SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

30    C
...

Maharashtra Politics : शिवसेनेत मोठी उलथापालथ ! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी घेतला ‘हा’तडकाफडकी निर्णय

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघातील (Maharashtra Politics) संपूर्ण जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे.

दैनिक प्रभात 16 Apr 2026 5:27 pm

Wagholi: वाघोली-भावडी रस्त्याची बनली चाळण; तातडीने दुरुस्त करण्याची नागरिकांची मागणी

Wagholi: पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक अनिल सातव यांनी या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी 50 लाख रुपये निधी उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा सुरू केला असून नागरिकांकडून या पाठपुराव्याचे स्वागत होत आहे.

दैनिक प्रभात 16 Apr 2026 5:26 pm

Parliament : निशिकांत दुबेंनी आदित्य ठाकरेंचं नाव घेतलं अन् सुळे, सावंत भडकले; संसदेत जोरदार शाब्दिक चकमक, नेमकं काय घडलं?

Parliament : नारीशक्ती विधेयकाच्या चर्चेदरम्यान भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी आदित्य ठाकरे यांचे नाव घेत टीका केली. यानंतर संसंदेत मोठा गोंधळ उडाला. काही वेळ वातावरण तणावपूर्ण झाले होते.

दैनिक प्रभात 16 Apr 2026 5:22 pm

Thane Illegal Cylinder Storage : ‘डॉमिनोज पिझ्झा’मधून ४.५९ लाखांचा सिलिंडर साठा जप्त

शिधावाटप भरारी पथकाचे छापासत्र; एकाला बेड्या, १४० सिलिंडर घेतले ताब्यातमुंबई : व्यावसायिक वापरासाठीच्या नियमांचे उल्लंघन करून बेकायदेशीररीत्या गॅस सिलिंडरचा मोठा साठा बाळगणाऱ्या ठाण्यातील ‘डॉमिनोज पिझ्झा’ या नामांकित उपाहारगृहावर शिधावाटप भरारी पथकाने गुरुवारी कारवाईचा बडगा उगारला. ठाण्यातील वंडर मॉल परिसरातील या स्टोअरमधून सुमारे ४ लाख ५९ हजार रुपये किमतीचा अवैध सिलिंडर साठा जप्त करण्यात आला असून या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.https://prahaar.in/2026/04/15/lpg-scam-police-foil-plot-to-black-market-lpg-cylinders/गोपनीय माहितीच्या आधारे, नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा (चर्चगेट) यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. भरारी पथकाने या स्टोअरच्या तळघरात छापा टाकला असता, तिथे विविध गॅस कंपन्यांच्या सिलिंडरचा साठा आढळला. यामध्ये कोणतीही सुरक्षिततेची मानके न पाळता हा साठा दडवून ठेवण्यात आला होता. या कारवाईत एचपीसीएल, बीपीसीएल, आयओसी आणि गो गॅस कंपन्यांचे एकूण १४० सिलिंडर जप्त करण्यात आले आहेत. यात ५५ गॅसने भरलेले, तर ८५ रिकाम्या सिलिंडरचा समावेश आहे. जप्त केलेला एकूण ४ लाख ५९ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल प्रशासनाने सीलबंद केला आहे.https://prahaar.in/2026/04/16/nanded-shaken-tragic-death-of-4-schoolchildren-after-drowning-in-stagnant-water-in-a-drain/जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत गुन्हाया बेकायदेशीर साठवणुकीप्रकरणी एका संशयित आरोपीला ताब्यात घेऊन चितळसर पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे. संबंधित आरोपीविरुद्ध 'जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५' मधील विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्यावसायिक आस्थापनांमध्ये घरगुती किंवा नियमबाह्य पद्धतीने गॅसचा वापर करणे हा गंभीर गुन्हा असून, अशा साठ्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यताही पथकाने वर्तवली आहे.

फीड फीडबर्नर 16 Apr 2026 5:10 pm

Mathadi Workers : कंबरतोड ओझ्यापासून माथाडी कामगारांची सुटका

बाजार समित्यांसाठी राज्य सरकारचे नवे नियम; ५० किलोची मर्यादा बंधनकारकमुंबई : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये राबणाऱ्या माथाडी कामगारांच्या आरोग्याचा विचार करून राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे कांदा, बटाटा व इतर शेतमालाच्या गोणीचे वजन ५० किलोपेक्षा जास्त असू नये, असे स्पष्ट आदेश सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने दिले आहेत. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून ५० किलोपेक्षा अधिक वजनाच्या गोण्यांचा भार उचलणाऱ्या कामगारांचा भार काहीसा हलका होणार आहे.https://prahaar.in/2026/04/16/thane-illegal-cylinder-storage-cylinder-stock-worth-%e2%82%b94-59-lakh-seized-from-dominos-pizza/आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेच्या कन्व्हेन्शन क्र. १२७ नुसार, कोणत्याही कामगाराकडून ५० किलोपेक्षा जास्त वजनाच्या मालाची हाताळणी करून घेऊ नये, असा नियम आहे. केंद्र सरकारने या निर्णयाची अंमलबजावणी करण्याबाबत राज्य सरकारला सूचित केले होते. त्यानुसार कामगार आयुक्तांनी २००० सालीच परिपत्रक काढले होते, मात्र बाजार समित्यांमध्ये त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नव्हती. अखेर, विविध कामगार संघटनांच्या मागणीनंतर १ एप्रिल २०२६ रोजी पणन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. गुरुवार, दि. १६ एप्रिल रोजी याबाबत अधिकृत निर्णय जाहीर करण्यात आला.त्यानुसार, बाजार समित्यांना काही सूचना देण्यात आल्या आहेत. बाजार समित्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये शेतमालाच्या गोणीचे वजन ५० किलोपर्यंतच ठेवण्याबाबत जनजागृती करावी, व्यापाऱ्यांनी ५० किलोपेक्षा जास्त वजनाच्या गोण्या भरू नयेत, अशा स्पष्ट सूचना त्यांना देण्यात याव्यात, या नियमाबाबत बाजार समिती आवारात पुरेशी प्रसिद्धी करण्यात यावी, जेणेकरून सर्वांना याची कल्पना येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.https://prahaar.in/2026/04/16/shyam-steel-and-jw-global-group-invest-in-the-state/अंमलबजावणीची जबाबदारी निश्चितया निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी होत आहे की नाही, हे पाहण्याची जबाबदारी बाजार समितीचे सचिव, जिल्हा उपनिबंधक आणि पणन संचालक यांच्यावर सोपवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ही वजन मर्यादा लागू करताना बाजार समितीचे दैनंदिन कामकाज प्रभावित होणार नाही, याची काळजी घेण्याचे निर्देशही सरकारने दिले आहेत. या प्रक्रियेचा वेळोवेळी अहवाल शासनाला सादर करावा लागणार आहे

फीड फीडबर्नर 16 Apr 2026 5:10 pm

Nari Shakti Vandan : ही मोदींची गॅरंटी... महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींचे विरोधकांना भर सभागृहात खडेबोल

नवी दिल्ली : सध्या संसदेच्या विशेष अधिवेशनात 'नारी शक्ती वंदन अधिनियमा'वर (महिला आरक्षण विधेयक) ऐतिहासिक चर्चा सुरू आहे. लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याच्या या महत्त्वाकांक्षी पावलाचे स्वागत होत असतानाच, विरोधी पक्षांनी 'परिसीमन' म्हणजेच मतदारसंघांच्या पुनर्रचनेच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या प्रक्रियेमुळे काही राज्यांचे किंवा विशिष्ट वर्गांचे राजकीय नुकसान होऊ शकते, अशी भीती विरोधकांकडून व्यक्त करण्यात येत होती. विरोधकांच्या या शंकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी लोकसभेत बोलताना थेट उत्तर दिले. मतदारसंघांची पुनर्रचना करताना कोणत्याही राज्यावर किंवा लोकप्रतिनिधीवर अन्याय होणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. पंतप्रधान म्हणाले की, महिलांना हक्क मिळवून देणारी ही प्रक्रिया पारदर्शक असेल. ही मोदींची गॅरंटी आहे, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना आश्वस्त करत, या विधेयकावर सर्वांनी मिळून शिक्कामोर्तब करण्याचे आवाहन केले.हा राजकारणाचा नाही, तर राष्ट्रहिताचा निर्णयराजकीय चष्म्यातून पाहू नका; पंतप्रधानांचे भावनिक आवाहनhttps://prahaar.in/2026/04/16/nanded-shaken-tragic-death-of-4-schoolchildren-after-drowning-in-stagnant-water-in-a-drain/विकसित भारताच्या स्वप्नपूर्तीसाठी महिला शक्तीचा सहभाग अनिवार्य आहे, त्यामुळे सर्वांनी मोकळ्या मनाने या निर्णयाचा स्वीकार करावा, असे पंतप्रधान म्हणाले. देश आज केवळ सरकारचा निर्णयच नाही, तर त्यामागची 'नियत' (हेतू) देखील पाहत आहे, असे नमूद करत त्यांनी या ऐतिहासिक विधेयकाला एकमताने पाठिंबा देण्याची विनंती केली. मतदारसंघांच्या पुनर्रचनेमुळे (परिसीमन) दक्षिण भारतातील राज्यांच्या जागा कमी होतील किंवा त्यांच्यावर अन्याय होईल, अशी भीती काही राजकीय पक्षांकडून व्यक्त केली जात होती. या शंकांचे निरसन करताना पंतप्रधान ठामपणे म्हणाले की, उत्तर असो वा दक्षिण, पूर्व असो वा पश्चिम; हे सरकार कोणत्याही राज्याशी भेदभाव करणार नाही. ही निर्णय प्रक्रिया पूर्णपणे न्याय्य असेल आणि दक्षिण भारताच्या हक्कांचे पूर्ण संरक्षण केले जाईल, असे आश्वासन त्यांनी सभागृहात दिले. मतदारसंघ पुनर्रचनेच्या तांत्रिक मुद्द्यावर स्पष्टीकरण देताना पंतप्रधानांनी सांगितले की, भूतकाळात ज्या ज्या सरकारांच्या काळात परिसीमन झाले, जे प्रमाण आणि सूत्र तेव्हापासून चालत आले आहे, त्यात कोणताही बदल केला जाणार नाही. जागांची वाढ ही पूर्वीच्याच प्रमाणात होईल, त्यामुळे कोणत्याही राज्याने घाबरण्याचे कारण नाही. २०२९ मध्ये देशासमोर मोठी संधी आहे आणि आता जर आपण निर्णय घेण्यास विलंब केला, तर देशातील माता-भगिनींचा लोकशाहीवरचा विश्वास उडू शकतो, असा इशाराही त्यांनी दिला.काश्मीर ते कन्याकुमारी आपण एकच!; स्वच्छ नियतीची हमीपंतप्रधानांनी आपल्या भाषणात देशाच्या एकतेवर भर दिला. संविधानाने आपल्याला देशाचा तुकड्यांमध्ये विचार करण्याचा अधिकार दिलेला नाही. आपण काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत एक राष्ट्र म्हणून विचार केला पाहिजे, असे ते म्हणाले. आपली नियत स्वच्छ असल्याचे सांगत त्यांनी जाहीरपणे शब्दाची हमी दिली की, ही प्रक्रिया कोणावरही अन्याय करणारी ठरणार नाही. हा माझा शब्द आहे आणि हीच माझी गॅरंटी आहे, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला.

फीड फीडबर्नर 16 Apr 2026 5:10 pm

Bhondubaba Arrest: महाराष्ट्र पुन्हा हादरला! आणखी एका भोंदू बाबाचे धक्कादायक कारनामे उघड, पोलिसांनी केली अटक

Bhondubaba Arrest: मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक उद्यानात शेकडो लोकांना जमवून उघडपणे जादूटोण्याचे प्रयोग केल्याने संतापाची लाट उसळली. या प्रकाराचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर प्रकरण अधिकच चिघळले.

दैनिक प्रभात 16 Apr 2026 4:58 pm

Shivsena News : शिंदेच्या बड्या नेत्याला अटक; राजकीय वर्तुळात उडाली खळबळ

शिंदे गटाच्या शिवसेनेचे (Shivsena News) महापालिका गटनेते सागर भारुका यांना बुधवारी झालेल्या राडा प्रकरणात सिटी कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे.

दैनिक प्रभात 16 Apr 2026 4:57 pm

Pradnya Satav : काँग्रेसमधून भाजपात प्रवेश; आता ‘या’महिला नेत्या पुन्हा आमदार होणार? हालचालींना वेग

Pradnya Satav : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या रिक्त झालेल्या जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. काँग्रेसमधून भाजपात आलेल्या प्रज्ञा सातव यांना भाजपकडून उमेदवार म्हणून घोषित केले जाणार असल्याची शक्यता आहे.

दैनिक प्रभात 16 Apr 2026 4:49 pm

Transfer new rules : सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठी निर्णय; शासन निर्णय प्रसिद्ध

Transfer new rules : उपसचिव चंद्रकांत विभूते यांच्या स्वाक्षरीने हा शासन निर्णय जारी करण्यात आला असून, नव्या धोरणामुळे आरोग्य विभागातील बदल्यांची प्रक्रिया अधिक शिस्तबद्ध आणि पारदर्शक होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

दैनिक प्रभात 16 Apr 2026 4:37 pm

Nanded News : नांदेड हादरले! नाल्यातील साचलेल्या पाण्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू

नांदेड : नांदेड शहरातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. शहरातील देगलूर नाका परिसरातील इस्लामपुरा भागातील चार शाळकरी मुलांचा नाल्यातील साचलेल्या पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. गुरुवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास ही भीषण दुर्घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण नांदेड शहरावर शोककळा पसरली असून मृतांच्या नातेवाईकांनी केलेला आक्रोश काळजाचा थरकाप उडवणारा आहे.नेमकी घटना काय ?मिळालेल्या माहितीनुसार, इस्लामपुरा भागातील ही मुलं शाळा सुटल्यानंतर घराकडे जात होती. दुपारी १२ च्या सुमारास हारूनबाग परिसरात एका मोठ्या खड्ड्यात पावसाचे किंवा नाल्याचे पाणी साचलेले होते. उन्हाचा तडाखा किंवा खेळण्याच्या ओघात ही मुलं पोहण्याच्या उद्देशाने त्या पाण्यात उतरली. मात्र, खड्ड्यातील पाण्याचा अंदाज न आल्याने आणि पाणी अतिशय खोल असल्याने चारही मुलांचा गुदमरून मृत्यू झाला.https://prahaar.in/2026/04/16/tcs-conversion-gang-used-to-inflict-torture-male-employee-makes-revelation-accused-said-send-wife-with-me/काठावर सापडले बूट आणि गणवेशघटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी त्या ठिकाणी धाव घेतली. पाण्याचा काठावर मुलांचे शालेय गणवेश, बूट आणि चपला आढळून आल्या, तेव्हा या दुर्घटनेची भीषणता समोर आली. स्थानिकांनी तातडीने शोधमोहीम राबवून मुलांना बाहेर काढले, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. मृत मुलांचे वय ८ ते १८ वर्षांच्या दरम्यान आहे.मृतांची नावे महमद अली (१३ वर्षे) महमद फुरखान (१८ वर्षे) महमद अदनान (८ वर्षे) महमद रेहान (११ वर्षे)प्रशासनाचा हलगर्जीपणा की कंत्राटदाराची चूक ?ज्या ठिकाणी ही घटना घडली, तिथे महानगरपालिकेकडून खासगी कंत्राटदारामार्फत नाल्याचे काम सुरू असल्याची प्राथमिक माहिती आहे. तसेच बाजूलाच प्लॉटिंगचेही काम सुरू आहे. हा मोठा खड्डा नेमका कोणी खोदला आणि तो उघडा का ठेवला? तिथे सुरक्षेचे कोणतेही उपाय का केले नव्हते? असे संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत. या दुर्घटनेला जबाबदार धरून संबंधित कंत्राटदार किंवा अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन आणि महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. पोलिसांनी पंचनामा केला असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले आहे.

फीड फीडबर्नर 16 Apr 2026 4:30 pm

Maharashtra Weather : महाराष्ट्रात उष्णतेची लाट जोर धरणार; तर या राज्यांमध्ये पावसाच्या सरी कोसळणार

मुंबई : हिवाळा संपला आणि उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. उन्हाचा पारा इतका चढलाय की उष्माघाताने लोक आपल्या जीवाला मुकत आहेत. काही दिवसांआधी पुण्यात हिंजवडी परिसरात गारा पडल्या आणि वातावरणात थंडावा निर्माण झाला. त्यानंतर पुन्हा उष्णतेचा पारा चढला तो अगदी ४० अंशापर्यंत जाऊन पोहोचला आहे. फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात वातावरण बदलाचा फटका जाणवत आहे. काही भागांमध्ये वादळी वारे आणि पाऊस आहे तर काही ठिकाणी वाढत्या उष्णतेमुळे पिकांची नासाडी झाली आहे.हवामान विभागाचा इशारा बदलत्या वातावरणावर हवामान विभागाने २१ एप्रिलपर्यंत अंदाज व्यक्त असून उष्णेतची लाट आणि दमट हवामानाचा इशारा दिला आहे. यानुसार महाराष्ट्रासह १३ राज्यात उष्णतेची लाट येणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.https://prahaar.in/2026/04/16/tcs-conversion-gang-used-to-inflict-torture-male-employee-makes-revelation-accused-said-send-wife-with-me/या राज्यांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यताभारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार आणि मांडलेल्या तारखांनुसार मध्य महाराष्ट्रात १६ ते १८ एप्रिल आणि मराठवाड्यात १६ ते १८ एप्रिल दरम्यान लाट येण्याचा अंदाज आहे. १६ ते १९ एप्रिल दरम्यान मध्य प्रदेश, तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल, किनारपट्टीवरील कर्नाटक तसेच केरळ माहे येथे काही भागांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे, तसेच १६ ते १९ एप्रिल दरम्यान छत्तीसगड आणि तेलंगणामध्ये लाट येण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. पश्चिम बंगाल आणि ओडिशा राज्यात १६ ते २१ एप्रिल दरम्यान लाटेचा इशारा दिला आहे. तर गुजरात राज्याच्या किनारपट्टीतील भागांना देखील या उष्णतेचा तडाखा बसण्याची शक्यता आहे.भारतावर पश्चिमी वाऱ्यासह एका पश्चिमी प्रणाली सक्रिय असल्याने १६ एप्रिलच्या रात्रीपासून पश्चिम हिमालयीन प्रदेशावर एक नवीन परंतु कमकुवत पश्चिमी प्रणाली येण्याची शक्यता आहे. यामुळेच वायव्य, मध्य आणि पूर्व भारतात कमल तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याहची शक्यता आहे. मध्य, पूर्व, पश्चिम आणि दक्षिण भारतातील काही भागांमध्ये उष्णतेच्या लाटेसह दमट हवामानाची शक्यता आहे.https://prahaar.in/2026/04/16/heatwave-sop-mandates-12-4pm-break-for-informal-workers/या आठ राज्यांना आहे पावसाचा इशारामध्य महाराष्ट्रात १८ ते २१ एप्रिल दरम्यान ३० - ४० किमी वेगाने वारे वाहणार असून हलका पाऊस आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच ईशान्य भारतातील आसाम आणि मेघालय या राज्यांमध्ये १६ ते १९ एप्रिल दरम्यान हलक्या पावसाची शक्यता असून ताशी ३० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. हीच स्थिती नागालँड, मणिपूर, मिझोराम, आणि त्रिपुरामध्ये देखील राहणार आहे. यासोबतच राज्याच्या सर्व भागांमध्ये मुसळधार पावसासह गारपिठीचीही शक्यता असल्याने शेतकऱ्यांसाठी चिंतेची बाब आहे.

फीड फीडबर्नर 16 Apr 2026 4:30 pm

Khaleel Ahmad Injury : सीएसकेला मोठा धक्का! स्टार खेळाडू IPL 2026 मधून पडला बाहेर, नेमकं कारण काय? जाणून घ्या

Khaleel Ahmad Injury : वैद्यकीय तपासणीनंतर सीएसकेच्या स्टार खेळाडूला 'ग्रेड २ क्वाड्रिसेप्स इंजरी' (Quadriceps Injury) झाल्याचे निदान झाले आहे.

दैनिक प्रभात 16 Apr 2026 4:28 pm

Akola News : मोठी बातमी! शिंदेसेनेच्या नेत्याला अटक; नेमकं प्रकरण काय?

Akola News: : अकोला महापालिकेतील मोठ्या राड्यानंतर शिंदेसेनेच्या गटनेत्याला पोलिसांनी अटक केली आहे. या अटकेनंतर स्थानिक राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

दैनिक प्रभात 16 Apr 2026 4:23 pm

LC Election: विधान परिषद निवडणूक जाहीर; काॅंग्रेस ‘या’उमेदवाराला देणार पाठिंबा, हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती

LC Election: विधान परिषदेचा एक आमदार निवडून येण्यासाठी 28 मतांचा कोटा आवश्यक आहे.

दैनिक प्रभात 16 Apr 2026 4:16 pm

Sapne Vs Everyone : प्राइम व्हिडिओने ‘सपने वर्सेस एवरीवन’च्या नवीन सीझनची जागतिक रिलीज डेट १ मे ठरवली

महत्त्वाकांक्षा आणि बदला यावर आधारित एक रोमांचक ड्रामामुंबई : भारताच्या सर्वाधिक लोकप्रिय एंटरटेनमेंट डेस्टिनेशन प्राइम व्हिडिओने आज जाहीर केले की, त्यांची बहुप्रतीक्षित प्राइम ओरिजिनल सीरिज सपने वर्सेस एवरीवन चा दुसरा सीझन १ मे रोजी जगभरात प्रीमियर होणार आहे. या सीरिजचे लेखन आणि दिग्दर्शन अंबरीश वर्मा यांनी केले असून, अरुणभ कुमार आणि विजय कोशी यांनी द वायरल फीवर (TVF) च्या बॅनरखाली याची निर्मिती केली आहे. ही एक सखोल ड्रामा सीरिज आहे जी महत्त्वाकांक्षा, बदला आणि ओळख यांसारख्या विषयांवर आधारित आहे.पहिल्या सीझनला मिळालेल्या प्रचंड यशानंतर—ज्याला IMDb वर 9.2 रेटिंग मिळाले आणि जो भारतातील सर्वाधिक प्रशंसित सीरिजपैकी एक ठरला—सपने वर्सेस एवरीवन आता नव्या सीझनसह परत येत आहे. यावेळीही अंबरीश वर्मा, परमवीर सिंह चीमा आणि विजयंता कोहली मुख्य भूमिकेत दिसणार आहेत, तर अभिषेक चौहान, निधी शाह आणि खुशाली कुमार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसतील. हा दुसरा सीझन १ मे २०२६ रोजी भारतासह जगभरातील २४० हून अधिक देश आणि प्रदेशांमध्ये प्राइम व्हिडिओवर हिंदी भाषेत एक्सक्लूसिव्ह रिलीज होणार आहे.https://prahaar.in/2026/04/15/bigg-boss-marathi-6-grand-finale-ceremony-on-april-19/सपने वर्सेस एवरीवन सीझन २ मुंबईच्या फिल्म इंडस्ट्री आणि रिअल इस्टेट या दोन वेगळ्या जगांच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे आणि मागील सीझनच्या थरारक वळणापासून पुढे जातो. नवीन सीझन प्रशांत (परमवीर सिंह चीमा) यांच्या प्रवासावर आधारित आहे, जो एंटरटेनमेंटच्या अत्यंत स्पर्धात्मक दुनियेत अभिनेता म्हणून स्वतःला सिद्ध करण्यासाठी झगडत राहतो. दुसरीकडे जिमी (अंबरीश वर्मा), ज्याला ‘सेल्स गॉड’ म्हणून ओळखले जाते, तो रिअल इस्टेट आणि राजकारणाच्या जगात अधिक खोलवर जातो.या दोघांचा प्रवास नकार, सत्तेचे खेळ आणि अनिश्चिततेने भरलेला आहे. या धोकादायक मार्गावर पुढे जाताना ते स्वतःलाच प्रश्न विचारू लागतात—नशीब आधीच ठरलेले असते का, की ते त्या लोकांच्या हातात असते जे स्वतःच्या नशिबाची सूत्रे हातात घेण्याचे धैर्य ठेवतात?“TVF सोबतची आमची दीर्घकालीन भागीदारी सतत अशा प्रामाणिक आणि जीवनाशी जोडलेल्या कथा सादर करत आली आहे, ज्या प्रेक्षकांच्या मनाला भिडतात. पंचायत पासून एस्पिरेंट्स पर्यंत, या कथांनी जगभरातील प्रेक्षकांची मने जिंकली आहेत,” असे प्राइम व्हिडिओ इंडिया येथील कंटेंट लायसेंसिंगचे संचालक आणि प्रमुख मनीष मेघानी यांनी सांगितले.ते पुढे म्हणाले, “सपने वर्सेस एवरीवन ही देखील तशीच एक कथा आहे. पहिला सीझन अत्यंत प्रभावी ठरला होता, ज्यात आजच्या अत्यंत स्पर्धात्मक जगात स्वप्ने पूर्ण करण्याच्या वास्तवाला सुंदरपणे मांडले गेले. आता दुसऱ्या सीझनमध्ये stakes अधिक मोठे आहेत. अंबरीश आणि परमवीर यांच्या उत्कृष्ट अभिनयासह आम्हाला पूर्ण विश्वास आहे की हा नवीन सीझन त्या यशाला पुढे नेईल आणि महत्त्वाकांक्षा, नाती आणि स्वप्नांची खरी किंमत अधिक खोलवर उलगडेल.”https://prahaar.in/2026/04/13/raja-shivaji-the-film-industry-is-plunged-into-mourning-following-the-passing-of-asha-bhosle-riteish-takes-this-major-decision-regarding-the-film-raja-shivaji/सीरिजचे सह-निर्माते विजय कोशी म्हणाले, “सपने वर्सेस एवरीवन ची सुरुवात एक अत्यंत वैयक्तिक कथा म्हणून झाली होती, जी महत्त्वाकांक्षा आणि तिच्या संघर्षावर आधारित होती. पहिल्या सीझनला मिळालेली प्रतिक्रिया आमच्या अपेक्षेपेक्षा खूप जास्त होती. प्रेक्षकांनी या कथेशी, पात्रांशी आणि भावनिक खोलीशी इतक्या घट्टपणे जोडले जाणे खूप उत्साहवर्धक होते.सीझन २ मध्ये आम्ही या प्रवासाला पुढे नेले आहे—या विश्वाचा अधिक विस्तार केला आहे आणि पात्रांना अधिक सखोलपणे मांडले आहे. प्राइम व्हिडिओसोबतचे आमचे सहकार्य दीर्घकाळापासून चालू आहे आणि ते अत्यंत समाधानकारक राहिले आहे. आमच्या अनेक आवडत्या कथा या मंचावर सादर करता आल्या. सपने वर्सेस एवरीवन चा नवीन सीझनही या यादीत सामील होत आहे याचा आम्हाला खूप आनंद आहे, आणि ही कथा भारतासह २४० हून अधिक देश आणि प्रदेशांतील विविध प्रेक्षकांपर्यंत पोहोचवताना आम्हाला अभिमान वाटतो.”

फीड फीडबर्नर 16 Apr 2026 4:10 pm

Navnath Ban PC : महिला आरक्षणप्रश्नी संजय राऊत तोंडावर पडतील, भाजपा प्रवक्ते नवनाथ बन यांचा प्रहार

मुंबई :देशाला आग लागावी, वणवा पेटावा अशी संजय राऊत यांची कितीही सुप्त इच्छा असली तरी या देशात आग लागणार नाही. कारण देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी उभा आहे. नारी शक्ती वंदन विधेयकाच्या निमित्ताने उत्तर विरुद्ध दक्षिण असा सामना रंगवण्याचा प्रयत्न तुमच्या माध्यमातून केला जातो आहे. मात्र ते होणार नाही. या विधेयकाद्वारे महिलांचा सन्मान होऊ नये, असा संजय राऊत यांचा मनसुबा असला तरी कोणत्याही परिस्थितीत हे विधेयक संसदेत मंजूर झाल्याशिवाय राहणार नाही. या विधेयकाच्या निमित्ताने संपूर्ण देश पुन्हा एकदा एकवटेल आणि तुम्ही मात्र तोंडावर पडाल, असा प्रहार भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.नारीशक्ती वंदन विधेयक म्हणजे भाजपा शक्ती विधेयक नाही तर, भारतीय शक्ति विधेयक आहे. या विधेयकामुळे देशातील महिलांना एक सन्मानाचे स्थान मिळणार आहे. महिलांना लोकसभेत ३३ टक्के आरक्षण मिळणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिला आपली कर्तबदारी दाखवतात. अगदी तशाच पद्धतीने संसदेत लोकसभेध्येही महिला आपल्या कर्तृत्वाचा झेंडा उंचावू शकतील. संजय राऊत तुम्ही या विधेयकाला विरोध करत आहात, कारण महिलांच्या हातामध्ये ताकद मिळाली तर आपल्या पक्षाचे काही खरे नाही, हे तुम्हाला ठाऊक आहे. महिलांना शिवीगाळ करणे, अपशब्द वापरणे हा संजय राऊत यांचा धंदा झालाय आणि अशा पद्धतीनं महिलांचा अपमान करणाऱ्याला जनता धडा शिकवेल याची कल्पना संजय राऊत यांना आहे. त्यामुळे हे विधेयक मंजूर होऊ नये अशी संजय राऊतांची इच्छा असल्याचे बन म्हणाले.हे विधेयक म्हणजे राजकीय अजेंडा नाही तर हा महिलांच्या स्वाभिमानाचा आणि सन्मानाचा अजेंडा आहे. हे विधेयक सादर होऊ द्या, त्यावर दोन दिवस चर्चा होईल आणि त्यानंतर कॉंग्रेस, तृणमूल कॉंग्रेस, शरद पवार यांचे खासदार या विधेयकाला नक्कीच पाठिंबा देतील यात अजिबात शंका नाही. लोकसभेमध्ये उद्धव ठाकरे यांचे खासदारही या विधेयकाच्या बाजूने राहतील. कारण आपण महिला शक्तीला वंदन करण्यासाठीच हे विधेयक आणले आहे. या विधेयकाच्या निमित्ताने महिलांना त्यांच्या हक्क मिळणार असल्याचे बन म्हणाले. बन पुढे म्हणाले, तृणमूल काँग्रेसच्या खासदारांना भाजपाचे खासदार संसदेत येण्यापासून कसे काय रोखतील? कुठल्याही खासदारांना संसदेमध्ये येण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. हे बेसिक नॉलेज संजय राऊतांकडे नाही का? संजय राऊत, उचलली जीभ लावली टाळ्याला असे करू नका. तोंडाला येईल ते बडबडू नका. आपल्या बाजूने भूमिका घेतली नाही की ते देशद्रोही, असे तुमचे आहे. झारीतील शुक्राचार्य होण्याचा प्रयत्न केलात तर महिला तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत, असेही बन यांनी बजावले.राहिला प्रश्न डिलिमीटेशनचा तर डिलिमीटेशन हे घटनेच्या तरतुदीनुसार दर ३० वर्षानुसार होते. संजय राऊत, तुम्हाला स्वतःचा मतदारसंघ नाही. आपल्या संपूर्ण हयातीत साध्या महापालिकेच्या प्रभागात तुम्ही निवडणूक लढवली नाही. ना विधानसभेची, ना लोकसभेची निवडणूक लढली, त्यामुळे तुम्ही मतदारसंघाची चिंता करू नका. ना उद्धव ठाकरे आजपर्यंत निवडणूक लढले. त्यामुळे तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीची किंवा डीलीमिटेशनची चर्चा करायची गरज नाही, असे बन यांनी सुनावले.

फीड फीडबर्नर 16 Apr 2026 4:10 pm

TCS Employee Allegation : मूल होत नसेल तर पत्नीला माझ्याकडे पाठव; नाशिक TCS मधील 'धर्मांतरण गँग'चा अमानवीय छळ!

नाशिक : नाशिक येथील टीसीएस (TCS) शाखेत धर्मांतरण आणि लैंगिक शोषणाचे अत्यंत गंभीर आरोप समोर आले आहेत. या प्रकरणात पीडित महिलांनंतर आता एका पुरुष कर्मचाऱ्याने आपली आपबिती सांगितली असून, त्याने केलेले खुलासे अंगावर शहारे आणणारे आहेत. या कर्मचाऱ्याने सांगितले की, त्याला केवळ जबरदस्तीने टोपी घालण्यास आणि नमाज पठण करण्यास भाग पाडले गेले नाही, तर त्याच्या वैयक्तिक आयुष्याचाही क्रूर अपमान करण्यात आला. आरोपीने त्याला म्हटले की, जर उपचार करूनही तुला मूल होत नसेल, तर तुझ्या पत्नीला माझ्याकडे पाठवून दे. अशा शब्दांत त्याचा मानसिक छळ करण्यात आला.२०२२ पासून सुरू झाला छळाचा प्रवासपीडित कर्मचाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, हा छळ २०१२ मध्ये त्याने कंपनीत रुजू झाल्यापासून सुरू झाला होता. त्याचा टीम लीड तौसिफ अख्तर आणि त्याचा सहकारी दानिश शेख यांनी संगनमताने त्याला लक्ष्य केले. कामाच्या ठिकाणी आपल्या अटी मान्य करण्यासाठी ते सर्व कर्मचाऱ्यावर दबाव टाकत असत. जे कर्मचारी त्यांच्या धार्मिक अटी मान्य करत नसत, त्यांच्यावर कामाचा अतिरिक्त बोजा टाकून त्यांना त्रस्त केले जात होते.https://prahaar.in/2026/04/16/amravati-crime-news-paratwada-case-ayan-ahmed-arrest-shocking-revelations-mastermind-rented-friend-room-for-abuse/महिला कर्मचाऱ्यांचे गंभीर आरोप आणि एफआईआरया प्रकरणात २३ वर्षीय महिला कर्मचाऱ्याने दाखल केलेल्या एफआयआरमध्ये तौसिफ आणि दानिश यांची नावे प्रामुख्याने आहेत. दानिशने पीडित महिलेला जबरदस्तीने चुंबन घेण्याचा प्रयत्न केला आणि लग्नासाठी दबाव टाकला. इतकेच नाही तर तौसिफ आणि एचआर निदा खान यांनी हिंदू देवी-देवतांबद्दल अत्यंत आक्षेपार्ह टिप्पण्या केल्याचा आरोपही या महिलेने केला आहे. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी एका महिला अधिकाऱ्याला गुप्त एजंट म्हणून कंपनीत पाठवून तपास केला आहे.सात आरोपींना अटक, पोलिसांकडून नऊ गुन्हे दाखलया प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत पाच पुरुष आणि दोन महिला अशा एकूण सात जणांना बेड्या ठोकल्या आहेत. अनेक महिला कर्मचाऱ्यांच्या तक्रारींनंतर पोलिसांनी या टोळीविरुद्ध एकूण नऊ गुन्हे दाखल केले आहेत. पीडित पुरुष कर्मचाऱ्याने सांगितले की, हे सर्व आरोपी वारंवार हिंदू धर्माचा अपमान करत असत आणि महाराष्ट्रातील आदरणीय महापुरुषांबद्दलही हीन दर्जाची विधाने करत असत.शाकाहारी कर्मचाऱ्याला मांसाहार खाण्याची सक्तीधर्मांतराच्या या कटात कर्मचाऱ्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयींवरही हल्ला करण्यात आला. पीडित कर्मचाऱ्याने सांगितले की, तो कट्टर शाकाहारी असूनही नाईट शिफ्ट संपल्यानंतर त्याला जबरदस्तीने हॉटेल्समध्ये नेले जायचे. तिथे त्याच्यावर मांसाहारी जेवण घेण्यासाठी दबाव टाकला जात असे. जेव्हा त्याने नकार दिला, तेव्हा त्याच्या धार्मिक श्रद्धेची चेष्टा केली जायची.नमाज पठण आणि सोशल मीडियावर फोटो व्हायरल२०२३ च्या ईदच्या दिवशी तौसिफ याने पीडित कर्मचाऱ्याला आपल्या घरी नेले. तिथे त्याला जबरदस्तीने धार्मिक टोपी घालण्यास लावली आणि नमाज वाचायला लावला. इतक्यावरच न थांबता, त्याचे फोटो काढून त्याला अपमानित करण्यासाठी ऑफिसच्या अधिकृत व्हॉट्सॲप ग्रुपवर शेअर केले. जेव्हा पीडिताने या गोष्टीला विरोध केला, तेव्हा तौसिफने त्याला टेबल फॅन फेकून मारले आणि जीवे मारण्याची धमकी दिली.'इस्लाम स्वीकारा तरच वडील बरे होतील' असा दावाजेव्हा पीडित कर्मचाऱ्याचे वडील अर्धांगवायूने (पॅरालिसिस) आजारी पडले, तेव्हा तौसिफ, दानिश, शाहरुख आणि रजा मेनन यांसारख्या लोकांनी त्याला इस्लाम स्वीकारण्याचा सल्ला दिला. तू इस्लाम स्वीकारला तरच तुझे वडील बरे होतील, असे त्यांनी सांगितले. पीडिताने त्यांचे ऐकले नाही, तेव्हा त्याच्याविरुद्ध कंपनीच्या मुख्य कार्यालयात खोट्या तक्रारी करून त्याला नोकरीवरून काढून टाकण्याचे षडयंत्र रचले गेले. हा छळ २३ मार्च २०२६ पर्यंत सुरू होता.मैत्रीच्या नात्याचा गैरफायदा आणि मानसिक खच्चीकरणआरोपींनी सुरुवातीला मैत्रीचे नाते निर्माण केले आणि त्यानंतर हळूहळू आपला खरा हेतू स्पष्ट केला. पीडित कर्मचाऱ्याला वारंवार गळ्यातील रुद्राक्ष काढायला लावले आणि कलमा वाचायला लावला. त्याला मानसिकदृष्ट्या इतके तोडले गेले की त्याने धर्मांतर करावे, यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न करण्यात आले. या संपूर्ण प्रकरणामुळे आयटी क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून नाशिक पोलीस अधिक तपास करत आहेत.

फीड फीडबर्नर 16 Apr 2026 4:10 pm

श्याम स्टील आणि जेडब्ल्यू ग्लोबल उद्योग समूहाची राज्यात गुंतवणूक

मुंबई : राज्यात गुंतवणूक येऊन त्याचे उद्योगात रूपांतर करण्यासाठी अनेक धोरणात्मक सुधारणा करण्यात आल्या आहेत. राज्य शासन महाराष्ट्रामध्ये उद्योग उभारण्यासाठी गुंतवणूकदारांना पुरेपूर सहकार्य करीत आहे. त्यामुळे राज्यामध्ये सद्यस्थितीत उद्योगांचे नवे पर्व सुरू झाले आहे. श्याम स्टील आणि जेडब्ल्यू ग्लोबल उद्योग समूह राज्यात करीत असलेली गुंतवणूक त्याचे मूर्तीमंत उदाहरण असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. राज्यात गुंतवणुकीसाठी येत असलेल्या उद्योग समूहांना राज्य शासन सर्व सहकार्य करीत आहे, गुंतवणूकदारांनी राज्यात गुंतवणुकीसाठी यावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.उद्योग विभागासोबत श्याम स्टील उद्योग आणि जेडब्ल्यू ग्लोबल उद्योग समूहाने राज्यात गुंतवणुकीसाठी वर्षा निवासस्थानी आयोजित बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार केले. याप्रसंगी बोलताना, राज्यात गुंतवणुकीसाठी स्वारस्य दाखविलेल्या उद्योग समूहांना प्रत्यक्षपणे उद्योग सुरू करण्यास सुटसुटीत प्रक्रिया करण्यात आली आहे. राज्यात शाश्वत ऊर्जा निर्मिती क्षेत्रामध्ये जेडब्ल्यू ग्लोबल च्या माध्यमातून गुंतवणूक येत आहे. केंद्र शासनाने सिव्हिल न्यूक्लिअर एनर्जी क्षेत्रामध्ये गुंतवणुकीला परवानगी दिली आहे. त्यानुसार राज्याने ' स्मॉल मॉड्युलर न्यूक्लिअर रिॲक्टर ' मध्ये गुंतवणूक करण्यास देशात पुढाकार घेतला आहे. यासाठी दोन सामंजस्य करारही करण्यात आले आहेत. राज्याच्या कुठल्याही भागामध्ये गुंतवणूक करण्यास स्वारस्य दाखवल्यास राज्य शासन सबंधित उद्योग समूहाला पुरेपूर सहकार्य करेल; असे मुख्यमंत्री म्हणाले.पश्चिम बंगालमधील श्याम स्टील उद्योग समूह चंद्रपूर जिल्ह्यात गोडपिंपरी तालुक्यामध्ये दहा हजार कोटीची गुंतवणूक करून स्टील उद्योग उभारत आहे. या माध्यमातून जवळपास ८ हजार पेक्षा जास्त रोजगार निर्मिती होणार आहे. तसेच जेडब्ल्यू ग्लोबल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी राज्यात जवळपास एक लाख ६५ हजार कोटींची गुंतवणूक करीत आहे. सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणात फ्लोटिंग सोलर पावर अँड एनर्जी स्टोरेज च्या माध्यमातून कंपनी १४ हजार ९७६ कोटींची गुंतवणूक करीत असून त्यामुळे कायमस्वरूपी ५०० रोजगार निर्मिती होणार आहे. तसेच शाश्वत कृत्रिम बुद्धिमत्ता कॅम्पस आणि डाटा सेंटर, ग्रीन हायड्रोजन प्रकल्प, स्मॉल मॉड्युलर न्यूक्लिअर रिऍक्टर या क्षेत्रात जेडब्ल्यू ग्लोबल उद्योग समूह गुंतवणूक करीत आहे. या संपूर्ण गुंतवणुकीमुळे राज्यात जवळपास ३ हजार रोजगार निर्मिती अपेक्षित आहे.बैठकीस उद्योग विभागाचे प्रधान सचिव पी अन्बळगण, उद्योग विभागाचे सहसचिव लक्ष्मीकांत ढोके, मुख्यमंत्री यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे, श्याम स्टील उद्योग समूहाचे अध्यक्ष पुरुषोत्तम बेरीवाला, व्यवस्थापकीय संचालक सिद्धार्थ बेरिवाला, मुख्य कार्यकारी अधिकारी राणा, जेडब्ल्यू उद्योग समूहाचे अध्यक्ष जयदीप वानखेडे, व्यवस्थापकीय संचालक ख्रिस्ती रेनेहान, संचालक संजय वाजे, अतुल गुप्ता, थॉमस पुर्दी आदी उपस्थित होते.

फीड फीडबर्नर 16 Apr 2026 4:10 pm

Narendra Modi : लष्करी संघर्षाने समस्या सुटणार नाहीत; पंतप्रधानांकडून शांततापूर्ण तोडगा काढण्याचे आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी गुरुवारी पश्चिम आशिया (मध्य-पूर्व) आणि युक्रेनमधील सुरू असलेल्या युद्धांबाबत भारताची स्पष्ट भूमिका मांडली.

दैनिक प्रभात 16 Apr 2026 4:03 pm

Pune Crime: पीएमपीएमएल बसमध्ये महिला कंडक्टरवर चाकू हल्ला

Pune Crime: याप्रकरणी, भालेराव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, बंडगार्डन पोलिसांनी अज्ञात आरोपीच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना बुधवारी (दि.15) रात्री आठ वाजताच्या सुमारास अलंकार चौक परिसरात घडली आहे.

दैनिक प्रभात 16 Apr 2026 3:58 pm

temperature pune : महाराष्ट्र सरकारची नवीन SOP, कडाक्याच्या उन्हात आता दुपारी १२ ते ४ 'सक्तीची विश्रांती'

राज्यात उन्हाचा कडाका वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र सरकारने शहरातील असंघटित क्षेत्रातील कामगारांना मोठा दिलासा दिला आहे. उन्हाळ्यात उघड्यावर काम करणाऱ्या या मजुरांचे आरोग्य जपण्यासाठी सरकारने एक विशेष 'प्रमाणित कार्यपद्धती' (SOP) जाहीर केली आहे. या नवीन नियमांनुसार, ज्या दिवशी हवामान खात्याकडून 'ऑरेंज' किंवा 'रेड' अलर्ट दिला जाईल, त्या दिवशी कामाच्या तासांचे पुनर्नियोजन करणे बंधनकारक असेल. विशेषतः दुपारी १२ ते सायंकाळी ४ या वेळेत कामगारांना सक्तीची विश्रांती द्यावी लागणार आहे, जेणेकरून त्यांना उष्माघातापासून वाचवता येईल. राज्य आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी या मार्गदर्शक तत्त्वांची घोषणा केली असून, मुंबईसह राज्यातील सर्व महानगरपालिका आणि नगरपालिका क्षेत्रांत ही नियमावली तत्काळ लागू करण्यात आली आहे.https://prahaar.in/2026/04/16/terrorist-amir-hamza-mastermind-behind-several-terror-attacks-in-india-shot-condition-critical/उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी राज्य सज्जवाढत्या तापमानामुळे होणारे मृत्यू टाळणे ही आमची प्राथमिकता असून त्यासाठीच नवीन एसओपी (SOP) लागू करण्यात आली आहे, असे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे, अति उष्णतेच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाय शोधण्यासाठी आणि शाश्वत शीतकरण धोरण आखण्यासाठी नागपूर येथे १८४ कोटी रुपये खर्चून एक अत्याधुनिक 'आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण व संशोधन केंद्र' उभारले जाणार आहे. देशातील सर्वाधिक उष्मा-संवेदनशील राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश होत असून विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशातील १५ जिल्हे सध्या रेड झोनमध्ये आहेत. यामध्ये जळगाव, नागपूर, अकोला, चंद्रपूर आणि नांदेड यांसारख्या शहरांचा समावेश असून, येथील नागरिकांना उष्णतेच्या धोक्यापासून वाचवण्यासाठी हे संशोधन केंद्र मैलाचा दगड ठरणार आहे. सोमवारी जारी करण्यात आलेली एसओपी या १५ जिल्ह्यांसह मुंबईसह राज्याच्या इतर भागांमध्येही उष्णतेच्या लाटेसारखी परिस्थिती असताना लागू होईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. संबंधित भागांच्या प्रशासनाकडून या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी अपेक्षित आहे, विशेषतः बांधकाम, उद्योग आणि रस्त्यावरील विक्री यांसारख्या ठिकाणी, जिथे कामगारांना तीव्र उष्णतेचा सामना करावा लागतो, असे ते म्हणाले.दुपारी १२ ते ४ 'आऊटडोअर' कामे बंद आणि...उन्हाच्या वाढत्या तडाख्यापासून सर्वसामान्यांचे रक्षण करण्यासाठी राज्य सरकारने लागू केलेल्या नवीन 'एसओपी'मध्ये (SOP) आता बाहेरील क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व घटकांचा समावेश करण्यात आला आहे. नवीन नियमानुसार, जेव्हा शहरात 'ऑरेंज' किंवा 'रेड' अलर्ट असेल, तेव्हा सकाळी ६ ते ११ आणि सायंकाळी ४ ते ८ या वेळेतच कामे करणे शक्य होणार आहे. तर दुपारी १२ ते ४ या वेळेत कामातून सक्तीची विश्रांती घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या नियमावलीचा सर्वाधिक फायदा रस्त्यावरील विक्रेते, बांधकाम मजूर, डिलिव्हरी बॉईज, रिक्षाचालक, ट्रॅफिक पोलीस आणि कचरा वेचकांना होणार आहे. यासोबतच सुरक्षा रक्षक, हमाल, अंगणवाडी आणि आशा कार्यकर्त्यांनाही या संरक्षणात्मक चौकटीत आणले गेले आहे. कडाक्याच्या उन्हात काम केल्याने होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी कामाच्या वेळा अशा प्रकारे 'री-शेड्युल' करणे आता बंधनकारक असणार आहे.आता शहरांत ठिकठिकाणी मिळणार मोफत ORS आणि पाण्याची सुविधा!आता शहरातील महत्त्वाचे बाजार, ट्रॅफिक जंक्शन आणि कामगार नाक्यांवर विशेष 'वॉटर बूथ' (पाण्याची केंद्रे) उभारली जाणार आहेत. याशिवाय, महापालिका आणि स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने कामगारांना ORS आणि इलेक्ट्रोलाइट पाकिटांचे वाटप करणे बंधनकारक करण्यात आले आहे. उन्हापासून तात्पुरता बचाव करण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी सावलीच्या शेड्स उभारल्या जाणार असून, नागरिकांना दुपारी विश्रांती घेता यावी यासाठी शहरातील सर्व सार्वजनिक उद्याने आणि बागा दुपारी उघड्या ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षेसाठी योग्य प्रकाशयोजना आणि सुरक्षित प्रवासाची सोय करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. भविष्यात कायमस्वरूपी 'कूल रूफ' (थंड छप्पर) आणि अद्ययावत पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी खासगी संस्था आणि बाजार संघटनांनाही प्रोत्साहन दिले जाणार आहे.

फीड फीडबर्नर 16 Apr 2026 3:30 pm

Mumbai Crime : मुंबईत मॉर्निग वॉकला जाणाऱ्या महिलांमध्ये भीती ; नक्की काय घडतंय

मुंबई : दिवसभरच्या धाकधुकीतून पहाटे व्यायामाचा, मॉर्निंग वॉकचा वेळ काढत मुंबईकर रस्त्यावर धावताना, चालताना दिसतात. सकाळच्या वेळी काही मोजकीच व्यायाम करणारी लोक असतात, याचा फायदा घेत सोनसाखळी चोरटयांनी विक्रोळी, पंतनगर आणि टिळकनगर यांसारख्या परिसराला लक्ष केलं आहे. या परिसरातून अनेक चोरीच्या घटना समोर आल्या असून परिसरात सोनसाखळी चोरांची दहशत पसरली आहे.https://prahaar.in/2026/04/15/crime-news-fearing-a-blow-to-his-familys-reputation-a-boyfriend-did-something-shocking/चोरी करण्याची पद्धत सकाळी ६ ते ९ या वेळेत माणसे कमी असतात.बाकीची माणसे व्यायामात गुंतलेली असतात. चोरटे तेव्हाच आपला डाव साधत एकट्या फिरणाऱ्या महिलांना लक्ष्य करतात. दुचाकीवरून येऊन मागून महिलांच्या गळ्यातील चेन , सोनसाखळी ओढून पसार होतात. त्या परिसरातील पोलिसांना मिळालेल्या तक्रारीनुसार जवळपास एकूण ४ लाख ४५ हजार रुपयांचा सोन्याचा ऐवज हा लंपास झाला आहे.https://prahaar.in/2026/04/14/crime-8-arrested-in-human-trafficking-case-163-children-rescued/पोलिसांची करडी नजर इतक्या गुन्ह्यांची नोंद झाल्याने पोलिसांनी या भामट्यांवर करडी नजर ठेवली, काहींना रंगेहात पडकून कायद्याचा बडगा दाखवला आहे. पंतनगर परिसरातून चोरी करून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या २ सोनसाखळी चोरांना पोलिसांनी पाठलाग करता रंगेहाथ पकडून त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. एकाच पद्धतीने ही चोरी केली जात आहे हे पोलिसांच्या लक्षात आले असून यामागे एखादी टोळीच असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.नागरिकांनी आपली खबरदारी घेऊनच मॉर्निंग वॉकला जावे, संशयास्पद वाटल्यास पोलिसांना तात्काळ कळवावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

फीड फीडबर्नर 16 Apr 2026 3:30 pm

वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात नियोजन भवन इमारतीचे भूमिपूजन

मुंबई : मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात बांधण्यात येणाऱ्या नियोजन भवन इमारतीचा भूमिपूजन सोहळा आज वांद्रे पूर्व येथे उत्साहात झाला. मुंबई उपनगरचे पालकमंत्री तसेच माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी विधिवत भूमिपूजन व कुदळ मारून या इमारतीच्या बांधकामाचा शुभारंभ केला. भूमिपूजन सोहळ्यास आमदार संजय उपाध्याय, जिल्हाधिकारी सौरभ कटियार तसेच जिल्हा नियोजन अधिकारी व जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. तत्पूर्वी सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी जागेची पूजा अर्चना केली.जिल्हा नियोजन समितीच्या कामकाजासाठी आवश्यक असणाऱ्या जिल्हा ‘नियोजन भवन’ उभारणीच्या कामाचे आज भूमीपूजन केले.यावेळी आमदार संजय उपाध्याय, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार आणि अन्य शासकीय अधिकारी उपस्थित होते. #AshishShelar pic.twitter.com/cbjgQiex4X— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) April 16, 2026वांद्रे (पूर्व) येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात “नियोजन भवन” उभारण्याचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, जिल्हा नियोजन समितीच्या कामकाजासाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे. महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाने प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र नियोजन भवन उभारण्याच्या सूचनेनुसार हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाला १९ नोव्हेंबर २०२५ रोजी सुमारे ७४१.०४ लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली असून, ६ फेब्रुवारी २०२६ रोजी तांत्रिक मान्यताही प्रदान करण्यात आली आहे. एकूण १०३१.२५ चौरस मीटर बांधकाम क्षेत्र असलेल्या या इमारतीचे काम दोन टप्प्यांत पूर्ण केले जाणार आहे.पहिल्या टप्प्यात तळमजला आणि एक मजला असलेली मुख्य इमारत उभारण्यात येणार आहे. यामध्ये ३०० आसनक्षमतेचे भव्य सभागृह, दोन स्वतंत्र ग्रीन रूम, किचन व पॅन्ट्री तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक सुविधा उभारल्या जाणार आहेत. पहिल्या मजल्यावर जिल्हा नियोजन समितीचे कार्यालय आणि लहान सभागृहाचीही व्यवस्था असेल. प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात अंतर्गत सजावट, सभागृहाचे ध्वनीरोधक काम, फॉल्स सिलिंग, दरवाजे तसेच आवश्यक फर्निचर आणि इतर पूरक सुविधा विकसित करण्यात येणार आहेत. हा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना पालकमंत्री ॲड.शेलार यांनी सर्व संबंधितांना यावेळी दिल्या.

फीड फीडबर्नर 16 Apr 2026 3:30 pm

Amravati Crime News : मित्राची रूम, दोन मुली अन् कॅमेऱ्याचं जाळं; परतवाडा व्हायरल व्हिडिओ प्रकरणात अयान अहमदच्या 'त्या'कृत्याचा पोलिसांनी केला पर्दाफाश!

अमरावती : परतवाडा येथे सोशल मीडियावर आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्याच्या प्रकरणाला आता एक गंभीर वळण मिळाले आहे. या प्रकरणाच्या पोलीस तपासात केवळ व्हिडिओ व्हायरल झाले नसून, दोन पीडित मुलींचे लैंगिक शोषण झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद याने पोलिसांसमोर आपला गुन्हा कबूल केला आहे. त्याने दिलेल्या माहितीनुसार, अमरावती शहरातील आपल्या एका मित्राची रूम त्याने काही तासांसाठी भाड्याने घेतली होती आणि तिथेच या मुलींवर अत्याचार केले. सुरुवातीला केवळ सोशल मीडियावरील गैरकृत्य वाटणाऱ्या या घटनेत आता लैंगिक शोषणाचे गंभीर गुन्हे उघड झाल्याने परिसरात खळबळ माजली आहे. पोलीस आता या प्रकरणातील इतर धागेदोरे आणि आरोपीच्या मित्राच्या भूमिकेचा अधिक तपास करत आहेत.शोषणाचे धक्कादायक वास्तव समोरया प्रकरणातील मुख्य मास्टरमाईंड अयान अहमद तनवीर अहमद (१९) याच्या अटकेनंतर पोलिसांनी तपासाचा फास आवळला असून, या प्रकरणात आतापर्यंत एकूण आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे. अयान अहमद याच्या मदतीला असलेल्या त्याच्या चार मित्रांनाही पोलिसांनी अटक केली आहे. या मित्रांनीच पीडित मुलींचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा प्राथमिक आरोप आहे. चौकशीदरम्यान अयानने कबुली दिली आहे की, अमरावती येथील एका मित्राच्या भाड्याच्या खोलीचा वापर करून त्याने दोन मुलींचे लैंगिक शोषण केले. हा मित्र केवळ काही तासांसाठी आपली रूम अयानला गुन्हेगारी कृत्यासाठी उपलब्ध करून देत असे. पोलिसांनी या रूम देणाऱ्या मित्रालाही ताब्यात घेतले आहे. पीडित मुली अद्याप स्वतःहून समोर आल्या नसून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. मात्र, आरोपींच्या मोबाईलमधील तांत्रिक पुराव्यांवरून या अत्याचाराची पुष्टी झाली आहे. याप्रकरणी पोलीस अजूनही काही संशयितांची चौकशी करत असून, अटकेतील आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे परतवाडा आणि अमरावती परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.https://prahaar.in/2026/04/16/heatwave-sop-mandates-12-4pm-break-for-informal-workers/अटक आरोपींची साखळी १६ एप्रिलच्या रात्रीपर्यंत पोलिसांनी एकूण ४ मुख्य आरोपींना अटक केली आहे. अयान अहमद तनवीर अहमद (१९) : मुख्य आरोपी (अत्याचार करणारा). उजेरखान इकबाल खान (२०) : व्हिडिओ डाऊनलोड करून व्हायरल करणारा. मोहम्मद साद मोहम्मद साबीर (२२) : व्हॉट्सॲपवरून व्हिडिओ शेअर करणारा. तरबेज खान तसलिम खान (२४) : व्हिडिओ प्रसारात सक्रिय सहभाग.चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्यांची संख्या सहावर पोहोचली आहे.४५ सदस्यांची SITआरोपींनी पीडित मुलींचे १८ व्हिडिओ आणि ३९ फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले होते. या प्रकरणी ४५ सदस्यीय विशेष चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे.

फीड फीडबर्नर 16 Apr 2026 3:30 pm

Krirtik kamra: कृतिका-गौरवचे ‘डेस्टिनेशन वेडिंग’ न करता घराच्या छतावर लग्न; म्हणाली “धार्मिक विधींमध्ये…”

Krirtik kamra : कृतिका ‘कितनी मोहब्बत है’ आणि ‘कुछ तो लोग कहेंगे’ या मालिकांसाठी ओळखली जाते.

दैनिक प्रभात 16 Apr 2026 3:29 pm

Artificial Intelligence: डोनाल्ड ट्रम्प यांना आता AI ची भीती ; म्हणाले,”या तंत्रज्ञानाला ‘किल स्विच’ची आवश्यकता..”

Artificial Intelligence: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना एआय (AI) बद्दल चिंता वाटते. त्यांच्या मते, एआयच्या सतत वाढणाऱ्या विकासावर नियंत्रण ठेवण्यासाठी 'किल स्विच'ची (kill switch) गरज आहे.

दैनिक प्रभात 16 Apr 2026 3:19 pm

Vada Pav Recipe: घरच्या घरी बनवा मुंबई स्टाइल वडा पाव! फक्त २० मिनिटांत तयार होणारी सोपी रेसिपी

Vada Pav Recipe ही डिश मुख्यतः मसालेदार बटाट्यापासून आणि मऊ पावपासून बनते. त्यावर तिखट आणि गोड चटणी लावून सर्व्ह केल्यावर त्याची चव आणखी वाढते. फक्त २० मिनिटांत तयार होणारी ही रेसिपी नाश्त्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकते.

दैनिक प्रभात 16 Apr 2026 2:44 pm

Nari Shakti Vandan Adhiniyan: महिला आरक्षणाशी संबंधित तीन विधेयके लोकसभेत सादर ; ‘या’विधेयकांमुळे देशात काय बदल होणार आहे? वाचा

Nari Shakti Vandan Adhiniyan: केंद्र सरकारने आज महिला आरक्षणाशी संबंधित तीन महत्त्वपूर्ण सुधारणा विधेयके सादर केली.

दैनिक प्रभात 16 Apr 2026 2:29 pm

Terrorist Amir Hamza : भारतातील अनेक दहशतवादी हल्ल्यांमागील सूत्रधार दहशतवादी अमीर हमजावर गोळीबार; प्रकृती गंभीर

- लष्कर-ए-तैयबाचा संस्थापक सदस्य अमीर हमजा याच्यावर लाहोरमध्ये गोळीबारपाकिस्तानातील दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा (LeT)चा संस्थापक सदस्य अमीर हमजा याच्यावर लाहोरमध्ये अज्ञात बंदूकधाऱ्यांनी गोळीबार केला आहे. सध्या त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, लाहोरमधील एका न्यूज चॅनलच्या कार्यालयाबाहेर अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या आणि घटनास्थळावरून फरार झाले.वर्षभरात दुसऱ्यांदा हल्ला :गेल्या वर्षी मे महिन्यातही अमीर हमजावर त्याच्या लाहोरमधील घराबाहेर गोळीबार करण्यात आला होता. त्यावेळीही त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या घटनेनंतर पाकिस्तान प्रशासनाने त्याची सुरक्षा वाढवली होती, मात्र अधिकृत प्रतिक्रिया देण्याचे टाळले होते.कोण आहे अमीर हमजा?१० मे १९५९ रोजी पंजाब प्रांतातील गुजरनवाला येथे जन्मलेला अमीर हमजा हा अफगाण जिहादचा अनुभवी सदस्य मानला जातो. १९८५-८६ दरम्यान त्याने हाफिज सईदसोबत मिळून लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेची स्थापना केली होती. भारतासह जगभरातील अनेक दहशतवादी कारवायांशी त्याचा संबंध असल्याचे सांगितले जाते.https://prahaar.in/2026/04/15/pakistans-inefficient-healthcare-system-331-children-were-given-aids-injections-with-a-single-needle-many-died/तो लष्कर-ए-तैयबामधील हाफिज सईदनंतरचा दुसरा महत्त्वाचा नेता मानला जातो. संघटनेच्या प्रचार यंत्रणा आणि संपर्क मोहिमांमध्ये त्याची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. अमेरिकेच्या ट्रेझरी विभागाने त्याला दहशतवादी म्हणून घोषित करून निर्बंध घातले आहेत.प्रचार आणि दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय भूमिका :हमजा हा लष्करच्या विचारसरणीचा प्रमुख चेहरा मानला जातो. तो प्रभावी वक्ता आणि लेखक असून संघटनेच्या प्रचारासाठी सक्रिय होता. त्याने अनेक पुस्तके लिहिली असून 'काफिला दावत और शहादत' हे त्याचे पुस्तक विशेष चर्चेत राहिले. तसेच, तो संघटनेच्या ‘स्पेशल कॅम्पेन्स’ विभागाचे नेतृत्व करत होता, ज्याद्वारे निधी उभारणी आणि दहशतवादी कारवायांसाठी लोकांना प्रवृत्त केले जात होते.लष्करपासून दूर? तरीही कारवाया सुरू२०१८ मध्ये पाकिस्तान सरकारने लष्करच्या निधीवर कारवाई केल्यानंतर हमजाने संघटनेपासून काहीसे अंतर घेतल्याचे सांगितले गेले. त्यानंतर त्याने ‘जैश-ए-मन्काफा’ नावाचा स्वतंत्र गट स्थापन केला. मात्र, तो अजूनही लष्करसाठी निधी उभारणी करत असल्याचे आणि जम्मू-काश्मीरमधील कारवायांना पाठिंबा देत असल्याचे आरोप आहेत.गोळीबारामागील कारण अस्पष्ट :या हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पाकिस्तानमधील सुरक्षा यंत्रणा तपास करत आहेत. या घटनेमुळे पुन्हा एकदा दहशतवादी संघटनांमधील अंतर्गत संघर्ष किंवा टार्गेटेड हल्ल्यांची शक्यता व्यक्त केली जात आहे.

फीड फीडबर्नर 16 Apr 2026 2:10 pm

IPL 2026 RCB vs CSK : 'डोसा-इडली-सांबर-चटणी'गाण्यावरून संतापली चेन्नई; केली बीसीसीआयकडे तक्रार

- जाणून घ्या नेमकं प्रकरण कायआयपीएल २०२६ मधील रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (RCB) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) यांच्यातील सामना मैदानापुरताच मर्यादित राहिला नाही, तर आता तो वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ५ एप्रिल रोजी बंगळूरच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यादरम्यान वाजवण्यात आलेल्या एका गाण्यावरून सीएसकेने थेट बीसीसीआयकडे तक्रार केली आहे.सीएसकेच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या डावापूर्वी “डोसा, इडली, सांबार, चटणी” हे गाणे वाजवून संघाची खिल्ली उडवण्यात आली. यामुळे खेळाडूंचा अपमान झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.डीजेच्या वर्तनावरही आक्षेप :वृत्तानुसार, आयपीएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सीएसकेची तक्रार प्राप्त झाल्याची पुष्टी केली असून, या प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे. सीएसकेचे व्यवस्थापकीय संचालक काशी विश्वनाथन यांनीही नाराजी व्यक्त करत सांगितले की, स्टेडियममधील डीजेचे काम प्रेक्षकांचे मनोरंजन करणे असते, परंतु खेळाडूंवर टिप्पणी करणे किंवा त्यांची चेष्टा करणे हे खेळाच्या भावनेविरुद्ध आहे.https://prahaar.in/2026/04/13/hardik-pandya-hat-trick-in-mumbais-defeat-hardik-pandyas-captaincy-criticized-by-veteran-players-and-everyone-around/‘डोसा-इडली’ गाण्यावरून आधीही वाद :हे गाणे याआधीही चर्चेत राहिले आहे. संगीतकार गणा अप्पू यांच्याशी संबंधित असलेले हे गाणे RCB-CSK सामन्यांदरम्यान वारंवार वादाचे कारण ठरले आहे. गेल्या वर्षी यष्टिरक्षक जितेश शर्मा याने हे गाणे गातानाचा व्हिडिओ शेअर केल्यानंतर सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला होता.‘सदर्न डर्बी’त वाढता तणाव :चेन्नई आणि बंगळूर यांच्यातील सामने आता ‘सदर्न डर्बी’ म्हणून ओळखले जातात आणि ही स्पर्धा दिवसेंदिवस अधिक तीव्र होत आहे. विशेष म्हणजे, 2024 पासून RCB ने CSK विरुद्ध सलग चार सामने जिंकले आहेत, ज्यामुळे दोन्ही संघांमधील तणाव आणखी वाढला आहे.BCCI च्या निर्णयाकडे लक्ष :या संपूर्ण प्रकरणावर आता BCCI आणि IPL गव्हर्निंग कौन्सिल काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या वादावर पुढे काय कारवाई होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

फीड फीडबर्नर 16 Apr 2026 1:30 pm

Sahar Sheikh: “कैसा हराया…” म्हणणाऱ्या सहर शेख नॉट रिचेबल; नगरसेवक पद धोक्यात येताच गायब?

Sahar Sheikh: सहर शेख यांचे वडील युनूस इक्बाल शेख हे मूळचे उत्तर प्रदेशातील गाजियाबादमधील

दैनिक प्रभात 16 Apr 2026 1:28 pm

Amit Shah on Akhilesh yadav: ‘धर्माच्या आधारावर मुस्लिमांना आरक्षण देणे घटनाबाह्य ‘ ; अमित शाह-अखिलेश यादव यांच्यात शाब्दिक चकमक

Amit Shah on Akhilesh yadav: महिला आरक्षण लागू करण्यासाठी आजपासून संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. आजपासून पुढील 2 दिवस हे विशेष अधिवेशन होणार आहे.

दैनिक प्रभात 16 Apr 2026 1:15 pm

Vinod Kambli : मैदानातील हिरो, आयुष्याच्या खेळपट्टीवर हतबल! माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीला ब्रेनस्ट्रोकचा धोका

आपल्या निर्भीड शैली, आकर्षक रूप आणि क्रिकेटच्या मैदानातील स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जाणारा विनोद कांबळी सध्या खऱ्या आयुष्यात एका अत्यंत कठीण परिस्थितीतून जात आहेत. एकेकाळी आपल्या प्रतिभेने लाखो लोकांचे मन जिंकणाऱ्या कांबळींची सध्याची अवस्था कोणालाही कळवळायला लावणारी आहे. पण, दिलासादायक बाब ही आहे की या कठीण काळात तो एकटा नाही, त्यांचे जवळचे मित्र त्यांच्या प्रकृती सुधारण्याची आशा बाळगून आहेत.कांबळीचा जवळचा मित्र, मार्कस कुटो म्हणाला, सुमारे एक वर्षापूर्वी कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ आढळली होती, ज्यावर उपचार करण्यात आले. डॉक्टरांच्या मते, ही गाठ पूर्णपणे काढता येत नाही, त्यामुळे भविष्यात त्याला पक्षाघाताचा धोका आहे. सध्या तो चालू शकतो, पण त्याची स्मरणशक्ती पूर्वीसारखी तल्लख नाही आणि तो अनेक गोष्टी विसरतो.https://prahaar.in/2026/04/16/vaishali-rameshbabu-chess-player-r-vaishalis-historic-feat-r-vaishali-became-the-first-indian-woman-to-win-candidates/कांबळीने दारू पूर्णपणे सोडली आहे, हे एक सकारात्मक चिन्ह आहे. पण, धूम्रपान त्याच्या आरोग्यासाठी एक मोठा धोका आहे. डॉक्टर आणि मित्रांच्या मते, जर त्याने हे सोडले नाही, तर त्याला भविष्यात गंभीर समस्यांना सामोरे जावे लागू शकते.https://prahaar.in/2026/04/14/ipl-2026-srh-vs-rr-vidarbhas-praful-hinge-wreaks-havoc-hyderabad-succeeds-in-stopping-rajasthans-victory-streak/मी कांबळीच्या मित्रांचा एक WhatsApp Group बनवला आहे. या ग्रुपमध्ये बहुतांश क्रिकेटपटू आहेत. हे क्रिकेटपटू आपली ओळख न सांगता कांबळीसाठी आर्थिक मदत करत आहेत”, असं कुटो यांनी सांगितलं.गेल्या वर्षी, प्रकृती अचानक खालावल्याने कांबळीला ठाण्यातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याला लघवीचा संसर्ग आणि स्नायूदुखीचा त्रास होत होता. तपासणीदरम्यान त्यांच्या मेंदूत रक्ताची गाठ आढळून आली. त्यांच्यावर सुमारे दोन आठवडे उपचार करण्यात आले, त्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आणि त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर कांबळी यांनी आपल्या चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. त्याने लोकांना दारू आणि अमली पदार्थांपासून दूर राहण्याचे आवाहन केले, कारण वाईट सवयी आयुष्य उद्ध्वस्त करतात.

फीड फीडबर्नर 16 Apr 2026 1:10 pm

India France Relations : फ्रान्स हा भारताच्या सर्वात विश्वासू आणि मैत्रीपूर्ण भागीदारांपैकी एक - लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला

फ्रान्स हा भारताचा सर्वात विश्वासार्ह आणि मैत्रीपूर्ण भागीदारांपैकी एक आहे असे सांगत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दोन्ही देशांमधील खोलवर रुजलेले आणि दीर्घकालीन संबंध अधोरेखित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यातील जिव्हाळ्याच्या वैयक्तिक संबंधांमुळे द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत आणि दृढ होण्यास मोठी गती मिळाली आहे, असे त्यांनी नमूद केले. फ्रान्सच्या सिनेटच्या भारत-फ्रान्स आंतर-संसदीय मैत्री गटाच्या शिष्टमंडळाने संसद भवनात बिर्ला यांची भेट घेतली, त्यावेळी त्यांनी हे विचार व्यक्त केले.फ्रान्सच्या संसदेत महिलांचे प्रतिनिधित्व ३६ टक्क्यांहून अधिक असल्याबद्दल प्रशंसा करताना बिर्ला यांनी, भारत देखील प्रशासनातील महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी सातत्यपूर्ण वैधानिक आणि संस्थात्मक प्रयत्न करत आहे यावर भर दिला. तळाच्या स्तरापर्यंत , विशेषतः पंचायती राज संस्थांमध्ये महिलांचे प्रतिनिधित्व अत्यंत उत्साहवर्धक असल्याचे त्यांनी समाधानाने नमूद केले.Pleased to meet the delegation of the France–India Parliamentary Friendship Group at the Parliament House and engage with the distinguished members on strengthening bilateral ties and parliamentary cooperation.Our discussions highlighted the strength of the India–France special… pic.twitter.com/I0vIM8mgDM— Om Birla (@ombirlakota) April 15, 2026बिर्ला यांनी शिष्टमंडळाला पुढे माहिती दिली की, नव्याने बांधलेल्या संसद भवनात संमत करण्यात आलेले पहिले विधेयक 'नारी शक्ती वंदन अधिनियम' हे होते, जे निवडून आलेल्या वैधानिक संस्थांमध्ये महिलांसाठी एक-तृतीयांश आरक्षणाची तरतूद करत आहे. हा ऐतिहासिक कायदा महिला-प्रणीत विकास आणि सर्वसमावेशक प्रशासनाप्रति भारताची ठाम वचनबद्धता दर्शवतो, असे त्यांनी अधोरेखित केले.भारत आणि फ्रान्स यांच्यातील राजनैतिक आणि संसदीय अशा दोन्ही स्तरांवरील नियमित आणि विधायक संवादाबद्दल बिर्ला यांनी समाधान व्यक्त केले. त्यांनी गेल्या वर्षी 'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारतीय संसदीय शिष्टमंडळाच्या फ्रान्स भेटीची आठवण करून दिली आणि त्या काळात फ्रान्सने दहशतवादाच्या स्पष्ट शब्दांत केलेल्या निषेधाची प्रशंसा केली. त्यांनी फ्रेंच शिष्टमंडळाच्या सदस्यांचा सातत्यपूर्ण पाठिंबा आणि एकजुटीच्या भावनेबद्दल त्यांचे आभार मानले.

फीड फीडबर्नर 16 Apr 2026 1:10 pm

Liver health: लिव्हर ठेवा फिट आणि मजबूत! आहारात या गोष्टी घेतल्या तर मिळेल जबरदस्त फायदा

Liver health आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत चुकीचा आहार, जंक फूड, मद्यपान आणि व्यायामाचा अभाव यामुळे लिव्हरवर वाईट परिणाम होतो. वेळेवर काळजी घेतली नाही तर फॅटी लिव्हर, सूज किंवा इतर गंभीर आजार होऊ शकतात. मात्र योग्य आहार घेतल्यास लिव्हर निरोगी आणि मजबूत ठेवता येतो.

दैनिक प्रभात 16 Apr 2026 1:06 pm

Vidhan Parishad Election : अखेर विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Vidhan Parishad Election : विधान परिषदेच्या ९ जागा १३ मे रोजी रिक्त होत आहेत.

दैनिक प्रभात 16 Apr 2026 12:38 pm

Bita Hemmati: बीता हेमातीविषयी इराणच्या न्यायाधीशांचा क्रूर निर्णय ; इतिहासात पहिल्यांदाच दिली जाणार ‘ही’शिक्षा

Bita Hemmati: अमेरिकेसोबतच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर, इराण आपल्या पहिल्या महिला आंदोलकाला फाशी देण्याची तयारी करत आहे.

दैनिक प्रभात 16 Apr 2026 12:34 pm

Maharashtra Vidhan Parishad Election 2026 : विधानपरिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर

- १२ मे रोजी मतदान; संख्याबळानुसार महाविकास आघाडीच्या पदरात केवळ एकच जागा पडणारमुंबई : विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर आता राज्याच्या वरिष्ठ सभागृहातही विरोधकांची पीछेहाट होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. विधानपरिषदेच्या ९ रिक्त जागांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला असून, येत्या १२ मे रोजी यासाठी मतदान होणार आहे. विधानसभेतील सध्याचे पक्षीय बलाबल पाहता, या निवड सत्ताधारी महायुतीचे वर्चस्व राहणार असून, महाविकास आघाडीला ९ पैकी केवळ एका जागेवर समाधान मानावे लागणार आहे.या निवडणुकीसाठी २३ एप्रिल रोजी अधिसूचना जारी होईल. तर, ३० एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. १२ मे रोजी सकाळी ९ ते ४ या वेळेत मतदान पार पडेल आणि त्याच दिवशी संध्याकाळी ५ वाजता मतमोजणी होऊन निकाल स्पष्ट होईल. निवृत्त होणाऱ्या सदस्यांमध्ये भाजपचे रणजितसिंह मोहिते-पाटील, संजय केनेकर, संदीप जोशी आणि दादाराव केचे यांचा समावेश आहे. याशिवाय नीलम गोऱ्हे (शिवसेना), अमोल मिटकरी (राष्ट्रवादी), शशिकांत शिंदे (राष्ट्रवादी- शरद पवार गट), राजेश राठोड (काँग्रेस) आणि उद्धव ठाकरे (उबाठा) यांचीही मुदत संपत आहे. विधानसभेत महायुतीचे (भाजप १३२, शिवसेना ५७ आणि अजित पवार गट ४१) असे प्रचंड संख्याबळ आहे. त्यातच राहुरी आणि बारामती पोटनिवडणुकीनंतर महायुतीच्या खात्यात आणखी दोन आमदारांची भर पडणार असल्याने ९ पैकी ७ जागांवर महायुतीचा विजय सुकर मानला जात आहे.एका जागेमुळे मविआत पेच :महाविकास आघाडीकडे सध्या एकूण ४६ (उबाठा २०, काँग्रेस १६ आणि शरद पवार गट १०) आमदार आहेत. एका जागेसाठी लागणारा कोटा पाहता मविआचा एक उमेदवार सहज निवडून येऊ शकतो. मात्र, दुसऱ्या जागेसाठी त्यांना किमान १० मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. राज्यसभेच्या वेळी झालेल्या तडजोडीनुसार, यावेळी शरद पवार गटाला माघार घ्यावी लागण्याची शक्यता असून, ही एकमेव जागा ‘उबाठा’ गटाच्या पदरात पडू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.भाजपमध्ये इच्छुकांची गर्दी :भाजप आपल्या रिक्त होणाऱ्या जागांच्या तुलनेत अधिक जागा जिंकण्याच्या स्थितीत आहे. पक्षाकडून केशव उपाध्ये, माधवी नाईक, रणजीतसिंह नाईक निंबाळकर, राम सातपुते यांच्या नावांची चर्चा सुरू असून, अनेक माजी आमदार आणि पदाधिकाऱ्यांनीही परिषदेसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.निवडणूक कार्यक्रम असाअधिसूचना : २३ एप्रिल २०२६अर्ज भरण्याची शेवटची तारीख : ३० एप्रिल २०२६अर्जांची छाननी : २ मे २०२६अर्ज मागे घेण्याची मुदत : ४ मे २०२६मतदान : १२ मे २०२६ (सकाळी ९ ते ४)निकाल : १२ मे २०२६ (संध्याकाळी ५ वाजता)

फीड फीडबर्नर 16 Apr 2026 12:30 pm

Madhubala biopic: मधुबालाच्या बायोपिकसाठी शर्वरी आघाडीवर? सारा, साई पल्लवीलाही टक्कर

Madhubala biopic मीडिया रिपोर्ट्सनुसार, शर्वरीला या महत्त्वाच्या भूमिकेसाठी विचारले जात आहे. काही अहवालांमध्ये असेही म्हटले जात आहे की, ती या रोलसाठी टॉप चॉइसपैकी एक आहे. मात्र, अद्याप याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे शर्वरीची निवड निश्चित झाली आहे का, याबाबत अजून स्पष्टता नाही.

दैनिक प्रभात 16 Apr 2026 12:27 pm

Sanjay Shirsat : महापालिकेची इमारत ‘भुतिया’, तिथे आत्मे वावरतात; महायुतीच्या मंत्र्याचा खळबळजनक दावा

Sanjay Shirsat : महायुतीमधील एका मंत्र्याने छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या इमारतीसंदर्भात एक धक्कादायक दावा केला आहे.

दैनिक प्रभात 16 Apr 2026 12:23 pm

Iran - America War : चीनच्या मदतीने इराण करतोय अमेरिकन तळांवर हल्ले? गुप्त दस्तावेजांतून धक्कादायक माहिती

पश्चिम आशियातील अलीकडील युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणच्या लष्करी क्षमतेबाबत एक महत्त्वपूर्ण आणि धक्कादायक खुलासा समोर आला आहे. अहवालानुसार, इराणने गुप्तपणे चीनकडून एक गुप्तचर उपग्रह मिळवला असून, त्याच्या मदतीने संपूर्ण प्रदेशातील अमेरिकन लष्करी तळांवर नजर ठेवून हल्ल्यांसाठी धोरणात्मक माहिती गोळा केली.अहवालानुसार, “टीईई-०१बी” नावाचा हा उपग्रह चीनी कंपनी “अर्थ आय को.” यांनी तयार केला असून चीनमधूनच त्याचे प्रक्षेपण करण्यात आले. २०२४ च्या अखेरीस हा उपग्रह इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (आयआरजीसी)च्या एरोस्पेस फोर्सच्या ताब्यात देण्यात आला. अहवालात लीक झालेल्या इराणी लष्करी कागदपत्रांचा हवाला देत म्हटले आहे की, आयआरजीसीच्या कमांडरांनी या उपग्रहाला थेट निर्देश देऊन पश्चिम आशियातील प्रमुख अमेरिकन लष्करी तळांवर नजर ठेवण्याचे काम करवून घेतले. या कागदपत्रांमध्ये वेळ-नोंद असलेले कोऑर्डिनेट्स, उपग्रह प्रतिमा आणि कक्षीय विश्लेषण समाविष्ट आहे, ज्यातून ही निगराणी अत्यंत नियोजनबद्ध आणि प्रणालीबद्ध पद्धतीने करण्यात आल्याचे दिसून येते.https://prahaar.in/2026/04/16/rohingya-refugee-boat-capsizes-in-andaman-sea-250-missing/माहितीनुसार, या उपग्रहाने घेतलेल्या प्रतिमा मार्च महिन्यातील असून, त्याच ठिकाणी ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले झाले होते. अहवालात असेही नमूद करण्यात आले आहे की, हल्ल्यांपूर्वी आणि नंतरच्या प्रतिमांचे विश्लेषण करून हल्ल्यांचा परिणाम किती प्रभावी होता, हेही तपासण्यात आले. मात्र, वृत्तसंस्थेला या अहवालाची स्वतंत्रपणे पुष्टी करता आलेली नाही, त्यामुळे अधिकृत पुष्टी अद्याप बाकी आहे.https://prahaar.in/2026/04/15/pakistans-inefficient-healthcare-system-331-children-were-given-aids-injections-with-a-single-needle-many-died/अहवालानुसार, या करारांतर्गत इराणला बीजिंगस्थित उपग्रह नियंत्रण आणि डेटा सेवा देणाऱ्या “एम्पोसॅट” कंपनीच्या व्यावसायिक ग्राउंड स्टेशन्सपर्यंत प्रवेश देण्यात आला. या ग्राउंड स्टेशन्सचे जाळे आशिया, लॅटिन अमेरिका आणि इतर भागांमध्ये पसरलेले असल्याने, उपग्रह संचालन आणि डेटा प्रेषणामध्ये इराणला मोठा तांत्रिक फायदा मिळाला.या उपग्रहाने घेतलेल्या छायाचित्रांमध्ये सौदी अरेबियातील “प्रिन्स सुलतान एअर बेस” प्रमुख आहे. या ठिकाणाचे फोटो १३, १४ आणि १५ मार्च रोजी घेण्यात आले होते. १४ मार्च रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या एअर बेसवरील अमेरिकन विमानांना हल्ल्यात नुकसान झाल्याची पुष्टी केली होती.याशिवाय, या उपग्रहाने जॉर्डनमधील “मुवाफ्फाक साल्टी हवाई तळ”, बहरीनची राजधानी “मनामा” जवळील अमेरिकन पाचव्या नौदल तळाच्या परिसराचे, तसेच इराकमधील “एरबिल विमानतळ” परिसराचेही निरीक्षण केले. या सर्व ठिकाणी त्या काळात इराणकडून हल्ल्यांचे दावे करण्यात आले होते. या संपूर्ण प्रकरणावर अद्याप व्हाईट हाऊस, सीआयए, पेंटागॉन, चीनचे परराष्ट्र व संरक्षण मंत्रालय, तसेच “अर्थ आय को.” आणि “एम्पोसॅट” यांच्याकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

फीड फीडबर्नर 16 Apr 2026 12:10 pm

India LPG Crisis: LPG पुरवठ्याबाबत मोठी बातमी ! भारताचे देशांतर्गत गॅस उत्पादन घटले, आयातही निम्म्याने कमी ; नेमके काय कारण?

India LPG Crisis: एप्रिल महिन्यात भारताच्या लिक्विड पेट्रोलियम वायू (एलपीजी) पुरवठ्यावर दबाव निर्माण झाला आहे.

दैनिक प्रभात 16 Apr 2026 12:10 pm

Chiraiya web series: ‘चिरैया’ला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद! दिव्या दत्ता भावूक, सोशल मीडियावर मानले आभार

Chiraiya web series ‘चिरैया’ ही सहा भागांची हिंदी ड्रामा सिरीज आहे. या सिरीजमध्ये वैवाहिक अत्याचार (marital rape) आणि पितृसत्ताक विचारसरणी यांसारख्या गंभीर आणि संवेदनशील विषयांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. आपल्या समाजात अनेकदा या विषयांवर खुलेपणाने चर्चा होत नाही, मात्र या सिरीजमुळे या मुद्द्यांवर बोलण्याची गरज अधोरेखित करण्यात आली आहे.

दैनिक प्रभात 16 Apr 2026 11:48 am

R Vaishali : आर वैशालीने रचला इतिहास; ठरली पहिली भारतीय महिला बुद्धिबळ खेळाडू

R Vaishali : वैशालीने रशियाच्या कॅटरीना लॅगनो हिला पराभूत करत ८.५ गुणांची कमाई केली

दैनिक प्रभात 16 Apr 2026 11:32 am

Airtel plans: एअरटेलचा मोठा निर्णय! आता २८ नव्हे तर पूर्ण ३० दिवसांची वैधता, OTT आणि डेटा भरपूर

Airtel plans या नव्या बदलात ग्राहकांना केवळ जास्त वैधता नाही, तर डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि OTT प्लॅटफॉर्म्सचे फायदेही दिले जात आहेत.

दैनिक प्रभात 16 Apr 2026 11:31 am

Vaishali Rameshbabu : आर. वैशालीचा ऐतिहासिक पराक्रम! ठरली कॅन्डिडेट्स जिंकणारी पहिली भारतीय महिला

मुंबई : भारतीय बुद्धिबळपटू आर. वैशाली (R Vaishali) हिने इतिहास रचत सायप्रसमध्ये झालेली फिडे महिला कॅन्डिडेट्स टूर्नामेंट २०२६ जिंकली. ही स्पर्धा जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली असून भारतीय बुद्धिबळासाठी हा अभिमानाचा क्षण आहे.या शानदार कामगिरीमुळे वैशालीला आता महिला विश्वचॅम्पियनशिपमध्ये चीनच्या विद्यमान विजेत्या जू वेनजुन (Ju Wenjun) विरुद्ध खेळण्याची संधी मिळणार आहे. हा सामना वर्षाच्या अखेरीस होणार असून त्याचे बक्षीस सुमारे २.७ कोटी रुपये आहे.महान बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद (Viswanathan Anand) यांनी वैशालीच्या या यशाला ऐतिहासिक संबोधले आहे. त्यांनी नमूद केले की, आता ओपन आणि महिला अशा दोन्ही विश्वचॅम्पियनशिपमध्ये भारताचे प्रतिनिधित्व असेल. विशेष म्हणजे डी. गुकेश (D Gukesh) आधीच ओपन विश्वविजेता ठरला आहे.https://prahaar.in/2026/04/16/relief-in-hormuz-tension-jag-vikram-lpg-ship-safely-arrives-at-kandla-port/अंतिम फेरीत वैशालीचा विजय इतर सामन्यांच्या निकालांवर अवलंबून होता. दिव्या देशमुख हिने बिबिसारा असोबायेवाविरुद्ध सामना बरोबरीत ठेवत वैशालीसाठी मार्ग मोकळा केला. त्यानंतर पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळताना वैशालीने कॅटेरिना लॅग्नोवा (Kateryna Lagn) हिच्यावर मात करत विजेतेपद पटकावले.स्पर्धेदरम्यान वैशालीने टॅन झोंगयी (Tan Zhongyi) आणि अलेक्झांड्रा गोर्याचकिना (Alexandra Goryachkina) यांसारख्या बलाढ्य प्रतिस्पर्ध्यांना पराभूत केले. ॲना मुझीचुक (Anna Muzychuk) विरुद्धचा सामना बरोबरीत सोडवत तिने महत्त्वाचे गुण मिळवले. जरी Zhu Jiner विरुद्ध तिला दोन पराभव पत्करावे लागले, तरी तिने जोरदार पुनरागमन करत स्पर्धा आपल्या नावावर केली.https://prahaar.in/2026/04/16/nashik-mnc-forced-conversion-case-7-people-arrested-in-womens-torture-and-conversion-case-main-mastermind-nida-khan-absconding/या विजयासह वैशालीने सुमारे २५ लाख रुपयांचे पारितोषिकही जिंकले आहे. तिचा हा पराक्रम भारतीय बुद्धिबळासाठी नवा मैलाचा दगड ठरत आहे.

फीड फीडबर्नर 16 Apr 2026 11:30 am

US Israel Iran War: “पहिल्याच क्षेपणास्त्राने अमेरिकन जहाजे बुडवू” ; इराणने चर्चेपूर्वी दिली ट्रम्प यांना थेट धमकी

US Israel Iran War: अमेरिकेने इराणच्या बंदरांवर नौदल नाकेबंदी लादली आहे.

दैनिक प्रभात 16 Apr 2026 11:17 am

Sadabhau Khot : सत्तेच्या सारीपाटावर स्वयंघोषित पुरोगामी धृतराष्ट्र बनला..! आमदार सदाभाऊ खोत यांची रोहित पवारांवर बोचऱ्या शब्दांत टीका

Sadabhau Khot : आमदार सदाभाऊ खोत यांनी एक्सवरुन ट्वीट करत आमदार रोहित पवार यांच्यावर बोचऱ्या शब्दांत टीका केली आहे.

दैनिक प्रभात 16 Apr 2026 10:45 am

Share Market : शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी ; सेन्सेक्स ४६५ अंकांनी तर निफ्टी १११ अंकांनी वधारला

Share Market : भारतीय शेअर बाजारात आज सलग दुसऱ्या दिवशी तेजी दिसून येत आहे.

दैनिक प्रभात 16 Apr 2026 10:43 am

Pune News : मंगळवार पेठेत सीमा भिंत कोसळून दोन रिक्षांचे नुकसान, जीवितहानी टळली

Pune News : कसबा अग्निशमन केंद्रातील रात्रपाळीतील पथक तात्काळ घटनास्थळी दाखल

दैनिक प्रभात 16 Apr 2026 10:41 am

CBSE Class 10 2026 : CBSE १० वी निकाल जाहीर! आता दुसऱ्या बोर्ड परीक्षेसाठी नोंदणी सुरू; जाणून घ्या महत्त्वाचे नियम आणि तारखा

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) २०२६ च्या इयत्ता १० वीच्या मुख्य परीक्षेचा निकाल बुधवारी अधिकृतपणे जाहीर केला असून, निकालाच्या घोषणेनंतर अवघ्या काही तासांतच बोर्डाने आता आगामी दुसऱ्या बोर्ड परीक्षेच्या आयोजनासाठी कंबर कसली आहे. ज्या विद्यार्थ्यांना आपल्या मुख्य परीक्षेतील गुणांमध्ये सुधारणा करायची आहे किंवा जे विद्यार्थी काही विषयांत उत्तीर्ण होऊ शकले नाहीत, त्यांच्यासाठी ही दुसरी परीक्षा एक महत्त्वाची संधी ठरणार आहे. या प्रक्रियेचा पहिला टप्पा म्हणून, पात्र विद्यार्थ्यांची माहिती संकलित करण्यासाठी 'उमेदवारांची यादी' (List of Candidates - LOC) सादर करण्याची प्रक्रिया आज, १६ एप्रिल २०२६ पासून अधिकृतपणे सुरू करण्यात आली आहे. सर्व संबंधित शाळांना आता त्यांच्या लॉगिन पोर्टलद्वारे या परीक्षेसाठी बसू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची अचूक माहिती आणि विषय निवड बोर्डाकडे सादर करावी लागणार आहे. ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे शाळांसाठी अनिवार्य असून, त्यानंतरच दुसऱ्या परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक आणि प्रवेशपत्रे जाहीर केली जातील. बोर्डाच्या या तत्परतेमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाचण्यास मदत होणार असून, त्यांना शैक्षणिक प्रगतीसाठी अधिक वेळ न घालवता पुन्हा परीक्षेला सामोरे जाण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.नोंदणीचे वेळापत्रक आणि शुल्क:दुसऱ्या बोर्ड परीक्षेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अत्यंत मर्यादित काळासाठी खुली राहणार आहे: नियमित अर्ज मुदत: १६ एप्रिल ते २० एप्रिल २०२६. विलंब शुल्कासह (Late Fee) अर्ज: २१ आणि २२ एप्रिल २०२६. शाळांना त्यांच्या विद्यार्थ्यांची माहिती ऑनलाइन पद्धतीनेच सादर करावी लागणार आहे.विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे नियम आणि मार्गदर्शक तत्त्वेमंडळाने या परीक्षेसाठी काही कडक आणि स्पष्ट नियम जाहीर केले आहेत, जे विद्यार्थी आणि पालकांनी समजून घेणे आवश्यक आहे:१. विषय बदल: विद्यार्थ्यांना केवळ गणिताचा पर्याय बदलण्याची मुभा असेल (Basic वरून Standard किंवा Standard वरून Basic). याव्यतिरिक्त इतर कोणत्याही विषयात बदल करता येणार नाही.२. कामगिरी सुधारणे (Improvement) : विद्यार्थी जास्तीत जास्त ३ विषयांमध्ये आपली श्रेणी किंवा गुण सुधारण्यासाठी ही परीक्षा देऊ शकतात.३. पहिला टप्पा चुकलेल्यांना संधी: ज्या विद्यार्थ्यांनी पहिली बोर्ड परीक्षा दिली नव्हती, ते आता शुल्क भरून या परीक्षेला बसू शकतात.४. निकाल धोरण: जर एखादा विद्यार्थी या दुसऱ्या परीक्षेत गैरहजर राहिला, तर त्याचा मुख्य परीक्षेचा (पहिली परीक्षा) निकालच अंतिम मानला जाईल.५. अभ्यासक्रम: या परीक्षेसाठी मुख्य परीक्षा २०२६ प्रमाणेच संपूर्ण अभ्यासक्रम लागू असेल.६. खासगी उमेदवार (Private Candidates): २०२४-२५ सत्रातील कंपार्टमेंट प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 'तिसरी संधी' म्हणून अर्ज करण्याची विशेष परवानगी देण्यात आली आहे.https://prahaar.in/2026/04/16/amarnath-yatra-2026-amarnath-yatra-2026-date-revealed-know-the-registration-process-travel/महत्त्वाची टीप : LOC (उमेदवारांची यादी) एकदा सादर केल्यानंतर त्यात कोणताही बदल करता येणार नाही. त्यामुळे शाळांनी माहिती भरताना ती अत्यंत अचूक भरावी, असे निर्देश सीबीएसईने दिले आहेत.नोंदणी कशी करावी? नियमित विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेमार्फतच अर्ज करणे बंधनकारक आहे. खासगी उमेदवारांनी (Private Candidates) सीबीएसईच्या अधिकृत वेबसाइटवरून ऑनलाइन अर्ज भरायचा आहे. अंतिम तारखेनंतर किंवा शुल्काशिवाय आलेले अर्ज कोणत्याही परिस्थितीत स्वीकारले जाणार नाहीत. या परीक्षेमुळे ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या परीक्षेत अपेक्षित यश मिळाले नाही किंवा ज्यांना आपले गुण वाढवायचे आहेत, त्यांना मोठी संधी उपलब्ध झाली आहे.

फीड फीडबर्नर 16 Apr 2026 10:30 am

Andaman Sea Boat Tragedy : मलेशिया गाठण्यापूर्वीच...अंदमान समुद्रात २५० प्रवाशांना घेऊन जाणारी नौका उलटली; अनेक प्रवाशांचा जीव धोक्यात

पोर्ट ब्लेअर : अंदमान समुद्रातून एक अत्यंत हृदयद्रावक बातमी समोर येत आहे. रोहिंग्या निर्वासित आणि बांगलादेशी नागरिकांना घेऊन जाणारी एक नौका खोल समुद्रात उलटल्याची भीती व्यक्त केली जात आहे. बुधवारचा दिवस या प्रवाशांसाठी जीवघेणा ठरला असून, या भीषण अपघातामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही नौका बेकायदेशीररीत्या प्रवाशांना घेऊन मलेशियाच्या दिशेने निघाली होती. मात्र, प्रवासादरम्यान अंदमानच्या समुद्रात नौकेचा ताबा सुटला आणि ती उलटली. या नौकेमध्ये नेमके किती प्रवासी होते आणि त्यापैकी किती जण सुरक्षित आहेत, याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही. या दुर्घटनेत मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, बचाव कार्यासाठी यंत्रणांकडून हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. समुद्रातील खराब हवामान किंवा क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असणे हे या अपघाताचे कारण असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्वासितांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.https://prahaar.in/2026/04/16/bse-class-10-2026-second-board-exams-loc-guidelines-dates-and-fee-details-out-check-details-inside/२५० प्रवासी बेपत्ता; मृतांचा आकडा वाढण्याची भीतीया भीषण दुर्घटनेत सुमारे २५० लोक बेपत्ता झाले असून, अद्याप त्यांचा ठावठिकाणा लागलेला नाही. संयुक्त राष्ट्रांच्या निर्वासित संस्था (UNHCR) आणि आंतरराष्ट्रीय स्थलांतर संघटनेने (IOM) या घटनेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. या नौकेमध्ये क्षमतेपेक्षा कितीतरी जास्त प्रवाशांना भरण्यात आले होते. नौकेतील अतिरिक्त गर्दी आणि समुद्रातील प्रतिकूल हवामान यांमुळे संतुलन बिघडून ही नौका उलटली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. या नौकेतून प्रवास करणारे प्रामुख्याने रोहिंग्या निर्वासित आणि बांगलादेशी नागरिक होते. सुमारे २५० लोक अद्याप बेपत्ता आहेत. समुद्रात शोध मोहीम वेगाने राबवली जात आहे, मात्र लाटांचा वेग आणि हवामानामुळे अडचणी येत आहेत. बेपत्ता लोकांची संख्या मोठी असल्याने मृतांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. ही दुर्घटना नेमकी किती वाजता घडली, याचा अधिकृत तपशील अद्याप स्पष्ट झालेला नाही. मात्र, या घटनेने निर्वासितांच्या धोकादायक स्थलांतराचा मुद्दा पुन्हा एकदा जगासमोर आला आहे.

फीड फीडबर्नर 16 Apr 2026 10:30 am

BMC News : थेट नगरसेविकेच्या पर्समधून रोकड लंपास; पालिकेच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

BMC : लक्ष्मी भाटिया यांनी महापौर, स्थायी समिती अध्यक्ष आणि विरोधी पक्षनेत्यांकडे लेखी तक्रार केली

दैनिक प्रभात 16 Apr 2026 10:27 am

US-Iran War: मुदत संपली ! भारत आता रशिया, इराणकडून तेल खरेदी करू शकणार नाही ; ट्रम्प प्रशासन म्हणाले, “आता बस्स झालं…”

US-Iran War:मध्य पूर्वेतील संघर्षामुळे बहुतांश देशांमध्ये तेलाचे संकट अधिक गडद होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेने इराण आणि रशियाकडून तेल खरेदी करण्यासाठी निर्बंधांमध्ये सूट दिली होती,

दैनिक प्रभात 16 Apr 2026 10:20 am

Watermelon Peel Uses: टरबूजाच्या साली फेकू नका! स्क्रबपासून आईस क्यूबपर्यंत…उन्हाळ्यात त्वचेसाठी नैसर्गिक उपाय

Watermelon Peel Uses टरबूजामध्ये सुमारे ९५ टक्के पाणी असतं, त्यामुळे ते शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करतं. त्याचप्रमाणे त्याच्या सालीतही त्वचेला ओलावा देणारे गुणधर्म असतात. योग्य पद्धतीने वापरल्यास टरबूजाच्या साली नैसर्गिक स्किन केअर प्रॉडक्टसारखं काम करतात.

दैनिक प्रभात 16 Apr 2026 10:20 am

Amarnath Yatra 2026 : भाविकांसाठी आनंदाची बातमी! 'या'तारखेपासून अमरनाथ यात्रेला सुरुवात; घरबसल्या नोंदणी प्रक्रियाही सुरू

श्रीनगर : देशातील सर्वात कठीण आणि तितकीच श्रद्धास्थान असलेली अमरनाथ यात्रा यंदा लवकरच सुरू होत आहे. हिमालयातील ३,८८८ मीटर उंचीवर असलेल्या पवित्र गुहेतील नैसर्गिक बर्फाच्या शिवलिंगाच्या दर्शनासाठी भाविकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. प्राप्त माहितीनुसार, यंदाची ही यात्रा १५ एप्रिल २०२६ पासून अधिकृतपणे सुरू झाली आहे. श्री अमरनाथ तीर्थक्षेत्र मंडळामार्फत (SASB) या यात्रेचे नियोजन केले जात असून, सुरक्षिततेच्या दृष्टीने नियमांची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे. यात्रेसाठी लागणारी नोंदणी प्रक्रिया (Registration) आता सुरू झाली असून भाविकांना ऑनलाइन किंवा ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने आपले नाव नोंदवता येणार आहे. दुर्गम भाग आणि हवामानातील बदल लक्षात घेता, भाविकांनी वेळेत नोंदणी करून प्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.रजिस्ट्रेशन कसं कराल ?ऑनलाइन पद्धतनोंदणी प्रक्रियेसाठी भाविकांना त्यांचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी वापरून व्हेरिफिकेशन (OTP) पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यानंतरच अर्ज सादर करता येईल. ही प्रक्रिया पूर्ण करताना काही महत्त्वाच्या कागदपत्रांची पूर्तता करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यात्रेसाठी अनिवार्य असलेले अधिकृत आरोग्य प्रमाणपत्र अपलोड करणे गरजेचे आहे. भाविकांकडे ८ एप्रिल २०२६ नंतर काढलेला ताजा पासपोर्ट आकाराचा फोटो असणे आवश्यक आहे. त्यापूर्वीचे फोटो अर्जासाठी ग्राह्य धरले जाणार नाहीत. या तांत्रिक बाबींची पूर्तता केल्यानंतरच भाविकांना यात्रेचे अधिकृत परमिट दिले जाणार आहे. त्यामुळे वेळेत नोंदणी पूर्ण करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.https://prahaar.in/2026/04/16/nashik-mnc-forced-conversion-case-7-people-arrested-in-womens-torture-and-conversion-case-main-mastermind-nida-khan-absconding/ऑफलाईन पद्धतअमरनाथ यात्रेसाठी ज्या भाविकांना ऑनलाइन नोंदणी करणे शक्य नाही, त्यांच्यासाठी ऑफलाइन नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी भाविकांना अधिकृत बँक शाखांमध्ये जाऊन प्रत्यक्ष अर्ज करावा लागणार आहे. ही नोंदणी प्रक्रिया पूर्णपणे 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' या तत्त्वावर राबवली जाणार असल्याने, भाविकांनी लवकरात लवकर अर्ज करणे फायद्याचे ठरेल. बँकेत नोंदणी करताना भाविकांना काही महत्त्वाची कागदपत्रे सोबत ठेवणे अनिवार्य आहे. ओळखीचा पुरावा म्हणून [Aadhaar Redacted] किंवा इतर वैध सरकारी ओळखपत्र आवश्यक आहे. वैद्यकीय तंदुरुस्तीचे अधिकृत प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. बँकेत अर्जासोबतच भाविकांचे बायोमेट्रिक प्रमाणीकरण देखील केले जाईल. या ऑफलाइन नोंदणीसाठी प्रति व्यक्ती ₹१५० शुल्क निश्चित करण्यात आले आहे. ही प्रक्रिया प्रत्यक्ष बँकेत जाऊन पार पाडायची असल्याने, आपल्या जवळच्या अधिकृत बँकेत याविषयी अधिक चौकशी करून भाविकांनी आपली जागा निश्चित करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.'RFID' कार्डशिवाय प्रवेश नाहीयात्रेमध्ये सुरक्षिततेसाठी RFID (Radio Frequency Identification) कार्ड अनिवार्य केले आहे. जम्मू-काश्मीरमधील नियुक्त केंद्रांवरून हे कार्ड घेणे प्रत्येक यात्रेकरूला बंधनकारक असेल. या कार्डाशिवाय डोमेल किंवा चंदनवारी येथील प्रवेशद्वारांच्या पुढे कोणालाही प्रवासाची परवानगी दिली जाणार नाही. अमरनाथ यात्रा अत्यंत खडतर असल्याने भाविकांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. त्यानुसार खालील निकष पाळणे अनिवार्य आहे. केवळ १३ ते ६० वर्षे वयोगटातील व्यक्तींनाच यात्रेत सहभागी होता येईल. ६ आठवड्यांपेक्षा जास्त काळ गर्भवती असलेल्या महिलांना या यात्रेसाठी परवानगी नाकारण्यात आली आहे. प्रत्येक यात्रेकरूने अधिकृत आरोग्य प्रमाणपत्र सोबत ठेवणे बंधनकारक आहे. यात्रेदरम्यान भाविकांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी आणि आपत्कालीन स्थितीत मदत मिळावी यासाठी RFID कार्ड अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.प्रवासासाठी निवडा योग्य मार्गपवित्र अमरनाथ गुहेच्या दर्शनासाठी भाविकांना त्यांच्या सोयीनुसार दोन प्रमुख मार्गांची निवड करता येणार आहे. यामध्ये ऐतिहासिक पहलगाम मार्ग आणि कमी अंतराचा बाल्टाल मार्ग यांचा समावेश आहे. प्रवासाचे अंतर आणि काठिण्य पातळी लक्षात घेऊन भाविक आपला मार्ग निवडू शकतात. पहलगाम मार्ग हा सर्वात जुना आणि मुख्य मार्ग आहे. याचे अंतर साधारणपणे ४६ किलोमीटर इतके असून, हा मार्ग लांब असला तरी बाल्टालच्या तुलनेत चढणीसाठी सुलभ मानला जातो. बाल्टाल मार्ग ज्यांना कमी वेळेत दर्शन हवे आहे, त्यांच्यासाठी हा १४ किलोमीटरचा मार्ग उपलब्ध आहे. मात्र, हा मार्ग अत्यंत अरुंद आणि तीव्र चढणीचा असल्याने तो अधिक कठीण आणि आव्हानात्मक समजला जातो. ज्या भाविकांना शारीरिक व्याधींमुळे किंवा वयामुळे चालणे शक्य नाही, त्यांच्यासाठी प्रशासनातर्फे हेलिकॉप्टरची सोय करण्यात आली आहे. दोन्ही मार्गांवर भाविकांसाठी तंबू, राहण्याची सोय आणि आरोग्य सेवा पुरवण्यात आल्या आहेत.हिमालयातील उंची आणि कडाक्याची थंडी लक्षात घेता, भाविकांनी प्रवासात उबदार कपडे आणि आवश्यक औषधे सोबत ठेवणे गरजेचे आहे. खडतर प्रवासाचे नियोजन करताना हवामानाचा अंदाज घेऊनच पुढे जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

फीड फीडबर्नर 16 Apr 2026 10:10 am

Vidhan Parishad Election 2026 : विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी! ९ जागांसाठी चुरस

- जाणून घ्या कोणाला किती जागा मिळणारमुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या ९ जागांसाठी पुढील आठवड्यात निवडणूक जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. या ९ सदस्यांचा कार्यकाळ १३ मे रोजी संपणार असल्याने सर्वच पक्षांनी आपापल्या पद्धतीने मोर्चेबांधणी सुरू केली आहे.सध्याच्या महाराष्ट्र विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपच्या वाट्याला ५ जागा, शिवसेनेला २, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला १ आणि महाविकास आघाडीला १ जागा मिळण्याची शक्यता आहे. मात्र राष्ट्रवादीकडे असलेल्या अतिरिक्त मतांमुळे ही समीकरणे बदलण्याची शक्यता असून निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी मानली जात आहे.दरम्यान, भाजपकडे ५ उमेदवार सहज निवडून येण्याइतके संख्याबळ असले तरी इच्छुकांची संख्या मोठी असल्याने पक्षांतर्गत स्पर्धा वाढली आहे. नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत संधी न मिळालेल्या नेत्यांनी आता विधान परिषदेसाठी जोरदार लॉबिंग सुरू केले आहे.https://prahaar.in/2026/04/16/nashik-mnc-forced-conversion-case-7-people-arrested-in-womens-torture-and-conversion-case-main-mastermind-nida-khan-absconding/या उमेदवारांचा कार्यकाळ संपणार: उद्धव ठाकरे नीलम गोर्हे शशिकांत शिंदे अमोल मिटकरी गोपीचंद पडळकर रणजितसिंह मोहिते-पाटील राजेश राठोड प्रवीण दटके रमेश कराडविधान परिषदेसाठी एका उमेदवाराला विजयासाठी २८ मतांचा कोटा आवश्यक आहे. महायुतीकडे भाजप (१३१), एकनाथ शिंदे यांची शिवसेना (५७) आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी (४०) असे मिळून मजबूत संख्याबळ आहे. त्यामुळे महायुतीचे ८ उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे.दुसरीकडे महाविकास आघाडीचे एकूण संख्याबळ ४६ असल्याने त्यांचा एक उमेदवार सहज निवडून येऊ शकतो. मात्र दुसऱ्या जागेसाठी त्यांना सुमारे १० अतिरिक्त मतांची गरज भासणार असून सध्याच्या परिस्थितीत ते आव्हानात्मक ठरत आहे.https://prahaar.in/2026/04/16/relief-in-hormuz-tension-jag-vikram-lpg-ship-safely-arrives-at-kandla-port/भाजपकडून या नावांची चर्चा :केशव उपाध्ये, माधवी नाईक, रणजीत सिंह निंबाळकर, राम सातपुते यांसारख्या नेत्यांची नावे चर्चेत आहेत. तसेच पक्षाचे काही विद्यमान आमदार निवृत्त होत असल्याने नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार का, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.एकूणच, येणारी विधान परिषद निवडणूक ही केवळ आकड्यांची नव्हे तर प्रतिष्ठेची लढत ठरणार आहे.

फीड फीडबर्नर 16 Apr 2026 10:10 am

Pooja Sawant : “…तर तो कोणत्याही स्त्रीला हात लावण्यापूर्वी दहा वेळा विचार करेन”; मराठी अभिनेत्रीने कायदे कडक करण्याची केली मागणी

Pooja Sawant : अभिनेत्री पूजा सावंतने सालबर्डी या तिच्या आगामी चित्रपटाविषयी मुलाखत दिली. या मुलाखतीत पूजाने स्त्रियांवर होत असलेले अत्याचार आणि प्राण्यांवर होत असलेले हिंसक कृत्ये यावर आपले मत मांडले.

दैनिक प्रभात 16 Apr 2026 9:57 am

BMC News : सहाय्यक आयुक्तांच्या दालनाचे ऑडिट करा; सभागृह नेते गणेश खणकर यांची मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी)मुंबई महापालिकेत पावणे चार वर्षे प्रशासकीय राज्य होते. त्यामुळे समिती अध्यक्षांची दालन धुळखात पडून होती. मात्र निवडणुका झाल्यानंतर नगरसेवक येणार हे माहीत असतानाही समिती अध्यक्षांच्या कार्यालयाची दुरुस्ती का केली नाही. विभाग कार्यालयातील सहायक आयुक्तांची दालन पंचतारांकित हॉटेल प्रमाणे, मात्र प्रभाग समिती अध्यक्षांची दालने ही कोंडवाडा प्रमाणे आहेत, असा आरोप स्थायी समिती सदस्य यशवंत किल्लेदार यांनी केला. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी याठिकाणी भेट द्यावी, कर्मचारी वर्ग अरुंद जागेत बसतात. त्यामुळे सहाय्यक आयुक्तांच्या दालनाचे ऑडिट करावे, अशी मागणी सभागृह नेते गणेश खणकर स्थायी समितीच्या बैठकीत केली.जी उत्तर विभाग कार्यालयाच्या इमारतीच्या दुरुस्तीचा ३४.३४ टक्के उणे दराने काम करण्याची तयारी कंत्राटदाराने दर्शवली आहे. त्यामुळे कामाचा दर्जा काय राखणार, चूक झाली तर कारवाई करणार का, असा सवाल स्थायी समिती सदस्या यामिनी जाधव यांनी उपस्थित केला. यावेळी स्थायी समिती सदस्यांनी सहायक आयुक्तांच्या पंचतारांकित कार्यालयाकडे लक्ष वेधले. एवढ्या कमी दरात हे काम कसे करणार असा सवाल भाजपच्या शीतल गंभीर यांनी केला. एन विभागाचे कार्यालय खासगी मालकाच्या जागेवर आहे. त्यामुळे मुंबई महापालिका विभाग कार्यालयासाठी जागा उपलब्ध करु शकत नाही का,असा सवाल स्थायी समिती सदस्य राखी जाधव यांनी उपस्थित केला. सहाय्यक आयुक्तांना आता प्रभाग समिती अध्यक्षांच्या दालनात बसवा आणि समिती अध्यक्ष सहायक आयुक्तांच्या कार्यालयात बसतील, असा टोला गणेश खणकर यांनी यावेळी लगावला.https://prahaar.in/2026/04/16/relief-in-hormuz-tension-jag-vikram-lpg-ship-safely-arrives-at-kandla-port/दरम्यान, प्रशासनाने सगळ्या सदस्यांच्या प्रश्नांची उत्तरांची माहिती पुढील बैठकीत सादर करावी, तोपर्यंत प्रस्ताव राखून ठेवण्यात आल्याचे स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी सांगितले.

फीड फीडबर्नर 16 Apr 2026 9:30 am

Actress Mrunal Thakur : अजय देवगणसोबतच्या या फ्लॅाप चित्रपटाविषयी मृणाल ठाकूरचा खुलासा म्हणाली “कोणतीही पूर्वकल्पना न देता…”

Actress Mrunal Thakur : बॅालिवूड अभिनेत्री मृणाल ठाकूर हिने एका मुलाखतीत सन अॅाफ सरदार 2 चित्रपटातील तिची काही सीन्स कट करण्यात आल्याचा खुलासा केला आहे.

दैनिक प्रभात 16 Apr 2026 9:27 am

Lara Dutta: हिट फिल्म्सनी दिली ओळख, फ्लॉप्सनी दिला धक्का; लारा दत्ताची कहाणी

Lara Dutta लारा दत्ताने वयाच्या अवघ्या २२व्या वर्षी ‘मिस युनिव्हर्स’ हा किताब जिंकत भारताचं नाव जागतिक स्तरावर उंचावलं. २००० साली मिळालेल्या या यशामुळे तिला आंतरराष्ट्रीय ओळख मिळाली. या स्पर्धेत तिने सर्वाधिक गुण मिळवत इतिहास रचला होता. तिच्यापूर्वी सुष्मिता सेन आणि नंतर हरनाज संधू यांनीही हा किताब जिंकला होता.

दैनिक प्रभात 16 Apr 2026 9:25 am

Top 10 News : राज्यात पुन्हा 5 बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्या, आजपासून संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात आणि ललित प्रभाकर साकारणार नामदेव ढसाळांची भूमिका, वाचा टॉप १० बातम्या

Top 10 News : राज्याच्या प्रशासनात मोठा उलटफेर झाला आहे. गेल्या १५ दिवसांपासून राज्यातील प्रशासनात अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

दैनिक प्रभात 16 Apr 2026 9:23 am

Vidhan Parishad Election 2026 : विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक कधी जाहीर होणार? इच्छुकांची फिल्डिंग सुरू

Vidhan Parishad Election 2026 : विधान परिषदेचा एक आमदार निवडून येण्यासाठी 28 मतांचा कोटा आवश्यक

दैनिक प्रभात 16 Apr 2026 9:16 am

'Jag Vikram' LPG Ship : होर्मुज तणावात दिलासा; ‘जग विक्रम’ एलपीजी जहाज सुरक्षित कांडला बंदरात दाखल

होर्मुज सामुद्रधुनीत सुरू असलेल्या अमेरिकेच्या नाकेबंदीच्या पार्श्वभूमीवर भारतीय एलपीजी जहाज ‘जग विक्रम’ भारतात पोहोचण्यात यशस्वी ठरले आहे. २०,४०० मेट्रिक टन एलपीजी घेऊन हे जहाज बुधवार, १५ एप्रिल रोजी गुजरातमधील कांडला बंदरात पोहोचले. अमेरिका आणि इराण यांच्यात दोन आठवड्यांच्या तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा झाल्यानंतर होर्मुज सामुद्रधुनी पार करणारे हे पहिले भारतीय जहाज ठरले आहे.एलपीजी जहाज ‘जग विक्रम’ ११ एप्रिल रोजी होर्मुज सामुद्रधुनी पार करण्यात यशस्वी झाले होते. मार्चच्या सुरुवातीपासून आतापर्यंत होर्मुजच्या पश्चिम भागातून बाहेर पडणारे हे भारताचे नववे जहाज आहे. पश्चिम आशियात तणाव सुरू होण्यापूर्वी होर्मुज सामुद्रधुनीच्या परिसरात २८ भारतीय जहाजे उपस्थित होती. यापैकी २४ जहाजे पश्चिम भागात होती, तर चार जहाजे पूर्व भागात अडकलेली होती.https://prahaar.in/2026/04/15/pakistans-inefficient-healthcare-system-331-children-were-given-aids-injections-with-a-single-needle-many-died/इराण आणि अमेरिका यांच्यात दोन आठवड्यांच्या तात्पुरत्या युद्धविरामाच्या आधी होर्मुजच्या पश्चिम भागातून भारताची आठ जहाजे यशस्वीरित्या बाहेर पडली होती. त्याचप्रमाणे पूर्व भागातूनही दोन भारतीय जहाजे सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले होते. आता एलपीजी टँकर ‘जग विक्रम’ देखील होर्मुजच्या पश्चिम भागातून बाहेर काढून सुरक्षितपणे भारतात पोहोचला आहे. मात्र, अजूनही अनेक भारतीय जहाजे होर्मुज सामुद्रधुनीच्या परिसरात अडकलेली आहेत. तसेच मोठ्या संख्येने विदेशी जहाजेही पर्शियन आखातात अडकून पडली असून होर्मुज सामुद्रधुनी पुन्हा पूर्ववत सुरू होण्याची वाट पाहत आहेत.उल्लेखनीय आहे की भारत पेट्रोलियम उत्पादनांच्या गरजांसाठी मोठ्या प्रमाणावर आयातीवर अवलंबून आहे. भारत आपल्या गरजेपैकी सुमारे ८८ टक्के कच्चे तेल आंतरराष्ट्रीय बाजारातून आयात करतो. त्याचप्रमाणे देशाच्या गरजेपैकी सुमारे ५० टक्के नैसर्गिक वायू आणि जवळपास ६० टक्के एलपीजी देखील आयात केली जाते. खाडी देशांतून येणाऱ्या कच्च्या तेल आणि वायूचा बहुतांश पुरवठा होर्मुज सामुद्रधुनीमार्गेच होतो. मात्र पश्चिम आशियात युद्ध सुरू झाल्यापासून हा मार्ग जवळपास ठप्प झाला आहे. यामुळे भारतातील एलपीजी पुरवठ्यावरही मोठा परिणाम झाला आहे.

फीड फीडबर्नर 16 Apr 2026 9:10 am

Ranichi Baug : राणीबागेतील वाघ, बिबटयांचा मांस मटणावर ताव; खरेदीला स्थायी समितीने दिली मंजुरी

मुंबई (विशेष प्रतिनिधी)राणीबागेतील वाघ, बिबट्यांसह अन्य प्राण्यांना म्हैस व रेड्याचे मांस दिले जात असून या प्राण्यांच्या नियमित खाद्यांसाठी तब्बल ६२ लाख रुपयांचा खर्च केला जात आहे. मुंबई महापालिकेचा स्वत:चा कत्तलखाना असला तरी महापालिकेला आपल्या राणीबागेतील या प्राण्यांना मांस पुरवता येत नसून त्यांनाही खरेदी करतच प्राण्यांना उपलब्ध करून द्यावे लागत आहे. महापालिकेचा कत्तलखाना हा सेवा देणारा पशुवधगृह असतानाही मुंबईत मात्र अनेक ठिकाणी अनधिकृत कत्तलखाने चालत असल्याचे स्पष्ट होत आहे.भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणीसंग्रहालय (राणीबाग) येथील मांसाहारी प्राण्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी बैल आणि रेड्याचे मांस खरेदी केले जाते. याबाबतच्या मांस खरेदीचा प्रस्ताव मंजुरीला आला असता या निर्णयावर यामिनी जाधव यांनी प्रश्न उपस्थित करत प्राण्यांच्या अन्नाची गरज सततची असल्याने किमान पाच वर्षांचा ठेका देण्यात यावी , अशी मागणी केली. तर भाजपच्या प्रिती सातम यांनी महापालिकेचा स्वत:चा कत्तलखाना असताना खासगी संस्थेकडून आपण मांसांची खरेदी का करत आहोत असा सवाल केला. यावेळी काँग्रेसच्या नगरसेविका ट्युलिप मिरांडा यांनी प्राणीसंग्रहालयातील स्थितीवर टीका करत कोट्यवधी रुपये खर्च करूनही माकडे कुपोषित दिसत असल्याचे सांगितले. त्यांनी प्राण्यांना योग्य आहार देण्यासोबतच नवीन प्राणी आणण्याचीही मागणी केली.यावर प्रशासनाच्यावतीने वाघ, बिबट्या, तरस आणि कोल्हे यांसारख्या मांसाहारी प्राण्यांसाठी नियमित मांस पुरवठा अत्यावश्यक आहे. मांसाच्या दरांमध्ये सतत चढ-उतार होत असल्याने एक वर्षाचा करार अधिक व्यवहार्य असल्याचे सांगितले. सध्याच्या दरांमध्ये वाहतूक, मजुरी, हाताळणी आणि वितरणाचा खर्च समाविष्ट असून हे दर बाजारभावापेक्षा कमी असल्याचा दावा करण्यात आला. तसेच पुरवठादार परवानाधारक असून मांस देवनारमधील अधिकृत कत्तलखान्यांतून घेतले जाते. आणि त्यावर पशुवैद्यकीय तपासणी केली जाते. हाच पुरवठादार संजय गांधी राष्ट्रीय उद्यान यांसारख्या ठिकाणीही पुरवठा करतो. देवनार कत्तलखान्यात पशुवधाची सेवा दिली जाते. महापालिका स्वत: जनावरे खरेदी करत नाही किंबहुना मांसही विकत नाही. परवानाधारक विक्रेत असतात ते म्हैस, रेड्यासह प्राणी घेवून येतात आणि याठिकाणी त्यांना कापून देण्याची सेवा दिली जाते,असे प्रशासनाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले .

फीड फीडबर्नर 16 Apr 2026 9:10 am

तृषा कृष्णनच्या चेन्नईतील घराला बॉम्बची धमकी; पोलिस तपासात मोठा खुलासा

Trisha Krishnan मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार सकाळी साधारण ९.३० वाजता तमिळनाडू पोलिसांच्या डीजीपी कंट्रोल रूमला एक ईमेल प्राप्त झाला. या ईमेलमध्ये तृषा कृष्णन यांच्या घरात स्फोटक ठेवले असल्याचा दावा करण्यात आला होता. हा संदेश मिळताच पोलिस यंत्रणा तत्काळ सतर्क झाली.

दैनिक प्रभात 16 Apr 2026 8:55 am

Amol Mitkari : अजित पवारांच्या विमान अपघाताचा मास्टरमाईंड कोण? अमोल मिटकरींनी थेट नावचं घेतलं

Amol Mitkari : अजित पवार यांचे विमान अपघात प्रकरण आमदार अमोल मिटकरी यांनी लावून धरले असून एका कार्यक्रमात त्यांनी थेट अपघाताचा मास्टरमाईंडचे नाव घेत गंभीर आरोप केले आहेत.

दैनिक प्रभात 16 Apr 2026 8:45 am

Mumbai Water Cut : मुंबईवर पाणी संकटाची टांगती तलवार; १ मेपासून १०% पाणी कपात होणार ?

मुंबई : भारतीय हवामान विभागाने यंदाच्या मान्सूनबाबत दीर्घकालीन अंदाज जाहीर केला असून देशात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. यंदा सुमारे ९२ टक्के पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अल निनोच्या प्रभावामुळे भारतीय उपखंडातील मान्सूनवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका प्रशासन सतर्क झाले असून पाणीटंचाई टाळण्यासाठी १ मेपासून १० टक्के पाणी कपात लागू करण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. हा प्रस्ताव आयुक्तांकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे.सध्या मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमध्ये मिळून ३३.६० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. हा साठा साधारणपणे ७ जुलैपर्यंत पुरेल, असा अंदाज आहे. मात्र वाढत्या तापमानामुळे बाष्पीभवन वाढत असून पाणीसाठ्यात घट होत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.दररोज मोडक सागर, तानसा, भातसा, वैतरणा यांसारख्या सात धरणांतून मुंबईला सुमारे ४१०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. शहराला वर्षभरासाठी १४.४७ लाख दशलक्ष लिटर पाण्याची गरज असते. यंदा मान्सून उशिरा येण्याची शक्यता लक्षात घेता ऑगस्टपर्यंतचे नियोजन करण्यात आले आहे.https://prahaar.in/2026/04/15/municipal-corporation-cbse-class-10-results-92-89-percent/१५ एप्रिल २०२६ रोजी धरणांतील पाणीसाठा:भातसा : २,३५,४३९ दशलक्ष लिटर (सर्वाधिक)मध्य वैतरणा : ६९,१०६अप्पर वैतरणा : ७७,०४५तानसा : ४०,८१७मोडक सागर : ४५,३४०विहार : १५,३५३तुळशी : ३,२७४गेल्या तीन वर्षांची तुलना:२०२६ : ३३.६०%२०२५ : ३०.२४%२०२४ : २४.५४%राज्य सरकारच्या सूचनेनुसार यंदा जुलैऐवजी ऑगस्टपर्यंत पाणी नियोजन करण्यावर भर देण्यात आला आहे. त्यामुळे १ मेपासून पाणी कपात लागू केल्यासच अखंडित पाणीपुरवठा राखता येईल, असे पालिका प्रशासनाचे मत आहे. यामुळे येत्या काही महिन्यांत मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याची गरज भासणार असून संभाव्य पाणीटंचाईची चाहूल लागली आहे.

फीड फीडबर्नर 16 Apr 2026 8:10 am

Raj Thackeray : “कोणाची तरी वाट लावायची म्हणून…”; अशोक खरात प्रकरणावर राज ठाकरेंचं मोठं विधान

Raj Thackeray : राज्यात गाजत असलेल्या बहुचर्चित अशोक खरात प्रकरणात पहिल्यांदाच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मोठं विधान केले आहे.

दैनिक प्रभात 16 Apr 2026 8:06 am

ब्लॅकबोर्ड-जीव वाचवण्यासाठी डोक्यावर बांधली भगवा पट्टी:दंगलीच्या फोटोने माझे आयुष्य बरबाद केले- चेहऱ्याचा वापर झाला, पण मिळाले काहीच नाही

२००२च्या गुजरात दंगलीतील दोन प्रमुख व्यक्तींची ही कहाणी आहे. त्यांपैकी, हिंदुत्वाचा चेहरा बनलेला चांभार अशोक परमार, आज पोटापाण्यासाठी धडपडत आहे. तो हिवाळ्यात, उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात रस्त्यावर झोपतो. तेव्हा तो २७ वर्षांचा होता. आज तो ५१ वर्षांचा आहे. मी त्याला अहमदाबादच्या शाहपूर भागातील के. टी. देसाई शाळेजवळ भेटायला गेलो. शेजारीच, एका कडुलिंबाच्या झाडाखाली अशोक परमारचे दुकान होते—एक बंद कपाट आणि त्याखाली एक पातळ, मळकट पुठ्ठ्याचा बॉक्स. मला जवळच्या लोकांकडून कळले की तो सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेला होता—काही दिवसांपूर्वी त्याला पक्षाघाताचा झटका आला होता. मी दुकानात त्याची वाट पाहिली. दोन तासांनी तो परत आला—अतिशय बारीक, फाटलेला टी-शर्ट आणि पॅन्ट घातलेला. औषधांनी भरलेली पिशवी घेऊन तो लंगडत चालत होता. मी विचारले – तुम्ही अशोक परमार आहात का? लाल डोळे आणि काळवंडलेला, सुकलेला चेहरा असलेला तो मोठ्याने म्हणाला, हो... तोच ज्याला २००२ मध्ये हिंदुत्वाचा चेहरा बनवण्यात आलं होतं. आता मी अन्नापेक्षा जास्त औषधं खातो. आपल्या बॅगेतील औषधे दाखवत तो म्हणतो, ही औषधे सरकारी रुग्णालयात मिळतात... पण जेवण? ते मोफत नाही. आता मी फक्त मरणाची वाट पाहतोय. 'पूर्वी मी जोडे आणि चपला शिवून कसेबसे ५०-१०० रुपये कमवायचो... आता पक्षाघाताने तेही हिरावून घेतलंय', असं म्हणत तो गप्पपणे दुकानाच्या बाहेर झाडू मारू लागतो. आज ब्लॅकबोर्डवर, २००२ च्या गुजरात दंगलीचे प्रतीक बनलेल्या अशोक परमार आणि कुतुबुद्दीन अन्सारी यांची कहाणी. अशोक परमार हे हिंदुत्वाचा चेहरा होते, तर कुतुबुद्दीन अन्सारी हे मुस्लिमांच्या दुःखाचे प्रतीक होते, पण आज त्या प्रतिमांमुळे त्यांचे आयुष्य काळवंडले आहे. झाडल्यानंतर अशोक टॉवेल पसरवतो. मी त्याच्याशी बोलायला बसलो. तो म्हणतो, तुम्हाला जे काही सांगायचं आहे, ते पटकन सांगा. तुमच्यासारख्या मीडियावाल्यांना पाहिल्यावर इथे गर्दी होते. मलाही जेवायला जायचं आहे. तुम्ही मला आजचे जेवण भरवाल का? मला दिवसातून दोन वेळच्या जेवणासाठी भीक मागावी लागते. गेल्या डिसेंबरमध्ये मला पक्षाघात झाला, त्यामुळे दुकान दोन महिने बंद होते. मी ते गेल्या महिन्यातच पुन्हा उघडले आहे. मी म्हणालो- चला, आधी जेवण करूया, मग बोलूया. तो म्हणतो, नाही, नाही, आधी माझ्याशी बोला. मला आता कमी भूक लागली आहे. मी फक्त तग धरून आहे. या आयुष्याला कंटाळून मी अनेकदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मी नैराश्य कमी करणाऱ्या औषधांचा ओव्हरडोस घेतला, पण मेलो नाही. मला श्वास घेता येत नाहीये. आता मी विचार करतोय की, मी आत्महत्या करणार नाही, नाहीतर लोक म्हणतील, अशोक किती भित्रा होता. त्याची अवस्था पाहून आश्चर्य वाटते. गुजरात दंगलीतील तेच चित्र डोळ्यासमोर उभे राहते—त्याच्या पाठीमागे आगीचा लोट आणि समोर, काळा शर्ट घालून, कपाळावर भगवी पट्टी बांधून, हातात रागाने लोखंडी सळई घेऊन उभे होते अशोक परमार. आता मी त्याला तो फोटो दाखवतो, ज्यामुळे तो प्रसिद्ध झाला आणि विचारतो – या फोटोत तू आहेस का? अशोक रागाने म्हणतो, या फोटोने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे. मी त्या मुंबईच्या पत्रकाराला फोटो काढायला का सांगितलं, हेच मला कळत नाही. खरं तर, तो २८ फेब्रुवारी २००२चा दिवस होता, गोध्रा घटनेच्या दुसऱ्या दिवसाचा. सकाळचे १० वाजले होते. शहरातील सर्व दुकाने बंद होती. असे आढळून आले की, शहापूर चौकाजवळ दंगलखोर धुमाकूळ घालत होते. मुस्लिम वस्त्यांना आग लावली जात आहे. चौकांमध्ये आणि रस्त्यांवर जळते टायर विखुरलेले आहेत. हा संपूर्ण परिसर मुस्लिमांच्या मालकीचा आहे. थोड्याच वेळात, दंगलखोर माझ्या दुकानाच्या दिशेने येत असल्याची अफवा पसरली. त्यांच्या हातात पेट्रोल आणि जळते टायर होते. मी लगेच दुकान बंद करून माझ्या भावाच्या घरी धावत गेलो. तिथेही गर्दी होती. वाटेत मला जमिनीवर एक भगवा पट्टा पडलेला दिसला. जमावापासून वाचण्यासाठी मी तो माझ्या कपाळावर बांधला, जेणेकरून दंगलखोरांना कळावे की मी सुद्धा हिंदू आहे. मी शहापूर चौकात पोहोचताच मला एक छायाचित्रकार भेटला. तो अस्वस्थ होता. मला पाहून तो म्हणाला, मी खूप दिवसांपासून एका संतप्त चेहऱ्याच्या शोधात होतो, जो हिंदुत्वाचा संताप व्यक्त करू शकेल. तुमचा चेहरा अगदी तसाच दिसतो. माझ्या पाठीमागे आगीच्या ज्वाळा उठत होत्या. मी रस्त्यावर पडलेली एक लोखंडी सळई उचलली, दोन्ही हात वर केले आणि म्हणालो, माझा फोटो काढा. त्याने माझा फोटो काढला आणि निघून गेला. मला कल्पनाही नव्हती की तो फोटो मला गुजरात दंगलींचा चेहरा बनवेल. दुसऱ्या दिवशी, माझा फोटो 'गुजरात दंगलखोर' म्हणून टीव्हीवर दाखवण्यात आला. त्या वेळी, परिसरातील लोकांव्यतिरिक्त मी तीच व्यक्ती आहे हे कोणालाही माहीत नव्हते. तुमच्या कुटुंबात कोण कोण आहेत? कोणी नाही. म्हणूनच मी गेल्या २४ वर्षांपासून याच रस्त्यावर राहत आहे. मी इथेच प्लॅटफॉर्मवर झोपतो. जर कोणी मला खायला दिले, तर माझी भूक भागते. दोन दिवसांपूर्वीच माझ्या वहिनीचं निधन झालं. त्याच वहिनीने मला घरातून हाकलून दिलं होतं. ते १९९० साल होतं. मी सातवीत होतो. माझे वडील चांभारकाम करायचे, पण ते नेहमी आजारी असायचे. त्यांचे अचानक निधन झाले. माझी आई आधीच वारली होती. माझ्या भावाने काही काळ माझ्या वडिलांचे काम सांभाळले. आम्ही दोन भाऊ आणि दोन बहिणी आहोत. आम्ही दोघेही विवाहित होतो. माझी वहिनी मला घरी पाहिल्यावर शिव्या द्यायची. ती मला जेवायला देत नसे. ती म्हणायची, जा पैसे कमव, मग तुला खायला मिळेल. तुझा भाऊ काम करत असताना तू अभ्यास करणार? मी त्याचं ऐकून ऐकून कंटाळले होते. एके दिवशी माझं त्याच्याशी खूप जोरदार भांडण झालं. जेव्हा माझा भाऊ घरी आला, तेव्हा त्याला हे कळलं. त्या दिवशी त्याने मला मारहाण केली आणि घरातून हाकलून दिलं. तो शाप देऊन म्हणाला, तुझ्यामुळे माझी बायको मला मारते. आता परत येऊ नकोस. त्यानंतर मी शिक्षण सोडून वडिलांच्या दुकानात काम करू लागलो. मी ५-१० रुपये कमवायचो आणि कसं तरी जेवण मिळवायचो. तेव्हापासून मी याच रस्त्यावर आहे. मी मोठा झाल्यावर, मला एका वेगळ्या समाजातील मुलीवर प्रेम जडले. आम्ही पाच वर्षे एकत्र राहिलो. जेव्हा तिच्या घरच्यांना हे कळले, तेव्हा त्यांनी तिचे लग्न दुसरीकडे लावून दिले. माझ्याकडे काहीच नव्हते. जर मी तिच्याशी लग्न केले असते, तर तिला कुठे ठेवले असते? म्हणून मी तिला जाऊ दिले. मग हा दंगा उसळला. २००२ च्या गुजरात दंगलींनंतर काय घडले? काय सांगू, त्यानंतर आयुष्य फक्त दोनच कपड्यांपुरते मर्यादित झाले. एक टी-शर्ट आणि पॅन्ट, जे मी आता घातले आहे, आणि दुसरी या कपाटात. रात्री एक माणूस त्याची ऑटो-रिक्षा इथे उभी करतो आणि मी त्यातच झोपतो. २०१२ मध्ये, दुकानासोबतचा माझा एक फोटो व्हायरल झाला आणि पोलिसांनी मला अटक केली. मी सत्य सांगितले. मला साबरमती तुरुंगात १४ दिवस ठेवण्यात आले, त्यानंतर माझी सुटका झाली. जेव्हा मी बाहेर आलो, तेव्हा काही लोकांनी मला मारण्याचा प्रयत्न केला. त्यांनी माझ्यावर गोळीबार केला, पण मी वाचलो. आता मला वाटतं, जर मी मेलो असतो, तर आज मला मृत्यूची वाट पाहावी लागली नसती. २०१२ मध्ये, माध्यमांतील लोक मला शोधत इथे आले होते, आणि तेव्हापासून ते मोठ्या संख्येने येत आहेत. त्यांनी नेहमी तोच एक प्रश्न विचारला आहे. मला पळून जावेसे वाटले, पण मी जाणार तरी कुठे? टीव्हीवर, राजकारण्यांच्या भाषणांमध्ये, जिथे कुठे गुजरात दंगलींचा उल्लेख व्हायचा, तिथे माझा फोटो दाखवला जायचा. मी अनेकदा हिंदू नेत्यांकडे जाऊन म्हणालो, तुम्ही हिंदुत्वाच्या नावाखाली माझा फोटो वापरता? कृपया मला राहायला घर द्या. मला काही काम द्या म्हणजे मी घर बांधू शकेन. ते 'तुम्हाला तुमची जात माहीत आहे का...?' असं विचारून मला हाकलून लावायचे. त्यानंतर मी हिंदू धार्मिक कार्यक्रमांना जाणं सोडून दिलं. या संभाषणादरम्यान इथे लोक जमा होऊ लागले आहेत. अशोक वारंवार म्हणाला आहे, जाऊ दे. चला, आम्हाला जेवायला द्या, नाहीतर तीन वाजल्यानंतर हॉटेल्स बंद होतील. आम्ही दोघे जेवायला ऑटो-रिक्षाने निघतो. तो सांगतो, तुमच्याशी बोलून जुन्या आठवणी ताज्या होतात. नुसत्या विचारानेच माझं डोकं फिरतंय. येथील लोक मला दिवसातून दोनदा जेवण देतात. गरज पडल्यास ते मला ५०-१०० रुपये सुद्धा देतात. राजस्थानी आणि मुस्लिम लोक मला खूप मदत करतात. कल्पना करा, मला ५ कोटी गुजराती लोकांचा चेहरा म्हटले गेले, पण कोणी विचारलेच नाही. ऑटो थांबताच ते एका हॉटेलमध्ये जातात, जिथे ते दोघे जेवण करतात. परत येताना अशोक म्हणतो, 'तुमच्याकडे पैसे असतील तर कृपया मला द्या, माझ्या खिशात फक्त वीस रुपये आहेत.' मी त्याच्या खिशात थोडे पैसे सरकवतो आणि गुजरात दंगलीतील दुसरा चेहरा असलेल्या कुतुबुद्दीन अन्सारीचे घर असलेल्या सोनी की चाली भागाकडे निघतो. त्यावेळी कुतुबुद्दीन २८ वर्षांचा होता. तिथे पोहोचल्यावर मला कळले की तो वरच्या मजल्यावर शिंपी म्हणून काम करत होता. मी सर्वात वरच्या मजल्यावर पोहोचण्यासाठी एक अरुंद जिना चढून गेलो. तो मला पाहताच म्हणतो, जेव्हा कोणी मला गुजरात दंगलीचा पोस्टर बॉय म्हणतं, तेव्हा मला खूप वाईट वाटतं. माझं स्वतःचं एक नाव आहे. लोकांनी मला त्याच नावाने हाक मारावी अशी माझी इच्छा आहे. मला आता त्या गोष्टींवर चर्चा करायची नाही. माझी मुलं मोठी झाली आहेत. दंगलीच्या वेळी माझ्या पत्नीच्या पोटात असलेल्या मुलाचं आता नुकतंच लग्न झालं. आता माझा मुलगा आणि सून मला रागावतात आणि विचारतात, तुम्ही त्या गोष्टी अजून किती काळ सारखं बोलत राहणार? मला ते आवडत नाही... म्हणूनच मला आता त्या सगळ्याबद्दल बोलायचं नाही. मी त्याला अनेकदा विनंती करतो, आणि मग तो बोलायला तयार होतो. तो वरच्या मजल्यावरून खाली येतो आणि एका खोलीत बसतो. आम्ही बोलायला सुरुवात करताच तो म्हणतो, त्या फोटोने माझं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त केलं. आता, अल्लाहच्या कृपेने, मी दिवसातून दोनदा जेवू शकतो आणि माझ्या कुटुंबासोबत शांततेत आहे. खरं तर, नरोडा महामार्गावर दंगल उसळली. सर्वत्र मृतदेह विखुरले होते. त्यांच्या हातात बॉम्ब, पेट्रोल आणि जळते टायर होते—ते एक भयानक दृश्य होते. दंगलखोर रस्त्यावर दिसताच मुस्लिमांवर तलवारीने वार करत होते. सुदैवाने, त्या दिवशी पोलिसांचे एक वाहन आले आणि त्यांनी आम्हाला कसेतरी एका मदत शिबिरात पोहोचवले. तिथे निवारा किंवा अन्नाची सोय नव्हती. त्यावेळी माझी पत्नी पाच महिन्यांची गरोदर होती आणि माझ्या हातात दीड वर्षांची मुलगी होती. दंगलखोर कोणत्याही क्षणी हल्ला करतील असे वाटत होते. असो, एक-दोन दिवसांत दंगली बऱ्यापैकी शमल्या. कदाचित सर्व काही ठीक चालले आहे असे वाटले. मी माझ्या पत्नी आणि मुलीला घेऊन मदत शिबिरातून घरी परत आलो. वस्तीत जेमतेम एक-दोन घरे रिकामी उरली होती. काहींना ठार मारण्यात आले होते, तर काही जण पळून गेले होते. पण १ मार्च २००२ रोजी, दुपारी २ वाजता, पेट्रोल बॉम्ब आणि तलवारी घेऊन दंगलखोर अचानक पुन्हा त्या वस्तीत दाखल झाले. त्यांनी दुकाने पेटवून द्यायला सुरुवात केली. समोर आलेल्या प्रत्येक मुस्लिमाला ते ठार मारत होते. ते गर्भवती महिलांच्या पोटात तलवारीने वार करत होते. मी हे सर्व आमच्या घराच्या दुसऱ्या मजल्यावरच्या भिंतीतील एका खिडकीतून पाहत होतो. आता हे निश्चित झाले होते की दंगलखोर आमच्या घरात घुसून आम्हाला ठार मारतील. माझ्या अखेरच्या क्षणी, मी फक्त अल्लाहचे नाव घेत होतो. तेवढ्यात, माझ्यासमोर एक पोलिसांची गाडी दिसली, ज्यात काही पोलीस बसले होते. मी खिडकीतून ओरडत होतो, साहेब, कृपया मला वाचवा! माझा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीये हे लक्षात आल्यावर, मी बाल्कनीत जाऊन ओरडू लागलो. काही पोलीस लगेच गाडीतून खाली उतरले आणि माझ्याकडे आले. मी हात जोडून दयेची भीक मागितली. त्याच गाडीत बसलेल्या एका पत्रकाराने रडताना आणि हात जोडलेल्या अवस्थेत माझा फोटो काढला. त्यानंतर पोलिसांनी आम्हाला एका मदत शिबिरात नेले. दुसऱ्या दिवशी, पीडित मुस्लिमांचा चेहरा म्हणून माझा फोटो वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झाला. एक-दोन दिवसांतच हा फोटो सर्वत्र पसरला. त्यानंतर पत्रकार हा फोटो वापरून मला शोधू लागले. काही पत्रकारांनी मला मदत शिबिरात ओळखले. यानंतर, माझा फोटो वारंवार दिसू लागला—एका बाजूला, हिंदुत्वाचा चेहरा म्हणून अशोक परमार, आणि दुसऱ्या बाजूला, एक पीडित मुस्लिम म्हणून मी. तुम्ही त्या वेळीही शिवणकाम करत होतात का? हो, हा आमचा घरचा व्यवसाय आहे. दंगलींपूर्वी मी अहमदाबादमधील एका मोठ्या कारखान्यात काम करायचो. तिथे सुनील नावाचा माझा एक मित्र होता. तो मला घरी न्यायचा आणि परत सोडायचा. २७ फेब्रुवारीला जेव्हा गोध्राची घटना घडली, तेव्हा संध्याकाळी कारखान्यात अशी घोषणा करण्यात आली की बाहेरची परिस्थिती चांगली नाही. सर्वांनी घरी जावे. दंगे थांबेपर्यंत कारखाना बंद राहील. त्यानंतर मी घरी परतलो. जेव्हा माझा फोटो समोर आला, तेव्हा प्रसारमाध्यमे आणि पक्षाचे नेते मला भेटायला येऊ लागले. त्या काळात, परिसरात कित्येक महिने संचारबंदी लागू करण्यात आली होती. हे नवीन घर २००८ साली बांधले गेले. माझा हिंदू मित्र सुनीलचे घर काही अंतरावरच होते, पण त्याने माझ्याशी बोलणे बंद केले. मी कारखान्यात सुमारे एक वर्ष काम केले, पण मालकाने मला कामावरून काढून टाकले. तो म्हणाला, माध्यमे तुमची मुलाखत घेत आहेत आणि इथे गर्दीही आहे, त्यामुळे आम्ही तुम्हाला ठेवू शकत नाही. जेव्हा माझी नोकरी गेली, तेव्हा मला वाटले, जर मी त्या दंगलीत मेलो असतो, तर हे घडले नसते. मीडियाचे लोक रात्रंदिवस माझ्या घराबाहेर असायचे. माझा व्यवसाय उद्ध्वस्त झाला होता. जेव्हा जेव्हा गुजरात दंगलीत मारल्या गेलेल्या मुस्लिमांविषयी चर्चा व्हायची, तेव्हा माझा फोटो दाखवला जायचा. कंटाळून मी शहर सोडून कोलकात्याला गेलो. तिथे मी तीन-चार वर्षे राहिलो, आणि मग गुपचूप अहमदाबादला परत आलो. दरम्यान, काही सामाजिक संस्थांनी मला फोन करून सांगितले, अनामिक राहून काही उपयोग होणार नाही. जर तुम्ही जगलात, तर लोक नक्कीच विचारतील, त्यामुळे तुम्ही तुमचं आयुष्य जगा. त्यानंतर, मी ५,००० रुपयांना पाच शिलाई मशीन विकत घेतल्या आणि घरबसल्या काम करायला सुरुवात केली. पण तो १३ सप्टेंबर २००८चा दिवस होता. दिल्लीत एक बॉम्बस्फोट झाला होता. इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. त्यांनी सरकारला एक ईमेल पाठवला, ज्यात म्हटले होते, डोळ्याच्या बदल्यात डोळा, म्हणजेच गुजरात दंगलीत मारल्या गेलेल्या मुस्लिमांचा ते बदला घेतील. त्यांनी ईमेलच्या शेवटी माझा फोटो जोडला होता. दुसऱ्या दिवशी, सकाळी ७ वाजल्यापासूनच प्रसारमाध्यमांचे लोक माझ्या घरी जमा झाले. माझी पत्नी आणि मुले खूप घाबरली होती. संध्याकाळपर्यंत पोलिसांनी मला ताब्यात घेतले होते, पण काही स्थानिकांच्या प्रयत्नांमुळे माझी सुटका झाली. २०१३ साली 'राजधानी एक्सप्रेस' हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यात मला एका दहशतवाद्याच्या भूमिकेत दाखवण्यात आले होते. एका दृश्यात, एका पोलीस अधिकाऱ्याच्या कार्यालयात माझा फोटो लावलेला असतो आणि त्याच्यासमोर एक दहशतवादी उभा असतो. आधी तो पोलीस अधिकारी माझ्या फोटोवर बंदूक रोखतो आणि नंतर त्या दहशतवाद्यावर गोळी झाडतो. मला त्या चित्रपटाबद्दल मित्रांकडून कळले. मी दिग्दर्शकाविरुद्ध तक्रार दाखल केली, पण काहीच झाले नाही आणि २०१९ मध्ये ती केस बंद झाली. ज्या पत्रकाराने माझा फोटो काढला होता, त्याला मी जाबही विचारला. माफी मागण्याशिवाय त्याच्याकडे काहीच उत्तर नव्हते. एका फोटोमुळे माझे आयुष्य असे उद्ध्वस्त होईल, याची मला कल्पनाही नव्हती. बरं… माझ्या मुलीचं बाळ आजारी आहे, मला आता जावं लागेल. संध्याकाळ झाली आहे, तो थरथरत्या आवाजात म्हणाला. कॅमेरा बंद करताना तो म्हणतो, खरं सांगायचं तर, मला माझ्या मोबाईल फोनचीसुद्धा भीती वाटते. त्यावर अशा बातम्या पाहून माझं मन अस्वस्थ होतं. माझी परिस्थिती अजून बरी आहे, पण अशोकचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे. तो दर पंधरा दिवसांनी जेवायला माझ्या घरी येतो. मी त्याला थोडे पैसे देतो. आता मी काय करू? मलाही मुलं आहेत. मी आता ५२ वर्षांचा आहे. ----------------------------------------------

दिव्यमराठी भास्कर 16 Apr 2026 7:37 am

बंगालमध्ये भाजप-RSSचे सूक्ष्म व्यवस्थापन गेमचेंजर ठरेल का?:विजयाच्या 12 रणनीती; हिंदूंचे मतदान वाढवण्यासाठी, भीती दूर करण्यासाठी स्वतंत्र पथके

श्चिम बंगालच्या राजकारणात यावेळी काहीतरी मोठं शिजत आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप आणि RSS यांनी शांतपणे आतापर्यंतची सर्वात मोठी रणनीती आखली आहे. बूथपासून ते सीमेपर्यंत संघटना सक्रिय आहेत. भाजपने ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचे ‘1 बूथ-10 यूथ’ हे सूत्र पश्चिम बंगालमधील सर्व 294 जागांवर लागू केले आहे. भाजप-RSS च्या 12 रणनीती कोणत्या आहेत, ज्या बंगालच्या राजकारणाचे समीकरण बदलू शकतात, हेच समजून घेण्यासाठी आम्ही कोलकाता येथे पोहोचलो. राज्याच्या वेगवेगळ्या भागांतील निवडणुकीचे वातावरण पाहिले. हे जितके समजून घेण्याचा प्रयत्न केला, तितके चित्र अधिकच गुंतागुंतीचे होत गेले. लोक म्हणत आहेत, ‘यावेळी बंगालचे राजकारण आणि हवामान, या दोघांचाही मूड सारखाच आहे. कधी काय बदलेल, हे सांगणे कठीण आहे. काही लोकांचे मत आहे की ममता बॅनर्जींचे पुनरागमन जवळपास निश्चित आहे. त्यांच्या मते भाजपच्या जागा वाढू शकतात, पण सरकार बनवणे सोपे नसेल. एक वर्ग असे मानतो की भाजपचे निवडणुकीचे गणित योग्य बसले, तर सत्तापरिवर्तन मोठी गोष्ट नसेल. 2021 च्या एका चुकीतून धडा, भाजपनेही रणनीती बदललीडॉ. धनपत राम अग्रवाल हे स्वदेशी जागरण मंचचे अखिल भारतीय सहसंयोजक आहेत. ही संघटना RSS शी संबंधित असून पश्चिम बंगालमध्ये सक्रिय आहे. डॉ. अग्रवाल सांगतात, ‘भाजपला 2021 मध्येच सरकार स्थापन करण्याची अपेक्षा होती. त्यांना 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 18 जागा मिळाल्या होत्या. लोकसभेच्या एका जागेवर विधानसभेच्या सरासरी 7 जागा असतात. पक्षाचे गणित असे होते की विधानसभा निवडणुकीत 18 7 म्हणजे 126 जागा मिळतील. निकाल अपेक्षेप्रमाणे लागला नाही आणि फक्त 77 जागा मिळाल्या.’ ‘भाजपने मान्य केले की संघटनेच्या काही चुका होत्या. गेल्या 5 वर्षांत बूथ स्तरापर्यंत सुधारणा करण्यात आली. सर्व प्रदेशांमध्ये - मध्य, उत्तर, दक्षिण बंगाल आणि जंगल महालमध्ये बूथ स्तरापर्यंत तयारी करण्यात आली आहे. भाजप 150 पेक्षा जास्त जागा जिंकेल अशी अपेक्षा आहे.’ भाजपची नवीन रणनीती, बॉटम टू टॉप दृष्टिकोनभाजपचे लक्ष शेतकरी, तरुण, महिला, व्यापारी आणि मजुरांवर आहे. या वर्गांशी वेगवेगळ्या बैठका घेऊन त्यांच्या सूचना जाहीरनाम्यात समाविष्ट करण्यात आल्या. पक्ष याला बॉटम टू अप रणनीती म्हणत आहे. यावेळी प्रचाराच्या गोंधळापेक्षा सूक्ष्म व्यवस्थापनावर अधिक भर आहे. हे 4 भागांमध्ये आहे… 1. एक बूथ-दहा युवा हे सुषमा स्वराज यांनी दिलेले सूत्र आहे. प्रत्येक बूथवर 10 तरुणांची टीम तैनात आहे. त्यांच्यासोबत अनुभवी संयोजक काम करत आहेत. मंडल स्तरावरील कार्यकर्तेही कार्यरत आहेत. असा एकही बूथ नाही, जिथे भाजपचे कार्यकर्ते सक्रिय नाहीत. 2. YM, म्हणजे युवा आणि महिला घटकभाजपच्या अंतर्गत अहवालात महिला आणि तरुण निर्णायक मतदार गट म्हणून समोर आले आहेत. त्यामुळे पक्ष संदेशखाली आणि आरजीकर मेडिकल कॉलेजमधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवरील बलात्काराच्या घटनांद्वारे महिला सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत आहे. विशेषतः ग्रामीण भागात, जिथे पुरुषांचे स्थलांतर जास्त आहे. बंगालमध्ये सुमारे 3.26 कोटी महिला मतदार आहेत. 2021 च्या विधानसभा निवडणुकीत 50% महिलांनी TMC ला मतदान केले होते. याचे कारण लक्ष्मी भंडार योजना मानले गेले. या तुलनेत यावेळी भाजपने अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे. राज्यात रोजगार आणि शिक्षणाची स्थिती भाजपच्या निवडणूक कथनाचा महत्त्वाचा भाग आहे. उद्योग क्षेत्रात गुंतवणूक थांबली असल्याचा पक्षाचा दावा आहे. 6800 कंपन्यांनी राज्य सोडले आहे. कायदा आणि सुव्यवस्थेमुळे गुंतवणूक येत नाहीये आणि राज्यावर कर्ज वाढले आहे. 3. पक्षांतरितांना प्राधान्य नाही2021 मध्ये भाजपने इतर पक्षांतून आलेल्या 100 हून अधिक नेत्यांना तिकीट दिले होते. यापैकी बहुतेक टीएमसीमधून आलेले होते. यामुळे भाजपचे जुने कार्यकर्ते नाराज झाले. अनेक नेते निवडणूक हरल्यानंतर पुन्हा टीएमसीमध्ये परतले. यावेळी पक्ष अधिक सतर्क राहिला. पक्षांतरितांऐवजी पक्ष नेत्यांना प्राधान्य देण्यात आले. 4. मुस्लिमांना तिकीट नाही भाजपने यावेळी एकाही मुस्लिमाला तिकीट दिले नाही. 2021 मध्ये 6 मुस्लिम उमेदवार होते. बांगलादेशात हिंदूंच्या विरोधात झालेल्या हिंसाचाराचा मुद्दाही पक्ष उपस्थित करत आहे. मुस्लिमांचा एक गट ममता सरकारवर नाराज असल्याचा दावाही भाजप करत आहे. बदलणारे लोकसंख्याशास्त्र आणि बांगलादेशात हिंदूंविरुद्धच्या हिंसाचाराचा घटकबांगलादेशात हिंदूंवरील हिंसाचार आणि दीपू दास यांची हत्या हा देखील एक घटक आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष समिक भट्टाचार्य म्हणतात, ‘पश्चिम बंगाल हळूहळू बांगलादेश बनत आहे. घुसखोरांमुळे सीमेलगतच्या जिल्ह्यांचे लोकसंख्याशास्त्र बदलत आहे. पश्चिम बंगालच्या जमिनीचा वापर बिहार, झारखंड, पूर्वांचल आणि सीमांचलचे लोकसंख्याशास्त्र बदलण्यासाठी केला जात आहे.’ समिक भट्टाचार्य सांगतात, ‘यावेळी निवडणूक जनता आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात आहे. आम्ही तयारी केली आहे. पर्वतापासून समुद्रापर्यंत, कूचबिहारपासून काकद्वीपपर्यंत, दार्जिलिंगपासून आसनसोलपर्यंत, गंगोत्रीपासून गंगासागरपर्यंत यावेळी भाजपचे सरकार बनेल.’ लोकांना न घाबरता मतदान करण्याचे आवाहन, पण RSS पदाधिकारी स्वतःच घाबरलेRSS शी संबंधित संघटना पत्रके वाटून राष्ट्रवादी पक्षाला मतदान करण्याचे आवाहन करत आहे. पदाधिकाऱ्यांनुसार, मतदारांना NOTA चा वापर न करण्याचे आवाहन केले जात आहे, जेणेकरून ते स्थिर सरकार निवडतील. लोकांना सकाळी लवकर मतदान करण्यास सांगितले आहे, कारण दुपारी 12 वाजल्यानंतर अनेक भागांमध्ये मतदानादरम्यान गोंधळ आणि गडबडीची शक्यता वाढते. आरएसएसचे प्रादेशिक कार्यालय 'केशव भवन' कोलकाता येथे आहे. येथे भेटलेल्या पदाधिकाऱ्यांनी कॅमेऱ्यावर बोलण्यास नकार दिला. मात्र, एका पदाधिकाऱ्याने सांगितले की, जर टीएमसीचे लोक निवडणुकीत आम्हाला मारतील, तर यावेळी आम्हीही त्यांना मारू. नंतर लगेच म्हणाले, 'हे लिहू नका, नाहीतर ते मला तुरुंगात टाकू शकतात.' त्यांच्या बोलण्यात भीती होती. सामान्य लोकांना न घाबरता मतदान करण्याचे आवाहन करणारे आरएसएसचे लोक स्वतः इतके घाबरलेले आहेत, याचे आश्चर्य वाटले. VHP चा दावा: भाजप १५० जागा जिंकून सरकार स्थापन करेल, टीएमसीची एक कोटी मते घटतीलआरएसएसच्या पदाधिकाऱ्यांनी आमची भेट विश्व हिंदू परिषदेचे नेते सचिंद्रनाथ सिंह यांच्याशी घडवून आणली. ते दावा करतात, ‘यावेळी भाजप १५० जागा जिंकून बंगालमध्ये सरकार स्थापन करेल. ही केवळ निवडणुकीची आशा नाही, तर शंभर वर्षांच्या हिंदुत्व साधनेच्या सिद्धीचा परिणाम असेल.’ सचिंद्रनाथ सिंह आरोप करतात की टीएमसीचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन महिलांवर दबाव टाकतात. मुलांच्या डोक्यावर हात ठेवून टीएमसीला मतदान करण्याची शपथ देतात. यावर मात करण्यासाठी गावांमध्ये क्विक रिस्पॉन्स टीम (त्वरित प्रतिसाद पथके) तयार केली जात आहेत. ही पथके संवेदनशील मतदान केंद्रांबद्दल निवडणूक आयोगाला माहिती देतील. मतांचे गणित समजावून सांगताना सचिंद्रनाथ सिंह म्हणतात, ‘गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला सुमारे २.३ कोटी आणि टीएमसीला २.९ कोटी मते मिळाली होती. एसआयआरमुळे टीएमसीची एक कोटी मते कमी होऊ शकतात.’ पश्चिम बंगालमध्ये एसआयआर दरम्यान सुमारे ९१ लाख नावे वगळण्यात आली आहेत. सर्वाधिक ४.५ लाख नावे मुस्लिमबहुल मुर्शिदाबाद जिल्ह्यातून कमी झाली आहेत. उत्तर २४ परगणा येथे ३.२५ लाख नावे वगळण्यात आली आहेत. मात्र, वगळलेल्या मतदाराला याविरोधात अपील करण्याची एक संधी मिळेल. जंगल महाल आणि उत्तर बंगालमध्ये भाजप मजबूत, दक्षिण बंगाल टीएमसीचा पॉवर हाऊस2021 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप उत्तर बंगालमध्ये सर्वात मजबूत होता. येथील 54 जागांपैकी भाजपला 30 आणि टीएमसीला 24 जागा मिळाल्या. कूचबिहार आणि अलीपूरद्वारमध्ये पक्षाने क्लीन स्वीप केला. जंगलमहालच्या 42 जागांपैकी 17 भाजपला आणि 25 टीएमसीला मिळाल्या होत्या. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत येथे भाजप आघाडीवर होता, परंतु 2021 मध्ये टीएमसीने पुनरागमन केले. यावेळी भाजप दोन्ही भागांना सुरक्षित क्षेत्र मानत आहे. दक्षिण बंगाल टीएमसीचा सर्वात मजबूत बालेकिल्ला आहे. येथे मुस्लिम आणि शहरी उदारमतवादी मतदार जास्त आहेत. येथील १६७ जागांपैकी १५३ जागा टीएमसीने जिंकल्या होत्या. उत्तर आणि दक्षिण २४ परगणा, हावडा, हुगळी आणि कोलकाता येथे तिला एकतर्फी विजय मिळाला होता. भाजपला फक्त १४ जागा मिळाल्या. हे विजय मतुआ लोकसंख्या असलेल्या भागांत मिळाले. यावेळी भाजप येथे त्या हिंदू मतदारांपर्यंत पोहोचत आहे, जे भीतीमुळे मतदान करण्यासाठी बाहेर पडत नाहीत. पाच पानांच्या अर्थव्यवस्थेवर लक्ष, मतुआ-राजबंशींपर्यंत पोहोचले RSSझारग्राम, पश्चिम मेदिनीपूर, पुरुलिया, बांकुरा व्यतिरिक्त उत्तर बंगालमध्ये आदिवासी लोकसंख्या आहे. यांची उपजीविका चहा, साल, तेंदू, पान आणि तंबाखूच्या पानांवर अवलंबून आहे. बंगालमध्ये सुमारे 42 ते 45 लाख आदिवासी मतदार आहेत. राज्यातील 294 जागांपैकी 16 जागा ST साठी राखीव आहेत, परंतु आदिवासींचा प्रभाव 45 ते 50 जागांवर आहे. RSS ने त्यांच्या भागात शाखा वाढवल्या, शाळा उघडल्या आणि स्थानिक सणांच्या माध्यमातून त्यांच्यात स्थान निर्माण केले. भाजप निवडणुकीत याच नेटवर्कचा वापर करत आहे. विशेषतः जंगलमहालमध्ये, जिथे पूर्वी डाव्या पक्षांचा मजबूत व्होट बँक होता. हळूहळू हे भाजपमध्ये शिफ्ट झाले. याव्यतिरिक्त भाजपने मतुआ, राजवंशी आणि बांगलादेशातून आलेल्या हिंदू निर्वासितांना नागरिकत्व मिळवून देण्यासाठी काम केले. सीएएचा सर्वाधिक परिणाम उत्तर २४ परगणा, नादिया, कूचबिहार, अलीपूरद्वार आणि जलपाईगुडी येथे आहे. २०२१ च्या निवडणुकीनंतर आरएसएसने सीमावर्ती भागांमध्ये शाखा वाढवल्या आहेत. मतुआ हे बांगलादेशातून आलेले निर्वासित आहेत. बंगालच्या लोकसंख्येत त्यांचा वाटा ४% ते ५% आहे. दलित लोकसंख्येत ते सुमारे १७% आहेत. हा समुदाय नादिया, उत्तर आणि दक्षिण २४ परगणा येथे राहतो आणि सुमारे १५ जागांवर जय-पराजय निश्चित करतो. त्याचप्रमाणे राजबंशी समुदाय कूचबिहार, अलीपूरद्वार, जलपाईगुडी आणि दार्जिलिंगमधील ५४ जागांपैकी सुमारे २५-३० जागांवर निर्णायक आहेत. तज्ज्ञ म्हणाले- ममता सरकारविरोधात संताप आहे, पण भाजपला त्याचा फायदा घेता येत नाहीयेपश्चिम बंगालच्या राजकारणावर संशोधन करणारे रवींद्र भारती विद्यापीठाचे प्राध्यापक बिश्वनाथ चक्रवर्ती म्हणतात, ‘गेल्या 3-4 निवडणुकांमध्ये TMC ने 30% विजय भीतीचे वातावरण निर्माण करून मिळवला आहे. ते भाजप समर्थकांना धमकावतात की, मतदान कराल तर घरातून काढून टाकू. लक्ष्मी भांडार योजनेचा फायदा मिळणार नाही, बूथवर कॅमेऱ्यातून पाहून घेऊ.’ ‘यावेळी निवडणूक आयोगाने सुरक्षा वाढवली आहे, पण भीतीचे वातावरण अजूनही कायम आहे. पश्चिम बंगालच्या राजकारणात हिंसेच्या माध्यमातून जिंकण्याची प्रवृत्ती राहिली आहे. अलीकडे मालदा आणि मुर्शिदाबादमध्ये स्पेशल इंटेंसिव्ह रिव्हिजन (SIR) चे काम करणाऱ्या न्यायिक अधिकाऱ्यांवरील हल्ले याची उदाहरणे आहेत.’ ते म्हणाले, ‘टीएमसी आणि ममता बॅनर्जी यांच्या विरोधात सत्ताविरोधी लाट आहे, पण याचा फायदा भाजपला मिळणार नाही. भाजपच्या संघटनेत त्रुटी आहेत. या त्रुटी 2021 मध्येही होत्या. भाजपने ममतांविरोधात मजबूत मुख्यमंत्री चेहरा दिला नाही. शुभेंदु अधिकारी यांना विधानसभेत सक्रिय ठेवले, पण संघटनेत त्यांच्याशी मतभेद राहिले.’ ‘गेल्या निवडणुकीच्या तुलनेत आरएसएस बंगालमध्ये अधिक सक्रिय दिसत आहे. भाजपची बूथवर मजबूत संघटना नाही, पण आरएसएसचे कार्यकर्ते काम करत आहेत. पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्या सभांपासून ते घरोघरी जाऊन केलेल्या प्रचारापर्यंत आरएसएसचे योगदान आहे.’ ‘गेल्या 5 वर्षांत ममता सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले, पण भाजप मोठे आंदोलन उभे करू शकला नाही. पक्षाचे ज्येष्ठ नेते मानत राहिले की गुजरात किंवा मध्य प्रदेशात कोणत्याही आंदोलनाशिवाय सरकार बनले. अशा परिस्थितीत बंगालमध्ये आंदोलनाचा फायदा होणार नाही, पण येथील राजकारणात आंदोलने आवश्यक असतात. याच कारणामुळे भाजपची संघटना मजबूत होऊ शकली नाही.’ प्रा. चक्रवर्ती पुढे म्हणतात, ‘पश्चिम बंगालमध्ये लोकसंख्याशास्त्रीय बदल झाले आहेत. राज्यात 35% मुस्लिम लोकसंख्या आहे. हे 146 विधानसभा जागांमध्ये 20% ते 80% पर्यंत आहेत. येथे डावे-उदारमतवादी मतदारही मजबूत आहेत. डावी परंपरा खूप दीर्घकाळची आहे. प्रेसिडेंसी कॉलेज, कलकत्ता विद्यापीठासारख्या संस्थांमधून बाहेर पडलेले उदारमतवादी विचारांचे लोक ममतांच्या विरोधात आहेत, पण भाजपच्या विचारसरणीचा स्वीकार करणार नाहीत.’ प्रो. चक्रवर्ती यांच्या मते, ‘भाजपने बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार आणि मुर्शिदाबाद दंगलींसारखे मुद्दे उपस्थित केले आहेत. 2021 मध्ये भाजपला सुमारे 94% आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकीत 95% हिंदू मते मिळाली. यात फारशी वाढ होण्याची शक्यता दिसत नाही.’

दिव्यमराठी भास्कर 16 Apr 2026 7:17 am

लोकसभा जागा 850 पर्यंत वाढवण्याची तयारी:2029च्या निवडणुकीपर्यंत महिलांसाठी प्रत्येक तिसरी जागा कशी आरक्षित होईल; 8 प्रश्नांमध्ये संपूर्ण कथा

1952 मध्ये जेव्हा देशात पहिल्यांदा लोकसभा निवडणुका झाल्या, तेव्हा संसदेत 489 जागा होत्या आणि लोकसंख्या सुमारे 36 कोटी होती. आज लोकसंख्या 140 कोटींच्या पुढे गेली आहे, पण गेल्या 50 वर्षांपासून जागा 543 वर स्थिर आहेत. आता सरकारने 16 ते 18 एप्रिलदरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे आणि एकाच वेळी तीन मोठी कामे करण्याची तयारी करत आहे- लोकसभेच्या जागा वाढवून 850 करणे, देशाचा नवीन निवडणूक नकाशा तयार करणे (म्हणजेच परिसीमन), आणि 2023 मध्ये मंजूर झालेल्या महिला आरक्षण कायद्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी करणे. पण हे इतके सोपे नाही. दक्षिणेकडील राज्यांना भीती आहे की त्यांच्या जागा कमी होतील. विरोधक विचारत आहेत की बंगाल निवडणुकीच्या अगदी आधी इतकी घाई का आणि सर्वात मोठा प्रश्न - महिला आरक्षण प्रत्यक्षात कधीपासून लागू होईल? अशाच 8 महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे, दिव्य मराठी एक्सप्लेनरमध्ये जाणून घेऊया... प्रश्न-1: महिला आरक्षणाचा कायदा 2023 मध्येच मंजूर झाला होता, तर आता तीन नवीन विधेयके का आणावी लागली?उत्तर: केंद्र सरकारने 19 सप्टेंबर 2023 रोजी संविधान (128 वी सुधारणा) विधेयक सादर केले होते. या अंतर्गत लोकसभा आणि राज्य विधानसभांमध्ये एक-तृतीयांश जागा महिलांसाठी आरक्षित करण्याची तरतूद होती. 20 सप्टेंबर रोजी लोकसभेत, 21 सप्टेंबर रोजी राज्यसभेत आणि 28 सप्टेंबर 2023 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मंजुरीनंतर हे विधेयक कायद्यात रूपांतरित झाले. पण ते लागू होऊ शकले नाही. का? कारण त्या कायद्यात अट होती की आरक्षण नवीन जनगणना आणि त्यानंतर होणाऱ्या मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतरच लागू होईल. नवीन जनगणनेचा डेटा येण्यासाठी आणखी सुमारे दोन वर्षे लागू शकतात. म्हणजेच, मतदारसंघांची पुनर्रचना 2034 च्या निवडणुकांपर्यंत पुढे ढकलली जाऊ शकली असती. हेच बदलण्यासाठी सरकारने 16 ते 18 एप्रिल दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे आणि तीन नवीन विधेयके आणत आहे: या विधेयकांचे तीन उद्देश आहेत… प्रश्न 2: लोकसभेच्या जागा वाढवून 850 करण्याची गरज का पडत आहे? उत्तरः सध्याच्या जागांचे वाटप 1971 च्या जनगणनेवर आधारित आहे. तेव्हा एक खासदार सरासरी 10 लाख लोकांचे प्रतिनिधित्व करत होता, जे आता वाढून 25 लाखांपेक्षा जास्त झाले आहे. पण राजकीय जाणकार आणखी एक गोष्टही सांगतात. लोकसभेत सध्या 74 महिला खासदार आहेत, म्हणजे फक्त 13.6%. 543 जागांवर 33% आरक्षण लागू झाले असते, तर 181 जागा महिलांसाठी राखीव झाल्या असत्या आणि अनेक पुरुष खासदारांना त्यांच्या जागा सोडाव्या लागल्या असत्या. यामुळे पक्षांमध्ये बंडाळीचा धोका होता. असा अंदाज आहे की, परिसीमननंतर 816 जागा होतील, म्हणजेच 273 नवीन जागा वाढतील. जवळपास तेवढ्याच जागा महिलांसाठी आरक्षित असतील. म्हणजेच, सध्याच्या पुरुष खासदारांवर थेट परिणाम कमी होईल. प्रश्न 3: परिसीमनसाठी 2011 चा जुना डेटा का, नवीन जनगणनेची वाट का नाही?उत्तरः लोकशाही मानकांनुसार, परिसीमन नेहमी ताज्या जनगणनेच्या आधारावर व्हायला हवे. पण जर 2027 च्या जनगणनेची वाट पाहिली, तर महिला आरक्षण 2034 पर्यंत लागू होऊ शकणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच देशातील महिलांना पत्र लिहिले - ‘महिलांचा हक्क आता आणखी पुढे ढकलता येणार नाही आणि 2029 च्या निवडणुकीपासून तो लागू व्हायला हवा.’ पण मोदी सरकारच्या या घाईवर प्रश्नचिन्हही उपस्थित केले जात आहेत- या प्रश्नांवर गृहमंत्री अमित शाह म्हणाले, ‘हे विधेयक 2023 मध्ये मंजूर झाले होते. आता वचन पूर्ण करण्याची वेळ आहे. संसदेने देशातील महिलांना 33% आरक्षण देण्याचे वचन दिले आहे. हे वचन लवकरात लवकर पूर्ण केले पाहिजे.’ प्रश्न-4: दक्षिणेकडील राज्यांनी लोकसंख्या नियंत्रणात ठेवली, तर आता त्यांच्या जागा कमी होतील आणि हिंदी भाषिक राज्यांच्या वाढतील का?उत्तरः ही भीती नवीन नाही. 1976 आणि 2001 मध्येही मतदारसंघांची पुनर्रचना याच कारणामुळे पुढे ढकलण्यात आली होती, कारण उत्तर आणि दक्षिणच्या लोकसंख्येत मोठा फरक होता. आजही हीच चिंता आहे. दक्षिणेकडील राज्यांनी कुटुंब नियोजन स्वीकारले, लोकसंख्या नियंत्रणात ठेवली, परंतु लोकसंख्या-आधारित मतदारसंघांच्या पुनर्रचनेत त्यांचे राजकीय प्रतिनिधित्व कमी होऊ शकते. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टालिन यांनी इशारा दिला आहे की, जर मतदारसंघांच्या पुनर्रचनेमुळे राज्याचे नुकसान झाले, तर 1950-60 च्या दशकासारखे आंदोलन होईल. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी दक्षिणेकडील सर्व मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून एकत्र येण्याचे आणि पंतप्रधान मोदींना सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची मागणी केली आहे. निवडणूक विश्लेषक ते राजकीय कार्यकर्ते बनलेले योगेंद्र यादव यांचे म्हणणे आहे की, जर 2011 च्या जनगणनेच्या आधारावर आनुपातिक मतदारसंघांची पुनर्रचना झाली, तर केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि पंजाबचे नुकसान होईल, तर हिंदी भाषिक राज्यांना फायदा होईल. यामुळे संघराज्यीय संरचनेचा नाजूक समतोल बिघडू शकतो. केंद्र सरकार वारंवार आश्वासन देत आहे की, राज्यांच्या आनुपातिक वाट्याशी छेडछाड केली जाणार नाही. संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, जागांचे वाटप परिसीमन आयोग करेल आणि ते आनुपातिक प्रतिनिधित्वाच्या आधारावर होईल. यामुळे दक्षिणेकडील राज्यांना नुकसान नाही, तर फायदा होईल. आनुपातिक प्रतिनिधित्व, म्हणजे लोकसभेत राज्यांच्या सध्याच्या वाट्यानुसार मतदारसंघांच्या पुनर्रचनेत जागा वाटल्या जातील. उदाहरणाने समजून घेऊया- तामिळनाडूमध्ये सध्या लोकसभेच्या 39 जागा आहेत, म्हणजे आनुपातिक वाटा झाला- (39/543) 100 = 7.18%. जर लोकसभेच्या जागा 543 वरून वाढून 850 झाल्या, तर या सूत्रानुसार तामिळनाडूच्या लोकसभेच्या जागा वाढून 61 होतील. प्रश्न-5: महिलांना आरक्षण कधीपासून मिळेल आणि परिसीमन कधी लागू होईल?उत्तरः यासाठी आधी परिसीमन आयोग स्थापन होईल. याचे अध्यक्ष सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश असतात. मुख्य निवडणूक आयुक्त आणि राज्य निवडणूक आयुक्त सदस्य असतात. प्रत्येक राज्यासाठी 5 लोकसभा आणि 5 विधानसभा सदस्य सहयोगी सदस्य असतात. मात्र, त्यांना मतदानाचा हक्क नसतो. भारताच्या मागील चार परिसीमन आयोगांना अंतिम आदेश जारी करण्यासाठी 3 ते साडे 5 वर्षे लागली होती. 2002 मध्ये सुरू झालेले परिसीमन 2008 मध्ये पूर्ण झाले, म्हणजे 6 वर्षांत. सरकारचा प्रयत्न आहे की हे सर्व 2029 च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत लागू व्हावे. आरक्षित जागा प्रत्येक निवडणुकीत आळीपाळीने बदलत राहतील. SC/ST कोट्यातील एक-तृतीयांश जागा त्याच वर्गातील महिलांसाठी राखीव असतील. प्रश्न-6: विधानसभांमध्येही महिला आरक्षण लागू होईल का?उत्तरः होय. नारी शक्ती वंदन अधिनियम (106 वे संविधान दुरुस्ती अधिनियम, 2023) अंतर्गत लोकसभेसोबतच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभांमध्येही एक-तृतीयांश जागा महिलांसाठी आरक्षित असतील. बहुतेक राज्यांमधील विधानसभा जागा 2001 च्या जनगणनेवर आधारित आहेत, आसाम आणि जम्मू-काश्मीर वगळता. ईशान्येकडील 4 राज्ये- नागालँड, मणिपूर, अरुणाचल आणि मिझोराममध्ये तर विधानसभा मतदारसंघ 2001 पेक्षाही जुन्या आधारावर आहेत. त्यामुळे या सर्व ठिकाणीही नव्याने परिसीमन होईल. प्रश्न-७: जर परिसीमन आयोगाचा निर्णय चुकीचा वाटला, तर न्यायालयात जाता येते का?उत्तरः परिसीमन आयोगाचे आदेश कायद्याप्रमाणे लागू होतात. अनुच्छेद ३२९ आणि परिसीमन अधिनियम २००२ च्या कलम १० नुसार, यांविरुद्ध न्यायालयात जाता येत नाही. संसद आणि विधानसभा देखील यात बदल करू शकत नाहीत. मात्र, २०२४ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने किशोरचंद्र छगनलाल राठौर विरुद्ध भारत सरकार प्रकरणात एक महत्त्वाचा निर्णय दिला. न्यायालयाने म्हटले की, अनुच्छेद ३२९ न्यायिक पुनरावलोकनाला पूर्णपणे रद्द करत नाही. जर कोणताही आदेश स्पष्टपणे मनमानी असेल, समानता आणि निष्पक्षता यांसारख्या संवैधानिक मूल्यांच्या विरोधात असेल किंवा चुकीच्या हेतूने घेतला गेला असेल, तर उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालय त्याची चौकशी करू शकते. लहान-सहान सीमा बदलांसारख्या मुद्द्यांवर न्यायालय हस्तक्षेप करणार नाही आणि यामुळे निवडणुकीला उशीर होणार नाही याचीही काळजी घेईल. मात्र, प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, २०२६ चा परिसीमन आयोग अधिक शक्तिशाली असेल, ज्याच्या निर्णयांना न्यायालयात आव्हान देता येणार नाही. प्रश्न-8: संसदेत तिन्ही विधेयके मंजूर होणे किती सोपे किंवा कठीण आहे?उत्तरः संविधान दुरुस्तीसाठी लोकसभेत 'विशेष बहुमत' आवश्यक आहे. म्हणजे एकूण 543 पैकी किमान अर्धे म्हणजे 272 खासदार उपस्थित असावेत. जेवढे खासदार उपस्थित असतील, त्यांच्या दोन-तृतीयांश सदस्यांचा पाठिंबा. समजा सर्व 543 खासदारांनी मतदान केले, तर विधेयक मंजूर करण्यासाठी 362 मतांची आवश्यकता आहे. सध्या NDA कडे 292 खासदार आहेत. विरोधी पक्षाकडे 233. म्हणजे NDA एकट्याने विधेयक मंजूर करू शकत नाही. विरोधी पक्षाचे सहकार्य आवश्यक आहे. भाजप, काँग्रेस, JDU, LJP(R) सह अनेक पक्षांनी व्हिप जारी केला आहे. 2023 मध्ये महिला आरक्षण विधेयक कोणत्याही विरोधाशिवाय मंजूर झाले होते, तसे यावेळी होण्याची शक्यता कमी आहे असे मानले जात आहे. कारण विरोधी आघाडी INDIA चे म्हणणे आहे की आम्ही महिला आरक्षणाच्या बाजूने आहोत, पण परिसीमनच्या विरोधात आहोत. याचा आम्ही संसदेत विरोध करू. लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले, सरकार जो प्रस्ताव मांडत आहे, त्याचा महिला आरक्षणाशी काहीही संबंध नाही. जातीनिहाय जनगणनेकडे दुर्लक्ष करून OBC, दलित आणि आदिवासींच्या हक्कांची चोरी होत आहे. दक्षिण भारत आणि ईशान्येकडील राज्यांवर होणारा कोणताही अन्याय आम्ही सहन करणार नाही.

दिव्यमराठी भास्कर 16 Apr 2026 6:58 am

‘तौसीफ म्हणाला- शिव भगवान नाही, ब्रह्माजींना शिवीगाळ’:हनिमूनचे तपशील विचारायचा, प्रायव्हेट पार्टकडे टक लावून पाहायचा; TCS प्रकरणात आतापर्यंत किती खुलासे झाले

‘मे 2025 ची गोष्ट आहे, मी सोमवारचे व्रत केले होते. तेव्हा तौसीफ अत्तार जवळ आला आणि माझ्या टेबलावर ठेवलेली महादेवाची मूर्ती पाहून म्हणाला की हे खरंच देव आहेत का. जर पार्वतीने गणेशाला जन्म दिला, तर त्यांना का माहीत नव्हते. मग तो हसू लागला. तो अनेकदा हिंदू धर्म आणि देवी-देवतांची चेष्टा करत असे. एके दिवशी तो म्हणाला की ब्रह्मदेवाने आपल्या मुलीसोबत चुकीचे काम केले होते.‘ ‘तौसीफ ऑफिसमध्ये बिझनेस प्रोसेस लीडर आहे. आम्ही एका टीममध्ये नव्हतो, तरीही तो माझ्याकडे येत असे आणि खाजगी आयुष्याबद्दल बोलत असे. तुझा बॉयफ्रेंड आहे का, असे विचारत असे. तो ऑफिसमधील मुलींना डोक्यापासून पायापर्यंत न्याहाळत असे आणि डोळा मारत असे. मी वरिष्ठांकडे तक्रार केली, पण काही झाले नाही, म्हणून पोलिसांकडे जावे लागले.‘ ही 25 वर्षांच्या त्या मुलीची आपबीती आहे, जिच्या तक्रारीनंतर नाशिक पोलिसांनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) च्या 7 अधिकाऱ्यांना अटक केली आहे. 26 मार्च ते 3 एप्रिलदरम्यान 9 महिलांनी एफआयआर (FIR) दाखल केली. त्यांनी कंपनीच्या मुस्लिम टीम लीडर्स आणि एचआर (HR) मॅनेजरवर लैंगिक छळवणुकीसह जबरदस्तीने धर्म परिवर्तन करण्यासारखे गंभीर आरोप केले आहेत. नवीन महिला कर्मचाऱ्यांना लक्ष्य करून ब्रेनवॉश करण्याचा नमुना आम्ही तपास करणाऱ्या नाशिक पोलिसांच्या एसआयटी अधिकाऱ्याशी बोललो. त्यांनी सांगितले की, या प्रकरणाचे धागेदोरे मानवी तस्करी, धर्मांतरण आणि परदेशी निधीशी संबंधित असू शकतात. याचा तपास सुरू आहे. आरोपींची पार्श्वभूमी आणि अधिकृत नोंदी तपासल्या जात आहेत. पीडित महिला महाराष्ट्र पोलिसांच्या निगराणीखाली आहेत. SITशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, ‘पहिली एफआयआर २६ मार्च रोजी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. त्यानंतर आणखी ८ महिलांनी तक्रारी दाखल केल्या. त्यांच्या जबाबातून लैंगिक शोषण, जबरदस्ती आणि धार्मिक भावना दुखावण्याचा नमुना समोर आला आहे.’ ‘बहुतेक साक्षींमध्ये असे आढळून आले की पीडित महिलांशी सुरुवातीला वेगवेगळ्या मार्गांनी संपर्क साधण्यात आला. नंतर नोकरीच्या दबावाखाली, पदोन्नती आणि काम शिकवण्याच्या बहाण्याने त्यांना लक्ष्य करण्यात आले. पोलिसांनी जबाबांच्या आधारे टीसीएस कंपनीचे दानिश शेख, तौसीफ अत्तार, रजा मेमन, शाहरुख कुरेशी, आसिफ अन्सारी, शफी शेख आणि अश्विनी चेनानी यांना अटक केली आहे. कंपनीची एचआर मॅनेजर निदा खान अजूनही फरार आहे.’ 9 पैकी 3 महिलांच्या FIR मिळाल्या…पहिली पीडितवरिष्ठ विचारत होते- हनिमूनला कुठे गेली होतीस, काय-काय केलेस पीडित महिलेने 2 एप्रिल रोजी नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यात FIR दाखल केली आहे. तिच्या म्हणण्यानुसार, जून 2025 ते 31 मार्च 2026 पर्यंत ती TCS कार्यालयात असोसिएट होती. पती कामाच्या निमित्ताने पुण्यात राहतात. FIR मध्ये तिने सांगितले, ‘24 जून 2025 रोजी मला 3 महिन्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात समाविष्ट करण्यात आले. रजा मेमनचा माझ्या प्रशिक्षणाशी काहीही संबंध नसतानाही, तो माझ्या जवळ येऊन माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल विचारत असे. तो म्हणायचा की पतीसोबत का राहत नाहीस, हनिमूनला कुठे गेली होतीस. तिथे काय केलेस, कसे केलेस. रजा मेमनसोबत शाहरुख कुरैशीदेखील होता.‘ ट्रेनिंगमध्ये आसिफ अन्सारीही अनेकदा माझ्या जवळ यायचा. जवळ बसून चुकीच्या पद्धतीने स्पर्श करायचा. कधी मांडीवर किंवा खांद्यावर हात ठेवायचा. एका दिवशी दुपारच्या जेवणाच्या वेळी त्याने हात मांडीवर ठेवला. मग म्हणाला- जर कोणती शारीरिक गरज असेल, तर सांग, मी पूर्ण करेन. महिलेने सांगितले, ‘सीनियर तौसीफ अत्तारनेही चुकीचे वर्तन केले. तोही टीममध्ये नव्हता, तरीही जवळ येऊन खाण्याबद्दल विचारायचा. अश्लील पद्धतीने विचारायचा, 'संत्री आणली आहेस का? लहान वाली आणली आहेस की मोठीवाली?' तो चेहरा जवळ आणायचा आणि स्पर्श करायचा. जेव्हा प्रश्न विचारला, तेव्हा म्हणाला, 'तुला पुढे जायचे नाही का?' पीडितेनुसार, शाहरुख कुरेशी, रजा मेमन, आसिफ अन्सारी, तौसीफ अत्तार आणि शफी शेख यांनी तिला शारीरिक आणि मानसिक त्रास दिला. हिंदू देवी-देवतांना अपशब्द वापरले, ज्यामुळे तिच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या. तिने एचआर सेलमध्ये तक्रार केली, पण कारवाई झाली नाही. तेव्हा तिने मुंबई नाका पोलीस ठाण्यात तक्रार केली. दुसरी पीडित‘देव तोच जो अदृश्य आहे, हिंदू देवी-देवता खोटे आहेत’ मुंबई नाका पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या तक्रारीनुसार, जानेवारी ते डिसेंबर 2025 पर्यंत तिचे ऑफिसमध्ये लैंगिक शोषण झाले. महिला कंपनीत क्रेडिट कार्ड ग्राहकांच्या तक्रारी ऐकत असे. तिने सांगितले, ‘तौसीफ अत्तार स्वतःच्या धर्माला श्रेष्ठ दाखवत असे आणि हिंदू धर्माला कमी लेखत असे. तो म्हणायचा की खरा देव तोच आहे, जो अदृश्य आहे. हिंदू धर्मात देव दिसतात, म्हणून ते खोटे आहेत.‘ ‘डिसेंबर 2025 ची गोष्ट आहे. मी दुपारच्या जेवणानंतर ताक पीत होते, तेव्हा तौसीफ आला आणि विचारले- ‘काय पीत आहेस?' मी म्हणाले- 'ताक पीत आहे.' त्याने विचित्र नजरेने पाहिले आणि म्हणाला- माझ्याकडेही ताक आहे, प्यायला आवडेल का? असे म्हणत त्याने खासगी भागाकडे इशारा केला.’ तिसरी पीडितभगवान कृष्ण आणि महादेवांबद्दल चुकीच्या गोष्टी बोलल्या तिसऱ्या FIR मध्ये पीडितेने सांगितले, ‘मी डिसेंबर 2024 मध्ये ऑफिसमध्ये होते. तेव्हा शफी शेख कामाच्या बहाण्याने जवळ येऊन बसला आणि जाणूनबुजून माझ्या पायाला आपला पाय घासण्याचा प्रयत्न केला. मग माझे कीपॅड वापरण्याच्या बहाण्याने चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. मी खुर्ची दूर केली, तेव्हा तो हसत निघून गेला.‘ ‘फेब्रुवारी 2026 मध्ये तौसीफने माझ्या धर्माला कमी लेखण्याचा प्रयत्न केला. त्याने म्हटले की कृष्णाने 16 हजार महिलांशी लग्न केले, यावरून कृष्ण कसे होते हे कळते. भगवान शंकरांना हे माहीत नव्हते का की गणेश पार्वतीचे पुत्र आहेत? जर माहीत नव्हते तर देवी पार्वतीला पुत्र कसा झाला? त्यांनी गणेशाचे शीर का कापले?’ 40 दिवसांच्या 'अंडरकव्हर ऑपरेशन'मधून खुलासा प्रकरणाची चौकशी करणारे एसआयटी प्रमुख आणि सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके सांगतात की, नाशिक पोलिसांना तपासादरम्यान महत्त्वाच्या गोष्टी समजल्या. तपास पथकातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, ‘फेब्रुवारीमध्ये काही मुलींनी आमच्याशी गोपनीय पद्धतीने संपर्क साधला. त्यांनी सांगितले की, कंपनीत खूप वाईट वातावरण आहे, मुली उघडपणे बोलण्यास घाबरत आहेत. आरोपांची सत्यता जाणून घेण्यासाठी आम्ही पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या निर्देशानुसार एक योजना तयार केली.‘ 7 महिला पोलीस कर्मचाऱ्यांना गुप्तपणे तैनात करण्यात आले. त्या हाऊसकीपिंग स्टाफ आणि इतर लहान पदांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या रूपात कंपनीत गेल्या. ‘अधिकाऱ्यांनी 40 दिवस लक्ष ठेवले की आरोपी मीटिंगमध्ये किंवा महिला कर्मचाऱ्यांच्या वर्क स्टेशनवर गैरवर्तन करत होते का. त्या गुप्त ड्युटीनंतर दररोज वरिष्ठांना अपडेट देत असत.‘ तपासादरम्यान, एका महिला कर्मचाऱ्याने 26 मार्च रोजी देवळाली पोलीस ठाण्यात पहिली एफआयआर दाखल केली. तिने कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर बलात्काराचा आरोप केला. 2 एप्रिलपर्यंत एकूण 9 गुन्हे दाखल झाले. यामध्ये आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी कर्मचारी निलंबित, टीसीएस अध्यक्षांचे म्हणणे- प्रकरण त्रासदायक टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन म्हणाले की, हे प्रकरण त्रासदायक आहे. आम्ही पोलिसांना सहकार्य करत आहोत. टीसीएस कोणत्याही प्रकारच्या छळाबद्दल आणि जबरदस्तीबद्दल दीर्घकाळापासून 'झिरो टॉलरन्स' धोरण अवलंबत आहे. या प्रकरणातही कंपनी कठोर भूमिका घेत आहे.

दिव्यमराठी भास्कर 16 Apr 2026 6:49 am

आजचे एक्सप्लेनर:चिंपांझींमध्ये इतिहासातील सर्वात रक्तरंजित 'युद्ध', सख्ख्या भावांनी एकमेकांना फाडून खाल्ले; शास्त्रज्ञही कारण शोधू शकले नाहीत

सर्वात आधी हा व्हिडिओ पाहा… युगांडामध्ये चिंपांझींच्या दोन मोठ्या गटांमध्ये अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या भीषण लढाईचे हे एक दृश्य आहे. आतापर्यंत 28 चिंपांझींचा मृत्यू झाला आहे, ज्यात 19 लहान पिल्ले आहेत. अनेक वर्षांपासून संशोधन करत असलेल्या वैज्ञानिकांनुसार, कधीकाळी हे दोन्ही गट एकत्र राहत होते. परस्परांशी संबंधही ठेवत होते. नंतर अचानक एक दिवस त्यांच्यात आपसात युद्ध सुरू झाले. अखेर, माणसांच्या या सर्वात जवळच्या नातेवाइकांमध्ये सुरू झालेल्या या गृहयुद्धाचे खरे कारण काय आहे, माणसांमध्येही अशाच प्रकारे युद्धाची सुरुवात झाली होती का, आजच्या एक्सप्लेनरमध्ये जाणून घेऊया... प्रश्न-1: युगांडामध्ये कोणत्या चिंपांझींमध्ये आणि कुठे ‘गृहयुद्ध’ सुरू झाले आहे?उत्तर: पूर्व आफ्रिकन देश युगांडामध्ये 'फोर्ट पोर्टल' नावाचे एक शहर आहे. त्यापासून सुमारे 25 किमी दक्षिण-पूर्व जंगली भागात सुमारे 800 चौरस किमीमध्ये पसरलेले 'किबाले नॅशनल पार्क' आहे. येथे एकूण सुमारे 1500 चिंपांझी राहतात. किबालेच्या घनदाट जंगली भागात न्गोमो नावाची एक टेकडी आहे. या टेकडीच्या आसपास चिंपांझींचा एक मोठा गट राहतो, ज्याला 'न्गोमो' असे नाव देण्यात आले आहे. 'न्गोमो' चिंपांझींच्या या गटावर अमेरिकेतील मिशिगन आणि कॅलिफोर्निया विद्यापीठे इत्यादींमधील काही प्राइमेटोलॉजिस्ट 1995 पासून संशोधन करत आहेत. 9 एप्रिल रोजी सायन्स मॅगझिनमध्ये प्रकाशित झालेल्या या संशोधनात असे सांगण्यात आले की न्गोमो चिंपांझी देखील इतर चिंपांझींप्रमाणे एकत्र राहत होते आणि शिकार करत होते. शास्त्रज्ञांना हेदेखील समजले की त्यांच्या मादींमध्ये रजोनिवृत्ती (मेनोपॉज) होऊ शकते, जे यापूर्वी कोणत्याही प्राइमेटमध्ये म्हणजेच मानवाच्या जवळच्या माकडांमध्ये पाहिले गेले नव्हते. सुमारे 12 वर्षांपूर्वी न्गोगोमध्ये दोन गट वेगळे झाले. तेव्हापासून त्यांच्यात माणसांप्रमाणेच भयानक मारामारी सुरू आहे. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की यापूर्वी चिंपांझींमध्ये असा भयानक आणि दीर्घकाळ चाललेला रक्तरंजित संघर्ष कधीही पाहिला गेला नव्हता. प्रश्न-2: शास्त्रज्ञांना चिंपांझींमधील गृहयुद्धाची माहिती कशी मिळाली?उत्तर: 1995 मध्ये ‘न्गोगो रिसर्च प्रोजेक्ट’ अंतर्गत जेव्हा शास्त्रज्ञांनी न्गोगो चिंपांझींवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. तेव्हा त्यांना समजले की हा समूह इतर गटांच्या तुलनेत सर्वात जास्त दाट वस्ती असलेला आहे. सुमारे 10 चौरस मैल परिसरातच 100 हून अधिक चिंपांझी होते. प्रकल्पाशी संबंधित मिशिगन विद्यापीठाचे प्राइमेटोलॉजिस्ट डॉ. जॉन मितानी सांगतात की, त्या परिसरात सर्वत्र न्गोगो चिंपांझी होते. हळूहळू त्यांची संख्या वाढून 200 पर्यंत पोहोचली. ते खाण्याच्या शोधात टोळ्या करून इकडे-तिकडे फिरत होते. कधीकधी एखादी टोळी दुसऱ्या टोळीशी भिडली तरीही ते आपसात प्रेमाने राहत होते. न्गोन्गो चिम्पांझ्यांमध्ये तीन मुख्य समूहांना वैज्ञानिकांनी क्लस्टर असे नाव दिले होते - पश्चिम क्लस्टर, सेंट्रल क्लस्टर आणि पूर्व क्लस्टर. सुरुवातीला त्यांच्यात एकोपा होता. एखादा चिम्पांझी दिवसातून अनेकदा एका क्लस्टरमधून दुसऱ्या क्लस्टरमध्ये ये-जा करत असे. वेगवेगळ्या क्लस्टरमधील नर आणि मादी संबंधही प्रस्थापित करत होते. सर्व नर चिम्पांझी एकत्र गस्त (पेट्रोलिंग) घालत आणि शिकारीला जात. नरांनी एकत्र येऊन दुसऱ्या मोठ्या चिम्पांझी गटाशी लढाई केली आणि त्यांना न्गोन्गो परिसरातून हाकलून दिले. यामुळे न्गोन्गोचा परिसर अधिक मोठा झाला. नंतर 2014 मध्ये या क्लस्टर्समध्ये आपापसात तणावाची चिन्हे दिसू लागली. आपसातील समन्वय कमी होऊ लागला. चिम्पांझी आपापल्याच क्लस्टरमध्ये संबंध प्रस्थापित करू लागले होते. 25 जून 2015 रोजी शास्त्रज्ञांनी एक विचित्र दृश्य पाहिले. जॉन मितानी सेंट्रल क्लस्टरमधील चिंपांझींचा पाठलाग करत होते, जे एका उतारावरून वेगाने खाली पळत होते. या दरम्यान जॉनसोबत उपस्थित असलेले पदवीधर विद्यार्थी ऍरॉन सँडेल पश्चिमी क्लस्टरचा पाठलाग करत होते. सँडेलने सांगितले, 'पश्चिमी क्लस्टरमधील चिंपांझींनी जेव्हा सेंट्रल क्लस्टरमधील चिंपांझींचे आवाज ऐकले, तेव्हा ते अचानक शांत झाले. ते एकमेकांना स्पर्श करून अशा प्रकारे सांत्वना देत होते, जणू काही ते खूप घाबरले होते.' थोड्या वेळाने दोन्ही क्लस्टरमधील चिंपांझी जेव्हा एकमेकांसमोर आले, तेव्हा ते किंचाळू लागले आणि भांडू लागले. तेथे गोंधळ उडाला. पश्चिमी क्लस्टर पळून गेले आणि सेंट्रल क्लस्टरमधील चिंपांझी त्यांचा पाठलाग करू लागले. जॉन आणि त्यांच्या सहकारी संशोधकांच्या मते, असे यापूर्वी कधीही घडले नव्हते. यानंतर सुमारे दीड महिना दोन्ही क्लस्टर एकमेकांसमोर येणे टाळत राहिले. जंगलात काहीतरी मोठी घटना घडली आहे असे वाटत होते. नंतर हा संघर्ष वाढत गेला. तिन्ही क्लस्टर वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये मर्यादित राहू लागले आणि 2018 पर्यंत ते पूर्णपणे वेगळे झाले आणि त्यानंतर चिंपांझींच्या हत्या सुरू झाल्या. सर्वात पहिला बळी सेंट्रल क्लस्टरमधील एक तरुण चिंपांझी होता. सँडेलने त्याला मोठे होताना पाहिले होते आणि त्याला ‘एरोल’ असे नाव दिले होते. मितानी यांच्या मते, आतापर्यंत 28 न्गोगो चिंपांझींची हत्या झाली आहे. यापैकी 19 पिल्ले आहेत. याशिवाय इतरत्र कुठेही चिंपांझींच्या आपापसातील संघर्षात इतके मृत्यू झाले नाहीत. विशेष बाब अशी आहे की, मरणारे सर्व चिंपांझी सेंट्रल क्लस्टरचे आहेत. सुरुवातीला सेंट्रल क्लस्टर खूप मोठे होते, परंतु हळूहळू पश्चिमी क्लस्टरचे चिंपांझी अधिक हिंसक बनले. पूर्वी क्लस्टर, सेंट्रल क्लस्टरचा सहयोगी मानला जातो, परंतु ते या लढाईपासून दूर राहते. प्रश्न-3: चिंपांझींमधील या गृहयुद्धाचे खरे कारण काय आहे?उत्तर: संशोधकांच्या मते, ही लढाई अजूनही सुरू आहे. त्याची तीन संभाव्य कारणे आहेत... 1. न्गोगो चिंपांझींची संख्या वाढली, ज्यामुळे त्यांच्यात खाण्यासाठी लढाई सुरू झाली.2. माद्यांशी संबंध बनवण्यासाठी आणि प्रजनन करण्यासाठी नरांमध्ये परस्पर संघर्ष सुरू झाला.3. 2014 मध्ये 5 प्रौढ नर आणि एका प्रौढ मादीचा आजारांमुळे मृत्यू झाला होता, त्यानंतर न्गोगो ग्रुपमधील परस्पर एकता संपली. सँडेलच्या मते, या 6 प्रौढ चिंपांझींच्या मृत्यूमुळे तो परस्पर संबंध तुटला, जो त्यांना एकत्र ठेवत होता. तरीही संशोधकांना अजूनही नेमके माहीत नाही की हा संघर्ष कसा सुरू झाला. डॉ. मित्तानी यांच्या मते, 'जे आधी मित्र होते, ते अचानक शत्रू बनत आहेत.' सध्या टेक्सास विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. सँडेल म्हणतात, 'मी निष्पक्ष विश्लेषण करण्याचा प्रयत्न करत आहे. मी प्रत्येक गोष्टीची नोंद करत आहे. मी एका अर्थाने युद्ध पत्रकार आहे. हे दुःखद आहे, कारण मी इतके चिम्पांझींचे मृतदेह पाहिले आहेत. मी त्यांच्या या अत्यंत विचित्र वर्तनाचे कारण समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे.' प्रश्न-4: यापूर्वी कधी चिम्पांझींमध्ये असे युद्ध पाहिले गेले आहे का?उत्तर: यापूर्वी फक्त एकदाच 1970 च्या दशकात प्रसिद्ध प्राइमेटोलॉजिस्ट दिवंगत डॉ. जेन गुडॉल यांनी टांझानियाच्या जंगलात असेच काहीतरी पाहिले होते. जेन तिच्या टीमसोबत तिथे सुमारे 2 डझन चिम्पांझींच्या एका गटावर अभ्यास करत होती. कधीकाळी एकत्र असलेला हा गट अचानक विभागला गेला आणि एकमेकांवर निर्दयपणे हल्ले करू लागला. जेनने 1993 मध्ये एका रेडिओ कार्यक्रमात म्हटले होते, 'मी आधी विचार करत होते की चिम्पांझी बऱ्याच अंशी माणसांसारखे आहेत, पण त्यांच्यापेक्षा थोडे चांगले आहेत. नंतर मला समजले की जेव्हाही त्यांना संधी मिळते, तेव्हा त्यांच्यातही आपल्यासारखाच एक क्रूर आणि निर्दयी पक्ष उभा राहतो.' जेनला विचारण्यात आले की त्यांच्यातील लढाईचे खरे कारण काय आहे, तेव्हा तिने म्हटले होते, 'असे पहिल्यांदाच घडले आहे, जोपर्यंत पुन्हा कधीतरी असे काहीतरी घडत नाही, तोपर्यंत आपण निश्चितपणे काहीही सांगू शकत नाही.' काही संशोधकांचे मत होते की जेन त्या चिम्पांझींना अनेक वर्षांपासून केळी खाऊ घालत होती. कदाचित, एकटे राहिल्यावर त्यांच्यात ही लढाई झाली नसती, जी केळ्यांमुळे सुरू झाली. मात्र आता न्गोन्गोमध्ये सुरू असलेल्या लढाईमुळे हे सिद्ध झाले आहे की, जी लढाई पाहिली, ती केळी किंवा इतर कोणत्याही बाह्य कारणामुळे नव्हती. परंतु चिंपांझी कोणत्याही अंतर्गत कारणामुळेच एक मोठी आणि दीर्घकाळ चालणारी लढाई सुरू करू शकतात. प्रश्न-5: माणसांमध्येही न्गोन्गो चिंपांझींप्रमाणेच लढाई सुरू झाली होती का?उत्तर: सुमारे 6 कोटी वर्षांपूर्वी माणसे आणि चिंपांझींचे पूर्वज एकच होते. सर्व प्राइमेट्समध्ये, चिंपांझींना माणसांचे सर्वात जवळचे नातेवाईक आणि माणसानंतर सर्वात बुद्धिमान प्राणी मानले जाते. म्हणूनच चिंपांझींवर संशोधन करणारे वैज्ञानिक त्यांच्यातील परस्पर लढाईला माणसांमधील सुरुवातीच्या लढायांशी जोडतात. सुरुवातीचे मानव देखील अन्न, प्रदेश आणि आपल्या गटांना इतरांपासून वाचवण्यासाठी एकमेकांशी लढत होते. केंब्रिज विद्यापीठाचे प्राइमेटोलॉजिस्ट सिल्वेन लेमोइन म्हणतात, 'न्गोन्गो चिंपांझींच्या या संशोधनातून हे कळते की मानवाच्या सुरुवातीच्या विकासादरम्यान अशा लढाया होत असाव्यात. आपले पूर्वज कोणत्याही विचारधारेविना किंवा सांस्कृतिक ओळखीविना, कोणत्याही भाषेविना देखील अनेक वर्षे चाललेल्या संघर्षात अडकू शकत होते.' जसा माणूस सर्वात बुद्धिमान प्राणी आहे, त्यामुळे हळूहळू सामाजिक संबंधांमध्ये झालेल्या बदलांनीही भांडणे भडकवण्याचे काम केले असेल आणि परस्पर मतभेद किंवा भावनिक मुद्द्यांमुळे सामुदायिक संघर्षही सुरू झाले. मिनेसोटा विद्यापीठाचे प्राइमेटोलॉजिस्ट मायकल विल्सन या संशोधनात सहभागी नव्हते. ते म्हणतात, 'भांडणे त्या गोष्टींशिवायही होऊ शकतात, ज्यांना आपण माणसे अनेकदा भांडणाचे कारण मानतो. सिंह, लांडगे किंवा मुंग्यांचा कोणताही धर्म, राजकीय पक्ष किंवा विचारधारा नसते. तरीही त्यांच्यात संघर्ष होतात.' सँडेल असेही म्हणतात की, माणसांमध्ये व्यवहारांमुळे ज्या कारणांमुळे भांडणे होतात, ती कारणे चिंपांझींमध्ये नाहीत. तरीही असा संघर्ष होत आहे, ज्याला आपण गृहयुद्ध म्हणत आहोत. जेव्हा माणसांमध्ये परस्पर संबंध आणि व्यवहार अधिक महत्त्वाचे असतात. जर हे संबंध मजबूत असतील आणि जुनी दुश्मनी विसरली गेली, तर हिंसा थांबवता येऊ शकते.' प्रश्न-6: चिंपांझींमध्ये सुरू असलेले हे युद्ध थांबू शकते का?उत्तर: डॉ. सँडेल आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मते, चिंपांझींमध्ये सुरू असलेले हे युद्ध कधी किंवा कसे संपेल हे सांगता येत नाही. कदाचित पश्चिम क्लस्टर, सेंट्रल क्लस्टरला पूर्णपणे नष्ट करेल. डॉ. सँडेलच्या टीमला पुढील संशोधन सुरू ठेवण्यातही समस्या आहे. खरं तर, ट्रम्प प्रशासनाने 2027च्या बजेटमध्ये ‘नॅशनल सायन्स फाउंडेशन’च्या बजेटमध्ये निम्म्याहून अधिक कपातीची घोषणा केली आहे. अशा परिस्थितीत, फाउंडेशनने स्वतः एक बजेट जारी केले आहे, ज्यामध्ये न्गोन्गो (Ngogo) सारख्या प्रकल्पांना बंद करण्याची शिफारस करण्यात आली आहे. या प्रकल्पांसाठी यापूर्वी 150 दशलक्ष डॉलर्सची रक्कम दिली जात होती. जर्मन प्रायमेट सेंटरचे प्रायमेटोलॉजिस्ट जेम्स ब्रूक्स यांच्या मते, 'जर नॅशनल सायन्स फाउंडेशनच्या बजेटमध्ये कपात करण्यात आली, तर दशकांपासून शास्त्रज्ञांनी न्गोगो प्रकल्पावर जेवढे काम केले आहे, ते वाया जाईल.’

दिव्यमराठी भास्कर 16 Apr 2026 6:37 am

Dr. Vinay Kore: “जनगणनेत ‘हिंदू लिंगायत’ अशी स्वतंत्र नोंद व्हावी”–डॉ. विनय कोरे

Dr. Vinay Kore: कर्नाटक व तेलंगणा राज्यांच्या सीमेलगत असलेल्या जिल्ह्यांमध्ये लिंगायत समाजाची मोठ्या प्रमाणावर वस्ती असून राज्यातील इतर जिल्ह्यांतही समाज मोठ्या संख्येने पसरलेला आहे.

दैनिक प्रभात 16 Apr 2026 6:18 am

अग्रलेख : बिहारचे नवे सम्राट

देशातील बहुचर्चित अशा बिहार राज्याच्या मुख्यमंत्रिपदी भाजपाचे नेते सम्राट चौधरी (Samrat Choudhary) यांनी शपथ घेतल्याने देशातील आणखी एका राज्याचे नेतृत्व भारतीय जनता पक्षाला मिळाले आहे.

दैनिक प्रभात 16 Apr 2026 6:00 am

RMC Plant Demolition : आरएमसी प्रकल्पावर महापालिकेचा बुलडोझर! ८ अनधिकृत प्रकल्प जमीनदोस्त..पाहा काय घडलं?

RMC Plant Demolition : आरएमसी प्लांटवरील कारवाईमुळे बांधकाम क्षेत्रात खळबळ; ४० हजार मजुरांच्या रोजगाराचा प्रश्न, बांधकाम व्यावसायिकांकडून भीती व्यक्त.

दैनिक प्रभात 16 Apr 2026 6:00 am

Pune Congress : पुणे जिल्हा काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल! आता एक नाही तर दोन जिल्हाध्यक्ष सांभाळणार धुरा

Pune Congress : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या आदेशावरून पुणे जिल्ह्याचे दोन भाग; शिरूर आणि बारामती विभागासाठी स्वतंत्र नेतृत्वाची घोषणा लवकरच.

दैनिक प्रभात 16 Apr 2026 5:45 am

PMC News : आजी-माजी नगरसेविका भिडल्या! बाणेरमधील प्रकल्पावरून महापालिकेत हायव्होल्टेज ड्रामा

PMC News : बाणेर येथील आदिवासी विद्यार्थिनी निवासी शिक्षण केंद्राच्या उर्वरित ३ कोटींच्या निविदेवरून वाद; महापालिका भवनात सुरक्षा रक्षकांना करावा लागला हस्तक्षेप.

दैनिक प्रभात 16 Apr 2026 5:30 am

लक्षवेधी : कोलॅटरल डॅमेज?

युद्ध (War) हे लष्करी लक्ष्यांपुरते मर्यादित असावे, ही मूलभूत संकल्पना कागदावर स्पष्ट असली, तरी प्रत्यक्षात निवासी परिसर, रुग्णालये आणि दैनंदिन जीवनाशी निगडित सुविधा यांच्यावरील हल्ले अधिक प्रमाणात दिसून येतात.

दैनिक प्रभात 16 Apr 2026 5:30 am

PMC Ward Committee : प्रभाग समिती अध्यक्ष निवडीचा बिगुल वाजला! १७ एप्रिलला अर्ज, तर ‘या’तारखेला होणार निवडणूक

PMC Ward Committee : १५ प्रभाग समित्यांसाठी रंगणार निवडणूक; महापालिकेच्या नवीन विस्तारित इमारतीतील श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात होणार अध्यक्षपदाची निवड.

दैनिक प्रभात 16 Apr 2026 5:15 am

हवामान : आता चिंता पर्जन्याची!

‘स्कायमेट’ या खासगी हवामान संस्थेने यंदाच्या मान्सूनबाबत (Monsoon) व्यक्त केलेल्या अंदाजांमुळे चिंतेत भर पडली आहे.

दैनिक प्रभात 16 Apr 2026 5:00 am

Talegaon Dhamdhere : महापुरुषांच्या विचारांची मशाल! तळेगाव ढमढेरेत फुले-आंबेडकर जयंती महोत्सव उत्साहात

Talegaon Dhamdhere : स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी हक्काचे व्यासपीठ; डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त तळेगाव ढमढेरेत नवीन वाचनालयाचे लोकार्पण.

दैनिक प्रभात 16 Apr 2026 5:00 am

Road Safety : सणसरमध्ये मृत्यूचा सापळा? ब्रिटीशकालीन पुलाचे कठडे कोसळले; मोठी दुर्घटना घडण्याची भीती

Road Safety : नीरा डावा कालव्यावरील ब्रिटीशकालीन पुलाचे संरक्षक कठडे तुटले; जड वाहनांच्या वाहतुकीमुळे पुलाला धोका, स्थानिक ग्रामस्थांची नवीन पुलासाठी आर्त हाक.

दैनिक प्रभात 16 Apr 2026 4:30 am

Shirur Crime : कवठे येमाई हादरले! किरकोळ वाद की पूर्वनियोजित कट? मारहाण आणि विनयभंगाच्या तक्रारींनी खळबळ

Shirur Crime : दारूच्या नशेत महिलेशी गैरवर्तन केल्याचा आरोप; मारहाणीच्या घटनेला विनयभंगाच्या तक्रारीचे वेगळे वळण.

दैनिक प्रभात 16 Apr 2026 4:15 am

Tamasha Artists Attack : कलावंतांची सुरक्षा वाऱ्यावर! तमाशा कलावंतांवर जीवघेणा हल्ला; महिला कलाकारांशी गैरवर्तन

Tamasha Artists Attack : बनाईदेवी यात्रेतील घटनेने तमाशा कलावंतांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; लाखो रुपयांच्या साहित्याचे नुकसान.

दैनिक प्रभात 16 Apr 2026 4:00 am

Parsul Fire : परसुलमध्ये आगीचे तांडव! हापूसच्या बागा आणि जनावरांचा चारा जळून खाक; वर्षभराची मेहनत मातीमोल

Parsul Fire : शेततळ्यातील पाण्यामुळे कुक्कुटपालन केंद्राचा बचाव; प्रशासनाने तत्काळ पंचनामे करून मदत देण्याची ग्रामस्थांची मागणी.

दैनिक प्रभात 16 Apr 2026 3:45 am