ते माझ्यासाठी सर्वकाही होते… - हेमा मालिनीची भावुक पोस्ट
दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांच्या ८९व्या वर्षी झालेल्या निधनानं संपूर्ण चित्रपटसृष्टी शोकात बुडाली. अनेक दशकं चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या या सुपरस्टारच्या शेवटच्या क्षणांत त्यांच्या सोबत मुलं आणि पत्नी हेमा मालिनी खंबीरपणे उभे होते. त्यांचं कुटुंब अजूनही या दुःखातून सावरू शकलेलं नाही. अशातच, धर्मेंद्र यांच्या निधनानंतर तीन दिवसांनी हेमा मालिनी यांनी अखेर आपल्या भावना व्यक्त केल्या. आयुष्यभर साथ देणाऱ्या जोडीदाराच्या आठवणी सांगताना त्यांनी भावनिक शब्दांत आपलं दु:ख व्यक्त केलं आणि त्यांच्या सहवासाच्या क्षणांना उजाळा दिला. त्या म्हणतात -धरमजी,ते माझ्यासाठी खूप काही होते. प्रेमळ पती, ईशा आणि अहानाचे आदर्श वडील, मित्र, तत्त्वज्ञ, मार्गदर्शक, कवी… आणि आयुष्यातील प्रत्येक कठीण क्षणी ‘ज्याच्याकडे मी धाव घेई’ असे माझे सर्वस्व! ते नेहमीच माझ्या कुटुंबाशी आत्मीयतेने वागले, प्रेम आणि समभावाने प्रत्येकाला आपलंसं केलं.कलाकार म्हणून त्यांचं अपार कसब, प्रचंड लोकप्रियतेनंतरही असलेली नम्रता आणि सार्वत्रिक आकर्षण यामुळे ते खऱ्या अर्थाने अद्वितीय आयकॉन होते. माझं वैयक्तिक दु:ख शब्दांत व्यक्तच होऊ शकत नाही…, त्यांच्याविना आयुष्यात निर्माण झालेली पोकळी कायमच राहील.आयुष्यभराच्या सहवासानंतर आता फक्त असंख्य आठवणी उरल्या आहेत….”
प्रभात वृत्तसेवा राजगुरूनगर – राजगुरूनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन रविवारी (दि. 30) रोजी मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती तथा पुणे जिल्हा पालक न्यायमूर्ती रेवती मोहिते -डेरे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती राजगुरूनगर वकील बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. वैभव कर्वे यांनी पत्रकार परिषदेत दिली.राजगुरुनगर येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाची नवीन 7 […] The post पक्षकारांचा त्रास आता संपणार! राजगुरूनगर नवीन न्यायालयात मिळणार ‘या’ खास सुविधा; वाचा कधी आहे उद्घाटन? appeared first on Dainik Prabhat .
Khed News: मुंबईच्या डबेवाल्यांचे ‘जनक’कोण? खेडमधील ‘या’गावाला मिळणार आता जागतिक ओळख
प्रभात वृत्तसेवा आंबेठाण – खेड तालुक्यातील वाजवणे (ता. खेड) या शांत गावाने आज एक ऐतिहासिक क्षण अनुभवला. मुंबई शहराच्या जगप्रसिद्ध डबेवाला सेवेला शिस्त, शून्य-चूक पद्धती आणि पर्यावरणपूरक कार्यपद्धतीची भक्कम पायाभरणी करणारे आद्य मार्गदर्शक स्व. महादू हावजी बच्चे यांच्या स्मरणार्थ उभारण्यात येत असलेल्या भव्य स्मारकाचे भूमिपूजन भक्तिमय आणि जल्लोषपूर्ण वातावरणात संपन्न झाले. सुमारे 125 वर्षांच्या परंपरेला […] The post Khed News: मुंबईच्या डबेवाल्यांचे ‘जनक’ कोण? खेडमधील ‘या’ गावाला मिळणार आता जागतिक ओळख appeared first on Dainik Prabhat .
leopard attack: ‘सायंकाळी सातनंतर घराबाहेर नको’! दौंड तालुक्यात बिबट्याचा वावर वाढला, पशुधन धोक्यात
प्रभात वृत्तसेवा मलठण – राज्यात दिवसेंदिवस नागरी वस्तीसह पाळीव जनावरांवर बिबट्यांचे हल्ले वाढत चालले आहेत. दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील काही गावांमध्ये बिबट्याचा वावर वाढत असून शेतातील गोट्यांमधील जनावरांवर बिबट्या हल्ले करू लागला आहे. तालुक्याच्या पूर्व भागात भीमा नदीकिनारी झाडे झुडपे आहेत. तसेच मोठ्या प्रमाणात ऊसाचे क्षेत्र असल्याने बिबट्यानं दडण्यासाठी खूप जागा आहे. रात्री शिकारीच्या शोधत […] The post leopard attack: ‘सायंकाळी सातनंतर घराबाहेर नको’! दौंड तालुक्यात बिबट्याचा वावर वाढला, पशुधन धोक्यात appeared first on Dainik Prabhat .
करिअर : सुरेश वांदिलेसध्या, देशाच्या अन्नप्रक्रिया उद्योगामध्ये महाराष्ट्राचा १३ टक्के वाटा आहे. कृषी आणि संबधित उद्योग क्षेत्रातील महाराष्ट्राचं एकूण मूल्यवर्धन (ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड) १२.१० टक्के आहे. महाराष्ट्रात २७२८ अन्न प्रकिया उद्योग घटकांची नोंदणी झाली आहे. देशाच्या कृषी आणि अन्नप्रकिया उद्योगातील निर्यातीपैकी महाराष्ट्राचा वाटा १८ टक्क्यांच्या आसपास आहे. या क्षेत्रात असणाऱ्या देशातील एकूण मनुष्यबळापैकी १३ टक्के मनुष्यबळ आपल्या राज्यात आहे. अन्नप्रक्रिया उद्योगाचे १२ क्लस्टर्स महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे विभागीय औद्योगिक समतोल साधला गेला आहे.अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये आपलं राज्य देशातील महत्त्वाचं केंद्र बनावं, यासाठी शासन प्रयत्नशील आहे. त्यासाठी, मुख्यमंत्री अन्नप्रक्रिया योजना राबवली जाते.योजनेची उद्दिष्ट्ये :-(१) या क्षेत्रातील गुंतवणुकीत वाढ होऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात दुप्पटीने वाढ व्हावी, (२) या क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी, गुंतवणूकदारांनी इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्राला प्राधान्य द्यावे, (३) या क्षेत्रात दोन आकडी विकास दर साध्य करता यावा, (४) या क्षेत्राद्वारे किमान ५ लाख कुशल आणि अकुशल मनुष्यबळासाठी रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात, (५) अपव्यय कमी करून आणि मूल्यवर्धन करून शेतकऱ्यांना चांगलं उत्पन आणि ग्राहकांना परवडणारा आणि दर्जेदार माल उपलब्ध व्हावा, (६) पोषणयुक्त आहाराचा समतोल साधणाऱ्या अन्नपदार्थांची निर्मिती करून कुपोषणाच्या समस्येवर मात करता यावी, (७) व्यापक पायाभूत सुविधा आणि पुरवठासाखळी निर्मिती करून अन्नप्रकिया उद्योग भविष्यवेधी आणि अधिक स्पर्धात्मक व्हावे, (७) या उद्योगासाठी आधुनिक तंत्रज्ञान उपलब्धता, (८) अन्न सुरक्षा, नवोपमक्रमशीलता, उपलब्ध संसाधनाच्या प्रभावी वापरास प्राधान्य, (९) विभागीय समतोल साधण्यासाठी स्थानिकरीत्या उत्पादित पिकांचा उपयोग.साहाय्याचे स्वरूप :-(१) प्रकल्प खर्चाच्या ३० टक्के भांडवली अनुदान. यामध्ये तांत्रिक सिव्हिल (बांधकामाशी सबंधित अभियांत्रिकी) कामं, यंत्रसामगी आणि प्रकल्पांचा समावेश आहे. या साहाय्यासाठी किमान ५० लाख रुपयांपर्यंत मर्यादा घालण्यात आली आहे. (२) काही अपवाद वगळल्यास, १०० टक्के थेट परदेशी गुंतवणुकीची सुविधा, (३) अशा घटकांना त्यांचं उत्पादन १०० टक्के निर्यात करण्याची मुभा. त्यांना ५० टक्के उत्पादन देशांतर्गत बाजारात विकण्याची परवानगी. निर्यातीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर कॉर्पोरेट कर लागू केला जात नाही. (४) गुंतवणुकीशी निगडित कर सवलती-थेट १०० टक्के कर वजावट.इतर सवलती :-मोठे नवीन उद्योग आणि त्यांच्या विस्तार करताना, सर्व प्रकारच्या गटासाठी पुढील अनुदान दिलं जातं - (१) जल लेखा(वाटर ऑडिट) परिक्षणाच्या ७५ टक्के किमतीपर्यंत एक लाख रुपयांच्या मर्यादेपर्यंत अनुदान, (२)ऊर्जा लेखा(एनर्जी ऑडिट)परीक्षणाच्या ७५ टक्के किमतीपर्यंत दोन लाख रुपयांच्या मर्यादेपर्यंत अनुदान, (३) पाणी जतन आणि पुनर्वापर करण्याच्या उपायांसाठी भांडवली उपकरणांच्या खर्चाच्या ५० टक्क्यांपर्यंत अनुदान. हे अनुदान ५ लाख रुपयांच्या मर्यादेपर्यंत असेल, (४) ऊर्जा कार्यक्षमतेत वाढ करण्याच्या उपकरणांसाठी भांडवली खर्चाच्या ५० टक्क्यांपर्यंत अनुदान. हे अनुदान ५ लाख रुपयांच्या मर्यादेपर्यंत असेल, (४) मोठ्या उद्योगांना जमीन अधिग्रहणासाठी (भाडेपट्टा व विक्री प्रमाणपत्रांसह) १०० टक्के मुद्रांक शुल्क माफ, (५) सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांना एमआयडीसीमधील मोकळी जमीन वापरण्याची सुविधा, (६) एमआयडीसीमार्फत विकसित होणाऱ्या नव्या औद्योगिक क्षेत्रात, सूक्ष्म आणि लघू उद्योंगासाठी १०० टक्के जमीन राखीव.अन्न प्रक्रिया उद्योगाला केंद्र सरकारने सर्वोच्च प्राधान्य दिलं आहे. त्या अानुषंगाने या क्षेत्राला सहाय्य करण्यासाठी, नाबार्ड (नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चरल ॲण्ड रुरल डेव्हलपमेंट - राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक)मार्फत २००० कोटींचं भांडवल उपलब्ध करून दिलं आहे. अधिसुचित फूड पार्कमध्ये अन्नप्रकिया घटक स्थापन केल्यास नाबार्डमार्फत अल्प दरातील भांडवल उपलब्ध करून दिलं जातं.संपर्क : - https : //maitri.maharashtra.gov.in/ agro -food- processing/
मंचरमध्ये राजकीय फड रंगणार! आज दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या सभा; नगरपंचायत निवडणुकीचा प्रचार तापला
प्रभात वृत्तसेवा मंचर – मंचर नगरपंचायतीच्या निवडणूक मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक असताना प्रचाराचा जोर शिगेला पोहोचला आहे. यात आता राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभांमुळे मंचरचे निवडणूक वातावरण आणखी तापण्याची चिन्हे आहेत. शुक्रवार, दि. 28 रोजी या […] The post मंचरमध्ये राजकीय फड रंगणार! आज दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या सभा; नगरपंचायत निवडणुकीचा प्रचार तापला appeared first on Dainik Prabhat .
अयोध्येतील राम मंदिराच्या शिखरावर धर्मध्वज विराजमान झाला तो दिवस मंगळवार २५ नोव्हेंबर २०२५. या भव्य मंदिरावर धर्मध्वज फडकवणे हा केवळ धार्मिक क्षण नाही, तर सनातन श्रद्धेच्या जागतिक प्रतिष्ठेचा पुरावा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंदिराच्या शिखरावर ध्वजारोहण करताच, 'जय श्री राम'च्या भावनिक जयघोषात उपस्थित विशाल जनसमूह हेलावला. धर्मध्वज फडकवण्याच्या ऐतिहासिक क्षणाने संपूर्ण अयोध्यानगरी भक्तीने भारावून गेली. शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवर, धर्मपाठासह, भाविकांमध्ये 'जय श्री राम'चा जयघोष दुमदुमला. हे केवळ मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्याचेच नव्हे, भारताच्या सांस्कृतिक जाणिवेचे प्रतीक होते. दुसऱ्या बाजूला हा क्षण पाच शतकांपासून चालत आलेल्या संघर्षाच्या सार्थकतेचे प्रतीक ठरतो. १५२८ मध्ये मोगल शासक बाबरचा सेनापती मीर बाकी याने प्रभू श्री रामचंद्रांच्या जन्मस्थानाचे पवित्र मंदिर उद्ध्वस्त करून त्यावर बाबरी मशीद बांधली. संघर्षाची बीजे रोवली गेली ती तेव्हापासूनच. तो संघर्ष केवळ जमिनीच्या तुकड्यासाठी नव्हता, तर ‘आस्था’ आणि ‘अनास्था’ यांच्यातला होता. भारताच्या आत्म्यावरचे ते आक्रमण होते. श्री रामभक्तांनी तेव्हापासूनच रामजन्मभूमी मुक्त करण्यासाठी अविरत संघर्ष केला, प्रसंगी बलिदानही दिले. इतिहासातील नोंदीनुसार, या संपूर्ण काळात तब्बल ७६ मोठे संघर्ष झाले आणि असंख्य कारसेवकांचे, साधू-संतांचे रक्त सांडले. १८५३ मध्ये हिंदू-मुस्लीम समाजात यावरून पहिला मोठा वाद झाला. त्यानंतर १८८५ मध्ये महंत रघुबर दास यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. ९० च्या दशकात विश्व हिंदू परिषदेच्या नेतृत्वाखाली श्री रामजन्मभूमी आंदोलन उभे राहिले. ‘श्री रामलला हम आयेंगे, मंदिर भव्य बनायेंगे’ ही घोषणा देशव्यापी झाली. मग ६ डिसेंबर १९९२ ची घटना असो, वा त्यानंतरचा न्यायालयीन लढा; प्रत्येक टप्पा हा या यज्ञातील एका आहुतीसारखाच होता. ५०० वर्षांच्या संघर्षाचा निर्णायक क्षण आला तो ९ नोव्हेंबर २०१९ रोजी. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक आणि एकमताने निर्णय देत, वादग्रस्त जमीन श्रीराम मंदिराला देण्याचा स्पष्ट आदेश दिला. त्यानंतर ५ ऑगस्ट २०२० रोजी पंतप्रधान मोदींच्या हस्ते या भव्य मंदिराचे भूमिपूजन झाले आणि बांधकामाची सुरुवात झाली.भगवान राम जन्मभूमीवर भव्य मंदिर बांधण्याची इच्छा पूर्ण होण्यास इतका कालावधी का लागला? त्याची अनेक कारणे आहेत. स्वातंत्र्यानंतर सर्वोच्च प्राथमिकता असूनही, संकुचित राजकीय विचारांमुळे ती दुर्लक्षित राहिली. कोणत्याही स्वाभिमानी राष्ट्राची प्राथमिक जबाबदारी म्हणजे स्वातंत्र्य मिळताच आक्रमणामुळे बाधित झालेल्या पुरातन वारसा जपण्यासाठी ते अवशेष पुसून टाकणे. जगभरातील अनेक देशांनी हेच केले आहे. रशियन साम्राज्याने बांधलेले ऑर्थोडॉक्स चर्च पाडण्याचा पोलंडचा निर्णय हे एक उदाहरण त्यासाठी देता येईल; परंतु भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सांस्कृतिक वारशाचा अभिमान असलेले राजकीय नेतृत्व नसल्याने अनेक वर्षं राम मंदिराच्या निर्माणाकडे आपण लक्ष दिले नाही. हिंदुधर्मियांचे आस्थेचे स्थान असलेले राम मंदिर अयोध्येत बांधून पूर्ण झाले, ते केवळ न्यायव्यवस्थेने वाद सोडवण्याचा निर्णय घेतल्यामुळे नाही, तर मोदी सरकारने अनुकूल धार्मिक सलोख्याची परिस्थिती निर्माण केल्यामुळे न्यायव्यवस्था ती सोडवू शकली. याउलट, आधीच्या बहुतेक केंद्र सरकारांनी अशा परिस्थितीत कोणतीही ठोस पावलं उचललेली दिसली नाहीत. हे संकुचित राजकारण तसेच मॅकॉलेच्या शिक्षण व्यवस्थेतून जन्मलेल्या मानसिकतेमुळे होते, ज्याचा उल्लेख पंतप्रधान मोदी यांनी अयोध्येतील आपल्या भाषणातून केला होता. यापूर्वीची गुलाम मानसिकता पूर्णपणे नष्ट करण्याची गरज असल्याचे पंतप्रधानांनी यावेळी अधोरेखित केले. मॅकॉलेच्या शिक्षण व्यवस्थेतून जन्मलेल्या मानसिकतेने भारतीय समाजाला केवळ त्याच्या समृद्ध सांस्कृतिक जाणिवेपासून दूर नेले नाही, तर त्या वारशाबद्दल मनात न्यूनगंडाची भावना निर्माण केली. पंतप्रधान मोदी यांनी पुढील दहा वर्षांत ही मानसिकता मुक्त करण्याचा दृढनिश्चय केला आहे, हे काही कमी नाही, पण हे तितकेसे सोपेही नसल्याने त्यासाठी शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल आवश्यक आहे. त्यांनी तेही अयोध्याभूमीतूनच सांगितले आहे.धर्मध्वजाबाबतच्या पारंपरिक श्रद्धा आहेत. हे शक्ती, वैभव आणि संरक्षणाचेही एक शक्तिशाली प्रतीक मानले जाते. शास्त्रांमध्ये त्याचे वर्णन ऊर्जा आणि आध्यात्मिक तेजाचे प्रकटीकरण म्हणून केले आहे. राम मंदिरात फडकवल्या जाणाऱ्या ध्वजाचा भगवा रंग देखील विशेष ओळख करून देतो. तो दीर्घकाळापासून शौर्य, त्याग, भक्ती आणि शक्तीचे प्रतीक आहे. ध्वजावर चित्रित केलेले सूर्य चिन्ह ऊर्जा, प्रकाश आणि जीवन दर्शवते, तर त्याच्या मध्यस्थानी कोरलेले 'ॐ' हे सौर मंडळाचे पहिले आणि अंतिम उच्चारण आहे, जे आध्यात्मिक शक्ती आणि देवत्व दर्शवते. कचनारची एक प्रजाती, कोविदार वृक्ष हा अयोध्येचा राज्यवृक्ष आहे. भरत जेव्हा रामाला राजी करण्यासाठी चित्रकूटला गेला तेव्हा त्याच्या रथावर 'कोविदार' असा शिलालेख असलेला ध्वज होता, असे असंख्य संदर्भ आहेत. खरं तर, आज भारत केवळ आपल्या चेतना, मन आणि काळाला स्वतःच्या चेतनेशी जोडत नाही, तर भविष्यासाठी ऊर्जा आणि दिशा देखील निश्चित करत आहे. दिशा, चेतना आणि आदर्शांचा हा संगम असाधारण आहे. एकीकडे ते कल्याणकारी लोकपरंपरेचे बीज धारण करते, तर दुसरीकडे, त्याच्या आध्यात्मिक-सांस्कृतिक आदर्शांची आणि शौर्याचीही खोल जाणीव आहे. अयोध्या आता केवळ एक धार्मिक नगरी नव्हे, तर जागतिक स्तरावर भारताच्या सांस्कृतिक परंपरेची राजधानी म्हणून उदयास आली आहे. प्रभू रामचंद्रांच्या आदर्श नीतीनुसार जगाला मार्गदर्शन करण्याची भारताची क्षमता दर्शविणारा हा धर्मध्वज अनेक शतके अवकाशात दिमाखाने फडकत राहील, यात शंका नाही.
Ranjangaon Crime: रांजणगावात दिवसाढवळ्या घरफोडी! ५ लाखांचा मुद्देमाल लंपास, पोलिसही चक्रावले
प्रभात वृत्तसेवा रांजणगाव गणपती – रांजणगाव गणपती परिसरात स्मशानभूमीसमोर, सोनेसांगवी रस्त्यावर बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरफोडीची घटना समोर आली आहे. या चोरीत तब्बल ५ लाख २९ हजार रुपयांचा सोन्या-चांदीचा मुद्देमाल आणि रोख रक्कम चोरीला गेली आहे.याबाबत नीलम पांडुरंग तोडकर (वय ४८, रा. रांजणगाव गणपती) यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलिसात फिर्याद दिली आहे. सोमवारी फिर्यादी कुटुंब […] The post Ranjangaon Crime: रांजणगावात दिवसाढवळ्या घरफोडी! ५ लाखांचा मुद्देमाल लंपास, पोलिसही चक्रावले appeared first on Dainik Prabhat .
प्रभात वृत्तसेवा मंचर – मंचर शहरात निवडणुकीची प्रचारमोहीम जोरात सुरू असून विविध पक्षांच्या तसेच अपक्ष उमेदवारांच्या वाहनांवरील स्पीकरमधून होणारा कर्कश आवाज नागरिकांना त्रासदायक ठरत आहे. व्यापारी, दुकानदार, रुग्णालयातील रुग्ण, तसेच शाळांमधील विद्यार्थी उच्च आवाजामुळे हैराण झाले असून, आवाजाची तीव्रता (डेसिबल) कमी ठेवावी,अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. निवडणूक मतदानास अवघे तीन दिवस राहिल्यामुळे सर्वच उमेदवारांनी प्रचाराचा […] The post Manchar Election: निवडणुकीचा ज्वर की डोकेदुखी? मंचरमध्ये उमेदवारांच्या ‘या’ कृतीमुळे व्यापारीही संतापले appeared first on Dainik Prabhat .
मराठवाड्यात खासदार, आमदारांची सत्त्वपरीक्षा
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत सध्या राजकीय रंगत भरली आहे. नगर परिषदेच्या निवडणुकीत सर्वाधिक नगराध्यक्ष व नगरसेवक आपल्याच पक्षाचे निवडून यावेत यासाठी सत्ताधारी पक्षातील भाजप, एकनाथ शिंदे गट तसेच अजित पवार गटाने कंबर कसली आहे. याविरुद्ध विरोधी पक्षांत असलेल्या काँग्रेस व उबाठा गटाने देखील यासाठी जोरदार प्रयत्न सुरू ठेवले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील प्रचार सभा तसेच नांदेड जिल्ह्यातील लोहा येथील प्रचार सभा लक्षवेधक ठरली. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे मराठवाड्यातील सर्वच भाजप उमेदवारांना मोठे बळ मिळाले आहे. अयोध्येत पार पडलेल्या धर्मध्वज सोहळ्याचा फायदा देखील मोठ्या प्रमाणात भाजपला मिळणार आहे. अयोध्येतील कार्यक्रमामुळे तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित राष्ट्राविषयीच्या भूमिकेमुळे भाजपचे संख्याबळ मराठवाड्यात निश्चितच वाढणार आहे. केंद्रातील सत्ताधारी भाजप तसेच राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राज्याच्या विकासासाठी असलेली भूमिका प्रत्येक प्रचार सभेतून स्पष्ट केली जात आहे. भाजपच्या अनेक नेत्यांनी तसेच विविध नेत्यांनी मराठवाड्यात भाजपचे सर्वाधिक नगराध्यक्ष व नगरसेवक निवडून यावेत यासाठी सूक्ष्म नियोजन करीत पक्षाचे कार्य व विकासाची दिशा स्पष्ट करत मतदारांकडे आपली भूमिका मांडली. याचबरोबर राज्यात सत्तेत असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील मराठवाड्यात विशेष लक्ष केंद्रित केले. मराठवाड्यातील धाराशिव तसेच नांदेड जिल्ह्यात त्यांच्या विक्रमी सभा पार पडल्या. आपल्याकडे तिजोरीची चावी आहे, असे सांगत त्यांनी मतदारांना आकर्षित केले. शिवसेनेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील मराठवाड्यातून जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणावेत असे आदेश त्यांच्या सहकारी मंत्र्यांना दिले आहेत. त्या दृष्टीने राज्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी मराठवाड्यात आपली शक्ती पणाला लावली आहे. मंत्री संजय शिरसाट यांनी नांदेड जिल्ह्यातील सभेत भाजपचे खासदार अशोकराव चव्हाण यांच्यावर केलेली टीका राज्यभर गाजत आहे. खासदार अशोक चव्हाण हे अन्न खातात की नाही, असा प्रश्न आपल्याला पडला आहे, अशी टीका करून त्यांच्याकडे असलेल्या भरमसाट एजन्सीचा पाढाच वाचला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील मंत्र्यांनी मते मिळविण्यासाठी टीकेची झोड उठवली आहे. प्रत्यक्षात भाजपवर टीका न करता त्या पक्षातील नेत्यांना रडारवर ठेवले जात आहे. मंत्री संजय शिरसाट यांच्या सभेत अशोक चव्हाण यांच्या विरुद्ध बोलत त्यांनी नांदेड जिल्ह्यात सभा गाजवली. राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत ग्रामीण भागातील नाळ पक्की करण्यावर जोर दिला आहे. त्यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे नेते सर्वाधिक नगराध्यक्ष व नगरसेवक निवडून आणण्यासाठी जीवाचे रान करत आहेत. परभणी जिल्ह्याच्या नेत्या तसेच भाजपच्या मंत्री मेघना बोर्डीकर यादेखील भाजपचे उमेदवार कसे निवडून येतील या दृष्टीने प्रयत्नशील आहेत; परंतु त्यांच्या तोडीला असलेल्या उबाठा गटातील नेत्यांनी त्यांना जेरीस आणले आहे. बीड जिल्ह्यातील मंत्री पंकजा मुंडे यांची देखील कसोटी पणाला लागली आहे. बीड जिल्ह्यात असलेल्या काही संवेदनशील भागातील मतदान प्रक्रिया रखडली जाण्याची भीती काही राजकीय पक्षांनी व्यक्त केली आहे. बीड जिल्ह्यातील प्रशासनाने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, या दृष्टीने पावले उचलली आहेत. दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील मराठवाड्यातील लातूर व नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक सभा घेतल्या. एकेकाळी मराठवाड्यातील लातूर व नांदेड जिल्हा हा काँग्रेसचा मोठा गड होता. या दोन्ही जिल्ह्यांनी महाराष्ट्राला एकेकाळी मुख्यमंत्रीपद दिले होते. काँग्रेसच्या कोट्यातून मुख्यमंत्रीपद घेतलेल्या नेत्यांच्या जिल्ह्यात काँग्रेसची दुरवस्था झाली आहे. ही दुरवस्था भरून काढण्याच्या दृष्टीने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे स्वतःच्या पक्षातील उमेदवारांच्या विजयासाठी प्रयत्नरत आहेत. मराठवाड्यातील हिंगोली व परभणी जिल्ह्यात उबाठा गटाचे वर्चस्व आहे.या ठिकाणी त्यांच्याच पक्षाचे खासदार आहेत. या दोन्ही जिल्ह्यांत त्यांच्या पक्षातील खासदारांनी मोठी शक्ती पणाला लावली आहे. एकंदरीत मराठवाड्यातील भाजप, एकनाथ शिंदे गट, अजित पवार गट व सत्ताधारी पक्षाच्याच आमदारांची व खासदारांची मोठी राजकीय कसोटी आहे. नगर परिषद तसेच नगरपंचायतसाठी २ डिसेंबर रोजी मतदान आहे. तसेच लगेच दुसऱ्या दिवशी ३ डिसेंबर रोजी मतमोजणी आहे. आपल्या पक्षातील उमेदवारांच्या पारड्यात मते पडावीत, यासाठी मराठवाड्यात सत्ताधारी पक्षातील आमदार एकमेकांच्या विरुद्ध बोलून मत मिळविण्याचे प्रयत्न करीत आहेत. एकंदरीत राज्याचे मुख्यमंत्रीपद हे भाजपकडे आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आजवरची स्पष्ट भूमिका भाजपच्या विजयासाठी फायदेशीर ठरणार आहे. केंद्रातील सत्ताधारी भाजप तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्या स्पष्ट भूमिका जनतेच्या हिताच्या आहेत. त्यामुळे मराठवाड्यात भाजपकडे ओढा असलेले मतदार जास्त संख्येने आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने मराठवाड्याला भरभरून निधी मिळालेला आहे. त्यामुळे त्या निधीने मराठवाड्याचा कायापालट होत आहे. ही बाब लक्षात घेऊन मराठवाड्यातील सर्वाधिक नगराध्यक्ष व नगरसेवक हे भाजपचेच असतील, असा अंदाज राजकीय विश्लेषक व्यक्त करीत आहेत. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत असलेल्या आमदारांचीच ही खरी कसोटी आहे. आपल्या पक्षातील जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणले तर आपल्या पक्षातील वरिष्ठ नेते आपली किंमत करतील, या भावनेतून आमदार मंडळी देखील मराठवाड्यात कामाला लागलेली आहेत.- डॉ. अभयकुमार दांडगे
Junnar Crime: खोट्या गुन्ह्याची भीती दाखवून लुटले दीड कोटी! ओतूरमधील ब्लॅकमेलर पती-पत्नीचा पर्दाफाश
प्रभात वृत्तसेवा ओतूर – बलात्कार आणि पोक्सो कायद्यांतर्गत खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन दोन कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या आरोपीला ओतूर पोलिसांनी अटक केली आहे. ओतूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांनी ही माहिती दिली.खामुंडी (ता. जुन्नर) येथील मारुती मनोहर कदम (वय ६१) यांनी १५ मे २०२५ रोजी ओतूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. […] The post Junnar Crime: खोट्या गुन्ह्याची भीती दाखवून लुटले दीड कोटी! ओतूरमधील ब्लॅकमेलर पती-पत्नीचा पर्दाफाश appeared first on Dainik Prabhat .
प्रभात वृत्तसेवा लाखणगाव – भारतीय संविधान जगात श्रेष्ठ असून ते प्रत्येक नागरिकाच्या घराघरात असणे आवश्यक आहे.संविधान हा राष्ट्रग्रंथ असल्याने त्याचा सन्मान आणि मूल्यांची जपणूक व्हावी. असे प्रतिपादन पूर्वा वळसे पाटील यांनी केले.लाखणगाव (ता.आंबेगाव) येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक संविधान भवन समिती, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, ग्रामपंचायत, न्यू इंग्लिश स्कूल आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लाखणगाव […] The post Ambegaon News: भारतीय संविधान हा राष्ट्रग्रंथ; घराघरात पोहोचला पाहिजे – पूर्वा वळसे पाटील यांचे प्रतिपादन appeared first on Dainik Prabhat .
Manchar Election: निवडणूक पहिलीच, पण गोंधळ मोठा! मंचरमधील ‘या’प्रकाराने प्रशासन अडचणीत?
प्रभात वृत्तसेवा मंचर – मंचर नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीत मतदार यादींच्या गोंधळामुळे मतदार मोठ्या संभ्रमात सापडले आहेत. एकाच कुटुंबातील नवरा एका प्रभागात तर बायको दुसरा प्रभागात तसेच कुटुंबियातील चार–पाच जणांची नावे वेगवेगळ्या प्रभागात टाकल्याचे प्रकार समोर येत असून काही जणांची नावे तर मतदार यादीतूनच वगळली गेल्याचे वास्तव उघड झाले आहे.त्यामुळे मतदारांना आपण नेमके कोणत्या प्रभागात असल्याची […] The post Manchar Election: निवडणूक पहिलीच, पण गोंधळ मोठा! मंचरमधील ‘या’ प्रकाराने प्रशासन अडचणीत? appeared first on Dainik Prabhat .
पाकिस्तान हुकूमशाहीच्या दिशेने...
पाकिस्तानने संरक्षण दल प्रमुख असे पद निर्माण करत त्याची जबाबदारी लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्याकडे सोपवली. नवीन दुरुस्ती विधेयकांतर्गत, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती मुनीर यांची या पदावर नियुक्ती करतील. यामुळे लष्करप्रमुखांना राष्ट्रपती, पंतप्रधान आणि सर्वोच्च न्यायालयापेक्षा जास्त अधिकार मिळणार असल्याने पाकिस्तानमध्ये हुकूमशहाचा उदय होऊ घातला आहे.पाकिस्तान संविधानाच्या कलम २४३ मध्ये सुधारणा करत आहे. त्यासाठी संसदेत २७वे दुरुस्ती विधेयक सादर करण्यात आले. पाकिस्तानी सरकारने सैन्यांमध्ये चांगले समन्वय स्थापित करण्यासाठी हे पद तयार केले जात आहे, असे सांगितले असले, तरी प्रत्यक्षात ते भारताचे अनुकरण आहे. भारतात जसे सरसेनाध्यक्षपद तयार करण्यात आले, तसे पाकिस्तानमध्ये हे पद तयार करण्यात आले; परंतु भारतात लोकशाही आहे आणि इथल्या सरसेनाध्यक्षांना पंतप्रधान आणि राष्ट्रपतींपेक्षा जास्त अधिकार नाहीत. पाकिस्तानमध्ये असीम मुनीर यांच्यासाठी ही घटनादुरुस्ती करण्यात आली असून, आता त्यांच्या एकाच आदेशाखाली सेना, नौदल आणि हवाई दल काम करू शकतील. सामान्यतः लष्करप्रमुखांना संरक्षण दल प्रमुख म्हणून नियुक्त केले जाते. पंतप्रधान आणि राष्ट्रीय धोरणात्मक कमांडच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती त्यांची नियुक्ती करतात. संरक्षण दलांचे प्रमुख हे तिन्ही सशस्त्र दलांचे प्रमुख म्हणूनही ओळखले जातात; परंतु ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे हादरलेल्या पाकिस्तान सरकारने घाईगडबडीत केलेल्या घटनादुरुस्तीमुळे स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतला. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तान सरकारने मुनीर यांना ‘फील्ड मार्शल’ म्हणून बढती दिली. ‘फील्ड मार्शल’ हे पाकिस्तानी सैन्यातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च पद आहे. आता संविधानात सुधारणा करून मुनीर यांना तिन्ही सशस्त्र दलांचे प्रमुख बनवण्यात आले. या नवीन दुरुस्ती विधेयकांतर्गत पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सल्ल्यानुसार अध्यक्ष आसिफ अली झरदारी हे मुनीर यांना ‘सीडीएफ’ पदावर नियुक्त करतील. ही घटनादुरुस्ती पाकिस्तानात लष्करी राजवटीच्या नवीन युगाची सुरुवात आहे.भारताच्या फाळणीनंतर काही वर्षांनी पाकिस्तानमध्ये पहिला मार्शल लॉ लागू करण्यात आला. १९५८ मध्ये जनरल अयुब खान यांनी राष्ट्रपती इस्कंदर मिर्झा यांना काढून टाकले आणि मार्शल लॉ लागू केला. १९५८ ते १९७१ पर्यंत चाललेला हा पाकिस्तानचा पहिला लष्करी हस्तक्षेप होता. या काळात २५ मार्च १९६९ रोजी अयुब यांनी पदाचा राजीनामा दिला आणि याह्या खानकडे सत्ता सोपवली. १९७७ मध्ये दुसरा लष्करी उठाव झाला, तेव्हा जनरल झिया-उल-हक यांनी पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांचे सरकार उलथवून टाकले. झिया यांचे शासन १९७७ ते १९८८ पर्यंत चालले. १९९९ मध्ये तिसरा उठाव झाला.भारताकडून कारगील युद्ध हरल्यानंतर जनरल परवेझ मुशर्रफ आणि तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यात संघर्ष निर्माण झाला. यामुळे १९९९ मध्ये मुशर्रफ यांनी लोकशाही सरकार उलथवून टाकले. मुशर्रफ यांचे शासन २००८ पर्यंत टिकले. हा सर्व इतिहास पाहिला, तर पाकिस्तानमध्ये सत्तेची चावी लष्कराकडे आहे, हे स्पष्ट होते. असे असले, तरी २००८ पासून पाकिस्तानमध्ये कोणत्याही लष्करी अधिकाऱ्याने सत्तेचे सूत्र हाती घेतलेले नाही.अर्थात सत्तेची सूत्रे नेहमीच लष्करी मुख्यालयात बसलेल्या जनरलकडे राहिली आहेत. पाकिस्तानमध्ये लोकशाही सरकारने लष्कराला आव्हान देण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ते उलथून टाकण्यात आले. संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी अलीकडेच सध्याच्या सरकारचे वर्णन ‘हायब्रिड सरकार’ असे केले. हायब्रिड म्हणजे ते अशा व्यवस्थेचा संदर्भ देतात, ज्यामध्ये लष्करी नेतृत्व आणि नागरी सरकार एकत्रितपणे निर्णय घेतात. आता मात्र ही परिस्थिती बदलणार आहे. १९७३ नंतर पहिल्यांदाच पंतप्रधानांनी लष्करप्रमुख मुनीर यांची ‘फील्ड मार्शल’ म्हणून नियुक्ती केली आहे आणि आता त्यांना ‘संवैधानिक संरक्षण’ प्रदान करणे आवश्यक होते.त्यासाठी घटनादुरुस्ती करण्यात आली. गेल्या वर्षी पाकिस्तान लष्कर कायद्यातील दुरुस्तीने लष्करप्रमुखांचा कार्यकाळ वाढवला होता; परंतु त्यांच्या नियुक्तीच्या वेळी मुनीर यांच्यासाठी तीन वर्षांची अधिसूचना जारी करण्यात आली होती. ‘ऑपरेशन सिंदूर’ची धास्ती घेतलेल्या पाकिस्तानने घटनेमध्ये २७ वी दुरुस्ती केली. हे करताना तिथल्या सरकारने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे. लष्करप्रमुखांकडे जादा अधिकार सोपवताना पाकिस्तानचे लोकनियुक्त सरकार त्यांच्या हातची कळसूत्री बाहुली ठरणार आहे. या निर्णयाविरोधात माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा पक्ष रस्त्यावर उतरला असला, तरी त्याला काहीच अर्थ नाही. हे विधेयक सशस्त्र दलांशी संबंधित असलेल्या संविधानाच्या कलम २४३ मध्ये सुधारणा करते. या विधेयकाअंतर्गत राष्ट्रपती पंतप्रधानांशी सल्लामसलत करून लष्करप्रमुख आणि संरक्षणप्रमुखांची नियुक्ती करतील. लष्करप्रमुख आता संरक्षण दलाचेही प्रमुख असतील. शिवाय, संरक्षण प्रमुख पंतप्रधानांशी सल्लामसलत करून राष्ट्रीय धोरणात्मक कमांडच्या प्रमुखाची नियुक्ती करतील.मुनीर यांना आधीच ‘फील्ड मार्शल’चा दर्जा देण्यात आला होता. ताज्या संविधान दुरुस्ती विधेयकामुळे त्याला घटनात्मक मान्यता मिळाली. मुनीर यांच्याकडे ‘फील्ड मार्शल’चे पद आणि विशेषाधिकार आयुष्यभर राहतील. याव्यतिरिक्त, संयुक्त ‘चीफ ऑफ स्टाफ कमिटी’च्या अध्यक्षपदाची पदवी रद्द केली जाईल. नवीन कायदा सरकारला फील्ड मार्शल, एअर फोर्स मार्शल आणि ‘ॲडमिरल ऑफ द फ्लीट’ या पदांवर अधिकाऱ्यांना बढती देण्याचा अधिकार देतो. पाकिस्तानच्या इतिहासात या पदावर बढती मिळालेले ते दुसरे सर्वोच्च लष्करी अधिकारी बनले. या व्यतिरिक्त, लष्करी समन्वय सुधारण्यासाठी त्यांनी संरक्षण दलप्रमुख पद निर्माण करण्याची योजना आखली. नव्या घटनादुरुस्तीनंतर पंतप्रधानही ‘फील्ड मार्शल’ला काढून टाकू शकत नाहीत. पंतप्रधान ‘राष्ट्रीय स्ट्रॅटेजिक कमांड’च्या कमांडरची नियुक्ती करतील. त्यामुळे पाकिस्तानच्या कमांड रचनेवर लष्करी नियंत्रण स्थापित होईल.शिवाय, पंतप्रधानांना ‘फील्ड मार्शल’ची पदवी काढण्याचा, महाभियोग चालवण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार राहणार नाही. निवृत्तीनंतर फील्ड मार्शलना अतिरिक्त जबाबदाऱ्या देता येतील. शरीफ यांच्या सरकारने लष्करप्रमुख आणि फील्ड मार्शल यांच्या पदांना संवैधानिक दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. मुनीर यांच्या अधिकारांमध्ये वाढ करण्यासाठी एक घटनात्मक सुधारणा आणण्यात आली आहे. संसदेत २७ व्या घटनात्मक दुरुस्तीमुळे लष्करप्रमुखांना प्रचंड अधिकार मिळणार आहेत. या दुरुस्तीमुळे संरक्षण दल प्रमुख हे एक नवीन पद निर्माण होईल. मुनीर यांच्याकडे पंतप्रधानांपेक्षा जास्त अधिकार असल्याचे म्हटले जात असले, तरी ते २७व्या घटनादुरुस्तीद्वारे स्वतःसाठी आजीवन सुरक्षा भिंत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.या दुरुस्तीमुळे ‘फील्ड मार्शल’ना आजीवन विशेषाधिकार मिळतील आणि त्यांच्याविरुद्ध आयुष्यभर कोणताही खटला दाखल करता येणार नाही. देशाला झालेल्या नुकसानासाठी त्यांना जबाबदार धरले जाण्याची भीती आहे, म्हणून ते या वादग्रस्त दुरुस्तीद्वारे स्वतःसाठी आजीवन संरक्षण सुनिश्चित करत आहेत. अर्थात या खेळामागे अमेरिकेचा हात असू शकतो. मात्र एखादा फुगा अशा प्रकारे किती फुगवता येतो, याला मर्यादा असतात, हे पाकिस्तानी प्रशासक विसरलेले दिसतात.- प्रा. जयसिंग यादव(लेखक राज्यशास्त्राचे अभ्यासक आहेत)
जमीन घोटाळ्याप्रकरणी शेख हसीनांना २१ वर्षांची शिक्षा!
मुलगा-मुलीलाही प्रत्येकी ५ वर्षांचा तुरुंगवासनवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना आणि त्यांच्या कुटुंबासाठी आजचा दिवस मोठा धक्का देणारा ठरला आहे. ढाका येथील एका न्यायालयाने जमीन घोटाळ्याशी संबंधित तीन प्रकरणांमध्ये शेख हसीना यांना एकूण २१ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. त्यांच्या कुटुंबावरही या निर्णयाचा मोठा परिणाम झाला असून, हसीना यांचे पुत्र सजीब वाजेद जॉय आणि कन्या सायमा वाजेद पुतुल यांनाही प्रत्येकी ५ वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.बांगलादेशच्या राजकारणात हा निर्णय ऐतिहासिक मानला जात आहे. ढाका येथील विशेष न्यायाधीश-५ मोहम्मद अब्दुल्लाह अल मामून यांच्या न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निकाल गुरुवारी (२७ नोव्हेंबर) दिला. भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपांखाली ही कारवाई झाली आहे. याआधीच, जुलै २०२४ च्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसक आंदोलनाप्रकरणी ‘मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांसाठी’ क्राइम्स ट्रिब्यूनलने हसीना यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे.न्यायालयाने ज्या तीन प्रकरणांमध्ये गुरुवारी निर्णय दिला, त्यात शेख हसीना यांच्यावर ढाका येथील पुरबाचल परिसरात सरकारी भूखंडांचे अवैध वाटप स्वतःच्या कुटुंबाच्या फायद्यासाठी केल्याचा आरोप आहे. शेख हसीना यांना प्रत्येक प्रकरणात ७-७ वर्षांची शिक्षा, अशी एकूण २१ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. तर, जमीन घोटाळ्याशी संबंधित उर्वरित तीन प्रकरणांवर १ डिसेंबर रोजी निर्णय येणार आहे, त्यामुळे हसीना यांची शिक्षा वाढण्याची शक्यता आहे.या जमीन घोटाळ्याच्या प्रकरणात शेख हसीना यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाही आरोपी बनवण्यात आले होते. शेख हसीना यांचा मुलगा सजीब वाजेद जॉय यांना न्यायालयाने ५ वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा आणि १ लाख टाका दंड ठोठावला आहे. तर, मुलगी सायमा वाजेद पुतुल यांनाही ५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे. या सर्व प्रकरणांची चौकशी अँटी-करप्शन कमिशनने जानेवारीमध्ये सुरू केली होती. तथापि, हसीना आणि त्यांच्या कुटुंबाने हे सर्व आरोप राजकीय सूडबुद्धीने प्रेरित असल्याचे सांगत सतत आपले निर्दोषत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे.भारताकडे प्रत्यार्पणाची विनंतीजुलै २०२४ मध्ये झालेल्या प्रचंड विद्यार्थी आंदोलनानंतर शेख हसीना यांचे सरकार कोसळले. ५ ऑगस्ट २०२४ रोजी त्या देश सोडून पळून गेल्या आणि त्यांनी भारतात आश्रय घेतला. आता ढाका येथील हंगामी सरकारने शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणाची मागणी भारताकडे केली आहे. भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी बुधवारी सांगितले की, भारताला विनंती अर्ज मिळाला असून, त्याची कायदेशीर तपासणी सुरू आहे.
प्रभात वृत्तसेवा पिंपरी – शहरातील उद्योजकांच्या समस्या सोडविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने ‘उद्योग सुविधा कक्ष’ स्थापन केला. मात्र, हा कक्ष पूर्णपणे ठप्प असून हा महापालिकेचा फक्त देखावा असल्याचे समोर आले आहे. उद्योगांना कोणतीही मदत होत नसल्याचा आरोप करीत उद्योजकांनी प्रशासनाविरुध्द नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे हा कक्ष तयार करणाऱ्या अधिकारी, सल्लागारांचेही पितळे उघड पडले आहे. राज्य सरकारच्या […] The post PCMC News: ‘सुविधा’ नव्हे, हा तर फक्त ‘देखावा’! महापालिकेतील ‘त्या’ कक्षाचे सत्य आले समोर..उद्योजकांची नाराजी appeared first on Dainik Prabhat .
प्रभात वृत्तसेवा वाई – वाई नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारार्थ आयोजित सभेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपा उमेदवारांना विजय मिळवून देण्याचे आवाहन केले. भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ घेण्यात आलेल्या या सभेत त्यांनी केंद्र व राज्य सरकारकडून नगरपालिका क्षेत्रांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक मोठ्या योजना राबविल्या जाणार असल्याचे सांगितले.येथील साेनगिरवाडीमध्ये भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अनिल सावंत यांच्या प्रचारार्थ आयाेजित ते […] The post Wai Municipal Election: नगरपालिका क्षेत्रांच्या सर्वांगीण विकासाच्या योजना राबवणार – चंद्रशेखर बावनकुळे appeared first on Dainik Prabhat .
प्रभात वृत्तसेवा सातारा – सातारा नगर पालिकेच्या निवडणुकीनिमित्त भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी शहरात पदयात्रांचा धडाका सुरु ठेवला आहे. यामुळे वातावरण ढवळून निघाले असून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अमोल मोहिते यांच्यासह भाजपच्या सर्व उमेदवारांना मताधिक्य देण्याचा निर्धार सातारकरांनी केला आहे. दरम्यान, सातारा शहराच्या चौफेर विकासासाठी ‘कमळ’ हाच पर्याय असून […] The post Satara Election: पालिकेच्या आखाड्यात शिवेंद्रराजेंची एन्ट्री! पदयात्रेने शहर ढवळून निघाले; निकालाबाबत केला ‘हा’ मोठा दावा appeared first on Dainik Prabhat .
दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, २८ नोव्हेंबर २०२५
पंचांगआज मिती मार्गशीर्ष शुद्ध अष्टमी शके १९४७, चंद्र नक्षत्र शततारका, योग व्याघात चंद्र राशी कुंभ. भारतीय सौर ७ पौष शके १९४७, शुक्रवार, दि. २८ नोव्हेंबर २०२५. मुंबईचा सूर्योदय ६.५३, मुंबईचा सूर्यास्त ५.५९, मुंबईचा चंद्रोदय १२.५६, मुंबईचा चंद्रास्त ००.५३ उद्याची, राहू काळ ११.०२ ते १२.२६. दुर्गाष्टमी, महात्मा जोतिबा फुले पुण्यतिथी, शुभ दिवस - दुपारी १२.२७नंतर.दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)मेष : महत्त्वाची कामे मार्गी लागतील.वृषभ : पत प्रतिष्ठा वाढेल.मिथुन : मनावरील ताण निघून जाईल, अडचणी दूर होतील.कर्क : धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.सिंह : समाजातील मान्यवर व्यक्तींच्या गाठीभेटी होतील.कन्या : नवीन नवीन संधी मिळतील.तूळ : भाग्य साथ देईल.वृश्चिक : महत्त्वाची कामे करू नका.धनू : अचानक धनलाभाची शक्यता.मकर : आपल्याला झेपतील एवढीच कामे घ्या.कुंभ : वादविवाद टाळा.मीन : आर्थिक बाजू चांगली राहील.
Satara News: जुन्या रजिस्टरात दडलेला हक्क! कोयना भूकंपग्रस्तांच्या लाखो नोंदी आता डिजिटल होणार
प्रभात वृत्तसेवा कोयनानगर – ११ डिसेंबर १९६७ च्या प्रलयंकारी भूकंपानंतर शासनाने मदत व पुनर्वसनासाठी तयार केलेली कोयना भूकंपग्रस्तांची ६१० रजिस्टर आज अर्धशतकानंतर अक्षरशः मोडकळीला आलेली आहेत. नोंदी धूसर, पान, तुटकी आणि अनेक ठिकाणी माहिती अपूर्ण असल्याने भूकंपग्रस्तांच्या दाखल्यांमध्ये वर्षानुवर्षे अडथळे निर्माण होत होते. आता या सर्व रजिस्टरचे स्कॅनिंग आणि डिजिटल स्वरूपात जतन करण्याचे मोठे काम […] The post Satara News: जुन्या रजिस्टरात दडलेला हक्क! कोयना भूकंपग्रस्तांच्या लाखो नोंदी आता डिजिटल होणार appeared first on Dainik Prabhat .
तिन्ही सैन्य दलासह अण्वस्त्रेही असीम मुनीर यांच्या हातात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था): पाकिस्तानमध्ये सेनेचे वर्चस्व किती आहे, हे यापूर्वीच जगाने बघितलेले आहे. देशाची सत्तापालट करण्याच्या कुरापती यापूर्वी झालेल्या आहेत. त्यातच आता पाकिस्तानचे आर्मी चीफ जनरल असीम मुनीर यांच्याकडे पाकिस्तानचे कंट्रोल आलेले आहेत. तिन्ही सैन्य दलासह देशाच्या अण्वस्त्राची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर देण्यात आलेली आहे.असीम मुनीर यांनी गुरुवारी देशातील पहिल्या चीफ ऑफ डिफेन्स फोर्स पदाची सूत्रे स्वीकारली. पाकिस्तानी राज्यघटनेच्या २७ व्या दुरुस्तीद्वारे हे नवीन पद निर्माण करण्यात आले आहे. या बदलामुळे आता असीम मुनीर हे पुढील पाच वर्षांसाठी तिन्ही सैन्य दले (लष्कर, हवाई आणि नौदल) यांचे प्रमुख असतील.पाकिस्ताच्या संसदेने १ नोव्हेंबर २०२५ रोजी घटनेत दुरुस्ती केली होती. त्यानुसार तिन्ही सेना दलांचे सर्व अधिकार असलेले जॉइंट चीफ ऑफ स्टाफ कमिटी हे पद संपुष्टात आणले गेले आहे. १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात पाकिस्तानचा पराभव झाल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांनी १९७६ मध्ये हे पद तयार केले होते. पाकिस्तानच्या राजकारणावर, अर्थव्यवस्थेवर लष्कराचा प्रभाव अजूनही कायम आहे. त्यात पुन्हा २७ व्या घटनादुरुस्तीने हे संतुलन पूर्णपणे सैन्याच्या बाजूने झुकवले आहे. या बदलानुसार, असीम मुनीर हे तिन्ही सेना प्रमुखांसोबतच देशातील अण्वस्त्र प्रणालीचेही प्रभारी असतील. या बदलांमुळे मुनीर यांना देशाच्या राष्ट्रपतींच्या बरोबरीची कायदेशीर सुरक्षा देखील मिळाली आहे.
श्रीलंकेत ११ दिवसांपासून पावसाचे तांडव!
पूर आणि भूस्खलनात आतापर्यंत ३१ जणांचा बळी; १४ बेपत्तानवी दिल्ली (वृत्तसंस्था) : श्रीलंकेत गेल्या ११ दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पाऊस, पूर आणि विनाशकारी भूस्खलनामुळे मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला आहे. श्रीलंकेच्या आपत्ती व्यवस्थापन केंद्राने गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार, या नैसर्गिक आपत्तींमध्ये आतापर्यंत ३१ जणांना मृत्यू झाला आहे. तर, अजूनही १४ जण बेपत्ता आहे. या आपत्तीमुळे देशभरात गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून, मदत आणि बचावकार्य वेगाने सुरू आहे.सर्वाधिक १८ मृत्यू एकट्या मध्यवर्ती डोंगराळ भागात झाले आहेत. अडाडेराना न्यूज पोर्टलने दिलेल्या वृत्तानुसार, सुमारे १० लोक जखमी झाले असून, अजूनही १४ जण बेपत्ता आहेत. एका थरारक घटनेत, कुंबुक्काना येथे एक प्रवासी बस वाढत्या पाण्यात अडकली होती. मात्र, आपत्कालीन पथकांनी तत्परता दाखवत बसमधील २३ प्रवाशांना वाचवले, अशी माहिती डेली मिरर ऑनलाइनने दिली आहे. या गंभीर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि मदत कार्याचे नियोजन करण्यासाठी अध्यक्ष अनुरा कुमार दिसानायके यांनी तातडीने बैठक बोलावली आहे. देशातील एकूण २५ पैकी १७ प्रशासकीय जिल्ह्यांमध्ये परिस्थिती बिकट झाली आहे.हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशाच्या आग्नेय भागात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आता खोल दाबाच्या पट्ट्यात तीव्र होण्याची शक्यता आहे. हा कमी दाबाचा पट्टा सध्या बट्टीकोलोआपासून २१० किलोमीटर आग्नेयेस स्थित आहे आणि तो पुढील १२ तासांत वायव्येकडे सरकण्याची शक्यता आहे. देशाच्या विविध भागात २०० मिमी पेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुंबई : महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषद व नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी जाहीर प्रचारबंदीच्या कालावधीबाबत सुधारित आदेश जारी केले आहेत. या सुधारणेनुसार, मतदान सुरू होण्यापूर्वी प्रचाराची समाप्ती कधी होईल याबद्दलची पूर्वीची तरतूद बदलण्यात आली आहे. आयोगाच्या ४ नोव्हेंबरच्या एकत्रित आदेशातील आचारसंहितेबाबत तरतूद सुधारित करण्यात आली आहे. त्यानुसार आता मतदान सुरू होण्याच्या दिवशीच्या अगोदरच्या दिवशी रात्री १० […] The post 1 तारखेला रात्री 10 वाजता प्रचार थांबेल: नगरपरिषद, नगरपंचायत निवडणूक प्रचारात मोठे बदल, जाणून घ्या सर्वकाही appeared first on Dainik Prabhat .
पुणे – कोल्हापूर पोलिसांच्या पथकाने गेल्या आठवड्यात शिक्षक पात्रता परीक्षेचा (टीईटी) पेपर फोडण्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीला ताब्यात घेण्याची मोठी कारवाई करत कसून तपास सुरू ठेवला आहे. त्यात या कोल्हापूरच्या पोलीस पथकाने पुण्यातील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या कार्यालयात तळ ठोकून अधिकाऱ्यांकडे टीईटी परीक्षेबाबत सखोल चौकशी करत प्रश्नपत्रिकांचे संच तपासासाठी ताब्यात घेतले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे […] The post शिक्षक पात्रता परीक्षेत गोंधळ: कोल्हापूरच्या पोलीस पथकाकडून परीक्षा परिषदेत कसून चौकशी, TET परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांचे संच तपासासाठी ताब्यात appeared first on Dainik Prabhat .
WPL 2026 Auction चा महासंग्राम! यंदाच्या लिलावात टॉप-५ सर्वात महागडे खेळाडू कोण ठरले? जाणून घ्या
WPL 2026 Mega Auction Top 5 Most Expensive Players : महिला प्रीमियर लीग (WPL 2026) २०२६ साठी नवी दिल्ली येथे झालेल्या मेगा ऑक्शनमध्ये फ्रेंचायझींनी खेळाडूंवर अक्षरशः पैशांचा वर्षाव केला. अनेक स्टार खेळाडूंसाठी संघात मोठी स्पर्धा पाहायला मिळाली. विशेष म्हणजे, ऑस्ट्रेलियाची यष्टिरक्षक-फलंदाज अॅलिसा हिली हिला मात्र कोणताही खरेदीदार मिळाला नाही. या ऑक्शनची सर्वात महागडी खेळाडू म्हणून […] The post WPL 2026 Auction चा महासंग्राम! यंदाच्या लिलावात टॉप-५ सर्वात महागडे खेळाडू कोण ठरले? जाणून घ्या appeared first on Dainik Prabhat .
Gauri Garje Case : अनंत गर्जेला २ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी
Gauri Garje Case : महाराष्ट्रात खळबळ माजवणाऱ्या डॉ. गौरी पालवे-गर्जे यांच्या आत्महत्येप्रकरणी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा पीए अनंत गर्जे याला २ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. न्यायालयाने हा आदेश दिला आहे. अनंत गर्जे हा डॉ. गौरी पालवे-गर्जे यांच्या आत्महत्या प्रकरणातला मुख्य संशयित आरोपी आहे.डॉ. गौरी गर्जेने राहत्या घरात आत्महत्या केल्याची माहिती उघड झाल्यानंतर सुरू झालेल्या तपासात अनेक नवीन बाबी समोर येत आहेत. प्राथमिक पोस्टमॉर्टम अहवालानुसार, गौरीच्या गळ्यावर दाब पडल्याचे तसेच तिच्या शरीरावर अनेक जखमा असल्याचे नमूद झाले आहे. केवळ गौरीच नव्हे, तर अनंत गर्जेच्याही शरीरावर खुणा आढळल्या असल्याने ही घटना नेमकी कशामुळे घडली, यावर नवीन प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.याशिवाय पोलिसांना मिळालेल्या कॉल रेकॉर्डिंग्स आणि घरातील सीसीटीव्ही फूटेजमध्ये काही संशयास्पद बाबी असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले आहे. या सर्व पुराव्यांची सखोल तपासणी करण्यासाठी अधिक वेळ आवश्यक असल्यामुळे अनंत गर्जेची कोठडी वाढवण्यात आली आहे. तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, गौरीच्या पतीसोबत नणंद शीतल गर्जे आणि दीर अजय गर्जे यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिघांवर मारहाण, मानसिक छळ आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे आरोप ठेऊन बीएनएसच्या १०८, ८५, ३५२, ३५१(२) या कलमांनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.गौरी गर्जे यांच्या कुटुंबियांनी दिलेल्या जबाबात, गौरीला किरण नावाच्या व्यक्तीच्या पहिल्या पत्नीच्या गर्भधारणेबाबतची काही कागदपत्रे मिळाल्यानंतर ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झाली होती, अशी माहिती दिली आहे. या सर्व गोष्टींच्या पार्श्वभूमीवर तपास आता निर्णायक टप्प्यात पोहोचला असून, पोस्टमॉर्टम अहवाल, जखमांचे स्वरूप, मोबाईलमधील संभाषण आणि सीसीटीव्ही फूटेज यांच्या आधारे पुढील महत्त्वाचे खुलासे समोर येऊ शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
सोमवार आणि मंगळवारी मुंबईत पाणीकपात
मुंबई (विशेष प्रतिनिधी) -मुंबई (३) जलवाहिनीवर, अमर महल भूमिगत बोगद्याच्या (१ व २) शाफ्टला जोडणाऱ्या २५०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी छेद-जोडणीचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामाच्या अनुषंगाने सोमवार, १ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजल्या पासून हाती घेण्यात येणार आहे. हे काम मंगळवारी २ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. Ya कालावधीत एकूण ११ प्रशासकीय विभागांमध्ये पाणीपुरवठा प्रभावित होणार आहे. या कालावधीत काही विभागांमध्ये पाणीपुरवठा कमी दाबाने होईल, तर काही विभागांचा पाणीपुरवठा पूर्णतः बंद अर्थात १०० टक्के पाणी कपात राहणार आहे.घाटकोपर (पूर्व) येथील छेडा नगर जंक्शन परिसरात असलेल्या ३००० मिलीमीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीला अमर महल बोगदा शाफ्टशी जोडणाऱ्या २५०० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनी छेद जोडणी करण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. सोमवार, १ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजेपासून ते मंगळवार दिनांक २ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत म्हणजेच एकूण ३० तास हे कामकाज करण्यात येणार आहे. या कामकाजामुळे शहर विभागातील ए, बी, सी, ई, एफ दक्षिण, एफ उत्तर विभाग अर्थात कुलाबा ते परळ, शीव आदी भागात आणि पूर्व उपनगरातील एम पूर्व, एम पश्चिम, एल, एस व एन विभागात कुर्ला भांडुप, नाहूर, चेंबूर, देवनार, गोवंडी आदी भागात पाणीपुरवठा प्रभावित होणार आहे. या कालावधीत काही विभागात पाणीपुरवठा कमी दाबाने होईल तसेच काही विभागांचा पाणीपुरवठा बंद राहील.तरी संबंधित परिसरातील नागरिकांनी या कालावधीसाठी पाण्याचा आवश्यक साठा करावा. पाणी कपातीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, अशी विनंती मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.प्रभावित विभागांचा तपशील पुढीलप्रमाणे :‘ए’ विभाग :* (बीएचआर जलाशय पुरवठा क्षेत्र) सेंट जॉर्ज रुग्णालय, पी. डी'मेलो मार्ग, रामगड झोपडपट्टी, भारतीय रिझर्व्ह बँक, नौदल डॉकयार्ड, डाकघर (जी. पी. ओ.) जंक्शन ते रिगल सिनेमा जंक्शन पर्यंत, शहीद भगतसिंग मार्गाच्या बाजूने‘बी’ विभाग :* वाडीबंदर परिक्षेत्र - नंदलाल जानी मार्ग, लीलाधर सह मार्ग, दाणाबंदर, संत तुकाराम मार्ग, पी. डी.’ मेलो मार्ग, वाडीबंदरउमरखाडी, नूरबाग चिंचबंदर, वालपाखाडी, कारागृह मार्ग, रामचंद्र भट्ट मार्ग, आनंदराव सुर्वे मार्ग, सामंतभाई नानजी मार्ग, डॉ. माहेश्वरी मार्ग, केशवजी नाईक, भाग एस. व्ही. पी., शायदा मार्ग, फ्लँक मार्ग, नवरोजी टेकडी, तांडेल (निशाण), निशाणपाडा रस्ता. मध्य रेल्वे परिक्षेत्र - रेल्वे क्षेत्र मुंबई बंदर न्यास (बी. पी. टी.) क्षेत्रडोंगरी ‘बी’ - तांडेल, टनटनपुरा, सॅम्युअल, मोहम्मद उमर, कोकीळ मार्ग, आय. एम. एम., वाय. एम. मार्ग, दोंताड, खडक, इस्राईल मोहल्ला, धोबी, शेरीफ देवजी, व्ही. व्ही. चंदन, दरियास्थान, काजी सय्यद, सय्यद मुखरी, इसाजी, नृसिंहनाथ, जंजीकर, रघुनाथ महाराज, जुना बंगालीपुरा, भंडारी, अभयचंद गांधी मार्ग, लोकमान्य टिळक रस्ता, निशाणपाडा, मशीद बंदर.बाबुला टँक परिक्षेत्र - इमामवाडा, आय. आर. मार्ग, मोहम्मद अली, मेमनवाडा, पीरू गल्ली, कांबेकर, नाखोडा, कोळसा, नारायण धुरू, अब्दुर रहमान रस्ता‘सी’ विभाग :* बाबुला टँक परिक्षेत्र - इब्राहिम रहिमतुल्ला मार्ग, मौलाना शौकत अली मार्ग, मौलाना आझाद मार्ग, एस. व्ही. पी. मार्ग, मटन रस्ता, चिमना बुचर रस्ता, बारा इमाम मार्ग, गुज्जर रस्ता, खारा टाकी मार्ग, ब्रिगेडियर उस्मान मार्ग, निजाम रस्ता, मशीद रस्ता, इस्माईल कुरटे मार्ग, बनियान रस्ता, किका रस्ता, बापू गोहल्ला मार्ग, अलीखोटे मार्ग. त्र्यंबक परशुराम मार्ग, दुसरा पठाण रस्ता, पहिला पठाण रस्ता, डॉ. मित्रसेन महिमतुरा मार्ग (तिसरा कुंभारवाडा), संतसेना महाराज मार्ग (दुसरा कुंभारवाडा), भंडारी रस्ता (पहिला कुंभारवाडा), दुर्गादेवी स्ट्रीट आणि दुसरी डंकन गल्ली‘ई’ विभाग : नेसबिट मार्ग, ना. म. जोशी मार्ग, मदनपुरा, बदलूपुरा, नागपाडा, शेख हाफिजुद्दीन मार्ग, मेघराज शेट्टी मार्ग, गणेश हरी पारुंडेकर मार्ग, पाईस रस्ता, मुस्सा किल्लेदार मार्ग, सोफिया झुबेर मार्ग, डिमटीमकर मार्ग, एम. ए. मार्ग, टँक पाखाडी मार्ग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, के. के. रस्ता.मुंबई सेंट्रल पुरवठा - एम. एस. अली मार्ग, बेलासिस मार्ग, कामाठीपुरा, एस. पी. मार्ग, शुक्लाजी रस्ता, मनाजी राजूजी मार्ग, आग्रीपाडा.बाबुला टाकी पुरवठा - डिमटीमकर मार्ग, उंद्रिया रस्ता, खंडिया रस्ता, टेमकर रस्ता, शेख कमरुद्दीन रस्ता, मस्तान टँक मार्ग, टँक रस्ता, काझिपुरा, डंकन मार्ग, जे. जे. मार्ग. दत्ताराम लाड मार्ग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, भाई बाल मुकुंद मार्ग, काळाचौकी, चिंचपोकळी, टी. बी. कदम मार्ग'एफ' दक्षिण पुरवठा परिक्षेत्र - म्हातार पाखाडी परिक्षेत्र + ताडवाडी म्हातार पाखाडी मार्ग, सेंट मेरी मार्ग, नेसबिट मार्ग, ताडवाडी, रेल्वे कुंपण, शिवदास चापसी मार्ग.डॉकयार्ड रोड परिक्षेत्र - माझगाव कोळीवाडा, नरसू नाखवा विठोबा मार्ग, ब्रह्मदेव खोत मार्ग, दर्गा गल्ली, नाथ पै मार्ग, डिलिमा रस्ता, रुग्णालय गल्ली, चर्च गल्ली, बेकर गल्ली, नवाब टाकी पूल.हाथीबाग परिक्षेत्र - हातीबाग परिसर, शेठ मोतिशाह गल्ली.बी. पी. टी. परिक्षेत्र - मुंबई बंदर न्यास (बी. पी. टी.) क्षेत्र, दारुखाना, लकडा बंदर.रे रोड परिक्षेत्र - बॅरिस्टर नाथ पै मार्ग, मोदी कुंपण, ऍटलस मिल कुंपण, घोडपदेव परिसर.माउंट मार्ग परिक्षेत्र - रामभाऊ भोगले मार्ग, फेर बंदर नाका, राणीबाग, घोडपदेव नाका, म्हाडा संकुल, शेठ मोतिशाह गल्ली, टी. बी. कदम मार्ग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, डॉ. मस्कारेऱहास मार्ग, डी. पी. वाडी, काळाचौकी, नारियल वाडी, संत सावता मार्ग, चापसी भीमजी मार्गजे. जे. रुग्णालय - जे. जे. रुग्णालय (दिनांक १ व २ डिसेंबर २०२५ रोजी कमी दाबाने पाणीपुरवठा)‘एफ उत्तर’ विभाग :* परिक्षेत्र ०१ शीव (पश्चिम), शीव (पूर्व), वडाळा (पूर्व), दादर (पूर्व व पश्चिम)कोरबा मिठागर, आनंदवाडी, मुंबई बंदर न्यास (बी. पी. टी.), प्रवेशद्वार क्रमांक ०४, शहीद भगतसिंग मार्ग.प्रतीक्षा नगर, शास्त्री नगर, डब्ल्यू. टी. टी., न्यू कफ परेड, अल्मेडा कंपाऊंडरावळी उच्चस्तरीय जलाशय, केंद्रीय कर्मचारी वसाहत (CGS) पुरवठारावळी उच्चस्तरीय जलाशय, केंद्रीय कर्मचारी वसाहत (CGS) विशेष पुरवठारावळी निम्नस्तरीय जलाशय. कोकरी आगार, केंद्रीय कर्मचारी वसाहत, मुंबई बंदर न्यास पुरवठाशीव (सायन) हॉस्पिटल परिक्षेत्र०७ कोरबा मिठागर (विशेष पुरवठा)अभ्युदय नगर परिक्षेत्र ०१के. ई. एम., टाटा, एम. जी. एम., वाडियाशिवडी, वडाळा पूर्व/पश्चिमडॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, दिनशा पतित मार्ग, एस. एस. राव मार्ग, डॉ. एमेस्ट बोर्जेस मार्ग, परमार गुरुजी मार्ग, गोखले मार्गजेरबाई वाडिया मार्ग, बी. जे. देवरुखकर मार्गनायगावपरेल गाव, आचार्य धोंडे मार्ग, विजयकुमार वाळिंबे मार्ग इत्यादीशिवडी स्मशानभूमी रस्ता, टी. जे. मार्ग, गणेश नगर झोपडपट्टी, शिवडी छेद मार्गशिवडी पूर्व गडी अड्डा, शिवडी कोळीवाडा.मुंबई बंदर न्यास परिक्षेत्रकाळेवाडी परिक्षेत्र – जिजामाता नगर, राम टेकडी मार्ग, मिंट वसाहत.पूर्व उपनगरे‘एल’ विभाग : नवीन टिळक नगर, लोकमान्य टिळक टर्मिनस, साबळे नगर, संतोषी माता नगर, क्रांती नगर , नेहरू नगर, मदर डेरी मार्ग, शिवसृष्टी मार्ग, नाईक नगर, जागृती नगर, केदारनाथ मंदीर मार्ग, स. गो. बर्वे मार्ग, कुर्ला (पूर्व), नवरेबाग, कामा नगर, हनुमान नगर , पोलिस वसाहत , कसाई वाडा, चुनाभट्टी , राहुल नगर, एव्हरार्ड नगर, कुरेशी नगर, तक्षशीला नगर, कॅफे गल्ली, पान बाजार, त्रिमूर्ती मार्ग, व्ही. एन. पुरव मार्ग, उमरवाडी मार्ग, अलिदादा इस्टेट, राजीव गांधी नगर, स्वदेशी जीवन चाळ, चुनाभट्टी फाटक, प्रेम नगर, हिल मार्ग, मुक्तादेवी मार्ग, ताडवाडी, समर्थ नगर‘एम पूर्व’ विभाग : लल्लूभाई कुंपण, कमला रमण नगर, रमण मामा नगर, शिवाजी नगर, बैंगणवाडी, लोटस वसाहत, गौतम नगर, गायकवाड नगर, अयोध्या नगर, शिवाजी नगर, वाशी नाका, भारत नगर, चिता कॅम्प, मानखुर्द. साठे नगर, झाकीर हुसेन नगर, देवनार गाव, देवनार वसाहत, न्यू भारत नगर, हशू अडवाणी नगर, म्हाडा इमारती, वाशी नाका, वाढवली गाव, भाभा अणुसंशोधन केंद्र (बी. ए. आर. सी.) वसाहत, नटवर पारेख कंपाऊंड.,रफिक नगर, मंडाळा गाव, न्यू मंडाळा, पद्मा नगर, विष्णू नगर, एल. यू. गडकरी मार्ग, आर. एन. ए. उद्यान, कुकरेजा इमारती वाशी नाका, सह्याद्री नगर, चिता कॅम्प, महाराष्ट्र नगर, म्हाडा इमारती, इंडियन ऑइल नगरबी. डी. पाटील मार्ग येथील रिफायनरी विभाग‘एम पश्चिम’ विभाग : मैत्री पार्क, घाटला, चेंबूर गावठाण, सुभाष नगर, लालडोंगर, सिद्धार्थ वसाहत, स्वस्तिक पार्क, पोस्टल वसाहत.चेंबूर कॅम्प, एम. एस. इमारत १-३२माहुलगाव, म्हैसूर वसाहत, वाशीगाव, वाशीनाका, कोकण नगर, जिजामाता नगर, अंबापाडा. भक्ती पार्क, एम. एम. आर. डी. ए. इमारतीटिळक नगर, ठक्कर बाप्पा वसाहत, पेस्तम सागर, शेल वसाहत, सहकार नगर, पी. एल. लोखंडे मार्ग, छेडा नगर, पी. वाय. थोरात मार्ग, मुकुंद नगर, नागेवाडी, महात्मा फुले नगर‘एन’ विभाग : विद्याविहार (पूर्व), चित्तरंजन नगर, राजावाडीसंपूर्ण घाटकोपर (पूर्व) विभाग, पंत नगर, गारोडिया नगर, लक्ष्मी नगर, बेस्ट वसाहत, नायडू वसाहत, रमाबाई नगर, कामराज नगर, विक्रोळी गाव, गोदरेज ट्रीज.घाटकोपर (पश्चिम) येथील काही परिसर, विद्याविहार (पश्चिम), नारायण नगर, महात्मा गांधी मार्ग, लाल बहादूर शास्त्री मार्ग ते एन. एस. एस. मार्ग ते श्रेयस सिनेमा, कामा गल्ली, किरोळ आणि खलई गांव, पारशीवाडी, चिराग नगर, महेंद्र उद्यान, नवीन माणेकलाल.सर्वोदय रुग्णालय, जीवदया लेन, भीमनगर येथील पाण्याच्या टाक्या, नित्यानंद नगर, पवार चाळ, पाटीदार वाडी, गंगावाडी, बरोट वाडी (दिनांक १ डिसेंबर २०२५ रोजी पाणीपुरवठा बंद राहील व दिनांक २ डिसेंबर २०२५ रोजी कमी दाबाने पाणीपुरवठा)‘एस’ विभाग :* नाहूर (पूर्व), भांडुप (पूर्व), कांजूर (पूर्व), टागोर नगर, कन्नमवार नगर विक्रोळी (पूर्व)
मतचोरीवरून लक्ष विचलित करण्याचा खटाटोप; कॉंग्रेसचा भाजपवर पलटवार
नवी दिल्ली : मतचोरी, सदोष मतदारयाद्या, बुथस्तरीय अधिकाऱ्यांच्या (बीएलओ) मृत्यूच्या घटना, अरूणाचल प्रदेशवर चीनचा दावा आदी मुद्द्यांवरून लक्ष विचलित करण्याचा भाजपचा खटाटोप आहे. त्यातून तो पक्ष आमच्या नेत्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटसचा विषय पुढे करत आहे, असा पलटवार कॉंग्रेसने केला. भाजपच्या आरोपांचा समाचार घेण्यासाठी कॉंग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी पत्रकार परिषद घेतली. भाजपशी संबंधित काही सोशल […] The post मतचोरीवरून लक्ष विचलित करण्याचा खटाटोप; कॉंग्रेसचा भाजपवर पलटवार appeared first on Dainik Prabhat .
पुणे: स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लंडनमध्ये केलेल्या वादग्रस्त भाषणाची सीडी न्यायालयातील सरतपासणीदरम्यान ‘प्ले’ न झाल्याने नवा ‘ट्विस्ट’ निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर, या प्रकरणी अत्यंत महत्त्वाचा पुरावा म्हणून न्यायालयात दाखल केलेल्या दोन सीडी चालविण्यात याव्यात, अशी मागणी तक्रारदार सात्यकी सावरकरांच्या वकिलांनी केली. त्यावर, सरतपासणी घेण्यासाठी तक्रारदारांच्या वकिलांकडून वारंवार मुदतवाढ घेण्यात […] The post सावरकर मानहानी प्रकरणात नवा ‘ट्विस्ट’: वादग्रस्त भाषणाची ‘सीडी’ न्यायालयात चालेना, पुरावे नोंदवण्यास विलंबावर राहुल गांधींच्या वकिलांचा आक्षेप appeared first on Dainik Prabhat .
पुणे : ‘लहान मुले हल्ली मोबाइल गेममध्ये रमली आहेत. त्यामुळे मैदानात येणाऱ्या मुलांची संख्या कमी झाली आहे. अशा परिस्थितीत पुण्यातून ४४ हजार खेळाडू मैदानात उतरतात, ही मोठी गोष्ट आहे. खेळातूच उत्तम आरोग्य घडत असते आणि आरोग्य हीच यशाची गुरुकिल्ली आहे,’ असे मत अभिनेता अक्षय कुमारने व्यक्त केले. त्याने पुण्याचे खासदार आणि केंद्रीय सहकार व नागरी […] The post अक्षय कुमारचा मंत्र: ‘आरोग्य हीच यशाची गुरुकिल्ली’; खासदार क्रीडा महोत्सवाची सांगता, विजेत्यांचा गौरव appeared first on Dainik Prabhat .
PM Modi : ब्लाइंड वर्ल्डकप विजेत्या महिला संघाचा पंतप्रधान मोदींकडून खास सन्मान! पाहा VIDEO
PM Modi Meets India Womens Blind Cricket Team : भारतीय दृष्टीहीन महिला क्रिकेट संघाने नेपाळला हरवून महिला ब्लाइंड टी-२० विश्वचषक २०२५ चा पहिलाच खिताब जिंकला होता. अंतिम सामन्यात भारताने नेपाळचा ७ विकेट्सने पराभव करत इतिहास रचला. या ऐतिहासिक विजयानंतर, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वचषक विजेत्या खेळाडूंची भेट घेऊन त्यांचा उत्साह वाढवला. ज्याचा व्हिडीओ सोशल […] The post PM Modi : ब्लाइंड वर्ल्डकप विजेत्या महिला संघाचा पंतप्रधान मोदींकडून खास सन्मान! पाहा VIDEO appeared first on Dainik Prabhat .
महिला प्रिमीअर लीग २०२६ च्या तारखा जाहीर
नवी दिल्ली : महिला प्रीमिअर लीग २०२६ हंगामाच्या तयारीला वेग आला असून गुरूवारी नवी दिल्लीत मेगा ऑक्शन पार पडत आहे. पाचही फ्रँचायझींनी ऑक्शनपूर्वी एकूण १८ खेळाडूंना कायम ठेवले आहे. महिला प्रीमिअर लीग २०२६ चे वेळापत्रक अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहे. यानुसार स्पर्धेची सुरुवात ९ जानेवारी २०२६ रोजी नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियमवर पहिल्या सामन्याने होणार आहे. तर फायनल ५ फेब्रुवारी २०२६ रोजी वडोदरा येथे रंगणार आहे. या वेळापत्रकातील मोठा बदल म्हणजे महिला प्रीमिअर लीग आता जानेवारीत सुरू होत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट कार्यक्रमांशी संघर्ष टाळण्यासाठी वेळेत बदल करण्यात आला असून, संपूर्ण हंगाम फक्त नवी मुंबई आणि वडोदरा या दोन शहरांमध्ये घेण्याचा निर्णय घेतला आहे.यंदाच्या हंगामासाठी १९४ भारतीय आणि ८३ परदेशी अशा एकूण २७७ खेळाडूंनी नोंदणी केली आहे. मात्र, त्यापैकी फक्त ७३ खेळाडूंनाच करारबद्ध करण्याची परवानगी आहे आणि त्यापैकी २३ जागा या परदेशी खेळाडूंना राखीव ठेवण्यात आल्या आहेत. सोफी डिव्हाईन, सोफी एक्लेस्टन, एलिसा हिली, अमेलिया केर, मेग लॅनिंग, दीप्ती शर्मा, रेणुका सिंग आणि लॉरा वॉलव्हार्ड्ट या नावाजलेल्या खेळाडूंचा Marquee यादीत समावेश आहे. त्यामुळे या खेळाडूंसाठी संघांमध्ये जोरदार बोली लावली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.वूमेन्स प्रीमियर लीगच्या खेळाडू लिलावात भारताची अष्टपैलू दीप्ती शर्मा सर्वाधिक किमतीची भारतीय खेळाडू ठरली. श्रेणी टप्प्यात उत्तर प्रदेश योद्ध्यांनी तिच्यासाठी ३ कोटी २० लाख रुपये इतकी हक्क राखून बोली लावून तिला पुन्हा संघात स्थान दिले. भारताच्या महिला क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या दीप्तीवर संघाने पुन्हा एकदा विश्वास दाखवला.परदेशी खेळाडूंमध्ये न्यूझीलंडच्या अमेलिया केरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मुंबईच्या संघाने तिला ३ कोटी रुपये देत आपल्या ताफ्यात कायम ठेवले. उपयुक्त फलंदाजी व अचूक फिरकीगोलंदाजी या गुणांच्या जोरावर केरची निवड ठरली. लिलावाच्या जलदगती टप्प्यात भारताची अनुभवी गोलंदाज शिखा पांडे सर्वांत महागडी ठरली. उत्तर प्रदेश योद्ध्यांनी तीला २ कोटी ४० लाख रुपये देत आपल्या संघात घेतले. तिच्या अचूक गोलंदाजीचा अनुभव संघाला महत्त्वाचा ठरणार आहे.या तिन्ही खेळाडूंच्या मोठ्या बोलीमुळे आगामी स्पर्धेत भारतीय खेळाडूंच्या कामगिरीकडून मोठ्या अपेक्षा निर्माण झाल्या आहेत. महिला प्रीमियर लीगमधील या लिलावामुळे भारतीय महिला क्रिकेटचा वाढता दर्जा पुन्हा अधोरेखित झाला आहे.
धुळ प्रदुषण वाढले, मुंबईतील ५३ बांधकामांना काम थांबवा नोटीस
मुंबई - मुंबईत वायू प्रदूषण नियंत्रणासाठी महानगरपालिकेने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तसेच वायू प्रदूषणास कारणीभूत ठरत असल्याप्रकरणी मुंबईतील ५३ बांधकामांना ‘कामे थांबवा’ नोटीस मुंबई महानगरपालिकेकडून देण्यात आली. तरीही मुंबई महानगरपालिकेडून जारी वायू प्रदूषणासंदर्भातील मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करावे. बांधकाम स्थळी संवेदक (सेन्सॉर) आधारित वायू गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) मोजणारे संयंत्र अविरतपणे सुरू राहतील हे सुनिश्चित करावे. ही संयंत्रे बंद आढळल्यास संबंधितांवर सक्त कारवाई केली जाईल, असा इशारा मुंबई अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ.अश्विनी जोशी यांनी दिला आहे.वायू प्रदूषण नियंत्रणासाठी १५ ऑक्टोबर २०२४ रोजी मुंबई महानगरपालिकेने २८ मुद्यांचा समावेश असलेली सर्वंकष मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. वायू प्रदूषण नियंत्रणासाठी निश्चित केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटकोरपणे पालन होत असल्याचे सुनिश्चित करण्यासाठी महानगरपालिकेकडून सर्व प्रशासकीय विभाग (वॉर्ड) स्तरावर भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. नोव्हेंबर महिन्यात वायू प्रदूषणात वाढ निदर्शनास आल्यानंतर वायू प्रदूषणास कारणीभूत ठरल्याप्रकरणी या पथकाच्या वतीने २६ नोव्हेंबर २०२५ पर्यंत एकूण ५३ बांधकामांना ‘कामे थांबवा’ नोटीस बजावण्यात आल्या आहेत. यामध्ये ‘जी दक्षिण’ विभागातील सिद्धार्थ नगर परिसरातील १७, ‘ई’ विभागातील भायखळा, माझगाव परिसरातील ५, ‘पी उत्तर’ विभागातील मालाड (पश्चिम) परिसरातील ३१ बांधकामांचा समावेश आहेदरम्यान, बांधकामाच्या ठिकाणी संवेदक अर्थात सेन्सॉर आधारित वायू गुणवत्ता निर्देशांक मोजणाऱ्या संयंत्रांच्या सद्यस्थितीबाबत अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी मंगळवारी २७ नोव्हेंबर २०२५ आढावा घेतला. मुंबईतील बांधकामाच्या ठिकाणी ६६२ संवेदक (सेन्सॉर) आधारित वायू गुणवत्ता निर्देशांक मोजणारे संयंत्र बसविण्यात आले आहेत. तर, २५१ संयंत्र प्रस्थापित करण्याची प्रक्रिया प्रगतिपथावर आहे. एकूण ४०० संयंत्रे ही एकत्रित माहिती संकलनाच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या डॅशबोर्डशी संलंग्नित करण्यात आली आहेत. यापैकी, ११७ संयंत्रे सक्रिय नसल्याचे अर्थात बंद असल्याचे आढळून आले आहेत. त्यामुळे त्यांना नोटीस बजावल्या जात असून त्यानंतरही याठिकाणची संयंत्र सक्रिय नसल्याचे आढळून आल्यास विभाग (वॉर्ड) स्तरावर नेमण्यात आलेल्या एकूण ९५ भरारी पथकांच्या माध्यमांतून संबंधितांवर सक्त कारवाई करण्यात येईल, असा इशारा डॉ. अश्विनी जोशी यांनी दिला आहे .मुंबईतील २०९ बेकऱ्या स्वच्छ इंधनावरबेकरी हेसुद्धा वायू प्रदूषणास कारक घटकांपैकी एक आहेत. मुंबईतील एकूण ५९३ बेकरींपैकी २०९ बेकऱ्या स्वच्छ इंधनावर चालणाऱ्या होत्या. महानगरपालिकेकडून करण्यात आलेल्या प्रयत्नांमुळे ५७ बेकऱ्या स्वच्छ इंधनावर परावर्तित झाल्या आहेत. तर, मागील सहा महिन्यात ७५ बेकऱ्यांनी या परिवर्तनासाठी पुढाकार घेतला आहे. तसेच, ८८ बेकऱ्यांनी महानगर गॅस मिळण्यासाठी अर्ज केला आहे.
मुंबईतले रस्ते धुळमुक्त करण्यासाठी 'ही'योजना राबवणार
मुंबई : मुंबईतील वायू प्रदूषण नियंत्रणाच्या अनुषंगाने महानगरपालिकेकडून २८ ते ३० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत ‘रस्ते स्वच्छता व धुळ नियंत्रण मोहीम’ राबविण्यात येणार आहे. महानगरपालिकेच्या सर्व प्रशासकीय विभाग (वॉर्ड) स्तरावर कार्यरत असलेल्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कनिष्ठ पर्यवेक्षकांनी दत्तक घेतलेल्या रस्त्यांवर ही मोहीम अत्यंत प्रभावीपणे राबवली जाणार आहे.मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशांनुसार, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनात, उपायुक्त (पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग) अविनाश काटे यांच्या देखीरेखीत वायू प्रदूषण नियंत्रणासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर, उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर यांच्या देखरेखीत ‘रस्ते स्वच्छता व धुळ नियंत्रण मोहीम’ आयोजित करण्यात आली आहे.येत्या २८ ते ३० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत राबविल्या जाणाऱ्या या मोहीम अंतर्गत, घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कनिष्ठ पर्यवेक्षकांनी दत्तक घेतलेल्या रस्त्यांवर सखोल स्वच्छता करण्यास प्राधान्य द्यावे. यासाठी पाणी टँकर, मिस्टिंग मशीन तसेच अन्य यांत्रिक उपकरणे व संयंत्रांचा वापर करावा. प्रामुख्याने वायू गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) अधिक असलेले बोरिवली (पूर्व), मालाड (पश्चिम), चकाला – अंधेरी (पूर्व), देवनार, माझगाव, नेव्ही नगर – कुलाबा, मुलुंड (पश्चिम), पवई या परिसरातील वायू निर्देशांकांत सुधारणा होईल, यादृष्टीने व्यापक स्वच्छता करावी. विभाग स्तरावर कार्यरत असलेले घनकचरा व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंते यांनी या संपूर्ण मोहिमेचे काटेकोरपणे पर्यवेक्षण करावे, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त डॉ अश्विनी जोशी यांनी दिले आहेत. या कनिष्ठ पर्यवेक्षक अर्थात जेओंच्या माध्यमातून ७५० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची पाण्याने धुवून स्वच्छता केली जाणार आहे. ही मोहिम पुढील तीन दिवस चालणार आहे.
‘घुसखोरांना मतदानाचा अधिकार द्यायचा का ? ’
नवी दिल्ली : देशभर सुरू असलेल्या मतदार यादी पुनिरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेविरोधात दाखल केलेल्या याचिकांवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निरीक्षणे नोंदवली. न्यायालयाने आधारधारक असणे म्हणजे नागरिकत्वाचा अधिकार मिळणे नव्हे, असे स्पष्ट करत घुसखोरीच्या मुद्द्यावर चिंता व्यक्त केली.सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांच्या खंडपीठाने म्हटले की, आधार कार्डचे उद्दिष्ट सामाजिक कल्याण योजना पोहोचवणे आहे. तो पूर्ण नागरिकत्वाचा पुरावा नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीला, अगदी शेजारी देशातील व्यक्तीलाही, केवळ आधार असल्यामुळे मताधिकार दिला जाऊ शकत नाही. एसआयआर प्रक्रियेत आधार हा फक्त एक पूरक कागदपत्र म्हणून स्वीकारता येईल, परंतु त्यावरुन नागरिकत्व सिद्ध होत नाही.फॉर्म ६ चे सर्व अर्ज स्वयंचलितपणे स्वीकारले जावेत, या काही याचिकाकर्त्यांच्या मागणीला न्यायालयाने नकार दिला. खंडपीठाने नमूद केले की, निवडणूक आयोग पोस्ट ऑफिस नाही. फॉर्म ६ मध्ये जमा केलेल्या कागदपत्रांची तपासणी करण्याचा आणि त्यांची सत्यता पडताळण्याचा पूर्ण अधिकार आयोगाकडे आहे. याचिकाकर्त्यांच्या वतीने वरिष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी न्यायालयात युक्तिवाद केला की, एसआयआर प्रक्रिया सामान्य मतदारांवर असंवैधानिक आणि अनावश्यक भार टाकते. अनेक मतदार अशिक्षित आहेत आणि फॉर्म भरणे त्यांच्या क्षमतेबाहेर आहे. फॉर्म न भरल्यास त्यांची नावे मतदार यादितून काढली जात आहेत. कोणाचे नाव वगळायचे असल्यास न्याय्य आणि पारदर्शक प्रक्रिया अवलंबली पाहिजे. आधार नागरिकत्व सिद्ध करत नाही, परंतु कार्डधारक भारतीय नागरिक असण्याची शक्यता दर्शवतो. जर सरकार आधारवरच निर्णय घेणार असेल, तर ती प्रक्रिया न्यायालयासमोर सिद्ध होणे आवश्यक आहे.
भाजपच्या ‘या’आमदाराची विरोधकांना कापून काढण्याची भाषा; नेमकं काय झालं ते जाणून घ्या..
नागपूर: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप शिगेला पोहोचले असताना, भाजप आमदार आशिष देशमुख यांनी नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारसभेत थेट वादग्रस्त वक्तव्य केले आहे. कळमेश्वरमध्ये बोलताना देशमुख यांनी विरोधकांना उघड धमकी दिली. “हे देवेंद्र फडणवीसांचे सरकार आहे. ते गृहमंत्री आहेत आणि ते नागपूरचे आहेत. त्यामुळं जास्त कराल तर कापून काढू,” अशा […] The post भाजपच्या ‘या’ आमदाराची विरोधकांना कापून काढण्याची भाषा; नेमकं काय झालं ते जाणून घ्या.. appeared first on Dainik Prabhat .
पदव्युत्तर वैद्यकीय विद्यार्थ्यांचा कल ‘जनरल मेडिसिन’ कडे
मुंबई (प्रतिनिधी): देशातील पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत (नीट-पीजी २०२५) यंदा विद्यार्थ्यांचा कल एमडी जनरल मेडिसिन या शाखेकडे असल्याचे स्पष्ट झाले आहे. टॉपर विद्यार्थ्यांपासून उच्च गुणधारकांपर्यंत मोठ्या प्रमाणावर या शाखेची निवड करताना दिसत आहेत. गेल्या काही वर्षांपासून प्रतिष्ठा मिळवलेल्या रॅडिओलॉजीने यंदाही आपले स्थान कायम राखले असले तरी या वर्षी ती दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यातुलनेत सर्जरीला प्राधान्य नसल्यामुळे तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.टॉप १० पैकी ९ विद्यार्थ्यांनी तसेच शंभरमधील जवळपास निम्म्या विद्यार्थ्यांनी जनरल मेडिसिनचा पर्याय निवडल्याने ही शाखा पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे. व्यापक क्लिनिकल काम, सुरक्षित करिअर, पुढील सुपर-स्पेशॅलिटीचे पर्याय आणि रुग्णांशी थेट निगडित काम यामुळे या शाखेची लोकप्रियता वाढत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. दुसरीकडे, गेल्या दशकभरात ‘हॉट फेव्हरेट’ मानली जाणारी एमडी रॅडिओडायग्नोसिस (रॅडिओलॉजी) ही यंदाही विद्यार्थ्यांची आवडती शाखा असली तरी स्थिर उत्पन्न आणि कमी शारीरिक ताण अशा कारणांमुळे तिची मागणी कायम असल्याचे दिसते. टेले-रॅडिओलॉजी आणि एआय-आधारित निदान तंत्रज्ञानामुळे या क्षेत्रात संधी वाढत असून त्याचा थेट परावर्तन विद्यार्थ्यांच्या पसंतीत दिसते.निवड प्रक्रियेत देशातील सर्वोच्च गुणवत्ता दाखविणाऱ्या वैद्यकीय पदवीधरांनी आपली पसंती स्पष्ट केली आहे. करिअरची स्थिरता हे ऑपरेशन थिएटरपेक्षा अधिक महत्त्वाचे ठरत आहे.प्रथम फेरीच्या मार्गदर्शनामध्ये मेडिसिन आणि रॅडिओलॉजी या शाखांवर उच्च गुणांच्या विद्यार्थ्यांचा मोठा भर दिसला तर शस्त्रक्रिया (सर्जरी) शाखेतील निवड लक्षणीयरीत्या घटली. आकडेवारीचा विचार करता पहिल्या १५०० उमेदवारांपैकी ६३२ (४२ टक्के) उमेदवारांनी जनरल मेडिसिन, तर ४४७ (३० टक्के) यांनी रॅडिओलॉजीची निवड केली. त्याच्या तुलनेत अवघे ६ टक्के विद्यार्थ्यांनीच एमएस जनरल सर्जरी स्वीकारली. हा कल उच्च-जोखमीच्या प्रक्रिया, दीर्घ प्रशिक्षण, ताणतणाव आणि वाढत्या वैद्यकीय वादप्रकरणांबद्दलच्या चिंतांमुळे दिसत असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
पंतप्रधान मोदी कर्नाटक आणि गोव्याचा दौरा करणार, ७७ फुटी श्रीराम मूर्तीचे अनावरण करणार
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवार २८ नोव्हेंबर रोजी कर्नाटक आणि गोव्याला भेट देणार आहेत. सकाळी साडे अकराच्या सुमाराला पंतप्रधान कर्नाटकातील उडुपी येथील श्रीकृष्ण मठाला भेट देणार आहेत. त्यांनतर ते गोव्याला जाणार आहेत. गोव्यातील श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठाच्या ५५० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित 'सार्ध पंचशतमानोत्सव' सोहळ्यानिमित्त पंतप्रधान दुपारी सव्वा तीनच्या सुमारास मठाला भेट देणार आहेत.Tomorrow, 28th November, is a special day as the programme to mark the 550th-year celebration of the Shree Samsthan Gokarn Partagali Jeevottam Math will be held in Canacona, Goa. I look forward to joining the celebrations. A 77 feet statue of Prabhu Shri Ram will be unveiled on…— Narendra Modi (@narendramodi) November 27, 2025पंतप्रधान मोदींचा उडुपी दौरापंतप्रधान उडुपी येथील श्रीकृष्ण मठाला भेट देणार असून लक्षकंठ गीता पारायणात सहभागी होणार आहेत. या आध्यात्मिक कार्यक्रमाला विद्यार्थी, साधू, विचारवंत आणि समाजातील विविध स्तरातील नागरिक मिळून सुमारे एक लाख जण उपस्थित राहणार असून ते एका स्वरात श्रीमद भगवद गीतेचे पठण करणार आहेत.याशिवाय पंतप्रधानांच्या हस्ते कृष्णा गर्भगृहासमोरील सुवर्ण तीर्थ मंडपाचे उद्घाटन होणार आहे आणि पवित्र कनकाना किंदीसाठी तयार करण्यात आलेल्या कनक कवचाचे समर्पण देखील त्यांच्या हस्ते होणार आहे. ही एक पवित्र खिडकी आहे त्यातून संत कनकदास यांना भगवान कृष्णाचे दिव्य दर्शन झाले असे मानले जाते. उडुपी येथील श्रीकृष्ण मठाची स्थापना आठशे वर्षांपूर्वी वेदांताच्या द्वैत तत्वज्ञानाचे संस्थापक मध्वाचार्य यांनी केली होती.पंतप्रधान मोदींचा गोवा दौरागोव्यातील श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठाच्या ५५० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित 'सार्ध पंचशतमानोत्सव' सोहळ्यानिमित्त पंतप्रधान दक्षिण गोव्यातील कानाकोना येथील मठाला भेट देणार आहेत.श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठ परिसरात उभारण्यात आलेल्या प्रभू श्रीराम यांच्या ७७ फूट उंचीच्या कांस्य पुतळ्याचे पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण होणार असून मठाने विकसित केलेल्या रामायण थीम पार्क उद्यानाचे' देखील ते उदघाटन करतील. यावेळी पंतप्रधान एका खास टपाल तिकिटाचे आणि स्मृती नाण्याचे अनावरण करतील, तसेच उपस्थितांना संबोधितदेखील करतील.श्रीसंस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठ हा पहिला गौड सारस्वत ब्राह्मण वैष्णव मठ आहे. येथे १३ व्या शतकात जगद्गुरु मध्वाचार्य यांनी स्थापित केलेल्या द्वैत व्यवस्थेचे पालन केले जाते. मठाचे मुख्यालय कुशावती नदीच्या काठावर दक्षिण गोव्यातील एका लहानशा शहरात पर्तगाळी येथे आहे.
बीएमसी अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून व्यावसायिकाला बेदम मारहाण !
मुंबई – शहरातील एका रिअल इस्टेट प्रकल्पाशी संबंधित आर्थिक वादातून एका महानगरपालिका अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून मारहाण करण्यात आल्याचा आरोप करत, एका ५३ वर्षीय व्यावसायिकाने मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. ही कथित घटना ४ ऑक्टोबर रोजी घडली. या महिन्याच्या सुरुवातीला तक्रार दाखल करण्यात आली असली तरी, कोणताही प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) नोंदवण्यात आलेला नाही, असे पोलिसांनी […] The post बीएमसी अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून व्यावसायिकाला बेदम मारहाण ! appeared first on Dainik Prabhat .
Shikha Pandey sold for 2.4 crore to UP Warriorz : महिला प्रीमियर लीग २०२५ च्या मेगा ऑक्शनमध्ये अनुभवी वेगवान गोलंदाज शिखा पांडे हिच्यावर फ्रेंचायझींनी अक्षरशः पैशांचा वर्षाव केला. या खेळाडूला आपल्या संघात घेण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळूर आणि यूपी वॉरियर्स यांच्यात कडवी टक्कर पाहायला मिळाली, परंतु अखेरीस यूपी वॉरियर्सने बाजी मारली आणि तिला २.४ कोटी रुपयांमध्ये […] The post WPL 2026 Auction : एअरफोर्सच्या विंग कमांडरचा ऑक्शनमध्ये जलवा! बेस प्राइसपेक्षा सहापट अधिकची लागली बोली appeared first on Dainik Prabhat .
Shikha Pandey sold for 2.4 crore to UP Warriorz : महिला प्रीमियर लीग २०२५ च्या मेगा ऑक्शनमध्ये अनुभवी वेगवान गोलंदाज शिखा पांडे हिच्यावर फ्रेंचायझींनी अक्षरशः पैशांचा वर्षाव केला. या खेळाडूला आपल्या संघात घेण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळूर आणि यूपी वॉरियर्स यांच्यात कडवी टक्कर पाहायला मिळाली, परंतु अखेरीस यूपी वॉरियर्सने बाजी मारली आणि तिला २.४ कोटी रुपयांमध्ये […] The post WPL 2025 Auction : एअरफोर्सच्या विंग कमांडरचा ऑक्शनमध्ये जलवा! बेस प्राइसपेक्षा सहापट अधिकची लागली बोली appeared first on Dainik Prabhat .
हाँगकाँगमधील भीषण आगीचे कारण आले समोर; आगीत ५५ जणांचा मृत्यू, २७९ अजूनही बेपत्ता
हाँगकाँग : हाँगकाँगमधील Tai Po District मध्ये बुधवारी दुपारी लागलेल्या भीषण आगीने संपूर्ण शहर हादरलं आहे. या घटनेत आतापर्यंत ५५ जणांचा मृत्यू झाला असून, २७९ लोक अजूनही बेपत्ता आहेत, असे अधिकृत माहितीवरून कळत आहे. हे हाँगकाँगमधील ३० वर्षातील सर्वात मोठे अग्नितांडव आहे.आग ३२ मजली निवासी इमारतीच्या बाहेरील बांबूच्या ज्वलनशील स्कॅफोल्डिंगमधून सुरू झाली, जिथे इमारतीच्या नूतनीकरणाचे काम सुरू होते. इमारतीवर लावलेल्या सुरक्षा जाळ्या, वेगवान वारा आणि ज्वलनशील साहित्य यांच्या संयोगामुळे आग काही मिनिटांतच मोठ्या प्रमाणावर पसरली. जवळील आठ टॉवरच्या गृहनिर्माण संकुलातील सात इमारतींमध्ये आग पसरली आणि जवळपास २००० फ्लॅट्स जळून खाक झाले.हाँगकाँग पोलिसांनी आगीशी संबंधित तीन जणांना अटक केली आहे. त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचे गंभीर आरोप आहेत. अटक केलेले तिघे लोक बांधकाम कंपनीचे अधिकारी आहेत, ज्यांच्यावर इमारतींच्या नूतनीकरणासाठी वापरल्या गेलेल्या ज्वलनशील साहित्याबाबत गंभीर निष्काळजीपणा केल्याचा आरोप आहे. यात दोन संचालक व एक प्रकल्प सल्लागार आहे.हाँगकाँग अग्निशमन विभागाने १४० पेक्षा जास्त फायर ट्रक्स, ६० रुग्णवाहिका आणि ९०० हून अधिक बचाव कर्मचारी घटनास्थळी तैनात केले. किमान ६८ जखमींना रुग्णालयात दाखल केले गेले, त्यापैकी २५ जणांची प्रकृती गंभीर आहे. संकुलातील शेकडो नागरिकांना, विशेषत: ज्येष्ठ नागरिकांना, तातडीने सुरक्षित स्थळी हलवण्यात आले.पोलिसांच्या अहवालानुसार, इमारतीवर लावलेल्या संरक्षक जाळ्या, वॉटरप्रूफ कॅनव्हास आणि प्लास्टिक फॅब्रिक अग्निरोधक मानकांची पूर्तता करत नसल्याचे दिसून आले. लिफ्ट लॉबीच्या खिडक्यांवर पॉलीयुरेथेन फोम वापरल्याने आग वेगाने पसरली, असेही तपासात उघड झाले.हाँगकाँगचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉन ली यांनी विशेष तपास पथक तयार करून बेपत्ता लोकांच्या शोध मोहिमेला गती दिली आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी शोक व्यक्त करत बचाव कार्यांना सर्वतोपरी सहाय्य करण्याचे निर्देश दिले आहेत.हाँगकाँगमधील ही भीषण आग आणि त्यातून निर्माण झालेली परिस्थिती शहरासाठी मोठा धक्का ठरली आहे, तर सरकार आणि बचाव कर्मचाऱ्यांचे प्रयत्न अद्याप सुरू आहेत.
भारतात ॲपल कंपनीवर होणार दंडात्मक कारवाई
नवी दिल्ली : जगातील अग्रगण्य टेक कंपनी ॲपलला भारतात नवीन स्पर्धा कायद्यांमुळे मोठा दंड भरावा लागणा आहे. भारतीय नियमांमध्ये बदल केल्याने भारतीय स्पर्धा आयोगला (CCI) कंपनीच्या जागतिक उत्पन्नावर दंड ठोठावण्याचा अधिकार मिळाला आहे. यामुळे ॲपलला अंदाजे $३८ अब्ज (सुमारे ₹3,20,000 कोटी) इतका दंड होण्याचा धोका आहे. कंपनीला अद्याप दंड आकारला गेलेला नाही, परंतु नवीन नियमांमुळे काय होईल याचा अंदाज आल्यामुळे कंपनीने न्यायालयात धाव घेतली आहे.हा वाद ॲपलच्या ॲप स्टोअर धोरणांपासून सुरू झाला. भारतीय डेव्हलपर्सने तक्रार केली की, आयफोन वापरकर्ते फक्त ॲपलच्या ॲप स्टोअरवरूनच ॲप्स डाउनलोड करू शकतात, तसेच पेमेंट सिस्टमवर ॲपलचे नियंत्रण असल्यामुळे त्यांना आर्थिक नुकसान होत आहे. डेव्हलपर्सनी याला बाजारातील असंतुलन मानले. यावरून CCI ने चौकशी सुरू केली आणि ॲपलच्या धोरणांचा तपास केला.पूर्वी, भारतात फक्त देशांतर्गत व्यवसायावर दंड आकारण्याचा नियम होता. अॅपलच्या बाबतीत, फक्त भारतातील ॲप स्टोअर उत्पन्नावर दंड लागू शकत होता, जो तुलनेने कमी होता. परंतु २०२३ मध्ये झालेल्या सुधारणेनुसार, CCI ला कंपनीच्या जागतिक उलाढालीच्या १० टक्क्यांपर्यंत दंड ठोठावण्याचा अधिकार मिळाला. ॲपलच्या जागतिक महसुलाचा विचार करता, कंपनीला $३८ अब्ज इतका मोठा दंड होण्याची शक्यता आहे.ॲपलच्या युक्तिवादानुसार, चौकशी भारतीय अॅप स्टोअरवर आधारित आहे, त्यामुळे फक्त त्याच उत्पन्नावर दंड आकारला जावा. कंपनीचे म्हणणे आहे की भारताचा नवीन नियम तत्त्वाच्या विरोधात आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आधीच्या निर्णयानुसार, संबंधित उलाढालीवरच दंड ठोठावला जावा, तर जागतिक उत्पन्नावर दंड लावणे चुकीचे आहे.सीसीआयचे म्हणणे आहे की, स्थानिक उत्पन्नावर दंड लावल्यास मोठ्या टेक कंपन्यांवर परिणाम होत नाही. त्यामुळे जागतिक उत्पन्नावर दंड ठोठावून कंपन्यांना भारतीय कायद्याचे पालन करण्यास भाग पाडले जाते. भारताचा असा युक्तिवाद आहे की मोठ्या कंपन्यांच्या जागतिक कार्यपद्धतीवरही कायद्याचा परिणाम समान असावा.हा वाद सध्या न्यायालयात आहे. जर ॲपलची याचिका मान्य झाली, तर दंड फक्त भारतातील व्यवसायांपुरता मर्यादित राहील. मात्र जर न्यायालयाने नवीन नियमांना मान्यता दिली, तर CCI ला जगातील सर्वात मोठ्या दंडात्मक अधिकार मिळतील, ज्याचा परिणाम ॲपलसह गुगल, मेटा आणि ॲमेझॉन सारख्या इतर टेक कंपन्यांनाही भोगावा लागू शकतो.
बोगस जन्म-मृत्यू दाखले रद्द करणार
मुंबई : राज्यात बेकायदेशीर पद्धतीने तसेच खोट्या कागदपत्रांच्या आधारे मिळविलेल्या जन्म-मृत्यू दाखल्यांचे रॅकेट मोडून काढण्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कंबर कसली असून, केवळ आधार कार्डच्या पुराव्यावर दिलेले किंवा संशयास्पद वाटणारे जन्म-मृत्यूचे दाखले आणि नोंदी तात्काळ रद्द करून, पोलिसात तातडीने तक्रार दाखल करण्याचे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. याबाबतचे परिपत्रक महसूल विभागाने जारी केले असून तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना सोळा मुद्यांच्या आधारे जन्म-मृत्यू दाखल्याची तपासणी करावी असे सुचविण्यात आले आहे. अतिरिक्त मुख्य सचिव गृह तसेच अतिरिक्त मुख्य सचिव महसूल यांच्या उच्चस्तरीय बैठकीतील सूचनानंतर महसूल मंत्री बावनकुळे यांनी आदेश दिले.'या' तारखेनंतरचे आदेश रद्द होणार११ ऑगस्ट २०२३ च्या सुधारणेनंतर नायब तहसीलदारांनी वितरीत केलेले जन्म-मृत्यू नोंदीचे आदेश परत घेण्याचे आणि रद्द करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, ज्या प्रकरणांमध्ये केवळ आधार कार्डला पुरावा मानून जन्म मृत्यू दाखले दिले गेले आहेत, ते आदेश त्रुटीपूर्ण मानले जातील. आधार कार्ड हा जन्माचा किंवा जन्म ठिकाणाचा पुरावा म्हणून ग्राह्य धरता येणार नाही, असे महसूल विभागाने केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचा हवाला देऊन स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे, जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांच्या देखरेखीखाली विशेष मोहीम राबवून विशेष मेळाव्याद्वारे या कामाचा निपटारा केला जावा असे बजावण्यात आले आहे.खोट्या नोंदी आढळल्यास थेट गुन्हा दाखलमहसूलमंत्री बावनकुळे यांच्या निर्देशानुसार, अर्जातील माहिती आणि आधार कार्डवरील जन्मतारीख यामध्ये तफावत आढळल्यास संबंधित व्यक्तीवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तसेच, जे लाभार्थी मूळ प्रमाणपत्र परत करणार नाहीत किंवा जे आता सापडत नाहीत, त्यांची यादी बनवून त्यांना 'फरार' घोषित करण्याची प्रक्रिया आणि त्यांच्यावर एफआयआर (FIR) दाखल करण्याची स्थानिक पोलिसांनी करावी असे म्हटले आहे.• राज्यातील 'ही' शहरे रडारवरअवैध जन्म-मृत्यू प्रकरणांमध्ये राज्यातील काही विशिष्ट शहरे आणि तालुके 'हॉटस्पॉट' असल्याचे दिसून आले आहे. यामध्ये अमरावती, सिल्लोड, अकोला, संभाजीनगर शहर, लातूर, अंजनगाव सुर्जी, अचलपूर, पुसद, परभणी, बीड, गेवराई, जालना, अर्धापूर आणि परळी या ठिकाणांचा समावेश असून, येथील तहसीलदार व जिल्हाधिकाऱ्यांना ही प्रकरणे गांभीर्याने तपासण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.ठळक वैशिष्ट्ये:• केवळ ‘आधार कार्ड’वर मिळालेले जन्म दाखले रद्द होणार.• जन्मतारखेत तफावत आढळल्यास थेट पोलिसात तक्रार.• बनावट प्रमाणपत्र घेणारे लाभार्थी पळून गेल्यास त्यांना ‘फरार’ घोषित करणार.• संभाजीनगर, अमरावती, लातूरसह १४ ठिकाणी विशेष तपास मोहीम.__मुळात जन्म मृत्यूचे दाखले देण्यासाठी आरोग्य विभागाची यंत्रणा आहे. मात्र एक वर्षे उलटून गेल्यावर हे दाखले महसूल विभागामार्फत दिली जातात. त्यासाठी तहसीलदार व त्यावरील अधिकारी सक्षम आहेत. मात्र, अनेक ठिकाणी बनावट कागदपत्रांच्या आधारे बरेच गैरप्रकार झाल्याचे आढळून आले. त्यामुळे आता प्रमाणपत्र परत घेणे किंवा त्यांची फेरतपासणी करण्याचे निश्चित केले आहे. - चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
मल जल प्रक्रिया केंद्रांची कामे जलदगतीने
केंद्र उभारणीच्या कामाच्या कार्यवाहीला वेग देण्याचे निर्देशमुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईत एकूण ७ ठिकाणी मलजल प्रक्रिया केंद्र उभारण्याची कार्यवाही प्रगतिपथावर असून अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून कामे तीन सत्रांत (शिफ्ट) अखंडितपणे सुरू ठेवण्याचे निर्देश महापालिका अतिरिक्त आयुक्त डॉ अभिजित बांगर यांनी दिले आहेत.नवीन मलजल प्रक्रिया केंद्रांमुळे समुद्राच्या पाण्याची गुणवत्ता व सागरी जीवनामध्ये सुधारणा होणार असल्याचेही बांगर यांनी अधोरेखित केले.मुंबईतील पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टिने महानगरपालिकेकडून एकूण ७ ठिकाणी मलजल प्रक्रिया केंद्र उभारण्यात येत आहेत. अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी महानगरपालिका मुख्यालयात या कामांचा प्रकल्पनिहाय आढावा गुरुवारी २७ नोव्हेंबर रोजी घेतला. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. प्रमुख अभियंता (मुंबई मलनिस्सारण प्रकल्प) अशोक मेंगडे यांच्यासह संबंधित अधिकारी, अभियंते, प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार यावेळी उपस्थित होते.मुंबई मलनिस्सारण प्रकल्प विभागाच्या वतीने वरळीमध्ये ५०० दशलक्ष लीटर प्रतिदिन, वांद्रे येथे ३६० दशलक्ष लीटर प्रतिदिन, मालाडमध्ये ४५४ दशलक्ष लीटर प्रतिदिन, घाटकोपरमध्ये ३३७ दशलक्ष लीटर प्रतिदिन, धारावीमध्ये ४१८ दशलक्ष लीटर प्रतिदिन, भांडुपमध्ये २१५ दशलक्ष लीटर प्रतिदिन आणि वेसावे (वर्सोवा) येथे १८० दशलक्ष लीटर प्रतिदिन याप्रमाणे एकूण ७ केंद्र उभारणीची कार्यवाही वेगाने सुरू आहे. या प्रकल्पांद्वारे दररोज २ हजार ४६४ दशलक्ष लीटर मलजलावर प्रक्रिया केली जाणार आहे. या सातही मलजल प्रक्रिया केंद्र प्रकल्पाची भौतिक कामे वेगाने सुरू आहेत. नियोजित वेळापत्रकानुसार, घाटकोपर, वेसावे (जुलै २०२६), भांडुप (ऑगस्ट २०२६), वरळी, वांद्रे, धारावी (जुलै २०२७) आणि मालाड मलजल प्रक्रिया केंद्र (जुलै २०२८) पूर्णत्वाचा कालावधी आहे. या विहित कालमर्यादेतच कामे पूर्ण झाली पाहिजेत, असे निर्देश बांगर यांनी दिले.मलजल प्रक्रिया कार्य अंतर्गत प्राथमिक व दुय्यम प्रक्रियांसह १ हजार २०० दशलक्ष लीटर मलजलावर तृतीय स्तरीय प्रक्रियाही केली जाणार आहे. विविध प्रयोजनार्थ या पाण्याचा पुनर्वापर केला जाणार आहे. तसेच, टप्प्याटप्प्याने १०० टक्के मलजलावर तृतीय स्तरीय प्रक्रिया करून विविध प्रयोजनार्थ पुनर्वापर करण्याचे नियोजन आहे. नवीन प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर समुद्राच्या पाण्याची गुणवत्ता आणि सागरी जीवनामध्ये सुधारणा होईल, असेही बांगर यांनी नमूद केले.मलजल प्रक्रिया केंद्र उभारणी कामातील विविध आव्हानांविषयी बांगर म्हणाले की, भांडुप, घाटकोपर, वेसावे आणि मालाड येथील मलजल प्रक्रिया केंद्र अस्तित्त्वातील खारक्षेत्र मध्ये उभारले जात आहेत. कांदळवनामुळे मालाड मलजल प्रक्रिया केंद्र उभारणी कामाला परवानगी मिळण्याकामी विलंब झाला. मात्र, सद्यस्थितीत दररोज ३००० मनुष्यबळ प्रकल्पस्थळी कार्यरत आहे. अत्यंत गतीने काम करून केवळ एका वर्षात ४० टक्के भौतिक कामे पूर्ण झाली आहेत. तर, जागेची उपलब्धता कमी असल्याने वैशिष्ट्यपूर्ण रचनेच्या बहुमजली इमारतीत धारावी मलजल प्रक्रिया केंद्र उभारले जात आहे. या केंद्रातून बाहेर पडणारे फेरप्रक्रियायुक्त पाणी मिठी नदीत सोडले जाणार आहे. वांद्रे पश्चिम परिसरात सागरी सेतू नजीक वांद्रे मलजल प्रक्रिया केंद्राचे बांधकाम करण्यात येत आहे. प्रकल्पाची भौतिक प्रगती समाधानकारक आहे. या ठिकाणी छतावरील बाग आणि व्ह्युविंग टॉवर अशा वैशिष्ट्यपूर्ण वास्तूदेखील उभारण्याचे नियोजन असल्याचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी सांगितले.
गझलनवाझ भीमराव पांचाळे यांना 'मृदगंध जीवनगौरव पुरस्कार'प्रदान
मुंबई : मी मातीतला माणूस असून, लोककलेने माझे भरणपोषण केले. आज लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या नावाचा जीवनगौरव पुरस्कार स्विकारताना आनंद होत असल्याची भावना गझलनवाझ भीमराव पांचाळे यांनी व्यक्त केली. ‘निहाल हो गयी जिंदगी मेरी’... अशा शब्दांत भीमरावांनी आपली कृतज्ञता व्यक्त केली. १५ वा लोकशाहीर विठ्ठल उमप स्मृती संगीत समारोह व विठ्ठल उमप फाऊंडेशनचा ‘मृद्गंध पुरस्कार २०२५’ च्या दिमाखदार समारंभात ते बोलत होते. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड.आशिषजी शेलार यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.आपले अवघे आयुष्य लोककलेसाठी समर्पित करणाऱ्या संगीत नाटक अकादमी, राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त महाराष्ट्र शिरोमणी लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी विविध क्षेत्रातील मान्यवरांना ‘मृद्गंध पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येते. यावर्षीच्या मृदगंध पुरस्कार विजेत्यांमध्ये शाहीर राजेंद्र राऊत (लोककला क्षेत्र),प्रदीप शिंदे (शिल्पकला), अभिनेते जयवंत वाडकर (अभिनय क्षेत्र),परेश मोकाशी (दिग्दर्शक), मधुगंधा कुलकर्णी (अभिनेत्री आणि निर्माती), अभिनेत्री रिंकू राजगुरू (नवोन्मेष प्रतिभा-अभिनय क्षेत्र) यांना ‘मृद्गंध पुरस्कार २०२५’ देऊन सन्मानित करण्यात आले. लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या नावाचा हा पुरस्कार आमच्यासाठी लाखमोलाचा असल्याची भावना मान्यवर पुरस्कार विजेत्यांनी व्यक्त केली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड.आशिष शेलार, अर्थतज्ज्ञ-माजी खासदार भालचंद्र मुणगेकर, भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम, यांच्यासह संगीत-अभिनय क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती.‘रसिक मायपाब आणि कुटुंबाच्या साथीने मी माझ्या बाबांना आठवणीतून जिवंत ठेवू शकलो. बाबांच्या स्मरणार्थ दिल्या जाणाऱ्या या पुरस्काराच्या निमित्ताने आपले ऋणानुबंध आणि रसिकांचे प्रेम आमच्यावर असंच कायम राहू द्या’, असं सांगत लोकशाहीर विठ्ठल उमप यांचे चिरंजीव, प्रसिद्ध गायक व विठ्ठल उमप फाऊंडेशनचे अध्यक्ष नंदेश वत्सला विठ्ठल उमप यांनी उपस्थितांचे आभार मानले.लोकशाहीर विठ्ठल उमप यांचा पहाडी आवाज हा महाराष्ट्राच्या चळवळीचा आवाज होता. वंचितांच्या आवाजाचं प्रतिनिधित्व करत त्यांनी लोककलेच्या माध्यमातून जो संघर्ष उभा केला ते कौतुकास्पद आहे. आता नंदेश त्यांचं कार्य ज्या पद्धतीने पुढे नेतो आहे आणि उत्तम अशा हिऱ्यांना आपल्यासमोर घेऊन त्यांना पुरस्काररूपी कौतुकाचं बळ देतोय ते नक्कीच अभिनंदनीय आहे, असं सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी याप्रसंगी सांगितलं.‘आपल्या भौतिक गरजा भागल्या की आपलं आयुष्य समृद्ध होतं असं नाही, सामाजिक आरोग्यासाठी कला ही तितकीच महत्त्वाची असते आणि ती जपण्याचं काम ही कलावंत मंडळी सातत्याने करीत आहेत त्यासाठी त्यांचे मी आभार मानतो, अशा शब्दांत भालचंद्र मुणगेकर यांनी पुरस्कार विजेत्यांचे कौतुक केले. ‘महाराष्ट्राच्या लोककलेला जागतिक स्तरावर नेणारा लोकशाहीर, लोककलेच्या सर्व प्रकारांत मुक्त संचार करणारे, परंपरा आणि नवता यांचा सुरेख, सुरेल संगम घालणारे लोकशाहीर विठ्ठल उमप यांचे कलेसाठीचं योगदान अमूल्य असल्याची भावना आमदार अमित साटम यांनी यावेळी बोलून दाखविली.पद्मश्री उस्ताद शाहीद परवेझ खान यांचे सितार वादन तसेच लावणी कलावंत रेशमा मुसळे परितेकर (पुणे) यांची संगीतबारी असा सादरीकरणाचा रंजक आस्वाद रसिकांनी घेतला.
Narendra Modi : “युवाशक्ती उद्योजकतेसह नवी शिखरे गाठत आहेत”–पंतप्रधान मोदी
Narendra Modi – आज देश अंतराळ क्षेत्रात एक अभूतपूर्व संधी असल्याचे पाहत असून खाजगी क्षेत्राच्या प्रगतीमुळे भारताची अंतराळ परिसंस्था मोठी झेप आहे. स्कायरूटचे इन्फिनिटी कॅम्पस हे भारताची नवीन विचारसरणी, नवोन्मेष आणि युवाशक्तीचे प्रतिबिंब आहे. युवकांची जोखीम घेण्याची क्षमता आणि उद्योजकता नवीन उंची गाठत आहे. आगामी काळात जागतिक उपग्रह प्रक्षेपण परिसंस्थेत भारत आघाडीचा देश म्हणून कसा […] The post Narendra Modi : “युवाशक्ती उद्योजकतेसह नवी शिखरे गाठत आहेत” – पंतप्रधान मोदी appeared first on Dainik Prabhat .
आमदार संतोष बांगर यांच्या घरावर पोलिसांची धाड; कारण काय? जाणून घ्या…
हिंगोली: राज्यात मित्रपक्ष असलेल्या शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप यांच्यातील स्थानिक वाद आता विकोपाला गेला आहे. कळमनुरीचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्या घरी पहाटेच्या सुमारास तब्बल १०० पोलिसांनी धाड टाकून झाडाझडती घेतल्याची माहिती विधानपरिषदेचे आमदार हेमंत पाटील यांनी दिली आहे. हा सर्व प्रकार भाजपचे हिंगोलीचे आमदार तानाजी मुटकुळे यांच्या दबावाखाली झाला असल्याचा गंभीर आरोप हेमंत […] The post आमदार संतोष बांगर यांच्या घरावर पोलिसांची धाड; कारण काय? जाणून घ्या… appeared first on Dainik Prabhat .
Amelia Kerr sold to Mumbai Indians for 3 crore : महिला प्रीमियर लीग २०२६ साठी नवी दिल्ली येथे आयोजित केलेल्या मेगा ऑक्शनमध्ये अनेक स्टार खेळाडूंवर मोठी बोली लागली. या ऑक्शनमध्ये न्यूझीलंडची स्टार अष्टपैलू खेळाडू अमेलिया केर हिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मुंबई इंडियन्सने या खेळाडूला पुन्हा आपल्या संघात सामील करण्यासाठी जोरदार बोली लावली आणि अखेरीस […] The post WPL 2026 Auction : मुंबई इंडियन्सने ‘या’ खेळाडूसाठी लावली सर्वाधिक बोली! बेस प्राइसपेक्षा सहापट अधिक पैसा ओतला appeared first on Dainik Prabhat .
भारताच्या १६ वर्षीय तन्वी शर्माने माजी विश्वविजेत्या ओकुहाराला हरवले
लखनऊ : भारताच्या १६ वर्षीय तन्वी शर्माने माजी विश्वविजेत्या नोझोमी ओकुहाराला पराभूत करून सय्यद मोदी इंटरनॅशनलच्या क्वार्टरफायनलमध्ये प्रवेश केला. तन्वीने नोझोमी ओकुहारा विरोधातला सामना हा १३-२१, २१-१६, २१-१९ असा जिंकला. या वर्षाच्या सुरुवातीला यूएस ओपन सुपर ३०० च्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या सोळा वर्षीय तन्वीने ५९ मिनिटांच्या रोमांचक सामन्यात दुसऱ्या मानांकित ओकुहारावर १३-२१, २१-१६, २१-१९ असा विजय मिळवला.एकोणीस वर्षीय मनराजने २०२३ च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक विजेत्या प्रणॉयचा केवळ ४३ मिनिटांत २१-१५, २१-१८ असा पराभव पत्करून पुरुष एकेरीच्या ड्रॉमध्ये धक्कादायक कामगिरी केली.अव्वल मानांकित उन्नती हुडाने तस्निम मीरवर २१-१५, २१-१० असा विजय मिळवत अंतिम आठमध्ये स्थान निश्चित केले, तर मिथुन मंजुनाथने सहाव्या मानांकित थरुन मन्नेपल्लीचा दुसऱ्या फेरीच्या सामन्यात २१-१६, १७-२१, २१-१७ असा पराभव केला.उन्नतीचा सामना सातव्या मानांकित रक्षिता श्री संतोष रामराजशी होईल, ज्याने देविका सिहागचा १६-२१, २१-१९, २१-१७ असा पराभव केला, तर मिथुनचा सामना या वर्षाच्या सुरुवातीला युगांडा इंटरनॅशनल चॅलेंज आणि इराण फजर इंटरनॅशनल चॅलेंज जिंकणाऱ्या मनराजशी होईल. २०२१ च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक विजेता माजी जागतिक क्रमांक १ किदाम्बी श्रीकांतने सनीथ दयानंदचा २१-६, २१-१६ असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. प्रियांशू राजावतने बीएम राहुल भारद्वाजवर २१-१६, १०-२१, २१-१२ असा संघर्षपूर्ण विजय मिळवला.किरण जॉर्ज, आलाप मिश्रा आणि सिद्धार्थ गुप्ता हे आपापल्या दुसऱ्या फेरीतील सामन्यांमध्ये पराभव पत्करून स्पर्धेतून बाहेर पडले.महिला एकेरीत, इशाराणी बरुआने सहाव्या मानांकित पोलिना बुहरोवाला २१-१५, २१-८ असे पराभूत करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला, जिथे तिचा सामना तुर्कीच्या चौथ्या मानांकित नेस्लिहान अरिनशी होईल. तथापि, तान्या हेमंत आणि अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत पराभवामुळे बाहेर पडल्या.पुरुष दुहेरीत, पाचव्या मानांकित हरिहरन अम्साकारुनन आणि एमआर अर्जुन यांनी मलेशियाच्या लाऊ यी शेंग आणि लिम त्झे जियान यांच्यावर २१-१२, २१-१८ असा विजय मिळवत प्रगती केली.गतविजेत्या ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत झेनिथ अबीगेल आणि लिखिता श्रीवास्तव यांच्यावर २१-१७, २१-१२ असा विजय मिळवला.
आधार कार्ड असल्यास घुसखोरांना मतदार मानले पाहिजे का? सर्वोच्च न्यायालयाचा गंभीर प्रश्न
नवी दिल्ली: सरकारी योजनांसाठी आधार कार्ड महत्त्वाचे असले तरी ते नागरिकत्वाचा किंवा मतदानाच्या हक्काचा पक्का पुरावा होऊ शकत नाही, असे स्पष्ट मत सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले आहे. शेजारील देशांतून आलेल्या व्यक्तींना केवळ आधार कार्डाच्या जोरावर मतदार यादीत समाविष्ट केले जाऊ शकते का, असा थेट आणि गंभीर प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये सुरू असलेल्या […] The post आधार कार्ड असल्यास घुसखोरांना मतदार मानले पाहिजे का? सर्वोच्च न्यायालयाचा गंभीर प्रश्न appeared first on Dainik Prabhat .
Disha Salian : दिशा सालियनच्या मृत्यूची चौकशी पोलिस किती काळ करणार.! मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल
Disha Salian – सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यूची चौकशी शहर पोलिस किती काळ करणार, असा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाने केला आहे. ८ जून २०२० रोजी मालाड येथील एका निवासी इमारतीच्या १४ व्या मजल्यावरून पडून तिचा मृत्यू झाला. त्यानंतर शहर पोलिसांनी अपघाती मृत्यूचा खटला दाखल केला. न्यायमूर्ती ए एस गडकरी आणि आर आर भोसले यांच्या खंडपीठाने […] The post Disha Salian : दिशा सालियनच्या मृत्यूची चौकशी पोलिस किती काळ करणार.! मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल appeared first on Dainik Prabhat .
दिव्यांगांच्या अपमानास्पद टीकेसाठी कायदा करा.! सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला सूचना
नवी दिल्ली – दिव्यांगांच्या प्रतिष्ठेचे रक्षण करण्यासाठी कठोर कायद्याची आवश्यकता अधोरेखित करताना, सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी केंद्राला एससी-एसटी कायद्याच्या धर्तीवर अपंग आणि दुर्मिळ अनुवांशिक विकार असलेल्या व्यक्तींची खिल्ली उडवणाऱ्या अपमानास्पद टीकेला दंडनीय गुन्हा ठरवण्यासाठी कायदा तयार करण्याचा विचार करण्यास सांगितले. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९ अनुसूचित जमाती आणि अनुसूचित जमातींच्या सदस्यांविरुद्ध जातीवादी […] The post दिव्यांगांच्या अपमानास्पद टीकेसाठी कायदा करा.! सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला सूचना appeared first on Dainik Prabhat .
Deepti Sharma 2nd most expensive player in WPL history : महिला प्रीमियर लीग २०२६ (WPL 2026) साठी नुकत्याच झालेल्या मेगा ऑक्शनमध्ये स्टार अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्मावर मोठी बोली लागली. दिल्ली कॅपिटल्सने दीप्तीवर पैशांचा पाऊस करत आपल्या संघात सामील करण्याचा प्रयत्न केला, परंतु यूपी वॉरियर्सने (UPW) राईट टू मॅच (RTM) कार्डचा वापर करत बाजी मारली आणि […] The post WPL 2026 Auction : दीप्ती शर्मा ठरली WPL च्या इतिहासातील दुसरी सर्वात महागडी खेळाडू! यूपी वॉरियर्सने पाडला पैशांचा पाऊस appeared first on Dainik Prabhat .
डेफलिंपिक २०२५ मध्ये भारताने जिंकली २० पदके
डेफलिंपिक २०२५ मध्ये भारताने नऊ सुवर्ण पदकांवर कोरले नावटोकियो : जपानमधील टोकियो येथे १५ ते २६ नोव्हेंबर या कालावधीत झालेल्या उन्हाळी डेफलिंपिक २०२५ मध्ये भारताने वीस पदके जिंकली. यात नऊ सुवर्ण (गोल्ड), सात रौप्य (सिल्व्हर) आणि चार कांस्य (ब्राँझ) पदकांचा समावेश आहे. भारताने जिंकलेल्या वीस पदकांपैकी सोळा पदके नेमबाजांनीच जिंकली आहेत. डेफलिंपिकमधील ही भारताची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. याआधी २०२२ च्या डेफलिंपिकमध्ये भारताने आठ सुवर्ण, एक रौप्य आणि सात कांस्य अशी सोळा पदके जिंकली होती.यंदा २५ वे डेफलिंपिक झाले, पहिले डेफलिंपिक १९२४ मध्ये पॅरिस येथे झाले होते. या स्पर्धेला १०१ वर्षांची परंपरा आहे. यंदाच्या डेफलिंपिकमध्ये भारताने ११ स्पर्धेत भाग घेतला होता. यासाठी भारतातून ७३ खेळाडूंचा चमू टोकियो येथे आला होता. यात ४५ पुरुष आणि २८ महिला खेळाडू होते.टोकियो २०२५ मध्ये, ऑलिंपियन दीक्षा डागरने महिला गोल्फ स्पर्धेत तिचे डेफलिंपिक विजेतेपद राखले. नेमबाजीमध्ये १२ खेळाडूंसह सर्वात मोठा भारतीय संघ होता तर अॅथलेटिक्समध्ये भारताकडून ११ खेळाडू सहभागी झाले होते.धनुष श्रीकांतने १० मीटर एअर रायफल प्रकारात २५२.२ गुणांसह विश्वविक्रम केला. मोहम्मद वानियाने त्याच स्पर्धेत रौप्यपदक जिंकले. या स्पर्धेत नेमबाजांनी भारताला पहिले पदक जिंकून दिले. महिलांच्या १० मीटर एअर रायफल स्पर्धेत महित संधू आणि कोमल वाघमारे यांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदक जिंकले.रायफल एस महित संधू हा सर्वात यशस्वी नेमबाज होता ज्याने दोन सुवर्ण आणि दोन रौप्य पदकांसह चार पदके जिंकली. अनुया प्रसादने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत विश्वविक्रम केला. अभिनव देशवालने पुरुषांच्या २५ मीटर पिस्तूल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आणि पात्रता फेरीत जागतिक आणि डेफलिम्पिक विक्रमाशी बरोबरी केली. प्रांजली धुमाळने महिलांच्या २५ मीटर पिस्तूलमध्येही असेच केले. लोमा स्वेनने कराटेमध्ये भारतासाठी पहिल्यांदाच डेफलिंपिक पदक जिंकले.२०२५ च्या डेफलिंपिकमध्ये भारतीय पदक विजेतेखेळाडू - कार्यक्रम - खेळ - पदक दीक्षा डागर - महिला वैयक्तिक - गोल्फ - सुवर्ण धनुष श्रीकांत/महित संधू - मिश्र १० मीटर एअर रायफल संघ - शूटिंग - सुवर्ण धनुष श्रीकांत - पुरुषांची १० मीटर एअर रायफल - शूटिंग - सुवर्ण अनुया प्रसाद - महिलांची १० मीटर एअर पिस्तूल - शूटिंग - सुवर्ण अभिनव देशवाल/प्रांजली धुमाळ - मिश्र १० मीटर एअर पिस्तूल - शूटिंग - सुवर्ण महित संधू - महिला ५० मीटर रायफल ३ पोझिशन्स - शूटिंग - सुवर्ण अभिनव देशवाल - पुरुषांची २५ मीटर पिस्तूल - शूटिंग - सुवर्ण प्रांजली धुमाळ - महिलांची २५ मीटर पोस्टोल - शूटिंग - सुवर्ण सुमित दहिया - पुरुष ९७ किलो - कुस्ती - सुवर्ण मोहम्मद वानिया - पुरुषांची १० मीटर एअर रायफल - शूटिंग - रौप्य महित संधू - महिलांची १० मीटर एअर रायफल - शूटिंग - रौप्य अभिनव देशवाल - पुरुषांची १० मीटर एअर पिस्तूल - शूटिंग - रौप्य प्रांजली धुमाळ - महिलांची १० मीटर एअर पिस्तूल - शूटिंग - रौप्य महित संधू - महिलांची ५० मीटर रायफल प्रोन - शूटिंग - रौप्य शौर्य सैनी - पुरुषांची ५० मीटर रायफल प्रोन - शूटिंग - रौप्य अमित कृष्णन - पुरुष ८६ किलो - कुस्ती- रौप्य लोमा स्वेन - कुमिते ५० किलो - कराटे - कांस्य कोमल वाघमारे - महिलांची १० मीटर एअर रायफल - शूटिंग - कांस्य कुशाग्र सिंग राजावत - पुरुषांची ५० मीटर रायफल प्रोन - शूटिंग - कांस्य मोहम्मद वानिया/कोमल वाघमारे - मिश्र १० मीटर एअर रायफल संघ - शूटिंग - कांस्य
मुंबईकरांसाठी अच्छे दिन.! महाराष्ट्र –गुजरातला जोडणाऱ्या दोन मोठ्या प्रकल्पांना मंजुरी
Maharashtra -Gujarat – केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी महाराष्ट्र आणि गुजरातमधील चार जिल्ह्यांना जोडणाऱ्या दोन मल्टी-ट्रॅकिंग प्रकल्पांना मंजुरी दिली असल्याने आता यामुळे भारतीय रेल्वेचे विद्यमान नेटवर्क २२४ किलोमीटरने वाढणार आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे २,७८१ कोटी रुपये खर्च येईल. या प्रकल्पांमध्ये गुजरातमधील द्वारका-कनालस रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण आणि मुंबई महानगर प्रदेशातील बदलापूर आणि कर्जत दरम्यान तिसऱ्या आणि चौथ्या मार्गाचे […] The post मुंबईकरांसाठी अच्छे दिन.! महाराष्ट्र – गुजरातला जोडणाऱ्या दोन मोठ्या प्रकल्पांना मंजुरी appeared first on Dainik Prabhat .
Jemimah Rodrigues : मैत्रिणीसाठी कायपण…! जेमिमाने रॉड्रिग्जने स्मृती मानधनासाठी घेतला मोठा निर्णय
Jemimah Rodrigues skips WBBL for Smriti Mandhana : भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज आणि वर्ल्डकप विजेती खेळाडू जेमिमा रॉड्रिग्स हिने एक अत्यंत भावनिक आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तिने ऑस्ट्रेलियातील प्रतिष्ठेची महिला बिग बॅश लीग न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. जेमिमा हिला ब्रिसबेन हीट संघाने आपल्या टीममध्ये समाविष्ट केले होते, परंतु आता ती ऑस्ट्रेलियाला […] The post Jemimah Rodrigues : मैत्रिणीसाठी कायपण…! जेमिमाने रॉड्रिग्जने स्मृती मानधनासाठी घेतला मोठा निर्णय appeared first on Dainik Prabhat .
Aadhaar Card Status: केंद्र सरकारने आधार डेटाबेस स्वच्छ आणि सुरक्षित ठेवण्यासाठी २ कोटींहून अधिक आधार क्रमांक (Aadhaar Number) निष्क्रिय (Deactivate) केले आहेत. अशा परिस्थितीत, आपले आधार कार्ड चालू (Active) आहे की नाही, हे घरबसल्या अगदी सहज तपासता येते. आजकाल प्रत्येक सरकारी कामात आधार क्रमांक हा सर्वात महत्त्वाचा दस्तऐवज म्हणून वापरला जातो. अशा परिस्थितीत, आपले आधार […] The post Aadhaar Card Status: सरकारने 2 कोटी ‘आधार’ कार्ड का केले निष्क्रिय; तुमचं कार्ड ॲक्टिव्ह आहे का? एका मिनिटात असं तपासा appeared first on Dainik Prabhat .
Election News : बापरे..! मुंबईतील १०.६४ टक्के मतदारांची नावे डुप्लिकेट; धक्कादायक माहिती समोर…
Election News – राज्य निवडणूक आयोगाने शेअर केलेल्या आकडेवारीनुसार मुंबईतील १.०३ कोटी मतदारांपैकी जवळपास १०.६४ टक्के म्हणजेच ११ लाखांहून अधिक मतदारांची मतदार यादीत डुप्लिकेट नोंदणी झाली असल्याचे समोर आले आहे. आकडेवारीवरून, सर्वाधिक डुप्लिकेट मतदार असलेल्या बहुतेक वॉर्डांमध्ये पूर्वी विरोधी पक्षाच्या नगरसेवकांचे प्रतिनिधित्व होते. आयोगाने बुधवारी हरकती सादर करण्याची अंतिम मुदत २७ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर […] The post Election News : बापरे..! मुंबईतील १०.६४ टक्के मतदारांची नावे डुप्लिकेट; धक्कादायक माहिती समोर… appeared first on Dainik Prabhat .
Trump phone call leaked | Donald Trump | WhatsApp : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे परराष्ट्र धोरण सल्लागार युरी उशाकोव्ह यांच्यातील फोन संभाषण लीक झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठी खळबळ उडाली आहे. हा कॉल १४ ऑक्टोबर २०२५ रोजी व्हॉट्सअॅपवर झाला होता, आणि त्याची ऑडिओ रेकॉर्डिंग व […] The post लपवलेले संवाद झाले व्हायरल.! लीक फोन कॉलमुळे आंतरराष्ट्रीय राजकारणातील गुपिते उघड; ‘WhatsApp’ प्रायव्हसीवर प्रश्नचिन्ह appeared first on Dainik Prabhat .
Rishabh Pant Apologise to fans : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत ०-२ असा लाजिरवाणा पराभव पत्करावा लागल्यानंतर भारतीय संघात निराशेचे वातावरण पसरले आहे. गुवाहाटी येथे झालेल्या दुसऱ्या कसोटीत संघाचे नेतृत्व करणाऱ्या यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत याने खराब कामगिरीबद्दल थेट चाहत्यांची माफी मागितली आहे. पंतने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत, या पराभवाची जबाबदारी स्वीकारली असून, […] The post Rishabh Pant : ‘माफ करा, या वेळी आम्ही अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही’, लाजिरवाण्या पराभवानंतर पंतची भावुक पोस्ट appeared first on Dainik Prabhat .
काही दिवसांपूर्वी गायक अभिजीत सावंत (Abhijeet Sawant) आणि महाराष्ट्राची लोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटील (Gautami Patil) यांचा एक एआय (AI) व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. गौतमी आणि अभिजीतने स्वतःच्या अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केल्यामुळे नेटकऱ्यांमध्ये याबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. 'सबसे कातील गौतमी पाटील' आणि सदाबहार गाण्यांसाठी ओळखले जाणारे गायक अभिजीत सावंत यांचा हा रोमँटिक अंदाज पाहून चाहत्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या होत्या. मात्र, आता या व्हिडिओमागचे खरे कारण समोर आले आहे. हा एआय व्हिडिओ त्यांच्या आगामी प्रोजेक्टची केवळ एक झलक होती, हे स्पष्ट झाले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गायक अभिजीत सावंत लवकरच एका नव्या गाण्यातून रसिकांच्या भेटीला येणार आहेत. या गाण्याचा सर्वात मोठा ट्विस्ट (Twist) म्हणजे, या व्हिडिओमध्ये गौतमी पाटील देखील अभिजीतसोबत काम करताना दिसणार आहे. पहिल्यांदाच ही अनोखी जोडी एका म्युझिक व्हिडिओमध्ये एकत्र येत असल्याने चाहत्यांमध्ये या गाण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.https://prahaar.in/2025/11/27/finally-the-date-of-the-legislative-session-will-be-set-for-december-1st/गायक अभिजीत सावंत (Abhijeet Sawant) यांनी २०२५ या वर्षात 'चाल तुरु तुरू' आणि नुकतेच प्रदर्शित झालेले 'आय पॉपस्टार'मधील 'मोहब्बते लुटाऊंगा' चे नवंकोरं 'जेन-झी' (Gen-Z) व्हर्जन अशा अनेक ट्रेंडिंग गाण्यांनी प्रेक्षकांना मोहित केले आहे. आपल्या सुमधूर आवाजाने रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारा अभिजीत आता अजून एका नव्या गाण्यामधून भेटीला येत आहे. अभिजीतचे हे नवंकोरं गाणं 'रुपेरी वाळूत' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या गाण्यात महाराष्ट्राची लोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटील देखील अभिजीत सावंतसोबत वेगळ्या आणि आकर्षक अंदाजात काम करताना दिसणार आहे, ज्यामुळे चाहत्यांमध्ये उत्साह वाढला आहे. हे बहुप्रतिक्षित गाणं येत्या ५ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. 'रुपेरी वाळूत' हे गाणे जुन्या गाण्याचा नवा ट्विस्ट (Twist) असणार की अभिजीत आणि गौतमी काहीतरी नवीन घेऊन येणार, हे जाणून घेण्यासाठी आता चाहत्यांना थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. अभिजीतच्या आवाजाची जादू आणि गौतमीचा खास अंदाज यामुळे हे गाणं नक्कीच हीट होण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली: कापड उद्योगाला चालना देण्यासाठी व आधुनिकीकरणासाठी केंद्र सरकारने टीईएक्स रॅम्पएस (Textile Focused Research, Assessment, Monitoring, Planning, And Startup Tex- RAMPS) योजनेला मान्यता दिली आहे. ३०५ कोटींच्या या योजनेला काळाच्या ओघात कापड निर्मिती व उद्योगांचा विकास, क्षेत्रातील संशोधन, आकलन, अमंलबजावणी, तसेच या साधनांचा वापर करून स्टार्टअप उद्योगांची पायभरणी करण्यासाठी व एकूणच स्पर्धात्मक वातावरण निर्मितीसाठी मान्यता देण्यात आली आहे. एकूणच या निमित्ताने कापड उद्योगाला चालना मिळताना आर्थिक वर्ष २०२५-२६ या कालावधीत ३०५ कोटींच्या योजनेला केंद्र सरकारने मान्यता दिल्याने वित्त आरोग्याच्या छताखाली या योजनेला अंतर्भूत करण्यात आले आहे.त्यामुळे या योजनेची घोषणा करताना केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह म्हणाले आहेत की,ही योजना संशोधन, डेटा आणि नवोपक्रम एकत्र आणते ज्यामुळे भारताच्या वस्त्रोद्योग क्षेत्राला सक्षम बनवता येते आणि शाश्वतता, तंत्रज्ञान आणि स्पर्धात्मकतेमध्ये देशाला जागतिक आघाडीवर स्थान मिळते. भारताच्या वस्त्रोद्योग आणि वस्त्रोद्योग परिसंस्थेला (Ecosystem) भविष्यासाठी बळकटी देण्याच्या उद्देशाने, टेक्स-रॅम्प्सची रचना संशोधन, डेटा प्रणाली, नवोपक्रम समर्थन आणि क्षमता विकासातील गंभीर अंतर दूर करण्यासाठी केली आहे.'सरकारच्या मते या गोष्टी नव्या योजनेतून शक्य -टेक्स-रॅम्प्स योजनेतून पुढील गोष्टी अपेक्षित आहेत: जागतिक बाजारपेठेत भारताची स्पर्धात्मकता वाढवणे संशोधन आणि नवोन्मेष परिसंस्था (Innovation Ecosystem) मजबूत करणे डेटाचालित धोरणनिर्मिती रोजगाराच्या संधी निर्माण करणे राज्ये, उद्योग, शैक्षणिक संस्था आणि सरकारी संस्थांमध्ये सखोल सहकार्य वाढवणेटेक्स-रॅम्प्स योजना भारतासाठी एक लवचिक, भविष्यासाठी तयार आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक कापड परिसंस्था तयार करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे असे सरकारने आपल्या निवेदनात म्हटले आहे.Tex Ramps योजनेतील प्रमुख घटक कुठले असतील?१. संशोधन आणि नवोपक्रम- भारताची नवोपक्रम क्षमता वाढविण्यासाठी स्मार्ट टेक्सटाइल, शाश्वतता (Sustainbility) प्रक्रिया कार्यक्षमता आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानातील संशोधनाचा प्रचार२. डेटा, विश्लेषण आणि निदान- पुराव्यावर आधारित धोरण तयार करण्यास सुलभ करण्यासाठी रोजगार मूल्यांकन, पुरवठा साखळी (Supply Chain) मॅपिंग आणि डेमोग्राफिक अभ्यासासह मजबूत डेटा सिस्टमची निर्मिती३. एकात्मिक वस्त्रोद्योग सांख्यिकी प्रणाली (ITSS)- संरचित (Structural) सह धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी वास्तविक डेटा आणि विश्लेषण प्लॅटफॉर्म४. क्षमता विकास आणि ज्ञान परिसंस्था- राज्यस्तरीय नियोजन मजबूत करणे, सर्वोत्तम पद्धतींचा प्रसार, क्षमता बांधणी कार्यशाळा आणि क्षेत्रीय कार्यक्रमांचे आयोजन५. स्टार्टअप आणि नवोपक्रमाला प्रोत्साहन- उच्च-मूल्य (High Value) असलेल्या टेक्सटाइल स्टार्ट-अप्स आणि उद्योजकतेला चालना देण्यासाठी इनक्यूबेटर, हॅकेथॉन आणि शैक्षणिक-उद्योग सहकार्यांसाठी पाठिंबा इत्यादी गोष्टींचा समावेश असेल.भारत सरकार वस्त्रोद्योग क्षेत्रात वाढ, कौशल्य विकास आणि जागतिक स्पर्धात्मकतेला चालना देण्यासाठी अनेक प्रमुख योजना वेळोवेळी राबवत असते. गेल्या काही वर्षातील ही तिसरी प्रमुख योजना आहे यापूर्वी कापड उद्योगाला चालना देण्यासाठी पायाभूत सुविधा (Infrastructure) विकासासाठी पीएम मित्र पार्क, उत्पादन वाढविण्यासाठी उत्पादन लिंक्ड इन्सेंटिव्ह (Production Linked Incentive PLI) योजना आणि कौशल्य विकासासाठी समर्थ योजना (SAMARTH) यांचा समावेश आहे.
Mahavatar Narsimha Oscar : २०२६ च्या ऑस्करमध्ये सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड फीचर फिल्मसाठी पात्र असलेल्या चित्रपटांची यादी जाहीर झाली आहे आणि “महावतार नरसिंह” हा भारतीय चित्रपट पात्र ठरला आहे. अकादमीने स्वतः एक अधिकृत अपडेट शेअर केला आहे ज्यामध्ये “महावतार नरसिंह” या श्रेणीतील अनेक चित्रपटांशी स्पर्धा करेल याची पुष्टी केली आहे. भारतासाठी ही अभिमानास्पद गोष्ट आहे. तसेच चित्रपटाची […] The post Mahavatar Narsimha Oscar : अभिमानास्पद.! ‘महावतार नरसिंह’ सिनेमा ऑस्करच्या शर्यतीत; भक्त प्रल्हादाला प्रेक्षकांची साथ, इतका यशस्वी का झाला? appeared first on Dainik Prabhat .
मोहित सोमण:मजबूत फंडामेंटलमुळे आज शेअर बाजारात वाढ झाली आहे. अखेरच्या सत्रात इक्विटी बेंचमार्क निर्देशांकातील रॅली राखण्यास बाजारात यश आले असले तरी नफा बुकिंग, घरगुती गुंतवणूकदारांकडून सेल ऑफ या कारणामुळे सेन्सेक्स व निफ्टी उच्चांकावरून घसरल्याने बाजारात किरकोळ वाढीसह बंद झाला आहे. सेन्सेक्स ११०.८७ व निफ्टी १०.२५ अंकाने उसळल्याने सेन्सेक्स ८५७२०.३८ व निफ्टी २६२१५.५५ पातळीवर स्थिरावला आहे. जागतिक शेअर बाजारात टेक युएस शेअरसह फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपातीवरील आशावादामुळे बुलिश पँटर्न कायम राहिला होता. सेन्सेक्स बँक व निफ्टी बँक निर्देशांकातील अस्थिरतेमुळे चढउतार मोठ्या प्रमाणात झाली आहे परंतु अखेरीस सेन्सेक्स व निफ्टी बँक निर्देशांकात समाधानकारक वाढ कायम राहिल्याने सपोर्ट लेवल मिळू शकली आहे. मिड व स्मॉल कॅप शेअर्समध्ये तेजी घसरल्याने बाजारातील रॅलीची घौडदौड अखेरीस मर्यादित राहिली आहे. ब्लू चिप्स कंपनीच्या स्क्रिपमध्येही संमिश्र प्रतिसाद राहिला असून निफ्टी व्यापक निर्देशांकात अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ मिड कॅप ५० (०.१६%), मिड कॅप सिलेक्ट (०.४८%) निर्देशांकात झाली असून सर्वाधिक घसरण स्मॉलकॅप १०० (०.५३%), स्मॉलकॅप ५० (०.५७%) निर्देशांकात झाली आहे. निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात सर्वाधिक वाढ आज मिडिया (०.८४%), फायनांशियल सर्विसेस एक्स बँक (०.४६%),फायनांशियल सर्विसेस एक्स बँक (०.६५%) निर्देशांकात झाली आहे.आज अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ अशोक लेलँड (७.२५%), सारेगामा इंडिया (५.०९%), जीएमडीसी (४.७४%), तेजस नेटवर्क (४.६३%), जिलेट इंडिया (३.९७%), एम अँड एम फायनांशियल सर्विसेस (३.९४%), संवर्धना मदर्सन (३.८६%), सन टीव्ही नेटवर्क (३.४३%) समभागात झाली असून सर्वाधिक घसरण वर्लपूल इंडिया (११.४२%), नाटको फार्मा (४.८१%), बजाज होल्डिंग्स (४.१६%), रेडिको खैतान (४.०६%), मोतीलाल ओसवाल फायनान्स (३.४९%), पीजी इलेक्ट्रोप्लास्ट (३.१०%), जेपी पॉवर वेंचर (२.९७%), अनंत राज (२.९७%), आयशर मोटर्स (२.७७%), अदानी एंटरप्राईजेस (२.५९%) समभागात झाली आहे.आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना मोतीलाल ओसवाल फायनांशियल सर्विसेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी व कार्यकारी संचालक अजय मेनन म्हणाले आहेत की,' जवळजवळ १४ महिन्यांच्या एकत्रीकरणानंतर, निफ्टी ५० ने नवीन उच्चांक गाठले आहेत, ज्याला मोठ्या कॅपिटल कंपन्यांमधील व्यापक ताकद आणि बाजारातील भावना सुधारल्याने पाठिंबा मिळाला आहे. निफ्टी मिडकॅपने देखील विक्रमी पातळी गाठली आहे, ज्यामुळे निर्देशांकातील दिग्गजांपेक्षा जास्त सहभाग दिसून येतो. आरबीआय आणि यूएस फेडरल रिझर्व्ह या दोन्हीकडून व्याजदर कपातीच्या अपेक्षांमुळे ही तेजी आणखी वाढली आहे ही जी व्याजदर-संवेदनशील क्षेत्रांसाठी दृश्यमानता सुधारते आणि नवीन एफपीआय इनफ्लोला चालना देऊ शकते. यासोबतच, जीएसटी तर्कसंगतीकरण आणि ग्रामीण मागणी सुधारण्यामुळे - तिसऱ्या तिमाहीतून कमाई पुनर्प्राप्तीची सुरुवातीची चिन्हे कमाई चक्रात आत्मविश्वास वाढवत आहेत. निर्यात-संबंधित क्षेत्रांना चालना देणाऱ्या संभाव्य व्यापार कराराच्या सभोवतालच्या आशावादामुळे भावना आणखी मजबूत झाली आहे. एकत्रितपणे, हे घटक गुंतवणूकदारांना निवडक स्थितीच्या पलीकडे जाण्यास आणि अधिक व्यापक-आधारित बाजार अपसायकलसाठी पोर्टफोलिओ पुनर्स्थित करण्यास प्रवृत्त करत आहेत.'आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले आहेत की,'नफा बुकिंग सुरू होण्यापूर्वी निफ्टी आणि सेन्सेक्स दोन्ही निर्देशांकांनी विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर भारतीय बाजार स्थिर झाले. वर्षभरात, किरकोळ विक्रेते प्राथमिक गुंतवणूकदार म्हणून उदयास आले. तथापि, एकूण बाजार कामगिरी अपेक्षेपेक्षा कमी राहिली, ज्यामुळे वर्षअखेरीस धोका पत्करण्याची शक्यता निर्माण झाली. बाजारातील सहभागी आता उद्याच्या जीडीपी प्रिंटवर अमेरिका-भारत करार आणि आरबीआय धोरण बैठकीसारख्या महत्त्वाच्या घटनांकडे बारकाईने लक्ष ठेवून आहेत. हे घटक इक्विटीसाठी जवळच्या काळातील दिशा निश्चित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील.'बाजारातील आजच्या बँक निफ्टीतील हालचालींवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे तांत्रिक विश्लेषक वत्सल भुवा म्हणाले आहेत की,'बँक निफ्टी एका लहान कॅंडलस्टिकसह बंद झाला, जो ५९४३५ पातळीचा उच्चांक तोडल्यानंतर फॉलो-अप चाल म्हणून काम करत होता, हे दर्शविते की बुल्सने निर्देशांकावर मजबूत पकड कायम ठेवली आहे. ७२ पातळीवर किंचित जास्त खरेदी केलेल्या झोनमध्ये पुन्हा प्रवेश केल्याने आरएसआयने पाठिंबा दर्शविला आहे, जो सूचित करतो की खरेदी-विक्री धोरण व्यापाऱ्यांसाठी योग्य आहे. ५९३०० आणि ५९००० पातळीवर प्रमुख समर्थन पातळी (Support Level) दिसून येत आहेत, जी संचय क्षेत्र म्हणून काम करू शकते. वरच्या बाजूला (Up Side) तात्काळ प्रतिकार (Immdiate Resistance) ६०००० पातळीच्या चिन्हावर स्थित आहे, जर गती कायम राहिली तर त्याची चाचणी केली जाऊ शकते.'आजच्या बाजारातील निफ्टी पोझिशनवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे वरिष्ठ तांत्रिक विश्लेषक रूपक डे म्हणाले आहेत की,'सकारात्मक सुरुवातीनंतर निर्देशांक बाजूलाच राहिला, दिवसाचा शेवट जवळजवळ कोणताही बदलला नाही. गुरुवारी, निफ्टीने १४ महिन्यांनंतर नवीन सार्वकालिक उच्चांक नोंदवला, परंतु ब्रेकआउट म्यूट झाला आणि त्यानंतर निर्देशांक बाजूलाच सरकला. तथापि, अल्पकालीन कल सकारात्मक राहिला आहे, निर्देशांक सर्व प्रमुख मूव्हिंग सरासरींपेक्षा आरामात व्यवहार करत आहे. आरएसआय तेजीच्या क्रॉसओवरमध्ये आहे आणि उच्च-शीर्ष, उच्च तळाशी रचना अबाधित दिसते, जी चढत्या चार्ट पॅटर्नची पुष्टी करते. खालच्या टोकावर, समर्थन २६००० पातळीवर ठेवले आहे जोपर्यंत ही पातळी ओलांडली जात नाही तोपर्यंत निर्देशांक २६४४०/२६५८० पातळीच्या दिशेने जाऊ शकतो. बाय-ऑन-डिप्स दृष्टिकोन हा एक चांगला धोरण असेल, कारण अलिकडच्या तीक्ष्ण वरच्या हालचालीनंतर जवळच्या काळात काही एकत्रीकरण अपेक्षित आहे.'आजच्या बाजारातील रूपयांच्या हालचालींवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले आहेत की,'रुपया ०.०६ ने कमकुवत होऊन ८९.३१ पातळीवर व्यवहार करत होता, डॉलर निर्देशांक १०० डॉलरच्या खाली राहिल्याने तो बाजूलाच राहिला. गेल्या काही दिवसांपासून दुय्यम बाजार मजबूत राहिल्याने आणि सर्वकालीन उच्चांकी पातळीजवळ फिरत राहिल्याने, सकारात्मक परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (FII) आवक (Inflow) सुरू राहण्याची शक्यता आहे, ज्यामुळे रुपयाला काही प्रमाणात दिलासा मिळेल.रुपया ८८.७५-८९.५५ रुपयांच्या श्रेणीत राहण्याची अपेक्षा आहे.'
Sunil Gavaskar defends Gautam Gambhir : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाला ०-२ अशा मानहानिकारक पराभवाला सामोरे जावे लागले आहे. गुवाहाटी येथे फलंदाजीची वाताहत झाल्यानंतर तब्बल २५ वर्षांनी दक्षिण आफ्रिका संघाने भारताच्या भूमीवर कसोटी मालिका जिंकण्याचा इतिहास रचला. या दारुण पराभवानंतर भारतीय क्रिकेट जगतात हाहाकार माजला असून, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरला पदावरून हटवण्याची […] The post Gautam Gambhir : ‘यशाचं श्रेय दिलं होतं का?’, गंभीरवर टीका करणाऱ्यांना गावस्करांचा सवाल; म्हणाले, ‘मग पराभवानंतरच कोच…’ appeared first on Dainik Prabhat .
Share Market: शेअर बाजार सलग दुसऱ्या दिवशी तेजीत; सेन्सेक्समध्ये 111 अंकांची वाढ
Share Market: भारतीय शेअर बाजारात गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी तेजी कायम राहिली. प्रमुख बेंचमार्क निर्देशांक हिरव्या निशाणीवर बंद झाले. सकाळच्या सत्रात सेन्सेक्सने ८६,०५५ या आपल्या सर्वोच्च पातळीला (All-Time High) स्पर्श केला, मात्र दिवसअखेर या तेजीला ब्रेक लागला आणि बाजारात काही प्रमाणात करेक्शन (Correction) दिसून आले. बाजार बंद होताना सेन्सेक्स १११ अंकांच्या (०.१३%) वाढीसह ८५,७२० च्या […] The post Share Market: शेअर बाजार सलग दुसऱ्या दिवशी तेजीत; सेन्सेक्समध्ये 111 अंकांची वाढ appeared first on Dainik Prabhat .
मैत्रीच्या गणपतीच्या दानपेटीतील दीड लाखांची गोशाळेस भेट; सामाजिक बांधिलकी जपत अनोखा उपक्रम
बिबवेवाडी (पुणे) – गणेशोत्सव काळात ‘मैत्रीच्या गणपती’ला भाविकांकडून मिळालेल्या दानातील तब्बल दीड लाख रुपये भिवरी येथील ‘गुरुमाँ डॉ. मंजूश्री गोशाळे’ला अर्पण करण्यात आले. प्रमुख उद्योगपती मनोज छाजेड यांच्या वाढदिवसानिमित्त दानपेटीतील सर्व रक्कम समाजोपयोगी कार्यासाठी देण्याचा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. या कार्याचे समाजात सर्वत्र कौतुक होत आहे. या प्रसंगी मैत्रीच्या गणपतीचे प्रमुख मनोज छाजेड, गोशाळेचे अध्यक्ष […] The post मैत्रीच्या गणपतीच्या दानपेटीतील दीड लाखांची गोशाळेस भेट; सामाजिक बांधिलकी जपत अनोखा उपक्रम appeared first on Dainik Prabhat .
नवी दिल्ली : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यातील संघर्ष आता राज्यातील मठांपर्यंत पोहोचला आहे. मुख्यमंत्रिपदासाठी सुरू झालेला हा संघर्ष हळू हळू तीव्र होऊ लागला आहे. या संघर्षामुळे काँग्रेसचे कर्नाटकमधील राजकीय समीकरण बिघडण्याची शक्यता वाढली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हे दोघेही स्वतःचा गट मबजूत करण्यासाठी तसेच प्रतिस्पर्धी गटाला कमकुवत करण्यासाठी शह काटशहचे राजकारण करू लागले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रतिस्पर्धी आमदारांना स्वतःच्या गटात ओढण्यासाठी ५० कोटी रुपये, फ्लॅट, लक्झरी कार अशा स्वरुपाची आमिषं दिली जात आहेत.मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यातील संघर्षात आता वोक्कालिगा समाजाचा आदिचुंचनगिरी मठ ओढला गेला आहे. आदिचुंचनगिरी मठाचे प्रमुख निर्मलानंद नाथ स्वामी यांनी जाहीररित्या डी. के. शिवकुमार यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यांनी काँग्रेसला निर्वाणीचा इशाराही दिला आहे. तर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या समर्थकांनी दलित आणि ओबीसी नेत्यांना आपल्या बाजूला ओढण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सत्ता स्थापनेवेळी सिद्धरामय्या अडीच वर्ष मुख्यमंत्री राहतील नंतर हे पद डी. के. शिवकुमार यांना दिले जाईल, असा तोंडी करार झाला होता. पण अडीच वर्ष उलटली तरी सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्री पद सोडलेले नाही. यामुळेच मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यात संघर्ष सुरू झाला आहे.कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे ओबीसी गटातील कुरुबा समाजाचे प्रतिनिधित्व करतात तर उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हे वोक्कालिगा समाजाचे प्रतिनिधित्व करतात. राजकीय संघर्ष वाढला तर कर्नाटकमध्ये काँग्रेसच्या मतपेढीवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे काँग्रेसच्या नेत्यांवर कर्नाटकचा राजकीय पेच सोडवण्यासाठीचा दबाव वाढत चालला आहे.
Maharashtra Winter Session 2025 : अखेर विधीमंडळ अधिवेशनाची तारीख १ डिसेंबरला ठरणार!
मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (Local Body Elections) निवडणुकांमुळे रखडलेल्या महाराष्ट्र विधीमंडळ अधिवेशनाच्या (Maharashtra Legislature Session) तारखेचा मुहूर्त अखेर ठरला आहे. विधीमंडळ कामकाजाबाबत निर्णय घेण्यासाठी विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीची (BAC) बैठक १ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे.या बैठकीत अधिवेशनाची नेमकी तारीख आणि कालावधी निश्चित केला जाणार आहे. दुपारी २.३० वाजता ही महत्त्वपूर्ण बैठक विधीमंडळात होणार आहे. त्यामुळे, अधिवेशनाच्या कामकाजाबाबतची अनिश्चितता आता संपुष्टात येणार आहे.
Aadhaar Card Update: आजच्या काळात सर्वात महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक असलेल्या आधार कार्डमध्ये (Aadhaar Card) बदल किंवा अपडेट (Update) करण्यासाठी युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने नवीन नियमावली जाहीर केली आहे. नाव, पत्ता किंवा जन्म तारीख बदलण्यासाठी आता कोणते कागदपत्र (Documents) आवश्यक असतील, याबाबत UIDAI ने स्पष्ट माहिती दिली आहे. या नवीन यादीमुळे नागरिकांसाठी आधार […] The post Aadhaar Card Update: आधार कार्ड अपडेटचे नियम बदलले; नाव, पत्ता, जन्म तारखेसाठी आता ‘हे’ कागदपत्रे आवश्यक appeared first on Dainik Prabhat .
‘बाहों में चली आओ…’; गाण्यावर भाग्यश्रीचा मनमोहक डान्स पाहून चाहते घायाळ, व्हिडीओ व्हायरल
Bhagyashree : सिनेसृष्टीतील कलाकार त्यांच्या सोशल मीडियावर सतत सक्रिय असतात. कलाकारांचे इंन्स्टाग्रामवर मोठ्या प्रमाणात रील व्हायरल होत असतात. बॅालीवूड इंडस्ट्रीत मैने प्यार किया या चित्रपटातून घराघरात पोहचलेली अभिनेत्री भाग्यश्री सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून, या व्हिडीओवर चाहत्यांनी भरभरून लाईक्स आणि कमेंट्स केल्या आहेत. अभिनेत्री भाग्यश्रीने तिच्या […] The post ‘बाहों में चली आओ…’; गाण्यावर भाग्यश्रीचा मनमोहक डान्स पाहून चाहते घायाळ, व्हिडीओ व्हायरल appeared first on Dainik Prabhat .
प्राइम व्हिडिओची नवी मालिका ‘दलदल’ IFFI 2025 मध्ये सादर—महिला-केंद्रित क्राईम थ्रिलरची प्रभावी झलक
मुंबई : भारताच्या सर्वाधिक लोकप्रिय मनोरंजन प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडिओने आज ५६ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFI) त्यांच्या मालिकेची ‘दलदल’ची एक्सक्लूसिव्ह फर्स्ट लुक सादर केली. या काल्पनिक मालिकेने आपल्या रोमांचकारी सादरीकरणाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले, ज्यात मुंबईच्या नव्या डीसीपी रीटा फेरेरा एका निर्दयी खुनीचा माग काढताना शहराच्या नैतिक धूसर प्रदेशात अडकत जाते आणि स्वतःच्या भूतकाळातील सावल्यांना सामोरी जाते. विश धमिजा यांच्या बेस्टसेलिंग कादंबरी भेंडी बाजारवर आधारित ‘दलदल’ हे अबंडेंटिया एंटरटेनमेंटचे निर्मितीकार्य असून, सुरेश त्रिवेणी यांनी या मालिकेची निर्मिती केली आहे आणि निर्माते म्हणून विक्रम मल्होत्रा व त्रिवेणी कार्यरत आहेत. दिग्दर्शन अमृत राज गुप्ता यांचे असून, लेखन त्रिवेणी, श्रीकांत अग्नीस्वरण, रोहन डी’सूझा आणि प्रिया सागी यांनी केले आहे. ही सायकोलॉजिकल क्राईम थ्रिलर भूमी सतीश पेडणेकर, आदित्य रावल आणि सामरा तिजोरी यांच्या प्रमुख भूमिकांनी सजलेली असून लवकरच भारतासह जगभरातील २४०+ देश आणि प्रदेशांमध्ये प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे.इन-रूम एक्सक्लूसिव्ह टीझर प्रीव्ह्यूनंतर “बियॉन्ड द स्टीरियोटाइप: रिडिफायनिंग विमेन अँड पॉवर इन मॉडर्न स्टोरीटेलिंग” या शीर्षकाखाली ज्ञानवर्धक फायरसाईड चर्चा झाली. या सत्रात मालिकेची मुख्य अभिनेत्री भूमी सतीश पेडणेकर व प्राइम व्हिडिओ इंडिया येथील डायरेक्टर आणि हेड ऑफ ओरिजिनल्स निखिल माधोक सहभागी झाले होते, तसेच ‘दलदल’चे अन्य सर्जनशील सहकारीही उपस्थित होते. त्यांनी मालिकेच्या मनोवैज्ञानिक गाभ्यावर आणि महिला पात्रांच्या चित्रणात रूढ चौकटी मोडण्याच्या प्रयत्नांवर चर्चा केली. चर्चेत स्पष्ट केले गेले की ‘दलदल’ जाणीवपूर्वक महिला पोलिस अधिकाऱ्यांच्या रूढ चित्रणापासून दूर जाते आणि त्याऐवजी एक बहुआयामी स्त्रीचे वास्तववादी चित्रण करते—जी एकाच वेळी मजबूतही आहे, द्वंद्वपूर्णही, संवेदनशीलही आणि जटिल उद्दिष्टांनी प्रेरितही.प्राइम व्हिडिओ इंडिया चे डायरेक्टर आणि हेड ऑफ ओरिजिनल्स निखिल माधोक यांनी महिलाकेंद्रित कथनाच्या ब्रँडच्या दृष्टिकोनावर बोलताना म्हटले, “प्राइम व्हिडिओमध्ये आमचा महिला-प्रधान स्टोरीटेलिंगचा दृष्टिकोन पूर्णपणे विचारपूर्वक आहे. दशकेभर मुख्य प्रवाहातील चित्रपट 90% पुरुष नायक आणि पुरुष दृष्टिकोनाभोवतीच फिरत राहिले, तर दूरदर्शनने (महिला प्रेक्षकांवर लक्ष केंद्रित असूनही) महिलांच्या कहाण्या घराच्या चौकटीपुरत्या मर्यादित ठेवल्या. स्ट्रीमिंगने आम्हाला हे पॅटर्न मोडण्याची संधी दिली—जिथे आम्ही अशा महिलांना समोर आणतो ज्यांच्याकडे एजन्सी आहे, खोली आहे, अपूर्णता आहे आणि ज्यांची व्यक्तिरेखा खऱ्या आयुष्यासारखी विकसित होते. तुम्ही हे आमच्या संपूर्ण स्लेटमध्ये पाहू शकता: ‘दलदल’, ‘दहाड’, ‘कॉल मी बे’, ‘मेड इन हेवेन’, ‘फोर मोर शॉट्स प्लीज’, ‘सुजल’ आणि इतर अनेक भाषांमधील कथांमध्ये—जिथे महिला प्रतीक नसून पूर्ण विकसित, जटिल पात्रे आहेत.” त्यांनी पुढे सांगितले, “हे फक्त महिलांच्या कहाण्या सांगण्याबाबत नाही; तर महिलांचा सहभाग संकल्पनेपासून लेखन, निर्मिती आणि अंमलबजावणीपर्यंत सर्व स्तरांवर सुनिश्चित करण्याबाबत आहे. हा एक सातत्यपूर्ण आणि सजग प्रयत्न आहे, आणि प्रतिसाद अत्यंत सकारात्मक आहे. प्रेक्षकांनी महिला-केंद्रित कथांना नाकारले नाही; त्यांनी त्या स्वीकारल्या आहेत.”मालिकेत डीसीपी रीटा फेरेराची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री भूमी सतीश पेडणेकर म्हणाल्या, “मी माझ्या घरातील महिलांकडून शिकलो की ताकद नेहमी आवाजात नसते—ती शांत, ठाम आणि जगावर सतत प्रश्न उपस्थित करणारीही असू शकते. हे मी माझ्या आईत पाहिले आणि रीटातही. रीटा जास्त बोलत नाही, पण खूप काही करते. कृती शब्दांपेक्षा मोठी असते, आणि ते रीटा फेरेरापेक्षा कोणी चांगले दाखवू शकत नाही. पहिल्यांदा मला संवाद वा डोळ्यांच्या भावांवर अवलंबून रहायचे नव्हते. मला सर्वात लहान शारीरिक संकेतांतून संवाद साधायचा होता—जसे अपराधगंडाने तिची मान ताणली जाणे किंवा राग आल्यावर शरीराची प्रतिक्रिया. ही माझ्या करिअरमधील सर्वांत कठीण भूमिकांपैकी एक होती, आणि त्यातून बाहेर येण्यासाठी मला महिनो लागले. पण ती अत्यंत समाधानकारक होती, कारण मला अशा टीमबरोबर काम करायला मिळाले ज्यांना जटिलता, अंधार आणि महिलांसाठी अँटी-हीरो गुण लिहिण्याचा विश्वास आहे. आमच्यासाठी असे पात्र फार कमी लिहिले जातात.”अबंडेंटिया एंटरटेनमेंटचे संस्थापक आणि सीईओ व ‘दलदल’चे निर्माता विक्रम मल्होत्रा यांनी ‘शकुंतला देवी’, ‘जलसा’, ‘शेरनी’, ‘हश हश’ आणि आता ‘दलदल’सारख्या प्रकल्पांद्वारे मजबूत महिला पात्रांना पाठिंबा देण्याबाबत सांगितले, “अबंडेंटियामध्ये नेहमी कथा प्रथम असते आणि त्यानंतर कथेचे दृष्टीकोन. माझा विश्वास असा आहे की जसजसे आपण कहाण्यांना महिला-प्रधान किंवा पुरुष-प्रधान अशा विभागांत विभागता, तसतशी त्यांची सार्वत्रिकता कमी होते. कहाण्यांनी सार्वत्रिक पातळीवर जोडले गेले पाहिजे; त्यानंतरच त्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचतात. मजबूत महिला पात्रे घडवताना संतुलन अत्यंत महत्त्वाचे असते. कोणीही पूर्णपणे चांगले किंवा पूर्णपणे वाईट नसते. भारतीय सिनेमातील महिलांच्या ऐतिहासिक चित्रणाबद्दल माझी समस्या हीच आहे की ते नेहमी एका बाजूला झुकते. अबंडेंटियामध्ये आम्ही मानवी सत्य, जटिलता, सूक्ष्मता आणि भावनिक प्रामाणिकता स्वीकारतो.”निर्माता आणि क्रिएटर सुरेश त्रिवेणी म्हणाले, “जेव्हा हा शो प्रथम माझ्याकडे आला, तेव्हा माझ्याही मनात तीच शंका होती जी बऱ्याच लोकांच्या मनात असते: आणखी एक क्राईम कथा—तेच जुने पॅटर्न्स. या शैलीत ठराविक टेम्पलेट असतात आणि आपण त्यात अडकू असे वाटते. पण ‘दलदल’साठी आमची मुळीच ती दिशा नव्हती. ही फक्त चांगले विरुद्ध वाईट किंवा ‘खुनी कोण?’ याबद्दलची कथा नाही. आम्हाला यापुढे जायचे होते. आम्हाला जाणून घ्यायचे होते की सगळे सुरू कुठून होते. सत्य हे आहे की आपण सर्वांमध्ये चांगले आणि वाईट दोन्ही आहेत; आपण सर्वांमध्ये कुठेतरी राग आहे. ही मालिका याच क्षेत्राचा शोध घेते. ‘व्होडनिट’च्या चौकटीत अडकायचे नव्हते; आम्हाला हा प्रश्न विचारायचा होता, लोक ते करतातच का?”दिग्दर्शक अमृत राज गुप्ता म्हणाले, “पहिली स्क्रिप्ट वाचताना मलाही कळत नव्हते की रीटा तशी का आहे, तिचे आघात, तिचा भूतकाळ आणि त्याने तिचा वर्तमान कसा घडवला. हे समजून घेतल्यावर प्रक्रिया सोपी झाली. आणि जेव्हा तुमच्याजवळ भूमीसारखी सहयोगी, सहज आणि उदार अभिनेत्री असते, तेव्हा काम आनंद देणारे होते. निर्माते आणि क्रिएटर यांच्या सहकार्याने सर्व गोष्टी हळूहळू योग्य ठिकाणी बसत गेल्या. आम्ही सतत स्वतःला आठवण करून देत होतो की पात्रे इतकी जटिल असल्यामुळे ‘कमी म्हणजे जास्त’. आम्हाला कोणतीही भावना अतिशय दाखवायची नव्हती. आम्हाला त्यांना मनुष्य म्हणून पाहायचे होते—संवेदनशील, त्रुटीपूर्ण, स्तरित. आम्हाला कोणाची बाजू घ्यायची नव्हती. आम्हाला पाहायचे होते आणि प्रेक्षकांना त्यांचा दृष्टिकोन ठरवू द्यायचा होता.”विक्रम मल्होत्रा आणि सुरेश त्रिवेणी निर्मित आणि त्रिवेणी यांनी मालिकेच्या रूपात क्रिएट केलेली ‘दलदल’—अबंडेंटिया एंटरटेनमेंटची निर्मिती—विश धमिजा यांच्या भेंडी बाजार या बेस्टसेलिंग कादंबरीवर आधारित आहे. दिग्दर्शन अमृत राज गुप्ता यांचे असून, भूमी सतीश पेडणेकर, आदित्य रावल आणि सामरा तिजोरी प्रमुख भूमिकेत आहेत. ‘दलदल’ लवकरच प्राइम व्हिडिओवर भारतासह २४०+ देश आणि प्रदेशांमध्ये एक्सक्लूसिव्हरीत्या प्रदर्शित होणार आहे.
How To Clean Gold: सोन्याचे दागिने महागडे असतात आणि त्यांची काळजीपूर्वक स्वच्छता करणे अत्यंत आवश्यक असते. कानातले, अंगठ्या किंवा मंगळसूत्रावर मळ, तेल किंवा धूळ साचू लागली की दागिन्यांची चमक कमी होते. अशावेळी घरच्या घरीच ते नीट आणि सुरक्षित पद्धतीने साफ करता येतात. पाहूया काही सोपे उपाय. १. टूथपेस्टने स्वच्छता अत्यंत मऊ आणि बिनदाणेदार टूथपेस्ट वापरा. […] The post How To Clean Gold: घरच्या घरी सोन्याच्या दागिन्यांची स्वच्छता कशी करावी? जाणून घ्या सोपे आणि सुरक्षित उपाय appeared first on Dainik Prabhat .
सिनेसृष्टीवर तब्बल सहा दशकांहून अधिक काळ आपल्या अभिनयाने राज्य करणारे सुपरस्टार धर्मेंद्र (Dharmendra) यांनी वयाच्या ८९ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. धरमजींच्या निधनामुळे अवघी बॉलिवूड इंडस्ट्री शोकसागरात बुडाली आहे. देओल कुटुंबासोबतच, जगभरातील त्यांच्या चाहत्यांवरही दुःखाचा डोंगर कोसळला आहे. धर्मेंद्र यांच्या निधनानंतर त्यांची दुसरी पत्नी आणि बॉलिवूडची 'ड्रीम गर्ल' (Dream Girl) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हेमा मालिनी (Hema Malini) यांनी आपल्या दुःखाला वाट मोकळी करून दिली आहे. पतीच्या आठवणींनी त्या व्याकूळ झाल्या असून, त्यांनी सोशल मीडियावर एक अत्यंत भावनिक पोस्ट लिहिली आहे. हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्यासोबतचे अनेक अविस्मरणीय फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमधून त्यांनी धर्मेंद्र यांच्यासोबत घालवलेल्या सुंदर क्षणांना उजाळा दिला आहे. त्यांच्या या इमोशनल पोस्टवर चाहत्यांकडून मोठी सहानुभूती व्यक्त होत असून, धरमजींना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.https://prahaar.in/2025/11/27/shocking-incident-in-hinjewadi-anganwadi-worker-and-helpers-locked-20-children-in-anganwadi-reached-meeting-but-kids-started-crying/हेमा मालिनींची हृदय हेलावून टाकणारी 'फर्स्ट रिॲक्शन
१० वर्षांनंतरही ‘तारा’ जिवंत: तमाशामधील दीपिकाचा अभिनय नव्या पिढीचा आवाज बनला
मुंबई : दीपिका पादुकोणच्या तमाशा या चित्रपटाला १० वर्षे पूर्ण झाली आहेत. इम्तियाज अली यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात दीपिकाने एक वेगळी, पण सहज समजून घेता येणारी भूमिका साकारली होती. ही अशी भूमिका आहे जी प्रत्येक मुलीच्या मनाला स्पर्श करते, कारण अनेकांना ताऱ्यामध्ये स्वतःचं प्रतिबिंब दिसतं. रोमँटिक आणि भावनिक कथानकात तिच्या व्यक्तिरेखेला एक खास खोलपणा आहे. प्रेम, स्वातंत्र्य आणि संवेदनशीलतेचं सुंदर मिश्रण असलेल्या ताऱ्याला दीपिकाने अतिशय जिवंतपणे उभं केलं आहे. या सर्व गुणांचा एकत्रित प्रभाव तिला अशी व्यक्ती बनवतो जी आपल्यालाही ओळखीची वाटते कदाचित आपण स्वतःच.ताऱ्याचा निडर स्वभाव, तिची रोमांचप्रियता, तिची रंगीबेरंगी आणि स्पष्ट विचारसरणी, तिचं मोठं मन आणि निर्भयपणे सत्य सांगण्याची तिची सवय, या सगळ्यांना दीपिकाने ज्या साधेपणाने आणि बारकाईने साकारलं आहे, त्यामुळेच ती या चित्रपटाची खरी जान बनते. *तमाशा* आजही दीपिकाच्या सर्वात आवडत्या आणि चर्चित चित्रपटांपैकी एक मानला जातो. तिच्या अभिनयातून दिसून येतं की ती अगदी छोट्या-छोट्या भावनाही किती सहज आणि वास्तववादी पद्धतीने जिवंत करते.रणबीर कपूरने साकारलेल्या वेदसोबत तिची केमिस्ट्री अत्यंत सुंदर दिसते आणि कथेला आणखी रंजक बनवते. आपल्या करिअरमध्ये दीपिकाने अनेक संस्मरणीय भूमिका साकारल्या आहेत, पण त्यामध्ये तारा ही एक वेगळीच आणि उठून दिसणारी व्यक्तिरेखा आहे. *तमाशा*मध्ये ती अनेक भावना व्यक्त करते आणि त्या देखील अत्यंत शांत, संतुलित आणि साधेपणाने. यामुळेच हा पात्र लोकांच्या मनात आजही खोलवर रुजलेला आहे.इम्तियाज अलींच्या चित्रपटांमध्ये पात्रं कॅमेऱ्यासमोर जगतात आणि श्वास घेतात, आणि दीपिका आपल्या अभिनयातून हे पुरेपूर सिद्ध करते. तारा ही अशी व्यक्तीरेखा आहे जी आजही लोकांना आपलीसारखी वाटते, चित्रपटाला अनेक वर्षे उलटून गेल्यानंतरही. ताऱ्याच्या रूपातील दीपिकाचा अभिनय हा अजूनही तिच्या करिअरमधील सर्वात सुंदर आणि मनाला भिडणाऱ्या परफॉर्मन्सपैकी एक मानला जातो.
नाशिकमध्ये सासरच्या छळाला कंटाळून नवविवाहितेची आत्महत्या; आत्महत्येपूर्वी लिहिली सात पानी चिठ्ठी
नाशिक : नाशिक शहरात एका नवविवाहितेने घरगुती छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. पंचवटी परिसरातील हिरावाडीत राहणाऱ्या नेहा संतोष पवार हिने विषारी औषध सेवन करून आयुष्य संपवले. मृत्यूपूर्वी तिने सात पानी चिठ्ठी लिहित पती आणि सासरकडून होत असलेल्या मानसिक, शारीरिक आणि आर्थिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, नेहाचे लग्न ४ जून २०२५ रोजी संतोष पवार याच्यासोबत झाले होते. लग्नाला काहीच महिने झाले असतानाच तिच्या जीवनात अत्याचारांची मालिका सुरू झाल्याचे तिने आपल्या चिठ्ठीत स्पष्ट केले आहे. सतत पैशांची मागणी, माहेरहून पैसे आणण्यासाठी दबाव, चारित्र्यावर संशय, आजारी असतानाही काम करायला भाग पाडणे, शिवीगाळ, तसेच नणदी व सासूकडून होणारा अपमान, अशा सर्व प्रकारच्या छळाचा उल्लेख तिने केलेला आहे.नेहाने चिठ्ठी सासरच्या लोकांकडून लपवली जाईल या भीतीने तिचे फोटो काढून भावाला व्हॉट्सअॅपवर पाठवले होते. सात पानी चिठ्ठीत तिने पतीच्या वागणुकीबाबत अनेक धक्कादायक दावे केले आहेत. पतीने तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला अपमानित करणे, कौमार्य तपासण्याचा प्रयत्न करणे, तसेच पूर्वीच्या प्रेमसंबंधातील अश्लील फोटो दाखवणे, हे सर्व प्रकार तिने चिठ्ठीत नोंदवले आहेत.चिठ्ठीमध्ये नेहाने पतीच्या अनैतिक संबंधांचा देखील उल्लेख केला आहे. तिने सांगितले की नवऱ्याने त्याच्या गर्लफ्रेंडसोबतचे अश्लील फोटो दाखवले होते. सासरकडून “माहेरून पैसे आण” असा सतत दबाव असल्याचेही नेहाने म्हटले आहे. तिच्या म्हणण्यानुसार, माहेरहून २० हजार रुपये आणि भावाची गाडी आणून दिल्यानंतरही मागण्या थांबल्या नाहीत. नवरा सारखा 'तुझा कोणी ठेवलेला यार असेल' म्हणून सारखी माहेरी जाते असे टोमणे मारायचा.चिठ्ठीत नेहाने सासू व नणदींकडून होणाऱ्या वागणुकीचाही उल्लेख केला आहे. पाळी आली आहे असे सांगितल्यावर सासूने संशय घेतला आणि नणंदेला तिला पाळी आली आहे की नाही हे चेक करायला सांगितलं होतं. नणंदा टोमणे मारायच्या आणि नवऱ्याला व सासूला खोटे सांगायच्या, असं गंभीर आरोप नेहाने आपल्या सुसाईड नोटमध्ये केले आहेत.नेहाने आपल्या चिठ्ठीच्या शेवटी लिहिलं होतं की, तुम्ही मला खूप प्रेमाने वाढवलं पण माझं नशीब खराब होते, म्हणून नवरा आणि सासर चांगले भेटले नाही. रोज थोडं थोडं मरण्यापेक्षा मी विष पिऊन स्वत:ला संपवते आहे.नेहाची चिठ्ठी तपासात महत्त्वाचा पुरावा ठरली आहे. प्राथमिक तपासात पोलिसांनी पती, त्याच्या तीन बहिणी आणि सासूला अटक केली आहे. पंचवटी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.अलीकडेच वैष्णवी हागवणे आणि डॉ. गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणानंतर नाशिकमध्ये पुन्हा एकदा अशीच घटना घडल्याने महिलांच्या सुरक्षिततेविषयी प्रश्न उपस्थित झाले आहेत.
मोहित सोमण: सकाळच्या सत्रात मोठ्या प्रमाणात एक यील्ड पातळी गाठल्यानंतर गुंतवणूकदारांनी सावधगिरीची भावना न बाळगता मोठ्या प्रमाणात सेल ऑफ करून आपला मोठ्या प्रमाणात नफा बुकिंग सुरू केल्याने शेअर बाजारातील एकाच सत्रात सेन्सेक्स ५०० अंकाहून अधिक पातळीवर कोसळला असून निफ्टीही ८० अंकांनी कोसळला आहे. त्यामुळे सेन्सेक्स ८५७६५ या उच्चांकी पातळीवरून ८५४९१.२३ पातळीवर व निफ्टी २६२८५.९५ पातळीवरून २६२०० पातळीवर कोसळला आहे. बाजार तज्ञांच्या मते गुंतवणूकदारांनी सावधगिरीची न बाळगता केवळ छोट्या नफा कमाईवर अवलंबून न राहता नियोजनबद्ध पद्धतीने व वित्तीय शिस्तीने कार्यवाही केल्याने शेअर बाजारातील घसरण झाली आहे. अर्थात शेअर बाजारात सकाळच्या सत्रात चांगल्या पद्धतीने वाढ झाल्याने गुंतवणूकदारांच्या अपेक्षा बळावल्या होत्या मात्र अखेरच्या सत्रात बँक निर्देशांक, तेल व गॅस, रिअल्टी शेअर्समध्ये घसरण झाल्याने व मेटल शेअर्समधील रॅली घसरल्याने अर्थातच इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात घसरण झाली असली तरी अद्याप 'हिरव्या' रंगातच बाजार व्यवहार करत आहे.सकाळी बँक निर्देशांकाने निफ्टीला मोठे बळ मिळावून दिले होते. उदाहरणार्थ एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, बजाज फायनान्स ळ अँक्सिस बँक, एल अँड टी, या शेअर्समध्ये वाढ झाल्याने बँक निफ्टीत रॅली झाली होती तर इतर कंपन्यांमध्ये बजाज ऑटो, हिंदाल्को इंडस्ट्रीज, टाटा मोटर्स एल अँड टी सारख्या शेअर्समध्ये वाढ झाल्याने बाजाराने दरपातळी राखण्यात यश मिळवले. मात्र बजाज होल्डिंग्स, आयशर मोटर्स, डीसीएम श्रीराम, इंडियन बँक, टीसीएस, टाटा स्टील यांसारख्या शेअर्समध्ये घसरण झाल्याने बाजारातील रॅली घसरली आहे.दुपारपर्यंत सेन्सेक्स ८५,४९१.२३ वर घसरला असून दिवसाच्या उच्चांकापेक्षा सुमारे ५६४ अंकांनी कमी तर निफ्टी दुपारी १:३० वाजेपर्यंत २६१५० पातळीच्या खाली २६१४४.७५ पातळीवर आला होता. अशा परिस्थितीतआयशर मोटर्स, ईटरनल आणि ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन हे निफ्टी५० निर्देशांकात मोठ्या प्रमाणात घसरले होते तर बजाज फायनान्स आणि हिंदुस्तान युनिलिव्हर हे निर्देशांकातील सर्वाधिक वाढणाऱ्या कंपन्यांमध्ये होते जे३ टक्क्यांपर्यंत आज वाढले.आज सेन्सेक्सच्या मासिक डेरिव्हेटिव्ह्जच्या समाप्तीच्या (Monthly Expiry) दिवशी बाजारात मोठ्या हालचाली झालेल्या दिसल्या. आतापर्यंत अनुभव बघता एक्सपायरी सत्रांमध्ये सामान्यतः किमतीत तीव्र चढउतार प्राईज पोझिशन्स बदलल्या जातात अथवा त्यांना स्क्वेअर ऑफ केले जाते.आजच्या या हालचालीवर जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे चीफ मार्केट स्ट्रॅटेजिस्ट आनंद जेम्स म्हणाले आहेत की,निर्देशांक २६१६५ पातळीच्यावर सकारात्मक पूर्वाग्रह राखेल अशी अपेक्षा होती परंतु जर तो २६०९८ पातळीच्या वर राहिला नाही तर आणखी नफा घेण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.निफ्टी व्यापक निर्देशांकांची कामगिरी पाहता स्मॉलकॅप आणि मिडकॅप शेअर्समध्ये आज अनपेक्षितपणे घसरण झाली आहे आणि दोन दिवसांचा रॅली त्यानिमित्ताने संपली आहे. विशेषतः सेन्सेक्स व निफ्टी निर्देशांक १४ महिन्यांच्या नवीन उच्चांकावर पोहोचले असतानाही हे घडले आहे.'महत्त्वाच्या निर्देशांकांनी सर्वकालीन उच्चांक गाठला असला तरी मिडकॅप आणि स्मॉलकॅप विश्वाचा एक मोठा भाग, ज्यामध्ये अनेक क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांचा समावेश आहे, सुधारात्मक किंवा नाजूक क्षेत्रात आहे. रॅलीचा पुढचा टप्पा टिकवून ठेवणे अर्थपूर्ण कमाई पुनर्प्राप्ती, जागतिक मॅक्रोमध्ये स्थिरता आणि सतत देशांतर्गत सहभागावर अवलंबून असेल. आम्ही उच्च पातळीवर गतीचा पाठलाग करण्याऐवजी निवडक, गुणवत्ता-केंद्रित दृष्टिकोनाचा सल्ला देतो' असे बाजार तज्ञ तापसे म्हणाले आहेत. जागतिक कमोडिटी बाजारातही कमालीची अस्थिरता पहायला मिळत आहे. जागतिक बाजारातील अस्थिरतेमध्ये ग्रीनबॅकची मागणी कायम राहिल्याने अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया किरकोळ किंमतीत घसरत आहे. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची वाढलेली गुंतवणूक व कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्याने काही प्रमाणात बाजारात आधार मिळाला आहे परंतु चलनावर व्यापक दबाव कमी करण्यासाठी ते पुरेसे नव्हते असे फॉरेक्स व्यापाऱ्यांनी सांगितले आहे.
‘दशावतार’फेम अभिनेत्रीने दिली आनंदाची बातमी! सोशल मीडियावर पोस्ट केली शेअर
Priyadarshini Indalkar : ‘दशावतार‘ या मराठी चित्रपटावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले. बॅाक्स अॅाफिसवर चांगली कमाई चित्रपटाने केली. या चित्रपटात अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या अभिनयाचे खूप कौतुक करण्यात आले. त्याचप्रमाणे चित्रपटातील इतर सहकलाकारांनी साकारलेल्या भूमिकेचे देखील कौतुक प्रेक्षकांनी केले. या चित्रपटात अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर हिच्या व्यक्तिरेखेचे देखील खूप कौतुक झाले. अशातच आता अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकरने चाहत्यांना […] The post ‘दशावतार’फेम अभिनेत्रीने दिली आनंदाची बातमी! सोशल मीडियावर पोस्ट केली शेअर appeared first on Dainik Prabhat .
Ram Gopal Varma : एक लोकप्रिय गाणे तयार होईपर्यंत किती मोठा संघर्ष करावा लागतो, हे अनेकांना ठाऊक नसते. अशाच एका प्रसिद्ध गाण्यामागची मनोरंजक आणि थोडी ड्रामेबाज गोष्ट अलीकडेच समोर आली. 1995 साली प्रदर्शित झालेल्या ‘रंगीला’ या सुपरहिट चित्रपटातील ‘हाय रामा’ हे गाणे आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. मात्र या गाण्याच कंपोजिशन आणि शूटिंग ही […] The post Ram Gopal Varma: ‘हाय रामा’ गाण्यामागची मजेदार गोष्ट; दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी सांगितला पडद्यामागचा ड्रामा! appeared first on Dainik Prabhat .
“मुंबईत कधीही असुरक्षित वाटलं नाही”; कॅनडामधील कॅफेवर झालेल्या हल्ल्यानंतर कपिल शर्माची प्रतिक्रिया
Kapil Sharma | कॉमेडियन अभिनेता कपिल शर्माने कॅनडातील सरे शहरातील त्याच्या ‘कॅप्स कॅफे’वर झालेल्या फायरिंग प्रकरणांवर भाष्य केले आहे. कॅनडातील सरी येथील कॅप्स कॅफेवर पहिला हल्ला जुलैमध्ये, त्यानंतर दुसरा ऑगस्ट आणि तिसरा ऑक्टोबरमध्ये झाला होता. मात्र या घटनांमुळे कॅफेला उलट मोठी ओपनिंग मिळाली आणि स्थानिक लोकांचा पाठिंबाही वाढल्याचं त्याने सांगितले. कपिलने सांगितले की, “गोळीबाराची घटना […] The post “मुंबईत कधीही असुरक्षित वाटलं नाही”; कॅनडामधील कॅफेवर झालेल्या हल्ल्यानंतर कपिल शर्माची प्रतिक्रिया appeared first on Dainik Prabhat .
Trump phone call leaked। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांची स्तुती ऐकायला आवडते. ते या त्यांच्या गुणाचा वापर करून अनेक कामे करून घेता येऊ शकतात. ट्रम्प यांचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे परराष्ट्र धोरण सल्लागार युरी उशाकोव्ह यांच्यात झालेल्या संभाषणाने सध्या एकच गोंधळ उडाला आहे. या दोघांमधील फोन कॉल वरील […] The post “ट्रम्पना स्वतःची प्रशंसा ऐकायला आवडते, म्हणून जेव्हा पुतिन फोन करतील..” ; लीक झालेल्या फोन कॉलमुळे एकच खळबळ appeared first on Dainik Prabhat .
WinZO गेमिंग कंपनीच्या संस्थापकांना ईडीकडून अटक
प्रतिनिधी: मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली गेमिंग प्लॅटफॉर्म WinZO च्या संस्थापक जोडीला अंमलबजावणी संचनालयाने (Enforcement Directorate ED) अटक केली आहे.अधिकाऱ्यांनी स्पष्ट केल्याप्रमाणे अंमलबजावणी संचालनालयाने ऑनलाइन मनी गेमिंग प्लॅटफॉर्म WinZO चे संस्थापक सौम्या सिंग राठोड आणि पावन नंदा यांना मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली अटक केली आहे.तपास यंत्रणेच्या क्षेत्रीय ऑफिसमध्ये चौकशी सुरू केल्यानंतर बुधवारी त्यांना बेंगळुरूमध्ये अटक करण्यात आली आहे. माहितीनुसार, त्याच रात्री दोघांना बेंगळुरूमधील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले आणि न्यायालयाने त्यांना एक दिवसाची कोठडी सुनावली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील सविस्तर आदेशासाठी त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले जाण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.ईडीने गेल्या आठवड्यात मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याच्या (Prevention of Money Laundering Act) तरतुदींनुसार ऑनलाइन गेमिंग देणारी कंपनी WinZO आणि गेमझक्राफ्ट आणि त्यांच्या प्रवर्तकांच्या जागांवर छापे टाकण्यात आले होते.सोमवारी, ईडीने एका निवेदनात असा आरोप केला आहे की, कंपनीने गेमर्सचे ४३ कोटी रुपयांचे निधी रखडून ठेवले होते आणि भारताने रिअल-मनी गेमिंगवर बंदी घातल्यानंतर हे पैसे ग्राहकांना परत करायला हवे होते. मात्र तसे न करता ते प्रलंबित ठेवले गेले असा आरोप कंपनीच्या प्रवर्तक जोडीवर करण्यात आले. ईडीने विन्झोवर गुन्हेगारी कारवाया आणि अनैतिक पद्धतींमध्ये सहभागी झाल्याचा आरोप केला आहे. कथित प्रकरणात ग्राहकांना हे माहित नसताना अल्गोरिदमसह खेळायला लावले जात होते की ते रिअल-मनी गेममध्ये मानवी खेळ आहे की नाही याची शाश्वती नसताना तर सॉफ्टवेअरशी अथवा माणसाशी खेळत हे स्पष्ट नाही. तसेच त्यात म्हटले आहे की विन्झो ब्राझील, अमेरिका आणि जर्मनीसारख्या देशांमध्ये भारतातून (भारतीय कंपनी वापरत असलेल्या त्याच प्लॅटफॉर्मवर) रिअल-मनी गेम (RMG) चालवत आहे.'केंद्र सरकारने २२ ऑगस्टपासून आरएमजीवर बंदी घातल्यानंतरही गेमर्स/ग्राहकांना पैशाची परतफेड न करता ग्राहकांचे ४३ कोटी रुपये कंपनीने प्रलंबित ठेवले आहेत असा आरोप ईडीने आरोप केला आहे.कथित प्रकरणात विन्झो गेम्सनचा मालमत्तेचे ५०५ कोटी रुपये किमतीचे बाँड, मुदत ठेवी आणि म्युच्युअल फंड मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्या (पीएमएलए) अंतर्गत गोठवण्यात आले आहेत अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. या आरोपांवर प्रतिक्रिया देताना,' विन्झोच्या प्रवक्त्याने एका निवेदनात म्हटले आहे की,'विन्झो त्याच्या प्लॅटफॉर्मची रचना आणि संचालन कसे करते याचा मुख्य भाग निष्पक्षता आणि पारदर्शकता आहे. आमचे लक्ष आमच्या युजरचे संरक्षण करण्यावर आणि सुरक्षित व विश्वासार्ह अनुभव सुनिश्चित करण्यावर आहे' असे म्हटले. WinZO ने असेही म्हटले आहे, तसेच ते सर्व लागू कायद्यांचे पूर्णपणे पालन करत आहेत.ईडीने म्हटले आहे की WinZO ने ग्राहकांनी वॉलेटमध्ये ठेवलेले पैसे काढण्यास प्रतिबंध केला आहे किंवा ते पैसे काढण्यास मर्यादा घातल्या आणि अल्गोरिदम/सॉफ्टवेअरच्या अनैतिक वापराद्वारे ग्राहकांनी ठेवलेली रक्कम आणि गमावलेल्या पैज रकमेच्या स्वरूपात कथित बेकायदेशीर निधी निर्माण केला आहे.ईडीने केलेल्या दाव्यानुसार, WinZO चे जागतिक ऑपरेशन्स एकाच अँपद्वारे केले जात होते, म्हणजेच ते भारत-आधारित प्लॅटफॉर्मवर होस्ट केले जात होते.भारतीय संस्थेने परदेशात गुंतवणुकीच्या नावाखाली अमेरिका आणि सिंगापूरमध्ये निधी वळवल्याचे देखील आढळून ईडीच्या तपासात आढळून आले आहे असे ईडीने म्हटले. याविषयी ईडीने म्हटले आहे की, सर्व ऑपरेशन्स आणि दैनंदिन व्यवसाय आणि बँक खात्यांचे ऑपरेशन भारतातून केले जात असल्याने ५५ दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे ४८९.८० कोटी मूल्यांकनाचा निधी अमेरिकेतील त्यांच्या (WinZO) बँक खात्यात ठेवण्यात आले आहेत, जी एक बनावट कंपनी आहे असाही गंभीर आरोप ईडीने आरोप केला आहे. एजन्सीने गेमझक्राफ्टवरही मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आरोप केले आहेत.
मुलगी घरासमोरील रस्त्याने अडखळत येत होती. ती पूर्णपणे रक्ताने माखलेली होती. मला पाहताच घाबरून 'पप्पा' म्हणत ती मला बिलगली. फक्त एवढंच सांगू शकली की, जे काका घरी आले होते, तेच तिला जंगलात घेऊन गेले. बोलता बोलता तिचा आवाज तुटला आणि ती माझ्याच हातात बेशुद्ध होऊन कोसळली. हे म्हणणं आहे त्या 6 वर्षांच्या निष्पाप मुलीच्या वडिलांचं, जिच्यावर 21 नोव्हेंबरच्या रात्री मध्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्यातील गौहरगंज परिसरात अत्याचार करण्यात आले. ती मुलगी भोपाळच्या एम्स (AIIMS) रुग्णालयात जीवन आणि मृत्यू यांच्यात एक कठीण लढाई लढत आहे. डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे आणि कुटुंबाच्या प्रार्थनांमुळे ती आता शुद्धीवर आहे आणि आपल्या घरच्यांशी तुटक-तुटक बोलू शकत आहे, पण तिच्यावर अजून तीन शस्त्रक्रिया होणे बाकी आहे. याचा अर्थ तिला अजून अनेक दिवस रुग्णालयाच्या बेडवरच काढावे लागतील, अशा वेदना सहन करत, ज्याची कल्पना करणेही कोणासाठी अशक्य आहे. डॉक्टरांचे म्हणणे आहे की पीडितेला तीन तास उशिरा उपचारासाठी एम्समध्ये आणण्यात आले होते, ज्यामुळे खूप रक्तस्राव झाला होता. जर तिला वेळेवर रुग्णालयात आणले असते तर कदाचित इतक्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेची वेळ आली नसती. या घृणास्पद घटनेचा आरोपी, २३ वर्षीय सलमान खान, अजूनही पोलिसांच्या ताब्यात नाही. गेल्या ५ दिवसांपासून गौहरगंज पोलीस ठाण्यासमोर शेकडो लोकांचा जमाव जमला आहे. त्यांची फक्त एकच मागणी आहे - आरोपीचा एन्काउंटर. आरोपीने मुलीसोबत जी क्रूरता केली, त्यालाही सार्वजनिकरित्या शिक्षा व्हावी अशी त्यांची इच्छा आहे. अखेर २१ नोव्हेंबरच्या त्या संध्याकाळी असे काय घडले होते? हे समजून घेण्यासाठी दिव्य मराठीने पीडितेच्या पालकांशी बातचीत केली. वडील म्हणाले- घटनेपूर्वी तो माझ्याशी बोलला होतामासूमचे वडील सांगतात की, संध्याकाळचे साडेपाच वाजले असतील. आरोपी सलमान आमच्या घरापाशी आला. तो आमच्या कॉलनीत नेहमी यायचा. आमच्याशी बोलायचा, मुलांना चॉकलेट द्यायचा. २१ नोव्हेंबरलाही तो आला होता. त्याने मला विचारले- 'कसे आहात?' मी म्हणालो- 'ठीक आहे.' काही मिनिटांनी तो निघून गेला आणि मी पण आत जेवायला गेलो. तेव्हा मला माहीत नव्हते की हा माणूस विश्वासाचा मुखवटा घातलेला एक सैतान आहे. ते पुढे सांगतात की, सुमारे एका तासानंतर, संध्याकाळी 6:30 वाजता माझी 6 वर्षांची मुलगी खेळायला बाहेर पडली. तिने आईला सांगितले की ती आधी शेजारच्या काकूंना टोमॅटो देऊन येईल आणि मग खेळायला जाईल. असे म्हणून ती घरातून बाहेर पडली. संध्याकाळचे सुमारे 7:30 वाजले असतील, मी पत्नीला मुलीबद्दल विचारले तेव्हा तिने सांगितले की ती खेळायला गेली आहे. वडील म्हणाले- मी तिला ज्या अवस्थेत पाहिले ते मी विसरू शकणार नाहीयानंतरही ती परत न आल्याने आम्ही तिला आजूबाजूला शोधायला सुरुवात केली, पण तिचा कुठेही पत्ता लागला नाही. मुलीचे वडील सांगतात की रात्री साधारण आठ वाजता मी मुलीला शोधत घराबाहेर रस्त्यावर उभा होतो, तेव्हा माझी नजर अशा दृश्यावर पडली, ज्यामुळे माझ्या पायाखालची जमीन सरकली. ते म्हणतात, जे मी पाहिले, ते मी आयुष्यभर विसरू शकणार नाही. ती घरासमोरील रस्त्यावरून येताना दिसली, तिने फक्त वर कुर्ती घातली होती आणि ती पूर्णपणे रक्ताने माखलेली होती. तिने मला पाहताच मोठ्याने 'पप्पा' अशी किंकाळी फोडली आणि धावत येऊन माझ्या छातीला अशी बिलगली जणू तिला जीव वाचवण्यासाठी शेवटचा आधार मिळाला होता. त्या निरागस मुलीने तुटक आवाजात जे सांगितले, ते कोणत्याही वडिलांसाठी ऐकणे असह्य होते. ती म्हणाली, जे काका संध्याकाळी आले होते, ते मला जंगलाच्या दिशेने, थोडे पुढे घेऊन गेले, आणि माझे तोंड दाबले. आरोपी सलमान, विश्वासाच्या बुरख्याखाली लपलेला क्रूरकर्मापीडितेच्या वडिलांनी सांगितले की, आरोपी सलमान खान आधी राजा भैयाच्या क्रशरवर काम करत होता, पण त्याच्या वाईट वागणुकीमुळे आणि वाईट सवयींमुळे राजा भैयाने त्याला नोकरीवरून काढून टाकले होते. नोकरीवरून काढल्यानंतर तो भटकू लागला. गेल्या एक-दोन महिन्यांपासून तो त्यांच्या परिसरातच राहत होता. तो जाणूनबुजून कॉलनीतील लोकांशी, विशेषतः मुलांशी मिसळायचा, जेणेकरून कोणालाही त्याच्यावर संशय येऊ नये. त्याने मुलांसाठी टॉफीवाले काका अशी प्रतिमा निर्माण केली होती. याच विश्वासाचा फायदा घेऊन त्याने हे घृणास्पद कृत्य केले. त्याने केवळ एका चिमुकलीच्या शरीरालाच नव्हे, तर एका कुटुंबाच्या विश्वासालाही छिन्नविछिन्न केले. आईचे दुःख, माझ्या मुलीचे गाल थपडांनी सुजले होतेजेव्हा आम्ही पीडितेच्या आईशी बोललो, तेव्हा त्यांचा कंठ दाटून आला. त्यांनी रडत सांगितले की त्यांना दोन मुलगे आणि दोन मुली आहेत, आणि पीडिता त्यांची सर्वात लहान आणि लाडकी मुलगी आहे, जी दुसऱ्या इयत्तेत शिकते. त्यांनी सांगितले की आरोपी सलमानला त्यांची मुले आधीपासून ओळखत होती, कारण तो नेहमी घराच्या जवळ येत-जात असे आणि टॉफी आणत असे. त्या रात्रीच्या भयानक दृश्याची आठवण करून आईने सांगितले, 'मुलीला खूप मारहाणही करण्यात आली होती. तिचे दोन्ही गाल इतके लाल आणि सुजले होते, जणू कोणीतरी तिला वारंवार आणि खूप जोरात थप्पड मारल्या असतील. तिच्या दोन्ही गुडघ्यांवर आणि हातांवर खोल जखमा आणि ओरखडे होते. इतकेच काय, तिची कंबरही वाईट रीतीने सोलली गेली होती.' आईने सांगितले की सर्वात भयानक जखमा तिच्या खासगी अवयवांवर होत्या, ज्या इतक्या गंभीर होत्या की डॉक्टरांना त्वरित अनेक शस्त्रक्रिया कराव्या लागल्या. त्यांनी सांगितले, 'जेव्हा तिला एम्समध्ये आणले, तेव्हा ती बेशुद्ध होती, पण आता शस्त्रक्रियेनंतर तिला शुद्ध आली आहे, ती बोलू शकत आहे. पण तिला अजूनही काही दिवस रुग्णालयात ठेवले जाईल.' तीन तास उशिरा उपचार मिळालापीडितेला सर्वात आधी गौहरगंज येथील सरकारी रुग्णालयात नेण्यात आले, तेथून डॉक्टरांनी तिला औबेदुल्लागंज येथे रेफर केले. सूत्रांनी सांगितले की, जेव्हा पीडितेला रुग्णालयात नेण्यात आले, तेव्हा तिथे 600-700 लोकांची गर्दी रुग्णालयात जमली होती. बीएमओ अमृता जीवने कर्तव्यावर नव्हती. बीएमओने एसडीएमला सांगितले की, त्यांच्याकडे डायल 108 रुग्णवाहिकेत पेट्रोल भरण्यासाठीही पैसे नाहीत आणि रुग्णवाहिकाही निकामी पडली आहे. त्यानंतर सागर फॅक्टरीतून रुग्णवाहिका मागवण्यात आली. याच अनास्थेमुळे ओबेदुल्लागंजहून भोपाळला जाण्यासाठी तीन तासांपेक्षा जास्त वेळ लागला, ज्यामुळे मुलीचे खूप रक्तस्राव झाले. शस्त्रक्रियेनंतर गुंतागुंतशनिवारी डॉक्टरांनी मुलीची शस्त्रक्रिया केली. तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले की तिचे गुप्तांग खूप खराब झाले होते. डॉक्टरांना नाइलाजाने गुप्तांगापर्यंत जाणाऱ्या नसांना बायपास करून नवीन व्यवस्था तयार करावी लागली, जेणेकरून शौचास जाता येईल आणि गुप्तांग बरे होण्यास सुरुवात होईल. मुलगी सध्या आयसीयूमध्ये आहे आणि बोलू शकत आहे. पूर्ण बरी झाल्यानंतर तिची आणखी एक शस्त्रक्रिया होईल. डॉक्टरांचे म्हणणे आहे की, संसर्ग पसरण्याची भीती असल्याने ते तिला अजून डिस्चार्ज देत नाहीत. पूर्ण बरे होण्यासाठी कमीत कमी सहा महिने लागतील. यानंतरही ती पूर्णपणे सामान्य होईल की नाही याबद्दल डॉक्टरांना शंका आहे. रुग्णालयात जीवन-मृत्यूशी झुंजणारी चिमुकली आणि उफाळलेला जन-आक्रोशभोपाळच्या एम्समध्ये मुलीवर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांची एक टीम तिच्यावर सतत लक्ष ठेवून आहे. ती शुद्धीवर असली तरी, शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खोल धक्क्यात आहे. तिच्यासमोर अजून एक लांब आणि वेदनादायक प्रवास आहे. तर, दुसरीकडे गौहरगंजमध्ये लोकांचा संताप गगनाला भिडला आहे. आरोपीच्या फरार झाल्याने पोलीस प्रशासनावरही गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे की, जर पोलिसांनी वेळेवर कारवाई केली असती, तर आरोपी आतापर्यंत गजाआड असता. ते या प्रकरणात कोणत्याही प्रकारची ढिलाई सहन करण्यास तयार नाहीत. त्यांची एकच मागणी आहे - 'सलमानला फाशी द्या' किंवा 'त्याचा एन्काउंटर करा'.
राजकोट: भारतीय क्रिकेटपटू चेतेश्वर पुजारा त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील नातेसंबंधामुळे चर्चेत आला आहे. पुजाराचा मेहुणा जीत रसिखभाई पाबरीवर याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी तपास सुरू झाला आहे. एका तरुणीने जीत विरोधात २६ नोव्हेंबर २०२४ रोजी बलात्काराची तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाला एक वर्ष पूर्ण होताच जीतने आत्महत्या केली असल्याने त्याच्या आत्महत्येसाठीचे प्राथमिक कारण हेच सांगितले जात आहे. लग्नाचे आश्वासन देऊन शरीरसंबंध ठेवल्याचा आरोप या तरुणीने तक्रारीमध्ये केला होता. यामुळे तणावाखाली आलेल्या जीतने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याने कुटुंबावर शोककळा पसरली आहे.जीत पाबरी विरोधात एका तरुणीने २६ नोव्हेंबर २०२४ रोजी मालवीय नगर पोलिसात बलात्काराची तक्रार दाखल केली होती. या तरुणीसोबत जीतचा साखरपुडा झाला होता. पण पुढे दोघांमध्ये काहीतरी बिनसल्याने त्यांनी नातेसंबंध तोडून टाकले. त्यानंतर तरुणीने जीत विरोधात बलात्काराची तक्रार नोंदवली. लग्नाचे आश्वासन देऊन साखरपुडा झाल्यावर जीतने अनेकदा जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले आणि नंतर लग्न मोडले, असे गंभीर आरोप तरुणीने केले. या प्रकरणामुळे जीत विरोधात तक्रार दाखल झाल्यानंतर वर्षभरातच जीतने आत्महत्या करत जीवन संपवले. यावेळी चेतेश्वर पुजारा भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी सामन्यात समालोचन करत होता.https://prahaar.in/2025/11/27/zubin-gargs-murder-assam-chief-minister-himanta-biswa-sarmas-shocking-statement-in-the-assembly/मिळालेल्या माहितीनुसार, जीत गेल्या वर्षभरापासून कायदेशीर खटल्याचा सामना करत होता. यामुळे तो बराच ताणतणावात होता. पण आत्महत्येमागील नेमके कारण शवविच्छेदन अहवाल आणि पुढील चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहे,असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.चेतेश्वर पुजारा यांची सासरवाडी जामजोधपूरमध्ये आहे. पण त्याच्या सासरचे लोक गेल्या २० वर्षांपासून राजकोटमध्येच वास्तव्यास असून ते कॉटन जिनिंग फॅक्ट्रीचा व्यवसाय करतात. त्यांच्या मालकीचा एक कारखाना आहे.
खेळताना ट्रॅक्टरवर चढला, चुकून गिअर पडला अन् ; बार्शीत ४ वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील शेळगावमध्ये गुरुवारी दुपारी ४ वर्षांच्या मुलाचा ट्रॅक्टरसह विहिरीत पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. गावात विहिरीत अडकलेली मोटार बाहेर काढण्याचे काम सुरू असताना ही दुर्घटना झाली.याचदरम्यान जवळच खेळत असलेला शिवराज संदिप शेरखाने हा चार वर्षांचा मुलगा खेळता खेळता ट्रॅक्टरवर चढला. चुकून त्याच्या हातून गिअर सरकल्याने ट्रॅक्टरचा तोल गेला आणि क्षणार्धात तो थेट विहिरीत कोसळला. ही घटना इतकी अचानक घडली की आसपासच्या लोकांना प्रत्यक्षात काही समजायलाच वेळ मिळाला नाही. ट्रॅक्टर विहिरीत पडताच शिवराज बेचक्यात अडकल्याने त्याला वाचवणे अशक्य बनले.अपघातानंतर शिवराजचे वडील संदिप शेरखाने यांनी मुलाला वाचवण्यासाठी तत्काळ धाव घेतली. गावातील युवकांनीही जीवाची पर्वा न करता विहिरीत उड्या मारत शोध मोहिम हाती घेतली. स्थानिक पोलिस आणि अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.अग्निशमन आणि पोलीस पथकाने घटनास्थळी पोहोचताच रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले. मात्र ट्रॅक्टर विहिरीच्या तळाशी अडकलेला, खोल पाणी आणि चिखल यामुळे शोधकार्य अत्यंत गुंतागुंतीचे झाले. ट्रॅक्टर बाहेर काढणे शक्य नसल्याने प्रथम विहिरीतील पाणी कमी करण्याचा निर्णय घेतला. सलग १२ तासांच्या प्रयत्नांनंतर विहिरीतील पाणी बाहेर काढण्यात यश आले आणि पाणी उतरल्यावर शिवराजचा मृतदेह तळाशी दिसून आला. संपूर्ण परिसरात शोककळा पसरली. अवघ्या चार वर्षांच्या निरागस मुलाचा झालेला मृत्यू कुटुंबासाठी आणि गावासाठी मोठा धक्का आहे.
चेहऱ्यावर सुरकुत्या, पांढरे केस…’असंभव’चित्रपटातील ‘या’अभिनेत्रीचा खतरनाक लुक समोर
Asmabhav Movie | सध्या सोशल मिडियावर एका मराठमोळ्या अभिनेत्रीच्या आगळ्या वेगळ्या लुकची चांगलीच चर्चा रंगली आहे. व्हिडीओत दिसणाऱ्या लोकप्रिय मराठी अभिनेत्रीची अशी अवस्था पाहून चाहते देखील अचंबित झाले आहेत. या अभिनेत्रीचे नाव आहे प्रिया बापट. तिच्या आगामी ‘असंभव’ या चित्रपटासाठी तिने हा खास लुक केला आहे. ‘असंभव’ सिनेमात प्रियाने दुहेरी भूमिका साकारली आहे. साधना सैगल […] The post चेहऱ्यावर सुरकुत्या, पांढरे केस…’असंभव’ चित्रपटातील ‘या’ अभिनेत्रीचा खतरनाक लुक समोर appeared first on Dainik Prabhat .
‘या’देशात भूकंपाचे जोरदार धक्के ; 6.4 रिश्टर स्केल तीव्रतेची नोंद
Indonesia Earthquake। इंडोनेशियातील सुमात्रा बेटावर आज ६.४ रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप झाला. आचे प्रांताजवळ हा भूकंप जाणवला. इंडोनेशियन हवामानशास्त्र, हवामानशास्त्र आणि भूभौतिकशास्त्र एजन्सी (BMKG) नुसार, भूकंपाची खोली १० किलोमीटर होती. हा भूकंप जवळपासच्या अनेक भागात जाणवला, परंतु अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की त्सुनामीचा धोका नाही. हा भूकंप केवळ प्रभावित भागातच नाही तर आजूबाजूच्या परिसरातही जाणवला. हा […] The post ‘या’ देशात भूकंपाचे जोरदार धक्के ; 6.4 रिश्टर स्केल तीव्रतेची नोंद appeared first on Dainik Prabhat .
पुणे : पुण्यातील आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडी (Hinjawadi, Pune) परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. इथे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी मिळून तब्बल वीस लहान मुलांना अंगणवाडीमध्ये कोंडून ठेवल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. हिंजवडीतील अंगणवाडी क्रमांक तीन मध्ये हा प्रताप घडला आहे. या घटनेचा जो व्हिडिओ व्हायरल झालाय त्यात लहान मुले अक्षरशः घाबरून रडत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. चिमुकल्यांना अशाप्रकारे कोंडून ठेवल्याचे पाहून पालकांनी आणि परिसरातील नागरिकांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे. अंगणवाडीतील सेविका सविता शिंदे आणि मदतनीस शिल्पा साखरे यांनी हा प्रताप केल्याचे उघड झाले आहे. ज्या ठिकाणी मुलांची काळजी घेणे अपेक्षित आहे, त्याच ठिकाणी त्यांच्यावर असा मानसिक आघात झाल्यामुळे पालकांमध्ये तीव्र असंतोष आहे. पालकांनी या सेविका आणि मदतनीस यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.'माजी सरपंचाने बैठकीला बोलावले म्हणून...'हिंजवडीत धक्कादायक प्रकार, सेविका अन मदतनीस वीस लहानग्यांना अंगवाडीत कोंडून बैठकीला गेल्या. मुलं रडत बसली. कालच्या घटनेचा व्हिडीओ एबीपी माझाच्या हाती#Punenews #hinjewadinews pic.twitter.com/g7DHcLNpGv— Ankita Shantinath Khane (@KhaneAnkita) November 27, 2025पुण्यातील हिंजवडी येथील अंगणवाडीत २० निष्पाप मुलांना आतमध्ये कोंडून ठेवण्याच्या धक्कादायक घटनेनंतर आता अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी या कृतीमागील धक्कादायक खुलासा केला आहे. सेविका सविता शिंदे आणि मदतनीस शिल्पा साखरे यांनी स्पष्ट केले की, ग्रामपंचायतीतील एका माजी सरपंचाने बैठकीसाठी बोलावले म्हणून त्यांनी मुलांना आतमध्ये ठेवून अंगणवाडीला कुलूप लावले आणि त्या बैठकीसाठी निघून गेल्या. काल, बुधवार (दि. २६) रोजी सकाळी ११ ते १२ च्या दरम्यान हा संतापजनक प्रकार घडला. काही वेळेसाठी का असेना, लहान मुलांना अशाप्रकारे अंगणवाडीत कोंडून ठेवणे हे किती धोकादायक आणि संतापजनक आहे, हे व्हायरल झालेल्या व्हिडिओतील मुलांच्या आक्रोशावरून स्पष्ट होत आहे. मुलांच्या सुरक्षिततेसाठी ही कृती अत्यंत गंभीर मानली जात आहे. उपस्थितांनी ही गंभीर बाब तात्काळ मुळशी पंचायत समितीचे बाल विकास प्रकल्प अधिकारी धनराज गिराम यांच्या निदर्शनास आणून दिली. गिराम यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन, सेविका शिंदे आणि साखरे या दोघींना बैठक सोडून तात्काळ अंगणवाडीचे कुलूप उघडण्याचे आदेश दिले. आता या घटनेनंतर बाल विकास प्रकल्प अधिकारी या सेविका आणि मदतनीस यांच्यावर काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.https://prahaar.in/2025/11/27/domestic-abuse-kills-nashik-newlywed-woman-her-7-page-note-reveals-torture/नेमकं काय प्रकरण ?पुण्यातील हिंजवडी परिसरातून एक अत्यंत गंभीर आणि धोकादायक असा प्रकार उघडकीस आला आहे, ज्यामुळे प्रशासकीय निष्काळजीपणावर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. येथील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी तब्बल २० लहान मुलांना केंद्रातच बंद ठेवून कुलूप लावल्याचे समोर आले आहे. या दोन्ही अंगणवाडी सेविकांनी हा धक्कादायक प्रकार घडवण्यामागे ग्रामपंचायतीतील एका माजी सरपंचाने बोलावलेल्या बैठकीला उपस्थित राहण्याचे कारण दिले आहे. काल, बुधवार (दि. २६) रोजी सकाळी सुमारे ११ ते १२ या वेळेत हा प्रकार घडला, जेव्हा मुलांना केंद्रातच बंदिस्त करण्यात आले. लहानग्या मुलांना अगदी काही काळासाठीसुद्धा अशा प्रकारे बंदिस्त करून ठेवणे किती घातक आणि धोकादायक ठरू शकते, याचा प्रत्यय व्हायरल झालेल्या व्हिडिओतील मुलांच्या रडण्याच्या आवाजातून स्पष्टपणे येत आहे. या घटनेनंतर चिमुकल्यांच्या पालकांनी आणि नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. उपस्थितांनी ही बाब तातडीने मुळशी पंचायत समितीचे बाल विकास प्रकल्प अधिकारी धनराज गिराम यांच्याकडे पोहोचवली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन, गिराम यांनी सेविका शिंदे आणि साखरे यांना तत्काळ बैठक सोडून अंगणवाडीचे कुलूप उघडण्याचे आदेश दिले. या गंभीर निष्काळजीपणावर बाल विकास प्रकल्प अधिकारी आता कोणती कठोर कार्यवाही करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मोहित सोमण:ग्लेनमार्क फार्मा या भारतातील मोठ्या फार्मा कंपनीच्या शेअर्समध्ये आज चांगली वाढ झाली आहे. सत्र सुरूवातीच्या काळात शेअर २% पर्यंत उसळला होता. दुपारी १ वाजेपर्यंत कंपनीचा शेअर १.०१% उसळत १९४०.६० रूपयांवर व्यवहार करत आहे. कंपनीला युएस स्थित अन्न नियामक व सुरक्षा मंडळ (US Food and Drug Administration FDA) यांच्याकडून ईआयआर (Establishment Inspection Report) प्राप्त झाल्याचे कंपनीने आपल्या एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे कंपनीच्या युएस मधील मोनरोई, नॉर्थ कॅरोलिना युएस येथे उत्पादन प्रकल्प सुरु करण्याच्या प्रस्तावाला एफडीएने परवानगी दिली गेली असल्याचे कंपनीने आज जाहीर केले. या सकारात्मक घडामोडींमुळे गुंतवणूकदारांनी कंपनीच्या शेअर्समध्ये मोठा प्रतिसाद दिला होता.कंपनीच्या उत्पादन सुविधेत ०९ जून ते १७ जून २०२५ या कालावधीत ही तपासणी करण्यात आली.या सकारात्मक घडामोडींसह, आम्ही व्यावसायिक उत्पादन पुन्हा सुरू करू असे कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले. कंपनी भारतासह विदेशात काम करणारी एमएनसी फार्मा कंपनी आहे.यापूर्वी कंपनीने १८ जूनला स्टॉक एक्सचेंज (BSE) फॉर्म-४८३ बद्दल माहिती दिली होती. त्यात कंपनीसाठी एफडीए कडून आलेले वॉर्निंग लेट अंतर्भूत होते असे कंपनीने स्पष्ट केले होते मात्र कंपनीला हिरवा कंदील मिळाल्यानंतर शेअरमध्ये तेजी दिसत आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला, ग्लेनमार्क फार्माने क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीजच्या उपचारांसाठी जगातील पहिली नेब्युलाइज्ड, फिक्स्ड-डोस ट्रिपल थेरपी लाँच केली होती.त्यांनी त्यामध्ये केलेल्या निवेदनात,'नेब्झमार्ट GFB स्मार्ट्यूल्स आणि एअर्झ एफबी स्मार्ट्यूल्स लाँच केले. श्वासनलिकेतील अडथळा, जळजळ कमी करण्यासाठी आणि फुफ्फुसांचे कार्य आणि लक्षण नियंत्रण सुधारण्यासाठी ग्लायकोपिरोनियम, फॉर्मोटेरॉल आणि बुडेसोनाइडसह तीन सिद्ध औषधे एकत्र करतात' असे त्यात म्हटले आहे.ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स ही एक आर अँड डी करणारी जागतिक फार्मा कंपनी आहे. कंपनी ब्रँडेड, जेनेरिक्स आणि ओटीसी विभागांमध्येही कार्यरत आहे. श्वसन, त्वचाविज्ञान आणि ऑन्कोलॉजीच्या उपचारात्मक क्षेत्रात कंपनी काम करते. कंपनीकडे चार खंडांमध्ये पसरलेल्या ११ उत्पादन सुविधा आहेत आणि ८० हून अधिक देशांमध्ये कंपनी कार्यरत आहे. गेल्या एक महिन्यापासून कंपनीच्या शेअरमध्ये ६.८३% वाढ झाली आहे तर ६ महिन्यात कंपनीच्या शेअरमध्ये ३९.८२% वाढ झाली आहे.

27 C