SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

30    C
...

जळगावच्या सुवर्ण बाजारात सोने-चांदीच्या किमतीत मोठी घसरण

जळगाव : एकीकडे आखाती देशांमधील युद्धामुळे एलपीजी, पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढत असताना दुसरीकडे सोन्याच्या दरावर मात्र वेगळाच परिणाम होताना दिसत आहे. इराण-अमेरिका युद्धामुळे सोने-चांदीचे दर घसरले आहेत.जळगावच्या सुवर्णबाजारात दोन्ही धातूंच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत गुरुवारी २१६३ रुपयांची घट झाल्यानंतर आज शुक्रवारी सकाळी बाजारपेठ उघडल्यावर पुन्हा २५७५ रुपयांची घट नोंदवली गेली. त्यामुळे सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ५१ हजार २०४ रुपयांपर्यंत घसरले जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत गुरुवारी दिवसभरात ६१८० रुपयांची घट झाल्यानंतर आज शुक्रवारी सकाळी बाजारपेठ उघडल्यावर आणखी ६१८० रुपयांची घट नोंदवली गेली. त्यामुळे चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो दोन लाख ४१ हजार २० रुपयांपर्यंत घसरलेआखाती देशांमधील या युद्धांमुळे सोन्याचे दर आतापर्यंत १२४८९ रुपयांची घसरण झाली आहे. तर युद्धाच्या कालावधी चांदीचे दर ४०,००० रुपयांनी घसरले आहेत. दरम्यान, जागतिक पातळीवर तणाव असला तरीही सोने-चांदीची मागणी वाढताना दिसत आहे. ही गुंतवणूक सुरक्षित असल्याने अनेक लोक सोने-चांदी खऱेदी करताना दिसत आहेत.

फीड फीडबर्नर 3 Apr 2026 6:30 pm

पश्चिम आशियातील संकटाच्या पार्श्वभूमीवर ब्रेंट क्रूड तेलाच्या किमती १०९ डॉलरच्या पुढे

नवी दिल्ली : पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या संकटामुळे कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये तीव्र चढ-उतार होत आहेत. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणाऱ्या तेल पुरवठ्यात व्यत्यय आल्यामुळे ब्रेंट क्रूड तेलाच्या किमती जवळपास आठ टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल १०९.२४ डॉलरवर पोहोचल्या आहेत.शुक्रवारी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढील दोन ते तीन आठवड्यांत इराणविरुद्ध संभाव्य लष्करी कारवाईचा इशारा दिल्यानंतर कच्च्या तेलाच्या पुरवठ्याबाबत चिंता वाढली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड फ्युचर्सच्या किमती जवळपास आठ टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल १०९.२४ डॉलरवर पोहोचल्या आहेत. वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट (डब्ल्यूटीआय) क्रूड फ्युचर्स प्रति बॅरल १११.५४ डॉलरवर व्यवहार करताना दिसले.पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या संकटामुळे साप्ताहिक आधारावरही कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये चढ-उतार होत आहेत. गेल्या शुक्रवारच्या तुलनेत यूएस डब्ल्यूटीआय क्रूडच्या किमतींमध्ये तब्बल ११.९४ टक्क्यांची वाढ झाली. मात्र, याच कालावधीत ब्रेंट क्रूडच्या किमती ३.१४ टक्क्यांनी घसरल्या, जे बाजारातील अस्थिरता दर्शवते.

फीड फीडबर्नर 3 Apr 2026 6:30 pm

आयएनएस ‘अरिदमन’ आणि ‘तारगिरी’ नौदलात दाखल

विशाखापट्टणम : आंध्रप्रदेशच्या विशाखापट्टणम येथे आयोजित नेत्रदीपक सोहळ्यात स्वदेशी बनावटीची आयएनएस अरिदमन ही अणु पाणबुडी आणि आयएनएस तारागिरी ही युद्धनौका नौदलात दाखल झाली. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आपल्या ट्विटर (एक्स) संदेशात “शब्द नाही, शक्ति आहे, ‘अरिदमन’!” असे नमूद करत कौतुक केले आहे.आयएनएस अरिदमन भारताची तिसरी अणुउर्जित बैलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी (एसएसबीएन) आहे. ही के-१५ आणि के-४ सारख्या प्राणघातक बैलिस्टिक क्षेपणास्त्रांनी सुसज्ज आहे आणि पाण्याखाली सुमारे ४४ किलोमीटर प्रति तास वेगाने हालचाल करू शकते. तिची अदृश्यता आणि उच्च मारक क्षमता भारतीय नौदलाच्या अणु-प्रतिरोधक शक्ती आणि सामरिक क्षमतेत महत्त्वपूर्ण वाढ करते. आकार आणि क्षमता या दृष्टीने अरिदमन तिच्या श्रेणीतील पहिल्या दोन पाणबुड्यांपेक्षा मोठी आणि अधिक शक्तिशाली आहे. यासोबतच चौथी पाणबुडीही या श्रेणीची आहे, जी सध्या समुद्री चाचण्यांमध्ये (सी ट्रायल) आहे आणि पुढील वर्षी नौदलात समाविष्ट होण्याची शक्यता आहे.पाणबुडीसोबतच नौदलात आईएनएस तारागिरी देखील सहभागी झाली. आयएनएस तारागिरी प्रोजेक्ट 17-ए ची चौथी आधुनिक आणि स्वदेशी फ्रिगेट आहे. तब्बल ६६७० टन वजनाचे हे युद्धजहाज ‘मेक इन इंडिया’ क्षमतेचे आणि भारतीय शिपयार्ड्सच्या प्रगत अभियांत्रिकी कौशल्याचे प्रतीक आहे. हे युद्धजहाज ७५ टक्क्यांपेक्षा अधिक स्वदेशी साहित्य वापरून तयार केले आहे आणि प्रादेशिक सुरक्षा परिस्थितींमध्ये जलद बदलत्या वातावरणात भारतीय नौदलाच्या सामरिक क्षमतांना बळकटी देईल.तज्ज्ञांच्या मते, अरिदमन आणि तारागिरीच्या कमीशनिंगचा वेळ सध्या अत्यंत महत्वाचा आहे. कारण हिंद-प्रशांत क्षेत्रातील भारताची भूमिका वाढत आहे आणि देशाच्या पूर्व किनाऱ्याचे रणनीतिक महत्त्व सतत वाढत आहे. या समारंभातून भारतीय नौदलाची सामरिक स्वावलंबनता आणि आधुनिकता यांचा स्पष्ट संदेश मिळाला.

फीड फीडबर्नर 3 Apr 2026 6:30 pm

पिंपरी चिंचवडमध्ये अवकाळी पावसामुळे निर्माण झालेल्या अडचणींवर उपाययोजना राबविण्याचे निर्देश

पुणे : पिंपरी चिंचवड शहरात झालेल्या अवकाळी पावसामुळे शहरातील विविध भागांमध्ये नागरिकांना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागला. अनेक ठिकाणी रस्त्यांवरील सुरू असलेली खोदकामे,अपूर्ण कामे,खड्डे तसेच अपुऱ्या निचऱ्यामुळे पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली आणि नागरिक,वाहनचालक व पादचारी यांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागले. या पार्श्वभूमीवर महापौर रवि लांडगे यांनी तातडीने या परिस्थितीची दखल घेत महानगरपालिका प्रशासनाला सर्वसमावेशक आणि परिणामकारक उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले आहेत. महापौरांनी स्पष्ट केले की,अशा प्रकारच्या परिस्थितीची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी तात्काळ,मध्यमकालीन आणि दीर्घकालीन अशा तीन स्तरांवर नियोजनबद्ध उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे.शहरातील सर्व प्रमुख व अंतर्गत रस्त्यांची तातडीने पाहणी करून खड्डे बुजविणे व रस्त्यांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. सुरू असलेली सर्व खोदकामे सुरक्षितरीत्या बंदिस्त करून रस्ते पूर्वस्थितीत आणण्यावर भर दिला जाणार आहे. साचलेले पाणी तातडीने काढण्यासाठी पंपिंग यंत्रणा कार्यान्वित करण्यात येईल तसेच प्रमुख चौक,पुल,अंडरपास व सखल भागात विशेष पथके नियुक्त करून सतत देखरेख ठेवली जाईल. नागरिकांच्या तक्रारींना त्वरित प्रतिसाद मिळावा यासाठी २४x७ नियंत्रण कक्ष अधिक सक्षम केला जाणार आहे.पावसाळ्यापूर्वी नालेसफाई व गटार स्वच्छतेची कामे युद्धपातळीवर पूर्ण केली जातील. वारंवार पाणी साचणाऱ्या ठिकाणांची यादी तयार करून त्या ठिकाणी स्वतंत्र निचरा आराखडा तयार केला जाईल. विविध विभागांमध्ये समन्वय साधण्यासाठी विशेष समन्वय समिती स्थापन केली जाणार असून रोड कटिंग परवानग्यांवर कडक अंमलबजावणी केली जाईल. तसेच रस्त्यांच्या गुणवत्तेसाठी तृतीय पक्ष तपासणी यंत्रणा लागू केली जाणार आहे.दीर्घकालीन उपाययोजना : शहरासाठी एकात्मिक पर्जन्यजल व्यवस्थापन आराखडा तयार करून त्याची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी केली जाईल. स्मार्ट तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पूरस्थितीचे रिअल-टाइम मॉनिटरिंग सुरू करण्यात येणार आहे. अंडरग्राउंड युटिलिटी डक्ट प्रणाली विकसित करून वारंवार होणारी खोदकामे टाळली जातील तसेच सखल भागांमध्ये कायमस्वरूपी पंपिंग स्टेशन उभारण्याचा प्रस्ताव सादर करण्यात येईल. यासोबतच नागरिकांमध्ये जनजागृती मोहिम राबवून नाल्यात कचरा टाकण्याचे प्रमाण कमी करण्यावर भर दिला जाणार आहे.

फीड फीडबर्नर 3 Apr 2026 6:30 pm

Nagpur : 15 वर्षाच्या मुलीचं 35 वर्षांच्या व्यक्तीसोबत लावत होते लग्न; पण तेवढ्यात पोलिस आले अन्….

Nagpur: सुटका करण्यात आलेल्या मुलीला सध्या सुरक्षिततेसाठी बालगृहात ठेवण्यात आले आहे.

दैनिक प्रभात 3 Apr 2026 6:28 pm

BJP Candidate List : तमिळनाडूमध्ये भाजपचा धक्कादायक निर्णय ! मोदी-शहांच्या लाडक्या नेत्याचं तिकीट कापले

आगामी तमिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी (BJP Candidate List) भाजपने जाहीर केलेल्या २७ उमेदवारांच्या यादीत अन्नामलाई यांचे नाव नसल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

दैनिक प्रभात 3 Apr 2026 6:27 pm

CSK vs PBKS : ९७ नंबरचं गुपित अन् दोन भावांचं युद्ध! IPLच्या मैदानात खान ब्रदर्स भिडणार; वडिलांनी कोणाची बाजू घेतली? पाहा VIDEO

CSK vs PBKS : चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि पंजाब किंग्स (PBKS) यांच्यात होणारा सामना केवळ दोन संघांमधील लढत नसून एकाच घरातील दोन भावांमधील 'हाय-व्होल्टेज' युद्ध ठरणार आहे.

दैनिक प्रभात 3 Apr 2026 6:14 pm

Crude Oil: इराणचे तेल घेऊन भारताकडे निघालेले जहाज चीनकडे वळवले; ‘हे’कारण आले समोर

Crude Oil: तज्ज्ञांच्या मते, जहाजाचा मार्ग बदलणे ही सामान्य प्रक्रिया आहे. जर भारत आणि विक्रेता यांच्यातील पेमेंटचा विषय सुटला, तर हे जहाज पुन्हा भारताकडे वळवले जाऊ शकते.

दैनिक प्रभात 3 Apr 2026 6:09 pm

NCP News : सुनेत्रा पवारांचे अध्यक्षपद धोक्यात? पटेल- तटकरेंच्या सहीने झाली कोंडी

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP News) अंतर्गत संघर्ष अधिक तीव्र होताना दिसत आहे.

दैनिक प्रभात 3 Apr 2026 5:48 pm

Raghav Chadha : राघव चढ्ढा भाजपमध्ये प्रवेश करणार? आतिशींच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

Raghav Chadha : आम आदमी पार्टीत मोठी फूट! राघव चढ्ढा यांना पदावरून हटवल्यानंतर आतिशी यांनी त्यांच्या भाजप प्रवेशाचे संकेत दिले आहेत.

दैनिक प्रभात 3 Apr 2026 5:46 pm

शाळांना 'इंटरनॅशनल', 'ग्लोबल'नाव वापरण्यास मज्जाव!

राज्य सरकारचा मोठा निर्णय; पालकांची दिशाभूल थांबवण्यासाठी निर्बंधमुंबई : आपल्या पाल्याला 'आंतरराष्ट्रीय' दर्जाचे शिक्षण मिळावे, या पालकांच्या ओढीचा फायदा घेत शाळांच्या नावांत सर्रास वापरल्या जाणाऱ्या 'इंटरनॅशनल', 'ग्लोबल' यांसारख्या शब्दांना आता राज्य सरकारने चाप लावला आहे. स्वयंअर्थसहाय्यित शाळांच्या नावात अशा दिशाभूल करणाऱ्या शब्दांचा वापर करण्यास शिक्षण विभागाने मज्जाव केला असून, नुकताच यासंदर्भातील शासन निर्णय (जीआर) जारी करण्यात आला.राज्यात अनेक खासगी शाळांच्या नावामध्ये 'इंटरनॅशनल' किंवा 'ग्लोबल' शब्द असल्याने संबंधित शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाची असल्याचा समज पालकांमध्ये निर्माण होतो. या नावांच्या आधारे अभ्यासक्रम, शिक्षणाची गुणवत्ता आणि भरमसाट शुल्क आकारणी याबाबत पालकांची दिशाभूल केली जात असल्याच्या तक्रारी सरकारकडे प्राप्त झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर शाळांच्या नामकरणाबाबत स्पष्ट नियमावली तयार करण्यात आली आहे.शासनाच्या नवीन निर्णयानुसार, केवळ आय.बी., केंब्रिज किंवा आय.जी.सी.एस.ई. यांसारख्या आंतरराष्ट्रीय मंडळांशी संलग्न असलेल्या किंवा तशी प्रक्रिया सुरू असलेल्या शाळांनाच आपल्या नावात 'इंटरनॅशनल', 'ग्लोबल', 'युनिव्हर्सल', 'वर्ल्ड' किंवा 'युरो' या शब्दांचा वापर करता येईल. राज्य मंडळ, सीबीएससी किंवा आयसीएसई यांसारख्या आंतरदेशीय मंडळांशी संलग्न असलेल्या शाळांना आता हे शब्द वापरता येणार नाहीत.'कॉन्व्हेंट’ आणि ‘सैनिकी’ शब्दांवरही मर्यादानावांच्या या शुद्धीकरण मोहिमेत 'कॉन्व्हेंट' आणि 'सैनिकी' या शब्दांबाबतही सरकारने भूमिका स्पष्ट केली आहे. त्यानुसार, केवळ ख्रिस्ती धर्मसंघाद्वारे किंवा ख्रिश्चन नन्स (भिक्षुणी) समुदायाद्वारे संचालित शाळांनाच 'कॉन्व्हेंट' शब्द वापरता येईल. त्याचप्रमाणे ज्या शाळांना शासनाची अधिकृत 'सैनिकी शाळा' म्हणून मान्यता आहे, त्यांनाच या शब्दाचा वापर नावामध्ये करता येणार आहे.अंमलबजावणी कधीपासून?शासनाने घेतलेला हा निर्णय पूर्वलक्षी प्रभावाने लागू होणार नाही. म्हणजेच, ज्या शाळांनी यापूर्वीच ही नावे धारण केली आहेत आणि ज्यांची नोंदणी जुनी आहे, त्यांना यातून तूर्तास सवलत मिळण्याची शक्यता आहे. मात्र, यापुढे सुरू होणाऱ्या नवीन शाळांना किंवा नाव बदलू इच्छिणाऱ्या संस्थांना या नियमांचे काटेकोर पालन करावे लागणार आहे. या निर्णयामुळे शाळांच्या नावावरून होणारी पालकांची फसवणूक थांबण्यास मदत होईल, अशी अपेक्षा शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहे.

फीड फीडबर्नर 3 Apr 2026 5:30 pm

दहिसर मेट्रो आणि पॉड टॅक्सीच्या उदघाटनाची तारीख ढकलली, काय आहे कारण ?

मुंबई : मुंबईच्या लोकलवरचा भार कमी व्हावा आणि नागरिकांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवास करता यावा यासाठी महाराष्ट्र सरकारने दोन नव्या मेट्रो मार्गिकेची घोषणा केली. एप्रिलच्या सुरुवातीला या मार्गिकांचे उद्घाटन होणार असल्याच्या चर्चाही रंगू लागल्या. पण हे उद्घाटन पुढे ढकलण्यात आले आहे.मुंबईतील २ नव्या मेट्रो मार्गिकांचे उद्घाटन गेले पुढेमुंबईतील दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रो ९ आणि अंधेरी ते मंडाले ( मानखुर्द ) मेट्रो २बी या दोन महत्वाच्या मार्गिकांचे उद्घाटन होणार होते. दोन्ही मार्गिकांचे काम पूर्ण झाले असून गेले काही दिवस निवडणूक आचारसंहिता आणि इतर प्रशासकीय कामांमुळे उद्घाटन शक्य झाले नव्हते.ठाणे - बोरिवली बोगदा तसेच ठाणे - बोरिवली हा प्रकल्प लवकरच उभारण्यात येणार आहे. ठाणे ते बोरिवली या मार्गावर प्रवास करताना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो, पण बोगदा सुरू झाल्यानंतर ठाणे आणि बोरीवली दरम्यानचा प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होऊन वाहतूक कोंडीचा त्रास ही कमी होणार आहे. ३ एप्रिलला भूमिपूजन करून ठाणे-बोरिवली बोगद्याच्या खोदकामालाही सुरुवात होणार होती. मात्र तो ही कार्यक्रम आता पुढे ढकलण्यात आला आहे.पॉड टॅक्सीचे भूमिपूजनवांद्रे ते कुर्ला दरम्यान सुमारे ८.८ किमी लांबीचा पॉड टॅक्सीचा प्रकल्प उभारण्यात आला आहे. मेट्रो मार्गिकांचे उद्घाटन आणि पॉड टॅक्सीचे भूमिपूजन ३ एप्रिल रोजी होणार होते. पण सध्या सत्तेतील सर्व प्रमुख मंत्री पाच राज्यांच्या निवडणूक प्रचारात गुंतले आहेत.केरळ, आसाम, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि तामिळनाडू या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. देशातील अनेक प्रमुख नेते या राज्यांचे धावते दौरे करत आहेत आणि प्रचारसभा, रोड शो यात गुंतले आहेत. यामुळेच मेट्रोचे उद्घाटन आणि पॉड टॅक्सीचे भूमिपूजन लांबणीवर पडले आहे. लवकरच नव्या तारखेची घोषणा होणार असल्याचे सूत्रांकडून समजते.

फीड फीडबर्नर 3 Apr 2026 5:30 pm

Ajinkya Rahane Slams : सलग दोन पराभवानंतर अजिंक्य रहाणे टीकाकांरावर संतापला; म्हणाला, ‘माझ्या यशावर जळणाऱ्यांची…’

Ajinkya Rahane Slams : मैदानावर अतिशय शांत आणि संयमी राहणारा रहाणे यावेळी मात्र पत्रकार परिषदेत टीकाकारांवर तुटून पडला.

दैनिक प्रभात 3 Apr 2026 5:30 pm

Congress News : काँग्रेसला मोठा धक्का; ‘या’खासदाराचा तडकाफडकी राजीनामा

Congress News : तामिळनाडू विधानसभा निवडणूक २०२६ पूर्वी खासदार मणिकम टागोर यांनी काँग्रेसच्या निवडणूक समिती अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

दैनिक प्रभात 3 Apr 2026 5:22 pm

‘पंचायत’ला ६ वर्षे पूर्ण, प्राइम व्हिडिओने केली पाचव्या पर्वाची घोषणा

मुंबई : द वायरल फीवर (टीव्हीएफ) निर्मित ‘पंचायत’च्या पाचव्या पर्वाची निर्मिती दीपक कुमार मिश्रा आणि चंदन कुमार यांनी संयुक्तपणे केली आहे. कथा लेखन चंदन कुमार यांचे असून दिग्दर्शन दीपक कुमार मिश्रा यांनी केले आहे.पाचव्या पर्वात ‘पंचायत’ची तीच लोकप्रिय कलाकारांची टीम पुन्हा दिसणार आहे, ज्यांनी पहिल्याच पर्वापासून प्रेक्षकांची मने जिंकली. भारताचा सर्वाधिक पसंतीचा मनोरंजन मंच प्राइम व्हिडिओ आज ३ एप्रिल २०२० रोजी प्रदर्शित झालेल्या ‘पंचायत’च्या पहिल्या पर्वाच्या सहाव्या वर्धापनदिनाचा उत्सव साजरा करत आहे. या निमित्ताने त्यांनी मालिकेच्या सर्वाधिक प्रतिक्षित पाचव्या पर्वाच्या चित्रीकरणाची अधिकृत घोषणा केली आहे. २०२० मध्ये सुरुवात झाल्यापासून ‘पंचायत’ सातत्याने भारतातील सर्वाधिक आवडत्या मालिकांपैकी एक ठरली आहे आणि प्रत्येक पर्वासह तिने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.विशेषतः चौथ्या पर्वाने प्रेक्षकांना पूर्वी कधी न पाहिलेल्या पद्धतीने खिळवून ठेवले. पहिल्याच महिन्यात चौथ्या पर्वाने विक्रमी यश मिळवले आणि प्रदर्शित आठवड्यात मालिकेच्या इतिहासातील सर्वात मोठी सुरुवात केली. प्रदर्शित झालेल्या पहिल्याच दिवशी चौथे पर्व अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, युनायटेड किंगडम आणि संयुक्त अरब अमिरातीसह ४२ पेक्षा अधिक देशांमध्ये अव्वल दहा शीर्षकांमध्ये झळकले. प्रदर्शित आठवड्यात भारतातील ९५ टक्के पिनकोडमध्ये आणि १८० पेक्षा अधिक देशांतील प्रेक्षकांनी ही मालिका पाहिली. चाहत्यांच्या या प्रेमामुळे नव्या पर्वाची उत्सुकता आणखी वाढली आहे—जे पुन्हा एकदा हृदयाला भिडणारी कथा आणि उत्कृष्ट अभिनयासह सुंदर प्रवासाचे आश्वासन देते.चौथ्या पर्वाच्या प्रभावी शेवटानंतर चाहत्यांना फुलेराच्या धुळीच्या रस्त्यांमध्ये आणि तिथल्या राजकारणात परतण्याची उत्सुकता आहे. मागील पर्व तिथे संपले होते जिथे सचिवजी आपल्या व्यवस्थापन प्रवेश परीक्षेच्या निकालानंतर पुढील पाऊल ठरवत होते, मंजू देवी पंचायत निवडणुकीतील पराभवातून सावरत होत्या आणि प्रधानजी या निकालाने हादरले होते. पाचवे पर्व या तणावपूर्ण टप्प्यापासून पुढे सुरू होणार असून फुलेरा शैलीतील विनोद, नाट्य आणि भावनिक क्षणांसह अनेक नवीन वळणे पाहायला मिळतील.द वायरल फीवर (टीव्हीएफ) निर्मित ‘पंचायत’च्या पाचव्या पर्वाची निर्मिती दीपक कुमार मिश्रा आणि चंदन कुमार यांनी संयुक्तपणे केली आहे. लेखन चंदन कुमार यांचे असून दिग्दर्शन दीपक कुमार मिश्रा यांनी केले आहे. या पर्वात जितेंद्र कुमार, नीना गुप्ता, रघुबीर यादव, फैसल मलिक, चंदन रॉय, सांविका, दुर्गेश कुमार, सुनीता राजवार आणि पंकज झा हे लोकप्रिय कलाकार पुन्हा एकत्र दिसणार आहेत.प्रत्येक नव्या पर्वासह ही मालिका प्रेक्षकांशी आपले नाते अधिक घट्ट करत आहे आणि त्यांना फुलेरा गावाच्या जगात आणखी खोल नेत आहे. भारताच्या हृदयात वसलेले हे काल्पनिक छोटे गाव आता जागतिक सांस्कृतिक घटना बनले आहे. ग्रामीण साधेपणातून सुरू झालेली ही कथा आता सीमांच्या पलीकडे जाऊन जगभरातील कोट्यवधी प्रेक्षकांच्या मनाला भिडत आहे.

फीड फीडबर्नर 3 Apr 2026 5:10 pm

मुंबईतील प्रलंबित एलआयसी इमारतीच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होणार, शेकडो कुटुंबांना दिलासा

कॅबिनेट मंत्री श्री मंगलप्रभात लोढा यांच्या प्रयत्नांना यश, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामनजी यांची घेतली भेटतीन महिन्यात सकारात्मक मार्ग काढण्याचे सीतारामन यांचे आश्वासनमुंबई : दक्षिण मुंबईतील जीर्ण झालेल्या आणि मोडकळीला आलेल्या एलआयसी इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग लवकरच मोकळा होणार आहे. सातत्याने या प्रश्नावर आवाज उठवणाऱ्या कॅबिनेट मंत्री श्री. मंगलप्रभात लोढाजी यांच्या प्रयत्नांना यश आले असून यासंदर्भात लवकरच सकारात्मक मार्ग काढण्याचे आश्वासन केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती. निर्मला सीतारामनजी यांनी दिले आहे. एलआयसी टेनंट्स अँड ऑक्युपंट्स वेल्फेअर असोसिएशनच्या मागणीचे पत्र घेऊन मंत्री लोढा यांनी गुरुवारी नवी दिल्लीत सीतारामनजी यांची भेट घेतली. यासंदर्भात त्यांनी पत्रकारांना माहिती दिली आहे.दक्षिण मुंबईतल्या विविध भागात एलआयसी आणि देना बँकेच्या अनेक जुन्या जीर्ण झालेल्या इमारती आहेत. या इमारतीतले शेकडो भाडेकरू जीव मुठीत घेऊन राहत आहेत. त्यातल्या अनेक इमारती सुमारे ९० वर्ष जुन्या आहेत. तर म्हाडाच्या नोटिस नंतर त्यातल्या अनेक भाडेकरूनी इमारती रिकाम्या केल्या आहेत.गेली चार वर्ष सातत्याने मंत्री मंगलप्रभात लोढा हे या इमारतीतल्या रहिवाशांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. म्हाडा, एलआयसी आणि केंद्रीय स्तरावरही त्यांचे प्रयत्न सुरूच आहेत. आता थेट केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामनजी यांच्याशी संपर्क करून त्यांच्या समोर भाडेकरूंचे प्रश्न मांडले आहेत. टेनंट्स संघटनेच्या निवेदनानुसार, या इमारतींच्या पुनर्विकास प्रक्रियेत मोठा विलंब होत असून प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार (PMC) नियुक्तीची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. एलआयसी अधिकाऱ्यांकडून ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी विलंब लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सुमारे दोन वर्षे लागू शकतात, असे सांगण्यात आले आहे. तसेच पावसाळा जवळ येत असताना ही विलंबाची स्थिती भाडेकरूंमध्ये भीती आणि असुरक्षितता निर्माण करत असल्याचे मंत्री लोढा यांनी अर्थमंत्र्यांच्या निदर्शनाला आणले आहे. या सर्व मुद्द्यांचा विचार करून पुढील तीन महिन्यात सकारात्मक मार्ग काढणार असल्याचे सीतारामन यांनी सांगितले असल्याचे मंत्री लोढा यांनी नमूद केले आहे.या संदर्भात संघटनेने काही महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. त्यामध्ये प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार( PMC) नियुक्तीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करणे, म्हाडाच्या निकषांनुसार भाडेकरूंना अंतरिम पर्यायी निवास उपलब्ध करून देणे, पुनर्विकासासाठी अनुभवी विकासकांची निवड करताना भाडेकरूंचा सहभाग सुनिश्चित करणे, रिक्त करण्यात आलेल्या इमारतीचे भाडे तात्पुरते स्थगित करणे आणि भाडेकरूंवर कोणतीही अतिरिक्त आर्थिक किंवा कायदेशीर जबाबदारी टाकू नये, यांचा समावेश अर्थमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आला आहे. दरम्यान मंत्री लोढा यांनी सीतारामन जी यांचे आभार व्यक्त केले असून लवकरच एलआयसी आणि बँकांच्या भाडेकरूंना न्याय मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे.

फीड फीडबर्नर 3 Apr 2026 5:10 pm

Raghav Chadha Wealth: राघव चड्ढा यांची एकूण संपत्ती किती? जाणून घ्या सविस्तर माहिती

Raghav Chadha Wealth: राजकारणात सक्रिय असलेले राघव चड्ढा यांची वैयक्तिक संपत्ती तुलनेने मर्यादित आहे, तर त्यांच्या पत्नी परिणीती चोप्रा ही बॉलिवूडमधील यशस्वी अभिनेत्री असल्याने आर्थिकदृष्ट्या खूप मजबूत आहे. दरम्यान, ‘आप’च्या या निर्णयामुळे राघव चड्ढा पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

दैनिक प्रभात 3 Apr 2026 5:05 pm

Khokya Bhosle Update : सतीश भोसले उर्फ खोक्याची जेलमधून सुटका; बाहेर येताच म्हणाला…

वर्षभरापूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या अमानुष मारहाणीच्या व्हिडिओमुळे राज्यभरात चर्चेत आलेल्या सतीश भोसले उर्फ खोक्या (Khokya Bhosle Update) याला मोठा दिलासा मिळाला आहे.

दैनिक प्रभात 3 Apr 2026 4:58 pm

Rinku Singh Record : रिंकू सिंगने आंद्रे रसेलला मागे टाकत केकेआरसाठी नवा इतिहास! ‘हा’पराक्रम करणारा पहिलाच खेळाडू

Rinku Singh Record : रिंकू सिंगने केकेआरच्या इतिहासात एका नव्या विक्रमाला गवसणी घातली.

दैनिक प्रभात 3 Apr 2026 4:49 pm

Bacchu Kadu : मोठी बातमी..! बच्चू कडूंना अटक होणार? ‘या’भाजप आमदाराच्या भावाला संपवण्याचा रचला कट?

Bacchu Kadu : प्रहार नेते बच्चू कडू यांच्यावर चांदूर बाजार पोलीस ठाण्यात हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

दैनिक प्रभात 3 Apr 2026 4:48 pm

Jan Vishwas Amendment Bill: जन विश्वास विधेयक 2026 मंजूर! छोट्या चुका आता गुन्हा नाहीत

Jan Vishwas Amendment Bill: जन विश्वास विधेयक २०२६ हा कायदा सामान्य नागरिक आणि उद्योगांसाठी दिलासा देणारा ठरत आहे. लहान चुका गुन्हा न मानता दंडावर भर देणे, न्यायालयांवरील ताण कमी करणे आणि विश्वासावर आधारित शासन निर्माण करणे हे या कायद्याचे मुख्य वैशिष्ट्य आहे.

दैनिक प्रभात 3 Apr 2026 4:44 pm

देऊळ बंद २येतोय २१ मे रोजी

मुंबई : २०१५ साली प्रदर्शित झालेल्या देऊळ बंद चित्रपटाला प्रेक्षकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड घालणारा, किंबहून विज्ञानाचा आत्मा हा अध्यात्म आहे हे अधोरेखित करणाऱ्या तसेच श्री स्वामी समर्थ महाराज आणि वैज्ञानिक यांच्या भोवती फिरणाऱ्या कथेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली त्यामुळे आजही देऊळ बंद आवर्जून बघितला जातो. देऊळ बंदचा अजून एक भाग यावा अशी इच्छा अनेक प्रेक्षकांनी व्यक्त केली होती आणि या इच्छेचा मान राखत लेखक, दिग्दर्शक प्रविण विठ्ठल तरडे यांनी देऊळ बंद २ ची घोषणा केली होती. आज वटवृक्ष एंटरटेनमेंट निर्मित देऊळ बंद २ चे डिजिटल पोस्टर समाज माध्यमांवर (सोशल मीडियावर) प्रदर्शित करण्यात आले आणि चित्रपट २१ मे २०२६ रोजी जगभरात प्रदर्शित होणार असल्याचे जाहीर झाले.लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते प्रविण विठ्ठल तरडे म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीत वाजणारं खणखणीत नाणं आहे. त्यांनी लेखन आणि दिग्दर्शित केलेले देऊळ बंद, मुळशी पॅटर्न, सरसेनापती हंबीरराव, धर्मवीर, धर्मवीर २ या पाचही चित्रपटांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले त्यामुळे या सर्व चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत अनेक रेकॉर्ड ब्रेक केले आणि देऊळ बंद २ हा त्यांचा सहावा चित्रपट रसिकांच्या पसंतीस उतरेल यात काही शंकाच नाही व त्याचीच एक झलक डिजिटल पोस्टर मध्ये दिसून येते आहे. आता परीक्षा देवाची असे उपशीर्षक असल्याने भक्तांसाठी देवाला कोणती परीक्षा द्यावी लागणार? याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे तसेच कोणते कलाकार कुठल्या भूमिकेत असणार आहेत? हे गुलदस्तात असल्याने ते जाणण्यासाठी रसिकांना अजून थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे.२१ मे २०२६ रोजी प्रदर्शित होणाऱ्या वटवृक्ष एंटरटेनमेंट निर्मित देऊळ बंद २ चे लेखन आणि दिग्दर्शन प्रविण विठ्ठल तरडे यांनी केले असून निर्मिती कैलाश वाणी, जयश्री कैलाश वाणी, कैवल्य वाणी आणि जुईली वाणी सूर्यवंशी यांनी केली आहे.

फीड फीडबर्नर 3 Apr 2026 4:31 pm

स्थापना दिनानिमित्त ५१ लाख घरांवर फडकणार भाजपचा झेंडा

मुंबई : भाजपच्या स्थापना दिनानिमित्त दि. ५ ते १२ एप्रिल याकाळात रोजी राज्यभर अनेक कार्यक्रमांचे आयोजन होणार असून, ६ एप्रिलला ५१ लाख घरांवर भाजपचा झेंडा फडकावला जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते, मंत्री या कार्यक्रमात सहभागी होतील, अशी माहिती प्रदेश उपाध्यक्ष केशव उपाध्ये यांनी शुक्रवारी दिली.भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यावेळी उपस्थित होते. स्थापना दिनानिमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, ज्येष्ठ नेते रावसाहेब पाटील दानवे, सुधीर मुनगंटीवार यांच्यासह उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह राज्यातील सर्व मंत्री, अन्य लोकप्रतिनिधी जनतेशी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. या निमिताने राष्ट्रवादी विचारांचा उत्सव साजरा होईल, असेही उपाध्ये यांनी नमूद केले.दि. एप्रिल रोजी भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिन आहे. या निमित्त २८८ विधानसभा मतदारसंघात, ३६ जिल्ह्यात आणि राज्यातील १ लाख बुथवर स्थापना दिनाचे कार्यक्रम होणार आहेत. प्रत्येक बुथवर वॉल पेंटिंग, ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार, सक्रीय कार्यकर्त्यांचे मेळावे, समाजातील नामवंत व्यक्तींशी संपर्क, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता, केंद्र व राज्य सरकारच्या योजनांच्या लाभार्थ्यांशी संपर्क असे कार्यक्रम होणार आहेत. वॉल पेंटिंग मध्ये प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासह पक्षाचे सर्व प्रमुख नेते आपापल्या मतदारसंघात वॉल पेंटिंग मध्ये सहभागी होणार आहेत. त्याबरोबरच केंद्र आणि राज्य सरकारच्या कामगिरीची माहिती घरोघरी पोहचवण्यात येणार आहे. पक्षाचे सक्रीय कार्यकर्ते आपल्या घरावर पक्षाचा झेंडा फडकवणार आहेत.एकूण ५१ लाख घरांवर फडकणार भाजपचा झेंडा :यंदा ६ एप्रिल रोजी राज्यातील ५१ लाख घरांवर भाजपचा झेंडा फडकावला जाईल. तसेच पक्षाच्या आजवरच्या वाटचालीनिमित्त तयार करण्यात आलेला माहितीपट दाखविण्यात येणार आहे. दोन खासदारांपासून जगातील सर्वात मोठ्या पक्षापर्यंतचा भारतीय जनता पार्टीचा प्रवास यातून उलगडला जाणार आहे. पक्षाच्या संघटनात्मक रचनेतील १ हजार २०० मंडलांमध्ये हे कार्यक्रम होणार आहेत. या बरोबरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंबईत, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण व अन्य प्रमुख नेते, मंत्री ६ व ७ एप्रिल रोजी पक्ष कार्यकर्ते व जनतेशी संवाद साधतील. सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये हा कार्यक्रम होईल. गाव चलो, वस्ती चलो या कार्यक्रमांतून पक्षाचे पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते जनसंपर्क अभियान राबविणार आहेत, अशी माहिती केशव उपाध्ये यांनी दिली.

फीड फीडबर्नर 3 Apr 2026 4:31 pm

Burgman 2026 Maxi-Scooter : भारतामध्ये सुझुकीची नवीन बर्गमन 2026 मॅक्सी स्कूटर लॉन्च

मुंबई : जपानी वाहन निर्माता कंपनी सुझुकीने भारतात आपली नवीन बर्गमन 2026 मॅक्सी स्कूटर लॉन्च केली आहे. या स्कूटरची सुरुवातीची किंमत 1.02 लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली असून टॉप व्हेरिएंटसाठी ग्राहकांना सुमारे 1.13 लाख रुपये मोजावे लागणार आहेत. विशेष बाब म्हणजे हे नवीन मॉडेल जुन्या बर्गमन स्ट्रीट एक्ससोबतच विक्रीसाठी उपलब्ध राहणार आहे आणि जुन्या मॉडेलच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.नवीन बर्गमन 2026 मध्ये सर्वात मोठा बदल त्याच्या डिझाइनमध्ये करण्यात आला आहे. या स्कूटरमध्ये आता ड्युअल-पॉड एलईडी हेडलाइट्स देण्यात आल्या आहेत, ज्यामुळे स्कूटरला अधिक मॉडर्न आणि प्रीमियम लुक मिळतो. हे डिझाइन कंपनीच्या आंतरराष्ट्रीय मॉडेलवर आधारित असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय नवीन कलर ऑप्शन्स, टॉप व्हेरिएंटमध्ये ड्युअल-टोन पेंट स्कीम आणि अधिक आकर्षक बॉडी डिझाइनमुळे ही स्कूटर विशेषतः तरुण ग्राहकांना लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे.फीचर्सच्या बाबतीतही बर्गमन 2026 मध्ये मोठे अपग्रेड करण्यात आले आहेत. या स्कूटरमध्ये की-लेस स्टार्ट, ईझी स्टार्ट, सायलेंट स्टार्ट, सर्व एलईडी लाईट्स आणि 4.2 इंचाचा टीएफटी डिजिटल डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेमध्ये नेव्हिगेशन सपोर्टसारखे आधुनिक फीचर्सही उपलब्ध आहेत. तसेच दोन फ्रंट स्टोरेज स्पेस आणि 24.6 लिटरचे अंडर-सीट स्टोरेज दिल्यामुळे ही स्कूटर रोजच्या वापरासाठी अधिक सोयीस्कर ठरते. विशेषतः या सेगमेंटमध्ये टीएफटी डिस्प्ले आणि नेव्हिगेशन फीचर ही मोठी वैशिष्ट्ये मानली जात आहेत.इंजिन आणि परफॉर्मन्सच्या बाबतीतही ही स्कूटर सक्षम आहे. बर्गमन 2026 मध्ये 124cc इंजिन देण्यात आले असून ते सुझुकी इको परफॉर्मन्स (एसईपी) प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. हे इंजिन 8 हॉर्सपावर पॉवर आणि 10.2 Nm टॉर्क निर्माण करते. स्कूटरमध्ये फ्रंटला टेलिस्कोपिक सस्पेंशन आणि रिअरला स्विंग आर्म सस्पेंशन देण्यात आले आहे. ब्रेकिंगसाठी पुढील चाकाला डिस्क ब्रेक आणि मागील चाकाला ड्रम ब्रेक देण्यात आले आहेत. 12 इंच अलॉय व्हील्स आणि 5.5 लिटरचा फ्यूल टँक यामुळे ही स्कूटर शहरातील रोजच्या प्रवासासाठी उपयुक्त ठरते.एकूणच पाहता, स्टायलिश लुक, आरामदायक राइडिंग अनुभव आणि आधुनिक फीचर्स यांचा संगम असलेली बर्गमन 2026 स्कूटर ग्राहकांसाठी एक चांगला पर्याय ठरू शकते. विशेषतः डेली कम्युटसाठी एक प्रीमियम आणि फिचर-लोडेड स्कूटर शोधणाऱ्यांसाठी ही स्कूटर आकर्षक ठरण्याची शक्यता आहे.

फीड फीडबर्नर 3 Apr 2026 4:30 pm

रहस्य, थरार आणि दमदार स्टारकास्ट सोबत येत आहे 'सालबर्डी'

मुंबई :मराठी चित्रपट त्याच्या आशय विषयासोबतच त्याच्या उच्च निर्मितीमूल्यांसाठी सुद्धा लोकप्रिय आहे. अभिनयसंपन्न कलाकारांची मोठी फौज आज मराठीत कार्यरत आहे. प्रसिद्ध कलाकारांना एकत्र घेऊन चित्रपट निर्माण करण्याचा ट्रेंड अलीकडे मराठी चित्रपटसृष्टीत प्रचलित होताना दिसतो आहे. त्यामुळे लोकप्रिय कलाकारांना एकत्र घेऊन निर्माण केलेल्या या कलाकृतींना प्रेक्षकांकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतो. ‘सालबर्डी’ या १७ एप्रिलला प्रदर्शित होणाऱ्या रहस्यमय मराठी चित्रपटातून पूजा सावंत, शशांक शेंडे, ओंकार भोजने, भारत गणेशपुरे, अंशुमन विचारे, रोहित कोकाटे, कमलाकर सातपुते, चित्तरंजन गिरी, अनिल नगरकर, माधव अभ्यंकर, प्रवीण डाळिंबकर, अभय गिते, राजेंद्र सातार्डेकर, कोमल चौधरी या कलाकारांची दमदार फळी एकत्र पहायला मिळणार आहे.‘नेब्यूला फिल्म्स’ बॅनरखालील ‘सालबर्डी’ चित्रपटाची निर्मिती अनिल देवडे पाटील, डॉ. गजानन जाधव आणि राम जाधव यांनी केली असून ‘गुल्हर’, ‘बाबो’, ‘पाणीपुरी’ यासारखे वेगळ्या धाटणीचे चित्रपट दिल्यानंतर दिग्दर्शक रमेश साहेबराव चौधरी यांनी ‘सालबर्डी’ हा मल्टीस्टारर थरारपट रसिकांसाठी आणला आहे.‘सालबर्डी’ या एका छोट्याशा गावात घडणाऱ्या विचित्र घटनांनी निर्माण झालेली भीती आणि त्या भीती मागचं सत्य शोधण्याची धडपड ही आहे ‘सालबर्डी’ची मध्यवर्ती कथा. भय आणि भ्रमाच्या छायेत घडणाऱ्या भीतीदायक घटनांमागचं गूढ उलगडण्याचा थरारक प्रवास ‘सालबर्डी’ या चित्रपटातून येत्या १७ एप्रिलला प्रेक्षकांसमोर येणार आहे.चित्रपटाचे छायांकन व संकलन सिद्धेश संतोष मोरे यांचे आहे. पटकथा व संवाद रोहित शुक्रे यांचे असून, गुरु ठाकूर आणि मुकुंद भालेराव यांच्या गीतांना पद्मनाभ गायकवाड यांचे संगीत लाभले आहे. पार्श्वसंगीताची जबाबदारी अमर मोहिले यांनी सांभाळली आहे. अजय गोगावले, जावेद अली आणि आनंदी जोशी यांच्या आवाजाने चित्रपटातील गाणी सजली आहेत. नृत्यदिग्दर्शन फुलवा खामकर आणि आशीष पाटील यांनी केले आहे. कार्यकारी निर्माते दीपक कुदळे पाटील असून, वेशभूषा प्रणिता चिंदगे, रंगभूषा श्रीनिवास मेनूगे आणि कलादिग्दर्शन प्रदीप गुरव यांचे आहे.रहस्य, थरार आणि दमदार स्टारकास्ट यांचा एकत्रित संगम असलेला ‘सालबर्डी’ प्रेक्षकांसाठी रंजक सिनेमॅटिक अनुभव ठरणार आहे.

फीड फीडबर्नर 3 Apr 2026 4:30 pm

Rupali Chakankar : रूपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल्स, एकनाथ शिंदेंच्या नावाचाही उल्लेख, दमानियांच्या दाव्याने खळबळ

Rupali Chakankar : अंजली दमानिया यांनी अशोक खरात प्रकरणात रूपाली चाकणकर आणि एकनाथ शिंदे यांच्या कॉल डिटेल्सचा खुलासा केला आहे.

दैनिक प्रभात 3 Apr 2026 4:22 pm

Sanjay Raut : संजय राऊत उद्धव ठाकरेंना देणार सर्वात मोठा धक्का? राजकीय वर्तुळात खळबळ

चंद्रकांत पाटील (Sanjay Raut) यांनी संजय राऊत भविष्यात ठाकरे गट फोडणार असल्याचा मोठा आणि खळबळजनक दावा केला आहे. यासोबतच त्यांनी राऊत यांच्यावर तीव्र टीकाही केली आहे.

दैनिक प्रभात 3 Apr 2026 4:21 pm

Abhishek Sharma Fined : अभिषेक शर्मावर बीसीसीआयची मोठी कारवाई! KKR vs SRH सामन्यातील ‘ती’चूक पडली महागात

Abhishek Sharma Fined : केकेआरविरुद्धच्या सामन्यानंतर एसआरएचचा सलामीवीर अभिषेक शर्मा याला बीसीसीआयने मोठा दणका दिला आहे.

दैनिक प्रभात 3 Apr 2026 4:16 pm

Malegaon News : मालेगावच्या महासभेत सत्ताधारी एकमेकांशी भिडले

मालेगाव : मतदार याद्यांचे पुनर्निरिक्षणाच्या मुद्द्यावरून मालेगाव महानगरपालिकेमध्ये सत्ताधारी एमआयएम आणि मालेगाव सेक्युलर फ्रंटचे नगरसेवक एकमेकात भिडले आणि मोठा गदारोळ झाला. मालेगाव मध्ये सत्ताधाऱ्यांमध्येच मतभेद चव्हाट्यांवर आले आहेत.निवडणूक आयोगातर्फे सध्या मतदार यादी पडताळणी व पुनरीक्षणाचे (एसआयआर) काम सुरू आहे. त्यासाठी मालेगावात नियुक्त करण्यात आलेल्या काही केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी (बीएलओ) हे काम स्वीकारण्यास नकार दिला आहे. त्यामुळे या कामात व्यत्यय निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर मतदार यादी पडताळणी व पुनरीक्षणाच्या कामात मतदारांना महापालिकेतर्फे मार्गदर्शन व सहाय्य सहाय्य करावे, या विषयावर विचार विनिमय करण्यासाठी महापौर नसरीन बानो शेख यांच्या अध्यक्षतेखाली या विशेष महासभेचे आयोजन करण्यात आले होते.महापालिकेतर्फे 'एसआयआर' कामासाठी 'बीएलओ' यांना मदतीसाठी मानधन तत्वावर काही तरुणांची मानधन तत्वावर नियुक्ती करावी, अशी सूचना समाजवादी पार्टीचे गटनेते मुस्तकीम डिग्निटी यांनी मांडली. त्यानंतर मतदार यादीच्या कामासाठी खाजगी व्यक्तींना नियुक्त करता येते का, असा प्रश्न शिवसेनेचे नरेंद्र सोनवणे यांनी उपस्थित केला. असे तरुण नियुक्त केले गेले तर त्यांना मानधन देण्यासाठी आर्थिक तरतूद कशी करणार, अशी विचारणा 'एमआयएम'चे खालीद परवेज यांनी उपस्थित केला. ही चर्चा सुरू असतानाच खालिद परवेज व अन्य नगरसेवक महापौरांच्या हौदासमोर आले.त्यावरून 'एमआयएम' व 'इस्लाम' पक्षाच्या सदस्यांमध्ये बाचाबाची सुरू झाली. त्यानंतर या दोन्ही पक्षांचे सदस्य एकमेकांच्या अंगावर धावून गेले. यामुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला. त्यावरून काही काळ तणाव निर्माण झाला. सभागृहातील विविध पक्षीय सदस्यांनी आक्रमक झालेल्या 'एमआयएम' व 'इस्लाम' पक्षाच्या सदस्यांना आवर घालत वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. या गोंधळानंतर 'एमआयएम'चे सदस्य महासभेवर बहिष्कार घालत सभागृहाबाहेर पडले. या गोंधळानंतर 'एसआयआर' च्या कामात मतदारांना सहाय्य करण्यासाठी मानधन तत्वावर तरुणांची नियुक्ती करण्याचा ठराव महासभेत मंजूर करण्यात आला. महासभेला उपमहापौर शान-ए-हिंद, आयुक्त रवींद्र जाधव, अतिरिक्त आयुक्त रोहिदास दोरकुळकर, उपायुक्त हेमलता डगळे, नगरसचिव साजिद अहमद आदी उपस्थित होते

फीड फीडबर्नर 3 Apr 2026 4:10 pm

संगमनेर रोडवरील मॉर्डन चायनीज दुकानावर दगडफेक; पाण्याच्या बाटलीच्या पैशांवरून वाद

श्रीरामपूर : श्रीरामपूर शहरातील संगमनेर रोड परिसरात महाराष्ट्र वाईनच्या समोरील मॉर्डन चायनीज दुकानावर किरकोळ कारणावरून दगडफेक झाली आणि तोडफोड करण्यात आली. हनुमान जयंती निमित्त काढण्यात आलेली मिरवणूक संपल्यानंतर ही घटना घडली. यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित दुकानात पाण्याच्या बाटलीचे पैसे मागितल्याच्या कारणावरून वाद झाला. या किरकोळ वादाचा राग मनात धरून एका व्यक्तीने आपल्या १५ ते २० साथीदारांसह दुकानावर हल्ला चढवला. यावेळी दुकानासमोरील काऊंटरची काच फोडण्यात आली तसेच खुर्च्या, प्लेट्स यांची तोडफोड करण्यात आली. दुकानातील मालाची नासधूस करून नुकसान करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी सांगितले की, ही घटना पाण्याच्या बाटलीच्या किमतीवरून झालेल्या वादातून घडली असून यामागे कोणताही पूर्वीचा वाद नाही. तसेच या घटनेला जातीय किंवा धार्मिक रंग देऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत चार आरोपींना अटक केली असून उर्वरित आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. पुढील तपास पोलीस करत आहेत.

फीड फीडबर्नर 3 Apr 2026 4:10 pm

'डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती त्यांच्या विचारांचा उत्सव म्हणून साजरी करूया'

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने आढावा बैठकमुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या विचारांनी आणि संविधानाने देशाला प्रगतीची दिशा मिळाली आहे. त्यांचे कार्य आणि त्यांनी समाजाच्या उन्नतीसाठी दिलेले योगदान समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवणे हे अत्यंत आवश्यक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त होणारा कार्यक्रम दरवर्षी अधिक उत्कृष्ट करण्याचा प्रयत्न राज्य शासन करत असून, यावर्षीही विविध विभागांच्या समन्वयातून तो अधिक भव्य स्वरूपात साजरा करण्यात येईल. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा सोहळा त्यांच्या विचारांचा उत्सव म्हणून साजरा करूया असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १४ एप्रिल, २०२६ रोजीच्या १३५ व्या जयंतीच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे आढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस बैठकीस सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, माजी राज्यमंत्री भाई गिरकर, माजी आमदार प्रकाश गजभिये, मुंबई महापालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे, अपर मुख्य सचिव लोकेश चंद्र, नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव गोविंदराज, कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल, मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती, प्रधान सचिव श्रीकर परदेशी, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, भन्ते डॉ. राहूल बोधी महाथेरो, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणदिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे, दादर चैत्यभूमी स्मारक समितीचे प्रतिनिधी यांच्यासह विविध विभागाचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव उपस्थित होते.महापुरुषांच्या जयंती साजरी करण्यामागील उद्देश केवळ औपचारिकता नसून त्यांच्या विचारांची आणि कार्याची प्रेरणा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणे असा आहे. डॉ. आंबेडकरांनी दिलेले संविधान हे जगातील सर्वोत्तम संविधानांपैकी एक असून, त्यातील समावेशकतेच्या तत्त्वामुळे भारत विकसित राष्ट्राकडे वाटचाल करत आहे. समाजाला मिळणाऱ्या संधी, हक्क आणि प्रगती यामागे कोणाचे योगदान आहे, हे नव्या पिढीला समजणे आवश्यक आहे. त्यामुळे जयंती सोहळा हा केवळ उत्सव न राहता विचारांचा प्रसार करणारा पर्व ठरतो, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १४ एप्रिल २०२६ रोजी होणाऱ्या जयंती उत्सवासाठी देशभरातून लाखो नागरिक चैत्यभूमीवर येतात. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर चैत्यभूमी परिसरात अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायी आणि नागरिकांसाठी आवश्यक सोयीसुविधांची सर्वंकष व्यवस्था करण्यात यावी. उष्णतेपासून संरक्षण मिळावे यासाठी ठिकठिकाणी मंडप उभारण्यात यावेत. प्रामुख्याने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उपलब्ध ठेवावी. तसेच, दादर आणि परिसरातील वाहतूक सुरळीत राहावी यासाठी वाहतूक पोलिसांनी योग्य नियोजन करून नियंत्रण ठेवावे,असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबधित अधिकाऱ्यांना दिले. नागरिकांना मार्गदर्शन होण्यासाठी विविध ठिकाणी सूचना फलक लावावेत. बेस्ट प्रशासनाने दादर रेल्वे स्थानक ते चैत्यभूमी दरम्यान पुरेशा प्रमाणात बससेवा उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून नागरिकांची ये-जा अधिक सुलभ होईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती देशासह जगभर मोठ्या प्रमाणावर साजरी होत असल्याचा उल्लेख करत, हा सोहळा अधिक उत्तम पद्धतीने साजरा करण्याची जबाबदारी आपली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.भारतीय संविधान प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचा उपक्रम विभागामार्फत हाती घेण्यात आला असून, जिल्हाधिकारी कार्यालयांच्या माध्यमातून त्याची अंमलबजावणी सुरू आहे. नागरिकांमध्ये संविधानाबाबत जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. डॉ. बाबसाहेब आंबेडकरांचा “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा संदेश लक्षात घेऊन विद्यार्थ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर वसतिगृहांची उभारणी करण्यात येत आहे. जयंती सोहळ्याच्या निमित्ताने यावर्षी काही विशेष उपक्रमही राबविण्यात येणार आहेत. १३ एप्रिल रोजी सायंकाळी ड्रोनच्या माध्यमातून डॉ. आंबेडकरांच्या जीवनावर आधारित भव्य ड्रोन शो चैत्यभूमी परिसरात सादर करण्यात येणार आहे, असे मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले.बैठकीत पोलीस पथक मानवंदना, चैत्यभूमीवर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी, शिवाजी महाराज मैदानावरील भव्य निवास मंडप, तेथील आपत्कालीन व्यवस्थेसह, आरोग्य सुविधा, प्रदर्शन मंडप, चैत्यभूमी स्तूप व परिसराची सजावट, लोकराज्य मासिकाचा विशेषांक, शासकीय जाहिरात व प्रसिध्दी याबाबत चर्चा झाली व याबाबत निर्देश देण्यात आले. बैठकीत मुंबई महापालिकेच्यावतीने नियोजनाची सविस्तर माहिती सादरीकरणातून देण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पोस्टरचे विमोचन करण्यात आले.

फीड फीडबर्नर 3 Apr 2026 4:10 pm

Congress MLA : रात्री सचिवालय उघडून काँग्रेस आमदाराची आमदारकी रद्द; राजकीय वर्तुळात खळबळ

Congress MLA : काँग्रेस आमदार राजेंद्र भारती यांची विधानसभा सदस्यता रद्द करण्यात आली आहे.

दैनिक प्रभात 3 Apr 2026 4:10 pm

Attack by Wild Elephants : रानटी हत्तींच्या हल्ल्यात तिघांचा मृत्यू; झारखंडच्या रामगढमधील घटना

झारखंडच्या रामगढ जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये, रानटी हत्तींनी (Attack by Wild Elephants) एका वृद्धासह तीन जणांचा बळी घेतला.

दैनिक प्रभात 3 Apr 2026 4:03 pm

Mumbai Goa Expressway : कोकणात विकेंड रश; मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

माणगाव : उन्हाळी सुट्ट्यांची सुरुवात आणि सलग तीन दिवसांचा विकेंड यामुळे कोकणाच्या दिशेने पर्यटकांचा ओघ प्रचंड वाढला आहे. या गर्दीचा थेट परिणाम महामार्गावरील वाहतुकीवर दिसून येत असून अनेक ठिकाणी कोंडीची गंभीर समस्या निर्माण झाली आहे.माणगाव परिसरात प्रचंड ट्रॅफिक झाले आहे. बाजारपेठेतील अरुंद रस्ते, स्थानिक वर्दळ आणि महामार्गावरील वाहनांचा वाढलेला ताण यामुळे येथे वाहतूक संथ गतीने सुरू आहे. काही ठिकाणी परिस्थिती इतकी बिकट झाली की वाहनांच्या रांगा या अनेक किलोमीटरपर्यंत लागलेल्या दिसल्या.कोकणाकडे जाणाऱ्या मार्गांवरही अशीच स्थिती असून प्रवाशांना तासन्‌तास प्रवास करावा लागत आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी हा प्रवास अधिकच त्रासदायक ठरत आहे. दरम्यान, वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिस आणि प्रशासनाकडून विशेष प्रयत्न सुरू आहे.प्रशासनाकडून पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आणि शक्य असल्यास प्रवास टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जोपर्यंत माणगाव बायपास चे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत पर्यटकांना भेडसावणारी ट्रॅफिकची हे समस्या कायम राहणार आहे.

फीड फीडबर्नर 3 Apr 2026 3:30 pm

कोरोनावर लस तयार करणाऱ्या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक एका पेंटिंगमुळे चर्चेत

मुंबई : शहरात पार पडलेल्या एका भव्य कला लिलावाने कला विश्वासह उद्योग क्षेत्रातही मोठी चर्चा रंगवली आहे. एका ऐतिहासिक पेंटिंगने कोट्यवधींची बोली लावत विक्रमी किंमत गाठली असून, हा व्यवहार आधुनिक भारतीय कलेतील सर्वात महागड्या लिलावांपैकी एक ठरला आहे.राजा रवी वर्मा यांची प्रसिद्ध कलाकृती ‘यशोदा आणि कृष्ण’ ही Saffronart च्या स्प्रिंग लाईव्ह लिलावात तब्बल १६७.२० कोटी रुपयांना विकली गेली. विशेष म्हणजे, मॉडर्न इंडियन आर्टमधील आतापर्यंतची ही सर्वात महागडी विक्री ठरली आहे.या लिलावात ही प्रतिष्ठित कलाकृती खरेदी करून डॉ. पूनावाला यांनी केवळ नवा विक्रमच केला नाही, तर भारतीय कलेबद्दलचा आपला जिव्हाळाही अधोरेखित केला.मुळात ८० ते १२० कोटी रुपये असा अंदाज असलेल्या या पेंटिंगने सर्व अपेक्षा ओलांडल्या.१८९०च्या दशकात साकारलेले हे तैलचित्र भगवान श्रीकृष्ण आणि माता यशोदा यांच्यातील वात्सल्याचे अप्रतिम चित्रण करते. यामध्ये यशोदा गाईचे दूध काढत असताना लहान कृष्ण त्यांच्या मागून दुधासाठी हात पुढे करताना दाखवले आहेत, जे भारतीय संस्कृतीतील मातृत्व आणि प्रेमाचे प्रतीक मानले जाते.या खरेदीनंतर प्रतिक्रिया देताना डॉ. पूनावाला यांनी या कलाकृतीचे जतन करून ती जनतेसाठी उपलब्ध करून देणार असलयाचे सांगितले.

फीड फीडबर्नर 3 Apr 2026 3:30 pm

West Bengal : पश्चिम बंगाल : मालदा हिंसाचाराच्या सूत्रधाराला अटक

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यातील कालियाचक इथल्या हिंसाचाराचा सूत्रधार आणि एआयएमआयएम नेते मोफक्करुल इस्लाम याला आज, शुक्रवारी बागडोगरा विमानतळाहून अटक करण्यात आली. मोफक्करूल पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले.देशाच्या इतर राज्यांप्रमाणे पश्चिम बंगालमध्ये देखील मतदारयादी पुनर्निरीक्षणाचे (एसआयआर) सुरू आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात अवैध मतदार आणि बांगलादेशी घुसखोरांची नोंद मतदार यादीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये एसआयआर प्रक्रिया सुरळीतपणे होऊ दिली जात नसल्याचा आरोप केला जातो. अशातच राज्याच्या मालदा जिल्ह्यातील कालियाचक येथे सुनियोजित पद्धतीने हिंसाचार घडवून एसआयआर करणाऱ्या न्यायिक अधिकाऱ्यांना 9 तास ओलिस ठेवण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयाने देखील या घटनेची गंभीर दखल घेत पश्चिम बंगालच्या कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले होते.सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यास सुरुवात केली. हिंसाचाराच्या प्रारंभिक चौकशीत असे आढळून आले की, पेशाने वकील असलेला एआयएमआयएमचा नेता मोफक्करुल इस्लाम हा या हिंसाचाराचा मुख्य सुत्रधार आहे. हिंसाचाराच्या व्हायरल व्हिडिओमध्ये इस्लाम अतिशय आक्रमक भूमिकेत दिसून येतो, जिथे तो जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना उघडपणे आव्हान देताना दिसतो. व्हिडिओमध्ये तो कॅमेऱ्यासमोर ओरडताना ऐकू येतो: “ओए डीएम, एसपी… सीआयडी कुठे आहे ? आयबी कुठे आहे ? तुम्ही सगळे कुठे आहात? इथे या…” प्रशासनाविरोधातील अशा वक्तव्यांमुळे आणि लोकांना भडकावल्याच्या आरोपांमुळे तो पोलिसांच्या रडारवर आला होता. तपासात असेही समोर आले आहे की सुजापूर आणि कालियाचक परिसरातील अलीकडील हिंसक आंदोलनांचे नेतृत्वही त्याच्याकडे होते.यापूर्वी 2021 साली झालेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत मोफक्करूल इस्लामने उत्तर दिनाजपूर जिल्ह्यातील इताहर मतदारसंघातून एआयएमआयएमच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. इस्लामच्या विरोधात ठोस पुरावे मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. तर अटक टाळण्यासाठी मोफक्करूल भूमीगत झाला होता. अशातच पोलिसांना माहिती मिळाली की, सिलीगुडीच्या बागडोगरा विमानतळाहून इस्लाम कुठेतरी पळून जाण्याच्या तयारीत होता. पोलिसांच्या विशेष पथकाने सापळा रचून विमानतळ्याचा टर्मिनल जवळ त्याला अटक केली.पोलिसांच्या माहितीनुसार, इस्लामच्या हिंसाचारातील भूमिकेची सखोल चौकशी सुरू आहे. सुजापूरमधील आंदोलनाचे नियोजनबद्ध नेतृत्व त्यानेच केल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. या हिंसाचारामागे कोणती मोठी साखळी किंवा कट होता का, याचा पोलीस घेत शोध घेत आहेत.

फीड फीडबर्नर 3 Apr 2026 3:30 pm

Smartphone Tips: टीव्हीचा रिमोट हरवला? काळजी नको! तुमचा स्मार्टफोनच बनेल स्मार्ट कंट्रोलर

Smartphone Tips आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात स्मार्टफोन अनेक कामांसाठी वापरला जातो. त्याचप्रमाणे, तो टीव्ही कंट्रोल करण्यासाठीही उपयोगी ठरतो. काही सोप्या पद्धतींचा वापर करून तुम्ही तुमच्या फोनला युनिव्हर्सल रिमोटमध्ये बदलू शकता.

दैनिक प्रभात 3 Apr 2026 2:59 pm

Eye Care: डोळ्यांत जळजळ आणि खाज? उन्हाळ्यात डोळ्यांची काळजी घेण्यासाठी या सोप्या टिप्स जरूर वापरा

Eye Care तज्ज्ञांच्या मते, डिजिटल स्क्रीनचा अतिवापर आणि उन्हात जास्त वेळ राहणं यामुळे डोळ्यांवर ताण येतो. त्यामुळे डोळ्यांना विश्रांती देणं आवश्यक आहे. यासाठी ‘20-20-20 नियम’ खूप उपयुक्त ठरतो.

दैनिक प्रभात 3 Apr 2026 2:21 pm

मातृभूमी’मधील ‘चांद देख लेना’ गाण्याचा मेकिंग व्हिडीओ प्रदर्शित

मुंबई : सलमान खान फिल्म्स संगीतने सर्वांच्या आवडीच्या ‘चांद देख लेना’ या गाण्याचा एक विशेष पडद्यामागील व्हिडीओ सादर केला आहे, ज्यातून या गाण्याच्या निर्मितीमागील खास क्षणांची झलक पाहायला मिळते. हे गाणे आधीच प्रेक्षकांच्या मनाला भिडले आहे. या व्हिडीओमध्ये चित्रीकरणादरम्यानचे अनेक खास आणि संस्मरणीय क्षण दाखवले आहेत. दृश्यांची बारकाईने केलेली तयारी ते सलमान खान आणि चित्रांगदा सिंह यांच्यातील सुंदर केमिस्ट्रीपर्यंत सर्व काही यात दिसते. तसेच नृत्यदिग्दर्शक वैभवी मर्चंट कलाकारांना पावले शिकवत मार्गदर्शन करताना दिसत आहेत.हिमेश रेशमिया यांनी संगीतबद्ध केलेले हे गाणे प्रेम आणि तडफडीचा पारंपरिक हिंदी चित्रपट शैलीतील अनुभव देते. ‘चांद देख लेना’ या गाण्याला युवा गायक निहाल ताउरो आणि अंकोना मुखर्जी यांनी आवाज दिला आहे.‘मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस’ ही निर्मिती सलमा खान यांनी केली असून दिग्दर्शन अपूर्व लाखिया यांनी केले आहे. ही कथा शौर्य, त्याग आणि जिद्दीची प्रभावी कहाणी सादर करणार असल्याचे सांगितले जात आहे. या चित्रपटात चित्रांगदा सिंह महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

फीड फीडबर्नर 3 Apr 2026 2:10 pm

Bhagwant Maan: ‘राघव चढ्ढा यांची भाजपसोबत…’ ; पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचा गंभीर आरोप

Bhagwant Maan: आम आदमी पक्षाचे नेते आणि राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांना उपनेतेपदावरून हटवण्याच्या निर्णयावर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे.

दैनिक प्रभात 3 Apr 2026 1:32 pm

Janhvi Kapoor: “दारूचं व्यसन ही सवय नाही, मानसिक आजार आहे”…जान्हवी कपूरचे ठाम मत

Janhvi Kapoor जान्हवी कपूरने दारूच्या व्यसनासारख्या गंभीर विषयावर समाजाला विचार करायला भाग पाडलं आहे. तिच्या या वक्तव्यामुळे मानसिक आरोग्याबाबत जागरूकता वाढण्यास मदत होऊ शकते.

दैनिक प्रभात 3 Apr 2026 1:30 pm

मार्चमध्ये युपीआयमधून नागरिकांनी केले कोटींचे व्यवहार; युपीआय ठरतोय वरदान

मुंबई : भारताने सुरु केलेली यूपीआय ही डिजिटल प्रणाली आज जगभर पोहोचली आहे. हातात कॅश नसेल तर आता घाबरून न जात आपण बिनधास्तपणे डिजिटल प्रणाली वापरत आहोत. अगदी किराणा मालापासून ते लाखोंचे व्यवहार करण्यापर्यंत युपीआय वापरले जाते आहे. सणासुदीच्या काळात तर या व्यवहारांत अधिक भर पडते.प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार मागच्या मार्च महिन्यात युपीआयने पेमेंट करणाऱ्यांची संख्या ही कोटींपर्यंत पोहोचली आहे. आणि एकट्या मार्च महिन्यात २२.६४ अब्ज असे विक्रमी संख्येने व्यवहार पार पडले आहेत. मार्च २०२५ महिन्याची तुलना करता, मार्च २०२६ मध्ये या व्यवहारांमध्ये १९ टक्के वाढ नोंदवली गेली आहे. तसेच फेब्रुवारीत एकूण २६.८४ लाख रुपये इतके व्यवहार झाले असून मार्च महिन्यात त्यात १० टक्क्यांनी वाढले आहेत.मार्च महिन्यातील सणमार्च महिन्यात होळी, धूलिवंदन, रंगपंचमी, गुढीपाडवा, ईद असे अनेक सण तसेच देवतांच्या यात्रा - जत्रा, उत्सव असतात. या निमित्ताने देशात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात खरेदी होते. या खरेदीसाठी यूपीआयचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला. दररोज सरासरी ७३ कोटी व्यवहार झाले आहेत असे निदर्शनास आले. ज्यांचे दैनिक मूल्य हे ९५,२४३ कोटी रुपये इतके आहे.आजच्या काळात भारतात डिजिटल पेमेंट्सवर जास्त भर दिला जात आहे. एकूण डिजिटल व्यवहारांपैकी जवळपास ८५ टक्के व्यवहार हे पूर्णपणे युपीआयच्या आधाराने केले जातात.

फीड फीडबर्नर 3 Apr 2026 1:30 pm

भारतीय बाजारात रेडमी, विवो आणि रिअलमीचे स्मार्टफोन लॉन्च

फीचर्स आणि किंमतींमध्ये जोरदार स्पर्धामुंबई : भारतीय स्मार्टफोन बाजारात सध्या स्पर्धा अधिकच तीव्र होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर शाओमीच्या उपकंपनी रेडमी, तसेच विवो आणि रिअलमी या कंपन्यांनी आपले नवीन स्मार्टफोन लॉन्च करत ग्राहकांसाठी आकर्षक पर्याय उपलब्ध करून दिले आहेत.रेडमीने आपला नवीन रेडमी नोट १५ एसई ५जी स्मार्टफोन भारतीय बाजारात सादर केला आहे. हा फोन विशेष एडिशन म्हणून लॉन्च करण्यात आला असून तो 7 एप्रिलपासून फ्लिपकार्ट आणि कंपनीच्या अधिकृत ऑनलाइन स्टोअरवर विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.77 इंचाचा कर्व्ड AMOLED डिस्प्ले असून 120Hz रिफ्रेश रेट, 3200 निट्स पीक ब्राइटनेस आणि TV Rheinland सर्टिफिकेशन दिले आहे. Qualcomm Snapdragon 6 Gen 3 प्रोसेसरसह 8GB RAM आणि 256GB पर्यंत स्टोरेज मिळते. कॅमेऱ्याबाबत बोलायचे झाल्यास, 50 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि 20 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. 5800mAh बॅटरी आणि 45W फास्ट चार्जिंगमुळे हा फोन अधिक प्रभावी ठरतो. या फोनची सुरुवातीची किंमत 24,999 रुपये ठेवण्यात आली असून विविध बँक ऑफर्समुळे ग्राहकांना सवलतीचाही लाभ मिळणार आहे.दुसरीकडे, विवोने आपला नवीन विवो व्ही७० एफई स्मार्टफोन मिड-रेंज सेगमेंटमध्ये सादर केला आहे. या फोनमध्ये 6.23 इंचाचा OLED डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट आणि HDR10+ सपोर्ट दिला आहे. MediaTek Dimensity 7360-Turbo प्रोसेसरसह 12GB RAM आणि 512GB स्टोरेजपर्यंत सुविधा मिळते. या फोनची सर्वात मोठी खासियत म्हणजे 200 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा असून OIS सपोर्टसह उत्कृष्ट फोटोग्राफीचा अनुभव देतो. याशिवाय 50 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देखील दिला आहे. 7000mAh ची मोठी बॅटरी आणि 90W फास्ट चार्जिंग यामुळे हा फोन जास्त काळ वापरासाठी उपयुक्त ठरतो. या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 37,999 रुपये असून 9 एप्रिलपासून विक्री सुरू होणार आहे. विविध बँक ऑफर्स आणि EMI पर्यायांमुळे ग्राहकांसाठी हा फोन अधिक आकर्षक बनला आहे.दरम्यान, रियलमीने देखील आपला रियलमी १६ ५जी स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या फोनमध्ये 6.57 इंचाचा AMOLED डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट आणि 4200 निट्स ब्राइटनेस दिला आहे. MediaTek Dimensity 6400 Turbo प्रोसेसरसह हा फोन येतो, जो दैनंदिन वापरासाठी योग्य असला तरी उच्चस्तरीय गेमिंगसाठी मर्यादित मानला जातो. कॅमेऱ्याच्या बाबतीत 50 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि 50 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. विशेष म्हणजे, रियर कॅमेरासोबत सेल्फी मिररची सुविधा देण्यात आली आहे. 7000mAh बॅटरी आणि 60W फास्ट चार्जिंगमुळे दीर्घकाळ वापर शक्य आहे. या फोनची सुरुवातीची किंमत 31,999 रुपये असून 5 एप्रिलपासून विक्री सुरू होणार आहे.एकूणच पाहता, रेडमी, विवो आणि रिअलमी या तिन्ही कंपन्यांनी वेगवेगळ्या किंमत आणि फीचर्ससह स्मार्टफोन बाजारात उतरवले आहेत. कॅमेरा, बॅटरी, डिस्प्ले आणि परफॉर्मन्सच्या बाबतीत प्रत्येक फोन आपली वेगळी ओळख निर्माण करत असून ग्राहकांसाठी आता अधिक पर्याय उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे ग्राहकांनी आपल्या गरजेनुसार आणि बजेटनुसार योग्य स्मार्टफोन निवडण्याची संधी या लॉन्चमुळे निर्माण झाली आहे.

फीड फीडबर्नर 3 Apr 2026 1:30 pm

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त अभिवादन

सोलापूर : श्री शिवजन्मोत्सव (मध्यवर्ती) महामंडळ संपर्क कार्यालय येथे आज श्री शिवजन्मोत्सव (मध्यवर्ती) महामंडळ ट्रस्ट, सोलापूर यांच्या वतीने तसेच छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय रक्तपेढी, सोलापूर यांच्या सहकार्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम व भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन महापौर श्री विनायक कोंड्याल यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी महापौरांच्या हस्ते रक्तदान केलेल्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. आपल्या मनोगतात महापौर श्री विनायक कोंड्याल यांनी सांगितले की, उन्हाळा सुरू झाल्यामुळे रक्ताचा तुटवडा जाणवत आहे, अशा परिस्थितीत श्री शिवजन्मोत्सव (मध्यवर्ती) महामंडळ ट्रस्ट यांनी आयोजित केलेला हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून समाजासाठी उपयुक्त आहे. अशा सामाजिक उपक्रमांमुळे अनेकांना जीवनदान मिळते, असेही त्यांनी नमूद करत आयोजकांचे आभार मानले.या प्रसंगी सभागृह नेते नरेंद्र काळे,ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर नाना काळे, राजन जाधव ,माजी आमदार रविकांत पाटील मध्यवर्ती उत्सव अध्यक्ष जयवंत सलगर , नगरसेवक मनीष केत,बजरंग जाधव , गणेश शेळके, नामदेव पवार, विजय पुकाळे, नाना भोईटे, उत्तरा बरडे, उज्वला साळुंखे , विजय चव्हाण , लता ढेरे , अंबादास शेळके ,शिवाजी वाघमोडे, श्रीकांत डांगे हरीभाऊ सुरवसे, नागेश वडणे , प्रकाश ननवरे ,वैभव गंगणे,महेश हनमे, भैय्या ताकभाते, सचिन स्वामी, देविदास घुले, शंतनू साळुंखे ,पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ट्रस्टचे सर्व पदाधिकारी व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

फीड फीडबर्नर 3 Apr 2026 1:30 pm

Deul Band 2 poster : आता परीक्षा देवाची ….देऊळ बंद 2 चे लक्षवेधक पोस्टर समोर; ‘या’दिवशी होणार रिलीज

Deul Band 2 poster : देऊळ बंद 2 सिनेमाचे लक्षवेधक पोस्टर रिलीज करण्यात आले आहे.

दैनिक प्रभात 3 Apr 2026 1:26 pm

Gold and Silver Price Today: आज पुन्हा सोन्याच्या दरात घसरण ; चांदीच्या दराविषयी काय परिस्थिती ? वाचा

Gold and Silver Price Today: गेल्या काही दिवसांत झालेल्या तीव्र वाढीनंतर आज देशात सोन्याच्या दरात थोडा दिलासा मिळाला आहे.

दैनिक प्रभात 3 Apr 2026 1:07 pm

Pooja Sawant: पहाटे ५ ला दिवसाची सुरुवात, रात्री १० ला झोप! पूजा सावंतची शिस्तबद्ध दिनचर्या चर्चेत

Pooja Sawant पूजा सावंतने सांगितलं की, गेली अनेक वर्ष ती पहाटे उठून व्यायाम करण्याची सवय पाळते. तिच्या मते, व्यायाम हा सूर्योदयापूर्वीच व्हायला हवा. त्यामुळे तिची मानसिकताच तशी तयार झाली आहे. ती रोज सकाळी ५ वाजता उठते आणि साडेपाच वाजल्यापासून तिचा वर्कआऊट सुरू होतो. सूर्योदय होईपर्यंत तिचा व्यायाम पूर्ण होतो.

दैनिक प्रभात 3 Apr 2026 12:55 pm

Kalpana Kharat : कल्पना खरातचा थांगपत्ता लागेना! SIT पथक माहेरी पोहचले; नातेवाईकांनी दिली धक्कादायक माहिती

Kalpana Kharat : एसआयटीचे पथक कल्पना खरातच्या माहेरी चौकशीसाठी गेले असताना त्यांना धक्कादायक माहिती मिळाली आहे.

दैनिक प्रभात 3 Apr 2026 12:46 pm

US Iran War: मोठी बातमी ! इराणकडून आखाती देशांमधील ८ प्रमुख पुलांची ‘हिट लिस्ट’जाहीर ; अमेरिकेने सर्वात उंच पूल पाडल्याने विध्वंसाचा आखला प्लॅन

US Iran War: इराणने आपल्या सुरू असलेल्या युद्धात अमेरिका आणि इस्रायल या दोघांचेही मोठे नुकसान केले आहे. या युद्धाचा परिणाम आखाती देशांवरही झाला आहे.

दैनिक प्रभात 3 Apr 2026 12:45 pm

संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते विशाखापट्टणममध्ये अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीचे आणि स्टेल्थ फ्रिगेटचे जलावतरण

विशाखापट्टणम : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते आज (शुक्रवार ३ एप्रिल २०२६) विशाखापट्टणममध्ये अणुऊर्जेवर चालणाऱ्या आयएनएस अरिदमन पाणबुडीचे आणि आयएनएस तारागिरी स्टेल्थ फ्रिगेटचे जलावतरण होणार आहे. या पार्श्वभूमीवर सकाळीच संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी हिंदीत एक एक्स पोस्ट (X Post or Tweet) केली आहे. 'शब्द नहीं शक्ति है अरिदमन' अशा स्वरुपाची सूचक पोस्ट संरक्षणमंत्र्यांनी केली आहे. अरिदमन हा केवळ एक शब्द नाही, ती शक्ती आहे, असे संरक्षणमंत्र्यांनी सांगितले.शब्द नहीं शक्ति है, ‘अरिदमन’!— Rajnath Singh (@rajnathsingh) April 3, 2026एल अँड टीने विशाखापट्टणम येथील गुप्त जहाजबांधणी केंद्रात अणुऊर्जेवर चालणाऱ्या आयएनएस अरिदमन पाणबुडीची निर्मिती केली आहे. मागील अनेक महिन्यांपासून समुद्रात या पाणबुडीच्या चाचण्या सुरू होत्या. नौदलात सहभागी झाल्यावर ही पाणबुडी स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड अंतर्गत कार्यरत राहणार आहे. स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड अंतर्गत २०१६ पासून आयएनएस अरिहंत आणि २०२४ पासून आयएनएस अरिघात कार्यरत आहे. आता स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड अंतर्गत आजपासून आयएनएस अरिदमन ही तिसरी पाणबुडीही कार्यरत होणार आहे. विशेष म्हणजे या तिन्ही पाणबुड्या अणुऊर्जेवर चालत असल्यामुळे दीर्घकाळ खोल समुद्रात लपून शत्रूच्या हालचालींचा वेध घेणे आणि योग्य वेळी घातक प्रहार करणे यासाठी सक्षम आहेत.अणुऊर्जेवर चालणारी आयएनएस अरिदमन ही सात हजार टन वजनाची पाणबुडी आहे. आयएनएस अरिहंत आणि आयएनएस अरिघात या सहा हजार टन वजनाच्या पाणबुड्या होत्या. या दोन्ही पाणबुड्यांपेक्षा आयएनएस अरिदमन महाकाय आणि शक्तिशाली आहे. पूर्वीच्या पाणबुड्यांवरील चारच्या तुलनेत, या पाणबुडीमध्ये आठ व्हर्टिकल लॉन्च सिस्टीम (VLS) ट्यूब आहेत, ज्यामुळे ती चोवीस के-१५ सागरिका ही कमी पल्ल्याची क्षेपणास्त्रे (७५० किमी) आणि आठ के-४ मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्रे (३५०० किमी) तैनात करू शकते. तसेच, ती सहा हजार किमी पल्ल्याची के-५ क्षेपणास्त्रे देखील पाणबुडीत सामावून घेऊ शकते.तब्बल ८३ मेगावॅट क्षमतेच्या कॉम्पॅक्ट लाईट वॉटर रिअॅक्टरवर चालणारी ही पाणबुडी तिच्या रचनेमुळे रडारला चकवू शकते. कमीत कमी आवाज करत ही पाणबुडी दीर्घकाळ प्रभावीरित्या कार्यरत राहू शकते. या पाणबुडीत सात पात्यांचा प्रोपेलर आहे, ज्यामुळे पृष्ठभागावर १२-१५ नॉट्स (सागरी मैल) आणि पाण्याखाली २४ नॉट्सचा (सागरी मैल) वेग मिळतो. प्रगत स्वदेशी सोनार प्रणाली उशूस (USHUS) आणि पंचेंद्रिय, तसेच अ‍ॅनेकोइक टाइल्समुळे या पाणबुडीची गुप्तता आणि शोध क्षमता वाढते.Tomorrow, 03 April, I shall be in Visakhapatnam to attend the Commissioning Ceremony of the advanced stealth Frigate ‘Taragiri’.This commissioning highlights the strategic and maritime importance of India’s eastern seaboard as well as the Indian Navy’s sustained focus on… pic.twitter.com/rOSxZ9Ftuz— Rajnath Singh (@rajnathsingh) April 2, 2026संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते आज आयएनएस तारागिरी स्टेल्थ फ्रिगेटचेही जलावतरण होणार आहे. याप्रसंगी गोदीचे (डॉकमधील) वरिष्ठ अधिकारी तसेच अनेक नौदल अधिकारी उपस्थित असतील.प्रोजेक्ट १७ ए अंतर्गत विकसित करण्यात आलेली तारागिरी ही चौथी स्टेल्थ फ्रिगेट आहे. ही मुंबईच्या माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने बांधलेली ६,६७० टन वजनाची युद्धनौका आहे. तिच्या रचनेमुळे ती रडारला चकवू शकते. या क्षमतेमुळे दीर्घकाळ ही फ्रिगेट समुद्रातील कठीण परिस्थितीतही सुरक्षित राहू शकते. ही नौका ७५ टक्क्यांहून अधिक स्वदेशी सामग्रीने बांधली आहे. आधुनिक शस्त्रांनी सुसज्ज असलेल्या या फ्रिगेटमध्ये सुपरसॉनिक क्षेपणास्त्र आहेत. समुद्रातून समुद्रात तसेच समुद्रातून आकाशात आणि समुद्रातून जमिनीवर हल्ला करण्याची क्षमता या फ्रिगेटमध्ये आहे.

फीड फीडबर्नर 3 Apr 2026 12:30 pm

गुड फ्रायडे निमित्त आज शेअर बाजार बंद; सोमवारी पुन्हा व्यवहार होतील सुरू

नवी दिल्ली : गुड फ्रायडे निमित्त आज देशांतर्गत शेअर बाजार बंद आहे. साप्ताहिक सुट्टीमुळे या शनिवार आणि रविवारीही शेअर बाजार बंद राहील. आता पुढील आठवड्याच्या पहिल्या दिवशी, सोमवारी व्यवहार पुन्हा सुरू होतील.https://prahaar.in/2026/04/02/12-6-percent-increase-in-maharashtra-gst-revenue/गुड फ्रायडे निमित्त भारतीय शेअर बाजार बंद असल्यामुळे, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (बीएसई) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई) या दोन्ही प्रमुख निर्देशांकांवर व्यवहार होणार नाहीत. पुढील शनिवार आणि रविवार हे आठवड्याचे शेवटचे दिवस (वीकेंड) असल्याने, शेअर बाजार सलग तीन दिवस बंद राहील.https://prahaar.in/2026/03/28/the-stock-market-will-operate-for-only-three-days-next-week/याव्यतिरिक्त, आज इक्विटी, इक्विटी डेरिव्हेटिव्ह्ज, एसएलबी, करन्सी डेरिव्हेटिव्ह्ज आणि इंटरेस्ट रेट डेरिव्हेटिव्ह्ज या सर्व विभागांमध्ये व्यवहार होणार नाहीत, म्हणजेच संपूर्ण दिवसभर एक्सचेंजवरील व्यवहार पूर्णपणे स्थगित राहतील. देशांतर्गत शेअर बाजारातील पुढील व्यवहार सत्र सोमवार, ६ एप्रिल रोजी सकाळी ९:१५ वाजता सुरू होईल.

फीड फीडबर्नर 3 Apr 2026 12:30 pm

Introvert Personality: फक्त कमी बोलणं म्हणजे इंट्रोव्हर्ट नाही! या ५ सवयी सांगतात तुमची खरी पर्सनॅलिटी

Introvert Personality इंट्रोव्हर्ट म्हणजे असा व्यक्ती ज्याला एकटं राहणं, शांत वातावरण आणि स्वतःच्या विचारांसोबत वेळ घालवणं आवडतं. अशा लोकांना सतत लोकांमध्ये राहणं किंवा खूप बोलणं आवडत नाही. मात्र, ते पूर्णपणे अबोल असतात असं नाही. ते कमी बोलतात, पण जेव्हा बोलतात तेव्हा विचारपूर्वक आणि अर्थपूर्ण बोलतात.

दैनिक प्रभात 3 Apr 2026 12:28 pm

PM Kisan Yojana 23rd Instalment: पीएम किसान योजनेचा २३ वा हप्ता 'या'महिन्यात मिळण्याची शक्यता

मुंबई: भारत हा कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे लाखो लोक शेती करतात. त्यांच्यापैकी अनेकांना शेतीतून फारसे उत्पन्न मिळत नाही. या शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान निधी योजना एक मजबूत आर्थिक कवच म्हणून उदयास आली आहे, जी दरवर्षी थेट त्यांच्या बँक खात्यात ६ हजार रुपये जमा करते. सरकार ही रक्कम दर चार महिन्यांनी२ हजारांच्या तीन समान हप्त्यांमध्ये वितरित करते.ही रक्कम थेट डीबीटीद्वारे हस्तांतरित केली जाते. २२ वा हप्ता मिळाल्यानंतर, शेतकरी आता २३ व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. जर तुम्हीही या योजनेचा लाभ घेत असाल, तर पुढील हप्ता तुमच्या खात्यात कधी जमा होईल हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. तुम्ही घरबसल्या तुमच्या हप्त्याची स्थिती कशी तपासू शकता, हे समजून घ्या.२३ वा हप्ता कधी येईल?पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत हप्ते दर चार महिन्यांनी दिले जातात आणि २२ वा हप्ता मार्चमध्ये मिळाला होता. त्यामुळे, २३ वा हप्ता जुलै २०२६ च्या सुमारास दिला जाईल असा अंदाज वर्तवला जात आहे. तथापि, सरकारने अद्याप कोणतीही अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही. अधिकृत माहिती जाहीर झाल्यानंतरच संपूर्ण चित्र स्पष्ट होईल.'या' शेतकऱ्यांना कोणताही फायदा होणारया हप्त्याचा लाभ केवळ त्या शेतकऱ्यांनाच मिळेल ज्यांनी आपली ई-केवायसी आणि जमीन पडताळणीची औपचारिकता वेळेवर पूर्ण केली आहे. जर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी जोडलेले नसेल किंवा तुमची केवायसी अपूर्ण असेल, तर जुलैमध्ये मिळणारा हा आनंद हुकण्याची शक्यता आहे. त्यामुळे, धोका पत्करण्याऐवजी आताच तुमची स्थिती अद्ययावत करणे शहाणपणाचे ठरेल.हप्त्याशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टीपुढचा हप्ता जुलै महिन्यात येण्याची दाट शक्यता आहे. ई-केवायसी आणि आधार सीडिंग न केल्यास तुमचे पेमेंट थांबवले जाऊ शकते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी जमीन पडताळणी प्रक्रिया पूर्ण करणे देखील आवश्यक आहे. आतापर्यंत सरकारने शेतकऱ्यांना ४.२७ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचे वाटप केले आहे. लाभार्थी यादीमध्ये आपले नाव कसे तपासावे. तुमचे नाव नवीन लाभार्थी यादीत आहे की नाही हे तपासायचे असल्यास, कुठेही धावपळ करण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या स्मार्टफोन किंवा लॅपटॉपचा वापर करून घरबसल्या ते तपासू शकता. सर्वप्रथम, pmkisan.gov.in या अधिकृत पीएम किसान वेबसाइटला भेट द्या आणि 'लाभार्थी यादी' (Beneficiary List) या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला तुमच्या राज्य, जिल्हा, तालुका आणि गावाचा तपशील भरावा लागेल.तुम्ही 'अहवाल मिळवा' वर क्लिक करताच, तुमच्या संपूर्ण गावाची यादी स्क्रीनवर दिसेल. तुम्ही तुमचे नाव तपासू शकता आणि तुमच्या मागील हप्त्यांची स्थिती पाहू शकता. ही डिजिटल पद्धत केवळ तुमचा वेळच वाचवत नाही, तर तुम्हाला मध्यस्थांच्या त्रासापासूनही वाचवते.

फीड फीडबर्नर 3 Apr 2026 12:10 pm

Nashik News : नाशिकमधून खळबळ उडवून देणारा प्रकार समोर! पोलिसांना टॅबमध्ये आढळले 200 तसले व्हिडिओ, नेमकं काय घडलं?

Nashik News : भोंदू बाबा अशोक खरातचे प्रकरण ताजे असतानाच आता नाशिकमधून आणखी एक खळबळ उडवून देणारा प्रकार समोर आला आहे.

दैनिक प्रभात 3 Apr 2026 12:04 pm

Vikrant Massey: वॉशरूमबाहेर मिळालेल्या संधीने बदललं आयुष्य; विक्रांत मॅसीचा संघर्षातून यशाकडे प्रवास

Vikrant Massey सुरुवातीला त्याला एका टीव्ही शोमध्ये काम करण्याची संधी मिळाली. त्यासाठी त्याला एका भागासाठी सुमारे ६ हजार रुपये मिळायचे. महिन्याला चार भागांमधून २४ हजार रुपये मिळत होते.

दैनिक प्रभात 3 Apr 2026 11:55 am

Sanjay Raut : काँग्रेसचा पोटनिवडणूक लढण्याचा निर्धार! संजय राऊतांनी त्या गोष्टीची आठवण करुन दिली, म्हणाले “ज्या ठिकाणी..”

Sanjay Raut : बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीत काँग्रेसकडून उमेदवार दिला जाणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. अशातच खासदार संजय राऊत यांनी मोठी प्रतिक्रिया यावर दिली आहे.

दैनिक प्रभात 3 Apr 2026 11:35 am

पूर्व काँगोमध्ये आयएसआयएसशी संबंधित बंडखोरांनी केला मोठा हल्ला; ४३ जण ठार

नवी दिल्ली: इस्लामिक स्टेट (IS) या दहशतवादी गटाशी संलग्न असलेल्या बंडखोरांनी पूर्व काँगोमध्ये एक मोठा हल्ला केला असून, त्यात किमान ४३ जण ठार झाले आहेत, असे अधिकाऱ्यांनी गुरुवारी सांगितले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.अलाईड डेमोक्रॅटिक फोर्सेसच्या (एडीएफ) तरुणांनी बुधवारी रात्री बाफवाकोआ गावातील नागरिकांना लक्ष्य केले. युगांडातील इस्लामिक स्टेट गटाशी संलग्न असलेला हा बंडखोर गट, सहज ओलांडता येणाऱ्या सीमेच्या दोन्ही बाजूंना सक्रिय आहे. त्यांनी गावातील घरांना आग लावली, असे एका नागरी समाज संघटनेचे सदस्य सॅम्युअल बानापिया यांनी फोनवरून सांगितले. काँगोच्या लष्कराने एका निवेदनात म्हटले आहे की, ४३ लोक ठार झाले, तर स्थानिक अधिकाऱ्यांनी मृतांचा आकडा किमान ५६ असल्याचे सांगितले. अनेक लोक बेपत्ता असून किमान दोन जणांना ओलीस ठेवण्यात आले आहे.एम२३ हा मुख्य बंडखोर गटकाँगोचे सैन्य पूर्व भागात एडीएफसह इतर अनेक बंडखोर गटांशी लढत आहे. यातील सर्वात प्रमुख गट म्हणजे रवांडा-समर्थित एम२३, ज्याने गेल्या वर्षी पूर्व भागातील प्रमुख शहरे ताब्यात घेतली. पूर्व काँगोमधील लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट ज्युल्स न्गोंगो म्हणाले, एडीएफ लष्कराशी थेट संघर्ष टाळते आणि नागरिकांना लक्ष्य करते. यामुळे शांततेच्या प्रयत्नांना बाधा येते. काँगोमधील एडीएफ तरुणांची संख्या अस्पष्ट आहे, परंतु या प्रदेशात त्यांचे मोठे अस्तित्व आहे आणि ते वारंवार नागरिकांवर हल्ले करतात. अलिकडच्या वर्षांत, युगांडाच्या सीमेजवळ एडीएफचे हल्ले तीव्र झाले आहेत. गेल्या वर्षी, एडीएफने शेजारच्या प्रदेशात ६६ लोकांना ठार केले आणि इतर अनेकांना ओलीस ठेवले.

फीड फीडबर्नर 3 Apr 2026 11:30 am

होर्मुज सामुद्रधुनी पुन्हा खुली करा, भारताची मागणी

ब्रिटनने बोलावलेल्या 60 देशांच्या बैठकीत मांडले मतनवी दिल्ली : पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणच्या नियंत्रणात गेलेली होर्मुजची सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्याची भारताने मागणी केली आहे. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी ब्रिटनच्या पुढाकाराने आयोजित बहुपक्षीय बैठकीत ही भूमिका मांडली. या संघर्षात जलमार्गावर आपले नागरिक गमावणारा भारत हा एकमेव देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.ब्रिटनने आयोजित केलेल्या या आभासी बैठकीत 60 हून अधिक देश सहभागी झाले होते. बैठकीचा मुख्य उद्देश होर्मुज सामुद्रधुनीत सुरक्षित आणि निर्बाध जहाजवाहतूक सुनिश्चित करणे हा होता. या संकटामुळे जागतिक तेलाच्या किमतीत मोठी वाढ होत आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनानुसार, मिस्री यांनी आंतरराष्ट्रीय जलमार्गांमध्ये मुक्त नौवहनाच्या तत्त्वावर भर दिला. तसेच या संघर्षाचा भारताच्या ऊर्जा सुरक्षेवर होत असलेला परिणामही त्यांनी अधोरेखित केला.बैठकीत त्यांनी सांगितले की, होर्मुज परिसरातील व्यापारी जहाजांवरील हल्ल्यांमध्ये भारतानेच सर्वाधिक नुकसान सोसले आहे. डायरेक्टोरेट जनरल ऑफ शिपिंगच्या माहितीनुसार, विदेशी ध्वज असलेल्या जहाजांवर कार्यरत किमान तीन भारतीय खलाशांचा मृत्यू झाला असून एक जखमी आहे. काही जहाजे अद्यापही या सामुद्रधुनीत अडकलेली आहेत.मिस्री यांनी इशारा दिला की, या प्रदेशातील अस्थिरतेचा थेट परिणाम भारताच्या ऊर्जा सुरक्षेवर होत आहे. भारत हा जगातील प्रमुख कच्चे तेल आयात करणाऱ्या देशांपैकी एक असल्याने पश्चिम आशियातील परिस्थितीचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा प्रभाव पडत आहे. या संकटावर तोडगा काढण्यासाठी तणाव कमी करणे आणि सर्व पक्षांमध्ये संवाद व कूटनीती हाच एकमेव मार्ग असल्याचे त्यांनी नमूद केले. भारताने पुन्हा एकदा स्पष्ट केले की व्यापारी जहाजांवरील हल्ले अस्वीकार्य आहेत आणि आंतरराष्ट्रीय जलमार्गांमध्ये मुक्त वाहतूक सुनिश्चित केलीच पाहिजे.आखाती देशांमध्ये सुमारे एक कोटी भारतीय नागरिक वास्तव्यास आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सर्व भारतीय नागरिक सुरक्षित असून भारतीय दूतावास त्यांच्या सतत संपर्कात आहेत. आतापर्यंत या संघर्षात 8 भारतीयांचा मृत्यू झाला असून एक जण बेपत्ता आहे.

फीड फीडबर्नर 3 Apr 2026 11:30 am

Raghav Chadha: “माझा आवाज दाबला गेलाय, पण मी हरलो नाही” ; ‘आम आदमीला संदेश’म्हणत राघव चड्ढा यांनी प्रसिद्ध केला व्हिडिओ

Raghav Chadha: आम आदमी पार्टीचे (आप) नेते आणि राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांनी उपनेतेपदावरून हटवल्याबद्दल पहिल्यांदाच उघडपणे भाष्य केले आहे.

दैनिक प्रभात 3 Apr 2026 11:29 am

Anjeer: उन्हाळ्यात अंजीर खावं की टाळावं? तज्ज्ञ सांगतात योग्य पद्धत आणि फायदे

Anjeer उन्हाळ्यात शरीर लवकर डिहायड्रेट होतं आणि पचनसंस्थाही संवेदनशील बनते. त्यामुळे या काळात लोक उष्ण तासीर असलेल्या पदार्थांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात. अंजीराचाही त्यात समावेश होतो. पण तज्ज्ञांच्या मते, योग्य पद्धतीने खाल्ल्यास अंजीर उन्हाळ्यातही फायदेशीर ठरू शकतं.

दैनिक प्रभात 3 Apr 2026 11:24 am

Pakistan: पाकिस्तानात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या किती रुपयांची वाढ?

नवी दिल्ली: पाकिस्तानने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. पेट्रोलच्या दरात ४३ टक्क्यांनी वाढ करण्यात आली असून, त्यामुळे पेट्रोलचा दर प्रति लिटर ४५८.४ रुपये ($१.६४) झाला आहे. पेट्रोलसोबतच डिझेलचा दरही प्रति लिटर ५२०.३५ रुपये ($१.८६) पर्यंत वाढवण्यात आला आहे. पेट्रोलियम मंत्री अली परवेझ मलिक यांनी गुरुवारी ही घोषणा केली आहे. मलिक म्हणाले की, मध्य-पूर्वेत सुरू असलेल्या युद्धामुळे केवळ संपूर्ण प्रदेशातच नव्हे, तर संपूर्ण जगात तेलाचे संकट निर्माण झाले आहे. पाकिस्तानमध्ये पेट्रोलचे नवीन दर आज सकाळपासून लागू झाले आहेत.पेट्रोल आणि डिझेलचे भाव किती झाले?पाकिस्तानने गुरुवारी डिझेल आणि पेट्रोलच्या दरात वाढ केली. एका महिन्यापेक्षा कमी कालावधीत ही दुसरी वेळ आहे. पाकिस्तानमध्ये डिझेलच्या दरात ५४.९ टक्के वाढ होऊन तो ५२०.३५ पाकिस्तानी रुपये ($१.८८) प्रति लिटर झाला आहे, तर पेट्रोलच्या दरात ४२.७ टक्के वाढ होऊन तो ४५८.४० पाकिस्तानी रुपये प्रति लिटर झाला आहे.दुचाकीस्वार आणि शेतकऱ्यांना दिलासामध्य पूर्वेतील सुरू असलेल्या संघर्षानंतर आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतीत झालेल्या तीव्र वाढीमुळे पाकिस्तानात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे. मात्र, पाकिस्तानी सरकार दुचाकी वापरकर्त्यांना तीन महिन्यांच्या कालावधीसाठी प्रति लिटर १०० रुपयांचे अनुदान देणार असून, याची कमाल मर्यादा दरमहा २० लिटर असेल.गेल्या महिन्यातच किमती २० टक्क्यांनी वाढल्या होत्या.गेल्याच महिन्यात पाकिस्तानने डिझेल आणि पेट्रोलच्या दरात जवळपास २० टक्क्यांनी वाढ केली. पाकिस्तान तेल आयातीवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे, जी प्रामुख्याने सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीकडून होर्मुझच्या सामुद्रधुनीमार्गे केली जाते.

फीड फीडबर्नर 3 Apr 2026 11:10 am

मुंबई-गोवा महामार्गावर बस उलटून भीषण अपघात; ३८ प्रवासी जखमी दोघांचा मृत्यू

नागोठणे : शुक्रवारी ( ३ एप्रिल ) मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या एका खासगी बसचा मुंबई गोवा महामार्गावर अपघात झाला. रायगड जिल्ह्यातील नागोठणे जवळील सुकळी खिंडीत शुक्रवारी पहाटे झालेल्या भीषण बस अपघाताने मुंबई गोवा महामार्गवर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. खाजगी ट्रॅव्हल्स बस पलटी झाल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला असून ३८ प्रवासी जखमी झाले आहेत. यापैकी ८ ते ९ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.अपघात इतका गंभीर होता की बस पूर्णपणे उलटून रस्त्याच्या कडेला फेकली गेली. जखमींना तातडीने कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. काही प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्या असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले जात आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, बस सुकळी खिंडीतून जात असताना अचानक चालकाचे नियंत्रण सुटले आणि काही क्षणांतच बस पलटी झाली. अपघातानंतर प्रवाशांचा आक्रोश ऐकून स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. पोलिस आणि आपत्कालीन यंत्रणांनीही तत्काळ घटनास्थळी धाव घेत अडकलेल्या प्रवाशांची सुटका केली.दरम्यान, बसमध्ये तांत्रिक बिघाड होता का, चालकाचा वेग किंवा निष्काळजीपणा कारणीभूत होता का, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत. या अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून प्रशासनाकडून कठोर उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

फीड फीडबर्नर 3 Apr 2026 11:10 am

Malda Violence: मालदा हिंसाचाराच्या ‘मास्टरमाइंड ‘ला अखेर अटक ; AIMIM नेता विमानतळावरून पळून जाण्याच्या होता तयारीत 

Malda Violence: पश्चिम बंगालमधील मालदा जिल्ह्यातील कालिआचक याठिकाणी नुकत्याच झालेल्या हिंसाचार आणि तणावाच्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे.

दैनिक प्रभात 3 Apr 2026 11:09 am

Malda Violence: मालदा हिंसाचाराचा ‘मास्टरमाइंड ‘अखेर अटक ; AIMIM नेता विमानतळावरून पळून जाण्याच्या होता तयारीत 

Malda Violence: पश्चिम बंगालमधील मालदा जिल्ह्यातील कालिआचक याठिकाणी नुकत्याच झालेल्या हिंसाचार आणि तणावाच्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे.

दैनिक प्रभात 3 Apr 2026 11:09 am

Satish Khokya Bhosale : ‘त्या’प्रकरणात पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता; एका वर्षानंतर तुरुंगाबाहेर येताच खोक्या उर्फ सतीश भोसले म्हणाला…

Satish Khokya Bhosale : सतीश उर्फ खोक्या भोसले याला मोठा दिलासा मिळाला आहे. त्याची एका मारहाण प्रकरणातून न्यायालयाने पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली आहे.

दैनिक प्रभात 3 Apr 2026 10:54 am

US military reshuffle: ट्रम्प यांनी स्वतःच्याच सैन्यावर केला ‘सर्जिकल स्ट्राइक’ ; इराण युद्धातील आणखी एक नवीन अध्याय

US military reshuffle: इराणच्या सैन्यानंतर, ट्रम्प प्रशासनाने आता आपल्याच सैन्यावर निशाणा साधला आहे.

दैनिक प्रभात 3 Apr 2026 10:44 am

Raw Onion: सावधान! कच्चा कांदा खाणं सगळ्यांसाठी फायदेशीर नाही; या ‘५’परिस्थितींमध्ये होऊ शकतो त्रास

Raw Onion कच्चा कांदा आरोग्यासाठी फायदेशीर असला तरी तो सर्वांसाठी योग्य नाही. आपल्या शरीराच्या स्थितीनुसार आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच त्याचे सेवन करणे अधिक सुरक्षित ठरते.

दैनिक प्रभात 3 Apr 2026 10:36 am

अमेरिकेने आपल्या लष्कर प्रमुखांना पदावरून हटवले

इराण युद्धादरम्यान सैन्य नेतृत्त्वात परिवर्तनाचा निर्णयवॉशिंग्टन : पश्चिम आशियात इराण विरुद्ध इस्त्रायल आणि अमेरिकेचा संघर्ष सुरू असतानाच अमेरिकेतून मोठी बातमी आली आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी सैन्य नेतृत्त्वात परिवर्तनाचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेचे सैन्य प्रमुख जनरल रँडी जॉर्ज यांना तातडीने पद सोडण्याचे आदेश दिले आहेत. अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनी लष्कर प्रमुखांना सेवानिवृत्ती घेण्याचे आदेश दिले आहेत.यासंदर्भातील माहितीनुसार जनरल रँडी जॉर्ज यांनी अद्याप अधिकृतपणे राजीनामा दिलेला नसला तरी संरक्षण मंत्रालयाच्या आदेशानंतर ते लवकरच निवृत्ती जाहीर करतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, अमेरिकेने इराणविरुद्ध संभाव्य जमिनीवरील लष्करी कारवाईची तयारी सुरू केली असून मध्यपूर्वेत मोठ्या प्रमाणावर सैन्य तैनात करण्यात आले आहे. जनरल रँडी जॉर्ज हे वेस्ट पॉईंट मिलिटरी अकादमीचे पदवीधर असून त्यांनी आखाती युद्ध, इराक आणि अफगाणिस्तानमधील मोहिमांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. जो बाईडेन यांच्या कार्यकाळात 2023 मध्ये त्यांची लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती झाली होती. त्यांचा कार्यकाळ 2027 पर्यंत असतानाही त्यांना मुदतीपूर्वी पद सोडावे लागत आहे. जनरल जॉर्ज यांच्या हकालपट्टीमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार, ट्रम्प प्रशासनाच्या लष्करी धोरणांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत त्यांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. तसेच, प्रशासनाला अशा नेतृत्वाची गरज असल्याचे सांगितले जात आहे जे राष्ट्राध्यक्षांच्या धोरणांशी पूर्णपणे सुसंगत असेल. ट्रम्प प्रशासन आणि जनरल जॉर्ज यांच्यात धोरणात्मक मतभेद असल्याच्या चर्चाही रंगत आहेत. दरम्यान, इराणशी सुरू असलेला संघर्ष आणि त्यानुषंगाने वाढत्या तणावामुळे पश्चिम आशिया आणइ मध्यपूर्वेतील परिस्थिती अधिकच गंभीर बनत असून जागतिक समुदायाचे लक्ष या घडामोडींवर केंद्रित झाले आहे.

फीड फीडबर्नर 3 Apr 2026 10:30 am

Jaya Prada: जया प्रदा यांचा वादग्रस्त प्रवास: तीन मुलांच्या वडिलांशी लग्न, तरीही यशाची उंच भरारी

Jaya Prada जया प्रदा यांचं खरं नाव ललिता राणी होतं. त्यांच्या वडिलांचा चित्रपट क्षेत्राशी संबंध होता. लहानपणापासूनच त्यांना डॉक्टर होण्याचं स्वप्न होतं. मात्र त्यांच्या आईने त्यांना नृत्य आणि संगीताचं प्रशिक्षण दिलं आणि त्यातूनच त्यांचा कल चित्रपटसृष्टीकडे वळला.

दैनिक प्रभात 3 Apr 2026 10:13 am

Baramati and Rahuri By Election : काँग्रेसचा निर्धार! बारामती आणि राहुरीत उमेदवार देणार; हालचालींना वेग, लवकरच नावांची घोषणा होणार

Baramati and Rahuri By Election : बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस उमेदवार देणार असल्याचे सांगितले जात आहे.

दैनिक प्रभात 3 Apr 2026 9:38 am

Seven Hills Hospital: सेव्हन हिल्स रुग्णालयाचे खासगीकरण?; रुग्णालय पूर्णपणे महापालिकेच्या ताब्यात घेण्याची काँग्रेसची मागणी

मुंबई: मुंबई महापालिकेच्यावतीने सध्या चालवण्यात येणारे सेव्हन हिल्स रुग्णालय हे आता खासगी संस्थेच्या ताब्यात देण्याचा घाट असून या रुग्णालयाचे खासगीकरण करण्यात येवू नये. त्यामुळे यासाठी मुंबईकरांना चांगल्याप्रकारची आणि दर्जेदार आरोग्यसेवा मिळण्यासाठी महापालिकेच्या ताब्यात घेवून त्याचा विकास एम्सच्या धर्तीवर करण्यात यावा अशी मागणी स्थायी समितीत करण्यात आला आहे.स्थायी समितीच्या बैठकीत काँग्रेस नगरसेवक अश्रफ आझमी यांनी हरकतीच्या मुद्दयाद्वारे या प्रश्नाला वाचा फोडत हे रुग्णालय खासगी संस्थेच्या ताब्यात देण्याचा डाव प्रशासनाचा असल्याचा आरोप केला.अंधेरीतील सेव्हन हिल्स रुग्णलयाची सरकारी मूल्यानुसार ५ हजार कोटी तर बाजार भावानुसार ७ हजार कोटी रुपये किंमत आहे. एनसीएलटी प्रक्रियेअंतर्गत झालेल्या समझोत्यानंतर, रिलायन्सचे मुकेश अंबानी यांच्याशी संबंधित असलेल्या खाजगी कॉर्पोरेट संस्थेकडे सोपवले जाऊ शकते. “जर खाजगी अधिग्रहणासाठी ४७६ कोटी रुपये उभे केले जाऊ शकतात, तर महानगरपालिका सार्वजनिक आरोग्यसेवेसाठी हे रुग्णालय ताब्यात घेण्यासाठी तीच रक्कम का वापरू शकत नाही?” “जेव्हा मुंबईकर रुग्णालयातील खाटांच्या कमतरतेमुळे त्रस्त आहेत, तेव्हा कॉर्पोरेट कंपन्यांच्या फायद्यासाठी सार्वजनिक पैशाचा वापर करु नये.”हे रुग्णालय सार्वजनिक जमिनीवर उभे आहे, १५०० खाटा, ३६ ऑपरेशन थिएटर्स, १२० बाह्यरुग्ण विभाग आहेत आणि तरीही, गरीब जनतेची सेवा करण्याऐवजी, ते खाजगी नियंत्रणाखाली उभे केले जात आहे. सेव्हन हिल्सच्या हस्तांतरणाची घाई का केली जात आहे. महानगरपालिका मुंबईकरांसाठी काम करत आहे की कॉर्पोरेट कंपन्यांसाठी? मुंबईत एका अद्ययावत रुग्णालयाची गरज आहे, मुंबईतील सरकारी व बीएमसीची रुग्णालयाची अवस्था अत्यंत बिकट आहे, रुग्णांच्या नातेवाईकांना खाटांसाठी धावपळ कराली लागते अशावेळी एक अद्ययावत जागतिक दर्जाचे रुग्णालय खाजगी लोकांच्या घशात का घातले जात आहे असा आरोप अशरफ आझमी यांनी केला आहे.सेव्हनहिल्स रुग्णालय उद्योगपतीच्या घशात घालण्याचे षडयंत्र दिसत असून कोणत्याही परिस्थितीत या रुग्णालयाचे खाजगीकरण करू नये. मुंबईकरांना चांगल्या व दर्जेदार आरोग्यसेवा मिळण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने हे रुग्णालय ताब्यात घेऊन चालवावे, आणि वैद्यकीय, नर्सिंग आणि संशोधन सुविधांसह त्याचा एम्स पातळीवर याचा विकास करावा, अशी मागणी काँग्रेसचे गटनेते अशरफ आझमी यांनी केली आहे. त्यामुळे याची संपूर्ण माहिती देण्यात यावी असे निर्देश देत हा हरकतीचा मुद्दा राखून ठेवला.

फीड फीडबर्नर 3 Apr 2026 9:30 am

Top 10 News: सुनेत्रा पवार-प्रफुल्ल पटेल यांची महत्वाची बैठक, पुण्यात विक्रमी पावसाची नोंद आणि बहुप्रतीक्षित रामायणचा टिझर प्रदर्शित, वाचा अशा टॉप १० बातम्या

Top 10 News: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सध्या मोठ्या घडामोडी घडताना दिसून येतायेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्यात दिल्लीत एक बैठक झालीय.

दैनिक प्रभात 3 Apr 2026 9:15 am

Summer Special Train: उन्हाळ्यात घरी परतणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मुंबई-पुणे दरम्यान २१०० हून अधिक विशेष गाड्या धावणार

मुंबई: उन्हाळ्याच्या सुट्ट्यांसाठी घरी परतण्याची योजना आखणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. मध्य रेल्वेने जाहीर केले आहे की, यावर्षी होणाऱ्या प्रचंड गर्दीचा अंदाज घेऊन मुंबई आणि पुणे येथून २,१०० हून अधिक उन्हाळी विशेष गाड्या चालवल्या जातील. यामुळे लाखो प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळवणे सोपे होईल आणि प्रतीक्षेचा त्रास लक्षणीयरीत्या कमी होईल.किती गाड्या धावतील आणि त्यात विशेष काय आहे?रेल्वेच्या माहितीनुसार, २,१०० हून अधिक विशेष गाड्यांपैकी ७३५ अनारक्षित, तर ६२४ आरक्षित असतील. या गाड्या विशेषतः उन्हाळ्यात घरी परतणाऱ्या किंवा सुट्टीवर जाणाऱ्या प्रवाशांसाठी आहेत.महाराष्ट्रांतर्गत कोणत्या मार्गांवर रेल्वे उपलब्ध असतील?राज्यांतर्गत प्रवास करणाऱ्या लोकांसाठीही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. या विशेष गाड्या मुंबई/दौंड - सोलापूर, पुणे - कोल्हापूर, नाशिक रोड - बडनेरा आणि हडपसर - हरंगुल या मार्गांवर धावतील. दरवर्षी या मार्गांवर प्रचंड गर्दी असते, त्यामुळे यंदा अतिरिक्त गाड्या चालवण्यात येत आहेत.महाराष्ट्राबाहेर जाणाऱ्यांनाही दिलासाजर तुम्ही इतर राज्यांमध्ये प्रवास करण्याची योजना आखत असाल, तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. मुंबई-बलिया, मुंबई-गोरखपूर, दौंड-कलबुर्गी आणि सोलापूर-कलबुर्गी/अनाकापल्ले या मार्गांवरही विशेष गाड्या धावणार आहेत. यामुळे उत्तर प्रदेश, बिहार आणि दक्षिण भारतात प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी सोय होईल.'मागणीनुसार प्रशिक्षण' देण्याचा फायदाहीरेल्वेने सांगितले की, या विशेष गाड्यांमध्ये सध्याच्या 'ट्रेन ऑन डिमांड' सेवेचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, प्रचंड गर्दीला प्रतिसाद म्हणून, प्रवाशांना त्यांच्या प्रवासात कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी अतिरिक्त नवीन गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत.बिग डेटा आणि रेल्वेची तयारीभारतीय रेल्वेने गेल्या आर्थिक वर्षात (२०२५-२६) विक्रमी ७६,३५२ विशेष गाड्या चालवल्या. देशभरात दररोज सुमारे २५,००० गाड्या धावत आहेत. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या मते, रेल्वे प्रवाशांची सोय आणि सुरक्षितता सुधारण्यासाठी सातत्याने कार्यरत आहे.प्रवाशांना काय फायदा होईल?कन्फर्म तिकीट मिळण्याची शक्यता वाढेल.गर्दी आणि दीर्घ प्रतीक्षा वेळेपासून दिलासा मिळेल.लांब पल्ल्याचा प्रवास सोपा होईलतुमच्या सुट्ट्यांचे नियोजन करणे सोपे होईल

फीड फीडबर्नर 3 Apr 2026 9:10 am

Mumbai: राजावाडी रुग्णालयाच्या होणारा विलंब खपवून घेणार नाही; महापौरांनी भरला अधिकाऱ्यांना दम

मुंबई: घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयावर रुग्णसेवेचा भार अधिक आहे. अशा स्थितीत रुग्णालयाच्या पुनर्विकासाचे काम रखडणे हे कोणत्याही स्थितीत परवडणारे नाही. पुनर्विकास टप्पा एक मधील इमारत उभारणीचे काम पुढील आठवड्यात कोणत्याही परिस्थितीत सुरू करावे, प्रलंबित असलेल्या परवानगी युद्ध पातळीवर प्रयत्न करून प्राप्त कराव्यात, असे निर्देश मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी दिले आहेत. आवश्यक सर्व परवानगी प्राप्त करणे हे कंत्राटदाराचे काम असून त्यासाठी प्रत्यक्ष कामास विलंब होणे खपवून घेणार नाही, अशी सक्त सूचना करत महापौरांनी अधिकाऱ्यांना दम भरला.घाटकोपर (पूर्व) येथील सेठ व्ही.सी. गांधी आणि एम. ए. व्होरा महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय अर्थात राजावाडी रुग्णालयाचा पुनर्विकास करण्यात येत आहे. याअंतर्गत पहिल्या टप्प्यामध्ये सुमारे ६०० रुग्णशय्या क्षमता असलेली इमारत बांधण्याचे प्रस्तावित आहे. त्यासंदर्भात महापौर श्रीमती रितू तावडे यांनी प्रत्यक्ष प्रकल्पस्थळी जाऊन गुुरुवारी २ एप्रिल २०२६ रोजी पाहणी केली. नगरसेवक धर्मेश गिरी, राजावाडी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. भारती राजूलवाला, रुग्णालये पायाभूत सुविधा कक्षाचे उपप्रमुख अभियंता मनोज राणे, एन विभागाचे सहायक आयुक्त (अतिरिक्त कार्यभार) मारुती पवार यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.प्रारंभी माहिती देताना उपप्रमुख अभियंता राणे म्हणाले की, राजावाडी रुग्णालय पुनर्विकास टप्पा एक अंतर्गत उभारण्यात येणारी इमारत ही निम्न तळघर, तळघर, तळमजला अधिक १० मजले या स्वरूपाची राहणार आहे. ६०० रुग्णशय्या क्षमतेच्या या इमारतीमध्ये सर्व अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध असतील. यासाठी सुमारे ३३ हजार १७९ चौरस मीटर इतके बांधकाम क्षेत्रफळ राहणार आहे. डिसेंबर २०२५ मध्ये टप्पा एक इमारतीचे भूमिपूजन झाले आहे. गौण खनिज आणि राडारोडा संदर्भातील परवानगी प्राप्त होताच तत्काळ इमारत उभारणीचे काम सुरू केले जाणार आहे, असे त्यांनी सांगितले. पहिल्या टप्प्यातील इमारत पूर्ण झाल्यानंतर त्यामध्ये संपूर्ण रुग्णालय स्थलांतरित केले जाईल आणि पुढील टप्प्यात दुसरी इमारत उभी केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.भूमिपूजन होऊन चार महिने लोटल्यानंतरही प्रत्यक्ष इमारत उभारणी कार्यवाही सुरू न झाल्याबद्दल महापौर श्रीमती रितू तावडे यांनी नापसंती व्यक्त केली. प्रशासनाला जिथे जिथे अडचणी वाटत असतील, त्या बाबी वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिल्या पाहिजेत. तसेच लोकप्रतिनिधींचे सहकार्य घेतल्यास अशा अडचणी मार्गी लागू शकतात. आवश्यक सर्व परवानगी प्राप्त करणे हे कंत्राटदाराचे काम असून त्यासाठी प्रत्यक्ष कामास विलंब होणे खपवून घेणार नाही, अशी सक्त सूचना महापौरांनी केली.पुढील आठवड्यात इमारत उभारणीचे काम सुरू करावे. इमारत उभारणीचे काम सुरू असताना शेजारी रुग्णालयामध्ये रुग्णांना बांधकामाचा आवाज, धूळ आदींचा त्रास होऊ नये यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात. कामाच्या प्रत्येक टप्प्यात घाटकोपर परिसरातील सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊन सातत्याने माहिती द्यावी. रुग्णालय पुनर्विकास संदर्भात महानगरपालिका मुख्यालयात संयुक्त सभेमध्ये सविस्तर सादरीकरण करावे, असे निर्देशही महापौर तावडे यांनी दिले.

फीड फीडबर्नर 3 Apr 2026 9:10 am

Weather alert : तो आजही बरसणार..! हवामान विभागाकडून अलर्ट जारी; ‘या’जिल्ह्यांत गारपीठ आणि वादळी पावसाचा इशारा

Weather alert : गेल्या दोन दिवसांपासून पुण्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. या पावसाने पुणेकरांची चांगलीच दैणा केली आहे. आजही पुण्यासह राज्यातील विविध जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.

दैनिक प्रभात 3 Apr 2026 9:04 am

Rashmika Mandanna: रश्मिका मंदानाचा स्टायलिश एअरपोर्ट लुक व्हायरल; चाहत्यांचा प्रश्न…‘विजय देवरकोंडा कुठे आहे?’

Rashmika Mandanna या व्हिडिओमध्ये रश्मिका एकटीच एअरपोर्टवर दिसते. तिने हलक्या पिवळ्या रंगाचा क्रॉप टॉप परिधान केला होता, जो तिच्या लुकला फ्रेश आणि ब्राइट टच देत होता. यासोबत तिने निळ्या रंगाची हाय-वेस्ट वाइड-लेग जीन्स घातली होती.

दैनिक प्रभात 3 Apr 2026 8:38 am

Rain Alert: दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारतात पाऊस आणि गारपिटीची शक्यता

नवी दिल्ली: दिल्ली एनसीआरमध्ये शुक्रवारी सकाळी जोरदार वाऱ्यांमुळे हवामान बदलले. हवामान विभागाने संपूर्ण उत्तर भारतात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) म्हटले आहे की, आज उत्तर मध्य भारतात पावसासोबत गारपिटीची शक्यता आहे. आयएमडीने जम्मू आणि काश्मीर, दिल्ली एनसीआर, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पंजाबसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. येत्या काही दिवसांत उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातही पावसाची शक्यता आहे.भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, सध्याची पश्चिमी प्रणाली आणि पुढील प्रणाली ५ एप्रिलपर्यंत वायव्य भारतात पाऊस आणू शकतात. यानंतर, आणखी एका पश्चिमी प्रणालीमुळे पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, जम्मू आणि काश्मीरमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे.तापमान सामान्यपेक्षा कमी राहण्याची शक्यताअरुणाचल प्रदेशात ५ आणि ६ तारखेला पाऊस पडण्याची शक्यता आहे. पंजाब आणि डोंगराळ राज्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडू शकतो. पुढील दोन आठवड्यांत तीन पश्चिमी वाऱ्यांच्या प्रभावामुळे हवामानावर परिणाम होऊ शकतो. एका वाऱ्यांचा प्रभाव सध्या आहे, दुसरा ७ तारखेपासून सक्रिय होईल आणि त्यानंतर तिसऱ्या वाऱ्यांचा प्रभाव येईल. सुरू असलेल्या पावसामुळे देशाच्या बहुतांश भागांमध्ये तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. परिणामी, कुठेही उष्णतेची लाट येण्याची शक्यता नाही.राजस्थानमध्ये अनेक ठिकाणी हलका पाऊसपश्चिमी वाऱ्यांच्या प्रभावामुळे गेल्या २४ तासात राजस्थानच्या अनेक भागांमध्ये हलका पाऊस झाला. हवामान केंद्रानुसार, देवगड (राजसमंद) येथे सर्वाधिक १२ मिमी पावसाची नोंद झाली. याच काळात चित्तोरगडमध्ये सर्वाधिक कमाल तापमान (३८.६ अंश सेल्सिअस) आणि अलवरमध्ये सर्वात कमी किमान तापमान (१८.२ अंश सेल्सिअस) नोंदवले गेले. हवामान केंद्रानुसार, २ एप्रिल रोजी जैसलमेर, बारमेर, फलोदी आणि बिकानेर विभागांतील जिल्हे आणि आसपासच्या परिसरात पश्चिमी वाऱ्यांमुळे मेघगर्जना आणि पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने असेही म्हटले आहे की, ३ आणि ४ एप्रिल रोजी आणखी एका पश्चिमी वाऱ्यांचा प्रभाव राहील. यामुळे जोधपूर, बिकानेर, अजमेर, जयपूर, भरतपूर आणि कोटा विभागांच्या काही भागांमध्ये मेघगर्जना आणि पावसाची शक्यता आहे. या काळात काही ठिकाणी गारपिटीचीही शक्यता आहे. त्याचप्रमाणे, ७ आणि ८ एप्रिल रोजी राज्याच्या काही भागांमध्ये आणखी एक पश्चिमी प्रणाली सक्रिय राहील.झारखंडमध्ये ४ एप्रिलपासून वादळ आणि पावसाची शक्यता४ एप्रिलपासून झारखंडच्या १४ जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्यांचा तडाखा बसेल. हवामान विभागाने सांगितले की, ४ आणि ५ एप्रिल रोजी काही जिल्ह्यांमध्ये गारपिटीचीही शक्यता आहे. विभागाने म्हटले आहे की, ४ आणि ५ एप्रिल रोजी झारखंडच्या वायव्य आणि मध्य भागात मेघगर्जना, वीज, गारपिटीसह ताशी ५० किमी वेगापर्यंत सोसाट्याच्या वाऱ्यांची शक्यता आहे. सतर्कतेचा इशारा देताना विभागाने सांगितले की, गरवा, पलामू, चत्रा, लातेहार, लोहरदगा, हजारीबाग, कोडरमा, रामगड, रांची, खुंटी, गिरीडीह, धनबाद, बोकारो आणि गुमला या जिल्ह्यांना वादळाचा फटका बसण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने इशारा दिला आहे की, सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे उभ्या पिकांचे नुकसान होऊ शकते.

फीड फीडबर्नर 3 Apr 2026 8:30 am

Accident on Mumbai-Goa highway : मुंंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात! खाजगी बस उलटली; दोन प्रवाशांचा जागीच अंत, 38 जखमी

Accident on Mumbai-Goa highway : मुंबई- गोवा महामार्गावर खाजगी बस उलटून भीषण अपघाताची घटना घडली आहे.

दैनिक प्रभात 3 Apr 2026 8:28 am

घरे-मदरसे पाडले, हिमंतांवर नाराज मुस्लिम म्हणाले- अत्याचार लक्षात ठेवू:प्रभाव 35 वरून 23 जागांवर आला, मियां फॅक्टर भाजपचा खेळ बिघडवणार का?

धुबरीच्या संतोषपूरमध्ये राहणारे अफसर अली कपड्याचे दुकान चालवतात. कुटुंबात पत्नी आणि दोन मुले आहेत. अफसर यांचे 5 बाय 6 चे दुकान 8 महिन्यांपासून त्यांचे घरही आहे. 8 जुलै, 2025 रोजी अफसर व्यतिरिक्त आणखी 1400 घरे पाडण्यात आली. सुमारे 12 हजार लोक बेघर झाले. बांगलादेश सीमेला लागून असलेल्या आसामच्या धुबरी जिल्ह्यात सुमारे 75% मुस्लिम आहेत. अफसर अली मिया मुस्लिम समुदायाचे आहेत, ज्यांना त्रास देण्याबद्दल आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी अनेकदा सांगितले आहे. अफसर हिमंता यांच्यावर मुस्लिमविरोधी असल्याचा आरोप करतात. ते म्हणतात की माझे घर मुस्लिम असल्यामुळे पाडण्यात आले. आणि असे म्हणणारे ते एकटे नाहीत. काँग्रेस आणि AIUDF मध्ये मुस्लिम मतांचे विभाजन झाले नाही, तर भाजपला अडचणआसाममधील 126 विधानसभा जागांवर 9 एप्रिल रोजी मतदान आहे. बुलडोझर, मिया मुस्लिम आणि बांगलादेशी घुसखोर यांसारखे शब्द चर्चेत आहेत. 2016 मध्ये पहिल्यांदा भाजप सरकार आल्यापासून 17,600 घरांवर बुलडोझर चालवण्यात आला. यापैकी बहुतेक मुस्लिम होते. मुस्लिम लोकसंख्या असलेल्या लखीमपूरमध्ये ५००, दरांगच्या ढालपूरमध्ये ८००, धुबरीच्या संतोषपूरमध्ये १४०० आणि नगावच्या बटाद्रवामध्ये १,००० हून अधिक कुटुंबे बेघर झाली. मदरसे बंद करण्यात आले. बालविवाह कायद्यांतर्गत मुस्लिमांना अटक करण्यात आली. पुनर्रचनेनंतर मुस्लिम बहुल जागाही ३५ वरून २३ पर्यंत कमी झाल्या. २०११ च्या जनगणनेनुसार, राज्यात ३५% मुस्लिम लोकसंख्या आहे. निवडणुकांमध्ये त्यांची भूमिका बऱ्याच गोष्टी ठरवते. मुस्लिमांची मते काँग्रेस आणि बदरुद्दीन अजमल यांच्या AIUDF मध्ये विभागली जातात. यावेळीही असेच झाले तर भाजपला फायदा होईल. मुस्लिमांनी काँग्रेसला एकतर्फी मतदान केले, तर भाजपला अडचणी येतील. हे गणित समजून घेण्यासाठी दैनिक भास्कर गुवाहाटीपासून २५० किमी दूर असलेल्या धुबरीला पोहोचले. 12 लाख मतांचा धुबरी बदरुद्दीनचा गड, आसामी गमछा ओळख आसाममधील मुस्लिमांमध्ये टोपीपेक्षा आसामी गमछ्याचा वापर जास्त आहे. राज्य लोअर, सेंट्रल आणि अपर आसाम अशा तीन भागांमध्ये विभागले आहे. धुबरी लोअर आसाममध्ये आहे. जिल्ह्यात मिया, म्हणजे बंगाली भाषिक मुस्लिम सर्वाधिक आहेत. जिल्ह्यातील 5 विधानसभा जागांवर 12.2 लाख मतदार आहेत. धुबरीच्या सीमेत प्रवेश करताच जागोजागी मशिदी आणि मदरसे दिसू लागतात. हा आसाममधील तिसऱ्या मोठ्या पक्ष ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट, म्हणजेच AUIDF चा गड आहे. पक्षाचे प्रमुख बदरुद्दीन अजमल हे येथील सर्वात मोठे नेते मानले जातात. त्यांच्या सभेत आलेले लोक आरोप करतात की हिमंता मुस्लिमांना त्रास देत आहेत. त्यांनी याच वर्षी जानेवारीमध्ये म्हटले होते की, मिया मुस्लिमांना कोणत्याही प्रकारे त्रास द्या, यामुळे ते आसाम सोडून जातील. धुबरीमध्ये जुलै, 2025 मध्ये सर्वात मोठी बुलडोझर कारवाई झाली होती. सरकारनुसार, येथे आसाम पॉवर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड आणि अदानी ग्रुपच्या थर्मल पॉवर प्लांटसाठी जमीन मोकळी करण्यात आली आहे. येथे अजूनही बाहेरील व्यक्तींच्या प्रवेशावर बंदी आहे. ही जागा लोखंडी गेट लावून बंद करण्यात आली आहे. दोन पोलीस कर्मचारीही तैनात आहेत. आम्ही गाववाल्यांचे नातेवाईक बनून आत प्रवेश केला. काही लोक तुटलेल्या घरांच्या ढिगाऱ्यातून विटा वेचत होते. बेघर झालेले लोक दुसऱ्या ठिकाणी राहत आहेत, पण मुले आजही मैदानात खेळायला येतात. आम्ही या कुटुंबांशी बोललो. अफसर अलीची पहिली गोष्ट‘70 वर्षांपूर्वीचे घर उद्ध्वस्त केले, हा अन्याय लक्षात ठेवू’37 वर्षीय अफसर अली दावा करतात की त्यांचे कुटुंब 70 वर्षांपासून येथे राहत होते. वडील इथेच जन्माला आले. इथेच मतदार आहेत, पण आता बेघर आहेत. मुख्यमंत्री हिमंता यांच्यावर नाराजी व्यक्त करत अफसर म्हणतात, ‘या सरकारला मुस्लिमांना बघायचेच नाही. निवडणुकीत लोक हे अन्याय लक्षात ठेवतील.’ ‘आमच्या परिसरात बुलडोझर चालवला, पण शेजारच्या हिंदू वस्तीतील घरे पाडली नाहीत. घर तुटण्याचा सर्वाधिक परिणाम मुलांवर झाला आहे. 6 वर्षांचा मुलगा इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकत होता. त्याचे शिक्षण सुटले आहे.’ सुनाउद्दीनची दुसरी गोष्ट‘आमच्या पिढ्या भारतात गेल्या, आता आम्हाला पाकिस्तानी-बांग्लादेशी ठरवले’फळांचे दुकान चालवणारे सुनाउद्दीन घर तुटल्यानंतर भाड्याच्या घरात राहतात. प्रशासनाने धमकावून जमीन खाली करून घेतली आणि नुकसानभरपाईही दिली नाही, असा त्यांचा आरोप आहे. सुनाउद्दीन म्हणतात, ‘आम्ही सर्व कागदपत्रे दाखवली. 1991 चा NRC (नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीजन), मतदार ओळखपत्र, आधार आणि रेशन कार्ड दाखवले, पण त्यांनी एकही ऐकले नाही. आम्हाला पाकिस्तानी आणि बांगलादेशी म्हटले. आमच्या पिढ्या इथेच गेल्या आहेत, तरीही आम्हाला बांगलादेशी म्हणतात. निवडणुकीत आम्ही त्याच पक्षासोबत उभे राहू, जो आम्हाला मदत करेल.’ अब्दुल रशीद शेख यांची तिसरी गोष्ट‘50 हजार रुपये नुकसानभरपाई मिळाली, नदीच्या मध्यभागी बेटावर घर’सरकारने पट्टा, म्हणजेच मालकी हक्काची कागदपत्रे दाखवणाऱ्या काही लोकांना 50 हजार रुपये नुकसानभरपाई आणि ब्रह्मपुत्रा नदीजवळ घर देण्याचे वचन दिले आहे. 35 वर्षांच्या अब्दुल रशीद शेख यांचे घर चिराकुटा गावात होते. ते आरोप करतात की, ‘सरकार आम्हाला बांगलादेशी आणि घुसखोर म्हणते, मग नुकसानभरपाई देखील देते. राहण्यासाठी नदीच्या मध्यभागी जागा देत आहे, जिथे माणूस जाऊच शकत नाही.’ आझादची चौथी कथा17 वर्षांच्या मुलीचे लग्न लावले, 14 वर्षांनंतर गुन्हा दाखलआसाममध्ये 3 फेब्रुवारी 2023 रोजी पोलिसांनी बालविवाह कायदा लागू करण्यासाठी मोहीम सुरू केली. पहिल्या दोन दिवसांत 2 हजारांहून अधिक लोकांना अटक करण्यात आली. पोलिसांनी जाणूनबुजून धुबरी, बारपेटा आणि दक्षिण सालमारा यांसारख्या मुस्लिमबहुल जिल्ह्यांमध्ये कारवाई केल्याचा आरोप करण्यात आला. डिसेंबर 2024 पर्यंत अटकेचा आकडा 5 हजार झाला होता. मुख्यमंत्री हिमंता यांनीही मान्य केले की अटक केलेल्या लोकांमध्ये 55% मुस्लिम समाजाचे आहेत. यामध्ये 60 वर्षांचे आझाद यांचाही समावेश आहे. त्यांना डिसेंबर 2025 मध्ये मुलाचा बालविवाह केल्याच्या आरोपाखाली तुरुंगात पाठवण्यात आले. सध्या ते जामिनावर आहेत. पाचवी गोष्ट मदरसा शिक्षक अन्वर हुसेन यांची‘200 मुली शिकायला येत होत्या, सरकारने मदरसाच पाडला’आसाम सरकारने 1 एप्रिल 2021 पासून सरकारी मदरशांना शाळांमध्ये रूपांतरित करण्यास सुरुवात केली. सरकारी पैशातून धार्मिक शिक्षण देऊ शकत नाही, असा युक्तिवाद केला. मदरशांवर बुलडोझरही चालवण्यात आला. धुबरीचे मौलाना अन्वर हुसेन 2000 सालापासून मुलांना शिकवत आहेत. जुलै 2025 मध्ये त्यांचा मदरसा पाडण्यात आला. प्रशासनाचा दावा होता की तो सरकारी जमिनीवर होता. बांगलादेश सीमेवर फक्त काँग्रेस-AIUDF चे झेंडे, भाजप गायब बांगलादेश सीमेचा सुमारे 134 किमी लांब भाग धुबरीला लागून आहे. सर्वात महत्त्वाचा 61 किलोमीटरचा परिसर आहे, जिथे नदीची सीमा आहे. ब्रह्मपुत्रा नदी धुबरीतूनच बांगलादेशात जाते. येथे अनेक प्रवाह आणि वाळूचे बेट तयार झाले आहेत. दलदली जमीन आणि नदीच्या परिसरात कुंपण घालणे शक्य नाही, म्हणून BSF येथे लेझर, सेन्सर आणि इलेक्ट्रॉनिक पाळत ठेवून लक्ष ठेवते. आम्ही बांगलादेश सीमेला लागून असलेल्या शेवटच्या घेवमारी गावात पोहोचलो. या परिसरात AIUDF चे वर्चस्व आहे. जवळपास प्रत्येक गल्लीत AIUDF आणि काँग्रेसचे झेंडे आहेत. भाजपचे झेंडे कमी आहेत. गावात सर्वात जास्त लोकसंख्या मियां मुस्लिमांची आहे. कच्च्या रस्त्यामुळेही गाड्या सीमेच्या जवळपर्यंत जातात. सीमेपासून सुमारे 600 मीटर दूर रस्ता संपतो आणि शेतं सुरू होतात. शेतांच्या जवळच ब्रह्मपुत्रा नदी वाहते. येथे नदी आणि जमीन अशा दोन्ही प्रकारच्या सीमा आहेत. सीमेच्या जवळ जाताना बीएसएफ जवानाने आम्हाला थांबवले. तो म्हणाला की येथे व्हिडिओ बनवू शकत नाही. सीमेवर राहणारे म्हणाले - मुख्यमंत्र्यांच्या बोलण्याने आम्ही बांगलादेशी होत नाहीआम्ही सीमेवर राहणाऱ्या लोकांशी बोललो. धुबरीचे वकील तौफिक हुसेन आम्हाला सीमेपर्यंत घेऊन गेले होते. ते आरोप करतात की मुख्यमंत्री हिमंता लोकांचे ब्रेनवॉश करत आहेत. वास्तविक पाहता, सीमेवर कडक सुरक्षा आहे. नदीच्या मार्गानेही घुसखोरी शक्य नाही. येथे भेटलेले २६ वर्षांचे रफीकुल इस्लाम गवंडी आहेत. ते म्हणतात की मुख्यमंत्री आम्हाला 'मियां' किंवा 'बांगलादेशी' म्हणतात, तेव्हा खूप वाईट वाटते. त्यांच्या बोलण्याने आम्ही बांगलादेशी होणार नाही. आमच्याकडे कागदपत्रे आहेत. 23 वर्षीय सफिर आलम म्हणतात की, मुख्यमंत्री धर्माच्या नावावर व्होट बँकेचे राजकारण करत आहेत. यावेळी भाजप नक्कीच हरणार. सीमांकनाद्वारे मुस्लिम प्रभाव असलेल्या जागा कमी केल्याचा आरोपनिवडणूक आयोगाने 2023 मध्ये सीमांकन केले होते. याचा परिणाम मुस्लिम बहुल जागांवर जास्त झाला आहे. आधी 126 विधानसभा जागांपैकी सुमारे 35 जागा मुस्लिम बहुल होत्या. आता त्या 23 राहिल्या आहेत. ॲडव्होकेट तौफिक हुसेन यांच्या मते, मतदारसंघांच्या पुनर्रचनेत दोन पद्धती वापरण्यात आल्या. मुस्लिम लोकसंख्या असलेल्या मोठ्या भागाला दोन ते तीन जागांमध्ये विभागले. यामुळे मुस्लिम मतांचे विभाजन झाले. दुसऱ्या पद्धतीत, वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेल्या मुस्लिम लोकसंख्येला एकत्र करून एका जागेत समाविष्ट केले. पूर्वी मुस्लिम मतदार तीन जागांवर प्रभाव टाकत होते, आता ते एका जागेवर मोठ्या फरकाने जिंकतील, परंतु उर्वरित दोन जागांवरील नियंत्रण संपले. धुबरी जिल्ह्यात पुनर्रचनेचा सर्वाधिक परिणाम पुनर्रचनेमुळे धुबरी जिल्ह्यात 5 विधानसभा जागाच राहिल्या, पण सीमा बदलल्या. बिलासीपारा पूर्व आणि पश्चिम जागा रद्द करून बिरसिंग जरुआ ही जागा तयार करण्यात आली. असा आरोप आहे की धुबरीतील भागांची अशा प्रकारे विभागणी केली की AIUDF चे अल्पसंख्याक मत विखुरले जावे. हिमंता यांनी पुनर्रचनेला ऐतिहासिक विजय म्हटले आहे. ते म्हणाले की आसामला वाचवण्यासाठी जे काम NRC मुळे होऊ शकले नाही, ते पुनर्रचनेने केले. बदरुद्दीन अजमल याला मुसलमानांविरोधात कट असल्याचे सांगतात. ते म्हणतात की याचा उद्देश विधानसभेतून मुस्लिम नेत्यांना बाहेर काढणे हा आहे.

दिव्यमराठी भास्कर 3 Apr 2026 7:25 am

स्तन झाकण्यासाठी केरळमधील महिला कर देत असत:विरोध म्हणून नांगेलीने आपले स्तन कापले; आजही 50+ जागांवर याचा परिणाम

सन 1803 म्हणजे आजपासून सुमारे 223 वर्षांपूर्वी. केरळमधील चेरथला शहरात एझावा जातीच्या एका मजूर महिलेच्या झोपडीसमोर राजवाड्यातून एक कर गोळा करणारा पोहोचला. महिलेने त्याला तिथेच थांबायला सांगितले आणि ती झोपडीत गेली. काही मिनिटांनंतर ती बाहेर आली, तेव्हा तिचे दोन्ही स्तन छातीवरून कापलेले होते. तिने रक्ताने माखलेले स्तन एका पानावर ठेवून कर गोळा करणाऱ्याकडे पुढे केले. ही कथा केरळमधील मुलक्करम म्हणजे स्तन झाकण्यासाठी द्याव्या लागणाऱ्या कराशी संबंधित आहे. केरळमध्ये निवडणुका होणार आहेत. आज मुलक्करमची कथा, ज्याचे घाव आणि परिणाम आजही राजकारणात दिसतात… मुलक्करम: ब्राह्मणांसमोर महिलांना वरचे वस्त्र काढावे लागत असे जेव्हा कर देण्याऐवजी, नांगेलीने स्तन कापून हातात ठेवले शरीर झाकण्यासाठी महिलांनी धर्म बदलले, तेव्हा त्यांचे कपडे फाडले गेले केरळमधील ब्रेस्ट टॅक्सचा इतिहास सांगणाऱ्या लेखकांपासून ते केरळच्या लोककथांमध्ये नांगेलीची ही कथा खूप प्रचलित आहे. पण याच्या सत्यतेवर अनेक इतिहासकार प्रश्नचिन्ह उपस्थित करतात… दुसरा पैलू: नांगेलीचा विरोध स्तन झाकण्यासाठी नव्हता साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक मनु पिल्लई लिहितात की, केरळमध्ये 1860 पर्यंत कोणतीही महिला स्तन झाकत नव्हती, मग ती राजघराण्यातील असली तरीही. उच्च जातीच्या स्त्रिया फक्त त्यांच्या खांद्यावर एक कापड टाकत असत. इंग्रज येण्यापूर्वी पुरुष आणि स्त्रियांसाठी धड झाकणे हे सभ्यतेचे प्रतीक नव्हते. 17 व्या शतकात युरोपीय प्रवासी विल्यम वॅन नीउहोफ त्रावणकोरच्या राणी अश्वथी थिरुनल उमयम्मा यांना भेटतात. आपल्या प्रवासवर्णनात विल्यम सांगतात, ‘राणीने कमरेपर्यंत एक कापड बांधले होते. एक कापड खांद्यावर टाकले होते. कमरेच्या वरच्या बहुतेक भागावर कोणतेही वस्त्र परिधान केले नव्हते.’ केरळचे इतिहासकार नंदकुमार सांगतात, ‘ज्या मुलक्करमला ब्रेस्ट टॅक्स म्हणत आहेत, तो खरं तर मुलाक्करम होता. मुला म्हणजे बांबू. बांबूवर लागणाऱ्या कराला ब्रेस्ट टॅक्स म्हटले जाऊ लागले. जिथेपर्यंत स्तन उघडे ठेवण्याचा प्रश्न आहे, केरळमध्ये 18व्या-19व्या शतकापूर्वी कोणतीही महिला स्तन झाकत नव्हती. उच्च जातीच्या महिलाही नाही. केरळमध्ये साडी घालणे 19व्या शतकात सुरू झाले आहे.’ नंदकुमार यांच्या मते, ‘1924 मध्ये महात्मा गांधी पहिल्यांदा केरळमध्ये आले होते. त्यानंतर ते आणखी 2 वेळा आले. त्यांनी अस्पृश्यता आणि कनिष्ठ जातींच्या हक्कांवर चर्चा केली. पण त्यांनी कधीही ब्रेस्ट टॅक्सचा उल्लेख केला नाही. जर असा कर असता, तर महात्मा गांधींच्या कोणत्याही पुस्तकात त्याचा उल्लेख आढळला असता. केरळमध्ये कनिष्ठ जातींच्या हक्कांसाठी आवाज उठवणाऱ्या कोणत्याही सुधारकाने ब्रेस्ट टॅक्सचा कधीही उल्लेख केला नाही.’ तिरुवनंतपुरम येथील सेंटर फॉर डेव्हलपमेंट स्टडीजमधील इतिहासकार जे. देविका यांच्या मते, ‘ब्रेस्ट टॅक्ससारख्या कोणत्याही कराचे जास्त रेकॉर्ड आमच्याकडे नाहीत, पण जे आहेत ते सांगतात की हा एक सामान्य कर होता. कथित खालच्या जातीच्या पुरुषांवरही डोक्यावर कर, मिशांवर कर लावले जात होते. नांगेलीचा विरोध स्तन झाकण्यासाठी नव्हता, तर कर प्रणालीद्वारे होणाऱ्या भेदभावाविरुद्ध होता.’ मुलक्करमसारख्या प्रथेचा आजच्या राजकारणावर परिणाम मुलक्करम आणि नंगेलीची कथा जरी वेगळी असली तरी, त्रावणकोरसारख्या समाजांमध्ये जातीय भेदभावाचे अनेक पुरावे आहेत. आजच्या राजकारणात याचे प्रतीकात्मक आणि कथनात्मक (नैरेटिव्ह) परिणाम मजबूत आहेत. डाव्या विचारसरणीचे पक्ष अशा ऐतिहासिक कथांमधून असे कथनात्मक (नैरेटिव्ह) तयार करतात की ते ऐतिहासिक अन्यायाविरुद्ध उभे आहेत. ब्रेस्ट टॅक्स आणि नंगेलीच्या कथेच्या सत्यतेबद्दल वाद असला तरी, एझावा जातीसोबत झालेल्या भेदभावाची आठवण करून देऊन डावे त्यांना पुन्हा आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करत राहतात. मात्र, सेंटर फॉर पब्लिक पॉलिसी रिसर्चचे संचालक डॉ. धनुराज सांगतात की, आता ब्रेस्ट टॅक्सची गोष्ट खूप जुनी झाली आहे. केरळमध्ये या नावावर मते मिळत नाहीत.

दिव्यमराठी भास्कर 3 Apr 2026 7:16 am

Israel US Iran War: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा; 'इराणचा सर्वात मोठा पूल कोसळला, उशीर होण्यापूर्वी इराणने...'

नवी दिल्ली: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला पुन्हा एकदा धमकी दिली आहे. आपल्या 'ट्रुथ सोशल' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील एका पोस्टमध्ये राष्ट्राध्यक्ष ट्रम्प म्हणाले, एका हल्ल्यात इराणचा सर्वात मोठा पूल कोसळला आहे. खूप उशीर होण्यापूर्वी आणि त्या देशाचे काहीही शिल्लक राहण्याआधी, इराणने आता एक करार करण्याची वेळ आली आहे.युद्धाच्या दरम्यान दोन्ही बाजूंनी हल्ले केले जात आहेत. दरम्यान, अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यात इराणचा सर्वात मोठा पूल उद्ध्वस्त झाला आहे. ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये या पुलाचा उल्लेख केला. या हल्ल्यात पूल कोसळत असल्याचा एक व्हिडिओही समोर आला असून, त्यातून इराणवरील प्राणघातक बॉम्बहल्ल्याची व्याप्ती उघड झाली आहे.पुलाविषयी माहितीबी१ पूल इराणच्या अल्बोर्झ प्रांतातील कराज शहरात आहे. हा मध्य पूर्वेतील सर्वात उंच पूल मानला जातो. त्याची उंची अंदाजे १३६ मीटर आणि लांबी १,०५० मीटर आहे. तो आठ भागांमध्ये विभागलेला असून, त्यातील सर्वात लांब भाग १७६ मीटर आहे. याच्या बांधकामासाठी अंदाजे ४०० दशलक्ष अमेरिकी डॉलर्स, म्हणजेच ३७,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त (अंदाजे ३७ अब्ज अमेरिकी डॉलर्स) खर्च झाला आहे.दिवसाच्या सुरुवातीला, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इराणविरुद्ध अमेरिका आणि इस्रायलच्या विजयाचा दावा केला. त्यांनी सांगितले की, अमेरिकेच्या लष्करी कारवाईने तेहरानची लष्करी शक्ती पूर्णपणे मोडीत काढली आहे आणि हे काम लवकरच पूर्ण होईल. मध्य-पूर्वेतील आपल्या योजनांबद्दल राष्ट्राला संबोधित करताना, ट्रम्प यांनी असेही सांगितले की, अमेरिकन सैन्य पुढील दोन ते तीन आठवड्यांत इराणवर एक अत्यंत शक्तिशाली हल्ला करेल. त्यांनी पुन्हा एकदा इराणी वीज प्रकल्पांना लक्ष्य करण्याची धमकी दिली.युद्धाच्या पार्श्वभूमीवर, इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ रेड क्रॉस अँड रेड क्रेसेंट सोसायटीजच्या प्रतिनिधी मंडळाच्या प्रमुखांनी एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे. प्रमुखांच्या मते, इराणमधील आपत्कालीन वैद्यकीय गरजा झपाट्याने वाढत आहेत आणि जर युद्ध असेच चालू राहिले, तर ट्रॉमा किट्स आणि इतर उपकरणांचा साठा कमी पडू शकतो. २८ फेब्रुवारी रोजी इराणवर अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये २ हजारांहून अधिक लोक ठार झाले असून २६ हजार ५०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

फीड फीडबर्नर 3 Apr 2026 7:10 am

आजचे एक्सप्लेनर:ट्रम्प ना होर्मुझ उघडणार, ना अणुबॉम्बचे युरेनियम जप्त करणार; 4 मोठे संकेत, इराण युद्धात पुढे काय होईल?

2 एप्रिलच्या सकाळी ट्रम्पने व्हाइट हाऊसमध्ये 19 मिनिटांचे भाषण दिले. लोक ट्रम्पकडून इराण युद्धावर कोणताही मोठा निर्णय घेण्याची वाट पाहत होते. तथापि, ट्रम्पने दोन दिवसांपूर्वी इराणला दिलेल्या धमकीची पुनरावृत्ती करत सांगितले की, ते इराणवर बॉम्ब हल्ला करतील आणि त्याला पाषाण युगात परत पाठवतील. ट्रम्प यांच्या भाषणाच्या विश्लेषणामध्ये चार मुख्य संकेत समोर आले आहेत जे दर्शवतात की इराण युद्धात पुढे काय होईल... पहिला संकेत : युद्ध थांबवण्यासाठी कोणतीही मार्गदर्शक सूचना नाही, कमीतकमी 3 आठवडे चालेल ट्रम्प यांनी इराण युद्ध थांबवण्यासाठी कोणतीही मुदत दिली नव्हती. फक्त एवढेच सांगितले होते की पुढील दोन ते तीन आठवड्यांत इराणवर मोठा हल्ला होईल. ट्रम्प म्हणाले, मला आनंद आहे की आमची रणनीतिक उद्दिष्टे आता जवळजवळ पूर्ण झाली आहेत आणि आम्ही इराणमध्ये 'मिशन ओव्हर' च्या जवळ आहोत. तथापि, या कामाला आणखी दोन ते तीन आठवडे लागू शकतात. आम्ही त्यांच्यावर मोठा हल्ला करणार आहोत. पुढील दोन ते तीन आठवड्यांत आम्ही त्यांना पाषाण युगात परत पाठवू. जिथे ते खरोखर असायला हवेत. या दरम्यान, वाटाघाटी सुरू राहतील. दुसरा संकेत: होर्मुझ सामुद्रधुनी उघडणे आता अमेरिकेचे लक्ष्य नाही ट्रम्प यांनी पुन्हा एकदा सांगितले की होर्मुझ सामुद्रधुनी उघडणे आता त्यांचे लक्ष्य नाही… ट्रम्प म्हणाले, इराणच्या दक्षिण किनाऱ्यातून जाणाऱ्या तेलाची अमेरिकेला गरज नाही. अमेरिका आपल्या तेलाच्या गरजांसाठी या मार्गावर अवलंबून नाही, त्यामुळे ते उघडण्याची जबाबदारी घेणार नाही. जगातील सुमारे 20% तेल होर्मुझ सामुद्रधुनीतून जाते. परिणामी, आशियाई आणि युरोपीय देशांची अमेरिकेच्या तेलावरील अवलंबित्व वाढणार आहे. तथापि, होर्मुझ सामुद्रधुनी बंद झाल्याचा परिणाम अमेरिकेवरही होईल, कारण कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने अमेरिकेतील वस्तूंच्या किमती वाढतील. डॉलरच्या किमतीवरही परिणाम होईल. तिसरा संकेत: युरेनियम जप्त करण्यासाठी अमेरिका ग्राउंड ऑपरेशन सुरू करणार नाही ट्रम्प यांच्या मते, त्यांना इराणच्या उर्वरित युरेनियमची चिंता नाही… ट्रम्प म्हणाले, “अमेरिकेने इराणच्या अणुस्थळांवर इतका बॉम्बवर्षाव केला आहे की तिथे पोहोचायला महिने लागतील. अमेरिकन उपग्रह या ठिकाणांवर लक्ष ठेवून आहेत. जर इराणने युरेनियम काढण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही पुन्हा हल्ला करू.” चौथा संकेत: सर्व आखाती देश अमेरिकेच्या बाजूने लढत राहतील ट्रम्प यांनी आपल्या भाषणात मध्यपूर्वेतील मित्र राष्ट्रांचे, म्हणजेच इस्रायल आणि आखाती देशांचे आभार मानले… ते म्हणाले, “आम्ही खूप जवळ आलो आहोत. मी आमच्या मित्र राष्ट्रांचे, विशेषतः इस्रायल, सौदी अरेबिया आणि कतारचे आभार मानू इच्छितो. आम्ही त्यांना कोणत्याही परिस्थितीत नुकसान होऊ देणार नाही आणि कधीही अपयशी ठरणार नाही.” प्रश्न-1: ट्रम्प यांनी पहिल्या दिवशी जे 5 उद्दिष्टे सांगितले होते, ते पूर्ण झाले का?उत्तर : इराणविरुद्धच्या युद्धाच्या सुरुवातीला ट्रम्प यांनी चार लष्करी उद्दिष्टे सांगितली होती, ज्यात इराणचे शासन उलथवून टाकण्याचाही समावेश होता. एका महिन्याच्या लढाईनंतर काही प्रगती दिसत आहे, परंतु यापैकी कोणतेही उद्दिष्ट साध्य होत असल्याचे दिसत नाही... 1. क्षेपणास्त्रे आणि ड्रोन नष्ट करण्याचे उद्दिष्ट अमेरिका आणि इस्त्रायलने अनेक इराणी क्षेपणास्त्र तळ आणि कारखाने नष्ट केले आहेत. ट्रम्प यांनी वारंवार दावा केला आहे की इराणची क्षेपणास्त्र आणि ड्रोन क्षमता जवळजवळ पूर्णपणे नष्ट झाली आहे. तरीही, इराण क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले करत आहे. त्याने अनेक ठिकाणी भूमिगत क्षेपणास्त्र साठवण सुविधा (स्टोरेज फॅसिलिटी) तयार केल्या आहेत, ज्या नष्ट करणे कठीण आहे. इराणकडे मोठ्या संख्येने कमी किमतीचे ड्रोन देखील आहेत, याचा अर्थ हे लक्ष्य पूर्णपणे साध्य झाले नाही. 2. नौदलाचा नाश केल्याचा दावा अमेरिकेने इराणची युद्धनौका, पाणबुड्या, नौदल तळ, बंदरे आणि शस्त्रे व क्षेपणास्त्रे वाहून नेणाऱ्या जहाजांना लक्ष्य केले. यामुळे लक्षणीय नुकसान झाले. त्याची सागरी शक्ती कमकुवत झाली होती आणि लांब पल्ल्याच्या कारवाया करण्याची त्याची क्षमता कमी झाली होती. तरीही, इराण अजूनही समुद्रात धोका निर्माण करण्याची क्षमता टिकवून आहे. त्याच्याकडे लहान आणि जलद हल्ला करणाऱ्या अनेक बोटी आहेत. ते होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये पाण्याखालील सुरुंग (माईन्स) पसरवत आहे. 3. इराणच्या प्रॉक्सी मिलिशियाचा नाश करणे ट्रम्पचा उद्देश इराण-समर्थित सशस्त्र गट जसे की येमेनमधील हुथी, लेबनॉनमधील हिजबुल्लाह आणि इराकमधील शिया मिलिशिया यांना कमकुवत करणे हा होता. इस्त्रायलने लेबनॉनमधील हिजबुल्लाहला नुकसान पोहोचवले असले तरी, ते सक्रिय आहे आणि हल्ले करत आहे. हुथी आणि शिया मिलिशिया थेट युद्धात सामील नाहीत, परंतु ते मजबूत आहेत. 4. इराणचा अणुकार्यक्रम थांबवणे इराणच्या फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान अणुप्रयोगशाळा तसेच त्याच्या जड पाण्याच्या प्रकल्पाचे (heavy water plant) लक्षणीय नुकसान झाले आहे. ते आता कार्यरत राहण्याच्या स्थितीत नाहीत, परंतु अहवाल सूचित करतात की इराणकडे अजूनही उच्च-श्रेणीचे युरेनियम आहे. जमिनीवरील सैनिक पाठवल्याशिवाय ते मिळवणे अशक्य आहे. 5. इराणमध्ये सत्ता परिवर्तन युद्धाच्या सुरुवातीपासून इस्रायली हल्ल्यांमध्ये इराणचे जवळजवळ सर्व उच्च अधिकारी आणि नेते मारले गेले आहेत. तथापि, इराणने त्यांना नवीन अधिकाऱ्यांसह बदलण्याची योजना आधीच तयार केली होती. हल्ल्यांनंतर इराणी जनता सैन्य आणि सरकारच्या समर्थनात एकवटली आहे. हे लक्ष्य देखील पूर्ण होऊ शकले नाही. ट्रम्प यांनी आपल्या भाषणात असेही संकेत दिले की ते सत्ता बदलण्याच्या आपल्या इराद्यापासून मागे हटले आहेत. ते म्हणाले, नवीन शासन अधिक बुद्धिमान आणि कमी कट्टरपंथी आहे. त्यांनी यापूर्वी अनेक वेळा दावा केला आहे की अमेरिका इराणमधील एका महत्त्वाच्या व्यक्तीशी बोलणी करत आहे, परंतु ते त्यांचे नाव उघड करणार नाहीत कारण नंतर त्यांना मारले जाईल. पाश्चात्त्य माध्यमांनी अहवाल दिला आहे की इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियन आणि इराणी सैन्य यांच्यात मतभेद निर्माण झाले आहेत. मात्र, इराणने यावर कोणतीही टिप्पणी केलेली नाही. मसूदवर अजून तरी हल्ला झालेला नाही. यावरून असे सूचित होते की राजवट पूर्णपणे बदलण्याऐवजी अमेरिका आता आपल्या अटींवर मसूदच्या सरकारशी वाटाघाटी करू इच्छितो. प्रश्न-2: अमेरिका आखाती देशांमध्ये सतत लष्करी जमवाजमव का वाढवत आहे?उत्तर: आखाती देशांमध्ये अमेरिकेच्या तळांवर सुमारे 50,000 अमेरिकन सैनिक तैनात आहेत. इराणच्या आसपास तैनात असलेल्या यूएस एअरक्राफ्ट कॅरियर्स यूएसएस गेराल्ड फोर्ड आणि यूएसएस अब्राहम लिंकनमध्येही सुमारे 5,000 सैनिक तैनात आहेत. दुसरे युद्धनौका, यूएसएस जॉर्ज बुश देखील त्यांच्या स्ट्राइक ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी मध्यपूर्वेत येत आहे. यापूर्वी, सुमारे 3,000 मरीन मध्यपूर्वेत पोहोचले आहेत. अमेरिका पॅराट्रूपर्सचे एक युनिट पाठवण्याचीही योजना आखत आहे. या सैन्य उभारणीमागे होर्मुझच्या सामुद्रधुनीतील इराणी बेटांवर भूमी हल्ला हे कारण असू शकते. ट्रम्प यांनी इराणच्या खार्ग बेटावर भूमी हल्ला करण्याची वारंवार धमकी दिली आहे. इराणचे सुमारे 90% तेल येथे मोठ्या टाक्यांमध्ये साठवले जाते आणि जहाजे येथून तेल घेऊन रवाना होतात. तथापि, इराण म्हणतो की ते कोणत्याही बेटावर भूमी हल्ल्यासाठी पूर्णपणे तयार आहे. खार्गवर हल्ला करण्यासाठी ट्रम्प यांच्याकडे वैयक्तिक कारणही आहे. त्यांनी अद्याप कोणत्याही लष्करी लक्ष्यांवर पूर्णपणे ताबा मिळवलेला नाही, त्यामुळे ते खार्गवर मोठा हल्ला करून युद्धात विजय घोषित करू शकतात. इस्त्रायली विश्लेषक श्लोमो ब्रोम यांच्या मते, ट्रम्पसाठी कोणत्याही प्रकारे युद्धाचा अंत करणे आणि स्वतःला विजेता म्हणून स्थापित करणे खूप महत्त्वाचे आहे. ते तेलाच्या वाढत्या किमती आणि महागाईमुळे दबावाखाली आहेत.

दिव्यमराठी भास्कर 3 Apr 2026 6:53 am

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, ०३ एप्रिल २०२६

पंचांग०३ एप्रिल २०२६--शुक्रवारआज मिती चैत्र शुद्ध त्रयोदशी शके १९४८. चंद्र नक्षत्र पूर्वा . योग गंड. चंद्र राशी सिंह भारतीय सौर १३ चैत्र शके १९४५ . शुक्रवार दिनांक ३ एप्रिल २०२६. मुंबईचा सूर्योदय ०६.३१ मुंबईचा चंद्रोदय ०४.३७ , मुंबईचा सूर्यास्त ०६.५२ मुंबईचा चंद्रास्त ०५.२५ राहू काळ ०८.०४ ते ०९.३६. गुड फ्रायडे ,उत्तम दिवसदैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)

फीड फीडबर्नर 3 Apr 2026 12:10 am

KKR vs SRH : सनरायझर्स हैदराबादने उघडले विजयाचे खाते, केकेआरचा सलग दुसऱ्या सामन्यात दारुण पराभव

KKR vs SRH : या विजयासह हैदराबादने यंदाच्या हंगामातील विजयाचे खाते उघडले आणि कोलकात्याला घरच्या मैदानावर पराभव पत्करावा लागला.

दैनिक प्रभात 2 Apr 2026 11:42 pm

सात जिल्ह्यांचे कलेक्टर बदलले; २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य सरकारने बदल्यांचे सत्र सुरू ठेवले असून, गुरुवारी विविध जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या. यात सात जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, पाच महागनरपालिका आयुक्त आणि चार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा समावेश आहे.गुरूवारी करण्यात आलेल्या बदल्यांमध्ये कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या जागी डाॅ. विजय राठोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर, येडगे यांची छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या महापालिका आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे. यासोबतच, किरण पाटील हे नवे पशुसंवर्धन आयुक्त असतील. तर, दीपक सिंगला यांची नियुक्ती महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, नागपूर आयुक्तपदी करण्यात आली आहे. जी. श्रीकांत यांची जल जीवन मिशन, नवी मुंबईचे मिशन संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दिलीप स्वामी यांची महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.तर, प्रजीत नायर यांची पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर, अंकित यांची नियुक्ती नागपूर महानगरपालिकेच्या अतिरिक्त महापालिका आयुक्त म्हणून करण्यात आली आहे. के. मंजुलक्ष्मी यांची पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे मध्ये अतिरिक्त आयुक्तपदी तर, वर्षा ठाकूर-घुगे यांची महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, मुंबईच्या सह मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.महापालिका आणि आयुक्त छत्रपती संभाजीनगर - अमोल येडगे जालना - अंजली शर्मा अमरावती - वर्षा लढ्ढा कोल्हापूर - डॉ. राजेंद्र भारूड सांगली मिरज कुपवाड शहर - संजीता मोहपात्राजिल्हा आणि जिल्हाधिकारी बुलडाणा - डॉ. प्रवीणकुमार देवरे लातूर - डॉ. भारत बास्टेवाड कोल्हापूर - डॉ. विजय राठोड गोंदिया - डॉ. मंगेश गोंदावले चंद्रपूर - वसुमना पंत सोलापूर - कार्तीकेयन एस. नागपूर - कुमार आर्शिवादजिल्हा परिषद - मुख्य कार्यकारी अधिकारी छत्रपती संभाजीनगर - मिन्नू पी. एम. जालना - कृष्णकांत कनवारिया अमरावती - सत्यम गांधी कोल्हापूर - डॉ. जॅसमिन

फीड फीडबर्नर 2 Apr 2026 11:10 pm

Metro : दहिसर ते मिरा-भाईंदर मेट्रो ९, डायमंड गार्डन ते मंडाले मेट्रो-२ बीचे उद्घाटन ६ एप्रिलला

मुंबई : मुंबईत मेट्रोचे जाळे झपाट्याने पसरत आहे. दरम्यान, आता दोन मेट्रो मार्गिकांचे लोकार्पण पुन्हा लांबणीवर गेले आहे. मुंबईकरांसाठी महत्त्वाच्या असलेल्या दोन मेट्रो मार्गिकांचे लोकार्पण पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आले आहे. मेट्रोच्या उद्घाटनाचा कार्यक्रम शुक्रवारी ३ एप्रिलला होणार होता, मात्र आता तो सोमवारी ६ एप्रिलला होणार असल्याची माहिती समोर आली आहे. दहिसर ते मिरा-भाईंदर मेट्रो ९ मार्गिकेतील दहिसर ते काशीगाव हा टप्पा आणि मेट्रो २ ब मार्गिकेतील डायमंड गार्डन ते मंडाले हा टप्पा मागील तीन ते चार महिन्यांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे.या दोन्ही टप्प्यांचे काम पूर्ण झाले असून संचालनासाठी आवश्यक सुरक्षा प्रमाणपत्रही मिळाले आहे. तरीही लोकार्पण रखडल्यामुळे सुविधा उपलब्ध असूनही मुंबईकरांना मेट्रो सेवेचा लाभ घेता येत नव्हता. या दोन मेट्रो टप्प्यांच्या लोकार्पणासोबतच पॉड टॅक्सी प्रकल्पाचे भूमिपूजन आणि ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पाच्या भुयारीकरणाच्या कामालाही सुरुवात होणार होती. त्यासाठी राज्य सरकारने ३ एप्रिलची तारीख निश्चित केली होती आणि त्यानुसार एमएमआरडीएने (एमएमआरडीए) तयारीही सुरू केली होती. मात्र, सर्व तयारी अंतिम टप्प्यात असतानाच बुधवारी उशीरा रात्री राज्य सरकारने शुक्रवारचे सर्व कार्यक्रम रद्द केल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे या प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आले आहे. आता हे सर्व कार्यक्रम सोमवार (६ एप्रिल) रोजी होणार असून त्यानंतर मंगळवार (७ एप्रिल) पासून या दोन मेट्रो मार्गिकांवर नियमित सेवा सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे मिरा-भाईंदर आणि पूर्व उपनगरातील प्रवाशांना मेट्रोसाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. दरम्यान, कार्यक्रम पुढे ढकलण्यामागचे अधिकृत कारण जाहीर करण्यात आलेले नाही. मात्र विविध राज्यांमध्ये सुरू असलेल्या निवडणूक प्रचारामुळे काही नेते व्यस्त असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

फीड फीडबर्नर 2 Apr 2026 11:10 pm

गडबड कराल तर पस्तावाल असा धडा शिकवू, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला इशारा

नवी दिल्ली : आपले शेजारी सध्या अशा स्थितीत आहेत की ते काहीतरी आगळीक करु शकतात. त्यांनी असे केल्यास भारताकडून जोरदार आणि तीव्र स्वरुपाचे उत्तर दिले जाईल. ऑपरेशन अद्याप समाप्त झालेले नाही. काही आगळीक करण्याचा प्रयत्न केल्यास जोरदार प्रत्त्युत्तर दिले जाईल, अशा शब्दांत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला कडक शब्दात इशारा दिला आहे.मध्यपूर्वेत सुरु असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर राजनाथ सिंह यांनी शेजाऱ्यांना इशारा दिला. ऑपरेशन सिंदूर अजून सुरु असल्याचेही त्यांनी नमूद केले. सिंह यांनी यावेळी भाषणात थेट कोणत्याही देशाचे नाव घेण्याचे टाळले.केरळममध्ये आयोजित सैनिक सन्मान संमेलन कार्यक्रमात राजनाथ सिंह बोलत होते. इराणच्या होर्मुझ सामुद्रधुनीतून भारतीय जहाजांना भारतीय नौसेना सुरक्षितपणे बाहेर काढून देशात आणत आहे. देशात इंधन तुटवडा असल्याचा दावा राजनाथ सिंह यांनी खोडून काढला. मध्यपूर्वेतील संघर्षावरुन काहीजण विनाकारण अफवा पसरवून भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असेही सिंह म्हणाले. देशात पेट्रोल, डिझेल किंवा गॅसचा तुटवडा नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विरोधक इंधन, तेल या विषयावरुन राजकारण करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. या कठीण काळात देशाबरोबर उभं न राहता ते राजकारण करत असल्याचे सिंह म्हणाले. “मध्यपूर्वेत संघर्ष सुरु असल्याने हा काळ थोडा आव्हानात्मक आहे. केरळममधील अनेक लोक या भागात काम करतात पण, त्यांच्या सुरक्षेची काळजी सरकार घेत आहे, त्यामुळे अधिक काळजी करु नये, असे राजनाथ सिंह म्हणाले.

फीड फीडबर्नर 2 Apr 2026 11:10 pm

मध्य रेल्वेचा विशेष ट्रॅफिक, पॉवर ब्लॉक

मुंबई : मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर अर्थात मेन लाईनवर परळ आणि करी रोड स्थानकांदरम्यानच्या प्रभादेवीवरील रेल्वे उड्डाणपुलाचे 'आरओबी'चे पॅनेल्स काढण्यासाठी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. अप धीम्या मार्गावर आणि अप व डाऊन जलद मार्गांवर दोन आणि तीन एप्रिल दरम्यानच्या मध्यरात्री बारा वाजून तीस मिनिटांनी ब्लॉक सुरू होईल आणि शुक्रवार ३ एप्रिल २०२६ रोजी पहाटे साडेचार वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल.ब्लॉक काळात ११०२० भुवनेश्वर न्यू- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोणार्क एक्सप्रेसचा मार्ग माटुंगा आणि भायखळा स्थानकांदरम्यान वळवण्यात येईल आणि तिला दादर स्थानकावर दुहेरी थांबा दिला जाईल. तसेच ११०२० भुवनेश्वर न्यू- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोणार्क एक्सप्रेस, १२८१० हावडा- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेल आणि १२१३४ मंगळुरू- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस या गाड्यांना माटुंगा आणि भायखळा स्थानकांदरम्यान वळवण्यात येईल आणि त्यांना दादर स्थानकावर दुहेरी थांबा दिला जाईल.पायाभूत सुविधांची देखभाल आणि सुरक्षितता यासाठी आवश्यक असल्यामुळे हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वेने दिलगिरी व्यक्त केली आहे.

फीड फीडबर्नर 2 Apr 2026 11:10 pm

IAS Transfers : मोठी बातमी! महाराष्ट्रातील 25 वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांची बदली; जाणून घ्या कोणाची कुठे झाली बदली

IAS Transfers : राज्य सरकारने प्रशासन अधिक कार्यक्षम करण्याच्या दृष्टीने हा मोठा फेरबदल केल्याचे मानले जात आहे. नवीन नियुक्त अधिकाऱ्यांसमोर स्थानिक पातळीवरील विविध प्रश्न सोडवण्याचे आव्हान असणार आहे.

दैनिक प्रभात 2 Apr 2026 11:03 pm