दहिसर नदी प्रदूषण रोखण्यासाठीच्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार
मुंबई : दहिसर नदीतील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार आहे, असे राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले. दहिसर (मुंबई) नदीतील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत आमदार अबू आझमी यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नास उत्तर देताना राज्यमंत्री माधुरी मिसाळ बोलत होत्या.राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले की, दहिसर नदी परिसरातील गोठ्यांच्या स्थलांतराची प्रक्रिया सुरू असून त्यासाठी जागाही निश्चित करण्यात आली आहे. महसूल विभागाने संबंधित नकाशा जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला असून आर्थिक तरतूदही करण्यात आली आहे. गोठे हलविण्याबाबत मुंबई महानगरपालिकेला निर्देश देण्यात आले असून, नोटिस देऊन स्थलांतराची कारवाई सुरू आहे.विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांनी, मुंबई प्रदूषण नियंत्रण मंडळाने नदी प्रदूषण रोखण्यासाठी आतापर्यंत कोणती कारवाई केली, याची माहिती सभागृहात सादर करण्याचे निर्देश दिले. त्यांनी सांगितले की, मंडळाने त्वरित जबाबदारी घ्यावी आणि एका आठवड्यात अहवाल सादर करावा.राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी माहिती दिली की, दहिसर, पोयसर, ओशिवरा आणि वालभट नद्या यांचे पुनरुज्जीवन कार्य सुरू आहे. दहिसर नदीसाठी दोन मलजल प्रक्रिया केंद्रांचे काम पूर्ण झाले असून प्रकल्प ३१ मार्च २०२६ पर्यंत कार्यान्वित होईल. पोयसर नदीसाठी १० मलजल प्रक्रिया केंद्रांपैकी नऊ केंद्रांचे काम प्रगतीपथावर आहे. ओशिवरा आणि वालभट नदीसाठी पाच प्रक्रिया केंद्रांची कामे सुरू असून तीही प्रगतीपथावर आहेत.राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले की, नदीकिनारी असलेल्या गोठ्यांवर आत्तापर्यंत दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तथापि, अनेक गोठ्यांची नोंदणी अद्याप न झाल्याने कारवाईत विलंब होत आहे. दहिसर नदी प्रकल्पात १३०, पोयसरमध्ये २,५५४ आणि ओशिवरा नदी प्रकल्पात ७०० घरे व दुकाने बाधित असून, पात्र बांधकामांच्या पर्यायी सदनिकांअभावी अतिक्रमण हटविण्याची प्रक्रिया प्रलंबित असल्याचेही त्यांनी सांगितले.या चर्चेत विधानसभा सदस्य मनिषा चौधरी, योगेश सागर, दिलीप लांडे, अस्लम शेख यांनी सहभाग घेतला.
बारावीचा पेपर दिला आणि आत्महत्या केली; चिठ्ठीत केले 'ते'खुलासे
कल्याण : गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात परीक्षेचा काळ सुरु आहे. वर्षभर अभ्यासासाठी केलेल्या मेहनतीची परीक्षा चालू आहे. लाखोंच्या संख्येने विविध राज्यातून विद्यार्थी पेपर देत आहेत. अशातच आपण नापास होणार या भीतीने घाबरून कल्याणमधील एका मुलीने आपले जीवन संपवले आहे.कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरात बुधवारी ही घटना उघडकीस आली. संबंधित विद्यार्थिनी वाणिज्य शाखेत बारावीचे शिक्षण घेत होती. नुकतेच दिलेले पेपर अपेक्षेप्रमाणे न झाल्याची खंत तिच्या मनात होती. ‘आपण परीक्षेत नापास होऊ’ या भीतीसोबतच घरच्यांची नाराजी सहन करावी लागेल, या विचारांनी ती तणावाखाली होती, अशी माहिती समोर येत आहे.परीक्षेच्या निकालाबाबत सतत मनात चाललेल्या भीतीमुळे विद्यार्थिनी मानसिकदृष्ट्या खचली होती. याच अवस्थेत तिने घरातच गळफास घेऊन जीवन संपवले. घटनेची माहिती मिळताच परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली.नैराश्यातून उचलले टोकाचे पाऊलघटनास्थळी सापडलेल्या चिठ्ठीत विद्यार्थिनीने, “माझे पेपर चांगले गेले नाहीत. मला आई-वडिलांना त्रास द्यायचा नाही,” असे शब्द लिहिले होते. या ओळींमधून तिच्या मनातील भीती आणि अपराधीपणाची भावना स्पष्ट होत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.या घटनेमुळे परीक्षा काळात विद्यार्थ्यांवर होणारा मानसिक दबाव पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. गुण, निकाल आणि अपेक्षांच्या ओझ्याखाली विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य धोक्यात येत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसर शोकसागरात बुडाला आहे.
Holi School Holiday: होळीनिमित्त शाळेला सुट्टी कधी? 2, 3 की 4 मार्च…. जाणून घ्या
Holi School Holiday: यंदा होळी 2 मार्च रोजी साजरी होणार असून, दुसऱ्या दिवशी म्हणजे 3 मार्च, मंगळवारी रंगपंचमी (धुलीवंदन) निमित्त सार्वजनिक सुट्टी असेल.
Manoj Jarange : माझ्याविरोधात मंत्रालयात स्टिंग ऑपरेशन सुरू आहे; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
माझ्या विरोधात कट रचला जात आहे. कारण काय तर मी गरिबांसाठी लढा देत आहे. मंत्रालयात स्टिंग ऑपरेशन सुरू आहे, असा खळबळजनक दावा मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी केला आहे.
नागपूर AIMS मधील विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या चक्क अळ्या..... सोशल मीडियावर चर्चेला उधाण
नागपूर : अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असतात. अशावेळी जेवणाची सोय होते ती खाणावळीतून किंवा कॉलेजच्या मेस मधून. मात्र याच मेसमधील जेवण तुमच्या आरोग्यासाठी धोक्याचं ठरलं तर ?नागपूर AIMS मधील विद्यार्थ्यांच्या मेसच्या जेवणात चक्क अळ्या आणि वेगवेगळे छोटे किडे आढळून आले आहेत. त्याचे काही फोटो सध्या सोशल मीडियावरून व्हायरल होत आहेत. विशेष म्हणजे मेडिकल कॉलेजच्या पदवीधर विद्यार्थ्यांच्या जेवणात हे कीडे आढळून आले .नेमका आरोप काय?२५ फेब्रुवारी रोजी दुपारच्या जेवणादरम्यान काही विद्यार्थ्यांच्या ताटात अळी दिसल्याचा आरोप आहे. फळांच्या तुकड्यांवर मृत किडा आढळल्याचेही सांगितले जात आहे. भाजीमध्ये अळ्या तसेच मशरूमच्या पदार्थात किडे असल्याची चर्चा विद्यार्थ्यांमध्ये रंगली. विशेष म्हणजे, काहींना जेवण संपल्यानंतर हा प्रकार लक्षात आल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे आरोग्य सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.महाविद्यालय प्रशासनाचे स्पष्टीकरणमहाविद्यालय प्रशासनाने या आरोपांवर प्रतिक्रिया देताना सांगितले की, त्यांच्याकडे अद्याप कोणतीही लेखी तक्रार प्राप्त झालेली नाही. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोंची सत्यता तपासण्याची प्रक्रिया सुरू आहे. संस्थेतील प्राध्यापक, डीन आणि वरिष्ठ अधिकारीही त्याच मेसमध्ये जेवण घेतात, असेही प्रशासनाने नमूद केले. स्वच्छतेबाबत संस्थेचे धोरण कठोर असल्याचे सांगत, मेस व्यवस्थापन करणाऱ्या कंत्राटदाराकडून त्रुटी आढळल्यास कडक कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.विद्यार्थी परिषदेची भूमिकाविद्यार्थी परिषदेच्या सदस्यांनी प्रशासनाला कळवले की, त्यांच्या पातळीवर अधिकृत तक्रार आलेली नाही. काही विद्यार्थ्यांनी मात्र मेसमधील मर्यादित जागा आणि कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे वाढणाऱ्या गर्दीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. प्रशासनानेही एका काउंटरवर कर्मचारी अनुपस्थित असल्याची बाब मान्य केली असून संबंधित कंत्राटदाराला तातडीने सुधारणा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.सध्या संपूर्ण प्रकरणाची पडताळणी केली जात असून, आरोपांमध्ये तथ्य आहे की नाही? याचा तपास सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्न असल्याने या घटनेकडे गांभीर्याने पाहिले जात आहे. अंतिम अहवालानंतरच पुढील कारवाई स्पष्ट होणार आहे.
डिजिटल माध्यमांनी आता केवळ मध्यस्थ म्हणून न राहता एका शक्तिशाली माध्यम संस्थेचे रूप धारण केले आहे. त्यामुळे, आपल्या प्लॅटफॉर्मवर प्रसारित होणाऱ्या मजकुराची पूर्ण जबाबदारी या कंपन्यांनी स्वीकारलीच पाहिजे, असे ठाम प्रतिपादन केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांनी केले.
शिक्षण क्षेत्रात काम करणारे सामाजिक कार्यकर्ते या निर्णयाचे स्वागत करत आहेत.
Sunetra Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवारांची निवड
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (एनसीपी) राष्ट्रीय कार्यकारिणीच्या महत्वाच्या बैठकीत आज एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांची पार्टीच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षा म्हणून औपचारिक घोषणा करण्यात आली आहे.
घर खरेदीत फसवणूक करणाऱ्या बिल्डरांची मालमत्ता जप्त होणार
मुंबई : राज्यात आपले गृहस्वप्न साकार करू पाहणाऱ्या हजारो सर्वसामान्यांची बिल्डरांकडून होणारी फसवणूक आता राज्य सरकारने गंभीरपणे घेतली आहे. महारेराने घरखरेदीदारांच्या नुकसानभरपाईपोटी जारी केलेल्या आदेशांची पायमल्ली करणाऱ्या आणि वसुलीस दाद न देणाऱ्या विकासकांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. फसवणूक करणाऱ्या अशा बिल्डरांची मालमत्ता जप्त करून त्यातून ग्राहकांची थकीत रक्कम वसूल केली जाईल, अशी घोषणा प्रभारी गृहनिर्माण मंत्री शंभूराज देसाई यांनी गुरुवारी विधानसभेत केली.आमदार अतुल भातखळकर, जितेंद्र आव्हाड, सुलभा खोडके, प्रताप पाटील चिखलीकर यांसह अन्य सदस्यांनी महारेराच्या कारभारावर जोरदार ताशेरे ओढले. मुंबई, ठाणे आणि पुण्यात सुमारे १ हजार २०० ग्राहकांची ७९२ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक आकडेवारी सभागृहात मांडण्यात आली. महारेरा स्थापन झाल्यापासून १ हजार २९१ तक्रारदारांच्या बाजूने ७९२ कोटींचे वसुली आदेश देण्यात आले. मात्र, यातील २०० कोटींचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी 'वसुली शक्य नाही' असे कारण देत परत पाठवले आहेत. यावरून सदस्यांनी संताप व्यक्त करत, 'महारेरा हे घरखरेदीदारांना न्याय देण्याऐवजी विकासकांना मुदतवाढ देणारे एक्स्टेंशन काउंटर झाले आहे का?' असा संतप्त सवाल केला.सभागृहात झालेल्या चर्चेला उत्तर देताना मंत्री शंभूराज देसाई यांनी वस्तुस्थिती मान्य केली. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून काही तांत्रिक कारणांमुळे वसुली रखडल्याचे त्यांनी सांगितले. लिलाव यशस्वी न होणे, मालमत्ता न सापडणे, बँकांकडे तारण असलेली मालमत्ता किंवा न्यायालयीन स्थगिती यामुळे वसुलीत अडथळे येत आहेत. मात्र, यावर आता ठोस उपाययोजना केली जाईल, असे देसाई म्हणाले.अशी होणार कारवाईप्रभारी मंत्री शंभुराज देसाई म्हणाले, ज्या विकासकांनी ग्राहकांचे पैसे परत केलेले नाहीत, त्यांच्या मालमत्ता जप्त करून त्यांचा लिलाव केला जाईल. थकीत वसुलीच्या आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सविस्तर सूचना देण्यात आल्या आहेत. करारातील नमूद क्षेत्रापेक्षा कमी जागा देणाऱ्या बिल्डरांचीही चौकशी केली जाणार आहे. घरखरेदीदारांची फसवणूक करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. वसुलीसाठी लवकरच व्यापक मोहीम हाती घेऊन सर्वसामान्यांना त्यांचा हक्काचा पैसा मिळवून दिला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
Daisy Shah : तो खूप चांगला माणूस आहे..! वादात अडकलेल्या ‘पलाश मुच्छल’ला अभिनेत्री डेझी शाहचा पाठिंबा
संगीतकार पलाश मुच्छल याच्या वैयक्तिक आयुष्याभोवती निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर बॉलिवूड अभिनेत्री डेझी शाह हिने त्याला उघड पाठिंबा दिला आहे.
Mahabaleshwar Shri 2026 : सांगलीचा अर्षद मेवेकरी ठरला ‘महाबळेश्वर श्री 2026’चा मानकरी
महाबळेश्वर येथील सुभाषचंद्र बोस चौक येथे आयोजक नगरसेवक ॲड. संजय जंगम व मसल फॅक्टरी यांच्या वतीने भव्य शरीरसौष्ठव स्पर्धा ‘महाबळेश्वर श्री २०२६ (Mahabaleshwar Shri 2026) पर्व ६ वे’ उत्साहात पार पडले.
मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाचे नामकरण; आता होणार 'पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर'पूल
- मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाच्या पुनर्बांधणी कामाचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पणमुंबई : विकासकामांची गुणवत्ता राखत कामे गतीने पूर्ण करण्यास राज्य शासनाचे प्रथम प्राधान्य आहे. त्याच पद्धतीने बृन्हमुंबई महानगरपालिकेने गती आणि गुणवत्तेसह विहीत मुदतीच्या चार महिने आधीच मुंबई सेंट्रल रेल्वस्थानकालगतच्या पुलाच्या पुनर्बांधणीचे काम केवळ १५ महिन्यात पूर्ण केले आहे, ही निश्चितच अभिनंदनीय बाब आहे. या पुलाचे नामकरण पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर असे करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.बृन्हमुंबई महानगरपालिकेच्यावतीने आयोजित मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकालगतच्या पुलाच्या कामाच्या लोकार्पण कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. या लोकार्पण कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. लोकार्पण कार्यक्रमस्थळी विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे, कौशल्यविकास मंत्री मंगलप्रभात लोढा, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार अमिन पटेल, महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी, विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांच्यासह लोकप्रतिनिधी, महापालिका पदाधिकारी व अन्य संबंधित मान्यवर उपस्थित होते.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मुंबई सेंट्र्ल रेल्वेस्थानकाजवळच्या या १३० वर्ष जुन्या पुलाची कालमर्यादा संपली होती आणि वाहतूकीच्या दृष्टीने अतिशय उपुयक्त असलेल्या या पुलाचे पुनर्बांधणी काम गतीने पूर्ण करणे गरजेचे होते. हे लक्षात घेऊन बृहृन्मुंबई महानगरपालिकेने कालबद्ध नियोजनद्वारे अतिशय वेगाने या पुलाची पुर्नबांधणी विहीत मुदतीच्या चार महिने आधी पूर्ण केल्याबद्दल मुंबई महानगरपालिकेचे पदाधिकारी, अधिकारी वर्ग यांचे अभिनंदन मुख्यमंत्री यांनी केले. मुंबईतील अजून जवळपास सहा पूल आता तयार होत असून त्यांचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे येत्या दोन तीन महिन्यात इतर सहा पुलांचे लोकार्पण ही महानगर पालिकेच्या माध्यमातून होईल. महानगरपालिकेत निर्वाचित प्रतिनिधी आल्याने महानगरपालिकेच्या कामाला अधिक गती आणि अधिक लोकाभिमुखता येईल, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.पुलाचे नामकरण पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर असे करण्यात येणारमुख्यमंत्री म्हणाले की, महानगरपालिकेशी चर्चा करुन आपण या पुलाचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असे करणार आहोत, ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. पुण्यश्लोक अहिल्यामाता यांनी या देशामध्ये एक उत्कृष्ट प्रशासक कसा असला पाहिजे याचा आदर्श आपल्या कामातुन निर्माण केला आहे. त्यांची संवेदनशीलता, धर्मपरायणता, कार्यकुशल प्रजाहितदक्ष राज्यकारभार, कायदा सुव्यवस्थेवर असेलली पकड, त्यांनी तयार केलेली मंदीरे आणि महिलांची पहिली तुकडी, त्यांनी तयार केलेले कारखाने, लघुउद्योग, त्यांनी निर्माण केलेले मंदिरे, घाट, या सर्व कामातून राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्यासमोर आदर्श निर्माण केला आहे. त्यामुळे तीन दशकांनंतरही त्यांचे नाव आपण घेतो कारण त्यांच्यासारखे जे उत्कृष्ट प्रशासक आपल्याकडे होऊन गेले त्यांच्या कामातून आपली संस्कृती आणि आपली गुणवत्ता आपल्याला आजही पाहायला मिळते.मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकालगतच्या पुलाच्या पुनर्बांधकामाच्या (ऑनलाईन) लोकार्पण कार्यक्रमातील संबोधन...(मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकालगतच्या पुलाच्या पुनर्बांधकामाचे लोकार्पण | मुंबई | 26-02-2026)#Maharashtra #Mumbai #Infrastructure pic.twitter.com/TbF4fw2O3G— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 26, 2026म्हणूनच पुण्यश्लोक अहिल्यामातेचे नाव या पुलाला देण्याचा निर्णय आपल्या सर्वानाचं अतिशय गौरन्वावित आहे. त्यांच्या कामातून प्रेरणा घेऊन यापुढे राज्य शासन आणि महानगरपालिका कार्य करतचं राहतील, असे मुख्यमंत्री म्हणाले.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मुंबई महानगरपालिकेने विहीत मुदतीच्या आत यशस्वरित्या या पुलाचे काम पूर्ण केले आहे.नागरिकांसाठी हा पूल खुप उपयुक्त ठरणारा आहे. सुरळित वाहतुकीसाठी या पुलाची आवश्यकता आहे. त्यापार्श्वभूमीवर महानगरपालिकेने या पुलाचे काम गतीने पूर्ण केले आहे. यासाठी महानगरपालिकेचे अभिनंदन करत उपमुख्यमंत्री म्हणाले की, राज्यातील अनेक रखडलेले प्रकल्प या शासनाने वेगाने पूर्ण केलेली आहेत. मुंबईकरांना अपेक्षित विकासकामे यापुढेही महानगरपालिका करत राहिल,असा विश्वास व्यक्त करत महानगरपालिकेने अशाच पद्धतीने गतीने आणि दर्जदार कामे करावीत.
११ वर्षांत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था तिपटीने वाढवली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
राज्यातील विरोधी पक्ष भ्रमित आणि संभ्रमित असल्याचा टोलामुंबई : महाराष्ट्राची अर्थव्यवस्था २०१२-१३ साली १३ लाख कोटी होती. गेल्या ११ वर्षांत ती ५१ लाख कोटींपर्यंत आली. आम्ही राज्याची अर्थव्यवस्था तिपटीने वाढवली. आता ९० लाख कोटींचा टप्पा गाठायचा आहे. महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे, ज्याने ६६० बिलियनचा टप्पा पार केला आहेत. इतर कुठलेही राज्य अर्थव्यवस्थेच्या बाबतीत आपल्याइतके पुढे नाही. त्यामुळे राज्य दिवाळखोरीत निघाल्याचे सांगून विरोधक जनतेची दिशाभूल करीत आहेत, असा हल्लाबोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत केला.राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, देशाच्या जीडीपीमधील महाराष्ट्राचा वाटा सातत्याने वाढत आहे. २०२१-२२ मध्ये हा वाटा १३.१ टक्के होता, २०२३-२४ मध्ये १३.५ टक्के, २०२४-२५ मध्ये १३.८ टक्के झाला असून आता तो १४ टक्क्यांच्या जवळपास जाईल, असा प्राथमिक अंदाज आहे. राज्याचे जीएसटी संकलन जवळपास ३ लाख ६० हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचले असून कृषी निर्यातीत १२ टक्के आणि सेवा क्षेत्रात २४ टक्के वाटा आहे. जीडीपीच्या तुलनेत कर्जाचे प्रमाणही नियंत्रित ठेवण्यात महाराष्ट्र यशस्वी ठरल्याचा दावा त्यांनी केला.२०२९-३० पर्यंत १ ट्रिलियन डॉलर आणि २०४७ पर्यंत ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था उभारण्याचा रोडमॅप तयार करण्यात आला आहे. या आराखड्यासाठी ३ लाख ८० हजार नागरिकांचा सहभाग आणि ७ लाखांहून अधिक सूचनांचा विचार करण्यात आला. प्रगतशीलता, शाश्वतता, सर्वसमावेशकता आणि सुशासन या चार तत्वांवर १६ प्रमुख थीम आणि १०० उपक्रम निश्चित करण्यात आले आहेत. दरवर्षी १० लाख रोजगारनिर्मिती, दरडोई उत्पन्नात दहापट वाढ आणि मोठ्या प्रमाणावर परकीय गुंतवणूक आकर्षित करण्याचे उद्दिष्ट त्यांनी स्पष्ट केले.दावोसबाबतच्या टीकेला दिले सडेतोड उत्तर- दावोस येथे होणाऱ्या करारांवरून विरोधकांनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्री फडणवीसांनी सडेतोड उत्तर दिले. ते म्हणाले, दावोसमध्ये होणाऱ्या करारांबद्दलही बरेच बोलले गेले. अनेकवेळा तिथे जाऊन करार का करता, इथेच का करत नाही, असे सांगितले जाते. दावोस छोटे गाव आहे. पण दोन-दोन दिवस तिथे ट्रम्प येऊन राहतात. त्याकाळात जगातील सगळ्या अर्थव्यवस्था, सगळे व्यवसाय तिथे असतात. जर तुम्हाला आर्थिक जगात प्रासंगिक राहायचे असेल, तर तिथे असले पाहिजे. दावोसमध्ये असलेल्या वेगवेगळ्या चर्चांमध्ये महाराष्ट्राची चर्चा असते. आपण त्यांना इथे बोलवूनही गुंतवणूकीचे करार करू शकतो. पण आपण हे दावोसला करावे अशी त्यांची अपेक्षा असते. आजूबाजूच्या सगळ्या युरोपीय देशांमध्ये असलेल्या सगळ्या परदेशी व्यावसायिक दावोसमध्ये आपली वार्षिक मिटींग ठेवतात. ज्यामध्ये परकीय गुंतवणूक नाही तो करार दावोसला करणार नाही असा निर्णय आम्ही केला होता. उत्सव केला की, जास्त लोक येतात, आपल्या राज्याची ताकद लोकांपर्यंत पोहोचते. त्यामुळे आपण दावोसला करार करतो.लोढांच्या मुलासोबत दावोसला करार का केले?मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मंत्री मंगलप्रभत लोढा यांच्या सुपुत्रांसोबत केलेल्या करारावरही अनेकांनी प्रश्न उपस्थित केला. पण त्यांचे सुपुत्र हे देशातील एक मोठे उद्योजकही आहेत. आपण त्यांच्यासोबत डेटा सेंटरमधील गुंतवणूकीचा १ लाख कोटींचा करार केला आहे. जागा आणि सगळ्या व्यवस्था करणे, हे लोढा यांचे काम आहे. मात्र, जगातील सगळ्यात मोठ्या कंपन्या यात गुंतवणूक करणार आहेत. त्यामुळे हा त्यांच्यासोबत केलेला करार आहे. मंगलप्रभात लोढांसोबत केलेला करार नाही. टीका होत असली तरी जागतिक गुंतवणूकदार एकत्र येतात त्या मंचावर उपस्थित राहणे आवश्यक असल्याचे फडणवीस म्हणाले.८८ टक्के करारांची अंमलबजावणीदावोसमध्ये २०२३ साली १९, २०२४ मध्ये २४ आणि २०२५ मध्ये ४८ करार झाले असून त्यापैकी ८८ टक्के करारांची अंमलबजावणी विविध टप्प्यांवर आहे. २०२६ साली ३१ लाख २५ हजार कोटी रुपयांचे करार झाले असून त्यापैकी ८३ टक्के परकीय गुंतवणूक आहे. देशातील एकूण थेट परकीय गुंतवणुकीपैकी ३९ टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात येत असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.बेरोजगारीचा दर कमी करण्यात यश- बेरोजगारीबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, २०२१-२२ मध्ये बेरोजगारी दर ४ टक्के होता, २०२३-२४ मध्ये तो ३.३ टक्क्यांवर आला आणि २०२५ मध्ये ३.१ टक्के आहे. महायुती सरकारच्या कार्यकाळात १ लाख २० हजार ४४९ जणांना सरकारी नियुक्त्या देण्यात आल्या असून लवकरच हा आकडा दीड लाखांवर जाईल.- गडचिरोलीतील स्टील हबसंदर्भात २ लाख ६१ हजार ८३९ कोटी रुपयांची गुंतवणूक आणि सुमारे ७० हजार ८९५ रोजगारनिर्मिती होणार असल्याचे त्यांनी सांगितले. जल, जमीन आणि जंगलाचे संवर्धन करत ५ कोटी झाडे लावण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. स्थानिक आदिवासींना प्राधान्य देत विकास साधला जात असल्याने नक्षलवाद आटोक्यात आल्याचा दावा त्यांनी केला.- स्टार्टअप क्षेत्रात महाराष्ट्र देशात आघाडीवर असून देशातील नोंदणीकृत स्टार्टअपपैकी २० टक्के महाराष्ट्रात आहेत. १४६ पेक्षा अधिक इन्क्युबेटरचे जाळे उभारण्यात येत आहे. त्यामुळे महाराष्ट्राला ‘स्टार्टअप कॅपिटल’ म्हणून ओळख मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.कुंभमेळा हा केवळ धार्मिक मेळा नव्हेनाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्या संदर्भात बोलताना त्यांनी सांगितले की, हा केवळ धार्मिक मेळा नसून शाश्वत पायाभूत सुविधांच्या उभारणीची संधी आहे. गोदावरी स्वच्छता, सांडपाणी प्रक्रिया, रस्ते रुंदीकरण आणि रिंगरोड यांसारख्या कामांमुळे दीर्घकालीन विकास साधला जाईल आणि नाशिकचे जागतिक ब्रँडिंग होईल.शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी?- शेतकऱ्यांसाठी पीक विमा पद्धतीत बदल करण्यात आला असून अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना १५ हजार ४७२ कोटी रुपये थेट खात्यात जमा करण्यात आले. कर्जमाफीसंदर्भात समिती स्थापन केली असून अॅग्रीस्टॅकद्वारे डिजिटल नोंदींच्या आधारे निर्णय घेतला जाईल. कर्जमाफी आम्ही करणारच आहोत, त्याबाबतचा निर्णय योग्यवेळी जाहीर करून, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मागेल त्याला कृषीपंप योजनेत ८५ टक्के मागण्या पूर्ण केल्या असून २०२२ ते २०२५ दरम्यान १० लाख ६३ हजार पंप बसवले. एका महिन्यात ५० हजार पंप बसवण्याची नोंद गिनीज बुकमध्ये झाल्याचे त्यांनी सांगितले.- भ्रष्टाचाराविरुद्ध झिरो टॉलरन्स धोरण अवलंबले असून एसीबीला स्वतंत्र कारवाईचे अधिकार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विरोधकांनी वारंवार टीका करण्याऐवजी शांतपणे अभ्यास करून मते मांडावीत, असे आवाहन करत “महाराष्ट्र देशातील पहिली ३ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनेल आणि भारत ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनेल, याबाबत शंका नाही,” असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
सकारात्मक निर्णय घेण्याचे संसदीय कार्यमंत्र्यांचे आश्वासनमुंबई : भारतीय स्वातंत्र्यचळवळीतील क्रांतिकारकांचे मुकुटमणी, द्रष्टे समाजसुधारक, प्रखर राष्ट्रभक्त स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार द्यावा, अशी मागणी भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी गुरुवारी विधान परिषदेत केली. संसदीय कार्यमंत्र्यांनी तसा प्रस्ताव केंद्रशासनाकडे पाठवावा आणि सभापतींनी हा ठराव एकमताने संमत करून घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.या मागणीवर संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. ते म्हणाले, ‘‘शासनाला असा प्रस्ताव आणावा लागेल. मी या परिषदेत असा प्रस्ताव मांडतो आणि त्यानंतर सभापतींनी त्यावर योग्य तो निर्णय घ्यावा’’, असे त्यांनी नमूद केले.गेल्या १० वर्षांहून अधिक काळापासून केंद्रात आणि राज्यातही स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या हिंदुत्वनिष्ठ विचारांवर चालणारे सरकार सत्तेत आहे. असे असूनही अद्याप विनायक दामोदर सावरकर यांना ‘भारतरत्न’ मिळालेला नाही. याविषयी हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून वारंवार खंत व्यक्त केली जात आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतकोत्सवी कार्यक्रमात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनीही या विषयावर भाष्य केले होते. आता विधान परिषदेत ही मागणी झाल्याने सावरकरप्रेमींच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
Marathi School: मराठी शाळांचे अस्तित्व टिकवत असतानाच विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषेचे ज्ञानही आत्मसात करणे तेवढेच आवश्यक असल्याचे नमूद करत मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांचा समतोल शिक्षणात महत्त्वाचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Amit Shah : “पश्चिम बंगालमध्ये भाजपचेच सरकार येणार”–अमित शाह
बंगालमध्ये सत्ता स्थापन होताच राज्यातील प्रत्येक घुसखोराला बाहेर काढण्याचे काम भाजप सरकार प्राधान्याने करेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दबावाखाली येऊन एका अशा व्यापार करारावर स्वाक्षरी केली आहे, ज्यामुळे भारतीय शेतकऱ्यांचे अस्तित्व धोक्यात येणार असल्याचा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे.
Samsung Galaxy S26 Ultra 5G भारतात लॉन्च; किंमत, फिचर्स जाणून घ्या सर्वकाही
Samsung Galaxy S26 Ultra 5G: थोडक्यात, हा फोन प्रायव्हसी, AI आणि कॅमेरा या तिन्ही बाबतीत एक पाऊल पुढे आहे, मात्र किंमतही तेवढीच जास्त आहे.
Russia’s attack on Ukraine : जिनिव्हा चर्चेपूर्वीच रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला
रशिया आणि युक्रेनमध्ये शांतता चर्चेसाठी राजनैतिक हालचाली सुरू असतानाच, रशियाने (Russia's attack on Ukraine) युक्रेनवर ४२० ड्रोन आणि ३९ क्षेपणास्त्रांचा भीषण मारा केला आहे.
The Kerala Story 2 : चित्रपटाच्या प्रदर्शनाला आव्हान देणाऱ्या याचिकांमध्ये याचिकाकर्त्यांनी म्हटले आहे की.
Stock Market: सेन्सेक्स-निफ्टी सपाट बंद, तरीही गुंतवणूकदारांनी कमावले तब्बल 1.08 लाख कोटी रुपये
Stock Market: आज बीएसईवर एकूण ४,३५६ शेअर्समध्ये व्यवहार झाले. यापैकी २,१७० शेअर्स वाढीसह, तर २,०३० शेअर्स घसरणीसह बंद झाले. १५६ शेअर्स सपाट राहिले. १०९ शेअर्सनी ५२ आठवड्यांचा नवा उच्चांक गाठला, तर २५८ शेअर्सनी ५२ आठवड्यांचा नवा नीचांक नोंदवला.
महाराष्ट्राची विकासयात्रा थांबणार नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधान परिषदेत ग्वाही
मुंबई : राज्यात गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेले अडथळ्यांचे राजकारण आता पूर्णपणे संपले असून, महाराष्ट्र विकासाच्या महामार्गावर सुसाट धावत आहे. विधान परिषदेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले की, प्रगत आणि सुरक्षित महाराष्ट्र घडवणे हेच सरकारचे अंतिम ध्येय आहे. भाषणाची सुरुवात करताना त्यांनी दिवंगत नेते अजित पवार यांच्या स्मृतींना उजाळा दिला आणि त्यांच्या निधनामुळे निर्माण झालेली पोकळी व्यक्त करत, दादांनी नेहमीच विकासाच्या राजकारणाला प्राधान्य दिल्याचे नमूद केले.गुंतवणुकीत महाराष्ट्र पुन्हा 'नंबर वन' :औद्योगिक क्षेत्रात महाराष्ट्राचा दबदबा कायम असून, राज्य आजही देशात गुंतवणुकीसाठी पहिल्या क्रमांकावर आहे. देशाच्या एकूण जीडीपीमध्ये महाराष्ट्राचा वाटा १३.५% इतका मोठा आहे. २०२४-२५ या वर्षात राज्याने १ लाख ६४ हजार ८७५ कोटींची परकीय गुंतवणूक खेचून आणली, जी देशाच्या एकूण गुंतवणुकीच्या ३९% आहे. ही आकडेवारी महाराष्ट्रावरील जागतिक विश्वासाचे प्रतीक असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.दावोस करारांची यशस्वी अंमलबजावणी :केवळ कागदावर करार न करता त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यावर सरकारचा भर आहे. या आर्थिक वर्षाच्या पहिल्या ६ महिन्यात ९१ हजार कोटींची गुंतवणूक राज्यात आली आहे. दावोस येथे झालेल्या ३० लाख कोटींच्या ऐतिहासिक करारांपैकी तब्बल ८२% करार आता प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या टप्प्यावर आहेत. यामुळे आगामी काळात एआय (AI), सेमीकंडक्टर्स आणि ग्रीन एनर्जी यांसारख्या आधुनिक क्षेत्रांत महाराष्ट्र क्रांती करेल.पायाभूत सुविधा आणि 'गेमचेंजर' प्रकल्प :मुंबईसह संपूर्ण राज्याचा चेहरामोहरा बदलणाऱ्या प्रकल्पांची माहिती देताना उपमुख्यमंत्र्यांनी 'वाढवण बंदर' आणि 'जागतिक क्षमता केंद्रा'चा उल्लेख केला. पालघरमधील वाढवण बंदर हे भविष्यात ५० लाख रोजगार निर्माण करणारे ठरेल. समृद्धी महामार्ग, कोस्टल रोड आणि अटल सेतू यांसारख्या प्रकल्पांमुळे दळणवळण वेगवान झाले असून, उद्योगांसाठी आवश्यक असलेली कनेक्टिव्हिटी राज्याला मिळाली आहे.घराघरात पोहोचणार उद्योग :विकास केवळ मुंबई-पुण्यापुरता मर्यादित न ठेवता तो राज्याच्या कानाकोपऱ्यात नेण्याचे धोरण सरकारने आखले आहे. उत्तर महाराष्ट्रात ५० हजार कोटींची, तर अहिल्यानगरमध्ये ११ हजार कोटींची गुंतवणूक प्रस्तावित आहे. विशेषतः छत्रपती संभाजीनगर हे शहर 'स्मार्ट इंडस्ट्रियल सिटी' म्हणून विकसित होत असून, ते भविष्यात इलेक्ट्रिक वाहनांचे (EV) सर्वात मोठे हब बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.२०२६ हे 'भरती वर्ष'; तरुणांसाठी रोजगाराची संधी :राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी उपमुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केली आहे. २०२६ हे वर्ष 'भरती वर्ष' म्हणून साजरे केले जाणार असून, रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवली जाईल. आतापर्यंत ८५ हजारांहून अधिक तरुणांना नियुक्त्या देण्यात आल्या असून, सरकारी आणि खासगी अशा दोन्ही क्षेत्रांत रोजगाराच्या प्रचंड संधी निर्माण केल्या जात आहेत. 'जीपीआर २.०' सारख्या उपक्रमांतून प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्याचे काम सुरू असल्याचेही त्यांनी ठामपणे सांगितले.
CM Devendra Fadnavis: राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना फडणवीस यांनी इतिहास, अर्थव्यवस्था, गुंतवणूक आणि रोजगार अशा विविध मुद्द्यांवर सरकारची बाजू भक्कमपणे मांडली.
Nilesh Sable: नवा दिवस… नवा विचार… चला…; निलेश साबळे नव्या प्रोजेक्टमधून येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Nilesh Sable: 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाला प्रेक्षकांची मोठी लोकप्रियता मिळाली. या शोच्या माध्यमातून निलेश साबळेला घराघरात लोकप्रियता मिळाली. झी मराठीवर या नव्या पर्वाची सुरुवातही झाली.
अंगणवाडी बांधकामासाठी १५ लाखांचा निधी प्रस्तावित; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती
मुंबई : राज्यातील अंगणवाड्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या 'स्मार्ट किट' खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता आणि गुणवत्तेचा अभाव असल्याचा मुद्दा आज विधानपरिषदेत चांगलाच गाजला. सुमारे ९० कोटी रुपये खर्चून खरेदी केल्या जाणाऱ्या या किटचा दर्जा आणि पुरवठादारांचे 'रॅकेट' पाहता, शासन या निर्णयाचा पुनर्विचार करणार का? असा थेट सवाल भाजप गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी सभागृहात उपस्थित केला.सदस्या उमा खापरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर बोलताना प्रवीण दरेकर यांनी अंगणवाड्यांच्या सद्यस्थितीवर बोट ठेवले. ते म्हणाले की, डिजिटल शिक्षणाचे उद्दिष्ट चांगले असले तरी अनेक अंगणवाड्यांमध्ये साध्या मूलभूत सुविधाही उपलब्ध नाहीत. अशा परिस्थितीत महागड्या इलेक्ट्रॉनिक किटची खरेदी करणे किती संयुक्तिक आहे? या किटच्या देखभालीची कोणतीही व्यवस्था नसून पुरवठादारांकडून अनेकदा निकृष्ट दर्जाचे साहित्य दिले जाते. या सर्व प्रक्रियेचा एखाद्या त्रयस्थ संस्थेमार्फत (Third Party) अभ्यास करून त्याचा अहवाल सभागृहासमोर ठेवणार का, अशी मागणीही त्यांनी केली.आमदार प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर सविस्तर स्पष्टीकरण देताना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी अंगणवाड्यांच्या सक्षमीकरणासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगितले. त्यांनी माहिती दिली की, अंगणवाड्यांच्या बांधकामासाठी मिळणाऱ्या निधीत मोठी वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. पूर्वी ७-८ वर्षांपूर्वी अंगणवाडी बांधकामासाठी केवळ ८ लाख रुपये मिळायचे, जे नंतर साडेबारा लाखांपर्यंत गेले. मात्र, आता शालेय शिक्षण विभागाच्या धर्तीवर ही रक्कम १५ लाख रुपयांपर्यंत नेण्याचा निर्णय अर्थ विभागाच्या मान्यतेने प्रस्तावित आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय, खरेदी प्रक्रियेतील विलंबाबाबत बोलताना तटकरे म्हणाल्या की, जिल्हा परिषद स्तरावरील बांधकाम विभागामार्फत प्रचलित नियमांनुसारच निविदा (Tender) प्रक्रिया राबवली जाते. या प्रक्रियेत साधारणपणे ४ ते ५ महिने जातात, ज्यामुळे साहित्य वेळेवर पोहोचण्यास अडथळे येतात. हा वेळ वाचवण्यासाठी आणि अंगणवाड्यांना दर्जेदार सुविधा तातडीने मिळाव्यात यासाठी शासन सकारात्मक पावले उचलत असून, निविदा प्रक्रियेत पारदर्शकता आणली जाईल, अशी ग्वाही त्यांनी सभागृहात दिली.
Budget Session : पोलादपूर एमआयडीसीचा प्रश्न मार्गी लागणार; अधिवेशन काळातच विशेष बैठकीचे आयोजन
मुंबई : रायगड जिल्ह्यातील पोलादपूर येथे औद्योगिक वसाहत (MIDC) स्थापन करण्याच्या मागणीने आता जोर धरला आहे. भाजप गटनेते आणि पोलादपूरचे सुपुत्र आमदार प्रवीण दरेकर यांनी आज (२६ फेब्रुवारी) विधानपरिषदेत या प्रश्नावर विचारणा केली. पोलादपूरमध्ये एमआयडीसी स्थापन करण्याबाबतचा निर्णय शासन कधीपर्यंत घेणार, असा थेट सवाल त्यांनी सभागृहात उपस्थित केला.जालना जिल्ह्यातील मंठा येथील एमआयडीसी संदर्भात सदस्य राजेश राठोड यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या चर्चेत सहभागी होताना दरेकर यांनी पोलादपूरचा विषय मांडला. पोलादपूरमध्ये एमआयडीसीसाठी आवश्यक असलेली जमीन उपलब्ध आहे, पाण्याची मुबलक सोय आहे, वाहतुकीची उत्तम साधने आणि स्थानिक मनुष्यबळही मोठ्या प्रमाणात आहे. सर्व निकष पूर्ण होत असतानाही उद्योग विभाग यावर कधी निर्णय घेणार? असा प्रश्न दरेकर यांनी विचारला. तसेच एमआयडीसी स्थापन करण्याचे नेमके निकष काय आहेत, याची स्पष्टताही त्यांनी मागितली.आमदार प्रवीण दरेकर यांच्या या प्रश्नाला उत्तर देताना राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी एमआयडीसी स्थापन करण्याबाबतचे तांत्रिक निकष स्पष्ट केले. पोलादपूरच्या औद्योगिक विकासाबाबत शासन सकारात्मक असून, या विषयावर सविस्तर चर्चा करण्यासाठी चालू अधिवेशन काळातच एक विशेष बैठक आयोजित केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. या निर्णयामुळे पोलादपूर तालुक्यातील तरुणांच्या हाताला काम मिळण्याच्या आणि स्थानिक उद्योगांना चालना मिळण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
योग्य इतिहास शिकवला असता तर औरंगजेब एकाही मुसलमानाचा हिरो नसता! - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
- ७५ हजार हिंदूंची कत्तल करणाऱ्या टिपूची शिवरायांशी बरोबरी खपवून घेणार नाहीमुंबई : देशाचा खरा इतिहास ७० वर्षे जाणीवपूर्वक लपवून ठेवण्यात आला. जर योग्य वेळी नीट आणि वस्तुनिष्ठ इतिहास शिकवला गेला असता, तर आज या देशातील एकाही मुसलमानाने क्रूरकर्मा औरंगजेबाला आपला 'हिरो' मानले नसते, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (२६ फेब्रुवारी) विधानसभेत विरोधकांवर प्रहार केला. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना त्यांनी इतिहासाच्या विकृतीकरणाचा मुद्दा उपस्थित करत काँग्रेस आणि डाव्या विचारसरणीवर निशाणा साधला.आमदार विजय वडेट्टीवार आणि भास्कर जाधव यांनी उपस्थित केलेल्या टिपू सुलतानच्या मुद्द्याला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, टिपू सुलतान चांगले होते की, वाईट यावर आमचा आक्षेप नाही. पण ज्यावेळी टिपू सुलतान हे छत्रपती शिवरायांऐवढे मोठे राजे होते, असे कुणीतरी म्हणतो, त्याला आमचा आक्षेप आहे. दुर्दैवाने, या देशाच्या इतिहासाशी जी छेडछाड करण्यात आली, त्यात वर्षानुवर्षे आम्हाला टिपू सुलतान हे महान राजे होते हेच शिकवण्यात आले. पण ७५ हजार हिंदूंची आणि ३३ हजार नायरांची कत्तल करणारेही टिपू सुलतानच होते, हे आम्हाला कधीच शिकवले नाही. आता खरा इतिहास सापडतो आहे.We will certainly fight against those who consider the invaders of this nation as their heroes...जे लोक या देशावर आक्रमण करणाऱ्यांना आपला हिरो मानतील त्यांच्या विरुद्ध आम्ही लढाई करूच...(विधानसभा, मुंबई | दि. 26 फेब्रुवारी 2026)#Maharashtra #Mumbai #MahaBudget2026 pic.twitter.com/gst3pn4zVV— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 26, 2026या देशात सरकारने ७० वर्षे एनसीईआरटीच्या पुस्तकात मुघल साम्राज्याला १७ पाने दिली आणि छत्रपती शिवरायांना एक परिच्छेद दिला. आता मोदी सरकारने एनसीईआरटीमध्ये छत्रपती शिवरायांच्या मराठ्यांच्या इतिहासाला २० पाने दिली. योग्यवेळी नीट इतिहास शिकवला असता तर या देशातील एकाही मुसलमानाने औरंगजेबाला आपाला हिरो म्हटले नसते. पण आपण खरा इतिहास कधी शिकवलाच नाही. या देशात अनेक राष्ट्रभक्त मुस्लीम आहेत आणि त्यांच्याबद्दल आमचा कुठलाच आक्षेप नाही. जे लोक देशाच्या विरोधातील लोकांना आपला हिरो म्हणतील त्यांच्याविरुद्ध आम्ही लढाई करू, असा इशाराही त्यांनी दिला.
महाराष्ट्रात सक्ती फक्त मराठीचीच - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
- हिंदी सक्तीच्या निर्णयावर सही उद्धव ठाकरेंचीमुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या काळात हिंदी सक्तीबाबत निर्णय झाला आणि त्यावर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सही होती. आमच्या सरकारच्या काळात महाराष्ट्रात सक्ती फक्त मराठीचीच राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत दिली.राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले :नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना २१ सप्टेंबर २०२० रोजी तज्ज्ञ समितीची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स स्थापन झाला. या समितीने १४ सप्टेंबर २०२१ रोजी सादर केलेल्या १०१ पानांच्या अहवालात पहिलीपासून इंग्रजी आणि हिंदी ही दुसरी भाषा म्हणून अनिवार्य करण्याची शिफारस केली होती. ३० जानेवारी २०२२ रोजी हा अहवाल मंत्रिमंडळासमोर आला आणि तत्कालीन सरकारने या शिफारसी स्वीकारल्या. ज्यांनी स्वतः या निर्णयावर स्वाक्षरी केली, तेच आज आम्हाला 'ठोकून' काढत आहेत. विशेष म्हणजे यात राज ठाकरेही सहभागी झाले. माझ्यामुळे दोन्ही भाऊ एका मुद्द्यावर एकत्र आले याचा मला आनंद असून त्याचे श्रेय मला घ्यायला आवडेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.मराठी शाळांच्या सद्यस्थितीवर भाष्य करताना मुख्यमंत्र्यांनी आकडेवारीनिशी बाजू मांडली. आजही राज्यातील ८४ टक्के शाळा मराठी माध्यमाच्या असून ७० टक्के विद्यार्थी त्यात शिक्षण घेत आहेत. मराठी शाळा बंद पडत असल्याची आकडेवारी कपोलकल्पित आहे. आपण आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत पाठवतो आणि इथे मराठी शाळांवरून केवळ भावनिक राजकारण करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शिक्षण मातृभाषेत उपलब्ध करून दिले, ही खरी मराठीची, भाषेची सेवा आहे, असेही त्यांनी नमूद केले.सीमावादाच्या प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले की, या विषयावर संपूर्ण सभागृहाचे एकमत आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयात तांत्रिक अडचण येत आहे. जेव्हा जेव्हा हे प्रकरण सुनावणीला येते, तेव्हा तीन न्यायाधीशांपैकी एक न्यायाधीश महाराष्ट्र किंवा कर्नाटकचे असतात. नियमानुसार तिन्ही न्यायाधीश त्रयस्थ राज्याचे असणे आवश्यक आहे. त्यामुळे हे प्रकरण लांबणीवर पडत आहे. मात्र, सीमावर्ती भागातील नागरिकांसाठी सवलती आणि जागा वाढवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.
Pune: अजित पवार यांच्या विमान अपघाताचा सीआयडी तपास योग्य दिशेने –अपर पोलीस महासंचालक सुनील रामानंद
Pune: सदर अकस्मात मृत्यूच्या गुन्ह्याचा तपास अत्यंत बारकाईने व काटेकोरपणे करण्यात येत असल्याचे अपर पोलीस महासंचालक रामानंद यांनी स्पष्ट केले.
- सहा महिन्यांत अहवाल सादर करणारमुंबई : राज्यातील शासकीय रुग्णालयांत उपचारासाठी आणलेल्या आरोपींनी पलायन केल्याच्या वाढत्या घटनांची सरकारने गंभीर दखल घेतली आहे. पुणे येथील ससून रुग्णालयातून एका गंभीर गुन्ह्यातील आरोपी पळून गेल्याच्या पार्श्वभूमीवर, राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांचे ‘सेफ्टी ऑडिट’ (सुरक्षा परीक्षण) करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. येत्या सहा महिन्यांत हे ऑडिट पूर्ण केले जाईल, अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी गुरुवारी (२६ फेब्रुवारी) विधानसभेत दिली.काँग्रेसचे आमदार हारून खान यांनी शासकीय रुग्णालयांतून आरोपी पळून जाण्याच्या घटनांबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना कदम बोलत होते. पुण्यातील ससून रुग्णालयात १९ फेब्रुवारी रोजी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीने पलायन केले होते. रुग्णालयाला रंगकाम करण्यासाठी लावलेल्या बांबूच्या साहाय्याने हा आरोपी पसार झाला होता. या गंभीर हलगर्जीपणाबद्दल संबंधित पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून, त्यांची विभागीय चौकशीही सुरू असल्याचे कदम यांनी स्पष्ट केले.सुरक्षा नियमावलीत बदल होणार :आरोपींना उपचारासाठी रुग्णालयात नेण्याबाबतची नवीन नियमावली तयार करण्यात आली असून ती सर्व रुग्णालयांना वितरित केली आहे. सेफ्टी ऑडिटचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर, रुग्णालयांच्या रचनेत आणि आरोपींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ते तांत्रिक बदल केले जातील, असेही त्यांनी नमूद केले.कारागृहातच मिळणार वैद्यकीय सुविधा :आमदार हरिश पिंपळे यांनी आरोपींना न्यायालयात नेताना होणारा अफाट खर्च आणि त्या दरम्यान त्यांना मिळणाऱ्या बेकायदेशीर सवलतींचा (मोबाईल, नातेवाईकांशी भेट) मुद्दा उपस्थित केला. यावर उत्तर देताना गृहराज्यमंत्र्यांनी सांगितले की, आरोपींना न्यायालयात नेण्याची गरज पडू नये, यासाठी सुनावणी 'व्हिडिओ कॉन्फरन्स'द्वारे घेण्याचे प्रमाण वाढवले जात आहे. येत्या दीड वर्षात राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांत ही सुविधा उपलब्ध होईल. नवीन बांधण्यात येणाऱ्या कारागृहांमध्ये अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा कारागृह परिसरातच उपलब्ध करून दिल्या जातील, जेणेकरून आरोपींना बाहेर नेण्याची वेळ येणार नाही. रुग्णालयांचे 'सेफ्टी ऑडिट' केवळ औपचारिकता न राहता, त्यातून ठोस सुरक्षा उपाययोजना अंमलात आणल्या जातील. आरोपींच्या पलायनाच्या घटनांना पूर्णविराम देणे हे आमचे उद्दिष्ट आहे, असे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितले.
Budget Session : डहाणूतील 'त्या'प्रकरणावर विधानपरिषदेत पडसाद; दोषी डॉक्टरांचे निलंबन
- आरोग्य केंद्रात बायोमेट्रिक सक्तीचे होणार!मुंबई : पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील आशागड प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरांच्या अनुपस्थितीत परिचारिकेने प्रसूती केल्याच्या गंभीर प्रकरणाचे पडसाद आज (२६ फेब्रुवारी) विधानपरिषदेत उमटले. भाजप आमदार चित्रा वाघ यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, महिला व बालविकास मंत्री मेघना बोर्डीकर यांनी संबंधित दोषी आरोग्य अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आल्याची माहिती दिली.चित्रा वाघ यांनी चर्चेला सुरुवात करताना आरोग्य व्यवस्थेतील त्रुटींवर बोट ठेवले. योजना आहेत, निधी आहे, मग शेवटच्या टप्प्यावर महिलांना सुविधा का मिळत नाहीत? असा सवाल त्यांनी केला. डहाणूच्या घटनेचा उल्लेख करत त्यांनी राज्यातील आरोग्य केंद्रांच्या सखोल पुनरावलोकनाची मागणी केली. तसेच, दुर्गम भागात डॉक्टरांनी सेवा द्यावी यासाठी शासनाचे काय धोरण आहे आणि बायोमेट्रिक उपस्थिती सक्तीची करणार का, असे रोखठोक प्रश्न त्यांनी विचारले.यावर आमदार चित्रा वाघ यांच्या प्रश्नांना उत्तर देताना मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या की, डहाणूतील घटना अत्यंत खेदजनक असून शासनाने त्याची गंभीर दखल घेतली आहे. आशागड प्राथमिक आरोग्य केंद्रातील संबंधित आरोग्य अधिकाऱ्याचे तातडीने निलंबन करण्यात आले आहे, तर कंत्राटी तत्त्वावर असलेल्या दोन अधिकाऱ्यांची सेवा खंडित (Termination) करण्यात आली आहे. आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टरांची उपस्थिती सुनिश्चित करण्यासाठी आता बायोमेट्रिक प्रणाली सक्तीची करण्यात आली असून, याद्वारे नियमित संनियंत्रण (Monitoring) केले जात आहे. 'आयुष्मान भारत' आणि 'लक्ष्य' (LaQshya) कार्यक्रमांतर्गत राज्यातील लेबर रूम आणि प्रसूती कक्षांच्या गुणवत्तेवर भर दिला जात आहे. पालघरमधील ४६ पैकी १२ आरोग्य केंद्रे राष्ट्रीय स्तरावर प्रमाणित झाली असून, उर्वरित केंद्रेही या वर्षात सुधारली जातील, असे त्यांनी आश्वासित केले.
मुंबई : पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात आरोग्य विभागाच्या निष्काळजीपणामुळे घडलेल्या प्रसूती प्रकरणाचे पडसाद आज (२६ फेब्रुवारी) विधानपरिषदेत उमटले. आमदार प्रवीण दरेकर यांनी डहाणूतील आरोग्य केंद्रांमधील अपुऱ्या सुविधा, डॉक्टरांची अनुपस्थिती आणि रिक्त पदांबाबत सरकारला धारेवर धरले. याला उत्तर देताना महिला व बालविकास मंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दोषींवर कडक कारवाई केल्याची आणि रिक्त पदे भरण्यासाठी विशेष पावले उचलल्याची घोषणा केली.प्रवीण दरेकर यांनी आरोग्य केंद्राच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला. आशागड प्राथमिक आरोग्य केंद्रात ३८ हजार आदिवासी लोकसंख्या असतानाही डॉक्टर का नसतात? परिचारिकांनी प्रसूती करणे हे रुग्णांच्या जीवाशी खेळणे नाही का? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. तसेच, मागील वर्षभरात आरोग्य कर्मचाऱ्यांच्या गैरवर्तवणुकीच्या किती तक्रारी आल्या आणि त्यावर काय चौकशी केली, असा जाबही त्यांनी विचारला. यासोबतच त्यांनी पालघर जिल्ह्यातील आरोग्य विभागातील रिक्त पदांचा मुद्दाही मांडला.आमदार दरेकर यांच्या प्रश्नांना उत्तर देताना मंत्री मेघना बोर्डीकर यांनी माहिती दिली की, सुदैवाने माता आणि बालकाची प्रकृती स्थिर आहे. मात्र, या प्रकरणातील गांभीर्य लक्षात घेता, आशागड केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्याचे (MO) तातडीने निलंबन करण्यात आले आहे, तर कंत्राटी तत्त्वावरील दोन डॉक्टरांची सेवा खंडित (Terminate) करण्यात आली आहे. पालघर जिल्ह्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. ही पदे भरण्यासाठी २७ फेब्रुवारी पासून नवी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे, ज्यामुळे रिक्त पदांचा प्रश्न सुटेल. पालघरमध्ये नवीन २०० खाटांचे जिल्हा रुग्णालय, १०० खाटांचे स्त्री रुग्णालय आणि क्रिटिकल केअर ब्लॉकला मंजुरी मिळाली असून त्याचे काम लवकरच पूर्ण होईल. तसेच, ४६ पैकी २८ प्राथमिक आरोग्य केंद्रे ही 'कायाकल्प' योजनेसाठी पात्र ठरली असून तेथे दर्जेदार सुविधा दिल्या जात आहेत.
'अजित पवारांच्या विमान अपघातावरून राऊत, रोहित पवारांची स्टंटबाजी'
- भाजपाचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांची प्रखर टीकाअजितदादांच्या निधनानंतर प्रसिद्धी मिळवण्यासाठी संजय राऊत आणि रोहित पवार रोज उठून तेचतेच मुद्दे मांडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. अपघातामागचे सत्य समोर आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकार अतिशय गांभीर्यपूर्वक प्रयत्न करत आहे. मात्र सत्य समोर आणतोय असा आव आणून स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न संजय राऊत आणि रोहित पवार करत आहेत असा घणाघात भारतीय जनता पार्टीचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी गुरुवारी (२६ फेब्रुवारी) केला.भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. केंद्र सरकार तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार आणि डीजीसीए स्तरावर अपघाताची चौकशी सुरूच आहे, सीबीआय चौकशीच्या केलेल्या मागणीवर देखील सकारात्मकरित्या विचार सुरू आहे, असेही नवनाथ बन यांनी नमूद केले.अजितदादांची मविआमध्ये यायची इच्छा होती असे सांगणा-या राऊतांना खडे बोल सुनावत नवनाथ बन म्हणाले की अजितदादांनी भाजपा महायुतीची साथ दिली, महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होते, एनडीएमध्ये सामील झाले होते याचे भान राऊतांनी ठेवावे. बाष्कळ दावे प्रतिदावे करण्यापेक्षा राऊतांनी उबाठा गटाची प्रवक्तेगीरी बंद करून वेब सीरीजचे लेखन सुरू करावे, त्यांचा तो धंदा चांगला चालेल असा टोमणा बन यांनी लगावला.अजितदादांच्या अपघातग्रस्त विमानातील ब्लॅक बॉक्स सुरक्षित असून त्याच्या माध्यमातून सत्य बाहेर येण्यासाठी थोडा वेळ द्यायला हवा. रोहित पवारांच्या पुढाकाराने आता संजय राऊत राज्यसभेमध्ये हा मुद्दा उचलून तो मार्गी लावणार आहेत. शरद पवार राष्ट्रवादीचे लोकसभा आणि राज्यसभेमध्ये खासदार असताना त्यांच्याऐवजी रोहित यांना राऊतांची गरज का भासली असा सवाल करीत बन म्हणाले की, शरद पवार गटाच्या खासदारांना हा मुद्दा लोकसभा आणि राज्यसभेत उचलायला सांगण्याऐवजी प्रसिद्धीच्या हव्यासापायी रोहित हे रोज उठून पत्रकार परिषदांमधून बेफाम आरोप करत आहेत. स्टंटबाजीपेक्षा व्हीएसआर कंपनी संदर्भात असतील तर ते पुरावे तपास यंत्रणांना द्यावे असेही ते म्हणाले.अपघात झाल्यानंतर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला जात नाही तर अपघाती मृत्यू अहवाल दाखल केला जातो. असा अहवाल यापूर्वीच दाखल झालेला आहे अशी माहिती देत बन यांनी रोहित यांना लक्ष्य केले. अपघाताची चौकशी संबंधित यंत्रणा करत आहेत हे ही अनेकदा सरकारने सांगूनही रोहित पवार प्रसिद्धीसाठी उतावीळ झाले आहेत. त्यासाठीच मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्याचा बालहट्ट रोहित पवारांनी धरला, या शब्दांत बन यांनी त्यांची खिल्ली उडवली.
मुंबई पोलिसांच्या १२९० वाहनांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण
मुंबई : मुंबईत आणि महानगर परिसरात घडलेल्या गुन्ह्याच्या ठिकाणी जलद गतीने पोहोचणे, १०० आणि ११२ या हेल्पलाइन क्रमांकावर आलेल्या तक्रारीच्या कॉलवर विनाविलंब पोहोचणे यासाठी मुंबई पोलीस दलात १२९० नवीन वाहनांचा समावेश करण्यात आला आहे.नरिमन पॉईंट येथील मुरली देवरा चौकात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून आज या वाहनांचे लोकार्पण करण्यात आले.कार्यक्रमाला गृह (शहरे) राज्यमंत्री योगेश कदम, मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सह आयुक्त (प्रशासन) एस. जयकुमार यांच्यासह पोलीस दलातील अधिकारी उपस्थित होते.या वाहनांमध्ये ६५७ दुचाकी ६३३ चार चाकी वाहनांचा समावेश आहे. चार चाकी वाहनांमध्ये स्कॉर्पिओ आणि मोठी अर्मेनिया वाहने आहेत. सध्या मुंबई पोलिसांचा हेल्पलाइनवर आलेल्या तक्रारीचा प्रतिसाद वेळ ५.३० मिनिटे आहे. हा प्रतिसाद वेळ या वाहनांच्या समावेशामुळे निश्चितच आणखी कमी होणार आहे. गुन्ह्याची जलद गतीने उकल करून पीडितांना तातडीने न्याय देणे या वाहनांमुळे शक्य होणार आहे.मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत एकूण ९० पोलीस स्टेशन कार्यरत आहेत. या प्रत्येक पोलीस स्टेशनला पाच दुचाकी, चार स्कॉर्पिओ आणि मोठी अर्मेनिया वाहने एक अशाप्रकारे एकूण दहा वाहने देण्यात येणार आहेत. ही चार चाकी वाहने मोबाईल डाटा टर्मिनल, जीपीएस यंत्रणा, व्हेईकल ट्रेकिंग यंत्रणा आधी आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त आहेत.
Amit Shah on Demography: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कालपासून बिहारच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान ते राज्य अधिकारी, सशस्त्र सीमा दल (एसएसबी) आणि इतर सुरक्षा एजन्सींसोबत बैठका घेणार आहेत.
Rohit Pawar : “कबुतरांच्या चोरीचा FIR होतो, मग दादांच्या मृत्यूचा का नाही?”; रोहित पवार आक्रमक
Rohit Pawar : 'आम्ही सर्व कायदे आणि सर्वोच्च न्यायालयाचे नियम सांगितले, तरीही पोलीस एफआयआर घेण्यास तयार नाहीत'
HIV India: ‘या’राज्यात एचआयव्हीचा वाढता धोका; उपचारात दोन मोठी आशादायी पावले
HIV India जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार २०२३ मध्ये जगभरात सुमारे ३९.९ दशलक्ष लोक एचआयव्हीसह जीवन जगत होते. यामध्ये महिलांची संख्या मोठी आहे. एचआयव्ही हा विषाणू शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमी करतो.
कॅनडातील हिंसक घटनांशी भारताचा संबंध नाही, कार्नी सरकारची अधिकृत भूमिका
ओटावा : कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या भारत दौऱ्याचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. कार्नी भारत दौऱ्यात मोदींना भेटणार आहेत. ही भेट होण्याच्या काही तास आधीच कॅनडा सरकारने एक महत्त्वाची माहिती दिली आहे. मागील काही महिन्यांमध्ये कॅनडात खलिस्तान समर्थक असलेल्यांचा मृत्यू झाला. अज्ञातांच्या हल्ल्यांमध्ये खलिस्तान समर्थक असलेल्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणांमध्ये तपास सुरू आहे. आतापर्यंच्या तपासातून भारताचा या कारवायांमध्ये हात असल्याचा एकही ठोस पुरावा मिळालेला नाही. यामुळे कॅनडातील हिंसक घटनांशी भारताचा संबंध नाही असे कार्नी सरकारच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.कॅनडातील हिंसक घटनांमध्ये भारताचा हात असता तर कार्नी सरकारने भारत दौऱ्याचे नियोजनच केले नसते. आता पंतप्रधान कार्नी भारत दौरा करत आहेत याचाच दुसरा अर्थ कॅनडातील हिंसक घटनांमध्ये भारताचा हात नाही, असे कार्नी सरकारच्या उच्चाधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले. कॅनडा सरकार भारतासोबत मैत्री दृढ करण्यास इच्छुक आहे. भारत - कॅनडा यांच्यातील व्यापार वाढावा आणि दोन्ही देशांना आर्थिक लाभ व्हावा यासाठी चर्चा होणार असल्याचे संकेत कार्नी सरकारच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या भारत दौऱ्याआधी राजधानी ओटावात सरकारच्यावतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. यात पत्रकार परिषदेत कॅनडा सरकारने पंतप्रधान कार्नी यांच्या भारत दौऱ्याचा कार्यक्रम जाहीर केला. भारतासोबत व्यापार आणि संरक्षणाच्या क्षेत्रातले सहकार्य वाढवण्यासाठी चर्चा करत असल्याची माहिती कार्नी सरकारने पत्रकार परिषदेत दिली.
'फुला'तून उलगडणार मुरळीची संघर्षमय कथा
मुंबई : अस्सल मराठी मातीतल्या वाघ्या-मुरळीची संघर्षमय कथा आगामी 'फुला' चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे. नुकतेच या चित्रपटाचं पोस्टर खंडेरायाच्या साक्षीने जेजुरी येथे वाघ्या-मुरळी परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मार्तंड साठे यांच्या हस्ते लाँच करण्यात आले याप्रसंगी चित्रपटाचे निर्माते , दिग्दर्शक, कलाकार आणि तंत्रज्ञ मंडळी उपस्थितीत होती. हा चित्रपट येत्या १७ एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहेपै. अजित शिवाजी जाधव यांनी फुला या चित्रपटाची निर्मिती केली असून शिवशर्विल मूव्ही आणि बोधी सिनेमा यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे.अभिषेक जावीर दिग्दर्शित या चित्रपटाची पटकथा रवीकिरण जावीर यांनी लिहिली आहे. सांगली जिल्ह्यातील आटपाडी गावात जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक असलेल्या समाधान ऐवळे यांनी या चित्रपटासाठी संगीत दिग्दर्शन केले आहे. अमर देवकर यांनी सर्जनशीर दिग्दर्शन, रवीकिरण जावीर, समाधान ऐवळे यांनी गीतलेखन, प्रताप जोशी यांनी छायांकन, अतुल लोखंडे यांनी कला दिग्दर्शन, राहुल प्रजापती यांनी संकलनाची जबाबदारी निभावली आहे. वेशभूषा कोमल जावीर, अक्षता पाटील तर रंगभूषा समाधान भोरे यांची आहे. गायिका वैशाली सामंत, वैशाली माडे, गायक रोहित राऊत, रवींद्र खोमणे, वैशाली इंगवले, वैष्णवी अदोडे, आकाश नवगिरे यांनी चित्रपटातील गाण्यांना आवाज दिला आहे. प्रियांतिका, आरोही गडदे, मंजुषा खेत्री, संतोष शिंदे, देवा गाडेकर, रविकिरण जावीर, सनी कदम, छाया आदट, शरद लांडगे या नव्या दमाच्या कलाकारांचा उत्तम अभिनय आपल्याला या चित्रपटात पहायला मिळणार आहे. चित्रपटाचे चित्रीकरण आणि टीम ही आटपाडी गावातील असून त्यांचा हा पहिलाच चित्रपट आहे.फुला ही एका मुरळीच्या पोटी जन्मलेल्या निरागस मुलीची संघर्षमय कथा आहे. तमाशा फड, जागरण गोंधळ या पारंपरिक सांस्कृतिक पटावर आधारित ही गोष्ट महाराष्ट्राच्या लोकपरंपरेतून आकार घेते. चित्रपटाविषयी दिग्दर्शक अभिषेक जावीर म्हणाले, फुला हा चित्रपट म्हणजे केवळ एका मुलीची शोकांतिका नाही, तर तो महाराष्ट्राच्या पारंपरिक लोककलांमध्ये अ़डकलेल्या स्त्री कलाकारांच्या अस्तित्त्वाचा जीवंत दस्तावेज आहे. मुरळी परंपरेत अनेक स्त्रियांना कधीही त्यांची स्वप्नं, हक्क, प्रेम, सन्मानाने जगण्याची संधी मिळत नाही. समाज त्यांची कला घेतो, पण त्यांना माणूस म्हणून जगू देत नाही. वास्तवाचं प्रामाणिकपणे चित्रण करण्याचा प्रयत्न या चित्रपटाद्वारे केला आहे.
Pune ZP News : पुणे : राजकीय हालचालींना वेग; अध्यक्षपदाची खुर्ची कोणाची? निवडीची तारीख ठरली
पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या अर्थाने सत्तेच्या समीकरणांना सुरुवात झाली आहे. पुणे जिल्ह्यामध्ये नवनिर्वाचित सदस्यांमधून जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच विविध पंचायत समित्यांचे सभापती आणि उपसभापती निवडण्याची प्रक्रिया आता प्रशासकीय स्तरावर वेग धरत आहे. ग्रामविकास विभागाने यासंदर्भात महत्त्वपूर्ण आदेश निर्गमित केले असून, यामुळे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. २० मार्च २०२६ पूर्वी पुणे जिल्हा परिषद आणि त्यांतर्गत येणाऱ्या सर्व पंचायत समित्यांची पहिली अधिकृत बैठक आयोजित करणे अनिवार्य आहे. ‘महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या अधिनियम, १९६१’ मधील कायदेशीर तरतुदींचा हवाला देत प्रशासनाने हे स्पष्ट केले आहे की, नवीन सदस्यांचा अधिकृत कार्यकाळ हा या पहिल्या बैठकीच्या दिनांकापासूनच मोजला जातो. त्यामुळे ही बैठक वेळेत होणे केवळ प्रशासकीय गरज नसून ती एक वैधानिक अट आहे. निवडणूक निकालानंतर आता जिल्ह्याच्या ग्रामीण राजकारणावर वर्चस्व गाजवण्यासाठी विविध राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या खुर्चीवर कोणाची वर्णी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. २० मार्चची मुदत जवळ येत असल्याने पुढील काही दिवसांत फोडाफोडीचे राजकारण किंवा युतीचे नवे समीकरण पाहायला मिळू शकते.निवड प्रक्रियेचे प्रशासकीय नियोजन आणि अधिकारपुणे जिल्ह्याच्या ग्रामीण राजकारणाची दिशा ठरवणारी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीची प्रक्रिया आता निर्णायक टप्प्यावर आली आहे. या निवडीसाठी विशेष बैठक बोलावण्याचे सर्व कायदेशीर अधिकार पुणे जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ही महत्त्वाची सभा पार पडणार असून, याच धर्तीवर जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांमध्ये सभापती व उपसभापती पदांसाठीची निवडणूक प्रक्रिया राबवली जाईल. या प्रक्रियेमुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या रिक्त असलेल्या सत्तास्थानी आता नवनिर्वाचित प्रतिनिधींची वर्णी लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.ग्रामविकास विभागाचे अवर सचिव बा. म. आसोले यांनी यासंदर्भातील अधिकृत आदेश जारी केले आहेत. या आदेशाची प्रत राज्य निवडणूक आयोग, विभागीय आयुक्त आणि पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) यांना पुढील तातडीच्या कार्यवाहीसाठी पाठवण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर आपल्याच पक्षाचा झेंडा फडकावण्यासाठी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. कोणाचे पारडे जड ठरणार आणि सत्तेसाठी कोणती नवीन समीकरणे उदयाला येणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी रस्सीखेचजिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. या पदासाठी इच्छुकांची संख्या मोठी असल्याने राजकीय हालचालींना वेग आला असून, पक्षीय स्तरावर बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. प्रत्येक गट आपली रणनीती आखण्यात व्यस्त असून, सत्तेची समीकरणे जुळवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत. प्रशासनाकडून अधिकृत घोषणा कधी होणार, याकडे नवनिर्वाचित सदस्यांसह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. सध्याची स्थिती पाहता, येत्या सोमवारपर्यंत अध्यक्षपदाचे चित्र पूर्णपणे स्पष्ट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात 'वेट अँड वॉच'ची भूमिका पाहायला मिळत आहे.राष्ट्रवादीत अध्यक्षपदासाठी ‘सव्वा वर्षाचा’ प्लॅन?अध्यक्षपदाची पहिली अडीच वर्षे सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुली असल्याने या पदासाठी इच्छुकांची मोठी फळी तयार झाली आहे. सर्वांना संधी मिळावी आणि पक्षात नाराजी नाट्य घडू नये, यासाठी राष्ट्रवादी आता 'सव्वा-सव्वा वर्षांचा' विशेष फॉर्म्युला अमलात आणण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. अध्यक्षपदाचा एकूण कार्यकाळ मोठा असला तरी, अंतर्गत तडजोडीनुसार अडीच वर्षांच्या कालावधीचे दोन भाग करून दोन वेगवेगळ्या नेत्यांना संधी देण्याबाबत पक्षीय पातळीवर खलबते सुरू आहेत. या नव्या सूत्रामुळे जास्तीत जास्त चेहऱ्यांना संधी मिळण्याचा मार्ग मोकळा होणार असला तरी, पक्षश्रेष्ठी अखेर कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करतात, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
Taliban on Pakistan: “‘लज्जास्पद कृत्याला’योग्य उत्तर देणार” ; तालिबानचा पाकिस्तानला थेट इशारा
Taliban on Pakistan: अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील तणाव धोकादायक पातळीवर पोहोचला आहे. पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या हद्दीत केलेल्या हवाई हल्ल्यानंतर, तालिबानने जोरदार लष्करी प्रत्युत्तराचे संकेत दिले आहेत.
Anupama Singh: संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेच्या ५५ व्या अधिवेशनात, पाकिस्तान आणि इस्लामिक सहकार्य संघटनेने (आयओसी) जम्मू आणि काश्मीरबाबत उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर भारताने जोरदार प्रत्युत्तर दिले.
Walmik Karad : न्यायमूर्ती एम एम सुंदरेश यांच्यासमोर आज वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली.
Panvel Karjat Local Train: पनवेल-कर्जत लोकल ट्रेन सुरु होणार; प्रवाशांचा वेळ वाचणार
मुंबई: पनवेल आणि कर्जत या दोन्ही स्थानकांना जोडणारा प्रकल्प लवकरच पूर्ण होणार आहे. तसे पाहिले तर पनवेल आणि कर्जत रेल्वे स्थानके ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावरून दोन दिशेला असलेली शेवटची रेल्वे स्थानके आहेत. पनवेल हे मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील शेवटचे रेल्वे स्थानक आहे. तर, कर्जत हे मध्य रेल्वे मार्गावरील उपनगरीय रेल्वेचे शेवटचे स्थानक आहे. त्यामुळे एका स्थानकातून दुसऱ्या स्थानकात जायचे असेल तर आधी ठाणे स्थानकात येऊन ट्रान्स हार्बर मार्गाने पुढे जावे लागते. परंतु आता नवीन कॉरिडोरमुळे पनवेल आणि कर्जतच्या मध्ये थेट लोकल रेल्वे केनक्टिव्हिटी मिळणार आहे. मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रकल्पा अंतर्गत मुंबई रेल विकास महामंडळ हे पनवेल कर्जत उपनगरीय रेल्वे कॉरिडोरची निर्मिती करत आहे.या कॉरिडोरवर एकूण पाच स्थानके असणार आहेत. पनवेल, चिखले, पोयंजे, चौक आणि पनवेल अशी स्थानके असतील. पनवेल कर्जत रेल्वे मार्गाचे खास वैशिष्ट्य म्हणजे मुंबई महानगरातील सर्वाधिक लांबीचा बोगदा या प्रकल्पाअंतर्गत तयार केला जात आहे. या नव्या रेल्वे मार्गावर तीन बोगदे तयार करणार असून, तिन्ही बोगद्यांचे काम पूर्ण झाले आहे. मध्य रेल्वेच्या ठाणे-दिवा स्थानका दरम्यान सध्या १.६ किमी पारसिक बोगदा हा सर्वात मोठा बोगदा आहे. मात्र पनवेल - कर्जतदरम्यानच्या वावर्ले येथील २.६ किमी लांबीचा बोगदा उभारला आहे. वावर्ले येथील बोगदा सर्वाधिक लांबीचा आहे. या बोगद्यात अनेक नवीन तंत्रज्ञानाचा आणि खडी नसलेला क्राँक्रिटचा ट्रॅक बनवण्यात येत आहे. आधुनिक स्काडा सिस्टीम यात लावली आहे.प्रवाशांसाठी मोठा फायदा, प्रवासात ३० मिनिटांची बचत
Orange Benefits: रोज एक संत्रे खाल तर शरीर म्हणेल धन्यवाद! जाणून घ्या ‘५’जबरदस्त फायदे
Orange Benefits दररोज एक संत्रे खाल्ल्याने इम्युनिटी वाढते. संत्र्यातील व्हिटॅमिन सी पांढऱ्या रक्तपेशींचे उत्पादन वाढवते. या पेशी शरीराला व्हायरस आणि बॅक्टेरियांपासून संरक्षण देतात. बदलत्या हवामानात सर्दी, खोकला आणि ताप यांसारख्या आजारांपासून बचाव करण्यासाठी संत्रे उपयुक्त ठरते.
उंदीर फळे खातात म्हणून फळविक्रेत्याने फळांना चक्क 'रॅट किलर'औषध लावलं; दोघांना अटक
मुंबई: मुंबई शहरात जर तुम्ही रस्त्यावर फळ घेत असाल तर सावधान! कारण मालाड परिसरात फळ विक्रेताचा एक अतिशय धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. यात मालाडमध्ये एका परप्रांतीय फळ विक्रेताचा बेजबाबदारपणा लोकांच्या जीवावर बेतू शकतो अशीच एक घटना समोर आली आहे. यात फळ विक्रेत्याकडून फळांवर चक्क उंदीर मारण्याचं औषध (Ratol) सारखी क्रीम लावून थेट मुंबईकरांच्या जीवाशी खेळ केला जात आहे. या संदर्भातील एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आता कारवाई करत फळांना 'रॅट किलर' औषध लावणाऱ्या दोघांना अटक केली आहे.मुंबईकरांच्या जीवाशी खेळदरम्यान, या व्हायरल व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे कि, फळ विक्रेता कच्च्या फळांना पिकवण्यासाठी थेट विषारी क्रीम लावून पकवत आहे. फळविक्रेताजे Ratol सारखे विषारी पदार्थ वापरात आहे ते वापरल्याने उलटी, पोटदुखी, विषबाधा, लिव्हर नुकसान आणि जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. मात्र, या फळविक्रेताकडून मुंबईकरांची आरोग्याची चिंता नसून तो सर्रासपणे मुंबईकरांच्या जीवाशी खेळ करत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नागरिकांकडून फळविक्रेत्यावर कारवाई करण्याची मागणी पालिका आणि पोलिसांकडे केली. त्यांनतर पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता तात्काळ कारवाई केली आहे. यात उंदीर मारण्याचे औषध फळांवर लावणाऱ्या दोघांना मालाड पोलिसांनी अटक केली असून मनोजकुमार केसरवाणी, बिपीन केसरवाणी अशी या आरोपींची नावे आहेत.खरंतर मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात रस्त्यावर अनधिकृत फळवाले स्टॉल लावून फळ विकतात. कच्चे फळ लवकर पिकण्यासाठी चक्क विषारी पदार्थ लावून फळ लवकर पिकवून मग विकतात. मात्र, अशामध्ये मुंबई महानगरपालिका आणि पोलिसांकडून याकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही घटना घडत असल्याचे देखील नागरिकांचा आरोप आहे. त्यामुळे मुंबईकरांचा जीवाशी खेळणारे असे फळविक्रेतांवर तात्काळ पोलिसांनी आणि मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी कारवाई करावी, अशी मागणी सुरू आहे.तर दुसरीकडे या प्रकरणात पोलिसांनी चौकशी केली असता उंदरांपासून बचावासाठी प्रयोग केल्याचा अजब दावा फळविक्रेत्याने केला आहे. 'उंदीर फळे खातात, म्हणून आम्ही त्यावर औषध लावत होतो' अशी कबुली फळविक्रेत्याने दिल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी भेट देऊन फळांचे नमुने घेत जप्त केले आहेत.
BMC Budget 2026 : मुंबईच्या शाश्वत विकासाची ग्वाही देणारा अर्थसंकल्प - महापौर रितू तावडे
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने वित्तीय वर्ष २०२६-२०२७ करिता सादर केलेले अर्थसंकल्पीय अंदाज हे मुंबईच्या रूपातील देशाच्या ग्रोथ इंजिनला गती देणारे आहे. रस्ते, पदपथ, पूल, पाणी, आरोग्य यासारख्या मूलभूत सुविधांपासून पायाभूत सुविधा प्रकल्पांपर्यंत, सामाजिक घटकांचे कल्याणापासून पर्यावरण संवर्धनापर्यंत आणि अद्ययावत तंत्रज्ञानासह कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा अवलंब करण्यापर्यंत सर्वसमावेशक बाबी यामध्ये आहेत. अधिकाधिक सूचनांचा समावेश करून महानगरपालिका प्रशासनाने मुंबईच्या शाश्वत विकासाची ग्वाही देणारा असा हा अर्थसंकल्प सादर केला आहे, याचा आनंद आहे, अशी प्रतिक्रिया मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी व्यक्त केली आहे.बृहन्मुंबई महानगरपालिकेचे वित्तीय वर्ष २०२६ - २०२७ चे 'अ', 'ब' आणि 'ग' हे अर्थसंकल्पीय अंदाज महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी स्थायी समिती सभेमध्ये, स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांना आज (दिनांक २५ फेब्रुवारी २०२६) सादर केले. तर, शिक्षण खात्याचे 'ई' अर्थसंकल्पीय अंदाज शिक्षण समिती सभेमध्ये, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे यांनी शिक्षण समिती अध्यक्ष राजेश्री शिरवडकर यांचेकडे सादर केले.काय म्हणाल्या रितू तावडे ?याअनुषंगाने अर्थसंकल्प अंदाजाविषयी प्रतिक्रिया देताना महापौर रितू तावडे म्हणाल्या की, मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. या पार्श्वभूमीवर, मुंबई महानगराच्या शाश्वत विकासासाठी तसेच या महानगरामध्ये जागतिक दर्जाचा विकास घडवण्यासाठी पर्यायाने आर्थिक राजधानीला बळकटी देण्यासाठी केंद्र शासन, महाराष्ट्र शासन यांच्याकडून सातत्याने प्रयत्न होत आहेत. त्याजोडीला आता बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुपाने तिसरे इंजिन जोडले गेले आहे. या ट्रिपल इंजिनाच्या गतीसमवेत धावता येईल, इतका बळ देणारा अर्थसंकल्प बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने सादर केला आहे. वित्तीय भान, पायाभूत सुविधांची आश्वासक पूर्तता, सार्वजनिक आरोग्य व शिक्षण यासारख्या थेट जनहिताशी जोडलेल्या घटकांमध्ये भरीव तरतूद, पर्यावरण संरक्षण व संवर्धनासाठी भविष्यवेधी प्रयत्न, प्रशासकीय कार्यक्षमता, आपत्कालिन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सुसज्जता तसेच व्यवसाय सुलभता व सामाजिक उपक्रम या सात वचनांच्या आधारे महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा मुंबईकरांप्रती वचनबद्धता अधोरेखित करणारा आहे, असे महापौर रितू तावडे यांनी नमूद केले आहे.पुढे त्या म्हणाल्या की, मुंबईतील अधिकृत फेरीवाल्यांना क्यूआर कोड आधारित प्रमाणपत्रं प्रदान करणे, किमान वर्षभर संपूर्ण मुंबई महानगरात सुरु राहील असा 'मुंबई स्वच्छता संकल्प ३६५’ अभियान हाती घेणे, मुंबई महानगराच्या वैभवाला व ओळखीला साजेसे असे मुंबईच्या चारही प्रमुख प्रवेश मार्गांवर भव्य प्रवेशद्वार व घड्याळ मनोरा (क्लॉक टॉवर) उभारणे यासह मी स्वतः सूचित केलेल्या विविध बाबींचा मुख्य अर्थसंकल्पात प्रशासनाने समावेश केला, याचेही समाधान आहे, असेही महापौरांनी नमूद केले आहे.त्याचप्रमाणे, शिक्षण खात्याच्या वतीने सादर करण्यात आलेला अर्थसंकल्प हा देखील विद्यार्थीभिमुख आहे. नवीन शैक्षणिक उपक्रमांसह हाती घेण्यात येणारे मिशन सफल, शालेय इमारतींची बांधणी व दुरुस्ती तसेच दर्जोन्नती, अत्याधुनिक बैठक व्यवस्था, ४० शाळांमध्ये खगोलशास्त्रीय प्रयोगशाळा स्थापन करणे, प्रायोगिक तत्त्वावर विज्ञान पार्कची उभारणी, डिजीटल क्लासरुम करणे, विज्ञान प्रयोगशाळांचे तसेच ग्रंथालयांचे अद्ययावतीकरण, जादुई पिटारा उपक्रम, शाळांमध्ये सीसीटीव्ही लावणे, आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांना सायबर साक्षरता प्रशिक्षण, विद्यार्थ्यांसाठी बेस्ट बसमध्ये विनामूल्य प्रवास अशा वैविध्यपूर्ण योजना / उपक्रम यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक तसेच सर्वांगीण व्यक्तिमत्त्व घडण्यास हातभार लागेल, असेही महापौर रितू तावडे यांनी म्हटले आहे.
CJI Surya Kant on NCERT: सर्वोच्च न्यायालयाने आज आठवीच्या एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकातील एका प्रकरणावरील वादावर सुनावणी केली.
Saiyami Kher Mumbai Air Pollution Post : 'मला तो जुना आनंद पुन्हा अनुभवायचा आहे, पण परिस्थिती बदलली आहे. आता धावण्यापूर्वी मला मास्क घालावा लागतो'
Boost Immunity इम्युनिटी एका दिवसात वाढत नाही. ती आपल्या रोजच्या आहार आणि जीवनशैलीवर अवलंबून असते. योग्य अन्नपदार्थांचा समावेश केल्यास शरीर संसर्गांपासून चांगल्या प्रकारे लढू शकते.
Benjamin Netanyahu: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या इस्राईल दौऱ्यावर आहेत. दरम्यान, त्यांच्या या दौऱ्यात दोन्ही देशांसाठी महत्वाचे करार होणारे आहेत.
Sanjay Raut : संजय राऊतांची निर्दोष मुक्तता, सत्र न्यायालयाचा निकाल; काय आहे नेमकं प्रकरण?
Sanjay Raut : माझगाव कोर्टाने २५ हजारांचा दंड आणि १५ दिवसांची कैद अशी ही शिक्षा होती. या शिक्षेला संजय राऊत यांनी सत्र न्यायालयात आव्हान दिले होते.
PM Modi Israel Visit : इस्रायलच्या संसदेकडून पंतप्रधान मोदींचा सर्वोच्च बहुमान
- हा बहुमान मिळणारे ठरले पहिले भारतीय पंतप्रधानतेल अवीव : पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवार २५ फेब्रुवारी रोजी सकाळी दोन दिवसांच्या इस्रायल दौऱ्यासाठी रवाना झाले. हा त्यांचा दुसरा इस्रायल दौरा आहे. पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, विशेषतः अमेरिका आणि इराणमधील बिघडत चाललेल्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर, भारत-इस्रायल धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी इस्रायली संसदेला संबोधित केले.‘स्पीकर ऑफ द नेसेट’ने सन्मानित :दौऱ्याच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान मोदींनी इस्रायली संसद नेसेटला संबोधित केले. यावेळी त्यांना इस्रायलच्या ‘स्पीकर ऑफ द नेसेट’ पदकाने सन्मानित करण्यात आले. हा मान मिळवणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान ठरले आहेत.बुधवारी (२५ फेब्रुवारी) इस्रायली संसद नेसेटमध्ये पंतप्रधान मोदींचे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर नेसेटचे सभापती अमीर ओहाना यांनी त्यांना इस्रायलचा सर्वोच्च बहुमान प्रदान केला. पंतप्रधानांना ओहाना यांनी स्पीकर ऑफ द नेसेट हा सर्वोच्च सन्मान प्रदान केला. हा सन्मान स्वीकारताना पंतप्रधान मोदींनी याला भारत आणि इस्रायली मैत्रीचे प्रतीक संबोधले. नेसेटमधील भाषणानंतर पंतप्रधान मोदींचे टाळ्यांच्या कडकडाटात इस्रायली खासदारांनी स्वागत केले. तसेच त्यांच्यासोबत अनेकांनी सेल्फी आणि फोटोही काढले.I am deeply honoured to receive the Medal of the Knesset.I accept it with humility and gratitude.This honour is not a tribute to an individual, but to the enduring friendship between India and Israel.It reflects the shared values that guide our two nations.@KnessetENG https://t.co/OGtBMTsLuC pic.twitter.com/6H6Dt9sP6v— Narendra Modi (@narendramodi) February 25, 2026पॅलेस्टाईनकडूनही मिळाला आहे सन्मान :यापूर्वी २०१८ मध्ये पंतप्रधान मोदींना पॅलेस्टाईनने ग्रॅंड कॉलर ऑफ द स्टेट ऑफ पॅलेस्टाईन या पुरस्काराने गौरवले होते. इस्रायल आणि पॅलेस्टाईन या दोन्ही शत्रू देशांकडून त्यांना सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाला आहे.इस्रायली पंतप्रधानांनी केले स्वागत :पंतप्रधान मोदी तेल अवीवमध्ये दाखल झाल्यानंतर स्वत: इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी प्रोटोकाल बाजूला ठेवून त्यांचे स्वागत केले. यावेळी एअरपोर्टवर दोन्ही देशांच्या राष्ट्रगीताची धुन वाजवण्यात आली. तसेच पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी हिंदीमध्ये ‘नमस्ते’ आणि हिब्रूमध्ये ‘शालोम’ लिहून एक ऐतिहासिक संदेश देण्यात आला. शालोमचा अर्थ शांतता असा होतो. जो आजच्या जागतिक परिस्थितीमध्ये भारताच्या भूमिकेचे वर्णन करतो.
DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ
मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे. वाढत्या महागाईमुळे जीवनावश्यक वस्तूंचे दर सातत्याने वाढत असताना कर्मचाऱ्यांवर आर्थिक ताण वाढत होता. त्यामुळे महागाई भत्त्यात वाढ करण्याची मागणी कर्मचारी संघटनांकडून वारंवार केली जात होती. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सकारात्मक निर्णय घेत कर्मचाऱ्यांना दिलासा दिला आहे. वित्त व नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी विधान परिषदेत अधिकृत निवेदन सादर करत महागाई भत्ता वाढीची घोषणा केली. राज्य सरकारने महागाई भत्त्यात तीन टक्क्यांची वाढ मंजूर केली आहे. यामुळे सध्या ५५ टक्के असलेला महागाई भत्ता थेट ५८ टक्क्यांवर गेला आहे. ही वाढ केवळ आकड्यांपुरती मर्यादित नसून कर्मचाऱ्यांच्या मासिक पगारात लक्षणीय फरक पडणार आहे.विशेषतः मध्यम व कनिष्ठ वेतन गटातील कर्मचाऱ्यांना याचा अधिक लाभ होणार आहे. सुमारे ५ लाख १६ हजार शासकीय कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा थेट फायदा होईल. धुळवडीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर मिळालेली ही भेट कर्मचाऱ्यांसाठी आर्थिक रंगांची उधळण करणारी ठरली आहे. महत्त्वाचे म्हणजे ही वाढ जुलै २०२५ पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात येणार आहे. म्हणजेच जुलै २०२५ पासून वाढीव दराने महागाई भत्ता ग्राह्य धरला जाईल. जुलै २०२५ ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीत जमा झालेली थकबाकीची रक्कम कर्मचाऱ्यांना अदा केली जाणार आहे. सरकारने स्पष्ट केले आहे की, ही थकबाकी मार्च २०२६ मध्ये गुढीपाडव्याच्या सुमारास देण्यात येईल. त्यामुळे नववर्षाच्या सुरुवातीलाच कर्मचाऱ्यांना अतिरिक्त आर्थिक दिलासा मिळणार आहे.वाढीव महागाई भत्ता फेब्रुवारी २०२६ पासून नियमितपणे रोखीने देण्यात येणार आहे. यासाठी स्वतंत्र शासकीय आदेश काढले जाणार असून, संबंधित विभागांना आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले जातील. या निर्णयामुळे केवळ कार्यरत कर्मचारीच नव्हे तर सुमारे ८ लाख ७२ हजार सेवानिवृत्त कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांनाही फायदा होणार आहे. त्यांच्या निवृत्तीवेतनातही वाढ होणार असल्याने हा निर्णय व्यापक स्वरूपाचा ठरतो. दरम्यान, केंद्र सरकार आठव्या वेतन आयोगाच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. पुढील दोन वर्षांत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनरचनेत मोठे बदल अपेक्षित आहेत. त्यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांकडूनही भविष्यात वेतनवाढीची मागणी होण्याची शक्यता आहे. सध्या मात्र महागाई भत्ता वाढीचा निर्णय हा राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा आणि आर्थिक स्थैर्य देणारा टप्पा मानला जात आहे.
Kidney Trafficking : किडनी विक्री रॅकेटमध्ये गुंतलेल्यांना मोक्का लावण्यासाठी कायद्यातील तरतुदी तपासून घेण्यात येतील, अशी माहिती पंकज भोयर यांनी दिली.
Chabahar Port: भारताच्या नवीन अर्थसंकल्पात चाबहार बंदरासाठी निधी उपलब्ध नसल्याबद्दल इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी निराशा व्यक्त केली. त्यांनी म्हटले की हा निर्णय भारत आणि इराण दोघांसाठीही निराशाजनक आहे.
Iftar Meal Plan: रोजा सोडताना काय खावं? जाणून घ्या इफ्तारसाठी योग्य आहारक्रम!
Iftar Meal Plan तज्ज्ञांच्या मते, इफ्तारचा उद्देश फक्त पोट भरून समाधान मिळवणे नसून शरीरातील पाणी, मीठ आणि प्रोटीनची कमतरता भरून काढणे हा असावा. चुकीच्या पद्धतीने इफ्तार केल्यास अॅसिडिटी, डोकेदुखी, बेचैनी आणि दुसऱ्या दिवशी आळस जाणवू शकतो.
Odisha News : भ्रष्टाचाराविरोधी मोठी कारवाई! खाण अधिकाऱ्याच्या घरातून तब्बल ४ कोटींची रोकड जप्त
ओडिशा : भ्रष्टाचाराविरोधातील कारवायांमध्ये ओडिशा राज्यात मोठी धडक कारवाई समोर आली आहे. ओडिशा दक्षता विभागाने कटक सर्कलमधील खाणींचे उपसंचालक देवव्रत मोहंती यांना लाच स्वीकारताना रंगेहात पकडले असून त्यांच्या ताब्यातून तब्बल चार कोटी रुपयांहून अधिक रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. राज्याच्या इतिहासातील दक्षता विभागाने केलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी रोख जप्ती असल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, कटक सर्कलमध्ये कार्यरत असलेले खाणींचे उपसंचालक देवव्रत मोहंती यांनी एका परवानाधारक कोळसा व्यापाऱ्याकडून त्याचा कोळसा डेपो सुरळीत चालवण्यासाठी आणि कोळशाच्या वाहतुकीला परवानगी देण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. या तक्रारीनंतर ओडिशा दक्षता विभागाने सापळा रचत मंगळवारी (२४ फेब्रुवारी) कारवाई केली आणि मोहंती यांना ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. त्यांच्या ताब्यातून लाचेची संपूर्ण रक्कम जप्त करण्यात आली असून तत्काळ त्यांना अटक करण्यात आली.अटकेनंतर दक्षता विभागाने एकाच वेळी तीन ठिकाणी धाडी टाकल्या. भुवनेश्वर येथील त्यांच्या निवासस्थानी, भद्रक जिल्ह्यातील मथासाही येथील वडिलोपार्जित घरी तसेच कटक येथील कार्यालयातील दालनात झडती घेण्यात आली. भुवनेश्वरमधील पाटिया परिसरातील श्रीविहार नेचर क्रेस्ट अपार्टमेंटमधील त्यांच्या फ्लॅटमध्ये मोठ्या प्रमाणात रोख रक्कम सापडली. ही रक्कम ट्रॉली बॅग आणि कपाटांमध्ये लपवून ठेवण्यात आली होती. प्राथमिक माहितीनुसार, जप्त केलेली रक्कम चार कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे.सध्या जप्त केलेल्या रोकड रकमेची मोजणी सुरू असून अंतिम आकडा मोजणी पूर्ण झाल्यानंतर जाहीर केला जाणार आहे. अधिकाऱ्यांच्या मते, राज्यातील सतर्कता विभागाच्या कारवाईत इतक्या मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम जप्त होण्याची ही पहिलीच वेळ आहे.या धाडीतून मोहंती यांच्या इतर संपत्तीबाबतही माहिती समोर आली आहे. भुवनेश्वरमधील पहाला परिसरात त्यांचे दुमजली घर असल्याचे उघड झाले आहे. याशिवाय सुमारे १३० ग्रॅम सोन्याचे दागिनेही जप्त करण्यात आले आहेत. अधिकाऱ्यांकडून इतर मालमत्ता आणि आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू असून बेहिशोबी संपत्तीबाबत अधिक तपास केला जात आहे.या कारवाईमुळे राज्यातील प्रशासकीय यंत्रणेत खळबळ उडाली असून भ्रष्टाचाराविरोधातील मोहिमेला अधिक वेग मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दक्षता विभागाच्या या मोठ्या कारवाईकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर
- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्टमुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन विभागाने राबविलेल्या सातत्यपूर्ण उपाययोजनांचा सकारात्मक परिणाम दिसून येत असून जानेवारी २०२६ मध्ये अपघाती मृत्यूंमध्ये ८.०५ टक्क्यांची घट नोंदविण्यात आली आहे. जानेवारी २०२५ मध्ये १,४२७ अपघाती मृत्यू झाले होते, तर जानेवारी २०२६ मध्ये ही संख्या १,३१२ वर आली आहे. म्हणजेच ११५ मृत्यूंनी घट झाली आहे. त्याचप्रमाणे अपघातांची एकूण संख्या ३,१६४ वरून ३,१०० वर आली असून त्यात २ टक्क्यांची घट झाली आहे.रस्ता सुरक्षा उपायांमुळे अनेक जिल्ह्यांत मृत्यूदरात लक्षणीय घट झाली आहे. नंदूरबार येथे ५० टक्के, सोलापूर शहर व वाशिम येथे प्रत्येकी ३६ टक्के, सिंधुदुर्ग येथे २९ टक्के, वर्धा येथे २८ टक्के, धाराशिव येथे २४ टक्के, गोंदिया व अमरावती ग्रामीण येथे प्रत्येकी २२ टक्के, तर नांदेड व नागपूर शहर येथे प्रत्येकी २१ टक्क्यांची घट नोंदविण्यात आली आहे.राज्यातील अपघातांची संख्या सन २०३० पर्यंत ५० टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवून परिवहन विभागाने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. राज्य व जिल्हास्तरावर रस्ता सुरक्षा कक्ष स्थापन करण्यात आले असून प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्र रस्ता सुरक्षा आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी सुरू आहे. अपघातप्रवण ‘ब्लॅक स्पॉट्स’वर सुधारणा करण्यात येत आहेत.नियमभंगाविरोधात कारवाईसाठी राज्यात ३३२ पथके कार्यरत असून रडार व इंटरसेप्टर वाहनांच्या मदतीने मोठ्या प्रमाणावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. हेल्मेट नसलेल्या ८९,६५१ चालकांवर , मागे बसलेल्या व हेल्मेट न घातलेल्या १३,३४८ प्रवाशांवर, वेगमर्यादा उल्लंघनाच्या ८,५२० तसेच सीटबेल्ट न वापरणाऱ्या चालकांवर ८,०२४ प्रकरणे नोंदविण्यात आली आहेत. तसेच अवैध पीयूसी, अवैध विमा व ट्रिपल रायडिंगविरोधातही कारवाई करण्यात आली आहे. हेल्मेट व सीटबेल्ट सक्तीकरिता एआय आणि रडार तंत्रज्ञानाचा वापर सुरू करण्यात आला आहे.वाहनांची तांत्रिक स्थिती योग्य राहावी यासाठी ५३ शासकीय व १३ खाजगी स्वयंचलित वाहन तपासणी केंद्रे (एटीएस) सुरू करण्यात येत आहेत. कुशल वाहनचालकांनाच परवाना देण्यासाठी ३८ स्वयंचलित वाहन चाचणी पथ (एडीटीटी) सुरू होणार आहेत. राज्यातील सुमारे २५ हजार किलोमीटर रस्त्यावर आधुनिक वाहतूक व्यवस्थापन प्रणाली (आयटीएमएस) बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ही प्रणाली कार्यान्वित झाल्यानंतर अपघातांत १९ टक्क्यांची घट झाल्याचा दावा विभागाने केला आहे.अपघातग्रस्तांना ‘गोल्डन अवर’मध्ये तात्काळ उपचार मिळावेत यासाठी केंद्र सरकारची ‘पीएम राहत’ योजना राज्यात लागू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र अपघातग्रस्तांना सात दिवसांपर्यंत व दीड लाख रुपयांपर्यंत कॅशलेस उपचार मिळणार आहेत. अपघाताच्या वेळी ११२ या क्रमांकावर संपर्क साधून रुग्णवाहिका व जवळच्या रुग्णालयाची माहिती मिळू शकते. अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या ‘जीवनदूत’ व्यक्तींना २५ हजार रुपयांचे बक्षीस देण्याची तरतूदही करण्यात आली आहे.परिवहन विभागाच्या मते, तंत्रज्ञानाधिष्ठित अंमलबजावणी, कडक कारवाई आणि जनजागृती मोहिमांमुळे राज्यात अपघाती मृत्यू कमी करण्यास यश मिळत असून २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याच्या उद्दिष्टाकडे राज्याची वाटचाल सुरू आहे, असे परिवहन विभागाचे अपर परिवहन आयुक्त भरत कळसकर यांनी कळविले आहे.
Rohit Pawar At Baramati Police Station: पोलिस स्टेशनबाहेर बारामतीकरांनी मोठी गर्दी केली असून एफआयआर दाखल करून घेण्यासाठी बारामतीकर आक्रमक झाले आहेत.
Devdas Movie: ‘मार डाला’च्या शूटिंगवेळी माधुरी-शाहरुख जखमी! भव्य गाण्यामागचं लपलेलं दुःख उघड
Devdas Movie ‘देवदास’मध्ये चंद्रमुखीची भूमिका साकारणाऱ्या माधुरी दीक्षित यांनी अलीकडेच या गाण्याच्या शूटिंगबद्दल एक खुलासा केला. त्यांनी सांगितलं की, ‘मार डाला’चं चित्रीकरण त्यांच्या करिअरमधील सर्वात कठीण अनुभवांपैकी एक होतं.
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; घरमालक-भाडेकरूंसाठी 'हे'नवे नियम लागू
नवी दिल्ली : कर वजावटीत पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि बनावट दावे रोखण्यासाठी केंद्र सरकारने प्राप्तिकर नियमांमध्ये मोठे बदल सुचवले आहेत. सहा दशकांहून अधिक काळ लागू असलेल्या जुन्या कायद्याची जागा घेणारा नवा ‘आयकर कायदा, २०२५’ येत्या १ एप्रिलपासून अंमलात येणार असून, त्यासोबतच कर विवरणपत्रे, लेखा परीक्षण आणि विविध कर दाव्यांसाठी नवे मसुदा अर्ज (फॉर्म्स) प्रसिद्ध करण्यात आले आहेत. या मसुद्यांवर हितधारकांकडून मते मागवण्यात आली असून, पुढील महिन्यात अंतिम नियम अधिसूचित होण्याची शक्यता आहे.नव्या कायद्याअंतर्गत कर वजावटीवर अधिक काटेकोर लक्षनव्या तरतुदीनुसार, कर वजावटीचा दावा करताना भाडेकरू आणि घरमालक यांच्यातील संबंधांची सविस्तर माहिती आता प्राप्तिकर विवरणपत्रात उघड करावी लागणार आहे. आतापर्यंत केवळ भाड्याची रक्कम आणि घरमालकाचा पॅन देणे पुरेसे होते. मात्र नव्या प्रणालीत नातेवाईकांमधील व्यवहारांवर विशेष लक्ष दिले जाणार आहे. यामुळे खोटे किंवा फुगवून सांगितलेले घरभाडे भत्ता (HRA) दावे प्राथमिक टप्प्यातच हेरले जातील, असा कर प्रशासनाचा उद्देश आहे.लेखा परीक्षकांची जबाबदारी वाढणारया नव्या मसुद्यांमुळे सनदी लेखापाल (CA) आणि लेखा परीक्षकांवर अधिक जबाबदारी येणार आहे. विशेषतः परदेशी उत्पन्नावर घेतल्या जाणाऱ्या फॉरेन टॅक्स क्रेडिट (FTC) दाव्यांसाठी स्वतंत्र आणि सखोल पडताळणी बंधनकारक केली जाणार आहे. ‘फॉर्म ४४’ अंतर्गत लेखा परीक्षकांना परदेशी कर कपात प्रमाणपत्रे, प्रत्यक्ष पेमेंटचे पुरावे, चलन विनिमय दराचे अचूक रूपांतर आणि दुहेरी कर टाळण्यासाठी लागू असलेल्या कर करारांच्या अटी तपासाव्या लागणार आहेत.बनावट दावे ओळखण्यासाठी नवे निकषप्रशासकीय दृष्टीने पाहता, या बदलांचा खऱ्या करदात्यांना त्रास होणार नाही, असा दावा तज्ज्ञ करतात. ‘Nangia Global Advisors’चे भागीदार संदीप झुनझुनवाला यांच्या मते, मालकी हक्क किंवा प्रत्यक्ष पेमेंटचा ठोस पुरावा नसलेल्या बनावट दाव्यांची अचूक ओळख पटवणे आता सोपे होईल. आवश्यक असल्यास असे दावे थेट फेटाळले जाऊ शकतील.पॅन कार्ड आणि कर लेखा परीक्षणात कडक नियमनव्या नियमांनुसार, कंपन्यांना पॅन कार्डसाठी अर्ज करताना प्रतिज्ञापत्र द्यावे लागेल की, त्यांच्याकडे आधीपासून कोणताही पॅन अस्तित्वात नाही. एकापेक्षा अधिक पॅन वापरून होणारी फसवणूक रोखणे आणि डेटाबेसची विश्वासार्हता वाढवणे, हा यामागचा उद्देश आहे.तसेच ‘फॉर्म २६’ अंतर्गत कर लेखा परीक्षणात वैधानिक लेखा अहवालातील कोणत्याही प्रतिकूल निरीक्षणांचा कंपनीच्या नफा-तोट्यावर नेमका काय परिणाम झाला आहे, हे स्पष्ट करणे बंधनकारक असेल.डिजिटल माहितीवरही सरकारची नजरकंपन्यांना आता त्यांच्या अकाउंटिंग सॉफ्टवेअरची माहिती, डेटा ज्या क्लाउड सर्व्हरवर साठवला आहे त्याचा आयपी पत्ता, डेटा कोणत्या देशात संग्रहित आहे आणि भारतातील बॅकअप सर्व्हरचा पत्ता देणेही अनिवार्य केले जाणार आहे.एकूणच, नव्या आयकर कायद्याअंतर्गत पारदर्शकता, जबाबदारी आणि डिजिटल नियंत्रण वाढवण्यावर सरकारचा भर असून, कर वजावटीतील त्रुटींना आळा घालण्याचा हा मोठा प्रयत्न मानला जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिरपेचात आणखी एक मनाचा तुरा रोवला गेला आहे. पंतप्रधान मोदींनी इंस्टाग्रामवर १०० दशलक्ष फॉलोअर्सचा टप्पा ओलांडला आहे. १०० दशलक्ष फॉलोअर्सचा टप्पा ओलांडणारे नरेंद्र मोदी हे जगातले पहिले राजकारणी ठरले आहेत.मोदी यांनी २०१४ मध्ये इंस्टाग्रामवर आपलं अकाउंट उघडलं होतं. मोदींच्या फॉलोअर्सची संख्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा दुप्पट आहे. ट्रम्प ४३.२ दशलक्ष फॉलोअर्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
PM Modi New Record: पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रसिद्धी ही जगात पसरली आहे. आता त्यांच्या नावावर आणखी एक विक्रम झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर इतिहास रचला आहे.
Ajit Pawar: “आम्हीही दुःखी आहोत, पण सुनेत्रा पवार यांचं दुःख डोंगराएवढं”…नाना पाटेकर भावूक
Ajit Pawar अभिनेते नाना पाटेकर हे नुकतेच सुनेत्रा पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांना भेटायला गेले होते. अजित पवार आणि नाना पाटेकर यांच्यात अनेक वर्षांची घट्ट मैत्री होती. त्यामुळे या घटनेने नाना पाटेकर यांनाही मोठा धक्का बसला.
Ajit Pawar : आमदार रोहित पवार आणि आमदार अमोल मिटकरी यांनी मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात आक्रमक पवित्रा घेतला.
Inspirational Story: दोन भावांची सोशल मीडियावर तुफान चर्चा, कमी वयात...
मुंबई: किशोर मंडल आणि त्याचा लहान भाऊ कृष मंडलची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे. अतिशय कमी वयात या दोन्ही भावांनी त्यांच्या गायकीने लाखो लोकांची मने जिंकली आहेत. कृष फक्त ७ वर्षांचा आहे. पण त्याच्या आवाजातील पकड आणि गोडवा पाहून लाखो लोक आश्चर्यचकित झालं आहेत. नावलौकीक मिळवण्यासाठी वर्षानुवर्षे मेहनत करावी लागते, असं म्हटलं जातं.पण मंडल ब्रदर्स याला अपवाद आहेत.प्रचंड मेहनतीच्या जोरावर तुम्ही तुमचं कलाकौशल्य सिद्ध केलं,तर वयाचा कोणीही विचार करत नाही. तुमच्या यशाच्या शिखरावर वय कधीच अडथळा ठरत नाही.कृष त्याच्या मोठा भाऊ किशोरसोबत गाणी गातो.दोघेही एकत्र बसून सिंगिंग व्हिडिओ रेकॉर्ड करतात आणि ते सोशल मीडियावर शेअर करतात.त्यांच्या व्हिडीओंना लाखोंच्या संख्येत व्ह्यूज मिळतात. लोक त्यांच्या आवाजावरच नाही,तर त्यांच्या साधेपणावरही फिदा झाले आहेत. कोणताही दिखाऊपणा नाही.साध्या-सरळ पद्धतीने गायलेले त्यांचे गाणे लोकांच्या मनाला भिडतात.मंडल ब्रदर्सची फॅन फॉलोईंग झपाट्याने वाढलीयाच कारणामुळे इंस्टाग्राम,यूट्यूब आणि फेसबुकसारख्या प्लॅटफॉर्मवर त्यांची फॅन-फॉलोइंग झपाट्याने वाढत आहे. अनेक लोक त्यांची गाणी री-शेअर करतात आणि कमेंटमध्ये त्यांचं कौतुक करतात. मंडल ब्रदर्स यांनी अलीकडेच जवळपास ७० लाख रुपयांची लक्झरी SUV Mercedes-Benz GLE खरेदी केली आहे. इतक्या कमी वयात अशी उपलब्धी मिळवणे ही मोठी गोष्ट आहे. सोशल मीडियावर त्यांचे नवीन कारसोबतचे फोटो आणि व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहेत.काही दिवसांपूर्वी मंडल ब्रदर्स यांनी ‘दिल लगाना मना था'हे गाणे आपल्या आवाजात सादर केले होते. हे गाणे सोशल मीडियावर काहीच मिनिटांत व्हायरल झाले. लोकांनी या गाण्यावर प्रचंड रील्स बनवल्या आणि हे गाणे यूट्यूबसोबतच इंस्टाग्रामवरही ट्रेंड होऊ लागले.म्युझिक व्हिडिओमध्ये टीव्ही कलाकार सनम जौहर आणि आशी सिंग दिसले. गाण्यात अधुरी प्रेमकहाणी आणि ब्रेकअपनंतरच्या भावना सुंदररीत्या दाखवण्यात आल्या होत्या. या गाण्याला प्रेक्षकांनी खूप पसंती दर्शवली. ३५ मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळालेल्या या गाण्याच्या यशानंतरच मंडल ब्रदर्स यांनी एक लक्झरी कार खरेदी केली आहे.
Top 10 news: राज्यसभेच्या ३७ जागा रिक्त होत होणार असून यातील ७ जागा महाराष्ट्रातील आहेत. राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सात जागांच्या अनुषंगाने आता घडामोडींना वेग आलाय.
Alpha Movie: २१५ कोटींची ऑफर नाकारून ‘अल्फा’ थेट थिएटरमध्येच! यशराज फिल्म्सचा मोठा निर्णय
Alpha Movie ‘अल्फा’मध्ये आलिया भट्ट, शरवरी वाघ आणि बॉबी देओल मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये आधीपासूनच मोठी उत्सुकता आहे. दरम्यान, नेटफ्लिक्स इंडियाकडून या चित्रपटासाठी थेट डिजिटल रिलीजसाठी तब्बल २१५ कोटी रुपयांची ऑफर देण्यात आल्याची चर्चा होती.
State Government Dearness Allowance: सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; महागाई भत्त्यात वाढ
State Government Dearness Allowance:
मुंबई: मुंबईमधील दादर पश्चिमेकडील बालमोह शाळेशेजारील सावरकर सदन हे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या वास्तव्याशी निगडित ऐतिहासिक स्थळ असून भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात त्यास विशेष राष्ट्रीय, सांस्कृतिक व ऐतिहासिक महत्त्व प्राप्त आहे.भारताच्या संविधानातील कलम १४ (समानता), कलम ४९ (राष्ट्रीय महत्त्वाच्या स्मारकांचे संरक्षण) व कलम ५१अ(फ) (सांस्कृतिक वारसा जपणे हे नागरिकांचे कर्तव्य) या तरतुदींनुसार अशा स्थळांचे संरक्षण करणे ही घटनात्मक जबाबदारी आहे.Ancient Monuments and Archaeological Sites and Remains Act, 1958 अंतर्गत केंद्र सरकारला एखाद्या स्थळास “राष्ट्रीय महत्त्वाचे स्मारक” घोषित करण्याचा वैधानिक अधिकार आहे.भारतीय पुरातत्व सर्वेक्षण नी सावरकर सदन ला राष्ट्रीय स्मारकचा मान देण्याचे नाकारले आहे. फक्त सावरकर सदन १०० वर्ष जुने नाही म्हणून १०० वर्षाची अट का?काही स्थळ एखादी गोष्ट झाल्या वर लगेच राष्ट्रीय स्मारक होते
तब्बल २ लाख ४४ हजार कोटींचे पायाभूत सुविधा प्रकल्प, राखीव निधी केवळ ३६ हजार कोटी
मुंबई: मुंबई महापालिच्यावतीने पायाभूत सुविधा प्रकल्प हाती घेण्यात आले असून आता या प्रकल्पांचा खर्च २ लाख ४४ हजार ५५२ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. यंदा सर्व प्रकल्प कामांसाठी ४१ हजार ३९० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, या पायाभूत सुविधा प्रकल्प कामांसाठी राखीव निधी हा केवळ ३६ हजार ६२३ कोटी रुपये एवढाच आहे. त्यामुळे तरतूद केलेल्या निधीपेक्षा राखीव निधीतील तरतुदीची रक्कमेतही पाच हजार कोटी रुपयांची कमतरता दिसून येत आहे.मुंबई महापालिकेच्यावतीने मलनि:सारण प्रकल्प अंतर्गत सात सांडपाणी प्रकल्प,कोस्टल रोड, रस्ते विकास, पुलांचा विकास, रुग्णांचा पुनर्विकास, पाणी पुरवठा प्रकल्प, महापालिका इमारतींचा पुनर्विकास, आश्रय योजना, घनकचरा प्रकल्प, राणी बागेचा विकास, पक्षी उद्यान अशाप्रकारे एकूण २ लाख ४४हजार ५५२ कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. मागील वर्षी या सर्व पायाभूत सुविधा प्रकल्पांचा खर्च २ लाख ३३ हजार कोटी रुपये एवढा होता. त्यामुळे एका वर्षांत ११ हजार कोटी रुपयांच्या विकासकामांना मंजुरी देण्यात आली आहे.या पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी आगामी सन २०२६-२७ या वर्षांत ४१ हजार ३९० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर या प्रकल्प कामांसाठी सध्या उपलब्ध असलेला राखीव निधी हा केवळ ३६ हजार ६२३ कोटी रुपये एवढा आहे. मुंबई महापालिकेकडे पायाभूत सुविधांकरता उपलब्ध राखीव निधी व बांधिल दायित्वापोटी राखीव निधी अशाप्रकारे एकूण ८१ हजार ४४९ कोटी रुपयांचा निधी मुदतठेवीत उपलब्ध आहे. परंतु त्यातील ४४ हजार८२६ कोटी रुपयांचा निधी हा बांधिल दायित्वापोटी अर्थात भविष्य निर्वाहनिधी, निवृत्ती वेतन निधी, उपदान, कंत्राटदारांच्या अनामत रक्कम, निवृत्त वेतन अंतर्गत मुदत ठेवी, चर खणण्याचे पैसे अशाप्रकारे निधी आहे. ज्याला महापालिका हात लावू शकत नाही. त्यामुळे या ८१ हजार ४४९ कोटी रुपयांच्या मुदतठेवींपैंकी केवळ ३६ कोटी ६२६ कोटी रुपयेच खर्च करू शकतो.महापालिका अर्थसंकल्प बनवताना तात्पुरते अंतर्गत हस्तांतरण अंतर्गत १३,७६५ कोटी रुपये आणि विशेष निधी तथा राखीव निधीतून १४,२९५कोटी रुपयांचा निधी अशाप्रकारचा अंतर्गत कर्जाची रक्कम दर्शवली आहे. त्यामुळे हे कर्ज दाखवून अर्थसंकल्पात निधीची तरतूद करत आकडा वाढवला गेला तरी प्रत्येक वेळी अंतर्गत कर्जांची रक्कम वापरलीच जाते असे नाही.मात्र, यासंदर्भात बोलतांना महापालिका आयुक्त डॉ भूषण गगराणी यांनी प्राप्त महसूल आणि तरतूद केलेला निधी यांची सांगड घालण्याचा प्रयत्न केला जातो. जर महसूल अधिक प्राप्त झाला तर मुदत ठेवीतील पैसे किंवा राखीव निधीतील पैसे खर्च करण्याची आवश्यकता नसते. परंतु महसूल वसूलीचे प्रमाण कमी असेल आणि जास्त खर्च असेल तर काही प्रमाणात राखीव निधी किंवा मुदत ठेवींना हात घालावा लागेल. परंतु प्रत्यक्षात स्थिती आर्थििक स्थितीवर अवलंबून आहे.
Satara: कराडमधील यशवंत को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्यात ५० जणांविरुद्ध गुन्हे दाखल
सातारा: कराडमधील गाजलेल्या यशवंत को-ऑपरेटिव्ह बँकेतील ११२ कोटी १० लाख रुपयांच्या अपहार प्रकरणात मुख्य आरोपी आणि सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर याला आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने मध्यरात्री विंग गावातून अटक केली आहे. दीर्घकाळ फरार असलेल्या चरेगावकरचा थांगपत्ता लागत नसल्याने पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं. अखेर गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे.या प्रकरणात यापूर्वीच त्याचा दत्तक भाऊ विठ्ठल कुलकर्णी याला अटक करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण संचालक मंडळ, पाच वरिष्ठ अधिकारी आणि चरेगावकर यांच्या नातेवाईकांसह एकूण सुमारे ५० जणांविरोधात १२ ऑक्टोबर २०२५ रोजी कराड शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.बँकेच्या लेखापरीक्षणात बोगस कर्जप्रकरणाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची अफरातफर झाल्याचे उघड झाले. सनदी लेखापाल मंदार शशिकांत देशपांडे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, तत्कालीन अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ, पाच अधिकारी आणि संबंधित नातेवाईक यांनी संगनमताने बनावट कागदपत्रांच्या आधारे तारण न घेता कर्जवाटप केले. जुनी थकबाकी खाती बंद दाखवून नव्याने कर्जखाती उघडणे, निधीचा उद्देशबाह्य वापर करणे, दस्तऐवजांमध्ये फेरफार करणे आणि खोट्या नोंदी करून ठेवीदार व सभासदांच्या हिताला बाधा पोहोचवणे, असे गंभीर आरोप फिर्यादीत नमूद आहेत.९ ऑगस्ट २०१४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत हा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. भारतीय न्याय संहितेतील कलम ६१, ३१६ (२), ३१६(४), ३१८ (४), ३३६ (३), ३३८, ३३९, ३४० (२) आणि ३ (५) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. संबंधित कलमे अजामीनपात्र असल्याने आरोपींवर अटकेची कारवाई सुरू आहे.दरम्यान, या प्रकरणात प्रवर्तन संचालनालय (ईडी) कडूनही कारवाई करण्यात आली असून, चरेगावकर यांच्या बंगल्यावर तसेच यशवंत बँकेच्या फलटण शाखेवर धाड टाकून कागदपत्रांची तपासणी करण्यात आली आहे. मुख्य आरोपीच्या अटकेनंतर तपासाला वेग आला असून, या घोटाळ्यात आणखी कोणती नावे समोर येणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. सहकार क्षेत्रातील या प्रचंड आर्थिक गैरव्यवहारामुळे ठेवीदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
‘वडिलांनी माझ्या लग्नासाठी दोन एकर जमीन विकली होती. त्यावेळी मी 20 वर्षांची होते. जून महिना होता जेव्हा माझे लग्न झाले आणि मी सासरी आले. मधुचंद्राच्या दुसऱ्या दिवशी सकाळी-सकाळी माझे जेठ आणि नणंदेचे पती (ननदोई) माझ्या खोलीत आले. त्यांनी विचारले- तुझी पहिली रात्र कशी होती? काही अडचण तर नाही आली? ऐकताच माझी नजर लाजेने खाली झुकली. मनातल्या मनात विचार करू लागले की कोणी अशा प्रकारच्या खासगी गोष्टी कशा विचारू शकते! नंतर मला कळले की माझ्या पतीला शारीरिक संबंधांशी संबंधित काही समस्या होत्या. मला दोन मुले आहेत. माझ्या मुलाचे वय 16 वर्षे आहे आणि मुलीचे 10 वर्षे. दोन्ही मुले दोन वेगवेगळ्या पुरुषांपासून आहेत आणि आता वडिलांशिवाय मोठी होत आहेत. त्यांच्यासाठी आता मीच आई-वडील आहे.’, सुनीता आर्या 'ब्लॅकबोर्ड' या 'काळोख्या कथा' मालिकेतील सुनीता आर्याची कहाणी, जिने घुंघट न घेतल्यामुळे मोठ्या दिराने तिला निर्वस्त्र करून मारहाण केली. गर्भवती झाल्यानंतर 3 महिन्यांनी पतीने तिला सोडून दिले. त्यानंतर प्रियकराने तिला गर्भवती केले आणि मुलाला स्वीकारले नाही. सुनीता आर्या सध्या मध्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्यातील गैरतगंज येथे राहतात. सरकारी जमिनीवर बांधलेल्या एका छोट्या घरात त्यांची गुजराण होत आहे. आई आणि दोन्ही मुलेही सोबत राहतात. जेव्हा मी त्यांच्याशी बोलण्यासाठी पोहोचलो, तेव्हा त्यांनी आजूबाजूला नजर फिरवली आणि हळूच म्हणाल्या, ‘मी मुलांना खोलीत पाठवते. आपण शेजारच्या नवीन घराच्या व्हरंड्यात बसून बोलूया. त्यांच्यासमोर या सगळ्या गोष्टी बोलणे योग्य होणार नाही.’ त्यांनी हलकेच इशारा केला, तेव्हा मुले गूपचूप खोलीत निघून गेली. मी त्या व्हरंड्यात त्यांच्यासोबत येऊन बसलो. सुनीताने दीर्घ श्वास घेतला, जणू काही ती गत वर्षांचे थर पुन्हा उलगडण्याची तयारी करत होत्या. त्या सांगतात, ‘2007 सालची गोष्ट आहे. मी माझ्या वडिलांसोबत मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये राहत होते. आई-वडिलांची एकुलती एक मुलगी. एक नातेवाईक घरी आले, तेव्हा ते नेहमी म्हणायचे- मुलगी मोठी झाली आहे. आता लग्न करून टाका. नंतर चांगला मुलगा मिळणार नाही. आपल्या समाजात तर 13-14 वर्षांच्या वयातच लग्न होते.’ उत्तरादाखल वडिलांनी म्हटले, ‘जर एखादा चांगला मुलगा मिळाला तर सांगा.’ त्यांनी माझ्या मामांशीही याबद्दल बोलले. काही दिवसांनी मामा रायसेनहून एक स्थळ घेऊन आले. त्यांनी मुलाबद्दल आणि त्याच्या कुटुंबाबद्दल खूप कौतुक केले - म्हणाले की लोक चांगले आहेत, खानदान चांगले आहे. मग आमच्या कुटुंबाचे एकमेकांना भेटणे-जुळणे सुरू झाले. बघता बघता गोष्ट पुढे सरकली आणि लग्न ठरले. लग्न झाले आणि मी सासरी आले. सुरुवातीला सर्व सामान्य वाटत होते. नवीन वातावरण समजून घेण्याचा आणि त्यात स्वतःला जुळवून घेण्याचा प्रयत्न करत होते. याच दरम्यान जेव्हा पहिल्यांदा गर्भवती झाले, तेव्हा मनात एक वेगळाच आनंद होता. वाटले की कदाचित आता आयुष्यात काही स्थिरता येईल. पण जेव्हा मी ही गोष्ट माझ्या पतीला सांगितली, तेव्हा त्यांचा चेहरा उतरला. त्यांनी मला समजावायला सुरुवात केली- आता मी बाळ जन्माला घालण्यासाठी तयार नाही, आमची परिस्थितीही ठीक नाही. पुढच्या वेळी करू. यावेळी बाळ पाडून टाकूया. ते वारंवार हेच म्हणत राहिले. मी द्विधा मन:स्थितीत होते. एकीकडे माझ्या मनात आई होण्याची इच्छा होती, दुसरीकडे पतीचे बोलणे आणि त्यांचा दबाव. शेवटी, त्यांनी आग्रह केल्यावर मी गर्भपात करून घेतला. याच दरम्यान घरात आणखी एक विचित्र परिस्थिती निर्माण होत होती. जे जेठ मला नेहमी घरात पदर घेण्याचा सल्ला देत होते, त्यांचीच नजर माझ्यावर ठीक नव्हती. ते अनेकदा कागदपत्रे बनवण्याच्या बहाण्याने मला शहरात घेऊन जात. गावातील बसच्या पायऱ्या उंच असत, तेव्हा ते माझ्या कमरेत हात घालून चढवण्याचे निमित्त करत आणि मग सीटवर चिकटून बसत. सुरुवातीला मला वाटले की ते माझी काळजी घेत आहेत, पण हळूहळू त्यांच्या हालचाली स्पष्ट होऊ लागल्या. एक-दोनदा त्यांनी मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न केला, इतकेच काय, माझ्या छातीवरही हात लावला. या घटनांमुळे मी आतून खूप अस्वस्थ होऊ लागले होते, पण पुढे जे घडले, त्याने मला पूर्णपणे हादरवून टाकले. आमचे शहरातही एक घर होते. एक दिवस मी तिथे आराम करत होते. दरवाजा आतून बंद केलेला होता. उन्हाळ्याचे दिवस होते, म्हणून मी हलक्या कपड्यांमध्ये झोपले होते. माझे जेठ शिक्षक होते. त्या दिवशी ते घरी आले. मी झोपले आहे असे समजून दरवाजाच्या वर असलेल्या खिडकीतून डोकावू लागले. अचानक माझी झोप उघडली, तेव्हा पाहिले तर ते दरवाजावर चढलेले होते. त्यांची नजर माझ्यावर पडताच ते लगेच खाली उतरले, जणू काही घडलेच नाही. त्या दिवशी मी खूप घाबरले होते, पण विचार करत राहिले की कदाचित ही एकदाच घडलेली गोष्ट असेल. पण तसे नव्हते. असेच एकदा मी वॉशरूममध्ये अंघोळीला गेले होते. माझे कपडे खोलीत बेडवर ठेवले होते. जेव्हा मी टॉवेल गुंडाळून वॉशरूममधून बाहेर आले, तेव्हा पाहिले तर जेठ समोरच्या खोलीत बसले होते. मी घाबरले. ओरडून म्हणाले- तुम्ही माझ्या खोलीत अचानक कसे आलात? ते इकडे-तिकडे पाहू लागले आणि काहीतरी कामासाठी आलो होतो असे बहाणे करू लागले. त्यावेळी मी कसेबसे स्वतःला सावरले, पण आतून मात्र पूर्णपणे खचून गेले होते. नंतर धीर करून मी ही गोष्ट माझ्या सासूबाईंना आणि पतीला सांगितली. मला आशा होती की ते मला साथ देतील, पण उलट तेच मला समजावू लागले. ते म्हणाले - ते असे करू शकत नाहीत, तू चुकीचे समजत आहेस. घरात थोडेफार चढ-उतार झाले तर बाईने सहन करायला पाहिजे. हे ऐकून मला पहिल्यांदाच जाणवले की या घरात माझे ऐकणारे कोणी नाही. मी त्यांच्या अशा वागण्यामुळे सतत त्रस्त होते. दररोज मला हीच चिंता सतावत असे की, माहीत नाही कधी, कोणत्या बहाण्याने ते पुन्हा माझ्यासमोर येऊन उभे राहतील. शेवटी मी धीर गोळा केला आणि माझ्या जाऊबाईंना सर्व गोष्टी सांगितल्या. त्यांना सांगितले की, ते मला शहरात घेऊन जाण्याच्या बहाण्याने कसे स्पर्श करण्याचा प्रयत्न करतात आणि खोलीत न सांगता येतात. जाऊबाईंनी ही गोष्ट हलक्यात घेतली नाही. त्यांनी दिरांना स्पष्टपणे विचारले - तुम्ही वहिनीला वारंवार शहरात का घेऊन जाता? तिचा नवरा का जात नाही? तुम्ही तिच्यापासून थोडे अंतर ठेवून राहायला पाहिजे. त्यावेळी मला वाटले की कदाचित आता काहीतरी बदलेल. पण तसं झालं नाही. मोठ्या दिराने आपल्या सवयी बदलल्या नाहीत. वरवर ते सामान्यपणे वागत होते, पण त्यांच्या नजरा अजूनही तशाच होत्या- टक लावून, संधी शोधणाऱ्या. एक दिवस मी स्वयंपाकघरात जेवण बनवत होते. काम करता करता नकळत डोक्यावरचा पदर थोडा खाली सरकला. माझ्या लक्षातही आलं नाही. तेव्हा अचानक मोठ्या दिराचा मोठा आवाज ऐकू आला. माझं उघडं डोकं पाहताच ते ओरडू लागले. शिवीगाळ करत म्हणाले- अशीच बाई कुटुंबाची इज्जत मातीत मिळवते. निर्लज्जपणे उघडं डोकं घेऊन पूर्ण अंगणात फिरत राहते. त्यांचा आवाज इतका मोठा होता की घरातील इतर लोकही तिथे पोहोचले. मी घाबरून लगेच पदर नीट करू लागले, पण तोपर्यंत त्यांनी विषय वाढवला होता. त्यांचा आवाज इतका मोठा होता की वातावरण तणावपूर्ण झाले. इतक्या लहान गोष्टीवर ते इतके का रागावत आहेत, हे मला समजत नव्हते. मी वारंवार पदर नीट करत होते आणि म्हणत होते की तो चुकून सरकला, माझा कोणताही चुकीचा हेतू नव्हता. पण जणू काही ते ऐकण्याच्या मन:स्थितीतच नव्हते. असे म्हणत ते रागाने माझ्या दिशेने आले आणि अचानक माझे केस पकडून जोराने ओढू लागले. मी वेदनेने किंचाळले. किंचाळण्याचा आवाज ऐकून माझे पतीही आले. त्यांनी मला वाचवण्याऐवजी आपल्या भावालाच साथ दिली. त्यांनीही माझा हात घट्ट पकडला. दोघे मिळून मला फरपटत खोलीतून अंगणाकडे घेऊन जाऊ लागले. या ओढाताणीत माझी साडी सैल होऊन सुटू लागली. मी स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत राहिले, पण त्यावेळी माझे ऐकणारे कोणीच नव्हते. त्यावेळी असं वाटलं की दुर्योधन द्रौपदीचं वस्त्रहरण करत आहे. आवाज ऐकून आजूबाजूच्या घरातील लोक अंगणात जमा झाले. पण कुणीही एक शब्द बोलणं गरजेचं समजलं नाही. साडी काढल्यामुळे मी फक्त ब्लाउज आणि पेटीकोटमध्ये राहिले होते. दीर आणि माझ्या पतीने माझे केस पकडले आणि बेल्ट व काठीने मारायला सुरुवात केली. अंगणात एक मोठा दगड ठेवला होता. त्यावरच आपटलं. जोराची दुखापत झाली आणि मी वेदनेने विव्हळले. त्यावेळी मी 3 महिन्यांची गर्भवती होते. हात-पाय आपटत दयेची भीक मागत होते, पण दोघांचंही काळीज पाझरलं नाही. त्यावेळी वाटलं की, काश! अशाप्रकारे गर्दीसमोर विवस्त्र होऊन अपमानित होण्यापेक्षा मला मारून टाकलं असतं तर बरं झालं असतं. माझा गळा दाबून टाकला असता. हळूहळू ही गोष्ट नातेवाइकांमध्येही पसरली. कदाचित एखाद्या शेजाऱ्याने माझ्या मामाच्या मुलाला सर्व काही सांगितलं. जेव्हा त्याला सत्य कळलं, तेव्हा तो वेळ न घालवता आला. त्याने माझी अवस्था पाहिली आणि त्याचवेळी निर्णय घेतला की आता तो मला तिथे सोडू शकत नाही. तो मला आपल्यासोबत माहेरी घेऊन आला. त्यावेळी मी गर्भवती होते आणि खूप अशक्तही होते. माहेरी पोहोचल्यावर थोडा दिलासा मिळाला. तिथे 6 महिन्यांनंतर मी एका मुलाला जन्म दिला. रुग्णालयाचा संपूर्ण खर्च माझ्या आई-वडिलांनी उचलला. माझे नातेवाईक वगैरे बघायला आले, पण माझा नवरा ना रुग्णालयात आला, ना कधी मुलाला बघायला. कोणताही खर्चही पाठवला नाही. त्या दिवशी मला स्पष्ट समजले की आता ही जबाबदारी फक्त माझी आहे. त्यानंतर मी मुलाला एकटीने वाढवले. मग ही मुलगी कशी झाली? ‘हो, पुढे तेच सांगणार आहे. 2011 सालची गोष्ट आहे. तोपर्यंत मी माझ्या मुलासोबत माहेरीच राहत होते. वडिलांना एक जमीन विकायची होती. गैरतगंजमध्ये मनीष जैन नावाचा एक व्यक्ती होता, जो जमिनीची खरेदी-विक्री करत असे. जेव्हा त्याला कळले की वडील जमीन विकू इच्छितात, तेव्हा तो माझ्या घरी आला. याच दरम्यान माझी त्याच्याशी पहिली भेट झाली. जमिनीच्या संदर्भात त्याचे घरी येणे-जाणे वाढू लागले. हळूहळू त्याच्याशी बोलणे सुरू झाले आणि तो मला आवडू लागला. माझा मुलगाही त्याला आपलेपणा देऊ लागला. त्याला ‘बाबा’ म्हणून हाक मारत असे. ‘बाबा’ हा शब्द ऐकून त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसायचा. तो विवाहित असूनही, त्याचे आमच्या घरी येणे-जाणे सतत चालू राहिले.’ तो अशा प्रकारे माझ्या माहेरी येऊ लागला. अनेकदा रात्रभर थांबायचा. हळूहळू तो माझ्यासोबत झोपू लागला. एक दिवस मी त्याला स्पष्ट विचारले - तू तुझ्या पत्नीला खोटे बोलून माझ्याकडे येतोस का? त्याने सांगितले - नाही, पत्नीला तुझ्याबद्दल सर्व काही माहीत आहे. तिला कोणतीही अडचण नाही. त्याच्या बोलण्यावर माझा विश्वास बसला नाही. मी त्याच्या पत्नीला फोन केला आणि विचारले - तुमचे पती माझ्यासोबत राहतात, तुम्हाला काही हरकत नाही का? तिने उत्तर दिले - मला माहीत आहे की ते तुमच्याकडे जातात. तुम्ही त्यांची मैत्रीण आहात. हे सर्व ऐकल्यानंतर माझ्या मनातील संकोच काहीसा कमी झाला. हळूहळू तोही मला आवडू लागला. इतक्या संघर्षानंतर मला एका आधाराची गरज भासत होती. जेव्हा तो मला भेटायला यायचा, तेव्हा आम्ही एकमेकांच्या जवळ यायचो आणि आमच्यात शारीरिक संबंध निर्माण होऊ लागले. आमच्यातील जवळीक वाढत गेली आणि भेटीगाठींचा सिलसिला सुरूच राहिला. याच दरम्यान, 2013 मध्ये, मी त्याच्यापासून गर्भवती झाले. जेव्हा त्याला ही गोष्ट कळली, तेव्हा तो घाबरलेला माझ्याकडे आला. त्याच्या चेहऱ्यावर अस्वस्थता होती. तो म्हणाला- मी अजून यासाठी तयार नाही. तू या बाळाला पाडून टाक. नंतर बाळ करू. आता गर्भपात करून घे. त्याचे बोलणे ऐकून मी पुन्हा एकदा द्विधा मनःस्थितीत पडले. मला वाटले की खरोखरच कोणीतरी त्रासलेले असेल, पण त्याच्या शब्दांनी मला आतून हादरवून टाकले. तुम्ही त्या विवाहित पुरुषाशी लग्न करू इच्छित होतात का? ‘नाही, मला त्याच्याशी लग्न करायचे नव्हते. पण मला वाटत होते की त्याने या बाळाला जगात येऊ द्यावे. तरीही, त्याच्या बोलण्यात येऊन शेवटी गर्भपात करून घेतला. 2 वर्षांनी पुन्हा त्याच्यापासून गर्भवती झाले. यावेळी जेव्हा त्याला कळले, तेव्हा त्याचे वर्तन पूर्णपणे बदलले. तो म्हणाला- हे बाळ माझे नाही, ते दुसऱ्या कोणाचे तरी असेल. तू माझ्या पाठीमागे कोणाकोणाला भेटतेस, मला काय माहीत? मी तर महिन्यातून एक-दोनदाच तुला भेटायला येतो. तुझ्या पोटात वाढणारे बाळ माझे नाही. त्याचे हे बोल ऐकून मला खूप मोठा धक्का बसला. ज्या नात्याला मी विश्वासाने जपत होते, त्याच नात्यावर त्याने प्रश्नचिन्ह उभे केले. मी आश्चर्यचकित झाले होते आणि आतून खूप रागातही होते. त्याचे बोल ऐकताच मी खूप तणावात गेले. मी वारंवार हेच विचार करत होते की 4 वर्षांपासून तो माझ्यासोबत संबंध ठेवत होता. दोनदा त्याच्यापासून गर्भवती झाले. पहिल्यांदा त्याच्या सांगण्यावरून मी गर्भपात करून घेतला, आणि आता तो म्हणतोय की हे बाळ दुसऱ्या कोणाचे तरी आहे. त्या क्षणी मला वाटले की माझ्या विश्वासाला काही किंमतच नव्हती. मी विचार करत होते की त्याला फक्त माझ्या शरीराशी मतलब होता, माझ्या भावनांशी नाही. हे म्हणता म्हणता सुनीता आपल्या दोन्ही हातांनी चेहरा झाकून घेते. 15 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे, पण त्या दिवसांची आठवण काढताना आजही तिचा आवाज थरथरतो. ती म्हणते, ‘जेव्हा जेव्हा त्या गोष्टींची आठवण येते, तेव्हा आतून थरथरून जाते.’ ती पुढे सांगते की, त्याच्या आरोपांनंतर आणि नकारानंतर मी ठरवले की आता मागे हटणार नाही. माझ्या पोटात वाढणाऱ्या बाळाला जगात आणीन. त्याला मी स्पष्ट सांगितले - या बाळाला जन्म देईन आणि न्यायालयात सिद्ध करेन की हे तुझेच आहे. तोपर्यंत माझ्या पहिल्या पतीपासून माझा घटस्फोट झाला होता, त्यामुळे मला इतर कोणत्याही बंधनाची भीती नव्हती. शेवटी, मी एका मुलीला जन्म दिला. मुलीच्या जन्मानंतर तिची डीएनए चाचणी करून घेतली. अहवाल घेऊन न्यायालयात पोहोचले. चौकशी झाली आणि सिद्ध झाले की मुलगी त्याचीच आहे. 2015 मध्ये न्यायालयाचा निर्णय माझ्या बाजूने आला. सिद्ध झाले की मुलगी मनीष जैनची आहे. पण मनीषने न्यायालयाचा निर्णय मानण्यास नकार दिला. त्याने या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले. 2018 मध्ये पुन्हा न्यायालयाचा निर्णय माझ्या बाजूने आला. निकाल माझ्या बाजूने लागला. इतक्या कायदेशीर लढाया आणि संघर्षांनंतरही माझे आयुष्य सोपे झाले नाही. आजही दोन्ही मुलांसोबत एकटीच राहते. गप्पा मारताना माझे लक्ष वारंवार त्यांच्या लहान कापलेल्या केसांकडे जात होते. मी काही विचारण्यापूर्वीच त्या स्वतःच म्हणाल्या- ‘2023 मध्ये बाबांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मी त्यांची एकुलती एक मुलगी आहे. मीच त्यांना मुखाग्नी दिली. त्यानंतर मी मुंडण केले होते. गावकऱ्यांनी तर असेही म्हटले होते की मी वेडी झाले आहे, मुलीने मुंडण करू नये. पण मी ऐकले नाही.’ ही खरी कहाणी सुनीता आर्याच्या अंधाऱ्या आयुष्याची आहे, पण ही पराभवाची कहाणी नाही. ज्या परिस्थितीत बहुतेक लोक खचून जातात, त्या परिस्थितीत सुनीता आर्या एकट्या उभ्या राहिल्या.
EPFO 3.0: PF क्लेम आता 3 दिवसांत पूर्ण होणार, कसं ते जाणून घेऊया...
नवी दिल्ली: देशातील लाखो नोकरदारांसाठी श्रम मंत्रालयाने 'EPFO 3.0' ही अत्यंत महत्त्वाची आणि फायदेशीर योजना सुरू केली आहे. अनेकदा कर्मचारी जुनी नोकरी सोडल्यानंतर जुन्या पीएफ खात्यातील शिल्लक रक्कम काढण्यास विसरतात. अशा प्रलंबित रक्कमेसाठी आता सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला असून, ज्या खात्यांमध्ये एक हजार रुपये किंवा त्यापेक्षा कमी रक्कम आहे, ती रक्कम सरकार स्वतःहून कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा करणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.या नव्या सुविधेमुळे कर्मचाऱ्यांना कोणत्याही सरकारी कार्यालयात हेलपाटे मारण्याची किंवा अर्ज भरण्याची गरज भासणार नाही. तुमचे पीएफ पैसे थेट तुमच्या व्हेरिफाईड बँक खात्यात ट्रान्सफर केले जातील. तसेच, ईपीएफओच्या नव्या प्रणालीमुळे क्लेम सेटलमेंटचा कालावधी कमी होऊन तो आता केवळ ३ दिवसांवर आला आहे. ईपीएफओच्या नियमांनुसार, ज्या पीएफ खात्यात सलग ४६ महिने (३ वर्षे) कोणताही नवा हिस्सा जमा होत नाही, ते खाते 'इनऑपरेटिव्ह' मानले जाते.ईपीएफओकडे सध्या अशा ३१.८६ लाख खात्यांमध्ये एकूण १०,९०३ कोटी रुपये पडून आहेत. पहिल्या टप्प्यात १,००० रुपयांपेक्षा कमी शिल्लक असलेली ७.११ लाख खाती निवडण्यात आली असून, त्यातील ३०.५२ कोटी रुपये थेट कर्मचाऱ्यांना परत दिले जाणार आहेत. अनेकजण छोटी रक्कम असल्याने पीएफ काढण्याचा कंटाळा करतात, यामुळे हजारो कोटी रुपये ईपीएफओकडे पडून आहेत. आता सरकारने हे पैसे थेट खातेदारांना देण्याचे अभियान हाती घेतले आहे.इतकेच नाही, तर आता पीएफ क्लेम अवघ्या ७२ तासांत (३ दिवसांत) सेटल होणार आहे. यामुळे तातडीच्या वेळी पैशांची गरज असणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात सरकारने अशा ७.११ लाख खात्यांची ओळख पटवली आहे. ज्यामध्ये १००० रुपयांपेक्षा कमी शिल्लक आहे. या मोहिमेमुळे लाखो कर्मचाऱ्यांच्या खिशात हक्काचे पैसे विनासायास परत येणार आहेत. जर तुमचे खाते ३ वर्षांपासून बंद असेल, तर आता तुमच्या मोबाईलवर लवकरच पैसे जमा झाल्याचा मेसेज येऊ शकतो.
22 फेब्रुवारी 2026‘रात्रीचे साधारण 8 वाजले असतील. मी ओरियन मॉलमध्ये काही कामं आटोपून मित्रासोबत कॅम्पसमध्ये परत येत होते. मी मॉलबाहेर पडताच, मला जाणवले की बाईकवरून 3 लोक माझा पाठलाग करत आहेत. सुरुवातीला मी दुर्लक्ष केले, पण अचानक बाईक माझ्या बाजूला आली. ते लोक फक्त माझा पाठलागच करत नव्हते, तर रस्त्यातभर वर्णद्वेषी आणि अश्लील कमेंट्स करत होते.’ 'त्या मुलांनी दीड किलोमीटरपर्यंत माझा पाठलाग केला. मी आर्मी कॅम्पजवळ कॉलेजच्या गेट नंबर 2 जवळ पोहोचले, तेव्हा त्यापैकी एक मुलगा माझ्या जवळ आला. त्याने मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला आणि स्वतःचे कपडे काढू लागला. मी खूप घाबरले होते, मी मदतीसाठी ओरडले. तेव्हा कॅम्पसमधील लोक तिथे पोहोचले. लोकांची गर्दी पाहून ते मुले तिथून पळून गेले.' ही गोरखपूरच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेतील (AIIMS) एका निवासी डॉक्टरची आपबीती आहे, ज्या नागालँडच्या रहिवासी आहेत. घटनेच्या दुसऱ्या दिवशी, 23 फेब्रुवारी रोजी, पीडितेने एम्स पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. या घटनेच्या 24 तासांच्या आत तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली. दिव्य मराठीच्या टीमने महिला डॉक्टरशी संपर्क साधला आणि गोरखपूर पोलिसांकडून संपूर्ण घटनाक्रम सविस्तरपणे जाणून घेतला. या घटनेव्यतिरिक्त, आम्ही ईशान्येकडील महिलांवर देशभरात झालेल्या वर्णद्वेषी टिप्पणीच्या प्रकरणांचीही यादी केली आहे. संपूर्ण अहवाल वाचा… पीडितेचे सहकारी डॉक्टर म्हणाले- मुले नीचपणाच्या थराला पोहोचलीया घटनेनंतर आम्ही पीडित डॉक्टरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. आम्हाला सांगण्यात आले की त्या घटनेनंतर खूप अस्वस्थ आहेत आणि कोणाशीही बोलू इच्छित नाहीत. पीडितेची सुरक्षा आणि काळजी घेण्यापासून ते तिची कायदेशीर लढाई सध्या नॅशनल फेडरेशन ऑफ ऑल इंडिया रेसिडेंट डॉक्टर्स (NAFORD) ही संघटना लढत आहे. आम्हाला पीडितेची बाजू जाणून घेण्यासाठी संघटनेचे अध्यक्ष डॉ. देवेश दुबे यांचा फोन नंबर देण्यात आला. डॉ. देवेश म्हणतात, ‘घटनेनंतर पीडितेने वसतिगृहात पोहोचून सर्वात आधी NAFORD च्या ग्रुपवर मेसेज केला. ती खूप घाबरली होती, तिने सांगितले की कसे 3 मुलांनी तिला रस्त्यात त्रास दिला.‘ ‘ती मुले नीचपणाच्या अशा थराला पोहोचली होती की त्यांनी डॉक्टरवर केवळ घाणेरड्या कमेंट्स केल्या नाहीत, तर तिच्या शरीराच्या मागील भागावर हात मारला. मग त्यापैकी एकाने पीडितेसमोर आपली टी-शर्ट काढली. त्या मुलांची ही कृती पाहून पीडिता घाबरली नाही, उलट तिने धैर्याने त्यांचा सामना केला.’ NAFORD नुसार, पीडितेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत सांगितले आहे की, त्या रात्री तिन्ही मुलांनी तिचा दीड किलोमीटरपर्यंत पाठलाग केला. यादरम्यान वर्णद्वेषी टिप्पणी करत तिच्याशी गैरवर्तन केले, तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. इतकेच नव्हे तर कपडे काढून तिला खाजगी अवयव दाखवण्याचा प्रयत्न केला. हे पाहून पीडितेने मदतीसाठी आवाज दिला, त्यानंतर मुले तिथून पळून गेली. पीडित डॉक्टर गोरखपूर एम्समध्ये प्रसूती आणि स्त्रीरोग विभागात तिसऱ्या वर्षाची निवासी डॉक्टर आहे. दिव्य मराठीला पीडित डॉक्टरचा तो मेसेज मिळाला आहे, जो तिने घटनेनंतर NAFORD च्या ग्रुपमध्ये शेअर केला होता. पाहूया, पीडितेने मेसेजमध्ये काय लिहिले आहे. ‘मी त्या तिन्ही मुलांना थप्पड मारू शकते का?’गोरखपूर एम्स रुग्णालयाचे डॉक्टर अमित राय NAFORD च्या सतत संपर्कात आहेत. त्यांनी आम्हाला पीडित डॉक्टरच्या स्थितीबद्दल सांगितले, जेव्हा त्या एम्स पोलीस स्टेशनमध्ये जबाब नोंदवण्यासाठी गेल्या होत्या. डॉ. अमित म्हणतात, ‘घटनेनंतर पीडित डॉक्टरने एम्सच्या वरिष्ठ डॉक्टरांना आपली आपबिती सांगितली. दुसऱ्या दिवशी आम्ही सर्व तिला घेऊन पोलीस ठाण्यात गेलो. तिच्या तक्रारीवरून, सीसीटीव्ही फुटेज आणि जबाबांच्या आधारे तिन्ही आरोपी मुलांना अटक करण्यात आली.‘ ‘२२ फेब्रुवारीच्या रात्री घडलेल्या घटनेने पीडितेला मोठा धक्का बसला. ती पोलीस ठाण्यात इतकी संतापली होती की तिने पोलीस अधिकाऱ्याला विचारले, मी त्या तिन्ही मुलांना थप्पड मारू शकते का? तिचे बोलणे ऐकून पोलिसांनी आश्वासन दिले की आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल.‘ घटनेने व्यथित झालेल्या डॉक्टरने म्हटले- ‘हे खूप दुःखद आहे की २०२६ मध्येही महिलांना दररोज अशा घटनांना सामोरे जावे लागत आहे. विशेषतः ईशान्येकडील महिलांना उघडपणे छळ आणि हल्ल्याचा सामना करावा लागतो. आम्ही सन्मान आणि सुरक्षिततेस पात्र आहोत. आम्हाला कोणत्याही भीतीशिवाय फिरण्याचे स्वातंत्र्य मिळायला हवे.‘ कोण आहेत तिन्ही आरोपीगोरखपूरचे एसपी सिटी अभिनव त्यागी यांच्या मते, २३ फेब्रुवारी रोजी आम्हाला महिला डॉक्टरची तक्रार मिळाली. पीडितेच्या जबाबाच्या आधारे एम्स पोलीस ठाण्यात BNS च्या कलम ७४, २९६ ए, ३५२ आणि ३५१ C अंतर्गत एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला आहे. एसपी अभिनव म्हणतात, ‘तक्रार दाखल झाल्यानंतर आम्ही आरोपींना पकडण्यासाठी 4 पोलीस पथके तयार केली. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपींची ओळख पटवण्यात आली आणि 24 तासांच्या आत तिघांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची ओळख सूरज गुप्ता, आदित्य राजपूत आणि अमृत विश्वकर्मा अशी झाली आहे, ज्यांचे वय 21 ते 24 वर्षांच्या दरम्यान आहे. घटनेत वापरलेली बाईकही जप्त करण्यात आली आहे.’ गोरखपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीत असे समोर आले आहे की सूरज आणि अमृत शेजारी आहेत. सूरज फळांचे दुकान चालवतो, तर अमृत देवरियामध्येच एका जनरल मर्चंडाईज स्टोअरमध्ये काम करतो. तिसरा आरोपी आदित्य बीए द्वितीय वर्षाचा विद्यार्थी आहे. मेघालयचे मुख्यमंत्री म्हणाले - ईशान्येकडील महिलांवरील भेदभाव विसरला जातोया घटनेवर मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड के संगमा यांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, 'ईशान्येकडील महिलांवरील वांशिक भेदभाव आणि लैंगिक छळाला केवळ मथळे बनवून विसरून जाऊ नये. एम्स गोरखपूरमध्ये नागालँडच्या एका निवासी डॉक्टरसोबत झालेला वांशिक आणि लैंगिक छळ अत्यंत लाजिरवाणा आहे.' 'कोणत्याही सुसंस्कृत देशात महिलांच्या सन्मानाशी छेडछाड सहन केली जाऊ नये. त्या तुमच्या बहिणी आणि मुलीच आहेत. मी अधिकाऱ्यांना आवाहन करतो की दोषींवर कठोर कारवाई करावी.' ही छेडछाड नाही, तर वर्णद्वेषी आणि लैंगिक छळाचे प्रकरण: NAFORDया प्रकरणी NAFORD सह अनेक वैद्यकीय संघटनांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. संघटनांनी या घटनेनंतर महिला डॉक्टर आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी कडक सुरक्षा व्यवस्थेची मागणी केली आहे. संघटनांनी या घटनेला गंभीर वर्णद्वेषी आणि लैंगिक छळाचे प्रकरण म्हटले आहे. पोस्टमध्ये म्हटले आहे की, ईशान्येकडील असल्यामुळे डॉक्टरांना रूढीवादी टिप्पण्यांचा सामना करावा लागला, ज्यामुळे त्यांना खूप धक्का आणि अपमान वाटला आहे. घटनेत पोलिसांनी तात्काळ कारवाई केल्याबद्दल आणि आरोपींना लवकर अटक केल्याबद्दल NAFORD चे अध्यक्ष डॉ. देवेश दुबे म्हणतात, ‘पीडित डॉक्टरचा मेसेज मिळताच आमच्या संघटनेने याची माहिती गोरखपूर पोलिसांना दिली. याच्या काही तासांतच 2 आरोपींना अटक करण्यात आली. तिसरा आरोपीही 24 तासांच्या आत पकडला गेला. या प्रकरणी कठोर कारवाई केल्याबद्दल आम्ही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि गोरखपूर पोलिसांचे आभार मानतो.‘ दिल्लीत 'मोमो विकणारी' आणि 'मसाज पार्लरवाली' असे म्हटले गेलेगोरखपूर एम्सच्या डॉक्टरशी संबंधित घटनेच्या एक दिवस आधी दिल्लीतील मालवीय नगरमध्येही ईशान्येकडील 3 महिलांवर वर्णद्वेषी टिप्पणी केल्याचा प्रकार समोर आला होता. यात त्यांना 'मोमो विकणारी' आणि '500 रुपयांत मसाज पार्लरमध्ये धंदा करणारी' असे कमेंट्स केले गेले. या प्रकरणातही एफआयआर (FIR) दाखल झाली आहे. हे प्रकरण मालवीय नगरचे आहे, जिथे अरुणाचल प्रदेशातील 3 महिला चौथ्या मजल्यावर एका फ्लॅटमध्ये राहत होत्या. त्यापैकी एक यूपीएससीची तयारी करत होती. त्यांनी त्यांच्या फ्लॅटमध्ये एअर कंडीशनर बसवण्यासाठी मेकॅनिकला बोलावले होते. ड्रिलिंग करताना धूळ आणि कचरा खालच्या मजल्यावर पडला, ज्यामुळे खाली राहणारे शेजारी हर्ष सिंग आणि त्यांची पत्नी रुबी जैन संतापले. सुरुवातीला हा वाद फ्लॅटवरील कचऱ्यावरून सुरू झाला, पण नंतर वाद वाढत जाऊन तो वर्णद्वेषी आणि आक्षेपार्ह बनला. घटनेनंतर इमारतीच्या ब्रोकरने महिलांना सांगितले की त्यांना 2 महिन्यांत फ्लॅट रिकामा करावा लागेल. यामुळे पीडित महिलांमध्ये त्यांच्या सुरक्षिततेबद्दल भीती वाढली. मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड के. संगमा यांनीही या घटनेचा निषेध केला होता. त्यांनी X वर या घटनेबद्दल लिहिले की, ईशान्येकडील लोकांशी होणारा भेदभाव थांबला पाहिजे.
Bhimashankar Temple : २८८ कोटींच्या विकास आराखड्यांतर्गत कामांना वेग; पारंपारिक स्थापत्यशैलीचा वापर करून पुरातत्त्व विभागाचा पहिलाच आगळावेगळा प्रकल्प.
Pune Konkan New Route : जुन्या ताम्हिणी घाटावरचा ताण कमी करण्यासाठी पर्यायी मार्गाची आखणी सुरू; अवजड वाहनांसाठी प्रशस्त रस्ता करण्यावर प्रशासनाचा भर.
RTE Admission : आरटीई २५ टक्के राखीव जागावरील प्रवेशासाठी आतापर्यंत ९२ हजार १५६ बालकांचे अर्ज त्यांच्या पालकांकडून ऑनलाइन दाखल झाले आहेत.
मुंबई: बँकिंग क्षेत्रात सध्या एका मोठ्या घोटाळ्याची जोरदार चर्चा सुरू आहे. आयडीएफसी फर्स्ट बँकेच्या चंदीगड शाखेत तब्बल ५९० कोटी रुपयांची मोठी फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. या संपूर्ण कटाचा मास्टरमाइंड त्या शाखेचा माजी मॅनेजर रिभव ऋषी हा आहे.या घोटाळ्याचा तपास करताना हरियाणाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) आतापर्यंत चार जणांना बेड्या ठोकल्या आहेत. यामध्ये माजी मॅनेजर रिभव ऋषी, माजी रिलेशनशिप मॅनेजर अभय, रिभवची पत्नी स्वाती सिंगला आणि तिचा भाऊ अभिषेक सिंगला यांचा समावेश आहे. या सर्वांनी मिळून सरकारी तिजोरीवर डल्ला मारण्याचा धाडसी पण तितकाच धक्कादायक कट रचला होता.५९० कोटींचा घोटाळाया घोटाळ्याची वाच्यता तेव्हा झाली जेव्हा हरियाणा सरकारच्या एका विभागाने आपले खाते बंद करून त्यातील पैसे दुसऱ्या बँकेत ट्रान्सफर करण्याची विनंती आयडीएफसी फर्स्ट बँकेला केली. जेव्हा बँक अधिकाऱ्यांनी रेकॉर्ड तपासले, तेव्हा त्यांना कागदोपत्री असलेली रक्कम आणि प्रत्यक्षात खात्यात शिल्लक असलेली रक्कम यामध्ये मोठी तफावत दिसून आली.एका खात्याचा तपास सुरू असतानाच हरियाणा सरकारच्या इतर संलग्न खात्यांमध्येही अशाच प्रकारच्या गडबडी असल्याचे बँकेच्या लक्षात आले. यानंतर बँकेने स्वतःहून या प्रकरणाची माहिती नियामक संस्थांना दिली आणि तपास यंत्रणांना पाचारण केले.कुटुंबाच्या नावे कंपनी काढून वळवले सरकारी पैसेतपासादरम्यान असे समोर आले की, रिभव आणि अभय या दोघांनी सुमारे ६ महिने आधीच बँकेचा राजीनामा दिला होता. त्यांनी हरियाणा सरकारच्या खात्यांमधील पैसे स्वास्तिक देश प्रोजेक्ट्स नावाच्या कंपनीच्या खात्यात वळवले होते. ही कंपनी रिभवची पत्नी स्वाती आणि तिचा भाऊ अभिषेक यांच्या मालकीची आहे.या कंपनीमध्ये स्वातीचे ७५ टक्के आणि अभिषेकचे २५ टक्के शेअर्स आहेत. या कंपनीच्या माध्यमातून सुमारे ३०० कोटी रुपये इतरत्र वळवण्यात आले. विशेष म्हणजे चंदीगडमधील बँक आणि हरियाणातील सरकारी खाती असताना हे पैसे मोहाली येथील एयू स्मॉल फायनान्स बँकेच्या शाखेत वळवण्यात आले होते. वेगवेगळ्या राज्यांच्या सीमांचा फायदा घेत हा व्यवहार लपवण्याचा प्रयत्न या आरोपींनी केला होता.बँकेची तत्परताया संपूर्ण प्रकरणात आयडीएफसी फर्स्ट बँकेने अत्यंत सकारात्मक भूमिका घेतली आहे. तपास अद्याप प्राथमिक टप्प्यात असताना आणि प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाही बँकेने हरियाणा सरकारच्या संबंधित विभागांचे नुकसान होऊ दिले नाही. बँकेने अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, आम्ही आमच्या 'कस्टमर फर्स्ट' या तत्त्वाचे पालन करतो. त्यामुळे तपासाची वाट न पाहता हरियाणा सरकारच्या विभागांनी दावा केलेली १०० टक्के रक्कम म्हणजेच व्याजासह सुमारे ५८३ कोटी रुपये बँकेने परत केले आहेत.हरियाणा सरकारने देखील बँकेच्या या तत्परतेचे आणि व्यावसायिक भूमिकेचे कौतुक केले आहे. सध्या या प्रकरणातील मुख्य आरोपींना कोर्टात हजर केले जाणार असून या कटात आणखी कोणाचे हात गुंतले आहेत का, याचा शोध एसीबी घेत आहे.
दिल्लीतील पॉश एरिया मालवीय नगरमधील खिडकी गावात असलेल्या एका पाच मजली इमारतीत शांतता पसरली आहे. तिच्या चौथ्या मजल्यावर राहणाऱ्या अरुणाचल प्रदेशातील तीन मुली तीन दिवसांपासून बाहेर पडलेल्या नाहीत. एसी बसवताना झालेल्या वादामुळे ज्यांना मोमो, पार्लरवाली, धंदा करणारी असे म्हटले गेले, त्या याच मुली आहेत. याच इमारतीत राहणारे हर्ष आणि त्यांची पत्नी रुबी जैन यांच्यावर आरोप आहे. SC-ST कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाल्यामुळे रुबीला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी कठोर कारवाईचे आश्वासन दिले आहे, परंतु तिन्ही मुली अजूनही घाबरलेल्या आहेत. ओळख उघड झाल्यानंतर त्यांनी त्यांचे सोशल मीडिया अकाउंट्स डिलीट केले आहेत. भीती आणि दबावामुळे एका मुलीला तिच्या कुटुंबियांनी शिक्षण सोडून घरी परत येण्यास सांगितले आहे. संपूर्ण प्रकरण समजून घेण्यासाठी आम्ही आरोपी हर्ष आणि रुबी यांच्याव्यतिरिक्त पीडित मुलींच्या वकिलांशी आणि प्रत्यक्षदर्शी एसी मेकॅनिकशी बोललो. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्याने मुली त्रस्तआम्ही पीडित मुलींशी बोलण्याचा प्रयत्न केला. त्यांनी त्यांच्या वकील लीयी मारली नोशी यांच्याशी बोलण्यास सांगितले. लीयी सांगतात की तिन्ही मुलींचे वय 20 ते 23 वर्षे आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून त्या त्रस्त आहेत. त्यांच्यावर खूप जास्त सार्वजनिक आणि सामाजिक दबाव आहे. सर्वजण त्यांचे चेहरे ओळखतात. कुटुंबेही घाबरलेली आहेत. त्यापैकी एकीला तर कुटुंबाने परत बोलावले आहे. मुलीला आता शिक्षण सोडून परत जावे लागेल. लीयी पुढे सांगतात की मुलींना सोशल मीडियावर सतत मेसेज येत होते. त्यामुळे त्यांनी अकाउंट्स डिलीट केले आहेत. AC बसवणाऱ्याशी गैरवर्तन, इथूनच वादाला सुरुवात झालीपीडित मुलींपैकी एक UPSC परीक्षेची तयारी करत आहे. बाकीच्या दोघीही विद्यार्थिनी आहेत आणि खर्च भागवण्यासाठी फ्रीलान्सिंग करतात. त्या त्यांच्या भाड्याच्या फ्लॅटमध्ये AC बसवत होत्या. घराच्या आत कॉरिडॉरमध्येच AC कंप्रेसर बसवण्याची जागा आहे. इथूनच वादाला सुरुवात झाली. वकील लीयी सांगतात, ‘आरोपींनी AC बसवणाऱ्याशी गैरवर्तन केले. ते म्हणत होते की, ड्रिल केल्याने पडलेल्या धुळीमुळे त्यांच्या AC चे नुकसान झाले आहे. मुलींनी सांगितले की, जर तुमच्या AC चे नुकसान झाले असेल, तर आम्ही ते दुरुस्त करून देऊ.’ ‘राहुल गांधींनी भेटायला बोलावले, पण आम्ही गेलो नाही’लीयी सांगतात की, या संपूर्ण प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्नही झाला आहे. वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांनी आमच्याशी बोलले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि अलका लांबा यांचा फोन आला होता. त्यांनी मला आणि मुलींना भेटायला बोलावले. मी स्पष्टपणे नकार दिला की हा राजकीय मुद्दा नाही. लीयी आरोप करतात की, आरोपींनी तडजोडीसाठी दबाव आणला होता. आधी घरमालकाच्या घरी माफी मागून तडजोड करण्याचा प्रयत्न झाला, पण त्यांच्या समुदायाबद्दल ज्या गोष्टी बोलल्या गेल्या आहेत, त्यानंतर कोणतीही तडजोड होणार नाही. AC मेकॅनिक प्रत्यक्षदर्शी, म्हणाला- माझे पाय तोडण्याची धमकी दिलीपीडित मुलींनी खिडकी गावातून सलीमला (बदललेले नाव) AC बसवण्यासाठी बोलावले होते. दुपारी सुमारे 3:30 वाजता AC चा कंप्रेसर लावण्यासाठी सलीमने ड्रिलिंग केली. यामुळे काही कचरा खालील इतर AC आणि कॉरिडॉरमध्ये जाऊन पडला. आम्ही AC मेकॅनिक सलीमला भेटलो. नाव आणि चेहरा लपवण्याच्या अटीवर ते सांगतात, ‘इमारत जुनी आहे, त्यामुळे थोडा कचरा आणि लहान दगड खाली पडले. खालील फ्लॅटमध्ये राहणारा माणूस यामुळे चिडला आणि मला शिवीगाळ करू लागला. मी दोनदा माफी मागितली. यावर तो म्हणाला की, तुझे पाय तोडून टाकीन.’ सलीम पुढे म्हणतात, ‘मी ज्या मॅडमच्या घरी एसी लावत होतो, त्यांनीही सांगितले की एसी लावताना थोडाफार कचरा पडतो. जर जास्त पडला असेल, तर साफसफाई करून देऊ. त्या व्यक्तीने त्यांनाही शिवीगाळ केली. यानंतर वाद वाढला.’ सलीम सांगतात की, सुरुवातीला वाद खालीच मिटला. 20 मिनिटांनंतर आरोपी पती-पत्नीने पोलिसांना बोलावून वर आले. पोलिसांसमोरच नॉर्थ-ईस्टबद्दल उलटसुलट बोलू लागले. मुलींना म्हणाले की, तुम्ही लोक पार्लर चालवता, धंदा करता, तुमच्याकडे ड्रग्ज चालतो. अटकेपूर्वी रुबी म्हणाली- मी माझ्या शब्दांसाठी माफी मागतेआरोपी हर्ष पत्नी रुबीसोबत इमारतीच्या पहिल्या मजल्यावर भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहतो. इमारतीत प्रत्येक मजल्यावर 4 फ्लॅट आहेत. याच इमारतीच्या चौथ्या मजल्यावर पीडित मुलीही भाड्याने राहतात. दोन्ही फ्लॅटचे मालक एकच आहेत. 25 फेब्रुवारी रोजी रुबीला अटक करण्यात आली. दिल्ली पोलिसांनी सांगितले की रुबीविरुद्ध SC-ST कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. 24 फेब्रुवारीच्या संध्याकाळी सुमारे 6 वाजता आम्ही रुबी आणि हर्षच्या घरी पोहोचलो होतो. सुमारे 7 वाजता त्यांच्या घरी अनिल कुमार नावाचे हेड कॉन्स्टेबल आले. त्यांनी रुबी आणि हर्षला मालवीय नगर पोलीस ठाण्यात जाऊन डीसीपींना भेटायला सांगितले. पोलीस ठाण्यात आधी रुबीची आणि नंतर हर्षची स्वतंत्रपणे चौकशी करण्यात आली. रुबी अटकेबद्दल घाबरली होती. हर्ष तिला न घाबरण्याचा सल्ला देत राहिला. सुमारे रात्री 8 वाजता चौकशीनंतर रुबी आणि हर्ष घरी परतले. 25 फेब्रुवारीच्या सकाळी मालवीय नगर पोलिसांनी रुबीला घरातून अटक केली. अटकेपूर्वी रुबीने आम्हाला सांगितले की, सोशल मीडियावर 4 मिनिटांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा भांडणाच्या दुसऱ्या भागाचा आहे. त्याआधी चार मुली माझ्या मजल्यावर आल्या होत्या. मी जिन्यावर उभी राहून त्यांना उत्तर देत होते, तेच रेकॉर्ड करून व्हायरल करण्यात आले, जेणेकरून आमच्या विरोधात मत तयार होईल. व्हायरल व्हिडिओमध्ये रुबीच्या हातात काठी दिसत आहे. यावर ती म्हणाली की, आम्ही पोलिसांना बोलावले होते, तोपर्यंत मुली आमच्या मजल्यावर आल्या होत्या. मी टीबीची रुग्ण आहे, माझ्या शरीराचा एक भाग व्यवस्थित काम करत नाही. म्हणून मी आत्मसंरक्षणासाठी घरात ठेवलेली डॉग स्टिक हातात घेतली होती. ती कोणाला मारण्यासाठी नव्हती. रुबी पुढे म्हणते की, पोलीस आल्यानंतर आम्हाला वर नेण्यात आले. व्हायरल व्हिडिओ त्याच वेळेचा आहे. तिथे मला आणि पोलिसांना धक्के मारण्यात आले. पोलीस अधिकारी माझ्यावर पडले. त्याच वेळी माझ्या तोंडातूनही अपशब्द बाहेर पडले. रुबी जैनने वर्णद्वेषी टिप्पणीसाठी माफी मागितली आहे. तिने म्हटले की, मी माझ्या शब्दांसाठी मनापासून माफी मागते. हे सर्व मी तेव्हा म्हटले, जेव्हा माझ्यासाठी 'धंदेवाली' आणि 'हिजडा' असे शब्द वापरले गेले. त्या परिस्थितीत माझ्याकडून काय अपेक्षा केली जाते? तरीही मी मानते की माझे शब्द चुकीचे होते. हर्ष म्हणाला- वर्णद्वेषी टिप्पणीसाठी आम्ही लज्जित आहोतआम्ही व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या रुबीचा पती हर्ष याच्याशीही बोललो. ३५ वर्षांचा हर्ष इव्हेंट मॅनेजर आहे. तो गेल्या एका वर्षापासून या फ्लॅटमध्ये राहत आहे. हर्ष म्हणतो, ‘आमच्या एसी आणि कॉरिडॉरमध्ये मोठे दगड पडल्याने मी बाहेर आलो होतो. एसीवर मोठे दगड पडले होते. दोनदा मोठा आवाज आला. वरून एक मुलगा डोकावला. मी रागाने दिल्लीच्या बोलीभाषेत एक-दोन गोष्टी बोललो. तेव्हा ती मुलगी आली आणि तिने वाद सुरू केला. दोन्ही बाजूंनी शिवीगाळ झाली.’ हर्ष आरोप करतात की, मुलींनी त्यांच्या पत्नीला जातीवाचक शब्द वापरले. यानंतर आम्ही पीसीआरला कॉल केला. पोलीस दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकत होते, तेव्हाच मुलीने व्हिडिओ बनवला. व्हायरल व्हिडिओ निवडक आहे, त्यात फक्त त्यांचा भाग दाखवला आहे. माझ्या पत्नीसोबत धक्काबुक्की करण्यात आली. आम्ही त्याच दिवशी लेखी तक्रार तयार करून व्हॉट्सअॅप आणि ईमेलद्वारे एसएचओ, डीसीपी आणि जॉइंट सीपी यांना पाठवली होती. गृह मंत्रालयालाही तक्रार पाठवली होती. ४ मिनिटांच्या व्हिडिओमध्ये काय आहे...व्हिडिओमध्ये पीडित मुलींव्यतिरिक्त, हर्ष, रूबी, एक पोलिस कर्मचारी आणि काही शेजारी दिसत आहेत. सुरुवातीला पीडितेचा आवाज ऐकू येतो... पीडित: तुम क्या बोला, हम दारू पीता है। मेरा रूम चेक करो, अगर एक भी चीज मिला न, उसके बाद देखेंगे। रूबी: ऊंगली पीछे करके बात कर। हर्ष: चल, चल, गंदगी मसाज पार्लर। पीडित: मसाज पार्लर तू, बुड्ढा। रूबी: मेरा बेडरूम खाली है, आजमा ले जा। तेरे को पता चलेगा कितना बुड्ढा है। 35 साल का लड़का तेरे यहां बुड्ढा होता होगा, क्योंकि ड्रग्स इतने करते हो तुम लोग, हमारे यहां 35 साल में एक्चुअल जवान होते हैं। पीडित: मसाज पार्लर तू चलाती है न। रूबी: चलाती हूं, तेरे को कराना है, नौकरी चाहिए। तेरी औकात नहीं है, जहां से वो आया है। कस्टम ऑफिसर का बेटा है, पॉलिटिशियन है उसका बाप। पुलिसवाला: आप इन्हें अंदर कर दो, जो समझदार हो, वो बाहर रहो रूबी: तेरे यहां आदमी मसाज पार्लर में काम करते होंगे, हमारे यहां नहीं। एक दुसरी मुलगी रुबीला समजावते. रुबी म्हणते, वो मेरे को बोली कि तेरा आदमी मसाज पार्लर में मिला होगा। हर्षचे भाजप नेत्यांसोबत फोटो, म्हणाला- पक्षाशी संबंधित नाहीहर्षचे भाजप नेत्यांसोबतचे फोटो व्हायरल झाले आहेत. भांडणाच्या व्हिडिओमध्येही रुबी त्याला राजकारण्याचा मुलगा सांगत आहे. यावर हर्ष म्हणतो, ‘मी सामान्य कुटुंबातून आहे. माझा कोणत्याही पक्षाशी संबंध नाही. मी इव्हेंट मॅनेजर आहे. वेगवेगळ्या नेत्यांसोबतचे माझे फोटो व्यावसायिक कामामुळे आहेत. मी कोणत्याही पक्षाकडून थेट पेमेंट घेतले नाही, ना मी कोणत्याही पक्षाचा सदस्य आहे. मी भाजपसाठी इव्हेंट मॅनेज केले आहेत. व्हायरल झालेले फोटोही याचेशी संबंधित आहेत.' घरमालक म्हणाले- ईशान्येकडील लोकांमुळे कधीच अडचण आली नाहीया वादावर आम्ही इमारतीत राहणाऱ्या लोकांशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना बोलायचे नव्हते. यानंतर आम्ही मालवीय नगरमधील प्रॉपर्टी व्यावसायिक विनोद चौहान यांना भेटलो. ते म्हणतात की माझ्या घरांमध्ये ईशान्येकडील लोक भाड्याने राहतात. आतापर्यंत कोणतीही अडचण आली नाही. अशा प्रकारच्या वंशवादी टिप्पणी होऊ नयेत. आमची मुलेही इतर राज्यांमध्ये शिकायला आणि काम करायला जातात. जर त्यांच्यासोबत तिथे भेदभाव झाला, तर आम्हालाही वाईट वाटेल.
PMC News : महापालिकेची ‘रस्ते दत्तक’योजना सपशेल फेल; लाखो रुपये पाण्यात, जबाबदार कोण?
PMC News : रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली लावलेली लाखो रुपयांची झाडे देखभालीअभावी सुकली; अभियंत्यांनीही फिरवली पाठ.
PMC News : महापालिकेचा ‘लेडीज कार्ड’; ३ वर्षांनंतर अचानक जाग, पण ‘या’दोनच ठेकेदारांवर मेहेरनजर का?
PMC News : तीन वर्षांच्या खंडानंतर राणी लक्ष्मीबाई महिला सक्षमीकरण योजना पुन्हा पटलावर; ४ कोटींच्या खर्चाला मंजुरी मिळण्याची शक्यता.
इराणवर हल्ला करण्यासाठी गेलेली सर्वात महागडी अमेरिकन विमानवाहू युद्धनौका USS जेराल्ड अडचणीत सापडली आहे. ही अडचण शत्रूच्या कोणत्याही क्षेपणास्त्रामुळे किंवा पाणबुडीमुळे नाही, तर शौचालये जाम झाल्यामुळे झाली आहे. युद्धनौकेवर तैनात असलेले 4,500 हून अधिक सैनिक 'टॉयलेट वॉर'चा सामना करत आहेत. फ्रेश होण्यासाठी 45 मिनिटांपर्यंत रांगेत उभे राहावे लागत आहे आणि दुरुस्तीवरून सैनिकांमध्ये वाद झाल्याच्याही बातम्या आहेत. अखेर याची शौचालये कशी जाम झाली, आता ते इराणवर हल्ला करू शकणार नाही का आणि USS जेराल्डसारख्या विमानवाहू युद्धनौकेला जग का घाबरते; जाणून घेऊया आजच्या एक्सप्लेनरमध्ये... प्रश्न-1: अमेरिकेच्या सर्वात महागड्या विमानवाहू जहाजाचे शौचालय कसे चोक झाले?उत्तर: यूएसएस जेराल्ड आर. फोर्ड हे अमेरिकेचे सर्वात मोठे आणि सर्वात महागडे विमानवाहू जहाज आहे. त्याचे वजन सुमारे एक लाख टन आणि किंमत सुमारे 1.08 लाख कोटी रुपये आहे. 2009 मध्ये त्याचे बांधकाम सुरू झाले आणि 22 जुलै 2017 रोजी ट्रम्प यांच्या हस्ते ते अमेरिकन नौदलात सामील करण्यात आले. ते अणुऊर्जेवर चालते. यूएसएस जेराल्ड आर. फोर्ड जून 2025 पासून समुद्रात आहे. त्यापूर्वी ते कॅरिबियन समुद्रात होते. जानेवारी 2026 मध्ये अमेरिकेने व्हेनेझुएलावर हल्ला करून त्याचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांना अपहरण केले, तेव्हा या ऑपरेशनमध्ये त्याचा वापर करण्यात आला होता. त्यासोबत 3 गाईडेड मिसाईल डिस्ट्रॉयर आहेत. 19 फेब्रुवारी रोजी हे स्ट्राइक ग्रुप स्पेन आणि मोरोक्कोदरम्यान जिब्राल्टरच्या सामुद्रधुनीमध्ये होते. 22 फेब्रुवारीच्या सकाळपर्यंत ते इस्रायलजवळ पोहोचले होते. इराण-अमेरिका तणावाच्या पार्श्वभूमीवर हे विमानवाहू जहाज मध्यपूर्वेत तैनात करण्यात आले आहे. म्हणजेच, आतापर्यंत हे विमानवाहू जहाज सुमारे 8 महिन्यांपासून समुद्रात आहे आणि पुढे सुमारे 6 महिने ते समुद्रातच राहू शकते. सतत समुद्रात असल्यामुळे त्याची देखभाल होऊ शकत नाही. जेराल्ड फोर्डवर 650 शौचालये 10 वेगवेगळ्या झोनमध्ये विभागलेली आहेत. या शौचालयांमधून कचरा काढण्यासाठी VCHT म्हणजेच व्हॅक्यूम कलेक्शन, होल्डिंग अँड ट्रान्सफर सिस्टीम बसवण्यात आली आहे. VCHT व्हॅक्यूम सिस्टीम निकामी झाल्यामुळे त्याची शौचालये चोक झाली आहेत. तंत्रज्ञ आणि अभियंते या समस्येवर उपाय शोधण्यासाठी 19 तास काम करत आहेत. खरं तर, VCHT सिस्टीम घरांमध्ये वापरल्या जाणाऱ्या व्हॅक्यूम क्लीनरसारखी असते. त्यात शौचालयाचे फ्लश दाबताच पाईपमध्ये व्हॅक्यूम म्हणजेच सक्शन तयार होते. ते घाण खेचून पाईपद्वारे एका मोठ्या स्टोरेज टँकपर्यंत पोहोचवते. स्टोरेजमध्ये पोहोचलेल्या या कचऱ्यावर रसायनांद्वारे प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावली जाते. अमेरिकेच्या मीडिया आउटलेट नॅशनल पब्लिक रेडिओ (NPR) च्या अहवालानुसार, 24 जुलै 2025 रोजी जेराल्ड फोर्ड प्रशांत महासागरातील नॉरफोक बेटावरून युरोप आणि भूमध्य समुद्रासाठी रवाना झाले होते. त्याच्या सुमारे एक महिन्यानंतर जहाजावरील एका खलाशाच्या आईने NPR शी संपर्क साधून जहाजावरील घाण आणि खराब स्वच्छतेबद्दल तक्रार केली होती. यादरम्यान जहाजाशी संबंधित अनेक ईमेल समोर आले, ज्यातून असे दिसून आले की जहाजाचे अधिकारी इंजिनिअरिंग विभागाकडे वारंवार मशीनमध्ये येत असलेल्या बिघाडांबद्दल तक्रार करत होते. अहवालानुसार, अनेक महिन्यांपासून समुद्रात अडकलेल्या सैनिकांना शौचालयासाठी रांगेत उभे राहून 45 मिनिटे वाट पाहावी लागत आहे. यामुळे त्यांच्यात आपापसात भांडणेही होत आहेत. जेराल्ड फोर्डमध्ये शौचालयाशी संबंधित समस्या उद्भवण्याची ही पहिलीच वेळ नाही. 18 मार्च 2025 रोजी जहाजाच्या अभियांत्रिकी विभागाकडून सर्व प्रमुखांना पाठवलेल्या ईमेलमध्ये असे सांगण्यात आले होते की 4 दिवसांत 205 शौचालये खराब झाली आहेत. अभियांत्रिकी संघ या समस्येबद्दल आपल्या अधिकाऱ्यांना स्पष्ट उत्तर देऊ शकला नाही. एका ईमेलमध्ये असे म्हटले होते की या प्रणालीमध्ये हजारो भाग आहेत आणि दररोज कोणता ना कोणता भाग खराब होत आहे. प्रश्न-2: तर काय USS जेराल्ड फोर्डमध्ये सुरुवातीपासूनच काही तांत्रिक बिघाड आहे?उत्तर: जेराल्ड फोर्ड कार्यान्वित होण्यापूर्वी अमेरिकेकडे निमित्झ क्लासची 10 विमानवाहू जहाजे होती, जसे की- USS ड्वाइट डी. आयझेनहॉवर, USS कार्ल विन्सन, USS थिओडोर रूझवेल्ट, USS अब्राहम लिंकन इत्यादी.नवीन जेराल्ड फोर्डच्या डिझाइन आणि ऑपरेशनमध्ये विशेषतः दोन नवीन गोष्टी समाविष्ट करण्यात आल्या होत्या... 1. फायटर जेट्स लॉन्च करण्याची प्रणाली बदलली 2. सीवेज सिस्टिम बदलली जेव्हा ही प्रणाली अनेक महिने प्रवासात असलेल्या जेराल्ड विमानवाहू नौकेत वापरली गेली, तेव्हा त्यात अनेक त्रुटी समोर आल्या आहेत... प्रश्न-3: एअरक्राफ्ट कॅरियरला देखभालीसाठी किनाऱ्यापर्यंत जावे लागेल का?उत्तर: सर्वात मोठी समस्या कॅरियरच्या सांडपाण्याच्या पाईप्समध्ये कॅल्सिफिकेशन म्हणजे कॅल्शियमचा थर जमा होण्याची आहे. NPR च्या अहवालानुसार, देखभाल करणाऱ्या अभियंत्यांना पाईप्समध्ये टी-शर्टपासून ते 4 फूट लांब दोरीपर्यंतच्या वस्तू मिळाल्या आहेत. यामुळे एअरक्राफ्ट कॅरियरच्या पातळ पाईप्स जाम होत आहेत. 2020 च्या अमेरिकन गव्हर्नमेंट अकाउंटेबिलिटी ऑफिस (GAO) च्या अहवालानुसार, पाईपमध्ये साचलेले कॅल्शियम काढण्यासाठी नौदलाला प्रत्येक वेळी सुमारे 4 कोटी रुपये खर्च करून 'ऍसिड फ्लश' म्हणजेच तेजाबाने साफसफाई करावी लागते. 2023 पासून आतापर्यंत जहाजावर किमान 10 वेळा ही प्रक्रिया करण्यात आली आहे. हे काम फक्त बंदरावरच होऊ शकते. युरो न्यूजच्या अहवालानुसार, विमानवाहू जहाजाला 24 फेब्रुवारी 2026 रोजी ग्रीसमधील क्रेट येथील सूडा बे नेव्हल बेसवर नेण्यात आले आहे. डिस्ट्रॉयर USS महान सोबत हे विमानवाहू जहाज इंधन भरण्यासाठी चार दिवस बेसवरच राहील. येथे त्याच्या VCHT प्रणालीची दुरुस्ती आणि पाणीपुरवठा पुन्हा व्यवस्थित करण्याचे काम केले जाईल. या दरम्यान तैनात दलांना आराम करण्याची वेळ देखील मिळेल. प्रश्न-4: एअरक्राफ्ट कॅरियरला युद्धाचे सर्वात मोठे शस्त्र का म्हटले जाते?उत्तर: एअरक्राफ्ट कॅरियरला समुद्रात तरंगणारा एक 'संपूर्ण लष्करी तळ' म्हटले जाते. प्रत्येक एअरक्राफ्ट कॅरियरसोबत अनेक युद्धनौका आणि पाणबुड्या सोबत असतात. यावर प्रत्येक वेळी सुमारे 90 लढाऊ विमाने, इंधन पुरवठा जहाजे, कॉम्बॅट हेलिकॉप्टर आणि हजारो सैनिक तैनात असतात. या संपूर्ण ताफ्याला 'कॅरियर स्ट्राइक ग्रुप' म्हटले जाते, जो सुमारे 3 महिने न थांबता समुद्रात कुठेही जाऊन शत्रूंवर वेगाने हल्ला करू शकतो. तो एकाच वेळी अनेक आघाड्यांवर हल्ला करण्यास, रडारने पाळत ठेवण्यास आणि सागरी सीमेचे संरक्षण करण्यास सक्षम आहे. यूएसएस जेराल्ड फोर्डच्या स्ट्राइक ग्रुपमध्ये 3 गाईडेड मिसाईल डिस्ट्रॉयर आहेत - यूएसएस विन्स्टन एस. चर्चिल, यूएसएस बेनब्रिज आणि यूएसएस महान. हे तिन्ही 2500 किमी रेंजच्या टॉमहॉक क्रूझ मिसाईल आणि अँटी-सबमरीन मिसाईलने सुसज्ज आहेत, जे हवा, जमीन आणि समुद्रातील धोके नष्ट करू शकतात.यूएसएस जेराल्ड फोर्डवर 'कॅरियर एअर विंग-8' नावाचा एअर ग्रुप आहे. त्यात 60 ते 75 विमाने आहेत. यापैकी सुमारे 48 सुपर हॉर्नेट फायटर जेट्स आहेत. EA-18G ग्राउलर विमान शत्रूचे रडार आणि दळणवळण व्यवस्था जाम करू शकते आणि सीहॉक हेलिकॉप्टर समुद्रात पाणबुड्या शोधून हल्ला करू शकते. एअरक्राफ्ट कॅरियरला 3 कारणांमुळे युद्धादरम्यान सर्वात शक्तिशाली मानले जाते: 1. शत्रूच्या कुठेही जवळ पोहोचू शकतो: विमानवाहू नौका समुद्रात जिथे पाहिजे तिथे जाऊन हल्ला करू शकते. यावर तैनात असलेल्या फायटर जेट्सना हवेत कमी अंतर कापावे लागते आणि मिड-एअर रिफ्यूलिंगची गरज कमी होते.2. सतत हल्ला करू शकते: विमानवाहू नौकेवर तैनात विमाने सतत बॉम्ब किंवा क्षेपणास्त्रे डागू शकतात. विमानवाहू नौकेवरून दर 8 मिनिटांनी एक जेट उड्डाण करू शकते. अशा प्रकारे, विमानवाहू नौका एका दिवसात शेकडो हल्ले करू शकते.3. याला बुडवणे कठीण आहे: जेराल्ड फोर्डचे वजन सुमारे 1 लाख टन आहे. मजबूत डिझाइन असलेल्या या विमानवाहू नौकेचे अनेक भाग असे आहेत जे पाणी भरले तरी बुडत नाहीत. अणुबॉम्बशिवाय याला बुडवणे जवळजवळ अशक्य आहे. प्रश्न 5: एअरक्राफ्ट कॅरियर स्ट्राइक ग्रुप युद्ध कसे लढते?उत्तर: प्रश्न-6: USS जेराल्ड फोर्डला किनाऱ्यावर जावे लागले, तर अमेरिकन हल्ला टळेल का?उत्तर: इराण आणि अमेरिका यांच्यात युद्धासारखी परिस्थिती आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 20 फेब्रुवारी रोजी इराणला धमकी देत म्हटले की, पुढील 10 दिवसांत कळेल की अमेरिका एकतर इराणसोबत अणुकरार करेल किंवा लष्करी कारवाई करेल. अमेरिकन फ्लीट फोर्स कमांडचे प्रवक्ते लेफ्टनंट कमांडर डेव्हिड कार्टर यांच्या म्हणण्यानुसार, एका दुरुस्तीला सरासरी 30 मिनिटांपासून दोन तास लागतात. या दरम्यान बाकीची प्रणाली स्वतःहून काम करत राहते. डेव्हिड कार्टर यांचे म्हणणे आहे की, या समस्यांचा जहाजाच्या तयारीवर किंवा मिशनवर कोणताही परिणाम झालेला नाही. या अडचणी सामान्यतः वेगवेगळ्या ठिकाणांपुरत्या मर्यादित असतात आणि संपूर्ण सांडपाणी प्रणालीला प्रभावित करत नाहीत. यूएसएस जेराल्ड फोर्ड व्यतिरिक्त अमेरिकेने इराणला 4 बाजूंनी वेढले आहे. त्यामुळे जेराल्ड फोर्डच्या देखभालीसाठी जाण्याने अमेरिकेच्या मिशनवर विशेष फरक पडणार नाही... पॉइंट-1: अमेरिकन नेव्हीचे एअरक्राफ्ट कॅरियर USS अब्राहम लिंकन अरबी समुद्रात इराणच्या दिशेने पुढे सरकत आहे.पॉइंट-2: सर्वात संवेदनशील सागरी व्यापार मार्ग होर्मुझ स्ट्रेटजवळ अमेरिकेचे 2 डिस्ट्रॉयर- USS मिट्शर, USS मायकल मर्फी आणि 1 कॉम्बॅट शिप USS सांता बार्बरा तैनात आहेत.पॉइंट-3: इराणजवळ पर्शियन गल्फमध्ये अमेरिकेचे 2 कॉम्बॅट शिप USS तुलसा आणि USS कॅनबेरा तळ ठोकून आहेत. अमेरिकन नेव्हीचे हे डिप्लॉयमेंट इराणची राजधानी तेहरानपासून फक्त 931 किमी दूर आहे.पॉइंट-4: रेड सीमध्ये अमेरिकन नेव्हीचे डिस्ट्रॉयर USS डेलबर्ट डी. ब्लॅक तैनात आहे. याशिवाय काही अणु पाणबुड्या देखील या परिसरात आहेत, ज्यांचे स्थान अत्यंत गुप्त आहे. तिसरे विमानवाहू नौका यूएसएस जॉर्ज एच. डब्ल्यू. बुशला देखील मध्य पूर्वेत पाठवण्याची तयारी सुरू आहे. त्यासोबत किमान 2 गाईडेड मिसाईल डिस्ट्रॉयर देखील तैनात असतील. ……………. संशोधन सहकार्य – सोमेश शर्मा
Bopodi Land Scam : बोपोडी कृषी महाविद्यालय जमीन प्रकरणात कुळांची नावे लावल्याचा ठपका; १८ मार्च रोजी होणार पुढील सुनावणी.
PMC News : उत्पन्न मर्यादा आणि मिळकतकराच्या जाचक अटीमुळे अनेक गरजू रुग्ण योजनेपासून वंचित; स्थायी समितीच्या बैठकीकडे शहराचे लक्ष.
Ramtekdi MIDC Accident : कामाच्या ठिकाणी पाणी आणण्यासाठी गेलेल्या वैशाली भोसले यांच्यावर काळाचा घाला; क्रेनने उचललेली सळई थेट डोक्यात पडल्याने जागीच मृत्यू.
Pune News : मोठ्या बांधकामांवर आता सेन्सर बंधनकारक! धूळ प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेचे कठोर पाऊल
Pune News : पीएम २.५ आणि पीएम १० च्या वाढत्या धोक्यामुळे ५ हजार चौरस मीटरपेक्षा मोठ्या प्रकल्पांवर सेन्सर बंधनकारक; नियम मोडल्यास कारवाईचे संकेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन दिवसांच्या इस्त्रायलच्या दौऱ्यामुळे भारत आणि इस्त्रायल या दोन महत्त्वाच्या देशांमधील मैत्रीला एक वेगळे परिमाण मिळणार आहे हे निश्चित. आपल्या अकरा वर्षांच्या पंतप्रधानपदाच्या कालावधीमध्ये दुसऱ्यांदा इस्त्रायल दौऱ्यावर गेलेले नरेंद्र मोदी यांचे इरादे स्पष्ट दिसत आहेत.
Talegaon Dabhade News : २६ डिसेंबर २०२५ रोजी सादर केलेल्या प्रस्तावाला यश; २५०० अर्जांपैकी पहिल्या टप्प्यात ५२८ लाभार्थ्यांची निवड.

28 C