मुंबई: 'बिग बॉस मराठी'चा सहावा सीझनची रंगत वाढत चालली आहे. या सीझनमधील स्पर्धकांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळते. अशातच दर आठवड्याला स्पर्धेत मोठा ट्वि्स्ट पाहायला मिळतो. अशातच सहाव्या आठवड्यात 'बिग बॉस'च्या घराचा निरोप कोण घेणार? याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली होती. पण सहाव्या आठवड्यात झालेल्या एलिमिनेशननं अनेकांना धक्का बसला. घरातला 'चांगला माणूस' म्हणजेच खान्देश किंग सचिन कुमावत घराबाहेर पडला. सचिन एलिमिनेट होणार हे पाहून घरातील इतर स्पर्धकांच्या अश्रुंचा बांध फुटला. सचिन कुमावतचं एलिमिनेशन घरातील अनेकांसाठी धक्का होता.खान्देश किंग सचिन कुमावत घराबाहेर येताच सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. बिग बॉस मराठीमधला सहा आठवड्यांचा प्रवास माझ्यासाठी खास होता, असं सचिननं म्हटलं आहे. तसेच, त्याच्या बिग बॉसच्या घरातल्या प्रवासात दिलेल्या प्रेमासाठी त्यानं मनापासून धन्यवाद म्हटलं आहे.
Sonali Kulkrani Post : अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, तिच्या चुलत भावाचे निधन झाले आहे.
Tamannaah Bhatia विनीता सिंह यांच्या पॉडकास्टमध्ये बोलताना तमन्नाने आपल्या ब्रँडविषयी मनमोकळेपणाने विचार मांडले. ती म्हणाली, “मी स्वतःकडे ब्रँड सुरू करणारी सेलिब्रिटी म्हणून पाहत नाही.
Sushma Andhare post : भाजपची नवीन कार्यकरणी जाहीर होताच उबाठा पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एक्सवरून पोस्ट शेअर करत जोरदार टोला लगावला आहे.
मुंबईतील काही परिसर फेरीवालामुक्त ठेवणारच; महापालिका आयुक्तांनी दिले तीव्र कारवाईचे निर्देश
मुंबई: मुंबई महानगराची वाढती लोकसंख्या, वाहतूक कोंडी आणि पदपथांवरील अतिक्रमण यामुळे पादचाऱ्यांना सुरक्षितपणे चालणे अवघड होत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिका प्रशासनामार्फत अनधिकृत फेरीवाला मुक्त रस्ते व पदपथ धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. या धोरणाचा मुख्य उद्देश म्हणजे प्रमुख रस्ते, अरुंद पदपथ, उड्डाणपुलाखालील जागा तसेच रुग्णालये, शाळा व रेल्वे स्थानकांच्या आसपासचे परिसर अतिक्रमणमुक्त करून नागरिकांसाठी मोकळी व सुरक्षित सार्वजनिक जागा उपलब्ध करून देणे असून अनधिकृत फेरीवाल्यांमुळे रस्त्यावर व पदपथांवर होणारी गर्दी, वाहतुकीला होणारे अडथळे आणि अपघातांची शक्यता लक्षात घेता काही भाग 'फेरीवाला मुक्त क्षेत्र' म्हणून घोषित करण्यात येत असल्याचे महापालिका आयुक्त डॉ भूषण गगराणी यांनी सांगत कारवाई तीव्र करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.‘एफ दक्षिण’, ‘एफ उत्तर’ व ‘जी उत्तर’ विभाग कार्यालयांच्या हद्दीतील विविध परिसरांची महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी सोमवारी २३ फेब्रुवारी २०२६ रोजी अचानक पाहणी केली. विशेषतः दादर परिसरास भेट देऊन अनधिकृत फेरीवाला मुक्त मोहीम तसेच अनधिकृत बांधकामांच्या निष्कासन कारवाईचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी उप आयुक्त (परिमंडळ २) प्रशांत सपकाळे, उप आयुक्त (विशेष) (अतिरिक्त कार्यभार) विनायक विसपुते यांच्यासह संबंधित विभागांचे सहायक आयुक्त, अधिकारी व अभियंते उपस्थित होते.मुंबई महानगरातील रस्ते व पदपथ अनधिकृत फेरीवाला मुक्त करण्याची मोहीम सध्या प्रभावीपणे राबवण्यात येत आहे. अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणांवर कोणतीही हयगय न करता न्यायालयाच्या आदेशानुसार कठोर कारवाई केली जात आहे. सार्वजनिक रस्ते व पदपथ हे नागरिकांच्या सुरक्षित व मोकळ्या वावरासाठी असतात; त्यामुळे त्यावरील अतिक्रमणामुळे होणारे अडथळे दूर करण्यासाठी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. या अंतर्गत अतिक्रमण हटवणे, साहित्य जप्त करणे तसेच दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.अतिक्रमणे व अनधिकृत बांधकामांबाबत न्यायालयीन आदेशांचे काटेकोर पालन केले जाईल आणि अतिक्रमणविरोधी कारवाई अधिक कठोर केली जाईल, असे ठाम प्रतिपादन महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी केले आहे.अनधिकृत फेरीवाला मुक्त परिसर, अतिक्रमण निर्मूलन मोहीम ही केवळ दंडात्मक स्वरूपाची नसून नागरी सुव्यवस्था राखणे, वाहतूक सुरळीत ठेवणे आणि पादचाऱ्यांसाठी हक्कांचे संरक्षण करणे या व्यापक उद्देशाने राबवण्यात येत आहे. या मोहिमेसाठी मुंबईकर नागरिकांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे या कारवाईसाठी नागरिकांनी महानगरपालिका प्रशासनाला सक्रिय साथ द्यावी, असे आवाहनही गगराणी यांनी केले आहे.फेरीवाल्यांची उपजीविका हिरावून घेणे हा मोहिमेमागील हेतू नाही तर, मुंबई महानगरातील सार्वजनिक जागांचा योग्य वापर सुनिश्चित करणे हा आहे. त्यामुळे पात्र व नोंदणीकृत फेरीवाल्यांसाठी अधिकृत 'हॉकर्स झोन' निश्चित करणे, त्यांचे सर्वेक्षण करून पुनर्वसनाच्या योजना राबवणे आणि नियमनबद्ध पद्धतीने व्यवसायाची संधी उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येत आहे. त्यामुळे एकीकडे पादचाऱ्यांचे हक्क सुरक्षित राहतील, तर दुसरीकडे फेरीवाल्यांनाही नियमांच्या चौकटीत रोजगाराची संधी मिळेल. नागरिकांनीही या मोहिमेत सहकार्य करणे अपेक्षित आहे. जेणेकरून मुंबई महानगर अधिक लोकाभिमुख, सुरक्षित, शिस्तबद्ध आणि राहण्यायोग्य बनू शकेल, असेही गगराणी यांनी नमूद केले आहे.
Nagpur News : बारावी पेपरफूटी प्रकरणी आणखी दोघांना अटक
नागपूर : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळातर्फे सुरू असलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेतील रसायनशास्त्र विषयाच्या पेपरफूट प्रकरणी पोलिसांनी (२३ फेब्रुवारी) सोमवारी आणखी २ आरोपींना अटक केली. जुनैद मोहम्मद अब्दुल जावेद (रा. हसनबाग) आणि मुस्तफा खान (रा. भानखेडा) अशा या आरोपींची नावे असून हे दोघेही ट्यूशन क्लास संचालक आहेत.यापूर्वी पोलिसांनी निशिकांत सुखदेव मून आणि फरहान अख्तर फहीम अख्तर यांना अटक केली होती. सोमवारी त्यांना न्यायालयात हजर केले, जिथे न्यायालयाने निशिकांत आणि फरहान यांना २६ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. आतापर्यंत या प्रकरणात पाच जणांविरुद्ध एफआयआर दाखल झाली असून चार जणांना अटक करण्यात आली आहे. प्रकरणात एका अल्पवयीन विद्यार्थ्याचा सहभाग असल्याचेही समोर आले आहे.पोलिस सूत्रांनी सांगितले की, अटक करण्यात आलेले मुस्तफा खान आणि जुनैद मोहम्मद हे मोमिनपुरा परिसरातील एक्सलंट अकादमीशी संबंधित आहेत. पोलिस तपास करत आहेत की पेपर कुठून लीक झाला, त्यात बोर्डाचे अधिकारी समाविष्ट होते का, आणि प्रश्नपत्रिका राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही पोहोचल्या का.तपासात आरोपींचे कॉल डिटेल्स, डिजिटल पुरावे आणि व्हॉट्सऍप चॅट्स तपासले जात आहेत.सुरुवातीला खाजगी कोचिंग क्लास शिक्षक निशिकांत मून आणि विद्यार्थी फरहान यांना अटक करण्यात आली होती. आणखी एका विद्यार्थ्यावर प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका “टेक वन” व्हॉट्सऍप ग्रुपवर फॉरवर्ड केल्याचा आरोप आहे. या विद्यार्थ्याची शैक्षणिक पार्श्वभूमी लक्षात घेऊन न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला आहे.
Gold Vs Venom : सापाचं विष सोन्यापेक्षा कित्येक पटीने महाग, जाणून घ्या
मुंबई: जगभरात सापांबाबत उत्सुकता, आकर्षण आणि भीतीची भावना कायमच पाहायला मिळते. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, जगभरातील ३००० हून अधिक सापांच्या प्रजातींपैकी अवघे १० टक्के म्हणजे ३०० हून कमी प्रजाती विषारी असतात. ताइपनसारखे काही साप इतके विषारी असतात की त्यांच्या एका दंशाने १०० लोकांचा जीव जाऊ शकतो. एका रिपोर्टनुसार, सर्पदंशाने दरवर्षी १,४०,००० लोकांचा मृत्यू होतो. या डेटावरून समजून घेऊया सापाच्या विषापासून औषध बनवणं किती महत्त्वाचं आहे.अलिकडेच, गुजरातमधील धरमपूर येथील सर्प संशोधन संस्था औषधे विकसित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्यामुळे चर्चेत आली आहे. गुजरात सरकारच्या पाठिंब्याने चालणाऱ्या या संस्थेने अलीकडेच कोब्रा, कॉमन क्रेट आणि रसेल वाइपर सारख्या प्रजातींमधून चांगल्या दर्जाच्या विषाच्या ई-लिलावात खूपच जास्त किंमत मिळवली आहे. महत्त्वाचं म्हणजे यावरुन लक्षात येतं की सापाचं विष किती मौल्यवान असतं. सापांमध्ये हे विष कुठं तयार होतं आणि ते कसं काढलं जातं हे पाहूया.https://x.com/PTI_News/status/2025640160248172547?s=20सापाचं विष कसं काढलं जातं?साप चावल्याने मोठ्या संख्येने लोकांचा मृत्यू होता आणि हेच पाहून अँटीडॉट म्हणजे विषविरोधी औषध तयार करण्याची गरज वाढली आहे. Let's Talk Science च्या अनुसार, सापाच्या डोक्याच्या मागच्या भागातील ग्रंथींमध्ये विष तयार होतं आणि साप चावल्यानंतर विष समोरच्याच्या शरीरात प्रवेश करतं. जेव्हा विषविरोधी औषध तयार केलं जातं, त्यावेळी सापाचं विष अत्यंत सावधानतेने काढलं जातं. विष काढण्याच्या प्रक्रियेत सापाला कोणत्याही भांड्याला चावायला दिलं जातं. मग त्या भांड्यात सोडलेलं विष जमा केलं जातं. दुसऱ्या पद्धतीत सापाच्या तोंडातील विष फेकणाऱ्या जागेतून विष एकत्र केलं जातं.सोन्यापेक्षा सापाचं विष किती महाग असतं?फ्लोरिडा विश्वविद्यापीठानुसार, विषाचं प्रमाण सापाच्या विविध प्रजातींमध्ये वेगवेगळं असतं. जे १ मिलीग्रॅमपासून ८५० मिलीग्रॅम किंवा त्याहून अधिक असतं. काही सापांचं विष वेदनाशामक म्हणून आणि रक्त गोठण्यासाठी वापरले जाते.किंग कोब्राचं विष प्रोटीनयुक्त असतं. दीर्घकालीन वेदनांवर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांमध्ये या विषाचा वापर केला जातो. हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात महागडे विष असल्याचं म्हटलं जातं, ज्याची किंमत प्रति गॅलन १.५ लाख डॉलर आहे. स्मिथसोनियन मासिकाच्या मते, अँटीवेनमच्या एका डोसची किंमत १४,००० डॉलरपर्यंत पर्यंत असू शकते.आता कोरल आर ब्राउन सापांच्या विषाचा वापर अँटीव्हायरल, अँटीबॅक्टेरियल, अँटीवेनमच्या औषधांच्या निर्मितीमध्ये केला जातो. त्याच्या १ ग्रॅमची किंमत ४ हजार डॉलरपर्यंत असू शकते. काही विषाची किंमत एका ग्रॅममागे १२-१३ हजार डॉलरपर्यंत असू शकते. आता या विषाच्या किमतीची तुलना सोन्याशी केली तर विष कित्येक पटीने महाग आहे.१ ग्रॅम सोन्याची किंमत सध्या १६६-१६७ डॉलर आहे. म्हणजेच १३ हजार डॉलरमध्ये तब्बल ७८-७९ ग्रॅम सोनं खरेदी करता येईल. हे २४ कॅरेट सोन्याचा भाव आहे.
तीन वर्षांनंतर प्रथमच स्वीकारणार स्थायी समिती अध्यक्ष स्वीकारणार महापालिका अर्थसंकल्प
मुंबई: मुंबई महापालिकेचा सन २०२६-२७ चा अर्थसंकल्प येत्या बुधवारी मांडला जाणार असून तब्बल तीन वर्षांनतर महापालिका स्थायी समिती अध्यक्ष हे अर्थसंकल्प स्वीकारणार आहेत. प्रशासक कालावधीमध्ये महापालिका अतिरिक्त आयुक्त यांच्यावतीने प्रशासक असलेल्या आयुक्तांना अर्थसंकल्प सादर केला जात असे. परंतु आता महापालिका स्थापन होवून स्थायी समिती अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे महापालिका आयुक्त डॉ भूषण गगराणी हे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांना अर्थसंकल्प सादर करणार आहे. त्यामुळे आयुक्तांकडून तीन वर्षानंतर स्थायी समिती अध्यक्ष हे अर्थसंकल्प स्वीकारणार आहेत.मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प येत्या बुधवारी स्थायी समितीमध्ये सादर केला जाणार आहे. महापालिका आयुक्त डॉ भूषण गगराणी हे स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांना आपला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. तत्पूर्वी शिक्षण समिती अध्यक्ष राजेश्री शिरवडकर यांना उपायुक्त (शिक्षण) डॉ प्राची जांभेकर शिक्षण विभागाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.मुंबई महापालिकेची मुदत ७ मार्च २०२२ रोजी संपुष्टात आली. त्यापूर्वी ४ फेब्रुवारी २०२२ रोजी इक्बालसिंह चहल यांनी तत्कालिन स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांना अर्थसंकल्प सादर केला होता. त्यानंतर सन २०२३ पासून २०२५ पर्यंत सलग तीन वर्षे महापालिका प्रशासकांच्यावतीने अर्थसंकल्प मांडला जात आहे. अतिरिक्त आयुक्त प्रकल्प यांच्यावतीने प्रशासकांना अर्थसंकल्प सादर केला जात होता. त्यामुळे आता महापालिका अस्तित्वात आल्यामुळे आता तीन वर्षांनंतर प्रथमच शिक्षण समिती अध्यक्ष आणि स्थायी समिती अध्यक्ष यांना आयुक्तांच्यावतीने अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे.मागील अर्थसंकल्प हा ७४ हजार ४०० कोटी रुपयांचा होता. परंतु आता त्यातील अनेक पायाभूत विकास प्रकल्प मार्गी लागल्यामुळे आता या अर्थसंकल्पाचा आकार वाढला जावून तब्बल दहा हजार कोटींनी याचा आकार वाढला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे ८४ ते ८५ हजार कोटी रुपयांच्या घरात महापालिका अर्थसंकल्पाचा आकार वाढला जाण्याची दाट शक्यता आहे.
मुंबई महानगरपालिका सुधार समिती अध्यक्षपदी संध्या विपुल दोशी
मुंबई: मुंबई महानगरपालिका सुधार समिती अध्यक्षपदी संध्या विपुल दोशी (सक्रे) यांची यांची सोमवारी २३ फेब्रुवारी २०२६ रोजी बिनविरोध निवड करण्यात आली. पीठासीन अधिकारी महापौर रितू तावडे यांनी त्यांची निवड बिनविरोध झाल्याची घोषणा केली.सुधार समिती अध्यक्षपदासाठी शिवसेनेच्यावतीने संध्या विपुल दोशी (सक्रे) यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाला होता. तर प्रतिस्पर्धी पक्षाकडून उमेदवारी अर्ज प्राप्त न झाल्यामुळे सोमवारी झालेल्या सुधार समितीच्या बैठकीमध्ये संध्या दोशी यांची बिनविरोध निवड झाल्याचे पीठासीन अधिकारी महापौर रितू तावडे यांनी जाहीर केले. याप्रसंगी सुधार समितीचे सर्व सदस्य, सहआयुक्त (सुधार) संजोग कबरे, महानगरपालिका सचिव मंजिरी देशपांडे आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी सर्व सुधार समिती सदस्यांनी पुष्पगुच्छ देत त्यांना शुभेच्छा दिल्या.सुधार समिती अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये संध्या दोशी यांनी मुंबई महानगरपालिकेच्या मालमत्तांसाठी आकारण्यात येणारे भुईभाडे; मक्ता हक्क हस्तांतरणाअंतर्गत आकारण्यात येणारे हस्तांतरण अधिमुल्य तथा शुल्कः त्याचप्रमाणे, मक्ता भूभागांचा विकास तसेच पुनर्विकास करताना आकारण्यात येणारे एकवेळ अधिमूल्य, शुल्क, आकार, दंडनीय शुल्क, भुईभाडे, अतिरिक्त भुईभाडे रुपांच्या सतत होत असलेल्या अवमूल्यनामुळे नगण्य ठरू लागले आहे. ही सर्व आकारणी महागाई निर्देशांकाशी जोडून महागाई निर्देशांकामध्ये जशी वाढ होईल तशी त्यात वाढ करण्याचे धोरण अवलंबिल्यास महानगरपालिकेच्या उत्पन्नात एक निश्चित व शाश्वत वाढ होण्यास खूप मदत होईल, त्यादृष्टीने योग्य त्या उपाययोजना करण्याचा मी प्रयत्न करीन.मंबई महानगरपालिकेच्या अखत्यारितील भूभागांच्या व्यवस्थापनाचे काम मालमत्ता विभागामार्फत केले जाते. मुंबई महानगरपालिकेच्या भाडेतत्त्वावर मक्त्याने देण्यात आलेल्या बहुतांश मालमत्तांच्या नुतनिकरणासंदर्भात मी प्रयत्नशील राहिन. जेणेकरून, महानगरपालिकेच्या महसूलात वाढ होईल.विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली २०३४ अंतर्गत महानगरपालिकेच्या मालमत्तांचा पुनर्विकास करण्यात येतो. परंतु, जास्तीत जास्त लाभ विकासकाकडून मिळावा या उद्देशाने वारंवार विकासक बदलले जातात. परिणामी, पुनर्विकासाच्या कामात अडथळा येऊन महानगरपालिकेच्या इमारतींची स्थिती दिवसेंदिवस खालावत जात आहे आणि तेथील रहिवाशांना नवीन घरांपासून वर्षानुवर्षे वंचित राहावे लागत आहे. याकरिता प्रशासनाने पुनर्विकासाबाबत काही ठोस धोरण तयार करण्याची आवश्यकता आहे. जेणेकरुन, भूभागांचा विहित कालावधीत पुनर्विकास होणे शक्य होईल.असेही त्यांनी म्हटले आहे.मुंबई महानगरपालिकेतर्फे अलिकडे प्रथमच विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली २०३४ च्या विनियम १५ व विनियम ३३ (२०) (ब) अंतर्गत प्राप्त होणाऱ्या सदनिका अत्यल्प व अल्प उत्पन्न गटासाठी पारदर्शकपणे संगणकीय सोडतीद्वारे वितरित करण्याचा उपक्रम राबविण्यात आला आहे. हा उपक्रम अधिकतेने यशस्वी होऊन त्याद्वारे अधिकाअधिक सदनिकांचे वितरण होण्याकरिता योग्य त्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. जेणेकरुन, आर्थिकदृष्टया दुर्बळ व गरजू लोकांना मुंबईमध्ये हक्काची घरे उपलब्ध होऊ शकतील.
Stock Market Today: शेअर बाजारात खळबळ ! सेन्सेक्स ५२४ अंकांनी घसरला, निफ्टीदेखील लाल रंगात उघड
Stock Market Today: भारतीय शेअर बाजाराने आज आठवड्याची सुरुवात नकारात्मकतेने केली. प्रमुख बेंचमार्क निर्देशांक, बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी ५०, लाल रंगात उघडले.
Supriya Sule: सुप्रिया सुळे यांची याआधी निवड ऑपरेशन सिंदूरच्या शिष्टमंडळात करण्यात आली होती.
Sridevi: ‘हिम्मतवाला’पासून महिला सुपरस्टारपर्यंत… २०० चित्रपटांत झळकलेली श्रीदेवीची अजरामर कहाणी
Sridevi १३ ऑगस्ट १९६३ रोजी तामिळनाडूतील मीनमपट्टी येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील अय्यपन हे वकील होते, तर आई राजेश्वरी गृहिणी होत्या. अवघ्या सहा वर्षांच्या वयात त्यांनी चित्रपटांत बालकलाकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली. दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीत त्यांनी लहानपणीच आपली वेगळी ओळख निर्माण केली.
Maharashtra BJP : भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत पक्षातील नव्या पदाधिकाऱ्यांच्या नावांची घोषणा केली आहे.
Navnath Ban: नगरसेवक नवनाथ बन यांची भाजपच्या मुख्य प्रवक्ते पदी नियुक्ती
मुंबई: मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील कोंढा या छोट्याशा गावातून देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईपर्यंतचा प्रवास करणारे नवनाथ बन हे आज राजकीय संवाद आणि माध्यमविश्वातील एक प्रभावी नाव आहे. सध्या त्यांची भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते म्हणून नियुक्ती झाली असून, यापूर्वी ते २०२३ पासून भाजप महाराष्ट्राचे माध्यम विभाग प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळत होते.शैक्षणिक व वैचारिक जडणघडणनवनाथ बन यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण गावापासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या महात्मा बसवेश्वर हायस्कूल, कामठा येथे झाले. पुढे वडिलांच्या बदलीच्या नोकरीमुळे नांदेडहून बीड येथे स्थलांतर झाले. सततच्या भ्रमंतीमुळे विविध प्रदेश, संस्कृती आणि माणसं जवळून पाहण्याची संधी मिळाली.विद्यार्थी चळवळ आणि वक्तृत्वमहाविद्यालयीन जीवनातच नवनाथ बन यांचे प्रभावी वक्तृत्व विशेषत्वाने उठून दिसले. शेकडो विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या भाषणशैलीमुळे त्यांची नाळ अनाहूतपणे तरुणाईशी जोडली गेली.या काळात त्यांनी महाराष्ट्रातील अनेक नामांकित वक्तृत्व स्पर्धा जिंकल्या. याचबरोबर २००४ ते २००८ या काळात त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) मध्ये बीड शहरमंत्री म्हणून काम करत शिक्षणविषयक प्रश्नांवर सक्रिय लढा दिला. बीड जिल्हा कॉपीमुक्त व्हावा यासाठी विद्यार्थ्यांना एकत्र करून अभियान राबवण्यात त्यांचा महत्त्वाचा सहभाग राहिला. याच नेतृत्वगुणांमुळे स्वातंत्र्यवीर सावरकर महाविद्यालयात विद्यार्थी संसद सचिव म्हणून त्यांची निवड झाली.पत्रकारितेकडे वाटचालमहाविद्यालयीन शिक्षणानंतर मळलेली वाट नाकारत नवनाथ बन यांनी पत्रकारितेचा मार्ग निवडला. २००८ साली बीडमधून पत्रकारितेला सुरुवात करत दोन वर्षांत गावकरी आणि मराठवाडा नेता या दैनिकांमध्ये शहर व जिल्हा प्रतिनिधी म्हणून त्यांनी प्रभावी कामगिरी केली.'एबीपी माझा'मधील पत्रकारिता प्रवासजुलै २०१० मध्ये तत्कालीन ‘स्टार माझा’ (आताचे एबीपी माझा) या मराठी वृत्तवाहिनीत नवनाथ बन यांनी पत्रकारितेला सुरूवात केली. गेल्या जवळपास १५ वर्षांहून अधिक काळ ते या वाहिनीत निर्माता (Producer) या पदावर निष्ठेने कार्यरत राहिले.या काळात त्यांनी• नमो व्हर्सेस रागा• कोण होणार मुख्यमंत्री?• नगरपालिकेच्या नाक्यावरयांसारख्या गाजलेल्या कार्यक्रमांद्वारे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील लोकमानस समजून घेतले. लोकांच्या समस्या, अपेक्षा आणि प्रश्नांना व्यासपीठ मिळवून देण्याचे महत्त्वाचे काम त्यांनी केले. तरुणाईच्या करिअर ऑप्शन्सवर मान्यवरांसोबत सखोल चर्चा घडवून आणण्यातही त्यांचा मोठा वाटा राहिला.सांस्कृतिक आणि सामाजिक संवेदनशीलतापत्रकारितेत केवळ राजकारण नव्हे, तर सामाजिक आणि सांस्कृतिक भान जपणारा दृष्टीकोन नवनाथ बन यांची ओळख ठरली.पंढरपूरच्या वारीचे विशेष कव्हरेज असो किंवा ‘माझा कट्टा’ या कार्यक्रमातून राजकारण, कला, साहित्य व संस्कृती क्षेत्रातील दिग्गजांना विचारलेले परखड प्रश्न — यामुळे त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली.राजकीय संवादातील भूमिकापत्रकारितेतील दीर्घ अनुभव, जनमानसाची खोल समज आणि धारदार शब्दसामर्थ्य यामुळे नवनाथ बन यांनी भाजपमध्ये महत्त्वाची जबाबदारी स्वीकारली.• २०२३ पासून : भाजप महाराष्ट्र माध्यम विभाग प्रमुख• सध्या : भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्तेया भूमिकेतून ते पक्षाची भूमिका ठामपणे, मुद्देसूद आणि प्रभावीपणे मांडत आहेत.तरुणाईसाठी प्रेरणाकोंढा या छोट्याशा गावातून मुंबईसारख्या महानगरात येऊन, केवळ शब्दांच्या बळावर माध्यमविश्वात आणि राजकीय संवादात स्वतःची ओळख निर्माण करणारे नवनाथ बन हे आज तरुणाईसाठी प्रेरणास्थान आहेत.
Vijay Rashmika: पूल पार्टी ते कॅंडललाइट डिनर! विजय-रश्मिकाच्या लग्नसोहळ्याची रंगतदार सुरुवात
Vijay Rashmika विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीजवर काही खास क्षण शेअर केले आहेत. मित्र-मैत्रिणींसोबत मजा, खेळ आणि आनंदात हे प्री-वेडिंग फंक्शन साजरे होत असल्याचे दिसत आहे.
Trending: दोन आयएएस अधिकाऱ्यांच्या लग्नाची जोरदार चर्चा
मुंबई: आजच्या काळात जिथे लग्नांमध्ये कोट्यवधी रुपयांचा खर्च आणि बडेजाव केला जातो, तिथे २०२३ बॅचच्या दोन तरुण आयएएस अधिकाऱ्यांनी साधेपणाचा एक नवा आदर्श घालून दिला आहे. राजस्थानच्या अलवरमध्ये सेवेत असलेले एसडीएम माधव भारद्वाज आणि गुजरातच्या जामनगरमध्ये सेवेत असलेल्या एसडीएम अदिती वास बुधवारी विवाहबंधनात अडकले. कोणत्याही गाजावाजाशिवाय या जोडप्याने कोर्ट मॅरेज करून समाजाला मोठा संदेश दिला आहे. त्यांच्या या साधेपणाची सगळीकडेच चर्चा होत आहे.मसुरीचे रहिवासी असलेले माधव आणि उत्तर प्रदेशच्या बरेली येथील अदिती यांची भेट प्रशासकीय सेवेच्या प्रशिक्षणादरम्यान झाली होती. तिथेच त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. दोन्ही कुटुंबांच्या संमतीनंतर त्यांनी थाटामाटात लग्न करण्याऐवजी नोंदणीकृत विवाहाला पसंती दिली. त्यानुसार त्यांनी नोंदणी करत लग्न केले. त्यांच्या लग्नाचे फोटो ही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. शिवाय साधे पणाने केलेल्या या लग्नाचे कौतूक ही होत आहे.बुधवारी अलवरच्या जिल्हाधिकारी अर्पिता शुक्ला यांच्या उपस्थितीत या दोघांनी लग्नाची नोंदणी केली. यावेळी कोणतेही ढोल-ताशे किंवा व्हीआयपी पाहुणे नव्हते. केवळ दोन्ही बाजूंचे आई-वडील आणि भावंडांच्या उपस्थितीत त्यांनी एकमेकांना हार घालून विवाह विधी पूर्ण केले. माधव भारद्वाज यांनी अनेक आव्हानांवर मात करून यूपीएससीमध्ये ५३६ वी रँक मिळवली होती. तर अदिती यांनी पहिल्याच प्रयत्नात ५७ वी रँक पटकावली आहे. माधव भारद्वाज हे २०२३ बॅचचे अधिकारी आहेत. आयआयएममधून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले आहे. यूपीएससीमध्ये ५३६ वी रँक मिळवली आहे. लोकोमोटर दिव्यांगत्व असूनही जिद्दीने त्यांनी यश मिळवले आहे.तर अदिति वासने या उत्तर प्रदेशच्या आहेत. त्यांनी पहिल्याच प्रयत्नात ५७ वी रँक मिळवून बरेली जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय स्तरावर उंचावले. दिल्लीच्या मिरांडा हाऊसच्या त्या माजी विद्यार्थिनी आहेत. अलवरच्या मिनी सचिवालय परिसरात जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा विवाह पार पडला. केवळ रक्ताच्या नात्यातील जवळची माणसे या सोहळ्याचे साक्षीदार होती. प्रशासकीय जबाबदाऱ्या सांभाळतानाच त्यांनी अत्यंत गोपनीय आणि साध्या पद्धतीने हा विधी उरकला. उच्चशिक्षित आणि उच्च पदावर असलेल्या व्यक्तींनी घेतलेल्या या निर्णयामुळे सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Maharashtra Budget Session: विरोधकांकडून आज झिरवाळांविरोधात आंदोलन केलं जाणार आहे. तसंच झिरवाळांच्या राजीनाम्याची मागणी विरोधक लावून धरण्याची शक्यता आहे.
Sunetra Pawar Post : अजित पवार यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी एक्सवरून ट्वीट करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
Top 10 news:
‘अतिक आता जिवंत नाही. प्रयागराजमध्ये त्याची दहशतही संपली आहे, पण मी आजही भीतीत जगत आहे. माझ्या पतीला भरबाजारात घेरून मारणारा गुड्डू बमबाज आणि अतिकची पत्नी शाइस्ता परवीन आजपर्यंत पकडले गेले नाहीत. त्यांचे लोक आम्हाला धमक्या देतात. व्हिडिओ पाठवतात, ज्यात लिहिलेले असते - असा बदला घेऊ, जो चार लोक लक्षात ठेवतील. जोपर्यंत हे लोक फरार राहतील, तोपर्यंत माझ्या कुटुंबावर धोका कायम राहील.‘ 24 फेब्रुवारी ही जया पालच्या आयुष्यातील सर्वात वाईट तारीख आहे. तीन वर्षांपूर्वी याच दिवशी त्यांचे पती आणि पेशाने वकील असलेले उमेश पाल यांची दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडाचा सूत्रधार माफिया डॉन अतीक अहमद होता. उमेशच्या मृत्यूनंतर जया पालने अतीकसहित 10 लोकांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. 36 महिन्यांनंतरही खटल्याची सुनावणी पूर्ण होऊ शकलेली नाही. उमेशच्या हत्येत सामील असलेल्या 10 पैकी 6 आरोपींना ठार मारण्यात आले आहे. अतीकची पत्नी शाइस्ता, गुड्डू मुस्लिम यांच्याशिवाय शूटर अरमान आणि साबिर अजूनही पकडले गेलेले नाहीत. अतीक अहमदच्या मृत्यूनंतर त्याची 'IS-227 गँग' संपली आहे, पण धोका अजूनही टळलेला नाही. याच कारणामुळे 24 फेब्रुवारी 2023 पासून आतापर्यंत उमेशच्या घराच्या मुख्य गेटवर आणि खोल्यांच्या बाहेर 24 तास पोलीस तैनात असतात. यूपीमधील सर्वात चर्चित उमेश पाल खून प्रकरण 3 वर्षांनंतरही कुठे अडकले आहे, मारेकऱ्यांना शिक्षा होण्यासाठी आणखी किती वेळ लागू शकतो? या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी दैनिक भास्करची टीम प्रयागराजला पोहोचली. अतीक मेला, तरीही 'IS-227 गँग'ची भीती का कायम आहे?अतीकच्या मृत्यूनंतरही, पोलीस रेकॉर्डमध्ये नोंद असलेल्या 'IS-227 गँग'चे नाव पूर्णपणे संपले असे मानले जात नाही. या गँगवर हत्या, लुटमार, खंडणी, जमिनीवर कब्जा करणे आणि अपहरण यांसारखे अनेक गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनुसार, अतीक मारला गेल्यानंतर त्याचे नेटवर्क कमकुवत झाले आहे. तरीही, कायदेशीर रेकॉर्डमध्ये, जोपर्यंत या गँगशी संबंधित सर्व प्रकरणांचा निपटारा होत नाही, तोपर्यंत ती संपली असे मानले जात नाही. अतीकच्या गँगवर सुरू असलेला सर्वात मोठा खटला उमेश पाल हत्याकांडाचा आहे. प्रयागराजमधील धूमनगंज पोलीस ठाण्यापासून अवघ्या 200 मीटर अंतरावर सुलेम सराय परिसरात उमेश पालचे घर आहे. येथे 24 तास प्रादेशिक सशस्त्र कॉन्स्टेब्युलरी (PAC) आणि प्रयागराज पोलिसांचे 20 जवान तैनात असतात. 24 फेब्रुवारी रोजी ही सुरक्षा दुप्पट केली जाते. सुरक्षा तपासणी आणि प्रशासनाच्या परवानगीशिवाय कोणीही घरात प्रवेश करू शकत नाही. अतीक मारला गेला, मग इतकी कडक सुरक्षा का? यावर उमेशची पत्नी जया म्हणते, ‘अतीक नक्कीच मेला आहे, पण त्याच्या टोळीतील लोक आजही फरार आहेत. ते आमच्याकडून सूड घेऊ इच्छितात. माझ्यासमोर गुड्डू मुस्लिमने याच घरात बॉम्ब फेकला, ज्यामुळे माझे पती उमेश पाल आणि त्यांचे गनर राघवेंद्र यांचा मृत्यू झाला. मी गुड्डू मुस्लिमचा चेहरा कसा विसरू शकते?‘ ‘आमच्या सुरक्षेत कोणतीही कमतरता नाही, पण तरीही मनात नेहमीच भीती असते की काहीतरी वाईट घडू नये. अतीकची पत्नी शाइस्ता परवीन, शूटर साबिर आणि अरमान आजही आमच्यासाठी धोका आहेत. या गुन्हेगारांना कठोर शिक्षा मिळाली पाहिजे.‘ एका मिनिटाच्या व्हायरल व्हिडिओमध्ये उमेश हत्याकांडाचा खुलासा झाला उमेश पाल यांच्या मृत्यूनंतर घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडिओ क्लिपमध्ये २४ फेब्रुवारी २०२३ रोजी संध्याकाळी ४ वाजून ३० मिनिटांनी उमेश पाल कोर्टातून घरी परतताना दिसत होते. उमेश घरी पोहोचताच, गुन्हेगारांनी त्यांच्या गाडीवर गोळीबार सुरू केला. उमेश आपल्या एक गनर राघवेंद्र सिंह यांच्यासोबत घराकडे धावले. तेव्हा गुन्हेगारांनी त्यांच्यावर दोन बॉम्ब फेकले. दुसरे गनर संदीप निषाद गाडीत होते. गुन्हेगारांनी त्यांनाही गोळी मारली. तिघांनाही तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, जिथे उमेश पाल आणि संदीप निषाद यांनी प्राण गमावले. दुसरे गनर राघवेंद्र सिंह यांना लखनऊला रेफर करण्यात आले, पण त्यांचाही जीव वाचू शकला नाही. हत्याकांडानंतर विरोधकांनी सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. याला उत्तर देताना मुख्यमंत्री योगी यांनी विधानसभेत सांगितले की, ज्या अतिक अहमदविरोधात पीडित कुटुंबाने गुन्हा दाखल केला आहे, तो (अतिक) समाजवादी पक्षाने पोसलेला माफिया आहे. त्याची कंबर मोडण्याचे काम आमच्या सरकारने केले आहे. मी पुन्हा याच सभागृहात सांगत आहे की, या माफियाला मातीत गाडून टाकू. 15 एप्रिल 2023 रोजी अतिक आणि त्याचा भाऊ अशरफ यांची पोलीस संरक्षणात हत्या करण्यात आली. फोनवर धमकी मिळाली- ‘असा बदला घेऊ की 4 लोक लक्षात ठेवतील’संभाषणादरम्यान जयाने धमकीचे मेसेजही दाखवले, जे अज्ञात नंबरवरून पाठवले गेले होते. जयाचा आरोप आहे की अतीकच्या मृत्यूनंतर त्याच्या टोळीतील लोक दर महिन्याला धमकीचे मेसेज पाठवतात. जया म्हणते, ‘आम्हाला 3 वर्षांपासून धमक्या मिळत आहेत. घरी वृद्ध सासू आणि दोन मुले आहेत. धमक्यांमुळे मुलांना एकटे शाळेत पाठवत नाही. पोलीस सोबत असतील, तरच अभ्यासासाठी घराबाहेर जातात.‘ उमेशच्या घराशेजारी बुरखाधारी महिलांना पकडण्यात आलेउमेश पाल यांच्या 81 वर्षीय आई शांती पाल म्हणतात, ‘आम्हाला घाबरवण्यासाठी अतीकचे नातेवाईक धमक्या देत आहेत. आम्ही घरी काय करतो, कोण आम्हाला भेटायला येतं, मुले कधी बाहेर जातात, याची माहिती अतीकच्या टोळीपर्यंत नियमितपणे पोहोचवली जात आहे.‘ गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये बुरखा घातलेल्या चार महिलांना पोलिसांनी आमच्या घराशेजारी पकडले होते. त्यांनी चौकशीत सांगितले की, त्या अतीकच्या ड्रायव्हरच्या सांगण्यावरून आमच्याबद्दल चौकशी करत होत्या. ‘त्यांनी गल्लीत येऊन आमच्या घरातही घुसण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी त्यांना पकडले. या घटनेनंतर आमची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.‘ मुलाची आठवण करून शांती पुढे म्हणतात, ‘माझ्या मुलाने एका माफियाशी 18 वर्षे कायदेशीर लढा दिला. आज त्यांची तिसरी पुण्यतिथी आहे. उमेशची आठवण कदाचित कधीच कमी होणार नाही, पण आता त्यांच्यामागे कुटुंबाला सांभाळणारे कोणी नाही.‘ गुड्डू-शाइस्ताची अटक न होणे हे प्रकरण अडकण्याचे मोठे कारण उमेश पालच्या हत्येनंतर यूपी पोलिसांनी सर्वात आधी असदचा ड्रायव्हर अरबाजला धूमनगंजच्या नेहरू पार्कमध्ये 27 फेब्रुवारी रोजी चकमकीत ठार केले. त्यानंतर दुसऱ्या चकमकीत 6 मार्च रोजी उमेश पालवर पहिली गोळी झाडणारा विजय चौधरी उर्फ उस्मान मारला गेला. 13 एप्रिल रोजी झाशीमध्ये UP-STF ने माफिया अतीकचा मुलगा असद आणि शूटर गुलामचा एन्काउंटर केला. या प्रकरणात सामील असलेल्या 3 गुन्हेगारांच्या एन्काउंटरनंतर, 15 एप्रिल रोजी पोलीस कोठडीत अतीक अहमद आणि अशरफ यांची हत्या करण्यात आली. सध्या, उमेश पाल हत्याकांडात सामील असलेले 5-5 लाखांचे बक्षीस असलेले 3 शूटर गुड्डू मुस्लिम, साबिर आणि अरमान फरार आहेत. अतीक अहमदची पत्नी शाइस्ता परवीन देखील फरार आहे. तिच्यावर 50 हजार रुपयांचे बक्षीस आहे. शाइस्तासोबत अशरफची पत्नी झेनब फातिमा आणि बहीण आयशा नूरी देखील मोस्टवॉन्टेड यादीत आहेत. उमेश पाल हत्याकांडात आरोपींविरुद्ध कारवाईला उशीर झाल्याबद्दल आम्ही अलाहाबाद उच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील विक्रम सिंह यांच्याशी बोललो. ते म्हणतात, ‘जोपर्यंत पोलीस या हत्याकांडातील सर्व आरोपींना पकडून न्यायालयात हजर करत नाहीत, तोपर्यंत या प्रकरणाची सुनावणी पुढे जाणे कठीण होईल. गुड्डू मुस्लिम, अरमान आणि साबिर यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल झाले आहे. सध्या ट्रायल कोर्टात आरोप निश्चित होणे बाकी आहे.’ ‘जया पाल यांनी 10 लोकांविरुद्ध सुरुवातीची एफआयआर (FIR) दाखल केली होती. तीन वर्षांच्या आत आरोपींची संख्या वाढून 17 झाली आहे. आरोपींमध्ये अतीकचा मेहुणा डॉक्टर अखलाक अहमद, सदाकत खान, अतीकचे वकील खान सौलत हनीफ, विजय मिश्रा आणि अतीकचे मुलगे मोहम्मद उमर आणि अली अहमद यांचाही समावेश आहे. त्यांच्या अटकेनंतर हे प्रकरण पुराव्याच्या टप्प्यावर आले आहे.’ महाकुंभापर्यंत प्रयागराजमध्ये शाइस्ता लपली होती, गुड्डू भारतात नाहीगुड्डू मुस्लिम आणि शाइस्ता परवीनची शेवटची लोकेशन काय होती? त्यांच्याबद्दल आम्ही प्रयागराज पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याशी बोललो. ते सांगतात, ‘यूपी पोलीस आणि एसटीएफच्या पथकांनी गुड्डू मुस्लिम, शाइस्ता, साबिर आणि अरमानला पकडण्यासाठी आतापर्यंत १४ राज्यांमध्ये छापे टाकले आहेत. त्यांच्या शोधादरम्यान, आम्हाला अतीकच्या IS-227 टोळीतील एकूण १२१ गुन्हेगार आणि ७४ साथीदारांची माहिती मिळाली आहे. यामध्ये काही मोठे व्यापारीही सामील आहेत. त्यांची चौकशी सुरू आहे.' ‘नोव्हेंबर 2025 रोजी आम्हाला माहिती मिळाली की गुड्डू मुस्लिम बनावट पासपोर्टच्या मदतीने दुबईला पळून गेला आहे. कोलकाता विमानतळावरील इमिग्रेशन रेकॉर्डच्या तपासणीत असे समोर आले आहे की, 6 डिसेंबर 2024 रोजी सय्यद वसीमुद्दीन नावाच्या एका व्यक्तीने एतिहाद एअरलाइन्सचे विमान पकडले होते. त्याच्या पासपोर्टवरील फोटो गुड्डू मुस्लिमशी खूप जुळत होता. मात्र, सध्या याची चौकशी सुरू आहे.' पोलिसांच्या माहितीनुसार, फेब्रुवारी 2025 पर्यंत शाइस्ता परवीनचे शेवटचे लोकेशन प्रयागराजमध्ये मिळाले होते. नंतर पोलिसांना माहिती मिळाली की ती महाकुंभ मेळ्यादरम्यान प्रयागराजमधून पळून पश्चिम बंगालमध्ये गेली आहे. आतापर्यंत तिचे लोकेशन शोधता आलेले नाही. शाइस्ता व्यतिरिक्त, टोळीतील दोन महिला सदस्य रुबी उर्फ झैनब (अशरफची पत्नी) आणि आयशा नूरी (अतीकची बहीण) देखील फरार आहेत. दोघींवर 25 हजार रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. उमेश पाल यांना आमदारकीची निवडणूक लढवायची होतीसाल 2004 ची गोष्ट आहे, त्यावेळी अतीक अलाहाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघातून आमदार होता. त्याने 1989 नंतर सलग 5 निवडणुका जिंकल्या होत्या. अतीक खासदार झाल्यामुळे ही जागा रिक्त झाली. 2004 मध्ये अतीकने आपला भाऊ अशरफ याला निवडणुकीच्या रिंगणात उतरवले, पण बसपा उमेदवार राजू पाल यांनी अशरफला 4 हजार मतांनी हरवले. अशरफ निवडणूक हरल्याने अतीक संतापला. 25 जानेवारी 2005 रोजी राजू पाल यांच्या ताफ्यावर हल्ला झाला. राजू पाल यांना अनेक गोळ्या लागल्या, तेव्हा उमेश पाल यांनीच त्यांना रुग्णालयात पोहोचवले होते. डॉक्टर राजू पाल यांना वाचवू शकले नाहीत. शवविच्छेदनात त्यांच्या छातीतून 19 गोळ्या काढण्यात आल्या होत्या. राजू पाल यांच्या हत्येनंतर उमेश पाल यांचे नाव चर्चेत आले. त्यांना या प्रकरणात मुख्य साक्षीदार बनवण्यात आले. असे सांगितले जाते की, अतीकने उमेशला अनेक वेळा फोन करून केस मधून बाजूला होण्यास सांगितले. जीवे मारण्याची धमकी दिली. उमेश न ऐकल्याने 28 फेब्रुवारी 2006 रोजी त्याचे अपहरण केले. त्यांना रात्रभर मारहाण केली. विजेचे धक्के दिले. मनासारखी साक्ष देण्यासाठी त्यांना छळण्यात आले. यानंतर त्यांना सोडून देण्यात आले. 2007 मध्ये अतीक आणि अशरफ यांच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर उमेश पाल राजकारणात गेले. 2006 ते 2012 पर्यंत बसपमध्ये होते. नंतर समाजवादी पक्षात सामील झाले. 2022 मध्ये विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या पत्नी जया पाल यांच्या मते, उमेश प्रयागराजच्या फाफामऊ मतदारसंघातून आमदारकीची निवडणूक लढवू इच्छित होते. राजू पाल हत्याकांडातील साक्षीदार असल्यामुळे उमेश आधीपासूनच अतीक टोळीच्या निशाण्यावर होते. 24 फेब्रुवारी 2023 रोजी त्यांची हत्या करण्यात आली. उमेशच्या मृत्यूनंतर अतीकचे साम्राज्य संपलेउमेश पालच्या हत्येपूर्वी अतीकवर हत्या, हत्येचा कट, खंडणी आणि अपहरण यांसारखे सुमारे 60 गुन्हे दाखल होते. अतीकने राजकारणातही वेगाने प्रगती केली. 2012 मध्ये त्याचा राजकीय प्रभाव इतका वाढला होता की त्याने विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी अलाहाबाद उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला, तेव्हा उच्च न्यायालयाच्या 10 न्यायाधीशांनी स्वतःला सुनावणीपासून दूर ठेवले. 11 व्या न्यायाधीशांनी सुनावणी केली आणि अतीक अहमदला जामीन मिळाला. अतीकने एकदा लोकसभा आणि 5 वेळा विधानसभा निवडणूक जिंकली. 2004 मध्ये त्याने फूलपूर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली. या काळात दिलेल्या प्रतिज्ञापत्रात अतीकने आपली मालमत्ता 3.36 कोटी रुपये असल्याचे सांगितले होते. 2012 मध्ये अतीकने अलाहाबाद पश्चिम मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली, तेव्हा त्याची संपत्ती 20.79 कोटी रुपये झाली. 2018 मध्ये फूलपूर जागेवर पोटनिवडणूक झाली. यात अतीकने आपली संपत्ती 25.50 कोटी रुपये असल्याचे सांगितले. 2019 मध्ये अतीकने पंतप्रधान मोदींविरोधात वाराणसी मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवली. ही त्याची शेवटची निवडणूक होती. उमेश पालच्या हत्येत नाव आल्यानंतर अतीकचे साम्राज्य कोसळायला सुरुवात झाली. सरकारच्या मते, गेल्या 3 वर्षांत अतीकच्या सुमारे 3000 कोटी रुपयांच्या बेकायदेशीर मालमत्तांवर कारवाई करण्यात आली आहे.
Pune: पुण्यातील 'या'वाहतूक मार्गात बदल; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले निर्देश
पुणे: पंडित प्रदिप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेचे मौजे रामलिंग रोड, शिरुर येथे आयोजन करण्यात आलं असून २४ फेब्रुवारी ते २ मार्च २०२६ या कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत शिरुर ते पाबळ रोडवरील (राज्य महामार्ग क्र.५४) वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी आदेश जारी केले आहेत.या आदेशानुसार हा कार्यक्रम मौजे रामलिंग, ता. शिरुर येथे होत असून, या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी येणाऱ्या भक्तगणाच्या सुरक्षितता व वाहतूक व्यवस्थापनाच्या दृष्टीने वाहतूक वळविण्यात येणार आहे. भक्तगणांना आपली वाहनं वाहनतळ ठिकाणी पार्क करुन कार्यक्रम स्थळी पायी जाता येणार आहे.वाहतूक मार्गात बदल...पाबळ रोड, शिरुररोडवरुन रामलिंगकडे जाणारी वाहतूक अग्निशामक केंद्र चौक, शिरुर येथून नवीन नगरपालिका रोड-जुना अहिल्यानगर पुणे हायवे रोड-बरला आर्टस शेजारील बगाड रोड ते बैलगाडा शर्यत घाट चौक, रामलिंग या मार्गे रामलिंगकडे जातील.मौजे रामलिंगकडून शिरुरकडे जाणारी वाहतूक बैलगाडा शर्यत घाट चौक, रामलिंग बगाड रोड ते बरला आर्टस शेजारुन जुना पुणे अहिल्यानगर हायवे रोडला मिळून शिरुरमध्ये जाईल. नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावं, असं आवाहन जिल्हाधिकारी डुडी यांनी केलं आहे.
Mira-Bhayander Police Recruitment: पोलीस भरतीदरम्यान तरुणाला रंगेहाख पकडलं, नेमकं घडलं काय?
मुंबई: सध्या अनेक ठिकाणी पोलीस भरती सुरू आहे. दरम्यान मीरा भाईंदरमध्ये सुरू असलेल्या पोलीस भरती प्रक्रियेत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथे पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान मैदानी चाचणीपूर्वीच उत्तेजक द्रव्य (ड्रग्ज) घेणाऱ्या एका उमेदवाराला पोलिसांनी रंगेहाथ पकडलं आहे.बारामतीचा रहिवासी असलेल्या साहिल अवघडे हा ताकद वाढवण्यासाठी इंजेक्शनचा आधार घेत होता. पण सीसीटीव्हीमध्ये हा प्रकार कैद झाला. पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करत या उमेदवाराला ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे.या घटनेनंतर आता पोलीस भरती प्रक्रियेतील पारदर्शकतेवर आणि उमेदवारांच्या वाढत्या हलगर्जीपणावर मोठी चर्चा सुरू झाली आहे.
Pune: पुण्यात स्पा सेंटरवर पोलिसांची धाड; पळून जाण्याच्या नादात महिलेचा...
पुणे: पुण्यातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या विमाननगर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील रूट स्पा सेंटरवर पोलिसांनी छापा टाकला. त्यानंतर मॅनेजरसह महिलेनं पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी खिडकीतून उडी मारण्याच्या प्रयत्नात महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर स्पा सेंटर मधील मॅनेजर गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, विमाननगर येथील रूट स्पा मध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सोमवारी या ठिकाणी छापा टाकला.पोलिसांची टीम स्पा सेंटरमध्ये आल्याची माहिती मिळताच कर्मचाऱ्यांची मोठी पळापळ झाली आणि गोंधळ निर्माण झाला. या भीतीपोटी एका महिलेने आणि स्पाच्या मॅनेजरने इमारतीच्या खिडकीतून खाली उडी मारली.महिलेचा जागीच मृत्यू, मॅनेजरची प्रकृती चिंताजनकइमारतीच्या उंचावरून खाली पडल्यामुळे संबंधित महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर,मॅनेजर या अपघातात गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. अद्याप मृत महिला आणि जखमी मॅनेजरची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. पुण्यात गेल्या काही दिवसांपासून स्पा सेंटरच्या नावाखाली चालणाऱ्या बेकायदेशीर कृत्यांवर पोलिसांनी कडक नजर ठेवली आहे. परंतु,या कारवाई दरम्यान घडलेल्या महिलेच्या मृत्यू प्रकरणामुळे पोलीस प्रशासनासमोर आता तपासाचे नवीन आव्हान उभे राहिले आहे.
मेक्सिकोचा ड्रग्ज लॉर्ड एल मेंचो मारला गेला आहे. अमेरिकेने त्याच्यावर अंदाजे 136 कोटी रुपयांचे बक्षीस ठेवले होते. त्याने पोलिसांत नोकरी केली... कधीही दारूला हात लावला नाही... पण अमेरिकेच्या रस्त्यांना फेंटॅनिल आणि कोकेनच्या विषाने भरले. त्याच्या मृत्यूनंतर संपूर्ण मेक्सिकोमध्ये हिंसाचार आणि जाळपोळीच्या बातम्या येत आहेत. अखेर एल मेंचो कोण होता, तो कसा मारला गेला आणि त्याच्यानंतर मेक्सिकोच्या ड्रग्ज साम्राज्याचे काय होईल; हे जाणून घेऊया आजच्या एक्सप्लेनरमध्ये... प्रश्न-1: एल मेंचो कोण होता आणि त्याचे ड्रग्ज कार्टेल किती शक्तिशाली आहे? उत्तर: मेक्सिकोचा सर्वात मोठा ड्रग्ज माफिया एल मेंचोची कहाणी कोणत्याही फिल्मी खलनायकापेक्षा कमी नाही… प्रश्न-2: एल मेंचोवर अमेरिकेने 136 कोटींचे बक्षीस का ठेवले होते? उत्तर: मेक्सिकोच्या जनरल प्रॉसिक्युटर ऑफिसने सप्टेंबर 2011 मध्ये एल मेंचोसाठी अटक वॉरंट जारी केले आणि 20 लाख मेक्सिकन पेसोचे बक्षीस ठेवले. 2014 नंतर अमेरिकेतही एल मेंचोवर अनेक खटले सुरू झाले. यादरम्यान, अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने एल मेंचोवर 1 कोटी डॉलरचे बक्षीस ठेवले, जे डिसेंबर 2024 मध्ये वाढवून 1.5 कोटी डॉलर म्हणजेच अंदाजे 136 कोटी रुपये करण्यात आले. एल मेंचोवर एवढे मोठे बक्षीस ठेवण्याची अनेक कारणे आहेत… प्रश्न-3: ड्रग लॉर्ड एल मेंचोला मेक्सिकोच्या सैन्याने कसे मारले? उत्तर: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मेक्सिको सरकारला धमकी दिली होती की जर त्यांनी त्यांच्या देशातील ड्रग माफियांना रोखले नाही तर अमेरिका स्वतः लँड स्ट्राइक करेल. तेव्हापासून मेक्सिको सरकारवर ड्रग्ज माफियांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा दबाव होता… प्रश्न-4: एका ड्रग माफियाच्या मृत्यूनंतर संपूर्ण मेक्सिकोमध्ये हिंसाचार कसा उसळला? उत्तर: मेन्चोच्या मृत्यूची बातमी समोर येताच त्याचे समर्थक शस्त्र घेऊन रस्त्यावर उतरले. अनेक गाड्यांना आग लावण्यात आली. परिस्थिती बिघडत असल्याचे पाहून जलिस्कोचे गव्हर्नर पाब्लो लेमुस यांनी लोकांना घरातच राहण्याचे आवाहन केले आहे. अनेक राज्यांमध्ये शाळा बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्ष क्लाउडिया शीनबाम यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर देशाच्या सुरक्षा दलांची प्रशंसा केली आहे आणि शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. मेन्चोच्या मृत्यूनंतर हिंसाचार भडकण्याची 2 मुख्य कारणे आहेत… 1. आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न: CJNG कार्टेल आणि मेन्चोचे समर्थक रस्त्यावर येऊन दाखवू इच्छितात की ते कमकुवत झालेले नाहीत, जेणेकरून लोकांमध्ये त्यांची भीती अजूनही कायम राहील. त्याचबरोबर ते सरकारला हे देखील सांगू इच्छितात की त्यांच्या नेत्याला मारल्यावर ते शांत बसणार नाहीत. दुसरे कार्टेल CJNG च्या क्षेत्रावर कब्जा करू नये, यासाठी ते हल्ल्याच्या तयारीत आहेत. रस्ते बंद करून CJNG आपली ताकद दाखवत आहे. 2. कार्टेलचा नेता बनण्याची लढाई: मेन्चोने मरण्यापूर्वी आपल्या वारसदाराची घोषणा केली नव्हती. एल मेंचोचा भाऊ आणि मुलगा 'एल मेन्चिटो' अमेरिकन तुरुंगात आहेत. पत्नी गोन्झालेझ अनेकदा तुरुंगात जाऊन आली आहे आणि आता संघटनेत फारशी सक्रिय नाही. एक दुसरी मुलगी जेसिकाला 2020 मध्ये वॉशिंग्टनमध्ये अटक करण्यात आली होती, परंतु 2022 मध्ये ती मुक्त झाली आणि तेव्हापासून तिच्या ठिकाणाबद्दल कोणालाही माहिती नाही. अशा परिस्थितीत कार्टेलमध्ये नवीन नेत्यावरून वाद सुरू आहे. प्रश्न-5: माजी ड्रग लॉर्ड एल चापो नंतर काय झाले होते, इतिहासाची पुनरावृत्ती होईल का? उत्तर: एल मेंचोने ज्याच्या मार्गदर्शनाखाली ड्रग्जचा खेळ समजून घेतला होता, तो होता जोआकिन गुझमान उर्फ एल चापो… अल मेंचो नंतर काय होईल? सुरक्षा विश्लेषक डेव्हिड सॉसेडो यांच्या मते, जर अल मेंचोच्या नातेवाईकांनी कार्टेलवर नियंत्रण मिळवले, तर हिंसाचार सुरूच राहील. वेगवेगळे छोटे कार्टेल संपूर्ण व्यवसायावर ताबा मिळवण्यासाठी लढतील. एल चापोच्या अटकेनंतर सिनालोआ कार्टेलमध्येही असेच घडले होते. डीईएचे माजी प्रमुख माईक विगिल यांच्या मते, एल मेंचो एका हुकूमशहासारखा काम करत होता. तो नसल्यामुळे कार्टेलची वाढ मंदावेल. ते त्यांचे शत्रू सिनालोआ कार्टेलसमोर कमकुवत होतील, जे आधीच अंतर्गत संघर्षाचा सामना करत आहेत. जर अमेरिका आणि मेक्सिकोने एकत्र काम केले, तर त्यांच्यासाठी ड्रग्ज माफियांना संपवण्याची ही एक चांगली संधी असेल. प्रश्न-6: फिफा 2026 च्या यजमानांमध्ये मेक्सिकोदेखील आहे, याचा काही परिणाम होईल का? उत्तर: जून-जुलै 2026 मध्ये फिफा विश्वचषक अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिकोमध्ये होणार आहे. ही जगातील फुटबॉलची सर्वात मोठी स्पर्धा आहे. मेक्सिकोमध्ये एकूण 13 सामने खेळले जातील. जिथे मेन्चोला पकडण्यात आले होते, त्या जलिस्को शहराची राजधानी ग्वाडालाहारामध्ये फिफा विश्वचषकाचे 4 सामने होणार आहेत. रविवार रात्रीच्या हिंसाचारानंतर येथे शांतता पसरली आहे. लोक घरांमध्ये बंद आहेत. हिंसाचारामुळे मेक्सिकोमध्ये रविवारी 4 उच्च-स्तरीय फुटबॉल सामने स्थगित करण्यात आले. बुधवारी मेक्सिकोच्या राष्ट्रीय संघाचा आइसलँडविरुद्धचा मैत्रीपूर्ण सामनाही स्थगित होऊ शकतो. अशा परिस्थितीत, सोशल मीडियावर फुटबॉल चाहते विश्वचषकादरम्यान मेक्सिकोमधील सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त करत आहेत. मात्र, आतापर्यंत फिफाकडून सामन्याचे ठिकाण बदलण्याबाबत कोणतेही निवेदन आलेले नाही. येत्या काही दिवसांत हिंसाचाराची परिस्थिती पाहून कोणताही निर्णय घेतला जाईल. संशोधन सहकार्य: सोमेश शर्मा
SPPU News : शुक्रवारी होणाऱ्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मोठा फैसला; अधिसभा सदस्य आणि विद्यार्थी संघटना आक्रमक पवित्र्यात.
Pune News : अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी दिले तातडीच्या सर्वेक्षणाचे आदेश; निकृष्ट कामाचा अहवाल सादर करण्याचे निर्देश.
PMC News : स्थायी समितीनंतर आता सहा विषय समित्यांवरही भाजपचे वर्चस्व; संख्याबळाअभावी राष्ट्रवादीला उमेदवारी अर्जच दाखल करता आला नाही.
Purandar Airport : सिडकोचा असणार मोठा वाटा; पुरंदरच्या ३ हजार एकर जमिनीसाठी ६ हजार कोटींचा मोबदला थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार.
प्रयागराजमधील माघ मेळ्याच्या वेळी शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांना तेथे स्नानास बंदी करून त्यांना आणि त्यांच्या शिष्यांना हुसकावून लावण्याचा प्रकार घडला होता. त्यातून शंकराचार्य विरुद्ध योगी आदित्यनाथ असा संघर्ष निर्माण झालेला आहे.
Anurag Thakur : राजकारणाचे शुद्धीकरणासाठी प्रतिभावान तरुणांची गरज; अनुराग सिंह ठाकूर यांचे प्रतिपादन
Anurag Thakur : १५ व्या भारतीय छात्र संसदेचा दिमाखदार समारोप; राजकारणात तर्क आणि तथ्यांच्या आधारावर काम करण्याचे अनुराग ठाकूर यांचे आवाहन.
Hanumant Pawar Attack : स्टुडिओमधील कार्यक्रमानंतर तुषार दामगुडे आणि हनुमंत पवार यांच्यात बाचाबाची; पिस्तुलाचा धाक दाखवल्याचा पवारांचा दावा, स्वारगेट पोलिसांत धाव.
Pune Crime : स्पा सेंटरवर पोलिसांचा थरारक छापा; पळताना पहिल्या मजल्यावरून उडी, दोघे गंभीर
Pune Crime : अहिल्यानगर रोडवरील 'द रुटस् स्पा' मध्ये पोलिसांचा छापा; अटकेच्या भीतीने गॅलरीतून खाली उडी मारल्याने मॅनेजर आणि महिला गंभीर जखमी.
Someshwar Sugar Factory : १०७ दिवसांत १० लाख ७ हजार मेट्रिक टनांचा टप्पा पूर्ण; ११ लाख ६४ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन घेत सोमेश्वरची घोडदौड सुरूच.
दखल : पाकिटावर ‘धोक्याची’ सूचना?
सार्वजनिक आरोग्य मानवी हक्काचा विषय आहे. ग्राहकांना आपण विकत घेत असलेला पदार्थ आरोग्यदायी आहे की हानिकारक हे जाणून घेण्याचा अधिकार आहे. पाकीटबंद पदार्थांवर ‘धोक्याची सूचना’ अनिवार्य करणे गरजेचे आहे.
Supriya Sule : पुरंदर तालुक्यात संपूर्ण टोलमाफी द्या! सुप्रिया सुळेंनी थेट नितीन गडकरींना धाडलं पत्र
Supriya Sule : सासवड-जेजुरी दरम्यानच्या बेलसर टोलनाक्यावर पुरंदरवासीयांना १००% सूट मिळावी; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना लिहिलं पत्र.
Shirur Crime : पाबळमध्ये दिवसाढवळ्या चोरीचा थरार! घरमालक लग्नाला गेले अन् चोरट्यांनी घरच साफ केलं
Shirur Crime : मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून कपाटातील दागिन्यांवर डल्ला; शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल.
Junnar News : २६ फेब्रुवारीला मंदिरात लकी ड्रॉ पद्धतीने टोकन वाटप; जुन्नर, आंबेगावसह ५ तालुक्यांतील बैलगाडा मालकांचा सहभाग वाढणार.
Daund News : शेतातील महिलांनी घटना पाहिली आणि कुटुंबाला दिली माहिती; रुग्णालयात नेण्यापूर्वीच शेतकऱ्याची प्राणज्योत मालवली.
Baramati News : बारामतीचा टोमॅटो मातीमोल! साडेतीन कोटींचा फटका; शेतकऱ्यांच्या डोळ्यात आलं पाणी
Baramati News : पुणे-मुंबईसह परराज्यात जाणारा बारामतीचा टोमॅटो कवडीमोल दरात विक्री; साडेतीन कोटींच्या उलाढालीवर पाणी फिरले.
Cyber Crime : इंस्टाग्रामवर ओळख वाढवून महागड्या भेटीचे आमिष; विश्वास संपादन करून तरुणीला आर्थिक विळख्यात ओढले.
Gas Tanker Brake Fail : २१ टन प्रोपेलीन गॅसवाहू टँकरचा बोरघाटात ब्रेक फेल; चालकाने भिंतीला धडक देऊन टँकर थांबवला, जीवितहानी टळली.
RTE Admissions PCMC : २५ टक्के राखीव कोटा आणि शिक्षण शुल्क वाचवण्यासाठी खासगी संस्थांची नवी शक्कल; मूळ उद्देशालाच हरताळ फासल्याचा आरोप.
Bhosari Accident : इंद्रायणी नगरमध्ये भीषण अपघात! टेम्पोच्या धडकेत १९ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत
Bhosari Accident : सकाळी कामावर जाताना टीप टॉप चौकासमोर घडली घटना; अज्ञात टेम्पो चालकाचा पोलीस शोध घेत आहेत.
Kanhe Railway Station : औद्योगिक आणि शैक्षणिक विस्तार होऊनही प्रवासी सुविधेच्या नावाखाली ठणठणाट; पिण्याच्या पाण्याची आणि स्वच्छतेची भीषण टंचाई.
Rang Panchami 2026 : होळीच्या उत्सवात रासायनिक रंगांना फाटा; ४० रुपयांपासून ५०० रुपयांपर्यंतच्या हर्बल रंगांना पिंपरीत मोठी मागणी.
Dahiwadi Nagar Panchayat : विकासासोबतच पर्यावरणाचा समतोल राखत दहिवडीने मारली बाजी; मुंबईतील दिमाखदार सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते गौरव.
दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, २४ फेब्रुवारी २०२६
पंचांगआज मिती फाल्गुन शुक्ल सप्तमी ०७.०४ पर्यंत नंतर अष्टमी शके १९४७.चंद्र नक्षत्र कृतिका, योग ऐद्र ०७.२३ पर्यंत नंतर वैधृती चंद्र राशी वृषभ. भारतीय सौर ५ फाल्गुन शके १९४७. मंगळवार दिनांक २४ फेब्रुवारी २०२६. मुंबईचा सूर्योदय ०७.०१ मुंबईचा सूर्यास्त ०६.४२ मुंबईचा चंद्रोदय ११.३९ मुंबईचा चंद्रास्त ०१.३२ उद्याची राहू काळ ०३.४७ ते ०५.१४,दुर्गाष्टमी,कृत्तिका वर्जदैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)
Satara News : डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली साताऱ्यात बेमुदत आंदोलन सुरू; ९८७६ पैकी हजारो प्रकल्पग्रस्त अद्यापही न्याय मिळण्याच्या प्रतीक्षेत.
Dada Bhuse : नाशिकमध्ये पार पडला राज्यस्तरीय उल्लास मेळावा; सातारा जिल्ह्यातील नवसाक्षरांचा आणि स्वयंसेवकांचा गौरव.
WI vs ZIM : २५५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना झिम्बाब्वेची दाणादाण; गुडकेश मोती आणि अकील हुसेनच्या फिरकीसमोर फलंदाजांनी टेकले गुडघे.
विंडीजचा झिम्बाब्वे विरुद्ध मोठा विजय
मुंबई : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर ८ फेरीत वेस्ट इंडिज विरुद्ध झिम्बाब्वे हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरू आहे. नाणेफेक जिंकून झिम्बाब्वेने गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या वेस्ट इंडिजने हेटमायर आणि पॉवेलच्या फटकेबाजीच्या जोरावर २० षटकांत सहा बाद २५४ धावा केल्या. धावांचा पाठलाग करणाऱ्या झिम्बाब्वेचा डाव १७.४ षटकांत १४७ धावांत आटोपला. वेस्ट इंडिजचा १०७ धावांनी दणदणीत विजय झाला. विंडीजकडून ३४ चेंडूत ७ षटकार आणि ७ चौकार मारत ८५ धावा करणारा शिमरॉन हेटमायर सामनावीर झाला.झिम्बाब्वेची फलंदाजीझिम्बाब्वेकडून तदिवानाशे मारुमणीने १४, ब्रायन बेनेटने ५, डायन मायर्सने २८, रायन बर्लने शून्य, सिकंदर रझाने २७, टोनी मुनयोंगाने १४, ताशिंगा मुसेकिवाने शून्य, ब्रॅड इव्हान्सने ४३, ग्रॅमी क्रेमरने शून्य, ब्लेसिंग मुजराबानीने शून्य, रिचर्ड नगारावाने नाबाद ७ धावांचे योगदान दिले. वेस्ट इंडिजकडून गुडाकेश मोतीने ४, अकील होसेनने ३, मॅथ्यू फोर्डेने २, जेसन होल्डरने १ विकेट घेतली.https://prahaar.in/2026/02/23/west-indies-cross-250-run-mark-thanks-to-hetmyer-and-powell/वेस्ट इंडिजची फलंदाजीवेस्ट इंडिजकडून ब्रँडन किंगने ९, शाई होपने १४, हेटमायरने ८५, पॉवेलने ५९, शेरफेन रुदरफोर्डने नाबाद ३१, रोमारियो शेफर्डने २१, जेसन होल्डरने १३, मॅथ्यू फोर्डेने नाबाद १ धावांचे योगदान दिले. झिम्बाब्वेने २१ अवांतर चेंडू टाकले. विंडीजच्या फलंदाजांनी झिम्बाब्वेच्या सर्व गोलंदाजांची धुलाई केली. झिम्बाब्वेकडून ब्लेसिंग मुजराबानी आणि रिचर्ड नगारावाने प्रत्येकी २ तर ग्रॅमी क्रेमर आणि ब्रॅड इव्हान्सने प्रत्येकी १ विकेट घेतली.विंडीजकडून शिमरॉन हेटमायरने ३४ चेंडूत ७ षटकार आणि ७ चौकार मारत ८५ तर रोवमन पॉवेलने ३५ चेंडूत ४ षटकार आणि ४ चौकार मारत ५९ धावा केल्या.
'दादा तुमचा निर्णय चुकला, माघारी या...!'
अजित पवारांच्या शोकसभेत दिग्गज भावुक; राजकीय क्षितीजावरचा धगधगता सूर्य मावळ्याची भावनामुंबई : वरळीचा एनएससीआय डोम सोमवारी तुडुंब भरला होता. पक्षीय अभिनिवेश बाजूला सारून एकत्र आलेल्या राजकीय नेत्यांच्या डोळ्यांतील ओलावा बरेच काही सांगून जात होता. प्रशासनावर असलेली घट्ट पकड, पहाटे ५ पासून कामाला लागण्याची शिस्त, दिलेला शब्द पाळण्याची वृत्ती आणि आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीत उमटवलेला आपला अमीट ठसा... अशा बहुआयामी व्यक्तिमत्वाचा, एका 'लोकनेत्या'चा अस्त झाल्याची भावना सर्वांच्याच मुखी होती. राजकीय क्षितिजावरचा एक धगधगता सूर्य मावळल्याची जाणीव कार्यकर्त्यांच्या मनाला चटका लावून जात होती. दादा, तुमचा निर्णय चुकला, माघारी या...! असा हुंदका देताना केवळ राजकीयच नव्हे, तर विविध क्षेत्रांतील मान्यवरांना आपले अश्रू आवरता येत नव्हते. कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा एक 'आधारवड' कोसळल्याने महाराष्ट्र पोरका झाल्याचीच ही साक्ष होती.निमित्त होते महाराष्ट्राचे लाडके 'दादा' अर्थात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शोकसभेचे. या शोकसभेला राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, आणि अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासह राजकीय, सामाजिक आणि उद्योग क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती होती. उद्योगपती मुकेश अंबानी, गौतम अदाणी, अशोक हिंदुजा आणि अभिनेते नाना पाटेकर, जॅकी श्रॉफदेखील आवर्जून उपस्थित होते.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले अजितदादांच्या श्रद्धांजली सभेला उपस्थित राहण्याची वेळ येईल, अशी साधी कल्पनाही कधी माझ्या मनाला शिवली नव्हती. एखादे राज्य घडत असते तेव्हा ते एका व्यक्तीने घडत नाही, वेगवेगळ्या काळात वेगवेगळे नेतृत्व त्यात आपला ठसा उमटवत असते. महाराष्ट्राच्या जडणघडणीत इतिहास ज्या नेत्यांचा उल्लेख करेल, त्यात अजितदादा यांचे नाव प्रामुख्या ने घेतले जाईल. लोकनेता, जननेता अशी प्रतिमा त्यांनी निर्माण केली. कोणत्या जिल्ह्यात कोणते प्रश्न आहेत, कोणते नेतृत्व प्रभावी आहे, त्या भागाची नाडी, याची अचूक जाण दादांना होती. राज्याच्या कानाकोपऱ्यातील माहिती त्यांना असायची. एक उत्तम प्रशासक म्हणून त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. त्यांचे नेतृत्व एका वेगळ्या क्षितिजाकडे वाटचाल करत होते, संघर्षातून स्थैर्याकडे त्यांचा प्रवास सुरू होता आणि नेमके त्याचवेळी त्यांचे अचानक आपल्यातून निघून जाणे अत्यंत वेदनादायी आणि विश्वास न बसणारे आहे. हा आघात केवळ पवार कुटुंबापुरता मर्यादित नाही, त्यांच्या आधाराने उभे राहिलेले अनेक नेते, कार्यकर्ते आणि जिवाभावाचे मित्र यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे.तर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आम्ही तिघे (मी, देवेंद्रजी आणि दादा) २४/७ काम करायचो. दादा पहाटे कामाला लागायचे, देवेंद्रजी दिवसभर आणि मी रात्रभर. आज महाराष्ट्र एका कर्तबगार मुख्यमंत्र्याला मुकला आहे. नशिबाने साथ दिली असती तर दादा नक्कीच मुख्यमंत्री झाले असते. लाडकी बहीण योजनेसाठी ४६ हजार कोटींची तरतूद करताना राज्याची आर्थिक घडी विस्कटू न देण्याचे कसब फक्त दादांकडेच होते, असेही त्यांनी नमूद केले.शरद पवारांचा हुकमी एक्का हरपला - जयंत पाटीलआमदार जयंत पाटील यांनी अजित पवारांसोबतच्या १९९१ पासूनच्या प्रवासाला उजाळा दिला. अजितदादा आणि मी सभागृहात कायम शेजारी असायचो. मी गमतीने म्हणायचो की राजकारणात आधी आबा, मग तुम्ही आणि मग मी. पण आबांनंतर दादा असे मध्येच सोडून जातील असं वाटलं नव्हतं. आजही ते शरद पवारांचा सर्वात मोठा 'हुकमी एक्का' होते, असे पाटील यांनी सांगितले. राजकारणात पुन्हा एकसंधपणे काम करण्याचे दादांचे स्वप्न अधुरे राहिल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.नाना पाटेकर झाले भावुकज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी दादांसोबतच्या ५० वर्षांच्या मैत्रीचा पट उलगडला. मी २५ वर्षांचा आणि दादा १८ वर्षांचे होते तेव्हापासूनचा आमचा स्नेह आहे. आज दादांचा ७५ वा वाढदिवस साजरा करायला जमलो असतो तर जास्त बरं वाटलं असतं, असे म्हणत नानांनी जड अंतःकरणाने दादांच्या प्रतिमेला अभिवादन केले.
वडिलांची चिता धगधगत होती, 17 वर्षांच्या मुलीनं काळीज घट्ट करत दिला बारावीचा पेपर
लातूरमधील १७ वर्षीय विद्यार्थिनी शिवानी देवकट्टे हिने वडिलांच्या अंत्यसंस्कारानंतर अवघ्या दीड तासात बारावीची गणिताची परीक्षा देऊन धैर्याचे उदाहरण मांडले आहे.
Pune Fire News : पुणे रेल्वे स्टेशनवरील हॉटेलमध्ये आग; मोठी दुर्घटना टळली
Pune Fire News : पुणे रेल्वे स्टेशनच्या फलाट क्रमांक एकवरील एका हॉटेलला आज अचानक आग लागली. शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या या आगीमुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली होती.
‘जर-तर’च्या समीकरणावर ठरणार भारताचा सेमीफायनलचा प्रवेश!
धावगती उंचावण्यासाठी दोन्ही सामने फरकाने जिंकावे लागणारनवी दिल्ली : टी-२० वर्ल्ड कपमध्ये सर्वात मजबूत संघ मानला जात असलेला भारत अचानक अडचणीत सापडला आहे. कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला सुपर-८ फेरीत दक्षिण आफ्रिकेकडून तब्बल ७६ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. टी-२० वर्ल्ड कपच्या इतिहासात एवढ्या मोठ्या धावांच्या फरकाने भारताचा हा सर्वात मोठा पराभव झाला आहे. या धक्कादायक निकालाने भारताची विजयी मालिका खंडित झालीच, पण उपांत्य फेरीचा मार्गही कठीण झाला आहे.अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियम येथे झालेल्या या सामन्यात भारताची फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही निराशाजनक झाली. गोलंदाजांनी सुरुवातीला चांगली झुंज देत दक्षिण आफ्रिकेला १८७ धावांवर रोखले होते. हा पाठलाग भारतासाठी अवघड नव्हता. मात्र या स्पर्धेत सुरुवातीपासूनच लय सापडत नसलेली भारतीय फलंदाजी पुन्हा एकदा कोसळली आणि संघ केवळ १११ धावांवर गारद झाला.या पराभवानंतर भारत आता ‘करो या मरो’ स्थितीत पोहोचला आहे. सुपर-८ फेरीत प्रत्येक संघाला तीन सामने खेळायचे आहेत. भारताने पहिलाच सामना गमावला असल्याने आता पुढील दोन्ही सामने जिंकणे अनिवार्य झाले आहे. भारताचा पुढील सामना २६ फेब्रुवारीला झिम्बाब्वेविरुद्ध, तर १ मार्चला वेस्ट इंडिजविरुद्ध होणार आहे. हे दोन्ही सामने जिंकले, तर भारताच्या खात्यात चार गुण जमा होतील.इतरांच्या पराभवावर ठरणार भारताचे समीकरणकेवळ दोन विजय मिळवणे पुरेसे ठरणार नाही. उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी भारताला इतर संघांच्या निकालांवरही अवलंबून राहावे लागेल. दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे यापैकी किमान दोन संघांनी आपले दोन सामने गमावणे भारतासाठी आवश्यक आहे. अशा परिस्थितीत भारत आणि आणखी एक संघ चार किंवा सहा गुणांसह पुढे जाऊ शकतील. जर या गटात तीन संघ चार-चार गुणांवर समान स्थितीत राहिले, तर निर्णय नेट रनरेटवर होईल. आणि इथेच भारताची अडचण आहे. ७६ धावांच्या मोठ्या पराभवानंतर भारताचा नेट रनरेट -३.८०० इतका घसरला आहे, तर दक्षिण आफ्रिकेचा +३.८०० आहे. इतक्या मोठ्या फरकामुळे भारतासाठी पुढील सामन्यांत मोठ्या अंतराने विजय मिळवणे आवश्यक झाले आहे. आयसीसीच्या नियमानुसार, गुण समान असतील तर प्रथम विजयांची संख्या पाहिली जाते. तीही समान असल्यास नेट रनरेट निर्णायक ठरतो. त्यामुळे भारताने उर्वरित दोन्ही सामन्यांत केवळ विजयच नाही, तर शक्य तितक्या मोठ्या फरकाने विजय मिळवणे आवश्यक आहे. अन्यथा सुपर ८ फेरीतूनच बाहेर पडण्याचा धोका आहे.
हेटमायर आणि पॉवेलमुळे वेस्ट इंडिजने ओलांडला २५० धावांचा टप्पा
मुंबई : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर ८ फेरीत वेस्ट इंडिज विरुद्ध झिम्बाब्वे हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरू आहे. नाणेफेक जिंकून झिम्बाब्वेने गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या वेस्ट इंडिजने हेटमायर आणि पॉवेलच्या फटकेबाजीच्या जोरावर २५० धावांचा टप्पा ओलांडला. विंडीजने २० षटकांत सहा बाद २५४ धावा केल्या.शिमरॉन हेटमायरने ३४ चेंडूत ७ षटकार आणि ७ चौकार मारत ८५ तर रोवमन पॉवेलने ३५ चेंडूत ४ षटकार आणि ४ चौकार मारत ५९ धावा केल्या.वेस्ट इंडिजकडून ब्रँडन किंगने ९, शाई होपने १४, हेटमायरने ८५, पॉवेलने ५९, शेरफेन रदरफोर्डने नाबाद ३१, रोमारियो शेफर्डने २१, जेसन होल्डरने १३, मॅथ्यू फोर्डेने नाबाद १ धावांचे योगदान दिले. झिम्बाब्वेने २१ अवांतर चेंडू टाकले. विंडीजच्या फलंदाजांनी झिम्बाब्वेच्या सर्व गोलंदाजांची धुलाई केली. झिम्बाब्वेकडून ब्लेसिंग मुजराबानी आणि रिचर्ड नगारावाने प्रत्येकी २ तर ग्रॅमी क्रेमर आणि ब्रॅड इव्हान्सने प्रत्येकी १ विकेट घेतली.वेस्ट इंडिज विरुद्ध झिम्बाब्वे या सामन्यातील विजेता उपांत्य फेरीच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकणार आहे. विशेष म्हणजे वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे या दोन्ही संघांना सुपर ८ फेरीत आणखी प्रत्येकी दोन सामने खेळायचे आहेत. यामुळे मुंबईत जिंकणाऱ्या संघाची बाजू पुढे जाण्याच्या दृष्टीने मजबूत होण्यास मदत होणार आहे. सध्या सुपर ८ च्या ग्रुप १ मध्ये भारताविरुद्ध जिंकल्यामुळे दक्षिण आफ्रिका अव्वलस्थानी आहे. भारत चौथ्या स्थानावर आहे. वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे यांचे स्थान मुंबईतल्या सामन्याच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे.
Trump Tariffs: भारतीय वस्तूवर अमेरिकेत नेमके किती शुल्क लागणार आहे. तसेच या निर्णयात पुन्हा कधी -कसा बदल होणार आहे. या सदर्भात संदिग्धता आहे.
Pune News : पुण्यात काँग्रेस प्रवक्त्याला मारहाण; राजकीय वर्तुळात मोठी खळबळ
Pune News : पुण्यातील एका वृत्तवाहिनीच्या कार्यालयाबाहेर हनुमंत पवार यांच्यावर तुषार दामगुडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे.
Nirmala Sitharaman warns: बँकांनी आपले मूळ काम करण्यावर भर द्यावा. त्यांनी विमा उत्पादने विकण्यावर जास्त भर देऊ नये.
Gold-Silver Prices : सोने आणि चांदीमध्ये जगभरातील गुंतवणूकदार गुंतवणूक करीत आहेत.
Pune: श्री पूना गुजराती बंधू समाजाच्या अध्यक्षपदी जयंत शहा यांची एकमताने निवड
Pune
भटका कुत्रा चावला अन् तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
कल्याण : दहशतवादी संघटनांप्रमाणेच आता भटक्या कुत्रांचीही दहशत अनेक शहरात वाऱ्यासारखी परसरत आहेत. अनेक लोकांकडून कुत्र्यांचा बंदोबस्त करा अशी मागणी होताना दिसते, आणि त्यावर कायमचा तोडगा महापालिका शोधताना दिसतही आहे. पण ही संख्या दिवसेंदिवस इतकी वाढत जाते आहे की याला आता आवरण मुश्किल झालय. या भटक्या कुत्रांच्या हल्ल्यात अनेक जण जखमी होतात तर काहींना आपला जीव गमवावा लागतो. ही दहशत इतकी वाढली आहे की लोकांच्या मनात याची भीती बसली आहे. आणि याच भीतीपोटी एका तरुणाने टोकाचे पाऊल उचलले आहे.कल्याण पूर्वेतील सहजीवन सोसायटीमधील एक आयाश आमीन या तरुणाच्या पायाला काही दिवसांपूर्वीच भटक्या कुत्र्याने चावा घेतला होता. त्यानंतर त्याने रेबीजचे इंजेक्शनही घेतले होते. परंतु याच कुत्र्याच्या चाव्याच्या भीतीने तो चिंतेत होता. घरातला कमावता मुलगा असल्याने मला रेबीज झाला तर घरच्यांचं कस होणार ही भीती त्याला सतावत होती. या भीतीमध्येच रेबीजची लक्षणे आपल्यात दिसू लागली आहेत असा भास त्याला व्हायचा.यामुळे खचून त्याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्याने त्याच्या भीतीची कारणे लिहिली होती. या प्रकरणात शिवसेना शिंदे गटाचे स्थानिक नगरसेवक महेश गायकवाड यांनी केडीएमसी अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांची भेट घेतली आहे. भटक्या कुत्र्यासंदर्भात त्वरित उपाययोजना करण्यात यावी ही मागणी त्यांनी केली आहे. मात्र या तरूणाच्या टोकाच्या पावलामुळे सर्वांनाच हादरा बसला आहे
रोमानिया – मिलिसाऊटी शहराच्या महापौरांनी घेतली मुंबईच्या महापौरांची सदिच्छा भेट
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : रोमानिया – मिलिसाऊटी शहराच्या महापौर वांगले कॅमेरे यांनी मुंबईच्या महापौर श्रीमती रितू राजेश तावडे यांची सोमवारी २३ फेब्रुवारी २०२६ रोजी महापौर दालनात सदिच्छा भेट घेतली. रोमानिया – मिलिसाऊटी शहराची घनकचरा व्यवस्थापन प्रणाली, कचऱ्यापासून वीज निर्मिती तसेच तेथील नवनवीन उपक्रम याची माहिती मुंबईच्या महापौरांनी रोमानिया – मिलिसाऊटी शहराचेमहापौर वांगले कॅमेरे यांच्याकडून जाणून घेतली.प्रारंभी, महापौर रितू तावडे यांनी रोमानिया – मिलिसाऊटी शहराच्या महापौर वांगले कॅमेरे यांचे पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार केला. याप्रसंगी सहआयुक्त (सुधार) संजोग कबरे, उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर, प्रमुख अभियंता (रस्ते व वाहतूक) स्वामी, व्यवसाय विकास विभागाच्या प्रमुख शशी बाला उपस्थित होत्या.
मुंबई (विशेष प्रतिनिधी) :मुंबई महापालिकेत दहा स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती केली जाणार असून या दहा जागांसाठी प्रत्येक राजकीय पक्षाने आपल्या कोट्यानुसार उमेदवारांची नावे महापालिका आयुक्तांकडे सादर केली आहे. यामध्ये चार माजी नगरसेवकांची वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. विशेष म्हणजे भाजपकडून माजी विरोधी पक्ष नेते प्रविण छेडा आणि माजी विरोधी पक्षनेते आणि विधान परिषद सदस्य राजहंस सिंह यांच्या पुत्राची अर्थात नितेश सिंह यांची वर्णी लावली जाणार आहे.मुंबई महापालिकेत यापूर्वी पाच स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती केली जात होती, परंतु आता ही संख्या दुप्पट करण्यात आली आहे. त्यामुळे पक्षाच्या गणसंख्येनुसार भाजपच्या वाट्याला चार स्वीकृत नगरसेवक, तर उबाठा तीन, शिवसेना दोन आणि काँग्रेसच्या वाट्याला १ अशाप्रकारे स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती केली जाणार आहे. यासाठी प्रत्येक पक्षाच्यावतीने उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले असून यासर्व अर्जांची छाननी करून बुधवारी होणाऱ्या महापालिका सभेपुढे नावे जाहीर करण्यात येणार आहे.भाजपात कर्पे आणि दळवी यांची वर्णीभाजपच्या वाट्याला स्वीकृत नगरसेवकांच्या चार जागा येत असून त्यानुसार भाजपच्यावतीने माजी विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा, नितेश राजहंस सिंह, प्रतिक कर्पे आणि कमलाकर दळवी यांची वर्णी लावण्यात येत आहे. यासर्वांचे प्रस्ताव महापालिका आयुक्तांना सादर करण्यात आले आहे. एका बाजुला प्रवीण छेडा आणि नितेश राजहंस सिंह यांची वर्णी लावतानाच अभ्यासू असलेल्या भालचंद्र शिरसाट यांना स्थान देण्यात आले नाही. तर दुसरीकडे पक्षाशी एकनिष्ट असलेल्या कमलाकर दळवी आणि प्रतिक कर्पे यांना महापालिकेत यामाध्यमातून संधी देण्यात येत आहे.शिवसेनेत उत्तर मुंबईलाच प्राधान्यस्वीकृत नगरसेवक पदासाठी शिवसेनेच्यावतीने बाळकृष्ण ब्रीद आणि राज प्रकाश सुर्वे यांची वर्णी लावण्यात येत आहे. मात्र, यापैंकी कुणाचा अर्ज बाद झाल्यास उमेश माने यांच्या ही नावाचा प्रस्ताव दिल्याची माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे बाळकृष्ण ब्रीद आणि राज सुर्वे हे मागाठाणे आणि दहिसर विधानसभेतील असून शिवसेनेने उत्तर मुंबईतील या दोनच विधानसभांमधील पदाधिकाऱ्यांची वर्णी लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे शिवसेनेने उत्तर मुंबईलाच प्राधान्य दिल्याचे दिसून येत आह.उबाठात दुर्गे, मांजरेकर आणि पाठकउबाठाच्यावतीने स्वीकृत नगरसेवक पदासाठी तीन उमेदवारांचे अर्ज महापालिका आयुक्तांना सादर करण्यात आल्याची माहिती मिळत असून यामध्ये माजी शिक्षण समिती सदस्य तसेच उबाठाचे सचिव साईनाथ दुर्गे यांना संधी देण्यात आली आहे. तर प्रभाग क्रमांक १७७चा प्रभाग मनसेला सोडण्यात आल्यानंतर उबाठाच्या माधुरी मांजरेकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. पण पुढे त्यांनी मनसेच्या उमेदवाराचा प्रचार करत निवडणुकीत भाग घेतला होता. आता शिवसेनेचे अमेय घोले निवडून येत नगरसेवक बनल्यानंतर त्याठिकाणी आपल्या पक्षाचा दावा सक्षम राहावा यासाठी उबाठाने माधुरी मांजरेकर यांना संधी दिल्याचे बोलले जात आहे. याशिवाय उबाठाच्यावतीने जोगेश्वरीतील कैलास पाठक यांचीही वर्णी महापालिकेवर लावण्यात येत आहे.काँग्रेसने मालाडलाच दिली संधीकाँग्रेसच्या वाट्याला एकच जागा जात असल्याने काँग्रेसच्यावतीने यापूर्वी प्रभाग क्रमांक ३३मधून निवडून आलेले आणि आता आरक्षणामुळे उमेदवारी न मिळालेले विरेंद्र चौधरी यांची वर्णी लावण्यात येत आहे. विरेंद्र चौधरी हे काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांचे अत्यंत विश्वासू सहकारी असल्याचे बोलले जात आहे.भाजपा :प्रवीण छेड़ानितेश राजहंस सिंहप्रतीप कर्पेकमलाकर दळवीशिवसेना :बाळकृष्ण ब्रीदराज सुर्वेउमेश मानेउबाठा :साईनाथ दुर्गे,माधुरी मांजरेकरकैलास पाठककांग्रेस :वीरेंद्र चौधरी
BMC मध्ये भाजपचा वरचष्मा! स्वीकृत नगरसेवक पदासाठी ४ नावे; पाहा कोणाचे नशीब उघडले?
Maharashtra Politics : मुंबई महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी भाजपने आपल्या ४ उमेदवारांची नावे निश्चित केली आहेत.
Dhurandhar 2 Vs Toxic : बॉक्स ऑफिसवर राडा होणार.! ‘धुरंधर २’आणि ‘टॉक्सिक’येणार आमने-सामने
२०२६ चा मार्च महिना चित्रपटप्रेमींसाठी खास असणार आहे. या वर्षी अनेक अद्भुत चित्रपट थिएटर आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहेत.
Shimron Hetmyer Record : ब्रँडन किंग स्वस्त्यात बाद झाल्यानंतर मैदानात उतरलेल्या शिमरॉन हेटमायरने झिम्बाब्वेच्या गोलंदाजांची अक्षरशः पळता भुई थोडी केली. हेटमायरने केवळ १९ चेंडूत अर्धशतक झळकावून नवा इतिहास रचला आहे.
Ajit Pawar : आता अजितदादांनाही नियतीने हिरावले.! दोन्ही सभागृहात अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा
२८ जानेवारीला झालेल्या त्या दुर्दैवी अपघातात नियतीने अजितदादांसारखा धडाडीचा नेता आपल्यातून हिरावून नेला.
नेवासे नगरपंचायत कार्यालयात (Newasa News) आज दैनिक प्रभातचे संपादक शिरीष समुद्र आणि निवासी संपादक जयंत कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रसंत गाडगे बाबांच्या १५१व्या जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली.
India semifinal scenario : स्ट इंडिज आणि झिम्बाब्वे यांच्यातील सामन्याच्या निकालाचा थेट परिणाम भारताच्या सेमीफायनल क्वालिफिकेशन समीकरणावर होणार आहे. कसा ते जाणून घ्या
टीएमएस २ .० (ट्रांन्झॅक्शन मॅनेजमेंट सिस्टिम) प्रणालीचा आज शुभारंभमुंबई : आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत जलद, पारदर्शक आणि रुग्णस्नेही उपचार मिळण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्न करीत आहे. राज्यात टीएमएस २ .० प्रणालीमुळे रुग्णांकरिता पारदर्शक, जबाबदार आणि सुलभ ठरणारी आरोग्य व्यवस्था निर्माण होणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.विधान भवन येथे मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत राज्यातील ४ हजार ५३७ रुग्णालयांमध्ये २ हजार ३९९ मोफत उपचारांचा ऑनलाइन पद्धतीने शुभारंभ करण्यात आला आहे. या टीएमएस २ .० प्रणालीचे कार्यान्वयन मध्यरात्रीपासून सुरू करण्यात येणार आहे.कार्यक्रमास सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर - साकोरे, राज्यमंत्री डॉ पंकज भोयर, राज्यमंत्री योगेश कदम, सचिव डॉ विनायक निपुण, सचिव ई रविंद्रन, जन आरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. चव्हाण आदी उपस्थित होते.टीएमएस २ .० प्रणाली विषयी...या प्रणालीमुळे रुग्ण नोंदणीपासून ते उपचार पूर्ण होईपर्यंतचे संपूर्ण प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल, पारदर्शक व ऑनलाईन होणार आहे. रुग्ण नोंदणी ऑनलाईन बायोमेट्रिक प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे. जलद उपचार मंजुरी प्रक्रिया व उपचार स्थितीचे डिजिटल ट्रॅकिंग, डिजिटल कृत्रिम बुद्धिमत्ता मॉनिटरिंगद्वारे तक्रारीचे निरसन केले जाणार आहे. या प्रणालीमध्ये रुग्णालय अंगीकरणाची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन व विहित मर्यादेत पूर्ण होणार आहे.या योजनेअंतर्गत फसवणूक झाल्यास १५५३८८ , १८००२३३२०० या हेल्पलाइनलवर संपर्क साधण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.
राज्यात गुंतवणुकीसाठी इव्हॉल्व कंपनीचा राज्य शासनाशी सामंजस्य करार
मुंबई : ऑस्ट्रेलियाची इव्हॉल्व कंपनी राज्यात गुंतवणूक करण्यास उत्सुक आहे. नवी मुंबई, पुणे, आणि नागपूर परिसरात कंपनी जवळपास तीनशे कोटी रुपयांची गुंतवणूक करीत आहे. या गुंतवणुकीतून जवळपास एक हजार ७५ लोकांना रोजगार मिळणार आहे. त्यासाठी कंपनीने राज्य शासनसोबत करार केल्याची माहिती उद्योग विभागामार्फत देण्यात आली. या करारांचे आदान प्रदान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विधान भवन येथे उद्योग विभाग व कंपनीमध्ये करण्यात आले.यावेळी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कंपनीच्या गुंतवणुकीबाबत माहिती दिली. यावेळी उद्योग विभागाचे सचिव डॉ. पी. अन्बळगन, मुख्यमंत्री यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे, इव्हॉल्व कंपनीचे कंट्री हेड आदित्य शर्मा, इव्हॉल्व कंपनीच्या भारतीय सहभागीदार असलेल्या एम्प्रेसेंड उद्योग समूहाचे अध्यक्ष रुस्तम केरावाला, वरूण गुप्ता, उद्योग विभागाचे सहसचिव श्रीकांत पुलकुंडवार आदी उपस्थित होते.
गौरी गर्जे मृत्यू प्रकरणात आली मोठी अपडेट
मुंबई : राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे याची पत्नी डॉ. गौरी पालवे हिने वरळीच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. पती अनंत गर्जेचे अन्य महिलेसोबतचे संबंध असल्याचे कळल्याने आलेल्या नैराश्यातून गौरीने टोकाचे पाऊल उचलल्याचे प्रथमदर्शनी समजले होते. पण गौरीच्या कुटुंबियांनी गर्जे कुटुंबाविरोधात पोलिसांकडे तक्रार केली. गौरीचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला. या छळाला वैतागून गौरीने गळफास घेतल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला. कायद्यातील तरतुदीनुसार पत्नीच्या आत्महत्येप्रकरणी आरोप आणि संशयाआधारे पोलिसांनी अनंत गर्जेला अटक केली होती. आता तब्बल तीन महिन्यांनंतर अनंत गर्जेला जामीन मिळाला आहे.डॉ. गौरी पालवे गर्जे आत्महत्या प्रकरणात संशयित आरोपी अनंत गर्जेला मुंबईच्या सत्र न्यायालयाने जामीन दिला. यामुळे तब्बल तीन महिन्यांनी अनंत गर्जे तुरुंगाबाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला.गौरीने २२ नोव्हेंबर २०२५ रोजी आत्महत्या केली होती. या प्रकरणी पती अनंत गर्जे याला पोलिसांनी अटक करत चौकशी केली होती. गौरी गर्जेने आत्महत्या केली नसून तिची हत्या करण्यात आली असल्याचा आरोप गौरीच्या पालकांनी केला होता. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली.अनंत गर्जे आणि डॉ. गौरी पालवे यांचा विवाह फेब्रुवारी २०२५ मध्ये झाला होता. दोघांचेही मूळ गाव एकच होते. पण मागील काही वर्षांपासून ते दोघेही मुंबईत स्थायिक होते. गौरी गर्जे या केईएम रुग्णालयातील दंत विभागात डॉक्टर होत्या. तर अनंत गर्जे हे पंकजा मुंडे यांचे पीए म्हणून काम करत होते. लग्न झाल्यानंतर सुरुवातीला सुरळीत सुरू होते. पण लवकरच गर्जे दांपत्यात वाद सुरू झाले. यातून परिस्थिती बिकट झाली आणि नोव्हेंबर २०२५ मध्ये गौरीने जीवन संपवले. या प्रकरणात कौटुंबिक हिंसाचार, पतीचे अनैतिक संबंध आदी मुद्यांच्याआधारे तपास करून पोलिसांनी संशयावरून आरोपी म्हणून अनंत गर्जेला अटक केली होती.
लाल किल्ल्यावर दहशतवादी हल्ल्याची भीती; ISI च बांगलादेशी कनेक्शन उघड
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील ऐतिहासिक वारसा स्थळ लाल किल्ला पुन्हा एकदा दहशतवाद्यांच्या रडारवर आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गुप्तचर यंत्रणांनी मिळवलेल्या ठोस सूचनांनंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आणि संभाव्य हल्ल्याचा कट उधळण्यात यश आले. या प्रकरणात ISI संबंधित बांगलादेशी कनेक्शन असल्याचे तपासात उघड झाले आहे.काय होता संशयित कट?गेल्या काही दिवसांत ‘लष्कर-ए-तोयबा’कडून दिल्लीतील काही भागांवर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली होती. विशेषतः लाल किल्ला आणि चांदणी चौक परिसरातील धार्मिक स्थळांवर स्फोटकांचा कट रचत असल्याचा संशय यंत्रणांना आला होता. काही ठिकाणी हाय अलर्ट देऊन बॉम्बशोधक पथके तैनात करण्यात आली होती.इस्लामाबादमधील अलीकडील घटनेचा बदला घेण्याच्या उद्देशाने हा डाव आखण्यात आल्याची शक्यता तपास यंत्रणा व्यक्त करत आहेत.देशभरातून संशयितांना ताब्यातदिल्ली पोलीस यांनी केलेल्या कारवाईत तामिळनाडू येथून सहा जणांना अटक करण्यात आली, तर पश्चिम बंगालमधून आणखी दोघांना ताब्यात घेण्यात आले. मिजानूर रहमान, मोहम्मद शबत, उमर, मोहम्मद लितान, मोहम्मद शाहिद आणि मोहम्मद उज्जल अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तपासादरम्यान ८ मोबाईल हँडसेट आणि १६ सिमकार्ड जप्त करण्यात आली आहेत.'Free Kashmir' पोस्टर प्रकरणाचीही चौकशी८ फेब्रुवारी रोजी नवी दिल्लीतील काही प्रमुख भागांमध्ये आणि मेट्रो स्थानकांवर ‘Free Kashmir’ अशी पोस्टर्स लावल्याची बाबही तपासात समोर आली आहे. एका आंतरराष्ट्रीय शिखर परिषदेदरम्यान हे पोस्टर्स चिकटवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपी सोशल मीडियावरून परस्पर संपर्कात राहून पाकिस्थानातील संघटनांच्या समर्थनार्थ पोस्ट देखील करत होते.सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा भरघटनेनंतर दिल्लीसह इतर संवेदनशील भागांत सुरक्षा वाढवण्यात आली आहे. केंद्रीय यंत्रणा आणि स्थानिक पोलीस मिळून या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. संभाव्य धोका टळल्याने मोठा अनर्थ टळला असला तरी राजधानीतील सुरक्षा व्यवस्थेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेतील रस्त्यांची गुणवत्ता तपासणार
खडी मुरमाच्या दबाईसाठी कोर कटिंग बंधनकारक!महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केली नवीन कार्यपद्धतीमुंबई : पाणंद रस्त्यांची कामे दर्जेदार व्हावीत यासाठी खडी आणि मुरूमाच्या दबाईची तपासणी करणे आवश्यक करण्यासोबतच रस्त्यांची गुणवत्ता तपासताना 'कोर कटिंग' करणे आता बंधनकारक करण्यात आले. विशेष म्हणजे यासाठी संबंधित जिल्ह्यातील कार्यकारी अभियंत्याकडून कामाची तांत्रिक गुणवत्ता तपासणी अनिवार्य करण्यात आले आहे. ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजने’च्या अंमलबजावणीत राज्य शासनाने महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या आहेत.महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, “राज्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना वर्षभर सक्षम रस्ते सुविधा उपलब्ध व्हाव्यात, शेतीमालाची वाहतूक वेळेत आणि कमी खर्चात व्हावी, यासाठी ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना’ प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. यामुळे शेतकऱ्यांचा वेळ, पैसा आणि श्रम वाचणार असून उत्पादनाला योग्य बाजारपेठ मिळण्यास मोठी मदत होईल. ही योजना केवळ रस्ते बांधण्यापुरती मर्यादित नसून ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती देणारी आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीस हातभार लावणारी ठरणार .योजनेसाठी कोणत्याही प्रकारचे भूसंपादन केले जाणार नाही. जे शेतकरी स्वतःहून जमीन देतील, त्यांना नोंदणीकृत दानपत्र/बक्षीसपत्र किंवा हक्कसोड पत्र देणे अनिवार्य आहे. या नोंदणीसाठी शासनाने संबंधित 'ग्राम महसूल अधिकारी' यांना प्राधिकृत केले आहे. एकदा दिलेली जमीन शेतकऱ्याला परत मागता येणार नाही आणि तशी नोंद सातबारा उताऱ्यावर केली जाईल.आता ग्रामपंचायत, पंचायत समिती,जिल्हा परिषद, प्रधानमंत्री/मुख्यमंत्री ग्रामसडक योजना विभाग आणि मसुदा आराखड्यातील यंत्रणांव्यतिरिक्त एमएमआरडीए, पीएमआरडीए, सिडको यांसारख्या प्राधिकरणांमार्फतही ही कामे करता येतील. प्रति कि.मी. १५ लाख रुपयांच्या मर्यादेत खडी उपलब्ध असल्यास खडीकरण करण्यास मुभा असेल. जास्तीचा निधी सीएसआर मधूनही घेता येईल. रस्त्याच्या ५ कि.मी. परिसरातील तलाव, बंधारे किंवा नदीचे खोलीकरण करून त्यातील माती, मुरूम आणि दगड विनारॉयल्टी वापरता येतील. कामाच्या देखरेखीसाठी विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीला बाह्ययंत्रणेद्वारे एका स्थापत्य अभियंत्याची नेमणूक करण्याची मुभा देण्यात आली आहे.योजनेअंतर्गत रस्त्यांच्या कामांना तांत्रिक मान्यता देण्याचे अधिकार २५ लाख रुपयांपर्यंत उपविभागीय अभियंता तर २५ लाख रुपयांच्या वर कार्यकारी अभियंता यांना राहतील. वन जमीन असल्यास तांत्रिक मान्यता वन विभागामार्फत दिली जाईल. देयके अदा करताना ८० टक्के रक्कम उपअभियंता यांच्या स्वाक्षरीने, तर उर्वरित २० टक्के रक्कम कार्यकारी अभियंता यांच्या पूर्णत्वाच्या प्रमाणपत्रावर दिली जाईल. विशेष म्हणजे, ८० टक्के रक्कम देताना लगतच्या शेतकऱ्यांचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक असेल.रस्त्यांच्या कामांचे जास्तीत जास्त २५ कि.मी. चे क्लस्टर तयार केले जाईल. जिल्हास्तरावर निश्चित केलेल्या पॅनेलमधून लॉटरी पद्धतीने कंत्राटदाराची निवड केली जाईल. कंत्राटदाराला कामाच्या रक्कमेच्या २ टक्के किंवा १५ लाख रुपये (यापैकी जे अधिक असेल) इतकी सुरक्षा ठेव भरावी लागेल. जर कंत्राटदाराने कामात कसूर केली, तर त्याचे नाव काळ्या यादीत टाकले जाईल.
Nigeria attack : नायजेरियात सशस्त्र हल्ल्यात ३८ जणांची हत्या, अनेकांचे अपहरण
नायजेरियाच्या वायव्येकडील झामफारा प्रांतात सशस्त्र हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्यात ३८ जणांची हत्या करण्यात आली आणि अन्य काही जणांचे अपहरण करण्यात आले.
Mohammad Amir on India : . पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरने एका टीव्ही शोमध्ये भारतीय संघाच्या पराभवाची ज्या प्रकारे खिल्ली उडवली, त्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
महाराष्ट्र-गोवा शक्तीपीठ द्रुतगती महामार्ग (Shaktipeeth Expressway) प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित करून राज्य सरकार शेतकऱ्यांची रोजीरोटी हिरावून घेत असल्याचा आरोप ठाकरेसेनेचे खासदार संजय जाधव यांनी केला.
Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात अवकाळी पावसाने कहर केला असून नागपूर, धाराशिव, बीड आणि सिंधुदुर्गमध्ये रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
Bus Accident News : पाणीपतहून बिहारला जाणारी स्लीपर कोच बस उलटून दरीत कोसळल्याने ७ प्रवाशांचा मृत्यू झाला असून ४० हून अधिक जखमी झाले आहेत.
भारताने गेल्या दोन दशकांत केलेल्या असाधारण विकास प्रवासामुळे देश आता केवळ 'महत्वाकांक्षी' न राहता जगासाठी एक 'प्रेरणादायक राष्ट्र' बनला आहे.
वनक्षेत्रातील जलाशयांमध्ये मत्स्यव्यवसायाला परवानगी देण्याबाबत मंत्री नितेश राणे आणि मंत्री गणेश नाईक यांची संयुक्त बैठक.मुंबई : वन विभागाच्या अखत्यारीतील मत्स्य तलाव हे मत्स्यव्यवसाय विभागाकडे वर्ग करण्याची मागणी मंत्री नितेश राणे यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे केली. दरम्यान, अनधिकृत मासेमारी मोठ्या प्रमाणात होत असल्याने शासनाचा महसुली तोटा होत असल्याचे नमूद करून लहान व मोठ्या माशांचे व्यवस्थापन आवश्यक असल्याचे मत मंत्री नितेश राणे यांनी आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत व्यक्त केले.राज्यातील बिगर संरक्षित वनक्षेत्रातील जलाशयांमध्ये शासन मान्यता प्राप्त मच्छीमार सहकारी संस्थांमार्फत मत्स्यव्यवसायाला परवानगी देण्याबाबत मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे आणि वनमंत्री गणेश नाईक यांची संयुक्त बैठक आज मंत्रालयात पार पडली. या बैठकीस वने विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक म्हैसकर यांच्यासह वने व मत्स्यव्यवसाय विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.वन विभागाच्या अखत्यारीतील मत्स्य तलावामध्ये अनधिकृत मत्स्यमारी सुरू असल्याचे निर्दशनास येत असल्यास अनधिकृत मासेमारी तातडीने बंद करावीत. यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ तसेच गस्तीची संख्या वाढवून अनधिकृत मासेमारी होऊ देऊ नये, असे स्पष्ट निर्देश वनमंत्री गणेश नाईक यांनी वन विभागाला दिले.यावेळी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी अभयारण्य व राखीव वनक्षेत्रात कायद्याने मासेमारीस परवानगी देता येत नसल्याचे सांगितले. यावर मंत्री गणेश नाईक यांनी कायद्याच्या चौकटीत आणि सर्वोच्च न्यायालये तसेच केंद्र सरकारच्या नियमांचे पालन करून काही जलाशयांमध्ये अटी शर्तीसह परवानगी देता येईल का, यांचा अभ्यास वन विभागाने करून पुन्हा बैठक बोलावण्याचे निर्देश दिले.
मुंबई : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासारखे थोर नेते फार कमी होतात. त्यामुळे त्यांनी ज्याप्रकारे महाराष्ट्राची सेवा केली, त्याची जाणिव पुढच्या पीढीला होण्यासाठी त्यांच्या नावाचे एक स्मृतीस्थान विधिमंडळाच्या आवारात होणे आवश्यक आहे. त्यासंदर्भात मुख्यमंत्री, गटनेते आणि बोर्डासमोर प्रस्ताव ठेवून मी निर्णय घेईन, अशी घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सोमवारी केली.अजित पवार यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या शोक प्रस्तावावर बोलताना नार्वेकर म्हणाले, मला माझ्या संसदीय कार्याची पहिली इनिंग सुरु करून दिली ती अजित पवार यांनी. त्यांनी मला पहिल्यांदा विधान परिषदेत काम करायची संधी दिली. त्याआधी मावळ लोकसभेची निवडणूक लढवण्याची सूचना त्यांनी केली होती. त्यात जरी यश मिळाले नाही, तरी तुमच्या राजकीय कारकीर्दीची ती सुरुवात असेल, असे त्यांनी सांगितले. या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर अवघ्या २८ दिवसांत त्यांनी मला विधान परिषदेत काम करण्याची संधी दिली. शब्दाला जागणारा नेता, अशी त्यांची ओळख होती. हा जसा माझा अनुभव आहे, तसाच या सभागृहातील अनेकांचा आहे, असे राहुल नार्वेकर यांनी सांगितले.अजितदादांनी दिली शाबासकी- अजित पवार यांच्या आठवणी सांगताना राहुल नार्वेकर म्हणाले, मी विधानसभा अध्यक्ष झाल्यानंतर विधान भवनाच्या सुशोभीकरणाचे काम हाती घेतले. काम पूर्ण झाल्यानंतर दादांनी माझी प्रशंसा केलीच. पण, कुठे काय कमतरता राहिली, हे देखील आवर्जून निदर्शनास आणून दिले. विशेष म्हणजे सह्याद्री अतिथिगृह हे विधिमंडळाच्या अखत्यारित येत नसले, तरी त्याच्या डागडुजीच्या कामात लक्ष घालून ते नीट करून घ्या, अशी सूचना त्यांनी केली होती.- त्यांच्या जाण्याने केवळ राज्याची नव्हे, देशाची अपरिमित हानी झालेली आहे. जीएसटी कौन्सिलमधील त्यांच्या कामाची प्रशंसा देशपातळीवर झालेली आहे. जीएसटी कौन्सिलमध्ये महाराष्ट्राची बाजू अजितदादा ज्या तळमळीने मांडायचे, त्याची कसर आपल्याला कायम जाणवत राहील, असेही राहुल नार्वेकर यांनी सांगितले.
महाराष्ट्र भाजपकडून 'एसआयआर'समिती गठित
मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदार यादीचा विशेष सखोल फेरनिरीक्षण (एसआयआर) कार्यक्रम जाहीर केला असून, या प्रक्रियेचा राज्यभर प्रभावी पाठपुरावा करण्यासाठी भाजपने विशेष नियोजन केले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी यासंदर्भात पक्षाची विशेष 'एसआयआर' समिती गठीत केली असून, यात अनुभवी नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे.निवडणूक आयोगाच्या 'एसआयआर' कार्यक्रमाच्या माध्यमातून मतदार याद्यांमधील त्रुटी दूर करणे, दुबार नावे वगळणे आणि पात्र मतदारांची नोंदणी सुनिश्चित करणे हे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. या प्रक्रियेत पारदर्शकता राहावी आणि तांत्रिक बाबींची पूर्तता व्हावी, यासाठी भाजपच्या या समितीवर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पक्षाच्या या महत्त्वाच्या समितीत माजी खासदार किरीट सोमय्या, राज्यसभा खासदार डॉ. भागवत कराड, आमदार रणधीर सावरकर, आमदार मंगेश चव्हाण, प्रदेश सरचिटणीस ॲड. माधवी नाईक, माजी संघटन मंत्री रघुनाथ कुलकर्णी, माजी आमदार सुनील राणे आणि माजी जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे यांचा समावेश आहे.
ठाणाच्या नगरसेवकांचा वेगळाच थाट; ठाणे महापालिकेच्या दारात सजल्या आलिशान गाड्या
ठाणे : कार एक्स्पो नव्हे तर ठाण्याच्या महानगरपालिका मुख्यालयाच अंगण आलिशान गाड्यांनी व्यापून गेलं होत. निमित्त होत शुक्रवारी झालेल्या ठाणे महापालिकेच्या महासभेचे. सभेला येताना नगरसेवकांनी आणलेल्या गाड्या महापालिकेच्या महासभेपेक्षा चर्चेचा विषय ठरला. वेलफेयर... डिफेंडर...थार... हायक्रॉस.... या गाड्यांवरूनच ठाण्याच्या नगरसेवकांचा रुबाब झळकून आला.तब्बल चार वर्षांपासून सुरु असलेला प्रशासक कार्यकाळ संपुष्टात येऊन महापौर - उपमहापौर विराजमान झाल्यानंतर शुक्रवारी ठाणे महापालिकेची सर्वसाधारण सभा झाली. याआधी प्रशासक कार्यकाळ सुरु होण्याआधी कोरोना काळातही पालिका मुख्यालयात नगरसेवकांची वर्दळ कमी झाली होती. त्यामुळे लोकप्रतिनिधींचा फारसा वावर मुख्यालयात नसल्याने अधिकारी - कर्मचारीही सुशेगात होते. मात्र नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर काही दिवसातच महापौर - उपमहापौर निवड झाली. त्यावेळी एकत्र आलेले लोकप्रतिनिधी शुक्रवारी पुन्हा प्रथमच होणाऱ्या महासभेसाठी जमले.आलिशान गाड्यायाच सभेच्या निमित्ताने नगरसेवक आपल्या लाखोंच्या गाड्यांसह दाखल झाले. काही गाड्यांची किंमत दोन ते अडीच कोटींच्या घरात असून या महागड्या गाड्यांच्या शर्यतीत सत्ताधाऱ्यांसह विरोधकही आघडीवर होते.
PAK vs ENG :
IAS Transfer : राज्यातील ‘या’६ वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांवर नवी जबाबदारी; तुकाराम मुंढेंची कुठे नियुक्ती?
IAS Transfer : महाराष्ट्र सरकारने ६ वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांची जिल्ह्यांचे पालक सचिव म्हणून नियुक्ती केली आहे.
Leave Iran : तत्काळ इराण सोडा…! परराष्ट्र मंत्रालयाचे भारतीयांना आवाहन; हेल्पलाईन नंबर केला जारी
इराण आणि अमेरिका यांच्यातील लष्करी तणाव वाढतच चालला आहे. कुठल्याही क्षणी युद्ध होण्याची शक्यता असून या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय दूतावासाने इराणमध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांना तातडीने देश सोडण्याचे आवाहन केले आहे.
देशाच्या अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेला असलेल्या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी केंद्र सरकारने सोमवारी प्रहार या नावाखाली भारताचे पहिले अधिकृत दहशतवादविरोधी धोरण (Anti-Terrorism Policy) जाहीर केले
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंची काही खाती इतर मंत्र्यांकडे; काय आहे कारण?
Eknath Shinde : विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काळापुरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या जवळील काही खाती तूर्तास शिवसेना पक्षातील इतर मंत्र्यांकडे तात्पुरत्या स्वरुपात देण्यासंबंधी पत्र जारी केले आहे.

31 C