांमध्‍ये व्‍यवसाय वाढीची अपेक्षा आहे, ज्‍यामधून क्षेत्र आशावादी असण्‍यासोबत स्‍मार्ट सिस्‍टम्‍स, कुशल टॅलेंट आणि विश्वसनीय डिजिटल प्‍लॅटफॉर्म्‍ससह पुन्‍हा विकसित होईल असे दिसून येते.मुंबईतील एसएमबींसाठी उत्‍क्रांती पर्याय नसून अस्तित्‍व टिकवण्‍याचे साधन -एसएमबींचा तत्‍परतेवर विश्वास असला तरी एआयबाबत आता फक्‍त चर्चा केली जात नसून ते विकासासाठी नवीन बेसलाइन बनले आहे. संशोधनामधून निदर्शनास येते की, मुंबईतील ५९ एसएमबी मार्जिन्‍सच्‍या संरक्षणासाठी महत्त्वाचे म्‍हणून ऑपरेशनल कार्यक्षमतेला महत्त्व देतात, ५७% एसएमबी स्‍पर्धात्‍मक राहण्‍यासाठी आवश्‍यक म्‍हणून एआय आणि ऑटोमेशनला प्राधान्‍य देतात आणि ५१% एसएमबींचे मत आहे की, डिजिटल परिवर्तन अस्तित्‍व कायम राहण्‍यासाठी महत्त्वाचे आहे.लिंक्‍डइन इंडियाचे कंट्री मॅनेजर कुमारेश पट्टाबिरामण (Kumaresh Pattabiraman, Country Manager, LinkedIn India) म्‍हणाले आहेत की,'मुंबईतील एसएमबी स्‍मार्टपणे काम करत आणि अधिक धोरणात्‍मकरित्‍या एआयमध्‍ये गुंतवणूक करत व्‍यवसाय विकास मानकांना नव्‍या उंचीवर घेऊन जात आहेत. उद्योजक व्‍यवसाय निर्माण करण्‍याच्‍या पद्धतींना आव्‍हान देत आहेत, एआयचा वापर करत कार्यक्षमतेला चालना देत आहेत, क्षमता वाढवण्‍यासाठी कुशल व्‍यक्‍तींना हायर करत आहेत आणि विश्वसनीय डिजिटल परिसंस्‍थांच्‍या माध्‍यमातून त्‍यांची बाजारपेठेतील उपस्थिती वाढवत आहेत. लिंक्‍डइनमध्‍ये आम्‍ही विकासाच्‍या या पुढील टप्‍प्‍याला सक्षम करण्‍याप्रती कटिबद्ध आहोत, जेथे प्रत्‍येक उद्योजकाला एकाच ठिकाणी योग्‍य नेटवर्क, योग्‍य ग्राहक आणि योग्‍य टॅलेंटसह सक्षम करत आहोत, ज्‍यामुळे ते आजच्‍या वाढत्‍या डिजिटल-केंद्रित अर्थव्‍यवस्‍थेमध्‍ये आत्‍मविश्वासाने प्रगती करू शकतील.'एआय विकासासाठी नवीन ऑपरेटिंग सिस्‍टम -एआय मुंबईतील एसएमबीच्‍या हायर, विपणन व विकास करण्‍याच्‍या पद्धतींमागील प्रेरक स्रोत बनले आहे. जवळपास सर्वेक्षण करण्‍यात आलेले सर्व व्‍यवसाय म्‍हणतात की, ते कार्यप्रवाह स्‍वयंचलित करण्‍यासाठी (८८%), विश्‍लेषण व व्‍यवसाय उत्‍कृष्‍टता दृढ करण्‍यासाठी (८८%) आणि कर्मचाऱ्यांना अधिक कुशल करण्‍यासाठी (८७%) एआयचा वापर करतात किंवा एआयचा वापर करण्‍याचे नियोजन करत आहे.हायरिंग मॉडेल्‍सना पुन्‍हा निर्माण करण्‍यात येत आहे, पदवींपेक्षा कौशल्‍यांना महत्त्व दिले जात आहे. शहरातील अर्ध्‍याहून अधिक एसएमबी आता पारंपारिक पात्रतांच्‍या तुलनेत नेतृत्‍व व टीम व्‍यवस्‍थापन (५८%), समस्‍या निवारण व महत्त्वपूर्ण विचारसरणी (५५ टक्‍के) आणि डिजिटल साक्षरता व एआय निपुणता (५३%) या गुणांना महत्त्व देतात. ही कौशल्‍ये असलेल्‍या टॅलेंटचा शोध घेण्‍यासाठी ५३% एसएमबी आधीच एआय हायरिंग टूल्‍सचा वापर करत आहेत, ज्‍यामधून सुधारित उमेदवार दर्जा आणि उच्‍च सहभाग दिसून येतो.मुंबईमध्‍ये विपणन (Marketing) व विक्री देखील उत्‍कृष्‍टता-संचालित बनत आहेत. ६९% एसएमबी एआय मार्केटिंग टूल्‍सचा वापर करत आहेत, त्‍यांच्‍यापैकी ९४% एसएमबी याकरिता त्‍यांचा जवळपास अर्धा बजेट वापरत आहेत. ६६% एसएमबी आता स्‍पष्‍ट लक्ष्‍य आणि ऑटोमेटेड फॉलोअप्‍ससाठी विक्रीमध्‍ये एआयवर अवलंबून आहेत, ज्‍यामुळे त्‍यांना मोठ्या अत्‍याधुनिक उद्योगांसह काम करता येते.स्‍केलरचे चीफ मार्केटिंग ऑफिसर राहुल कार्तिकेयन (Rahul Karthikeyan, Chief Marketing Officer, Scaler) म्‍हणाले आहेत की,'स्‍केलरच्‍या अलिकडील मोहिमांनी अचूक ग्राहक लक्ष्‍य आणि डेटा-संचालित ऑप्टिमायझेशनच्‍या माध्‍यमातून उत्तम कामगिरी केली आहे. प्रायोजित कनेन्ट, विशेषत: व्‍हर्टिकल फॉर्मेट्सनी इतर चॅनेल्‍सवरील स्थिर फॉर्मेट्सच्‍या तुलनेत २०% उच्‍च लीड-टू-पेमेंट रूपांतरण दिले. ऑगस्‍टमध्‍ये लिंक्‍डइनने जवळपास ७० ते ८० नवीन पेमेंट्स निर्माण केले, ज्‍यामध्‍ये रिटर्न ऑन स्‍पेण्‍ड (आरओएस) २.२ आहे. आमची या उच्‍च-प्रभावी चॅनेलला अधिक विकसित करण्‍याची, तसेच प्रति विक्री खर्चासहित कार्यक्षमता कायम ठेवण्‍याची योजना आहे.'विश्वास नवीन स्‍पर्धात्‍मक फायदा -एसएमबी झपाट्याने एआयचा अवलंब करत असले तरी विश्वास कोणावर ठेवावा याबाबत सतर्कता राखत आहेत. ९६% एसएसमबी म्‍हणतात की, खर्च किंवा सोयीसुविधेपेक्षा विश्वसनीयता महत्त्वाची आहे. ते डेटा सुरक्षा (८३%), विनासायास एकीकरण (७८%) आणि व्‍याजदराबाबत (ROI) स्‍पष्‍टता (७६%) यांना अधिक प्राधान्‍य देत आहेत. या बदलांमधून स्‍मार्ट अधिक स्थिर एसएमबी परिसंस्‍थेचा (Ecosystem) उगम दिसून येतो.

फीड फीडबर्नर 20 Nov 2025 11:10 am

नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार ; पंतप्रधानांसह दिग्गज नेते राहणार उपस्थित

Bihar CM Oath Ceremony। बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएच्या प्रचंड विजयानंतर, आज पाटणामधील गांधी मैदानावर मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी समारंभाची तयारी सुरू आहे. नितीश कुमार शपथविधी सोहळ्यासाठी गांधी मैदानावर पोहोचले आहेत. तर थोड्याच वेळात पंतप्रधान मोदी याठिकाणी दाखल होणार आहेत. यासोबतच अमित शहा, अनेक केंद्रीय मंत्री तसेच एनडीए शासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. शपथविधी समारंभाची […] The post नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार ; पंतप्रधानांसह दिग्गज नेते राहणार उपस्थित appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 20 Nov 2025 11:03 am

अनगर नगरपंचायत निवडणूक बिनविरोध जिंकल्यानंतर राजन पाटलांच्या सुनबाईंची पहिली प्रतिक्रिया म्हणाल्या “मी उज्ज्वला थिटे…”

Prajakta Patil : सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अनगर नगरपंचायतची बिनविरोध झालेली निवडणुकीची मोठी चर्चा संबंध राज्यात होत आहे. येत्या काही दिवसांवर नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी निवडणुका होणार आहेत. निवडणुका होण्याअगोदरच अनगर नगरपंचायत निवडणूक बिनविरोध झाली आहे. भाजपचे १७ उमेदवार बिनविरोध निवडून आल्यानंतर या नगरपंचायत निवडणुकीत नाट्यमयरित्या घडामोडी घडल्या. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत प्राजक्ता पाटील बिनविरोध निवडून […] The post अनगर नगरपंचायत निवडणूक बिनविरोध जिंकल्यानंतर राजन पाटलांच्या सुनबाईंची पहिली प्रतिक्रिया म्हणाल्या “मी उज्ज्वला थिटे…” appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 20 Nov 2025 10:51 am

जामखेड नगरपरिषदेत धक्कातंत्र: नगराध्यक्षपदाचे ९ तर नगरसेवकपदाचे तब्बल ८२ अर्ज बाद

जामखेड – अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापासून सस्पेन्समध्ये राहिलेल्या जामखेड नगरपरिषदपदासाठी नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांच्या उमेदवारी अर्जाची छाननी प्रक्रिया पूर्ण झाली असून, नगराध्यक्ष पदासाठी ९ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत, तर तब्बल ८२ उमेदवारांचे अर्ज त्रुटीमुळे रद्द करण्यात आले. नगराध्यक्षपदासाठी १३ तर नगरसेवक पदासाठी २४ जागांसाठी १२१ उमेदवारांचे अर्ज वैध ठरल्याची माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली. […] The post जामखेड नगरपरिषदेत धक्कातंत्र: नगराध्यक्षपदाचे ९ तर नगरसेवकपदाचे तब्बल ८२ अर्ज बाद appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 20 Nov 2025 10:50 am

“पुढच्या वर्षी मीच अर्थसंकल्प सादर करणार” ; ‘रोटेशनल सीएम’बद्दलच्या चर्चांना सिद्धरामय्याकडून पूर्णविराम?

Karnataka Chief Minister। मागील काही दिवसांपासून कर्नाटकमध्ये मुख्यमंत्रीपदावरून नाराजीनाट्य सुरु आहे. या नाट्यात मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि डी शिवकुमार यादव यांचा समावेश आहे.मुख्यमंत्री पदावरून सुरु असलेला वाद आता आणखी तीव्र होणार असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी ते त्यांच्या पदावर कायम राहणार असून पुढील वर्षी त्यांचा विक्रमी १७ वा अर्थसंकल्प सादर करणार असल्याचं म्हटलंय. […] The post “पुढच्या वर्षी मीच अर्थसंकल्प सादर करणार” ; ‘रोटेशनल सीएम’ बद्दलच्या चर्चांना सिद्धरामय्याकडून पूर्णविराम? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 20 Nov 2025 10:47 am

Kriti Sanon: ‘त्या व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा, ज्याच्या समोर मी अगदी निश्चिंत होऊ शकते…’ रूमर्ड बॉयफ्रेंड कबीर बहियाच्या वाढदिवशी कृति सेननची खास पोस्ट

Kriti Sanon: अभिनेत्री कृति सेनन सध्या तिच्या आगामी चित्रपट ‘तेरे इश्क में’मुळे चर्चेत आहे. दरम्यान, तिने तिच्या कथित प्रियकर कबीर बहियाला वाढदिवसानिमित्त खास पद्धतीने शुभेच्छा दिल्या असून तिची पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. कृतीची खास इंस्टाग्राम स्टोरी कृतिने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर कबीरसोबतचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे. दोघेही त्या फोटोत हसतमुख दिसत […] The post Kriti Sanon: ‘त्या व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा, ज्याच्या समोर मी अगदी निश्चिंत होऊ शकते…’ रूमर्ड बॉयफ्रेंड कबीर बहियाच्या वाढदिवशी कृति सेननची खास पोस्ट appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 20 Nov 2025 10:30 am

स्पॉटलाइट: पाकिस्तानातून आली होती सीमा, भारतातून गेली सरबजीत:सोशल मीडियावरून कसे जडले प्रेम, पाकिस्तानात नूर बनली आणि आता फरार; पाहा व्हिडिओ

सचिन वरच्या प्रेमासाठी पाकिस्तानातून पळून आलेल्या सीमा हैदरप्रमाणेच, एका भारतीय महिलेने आता एका पाकिस्तानी पुरुषाच्या प्रेमात पडून त्याच्याशी लग्न केले आहे. तथापि, दोघेही आता फरार आहेत आणि पाकिस्तानमध्ये त्यांचा शोध सुरू आहे. सोशल मीडियाद्वारे ही प्रेमकहाणी कशी सुरू झाली हे जाणून घेण्यासाठी, वरील प्रतिमेवर क्लिक करा आणि व्हिडिओ पाहा...

दिव्यमराठी भास्कर 20 Nov 2025 10:21 am

शेअर बाजारात प्री ओपन सत्रात सकारात्मक संकेत सेन्सेक्स ३०० व निफ्टी ७३ अंकाने उसळला 'या'कारणामुळे

मोहित सोमण:जागतिक पातळीवरील रॅलीचा फायदा आजही भारतात कायम राहू शकतो. प्री ओपन सत्रात सेन्सेक्स ३०० अंकांने व निफ्टी ७३ अंकाने उसळला आहे. अनुकुल वातावरण प्री ओपन बाजारात दिसत आहे. प्रामुख्याने बाजारातील चढउताराचा 'सिलसिला' आज मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात वाढच अपेक्षित आहे. विशेषतः जागतिक बाजारपेठेत आर्टिफिशियल इंटेलिजन्स शेअर व त्यातील बुडबड्याबद्दल हवा निर्माण झाल्याने बाजारात आयटी शेअर सलग दोन दिवस घसरले असले तरी सलग दोन दिवसात पुन्हा एविडिया व इतर आयटी कंपन्यांच्या शेअर्समध्ये झालेल्या मजबूत वाढीमुळे कालही युएस बाजारात रॅली झाली आहे. एनविडिया शेअर अतिरिक्त ५% उसळल्याने बाजारात आणखी वाढ झाली. तीच परिस्थिती भारतीय बाजारात राहिल का हे पाहणे महत्त्वाचे ठरेलच तत्पूर्वी फेड व रेपो दरात कपातीचे संकेत मिळत असल्याने बँक शेअरही तेजीत दिसत आहे. काही प्रमाणात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी आपली रोख विक्रीही कमी केल्याने निर्देशांकात स्थैर्य मिळत असले तरी आगामी आर्थिक आकडेवारी, निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकातील कंपन्यांची कामगिरी यांचा परिणाम बाजारात प्रभावी ठरू शकतो.प्री ओपन सत्रात मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे बाजारातील सपोर्ट लेवल दिवसभरात कायम राहण्याची चिन्हे आहेत कारण आज सकाळी गिफ्ट निफ्टीतही समाधानकारक वाढ झाली होती.प्री ओपन बाजारात डीसीएम श्रीराम (६.०४%), नेटवेब टेक्नॉलॉजी (४.९३%), एनबीसी (४.२९%), चोला इन्व्हेसमेंट अँड फायनान्स (३.५७%),जेपी पॉवर वेंचर (३.४०%), पीसीबीएल केमिकल्स (३.२८%), अदानी एनर्जी सोल्यूशन (२.८६%), सोनाटा सॉफ्टवेअर (२.६९%), क्लीन सायन्स (२.५१%), टाटा कम्युनिकेशन (२.३४%), झेंसार टेक्नॉलॉजी (२.३३%) समभागात वाढ झाली आहे.प्री ओपन बाजारात आयनॉक्स इंडिया (३.३६%), अदानी एंटरप्राईजेस (३.२१%), क्रिष्णा इन्स्टिट्यूट (१.७७%), फिनोलेक्स इंडस्ट्रीज (१.२२%), ग्राफाईट इंडिया (१.१५%), रेनबो चाईल्ड (१.१३%), ब्लू स्टार (१.११%), सेंच्युरी फ्लायबोर्ड (१.०३%), भारती एअरटेल (१.०१%), आय आयएफएल फायनान्स (१%), त्रिवेणी इंजिनिअरिंग इंडस्ट्रीज (०.९५%) समभागात झाली आहे.

फीड फीडबर्नर 20 Nov 2025 10:10 am

ताकझुरे अर्बन निधी लिमिटेड संस्थेत घोटाळा! सर्वसामान्यांच्या बचतीचा पदाधिकाऱ्यांनी घेतला फायदा

अकोला: अकोल्यातली ताकझुरे अर्बन निधी लिमिटेड या संस्थेमध्ये ठेवी केलेल्या नागरिकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी संस्थेकडून ठेवी परत न मिळाल्याने तब्बल १६ हून अधिक ठेवीदारांनी पोलीस ठाण्यात तक्रारी नोंदवायला सुरुवात केली आहे. या तक्रारींमध्ये, संस्थेने परतावा न देता आर्थिक विश्वासघात केल्याची माहिती ठेवीदारांनी दिली आहे. तक्रारदार विलास महादेवराव हनुमंते यांनी केलेल्या विस्तृत तक्रारीत संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष तुषार हुने, उपाध्यक्ष निलेश गावंडे, तसेच सदस्य प्रकाश जोशी आणि राजीव गायकवाड यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.तक्रारीनुसार, ठेवीदारांनी जमा केलेली रक्कम संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी नियमबाह्य पद्धतीने वापरून मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक केल्याचे सांगितले. संस्थेकडून कोणताही स्पष्ट हिशोब न देणे, ठेवी परत न करणे आणि चौकशी टाळण्याचा प्रयत्न केल्यामुळे ठेवीदारांचा रोष वाढला. या प्रकरणामुळे संस्थेच्या कार्यप्रणालीवर अनेक प्रश्नचिन्हे निर्माण झाली आहेत. मिळालेल्या प्राप्त तक्रारींच्या आधारे पोलिसांनी प्राथमिक पडताळणी पूर्ण करून गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया गतीने सुरू केली आहे.https://prahaar.in/2025/11/20/army-chiefs-statement-and-pakistans-fear-he-said-india-can-intrude-anytime/पोलिसांचे पथक संबंधित कागदपत्रे, व्यवहार नोंदी आणि संस्थेच्या आर्थिक हालचालींची तपासणी करत असून या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येत आहे. दरम्यान, स्वतःच्या आयुष्यभराची बचत संस्थेत जमा केलेल्या अनेक ठेवीदारांमध्ये मोठी चिंता आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. या प्रकरणाचा वेगाने तपास होऊन ठेवीदारांना न्याय मिळावा, अशी मागणी करण्यात येत आहे. ताकझुरे अर्बन निधी लिमिटेड संस्थेत गुंतवणूक करणारे ठेवीदार सर्व सामन्य वर्गातील आहेत. त्यामुळे छोटी रक्कम बुडणे हे त्यांच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे आमचे पैसे आम्हाला परत मिळाले पाहिजेत अशी मागणी ते करत आहे.

फीड फीडबर्नर 20 Nov 2025 10:10 am

शुभमन गिल बाहेर; साई सुदर्शनला मिळणार कसोटीची संधी

गुवाहाटी : पहिल्या कसोटी दरम्यान झालेल्या गंभीर दुखापतीनंतर शुभमन गिलची मैदानात पुनरागमन करण्याची शक्यता कमी होत चालली आहे. फलंदाजीसाठी उतरल्यानंतर काहीच चेंडूत त्याची मान लचकली आणि वेदना वाढत गेल्याने त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये हलवावे लागले. उपचारासाठी ICU मध्ये दाखल करण्यात आलेल्या शुभमनला आता बरं वाटत असलं तरी दुसऱ्या कसोटीसाठी तो फिट नाही, हे जवळपास निश्चित मानलं जात आहे.भारतीय संघाच्या व्यावसायिक डॉक्टरांनी प्रयत्न केले, पण दुखापतीमुळे शुभमन पहिल्या कसोटीतील दुसऱ्या डावातही मैदानात उतरू शकला नाही. त्यामुळे दुसऱ्या कसोटीत त्याच्या जागी कोणाला संधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष होते.सूत्रांच्या माहितीनुसार शुभमन गिलच्या जागी इंग्लंड दौऱ्यावर खेळलेला डावखुरा फलंदाज साई सुदर्शनला स्थान मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर संघाचे नेतृत्व ऋषभ पंतकडे जाणार असल्याचेही संकेत आहेत. त्यामुळे दुसऱ्या कसोटीत भारतीय संघात एक महत्त्वाचा बदल पाहायला मिळणार आहे. पहिली कसोटी हातातून गेल्यानंतर टीम इंडिया आता मालिकेत परतण्यासाठी दुसऱ्या कसोटीमध्ये कशी कामगिरी करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

फीड फीडबर्नर 20 Nov 2025 10:10 am

मुलुंडमध्ये शत प्रतिशत भाजपा, शिवसेनेच्या वाट्याला जाणार नाही एकही प्रभाग

मुंबई (सचिन धानजी):उत्तर पूर्व अर्थात ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघातील मुलुंड विधानसभा मतदार हा संघ भाजपाचा बालेकिल्ला असून या विधानसभेत भाजपाचे सहा नगरसेवक आहेत. या विधानसभेत भाजपा शतप्रतिशत आहे. त्यामुळे शिवसेना आणि भाजपाची युती झाल्यास या विधानसभेत शिवसेनेला कुठेच शिरकाव करण्याची संधी नाही. या विधानसभेत युती नसल्यासच शिवसेनेला जागा मिळवता येतील. परंतु मुलुंडमधील विधानसभेत सहा प्रभागांमध्ये उबाठाच्या वाट्याला चार ते पाच जागा जाण्याची शक्यता असून मनसेला एका किंवा अधिक ताणल्यास दुसऱ्या जागेवर उमेदवार उभा करण्याची संधी मिळेल . मात्र, या सहाही प्रभागांमध्ये काँग्रेसचे उमेदवार उभे केले जाण्याची शक्यता आहे.शिवसेना भाजपा युती असताना मुलुंड पश्चिमेला भाजपाची दावेदारी आणि मुलुंड पुर्वेचे प्रभाग शिवसेनेच्या वाट्याला येत होते. पण सन २०१७च्या निवडणुकीत शिवसेना भाजपा युती तुटली आणि भाजपाने स्वबळावर निवडणूक लढवताना मुलुूंडमधील सहाही प्रभागांमध्ये आपले उमेदावार उभे केले आणि सहाही उमेदवार निवडून आणले. भाजपाचे सहा नगरसेवक असल्याने या विधानसभेत युतीमध्ये शिवसेनेच्या वाट्याला एकही जागा येणार नाही. तर याठिकाणी शत प्रतिशत भाजपाच दिसून येणार आहे.प्रभाग क्रमांक १०३हा प्रभाग आता महिला राखीव झाला असून मागील दोन निवडणुकांमध्ये तो सर्वसाधारण खुला प्रवर्गाकरता आरक्षित झाला होता. त्याआधी तो महिला आरक्षित होता. या मतदार संघातून भाजपाचे मनोज कोटक दोन वेळा निवडून आले होते. पण हा प्रभाग महिला आरक्षित झाल्याने याठिकाणी भाजपा महिला पदाधिकारी हेतल जोबनपुत्रा यांचे नाव चर्चेत आहे. तर या प्रभागावर उबाठाचा दावा असल्याने माजी नगरसेविका हेमलता सुकाळे यांचे नाव चर्चेत आहे. तर काँग्रेसच्यावतीने माजी महापौर आर आर सिंह यांच्या कुटुंबातून त्यांची सून निवडणूक रिंगणात उतरण्याचीही शक्यता आहे.प्रभाग १०४हा प्रभाग सर्वसाधारण खुला प्रवर्गकरता राखीव झाला आहे. या प्रभाग मागील दोन निवडणूक ओबीसीकरता राखीव झाला असून सन २००७ नंतर प्रथमच हा प्रभाग खुला झाला आहे. या मतदार संघातून भाजपाचे प्रकाश गंगाधरे हे निवडून येत आहेत. यंदाही त्यांची पक्की दावेदारी असली तरी किरीट सोमय्यांच्या मुलाचा प्रभाग ओबीसी महिला झाल्याने निलसाठी हा प्रभाग मोकळा करून तर दिला जाणार नाही ना असा स्थानिकांना प्रश्न पडला आहे. या प्रभागात उबाठाची प्रबळ दावेदारी असून त्यांच्याकडून सिताराम खांडेकर, शैलेश पवार यांच्या नावाची चर्चा आहे. तर काँग्रेसच्यावतीने माजी नगरसेवक सुरेश पाटील यांचे पुत्र अमित किंवा अन्य सदस्य निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहे.प्रभाग क्रमांक १०५या प्रभागातून भाजपाच्या रजनी केणी निवडून आल्या होत्या, परंतु काही महिन्यांपूर्वीच त्यांचे देहावसान झाले. पण हा प्रभाग आता ओबीसी महिला करता राखीव झाला आहे. सन २०१२ वगळता हा प्रभाग महिला राखीव झालेला आहे. सन २०१२मध्ये हा प्रभाग ओबीसी करता राखीव झाला होता. या प्रभागातून भाजपाच्यावतीने दिपिका घाग आणि नम्रता वैती यांच्या नावाची चर्चा आहे, हा प्रभाग उबाठालाच जाणार असून याठिकाणी त्यांच्याकडून ज्योती वैती, रसिका तोंडवळकर यांच्या नावाची चर्चा आहे . या प्रभागात शिवसेनेची दावेदारी असली तरी भाजपाची परंपरागत जागा असल्याने सोडली जाणार नाही. मात्र, शिवसेनेकडून माजी नगरसेविका सुजाता पाठक यांचेही नाव इच्छुकांच्या यादीत आहे.प्रभाग १०६हा प्रभाग सर्वसाधारण खुला प्रवर्गकरता राखीव झाला आहे. हा प्रभाग सन २०१२ ओबीसी झाला होता. पण इतर प्रत्येक निवडणुकीत तो खुलाच झालेला आहे. या प्रभागातून मनसेचे सत्यवान दळवी यांचा प्रबळ दावेदारी असली तरी उबाठाकडे इच्छुकांची मोठी यादी आहे. यात मनसेतून उबाठात आलेले सागर देवरे, खासदा संजयभाऊ पाटील यांचे अत्यंत विश्वासू अभिजित चव्हाण तसेच अमोल संसारे, अनिष शेडगे यांची नावे चर्चेत आहे. पण देवरे हे आदित्य आणि वरुण सरदेसाई यांचे अतिविश्वासू आणि मित्र असल्याने देवरे यांची उमेदवारी पक्की मानली जात आहे. तर काँग्रेसच्यावतीने संजय घरत आणि कैलास पाटील यांची नावे चर्चेत आहेप्रभाग १०७हा प्रभाग सर्वसाधारण खुला प्रवर्गकरता राखीव झाला.यापूर्वी दोन निवडणुकीत हा प्रभाग महिला आरक्षित झाला. भाजपाच्या समिता कांबळे या प्रभागातून निवडून आल्या असून महापालिका शाळांमध्ये योगा वर्ग सुरु करण्याची मागणी केल्याने त्या चर्चेत आल्या होत्या. हा प्रभाग खुला झाल्याने याठिकाणांहून समिता कांबळे यांची पक्की दावेदारी असली तरी खुला प्रवर्ग झाल्याने निल सोमय्या आणि माजी खासदार मनोज कोटक यांचे भाऊ केतन कोटक यांच्याही नावाची चर्चा आहे. तर उबाठाच्यावतीने दिनेश जाधव हे इच्छुक आहेत. या प्रभागातून शिवसेनेचे जगदीश शेट्टी हे इच्छुक असले तरी युतीमध्ये हा प्रभाग भाजपाकडे राखला जाणार आहे. युती न झाल्यास शेट्टी हे शिवसेनेकडून प्रबळ दावेदार ठरतील . तर काँग्रेसच्यावतीने अनु शेट्टी हे इच्छुक असल्याची माहिती मिळत आहे.प्रभाग १०८या प्रभागातून भाजपाचे किरीट सोमय्या यांचे पुत्र निल सोमय्या हे निवडून आले आहे. पण प्रभाग आता ओबीसी महिला करता राखीव झाला. मागील चार निवडणुकीत सर्व प्रकारची अनुसूचित जाती आणि जमाती वगळता सर्व प्रकारची आरक्षण पडली आहेत. हा प्रभाग भाजपाचा असल्याने भाजपाकडून जिल्हा महिला मोर्चा अध्यक्ष दिपिका घाग यांचे नाव आघाडीवर आहे. तर उबाठाकडून शुभांगी केणी, नंदिनी सावंत यांची नावे चर्चेत आहेत.लोकसभेतील मुलुंड विधानसभेतील मतदानविद्यमान खासदार संजय पाटील : ५५,९७९पराभूत उमेदवार मिहिर कोटेचा : १, १६, ४२१विधानसभेतील मतदानआमदार मिहिर कोटेचा : १, ३१,५४९पराभूत उमेदवार काँग्रेसचे राकेश शेट्टी : ४१,५१७विधानसभा क्षेत्रातील संभाव्य उमेदवारप्रभाग क्रमांक १०३(महिला प्रवर्ग)भाजपा : हेतल जोबनपुत्रा, उबाठा : हेमलता सुकाळेप्रभाग क्रमांक १०४(सर्व साधारण खुला प्रवर्ग)भाजपा : प्रकाश गंगाधरे, उबाठा : सिताराम खांडेकर, शैलेश पवार, काँग्रेस: उत्तम गीते, राष्ट्रवादी काँग्रेस : अमित सुरेश पाटीलप्रभाग क्रमांक १०५ (ओबीसी महिला प्रवर्ग)भाजपा : नम्रता वैती, दिपिका घाग, उबाठा : ज्योती वैती, रसिका तोंडवळकर, शिवसेना : सुजाता पाठक, काँग्रेस: मालती पाटीलप्रभाग क्रमांक १०६(सर्वसाधारण खुला प्रवर्ग)भाजपा :प्रभाकर शिंदे, उबाठा : सागर देवरे, अभिजित चव्हाण, अमोल संसारे, अनिष शेडगे, मनसे: सत्यवान दळवी, काँग्रेस : संजय घरत, कैलास पाटीलप्रभाग क्रमांक १०७ (सर्वसाधारण खुला प्रवर्ग)भाजपा: समिता कांबळे, निल सोमय्या, केतन कोटक, उबाठा : दिनेश जाधव, काँग्रेस : अनु शेट्टी, अपक्ष : विरल शाहप्रभाग क्रमांक १०८ (ओबीसी महिला प्रवर्ग)भाजपा : दिपिका घाग, उबाठा : शुभांगी केणी, नंदिनी सावंत, मनसे: राजेंद्र देशमुख

फीड फीडबर्नर 20 Nov 2025 10:10 am

नाशिकच्या सिन्नर बस स्थानकात बस थेट फलाटावर धडकली अन्... ९ वर्षाच्या मुलाचा जागीच मृत्यू तर ५ जण जखमी

नाशिक : नाशिकच्या सिन्नर बस स्थानकात घडलेल्या भीषण अपघातात एका ९ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत. १८ तारखेला बुधवारी दुपारी २ च्या सुमारास हा प्रकार घडला असून, स्थानकात प्रवेश करताना बसचा ब्रेक अचानक निकामी झाला आणि नियंत्रण सुटल्याने बस थेट फलाटावर चढली. या धडकेत फलाटावर उभ्या असलेल्या नागरिकांना स्वतःचा बचाव करता न आल्याने मोठी दुर्घटना घडली.मृत मुलाचे नाव आदर्श बोराडे असून, तो आपल्या कुटुंबासोबत देवदर्शनासाठी गेला होता. दर्शन आटोपून गावाकडे परत जाण्यासाठी त्याचे कुटुंब सिन्नर बस स्थानकात बसची वाट पाहत उभे होते. मात्र अचानक बस फलाटावर धडकली आणि या धडकेत आदर्शचा घटनास्थळीच मृत्यू झाला. जखमी झालेल्या इतर प्रवाशांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले.घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी प्रचंड संताप व्यक्त करत स्थानकाबाहेर रास्ता रोको केला. त्यांनी वाहतूक व्यवस्थेतील ढिसाळपणा आणि बसच्या तांत्रिक तपासणीतील त्रुटींवर नाराजी व्यक्त केली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत पुढील तपास सुरू केला आहे.

फीड फीडबर्नर 20 Nov 2025 10:10 am

BMC साठी ठाकरे बंधूंचा युतीचा नारळ फुटला? जागावाटपाची झाली प्राथमिक चर्चा; महत्वाची माहिती समोर

Thackeray brother : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतील पहिला टप्पा पूर्ण होण्यासाठी अवघे काही दिवस उरलेले आहेत. राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतीसाठी निवडणुका होणार आहेत. यानंतर दुसरा आणि त्यानंतर तिसरा टप्पा अर्थात महापालिका निवडणुकांचा असणार आहे. यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष […] The post BMC साठी ठाकरे बंधूंचा युतीचा नारळ फुटला? जागावाटपाची झाली प्राथमिक चर्चा; महत्वाची माहिती समोर appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 20 Nov 2025 9:48 am

कर्माचे प्रतिबिंब

ऋतुराज : ऋतुजा केळकरआज अचानक एका अतिशय वाईट वृत्तीच्या घमेंडी, उद्धट ओळखीच्या व्यक्तीला असाध्य रोग झाल्याचे कळले आणि “त्यांनी आयुष्यभर जे लोकांकडून शिव्याशाप घेतलेत त्याचा हा परिणाम आता मोठा पशात्ताप होतोय” असे जेव्हा सांगणारी माझी मैत्रीण म्हणाली. तेव्हा मग,पापांचे ओझे पाठीवरती, तरीही चालतो अभिमानाने...दुःखाचे कारण शोधत नाही, जगतो फक्त तक्रारीतून...एक क्षण थांबून पाहिले, अंतर्मनात डोकावले...तेव्हा उमगले हे सारे मीच पेरले, मीच उगमले...मीच लिहिलेली ही चारोळी आठवली. आपल्या आयुष्यात कितीतरी चुका, पाप, अन्याय आपण नकळत वा जाणूनबुजून केलेले असतात. त्या सर्वांचं ओझं आपल्या पाठीवर आहे, पण तरीही आपण अभिमानाने मिरवतो जणू काही आपण निष्पाप आहोत, निर्दोष आहोत. हीच आपली पहिली चूक असते. आत्मपरीक्षणाऐवजी आत्मप्रशंसेत रमणं. दुःख आलं की आपण त्याचं मूळ शोधण्याऐवजी त्यावर तक्रारींचा पडदा टाकतो. ‘का माझ्याच बाबतीत असं होतं?’ असा प्रश्न विचारतो, पण ‘मी असं का केलं?’ हा प्रश्न टाळतो. ही तक्रारींची सवय आपल्याला सत्यापासून दूर नेत राहते. दुःखाच्या क्षणी आपण त्याच्या उगमाकडे पाहण्याऐवजी, तक्रारींच्या धुक्यात स्वतःलाच हरवून टाकतो. ‘का माझ्याच बाबतीत असं होतं?’ असा प्रश्न विचारतो, पण ‘मी असं का केलं?’ हा प्रश्न टाळतो. ही तक्रारींची सवय आपल्याला सत्यापासून दूर नेत राहते आणि मग जाणवतं हे दुःख कुणी दुसऱ्याने दिलेलं नाही, ते माझ्याच कर्मांचं फळ आहे. जे पेरलं, तेच उगवलं.ही जाणीवच आत्मबोधाची पहिली पायरी ठरते. दैनंदिन जीवनाच्या ओघात शरीर थकून बसलेलं असतं, मन विस्कळीत विचारांच्या वावटळीत हरवलेलं आणि ‘आत्मा’ तो तर काळाच्या पडद्याआड गूढतेत हरवलेला. व्याधींचा भार जणू काळजाच्या कपारीत खोलवर रुजलेला असतो, पण त्याच्या मुळाचा शोध घेताना आपण बाह्य कारणांचा एक चकवा किंवा जाळं म्हणू या हवे तर ते कायम विणत असतो. तसं पाहायला गेलं तर ‘हवामान, आहार, काळ, नशीब’ हे सारे केवळ दोषारोपाचे मुखवटे आहेत.पण एक क्षण, जिथे वेळ थांबते आणि मनाच्या शांत किनाऱ्यावर जाणिवेची लाट हलकेच स्पर्शून जाते तिथे, एक निःशब्द प्रकाश झिरपतो आणि त्या प्रकाशात उमगते ती वेदना. बाहेरून आलेली नाही तर ती आतून उगमलेली असते. पूर्वजन्मीच्या कर्मांची सावली आजच्या दुःखाच्या पानांवर उमटलेली आहे, जणू ‘काळाच्या हस्ताक्षरात कोरलेली’. कलियुगाच्या वेगात आता कर्माचा हिशेब पुढच्या जन्मावर न ढकलता, याच जन्मात चुकता केला जातो. म्हणूनच जगण्याच्या प्रत्येक वळणावर आपली कृती आपल्यालाच आरसा दाखवते क्षणोक्षणी, स्पष्टपणे, निःशब्दपणे. ही जाणीव हीच खरी बुद्धीची पहिली पायरी आहे. कारण जेव्हा आपण स्वतःच्या दुःखाचा उगम स्वतःच्या कर्मात पाहतो, तेव्हा आत्मबोधाचा दीप मंदपणे उजळू लागतो.कर्म म्हणजे केवळ कृती नव्हे तर ती एक सूक्ष्म ऊर्जा आहे, जी काळाच्या सीमारेषा ओलांडून अस्तित्वाच्या गाभाऱ्यात खोलवर रुजते. काही कर्म क्षणात फळ देतात, तर काही जन्मांच्या प्रवासात गुढपणे अंकुरतात आणि योग्य क्षणी उगम पावतात. ‘कधी अन्नदान टाळलं जातं, कधी गुरूंचा अवमान होतो आणि कधी, आजच्या जगात, एखाद्याला जाणीवपूर्वक मानसिक छळाच्या गर्तेत ढकललं जातं. शब्दांनी जखम केली जाते, प्रतिष्ठा पायदळी तुडवली जाते आणि माणूस नोकरीच नव्हे तर स्वतःच्या अस्तित्वापासूनही दूर जाऊन आत्महत्येसारख्या निर्णयापर्यंत पोहोचतो’. हेही कर्मच आहेत आणि त्यांचाही विपाक अटळ आहे. या कृतींमध्ये केवळ सामाजिक दोष नाही, तर आत्म्याच्या प्रवासातले गडद वळण दडलेले असतात. ज्येष्ठ पुराणांपैकी एक ब्रह्मांड पुराण जे सृष्टी, धर्म आणि कर्मविपाक म्हणजेच केलेल्या प्रत्येक कृतीचा अचूक आणि अटळ परिणाम, जो कधी आशीर्वादासारखा, तर कधी शापासारखा उगवत असतो याचे गूढ उलगडते. त्यात म्हटलं आहे की, प्रत्येक कृती विश्वाच्या एका अदृश्य कोपऱ्यात नोंदली जाते आणि ‘काळाच्या हस्ताक्षरात’ ती आपल्यासमोर उभी ठाकते. आणि आता याचा ‘पश्चाताप’ म्हणजे अगदी साध्या शब्दांत सांगायचे झाले तर, ‘आत्म्याचं स्नान’ एक निःशब्द झरं, जिथे गढूळपणा विरघळतो आणि शुद्धतेची झुळुक अलगद उसळते. ती केवळ अपराधांची यादी नसते, तर एक अंतर्मुख संधी असते, स्वतःच्या गोंधळलेल्या अस्तित्वाला पुन्हा आकार देण्याची म्हणजेच, विस्मरणात गेलेल्या आत्मभानाला पुन्हा जागवण्याची. जसं गंगाजळीत पाणी शुद्ध होतं, तसंच पश्चाताप मनाच्या खोल तळाशी उतरतो. जिथे शब्द नसतात, पण जाणिवा असतात आणि त्या जाणिवांच्या स्पर्शात, आपण निःशब्दपणे म्हणतो, “जे मी केलं आणि मला त्याचा पश्चाताप आहे.” तोच क्षण जिथे, आत्मा स्वतःच्याच सावल्यांना सामोरा जातो आणि त्या सामर्थ्याने उजळतो. पर्यायाने पश्चाताप म्हणजे दोषांची कबुली नव्हे, तर शुद्धतेची तयारी. तो, ‘अकल्पित पण अतिशय योग्य क्षण’ जिथे आपण स्वतःला पुन्हा एकदा नव्याने पाहतो, नव्याने ओळखतो आणि नव्याने घडवतो.आज आपण दुःखात आकंठ बुडालो आहोत, पण त्याचं मूळ शोधण्याची जाणीवच हरवली आहे. उलट, नव्या पापांची गुंफण अधिक गडद होत चालली आहे जणू, अंधारात अंधाराची भर. काॅर्पोरेट जगात जाणीवपूर्वक मानसिक छळ आणि राजकीय क्षेत्रात प्रतिष्ठेचा खेळ हेही कर्मच आहेत. जेव्हा एखाद्याला खोट्या आरोपांनी बदनाम केलं जातं, जनतेला दिशाभूल केली जाते किंवा सत्तेसाठी सत्य दडपलं जातं तेव्हा केवळ सामाजिक अन्याय होत नाही, तर आत्म्याच्या प्रवासात गडद सावल्या उमटतात. पण यातून मार्ग आहे आत्मचिंतन, पश्चाताप आणि सुधारणा. हे तीन शब्द नाहीत, ते तीन दीप आहेत जे, अंधारात उजेड देतात आणि त्या उजेडात, आपल्याला स्वतःचं प्रतिबिंब दिसतं जसं आहे, तसं. त्या क्षणात, आपण स्वतःला पाहतो दोषांसह, पण सुधारण्याच्या संधीसह.‘शेवटी, आपण जे पेरतो तेच उगवतं’ हे केवळ तत्त्वज्ञान नाही, तर अनुभवाने सिद्ध झालेलं सत्य आहे. कर्म हे केवळ कृती नव्हे, तर अस्तित्वाच्या गाभ्यात रुजणारी ऊर्जा आहे, जी वेळेच्या ओघात आपल्याला आरशासमोर उभं करत राहते आणि जेव्हा त्या आरशात आपलं प्रतिबिंब स्पष्ट दिसू लागतं, तेव्हा आत्मचिंतन, पश्चाताप आणि सुधारणा हे तीन दीप आपल्याला अंधारातून उजेडाकडे घेऊन जातात. त्या उजेडात आपण स्वतःला पाहतो दोषांसह, पण नव्याने घडण्याच्या संधीसह आणि हेच ‘कर्माचे प्रतिबिंब’ जे प्रत्येक वळणावर आपल्याला स्वतःशी प्रामाणिक राहण्याची संधी देतं.

फीड फीडबर्नर 20 Nov 2025 9:30 am

महर्षी भारद्वाज

भारतीय ऋषी : डॉ. अनुराधा कुलकर्णीआपल्या देदिप्यमान तेजाने आसमंतात अखंड झळकणाऱ्या सप्तर्षींपैकी एक ऋषी म्हणजे महर्षी भारद्वाज. आपल्या पुण्यभूमी भारतातल्या अलकनंदा आणि भागिरथीच्या पावन संगमावर, देवप्रयाग येथे महर्षी भारद्वाजांचा आश्रम होता. त्या आश्रमाच्या परिसरात धरित्रीवर उदात्त तत्त्वांचे बिजारोपण करणारे आणि आकाशाच्या हृदयात भरून जाणारे विलक्षण नादमधुर आणि ओजस्वी असे वेदमंत्रांच्या सामगायनाचे सूर प्रत्यही निनादत असत. महर्षी भारद्वाज हे बृहत्साम या सामगायन प्रकाराचे आचार्य होते. सामवेदात रुची असणारे, म्हणजेच वेदमंत्रांच्या शास्त्रशुद्ध व स्वरबद्ध गायनाची आवड असणारे शेकडो शिष्य भारद्वाजांच्या आश्रमात सामवेदाचे अध्ययन करीत असत.ऋग्वेदातील सहाव्या मंडलाच्या मंत्राचे द्रष्टे महर्षी भारद्वाज आहेत. त्यांची एक काव्यमय ऋचा बघू या,न अहं तन्तुं न वि जानामि ओतुं न यं वयन्ति समरे अतमानाः।कस्य स्वित् पुत्रः इह वक्त्वानि परः वदाति अवरेण पित्रा।।ऋ.मं६सू९.२या जीवनरूपी वस्त्रपटलाच्या सरळ धाग्यांना मी जाणत नाही, तसेच तिरक्या धाग्यांनाही मी जाणत नाही. या वस्त्रनिर्मितीच्या उद्योगात जो नवनवीन मनोहर रंगीत वस्त्रे विणीत असतो त्यालाही मी जाणत नाही. या पृथ्वीतलावर असा कोणता थोर पुत्र असेल, की जो आपल्या पित्याशी याबाबत चर्चा करून आपल्याला उपदेश करेल? अशा अर्थाची ही ऋचा आहे, यात जीवनरहस्य जाणून घेण्याची नुसतीच इच्छा नाही, तर तळमळ आहे. सद्गुरूच्या भेटीची आस आहे. आपल्या आयुष्याला दिवसरात्रींच्या धाग्यांनी विणणारा कोण असेल? त्यात सुखाचे सरळ धागे वा दुःखाचे तिरपे धागे केव्हा येतील, हे आपल्याला माहीत नसते. या वस्त्राच्या विणकऱ्याला जाणून जीवनाचे रहस्य उलगडून सांगणारा श्रेष्ठ गुरू आपल्याला केव्हा भेटेल? या भावार्थाची ही ऋचा, “एक धागा सुखाचा... या वस्त्राते विणते कोण...’’ या सुप्रसिद्ध गीताची आठवण करून देते. असे आत्मचिंतन करणाऱ्या महर्षी भारद्वाजांना सत्कर्मरूप यज्ञातील वैश्वानर ज्योतीत आत्मदर्शन झालेले दिसून येते.ध्रुवं ज्योतिः निहितं दृशये कं मनः जविष्ठं पतयत्सु अन्तः ।विश्वेदेवाः समनसः सकेताः एकं ख्रतुं अभि विदन्ति साधु ।।ऋ.मं.६सू९.५स्थिर असूनही गतिशील, चलनवलनाला शक्ती देणारी अशी ही वैश्वानर ज्योती सर्व प्राणिमात्रांत आत्मसुखदर्शनास्तव स्थापन केलेली आहे. सर्व देवस्वरूप मानव एक मनाने, एक विचाराने या वैश्वानर ज्योतीची उपासना करीत असतात, असे महर्षी भारद्वाज म्हणतात.अाध्यात्माप्रमाणे महर्षी भारद्वाज धनुर्वेद, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, धर्मशास्त्र यांचेही विशेषज्ञ होते. भौतिक विज्ञानातही त्यांची स्पृहणीय कामगिरी असून यंत्रसर्वस्व नावाच्या महान ग्रंथाचे ते निर्माते होते. अथर्ववेदातही त्यांचे २३ मंत्र आहेत. महर्षी अंगिरस हे भारद्वाजांचे पितामह होते. भारद्वाजांचे पिता बृहस्पती व माता ममता. कौरवपांडवांचे गुरू द्रोण हे भारद्वाजांचे पुत्र होत. भारद्वाजांनी इंद्राकडून व्याकरणशास्त्राचे अध्ययन केले व ते अनेक ऋषींना शिकवले. तसेच इंद्राकडून भारद्वाज आयुर्वेद शिकले आणि आयुर्वेद संहितेची रचना केली. त्यांनी महर्षी भृगूंकडून धर्मशास्त्राचा उपदेश घेतला व भारद्वाजस्मृती लिहिली.महर्षी भारद्वाजांच्या बाबतीत एक गोष्ट तैत्तिरिय ब्राह्मग्रंथात अशी आहे की, त्यांनी संपूर्ण वेदाच्या अध्ययनाचा प्रयत्न केला. त्यांच्या अध्ययन तपस्येने इंद्र प्रसन्न झाला. त्याच्याकडून भारद्वाजांनी तीन वेळा १००, १०० वर्षांचे आयुष्य वेदाध्ययनासाठी मागून घेतले. पण अखेरीस इंद्राने त्यांना सांगितले की वेदरूपी तीन पहाडापुढे तुझे अध्ययन मुठ्ठीभरच्या वाळूइतके आहे. वेद अनंत आहेत तेव्हा तू अग्नीला जाणून घे. त्यामुळे सर्व ज्ञान तू स्वतःच होशील. तेव्हा भारद्वाजांनी इंद्राकडूनच अग्नीतत्त्वाला जाणून घेतले आणि ते ज्ञानाशी तादात्म्य पावले. आयुर्वेदनिपूण असल्याने भारद्वाज हे सर्वांपेक्षा दीर्घायू आहेत. त्यांनी देवतांकडून बृहत्साम प्राप्त केले. बृहत्साम म्हणजे ऋचांचे असे गायन की ज्याच्या तेजोमय आलापातून स्वर्गलोकीची, आदित्याची दिव्यता प्रतीत होते. ते मनात भरून उरते. गौतम, वामदेव, कश्यप आणि भारद्वाज या ऋषीश्रेष्ठांना प्रमुख सामगायक म्हणतात. भारद्वाज म्हणतात, अग्नी हा मर्त्य मानवातील अमर ज्योती आहे, अग्नी विश्वव्यापी आहे, कर्मप्रेरक आहे अग्नीच्या धारणेसाठी दृढ साहसशक्ती हवी. स्वतःतली ही शक्ती जाणून घ्या. कोणापुढेही लाचारीने झुकू नका. आपल्या विद्येने सर्वांचे पोषण व्हावे, असा अनमोल उपदेश महर्षी भारद्वाजांनी केला आहे.?anuradha.klkrn@gmil.com

फीड फीडबर्नर 20 Nov 2025 9:30 am

लष्कर प्रमुखांचे विधान आणि पाकिस्तानचा उडाला थरकाप! म्हणाले, भारत कधीही घुसखोरी करू शकतो...

लाहोर: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष अधिक तीव्र झाल्याचे पाहायला मिळाले. भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानातील १०० पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. यानंतर झालेल्या दिल्ली बॉम्ब स्फोटामुळे भारत सरकार दहशतवादाला कसे उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. पण यापूर्वीच पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी पुन्हा भारत पाकिस्तान युद्ध सुरू होणार असल्याचे विधान केले आहे.गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या लाल किल्ला बॉम्ब स्फोटाच्या प्रकरणात पाकिस्तानचे नाव समोर येत आहे. या हल्ल्याच्या सखोल तपासणीमधून लक्षात आले की, हा खूप मोठा घातपात होता. ज्याचे रॅकेट मोठे होते. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या स्फोटात सहभागी असलेल्या कोणालाही सोडले जाणार नाही असा इशारा दिला आहे.दरम्यान, भारताचे लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी सांगितले की, ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक ट्रेलर होता आणि हा भाग ८८ तासांनंतर संपला. द्विवेदी यांनी स्पष्टपणे सांगितले की जर पाकिस्तानने आम्हाला संधी दिली तर भारत त्यांना एका जबाबदार राष्ट्राने आपल्या शेजाऱ्यांशी कसे वागावे याबद्दल धडा शिकवेल.https://prahaar.in/2025/11/20/mumbai-police-summons-social-media-influencer-ori-in-drug-case-many-bollywood-actors-attend-that-party/या पार्श्वभूमीवर, एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत आसिफ म्हणाले की, आम्ही भारताकडे दुर्लक्ष करत नाही. मी युद्ध किंवा भारताकडून कोणत्याही शत्रुत्वाच्या रणनीतीची शक्यता नाकारू शकत नाही. यामध्ये सीमापार घुसखोरी किंवा हल्ल्यांचा समावेश असू शकतो. त्यामुळे पाकिस्तानला पूर्णपणे सतर्क राहावे लागेल.भारताचा सर्वात मोठा शत्रू देश असलेला पाकिस्तान सतत काहीना काही कुरघोड्या करत असतो. मात्र आता भारत कधीही दिल्ली हल्ल्याचे उत्तर देऊ शकतो, अशी भीती पाकिस्तानच्या मनात निर्माण झाली असल्याचे आसिफ यांच्या विधानांवरून लक्षात येते.

फीड फीडबर्नर 20 Nov 2025 9:30 am

ज्ञानाचे मर्म

जीवन संगीत : सद्गुरू वामनराव पैसगळ्या ठिकाणी ज्ञान हे कार्य करते व त्याच्याच वापरांतून प्रयोगांतून मिळणारे परिणाम हे चांगले किंवा वाईट ठरतात. म्हणजेच ज्ञान नाही, तर त्याचे प्रात्यक्षिक हे चांगले अथवा वाईट ठरवणारा निर्धारक घटक आहे. उदाहरणार्थ काळा पैसा असे म्हटले जाते मात्र प्रत्यक्षात हा पैसा काळाही नसतो व गोराही नसतो. पण पैशाचा वापर करणारे तो काळा की गोरा हे ठरवत असतात. काळा धंदा वा काळा व्यवसाय करणारे जे आहेत त्यांच्याकडचा पैसा तो काळा पैसा. त्यामुळे भ्रष्टाचार बोकाळतो आहे आणि त्यामुळे आपला सगळा देश गुदमरतो आहे. हा भ्रष्टाचार जितक्या लवकर नष्ट होईल तेवढे आपण लवकर सुखी होऊ. सांगायचा मुद्दा भ्रष्टाचार करणाऱ्यांकडे ज्ञानच आहे व भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढणाऱ्यांकडे ज्ञानच आहे, म्हणजेच जीवनविद्या जेव्हा ‘देतो तो देव’ असे म्हणते तेव्हा चांगले देतो तेव्हा तो देव व तोच जेव्हा दुःख देतो तेव्हा तो सैतान. जीवनविद्येचा अमृततुषारच आहे,‘शरीर साक्षात परमेश्वर व सैतान सुद्धा’. शरीराने सैतान व्हायचे की, परमेश्वर व्हायचे हे तुझ्या हातात आहे. आज शरीर सैतान झालेले आहे कारण पैसा हाच देव झालेला आहे. पैशासाठी वाटेल ते करायचे अशी परिस्थिती झालेली आहे. माणसे पैशासाठी सैतानसुद्धा होतात. परमेश्वर की सैतान या दोन्ही गोष्टी ज्ञानानेच ठरतात.मुळात ज्ञान हाच देव किंवा ज्ञान हाच विठ्ठल असे म्हणतात तेव्हा ज्ञान म्हणजे काय हे समजून घेतले पाहिजे. ज्ञान हे आपल्या ठिकाणी मुळातच असते. आपले स्वरूपच ज्ञान आहे. सत् चित् आनंद म्हणतात तेव्हा त्यात चित् म्हणजे जाणीव. सत् व आनंदाच्यामध्ये चित् असते. चित् म्हणजेच दिव्य ज्ञान, चित् म्हणजेच दिव्य जाणीव एवढे लक्षांत ठेवले, तर चित् म्हणजे दिव्य जाणीव व हेच आपले स्वरूप आहे व ते आज गढूळ झालेले आहे. किती व कसे गढूळ झालेले आहे हे उदाहरण देऊन सांगतो. गंगा नदी किती गढूळ झालेली आहे. हरिद्वारला गेलो, तर गंगेचे पाणी पिऊ नये इतके गढूळ झालेले आहे. पंढरपूरला भीमा नदी व चंद्रभागा यांचे पाणी इतके गढूळ झालेले आहे की, लोक त्यात स्नान कसे करतात हे देवालाच ठाऊक. गंगा असो भीमा वा चंद्रभागा किंबहुना हिंदुस्थानातल्या सर्वच नद्या गढूळ झालेल्या आहेत. कारणे तुम्हाला माहीतच आहेत. कारखान्यांचे दूषित पाणी त्यात सोडले जाते. प्रेते सोडली जातात. नदीत सगळे घाण करतात. त्याचा परिणाम नद्यांचे पाणी गढूळ झालेले आहे. ज्या गंगेत स्नान केले असता आपण पवित्र होणार असे म्हणत होतो त्या गंगेत स्नान करण्याची आता सोय राहिलेली नाही. पाणी तेच पण ते पूर्वी शुद्ध होते व आज ते गढूळ झालेले आहे. अगदी तशीच आपल्या ठिकाणी जी दिव्य जाणीव होती ती दिव्य जाणीव आज गढूळ झालेली आहे. त्यामुळे ते ज्ञान देव राहिलेल नाही, तर ते दैत्य झालेले आहे. म्हणून जीवनविद्येने ही गोष्ट स्पष्ट केली की तुम्ही जे ज्ञान, विज्ञान व अज्ञान म्हणता त्यात ज्ञान हे महत्त्वाचे आहे. यासाठी शुद्ध सुंदर ज्यामुळे लोकांचे भले होईल असे ज्ञान मिळणे व अशा ज्ञानाचा सदुपयोग करणे महत्त्वाचे आहे. या अशा शुद्ध ध्यानाची उपासना केली पाहिजे, कारण जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत जग सुखी होणार नाही. हे करायचे की नाही हे आपणच ठरवायचे म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार.

फीड फीडबर्नर 20 Nov 2025 9:30 am

भारत-अमेरिकेत शस्त्रांसंबंधी मोठा करार ; ९३ दशलक्ष डॉलर्सच्या लष्करी पॅकेजला मंजुरी

US-India defence deal। भारत आणि अमेरिका यांच्यात मागील काही दिवसांपासून तणावाचे वातावरण आहे. रशियाकडून तेल खरेदीचा भारताला ट्रम्प टॅरिफच्या माध्यमातून फटका बसला. मात्र आता दोन्ही देशात एक मोठा करार झाल्याची माहिती समोर येत आहे. अमेरिकेने भारतासाठी ९३ दशलक्ष डॉलर्सच्या लष्करी पॅकेजला मंजुरी दिली आहे, ज्यामुळे भारताला अत्यंत धोकादायक शस्त्रे मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या […] The post भारत-अमेरिकेत शस्त्रांसंबंधी मोठा करार ; ९३ दशलक्ष डॉलर्सच्या लष्करी पॅकेजला मंजुरी appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 20 Nov 2025 9:20 am

गृहनिर्माण धोरणात भाडेतत्त्वावरील घरांना प्राधान्य

म्हाडाच्या विकासकांना १०० टक्के मालमत्ता कर माफ'मुंबई : मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) ग्रोथ हबअंतर्गत म्हाडाने २०३० पर्यंत आठ लाख घरे बांधण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या आठ लाख घरांमध्ये भाडेतत्त्वावरील घरांचाही समावेश आहे. खासगी विकासकांनी २०३० पर्यंत मोठ्या संख्येने भाडेतत्वावरील गृहप्रकल्प राबवावेत यासाठी म्हाडाने स्वतंत्र धोरण तयार केले आहे. या धोरणाअंतर्गत विकासकांना अनेक सवलती देण्यात आल्या आहेत.मुंबईत असे प्रकल्प राबवणाऱ्या विकासकांना ०.५, तर एमएमआरमधील प्रकल्पासाठी अतिरिक्त ०.३ असा प्रोत्साहनात्मक चटईक्षेत्र निर्देशांक (एफएसआय) देण्यात येणार आहे. त्याचबरोबर मालमत्ता करात पहिल्या पाच वर्षांमध्ये १०० टक्के, तर पुढील पाच वर्षांमध्ये ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे. भाडेतत्वावरील गृहनिर्मितीचे धोरण म्हाडाने राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविले आहे. मुंबईसह राज्यातील अपुऱ्या घरांचा प्रश्न गंभीर बनला असून भाडेतत्वावरील गृहनिर्मिती त्यावर चांगला पर्याय ठरू शकतो असा मुद्दा उपस्थित करीत राज्य सरकारने नव्या गृहनिर्माण धोरणात भाडेतत्वावरील घरांच्या निर्मितीला प्राधान्य दिले. त्यानुसार म्हाडाने एमएमआर ग्रोथ हबअंतर्गत आठ लाख घरांपैकी काही घरांची निर्मिती भाडेतत्त्वावरील गृहनिर्मितीच्या माध्यमातून करण्याचा निर्णय घेतला आहे.एमएमआरसह राज्यभरातही भाडेतत्त्वावरील गृहनिर्मिती करण्याचाही निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार म्हाडाने भाडेतत्वावरील गृहनिर्मितीसाठी स्वतंत्र धोरण तयार केले आहे. या धोरणाच्या प्रारुप मसुद्याचे सादरीकरण बुधवारी एका चर्चासत्रात म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी केले. या मसुद्यावर विकासकांच्या सूचना जाणून घेऊन धोरणात आवश्यक ते बदल करण्यात येणार असल्याचे जयस्वाल यांनी सांगितले.या धोरणानुसार खासगी विकासकांना भाडेतत्वावरील गृहनिर्मितीकडे आकर्षित करण्यासाठी अनेक सवलती देण्यात आल्या आहेत. मुंबईत भाडेतत्वावरील गृहप्रकल्प राबविणाऱ्या विकासकाला अतिरिक्त ०.५, तर एमएमआरमध्ये असा प्रकल्प राबविणाऱ्या विकासकाला अतिरिक्त ०.३ चटईक्षेत्र निर्देशांक (एफएसआय) मिळणार आहे.बांधकाम शुल्क कमीत कमी लागावे आणि विकासकांना असे प्रकल्प परवडावे या उद्देशाने त्यांना अनेक सवलती देण्यात आल्याचे म्हाडाकडून सांगण्यात आले. त्यानुसार विकासकांसाठी मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क नाममात्र, केवळ ५०० रुपये ठेवण्यात आले आहे, तर राज्य वस्तू आणि सेवा कर पूर्णपणे माफ करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त पहिल्या १० वर्षांसाठी १०० टक्के आयकर सवलत लागू होणार आहे. विकासकांना सहा टक्के व्याजदराने या प्रकल्पासाठी कर्ज देण्याचीही शक्यता आहे. त्याचवेळी मालमत्ता करात पहिल्या पाच वर्षांसाठी १०० टक्के, तर पुढील पाच वर्षांकरिता ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे. यासंबंधीचे धोरण राज्य सरकारने मंजूर केल्यानंतर त्याची म्हाडाकडून राज्यभर अंमलबजावणी केली जाणार आहे.

फीड फीडबर्नर 20 Nov 2025 9:10 am

मॅरेथॉनसाठी मध्य रेल्वेच्या विशेष लोकल

मुंबई : पश्चिम नौदल कमांड (डब्ल्यूएनसी) नेव्ही हाफ मॅरेथॉननिमित्त मध्य रेल्वेने शनिवारी रात्री विशेष लोकल चालविण्याचा निर्णय घेतला असून मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावरून प्रत्येकी एक लोकल धावणार आहे. यामुळे मॅरेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना दिलासा मिळेल. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील कल्याण – सीएसएमटी विशेष लोकल शनिवारी रात्री २.३० वाजता कल्याण येथून सुटेल. ही लोकल सीएसएमटी येथे पहाटे ४ वाजता पोहोचेल, तर हार्बर मार्गावरील पनवेल – सीएसएमटी विशेष लोकल शनिवारी रात्री २.४० वाजता पनवेल येथून सुटेल. ही लोकल सीएसएमटी येथे पहाटे ४ वाजता पोहोचेल. या दोन्ही विशेष लोकल धीम्या असून सर्व स्थानकांमध्ये थांबतील, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली. पश्चिम रेल्वेवरील विरार येथून शनिवारी रात्री २.३० वाजता विशेष लोकल सुटेल. ही लोकल चर्चगेट येथे पहाटे ४.१२ वाजता पोहचेल. ही लोकल धीम्या मार्गावर धावणार असून सर्व स्थानकात थांबा घेतील, अशी माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाने दिली.

फीड फीडबर्नर 20 Nov 2025 9:10 am

मुलुंडमध्ये शत प्रतिशत भाजप

युतीमध्ये या विधानसभा मतदार संघात शिवसेनेच्या वाट्याला जाणार नाही एकही प्रभागसचिन धानजी मुंबई : उत्तर पूर्व अर्थात ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघातील मुलुंड विधानसभा मतदार हा संघ भाजपचा बालेकिल्ला असून या विधानसभेत भाजपचे सहा नगरसेवक आहेत. या विधानसभेत भाजप शतप्रतिशत आहे. त्यामुळे शिवसेना आणि भाजपची युती झाल्यास या विधानसभेत शिवसेनेला कुठेच शिरकाव करण्याची संधी नाही. या विधानसभेत युती नसल्यासच शिवसेनेला जागा मिळवता येतील; परंतु मुलुंडमधील विधानसभेत सहा प्रभागांमध्ये उबाठाच्या वाट्याला चार ते पाच जागा जाण्याची शक्यता असून मनसेला एका किंवा अधिक ताणल्यास दुसऱ्या जागेवर उमेदवार उभा करण्याची संधी मिळेल. मात्र, या सहाही प्रभागांमध्ये काँग्रेसचे उमेदवार उभे केले जाण्याची शक्यता आहे.शिवसेना भाजप युती असताना मुलुंड पश्चिमेला भाजपची दावेदारी आणि मुलुंड पुर्वेचे प्रभाग शिवसेनेच्या वाट्याला येत होते. पण सन २०१७च्या निवडणुकीत शिवसेना भाजप युती तुटली आणि भाजपने स्वबळावर निवडणूक लढवताना मुलुंडमधील सहाही प्रभागांमध्ये आपले उमेदावार उभे केले आणि सहाही उमेदवार निवडून आणले. भाजपचे सहा नगरसेवक असल्याने या विधानसभेत युतीमध्ये शिवसेनेच्या वाट्याला एकही जागा येणार नाही, तर याठिकाणी शतप्रतिशत भाजपच दिसून येणार आहे.विधानसभा क्षेत्रातील संभाव्य उमेदवार : मुलुंड विधानसभासंभाव्य आणि इच्छुक उमेदवारप्रभाग क्रमांक १०३ (महिला प्रवर्ग)भाजप : हेतल जोबनपुत्रा, उबाठा : हेमलता सुकाळे,प्रभाग क्रमांक १०४ (सर्व साधारण खुला प्रवर्ग)भाजपा : प्रकाश गंगाधरे, उबाठा : सिताराम खांडेकर, शैलेश पवार, काँग्रेस: उत्तम गीते, राष्ट्रवादी काँग्रेस : अमित सुरेश पाटीलप्रभाग क्रमांक १०५ (ओबीसी महिला प्रवर्ग)भाजपा : नम्रता वैती, दिपिका घाग, उबाठा : ज्योती वैती, रसिका तोंडवळकर, शिवसेना : सुजाता पाठक, काँग्रेस: मालती पाटीलप्रभाग क्रमांक १०६ (सर्वसाधारण खुला प्रवर्ग)भाजपा : प्रभाकर शिंदे, उबाठा : सागर देवरे, अभिजित चव्हाण, अमोल संसारे, अनिष शेडगे, मनसे: सत्यवान दळवी, काँग्रेस : संजय घरत, कैलास पाटील,प्रभाग क्रमांक १०७ (सर्वसाधारण खुला प्रवर्ग)भाजपा : समिता कांबळे, निल सोमय्या, केतन कोटक, उबाठा : दिनेश जाधव, काँग्रेस : अनु शेट्टी, अपक्ष : विरल शाहप्रभाग क्रमांक १०८ (ओबीसी महिला प्रवर्ग)भाजपा : दिपिका घाग, उबाठा : शुभांगी केणी, नंदिनी सावंत, मनसे: राजेंद्र देशमुखलोकसभेतील मुलुंड विधानसभेतील मतदान :विद्यमान खासदार संजय पाटील : ५५,९७९पराभूत उमेदवार मिहिर कोटेचा : १,१६, ४२१विधानसभेतील मतदान :आमदार मिहिर कोटेचा : १,३१,५४९पराभूत उमेदवार काँग्रेसचे राकेश शेट्टी : ४१,५१७प्रभाग क्रमांक १०३हा प्रभाग आता महिला राखीव झाला असून मागील दोन निवडणुकांमध्ये तो सर्वसाधारण खुला प्रवर्गाकरता आरक्षित झाला होता. त्याआधी तो महिला आरक्षित होता. या मतदार संघातून भाजपचे मनोज कोटक दोन वेळा निवडून आले होते. पण हा प्रभाग महिला आरक्षित झाल्याने याठिकाणी भाजप महिला पदाधिकारी हेतल जोबनपुत्रा यांचे नाव चर्चेत आहे, तर या प्रभागावर उबाठाचा दावा असल्याने माजी नगरसेविका हेमलता सुकाळे यांचे नाव चर्चेत आहे, तर काँग्रेसच्यावतीने माजी महापौर आर. आर. सिंह यांच्या कुटुंबातून त्यांची सून निवडणूक रिंगणात उतरण्याचीही शक्यता आहे.प्रभाग १०४हा प्रभाग सर्वसाधारण खुला प्रवर्गकरता राखीव झाला आहे. या प्रभाग मागील दोन निवडणूक ओबीसीकरिता राखीव झाला असून सन २००७ नंतर प्रथमच हा प्रभाग खुला झाला आहे. या मतदार संघातून भाजपचे प्रकाश गंगाधरे हे निवडून येत आहेत. यंदाही त्यांची पक्की दावेदारी असली तरी किरीट सोमय्यांच्या मुलाचा प्रभाग ओबीसी महिला झाल्याने निलसाठी हा प्रभाग मोकळा करून तर दिला जाणार नाही ना असा स्थानिकांना प्रश्न पडला आहे. या प्रभागात उबाठाची प्रबळ दावेदारी असून त्यांच्याकडून सिताराम खांडेकर, शैलेश पवार यांच्या नावाची चर्चा आहे, तर काँग्रेसच्यावतीने माजी नगरसेवक सुरेश पाटील यांचे पुत्र अमित किंवा अन्य सदस्य निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहे.प्रभाग क्रमांक १०५या प्रभागातून भाजपच्या रजनी केणी निवडून आल्या होत्या; परंतु काही महिन्यांपूर्वीच त्यांचे देहावसान झाले. पण हा प्रभाग आता ओबीसी महिलाकरीता राखीव झाला आहे. सन २०१२ वगळता हा प्रभाग महिला राखीव झालेला आहे. सन २०१२ मध्ये हा प्रभाग ओबीसी करता राखीव झाला होता. या प्रभागातून भाजपच्यावतीने दिपिका घाग आणि नम्रता वैती यांच्या नावाची चर्चा आहे, हा प्रभाग उबाठालाच जाणार असून याठिकाणी त्यांच्याकडून ज्योती वैती, रसिका तोंडवळकर यांच्या नावाची चर्चा आहे. या प्रभागात शिवसेनेची दावेदारी असली तरी भाजपची परंपरागत जागा असल्याने सोडली जाणार नाही. मात्र, शिवसेनेकडून माजी नगरसेविका सुजाता पाठक यांचेही नाव इच्छुकांच्या यादीत आहे.प्रभाग १०६हा प्रभाग सर्वसाधारण खुला प्रवर्गकरता राखीव झाला आहे. हा प्रभाग सन २०१२ ओबीसी झाला होता. पण इतर प्रत्येक निवडणुकीत तो खुलाच झालेला आहे. या प्रभागातून मनसेचे सत्यवान दळवी यांचा प्रबळ दावेदारी असली तरी उबाठाकडे इच्छुकांची मोठी यादी आहे. यात मनसेतून उबाठात आलेले सागर देवरे, खासदा संजयभाऊ पाटील यांचे अत्यंत विश्वासू अभिजित चव्हाण तसेच अमोल संसारे, अनिष शेडगे यांची नावे चर्चेत आहे. पण देवरे हे आदित्य आणि वरुण सरदेसाई यांचे अतिविश्वासू आणि मित्र असल्याने देवरे यांची उमेदवारी पक्की मानली जात आहे. तर काँग्रेसच्यावतीने संजय घरत आणि कैलास पाटील यांची नावे चर्चेत आहेप्रभाग १०७हा प्रभाग सर्वसाधारण खुला प्रवर्गकरीता राखीव झाला. यापूर्वी दोन निवडणुकीत हा प्रभाग महिला आरक्षित झाला. भाजपाच्या समिता कांबळे या प्रभागातून निवडून आल्या असून महापालिका शाळांमध्ये योगा वर्ग सुरु करण्याची मागणी केल्याने त्या चर्चेत आल्या होत्या. हा प्रभाग खुला झाल्याने याठिकाणांहून समिता कांबळे यांची पक्की दावेदारी असली तरी खुला प्रवर्ग झाल्याने निल सोमय्या आणि माजी खासदार मनोज कोटक यांचे भाऊ केतन कोटक यांच्याही नावाची चर्चा आहे. तर उबाठाच्यावतीने दिनेश जाधव हे इच्छुक आहेत. या प्रभागातून शिवसेनेचे जगदीश शेट्टी हे इच्छुक असले तरी युतीमध्ये हा प्रभाग भाजपकडे राखला जाणार आहे. युती न झाल्यास शेट्टी हे शिवसेनेकडून प्रबळ दावेदार ठरतील . तर काँग्रेसच्यावतीने अनु शेट्टी हे इच्छुक असल्याची माहिती मिळत आहे.प्रभाग क्रमांक १०८या प्रभागातून भाजपचे किरीट सोमय्या यांचे पुत्र निल सोमय्या हे निवडून आले आहे. पण प्रभाग आता ओबीसी महिला करता राखीव झाला. मागील चार निवडणुकीत सर्व प्रकारची अनुसूचित जाती आणि जमाती वगळता सर्व प्रकारची आरक्षण पडली आहेत. हा प्रभाग भाजपचा असल्याने भाजपकडून जिल्हा महिला मोर्चा अध्यक्ष दिपिका घाग यांचे नाव आघाडीवर आहे. तर उबाठाकडून शुभांगी केणी, नंदिनी सावंत यांची नावे चर्चेत आहेत.

फीड फीडबर्नर 20 Nov 2025 9:10 am

उठाबशा काढायला सांगणाऱ्या शिक्षिकेला शिक्षा!

ममता यादववर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखलवसई : उठाबशा काढण्यास सांगितल्यामुळे वसईच्या एका शाळेतील मुलीचा मृत्यू झाल्याची घटना वसईत शुक्रवारी घडली होती. या प्रकरणी मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीनंतर उठाबशा काढण्यास सांगणाऱ्या शिक्षिकेविरोधात अखेर मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच तिला अटक देखील करण्यात आली आहे.श्री हनुमत विद्या मंदिर शाळेत इयत्ता सहावीमध्ये काजल (अंशिका) गौड ही वर्षीय मुलगी शिकत होती. ८ नोव्हेंबरच्या दिवशी सकाळी शाळेत पोहोचण्यास तिला उशीर झाल्याने उठाबशा काढण्याची शिक्षा तिला दिली होती. मात्र शाळेतून घरी गेल्यानंतर तिची तब्येत खालावली. त्यामुळे तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यानच शुक्रवारी रात्री तिचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी मुंबईच्या जे जे मार्ग पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली होती. त्यानंतर हा गुन्हा वालिव पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला होता. उठाबशा काढण्यास सांगितल्यामुळे मृत्यू झाल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबीयांनी केला होता, तर त्याबाबतची तक्रार त्यांनी वालिव पोलीस ठाण्यात नोंदविल्यानंतर पोलिसांनी उठाबशा काढण्यास सांगितलेल्या शिक्षिका ममता यादव यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला असून तिला अटक केल्याची माहिती वालिव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप घुगे यांनी दिली.काजल ही आधीच अशक्त होती. त्यातच तिला बॅगेचे ओझे खांद्यावर घेऊन १०० उठाबशा काढण्यास सांगितल्या. १०० उठाबशा काढण्याची क्षमता नसल्याची जाणीव असतानाही तिला शिक्षा दिल्याने तिची तब्येत खालावली आणि त्यातच तिचा मृत्यू झाल्याची फिर्याद तिच्या कुटुंबाने पोलिसांनी दिली आहे. तर दुसरीकडे मुलीच्या मृत्यू प्रकरणी तालुका आणि जिल्हा शिक्षण विभागातर्फे याबाबत चौकशी सुरू करण्यात आली आहे.

फीड फीडबर्नर 20 Nov 2025 9:10 am

पाणी भरण्याच्या वादातून तोंडावर 'स्प्रे'मारलेल्या व्यक्तीचे निधन

विरार : पाणी भरण्याच्या क्षुल्लक वादातून एका महिलेने आपल्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर मच्छर मारण्याचा स्प्रे फवारल्याची घटना विरारच्या जेपी नगरमध्ये मंगळवारी रात्री घडली. या घटनेत स्प्रे फवारलेल्या व्यक्तीचा गुदमरून मृत्यू झाला आहे. अर्नाळा सागरी पोलिसानी या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला असून स्प्रे फवारणाऱ्या महिलेला अटक केली आहे.विरार पश्चिमेच्या जेपी नगर येथील १५ क्रमांकाच्या इमारतीमध्ये उमेश पवार (५७) राहत होते. त्यांच्यासमोर राहणाऱ्या कुंदा तुपेकर (४६) यांच्याशी त्यांचा पाणी भरण्यावरून वाद होता. मंगळवारी रात्री या दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. त्यावेळी संतापलेल्या कुंदा यांनी मच्छर मारण्याचा स्प्रे उमेश पवार यांच्या तोंडावर मारला. त्यामुळे पवार हे बेशुद्ध होऊन खाली पडले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान अवघ्या दीड तासांमध्ये त्यांचा मृत्यू झाला. कुंदा तुपेकर या पेशाने परिचारिका आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून हा प्रकार घडल्याने विविध चर्चांना ऊत आला आहे.या प्रकरणी अर्नाळा पोलिसांनी सदोस्य मनुष्यधाचा गुन्हा दाखल करून कुंदा तुपेकर यांना अटक केली आहे. अशी माहिती अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पाटील यांनी दिली. तसेच अनेक ठिकाणी नळाला कमी दाबाने पाणी येते. पाणी भरण्याच्या वेळेचा भंग किंवा जास्त भांडी भरण्यावरूळावन दररोज नर वादावादी होते. हे वाद कधी कधी इतके विकोपाला जातात की, शेजारी एकमेकांच्या अंगावर धावून ताजात. ज्यामुळे क्षुल्लक वादातून गंभीर घटना घडतात.

फीड फीडबर्नर 20 Nov 2025 9:10 am

वाहनांच्या फिटनेस चाचणीसाठी १० पट जास्त शुल्क

ट्रकपासून बाईकपर्यंत २,५०० वरून थेट २५,००० रुपयेनवी दिल्ली : केंद्र सरकारने रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या माध्यमातून 'केंद्रीय मोटार वाहन नियम' अंतर्गत देशभरातील वाहनांच्या फिटनेस चाचणी शुल्कात बदल करण्यात आला असून, यामुळे, वाहनांच्या फिटनेस चाचणी शुल्कात जवळपास १० पट वाढ झाली आहे. हे नवीन शुल्क दुचाकी, तीन चाकी, क्वाड्रिसायकल, हलकी मोटार वाहने, मध्यम आणि जड वस्तू/प्रवासी वाहनांसह सर्व प्रकारच्या वाहनांना लागू होतात. ट्रकपासून बाईकपर्यंत २,५०० वरून थेट २५,००० करण्यात आला आहे. पूर्वी १५ वर्षांपेक्षा जुनी गाडी असेल तरच फिटनेस टेस्टसाठी जास्त फी आकारली जात होती. मात्र नवे नियम लागू झाल्यानंतर गाडी १० वर्षांची झाली की वाढीव फी लागू होणार आहे. नवीन व्यवस्थेनुसार गाड्यांना तीन गटांमध्ये विभागण्यात आले असून, १० ते १५ वर्ष, १५ ते २० वर्ष, २० वर्षांपेक्षा जास्त गाडीचे वय वाढेल तसा फिटनेस टेस्टचा खर्चही वाढत जाणार आहे.या नवीन नियामांचा सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे उच्च फिटनेस शुल्क लागू करण्यासाठी वाहनाच्या वयाचे निकष १५ वर्षांवरून १० वर्षे करण्यात आले आहेत. याचा अर्थ असा की १० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या वाहनांनाही आता वाढीव शुल्क आकारले जाईल.सरकारने आता वाहनांच्या वयानुसार (१० ते १५ वर्षे, १५ ते २० वर्षे आणि २० वर्षांपेक्षा जास्त) शुल्क आकारण्यासाठी तीन वेगवेगळ्या श्रेणी लागू केल्या आहेत. वाहनाचे वय वाढत असताना, शुल्क त्या प्रमाणात वाढेल, १५ वर्षांपेक्षा जुन्या वाहनांना एकच शुल्क लागू करण्याच्या मागील पद्धतीपेक्षा वेगळे.दोन चाकीपासून ट्रकपर्यंत सर्व वाहनांसाठी दर वाढले असून, २,५०० वरून थेट २५,००० रुपये करण्यात आल्याने हा सर्वात मोठा धक्का व्यावसायिक वाहनांना बसणार आहे. यात २० वर्ष जुने ट्रक/बस २,५००-२५,०००रुपये, २० वर्ष जुने मीडियम कमर्शियल वाहन असेल तर १,८००-२०,००० रुपये असेल. २० वर्ष जुने लाइट मोटर वाहनाला १५,००० रुपये तर २० वर्ष जुनी ऑटोरिक्षा ७,००० रुपये आकारले जाणार आहे. २० वर्ष जुनी मोटरसायकल ६००- २,००० रुपये, १५वर्षांखालील गाड्यांचीही फी वाढली असून, यात मोटरसायकल ४०० रुपये, लाइट मोटर वाहन (LMV) ६०० रुपये, मीडियम/हेवी कमर्शियल वाहनासाठी १,००० रुपये आकारले जाणार असून, ही फीही आधीपेक्षा जास्त आहे.

फीड फीडबर्नर 20 Nov 2025 9:10 am

आधार कार्ड पुन्हा एकदा बदलणार

नाव असेल ना पत्ता, फोटोसोबत असेल क्युआर कोडनवी दिल्ली : सर्व आर्थिक व्यवहारांसाठी आधारकार्डशिवाय पर्याय नाही. इतकं महत्त्वाचं कागदपत्र असल्यामुळे, त्याचा गैरवापर होण्याचा धोका लक्षात घेऊन, तुमच्या आधारकार्डला अधिक सुरक्षित करण्यासाठी सरकारनं पुन्हा एकदा बदल केला आहे. नवीन आधारकार्डवर फक्त तुमचा फोटो आणि एक क्यूआर कोड असेल. यामध्ये सध्या छापलेले नाव, पत्ता आणि आधार क्रमांक यांसारखे तपशील काढून टाकले जातील. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण लोकांच्या माहितीचा गैरवापर रोखण्यासाठी आणि ऑफलाइन पडताळणीला प्रोत्साहन मिळू नये यासाठी, कार्डधारकाच्या फोटोसह आणि क्यूआर कोडसह आधारकार्ड जारी करण्यावर विचार करत आहे.आधार अधिनियमानुसार, कोणत्याही व्यक्तीचा आधार क्रमांक किंवा बायोमेट्रिक माहिती ऑफलाइन पडताळणीसाठी जमा केले जाऊ शकत नाही, वापरली जाऊ शकत नाही किंवा संग्रहित केली जाऊ शकत नाही. तरीसुद्धा अनेक संस्था, जसे की हॉटेल, कार्यक्रम आयोजक इत्यादी, आधारकार्डच्या फोटोकॉपी गोळा करतात आणि स्टोअर करतात. यामुळे त्यांच्यासोबत फसवणूक होण्याची किंवा या आधार माहितीचा गैरवापर होण्याची शक्यता कायम राहते. यापासून बचाव करण्यासाठी, आधारमधील सर्व माहिती आता गोपनीय ठेवण्याची तयारी सुरू आहे, जेणेकरून ऑफलाइन पडताळणी थांबवून लोकांच्या माहितीचा गैरवापर रोखता येईल.आधार कायद्यानुसार, एखाद्या व्यक्तीचा आधार क्रमांक किंवा बायोमेट्रिक माहिती ऑफलाइन पडताळणीसाठी एकत्र केली, वापरली किंवा साठवली जाऊ शकत नाही. तरीही, अनेक संस्था आधार कार्डच्या छायाप्रती गोळा आणि साठवतात. यामुळे फसवणूक किंवा गैरवापर होण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी, आधार माहिती गोपनीय ठेवली जात आहे.आधार पडताळणीचे नियम काय? देशात आधारची पडताळणी धारकाच्या सहमतीशिवाय केली जाऊ शकत नाही. कोणतीही संस्था असं केल्यास, तिच्यावर ₹१ कोटींपर्यंतचा दंड लावला जाऊ शकतो. ही सहमती बायोमेट्रिक किंवा इलेक्ट्रॉनिक स्वरूपातच घेतली जाईल, जी धारकाकडून ओटीपी, फिंगरप्रिंट, आयरिस इत्यादीद्वारे घेतली जाऊ शकते. फक्त यूआयडीआयद्वारे अधिकृत संस्था आणि बँकाच आधारची पडताळणी करू शकतात. युजरला हवं असल्यास, तो आपला बायोमेट्रिक डेटा लॉक करू शकतो आणि तेव्हा फक्त ओटीपीच काम करेल. जर कोणी आधारच्या डेटाचा गैरवापर केला, तर त्याच्यावरही मोठा दंड लावला जाऊ शकतो

फीड फीडबर्नर 20 Nov 2025 9:10 am

माँ नर्मदा... एक अध्यात्मिक परिक्रमा!!

मनाचा गाभारा : अर्चना सरोदेत्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे!!आजच्या भागात आपण नर्मदा परिक्रमा कोणकोणत्या प्रकारे करता येते हे जाणून घेणार आहोत. खरं सांगायचं झालं तर मला पण नर्मदा परिक्रमा करायची आहे किंवा मी नर्मदा परिक्रमा करणार आहे असं म्हटलं आणि लगेच आपण परिक्रमेला निघालो किंवा परिक्रमा केली असं होतं नाही, तर त्यासाठी तुम्हाला ती इच्छा मनापासून व्हायला हवी. तुमच्या मनाच्या गाभाऱ्यातून जेव्हा ही इच्छा ध्वनी निघते ती मय्याने ऐकायला हवी, त्यासाठीची तुमची जी तळमळ असते ती मय्यापर्यंत पोहोचायला हवी. कारणं जोपर्यंत मय्याला भेटण्याची ओढ मय्यापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत तिचं बोलावणं तुम्हाला येत नाही आणि जोपर्यंत तिचं बोलावणं येतं नाही तोपर्यंत तुम्ही परिक्रमेला जाऊ शकत नाही. मग तुम्ही कितीही ठरवलं तरी या ना त्या कारणाने ते लांबणीवर पडतं. असो. दुसरं म्हणजे तुमच्या मनात समर्पित भाव असायला हवा. तुम्ही स्वतःला जेव्हा तिच्या चरणी समर्पित करता तेव्हा तिची तुमच्यावर भरभरून कृपा होते.नर्मदा मय्याची परिक्रमा कोणकोणत्या प्रकारे करता येते ते बघूया. पहिल्या प्रकारात तुम्ही ही परिक्रमा अमरकंटक, ओंकारेश्वर, नेमावर किंवा अन्य कोणत्याही घाटापासून उचलू शकता. तसं बघायला गेलं तर अमरकंटक हे मय्याचे उद्गम स्थान असल्याने खरी परिक्रमेची सुरुवात तिथूनच करतात; परंतु अमरकंटक ते अमरकंटक परिक्रमा केल्यानंतर जल अर्पण करायला पुन्हा ओंकारेश्वरला यावे लागत असल्याने सोयीस्करदृष्ट्या बहुतेक जण ओंकारेश्वराहून परिक्रमा सुरू करतात आणि तिथेच संकल्प सोडून परिक्रमा पूर्ण करतात. तुम्हाला नर्मदा मैय्याला न ओलांडता संपूर्ण परिक्रमा पूर्ण करावी लागते. तुम्हाला ओंकारेश्वर दक्षिण तट इथून परिक्रमा सुरु केल्यावर मिठीतलाई वरुन समुद्र तट परिवर्तन करुन परत उत्तर तटावर ओंकारेश्वर इथेच परिक्रमा पूर्ण करावी लागते. या परिक्रमे दरम्यान तुम्ही जर नर्मदा मय्याला ओलांडून परिक्रमा केलीत तर तुमची परिक्रमा खंडित होते.दुसरा प्रकार म्हणजे जलहरी परिक्रमा. जलहरी परिक्रमा ही दोन्ही तटांची दोन वर्तुळात केली जाते. ती सामान्यतः अमरकंटकपासून सुरू होते. जलहरी परिक्रमा करणारे बहुतेक लोक अमरकंटकपासून सुरुवात करतात. या परिक्रमेत प्रथम अमरकंटकपासून सुरुवात करून दक्षिण तीरावरून अमरकंटकहून विमलेश्वरपर्यंत किनाऱ्याने पुढे जातात; परंतु समुद्र ओलांडत नाहीत आणि तिथून परत अमरकंटकला परत येतात. त्यानंतर अमरकंटकहून उत्तरतटावर समुद्राकडे जाऊन नंतर मिठी तलाई मार्गे अमरकंटकला परत येतात. तेव्हा सुद्धा समुद्र ओलांडत नाहीत. ही प्रदक्षिणा दोनदा पूर्ण होते. याला जलहरी परिक्रमा म्हणतात.तिसरा प्रकार म्हणजे खंड परिक्रमा. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेकांना वेळेअभावी परिक्रमा करता नाही येत. म्हणून यात तुमच्या वेळेनुसार किंवा सुट्टीनुसार तुम्ही ही परिक्रमा करू शकता. अगदी आठ, पंधरा दिवस किंवा महिनाभर सुट्टी काढून तुम्ही ही परिक्रमा करून परत कामावर जाऊ शकता. त्यानंतर, जेव्हा जेव्हा तुम्हाला सुट्टी मिळेल तेव्हा तुम्ही जिथे परिक्रमा अर्धवट सोडली होती तिथून परत तेवढ्या दिवसांसाठी पुढे ती परिक्रमा सुरू करू शकता. ही परिक्रमा टप्प्याटप्प्यात होते, म्हणूनच या परिक्रमेला ‘खंड परिक्रमा’ असे नाव पडले आहे.नर्मदा परिक्रमेच्या उप परिक्रमासुद्धा आहेत. पंचक्रोशी आणि उत्तरवाहिनी परिक्रमा. पंचक्रोशी यात्रेबद्दल बोलायचे झाले, तर वेगवेगळ्या ठिकाणी अनेक पंचक्रोशी आहेत. प्रत्येक ठिकाणची वेगळी पंचक्रोशी आहे. उदाहरणार्थ, अमरकंटकला वेगळी पंचक्रोशी आहे, दिंडोरीला वेगळी पंचक्रोशी आहे, मंडाला येथे वेगळी पंचक्रोशी आहे आणि जबलपूरला वेगळी पंचक्रोशी आहे. पंचक्रोशी यात्रा वेगवेगळ्या पंचक्रोशी प्रदेशांमध्ये आयोजित केली जाते. ही यात्रा पाच दिवसांची असते. विशेष म्हणजे ती एकादशीला सुरू होते आणि पाच दिवसांनी पौर्णिमेला किंवा अमावस्येला संपते. यामध्ये दररोज ५ गाव ५ दिवसांत चालणे व २५ कोस अंतर पार करणे समाविष्ट आहे. ही एक छोटीशी यात्रा असते आणि साधारणपणे अशी मान्यता आहे की, ज्यांना नर्मदा मय्याची मोठी परिक्रमा करता येत नाही ते पंचक्रोशी परिक्रमा करतात. उत्तर वाहिनी परिक्रमा ही एक किंवा दोन दिवसांची असते. जरी नर्मदा सामान्यतः पश्चिमेकडे वाहते, तरी काही ठिकाणी ती सर्व दिशांना वाहते. अंदाजे पाच ते सहा ठिकाणी नर्मदा उत्तरेकडे अनेक किलोमीटर वाहते. शास्त्रांमध्ये असे नमूद आहे की, उत्तरेकडे वाहत जाणारी नर्मदा नदी एका काठापासून ५ कोसापेक्षा जास्त अंतरावर वाहते. उत्तरेकडे वाहून जाणारी नर्मदा नदी तीन ठिकाणी प्रवास करू शकते. यापैकी एक ठिकाण मंडाला येथील व्यास नारायणपासून संपूर्ण अंतरावर पसरलेले आहे. दुसरे ठिकाण नर्मदा बांध प्रकल्पात पाण्याखालचा भाग म्हणून घोषित केले आहे आणि तिसरे ठिकाण हे गुजरातमधील तिलकवाडा येथे आहे, जिथे उत्तरवाहिनी यात्रा केली जाते. टिळकवाड्यातील उत्तरवाहिनी यात्रा सर्वात प्रसिद्ध आहे. उत्तरवाहिनी यात्रा चैत्र महिन्यात केली जाते. असे मानले जाते की, उत्तरवाहिनी नर्मदा नदीला परिक्रमा केल्याने पूर्ण प्रदक्षिणा केल्यासारखेच पुण्य मिळते. चैत्र महिन्यात, गुजरातमधील तिलकवाडा येथे लाखो लोक उत्तरवाहिनी परिक्रमा करण्यासाठी जमतात. गेल्या चार वर्षांपासून मंडाला येथे उत्तरवाहिनी परिक्रमा आयोजित केली जात आहे. गेल्या ४ वर्षांपासून मांडला येथे उत्तरवाहिनी परिक्रमा सुरू झाली आहे. कारण यावर्षी सुमारे १४ ते १५ राज्यांमधून, सुमारे २५०० ते ३००० लोक मोठ्या संख्येने मांडला येथे आले होते. ज्यांनी उत्तरवाहिनी परिक्रमा केली आहे. ती चैत्र महिन्यात दोन दिवसांत होते. मंडालापासूनचा उत्तरवाहिनी परिक्रमा मार्ग ३९ किलोमीटर आहे. एकाच दिवसात पार करणे शक्य नाही म्हणून ते दोन दिवसांत पूर्ण केले जाते. गुजरातच्या रामपुरापासून तिलकवाड्यापर्यंत उत्तरवाहिनी परिक्रमेचे अंतर २२ कि.मी. आहे, तर अशा प्रकारे नर्मदा नदीची परिक्रमा आपण करू शकतो.नर्मदे हर... नर्मदे हर... नर्मदे हर

फीड फीडबर्नर 20 Nov 2025 9:10 am

Madhuri Dixit: ‘मिसेस देशपांडे’मध्ये दिसणार माधुरी दीक्षित; धकधक गर्लचा नवा अंदाज चाहत्यांच्या पसंतीस

Madhuri Dixit: बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित सध्या तिच्या आगामी वेब सीरिज ‘मिसेस देशपांडे’मुळे चर्चेत आहे. या शोमधील तिचा फर्स्ट लुक समोर आला असून तो पाहून चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे. फर्स्ट लुकमध्ये माधुरीचा अनफिल्टर्ड लूक फर्स्ट लुकमध्ये माधुरी आपला मेकअप आणि दागिने काढताना दिसते. पुढच्या फ्रेममध्ये तिचा एक साधा, अनफिल्टर्ड आणि नैसर्गिक अवतार दिसतो. […] The post Madhuri Dixit: ‘मिसेस देशपांडे’मध्ये दिसणार माधुरी दीक्षित; धकधक गर्लचा नवा अंदाज चाहत्यांच्या पसंतीस appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 20 Nov 2025 9:09 am

शिंदेंनी वाचला तक्रारींचा पाढा; ‘या’दोन बड्या नेत्यांचं घेतलं नाव, राजधानीत काय घडलं? आतली ‘चर्चा’समोर

Eknath Shinde : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची काल सायंकाळी दिल्लीत जावून भेट घेतली. शिंदे आणि शाह यांच्यात ५० मिनिटे चर्चा झाली असून, शिंदेंनी अमित शाह यांच्यापुढे तक्रारींचा पाढा वाचला, अशी माहिती समोर आली आहे. शिंदे गटातील मंत्र्यांच्या रंगलेल्या नाराजी नाट्यानंतर ही भेट अत्यंत महत्वपूर्ण मानली जात […] The post शिंदेंनी वाचला तक्रारींचा पाढा; ‘या’ दोन बड्या नेत्यांचं घेतलं नाव, राजधानीत काय घडलं? आतली ‘चर्चा’ समोर appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 20 Nov 2025 9:08 am

देशात 5 बॉम्बस्फोट घडवणाराही अल-फलाहचा विद्यार्थी:2007 मध्ये बीटेक केले, त्याच वर्षी गोरखपूर स्फोट घडवला, अजूनही फरार

देशात 5 बॉम्बस्फोट घडवून आणणारा दहशतवादी मिर्झा शादाब बेग हादेखील फरिदाबाद येथील अल-फलाह विद्यापीठाचा विद्यार्थी आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या एका अहवालातून हा खुलासा झाला आहे, ज्याची प्रत भास्करकडे आहे. १० नोव्हेंबर रोजी दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ बॉम्बस्फोट घडवून आणणारा दहशतवादी डॉ. उमर नबी देखील येथे प्राध्यापक होता. भास्करने विद्यापीठाची चौकशी केली तेव्हा असे आढळून आले की गेल्या १८ वर्षांपासून फरार असलेला दहशतवादी मिर्झा शादाब बेगने २००७ मध्ये याच विद्यापीठातून बी.टेक केले होते. तपासादरम्यान, आम्हाला दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाकडून मिळालेला एक गुप्तचर अहवाल मिळाला, ज्यामध्ये शादाबच्या दहशतवादी कारवायांची माहिती आहे. या स्फोटानंतर दिल्ली पोलिसांनी विद्यापीठाविरुद्ध दोन एफआयआर दाखल केले आहेत. ईडीचे छापे सुरू आहेत. एनएएसीकडून कारणे दाखवा नोटीस जारी करण्यात आली आहे. अटक करण्यात आली आहे आणि ७० हून अधिक लोकांची चौकशी सुरू आहे. बेग कोणत्या दहशतवादी घटनांमध्ये सहभागी होता हे क्रमाने जाणून घ्या जयपूर बॉम्बस्फोट, मे २००८ बेग स्फोटके गोळा करण्यासाठी उडुपीला गेला होता. उत्तर प्रदेशातील आझमगड येथील रहिवासी मिर्झा शादाब बेग हा इंडियन मुजाहिदीनचा एक प्रमुख सदस्य होता आणि २००८ च्या जयपूर मालिकेतील स्फोटांमध्ये त्याचा सहभाग होता. बेगने स्फोटांसाठी स्फोटके गोळा करण्यासाठी कर्नाटकातील उडुपी येथे प्रवास केला. उडुपीमध्ये, बेगने रियाज भटकळ आणि यासीन भटकळ यांना मोठ्या प्रमाणात डेटोनेटर्स आणि बेअरिंग्ज पुरवले, जे आयईडी असेंबल करण्यासाठी वापरले जात होते. बेगला बॉम्बच्या अभियांत्रिकीचे चांगले ज्ञान होते, त्यांनी इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले होते, असेही म्हटले जाते. अहमदाबाद-सुरत स्फोट, जुलै २००८ १५ दिवसांपूर्वी अहमदाबादला पोहोचला २००८ मध्ये गुजरातमधील अहमदाबाद आणि सुरत येथे बॉम्बस्फोट झाले. बेगचाही यामध्ये सहभाग होता. तो बॉम्बस्फोटांच्या १५ दिवस आधी अहमदाबादमध्ये आला होता. त्याने प्रथम संपूर्ण शहराची रेकी केली. त्याने कयामुद्दीन कपाडिया, मुजीब शेख आणि अब्दुल रझीक यांच्यासह तीन पथके तयार केली. अब्दुल रझीकच्या टीममध्ये आतिफ अमीन आणि मिर्झा शादाब बेग यांचाही समावेश होता. बेगने स्फोटांसाठी सर्व रसद व्यवस्था केली. स्फोटांपूर्वी बेगने बॉम्ब तयार केले आणि प्रशिक्षण दिले. गोरखपूर बॉम्बस्फोट, २००७ स्फोटांची मालिका २००७च्या गोरखपूर बॉम्बस्फोटात बेगचा सहभाग होता, ज्यामध्ये सहा लोक जखमी झाले होते. इंडियन मुजाहिदीन (आयएम) शी त्याचे नाव जोडल्यानंतर गोरखपूर पोलिसांनी त्याची मालमत्ता जप्त केली. सप्टेंबर २००८ मध्ये इंडियन मुजाहिदीनचा पर्दाफाश झाल्यापासून बेग फरार आहे, देशभरात बॉम्बस्फोट घडवून आणल्याचा आरोप आहे. दिल्ली, जयपूर, अहमदाबाद आणि गोरखपूर येथे झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात त्याच्या सहभागाबद्दल १,००,००० रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. सूत्रांचे म्हणणे आहे की बेग शेवटचा २०१९ मध्ये अफगाणिस्तानात होता आणि तो अद्याप सापडलेला नाही. दिल्लीतील बॉम्बस्फोटांचा संबंध अफगाणिस्तानशी गुप्तचर अहवालांवरून दिसून येते की, बेग नवीन भरती करणाऱ्यांना कट्टरपंथी बनवण्यातही पटाईत होता. १० ऑक्टोबर २०२५ रोजी दिल्ली बॉम्बस्फोटाप्रकरणी अटक करण्यात आलेले डॉ. मुझम्मिल शकील हे देखील प्रशिक्षणासाठी अफगाणिस्तानला गेले होते. दोघेही अल-फलाहचे पदवीधर आहेत. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, दिल्ली बॉम्बस्फोटात बेगचा सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही. २००७ आणि २००८ च्या बॉम्बस्फोटांचा आणि अलिकडच्या लाल किल्ल्यावरील स्फोटाचा संबंध असू शकतो. अभियांत्रिकी बंद, २०१९ मध्ये एमबीबीएस कार्यक्रम सुरू झाले अल-फलाहची सुरुवात अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान शाळेपासून झाली, ज्याला नंतर हरियाणा खाजगी विद्यापीठ सुधारणा कायदा, २०१४ अंतर्गत विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला. त्याच्या ७० एकरच्या कॅम्पसमध्ये वसतिगृहे, प्रयोगशाळा आणि एक वैद्यकीय महाविद्यालय आहे. या वर्षी जानेवारीमध्ये त्याच्या नवीन रुग्णालयाच्या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. २०१९ मध्ये येथे एमबीबीएस कार्यक्रम सुरू झाले. शेवटची बॅच २०२२ मध्ये पदवीधर झाली. त्यानंतर विद्यापीठात अभियांत्रिकी शिक्षण बंद करण्यात आले. काश्मीर, मेवात आणि अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने विद्यापीठात प्रवेश घेतला. विद्यापीठाच्या अध्यक्षांना अटक अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अल फलाह ग्रुपचे अध्यक्ष जवाद अहमद सिद्दीकी यांना अटक केली आहे. मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए) २००२ च्या कलम १९ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने दोन एफआयआर नोंदवले होते. त्यांचा आरोप आहे की फरीदाबादमधील अल फलाह विद्यापीठाने राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद (एनएएसी) द्वारे मान्यताप्राप्त असल्याचा खोटा दावा केला होता, परंतु तो तसा नव्हता. विद्यापीठाने असाही खोटा दावा केला की ते यूजीसीच्या कलम १२(ब) अंतर्गत मान्यताप्राप्त आहेत आणि सरकारी अनुदान मिळवू शकतात. तथापि, यूजीसीने स्पष्ट केले की विद्यापीठ फक्त कलम २(फ) अंतर्गत नोंदणीकृत आहे आणि त्यांनी १२(ब) साठी अर्ज केलेला नाही. या खोट्या दाव्यांमुळे विद्यार्थी, पालक आणि जनतेची फसवणूक झाली. लाखो आणि कोट्यवधी रुपयांचे शुल्क वसूल केले गेले. अल फलाह चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना १९९५ मध्ये झाली. जवाद अहमद सिद्दीकी हे त्याचे पहिले विश्वस्त आणि व्यवस्थापकीय विश्वस्त आहेत. ते सर्वकाही नियंत्रित करतात. अनेक दहशतवादी पकडले गेले पण बेग पळून जाण्यात यशस्वी झाला दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलचे माजी डीसीपी एलएन राव म्हणतात, इंडियन मुजाहिदीनचा दहशतवादी मिर्झा शादाब बेग देशभरात झालेल्या अनेक बॉम्बस्फोटांमध्ये सहभागी होता. २००७ मध्ये त्याने फरीदाबादमधील अल-फलाह विद्यापीठातून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. त्याच वर्षी देशभरात झालेल्या मालिकेतील स्फोटांमध्ये त्याचे नाव समोर आले. स्फोटांमध्ये सहभागी असलेल्या इंडियन मुजाहिदीनच्या अनेक दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती, परंतु मिर्झा शादाब बेग फरार होता. एल. एन. राव यांच्या मते, अफगाणिस्तान हे दीर्घकाळापासून दहशतवाद्यांचे प्रशिक्षण केंद्र राहिले आहे. आतापर्यंत पकडलेल्या बहुतेक प्रमुख दहशतवाद्यांनी तेथे शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण घेतले होते. दिल्ली बॉम्बस्फोटांच्या तपासातही हाच दृष्टिकोन समोर येत आहे, त्यामुळे मिर्झा शादाब बेगशी संबंध असण्याची शक्यता आहे, कारण दोघेही एकाच महाविद्यालयात शिकले होते. विद्यापीठाचे अध्यक्ष, दोन डॉक्टर आणि धर्मगुरूंना अटक आतापर्यंत अल फलाह विद्यापीठातून डॉक्टर डॉ. मुझम्मिल शकील, डॉ. शाहीन सईद, विद्यापीठ कॅम्पसमधील मशिदीचे इमाम मौलवी इश्तियाक, डॉ. जावेद अहमद सिद्दीकी, लॅब असिस्टंट बशीद आणि इलेक्ट्रिशियन शोएब यांना अटक करण्यात आली आहे. दहशतवादी मॉड्यूलशी संबंधित असलेल्या डॉ. निसार उल हसन यांच्या डॉक्टर पत्नी आणि एमबीबीएस मुलीला तपास यंत्रणांनी विद्यापीठ कॅम्पसमध्ये नजरकैदेत ठेवले आहे. याव्यतिरिक्त, ७० हून अधिक लोकांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. (संपूर्ण घटनेची सुरुवात १९ ऑक्टोबर रोजी नौगाममध्ये जैश-ए-मोहम्मदच्या पोस्टरने झाली. तपासादरम्यान, काश्मीरमधील शोपियान येथील एका मशिदीचे इमाम मौलवी इरफान अहमद यांना प्रथम अटक करण्यात आली. त्यांची चौकशी केल्यानंतर, जम्मू-काश्मीर पोलिस फरीदाबादमधील अल-फलाह विद्यापीठात कार्यरत असलेल्या दहशतवादी मॉड्यूलपर्यंत पोहोचले.)

दिव्यमराठी भास्कर 20 Nov 2025 8:53 am

अल-फलाह विद्यापीठाची 'सीक्रेट' पार्किंग, ये-जा करणारी वाहने कोणाची:मृतांच्या जमिनी हडपल्या, 415 कोटींचा घोटाळा; काय आहे जवादचे तरबिया फाउंडेशन?

दिल्लीच्या कालिंदी कुंज पोलिस स्टेशनपासून सुमारे ३०० मीटर अंतरावर, एका कच्च्या रस्त्याने गेल्यावर राजनगर येथील जेजे कॉलनी येते. हा मदनपूर खादर परिसर आहे. कॉलनीच्या समोर एक मोठा दरवाजा आहे. तो अलिकडेच काळा रंगवण्यात आला आहे. दरवाजाजवळील भिंतीवर लिहिले आहे, अल-फलाह विद्यापीठ, फरिदाबाद. हा शिलालेख पूर्वी गेटवरही होता, परंतु दिल्ली बॉम्बस्फोटानंतर तो रंगवण्यात आला. अल-फलाह हे फरिदाबाद दहशतवादी मॉड्यूलशी जोडलेले विद्यापीठ आहे. या मॉड्यूलशी संबंधित डॉ. उमरने १० नोव्हेंबर रोजी लाल किल्ल्याजवळ कार बॉम्बस्फोट घडवून आणला होता, ज्यामध्ये १५ लोक मृत्युमुखी पडले होते. १८ नोव्हेंबर रोजी, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) विद्यापीठाचे अध्यक्ष जवाद अहमद सिद्दिकी यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली. त्यांच्यावर बनावट मान्यता मिळवण्याचा आणि ४१५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. विद्यापीठाव्यतिरिक्त जवाद अहमदच्या नावावर नऊ बनावट कंपन्या असल्याचेही आढळून आले आहे. दिव्य मराठीने या कंपन्यांची चौकशी सुरू केली. कागदपत्रांवर सूचीबद्ध केलेले पत्ते शोधत, आम्ही जेजे कॉलनीत पोहोचलो, जिथे जवाद अहमदच्या नावावर एक फाउंडेशन नोंदणीकृत आहे. मृत व्यक्तींच्या बनावट स्वाक्षऱ्या करून ही जमीन बळकावल्याचे आम्हाला आढळून आले. सध्या हा खटला न्यायालयात आहे. आम्ही जमीन मालकांनाही भेटलो. कॉलनीतील रहिवाशांनी सांगितले की अल-फलाह विद्यापीठाची वाहने येथे येत असत. लोक घाबरले होते, ते म्हणाले - दररोज रात्री गाड्या येत असतआमच्या तपासादरम्यान आम्हाला तरबिया एज्युकेशन फाउंडेशन सापडले, जे जवाद अहमद सिद्दिकी यांच्या नावाने नोंदणीकृत आहे. ते २१ डिसेंबर २०१२ रोजी नोंदणीकृत झाले. त्याचे दोन संचालक आहेत: जवाद अहमद सिद्दीकी आणि सुफियान अहमद सिद्दीकी. आम्हाला कळले की हे फाउंडेशन दिल्लीतील मदनपूर खादरजवळ आहे. आम्ही प्रथम कालिंदी कुंज पोलिस स्टेशनला गेलो आणि लोकांना त्या जागेबद्दल विचारले. अल-फलाह विद्यापीठ हे नाव ऐकून बरेच लोक बोलण्यास कचरत होते. शेवटी, एका वृद्ध महिलेने होकार दिला. ती सांगते, इथे दररोज शाळेच्या बसेस येतात. कधीकधी, अंधार पडल्यानंतर गाड्याही येतात. जवळच स्मशानभूमीची जमीन आहे. हा पाया त्या जमिनीवर बांधला गेला होता. पूर्वी, त्याच्या गेटवर नाव लिहिलेले होते. दिल्लीतील स्फोटानंतर, ते काढून टाकण्यात आले. फक्त एक-दोन दिवसांपूर्वी, गेट पूर्णपणे काळे झाले होते. आम्हाला इथे आणखी एक माणूस भेटला. तो भीतीमुळे त्याचे नाव सांगत नव्हता. आम्ही विचारले की गेटवर काय लिहिले आहे? ही मालमत्ता कोणाची आहे? उत्तर मिळाले, गेटवर काही नाव लिहिलेले होते. विद्यापीठाची वाहने येथे पार्क केलेली आहेत. या जमिनीबाबत एक खटला सुरू आहे. आम्ही विचारले की ही मालमत्ता दिल्ली बॉम्बस्फोटानंतर ज्या विद्यापीठाचे नाव पुढे आले त्याच्याशी संबंधित आहे का? यावर त्यांनी उत्तर दिले, तुम्ही भिंतीवरील नाव वाचले पाहिजे. ते स्पष्टपणे लिहिले आहे. या संभाषणातून दोन माहिती उघड झाली: एक म्हणजे अल-फलाह विद्यापीठाची वाहने या ठिकाणी पार्क केलेली होती आणि दुसरी म्हणजे ही जमीन वादग्रस्त होती. काळजीवाहक म्हणाला - हे जवाद अहमदचे तरबिया फाउंडेशन आहेआम्ही एका काळ्या रंगाच्या गेटवर पोहोचलो. एका माणसाने ते थोडेसे उघडले आणि बोलू लागला. तो केअरटेकर होता. आम्ही सांगितले की आम्हाला आत जायचे आहे. त्याने उत्तर दिले, गेट उघडण्यास मनाई आहे. आम्ही विचारले की या जागेचे नाव काय आहे. काळजीवाहकाने आम्हाला सांगितले की त्याचे नाव तरबिया एज्युकेशन फाउंडेशन आहे. गेट कधी काळा रंगवला होता? उत्तर दिले, ३-४ दिवसांपूर्वी. मग त्याने म्हटले, मी यापेक्षा जास्त बोलणार नाही. संभाषणादरम्यान, काळजीवाहकाने वारंवार आपला चेहरा लपवण्याचा प्रयत्न केला. आम्ही विचारले की ते जवाद अहमद सिद्दीकी यांचे आहे का? उत्तर आले, हो, ते त्यांचे आहे. आरोप: ३० मृतांच्या बनावट स्वाक्षऱ्या करून मालमत्ता हडप करण्यात आलीतरबिया फाउंडेशन हे अल-फलाह विद्यापीठाचे अध्यक्ष जवाद अहमद सिद्दीकी यांचे असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर आम्ही जमिनीच्या वादाची चौकशी सुरू केली. सुमारे ३-४ किलोमीटर चालत गेल्यानंतर आणि लोकांशी बोलल्यानंतर, आम्हाला पीडित सापडले. कुलदीप सिंग बिधुरी न्यायालयात जमिनीचा खटला लढत आहेत. आम्ही त्यांना संपूर्ण वादाबद्दल विचारले. मालमत्तेची कागदपत्रे दाखवत कुलदीप सिंग म्हणाले, आमची मदनपूर खादर एक्सटेंशनमध्ये मालमत्ता आहे. त्याचा खसरा क्रमांक ७९२ आहे. ती आमच्या कुटुंबाची संयुक्त मालमत्ता आहे. माझ्या कुटुंबाचीही तिथे इतर मालमत्ता आहेत. २०१५ मध्ये काही लोकांनी तरबिया एज्युकेशन फाउंडेशनच्या नावावर मालमत्ता नोंदणीकृत केल्याचे आढळून आले. ते तिथे सीमा भिंत बांधत होते. माझ्या कुटुंबातील सदस्य, नथू सिंग यांचे १९७२ मध्ये निधन झाले. मी २००४ मध्ये त्यांच्या नावावर बनावट जनरल पॉवर ऑफ अॅटर्नी (GPA) बनवून घेतली होती. २००४ चा GPA २०१३-१४ मध्ये तरबिया एज्युकेशन फाउंडेशनच्या नावावर नोंदवण्यात आला होता. डॉ. जवाद अहमद सिद्दीकी हे त्या फाउंडेशनचे अध्यक्ष आहेत. रजिस्ट्रीची कागदपत्रे मिळवल्यानंतर आम्हाला फसवणूक झाल्याचे लक्षात आले. आमच्या कुटुंबाच्या आणि आमच्या परिसरातील अनेक लोकांच्या बनावट स्वाक्षऱ्या वापरून ही रजिस्ट्री करण्यात आली होती. २००४ मध्ये २५ ते ३० जणांच्या नावावर बनावट जीपीए बनवण्यात आले होते. हे लोक २००४ पूर्वीच मरण पावले होते. मालमत्ता त्यांच्या तिसऱ्या पिढीला आधीच हस्तांतरित करण्यात आली होती. तरीही, त्यांनी जमिनीची नोंदणी त्यांच्या नावावर करून घेतली. तरबिया एज्युकेशन फाउंडेशन जवाद अहमद सिद्दीकी यांचे आहे. आम्ही २०१५ मध्ये त्यांच्याविरुद्ध पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्यानंतर मला अनेक वेळा धमक्या देण्यात आल्या. मी म्हणालो, 'मला गोळी घाला, तरच मी गप्प बसू शकेन, अन्यथा मी लढत राहीन.' परदेशी निधीची चौकशी करण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाला (पीएमओ) पत्र लिहिले, परंतु कोणतीही कारवाई झाली नाहीकुलदीप सिंह पुढे म्हणतात, 'ज्या पद्धतीने मला धमकावण्यात आले, आमची फसवणूक करण्यात आली, पोलिस अधिकाऱ्यांकडे तक्रारी करूनही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, पैशांचा गैरवापर करण्यात आला, त्यामुळे तरबिया फाउंडेशनला बेकायदेशीर पद्धतीने निधी दिला जात असल्याचा संशय निर्माण झाला.' मी २०१५ मध्ये पंतप्रधान कार्यालयात याबद्दल तक्रार केली होती. मी म्हटले होते की तारबिया एज्युकेशन फाउंडेशनच्या निधीची चौकशी झाली पाहिजे. त्यांना इतका निधी कुठून मिळत आहे? त्यांनी माझ्या वकिलाचीही व्यवस्था केली. मी माझ्या मुलाला कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी पाठवले. आता, तोच हा खटला हाताळणारा वकील आहे. दहशतवादी नेटवर्कचा अल-फलाह विद्यापीठाशी संबंध असल्याचे उघड झाल्यापासून भीती वाढली आहे. आम्ही विचारले की खटल्याची स्थिती काय आहे. कुलदीप म्हणाला, आरोपींविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला. त्यांनी न्यायालयात जाऊन खटला थांबवला. आम्ही त्याविरुद्ध उच्च न्यायालयात गेलो. त्यानंतर धमकी दिल्याबद्दल माझ्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला. इतर अनेक लोकांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आले. मृतांसाठी दिलेले मृत्यू प्रमाणपत्र, त्यांच्या स्वाक्षऱ्याही बनावट होत्याकुलदीपच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी, आम्ही रजिस्ट्री विभागाच्या नोंदींच्या प्रमाणित प्रती तपासल्या. फसव्या कारवायांविरुद्ध दाखल केलेल्या तक्रारींचाही आढावा घेतला. या प्रक्रियेदरम्यान, आम्हाला मुद्रांक विभागाकडून २४ जून २०१३ रोजीचा एक कागदपत्र सापडला. त्यात मदनपूर खादरच्या खसरा क्रमांक ७९२ ची रजिस्ट्री आहे. एकूण १.१४६ एकर जमीन ७.५ कोटी रुपयांना संपादित करण्यात आली. ही जमीन ५८ वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावे होती, ज्यांनी त्यांच्याकडून जनरल पॉवर ऑफ अटर्नी मिळवली आणि विनोद कुमार नावाच्या व्यक्तीने ती जवाद अहमदला विकली. याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, आम्ही नथू सिंग यांचे पणतू धर्मेंद्र यांची भेट घेतली. ते म्हणाले, तरबिया एज्युकेशन फाउंडेशनने आमची फसवणूक केली. माझे पणजोबा नथू सिंग यांचे १९७२ मध्ये निधन झाले. त्यांना चार मुले होती. त्यांचा मोठा मुलगा लालचंद यांचे १९८७ मध्ये निधन झाले. त्यांचा दुसरा मुलगा लिक्की रामही आता हयात नाही. तिसरा मुलगा रामपाल सिंग २०१२ मध्ये मरण पावला. चौथा मुलगा बाबू सिंग जवाद सिद्दीकीसोबत स्थायिक झाला. त्याने इतर तीन भावांकडे दुर्लक्ष केले आणि फसवणूक करून जमीन घेतली. आम्ही लढाई लढत होतो. धर्मेंद्र यांच्या कुटुंबातील नातेवाईक बिजेंद्र कुमार स्पष्ट करतात, मी लाल चंद यांचा मुलगा आहे. माझे आजोबा, नथू सिंग यांचे १९७२ मध्ये निधन झाले, तर २००४ मध्ये त्यांची सही कशी दिसली? जवाद अहमद यांनी ही फसवणूक केली. 'मी इंग्रजीत सही करतो, पण त्यांनी माझ्या नावाने हिंदीत सही करून जमीन बळकावली'येथे राहणारे भगत सिंग म्हणतात, जेजे कॉलनीत आमची जमीन होती. आम्हाला कळले की ती जमीन बनावट स्वाक्षरी वापरून तरबिया फाउंडेशनला विकण्यात आली आहे. आम्ही पोलिस तक्रार दाखल केली. त्यानंतर, तरबिया फाउंडेशनमधील अनेक लोक आले आणि आम्हाला धमकावले. त्यापैकी एकाचे नाव डॉ. अब्बास होते. आम्ही पाच भाऊ आहोत. सर्वांच्या बनावट सह्या करून जमीन बळकावण्यात आली. एका भावाचे नाव प्रेम सिंग आहे. त्याचे नाव देवा सिंग असे लिहिले आहे. साकेत न्यायालयाने तपास थांबवला, दोन दिवाणी खटले सुरू आहेत आणि हा खटला उच्च न्यायालयात प्रलंबित आहेआम्ही या संपूर्ण प्रकरणाबाबत न्यायालयाकडून माहिती मागितली. आम्हाला कळले की न्यायालयाने तपासावर स्थगिती दिली आहे. तथापि, खटला रद्द करण्यात आलेला नाही. पीडितांचे म्हणणे आहे की ते चौकशी करतील आणि न्यायालयाकडून कारवाईची मागणी करतील. आम्ही न्यायालयात अल-फलाह विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणारे वकील मोहम्मद रझी यांना या प्रकरणाची स्थिती आणि फसवणुकीबद्दल विचारले. तथापि, त्यांनी सांगितले की, मी हा खटला हाताळत नाही. आम्ही या प्रकरणाबाबत अल-फलाह विद्यापीठाकडूनही माहिती मागितली आहे. आम्हाला ती मिळताच आम्ही त्यांचे म्हणणे या कथेत जोडू. त्यानंतर आम्ही पीडितांचे वकील दीपक यांच्याशी बोललो. ते म्हणाले, या फसवणुकीत दिवाणी आणि फौजदारी दोन्ही खटले सुरू आहेत. फौजदारी खटल्यातील एक एफआयआर २०१५ चा आहे आणि दुसरा २०२१ चा आहे. या प्रकरणांची सुनावणी साकेत न्यायालयात सुरू होती. नंतर, न्यायालयाने फौजदारी खटल्याच्या तपासावर स्थगिती आणली. आम्ही याविरुद्ध दिल्ली उच्च न्यायालयात अपील केले आहे. अशाच प्रकारचे दोन दिवाणी खटले देखील सुरू आहेत. बनावट स्वाक्षऱ्या वापरून जमिनीच्या नोंदणीचा ​​हा खटला आहे. नोंदणी रद्द करण्याचा खटला सुरू आहे. हे अजूनही प्रलंबित आहे. अल-फलाह विद्यापीठाने ७ वर्षांत ४१५ कोटी रुपये कमावलेआतापर्यंतच्या तपासात असे दिसून आले आहे की अल फलाह विद्यापीठाने सात वर्षांत ₹४१५ कोटी कमावले आहेत. विद्यापीठाशी जोडलेल्या नऊ बनावट कंपन्या देखील उघड झाल्या आहेत. सर्व व्यवहार एकाच पॅन नंबरचा वापर करून केले गेले. हे स्पष्ट आहे की सर्व व्यवहार एकाच ट्रस्टद्वारे केले जात होते. १८ नोव्हेंबर रोजी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अल-फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद अहमद सिद्दीकी यांना मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पीएमएलए) अटक केली. अटकेनंतर सिद्दीकी यांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश शीतल चौधरी प्रधान यांच्यासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना १३ दिवसांच्या कोठडीत पाठवले. ईडीने न्यायालयाला सांगितले की अल-फलाह विद्यापीठाने २०१८-१९ ते २०२४-२५ दरम्यान अंदाजे ४१५.१० कोटी रुपये कमावले. ईडीचा असा युक्तिवाद आहे की विद्यापीठाला फसवणूक करून मान्यता देण्यात आली असताना हे पैसे कमावले गेले. त्यामुळे हे उत्पन्न गुन्हेगारी आहे. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने दाखल केलेल्या दोन एफआयआरच्या आधारे ईडीने अल-फलाह ग्रुपविरुद्ध तपास सुरू केला, ज्यामध्ये असा आरोप करण्यात आला होता की अल-फलाह चॅरिटेबल ट्रस्टद्वारे चालवल्या जाणाऱ्या अल-फलाह विद्यापीठाने विद्यार्थी आणि पालकांची फसवणूक करण्यासाठी NAAC मान्यताबद्दल खोटे दावे केले होते. अल-फलाह विद्यापीठातील १० विद्यार्थी बेपत्ता, दिल्ली बॉम्बस्फोटांशी त्यांचा संबंध असल्याचा संशयदिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार बॉम्बस्फोटानंतर, अल-फलाह विद्यापीठाशी संबंधित १० जण बेपत्ता आहेत. त्यांचे फोन देखील बंद आहेत. तपास यंत्रणांना संशय आहे की त्यांचा या स्फोटात सहभाग असावा. स्फोटकांनी भरलेल्या कारमध्ये स्फोट घडवणारे डॉ. उमर नबी हे स्वतःसारख्याच आणखी आत्मघातकी हल्लेखोरांना प्रशिक्षण देण्याचा कट रचत होते, असे तपास यंत्रणांनी उघड केले आहे. तो व्हिडिओ बनवून तरुणांना पाठवत असे. दिल्ली बॉम्बस्फोटासंदर्भात आतापर्यंत आठ जणांना अटक करण्यात आली आहे, ज्यात डॉ. मुझम्मिल, डॉ. आदिल आणि डॉ. शाहीन यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, अल फलाह विद्यापीठातील शिक्षक डॉ. उमर हे काश्मीरमधील पुलवामा येथील रहिवासी आहेत. दिल्लीत स्फोट झालेली कार ते चालवत होते.

दिव्यमराठी भास्कर 20 Nov 2025 8:33 am

पाकिस्तानवरील हवाईक्षेत्र रोखले गेल्याने एअर इंडिया आर्थिक अडचणीत

पहलगाम घटनेनंतर संबंध विकोपाला गेल्याचा फटकानवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानचे संबध विकोपाला गेले आहेत. भारत आणि पाकिस्तानमधील तणावपूर्ण संबंधांचा थेट परिणाम विमान कंपन्यांवर होत आहे. दोन्ही देशांनी एकमेकांसाठी एअरस्पेस बंद केल्याने एअर इंडियासहित अनेक आंतरराष्ट्रीय एअरलाइन्सला मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. लांब पल्ल्याच्या मार्गांवर प्रवास वेळ तीन तासांपर्यंत वाढला असून इंधन खर्चात २९% वाढ झाली आहे.एअरस्पेस बंदीमुळे एअर इंडियाला वर्षाकाठी ४५५ मिलियन डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनात सुमारे ३ हजार ८०० कोटी इतके नुकसान होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. हे नुकसान २०२४-२५ मधील ४३९ मिलियन डॉलरच्या तुलनेत अधिक आहे. या वाढत्या आर्थिक ताणातून सुटण्यासाठी एअर इंडियाने केंद्र सरकारकडे चीनच्या शिनजियांग प्रांतातील हॉटन, काश्गर, उरुमकी मार्गे ‘इमर्जन्सी एअर एक्सेस’ मिळण्याची मागणी केली आहे. मागणी मान्य झाल्यास अमेरिका, कॅनडा आणि युरोपकडे जाणाऱ्या उड्डाणांचे अंतर कमी होईल. यामुळे प्रवासाच्या कालावधीत बचत होईल आणि इंधन खर्चातही मोठी कपात होईल.लांब पल्ल्याचा प्रवासात तीन तासांनी वाढ, इंधन खर्चात २९ टक्के वाढ, वर्षाला ३,८०० कोटींचे नुकसान होण्याचा अंदाजचीनच्या शिनजियांग प्रांतातील ‘इमर्जन्सी एअर एक्सेस’ची मागणीएअर इंडियाच्या मागणीला चीन मान्यता देण्याची शक्यता कमीएअर इंडिया मागत असलेला शिनजियांगचा रुट जगातील सर्वात उंच पर्वतरांगांमधून जातो. येथे पर्वतांची उंची २० हजार फुटांपेक्षा जास्त आहे. या क्षेत्रात डीकंप्रेशनचा (केबिनमधील वायुदाब अचानक कमी होणे) धोका अत्यंत गंभीर मानला जातो. यामुळे, प्रवाशांना श्वास घेण्यास अडचण, खिडक्या वा दरवाजे अचानक उघडणे, विमानाच्या संरचनेला नुकसान होणे अशा प्रकारच्या घटना घडू शकतात. ही जोखीम पाहून अनेक आंतरराष्ट्रीय एअरलाइन्स हा मार्ग टाळतात. याशिवाय हा भाग चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी वेस्टर्न थिएटर कमांडच्या अधिकारात येतो. त्यामुळे हा संवेदनशील ‘मिलिटरी एअरस्पेस’ आहे. अशा परिस्थितीत, चीन या मार्ग वापरण्याची परवानगी देईल का? असा प्रश्न आहे.

फीड फीडबर्नर 20 Nov 2025 8:30 am

मुंबईतील १२ मेट्रो स्थानकांवर स्मार्ट लॉकर सुरू

मुंबई : भारताच्या सार्वजनिक वाहतूक इकोसिस्टमसाठी निर्बाध डिजिटल पेमेंट्स आणि सेवा सक्षम करणाऱ्या ऑटोपे पेमेंट सोल्यूशन्स लिमिटेड या फिनटेक कंपनीने बुधवारी १२ मुंबई मेट्रो वन स्थानकांवर आपली नावीन्यपूर्ण स्मार्ट लॉकर प्रणाली यशस्वीरीत्या सुरू केल्याचे जाहीर केले. हा पहिलाच उपक्रम असून मुंबई मेट्रो वनच्या सहयोगाने राबविल्या जात असलेल्या या उपक्रमात मुंबईतील वाहतूक नेटवर्कमध्ये अत्याधुनिक अशी ९९६ पेक्षा जास्त डिजिटल लॉकर्स दाखल करण्यात आली आहेत. व्यापक प्रमाणात बसवलेली ही स्मार्ट लॉकर्स म्हणजे सुमारे ५ लाख प्रवाशांसाठी दैनंदिन प्रवासातील सुविधा, लास्ट-माईल लॉजिस्टिक्स आणि ई-कॉमर्स डिलिव्हरीमध्ये परिवर्तनाच्या दिशेने उचललेले एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.ही लॉकर्स केवळ सुरक्षित स्टोरेजची सुविधा देत नाहीत, तर शहरी गतिशीलतेच्या भविष्यातील एक महत्त्वपूर्ण दुवा ठरतात. ती कार्यक्षम ई-कॉमर्स डिलिव्हरी सक्षम बनवतात, लॉजिस्टिक्समधील फर्स्ट अँड लास्ट-माईल कनेक्टिव्हिटी वाढवतात आणि आधुनिक शहरवासीयांसाठी डोअर-टू-डोअर लॉजिस्टिक्स अधिक कार्यक्षम आणि शाश्वत बनवतात. या सेवा आणखी वाढवण्यासाठी ऑटोपे सध्या भारतातील मोठ्या ई-कॉमर्स कंपन्यांसोबत चर्चा करत आहे. मुंबईत केलेला हा विस्तार देशभरात स्मार्ट मोबिलिटी इन्फ्रास्ट्रक्चर वाढवण्याच्या ऑटोपेच्या धोरणात्मक योजनेतील एक महत्त्वाचा टप्पा आहे, ज्यामध्ये मुंबई मेट्रो वन सोबतच्या भागीदारीला पुढे नेले आहे. ऑटोपे पेमेंट टेक्नॉलॉजीसह वाहतूक संचालनाच्या एकीकरणाला प्रोत्साहन देण्यास आणि देशभरात सुधारित कार्यक्षमता आणि प्रवाशांच्या अनुभवासाठी डेटा अॅनालिटिक्सचा फायदा करून घेण्याबाबत वचनबद्ध आहे. ऑटोपे स्मार्ट लॉकर्स अशा प्रकारे डिझाईन करण्यात आली आहेत की, मेट्रोच्या गजबजलेल्या ईकोसिस्टममध्ये ती सहज समाविष्ट होऊ शकतील आणि प्रवासी व शहरी हितधारकांसाठी अनेक सुविधा आणि लाभ प्रदान करतील.५ लाख प्रवाशांसाठी दैनंदिन प्रवासातील सुविधामुख्य वैशिष्ट्ये : डिजिटल अॅक्सेस : यूझर-फ्रेंडली अॅप, एसएमएस किंवा क्यूआर कोड स्कॅनिंग द्वारे प्रवासी सहजतेने ही लॉकर्स अॅक्सेस करू शकतात, ज्याचा इंटरफेस आधुनिक आणि सुरक्षित आहे. लॉकरच्या वेगवेगळ्या साईझ : लॉकर्स दोन मुख्य प्रकारांमध्ये उपलब्ध आहेत : छोटा खण (सुमारे ५ किलो क्षमता) आणि मध्यम आकाराचा खण (सुमारे १० किलो क्षमता), जो पार्सल, वाणसामान किंवा व्यक्तिगत वस्तूंसाठी योग्य आहे. किफायतशीर आणि लवचिक वापर : छोट्या खणांसाठी ताशी २० रु आणि मध्यम आकाराच्या लॉकर्ससाठी ताशी ३० रु. शुल्क आहे, ज्यामुळे सर्व प्रवासी त्याचा उपयोग करू शकतात. सुरक्षित आणि निरीक्षणांतर्गत : मनःशांती देणाऱ्या या लॉकर्समध्ये २४x७ सीसीटीव्ही देखरेख आणि वस्तू सुरक्षित ठेवण्यासाठी आणि ती परत मिळवण्यासाठी ओटीपी -आधारित प्रमाणिकरणाची सुविधा आहे. बहुविध उपयोग : तात्पुरते स्टोरेज, सुरक्षित ई-कॉमर्स आणि कुरियर डिलिव्हरी, मिडल्-माईल लॉजिस्टिक्सचे समर्थन तसेच वाहतूक केंद्रात ब्रॅंड सॅम्पलिंग साठी आदर्श.प्रवासी आणि शहरी ईकोसिस्टमसाठी फायदे : प्रवाशांची वाढीव सुविधा : मेट्रोच्या प्रवाशांना प्रवास करताना सहजपणे ऑनलाइन ऑर्डर घेणे किंवा आपल्या व्यक्तिगत गोष्टी सुरक्षित ठेवणे शक्य होते. शाश्वतता : मेट्रो स्थानकांवर डिलिव्हरीज एकत्र करून स्मार्ट लॉकर्स लास्ट-माईल उत्सर्जन कमी करण्यात, हरित शहरी लॉजिस्टिक्सला प्रोत्साहन देण्यात आणि शहरी वाहतूक कोंडी कमी करण्यात योगदान देतात. ब्रँड एंगेजमेंट : ही ईकोसिस्टम रिटेल आणि डिलिव्हरी पार्टनर्ससाठी एक दृश्यमान आणि उच्च-फुटफॉल असलेले टचपॉइंट उभे करते आणि मेट्रो ईकोसिस्टममध्ये नवीन व्यावसायिक संधी निर्माण करते. प्रवाशांच्या अनुभवात सुधारणा : मेट्रोच्या सेवेच्या ईकोसिस्टममध्ये भर घालते आणि अशाप्रकारे, सार्वजनिक वाहतुकीस अधिक आकर्षक, कार्यक्षम आणि नागरिकांसाठी एकीकृत पर्याय बनवते.“आमच्या मेट्रो स्थानकांवर स्मार्ट लॉकर सेवा आणण्यासाठी ऑटोपे सोबत भागीदारी करताना आम्हाला आनंद होत आहे. हा उपक्रम मुंबई मेट्रो लाइन-१ आधुनिक करण्याच्या आणि आमच्या प्रवाशांचा दैनंदिन अनुभव उन्नत करण्याच्या दिशेने उचललेले आणखी एक पाऊल आहे. प्रवाशांना, चिंतामुक्त होऊन, जास्त सामान सोबत न नेण्यासाठी सक्षम करून आम्ही मुंबईसाठी एक सोयीची, टेक-सक्षम आणि भविष्यासाठी तत्पर असलेली शहरी मोबिलिटी इकोसिस्टम उभारण्याचे आमचे व्हिजन दृढ करत आहोत.” - श्यामंतक चौधरी, मुंबई मेट्रो वनचे सीईओऑटोपेमध्ये आमचे मुख्य ध्येय वाहतूक आणि आर्थिक टेक्नॉलॉजीमधील दरी भरून काढून देशभरातील शहरी प्रवाशांसाठी निर्बाध, एकीकृत अनुभव निर्माण करण्याचे आहे. या व्हिजनच्या दृष्टीने, १२ मुंबई मेट्रो वन स्थानकांवर ९९६ पेक्षा जास्त स्मार्ट लॉकर्सची उभारणी हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. दिल्ली मेट्रो स्थानकांवर लॉकर्सच्या उभारणीत मिळालेले यश आणि अनुभव यांचा उपयोग करत हे प्रगत अनोख्या प्रकारचे सोल्यूशन मुंबईत आणताना आम्ही रोमांचित आहोत.- अनुराग बाजपेयी, ऑटो पे पेमेंट्स सोल्यूशन्स लि.चे संस्थापक आणि मॅनिजिंग डायरेक्टर

फीड फीडबर्नर 20 Nov 2025 8:30 am

सोशल मीडिया इन्फ्लुएंसर ओरीला ड्रग्ज प्रकरणात मुंबई पोलिसांनी बजावले समन्स! 'त्या'पार्टीत अनेक बॉलीवूड कलाकारांची हजेरी

मुंबई: मुंबई पोलिसांनी सोशल मीडिया इन्फ्लुएंसर ओरीला २५२ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात समन्स बजावले आहेत. हे समन्स अँटी-नार्कोटिक्स सेलच्या वतीने जारी करण्यात आले असून आज सकाळी १० वाजता अँटी-नार्कोटिक्स सेलच्या घाटकोपर युनिटसमोर चौकशीसाठी हजर राहण्याच्या सुचना दिल्या आहेत.दाऊद इब्राहिम टोळीतील प्रमुख सदस्य ड्रग्ज किंगपिन सलीम डोला याचा निकटवर्तीय सहकारी मोहम्मद सलीम मोहम्मद सुहैल शेख याला ताब्यात घेण्यात आले होते. त्याच्या चौकशीमध्ये त्याने धक्कादायक खुलासा केला. त्याने सांगितलं की, तो भारतात आणि परदेशात ड्रग्ज पार्ट्या आयोजित करतो आणि त्या पार्ट्यांना ड्रग्ज पुरवतो.https://x.com/ANI/status/1991165255716921348?s=20शेखच्या पार्टीत कोणाकोणाचा सहभाग?मोहम्मद सलीम मोहम्मद सुहैल शेख आयोजित पार्टीमध्ये दाऊद इब्राहिमची दिवंगत बहीण हसीना पारकरचा मुलगा अलीशाह,अभिनेत्री नोरा फतेही,श्रद्धा कपूर आणि तिचा भाऊ सिद्धार्थ कपूर सहभागी झाले होते. पोलिसांनी मुंबईतील एका न्यायालयासमोर सादर केलेल्या रिमांड अर्जात असेही म्हटले आहे की चित्रपट निर्माते अब्बास-मस्तान यांच्यासह रॅपर लोका, ओरी आणि एनसीपी नेते जिशान सिद्दीकी यांसारख्या काही इतर व्यक्ती देखील उपस्थित होत्या.https://prahaar.in/2025/11/20/nitish-kumars-oath-taking-ceremony-today/अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा मित्र सलीम डोला हा ड्रग्ज सिंडिकेट चालवत असल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली होती. या सिंडिकेटनं देशभरातील सात ते आठ राज्यांमध्ये मेफेड्रोन (एमसीएटी), म्याऊ म्याऊ आणि आइस सारख्या ड्रग्जचा पुरवठा केला आणि मोठ्या प्रमाणात परदेशातही त्यांची तस्करी केली. मुंबई गुन्हे शाखेव्यतिरिक्त, अंमलबजावणी संचालनालय देखील या संपूर्ण नेटवर्कची चौकशी करत आहे. या ड्रग्ज तस्करीतून मिळणारे पैसे हवाला आणि रिअल इस्टेटद्वारे लाँडरिंग केले जात असल्याचा ईडीला संशय आहे. मुंबई गुन्हे शाखा लवकरच या सर्व व्यक्तींना समन्स बजावेल आणि त्यांचे जबाब नोंदवेल.

फीड फीडबर्नर 20 Nov 2025 8:30 am

PMC Election : महायुतीत ‘बिघाडी’? भाजप ‘एकला चलो रे’च्या भूमिकेत, शिवसेना-राष्ट्रवादीची कोंडी

प्रभात वृत्तसेवा पुणे – महापालिका निवडणुकीची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात पोहोचली असताना भाजपकडून शहरात बैठकींचा जोर वाढला आहे. स्वबळावर लढण्याची तयारी जवळपास पूर्ण झाली असून, महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादीला दूर ठेवण्याची भूमिका भाजपकडून घेतली जात आहे. त्यामुळे महायुतीत लढण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या शिवसेनेची कोंडी झाली आहे. त्याच वेळी भाजपला राजकीयदृष्ट्या कोंडीत पकडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने समविचारी पक्षांसोबत […] The post PMC Election : महायुतीत ‘बिघाडी’? भाजप ‘एकला चलो रे’ च्या भूमिकेत, शिवसेना-राष्ट्रवादीची कोंडी appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 20 Nov 2025 8:30 am

satara news: एकजुटीने काम करून विजय मिळवावा: खासदार उदयनराजे

satara news: सातारा नगरपालिका निवडणुकीतील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी एकजुटीने काम करून जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा. एकजुटीने काम केल्यास विजय आपलाच आहे, असा विश्वास खासदार उदयनराजे भोसले यांनी जलमंदिरातील बैठकीत व्यक्त केला. मनोमिलनाच्या धर्माला जागताना काही लोकांना मी न्याय देऊ शकलो नाही. परंतु, अशा कार्यकर्त्यांच्या पाठीशी माझी ताकद कायमच राहील, अशी स्पष्ट ग्वाही […] The post satara news: एकजुटीने काम करून विजय मिळवावा: खासदार उदयनराजे appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 20 Nov 2025 8:28 am

Pune News : पोलीस आयुक्तांच्या आश्वासनानंतर पेट्रोल पंप चालकांचा बंदचा निर्णय मागे

प्रभात वृत्तसेवा पुणे – पेट्रोलपंपावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्याच्या निषेधार्थ पुण्यात सायंकाळी सात वाजल्यानंतर पेट्रोलपंप बंद ठेवणार असल्याचा इशारा ऑल इंडिया पेट्रोल ड्रीलर्स असोसिएशनने पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आश्वासन दिल्यानंतर मागे घेतला आहे. संबंधित पेट्रोल पंपांना संरक्षण देणार आणि मारहाण करणाऱ्यांचा बंदोबस्त करण्याचे आश्वासन पोलीस आयुक्तांनी असोसिएशनच्या प्रतिनिधींना दिले आहे. पुणे पेट्रोल डीलर्स […] The post Pune News : पोलीस आयुक्तांच्या आश्वासनानंतर पेट्रोल पंप चालकांचा बंदचा निर्णय मागे appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 20 Nov 2025 8:15 am

Shirur News : शिरूर शहरात स्टीमरूम कॅफेमध्ये विद्यार्थ्यांचे अश्लील चाळे; पालक वर्ग संतप्त, पोलिस कारवाईची मागणी

शिरूर : शिरुर शहरातील कॅनरा बँकेच्या पाठीमागील स्टीमरूम कॅफे वादाच्या केंद्रस्थानी आले आहे. कॉलेजमधील काही विद्यार्थी-विद्यार्थिनी येथे येऊन सेपरेट पार्टिशनचा फायदा घेत अश्लील चाळे करत असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्यांनी समोर आणली आहे. या प्रकारामुळे परिसरातील नागरिक आणि पालकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे. कॅफेमध्ये दोन ते तीन जणांसाठी वेगवेगळे केबिनसदृश पार्टिशन तयार करण्यात आले […] The post Shirur News : शिरूर शहरात स्टीमरूम कॅफेमध्ये विद्यार्थ्यांचे अश्लील चाळे; पालक वर्ग संतप्त, पोलिस कारवाईची मागणी appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 20 Nov 2025 8:11 am

निवडणुकीवर संकट?

आरक्षण मर्यादा प्रकरणी २५ नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणीनवी दिल्ली : राज्यात सध्या सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे काय होणार, याची टांगती तलवार राज्यकर्ते व सर्व राजकीय पक्षांवर होती. या निवडणुकीत आरक्षणाने ५० टक्के मर्यादा ओलांडल्याने सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे बुधवारच्या सुनावणीत सुरू असलेल्या ४२ नगरपंचायती आणि २४६ नगर परिषदांची निवडणूक प्रक्रिया थांबणार की सुरूच राहणार, याची चिंता सर्वांना सतावत होती. या प्रकरणावर २५ नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. त्यामुळे सध्याची निवडणूक प्रक्रिया सुरूच राहणार आहे.महापालिका व जिल्हा परिषदांच्या निवडणुकीची घोषणा २५ नोव्हेंबरपर्यंत होऊ शकणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी राज्य सरकारकडून सॉलिसिटर जनरल तुषार मेहता उपस्थित होते. याचिकाकर्ते विकास गवळी यांच्याकडून अॅड. देवदत्त पालोदकर यांनी बाजू मांडली. नगर परिषदा व नगरपंचायतींसाठी २ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. प्रचार, अर्जांची छाननी झालेली असतानाच अचानक राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार की नाहीत, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. ओबीसी आरक्षणाची मर्यादा व एकूण आरक्षण ५० टक्क्यांवर गेल्यामुळे हा प्रश्न निर्माण झाला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना सरसकट २७ टक्के आरक्षण लागू करण्यात आले आहे.मुळात आरक्षणाची मर्यादा ५० टक्के आहे. ही मर्यादा ८३ पंचायत समित्या, १७ जिल्हा परिषदा, ५७ नगरपालिका व २ महापालिका अशा १५९ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींमध्ये ओलांडण्यात आली आहे. याबाबत न्यायालयाच्या न्या. सूर्यकांत व न्या. जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठाने नाराजी व्यक्त केली होती. त्यावर सुनावणी करताना या निवडणुकांमध्ये आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडता कामा नये. तसे झाले असेल तर निवडणुकांना स्थगिती द्यावी लागेल, असा इशारा न्यायालयाने सुनावणी करताना दिला होता. राज्यातील ३४ पैकी २० जिल्हा परिषदांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक आरक्षण असल्याची बाब समोर आली आहे. तसेच नगर परिषदा व महापालिकांमध्येही अनेक ठिकाणी ही मर्यादा ओलांडण्यात आली असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला होता. या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने या निवडणुकांमध्ये आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडता कामा नये. तसे झाले असेल तर निवडणुकांना स्थगिती द्यावी लागेल, असा इशारा दिला होता. राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षणाचे निकष निश्चित करण्यासाठी बांठिया आयोगाने नेमला होता. या आयोगाचा अहवाल राज्य सरकारने स्वीकारला आहे. या निवडणुका घेताना ओबीसी आरक्षणाबाबत बांठिया आयोगाच्या अहवालापूर्वीची स्थिती राहील, असा न्यायालयाचा आदेश असतानाही राज्य सरकारने या आदेशाचा स्वत:च्या सोयीने अर्थ लावत नगर परिषदा, महापालिका, जिल्हा परिषदांमध्ये सरसकट २७ टक्के आरक्षण ओबीसींसाठी लागू करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार ग्रामविकास विभागाने पंचायत समिती, जिल्हा परिषदांसाठी व नगरविकास विभागाने नगर परिषदा, नगरपंचायती व महापालिकांसाठी ओबीसी आरक्षण लागू केले होते. ‘ते’ जिल्हे कोणते?ओबीसी आरक्षणामुळे आरक्षणाची मर्यादा वाढल्याचा मुद्दा मुख्यत्वे आदिवासीबहुल स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निर्माण झाला आहे. नंदुरबार जिल्हा परिषदेमध्ये १०० आरक्षण टक्के झाले आहे. चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती, अकोला जिल्हा परिषदांमध्ये ६० ते ७० टक्के आहे. शिवाय गडचिरोली ७८ टक्के, पालघरमध्ये ९३ टक्के, धुळे ७३ टक्के आणि नाशिक जिल्हा परिषदेत ७२ टक्के आरक्षण लागू झाले आहे. ठाणे, नागपूर, नांदेड, वाशीम, हिंगोली, जळगाव, वर्धा तसेच बुलढाणा या ८ जिल्हा परिषदांमध्ये ५१ ते ६० टक्के आरक्षण दिले आहे.

फीड फीडबर्नर 20 Nov 2025 8:10 am

दिल्लीभेटीत भाजपच्या शिवसेनाविरोधी ऑपरेशन लोटसवर आक्षेप?

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी दुपारी दिल्लीला रवाना झाले. दिल्लीत जावून त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी अमित शहा यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली. विशेष म्हणजे दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास १ तास चर्चा झाली असून शिंदे यांनी अमित शहा यांच्याकडे नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरून राजकीय वातावरण तापलेले असतानाच दुसरीकडे महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या नाराजीनाट्याच्या घडामोडी सुरू आहेत. भाजपकडून शिवसेनेच्या नेते, पदाधिकारी, माजी नगरसेवक आणि इतर कार्यकर्त्यांना जो पक्षप्रवेश देण्यात आला, त्यावरून शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये नाराजी आहे. तसेच अनेक ठिकाणी शिवसेनेच्या मंत्र्यांना आव्हान देणाऱ्या राजकीय नेत्यांना भाजपने प्रवेश देत बळ दिल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्या पक्षप्रवेशांवर शिवसेनेच्या मंत्र्यांचा आक्षेप आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही बाजू ऐकून घेत त्यावर तोडगा काढला. आता सत्ताधारी महायुतीच्या पक्षांचे कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी फोडायचे नाहीत, असे ठरले. पण यानंतरही एकनाथ शिंदे यांची नाराजी दूर झाली नसल्याने एकनाथ शिंदे बुधवारी अचानक दिल्ली दौऱ्यावर गेल्याची चर्चा आहे. शिंदे यांनी शहा यांच्या भेटीत कोणत्याही प्रकारची नाराजी व्यक्त केलेली नाही. तसेच तक्रारही केलेली नसल्याचे सांगितले. तसेच, मी आतमध्ये बसलोय आणि बाहेर तुमच्या बातम्या सुरू आहेत, तुम्ही पतंग उडवता. युतीतल्या नेत्यांनी एकमेकांवर टीका टाळली पाहिजे. भाष्य करताना प्रत्येकाने संयमाची आणि सामंजस्याची भूमिका घेणे अपेक्षित आहे, असे मुद्दे शिंदेंनी शह यांच्यापुढे दिल्ली भेटीत मांडले.अभिनंदन करण्यासाठी भेट, मी रडणारा नाही तर लढणारा आहेबिहारच्या यशाबाबत अभिनंदन करण्यासाठी ही भेट होती. स्थानिक पातळीवरील प्रश्नांवर आम्ही दिल्लीत चर्चा करत नाही. चव्हाण यांच्याबाबत निर्णय त्यांचे पक्षश्रेष्ठी घेतील. अमित शहा यांच्यासोबतच्या चर्चेत नाराजीचा विषय नव्हता. तक्रारींचा पाढा वाचून मी रडणारा नाही तर लढणारा आहे. महायुतीला गालबोट लागेल असे आम्ही करणार नाही. मतभेद होणार नाहीत याची काळजी प्रत्येकाने घेणे आवश्यक आहे. - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेशहा यांच्या भेटीत शिंदे यांच्याकडून नाराजी व्यक्त?खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात ऑपरेशन लोटस राबवले जात असल्याची खंत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांनी ज्यांचा पराभव केला, त्यांना पक्षप्रवेश देत भाजपने त्यांची ताकद वाढवली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महायुतीत लढवल्या जातील, असे आश्वासन भाजपकडून देण्यात आले होते. पण सध्या राज्यात अनेक ठिकाणी भाजपने वेगळी चूल मांडल्याचे बघायला मिळाले आहे. त्यावरूनही एकनाथ शिंदे यांनी नाराजी व्यक्त केल्याची चर्चा आहे.

फीड फीडबर्नर 20 Nov 2025 8:10 am

नितीश कुमार यांचा आज शपथविधी

दोन्ही उपमुख्यमंत्री भाजपचेचनवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीत जनता दल संयुक्त (जेडीयू) आणि भाजपने अभूतपूर्व विजय मिळवला. आता पुन्हा एकदा नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली सरकार गुरुवारी स्थापन होत आहे. पुढील सरकारमध्ये भाजपच्या कोट्यातून सम्राट चौधरी आणि विजय कुमार सिन्हा उपमुख्यमंत्री म्हणून कायम राहतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अन्य मंत्री या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.‘जेडीयू’चे प्रमुख नितीश कुमार यांची पाटणा येथे झालेल्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत पक्षाच्या विधिमंडळ गटाचे नेते म्हणून निवडण्यात करण्यात आली. त्यामुळे ते पुढील मुख्यमंत्री असल्याचे स्पष्ट झाले आहे. जेडीयू अध्यक्ष नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील आठवे एनडीए सरकार शपथ घेणार आहे. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील हे दहावे सरकार असेल.भाजपने उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांना निरीक्षक म्हणून आणि केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल आणि माजी केंद्रीय मंत्री साध्वी निरंजन ज्योती यांना पक्षाच्या विधिमंडळ पक्षनेते निवडण्यासाठी सह-निरीक्षक म्हणून पाटणा येथे पाठवले होते. बैठकीनंतर केशव मौर्य यांनी औपचारिकपणे सम्राट चौधरी आणि विजय कुमार सिन्हा यांची नेते आणि उपनेते म्हणून निवड जाहीर केली. भाजपने उपमुख्यमंत्रीपदासाठी आपल्या जुन्या चेहऱ्यांवर विश्वास ठेवताना सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे. भाजप आमदारांच्या बैठकीत दोघांनाही त्यांच्या पदांवर कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. आतापर्यंत, बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील रालोआ सरकारमध्ये सुशील कुमार मोदी, तारकिशोर प्रसाद, रेणू देवी, सम्राट चौधरी, विजय कुमार सिन्हा यांनी वेगवेगळ्या टर्मसाठी उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहिले आहे.

फीड फीडबर्नर 20 Nov 2025 8:10 am

जवाद सिद्दिकीला १३ दिवसांची ईडी कोठडी

नवी दिल्ली : दिल्लीतील एका न्यायालयाने बुधवारी अल फलाह विद्यापीठाचे प्रमुख व संस्थापक जवाद अहमद सिद्दिकी यांना १३ दिवसांसाठी ईडी कोठडीत पाठवले आहे. केंद्रीय तपास संस्थेने दावा केला आहे की, जवाद यांनी विद्यार्थी व त्यांच्या पालकांची फसवणूक करून ४१५ कोटी कमावले आहेत. इतकंच नाही तर, त्यांच्या कुटुंबाचे आखाती देशांमध्ये संबंध असल्यामुळे ते पळून जाण्याची देखील शक्यता आहे.सिद्दिकी व त्यांच्या नियंत्रणाखालील अल फलाह चॅरिटेबल ट्रस्टने विद्यार्थी व पालकांना नॅक मान्यता व यूजीसीच्या ओळखपत्रांबद्दल खोटे दावे करून दिशाभूल केली आणि ४१५.१० कोटींची रक्कम गोळा केली. १० नोव्हेंबरला लाल किल्ल्याजवळ झालेल्या आत्मघाती हल्ल्यानंतर हे विद्यापीठ तपासणीच्या कक्षेत आले. हा हल्ला करणाऱ्या दहशतवादी मॉड्यूलचे अनेक सदस्य अल फलाह विद्यापीठाशी संबंधित होते.एजन्सीने दावा केला की, ट्रस्टने फसवणुकीच्या मार्गाने फी व शिक्षण शुल्काच्या नावाखाली ४१० कोटींहून अधिक रक्कम गोळा केली व ही रक्कम सिद्दिकी यांच्या वैयक्तिक व खासगी फायद्यासाठी वळवली.

फीड फीडबर्नर 20 Nov 2025 8:10 am

महिला राखीव जागेवर पुरुषाचे नामनिर्देशन अर्ज छाननीत वैध

मुंबई : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. सातारा नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक तीनमध्ये ३ ब सर्वसाधारण महिलासाठी राखीव असून या जागेवर एका पुरुषाने नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे. आज छाननीतही हा अर्ज वैध झाल्याने राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. अर्ज दाखल करण्याची मुदत संपली आहे. सध्या अर्जाची छाननी सुरू आहे. दरम्यान, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात देखील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.प्रभाग क्रमांक तीनमध्ये ३ ब सर्वसाधारण महिला राखीव जागा आहे. या जागेसाठी एकूण ७ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यापैकी ६ महिला असून त्यात एका पुरुषाचा उमेदवार अर्ज दाखल झाल्याची बाब भाजपचे माजी शहराध्यक्ष व नगरपालिका प्रभारी यांनी निदर्शनास आणून दिली आहे. त्यामुळे एका पुरुषाचा महिला राखीव जागेमध्ये उमेदवारी अर्ज दाखल होत असताना निवडणूक निर्णय अधिकारी नेमके करत होते काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सर्वसाधारण महिलेसाठी ही जागा आरक्षित असताना एका पुरुषाचा अर्ज दाखल करून घेणे ही बाब अत्यंत गंभीर आहे. त्यातच सर्व उमेदवारांची प्रभाग निहाय छाननी झाली आहे. मात्र, या छाननीमध्ये ही बाब निवडणूक अधिकाऱ्यांच्या लक्षात न आल्याने नेमकी चूक कोणाची झाली? हा प्रश्न निर्माण झाला आहे.

फीड फीडबर्नर 20 Nov 2025 8:10 am

Nevase News : नेवासे नगरपंचायत चौकात पुन्हा एकदा अग्नितांडव; दहा व्यावसायिक दुकाने आगीत भस्मसात, व्यापाऱ्यांचे प्रचंड नुकसान

नेवासे : नेवासे शहरातील नगरपंचायत चौकात बुधवार (दि.१९) रोजी सायंकाळी रात्री ९:४५ वाजेच्या सुमारास एका व्यावसायिक दुकानाला आग लावून एका मागोमाग एक असे दहा दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी सापडून सर्वच्या सर्व दुकाने आगीत जळून बेचिराख झाल्याची संतापजनक दुर्देवी घटना पुन्हा एकदा शहरात घडली. या व्यावसायिकांचे लाखो रुपयांचे प्रचंड नुकसान या लागलेल्या आगीमध्ये झालेले आहे. मागच्या वर्षी […] The post Nevase News : नेवासे नगरपंचायत चौकात पुन्हा एकदा अग्नितांडव; दहा व्यावसायिक दुकाने आगीत भस्मसात, व्यापाऱ्यांचे प्रचंड नुकसान appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 20 Nov 2025 8:06 am

सीसीटीव्ही प्रकल्पाला ब्रेक? आधी दुरुस्ती, मगच पुढचं काम; नियम मोडणाऱ्या ठेकेदाराला महापालिकेचा दणका

प्रभात वृत्तसेवा पुणे : पोलिसांच्या सीसीटीव्ही प्रकल्पासाठी शहरात सुरू असलेले खोदकाम तातडीने थांबवण्याचे आदेश महापालिकेने ठेकेदाराला दिले आहेत. पोलिसांच्या सीसीटीव्ही प्रकल्पासाठी पालिकेने दिनेश इंजिनिअरिंग लिमिटेड या कंपनीस खोदकामाची परवानगी दिली आहे. मात्र, ठेकेदाराने खोदकामाच्या नियमाचे उल्लंघन करत एकाचवेळी शहरभर खोदकाम सुरू केले आहे. शहरभर सुरू असलेल्या खोदकामामुळे नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्याची दखल […] The post सीसीटीव्ही प्रकल्पाला ब्रेक? आधी दुरुस्ती, मगच पुढचं काम; नियम मोडणाऱ्या ठेकेदाराला महापालिकेचा दणका appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 20 Nov 2025 8:00 am

Pune railway : प्रवाशांसाठी खुशखबर! पुणे-मिरज रेल्वे दुहेरीकरण पूर्ण, आता प्रवास होणार सुपरफास्ट

प्रभात वृत्तसेवा पुणे – मध्य रेल्वे विभागातील महत्वकांक्षी प्रकल्प असलेला पुणे-मिरज या २८० किलोमिटर लोहमार्गाच्या दुहेरीकरणाचे काम पूर्ण झाले. त्यामुळे या मार्गावरील गाड्यांचा वेग वाढणार असून, या मार्गावरील गाड्यांची संख्या वाढवावी अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. रेल्वे गाड्यांची संख्या वाढल्यामुळे प्रवाशांची अधिक सोय होणार आहे.पुणे ते मिरज लोहमार्गाच्या दुहेरीकरण नुकतेच पूर्ण झाले आहे. आता भविष्यात […] The post Pune railway : प्रवाशांसाठी खुशखबर! पुणे-मिरज रेल्वे दुहेरीकरण पूर्ण, आता प्रवास होणार सुपरफास्ट appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 20 Nov 2025 7:50 am

मुंढवा जमीन घोटाळा : शीतल तेजवानी अखेर पोलिसांसमोर हजर, ४० एकर जमिनीचं गूढ वाढलं

प्रभात वृत्तसेवा पुणे – कोरेगाव पार्कजवळच्या मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात शीतल तेजवानीचा जबाब नोंदविण्यात आला. याप्रकरणाचा आर्थिक गुन्हे शाखा तपास करत असून, यापूर्वी तिघांचे जबाब नोंदविले आहेत.या प्रकरणी हेमंत गवंडे, शीतल तेजवानी, दिग्वीजय पाटील, तहसीलदार सुर्यकांत येवले यांना पुणे पोलिसांनी जबाब नोंदविण्याबाबत नोटीस बजावली आहे. हेमंत गवंडे यांनी सोमवारी (दि.१७) जबाब नोंदविला. त्यानंतर मंगळवारी (दि.१८) […] The post मुंढवा जमीन घोटाळा : शीतल तेजवानी अखेर पोलिसांसमोर हजर, ४० एकर जमिनीचं गूढ वाढलं appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 20 Nov 2025 7:45 am

Pune News : समाविष्ट ३२ गावांतील करवसुली थांबवा; नगरविकास विभागाचा महापालिकेला पुन्हा आदेश

प्रभात वृत्तसेवा पुणे : महापालिकेत समाविष्ट ३२ गावांमधील शास्तीकर आकारणी तसेच कर वसुली करण्यास स्थगिती दिली आहे. या गावांत पालिके ग्रामपंचायतीच्या करापेक्षा दुप्पट दराने मिळकत कर आकारणी करावी असे आदेश शानाने दिले होते. याबाबत पुनर्विलोकन होईपर्यंत पालिकेने करवसुली थांबवावी असे आदेश नगरविकास विभागाने पत्राद्वारे पालिकेस बुधवारी पाठविले आहे.उपसचिव प्रियंका छापवाले यांनी हे पत्र पाठविले असून […] The post Pune News : समाविष्ट ३२ गावांतील करवसुली थांबवा; नगरविकास विभागाचा महापालिकेला पुन्हा आदेश appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 20 Nov 2025 7:40 am

लग्नाच्या पत्रिका छापल्यानंतर संतापले होते नितीश:मंडपात पहिल्यांदा मंजू यांना पाहिले, जास्त काळ एकत्र का राहू शकले नाहीत; जाणून घ्या लव्ह स्टोरी

अखेर कुटुंबीयांना झुकावे लागले. नवीन लग्नपत्रिका छापण्यात आल्या, ज्यावर लिहिले होते, टिळा, हुंडा आणि शोषणाच्या वाईट प्रथांपासून मुक्त, आणि हार आणि आशीर्वाद वगळता इतर कोणत्याही भेटवस्तूंची देवाणघेवाण केली जाणार नाही. नितीश कुमार आज १०व्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत आहेत. या कथेत आपण त्यांच्या प्रेमकथेबद्दल जाणून घेऊ... बख्तियारपूरमध्ये सुरुवातीचे शिक्षण घेतल्यानंतर, नितीश कुमार यांनी १९६७ मध्ये पाटणा अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला. नितीश लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होते आणि श्रीमंत कुटुंबातून आले होते, त्यामुळे कुटुंबाची इच्छा होती की त्यांनी अभियंता व्हावे. अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षात असताना नितीश यांच्या कुटुंबाने त्याचे लग्न मंजू कुमारी सिन्हासोबत ठरवले. त्यावेळी मंजू पाटणा येथील मगध महिला महाविद्यालयात समाजशास्त्राचे शिक्षण घेत होत्या. नितीश यांचे कॉलेज मित्र उदय कांत यांच्या 'नितीश कुमार: थ्रू द आइज ऑफ इंटिमेट फ्रेंड्स' या पुस्तकात मंजू यांचे वडील कृष्णनंदन बाबू म्हणतात, ' माझ्या समुदायाबद्दल विसरून जा, त्या वेळी बिहारमधील कोणत्याही जातीत, मंजूसारख्या हुशार मुलीसाठी नितीशजींपेक्षा चांगला मुलगा सापडला नसता.' नितीश कुमार यांनी मंजू यांना पहिल्यांदा लग्नाच्या मंडपात पाहिलेजेव्हा नितीश आणि मंजू यांचे लग्न ठरले तेव्हा दोघेही पाटण्यात शिकत होते. नितीश कुमार: थ्रू द आयज ऑफ इंटीमेट फ्रेंड्समध्ये, नितीश यांचे मित्र कौशल सांगतात, 'आमच्यापैकी कोणीही तोपर्यंत मंजू यांना पाहिले नव्हते, पण आम्हाला माहिती होते की त्या पाटणा विद्यापीठात समाजशास्त्र शिकत आहेत. आम्ही तिघे खोडकर मित्र कोणालाही न सांगता त्यांना भेटण्यासाठी समाजशास्त्र विभागात पोहोचलो.' जेव्हा नितीश यांच्या मित्रांनी विद्यापीठात मंजू यांना थांबवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या फक्त हसल्या आणि निघून गेल्या. नितीश यांच्या मित्रांच्या कृतीवरून त्यांना समजले की ते त्यांना भेटायला आले आहेत, म्हणून त्या लाजल्या आणि पळून जाऊ लागल्या. नितीश यांचे मित्र मंजू यांच्या पुढे गेले होते आणि नितीश यांना याबद्दल खूप आनंद झाला. त्यांच्या मित्रांनी मंजू यांना पाहिले असले तरी, नितीश यांनी त्यांना लग्नाच्या ठिकाणी पहिल्यांदाच पाहिले होते. नितीश यांच्या अटी- मी हुंडा घेणार नाही आणि लग्न मंजूच्या संमतीनेच होईल नितीश यांचे लग्न त्यांच्या कुटुंबाने ठरवले होते. त्यांनी मंजूला न भेटताही लग्नाला संमती दिली होती. लग्नाची पत्रिका वाटल्यानंतर नितीश यांना कळले की टिळा समारंभात २२,००० रुपये देण्याचे ठरवण्यात आले आहे. नितीश यांनी लग्नात हुंडा न घेण्याची खूप आधीपासून प्रतिज्ञा केली होती आणि त्यांच्या कुटुंबालाही हे माहिती होते. म्हणून जेव्हा त्यांना टिळा समारंभात पैसे घेतल्याचे कळले तेव्हा ते खूप संतापले. त्यांनी त्यांच्या आणि मंजूच्या कुटुंबाला स्पष्टपणे सांगितले की ते टिळ्याच्या नावावर कोणतेही पैसे किंवा हुंडा घेणार नाही. लग्नासाठी त्यांनी दोन अटीही घातल्या. पहिली, ज्याप्रमाणे मंजूसाठी त्यांची संमती घेण्यात आली होती, त्याचप्रमाणे त्यांच्यासाठीही मंजू यांची संमती घेण्यात यावी. दुसरी, जर मंजूला काही अडचण नसेल, तर ते कोणत्याही थाटामाटात, पारंपरिक मिरवणुकीशिवाय आणि फक्त जवळच्या लोकांच्या उपस्थितीत लग्न करतील. मंजू यांना यावर कोणताही आक्षेप नव्हता. त्यानंतर नवीन लग्नपत्रिका छापण्यात आल्या. लग्नाच्या वेळी, विद्यार्थी राजकारणामुळे नितीश कॉलेजमध्ये खूप लोकप्रिय झाले होते. त्यांचे लग्न कॉलेजमधील संस्मरणीय लग्नांमध्ये गणले जाते. उदय कांत त्यांच्या पुस्तकात लिहितात, 'मी भाड्याने घेतलेल्या अ‍ॅम्बेसेडर कारमधून संपूर्ण विद्यापीठ फिरलो आणि सर्वांना एका बंडखोराच्या लग्नाचे आमंत्रण दिले.' लग्नाच्या एका वर्षातच नितीश तुरुंगात गेले लग्नानंतरही मंजू यांनी त्यांचे शिक्षण सुरू ठेवावे अशी नितीश यांची इच्छा होती. म्हणून काही दिवस सासरच्या घरी राहिल्यानंतर, ती पाटण्याला परतली आणि जीडी हॉस्टेलमध्ये राहून त्यांचे शिक्षण पूर्ण केले. नितीश अनेकदा कॉलेज किंवा हॉस्टेलच्या बाहेर मंजू यांना भेटायला जायचे. बऱ्याचदा ते त्यांना रिक्षात चित्रपट पाहण्यासाठी घेऊन जायचे. 'इंटिमेट फ्रेंड्स' या पुस्तकानुसार, 'त्या काळात नितीश अनेक रोमँटिक गाणी गुणगुणत असे. जसे की- जो बात तुझमे है, तेरी तस्वीर में नहीं... आणि आम्ही त्या डोळ्यांचा सुगंधित वास पाहिला आहे...' एकीकडे नितीश वैवाहिक जीवनात प्रवेश करत होते, तर दुसरीकडे बिहारमध्ये जेपी चळवळ जोर धरत होती. अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर नितीश यांनी नोकरी करण्यास नकार दिला होता. ते राजकारणात येऊ इच्छित होते. त्यांच्या वडिलांनीही त्यांना यामध्ये पाठिंबा दिला. या काळात विद्यार्थी चळवळीदरम्यान नितीश यांना तुरुंगात जावे लागले. मंजू अनेकदा तुरुंगात त्यांना भेटायला येत असत. त्यावेळचा एक प्रसंग आठवताना नितीश म्हणतात, 'गया मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक खूप कडक होते. ते आठवड्यातून एकदाच कुटुंबाला भेटण्याची परवानगी देत ​​असत. तेही जाळ्याद्वारे. मंजू मला भेटायला येत असे. पण दुर्दैवाने आमच्यासाठी जाळे इतके जाड होते की करंगळीही त्यातून जाऊ शकत नव्हती.' नितीश कुमार सतत निवडणुका गमावत होते नितीशच्या राजकारणातील व्यग्र वेळापत्रक आणि त्याच्या वारंवार तुरुंगात जाण्याने मंजूला त्रास होत होता. स्वतःला व्यग्र ठेवण्यासाठी, बीए पूर्ण केल्यानंतर, मंजूने बीएड आणि नंतर एमए केले. नितीशशी लग्न करण्यापूर्वी, मंजूला कधीही पैशाची कमतरता भासली नव्हती, परंतु जेव्हा नितीशला १२ वर्षांच्या लग्नात योग्य नोकरी मिळाली नाही आणि ती सलग दोन निवडणुका गमावली तेव्हा तिला घर चालवणे कठीण झाले. १९८२ मध्ये मंजू बिहार सरकारमध्ये शिक्षिका झाल्या. त्यांची पहिली नियुक्ती माहेरच्या सेवादाह येथील हायस्कूलमध्ये झाली. मंजू यांच्या नोकरीमुळे कुटुंब चालवण्याचा प्रश्न सुटला, परंतु नितीश यांचे कुटुंब दोन भागांत विभागले गेले. मंजू आणि मुलगा निशांत सेवादाह येथे राहत होते आणि नितीश कधी पाटण्याला, तर कधी बख्तियारपूरला राहत होते. दोघेही बराच काळ भेटू शकले नाहीत. नितीश राजकारण सोडण्याच्या बेतात होते, मंजूने त्यांना अडीच वर्षांची बचत दिली १९८५च्या विधानसभा निवडणुकीत नितीश यांनी ठरवले होते की हा त्यांचा शेवटचा प्रयत्न असेल. जर ते जिंकले नाहीत तर ते पुन्हा कधीही निवडणूक लढवणार नाहीत. 'नीतीश कुमार: इंटिमेट फ्रेंड्स व्ह्यूपॉइंट' या पुस्तकात, मैत्रीण मीता सांगते की नितीशकडे निवडणूक लढवण्यासाठी पैसे नव्हते. मग भाभी मंजूने तिची अडीच वर्षांची बचत काढून नितीशला दिली. त्यावेळी, हे २० हजार रुपये नितीशसाठी आधार ठरले. दोन निवडणुकांमध्ये पराभव झाल्यानंतर, नितीश यांनी १९८५ मध्ये लोकदलाच्या वतीने हरनौत विधानसभा जागा जिंकली. निवडणूक जिंकल्यानंतर, नितीश बख्तियारपूर येथील त्यांच्या घरी पोहोचले तेव्हा त्यांचे मोठ्या थाटामाटात स्वागत करण्यात आले, परंतु त्यांच्या नजरा त्यांच्या पत्नी मंजूला शोधत होत्या ज्या त्यावेळी सेवादाह येथील त्यांच्या माहेरी होत्या. नितीश मध्यरात्री त्यांच्या मोटारसायकलवरून पत्नीला भेटण्यासाठी निघाले पत्नीला भेटण्यासाठी उत्सुक असलेले नितीश रात्री एका मित्रासोबत मोटारसायकलवरून सेवादाहला निघाले. होळीच्या आदल्या रात्रीची वेळ होती. दंगलीच्या भीतीने अनेकांनी नितीश यांना जाण्यास मनाई केली, पण त्यांनी ऐकले नाही. नितीश यांच्यासोबत सेवादाह येथे गेलेला त्यांचा मित्र मुन्ना सरकार यांच्या म्हणण्यानुसार, भाभीजी काल रात्रीपासून नेताजींची वाट पाहत होत्या. नेताजी घरी पोहोचताच भाभीजींनी प्रथम त्यांच्याकडे पाहून हसल्या, नंतर आमच्या स्वागताची तयारी सुरू केली. आमदार झाल्यानंतर नितीश यांना पाटण्यात राहण्यासाठी एक फ्लॅट मिळाला. त्यानंतर मंजू यांनीही स्वतःची पाटण्याला बदली केली. लग्नाच्या इतक्या वर्षांनंतर नितीश, मंजू आणि त्यांचा मुलगा निशांत एकत्र राहू लागले. दररोज व्यस्त असूनही, नितीश स्वतः मंजू यांना शाळेत सोडत असत. दिल्लीत पत्नीला नोकरी मिळवून देण्यात अनियमिततेचे आरोप उदय कांत त्यांच्या 'नीतीश कुमार: इंटिमेट फ्रेंड्स व्ह्यूपॉइंट' या पुस्तकात लिहितात- '५ वर्षे एकत्र राहिल्यानंतर, नितीश आणि मंजू यांना पुन्हा एकमेकांपासून दूर राहावे लागले. खरं तर, १९८९ मध्ये लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर नितीश दिल्लीला पोहोचले. मंजू या बिहार माहिती केंद्र, नवी दिल्ली येथे प्रतिनियुक्तीवर गेल्या. ही बातमी बिहारच्या वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झाली आणि नितीश यांच्यावर पत्नीला दिल्लीला बोलावण्यासाठी नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला. या आरोपांमुळे त्रस्त होऊन नितीश यांनी तत्कालीन मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना पत्र लिहून मंजू यांचे प्रतिनियुक्ती रद्द करण्याची विनंती केली. त्यानंतर मंजू पाटण्याला परतल्या. जेव्हा जेव्हा नितीश यांना दिल्लीतील कामातून सुट्टी मिळायची तेव्हा ते आपल्या पत्नी आणि मुलाला भेटण्यासाठी पाटण्याला जायचे. जेव्हा जेव्हा मंजू यांना सुट्टी असायची तेव्हा त्या मुलासोबत दिल्लीला जायच्या. कामामुळे वारंवार घर बदलणे आणि पुन्हा घर वसवणे यामुळे मंजू नेहमीच नितीशवर नाराज असायच्या. नितीश २००५ मध्ये मुख्यमंत्री झाले, पण चार महिन्यांनंतर त्यांना मुख्यमंत्री निवासस्थान मिळाले. तोपर्यंत मंजू त्यांचा मुलगा निशांतसोबत माहेरी राहत होत्या आणि नितीश सरकारने ठरवलेल्या घरात एकटे राहत होते. मंजू म्हणाल्या, आपण निवृत्तीनंतर एकत्र राहू, पण ते होऊ शकले नाही २००७ मध्ये, जेव्हा मंजू यांना न्यूमोनिया झाला, तेव्हा नितीश त्यांना उपचारासाठी दिल्लीतील मॅक्स हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. नितीश नेहमीच मंजूसोबत राहिले. रुग्णालयात, नितीश अनेकदा मंजूजवळ बसायचे आणि त्यांच्यासोबत वेळ घालवू न शकल्याबद्दल पश्चात्ताप करायचे. मग मंजू म्हणायच्या की माझ्या निवृत्तीनंतर आपण सर्व एकत्र राहू. त्यावेळी मंजू यांच्या निवृत्तीसाठी पाच वर्षे शिल्लक होती. त्या २०१२ मध्ये निवृत्त होणार होत्या, पण निवृत्तीपूर्वी, १४ मे २००७ रोजी, मंजू यांनी या जगाचा निरोप घेतला. पत्रकार अरुण पांडे यांच्या मते, 'पत्नीच्या निधनावर नितीश कुमार खूप रडले.' नंतर, नितीश यांनी मंजू कुमारी स्मृती पार्क आणि पाटणाच्या कंकरबागमध्ये मंजू यांच्या नावाने स्मारक बांधले. आता दरवर्षी नितीश त्यांच्या पत्नीच्या पुण्यतिथीला या स्मारकाला भेट देतात आणि फुले अर्पण करतात. यावेळी बिहार विधानसभा निवडणुकीत नितीश कुमार पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत. एनडीए त्यांना आपला नेता म्हणत आहे. जर नितीश जिंकले तर ते विक्रमी १०व्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. दिव्य मराठीच्या निवडणूक मालिकेतील 'लव्ह स्टोरी'च्या उद्या म्हणजेच ७ सप्टेंबर रोजी तिसऱ्या भागात, लोक जनशक्ती पक्षाचे संस्थापक रामविलास पासवान आणि रीना यांची कहाणी वाचा... , लव्ह स्टोरीचा पहिला भाग देखील वाचा... साध्वी उमा यांनी शाहनवाजचे लग्न त्याच्या हिंदू प्रेयसीसोबत लावले: डीटीसी बसमध्ये प्रेम झाले; भाजप नेते वऱ्हाडी झाले, विरोधक त्यांना अडवाणींचे जावई म्हणत एके दिवशी भाजप खासदार उमा भारती यांनी युवा मोर्चाचे सय्यद शाहनवाज हुसेन यांच्यावर टीका केली आणि म्हणाल्या, शानवाज, दिल्लीतील मुलींपासून सावध राहा. शाहनवाज लाजून उत्तरले, दीदी, मी पळून जाऊ शकलो नाही. माझ्या आयुष्यात कोणीतरी आहे. मुलीचे नाव ऐकून उमा म्हणाली, तुमचे लग्न भव्य होणार नाही. संपूर्ण कथा वाचा.

दिव्यमराठी भास्कर 20 Nov 2025 7:22 am

पुण्यात जमिनीला फुटले पाय? मुंढवा जमीन घोटाळ्यात निलंबित निबंधकाचा प्रताप, वाचा घोटाळ्याची नवी कहाणी

प्रभात वृत्तसेवा पुणे – मुंढवा येथील सुमारे 40 एकर शासकीय जमीन खरेदी- विक्रीचा दस्त नोंदविताना केलेल्या अनेक भानगडी आता उघड होत आहे. दस्त नोंदणी झाल्यावर तो ऑनलाइन ई-म्युटेशन म्हणजेच ई-फेरफारसाठी पाठवायचा होता. तेव्हा जुना सातबारा वापरल्याचा घोळ उघडकीस येऊ नये म्हणून या जमीन व्यवहाराला चक्क स्थावर मानण्याऐवजी, जंगम मालमत्ता म्हणजेच मुव्हेबल प्रॉपर्टी म्हणून नोंदवले! म्हणजेच […] The post पुण्यात जमिनीला फुटले पाय? मुंढवा जमीन घोटाळ्यात निलंबित निबंधकाचा प्रताप, वाचा घोटाळ्याची नवी कहाणी appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 20 Nov 2025 7:20 am

Pune News : पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदतीचा हात, चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत २० महाविद्यालयांचा गौरव

प्रभात वृत्तसेवा पुणे – सामाजिक कामे संवेदनशीलतेने केले पाहिजे,असे मत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.उच्च व तंत्र शिक्षण विभाग, उच्च शिक्षण संचालनालय आणि प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे शिवाजीनगरमधील मॉडर्न कॉलेजतर्फे संकटातून संकल्पाकडे हा कार्यक्रम झाला. यावेळी उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. अर्चना बोऱ्हाडे, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू […] The post Pune News : पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदतीचा हात, चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत २० महाविद्यालयांचा गौरव appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 20 Nov 2025 7:15 am

जेव्हा नितीशवर बक्षीस जाहीर झाले, कानाला चाटून गेली गोळी:कधीकाळी मोदींची बिहारमध्ये एंट्री रोखली; 10व्यांदा CM होणाऱ्या नितीश यांचे किस्से

नितीश कुमार हे विक्रमी १०व्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत आहेत. त्यांनी एकदा कॉलेजमध्ये लालू यादव यांचे पोस्टर चिकटवले होते, पोलिसांच्या गोळीतून थोडक्यात बचावले होते आणि एकदा ते त्यांच्या पत्नीला भेटण्याच्या उत्सुकतेने मध्यरात्री सायकलवरून निघून गेले होते; आम्ही नितीश यांच्या आयुष्यातील या आकर्षक कथा १२ ग्राफिक्समध्ये संकलित केल्या आहेत... , ग्राफिक्स: ड्रॅगचंद्र भुर्जी, अजित सिंग आणि अंकुर बन्सल

दिव्यमराठी भास्कर 20 Nov 2025 7:13 am

आजचे एक्सप्लेनर:10व्यांदा CM होणाऱ्या नितीश यांच्या तिजोरीची स्थिती; प्रत्येक बिहारीवर 27 हजारांचे कर्ज, दररोज व्याजात जातात 63 कोटी

नितीश कुमार यांनी निवडणुकीपूर्वी ४० हजार कोटी रुपयांच्या योजनांचे आश्वासन दिले होते. आता ते १०व्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत आहेत, त्यामुळे बिहारच्या तिजोरीचे आरोग्य तपासणे आवश्यक आहे. २०२२-२३ च्या कॅग (नियंत्रक आणि महालेखा परीक्षक) च्या राज्य वित्त अहवालानुसार बिहार नवीन कर्ज कारखाने, रस्ते किंवा रुग्णालये बांधण्यासाठी नाही तर जुन्या कर्जांवरील उत्पन्न आणि व्याज भरण्यासाठी घेत आहे. बिहार सरकारचे उत्पन्न आणि खर्च किती आहे, कर्जाचा हिशेब काय आहे आणि नितीश महागडी निवडणूक आश्वासने कशी पूर्ण करणार; आजच्या एक्सप्लेनरमध्ये अगदी सोप्या भाषेत जाणून घ्या... प्रश्न-१: बिहार सरकारचे उत्पन्न आणि खर्च किती आहे?उत्तर: २०२४-२५ या आर्थिक वर्षात बिहारचा एकूण खर्च सुमारे ₹३.२७ लाख कोटी होता. तर उत्पन्न फक्त ₹२.४४ लाख कोटी होते. याचा अर्थ बिहार सरकारने आपल्या उत्पन्नापेक्षा ₹८२ हजार कोटी जास्त खर्च केले. ही जबाबदारी काही प्रमाणात पूर्ण करण्यासाठी सरकारने ₹६३ हजार कोटींचे कर्ज घेतले होते. जेव्हा खर्च उत्पन्नापेक्षा जास्त असते तेव्हा त्याला वित्तीय तूट म्हणतात. २०२४-२५ मध्ये बिहारची वित्तीय तूट राज्याच्या जीडीपीच्या ९.२% होती, तर भारताची ४.८% म्हणजे केवळ निम्मी होती. याचा अर्थ बिहार सरकारच्या उत्पन्न आणि खर्चात मोठी तफावत आहे, जी आर्थिक दृष्टिकोनातून धोकादायक आहे असे मानले जाते. तथापि, या वर्षीच्या अर्थसंकल्पात बिहारने ही तूट निम्म्याने कमी करून ३% करण्याचा दावा केला आहे. सरकारच्या २०२५-२६च्या अर्थसंकल्पानुसार त्यांना यावर्षी २.६१ लाख कोटी रुपये मिळतील आणि २.९४ लाख कोटी रुपये खर्च होतील. यावेळीही सरकार तूट भरून काढण्यासाठी कर्ज घेईल. ₹१च्या उदाहरणाने सरकारचे उत्पन्न आणि खर्च समजून घ्या... प्रश्न-२: सध्या बिहार सरकारचे एकूण कर्ज किती आहे?उत्तर: २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या अखेरीस बिहार सरकारवर एकूण ₹३.४८ लाख कोटी कर्ज होते. हे राज्याच्या जीडीपीच्या ३८.९% आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे - बिहारमध्ये उत्पादित होणाऱ्या ₹१०० किमतीच्या वस्तू/सेवांसाठी, त्यावर सुमारे ₹४० कर्ज आहे. बिहारची लोकसंख्या १३ कोटींहून अधिक आहे. यानुसार, प्रत्येक बिहारीवर सुमारे ₹२७,००० कर्ज आहे. कॅगच्या अहवालानुसार, भारतात फक्त ११ राज्ये अशी आहेत ज्यांचे कर्ज-जीडीपी प्रमाण बिहारपेक्षा जास्त आहे. बिहार हे पाचवे सर्वात कर्जदार राज्य आहे. सर्वात वाईट गोष्ट म्हणजे हे कर्ज नवीन गोष्टी निर्माण करण्यासाठी वापरले जात नाही, तर जुने कर्ज फेडण्यासाठी वापरले जात आहे. आणि ते स्थिर खर्च चालवण्यासाठी वापरले जात आहे. २०२५-२६ मध्ये सादर केलेल्या अर्थसंकल्पानुसार पुढील ३ वर्षांत यामध्ये कोणताही महत्त्वाचा बदल होणार नाही. अंदाजानुसार, २०२७-२८ मध्ये बिहारचे कर्ज राज्याच्या जीडीपीच्या ३४.९% असेल. जर निवडणूकीत दिलेली सर्व आश्वासने पूर्ण केली तर हे कर्ज आणखी वाढू शकते. प्रश्न-३: बिहार सरकार या कर्जावर दरमहा किती व्याज देत आहे?उत्तर: २०२५-२६च्या अर्थसंकल्पानुसार, बिहार सरकारला दरवर्षी २३,०१४ कोटी रुपयांचे व्याज द्यावे लागते. त्यानुसार, नितीश सरकार दररोज फक्त ६३ कोटी रुपयांचे व्याज देत आहे. सरकारवरील कर्ज आणि व्याज दोन्ही वर्षानुवर्षे वाढत आहेत. गेल्या वर्षी बिहार सरकारने वार्षिक ₹ २०,५२६ कोटी म्हणजेच दररोज ₹ ५६ कोटी व्याज दिले होते. यावर्षी बिहार सरकारने गेल्या वर्षीच्या तुलनेत १२% जास्त व्याज दिले आहे. प्रश्न-४: निवडणुकीपूर्वीच्या घोषणा पूर्ण करण्यासाठी किती खर्च येईल?उत्तर: बिहार निवडणुकीपूर्वी नितीश कुमार यांनी ४ सर्वात महागड्या जाहिराती केल्या: वित्तीय सेवा कंपनी एमकेवाय ग्लोबलच्या मुख्य अर्थशास्त्रज्ञ माधवी अरोरा यांच्या मूल्यांकनानुसार, हे वचन पूर्ण करण्यासाठी बिहार सरकारला ₹ 40,000 कोटी अधिक खर्च करावे लागतील. यापैकी १५,००० कोटी रुपये फक्त महिलांना १०,००० रुपये देण्यासाठी खर्च करण्यात आले. एका अंदाजानुसार, सरकारला या आर्थिक वर्षात केवळ वाढीव पेन्शन आणि मोफत विजेतून ८,५०० कोटी रुपये लागतील. ४,००० कोटी रुपये अधिक खर्च केले जातील. यापूर्वी केंद्र सरकारच्या किसान सन्मान निधी अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी ६,००० रुपये मिळत होते. एनडीएने त्यात ३,००० रुपये अधिक वाढ केली आहे, ज्यामुळे सरकारचा खर्च २,६०० कोटी रुपयांनी वाढेल. प्रश्न-५: सरकार हे पैसे कसे आणेल?उत्तर: व्यवसाय तज्ज्ञ शिशिर सिन्हा म्हणतात की बिहार सरकार त्यांच्या निवडणूक आश्वासनांची पूर्तता करण्याचा प्रयत्न करत आहे. पैसे 3 मुख्य मार्गांनी उभे केले जाऊ शकतात: राजकीय विश्लेषक अमिताभ तिवारी म्हणतात, 'एनडीएने जाहीर केलेली सर्वात मोठी योजना महिलांसाठी ₹१०,००० आहे. हा फक्त एकदाच होणारा खर्च आहे. यापैकी फक्त ५८% महिलांनी व्यवसाय सुरू करण्यासाठी पैसे खर्च केले आहेत. जरी त्या २ लाख रुपयांचे कर्ज घेण्यासाठी गेल्या तरी, सरकारच्या महसुलातून कर्ज घेतले जाणार नाही. सरकार फक्त एक सुविधा देणारे म्हणून काम करेल जे या लोकांना बँकांकडून कर्ज देईल. उर्वरित योजना पूर्ण करण्यासाठी, सरकारने शिक्षण आणि आरोग्य यासारख्या क्षेत्रांमध्ये काही टक्के बजेट कमी करणे शक्य आहे.' ओपी जिंदाल ग्लोबल युनिव्हर्सिटीचे असोसिएट प्रोफेसर दीपांशू मोहन लिहितात की जर बिहारमध्ये खरा बदल झाला तर नवीन रस्ते, कारखाने आणि रुग्णालये बांधण्यावरील भांडवली खर्च २०% ने कमी होईल. आपल्याला अनुदान आणि पगार बिलांवर नियंत्रण ठेवावे लागेल आणि आपले कर संकलन वाढवावे लागेल. अन्यथा बिहारची अर्थव्यवस्था वाढेल, परंतु जमिनीवर कोणतीही सुधारणा दिसणार नाही.

दिव्यमराठी भास्कर 20 Nov 2025 7:05 am

पुणे रेल्वे स्टेशनवर मृत्यूचा सापळा! १० महिन्यांत २९७ जणांचा जीव गेला, तर मागील पाच वर्षांत..धक्कादायक आकडेवारी समोर

प्रभात वृत्तसेवा पुणे – एका प्लॅटफाॅर्मवरून दुसऱ्या प्लॅटफाॅर्मवर जाण्यासाठी धोकादायक पद्धतीने रेल्वे रूळ ओलांडून शाॅर्टकट मारतात. मात्र, हाच शाॅर्टकट जीवावर बेततो, मागील दहा महिन्यांत २९७ प्रवाशांना असा शाॅर्टमुळे जीव गमवावा लागला आहे. तर मागील पाच वर्षांत तब्बल जवळपास दीड हजार प्रवाशांना जीव गमवावा लागल्याची घटना दरवर्षी घडत आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकांवर आरपीएफकडून सुरक्षा वाढविण्याची आवश्यकता […] The post पुणे रेल्वे स्टेशनवर मृत्यूचा सापळा! १० महिन्यांत २९७ जणांचा जीव गेला, तर मागील पाच वर्षांत..धक्कादायक आकडेवारी समोर appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 20 Nov 2025 7:00 am

अग्रलेख : अशी ही पळवापळवी

गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकीय मंचावर विविध प्रकारच्या नाट्यपूर्ण घडामोडी घडत असल्याने एखाद्या चित्रपटाला किंवा नाटकाला लाजवतील असे प्रसंगही महाराष्ट्रात घडताना दिसत आहेत. सध्या महाराष्ट्रात सत्तेवर असलेल्या महायुतीतील घटक पक्ष भाजपा आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये नेते आणि कार्यकर्ते पळवापळवी नाटक रंगले आहे त्या पार्श्‍वभूमीवर पक्षांच्या नेत्यांमध्ये आणि […] The post अग्रलेख : अशी ही पळवापळवी appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 20 Nov 2025 6:55 am

Pune News : रुबी हॉलजवळ हॉटेलचा स्लॅब कोसळला, अग्निशमन दलाच्या जवानांनी वाचवले दोघांचे प्राण

प्रभात वृत्तसेवा पुणे – ढोले-पाटील रस्त्यावर रूबी हॉस्पिटलजवळ हाॅटेलच्या नूतनीकरणाचे काम सुरू असताना स्लॅब कोसळून दोन जण अडकले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी भिंतीच्या ढिगाऱ्या खालून त्यांना बाहेर काढले. दोघे जखमी असून, उपचारासाठी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची चर्चा दिवसभर शहरात होती.रुबी हाॅल हाॅस्पिटलशेजारी एका हाॅटेलचे नूतनीकरणाचे काम सुरू होते. भिंत पाडण्याचे […] The post Pune News : रुबी हॉलजवळ हॉटेलचा स्लॅब कोसळला, अग्निशमन दलाच्या जवानांनी वाचवले दोघांचे प्राण appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 20 Nov 2025 6:45 am

थंडीचा कहर! पुणेकर गारठले, किमान तापमान ७.७ अंशावर; वेधशाळेचा काय आहे अंदाज?

प्रभात वृत्तसेवा पुणे – सलग दुसऱ्या दिवशी शहरासह उपनगरात थंडीचा जोर कायम होता. बहुतांश परिसरातील किमान तापमान १० अंशाच्या खाली नोंदविले गेले. तर पुढील दोन दिवस थंडीचा जोर कायम राहणार असून, दि. २२ नोव्हेंबरनंतर शहरासह जिल्ह्यातील किमान तापमानात वाढ होऊन थंडी काहीशी कमी होईल. तर ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी पावसाच्या अति हलक्या सरींची शक्यता पुणे […] The post थंडीचा कहर! पुणेकर गारठले, किमान तापमान ७.७ अंशावर; वेधशाळेचा काय आहे अंदाज? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 20 Nov 2025 6:30 am

लक्षवेधी : भारतीय शेतीमालाला दिलासा

– हेमंत देसाई ट्रम्प यांच्या वाढीव करशुल्कामुळे अमेरिकेत भारतातून होणारी शेतीमालाची निर्यात घटली होती. आता वाढीव शुल्क हटवण्याच्या निर्णयामुळे भारताला अडीच ते तीन अब्ज डॉलर इतक्या मूल्याचा फायदा होऊ शकतो. देशातील कंपन्यांची तिमाही कामगिरी सरस ठरलेली आहे. त्याचबरोबर स्थानिक संस्थात्मक गुंतवणूकदार आणि परकीय गुंतवणूकदार हे भारतात जोरदार शेअर खरेदी करत आहेत. अमेरिकेशी संभाव्य व्यापार करार […] The post लक्षवेधी : भारतीय शेतीमालाला दिलासा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 20 Nov 2025 6:22 am

पुणे विद्यापीठाचा मोठा निर्णय! PRN ब्लॉक झालेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेची एक शेवटची संधी..वाचा सविस्तर

प्रभात वृत्तसेवा पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातील सुमारे १ लाख विद्यार्थ्यांची सत्र पूर्तता संपल्यामुळे या विद्यार्थ्यांचे पीआरएन क्रमांक ब्लॉक करून ठेवण्यात आले आहेत. या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा परीक्षा देण्याची एक संधी द्यावी,असा निर्णय विद्यापीठाच्या विद्यापरिषद व व्यवस्थापन परिषदेत झाला. याला पंधरा दिवसांहून अधिक कालावधी उलटून गेला तरी अद्याप त्यावर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने […] The post पुणे विद्यापीठाचा मोठा निर्णय! PRN ब्लॉक झालेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेची एक शेवटची संधी..वाचा सविस्तर appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 20 Nov 2025 6:15 am

PMC News : आयुक्तांचा दणका! निकृष्ट खड्डे दुरुस्ती भोवली, दोन अभियंते निलंबित, ठेकेदाराला लाखोंचा दंड

प्रभात वृत्तसेवा पुणे – शहरातील खड्डेमुक्त अभियानात निकृष्टपणे केलेले काम दोन अभियंते, तसेच ठेकेदाराला चांगलेच भोवले आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत महापालिका आयुक्तांनी वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाचे कनिष्ठ अभियंता अमित हेरकर आणि उपअभियंता विनायक शिंदे यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय हे काम करणाऱ्या जय शिवशंकर कन्स्ट्रक्शन या ठेकेदारास १ लाख रुपयांचा दंड […] The post PMC News : आयुक्तांचा दणका! निकृष्ट खड्डे दुरुस्ती भोवली, दोन अभियंते निलंबित, ठेकेदाराला लाखोंचा दंड appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 20 Nov 2025 6:00 am

बिबट्याच्या दहशतीमुळे मोठा निर्णय! अहिल्यानगरच्या ६०० गावांमधील शाळांची वेळ बदलली

प्रभात वृत्तसेवा पुणे – अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निर्देशानंतर, जिल्हाधिकाऱ्यांनी अहिल्यानगरमधील ज्या गावांमध्ये अलिकडच्या काळात बिबट्या संघर्षाची नोंद झाली आहे, त्या गावांमध्ये शाळांच्या वेळा बदलण्याचे आदेश जारी केले आहेत.अहिल्यानगरमधील ६०० गावांमधील शाळांसाठी आदेश जारी करण्यात आला असून, त्याच्या अंमलबजावणीला १८ नोव्हेंबरपासून सुरुवात झाली आहे. याविषयी अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी ही माहिती दिली. […] The post बिबट्याच्या दहशतीमुळे मोठा निर्णय! अहिल्यानगरच्या ६०० गावांमधील शाळांची वेळ बदलली appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 20 Nov 2025 5:45 am

Pune News : “स्वस्थ भारतासाठी निसर्गोपचार आवश्यक,”राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी दिला मोलाचा सल्ला

प्रभात वृत्तसेवा पुणे – निसर्गोपचार, आयुर्वेद, पूर्वीची जीवनशैली, नैसर्गिक शेती, जीवनमूल्यांचा अंगीकार केल्यास स्वस्थ भारत बनू शकतो, असा विश्वास राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी व्यक्त केला. यासाठी निसर्गोपचार वैद्यक, संशोधक, प्राध्यापक, विद्यार्थी महत्त्वाची भूमिका बजावतील, असेही ते म्हणाले.राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेतर्फे येवलेवाडीतील निसर्गग्राम येथे आठव्या निसर्गोपचार दिनी ते बोलत होते. या वेळी केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव, […] The post Pune News : “स्वस्थ भारतासाठी निसर्गोपचार आवश्यक,” राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी दिला मोलाचा सल्ला appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 20 Nov 2025 5:30 am

Z.P Election : नारायणगाव गटात पक्षांची भूमिका गुलदस्त्यात, पण इच्छुकांच्या भेटीगाठी सुरू

प्रभात वृत्तसेवा नारायणगाव – जिल्हा परिषद निवडणुकीची अधिकृत घोषणा झालेली नसली तरी नारायणगाव-वारुळवाडी जिल्हा परिषद गटात इच्छुकांनी मतदारांच्या भेटीगाठी घेऊन प्रचारास सुरुवात केली आहे. काही उमेदवारांनी आपण केलेली विकासकामे आणि भविष्यातील योजनांची माहितीपत्रके छापून मतदारांपर्यंत पोहोचवणे सुरू केले आहे. या गटात आतापर्यंत एकाही राजकीय पक्षाने अधिकृत उमेदवारी जाहीर केलेली नाही. परंतु, इच्छुक उमेदवारांच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर […] The post Z.P Election : नारायणगाव गटात पक्षांची भूमिका गुलदस्त्यात, पण इच्छुकांच्या भेटीगाठी सुरू appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 20 Nov 2025 5:15 am

Malegaon : ‘पॅनेल उभे करतोस काय?’माळेगावात शरद पवार गटाच्या नेत्यावर प्राणघातक हल्ला

प्रभात वृत्तसेवा बारामती – बारामती नगरपरिषद आणि माळेगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीमुळे राज्यात चर्चा सुरू असतानाच, माळेगावात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे शहराध्यक्ष नितीन तावरे यांना बुधवारी (दि. १९) सायंकाळी मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे माळेगावातील राजकीय वातावरण तापले आहे.मारहाणीमागे राजकीय कारणे असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.माळेगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी एकूण १० अर्ज दाखल झाले […] The post Malegaon : ‘पॅनेल उभे करतोस काय?’ माळेगावात शरद पवार गटाच्या नेत्यावर प्राणघातक हल्ला appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 20 Nov 2025 5:00 am

इंदापुरात ‘महाभारत’! भरणेंचा विकासाचा ‘मास्टरस्ट्रोक’की पाटील-गारटकरांची नवी आघाडी ठरणार वरचढ?

प्रभात वृत्तसेवा इंदापूर – इंदापूर नगरपरिषद निवडणुकीने तालुक्यातील राजकीय वातावरणाला अक्षरशः उकळी आणली आहे. यंदाची निवडणूक केवळ उमेदवारांची नसून, दोन भिन्न राजकीय शक्तींच्या वैचारिक, संघटनात्मक आणि प्रतिष्ठेच्या आमनेसामने झुंजीची बनली आहे.एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी राष्ट्रवादीचा त्याग करून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि भाजप नेते प्रवीण माने यांना एकत्र आणत ‘कृष्णा-भीमा विकास आघाडी’ […] The post इंदापुरात ‘महाभारत’! भरणेंचा विकासाचा ‘मास्टरस्ट्रोक’ की पाटील-गारटकरांची नवी आघाडी ठरणार वरचढ? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 20 Nov 2025 4:45 am

सासवडमध्ये राजकीय भूकंप! नगराध्यक्षपदाचे ९ अर्ज बाद, भाजप न्यायालयात जाण्याच्या तयारीत

प्रभात वृत्तसेवा सासवड – सासवड नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया मंगळवारी (ता. १८) संथगतीने सुरू झाली. ही प्रक्रिया अखेर बुधवारी रात्री उशिरापर्यंत चालु राहिली. निवडणूक निर्णय अधिकारी सतीश थेटे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या काटेकोर छाननीत अनेक अर्जांवर आक्षेप घेतल्यामुळे मोठी उलथापालथ दिसून आली.नगराध्यक्षपदासाठी दाखल झालेल्या एकूण १५ अर्जांपैकी ६ अर्ज वैध, तर […] The post सासवडमध्ये राजकीय भूकंप! नगराध्यक्षपदाचे ९ अर्ज बाद, भाजप न्यायालयात जाण्याच्या तयारीत appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 20 Nov 2025 4:30 am

Manchar Election : मंचर राजकारण तापलं! महायुती-मविआ दोन्ही आघाड्यांमध्ये गोंधळ, बंडखोरांचे फावणार?

प्रभात वृत्तसेवा मंचर – मंचर नगरपंचायतीची पहिलीच निवडणूक होत असल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस –भाजप विरुद्ध शिवसेना, अशी लढत रंगण्याचे संकेत आहेत. तर, दुसरीकडे महाविकास आघाडीत शरदचंद्र पवार पक्षाची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (उबाठा) यांनी एकत्र येत आघाडीची घोषणा केली आहे. काँग्रेस आय पक्षाने स्वतंत्र भूमिका घेतल्याने राजकीय समीकरणे अधिकच जटील […] The post Manchar Election : मंचर राजकारण तापलं! महायुती-मविआ दोन्ही आघाड्यांमध्ये गोंधळ, बंडखोरांचे फावणार? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 20 Nov 2025 4:15 am

Bhor News : पारवडीत नेमकं काय घडलं? बेपत्ता महिलेचा मृतदेह विहिरीत आढळल्याने परिसरात खळबळ

प्रभात वृत्तसेवा नसरापूर – भोर तालुक्यातील पारवडी गावातील अलका किसन लिमण या महिलेचा मृतदेह शेतातील विहिरीत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सकाळपासून त्या बेपत्ता असल्याने नातेवाईक व गावकरी यांनी शोधमोहीम सुरू केली होती. शोध लागल्यावर हवेली आपत्ती व्यवस्थापन पथकाला बोलावण्यात आले. खबर देणारे लहु बापुराव लिमण (वय 35) यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते आणि त्यांचे चुलत […] The post Bhor News : पारवडीत नेमकं काय घडलं? बेपत्ता महिलेचा मृतदेह विहिरीत आढळल्याने परिसरात खळबळ appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 20 Nov 2025 4:00 am