प्रभात वृत्तसेवा पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने आर्थिक दुर्बल, गुणवत्ताधारक व मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी दिलासा देणारा निर्णय घेत विविध अर्थसहाय्य योजनांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमात शिक्षण घेणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांना या योजनांचा लाभ घेता येणार असून, अर्ज करण्याची अंतिम मुदत १० जानेवारी आहे. पुणे विद्यापीठातील शैक्षणिक विभाग, संलग्न अस्वायत्त महाविद्यालयातील […] The post SPPU Scholarship: पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी ‘गुड न्यूज’! १६ हजारांपर्यंत मिळणार शिष्यवृत्ती; शेवटची तारीख जवळ appeared first on Dainik Prabhat .
प्रभात वृत्तसेवा पुणे – पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांचे अधिक काम आहे. तेथे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते खूप वर्षे काम करीत असल्याने सर्वांना लढण्याची संधी मिळावी म्हणूनच आम्ही वेगळे लढत आहोत, असे स्पष्टीकरण महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी दिले. महायुतीच्या पक्षांमध्ये मतभेद आणि मनभेद होणार नाहीत, याची काळजी […] The post Chandrashekhar Bawankule: पुणे आणि पिंपरीत भाजप-राष्ट्रवादी आमने-सामने! बावनकुळेंनी सांगितले वेगळे लढण्याचे कारण appeared first on Dainik Prabhat .
प्रभात वृत्तसेवा पुणे – पुणे ग्रँड चॅलेज टूर स्पर्धेची देश-विदेशात मोठ्या प्रमाणात उत्सुकता असून, या स्पर्धेच्या माध्यमातून देशाची प्रतिमा आंतरराष्ट्रीय पातळीवर उंचविणार आहे. त्यामुळे संपूर्ण स्पर्धेच्या अनुषंगाने कामे करताना गुणवत्तापूर्वक, दर्जेदार, टिकाऊ आणि वेळेत पूर्ण होतील, याकडे लक्ष द्यावे, सायकलपटूंना कोणताही त्रास होणार नाही, यादृष्टीने सर्व संबंधित विभागाने समन्वयाने कामे करावीत, असे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र […] The post Pune News: पुणे ग्रँड चॅलेज टूर अनुषंगाने कामे दर्जेदार आणि वेळेत करावी – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश appeared first on Dainik Prabhat .
Kamshet News: ग्रामसभेत उद्या खडाजंगी! करसवलतीच्या निर्णयाने विकासकामांना ब्रेक लागण्याची भीती
प्रभात वृत्तसेवा कामशेत – महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार ग्रामपंचायतींना घरपट्टी आणि इतर करांवर ५० टक्के सवलत देण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र ही सवलत लागू करण्यासाठी ग्रामसभेचा ठराव आवश्यक आहे. कामशेत ग्रामपंचायतीकडून हा ठराव उद्याच्या ग्रामसभेत मांडला जाण्याची शक्यता असून, त्यामुळे ग्रामपंचायतीच्या उत्पन्नावर मोठा परिणाम होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. कामशेत हे वेगाने विकसित होत […] The post Kamshet News: ग्रामसभेत उद्या खडाजंगी! करसवलतीच्या निर्णयाने विकासकामांना ब्रेक लागण्याची भीती appeared first on Dainik Prabhat .
Pune News: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! जमिनीची सर्व कामं आता घरबसल्या होणार; बावनकुळेंची मोठी घोषणा
प्रभात वृत्तसेवा पुणे – राज्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांची जमिनीशी संबंधित कामे घरबसल्या आणि विनासायास व्हावीत, यासाठी महसूल विभागाचे संपूर्ण डिजिटलायझेशन आणि आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. छोट्या- छोट्या तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांची कामे अडू नयेत, अशा सक्त सूचना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या आहेत.महसूल विभागाचे स्वतंत्र डाटा सेंटर आणि महसूल विभागाच्या तांत्रिक सक्षमीकरणाबाबतच्या उच्चस्तरीय बैठकीत ते […] The post Pune News: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! जमिनीची सर्व कामं आता घरबसल्या होणार; बावनकुळेंची मोठी घोषणा appeared first on Dainik Prabhat .
प्रभात वृत्तसेवा तळेगाव दाभाडे – तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासनाची सर्व तयारी पूर्ण झाली असून दुसऱ्या टप्प्यातील मतदान शनिवारी (दि. २०) होणार आहे. यासाठी चार प्रभागांमध्ये एकूण २० मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.प्रभाग क्रमांक २ साठी एमआयटी प्री-स्कूल कॅम्पस, मायमर हॉस्टेल कॅम्प येथे ६ मतदान केंद्रे, प्रभाग क्रमांक ७ साठी माउंट सेंट […] The post Talegaon Dabhade Election: शनिवारी मतदान, रविवारी निकाल! तळेगाव दाभाडेत प्रशासनाची तयारी पूर्ण; काउंटडाऊन सुरू appeared first on Dainik Prabhat .
रविवार ठरणार ‘सुपर संडे’! वडगाव नगरपंचायतीच्या निकालाकडे तालुक्याचे लक्ष; प्रशासनाची तयारी पूर्ण
प्रभात वृत्तसेवा वडगाव मावळ – वडगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी मतदान प्रक्रिया दि. २ डिसेंबर रोजी शांततेत पार पडली असून, राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतमोजणी रविवारी (दि. २१) सकाळी १० वाजता होणार आहे. मतमोजणी वडगाव नगरपंचायत सभागृहात पार पडणार आहे.मतमोजणीसाठी आवश्यक पोलीस बंदोबस्त तसेच प्रशासकीय यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली असून, एकूण सात मतमोजणी टेबलांची […] The post रविवार ठरणार ‘सुपर संडे’! वडगाव नगरपंचायतीच्या निकालाकडे तालुक्याचे लक्ष; प्रशासनाची तयारी पूर्ण appeared first on Dainik Prabhat .
Patas Bus Stand: पाटस येथील बसथांबा धूळखात! एसटी बसेस थांबत नसल्याने प्रवाशाची गैरसोय
प्रभात वृत्तसेवा पाटस – पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दौंड तालुक्यातील पाटस येथे आमदार राहुल कुल यांनी आमदार विकास निधीतून लाखो रुपये खर्च करून बस थांबा उभारले आहे. मात्र, बसथांबा याकडे ग्रामपंचायत प्रशासन आणि स्थानिक गाव नेत यांच्या दुर्लक्षामुळे प्रचंड दुरावस्था झाली आहे. या ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले असून धूळखात पडले आहे. पुणे येथील स्वारगेट आणि […] The post Patas Bus Stand: पाटस येथील बसथांबा धूळखात! एसटी बसेस थांबत नसल्याने प्रवाशाची गैरसोय appeared first on Dainik Prabhat .
Chakan Accident: भरधाव रिक्षाने घेतला बळी! कुरुळी गावच्या हद्दीत भीषण अपघात; मित्र गंभीर जखमी
प्रभात वृत्तसेवा चिंबळी – पुणे-नाशिक महामार्गावर एका भरधाव रिक्षाने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील तरुणाचा मृत्यू झाला, तर एकजण जखमी झाला आहे. ही घटना मंगळवारी (१६ डिसेंबर) रात्री पुणे-नाशिक हायवेवरील कुरुळी गावच्या हद्दीत स्पायसर चौक येथे घडली.या अपघातात संदीप जगरनाथ गुप्ता (वय २७) याचा मृत्यू झाला आहे. याबाबत मोहम्मद हानिफ खालिद (३४, नाणकरवाडी, चाकण; मूळ रा. […] The post Chakan Accident: भरधाव रिक्षाने घेतला बळी! कुरुळी गावच्या हद्दीत भीषण अपघात; मित्र गंभीर जखमी appeared first on Dainik Prabhat .
ओतूरमध्ये पोलिसांची धडक कारवाई! ५ दिवसांत ३.८७ लाखांचा ऐवज परत; आरोपीला अटक
प्रभात वृत्तसेवा ओतूर – ब्राह्मणवाडा रोडवरील संकल्प पॅराडाईजमध्ये झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा यशस्वी तपास लावून पोलिसांनी सुमारे ३ लाख ८७ हजार २०० रुपये किमतीचा चोरीला गेलेला मुद्देमाल फिर्यादीला परत केला आहे. पोलिसांच्या या तत्पर कामगिरीबद्दल नागरिकांमधून मोठे कौतुक होत असून सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांनी या संदर्भात सविस्तर माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार, येथील मंदाकिनी लक्ष्मण […] The post ओतूरमध्ये पोलिसांची धडक कारवाई! ५ दिवसांत ३.८७ लाखांचा ऐवज परत; आरोपीला अटक appeared first on Dainik Prabhat .
सुलतानपूरमध्ये पहाटे थरार! घोडनदीच्या काठी अखेर बिबट्या जेरबंद; ग्रामस्थांनी टाकला सुटकेचा निःश्वास
प्रभात वृत्तसेवा लाखणगाव – आंबेगाव तालुक्यातील सुलतानपूर येथे घोडनदीच्या काठालगत लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात सुमारे पाच वर्षे वयाची बिबट्याची मादी पकडण्यात वन विभागाला गुरुवार, दि. १८ रोजी पहाटे यश आले आहे.गेल्या काही दिवसांपासून या परिसरात बिबट्याचा मोठ्या प्रमाणावर वावर दिसून येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. अखेर स्थानिक पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांच्या सातत्यपूर्ण मागणीनंतर वन विभागाने […] The post सुलतानपूरमध्ये पहाटे थरार! घोडनदीच्या काठी अखेर बिबट्या जेरबंद; ग्रामस्थांनी टाकला सुटकेचा निःश्वास appeared first on Dainik Prabhat .
‘बकासूर’आणि साथीदारांची दहशत! दुचाकी अडवून कुटुंबाला बेदम मारहाण; चौघांवर गुन्हा
प्रभात वृत्तसेवा थेऊर – थेऊर – कोलवडी रस्त्यावरून घरी जात असताना दुचाकी रस्त्यात अडवून एकाच कुटुंबातील चार जणांना शिवीगाळ करून लाकडी बैटने पट्टी व दगडाने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या मारहाणीत एक महिला गंभीर जखमी झाली आहे.ही घटना थेऊर (ता. हवेली) हद्दीतील श्री चिंतामणी विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय शाळेच्या मेनगेट समोर मंगळवारी (दि. […] The post ‘बकासूर’ आणि साथीदारांची दहशत! दुचाकी अडवून कुटुंबाला बेदम मारहाण; चौघांवर गुन्हा appeared first on Dainik Prabhat .
माणुसकीची २२ वर्षे! सासवडच्या मातीत रुजली रक्तदानाची अखंड चळवळ; २५६ जणांचे रक्तदान
प्रभात वृत्तसेवा सासवड – (स्व) शिवाजी पोमन यांच्या निधनानंतर राहुल गिरमे यांनी रक्तदानाचे काम कायमस्वरूपी पुढे चालू ठेवले आहे, हे अतिशय उत्कृष्ट असून रक्तदानासारखे जे दान आहे ते अमूल्य दान आहे. ते अविरतपणे सुरू राहणे गरजेचे आहे. रक्त हे नाती रंग वर्ण न पाहता जीवदान देत असते. नोबेल हॉस्पिटलच्या वतीने अमूल्य दान ही संकल्पना राबवण्यात […] The post माणुसकीची २२ वर्षे! सासवडच्या मातीत रुजली रक्तदानाची अखंड चळवळ; २५६ जणांचे रक्तदान appeared first on Dainik Prabhat .
Mulshi Politics: ‘ठाकरे’गटाची मोठी चाल; गणेश शिर्के यांच्याकडे दिली ‘ही’महत्वाची जबाबदारी
प्रभात वृत्तसेवा पौड – कोंढावळे – शिर्केवाडा ( ता. मुळशी ) येथील गणेश तानाजी शिर्के यांची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पौड – आंबवणे विभागप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना भोर विधानसभा संपर्क प्रमुख किसन टिकेकर यांच्या हस्ते गणेश शिर्के यांना नुकतेच नियुक्तीपञ देण्यात आले.गणेश शिर्के यांनी याआधी भारतीय विद्यार्थी सेना शाखा कोंढावळेचे शाखाप्रमुख तसेच भारतीय […] The post Mulshi Politics: ‘ठाकरे’ गटाची मोठी चाल; गणेश शिर्के यांच्याकडे दिली ‘ही’ महत्वाची जबाबदारी appeared first on Dainik Prabhat .
Shikrapur Crime: ‘मटक्या’ने चोरी केली आणि धोंडीबाने माल घेतला; शिक्रापूर पोलिसांनी असा लावला छडा
प्रभात वृत्तसेवा शिक्रापूर – तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथे बंद घराचे कुलूप तोडून घरातील अडीच तोळे सोने व पन्नास हजार रुपये चोरणाऱ्या चोरट्यासह चोरीचा मुद्देमाल घेणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. नवनाथ उर्फ मटक्या ईश्वर भोसले असे चोरी करणाऱ्या चोरट्याचे, तर धोंडीबा अर्जुन उगले असे चोरीचा मुद्देमाल घेणाऱ्या आरोपीचे नाव आहे. तळेगाव ढमढेरे येथील शिक्षक […] The post Shikrapur Crime: ‘मटक्या’ने चोरी केली आणि धोंडीबाने माल घेतला; शिक्रापूर पोलिसांनी असा लावला छडा appeared first on Dainik Prabhat .
‘डिअर पँथर’ मराठी शॉर्टफिल्मची परदेशातही चर्चा
ऑस्कर नामांकित चित्रपट महोत्सवासाठी पात्र ठरलेला मराठी लघुपट ‘ डिअर पँथर ’ याची लंडन इथल्या प्रतिष्ठित लिफ्ट-ऑफ ग्लोबल नेटवर्क – लंडन लिफ्ट-ऑफ फिल्म फेस्टिव्हल २०२५ मध्ये अधिकृत निवड झाली आहे. जागतिक स्तरावरील उदयोन्मुख चित्रपट निर्मात्यांसाठी हा महोत्सव एक महत्त्वाचा आणि विश्वासार्ह मंच मानला जातो.सामाजिक वास्तवाचे प्रभावी व संवेदनशील चित्रण करणारा ‘डिअर पँथर’ हा लघुपट आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष चर्चेचा विषय ठरत आहे. या लघुपटाची कथा एका पीएच.डी. विद्यार्थ्याभोवती फिरते, जो आपल्या हक्काच्या घरासाठी स्थानिक महानगरपालिकेशी झुंज देतो. ही केवळ वैयक्तिक लढाई नसून, शासकीय अन्याय, व्यवस्थात्मक दुर्लक्ष आणि वाढत्या सामाजिक विषमतेविरुद्धचा व्यापक संघर्ष आहे. ‘असलेले’ आणि ‘नसलेले’ यांच्यातील वाढती दरी अधिक तीव्र होत असताना, ‘पँथर’ हे पात्र दडपल्या गेलेल्या वर्गाचा आवाज बनून पुढे येते.
ओटीटी पोर्टफोलिओमध्ये ‘अल्ट्रा प्ले’ आणि ‘अल्ट्रा झकास’ अॅप
भारतातील आघाडीचे ओटीटी अॅग्रीगेशन प्लॅटफॉर्म ‘टाटा प्ले बिंज’ने आपल्या पोर्टफोलिओमध्ये ‘अल्ट्रा प्ले’ आणि ‘अल्ट्रा झकास’ या दोन नवीन अॅप्सचा समावेश केला आहे. या अॅपमुळे आता प्रेक्षकांना हिंदी आणि मराठी भाषेतील दर्जेदार मनोरंजनाचा खजिना एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे.हिंदी चित्रपटांचा मोठा संग्रह: ‘अल्ट्रा प्ले’हिंदी भाषिक प्रेक्षकांसाठी ‘अल्ट्रा प्ले’ हे अॅप खास पर्वणी ठरणार आहे. यामध्ये १९४३ पासूनचे क्लासिक चित्रपट ते आधुनिक ब्लॉकबस्टर चित्रपटांचा समावेश आहे. यात गदर : एक प्रेम कथा, ३ इडियट्स, दबंग, क्रिश, अंदाज अपना अपना आणि गजनी यांसारख्या सुपरहिट चित्रपटांसोबतच वेब सिरीज आणि डब केलेले दाक्षिणात्य व हॉलिवूड चित्रपटही पाहता येणात आहेत.मराठी संस्कृतीचे दर्शन : ‘अल्ट्रा झकास’मराठी प्रेक्षकांसाठी ‘अल्ट्रा झकास’ हे अॅप ४,००० तासांहून अधिक मराठी कंटेंट ऑफर करते. यात बेटर हाफची लव्ह स्टोरी, जिलेबी, एक डाव भुताचा यांसारख्या लोकप्रिय कार्यक्रमांसह १५०० हून अधिक शीर्षके उपलब्ध आहेत.३६ अॅप्ससह भारतातील सर्वात मोठा प्लॅटफॉर्मया दोन नवीन अॅप्सच्या समावेशामुळे टाटा प्ले बिंज आता ३६ अॅप्ससह भारतातील सर्वसमावेशक प्लॅटफॉर्म बनला आहे. टाटा प्लेच्या मुख्य कमर्शियल आणि कंटेंट ऑफिसर पल्लवी पुरी यांनी सांगितले की, या नवीन अॅप्समुळे आमची हिंदी आणि मराठी ऑफरिंग अधिक मजबूत झाली आहे, तर अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेन्मेंटचे व्यवस्थापकीय संचालक सुशीलकुमार अग्रवाल यांनी या सहयोगाला प्रादेशिक कंटेंट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा महत्त्वाचा टप्पा मानले आहे. आता टाटा प्ले बिंजच्या सबस्क्राइबर्सना प्राइम व्हिडिओ, झी ५, अॅपल टीव्ही+, आणि हंगाामा यांसारख्या ३० हून अधिक अॅप्ससोबतच ‘अल्ट्रा’च्या या नवीन सेवांचा आनंद एकाच प्लॅटफॉर्मवर घेता येईल.
गरज सरो, वैद्य मरो! निवडणूक संपताच मंचरच्या ‘साहेबां’ना मतदारांचा विसर? वाचा सविस्तर
प्रभात वृत्तसेवा मंचर – मंचर नगरपंचायत निवडणूक प्रक्रिया पार पडली असली तरी निवडणूक संपताच राजकीय पदाधिकाऱ्यांची सर्वसामान्य कार्यक्रमातील उपस्थिती अचानक कमी झाल्याचे चित्र दिसून येत आहे. विशेषतः दशक्रिया विधी, अंत्यविधी किंवा सामाजिक दुःखातील कार्यक्रमांमध्ये त्यांची उपस्थिती नगण्य प्रमाणात असल्याचे दिसून येते. निवडणुकीपूर्वी मतदारांच्या घरापर्यंत जाऊन समर्थन मागणारे, पायापडून विनंती करणारे अनेक राजकीय पुढारी आता निवडणूक […] The post गरज सरो, वैद्य मरो! निवडणूक संपताच मंचरच्या ‘साहेबां’ना मतदारांचा विसर? वाचा सविस्तर appeared first on Dainik Prabhat .
प्रभात वृत्तसेवा शिक्रापूर – कस्तुरी शिक्षण संस्थेच्या कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समिती यांच्या वतीने आयोजित पुरुष व महिला गटासाठीची आंतरमहाविद्यालयीन रोड सायकलिंग स्पर्धा २०२५ नुकतीच उत्साहात पार पडली. युवकांमध्ये सायकलिंगची आवड निर्माण करणे व शारीरिक तंदुरुस्तीबाबत जनजागृती करणे या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले […] The post Shikrapur News: शिक्रापूरच्या रस्त्यावर सायकल स्पर्धा उत्साहात! ‘या’ पठ्ठ्याने मारली बाजी; पाहा निकालाची संपूर्ण यादी appeared first on Dainik Prabhat .
प्रभात वृत्तसेवा मंचर – हुतात्मा बाबू गेनू सागर डिंभे धरणाच्या उजव्या कालव्याला पाणी सोडण्यात आल्यामुळे आंबेगाव आणि शिरूर तालुक्यातील एकूण ४५ गावांमधील रब्बी हंगामातील शेती पिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. दीर्घकाळ पावसाअभावी आणि अपुऱ्या पाणीसाठ्यामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांसाठी हे पाणी जीवनदायी ठरणार आहे. उजव्या कालव्यातील पाण्याचा लाभ प्रामुख्याने ऊस, गहू, बटाटा, कांदा आदी पिकांना होणार […] The post Manchar News: ४५ गावांची चिंता मिटली! डिंभे धरणाचे पाणी उजव्या कालव्याला सोडल्याने शेतकऱ्यांना दिलासा appeared first on Dainik Prabhat .
‘हिमालयाची सावली’ नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर
जेन-झींना शरद पोंक्षेंनी दिला मोलाचा सल्लाप्रा.वसंत कानेटकर लिखित आणि राजेश देशपांडे दिग्दर्शित ‘हिमालयाची सावली’ हे अजरामर नाटक पुन्हा एकदा मराठी रंगभूमीवर अवतरले आहे. मोरया भूमिका आणि अथर्व निर्मित हे नाटक समाजासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या ‘हिमालयाच्या’ पाठीशी उभ्या राहिलेल्या ‘सावली’चे, म्हणजेच त्यांच्या पत्नीचे, मन हेलावून टाकणारे आयुष्य दर्शवणारे आहे. या महत्त्वपूर्ण भूमिकेत ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे आणि अभिनेत्री शृजा प्रभुदेसाई असून, पोंक्षे यांनी नाटकाच्या भावनिक गाभ्यावर आणि आजच्या तरुण पिढीसाठी असलेल्या त्याच्या महत्त्वाबद्दल मनमोकळेपणाने भाष्य केले आहे. या नाटकात विघ्नेश जोशी, जयंत घाटे, सृजन देशपांडे, प्राची रिंगे, सोनाली राजे, चैतन्य राव, ओंकार कर्वे आणि विजय मिरगे या कलाकारांचा समावेश आहे.नानासाहेब आणि त्यांच्या सावलीची वेदनाशरद पोंक्षे या नाटकात ‘नानासाहेब’ ही भूमिका साकारत आहेत, जे आपल्या जीवनात समाजकार्याला सर्वोच्च स्थान देतात. ते सांगतात, आज आपण आजूबाजूला जे समाजकारण आणि राजकारण पाहतो त्यात नानासाहेब हे समाजकारण करणारे आहेत. पोंक्षे यांच्या मते, हे नाटक नानासाहेबांचे नसून, त्यांच्या ‘सावली’चे आहे. ते एका अत्यंत महत्त्वाच्या सत्याकडे लक्ष वेधतात: आयुष्यात बायका-मुलांचा तरी संसार करता येतो किंवा समाजाचा तरी प्रपंच करता येतो. या दोघांची मोट बांधू पाहणारे दोन्हीकडे पराभूतच होतात.ते पुढे म्हणतात, आपल्याकडे छत्रपती शिवाजी महाराज, मोहनदास करमचंद गांधी, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, महर्षी कर्वे यांसारखे अनेक ‘हिमालय’ होऊन गेले. त्यांच्या पत्नींच्या, म्हणजेच त्यांच्या ‘सावल्यांच्या’ वाट्याला जे भयानक आयुष्य आले, ते हे नाटक दर्शवते. म्हणायला मोठ्या माणसाची बायको, पण सुख कितीसं पदरात पडलं? पण ही माणसं कधी एकाची नव्हतीच. ते समाजाचेच होते. हे नाटक त्याच सावलीची गोष्ट सांगते.भव्यता, शिकवण आणि आवाहन‘हिमालयाची सावली’ हे नाटक केवळ मनोरंजन नाही, तर ते ‘खऱ्या आयुष्यात हिमालय व्हायला शिकवणारं’ आहे. शरद पोंक्षे तरुण पिढीला उद्देशून सांगतात की, भविष्यात तुम्हाला जे काही व्हायचं आहे ते होत असताना, आपण काम करतो त्या कामाच्या ठिकाणाशी आणि कामाशी किती प्रामाणिक रहावं, किती बांधिलकी पाळावी, हे शिकवतं. दिग्दर्शक राजेश देशपांडे यांनी १९१० सालचे हे नाटक अत्यंत उत्तम पद्धतीने बसवले आहे. तेव्हाची मराठी भाषा, लोकांचे बोलणे आणि राहणीमान, तसेच तेव्हाचा पेहराव हे सर्व प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. दरम्यान, यावेळी शरद पोंक्षे नाट्य रसिकांना कळकळीची विनंती केली की ‘हिमालयाची सावली’सारखी जी नाटकं असतात ती अत्यंत खर्चीक नाटकं असतात. सध्याची जी ५-६ पात्रांची नाटकं येतात त्यांच्या दोन प्रयोगांचा खर्च म्हणजे हिमालयाची सावली नाटकाच्या एका प्रयोगाचा खर्च आहे. अशा दर्जेदार नाटकांना प्रेक्षकांचा आशीर्वाद लाभणे फार आवश्यक आहे.
लोक शिव्या द्यायचे तेव्हा त्रास व्हायचा : मिलिंद गवळी
मिलिंद गवळी यांनी आजवर अनेक मालिका, चित्रपटांमध्ये काम केले आहे. नुकतीच त्यांची ‘वचन दिले तू मला’ ही नवीन मालिका सुरू झाली आहे. यानिमित्ताने त्यांनी यातील त्यांची भूमिका आणि ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील भूमिकांबद्दलची माहिती दिली. ते म्हणाले की, ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील त्यांच्या पात्रामुळे लोक खूप शिव्या द्यायचे. पण ‘वचन दिले तू मला’ या नवीन मालिकेतील भूमिकेबद्दल म्हणाले, हर्षवर्धन जहागीरदारची ही भूमिकासुद्धा खूप रंजक आहे. त्याला कायद्याची खूप जाण आहे. ते वकिलांचे कुटुंब आहे. मला वकिलाची भूमिका करायचीच होती. पण ती भूमिका सकारात्मक आहे की नकारात्मक हे लेखक, दिग्दर्शक, निर्माते, वाहिनी ठरवेल माझ्याकडे जेव्हा भूमिका येते तेव्हा मी कधीच त्याकडे नकारात्मक आहे या पद्धतीने पाहत नाही. अनिरुद्धकडेही मी कधीच नकारात्मक दृष्टीने पाहिले नव्हते. अनिरुद्ध एक चांगला मुलगा होता. आई-वडिलांवर प्रेम करणारा, मुलांवर प्रेम करणारा, बायकोवर अन्याय करतो; पण तो ती चूक कबूलही करतो. अशा खूप चांगल्या गोष्टींचा विचार करून, मी ती भूमिका करत होतो. लोक शिव्या देत होते. सुरुवातीला मला थोडा त्रास व्हायचा; पण नंतर मला लक्षात आले की, ते प्रेम आहे.
Manchar Election: एका मताला १० हजार? मंचर निवडणुकीत पैशांचा पाऊस; आकडा ऐकून थक्क व्हाल
प्रभात वृत्तसेवा मंचर – मंचर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात चुरस पाहावयास मिळाली. काही प्रभागांमध्ये उमेदवारांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात रोख रकमेचा वापर केल्याची चर्चा शहरभर जोरात सुरू आहे. या प्रकारामुळे निवडणूक लढवण्यापेक्षा मतदार होणेच फायदेशीर ठरत असल्याच्या प्रतिक्रिया उमेदवार खाजगी बैठकी मध्ये देत आहे. अनेक मतदारांनी पैसे स्वीकारल्याची माहिती स्थानिक […] The post Manchar Election: एका मताला १० हजार? मंचर निवडणुकीत पैशांचा पाऊस; आकडा ऐकून थक्क व्हाल appeared first on Dainik Prabhat .
प्रभात वृत्तसेवा मंचर – दिवाळीचा उत्सव संपून अनेक दिवस झाले असले तरी ग्रामीण भागात रात्री उशिरापर्यंत फटाके फुटत असल्याचा आवाज कायम ऐकू येत आहे. मात्र, हे फटाके सणाचे नसून ‘बिबट्याला हूसंकावण्यासाठी’ वापरले जाणारे सुरक्षा उपाय असल्याचे वास्तव समोर आले आहे. ग्रामीण भागात ‘बिबट्या सुरक्षा अलर्ट’ सुरूच आहे. आंबेगाव, जुन्नर, शिरूर पट्ट्यातील अनेक गावांमध्ये गेल्या काही […] The post Manchar News: दिवाळी संपली तरी रात्री फटाक्यांचा धुरळा का? ग्रामीण भागातल्या ‘त्या’ आवाजामागचं भयानक वास्तव appeared first on Dainik Prabhat .
Bhigwan News: ६ मृत्यूंनंतर पोलिसांची जागृती; भिगवण-शेटफळगढे मार्गावर ऊस वाहतूकदारांना धडा
प्रभात वृत्तसेवा भिगवण – वाहतूक नियमांचे उल्लंघन करून बेशिस्तपणे ऊस वाहतूक करणाऱ्या १२ ते १३ ट्रॅक्टरवर भिगवण पोलिसांकडून कारवाई करण्यात आल्याची माहिती भिगवण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे यांनी दिली. भिगवण ते शेटफळगढे या रस्त्यावरील ट्रॅक्टर वाहतूकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी भिगवण पोलिसांनी कठोर पावले उचलायला सुरुवात केली आहे. मदनवाडी येथील घाटात बारा ते तेरा […] The post Bhigwan News: ६ मृत्यूंनंतर पोलिसांची जागृती; भिगवण-शेटफळगढे मार्गावर ऊस वाहतूकदारांना धडा appeared first on Dainik Prabhat .
प्रभात वृत्तसेवा रांजणी ( रमेश जाधव ) – राज्याच्या ग्रामीण सत्तेचा कणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका केव्हा होणार ? हा सर्वसामान्य मतदाराला पडलेला प्रश्न आहे. खरे तर जिल्हा परिषद ही ग्रामीण भागातील सत्तेचा कणा समजली जाते. पाणी,रस्ते,आरोग्य, शिक्षण, महिला बालकल्याण या सगळ्या प्रश्नांची नाडी जिल्हा परिषदेच्या हातात असते. त्यामुळे जिल्हा […] The post ZP Election: १४ जिल्हे ‘सेफ’, पण १८ जिल्ह्यांचे काय? जिल्हा परिषद निवडणुकांचा ‘हा’ मोठा अडथळा आला समोर appeared first on Dainik Prabhat .
प्रभात वृत्तसेवा चिखली – दुबई येथे नुकत्याच पार पडलेल्या ओशन मॅन ओपन वॉटर वर्ल्ड फायनल चॅम्पियनशिप या आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित सागरी जलतरण स्पर्धेत पिंपरी-चिंचवड शहरातील पाच भारतीय जलतरणपटूंनी उल्लेखनीय कामगिरी करत देशाचा नावलौकिक वाढवला. या स्पर्धेत तब्बल ६८ हून अधिक देशांतील ८८६ आंतरराष्ट्रीय दर्जाचे जलतरणपटू सहभागी झाले होते. या जागतिक स्पर्धेत पिंपरी-चिंचवडच्या जलतरणपटूंनी विविध वयोगटांत […] The post Oceanman World Final: दुबईत पिंपरी-चिंचवडचा डंका; ६८ देशांच्या स्पर्धेत ‘या’ पाच भारतीयांनी रचला इतिहास..पहा appeared first on Dainik Prabhat .
प्रभात वृत्तसेवा पिंपरी – श्री जैन विद्या प्रसारक मंडळ संचलित श्रीमती गेंदीबाई ताराचंद चोपडा हायस्कूल व ज्यूनिअर कॉलेज मध्ये वार्षिक स्नेहसंमेलनव पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला .या प्रसंगी संस्थेचे मानद सचिव राजेंद्रकुमार मुथा, कार्याध्यक्ष शांतीलाल लुंकड, कोषाध्यक्ष प्रकाशचंद चोपडा यांनी शुभेच्छा दिल्या. सहाय्यक सेक्रेटरी अनिलकुमार कांकरिया , विश्वस्त जयप्रकाश राका, नवीनचंद लुंकड, चंद्रकांत भन्साळी, प्रकाशचंद […] The post Pimpri News: महावीर वंदना ते देशभक्तीपर गीते; श्रीमती गेंदीबाई विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात appeared first on Dainik Prabhat .
प्रभात वृत्तसेवा सातारा – शहरालगतच्या महादरे येथील भारतातील पहिल्या फुलपाखरु संवर्धन राखीव क्षेत्राला वन विभागाने वेळीच योग्य संरक्षण पुरवणे गरजेचे बनले आहे. या परिसरामध्ये खासगी प्लॉटिंगचे प्रस्थ वाढू लागल्यामुळे येथील जैवविविधता धोक्यात आली आहे. वन विभागाने हद्दीमध्ये कुंपण करून येथील जैवविविधतेला संरक्षण द्यावे आणि फुलपाखरु राखीव क्षेत्राचा बचाव करावा, अशी मागणी पर्यावरण प्रेमींनी केली आहे. […] The post Satara News: भारतातील पहिल्या फुलपाखरू उद्यानाला खासगी प्लॉटिंगचा विळखा; निसर्गाची अनमोल ठेव धोक्यात? appeared first on Dainik Prabhat .
दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १९ डिसेंबर २०२५
पंचांगआज मिती मार्गशीर्ष अमावस्या शके १९४७.चंद्र नक्षत्र ज्येष्ठा. योग शूल चंद्र राशी वृश्चिक ,भारतीय सौर २८ मार्गशीर्ष शके १९४७.शुक्रवार दिनांक १९ डिसेंबर २०२५ ,मुंबईचा सूर्योदय ०७.०५, मुंबईचा सूर्यास्त ०६.०४, मुंबईचा चंद्रोदय नाही मुंबईचा चंद्रास्त ०६.०४ राहू काळ ११.१२ ते १२.३५, मार्गशीर्ष अमावास्या-दर्शवेळा अमावास्या-दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)मेष : मनासारखा खर्च करू शकाल.वृषभ : सामाजिक ठिकाणी गौरव व कौतुक होईल.मिथुन : मोठे धनलाभ होऊ शकतात.कर्क : स्वतःच्या बोलण्यावर नियंत्रण आवश्यक आहे.सिंह : मोठ्या व्यक्तिगत सुवार्ता मिळतील.कन्या : आहारावर नियंत्रणाची गरज.तूळ : नोकरीसाठी दिलेल्या मुलाखतीतून यश मिळेल. वृश्चिक : इतरांवर आपली मते लादू नका.धनू : नवीन योजनाअमलात आणू शकता.मकर : जुनी येणी येतील. कुंभ : मनाला समाधान देणार्या घटना घडतील.मीन : प्रेमात यश मिळेल
भाजप आमदार राम कदमांनी पाच वर्षांनी कापले केस, कारण जाणून घ्याल तर चक्रावून जाल
मुंबई : भारतीय जनता पक्षाचे घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार राम कदम यांनी तब्बल पाच वर्षांनंतर सार्वजनिक ठिकाणी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत केस कापले. केस कपाताना माईक हातात घेऊन राम कदम यांनी केस पाच वर्ष वाढवण्याचे कारण स्वतःच जाहीर केले. पाण्याबाबत जनजागृतीसाठी राम कदमांनी कापले केस..#prahaarnewsline #MarathiNews #RamKadam #WaterAwareness pic.twitter.com/ZQ7OiDQGm6— Prahaar Newsline (@PrahaarNewsline) December 18, 2025जोपर्यंत घाटकोपरची पाण्याची समस्या सुटत नाही तोपर्यंत केस कापणार नाही, असा संकल्प राम कदम यांनी केला होता. हा संकल्प पूर्ण झाला म्हणून तब्बल पाच वर्षांनंतर घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार राम कदम यांनी केस कापत असल्याचे जाहीर केले. मुंबईच्या पूर्व उपनगरांमध्ये घाटकोपरचा समावेश होतो. या घाटकोपरमध्ये लोकसंख्या झपाट्याने वाढत असताना एकच चौदा लाख लिटरची पाण्याची मोठी टाकी होती. यामुळे स्थानिकांना पाणी टंचाईच्या समस्येचा वारंवार सामना करावा लागत होता. घाटकोपरमध्ये पाण्याची गंभीर समस्या होती. ही समस्या सुटेपर्यंत केस कापणार नाही, असा संकल्प राम कदम यांनी केला. यानंतर पाठपुरावा करुन प्रशासकीय यंत्रणेच्या संपर्कात राहून राम कदम यांनी घाटकोपरसाठी २२ लाख लिटर क्षमतेची पाण्याची महाकाय टाकी उभारण्याचा निर्णय घेतला. भांडुप पासून घाटकोपरपर्यंत चार किमी. लांबीची जलवाहिनी टाकून नागरिकांना पाणी उपलब्ध होईल अशी व्यवस्था केली. आता ही व्यवस्था मार्गी लागत असल्याचे पाहून राम कदम यांनी केस कापण्याचा निर्णय घेतला. महाकाय टाकीमुळे घाटकोपर पश्चिमची पाण्याची समस्या सुटणार असल्याचे राम कदम म्हणाले. जनतेच्या प्रश्नांना सदैव प्राधान्य देतो आणि देणार असेही त्यांनी सांगितले. राम कदमांच्या कार्याचे नागरिक कौतुक करत आहेत.
‘व्हीबी-जी राम-जी’ लोकसभेत मंजूर, विरोधकांनी मंत्री शिवराजसिंह चौहानांच्या अंगावर फेकले कागद
नवी दिल्ली : देशातील ग्रामीण जनतेला दोन दशके रोजगाराची हमी देणाऱ्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे नाव आणि स्वरूप बदलणारे ‘व्हीबी-जी राम-जी’ विधेयक लोकसभेत मंजूर झाले आहे. विरोधी पक्षांनी या विधेयकाला सभागृहात कडाडून विरोध केला. विरोधी खासदारांच्या गोंधळादरम्यान सरकारने हे विधेयक पारित केले आहे. यावेळी निषेध म्हणून विरोधकांनी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या अंगावर कागद फेकले. गेल्या काही दिवसांपासून या विधेयकावरून वाद होत आहे.नव्या रोजगार हमी योजनेतून ‘महात्मा गांधी’ हे नाव वगळण्यात आले असून या योजनेचे ‘विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड अजीविका मिशन’ (व्हीबी-जी-राम-जी) असं नामांतर करण्यात आले आहे. विरोधकांनी आरोप केला आहे की सरकार जाणीवपूर्वक महात्मा गांधींचे नाव हटवू पाहतेय. दुसऱ्या बाजूला सत्ताधाऱ्यांनी याबाबत म्हटले आहे की विकसित भारताची आपली योजना डोळ्यासमोर ठेवून आम्ही योजनेत बदल करत आहोत.बापू आमच्यासाठी आदर्श : शिवराज सिंह चौहानशिवराज सिंह चौहान म्हणाले, विरोधी पक्ष बापूंच्या (महात्मा गांधी) विचारांचा खून करत आहे. काल सभागृहात मी मध्यरात्री दिड वाजेपर्यंत सर्व सदस्यांची मते ऐकली. मात्र, आता ते आमचे काही ऐकूनच घेत नाहीत. केवळ आपण बोलायचे, समोरच्या बाकावरील खासदारांचे काही ऐकूनच घ्यायचे नाही ही देखील एक प्रकारची हिंसा आहे. बापू आमच्यासाठी आदर्श आहेत. ते आम्हाला प्रेरणा देतात. आम्ही महात्मा गांधींच्या विचारांवर चालत आहोत. म्हणूनच भाजपने आपल्या पंचनिष्ठेमध्ये महात्मा गांधीजींच्या समाजिक, आर्थिक विचारांना सर्वप्रथम स्थान दिले आहे. केंद्रीय कृषीमंत्री म्हणाले, मनरेगाऐवजी केंद्र सरकारच्या व्हीबी-जी राम जी /ई योजनेचे प्रमुख उद्दीष्ट म्हणजे विकसित भारत २०४७ या पंतप्रधान मोदींच्या संकल्पाला हातभार लावणे. मोदींच्या राष्ट्रीय व्हिजनला अनुरूप असा ग्रामीण विकासाचा पाया रचणं हे या योजनेचं उद्दीष्ट आहे. मागील २० वर्षांमध्ये मनरेगाने ग्रामीण कुटुंबांना रोजगार दिला. परंतु, गावांमध्ये अलीकडच्या काळात अनेक सामाजिक व आर्थिक बदल झाले आहे. त्या आधारावर आता ही योजना अधिक व्यापक व मजबूत करणे आवश्यक आहे. आम्ही नेमके तेच करत आहोत.लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांकडून नाराजी व्यक्तदरम्यान, सभागृहात विरोधकांनी विधेयकाची प्रत फाडून भिरकावल्याबद्दल लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. आपण सभागृहात जनतेचे मुद्दे मांडायला हवेत. गदारोळ केल्याने आणि विधेयकाची प्रत फाडून फेकल्याने, प्रश्न सुटणार नाही, अशा शब्दात त्यांनी विरोधकांना फटकारले. दरम्यान, विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी करत कागदाचे तुकडे भिरकावल्याने सभागृहाचे कामकाज शुक्रवारपर्यंत तहकूब करण्यात आले आहे.
भारतात अणुऊर्जा क्षेत्रात खासगी गुंतवणुकीला परवानगी देणाऱ्या विधेयकाला संसदेची मंजुरी
नवी दिल्ली : भारतात अणुऊर्जा क्षेत्रात खासगी गुंतवणुकीला परवानगी देणाऱ्या विधेयकाला राज्यसभेची मंजुरी मिळाली आहे. यामुळे देशातील कडक नियमन असलेल्या नागरी अणुऊर्जा क्षेत्रात खासगी गुंतवणुकीला परवानगी मिळाली आहे. हे विधेयक बुधवारी लोकसभेत मंजूर झाले आहे. आता राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर या विधेयकाचे कायद्यात रुपांतर होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स पोस्ट करुन विधेयकाला संसदेच्या दोन्ही सभागृहांची मंजुरी मिळाल्याबाबत आनंद व्यक्त केला. हा भारताच्या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात 'परिवर्तनाचा क्षण' असे पंतप्रधान मोदी यांनी एक्स पोस्टमध्ये नमूद केले आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांनी शांती विधेयक मंजूर करणे हा आपल्या तंत्रज्ञान परिसंस्थेसाठी एक परिवर्तनाचा क्षण आहे. ते मंजूर करण्यासाठी मदत करणाऱ्या खासदारांचा मी आभारी आहे. एआयला सुरक्षितपणे सक्षम करण्यापासून ते हरित उत्पादन सक्षम करण्यापर्यंत, हा देश आणि जगासाठी स्वच्छ-ऊर्जेच्या स्वरुपात भविष्याला मोठी चालना देणार आहे. यामुळे खासगी क्षेत्र आणि आपल्या तरुणांसाठी असंख्य संधी देखील खुल्या होणार आहेत. गुंतवणूक, नवोन्मेष आणि मेक इन इंडियासाठी ही सर्वोत्तम वेळ आहे; असेही पंतप्रधान मोदींनी एक्स पोस्टमध्ये नमूद केले आहे.याआधी राज्यसभेत चर्चेला उत्तर देताना, अणुऊर्जा विभागाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह म्हणाले की, हे विधेयक भारताला अणुऊर्जेमध्ये स्वावलंबी बनवण्याच्या आणि इतर ऊर्जा स्रोतांवरील अवलंबित्व कमी करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे. ते म्हणाले की, अणुऊर्जा २४x७ विश्वसनीय वीज प्रदान करते, तर इतर अक्षय ऊर्जा स्रोतांमध्ये ही सातत्यता नसते. भारतात सध्या ८.९ गीगावॉट अणुऊर्जा निर्मिती होते. आता २०४७ पर्यंत देश १०० गीगावॉट अणुऊर्जा निर्मिती करण्याचे लक्ष्य ठेवून काम करणार आहे.
Wagholi News : वाघोलीत कोयत्याने वाहनांची तोडफोड करून दहशत माजवणाऱ्यांना अटक
वाघोली : वाघोलीत वाहनांची तोडफोड करून नुकसान करीत, रस्त्यावरील दुकानांचे सीसीटीव्ही कॅमेरे कोयत्याने तोडून दहशत पसरविणाऱ्या वाघोलीतील पाच पैकी चार अल्पवयीन मुलांना गुन्हे शाखा युनिट ६ च्या पोलिसांनी ताब्यात घेतले असून आणखी एका तरुणाचा शोध पोलीस घेत आहेत. याप्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाघोली येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या पाठीमागे, वाघोली-लोहगाव […] The post Wagholi News : वाघोलीत कोयत्याने वाहनांची तोडफोड करून दहशत माजवणाऱ्यांना अटक appeared first on Dainik Prabhat .
Sourav Ganguly 50 crore defamation suit : फुटबॉलचा महान खेळाडू लिओनेल मेस्सीच्या कोलकाता दौऱ्यादरम्यान सॉल्ट लेक स्टेडियमवर झालेला गोंधळ आता कायदेशीर वादात अडकला आहे. भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालचे (CAB) अध्यक्ष सौरव गांगुली यांनी अर्जेंटिना फॅन क्लबचे अध्यक्ष उत्तम साहा यांच्याविरोधात ५० कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल केला आहे. कोलकाता […] The post Sourav Ganguly : मेस्सीच्या कार्यक्रमातील गोंधळ गांगुलींच्या जिव्हारी; अर्जेंटिना फॅन क्लबच्या अध्यक्षावर मानहानीचा दावा appeared first on Dainik Prabhat .
Share Market : सलग पाचव्या दिवशी शेअर निर्देशांकात घट
मुंबई : भारतीय रुपयाचे मूल्य निचांकी पातळीवर असतानाच भारत- अमेरिका करार होण्याची शक्यता स्पष्ट होत नाही. अशा परिस्थितीत परदेशी गुंतवणूकदाराकडून विक्री चालू असल्यामुळे सलग पाचव्या दिवशी शेअर बाजाराचे निर्देशांक कमी पातळीवर बंद झाले. निर्देशांक घसरत आहेत. मात्र विक्रीचा जोर कमी आहे. ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब समजली जाते. गुरुवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 77 […] The post Share Market : सलग पाचव्या दिवशी शेअर निर्देशांकात घट appeared first on Dainik Prabhat .
...म्हणून टीव्ही अभिनेत्यावर झाला हल्ला, डोक्यात मारला दंडुका
मुंबई : टीव्ही अभिनेता अनुज सचदेवावर त्याच्याच सोसायटीच्या आवारात पाठीमागून येऊन डोक्यात दंडुका मारण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. दंडुका मारुन संबंधित व्यक्ती घटनास्थळावरुन शिवीगाळ करत पळून गेली. या घटनेत टीव्ही अभिनेता अनुज सचदेवाच्या डोक्याच्या मागील भागात जखम झाली. हल्लेखोराने अनुजच्या पायावर पण दंडुका मारला. यामुळे त्याच्या एका पायाला जखम झाली आहे. जखमी झालेल्या अनुज सचदेवाने तातडीने उपचार घेतल्यामुळे आता त्याची प्रकृती स्थिर आहे.
नवी दिल्ली : जपान आणि चीनमध्येही त्यांच्या वाढत्या विकासदराच्या काळात चलनाचे मूल्य कमी झाले होते. त्यामुळे सध्या घसरत असलेल्या रुपयाच्या मूल्याबद्दल आपल्याला फारसे चिंता नाही असे मत पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे सदस्य संजय यांनी व्यक्त केले आहे.एका माध्यम समूहाने आयोजित केलेल्या आर्थिक परिषदेत बोलताना संन्याल म्हणाले की, 1990 पासून रुपयाचे मूल्य जागतिक चलन बाजारानुसार ठरवू […] The post Sanjeev Sanyal : रुपया घसरण्याची चिंता नाही ! पंतप्रधान आर्थिक सल्लागार परिषद सदस्य संजीव संन्याल यांचे प्रतिपादन appeared first on Dainik Prabhat .
डेहराडून : डेहराडून येथील इंडियन मिलिटरी अकादमी (आयएमए) मध्ये महाराष्ट्राच्या लेकीने नवीन इतिहास घडविला आहे. कोल्हापूरची सई जाधव ही डेहराडून येथील आयएमएमध्ये प्री-कमिशनिंग प्रशिक्षण पूर्ण करणारी पहिली महिला टेरिटोरियल आर्मी अधिकारी ठरली आहे. या कामगिरीसह तिने या संस्थेची ९३ वर्षांची केवळ पुरुष अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणाची परंपरा मोडीत काढली आहे. २३ वर्षीय सई जाधवला १५७व्या तुकडीच्या पासिंग […] The post Saee Jadhav : महाराष्ट्राच्या लेकीने रचला इतिहास! कोल्हापूरची सई जाधव ठरली टेरिटोरियल आर्मीची पहिली महिला लेफ्टनंट appeared first on Dainik Prabhat .
Jharkhand Won SMAT 2025 Title : पुण्याच्या गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२५ स्पर्धेचा सामना पार पडला. या सामन्यात इशान किशनच्या नेतृत्वाखाली झारखंडने हरियाणाचा ६९ धावांनी पराभव करत पहिल्यांदाच या प्रतिष्ठेच्या चषकावर आपले नाव कोरले. झारखंडच्या फलंदाजांनी आणि गोलंदाजांनी केलेल्या अष्टपैलू कामगिरीमुळे हरियाणाचा संघ दबावाखाली पूर्णपणे विखुरलेला पाहायला मिळाला. झारंखडने […] The post SMAT 2025 Title : झारखंडने रचला इतिहास! इशानच्या नेतृत्त्वाखाली पहिल्यांदाच सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीवर कोरलं नाव appeared first on Dainik Prabhat .
Kolhapur bench : कोल्हापूर खंडपीठाचा मार्ग मोकळा ! विरोधातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
Kolhapur bench | Supreme Court – कोल्हापूर उच्च न्यायालय खंडपीठाच्या स्थापनेला दिलेले आव्हान सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावत न्यायप्रवेशाच्या मूलभूत संकल्पनेला बळ दिले आहे. सर्वसामान्य नागरिकांना सुलभ, जलद आणि परवडणारा न्याय मिळावा, या संविधानिक तत्त्वानुसार कोल्हापूर खंडपीठाची स्थापना करण्यात आली आहे. कोल्हापूर खंडपीठाच्या स्थापनेविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. ही सुनावणी न्या. […] The post Kolhapur bench : कोल्हापूर खंडपीठाचा मार्ग मोकळा ! विरोधातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली appeared first on Dainik Prabhat .
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या अडचणीत वाढ, आयकर विभागाची घरावर पडली धाड
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या अडचणीत वाढ झाल्याचे वृत्त आहे. आयकर विभागाच्या पथकाने शिल्पा शेट्टीच्या घरावर धाड टाकली आहे. शिल्पाचा पती राज कुंद्रा याच्या हॉटेल बॅस्टियन रेस्टॉरंटशी संबंधित आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू आहे. हॉटेलशी संबंधित संशयास्पद आर्थिक व्यवहार आणि कर भरणा प्रकरणाची आयकर विभागाचे पथक चौकशी करत आहे. राज कुंद्राच्या खासगी तसेच व्यावसायिक आर्थिक व्यवहारांची कसून तपासणी होत आहे.आयकर विभागाने मुंबई आणि बंगळुरू येथे धाडी टाकून तपास सुरू केला आहे. यामुळे शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राच्या अडचणीत वाढ झाल्याचे वृत्त आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, पुणे, बंगळुरू आणि गोव्यात बास्टियन नावाने क्लब आणि रेस्टॉरंट चालवणाऱ्या बास्टियन हॉस्पिटॅलिटीच्या आर्थिक व्यवहारांची कसून चौकशी सुरू आहे. आतापर्यंत मुंबई, पुणे, बंगळुरू येथे आयकर विभागाने ठिकठिकाणी धाडी टाकल्याचे समजते. याआधी बुधवारी बंगळुरू पोलिसांनी बास्टियनसह दोन रेस्टॉरंट्सविरुद्ध त्यांच्या परवानगी दिलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ काम केल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. शिल्पा शेट्टीकडे बास्टियन गार्डन सिटीमध्ये ५० टक्के हिस्सा असल्याचे वृत्त आहे.आयकर विभागाने चर्च स्ट्रीटवरील बास्टियन पबवरही छापा टाकला. या कारवाईची माहिती अद्याप जाहीर झालेली नसली तरी, आता शिल्पाच्या मुंबईतील घरावरही छापा टाकण्यात आल्याचे वृत्त आहे.बास्टियन गार्डन सिटी रेस्टॉरंट हे उद्योगपती रणजीत बिंद्रा यांनी स्थापन केलेल्या बास्टियन हॉस्पिटॅलिटीद्वारे चालवले जाते. वृत्तानुसार, शिल्पा शेट्टीने २०१९ मध्ये या उपक्रमात गुंतवणूक केली होती.
महसूलमंत्र्यांच्या आश्वासनानंतर महसूल कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन स्थगित
मुंबई : महाराष्ट्र राज्य महसूल अधिकारी व कर्मचारी समन्वय महासंघाने आपल्या प्रलंबित आर्थिक आणि सेवाविषयक मागण्यांसाठी पुकारलेले राज्यव्यापी कामबंद आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि महासंघाच्या प्रतिनिधींमध्ये गुरुवारी, (दि. १८ ) मंत्रालयात झालेल्या बैठकीत सकारात्मक आश्वासन दिल्यानंतर हा पवित्रा घेण्यात आला असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य महसूल अधिकारी व कर्मचारी समन्वय महासंघाच्यावतीने देण्यात आली आहे.मंत्रालयात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनात आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत मावळ (पुणे) येथील प्रकरणातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे निलंबन चौकशी अहवालानंतर तीन दिवसांत मागे घेण्यासह, पालघरमधील कर्मचाऱ्यांचे निलंबनही तातडीने रद्द करण्याचे आश्वासन देण्यात आले. बावनकुळे यांनी सांगितले की, अनावधानाने झालेल्या चुकीला एकवेळ माफ करता येईल. पण जाणीवपूर्वक केलेल्या चुकीला माफी मिळणार नाही. सरकार व जनतेच्या कामात अधिकाऱ्यांचा कसूर माफीयोग्य नसेल.बैठकीत एकूण १३ विषयांवर चर्चा करण्यात आली. त्यानुसार जिल्हाधिकारी स्तरावर झालेली गौण खनिज विषयक सर्व कारवाई मागे घेण्याचे निर्देश मंत्र्यांनी दिले असून, अनधिकृत वाहतूक रोखण्यासाठी नवीन प्रणाली विकसित करण्यात येईल, ज्यामुळे कर्मचाऱ्यांना रात्री-अपरात्री घटनास्थळी जाण्याचा त्रास होणार नाही. नायब तहसीलदार, मंडल अधिकारी व महसूल सहायकांच्या वेतन श्रेणी वाढीचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर करण्याचे, तसेच महसूल सेवकांचे आंदोलन काळातील वेतन देण्याचे आदेशही यावेळी देण्यात आले. पोलीस विभागाच्या धर्तीवर नायब तहसीलदार पदासाठी अंतर्गत परीक्षा घेण्याबाबतची मागणी मान्य करण्यात आली असून, अर्धन्यायिक प्रकरणातील पोलीस हस्तक्षेपाबाबत मंत्री महोदय स्वतः मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत.बैठकीला महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष जीवन आहेर, महाराष्ट्र राज्य तलाठी पटवारी मंडलाधिकारी समन्वय महासंघाचे अध्यक्ष विजय टेकाळे, महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष दीपक चव्हाण, महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे अध्यक्ष निळकंठ उगले, विदर्भ पटवारी संघ नागपूरचे अध्यक्ष बाळकृष्ण गाढवे, महाराष्ट्र राज्य महसूल सेवक संघटनेचे राज्य अध्यक्ष नामदेव शिंदे, चतुर्थश्रेणी महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष शंतनू गायकवाड, आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हा तलाठी संघाचे सरचिटणीस एम.जी. गवस आदी उपस्थित होते.कोणाच्याही दबावाखाली चुकीचे काम करू नकामहसूल मंत्र्यांनी सर्व महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांना विशेषत्वाने आश्वस्त केले आहे की, त्यांनी कोणाच्याही दबावाखाली चुकीचे काम करू नये. जर कोणी चुकीच्या कामासाठी आग्रह धरून त्रास देत असेल, तर ती बाब तातडीने मंत्र्यांच्या निदर्शनास आणून द्यावी.ग्रेड-पे आणि पदोन्नतीवर भरनायब तहसीलदारांच्या ग्रेड-पेचा विषय मार्गी लावण्यासाठी शासन सकारात्मक आहे. तसेच, महसूल आणि भूमी अभिलेख विभागाचा नवीन 'आकृतीबंध' तयार करण्याचे काम सुरू असून त्यात संघटनांच्या सूचना विचारात घेतल्या जातील. तलाठ्यांसाठी नवीन लॅपटॉप लवकरच दिले जातील. आतापर्यंत सुमारे ७५० अधिकाऱ्यांची पदोन्नती करण्यात आली असून यात अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकाऱ्यांना प्राधान्य दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Shashi Tharoor : क्रिकेटप्रेमींची फसवणूक करू नका; शशी थरूर यांचा बीसीसीआयला सल्ला
नवी दिल्ली : भारत आणि दक्षिण आफ्रिकामधील चौथा टी-20 सामना दाट धुके आणि प्रदुषणामुळे रद्द करण्याची नामुष्की ओढवली. त्यावरून कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) मिश्कील शैलीत सल्ला दिला. डिसेंबरच्या मध्यापासून ते जानेवारीच्या मध्यापर्यंत उत्तर भारताऐवजी दक्षिण भारतात सामने खेळवले जावेत, असे त्यांनी सुचवले. तसेच, क्रिकेटप्रेमींना फसवणूक झाल्याचे वाटू देऊ […] The post Shashi Tharoor : क्रिकेटप्रेमींची फसवणूक करू नका; शशी थरूर यांचा बीसीसीआयला सल्ला appeared first on Dainik Prabhat .
सौदी अरेबियाने हाकलून दिले ५६ हजार पाकिस्तानी भिकारी
रियाध : तेलाच्या विहिरी तसेच मक्का आणि मदिना यामुळे इस्लाम धर्मियांमध्ये प्रचंड महत्त्व असलेल्या सौदी अरेबिया या देशाने मोठी कारवाई केली. या कारवाईअंतर्गत सौदी अरेबियाने त्यांच्या देशात बेकायदा वास्तव्य करत भीक मागत असलेल्या ५६ हजार पाकिस्तानी भिकाऱ्यांना देशातून हाकलून दिले. सौदीच्या शाही सुरक्षा पथकांनी पाकिस्तानी भिकाऱ्यांना विमानात बसवून पाकिस्तानला पाठवून दिले. पाकिस्तानमध्ये पाठवण्याआधी सौदीने भिकाऱ्यांचे फोटो काढून त्यांची रितसर नोंद केली. या भिकाऱ्यांना सौदीत पुन्हा भीक मागण्यासाठी प्रवेश दिला जाणार नाही. एका अहवालानुसार पाकिस्तानचे भिकारी परदेशात भिकेच्या स्वरुपात दरवर्षी ४२ अब्ज रुपयांची कमाई करतात. पण हे भिकारी संबंधित देशातील नागरिकांना वेगवेगळ्या प्रकारे इतका त्रास देतात की संबंधित देशाचे सरकार काही महिन्यांनी किंवा काही वर्षांनी भिकाऱ्यांना जबरदस्तीने पाकिस्तानमध्ये पाठवून देते. हे प्रकार वारंवार होत असले तरी दरवर्षी बनावट कागदपत्रे दाखवून हजारो पाकिस्तानी भिकारी भीक मागण्यासाठी सौदी अरेबियासह विविध आखाती देशांमध्ये प्रवेश करतात. यामुळे पाकिस्तानी भिकारी ही आखाती देशांसाठी एक नवी गंभीर समस्या झाली आहे. सौदी अरेबिया, यूएई, ओमान हे देश तर पाकिस्तानच्या भिकाऱ्यांच्या त्रासाने त्रस्त झाले आहेत.
“वैद्यकीय वादांवर स्वतंत्र यंत्रणेची गरज”–ॲड. श्रीकांत ठाकूर
पुणे – रुग्णालय आणि रुग्ण यांच्यातील वाद वारंवार रस्त्यावर येत असतील, तर दोष केवळ व्यक्तींचा नसून त्वरित, निपक्ष आणि विश्वासार्ह निर्णय देणारी स्वतंत्र यंत्रणा अस्तित्वात नसणे हे त्यामागचे मुख्य कारण आहे. वैद्यकीय कायदा २०१० मधील कलम ७ अंतर्गत राज्यात स्वतंत्र प्राधिकरणाची स्थापना झाल्यास अशा घटना टाळता येऊ शकतात. त्यामुळे रुग्ण, डॉक्टर आणि राज्य यांच्यातील घटनात्मक […] The post “वैद्यकीय वादांवर स्वतंत्र यंत्रणेची गरज” – ॲड. श्रीकांत ठाकूर appeared first on Dainik Prabhat .
रेशन कार्डधारकांसाठी नवे नियम व अटी लागू; अपात्र लाभार्थ्यांवर कारवाईची तयारी
मुंबई : सार्वजनिक वितरण व्यवस्थेत वर्षानुवर्षे सुरू असलेल्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलली आहेत. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत दिले जाणारे रेशन केवळ पात्र आणि गरजू कुटुंबांपर्यंतच पोहोचावे, या उद्देशाने अन्न व ग्राहक संरक्षण विभागाने विशेष तपासणी आणि पडताळणी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेमुळे बनावट नावे आणि अपात्र लाभार्थी नोंदी उघडकीस येणार असून रेशन व्यवस्थेत पारदर्शकता वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.सरकारच्या निर्देशानुसार आता केवळ कागदपत्रांवर अवलंबून न राहता प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन रेशन कार्डांची पडताळणी केली जाणार आहे. संशयास्पद, चुकीच्या किंवा नियमबाह्य नोंदी आढळल्यास त्या थेट संगणक प्रणालीतून वगळल्या जाणार आहेत.आधार लिंक करणे बंधनकारक?या विशेष मोहिमेचा मुख्य आधार म्हणजे ई-केवायसी प्रक्रिया. रेशन कार्ड आधारशी लिंक करणे आता अनिवार्य करण्यात आले आहे. ज्या लाभार्थ्यांनी अद्याप ई-केवायसी पूर्ण केलेली नाही, त्यांना भविष्यात रेशन मिळण्यात अडचणी येऊ शकतात. त्यामुळे ग्रामपातळीपासून शहरांपर्यंत याबाबत जनजागृती करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत, जेणेकरून केवळ माहितीच्या अभावामुळे कोणतेही पात्र कुटुंब लाभापासून वंचित राहू नये.या प्रक्रियेचा फायदा काय?या पडताळणी प्रक्रियेमुळे रेशन व्यवस्थेतील अनावश्यक नावे कमी होतील. अपात्र लाभार्थी आपोआप वगळले गेल्याने साठ्याचा गैरवापर थांबेल. तसेच ज्या कुटुंबांना खरोखर अन्नधान्याची गरज आहे, त्यांना वेळेवर आणि पूर्ण प्रमाणात रेशन मिळण्यास मदत होईल. यामुळे सार्वजनिक वितरण व्यवस्था अधिक सक्षम आणि विश्वासार्ह बनेल, असा प्रशासनाचा दावा आहे.ई-केवायसी म्हणजे काय?ई-केवायसी ही एक डिजिटल ओळख पडताळणी प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत रेशन कार्डधारकाची ओळख आधार कार्डच्या माध्यमातून बायोमेट्रिक पद्धतीने तपासली जाते. फिंगरप्रिंट किंवा आयरिस स्कॅनद्वारे ही पडताळणी केली जाते. ही प्रक्रिया पूर्ण न झाल्यास संबंधित रेशन कार्डवरील धान्य वितरण थांबवले जाऊ शकते.ई-केवायसी कशी करावी?ई-केवायसी करण्यासाठी लाभार्थ्यांनी आपल्या जवळच्या रेशन दुकानात जावे. कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड आणि रेशन कार्ड सोबत नेणे आवश्यक आहे. रेशन दुकानदाराकडे उपलब्ध असलेल्या पीओएस मशीनद्वारे बोटांचे ठसे किंवा डोळ्यांचे स्कॅन घेऊन ही प्रक्रिया पूर्ण केली जाते.
Bomb Threat : ‘मुंबई, नागपूर’मध्ये बॉम्बस्फोटाच्या धमकीचे ईमेल; सर्वत्र पसरतले भीतीचे वातावरण
Mumbai | Nagpur | Bomb blast – मुंबई आणि नागपूरमध्ये प्रमुख संस्थांना लक्ष्य करत, बॉम्बस्फोटाच्या धमक्या देणाऱ्या ईमेलमुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलिसांनी आणि बॉम्ब नाशक पथकाने व्यापक तपासणी केल्यानंतर कोणतेही स्फोटक पदार्थ न आढळल्याने या सर्व धमक्या अफवा असल्याचे घोषित करण्यात आले. बॉम्बे उच्च न्यायालय, अनेक स्थानिक न्यायालये आणि प्रमुख वित्तीय […] The post Bomb Threat : ‘मुंबई, नागपूर’ मध्ये बॉम्बस्फोटाच्या धमकीचे ईमेल; सर्वत्र पसरतले भीतीचे वातावरण appeared first on Dainik Prabhat .
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंना मोठा धक्का ! ‘या’जिल्ह्यात पदाधिकाऱ्यांनी दिले सामूहिक राजीनामे
रायगड : महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने नुकतीच राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा केली असून, १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान आणि १६ जानेवारी २०२६ रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरू असताना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला (शिंदे गट) रायगड जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे. उरण विधानसभा मतदारसंघ आणि परिसरात शिवसेनेच्या अनेक […] The post Eknath Shinde : एकनाथ शिंदेंना मोठा धक्का ! ‘या’ जिल्ह्यात पदाधिकाऱ्यांनी दिले सामूहिक राजीनामे appeared first on Dainik Prabhat .
वरळी सी लिंक वर २५० च्या स्पीडने पळवली लंबोर्गिनी; पोलिसांनी घडवली अद्दल
मुंबई : मुंबईतील वांद्रे–वरळी सी लिंकवर भरधाव वेगात आणि अत्यंत धोकादायक पद्धतीने लॅम्बोर्गिनी उरूस चालवण्याचा प्रकार उघडकीस आला असून, पोलिसांनी कोट्यवधी रुपयांची ही आलिशान कार जप्त केली आहे. वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन करत स्टंटबाजी करण्यात आल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत चालकाविरोधात गुन्हा दाखल केला.बुधवारी घडलेल्या या घटनेत सी लिंकसारख्या महत्त्वाच्या आणि वर्दळीच्या मार्गावर गंभीर अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती. इंस्टाग्रामवर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये पिवळ्या रंगाची लॅम्बोर्गिनी इतर वाहनांना ओव्हरटेक करत भरधाव वेगात जाताना स्पष्टपणे दिसत आहे. या मार्गावर ताशी ८० किलोमीटरची वेगमर्यादा असताना, कार अत्यंत वेगाने चालवली जात असल्याचे व्हिडीओतून स्पष्ट झाले.व्हिडीओच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आणि कार चालवणाऱ्या व्यक्तीची ओळख पटवली. फैज अदनवाला (वय ३६) या मुंबईत खारमध्ये राहणाऱ्या कार डीलरने वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे उघड झाले. प्राथमिक चौकशीत त्याने सोशल मीडियासाठी व्हिडीओ शूट करताना कार भरधाव चालवल्याची कबुली दिली.वांद्रे–वरळी सी लिंकसारख्या महत्त्वाच्या पुलावर अशा प्रकारे बेदरकार वाहन चालवणे इतरांच्या जीवाला धोका निर्माण करू शकते, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असेही पोलिसांनी स्पष्ट केले. या प्रकरणी संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई सुरू आहे.
खेड - मंडणगड मार्गावर भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
खेड : खेड–मंडणगड मार्गावर एसटी बस आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वाराचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी जिल्ह्यातील खेड–मंडणगड मार्गावरील भिलारे–आयनी गावाजवळ गुरुवारी (१८ डिसेंबर) दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. मंडणगडहून खेडकडे येणाऱ्या एसटी बस आणि खेडकडून दुचाकीवर जात असलेल्या विलास कोरपे (रा. आयनी, चव्हाणवाडी) यांची समोरासमोर जोरदार धडक झाली.धडक इतकी तीव्र होती की विलास कोरपे यांचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला. अपघाताची माहिती मिळताच स्वामी नरेंद्र महाराज संस्थेची रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाली; मात्र तोपर्यंत विलास कोरपे यांचा मृत्यू झाला होता. या अपघातानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून काही काळ वाहतूकही विस्कळीत झाली होती. घटनेची नोंद संबंधित पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
Murlidhar Mohol – देशातील सहकारी संस्थांमार्फत कृषी, दुग्ध, मत्स्य व सेंद्रिय उत्पादनांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळावी आणि शेतकऱ्यांना योग्य दर मिळावा, या उद्देशाने २०२३ मध्ये राष्ट्रीय सहकारी निर्यात मर्यादित (एनसीईएल)ची स्थापना करण्यात आली आहे. देशातील विविध राज्य व केंद्रशासित प्रदेशातील सुमारे १६ हजारांपेक्षा सहकारी संस्था एनसीईएलच्या सदस्य झाल्या आहेत. एनसीईएलमार्फत विविध राज्यातील खास पदार्थांची निर्यातही सुरू […] The post Murlidhar Mohol : “सहकारी संस्थांच्या निर्यातीस चालना देण्यासाठी एनसीईएलची स्थापना”; मुरलीधर मोहोळ यांची लोकसभेत माहिती appeared first on Dainik Prabhat .
नवी दिल्ली : कॉंग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची २७ डिसेंबरला दिल्लीत बैठक होणार आहे. त्यामध्ये देशातील सध्याची राजकीय स्थिती आणि इतर प्रमुख मुद्द्यांवर चर्चा होणार असल्याचे समजते. काही राज्यांतील विधानसभा निवडणुका जवळ येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळेही संबंधित बैठकीचे महत्व वाढले आहे.बिहारमध्ये नुकतीच विधानसभा निवडणूक झाली. ती कॉंग्रेस आणि मित्रपक्षांना मोठा राजकीय हादरा देणारी ठरली. त्या निवडणुकीनंतर कॉंग्रेसच्या […] The post Congress Meeting : ‘या’ दिवशी होणार कॉंग्रेस कार्यकारिणीची महत्वपूर्ण बैठक; बैठकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष appeared first on Dainik Prabhat .
Ishan Kishan record breaking century in SMAT 2025 : भारतीय क्रिकेट संघात पुनरागमनासाठी सज्ज असलेल्या युवा यष्टीरक्षक-फलंदाज इशान किशनने आपल्या बॅटने निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये झारखंड संघाचे नेतृत्व करणाऱ्या इशान ने ‘सय्यद मुश्ताक अली टी-२० ट्रॉफी २०२५’ च्या अंतिम सामन्यात हरियाणाविरुद्ध धडाकेबाज शतक झळकावून नवा इतिहास रचला आहे. केवळ ४५ चेंडूंमध्ये झळकावले […] The post Ishan Kishan Century : इशानने SMAT फायनलमध्ये झळकावले वादळी शतक! हरियाणाच्या गोलंदाजांची उडाली दाणादाण appeared first on Dainik Prabhat .
Mumbai : मुंबईत भुयारी मेट्रो सेवा कोलमडली.! तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय
मुंबई – मुंबईतील पहिल्या आणि महत्त्वाकांक्षी भुयारी मेट्रो-३ सेवेला आज पुन्हा तांत्रिक बिघाडाचा फटका बसला. दक्षिण मुंबईतील सीएसएमटी स्थानकाजवळ भुयारात मेट्रो काही काळासाठी बंद पडल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाल्याचे दिसून आले. मेट्रोच्या दरवाजांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ते वारंवार उघड-बंद होत होते. यामुळे खबरदारी म्हणून मेट्रो काही वेळ थांबविण्यात आली होती. त्यामुळे या बिघाडाचा परिणाम संपूर्ण […] The post Mumbai : मुंबईत भुयारी मेट्रो सेवा कोलमडली.! तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय appeared first on Dainik Prabhat .
१) आम्ही शांत बसणार नाही.! मुंडेंच्या कमबॅकची शक्यता, सुप्रिया सुळेंचा इशारा : नाशिकच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने मंत्री माणिकराव कोकाटे यांना फसवणूक प्रकरणात २ वर्षांची शिक्षा सुनावलीये. यानंतर त्यांना मंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागलं असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची खाती तातडीने उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे सोपवलीयेत. कोकाटेंच्या जागी आता माजी मंत्री धनंजय मुंडे मंत्रिमंडळात कमबॅक करण्याची […] The post टॅरिफ माझा प्रिय शब्द.! सुप्रिया सुळेंचा इशारा ते पृथ्वीराज चव्हाण यांची हकालपट्टी…; TOP 10 News वाचा एका क्लिकवर appeared first on Dainik Prabhat .
सोलापूर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या पंढरपूरच्या विठ्ठल मूर्तीच्या चरणांची झीज होत आहे. याबाबत पुरातत्व विभागाच्या तज्ज्ञांनी विठ्ठल मूर्तीची पाहणी करून अहवाल सादर करण्यात आला आहे. याबाबत शासनाच्या विधी व न्याय विभागाने परवानगी दिल्यावर विठ्ठल मूर्तीवर वज्रलेप होणार आहे. दरम्यान, यापूर्वीही पांडूरंगाच्या चरणांची झीज झाली होती. त्यावेळी वज्रलेप लावण्यात आला होता. यावेळी ही हीच प्रक्रीया […] The post Solapur News : महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरपूरच्या विठ्ठल मूर्तीच्या चरणांची झीज; पुरातत्व विभागाकडून अहवाल सादर appeared first on Dainik Prabhat .
अनधिकृत ‘एलईडी’ मासेमारी करणाऱ्यांना मत्स्यव्यवसाय विभागाचा दणका
मंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार गस्ती मोहीम; तीन नौकांवर कठोर कारवाईमुंबई : महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत अनधिकृत ‘एलईडी’ मासेमारी करणाऱ्यांना मत्स्यव्यवसाय विभागाने दणका दिला आहे. मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार राबवलेल्या विशेष गस्ती मोहिमेत रायगड जिल्ह्यातील तीन नौका जप्त करण्यात आल्या असून, त्यावरील एलईडी मासेमारीचे सर्व साहित्यही विभागाने ताब्यात घेतले आहे.रायगड जिल्ह्यातील सागरी भागात अनधिकृत एलईडी पद्धतीने मासेमारी करणाऱ्या नौकांवर मत्स्यव्यवसाय विभागाने १७ आणि १८ डिसेंबर रोजी रात्री आणि सकाळी धाडी घातल्या. १७ डिसेंबर रोजी रात्री ९:३० वाजता केलेल्या पहिल्या कारवाईत जगन्नाथ कोळी यांच्या मालकीची ‘साई गणेश’ ही नौका अनधिकृत एलईडी पद्धतीने मासेमारी करताना विभागाच्या गस्ती नौकेने पकडली. त्याच दिवशी रात्री ११ वाजता अलिबागलगत यशवंत नाखवा यांची ‘हेरंब कृपा’ ही नौका अनधिकृत एलईडी लाइट्स वापरून मासेमारी करताना आढळली आणि तीही जप्त करण्यात आली.तिसरी कारवाई १८ डिसेंबर रोजी सकाळी ६ वाजता उरण तालुक्यातील तुकाराम पाटील यांच्या ‘श्रीसमर्थ कृपा’ या नौकेवर करण्यात आली. विभागाच्या गस्ती नौकेने तपासणी केली असता या नौकेत मोठ्या प्रमाणात अनधिकृत एलईडी साहित्य आढळले. या कारवाईत ४ हजार वॅटचे अंडर वॉटर एलईडी लाइट्स, १ हजार वॅटचे सीया लाइट्स, ४०० वॅटचे हॅलोजन बल्ब आणि जनरेटर असे साहित्य जप्त करण्यात आले. ही कारवाई सहआयुक्त (सागरी) महेश देवरे, प्रादेशिक उपायुक्त मत्स्यव्यवसाय मुंबई नागनाथ भादुले, परवाना अधिकारी ससून गोदी, परवाना अधिकारी करंजा, परवाना अधिकारी मिरकरवाडा (रत्नागिरी) आणि परवाना अधिकारी साखरीनाटे (रत्नागिरी) यांच्या उपस्थितीत पार पाडण्यात आली.
बंगळुरू : घरात लहान मूल असताना क्षणभराचे दुर्लक्षही किती मोठी किंमत मोजायला लावू शकते, याचा हृदयद्रावक अनुभव असिस्टंट डायरेक्टर कीर्तन नाडगौडाला आला आहे. KGF २ मध्ये असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केलेले कीर्तन नादगौडा यांच्या साडेचार वर्षीय मुलाचा अपघाती मृत्यू झाल्याची दु:खद घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे.कीर्तन नादगौडा यांचा मुलगा सोनार्श हा खेळता खेळता लिफ्टमध्ये गेला आणि त्याच दरम्यान तो लिफ्टमध्ये अडकला. या अपघातात त्याला गंभीर दुखापत झाली. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.नेमकं काय घडलं?ही घटना सोमवारी, १५ डिसेंबर रोजी घडली. साडेचार वर्षांचा सोनार्श घरात खेळत असताना अचानक लिफ्टमध्ये गेला. काही क्षणांतच अपघात घडला आणि परिस्थिती हाताबाहेर गेली. अपघाताची तीव्रता इतकी होती की रुग्णालयात पोहोचेपर्यंत उशीर झाला. या घटनेने नादगौडा कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.कीर्तन नादगौडा यांनी KGF २ या गाजलेल्या चित्रपटात दिग्दर्शक प्रशांत नील यांच्यासोबत असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केले होते. सध्या ते ‘मैत्री मुव्ही मेकर्स’च्या एका मोठ्या आगामी प्रोजेक्टवर काम करत होते. करिअरच्या महत्त्वाच्या टप्प्यावर असताना आलेल्या या वैयक्तिक आघातामुळे तो पूर्णपणे हादरले आहेत. या दु:खद घटनेनंतर चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार आणि तंत्रज्ञांनी सोशल मीडियावर शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.
TVF (द व्हायरल फीव्हर) हे भारतातील सर्वात मोठ्या कंटेंट प्रोड्यूसर्सपैकी एक असून, प्रेक्षकांना सातत्याने सर्वाधिक आवडणारा, रिलेटेबल आणि मनोरंजक कंटेंट देत आले आहे. OTT स्पेसला नव्या अर्थाने परिभाषित करण्यात TVFची महत्त्वाची भूमिका राहिली आहे आणि प्रेक्षकांची नाडी TVFइतकी अचूकपणे कोणीच ओळखत नाही, हे त्यांनी पुन्हा पुन्हा सिद्ध केले आहे. आपल्या शोद्वारे TVFने अनेक उत्तम कलाकारांना व्यासपीठ दिले आहे आणि मोना सिंग देखील आपल्या OTT करिअरच्या सुरुवातीचे श्रेय याच प्लॅटफॉर्मला देते.अलीकडेच मोना सिंग यांनी टेलिव्हिजनवरून OTT कडे झालेल्या आपल्या प्रवासाबद्दल बोलताना त्यासाठी TVFचे आभार मानले. त्या म्हणाल्या, “2020 च्या लॉकडाऊननंतर सगळ्यांनीच OTT स्वीकारले, कारण आपण सगळे घरी बसून कंटेंट पाहत होतो. पण माझ्यासाठी, एक कलाकार आणि एक माणूस म्हणून, टीव्हीचा प्रवास पुरेसा झाला होता. मी टीव्हीवर जवळपास सगळेच प्रकारचे काम केले होते. टीव्ही मला पुढे काहीतरी नवीन देऊ शकत नव्हता. तेव्हा मला वाटले की आता पुढचे मोठे पाऊल उचलायला हवे, जरी ते नेमके काय असेल हे मला माहीत नव्हते.मी यूट्यूबवर TVFच्या अनेक वेब सिरीज पाहत असे आणि त्यांच्यापासून खूप प्रेरणा मिळाली. त्या खूपच रिअल आणि रिलेटेबल वाटायच्या. त्याच काळात मी TVFसोबत माझी पहिली वेब सिरीज ये मेरी फॅमिली केली. तिथूनच माझ्या OTT प्रवासाची सुरुवात झाली आणि त्यानंतर मागे वळून पाहण्याची वेळच आली नाही. आज मी हा काळ सेलिब्रेट करते आहे—वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारते आहे, चित्रपट, OTT आणि सगळ्याचा योग्य तो समतोल साधण्याचा प्रयत्न करते आहे. एकूणच, OTT माझ्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहे.”मोना सिंग यांनी TVFसोबत ये मेरी फॅमिली या सिरीजमध्ये काम केले. त्या आधीच टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील एक परिचित चेहरा असल्या, तरी त्यांच्या OTT करिअरची खरी सुरुवात TVFसोबतच झाली—आणि त्यानंतर इतिहास घडत गेला. यावरून स्पष्ट होते की TVFने नेहमीच खऱ्या आणि असाधारण टॅलेंटवर विश्वास ठेवला आहे.याशिवाय, भारतातील डिजिटल स्टोरीटेलिंगला नवे रूप देण्यात TVFची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. 2014 मध्ये परमनंट रूममेट्सपासून वेब सिरीज क्रांतीची सुरुवात केल्यानंतर, TVFने पिचर्स, ट्रिपलिंग, अॅस्पिरंट्स, पंचायत, कोटा फॅक्टरी आणि गुल्लक यांसारखे दर्जेदार आणि लक्षात राहणारे शो दिले आहेत. नव्या टॅलेंटला संधी देणे आणि आयुष्याशी जोडलेल्या कथा मांडणे यामुळे TVFने असे एक युनिव्हर्स तयार केले आहे, ज्यावर प्रेक्षकांचा विश्वास आहे आणि ज्याच्याशी ते भावनिकदृष्ट्या जोडले गेले आहेत.प्रेक्षक आणि समीक्षकांकडून मिळणारी सातत्यपूर्ण दाद यावर्षी मिळालेल्या अनेक नामांकनांमधूनही स्पष्टपणे दिसून येते. नेहमी काहीतरी नवीन करण्याचा विचार करणारा TVF आता एका नव्या क्रिएटिव्ह क्षेत्रात पाऊल टाकत आहे—VVAN – Force of the Forest या प्रोजेक्टसह, जो एकता कपूर यांच्या बालाजी मोशन पिक्चर्स आणि अरुणाभ कुमार यांच्या द व्हायरल फीव्हर यांच्यातील एक विशेष सहयोग आहे.
KKR ला मोठा झटका! हुकमी एक्का IPL 2026 सोडून मायदेशी परतणार; काय आहे कारण?
Mustafizur Rahman will miss 8 days in IPL 2026 : आयपीएलच्या १९ व्या हंगामाचा बिगुल २६ मार्चपासून वाजण्याची शक्यता आहे. १६ डिसेंबर रोजी अबू धाबी येथे झालेल्या लिलावात कोलकाता नाइट रायडर्सने (KKR) मोठी बोली लावत आपला संघ मजबूत केला. मात्र, हंगाम सुरू होण्यापूर्वीच केकेआरच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. संघाचा नवा प्रमुख वेगवान गोलंदाज […] The post KKR ला मोठा झटका! हुकमी एक्का IPL 2026 सोडून मायदेशी परतणार; काय आहे कारण? appeared first on Dainik Prabhat .
Beed News : बीडमध्ये कॉलेजवरून परतणाऱ्या विद्यार्थिनीचे अपहरण; तपासासाठी पोलिसांची पथके तयार
बीड : बीड जिल्ह्यातील गेवराई शहराच्या मध्यवर्ती भागात गुरुवारी दुपारी कॉलेजमधून घरी परतणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचे दोन तरुणांनी अपहरण केले आहे. ही घटना दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास पंचायत समिती कार्यालयाच्या रस्त्यावर घडली. मुलगी कॉलेजमधून पायी घरी परतत असताना दोन तरुणांनी तिला अडवले. आरोपींनी तिच्यावर हल्ला केला आणि तिला जबरदस्तीने एका कारमध्ये ढकलून, जालना जिल्ह्यातील अंबड […] The post Beed News : बीडमध्ये कॉलेजवरून परतणाऱ्या विद्यार्थिनीचे अपहरण; तपासासाठी पोलिसांची पथके तयार appeared first on Dainik Prabhat .
Satara News : लाखो भाविकांच्या उपस्थितीत श्री सेवागिरी रथोत्सव उत्साहात संपन्न
पुसेगाव : संपूर्ण राज्यात आणि उत्तर कर्नाटकामध्ये प्रसिध्द असलेल्या लाखो भाविकांचे श्रद्धास्थान श्री सेवागिरी महाराजांच्या ७८ व्या स्मृतिदिनानिमित्त निघालेल्या रथाच्या मिरवणुकीत लाखो भाविक सहभागी झाले होते.कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष ना.महेश शिंदे,राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, आमदार शशिकांत शिंदे व आमदार मनोज घोरपडे यांच्या हस्ते आज सकाळी दहा वाजता रथपूजन झाले. रथपूजन सोहळ्यास मठाधिपती सुंदरगिरी महाराज, सेवागिरी […] The post Satara News : लाखो भाविकांच्या उपस्थितीत श्री सेवागिरी रथोत्सव उत्साहात संपन्न appeared first on Dainik Prabhat .
माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा स्वीकारला
मुंबई : बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिका मिळवल्याप्रकरणी नाशिक सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा कायम ठेवल्यानंतर क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांनी मंगळवारी नैतिकतेच्या आधारावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला होता. अजित पवार यांनी गुरुवारी तो स्वीकारून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवला.कोकाटे यांनी सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात बुधवारी उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, न्यायालयाने तातडीच्या सुनावणीस नकार दिल्याने, त्यांच्या अडचणीत वाढ झाली. कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी झाल्याने, त्यांच्याकडील खाते काढून घेण्याची शिफारस बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे केली. त्यानुसार, कोकाटे यांच्याकडील खाते काढून ते अजित पवार यांच्याकडे सोपविण्यात आले. त्यानंतर, कोकाटे यांचा राजीनामा स्वीकारून तो मंजुरीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठवल्याची माहिती अजित पवार यांनी गुरुवारी समाज माध्यमांद्वारे दिली.
पुणे : यंदाच्या खरीप हंगामात राज्यातील अनेक भागांत अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी पिके आडवी झाली, उत्पादनात घट झाली तर काही भागांत संपूर्ण पीकच हातचे गेले. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सुमारे ३१ हजार कोटी रुपयांचे मदत पॅकेज जाहीर करत पीक विमा योजनेतून प्रति हेक्टर १७,५०० रुपयांची मदत देण्याची घोषणा केली होती. ही रक्कम थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहचावी यासाठी यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.सरकारकडून देण्यात येणारी ही मदत थेट वैयक्तिक शेतकऱ्याच्या नुकसानीवर आधारित नसून महसूल मंडळ पातळीवरील पीक कापणी प्रयोगावर अवलंबून असणार आहे. प्रत्येक महसूल मंडळात बारा ठिकाणी पीक कापणी प्रयोग घेतले जातात. या प्रयोगांतून त्या मंडळाचे सरासरी उत्पादन निश्चित केले जाते.हे सरासरी उत्पादन मागील पाच वर्षांच्या सरासरी उत्पादनाशी, तुलना करून नुकसानभरपाई ठरवली जाते. जर चालू हंगामातील सरासरी उत्पादन उंबरठा उत्पादनापेक्षा कमी असेल, तरच त्या महसूल मंडळातील शेतकरी पीक विमा भरपाईसाठी पात्र ठरणार आहेत.भरपाईची रक्कम किती मिळणार?भरपाईची रक्कम ही उत्पादनातील घट किती टक्क्यांनी आहे, यावर ठरवली जाणार आहे. उदाहरणार्थ, एखाद्या महसूल मंडळात सरासरी उत्पादन उंबरठा उत्पादनाच्या १० टक्क्यांनी कमी असेल, तर विमा संरक्षित रकमेच्या केवळ १० टक्केच भरपाई मिळणार आहे.उत्पादनातील घट जशी वाढेल, तशी भरपाईची टक्केवारीही वाढणार आहे. जर एखाद्या महसूल मंडळात सरासरी उत्पादन पूर्णपणे घटून शून्यावर आले, तर संबंधित शेतकऱ्यांना संपूर्ण विमा संरक्षित रक्कम मिळू शकते. उदाहरणार्थ, सोयाबीन पिकासाठी विमा संरक्षण रक्कम सुमारे ५६ हजार रुपयांपर्यंत आहे. मात्र अशी पूर्ण भरपाई मिळणे प्रत्यक्षात शक्य नाहीयाच कारणामुळे सरकारने जाहीर केलेली प्रति हेक्टर १७,५०० रुपयांची मदत सर्व शेतकऱ्यांना मिळेलच, याची हमी देता येत नाही. प्रत्येक महसूल मंडळातील परिस्थिती वेगवेगळी असल्याने काही ठिकाणी मोठे नुकसान होऊनही सरासरी उत्पादन तुलनेने जास्त राहू शकते. अशा परिस्थितीत त्या मंडळातील शेतकऱ्यांना अपेक्षेपेक्षा कमी भरपाई मिळण्याची शक्यता आहे.
लोकसभेत प्रचंड गदारोळात ‘जी राम जी’विधेयक मंजूर; शिवराज सिंह चौहान यांच्यावर फेकले कागद !
Ji Ram Ji bill passed | Lok Sabha | Shivraj Singh Chouhan – देशातील ग्रामीण जनतेला दोन दशके रोजगाराची हमी देणाऱ्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे (मनरेगा) नाव आणि स्वरूप बदलणारे भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन (ग्रामीण) म्हणजेच व्हीबी-जी राम-जी हे विधेयक अखेर गुरुवारी लोकसभेत मंजूर करण्यात आले. या विधेयकाला विरोधी […] The post लोकसभेत प्रचंड गदारोळात ‘जी राम जी’ विधेयक मंजूर; शिवराज सिंह चौहान यांच्यावर फेकले कागद ! appeared first on Dainik Prabhat .
Yashasvi Jaiswal 2 KG weight loss in 2 Day : भारतीय क्रिकेट संघाचा धडाकेबाज सलामीवीर यशस्वी जैस्वालच्या प्रकृतीबाबत एक चिंताजनक अपडेट समोर आली आहे. गेल्या दोन दिवसांत यशस्वीचे सुमारे २ किलो वजन कमी झाले असून डॉक्टरांनी त्याला ७ ते १० दिवस पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी दरम्यान हरियाणाविरुद्धच्या सामन्यात त्याची […] The post Yashasvi Jaiswal : जैस्वालची तब्येत अचानक बिघडली; दोन दिवसांत २ किलो वजन घटलं, नेमकं काय झालं? जाणून घ्या appeared first on Dainik Prabhat .
Ajit Pawar : अखेर अजित पवारांनी स्वीकारला माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; म्हणाले…
नाशिक/मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) चे आमदार आणि राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांना बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिका मिळवल्याच्या प्रकरणात नाशिक सत्र न्यायालयाने दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. या निकालानंतर त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले असून, राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर कोकाटे […] The post Ajit Pawar : अखेर अजित पवारांनी स्वीकारला माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; म्हणाले… appeared first on Dainik Prabhat .
मोहित सोमण: आज प्रामुख्याने भूराजकीय अस्थिरतेचा फटका बाजारात बसल्याने सोने चांदी प्रचंड महाग झाले आहे. प्रति तोळा सोने जवळपास १३५००० पातळीवर पोहोचले असून प्रति किलो चांदीने जवळपास २१०००० रूपये पार केले आहेत. कारण 'गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, सोन्याच्या प्रति ग्रॅम दर २४ कॅरेटसाठी १३४८४, २२ कॅरेटसाठी १२३६०, १८ कॅरेटसाठी १०११३ रूपयांवर पोहोचल्या आहेत. तर संकेतस्थळावरील माहितीनुसारच प्रति तोळा सोन्याच्या किंमती २४ कॅरेटसाठी १३४८४० रूपयांवर, २२ कॅरेटसाठी १२३६०० रूपयांवर, १८ कॅरेटसाठी १०११३० रूपयांवर पोहोचल्या आहेत. माहितीनुसार मुंबईसह भारतातील प्रमुख शहरातील सोन्याचे प्रति ग्रॅम सरासरी दर २४ कॅरेटसाठी १३४७४ रूपये, २२ कॅरेटसाठी १२३६० रूपये, १८ कॅरेटसाठी १०११३ रूपयांवर पोहोचले आहेत.यासह भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये (Multi Commodity Exchange MCX) मधील सोन्याचे दर प्रति किलो संध्याकाळपर्यंत ०.३५% घसरुन १३४४२४ रूपयांवर पोहोचले आहेत. सकाळी किरकोळ उसळलेले दर जागतिक स्तरावर मर्यादित झाल्याने संध्याकाळपर्यंत सोन्याच्या गोल्ड फ्युचर निर्देशांकात ०.३४% घसरण झाली असून युएस गोल्ड स्पॉट दरात ०.२८% घसरण संध्याकाळपर्यंत झाली असून प्रति डॉलर दरपातळी ४३२६.४८ औंसवर गेली आहे.गेल्या १८ दिवसात सोने प्रति ग्रॅम २४ कॅरेटचे दर ४७६ रुपयांनी उसळले आहेत तर २२ कॅरेटसाठी प्रति ग्रॅम दर ४०० रूपयांनी उसळले आहेत. म्हणजेच सोन्यात प्रति ग्रॅम दरात १८ दिवसात ३.३४% वाढ झाल्याचे दिसून आले आहे.चांदीतही उच्चांकी वाढ कायम!काल वाढलेल्या उच्चांकी पातळीवरून आणखी चांदी महागली आहे. 'गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, चांदीचा प्रति ग्रॅम दर आज २११ रूपयांवर पोहोचले असून प्रति किलो दर २११००० रूपयांवर पोहोचले आहेत. संकेतस्थळावरील माहितीनुसार एकाच दिवसात चांदीच्या किंमतीत आज ३००० रूपये वाढ झाली आहे. म्हणजेच गेल्या दोन दिवसात चांदीच्या दरात ११९०० रूपयांनी वाढ झाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले.मुंबईसह भारतातील प्रमुख शहरातील चांदीचे सरासरी १० ग्रॅम दर २११०० रूपये, प्रति किलो दर २११०० रूपयांवर पोहोचले आहेत. भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये चांदीच्या निर्देशांकात संध्याकाळपर्यंत ०.६४% घसरण झाल्याने दरपातळी २०६१०० रुपयांवर पोहोचली आहे.सोने चांदी आणखी काय उसळतीय?जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या युएस बाजारातील अर्थव्यवस्था डळमळीत असल्याचा फटका संपूर्ण जगभरातील कमोडिटी बाजारांना बसतो. आज घसरलेल्या पेरोल आकडेवारीसह आगामी प्रतिक्षित महागाई आकडेवारीचा दबाव सोन्यात बसल्याने सोने आज मोठ्या प्रमाणात वाढले.गुंतवणूकदारांनी अस्थिरतेच्या काळात गुंतवणूक पर्याय म्हणून सोन्याला महत्व दिल्याने सोन्याच्या मागणीत वाढ झाली आहे. तसेच मंगळवारी जाहीर झालेल्या अमेरिकेच्या संमिश्र आर्थिक आकडेवारीमुळे सुरक्षित गुंतवणुकीच्या मागणीला चालना मिळाली आहे ज्यात प्रामुख्याने नोव्हेंबरमध्ये बिगरशेती (Non Farm Payroll) क्षेत्रातील रोजगारात झालेली किरकोळ वाढ आणि वाढलेला बेरोजगारीचा दर यांचा समावेश आहे.अमेरिकेतील बेरोजगारीचा दर चार वर्षांतील उच्चांकावर पोहोचला असून त्यामुळे अर्थव्यवस्थेबद्दल चिंता वाढली आहे.डिसेंबर महिन्यासाठी अपेक्षेपेक्षा कमकुवत असलेल्या खरेदी व्यवस्थापक निर्देशांक (Purchasing Manager Index PMI) आकडेवारीमुळे अमेरिकेची अर्थव्यवस्था मंदावत असल्याची चिन्हे अधिक स्पष्ट झाली असून ऑक्टोबर महिन्याच्या उशिरा जाहीर झालेल्या किरकोळ विक्रीच्या आकडेवारीनेही मागील महिन्याच्या तुलनेत वाढ मंदावल्याचे दर्शवले.सोन्याबाबत वर्ल्ड गोल्ड काऊन्सिलने काय म्हटले?सोन्याची अनेक वर्षांपासून सुरू असलेली तेजी कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत आणि २०२६ पर्यंत किमती उच्च पातळीवर राहण्याची शक्यता आहे तसेच त्या प्रति औंस ६००० डॉलरपर्यंत (सुमारे ५४१९२० रुपये प्रति औंस, आणि १.९० लाख रुपये प्रति १० ग्रॅम) पोहोचू शकतात असे वर्ल्ड गोल्ड कौन्सिलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड टेट यांनी आज सांगितले.चांदीच्या बाबतीत विशेषतः चांदीच्या जागतिक साठ्यांमध्ये आलेली घट, वाढलेली औद्योगिक मागणी आणि अमेरिकेच्या महत्त्वपूर्ण खनिजांच्या यादीत चांदीचा अधिकृत समावेश यामुळे चांदीच्या किमतीत मोठी वाढ झाली आणि ती आज ४.८९ टक्क्यांनी वाढून २०७४३५ पातळीवर स्थिरावली आहे. तज्ञांच्या मते ईटीएफमधील जोरदार गुंतवणूक आणि किरकोळ खरेदीदारांकडून सुरू असलेल्या खरेदीमुळे तेजीच्या भावनांना आणखी बळ मिळाले आहे. ज्यामुळे चांदीच्या बाबतीत आगामी वर्षात बाजारात तुटवडा निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. वाढलेली चांदीच्या वैयक्तिक मागणीसह वाढलेली औद्योगिक मागणी (सौर ऊर्जा, इलेक्ट्रिक वाहने आणि डेटा-सेंटर पायाभूत सुविधांमधील औद्योगिक वापर) हे महत्वाचे ट्रिगर ठरल्याने चांदी वेगाने वाढत आहेत तर आज चीनने २०२६ पासून चांदीच्या निर्यातीवर कठोर निर्बंध लागू करण्याची घोषणा केल्यानंतर पुरवठ्यासंबंधीच्या चिंता वाढल्या ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर आगाऊ खरेदी सुरू झाली असे प्रसारमाध्यमांनी स्पष्ट केले.
Pench : पेंच व्याघ्र प्रकल्पात आता 'सोलर बोट'ची सफारी लवकरचं पर्यटकांच्या सेवेत!
किरंगीसरा ते नवेगाव खैरी दरम्यान धावणार पर्यावरणपूरक 'सोलर बोट'पेंच : निसर्गप्रेमी आणि वन्यजीव पर्यटकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. पेंच व्याघ्र प्रकल्पातील पर्यटनाचा अनुभव अधिक समृद्ध करण्यासाठी आता जल पर्यटनाची (Water Tourism) विशेष सोय करण्यात आली आहे. किरंगीसरा, कोलीतमारा ते नवेगाव खैरी या विस्तीर्ण जलमार्गावर पर्यटकांना निसर्गाचा आनंद घेता यावा, यासाठी २२ सीटर अत्याधुनिक सोलर बोट पेंचमध्ये दाखल झाली आहे.प्रत्यक्ष पाहणी आणि सुविधांचा आढावा नुकतीच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि सहकाऱ्यांनी या सोलर बोटीतून विहार करत संपूर्ण मार्गाची तांत्रिक पाहणी केली. उपलब्ध सुविधा, सुरक्षितता आणि पर्यटनाच्या दृष्टीने या मार्गाचे महत्त्व यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. लवकरच अशाच प्रकारची दुसरी सोलर बोटदेखील येथे उपलब्ध होणार असून, यामुळे पर्यटकांची प्रतीक्षा संपणार आहे. पेंचच्या समृद्ध जैवविविधतेचे दर्शन पेंच व्याघ्र प्रकल्प हे त्याच्या दुर्मिळ वैशिष्ट्यांसाठी ओळखले जाते. व्याघ्र प्रकल्पाच्या हद्दीतून वाहणारी विस्तीर्ण नदी हे पर्यटकांसाठी मोठे आकर्षण आहे. या जल सफारीदरम्यान पर्यटकांना केवळ पाण्याचा शांत अनुभव मिळणार नाही, तर विविध दुर्मिळ आणि स्थलांतरित पक्ष्यांचे दर्शन घडेल. नदीकाठी पाणी पिण्यासाठी येणारे वाघ, बिबट्या आणि इतर वन्यप्राणी पाहण्याची दुर्मिळ संधी मिळेल.https://prahaar.in/2025/12/18/the-municipal-corporation-says-that-mumbais-air-quality-has-improved-compared-to-last-year/पर्यावरणपूरक सोलर बोट असल्यामुळे आवाजाचं प्रदूषण होणार नाही, परिणामी वन्यजीवांना त्रास न होता पर्यटकांना शांततेत निसर्ग अनुभवता येईल. लवकरच उद्घाटन आणि पर्यटकांना आवाहन या दोन्ही सोलर बोटींचे उद्घाटन लवकरच एका विशेष सोहळ्यात करण्यात येणार आहे. त्यानंतर या बोटी सर्वसामान्य पर्यटकांसाठी खुल्या केल्या जातील. भविष्यात येथे अधिक अत्याधुनिक बोटी उपलब्ध करून देण्याचा मानस प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.पेंच व्याघ्र प्रकल्प हे एक निसर्गसंपन्न ठिकाण आहे. येथील जल पर्यटनाचा सुरक्षित आणि शांत अनुभव घेण्यासाठी पर्यटकांनी मोठ्या संख्येने भेट द्यावी, असे आवाहन प्रशासकीय स्तरावरून करण्यात आले आहे.बोटीची ठळक वैशिष्ट्ये:क्षमता : २२ सीटर मोठी सोलर बोट.मार्ग : किरंगीसरा - कोलीतमारा ते नवेगाव खैरी.वैशिष्ट्य : पूर्णपणे पर्यावरणपूरक, आवाजाचा त्रास नाही.फायदा : जलमार्गावरून वन्यजीव आणि पक्षी निरीक्षणाची विशेष संधी.
तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांची कामे अडू नये ! - महसूलमंत्र्यांच्या स्पष्ट सूचना
महसूल विभागाचा ‘डिजिटल’ कायापालट!मुंबई : छोट्या-छोट्या तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांची कामे अडता कामा नयेत,असा सक्त सूचना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूल विभागाचे स्वतंत्र डाटा सेंटर आणि महसूल विभागाच्या तांत्रिक सक्षमीकरणाबाबतच्या उच्चस्तरीय बैठकीत केली.ते म्हणाले,जमिनीचा डाटा हा अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचा असून त्याच्या सुरक्षिततेसाठी आणि विभागाच्या सक्षमीकरणासाठी अधिकाऱ्यांनी तयारी करावी. महसूल विभागाला देशात पहिल्या क्रमांकावर नेण्यासाठी अधिकाऱ्यांनी अत्याधुनिक यंत्रणा उभारावी.राज्यातील शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्य नागरिकांना जमिनीशी संबंधित कामे घरबसल्या आणि विनासायास करता यावीत, यासाठी महसूल विभागाचे संपूर्ण डिजिटलायझेशन आणि आधुनिकीकरण करण्यात येणार आहे.मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या दालनात उच्चस्तरीय बैठक पार पडली. बैठकीला महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अप्पर मुख्य सचिव विकास खारगे, जमाबंदी आयुक्त सुहास दिवसे, नोंदणी महानिरीक्षक (IGR) रविंद्र बिनवडे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.राज्याची सर्व जमीन ‘डाटा सेंटर’वर येणारमहसूलमंत्री बावनकुळे म्हणाले की, राज्याच्या कानाकोपऱ्यातील जमिनींची मोजणी आणि नोंदी अद्ययावत करायच्या आहेत. ई-फेरफार, ई-मोजणी २.०, ई-पीक पाहणी, महाभूमी पोर्टल यांसारख्या ५५ हून अधिक ॲप्लिकेशन्सचा भार सध्या यंत्रणेवर आहे. भविष्यात संपूर्ण राज्याची जमीन डाटा सेंटरवर आणायची असल्याने या प्रणालीत कोणताही तांत्रिक बिघाड खपवून घेतला जाणार नाही. भूसंपादन आणि इतर महसूल विषयक कामे जलदगतीने होण्यासाठी हे आधुनिकीकरण काळाची गरज आहे.नागपूरला होणार 'डिझास्टर डाटा सेंटर'माहितीच्या सुरक्षिततेबाबत बैठकीत सविस्तर चर्चा झाली. सध्या नवी मुंबईतील ऐरोली येथे डाटा सेंटर कार्यरत असले तरी, नैसर्गिक आपत्ती किंवा तांत्रिक बिघाड झाल्यास कामात खंड पडू नये यासाठी ‘डिझास्टर रिकव्हरी’ (DR) साईट अधिक सक्षम करणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने नागपूर येथे डिझास्टर डाटा सेंटर कार्यान्वित करण्यात येईल, तसेच मुंबईतील डाटा सेंटरचेही आधुनिकीकरण करण्यात येईल, असे बैठकीत निश्चित करण्यात आले. मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी यावेळी महसूल विभागाला आयटी विभागाच्या मदतीने जागा आणि तांत्रिक सहकार्य उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
पृथ्वीराज चव्हाण यांची हकालपट्टी करावी.! ‘ऑपरेशन सिंदूर’वरून भाजप आक्रमक
Prithviraj Chavan | BJP – ऑपरेशन सिंदूरबाबत केलेल्या वक्तव्यावरून भाजपने गुरुवारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. चव्हाण यांची टिप्पणी देशविरोधी असून, त्यामुळे भारतीय लष्कराचा अपमान झाला आहे, असा आरोप करत काँग्रेसने त्यांची तात्काळ पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी भाजपने केली. भाजप मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत पक्षाचे राष्ट्रीय […] The post पृथ्वीराज चव्हाण यांची हकालपट्टी करावी.! ‘ऑपरेशन सिंदूर’वरून भाजप आक्रमक appeared first on Dainik Prabhat .
Ravindra Dhangekar : पुण्यात भाजप-शिवसेनेची जागा वाटपाची चर्चा; मात्र रवींद्र धंगेकरांना डावललं
पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्यात जागावाटपासंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेत एक उल्लेखनीय बाब म्हणजे शिवसेनेचे पुणे महानगरप्रमुख रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना पूर्णपणे डावलण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी धंगेकर यांनी पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणात भाजपचे पुणे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर […] The post Ravindra Dhangekar : पुण्यात भाजप-शिवसेनेची जागा वाटपाची चर्चा; मात्र रवींद्र धंगेकरांना डावललं appeared first on Dainik Prabhat .
Stokes Archer Fight : लाइव्ह सामन्यात स्टोक्स-ऑर्चरमध्ये जुंपली! जोरदार वादावादीचा VIDEO व्हायरल
Stokes Archer Fight video viral : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील प्रतिष्ठित ‘अॅशेस’ मालिकेतील तिसरा कसोटी सामना सध्या ॲडलेडच्या मैदानावर रोमांचक वळणावर पोहोचला आहे. मात्र, खेळाच्या दुसऱ्या दिवसाअखेर इंग्लंडची स्थिती अत्यंत नाजूक असून संघ पराभवाच्या छायेत दिसत आहे. विशेष म्हणजे, मैदानावर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स आणि वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर यांच्यात झालेल्या तीव्र वादाने या सामन्याला […] The post Stokes Archer Fight : लाइव्ह सामन्यात स्टोक्स-ऑर्चरमध्ये जुंपली! जोरदार वादावादीचा VIDEO व्हायरल appeared first on Dainik Prabhat .
मोबाईलचा वापर ‘स्मार्ट’हवा; अतिरेकाने होताहेत दुष्परिणाम –प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया
पुणे: किशोरवयीन मुलांमध्ये मोबाईल वापराचे मोठे आकर्षण आहे. एवढेचनाही, तर मुलांमध्ये मोबाईलच्या वापराचे चांगले व वाईट परिणाम याबाबत जागरूकता येत असली, तरी त्याचा मोह सुटत नसल्याचेदिसून येत आहे. मुलांना मोबाईलचा स्मार्ट वापर हवा आहे. त्याचवेळी मोबाईलच्या अतिरेकी वापरानेशारीरिक व मानसिक दुष्परिणामांना सामोरे जावे लागत असल्याचे सर्वेक्षणातून दिसून आले आहे. विद्यार्थ्यांमध्ये मोबाईलचा ‘मर्यादित व शहाणपणाचा’ वापर […] The post मोबाईलचा वापर ‘स्मार्ट’ हवा; अतिरेकाने होताहेत दुष्परिणाम – प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया appeared first on Dainik Prabhat .
Mamata Banerjee – रोजगार हमीसाठी गाजलेल्या मनरेगाचे नाव का बदलण्यात आले? सध्याच्या केंद्र सरकारला महात्मा गांधींची एलर्जी असावे, असे दिसते. जर केंद्र सरकार राष्ट्रपित्याचा आदर करू शकत नसतील तर आम्ही करू. आम्ही आमच्या ग्रामीण रोजगार हमी योजनेचे नाव कर्मश्री असे ठेवू, अशा शब्दांत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपला संताप व्यक्त केला. व्यवसाय आणि […] The post Mamata Banerjee : केंद्र सरकारला महात्मा गांधींची एलर्जी.! ‘मनरेगा’चे नाव बदलल्याने ममता बॅनर्जी भडकल्या appeared first on Dainik Prabhat .
Delhi High Court : सतत याचिका दाखल केल्याने दिल्ली हायकोर्टाने याचिकाकर्त्याला ठोठावला दंड
नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी एका आक्रमक याचिकाकर्त्याला ५०,००० रुपयांचा दंड ठोठावला. त्याने राष्ट्रीय राजधानीतील मालमत्तांवरील बेकायदेशीर बांधकामांविरुद्ध अनेक याचिका दाखल केल्या होत्या. परंतु त्यांचा पाठपुरावा केला नव्हता. आरके पुरम परिसरातील एका मालमत्तेच्या बेकायदेशीर बांधकामाविरुद्ध याच याचिकाकर्त्याने दाखल केलेल्या पाचव्या रिट याचिकेवर न्या. मिनी पुष्कर्ण सुनावणी करत असताना हे प्रकरण उघडकीस आले. त्यांनी […] The post Delhi High Court : सतत याचिका दाखल केल्याने दिल्ली हायकोर्टाने याचिकाकर्त्याला ठोठावला दंड appeared first on Dainik Prabhat .
मुंबई: मारूती सुझुकी इंडिया (Maruti Suzuki India) कंपनीने मोठी घोषणा केली आहे. दिव्यांगासाठी ही योजना फळास ठरू शकते कारण बुधवारी मोठ्या प्रमाणावर विकल्या जाणाऱ्या कार्समध्ये सर्वसमावेशकतेला चालना देण्यासाठी एक पाऊल म्हणून मारूतीने स्विव्हल सीटच्या पर्यायासह वॅगनआर सादर बाजारात आणल्याची घोषणा नुकतीच केली आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींना अधिक सोयीसुविधा देण्यासाठीस्विव्हल सीट्स डिझाइन केल्या आहेत असे कंपनीने सांगितले. 'हा उपक्रम संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास ध्येय १० शी सुसंगत आहे, ज्याचा उद्देश असमानता कमी करणे आहे' असे कंपनीने आपल्या एका निवेदनात म्हटले आहे.'स्विव्हल सीट्समुळे ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींसाठी दैनंदिन प्रवास अधिक सोयीस्कर होईल. वॅगनआर हे भारतातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या पहिल्या दहा मॉडेल्सपैकी एक आहे आणि हे सुलभीकरण व वैशिष्ट्य मोठ्या जनसमुदायापर्यंत पोहोचवण्यासाठी ते आदर्श आहे' असे मारुती सुझुकी इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हिसाशी ताकेउची यांनी सांगितले.कंपनीने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकातील माहितीनुसार, वॅगनआर स्विव्हल सीट किटची ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (ARAI) येथे सुरक्षा चाचण्या करण्यात आल्या आहेत आणि ते सगळ्या त्या आवश्यक सुरक्षा मानकांचे पालन कंपनी करते, असे कंपनीने नमूद केले.सुझुकी ग्रुपच्या 'बाय युवर साइड' या कॉर्पोरेट घोषणेपासून प्रेरणा घेऊन हा उपक्रम संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास ध्येय १० शी सुसंगत आहे, ज्याचा उद्देश सध्याची असमानता कमी करणे आहे हे उद्दिष्टही कंपनीने यावेळी स्पष्ट केले.उपलब्ध माहितीनुसार, या उपक्रमासाठी मारुती सुझुकीने NSRCEL-IIM बंगळूरच्या स्टार्टअप इनक्यूबेशन प्रोग्राम अंतर्गत बंगळूर स्टार्टअप TRUEAssist Technology Private Limited सोबत भागीदारी केली आहे. ग्राहक मारुती सुझुकी अरेना डीलरशिपवर स्विव्हल सीट रेट्रो फिटमेंट किट म्हणून ग्राहक ऑर्डर करू शकतात. ही सीट नवीन वॅगनआर मॉडेल्समध्ये बसवता येईल किंवा सध्याच्या वाहनांमध्ये रेट्रोफिट करता येईल असे कंपनीने म्हटले.
भयानक हत्याकांड; जौनपूरमध्ये मुलानेच आई-वडिलांची निर्घृण हत्या करून मृतदेहाचे तुकडे नदीत फेकले
जौनपूर : उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक हत्याकांड समोर आले आहे. जाफराबाद पोलीस स्टेशन हद्दीतील अहमदपूर गावात अंबेश कुमार या तरुणाने आपली आई बबिता (६०) आणि वडील श्यामलाल (६२) यांची हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हत्येनंतर आरोपीने दोघांच्या मृतदेहांचे तुकडे करून ते वेगवेगळ्या ठिकाणी नदीत फेकल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.पोलिसांच्या चौकशीत अंबेश कुमारने गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्याने प्रथम आईची हत्या केल्यानंतर वडिलांचा गुदमरून मृत्यू झाल्याचे सांगितले. त्यानंतर दोघांच्या मृतदेहांचे तुकडे करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून संपूर्ण राज्यात संताप व्यक्त केला जात आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे वडील श्यामलाल हे रेल्वेचे निवृत्त लोको पायलट होते. ८ डिसेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास अंबेश आणि त्याच्या वडिलांमध्ये पैशाच्या कारणावरून जोरदार वाद झाला होता. या वादातूनच अंबेशने टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.हत्येनंतर आरोपीने मृतदेहांचे तुकडे सहा पोत्यांमध्ये भरून ते आपल्या गाडीच्या डिक्कीत ठेवले. घरातील रक्ताचे डाग साफ करून आणि कपडे धुऊन त्याने पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. पहाटे चार ते पाचच्या दरम्यान तो गाडीतून निघून गेला. वडिलांच्या मृतदेहाचे तुकडे गोमती नदीच्या बेलाव घाटावर फेकण्यात आले, तर आईच्या मृतदेहाचे तुकडे जलालापूर परिसरातील साई नदीत टाकण्यात आले. नदीत मृतदेहाचे अवयव आढळल्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली.पोलिस तपासात कौटुंबिक वादाचा आणखी एक धागा समोर आला आहे. लॉकडाऊन काळात अंबेश कुमारने कोलकातामधील सहजिया नावाच्या महिलेशी विवाह केला होता. ती कोलकातामध्ये ब्युटी पार्लर चालवते. मात्र कुटुंबीय या विवाहास विरोध करत होते आणि अंबेशवर घटस्फोट घेण्यासाठी दबाव टाकत होते. घटस्फोटासाठी पैशांच्या मागणीवरून घरात सतत वाद होत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेने जौनपूरसह संपूर्ण उत्तर प्रदेशात खळबळ उडवून दिली आहे.
IND vs SA fans fury reactions video viral : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील चौथा सामना बुधवारी लखनौ येथे खेळवला जाणार होता. मात्र, उत्तर भारतात वाढलेल्या प्रचंड धुक्यामुळे सुरक्षेचे कारण देत हा सामना अखेर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे मैदानावर मोठ्या आशेने आलेल्या हजारो क्रिकेट चाहत्यांना एकही चेंडूचा खेळ न […] The post IND vs SA : ‘तीन पोती गहू विकून आलो होतो…’, सामना रद्द झाल्यानंतर संतापलेल्या चाहत्याचा VIDEO व्हायरल appeared first on Dainik Prabhat .
BMC Election : मुंबईसाठी महायुतीचा फॉर्मुला ठरला ! ‘एवढ्या’जागांवर एकमत तर राष्ट्रवादीचा ‘पत्ता कट’
मुंबई महापालिकेवर (BMC Election) सत्ता मिळवण्यासाठी महायुतीने आपली कंबर कसली आहे. या निवडणुकीसाठी (BMC Election) महायुतीमधील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजप आणि शिवसेनेमध्ये (शिंदे गट) 227 पैकी तब्बल 150 जागांवर एकमत झाले आहे. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम आणि शिवसेना नेते उदय सामंत यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन याची माहिती दिली. राष्ट्रवादी (अजित पवार गट) […] The post BMC Election : मुंबईसाठी महायुतीचा फॉर्मुला ठरला ! ‘एवढ्या’ जागांवर एकमत तर राष्ट्रवादीचा ‘पत्ता कट’ appeared first on Dainik Prabhat .
‘OTT’प्लॅटफॉर्मला सेन्साॅर नाही.! माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे स्पष्टीकरण
OTT platforms – ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रकाशित होणारा कंटेंट सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनच्या अधिकारक्षेत्राबाहेर राहील. परंतु सध्याच्या माहिती तंत्रज्ञान नियमांनुसार त्याचे नियमन स्वतंत्रपणे सुरू राहील, असे स्पष्टीकरण माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने दिले आहे. एका लेखी निवेदनात, माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल. मुरुगन यांनी लोकसभेत दिलेल्या उत्तरावर आधारित, मंत्रालयाने नमूद केले की ओटीटी कंटेंटचे नियमन माहिती […] The post ‘OTT’ प्लॅटफॉर्मला सेन्साॅर नाही.! माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे स्पष्टीकरण appeared first on Dainik Prabhat .
Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये मोठी चकमक 3 नक्षलवादी ठार
सुकमा : छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात गुरुवारी सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत एका महिलेसह तीन नक्षलवादी ठार झाले, अशी माहिती पोलिसांनी दिली. सुकमा पोलीसांनी पीटीआयला सांगितले की, गोलापल्ली पोलीस स्टेशन परिसरातील एका डोंगरावर सकाळी गोळीबार सुरू झाला, जेव्हा जिल्हा राखीव दलाचे एक पथक या भागात माओवादी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीबद्दल मिळालेल्या माहितीच्या आधारे शोध मोहिमेवर होते. आतापर्यंत चकमकीच्या ठिकाणाहून […] The post Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये मोठी चकमक 3 नक्षलवादी ठार appeared first on Dainik Prabhat .
मोहित सोमण:आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात अखेरच्या सत्रात किरकोळ घसरण झाली आहे. सेन्सेक्स ७७.८४ अंकानी घसरला असून ८४४८१.८१ पातळीवर स्थिरावला असून निफ्टी ३ अंकाने घसरत २५८१५.५५ पातळीवर स्थिरावला आहे. तरीही बाजारातील अस्थिरता काही प्रमाणात स्थिरावली असली असूनही पुन्हा एकदा बाजारात शॉर्ट पोझिशन वाढवल्याने मोठ्या प्रमाणात नफा बुकिंग झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. असे असल्याने आज बँक निर्देशांकातील अपेक्षित घसरण रोखली गेली असून अखेरच्या रूपयात मोठी रिकव्हरी झाली ज्यामुळे घरगुती गुंतवणूकदारांनी आज आपली रोख विक्री मर्यादित राखली. घरगुती गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढवल्यामुळे बाजारात त्याचा निश्चितच फायदा झाला असला तरी भारत युएस यांच्यातील द्विपक्षीय करारावर अनिश्चितता तसेच ऑटो, मिडिया, तेल व गॅस शेअर्समध्ये झालेल्या घसरणीचा फटकाही बाजारात बसला. दरम्यान आयटी, कंज्यूमर ड्युरेबल्स, फायनांशियल सर्विसेस एक्स बँक, फायनांशियल सर्विसेस एक्स बँक शेअर्समध्ये झालेल्या घसरणीमुळे शेअर बाजारात घसरण मर्यादित राहिली आहे.याशिवाय बँक निर्देशांकाही सेन्सेक्स बँक किरकोळ वाढीसह बंद झाला असून बँक निफ्टीत किरकोळ घसरण झाली. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार,ऑटो शेअर्समध्ये आज मोठ्या प्रमाणात ट्रेडिंगमध्ये वाढ झाल्याने अस्थिरतेचा फटका ऑटो शेअर्समध्ये बसला होता ज्यामुळे सलग चौथ्या सत्रात ऑटो शेअर्समध्ये घसरण झाली आहे. दरम्यान कच्च्या तेलाच्या निर्देशांकातही जागतिक भूराजकीय अस्थिरतेच्या फटक्यामुळे तेल व गॅस शेअर्समध्ये घसरण झाली. आगामी युएस बाजारातील महागाईतील आकडेवारीची प्रतिक्षा गुंतवणूकदार करत असल्याने आगामी आशियाई बाजारातही त्यांचे पडसाद उमटू शकतात. चलनविषयक धोरणाच्या भविष्यातील मार्गाबद्दल अनिश्चितता अस्थिरतेत भर घालत आहे. स्थानिक पातळीवर, डेरिव्हेटिव्ह्ज डेटा एकत्रीकरण टप्प्याकडे निर्देश करतो. तथापि कमी अस्थिरता आणि जास्त विक्री निर्देशक सूचित करतात की अधूनमधून शॉर्ट-कव्हरिंग रॅली नाकारता येत नाहीत असे तज्ञांचेही मत आहे.खासकरुन आशिया-पॅसिफिक प्रदेशातील शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात फंडामेंटल व टेक्निकल कमकुवत पातळीवर व्यवहार करत आहेत. उदाहरणार्थ जपानमध्ये आलेल्या आकडेवारीनंतर जपानचा निक्केई तोट्यात सुरू असताना तंत्रज्ञान आणि एआय स्टॉक्समध्ये नफाबुकिंग व एका अहवालाच्या आधारे कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित भांडवली खर्चातून परताव्यावर पुन्हा वाढलेली चिंता यामुळे गुंतवणूकदार सावध झाले आहेत. अमेरिकेच्या प्रमुख चलनवाढीच्या डेटापूर्वी बाजारातील सहभागी देखील सावध अधिक होत आहेत याचाही फटका भारताला बसला. दुपारच्या सत्रात सकाळी सावरलेले बाजार पुन्हा एकदा खाली सपोर्ट लेवल मिळण्यास कमी पडले असून स्मॉलकॅप शेअर्समध्ये झालेल्या घसरणीचा आणखी फटका बसला. मिडकॅपमध्येही किरकोळ घसरण झाली असताना लार्जकॅपचा संमिश्र प्रतिसाद दिसून आला.आज अखेरच्या सत्रात आशियाई बाजारातील गिफ्ट निफ्टी (०.०३%)सह निकेयी २२५ (०.८३%), कोसपी (१.५५%), सेट कंपोझिट (०.५४%), जकार्ता कंपोझिट (०.६९%) निर्देशांकात सर्वाधिक घसरण झाली असून केवळ हेंगसेंग (०.०५%), शांघाई कंपोझिट (०.१६%) निर्देशांकात वाढ झाली आहे. युएस बाजारातील सुरूवातीच्या कलात डाऊ जोन्स (०.३१%) निर्देशांकात वाढ झाली असून एस अँड पी ५०० (१.१६%), नासडाक (१.८०%) निर्देशांकात घसरण झाली आहे.अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ एचबीएल इंजिनिअरिंग (७.३५%),एचडीएफसी एएमसी (७.१५%), रिलायन्स पॉवर (५.८६%), हिंदुस्थान कॉपर (५.२३%), मोतीलाल ओसवाल फायनान्स (४.०६%), पीबी फिनटेक (३.९३%) समभागात झाली असून सर्वाधिक घसरण हिताची एनर्जी (५.१७%), ओला इलेक्ट्रिक (४.९८%), सिमेन्स इंजिनिअरिंग (४.९५%), रामकृष्ण फोर्ज (३.७५%), एबी लाईफस्टाईल (३.६९%), कल्पतरू प्रोजेक्ट (३.५१%), एमआरपीएल (३.०७%), पीटीसी इंडस्ट्रीज (३.०२%), कमिन्स इंडिया (२.८२%) निर्देशांकात घसरण झाली आहे.बँक निफ्टीबाबत भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे तांत्रिक विश्लेषक वत्सल भुवा म्हणाले आहेत की,' बँक निफ्टी अजूनही एका मर्यादित श्रेणीत व्यवहार करत आहे; तथापि, हा निर्देशांक त्याच्या महत्त्वाच्या अल्प-मुदतीच्या १० दिवसांच्या एसएमए (Simple Moving Average SMA) जवळ पुन्हा पुन्हा विक्रीच्या दबावाला सामोरे जात आहे जे बाजारातील मंदीचा कल दर्शवते. जर निर्देशांकाने ५८७०० येथील रेंज सपोर्ट तोडला आणि त्याखाली क्लोजिंग दिले, तर घसरणीचा धोका वाढू शकतो. वरच्या बाजूला, तात्काळ प्रतिकार पातळी (Immediate Resistance) ५९१५० पातळीवर आहे, तर आधार पातळी ५८७०० पातळीच्या जवळ आहे. ५८७०० पातळीच्या खाली निर्णायक क्लोजिंग झाल्यास ५८३५० पातळीपर्यंत आणखी घसरण होऊ शकते, जिथे ५०-दिवसांचा एसएमए (SMA) आहे.आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले आहेत की,'जागतिक बाजारातील संमिश्र संकेतांमुळे देशांतर्गत शेअर बाजारात अस्थिर व्यवहार झाले, ज्यात लार्ज-कॅप शेअर्सनी मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप शेअर्सच्या तुलनेत पिछाडी घेतली. सलग तीन दिवसांच्या घसरणीनंतर, सुरुवातीच्या तेजीला व्हॅल्यू बाइंग आणि मध्यवर्ती बँकेच्या हस्तक्षेपामुळे रुपयाला मिळालेल्या पाठिंब्यामुळे आधार मिळाला. तथापि, अमेरिका-भारत संभाव्य व्यापार कराराबद्दलच्या अनिश्चिततेमुळे बाजारातील भावनांवर परिणाम झाला, ज्यामुळे दिवसाच्या उत्तरार्धात नफावसुली झाली. क्षेत्रनिहाय विचार केल्यास,आयटी आणि वित्तीय सेवा क्षेत्रांनी गुंतवणूकदारांचे लक्ष वेधले, तर ऑटो, तेल आणि वायू, रसायने आणि फार्मा क्षेत्रांमध्ये लक्षणीय कमजोरी दिसून आली. पुढे पाहता, बाजाराला स्पष्ट दिशादर्शक संकेतांसाठी अमेरिकेचा मुख्य चलनवाढीचा दर आणि बेरोजगारीच्या दाव्यांची आकडेवारी, तसेच बँक ऑफ इंग्लंड, युरोपियन सेंट्रल बँक आणि बँक ऑफ जपानच्या व्याजदर निर्णयांवर लक्ष केंद्रित करावे लागेल.'बाजारातील निफ्टी पोझिशनवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे वरिष्ठ तांत्रिक विश्लेषक रूपक डे म्हणाले आहेत की,' निफ्टीमध्ये कमजोरी कायम आहे, कारण निर्देशांकाला तासाभराच्या चार्टवर २००-डीएमए (Daily Moving Average DMA) पातळी पुन्हा मिळवण्यात अपयश आले आहे आणि बाजारातील मंदीचे वातावरण भारतीय इक्विटींना खाली खेचत आहे. सलग खालच्या शिखरांची निर्मिती मंदीच्या दृष्टिकोनाला आणखी बळकटी देत आहे. मोमेंटम इंडिकेटर आरएसआय (Relative Strength Index RSI) बेरिश क्रॉसओव्हरमध्ये आहे आणि तो देखील खालची शिखरे तयार करत आहे, जे गती कमकुवत होत असल्याचे दर्शवते. बाजाराचा कल कमकुवतच राहिला आहे आणि २५७०० ची पातळी ब्रेकडाउनसाठी असुरक्षित दिसत आहे. २५७०० पातळीच्या खाली निर्णायक घसरण झाल्यास करेक्शनच्या पुढील टप्प्याला वेग येऊ शकतो. वरच्या बाजूला (Upside) २५९०० पातळीच्या आसपास प्रतिकार पातळी आहे.'
Jasprit Bumrah : बुमराहचा विमानतळावर दिसला ‘अँग्री’अवतार! फोन हिसकावत फॅनला शिकवला धडा, पाहा VIDEO
Jasprit Bumrah snatches fans phone : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा त्याच्या मैदानावरील भेदक गोलंदाजीसाठी आणि मैदानाबाहेरील शांत स्वभावासाठी ओळखला जातो. प्रतिस्पर्धी फलंदाजांच्या दांड्या गुल करणारा बुमराह खऱ्या आयुष्यात कमालीचा ‘कूल’ मानला जातो. मात्र, सध्या सोशल मीडियावर बुमराहचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत असून, यामध्ये तो एका चाहत्यावर प्रचंड संतापलेला पाहायला […] The post Jasprit Bumrah : बुमराहचा विमानतळावर दिसला ‘अँग्री’ अवतार! फोन हिसकावत फॅनला शिकवला धडा, पाहा VIDEO appeared first on Dainik Prabhat .
नवी दिल्ली : भारतामध्ये कुपोषण हे अर्भक आणि बालमृत्यूचे कारण म्हणून ओळखले जात नाही. अतिसाराचे आजार, अज्ञात कारणांमुळे येणारा ताप आणि जखमा ही या मृत्युसाठी मुख्य कारणे आहेत, असे प्रतिपादन राज्यसभा सदस्य आणि महिला आणि बालविकास राज्यमंत्री सावित्री ठाकूर यांनी केले.कुपोषणाच्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी, अंगणवाडी सेवा, पोषण अभियान आणि किशोरवयीन मुलींसाठीची योजना (१४-१८ वर्षे, आकांक्षित […] The post Savitri Thakur : बालमृत्यूमागे कुपोषण हे कारण नाही; महिला-बालविकास राज्यमंत्री सावित्री ठाकूर यांचे प्रतिपादन appeared first on Dainik Prabhat .
धनंजय मुंडे नाही तर बीडच्या ‘या’नेत्याला मिळणार कोकाटेंचं मंत्रिपद? अजित पवार घेणार मोठा निर्णय !
Dhananjay Munde | Manikrao Kokate | Ajit Pawar : शासकीय सदनिकेचा गैरवापर केल्याप्रकरणी नाशिक न्यायालयाने मंत्री माणिकराव कोकाटे यांना शिक्षा सुनावल्यानंतर, राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरू झाली आहे. कोकाटे यांचे मंत्रिपद गेल्यानंतर आता त्यांच्या जागी कोणाची वर्णी लागणार? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या शर्यतीत धनंजय मुंडे यांचे नाव आघाडीवर असल्याचे वाटत असले, तरी राजकीय […] The post धनंजय मुंडे नाही तर बीडच्या ‘या’ नेत्याला मिळणार कोकाटेंचं मंत्रिपद? अजित पवार घेणार मोठा निर्णय ! appeared first on Dainik Prabhat .
नवी दिल्ली : सरकारकडून मनरेगाऐवजी नव्या उपक्रमाअंतर्गत दरवर्षी १२५ दिवसांच्या ग्रामीण रोजगाराची हमी दिली जाणार असल्याचा दावा केला जात असला, तरी हा केवळ दिखावा आहे. १०० दिवसांवरून १२५ दिवस काम देण्याची भाषा ही फसवणूक आहे. या योजनेचा मोठा भार राज्यांवर टाकला जाईल. अनेक राज्यांकडे, विशेषतः ज्या राज्यांना या योजनेची सर्वाधिक गरज आहे, तिथे पुरेसा निधीच […] The post Priyanka Gandhi : ग्रामीण रोजगार हमी योजना संपुष्टात आणण्याचा डाव; जी-राम-जी विधेयकावरून प्रियांका गांधींचा हल्लाबोल appeared first on Dainik Prabhat .
एसीएमई सोलारने ४७२५ कोटी रुपयांचे वित्तपुरवठा मिळवला
गुरूग्राम: एसीएमई सोलार होल्डिंग्ज लिमिटेड (एसीएमई सोलार) या अक्षय उर्जा (Renewable Energy) आपल्या नव्या विस्तारासाठी व पायाभूत सुविधेसह आर्थिक बाबीत रिस्ट्रक्चरिंग करण्यासाठी कंपनीने आपल्या विविध उपकंपन्यांच्या माध्यमातून कर्ज उभारण्याचे घोषित केले. या आपल्या उपकंपनी (Subsidiary) कंपन्यांच्या विविध ऊर्जा प्रकल्पाला वित्तीय पुरवठा करण्यासाठी कंपनीने एकूण ४७२५ कोटी मूल्यांकनांचे कर्ज विविध बँकाकडून मिळवले आहे. कंपनीने संबंधित आपल्या एक्सचेंज फायलिंगमध्येही स्पष्ट केली आहे.कंपनीच्या मते, केवळ ऊर्जा प्रकल्पांच्या बांधकामासाठी निधी उभारण्यासाठी आणि वित्तपुरवठ्याचा खर्च कमी करण्यासाठी नाही तर आपल्या आर्थिक भांडवली रचना सुरळीत करण्यासाठी हे कर्ज उभारण्यात येणार आहे.१८ ते २० वर्षांच्या कालावधीसाठी वित्तपुरवठा आणि पुनर्वित्तपुरवठ्यासाठी (Refinancing) प्रकल्पबांधणीसाठी कर्जाचा समावेश आहे.कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, नवीन ग्रीनफिल्ड वित्तपुरवठा (Greenfield Refinancing) करण्यासाठी ३०० मेगावॉटच्या एसीएमई सिग्मा एफडीआरई प्रकल्पासाठी पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (पीएफसी लिमिटेड) कडून २७१६ कोटी रुपये आणि १५० मेगावॉटच्या एसीएमई प्लॅटिनम सोलार + ईएसएस प्रकल्पासाठी नॅशनल बँक फॉर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट (NaBFID) कडून ८०० कोटी रुपयांचा पहिला ग्रीनफिल्ड प्रकल्प वित्तपुरवठा प्राप्त केला आहे. अशी प्राथमिक माहिती पुढे आली. यापूर्वीच दोन्ही प्रकल्प सध्या बांधकामाच्या अंतिम टप्प्यात आहेत असे कंपनीने स्पष्ट केले होते.कंपनीच्या दाव्यानुसार, ३०० मेगावॉटच्या एसीएमई सीकर सोलार प्रकल्पाच्या कार्यान्वित प्रकल्पाच्या पुनर्वित्तपुरवठ्यासाठी कंपनीने येस बँकेकडून १२०९ कोटी रुपये गोळा केले आहेत. ज्यामुळे आता कर्जाच्या खर्चातील सुरुवातीला १७० बीपीएस आणि अखेरीस १९५ बीपीएसची कपात झाली असेही कंपनीने स्पष्ट केले. उपलब्ध माहितीनुसार, एसीएमई सोलारसाठी येस बँकेकडून हा पहिला दीर्घकालीन पुनर्वित्तपुरवठा आहे.या वित्तपुरवठ्याच्या फेरीमुळे,चालू आर्थिक वर्षात कंपनीने सुमारे १०५९० कोटी रुपयांचा ग्रीनफिल्ड वित्तपुरवठा सुरक्षित केला आहे ज्यामुळे बांधकाम सुरू असलेल्या प्रकल्पांमधील स्वाक्षरी केलेल्या पीपीएच्या ९०% पेक्षा जास्त कर्जाची एकूण तरतूद करणे कंपनीला शक्य झाले आहे.याव्यतिरिक्त कंपनीने सुमारे ३३८० कोटी रुपयांच्या कर्जाचा पुनर्वित्तपुरवठा केल्याने पुनर्वित्तपुरवठा केलेल्या कर्जावर सुमारे १३५ बीपीएस दर कपात साध्य झाली आहे आणि इतर प्रकल्पांसाठी सुमारे ४०३५ कोटी रुपयांच्या कर्जावर अतिरिक्त सुमारे ६० बीपीएस दर कपात झाली आहे असेही म्हटले.नॉन-फंड आधारित मर्यादा एसीएमई सोलारने या वर्षी आयसीआयसीआय बँक, स्टँडर्ड चार्टर्ड बँक, फर्स्ट अबू धाबी बँक, एक्झिम बँक इत्यादी विविध बँकांकडून नॉन-फंड आधारित कर्ज मर्यादांचाही विस्तार केला आहे. या मर्यादा प्रकल्प उभारणीच्या टप्प्यात ट्रेड फायनान्सद्वारे कर्जाचा खर्च कमी करण्यास मदत करतात.तरीही कंपनीच्या शेअर्समध्ये दुपारी ३.०२ वाजेपर्यंत १.२९% अंकांने घसरण झाली होती. ज्यामुळे कंपनीचा शेअर २३३ रूपये प्रति शेअर व्यवहार करत होता.
Supriya Sule On Dhananjay Munde : राज्याच्या राजकारणात सध्या मोठ्या खळबळजनक घडामोडी घडत आहेत. नाशिकच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने मंत्री माणिकराव कोकाटे यांना एका प्रकरणात दोषी ठरवत दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या नियमानुसार, दोन वर्षांची शिक्षा झाल्यामुळे कोकाटे यांची आमदारकी रद्द झाली असून त्यांना मंत्रिपदावरूनही पायउतार व्हावे लागले आहे. कोकाटे यांची आमदारकी […] The post Supriya Sule : आम्ही शांत बसणार नाही.! धनंजय मुंडे मंत्रिमंडळात कमबॅक करण्याची शक्यता, सुप्रिया सुळेंचा सरकारला दम appeared first on Dainik Prabhat .

24 C