IND vs ENG : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ च्या दुसऱ्या रोमांचक सेमीफायनल सामन्यात भारताने इंग्लंडवर ७ धावांनी मात करत फायनलमध्ये धडक मारली आहे.
Basmati Rice Rates: 72 तासात बासमती तांदळाचे दर 10 टक्क्यांनी कोसळले, निर्यातदार संकटात
Basmati Rice Rates:
नवी मुंबईत घरगुती ट्युशन क्लासचा स्लॅब कोसळला, एका मुलाचा मृत्यू आणि १० मुले जखमी
कोपरखैरणे : नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे सेक्टर दोनमधील प्लॉट क्रमांक १२ येथे विद्याभवन अपार्टमेंटमधील तळमजल्यावर असलेला स्लॅब कोसळला. स्लॅब कोसळला त्यावेळी तळ मजल्यावरील घरात घरगुती ट्युशन क्लास सुरू होता. यामुळे एकूण ११ विद्यार्थी जखमी झाले. जखमींपैकी मनिष म्हसे नावाच्या नऊ वर्षीय विद्यार्थ्याचा थोड्या वेळापूर्वी मृत्यू झाला. इतर १० जखमींवर उपचार सुरू आहेत. क्लासमध्ये असलेला आराध्य धनवडे हा विद्यार्थी सुखरुप असून त्याला पालकांनी घरी नेले आहे.अपेक्स रुग्णालय येथे निशिका धनवडे (१३), आयेशा खान (११), देवांश पुजारी (१२), सिद्धांत गुप्ता (९), राजदीप वरखडे (११) यांच्यावर उपचार सुरू आहेत. लायन्स क्लब रुग्णालयात तन्वी श्रीवास्तव (१०), रुद्र पाटील, प्रिन्स सोनी (१४) यांच्यावर उपचार सुरू आहेत. ऍसलोन रुग्णालयात कुलसुम खान (१३) वर उपचार सुरू आहेत. पार्थ खैरनार (१२) वर साईज्योत रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींपैकी फक्त पार्थ हा एकमेव मुलगा आहे जो पहिल्या मजल्यावरील घरात होता. तळमजल्यावरील स्लॅब पडल्यामुळे झालेल्या दुर्घटनेत घर क्रमांक १०२ मधील पार्थ जखमी झाला.प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवार ५ मार्च रोजी संध्याकाळी साडेचार ते पाच दरम्यान स्लॅब कोसळून दुर्घटना झाली. कोपरखैरणे, वाशी आणि ऐरोली येथील अग्निशमन दलाच्या पथकांनी संयुक्त कारवाई केली आणि सर्व जखमींना तातडीने ढिगाऱ्यातून बाहेर काढून रुग्णालयांमध्ये दाखल केले. घटनेची माहिती मिळताच नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील, उपमहापौर दशरथ भगत आणि आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी घटनास्थळाला भेट देऊन दुर्घटनेची माहिती घेतली. रुग्णालयांमध्ये जाऊन जखमींची विचारपूस केली. जखमींच्या नातलगांना धीर दिला. दुर्घटनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून विद्याभवन अपार्टमेंट रिकामी करण्यात आली आहे. सर्व रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले आहे. अण्णासाहेब पाटील सांस्कृतिक भवन कोपरखैरणे यांनी तात्पुरत्या निवासाची व्यवस्था केली आहे. इमारतीचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश आयुक्तांनी संबंधित विभागाला दिले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्या, शुक्रवारी राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
Trump's import tariffs: ट्रम्प यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर नापसंती व्यक्त केली होती. सर्वोच्च न्यायालयाने शुल्क परत करावे की नाही याबाबत वक्तव्य केले नाही असे सांगितले होते.
Fighter aircraft missing: सुखोई Su-30MKI हे दोन इंजिन आणि दोन आसन असलेले ४.५ व्या पिढीचे लढाऊ विमान आहे. हवाई वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी (Air Superiority) हे विमान विशेषतः तयार केले आहे.
मुंबईच्या एफ दक्षिण आणि एफ उत्तर प्रभाग समितीमध्ये शिवसेनेच्या मानसी सातमकर यांचा विजय
मुंबई : मुंबई महापालिकेच्या प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी गुरुवारी १७ प्रभाग समित्यांपैंकी ६ प्रभाग समित्यांच्या निवडणुका पार पडल्या. यामध्ये एफ दक्षिण आणि एफ उत्तर या प्रभाग समितीमध्ये नाट्यमयरित्या निकाल लागला. उबाठाकडे जाणारी प्रभाग समिती आता महायुतीकडे आली. या प्रभाग समितीमध्ये उबाठाच्या उमेदवार श्रध्दा जाधव यांचा विजय निश्चित मानला जात असतानाच शिवसेनेचे महापालिका गटनेते अमेय घोले तसेच माजी नगरसेवक मंगेश सातमकर यांनी उबाठाच्या उमेदवार श्रध्दा जाधव यांचा पराभव करत शिवसेनेच्या मानसी सातमकर यांना विजय मिळवून दिला.मुंबई महापालिकेच्या सहा प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुका पार पडल्या. त्यात तीन ठिकाणी बिनविरोध निवड झाली. बिनविरोध निवडीमध्ये सी अँड डी प्रभाग समिती अध्यक्षपदी आकाश पुरोहित, आर उत्तर व आर मध्य प्रभाग समिती अध्यक्षपदी प्रकाश दरेकर आणि आर दक्षिण प्रभाग समिती अध्यक्षपदी लिना देहेरकर यांचा समावेश होता. ए, बी आणि ई प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी काँग्रेसच्यावतीने ज्ञानराज निकम आणि भाजपचे रोहिदास लोखंडे यांच्यात लढत होती. या प्रभाग समिती निवडणुकीत निकम यांना ७ तर प्रतिस्पर्धी उमेदवार रोहिदास लोखंडे यांना ५ मते मिळाली. ‘पी पूर्व’ आणि ‘पी पश्चिम’ प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार हैदरअली शेख हे १० मते मिळवून निवडून आले. तर त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षाचे उमेदवार अजित रावराणे यांना ८ मते मिळाली. या प्रभागात भाजप ६, शिवसेना १ अशा प्रकारे महायुतीचे ७ सदस्य आहेत. तर उबाठा ५, काँग्रेस ४, मनसे एक आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शप) १ अशाप्रकारे सदस्य आहे. त्यामुळे महायुतीसोबत अजित रावराणे गेल्यामुळे त्यांचे संख्याबळ ८ असून काँग्रेस, मनसे, उबाठाचे १० एवढे संख्याबळ होत आहे. एफ दक्षिण' व ‘एफ उत्तर’ प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत नाट्यमय निकाल लागला. या प्रभागात महायुतीचे ८ आणि उबाठा, मनसे, काँग्रेस आणि सपाचे मिळून ९ सदस्य संख्या असल्यामुळे महायुतीचा उमेदवार मानसी सातमकर यांचा पराभव निश्चित मानला जात होता. त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवार उबाठा नगरसेविका श्रध्दा जाधव यांचा विजय निश्चित मानला जात होता. यासाठी उबाठासह मनसेचे नगरसेवक फेटा बांधून सभागृहात दाखलही झाले होते. परंतु पहिल्या १५ मिनिटांमध्ये उमेदवारी मागे घेण्याच्या कालावधीमध्ये काँग्रेसच्या नगरसेविका आयेशा वणू आणि सपाच्या नगरसेविका इरम सिध्दीकी या सभागृहात पोहोचल्याच नाही. यामुळे पिठासीन अधिकारी रितू तावडे यांनी प्रभाग समिती अध्यक्षपदी मानसी सातमकर यांना विजयी घोषित केले.विशेष म्हणजे काँग्रेस पक्षाने प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उबाठाच्या उमेदवारांना जाहिर पाठिंबा दिला होता आणि या प्रभागात नगरसेविका आयेशा वणू यांना व्हिपही लागू केला होता. परंतु पक्षादेश डावलून आयेशा वणू या अनुपस्थित राहिल्याने शंका उपस्थित केली जात आहे. त्यामुळे या निवडणुकीत शिवसेना महापालिका गटनेते अमेय घोले आणि माजी नगरसेवक मंगेश सातमकर हे किंगमेकर ठरले आहे. विशेष म्हणजे श्रध्दा जाधव यांना उमेदवारी दिल्यामुळे त्यांच्या पक्षातील काही नगरसेवकही नाराज होते. या नाराजीचा फायदा महायुतीला उठवता आला असे बोलले जात आहे. या सहा पैंकी ‘आर मध्य‘ आणि ‘आर उत्तर’; ‘आर दक्षिण’; ‘पी पूर्व’ आणि ‘पी पश्चिम’ या तीन प्रभाग समितीच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत पीठासीन अधिकारी म्हणून उप महापौर संजय घाडी यांनी कामकाज पाहिले, तर शहरातील तीन प्रभाग समित्यांच्या निवडणुकीत महापौर रितू तावडे यांनी पिठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले. या निवडणुकीनंतर माध्यमांशी बोलतांना शिवसेनेचे महापालिका गटनेते अमेय घोले यांनी, शिवसेनेच्या मानसी सातमकर यांचा विजय झाला आणि श्रध्दा जाधव यांचा पराभव केल्याचे सांगतानाच महाविकास आघाडीच्या नगरसेवकांचा अविश्वास होता म्हणून त्यांची अनुपस्थिती लागली हे यावरून दिसून आल्याचे सांगितले. महायुतीचा विजय झाला आहे, महाविकास आघाडीत विश्वास राहिलेला नाही, संवाद राहिलेला नाही, याचा प्रत्यय प्रभाग समिती दिसून आला. उद्या तो राज्यात दिसून येईल आणि परवा केंद्रातही दिसून येईल,असा विश्वास घोले यांनी व्यक्त केला.
भटक्या श्वानांच्या नसबंदीकरण केंद्रांची क्षमता वाढवा
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील भटक्या श्वानांचे नियंत्रण, निर्बीजीकरण, रेबीज प्रतिबंधक लसीकरण यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत. असे असले तरी या उपाययोजनांना गती देण्यासाठी, त्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी क्षमता वाढविणे गरजेचे आहे. एवढेच नव्हे तर, नसबंदीकरण केंद्रांची क्षमता वाढवणे, प्राणी निवारा केंद्रांची निर्मिती करणे, सर्व प्रशासकीय प्रभागनिहाय श्वान पकडणारी वाहने आणि मनुष्यबळ उपलब्ध करून देणे इत्यादी उपाययोजना राबविण्यात याव्यात. एकूणच प्राणी व्यवस्थापन अधिक शास्त्रीय आणि मानवीय पद्धतीने करण्यात यावे, अशी सूचना मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी महानगरपालिका प्रशासनाला केली आहे.यासंदर्भात महापौर रितू तावडे यांनी महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे की, मुंबईमध्ये भटक्या श्वानांची संख्या मागील काही वर्षांत लक्षणीय प्रमाणात वाढल्याचे आढळून आले आहे. विविध प्रभागांमध्ये श्वानांनी चावा घेतल्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. हा विषय सार्वजनिक आरोग्य, नागरिकांची सुरक्षितता आणि नागरी व्यवस्थापन या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे.महानगरपालिकेकडून प्राणी जन्म नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येत असला तरी विद्यमान पायाभूत सुविधा आणि उपलब्ध क्षमता ही मुंबईतील श्वानांच्या वाढत्या संख्येच्या तुलनेत अपुरी ठरत आहे. सध्या मुंबईत सुमारे ८ अशासकीय संस्थामार्फत नसबंदीकरण व लसीकरणाची कामे केली जातात. मात्र, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या २६ प्रशासकीय प्रभागांमध्ये भटक्या श्वान संख्येवर प्रभावीपणे नियंत्रण मिळविण्यासाठी या क्षमतेत मोठ्या प्रमाणात वाढ करणे आवश्यक आहे. यादृष्टीने पुढील काही उपाययोजना सुचवित आहे.नसबंदीकरण केंद्रांची क्षमता वाढविणे - सध्या कार्यरत असलेल्या ८ अशासकीय प्राणीप्रेमी संस्थांव्यतिरिक्त मुंबईच्या विविध भागांमध्ये नवीन नसबंदीकरण केंद्रे स्थापन करणे आवश्यक आहे. यामुळे श्वानांच्या नसबंदी आणि रेबीज प्रतिबंधक लसीकरणाची क्षमता वाढेल. तसेच श्वानांची संख्या नियंत्रित करण्यासाठी आवश्यक असलेले वार्षिक लक्ष्य साध्य करता येईल.अशा प्रकारे सर्व उपाययोजना प्रभावीपणे राबविल्यास भटक्या श्वानांच्या संख्येवर नियंत्रण मिळविता येईल, श्वान चावण्याच्या घटनांमध्ये घट होवू शकते आणि नागरिकांच्या सुरक्षिततेत वाढ करता येईल. समवेत, नागरी प्राणी व्यवस्थापन अधिक शास्त्रीय आणि मानवीय पद्धतीने राबविता येईल. त्यामुळे सदर विषयाचा प्राधान्याने विचार करून आवश्यक प्रशासकीय मान्यता व अंमलबजावणीबाबत कृपया पुढील कार्यवाही करण्यात यावी, असे महापौर रितू तावडे यांनी या पत्रात नमूद केले आहे.
Anti-Conversion Bill : धर्मांतरविरोधी कायद्याला मंजुरी.! मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
सक्तीच्या धर्मांतराविरोधात कायदा लागू करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
Israel War cost: युद्धाचा रोज तीन अब्ज डॉलर खर्च; इस्रायलची अर्थव्यवस्था संकटात
Israel War cost: यासंदर्भात इस्रायलच्या अर्थ मंत्रालयाने लष्कर प्रमुखांना एक पत्र पाठवून ही माहिती दिली आहे. युद्ध सुरू झाल्यापासून इस्रायलमध्ये नागरिकांच्या हालचालीवर मर्यादा आणण्यात आल्या आहेत.
Maharashtra growth rate: विकासदरात महाराष्ट्र पडला मागे; कर्नाटक, गुजरात, तामिळनाडू पुढे
Maharashtra growth rate: 2024-25 च्या मूल्यांकनानुसार महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सर्वात मोठी म्हणजे 42.67 लाख कोटी रुपयांची आहे. 2021-22 ते 2024-25 या आर्थिक वर्षाच्या कालावधीत महाराष्ट्र सरकारचे सकल राज्य उत्पन्न 43 टक्क्यांनी वाढले. मात्र कर्नाटक, गुजरात, तामिळनाडूचे उत्पन्न महाराष्ट्रापेक्षा जास्त वेगाने वाढले आहे.
Sanju Samson Records : संजू सॅमसन आता एका टी-२० विश्वचषकात भारतासाठी सर्वाधिक षटकार ठोकणारा फलंदाज बनला आहे. यापूर्वी हा विक्रम रोहित शर्माच्या नावावर होता. संजूने केवळ ४ सामन्यात १६ षटकार ठोकले आहेत.
संजू सॅमसनचे शतक हुकले, भारताने दिली १९ षटकार, १८ चौकारांची मेजवानी
मुंबई : मोठ्या आणि महत्त्वाच्या सामन्यात कसे खेळावे, हे संजू सॅमसनने पुन्हा एकदा दाखवून दिले. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या लढतीत संजूने इंग्लंडच्या गोलंदाजांना बेक्कार चोप देताना ८९ धावांची अविश्वसनीय खेळी केली. त्याच्या या खेळीने इंग्लंडच्या आत्मविश्वासाचा चुराडा केला. भारतीय फलंदाजांनीही संजूने रचलेल्या पायावर धावसंख्येचे मोठे इमले रचले. भारतीय संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या बाद फेरीतील सर्वात वेगवान शतकांमध्ये दुसरे स्थान पटकावले. संजूने आज विराट कोहलीच्या मोठ्या विक्रमाशी बरोबरी केली आणि भारताने दोनशेपार धावांचा डोंगर उभा केला. वर्ल्ड कप नॉक आऊटमधील ही सर्वोत्तम धावसंख्या ठऱली.https://prahaar.in/2026/03/05/will-india-achieve-a-historic-feat/अभिषेक शर्मा (९) पुन्हा अपयशी ठरला, पंरतु संजू इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर नाही नमला. त्याने कोलकातामध्ये केलेल्या खेळीचा अॅक्शन रिप्ले मुंबईत दाखवला. ट्वेंटी-२० वर्ल्ड कपच्या बाद फेरीत ५०+ धावांची खेळी करणारा संजू भारताचा चौथा सलामीवीर ठरला. संजूला दुसऱ्या विकेटसाठी इशान किशनची साथ मिळाली आणि दोघांनी ४५ चेंडूंत ९७ धावा जोडल्या. इशान १८ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ३९ धावांवर झेलबाद झाला. भारतासाठी ट्वेंटी-२० वर्ल्ड कपच्या नॉक आऊट सामन्यातील ही सर्वोत्तम भागीदारी ठरली.भारताने फलंदाजीच्या स्ट्रॅटेजीत बदल करताना शिवम दुबेला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवले. शिवमने इंग्लंडचा प्रमुख फिरकीपटू आदिल रशीदला एकाच षटकात दोन खणखणीत षटकार खेचून इशानच्या विकेटचा वचपा काढला. संजू आणि शिवम या जोडीने २२ चेंडूंत ४३ धावा जोडल्या. संजू ४२ चेंडूंत ८ चौकार व ७ षटकारांसह ८९ धावांवर झेलबाद झाला. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या बाद फेरीतील ही चौथी सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली. संजूने विराट कोहलीच्या ( नाबाद ८९ धावा वि. वेस्ट इंडिज, मुंबई, २०१६ उपांत्य फेरी) विक्रमाशी बरोबरी केली.नॉकआऊट सामन्यात सर्वांधिक धावसंख्येच्या या विक्रमात फिन अॅलन ( नाबाद १०० वि. दक्षिण आफ्रिका, कोलकाता, २०२६ उपांत्य फेरी) अव्वल स्थानी आहे. तिलकरत्ने दिलशानने २००९च्या उपांत्य फेरीत वेस्ट इंडिजविरुद्ध नाबाद ९६ धावा केल्या होत्या. संजूने आज इंग्लंडच्या अॅलेक्स हेल्सचा नाबाद ८६ धावांचा ( वि. भारत, २०२२ उपांत्य फेरी) विक्रम मोडला. संजूने सेट केलेल्या पायावर नंतर शिवम व सूर्यकुमार यादव यांनी धावांचा डोंगर उभा केला. सूर्या व शिवम यांनी १५ चेंडूंत ३० धावा जोडल्या. कर्णधार ११ धावांवर यष्टिचीत झाला.भारताने १६.५ षटकांत फलकावर दोनशे धावा पूर्ण केल्या. हार्दिक पांड्याच्या नो लूक शॉटने सर्वांची वाहवाह मिळवली. शिवम दुबे २५ चेंडूंत १ चौकार व ४ षटकारांसह ४३ धावांवर रन आऊट झाला. हार्दिकच्या चुकीच्या कॉलचा त्याला फटका बसला. पुढच्याच चेंडूवर हार्दिकचा झेल उडालेला, परंतु बँटनने तो सोडला. वर्ल्ड कपच्या एका पर्वात तीन वेळा रन आऊट होणारा शिवम हा दुसरा फलंदाज ठरला. महेंद्रसिंग धोनी २००७ मध्ये तीन वेळा रन आऊट झाला होता. तिलक व हार्दिकने टीम इंडियाला २० षटकांत ६ बाद २५३ धावांपर्यंत पोहोचवले. तिलकने १९व्या षटकात जोफ्रा आर्चरला तीन षटकार खेचले. तिलक ७ चेंडूंत २१ धावा करून माघारी परतला. हार्दिकही १२ चेंडूंत २७ धावांवर रन आऊट झाला.
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाला माणगाव तालुक्यात ७ मार्चपासून सुरुवात
माणगाव : माणगाव तालुक्यातील नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आणि महिलांना विविध प्रकारचे शासकीय दाखले व महसूल विषयक सेवा तातडीने उपलब्ध करून देण्यासाठी “छत्रपती शिवाजी महाराज महसूल शिबीर अभियान” ७ मार्चपासून सुरू होत आहे. या अभियानाच्या माध्यमातून महसूल विभागाच्या विविध सेवांचा लाभ थेट नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येणार असून, सर्व स्तरावरील नागरिकांनी या उपक्रमाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ. संदीपान सानप यांनी पत्रकार परिषदेत केले.या विशेष अभियानांतर्गत तालुक्यातील विविध भागांमध्ये महसूल शिबिरे आयोजित करण्यात आली असून नागरिकांना त्यांच्या गावाजवळच सेवा मिळणार आहेत. त्यामुळे कार्यालयीन फेऱ्या टाळून नागरिकांचे वेळ व खर्च दोन्ही वाचणार आहेत. या अभियानाचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे. ७ मार्च – निकम स्कूल, लोणेरे १४ मार्च – ग्रामपंचायत तळाशेत - इंदापूर आणि ग्रामपंचायत निजामपूर १० एप्रिल – मराठी शाळा, विळे, १७ एप्रिल – बुद्ध विहार, गोरेगाव,८ मे – तलाठी भवन, माणगाव, १५ मे – ग्रामपंचायत मोरबा, ही सर्व शिबिरे सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत आयोजित करण्यात येणार आहेत.या शिबिरांमध्ये ग्रामीण भागातील नागरिकांच्या महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन जीवनातील विविध समस्या आणि तक्रारी तातडीने निकाली काढण्यावर भर दिला जाणार आहे. विशेषतः उत्पन्न दाखला, जात दाखला, रहिवासी दाखला, वारस प्रमाणपत्र, ७/१२ उतारे, फेरफार नोंदी तसेच इतर महसूल विषयक कागदपत्रे तातडीने देण्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया शिबिरातच पूर्ण केली जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवेशासाठी तसेच नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी मोठी मदत होणार आहे.
2 Governor Resigns: गुरुवारी एकाच दिवशी दोन राज्यपालांनी राजीनामा दिल्याने देशाच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
मुंबई : आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकप मध्ये २००७ पासून आतापर्यंत भारत तीन वेळा फायनलमध्ये धडकला आहे. टीम इंडिया २००७, २०१४ आणि २०२४ मध्ये फायनलमध्ये पोहोचली. यापैकी २००७ आणि २०२४ मध्ये भारताने आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकप जिंकला तर २०१४ मध्ये भारत आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकपचा उपविजेता झाला. आता इंग्लंड विरुद्धची सेमी फायनल जिंकल्यास भारतीय संघ चौथ्यांदा आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकपच्या फायनलमध्ये धडकणार आहे.आतापर्यंत प्रत्येकी दोन वेळा आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकप जिंकण्याची कामगिरी भारत, इंग्लंड आणि वेस्ट इंडिज या तीन संघांनी केली आहे. कोणत्याही संघाने तिसऱ्यांदा आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकप जिंकण्याची कामगिरी केलेली नाही. यामुळे इंग्लंड विरुद्धची सेमी फायनल जिंकून फायनलमध्ये जात पुढे विश्वविजेता होण्याची संधी भारताकडे आहे. भारत इंग्लंडला हरवून फायनलमध्ये पोहोचला तर आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकपच्या फायनलमध्ये तब्बल चार वेळा धडक मारणारा एकमेव संघ अशीही टीम इंडियाची ख्याती होणार आहे. भारत ही ऐतिहासिक कामगिरी करतो की नाही याकडे अनेकांचे लक्ष आहे. वर्ष २००७ विजेता भारत - उपविजेता पाकिस्तान वर्ष २००९ विजेता पाकिस्तान - उपविजेता श्रीलंका वर्ष २०१० विजेता इंग्लंड - उपविजेता ऑस्ट्रेलिया वर्ष २०१२ विजेता वेस्ट इंडिज - उपविजेता श्रीलंका वर्ष २०१४ विजेता श्रीलंका - उपविजेता भारत वर्ष २०१६ विजेता वेस्ट इंडिज - उपविजेता इंग्लंड वर्ष २०२१ विजेता ऑस्ट्रेलिया - उपविजेता न्यूझीलंड वर्ष २०२२ विजेता इंग्लंड - उपविजेता पाकिस्तान वर्ष २०२४ विजेता भारत - उपविजेता दक्षिण आफ्रिका
मत्स्यव्यवसाय आणि जल संवर्धन क्षेत्राचा वृद्धीदर ८.४ टक्क्यांवर
मुंबई : महाराष्ट्राच्या मत्स्य व्यवसाय क्षेत्रात गेल्या काही वर्षांत अत्यंत सकारात्मक बदल दिसून येत असून, राज्याच्या अर्थव्यवस्थेत या क्षेत्राचा मोठा वाटा अधोरेखित झाला आहे. २०२४-२५ या वर्षात राज्याच्या एकूण मत्स्य उत्पादनात लक्षणीय वाढ झाली असून, मासेमारी आणि जल संवर्धन क्षेत्राचा अपेक्षित वृद्धीदर ८.४ टक्क्यांवर पोहोचला आहे. राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालातून हे आशादायक चित्र समोर आले आहे.राज्यात २०२३-२४ मध्ये एकूण ७ लाख मेट्रिक टन मत्स्य उत्पादन झाले होते, त्यामध्ये वाढ होऊन २०२४-२५ मध्ये हे उत्पादन ७.३२ लाख मेट्रिक टन इतके झाले आहे. यामध्ये ४.६३ लाख मे. टन सागरी मासेमारीचा, तर २.६९ लाख मे. टन वाटा गोड्या पाण्यातील मासेमारीचा आहे. विशेष म्हणजे, उत्पादनाच्या मूल्यात मोठी झेप पाहायला मिळाली असून, गेल्या वर्षीच्या १० हजार ३४७ कोटी रुपयांच्या तुलनेत यंदा हे मूल्य १२ हजार ६७५ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. उत्पादनात वाढ झाली असली तरी निर्यातीच्या प्रमाणात काहीशी घट झाली आहे. २०२३-२४ मधील २.४६ लाख मेट्रिक टन निर्यातीवरून २०२४-२५ मध्ये हा आकडा २.२३ लाख मेट्रिक टन इतका नोंदवण्यात आला. मात्र, जागतिक बाजारातील दरामुळे निर्यातीचे मूल्य ६ हजार ५८२ कोटींवरून ७ हजार ३४३ कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे. यामुळे राज्याच्या तिजोरीत अधिक परकीय चलन जमा करण्यात यश आले आहे.पायाभूत सुविधा आणि आधुनिक तंत्रज्ञानावर भरराज्याला लाभलेल्या ७२० किमी लांबीच्या किनारपट्टीवर १७३ मासेमारी केंद्रे कार्यरत आहेत. केंद्र सरकारच्या 'प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजने'ची मुदत २०२५-२६ पर्यंत वाढवण्यात आल्याने या क्षेत्राला अधिक बळकटी मिळणार आहे. राज्यातील १०५ जलाशयांमध्ये १० हजार ८० पिंजरे बसवण्यात आले असून, त्यातून २६ हजार २३४ मेट्रिक टन उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेतंर्गत ६ जेटींच्या विकासासाठी १०७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती, त्यापैकी ४ जेटींची कामे यशस्वीरित्या पूर्ण झाली आहेत. राज्यात सध्या १३ हजार ८३१ यांत्रिक नौका असून सागरी मासेमारीसाठी १.१२ लाख चौ. किमी क्षेत्र उपलब्ध आहे. तसेच गोड्या पाण्यातील मासेमारीसाठी ४ लाख हेक्टर क्षेत्र उपलब्ध असून, वार्षिक मत्स्यबीज उत्पादन क्षमता १८०.२५ कोटी इतकी आहे, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
वीर सावकरांना भारतरत्न देण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार
सुधीर मुनगंटीवार यांच्या अशासकीय ठारावावर मंत्री जयकुमार रावल यांचे उत्तरमुंबई : भारतीय स्वातंत्र्यचळवळीतील क्रांतिकारकांचे मुकुटमणी, द्रष्टे समाजसुधारक, प्रखर राष्ट्रभक्त स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार द्यावा, असा अशासकीय ठराव गुरुवारी भाजप आ. सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत मांडला. त्यावर, वीर सावकरांना भारतरत्न देण्यासाठी शासकीय पातळीवर केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन देत राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी अशासकीय ठराव मागे घेण्याची विनंती मुनगंटीवार यांना केला.आ. सुधीर मुनगंटीवार यांनी नियम १०६ अन्वये हा अशासकीय ठराव विधानसभेत मांडला. देशाला स्वातंत्र्य मिळण्याकरिता लढा देऊन, त्यासाठी काळ्या पाण्याची शिक्षा भोगून जनतेला मातृभूमी प्रेमाची ज्वलंत विचारसरणी देणारे आणि क्रांतिकारकांचे प्रेरणास्थान असलेले स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावकर यांना मरणोत्तर भारतरत्न प्रदान करण्याबाबत राज्य शासनाने केंद्र शासनाकडे आग्रह धरावा, अशी शिफारस विधानसभेने शासनाला करावी, अशी मागणी त्यांनी केली.स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिलेले अभूतपूर्व आणि अमूल्य योगदान यावेळी मुनगंटीवार यांनी सभागृहात बोलताना अधोरेखित केले. दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनीही तशी भावना व्यक्त केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेळोवेळी आपल्या भाषणांतून याबाबतचा उल्लेख केला होता. तसेच भाजपने आपल्या जाहीरनाम्यातही अनेकवेळा याबाबत आश्वासन दिल्याचे मुनगंटीवार यांनी नमूद केले. त्यावर उत्तर देताना मंत्री जयकुमार रावल म्हणाले, २०१८ आणि २०१९ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून स्वातंत्र्यवीर सावकर यांना मरणोत्तर भारतरत्न देण्याची आग्रही मागणी केली होती. यापुढे देखील या मागणीसाठी शासन म्हणून केंद्राकडे पाठपुरावा केला जाईल. राजशिष्टाचार मंत्री म्हणून मी स्वतः याबाबत पाठपुरावा करेन. त्यामुळे सुधीर मुनगंटीवार यांनी अशासकीय ठराव मागे घ्यावा, अशी विनंती त्यांनी केली.नेमके काय घडले?आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी अशासकीय ठरावाचे शासकीय ठरावात रुपांतर करण्याची मागणी केली. महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याबाबतच्या अशासकीय ठरावाचे अशाप्रकारे शासकीय ठरावात रुपांतर करण्यात आल्याची आठवण त्यांनी करून दिली. याबाबत निश्चितच शासकीय स्तरावर कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन मंत्री रावल यांनी दिले. त्यानंतर हा अशासकीय ठराव मागे घेण्यात आला.
IND vs ENG : या विश्वचषकात तीन वेळा पहिल्याच षटकात षटकार ठोकणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे.
महाराष्ट्र परिवहन आयुक्त कार्यालयात बुधवारी झालेल्या बैठकीत तोडगा न निघल्याने महाराष्ट्र परिवहन कृती समितीने संपाचा निर्णय घेतला आहे.
IND vs ENG : संजू सॅमसनचा मोलाचा सल्ला धुडकावला आणि घात झाला! अभिषेक शर्मा पुन्हा एकदा ठरला फ्लॉप
IND vs ENG : इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात अभिषेक शर्मा सुरुवातीपासूनच दबावात दिसत होता. मैदानावर असलेल्या संजू सॅमसनने त्याला 'थोडं थांबून खेळ, खेळपट्टीवर वेळ घे' असा मोलाचा सल्ला दिला होता.
'वाहतूकदारांनी राज्यव्यापी संप मागे घेतला'
मुंबई :अन्यायकारक इ-चलान रद्द करण्याबाबत शासन सकारात्मक भूमिका घेणार असल्याचे आश्वासन देत तसेच वाहतूकदारांच्या विविध समस्यांवर तोडगा काढण्यासाठी लवकरच पोलीस व परिवहन विभागाची संयुक्त बैठक बोलावण्यात येणार असल्याची माहिती दिल्यानंतर राज्यातील विविध वाहतूकदार संघटनांनी पुकारलेला राज्यव्यापी संप मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.मंत्री सरनाईक म्हणाले की, राज्य व्यापी वाहतूकदारांच्या संपा संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली . तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुरदृष्य प्रणालीद्वारे वाहतूकदार संघटनांची शिखर समिती ' महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट ॲक्शन ' कमिटीच्या सदस्यांशी संवाद साधला. त्यांच्या मागण्यांचा सहानुभूतीने शासन विचार करित आहे, तरी संप मागे घ्यावा असे आवाहन केले. त्या आव्हानाला प्रतिसाद देत वाहतूकदारांनी संप मागे घेतला आहे. तसेच , शासन वाहतुकदारांच्या विविध मागण्या संदर्भात संवेदनशील असल्याचे मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले . अन्यायकारक पद्धतीने काढण्यात आलेल्या इ-चलानांबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल तसेच संबंधित समस्यांवर चर्चा करण्यासाठी परिवहन विभाग व पोलीस प्रशासन आणि वाहतूकदार संघटनांचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. या आश्वासनानंतर वाहतूकदारांनी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला.
'जलवाहतूक क्षेत्रात जागतिक दर्जाच्या सुविधा निर्माण करणार'
मुंबई :रायगड जिल्ह्यातील दिघी बंदराचा कायापालट करून तेथे जागतिक दर्जाच्या सुविधा निर्माण करण्यावर राज्य सरकारचा भर असल्याचे प्रतिपादन मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी आज येथे केले.मंत्रालयात आयोजित बैठकीत अदानी पोर्ट्स कडून दिघी बंदराच्या विकास आराखड्याबाबत सविस्तर सादरीकरण करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.या बैठकीत बंदराच्या प्रगतीचा आणि सुरू असलेल्या विविध विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.दिघी बंदराचे आतापर्यंतचे काम अत्यंत शिस्तबद्ध आणि पूर्वनियोजित आराखड्यानुसार सुरू असल्याचे मंत्री राणे यांनी नमूद केले.राज्यातील रस्ते वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी आगामी काळात वॉटर ट्रान्सपोर्ट (जलवाहतूक) हा उत्तम पर्याय ठरणार आहे. यावर सरकार विशेष भर देत असल्याचेही मंत्री राणे म्हणाले.दिघी बंदर हे केवळ मालाची ने-आण करण्याचे केंद्र न राहता, ते जागतिक स्तरावरील एक लॉजिस्टिक हब म्हणून विकसित करण्याचा सरकारचा मानस आहे.मंत्री नितेश राणे यांनी स्पष्ट केले की, राज्याच्या किनारपट्टीचा वापर करून दळणवळण अधिक वेगवान करण्यासाठी जलवाहतूक व्यवस्था सुधारण्यावर प्राधान्य दिले जाईल. यामुळे इंधनाची बचत होण्यासोबतच पर्यावरणाचे रक्षण होण्यासही मदत होईल.या विकास प्रकल्पामुळे रायगड जिल्ह्यातील स्थानिक रोजगार वाढण्यास आणि राज्याच्या महसुलात भर पडण्यास मोठी मदत होणार आहे.या बैठकीस महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी प्रदीप,अदानी पोर्ट चे मुख्य कार्यकारी अधिकारी नीरज बंसल,तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार
शिवसेनेकडून ज्योती वाघमारेंना उमेदवारी; शरद पवारांनी घरातून भरला अर्ज, तावडे, आठवले, पार्थ पवारांसह महायुतीच्या उमेदवारांचे अर्ज दाखलमुंबई : राज्यातील राज्यसभेच्या सात जागांसाठी केवळ सातच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजप-महायुतीकडून सहा आणि महाविकास आघाडीकडून शरद पवार यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. अर्जांची छाननी आणि इतर तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर १६ मार्च रोजी याबाबतची अधिकृत घोषणा केली जाईल.गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी राजकीय हालचालींना वेग आला होता. महायुतीकडून भाजपने चार, राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) एक आणि शिवसेनेने एक असे एकूण सहा अर्ज दाखल केले आहेत. तर महाविकास आघाडीकडून ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा एकमेव अर्ज दाखल झाला आहे. प्रकृतीच्या कारणास्तव शरद पवार विधानभवनात उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण केली. महाराष्ट्राच्या निवडणूक इतिहासात घरी जाऊन उमेदवारी अर्ज भरण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे.भाजपचे उमेदवार विनोद तावडे, रामदास आठवले, माया ईवनाते आणि रामराव वडकुते यांनी राष्ट्रवादीच्या वतीने पार्थ पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आपले अर्ज सादर केले. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उपस्थित होते. शिवसेनेकडून ज्योती वाघमारे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अर्ज भरला. अर्ज बाद होण्याचा धोका टाळण्यासाठी शरद पवार, पार्थ पवार आणि ज्योती वाघमारे यांनी प्रत्येकी दोन संच दाखल केले आहेत.
भारतीय जनता युवा मोर्चा, मुंबईच्या अध्यक्षपदी दीपक सिंह यांची नियुक्ती
मुंबई : भारतीय जनता युवा मोर्चा, मुंबईचे महामंत्री दीपक आजाद सिंह यांची आज पक्षाचे मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी भाजयुमो मुंबई अध्यक्षपदी नियुक्ती केल्याचे जाहीर केले. संघटेनत दाखवलेली ऊर्जा, केलेले परिश्रम, पक्षनिष्ठा या सर्वाची दखल घेऊन भाजपने त्यांना नवी जबाबदारी सोपवली आहे. दीपक सिंह यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात धारावी विधानसभा क्षेत्रातील युवा मोर्चा वॉर्ड महामंत्री म्हणून केली. त्यानंतर विविध संघटनात्मक जबाबदाऱ्या पार पाडत त्यांनी मुंबई युवा मोर्चा महामंत्री पद यशस्वीरीत्या सांभाळले आणि आता मुंबई अध्यक्ष म्हणून नवी जबाबदारी स्वीकारली आहे.
लक्षवेधींची संख्या कमी केल्याने सत्ताधारी आणि विरोधी आमदारांकडून नाराजी
गटनेत्यांची बैठक घेणार; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे आश्वासनमुंबई : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधी सूचनांच्या मर्यादित संख्येवरून गुरुवारी सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही बाजूंच्या आमदारांनी सभागृहात तीव्र नाराजी व्यक्त केली. मतदारसंघातले प्रश्न मांडायला वाव मिळत नसल्याचा आरोप करीत, आमदारांनी तीव्र नापसंती व्यक्त केली. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी लवकरच गटनेत्यांची बैठक बोलावून लक्षवेधींची संख्या वाढवण्याबाबत अंतिम निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.कामकाज सल्लागार समितीच्या निर्णयानुसार, यंदाच्या अधिवेशनात दररोज केवळ तीन ते पाच लक्षवेधी घेतल्या जात आहेत. मात्र, ही संख्या पुरेशी नसल्याची भावना सदस्यांमध्ये होती. गुरुवारी या नाराजीचा स्फोट सभागृहात झाला. भाजप आमदार विक्रम पाचपुते यांनी या मुद्द्यावर आक्रमक पवित्रा घेत विधानसभा अध्यक्षांकडे दाद मागितली. लक्षवेधींची संख्या कमी केल्यामुळे आम्हाला मतदारसंघातील महत्त्वाचे प्रश्न मांडता येत नाहीत. हा आमदारांवर अन्याय असून अध्यक्षांनी आपल्या विशेषाधिकाराचा वापर करून ही संख्या वाढवावी, अशी मागणी पाचपुते यांनी केली. त्यांच्या या भूमिकेला भाजपचेच आमदार गोपीचंद पडळकर यांनीही पाठिंबा दर्शवत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.यावर स्पष्टीकरण देताना अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले की, नियमानुसार एका दिवशी तीनच लक्षवेधी घेण्याची तरतूद आहे. मात्र, सदस्यांच्या भावना लक्षात घेता गेल्या काही वर्षांत आपण जास्तीत जास्त लक्षवेधी घेण्याचा प्रयत्न केला असून गेल्या अधिवेशनात विक्रमी कामकाज झाले आहे. कामकाज सल्लागार समितीने ठरवलेल्या विषयावर सभागृहात चर्चा करण्याची प्रथा नाही, तरीही आमदारांची मागणी रास्त आहे. त्यामुळे लक्षवेधींची संख्या वाढवण्याबाबत लवकरच सर्व पक्षांच्या गटनेत्यांशी चर्चा केली जाईल. नियमात तीनचा आकडा असला तरी, सदस्यांच्या आग्रहाखातर विशेषाधिकार वापरून संख्या वाढवण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवार ६ मार्च रोजी मांडणार राज्याचा अर्थसंकल्प
मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून, शुक्रवारी ६ मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सन २०२६-२७ या वर्षाचा अर्थसंकल्प मांडणार आहेत. गेल्या दशकाभरापासून राज्याच्या आर्थिक नियोजनावर आपली पकड ठेवणारे आणि तब्बल ११ वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम नावावर असलेले अजित पवार यावेळी सभागृहात नसतील. त्यांच्या अनुपस्थितीत राज्याच्या तिजोरीचे व्यवस्थापन आणि 'आर्थिक इंजिना'ची गती कायम राखण्याचे मोठे आव्हान फडणवीस यांच्यासमोर असणार आहे.राज्यावर सध्या ९.३ लाख कोटी रुपयांच्या कर्जाचा बोजा असताना, महसूल वाढीसोबतच लोककल्याणकारी योजनांचा खर्च पेलण्याचे दुहेरी आव्हान सरकारसमोर आहे. विशेषतः 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' यांसारख्या लोकप्रिय योजनांना कात्री न लावता आर्थिक शिस्त राखण्यावर मुख्यमंत्र्यांचा भर असेल. महसूली तूट कमी करण्यासाठी राज्य सकल उत्पन्नाच्या तुलनेत कर्जाचे प्रमाण २५ टक्क्यांच्या मर्यादेत ठेवण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे.या अर्थसंकल्पातून राज्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्याचा प्रयत्न दिसणार आहे. मुंबई, पुणे आणि नागपूर या शहरांना 'ग्रोथ हब' म्हणून विकसित करण्यासाठी प्रत्येकी ५ हजार कोटी रुपयांची तरतूद अपेक्षित आहे. नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यासाठी मोठी तरतूद केली जाण्याची शक्यता आहे. प्रशासकीय कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि मानवी हस्तक्षेप कमी करण्यासाठी एआय-आधारित पारदर्शक प्रशासनावर मुख्यमंत्री भर देतील. त्याशिवाय ५० हजार सौर कृषी पंप आणि ऊर्जा क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी भरीव तरतूद केली जाण्याची शक्यता आहे.
मुंबईतील प्रत्येक रेल्वे स्थानकात आता 'आरोग्य कवच'
मुंबई : उपनगरीय रेल्वे मार्गांवरील वाढते अपघात आणि प्रवाशांचा जीवघेणा प्रवास रोखण्यासाठी राज्य सरकारने विशेष उपाययोजना करण्याचे ठरविले आहे. मुंबईतील प्रत्येक रेल्वे स्थानकात रुग्णवाहिका आणि आरोग्यविषयक सुविधा पुरवण्याबाबत आरोग्य विभागाला तातडीने सूचना दिल्या जातील, असे आश्वासन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी गुरुवारी विधानसभेत दिले. तसेच, बंद दरवाजाच्या लोकल वाढवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांशी चर्चा केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.आमदार काशिनाथ दाते यांनी मुंबईतील रेल्वे अपघातांच्या वाढत्या संख्येकडे लक्षवेधी सूचनेद्वारे सभागृहाचे लक्ष वेधले होते. त्याला उत्तर देताना सरनाईक यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. रेल्वे प्रवासातील सुरक्षिततेबाबत माहिती देताना सरनाईक यांनी २०१४ आणि २०२५ च्या आकडेवारीची तुलना केली. ते म्हणाले. २०१४ मध्ये रेल्वे अपघातातील मृतांची संख्या ३ हजार ४२३ इतकी होती, जी २०२५ मध्ये १ हजार १३६ पर्यंत खाली आली आहे. तसेच जखमींची संख्याही ३ हजार २९९ वरून १ हजार ४५ पर्यंत कमी झाली आहे, असे त्यांनी नमूद केले. राज्य सरकार आणि रेल्वे प्रशासन यांच्यातील उत्तम समन्वयामुळेच हे शक्य झाल्याचा दावा त्यांनी केला.विद्यार्थ्यांसाठी आरक्षित डब्याचा प्रश्न रेल्वेच्या अखत्यारीतलक्षवेधी दरम्यान आमदार काशिनाथ दाते आणि ज्योती गायकवाड यांनी रेल्वेमध्ये विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र आरक्षित डबा ठेवण्याची मागणी केली. यावर उत्तर देताना, असा निर्णय घेण्याचे अधिकार रेल्वे प्रशासनाच्या अखत्यारीत असल्याचे मंत्र्यांनी स्पष्ट केले.राज्य सरकार रेल्वेसोबत समन्वय साधून अनेक उपाययोजना राबवित असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. त्याचबरोबर मेट्रोचे जाळे वाढविण्याबरोबरच स्थानिक प्रशासनाच्या लोकल बसेस मुंबई शहरात जास्तीत जास्त सुरु करण्यातही भर दिला जात असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
Ind vs Eng T20 WC Semi Final: ही तिकिटे कोणत्या स्रोतातून मिळवली आणि शहरातील मोठ्या क्रिकेट सामन्यांभोवती तिकीट काळाबाजाराचे मोठे रॅकेट कार्यरत आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.
आखाती देशात मुंबईतून रोजचा चारशे ते पाचशे टन इतका शेतमाल निर्यात होतो. त्यामध्ये पेरू, चिक्कू, द्राक्षांसह आंब्यांची तुरळक निर्यातही सुरू झाली होती.
Transport Strike : महाराष्ट्रात आज मध्यरात्रीपासून सुरू होणारा राज्यव्यापी वाहतूक संप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वैयक्तिक आवाहनानंतर तूर्तास स्थगित करण्यात आला आहे.
धर्मांतरविरोधी कायद्याच्या मसुद्याला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता
मंत्री नितेश राणे यांनी दिली माहिती; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मानले आभारमुंबई : राज्यातील हिंदूंना दिलेला शब्द पाळत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गुरुवारी एका ऐतिहासिक निर्णयावर शिक्कामोर्तब केले. महाराष्ट्रात सक्तीचे धर्मांतर आणि 'लव्ह जिहाद'सारख्या वाळवीला मुळासकट उखडून टाकण्यासाठी प्रस्तावित असलेल्या 'धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६' च्या मसुद्याला गुरुवारी मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या निर्णयामुळे गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष करणाऱ्या हिंदुत्ववादी संघटना आणि सकल हिंदू समाजाच्या संघर्षाला मोठे यश मिळाले आहे.कॅबिनेट मंत्री आणि प्रखर हिंदुत्ववादी नेते नितेश राणे यांनी विधानभवन परिसरात माध्यमांशी संवाद साधताना याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, निवडणुकीत आम्ही वचन दिले होते की, महाराष्ट्रात सक्षम असा धर्मांतरविरोधी कायदा आणू. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तो शब्द पूर्ण केला आहे. हा कायदा अतिशय कठोर आणि हिंदू भगिनींना खऱ्या अर्थाने न्याय देणारा ठरेल, अशा शब्दांत त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. महाराष्ट्राचा हा प्रस्तावित कायदा गुजरात आणि मध्य प्रदेशसारख्या राज्यांच्या कायद्यांपेक्षाही अधिक प्रभावी आणि कडक असेल. त्यामुळे यापुढे कोणत्याही हिंदू भगिनीकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत कोणाचीही होणार नाही. सक्तीने किंवा प्रलोभन दाखवून धर्मांतर करणाऱ्यांना आता थेट तुरुंगाची हवा खावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.View this post on Instagram
'पर्यावरणीय दृष्टिकोनातून श्रीक्षेत्र ज्योतिबा मंदिर परिसराचा विकास करावा'
मुंबई : कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र ज्योतिबा मंदिर येथे राज्यातूनच नव्हे, तर देशातून मोठ्या संख्येने भाविक घेत असतात. या परिसराचे पर्यावरणीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्व आहे. या मंदिर परिसराचा विकास हा पर्यावरणीय दृष्टिकोनातून करण्यात यावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.श्रीक्षेत्र ज्योतिबा मंदिर व परिसर विकासाचा एकूण आराखडा २५० कोटी रुपयांचा आहे. त्यापैकी ८० कोटी रुपयांची कामे सुरू झालेली आहेत. श्रीक्षेत्र ज्योतिबा मंदिर व परिसराचा सुधारित १७० कोटींच्या विकासकामांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथे आयोजित शिखर समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.बैठकीस उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वन मंत्री गणेश नाईक, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार विनय कोरे, आमदार राहुल आवाडे, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, अपर मुख्य सचिव (वित्त) ओ. पी गुप्ता, अपर मुख्य सचिव (महसूल) विकास खारगे, प्रधान सचिव (ग्रामविकास) एकनाथ डवले आदी उपस्थित होते.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ज्योतिबा मंदिर डोंगर परिसराचा विकास करताना मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करण्यात यावी. आधी लागवड केलेल्या वृक्षांचे जिवंत राहण्याचे प्रमाण वाढविण्यात यावे. डोंगर परिसरावर घनकचरा व्यवस्थापन प्रभावीपणे करण्यात यावे. मंदिर परिसरात अनेक भाविक अन्नदान करीत असतात या अन्नदानाकरिता अन्न छत्रालय विकसित करण्यात यावे. येथे जास्तीत जास्त भाविक सामावून घेण्याची क्षमता असावी.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, डोंगर परिसराचे पर्यावरणीय महत्त्व लक्षात घेता, येथे असणाऱ्या वस्तीमधील सांडपाणी व्यवस्थापन करावे. येथे येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता स्वच्छतेबाबत काटेकर नियोजन करण्यात यावे. डोंगर परिसरात असलेल्या वन जमिनीचे नियमानुसार हस्तांतरण करुन मंदिर परिसराचा विकास व्हावा, यासाठी स्वतंत्र प्राधिकरण बैठकीत सादरीकरण कोल्हापूर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले.थोडक्यात विकास आराखडाकोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यात असलेल्या श्रीक्षेत्र ज्योतिबा मंदिर व परिसर विकास आराखडा आराखड्यामध्ये श्री ज्योतिबा डोंगरावरील जुन्या पायवाटांचे दुरुस्तीसह रुंदीकरण करण्यात येणार आहे. तसेच पायवाटांच्या बाजूने विविध प्रकल्पांमध्ये बाधित होणाऱ्या वृक्षांचे पुनर्रोपण, सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष, विद्युत नियंत्रण कक्ष, पोलीस कक्ष व देवस्थान व्यवस्थापन कार्यालय, यमाईदेवी मंदिर परिसरात भाविकांसाठी सुविधा केंद्र, मंदिराचे दक्षिणद्वार प्रवेश मार्गाची दुरुस्ती, शाहूकालीन हुजूरवाडा इमारत संवर्धन, कुशीरे ते गायमुख तलाव पार्किंगसह पादचारी मार्गाचा विकास, पाच मेगावॉट समतेचे वीज उपकेंद्र व सौर ऊर्जा प्रकल्प, भाविकांसाठी निवास व्यवस्था, प्राथमिक आरोग्य सुविधा कक्ष व अन्नछत्र, वाडी रत्नागिरी गावामधील रहिवासी व भाविकांसाठी कायमस्वरूपी पाणीपुरवठा व्यवस्था करण्यात येणार आहे.
IAS Transfer: नागपूरला नवे महापालिका आयुक्त; डॉ. विपीन इटनकर यांची नियुक्ती, चौधरी पुण्याला
IAS Transfer: डॉ. विपीन इटनकर हे आयएएस सेवेतील अनुभवी अधिकारी आहेत. प्रशासनात येण्यापूर्वी त्यांनी एमबीबीएस पूर्ण केले असून ते व्यवसायाने डॉक्टरही आहेत. २०१४ च्या बॅचमधून यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन ते भारतीय प्रशासन सेवेत दाखल झाले.
Misbah ul Haq : पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि माजी मुख्य प्रशिक्षक मिस्बाह उल हक याची निवड समितीमध्ये एन्ट्री झाली आहे.
Baramati: सारथीचे नेट-सेट ऑफलाईन कोचिंग तात्काळ सुरू करा; भाजप युवा मोर्चाची मागणी
Baramati:
'मी मोठ्या बापाची लेक नाही पण शिंदेंनी माझ्या कामाला न्याय दिला'
शिवसेनेच्या राज्यसभा उमेदवार डॉ. ज्योती वाघमारे यांनी व्यक्त केली भावनाआपली उमेदवारी ही राज्यातील अडीच कोटी लाडक्या बहिणींची उमेदवारीजातीपातीच्या भिंती मोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून कार्यकर्त्याला संधीपक्षाकडून सर्वसामान्य कार्यकर्त्याला बळ देण्याचे काम – एकनाथ शिंदेमुंबई :राजकारण करण्यासाठी बाप मोठा असावा लागतो, नाव मोठं लागतं, आडनाव मोठं लागतं, मी मोठ्या बापाची मुलगी नाही पण पक्षासाठी केलेली प्रामाणिक धडपड आणि काम यापुढे तुम्ही गरिब जरी असलात तरी शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लक्ष असते आणि ते न्याय देतात याचं उदाहरण आज समोर आहे, अशी भावना शिवसेनेच्या राज्यसभेच्या उमेदवार डॉ. ज्योती वाघमारे यांनी व्यक्त केली. शिवसेनेच्या आक्रमक प्रवक्त्या डॉ. वाघमारे यांनी आज उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शिवसेनेचे खासदार संसदरत्न डॉ. श्रीकांत शिंदे, मंत्री दादाजी भुसे, मंत्री संजय शिरसाट,आमदार डॉ. मनिषा कायंदे, ज्येष्ठ नेते गजानन किर्तीकर, आनंदराव अडसूळ, राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एन.सी आणि प्रमुख नेते उपस्थित होते.उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिलेली राज्यसभेची उमेदवारी ही राज्यातील अडीच कोटी लाडक्या बहिणींची उमेदवारी आहे, अशी भावना डॉ. ज्योती वाघमारे यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर डॉ. ज्योती वाघमारे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आज माझ्यासारख्या गरिब कुटुंबातील मुलीला, डॉ. भीमरावांच्या मुलीला दिलेला हा न्याय आहे. त्या म्हणाल्या की, माझी उमेदवारी ही बाबासाहेबांच्या हातातील पेनाची, सावित्रीबाई फुलेंच्या हातातील पाटीची आणि संविधानाने आम्हाला माणूस म्हणून जगण्यासाठी दिलेल्या अधिकाराची उमेदवारी आहे, असे सांगत त्यांनी महापुरुषांबाबत कृतज्ञता व्यक्त केली. आपल्या आई वडिलांना राज्यसभा काय हे माहित नाही आणि त्यांना सांगून देखील खरं वाटणार नाही. जातीपातीच्या भिंती मोडून उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी दिली, असे डॉ. वाघमारे म्हणाल्या. पक्षाने दाखवलेला विश्वास सार्थ करेन, असा विश्वास व्यक्त करत डॉ. वाघमारे यांनी उपमुख्यमंत्री शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, शिवसेना मंत्री, खासदार, आमदार यांचे आभार मानले.डॉ. ज्योती वाघमारे या मूळच्या सोलापूरच्या असून त्यांनी इंग्रजी साहित्यात पीएचडी केली आहे. त्यांनी वालचंद महाविद्यालयात १० वर्ष प्राध्यापिका म्हणून काम केले. डॉ. वाघमारे यांचे मराठी, हिंदी, इंग्रजी, तेलगू आणि कन्नड या पाच भाषांवर प्रभुत्व आहे. त्यांचे वडील नागनाथ वाघमारे हे दलित पँथरचे कार्यकर्ते होते. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी नागनाथ वाघमारे यांनी हॉटेलमध्ये वेटर म्हणून तसेच काहीकाळ बांधकाम मजूर म्हणून काम केले. पत्र्याच्या शेडमध्ये राहणाऱ्या, शाळेत अनवाणी जाऊन अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ज्योती यांनी दहावी तसेच बारावीत परीक्षेत चांगले गुण मिळवले. उच्चशिक्षणाचा उपयोग सामाजिक जनजागृतीसाठी व्हावा, या उद्देशाने डॉ. वाघमारे यांनी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यांत डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा बसवेश्वर यांच्या जीवनावर आधारित व्याख्यानं दिली आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांना राजकारणात समान हक्क, निर्णयप्रक्रियेत सहभाग आणि नेतृत्वाची संधी मिळावी, अशी जी दूरदृष्टी मांडली होती. महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी शिक्षण व सामाजिक समतेसाठी उभारलेला लढा आज अशा सुशिक्षित आणि जिद्दी प्रतिनिधित्वातून पुढे जाताना दिसतो. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी डॉ. वाघमारे यांना दिलेली उमेदवारी हे सशक्त प्रतिबिंब आहे.https://prahaar.in/2026/03/05/from-a-waiters-daughter-to-a-rajya-sabha-candidate-this-is-how-dr-jyoti-waghmares-political-journey-unfolded/शिवसेनेत सर्वसामान्य कार्यकर्त्याला बळ देण्याचे काम – एकनाथ शिंदेशिवसेना हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांनी सामान्य कार्यकर्त्यांना मोठं केलं आणि तोच विचार घेऊन आम्ही पुढे चाललोय. मुख्यमंत्री असताना राज्यात लाडकी बहिण योजना राबवली. अनेक लाडक्या बहिणींच्या संसाराला हातभार लागला. शिवसेनेत मागील साडेतीन वर्षांपासून सर्वसामान्य कार्यकर्त्याला बळ देण्याचे काम करतोय, त्याचा एक भाग म्हणून डॉ. ज्योती वाघमारे यांना राज्यसभेची संधी दिलेली आहे. डॉ. वाघमारे या शिवसेनेची भूमिका, ध्येयधोरणं आणि पक्षाचे काम लोकांपर्यंत पोहोचवली. राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील सर्वसामान्यांच्या हिताचे प्रश्न त्या राज्यसभेत उपस्थित करतील. त्यांनी पक्षाकडे कोणतीही अपेक्षा व्यक्त केली नव्हती. शिवसेनेची निवड सार्थक ठरेल, असा विश्वास शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांचा परिचय- इंग्रजी साहित्यात पीएचडी- दहावीच्या परिक्षेत ज्योती वाघमारे यांना ८४% गुण मिळवून उत्तीर्ण झाल्या.- बारावीच्या परिक्षेत पुणे विभागातून मागासवर्गीय विद्यार्थ्यांमध्ये प्रथम- अर्धमागधी विषयात राज्यात प्रथम- महिलांच्या प्रश्नांवरील संशोधनाला राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार- १० वर्षांहून अधिककाळ प्राध्यापिका म्हणून कामाचा अनुभवमराठी, हिंदी, इंग्रजी, तेलगू आणि कन्नड या पाच भाषांवर प्रभुत्व- डॉ. ज्योती वाघमारे सुरुवातीच्या काळात मानवी हक्क अभियान, विद्रोही संस्कृतिक चळवळ, आंबेडकरी चळवळीतून आपल्या कामाला सुरुवात केली.- मागील १५ वर्षांपासून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात प्रा. डॉ. ज्योती वाघमारे सक्रियपण काम करत आहेत.- शिवसेना पक्षात ऐतिहासिक उठाव झाल्यानंतर प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांनी शिवसेना मुख्य नेते श्री. एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाचा स्वीकार करत एप्रिल २०२३ मध्ये शिवसेनेत प्रवेश केला.- प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांची शिवसेना पक्षाच्या राज्य प्रवक्त्या आणि धाराशिव जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली.- मागील अडीच वर्षात विविध मंचांवर आणि चर्चासत्रात शिवसेना आणि माननीय श्री. एकनाथजी शिंदे साहेबांनी केलेल्या ऐतिहासिक उठावाबाबत सडेतोड आणि मुद्देसूद बाजू मांडत शिवसेना प्रवक्त्या म्हणून प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांनी उपयुक्तता सिद्ध केलेली आहे.- प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांनी शिवसेनेच्या ऐतिहासिक दसरा मेळाव्यांमध्ये केलेली भाषणं त्यांच्या वक्तृत्व आणि अभ्यासू व्यक्तिमत्वाची साक्ष देतात.- शिवसेना नेतृत्वावर टीका करणाऱ्या विरोधकांना त्यांच्याच भाषेत किंवा त्याहून विखारी भाषेत सडेतोड उत्तरं देणाऱ्या प्रवक्त्या म्हणून प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांनी राजकारणात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.- महाराष्ट्राचा इतिहास, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, संविधान, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा बसवेश्वर यांच्या जीवनावर प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांचा सखोल अभ्यास आहे.
धारावीतील ४३६ झोपडपट्टीधारकांचे देवनार येथे पुनर्वसन
मुंबई : धारावी येथे १९९९ साली लागलेल्या भीषण आगीत बाधित झालेल्या ‘राजीव गांधी एस.आर.ए. सहकारी गृहनिर्माण संस्थे’तील ४३६ पात्र झोपडपट्टीधारकांच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यांच्या पुनर्वसनासाठी देवनार येथील सर्व्हे क्रमांक ९३ मधील सुमारे ११ हजार ६५९ चौरस मीटर शासकीय जमीन झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाला (एसआरए) देण्यास गुरुवारी मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकारातून हा प्रस्ताव मंजूर करण्यात आल्याने धारावीतील आगग्रस्त कुटुंबांच्या पुनर्वसन प्रक्रियेला गती मिळणार आहे. धारावी परिसरात १९९९ साली लागलेल्या आगीत अनेक झोपड्या जळून खाक झाल्या होत्या. या घटनेत बाधित झालेल्या नागरिकांच्या पुनर्वसनासाठी ‘राजीव गांधी एस.आर.ए. सहकारी गृहनिर्माण संस्था’ स्थापन करण्यात आली होती. मात्र पुनर्वसनासाठी आवश्यक जमीन उपलब्ध नसल्याने हा प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित राहिला होता.आता देवनार येथील सर्व्हे क्रमांक ९३ मधील शासकीय जमीन एसआरएकडे वर्ग करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतल्यामुळे या ४३६ पात्र झोपडपट्टीधारकांच्या घरांच्या पुनर्वसन प्रकल्पाला गती मिळणार आहे. या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागणार आहे.राज्य सरकारच्या या निर्णयामुळे आगग्रस्त कुटुंबांना सुरक्षित आणि कायमस्वरूपी निवारा उपलब्ध करून देण्याच्या प्रक्रियेला आता वेग मिळणार असून धारावी परिसरातील पुनर्वसनाच्या प्रयत्नांना महत्त्वपूर्ण चालना मिळेल, अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली.
'अमरावतीमध्ये हनुमान गढी धार्मिक पर्यटन केंद्राची उत्कृष्ट निर्मिती करावी'
मुंबई : अमरावती शहरालगत हनुमान गढी परिसर पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करण्यात येत आहे. या प्रस्तावित हनुमान गढी परिसर पर्यटन विकासासाठी १२१ कोटींच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित शिखर समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.अमरावती शहरालगत असलेल्या हनुमान गढी परिसरात पर्यटकांच्या सुविधांची कामे आधी पूर्ण करावी. ही कामे दर्जेदार असावीत. या पर्यटन केंद्राचे मुख्य आकर्षण असलेल्या हनुमान मूर्तीचे काम पूर्ण करावे. संपूर्ण परिसर उत्कृष्ट धार्मिक पर्यटन केंद्र म्हणून विकसित करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीदरम्यान दिले.बैठकीस ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, वित्त व नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल, आमदार रवी राणा, आमदार प्रताप अडसड, आमदार प्रवीण दटके, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, पोलीस महासंचालक सदानंद दाते, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे आदी उपस्थित होते.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, हनुमान गढी परिसराचा विकास करताना पर्यटकांसाठी सुविधा कामांना प्राधान्य द्यावे. या विकास आराखड्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. सर्व कामे विहित कालमर्यादेत पूर्ण करावी. हनुमान गढी स्थळाच्या विकासानंतर हे ठिकाण अमरावती शहरालगत पर्यटकांसाठी पर्यटन केंद्राची पर्वणी ठरणार आहे.तसेच नागपूर शहरातील महाल परिसरात असलेल्या पुरातन कल्याणेश्वर मंदिर परिसराचा विकास करण्यात येणार आहे. नागपूरच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या मंदिराचा विकास करताना पार्किंग महत्वाचे ठरणार असून या परिसरात पार्किंगची व्यवस्था उभारण्यात यावी. मोठ्या संख्येने वाहनांची पार्किंग होईल, अशा पद्धतीने करण्यात यावी, असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.असा आहे विकास आराखडाहनुमान गढी परिसर विकास करताना 17 हजार 671 चौरस मीटर क्षेत्रावर विविध विकासकामांचे बांधकाम करण्यात येणार आहे. याठिकाणी अयोध्येतील राम मंदिर यज्ञ मंडपाच्या प्रतिकृतीवर आधारित यज्ञ मंडप, ॲम्फीथिएटर, यज्ञशाळा, फूड मॉल, क्राफ्ट सेंटर , आखाडा, महाप्रसाद हॉल, बहुउद्देशीय सभागृह, प्रशासकीय इमारत, हनुमान गॅलरी, दिव्यांग स्नेही रस्ता, पावसाच्या पाण्याचे पुनर्भरणाची व्यवस्था राहणार आहे. तसेच संपूर्ण परिसरात संरक्षण भिंत, अंतर्गत रस्ते, मुख्य प्रवेशद्वार, हनुमान मूर्तीवर लेझर शो ची व्यवस्था करण्यात येणार आहे.
Nevasa News: आमदार लंघे-पाटील यांनी मागणी केली की, सरकारने डीबीटी पोर्टलमधील तांत्रिक त्रुटी तत्काळ शोधाव्यात आणि त्या पूर्णपणे दुरुस्त होईपर्यंत या लाभार्थ्यांना पूर्वीप्रमाणे ऑफलाईन पद्धतीने अनुदान द्यावे.
Baramati Cyber Crime: अशी फसवणूक झाल्यास तत्काळ १९३० या राष्ट्रीय सायबर हेल्पलाईनवर संपर्क साधावा आणि जवळच्या पोलीस ठाण्यात प्रत्यक्ष जाऊन तक्रार नोंदवावी. गुन्हा घडल्यानंतर लवकरात लवकर तक्रार दिल्यास संबंधित बँक खाती गोठवून (Freeze) रक्कम वाचवणे शक्य होऊ शकते.
इस्रायलने आपल्या देशातील कामाच्या ठिकाणांवरील निर्बंध शिथिल केले असले तरी शाळा अजूनही बंदच आहेत.
US-Iran-Israel War: या पाच दिवसांच्या कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यपूर्वेतील अनेक देशांच्या नेत्यांशी दूरध्वनीवर संवाद साधला, मात्र खामेनेई यांच्या निधनावर त्यांनी अद्याप कोणतेही जाहीर भाष्य केलेले नाही.
IND vs ENG Semifinal : टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात आतापर्यंत केवळ एकदाच असे घडले आहे की, यजमान देशाने (Host Nation) अंतिम फेरी गाठली आहे.
बेळगाव जिल्ह्यातील यदूर येथील श्री वीरभद्रेश्वर मंदिराच्या राजगोपुर सोहळ्याचे उद्घाटन करताना ते बोलत होते.
अमेरिकेने घेतली डूम्सडे बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी, हिरोशिमा अणुबॉम्बपेक्षा २० पट घातक
वॉशिंग्टन डीसी : पश्चिम आशियात अमेरिका - इस्रायल विरुद्ध इराण असे युद्ध सुरू आहे. या २८ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू झालेल्या युद्धाने आज ५ मार्च रोजी सहाव्या दिवसात प्रवेश केला. दोन्ही बाजू कमालीच्या आक्रमकतेने लढताना दिसत आहेत. अशातच अमेरिकेने सांता बार्बराजवळ वेंडेनबर्ग स्पेस फोर्सच्या तळावरुन रात्री ११ च्या सुमारास 'मिनिटमॅन ३ बॅलेस्टिक क्षेपणास्त्र' प्रक्षेपित करून एक चाचणी घेतली. न्यूयॉर्क पोस्टने या संदर्भात वृत्त दिले आहे.अमेरिकेने दुसऱ्या महायुद्धात हिरोशिमा शहरावर टाकलेल्या अणुबॉम्बपेक्षा डूम्सडे बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची अर्थात मिनिटमॅन ३ बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची क्षमता २० पट जास्त आहे. चाचणीसाठी वापरलेले क्षेपणास्त्र मार्शल बेटाजवळ त्याच्या लक्ष्याजवळ कोसळलं. प्रभाव, तत्परता आणि मारक क्षमता तपासून पाहण्यासाठी क्षेपणास्त्राची ही चाचणी घेण्यात आली. अमेरिकेने चाचणी केलेले हे क्षेपणास्त्र १३ हजार किलोमीटर दूर जाऊन लक्ष्य भेद करण्यास सक्षम आहे. अमेरिकेकडे १९७० पासून हे क्षेपणास्त्र आहे. यात काळानुरुप अनेक बदल केले आहेत. जहाजावरून, विमानातून तसेच जमिनीवरून डूम्सडे बॅलेस्टिक क्षेपणास्त्र अर्थात मिनिटमॅन ३ बॅलेस्टिक क्षेपणास्त्राद्वारे हल्ला करणे शक्य आहे.अमेरिकेकडे अशी तब्बल ४०० डूम्सडे बॅलेस्टिक क्षेपणास्त्र आहेत. रशिया आणि चीनला टक्कर देण्यासाठी ही क्षेपणास्त्र तयार केली आहेत. ही क्षेपणास्त्र फक्त एका मिनिटात मारै करण्यास सज्ज होतात म्हणून त्यांना मिनिटमॅन असेही म्हणतात. या क्षेपणास्त्राचं रुपांतर नव्या आणखी आधुनिक आणि घातक क्षेपणास्त्रात करण्याचा अमेरिकेचा प्रयत्न सध्या सुरू आहे. यासाठीच अमेरिकेने क्षेपणास्त्राच्या चाचण्या सुरू केल्या आहेत.कॅलिफॉर्नियात करण्यात आलेल्या चाचणीमुळे क्षेपणास्त्र यंत्रणेतील विविध भागांच्या कार्यक्षमतेचा अंदाज लावण्यास मदत मिळेल, अशी माहिती ५७६ व्या फ्लाईट टेस्ट स्क्वाड्रनचे कमांडर लेफ्टनंट कर्नल कॅरी रे यांनी सांगितलं. अशा चाचण्यांमुळे देशाची अण्वस्त्र शक्ती अधिक सक्षम होत असल्याचे ते म्हणाले.
क्रेडाई नाशिक मेट्रोतर्फे जळगावमध्ये ७,८,९ मार्च रोजी प्रॉपर्टी एक्स्पो
जळगाव व नाशिक हे दोन्ही महाराष्ट्रातील एक अग्रगण्य प्रगतिशील शहर म्हणून ओळखले जाते. औद्योगिक शैक्षणिक, आरोग्य तसेच कृषि यावर आधारित अनेक उद्योग संधी नाशिकमध्ये उपलब्ध आहेत. याच नाशिक मध्ये रिअल इस्टेट क्षेत्रातील गुंतवणुकीच्या अपरिमित संधी आहेत. या संधींची माहिती एकाच छताखाली मिळावी यासाठी बांधकाम व्यावसायिकांची देशातील सर्वात मोठी संस्था क्रेडाई नाशिक मेट्रो तर्फे येत्या ७ से ९ मार्च दरम्यान सागर पार्क ग्राउंड येथे नाशिक प्रॉपर्टी एक्स्पो या प्रदर्शनाचे आयोजन केले असल्याची माहिती क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष गौरव ठक्कर यांनी दि.५ मार्च गुरुवार रोजी जळगाव येथील रॉयल पॅलेस येथे आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली. ते पुढे म्हणाले हवेची गुणवत्ता आणि पाण्याची मुबलकता याचे वरदान लाभलेल्या नाशिक मधील हवामान अनेकांना आकर्षित करते. तसेच मुंबई पुण्यापासून कमी अंतर आणि जगभरातील सर्व प्रमुख शहरां सोबत वाढलेली या शहराची कनेक्टिव्हिटी यामुळे नाशिक मधील रिअल इस्टेटमधील गुंतवणूक ही भविष्यात लाभदायी ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले. चेन्नई- सुरत महामार्ग, नाशिक जवळ विकसित होत असलेले बाढवण बंदर या सोबतच नुकत्याच समृद्धी महामार्ग खानदेश एक्सप्रेस वेद्वारे जळगावला सहा पदरी रस्त्याने जोडण्याच्या घोषणेमुळे जळगाव आणि नाशिकची कनेक्टिव्हिटी वाढणार आहे.प्रदर्शनाबद्दल माहिती देताना प्रदर्शनाचे समन्वयक सागर शहा म्हणाले, क्रेडाई सदस्य म्हणजे विश्वासार्ह व्यवहार असे समीकरण रुढ झाले आहे. सुमारे २८ वर्षापासून कार्यरत क्रेडाई ही राष्ट्रीय स्तरावरील बांधकाम व्यावसायिकांची सर्वात मोठी संस्था असून आज मीतिला २३० शहरांमध्ये ३००० बांधकाम व्यावसायिक या संस्थे सोबत जोडले आहेत. जळगाव येथे आयोजित या प्रदर्शनात नाशिकचे अनेक आघाडीचे विकसक सहभागी होणार असून फ्लॅट्स, प्लॉट्स, फार्म हाऊस, शॉप्स ऑफिसेस यांचे असंख्य पर्याय इथे उपलब्ध असतील. प्रदर्शनाचा लेआउट व व्यवस्था आंतरराष्ट्रीय स्तराला साजेशी असल्याचेही त्यांनी नमूद केले.प्रदर्शनाचे सह समन्वयक अनंत ठाकरे म्हणाले नाशिकमध्ये होत असलेल्या कुंभमेळ्यामुळे नाशिक मध्ये लाखो भाविक आगामी दीड वर्षाच्या कालावधीत येणार आहेत. यामुळे रिअल इस्टेट क्षेत्रातील गुंतवणुकीला परतावा मिळण्याची शक्यता अधिक आहे. यासोबतच विविध क्षेत्रातील उपलब्ध संधीमुळे देखील भविष्यातील गुंतवणूक म्हणजे नाशिक रिअल इस्टेट क्षेत्रातील गुंतवणूक असे म्हणणे वावगे ठरणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. या तीन दिवसीय प्रॉपर्टी एक्सपोमध्ये नाशिक सोबतच इगतपुरी, कसारा, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी या भागातील अनेक पर्याय उपलब्ध राहणार असून प्रदर्शनाचे प्रायोजक म्हणून अर्बन स्टाईल्स व सहप्रायोजक म्हणून क्रिश गुपने जबाबदारी स्वीकारली असल्याची माहिती क्रेडाई नाशिक मेट्रोचे मानद सचिव तुषार संकलेचा यांनी दिली. प्रदर्शनाची वेळ सकाळी १० ते रात्री ८ पर्यंत असणार आहे .क्रेडाई नाशिक मेट्रोचे उपाध्यक्ष मनोज खीवंसरा यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, जळगाव आणि नाशिक चे गेल्या पन्नास पेक्षा जास्त वर्षांपासून विविध स्वरूपात जुने नाते आहे. नाशिक शहर हे रामायण काळातील श्रीरामचंद्र प्रभू यांच्या पद स्पर्शाने पावन झालेली धार्मिक आणि अध्यात्मिक भूमी आहे. सन २००० साल नंतर ज्या प्रमाणे पुणे शहर झपाट्याने विकसित झाले तसेच बदलत्या काळात नाशिक शहर देखील सर्वच क्षेत्रात आधुनिकतेकडे विकसित होत आहे. मंत्र भूमी ते तंत्रभूमी अशी पौराणिक ओळख असलेले नाशिक एज्युकेशन हब झाले असून वाईन कॅपिटल देखील आहे. मुंबई, पुणे व अन्य महानगरातील न परवडणारे महाग शिक्षण नाशिकला नाही. शैक्षणिक खर्चाची तफावत बघता अन्य राज्यातील, महाराष्ट्रातील विविध भागातील विद्यार्थी व सर्व स्तरावरील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या नाशिकला वाढत असल्याने शिक्षण संस्था वाढत आहे. निसर्गाच्या कुशीत वसलेले या शहरात अन्य महानगरां सारखी सतत वाढणारी लोकसंख्या, वाढती वाहने त्यामुळे रहदारीची कोंडी, वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण त्या मानाने कमी प्रमाणात दिसून येते ! त्यामुळे नाशिक येथे शिक्षणासाठी, उद्योग व्यवसाय करिता किंवा रिटायर्ड झाल्या नंतर स्थायिक होणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. तसेच बारा वर्षानंतर येणाऱ्या कुंभमेळ्या नंतर नाशिकचा प्रचंड असा विकास साधला जाणार आहे .नाशिकला पंधरा लाखांपासून ते दहा कोटी किंमती पर्यंत असलेल्या सर्व सुसज्ज सोय सुविधा असलेल्या प्रॉपर्टी चे जळगाव एक्सपो मध्ये भारतातील वीस मोठे नामवंत बिल्डर भाग घेणार असून २८ स्टॉल लावले जाणार आहेत. दीपक भाई यांनी पुढील माहितीत सांगितले की, प्रॉपर्टी स्टॉल सोबत विविध प्रकल्पांचे देखील सादरीकरण या एक्सपो केले जाणार आहे. म्हणून नाशिक मध्ये प्रॉपर्टी घेण्याची इच्छा असलेल्या जळगावकरांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी अवश्य भेट देण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.हे प्रदर्शन यशस्वी होण्यासाठी क्रेडाई नाशिक मेट्रोचे उपाध्यक्ष मनोज खिवसरा, उदय घुगे, अनिल आहेर, अंजन ,भालोदिया, आयपीपी कृणाल पाटील, कोषाध्यक्ष श्रेणिक सुराणा, सहसचिव नरेंद्र कुलकर्णी, सचिन बागड, हंसराज देशमुख,, मॅनेजिंग कमिटी सदस्य श्यामकुमार साबळे, विजय बव्हाणके, निजित अटल, सुशील बागड, निरंजन शाह, वृषाली हिरे, दीपाली बिरारी, सहयोगी सदस्य सतीश मोरे, सुशात गांगुर्डे, अभिषेक महाजन, समीर सोनवणे, मनोज लाहानी, हर्षल हणमंते, भूषण कोठावदे, शिवम पटेल, हिरेन भडजा, मयुरेश चौधरी, ऋषभ तोडरवाल, क्रेडाई युवा विंग समन्वयक आदित्य भातंबरेकर, सह समन्वयक अजिंक्य नाहर हे विशेष सहकार्य करीत आहेत.
Rajya Sabha Election 2026: आमदार रोहित पवार यांनी फेसबुकवर पोस्ट करत सर्व निवडून आलेल्या उमेदवारांचे अभिनंदन केले आणि बिनविरोध निवडीसाठी सहकार्य केलेल्या सर्व पक्षांचेही आभार मानले.
Accident News : बीडमध्ये एसटी बसची ट्रकला धडक; चालक आणि वाहकांसह १३ जण गंभीर जखमी
बीड जिल्ह्यातील कैज शहराजवळ गुरुवारी सकाळी राज्य परिवहन महामंडळाची बस एका उभ्या असलेल्या ट्रकला धडकली.
Arjun Tendulkar Wedding : या लग्नातील सर्वात जास्त चर्चेत असलेला व्हिडिओ वरमाला विधीवेळचा आहे. एकमेकांना वरमाला घातल्यानंतर सानिया चंडोकने अर्जुनकडे एक गोड इशारा केला.
Pune Accident: अपघातात कारमधील चालक चरणदास लक्ष्मण आकटे ( 64,रा. हरपुडे देवरुख, रत्नागिरी), सिमेंट बल्कर चालक आदृश्यप्पा गुरू सिद्दप्पा मस्तीहोली (35,रा.बेलगम कर्नाटक) हे जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
महाराष्ट्रात धर्मांतरविरोधी कायदा मंजूर; मंत्री नितेश राणे यांनी दिली माहिती
- लव्ह जिहाद रोखण्यासाठी 'धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६'वर मंत्रिमंडळाची मोहरमुंबई : बहुप्रतिक्षित धर्मांतर विरोधी कायदा अखेर मंजूर झाला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत 'धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६'वर अंतिम मोहोर उमटवण्यात आली. राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि प्रखर हिंदुत्ववादी नेते नितेश राणे यांनी गुरुवारी याबाबत माहिती दिली.विधानभवन परिसरात माध्यमांना या ऐतिहासिक निर्णयाची माहिती देताना मंत्री नितेश राणे म्हणाले, निवडणुकीवेळी आम्ही वचन दिले होते की, महाराष्ट्रात सक्षम असा धर्मांतरविरोधी कायदा आणू. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तो शब्द पूर्ण केला आहे. हा कायदा अतिशय कठोर आणि हिंदू भगिनींना न्याय देणारा असेल असे राणे यांनी नमूद केले.यापुढे कोणत्याही हिंदू भगिनीकडे वाकड्या नजरेने पाहण्याची कोणाचीही हिंमत होणार नाही. मिशनऱ्यांकडून होणारे धर्मांतर किंवा लव्ह जिहादसारखे प्रकार आता खपवून घेतले जाणार नाहीत. ज्या कार्यकर्त्यांनी यासाठी मोर्चे काढले, संघर्ष केला आणि काहींनी प्राणांचे बलिदान दिले, त्या सर्वांच्या संघर्षाचा आज खऱ्या अर्थाने विजय झाला आहे, अशा शब्दांत नितेश राणे यांनी भावना व्यक्त केल्या.
थोडक्यात बोलायचं तर, MacBook Neo हा हलका, दमदार परफॉर्मन्स देणारा आणि तुलनेने कमी किंमतीत उपलब्ध असलेला लॅपटॉप आहे.
Rajya Sabha Election 2026: ही निवडणूक निवडणूक आयोगाने दहा राज्यांमधील ३७ राज्यसभा जागांसाठी जाहीर केलेल्या व्यापक निवडणूक प्रक्रियेचा भाग आहे.
MS Dhoni Fine : धोनीला वेगवान गाड्या आणि ड्रायव्हिंगची आवड सर्वश्रुत असल्याने, या किरकोळ दंडाची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे.
Stock Market: अमेरिका-इराण तणाव कमी होण्याच्या आशेने बाजार उसळला; सेन्सेक्स 900 अंकांनी वधारला
Stock Market: रिलायंस इंडस्ट्रीज, एल अँड टी आणि एचडीएफसी बँक सेन्सेक्सच्या तेजीतील आघाडीचे शिलेदार ठरले
Nitish Kumar : “मला राज्यसभेचा सदस्य होण्यात जास्त रस आहे…”–नितीश कुमार
तुमच्या विश्वास आणि पाठिंब्यामुळेच आज बिहार विकास आणि आदराचा एक नवीन आयाम अनुभवत आहे.
मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर बरोबर 105 दिवसांनी नितीश कुमार यांनी राज्यसभेसाठी अर्ज भरला. याचा अर्थ ते मुख्यमंत्री राहणार नाहीत. आता बिहारमध्ये पहिल्यांदाच भाजपचा मुख्यमंत्री बनू शकतो. भाजपने आतापर्यंत युतीच्या मदतीने सत्तेत येऊन 3 राज्यांवर ताबा मिळवला आहे. 2-3 राज्यांमध्ये असे प्रयत्न अजूनही सुरू आहेत. तर 3 राज्यांमध्ये असे प्रयत्न अयशस्वी देखील झाले आहेत. मित्र पक्षांच्या बळावर आधी ताकद मिळवणे आणि नंतर पूर्णपणे सत्तेवर कब्जा करणे, हा भाजपचा पॅटर्न आहे का? अनेक तज्ज्ञ बिहारमधील घडामोडींना ‘ऑपरेशन लोटस’चा क्लोन म्हणत आहेत. दिव्य मराठी एक्सप्लेनरमध्ये भाजपच्या राजकारणातील या खास पॅटर्नची संपूर्ण कहाणी जाणून घेऊया… प्रश्न-1: बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या जागी भाजपचा मुख्यमंत्री बनणे निश्चित आहे का? उत्तर: 89 जागांसह भाजप बिहारमधील सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे बिहार सरकारचा पुढील मुख्यमंत्री भाजपचाच असेल अशी दाट शक्यता आहे. भाजपच्या एका राष्ट्रीय नेत्याने भास्करला सांगितले की, त्यांना आता कोणत्याही परिस्थितीत दुसरा नितीश कुमार तयार करायचा नाहीये. खरं तर, 2000 च्या बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपला 67 जागा मिळाल्या होत्या आणि नितीश यांच्या नेतृत्वाखालील समता पक्षाला 34 जागा मिळाल्या होत्या. तरीही, अटलबिहारी वाजपेयींच्या नेतृत्वाखालील भाजपने नितीश यांना आपला नेता निवडले होते आणि ते पहिल्यांदा बिहारचे मुख्यमंत्री बनले होते. मात्र, त्यावेळी विधानसभेत फ्लोअर टेस्टदरम्यान लालू यादव यांनी नितीश यांना हरवले होते. आणि सरकार फक्त 7 दिवसच चालले होते, पण भाजपसाठी नितीश हेच नेते राहिले आणि भाजप त्यांचे अनुयायी बनून राहिले. असे म्हटले जात आहे की, भाजपमध्ये विशेषतः गृहमंत्री अमित शहा यांना 20 नोव्हेंबर 2025 रोजी गांधी मैदानावर नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यावी असे वाटत नव्हते. भाजपने ऑफर दिली होती की नितीश कुमार यांनी त्यांच्या पसंतीच्या कोणत्याही नेत्याचे नाव सांगावे. ते ज्याला त्यांची पसंती सांगतील, भाजप त्याला मुख्यमंत्री म्हणून स्वीकारेल. नितीश कुमार यांनी तेव्हा हा प्रस्ताव स्वीकारला नाही. त्यांचे रणनीतीकारही यावर सहमत नव्हते. जेडीयूच्या वतीने सांगण्यात आले की, जनादेश नितीश कुमार यांच्या नावावर मिळाला आहे, तर मुख्यमंत्रीही तेच बनतील. यानंतर त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, निवडणुकीदरम्यानच नितीश कुमार यांच्या आरोग्याबाबत सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात होते. अशा परिस्थितीत, जेडीयू नेत्यांकडून मागणी केली जात आहे की नितीश कुमार यांच्या पसंतीच्या नेत्याला मुख्यमंत्री बनवण्यात यावे. प्रश्न-२: यापूर्वी कोणत्या राज्यांमध्ये मित्रपक्षांना कमकुवत करून भाजपने सत्ता मिळवली? उत्तर: भाजपने गेल्या काही वर्षांत एका विशिष्ट रणनीतीनुसार अनेक प्रादेशिक पक्षांशी युती करून सत्तेत वाटा घेतला. त्यानंतर आपले कार्यकर्ते आणि मतदारांचा आधार तयार केला. मित्रपक्षांमधील असंतुष्ट नेत्यांनाही सामील करून घेतले. इतर पक्षांमध्ये फूट पाडल्याचे आरोपही झाले. यानंतर भाजप स्वतः राज्यात नंबर एकचा पक्ष बनला, तर मित्रपक्ष कमकुवत होत गेले… महाराष्ट्रामध्ये ‘लहान भावा’पासून ‘मोठ्या भावा’पर्यंतचा प्रवास ओडिशात बीजेडीच्या सहयोगी पक्षातून नंबर 1 पर्यंतचा प्रवास गोव्यात लहान पक्षांच्या मदतीने बहुमताशिवाय सरकार स्थापन केले प्रश्न-3: केंद्रात भाजपने कोणत्या पक्षांच्या मदतीने सत्ता मिळवली? उत्तर: भाजपचा जुना पक्ष म्हणजेच जनसंघाची स्थापना 1951 मध्येच झाली होती, पण सत्तेपर्यंत पोहोचायला त्यांना 26 वर्षे लागली. ही गोष्ट 1974-75 ची आहे. केंद्रातील इंदिरा सरकारविरोधात बिहारचे जय प्रकाश नारायण म्हणजेच जेपी यांनी आघाडी उघडली होती. त्यांनी विरोधी पक्षांना आपली विचारधारा सोडून आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले. तेव्हा भारतीय लोकदल, काँग्रेस (ओ) आणि सोशलिस्ट पार्टीसोबत भारतीय जनसंघही जेपींच्या सोबत झाला. जेपींच्या मदतीने पहिल्यांदा सत्ता मिळाली शांतनु गुप्ता त्यांच्या 'भारतीय जनता पार्टीची गौरव गाथा' या पुस्तकात लिहितात- ‘जेपी जनसंघावर अवलंबून होते, कारण जनसंघ आणि ABVP कडे एक शिस्तबद्ध आणि शक्तिशाली कॅडर होते. जेपींनी तर असेही म्हटले होते की, जर जनसंघ फॅसिस्टवादी असेल, तर मी देखील फॅसिस्टवादी आहे.’ नोव्हेंबर 1974 मध्ये दिल्लीत विरोधी पक्षांची बैठक झाली. इंदिरा सरकारविरोधात एका मोठ्या आंदोलनाची घोषणा झाली. यासाठी 6 मार्च 1975 ही तारीख निश्चित करण्यात आली. जेपींनी सांगितले की, या आंदोलनात पक्षांनी आपापले झेंडे किंवा बॅनर घेऊन येऊ नये. आंदोलन एकाच बॅनरखाली व्हायला हवे. जनसंघाने ही संधी साधली. जानेवारी 1975 मध्ये जनसंघाने असा प्रस्ताव मंजूर केला की, एका जागेवर विरोधी पक्षाचा एकच उमेदवार मैदानात उतरला पाहिजे. आणि तसेच झाले. आणीबाणीनंतर 1977 च्या लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षांनी जनता पक्षाच्या बॅनरखाली जेपींच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली. 542 पैकी 295 जागा जनता पक्षाला मिळाल्या आणि काँग्रेस 154 जागांवर मर्यादित राहिली. जनता पक्षाचे मोरारजी देसाई पंतप्रधान झाले. जनसंघाचे एकूण 5 लोक केंद्रात मंत्री झाले. अटलबिहारी वाजपेयी परराष्ट्र मंत्री झाले आणि लालकृष्ण अडवाणी माहिती व प्रसारण मंत्री झाले. अशा प्रकारे जनसंघाने पहिल्यांदा सत्तेची चव चाखली. जनता पक्ष सोडून भाजप नावाने नवीन पक्ष स्थापन केला 1979 येईपर्यंत जनता पक्षाच्या आत जनसंघाबद्दल दुहेरी सदस्यत्वाचा वाद सुरू झाला. जनसंघाच्या लोकांना RSS ची सदस्यता सोडण्याची मागणी होऊ लागली. अटल, अडवाणींसारख्या नेत्यांनी असे करण्यास नकार दिला. 1979 मध्ये जनता पक्षाचे सरकार पडले. 6 एप्रिल 1980 रोजी जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पक्ष म्हणजेच भाजप (BJP) या नावाने नवीन पक्षाची घोषणा केली. भाजपला त्यांच्या पहिल्या निवडणुकीत म्हणजेच 1984 मध्ये फक्त 2 जागा मिळाल्या. व्ही.पी. सिंह यांना पाठिंबा देऊन गैर-काँग्रेसी सरकार स्थापन केले, नंतर ते पाडले 1987-88 मध्ये काँग्रेस सरकारमध्ये संरक्षण मंत्री असलेल्या व्ही.पी. सिंह यांनी बंडखोरी करून 'जनता दल'ची स्थापना केली. 1989 च्या निवडणुकीत जनता दलाला 143 जागा मिळाल्या. 85 जागा मिळवणाऱ्या भाजपने बाहेरून पाठिंबा देऊन जनता दलाचे सरकार स्थापन केले. म्हणजेच काँग्रेस पुन्हा एकदा सत्तेतून बाहेर पडली. ऑक्टोबर 1990 मध्ये राम रथयात्रेदरम्यान जनता दलाचे लालू यादव यांनी बिहारमध्ये अडवाणींचा रथ थांबवला आणि त्यांना अटक केली. यानंतर भाजपने पाठिंबा काढून व्ही.पी. सिंह यांचे सरकार पाडले. 1991 च्या निवडणुकीत काँग्रेसने पुन्हा सत्ता मिळवली आणि नरसिंह राव पंतप्रधान झाले. त्यानंतर 1996 च्या निवडणुकीत भाजप 161 जागा जिंकून पुन्हा सर्वात मोठा पक्ष बनला. अटल बिहारी पंतप्रधान झाले, परंतु बहुमत सिद्ध करू न शकल्यामुळे अवघ्या 13 दिवसांत त्यांचे सरकार पडले. एकट्याने बहुमत न मिळाल्याने 20 हून अधिक पक्षांना एकत्र करून सत्ता मिळवली 1998 मध्ये भाजप 182 जागा जिंकून पुन्हा मोठा पक्ष बनला. यानंतर त्यांनी वेगवेगळ्या पक्षांना एकत्र करून नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स म्हणजेच एनडीए (NDA) स्थापन केला. यात शिवसेना, समता पार्टी, बिजू जनता दल, टीएमसी, शिरोमणी अकाली दल आणि जयललिता यांचा पक्ष AIADMK यांसारखे पक्ष सामील होते. मात्र, 13 महिन्यांनंतर जयललिता यांनी पाठिंबा काढून सरकार पाडले. 1999 च्या निवडणुकीत भाजपला पुन्हा 182 जागा मिळाल्या. यावेळीही भाजपने 20 हून अधिक वेगवेगळ्या पक्षांना एकत्र घेऊन सरकार स्थापन केले. हे सरकार पूर्ण 5 वर्षे चालले. पण 2004 च्या निवडणुकीत टीएमसी, डीएमके आणि टीडीपीसारख्या पक्षांनी भाजपची साथ सोडली. याचा परिणाम असा झाला की भाजप 2004 ते 2014 पर्यंत सत्तेबाहेर राहिला. प्रश्न- 4: सध्या भाजपच्या निशाण्यावर पुढे कोणती राज्ये आहेत? उत्तर: 2026 मध्ये पाच विधानसभा निवडणुका होणार आहेत. ही राज्ये आसाम, केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि पुडुचेरी आहेत. आसाममध्ये भाजप सत्तेत आहे. पुडुचेरीमध्ये आघाडीची स्थिती मजबूत आहे. तर पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये छोट्या-छोट्या पक्षांसोबत आघाडी करून निवडणूक लढण्याची तयारी करत आहे. तामिळनाडूमध्ये कथा काही वेगळी आहे… प्रश्न-५: कोणत्या राज्यांमध्ये भाजपची ही रणनीती अयशस्वी ठरली? उत्तर: सध्याच्या राजकारणाकडे पाहिले तर 3 राज्ये अशी आहेत, जिथे भाजपची ही रणनीती अयशस्वी ठरली… 1. पश्चिम बंगाल: अनेक टीएमसी नेते गोळा केले, तरीही अयशस्वी 2. झारखंड: ऑपरेशन लोटसचे आरोप झाले 3. पंजाब: अकाली दलची साथ सोडून नुकसान झाले
देहू –बीज सोहळा दिनी पीएमपीएल बसच्या चाकाखाली ज्येष्ठ महिलेचा मृत्यू
देहूरोड, दि. ५ (वार्ताहर) – संत तुकाराम महाराज बीज सोहळ्याच्या दिवशी देहू येथे झालेल्या अपघातात एका ज्येष्ठ महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. काळोखे चौकाकडून गाथा मंदिराकडे जाणाऱ्या बायपास रिंगरोडवर गुरुवारी (दि.५) दुपारी सुमारे सव्वादोन वाजण्याच्या सुमारास पीएमपीएल बसच्या चाकाखाली सापडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, भागीरथी त्र्यंबक विभुते (वय ६७, रा. चिखली) असे मृत्यू झालेल्या […]
Amit Shah : जनगणनेसाठी डिजिटल टूल्सचे लाँचिंग; प्रगती आणि विकास या दोन शुभंकरांचेही अनावरण
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी नवी दिल्ली येथे आगामी जनगणना २०२७ साठी डिजिटल टूल्सचा एक संच सॉफ्ट-लाँच केला.
IND vs ENG : संजूने मागील सामन्यात ९७ धावांची ऐतिहासिक खेळी करून भारताला सेमीफायनलमध्ये पोहोचवले असले, तरी आज आर्चरचे भेदक मारा रोखणे त्याच्यासाठी मोठे आव्हान असेल.
चीनने आपल्या लष्करी आधुनिकीकरणाला वेग देण्यासाठी गुरुवारी आपल्या संरक्षण बजेटमध्ये ७ टक्क्यांनी वाढ करून ते १.९१ ट्रिलियन युआन (सुमारे २७७ अब्ज डॉलर्स) इतके केले आहे.
Iran Israel War : अमेरिकेच्या 'त्या'दाव्यांना भारताने फेटाळून लावले
अमेरिका इराणविरुद्ध लष्करी कारवाईसाठी भारतीय बंदरे आणि नौदल तळांचा वापर करत असल्याच्या दाव्यांना भारताने ठामपणे फेटाळून लावले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने (एमईए ) हे दावे निराधार आणि बनावट असल्याचे सांगत स्पष्ट केले की त्यामध्ये कोणतीही तथ्यात्मकता नाही.परराष्ट्र मंत्रालयाने बुधवारी (४ मार्च) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म “एक्स” वर म्हटले की, “अशा निराधार आणि मनगढंत टिप्पणींपासून दूर राहण्याचा आम्ही सल्ला देतो.” मंत्रालयाने स्पष्ट केले की, भारत कोणत्याही देशाला इराणविरुद्ध लष्करी हल्ल्यांसाठी आपल्या बंदरांचा वापर करण्याची परवानगी देत नाही.संयम बाळगा; तणाव आणखी वाढू देऊ नका :यासोबतच भारताने पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संघर्षाबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. भारताने सर्व पक्षांना संयम बाळगण्याचे, तणाव आणखी वाढू न देण्याचे आणि सामान्य नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याचे आवाहन केले आहे.अमेरिकेचा दावा भारताने खोडला :भारताची ही प्रतिक्रिया अमेरिकेचे माजी सैन्य अधिकारी कर्नल डग्लस मॅकग्रेगर यांनी दिलेल्या एका मुलाखतीनंतर आली. त्यांनी एका अमेरिकन चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत दावा केला होता की, इराणसोबतच्या युद्धादरम्यान अमेरिकेचे अनेक नौदल तळ नष्ट झाले असून आता त्यांना भारत आणि भारतीय बंदरांवर अवलंबून राहावे लागत आहे. मॅकग्रेगर यांनी असे म्हटले होते, “आमचे सर्व बेस नष्ट झाले आहेत, आमची बंदर व्यवस्था देखील उद्ध्वस्त झाली आहे. आता आम्हाला भारत आणि भारतीय बंदरांवर अवलंबून राहावे लागत आहे, जे आदर्श परिस्थिती नाही.”अनेकांचा मृत्यू :दरम्यान,आज गुरुवारी हे युद्ध सहाव्या दिवशी पोहोचले असून सध्या तणाव कमी होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. अहवालानुसार आतापर्यंत इराणमध्ये आतापर्यंत १००० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे, तर इस्रायलमध्ये सुमारे डझनभर लोक ठार झाल्याची माहिती आहे.या युद्धाची सुरुवात शनिवारी (२८ फेब्रुवारी) झाली. अमेरिका आणि इस्रायलने संयुक्तपणे इराणवर हवाई हल्ले केले, ज्यामध्ये ८६ वर्षीय इराणी सर्वोच्च नेता आयातोल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला. यानंतर या प्रदेशातील तणाव झपाट्याने वाढला आहे. जवाबी कारवाई म्हणून इराणने इस्रायल आणि खाडी देशांमधील अमेरिकन लष्करी तळांवर क्षेपणास्त्र हल्ले केले.
Pune Crime: पुण्यात घरफोडी करणारा ‘गँगस्टर’ जेरबंद; 62 लाखांचे सोने-चांदीचे दागिने जप्त
Pune Crime: विश्रामबाग पोलिसांची धडाकेबाज कारवाई; उत्तर प्रदेशातील गुन्हेगाराचा पर्दाफाश
UN मध्ये भारताची दहशतवादाविरोधात कडक भूमिका
- ISIS-अल-कायदाविरुद्ध जागतिक कारवाईचे आवाहनभारताने संयुक्त राष्ट्रात दहशतवादाविरोधात अत्यंत कडक भूमिका घेतली आहे. या अंतर्गत भारताने आयएसआयएस (ISIS) आणि अल-कायदा तसेच त्यांच्या प्रॉक्सी संघटनांविरुद्ध आंतरराष्ट्रीय समुदायाने एकत्रित कारवाई करण्याचे आवाहन केले आहे. भारताने ठामपणे सांगितले की दहशतवाद हा आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेच्या “अस्तित्वाला धोका” ठरलेला आहे.जागतिक पातळीवर दहशतवादाविरोधात एकत्र या :संयुक्त राष्ट्रांतील भारताच्या स्थायी मिशनचे प्रथम सचिव रघू पुरी यांनी बुधवारी (४ मार्च) सांगितले की दहशतवादाला कोणतीही सीमा, राष्ट्रीयत्व किंवा वंश माहिती नाही आणि ही अशी समस्या आहे ज्याचा सामना आंतरराष्ट्रीय समुदायाने सामूहिकपणे करणे आवश्यक आहे.पहलगाम हल्ल्याचा उल्लेख :संयुक्त राष्ट्र दहशतवादविरोधी कार्यालय यांच्या सदस्य देशांसाठी आयोजित वार्षिक राजदूत-स्तरीय बैठकीत बोलताना पुरी यांनी एप्रिल २०२५ मध्ये जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याची आठवण करून दिली. हा हल्ला पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तैयबा (संयुक्त राष्ट्रांनी दहशतवादी संघटना म्हणून सूचीबद्ध केलेली) या संघटनेच्या प्रॉक्सी द रेसिस्टन्स फ्रंटने केला होता. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. ते म्हणाले, “आपल्याला आयएसआयएस, अल-कायदा आणि त्यांच्या प्रॉक्सी संघटनांविरुद्ध एकत्रितपणे कारवाई करावी लागेल.”रघू पुरी यांनी सांगितले की जवळपास तीन दशकांपासून सीमापार दहशतवादाचा सामना करणाऱ्या देश म्हणून भारताला दहशतवादाची सामाजिक-आर्थिक आणि मानवी किंमत, चांगलीच माहिती आहे.दहशतवाद्यांच्या हातात अत्याधुनिक तंत्रज्ञान धोकादायक :भारताने इशारा दिला की दहशतवाद्यांच्या हातात अत्याधुनिक तंत्रज्ञान जाणे ही संपूर्ण जगासाठी गंभीर चिंतेची बाब ठरू शकते. त्यामुळे हे आत्ताच रोखणे अत्यावश्यक आहे.भारताने असेही म्हटले की “न्यूयॉर्क आणि जगभरात या संदर्भात केलेल्या आमच्या पुढाकारांमधून आमची बांधिलकी स्पष्ट दिसते.” यात दहशतवादी उद्देशांसाठी नव्या आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या वापराला आळा घालण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ऐतिहासिक दस्तऐवज ‘दिल्ली घोषणा’ चा समावेश आहे. पुरी यांनी सांगितले की हा दस्तऐवज अनेक सदस्य देशांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.दरम्यान, ऑक्टोबर २०२२ मध्ये संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या दहशतवादविरोधी समितीची (CTC) बैठक झाली होती, ज्याचे त्या वर्षी अध्यक्षपद भारताकडे होते. या काळात नवी दिल्ली आणि मुंबई येथे “दहशतवादी उद्देशांसाठी नव्या आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या वापराला आळा घालणे” या विषयावर विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या परिणामी समितीने दहशतवादी उद्देशांसाठी नव्या आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या वापराला आळा घालण्यासंबंधी ‘दिल्ली घोषणा’ स्वीकारली.
Nagpur Crime : पिचकारी मारली म्हणू आजीने थेट नातवाच्या अंगावर ओतले गरम पाणी; व्हिडिओ व्हायरल
नागपूर : होळीचा सण म्हणजे रंगाचा आणि पाण्याचा त्याशिवाय होळी ही अपूर्ण, अशीच होळी खेळताना नातवाने आजीवर पिचकारी उडवली आणि आजीने संतापाच्या भरात असं काही केलं की तो लहान मुलगा चक्क ४५ टक्के भाजला.
ST Bus : एसटीत मद्यपानास 'शून्य सहनशीलता'; चालक-वाहकांची अल्कोटेस्ट तपासणी सक्तीची
— परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहितीमुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात (एसटी) सेवेत असताना मद्यपानास आळा घालण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यासाठी कठोर उपाययोजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार आगारात कामावर हजर होणाऱ्या सर्व चालकांची अल्कोटेस्ट मशीनद्वारे दररोज मद्यपान तपासणी करणे बंधनकारक करण्यात आले असून, योग्य नोंदी घेऊनच चालकांना कर्तव्यावर पाठविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.२५ जानेवारी रोजी मंत्री सरनाईक यांनी मुंबईतील परळ बसस्थानकाला अचानक भेट दिली. यावेळी चालक-वाहकांच्या विश्रांतीगृहांमध्ये अनेक मद्याच्या बाटल्या आढळून आल्या. तसेच काही कर्मचारी मद्यधुंद अवस्थेत असल्याचेही निदर्शनास आले. या धक्कादायक प्रकाराची गंभीर दखल घेत मंत्री सरनाईक यांनी तातडीने चौकशी समिती नेमून या प्रकरणास जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. तसेच असे प्रकार पुन्हा घडू नयेत यासाठी कडक उपाययोजना करण्यासही सांगितले होते.त्या अनुषंगाने एसटी प्रशासनाने तीन अधिकाऱ्यांची समिती नेमून या प्रकरणाची सखोल चौकशी केली. चौकशीमध्ये दोषी आढळलेल्या अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली असून, असे प्रकार पुन्हा घडू नयेत यासाठी आवश्यक उपाययोजनाही सुचविण्यात आल्या आहेत. सदर चौकशी अहवाल एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांना सादर करण्यात आला असून त्यांच्या निर्देशानुसार दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. तसेच समितीने सुचविलेल्या उपाययोजना तातडीने सर्व आगारांमध्ये लागू करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.नव्या उपाययोजनांनुसार आगारात कामावर हजर होणाऱ्या चालकांची वाहन परीक्षकांच्या माध्यमातून नियमित तपासणी केली जाणार आहे. तसेच वाहकांचीही ड्युटी देण्यापूर्वी अल्कोटेस्ट मशीनद्वारे तपासणी करून त्याची नोंद ठेवणे आवश्यक राहणार आहे. चालक व वाहकांची मद्यपान तपासणी झाली आहे की नाही, यावर सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक, सहाय्यक वाहतूक अधीक्षक, वाहतूक निरीक्षक, सहाय्यक वाहतूक निरीक्षक आणि वाहतूक नियंत्रक यांनी देखरेख ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच आगार व्यवस्थापकांनीही नियमित नियंत्रण ठेवून या आदेशांची प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.बस मार्गावर असताना चालकाने नियंत्रण कक्षात लॉगबुकची नोंद करणे बंधनकारक राहणार आहे. चालकाने नोंद केल्यानंतर त्याची पुन्हा एकदा अल्कोटेस्ट तपासणी करून योग्य नोंद घेतल्यानंतरच पुढील मार्गावर पाठविण्याची सक्ती करण्यात आली आहे. ही तपासणी नियमितपणे होत आहे की नाही, याची खात्री स्थानक प्रमुखांनी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.याशिवाय बसस्थानक व आगार परिसरातील चालक, वाहक आणि विश्रांतीगृहांमध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांचीही वेळोवेळी अल्कोटेस्ट मशीनद्वारे तपासणी करून त्याची नोंद ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. संबंधित विभागातील पालक अधिकाऱ्यांनी आगार व बसस्थानक भेटीदरम्यान या उपाययोजनांची अंमलबजावणी तपासण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.दरम्यान, या बाबतीत दक्षता विभागाकडून वेळोवेळी गोपनीय तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. मार्गतपासणी पथक, वाहतूक निरीक्षक, प्रशिक्षण विभाग आणि सुरक्षा विभाग यांच्या माध्यमातून तपासणी कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.एसटी कर्मचाऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी प्रशिक्षण सत्रांचे आयोजन करण्यात येणार असून सामाजिक संस्थांच्या सहकार्याने मद्यपानाचे दुष्परिणाम याबाबत प्रबोधन केले जाणार आहे. तसेच आगारांमध्ये विशेष ‘मद्यपान जनजागृती सप्ताह’ आयोजित करून चालक-वाहक व इतर कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.यासोबतच जिल्ह्यातील मुख्य बसस्थानक, चालक-वाहक विश्रांतीगृहे तसेच ज्या आगारांमध्ये चालक-वाहक जास्त प्रमाणात थांबतात अशा ठिकाणी मद्यपानास प्रतिबंध करण्यासाठी विशेष लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अतिथ्यगृह परिसरातील स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, लाईट-पंखे आदी सुविधांची देखभाल करण्याची जबाबदारीही संबंधित अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे.प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत एसटी प्रशासनाने मद्यपानासंदर्भात कठोर भूमिका घेतली असून या उपाययोजनांमुळे बससेवा अधिक सुरक्षित आणि शिस्तबद्ध होईल, असा विश्वास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.
Chief Minister of Bihar: होळीच्या निमित्ताने बिहारचे राजकारण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. होळीच्या दिवशीच बिहारमध्ये नवीन मुख्यमंत्र्यांची चर्चा सुरू झाली आहे.
Smita Gondkar : स्मिता गोंदकरने मायदेशी परताच मानले एकनाथ शिंदेंचे आभार
Smita Gondkar : 'एक भारतीय म्हणून मला अत्यंत अभिमान वाटतो की कठीण काळात आपले सरकार आपल्या नागरिकांसोबत ठामपणे उभे आहे'
Preity Zinta : कभी अलविदा ना कहना चित्रपटाच्या चित्रीकरणाचा किस्सा अभिनेत्री प्रिती झिंटाने शेअर केला आहे.
Iran on america: अमेरिकेच्या पाणबुडीने हिंदी महासागरात इराणी फ्रिगेट आयआरआयएस देना वर टॉर्पेडो टाकल्यानंतर आंतरराष्ट्रीय तणाव वाढला आहे.
Ajit Pawar Plane Crash : आमदार रोहित पवार यांनी व्हीएसआर कंपनी तसेच केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत.
मुंबई: बिहारच्या राजकारणात आज एक अत्यंत मोठी आणि ऐतिहासिक घडामोड घडली आहे. मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी मुख्यमंत्रिपद सोडण्याचा आणि राज्यसभेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे बिहारमध्ये प्रथमच भाजपचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.गेल्या दोन दशकांहून अधिक काळ बिहारच्या राजकारणाचे केंद्रस्थान राहिलेले नीतीश कुमार आता राज्याच्या राजकारणातून दिल्लीच्या राजकारणात प्रवेश करत आहेत. त्यांनी स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण राज्यसभेवर जाणार असल्याचे जाहीर केले आहे. या निर्णयामुळे बिहारच्या राजकारणात आता सत्तेचे नवे समीकरण आकारास येत आहे.भाजपचा पहिला मुख्यमंत्रीहिंदी भाषिक राज्यांमध्ये बिहार हे एकमेव असे राज्य होते जिथे अद्याप भाजपचा मुख्यमंत्री झाला नव्हता. नीतीश कुमार यांच्या राजीनाम्यानंतर भाजपचे आता हे स्वप्न पूर्ण होणार आहे. एनडीएच्या सूत्रानुसार, आता मुख्यमंत्रीपद भाजपकडे जाईल, तर जेडीयूच्या वाट्याला उपमुख्यमंत्रीपद येणार आहे. २०२५ च्या विधानसभा निवडणुकीत एनडीएच्या विजयानंतर नीतीश कुमार यांनी सन्मानाने पद सोडण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.निशांत कुमार यांची राजकारणात एन्ट्रीनीतीश कुमार यांचे पुत्र निशांत कुमार हे आता बिहारचे नवे उपमुख्यमंत्री होऊ शकतात. निशांत कुमार विधान परिषदेच्या माध्यमातून मंत्रिमंडळात प्रवेश करतील. त्यांना पक्षातील वरिष्ठ नेत्यांचा पूर्ण पाठिंबा असल्याचे समजते. जेडीयू कोठ्यातून दुसऱ्या उपमुख्यमंत्रीपदासाठी विजय चौधरी आणि अशोक चौधरी (दलित चेहरा) यांची नावेही चर्चेत आहेत.जेडीयूमध्ये नाराजी?नीतीश कुमार यांच्या या निर्णयामुळे जेडीयूच्या गोटात काही प्रमाणात नाराजी पाहायला मिळत आहे. आमदार दलाची बैठक न घेता इतका मोठा निर्णय घेतल्याने कार्यकर्ते नाराज आहेत. अशा महत्त्वाच्या निर्णयावर विधिमंडळ पक्षात चर्चा होणे गरजेचे होते, असे काही आमदारांचे मत आहे. लवकरच या संदर्भात आमदार दलाची बैठक बोलावली जाण्याची शक्यता आहे.राज्यसभा निवडणुकीचे गणितबिहारमधून राज्यसभेच्या ५ जागांसाठी १६ मार्च रोजी मतदान होणार असून गुरुवारी (आज) नामांकनाचा शेवटचा दिवस आहे. विधानसभेतील संख्याबळ पाहता नीतीश कुमार यांची निवड जवळपास निश्चित मानली जात आहे.
काँग्रेस, उबाठाची अट मान्य केली म्हणून शरद पवारांना राज्यसभेची उमेदवारी ?
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांचे विलिनीकरण होणार नसेल तरच शरद पवारांना राज्यसभेच्या उमेदवारीसाठी पाठिंबा देऊ, अशी अट काँग्रेसकडून घालण्यात आली. तर विधानपरिषदेसाठी उद्धवना पाठिंबा देणार असाल तरच शरद पवारांच्या उमेदवारीला पाठिंबा देऊ अशी अट उबाठाकडून घालण्यात आली. काँग्रेस आणि उबाठाच्या अटी शरद पवारांच्या पक्षाने ताबडतोब मान्य केल्या. यानंतर काँग्रेस आणि उबाठाने शरद पवारांना राज्यसभेसाठी पाठिंबा जाहीर केला, अशी माहिती सूत्रांकडून समजते.https://prahaar.in/2026/02/27/nationalist-congress-partys-big-announcement-regarding-parth-pawar/महाराष्ट्रात राज्यसभेच्या सात जागांसाठी निवडणूक होत आहे. यापैकी सहा जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून येणार हे निश्चित आहे. विरोधकांनी एकी राखली तरच ते एका उमेदवाराला जिंकवून आणू शकतील अशी परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर मविआकडून शरद पवारांना उमेदवारी जाहीर झाली आहे. ही उमेदवारी जाहीर होण्याआधी शरद पवार आणि त्यांच्या पक्षाने काँग्रेस आणि उबाठाने घातलेल्या अटी मान्य केल्या आहेत. यामुळे महायुतीचे सहा आणि मविआचा एक उमेदवार असल्यास निवडणूक बिनविरोध होईल. पण महायुतीकडून सहा ऐवजी सात उमेदवार देण्यात आले तर निवडणूक अपरिहार्य आहे.https://prahaar.in/2026/03/04/bjp-announces-four-names-for-rajya-sabha/महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी भाजपचे उमेदवार रामदास आठवले विनोद तावडे माया चिंतामण ईवनाते रामराव वडकुतेमहाराष्ट्रातून राज्यसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार पार्थ पवारमहाराष्ट्रातून राज्यसभेसाठी शिवसेना उमेदवार ज्योती वाघमारेमहाराष्ट्रातून राज्यसभेसाठी मविआचा एकमेव उमेदवार शरद पवार
Bihar CM Nitish Kumar:
नीतीश कुमार 20 वर्षांनंतर मुख्यमंत्रिपद सोडत आहेत. 10व्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सुमारे 100 दिवसांनी हे घडत आहे. राजकीय वर्तुळात चर्चा आहे की JDUचे काही नेते त्यांना मुख्यमंत्रिपदी कायम ठेवण्याच्या बाजूने आहेत, परंतु भाजपच्या दबावामुळे नितीश यांना पद सोडावे लागत आहे. दिव्य मराठीच्या विश्लेषणामध्ये वाचा, नितीश कुमार इच्छा नसतानाही मुख्यमंत्रिपद का सोडत आहेत. भाजप का दबाव टाकत आहे. 4 मुद्द्यांमध्ये जाणून घ्या, भाजप नितीश यांच्यावर दबाव टाकण्यात का यशस्वी झाला मुद्दा-1: पहिल्यांदाच आमदारांची संख्या भाजपच्या बाजूने 18व्या विधानसभेत भाजपने 101 जागांवर निवडणूक लढवून 89 जागा जिंकल्या आहेत. तो विधानसभेतील नंबर-1 पक्ष आहे. भाजप नितीश कुमार यांच्याशिवायही जुळवाजुळव करून सरकार स्थापन करू शकतो. पॉइंट-2ः तेजस्वींच्या खराब कामगिरीमुळे नितीश कुमार कमकुवत झाले 85 जागा जिंकूनही नितीश कुमार 2005, 2010, 2015 आणि 2020 मध्ये होते तितके मजबूत नाहीत. खरे तर, नितीश कुमार यांची ताकद आरजेडी आणि काँग्रेसच्या कामगिरीवर अवलंबून असते. हे असे समजा… मुद्दा-3: नितीश यांनी साथ सोडल्यास मोदी सरकारवर परिणाम होणार नाही केंद्रातील मोदी सरकारकडे २९२ जागा आहेत, ज्यात जदयूकडे १२ जागा आहेत. जर जदयू, इंडीसोबत गेले, तर एनडीएकडे २८० जागा राहतील. म्हणजे बहुमतापेक्षा ८ जागा जास्त. एनडीएचे सरकार बनेल. २९२-१२= २८० (एनडीए बहुमतापेक्षा ८ जास्त) पॉइंट-४: नितीश कुमार यांच्या वाढत्या वयाचा फायदा घेईल भाजप नितीश कुमार ७५ वर्षांचे आहेत. पुढील विधानसभा निवडणूक २०३० मध्ये होईल. त्यावेळी त्यांचे वय ७९-८० होईल. आत्ताही नितीश कुमार यांच्या आरोग्याबाबत अनेक दावे केले जातात. अशा स्थितीत आता भाजप बिहारमध्ये आपला नेता तयार करेल.
Priyanka Chopra : प्रियंकाच्या लेकीचं नाव मालती आहे. प्रियांका अनेकदा मालतीबरोबरचे खास क्षण सोशल मीडियावर शेअर करत असते
Jyoti Waghmare : शिवसेनेकडून अखेरच्या दिवशी राज्यसभेच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. ज्योती वाघमारे या नवीन चेहऱ्याला राज्यसभेची उमेदवारी शिवसेनेकडून जाहीर करण्यात आली आहे.
दुबईत अडकलेल्या भारतीयांच्या मदतसाठी सरसावले सोनू सूद; चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि इराणमधील युद्धामुळे जगभरातील लोकांना त्रास होत आहे. मध्य पूर्वेतील परिस्थिती भयानक आहे आणि लोक दुबईसह अनेक ठिकाणी विमानतळांवर अडकले आहेत. या युद्धादरम्यान दुबईत अडकलेल्या भारतीयांना मदत करण्यासाठी सोनू सूद पुढे आला आहे. तो दुबईत अडकलेल्यांसाठी राहण्याची व्यवस्था करत आहे. त्याने ही माहिती सोशल मीडियाद्वारे शेअर केली आहे. त्याने एक व्हिडिओ शेअर करत ट्विट केले की, युद्धामुळे दुबईत अनेक प्रवासी अडकले आहेत. जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीचे कोणी बेघर असेल तर आम्ही मोफत सुरक्षित निवासस्थान देत आहोत. कोणतेही राष्ट्रीयत्व नाही. कोणत्याही अटी नाहीत. फक्त मानवता. जर तुम्हाला मदत हवी असेल तर आम्हाला इंस्टाग्राम @dugastaproperties वर मेसेज करा. कृपया हे शेअर करा जेणेकरून ते गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचू शकेल.व्हिडिओद्वारे केली माहिती शेअरव्हिडिओमध्ये सोनू म्हणाला, नमस्कार मित्रांनो. सध्याच्या संकटामुळे दुबईमध्ये अडकलेल्यांसाठी, आम्ही तुम्हाला कळवू इच्छितो की राहण्याची व्यवस्था उपलब्ध आहे. आम्ही तुम्हाला मोफत राहण्याची व्यवस्था करू. आमच्यापैकी जे भारतीय आहेत किंवा कोणत्याही राष्ट्रीयत्वाचे आहेत, ते दुबईमध्ये अडकले आहेत, त्यांनी कृपया मला इंस्टाग्रामवर डीएम करा. तुम्ही तुमच्या मायदेशी पोहोचेपर्यंत आम्ही तुम्हाला मोफत राहण्याची खात्री देऊ.War has left many travelers stranded in Dubai.If you or someone you know has nowhere to stay, we are offering safe accommodation free of cost.No nationality. No conditions. Just humanity.DM us on Instagram if you need help.@dugastapropertiesPlease share so this reaches… pic.twitter.com/TDDr9st79M— sonu sood (@SonuSood) March 5, 2026चाहत्यांकडून सोनू सूदवर कौतुकाचा वर्षावसोनूने भूतकाळात आपल्या उदात्त कृत्यांनी मन जिंकले आहे आणि आता त्याने पुन्हा एकदा नेटिझन्सना प्रभावित केले आहे. अभिनेत्याने शेअर केलेल्या व्हिडिओवर कमेंट करताना एका नेटिझनने लिहिले की, मी तुमच्या मानवतेला, तुमच्या त्यागाला आणि तुमच्या समर्पणाला सलाम करतो. तुम्ही चित्रपटातील नायक नाही तर खरा नायक आहात. दुसऱ्या एका वापरकर्त्याने लिहिले की, तुमच्या दयाळूपणाला सलाम. मानवता सर्वोपरि आहे. तुमचा अभिमान आहे. कठीण काळात, तुमच्यासारखे लोक मानवतेवर विश्वास पुनर्संचयित करतात. देव तुम्हाला आशीर्वाद देवो. दुसऱ्या एका नेटिझनने ट्विट केले की, कोणतेही राष्ट्रीयत्व नाही. कोणत्याही अटी नाहीत. फक्त मानवता. आम्हाला अशा जगाची आणखी गरज आहे.
Ali Khamenei Funeral: खामेनी यांचा दफनविधी ‘या’कारणासाठी पुढे ढकलला ; वाचा नेमकं काय असेल कारण
Ali Khamenei Funeral: इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी यांचे अंत्यसंस्कार पुढे ढकलण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता त्यांना तातडीने दफन केले जाणार नाही.
Rajesh Tailang Post : प्रसिद्ध अभिनेते राजेश तैलंग यांच्या आईचे निधन झाले असून, अभिनेत्याने सोशल मीडियावर ही माहिती देत भावूक पोस्ट शेअर केली आहे.
Israel - Iran War : इराणला कधीही अण्वस्त्रे मिळवण्याची किंवा विकसित करण्याची परवानगी मिळू नये
- कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांची स्पष्ट भूमिकाकॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी सांगितले की मध्यपूर्वेत वाढत असलेल्या संघर्षात लष्करी सहभागाची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही. पंतप्रधान मार्क कार्नी यांनी म्हटले आहे की अमेरिका आणि इस्रायलने इराणविरुद्ध सुरू केलेल्या युद्धात कॅनडाचा सहभाग पूर्णपणे नाकारता येणार नाही.त्यांनी यापूर्वी केलेल्या त्या वक्तव्यानंतर ही टिप्पणी केली आहे, ज्यात त्यांनी म्हटले होते की या संघर्षाला कारणीभूत ठरलेले अमेरिका-इस्रायलचे हल्ले आंतरराष्ट्रीय कायद्याच्या विरोधात असल्याचे दिसते.इराणला कधीही अण्वस्त्रे मिळवण्याची किंवा विकसित करण्याची परवानगी मिळू नये :मार्क कार्नी यांनी ओटावाची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की मध्यपूर्वेत सुरू असलेल्या घडामोडींवर कॅनडाची भूमिका स्पष्ट आहे. त्यांनी इराणला संपूर्ण प्रदेशातील अस्थिरता आणि दहशतीचा प्रमुख स्रोत असल्याचे म्हटले आणि त्याच्या मानवाधिकार नोंदीवर टीका केली. त्यांनी पुढे असेही सांगितले की इराणला कधीही अण्वस्त्रे मिळवण्याची किंवा विकसित करण्याची परवानगी दिली जाऊ नये.कार्नी यांनी सांगितले की कॅनडा आणि कॅनडाच्या आंतरराष्ट्रीय भागीदारांनी इराणला वारंवार आपला अणु कार्यक्रम थांबवण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी जी-7 शिखर परिषदेत झालेल्या चर्चांचा तसेच गेल्या सप्टेंबरमध्ये पुन्हा लागू करण्यात आलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या निर्बंधांचा उल्लेख केला.कॅनबेरा येथे झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत मार्क कार्नी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी एकसंघ भूमिका दर्शवली. त्यांनी मध्यपूर्वेत वाढत असलेली व्यापक शत्रुता कमी करण्याचे आवाहन केले आणि इराणच्या अण्वस्त्र महत्त्वाकांक्षा रोखण्याची गरज अधोरेखित केली.
Sagarika Ghatge: मेहंदी सोहळ्यात सागरिका घाटगेची रॉयल एंट्री; लाल शराऱ्याने वेधले लक्ष
Sagarika Ghatge मेहंदी सोहळा म्हणजे रंग, उत्साह आणि पारंपरिक पोशाखांचा जल्लोष. सागरिकाने निवडलेला गडद लाल रंगाचा शरारा ड्रेस तिच्या व्यक्तिमत्त्वाला अगदी साजेसा वाटला. सूक्ष्म भरतकाम, हलकी झळाळी आणि मोकळा सिल्हूट यामुळे तिचा संपूर्ण लूक रॉयल आणि देखणा दिसत होता.
Asif Merchant: ‘ट्रम्पला मारण्याची योजना होती’ ; इराणी गुप्तचर एजंट्सचा मोठा कट उघड
Asif Merchant: अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील सुरू असलेल्या संघर्षादरम्यान, एका पाकिस्तानी नागरिकाने एक महत्त्वाचा दावा केला आहे.
Sharad Pawar and Parth Pawar:
Anger Management: सावधान! वाढता राग ठरू शकतो ‘सायलेंट किलर’; औषधांशिवाय असा ठेवा नियंत्रणात
Anger Management आजच्या धावपळीच्या जीवनात छोट्या-छोट्या गोष्टींवर चिडचिड होणे सामान्य झाले आहे. पण वैद्यकीय विज्ञान आणि आयुर्वेद दोन्ही सांगतात की, सततचा राग शरीरासाठी घातक आहे.
Pakistan Player : खेळाडू की हैवान; पाकिस्तानी खेळाडूंकडून मैदानाबाहेर महिलांचा विनयभंग
आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषकातून पाकिस्तानचा संघ बाहेर पडला असला, तरी आता एका नव्या वादामुळे पाकिस्तानी खेळाडू पुन्हा चर्चेत आले आहेत. श्रीलंकेतील कँडी येथे मुक्कामादरम्यान पाकिस्तानच्या एका खेळाडूने हॉटेलमधील महिला कर्मचाऱ्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप समोर आला आहे. ‘टेलिकॉम एशिया स्पोर्ट’च्या अहवालात याबाबत दावा करण्यात आला आहे.नेमकी घटना काय?मिळालेल्या माहितीनुसार, श्रीलंकेविरुद्धच्या शेवटच्या सुपर ८ सामन्यापूर्वी ही घटना घडली. कँडीतील ‘गोल्डन क्राऊन हॉटेल’मध्ये पाकिस्तानचा संघ थांबला असताना एका खेळाडूने हाऊसकीपिंग विभागातील महिला कर्मचाऱ्याशी विनयभंग केला.महिलेने मदतीसाठी आरडाओरडा केल्यानंतर हॉटेलमधील इतर कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर या प्रकरणाची माहिती पाकिस्तान संघाचे व्यवस्थापक नवीद चीमा यांना देण्यात आली.हॉटेल व्यवस्थापनाची कठोर कारवाईची मागणी :या घटनेनंतर हॉटेल व्यवस्थापनाने संबंधित खेळाडूवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. मात्र, संघ व्यवस्थापकांनी खेळाडूच्या वतीने माफी मागत त्याच्यावर तातडीने दंड लावून प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे.पीसीबीकडून पुढील कारवाईची शक्यता :पाकिस्तान संघ मायदेशी परतल्यानंतर या घटनेची गंभीर दखल घेतली जात आहे. संबंधित खेळाडूला पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (पीसीबी) शिस्तभंग समितीसमोर हजर राहावे लागू शकते. टीम मॅनेजरने दंड ठोठावला असला तरी बोर्डाकडून अतिरिक्त कारवाई किंवा बंदीची शक्यता वर्तवली जात आहे.पूर्वीही वादात पाकिस्तानी खेळाडू :पाकिस्तानी खेळाडू किंवा सपोर्ट स्टाफ गैरवर्तनाच्या आरोपांमुळे यापूर्वीही वादात सापडले आहेत. गेल्या वर्षी इंग्लंड दौऱ्यादरम्यान मँचेस्टर पोलिसांनी फलंदाज हैदर अली याला बलात्काराच्या आरोपावरून अटक केली होती, मात्र पुराव्याअभावी त्याची सुटका झाली होती.तसेच काही वर्षांपूर्वी मलेशिया दौऱ्यावेळी पाकिस्तान संघाच्या मसाज देणाऱ्या मलंग अली यांच्यावरही महिला कर्मचाऱ्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप झाला होता आणि त्यांना दंडही ठोठावण्यात आला होता.या नव्या घटनेमुळे पाकिस्तानी संघाच्या शिस्तीबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मुंबई : 'मराठी बाणा' या सुप्रसिद्ध कार्यक्रमाच्या माध्यमातून मराठी संस्कृती जगभरात पोहोचवणारे लोककलेचे ज्येष्ठ अभ्यासक अशोक हांडे यांच्यासोबत एक भीषण घटना घडली आहे. गाडी पार्किंगच्या हप्त्यावरून धमकी देत त्यांना मारहाण करण्यात आली आहे. माहीम पोलीस स्थानकात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.नेमकं घडलं काय ?ही घटना १ मार्च रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास माटुंगा पश्चिम येथील मनमाला टँक रोडवरील युनायटेड हाऊस इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या ‘चौरंग–मराठी बाणा’ या अशोक हांडे यांच्या कार्यालयात घडली.महिम पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीनुसार, प्रथमेश पांडुरंग उन्फोडे उर्फ बंटी (वय ५३) हा क्रिकेट बॅट हातात घेऊन कार्यालयात घुसला आणि परिसरात वाहने पार्क करायची असतील तर ‘हफ्ता’ द्यावा लागेल, अन्यथा गाड्या उभ्या करू देणार नाही, अशी धमकी दिली.यावेळी अशोक हांडे यांनी सांगितले की, “आमच्या ‘मराठी बाणा’ कार्यक्रमाच्या गाड्या कार्यालयाबाहेर उभ्या होत्या. आरोपी मागील चाळीत राहतो आणि त्या पार्किंगशी त्याचा काहीही संबंध नाही. तरीही तो आमच्या चालकांना वारंवार धमक्या देत होता.”१ मार्च रोजी तो थेट कार्यालयात घुसला आणि रिसेप्शनिस्ट सुरेश मारुती मंकार यांना शिवीगाळ करत पार्किंगच्या मुद्द्यावरून धमकावू लागला. आवाज ऐकून हांडे बाहेर आले असता आरोपीने त्यांच्या दिशेने धाव घेत क्रिकेट बॅटने त्यांच्यावर हल्ला केला. या झटापटीत आरोपीने अशोक हांडे यांच्या डाव्या कानाजवळ बॅटने मारहाण केली तसेच त्याने त्यांना हातानेही मारहाण केली.कार्यालयातील कर्मचारी आणि स्थानिकांनी हस्तक्षेप करून आरोपीला बाहेर काढले. मात्र त्यानंतरही तो पुन्हा हांडे यांच्याकडे धाव घेण्याचा प्रयत्न करत होता. यानंतर पोलिसांना या प्रकरणाची माहिती देण्यात आली.पोलिस घटनास्थळी पोहोचले असता आरोपीने पोलिसांनाही शिवीगाळ केल्याचे सूत्रांनी सांगितले. हांडे यांच्या चालकानेही पोलिसांना सांगितले की, सायंकाळी सुमारे ६ वाजता आरोपीने गाडी पार्क करू नका, पैसे द्या, अशी धमकी दिली होती.या प्रकरणी पोलिसांनी खंडणी मागणे, मारहाण करणे आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या कामात अडथळा आणणे यांसंबंधी कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला २ मार्च रोजी अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.महिम पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पाटील यांनी सांगितले की, “हांडे यांच्या तक्रारीनंतर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.”कोण आहेत अशोक हांडे ?अशोक हांडे हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध सांस्कृतिक व्यक्तिमत्त्व आहेत. भारतीय संस्कृतीचा प्रसार करण्यासाठी त्यांनी १९८७ मध्ये ‘चौरंग’ संस्थेची स्थापना केली, तर २००५ मध्ये ‘मराठी बाणा’ हा कार्यक्रम सुरू केला. या कार्यक्रमांचे भारतातील अनेक राज्यांसह यूके, अमेरिका, कॅनडा, बेल्जियम आणि संयुक्त अरब अमिरातीमध्येही हजारो प्रयोग झाले आहेत.
पुणे: भारतीय गुन्हेगारी इतिहासातील सर्वात रहस्यमय आणि अंगावर शहारे आणणारं प्रकरण म्हणून 'सनम हसन केस' ओळखली जाते. एका १९ वर्षांच्या तरुणीचा वाढदिवसाच्या रात्री मृत्यू होतो आणि त्यानंतर सुरू होतो असा एक तपास, जो पाहून सीबीआयचे अधिकारीही चक्रावून गेले. या प्रकरणातील सर्वात मोठा ट्विस्ट म्हणजे सनमच्या शरीरात चक्क एका 'पुरुषाचे हृदय' आढळले होते. मुंबईची असलेली सनम हसन पुण्यात फॅशन डिझाईनिंगचे शिक्षण घेत होती. ३ ऑक्टोबर २०१२ रोजी तिचा वाढदिवस होता. मित्रांनी आग्रह केला, वडिलांनी 'नाईट आऊट'ची परवानगी दिली आणि पुण्याच्या एका आलिशान अपार्टमेंटमध्ये पार्टी सुरू झाली. मात्र, ४ ऑक्टोबरच्या पहाटे सनमच्या घरी फोन गेला की तिची तब्येत खराब आहे. पालकांनी पुण्यात धाव घेतली, तोपर्यंत त्यांच्या काळजाचा तुकडा या जगातून निघून गेला होता.पोस्टमॉर्टममध्ये थक्क करणारा रिपोर्टससून रुग्णालयात सनमचे पोस्टमॉर्टम झाले आणि तिथूनच या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले. रिपोर्टमध्ये नमूद होते की, सनमच्या शरीरात जे हृदय आहे ते एका पुरुषाचे असून ते ७० टक्के ब्लॉक होते. ही बाब सनमच्या पालकांना पचनी पडण्यासारखी नव्हती, कारण सनम एक फुटबॉल खेळाडू होती आणि ती पूर्णपणे तंदुरुस्त होती. मग एका तरुण मुलीच्या शरीरात मुलाचे हृदय आले कुठून? असा प्रश्न आजही अनुत्तरित आहे.बलात्कार की घातपात?सनमच्या शरीरावर सीमेनचे नमुने आणि चार इंजेक्शनच्या खुणा आढळल्या होत्या, ज्यामुळे तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याचा दाट संशय निर्माण झाला. पार्टीत हजर असलेल्या १७ जणांची डीएनए चाचणी करण्यात आली, मात्र कोणाचेही नमुने मॅच झाले नाहीत. तपासात पुढे असे सांगितले गेले की, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे हृदयांची अदलाबदल झाली असावी. पण पुरावा म्हणून दिलेले ते हृदय नेमके कोणाचे होते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.सीबीआयलाही अपयश२०१४ मध्ये हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले. २०१६ मध्ये तिचा मृतदेह पुन्हा थडग्यातून बाहेर काढून तपासणी करण्यात आली. मात्र, वेळेत पुरावे गोळा न केल्याने आणि फॉरेन्सिक पुराव्यांशी झालेल्या छेडछाडीमुळे सीबीआयलाही ठोस काही सापडले नाही. आज १० वर्षांहून अधिक काळ लोटला असला तरी, सनम हसनचा मृत्यू एक नैसर्गिक 'हार्ट अटॅक' होता की सुनियोजित 'मर्डर मिस्ट्री', हे गुपित आजही कायम आहे. ही जर हत्या असेल तर आरोपी अजूनही पकडला गेला नाही.
Sanjay Raut : राज्यसभा निवडणुकीत भाजपने पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यानंतर संजय राऊत यांनी तावडेंविषयी कौतुकाचे उद्गार काढले आहे.

32 C