इस्रायलमधील मोठ्या केमिकल फॅक्टरीवर इराणचा हल्ला
तेल अविव : इराणने (Iran) बॅलिस्टिक क्षेपणास्त्राने (Ballistic missile) इस्रायलच्या (Israel) एका प्रमुख रासायनिक कारखान्यावर अर्थात केमिकल फॅक्टरीवर हल्ला केला आहे. इस्रायलमधील नेओत होवाव येथे मोठ्या केमिकल फॅक्टरीवर इराणने बॅलिस्टिक क्षेपणास्त्राद्वारे हल्ला केला. या हल्ल्यामुळे कारखान्यातून रसायन गळती (Chemical Leak) सुरू झाल्याचे वृत्त आहे. कारखान्यातून सतत मोठे काळ्या रंगाचे धुराचे लोट आकाश उंचच उंच जात असल्याचे दिसत आहे.आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे मोठे पथक घटनास्थळी मदतकार्य करत आहे. अद्याप आग आणि गळती नियंत्रणात आलेली नाही. हल्ल्यात जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. पण मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून स्थानिकांना घराबाहेर पडू नका असे सांगण्यात आले आहे. घरांची दारं खिडक्या बंद ठेवण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. व्हायरल फोटो आणि व्हिडीओंमध्ये केमिकल फॅक्टरीला लागलेली आग दिसत आहे.नेओत होवाव औद्योगिक क्षेत्र हे इस्रायलमधील एक प्रमुख रासायनिक आणि औद्योगिक केंद्र आहे. या भागात अनेक धोकादायक रसायनांचे उत्पादन आणि साठवणूक करण्याचे काम चालते. रसायन गळती झाल्याचे वृत्त असल्यामुळे परिसरात प्रचंड खबरदारी घेतली जात आहे.पश्चिम आशियातील युद्धाला झाला एक महिनाअमेरिका आणि इस्रायल यांनी २८ फेब्रुवारी २०२६ रोजी इराणवर हवाई हल्ले सुरू केले आणि पश्चिम आशियात युद्ध सुरू झाले. या युद्धाला आज म्हणजेच रविवार २९ मार्च २०२६ रोजी एक महिना पूर्ण झाला. अमेरिकेने एका महिन्यात इराणची बहुतांश लढण्याची क्षमता नष्ट केल्याचा दावा केला आहे. पण होर्मुझ सामुद्रधुनीतून प्रवास करण्याची हिंमत अमेरिका आणि त्यांच्या मित्र देशांपैकी कोणाच्याही युद्धनौकेने तसेच व्यापारी जहाजांनी दाखवलेली नाही. इराणने अमेरिका आणि त्यांच्या मित्र देशांचे एकही जहाज होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकणार नाही असा इशारा देत आपला प्रभाव दाखवून दिला आहे. अमेरिका इराणला दणके दिल्याचे सांगत असली तरी अमेरिकेने महिन्याभरात स्वतःची काही लढाऊ विमानं, हवेतल्या हवेत इंधन भरणारी विमानं, अनेक हवाई सुरक्षा यंत्रणा आणि काही सैनिक गमावले आहेत. इराण अमेरिकेच्या पश्चिम आशियातील सैन्य तळांवर तसेच इस्रायलवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र यांच्याद्वारे वारंवार हल्ले करू लागला आहे. इराणच्या हल्ल्यात झालेल्या हानीबाबत अमेरिकेने अद्याप अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही. पण सूत्रांच्या वृत्तानुसार युद्धामुळे अमेरिकेचेही अनपेक्षित असे मोठे नुकसान झाले आहे. इतर देशांनी अमेरिकेला मदत करू नये यासाठी इराणने मुद्दाम निवडक आखाती देशांतील अमेरिकेच्या सैन्य तळांना लक्ष्य करून हल्ले केले आहेत.
जमीन मोजणी होणार आता सुपरफास्ट, प्रत्येक जिल्ह्यात खाजगी भूमापकांची नियुक्ती
मुंबई :जमीन मोजणी प्रकरणांचा निपटारा अचूक, जलद, गुणवत्तापूर्ण व पारदर्शी पद्धतीने व्हावा यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात प्रशिक्षित परवानाधारक भूमापक आणि भूमापन एजन्सी नियुक्ती करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला.याबद्दलची कार्यपद्धती निश्चित करून शासनाने आदेश जारी केला आहे. मोजणी प्रकरणांचे निश्चित वेळापत्रक ठरवून त्यानुसारच प्रत्यक्ष जमिनीची मोजणी व हद्द कायम करावी लागेल. वेळापत्रक निश्चित करूनच भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक संबंधितासाठी नोटीस काढतील. कामाशी संबंधित कागदपत्रे नसतील तर जबाब पंचनामे करून अहवाल द्यावा लागेल. या कामात भ्रष्टाचार अथवा गुन्हेगारी कारण समोर आले तर, परवाना रद्द करण्यात येणार आहे.भूमी अभिलेख विभागामार्फत मोजणीचे काम केले जाते. तथापि, मोजणीसाठी वाढते अर्ज व मर्यादित शासकीय मनुष्यबळामुळे जमीन मोजणीची प्रकरणे प्रलंबित राहू नयेत याकरिता जिल्हास्तरावर परवानाधारक भूमापकांची नियुक्ती तांत्रिकदृष्ट्या पात्र असणाऱ्या एजन्सीकडून करण्यात येत आहे.कामात अचूकता राहावी यासाठी या भूमापकांना 'ई-मोजणी २.०' या आधुनिक सॉफ्टवेअरचा वापर करावा लागणार असून, प्रत्येक भूमापकास दरमहा किमान वीस मोजणी प्रकरणे निकाली काढणे बंधनकारक करण्यात आले आहे. मोजणीनंतरचा नकाशा आणि कागदपत्रे ऑनलाईन अपलोड केल्यानंतर उपअधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडून अंतिम मंजुरी दिली जाणार आहे. यामुळे रखडणाऱ्या मोजणी प्रक्रियेत पारदर्शकता येईल आणि कामांना वेग मिळेल.* जिल्हाधिकाऱ्यांची समिती : योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये एन.आय.सी.चे तांत्रिक सल्लागार, आय.टी.आय.चे प्राचार्य आणि जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांचा समावेश आहे. खाजगी भूमापक म्हणून काम करण्यासाठी आय.टी.आय. (सर्व्हेइंग), सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा पदवी, आणि जिओइन्फॉर्मेटिक्समधील पदवीधारक पात्र असतील. तसेच १० वर्षे सेवा केलेले निवृत्त भूमापन कर्मचारीही ६५ वर्षांपर्यंत हे काम करू शकतील.* प्रशिक्षित उमेदवार :निवड झालेल्या उमेदवारांना भूमी अभिलेख विभागामार्फत दोन आठवड्यांचे प्रशिक्षण दिले जाईल. ते पूर्ण केल्यानंतर परीक्षा घेतली जाईल आणि पात्र उमेदवारांना छत्रपती संभाजीनगर येथी लँड रेकॉर्ड ट्रेनिंग अकॅडमीकडून दोन वर्षांसाठी वैध असलेला परवाना दिला जाईल.केवळ जागेची मोजणी न झाल्यामुळे अनेक कामे थांबून राहतात. उद्योजक आणि नवीन व्यवसायासाठी सुरुवात देखील करता येत नाही. राज्याच्या प्रगतीसाठी बाधा होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. आता तातडीने मोजणी होईल, सर्वसामान्यांचा मनस्ताप वाचेल, वेळ वाचेल. - चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री, महाराष्ट्र
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे विश्लेषण
मुंबई :कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामगिरीचे रिअल-टाइम विश्लेषण आणि ट्रॅकिंग करणाऱ्या राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटीची) महाराष्ट्र शासनाच्या 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकताच सर्वोत्तम आयुक्त / संचालक गटातील 68 सहभागींपैकी तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करुन एससीईआरटीला गौरविण्यात आले असून परिषदेच्या वतीने सहसंचालक डॉ. कमलादेवी आवटे आणि उपसंचालक ज्योती शिंदे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. परिषदेचे तत्कालीन संचालक राहुल रेखावार यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे शिक्षण व्यवस्थेत डेटा-आधारित निर्णयप्रक्रियेला मोठी चालना मिळाली आहे.एआय च्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे मूल्यांकन :एससीईआरटीने एआयच्या माध्यमातून इयत्ता दुसरी ते पाचवीतील विद्यार्थ्यांच्या वाचन क्षमतेचे आणि एकूण प्रगतीचे मूल्यांकन करण्यासाठी निपुण महाराष्ट्र उपक्रमांतर्गत नाविन्यपूर्ण प्रयोग राबवले आहेत. विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे विश्लेषण करून शिक्षक व प्रशासनाला त्वरित निर्णय घेणे सुलभ झाले आहे. डिजिटल प्रशासनाच्या क्षेत्रातही परिषदेने लक्षणीय प्रगती केली असून एकूण 152 पैकी 135.5 गुण मिळवत उच्च कामगिरी नोंदवली आहे. ई-ऑफिस प्रणालीत 100 टक्के अंमलबजावणी करत 96.94 टक्के फाइल्स निकाली काढण्यात आल्या आहेत. सर्व 92 कर्मचारी ई-ऑफिसवर सक्रिय असून कार्यालयीन कामकाज अधिक गतिमान झाले आहे.चॅटबॉटच्या माध्यमातून शंकांचे निराकरण :नागरिकाभिमुख सेवांमध्ये व्हॉट्सअॅप चॅटबॉटचा प्रभावी वापर करण्यात आला असून नागरिकांच्या शंकांचे स्वयंचलित निराकरण, योजनांची माहिती आणि अलर्ट्स देण्यात येत आहेत. मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये सेवा उपलब्ध असल्यामुळे या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.तंत्रज्ञान आधारित रिअल-टाइम मॉनिटरिंग :डॅशबोर्ड प्रणालीद्वारे डेटा व्हिज्युअलायझेशन आणि नियमित अपडेट्समुळे जिल्हास्तरापर्यंत निर्णयप्रक्रिया अधिक सक्षम झाली आहे. डिजिटल हजेरी आणि इतर उपक्रमांचे रिअल-टाइम मॉनिटरिंगही प्रभावीपणे केले जात आहे. तसेच जीआयएस तंत्रज्ञानाच्या वापरातून राज्य ते शाळा स्तरापर्यंत हीटमॅप्सद्वारे उपस्थिती व अध्ययन कामगिरीचे विश्लेषण करण्यात येत आहे. यामुळे जोखीम ओळख, तफावत विश्लेषण आणि लक्ष्यित नियोजन अधिक परिणामकारक ठरत आहे.तक्रार निवारणाचा दर 97 टक्के :तांत्रिकदृष्ट्या एससीईआरटीची वेबसाइट 100 टक्के सुरक्षित, प्रमाणित आणि मोबाइल सुसंगत असून दररोज एक हजाराहून अधिक वापरकर्ते या वेबसाइटला भेट देत आहेत. माहिती अधिकार कायद्यांतर्गत आवश्यक माहितीचे प्रकटीकरणही पारदर्शकपणे करण्यात आले आहे. तक्रार निवारण प्रक्रियेत 10 पैकी 9.7 इतका चांगला समाधान दर नोंदवला गेला आहे.एकूणच, कृत्रिम बुद्धिमत्ता, जीआयएस आणि डिजिटल तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरातून एससीईआरटीने शिक्षण क्षेत्रात आधुनिक, पारदर्शक आणि परिणामकारक प्रशासनाचा आदर्श निर्माण केला आहे. परिषदेने सुरू केलेले हे कार्य यापुढे अधिक प्रभावीपणे राबविले जाईल, असा विश्वास विद्यमान संचालक डॉ. हेमंत वसेकर यांनी यानिमित्ताने व्यक्त केला आहे.
Mumbai Indians Record : वानखेडे स्टेडियमवर नाणेफेक होताच मुंबई इंडियन्सने अशा एका शिखरावर गवसणी घातली आहे
IRCTC पूर्ण करणार प्रवाशांची काश्मीर ते गोवा फिरण्याची संधी, जाणून घ्या माहिती
मुंबई : फिरण्याची इच्छा असते, पण वेळ आणि बजेटमुळे अनेकदा प्लॅन पुढे ढकलला जातो. अशा प्रवाशांसाठी Indian Railway Catering and Tourism Corporation (IRCTC) ने एप्रिल महिन्यात खास आणि परवडणारी टूर पॅकेजेस जाहीर केली आहेत. १ ते १० एप्रिल दरम्यान विविध ठिकाणांसाठी ही पॅकेजेस उपलब्ध असणार असून, प्रवाशांना कमी खर्चात देशातील सुंदर ठिकाणे पाहण्याची संधी मिळणार आहे.काश्मीर टूर: ‘स्वर्ग’ अनुभवण्याची संधी‘HEAVENLY KASHMIR EX JAIPUR’ या पॅकेजअंतर्गत श्रीनगर, सोनमर्ग, गुलमर्ग आणि पहलगाम या निसर्गरम्य ठिकाणांचा समावेश आहे.प्रस्थान: जयपूर (१० एप्रिल)कालावधी: ५ रात्री / ६ दिवसप्रवास: फ्लाइट + कॅबकिंमत:एकट्यासाठी: ₹५१,०४०२ जणांसाठी: ₹४०,८९० प्रति व्यक्ती३ जणांसाठी: ₹३९,४६० प्रति व्यक्तीमुलांसाठी: ₹३३,९६०कर्नाटक टूर: कुर्ग–म्हैसूरचा निसर्गसफर‘कॉफी विथ कर्नाटक’ पॅकेजमध्ये कुर्ग आणि म्हैसूर या हिरव्यागार ठिकाणांचा समावेश आहे.प्रस्थान: हैदराबाद (१ एप्रिल)कालावधी: ५ रात्री / ६ दिवसप्रवास: फ्लाइट + कॅबकिंमत:एकट्यासाठी: ₹१६,७००२ जणांसाठी: ₹१४,०१० प्रति व्यक्ती३ जणांसाठी: ₹१०,९३० प्रति व्यक्तीमुलांसाठी: ₹९,८१०गोवा टूर: बीच आणि मजेचा परफेक्ट कॉम्बोचंदीगड ते गोवा या रेल्वे टूरमध्ये समुद्रकिनाऱ्याचा आणि पार्टीचा आनंद घेता येणार आहे.प्रस्थान: चंदीगड (४ एप्रिल)कालावधी: ५ रात्री / ६ दिवसप्रवास: ट्रेन + कॅबकिंमत:एकट्यासाठी: ₹२७,०८५२ जणांसाठी: ₹१९,४०५ प्रति व्यक्ती३ जणांसाठी: ₹१८,५९५ प्रति व्यक्तीमुलांसाठी: ₹१४,७२५बुकिंग कसं कराल?या सर्व पॅकेजेसचं बुकिंग तुम्ही Indian Railway Catering and Tourism Corporation (IRCTC) च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन सहज करू शकता. या टूर पॅकेजेसमुळे प्रवाशांना नियोजनाची चिंता न करता, किफायतशीर दरात देशातील लोकप्रिय पर्यटनस्थळांचा आनंद घेता येणार आहे. त्यामुळे ही खास संधी उन्हाळी सुट्ट्यांसाठी ही एक उत्तम संधी आहे.
आनंदाची बातमी, ९४ हजार मेट्रिक टन LPG घेऊन दोन टँकर भारताकडे रवाना
नवी दिल्ली : मागील एक महिन्यापासून पश्चिम आशियात अमेरिका, इस्रायल विरुद्ध इराण असे युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे अनेक देश तेल आणि गॅसच्या टंचाईचा सामना करत आहे. पण भारतात पुरेसे पेट्रोल, डिझेल उपलब्ध आहे. देशातील एलपीजीचा साठाही समाधानकारक आहे. एकीकडे ही सुसह्य अशी स्थिती असतानाच देशात लवकरच ९४ हजार मेट्रिक टन LPG घेऊन दोन टँकर पोहोचणार आहेत. ‘BW Tyr’ आणि ‘BW Elm’ हे टँकर अनुक्रमे ३१ मार्च रोजी मुंबईत आणि १ एप्रिल रोजी न्यू मँगलोर (नवे मंगळुरू) येथे पोहोचण्याची शक्यता आहे.युद्धामुळे होर्मुझ सामुद्रधुनीमार्गे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय तेल व्यापारावर परिणाम झाला असताना भारतासाठी आनंदाची बातमी आली आहे. ऐन युद्ध काळात अरुंद अशा होर्मुझ सामुद्रधुनीतून भारतासाठी ९४ हजार मेट्रिक टन LPG घेऊन दोन टँकर निघाले आहेत. या टँकरनी सामुद्रधुनी पार केली असून लवकरच ते भारतात पोहोचणार आहेत. पश्चिम आखाती क्षेत्रात अजूनही ४८५ भारतीय खलाशांसह भारताचा ध्वज असलेली एकूण १८ जहाजं अद्याप समुद्रात आहेत.भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा एलपीजी (LPG) आयातदार देश आहे. भारतात गेल्या वर्षी ३३.१५ दशलक्ष टन गॅसचा वापर केला गेला. भारताच्या एकूण गरजेपैकी सुमारे ६० टक्के गॅस हा आयात केला जातो. यामुळे ९४ हजार मेट्रिक टन LPG घेऊन दोन टँकर देशात पोहोचल्याने भारतातील एलपीजीच्या साठ्यात आणखी वाढ होणार आहे.
केंद्र सरकारच्या व्यक्तिगत केंद्रित परराष्ट्र धोरणामुळे भारताची आंतरराष्ट्रीय प्रतिमा मलिन होत असल्याचा आरोप करत काँग्रेसने केंद्र सरकारवर सडकून टीका केली.
पालघर हादरले! कारखान्यात एसीच्या स्फोटात होरपळलेल्या तिन्ही कर्मचाऱ्यांचा मृत्यू
Palghar factory Blast : पालघरमधील विस्तार मेटल कंपनीत एसी युनिटच्या स्फोटात जखमी झालेल्या मोहम्मद अन्सारी, अखिलेश जयस्वाल आणि किसान निकम यांचा मृत्यू झाला आहे
एप्रिलमध्ये तब्बल इतके बँक हॉलिडेज, ही सुट्ट्यांची यादी जाहीर
मुंबई : एप्रिल महिन्यात कुठे फिरायला जायचा प्लॅन करत असाल, तर बाहेर गावी जायच्या आधी बँक हॉलिडेज नक्की तपासून घ्या, एप्रिल महिण्यापासून नवीन आर्थिक वर्ष सुरु होत आहे आणि त्याचसोबत बँकांनी आपल्या सुट्ट्यांची यादी देखील जाहीर केली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या सुट्ट्यांच्या आयडीनुसार, पुढील महिन्यात तब्बल १४ दिवस बंद राहणार आहेत, ज्यामध्ये रविवार आणि दुसरा व चौथा शनिवार तसेच काही सण आणि विशेष प्रसंगाचा समावेश आहे.एप्रिल महिन्यात किती दिवस राहतील बँक बंद पहा ही यादी...१ एप्रिल (बुधवार): वार्षिक बंदमुळे देशभरातील बँका बंद राहतील.२ एप्रिल (गुरुवार): मौंडी थर्सडे निमित्त कोची आणि तिरुवनंतपुरम येथील बँका बंद राहतील.३ एप्रिल (शुक्रवार): गुड फ्रायडे निमित्त देशभरात बँकांना सुट्टी असेल.५ एप्रिल (रविवार): सर्व बँकांना साप्ताहिक रविवारची सुट्टी असेल.११ एप्रिल (शनिवार): महिन्यातील दुसऱ्या शनिवारची सुट्टी असेल.१२ एप्रिल (रविवार): सर्व बँका रविवारी बंद राहतील.१४ एप्रिल (मंगळवार): डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती/महाविषुव संक्रांती/बिजू/बुईसू उत्सव/तमिळ नववर्ष दिन/बोहाग बिहू/चिराओबा/बैसाखी निमित्त देशभरातील विविध राज्यांमध्ये बँका बंद राहतील.१५ एप्रिल (बुधवार): बंगाली नववर्ष दिन (नबवर्षा)/बोहाग बिहू/विशू/हिमाचल दिन – आगरतळा, गुवाहाटी, इटानगर, कोची, कोलकाता, शिमला आणि तिरुवनंतपुरम येथील बँका बंद राहतील.१६ एप्रिल (गुरुवार): बोहाग बिहू निमित्त गुवाहाटीतील बँका बंद राहतील.१९ एप्रिल (रविवार): देशभरातील सर्व बँका बंद राहतील.२० एप्रिल (सोमवार): बसव जयंती/अक्षय तृतीयेनिमित्त बंगळूरसह अनेक राज्यांतील बँका बंद राहतील.२१ एप्रिल (मंगळवार): गारिया पूजेनिमित्त आगरतळा येथील बँका बंद राहतील.२५ एप्रिल (शनिवार): महिन्याचा चौथा शनिवार असल्याने बँका बंद राहतील.२६ एप्रिल (रविवार): देशभरातील सर्व बँकांना रविवारची साप्ताहिक सुट्टी असेल.बँका जरी बंद असल्या तरी युपीआय सेवा ही आपल्या हातात म्हणजेच आपल्या फोन मध्ये कायम उपलब्ध तर आहेच. त्यामुळे लक्षात ठेवा पुढील काही दिवस बँकवर अवलंबून न राहता आपला युपीआय सिस्टीम अपडेट करा.
Sanjay Shirsat : मंत्री शिरसाटांच्या घराबाहेर रिक्षाचालकांचे आंदोलन; गॅसचा पुरवठा होत नसल्याचा आरोप
पश्चिम आशियातील संघर्षामुळे आपल्या वाहनांसाठी गॅसचा पुरवठा होत नसल्याचा आरोप करत, अनेक रिक्षाचालकांनी रविवारी मंत्री संजय शिरसाट यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने केली.
Hardik Pandya Gift : हार्दिक पंड्याने गर्लफ्रेंड माहिका शर्मा हिला एक अत्यंत महागडे आणि लक्झरी गिफ्ट दिले आहे.
उबाठा सेनेच्या शहरप्रमुखाचा भाजपात प्रवेश
डोंबिवली : भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी डोंबिवली पश्चिम देवीचा पाडा येथील गावदेवी मंदिर सभागृहात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) पक्षातील डोंबिवली पश्चिम शहरप्रमुख प्रकाश तेलगोटे यांनी अनेक शिवसैनिकासह भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेश केला.यावेळी भाजपा कल्याण जिल्हाअध्यक्ष नंदू परब, डोंबिवली पश्चिम मंडळ अध्यक्षा प्रिया जोशी, भाजपा गटनेते शशिकांत कांबळे,भाजपा नगरसेवक दीपेश म्हात्रे, जयेश म्हात्रे, नंदू म्हात्रे, हृदयनाथ भोईर, सचिन चिटणीस, जुनी डोंबिवली पश्चिम मंडळ अध्यक्ष पवन पाटील, ज्योती पाटील यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले, भारतीय जनता पार्टी पक्षावर विश्वास ठेवत अनेकजण प्रवेश करत आहेत. देशाचा विकास हाच भारतीय जनता पार्टीचा ध्यास असल्याने अनेक जण पक्ष्यात प्रवेश घेत आहेत.तर भाजपा नगरसेवक दीपेश म्हात्रे म्हणाले की, भारतीय जनता पार्टीत अजून अनेकजण प्रवेश करतील असा मला विश्वास आहे. प्रकाश तेलगोटेयांनी प्रवेशानंतर थेट ठाकरेंची शिवसेनेवर निशाणा साधला. ठाकरेंची शिवसेना पक्षात काम करताना माझ्यावर अन्याय झाला. मला कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत उमेदवारी दिली नाही. ठाकरेंची शिवसेना पक्षात स्थानिक राजकारण होत असल्याचा आरोपहि तेलगोटे यांनी यांनी केला.
US Iran Conflict अमेरिकेचे सैनिक इराणच्या जमिनीवर कुठेही उतरले तरी युद्धाचा मोठा भडका उडणार ?
Boots on Ground, तेहरान : अमेरिका आणि इस्रायल यांनी इराणवर हवाई हल्ले सुरू केले आणि पश्चिम आशियात युद्ध सुरू झाले. या युद्धाला एक महिना झाला. अद्याप युद्ध संपण्याची शक्यता दिसत नाही. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे सैनिक इराणच्या जमिनीवर कुठेही उतरले तरी युद्धाचा मोठा भडका उडेल असा इशारा इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बागेर कलिबाफ यांनी दिला आहे.आम्ही शरणागती पत्करणार नाही, लढणे सोडणार नाही, असे इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बागेर कलिबाफ यांनी सांगितले. इराणचे सशस्त्र दल अमेरिकेच्या सैनिकांना मारण्यासाठी सज्ज असल्याचेही त्यांनी जाहीर केले. अमेरिकेच्या प्रादेशिक मित्र राष्ट्रांनी इराणविरुद्धच्या लष्करी कारवाईला पाठिंबा दिल्यास त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा त्यांनी दिला.इराणच्या सार्वभौमत्वाला आव्हान देणाऱ्या प्रत्येक शत्रूशी दोन हात करून त्याचा बीमोड करण्यासाठी देश सज्ज आहे, असे इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बागेर कलिबाफ म्हणाले. इराणचे सैन्य सज्ज आहे. आम्ही स्वप्नातही शरणागती पत्करणार नाही, असे बागेर कलिबाफ यांनी सांगितले.अमेरिका आणि इस्रायल यांनी २८ फेब्रुवारी २०२६ रोजी इराणवर हवाई हल्ले सुरू केले आणि पश्चिम आशियात युद्ध सुरू झाले. या युद्धाला आज म्हणजेच रविवार २९ मार्च २०२६ रोजी एक महिना पूर्ण झाला. अमेरिकेने एका महिन्यात इराणची बहुतांश लढण्याची क्षमता नष्ट केल्याचा दावा केला आहे. पण होर्मुझ सामुद्रधुनीतून प्रवास करण्याची हिंमत अमेरिका आणि त्यांच्या मित्र देशांपैकी कोणाच्याही युद्धनौकेने तसेच व्यापारी जहाजांनी दाखवलेली नाही. इराणने अमेरिका आणि त्यांच्या मित्र देशांचे एकही जहाज होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकणार नाही असा इशारा देत आपला प्रभाव दाखवून दिला आहे. अमेरिका इराणला दणके दिल्याचे सांगत असली तरी अमेरिकेने महिन्याभरात स्वतःची काही लढाऊ विमानं, हवेतल्या हवेत इंधन भरणारी विमानं, अनेक हवाई सुरक्षा यंत्रणा आणि काही सैनिक गमावले आहेत. इराण अमेरिकेच्या पश्चिम आशियातील सैन्य तळांवर तसेच इस्रायलवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र यांच्याद्वारे वारंवार हल्ले करू लागला आहे. इराणच्या हल्ल्यात झालेल्या हानीबाबत अमेरिकेने अद्याप अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही. पण सूत्रांच्या वृत्तानुसार युद्धामुळे अमेरिकेचेही अनपेक्षित असे मोठे नुकसान झाले आहे. इतर देशांनी अमेरिकेला मदत करू नये यासाठी इराणने मुद्दाम निवडक आखाती देशांतील अमेरिकेच्या सैन्य तळांना लक्ष्य करून हल्ले केले आहेत.
कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले अभिनंदनमुंबई : राज्यातील १०,००० पेक्षा जास्त मंजूर पदसंख्या असलेल्या शासकीय आस्थापनांच्या वर्गवारीतील व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय या आस्थापनेने प्रथम स्थान प्राप्त केले आहे त्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १५० दिवसांच्या सेवाकर्मी कार्यक्रमात या उत्कृष्ट कामगिरीसाठी कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा व सतिश सूर्यवंशी, संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय व त्यांच्या चमूला प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले.कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा यांचे व संचालक सतीश सुर्यवंशी यांचे कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी अभिनंदन केले आहे.सह्याद्री अतिथिगृह येथे '१५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा' कार्यक्रमांतर्गत निवडलेली उत्कृष्ट कार्यालये व सेवाकर्मी कार्यक्रमांतर्गत निवडलेल्या उत्कृष्ट कार्यालय प्रमुखांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात यावेळी माहिती तंत्रज्ञान तथा संस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल, पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्यासह सर्व मंत्रालय विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव सचिव यांच्यासह १५० दिवसांच्या ई- गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट कार्य करणारे प्रमुख अधिकारी प्रत्यक्ष व दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते.१५० दिवसांचा सेवाकर्मी कार्यक्रम सर्व मंत्रालयीन विभाग व त्यांच्या अधिनस्त शासकीय आस्थापना यांच्या स्तरावर यशस्वीपणे राबविण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत आकृतिबंध, सेवा प्रवेश नियम, पदोन्नती, सरळसेवा भरती, गोपनीय अहवाल (MAHAPAR), अनुकंपा भरती, विभागीय चौकशी, आय गॉट प्रशिक्षण व महा इ एचआरएमएस या घटकांच्या अनुषंगाने गुणांकन करण्यात आले.या विशेष मोहिमे अंतर्गत राज्यातील १०,००० पेक्षा जास्त मंजूर पदसंख्या असलेल्या शासकीय आस्थापनांच्या विगतवारीतून व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय या आस्थापनेने प्रथम स्थान प्राप्त केले आहे. व्यवसाय,शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने सेवा विषयक विविध प्रक्रियांमध्ये १०० टक्के कार्यवाही पूर्ण करून प्रशासनातील पारदर्शकता, कार्यक्षमता आणि डिजिटल व्यवस्थापन यामध्ये उच्च दर्जा राखल्याचे या मूल्यांकनातून स्पष्ट झाले आहे.या यशामुळे राज्यातील इतर विभागांसाठीही एक आदर्श निर्माण झाला असून, शासनाच्या सेवा सुधारणा उपक्रमांना नवे बळ मिळाले आहे.
इंधन संकटकाळात भारताची श्रीलंकेला मदत; पंतप्रधान मोदींचे केले आभार व्यक्त
मुंबई : इंधन पुरवठ्याच्या अडचणींना सामोरे जात असलेल्या श्रीलंकेच्या मदतीच्या हाकेला भारताने तत्काळ प्रतिसाद देत मदतीचा हात पुढे केला. भारत सरकारच्या या सकारात्मक भूमिकेबद्दल श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुर कुमार दिसानायके यांनी आभार व्यक्त केले आहेत.राष्ट्रपती दिसानायके यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर याबाबत आपली प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की काही दिवसांपूर्वीच त्यांची भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा झाली होती. या चर्चेदरम्यान मध्यपूर्वेतील संघर्षामुळे श्रीलंकेला इंधन पुरवठ्यात येत असलेल्या अडचणींबाबत त्यांनी माहिती दिली होती. त्यांनी लिहिले की भारताने तात्काळ मदतीचा हात पुढे केला आणि त्यासाठी ते भारताचे आभारी आहेत.शनिवारी कोलंबो येथे ३८,००० मेट्रिक टन इंधन पोहोचले. सध्याच्या संकटाच्या काळात परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या पूर्ण सहकार्याचाही त्यांनी उल्लेख करत त्यांचे आभार मानले.दरम्यान भारताने श्रीलंकेला मदत करण्याची ही पहिलीच वेळ नसून, यापूर्वीही ‘नेबरहुड फर्स्ट’ धोरणांतर्गत अनेकदा मदत केली आहे.
Mumbai News : मुंबईतील डबेवाले ६ दिवस सुट्टीवर; चाकरमान्यांची होणार जेवणाची गैरसोय
Mumbai News :
शहापूर हादरले..! बिबट्याचा तीन युवकांवर जीवघेणा हल्ला; युवक जखमी
karad leopard attack : कराड तालुक्यातील शहापूर येथे बिबट्याने निखिल वांगडे, जयवंत फसाले आणि सौरभ कदम या तीन तरुणांवर हल्ला केला आहे.
भाजपला जबर हादरा; ३ माजी आमदारांसह ६ बडे नेते काँग्रेसमध्ये
Congress vs bjp : उत्तराखंड विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप आणि बसपाच्या ६ नेत्यांनी काँग्रेसचा 'हात' धरला आहे.
MI vs KKR : भारताचे माजी मुख्य निवडकर्ते कृष्णमचारी श्रीकांत यांनी 'हिटमॅन' रोहित शर्माच्या फॉर्मबाबत कोलकात्याला दिलेला इशारा चर्चेत आहेत.
कुर्दिस्तानमध्ये राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानावर ड्रोन हल्ला; अमेरिका-इराण तणाव पुन्हा तीव्र
वॉशिंग्टन : पश्चिम आशियातील संपूर्ण प्रदेशात सध्या परिस्थिती तणावपूर्ण झाली आहे. अशातच इराकच्या कुर्दिस्तानमधून एक ताजे प्रकरण समोर आले असून, तेथे राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानाला लक्ष्य करत मोठा ड्रोन हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामुळे केवळ कुर्दिस्तानच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही मोठी खळबळ उडाली आहे. घटनेनंतर अमेरिका अत्यंत आक्रमक भूमिकेत दिसत आहे, तर इराणही शांत बसलेले नाही. दोन्ही देशांतील जुना वाद पुन्हा एकदा समोर आला आहे.कुर्दिस्तानमधून राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानावर हल्ल्याची बातमी समोर येताच अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने तत्काळ निवेदन जारी केले. अमेरिकेने या हल्ल्याला “भ्याड दहशतवादी कृत्य” असे संबोधत तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. तसेच कुर्दिस्तान आणि इराकच्या सार्वभौमत्व व सुरक्षेसाठी आपण ठामपणे उभे असल्याचे अमेरिकेने स्पष्ट केले. या कटामागील जबाबदार व्यक्तींना उघड करून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी अमेरिकेने इराकी प्रशासनाकडे केली आहे.या एका हल्ल्यामुळे जमिनीवर जितकी भीती निर्माण झाली नाही, त्यापेक्षा अधिक तणाव राजनैतिक पातळीवर निर्माण झाला आहे. हल्ल्यानंतर काही तासांतच अमेरिका आणि इराण यांच्यात आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली. अमेरिकन सुरक्षा अधिकाऱ्यांचा दावा आहे की या हल्ल्यामागे अशा अतिरेकी गटांचा हात आहे, ज्यांना थेट इराणकडून आर्थिक व लष्करी मदत मिळते. प्रदेशात आपला प्रभाव कायम ठेवण्यासाठी हे इराण समर्थित गट अशा प्रकारचे हल्ले करत असल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे.दुसरीकडे, इराणनेही या आरोपांवर मौन न बाळगता अमेरिकेचे दावे ठामपणे फेटाळले आहेत. इराणी परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की कोणतेही ठोस पुरावे नसताना अमेरिकेकडून इराणची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पश्चिम आशियातील स्वतःच्या अपयशांवर पडदा टाकण्यासाठी अमेरिका असे निराधार आरोप करत असल्याचेही इराणने म्हटले आहे.सध्या कुर्दिस्तानमध्ये सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर असून, हल्ल्यामागील धागेदोरे शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र एक गोष्ट स्पष्ट आहे — या एका ड्रोन हल्ल्याने अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव आणि कटुता आणखी वाढवली आहे.
Lock Down in Pakistan : पाकिस्तानची दयनीय अवस्था, युद्धामुळे लागले 'लॉकडाउन'; शहबाज सरकारचा निर्णय
इस्लामाबाद : इराण अमेरिका आणि इस्त्रायल यांच्यात सुरु असलेल्या युद्धामुळे अनेक देशांची तेलवाहू, गॅस वाहू जहाजे ही होर्मूझच्या सामुद्रधुनीत अडकले, आणि देशभर लोकांच्या गॅस आणि तेलाचे वांदे झाले. याच गॅस टंचाईचा सर्वात मोठा फटका हा भारताच्या शेजारील देशाला पाकिस्तानला बसला आहे. इतकी घसरली, अवस्था इतकी दयनीय झाली की पाकिस्तान सरकारने स्मार्ट लॉकडाउन हे लागू केले आहे.पाकिस्तानमधील लॉकडाऊन स्मार्ट लॉकडाऊन याची अंमलबजावणी ४ एप्रिल पासून केली जाणार असून शनिवारी मध्यरात्री १२ वाजल्यापासून रविवारी रात्री पर्यंत अनेक निर्बंध लागू होणार आहेत.तसेच मोटरवे आणि हायवेवर वाहतूक पूर्णपणे बंद ठेवली जाणार आहे,तेल आणि गॅस संकटामुळे निर्णयइराण अमेरिका आणि इस्त्रायलच्या युद्धानंतर अनेक देशानं तेल आणि गॅस संकटाचा सामना हा करावा लागला, परंतु पाकिस्तानवर याचा भयंकर परिणाम झाल्याचे दिसून आले. आधीच महागाई आणि आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानवर तेल आणि गॅस चे संकट ओढावल्याने या देशाचा दुष्काळात तेरावा महिना अशी परिस्तिथी झाली आहे. एलपीजी, पेट्रोल, आणि डिझेलच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली असून याचा थेट परिणाम सर्वसामान्य नागरिकांच्या खर्चावर होत आहे.एलपीजी दरात मोठी वाढऊर्जा संकटाचा थेट परिणाम नागरिकांच्या खिशावर झाला आहे. ११.६७ किलो एलपीजी सिलेंडरची किंमत सुमारे ३९०० रुपयांवरून वाढून ५१३५ रुपयांपर्यंत पोहोचली आहे. यामुळे घरगुती वापरासोबतच एलपीजीवर चालणाऱ्या रिक्षा, बस आणि मिनीबसच्या भाड्यातही वाढ झाली आहे.सामान्य नागरिकांवर आर्थिक ताणदरवाढ आणि इंधन टंचाईमुळे दैनंदिन जीवनावर परिणाम होत असून, विशेषतः निम्न आणि मध्यमवर्गीय नागरिकांना मोठ्या आर्थिक ताणाचा सामना करावा लागत आहे. वाहतूक खर्च वाढल्याने वस्तूंच्या किमतीतही वाढ होण्याची शक्यता आहे.ऊर्जा संकट, महागाई आणि राजकीय दबाव या तिहेरी संकटात सापडलेल्या पाकिस्तानसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. येत्या काही दिवसांत परिस्थिती सुधारेल की पाकिस्तानची आर्थिक स्थिती आणखी डबघाईला येईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.सोशल मीडियावर ही बातमी खोटी असल्याचा दावाअताउल्लाह तारड यांनी सांगितले की त्या नोटिफिकेशनमध्ये वीज आणि इंधन बचतीसाठी आठवड्यात दोन दिवस स्मार्ट लॉकडाउन लागू करण्याचे प्रस्ताव तयार करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले होते. तसेच हे प्रस्ताव आझाद काश्मीर आणि गिलगिट-बाल्टिस्तान सरकारांकडे पाठवण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता.मात्र, अताउल्लाह तारड यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की या सर्व बातम्या खोट्या आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, प्रांतांची संमती मिळाल्यानंतरच पाकिस्तानमध्ये लॉकडाउनसंबंधी कोणतेही अधिकृत नोटिफिकेशन जारी केले जाईल.
Nashik Police : महाराष्ट्र सरकारच्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स कार्यक्रमात नाशिक पोलीस आयुक्तालय सर्वोत्तम ठरले आहे.
Balwant Singh Sodha : टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेच्या पडद्यामागे तिकिटांचा मोठा काळाबाजार सुरू होतो. जो आता उघड झाला आहे.
US-Israel-Iran War : औषधांच्या किमतीही कडाडणार.! इराण युद्धामुळे आरोग्य क्षेत्रालाही बसणार फटका
कंपन्या अचानक किमती वाढवण्याऐवजी उत्पादनाचे वजन किंवा आकार कमी करू शकतात.
Amol Mitkari : रायगडमधील राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात अजित पवार आणि सुनेत्रा पवारांचे फोटो नसल्याने अमोल मिटकरी यांनी सुनील तटकरे यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे.
Supreme Court : “विनाखटला तुरुंगवास ही शिक्षाच..”; सर्वोच्च न्यायालयाने आरोपीला मंजूर केला जामीन
तपास आणि खटला पूर्ण होण्यास विलंब लागत असल्यास केवळ संशयावरून कोणालाही अनिश्चित काळासाठी तुरुंगात ठेवता येणार नाही.
Aryna Sabalenka : टेनिस जगतातील सध्याची सर्वात शक्तीशाली खेळाडू आर्यना सबालेंका हिने मियामी ओपनचे जेतेपद पटकावून इतिहास रचला आहे.
Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदू अशोक खरात प्रकरणात ३०० व्हिडिओ सापडल्याने खळबळ उडाली आहे.
Virat Kohli Drop Catch ; विराट कोहलीने सोपा झेल सुटल्यानंतर अनुष्का शर्माने दिलेली प्रतिक्रिया व्हायरल होत आहे.
सांगली कारागृहात टोळीयुद्ध! १६ कैद्यांकडून दोघांना विटांनी मारहाण
Sangli gangwar : सांगली जिल्हा कारागृहात दोन टोळ्यांमध्ये गँगवॉर झाले आहे. आदित्य पवारच्या १६ जणांच्या टोळीने पवन साळुंखे आणि मेघशाम जाधव यांना विटांनी बेदम मारहाण केली.
मुंबईकरांसाठी मोठी दिलासादायक बातमी! दोन नव्या मेट्रो मार्गिका अखेर सेवेत
मुंबई : अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या मेट्रो प्रकल्पांबाबत अखेर मोठा निर्णय घेण्यात आला आहे. दहिसर ते मिरा-भाईंदर मेट्रो ९ आणि अंधेरी पश्चिम ते मंडाले (मानखुर्द) मेट्रो २B या दोन महत्त्वाच्या मार्गिकांच्या पहिल्या टप्प्यांचे लोकार्पण आता निश्चित झाले असून, येत्या ३ एप्रिलपासून या मार्गांवर मेट्रो धावणार आहे.प्रवाशांची प्रतीक्षा अखेर संपलीदोन्ही मार्गिकांचे काम पूर्ण होऊनही उद्घाटन रखडल्याने प्रवाशांना सेवेचा लाभ घेता येत नव्हता. मात्र आता या दोन्ही टप्प्यांना हिरवा कंदील मिळाल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. मेट्रो ९ अंतर्गत दहिसर ते काशीगाव, तर मेट्रो २B अंतर्गत डायमंड गार्डन ते मंडाले या टप्प्यांवर सेवा सुरू होणार आहे.राजकीय आणि प्रशासकीय कारणांमुळे उशीरया मार्गिकांना सुरक्षा प्रमाणपत्र मिळूनही काही महिन्यांपासून उद्घाटन लांबणीवर पडले होते. निवडणूक आचारसंहिता आणि इतर प्रशासकीय कारणांमुळे हा विलंब झाला असून अखेर आता ३ एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांचीही हा उदघाटनाला उपस्तिथी असणार आहे.मुंबईच्या मेट्रो नेटवर्कला मोठी भरया दोन्ही मार्गिका सुरू झाल्यानंतर मुंबईतील कार्यरत मेट्रो मार्गिकांची संख्या सहा होणार आहे. विशेष म्हणजे, मेट्रो ९ च्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यालाही पहिल्यांदाच मेट्रो सेवा मिळणार आहे.बीकेसीसाठी ‘पॉड टॅक्सी’ प्रकल्पाचीही घोषणायाच कार्यक्रमात बीकेसीतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महत्त्वाच्या ‘पॉड टॅक्सी’ प्रकल्पाचे भूमिपूजनही होणार आहे. वांद्रे पूर्व ते कुर्ला दरम्यान सुमारे ८.८ किमी लांबीचा हा प्रकल्प उभारला जाणार असून, भविष्यातील शहरी वाहतुकीसाठी हा मोठा टप्पा मानला जात आहे.नवीन मेट्रो मार्गिकांमुळे पश्चिम उपनगर आणि पूर्व मुंबईदरम्यानचा प्रवास अधिक जलद, सोयीस्कर आणि किफायतशीर होणार आहे. त्यामुळे रोजच्या प्रवाशांना वाहतूक कोंडीपासून मोठा दिलासा मिळणार आहे.
Australia's Red Sky : पाहावे ते नवलच! ऑस्ट्रेलियाचे आकाश झाले लाल; नेमकं कारण काय?
मुंबई : ऑस्ट्रेलिया मधील पश्चिम भागात अलीकडे एक विलक्षण नैसर्गिक घटना पाहायला मिळाली. २७ मार्च रोजी शार्क बे आणि पिलबारा परिसरात आकाश अचानक गडद लाल रंगाचे दिसू लागले. हा दृश्य इतका वेगळा होता की अनेकांना तो एखाद्या sci - fi चित्रपटातील सीन असल्यासारखा भासला.चक्रीवादळामुळे बदललं आकाशाचं रूपही घटना चक्रीवादळ नरेल मुळे घडली. या शक्तिशाली वादळाने किनाऱ्याकडे सरकत असताना प्रचंड वेगाने वारे वाहू लागले. या वाऱ्यांनी ऑस्ट्रेलियाच्या वाळवंटी भागातील मोठ्या प्रमाणातील धूळ हवेत उचलली. या धुळीत लोहयुक्त कण मोठ्या प्रमाणात असल्याने वातावरणात एक लालसर, किरमिजी छटा निर्माण झाली. त्यामुळे पूर्ण आकाशच रक्तासारखे लाल दिसू लागले.आकाश लाल का दिसलं? विज्ञान काय सांगतंसामान्यतः आकाश निळे दिसते कारण रेले विखुरण या प्रक्रियेमुळे निळ्या प्रकाशाचे जास्त विखुरण होते.मात्र या घटनेत हवेत मोठ्या प्रमाणात धूळकण असल्याने स्कॅटरिंग झाली. या प्रक्रियेत मोठे कण निळा-हिरवा प्रकाश अडवतात आणि लाल रंगाची तरंगलांबी पुढे जाऊ देतात. विशेष म्हणजे या धुळीत असलेले आयर्न ऑक्साइड (हेमॅटाइट) नैसर्गिकरित्या लाल रंग परावर्तित करते. त्यामुळे आकाशाचा रंग अधिक गडद लाल दिसू लागले.इतिहासातील दुर्मिळ हवामान घटनाहवामान तज्ज्ञांच्या मते, हे चक्रीवादळ अत्यंत दुर्मिळ प्रकारात मोडते. ऑस्ट्रेलियाच्या वेगवेगळ्या किनारपट्ट्यांवर प्रभाव टाकणाऱ्या अशा वादळांची संख्या अत्यंत कमी आहे. वादळाने ताशी १२५ किमीपेक्षा अधिक वेगाने वारे वाहिले आणि मुसळधार पावसासह मोठा परिणाम घडवला.धुळीच्या वादळांचे धोकेया सुंदर दिसणाऱ्या दृश्यामागे गंभीर धोकेही दडलेले आहेत.हवेची गुणवत्ता अत्यंत खराब होऊ शकतेश्वसनाच्या समस्या वाढू शकतातवाहतुकीत अडथळे निर्माण होताततज्ज्ञांच्या मते, हवामान बदलामुळे भविष्यात अशा धुळीच्या आणि तीव्र वादळांच्या घटना वाढण्याची शक्यता आहे.नैसर्गिक चमत्कार की इशारा?ऑस्ट्रेलियातील लाल आकाशाने जगभराचे लक्ष वेधले असले, तरी ही घटना केवळ निसर्गाचा चमत्कार नसून हवामानातील बदलांचे संकेतही देणारी आहे. त्यामुळे अशा घटनांकडे केवळ कुतूहल म्हणून नव्हे, तर पर्यावरणाच्या दृष्टीनेही गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आह
Ncp Merger News : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? बड्या नेत्याच्या वक्तव्याने राजकारण फिरणार?
Ncp Merger News : मावळचे आमदार सुनील शेळके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबत मोठे विधान केले आहे.
Virat Kohli Record : आयपीएल २०२६ च्या पहिल्याच सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) संघाने विजयाचा झेंडा फडकावताना क्रिकेट विश्वातील अनेक मोठे विक्रम मोडीत काढले आहेत.
Ashok Kharat : अशोक खरातच्या पोलीस कोठडीत पुन्हा वाढ! सुनावणीवेळी नेमकं काय घडलं? पाहा…
तपास पूर्ण झाला असून पोलीस कोठडी वाढवण्याचे कोणतेही कारण उरलेले नाही, असा दावाही त्यांनी केला.
चॅटबॉटमुळे नागरिकांना अचूक माहिती;
१५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स उपक्रमात शालेय शिक्षण विभागाचा गौरवमुंबई : शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत तंत्रज्ञानाधिष्ठित उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करून नागरिक, विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना व्हॉट्सॲप चॅटबॉटच्या माध्यमातून २४x७ तत्पर, बहुभाषिक आणि सुलभ माहिती उपलब्ध करून देण्यात यश मिळवले आहे. या अभिनव आणि लोकाभिमुख कामगिरीची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विभागाचा गौरव करण्यात आला. डिजिटल प्रशासन, पारदर्शकता आणि सेवा वितरणात गती आणणाऱ्या या उपक्रमामुळे राज्यातील शिक्षण व्यवस्थेला नवे बळ मिळाले आहे.राज्य शासनाच्या १५० दिवसांच्या कृती कार्यक्रमात शालेय शिक्षण विभागाने डिजिटल परिवर्तन, डेटा-आधारित निर्णयप्रक्रिया आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० शी सुसंगत प्रशासन यावर भर देत अनेक महत्त्वपूर्ण सुधारणा राबविल्या. विभागाची अधिकृत संकेतस्थळ व्यवस्था अधिक सक्षम करून धोरणे, परिपत्रके, अधिसूचना, डॅशबोर्ड आणि नागरिकाभिमुख सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करण्यात आल्या. यामुळे माहितीची पारदर्शकता वाढली असून विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि प्रशासकीय अधिकारी यांना माहिती सहज उपलब्ध होत आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे आणि राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली विभागाच्या सर्वांगीण गुणवत्तेत सुधारणा झाली असून ५७ विभागांमधून शालेय शिक्षण विभागाने सहावा क्रमांक मिळवल्याबद्दल प्रधान सचिव रणजितसिंह देओल यांनी समाधान व्यक्त केले आहे. क्षेत्रीय पातळीवर संपूर्ण कामाची अंमलबजावणी करणारे शिक्षण आयुक्त सच्चिंद्रप्रताप सिंह आणि मंत्रालय पातळीवर ई गव्हर्नन्स चे काम पूर्णत्वास नेणारे उपसचिव समीर सावंत यांचे त्यांनी विशेष कौतुक केले आहे .ई-ऑफिस प्रणालीमुळे निर्णयप्रक्रिया सक्षमई-ऑफिस प्रणालीमुळे विभागातील फाईल्सची प्रगती, मंजुरी प्रक्रिया आणि प्रशासकीय कामे पूर्णपणे डिजिटल झाल्याने कार्यक्षमता, उत्तरदायित्व आणि पारदर्शकता वाढली आहे.‘आपले सरकार’ पोर्टलशी जोडून शिक्षणाशी संबंधित विविध सेवा आणि प्रमाणपत्रे ऑनलाइन, वेळेत आणि उत्तरदायी पद्धतीने उपलब्ध करण्यात आली आहेत. यामुळे नागरिकांच्या शासकीय कार्यालयांतील फेऱ्या कमी झाल्या असून सेवा हक्क कायद्याअंतर्गत सेवा वितरण अधिक प्रभावी झाले आहे.परस्परसंवादी डॅशबोर्डविभागाने नोंदणी, उपस्थिती, शैक्षणिक गुणवत्ता, शालेय पायाभूत सुविधा, शिक्षक नियोजन आणि विविध योजनांची अंमलबजावणी यांसारख्या प्रमुख बाबींवर लक्ष ठेवण्यासाठी परस्परसंवादी डॅशबोर्ड विकसित केले आहेत. या डॅशबोर्डच्या साहाय्याने सर्व प्रशासकीय स्तरांवर रिअल-टाइम आढावा घेऊन धोरणात्मक निर्णय अधिक अचूकपणे घेणे शक्य होत आहे.व्हॉट्सॲप चॅटबॉटद्वारे परिणामकारक संवादशालेय शिक्षण विभागाने राबविलेल्या बाबींमध्ये विशेष उल्लेखनीय म्हणजे विभागाने सुरू केलेला अधिकृत एआय-आधारित व्हॉट्सॲप चॅटबॉट हा नागरिकांसाठी एक-खिडकी डिजिटल सहाय्यक ठरत आहे. शाळा व्यवस्थापन, विद्यार्थी कल्याण योजना, शिक्षकांच्या सेवाविषयक शंका, इयत्ता अकरावी प्रवेश, अपार आयडी, परीक्षा व निकाल, तसेच तक्रारी आणि अभिप्राय या सर्व बाबींवर मराठी आणि इंग्रजी भाषेत त्वरित माहिती उपलब्ध होत आहे. त्यामुळे विभाग आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक परिणामकारक झाला आहे.'एआय'मुळे मूल्यमापनाच्या गुणवत्तेत वाढ‘निपुण महाराष्ट्र’ एआय-सक्षम मूल्यमापन ॲपच्या संकल्पना चाचणीने पायाभूत शिक्षणातील मूल्यमापन प्रक्रियेत नवे पर्व सुरू केले आहे. मूल्यमापन पत्रिकांमधील माहितीचे स्वयंचलित संकलन, विद्यार्थ्यांच्या वाचन कौशल्याचे एआय-आधारित परीक्षण, वर्गस्तरीय तात्काळ विश्लेषण आणि वैयक्तिक शैक्षणिक गरजांनुसार बेंचमार्किंग यामुळे मूल्यमापनाची गुणवत्ता वाढली आहे. निवडक जिल्ह्यांतील पायलटमध्ये ९० टक्क्यांहून अधिक अचूकता आणि ३० ते ४० टक्के वेळ बचत नोंदविण्यात आली.याशिवाय शाळांचे जिओ-टॅगिंग करून पायाभूत सुविधांचे अचूक नकाशे तयार करण्यात आले आहेत. यामुळे शाळांच्या भौतिक मालमत्तेची पडताळणी, सुविधांचे नियोजन आणि गरजेनुसार विकासकामांचे प्राधान्य ठरविणे अधिक परिणामकारक झाले आहे.एकूणच या सर्व उपक्रमांमुळे शालेय शिक्षण विभागाने ई-गव्हर्नन्स, सेवा सुलभता, पारदर्शक प्रशासन आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण या चारही स्तरांवर उल्लेखनीय प्रगती साधली असून १५० दिवसांच्या कार्यक्रमात विभागाच्या कामगिरीला राज्यस्तरीय मान्यता मिळाली आहे.
अटल सागरी सेतूवरून २६ महिन्यांत २ कोटी वाहनांचा प्रवास!
मुंबई : मुंबईला वेगाने विकसित होत असलेल्या तिसऱ्या मुंबईशी जोडणाऱ्या अटल सागरी सेतूवरून २६ महिन्यांत २ कोटी वाहनांनी प्रवास केला आहे. यामुळे भारतातील सर्वात लांब सागरी सेतू असलेल्या अटल सेतूनं एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. ही माहिती एमएमआरडीए प्रशासनाने दिली.अटल सागरी सेतूवरून २६ महिन्यांत २ कोटी वाहनांचा प्रवास!भारतातील सर्वात लांब सागरी सेतू असलेल्या अटल सेतूनं आणखी एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे.१३ जानेवारी २०२४ रोजी अटल सेतूचे उद्घाटन झाल्यापासून, या पुलावर २ कोटींहून अधिक वाहनांच्या प्रवासाची नोंद झाली आहे. २७ मार्च २०२६ रोजी… pic.twitter.com/i3RCdyX5eW— MMRDA (@MMRDAOfficial) March 29, 2026नवा उच्चांक गाठणाऱ्या अटल सेतूचे १३ जानेवारी २०२४ रोजी उद्घाटन झाले. उद्घाटन झाल्यापासून, या पुलावर २ कोटींहून अधिक वाहनांच्या प्रवासाची नोंद झाली आहे. वाहनांच्या नोंदणीनुसार २७ मार्च २०२६ रोजी २,००,००,३१६ व्या वाहनाने अटल सेतूवरून प्रवास केला आहे. हा क्षण मुंबई महानगर क्षेत्रातील प्रत्येक प्रवासी, प्रत्येक कुटुंबासाठी विशेष आहे. या माध्यमातून नवीन जीवनवाहिनीनं क्रांती घडवून आणली आहे, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही, असे एमएमआरडीए प्रशासनाने सांगितले.अटल सेतूवरून २६ महिन्यांत... १,८१,९५,७१८ खाजगी वाहनांची पुलावरून वाहतूक. हा आकडा एकूण वाहतुकीच्या ९१% पेक्षा अधिक आहे. ५,९८,५२५ लघु व्यावसायिक वाहनं, मिनीबस, बस आणि ट्रकची पुलावरून वाहतूक. १२,०६,०७३ मध्यम, जड आणि अति-अवजड वाहनांच्या वाहतुकीची नोंद.दुर्गम भाग ते मुख्य शहर, अवघ्या काही मिनिटांत : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेला अटल सेतू दक्षिण मुंबईतील शिवडीला नवी मुंबईतील चिरले या गावाशी जोडतो, ज्यामुळे प्रवासाचा वेळ तासाभरावरून अवघ्या २० मिनिटांवर आला आहे. केवळ दोन वर्षांत या सेतूनं फक्त दळणवळणाची परिभाषा बदलली नाही, तर अर्थव्यवस्थेलाही गती दिली आहे. व्यापार वाढवणं, इंधनाचा खर्च कमी करणं, प्रवास सुलभ करणं आणि जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांचे नवे मानक प्रस्थापित करणं हे या पुलानं साध्य केलं आहे.अटल सेतू हा केवळ एक पूल नाही, तर ती मुंबई महानगर क्षेत्राची जीवनवाहिनी आहे. पुलावरून २ कोटी वाहनांनी प्रवास केल्यानंतर हे सिद्ध झालं आहे की, जेव्हा महाराष्ट्र काही घडवतो त्यात गतिमान भविष्याची झलक पाहायला मिळते, असे एमएमआरडीए प्रशासनाने सांगितले.अटल सेतूचे फायदेअटल सेतू अर्थात मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (MTHL) हा भारतातील सर्वात लांब सागरी पूल आहे, जो दक्षिण मुंबईतील शिवडीला नवी मुंबईतील न्हावा-शेवाशी जोडतो. हा सहा मार्गिकांचा पूल आहे. शिवडी (मुंबई) ते न्हावा-शेवा (नवी मुंबई/चिर्ले) पर्यंतच्या भागाला जोडणारा हा पूल एकूण २१.८ किमी लांबीचा आहे. पुलाचा १६.५ किमीचा भाग समुद्रावर आणि ५.५ किमीचा भाग जमिनीवर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुलाचे उद्घाटन झाले. हा पूल दक्षिण मुंबई, नवी मुंबई आणि जेएनपीटी (JNPT) बंदराला एकमेकांशी जोडतो. फक्त मुंबईच नाही तर संपूर्ण मुंबई महानगर क्षेत्राच्या आर्थिक विकासाला गती देण्यात अटल सेतू एका प्रमुख सहाय्यकाची भूमिका बजावतो.
इंदुमिल स्मारक उभारणीसाठी सरकारचा पुढाकार महत्वाचा..
गाझियाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या कामाची उपाध्यक्षांसह शिस्थमंडळाने केली पाहणी..वाढीव खर्चातील तफावत कंत्राटदाराला देत सरकारने डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याचा मार्ग मोकळा करावा..मुख्यमंत्र्यांची भेट घेत स्मारकाच्या कामाला गती देण्याची करणार मागणी..उपाध्यक्ष अण्णा बनसोडे याचे आश्वासन..मुंबई : विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे हे दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर असून, या दौऱ्यादरम्यान त्यांनी राम सुतार यांच्या गाझियाबाद येथील कारखान्यात सुरू असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य पुतळ्याच्या कामाची पाहणी केली. मुंबईतील इंदू मिल येथे उभारल्या जाणाऱ्या या पुतळ्याचे काम सध्या प्रगतीपथावर आहे.या पाहणीवेळी राष्ट्रवादी सामाजिक न्याय सेलचे पदाधिकारी व इतर शिष्टमंडळ उपस्थित होते. २०१८ साली या पुतळ्याच्या उभारणीचे कंत्राट राम सुतार यांच्या कारखान्याला देण्यात आले होते. मात्र, २०२६ पर्यंत या प्रकल्पाच्या खर्चात वाढ झाल्याने शासनाने किंमतीतील तफावत तातडीने कंत्राटदाराला देण्याची गरज असल्याचे अण्णा बनसोडे यांनी स्पष्ट केले.यासंदर्भात त्यांनी लवकरच मुख्यमंत्री यांची भेट घेऊन प्रकल्पातील आर्थिक तफावत दूर करण्यासोबतच MMRDA कडून कंत्राटदारांना वेळेत निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करणार असल्याचे सांगितले.दरम्यान, ३५० फूट उंचीच्या या भव्य पुतळ्यापैकी सध्या सुमारे ५० फूट काम पूर्ण झाले आहे. पुतळ्याचे बूट आणि पॅंटचा काही भाग तयार झाला असून उर्वरित काम गाझियाबाद येथील कारखान्यात सुरू आहे. हा प्रकल्प २०२७ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते.मात्र स्मारकाच्या कामाला २०२८ उजाडणार असल्याचे चित्र आहे.या स्मारकाबाबत बोलताना अण्णा बनसोडे यांनी सांगितले की, इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक हे भविष्यात एक मोठे पर्यटन आणि प्रेरणास्थळ ठरणार आहे. देश-विदेशातील लाखो अनुयायांसाठी हे केंद्र आकर्षणाचे ठिकाण ठरेल, तसेच बाबासाहेबांच्या विचारांचे जतन करणारे एक महत्त्वपूर्ण स्थळ म्हणूनही ते ओळखले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Top 10 News : Top 10 News : जगावर पुन्हा कोरोनाचं संकट? ते दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार?..; वाचा आजच्या टॉप दहा बातम्या
LPG cylinders : मुंबईत २७ एलपीजी सिलिंडरची चोरी; संशयित व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात
या चोरीमागे असलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची अनेक पथके तयार करण्यात आली आहेत.
MI vs KKR : पाचवेळा चॅम्पियन राहिलेला मुंबई इंडियन्स आणि तीनवेळा जेतेपद पटकावणारा कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणारी ही लढत क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार आहे
Kapil Sibal : “मोदी सरकारसाठी राष्ट्र प्रथम नव्हे”–कपिल सिब्बल
मोदी सरकारकडे राष्ट्र प्रथम या दृष्टिकोनाचा अभाव आहे. केंद्रातील सत्ताधाऱ्यांचे केवळ निवडणुका जिंकण्यावर लक्ष केंद्रित असते
Akola News : अकोल्यात गॅसच्या रांगेत वृद्धाचा मृत्यू; नागरिकांमध्ये संतापाची लाट
राज्यात गॅसचा तुटवड्यामुळे अनेक जिल्ह्यात गॅस सिलिंडरसाठी रांगाच रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
Ishan Kishan Statement : सनरायझर्स हैदराबादचा (SRH) नवा कर्णधार इशान किशनने आपल्या पहिल्या पराभवावर प्रतिक्रिया दिली.
नवी दिल्ली : जागतिक संघर्ष आणि ऊर्जा संकटावर चिंता व्यक्त करत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या 'मन की बात' कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांना पुन्हा एकदा अफवांकडे दुर्लक्ष करून एकता राखण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, हा मार्च महिना जागतिक पातळीवर खूपच उलथापालथींचा होता. आपल्या सगळ्यांच्या लक्षात आहे, की भूतकाळात कोविडमुळे साऱ्या जगाला दीर्घकाळ अनेक अडचणींमधून जावं लागलं. आपल्या सगळ्यांनाच अपेक्षा होती की, कोरोनाच्या संकटातून बाहेर पडल्यावर जग नव्या दमानं प्रगतीच्या वाटेवर पुढे जात राहील. पण जगाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये सतत युद्ध आणि संघर्षाची परिस्थिती उत्पन्न होत राहिली. सध्या आपल्या शेजारी एक महिन्यापासून भीषण युद्ध चालू आहे. आपल्या लक्षावधी कुटुंबांचे सगे-सोयरे या देशांमध्ये राहतात, विशेषतः आखाती देशांमध्ये काम करतात. अशा एक कोटींहून अधिक भारतीयांना सर्वतोपरी मदत करण्याबद्दल, मी आखाती देशांना विशेष धन्यवाद देतो.ज्या भागात आत्ता युद्ध चालू आहे, तो भाग आपल्या ऊर्जा- गरजा भागवणारं खूप मोठं केंद्र आहे. त्यामुळे जगभरात पेट्रोल आणि डिझेलच्या बाबतीत संकटाची परिस्थिती निर्माण होत आहे. आपले जागतिक संबंध, निरनिराळ्या देशांकडून मिळत असलेला सहयोग, आणि गेल्या दशकभरात उभं राहिलेलं देशाचं सामर्थ्य, यांच्या बळावर भारत या परिस्थितीचा नेटानं सामना करत आहे.हा निश्चितच आह्वानात्मक काळ आहे. 'मन की बात'च्या माध्यमातून मी आज सर्व देशवासीयांना पुन्हा एकदा आग्रह करेन, की आपल्याला एकजुटीनं या आह्वानात्मक स्थितीतून बाहेर पडायचं आहे. जे लोक याही बाबतीत राजकारण करत आहेत, त्यांनी राजकारण करू नये. हा देशाच्या १४० कोटी देशवासीयांच्या हिताशी संबंधित विषय आहे, आणि यामध्ये स्वार्थाने बरबटलेल्या राजकारणाला अजिबात थारा नाही. अशा स्थितीत जे लोक अफवा पसरवत आहेत, ते देशाचं खूप मोठं नुकसान करत आहेत. मी सर्व देशवासीयांना आवाहन करेन की त्यांनी जागरूक राहावं, अफवांना बळी पडू नये. सरकारकडून आपल्याला सातत्याने जी माहिती दिली जात आहे तिच्यावर विश्वास ठेवा आणि तिच्यावरच विश्वास ठेवून कोणतंही पाऊल उचला. मला दर वेळेप्रमाणेच याही वेळी खात्री आहे, की जसा आपल्या देशाने 140 कोटी देशवासीयांच्या सामर्थ्यावर जुन्या संकटांचा पाडाव केला होता, तसं यावेळीही आपण सर्व मिळून या अवघड परिस्थितीतून अतिशय चांगल्या पद्धतीने बाहेर पडू.पंतप्रधान मोदींनी त्यांच्या 'मन की बात' कार्यक्रमातून देशाच्या हस्तलिखित वारशाच्या जतनकार्यात जनतेच्या सहभागाचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, 'ज्ञान भारतम' उपक्रमांतर्गत हस्तलिखिते जतन केली जात आहेत आणि त्यांच्याशी संबंधित माहिती गोळा केली जात आहे. या उद्देशासाठी एक ॲपदेखील विकसित करण्यात आले आहे. त्यांनी लोकांना त्यांच्या ताब्यात असलेल्या जतन केलेल्या हस्तलिखितांविषयी माहिती देण्याचे आवाहन केले.या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांनी देशातील खेळांबद्दल वाढता उत्साह आणि त्यातील कामगिरीचाही उल्लेख केला.देशभरच्या क्रिकेटच्या चाहत्यांसाठी हा महिना एकदम जोशपूर्ण आणि उत्साही राहिला आहे. भारतानं जेव्हा टी ट्वेंटी विश्वचषकामध्ये ऐतिहासिक विजय मिळवला तेव्हा देशाच्या कानाकोपऱ्यात आनंदाच्या लाटा उसळल्या. आपल्या संघाच्या या शानदार यशाचा आपल्या सर्वांना खूप अभिमान वाटतो. गेल्या महिन्याअखेरीस कर्नाटकात हुबळीमध्ये एक खूपच रोमहर्षक सामना बघायला मिळाला. हा सामना जिंकून जम्मू-काश्मीरच्या क्रिकेट टीमनं रणजी करंडकावर आपलं नाव कोरलं. सर्वाधिक आनंदाची गोष्ट ही की जवळपास सात दशकांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर या टीमनं पहिल्यांदा रणजी करंडक जिंकला. हे अभूतपूर्व यश म्हणजे, खेळाडूंनी अनेक वर्षं सातत्याने केलेल्या कष्टांचं फळ आहे. संघाचा कर्णधार पारस डोगरा यानं अद्भुत कौशल्य दाखवलं. आपल्या नेतृत्वाने त्यानं या विजयात अभूतपूर्व योगदान दिलं. रणजीच्या सीझनमध्ये 60 गडी बाद करणारा काश्मीरचा तरुण गोलंदाज आकिब नबी याच्याही कामगिरीचा आज देशात बोलबाला आहे. या विजयामुळे संघाचे खेळाडू आणि प्रशिक्षक वर्गाबरोबरच जम्मू-काश्मीरची जनताही अतिशय रोमांचित झाली आहे. क्रिकेटच्या मैदानातल्या या शानदार कामगिरीमुळे तिथल्या तरुणांमध्ये खेळांप्रती उत्साह अधिकच वाढला आहे. यामुळे येत्या काळात अनेक तरुणांना क्रीडाक्षेत्र आपलंसं करण्यासाठी प्रेरणा मिळेल. जम्मू-काश्मीरच्या लोकांमध्ये खेळांविषयी कमालीची जोशभावना आहे. आता हे मोठमोठ्या क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाचं केंद्रही होत चाललं आहे याचा मला आनंद आहे. खेलो इंडिया हिवाळी खेळांसाठी गुलमर्गनं तर आधीच आपली ओळख निर्माण केली आहे. फुटबॉलसारखे खेळही इथल्या तरुणांमध्ये बऱ्यापैकी लोकप्रिय आहेत. येत्या काळातही जम्मू-काश्मीरच्या खेळाडूंच्या विजयपताका अशाच फडकत राहतील अशी मला आशा वाटते.मी नेहमी म्हणतो - जो खेळेल तो फुलेल. पूर्वी फारशा लोकप्रिय नसलेल्या खेळांनाही आता आपल्या देशाचे तरुण आपलंसं करत आहेत, हे बघून मला आनंद वाटतो. गुलवीर सिंह या उत्तर प्रदेशच्या प्रतिभाशाली अॅथलीटने अशाच एका खेळात कमाल करून दाखवली आहे. अगदी काही आठवड्यांपूर्वीच न्यूयॉर्क सिटी हाफ मॅरेथॉनमध्ये तिसरा क्रमांक पटकावून त्यानं इतिहास घडवला आहे. एका तासापेक्षाही कमी वेळात हाफ मॅरेथॉन पूर्ण करणारे ते पहिले भारतीय ॲथलीट ठरले आहेत. आपली स्क्वाश खेळाडू कन्या अनाहत सिंह हिनं स्क्वाश ऑन फायर ओपनच्या मोठ्या आंतरराष्ट्रीय अजिंक्यपदावर नाव कोरलं. अवघ्या सतरा वर्षांच्या वयातच तिनं हे यश मिळवलं. याबरोबरच पीएसए जागतिक क्रमवारीत अव्वल २० मध्ये स्थान मिळवणारी ती सर्वात कमी वयाची आशियाई महिला खेळाडू ठरली आहे. मला अस्मिता अॅथलॅटिक्स लीग बद्दलही कळलं आहे. यात ८ मार्चला महिला दिनानिमित्त अनेक स्पोर्टिंग इव्हेंट आयोजित करण्यात आले होते. लीग मध्ये जवळपास दोन लाख मुलींनी भाग घेतला. देशात होत असलेल्या या क्रीडाक्रांतीमध्ये भारताची स्त्रीशक्ती महत्त्वाची भूमिका निभावत आहे, हे बघून छान वाटतं.पंतप्रधानांनी निरोगी जीवनशैलीच्या महत्त्वावर जोर दिला. त्यांनी नियमित व्यायाम, योग आणि संतुलित आहाराच्या गरजेवर भर दिला. एका प्रसंगी, त्यांनी सांगितले की त्यांनी इंस्टाग्रामवरील कंटेंट क्रिएटर युवराज दुआ यांच्या विनंतीला प्रतिसाद दिला, ज्याचा त्यांच्या वडिलांवर सकारात्मक परिणाम झाला आणि त्यांनी साखरेचे सेवन कमी केले.त्यांनी बंगळूरु येथील 'प्रयोग इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन रिसर्च'च्या प्रयत्नांची प्रशंसा केली. ते म्हणाले की, ही संस्था मुलांना विज्ञानातील व्यावहारिक अनुभवांमध्ये गुंतवून ठेवत आहे. त्यांनी नागा समाजाच्या 'मोरुंग' प्रणालीचाही उल्लेख केला, जी परंपरा आणि आधुनिक शिक्षणाचा संगम साधते.पंतप्रधानांनी उन्हाळा लक्षात घेऊन जलसंधारणाच्या प्रयत्नांवरही प्रकाश टाकला. त्यांनी त्रिपुरातील वांगमुन गाव, छत्तीसगडमधील कोरिया जिल्हा आणि तेलंगणातील मुधिगुंटा गाव यांची उदाहरणे दिली, जिथे पावसाचे पाणी आणि भूजल वाचवण्यासाठी प्रभावी प्रयत्न केले जात आहेत. पंतप्रधानांनी मच्छिमारांचे राहणीमान गुणात्मकदृष्ट्या सुधारण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांचा उल्लेख केला. ते म्हणाले की, या क्षेत्रात नवनवीन शोध लागत आहेत आणि मच्छिमार आत्मनिर्भर होत आहेत.पंतप्रधानांनी माहिती दिली की, वाराणसीमध्ये नुकताच एका तासात २,५१,००० हून अधिक रोपे लावून एक जागतिक विक्रम प्रस्थापित झाला आहे. दरम्यान, नागालँडमधील चिझामी गावातील महिला १५० हून अधिक पारंपरिक बियाण्यांच्या जातींचे जतन करत आहेत. सामूहिक प्रयत्नांतून, ही बियाणे एका सामुदायिक बीज बँकेत जतन केली जात आहेत.'प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजने'च्या माध्यमातून देशभरातील लोकांच्या जीवनात घडवून आणल्या जात असलेल्या सकारात्मक बदलांच्या विषयाचाही त्यांनी समावेश केला.'माय इंडिया' उपक्रमांतर्गत युवकांना राष्ट्रउभारणीशी कसे जोडले जात आहे, हे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. याच्या माध्यमातून, नुकत्याच पार पडलेल्या 'बजेट क्वेस्ट'मधून युवकांची मते समोर आली, जी देशाच्या विकासातील त्यांच्या सक्रिय सहभागाचे प्रतिबिंब आहेत.
रामनवमी भंडाऱ्यासाठी मंत्री लोढा यांच्याकडून मंडळांना गॅसची मद
गिरगावच्या ओम श्री सदगुरू साईनाथ मंडळाकडून मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे आभारधार्मिक कार्यात सहकार्याची आवश्यकता असल्यास संपर्क करा, मंत्री लोढा यांचे कार्यकर्त्यांना आवाहनमुंबई : गिरगाव येथील ओम श्री सदगुरू साईनाथ रामनवमी पदयात्रा मंडळाच्या वतीने आयोजित भंडाऱ्यासाठी आवश्यक असलेल्या गॅसची व्यवस्था करून दिल्याबद्दल राज्याचे कॅबिनेट मंगलप्रभात लोढा यांचे मंडळातर्फे आभार व्यक्त करण्यात आले. रामनवमी निमित्त मंडळाच्या वतीने दरवर्षी पदयात्रा आणि भंडाऱ्याचे आयोजन करण्यात येते. यंदाही मोठ्या संख्येने भाविक सहभागी होणार असल्याने भंडाऱ्याची व्यापक तयारी करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर गॅसची आवश्यकता भासल्याने मंडळाने मंत्री लोढा यांच्याकडे विनंती केली होती असे मंडळच्या उत्सव समितीचे पालखी प्रमुख राजू बोडके यांनी सांगितले.इराण आणि अमेरिकादरम्यान सुरू असलेल्या युद्धामुळे सध्या राज्यात इंधन पुरवठ्यावर परिणाम झाल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर भंडारा कार्यक्रम होणार की नाही, अशा चिंतेत कार्यकर्ते होते. मात्र मंत्री लोढा यांनी तात्काळ दखल घेत संबंधित यंत्रणेला निर्देश देत गॅसची व्यवस्था करून दिली. त्यामुळे भंडाऱ्याचे नियोजन सुरळीत पार पडण्यास मदत झाली असल्याचे बोडके यांनी सांगितले.यासंदर्भात मंत्री लोढा यांना विचारले असता ते म्हणाले की, आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशभरात नागरिकांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेतली जात असल्याचे म्हटले आहे. कुठेही इंधन पुरवठ्यात बाधा येणार नाही. तसेच आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राज्यात आवश्यक तेवढा गॅसचा साठा उपलब्ध आहे. अफवांवर विश्वास ठेवू नये असे जनतेला आवाहन केले आहे. धार्मिक कार्यात मला माझ्या मलबार हिल मतदार संघात सहकार्य करता आले, याचा मला अत्याधिक आनंद असल्याचेही लोढा यांनी सांगितले. त्याचबरोबर कोणत्याही धार्मिक कार्यात सहकार्याची गरज असल्यास निःसंकोचपणे माझ्या मलबार हिल विधानसभेतील कार्यकर्त्यांनी संपर्क साधावा, असे आवाहन मंत्री लोढा यांनी केले आहे. काही लोक केवळ या स्थितीत राजकारण करू पाहत आहेत. स्थानिक आमदार आणि मंत्री या नात्याने समरसता जपत मी धार्मिक कार्यात सहकार्य करत असल्याचे ही मंत्री लोढा यांनी स्पष्ट केले.
21 प्रवर्गातील दिव्यांगांना शासन योजनांचा लाभ
सचिव तुकाराम मुंढेमुंबई : दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, 2016 अंतर्गत निर्धारित करण्यात आलेल्या सर्व 21 प्रवर्गातील दिव्यांग व्यक्तींना राज्य शासन तसेच तत्सम यंत्रणांच्या विविध योजना, सवलती, लाभ, अनुदान व इतर सुविधांसाठी पात्र ठरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय दिव्यांग व्यक्तींच्या सर्वसमावेशक सक्षमीकरणाच्या दिशेने महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार असून, राज्यातील अधिकाधिक दिव्यांग नागरिकांना शासनाच्या योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळण्यास मोठी चालना मिळणार आहे, अशी माहिती दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी दिली.सचिव तुकाराम मुंढे म्हणाले, या निर्णयामुळे यापूर्वी 1995 च्या अधिनियमानुसार केवळ 7 प्रवर्गापुरते मर्यादित असलेले लाभ आता विस्तारून सर्व 21 प्रकारच्या दिव्यांग व्यक्तींना उपलब्ध होणार आहेत. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, 2026 लागू झाल्यानंतरही काही शासकीय कार्यालयांमध्ये जुन्या निकषांनुसारच लाभ दिला जात असल्याचे आढळून आले होते. त्यामुळे नव्याने समाविष्ट प्रवर्गातील दिव्यांगांना योजनांचा लाभ मिळण्यात अडचणी येत होत्या. या पार्श्वभूमीवर शासनाने स्पष्ट, एकसंघ व सर्वसमावेशक धोरण निश्चित करत हा निर्णय घेतला आहे.या निर्णयानुसार अस्थिव्यंग, कुष्ठरोगमुक्त, मेंदूचा पक्षाघात, शारीरिक वाढ खुंटणे, स्नायूंची विकृती, आम्ल हल्ला पिडीत, पुर्णतः अंधत्व, अंशतः अंध, कर्णबधिरता, वाचा/भाषा दोष, बौद्धिक अक्षम, विशिष्ट अध्ययन अक्षम, स्वमग्नता (Autism), मानसिक आजार, मल्टिपल स्क्लेरोसिस, पार्किन्सन, हिमोफिलिया, थॅलेसेमिया, सिकल सेल, मज्जासंस्थेचे तीव्र आजार आणि बहुविकलांग अशा सर्व 21 प्रवर्गांचा समावेश करण्यात आला आहे.हा लाभ घेण्यासाठी संबंधित व्यक्तीकडे किमान 40 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक दिव्यांगत्व असल्याचे सक्षम प्राधिकरणाने प्रमाणित केलेले वैध वैश्विक दिव्यांग ओळखपत्र (UDID) असणे आवश्यक आहे. तसेच कायमस्वरूपी दिव्यांगत्व प्रमाणपत्रधारकांनाच योजनांचा लाभ मिळणार असून, तात्पुरत्या प्रमाणपत्रधारकांना लाभ अनुज्ञेय राहणार नाही.या निर्णयामुळे दिव्यांग व्यक्तींना गृहनिर्माण योजना, विविध शिष्यवृत्ती योजना, दिव्यांग विवाह योजना, गुणवत्ता पुरस्कार, प्रशिक्षित दिव्यांग व्यक्तीना स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य, दिव्यांग व्यक्तींना साधने व उपकरणांसाठी आर्थिक सहाय्य, राज्य पुरस्कार योजना, बीज भांडवल योजना तसेच इतर विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळणार आहे.हा निर्णय सर्व मंत्रालयीन विभाग, त्यांच्या नियंत्रणाखालील कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, महामंडळे व अनुदानित संस्थांना लागू राहणार असून संबंधित विभागांनी आवश्यकतेनुसार नवीन योजना आखून स्वतंत्र शासन निर्णय जारी करावेत, असे निर्देश देण्यात आले आहेत.हा निर्णय दिव्यांग व्यक्तींच्या सर्वसमावेशक विकासासाठी आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. याबाबतचा शासन निर्णय दिव्यांग सक्षमीकरण विभागाने निर्गमित केला असून महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
Tuljabhavani Temple : चैत्र पौर्णिमा महोत्सवानिमित्त २२ तास खुलं राहणार तुळजाभवानीचं दर्शन
तुळजापूर : तुळजाभवानी देवीच्या मंदिरात यंदा विशेष दर्शन व्यवस्था करण्यात आली असून चैत्र पौर्णिमा महोत्सवानिमित्त तुळजापूर येथील भाविकांची मोठ्या प्रमाणावर होणारी गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनानं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महोत्सव काळात मंदिर २२ तास खुलं ठेवण्यात येणार आहे. तसेच भाविकांना सुरळीत व सुलभ दर्शन मिळावं याकरीता उद्यापासून मंदिरात प्रवेशासाठी भक्तांना बीडकर पायऱ्या मार्गाचा वापर करता येणार आहे.श्री तुळजाभवानी मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही चैत्र पौर्णिमा महोत्सव ३० मार्च २०२६ ते ३ एप्रिल २०२६ या कालावधीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी मानल्या जाणाऱ्या आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी यावेळी देशभरातून लाखो भाविक तुळजापूरमध्ये दाखल होत असतात.यंदा सलग सुट्ट्या असल्यानं भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता असल्यामुळे मंदिर संस्थानकडून विशेष नियोजन करण्यात आलं असनू ३१ मार्च रोजी मध्यरात्री १ वाजल्यापासून ते ५ एप्रिल रोजी रात्री ११ वाजेपर्यंत सर्व भाविकांना बीडकर पायऱ्यांमार्फत मंदिरात प्रवेश देण्यात येणार आहे.या महोत्सवानिमित्त काही महत्त्वाचे बदल करण्यात आले असनू याकाळात व्हीआयपी दर्शन आणि रेफरल दर्शन पास पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच ३१ मार्च ते २ एप्रिल दरम्यान ५०० रुपयांचा स्पेशल देणगी दर्शन पासही बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर संस्थाननं घेतला आहे. दरम्यान २०० रुपयांचं सशुल्क देणगी दर्शन पासधारक, अभिषेक पासधारक तसेच धर्म दर्शन आणि मुख दर्शन घेणाऱ्या सर्व भाविकांना बीडकर पायऱ्या मार्गेच दर्शनासाठी प्रवेश दिला जाणार आहे.चैत्र पौर्णिमा महोत्सव भक्तांसाठी अत्यंत श्रद्धेचा आणि उत्साहाचा सोहळा मानला जातो. त्यामुळे या उत्सवा दरम्यान भाविकांना तूळजाभवानी देवीचं योग्य दर्शन घेता यावं याकरिता विशेष दर्शन व्यवस्था करण्यात आली आहे.
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; बड्या नेत्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश
Uddhav Thackeray : कल्याण-डोंबिवलीत ठाकरे सेनेचे शहरप्रमुख प्रकाश तेलगोटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
Matka King : विजय वर्माच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना सरप्राईज, १७ एप्रिलला रिलीज होणार ‘मटका किंग’
मुंबई : अभिनेता विजय वर्माच्या वाढदिवसानिमित्त भारतातील सर्वात लोकप्रिय प्राईम व्हिडिओनं विजयच्या आगामी ओरिजिनल ड्रामा सीरिज ‘मटका किंग’ वर्ल्डवाइड प्रीमियरची तारीख जाहीर केली असून येत्या १७ एप्रिल २०२६ रोजी ही सिरीज रिलीज होणार आहे.अभय कोरन्ने यांनी लिहिलेली आणि नागराज पोपटराव मंजुळे यांनी तयार करून दिग्दर्शित केलेली ही सिरीज १९६० च्या दशकातील बदलत्या बॉम्बेवर आधारित आहे. ही कथा एका कापूस व्यापाऱ्याभोवती फिरते, जो ‘मटका’ नावाची नवी जुगार प्रणाली सुरू करतो आणि श्रीमंतांच्या या छंदाला संपूर्ण देशभर पसरवतो.ही सिरीज सिद्धार्थ रॉय कपूर, नागराज पोपटराव मंजुळे, गार्गी कुलकर्णी, अश्विनी सिदवानी आणि आशीष आर्यन यांनी ‘रॉय कपूर फिल्म्स’, ‘आटपाट’ आणि ‘SMR प्रोडक्शन्स’च्या बॅनरखाली निर्मित केली आहे.या सिरीजमध्ये विजय वर्मा, कृतिका कामरा, सई ताम्हणकर, सिद्धार्थ जाधव, भूपेंद्र जादावत आणि गुलशन ग्रोवर मुख्य भूमिकांमध्ये झळकणार आहेत.यांच्यासोबत विनीत कुमार सिंह, भरत जाधव, गिरीश कुलकर्णी, जेमी लीवर, किशोर कदम, सायरस साहूकार, अर्पिता सेठिया, संभाजी तांगडे, इश्तियाक खान, संजीव जोटांगिया आणि सिमरन अश्विनी महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.या सिरीजमद्ये १९६० च्या दशकातील बदलत्या बॉम्बेमध्ये स्वतःची ओळख आणि मान-सन्मान मिळवण्यासाठी झटणारा एक हुशार आणि मेहनती कापूस व्यापाऱ्याची कथा आहे.ज्याची भूमिका विजय वर्मा यांनी साकारली आहे.गर्दीने गजबजलेले बाजार, चाळी आणि बदलणारी सत्ता यांच्यात ही कथा उभी राहते. एका महत्त्वकांक्षी कल्पनेपासून सुरू होणारी ही कथा हळूहळू स्वतःची वेगळी ओळख निर्माण करते आणि समाजातील सर्व स्तरातील लोकांना आकर्षित करते.जसजशी अपेक्षा आणि जोखीम वाढत जाते, तशी ही सीरिज महत्त्वाकांक्षा, सत्ता आणि स्वतःची जागा निर्माण करण्याच्या रोमांचक प्रवासात रूपांतरित होते. ही सिरीज १७ एप्रिलपासून भारतासह जगभरातील २४० पेक्षा अधिक देशांमध्ये फक्त प्राइम व्हिडिओवर स्ट्रीम होणार आहे.
३,५०० मरीन सैनिकांसह अमेरिकेची यूएसएस त्रिपोली युद्धनौका युद्धक्षेत्रात दाखल
वॉशिंग्टन : पश्चिम आशियामध्ये सुरू असलेला संघर्ष दिवसेंदिवस अधिक भीषण होत चालला आहे. अमेरिका आणि इस्रायलच्या तीव्र हल्ल्यांवर इराणदेखील इस्रायल आणि आखाती देशांमधील अमेरिकन लष्करी तळांवर जोरदार प्रत्युत्तर देत आहे. हा संघर्ष आता ३०व्या दिवशी पोहोचला असून या तणावपूर्ण परिस्थितीत अमेरिकेने आपले विशाल युद्धनौक यूएसएस त्रिपोली तैनात केले आहे. सुमारे ३,५०० मरीन सैनिकांसह ते अमेरिकन सेंट्रल कमांड (सेंटकॉम) क्षेत्रात दाखल झाले आहे.ही युद्धनौका जपानमधील आपल्या मूळ बंदरातून रवाना झाली असून आता सेंटकॉम क्षेत्रात सक्रिय झाली आहे. यूएसएस त्रिपोली ही अमेरिका-श्रेणीतील उभयचर हल्लेखोर युद्धनौका असून आकाराने ती जवळपास विमानवाहू नौकेइतकी मोठी आहे. या जहाजावर हेलिकॉप्टर, MV-22 ऑस्प्रे विमान तसेच F-35B जॉइंट स्ट्राइक फायटर जेट्स तैनात करता येतात. जहाजावर त्रिपोली उभयचर तत्पर गट आणि 31वी मरीन एक्स्पिडिशनरी युनिट तैनात आहे.हा संघर्ष सुरू होऊन एक महिना झाल्यानंतर अमेरिकेचे हे पाऊल केवळ लष्करी ताकदीचे प्रदर्शन नसून संभाव्य मोठ्या लष्करी कारवाईची तयारी मानली जात आहे. आधुनिक शस्त्रसामग्री आणि लढाऊ विमानांनी सज्ज असलेली ही नौका अमेरिकेची युद्धक्षमता अनेक पटींनी वाढवते. यावरून अमेरिका या संघर्षात आपला प्रभाव आणि पकड अधिक मजबूत करण्यासाठी पूर्ण ताकद लावत असल्याचे स्पष्ट होते.या जहाजाच्या पश्चिम आशियात आगमनानंतर अमेरिकेची लष्करी उपस्थिती आणखी मजबूत झाली आहे. आधीपासूनच या प्रदेशात यूएसएस निमित्झ आणि यूएसएस जेराल्ड आर. फोर्ड या विमानवाहू नौका तैनात आहेत. मात्र, यूएसएस जेराल्ड आर. फोर्डला अलीकडे लागलेल्या आगीमुळे आणि दुरुस्तीच्या कामामुळे पोर्ट ऑफ स्प्लिट येथे थांबवण्यात आले असून ते सुमारे एक वर्ष युद्ध क्षेत्रात कार्यरत राहू शकणार नाही.याशिवाय यूएसएस जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश ही विमानवाहू नौकाही नॉरफोकहून पश्चिम आशियाकडे रवाना झाली आहे. ती तैनात झाल्यास या भागातील अमेरिकन विमानवाहू नौकांची संख्या तीन होईल.दरम्यान, सेंटकॉमने आपल्या पोस्टमध्ये इराणविरोधातील अमेरिकेच्या कारवायांची माहिती दिली आहे. पोस्टनुसार २८ फेब्रुवारीनंतर अमेरिकन सैन्याने इराणच्या लष्करी ठिकाणांवर हल्ले केले असून ११,००० हून अधिक युद्धविमान उड्डाणे करण्यात आली आणि १५० पेक्षा जास्त इराणी जहाजांचे नुकसान किंवा विनाश करण्यात आला. तसेच अमेरिकेने इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स, क्षेपणास्त्र तळ, नौदल जहाजे आणि शस्त्रनिर्मिती केंद्रांना लक्ष्य केले आहे.
विवोचा व्ही70 एफई स्मार्टफोन २ एप्रिलला होणार लाँच
मुंबई : विवो कंपनीनं आपल्या व्ही70 सिरीज अंतर्गत व्ही70 एफई हा नवीन स्मार्टफोन भारतात लाँच करण्याची अधिकृत घोषणा केली असून हा फोन २ एप्रिल २०२६ रोजी दुपारी १२ वाजता सादर केला जाणार आहे. मिड-रेंज सेगमेंटमध्ये येणाऱ्या या फोनमध्ये दमदार कॅमेरा, मोठी बॅटरी आणि आधुनिक फीचर्स दिल्यामुळे सर्वसामान्य वापरकर्त्यांसाठी हा एक आकर्षक पर्याय ठरण्याची शक्यता आहे. कंपनीनं आधीच या फोनसाठी टीझर आणि मायक्रोसाइट सुरू केली असून, फोनचा फोकस ऑल-डे परफॉर्मन्स आणि यूजर-फ्रेंडली डिझाइनवर असल्याचं स्पष्ट केलं आहे.व्ही70 एफई हा स्मार्टफोन भारतात ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होणार असून अमेझॉन आणि फ्लिपकार्ट यांसारख्या ई-कॉमर्स साइट्सवर त्याची विक्री होईल. तसेच विवोच्या अधिकृत स्टोअर्समधूनही हा फोन खरेदी करता येणार आहे. इंडोनेशियामध्ये आधीच लाँच झालेल्या या मॉडेलच्या भारतीय व्हर्जनमध्ये काही नवीन रंग पर्याय दिले जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे मॉन्सून ब्लू या रंगात ग्लो-इन-द-डार्क फिनिश देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. या फोनची किंमत अंदाजे ३०,००० ते ४०,००० रुपयांच्या दरम्यान असू शकते.डिझाइन आणि डिस्प्लेच्या बाबतीत व्ही70 एफईमध्ये ६.८३ इंचाचा १.५के फ्लॅट अमोलेड डिस्प्ले दिला जाणार आहे. या डिस्प्लेमध्ये १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि १९०० निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस मिळेल, ज्यामुळे वापरकर्त्यांना स्मूथ आणि ब्राइट व्हिज्युअल अनुभव मिळेल. एचडीआर१० प्लस सपोर्ट आणि ९४.४ टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशोमुळे व्हिडिओ पाहताना आणि गेमिंग करताना उत्कृष्ट अनुभव मिळेल. याशिवाय फोन आयपी६८ आणि आयपी६९ वॉटर आणि डस्ट रेसिस्टंट असल्यामुळे तो पाण्यातही सुरक्षित राहील. फोनमध्ये अंडर-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर आणि ड्युअल स्टिरिओ स्पीकर्ससारखी आधुनिक फीचर्सही देण्यात आली आहेत.कॅमेरा विभागात हा फोन विशेष लक्ष वेधून घेतो. यामध्ये २०० मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे, जो सॅमसंग एचपी५ सेन्सरवर आधारित आहे. या कॅमेरामध्ये ओआयएस आणि एफ/१.८८ अपर्चर असल्यामुळे कमी प्रकाशातही चांगले फोटो काढता येतात. त्यासोबत ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स दिला आहे. विवोचं सिग्नेचर ऑरा लाईट फीचर पोर्ट्रेट फोटोग्राफी अधिक चांगली बनवतं. याशिवाय ३०एक्स टेलिफोटो झूम सपोर्ट असल्यामुळे दूरच्या वस्तूंचे फोटो स्पष्टपणे टिपता येतात. सेल्फीसाठी ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे, ज्यामध्ये आय ऑटोफोकससारखी सुविधा आहे.परफॉर्मन्सच्या दृष्टीने व्ही70 एफईमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी ७३६० टर्बो प्रोसेसर दिला आहे, जो ४ एनएम प्रोसेसवर आधारित आहे. यामुळे फोन वेगवान आणि स्मूथ परफॉर्मन्स देण्यास सक्षम ठरतो. यामध्ये ८ जीबीपर्यंत एलपीडीडीआर५ रॅम आणि ५१२ जीबीपर्यंत यूएफएस ३.१ स्टोरेज मिळेल. त्यामुळे मल्टिटास्किंग आणि दैनंदिन वापर सहज पार पडतो. या फोनमध्ये ७००० एमएएचची मोठी बॅटरी दिली असून ती ९० वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. त्यामुळे कमी वेळात फोन चार्ज होतो आणि पूर्ण दिवस बॅटरी टिकते.सॉफ्टवेअरच्या बाबतीत हा स्मार्टफोन अँड्रॉइड १६ आधारित ओरिजिनओएस ६ वर चालणार आहे. विवो कंपनी या फोनसाठी ४ वर्षे ओएस अपडेट्स आणि ६ वर्षे सिक्युरिटी अपडेट्स देणार असल्याचं सांगितलं आहे. यामध्ये एआय फीचर्सचाही समावेश असणार आहे, ज्यामुळे वापरकर्त्यांना अधिक स्मार्ट आणि वैयक्तिक अनुभव मिळेल. एकूणच, व्ही70 एफई हा स्मार्टफोन आपल्या प्राइस रेंजमध्ये कॅमेरा, बॅटरी आणि परफॉर्मन्स यांचा उत्तम समतोल साधणारा पर्याय ठरण्याची शक्यता आहे.
आर. अश्विन आता अमेरिकेत खेळणार क्रिकेट : सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्ससोबत करार
नवी दिल्ली : भारताचा माजी ऑफ-स्पिनर रविचंद्रन अश्विन आता अमेरिकेच्या टी-२० लीगमध्ये खेळताना दिसणार आहे. त्याने आगामी मेजर लीग क्रिकेट (एमएलसी) हंगामासाठी सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्ससोबत करार केला असून, या स्पर्धेत खेळणारा तो पहिला माजी भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू ठरला आहे.अश्विनने २०२४ च्या अखेरीस आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर तो २०२५ च्या आयपीएलमध्ये सीएसकेकडून खेळला, पण तो हंगाम त्याच्यासाठी फारसा खास नव्हता. आयपीएल संपल्यानंतर त्याने त्या लीगमधूनही निवृत्ती जाहीर केली होती. आता निवृत्तीनंतर तो जागतिक लीगकडे वळत आहे.आपल्या प्रदीर्घ आणि यशस्वी कारकिर्दीत अश्विनने भारताबाहेरील कोणत्याही टी-२० लीगमध्ये भाग घेतलेला नाही. आयपीएल व्यतिरिक्त जागतिक फ्रँचायझी स्पर्धेत खेळण्याची ही त्याची पहिलीच वेळ असेल. यापूर्वी त्याने ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीग (बीबीएल) मध्ये सिडनी थंडरसोबत करार केला होता, पण गुडघ्याच्या शस्त्रक्रियेमुळे तो त्यावेळी खेळू शकला नव्हता.अमेरिकेत खेळण्यासाठी अश्विन खूप उत्सुक आहे. तो म्हणाला, मी नुकताच डॅलसमध्ये एक प्रदर्शनीय सामना खेळलो. तेथील आशियाई अमेरिकन लोकांमध्ये क्रिकेटबद्दल असलेली आवड पाहून मी थक्क झालो. तिथे क्रिकेटसाठी खूप मोठी क्षमता आहे. त्याने पुढे सांगितले की, अमेरिकेत राहणाऱ्या लोकांची, विशेषतः मुलांची आवड प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी त्याला एमएलसीचा भाग व्हायचे होते.१२८ वर्षांनंतर २०२८ मध्ये लॉस एंजेलिस येथे होणाऱ्या ऑलिम्पिक खेळांमध्ये क्रिकेटचे पुनरागमन होणार आहे. त्यानिमित्ताने, अमेरिका एक प्रमुख क्रिकेट केंद्र म्हणून स्वतःला स्थापित करत आहे. एमएलसीचे मुख्य कार्यकारी जॉनी ग्रेव्ह म्हणाले, अश्विनसारख्या क्रिकेटपटूचा समावेश हे दाखवतो की गेल्या तीन वर्षांत आमची लीग किती वाढली आहे. अमेरिकेतील लोक आता क्रिकेटबद्दल शिकत आहेत.आयपीएलचे मेजर लीग क्रिकेटशी घनिष्ठ संबंध आहेत. लीगच्या सहा संघांपैकी तीन संघ त्याच समूहांच्या मालकीचे आहेत जे आयपीएल संघांचे मालक आहेत. यामध्ये एमआय न्यूयॉर्क (MI), टेक्सास सुपर किंग्स (CSK) आणि एलए नाइट रायडर्स (KKR) यांचा समावेश आहे. शिवाय, राजस्थान रॉयल्स संघ अलीकडेच एनएफएल (NFL) संघांच्या मालकांसह प्रमुख अमेरिकन गुंतवणूकदारांनी विकत घेतला आहे.एमएलसीचा २०२६ चा हंगाम, १८ जून रोजी सुरू होईल. ही स्पर्धा टेक्सास, लॉस एंजेलिस आणि ओकलंड येथे खेळवली जाईल. अंतिम सामना १८ जुलै रोजी ओकलंड कोलिझियम येथे होईल. अश्विनच्या सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्स संघाने अद्याप एकही विजेतेपद जिंकलेले नाही. २०२४ मध्ये, ते अंतिम फेरीत पोहोचले होते, पण वॉशिंग्टन फ्रीडम संघाकडून त्यांचा पराभव झाला होता.
USA No Kings Protest: अमेरिका सध्या दोन प्रमुख आघाड्यांवर संघर्ष करत आहे. पश्चिम आशियामध्ये इराणविरुद्ध सुरू असलेल्या युद्धात हजारो लोकांनी आपले प्राण गमावले आहेत
मुंबई : काहीवेळा एखाद्या अभिनेत्याला आपल्या अभिनयाची छाप पाडण्यासाठी एक दमदार अभिनय पुरेसा असतो. धुरंधर २ सिनेमात जमील जमालीच्या भूमिकेमुळे चर्चेत असलेल्या अभिनेता राकेश बेदींसाठी तो क्षण 'धुरंधर २' च्या रूपाने आला आहे. मात्र, या सिनेमात साकारलेल्या दमदार भूमिकेमुळे सर्वत्र चर्चेत असलेला अभिनेता राकेश बेदीने (Rakesh Bedi) याआधीही मोठ्या पडद्यावर अनेक भूमिका साकारल्या आहेत. चला तर जाणून घेऊयात अभिनेता राकेश बेदींच्या या प्रवासाबद्दलचश्मे बद्दूर (१९८१)'चश्मे बद्दूर' या अजरामर सिनेमात राकेश बेदी यांनी 'ओमी' ही भूमिका साकारली होती. एक खोडकर वागणारा मित्र, जो एका साध्या-सरळ प्रेमकहाणीत गोंधळ निर्माण करतो. त्याची अचूक विनोदबुद्धी आणि त्यासोबतच त्याचे सहजसुंदर हावभाव यामुळे 'ओमी' ही भूमिका अविस्मरणीय आहे. आजही, त्या चित्रपटातील प्रेमकथेत खोडा घालण्याच्या त्याच्या अत्यंत विनोदी प्रयत्नांमुळे अनेक चाहते या सिनेमाची आठवण काढतात.श्रीमान श्रीमती (१९९४–१९९७)९० च्या दशकातील दूरचित्रवाणीवरील एक अत्यंत लोकप्रिय मालिका असलेल्या 'श्रीमान श्रीमती'मध्ये, राकेशनं 'दिलरुबा' ही भूमिका साकारली होती. एक असा माणूस जो आपल्या शेजारणीच्या प्रेमात पूर्णपणे वेडा झालेला असतो. या मालिकेची लोकप्रियता तिच्यातील अनोख्या संवादांवर व परस्परसंबंधांवर आधारित होती आणि यामधील राकेश बेदी यांच्या अभिनयाने त्यात निरागसता व विनोद यांचा असा काही सुरेख मेळ साधला होता, ज्यामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या फार पसंतीस उतरली आणि अत्यंत प्रिय ठरली.Yes Boss (1999–2009)'Yes Boss' या मालिकेमुळे राकेशसाठी दूरचित्रवाणीच्या क्षेत्रात एक संपूर्णपणे नवी दालनं खुली झाली. मोहन या भूमिकेत, कामाच्या ठिकाणी आपलं लग्न लपवण्याची कसरत सतत करणाऱ्या एका व्यक्तीचं चित्रण करताना, त्यांनी ती व्यक्तिरेखा अत्यंत वास्तववादी आणि प्रेक्षकांना आपलीशी वाटेल अशी साकारली. त्यानं ही भूमिका ज्या सहज आणि नैसर्गिक शैलीत निभावली. राकेशच्या अभिनयानं कार्यालयातील अगदी साध्या प्रसंगांमध्येही अस्सल विनोद निर्माण झाला होता.ये जो है जिंदगी (१९८४)या मालिकेनं राकेश बेदी यांना दूरचित्रवाणीवरील त्यांच्या सुरुवातीच्या मोठ्या संधींपैकी एक महत्त्वाची संधी मिळवून दिली. यामध्ये त्यांनी एका प्रेमळ, पण थोड्याशा दुर्दैवी मेहुण्याची भूमिका साकारली होती. जो आपली बहीण रेणू आणि तिचा पती रणजित यांच्यासोबत राहण्यास येतो. त्याचे हेतू नेहमीच चांगले असायचे, पण त्याच्या कल्पना मात्र सहसा गमतीशीररित्या अंगाशी यायच्या आणि त्यामुळे ते जोडपे विनोदी संकटांमध्ये सापडायचे. दूरदर्शनच्या त्या काळात, याच भूमिकेमुळे ते संपूर्ण भारतात घराघरात पोहोचलेले आणि अतिशय लोकप्रिय झाले.भाभीजी घर पर हैं!अलीकडील काही वर्षांत, राकेश बेदीनं 'भाभीजी घर पर हैं!' या मालिकेच्या माध्यमातून एका नव्या पिढीची मने जिंकली आहेत. अंगूरी भाभीचे वडील 'भुरे लाल' या विनोद भूमिकेतून राकेश चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरले आहेत.
Ashok Kharat Case: अशोक खरात महिलांना कसं भुलवायचा?; तपासात धक्कादायक माहिती समोर
नाशिक: नाशिक जिल्ह्यातील अशोक खरात प्रकरणात रोज नवीन खुलासे समोर येत आहेत. अशोक खरात महिलांना टार्गेट करुन त्यांच्या मानसिकतेचा अभ्यास करत असल्याचे तपासात समोर आले आहे. त्याने पोलीस तपासात स्पष्ट केले की, तो महिलांशी गोड बोलून त्यांचे कौतुक करत होता. तसेच भावनिक जवळीक वाढवून त्यांना जाळ्यात ओढत होता. 'तू खूप सुंदर आहेस', 'तुझा पती तुला समजून घेत नाही', 'तुझी खरी क्षमता कोणालाच कळत नाही' अशा वाक्यांनी तो महिलांवर प्रभाव पाडत होता, असे समोर आले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, अशोक खरात माइंड रीडिंगमध्ये स्वत:ला पटाईत असल्याचे भासवत होता. परंतु प्रत्यक्षात तो समोरच्या भावनिकतेचा, मानसिकतेचा आणि देहबोलीचा अभ्यास करुन त्यांच्याशी संवाद साधत होता. पीडित महिलांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या मनातील भीती, असुरक्षितता आणि भावनिक कमकुवत बाजू ओळखून त्यावर तो संवाद साधत असे. या पद्धतीने तो महिलांना मानसिकदृष्ट्या जखडून ठेवत असल्याचा आरोप आहे. चौकशीत त्याने भावनिक जाळं विणून विश्वास मिळवल्याची कबुली दिल्याचीही माहिती समोर आली आहे.किती महिलांना फसवले?दरम्यान, किती महिलांचे शोषण केले याबाबत विचारले असता खरातने स्पष्ट उत्तर देण्यास टाळाटाळ केली. नेमका आकडा सांगता येणार नाही, असा दावा खरातने केल्याचे सूत्रांकडून समजले आहे. आतापर्यंत त्याच्याविरोधात १० गुन्हे दाखल झाले असून, त्यापैकी ८ गुन्हे महिलांवरील अत्याचारासंदर्भात तर २ गुन्हे आर्थिक फसवणुकीशी संबंधित आहेत.
Ashok Kharat Case : भोंदूबाबा अशोक खरातला १ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी
नाशिक : महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या भोंदूबाबा अशोक खरातला (Ashok Kharat) न्यायालयाने १ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी (Police Custody) दिली आहे. पोलीस कोठडीची मुदत संपत असल्यामुळे आज म्हणजेच रविवार २९ मार्च रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याच्या पोलीस कोठडीत वाढ केली. तपास व्यवस्थित व्हावा या उद्देशाने अशोक खरातच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. याआधी त्याला २९ मार्चपर्यंत न्यायालयाने अशोक खरातला पोलीस कोठडी दिली होती.सुनावणीदरम्यान एसआयटीच्यावतीने तपासाची थोडक्यात माहिती देऊन तपासाकरिता आणखी अवधी आवश्यक असल्याचा मुद्दा मांडण्यात आला. न्यायालयाने एसआयटीचा मुद्दा समजून घेतल्यानंतर पोलीस कोठडीत वाढ केली.संशयित आरोपी अशोक खरात स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचा दावा करत होता. तो महिलांना गुंगी येणारा पदार्थ मिसळून तीर्थ प्रसाद देत होता. यामुळे महिलांना थोड्या वेळाने ग्लानी यायची. या स्थितीचा अशोक खरात गैरफायदा घेत होता. तो महिलांचा लैंगिक छळ करत होता, असा आरोप होत आहे. या प्रकरणी एसआयटीने सीसीटीव्ही कॅमेरा, मोठी रोख रक्कम, लॅपटॉप, रिव्हॉल्व्हर आणि काडतुसे जप्त केली आहेत. आर्थिक व्यवहार, कथित धार्मिक विधी आणि इतर बाबींचा तपास सुरू आहे.अशोक खरात स्वतःला ‘सिद्ध पुरुष’ सांगत लोकांची फसवणूक करत असल्याचा आरोप आहे. भीती निर्माण करण्यासाठी तो वन्यजीव कायद्याचे उल्लंघन करत होता. काही वेळा सापाचा वापर करत होता; असाही आरोप होत आहे.
Ashok Kharat Case Update: खरातला 1 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी
नाशिक: अशोक खरातच्या भोंदूगिरीने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. हे प्रकरण बाहेर आल्यापासून नवनवे खुलासे समोर येत आहेत. खरातला २९ मार्चपर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. आज त्याला जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. या प्रकरणाची गंभीर दखल घेत न्यायालयाने त्याच्या पोलीस कोठडीत वाढ करुन १ एप्रिलपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे. महिलांवरील अत्याचार आणि आर्थिक फसवणुकीचे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या खरातची चौकशी करण्यासाठी एसआयटीला (SIT) अधिक कालावधीची गरज असल्याचे न्यायालयाने मान्य केले आहे.पोलिसांच्या कडक बंदोबस्तात खरातला आज न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी एसआयटीचे तपास अधिकारी किरण सुर्यवंशी आणि सरकारी वकील शैलेंद्र बागडे यांनी खरातच्या तीन दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. सरकारी वकिलांनी युक्तिवाद करताना सांगितले की, आरोपी हा तपासात सहकार्य करत नाही. त्याने मोबाईलमध्ये अनेक नावे 'डमी' किंवा 'कोडवर्ड'मध्ये सेव्ह केली असण्याची शक्यता आहे, ज्यात काही राजकीय व्यक्तींचाही समावेश असू शकतो. तसेच, पीडित महिलांना तो जे 'द्रव्य' किंवा पाणी पाजत होता, त्याबाबतही सखोल तपास करायचा आहे.दुसऱ्या बाजूला आरोपीचे वकील सचिन भाटे यांनी पोलीस कोठडीला विरोध दर्शवला आहे. मोबाईल जप्त केला आहे, क्लोन कॉपी मिळाली आहे, मग पुन्हा कोठडीची गरज काय? रिव्हॉल्व्हरचा परवानाही आरोपीकडे होता, असा दावा त्यांनी केला. परंतु पीडित महिलेचे वकील एम.वाय.काळे यांनी यावर आक्षेप नोंदवला आहे आणि आरोपीच्या कृत्यामुळे पीडितेचे आयुष्य उद्ध्वस्त झाले असून समाजाला न्याय मिळण्यासाठी पोलीस कोठडी आवश्यक असल्याचे म्हटले आहे.दरम्यान आतापर्यंत खरातविरोधात १० गुन्हे दाखल झाले असून, त्यापैकी ८ गुन्हे महिलांवरील अत्याचारासंदर्भात तर २ गुन्हे आर्थिक फसवणुकीशी संबंधित आहेत.
'Mann Ki Baat': पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ऑल इंडिया रेडिओवर प्रसारित झालेल्या 'मन की बात' या कार्यक्रमाच्या माध्यमातून भारत आणि परदेशातील लोकांशी आपले विचार व्यक्त केले.
मुंबई : पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित, रेमंड ग्रूपचे माजी अध्यक्ष आणि उद्योगविश्वातील दिग्गज व्यक्तिमत्व डॉ. विजयपत सिंघानिया (vijay singhania) यांचं शनिवारी सायंकाळी मुंबईत दुख:द निधन झालं. त्यांच्या निधनानं उद्योग आणि समाजकारण, विमानचालन क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झालीयं.'द कम्प्लीट मॅन' आणि 'फील्स लाइक हेवन' यांसारख्या सिनेमांच्या माध्यमातून शून्यातून सुरुवात करून अब्जावधींची संपत्ती कमावणारे आणि आपली कंपनी जगभरात पोहोचवणारे रेमंडचे मालक विजयपत सिंघानिया यांचं निधन झालं आहे. त्यांच्या निधनानं उद्योग आणि समाजकारण, विमानउद्योग क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झालीयं.भारताचे 'टेक्सटाईल टायकून' म्हणून ओळखले जाणारे विजयपत सिंघानिया यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्यावर २९ मार्च रोजी दुपारी ३ वाजता मुंबईतील चंदनवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील. ही घोषणा त्यांचे पुत्र आणि रेमंडचे सध्याचे मालक, गौतम सिंघानिया यांनी केली. आपल्या ८७ वर्षांच्या आयुष्यात विजयपत सिंघानिया यांनी अनेक चढ-उतार अनुभवले. त्यांनी यशाची सर्वोच्च पायरी चढली आणि प्रेमातील विश्वासघातही सहन केला. जेके हाऊसचे मालक आणि अब्जाधीश असलेल्या या व्यक्तीला एकेकाळी भाड्याच्या घरात राहण्यास भाग पडले होते.१९२५ मध्ये ठाण्यातील वाडिया मिल या लोकरीच्या गिरणीत सैन्यासाठी गणवेश शिवण्यापासून रेमंडची सुरुवात झाली. १९८० मध्ये रेमंडचा ताबा घेतल्यानंतर, विजयपत सिंघानिया यांनी रेमंडला मोठ्या उंचीवर नेलं. रेमंड केवळ देशातच नव्हे, तर परदेशातही पोहोचला होता. त्यांनी भारताच्या वस्त्रोद्योगाला ओळख मिळवून दिली, पण एक वेळ अशी आली की, ज्या विजयपत यांनी आपल्या कपड्यांनी जगाला परिपूर्ण बनवलं होतं, त्यांनाच त्यांच्या लोकांनी बेघर केलं. एका सहीमुळे ते केवळ त्यांच्या कंपनीतूनच नव्हे, तर त्यांच्या ३४ मजली आलिशान घरातूनही बेघर झाले.रेमंडला यशाच्या शिखरावर नेल्यानंतर, त्यांनी २०१५ मध्ये कंपनी आपला मुलगा गौतम सिंघानिया याच्याकडे सोपवली. त्यांनी आपले सर्व शेअर्स, ज्यांचे मूल्य तेव्हा १००० कोटी रुपये होते, आपल्या मुलाला दिले आणि १२,००० कोटी रुपये किमतीची रेमंड कंपनी त्याच्या हवाली केली. कंपनी आणि शेअर्सवर ठेवलेल्या प्रेमाचा आणि विश्वासाचा त्यांना तितकाच मोठा विश्वासघात अनुभवायला मिळाला. याच एका कृत्यामुळे केवळ आपली संपूर्ण बचतच नव्हे, तर घर, गाडी आणि ड्रायव्हरसुद्धा गमवावा लागेल, याची त्यांनी कधी कल्पनाही केली नव्हती.विजयपत सिंघानिया यांनी स्वतःच आपल्या मुलावर गंभीर आरोप केले होते. त्यांनी मुंबईत ३४ मजली जेके हाऊस बांधले, पण कंपनी मुलगा गौतमच्या हवाली करताच त्यांनी त्याच्या आई-वडिलांना त्याच घरातून जबरदस्तीने बाहेर काढले. त्यांनी केवळ घरच नाही, तर गाडी आणि ड्रायव्हर यांसारख्या मूलभूत सुविधाही काढून घेतल्या. इतकेच नाही, तर आपल्या नावापुढे 'चेअरमन एमेरिटस' ही उपाधी लावण्याचा हक्कही त्यांनी काढून घेतला.रेमंडप्रमाणे अब्जावधींची संपत्ती कमावून एक बहुराष्ट्रीय कंपनी उभी करणाऱ्या आपल्याच मुलाने विश्वासघात केल्यामुळे, त्यांना आपल्या पत्नीसोबत दोन भाड्याच्या घरांमध्ये राहण्यास भाग पाडले. त्यांनी एकदा एका मुलाखतीत सांगितले होते की, त्यांचा मुलगा गौतम त्यांना रस्त्यावर पाहून आनंदी झाला होता. सर्व काही त्याच्या हाती सोपवणे ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती.५,००० तासांचा उड्डाणाचा अनुभव असलेल्या विजपत सिंघानिया यांना उड्डाणाची प्रचंड आवड होती. वयाच्या ६७ व्या वर्षीही त्यांनी जगातील सर्वात उंच हॉट एअर बलून उड्डाणाचा विक्रम प्रस्थापित केला. त्यांनी रेमंडला यशाच्या शिखरावर नेले. त्यांनी १२,००० कोटी रुपयांची मालमत्ता, अब्जावधी डॉलर्सची रेमंड कंपनी आणि मुंबईतील मलबार हिल परिसरातील ३७ मजली जेके हाऊस आपल्या मुलाच्या नावावर केले. त्यानंतर ही त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक असल्याचं त्यांनी म्हटलं.
Iran US War: येमेनच्या हुथी बंडखोरांनी आज इस्रायलला लक्ष्य करून दुसऱ्या लष्करी कारवाईची घोषणा केली.
Rupali Chakankar : खरात प्रकरण रुपाली चाकणकरांच्या अंगलट; SITकडून बजावले समन्स, चौकशी होणार
Rupali Chakankar : एसआयटीने 'शिवनिका' संस्थेचे बँक खात्यांचे तपशील आणि मागील काही वर्षांतील व्यवहारांची कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत.
Balen Shah plan: नेपाळच्या नव्याने स्थापन झालेल्या 'बालेन सरकारने' शिक्षण व्यवस्थेत परिवर्तन घडवण्यासाठी एक क्रांतिकारक '१०० दिवसांची कृती योजना' जाहीर केली आहे.
भरधाव वेगाने येत थारने तीन जणांना उडवले; धक्कादायक घटना सीसीटीव्हीत कैद
नवी दिल्ली: गुरुग्राममध्ये एक मोठा अपघात झाला आहे. भरधाव वेगाने येणाऱ्या थार कारने तिघांना चिरडले. तिघांचाही जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये एक पुरुष, एक १० वर्षाचा मुलाचा आणि एक ८ वर्षाचा मुलगा आहे. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे.नेमकं प्रकरण काय?गुरुग्राममध्ये भरधाव वेगाने जाणाऱ्या थार कारने तीन जणांना चिरडले आहे. या घटनेत तिघांचाही मृत्यू झाला आहे. ही घटना पटौदीच्या खोड गावात घडली. थार गाडीचा चालक, तिघांना धडक दिल्यानंतर गाडी सोडून घटनास्थळावरून फरार झाला. पोलिसांच्या अहवालानंतर, थार गाडी जप्त करण्यात आली असून तपास सुरू करण्यात आला आहे.पोलिसांनी तिन्ही मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात ठेवले आहेत. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, गुरुग्राममधील पटौदीजवळच्या खौद गावात रात्री सुमारे ११ वाजता एक व्यक्ती दोन मुलांसोबत प्रवास करत होता. तिघांनाही एका थार गाडीने धडक दिली, त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले, त्यांनी तिन्ही मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. त्यांनी थार गाडीही जप्त करून पोलीस ठाण्यात उभी केली.थार गाडीचा धक्का इतका जोरदार होता की, तिघेही सुमारे तीस फूट दूर फेकले गेले. चालकाने गाडी सोडून घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेत तिघांचाही जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी गाडी ताब्यात घेतली. त्यांनी तिन्ही मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात दाखल केले. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिले जातील. पोलिसांनी थार गाडी पोलीस ठाण्यात उभी केली असून आता आरोपीचा शोध घेत आहेत. पोलीस प्रवक्ते संदीप कुमार यांनी सांगितले की, घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आता आरोपीला अटक केली. अटक केलेल्या आरोपीची ओळख दीपांशु (वय २५) अशी असून तो गोरियावासचा रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाईसाठी त्याला लवकरच जिल्हा न्यायालयात हजर केले जाईल.
मुंबई : उद्योगविश्वातील दिग्गज व्यक्तिमत्व डॉ. विजयपत सिंघानिया (vijay singhania) यांचं शनिवारी सायंकाळी मुंबईत दुख:द निधन झालं. विजयपत सिंघानिया यांच्या निधनानं उद्योग आणि समाजकारण, विमानचालन क्षेत्रात पोकळी निर्माण झालीय.प्रसिद्ध उद्योजक विजयपत सिंघानिया हे एक यशस्वी उद्योगजक असण्याबरोबरच ते पद्मभूषण पुरास्काराने समान्मित रेमंड ग्रूपचे माजी अध्यक्ष, वैमानिक आणि 'द कम्प्लीट मॅन' या ब्रँडचे निर्मातेही होते. त्यांनी रेमंड कंपनी एका जागतिक दर्जाच्या ब्रँडमध्ये रूपांतरित केली, परंतु आयुष्याच्या अखेरच्या वर्षांत त्यांना कौटुंबिक आणि व्यावसायिक आव्हानांना सामोरं जावं लागलं. त्यांचा जीवनप्रवास म्हणजे यश, धैर्य, उत्कटता आणि दुःखद असं अनोखं मिश्रण असलेलं जगाला शिकवण देणारा आहे. चला तर जाणून घेऊयात दिवंगत विजयपत सिंघानिया यांच्या जीवनप्रवासातील या १० शिकवणींबद्दलविजयपत सिंघानिया यांचा प्रेरणादायी जीवनप्रवासवारसा जपणं आणि काळानुसार बदलणंविजयपत यांनी रेमंड या सामान्य कंपनीचं रूपांतर एका जगप्रसिद्ध ब्रँडमध्ये केलं असून त्यांच्या जीवनप्रवासातून ही शिकवण मिळते की वारशाचा आदर केला पाहिजे, पण त्याचबरोबर प्रयोग करणं आणि काळानुसार बदलणंदेखील महत्त्वाचं आहे.कामाला महत्वं देण्याबरोबरोच छदं जोपासणंविजयपत सिंघानिया यांनी वयाच्या ६७ व्या वर्षी हॉट एअर बलूनमध्ये विश्वविक्रम प्रस्थापित केला आणि लंडन ते दिल्ली मायक्रोलाइट विमान उडवलं. यातून ही प्रेरणा मिळते की आपल्याला शिकवतात की कामासोबतच आपण आपले छंद आणि आवड जोपासली पाहिजे. यामुळे जीवनातील ऊर्जा टिकून राहण्यास मदत होते.मेहनत आणि संयमला महत्व देणंरेमंडला नव्या उंचीवर नेण्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत आणि दूरदृष्टी आपल्याला शिकवते की यश एका रात्रीत मिळत नाही. त्यासाठी सातत्यपूर्ण मेहनत आणि संयम आवश्यक आहेत.चूकांचा स्वीकार करणंविजयपत सिंघानिया यांनी कंपनीमधील त्यांचा ३७ टक्के भाग मुलगा गौतमला भेट म्हणून दिला. यानंतर त्यांनी याला आपली सर्वात मोठी चूक म्हटलं. यावरून आपल्याला आयुष्यातील महत्त्वाचे निर्णय घेताना सावधगिरी बाळगण्याची शिकवणं मिळते.धैर्य आणि आत्मविश्वासानं आव्हानावर मात करणंज्या वयात अनेक लोक साधारणपणे निवृत्तीची योजना आखतात, त्या वयात विजयपत सिंघानिया यांनी एक नवा विक्रम रचला. यातून आपल्याला अशी शिकवण मिळते की, आपलं वय हे फक्त आकडा आहे. धैर्य आणि आत्मविश्वासानं कोणत्याही आव्हानावर मात करता येते.अपूर्ण गोष्टींचा स्वीकार करून पुढे जाणंविजयपत सिंघानिया यांनी त्यांच्या 'अॅन इनकम्प्लीट लाईफ' या आत्मचरित्रात लिहिलं आहे की, आयुष्य कधीच पूर्ण झाल्यासारखं वाटत नाही. आयुष्यात नेहमीच काहीतरी अपूर्ण राहतं आणि ते स्वीकारून पुढे जायला हवं.यशाच शिखर गाठूनही नम्रपणा जपणंविजयपत सिंघानिया यांनी आपल्या जीवनात मोठी कामगिरी केलीय. मात्र, यशाच शिखर गाठूनही त्यांनी आपली नम्रता कधीही सोडली नाही. आपणही साधेपणा आणि नम्रता यांना आपल्या जीवनाचा पाया बनवलं पाहिजे.चुकीच्या निर्णयांची जबाबदारी घेणंविजयपत सिंघानिया यांनी ज्या पद्धतीनं आपल्या चुकीच्या निर्णयांची जाहीरपणे जबाबदारी स्वीकारली, त्यातून आपल्याला हा धडा मिळतो की आपण आपल्या चुका मान्य कराव्यात आणि इतरांना सावध करावं, जेणेकरून ते त्या चुकांची पुनरावृत्ती करणार नाहीत.विजयपत सिंघानिया यांचं आयुष्य चढ-उतारांनी भरलेलं होतं. त्यांनी श्रीमंतीतून गरिबीकडे आणि पुन्हा श्रीमंतीकडे असा प्रवास अनुभवला. २८ मार्च २०२६ रोजी त्यांचं निधन झालं असून त्यांनी आपली जीवनकथा सर्वांसाठी मागे ठेवली आहे. शिकण्याची इच्छा असणाऱ्यांना विजयपत सिंघानिया यांच्या जीवनातून प्रेरणा मिळणार आहे.
Sunil Tatkare : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलिनीकरणाचा मुद्दा पुन्हा एकदा आमदार सुनील शेळके यांनी उपस्थित केला असून, यावर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Volodymyr Zelensky:युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी केलेल्या एका खळबळजनक दाव्याने एकच गोंधळ उडाला आहे.
IPL 2026 : पहिला सामना हरण्याची मुंबई इंडियन्स परंपरा राखणार?
मुंबई : आयपीएल २०२६ (IPL 2026) मधील दुसरा सामना मुंबई इंडियन्स (MI) विरुद्ध कोलकता नाइट रायडर्स (KKR) यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर संध्याकाळी ७.३० वाजता रंगणार आहे. आयपीएलमध्ये तब्बल पाच वेळा विजेतेपद मिळवणारा संघ अशी मुंबईची ख्याती आहे. पण २०२० पासून मुंबई इंडियन्सला विजेतेपद मिळविता आलेले नाही. आतापर्यंत झालेल्या १८ हंगामांपैकी सलग १३ आणि एकूण १४ वेळा मुंबई इंडियन्सच्या त्यांच्या साखळी फेरीतील सलामीच्या सामन्यात पराभव झाला आहे. यंदाच्या सलामीच्या सामन्यात हरल्याल मुंबई इंडियन्स सलग चौदाव्यांदा आणि एकूण १५ वेळा त्यांचा साखळी फेरीतील सलामीचा सामना गमावल्याचा नवा विक्रम नोंदवणार आहेत. हा नको असलेला विक्रम टाळण्यात मुंबईची टीम यशस्वी होणार का याकडे अनेकांचे लक्ष आहे.साखळी सामन्यांमध्ये असलेल्या गटामध्ये अन्य संघांच्या तुलनेत मुंबई इंडियन्सचे पारडे कागदावर तरी प्रभावी दिसत आहे. वानखेडे स्टेडियम या घरच्या मैदानावर मुंबई इंडियन्स पहिला विजय मिळवते का पाहुया. या सामन्यात मुंबईचे पारडे जड वाटते. विश्वचषक २०२६ मधील ४ हुकमी एक्के मुंबई इंडियन्सच्या संघातून खेळताना दिसतील. कर्णधार हार्दिक पांड्या, विश्वचषक २०२६ भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार याादव, तिलक वर्मा, विश्वचषक २०२६ गाजवलेला गोलंदाज जसप्रीत बुमराह. त्याशिवाय रोहित शर्मा, क्विंटन डीकॉक, नमन धीर, रायन रिकल्टन, शेरफेन रुदरफोर्ड , कॉर्बीन बॉश असे चांगले फलंदाज मुंबई इंडियन्सकडे आहेत. मुंबईची पलटन फलंदाजीत काय कमाल करते, याची उत्सुकता राहील. गोलंदाजीत बुमराह, टेंट बोल्ट, दिपक चहर, शार्दुल ठाकुर, मयांक मारकंडे, कॉर्बीन बॉश असे गोलंदाज आहेत. कोलकता नाइट रायडर्स संघात कर्णधार अजिंक्य रहाणे, कॅमरुन ग्रीन, फिन एलेन, टिम सेफर्ट, यष्टीरक्षक, मथीशा पथिराना रिंकू सिंग, सुनील नारायण असे नामांकीत खेळाडू आहेत फलंदाजीत अजिंक्य रहाणे, कॅमरुन ग्रीन, फिन एलेन, रचिन रविंद्र, रिंकू सिंग, रोवमॅन पॉवेल, अंगरीश रघुवंशी असे नामाकिंत फलंदाज आहेत. गोलंदाजीत सुनील नारायण, वरुण चक्रवर्ती, मथीशा पथिराना, उमरान मलिक, ब्लेसिंग मुझारबानी असे नामांकित गोलंदाज आहेत. मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांना रोखण्याची जबाबदारी त्यांच्यावर असेल. मुंबईचे वानखेडे स्टेडियम फलंदाजीसाठी अनुकूल मानले जाते. मुंबई इंडियन्सला कोलकता नाइट रायडर्स कशी काय टक्कर देते पाहूया.
Viraj Jagtap : महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याचा अपघात झाला असून, त्याच्या हातावर शस्त्रक्रिया पार पडली.
आयआरजीसीचा मोठा दावा; इराणने अमेरिकेचे एफ-१६ लढाऊ विमान पाडले
नवी दिल्ली: मध्य पूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, इराणने अमेरिकेचे लष्करी तळ आणि त्यांची एफ-१६ लढाऊ विमाने लक्ष्य केल्याचा मोठा दावा केला आहे. इराणच्या निमलष्करी इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सचा हवाला देत, स्थानिक माध्यमांनी वृत्त दिले आहे की, त्यांनी एक एफ-१६ लढाऊ विमान आणि एक अमेरिकन एमक्यू-९ ड्रोन पाडले आहे. मात्र, अमेरिकेने याबाबत कोणतेही निवेदन जारी केलेले नाही.इराणच्या तसनीम वृत्तसंस्थेच्या म्हणण्यानुसार ( Tasnim News Agency), इराणी नागरिक आणि औद्योगिक स्थळांवर झालेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आली. आयआरजीसीचा (IRGC) दावा आहे की, त्यांनी 'व्याप्त प्रदेशां'मधील अमेरिकी-इस्रायली तळांना लक्ष्य केले.आयआरजीसीकडून एफ-१६ जेट पाडल्याचा दावाआयआरजीसीने दावा केला आहे की, त्यांनी दक्षिण इराणमधील शिराझ शहरावरून उडणारा एक अमेरिकन MQ-9 ड्रोन यशस्वीरित्या पाडला. आयआरजीसीने एका अमेरिकन F-16 लढाऊ विमानावर हल्ला केल्याचाही दावा केला आहे, मात्र झालेल्या नुकसानीचा किंवा त्याच्या ठिकाणाचा तपशील अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही.अमेरिकेने या दाव्यांना दुजोरा दिलेला नाहीमात्र, अमेरिकेकडून या दाव्यांना अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. लष्करी तज्ज्ञांच्या मते, अशा दाव्यांची स्वतंत्र पुष्टी होणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण सध्या दोन्ही बाजूंनी माहिती युद्धही (Information War) सुरू आहे.मध्य पूर्वेतील तणाव सातत्याने वाढत आहे. इराण, इस्रायल आणि अमेरिका एकमेकांवर हल्ले करत आहेत. हा संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे. सध्या, इराणसोबत सुरू असलेले इस्रायल-अमेरिकेचे युद्ध केव्हा आणि कोणत्या टप्प्यावर संपेल यावर संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.नवी दिल्ली: मध्य पूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, इराणने अमेरिकेचे लष्करी तळ आणि त्यांची एफ-१६ लढाऊ विमाने लक्ष्य केल्याचा मोठा दावा केला आहे. इराणच्या निमलष्करी इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सचा हवाला देत, स्थानिक माध्यमांनी वृत्त दिले आहे की, त्यांनी एक एफ-१६ लढाऊ विमान आणि एक अमेरिकन एमक्यू-९ ड्रोन पाडले आहे. मात्र, अमेरिकेने याबाबत कोणतेही निवेदन जारी केलेले नाही.इराणच्या तसनीम वृत्तसंस्थेच्या म्हणण्यानुसार ( Tasnim News Agency), इराणी नागरिक आणि औद्योगिक स्थळांवर झालेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आली. आयआरजीसीचा (IRGC) दावा आहे की, त्यांनी 'व्याप्त प्रदेशां'मधील अमेरिकी-इस्रायली तळांना लक्ष्य केले.आयआरजीसीकडून एफ-१६ जेट पाडल्याचा दावाआयआरजीसीने दावा केला आहे की, त्यांनी दक्षिण इराणमधील शिराझ शहरावरून उडणारा एक अमेरिकन MQ-9 ड्रोन यशस्वीरित्या पाडला. आयआरजीसीने एका अमेरिकन F-16 लढाऊ विमानावर हल्ला केल्याचाही दावा केला आहे, मात्र झालेल्या नुकसानीचा किंवा त्याच्या ठिकाणाचा तपशील अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही.अमेरिकेने या दाव्यांना दुजोरा दिलेला नाहीमात्र, अमेरिकेकडून या दाव्यांना अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. लष्करी तज्ज्ञांच्या मते, अशा दाव्यांची स्वतंत्र पुष्टी होणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण सध्या दोन्ही बाजूंनी माहिती युद्धही (Information War) सुरू आहे.मध्य पूर्वेतील तणाव सातत्याने वाढत आहे. इराण, इस्रायल आणि अमेरिका एकमेकांवर हल्ले करत आहेत. हा संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे. सध्या, इराणसोबत सुरू असलेले इस्रायल-अमेरिकेचे युद्ध केव्हा आणि कोणत्या टप्प्यावर संपेल यावर संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
US Israel Iran War: इराणसोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, अमेरिका आता जमिनीवरील लष्करी कारवाईची तयारी करत आहे.
Mumbai BMC Commissioner: मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी कोणाची वर्णी? ‘या’नावांची होतेयं चर्चा
Mumbai BMC Commissioner: मुंबई महापालिका आयुक्तपदाच्या निवडीसंदर्भात अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार
Rohini Khadse : अकोल्यात गॅस सिलिंडेरसाठी रांगेत उभे असलेल्या वृद्धाला आपला जीव गमवावा लागला. या घटनेवरुन रोहिणी खडसे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
US Iran War: इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धाने आता वेगळे वळण घेतले आहे. त्यातच आता इराणमध्ये अंतर्गत कलहाला सुरुवात झाली असल्याचे समोर येत आहे.
कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज येथे सकल हिंदू समाजाकडून विराट हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले. या विराट हिंदू संमेलनाला मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी उपस्थिती लावली. यावेळी हिंदू बांधवांना संबोधित करण्याची संधी लाभली. या संमेलनात दिसलेली हिंदू एकतेची ऊर्जा आणि धर्माभिमान खरोखर प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.विराट हिंदू संमेलनात बोलताना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शंभर वर्षांची व्यक्ती निर्माण आणि राष्ट्रनिर्माणाची अखंड यात्रा आजही समाजाला दिशा देणारी आहे. संघाने दिलेले संस्कार, शिस्त आणि राष्ट्रप्रेम यामुळे हिंदू समाज अधिक सक्षम व संघटित होत आहे, असे मंत्री राणे यांनी सांगितले.मंत्री राणे म्हणाले, राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ठाम हिंदुत्ववादी नेतृत्व असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली लागू झालेला धर्मांतर विरोधी कायदा आपल्या माता-भगिनींच्या सन्मान आणि सुरक्षेसाठी एक मजबूत कवच ठरत आहे.पुढे बोलताना, चला, हिंदू एकतेच्या या शक्तीला अधिक बळकट करूया आणि आपल्या धर्म, संस्कृती व राष्ट्रासाठी संघटित होऊया असे मंत्री नितेश राणे यांनी म्हटले.
Rain Alert: 'या'राज्यांमध्ये पावसाची शक्यता, मुंबईसह गुजरातमध्ये उष्णतेची लाट
नवी दिल्ली: देशभरात हवामानात बदल दिसून येत आहे. देशाची राजधानी दिल्लीसह आसपासच्या परिसरात आज पावसाची शक्यता आहे. सकाळ आणि संध्याकाळी सौम्य गारवा जाणवतो, पण दुपारपर्यंत कडक ऊन आणि उष्ण वाऱ्यांमुळे लोकांना त्रास होत आहे. हवामान विभागाने (आयएमडी) आज दिल्ली-एनसीआरमध्ये पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मात्र, विभागाने असा इशाराही दिला आहे की, एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून तापमानात मोठी वाढ होईल, ज्यामुळे सुरुवातीच्या दिवसांतच उष्णतेच्या लाटेसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते.उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब, हरियाणा आणि उत्तराखंडमध्ये सध्या हवामान पूर्णपणे कोरडे आहे. या प्रदेशात धुळीने भरलेले वारे अपेक्षित आहेत, यामुळे केवळ उष्णता वाढणार नाही, तर दृश्यमानता आणि हवेच्या गुणवत्तेवरही परिणाम होईल. उत्तराखंडसारख्या डोंगराळ राज्यांमध्ये, खालच्या भागात अधिक प्रखर सूर्यप्रकाश मिळत आहे, ज्यामुळे बर्फ वितळण्याची प्रक्रिया वेगवान होत आहे आणि दिवसाचे तापमान वाढत आहे.जैसलमेर आणि बारमेरमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारादरम्यान, राजस्थानमध्ये उष्णतेची लाट तीव्र होऊ लागली आहे. जैसलमेर, बारमेर आणि बिकानेरसारख्या पश्चिम जिल्ह्यांमध्ये तापमान ४० अंश सेल्सिअसच्या जवळ पोहोचत असून, त्यामुळे उष्णतेच्या लाटेसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. राजधानी जयपूरमध्येही उष्ण वाऱ्यांमुळे दुपारच्या वेळी रस्ते ओस पडलेले असतात. प्रशासनाने लोकांना दुपारच्या वेळी अनावश्यक बाहेर फिरणे टाळण्याचा सल्ला दिला आहे.गुजरात आणि मुंबईमध्ये उष्णतेची लाट अधिक तीव्रगुजरातमध्ये उष्णतेचा सर्वाधिक त्रास जाणवत असून, तापमान ३५ ते ३९ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. उष्ण वाऱ्यांमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, मुंबईत समुद्राच्या आर्द्रतेमुळे निर्माण झालेल्या दमट उष्णतेने नागरिकांना त्रास होत आहे. येथील तापमान ३०-३३ अंश सेल्सिअस असले तरी, जाणवणारी उष्णता खूपच जास्त तीव्र आहे.मान्सूनपूर्व पावसामुळे दक्षिण भारताला दिलासादरम्यान, दक्षिण भारतात हवामान अनुकूल दिसत आहे. तामिळनाडू, केरळ, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये मान्सूनपूर्व हालचाली सुरू झाल्या आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, या राज्यांमध्ये मेघगर्जनेसह हलका पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता आहे. ढगांच्या हालचालीमुळे तापमान कमी होईल.
Ashok Kharat Case : नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरातला आज 29 मार्चला न्यायालयात हजर केले जाणार असून, चौकशीतून एक मोठी माहिती समोर आली आहे.
Rinku Rajguru Romeo post : रिंकू राजगुरूने ‘डार्लिंग’म्हणत शेअर केली खास पोस्ट
Rinku Rajguru Romeo post : रिंकूने या पोस्टला 'आय एम सो इन लव्ह विथ यू' हे रोमँटिक इंग्रजी गाणे जोडले आहे.
Vijaypat Singhania death: देशातील नामांकित उद्योगपती, रेमंड ग्रुपचे माजी अध्यक्ष आणि पद्मभूषण पुरस्कार विजेते विजयपत सिंघानिया यांचं वयाच्या 87 व्या वर्षी मुंबईत निधन झालं.
Saba Azad Hospitalised: हृतिक रोशनची गर्लफ्रेंड सबा आझाद रुग्णालयात दाखल; चाहत्यांना केलं ‘हे’आवाहन
Saba Azad Hospitalised:
Bhooth Bangla : बॅाक्स अॅाफिसवर धुरंधर 2 चा बोलबाला! ‘भूत बंगला’ची टीम मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Bhooth Bangla : बॅाक्स अॅाफिसवर धुरंधर 2 ची मोठी क्रेझ आहे. या पार्श्वभूमीवर भूत बंगला चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्याचा विचार सुरू आहे.
Top 10 News :राज्यात नुकतेच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या नेत्यांना भावनिक आवाहन करत त्यांचे पक्ष सोडण्याच्या निर्णयाचे मत परावर्तित केले होते,
Onion Price crash : शेतकऱ्यांच्या कांद्याला सरासरी केवळ ३०० ते ८०० रूपये प्रति क्विंटल इतका कमी दर
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जेवर येथील नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन झाले आहे. ११ हजार २०० कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या या विमानतळाचा पहिला टप्पा दरवर्षी सुमारे १.२ कोटी प्रवाशांना हाताळू शकेल. हे उत्तर प्रदेशातील ५ वे आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल. हे विमानतळ केवळ नोएडा आणि ग्रेटर नोएडासाठीच नव्हे, तर दिल्ली, गाझियाबाद आणि फरिदाबाद तसेच अलीगढ, मथुरा आणि आग्रासाठीही खूप महत्त्वाचे ठरेल. नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ हे दिल्ली-एनसीआरसाठी दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून विकसित करण्यात आले आहे. याआधी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे संपूर्ण प्रदेशातील एकमेव विमानतळ होते.प्रवाशांसह पहिले उड्डाण केव्हा होईल?केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री किंजरपू राममोहन नायडू यांच्या म्हणण्यानुसार, विमानतळाचा परवाना जारी झाल्यानंतर विमानसेवा सुरू होण्यामध्ये साधारणपणे ४५ ते ६० दिवसांचे अंतर असते. नोएडा विमानतळाला या महिन्याच्या ६ तारखेला विमानतळाचा परवाना मिळाला आहे. यावरून असे सूचित होते की, आजच्या उद्घाटनानंतर एप्रिलच्या अखेरीस किंवा मे महिन्याच्या सुरुवातीला व्यावसायिक सेवा सुरू होतील. देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगो या विमानतळावरून पहिले उड्डाण करेल. इंडिगो व्यतिरिक्त, अकासा एअर आणि एअर इंडिया देखील नोएडा विमानतळावरून सेवा चालवतील.कोणत्या शहरांसाठी सेवा सुरू होतील?नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरुवातीला मुंबई, कोलकाता, चेन्नई, बंगळूर, हैदराबाद यांसारख्या प्रमुख शहरांसाठी सेवा सुरू करेल, त्यानंतर लखनौ, अहमदाबाद, पुणे, गोवा आणि जयपूरसाठी सेवा सुरू होतील अशी अपेक्षा आहे.नोंदणी कधी सुरू होईल?नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिल्या व्यावसायिक उड्डाणाच्या अंदाजे ४-६ आठवडे आधी बुकिंग सुरू होण्याची शक्यता आहे.नोएडा विमानतळाची वैशिष्ट्येनोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ हे भारतातील सर्वात मोठ्या ग्रीनफिल्ड विमानतळ प्रकल्पांपैकी एक आहे. या विमानतळावर ३ हजार ९०० मीटर लांबीची धावपट्टी असून, ती मोठ्या आकाराची विमाने हाताळण्यास सक्षम आहे. येथे इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टीम (ILS) आणि प्रगत एअरफिल्ड लायटिंगसह आधुनिक नेव्हिगेशन प्रणालीदेखील आहे, ज्यामुळे सर्व प्रकारच्या हवामानात दिवस-रात्र कार्यक्षमतेने कामकाज करणे शक्य होते. या विमानतळावर एक मजबूत कार्गो प्रणाली देखील आहे, ज्यामध्ये मल्टी-मोडल कार्गो हब, एक एकात्मिक कार्गो टर्मिनल आणि एक लॉजिस्टिक्स झोन यांचा समावेश आहे. ही कार्गो सुविधा दरवर्षी २,५०,००० मेट्रिक टनपेक्षा जास्त माल हाताळण्यासाठी तयार करण्यात आली आहे, आणि ही क्षमता अंदाजे १.८ दशलक्ष मेट्रिक टनपर्यंत वाढवण्याची क्षमता आहे.
मुंबई: गारगाई नदीवर प्रस्तावित धरण प्रकल्पाच्या कामाच्या प्रस्तावाबाबत स्थायी समिती सदस्यांनी विविध प्रश्न उपस्थित करत हा प्रस्ताव फेरविचारासाठी परत पाठवल्यानंतर अखेर कंत्राटदार कंपनी वरमली. ज्या कंत्राटदार कंपनीने तीन वेळा वाटाघाटींमध्ये केवळ ५७. ७३ कोटी रुपयांची सूट देत हे काम ९ टक्क्यांमध्ये करण्याची तयारी दर्शवली हाती, तिथे स्थायी समितीच्या मागणीनंतर संबंधित कंत्राटदाराने गारगाई धरणाचे काम १.९० टक्क्यांमध्ये करण्यास तयार दर्शवली आहे. त्यामुळे अखेर पुन्हा एकदा गारगाई धरणाचा सुधारीत प्रस्ताव स्थायी समितीला सादर झाला आहे. त्यामुळे महापालिकेचे निव्व्ळ कंत्राटात २६९ कोटी तर विविध करांसहच्या कंत्राटात ३४४ कोटी रुपयांची बचत झाली आहे. त्यामुळे उबाठाच्या काळात अव्वाच्या सव्वा दरात कंत्राटे मंजूर करून महापालिकेच्या निधीची उधळपट्टी केली जात होती, तिथे भाजप शिवसेना महायुतीच्या काळात कंत्राटदाराला दर कमी करायला लावून कोट्यवधी रुपयांचा निधी वाचवला जात आहे.मुंबई महापालिकेच्यावतीने मागील अनेक वर्षांपासून बहुप्रतिक्षेत असलेल्या गारगाई प्रकल्पासाठी सुमारे ६७ मीटर उंच आणि सुमारे ७०० मीटर लांबीचे रोलर कॉम्पॅक्टेड काँक्रीट तंत्रज्ञानावर आधारित धरण उभारण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाच्यावतीने घेण्यात आला आहे. या धरणाचे बांधकाम २.२ मीटर व्यासाचा आणि सुमारे १.६ किलोमीटर लांबीचा जलवाहन बोगदा बांधण्यात येणार असून त्यामध्ये पाच रेडियल गेट्ससह स्पिलवे, स्टॉपलॉग, टर्बाइन तसेच अंतर्गत काँक्रीट रस्ते आणि पूल यांचा समावेश असेल. या प्रकल्पातून किमान १.२ मेगावॅट वीज निर्मिती करण्याची तरतूद करण्यात आली आहे. प्रकल्प कामासाठी महापालिकेच्यावतीने सोमा इंटरप्रायझेस या कंपनीची निवड करण्यात आली. महापालिकेच्या कार्यालयीन अंदाजापेक्षा ११ टक्के अधिक बोली लावणारी कंपनी पात्र ठरली असून या कामासाठी विविध करांसह ५४०० कोटी रुपये एवढा खर्च केला जाणार आहे.या बाबतचा प्रस्ताव प्रथम स्थायी समितीच्या बैठकीपुढे आल्यानंतर सभागृहनेते गणेश खणकर यांनी महापालिकेच्या अंदाजित दरापेक्षा अधिक दरात हे काम मिळवलेले असून प्रशासनाने पुन्हा वाटाघाटी करून कंपनीला अंदाजित दरातच काम करण्यास भाग पाडावे अशी सूचना केली आहे. त्यामुळे हा प्रस्ताव सभागृहनेत्यांच्या उपसूचनेनुसार केलेल्या मागणीनुसार स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी फेरविचारासाठी परत पाठवला होता. पण हा प्रस्ताव पुन्हा एकदा हा मंजुरीसाठी स्थायी समितीच्या सभेपुढे मंजुरीसाठी ठेवला आहे. नव्याने सादर केलेल्या प्रस्तावामध्ये संबंधित सोमा कंपनीने कार्यालयीन अंदाजापेक्षा ८.९८ टक्के अधिक दराने कंत्राट काम करण्याऐवजी १. ९६ टक्के अधिक दराने काम करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे तब्बल ७ टक्के दर कमी केला आहे. त्यामुळे जिथे हे कंत्राट पूर्वी विविध करांसह ५३९६. ४३ कोटी रुपयांचे होते, तिथे आता स्थायी समितीने प्रस्ताव फेटाळून लावल्यानंतर कंत्राटदाराने दर कमी विविध करांसह ५०५१.८२ कोटींमध्ये हे काम करण्यास तयारी दर्शवली आहे. त्यामुळे तब्बल ३४४ कोटी रुपयांची बचत होणार आहे. तर विविध कर वगळता या कंपनीने महापालिकेच्या अंदाजित दर ३००६.७५ कोटी रुपयांच्या तुलनेत पूर्वी ३३३४. ३८ कोटींमध्ये काम मिळवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु आता स्थायी समितीने दणका दिल्यानंतर हे काम विविध करत वगळता निव्वळ कंत्राट ३०६५.६८ कोटींमध्ये काम करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे निव्वळ कंत्राट कामांत २६८.८० कोटी रुपयांची बचत झाली आहे.
Weather Alert : 1 ते 4 एप्रिल दरम्यानच्या काळात राज्यात मध्य महाराष्ट्र, विदर्भासह विविध ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मी अरुणाचल प्रदेशातील इटानगरची रहिवासी मरीना नीडो आहे- नीडो तानियाची आई, ज्याला दिल्लीत जमावाने मारहाण करून ठार केले. जर असा द्वेष वाढत राहिला, तर एके दिवशी परिस्थिती धोकादायक होऊ शकते. आम्हाला फक्त एवढेच हवे आहे की- तुम्ही आम्हाला समजून घ्या. आम्ही वेगळे दिसतो, पण वेगळे नाही. आम्हीही याच देशाचे आहोत. माझ्या मुलाला फक्त यासाठी मारण्यात आले, कारण त्याचा चेहरा तुमच्यापेक्षा वेगळा होता. तो ओरडत होता- ‘मी भारतीय आहे…’ पण जमावाने त्याचे एकही ऐकले नाही. विचार केला होता- माझा मुलगा शिकून मोठा माणूस बनेल, पण त्याचे प्रेत विमानाने परत आले. नीडो इतर मुलांसारखा नव्हता. अनेकदा माझ्याकडे 5-10 हजार मागायचा. मी विचारायचे- एवढे पैसे कुठे जातात? तो हसून टाळायचा. नंतर कळले- तो गरजूंची मदत करायचा. मित्रांची फी भरायचा. मला न सांगता घरातील ड्रायव्हर्सना पैसे द्यायचा. त्याच्या मनात माणुसकी भरलेली होती. तो माझ्या शेजारी बसून म्हणायचा- मम्मी, मोठा झाल्यावर अशी एक जागा बनवेन, जिथे मंदिर, गुरुद्वारा, चर्च आणि मशीद- सर्व असतील… आणि प्रत्येकजण तिथे येऊन एकत्र प्रार्थना करू शकेल. मी त्याला बघतच राहिले… आणि विचार करत होते- हे बाळ मोठे होऊन शेवटी काय बनेल? नीडो पाच मुलांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर होता. इटानगरच्या छोट्याशा शाळेतून शिकून जेव्हा त्याला हरियाणाच्या डीपीएस पानिपतमध्ये पाठवत होते, तेव्हा मनात भीती होती… पण एक विश्वासही होता की- माझा मुलगा काहीतरी मोठे करेल. पानिपतमध्ये विज्ञानाचे शिक्षण घेतले. १२वीनंतर म्हणाला- मम्मी, मी समाजशास्त्र शिकेन आणि परदेशात जाईन. मी विचारले- तुला काय बनायचे आहे? तो फक्त हसला. आता समजते आहे- त्याला काही बनायचे नव्हते, तर काहीतरी बदलायचे होते. 12वी नंतर त्याने लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेतला. वार्षिक शुल्क 68 हजार रुपये होते. पण जेव्हा त्याची मार्कशीट पाहिली गेली, तेव्हा युनिव्हर्सिटी म्हणाली - इतका हुशार मुलगा आमच्याकडे शिकेल, हेच आमच्यासाठी पुरेसे आहे. त्यांनी शुल्क कमी करून 13 हजार केले. त्या दिवशी मला वाटले - माझा मुलगा खरोखरच काहीतरी वेगळा आहे. पण एक भीती मनात होती. मी वर्णद्वेष अनुभवला होता, म्हणून मी त्याला नेहमी समजावत असे - सावध रहा, सगळीकडे लोक सारखे नसतात, पण त्याने कधीच तक्रार केली नाही - ना डीपीएसमध्ये, ना युनिव्हर्सिटीमध्ये. सुट्ट्यांमध्ये घरी यायचा तेव्हा रिकाम्या हाताने यायचा नाही. सर्वांसाठी काहीतरी घेऊन यायचा. आमच्या घरचे ड्रायव्हर मुस्लिम आहेत - ईदला त्यांच्यासाठी टोपी आणायचा. त्यांच्यासाठी ख्रिसमस आणि नवीन वर्षाला पार्टी करायचा. तो सगळ्यांना हसवायचा, घराचे वातावरण हलके करायचा. नीडो मला कधीच उदास पाहू शकत नव्हता. चेहऱ्यावर थोडी जरी उदासी दिसली की, तो लगेच काहीतरी विनोद करायचा. एक दिवस हसत-हसत म्हणाला - मम्मी, मी दोन लग्न करेन. मी दचकले - काय? तो हसून म्हणाला- जेणेकरून मी तुला नेहमी आनंदी ठेवू शकेन… मग घरात कोणत्याही नोकराची गरज पडणार नाही. हे त्याचे बालिश बोलणे होते, पण हेतू खरा होता- मला आनंदी पाहणे. कधीकधी तो स्वयंपाकघरात जायचा, काहीतरी बनवून स्वतःच चाखायचा आणि म्हणायचा- मम्मी, एक दिवस मी सगळं सांभाळून घेईन. खरं सांगायचं तर, मला त्याच्यावर विश्वास होता. मग एक दिवस असा आला, जेव्हा सगळं काही बदललं. त्या दिवशी तो दिल्लीत त्याच्या बहिणीच्या घरी होता. बॅग पॅक होती, गाडी खाली उभी होती. तो वाकून बुटाचे फीत बांधत होता… तेवढ्यात फोन वाजला. दुसऱ्या बाजूने एका मुलीचा घाबरलेला आवाज होता- भैया, माझ्या भावाची तब्येत खूप खराब आहे. आम्ही लाजपत नगरमध्ये, चौथ्या मजल्यावर आहोत… कृपया या. मी एकटी आहे. नीडोने एक सेकंदही विचार केला नाही. ड्रायव्हरला म्हणाला- थांब, कॉलेजला नंतर जाऊ. त्याने लगेच ॲम्ब्युलन्स बोलावली आणि लाजपत नगरसाठी निघाला. अरुंद गल्ल्यांमध्ये तो भटकत राहिला- घर मिळत नव्हते. फोन कानाला लावला होता- तिकडून घाईघाईने आवाज येत होता- लवकर या, तब्येत आणखी खराब होत आहे… जवळ एक मिठाईचे दुकान आहे, तिथून पत्ता विचारून घ्या. तो थेट त्याच दुकानात पोहोचला- अंकल, एक पत्ता विचारायचा आहे. दुकानदाराने न पाहताच सांगितले- माहीत नाही. तो पुन्हा गल्लीत भटकू लागला. फोन पुन्हा वाजला- यावेळी आवाज अधिक घाबरलेला होता- भैया, लवकर ये. थकून तो त्याच मिठाईच्या दुकानात परत गेला. तो म्हणाला- अंकल, प्लीज, माझ्या मित्राचा जीव जाऊ शकतो. दुकानदार चिडला- स्वतःला काय समजतोस? सलमान खान, अक्षय कुमार? वारंवार का येतोयस? एवढे बोलून त्याने त्याला धक्का दिला. बस इथूनच सर्व काही बदलले. नीडोने मागे वळून काहीही म्हटले नाही, फक्त रागाने दुकानाच्या काउंटरवर हात मारला- काचेला हलकी भेग पडली. पुढच्याच क्षणी आजूबाजूचे दुकानदार जमा झाले. एकाने कॉलर पकडली, एकाने ठोसा मारला. तो काही बोलूही शकला नाही. मग पोलिसांना बोलावण्यात आले. तिकडे, लाजपत नगरला जाताना त्याने मला फोनवर सांगितले होते आणि 10 हजार रुपये मागितले होते. मी पैसे पाठवले होते. तेच पैसे त्याने पोलिसांना दिले. पोलिसांनी त्यातून 6 हजार दुकानदाराला दिले आणि 4 हजार स्वतःकडे ठेवले. पोलिस त्याला आपल्यासोबत घेऊन गेली. पोलीस ठाण्यात बसवून ठेवले- जखमी झाला होता, तरीही रुग्णालयात नेले नाही. थोड्या वेळाने पोलिस त्याला पुन्हा त्याच दुकानावर घेऊन गेली- म्हटले, 'समझोता करायचा आहे.' पण तिथे पुन्हा गर्दी जमली. एकाने म्हटले- हाच आहे, काच फोडणारा मुलगा! आणि गर्दीने पुन्हा हल्ला केला. त्याला पुन्हा निर्दयीपणे मारहाण करण्यात आली. मी सतत फोन करत होते, पण तो उचलू शकत नव्हता. जेव्हा गर्दीने त्याला सोडले, तेव्हा त्याने कॉल उचलला. आवाज खूप हळू होता- 'सर्व ठीक आहे मम्मी… फक्त थोडी जखम आहे… औषध घेतले… बाय बाय…,' फोन कट झाला. कदाचित त्याला स्वतःलाही माहीत नव्हते- हेच त्याच्या आयुष्यातील शेवटचे बोलणे असेल. दुसऱ्या दिवशी फोन आला. स्क्रीनवर मोठ्या मुलीचे नाव होते. आवाज थरथरत होता- 'मम्मी… नीडो एम्समध्ये आहे… आता तो… राहिला नाही.' एवढे ऐकताच माझ्या डोळ्यासमोर अंधार पसरला. मी बेशुद्ध पडले. शुद्धीवर आले तेव्हा स्वतःला रुग्णालयात पाहिले. इकडे, मुलाचा मृतदेह हेलिकॉप्टरने गुवाहाटीला आणण्यात आला. आम्ही हेलिकॉप्टरने पोहोचलो. ताबूतमध्ये त्याला पाहिले तेव्हा वाटले - हा तोच मुलगा नाही जो हसत हसत घरातून गेला होता. माझे शरीर थरथरत होते. आम्ही कसेबसे त्याला इटानगरला घेऊन आलो आणि अंत्यसंस्कार केले. सुमारे 15 दिवसांनंतर आम्ही 300 लोक एकत्र जमून दिल्लीला पोहोचलो. रस्ते, कार्यालये, न्यायालये - प्रत्येक ठिकाणी एकच आवाज घुमत होता - नीडोसाठी न्याय हवा आहे. मी जंतर-मंतरवर भाषण दिले. ‘मरीना नीडो स्पीच’ या नावाने तो व्हिडिओ यूट्यूबवर आहे. त्यावर जगभरातील विद्यार्थ्यांचा पाठिंबा मिळाला - जपान, आफ्रिका, काश्मीर… प्रत्येक ठिकाणाहून आमच्या बाजूने आवाज उठला. लोक लिहीत होते- आंटी, आम्हीही हे सोसले आहे… मागे हटू नका, आम्ही तुमच्यासोबत आहोत. हे वाचून मला नीडोची ती गोष्ट आठवली- मम्मी, मी मोठा झाल्यावर असे काहीतरी करेन की जग मला लक्षात ठेवेल. त्याने खरंच काहीतरी मोठं केलं होतं. संपूर्ण जग त्याला ओळखले होते. फक्त फरक इतकाच होता की तो स्वतः हे पाहण्यासाठी जिवंत नव्हता. काही दिवसांनी लंडनहून बीबीसीची टीम आली. कॅमेरा माझ्यासमोर होता, पण मला फक्त माझ्या मुलाचा चेहरा दिसत होता. अशा प्रकारे नीडो गेल्यानंतर मला रडायला वेळच मिळाला नाही. मी त्याच्या न्यायाच्या लढाईत गुंतले. अश्रू यायचे, पण प्रत्येक वेळी ते पुसून मी एक नवीन फाईल उचलत असे. दिल्लीचे रस्ते, कार्यालयांच्या बाहेर, कोर्टाचे कॉरिडॉर- फक्त कागदपत्रांसह भटकत राहिले. सरकारने वकील दिला, दोषींना शिक्षा मिळेल असे आश्वासनही दिले. पण सत्य वेगळे होते- कार्यवाही संथ, फाईल्स सरकत राहिल्या, तारखा वाढत राहिल्या. काहीच झाले नाही. मी अनेक वकील बदलले. अशा प्रकारे एक वकील जायचा, दुसरा यायचा. करोडो रुपये खर्च केले. शेवटी मी खाजगी वकील केला. तेव्हा केस थोडी पुढे सरकली. या दरम्यान प्रकरण सीबीआयपर्यंत पोहोचले. आशा निर्माण झाली, पण तिथेही माझ्या मुलावरच प्रश्न उपस्थित झाले- म्हटले गेले की त्याचे कागदपत्र नाहीत, त्याचे एससीचे प्रमाणपत्र नाही. तेव्हाच ठरवले- जर मुलाला न्याय मिळत नसेल, तर निदान त्याची कहाणी देशापर्यंत पोहोचावी. मी सरकारला एक मागणीपत्र दिले. त्यात मागणी होती- दिल्लीतील कोणत्याही व्यस्त रस्त्याच्या कडेला नीडोचा उंच पुतळा उभारण्यात यावा, ज्यावर लिहिलेले असावे- त्याला फक्त वेगळा दिसत असल्यामुळे मारण्यात आले. चित्रपटगृहांमध्ये चित्रपटांपूर्वी इशारा दाखवण्यात यावा- ईशान्येकडील लोकही याच देशाचे आहेत. रेल्वे स्टेशन, विमानतळ यांसारख्या सार्वजनिक ठिकाणीही हा संदेश लिहिलेला असावा. शाळा आणि विद्यापीठांमध्ये आपल्या संस्कृतीबद्दल शिकवले जावे. सांस्कृतिक देवाणघेवाण कार्यक्रम चालवले जावेत. पण आजपर्यंत यावर कोणतेही काम झाले नाही. बरं, तिकडे, न्यायालयात पहिल्या सुनावणीचा दिवस आला. न्यायालयीन कक्ष खचाखच भरलेला होता. विरोधी वकील उभा राहिला आणि म्हणाला की नीडो ड्रग्स घेत असे. तो खूप रागीट होता. हे ऐकताच माझं रक्त सळसळलं. मी स्वतःला थांबवू शकले नाही. कटघऱ्यातून बाहेर पडून वकिलाजवळ पोहोचले आणि त्यांची कॉलर पकडली. मी म्हणाले- माझ्या मुलाबद्दल असं काही बोलू नका. कोर्टात एकच गोंधळ उडाला. वकील हसला आणि म्हणाला- यांना बघा... यांचा मुलगाही असाच तापट होता. तेव्हाच न्यायाधीशांनी वकिलाला थांबवले आणि म्हणाले- त्या आई आहेत, त्यांचा राग स्वाभाविक आहे. नंतर माझ्याकडे पाहून त्यांनी मला पुढील सुनावणीला येण्यापासून रोखले. यानंतर प्रकरण लांबतच गेलं - खूप लांब, थकवणारं होतं. मग एक दिवस निकाल आला. कोर्टरूममध्ये शांतता होती. न्यायाधीशांनी दोषींना 10 वर्षांची शिक्षा सुनावली. लोक म्हणत होते- न्याय मिळाला आहे. पण मी तिथेच उभी राहून विचार करत होते- 10 वर्षे एका आयुष्याएवढी असू शकतात का? 12 वर्षांनंतर मिळालेला हा निकाल... माझ्यासाठी आजही अपूर्ण आहे. मी आजही माझ्या मुलासाठी लढत आहे. माझ्या टेबलावर नेहमी एक फाईल असते - ज्यावर 'बेजवाडा समिती' असं लिहिलेलं आहे. 2014 मध्ये सरकारने या प्रकरणाच्या चौकशीसाठी ही समिती स्थापन केली होती. समितीने आपल्या तपासणीनंतर शिफारस केली होती- वंशभेदाविरोधात कठोर कायदे बनवले जावेत. ईशान्य भारतासाठी पोलिसांमध्ये स्वतंत्र कक्ष असावा. ईशान्येकडील लोकांसाठी हेल्पलाइन सुरू करावी आणि लोकांना सांगावे की ईशान्य भारत देखील भारताचाच एक भाग आहे. पण या शिफारसी कागदावरच राहिल्या. आज १२ वर्षे झाली, पण नीडो कुठेही गेला नाहीये. तो कोणत्या ना कोणत्या रात्री, माझ्या स्वप्नात परत येतो. मी पाहते- तो उभा आहे, अगदी तसाच, निरागस. स्वप्नात म्हणतो- मम्मी, तिकीट मिळवून दे, मला जायचं आहे. मी झोपेतच त्याला थांबवू इच्छिते, काही विचारू इच्छिते, पण तो निघून जातो. जणू तो विचारत असेल- मम्मी, तुम्ही माझ्यासाठी काही का करत नाहीये? झोप मोडते आणि रात्र पुन्हा लांब होते. आजही त्याची सर्व प्रमाणपत्रे माझ्याकडे आहेत- ओळखपत्र, एटीएम कार्ड, गुणपत्रिका सर्व. कधीकधी मी ती काढून पाहते आणि वाटते, जणू तो आताच दारातून आत येईल. आत्ताच देहरादूनमधून बातमी आली- त्रिपुराच्या एंजेल चकमाची हत्या करण्यात आली. बातमी वाचताच नीडोची आठवण ताजी झाली. जणू तोच प्रसंग पुन्हा समोर उभा राहिला- नीडो गर्दीत ओरडत होता- 'मी भारतीय आहे...' आणि गर्दी... फक्त त्याचा चेहरा पाहत होती, काही ऐकत नव्हती. एंजेलच्या आईबद्दल विचार करते- तीही कदाचित कुठेतरी बसून रडत असेल, अगदी माझ्यासारखीच. अनेकदा त्रिपुराला जाऊन तिला भेटावे असे वाटले, पण हिंमत गोळा करू शकत नाही. आता तर एंजेलही स्वप्नात येऊ लागली आहे, जरी मी त्याला कधी पाहिलेही नाही. ईशान्येकडील लोकांना फक्त एवढेच सांगेन- मी इथपर्यंत लढून आले आहे, आता आणखी कोणीतरी पुढे यावे... नाहीतर आपल्यासोबत हे असेच घडत राहील. एंजेलच्या बातमीनंतर मी सोशल मीडिया पाहणे सोडून दिले आहे. प्रत्येक फोटोत मला माझा नीडो दिसू लागतो. आज नीडो असता, तर तो 31 वर्षांचा असता. कदाचित त्याचे लग्न झाले असते, घरात मुले खेळत असती. तो माझ्या शेजारी बसून म्हणायचा- मम्मी, काळजी करू नकोस, मी आहे. पण डोळ्यासमोर आजही तेच चित्र फिरते- विमानतळ, एक पांढरी शवपेटी… आणि त्यात माझा मुलगा. मी त्याला माझ्या हातांनी स्वीकारले होते, मग अग्नी दिला होता. इटानगरमध्ये आमच्या घरांमध्ये आणि कार्यालयांमध्ये उत्तर भारतातील लोक काम करतात. आम्ही त्यांना पाहुणे मानतो, आदर देतो. पण मनात एक प्रश्न अडकतो- आमच्यासोबत असे का केले जात नाही? जर आम्हीही तुमच्या लोकांशी नीडोसारखं वागलो तर काय होईल? आम्ही ठरवलं तर एका फोन कॉलवर नॉर्थ-ईस्टच्या लोकांना एकत्र करू शकतो - नागालँड, गुवाहाटी, सिक्कीम... प्रत्येक ठिकाणाहून. मग तुमच्यासोबत तेच होईल, जे आमच्यासोबत होतं. त्यांनी माझ्या मुलाला मारून हेलिकॉप्टरने पाठवलं, आम्हीही ठरवलं तर ट्रेनच्या डब्यांना प्रेतांनी भरून पाठवू शकतो. तेव्हा मेनलँड इंडियाच्या लोकांना समजणार नाही की अचानक काय झालं. म्हणून वंशभेदाविरोधात कठोर कायदे बनवा. हे थांबवलं नाही, तर माझ्यासारखाच जखम खाल्लेला दुसरा कोणीतरी एक दिवस उभा राहील. मला या गोष्टी बोलायच्या नाहीत. पण नीडोच्या आठवणीने राग येतो. आमची मुलं दिल्लीत फुकट शिकायला जात नाहीत. ते भाडं देतात, फी भरतात. आमच्याकडे यूपीएससीची कोचिंग नाही, म्हणून आम्ही त्यांना बाहेर पाठवतो - शिकण्यासाठी, जगण्यासाठी... मरण्यासाठी नाही. आमचे डोळे आणि चेहरा वेगळे आहेत - हे आम्ही नाही, देवाने बनवले आहे. देवाला विचारा, त्याने आम्हाला वेगळे का बनवले आहे. जर तुम्हाला सर्वजण सारखे दिसावेत असे वाटत असेल, तर सरकारला सांगा - सर्व कपड्यांच्या फॅक्टऱ्या फक्त साड्या बनवतील, संपूर्ण देशात फक्त गहू पिकवला जाईल. मग सर्वजण सारखे कपडे घालतील, सारखे खातील. तेव्हा कदाचित आम्हीही तुमच्यासारखे दिसू लागू. पण खरंच असं शक्य आहे का, तरीही आमचा चेहरा बदलणार नाही? (मरीना नीडोने आपल्या या भावना भास्कर रिपोर्टर मनीषा भल्ला यांच्याशी शेअर केल्या)
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जेवर येथील नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करणार आहेत. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास हा कार्यक्रम पार पडेल. ११ हजार २०० कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या या विमानतळाचा पहिला टप्पा दरवर्षी सुमारे १.२ कोटी प्रवाशांना हाताळू शकेल. हे उत्तर प्रदेशातील ५ वे आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल. हे विमानतळ केवळ नोएडा आणि ग्रेटर नोएडासाठीच नव्हे, तर दिल्ली, गाझियाबाद आणि फरिदाबाद तसेच अलीगढ, मथुरा आणि आग्रासाठीही खूप महत्त्वाचे ठरेल. नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ हे दिल्ली-एनसीआरसाठी दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून विकसित करण्यात आले आहे. याआधी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे संपूर्ण प्रदेशातील एकमेव विमानतळ होते.प्रवाशांसह पहिले उड्डाण केव्हा होईल?केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री किंजरपू राममोहन नायडू यांच्या म्हणण्यानुसार, विमानतळाचा परवाना जारी झाल्यानंतर विमानसेवा सुरू होण्यामध्ये साधारणपणे ४५ ते ६० दिवसांचे अंतर असते. नोएडा विमानतळाला या महिन्याच्या ६ तारखेला विमानतळाचा परवाना मिळाला आहे. यावरून असे सूचित होते की, आजच्या उद्घाटनानंतर एप्रिलच्या अखेरीस किंवा मे महिन्याच्या सुरुवातीला व्यावसायिक सेवा सुरू होतील. देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगो या विमानतळावरून पहिले उड्डाण करेल. इंडिगो व्यतिरिक्त, अकासा एअर आणि एअर इंडिया देखील नोएडा विमानतळावरून सेवा चालवतील.कोणत्या शहरांसाठी सेवा सुरू होतील?नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरुवातीला मुंबई, कोलकाता, चेन्नई, बंगळूर, हैदराबाद यांसारख्या प्रमुख शहरांसाठी सेवा सुरू करेल, त्यानंतर लखनौ, अहमदाबाद, पुणे, गोवा आणि जयपूरसाठी सेवा सुरू होतील अशी अपेक्षा आहे.नोंदणी कधी सुरू होईल?नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिल्या व्यावसायिक उड्डाणाच्या अंदाजे ४-६ आठवडे आधी बुकिंग सुरू होण्याची शक्यता आहे.नोएडा विमानतळाची वैशिष्ट्येनोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ हे भारतातील सर्वात मोठ्या ग्रीनफिल्ड विमानतळ प्रकल्पांपैकी एक आहे. या विमानतळावर ३ हजार ९०० मीटर लांबीची धावपट्टी असून, ती मोठ्या आकाराची विमाने हाताळण्यास सक्षम आहे. येथे इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टीम (ILS) आणि प्रगत एअरफिल्ड लायटिंगसह आधुनिक नेव्हिगेशन प्रणालीदेखील आहे, ज्यामुळे सर्व प्रकारच्या हवामानात दिवस-रात्र कार्यक्षमतेने कामकाज करणे शक्य होते. या विमानतळावर एक मजबूत कार्गो प्रणाली देखील आहे, ज्यामध्ये मल्टी-मोडल कार्गो हब, एक एकात्मिक कार्गो टर्मिनल आणि एक लॉजिस्टिक्स झोन यांचा समावेश आहे. ही कार्गो सुविधा दरवर्षी २,५०,००० मेट्रिक टनपेक्षा जास्त माल हाताळण्यासाठी तयार करण्यात आली आहे, आणि ही क्षमता अंदाजे १.८ दशलक्ष मेट्रिक टनपर्यंत वाढवण्याची क्षमता आहे.
अमेरिकी सैनिकांना शवपेट्यांमध्ये पाठवणार; इराणची अमेरिकेला धमकी
नवी दिल्ली: इराणच्या इंग्रजी दैनिक 'तेहरान टाइम्स'च्या पहिल्या पानावर आज 'नरकात आपले स्वागत आहे' (Welcome To Hell) या मथळ्याखाली अमेरिकेला एक तीव्र इशारा देण्यात आला आहे. त्यात म्हटले आहे की, इराणी भूमीवर पाऊल ठेवणारा कोणताही अमेरिकन सैनिक 'शवपेटीतून परत येईल' असा इशारा देण्यात आला आहे. जेव्हा अमेरिकन माध्यमांनी शुक्रवारी वृत्त दिले होते की, अमेरिका मध्य-पूर्वेत १० हजार अतिरिक्त सैन्य तैनात करण्याचा विचार करत आहे आणि इराणमध्ये जमिनीवरील कारवाईची तयारी करत आहे.अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, संघर्ष संपवण्यासाठी तेहरान अमेरिकेसोबत शांतता चर्चेत गुंतले असल्याचा वारंवार दावा केला असला तरी, ही संभाव्य अमेरिकी सैन्य तैनाती इराणमधील एक मोठी तैनाती ठरेल. वॉल स्ट्रीट जर्नलच्या मते, या अतिरिक्त अमेरिकी सैन्याचा उद्देश ट्रम्प यांना मध्य-पूर्वेत अधिक व्यापक लष्करी पर्याय उपलब्ध करून देणे हा आहे. २८ फेब्रुवारी रोजी इराणवर अमेरिका-इस्रायलने केलेल्या हल्ल्यांपासून मध्य-पूर्वेत युद्ध सुरू आहे.अमेरिकेचे अतिरिक्त सैन्य, या प्रदेशात आधीच पाठवलेल्या हजारो पॅराट्रूपर्स आणि मरीन सैनिकांमध्ये सामील होईल. एका इराणी अधिकाऱ्याने बुधवारी सांगितले की, अमेरिकेच्या कोणत्याही भू-आक्रमणाला प्रत्युत्तर म्हणून तेहरान येमेनमधील आपल्या हुथी मित्रपक्षांना सक्रिय करेल. हुथींना तांबड्या समुद्रातील जहाजांवर पुन्हा हल्ले सुरू करण्याचे निर्देश दिले जातील, ज्यामुळे युद्धात एक नवीन मार्ग उघडला जाईल, असे त्या अधिकाऱ्याने सांगितले.इराणविरुद्धच्या लढाऊ कारवाईत भूदल पाठवण्याचा आपला कोणताही हेतू नाही, असे ट्रम्प यांनी सातत्याने म्हटले आहे. अतिरिक्त अमेरिकी सैन्य कोठे तैनात केले जाईल हे अद्याप अस्पष्ट आहे. वॉल स्ट्रीट जर्नलने दिलेल्या वृत्तानुसार, त्यांना इराण आणि खारग बेटाजवळ तैनात केले जाईल; जे इराणच्या किनाऱ्यालगत असलेले एक महत्त्वाचे तेल निर्यात केंद्र आहे.
३० मार्च ते ४ एप्रिल दरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाचे नवीन सत्र
मुंबई: ३० मार्चपासून राज्यात आभाळी हवामान आणि दुपारनंतर होणाऱ्या वादळी पावसाचे नवीन सत्र सुरू होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. ३० मार्च रोजी प्रामुख्याने खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातील जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट, वादळी वारे, पाऊस आणि काही ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे. उर्वरित विदर्भात देखील काही प्रमाणात हवामानात बदल दिसून येऊ शकतो.३० मार्चच्या तुलनेत ३१ मार्च रोजी एकंदरीत वादळी पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. मात्र, या भागांमध्ये काही प्रमाणात अस्थिर हवामान आणि वादळी पाऊस पडू शकतो.त्यानंतर १ ते ४ एप्रिल दरम्यान वादळी पावसाचे प्रमाण वाढण्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे या कालावधीत मध्य महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा आणि विदर्भातील ठिकठिकाणी आभाळी हवामान, दुपारनंतरचा वादळी पाऊस, आणि काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.शेतकऱ्यांनी पुढील काही दिवस हवामानाच्या या स्थितीनुसार शेतीची कामे नियोजित करावीत. सध्या रब्बी पिकांची काढणी सुरू असल्याने काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा झाकून ठेवण्याची व्यवस्था करावी. तसेच वादळी वारे, पाऊस आणि संभाव्य गारपीटीपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.मेघगर्जना आणि विजेच्या कडकडाटाच्या वेळी नागरिकांनी व शेतकऱ्यांनी स्वतःची तसेच पाळीव जनावरांची सुरक्षितता सुनिश्चित करावी. अशा वेळी झाडाखाली, टिनशेडखाली तसेच विद्युत ट्रान्सफॉर्मर, वीज खांब आणि विद्युत वाहिन्यांच्या जवळ उभे राहणे टाळावे, असेही आवाहन करण्यात येत आहे.

28 C