SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

31    C
... ...View News by News Source

बिग बॉस १९ स्पर्धकांना दाखवली ट्रॉफीची पहिली झलक, टॉप ५ स्पर्धकांचे डोळे दिपले

मुंबई : बिग बॉस १९ चा ग्रँड फिनाले जवळ येत असताना घरातील पाच फायनलिस्ट निश्चित झाले आहेत. बिग बॉसने या सीझनच्या ट्रॉफीची पहिली झलक दाखवून घरातील स्पर्धकांना रोमांचित केले. यंदाची ट्रॉफी विशेष आहे कारण तिचा लूक अगदी तसा आहे जसा सलमान खान शोच्या प्रोमोमध्ये पोज देताना दिसतो.पाच फायनलिस्ट जाहीरफायनल फेरीसाठी निवडले गेलेले पाच स्पर्धक आहेत गौरव खन्ना, अमल मलिक, तान्या मित्तल, फरहाना आणि प्रणित मोरे. मालतीची शोमधून एक्झिट झाली. असेम्बली रूममध्ये बिग बॉसने यंदाच्या सीझनच्या ट्रॉफीचं अनावरण केलं. दोन हात जोडलेल्या डिझाइनमधील ही खास ट्रॉफी पाहताच स्पर्धकांना आनंद गगनात मावेनासा झाला.बिग बॉस १९ चा ग्रँड फिनाले ७ डिसेंबर २०२५ रोजी होणार आहे. यात विजेत्याला मिळणार आहे एक सोनेरी स्वप्नांची ट्रॉफी.. खास डिझाईन केलेली आणि विजेत्यांना अविस्मरणीय ठरेल अशी ही ट्रॉफी आहे. ही ट्रॉफी एक खास प्रतीक आहे. यंदाच्या सीझनची थीम घरवालों की सरकार अशी आहे. ट्रॉफीचा वरचा भाग दोन हातांच्या आकाराचा आहे जो बोटांनी एकत्र जोडलेला आहे. ही ट्रॉफी आहे सिल्व्हर क्रॉस हातांची आणि हिऱ्यांनी मढवलेली आहे. त्यामुळे ती चमकदार दिसतेय. याच हातांच्या खाली BB हा लोगो आहे. ही आकर्षक अशी ट्रॉफी घराच्या आकारासारखी आहे. महत्त्वाचं म्हणजे ही ट्रॉफी सलमान खान ज्याप्रमाणे हात जोडतो त्या प्रतिमेशी मिळतीजुळती आहे.आता लक्ष सात डिसेंबरच्या रात्रीकडे...रात्री नऊ वाजता बिग बॉसचा लाईव्ह फिनालेचा महाप्रसंग रंगणार आहे. त्यातच या आकर्षक ट्रॉफीवर नाव कोण कोरणा र? स्टारडम कोणाच्या वाट्याला येणार? बस... काही तास शिल्लक आहेत...आणि त्यानंतर ठरणार आहे बिग बॉस सीझन १९ चा खरा बॉस...

फीड फीडबर्नर 5 Dec 2025 8:10 pm

वरळीत शिउबाठाची दादागिरी; भाजपच्या कामगार संघटनेचा फलक लावण्यास विरोध

मुंबई : विधानसभा निवडणुकीत वरळीची जागा कशीबशी जिंकलेल्या शिउबाठाला अद्याप राजकीय स्थितीचे भान आलेले दिसत नाही. वरळीतील एका खासगी हॉटेलमध्ये भाजपप्रणित युनियनचा फलक लावण्यावरून शिउबाठाच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी राडा घातला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत, कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.वरळीतील हॉटेल सेंट रेजिसमध्ये भाजपने आपली कामगार संघटना स्थापन केली असून, त्याबाबतचा फलक लावण्याचे काम शुक्रवारी सुरू होते. मात्र, शिउबाठाच्या कार्यकर्त्यांना दादागिरी करीत, फलक लावण्यास विरोध केला. भाजपच्या कार्यकर्त्यांनीही त्याला जशासतसे उत्तर दिल्यामुळे हॉटेलच्या परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करावा लागला.याविषयी माहिती देताना स्थानिक पदाधिकारी समीर कदम म्हणाले, “आमच्या युनियनचा बोर्ड लावण्याकरिता आम्ही तेथे जमलो होतो. कामगारांचा युनियनशी चांगला संपर्क राहील आणि त्यांच्या न्याय हक्कांसाठी आम्हालाही आवाज उठवता येईल, हा त्यामागचा हेतू होता. मात्र, शिउबाठाच्या काही कार्यकर्त्यांनी उगाच गोंधळ घालायला सुरवात केली. भाजपने कोणतीही संघर्षाची भूमिका घेतलेली नाही”, असेही त्यांनी स्पष्ट केले.मुख्यमंत्र्यांनी दिला कारवाईचा इशारादरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून, कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. याविषयी छत्रपती संभाजीनगरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले, “सगळ्यांना कामगार युनियनमध्ये त्यांच्या त्यांच्या मनाप्रमाणे काम करण्याचा पूर्ण हक्क आहे. संविधानानुसार सगळ्यांना मनाप्रमाणे काम करू द्यावे”, असे त्यांनी स्पष्ट केले.

फीड फीडबर्नर 5 Dec 2025 8:10 pm

इंडिगोचा सावळा गोंधळ, नागपूरहून पुण्यासाठी निघालेले प्रवासी हैदराबादला पोहोचले

नागपूर : इंडिगो विमानांच्या बिघडण्याचे, अपघात होण्याचे आणि क्रू मेम्बर्सच्या सावळ्या गोंधळाचे सत्र हे अजूनही सुरूच आहे. सलग दुसऱ्या दिवशी इंडिगोच्या शेकडो उड्डाणांना रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप झाला. इंडिगोच्या या बेफिकीर कामामुळे बरेच प्रवासी एकाच ठिकाणी अडकून पडले.इंडिगोचे एक विमान नागपूरहुन पुण्याला जाणार होते. पण ते पुण्याला न पोहोचता थेट हैदराबादला गेले. विमान हैदराबादला पोहोचलं, तेव्हा तिथे देखील त्यांना तब्बल एक तास विमानाच्या बाहेर येऊच दिलं नाही, झालेल्या घटनेमुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. अखेर प्रवाशांचा संयम सुटला आणि त्यांनी विमानातच गोंधळ घालायला सुरुवात केली. प्रवाशांनी विमानात गोंधळ सुरू केल्यामुळे अखेर या प्रवाशांना विमानातून बाहेर सोडण्यात आलं, नागपुरहून पुण्याला निघालेले अनेक प्रवासी अजूनही हैदरबाद विमानतळावरच अडकून पडले आहेत. सध्या या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे.हाती आलेल्या माहितीनुसार नागपूरमधील प्रवाशांना इंडिगोच्या विमानाने पुण्याला जायचे होते. मात्र इंडिगोने गुरुवारी प्रवाशांना मध्यरात्री नागपुरातून घेऊन पुण्याऐवजी हैदराबादला सोडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. काल रात्री ११ वाजून ४० मिनिटांनी नागपूर – पुणे अशी इंडिगोची फ्लाईट नियोजित होती. मात्र ती फ्लाईट एक वाजेपर्यंत नागपुरातून उडालीच नाही, त्यानंतर रात्री एक वाजता फ्लाईटने उड्डाण घेतले. मात्र अर्ध्या तासाच्या उड्डाणानंतर आपल्या विमानाला पुण्यात लँड होण्याची परवानगी मिळत नाही, त्या ठिकाणी लँड होण्यासाठी जागा नाही, असं कारण सांगून इंडिगोच्या पायलटने आणि व्यवस्थापनाने फ्लाईट पुण्या ऐवजी हैदराबादला लँड केलं.हे विमान हैदराबादला लँड झाल्यानंतरही प्रवाशांना सुमारे एक तास विमानाच्या बाहेर येऊ दिले नाही. अखेरीस काही प्रवाशांनी विमानाच्या आत गोंधळ घालण्यास सुरुवात केल्यानंतर त्यांना हैदराबाद टर्मिनल्सवर विमानातून बाहेर सोडण्यात आले. अजूनही नागपूरचे अनेक प्रवासी जे पुण्याला जायला निघाले होते, ते हैदराबादमध्येच अडकून पडले आहेत. नागपूरातील प्रवाशांनी दिलेल्या माहितीप्रमाणे वाराणसीवरून पुण्याला जाण्यासाठी निघालेले देखील अनेक प्रवासी सध्या हैदराबादमध्ये अडकून पडले आहेत. हैदराबाद विमानतळावर प्रचंड हाल होत असल्याची तक्रार या प्रवाशांनी केली आहे.

फीड फीडबर्नर 5 Dec 2025 8:10 pm

Nashik Tapovan News : “हे म्हणजे, माणसं मारायची आणि त्यांना मूल बक्षिस म्हणून द्यायचे…”; वृक्षतोडीवरून सयाजी शिंदे पुन्हा भडकले

Nashik Tapovan News । Sayaji Shinde – प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे नाशिकच्या तपोवनात आले असता त्यांनी राज्‍य सरकारवर जोरदार टीका केली असून ‘निवडून दिले म्हणजे सगळे अधिकार तुमच्याकडे आहेत असे नाही. सर्वसामान्य माणसाचा विचार केला पाहिजे. मोठी झाडे तोडायची आणि नवीन झाडं लावायची हे चूक आहे. काही माणसे मारायची आणि त्यांना मूल बक्षिस म्हणून द्यायचे, […] The post Nashik Tapovan News : “हे म्हणजे, माणसं मारायची आणि त्यांना मूल बक्षिस म्हणून द्यायचे…”; वृक्षतोडीवरून सयाजी शिंदे पुन्हा भडकले appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 5 Dec 2025 7:47 pm

सातारा: उसाच्या ट्रॉलीचा डाबर तूटला; ट्रॅक्टर थेट पुलावर लोंबकळला…

कराड – ओंड ते उंडाळे यादरम्यान असलेल्या तुळसण पुलावर शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला. अचानक पाठीमागील ट्रॉलीचा डाबर तुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि वेगात असलेला ट्रॅक्टर सरळ पुलाच्या कठड्यावर जाऊन अडकला. मात्र, चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे त्याचा जीव वाचला. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, शेवाळेवाडी- म्हासोली येथील अथणी- रयत कारखान्याकडे ऊस घेऊन […] The post सातारा: उसाच्या ट्रॉलीचा डाबर तूटला; ट्रॅक्टर थेट पुलावर लोंबकळला… appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 5 Dec 2025 7:31 pm

Vaibhav Suryavanshi : नाद करा पण वैभवचा कुठं! विराट-रोहितलाही मागे टाकत ठरला २०२५ चा ‘गूगल किंग’

Vaibhav Suryavanshi Trend in Google Search in 2025 : भारतीय क्रिकेटमधील युवा स्टार वैभव सूर्यवंशीने एक खास विक्रम आपल्या नावावर करत २०२५ मध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मासह सर्व दिग्गज खेळाडूंना मागे टाकले आहे. २०२५ हे वर्ष वैभवच्या कारकिर्दीसाठी अत्यंत यशस्वी ठरले, ज्यात त्याला आयपीएलमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली आणि त्याने शतकी खेळी देखील साकारली. […] The post Vaibhav Suryavanshi : नाद करा पण वैभवचा कुठं! विराट-रोहितलाही मागे टाकत ठरला २०२५ चा ‘गूगल किंग’ appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 5 Dec 2025 7:27 pm

ठाकरेंच्या शिवसेनेत इनकमिंग! भाजप अन् अजित पवार गटाला धक्का; संभाजीनगरमधील राजकीय समीकरणे बदलणार?

Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात प्रक्षप्रवेशाची राजकीय घडामोड समोर आली आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने धक्का दिला आहे. केवळ राष्ट्रवादीचेच नव्हे, तर भारतीय जनता पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनीही ‘मातोश्री’वर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत (उबाठा) प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे छत्रपती संभाजीनगर शहरातील राजकीय समीकरणे बदलणार का, असा प्रश्न […] The post ठाकरेंच्या शिवसेनेत इनकमिंग! भाजप अन् अजित पवार गटाला धक्का; संभाजीनगरमधील राजकीय समीकरणे बदलणार? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 5 Dec 2025 7:12 pm

मोदी पुतिन बैठकीतले महत्त्वाचे मुद्दे आणि भारत आणि रशिया दरम्यानच्या करारांची यादी जाणून घ्या एका क्लिकवर...

नवी दिल्ली : भारत आणि रशिया यांच्यातील धोरणात्मक मैत्रीला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या आणि दिल्लीत होत असलेल्या २३ व्या शिखर परिषदेच्या बैठकीच्या निमित्ताने रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. पुतिन आणि मोदी यांच्यात हैदराबाद हाऊस येथे झालेल्या बैठकीनंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत पंतप्रधान मोदींनी हशतवादापासून ते युक्रेनमधील शांततेपर्यंतच्या मुद्द्यांवर चर्चा केली. पंतप्रधान मोदींनी रशियाच्या नागरिकांना तीस दिवसांचा विनामूल्य पर्यटन व्हिसा देणार असल्याचेही जाहीर केले. ई टुरिस्ट व्हिसा आणि ग्रुप टुरिस्ट व्हिसा अशा दोन प्रकारात रशियाच्या नागरिकांना तीस दिवसांचा विनामूल्य पर्यटन व्हिसा मिळेल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. रशिया भारतातील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प बांधण्यासाठी सहकार्य करत असल्याची माहिती मोदींनी दिली.मोदींनी सांगितलेले सात महत्त्वाचे मुद्दे भारत आणि रशिया यांच्यातील धोरणात्मक मैत्रीला २५ वर्षे पूर्ण. पुतिन यांच्या विशेष प्रयत्नांमुळे या मैत्रीत सातत्य राहिले आणि विश्वासार्हता वृद्धिंगत झाली. जगाने अनेकच-उतार बघितले पण भारत आणि रशियाची मैत्री ध्रुव ताऱ्यासारखी राहिली. भारत-रशिया दरम्यान २०३० पर्यंतच्या आर्थिक सहकार्यासाठी विशेष करार पुतिन आणि मोदी इंडिया रशिया बिझनेस फोरमला मार्गदर्शन करणार अलीकडेच दोन नवीन रशियन-भारतीय वाणिज्य दूतावास उघडण्यात आले आहेत, यामुळे तुमची जवळीक वाढेल. या वर्षी ऑक्टोबरमध्ये लाखो यात्रेकरूंनी काल्मिकियामध्ये भगवान बुद्धांच्या पवित्र अवशेषांना भेट दिली. आता भारत रशियाच्या नागरिकांना तीस दिवसांचा विनामूल्य पर्यटन व्हिसा देणार. ई टुरिस्ट व्हिसा आणि ग्रुप टुरिस्ट व्हिसा अशा दोन प्रकारात रशियाच्या नागरिकांना तीस दिवसांचा विनामूल्य पर्यटन व्हिसा मिळेल. भारताने सुरुवातीपासूनच युक्रेन मुद्द्यावर शांततेचा पुरस्कार केला आहे. या प्रकरणाच्या शांततापूर्ण आणि कायमस्वरूपी तोडग्यासाठी केल्या जाणाऱ्या सर्व प्रयत्नांचे आम्ही स्वागत करतो. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत रशियाने सहकार्य केले आहे. पहलगाम असो किंवा क्रोकस सिटी हॉलवरील हल्ला असो, या सर्वांचे मूळ एकच आहे. दहशतवाद हा मानवतेच्या मूल्यांवर थेट हल्ला आहे आणि यामध्ये जागतिक एकता ही आपली ताकद आहे.पुतिननी सांगितलेले सात महत्त्वाचे मुद्दे रशिया आणि भारत यांच्यातील परस्पर संबंध खूप मजबूत आहेत. विविध क्षेत्रात एकमेकांना पुरेपूर सहकार्य सुरू आहे. ट्रेन, गुंतवणूक आणि तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्य वाढीसाठी चर्चा सुरू आहे तेल आणि वायू क्षेत्रात रशिया आणि भारत एकमेकांना गरज ओळखून सहकार्य करत आहे रशियामध्ये भारतीय चित्रपट खूप लोकप्रिय आहेत. रुपयाच्या वापराची व्याप्ती देखील वाढली आहे. ब्रिक्स देशांसोबतचे भारत आणि रशियाचे सहकार्य सर्वांना पूरक आणि विकासाला चालना देणारे असे आहे.व्यापार आणि तंत्रज्ञान क्षेत्रात प्राधान्याने सहकार्य वाढत आहे. रशिया भारताला देशातील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प बांधण्यासाठी सहकार्य करत आहे. आतापर्यंत तीन अणुभट्ट्या ऊर्जा जाळ्याशी जोडल्या आहेत. आणखी चार भट्ट्यांचे काम सुरू आहे. या अणुभट्ट्यांमुळे भारताच्या औद्योगिक क्षेत्राला तसेच नागरी वस्त्यांना स्वच्छ ऊर्जा मिळेल. रशिया आणि भारत ब्रिक्स, एससीओ आणि इतर आंतरराष्ट्रीय मंचांवर इतर देशांमधील समान विचारसरणीच्या देशांसह स्वतंत्र आणि स्वावलंबी परराष्ट्र धोरण राबवत आहेत... आम्ही संयुक्त राष्ट्रांमध्ये समाविष्ट असलेल्या कायद्याच्या राज्याच्या मुख्य तत्त्वाचे रक्षण करत आहोत.भारत आणि रशिया यांच्यातील महत्त्वाचे सहकार्य करार भारत आणि रशिया यांच्यात कामगार सहकार्य करार भारत आणि रशियातील नागरिकांच्या एकमेकांच्या देशात होणाऱ्या स्थलांतरातून निर्माण होणारे प्रश्न हाताळण्यासाठीचा करार भारत आणि रशिया यांच्यात आरोग्य सेवा, वैद्यकीय शिक्षण आणि विज्ञान क्षेत्रातील सहकार्यासाठी करार अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण आणि अन्न सुरक्षिततेच्या क्षेत्रात ग्राहक हक्क संरक्षण आणि मानवी कल्याणावरील देखरेखीसाठी भारत आणि रशिया दरम्यान सहकार्य करार ध्रुवीय पाण्यात कार्यरत जहाजांवरील तज्ज्ञांच्या प्रशिक्षणासाठी करार खतांसाठी भारत आणि रशियाचा सहकार्य करार मालवाहतूक आणि आयात - निर्यातीवरील करांसाठी भारत आणि रशियाच्या संबंधित कर वसुली विभागांचा सहकार्य करार भारत आणि रशियात टपाल आणि दूरसंचार क्षेत्रात सहकार्य करार डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी, पुणे आणि फेडरल स्टेट ऑटोनॉमस एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन ऑफ हायर एज्युकेशन नॅशनल टॉम्स्क स्टेट युनिव्हर्सिटी यांच्यात वैज्ञानिक आणि शैक्षणिक सहकार्याचा करार मुंबई विद्यापीठ, लोमोनोसोव्ह मॉस्को स्टेट युनिव्हर्सिटी आणि जॉइंट-स्टॉक कंपनी मॅनेजमेंट कंपनी ऑफ रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड यांच्यात सहकार्याबाबत टॉम्स्क करार प्रसार भारती, भारत आणि जॉइंट स्टॉक कंपनी गॅझप्रॉम-मीडिया होल्डिंग, रशियन फेडरेशन यांच्यातील प्रसारणावर सहकार्य आणि सहकार्यासाठी सामंजस्य करार. प्रसार भारती, भारत आणि नॅशनल मीडिया ग्रुप, रशिया यांच्यातील प्रसारणावर सहकार्य आणि सहकार्यासाठी सामंजस्य करार प्रसार भारती, भारत आणि बिग एशिया मीडिया ग्रुप यांच्यातील प्रसारणावर सहकार्य आणि सहकार्यासाठी सामंजस्य करार प्रसार भारती, भारत आणि एएनओ टीव्ही-नोवोस्ती यांच्यातील प्रसारणावर सहकार्य आणि सहकार्यासाठी सामंजस्य कराराची परिशिष्ट टीव्ही ब्रिक्स संयुक्त स्टॉक कंपनी आणि प्रसार भारती (पीबी) यांच्यातील सामंजस्य करार भारताच्या धोरणात्मक क्षेत्रांच्या विकासासाठी कार्यक्रम - रशिया २०३० पर्यंत आर्थिक सहकार्याची रशियन बाजूने आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स (आयबीसीए) मध्ये सामील होण्यासाठी फ्रेमवर्क करार स्वीकारण्याचा निर्णय राष्ट्रीय हस्तकला संग्रहालय आणि हस्तकला अकादमी (नवी दिल्ली, भारत) आणि त्सारित्सिनो राज्य ऐतिहासिक, वास्तुकला, कला आणि लँडस्केप संग्रहालय-रिझर्व्ह (मॉस्को, रशिया) यांच्यातील इंडिया. फॅब्रिक ऑफ टाइम या प्रदर्शनासाठी करार रशियन नागरिकांना परस्पर आधारावर ३० दिवसांचा ई-टूरिस्ट व्हिसा मोफत देणे आणि रशियन नागरिकांना मोफत समूह पर्यटक व्हिसा देणे

फीड फीडबर्नर 5 Dec 2025 7:10 pm

हजारो विमानांच्या फेऱ्या सतत रद्द का होत आहेत?:कोणत्या नियमांवरून गोंधळ, DGCA ने सूट का दिली; इंडिगोलाच सर्वाधिक फटका कसा बसला

इंडिगो एअरलाइन्सच्या दर 10 पैकी 9 विमानांना उशीर होत आहे किंवा ती रद्द झाली आहेत. गेल्या 72 तासांत 1200 हून अधिक विमानांवर परिणाम झाला आहे आणि लाखो प्रवासी त्रस्त आहेत. इंडिगोचे म्हणणे आहे की, 'फ्लाइट ड्युटी टाइम लिमिटेशन'च्या (Flight Duty Time Limitation) नवीन नियमांची अंमलबजावणी करताना इतकी मोठी अव्यवस्था निर्माण झाली. सध्या, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) 10 फेब्रुवारी 2026 पर्यंत नियमांमध्ये तात्पुरती सूट दिली आहे, परंतु परिस्थिती सामान्य होण्यास वेळ लागेल. हजारो विमानांच्या थांबण्यामागचे खरे कारण काय आहे, समस्येची सुरुवात कशी झाली, इंडिगोवरच सर्वाधिक परिणाम का झाला, नियमांमध्ये सूट का द्यावी लागली आणि आता पुढे काय होईल; दिव्य मराठी एक्सप्लेनरमध्ये जाणून घ्या 6 महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे... प्रश्न-1: गेल्या 2-3 दिवसांत असे काय घडले की देशभरातील हजारो विमाने थांबली? उत्तरः खरं तर, पायलट युनियनने जास्त कामाचे तास आणि थकवा यामुळे जानेवारी 2024 मध्ये दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाच्या आदेशानंतर, DGCA ने फ्लाइट ड्युटी टाइम लिमिटेशन (FDTL) नियमांमध्ये बदल केले. पायलटला आराम देण्यासाठी 1 जुलै 2025 रोजी 'फ्लाइट ड्युटी टाइम लिमिटेशन (FDTL)' चे नियम लागू करण्यात आले होते. यानुसार, एअरलाइन कंपन्यांसाठी पायलटना आठवड्यातून 36 तासांऐवजी 48 तास आराम, म्हणजेच दोन दिवसांची साप्ताहिक सुट्टी देणे बंधनकारक केले होते. या काळात कोणतीही सुट्टी साप्ताहिक सुट्टी म्हणून मोजण्यावर बंदी घालण्यात आली होती. FDTL च्या दुसऱ्या टप्प्यात, 1 नोव्हेंबरपासून नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) पायलट आणि इतर क्रू मेंबर्सच्या सलग रात्रीच्या शिफ्टवरही बंदी घातली होती. या नवीन नियमांमुळे इंडिगो पायलट आणि इतर कर्मचाऱ्यांची कमतरता दूर करू शकले नाही आणि गेल्या 4 दिवसांत इंडिगोने 1200 हून अधिक उड्डाणे रद्द केली... DGCA ने म्हटले आहे की, FDTL फेज 2 च्या नियोजनातील कमतरतेमुळे क्रूची कमतरता निर्माण झाली आहे. इंडिगो काही ना काही कारणे देत राहिली. जेव्हा एक हजारहून अधिक विमानांची उड्डाणे रद्द झाली, तेव्हा इंडिगोने अखेर आपली चूक मान्य करत प्रवाशांची माफी मागितली आहे. प्रश्न-2: इंडिगो उपायांच्या ऐवजी सतत कारणे का देत राहिले? उत्तर: 2 डिसेंबर रोजी विमान रद्द झाल्यापासून इंडिगोने अनेक वेळा अधिकृत निवेदन जारी करून याची वेगवेगळी कारणे सांगितली, परंतु स्पष्टपणे हे सांगितले नाही की नवीन नियमांनुसार पायलट आणि क्रूला अधिक आराम देण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसा कर्मचारी वर्ग नाही… इंडिगोने कबूल केले की, क्रूची आवश्यकता अंदाजित प्रमाणापेक्षा जास्त होती. इंडिगोने सांगितले की, नवीन क्रू रोस्टरिंग नियम आणि इतर तांत्रिक कारणे, हवामान इत्यादींच्या एकत्रित परिणामामुळे त्यांच्या विमानांवर परिणाम झाला. अहवालानुसार, इंडिगोला नवीन पायलट आणि इतर कर्मचारी नियुक्त करण्यासाठी 9 महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता, परंतु इंडिगोने गरजेनुसार नवीन भरती केली नाही. इंडिगोने एक लांब नोट लिहून प्रवाशांची माफी मागितली आहे आणि लवकरच सेवा पूर्ववत करण्याची ग्वाही दिली आहे. प्रश्न-3: पायलट-क्रूच्या विश्रांतीचा संपूर्ण नियम काय आहे? उत्तर: FDTL च्या नियमांनुसार… एअरलाईन्सना दरमहा थकवा-धोका अहवाल सादर करावा लागेल. असे न केल्यास 1 कोटी रुपयांपर्यंत दंड लागू शकतो. प्रश्न-4: सरकारने हे नियम का बनवले आणि त्यांची अंमलबजावणी करणे का आवश्यक होते? उत्तरः DGCA ने वैमानिकांच्या थकव्याशी संबंधित अहवालांचे पुनरावलोकन केल्यानंतर हे नियम लागू केले आहेत. गेल्या 3-4 वर्षांत वेळोवेळी अनेक वैमानिक संघटनांनी DGCA ला पत्र लिहून या नियमांची अंमलबजावणी करण्याची मागणी केली होती, जेणेकरून वैमानिकांना आवश्यक विश्रांती मिळू शकेल. दिल्ली उच्च न्यायालयात 2019 पासून सुरू असलेल्या या याचिकांनंतर DGCA ने हे नियम बनवले आहेत. DGCA चे म्हणणे आहे की, वैमानिकांचा थकवा मोठ्या अपघातांना जन्म देऊ शकतो. जगभरातील एअरलाईन्सही याला एक मोठा धोका मानतात. थकव्यामुळे खराब परिस्थितीत निर्णय घेण्याची आणि रात्रीच्या वेळी विमान उतरवण्याची क्षमताही प्रभावित होऊ शकते. इकोनॉमिक टाइम्सच्या अहवालानुसार, DGCA ने 2023 मध्ये 1,622 व्यावसायिक वैमानिकांना परवाने जारी करण्याची घोषणा केली होती, परंतु तरीही पुढील 5 वर्षांत 2,375 वैमानिकांची कमतरता राहील. 2029 पर्यंत एकूण 22,400 वैमानिकांची गरज असेल, तर सध्या फक्त 11,745 वैमानिक आहेत. 2022 ते 2025 दरम्यान उड्डाणे वाढल्यामुळे वैमानिकांवर, विशेषतः कॅप्टनवर कामाचा ताण वाढला आहे. भारतातील वैमानिक प्रशिक्षण संस्थांची क्षमताही कमी आहे. दरवर्षी फक्त 1200-1500 वैमानिकांनाच प्रशिक्षणानंतर परवाना मिळू शकतो. तर गरज यापेक्षा खूप जास्त आहे. प्रश्न-5: अमेरिका आणि यूकेमध्ये वैमानिकांना किती विश्रांती मिळते? उत्तरः अमेरिकेच्या फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन (FFA) आणि युरोपच्या युनियन एव्हिएशन सेफ्टी एजन्सी (EASA) ने वैमानिकांना आवश्यक विश्रांती देण्यासाठी असेच काही नियम बनवले आहेत, जे अमेरिका आणि युरोपातील जवळपास सर्व एअरलाईन्सना लागू होतात… प्रश्न-6: नवीन नियमांमुळे सर्वाधिक इंडिगोलाच का फटका बसला? उत्तरः नवीन नियमांमुळे इंडिगो सर्वाधिक प्रभावित झाली आहे, कारण भारताच्या एअरलाइन्स मार्केटमध्ये तिचा सर्वाधिक 60% वाटा आहे. एअरलाइन दिवसभरात सुमारे 2,300 देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे चालवते. ही संख्या एअर इंडियाच्या एका दिवसात चालवल्या जाणाऱ्या उड्डाणांच्या जवळपास दुप्पट आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर जर 10–20 टक्के उड्डाणे देखील उशिराने धावली किंवा रद्द झाली, तर याचा अर्थ 200–400 उड्डाणे प्रभावित होणे असा होतो. इंडस्ट्री इनसाइडरच्या अहवालानुसार, इंडिगो भारतात मोठ्या प्रमाणावर काम करते. एअरलाइन्स मार्केटमध्ये तिचे वर्चस्व आहे. इंडिगोच्या सर्वाधिक आणि सातत्याने विमानांच्या फेऱ्या असतात. रात्री उशिराच्या आणि सकाळच्या उड्डाणांवर इंडिगो सर्वाधिक लक्ष केंद्रित करते. इंडस्ट्री इनसाइडरनुसार, या तुलनेत इतर एअरलाइन्स कंपन्या नवीन विमानांच्या वितरणातील विलंब आणि दुरुस्तीसाठी थांबलेल्या विमानांशी झगडत आहेत. अशा परिस्थितीत त्यांची उड्डाणे कमी आणि कर्मचारी जास्त आहेत. या एअरलाइन्स नवीन नियमांनुसार पायलट्सच्या ड्युटीचे वेळापत्रक सहजपणे तयार करू शकत आहेत. सध्या इंडिगोकडे 5,456 पायलट आणि 10,212 केबिन क्रू सदस्य आहेत. 41 हजारांहून अधिक कायमस्वरूपी कर्मचारी आहेत. इंडिगोचे म्हणणे आहे की नवीन फ्लाइट टाइम लिमिटेशन नियमांमुळे पायलट आणि क्रूची कमतरता निर्माण झाली आहे. नवीन नियमांनुसार, पायलटांच्या उड्डाणाच्या वेळेची मर्यादा दररोज 8 तासांपर्यंत कमी करण्यात आली आहे. रात्रीच्या लँडिंगची संख्या 6 वरून 2 पर्यंत कमी करण्यात आली आहे. क्रूसाठी 24 तासांत 10 तास विश्रांतीची वेळ ठेवण्यात आली आहे. प्रश्न-7: या संपूर्ण प्रकरणात पुढे काय होऊ शकते? उत्तरः एव्हिएशन तज्ज्ञ अनंत सेठी म्हणतात की, इंडिगोने विचारपूर्वक संप केला आहे. नवीन नियम अचानक लागू केले गेले नव्हते. कर्मचाऱ्यांची कमतरता पूर्ण करण्यासाठी इंडिगोकडे पुरेसा वेळ होता, परंतु भारतीय एव्हिएशन क्षेत्रात इंडिगोचा वाटा सुमारे 65% आहे. त्यांनी आपला खर्च कमी करण्यासाठी नवीन कर्मचाऱ्यांची भरती केली नाही आणि दबाव निर्माण करण्यासाठी उड्डाणांवर परिणाम केला. अनंत म्हणतात, ‘सध्या सरकारकडे प्रवाशांची समस्या दूर करण्याचा पर्याय नाही, त्यामुळे सध्या इंडिगोशी बोलणी सुरू आहेत. DGCA ने इंडिगोला विचारले आहे की, ते किती टप्प्यांत आणि कोणत्या प्रकारे नवीन नियम लागू करतील. कदाचित काही दिवसांत इंडिगो नवीन वेळापत्रक जारी करून काही उड्डाणे कमी करेल, कारण हाच एक उपाय आहे, अचानक पायलट वाढवणे सोपे काम नाही.’ अनंत यांच्या मते, पायलटला 48 तास आराम देणे आवश्यक आहे, त्यामुळे सरकार त्यांचे कामाचे तास कमी करण्यास सहजासहजी तयार होणार नाही.

दिव्यमराठी भास्कर 5 Dec 2025 7:08 pm

Baramati : राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; विदेशी दारूचा साठा आणि वाहन ताब्यात

बारामती – स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनधिकृत मद्य वाहतूक रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई करत सुमारे 6 लाख 97 हजार रुपये किमतीचा विदेशी दारूचा साठा आणि एक चारचाकी वाहन जप्त केले आहे. अधीक्षक अतुल कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. तालुक्यातील मौजे शिरवली गावाच्या हद्दीत सांगवी–बारामती रोड, माळेगाव फाटा […] The post Baramati : राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; विदेशी दारूचा साठा आणि वाहन ताब्यात appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 5 Dec 2025 6:54 pm

Bribe News: भूमी अभिलेख कर्मचाऱ्याला दीड लाखांची लाच घेताना रंगोहात अटक; शिवरस्ता मोजणी प्रकरण

अहिल्यानगर: नेवासा येथील भूमी अभिलेख कार्यालयात कार्यरत असलेल्या भूकरमापक अजयभानसिंग गुलाबसिंग परदेशी (वय ४८) याला नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १.५ लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली आहे. शासकीय कामासाठी आपल्या पदाचा गैरवापर करून स्वतःचा फायदा करून घेण्याच्या उद्देशाने ही लाच मागण्यात आली होती. हे प्रकरण पाथरवाला गायगव्हाण (ता. नेवासा) शिवारातील शिवरस्त्याच्या वादातून उद्भवले आहे. […] The post Bribe News: भूमी अभिलेख कर्मचाऱ्याला दीड लाखांची लाच घेताना रंगोहात अटक; शिवरस्ता मोजणी प्रकरण appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 5 Dec 2025 6:53 pm

Fakhar Zaman : पाकिस्तानच्या खेळाडूला पंचांशी पंगा घेणं पडलं महागात! ICC ने केली मोठी कारवाई

ICC Fakhar Zaman fined 10% match fee : पाकिस्तान संघाने नुकतीच आपल्या मायदेशात खेळल्या गेलेल्या टी-२० तिरंगी मालिकेच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेचा ६ विकेट्सनी धुव्वा उडवला. या विजयात पाकिस्तानने अष्टपैलू कामगिरी केली होती. मात्र, आता या सामन्यातील एका चुकीमुळे पाकिस्तानचा फलंदाज फखर झमानवर आयसीसीने मोठी कारवाई केली आहे. आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल त्याला दंड ठोठावण्यात आला असून, […] The post Fakhar Zaman : पाकिस्तानच्या खेळाडूला पंचांशी पंगा घेणं पडलं महागात! ICC ने केली मोठी कारवाई appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 5 Dec 2025 6:45 pm

राज्यात अपघाताचे सत्र सुरूच.! अंबा घाटात प्रवासी बसला अपघात; थेट १०० फूट खोल दरीत कोसळली

Bus accident – राज्यात अपघाताचे सत्र सुरू असून अंबा घाटात आज पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास प्रवासी बसचा अपघात घडला आहे. हा अंबा घाट महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि रत्नागिरीला या मुख्य शहरांना जोडतो. याच घाटात एका खासगी बसचा आज दुर्दैवी अपघात झाला आहे. मध्यप्रदेशचे पासिंग असलेली ही खासगी बस तब्बल ७० ते १०० फूट खोल दरीत कोसळली […] The post राज्यात अपघाताचे सत्र सुरूच.! अंबा घाटात प्रवासी बसला अपघात; थेट १०० फूट खोल दरीत कोसळली appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 5 Dec 2025 6:37 pm

‘महाराष्ट्राच्या विकासासाठी रात्रीची झोपही नाही’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारला एक वर्ष पूर्ण

मुंबई: महायुती सरकारने आज सत्तेत एक वर्ष पूर्ण केले असून, या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची महत्त्वपूर्ण कामगिरी आणि भविष्यातील धोरणे स्पष्ट केली आहेत. “मला रात्रीची झोप यासाठी येत नाही, कारण मला महाराष्ट्रासाठी अनेक गोष्टी करायच्या आहेत,” अशा शब्दांत त्यांनी राज्याप्रतीची आपली बांधिलकी व्यक्त केली. वर्षपूर्तीनिमित्त बोलताना फडणवीस यांनी महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले आणि […] The post ‘महाराष्ट्राच्या विकासासाठी रात्रीची झोपही नाही’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारला एक वर्ष पूर्ण appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 5 Dec 2025 6:13 pm

रिंकू राजगुरूच्या ‘आशा’ या सिनेमाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई : रिंकू राजगुरूच्या ‘आशा’ या आगामी चित्रपटाने प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच वाढवली आहे. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या टिझरमध्ये ‘बाई अडलीये म्हणून नडलीये’ ही प्रभावी टॅगलाईन आणि सायकलवरून गावागावांत फिरणाऱ्या आरोग्य सेविकेची झलक दाखवत चित्रपटाने सर्वांचे लक्ष वेधले होते. टिझरमधील वास्तववादी दृश्यांमुळे प्रेक्षकांच्या मनात आशाच्या प्रवासाबद्दल वेगळे कुतूहल निर्माण झाले.या कुतूहलाला उधाण आले ते नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘चालत रहा पुढे’ या प्रेरणादायी गाण्यामुळे. आशाच्या संघर्षाला बळ देणारे हे गीत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असून, प्रेक्षकांनी तिच्या जिद्दीचे आणि धैर्याचे कौतुक केले आहे. यानंतर प्रदर्शित झालेला दमदार ट्रेलर तर प्रेक्षकांच्या अपेक्षा आणखी वाढवणारा ठरला आहे.चित्रपटाचा ट्रेलर लाँच आयुष्यमान भारत – मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे, ज्येष्ठ साहित्यिक व ९९व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील, लोढा फाउंडेशनच्या अध्यक्षा मंजू मंगलप्रभात लोढा आणि आशा सेविका यांच्या उपस्थितीत पार पडला.‘आशा’ हा महिलांच्या संघर्षाचा वास्तववादी प्रवास मांडणारा चित्रपट आहे. ट्रेलरमध्ये रिंकूने साकारलेली आशा गावोगावी आरोग्याची जबाबदारी पेलताना, कुटुंबातील ताणतणावांचा सामना करताना, अन्यायासमोर ठामपणे उभी राहताना दिसते. तिच्या आयुष्यातील वेदना, तळमळ आणि न थकणारी धडपड ट्रेलरमधून स्पष्टपणे जाणवते.रिंकूसोबत सयंकित कामत, उषा नाईक, शुभांगी भुजबळ, सुहास शिरसाट, दिशा दानडे, दिलीप घारे आणि हर्षा गुप्ते या कलाकारांनी चित्रपटाला अधिक बळ दिले आहे. महिलांच्या आयुष्यातील कठोर निर्णय, सामाजिक वास्तव, भावनिक दडपण आणि अस्मितेची सतत सुरू असलेली लढाई या सर्वांचा प्रभावी संगम चित्रपटात पाहायला मिळणार आहे. ‘आशा’ ही कथा एका सेविकेपुरती मर्यादित नसून दररोज जीवनाशी दोन हात करणाऱ्या लाखो महिलांची कहाणी आहे.दीपक पाटील दिग्दर्शित ‘आशा’चे निर्माते कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, निलेश कुवर, दैवता पाटील आणि दीपक पाटील असून मुरलीधर चटवानी आणि रवींद्र औटी सहनिर्माते आहेत. पॅनोरमा स्टुडिओज या बॅनरखाली प्रदर्शित होणारा हा चित्रपट १९ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. टिझर, गाणे आणि ट्रेलरमुळे ‘आशा’विषयीची उत्सुकता सध्या उच्चांक गाठत आहे.

फीड फीडबर्नर 5 Dec 2025 6:10 pm

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. मानवी वस्त्यांच्या जवळपास हे वन्य प्राणी मुक्तपणे फिरताना दिसत असून, गेल्या काही दिवसांत अनेक ठिकाणी हल्ल्यांच्या घटना नोंदवल्या गेल्या आहेत.नारायणगाव–जुन्नर रस्त्यालगत साकार नगरी सोसायटीजवळ एका तरुणावर झालेला हल्ला चिंताजनक ठरला आहे. तनिष नवनाथ परदेशी हा १८ वर्षीय तरुण रात्री फोनवर बोलत उभा असताना बिबट्याने अचानक झडप घातली. त्याच्या पोटरीवर खोल ओरखडे झाले. तातडीची वैद्यकीय मदत मिळाल्याने तो सुदैवाने बचावला असून त्याची प्रकृती आता स्थिर आहे.घटनेनंतर वन विभागाने रात्रीच शोधमोहीम सुरू केली. ड्रोनच्या मदतीने जवळच्या मीनाक्षी कृपा वसतीगृह परिसरात तब्बल तीन बिबटे फिरताना दिसले. याच भागात एका दिवसात चार पाळीव जनावरांवर हल्ले झाल्याची माहिती समोर आली आहे. धोक्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाने परिसरात आठ पिंजरे लावले आहेत. जुन्नर तालुक्यात मागील काही वर्षांत अशा घटना सातत्याने घडत असल्याने मानव–वन्यजीव संघर्ष तीव्र होऊ लागला आहे.जुन्नर तालुक्यातील धोलवडमध्येही अशीच भीतीची घटना घडली. निसर्गरम्य परिसरात बिबट्यांचा वावर स्थिरपणे वाढत असून नागरिकांना अधिक सतर्क राहण्याची गरज भासते आहे. वन विभागाने नागरिकांना अंधारात बाहेर पडू नये, एकट्याने फिरणे टाळावे आणि कोणतीही हालचाल दिसल्यास त्वरित कळवावे, असे आवाहन केले आहे.

फीड फीडबर्नर 5 Dec 2025 6:10 pm

दीड वर्षांच्या जलतरणपटू 'वॉटर बेबी'वेदाने इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड वर कोरलं नाव

रत्नागिरी : वय फक्त दीड वर्ष… आणि कामगिरी थेट राष्ट्रीय स्तरावर! रत्नागिरीच्या वेदा सरफरेने देशातील सर्वात लहान भारतीय जलतरणपटू होण्याचा मान पटकावत इंडियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आपलं नाव कोरलं आहे. अवघ्या ९ महिन्यांची असताना पाण्यात हातपाय मारून तिने आपली क्षमता दाखवून ती कोकणची ‘जलपरी’ ठरली आहे.वेदाचा मोठा भाऊ रूद्र हा राज्यस्तरीय जलतरणपटू. त्याच्या सरावासाठी आई पायल सरफरे रोज शासकीय जलतरण तलावावर जायची. त्या दरम्यान तलावाजवळ बसणारी वेदा पाण्याकडे आवडीने पाहायची. एके दिवशी प्रशिक्षक महेश मिलके यांनी तिला पाण्यात सोडलं; पण अपेक्षेप्रमाणे ती रडली नाही. उलट पाण्यात सहज हातपाय मारत तिने सर्वांना आश्चर्यचकित केलं.१०० मीटरचा वेगवान विक्रमनित्य सरावामुळे वेदा काही महिन्यांतच पोहण्यात पारंगत झाली. वयाच्या १ वर्ष ९ महिन्यांत तिने १०० मीटर पोहण्याचं अंतर फक्त १० मिनिटे ८ सेकंदांत पूर्ण करत विक्रम रचला. इतक्या लहान वयात इतकं मोठं अंतर पूर्ण करणारी वेदा देशात प्रथम ठरली आहे.वेदा जलतरण तलावाच्या कठड्यावरून सहज पाण्यात झेपावते. पाण्याशी झालेली तिची ‘मैत्री’च तिला थेट रेकॉर्ड बुकपर्यंत घेऊन गेली आहे. तिच्या या यशाने रत्नागिरीचे नाव देशभरात झळकले आहे.

फीड फीडबर्नर 5 Dec 2025 6:10 pm

पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून आरे कॉलनी व दिंडोशी वन क्षेत्रातील रहिवाश्यांना घरे द्या'

मुंबई : आरेमध्ये तसेच दिंडोशी येथील वन क्षेत्रात गेली अनेक वर्ष वास्तव्य रहिवाशी हि देखील माणसे असून ते मुलभूत सुविधेपासून वंचित आहेत. त्यांना या मुलभूत सुविधा देण्यासाठी अनेक अडचणीचा सामना करावा लागत असल्याने आरे कॉलनी तसेच दिंडोशी वन क्षेत्रात राहणाऱ्या रहिवाश्यांना पंतप्रधान आवास योजनांच्या माध्यमातून घरे उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे खासदार रविंद्र वायकर यांनी लोकसभा नियम ३७७ अन्वये मागणी केली.पंतप्रधान आवास योजने अतंर्गत राज्य तसेच संघ राज्य येथील सर्व पत्र लाभार्थी यांना मुलभूत सुविधांनी युक्त असलेली पक्की घरे बांधून देण्यासाठी केंद्र सरकार राज्य तसेच संघ राज्य यांना सर्वतोपरी मदत करीत आहे. या व्यतिरिक्त भारत सरकारने पंतप्रधान आवास योजना-शहर नव्या रुपात सुरु केली असून त्यानुसार या सुधारती पंतप्रधान आवास योजना-शहर २.० (पीएमएवाई-यु २.०) योजनेला १ सप्टेंबर २०२४ पासून सुरुवात झाली. या योजनेच्या माध्यमातून राज्य तसेच संघ राज्य क्षेत्र यांनी प्राधिकरणा मार्फत शहरी भागांसाठी गरीब, मध्यमवर्गातील कुटुंबांतील लाभार्थी यांच्यासाठी माफक दरात घरे (एएचपी) , माफक दरात घरे (एआरएच) तसेच व्याज सबसिडी योजनेच्या (आईएसएस) माध्यमातून योजनेसाठी मदत करण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज जमा करण्यासाठी पीएमएवाई-२.० च्या संकेतस्थळावरून (https://pmay-urban.gov.in) करावे लागणार असल्याची माहिती, केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्री मनोहर लाल यांनी लेखी पत्राद्वारे खासदार वायकर यांना कळवले आहे.तसेच राज्य सरकारच्या विविध प्राधिकरणामार्फत पीएमएवाई-यु २.० मधील नियम व तरतुदीला अनुसरून योजना तयार करून राज्य सरकारच्या तसेच निरीक्षण समिती यांच्या मंजुरीनंतर हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पुढील मंजुरीसाठी पाठवण्यात यावा, अशी सूचना हि केंद्रीय गृहनिर्माण तसेच शहरी व्यवहार मंत्री मनोहर लाल यांनी खासदार वायकर यांना लेखी पत्राद्वारे केली आहे.

फीड फीडबर्नर 5 Dec 2025 6:10 pm

Shai Hope Century : डोळ्यांना संसर्ग असतानाही चष्मा लावून शतक; शाई होपने साकारली जिगरबाज खेळी

Shai Hope Century during NZ vs WI 1st Test Match : वेस्ट इंडिज संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे, जिथे टी-२० आणि एकदिवसीय मालिकेनंतर आता तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजचा स्टार फलंदाज शाई होपने एका अविस्मरणीय खेळीची नोंद केली आहे. डोळ्यांना संसर्ग झालेला असतानाही त्याने फलंदाजी करण्याचा निर्णय […] The post Shai Hope Century : डोळ्यांना संसर्ग असतानाही चष्मा लावून शतक; शाई होपने साकारली जिगरबाज खेळी appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 5 Dec 2025 6:09 pm

Today Top 10 News: महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा निर्णय; महापालिका निवडणुकीच्या तोंडावर महायुतीमध्ये ‘प्रवेशबंदी’, वाचा आजच्या टाॅप 10 बातम्या…

नगरपरिषद, नगरपंचायतचा निकाल 21 डिसेंबरलाच – नागपूर उच्च न्यायालयाचा आदेश सर्वोच्च न्यायालयाकडून कायम – नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबर रोजी लागणार आहे. नागपूर उच्च न्यायालयाच्या आदेशावर आज सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले. सोबतच विरोधातली याचिकाही फेटाळून लावली. त्यामुळे मतदारांचे लक्ष आता आगामी मतमोजणीकडे लागले असून अनेक शहरांतील सत्तांतराविषयीची उत्सुकता वाढली आहे. राज्यातील नगरपरिषद आणि […] The post Today Top 10 News: महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा निर्णय; महापालिका निवडणुकीच्या तोंडावर महायुतीमध्ये ‘प्रवेशबंदी’, वाचा आजच्या टाॅप 10 बातम्या… appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 5 Dec 2025 5:57 pm

Pimpri-Chinchwad : लाखोंची लूट करणाऱ्या टोळीला चोविस तासांत अटक; गुंडा विरोधी पथकाची कारवाई

Pimpri-Chinchwad – चिंचवडमध्ये कोयत्याचा वार करीत रोकड लुटणाऱ्या टोळीला अवघ्‍या २४ तासांत गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने अटक केली. यश रमेश अंधारे (वय १८, रा. थेरगाव, मूळ रा. भोनजे ता. बार्शी, सोलापूर), रितेश मुकेश चव्हाण (वय १८, रा. जगताप नगर, थेरगाव), रुपेंद्र रुपबसंत बैद (वय १९, रा. सुभाष नगर झोपडपट्टी, रिव्हर रोड, आंबेडकर कॉलनी, पिंपरी) […] The post Pimpri-Chinchwad : लाखोंची लूट करणाऱ्या टोळीला चोविस तासांत अटक; गुंडा विरोधी पथकाची कारवाई appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 5 Dec 2025 5:45 pm

फिनटेक कंपनी झॅगलकडून रिव्पे टेक्नॉलॉजीचे ९७ कोटीला १००% अधिग्रहण

मोहित सोमण: झॅगल (Zaggle Prepaid Services Limited) या फिनेटक व सास (SaaS) कंपनीने रिव्पे टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड (Rivpe Technology Private Limited) कंपनीचे अधिग्रहण केल्याची घोषणा केली आहे. ९७ कोटीला हे अधिग्रहण पूर्ण झाल्याचे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. संचालक मंडळाने या अधिग्रहणाला मान्यता दिली आहे . एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, फिनटेक कंपनीपैकी प्रसिद्ध असलेल्या स्टार्टअप कंपनी रिव्पे कंपनीचे १००% अधिग्रहण केले असून कंपनी कंज्यूमर क्रेडिट कार्ड व युपीआय आधारित या कंपनीचे अधिग्रहण केल्याने कंपनीचा विस्तार केल्याचे कंपनीने दिलेल्या माहितीत म्हटले.माहितीनुसार पहिले कंपनी २२ कोटींची गुंतवणूक या स्टार्टअप कंपनी रिव्पेमध्ये करणार असून उर्वरित ७५% गुंतवणूक कंपनी त्या कंपनीचा ब्रँड रिओ मनी (Rio.Money) मध्ये करणार आहे असे कंपनीने म्हटले. उत्पादनातील दर्जा वाढवण्यासाठी व आपल्या उत्पादनातील पोर्टफोलिओत वाढ करण्यासाठी हे अधिग्रहण (Acquisition) करण्यात आल्याचे कंपनीने नमूद केले.एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीत,'आम्ही तुम्हाला कळवू इच्छितो की झॅगल प्रीपेड ओशन सर्व्हिसेस लिमिटेडच्या संचालक मंडळाने आज झालेल्या बैठकीत रिव्पे टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेडच्या विद्यमान भागधारकांकडून २२ कोटी रुपयांपर्यंतच्या विचारार्थ ८१४२९ इक्विटी शेअर्स आणि १६४०७ अनिवार्य परिवर्तनीय (Compulsory Preference Share) पसंती शेअर्सच्या अधिग्रहणाला मान्यता दिली आहे. पूर्णपणे सौम्य आधारावर जे रिव्पेच्या जारी केलेल्या आणि भरलेल्या भांडवलाच्या १००% प्रतिनिधित्व करतात' या शब्दात कंपनीने स्पष्ट केले आहे.हे अधिग्रहण १००% कॅशमध्ये होणार असल्याचेही कंपनीने म्हटले आहे. त्यामुळे शेअर खरेदी करारासह १२० दिवसांच्या आत कंपनी हा व्यवहार पार पाडणार आहे. कंपनी पायाभूत सुविधेत भर टाकण्यासाठी ७५ कोटींची भांडवली गुंतवणूक करणार आहे. खरेदी केल्यावर रिव्पे झॅगलची उपकंपनी (Subsidiary) बनेल. डिजिटल क्रेडिट कार्डसह इतकं आधुनिक फिनटेक उत्पादनात आपला पोर्टफोलिओ वाढण्याचे कंपनीने ठरवले आहे. रिव्पेने आर्थिक वर्ष २०२५ कंपनीने ०.९८ कोटींचा महसूल मिळवला होता.झॅगलचे संस्थापक आणि कार्यकारी अध्यक्ष डॉ. राज पी. नारायणम म्हणाले,'रिओ.मनीचे संपादन हा भारताला सर्वात व्यापक फिनटेक परिसंस्थेपैकी एक तयार बनविण्याच्या आमच्या महत्त्वाकांक्षेतील एक धोरणात्मक आधारस्तंभ अनुरूप पडलेले पाऊल आहे. रिओ.मनी आज भारतातील दोन सर्वात परिवर्तनकारी देयक उपायांपैकी एक असलेल्या यूपीआय आणि ग्राहक क्रेडिट कार्ड यामध्ये आम्हाला अपवादात्मक क्षमता प्रदान करणारी ठरेल.'झॅगलचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश गोडखिंडी म्हणाले आहेत की,'रिओ.मनीची ग्राहक क्रेडिट कार्ड आणि यूपीआय व्यवसायातील क्षमता आमच्या वाढीच्या धोरणाशी अखंडपणे जुळणारी आहे. झॅगलचे ३५ लाख वापरकर्ते आणि ३६०० कॉर्पोरेट ग्राहकांचा फायदा घेऊन ताजे संपादन हे आमच्या एंटरप्राइझ खर्च व्यवस्थापन आणि वित्तीय तंत्रज्ञानातील भक्कम पायाला जमेस धरून एकत्रितपणे नवीन ग्राहक विभाग आणि बाजारपेठांमध्ये आमचा विस्तार वाढवण्यास नक्कीच फायदेशीर ठरेल.'रिओ.मनीच्या संस्थापक रिया भट्टाचार्य यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की,'झॅगलमध्ये सामील होणे रिओ.मनीसाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. ग्राहक क्रेडिट कार्ड आणि यूपीआय व्यवसायामधील आमची कौशल्ये, झॅगलच्या विस्तृत वापरकर्ता आधार आणि मजबूत एंटरप्राइझ संबंधांसह एकत्रितपणे जलद प्रमाणात एक शक्तिशाली पाया तयार करतील. भविष्यात लाखो लोकांसाठी आर्थिक प्रवेश आणि सुविधा वाढवणारे प्रभावी उपाय तयार करण्याच्या आमच्या दृष्टिकोनाला गती देण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.'दोन्ही कंपन्यांनी संयुक्तपणे दिलेल्या माहितीत एंटरप्राईजेस वाढीसाठी लागणारा खर्च, ग्राहक क्रेडिट कार्ड उत्पादन पोर्टफोलिओ वाढ, व्यापक विस्तार SaaS आधारित आर्थिक फ्लो कायम राखण्यासाठी, युपीआय डिजिटल पेमेंट प्रणाली विकसित करण्यासाठी केला जाणार आहे. सप्टेंबर २०२३ मध्ये झॅगलचा आयपीओ (Initial Public Offerings IPO) बाजारात दाखल झाला होता. ५६३ कोटींच्या या आयपीओला १२.८६ पटीने सबस्क्रिप्शन मिळाले होते. १६४ प्राईज असलेला शेअर १६४ रूपयालाच सूचीबद्ध (Listed) झाला होता. दुसऱ्या तिमाहीत कंपनीला इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) ७२% निव्वळ नफा (Net Profit) मिळाला होता. तर कंपनीच्या कामकाजातून मिळणाऱ्या महसूलात (Revenue from Operations) इयर ऑन इयर बेसिसवर दुसऱ्या तिमाहीत ४२.९% वाढ झाली आहे. कंपनीच्या ऑपरेटिंग खर्चातही इयर ऑन इयर बेसिसवर ४५.६% वाढ झाली होती. कंपनीने तिमाही निकालानंतर ईओपी (Employee Stock Options) अंतर्गत १३४४५१९६७ शेअरचे वाटप (Allotment) केले होते. त्यावेळीही कंपनीने नवीन वित्तीय उत्पादन निर्मितीसाठी निधी प्राप्त केला होता. २०११ साली कंपनीची (Zaggle) स्थापना झाली होती. आज कंपनीचा शेअर ४.०७% कोसळत ३५१.२० रूपये प्रति शेअरवर स्थिरावला आहे. गेल्या ५ दिवसात कंपनीचा शेअर १०.२४% घसरला असून इयर टू डेट (YTD) बेसिसवर ३५.५८% घसरला आहे. तर गेल्या ५ वर्षांत कंपनीने १२१.७९% परतावा गुंतवणूकदारांना दिला.

फीड फीडबर्नर 5 Dec 2025 5:30 pm

जहाज उद्योग, वाहतूक, आरोग्य, संरक्षण, आर्थिक क्षेत्रात भारत आणि रशिया दरम्यान करार, मोदी - पुतिन चर्चेतील पाच महत्त्वाचे मुद्दे

नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन मोठ्या शिष्टमंडळासह भारत दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात रशिया आणि भारत यांच्या दरम्यान जहाज उद्योग, बंदरे, वाहतूक, आरोग्य, संरक्षण आणि आर्थिक क्षेत्रात सहकार्यासाठी महत्त्वाचे करार झाले. राष्ट्राध्यक्ष पुतिन आणि पंतप्रधान मोदी यांच्यात महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा झाली. यानंतर करारांवर सह्या झाल्या.रशिया आणि भारत यांच्यात झालेल्या २३ व्या शिखर परिषदेनंतर दिल्लीत संयुक्त पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत बोलताना उर्जा क्षेत्रात, प्रामुख्याने नागरी वापराच्या अणुऊर्जेच्या क्षेत्रात सहकार्यासाठी करार झाल्याची माहिती दोन्ही देशांकडून देण्यात आली. दुर्मिळ खनिजांच्या पुरवठा साखळीचे संरक्षण करणे आणि या खनिजांचा सुयोग्य वापर करण्यासाठी नियोजन करणे याकरिता रशिया आणि भारत एकमेकांच्यात समन्वय राखतील, असेही संयुक्त पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. विनाअडथळा शुद्ध ऊर्जेचा पुरवठा, उच्च दर्जाची औद्योगिक निर्मिती आणि उच्च तंत्रज्ञानशी संबंधित उद्योग या क्षेत्रात दोन्ही देश एकमेकांना सहकार्य करणार आहेत. चला तर मग, जाणून घेऊ रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन आणि पंतप्रधान मोदी यांच्यात झालेल्या चर्चेतील पाच महत्त्वाचे मुद्दे... जहाज बांधणीतील सहकार्यामुळे भारत आत्मनिर्भरतेच्या दिशेने आणखी दमदाल पावलं टाकणार आहे. रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे; असे पंतप्रधान मोदी म्हणाले. जहाज बांधणीत कौशल्याधारित रोजगारांना प्राधान्य असेल, असेही ते म्हणाले. रशिया आणि भारत यांनी आर्थिक सहकार्य वाढवण्यासाठी व्हिजन २०३० दस्तऐवजावर स्वाक्षरी केली. लवकरच दोन्ही देश युरेशियन इकॉनॉमिक युनियनसोबत मुक्त व्यापार करार करणार आहेत. मागील आठ दशकांत जगाने अनेक चढ-उतार बघितले. पण भारत-रशिया मैत्री ध्रुव ताऱ्यासारखी स्थिर आणि मार्गदर्शक राहिली आहे. हे नाते परस्पर आदर आणि विश्वासावर बांधलेले आहे. आजच्या चर्चेत हे नाते आणखी मजबूत करणाऱ्या सर्व पैलूंवर चर्चा झाली, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. पुतिन यांचे स्वागत करताना पंतप्रधान म्हणाले की, २३ व्या भारत-रशिया द्विपक्षीय शिखर परिषदेत उपस्थित राहून त्यांना आनंद झाला. राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी २५ वर्षांपूर्वी या धोरणात्मक भागीदारीचा पाया रचल्याची आठवण मोदींनी करून दिली. पुतिन यांच्या कार्यकाळात रशिया आणि भारत मैत्री संबंध नव्या उंचीवर पोहोचले आहेत. रशिया आणि भारत यांच्यातील धोरणात्मक भागीदारी आणखी वृद्धिंगत होत आहे; असे मोदी म्हणाले.

फीड फीडबर्नर 5 Dec 2025 5:10 pm

Smriti Mandhana : ‘…हे मला खरंच वाटत नव्हतं’, लग्न स्थगित झाल्यानंतर स्मृतीने पहिल्यांदाच केली पोस्ट; म्हणाली, ‘मी देवाची..

Smriti Mandhana post video after wedding postponed : टीम इंडियाची स्टार फलंदाज स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचा २३ नोव्हेंबर रोजी लग्न सोहळा पार पडणार होता. मात्र, लग्नाच्या दिवशी सकाळी स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना यांची तब्येत बिघडली आणि लग्न अचानक स्थगित करण्यात आले. यानंतर सोशल मीडियावर पलाश मुच्छलबद्दल अफवा पसरल्या होत्या. आता या सर्व […] The post Smriti Mandhana : ‘…हे मला खरंच वाटत नव्हतं’, लग्न स्थगित झाल्यानंतर स्मृतीने पहिल्यांदाच केली पोस्ट; म्हणाली, ‘मी देवाची.. appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 5 Dec 2025 5:08 pm

Nitish Kumar : नितीश कुमारांचे नाव आता ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये; १० वेळा मुख्यमंत्री झाल्याबद्दल केले अभिनंदन

Nitish Kumar : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आणखी एक विक्रम केला आहे. नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएच्या विजयानंतर, नितीश कुमार १० वेळा मुख्यमंत्री झाले. त्यांच्या नियुक्तीमुळे आता त्यांना ‘लंडन वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये स्थान मिळाले आहे. लंडन वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्सने नितीश कुमार यांना दहाव्यांदा शपथ घेतल्याबद्दल पत्र लिहून या कामगिरीबद्दल अभिनंदन केले […] The post Nitish Kumar : नितीश कुमारांचे नाव आता ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये; १० वेळा मुख्यमंत्री झाल्याबद्दल केले अभिनंदन appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 5 Dec 2025 5:04 pm

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी; खात्यात येणार 3000 रुपये?

मुंबई: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या (Ladki Bahin Yojana) लाखो लाभार्थ्यांसाठी वर्षाअखेरीस मोठी भेट मिळण्याची शक्यता आहे. डिसेंबर महिन्यात ₹1500 नाही, तर थेट ₹3000 सन्माननिधी जमा होण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर महिन्याचा हप्ता अजून जमा न झाल्याने, सरकार नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्यांचे दोन हप्ते एकत्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्याची शक्यता आहे, अशी […] The post Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी; खात्यात येणार 3000 रुपये? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 5 Dec 2025 4:48 pm

भारतात येणाऱ्या रशियन नागरिकांची संख्या वाढणार; 30 दिवसांचा मोफत व्हिसा देण्याची मोदींची मोठी घोषणा

नवी दिल्ली: रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत रशियातील नागरिकांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. रशियन पर्यटकांसाठी ३० दिवसांचा ई-टुरिस्ट व्हिसा आणि ३० दिवसांचा ग्रुप टुरिस्ट व्हिसा मोफत देण्याची घोषणा यावेळी करण्यात आली. या घोषणेमुळे भारतात येणाऱ्या रशियन नागरिकांची संख्या वाढण्याची […] The post भारतात येणाऱ्या रशियन नागरिकांची संख्या वाढणार; 30 दिवसांचा मोफत व्हिसा देण्याची मोदींची मोठी घोषणा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 5 Dec 2025 4:39 pm

Leopard Rescue : हुलकावणी देणारा बिबट्या अखेर जेरबंद; पाच दिवसांच्या मोहिमेला यश!

Leopard Rescue : दौंड तालुक्याच्या पूर्व भागात दिवसेंदिवस नागरी वस्ती सह पाळीव जनावरांवर बिबट्यांचे हल्ले होत असल्याने, हिंगणीबेर्डी येथे मागील पाच दिवसांपूर्वी बिबट्या पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला होता. आज पहाटेच्या सुमारास पिंजऱ्यातील शिकार टिपण्यासाठी आलेला बिबट्या जेरबंद करण्यास वन विभागाला यश आले आहे. दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील काही गावांमध्ये बिबट्याचा वावर वाढत असून शेतातील गोट्यांमधील […] The post Leopard Rescue : हुलकावणी देणारा बिबट्या अखेर जेरबंद; पाच दिवसांच्या मोहिमेला यश! appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 5 Dec 2025 4:31 pm

शेअर बाजार सविस्तर विश्लेषण: आरबीआयच्या निर्णयानंतर बँक निर्देशांकात धमाका मात्र 'ही'टेक्निकल पोझिशन? सेन्सेक्स ४३७.०५ व निफ्टी १५२.७० उसळला

मोहित सोमण: रेपो दरातील कापणीनंतर बँक निर्देशांकातील जबरदस्त वाढीमुळे शेअर बाजारात अखेरच्या सत्रात वाढ झाली आहे. इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सकाळच्या सत्रात वाढ झाल्याने सेन्सेक्स ४३७.०५ व निफ्टी १५२.७० अंकाने वाढ झाली आहे. परिणामी सेन्सेक्स ८५७१२.३७ व निफ्टी २६१८६.४५ पातळीवर स्थिरावला आहे. सेन्सेक्स बँक ५७१.५२ व बँक निफ्टी ४८८.५० अंकाने उसळला. आज आरबीआयच्या पतधोरण समितीच्या बैठकीनंतर आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी रेपो दरात २५ बेसिस पूर्णांकाने कपात करण्याचा निर्णय घेतल्याने रेपो दर ५.२५% पातळीवर स्थिरावला आहे. त्यामुळेच बँकेच्या कर्जाचे व्याजदर कमी होण्याची शाश्वती निर्माण झाल्याने बँक, एनबीएफसी कंपनीच्या शेअर्ससह रियल इस्टेट,ऑटो जिथे रोख प्रवाह महत्वाचा ठरतो या ठिकाणी शेअर्समध्ये वाढ झाली आहे. निफ्टी व्यापक निर्देशांकातील अखेरच्या सत्रात स्मॉलकॅप १०० (०.५७%), स्मॉलकॅप ५० (०.५३%) निर्देशांकात घसरण झाली असली तरी इतर निर्देशांकात वाढ झाली ज्यात सर्वाधिक वाढ निफ्टी १०० (०.५३%), मिडकॅप १०० (०.४९%), निफ्टी २०० (०.५२%) निर्देशांकात वाढ झाली आहे. निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात सर्वाधिक वाढ बँक (०.८२%),फायनांशियल सर्विसेस (०.९८%), फायनांशियल सर्विसेस एक्स बँक (१.४८%) व्यतिरिक्त पीएसयु बँक (१.५१%), प्रायव्हेट बँक (०.४९%),आयटी (०.९०%), मेटल (०.६७%),ऑटो (०.७४%), रिअल्टी (०.३४%) या शेअर्समध्ये वाढ कायम राहिली आहे. सकाळी गुंतवणूकदारांनी सावधगिरीची भावना बाळगल्याने घसरलेले आयटी, रिअल्टी, ऑटो, मेटल शेअर्समध्ये निकालानंतर मोठी वाढ झाली आहे.अखेरच्या सत्रात खासकरुन शेवटच्या सत्रात चढउतारात घसरण झाल्याने सेन्सेक्स ३०० ते ४०० अंकामध्ये परावर्तित होत होता तर निफ्टीतील तेजी कायम होती. दुसरीकडे परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक वाढवल्याची शक्यता वर्तवली जात असल्याने बाजारातील भावनांना आधार मिळाला. अर्थात आज डॉलरच्या तुलनेत रूपयात घसरण झाली असली तरी लवकरच रिकवर होण्यास सुरुवात होऊ शकते. कमोडिटी बाजारातील अस्थिरता आजही कायम असल्याने सोन्याच्या दरात वाढ झाली. डॉलरच्या किंमती वाढत रूपयांची किंमत आंतरराष्ट्रीय स्तरावर घसरल्याने भारतीय सराफा बाजारातील सोने वाढले असून चांदीच्या मागणीत मात्र घसरण झाल्याने व फेड दरातील कपात अपेक्षित असल्याने चांदी आज स्वस्त झाली. याशिवाय मोठ्या प्रमाणात लार्जकॅप शेअर्समध्ये झालेल्या वाढीमुळे गुंतवणूकदारांना त्यांचा फायदा अखेरच्या सत्रात झाला.अखेरच्या सत्रात आशियाई बाजारातील बहुतांश निर्देशांकात वाढ झाली आहे. गिफ्ट निफ्टी (०.५४%) सह हेंगसेंग (०.५२%), कोसपी (१.७४%) शांघाई कंपोझिट (०.६९%) निर्देशांकात वाढ झाली आहे तर सर्वाधिक घसरण निकेयी २२५ (१.२७%), स्ट्रेट टाईम्स (०.०८%), जकार्ता कंपोझिट (०.०९%) निर्देशांकात घसरण झाली आहे. युएस बाजारातील सुरूवातीच्या कलात तिन्ही डाऊ जोन्स (०.०२%), एस अँड पी ५०० (०.११%), नासडाक (०.१३%) निर्देशांकात वाढ झाली आहे.अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ एम अँड एम फिनसर्व्ह (५.९२%), आरसीएफ (४.८०%), पतांजली फूड (४.१३%), सुंदरम फायनान्स (३.८७%), सुंदरम फायनान्स (३.४२%), एसबीआय कार्ड (३.४२%), इंडस (३.४१%), पीटीसी इंडस्ट्रीज (३.३७%), श्रीराम फायनान्स (३.२३%), एल अँड टी फायनान्स (३.०५%) समभागात वाढ झाली असून सर्वाधिक घसरण कँमस सर्विसेस (८०.०४%), काईन्स टेक (१२.५५%), हिन्दुस्तान युनिलिव्हर (५.०२%), डेटा पँटर्न (४.५१%), पीजी इलेक्ट्रोप्लास्ट (४.३४%), बंधन बँक (४.१३%), सफायर फूडस (३.६९%), नेटवेब टेक्नॉलॉजी (३.६५%) समभागात झाली आहे.आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले आहेत की,'भारतीय बाजारपेठांनी आरबीआयच्या अनपेक्षित २५ बीपीएस दर कपातीला उत्साहाने प्रतिसाद दिला आहे, जी दुसऱ्या तिमाहीतील मजबूत जीडीपी डेटामुळे अशक्य वाटत होती. या आश्चर्याने, महागाईच्या तीव्र घटीच्या अंदाजांसह आणि सहाय्यक तरलता उपायांसह, समभागांमध्ये जोखीम-संवेदनशीलता निर्माण केली आहे. खर्चात घट झाल्यामुळे ऑटो, रिअल इस्टेट आणि एनबीएफसी सारख्या दर-संवेदनशील क्षेत्रांमध्ये वाढ होत आहे. खाजगी बँकांनाही ट्रेझरी नफ्याच्या अपेक्षेपेक्षा वाढ झाली आहे, तर निव्वळ व्याज मार्जिन (एनआयएम) बद्दलच्या चिंतेमुळे त्यांची वाढ मर्यादित झाली आहे. एकूणच, डिसेंबरमध्ये मजबूत कॉर्पोरेट कमाईवर लक्ष केंद्रित करून अल्पकालीन दृष्टीकोन सावधपणे सकारात्मक राहिला आहे. तथापि, वाढती चालू खात्यातील तूट आणि जागतिक व्यापार तणाव यासारख्या जवळच्या जोखमी आव्हाने निर्माण करत आहेत. महिन्यासाठी देशांतर्गत कल राखण्यासाठी यूएस फेडचा दर कपातीचा पवित्रा महत्त्वपूर्ण असेल.'आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण अशिका इन्स्टिट्युशनल इक्विटीजने म्हटले आहे की,'भारतीय शेअर बाजारांमध्ये आज अस्थिर पण उत्साही सत्र दिसून आले, कारण आरबीआयने २५-बीपीएस रेपो दर ५.२५% पर्यंत कमी केला. बेंचमार्क निफ्टी २५९९९.८० पातळीवर उघडला, काही काळासाठी २५९८५ पातळीवर घसरला आणि नंतर २६२०० पातळीच्या पातळीची चाचणी घेण्यासाठी तीक्ष्ण पुनरागमन केले. बँक निफ्टीनेही धोरणात्मक हालचालींना त्वरित प्रतिसाद दिला, दिवसाच्या ५९१०६.५५ पातळीच्या नीचांकी पातळीवरून ५९,७७७.३५ पातळीच्या उच्चांकावर पोहोचला. क्षेत्रीय हालचाली मिश्रित होत्या, ज्यामध्ये पीएसयू बँका, आयटी, वित्तीय सेवा आणि धातूंनी आघाडी घेतली, तर मीडिया, एफएमसीजी, ऊर्जा आणि फार्मा कमकुवत नोटवर बंद झाले. एफ अँड ओ सेगमेंटमध्ये, इंडिगो, केनेस, एम्बर, पॉवरइंडिया आणि युनोमिंडा मध्ये लक्षणीय ओपन इंटरेस्ट बिल्डअप दिसून आले, जे या काउंटरमध्ये वाढलेल्या डेरिव्हेटिव्हचे संकेत देते.'आजच्या बाजारातील बँक निफ्टीतील परिस्थितीवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे तांत्रिक विश्लेषक वत्सल भुवा म्हणाले आहेत की,'शुक्रवारच्या सत्रात, बँक निफ्टीने एक दीर्घ तेजीची कॅंडलस्टिक तयार केली, त्याने त्याचा १० दिवसांचा एसएमए (Simple Moving Average SMA) यशस्वीरित्या परत मिळवला आणि चालू सकारात्मक गतीला बळकटी दिली. तथापि, आरएसआय (Relative Strength Index RSI) अद्याप तेजीच्या क्रॉसओवरमध्ये प्रवेश केलेला नाही, ज्यामुळे काही पुष्टीकरण अद्याप प्रलंबित आहे असे सूचित होते. एकंदरीत, तांत्रिक सेटअप दर्शवितो की बँक निफ्टी निर्देशांकात प्रचलित अपट्रेंड कायम आहे. वरच्या बाजूला, प्रतिकार (Resistance) ६०००० पातळीच्या जवळ आहे, तर तात्काळ समर्थन (Support) ५९२५० पातळीच्या आसपास ओळखले जाते, ज्यामुळे निर्देशांक एका परिभाषित ट्रेडिंग रेंजमध्ये चांगल्या स्थितीत राहतो.'आजच्या बाजारातील रूपयावर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले आहेत की,'डॉलर निर्देशांक स्थिर राहिल्याने रुपया ०.०८ पैशांनी किंचित कमकुवत होऊन ८९.९२ वर व्यवहार करत होता, परंतु सततच्या एफआयआय विक्रीमुळे चलनावर दबाव राहिला. आरबीआयच्या २५ बीपीएस दर कपातीमुळे वित्तीय क्षेत्रांना काही स्थिरता मिळू शकते, परंतु भारत-अमेरिका व्यापार करारातील विलंब आणि वाढत्या सोन्या-चांदीच्या आणि धातूच्या किमती भावनांवर परिणाम करत आहेत. रुपया ८९.७५-९०.२५ रूपयांच्या श्रेणीत राहण्याची अपेक्षा आहे.'आजच्या बाजारातील निफ्टी पोझिशनवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे वरिष्ठ तांत्रिक विश्लेषक रूपक डे म्हणाले आहेत की,' शुक्रवारी निफ्टीमध्ये मोठी वाढ झाली, कारण त्याला चलनविषयक धोरणाचे निकाल मिळाले आहेत. ट्रेंड सकारात्मक राहिला आहे, निर्देशांक २१ ईएमए (Exponential Moving Average EMA) पातळीच्या वर टिकून आहे. तासिक चार्टवर निर्देशांकाने अलिकडच्या एकत्रीकरणातून ब्रेकआउट दिला आहे, जो वाढती आशावाद दर्शवितो. आरएसआय (RSI) ने पुन्हा एकदा तेजीचा क्रॉसओवर मिळवला आहे, जो मजबूत गतीकडे निर्देश करतो.अल्पावधीत, ट्रेंड मजबूत राहू शकतो, निफ्टी २६,३००/२६४४० पातळीच्या दिशेने जाण्याची शक्यता आहे. २६०६०-२६००० पातळीवर आधार आहे. जोपर्यंत निर्देशांक २६००० पातळीच्या वर टिकत आहे तोपर्यंत घसरणीवर खरेदी करणे अनुकूल असू शकते.'सोन्यातील टेक्निकल पोझिशनवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले आहेत की,'कॉमेक्स सोन्याचा भाव ४२०० डॉलर्सच्या महत्त्वपूर्ण समर्थनाच्या वर स्थिरावल्याने आणि ४२२४ डॉलर्सच्या वर गेल्याने सोन्याचा भाव ५२५ रुपयांनी वाढून १३०६५० रुपयांवर सकारात्मक व्यवहार झाला. आज नंतर यूएस कोअर पीसीई किंमत निर्देशांक रांगेत असल्याने, फेडरल रिझर्व्हकडून १० डिसेंबर रोजी दर कपातीच्या अपेक्षेनुसार सहभागींनी त्यांची तेजीची स्थिती कायम ठेवली आहे. सोन्याला ४,१८० डॉलर्सवर मजबूत समर्थन मिळत आहे, तर प्रतिकार ४२५५ $ च्या जवळ आहे. एमसीएक्समध्ये समर्थन १२८००० रुपये आणि प्रतिकार १३१५०० रुपयांच्या जवळ दिसत आहे.'

फीड फीडबर्नर 5 Dec 2025 4:30 pm

फडणवीस सरकारची ‘विकसित महाराष्ट्र २०४७’च्या दिशेने वाटचाल

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे; महायुती सरकारच्या वर्षपूर्ती निमित्त विशेष संवादमुंबई : “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ चे व्हिजन निश्चित करून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखालील सरकार दिशेने पावले उचलत आहे. शेती, पायाभूत सुविधा, सिंचन, उद्योग, रोजगार निर्मिती, सामाजिक न्याय, सुरक्षा या प्रत्येक क्षेत्रात महायुती सरकारने क्रांतीकारी निर्णय घेऊन विकासाची गती वाढवली आहे. महायुती सरकारमुळे महाराष्ट्राची शाश्वत विकासाच्या दिशेने दमदार वाटचाल सुरू आहे”, असे प्रतिपादन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी केले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारला शुक्रवारी एक वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्त मुंबईमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपचे मुंबई अध्यक्ष अमीत साटम, प्रदेश सरचिटणीस आ. विक्रांत पाटील, प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन, रघुनाथ पांडे, प्रतिक करपे आदी उपस्थित होते.बावनकुळे म्हणाले की, अतिवृष्टीग्रस्तांना ३२ हजार कोटींचे पॅकेज, दुष्काळी उपाययोजना लागू तसेच पीककर्ज वसुलीला स्थगिती देण्याचे आदेश देऊन सरकारने शेतकऱ्यांना दिलासा दिला. पीकविमा आणि भरपाई प्रक्रियेला गती देण्यात आली. पशुसंवर्धन आणि मत्स्यव्यवसायाला कृषीचा दर्जा देण्यात आला. सिंचनक्षमता वाढवण्यावर भर देण्यात आला. नदीजोड प्रकल्पांना मान्यता देऊन निधीची तरतूद करण्यात आली. उपसा सिंचन प्रकल्पांना कोट्यवधींचे निधी मंजूर करण्यात आले. जलयुक्त शिवार २.० अंतर्गत वर्षभरात ३७ हजार १६६ कामे पूर्ण करण्यात आली.पायाभूत सुविधांवर सर्वाधिक भरपायाभूत सुविधांच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर करून पायाभूत यंत्रणा सक्षम करण्याला प्राधान्य दिले. समृद्धी महामार्ग पूर्णत: खुला करण्यात आला. शक्तीपीठ महामार्ग, वाढवण बंदर, ऑफशोअर विमानतळ यांचे नियोजन करण्यात आले. १०० गावांत सौरग्राम योजना, नागपूरमध्ये राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्था, मेट्रो ११ ला मान्यता, मुंबईत २३८ लोकल गाड्यांच्या खरेदीसाठी ४ हजार ८२६ कोटींचा निधी, रेल्वे सेवेच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी मंजूर करण्यात आला असेही बावनकुळे यांनी नमूद केले.

फीड फीडबर्नर 5 Dec 2025 4:30 pm

AUS vs ENG : मार्नस लाबुशेन ठरला पिंक बॉलचा बादशहा! डे-नाईट टेस्टमध्ये ‘हा’पराक्रम जगातील पहिलाच खेळाडू

Marnus Labuschagne 1st Batter to reach 1000 runs in Day-Night Tests : ॲशेस मालिका २०२५-२६ चा दुसरा डे-नाइट कसोटी सामना ब्रिसबेनमध्ये खेळला जात असताना, ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज मार्नस लाबुशेन याने एक मोठी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. तो डे-नाइट कसोटी क्रिकेटमध्ये एक खास पराक्रम करणारा जगातील पहिला खेळाडू ठरला आहे. लाबुशेनने रचला इतिहास – मार्नस लाबुशेन […] The post AUS vs ENG : मार्नस लाबुशेन ठरला पिंक बॉलचा बादशहा! डे-नाईट टेस्टमध्ये ‘हा’ पराक्रम जगातील पहिलाच खेळाडू appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 5 Dec 2025 4:15 pm

आरबीआयच्या रेपो रेट कपातीमुळे शेअर बाजारात जोरदार तेजी; सेन्सेक्स 447 अंकांनी वाढला, निफ्टी 26186 वर बंद

मुंबई: भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) द्वारे रेपो दरात कपातीच्या ऐतिहासिक निर्णयामुळे आज, शुक्रवार, ५ डिसेंबर रोजी शेअर बाजारामध्ये जोरदार तेजी दिसून आली. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टी (Nifty) दोन्ही प्रमुख निर्देशांक सुमारे ०.५० टक्क्यांच्या दमदार वाढीसह बंद झाले. रेपो रेट कपातीचा परिणाम – आरबीआयने आज रेपो रेटमध्ये २५ आधार अंकांची कपात करण्याची घोषणा […] The post आरबीआयच्या रेपो रेट कपातीमुळे शेअर बाजारात जोरदार तेजी; सेन्सेक्स 447 अंकांनी वाढला, निफ्टी 26186 वर बंद appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 5 Dec 2025 4:12 pm

शिरूर पोलिसांचा कौतुकास्पद पराक्रम.! १८ गुन्ह्यांचा गुंता सोडवून १२.३६ लाखांचा मुद्देमाल परत मिळवला

शिरूर – शिरूर पोलिसांनी घरफोडी, जबरी चोरी आणि चोरी अशा क्लिष्ट गुन्ह्यांमागील सराईत आरोपींचा पाठपुरावा करत अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करून तब्बल १२ लाख ३६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल शोधून काढत १८ गुन्ह्यांचे फिर्यादींना परत केला. पोलिसांच्या या उल्लेखनीय कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. मुद्देमालामध्ये साडे सोळा तोळे सोन्याचे दागिने आणि दीड लाख रुपये रोख रक्कम […] The post शिरूर पोलिसांचा कौतुकास्पद पराक्रम.! १८ गुन्ह्यांचा गुंता सोडवून १२.३६ लाखांचा मुद्देमाल परत मिळवला appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 5 Dec 2025 4:10 pm

रिलायन्स इंडस्ट्रीजला एस अँड पी ग्लोबलकडून कौतुकाची थाप, BBB+ वरून A- वर वाढ

मुंबई: जागतिक रेटिंग एजन्सी एस अँड पी ग्लोबल रेटिंग्जने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) वरील श्रेणीत (Ratings) मध्ये सुधारणा केली आहे. त्यामुळे रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये ग्राहक-केंद्रित कंज्यूमर व्यवसायातील व्यवसायात वाढलेल्या रोख प्रवाह (Cash Flow) स्थिरता सुधारण्याची अपेक्षा असताना संस्थेने दीर्घकालीन श्रेणीत 'बीबीबी+' वरून 'ए-' अशी सुधारणा केली आहे. एस अँड पी ग्लोबलने नुकतीच ही घोषणा केली. यासह एजन्सीने स्थिर दृष्टीकोन देखील निश्चित केल्याचे रेटिंग एजन्सीने स्पष्ट केले आहे.एस अँड पी ग्लोबल रेटिंग्जनुसार, रिलायन्स इंडस्ट्रीज त्यांच्या चक्रीय रोख प्रवाह वाढवत राहील. ज्यामुळे उत्पन्नाची गुणवत्ता मजबूत होईल असे निरिक्षण अहवालाने नोंदवले आहे इतकेच नाही तर त्यात म्हटले आहे की 'आम्ही रिलायन्स इंडस्ट्रीजवरील आमचे दीर्घकालीन क्रेडिट रेटिंग 'बीबीबी+' वरून 'ए-' केले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कमी चक्रीय वाढीतील व्यवसायांमधून रोख प्रवाह वाढवत राहील ज्यामुळे त्यांची कमाईची गुणवत्ता सुधारेल.' असे म्हटले आहे.रेटिंग एजन्सीने अधोरेखित केले की, कंपनीच्या विविध व्यवसायांमधील स्पर्धात्मक स्थितीमुळे उत्पन्न आणि रोख प्रवाह निर्मितीला आणखी चालना मिळेल, ज्यामुळे ती प्रमुख विभागांमधील मोठ्या गुंतवणुकीला पुरेसे कव्हर करू शकेल.'स्थिर रेटिंग आउटलुक पाहता आमच्या मते प्रतिबिंबित रिलायन्स कंपनी त्याच्या प्रमुख व्यवसायांमध्ये आघाडीचे स्थान बाजारपेठेतील कायम ठेवेल आणि त्यांचे उत्पन्न पुढील १२-२४ महिन्यांत भांडवली खर्च कव्हर करण्यासाठी पुरेसे असेल असे रेटिंग एजन्सीने पुढे म्हटले आहे.एस अँड पीने म्हटले आहे की डिजिटल सेवा आणि किरकोळ विक्रीसह अधिक स्थिर ग्राहक व्यवसायांमध्ये कंपनीच्या चालू विस्तारामुळे उत्पन्न आणि रोख प्रवाह स्थिरता वाढण्याची अपेक्षा आहे.डिजिटल सेवा विभागातून वाढत्या कमाईमुळे समूहाचे अधिक अस्थिर हायड्रोकार्बन व्यवसायावरील अवलंबित्व कमी होण्याची शक्यता आहे.एजन्सीचा अंदाज आहे की डिजिटल सेवा आणि किरकोळ व्यवसाय एकत्रितपणे आर्थिक वर्ष २०२६ (३१ मार्च २०२६ रोजी संपणारे वर्ष) मध्ये ऑपरेटिंग कॅश फ्लोमध्ये जवळजवळ ६०% योगदान देतील, तर तेल-ते-रसायन (O2C) आणि तेल आणि वायू विभाग उर्वरित ४०% वाटा देतील. भारतातील दूरसंचार क्षेत्रात रिलायन्स इंडस्ट्रीजची मजबूत स्थिती पुढील दोन वर्षांत नफ्याला चालना देत राहील, असे त्यात पुढे नमूद केले आहे.एजन्सीने म्हटले आहे की, कंपनीचे वायरलेस ग्राहक पुढील १२-२४ महिन्यांत ३-६% वाढू शकतात, ज्याला मर्यादित नेटवर्क गुंतवणुकीमुळे ग्राहकांचे नुकसान सहन करणाऱ्या इतर दूरसंचार कंपन्यांकडून ग्राहकांच्या संख्येत वाढ होण्यास मदत होऊ शकते. दरम्यान, अधिकाधिक ग्राहक उच्च किमतीच्या (Consumers High Price) योजनांमध्ये अपग्रेड करत असल्याने आणि भारतात डेटा वापर वाढत असल्याने रिलायन्स जिओसाठी एआरपीयु (Average Revenue per User ARPU) वाढू शकतो. उल्लेखनीय म्हणजे, कंपनीने गेल्या दोनदा भारतात दरांमध्ये वाढ केली आहे.S&P ग्लोबल रेटिंग्जने असेही म्हटले आहे की पुढील १२-२४ महिन्यांत कमाईची वाढ उच्च भांडवली खर्च (High Capital Expenditure Capex) पेक्षा जास्त असू शकते. त्यांच्या बेस केसनुसार, समूह आर्थिक वर्ष २०२७ पर्यंत समायोजित कर्ज (Adjusted Loan) ते ईबीटा (EBITDA) गुणोत्तर (Ratio) १.५x-१.६x राखेल जे गेल्या दोन वर्षांत नोंदवलेल्या १.७x पेक्षा किंचित कमी आहे.आर्थिक वर्ष २०२७ पर्यंत कॅपेक्स सुमारे १.४ ट्रिलियन रुपयांवर राहू शकते, तर आर्थिक वर्ष २०२४ मध्ये १.५ ट्रिलियन रुपयांच्या सर्वोच्च रोख भांडवली खर्चाच्या तुलनेत ओ२सी विस्तार, ५जी नेटवर्कची सतत तैनाती आणि विस्तार आणि किरकोळ दुकानांच्या पुढील अंमलबजावणीमुळे एजन्सीला सकारात्मक मुक्त ऑपरेटिंग रोख प्रवाह सुरू राहण्याची अपेक्षा आहे असे संस्थेने पुढे म्हटले.एस अँड पीने कंपनीच्या मजबूत बॅलन्स शीट आणि त्याच्या ऊर्जा-संबंधित व्यवसायांमधून अमेरिकन डॉलरच्या महसुलात लक्षणीय एक्सपोजरचा हवाला देत रिलायन्स इंडस्ट्रीजवरील त्यांचे रेटिंग भारतावरील सार्वभौम रेटिंगपेक्षा दोन स्थानांनी वर असल्याचे अधोरेखित केले.पुढे पाहता, एस अँड पीने म्हटले आहे की स्थिर दृष्टीकोन रिलायन्स इंडस्ट्रीज त्यांचे मजबूत नेतृत्व कायम ठेवेल अशी अपेक्षा अधोरेखित करते.'

फीड फीडबर्नर 5 Dec 2025 4:10 pm

झारखंडमध्ये विषारी वायूचे थैमान.! जमिनीतून अचानक बाहेर पडू लागला विषारी गॅस; ६,००० लोक गाव सोडण्याच्या तयारीत

Jharkhand news – धनबाद जिल्ह्यातील केंदुआडीह खाण क्षेत्रात धोकादायक विषारी वायूचे संकट वाढत चालले आहे. या परिसरातील तीन ठिकाणांहून सतत गॅस गळती होत आहे. त्यामध्ये जीएम बंगालजवळ, नया डेरा क्रमांक १ गेट आणि केंदुआ क्रमांक ५ येथून विषारी वायू बाहेर पडत आहे. त्यामुळे ६,००० हून अधिक लोक प्रभावित झाले आहेत. रात्रीच्या वेळी गळती तीव्र झाली […] The post झारखंडमध्ये विषारी वायूचे थैमान.! जमिनीतून अचानक बाहेर पडू लागला विषारी गॅस; ६,००० लोक गाव सोडण्याच्या तयारीत appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 5 Dec 2025 3:47 pm

Russian President Putin : रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन स्मार्टफोन का वापरत नाहीत? त्यांनी स्वतः सांगितलं मोठं कारण….

Russian President Putin | Smartphone : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे त्यांच्या भारत भेटीमुळे चर्चेत आहेत, परंतु त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील एक मोठी गोष्ट पुन्हा एकदा समोर आली आहे: ते स्मार्टफोन वापरत नाहीत. डिजिटल युगात, जागतिक नेत्यांसाठी अनेक फोन असणे सामान्य आहे, परंतु पुतिन पूर्णपणे उलट आहेत. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उघडपणे त्यांचा वैयक्तिक आयफोन […] The post Russian President Putin : रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन स्मार्टफोन का वापरत नाहीत? त्यांनी स्वतः सांगितलं मोठं कारण…. appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 5 Dec 2025 3:32 pm

रणवीर सिंहचं मोठ्या पडद्यावर दमदार कमबॅक! ‘धुरधरं’च्या रिलीजच्या दिवशीच मोठी घोषणा, २०२६ मध्ये…

Dhurandhar Sequel : आज बहुप्रतिक्षित अभिनेता रणवीर सिंहची प्रमुख भूमिका असलेला धुरंधर चित्रपट प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू होती. अखेर धुरंधर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटातून अभिनेता रणवीर सिंह याने मोठ्या पडद्यावर दमदार कमबॅक केले आहे. अशातच धुरंधरच्या टीमने सिक्वलची घोषणा […] The post रणवीर सिंहचं मोठ्या पडद्यावर दमदार कमबॅक! ‘धुरधरं’च्या रिलीजच्या दिवशीच मोठी घोषणा, २०२६ मध्ये… appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 5 Dec 2025 3:32 pm

वसई - विरारमध्ये ८० हजार दुबार मतदार?

मतदारयादीत सुधारणा करण्याची बविआची मागणीवसई : वसई - विरार महानगरपालिकेने प्रसिद्ध केलेल्या मतदार याद्यांमध्ये ५२ हजार दुबार मतदार असल्याचे समोर आले. त्यामुळे पालिकेने अशा मतदारांकडून मतदान कुठे करणार? याबाबतचे हमीपत्र लिहून घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र दुबार मतदारांची ही संख्या मोठी असून ती ८० हजारांच्या घरात असल्याचा दावा बहुजन विकास आघाडीने केला आहे. यासह एका प्रभागातील मतदारांची नावे दुसऱ्या प्रभागात टाकण्यात आली आहेत. त्यामुळे या सर्वांची नावे पूर्ववत करावी आणि दुबार मतदार वगळावे अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे.वसई - विरार महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभाग रचना पार पडली. महापालिका क्षेत्रात २९ प्रभाग असून चार स्तरीय प्रभाग रचनेनुसार चार सदस्य निवडून द्यावयाचे आहेत. प्रभाग रचना पार पडल्यानंतर आरक्षण सोडत प्रक्रिया पालिकेने पूर्ण केली.त्यानंतर मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. यासाठी बुधवारपर्यंतची मुदत हरकती आणि सूचना नोंदविण्यासाठी देण्यात आली होती. १ जुलै २०२५ पर्यंतच्या गृहीत धरलेल्या विधानसभा मतदार यादीनुसार पालिका हद्दीत ११ लाख २७ हजार ६४० मतदारांची नोंद आहे. यामध्ये ५२ हजार ३७८ मतदारांची नावे ही दुबार असल्याची माहिती निवडणूक आयोगाकडून मिळाली होती. त्यानंतर पालिकेने दुबार असलेल्या मतदारांकडून मतदान कुठे करणार? याबाबतचे हमीपत्र लिहून घेणार असल्याचे सांगत प्रक्रिया सुरु केली आहे.मात्र दुसरीकडे हरकती आणि सूचना नोंदविण्याच्या शेवटच्या दिवशी बहुजन विकास आघाडीने महापालिका हद्दीत ८० हजार दुबार मतदार असल्याचा दावा केला आहे. तसेच एका प्रभागातील मतदारांची नावे दुसऱ्या प्रभागात टाकण्यात आल्याचे देखील त्यांना निदर्शनास आले आहे. यासह अनेक मतदारांची नावे सारखीच आहेत, फोटो एका मतदाराचा दुसऱ्या मतदाराला एक सारखाच देण्यात आला आहे तर काही ठिकाणी फोटोच नसल्याचे देखील आढळून आल्याचा दावा बविआने केला असून याबाबत त्यांनी महापालिकेला लेखी निवेदन दिले आहे. तसेच या दुबार मतदारांची नावे वगळण्याची मागणी केली आहे.शोध मोहीम सुरू : वसई-विरार महापालिका हद्दीत मतदारांपैकी ५२ हजार दुबार मतदारांची नावे आयोगाने दिली होती. तसेच आता बविआने देखील ८० हजार मतदार दुबार असल्याचा दावा केला आहे. यासाठी आता नऊ प्रभागात नऊ पथके नेमण्यात आली आहेत. त्यांच्यामार्फत ५२ हजारांहून अधिक असलेल्या दुबार मतदारांची पडताळणी करण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्याकडून हमीपत्र लिहून घेतली जाणार आहेत. दुबार मतदारांबाबत आयोगाने जो कार्यक्रम ठरवून दिला आहे त्यानुसार आमचे कामकाज सुरु असल्याचे पालिका उपायुक्त स्वाती देशपांडेयांनी सांगितले.मतदार याद्यांवर ८ हजार हरकती - सूचनावसई - विरार महानगरपालिकेने मतदार याद्या प्रसिद्ध केल्यानंतर ३ डिसेंबर पर्यंत हरकती आणि सूचना नोंदविण्याची मुदत दिली होती. मंगळवार सायंकाळी उशिरापर्यंत पालिकेकडे ८ हजार ४१६ हरकती आणि सूचना मतदार याद्यांवर नोंदविण्यात आल्या होत्या. बुधवारी सुद्धा हरकती स्वीकारण्यात आल्या आहेत.

फीड फीडबर्नर 5 Dec 2025 3:10 pm

महावितरणमध्ये एआय तंत्रज्ञानाच्या आधारित डिजीटलायझेशन

तांत्रिक किचकट अडचणी दूर होणारमुंबई : राज्यात सौर ऊर्जेसह नवीनीकृत ऊर्जा स्त्रोतांच्या ‘डिजिटल ट्वीन’ पद्धतीच्या माध्यमातून वीज वितरण व्यवस्था मजबूत करण्यात येणार आहे. महावितरणमध्ये आंतरराष्ट्रीय संस्थांच्या सहभागातून कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान (एआय )आधारित डिजिटायझेशन उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे 'एआय' तंत्रज्ञानाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील ऊर्जा क्षेत्रात पर्यावरणपूरक शाश्वत आर्थिक विकासाची सुरूवात होत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (महावितरण) 'द रॉकफेलर फाउंडेशन- आरएफ', 'ग्लोबल एनर्जी अलायन्स फॉर पीपल अँड प्लॅनेट-जीईएपीपी' आणि ऊर्जा विभाग यांच्या सहकार्यातून कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान (एआय) आधारित डिजिटायझेशन उपक्रम राबविणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमेरिकेतील रॉकफेलर फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. राजीव शाह यांची यावर्षी जानेवारीमध्ये यासंदर्भात चर्चा झाली. यामध्ये वीज वितरण प्रणालीमध्ये डिजिटल ट्वीन वापर करण्याची अतिशय नाविन्यपूर्ण संकल्पना पुढे आली. ऊर्जा विभागही मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे असून त्यांनी महाराष्ट्रातील ऊर्जा क्षेत्राच्या दृष्टीने हा क्रांतिकारी निर्णय घेतला.आरएफ आणि जीईएपीपीसारख्या संस्थांच्या सहकार्यातून अत्याधुनिक एआय आधारित जागतिक दर्जाचा प्लॅटफॉर्म हा देशातील इतर वीज कंपन्यांसाठी आदर्श ठरेल, वीज वितरण क्षेत्रातील कंपन्यासाठी हा एक आदर्श मानदंड असेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे. महावितरण कंपनीसाठी विकसित होणाऱ्या उपाययोजना वीज वितरण क्षेत्रातील दीर्घकालीन, शाश्वत आणि परिणामकारक सहाय्यभूत असतील. तसेच वीज वितरणमध्ये 'डिजिटल ट्वीन' पद्धती विकसित करण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे.महाराष्ट्रातील ग्रामीण भागांतील शेतकरी आणि वीज ग्राहक यांना या नवीन डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अधिक विश्वसनीय व विजेची सहज उपलब्धता मिळणार आहे. जागतिक स्तरावरील ए आय तंत्रज्ञान व ऊर्जा क्षेत्रातील थेट भागीदारीच्या मदतीने, महाराष्ट्रात प्रगत डिजिटल प्रणाली लागू होइल. या उपक्रमामध्ये, वीज नेटवर्कचे डिजिटल मॉडेल तयार केले जात आहे. जेणेकरून वीज प्रवाहाचे विश्लेषण, ग्रीडची ऑप्टिमायझेशन, वीज आउटेज नियोजन, नवीनीकृत ऊर्जा स्त्रोतांचे (आरई) अधिक चांगले होईल. विद्युत वाहिन्यांच्या देखभालीसाठी अधिक जागरूक नियोजन तसेच शेतकऱ्यांसाठी सौर उर्जा वापर यासाठी ही कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली काम करेल. ही डिजिटल प्रणाली महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये लागू केली जात आहे, ज्यामुळे सध्या अस्तित्वात असलेल्या तांत्रिक किचकट अडचणी दूर होणार आहेत.पर्यावरणपूरक शाश्वत विकासाची सुरुवातहरित ऊर्जा प्रणालीकडे वाटचाल या डिजिटल रूपांतरणामुळे प्रकल्प व्यवस्थापनात जलद निर्णय घेता येतात. यामुळे ग्रीडच्या कार्यक्षमतेत वाढ झाली असून, सौर ऊर्जा अधिक प्रमाणात उपयोगात आली आहे. या हरित ऊर्जा वापराने प्रदूषणात मोठी घट होणार आहे. या नव्या प्रणालीमुळे विद्युत वितरणामध्ये कमीत कमी एक टक्का जरी वीज गळती घटली तरी वर्षाला सुमारे १०००-१५०० कोटी रुपयांची बचत होऊन नुकसानीत मोठी घट होणार आहे.राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्त्वउपक्रमात जागतिक सहभागामुळे याप्रकारच्या डिजिटल उपाययोजना, विशेषतः भारतासारख्या वेगाने विकसित होणाऱ्या देशांत, वीजविषयक स्थिरता, अखंड उपलब्धता व ग्रामीण भागांत विद्युत सेवांची गुणवत्ता सुधारण्यात महत्त्वाचा बदल ठरू शकतो. भारतात वीज वितरण व्यवस्थेत एआय डिजिटल प्रणाली वापराचा महत्त्वपूर्ण प्रयत्न होत असून, आधुनिक भारताला शाश्वत स्वयंपूर्ण, पर्यावरणपूरक कार्यक्षम ऊर्जा प्रणालीची गरज आहे.

फीड फीडबर्नर 5 Dec 2025 3:10 pm

१० टोलनाक्यांवर नवीन टोल प्रणाली सुरू

गडकरी यांची लोकसभेत माहितीमुंबई : देशातील वाहनचालकांना आणि प्रवाशांना मोठी दिलासा देणारी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी लोकसभेत केली. गडकरी यांनी सांगितले की, देशातील सध्याची टोल वसुली प्रणाली एका वर्षाच्या आत पूर्णपणे बंद केली जाईल आणि त्याऐवजी नवी इलेक्ट्रॉनिक टोल प्रणाली लागू करण्यात येईल. या नवीन प्रणालीमुळे महामार्गावर वाहने न थांबता, विनाअडथळा प्रवास करणे शक्य होणार आहे.नितीन गडकरी म्हटले की, हायवे पूर्णपणे डिजिटल करण्याच्या उद्देशाने वाहन थांबवून शुल्क घेण्याची सध्याची पद्धत बंद करण्यात येत आहे. या नवीन तंत्रज्ञानामुळे देशभरातील टोल प्लाझा अदृश्य होतील आणि वाहने टोल भरण्यासाठी न थांबता वेगात पुढे जाऊ शकतील. यामुळे टोलवरील लांब रांगा आणि वेळेची बचत होईल.सध्याच्या फास्टॅग तंत्रज्ञानावर आधारित ही नवी प्रणाली राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन (एनईटीसी) अंतर्गत नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने विकसित केली आहे. यात आरएफआयडी आधारित फास्टॅग उपकरण वाहनाच्या विंडस्क्रीनवर (समोरच्या काचेवर) लावले जाते. वाहन टोल प्लाझातून जाताना, हे उपकरण थेट चालकाच्या बँक खात्यातून टोलची रक्कम आपोआप कापते. यामुळे रोख व्यवहार किंवा थांबण्याची आवश्यकता भासत नाही. सध्या ही नवीन प्रणाली देशभरातील सुमारे १० ठिकाणी चाचणी आणि देखरेखीसाठी लागू करण्यात आली आहे. पुढील एका वर्षात ती संपूर्ण राष्ट्रीय महामार्ग नेटवर्कवर लागू होण्याची अपेक्षा आहे.

फीड फीडबर्नर 5 Dec 2025 3:10 pm

डॉ. अविनाश ढाकणे यांनी स्वीकारला महापालिका अतिरिक्त आयुक्त पदाचा कार्यभार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) -मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) म्हणून डॉ. अविनाश ढाकणे यांनी शुक्रवारी ५ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी पदभार स्वीकारला. मावळते अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांच्याकडून ढाकणे यांनी हा पदभार स्वीकारला.मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने उप आयुक्त (सामान्य प्रशासन) किशोर गांधी यांनी डॉ. ढाकणे यांचे स्वागत केले. त्यानंतर डॉ. ढाकणे यांनी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांची भेट घेतली.डॉ. ढाकणे यांच्या प्रशासकीय सेवेची सुरुवात सन १९९४ मध्ये नाशिक येथे उप जिल्हाधिकारी म्हणून झाली. डॉ .ढाकणे हे भारतीय प्रशासकीय सेवेतील २०१० च्या तुकडीचे अधिकारी आहेत. आजवरच्या ३१ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी केंद्र शासनाच्या वित्त व उद्योग मंत्रालयात अतिरिक्त खासगी सचिव, सोलापूर महानगरपालिका आयुक्त, जळगाव जिल्हाधिकारी, महाराष्ट्र राज्याचे परिवहन आयुक्त, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक या पदांची जबाबदार पार पाडली आहे.तसेच अहिल्यानगर (अहमदनगर) आणि मालेगाव येथे उप विभागीय अधिकारी, महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री कार्यालयात खासगी सचिव, ऊर्जा मंत्रालयात खासगी सचिव, ‘महानिर्मिती’चे कार्यकारी संचालक, वित्त मंत्री यांचे खासगी सचिव, महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास मंडळात सह व्यवस्थापकीय संचालक, मुंबईत अपर जिल्हाधिकारी व नियंत्रक (अतिक्रमण निर्मूलन / निष्कासन), महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात उप मुख्य कार्यकारी अधिकारी या पदांचीही जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे. अलीकडे ते महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव म्हणून कार्यरत होते.

फीड फीडबर्नर 5 Dec 2025 3:10 pm

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी साईबाबांची भूमिका साकारली होती. हा चित्रपट तेव्हाच्या आणि नंतर आलेल्या पिढ्यांनाही प्रेरणा देणारा ठरला.८६ वर्षीय सुधीर दळवी सध्या एका दुर्धर आजाराने ग्रस्त असून ते ऑक्टोबर महिन्यापासून मुंबईच्या लीलावती रुग्णालयात उपचार घेत आहेत. मात्र उपचारासाठी पैसे नसल्याने त्यांच्या कुटुंबियांसमोर अडचणींचा डोंगर उभा राहिला होता. मात्र आता मुंबई उच्च न्यायालयाच्या एका निर्णयामुळे त्यांना शिर्डी संस्थानाकडून ११ लाख रुपयांची मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.अभिनेते सुधीर दळवी यांना आर्थिक अडचण असल्याचे लक्षात येताच श्री साई बाबा संस्थान ट्रस्टने (शिर्डी) त्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला. यासाठी संस्थेच्या वतीने नियमात बदल करून त्यांना मदत करण्यासाठी प्रतिज्ञापत्र दाखल केले. यावर झालेल्या सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयाने ११ लाख रुपयांची मदत देण्यास हिरवा झेंडा दाखवला.न्यायमूर्ती विभा कंकणवाडी आणि हितेन एस वेणेगावकर यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीत म्हटले, लोकांची श्रद्धा आणि ज्येष्ठ अभिनेत्याने साकारलेली भूमिका पाहता. ट्रस्ट त्यांना आर्थिक मदत देऊ शकते. श्री साई बाबांनी आयुष्यभर इतरांना मदत केली होती.त्यांच्या आयुष्याचा सार पाहता ही मदत योग्य आहे. खंडपीठाने म्हटले की, ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांना आर्थिक मदत हवी असल्याची माहिती समोर आली. त्यांच्या उपचारासाठी ११ लाख रुपये देण्यास आम्ही संस्थेला परवानगी देण्यात आली असून श्री साई बाबा संस्थान ट्रस्ट (शिर्डी), कायदा २००४ च्या कलम १७ (२) (२) (ओ) च्या तरतुदीनुसार ही मदत मानवी कल्याणाच्या उद्देशाने देण्यात येत असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

फीड फीडबर्नर 5 Dec 2025 3:10 pm

‘ओंकार’ हत्तीला ‘वनतारा’कडे हस्तांतरित करू नये

उच्चाधिकार समितीचा निकालसावंतवाडी : महाराष्ट्र आणि गोवा सीमेवर ‘ये-जा’ करणाऱ्या ‘ओंकार’ हत्तीला ‘वनतारा’कडे हस्तांतरित न करता त्याला पकडून महाराष्ट्र वनविभागाने आपल्या अखत्यारित नैसर्गिक अधिवासात सोडावे, असा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाच्या उच्चाधिकार समितीने दिला आहे.समितीने दिलेल्या आदेशात अनेक निरीक्षणे नोंदविली असून, येत्या दोन आठवड्यांत हत्तीची वर्तणूक, आरोग्य अहवाल व तज्ज्ञांची मते विचारात घेऊन अंतिम निकाल देण्याचा निर्णय राखून ठेवला आहे. या निकालाने ओंकारप्रेमींनी आनंद व्यक्त केला आहे. मात्र, या निर्णयाविरोधात कोल्हापूर वनविभागाने न्यायालयाच्या उच्चाधिकार समितीकडे पुनर्विचार याचिका दाखल केली आहे.ओंकार हत्तीला वनताराकडे पाठवण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने दिला होता. या संदर्भात सर्किट बेंचच्या निर्देशानुसार मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानुसार न्यायालयाच्या उच्चाधिकार समितीने हा निर्णय रद्द करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्याचा आदेश जारी केला आहे. उच्च न्यायालयाच्या या निर्णयाने ओंकारप्रेमींनी आनंद व्यक्त केला आहे. वनविभाग गुजरात लॉबीला हाताशी धरून ओंकारला वनतारात विकण्याचा कट आखत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.असा आहे आदेश‘ओंकार’ला पकडल्यानंतर महाराष्ट्रातील सुरक्षित व सरकारने व्यवस्थापित केलेल्या बचाव सुविधेत ठेवले जावे, या सुविधेत मूलभूत पायाभूत सुविधा, पशुवैद्यकीय कर्मचाऱ्यांची उपलब्धता आणि २४ तास वनविभागाच्या पथकाचे निरीक्षण हे अनिवार्य आहे.

फीड फीडबर्नर 5 Dec 2025 3:10 pm

दिल्ली पॅरिस भाडे २५०००, तर दिल्ली कलकत्ता तिकिट ८५०००रूपये, प्रवाशांची इंडिगो एअरलाइन्सकडून आदेशांचे उल्लंघन करत लूटमार सुरू?

मोहित सोमण: इंडिगो विमाने शेकडोंच्या संख्येने रद्द झाल्याने उपलब्ध असलेल्या विमानाचे तिकिट अव्वाच्या सव्वा दराने सुरू आहेत. मोठ्या प्रमाणात ग्राहकांची लूटमार सुरू असल्याने प्रवाशांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजीचे वातावरण आहे. एका तिकिटाचे दर ३००० ते ४००० पासून ६०००० रूपयांपर्यंत गगनाला भिडले आहेत. काल आणि परवा १९१ पेक्षा अधिक विमाने इंडिगो (IndiGo) एयरलाईनने रद्द केल्याने मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गैरसोय झाली आहे. सर्वात मुख्य बाब म्हणजे सरकारच्या हवाई उड्डाण विभागाच्या डीजीसीएने स्पष्टपणे तिकीट न वाढवण्याची ताकीद दिल्यानंतरही कंपनीच्या मोबाईल अँप किंवा पोर्टलवर अथवा इतर थर्ड पार्टी अँपवरली तिकिट दर महागड्या दरात विकत असल्याचे स्पष्ट झाले आहे. संबंधित प्रवाशांनी ही तक्रार करताना प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, कोणतीही पूर्वसूचना न देता कंपनीने तिकिटाचे दर ६०००० रुपयांवर वाढवले आहेत.'एअरलाइन्सने लवकरात लवकर कायद्याचे पालन करूनच व्यवस्था पूर्ववत करण्याचे आश्वासन दिले आहे. यापूर्वीच सरकारने अधिसूचनेत सांगितलेल्या नियामांचे पालन करताना व्यवस्था सुनिश्चित राहिल याची खात्री करण्यासाठी सांगितले होते. मात्र तांत्रिक कारणांमुळे, कमी मनुष्यबळामुळे व बदलेल्या पायलट नियमांची पूर्तता करताना पायलटांचेही मनुष्यबळ कमी पडल्याने अनेक विमाने आजही रद्द झाल्याचा खुलासा प्रवाशांनी केला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात परतावा (Refund) घेण्यासाठी लांब रांगा लागल्याचे चित्रही प्रसारमाध्यमांनी दाखवले आहे.डीजीसीए (Directorate of Civil Aviation DGCA) या नियामक आयोगाने मोठ्या प्रमाणात यासाठी इंडिगो कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापनाची चौकशी सुरू केली असून व्यवस्था पूर्ववत करण्यासाठी सूचना दिल्या आहेत. काल संध्याकाळी कंपनीने पुढील ४८ तासात व्यवस्था पूर्ववत होईल असे म्हटले होते. इंडस्ट्रीतील सुत्रांच्या माहितीनुसार, इंडिगोची गेल्या १ महिन्यात ६२% विमाने रद्द करण्यात आली होती ज्यामुळे मोठा फटका प्रवाशांना बसला. तरीही व्यवस्थापन सुनिश्चित करण्यासाठी अद्याप यंत्रणेला यश न आल्याने या निमित्ताने कंपनीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. कालही उपलब्ध विमानाचे तिकिट दर ४३००० रूपयांवर पोहोचले होते.याउलट, अनेक परदेशी शहरांना जाणाऱ्या विमानांचा खर्च अनेक व्यस्त देशांतर्गत मार्गांपेक्षा कमी झाला आहे कारण या संकटात आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर कोणताही परिणाम झालेला नाही. जगातील सर्वात व्यस्त मार्गांपैकी एक असलेल्या दिल्ली आणि मुंबई दरम्यान परतीच्या विमानांचा खर्च आता इकॉनॉमी श्रेणीत सुमारे ६०००० रुपये सुरू असल्याचे रिपोर्टिंग प्रसारमाध्यमांनी केले आहे.इंडिगोने दिल्ली विमानतळावरून मध्यरात्रीपर्यंत सर्व देशांतर्गत उड्डाणे रद्द केली आहेत जी आजपर्यंतच्या एकूण ५२३ रद्द झालेल्या विमानांपैकी केवळ एक भाग आहे. कोणताही पर्याय नसल्यामुळे, प्रवाशांना दुसऱ्या एअरलाइनसह शेवटच्या क्षणी बुकिंग करायचे असल्यास अतिरिक्त पैसे द्यावे लागणार आहेत दिल्ली- कोलकातासाठी आज उपलब्ध असलेल्या विमानाची किंमत सुमारे ३२००० रुपये आहे. उद्याच्या फेरीसाठी, त्याच मार्गावर ८५००० रुपये आहेत ज्यामुळे ते युरोपला जाण्यापेक्षा महाग झाले आहे. माहितीनुसार, सर्वात स्वस्त दिल्ली-लंडन विमान प्रवासाचे भाडे २५००० रुपयांच्या आसपास आहे, तर दिल्ली-पॅरिसचे भाडे २५००० रुपयांपेक्षा कमी आहे. दोन्ही ठिकाणांसाठी राउंड-ट्रिपचा खर्च ६०००० रुपयांपेक्षा कमी आहे.मुंबई आणि चेन्नई दरम्यानचा सर्वात स्वस्त विमान प्रवासाचा भाडा सुमारे ६०००० रुपयांचा आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई-श्रीनगर विमानाचे तिकीट ज्याची किंमत इतर दिवशी १०००० रुपयांपेक्षा जास्त नाही त्या किमान ६२००० रुपयांना विकल्या जात आहेत. आणि ती फक्त एक मार्ग आहे. दुसऱ्या दिवसासाठी बुक केलेले परतीचे तिकीट ९२००० रुपयांपेक्षा जास्त आहे. यामुळे तिकिट न वाढवण्याचा सूचना दिल्या असतानाही आदेशाचे उल्लंघन करून सरास प्रवाशांची लूट सुरू असल्याचे प्रवासी सांगत आहेत.नवीन फ्लाइट ड्युटी टाइम लिमिटेशन (FDTL) नियमांमुळे कर्मचाऱ्यांसाठी जास्त विश्रांती कालावधी अनिवार्य करणाऱ्या वैमानिक आणि विमान कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे इंडिगोला शेकडो उड्डाणे रद्द करावी लागली अशी प्राथमिक माहिती मिळाली होती. इंडिगोने कबूल केले आहे की नवीन FDTL नियमांनुसार आवश्यक असलेल्या वैमानिकांची संख्या त्यांनी चुकीची ठरवली ज्यामुळे हे संकट निर्माण झाले.

फीड फीडबर्नर 5 Dec 2025 3:10 pm

“राज्यातील इतर पक्षही देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यानेच चालतात”; भाजपच्या बड्या मंत्र्यांचं खळबळजनक विधान

Mangal Prabhat Lodha : भाजपच्या वर्षपूर्ती मेळाव्यात कौशल्यविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केलेल्या वक्तव्याने मोठी खळबळ उडाली आहे. या मेळाव्यातून मंगलप्रभात लोढा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. भाजप देवाभाऊमय तर आहेच. मात्र, महाराष्ट्रातील इतर पक्ष कसे चालतील हे देखील देवाभाऊच ठरवतात, असे मोठं वक्तव्य मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले आहे. त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे […] The post “राज्यातील इतर पक्षही देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यानेच चालतात”; भाजपच्या बड्या मंत्र्यांचं खळबळजनक विधान appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 5 Dec 2025 2:42 pm

दोन प्रौढ व्यक्ती लिव्ह-इनमध्ये राहू शकतात.! लग्नाचे वय पूर्ण असण्याची अट नाही? न्यायालयाने स्पष्ट सांगितले

live-in relationship | court – राजस्थान उच्च न्यायालयाने असा निर्णय दिला आहे की, एकत्र राहू इच्छिणा-या दोन प्रौढ व्यक्ती त्यांच्या लग्नाच्या वयाच्या नसल्या, तरीही ते लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू शकतात. केवळ लग्नासाठी कायदेशीर वय गाठले नसल्याच्या आधारावर एखाद्याचे घटनात्मक अधिकार मर्यादित केले जाऊ शकत नाहीत, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. जयपूर उच्च न्यायालयातील न्या. अनुप […] The post दोन प्रौढ व्यक्ती लिव्ह-इनमध्ये राहू शकतात.! लग्नाचे वय पूर्ण असण्याची अट नाही? न्यायालयाने स्पष्ट सांगितले appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 5 Dec 2025 2:40 pm

Pune : उड्डाणपूलासाठी शासनाने प्रस्ताव पाठवावा

प्रभात वृत्तसेवा पुणे : औंधपासून खडकी पोलिस स्टेशनदरम्यानच्या रस्त्यावर अनेक समस्या असल्याने येथे उड्डाणपूल किंवा भुयारी मार्ग उभारण्यासाठी राज्य शासनाने प्रस्ताव पाठवावा, अशा सूचना केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केल्या आहेत. या समस्येबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आणि प्रवक्ता सुनील माने यांनी दिल्लीत गडकरी यांची भेट घेऊन मागणी केली […] The post Pune : उड्डाणपूलासाठी शासनाने प्रस्ताव पाठवावा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 5 Dec 2025 2:37 pm

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवादमुंबई : लहान वयात आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या मुलांच्या नशीबात अतिशय हालाखीचे दिवस येतात. शिक्षण आणि रोजगार दूरच, ही मुले कायमस्वरुपी प्रवाहाबाहेर फेकली जातात. ही बाब गंभीरपणे विचारात घेऊन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दि. १७ जानेवारी २०१८ रोजी अनाथांना शिक्षण आणि नोकरीत एक टक्का समांतर आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेतला. असा निर्णय घेणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले. या ऐतिहासिक निर्णयामुळे आतापर्यंत ८०० हून अधिक अनाथ मुले शासकीय सेवेत दाखल झाली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी आपल्या तिसऱ्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळाची पहिली वर्षपूर्ती अनाथ मुलांसोबत साजरी करत, त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला.यानिमित्ताने वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी ‘कृतज्ञतेचा आनंद’ हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. राज्यभरातून आलेल्या अनाथ लाभार्थी मुला-मुलींसोबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी जवळून संवाद साधला. या प्रसंगी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, “मुख्यमंत्रीपदाची तिसऱ्यांदा शपथ घेऊन आज एक वर्ष पूर्ण झाले. वर्षपूर्तीच्या निमित्ताने अनेक चांगले कार्यक्रम आयोजित केले, पण सगळ्यात जास्त आनंद या मुलांसोबत साजरा करताना येतोय. निःशब्द भाव खूप काही बोलून जातो. कार्यातून समाजपरिवर्तन घडवणे, हेच खरे समाधान आहे”, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

फीड फीडबर्नर 5 Dec 2025 2:30 pm

चौलच्या पर्वतवासी श्री दत्तात्रेय देवस्थानच्या यात्रेला सुरुवात

सोमवारी, ८ डिसेंबरला पाच दिवसाच्या यात्रेचा होणार समारोपअलिबाग : चौलच्या पर्वतवासी श्रीदत्तात्रेय देवस्थानच्या पाचदिवसीय यात्रेला श्री दत्तजयंतीपासून ४ डिसेंबरपासून सुरुवात झाली असून, या यात्रेसाठी रायगडसह मुंबई, पुणे, ठाणे, कल्याण, डोंबिवली आदी भागातून भाविक येण्याची शक्यता असल्याने या पाचदिवसीय यात्रेत लाखोंची उलाढाल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सोमवारी ८ डिसेंबरला या पाचदिवसीय यात्रेचा समारोप होणार आहे.इतिहास काळात विदेश व्यापारांशी संलग्न असलेल्या चौल चंपावती नगरीत प्रसिद्ध अशी ३६० मंदिरांची नोंद सापडते. चौल रामेश्वर, चौल शितळादेवी, हिंगुळजा देवी, मुखरी गणपती, महालक्ष्मी, चंपावतीदेवी, चौल कुंडेश्वर मंदिर, रेवदंडा हरेश्वर मंदिर, रेवदंडा मारूती मंदिर आदी मंदिरे अद्यापी इतिहासाची साक्षीदार आहेत, त्यापैकीच चौलचे भोवाळे येथील पर्वतवासी श्रीदत्तात्रयांचे स्वयंभू देवस्थान होय. चौल भोवाळे येथील पर्वतवासी श्री दत्तात्रयांचे स्वयंभू देवस्थान संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिध्द आहे.या यात्रेला रायगड जिल्ह्यासह मुंबई, पुणे, ठाणे या भागांतून असंख्य भाविक यात्रेच्या पाच दिवसात उपस्थिती लावत श्रीदत्तात्रेयाचे दर्शन घेण्याबरोबरच यात्रेचा मनमुराद आनंद लुटत असतात. या वर्षातील ही अलिबाग तालुक्यातील शेवटची यात्रा असून, हा दत्त नवसाला पावतो व त्याच्या दर्शनाने भाविकांच्या अडीअडचणीचे निवारण होते अशी लोकांची श्रध्दा आहे. यात्रेच्या पहिल्या दिवशी नगरीतील पाठारे क्षत्रिय पाचकळशी समाजापैकी मुंबईत राहणाऱ्या मंडळीनी सुमारे ४० ते ६० वर्षापूर्वी तयार केलेला चांदीचा मुखवटा चौल थेरोंडा येथून पालखीतून वाजतगाजत श्रीदत्त मंदिरात आणला जातो. मुळ दत्तमूर्तीची यथासांग पुजा करून हा मुखवटा मुळ दत्तमूर्तीला लावला जातो. यात्रेपूर्वी श्रीदत्त मंदिरात सात दिवस सप्ताह चालतो.हे मंदिर पुरातन नसले तरी ऐतिहासिक निश्चितच आहे. कारण आग्रेंच्या उत्तरकालीन इतिहासात या दत्तमंदिराचा उल्लेख वरचेवर आढळतो, तसेच आंग्रे घराण्यातील पुरूषांची या पर्वतवासी दत्तावर अतिशय श्रध्दा होती असे समजले.चौलला येण्यासाठी खासगी वाहनाने वडखळ, पोयनाड, अलिबाग, नागावमार्गे चौलला येता येते. एसटीने आल्यास बोरिवली-रेवदंडा या एसटीने किंवा गेटवे ऑफ इंडिया येथून पीएनपी, अंजठा, पीएनपीने लॉचने मांडवा (अलिबाग) आल्यानंतर त्यांच्या खासगी बसने अलिबागला आल्यानंतर अलिबाग-रेवदंडा एसटीने, तसेच खासगी रिक्षाने चौल नाका येथे उतरून यात्रेच्या ठिकाणी पायी जाता येते. चौलमध्ये राहावयाचे झाल्यास या परिसरात लॉजिंग-बोर्डीगची सोय आहे. उपहारगृहेही आहेत.

फीड फीडबर्नर 5 Dec 2025 2:30 pm

Lifestyle: हिवाळ्यात घरच्या घरी बनवा हेल्दी व्हेजिटेबल सूप पावडर…प्रत्येक घोटात चव आणि भरपूर पौष्टिकता

Lifestyle: हिवाळ्याच्या दिवसांत शरीराची काळजी घेणे आवश्यक असते. थंडीमुळे सर्दी-खोकला, थकवा आणि कमजोरी लवकर जाणवते. अशा वेळी आहारात सूप समाविष्ट करणे उत्तम मानले जाते. पण बाजारातील बहुतेक सूप पावडरमध्ये मैदा, एमएसजी, प्रिझर्व्हेटिव्ह आणि कृत्रिम फ्लेवर असतात. त्यामुळे घरच्या घरी व्हेजिटेबल सूप पावडर बनवणे सर्वात सुरक्षित आणि पौष्टिक पर्याय आहे. घरच्या घरी सोप्या पद्धतीने व्हेजिटेबल सूप […] The post Lifestyle: हिवाळ्यात घरच्या घरी बनवा हेल्दी व्हेजिटेबल सूप पावडर… प्रत्येक घोटात चव आणि भरपूर पौष्टिकता appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 5 Dec 2025 2:29 pm

RBI MPC Special: रेपो व्याजदरात कपात झाली पण अर्थकारणावर त्याचा व्यापक परिणाम काय? जाणून घ्या दिग्गज तज्ञांच्या विविध प्रतिक्रिया

मोहित सोमण: आज शुक्रवारी आरबीआयने आपल्या महत्वपूर्ण निर्णयात ५० बेसिस पूर्णांकाने कपात करून रेपो दर ५.५०% वरून ५.२५% आणला असला तरी आजही आव्हाने अर्थव्यवसमोर उभी ठाकली आहे. देशांतर्गत परिस्थिती चांगली असली तरी परदेशी निर्यात, चलनवाढ, घसरता रूपया, टॅरिफ अनिश्चितता यासारखी आव्हाने आहेत. भूराजकीय परिस्थितीला सामोरे जाताना महागाई व जीडीपी वाढ संतुलित करण्याची गरज असताना आरबीआयने निश्चितच यासंदर्भात आवश्यक ती पाऊले उचलण्याचे ठरवले. एकीकडून १ लाख कोटींच्या सिक्युरिटीज एमओसी सरकारकडून विकत घेताना दुसरीकडे तरलता नियंत्रित करण्यासाठी सरकार इतर पावले उचलणार आहे. यंदाही अर्थव्यवस्थेत आरबीआयच्या रेपो दरात कपात केली असली तरी 'तटस्थ' भूमिका (Neutral Stance) कायम आहे.याच पार्श्वभूमीवर आपण बाजार तज्ञांची मते जाणून घेऊयात...१) फेडरल बँकेचे व समुहाचे मुख्य खजिनदार अध्यक्ष व्ही लक्ष्मणनन - एमपीसीमध्ये बाजाराला जे अपेक्षित होते तेच दिले आहे. दीर्घकाळापासून चालणाऱ्या स्वॅप्स आणि ओएमओसह दर कपात केल्याने केवळ रोखतेचे आश्वासन अबाधित राहतेच, शिवाय चलन सापेक्ष संतुलनातही राहते. बाजाराने सगळ्याच बाबींवर सकारात्मक प्रतिक्रिया दिल्याचे दिसून येते.२) क्वेस्ट इन्व्हेसमेंट मॅनेजर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार सिंघल - 'धोरणात्मक उपाययोजना दर्शवितात की मध्यवर्ती बँकेने आर्थिक स्थिरता राखून आणि महागाई संतुलित करून वाढीला पाठिंबा देण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. २५ बीपीएस दर कपात, १ लाख कोटी रुपयांची ओएमओ खरेदी आणि अमेरिकन डॉलर्स/आयएनआर स्वॅप, तरलतेची स्थिती आणखी वाढवण्यासाठी योग्य तरलता उपाय प्रदान करतात. संपूर्ण वर्षासाठी सीपीआय चलनवाढ २% असा अंदाज आहे आणि मुख्य चलनवाढ स्थिर राहिल्याने, समष्टि आर्थिक परिस्थिती वेगवान विकास गतीसाठी अत्यंत आधारभूत आहे. धोरण घोषणा देखील अर्थव्यवस्थेच्या सध्याच्या वाढीच्या टप्प्यावर मध्यवर्ती बँकेचा विश्वास प्रतिबिंबित करतात. मजबूत ग्रामीण मागणी, शहरी मागणीची पुनर्प्राप्ती आणि खाजगी गुंतवणूकीचा वेग वाढल्याने, धोरणात्मक उपाययोजना निश्चितच विकासाच्या भावनेला आणखी बळकटी देतील.'३) मोतीलाल ओसवाल होम फायनान्सचे कार्यकारी संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भोवाल- 'आरबीआयने घेतलेला हा एक अतिशय स्वागतार्ह निर्णय आहे आणि त्यामुळे घर खरेदी करण्याची क्षमता लक्षणीयरीत्या सुधारेल. आमच्यासारख्या परवडणाऱ्या एचएफसींसाठी, रेपो दर कपातीचे जलद प्रसारण, ज्यामुळे बँकांसाठी एमसीएलआर कमी होईल, यामुळे आमचे कर्ज घेण्याचे खर्च कमी होण्यास मदत होईल, ज्यामुळे आमच्या कमी उत्पन्न गटातील ग्राहकांना फायदा होईल.'४) श्रीराम जनरल इन्शुरन्सचे कार्यकारी संचालक व मुख्य गुंतवणूक अधिकारी अश्वनी धनावत-'गव्हर्नर संजय मल्होत्राच्या नेतृत्वाखालील रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीने (Monetary Policy Committee MPC) डिसेंबर २०२५ चा आढावा एका मोजूनमापून असला तरी परंतु अपेक्षित पाऊल पुढे टाकून पूर्ण केला आहे. बाजाराच्या अपेक्षांनुसार रेपो दर २५ बेसिस पॉइंट्सने कमी करून ५.२५% करण्यात आला आहे, जो या वर्षीच्या सुलभीकरण चक्रातील (Easying Cycle) चौथा कपात आहे (एकूण १२५ बीपीएस). हे समायोजन (Adjustment) मजबूत आर्थिक गतीला पाठिंबा देण्यासाठी तटस्थ धोरणात्मक भूमिका राखताना, सतत चलनवाढ कमी करण्यावर एमपीसीचा विश्वास प्रतिबिंबित करते.'५) मोतीलाल ओसवाल समुहाच्या मुख्य अर्थतज्ज्ञ राधिका पिपलानी -' एमपीसीचा निर्णय ठाम होता.समितीने दर कपात आणि तरलता समर्थन दोन्हीवर निर्णय घेतला. गव्हर्नर यांनी अर्थव्यवस्थेत चलनवाढीचा दबाव लक्षात घेतला, ज्यामुळे चालू व्यापार अनिश्चितता, आयआयपी आणि वीज मागणी यासारख्या निर्देशकांमध्ये कमकुवतपणाची सुरुवातीची चिन्हे असूनही दर कपातीसाठी जागा निर्माण झाली. पुढील २-३ महिन्यांत चलनवाढीत आणखी घट होण्याच्या आमच्या अंदाजावर आधारित, फेब्रुवारी २०२५ मध्ये अतिरिक्त २५ बॅपल्स प्रति पेमेंट दर कपात होण्याची अपेक्षा आहे.डिसेंबर २०२५ मध्येच १.५% रुपयांचे टिकाऊ तरलता इंजेक्शन (Liquidity Injection) हा एक आश्चर्यकारक घटक आहे. फेब्रुवारीच्या धोरणात अतिरिक्त ओपन-मार्केट ऑपरेशन्स (OMO) अपेक्षित आहेत, विशेषत: व्यापार शुल्काच्या मुद्द्यांवर सतत दिलासा मिळत नसल्याने सेंट्रल बँकेकडून डॉलर विक्री वाढण्याची शक्यता आहे.'६) चॉईस इंटरनॅशनल लिमिटेडचे कार्यकारी संचालक अजय केजरीवाल - 'आरबीआयच्या वित्तीय पतधोरण समितीने पॉलिसी रेपो दर २५ बेसिस पॉइंट्सनी कमी करून ५.२५% पर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे आणि महागाई अभूतपूर्व पातळीवर येत असल्याने आणि अर्थव्यवस्थेत मजबूत वाढ होत असल्याने 'तटस्थ' भूमिका कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय, केंद्रीय बँकेने प्रणालीमध्ये टिकाऊ तरलता निर्माण करण्यासाठी १ लाख कोटी रुपयांच्या सरकारी सिक्युरिटीजची OMO खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. या टप्प्यावर प्राथमिक लक्ष केंद्रित केले आहे की सौम्य चलनवाढीच्या दृष्टिकोनाचा वापर करून जीडीपी वाढ अबाधित ठेवणे. आरबीआयला अपेक्षा आहे की, पुढील वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीपर्यंत, सीपीआय (Consumer Price Index CPI) चलनवाढ ४% च्या सहनशीलतेच्या मर्यादेत राहील. आर्थिक वर्ष २६ मधील दुसऱ्या तिमाहीत (Q2FY26) जीडीपी आकडेवारी आश्चर्यकारकपणे मजबूत असूनही, आरबीआयला जाणीव आहे की बाह्य वातावरण (External Enviornment) खूप आव्हानात्मक आहे आणि पुढे जाऊन, असे अनेक घटक आहेत जे सध्याच्या वाढीच्या गतीला अडथळा आणू शकतात. अशाप्रकारे, केंद्रीय बँकेने स्पष्टपणे सूचित केले आहे की आर्थिक वाढीला चालना देणे, प्रणालीमध्ये अधिक तरलता निर्माण करणे, क्रेडिट वाढ सुधारणे आणि दर कपातीचे सुरळीत प्रसारण सुलभ करणे ही या टप्प्यावर प्राथमिक उद्दिष्टे आहेत.'७) क्रेडाई (CREDAI) अध्यक्ष शेखर पटेल- आरबीआयने रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात करून तो ५.२५ % करण्याचा घेतलेला निर्णय बाजारातील सकारात्मक भावना आणखी बळकट करेल, रियल इस्टेट क्षेत्रासाठी हे सकारात्मक पाऊल आहे. त्यामुळे व्याजदर कपात हे कर्जातील खर्चात घट घडवून आणेल, कर्जवाढीस चालना देईल आणि रिअल इस्टेटसह सर्व क्षेत्रांमध्ये मागणी वाढवण्यास मदत करेल. या दरकपातीद्वारे चलनविषयक धोरण समितीने महागाई दशकातील नीचांकी पातळीवर असताना आर्थिक वाढीस चालना देण्याबाबतची आपली कटिबद्धता पुन्हा एकदा दर्शवली आहे. तरलता हा आता केंद्रीय बँकेसाठी मोठा मुद्दा राहिलेला नसल्यामुळे, क्रेडाईला आर्थिक वर्षाचा मजबूत शेवट होईल आणि सर्व गृहनिर्माण विभागांमध्ये मागणीची गती कायम राहील अशी अपेक्षा आहे.'८) ओम्नीसायन्स कॅपिटलचे अध्यक्ष व मुख्य पोर्टफोलिओ व्यवस्थापक अश्विनी शमी- चलनवाढीचा दर आरबीआयच्या २% च्या लक्ष्य श्रेणीच्या खालच्या टोकापेक्षा कमी झाल्यामुळे व्याजदर कपातीची अपेक्षा होती. यामुळे फेब्रुवारी २०२५ पासून या वर्षी एकूण व्याजदर कपात १.२५% पर्यंत वाढली आहे. गव्हर्नर यांनी सध्याच्या आर्थिक स्थितीचे वर्णन 'दुर्मिळ सोन्याच्या किमतीची परिस्थिती' असे केले आहे आणि या कपातीमुळे आर्थिक वर्ष २६ च्या दुसऱ्या सहामाहीत आणि त्यानंतरच्या काळात आर्थिक वाढीसाठी अनुकूल पार्श्वभूमी निर्माण झाली आहे. आरबीआयने तरलता वाढविण्यासाठी आणि रुपया स्थिर करण्यासाठी पावले उचलण्याची घोषणा केली आहे, जे वित्तीय व्यवस्थेच्या स्थिरतेसाठी आणि शाश्वत आर्थिक वाढीसाठी महत्त्वाचे घटक आहेत. या वर्षासाठी आणि पुढील वर्षासाठी चलनवाढीचा अंदाज वाढीला आधार देणारा आहे आणि जीडीपीच्या अंदाजातील सुधारणा वाढीचा अंदाज ८% वाढीच्या जवळ घेऊन जाते - जी पुढील अनेक वर्षांसाठी आमची विकास दराची अपेक्षा आहे.९) GoalFi कंपनीचे इन्व्हेसमेंट मॅनेजर व कार्यकारी संचालक वरूण जोशी- 'आज आपण आरबीआयकडून जे पाहत आहोत ते आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचे आहे - तुम्ही पोर्टफोलिओ व्यवस्थापित करत असाल, व्यवसाय चालवत असाल किंवा तुमच्या गुंतवणुकीचे नियोजन करत असाल. त्यांनी रेपो दर २५ बेसिस पॉइंट्सने ५.२५% पर्यंत कमी केला आहे, १ लाख कोटी रुपयांच्या बाँड खरेदीची घोषणा केली आहे आणि आम्हाला उत्पन्न कमी होताना दिसत आहे. हे स्पष्ट संकेत आहे की भारताने सुलभीकरण चक्रात प्रवेश केला आहे. पण येथे महत्त्वाचा भाग आहे. हा एक मुक्त मार्ग नाही. सगळी काही महागाई त्या ४% च्या आसपास राहण्यावर अवलंबून आहे. आरबीआय जे प्रयत्न करत आहे ते एक संतुलित कृती आहे. ते कर्ज स्वस्त करू इच्छितात, आर्थिक वाढीला पाठिंबा देऊ इच्छितात आणि वित्तीय बाजारपेठ स्थिर ठेवू इच्छितात हे सर्व तीन वर्षांच्या नियंत्रणात ठेवल्यानंतर महागाई पुन्हा वाढणार नाही याची खात्री करून घेतात. इक्विटी गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून, यामुळे गोष्टींमध्ये लक्षणीय बदल होतात. कमी दर आणि स्थिर चलनवाढीचा अर्थ असा होतो की गुंतवणूकदार दर्जेदार कंपन्यांसाठी - विशेषतः बँका, ग्राहक व्यवसाय आणि दर-संवेदनशील क्षेत्रांसाठी जास्त मूल्यांकन देण्यास तयार असतात. परंतु येथे मुख्य शब्द 'गुणवत्ता' आहे. हे बाजार कमकुवत बॅलन्स शीट असलेल्या कमकुवत कंपन्यांना दंड करेल. आता सर्वकाही खरेदी करण्याबद्दल नाही. तुम्हाला निवडक असण्याची गरज आहे. आमची रणनीती सरळ आहे: स्वतःचे दर्जेदार स्टॉक ठेवा आणि अपेक्षित उत्पन्न असलेल्या कंपन्यांवर लक्ष केंद्रित करा. आरबीआयने जीडीपी वाढीचा अंदाज ६.८% वरून ७.३% पर्यंत वाढवला आहे जी कॉर्पोरेट उत्पन्नासाठी उत्साहवर्धक बातमी आहे. जर महागाईने सहकार्य केले, तर पुढच्या वर्षी आपल्याला आणखी एक दर कपात दिसेल, जी इक्विटीसाठी आणखी सकारात्मक असेल. परंतु जर किमती पुन्हा वाढू लागल्या, तर हा डौविश (Dowish) टप्प्याचा शेवट असू शकतो.'

फीड फीडबर्नर 5 Dec 2025 2:10 pm

कूपर रुग्णालयाची रुग्णसुरक्षा रामभरोसेच!

कधी रुग्णांना उंदरांचा चावा, तर कधी रुग्ण खाटेवरून पडतातमुंबई : महापालिकेच्या कूपर रुग्णालयात रुग्णांना कधी उंदीर चावत आहेत तर कधी रुग्ण खाटेवरून पडत आहेत. या घटना सुरूच आहेत. महिनाभरात तीन रुग्ण खाटांवरून पडले आहेत. चार दिवसांपूर्वीही अशीच घटना घडली आहे. त्यामुळे रुग्ण सुरक्षेचा प्रश्न कायम आहे. मात्र मिरगीचा झटका आल्याने ही महिला पडल्याचे स्पष्टीकरण रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आले. तर रुग्णाच्या नातेवाईकांनी सुरक्षेसाठी रेलिंग बसवण्याची मागणी केली आहे. कूपर रुग्णालयातील ८० वर्षांच्या झिन्नत रसूल अहमद यांना ३० नोव्हेंबर रोजी उपचारासाठी दाखल केले होते. रात्री उशिरा त्यांच्यासोबत असलेल्या नातेवाईक महिला थंडी वाढल्याने पंखा बंद करण्यासाठी दोन पावले दूर गेल्या आणि इतक्यात झिन्नत या अचानक बेडवरून थेट जमिनीवर कोसळल्या.रुग्णालय प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, झिन्नत यांना उच्च रक्तदाब, फिट्स येणे आणि मनोविकार असे आजार असून त्या मिरगीच्या झटक्यामुळेच त्या पडल्या. हा अपघात असून रुग्णाच्या वैद्यकीय स्थितीशी संबंधित आहे. तसेच या रुग्णाला रेलिंग बेड उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची प्रतिक्रिया प्रशासनाकडून सांगण्यात आले. नोव्हेंबर महिन्यात एक ज्येष्ठ महिला रुग्ण अशीच पडल्याची घटना घडली होती. वॉर्डमध्ये रात्री नातेवाईकांना वॉर्डमध्ये राहू दिले जात नाही. तसेच अनेक बेड ला सेफ्टी ग्रील नसतात. त्यामुळे किमान बेडवर सेफ्टी ग्रिल अनिवार्य करावी किंवा गंभीर रुग्णांसोबत एक नातेवाईक राहण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी नातेवाईकांकडून करण्यात आली आहे.सुरक्षेसाठी अतिरिक्त रक्षकांची मागणीकूपर रुग्णालयातील वाढत्या सुरक्षेच्या गरजेनुसार अतिरिक्त सुरक्षारक्षक उपलब्ध होणार आहेत. मुंबई महापालिकेकडून आलेल्या मागणीनुसार महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाने अतिरिक्त सुरक्षारक्षक नियुक्त करण्यास तत्त्वतः सहमती दिली आहे. महामंडळाच्या ई-पोर्टलवर कोटेशन नोंदविणे, शुल्क तपशील अपलोड करणे आणि अधिकृत मागणी नोंदविणे ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच सुरक्षारक्षकांची प्रत्यक्ष नियुक्ती होणार आहे. तसेच, सुरक्षारक्षक नियुक्तीसाठी लागणारा निधी महापालिकेकडून उपलब्ध झाल्यावरच संबंधित रुग्णालयात रक्षक पाठविण्याची प्रक्रिया पूर्ण होईल, असेही पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. महामंडळाच्या दरपत्रकानुसार शुल्क अंमलात असून, कोणत्याही अडचणीसाठी संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने माहिती द्यावी, असे निर्देशही देण्यात आले आहेत. सर्व आवश्यक कागदपत्रे व प्रशासनिक मंजुरी मिळाल्यानंतरच कूपर रुग्णालयात अतिरिक्त सुरक्षारक्षक नेमले जाणार आहेत. त्यामुळे ही समस्या लवकरच सुटणार आहे.२० रेलिंग बेडसाठी लवकरच निविदासध्या महिला वॉर्डमध्ये एकूण १० बेडला रेलिंग आहे. आम्ही लवकरच अजून २० रेलिंग बेडसाठी निविदा काढणार असून, याची प्रक्रिया देखील सुरू आहे. त्यामुळे एकूण ३० रेलिंग बेड्स आमच्याकडे उपलब्ध होतील. वॉर्डची क्षमता ८० आहे. त्यामुळे किमान ४० रेलिंग बेड असणे गरजेचे आहे. ३० बेड लवकर होतील, त्यानंतर आणखी १० रेलिंग बेड्ससाठी देखील प्रयत्न करणार आहोत.

फीड फीडबर्नर 5 Dec 2025 1:30 pm

मुख्याध्यापक, शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी आज ‘शाळा बंद’

एक दिवसाचे वेतन कापण्याचा संचालनालयाचा इशारामुंबई : शिक्षकांचे समायोजन, टीईटी सक्ती, ऑनलाईन व अशैक्षणिक कामांचा बोजा थांबवा, सुधारित आश्वासित प्रगती योजना लागू करावी, शिक्षण क्षेत्रातील कंत्राटीकरण थांबवा अशा अनेक मागण्यासाठी राज्यातील खासगी अनुदानित, अंशत अनुदानित, विनाअनुदानित शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी ५ डिसेंबर रोजी ‘शाळा बंद’ आंदोलन पुकारले आहे. मात्र शिक्षकांनी ५ डिसेंबर रोजी शाळा बंद ठेवल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय शिक्षण संचालनालयाने घेतला आहे.राज्यातील शिक्षकांच्या विविध संघटनांनी विविध मागण्यांसाठी ५ डिसेंबर रोजी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्यातील खासगी अनुदानित, अंशत अनुदानित, विनाअनुदानित अशा जवळपास २५ हजार शाळा शुक्रवारी बंद राहणार आहेत. हे प्रमाण राज्यातील एकूण शाळांच्या जवळपास २५ टक्के इतके आहे. त्यामुळे याचा मोठा परिणाम शुक्रवारी राज्यामध्ये दिसून येण्याची शक्यता आहे. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे ‘शाळा बंद’ आंदोलन मोडीत काढण्यासाठी शिक्षण संचालनालयाने शाळा बंद ठेवणाऱ्या मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.विद्यार्थी हित लक्षात घेता ५ डिसेंबर रोजी शाळा बंद राहणार नाही दक्षता घ्यावी. तसेच आंदोलनात सहभागी शाळा बंद ठेवणाऱ्या मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्याचे आदेश माध्यमिक व उच्च माध्यमिकचे शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी दिले.राज्यातील विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय, जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी, मुंबई महानगरपालिकेचे शिक्षण निरीक्षक यांना आदेश दिले. या आदेशानुसार राज्यातील सर्वच शाळा प्रशासनाला आंदोलनात सहभागी होणाऱ्या शिक्षकांचे एक दिवसांचे वेतन कपात करण्याचे निर्देश शिक्षण कार्यालयांकडून देण्यात आले आहेत. राज्यामध्ये २०१३ पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना टीईटी सक्ती रद्द करण्यात यावी, संचमान्यतेसंदर्भात काढण्यात आलेला शासन निर्णय रद्द करून जुने निकष लागू करावेत, शिक्षकांवरील ऑनलाइन व अशैक्षणिक कामांचा बोजा थांबवावा, शिक्षणसेवक योजना रद्द करून नियमित वेतनश्रेणी लागू करावी, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची तत्काळ पदभरती करावी, सुधारित आश्वासित प्रगती योजना लागू करावी, अल्पसंख्याक शाळांना संचमान्यतेबाबत विशेष सवलती द्याव्या, शिक्षण क्षेत्रातील कंत्राटीकरण थांबवावे, अशा विविध मागण्यांसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संघटनांकडून ‘शाळा बंद’ आंदोलन करण्यात येणार आहे.खालील प्रमुख मागण्या१. टीईटी निर्णयावरील पुनर्विचार याचिका तातडीने दाखल करावी.२. टीईटी निकालाचा चुकीचा अर्थ काढून विविध कार्यालयांकडून सुरू असलेली कार्यवाही तत्काळ थांबवावी.३. म.ना.से. नियम १९८२ व ८४ अंतर्गत जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करावी.४. शिक्षण सेवक योजना रद्द करून नियमित वेतनश्रेणी लागू करावी.५. शिक्षकांनाही १०, २०, ३० वर्षांनंतरची सुधारित तीन वेतन लाभाची आश्वासित प्रगती योजना लागू करावी.६. १५ मार्च २०२४ चा संचमान्यता विषयक शासन निर्णय रद्द करावा.७. राज्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची बंद असलेली पदभरती तत्काळ सुरू करावी.८. शिक्षकांवरील विविध अशैक्षणिक व ऑनलाइन उपक्रम तात्काळ थांबवावेत.९. विषय पदवीधर शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी भेदभाव न करता मंजूर करावी.१०. वस्तीशाळेतील शिक्षकांची सेवा मूळ नियुक्ती तारखेपासून सर्व लाभांसाठी ग्राह्य धरावी.११. आश्रमशाळांमध्ये कंत्राटी शिक्षक भरतीचे धोरण रद्द करण्यात यावे.१२. कमी पटाच्या शाळा बंद न करता शिक्षणक्रम सुरू ठेवावा.१३. शिक्षकांचे इतर सर्व प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवावेत.

फीड फीडबर्नर 5 Dec 2025 1:30 pm

बुरख्याच्या परवानगीसाठी आंदोलन

मुंबई : गोरेगावमधील विवेक एज्युकेशन सोसायटीच्या विवेक विद्यालय-कनिष्ठ महाविद्यालयाने कपड्यांबाबत आचारसंहिता जाहीर केली असून विद्यार्थ्यांना धार्मिक पेहराव करून येण्यास बंदी घातली आहे. त्यानुसार महाविद्यालयात बुरखा-नकाब घालून येण्यास बंदी घातली आहे. या निर्णयाविरोधात मुस्लम विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. गोरेगाव पश्चिमेकडील सिद्धार्थ नगर येथे असलेल्या विवेक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाने विद्यार्थ्यांसाठी आचारसंहिता लागू केली. त्यात महाविद्यालयात येण्याच्या वेळा, प्रवेशद्वार बंद होण्याच्या वेळा याचबरोबर विद्यार्थ्यांनी कोणते पोशाख घालणे टाळावे, हे नमूद केले. या पत्रकात धार्मिक पोशाख परिधान करण्यावर बंदी घातली आहे. त्यानुसार मुस्लिम मुलींना बुरखा आणि नकाब परिधान करण्यास बंदी घातली आहे. मात्र हिजाब घालण्यास परवानगी दिली आहे.या निर्णयाविरोधात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले. यावेळी आम्ही येथे शिकायला येतो. आम्ही नकाब किंवा बुरख्यात जास्त सहजपणे वावरू शकतो. आमचा पोशाख आमच्या शिक्षणाच्या आड कसा येऊ शकतो, असा प्रश्न या विद्यार्थिनींनी उपस्थित केला.एमआयएमच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला, तसेच मनसेने सुद्धा महाविद्यालयामध्ये धार्मिक बाबी आणू नयेत अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा दिला. एमआयएमच्या आणि मनसेच्या सहभागामुळे या मुद्द्याने राजकीय स्वरूप धारण केले आहे. याबाबत महाविद्यालयाच्या प्राचार्य शिजा मेनन यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी उत्तर देण्याचे टाळले. तसेच आमच्या वकिलांनी आंदोलनकर्त्या मुलींनाही उत्तर दिले असल्याचे सांगितले.

फीड फीडबर्नर 5 Dec 2025 1:30 pm

कल्याण - डोंबिवलीतील विकासकामांसाठी निधी उपलब्ध

डोंबिवली: कल्याण-डोंबिवलीतील कामांना गती देण्यासाठी राज्य नगर विकास विभागाच्या माध्यमातून तब्बल १६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. पायाभूत सुविधा, पिण्याच्या पाण्याची सोय व नागरी सोयीसुविधा मजबूत करण्यासाठी विविध महत्त्वपूर्ण कामांना मंजुरी देण्यात आली आहे. जलकुंभ, पूल, सभागृह विकास, रस्ते कॉंक्रिटीकरण अशा कामांसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनि त्यासाठी पाठपुरावा केला होता. त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांचे आभार मानले आहेत.कल्याण लोकसभा मतदारसंघात गेल्या काही वर्षात पायाभूत सुविधांनी सर्वसमान्यांना मोठा दिलासा दिला आहे. नगरविकास विभागाच्या माध्यमातून ५ विकासकामांसाठी तब्बल १६ कोटींचा निधी मिळवण्यात यश आले आहे. यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी खा.श्रीकांत शिंदे यांच्याकडे निधीची मागणी केली होती. त्यानुसार त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला.जुनी डोंबिवली परिसरातील प्रभाग क्रमांक ६४ साठी उंच जलकुंभ आणि पंप हाऊस बांधण्यासाठी ७ कोटी २४ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. कल्याण पूर्वेतील वालधुनी नदीवरील पुलाच्या बांधकामासाठी १.७६ कोटींचा निधी देण्यात आला आहे. तर डोंबिवली पश्चिमेतील देविचा पाडा येथील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी सभागृह विकसित करण्यासाठी १.५० कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे. तर गोग्रासवाडी येथील रस्ते कॉंक्रिटीकरणासाठी ५० लाख, गरिबाचा वाडा ते ४५ मीटर रिंगरोड जोडणारा रस्ता कॉंक्रिटीकरणासाठी ५ कोटींची निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीच्या उपलब्धतेमुळे महत्वाच्या रस्ते कॉंक्रिटीकरणाच्या आणि पूल बांधणीचा कामाला गती मिळणार आहे.

फीड फीडबर्नर 5 Dec 2025 1:30 pm

भाईंदरमध्ये मराठी माणसाला घर देण्यास नकार !

बिल्डर लॉबीची अजब वागणूकभाईंदर : मराठी विरुद्ध अमराठी वादाचे भाईंदरमध्ये पडसाद उमटले आहेत. भाईंदरमध्ये एका सोसायटीत मराठी माणसाला फ्लॅट देण्यास नकार देण्यात आला आहे, असा आरोप एका तरुणाने केला. त्यामुळे हे प्रकरण चर्चेत आले आहे. सतत मराठी-अमराठी वाद निर्माण होत आहे. भाईंदर प., येथील स्कायलाईन या सोसायटीत घर खरेदी करण्यास गेलेल्या रवींद्र खरात नामक युवकाने हे गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या आरोपांनुसार, ते फ्लॅटची माहिती घेण्यासाठी गेले तेव्हा त्यांना स्पष्ट सांगण्यात आले की, येथे फक्त जैन, मारवाडी किंवा ब्राह्मण समाजातील लोकांनाच फ्लॅट दिले जातील. खरात यांनी म्हटले की, आम्ही मराठी, नॉनव्हेज खातो आणि आमची जात ब्राह्मण, जैन किंवा मारवाडी नसेल, तर आम्हाला फ्लॅट दिला जाऊ शकत नाही, असे तिथे स्पष्टपणे सांगण्यात आले. संबंधित बांधकाम व्यावसायिकावर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी खरात यांनी केली आहे.संबंधित बांधकाम व्यावसायिक हा जैन समाजाचा आहे. तो फक्त जैन बांधवांसाठीच इमारती बांधणार आहे का? स्थानिक आमदार आणि बांधकाम व्यावसायिकदेखील जैन असल्याने भाईंदरमध्ये मराठी माणसाला डावलले जात आहे. महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाच्या हक्काची आणि भाषेची गळचेपी सुरू आहे, असा संताप या प्रकरणी व्यक्त होत आहे. काँग्रेसने संबंधित बांधकाम व्यावसायिकाच्या प्रोजेक्टवर स्टिंग ऑपरेशन करून हे धक्कादायक वास्तव उघड केल्याचा दावा केला आहे. युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये बिल्डरची माणसे मराठी माण्साला फ्लॅट देण्यास नकार देत असल्याचे समोर आले आहे. या पट्ट्यामध्ये ८५ टक्के गुजराती, मारवाडी लोक आहेत. कोणाशीही बोलून फायदा नाही. बिल्डरसुद्धा जैन आहे, असे प्रकल्पाचा प्रतिनिधी बोलत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.

फीड फीडबर्नर 5 Dec 2025 1:30 pm

“मशिदी अन् मदरशांमध्येही सीसीटीव्ही अनिवार्य करावे” ; भाजप खासदार अरुण गोविल यांची मागणी

Arun Govil on Mosques। लोकसभेत शून्य प्रहरात, मेरठचे भाजप खासदार अरुण गोविल यांनी मशिदी आणि मदरशांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी केली. त्यांनी,”ही मोठी सार्वजनिक आणि सामुदायिक जागा आहेत जिथे सुरक्षा सुनिश्चित करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.” असे सांगितले. त्यांनी पुढे स्पष्ट करताना, त्यांचे विधान कोणत्याही धर्मावर टीका करण्यासाठी नाही, तर देशातील नागरिकांचे रक्षण करण्यासाठी होते” असे […] The post “मशिदी अन् मदरशांमध्येही सीसीटीव्ही अनिवार्य करावे” ; भाजप खासदार अरुण गोविल यांची मागणी appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 5 Dec 2025 1:28 pm

रिंकू राजगुरु एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला; ‘आशा’चित्रपटाचा हृदयस्पर्शी ट्रेलर प्रदर्शित

Asha Upcoming Marathi Movie Official Trailer: अभिनेत्री रिंकू राजगुरुने चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्यापासून सातत्याने वैविध्यपूर्ण भूमिका साकारताना दिसते. तसेच ती सोशल मीडियावर तिच्या फोटोशूटमुळे सतत चर्चेत असते. तिचा चाहतावर्ग देखील मोठा आहे. आपल्या चाहत्यांशी रिंकूने एक प्रकारचे घट्ट नाते तयार केले असून, सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांशी संपर्कात असते. रिंकू आता एका नव्या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला […] The post रिंकू राजगुरु एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला; ‘आशा’ चित्रपटाचा हृदयस्पर्शी ट्रेलर प्रदर्शित appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 5 Dec 2025 1:15 pm

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून कांदा खरेदी करण्याची परवानगी दिली होती. मात्र, या प्रक्रियेत नाफेड, एनसीसीएफ, काही फार्मर प्रोड्युसर कंपन्या आणि व्यापाऱ्यांनी वैयक्तिक आर्थिक फायद्यासाठी केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याविरोधात विश्वास माधवराव मोरे यांनी पिंपळगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती तसेच मुंबई उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली होती. मुंबई उच्च न्यायालयाने या कथित घोटाळ्याची चौकशी आर्थिक गुन्हे विभागाकडे सोपवण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून अहवाल १६ जानेवारी २०२६ पर्यंत सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.केंद्र सरकारच्या योजनेत शेतकऱ्यांना अधिक दर मिळावा आणि ग्राहकांना कांदा योग्य दरात उपलब्ध व्हावा, यासाठी नाफेड आणि एनसीसीएफमार्फत फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून कांदा खरेदी करायची योजना आखण्यात आली होती तथापि, नाफेड आणि एनसीसीएफच्या अधिकाऱ्यांनी काही व्यापारी, फेडरेशनचे सदस्य आणि चार्टर्ड अकाउंटंट यांच्याशी मिळून शेतकऱ्यांचा कांदा खरेदी न करता, व्यापाऱ्यांकडून स्वस्त दरात घेतलेला कांदा शेतकऱ्यांचा कांदा दाखवला. या पद्धतीने स्वस्त दरातील कांदा वाढीव दराने केंद्राला विकून मोठा आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप आहे.

फीड फीडबर्नर 5 Dec 2025 1:10 pm

देवेंद्र फडणवीस ३.० ची यशोगाथा

महाराष्ट्रासाठी ‘गोल्डन इयर’सुहास शेलार मुंबई : ५ डिसेंबर २०२४ चा दिवस महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक ठरला. हजारो नागरिकांच्या साक्षीने देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची तिसऱ्यांदा शपथ घेतली. शुक्रवारी या घटनेला वर्ष पूर्ण होत आहे. २०१४ ला ते पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले, तेव्हापासून २०२४ पर्यंतचा त्यांचा राजकीय प्रवास हा प्रचंड संघर्षांचा राहिला. अनेकांनी त्यांना चक्रव्युहात अडकवण्याचा प्रयत्न केला. महाभारतातील अभिमन्यू चक्रव्यूह भेदण्यात अपयशी ठरला होता. पण, महाराष्ट्रातील या आधुनिक अभिमन्यूने चक्रव्यूह अचूक भेदला आणि भल्याभल्यांना गारद केले. या काळात फडणवीसांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची मोलाची साथ लाभली. गेल्या वर्षभरात त्यांनी लोकहिताचे अनेक निर्णय घेतले. आज वर्षपूर्तीनिमित्त फडणवी ३.० सरकारच्या वर्षभरातील कामगिरीचा आढावा...पर्यटन क्षेत्रातील गुंतवणूक महाराष्ट्र पर्यटन धोरण २०२४ - ५ हजार कोटी नवीन महाबळेश्वर हिल स्टेशन – १ हजार कोटी नाशिक कुंभ २०२७ तयारी – २५ हजार कोटी महिलांसाठी व्यवसाय योजना – ५०० कोटी मुंबई क्रूज टर्मिनल – २ हजार कोटीसामाजिक क्षेत्रात भरीव काम मराठा आरक्षणाबाबत ऐतिहासिक निर्णय आणीबाणी बंदी सन्मान योजना (पेन्शन वाढ) संत सेवालाल महाराज योजना (बंजारा समाजासाठी) डबेवाले आणि चर्मकार समाजासाठी घरे झोपडपट्टीमुक्त मुंबईसाठी स्वयं आणि समूह पुनर्विकास प्राधिकरणाची स्थापना‘इन्फ्रा मॅन’ देवेंद्रदेवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्या कार्यकाळातील पहिल्या वर्षात पायाभूत सुविधांवर सर्वाधिक ४ लाख कोटी रुपये खर्च केले. ही रक्कम महाराष्ट्राच्या सकल राज्य उत्पन्नाच्या एकूण १५ टक्के आहे. वांद्रे-कुर्ला संकुल ते विमानतळ भुयारी मार्ग, उत्तन ते विरार सागरी सेतू, समृद्धी महामार्ग थेट वाढवण बंदराला जोडणाऱ्या प्रकल्पांचा यात आवर्जून उल्लेख करावा लागेल.सप्टेंबर २०२५ मध्ये फडणवीस सरकारने ७५ हजार कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी दिली. त्यात मुंबई मेट्रो लाइन-११ (२४ हजार कोटी) आणि नागपूर आऊटर रिंग रोडचा समावेश आहे. मार्च २०२५ मध्ये ‘हायब्रिड एन्युइटी मॉडल’ फेज-१ अंतर्गत ६ हजार किमी रस्त्यांसाठी ४१ हजार ७३० कोटींची गुंतवणूक जाहीर करण्यात आली.महाराष्ट्राच्या सागरी क्षेत्राला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मंत्री नितेश राणे यांच्या पुढाकाराने ऑक्टोबर २०२५ मध्ये १५ सामंजस्य करार (५६ हजार कोटी) करण्यात आले.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे मोलाचे योगदानफडणवीसांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे मोलाची भूमिका बजावत आहेत. शिंदे यांनी नगरविकास, गृहनिर्माण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी सांभाळत मुंबईसह महानगरातल्या पायाभूत सुविधांवर भर दिला. त्यांच्या पुढाकाराने सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोडसारखे प्रकल्प पूर्ण झाले. परिणामी, पूर्व आणि पश्चिम महामार्गांची कनेक्टिव्हिटी सुधारली. शिंदे यांच्या प्रयत्नांमुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील ग्रामीण भागात रस्ते आणि पाणीपुरवठा प्रकल्पांना प्राधान्य मिळाले.दुसरीकडे, अजित पवार यांनी अर्थ आणि नियोजन विभागाचा कारभार सांभाळत राज्याच्या आर्थिक स्थिरतेवर लक्ष केंद्रित केले. २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात त्यांनी महिला, तरुणवर्ग आणि शेतकऱ्यांसाठी ६ लाख १२ हजार कोटींचे विशेष पॅकेज जाहीर केले. पवार यांच्या कठोर आर्थिक शिस्तीमुळे राज्याची आर्थिक तूट कमी करण्यात यश मिळाले.आजवरची सर्वाधिक परकीय गुंतवणूक आणण्यात यशदि. २० ते २४ जानेवारी २०२५ या कालावधीत दावोस येथे झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्राने सर्वाधिक १५ लाख ७० हजार कोटींचे सामंजस्य करार केले. त्यातून जवळपास १६ लाख रोजगार निर्मिती होणार आहे. या परिषदेत एकूण ६१ प्रकारचे करार झाले. त्यातील ५४ करार हे गुंतवणुकीचे आणि ७ करार हे स्ट्रॅटिजिक कॅटेगरीतले होते. यामध्ये स्टील, आयटी, ग्रीन एनर्जी, इन्फ्रास्ट्रक्चर आदी सेक्टरमध्ये गुंतवणूक झालेली आहे. पैकी मुंबई महानगर क्षेत्रामध्ये ६ ते ७ लाख कोटी, विदर्भामध्ये ५ लाख कोटी, उत्तर महाराष्ट्र आणि नाशिकमध्ये ३० ते ३५ हजार कोटी, त्याचबरोबर मराठवाडा विभागामध्ये २५ ते ३० हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे.शेतकऱ्यांना आधार कृषी पायाभूत विकास योजना : २५ हजार कोटी रुपयांची योजना जाहीर; हवामान बदल, आपत्ती आणि बाजार अस्थिरतेच्या काळात शेतकऱ्यांना आधार. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना : हवामान अनुकूल प्रकल्प; पावसाच्या अनियमिततेपासून शेतकऱ्यांचे संरक्षण. मागेल त्याला सौर कृषी पंप योजना : सिंचनासाठी सौर पंप आणि दिवसा वीज पुरवठा. पीएम किसान सन्मान निधी : २१ व्या हप्त्यात १ हजार ८०८ कोटी रुपये लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात जमा. अतिवृष्टीग्रस्तांना मदत : ३१ हजार ६२८ कोटी रुपयांचे पॅकेज. देशी गोवंश रक्षण : शेती आणि सांस्कृतिक संवर्धनासाठी.

फीड फीडबर्नर 5 Dec 2025 1:10 pm

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये एकीकडे दुबार मतदार आणि आरक्षण मर्यादेमुळे वाद निर्माण झाला. तर ऐन मतदानाच्या दिवशी नागपूर खंडपीठाने नगरपरिषदेची मतमोजणी २१ डिसेंबर रोजी घेण्याचा निर्णय दिल्याने मतमोजणी लांबणीवर पडली. या पार्श्वभूमीवर नागपूर खंडपीठाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली होती. ज्यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली असून मतमोजणी २१ डिसेंबरलाच होणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले.राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी २ डिसेंबर रोजी मतदान झाले होते. आता या निकालाबाबत सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत महत्त्वपूर्ण आणि निर्णायक आदेश दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने नागपूर खंडपीठाचा निर्णय कायम ठेवत मतदानानंतर तातडीने निकाल जाहीर करण्याची याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे आता २ डिसेंबर आणि २० डिसेंबर या दोन दिवशी होणाऱ्या मतदानाचा निकाल एकत्रितपणे २१ डिसेंबर रोजीच जाहीर होणार हे निश्चित झाले आहे.https://prahaar.in/2025/12/05/bjps-election-steering-committee-for-mumbai-municipal-corporation-announced/तसेच यावेळी न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला अत्यंत स्पष्ट निर्देश दिले आहेत. जर २० डिसेंबर रोजी होणाऱ्या मतदानात काही तांत्रिक अडचण आली किंवा ते मतदान पूर्णपणे पार पडू शकले नाही, तरीही निकालाची तारीख ही २१ डिसेंबरच असेल. ती पुढे ढकलली जाणार नाही. या सक्त निर्देशांमुळे आयोगावरील निकालाची प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याची जबाबदारी वाढली आहे.

फीड फीडबर्नर 5 Dec 2025 1:10 pm

अवधूत साठे 'धर्मसंकटात'६०१ कोटींच्या दंडासह बाजारातूनही बंदी सेबीने आदेशात दिली विस्तृत माहिती

मुंबई: सेबीच्या निर्देशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अवधूत साठे यांच्याकडून ६०१ कोटीचा दंड वसूली केला जाणार असून सेबीने त्यांच्यावर खटला चालवून पुढील आदेशापर्यंत शेअर बाजारात भाग घेण्यास प्रतिबंध लागू केले आहेत. १२५ पानी अंतरिम आदेशात सेबीने बाजार तज्ञ व अवधूत साठे ट्रेडिंग अ‍ॅकेडमी यांच्यावर गंभीर आरोप केले असून शिकवणीच्या नावाखाली अनाधिकृतपणे शेअरची नावे सूचवून विद्यार्थ्यांना गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केल्याचे आढळले असल्याचे आदेशात स्पष्ट केले आहे. सेबीचे पूर्ण वेळ अधिकारी व सदस्य कमलेश वर्षनी यांनी आर्थिक २०२४-२०२५ कालावधीत यावर सखोल तपास करून आपले निष्कर्ष आरोपपत्रात दाखल केले आहेत. सेबीचे नोंदणीकृत नसूनही गुंतवणूकीचे सल्ले देणे यामुळे साठेंना महाग पडले आहे. अधिकाऱ्यांनी यापूर्वी २० ते २१ ऑगस्टला कर्जत येथील त्यांच्या क्लासेसच्या जागांवर धाडी टाकून काही महत्वाची कागदपत्रे जप्त केली होती.इतकेच नाही तर सेबीने दिलेल्या माहितीनुसार, मार्च २०२४ पर्यंत अवधूत साठे यांना ताकीद (Warning) देऊनही साठे व त्यांच्या क्लासेसने यावर गांभीर्याने विचार केला नसल्याचे सेबीने आरोपपत्रात म्हटले आहे. त्यामुळे हे सल्ले न थांबवल्याने सेबीने ही कारवाई केली. विशिष्ट शेअर सूचवून व त्यातून गुंतवणूक गोळा करुन अथवा झटपट पैसे कमावण्याचे आश्वासन देऊन गुंतवणूकीच्या नावाखाली 'माया' जमावण्यात आली असा आरोप सेबीने केला आहे. सेबी कायद्याच्या (SEBI Act) या कायद्याचे उल्लंघन करत हे कार्य साठेंनी सुरू ठेवल्याचेही नियामकांनी यावेळी स्पष्ट केले.तांत्रिकदृष्ट्या साठे यांची अकादमी केवळ ट्रेडिंग कोर्सेसच शिकवत नव्हती तर लाईव्ह मार्केट सत्रादरम्यान खरेदी-विक्री कॉल्स देखील देत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर सेबीने मोठ्या पातळीवर या प्रकारांची चौकशी सुरू केली. खासकरून चौकशी दरम्यान काहींना गुंतवणूकीत नुकसान झाल्याचे लक्षात आल्यानंतर सेबीने कारवाईला वेग वाढवला. चौकशी सुरू झाल्यानंतर, सेबीने व्हिडिओ, व्हॉट्सअँप संदेश, सोशल मीडिया कंटेंट, पेमेंट स्ट्रक्चर्स आणि सहभागींच्या साक्षींचे सखोल विश्लेषण केले त्या आधारे हे आरोपपत्र दाखल केले होते.आदेशात, नियामकाने म्हटले आहे की मार्च २०२४ मध्ये चुकीची माहिती आणि निवडक खुलासे केल्याबद्दल प्रशासकीय इशारा जारी करूनही, अकादमीने केवळ अभ्यासक्रम सहभागींच्या यशस्वी व्यवहारांचे प्रदर्शन करणारी दिशाभूल करणारी जाहिरात सामग्री प्रकाशित करणे सुरूच ठेवले. अनेक तक्रारदारांनी आरोप केला की प्रशिक्षण कार्यक्रमांनी असाधारण परताव्याचे आश्वासन दिले परंतु त्यामुळे मोठे नुकसान झाले आणि अकादमीने थेट बाजार व्यापार सत्रे आयोजित केली जिथे थेट व्यापार शिफारसी दिल्या गेल्या. सेबीच्या व्हिडिओ रेकॉर्डिंगच्या विश्लेषणात असे आढळून आले की थेट वर्गांदरम्यान विशिष्ट स्टॉक,लक्ष्य (Target Price) स्टॉप-लॉस पातळी आणि दिशात्मक दृश्ये (Directional Advice) नियमितपणे प्रदान केली जात होती. अवधूत साठे यांनी स्वतःचे एमटीएम पोझिशन्स देखील प्रदर्शित केले. सहभागींनी त्यांच्या सूचनांवर आधारित व्यवहार केल्याचे कबूल करताना पाहिले.तपासात पुढे असे दिसून आले की, ६.७५ लाख रुपयांपर्यंतच्या शुल्कासह मार्गदर्शन बॅचसाठी तयार केलेले अनेक खाजगी व्हॉट्सअँप ग्रुप स्टॉक शिफारसी, पर्याय धोरणे, प्रवेश आणि निर्गमन पातळी आणि निर्देशांक अंदाज सामायिक करण्यासाठी वापरले जात होते. सेबीने असे नमूद केले की असे वर्तन नोंदणीशिवाय गुंतवणूक सल्ला देण्यासारखे आहे यामुळे सेबी कायदा, गुंतवणूक सल्लागार नियम, संशोधन विश्लेषक नियम आणि PFUTP नियमांचे प्रथमदर्शनी उल्लंघन झाले आहे.सेबीने अंतरिम निर्देश लागू केले आहेत ज्यात (ASTAPL),अवधूत साठे आणि गौरी अवधूत साठे यांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सिक्युरिटीज मार्केटमध्ये प्रवेश करण्यापासून यापुढे रोखले आहे. पुढील आदेशापर्यंत सिक्युरिटीज खरेदी, विक्री किंवा व्यवहार करण्यापासून शेअर बाजारातून पूर्णपणे प्रतिबंधित करण्यात आले आहे, त्यांच्या विद्यमान होल्डिंग्जचे लिक्विडेशन वगळता नोटिसींना कोणत्याही गुंतवणूक सल्लागार किंवा संशोधन सेवा देण्यास, थेट ट्रेडिंग किंवा स्टॉकविशिष्ट मार्गदर्शन, स्टॉकमार्केट प्रशिक्षण घेण्यास किंवा सोशल मीडिया, व्हॉट्सअँप ग्रुप्स किंवा इतर प्लॅटफॉर्मद्वारे अथवा माध्यमातून स्टॉकशी संबंधित कोणताही सल्ला देण्यास जारी मनाई केली आहे.सेबीने त्यांना गुंतवणूकदारांकडून गोळा केलेले कोणतेही पैसे वळवू नयेत किंवा विल्हेवाट लावू नयेत आणि अशी रक्कम एस्क्रो खात्यातही ठेवू नये असे निर्देश दिले आहेत. सेबीने प्रथमदर्शनी बेकायदेशीर नफा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रकमा जप्त करण्याचे निर्देश दिले आहेत आणि ही रक्कम १५ दिवसांच्या आत सेबीच्या बाजूने चिन्हांकित (Notified) करून मुदत ठेवींमध्ये ठेवण्याची आवश्यकता आहे.याव्यतिरिक्त बँकांना सूचना देण्यात आल्या आहेत की त्यांनी नोटिसधारकांच्या खात्यांमधून चिन्हांकित ठेवींमध्ये हस्तांतरण वगळता कोणत्याही डेबिट व्यवहारांना परवानगी देऊ नये. पुढील २१ दिवसांत आर्थिक दंड अर्थात व्याजासह ६०१ कोटी रुपये आणि परतफेड देणींसह असे आदेश सेबीने दिले आहेत. व कारणे दाखवा नोटीसही बजावली असल्याचे सेबीने स्पष्ट केले. सेबी आपली कार्यवाही पूर्ण करत नाही आणि अंतिम आदेश देत नाही तोपर्यंत अंतरिम निर्देश लागू राहतील असे सेबीने अंतिमतः आपल्या निरिक्षणात म्हटले.

फीड फीडबर्नर 5 Dec 2025 1:10 pm

Lifestyle: आता बदाम नव्हे, ‘हा’नाश्ता करा! वैज्ञानिकांचा दावा – ‘शेंगदाणे वाढवते मेमरी पॉवर’

Lifestyle: हिवाळ्यात स्नॅक्स म्हणून खाल्ली जाणारी शेंगदाणे फक्त चवीला चांगली आणि शरीराला ऊब देणारीच नाही, तर मेंदूच्या आरोग्यासाठीही फायदेशीर असतात. एका नव्या अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे की शेंगदाण्याचे नियमित सेवन केल्याने मेमरी पॉवर वाढू शकते आणि मेंदूतील रक्तप्रवाह सुधारतो. फिजिकल हेल्थसोबत मेंटल हेल्थमध्येही आहाराचा मोठा वाटा बॅलन्स डाएट आणि योग्य जीवनशैली मानसिक आरोग्य […] The post Lifestyle: आता बदाम नव्हे, ‘हा’ नाश्ता करा! वैज्ञानिकांचा दावा – ‘शेंगदाणे वाढवते मेमरी पॉवर’ appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 5 Dec 2025 12:47 pm

ईव्हीएम हॅक करण्यासाठीच मतमोजणी लांबवली; काँग्रेसच्या बड्या नेत्याचा मोठा दावा, राजकीय वर्तुळात खळबळ

Vijay Vadettiwar : राज्यात पहिल्या टप्प्यातील २ डिसेंबर रोजी झालेल्या नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या मतदानात मोठा गोंधळ झाल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळाले. यापैकी उर्वरित २४ नगरपरिषदांसाठी २० डिसेंबर रोजी मतदान होणार असून, त्यानंतर २१ डिसेंबर रोजी एकत्रितपणे निकाल जाहीर करण्यात येणार आहे, असा निर्णय मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने घेतला. या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वेाच्च […] The post ईव्हीएम हॅक करण्यासाठीच मतमोजणी लांबवली; काँग्रेसच्या बड्या नेत्याचा मोठा दावा, राजकीय वर्तुळात खळबळ appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 5 Dec 2025 12:40 pm

रशिया-युक्रेन युद्ध संपणार ? ; मोठी अपडेट देत डोनाल्ड ट्रम्प म्हणाले,”मी युद्ध…”

Trump on Russia-Ukraine war। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्याचा आपला संकल्प पुन्हा व्यक्त केला. याविषयी बोलताना त्यांनी,”तीन वर्षांपासून सुरू असलेले रशिया-युक्रेन युद्ध संपेल आणि युद्धबंदीची वेळ जवळ आली आहे. आपण जगभरात शांतता प्रस्थापित करत आहोत. आपण अशा प्रकारे युद्धे सोडवत आहोत की कोणीही यापूर्वी कधीही केले नाही. मी आठ युद्धे थांबवली आहेत […] The post रशिया-युक्रेन युद्ध संपणार ? ; मोठी अपडेट देत डोनाल्ड ट्रम्प म्हणाले,”मी युद्ध…” appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 5 Dec 2025 12:33 pm

मुंबई महानगरपालिकेसाठी भाजपची निवडणूक संचालन समिती जाहीर

मुंबई: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांची रणधुमाळी सुरू आहे. ज्यातील पहिल्या टप्प्याचे मतदान पूर्ण झाले असून मतमोजणी बाकी आहे. तर इतर दोन टप्प्यातील निवडणूकीसाठी सर्व पक्ष रणनीती आखण्यात व्यस्त आहेत. दरम्यान तिसऱ्या टप्प्यात होणाऱ्या महानगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई भाजपने मोठी घोषणा केली आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६ करिता भारतीय जनता पक्षाची मुंबई निवडणूक संचालन समिती घोषित केली आहे.अमित साटम यांच्या अध्यक्षतेखाली जाहिर करण्यात आलेल्या निवडणूक संचालन समितीमध्ये पक्षातील अनेक आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा समावेश आहे. ज्यात आशिष शेलार, अॅड. मंगलप्रभात लोढा, अॅड. राहुल नार्वेकर, प्रकाश मेहता, किरीट सोमैय्या, कालिदास कोळंबकर, मिहिर कोटेचा, पराग शाह, राम कदम, प्रसाद लाड, चित्रा वाघ या महत्त्वाच्या व्यक्तींचा समावेश आहे. तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते मिळून एकूण १४४ जणांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.https://prahaar.in/2025/12/05/modi-governments-special-gift-for-mumbaikars-additional-local-services-will-start-soon-in-nerul-uran-belapur-belt/दुसरीकडे भारतीय जनता पक्षाच्या मुंबई निवडणूक संचालन समितीमधील निमंत्रितांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण, भाजपचे राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि पीयूष गोयल यांचा समावेश आहे.

फीड फीडबर्नर 5 Dec 2025 12:30 pm

Dollar Rupee Rate: पतधोरण समितीच्या पार्श्वभूमीवर एका तासात ४० पैशाने रूपया घसरला 'ही'आहेत कारणे !

मोहित सोमण:आरबीआयच्या पतधोरण समितीच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद बाजारात दिलाच परंतु याचा फटका रूपयाला बसला आहे. निकाल जाहीर होण्यापूर्वी ८९.४९ रूपये प्रति डॉलर असलेला ८९.६९ रूपयावर पोहोचला होता जो तब्बल २० पैशाने वाढला होता. आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी रेपो दर ५.५०% वरून ५.२५% दरकपात केल्याने रूपया आणखी २० पैशाने वाढला असून ८९.६९% वरून ८९.८९ रूपये प्रति डॉलरवर पोहोचला असल्याने एका तासात ४० पैशाने घसरला असल्याचे बाजारात दिसले आहे. किरकोळ गुंतवणूकदारांना अद्याप आपल्या गुंतवणूकीत अपेक्षित वाढ केली नसली तरी मोठ्या प्रमाणात डॉलरच्या गुंतवणूकीत भारतीय बाजारात वाढ सुरु झाल्याने रूपया आणखी घसरला आहे.उपलब्ध माहितीनुसार, सकाळी आंतरबँकिंग परकीय चलन बाजारात रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ८९.८५ वर उघडला तो सकाळच्या व्यवहारात ८९.६९ रूपयावर सावरला. तरी देखील त्याच्या मागील बंदपेक्षा २० पैशांनी वाढला. परंतु यापूर्वीच तज्ञांनी यापूर्वीच दरकपातीतील पार्श्वभूमीवर चलनाची आधीच नाजूक स्थिती पाहता कोणतेही संकेत रुपयावर नवीन दबाव आणू शकतात असे म्हटले होते.परदेशी गुंतवणूकदारांकडून विक्रीचा (Sale off) दबाव, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि भारत-अमेरिका व्यापार कराराच्या घोषणेस झालेला विलंब यामुळे असलेली भूराजकीय स्थितीचा आढावा घेता यामुळे रुपयावर परिणाम झाला आहे. काल रुपया त्याच्या सर्वकालीन नीचांकी पातळीवरून २६ पैशांनी वाढून ८९.८९ वर बंद झाला होता.याविषयी सत्राच्या सुरुवातीला निर्णय जाहीर होण्यापूर्वी, 'आज सकाळी, सर्वांच्या नजरा आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीकडे आहेत. भारताच्या अत्यंत कमी महागाईमुळे दर कपात किंवा भविष्यात संभाव्य कपातीचा संकेत रुपयावर अधिक परिणाम करू शकतात' असे सीआर फॉरेक्स अॅडव्हायझर्सचे एमडी अमित पाबारी म्हणाले होते.

फीड फीडबर्नर 5 Dec 2025 12:10 pm

निर्णय कायम! नगरपरिषद नगरपंचायतींचा निकाल २१ डिसेंबरलाच; आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी

Supreme Court : राज्यातील नगरपरिषद, नगरपंचायतींचा निकालाबाबत महत्वाचा निर्णय सर्वेाच्च न्यायालने घेतला आहे. २ डिसेंबर आणि २० डिसेंबर या दिवशी मतदान झालेल्या निवडणुकांचा निकाल एकत्रितपणे २१ डिसेंबरला जाहीर करण्यात येणार असल्याचा नागपूर खंडपीठाचा निर्णय सर्वेाच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. याबाबत आज सुप्रीम कोर्टात आव्हान देणारी याचिका दाखल करण्यात आली होती. बातमी अपडेट होत आहे. […] The post निर्णय कायम! नगरपरिषद नगरपंचायतींचा निकाल २१ डिसेंबरलाच; आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 5 Dec 2025 12:08 pm

ईडीची आणखी एक मोठी कारवाई ; अनिल अंबानींची कोट्यवधींची मालमत्ता जप्त

ED on Anil Ambani। रिलायन्स अनिल अंबानी समूहाशी संबंधित बँक फसवणूक प्रकरणात, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) १८ हून अधिक मालमत्ता तात्पुरत्या स्वरूपात जप्त केल्या आहेत. ज्यामध्ये मुदत ठेवी, बँक बॅलन्स आणि न उद्धृत केलेल्या गुंतवणुकीतील शेअर्स यांचा समावेश आहे. जप्त केलेल्या मालमत्तेचे एकूण मूल्य अंदाजे १,१२० कोटी रुपये आहे. ही कारवाई रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड (RHFL), […] The post ईडीची आणखी एक मोठी कारवाई ; अनिल अंबानींची कोट्यवधींची मालमत्ता जप्त appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 5 Dec 2025 12:03 pm

इंडिगो विमानसेवेचा खासदार अमोल कोल्हेंनाही फटका; पोस्ट शेअर करत म्हणाले “ही अपेक्षा नव्हती, यापुढे…”

Amol Kolhe : इंडिगो एअरलाईन्सच्या विमानांच्या वेळापत्रकात झालेल्या मोठ्या गोंधळामुळे पुणे विमानतळावर विमानसेवा पूर्णपणे विस्कळित झाली असून, प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. गेल्या दोन दिवसांत पुणे विमानतळावरून इंडिगोची १६ हून अधिक उड्डाणे रद्द झाली आहेत. तर १९ हून अधिक विमानांना प्रचंड विलंब झाला आहे. या गोंधळाचा फटका खासदार डॅा. अमोल कोल्हे यांना देखील […] The post इंडिगो विमानसेवेचा खासदार अमोल कोल्हेंनाही फटका; पोस्ट शेअर करत म्हणाले “ही अपेक्षा नव्हती, यापुढे…” appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 5 Dec 2025 11:33 am

Bank Shares after RBI Policy: आरबीआयच्या निर्णयानंतर बँक व एनबीएफसी शेअर्समध्ये वादळ 'या'कारणामुळे जबरदस्त मायलेज सुरूच

मोहित सोमण: आरबीआयच्या पतधोरण समितीच्या निकालानंतर घसरलेला सेन्सेक्स व निफ्टी मोठ्या प्रमाणात उसळला असून बँक निर्देशांकातही वाढ झाली आहे. सकाळी ११.०४ वाजता सेन्सेक्स ३२८ अंकाने व निफ्टी १०१ अंकाने उसळला असून सेन्सेक्स बँक २१० अंकाने व बँक निफ्टी २७१ अंकाने उसळला आहे. आरबीआयच्या पतधोरण समितीच्या बैठकीत रेपो दरात २५ बेसिस पूर्णांकाने कपात करण्याचा निर्णय घेतल्यानंतर याचा मोठा फायदा शेअर बाजारात होताना दिसत आहे. कपात झाल्यानंतर आता रेपो दर ५.५०% वरून ५.२५% पोहोचल्याने बाजारात तरलता वाढीसह कर्जाचे हप्ते स्वस्त होण्याची आशा गुंतवणूकदारांनी केली. परिणामी बँक निर्देशांकासह विशेषतः मोठ्या बँकेच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात उसळी घेतली गेली.एचडीएफसी बँक (०.९६%), आयसीआयसीआय बँक (०.२६%), एसबीआय (०.९५%), कोटक महिंद्रा बँक (०.३६%), बँक ऑफ बडोदा (०.४०%), पीएनबी (१.३९%), कॅनरा बँक (०.४५%), युनियन बँक ऑफ इंडिया (०.०५%), आयडीबीआय बँक (०.०२%), एयु स्मॉल फायनान्स बँक (१.०७%) शेअर्समध्ये जबरदस्त वाढ झाली. केवळ अँक्सिस बँक (०.७२%), इंडियन ओव्हरसिज बँक (०.३४%) घसरण कायम राहिली.तरलतेविषयी भाष्य करताना इंडियाबाँड.कॉम चे सह संस्थापक विशाल गोयंका म्हणाले आहेत की,'आरबीआय एमपीसी घोषणेवर भाष्य करताना, इंडियाबॉन्ड्स डॉट कॉमचे सह-संस्थापक विशाल गोएंका म्हणाले,'अलीकडील महागाईचे प्रमाण आणि बँकिंग क्षेत्रात कमी व्याजदरांचे प्रसारण न झाल्यामुळे, आरबीआयने रेपो दरात २५ बेसिस पॉइंटने कपात केली आहे. मनोरंजक म्हणजे, महागाईच्या अपेक्षा खूपच कमी झाल्या आहेत, ज्यामुळे आर्थिक वर्षाच्या अखेरीस आवश्यकता भासल्यास पुन्हा दर कपात करण्याचे दार उघडले आहे. सरकार आणि कॉर्पोरेट्ससाठी निधी स्वस्त करणे हा यामागील हेतू आहे आणि १ लाख कोटी रुपयांच्या ओएमओ खरेदीच्या घोषणेमुळे तरलता वाढविण्यास आणि उत्पन्न वक्र सपाट करण्यास मदत होईल. यानंतर, गुंतवणूकदारांनी २-३ वर्षांच्या सेगमेंटमधील कॉर्पोरेट्सकडून सध्याच्या उच्च दरांमध्ये लॉक करण्याचा विचार करावा आणि संभाव्य नफ्यासाठी दीर्घकालीन सरकारी बाँड खरेदी करून याला पूरक ठरावे.'गेल्या तीन दिवसात पतधोरण समितीच्या बैठकीपूर्वी बँकेच्या शेअर्समध्ये बाजारातील नफा बुकिंग सुरू होता. सावधगिरी बाळगल्याने शेअरमधील विक्रीही मोठ्या प्रमाणात थांबली होती. अर्थात परवा सरकारने एफडीआय पीएसयु बँकेत आणण्याचा कुठलाही विचार नसल्याचे स्पष्ट केल्याने बाजारात बँक शेअर्समध्ये मोठा फटका बसला असला तरी एका सत्रात बँकांनी हा तोटा नव्याने उसळत नफ्यात बदलला आहे. केवळ बँक नाही तर विना बँकिंग वित्तीय संस्था (Non Banking Financial Institution NBFCs) शेअर ३% पातळी पर्यंत उसळले आहेत. बजाज फायनान्स (२.८१%), जियो फायनांशियल सर्विसेस (०.२३%), श्रीराम फायनान्स (२.३१%), मुथुट फायनान्स (१.३३%), चोलामंडलम फायनान्स (१.७४%), टाटा कॅपिटल (१.७६%), आदित्य बिर्ला कॅपिटल (२.८१%), एसबीआय कार्ड (२.४४%), सुंदरम फायनान्स (३.८८%), एचडीबी फायनांशियल सर्विसेस (०.५६%), महिंद्रा अँड महिंद्रा फिनसर्व्ह (५.५६%) शेअर्समध्ये वाढ झाली असून केवळ बजाज होल्डिंग्स अँड इन्व्हेसमेंट (०.६२%) मध्ये किरकोळ घसरण झाली.आरबीआयच्या निर्णयानंतर बँकेच्या क्रेडिट ग्रोथ (वाढ) अपेक्षित असल्याने मोठ्या प्रमाणात कर्जाच्या मागणीत वाढ होऊ शकते. अर्थात याचा फायदा ग्राहकांना झाल्यास वैयक्तिक उपभोगात (Personal Consumption) व खर्चाचे बजेट वाढल्यास त्याचा परिणाम व्यापारावर अपेक्षित आहे. याच कारणामुळे शेअर आज मोठ्या प्रमाणात उसळले आहेत.

फीड फीडबर्नर 5 Dec 2025 11:30 am

आताची सर्वात मोठी बातमी: आरबीआयकडून रेपो दरात २५ बेसिसने कपात कर्ज स्वस्त होणार! आरबीआय १ लाख कोटींची सरकारी सिक्युरिटीज खरेदी करणार सगळंच वाचा एका क्लिकवर

मोहित सोमण: ज्या क्षणाची गुंतवणूकदार वाट पाहत होते त्यानुसार अखेर काही वेळापूर्वी आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज मोठी घोषणा केली आहे. संजय मल्होत्रा यांनी आपल्या अभिभाषणात २५ बेसिस पूर्णांकाने दरकपातीची घोषणा केली आहे. त्यामुळे हा रेपो दर ५.५०% वरून ५.२५% घसरला आहे. पतधोरण समितीच्या सदस्यांनी बिनविरोध दरकपातीच्या निर्णयाला पाठिंबा दिला असून इतकेच नाही तर बाजारातील तरलता आणखी सुधारण्यासाठी सरकारने १ लाख कोटींची एमओसी (Market on Close) सिक्युरिटीज खरेदी करण्याची मोठी घोषणा मल्होत्रा यांनी केली आहे. इतकेच नाही तर डॉलर व रूपयांच्या यांच्यातील दैनंदिन संतुलन राखण्यासाठी आरबीआयने ३ वर्षाच्या बाय सेल स्वॅप (Buy Sale Swap) घोषणा केली आहे. तसेच मोठ्या निर्णयानुसार आर्थिक धोरणाचा निर्णय 'तटस्थ' ठेवण्यात आला आहे. इतकेच नाही तर गरजेनुसार तरलतेतील लवचिकता (Flexibility) वाढवण्यासाठी ती वाढवून दुसरीकडे जागतिक व्यापार व देशांतर्गत अंतर्गत तरलतेवर महागाई दृष्टीने नियंत्रण आणण्यासाठी आरबीआय तरलता बाँड माध्यमातून नियंत्रित करणार असल्याचे आरबीआयने स्पष्ट केले आहे.याशिवाय भारतीय अर्थव्यवस्था चांगल्या स्थितीत असून वाढलेल्या निर्यातीसह शेतीत झालेल्या उत्पादनवाढीमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळाल्याचे मल्होत्रा यांनी स्पष्ट केले आहे. याखेरीज महागाईत झालेली घसरण पाहता ते ४% बास्केट अंतर्गत राहिल्याने व्यवस्थेत चांगले संकेत मिळत असले तरी काही आव्हाने कायम असल्याचे मल्होत्रा यांनी स्पष्ट केले आहे. अन्नधान्याच्या किंमतीत घसरण झाल्याने महागाई नियंत्रणात असल्याचे गव्हर्नर संजय मल्होत्रा म्हणाले आहेत. महागाई नियंत्रणात आणताना आरबीआयने जीडीपी वाढही आश्वासक असल्याचे म्हटले. उत्पादन क्षेत्रात वाढ होत असताना सेवा क्षेत्रातील वाढ 'जैस थे' नियंत्रित (Stable) असल्याचे आरबीआयच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.याखेरीज आपल्या कोर (मुख्य) महागाई नियंत्रणात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. आरबीआयला आता आर्थिक वर्ष २६ मध्ये ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) महागाई २.०% राहण्याची अपेक्षा आहे, जी पूर्वीच्या २.६% अंदाजापेक्षा कमी आहे. सध्याचे सीपीआय भाकीत सरकारने ठरविलेल्या २% बास्केट पेक्षा कमी असल्याचे संजय मल्होत्रा म्हणाले आहेत. अन्न, इंधन आणि मुख्य श्रेणींमध्ये किमतीवरील दबाव कमी होत असल्याचे दिसते.आरबीआयने तिमाही चलनवाढीच्या अपेक्षा देखील सामायिक केल्या आहेत. आर्थिक वर्ष २६ साठी सीपीआय महागाई २.६% आर्थिक वर्ष २६ च्या चौथ्या तिमाहीत ४% आणि आर्थिक वर्ष २७ च्या पहिल्या तिमाहीत ४.५% राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. जुलै-सप्टेंबर तिमाहीत उत्पादन वाढ ९.१% वाढली, जी गेल्या वर्षीच्या २.२% जास्त होती, ती सुधारित दृष्टिकोनाच्या प्रमुख चालकांपैकी एक आहे असे गव्हर्नर संजय मल्होत्रा म्हणालेकेंद्रीय बँकेने चलनवाढीचे धोके 'समान संतुलित राहतील' यावर प्रकाश टाकला परंतु भविष्यातील हालचालींना आकार देण्यात जागतिक अनिश्चितता, वस्तूंच्या किमती आणि अस्थिर चलनांची भूमिका मान्य करत आव्हाने कायम असल्याचे स्पष्ट केले.संजय मल्होत्रा तिमाही जीडपी वाढीचे अंदाज देखील मांडले. आर्थिक वर्ष २५ च्या तिसऱ्या तिमाहीत वाढ ७%, त्यानंतर चौथ्या तिमाहीत ६.५% राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. पुढील आर्थिक वर्षात, पहिल्या तिमाहीत रिअल जीडीपी वाढ ६.७% टक्के आणि दुसऱ्या तिमाहीत ६.८% राहण्याचा अंदाज आहे, जो स्थिर आणि व्यापक विस्तार दर्शवितो.यापूर्वी मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंत नागेश्वरन यांनी अलीकडेच सांगितले की आर्थिक वर्ष २६ मध्ये जीडीपी वाढ ७% जास्त असू शकते, ज्यामुळे वर्षभरात अर्थव्यवस्था ४ ट्रिलियन डॉलर्सच्या पुढे जाऊ शकते.आर्थिक सर्वेक्षणात यापूर्वी आर्थिक वर्ष २६ साठी ६.३-६.८% श्रेणीत वाढ होण्याचा अंदाज होता. ज्यामुळे पहिल्या सहामाहीतील चांगल्या कामगिरीमुळे अपेक्षा वाढल्या आहेत.इतर महत्वाचे मुद्देआरबीआयने आर्थिक वर्ष २०२६ च्या सीपीआय महागाईच्या अंदाजात सुधारणा केली आहे आणि तो आधीच्या २.६% वरून २% पर्यंत कमी केला आहे.आर्थिक वर्ष २०२६ च्या तिसऱ्या तिमाहीत सीपीआय महागाईचा अंदाज १.८% वरून ०.६% वर आहे.आर्थिक वर्ष २०२६ च्या चौथ्या तिमाहीत सीपीआय महागाईचा अंदाज ४% वरून २.९% वर आहे.आर्थिक वर्ष २०२७ च्या पहिल्या तिमाहीत सीपीआय महागाईचा अंदाज ४.५% वरून ३.९% वर आहे. आर्थिक वर्ष २०२७ च्या दुसऱ्या तिमाहीत सीपीआय महागाईचा अंदाजआरबीआयने आर्थिक वर्ष २०२६ च्या जीडीपी वाढीचा अंदाज ७.३% वर सुधारित केला आहे जो आधीच्या ६.८% होता.तिसऱ्या तिमाहीत आर्थिक वर्ष २०२६ च्या जीडीपी वाढीचा अंदाज ७% वर आहे जो आधीच्या ६.४% होता.चौथ्या तिमाहीत आर्थिक वर्ष २०२६ च्या जीडीपी वाढीचा अंदाज ६.५% वर आहे जो आधीच्या ६.२% होता.आर्थिक वर्ष २०२७ च्या पहिल्या तिमाहीत जीडीपी वाढीचा अंदाज ६.७% आहे जो पूर्वीचा ६.४% होता. दुसऱ्या तिमाहीत २०२७ च्या दुसऱ्या तिमाहीत जीडीपी वाढीचा अंदाज ६.८% आहे.अभिभाषणातील इतर महत्वाचे मुद्देMSF - (Marginal Standing Facility) एमसीएफ ५.५% समायोजित (Adjusted) राहणारतटस्थ भूमिका कायमतरलता वाढवणारदुसऱ्या तिमाहीत मुख्य (Core) महागाई स्थिरमहागाई दबाव कमी व नियंत्रणातअर्थव्यवस्थेतील वाढ तेजीतअर्थव्यवस्था दुसऱ्या तिमाहीत ६ महिन्यांच्या उच्चांकी घसरणीवरजीवीए (Gross Value Added GVA) ८.१% (औद्योगिक क्षेत्रातील वाढीमुळे)जीएसटी दरकपात व जीएसटी तर्कसंगतीकरणानंतर अर्थव्यवस्थेला फायदामर्चेंडाइज एक्सपोर्ट (निर्यातीत) आंतरराष्ट्रीय कारणांमुळे घसरणशेतीतील खरीप व रबी हंगामातील पीक उत्पादनात वाढ व अपेक्षित वाढउत्पादनात (Manufacturing) क्षेत्रात सुधारणासेवा क्षेत्र - नियंत्रित वाढ सुरू (Stable Growth)

फीड फीडबर्नर 5 Dec 2025 11:10 am

Dia Mirza: भारतातील प्रदूषणावर दीया मिर्झाचा गंभीर इशारा : ‘जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरे भारतात’

Dia Mirza: ऑल लिव्हिंग थिंग्स एन्व्हायर्नमेंटल फिल्म फेस्टिव्हलमध्ये अभिनेत्री आणि पर्यावरणप्रेमी दीया मिर्झा तसेच दिग्दर्शिका जोया अख्तर यांनी हजेरी लावली. पर्यावरण संरक्षण, हवामान बदल आणि सामाजिक न्याय यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर दोघांनीही स्पष्टपणे आपली मते व्यक्त केली. ‘कथाकथन हे पर्यावरण जागरूकतेचे प्रभावी माध्यम’ – दीया मिर्झा दीया मिर्झा म्हणाल्या की, हा फेस्टिव्हल केवळ वन्यजीवांवरील माहितीपटच सादर […] The post Dia Mirza: भारतातील प्रदूषणावर दीया मिर्झाचा गंभीर इशारा : ‘जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरे भारतात’ appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 5 Dec 2025 11:06 am

अख्या बच्चन कुटुंबाला बाॅयकाॅट करणार! जया बच्चन यांच्या वक्तव्यावर पापाराझी प्रचंड संतापले; असं नेमकं घडलं तरी काय?

Jaya Bachchan : गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री जया बच्चन त्यांच्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंमुळे सतत चर्चेत असतात. सिनेइंडस्ट्रीतील कलाकारांना कव्हरेज देण्याचे काम पापाराझी करत असतात. काही कलाकारांना ते आवडत तर काहींना आवडत नाही, परिणामी ते पॅपराझींवर चिडतात. ज्येष्ठ अभिनेते धर्मेंंद्र यांच्या निधनानंतर पापाराझींवर अभिनेता सनी देओल प्रचंड चिडला होता. त्याला कारणही तसेच होते. पण […] The post अख्या बच्चन कुटुंबाला बाॅयकाॅट करणार! जया बच्चन यांच्या वक्तव्यावर पापाराझी प्रचंड संतापले; असं नेमकं घडलं तरी काय? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 5 Dec 2025 11:03 am

RBI कडून कर्जदारांना मोठा दिलासा ! रेपो दरात 0.25 टक्क्यांची कपात ; कर्जाच्या EMI चा भार कमी होणार

RBI Repo Rate । रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या चलनविषयक धोरण समितीने (MPC) रेपो दर ० .२५ टक्क्यांची कमी करून ५.२५% पर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. गव्हर्नर संजय मल्होत्रा ​​यांनी ही घोषणा केली. या घोषणेसह, रेपो दर आता ५.५% वरून ५.२५% पर्यंत कमी झाला आहे. रेपो दरातील कपातीमुळे कर्जे स्वस्त होतील, ज्यामुळे EMI […] The post RBI कडून कर्जदारांना मोठा दिलासा ! रेपो दरात 0.25 टक्क्यांची कपात ; कर्जाच्या EMI चा भार कमी होणार appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 5 Dec 2025 10:53 am

Stock Market Update: पतधोरण समितीच्या निर्णयापूर्वी शेअर बाजारात सावधगिरीची घसरण बँक निर्देशांकात विशेष लक्ष सेन्सेक्स २४ व निफ्टी २ अंकाने घसरला

मोहित सोमण: थोड्याच वेळात आरबीआयच्या रेपो दराबाबत आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा वित्तीय पतधोरण समितीची निकाल जाहीर करतील. तीन दिवसीय बैठकीची इतिश्री आज झाल्याने अखेर रेपो दरात २५ बेसिस पूर्णांकाने कपात होईल का व्याजदर स्थिर राहील याची प्रचिती सकाळी १० वाजता येईलच तत्पूर्वी सावधगिरीचा पवित्रा बाळगल्याने इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सकाळच्या सत्रात उघडल्यावरच बाजारात सावधगिरीचे संकेत मिळाले आहेत. सेन्सेक्स २४ अंकाने व निफ्टी २ अंकाने घसरला आहे. सकाळी विशेषतः गुंतवणूकदारांचे लक्ष बँक निर्देशांकात केंद्रित झालेले असून सुरूवातीच्या कलात सेन्सेक्स बँक मात्र २२.४५ अंकाने व २२.२५ अंकाने उसळला आहे. आज रेपो व्याजदरात कपात सर्वसामान्यांसाठी कर्जाचे व्याजदर स्वस्त होऊ शकतात. बहुतांश तज्ञांच्या मते बाजारात रेपो व्याजदर स्थिर राहू शकतात कारण रेपो दरपूर्व दुसऱ्या तिमाहीतील अनपेक्षितपणे वाढलेली ८.२% जीडीपी वाढ व दुसरीकडे महागाईत झालेली लक्षणीय घसरण पाहता व २२ सप्टेंबरपासूश लागू झालेली जीएसटी कपात पाहता बाजारात तरलता कायम असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे महागाई ४% पातळी खाली असल्याने हे दर कायम राहू शकतात. तज्ञांच्या मते आरबीआय अधिक लक्ष घसरणाऱ्या रूपयांकडे देऊन जीडीपी वाढीबरोबर महागाई नियंत्रण व अर्थव्यवस्था अधिक लवचिक होण्यासाठी प्रयत्न करेल. खरं तर मागील वित्तीय पतधोरण समितीच्या बैठकीदरम्यान मल्होत्रा यांनी आगामी सत्रात दरकपातीला 'वाव' असल्याचे संकेत दिले होते. काही तज्ञांच्या मते ही दरकपात होणार असून २५ बेसिसने कमी करून ५.५०% वरून ५.२५% वर रेपो दर येऊ शकतो.फेब्रुवारी महिन्यपासून तीन बैठकीतील १०० बीपीएसने कपात आरबीआयने केली आहे. मात्र गेल्या पतधोरण बैठकीत आरबीआयने व्याजदर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला होता. जेव्हा धोरणाची भूमिका 'तटस्थ' ठेवण्यात आली होती.शेअर बाजारात गेल्या तीन दिवसात मोठ्या प्रमाणात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक काढून घेतली. वित्तीय तूटीतही भर पडल्याने रूपयांच्या स्थिरीकरणाला फटका बसल्याने रूपयाने ९० रूपये प्रति डॉलर पातळी गाठली होती. आज रेपो दरात कपातीकडे गुंतवणूकदारांचे लक्ष असणार असून याशिवाय आयटी, टेलिकॉम, फार्मा, मेटल, रिअल्टी या क्षेत्रातील निर्देशांकांनाही महत्व प्राप्त होऊ शकते.ऑक्टोबरच्या धोरणात, एमपीसीने रेपो दर ५.५०% वर अपरिवर्तित ठेवला आणि धोरणात्मक भूमिका 'तटस्थ' ठेवली. आरबीआयने आर्थिक वर्ष २०२६ च्या जीडीपी वाढीचा अंदाज पूर्वीच्या ६.५% वरून ६.८% पर्यंत वाढवला आणि आर्थिक वर्ष २०२६ च्या सीपीआय चलनवाढीचा अंदाज पूर्वीच्या ३.१% वरून २.६% पर्यंत कमी केला.सकाळच्या सत्रातील सुरुवातीला सर्वाधिक वाढ एससीआय (२.६७%), दीपक नायट्रेट (२.३६%), झेन टेक्नॉलॉजी (२.१५%), हिमाद्री स्पेशल (२.०४%) समभागात झाली असून सर्वाधिक घसरण कँमस सर्विसेस (८०.४४%), काईन्स टेक (६.६२%), सफायर फूडस (३.६५%), इंडिया सिमेंट (३.३४%) समभागात झाली आहे.

फीड फीडबर्नर 5 Dec 2025 10:30 am

“…तर तुम्हाला अन्न आणि पाणी मिळणार नाही” ; मध्यप्रदेशच्या मंत्र्यांच्या विधानाने गोंधळ

Govind Rajput। मध्य प्रदेशचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री गोविंद सिंह राजपूत यांच्या एका विधानामुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. सागर जिल्ह्यातील एका कार्यक्रमात त्यांनी केलेल्या एका विधानाचा व्हिडिओ सध्या वेगाने व्हायरल होत आहेत. व्हिडिओमध्ये, मंत्री गावकऱ्यांना उद्देशून म्हणतात की,” मतदार यादी सध्या तयार केली जात आहे. प्रत्येकाने त्यांची नावे जोडली […] The post “…तर तुम्हाला अन्न आणि पाणी मिळणार नाही” ; मध्यप्रदेशच्या मंत्र्यांच्या विधानाने गोंधळ appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 5 Dec 2025 10:29 am

'शक्ती'नंतर राणीबागेत 'रूद्र'वाघाचा मृत्यू! प्रशासनाच्या कारभारावर अनेक प्रश्न

मुंबई: मुंबईच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणीसंग्रहालयातून आणखी एका वाघाच्या बाबतीत धक्कादायक घटना समोर आली आहे. शक्ती नावाच्या वाघाच्या संशयास्पद मृत्यूनंतर आता रुद्र नावाचा आणखी एक वाघ बेपत्ता झाल्याचा दावा करण्यात आला होता. भाजपाचे दक्षिण मुंबई सरचिटणीस नितीन बनकर यांनी हा दावा केला आहे. यामुळे वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणीसंग्रहालयाच्या प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या दोन्ही प्रकरणांवरून प्रश्न पडतो तो, प्रशासन या गोष्टी स्वत:हून जाहीर का करत नाही. दरम्यान राणीच्या बागेत एकूण शक्ती, जय, करिश्मा आणि रुद्र असे चार वाघ होते. त्यापैकी शक्ती आणि रुद्र वाघाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता प्राणीसंग्रहालयात 'जय' (वय ३ वर्षे) आणि 'करिश्मा' (वय ११ वर्षे ६ महिने) हे दोन वाघ असल्याचे नमूद केले आहे.राणीबागेतील शक्ती वाघाचा १७ नोव्हेंबरला मृत्यू झाला होता. परंतु, प्रशासनाने ही माहिती २६ नोव्हेंबरला समोर आणली. तब्बल आठ दिवसांनंतर ही माहिती समोर आल्यामुळे उद्यान प्रशासनावर संशय व्यक्त करण्यात येत होता. न्यूमोनिया बाधा झाल्यामुळे श्वसन प्रणाली सुरळीत नसल्याने शक्ती वाघाचा मृत्यू झाल्याचा दावा प्रशासनाने केला होता. याचप्रकरणी अधिक माहिती मिळवण्याकरिता आणि बागेतील रुद्र वाघ बेपत्ता झाल्यामुळे चौकशी करणारे पत्र भाजपाचे दक्षिण मुंबई सरचिटणीस नितीन बनकर यांनी उद्यान संचालकांना लिहिले होते. यानंतर पत्रातील प्रश्नांबाबत खुलासा करताना रुद्र वाघाचा मृत्यू २९ ऑक्टोबरला झाल्याची माहिती उघडकीस आली. रुद्र हा मृत शक्ती वाघ आणि करिष्मा वाघिणी यांचा बछडा असल्याचेही या पत्रातून उघडकीस आले आहे.https://prahaar.in/2025/12/05/reelstar-couple-turns-out-to-be-innkeepers-iphone-17-pro-max-six-and-a-half-tolas-of-gold-jewelry-and-lakhs-of-rupees/रुद्र बछड्याच्या आरोग्याबाबत प्रशासनाने सांगितले की, त्याला आईचे दूध कमी मिळाल्यामुळे त्याच्या संगोपनासाठी पशुवैद्यकीय अधिकारी व त्यांच्या पथकाने लहानपणापासूनच मेहनत घेतलेली आहे. परंतु योग्य त्या काळात आईचे दूध न मिळाल्यामुळे त्याची प्रतिकार शक्ती ही कमजोराच होती. यामुळे तो आकाराने, वजनाने व आरोग्याच्या दृष्टीने जय वाघापेक्षा कमजोर होता. तसेच त्याला अनेकदा ट्रिपॅनोसोमा संसर्गाची लागण अनेकदा झाली होती. ज्याचा परिणाम त्याच्या दृष्टीवर झाल्याने त्याने दृष्टी गमावली होती. त्यात त्याला २१ ऑक्टोबरपासून श्वास घेण्यासाठी खूप त्रास होऊ लागल्यामुळे नेब्युलायझेशन नियमित देण्यात येत होते. मात्र २९ ऑक्टोबरला रात्री त्याने प्राण सोडला.

फीड फीडबर्नर 5 Dec 2025 10:10 am

राज्याचे हिवाळी अधिवेशन ते अमृताच्या रंगभूमी पदार्पणापर्यंतच्या टॉप १० बातम्या एका क्लिकवर

८ डिसेंबरपासून राज्याचे हिवाळी अधिवेशन महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. ८ डिसेंबर ते १४ डिसेंबर या कालावधीत नागपूरमध्ये हे अधिवशेन होणार आहे. महत्वाचे म्हणजे शनिवार आणि रविवार या शासकीय सुट्टीच्या दिवशी देखील दोन्ही सभागृहाचे कामकाज होणार आहे. हा निर्णय विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेतला. हिवाळी अधिवेशनासाठी नागपुरातील मुख्यमंत्री निवासस्थानापासून विधिमंडळ […] The post राज्याचे हिवाळी अधिवेशन ते अमृताच्या रंगभूमी पदार्पणापर्यंतच्या टॉप १० बातम्या एका क्लिकवर appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 5 Dec 2025 9:47 am

रीलस्टार जोडपं निघाले सराईत चोर! आयफोन 17 प्रो मॅक्स, साडे सहा तोळे सोन्याचे दागिने आणि लाखो रुपये...

अहिल्यानगर: जिल्हा पोलिस दलाने बसमधून महिलांच्या पर्स चोरी करणाऱ्या एका सराईत जोडप्याला जेरबंद केले आहे. या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे, चोरीच्या गुन्ह्यात पकडलेली आरोपी कोमल काळे ही तब्बल ५० हजारांहून अधिक फॉलोअर्स असलेली रीलस्टार आहे. सोशल मीडियावर रील्स करून नेटकऱ्यांचे मन आकर्षित करणारी रीलस्टार कोमल काळे प्रत्यक्षात बसने प्रवास करणाऱ्या महिलांचे दागिने आणि पर्स चोरणारी चोरटी निघाली आहे. या कारनाम्यांमध्ये तिचा प्रियकर सुद्धा तिला साथ देत होता.पाथर्डी–कल्याण एस.टी.ने प्रवासात अलका पालवे यांच्या पर्सवर कोमलने हात साफ केल्याची तक्रार १९ नोव्हेंबर रोजी दाखल झाली होती. या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या पथकाने कोमल काळे हिला पाथर्डी बसस्टँड परिसरातून ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान तिने आपला प्रियकर सुजित चौधरी याच्याकडे चोरीचा माल दिल्याचे कबुल केल्यावर पोलिसांनी तातडीने शेवगाव येथून सुजितला अटक केली.https://prahaar.in/2025/12/05/what-will-change-if-the-health-security-and-national-security-cess-2025-bill-is-passed-know-in-detail/कोमल काळे आणि तिचा प्रियकर चोरी केलेल्या वस्तू विकून महागड्या वस्तू खरेदी करत होती. महागडे कपडे, मोबाईल, रिल बनवण्यासाठी कॅमेरे अशा अनेक वस्तूंची तिने चोरीच्या पैशातून खरेदी केल्याचे पोलीस तपासात समोर आले. ज्या महिलेने चोरीची तक्रार दाखल केली होती त्या महिलेच्या पर्समधून चोरलेले पैसे आणि दागिन्यांमधून कोमलने आयफोन 17 प्रो मॅक्स व ओप्पो कंपनीचा एक १५ हजाराचा मोबाईल खरेदी केल्याचे उघड झाले. तर पोलिसांनी त्यांच्याकडून साडे सहा तोळे सोन्याचे दागिने, मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण ९ लाख ३५ हजार २३० किंमतीचा माल जप्त केला.इंस्टाग्राम आयडी komal_kale_1_ वर ५० हजारांहून अधिक फॉलोवर्स, रिल्स शूट करणारी इंस्टा मॉडेल अशी स्वतःची ओळख सांगून कोमल बसप्रवासात महिलांचा विश्वास संपादन करत असे, अशी माहिती पोलिसांनी दिली. तिच्यावर पूर्वी बीड व अहिल्यानगरमध्ये ३ गुन्हे दाखल आहेत. तर सुजितवर दरोडा, जबरी चोरी, घरफोडी अशा ८ गुन्ह्यांची नोंद असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी कोमल आणि तिचा प्रियकरावर पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३ (२)अंतर्गत गुन्हा दाखल केला असून या दोघांनी अजून किती ठिकाणी चोरी केल्या आहेत याचा तपास सुरू आहे.

फीड फीडबर्नर 5 Dec 2025 9:30 am

महापालिकांच्या निवडणुकीची तारीख ठरली? शिंदेंच्या मंत्र्यांने स्पष्टचं सांगितलं म्हणाले…

Pratap Sarnaik : २ डिसेंबर रोजी राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. आता उर्वरित २४ नगरपरिषदांसाठी २० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यानंतर २१ डिसेंबर या दिवशी निवडणुकांचा निकाल एकत्रितपणे जाहीर करण्यात येणार आहे. मात्र, या निर्णयावर आक्षेप घेण्यात आला आहे. २१ डिसेंबरपूर्वीच निकाल जाहीर करण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका सर्वेाच्च न्यायालयात दाखल […] The post महापालिकांच्या निवडणुकीची तारीख ठरली? शिंदेंच्या मंत्र्यांने स्पष्टचं सांगितलं म्हणाले… appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 5 Dec 2025 9:19 am

एन्काउंटर-3: कालियाच्या इशाऱ्यावर पहिल्यांदा लखनऊमध्ये चालली AK-47:माजी मंत्र्याला घरात घुसून मारले; रमेश यादव कसा बनला 'लखनऊचा बाप'

90 चे दशक होते. लखनऊमधील बाघामऊ गाव (चिनहटजवळ) दारूगोळ्यासारखे पेटले होते. वर्चस्वाच्या लढाईत गाव दोन भागांमध्ये विभागले गेले होते. एका बाजूला अयोध्या प्रसाद यादव होते आणि दुसऱ्या बाजूला रघुनाथ यादव. एका संध्याकाळी, अयोध्या प्रसाद घरी परतत होते. तेव्हा शेतात लपलेले काही लोक बाहेर आले. धांय… धांय… धांय… संपूर्ण गाव स्तब्ध झाले. अयोध्या प्रसाद यांचा जागीच मृत्यू झाला. काही दिवसांनी रघुनाथ यादव यांच्यावर गोळीबार झाला. रघुनाथ यांना गोळी लागली, पण ते वाचले. पोलिसांनी दोन जणांना आरोपी केले. यापैकी एक होता - रमेश यादव. नात्यात अयोध्या प्रसाद त्याचे आजोबा होते. हीच ती वेळ होती, जेव्हा पोलीस दप्तरात या नावाची पहिली नोंद झाली. येणाऱ्या काळात हा माणूस दहशतीचे दुसरे नाव बनला. आज ‘एन्काउंटर’च्या तिसऱ्या भागात कुख्यात गँगस्टर रमेश यादव उर्फ रमेश कालियाची कहाणी. एक असा गुन्हेगार ज्याचे जीवन आणि मृत्यू कोणत्याही फिल्मी कथेपेक्षा कमी नव्हते आणि जो स्वतःला ‘लखनऊचा बाप’ म्हणत असे… प्रकरण 1: पहिल्यांदा लखनऊमध्ये घुमली AK-47 रघुनाथ यादव प्रकरणात रमेशला तुरुंगवास झाला. येथे त्याची भेट गँगस्टर सूरजपाल यादवशी झाली. एक दिवस सूरजपालने विचारले- काय रे, तू कोणत्या प्रकरणात आत आला आहेस? रमेशने न डगमगता सांगितले- रघुनाथ यादववर गोळी झाडली होती. हे नाव ऐकताच सूरजपाल चमकून म्हणाला- रघुनाथ... तो तर माझाही शत्रू आहे. मग काय, सामायिक द्वेषाने त्यांना मित्र बनवले. दोघे एकत्र बसत, गप्पा मारत. कधी सूडाच्या, कधी कटाच्या. प्रत्येक रात्री, जेव्हा तुरुंगाच्या कॉरिडॉरमध्ये शांतता असे, तेव्हा दोघांच्या हळू आवाजात कट रचले जात. एक संध्याकाळी, सूरजपाल हळूच म्हणाला- एक माणूस आहे, श्रीप्रकाश शुक्ला रमेश- हा कोण आहे? सूरजपाल- पोलिसांना अंगठा दाखवून फिरतो. त्याला भेटलास तर तुला समजेल की खेळ कसा खेळला जातो. त्या रात्री दोघांनी ठरवले की बाहेर येताच श्रीप्रकाशला भेटायचे. श्रीप्रकाश त्या दिवसांत पूर्व यूपी आणि त्याला लागून असलेल्या बिहारच्या जिल्ह्यांमध्ये एक कुख्यात गुन्हेगार बनला होता. काही महिन्यांनंतर दोघे जामिनावर बाहेर आले तेव्हा श्रीप्रकाशला भेटले. श्रीप्रकाश, रमेशकडे पाहून हसला- ऐकले आहे, तू अगदी सरळ गोळी चालवतोस. रमेशने उत्तर दिले- चुकीच्या माणसावर कधीच तिरकी चालत नाही. श्रीप्रकाश हसला- चांगली गोष्ट आहे. इथूनच रमेश यादवच्या आयुष्याने नवे वळण घेतले. श्रीप्रकाश शुक्लाने सूरजपाल आणि रमेश यादवसोबत करार केला. लक्ष्य होते रघुनाथ यादवचा भाऊ, शंभू यादव. काही दिवसांनी, लखनऊमधील मल्हौर रोड. दुपारची वेळ होती, रस्त्यावर बरीच वर्दळ होती. पशुसंवर्धन विभागाच्या कार्यालयाबाहेर उभे असलेले शंभू यादव तंबाखू चोळत होते. कदाचित काही कामासाठी आले असावेत. तेव्हाच दूरून एक मोटारसायकल येताना दिसली. दोन लोक स्वार होते. मागे बसलेला माणूस श्रीप्रकाश शुक्ला होता, त्याने कपड्यात गुंडाळलेली कोणतीतरी वस्तू पकडली होती. बाईक कार्यालयाजवळ येऊन थांबली. श्रीप्रकाशने हळूच कापड बाजूला केले. हातात AK-47 होती, पुढच्याच क्षणी गोळ्यांचा वर्षाव झाला. शंभू यादव यांचे शरीर छिन्नविछिन्न झाले. पहिल्यांदाच लखनऊच्या रस्त्यांवर AK-47 चा आवाज घुमला होता. हात जरी श्रीप्रकाशचे असले तरी, बंदुकीची नळी ओरडून ओरडून रमेश यादवचे नाव घेत होती. पोलिसांनी जेव्हा गुन्हा दाखल केला, तेव्हा रेकॉर्डमध्ये नाव आले - ‘रमेश यादव उर्फ रमेश कालिया.’ हे उपनाव ‘कालिया’ पोलिसांची देणगी होती. याचे कारण रमेशचा गडद काळा रंग होता. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर रमेश कालिया, सूरजपालसोबत मिळून पोलिसांना उघड आव्हान देत होता. रायबरेली, बाराबंकी, सुलतानपूरसह लखनऊच्या आसपासच्या इतर जिल्ह्यांमध्ये त्याने अनेक गुन्हे केले. हळूहळू रमेश कालिया भीतीचे दुसरे नाव बनला होता. प्रसंग 2: “काकाजी, नमस्कार…” आणि मग गोळीबार झाला सन 1995, उत्तर प्रदेशच्या राजकीय वर्तुळात बरीच उलथापालथ सुरू होती. गेस्ट हाऊस प्रकरणानंतर समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाची युती तुटली होती. मुख्यमंत्र्यांची खुर्ची रिकामी होती. राज्यपाल मोतीलाल वोरा यांनी राज्याची सूत्रे हाती घेतली होती. या राजकीय घडामोडींदरम्यान आलेल्या एका बातमीने संपूर्ण देशाला हादरवून सोडले. 29 ऑक्टोबर, लखनऊमधील जियामऊ परिसर सकाळची हलकी थंडी होती. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री लक्ष्मी शंकर यादव घराच्या बाहेरील खोलीत बसून वर्तमानपत्र वाचत होते. तेव्हाच बाहेर गेटवर एक गाडी येऊन थांबली आणि चार लोक उतरले. “काकाजी, नमस्कार…” आवाज ओळखीचा होता. लक्ष्मी शंकर हसले- “अरे अंगद... या-या, आत या.” चारही लोक खोलीत दाखल झाले. अंगद यादव, रमेश कालिया, सूरजपाल आणि त्याचा भाऊ चंद्रपाल. अंगद यादव नुकत्याच पडलेल्या सपा-बसपा सरकारमध्ये मंत्री होते. लक्ष्मी शंकर इतरांना ओळखत नव्हते, पण अंगदसोबत सर्वजण आत आले. थोड्या वेळ इकडे-तिकडेच्या गप्पा झाल्या. अचानक रमेश उभा राहिला. हळूच जॅकेटच्या आत हात घालून पिस्तूल बाहेर काढले. लक्ष्मी शंकर काही समजण्यापूर्वीच ठां… ठां… ठां… संपूर्ण घर गोळ्यांच्या आवाजाने दणाणून गेले. खोलीच्या पांढऱ्या भिंतींवर रक्ताचे लाल शिंतोडे होते. लक्ष्मी शंकर यादव सोफ्यावरच कोसळले. खरं तर, अंगद यादव त्याच गल्लीत आपले घर बांधत होता, जिथे लक्ष्मी शंकर राहत होते. तो रस्त्याचा काही भाग बळकावू इच्छित होता. लक्ष्मी शंकर यांनी याचा विरोध केला होता. दोघांमध्ये बाचाबाचीही झाली होती, पण कोणीही विचार केला नव्हता की प्रकरण इथपर्यंत पोहोचेल. त्यावेळी लक्ष्मी शंकर यादव केवळ यूपीमध्येच नव्हे तर देशाच्या राजकारणात एक मोठे नाव होते. ते स्वातंत्र्य संग्राम सेनानी, संविधान सभेचे सदस्य आणि प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष होते. या हाय प्रोफाइल हत्येमुळे लखनऊपासून दिल्लीपर्यंत खळबळ उडाली होती. काही मिनिटांतच जियामऊच्या गल्ल्या 'खाकी' आणि 'खादी' परिधान केलेल्या लोकांनी भरून गेल्या. राज्यपाल मोतीलाल व्होरा यांनी डीआयजी (लखनऊ रेंज) कश्मीरा सिंग आणि एसएसपी गुरबचन लाई यांची बदली केली. त्यांच्या जागी एस.के. मिश्रा यांना डीआयजी आणि सूर्य कुमार शुक्ला यांना एसएसपी बनवण्यात आले. राजभवनातून एकच आदेश देण्यात आला - “लक्ष्मी शंकर यादवच्या मारेकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत पकडा.” पोलिसांनी लखनऊपासून बाराबंकी, रायबरेली, उन्नावपर्यंत छापे टाकले. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या भिंतीवर एकच पोस्टर चिकटवले होते - 'वॉन्टेड: रमेश कालिया' दोन दिवसांनंतर, 31 ऑक्टोबर बाराबंकी पोलीस लाईनमध्ये बैठक सुरू होती. तेव्हा दरवाजा उघडला. एक माणूस आत आला. चेहरा धुळीने माखलेला, मळके कपडे, दोन्ही हात हवेत वर उचललेले, तो म्हणाला - “मी रमेश कालिया आहे!” काही सेकंदांसाठी हॉलमध्ये शांतता पसरली. एवढा उद्दाम गुन्हेगार इतक्या सहजपणे आत्मसमर्पण करत होता? खरं तर, हे आत्मसमर्पण नव्हते तर कालियाचा माइंड गेम होता. स्वतःला वाचवण्याची सर्वात धूर्त चाल. कथा 3: बाबाचा सूड पूर्ण झाला 1998 च्या मे महिन्यात सूरजपाल आणि सप्टेंबरमध्ये श्रीप्रकाश शुक्ला यांच्या एन्काऊंटरनंतर रमेश कालियाचा दबदबा वाढू लागला. तुरुंगात येण्या-जाण्याची मालिका सुरू होती, पण दहशतीचे युगही सुरूच राहिले. प्रत्येक मोठ्या घटनेनंतर कालिया आपल्या साथीदारांमध्ये हसत हसत एकच प्रश्न विचारायचा- “लखनऊचा बाप कोण…?” आणि उत्तर एका प्रतिध्वनीसारखे हवेत पसरून जायचे- “रमेश कालिया… रमेश कालिया…” गुन्हेगारीच्या जगात सर्वोच्च स्थानी पोहोचूनही रमेश कालिया आपल्या बाबाच्या हत्येचा सूड घेऊ शकला नव्हता. दोन्ही बाजूंनी अनेक लोकांची हत्या झाली होती. रघुनाथ यादववरही अनेकदा हल्ला झाला, पण प्रत्येक वेळी ते वाचले. 28 ऑक्टोबर, 2002 रघुनाथ यादव बीडीसी सदस्य (क्षेत्र पंचायत सदस्य) बनले होते. एका संध्याकाळी ते आपल्या ॲम्बेसेडर कारमधून बाराबंकीहून लखनऊला येत होते. कालियाला बातमी मिळाली. त्याचे साथीदार टाटा सुमोमधून निघाले आणि तो स्वतः आपल्या आवडत्या यामाहा मोटरसायकलवरून निघाला. बाराबंकी रोडवरील सफेदाबाद रेल्वे क्रॉसिंग पार करून कालिया आणि त्याचे साथीदार दबा धरून बसले. पांढरी ॲम्बेसेडर दिसताच कालियाच्या डोळ्यात जुना द्वेष उतरला. कारमध्ये बसलेल्या रघुनाथ यादव यांनी या सगळ्यांना पाहिले आणि गाडी वेगाने चालवायला सांगितले. पण त्या दिवशी रघुनाथ यादव यांच्या नशिबाने साथ दिली नाही. पुढे क्रॉसिंग बंद होते. मागे गाडीत कालियाचे गुंड होते. धडाधड गोळीबार सुरू झाला आणि काही सेकंदात सर्व संपले. रघुनाथ यादव आणि त्यांच्यासोबत बसलेले दोन लोक तिथेच ठार झाले. या तिहेरी हत्याकांडामुळे लखनऊ-बाराबंकी पट्ट्यात कालियाची दहशत आणखी वाढली. प्रकरण 4: निवडणूक, पाठलाग आणि मृत्यूची सावली साल 2003, विधान परिषद निवडणुकीने लखनऊमधील वातावरण अस्वस्थ केले होते. रमेश कालियाही राजकारणात येण्याचा प्रयत्न करत होता. त्याची पत्नी रीता यादव लखनऊ-उन्नाव मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात होती. तर, दुसरीकडे विद्यमान MLC आणि माफियातून नेते बनलेले अजित सिंह होते. जमीन, वर्चस्व आणि प्रतिष्ठेची लढाई शिगेला पोहोचली होती. कोणत्याही क्षणी परिस्थिती बदलू शकली असती आणि कथा रक्तरंजित वळण घेऊ शकली असती. घडलेही तसेच, एके संध्याकाळी अजित सिंह उन्नावहून लखनऊला परत येत होते. तिकडे रमेश कालियाही उन्नावमध्ये निवडणूक प्रचार करून आपल्या लोकांसोबत लखनऊला येत होता. सोहरामऊजवळ त्याची नजर अजित सिंहच्या गाडीवर पडली. त्याने अजित सिंहचा पाठलाग करायला सुरुवात केली. त्यावेळी अजित एकटे होते, गनरही नव्हता. ते पूर्ण वेगाने गाडी चालवत होते. गाड्यांमधील अंतर कमी झाले की त्यांची धाकधूक वाढत असे. बराच लांबपर्यंत उंदीर-मांजराची ही शर्यत सुरू राहिली. शेवटी, अजित सिंहने कालियाला चकमा देऊन लखनऊ-उन्नाव सीमेवरील सई नदीजवळच्या एका पेट्रोल पंपावर आश्रय घेतला. तिथूनच त्याने आपल्या साथीदारांना फोन केला - “कालिया आणि त्याचे माणसे माझ्या मागे आहेत. लवकर पोहोचा.” रमेश कालिया आणि त्याचे गुंड आजूबाजूचा परिसर शोधत राहिले, पण अजित त्यांच्या हाती लागला नाही. थोड्या वेळाने त्याचे समर्थक तिथे पोहोचले आणि कसेतरी अजित सिंहचा जीव वाचला. या घटनेने दोघांमधील शत्रुत्वाची आग आणखी भडकवली. त्याचबरोबर, निवडणुकीत अजित सिंहच्या विजयाने आगीत तेल ओतण्याचे काम केले. ४ सप्टेंबर, २००४ अजित सिंह उन्नावमध्ये वाढदिवस साजरा करत होते. फार्म हाऊसमध्ये दारूच्या बाटल्या उघडल्या जात होत्या. समर्थक नाचत-गाजत होते, “तुम्ही हजारो वर्षे जगा, वर्षाचे दिवस पन्नास हजार असोत...।” मध्येच बंदुकीच्या गोळ्या झाडून अजित सिंहला सलामी दिली जात होती. अजित सिंह व्यासपीठावर बसून हसत होते. थोड्या वेळाने एका समर्थकाने पाहिले की, अजित सिंह खुर्चीवर एका बाजूला कलंडले आहेत. शुभ्र पांढरा कुर्ता रक्ताने लाल झाला होता. उत्सवात सुरू असलेल्या गोळीबारादरम्यानच एक गोळी अजितला लागली होती. कदाचित हर्ष फायरिंगचा फायदा घेऊन कोणीतरी अजित सिंह यांची हत्या केली होती. संशयाची सुई रमेश कालियाकडे वळली, त्याचे नावही घेण्यात आले. मात्र, नंतर हा मृत्यू अपघात मानला गेला. मुख्यमंत्री म्हणाले- कालियासाठी सिकेराला लखनौला आणा नोव्हेंबर 2004, राजधानीत एक संध्याकाळ. हजरतगंजच्या VVIP गेस्ट हाऊसमध्ये शांतता होती. बाहेर लाल दिव्यांच्या गाड्या रांगेत उभ्या होत्या. आत मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांचा आवाज घुमत होता- “हे सर्व काय चालले आहे? एमएलसीसुद्धा सुरक्षित नाहीत? सरकारवर जनतेचा विश्वास कसा बसेल, सांगा जरा?” डीजीपीने संकोच करत म्हटले- “सर, आम्ही पूर्ण प्रयत्न करत आहोत, पण रमेश कालिया हाती लागत नाहीये.” मुलायम यांनी टेबलावर ठेवलेल्या फाईलवर हात मारला- “फाईल्स बंद करा, निकाल दाखवा. असा अधिकारी नेमा, जो भीती निर्माण करेल. जो यांना सांगेल की सरकार कोणाचं आहे.” काही क्षणांसाठी शांतता पसरली. मग डीजीपी हळूच म्हणाले- “सर, एक नाव आहे… नवनीत सिकेरा. 96च्या बॅचचा तरुण आयपीएस, धडाडीचा अधिकारी.” मुलायम यांनी भुवया उंचावल्या- “सिकेरा… नाव ऐकलंय मी. बोलावा लखनौला.” दोन दिवसांनंतर, लखनौचे नवे एसएसपी नवनीत सिकेरा त्यांच्या खुर्चीवर बसले होते. कडक अधिकारी, संयमित चेहरा, समोर टेबलावर रमेश कालियाची फाईल पडली होती. सिकेरा यांनी फाईल बंद केली. त्यांना डीजीपीची गोष्ट आठवली. “कालियाचा दहशतवाद संपवायचा आहे.” सिकेरा हसले. एमएलसी अजित सिंह यांच्या मृत्यूनंतर कालियाचा शोध सुरू होता. फोन टॅपिंग, गुप्तहेरांचे जाळे, धाडी - सर्व काही सुरू होते, पण प्रत्येक प्रयत्न अयशस्वी ठरत होता. याच दरम्यान, एका माहितीने संपूर्ण ऑपरेशनला नवी दिशा दिली. 10 फेब्रुवारी, 2005 लखनऊचे प्रॉपर्टी डीलर इम्तियाज यांना एक फोन आला. दुसऱ्या बाजूने दरारा असलेला आवाज आली- “पाच लाख तयार ठेव, नाहीतर परिणाम वाईट होतील.” इम्तियाज यांचा आवाज थरथरला- “माझ्याकडे इतके पैसे नाहीत, भैया” कालिया हसून म्हणाला- “दिसतंय की तुला तुझा जीव प्रिय नाहीये. उद्या फोन करून जागा सांगू. आम्हाला 'नाही' ऐकायला आवडत नाही.” इम्तियाज यांना वाटले की जणू मृत्यूने त्यांचा पाठलाग सुरू केला आहे. ते थेट SSP कार्यालयात धावले. SSP सिकेरा यांनी त्यांना समजावून शांत केले. “घाबरू नका इम्तियाज भाई, तुम्ही एकटे नाही आहात. फक्त आमच्यासोबत राहा, आम्ही कालियापर्यंत पोहोचू.” इम्तियाज यांनी मान हलवली- “सर, तुम्ही जसे सांगाल, आम्ही तसेच करू. फक्त आम्हाला वाचवा.” दुसऱ्या दिवशी इम्तियाजचा फोन पुन्हा वाजला. तिकडून आवाज आला- “उद्या संध्याकाळी 4 वाजता, नीलमथामध्ये भेटूया.” लखनऊ कॅन्टजवळचा निर्जन परिसर, आजूबाजूला शेतं, गाव आणि जंगल. कालियाने आपले ठिकाण विचारपूर्वक निवडले होते, जेणेकरून पोलिसांची चाहूल दूरूनच लागेल. ऑपरेशन कालियामध्ये वऱ्हाडी बनले पोलीस नवनीत सिकेरा यांच्यासमोर मोठे आव्हान होते. कारण, परिसरात लपण्यासाठी योग्य जागा नव्हती. एक चूक आणि कालिया पुन्हा गायब झाला असता. अनेक तास विचारमंथन सुरू होते, पण प्रत्येक योजनेत धोका होता. तेव्हा एक शिपाई म्हणाला- “सर, लग्नाचा हंगाम आहे. वरातीचे सोंग केले तर कसे राहील?” खोलीत काही क्षण शांतता पसरली, मग एसएसपी सिकेरा हसले. 12 फेब्रुवारी 2005, संध्याकाळी 4:00 वाजता नीलमथा परिसरात वाजतगाजत वरात निघत होती. वऱ्हाडी नाचत होते. नवरदेव बनलेले दरोगा प्रताप सिंह फुलांनी सजवलेल्या गाडीत बसले होते. गणवेशाऐवजी क्रीम रंगाचा सूट घातला होता आणि बुटांमध्ये रिव्हॉल्व्हर लपवले होते. अशाच प्रकारे प्रत्येक वऱ्हाड्याच्या स्वेटर-शेरवानीमध्ये शस्त्र लपवलेले होते. थोड्याच अंतरावर गल्लीतील एका घरात रमेश कालिया त्याचे साथीदार विश्वनाथ आणि राजेश यांच्यासोबत बसला होता. “इम्तियाज पैसे घेऊन येत असेल, जर कमी आणले तर साल्याला इथेच गाडून टाकू.” वरात हळूहळू त्याच गल्लीत वळत होती. वरातीच्या अगदी पुढे थोड्या अंतरावर इम्तियाज चालत होते. हातात पिशवी, फेब्रुवारीच्या थंडीत चेहऱ्यावर घाम. घराच्या दारापर्यंत पोहोचले तेव्हा आतून आवाज आला- “आत ये, उशीर का झाला?” इम्तियाज घाबरत आत आला. कालिया म्हणाला- पैसे आणले? इम्तियाजने पिशवी दिली. कालियाने पिशवी उघडून नोटांची बंडल काढले आणि इम्तियाजकडे रागाने पाहिले. इम्तियाज गयावया करत म्हणाला- “भाऊ… साठ हजारांचीच व्यवस्था होऊ शकली, बाकीचे दोन-चार दिवसांत देईन.” “साठ हजार? भिकारी समजतोस काय? साल्या, इथेच जिवंत गाडून टाकीन.” कालियाचा आवाज घुमला. इम्तियाज हात जोडून म्हणाला- “थोडा वेळ द्या भाऊ, घाईघाईत एवढेच होऊ शकले.” यावेळी विश्वनाथ गुरगुरला- “पळ इथून… पुढच्या वेळी पूर्ण पैसे घेऊन ये.” इम्तियाज 'जी-जी' करत लगेच बाहेर आला. तोपर्यंत वरातही घराच्या जवळ पोहोचली होती. इम्तियाजने वऱ्हाडी बनलेल्या एसएसपी सिकेरा यांच्याकडे पाहून हलकेच मान झुकवली. इशारा मिळाला होता. बँड-बाजाचा आवाज थोडा मंदावला. सिकेरा यांचा आवाज वायरलेसवर घुमला - “सर्व युनिट्स तयार रहा… कोणतीही चूक होता कामा नये.” सूट-बूट घातलेल्या पोलिसांनी एका झटक्यात संपूर्ण घर वेढले. एसएसपी सिकेरा यांनी लाऊडस्पीकरवरून इशारा दिला - कालिया, पोलिसांनी तुला चारही बाजूंनी वेढले आहे. शरणागती पत्कर, बाहेर ये. हे ऐकताच कालिया विश्वजीत आणि राजेशला म्हणाला - “पळा साल्यांनो, पोलीस आले...” आणि मग, तडतडतडतड… दोन्ही बाजूंनी गोळ्यांचा वर्षाव सुरू झाला. संपूर्ण गल्ली दारूगोळ्याच्या वासाने भरून गेली. 25 मिनिटे सतत गोळीबार झाला. इन्स्पेक्टर एसके प्रताप आणि आदेश शर्मा यांना प्रत्येकी तीन गोळ्या लागल्या, पण बुलेटप्रूफ जॅकेटने त्यांचे प्राण वाचवले. एक गोळी कॉन्स्टेबल चंद्रपालच्या पायाला लागली, दोन गोळ्या जॅकेटला लागून उसळल्या. घराच्या आत विश्वनाथ, राजेश आणि कालियाने मोर्चा सांभाळला होता. चेहऱ्यावर घाम होता, पण डोळ्यात तोच अहंकार. कालिया ओरडला- “माझ्यासाठी जाळं टाकलं होतंस सिकेरा, पण हे लक्षात ठेव, तुमच्यापैकी कोणीही जिवंत वाचणार नाही.” सिकेराने उत्तर दिले- “अजूनही वेळ आहे, शरण ये कालिया. कायद्यापेक्षा कोणीही मोठं नाही.” कालिया मोठ्याने हसला- “कायदा... कायदा माझ्या बुटाखाली आहे.” एवढे बोलून त्याने पुन्हा ट्रिगर दाबला- धांय, धांय, धांय… पोलिसही प्रत्युत्तरादाखल गोळीबार करत राहिले. गोळ्या भिंती भेदत होत्या. पुढची गोळी कुठे लागेल हे कोणालाच माहीत नव्हते. मग अचानक आतून गोळीबार थांबला, शांतता पसरली. पोलिस हळू हळू आत शिरले. मागील भिंतीवर रक्ताचे शिंतोडे, जमिनीवर गोळ्यांचे रिकामे काडतुसे. विश्वनाथ आणि राजेश एका कोपऱ्यात जखमी अवस्थेत पडले होते. आणि जमिनीवर पडले होते ते नाव, ज्याने यूपीला वर्षानुवर्षे घाबरवले होते - रमेश कालिया. *** कथा संपादन - कृष्ण गोपाल *** संदर्भ पत्रकार - डॉ. गोविंद पंत राजू, विष्णू मोहन, सूर्य प्रकाश शुक्ला. भास्कर टीमने पोलीस, पीडित आणि जाणकारांशी बोलल्यानंतर सर्व दुवे जोडून ही कथा लिहिली आहे. तरीही घटनांच्या क्रमात काही फरक असू शकतो. कथा रंजक बनवण्यासाठी क्रिएटिव्ह लिबर्टी घेण्यात आली आहे. --------------------------------------- 'एनकाउंटर'च्या या कथाही वाचा... 50 खून करणारा पश्चिम यूपीचा 'फौजी'; बहिणीचा दुपट्टा ओढणाऱ्यांना मारले, आधी चेअरमन मग आमदाराला ठार केले 80 चे दशक. हा तो काळ होता जेव्हा गावातील गुंड, नेते आणि दलाल सगळे एकाच धंद्यात गुंतले होते. जमीन हडपा, विका आणि पैसे कमवा. याच काळात एक गुन्हेगार जन्माला आला, महेंद्र सिंह गुर्जर. खूपच सनकी, छोट्या-छोट्या गोष्टींवरून मारामारीवर उतरत असे. 1982 साली जुलै महिन्याच्या एका दुपारी, तेव्हा त्याची बहीण महेंद्री येताना दिसली. संपूर्ण कथा वाचा... लखनऊमध्ये बाहुबलीला भररस्त्यात 126 गोळ्या मारल्या, जीव वाचवण्यासाठी पोलिसांना जानव्याची शपथ देत होता श्रीप्रकाश लखनौच्या पॉश भागांपैकी एक इंदिरा नगर. शांत आणि स्वच्छ रस्ते. स्प्रिंगडेल शाळेच्या आसपास बरीच वर्दळ होती. तेव्हाच ठांय… ठांय… ठां…ठां…ठां… अचानक कान फाडून टाकणारा आवाज येऊ लागला. जणू कोणी फटाक्यांची माळ लावली असावी असे वाटले, पण तो आवाज फटाक्यांचा नव्हता, गोळ्यांचा होता. संपूर्ण कथा वाचा...

दिव्यमराठी भास्कर 5 Dec 2025 9:18 am

Aishwarya Rai: रेड फिल्म फेस्टिवलमध्ये झळकली ऐश्वर्या राय; “अस्सलामु अलैकुम” म्हणत प्रेक्षकांना दिला खास नमस्कार

Aishwarya Rai: बॉलिवूडची सदाबहार अभिनेत्री आणि भारतीय सिनेमाची ओळख मानल्या जाणाऱ्या ऐश्वर्या राय बच्चन यांनी पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय मंचावर आपली मोहोर उमटवली आहे. सौदी अरेबियात सुरू असलेल्या रेड सी फिल्म फेस्टिवलच्या पाचव्या पर्वात त्या सहभागी झाल्या असून, त्यांच्या उपस्थितीने प्रेक्षकांचा उत्साह दुप्पट झाला. खास अंदाजात दिला प्रेक्षकांना नमस्कार कार्यक्रमात ऐश्वर्या जेव्हा ब्लॅक रंगाच्या आकर्षक ड्रेसमध्ये […] The post Aishwarya Rai: रेड फिल्म फेस्टिवलमध्ये झळकली ऐश्वर्या राय; “अस्सलामु अलैकुम” म्हणत प्रेक्षकांना दिला खास नमस्कार appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 5 Dec 2025 9:13 am

Tejashri Pradhan: तेजश्री प्रधानला राज्य सांस्कृतिक युवा पुरस्कार; अभिनेत्रीची भावूक पोस्ट चर्चेत

Tejashri Pradhan: मराठी मालिकांमधून आणि चित्रपटांतून प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण करणारी अभिनेत्री तेजश्री प्रधान एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून तिला “राज्य सांस्कृतिक युवा पुरस्कार 2024” जाहीर झाला आहे. सध्या तेजश्री ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेत काम करत आहे. पुरस्कार मिळाल्यानंतर तिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर करत […] The post Tejashri Pradhan: तेजश्री प्रधानला राज्य सांस्कृतिक युवा पुरस्कार; अभिनेत्रीची भावूक पोस्ट चर्चेत appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 5 Dec 2025 8:43 am

८ डिसेंबरपासून राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन; विधिमंडळ परिसरात चोख पोलीस बंदोबस्त, नागपूरात ३३ मोर्चे धडकणार

Nagpur Winter Session : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये ८ डिसेंबरपासून सुरू होत आहे. त्यामुळे कामाला वेगाने सुरूवात झाली असून हे अधिवेशन ८ ते १४ डिसेंबर या दरम्यान होणार आहे. त्यामुळे प्रशासकीय कामाला देखील वेग आला आहे. नागपूरमधील रविभवन परिसरातील कॅबिनेट मंत्र्यांचे निवासाची व्यवस्था असलेल्या बंगल्यांची डागडुजी, रंगकाम अंतिम टप्प्यात आले आहे. हे हिवाळी अधिवेशन […] The post ८ डिसेंबरपासून राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन; विधिमंडळ परिसरात चोख पोलीस बंदोबस्त, नागपूरात ३३ मोर्चे धडकणार appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 5 Dec 2025 8:40 am

MCCL : डोंबिवलीत क्रिकेटचा महाधमाका!

डोंबिवली - डोंबिवली जिमखाना ग्राउंडवर यंदा क्रिकेट आणि ग्लॅमरचा अनोखा संगम पाहायला मिळणार आहे. मराठी मनोरंजन विश्वातील तब्बल ८० हून अधिक लोकप्रिय कलावंत एका मैदानावर उतरणार असून दोन दिवस हा रोमांचक क्रिकेटचा संग्राम रंगणार आहे. मराठी सेलिब्रिटी क्रिकेट लीग (MCCL) अंतर्गत आयोजित करण्यात आलेले हे सामने ६ आणि ७ डिसेंबर २०२५ रोजी होणार असून या स्पर्धेचं आयोजन डोंबिवलीकर संस्थेने केले आहे. हा उपक्रम आमदार रवींद्र चव्हाण यांच्या डोंबिवलीकर - एक सांस्कृतिक परिवाराच्या संकल्पनेतून साकार झालेला आहे.यंदाच्या चषकाचं वैशिष्ट्य म्हणजे मराठी चित्रपटसृष्टी घडवणाऱ्या ८ दिग्गज महानुभवांना आदरांजली म्हणून त्यांच्या नावाने संघ बनवण्यात आले आहेत. पहिला संघ निळू फुले संघ असून त्याचा कॅप्टन सिद्धार्थ जाधव आहे. या टीममध्ये नूपुर दुधवाडकर, वरद चव्हाण, ऋषिकेश पाटील, तेजस बर्वे, सुप्रीत कदम, शिव ठाकरे, ऋतुजा लिमये, ऋतुजा कुलकर्णी आहेत, तर दुसरा भालजी पेंढारकर संघ आहे. त्याचा कॅप्टन हार्दिक जोशी असून त्याच्या टीममध्ये ऋतुराज फडके, आकाश पेंढारकर, अमोल नाईक, नचिकेत लेले, सौरभ चौगुले, रोहित शिवलकर, कीर्ती पेंढारकर, धनश्री काडगांवकर आहेत. दादासाहेब फाळके संघाचे संजय जाधव कॅप्टन असून माधव देवचक्के, सुजय डहाके, आदिश वैद्य, प्रदीप मिस्त्री, विजय आंदळकर, जगदीश चव्हाण, जयंती वाघधरे, नम्रता प्रधान त्यांच्या टीममध्ये आहेत. चौथा संघ रंजना संघ असून तितिक्षा तावडे त्याची कॅप्टन आहे. तिच्या संघात सिद्धार्थ बोडके, आशीष कुलकर्णी, प्रणव रावराणे, प्रसाद बर्वे, गौरव घाटणेकर, उमाकांत पाटील, शांतनू भाके, अमृता रावराणे यांचा समावेश आहे, तर पु. ल. देशपांडे संघाचे कॅप्टन प्रवीण तरडे असून त्यांच्या संघात अभिजीत कवठाळकर, अजिंक्य जाधव, सागर पाठक, विराट मडके, चिन्मय संत, अंशुमन विचारे, राधा सागर आहेत. सहावा संघ दादा कोंडके संघ असून प्रथमेश परब त्याचा कॅप्टन आहे, तर या संघात विजय पटवर्धन, पृथ्वीक प्रताप, गौरव मोरे, रोहन मापुस्कर, विशाल देवरुखकर, कृणाल पाटील, मयुरी मोहिते, संजना पाटील आहेत. व्ही. शांताराम संघाचे कॅप्टन विजू माने असून संदीप जुवाटकर, विनय राऊळ, सुमित कोमुर्लेकर, अभिजीत चव्हाण, महेश लिमये, ओमप्रकाश शिंदे, प्राजक्ता शिसोदे, गौरी इंगवले या संघात आहेत. अखेरचा संघ भक्ती बर्वे संघ असून अनुजा साठे त्याची कॅप्टन आहे. या संघात सौरभ गोखले, वैभव चव्हाण, हर्षद अटकरी, अंगद म्हसकर, अक्षय वाघमारे, आनंद काळे, विशाल निकम, रिया राज सहभागी आहेत. दोन दिवस डोंबिवलीत फक्त क्रिकेट, उत्साह, कलाकारांची धमाल आणि मनोरंजनाचा झंझावात पाहायला मिळणार आहे.मैदानावर कलाकारांची फिल्डिंग, बॅटिंग, चौकार-षटकारांचा वर्षाव अविस्मरणीय अनुभव देणार आहे. प्रत्येक संघ महान दिग्गजांना सन्मान देत मैदानावर उतरणार असल्याने स्पर्धेला भावनिक आणि सांस्कृतिक रंगही मिळणार आहे.

फीड फीडबर्नर 5 Dec 2025 8:30 am

'आरोग्य सुरक्षा आणि राष्ट्रीय सुरक्षा उपकर २०२५'विधेयक मंजूर झाल्यास काय बदल होणार? जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली: संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी 'आरोग्य सुरक्षा आणि राष्ट्रीय सुरक्षा उपकर २०२५' हे विधेयक सादर करण्यात आले. यावेळी, संसदेची मंजुरी मिळून हा कायदा लागू झाल्यानंतर घरगुती किराणा सामान किंवा आवश्यक औषधे यांच्यासारख्या जीवनावश्यक वस्तूंवर महागाईचा अतिरिक्त भार पडणार नसल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी स्पष्ट केले. हे विधेयक मार्च २०२६ मध्ये संपणाऱ्या जीएसटी भरपाई उपकराची जागा घेणार आहे.लोकसभेत हे विधेयक मांडताना अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले की, हा उपकर सामान्य माणसासाठी दैनंदिन वापराच्या आवश्यक वस्तूंवर लादला जाणार नाही, तर गुटखा आणि पानमसाला सारख्या हानीकारक तंबाखूजन्य उत्पादने तयार करणाऱ्या कारखान्यांतील यंत्रसामग्रीच्या उत्पादन क्षमतेनुसार तो लादला जाणार आहे. तसेच हा उपकर प्रत्येक कारखान्यासाठी त्यांच्या उत्पादन क्षमतेनुसार बदलणार आहे. महत्त्वाचे म्हणजे उपकरातून मिळणाऱ्या महसुलाचा एक भाग देशाच्या आरोग्य आणि राष्ट्रीय सुरक्षा कार्यक्रमांना निधी देण्यासाठी वापरला जाणार असल्याचे, सीतारामन यांनी सांगितले.https://prahaar.in/2025/12/05/supreme-hearing-on-election-controversy-in-the-state-today-will-the-nagpur-benchs-decision-be-stayed/सध्या, पान मसाला, तंबाखू आणि संबंधित हानीकारक उत्पादनांवर २८ टक्के वस्तू व सेवा कर (जीएसटी) आणि वेगवेगळे भरपाई उपकर आकारले जातात. भरपाई उपकर रद्द केल्यानंतर यांचा जीएसटी दर ४० टक्क्यांपर्यंत वाढणार आहे. या उपकराचा जीएसटी महसुलावर परिणाम होणार नाही. पान मसाल्यावर उत्पादन शुल्क आकारता येत नाही. म्हणून, सरकारने त्यावर उपकर लावण्यासाठी एक विधेयक आणले आहे, जो जीएसटी व्यतिरिक्त आकारला जाईल.आरोग्यासाठी मोठा धोका निर्माण करणाऱ्या तंबाखूजन्य उत्पादनांच्या वापरावर आळा बसावा यासाठी वाढीव उपकर लावणे हा या विधेयकाचा उद्देश आहे. दरम्यान तांदूळ, डाळी, पीठ, मीठ, साखर, दूध, भाज्या, फळे, आवश्यक औषधे, साबण, तेल, टूथपेस्ट आणि इतर दैनंदिन वापराच्या वस्तू आरोग्य उपकरांतून वगळल्या आहेत.

फीड फीडबर्नर 5 Dec 2025 8:30 am

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च'सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये एकीकडे दुबार मतदार आणि आरक्षण मर्यादेमुळे वाद निर्माण झाला. तर ऐन मतदानाच्या दिवशी नागपूर खंडपीठाने नगरपरिषदेची मतमोजणी २१ डिसेंबर रोजी घेण्याचा निर्णय दिल्याने मतमोजणी लांबणीवर पडली. या पार्श्वभूमीवर नागपूर खंडपीठाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे. ज्यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असल्याने सरन्यायाधीश सूर्यकांत व न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.राज्यातील २६४ नगरपालिका व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २ डिसेंबरला मतदान झाले. या ठिकाणी ३ डिसेंबरला मतमोजणी होणार होती. मात्र वादात राहिलेल्या नगरपरिषदांसाचे मतदान २० डिसेंबरला झाल्यावर राज्यातील सर्व २८८ नगरपालिका व नगरपंचायतींची मतमोजणी २१ डिसेंबर रोजी करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने २ डिसेंबरला दिला. त्याचबरोबर मतदानोत्तर चाचण्यांचे निष्कर्षही २० डिसेंबर रोजी मतदान संपल्याच्या पुढील अर्ध्या तासापर्यंत जाहीर करता येणार नाहीत, असेही न्यायालयाच्या आदेशात नमूद केले आहे.न्यायालयीन प्रक्रिया प्रलंबित असल्याने २० डिसेंबरला होणाऱ्या मतदानावर आधीच्या निवडणुकीच्या निकालावर प्रभाव पडू शकतो. यामुळे सर्व निकाल एकाच दिवशी जाहीर व्हावेत, अशी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. या युक्तीवादावर उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सर्व नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांचा निकाल एकाच दिवशी म्हणजे २१ डिसेंबरला जाहीर करण्याचे निर्देश दिले. मात्र या आदेशाला आता सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका ४ डिसेंबरला स्वीकारली.याचिकाकर्ते राजकिरण बर्वे आणि कारंजा येथील 'एआयएमआयएम'चे प्रदेश उपाध्यक्ष मो. युसूफ पुंजानी यांनी संयुक्तरित्या सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या याचिकेमध्ये तत्काळ मतमोजणी करण्याची मागणी करण्यात आली असून आज यावर सुनावणी होणार असल्याची माहिती याचिकाकर्ते मो. युसूफ पुंजानी यांच्यावतीने अॅड. फिरोज शेकूवाले यांनी दिली. या याचिकेच्या निर्णयावर स्थानिक निवडणुकीच्या मतमोजणीचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.

फीड फीडबर्नर 5 Dec 2025 8:10 am

स्पॉटलाइट-79 वर्षांच्या अब्जाधीशाने पत्नीसाठी जाहिरात काढली:वार्षिक 60 लाख पगार, काम मुले जन्माला घालणे; या 7 अटी पूर्ण करणे आवश्यक

79 वर्षांच्या एका अब्जाधीशाला आपली मालमत्ता सांभाळण्यासाठी किमान दोन मुले हवी आहेत. ते ज्या महिलेशी लग्न करतील, तिला वार्षिक सुमारे 60 लाख रुपये देण्यास तयार आहेत, पण त्यांची पत्नी होणे अजिबात सोपे नाही, कारण त्यांनी अनेक अनोख्या आणि कठीण अटी ठेवल्या आहेत. संपूर्ण प्रकरण जाणून घेण्यासाठी वर दिलेल्या इमेजवर क्लिक करून व्हिडिओ पहा.

दिव्यमराठी भास्कर 5 Dec 2025 7:57 am

पुणेकरांनो सांभाळा! थंडीसोबतच शहराला पडलाय ‘धुळीचा विळखा’; श्वसनविकाराचा धोका वाढला

प्रभात वृत्तसेवा पुणे – धुक्यामुळे वातावरणात धुळीचे प्रमाण वाढले असून नागरिकांन आरोग्याविषयी योग्य काळजी घेण्याचे आवाहन आरोग्यविभागातर्फे करण्यात आले आहे.पावसाच्या प्रदीर्घ उपस्थितीनंतर रखडलेली रस्त्यांची, इमारतींची कामे वेगाने सुरू झाली आहेत. त्यामुळे वातावरणात धुळीचे प्रमाण खूप जास्त आहे. धुक्यांंमध्ये धुलीकण अडकल्याने ते हवेच्या खालच्या स्तरावरच अडकले आहेत. त्यामुळे हवेच्या खालच्या स्तरावरच धुळीची झालर पसरली आहे.पुण्यात दिवसाचे […] The post पुणेकरांनो सांभाळा! थंडीसोबतच शहराला पडलाय ‘धुळीचा विळखा’; श्वसनविकाराचा धोका वाढला appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 5 Dec 2025 7:45 am