Pune News : मतदान केंद्र असलेल्या ठिकाणी सुट्टी !
पुणे – पुणे महानगरपालिकेची निवडणुकीसाठी मतदान दि.15 जानेवारी रोजी होणार आहे. मतदान केंद्र म्हणून निश्चित करण्यात आलेल्या इमारतींमध्ये सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, असे पुणे महापालिका प्रशासनाने जाहीर केले आहे. निवडणूक प्रक्रिया सुरळीत, निर्भय व शांततेत पार पाडण्यासाठी तसेच मतदान यंत्रांची वाहतूक, मतदान कक्षांची मांडणी, कायदा व सुव्यवस्था व सुरक्षा व्यवस्था आदी पूर्वतयारी व मतदानाच्या […] The post Pune News : मतदान केंद्र असलेल्या ठिकाणी सुट्टी ! appeared first on Dainik Prabhat .
पुणे – आरोग्य सेनेतर्फे आयोजित १२ वा स्मिता पाटील आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सव नुकताच पार पडला असून यात भारतीय चित्रपटांच्या वर्गवारीत शेफाली जैन आणि शिवी भटनागर यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘एव्हरी नाऊ अँड देन गर्ल्स’ या लघुपटाने बाजी मारली आहे. सोबिता शाबा कुडतरकर यांना ‘द डे बिफोर द वेडिंग’ या लघुपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचे पारितोषिक प्रदान करण्यात आले. […] The post Pune News : १२ व्या स्मिता पाटील आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘एव्हरी नाऊ अँड देन गर्ल्स’ने मारली बाजी appeared first on Dainik Prabhat .
Pune News : “मोफत योजनांच्या घोषणा करणे चुकीचे”–विश्वजीत कदम
पुणे – राज्याची आर्थिक स्थिती बिघडलेली असताना मोफत योजनांच्या घोषणा करणे चुकीचे आहे. शेतकरी कर्जबाजारी असताना कर्जमाफी दिली जात नाही. लाडकी बहीण योजनेचे दोन महिन्यांचे पैसे एकत्र देणे हा निव्वळ निवडणूकपूर्व राजकीय निर्णय असल्याची टीका काँग्रेसचे माजी राज्यमंत्री व आमदार विश्वजीत कदम यांनी केली आहे. पुणे महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्ष आणि शिवसेना उद्धव […] The post Pune News : “मोफत योजनांच्या घोषणा करणे चुकीचे” – विश्वजीत कदम appeared first on Dainik Prabhat .
दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, १३ जानेवारी २०२६
पंचांगआज मिती पौष कृष्ण दशमी शके १९४७.चंद्र नक्षत्र विशाखा. योग शुल.चंद्र राशी तूळ. भारतीय सौर २३ पौष शके १९४७. मंगळवार दिनांक १३ जानेवारी २०२६ मुंबईचा सूर्योदय ०७.१४ मुंबईचा चंद्रोदय ०३.२३ उद्याची. मुंबईचा सूर्यास्त ०६.१९ मुंबईचा चंद्रास्त ०१.४६, राहू काळ ०३.३३ ते ०४.५६ .भोगी,ध्ंनुर्मास समाप्ती,विशाखा वर्ज,दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)मेष : आपण धर्म आणि अध्यात्म यामध्ये रुची घ्याल.वृषभ : आपण नवीन कल्पना राबवणार आहात.मिथुन : काही वाद होऊ शकतात.कर्क : कार्यामध्ये यश येणार आहे.सिंह : आर्थिक फायदा होईल.कन्या : चांगली बातमी मिळणार आहे.तूळ : आजचा दिवस चांगला जाणार आहे.वृश्चिक : आज आपल्या मध्ये आत्मविश्वास असणार आहे.धनू : पूर्णपणे आत्मविश्वासाने आपले कार्य करावे.मकर : आपल्या कार्यक्षेत्रामध्ये चांगली कामे मिळतील. कुंभ : कामाचा ताण जाणवणार नाही.मीन : सामाजिक कार्यामध्ये आपल्याला प्रतिष्ठा मिळेल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा; ठाकरेंनी वडापावव्यतिरिक्त मराठी माणसाकरता कधी स्वप्न पाहिले का?मुंबई : कोरोना काळातील बॉडीबॅग घोटाळ्यातील दोषींना जेलमध्ये पाठवून मुंबई महानगरपालिकेत पारदर्शक आणि प्रामाणिक कारभार रुजवण्याचा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी व्यक्त केला. कफनातही चोरी करणाऱ्या बेईमानांना संपवण्याचा आमचा संकल्प आहे. मुंबईकरांच्या हक्काच्या पैशावर डल्ला मारणाऱ्यांना कठोर शासन करून मुंबईला नवसंजीवनी देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे, असे ते म्हणाले. तसेच ठाकरेंनी मराठी माणसाकरता वडापावव्यतिरिक्त कोणते मोठे स्वप्न पाहिले का? असा उपरोधिक सवाल करीत, ही मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई नसून ठाकरेंच्या राजकीय अस्तित्वाची लढाई आहे, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली.शिवाजी पार्क येथे आयोजित महायुतीच्या प्रचार सांगता सभेत ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आरपीआय) अध्यक्ष रामदास आठवले, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, भाजप नेते विनोद तावडे, मंत्री आशिष शेलार आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांच्यासह महायुतीच्या घटक पक्षांचे वरिष्ठ नेते व्यासपीठावर हजर होते.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मी उत्तर द्यायला लागलो तर अनेकांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही. आमचा संकल्प हा कोणालातरी महापौर बनवण्याचा नाही. तर, पारदर्शक आणि प्रामाणिक कारभारातून मुंबईला बदलण्याचा आहे. मुंबईकरांच्या हक्काचा पैसा मुंबईकरांसाठीच वापरला गेला पाहिजे. बेईमान लोकांचे राज्य समाप्त करायचे आहे. कफनमध्येही जे चोरी करतात, अशा बॉडीबॅग घोटाळ्यातील दोषींना जेलमध्ये पाठवून मुंबईमध्ये मुंबईकरांच्या हक्काचे सरकार बसवण्यासाठी आम्ही आलो आहोत.\आम्ही तीन जानेवारीला प्रचाराचा शुभारंभ केला, जो आई जिजाऊंच्या जन्मतिथीचा दिवस होता. आणि आज शिवतीर्थावरची ही शेवटची सभा, ही पुन्हा आई जिजाऊ मा साहेबांच्या जयंती दिवशी आहे. म्हणून आजच्या पवित्र दिवशी छत्रपती शिवरायांचे स्मरण करतो. तसेच स्वामी विवेकानंदांच्या जयंतीनिमित्त त्यांनाही नमन करत फडणवीस म्हणाले की, विवेकानंदांनी हिंदू संस्कृती आणि भगव्याचा झेंडा जगभर नेला. त्यांच्या या उल्लेखाने सभेला सांस्कृतिक आणि राष्ट्रीय भावनेचा स्पर्श मिळाला.ठाकरे बंधूंच्या टीकेचा समाचार घेताना फडणवीस म्हणाले, कालच्या सभेमध्ये पुन्हा तेच अपील, पुन्हा तीच कारणे, पुन्हा तेच मुद्दे. पण मी पुन्हा सांगतो, मुंबई कोणाचा बाप जरी आला तरी महाराष्ट्रातून तुटू शकत नाही. माझा सवाल आहे, जर आज मराठी माणूस अडचणीत दिसतो तर ३० वर्षे तुम्ही काय करत होता? २५ वर्ष महानगरपालिकेची सत्ता सांभाळली तरी मराठी माणूस अडचणीत असेल, तर 'चुल्लू भर पाण्यात बुडून मरा', असा टोला त्यांनी लगावला.आदित्यला उत्तर देण्यासाठी शीतल गंभीर पुरेशाआदित्य ठाकरेंच्या आव्हानाला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, उद्धव ठाकरे म्हणाले, माझ्याशी जमत नसेल तर आदित्यशी चर्चा करा. ठीक आहे, तुम्हाला पोराला प्रमोट करायचे आहे. पण, आमची उमेदवार शितल गंभीर त्याच्यासाठी पुरेशी आहे. उद्याच्या दिवसभरात कधीही सांगा, शितल गंभीर चर्चेसाठी येतील. खुले आव्हान स्वीकारा. मुंबईकरांसाठी शेवटची निवडणूक असा दावा ते करत आहेत, पण मुंबईकरांसाठी नाही तर त्यांच्यासाठी शेवटची निवडणूक आहे, असा टोला फडणवीसांनी लगावला. देवेंद्र फडणवीस म्हणाले, काही लोकांनी काल माझी नक्कल केली, पण नक्कल करता करता त्यांच्या काकांच्या पक्षाची काय स्थिती झाली? याचाही अभ्यास करा, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.महाराष्टात मराठीच सक्तीचीमराठीसाठी आम्ही एकत्रित आलो, असे ते सांगतात. या महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची असेल. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी त्रिभाषा सूत्रावर समिती तयार करण्याची घोषणा केली. १४ सप्टेंबर २०२१ ला या समितीने तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना अहवाल सादर केला. या अहवालाच्या इंग्रजी आणि हिंदी भाषा ही दुसरी भाषा म्हणून पहिला वर्गापासून लागू करण्यात यावी, अशी शिफारस होती. त्यानंतर २० जानेवारी २०२२ ला उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळ बैठकीत या अहवालाला मान्यता दिली. यांचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहेत, असेही ते म्हणाले.मुंबईत तिसरे विमानतळ उभारणारमुंबईच्या विमानतळावर एकच धावपट्टी होती, दुसरी धावपट्टी तयार करता येत नव्हती म्हणून इतक्या वर्षांपासून नवी मुंबईला विमानतळाची मागणी होती. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात पाच वर्षात आम्ही हे विमानतळ केले. आम्ही अजून तिसरे विमानतळही करणार आहोत. मुंबई विमानतळाची क्षमता दीड पट करणार आहोत.विकासावर बोलायचे असल्यास मर्द असावे लागतेधारावीच्या पुनर्विकासाचे पहिले टेंडर आम्ही विकासकाला दिले होते. पण उद्धव ठाकरे तुम्ही ते टेंडर रद्द का केले? तुम्हालाच अडाणींना ते द्यायचे होते का? आम्ही धारावीचा जागा कुणाला दिली नसून डीआरपीला दिले आणि त्यात सरकारसुद्धा आहे. तुम्हाला २५ वर्षात एकही काम करता आले नाही. विकासावर बोलायचे असल्यास मर्द असावे लागते. राहुल गांधी अडाणीविषयी बोलतात पण काँग्रेसशासित राज्यांमध्ये अदानी कडून कोट्यावधींची गुंतवणूक आणली. एकही मराठी माणूस बेरोजगार राहू नये यासाठी आम्ही जो महाराष्ट्रात येईल त्यांचे स्वागत करू. आपल्याकडे गुंतवणूक येत असेल आणि आपली अर्थव्यवस्था विस्तारित होत असेल तर आपण त्याचे स्वागत केले पाहिजे, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.स्वार्थासाठी वेगळे झाले आणि स्वार्थासाठीच एकत्र आलेत - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेयावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, शिवतीर्थाचे आणि शिवसेनेचे अतूट नाते आहे. ही प्रचार सभा नाही तर परिवर्तनाची नांदी आहे. काल इथे झालेल्या सभेत नेहमीचेच शिव्याशाप, टोमणे होते. त्यांची आम्हाला सवय झाली आहे. आपली ही सभा कुणाला उत्तर देण्यासाठी नाही तर महायुतीने केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडण्यासाठी आहे. मी नेहमी आरोपाला कामातून उत्तर देतो. लोकांना भावनेचे नाही तर विकासाचे राजकारण हवे आहे. बाळासाहेबांचे विचार आणि मोदीजीचे व्हिजन घेऊन आपण पुढे जात आहोत. काही लोकांना फक्त निवडणूक आली की, मराठी माणसाची आठवण येते. एरवी ते ढुंकूनही पाहत नाही. मराठी माणसाच्या आजच्या अवस्थेला हेच लोक जबाबदार आहेत. ही मराठी माणसाची शेवटची लढाई आहे, असे भावनिक आवाहन कुणीतरी केले. पण मराठी माणसाचे अस्तित्व आजही धोक्यात नाही आणि उद्याही नसेल. मुंबईतील मराठी माणसाचे महत्व कधीही कमी होणार नाही. येणारा महापौर हा महायुतीचा आणि मराठीच असेल. मुंबईकरांना मूलभूत सोयीसुविधा आणि रोजगार हेच आमचे मिशन आहे. आज जे लोक मराठी माणसाच्या नावाने गळे काढतात ते निवडणूक संपल्यानंतर आराम करायला कुठे जातात हे सर्वांना माहिती आहे. २० वर्षांपूर्वी बाळासाहेबांची ईच्छा पूर्ण केली नाही. त्यावेळी तुमचा अहंकार मोठा होता. तुम्ही स्वार्थासाठी वेगळे झालात आणि आता स्वार्थासाठीच एकत्र आला आहात.महायुतीचा महापौर बसविण्यासाठी आमचा पूर्ण पाठिंबा - केंद्रीय मंत्री रामदास आठवलेभरून गेलेले आहे मैदान शिवाजी पार्क, मी महायुतीला देतो १५० मार्क, ठाकरे बंधूंना देतो ४० मार्क, काँग्रेसला देतो ३० मार्क आणि बाकीचे सगळे आमचे मार्क, असे विधान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले. तसेच कालच्या सभेपेक्षा आज जास्त माणसं दिसत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत मोठ्या प्रमाणात कामे केली आहेत. महायुतीची मुंबईत येणार सत्ता आणि ठाकरे बंधूंचा उडून जाणार पत्ता. उद्धव ठाकरेंनी आमच्यासोबत राहायला हवे होते. तुम्ही आमच्यासोबत राहिले असते तर धनुष्यबाण तुमच्याकडे असता, पण आज धनुष्यबाण आमच्याकडे आहे. मुंबईत महायुतीचा महापौर बसविण्यासाठी माझा पाठिंबा आहे, असेही ते म्हणाले.२५ वर्षात उद्धव ठाकरेंनी बंगला नंबर २ बांधला - आ. अमीत साटमतुम्ही २५ वर्षे मुंबई महापालिकेवर राज्य करूनही त्यावेळी केलेले एक काम दाखवण्यासारखे नाही. उद्धव ठाकरेंनी भ्रष्टाचार केला आणि बंगला नंबर दोन तयार केला. दर आठवड्याच्या स्टँडिंग कमिटीच्या पाच टक्क्यांवर हे जगतात. उद्धव ठाकरेंचा महापौर झाल्यास मुंबईचे पाकिस्तान होईल. तुम्हीच अदाणींना घरी बोलवून त्यांच्या गळाभेटी घेतला. तुमची पोरं त्यांच्या लग्नात नाचतात. या ढोंगीपणाला आणि दुटप्पीपणाला मुंबईकर जनता भुलणार नाही. मुंबई महापालिकेवर भगवा फडकवण्यासाठी आमच्या सर्व उमेदवारांना साथ द्यावी, असे आवाहन मुंबई भाजपचे अध्यक्ष आ. अमीत साटम यांनी केले.
तब्बल ६० हजार मुंबईकरांच्या घरी मतदार माहिती चिठ्ठीचे वाटप
तब्बल ८० हजार कर्मचाऱ्यांना निवडणूक कामांचे प्रशिक्षण१० हजार २३१ मतदान केंद्रांची उभारणीमुंबई (विशेष प्रतिनिधी) :मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी तब्बल २२७८ मतदानाची ठिकाणे निश्चित करून तिथे १०,२३१ मतदान केंद्र तयार करण्यात आली असून या निवडणूक कामांसाठी ८० हजार कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणात सहभागी करून घेत मनुष्यबळही तैनात करण्यात आले आहे. मुंबईतील प्रत्येक पात्र मतदारापर्यंत ठराविक कालावधीत मतदार माहिती चिट्ठी वेळेत व अचूकरीत्या पोहोचावी, याकामी अत्यंत सूक्ष्म व प्रभावी नियोजन करण्यात येत असून मतदारांचे नाव, पत्ता, मतदार यादीतील भाग क्रमांक, मतदान केंद्राचे नाव व खोली क्रमांक यांसह आवश्यकः माहिती असलेली मतदार माहिती चिट्ठी वितरणाची कार्यवाही सुरू आहे. तब्बल ६० लाख मतदार माहिती चिट्ठीचे वाटप करण्यात येत आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसांमध्ये ही सर्व प्रक्रिया पूर्ण केली जाईल असे महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ भूषण गगराणी यांनी स्पष्ट केले.मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणूक २५ च्या पूर्व तयारीच्या अनुषंगाने महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ भूषण गगराणी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली. या पत्रकार परिषदेला अतिरिक्त आयुक्त डॉ अश्विनी जोशी यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते. मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी १७०० उमेदवार निवडणूक रिंगणात असून २२७८ ठिकाणी १० हजार २३१ मतदान केंद्रांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी ६४ हजार ३७५ अधिकारी व कर्मचाऱ्यांची आवश्यकता असली तरी तब्बल ८० हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण प्रक्रियेत सहभागी करून घेण्यात आले आहे. यातील तीन प्रशिक्षणांमध्ये सहभागी न झालेल्या कर्मचारी आणि अधिकारी यांना नोटीस बजावून आवश्यक ती कार्यवाही केली जात आहे. या मतदानासाठी २० हजार कंट्राेल युनिट आणि २५ हजार बॅलेट युनिटचा वापर केला जाणार आहे. तसेच या निवडणूक कामांसाठी २२ हजार पोलिसांची फौज तैनात करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत चांगले काम केल्यामुळे ४५०० हजार स्वयंसेवकांची मदत घेतली जाणार असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले.यंदा महापालिकेत प्रथमच 'पाडो' प्रणालीचा भागमतदान प्रक्रियेमध्ये मतदान यंत्र कंट्रोल युनिटला जोडण्यात येत असले तरी मतमोजणीच्या दिवशी कंट्राेल युनिटमध्ये बंद पडल्यास यंदा महापालिकेच्यावतीने 'पाडो 'चा वापर केला जाणार आहे. यासाठी राज्य निवडणूक आयाेगाच्या निर्देशानुसार १४० पाडो अर्थात छपाई असलेल्या मतदानाची नोंद असलेल्या कंट्रोल युनिटची पर्यायी व्यवस्था केली जाईल. जर कंट्रोल युनिटमध्ये तांत्रिक बिघड होवून त्यांचा डिस्पले बंद पडल्यास या पर्यायी व्यवस्था असलेल्या पाडोचा वापर करण्याचे अधिकार हे निवडणूक निर्णय अधिकारी असतील. मुंबई महापालिकेत याचा प्रथमच वापर केला जाणार आहे.मतदान केंद्रांवरील किमान आवश्यक सुविधापिण्याचे पाणी,मतदारांसाठी प्रतीक्षागृह / शेड, स्वच्छतागृह, पुरेशी प्रकाशव्यवस्था, दिव्यांग (PWD) मतदारांसाठी योग्य उताराचा रॅम्प व व्हीलचेअर, मानक मतदान कक्ष , आवश्यक दिशादर्शक फलक इत्यादीगुलाबी मतदान केंद्रप्रत्येक प्रभागात केवल महिलांकन केलेले किमान एक गुलाबी मतदान स्थापित करण्यात येईल. अशा महिला व्यवस्थापित मतदान केंद्रांमध्ये पोलीस व सुरक्षा कर्मचाऱ्यासह सर्व निवडणूक कर्मचारी महिला असतील. प्रत्येक प्रभागात गुलाबी रंगसंगतीमधील साहित्यप्रकारांचा वापर करून किमान एक आदर्श मतदान केंद्र असेलपात्र अंतिम उमेदवार -एकूण १,७००( पुरुष ८२२, महिला ८७८)मतदान केंद्र माहितीमतदानाची ठिकाणे - २,२७८मतदान केंद्रे - १०,२३१मतदान केंद्रांची विगतवारीशासकीय इमारतीःबंदिस्त जागा २,३८२ ।अर्धबंदिस्त जागा- ८७९ ।खुल्या जागा- १,१४३सहकारी गृहनिर्माण संस्थाःबंदिस्त जागा- १८१ ।अर्धबंदिस्त जागा- ३१२ ।खुल्या जागा- २०९खासगी इमारतीःबंदिस्त जागा २.६९३ ।अर्धबंदिस्त जागा- १.३८५ ।खुल्या जागा- १,०४७एकूण १०२३१ मतदान केंद्रांसाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची माहितीमतदान केंद्राध्यक्ष - (१२,८७५)सहायक मतदान केंद्राध्यक्ष -(१२,८७५)मतदान अधिकारी क्र. १-(१२,८७५)मतदान अधिकारी क्र. २- (१२,८७५)शिपाई - (१२,८७५)एकूण - (६४,३७५)
RCB W vs UPW W : ‘स्मृती-ग्रेस’वादळात यूपी वॉरियर्स भस्म! आरसीबीचा ९ विकेट्सनी दणदणीत विजय
RCB W vs UPW W Royal Challengers Bengaluru win : महिला प्रीमियर लीग २०२६ च्या पाचव्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) संघाने आपला दबदबा कायम राखत यूपी वॉरियर्सचा ९ गडी राखून धुव्वा उडवला. यूपीने दिलेल्या १४४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आरसीबीच्या फलंदाजांनी आक्रमक पवित्रा घेत हा सामना एकतर्फी जिंकला. या विजयासह आरसीबीने गुणतालिकेत आपली स्थिती […] The post RCB W vs UPW W : ‘स्मृती-ग्रेस’ वादळात यूपी वॉरियर्स भस्म! आरसीबीचा ९ विकेट्सनी दणदणीत विजय appeared first on Dainik Prabhat .
PMC Election : बोपोडीचा आरोग्यपूर्ण विकास करू; सनी निम्हण यांची पदयात्रेत ग्वाही
पुणे : बोपोडी परिसराचा विकास केवळ स्मार्टच नव्हे, तर आरोग्यपूर्ण जीवनशैलीपर्यंत विस्तृत करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही भारतीय जनता पक्ष- रिपब्लिकन पक्ष (आठवले) युतीचे उमेदवार चंद्रशेखर ऊर्फ सनी विनायक निम्हण यांनी दिली. बोपोडी परिसरात काढलेल्या पदयात्रेच्या समारोपप्रसंगी बोलताना बोलताना निम्हण यांनी हा आश्वास दिला. या वेळी प्रभाग क्रमांक ८ मधील भाजप- रिपाइं (आठवले) युतीचे […] The post PMC Election : बोपोडीचा आरोग्यपूर्ण विकास करू; सनी निम्हण यांची पदयात्रेत ग्वाही appeared first on Dainik Prabhat .
Pmc Election : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न साकार; करण्यासाठी भाजपसोबत –आठवले
पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न साकारण्यासाठी, पुण्याच्या विकासासाठी आणि सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी आम्ही भारतीय जनता पक्षासोबत आहोत, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. मंगळवार पेठ परिसरातील भेटीदरम्यान त्यांनी प्रभाग क्रमांक २४ मधील भाजपा- रिपब्लिकन युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मतदारांशी संवाद साधला. महायुतीच्या चारही उमेदवारांना निवडून देण्यासाठी आपण येथे आलो […] The post Pmc Election : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न साकार; करण्यासाठी भाजपसोबत – आठवले appeared first on Dainik Prabhat .
India-Germany historic agreement: भारत आणि जर्मनी या दोन्ही देशांनी टपाल, एक्सप्रेस आणि लॉजिस्टिक सेवा क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी एका महत्त्वाच्या द्विपक्षीय करारावर स्वाक्षरी केली आहे. जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्ज हे सध्या दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर असून सोमवारी सकाळी अहमदाबादमध्ये त्यांचे आगमन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे स्वागत केले आणि त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय भागीदारीचा विस्तार […] The post भारत–जर्मनी ऐतिहासिक करार: इंडिया पोस्ट–डीएचएल ‘प्रीमियम इंटरनॅशनल एक्सप्रेस’मुळे निर्यात व ई-कॉमर्सला नवे बळ appeared first on Dainik Prabhat .
PMC Election : महिला, बालकल्याणावर भर देणार; संपर्क अभियानप्रसंगी कुणाल टिळक यांची ग्वाही
पुणे : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २५ मधील भाजपचे उमेदवार कुणाल शैलेश टिळक यांनी सोमवारी बुधवार पेठ परिसरात घरोघरी संपर्क अभियान राबविले. या अभियानात प्रभागातील अन्य उमेदवारही सहभागी झाले होते. या वेळी महिला व बालकांशी संबंधित प्रश्नांवर कुणाल टिळक यांनी विशेष लक्ष केंद्रित केले. संवादादरम्यान महिलांनी सुरक्षिततेचे प्रश्न, आरोग्य सुविधा, सार्वजनिक स्वच्छतागृहे, तसेच बालकांसाठी […] The post PMC Election : महिला, बालकल्याणावर भर देणार; संपर्क अभियानप्रसंगी कुणाल टिळक यांची ग्वाही appeared first on Dainik Prabhat .
मुंबई – शेअर बाजाराचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक सुंदररामन राममूर्ती यांचा गुंतवणुकीच्या ससल्ल्याबाबत बनावट व्हिडिओ सध्या समाज माध्यमावर फिरत आहे. हा व्हिडिओ चूकीचा आहे आणि गुंतवणूकदारांनी यापासून सावध राहण्याची गरज असल्याचे मत मुंबई शेअर बाजाराने व्यक्त केले आहे. या व्हिडिओमध्ये राममूर्ती गुंतवणूक आणि इतर बाबीसंदर्भात सल्ला देत असल्याचे दाखविण्यात आले आहे. शेअर बाजाराच्या […] The post डीपफेकचा सापळा! शेअर बाजाराच्या सीईओंच्या गुंतवणूक सल्ल्याचा बनावट व्हिडिओ व्हायरल, गुंतवणूकदारांना सतर्कतेचा इशारा appeared first on Dainik Prabhat .
Pmc Election : कार्यक्षम नगरसेविका सुजाता शेट्टी यांचा सत्कार
पुणे : राजमाता जिजाऊ जन्मोत्सव समितीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्षम माजी नगरसेविका सुजाता सदानंद शेट्टी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. महापालिकेच्या माध्यमातून सुजाता शेट्टी आणि माजी स्थायी समिती अध्यक्ष सदानंद शेट्टी यांनी मंगळवार पेठ, सोमवार पेठ, तसेच परिसरात केलेल्या विकासकामांची दखल घेत समितीचे अध्यक्ष सुनील पवार यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला. या वेळी राहुल […] The post Pmc Election : कार्यक्षम नगरसेविका सुजाता शेट्टी यांचा सत्कार appeared first on Dainik Prabhat .
PMC Election : ॠतुजा तेजस गडाळेंचा प्रचार शिगेला; घरोघरी भेटीत होतेय कौतूक
पुणे : प्रभाग क्रमांक २३ ( नानापेठ-रास्तापेठ) मधील भाजपच्या अधिकृत उमेदवार ॠतुजा तेजस गडाळे यांचा प्रचार शिगेला पोहचला आहे. प्रचाराच्या पहिल्या दिवसापासून ॠतुजा यांनी प्रभाग पिंजून काढला असून शेवटच्या टप्प्यात ॠतुजा यांच्याकडून घरोघरी भेटींवर भर दिला जात आहे. या भेटीत प्रभागात सुशिक्षित उमेदवार दिल्याने प्रभागाच्या विकासाला गती मिळणार असल्याचा विश्वास मतदारांकडूनच व्यक्त करण्य़ात येत आहे. […] The post PMC Election : ॠतुजा तेजस गडाळेंचा प्रचार शिगेला; घरोघरी भेटीत होतेय कौतूक appeared first on Dainik Prabhat .
RCB W vs UPW W Hat-trick Missed : महिला प्रीमियर लीग (WPL) २०२६ मध्ये सध्या रोमांचक क्रिकेटचा थरार पाहायला मिळत आहे. सोमवारी १२ जानेवारी रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि यूपी वॉरियर्स यांच्यातील सामन्यात एका विचित्र योगायोगाची चर्चा रंगली. यूपी वॉरियर्सने सलग ३ चेंडूंवर ३ विकेट्स गमावल्या, मात्र तांत्रिक कारणामुळे गोलंदाजाच्या नावावर ‘हॅट्ट्रिक’ची नोंद होऊ […] The post RCB W vs UPW W : सलग ३ चेंडूंत ३ विकेट्स, तरीही हॅट्ट्रिक झाली नाही! वडोदऱ्यात RCBच्या गोलंदाजांचा थरार; नेमकं काय घडलं? appeared first on Dainik Prabhat .
एका वेळी दोन प्रभागांचीच होणार मतमोजणी
मतमोजणीला विलंब होण्याची शक्यतामुंबई (विशेष प्रतिनिधी) :महापालिका निवडणुकीत मतमोजणीच्या दिवशी एका वेळी दोनच प्रभागांची मोजणी केली जाणार असून पहिल्या दोन प्रभागांची मोजणी पूर्ण झाल्यानंतरच पुढील प्रभागाची मतमोजणीला सुरुवात केली जाईल असे महापालिका आयुक्त तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ भूषण गगराणी यांनी स्पष्ट केले. त्यामुळे प्रत्येक प्रभागाची मतमोजणीची प्रक्रिया टप्पानिहाय केली जाणार असल्याने मतमोजणीची प्रक्रिया लांबली जाण्याची शक्यता आहे.मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी १७०० उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. यासाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून दुसऱ्याच दिवशी म्हणजे १६ जानेवारी रोजी मतमोजणी केली जाणार आहे. या मतमोजणीमध्ये एकाच वेळी १४ टेबल ठेवले आहेत.त्यामुळे एकाच वेळी १४ टेबल अशाप्रकारे २८ टेबल ठेवली जाणार आहे. या १४ टेबलांवर एका प्रभागाची आणि दुसऱ्या १४ टेबलावंर दुसऱ्या प्रभागाची मतमोजणी केली जाणार आहे. या १४ टेबलांमध्ये पार्टीशन टाकून ही मतमोजणी केली जाईल.एका वेळी दोन प्रभागांची मतमोजणी केली जाईल आणि एका प्रभागाची मोजणी पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या प्रभागाची मोजणी केली जाईल आणि अशाप्रकारे एका वेळेला दोन प्रभागांमध्ये मतमोजणी केली जाईल,असे जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ भूषण गगराणी यांनी स्पष्ट केले जाईल.मतदानाच्या दिवशी शेवटच्या वेळी मिळणार टोकननिवडणुकीच्या मतदानासाठी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच अशी मतदानाची वेळ आहे. परंतु साडेपाच वाजेपर्यंत जे मतदान केंद्रात पोहोचतील त्यांना निवडणूक निर्णय अधिकारी हे टोकन उपलब्ध करून देत त्यांना मतदानाची संधी देणार आहे. टोकन दिल्यानंतर कुणालाही मतदान केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे मतदान करण्याची वेळेची मुदत संपुष्टात येण्यापूर्वी मतदान केंद्रात पोहोचल्यास टोकन देत मतदान करण्याची संधी दिली जाणार असल्याने वेळेत मतदान केंद्रात पोहोचणाऱ्या प्रत्येक मतदानाला मतदानाचा हक्क बजावण्याचा अधिकार मिळणार आहे.
दुबार मतदारांपैंकी ४८ हजार मतदारांचा मतदानाचा मार्ग मोकळा, मतदान केंद्रात मोबाईल बंदी कायम
मुंबई (विशेष प्रतिनिधी) :मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मतदार याद्या बनवताना दुबार मतदारांचा शोध घेण्यात येत असून तब्बल १ लाख ६५ हजार दुबार मतदारांपैंकी ४८ हजार दुबार मतदारांनी आपले परिशिष्ट दोन लिहून दिले आहे. त्यामुळे त्यांनी लिहून दिलेल्या मतदान केंद्रात त्यांना मतदान करता येणार असून त्यांच्या नावासमोरील स्टार काढून टाकण्यात आला आहे. तसेच ज्यांनी परिशिष्ट दोन भरुन दिले नसल्यास त्यांना मतदान केंद्रावर दोन पुरावे सादर करणारी ओळखपत्रे आणि परिशिष्ट दोन भरुन दिल्यावर मतदानाचा अधिकार दिला जाईल,असे महापालिका आयुक्त तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ भूषण गगराणी यांनी स्पष्ट केले.मुंबईतील दुबार मतदारांच्यासंदर्भातील सर्व प्रकारची प्रक्रिया पूर्ण करून ११ लाख १ हजार ५०६ दुबार मतदारांपैंकी केवळ १ लाख ६५ हजार निव्वळ दुबार मतदार आढळून आले आहेत. त्या सर्व दुबार मतदारांची घरोघरी जावून स्थळ पाहणी करून त्यांच्याकडून मतदान कुठे करणार याची माहिती जाणून घेतली. यानुसार तब्बल ४८ हजार ६२८ दुबार मतदारांनी परिशिष्ट दोन सादर करून आपण कुठल्या मतदान केंद्रात मतदान करणार याची माहिती दिली आहे. त्यानुसार त्यांच्या नावासमोरील स्टार काढून टाकण्यात आला असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ भूषण गगराणी यांनी दिली आहे.परिशिष्ट दोन सादर करणाऱ्या मतदारांच्या नावासमोर शिक्के मारुन त्यांना मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे. परंतु ज्या दुबार मतदारांनी परिशिष्ट दोन भरुन दिले नाही आणि ते जर मतदान करण्यासाठी आले तर त्यांच्याकडून दोन ओळखपत्र पुरावे म्हणून स्वीकारुन त्यांच्याकडून परिशिष्ट दोन भरुन घेतले जाईल आणि त्यानंतर त्यांना मतदानाचा अधिकार दिला जाईल. याबाबत पीआरओंना योग्यप्रकारचे प्रशिक्षण दिले असून याबाबत कुणाकडून हुज्जत घालण्याचा प्रकार घडणार नाही असाही विश्वास व्यक्त केलादुबार मतदारांसंदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधान करत अशाप्रकारचे दुबार मतदार मतदान करण्यास आल्यास त्यांच्या तोडून काढा असे म्हटले आहे. यासंदर्भात बोलतांना डॉ भूषण गगराणी यांनी यासंदर्भात कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून योग्य ती काळजी घेण्यात आली आहे. त्यामुळे अशाप्रकारची घटना घडण्याची शक्यता नसेल तरीही आमची यंत्रणा यासाठी सज्ज आणि अलर्ट असेल असेही त्यांनी स्पष्ट केल,मोबाईल बंदी कायम, पण पूर्णपणे बंद करून मतदान केंद्रात नेता येवू शकतोमागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास पूर्ण बंदी घालण्यात आली होती, ती बंदी याही निवडणुकीत कायम आहे.मतदान केंद्रात मोबाईल नेता येईल किंवा नाही याबाबत राज्य निवडणूक आयोगाच्या कोणत्याही सूचना नसल्याने मागील निवडणुकीप्रमाणे यंदाच्या महापालिका निवडणुकीतही तेच नियम कायम आहेत. मतदान केंद्रात मोबाईल फोन नेता येणार नाही. परंतु जर आप मोबाईल फाेन जवळ बाळगणार असाल तर तो पूर्णपणे बंद करून खिशात किंवा पर्समध्ये टाकून नेवू शकता असेही महापालिका आयुक्तांनी स्पष्ट केले.
PMC Election : चौधरीनगर, मुंजाबा वस्तीसाठी निधी आणणार; अनिल टिंगरे यांची ग्वाही
पुणे : पावसाळ्यात चौधरीनगर, मुंजाबा वस्ती परिसरात ड्रेनेज, तसेच पावसाच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून विशेष निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही प्रभाग क्रमांक १ (कळस-धानोरी- लोहगाव उर्वरीत)चे भाजप महायुतीचे उमेदवार अनिल ( बाॅबी) वसंतराव टिंगरे यांनी सोमवारी मतदारांना दिली. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १ मधील चौधरीनगर आणि मुंजाबा वस्ती परिसरात पदयात्रा काढण्यात आली. या […] The post PMC Election : चौधरीनगर, मुंजाबा वस्तीसाठी निधी आणणार; अनिल टिंगरे यांची ग्वाही appeared first on Dainik Prabhat .
Maruti Suzuki: मारुती सुझुकीचा गुजरात प्रकल्प विस्तारणार; जमीन अधिग्रहणासाठी 4,960 कोटींची मंजुरी
नवी दिल्ली – मारुती सुझुकी कंपनीचा गुजरातमध्ये प्रकल्प आहे. मात्र मागणी वाढत आहे. अशा परिस्थितीत या प्रकल्पाचे विस्तारीकरण करावे लागणार आहे. याकरिता जमीन उपलब्ध करण्यासाठी आणि इतर कामासाठी मारुती सुझुकी इंडिया कंपनीच्या संचालक मंडळाने 4,960 कोटी रुपयांच्या खर्चाला परवानगी दिली आहे. मारुती सुझुकी कंपनीचा गुजरातमधील खोराज येथील गुजरात औद्योगिक विकास महामंडळाच्या जमिनीवर प्रकल्प कार्यरत आहे. […] The post Maruti Suzuki: मारुती सुझुकीचा गुजरात प्रकल्प विस्तारणार; जमीन अधिग्रहणासाठी 4,960 कोटींची मंजुरी appeared first on Dainik Prabhat .
TCS Q3 results: भारतातील सर्वात मोठ्या सॉफ्टवेअर निर्यातदार कंपनीचा नफा 14 टक्क्यांनी घटला
TCS Q3 results: – भारतातील सर्वात मोठे सॉफ्टवेअर निर्यातदार कंपनी असलेल्या टीसीएस कंपनीने तिसर्या तिमाहीचा ताळेबंद सोमवारी जाहीर केला. जागतिक परिस्थिती खराब असल्यामुळे या कंपनीच्या नफ्यात या तिमाहित 14 टक्क्यांची घट होऊन या कंपनीला केवळ 10,657 कोटी रुपयांच्या नफ्यावर समाधान मानावे लागले. या आकडेवारीचा मंगळवारच्या शेअर बाजार घडामोडीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी तिसर्या […] The post TCS Q3 results: भारतातील सर्वात मोठ्या सॉफ्टवेअर निर्यातदार कंपनीचा नफा 14 टक्क्यांनी घटला appeared first on Dainik Prabhat .
Pmc Election : प्रभाग झोपडपट्टीमुक्त करणार : अर्चना पाटील
पुणे : प्रभागातील प्रत्येक झोपडपट्टीधारकाला एसआरए आणि म्हाडाच्या माध्यमातून हक्काचे, कायदेशीर आणि पक्के घर उपलब्ध करून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही भाजपच्या प्रभाग क्रंमाक २२ (क) च्या अधिकृत उमेदवार अर्चना तुषार पाटील यांनी दिली. अर्चना पाटील यांनी प्रचाराच्या दरम्यान मतदारांशी संवाद साधताना प्रभागाच्या विकासाचा एक ठोस आणि महत्त्वाकांक्षी आराखडा जनतेसमोर मांडला. त्यामध्ये कष्टकऱ्यांना हक्काचे […] The post Pmc Election : प्रभाग झोपडपट्टीमुक्त करणार : अर्चना पाटील appeared first on Dainik Prabhat .
PMC Election : भाजप सत्तेत असूनही विकास नाही –रमेश बागवे
पुणे : भाजप केंद्र व राज्यात सत्तेत असूनही सर्वसामान्यांची फसवणूक, गुन्हेगारी आणि जातीयवाद वाढत असल्याने पुण्यासारखे विद्येचे माहेरघरही असुरक्षित झाले आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी काँग्रेसच्या उमेदवारांना विजयी करणे आवश्यक आहे, असे आवाहन माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांनी लोहियानगर येथील प्रचार सभेत केले. काँग्रेस महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित कोपरा सभेत ते बोलत होते. या […] The post PMC Election : भाजप सत्तेत असूनही विकास नाही – रमेश बागवे appeared first on Dainik Prabhat .
Pmc Election : अमर आवळेंचा भेटीगाठींवर भर
पुणे : निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात प्रभाग क्रमांक २७ मधील भाजपचे उमेदवार महेश (ऊर्फ) अमर आवळे यांनी सोमवारी नागरिकांच्या भेटीगाठींवर भर दिला. लोकमान्यनगर, नवी पेठ भागातील विविध नागरिकांच्या घरी जाऊन त्यांनी आपल्याला मतदान करण्याचे आवाहन केले. या वेळी भाजपाचे शहराध्यक्ष धीरज घाटे त्यांच्यासोबत उपस्थित होते. महापालिका निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान होत आहे. मंगळवारी संध्याकाळी प्रचार संपुष्टात […] The post Pmc Election : अमर आवळेंचा भेटीगाठींवर भर appeared first on Dainik Prabhat .
Today Silver Prices: चांदीचा दर आज एकाच दिवशी वाढला 15 हजार रुपयांनी; किलोचा ताजा भाव जाणून घ्या…
Today Silver Prices – जागतिक पातळीवरील भूराजकीय तणाव, व्यापार युद्ध आणि अमेरिकेत होणार असलेली व्याजदर कपात, या कारणामुळे सोने आणि चांदीच्या दरत एकतर्फी वाढ होत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकेच्या रिझर्व बँकेदरम्यानचा संघर्ष वाढत असल्यामुळेही या दोन धातूच्या दरात वाढ होत असल्याचे विश्लेषकानी सांगितले. परिणामी दिल्ली सराफात सोमवारी एकाच दिवशी चांदीचा दर 6 […] The post Today Silver Prices: चांदीचा दर आज एकाच दिवशी वाढला 15 हजार रुपयांनी; किलोचा ताजा भाव जाणून घ्या… appeared first on Dainik Prabhat .
Devdutt Padikkal Record : देवदत्त पडिक्कलने रचला इतिहास! ‘असा’पराक्रम करणारा भारताचा पहिलाच फलंदाज
Devdutt Padikkal record in Vijay Hazare Trophy : भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये देवदत्त पडिक्कलच्या बॅटने सध्या धावांचा पाऊस पाडण्यास सुरुवात केली आहे. विजय हजारे ट्रॉफी २०२५-२६ च्या उपांत्यपूर्व (Quarter-final) फेरीत मुंबईविरुद्ध खेळताना पडिक्कलने नाबाद अर्धशतकी खेळी साकारली आणि एका खास विक्रमाला गवसणी घातली. विजय हजारे ट्रॉफीच्या दोन वेगवेगळ्या हंगामात ७०० हून अधिक धावा करणारा तो भारताचा […] The post Devdutt Padikkal Record : देवदत्त पडिक्कलने रचला इतिहास! ‘असा’ पराक्रम करणारा भारताचा पहिलाच फलंदाज appeared first on Dainik Prabhat .
एक्सच्या ‘ग्रोक’एआय चॅटबॉटची ब्रिटनमध्ये चौकशी; आक्षेपार्ह फोटोंमुळे इलॉन मस्क यांच्या अडचणीत वाढ
Grok AI: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’चा (पूर्वीचे ट्विटर) एआय चॅटबॉट ‘ग्रोक’ (Grok) सध्या मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ग्रोकद्वारे लैंगिक स्वरूपाचे आणि आक्षेपार्ह फोटो तयार केले जात असल्याच्या तक्रारींनंतर, ब्रिटनच्या ‘ऑफकॉम’ (Ofcom) या माध्यम नियामक संस्थेने ‘एक्स’ विरुद्ध अधिकृत चौकशी सुरू केली आहे. ब्रिटनच्या ‘ऑनलाइन सुरक्षा कायद्या’चे (Online Safety Act) उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत ही […] The post एक्सच्या ‘ग्रोक’ एआय चॅटबॉटची ब्रिटनमध्ये चौकशी; आक्षेपार्ह फोटोंमुळे इलॉन मस्क यांच्या अडचणीत वाढ appeared first on Dainik Prabhat .
मोठी बातमी…! मुंबईत ठाकरे बंधूंची ताकद वाढली; ‘या’संघटनेचा जाहीर पाठिंबा
मुंबई : महापालिका निवडणुकांचा रणसंग्राम अंतिम टप्प्यात पोहोचला असून मतदान अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलं आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून, ठाकरे बंधूंच्या संयुक्त सभेनंतर समीकरणांना वेगळीच कलाटणी मिळाल्याचं चित्र आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या ऐतिहासिक सभेनंतर मुंबईत जबरदस्त वातावरणनिर्मिती झाली आहे. या सभेनंतर भाजपकडून ठाकरे बंधूंवर जोरदार टीकेची झोड […] The post मोठी बातमी…! मुंबईत ठाकरे बंधूंची ताकद वाढली; ‘या’ संघटनेचा जाहीर पाठिंबा appeared first on Dainik Prabhat .
इराणमध्ये सत्तापालटाचे वारे: निदर्शनांमुळे सरकार दबावाखाली, अर्थव्यवस्था कोलमडली
Iran Protest: इराणमधील इस्लामिक राजवटीविरोधात सुरू असलेल्या तीव्र आंदोलनांमुळे सध्याचे नेतृत्व प्रचंड दबावाखाली आले आहे. गेल्या अनेक वर्षांतील हे सर्वात मोठे आंदोलन मानले जात असून, देशातील ढासळलेली अर्थव्यवस्था आणि अंतर्गत असंतोषामुळे इराणच्या ४७ वर्षांच्या इतिहासातील हे सर्वात कठीण संकट असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. गेल्या वर्षी इस्रायलसोबत झालेल्या १२ दिवसांच्या युद्धामुळे आणि अमेरिकेने अणुकेंद्रं लक्ष्य केल्यामुळे […] The post इराणमध्ये सत्तापालटाचे वारे: निदर्शनांमुळे सरकार दबावाखाली, अर्थव्यवस्था कोलमडली appeared first on Dainik Prabhat .
Eknath Shinde : इतरवेळी नेटफ्लिक्स अन् निवडणुका आल्या की पॉलिटिक्स; एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंना टोला
मुंबई : महानगरपालिका निवडणुकीच्या (जानेवारी २०२६) प्रचाराला जोर चढत असताना आज (१२ जानेवारी २०२६) शिवाजी पार्क मैदानावर महायुतीची (भाजप-शिवसेना शिंदे गट) जाहीर सभा पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सभेला मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. सभा सुरू झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी प्रथम बाळासाहेब ठाकरे यांचे […] The post Eknath Shinde : इतरवेळी नेटफ्लिक्स अन् निवडणुका आल्या की पॉलिटिक्स; एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंना टोला appeared first on Dainik Prabhat .
भारताच्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या संघटनेचा सिनेमॅटिक प्रवास उलगडणारा ‘शतक’
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शंभर वर्षांच्या अद्भुत आणि अज्ञात वाटचालीचा मागोवामुंबई : यंदाचे वर्ष (२०२६) राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी (RSS) अत्यंत विशेष आणि ऐतिहासिक ठरणार आहे. देशाच्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या संघटनेला यंदा १०० वर्षे पूर्ण होत असून, हा त्याच्या इतिहासातील एक मोठा टप्पा आहे.शंभर वर्षांचा हा प्रवास पूर्ण करत असताना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतातील सर्वाधिक चर्चेत असलेली संघटना राहिली आहे. संघाविषयीची सार्वजनिक मते अनेकदा सखोल समजुतीपेक्षा धारणांवर आणि समजुतींवर आधारित राहिली आहेत. त्याच्या मूळ तत्त्वज्ञान, मूल्यव्यवस्था आणि अंतर्गत कार्यपद्धतीकडे पाहाण्याचा प्रयत्न फारसा झालेला नाही.‘शतक (संघ के १०० वर्ष)’ असे शीर्षक असलेला हा हिंदी चित्रपट वीर कपूर निर्मित असून, आशिष तिवारी सहनिर्माते आहेत. एडीए ३६० डिग्री एलएलपी यांच्या सहकार्याने साकारलेला हा चित्रपट गोंगाटापलीकडे जाऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा खरा, प्रामाणिक आणि वास्तव प्रवास मांडण्याचा प्रयत्न करतो. या चित्रपटात संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचे योगदान, तसेच एम. एस. गोळवलकर (गुरुजी) यांच्या नेतृत्वाखाली झालेला संघटनात्मक विकास उलगडण्यात आला आहे. मूल्यनिष्ठा, शिस्त आणि दीर्घकालीन दृष्टी यांवर आधारित संघटनेचे खरे स्वरूप या चित्रपटातून मांडले आहे.चित्रपटाबाबत निर्माता वीर कपूर म्हणतात, ‘’मी नेहमीच या राष्ट्राची सेवा केली आहे आणि त्याच माध्यमातून शक्य त्या प्रत्येक प्रकारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचीही सेवा केली आहे. ‘शतक’ हा शंभर वर्षांपूर्वी सुरू झालेल्या, शांत तरीही अथक परिश्रमांनी उभ्या राहिलेल्या प्रवासातील एक नम्र पाऊल आहे. आज जग भारताकडे प्रेरणेसाठी पाहात असताना, गैरसमज आणि धारणांपलीकडे जाऊन ही कथा प्रामाणिकपणे मांडणे आणि देश घडवण्यात संघाची भूमिका अधोरेखित करणे अत्यावश्यक आहे. स्पष्टता, एकता आणि राष्ट्रीय अभिमान या व्यापक ध्येयासाठी हा चित्रपट आमचे छोटेसे योगदान आहे.” आशिष मल दिग्दर्शित ‘शतक’ हा चित्रपट याच वर्षी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
पुणे : महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 26 (गट ड) मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार विजय प्रकाश ढेरे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दीपक मानकर यांच्या उपस्थितीत भव्य व प्रभावी प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला नागरिकांचा, कार्यकर्त्यांचा व पक्ष पदाधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सदर प्रचार रॅलीची सुरुवात […] The post Pmc Election : विजय ढेरे यांच्यासह राष्ट्रवादीच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा : दीपक मानकर appeared first on Dainik Prabhat .
पहिल्यांदाच केंद्रीय अर्थसंकल्प रविवारी सादर होणार, २८ जानेवारी रोजी संसदेचे अधिवेशन सुरू होणार
नवी दिल्ली : देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच केंद्रीय अर्थसंकल्प हा रविवारी सादर केला जाणार आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सोमवारी केंद्रीय अर्थसंकल्प रविवारी १ फेब्रुवारी रोजीच सादर होणार असल्याचे स्षष्ट केले.यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण सादर करणार आहेत. संसदेच्या पटलावर त्या आठव्यांदा अर्थसंकल्प ठेवणार आहेत. यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेश हे २८ जानेवारी आणि २ एप्रिल दरम्यान दोन सत्रात होणार आहे.केंद्रीय संसदीय मंत्री किरण रिजीजू यांनी याबाबतचा निर्णय सोशल मीडियावर शेअर केला. ते म्हणाले, 'भारत सरकारच्या शिफरसीनुसार भारताच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मी यांनी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२६ साठी दोन्ही सभागृहांचे सत्र भरवण्याची परवानगी दिली आहे. हे सत्र २८ जानेवारी रोजी सुरू होईल आणि पहिले सत्र १३ फेब्रुवारी रोजी संपुष्टात येईल. त्यानंतर दुसरे सत्र हे ९ मार्च रोजी सुरू होईल आणि २ एप्रिल रोजी संपेल. दरम्यान, अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर जुलै-ऑगस्ट महिन्यात पावसाळी अधिवेशन आणि नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात हिवाळी अधिवेशन होते.
निवडणूक काळात तब्बल ३ कोटी १० लाखांची रोख रक्कम जप्त
मुंबई : मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीशी संबंधित आचारसंहितेच्या काळात तब्बल ३ कोटी १० लाख १७ हजार २० रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. तर तब्बल ०८ लाख ३ हजार ३३० रुपये किंमतीची १२३७ लिटर दारु जप्त करण्यात आली आहे. ५५ किलोग्रॅम अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. याचा बाजारभाव ४४ कोटी ९५ लाख ०७ हजार २३७ रुपये एवढी आहे. महापालिकेच्या निवडणूक भरारी पथकामार्फत ही कारवाई करण्यात आली आहे.मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक २ हजार ०२५ करता आचारसंहितेच्या काळात महापालिकेच्या भरारी पथकाच्यावतीने धडक कारवाई करण्यात येत आहे. महापालिका आचारसंहिता कक्षाच्यावतीने १६ जणांवर गुन्हे अदखलपात्र आणि १३ जणांवर गुन्हे दखलपात्र नोंदवण्यात आले आहे. तसेच ५२ दारुगुळा तसेच परवानाधारक व्यक्तींकडून ३६ रिव्हॉल्वर जप्त करण्यात आली आहे. ११५ धारदार शस्त्रे पोलिसांच्या मदतीने जप्त करण्यात आली आहे. महापालिका निवडणुकीसाठी आचारसंहिता कक्षाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या या कारवाईत प्रतिबंधात्मक कारवाई करताना २४५० जणांवर प्रलोभन तसेच इतर अन्वये कारवाई करण्यात आली आहे. ५१ जणांना गुन्हेगार घोषित करण्यात आले आहे. १०६ जणांना फरारी तसेच फरारी आरोपी घोषित करण्यात आले आहे, तसेच एमपीडीए अंतर्गत दोघांवर कारवाई करण्यात आली आहे.
आयसीसी क्रमवारीतील अव्वल स्थानाकडे विराट कोहलीची वाटचाल
वडोदरा : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माच्या आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानाला आता धोका निर्माण झाला असून, विराट कोहली पुन्हा एकदा या सिंहासनावर विराजमान होण्याची चिन्हे आहेत. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या सामन्यानंतर क्रमवारीची समीकरणे वेगाने बदलली आहेत.भारतीय क्रिकेट संघाने सन २०२६ ची दमदार सुरुवात केली आहे. ११ जानेवारी रोजी वडोदरा येथे झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने न्यूझीलंडवर चार गडी राखून विजय मिळवत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. भारताचा माजी कर्णधार विराट कोहली पुन्हा एकदा ‘नंबर वन’ फलंदाज बनू शकतो, तर रोहित शर्माच्या रेटिंगमध्ये मोठी घसरण होण्याची शक्यता आहे. आयसीसीची नवीन अधिकृत क्रमवारी जाहीर झाल्यानंतर यावर शिक्कामोर्तब होईल.आयसीसीने शेवटची एकदिवसीय क्रमवारी ६ डिसेंबर २०२५ रोजी अपडेट केली होती. नवीन वर्षातील पहिल्या सामन्यासह आता खेळाडूंच्या रेटिंगमध्ये बदल होणार आहेत. शेवटच्या अपडेटनुसार, रोहित शर्मा ७८१ रेटिंगसह पहिल्या तर विराट कोहली ७७३ रेटिंगसह दुसऱ्या स्थानावर होता.न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात रोहित शर्माने आक्रमक सुरुवात केली, मात्र तो मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. रोहितने २९ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने २६ धावा केल्या. याउलट, विराट कोहलीने आपल्या लौकिकास साजेसी फलंदाजी केली. विराटचे शतक अवघ्या ७ धावांनी हुकले असले, तरी त्याने ९१ चेंडूत ९३ धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली. विराटने १०२.२० च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या, तर रोहितचा स्ट्राइक रेट ८९.६६ इतकाच राहिला. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मालिकेचा दुसरा सामना १४ जानेवारी रोजी म्हणजेच बुधवारी खेळवला जाणार आहे. योगायोगाने त्याच दिवशी आयसीसी आपली क्रमवारी अपडेट करणार आहे. बुधवारी (दि. १२) जाहीर होणाऱ्या या क्रमवारीत नक्की कोणाचे वर्चस्व राहते, याकडे आता क्रिकेट विश्वाचे लक्ष लागले आहे.रोहित शर्माची दोन क्रमाकांनी होणार घसरणजुन्या क्रमवारीनुसार रोहित आणि विराट यांच्यात केवळ ८ रेटिंग गुणांचा फरक होता. ताज्या कामगिरीनंतर हा फरक भरून निघणार असून विराट कोहली ८०० रेटिंग गुणांच्या समीप पोहोचण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, तिसऱ्या स्थानावर असलेल्या न्यूझीलंडच्या डॅरिल मिचेलनेही ८४ धावांची खेळी केली आहे. त्यामुळे नवीन क्रमवारीत मिचेल दुसऱ्या स्थानावर झेप घेऊन रोहित शर्माची तिसऱ्या क्रमांकावर घसरण होण्याची देखील दाट शक्यता आहे.
इस्रोचे २०२६ मधील पहिले प्रक्षेपण अयशस्वी, १६ उपग्रह अंतराळात बेपत्ता
नवी दिल्ली : इस्रोचे २०२६ मधील पहिले प्रक्षेपण अयशस्वी झाले. PSLV-C62 मोहिमेपूर्वी, गेल्या वर्षी C61 देखील अयशस्वी झाले. यावेळी, रॉकेट यशस्वीरित्या प्रक्षेपित झाले. पण तिसऱ्या टप्प्याची टप्प्याची माहिती नियोजीत वेळेपेक्षा विलंबाने मिळाली. चौथ्या टप्प्याला सुरुवात झाली पण नंतर अपडेट मिळणे थांबले. वारंवार संपर्काचा प्रयत्न झाला. मात्र PSLV-C62 चा नियंत्रण कक्षाशी तुटलेला संपर्क पुन्हा सुरळीत झाला नाही. इस्रोने दिलेल्या माहितीनुसार तिसऱ्या टप्प्यात आलेल्या एका समस्येमुळे रॉकेटने मार्ग बदलला आणि PSLV-C62 चा नियंत्रण कक्षाशी संपर्कच तुटला. यामुळे रॉकेटमधून अंतराळात पाठवलेले १६ उपग्रह बेपत्ता झाले आहेत. इस्रोच्या नियंत्रण कक्षाशी असलेला PSLV-C62 चा संपर्क तुटल्यामुळे १६ उपग्रह अंतराळात बेपत्ता झाले आहेत. प्रक्षेपण यशस्वी झाले असते तर १६ उपग्रह अंतराळात स्थिरावले असते. यात चेन्नईच्या ऑर्बिटएड एरोस्पेसचा पहिला उपग्रह आयुलसॅटचाही समावेश झाला असता. आयुलसॅटमुळे अंतराळात उपग्रहांचे कक्षेत इंधन भरण्याचे तंत्रज्ञान आणखी विकसित झाले असते. भारताचा पहिला व्यावसायिक इन-ऑर्बिट डॉकिंग आणि इंधन भरण्याचा इंटरफेस तयार झाला असता. उपग्रहातील एका टाकीतून दुसऱ्या टाकीत इंधन (प्रोपेलंट) स्थानांतरित करणे, शक्ती स्थानांतरित करणे, डेटा स्थानांतरित करणे यासाठीचे तंत्रज्ञान विकसित झाले असते.
Mohammad Nabi angry on Bangladesh reporter : बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमान आणि आयपीएल २०२६ मधील त्याच्या हकालपट्टीवरून सुरू झालेला वाद आता विकोपाला गेला आहे. कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) त्याला संघातून वगळल्यानंतर बांगलादेशातून भारताविरुद्ध तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. आता या वादात अफगाणिस्तानचा अष्टपैलू खेळाडू मोहम्मद नबी याने उडी घेत बांगलादेशी पत्रकाराला चांगलेच सुनावले आहे. पत्रकाराचा […] The post Mohammad Nabi : ‘माझा काय संबंध?’, मुस्तफिझूरबद्दल प्रश्न विचारताच मोहम्मद नबी बांगलादेशी पत्रकारावर संतापला appeared first on Dainik Prabhat .
आपल्याला टप्पू मासा लागतो.! समाजाच्या विरोधात गेले, त्यांना धडा शिकवा; जरांगे पाटलांचा एल्गार !
Manoj Jarange Patil : राज्यात सध्या २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. १५ जानेवारीला मतदान आणि १६ जानेवारीला मतमोजणी होणार असतानाच, मनोज जरांगे पाटील यांनी या निवडणुकीत थेट उडी घेतली आहे. “जे समाजाच्या आणि आरक्षणाच्या विरोधात गेले, त्यांना या निवडणुकीत धडा शिकवा,” असे आवाहन त्यांनी मराठा बांधवांना केले आहे. जरांगे पाटलांच्या भाषणातील मुख्य मुद्दे : […] The post आपल्याला टप्पू मासा लागतो.! समाजाच्या विरोधात गेले, त्यांना धडा शिकवा; जरांगे पाटलांचा एल्गार ! appeared first on Dainik Prabhat .
Bigg Boss Marathi 6: ‘बिग बॉस मराठी’ शोमध्ये ‘हे’ स्पर्धक, जाणून घ्या त्यांची वैयक्तिक माहिती…
मुंबई : मराठी मनोरंजन विश्वातील सर्वाधिक लोकप्रिय आणि चर्चेत असलेला रिअॅलिटी शो ‘बिग बॉस मराठी’ आपल्या सहाव्या पर्वासह प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अभिनेता रितेश देशमुख याच्या दमदार सूत्रसंचालनाखाली हा शो ११ जानेवारी रोजी भव्य दिमाखात सुरू झाला. बिग बॉस मराठी ६ च्या ग्रँड प्रीमियरला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, यंदाच्या पर्वातील स्पर्धकांची अंतिम व अधिकृत […] The post Bigg Boss Marathi 6: ‘बिग बॉस मराठी’ शोमध्ये ‘हे’ स्पर्धक, जाणून घ्या त्यांची वैयक्तिक माहिती… appeared first on Dainik Prabhat .
Ladki Bahin Yojna : निवडणूक आयोगाचा राज्य सरकारला झटका ! लाडकी बहीण योजनेबाबत घेतला ‘हा’मोठा निर्णय
Ladki Bahin Yojna : महाराष्ट्रातील २९ महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात लागू असलेल्या आदर्श आचारसंहितेमुळे ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेच्या (Ladki Bahin Yojna) लाभ वितरणावर मोठे निर्बंध आले आहेत. सत्ताधारी महायुती सरकारने मकर संक्रांतीच्या (१४ जानेवारी) पूर्वी डिसेंबर २०२५ आणि जानेवारी २०२६ या दोन्ही महिन्यांचा एकत्रित ३,००० रुपये (प्रति महिना १,५०० रुपये) लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याची […] The post Ladki Bahin Yojna : निवडणूक आयोगाचा राज्य सरकारला झटका ! लाडकी बहीण योजनेबाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय appeared first on Dainik Prabhat .
थंडीचा जोर वाढणार.! राज्यात तापमानाचा पारा घसरला, हवामान खात्याने स्पष्टच सांगितलं….
Weather Update : देशभरातील काही राज्यात अचानक थंडी, तर काही राज्यात पावसाच्या सरी कोसळत असल्यामुळे काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होत असून महाराष्ट्रातही तापमानात मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. काही भागांत पारा घसरला आहे. वर्षाच्या पहिल्याच दिवशी राज्यातील अनेक भागांत पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे काही काळ थंडी कमी झाली आणि तापमानात वाढ नोंदवली गेली. […] The post थंडीचा जोर वाढणार.! राज्यात तापमानाचा पारा घसरला, हवामान खात्याने स्पष्टच सांगितलं…. appeared first on Dainik Prabhat .
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना लॉटरी लागणार? 2100 रुपये कधीपासून मिळणार
मुंबई : राज्यातील अडीच लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेली लाडकी बहीण योजना महिलांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी जाहीर करण्यात आलेल्या या योजनेचा महायुतीला मोठा राजकीय फायदा झाला होता. दरम्यान, सत्तेत आल्यानंतर लाडक्या बहिणींना दरमहा 2100 रुपये देण्यात येतील, असं आश्वासन निवडणूक प्रचारादरम्यान अनेक महायुती नेत्यांनी दिलं होतं. मात्र […] The post Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना लॉटरी लागणार? 2100 रुपये कधीपासून मिळणार appeared first on Dainik Prabhat .
बंगळुरूत महिला इंजिनिअरची निर्घृण हत्या; १८ वर्षीय आरोपीने खिडकीतून घरात शिरून ...
बंगळुरू : आयटी क्षेत्रात कार्यरत असलेल्या ३४ वर्षीय महिला इंजिनिअरचा मृत्यू सुरुवातीला अपघात मानला जात होता. मात्र पोलिस तपास पुढे जाताच हा प्रकार अपघात नसून पूर्वनियोजित आणि क्रूर खून असल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. या प्रकरणात अवघ्या १८ वर्षांच्या तरुणाला अटक करण्यात आली असून, त्याच्या कृत्याने संपूर्ण शहर हादरले आहे.ही घटना बंगळुरू शहरातील राममूर्ती नगर परिसरातील सुब्रमणि लेआऊट येथे घडली. शर्मिला डिके (वय ३४) या एका खासगी आयटी कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कार्यरत होत्या. ३ जानेवारी रोजी त्यांच्या भाड्याच्या घरात त्यांचा मृतदेह आढळून आला होता. घरात आग लागल्याचे चिन्ह दिसत असल्याने सुरुवातीला हा मृत्यू गुदमरून झालेला अपघात असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.तपासात उलगडले धक्कादायक सत्यपोलीस आणि फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळाची सखोल पाहणी केल्यानंतर संशय अधिक बळावला. वैज्ञानिक आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू असतानाच मृत महिलेच्या शेजारी राहणाऱ्या कर्नाल कुराई (वय १८) याच्यावर संशय बळावला.पोलीस चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याचे समोर आले आहे. ३ जानेवारी रोजी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास आरोपीने खिडकीतून घरात प्रवेश केला. त्यानंतर त्याने शर्मिला यांच्याकडे शरीरसुखाची मागणी केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले.विरोध केल्यानंतर हिंसाचारशर्मिला यांनी ठाम विरोध करताच आरोपी आक्रमक झाला. झालेल्या झटापटीत त्यांना गंभीर इजा झाली आणि त्या बेशुद्ध पडल्या. परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे लक्षात येताच, आरोपीने गुन्हा लपवण्यासाठी घरातील काही वस्तूंना आग लावून हा प्रकार अपघात असल्याचा बनाव करण्याचा प्रयत्न केला. पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपीने मृत महिलेचा मोबाईल फोनही सोबत नेल्याचे तपासात समोर आले आहे. मात्र तांत्रिक विश्लेषण आणि कॉल डिटेल्सच्या आधारे पोलिसांनी आरोपीपर्यंत मजल मारली.खुनाचा गुन्हा दाखल, आरोपी अटकेतया प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३ (१ ) (खून), ६४ (२ ), ६६ आणि २३८ (पुरावे नष्ट करणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरुवातीला अनैसर्गिक मृत्यूची नोंद असलेले हे प्रकरण आता खुनात रूपांतरित झाले असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे बंगळुरूतील आयटी क्षेत्रात तसेच नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना व्यक्त केली जात असून, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीरपणे ऐरणीवर आला आहे.
लाडकी बहीण योजनेचा लाभ अग्रिम स्वरुपात देण्यास मज्जाव
मुंबई : महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात आदर्श आचारसंहिता लागू असताना ‘लाडकी बहीण’ योजनेचा नियमित किंवा प्रलंबित लाभ देता येईल; परंतु जानेवारी महिन्याचा लाभ अग्रिम स्वरुपात देण्यास राज्य निवडणूक आयोगाने मज्जाव केला आहे.“लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीची मोठी भेट! १४ जानेवारी पूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात डिसेंबर व जानेवारी महिन्याचे तीन हजार जमा होणार,” अशा आशयाच्या प्रसिद्ध झालेल्या बातम्यांच्या आधारे राज्य निवडणूक आयोगाकडे विविध तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यासंदर्भातील वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी लाडकी बहिण योजनेसंदर्भात शासनाने घेतलेल्या निर्णयाबाबत स्पष्टीकरण देण्यात यावे, असे राज्य निवडणूक आयोगाने मुख्य सचिवांना कळविले होते.“राज्य निवडणूक आयोगाने ४ नोव्हेंबर २०२५ रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आदर्श आचार संहितेबाबत एकत्रित आदेश निर्गमित केले आहेत. या आदेशातील तरतुदींनुसार निवडणूक जाहीर होण्यापूर्वी प्रत्यक्ष सुरू झालेली विकासकामे व योजना आचारसंहिता काळात सुरू ठेवण्यास परवानगी आहे,” असे मुख्य सचिवांनी आपल्या अहवालात कळविले होते. ही पार्श्वभूमी लक्षात घेता, या योजनेचा नियमित लाभ देता येईल; परंतु अग्रिम स्वरुपात लाभ देता येणार नाही; तसेच नवीन लाभार्थीदेखील निवडता यणार नाहीत, असे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत.
Top-10 Richest Indian: भारतातील श्रीमंतांची यादी जाहीर; पहा पहिल्या 10 मध्ये कोणाचा समावेश
Top-10 Richest Indian: भारतात अब्जाधीशांची संख्या झपाट्याने वाढत असली, तरी जागतिक स्तरावर मानल्या जाणाऱ्या ‘१०० अब्ज डॉलर क्लब’मध्ये स्थान मिळवणारे मुकेश अंबानी हे सध्या एकमेव भारतीय ठरले आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी आपले अव्वल स्थान कायम राखले असून, त्यांच्या पाठोपाठ गौतम अदानी दुसऱ्या क्रमांकावर आहेत. मार्केट व्हॅल्यूच्या बाबतीत देशातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या […] The post Top-10 Richest Indian: भारतातील श्रीमंतांची यादी जाहीर; पहा पहिल्या 10 मध्ये कोणाचा समावेश appeared first on Dainik Prabhat .
Election 2026 : पैसे वाटपावरून तुफान राडा.! राष्ट्रवादीचे दोन गट एकमेकांना भिडले
Election 2026 – सांगली महापालिका निवडणुकीत मिरज येथे पैसे वाटप सुरू असल्याच्या कारणातून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दोन गटामध्ये वादावादीचा प्रकार घडला. यावेळी अजित पवार पक्षाचे आमदार इद्रिस नायकवडी यांचे आणि शरद पवार पक्षाच्या उमेदवारांचे कार्यकर्ते एकमेकांवर धावून गेले. आमदार इद्रिस नायकवडी यांचा मुलगा प्रभाग २० मधून निवडणूक लढवत असून त्यांच्याकडुन निवडणुकीत मतदारांना पैसे वाटप करण्यात येत […] The post Election 2026 : पैसे वाटपावरून तुफान राडा.! राष्ट्रवादीचे दोन गट एकमेकांना भिडले appeared first on Dainik Prabhat .
‘अर्ध्या हिंदुस्थानला बुडवू!’, पाकिस्तानच्या लष्करप्रमुखाची नवी धमकी; आखला धोकादायक प्लॅन
इस्लामाबाद: पहलगाममधील दहशतवादी हल्ला आणि भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तानने संबंध सुधारणे अपेक्षित होते. मात्र, शेजारील देश भारताच्या विरोधात सातत्याने विष ओकत आहे. पाकिस्तानचा लष्करप्रमुख फील्ड मार्शल आसिम मुनीरने पुन्हा एकदा भारताला धमकी दिली असून, मुस्लिम देशांच्या सुरक्षेच्या नावाखाली एक नवीन ‘डिफेंस डॉक्ट्रिन’ (संरक्षण धोरण) सादर केले आहे. काय आहे मुनीरचा नवा प्लॅन? या नव्या धोरणांतर्गत […] The post ‘अर्ध्या हिंदुस्थानला बुडवू!’, पाकिस्तानच्या लष्करप्रमुखाची नवी धमकी; आखला धोकादायक प्लॅन appeared first on Dainik Prabhat .
TMC Election : ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या (जानेवारी २०२६) पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) जोरदार मोर्चेबांधणी करत आहे. अशातच मनसेचे ठाणे शहर प्रभाग अध्यक्ष आणि महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार सीमा महेश इंगळे यांचे पती महेश इंगळे यांनी सोशल मीडियावर केलेल्या गंभीर आरोपाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. महेश इंगळे यांनी फेसबुकवर स्वतःचा एक व्हिडीओ पोस्ट […] The post TMC Election : ठाकरेंच्या सभेआधी ठाण्यात खळबळ ! ‘माझ्या रक्तात गद्दारी नाही’ म्हणत ‘या’ नेत्याचे गंभीर आरोप appeared first on Dainik Prabhat .
PMC Election : “प्रभाग २१ चा आदर्श प्रभाग म्हणून विकास करणार”; राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा निर्धार
पुणे : ‘प्रभाग क्रमांक २१’ हा शहरातील एक आदर्श प्रभाग म्हणून विकसित करून दाखविण्याचा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी मतदारांना दिला. प्रचारादरम्यान नागरिकांशी संवाद साधताना उमेदवारांनी प्रभागातील सर्व घटकांच्या सर्वांगीण विकासावर भर देणार असल्याचे स्पष्ट केले. यावेळी प्रभाग क्रमांक २१ (मुकुंदनगर – सॅलिसबरी पार्क) येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुगत (श्रीशैल) चंद्रशेखर दसाडे, शोभा संतोष […] The post PMC Election : “प्रभाग २१ चा आदर्श प्रभाग म्हणून विकास करणार”; राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा निर्धार appeared first on Dainik Prabhat .
Wasim Akram Revealed : “मला बसखाली फेकून देणार होते…”; वसीम अक्रमचा सहकाऱ्यांबद्दल खळबळजनक खुलासा
Wasim Akram Revealed about 1996 WC : पाकिस्तानचा महान वेगवान गोलंदाज आणि माजी कर्णधार वसीम अक्रमने आपल्याच जुन्या सहकाऱ्यांवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. १९९६ च्या वर्ल्ड कपमध्ये भारताकडून झालेल्या पराभवानंतर पाकिस्तानी संघाने आपल्याला ‘बळीचा बकरा’ बनवण्याचा आणि संपूर्ण दोष आपल्यावर ढकलण्याचा कट रचला होता, असा खळबळजनक खुलासा अक्रमने एका टीव्ही शोमध्ये केला आहे. नेमकं […] The post Wasim Akram Revealed : “मला बसखाली फेकून देणार होते…”; वसीम अक्रमचा सहकाऱ्यांबद्दल खळबळजनक खुलासा appeared first on Dainik Prabhat .
PMC Election : राष्ट्रवादीच्या उमेदवारांची ‘संवाद फेरी’उत्साहात, प्रचाराला मिळतोय मोठा प्रतिसाद !
PMC Election : महानगरपालिका निवडणुकीसाठीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. अशातच शंकर महाराज मठ-बिबवेवाडी, प्रभाग क्रमांक २० मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रचार संवाद फेरीचे आयोजन करण्यात आले होते. या फेरीला स्थानिक नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे. याठिकाणी राष्ट्रवादीकडून गौरव गणेश घुले, प्रितम रमेश नागापुरे, अस्मिता विशाल शिंदे आणि रश्मी विक्रांत अमराळे यांच्या पॅनलला संधी […] The post PMC Election : राष्ट्रवादीच्या उमेदवारांची ‘संवाद फेरी’ उत्साहात, प्रचाराला मिळतोय मोठा प्रतिसाद ! appeared first on Dainik Prabhat .
Rashtrapati Bhavan : राष्ट्रपती भवनाचं राजेशाही रूप सामान्यांना पाहायला मिळत का? असं करा तिकीट बुक !
Rashtrapati Bhavan | Rashtrapati Bhavan Ticket – जेव्हा दिल्लीत फिरण्याचा विषय येतो, तेव्हा प्रत्येकाच्या मनात लाल किल्ला, कुतुब मीनार, लोधी गार्डन आणि चांदनी चौक यांसारखी ठिकाणेच येतात. पण देशाच्या राजधानीत अशीही अनेक ठिकाणे आहेत जिथे तुम्ही राजेशाही वैभव आणि इतिहासाची पाने जवळून पाहू शकता. असेच एक खास ठिकाण म्हणजे ‘राष्ट्रपती भवन’, जे भारताच्या राष्ट्रपतींचे अधिकृत […] The post Rashtrapati Bhavan : राष्ट्रपती भवनाचं राजेशाही रूप सामान्यांना पाहायला मिळत का? असं करा तिकीट बुक ! appeared first on Dainik Prabhat .
Weather Updates : राज्यात सध्या ढगाळ हवामान आणि हलक्या पावसाच्या शक्यतेमुळे थंडीचा जोर कमी होत आहे. किमान आणि कमाल तापमानात लक्षणीय वाढ नोंदवली गेली असून, भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील तीन दिवस थंडीचा कडाका कमी राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा भागात ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा […] The post Weather Updates : राज्यातील ‘या’ 10 जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज; पुढील तीन दिवस थंडीचा कडाका कमी राहणार appeared first on Dainik Prabhat .
Atul Londhe : काँग्रेसला महिला विरोधी ठरवणे हास्यास्पद; प्रवक्ते अतुल लोंढे यांची टीका
नागपूर : महिलांचे शोषण आणि बलात्कार प्रकरणांतील आरोपींच्या पाठीशी उभे राहणाऱ्या भाजपने काँग्रेसला महिला विरोधी ठरवणे हे अत्यंत हास्यास्पद असल्याची तीव्र टीका काँग्रेसचे प्रदेश मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली. भाजपचे शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांच्या वक्तव्याचा समाचार घेत त्यांनी भाजपच्या महिलाविषयक दुटप्पी भूमिकेवर घणाघाती हल्लाबोल केला. लोंढे म्हणाले की, भाजपने महापालिका निवडणुकीसाठी जाहीरनामा जाहीर केला […] The post Atul Londhe : काँग्रेसला महिला विरोधी ठरवणे हास्यास्पद; प्रवक्ते अतुल लोंढे यांची टीका appeared first on Dainik Prabhat .
मुंबई पोलिसांची डान्स बारविरोधात मोठी कारवाई, १५ जण अटकेत
मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात बेकायदेशीर डान्स बारविरोधात कारवाई वेगाने सुरू आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट एकने माझगाव येथील डायमंड डोअर बार अँड रेस्टॉरंटवर छापा टाकून नियमबाह्य आणि अश्लील नृत्यप्रकार उघडकीस आणला. या कारवाईत बार चालक, कर्मचारी, बारबाल आणि ग्राहकांसह एकूण 15 जणांना अटक करण्यात आली आहे. नवाब टँक रोडवरील खान बिल्डिंगमधील या […] The post मुंबई पोलिसांची डान्स बारविरोधात मोठी कारवाई, १५ जण अटकेत appeared first on Dainik Prabhat .
माळेगाव – बारामती शहरातील काळे वेअर हाऊस कॅम्पस येथे स्व. चंद्रभागा शंकरराव काळे-देशमुख यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर रवींद्र आबा काळे परिवाराच्यावतीने बुधवार दि. १४ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत होणार आहे. या उपक्रमाचा उद्देश समाजात रक्तदानाचे महत्त्व पटवून देणे, जनजागृती निर्माण करणे आणि […] The post स्मरण माऊलीचे, कार्य समाजहिताचे..! स्व. चंद्रभागा काळे-देशमुख यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ परिवाराच्यावतीने भव्य रक्तदान शिबिर appeared first on Dainik Prabhat .
Pune Crime News : प्रेमप्रकरणातून नायजेरियन नागरिकाची हत्या; दोन आरोपी ताब्यात
पुणे : काळेपडळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रेमप्रकरणाच्या कारणावरून झालेल्या वादातून एका नायजेरियन नागरिकाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना आज १२ जानेवारी २०२६ रोजी पिसोळी परिसरात घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एनकेनिया पेंट्रिशिया मबिगा (रा. लिमरास हाइट्स सोसायटी, बालाजी पद्मावती नगर, धर्मावत पेट्रोलपंपाजवळ, पिसोळी, पुणे) या नायजेरियन महिलेच्या घरी येमेका क्रिस्टीएन (४०, रा. […] The post Pune Crime News : प्रेमप्रकरणातून नायजेरियन नागरिकाची हत्या; दोन आरोपी ताब्यात appeared first on Dainik Prabhat .
इंडिगो फ्लाईटला हवेत पक्षाची धडक! पायलटच्या प्रसंगावधानाने वाचले २१६ लोकांचे प्राण
वाराणसी : हवेत उड्डाण करत असताना इंडिगो एअरलाईन्सच्या एका विमानाला पक्षाची जोरदार धडक बसल्याची गंभीर घटना रविवारी संध्याकाळी घडली. गोरखपूरहून बेंगळुरूकडे निघालेल्या इंडिगोच्या 6E-437 या विमानाच्या पुढील भागाला (नोज सेक्शन) या धडकेमुळे नुकसान झाले. विमानात एकूण २०६ प्रवासी असल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.धडकेनंतर परिस्थितीचे गांभीर्य ओळखत वैमानिकाने तातडीने वाराणसी एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क साधला. प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत फ्लाईट वाराणसीच्या लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे वळवण्याचा निर्णय घेण्यात आला. संध्याकाळी ७.०५ वाजता विमानाचे सुरक्षित लँडिंग करण्यात आले.विमानाच्या पुढील भागाला तडेलँडिंगनंतर करण्यात आलेल्या प्राथमिक तपासणीत विमानाच्या पुढील भागाला तडे गेल्याचे स्पष्ट झाले. संभाव्य धोका लक्षात घेऊन वैमानिकाने पुढील उड्डाण न करण्याचा निर्णय घेतला. परिणामी ही फ्लाईट अधिकृतपणे रद्द करण्यात आली. वैमानिकाच्या या निर्णयामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.२१६ प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढलेसर्व प्रवाशांना रात्री ८.४० वाजेपर्यंत सुखरूपपणे विमानातून उतरवण्यात आले. इंडिगो प्रशासनाने तात्काळ हालचाल करत प्रवाशांच्या निवासाची व्यवस्था वाराणसीतील विविध हॉटेल्समध्ये केली गेली तसेच इतर पर्यायी प्रवास व्यवस्थेबाबत प्रवाशांना माहिती देण्यात आली.तांत्रिक तपासणी सुरूविमानाला बे नंबर-०३ वर उभे करण्यात आले असून तांत्रिक पथकाकडून सखोल तपासणी सुरू आहे. तपासणीत विमानाच्या पुढच्या भागाला नुकसान झाल्यानंतर दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. या संपूर्ण घटनेत कोणतीही जीवितहानी न झाल्याने सर्व प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला असून, वैमानिकाच्या सतर्कतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीला (१५ जानेवारी २०२६) अवघे तीन दिवस शिल्लक असताना मुंबईत राजकीय वादळ उठले आहे. भारतीय जनता पक्षाने (भाजप) प्रचारासाठी इतर राज्यांतील नेत्यांना स्टार कॅम्पेनर म्हणून उतरवले असून, उत्तर भारतीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी रवी किशन आणि मैथिली ठाकूर यांसारख्या नेत्यांना बोलावले. तर मुंबईतील दाक्षिणात्य समुदायाला लक्षात घेता तमिळनाडू भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष के. आन्नामलाई […] The post Raj Thackeray : मी मुंबईत येणारच, हिंमत असेल तर पाय कापून दाखवा; ‘या’ नेत्याचे राज ठाकरेंना खुलं आव्हान appeared first on Dainik Prabhat .
जिल्हा परिषद निवडणुकांना मुदतवाढ; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला दिलासा राज्यातील प्रलंबित जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला मोठा दिलासा दिलाय. या निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी न्यायालयाने १५ दिवसांची मुदतवाढ दिली असून, आता १५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत मुदत निश्चित केलीय. यापूर्वी ही मुदत ३१ जानेवारीपर्यंत होती. ज्या जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची ५० […] The post Today TOP 10 News: झेडपी निवडणूका पुढे ढकलल्या, मतदारांना पैसे वाटप, महाराष्ट्रात हुडहुडी ते टाटाच्या कारवर सूट… वाचा आजच्या टाॅप 10 बातम्या appeared first on Dainik Prabhat .
मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळातून (Maharashtra Vidhimandal) मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या 4 आमदारांसह सत्ताधारी पक्षातील 6 आमदारांना मंत्रिपदाचा दर्जा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याबाबतचा अधिकृत शासन निर्णय (GR) काढण्यात आला असून, या आमदारांना ‘लाल दिवा’सह मंत्रिपदाच्या सोयी-सुविधा मिळणार आहेत. कोणत्या आमदारांना मंत्रिपदाचा दर्जा? हा निर्णय […] The post मोठी बातमी..! ठाकरे–काँग्रेसच्या ‘या’ 4 आमदारांना मंत्रिपदाचा दर्जा; सत्ताधारी 6 आमदारांनाही ‘लाल दिवा’, फडणवीस सरकारचा निर्णय appeared first on Dainik Prabhat .
राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीला अवघे काही तास शिल्लक असताना कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत (KDMC Election) प्रचार शिगेला पोहोचला आहे. येथील प्रभाग क्रमांक २९ (पॅनल २९) मध्ये सत्ताधारी भाजपकडून मतदारांना पैसे वाटप केल्याचा धक्कादायक आरोप विरोधकांनी केला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत पांढऱ्या पाकिटातून ५०० रुपयांच्या ६ नोटा (एकूण ३,००० रुपये) मतदारांना दिले जात असल्याचे दिसून येत […] The post KDMC Election : कल्याण -डोंबिवलीमध्ये भाजपकडून पैशांचे वाटप; विरोधकांकडून Video व्हायरल करत टीकेची झोड appeared first on Dainik Prabhat .
“पावसाळ्यात बेडकं बाहेर येतात तसे, निवडणुका आल्या की ठाकरे बंधूंच्या नकला सुरु होतात…”–गिरीश महाजन
Raj Thackeray | Uddhav Thackeray | Girish Mahajan – पावसाळा सुरू झाला की बेडकं बाहेर यावीत तसे निवडणुका आल्या की, ठाकरे बंधूंची भाषणे आणि नकला सुरू होतात. कितीही भाषणे केली तरी लोक त्यांना स्वीकारत नाहीत; कारण लोकांचा विश्वास भाजपवर आहे. या निवडणुकीत राज्यातील एकातरी मोठ्या महापालिकेत ठाकरे बंधू आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सत्ता […] The post “पावसाळ्यात बेडकं बाहेर येतात तसे, निवडणुका आल्या की ठाकरे बंधूंच्या नकला सुरु होतात…” – गिरीश महाजन appeared first on Dainik Prabhat .
पंढरपूर : मकरसंक्रांती आणि भोगी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर येथील श्री विठ्ठल–रुक्मिणी मंदिरात भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन विशेष दर्शन व व्यवस्थापन आराखडा राबवण्यात येत आहे. परंपरेनुसार साजऱ्या होणाऱ्या या उत्सवासाठी राज्यभरातून हजारो भाविक दाखल होत असून, यंदा महिला भाविकांसाठी दर्शन सुलभ करण्यावर मंदिर समितीने विशेष भर दिला आहे.भोगीच्या दिवशी पहाटेचे वेळापत्रक बदलणारमंगळवार, १३ जानेवारी रोजी भोगी उत्सवानिमित्त श्री रुक्मिणी मातेची काकड आरती व नित्यपूजा पहाटे ३.०० ते ४.३० या वेळेत होणार आहे. भोगी अर्पण करण्यासाठी माता व भगिनींना पहाटे ४.३० ते ५.३० या कालावधीत मंदिरात प्रवेश देण्यात येणार आहे. त्यानंतर अलंकार व पोषाख परिधान केल्यानंतर सकाळी ६.३० पासून दर्शन खुले करण्यात येणार आहे.त्याच दिवशी श्री विठ्ठल मंदिरात काकड आरती व नित्यपूजा पहाटे ४.३० ते ५.४५ या वेळेत पार पडेल. भाविकांसाठी *पहाटे ६.०० नंतर पदस्पर्श दर्शन सुरू होणार आहे.संक्रांतीच्या दिवशी महिलांना दर्शनात प्राधान्यबुधवार, १४ जानेवारी रोजी मकरसंक्रांतीनिमित्त नेहमीच्या पूजाविधीनंतर श्री रुक्मिणी मातेचे अलंकार परिधान करून दर्शन सुरू करण्यात येणार आहे. या दिवशी जास्तीत जास्त माता व भगिनींना दर्शनाचा लाभ मिळावा, यासाठी पुरुष भाविकांनी शक्यतो मुखदर्शन घेण्याचे आवाहन मंदिर समितीने केले आहे.१५ जानेवारीपासून नियमित व्यवस्थागुरुवार, १५ जानेवारी रोजी काकड आरती, नित्यपूजा आणि दर्शन व्यवस्था पूर्ववत वेळापत्रकानुसार सुरू राहणार आहे.कडक बंदोबस्त आणि व्यवस्थापनउत्सव काळात होणारी गर्दी लक्षात घेऊन दर्शनरांगा, सुरक्षाव्यवस्था आणि स्वच्छतेवर विशेष लक्ष देण्यात आले आहे. कमांडो पथकांची नियुक्ती, व्हीआयपी दर्शनावर तात्पुरते निर्बंध, टोकन दर्शन व्यवस्था बंद ठेवणे आणि पूजेची संख्या मर्यादित करून भाविकांना अधिक वेळ दर्शनासाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.हा उत्सव मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर व सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडत असून, भाविकांनी मंदिर प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन प्रभारी व्यवस्थापक संदेश भोसले यांनी केले आहे.
Pune News : मार्केट यार्ड व उपबाजार ‘या’दिवशी राहणार बंद
पुणे : गुरूवारी (दि.१५) महापालिका निवडणूकीसाठी मतदान आहे. त्यामुळे मार्केट यार्ड व उपबाजार बंद राहणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीमाल विक्रीसाठी आणू नये, तसेच ग्राहकांनी खरेदीसाठी येऊ नये, असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणेचे सभापती प्रकाश जगताप आणि सचिव डॉ. राजाराम धोंडकर यांनी केले आहे. मार्केट यार्डातील मुख्य बाजारातील फळ, भाजीपाला, गुळ-भुसार, केळी, फुल आणि […] The post Pune News : मार्केट यार्ड व उपबाजार ‘या’ दिवशी राहणार बंद appeared first on Dainik Prabhat .
राज्यभरातील12 हजार शिक्षकांना दिलासा; 3 वर्षांपासून रखडलेली ‘ही’प्रक्रिया मार्गी
मुंबई : तीन वर्षांपासून जिल्हा परिषदेची आंतरजिल्हा बदली प्रक्रिया रखडली होती. ही प्रक्रिया आता मार्गी लागली आहे. या निर्णयामुळे 12 हजार शिक्षकांना मूळ गावात किंवा जिल्ह्यात परत येता येणार आहे. आंतरजिल्हा बदली प्रक्रियेचा सातवा टप्पा सुरु होत आहे. त्यासाठी 31 मे 2026 पर्यंतची रिक्त पदे विचारात घेतली जातील. शिक्षक भरतीपूर्वी आंतरजिल्हा बदली प्रक्रिया पूर्ण होणार […] The post राज्यभरातील12 हजार शिक्षकांना दिलासा; 3 वर्षांपासून रखडलेली ‘ही’ प्रक्रिया मार्गी appeared first on Dainik Prabhat .
मराठी माध्यमच्या पोरांनी गाजवले थिएटर्स’! क्रांतीज्योती विद्यालय ११ दिवसांत १० कोटींच्या पार
मुंबई : मराठी सिनेविश्वासाठी नववर्षाची सुरुवात जल्लोषाची ठरली आहे. हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘क्रांतीज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार मुसंडी मारत अवघ्या ११ दिवसांत १० कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. मराठी शाळा, मातृभाषा आणि शिक्षणपद्धतीवर भाष्य करणाऱ्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळतोय.१ जानेवारी २०२६ रोजी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने पहिल्या आठवड्यापासूनच चांगली कमाई केली. मात्र दुसऱ्या आठवड्यात सिनेमाचा वेग अधिक वाढताना दिसतोय. सुट्ट्या आणि वीकेंडचा पुरेपूर फायदा या चित्रपटाला झाला आहे.कमाईचे आकडेपहिल्या आठवड्यातील कमाई – ५.७५ कोटी रुपये१० वा दिवस (शनिवार) – १.६५ कोटी रुपये११ वा दिवस (रविवार) – २.१ कोटी रुपयेएकूण नेट कलेक्शन – १०.१ कोटी रुपयेजागतिक कमाई – अंदाजे १२ कोटी रुपयेमुंबई, पुणे, नाशिक, नागपूरसह अनेक शहरांमध्ये चित्रपटाचे शो हाऊसफुल्ल जात आहेत. विशेष म्हणजे केवळ मराठी माध्यमातील विद्यार्थीच नाही, तर इंग्रजी माध्यमात शिकणारी मुले आणि पालकही मोठ्या संख्येने हा सिनेमा पाहत आहेत.अभिनयाचं विशेष कौतुकसचिन खेडेकर, अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर आणि प्राजक्ता कोळी यांच्या अभिनयाचं प्रेक्षकांसह समीक्षकांकडूनही भरभरून कौतुक होत आहे. भावनिक आशय, वास्तवदर्शी मांडणी आणि प्रभावी संवाद यामुळे सिनेमा प्रेक्षकांच्या मनाला भिडतोय.कमी बजेट, मोठा नफाया चित्रपटाचं बजेट साधारणतः २ ते ३ कोटी रुपये असल्याचं सांगितलं जातं. त्या तुलनेत आतापर्यंत झालेली कमाई पाहता, सिनेमाने आपल्या बजेटच्या तब्बल पाचपट अधिक उत्पन्न मिळवलं आहे. चित्रपट विश्लेषकांच्या मते, येत्या काही दिवसांतच ‘क्रांतीज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ १५ कोटींचा आकडा पार करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
Jagdeep Dhankhar : माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड एम्समध्ये दाखल
नवी दिल्ली : माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) यांना प्रकृती बिघडल्यामुळे सोमवारी दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) दाखल करण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात त्यांना दोनदा भोवळ आल्याने डॉक्टरांनी त्यांना तातडीने रुग्णालयात भरती होण्याचा सल्ला दिला असून, आज त्यांच्या विविध वैद्यकीय चाचण्यांसह एमआरआय स्कॅन केले जाणार आहे. १० जानेवारी रोजी धनखड यांची दोनदा शुद्ध […] The post Jagdeep Dhankhar : माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड एम्समध्ये दाखल appeared first on Dainik Prabhat .
शिंदेसेना-भाजपात जोरदार राडा; अंबरनाथ नगरपरिषद-उपनगराध्यक्ष निवडणुकीत तणाव
ठाणे : अंबरनाथ नगरपरिषदेत शिंदेसेना आणि भाजप यांच्यातील महायुतीतून राजकीय राडा उडाला आहे. गेल्या आठवड्यात दोन्ही पक्षांनी सत्ता स्थापनेसाठी विविध डावपेच रचले. भाजपनं शिंदेसेनेला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसला सोबत घेतलं, त्यानंतर काँग्रेसने १२ नगरसेवकांना निलंबित केलं. दुसऱ्या दिवशी भाजपने या सर्व नगरसेवकांना आपल्याकडे घेत सत्ता स्थापनेसाठी दावा केला. याच पार्श्वभूमीवर अंबरनाथ नगरपरिषदेत उपनगराध्यक्ष पदासाठी मतदान […] The post शिंदेसेना-भाजपात जोरदार राडा; अंबरनाथ नगरपरिषद-उपनगराध्यक्ष निवडणुकीत तणाव appeared first on Dainik Prabhat .
Virat Kohli Reaction on POTM : न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात भारताने ४ विकेट्सनी विजय मिळवला आणि वर्षाची सुरुवात विजयाने केली. या सामन्यात ९३ धावांची मॅचविनिंग खेळी करणाऱ्या विराट कोहलीला ‘सामनावीर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्कारानंतर दिलेल्या मुलाखतीत विराटने आपल्या ट्रॉफीज, कारकिर्दीतील संघर्ष आणि चाहत्यांच्या वागणुकीवर अतिशय प्रामाणिक मते मांडली. विराट नक्की काय म्हणाला? ते […] The post Virat Kohli Reaction : ‘मला चाहत्यांची ‘ही’ गोष्ट अजिबात आवडत नाही’, विराटने धोनीची आठवण काढत व्यक्त केली नाराजी appeared first on Dainik Prabhat .
IRCTC New Rule: आजपासून रेल्वे तिकीट बुकिंगचे नियम बदलले, जाणून घ्या नवे नियम
IRCTC New Rule 2026 : आजपासून म्हणजे १२ जानेवारी २०२६ पासून भारतीय रेल्वेने प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी दोन महत्त्वाचे बदल लागू झाले आहेत. रेल्वे प्रवासाचे नियोजन करणाऱ्या प्रत्येकाने हे बदल समजून घेणे आवश्यक आहे, कारण याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर आणि तिकीट बुकिंगच्या पद्धतीवर होणार आहे. सर्वात मोठा बदल तिकीट बुकिंगच्या प्रक्रियेत झाला आहे. रेल्वे प्रवासाचे […] The post IRCTC New Rule: आजपासून रेल्वे तिकीट बुकिंगचे नियम बदलले, जाणून घ्या नवे नियम appeared first on Dainik Prabhat .
Navi Mumbai Election : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असताना, नवी मुंबई आणि लातूर महानगरपालिकांमध्ये राजकीय तणाव कमालीचा वाढला आहे. नवी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांच्यातील जुना संघर्ष आता रस्त्यावर उतरला असून, कोपरखैरणे येथे भाजप आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये हिंसक झटापट झाली. तर दुसरीकडे, लातूरमध्ये […] The post Navi Mumbai Election : नवी मुंबईमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिंदेच्या कार्यकर्त्यांला चोपलं; नेमकं काय घडलं? appeared first on Dainik Prabhat .
राज्यात मोठी खळबळ..! 35 हजार नागरिकांचा मतदानावर बहिष्कार, नेमकं कारण काय?
मुंबई : एकीकडे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी (BMC Election) मतदानाचा टक्का वाढवण्याचे प्रयत्न सुरू असताना, जुहू परिसरातून मोठी बातमी समोर आली आहे. जुहू रुईया पार्क आणि कराची सोसायटी परिसरातील सुमारे 35 हजार नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयाची माहिती देणारे बॅनर जवळपास प्रत्येक सोसायटीच्या गेटवर झळकत असल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. […] The post राज्यात मोठी खळबळ..! 35 हजार नागरिकांचा मतदानावर बहिष्कार, नेमकं कारण काय? appeared first on Dainik Prabhat .
मकरसंक्रांती २०२६, १४ की १५ जानेवारी? जाणून घ्या तारीख, शुभ मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व
मुंबई : हिंदू धर्मात मकरसंक्रांतीला अत्यंत विशेष महत्त्व आहे. या दिवशी स्नान, दान आणि सूर्योपासना केल्यास मोठे पुण्य लाभते, अशी धार्मिक मान्यता आहे. मकरसंक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव शनीच्या स्वामित्वातील मकर राशीत प्रवेश करतात. म्हणजेच सूर्यदेव आपल्या पुत्र शनीच्या राशीत प्रवेश करतात आणि याच दिवसापासून सूर्य उत्तरायणाला प्रारंभ करतो.मकरसंक्रांती २०२६ कधी आहे?२०२६ साली मकरसंक्रांतीचा सण १४ जानेवारी २०२६ (बुधवार) रोजी साजरा केला जाणार आहे. त्यामुळे १४ की १५ जानेवारी या संभ्रमाला पूर्णविराम मिळतो.भारताच्या विविध भागांत मकरसंक्रांती वेगवेगळ्या नावांनी साजरी केली जाते.बिहार आणि उत्तर प्रदेशात — मकरसंक्रांती / खिचडी पर्वपंजाब आणि हरियाणामध्ये — लोहडीतामिळनाडूमध्ये — पोंगलआसाममध्ये — माघ बिहू किंवा भोगली बिहूमकरसंक्रांती २०२६ : पुण्यकाळ आणि महापुण्यकाळपुण्यकाळदुपारी १५:१३ ते सायंकाळी १७:४५कालावधी : २ तास ३२ मिनिटेमहापुण्यकाळदुपारी १५:१३ ते १६:५८कालावधी : १ तास ४५ मिनिटेदान–पुण्याचे धार्मिक महत्त्वमकरसंक्रांतीच्या दिवशी तिळगुळाचे लाडू, गजक आणि रेवडी वाटण्याची परंपरा आहे. “तिळगुळ घ्या, गोड गोड बोला” या संदेशातून सामाजिक ऐक्य जपला जातो. या दिवशी अन्नधान्य, तूप, तिळ, तांदूळ, डाळी, भाजीपाला, मीठ, खिचडी, वस्त्र आणि कम्बल दान करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते.धार्मिक मान्यतेनुसार, मकरसंक्रांतीच्या दिवशी केलेले दान अक्षय पुण्य प्रदान करते. यामुळे जीवनात सुख, समृद्धी, समाधान टिकून राहते. तसेच या दिवशी श्रद्धेने सूर्यदेवाची उपासना केल्यास मान-सन्मान, प्रतिष्ठा आणि यश प्राप्त होते, असे मानले जाते.
मुंबई: भारतीय शेअर बाजारात गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या घसरणीच्या सत्राला सोमवारी, १२ जानेवारी रोजी अखेर पूर्णविराम मिळाला. सुरुवातीच्या सत्रात मोठी घसरण अनुभवल्यानंतर बाजाराने जबरदस्त रिकव्हरी केली आणि सेन्सेक्स-निफ्टी दोन्ही निर्देशांक हिरव्या निशाणावर बंद झाले. व्यवहारअखेर बीएसई सेन्सेक्स ३०२ अंकांच्या म्हणजेच ०.३६ टक्क्यांच्या वाढीसह ८३,८७८ च्या पातळीवर बंद झाला, तर निफ्टी १०७ अंकांनी वधारून २५,७९०.२५ […] The post Stock Market: ‘हे’ एक सकारात्मक विधान येताच शेअर बाजारात जबरदस्त रिकव्हरी; ‘या’ कंपन्यांच्या शेअर्समध्ये झाली वाढ appeared first on Dainik Prabhat .
Mardaani 3 : बॉलीवूडची दमदार अभिनेत्री राणी मुखर्जी पुन्हा एकदा ‘शिवानी शिवाजी रॉय’ या धडाकेबाज पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत मोठ्या पडद्यावर परतत आहे. ‘मर्दानी’ आणि ‘मर्दानी २’ च्या तुफान यशानंतर आता या फ्रँचायझीचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच या सिनेमाचा अधिकृत ट्रेलर प्रदर्शित झाला असून, ३ मिनिट १६ सेकंदांचा हा ट्रेलर प्रेक्षकांना सुरुवातीपासून शेवटपर्यंत […] The post आई शप्पथ.. ये कुत्रे साले.! अचानक गायब झालेल्या मुलींचा शोध लावणार ‘मर्दानी’; ट्रेलर पाहून अंगावर येईल काटा appeared first on Dainik Prabhat .
BJP Politics : भाजपाचा ‘पावर’गेम.! पवारांचा अधिकृत उमेदवार फोडला; मतदानाआधीच दिला मोठा धक्का
BJP Politics : सोलापूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत (जानेवारी २०२६) राजकीय वातावरण (BJP Politics ) तापले असताना भारतीय जनता पक्षाने (भाजप) एक धाडसी आणि रणनीतिक खेळी खेळली आहे. मतदानाला अवघे तीन दिवस शिल्लक असताना राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या अधिकृत उमेदवाराने पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे सोलापूरच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून अजित पवार […] The post BJP Politics : भाजपाचा ‘पावर’ गेम.! पवारांचा अधिकृत उमेदवार फोडला; मतदानाआधीच दिला मोठा धक्का appeared first on Dainik Prabhat .
BJP-MIM alliance: भाजप नेत्याचा मुलगा ‘एमआयएम’च्या पाठिंब्यांवर स्वीकृत नगरसेवक
अकोला: अकोला जिल्ह्यातील अकोट नगरपालिकेत राजकीय समीकरणे पुन्हा एकदा थक्क करणारी ठरली आहेत. गेल्या आठवड्यात झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, आज स्वीकृत नगरसेवक निवडीच्या प्रक्रियेत भाजप आणि एमआयएम (MIM) मधील ‘छुप्या’ युतीचा दुसरा अंक पाहायला मिळाला. भाजपचे माजी नगराध्यक्ष रामचंद्र बरेठिया यांचे पुत्र जितेन बरेठिया यांना एमआयएमच्या पाचही नगरसेवकांनी पाठिंबा दिल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. […] The post BJP-MIM alliance: भाजप नेत्याचा मुलगा ‘एमआयएम’च्या पाठिंब्यांवर स्वीकृत नगरसेवक appeared first on Dainik Prabhat .
Washington Sundar Injury Ayush Badoni Replacement : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेतील पहिल्या विजयाचा आनंद साजरा करत असलेल्या भारतीय संघासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर दुखापतीमुळे उर्वरित मालिकेतून बाहेर पडला आहे. वडोदरा येथील पहिल्या वनडे सामन्यात गोलंदाजी करताना सुंदरला बरगड्यांना दुखापत (Side Strain) झाली होती. बीसीसीआयने त्याच्या जागी युवा फलंदाज आयुष बडोनी […] The post Washington Sundar : भारताला तिसरा धक्का! वॉशिंग्टन सुंदर मालिकेतून बाहेर; विराटच्या खास शिलेदाराला मिळाली संधी appeared first on Dainik Prabhat .
मोहित सोमण: आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात अखेरच्या सत्रात किरकोळ वाढ झाली आहे. सेन्सेक्स ३०१.९३ अंकांने उसळत ८३८७८.१७ पातळीवर स्थिरावला असून निफ्टी १०६.९५ अंकाने उसळत २५७९०.२५ पातळीवर स्थिरावला आहे. मोठ्या प्रमाणात इंट्राडे सेन्सेक्स व निफ्टी 'रिबाऊंड' झाल्याने सेन्सेक्स व निफ्टी बँक निर्देशांकात सुधारणा झाली. घसरत्या शेअर बाजारात ८०० अंकाने सेन्सेक्सने रिकक्वरी दर्शविल्याने शेअर बाजार ग्रीन सिग्नल मध्ये बंद झाला. आज सेन्सेक्सने सत्रात सर्वाधिक वाढ ८३९४५.७३ अंकावर नोंदवली असून सर्वाधिक घसरण ८२८६१.०७ पातळीवर नोंदवला आहे. दरम्यान बँक निफ्टीनेही वापसी केल्याने बाजारात मूलभूत सपोर्ट लेवल मिळण्यास मदत झाली आहे. निफ्टी व्यापक निर्देशांकात मिडकॅप १००, मिडकॅप ५०, स्मॉलकॅप १०० निर्देशांकात सर्वाधिक घसरण झाली आहे. तेल, गॅस, फायनांशियल सर्विसेस, एफएमसीजी, मेटल, पीएसयु बँक, प्रायव्हेट बँक या निर्देशांकात अखेरीस वाढलेल्या खरेदी व्हॉल्यूममध्ये झालेल्या वाढीचा फायदा झाल्याचे स्पष्ट झाले. तर घसरण मिडिया, आयटी, रियल्टी, हेल्थकेअर, मिड स्मॉल आयटी टेलिकॉम निर्देशांकात झाली आहे. आज अस्थिरतेचा जागर असतानाच मात्र एका अहवालातील माहितीत युएस व भारत यांच्यातील द्विपक्षीय करारास पुन्हा वेग आल्याने चर्चा सकारात्मक स्थितीत जात असल्याचे म्हटले होते.ज्याचा परिणाम म्हणून गुंतवणूकदारांनी आपले सेल ऑफ रोखत खरेदीत वाढ केली. परिणामी शेअर बाजार रिबाऊंड झाले.आज शेअर बाजारात गुंतवणूकदारांनी सुरुवातीला सत्रात इराण व युएस यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीमुळे सावध पवित्रा घेतला होता. ज्यामुळे कच्च्या तेलाच्या निर्देशांकात मोठी वाढ झाली होती तर सोने चांदी व इतर कमोडिटीतही मोठी वाढ झाली आहे. दरम्यान दिग्गज एचडीएफसी बँक, बजाज फायनान्स,बजाज ऑटो, टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल यांसारख्या शेअर्समध्ये घसरण झाली होती तर रिलायन्स इंडस्ट्रीज,टाटा स्टील, कोल इंडिया, वेदांता, जेएसडब्लू स्टील, नेस्ले इंडिया यांसारख्या शेअर्समध्ये वाढ झाल्याने बाजार तेजीत बंद होण्यास कारणीभूत ठरला आहे. निश्चितच निर्देशांकात वरकरणी तेजी दिसत असली तरी अस्थिरतेचा अंडकरंट कायम राहिला आहे. अस्थिरता निर्देशांक (VIX Volatility Index VIX ) ३.६३% उसळला होता. बीएसईवर ४४७७ शेअरपैकी १५६४ शेअर्समध्ये वाढ झाली असून २७०७ शेअर्समध्ये आज घसरण झाली आहे. एनएसईत ३२३७ शेअरपैकी १२३१ शेअर्समध्ये वाढ झाली असून १९०६ शेअर्समध्ये घसरण झाली आहे. बीएसईत एकूण १८० शेअर अप्पर सर्किटवर पोहोचले असून २६६ शेअर लोअर सर्किटवर पोहोचले आहेत. तर एनएसईत ४८ शेअर अप्पर सर्किटवर पोहोचले असून ४५९ शेअर लोअर सर्किटवर पोहोचले आहेत. आज महत्वपूर्ण आयटी कंपन्यांचे तिमाही निकाल जाहीर होणार असल्याने गुंतवणूकदारांचा बाजारातील उत्साहात वाढ झाली आहे. रूपयातही किरकोळ घसरण झाल्याने परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी रोख विक्रीत काय भूमिका घेतील ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.आज अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ आयएफसीआय (१५.१४%), फोर्स मोटर्स (३.३६%), हिंदुस्थान कॉपर (४.४८%), बीएसई (४.५४%),प्रिमियर एनर्जीज (३.९७%), हिंदुस्थान झिंक (३.५९%), होम फर्स्ट फायनान्स (३.५२%) समभागात झाली असून सर्वाधिक घसरण तेजस नेटवर्क (९.४८%), सिटी युनियन बँक (३.४८%), जीई व्हर्नोवा (६.२१%), सिग्नेचर ग्लोबल (५.१६%), अपार इंडस्ट्रीज (५.१७%) समभागात झाली आहे.आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले आहेत की,'पुढील वाटाघाटींच्या फेरीपूर्वी अमेरिकेच्या राजदूतांनी व्यापार कराराबाबत केलेल्या अनुकूल विधानांमुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढल्याने भारतीय बाजारपेठ दिवसाच्या नीचांकी पातळीवरून सावरली. या सकारात्मक वातावरणाचा एकूण बाजाराच्या भावनांना चालना मिळाली.कमोडिटी क्षेत्राने उत्कृष्ट कामगिरी केली, ज्याला धातूंमधील तेजीचा आधार मिळाला, कारण पुरवठ्याच्या मर्यादा असतानाही नव्याने खरेदीची आवड निर्माण झाल्याने त्यांना फायदा झाला. ग्राहक आणि बँकिंग क्षेत्रातील शेअर्समध्येही मूल्याधारित खरेदी दिसून आली, कारण गुंतवणूकदार अलीकडील घसरणीनंतर संधी शोधत होते, ज्याला तिसऱ्या तिमाहीतील मजबूत कमाईच्या अपेक्षा आणि सुधारत्या मागणीचा पाठिंबा होता. याव्यतिरिक्त, सततच्या भूराजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर मौल्यवान धातूंनी आपली तेजी कायम ठेवली आहे.'
निवडणुकीपूर्वी शरद पवार गटाला मोठा धक्का; ‘या’जिल्हाध्यक्षांनी ऐन वेळी सोडली साथ
जळगाव : राज्यातील महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या असतानाच जळगाव जिल्ह्याच्या राजकारणातून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) साठी मोठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. पक्षाचे युवक ग्रामीण जिल्हाध्यक्ष विश्वजीत मनोहर पाटील यांनी आपल्या पदाचा तसेच प्राथमिक सदस्यत्वाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. निवडणुकांचे रणशिंग फुंकले जात असतानाच जिल्हा स्तरावरील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्याने साथ […] The post निवडणुकीपूर्वी शरद पवार गटाला मोठा धक्का; ‘या’ जिल्हाध्यक्षांनी ऐन वेळी सोडली साथ appeared first on Dainik Prabhat .
पुणे : महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, विविध शक्यता आणि चर्चांना उधाण आले आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र निवडणूक लढवत असल्याने, निवडणुकांनंतर दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार का, यावर राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) नेत्या सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार […] The post सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “आमच्या कार्यकर्त्यांचे…” appeared first on Dainik Prabhat .
Akbaruddin Owaisi : राज्यातील पक्ष केवळ सत्तेचे भुकेले; अकबरुद्दीन ओवैसी यांची टीका
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्रातील राजकीय पक्षांनी आपली विचारसरणी पूर्णपणे बाजूला ठेवली असून त्यांना केवळ सत्तेची लालसा आहे, असा थेट आरोप एआयएमआयएमचे नेते आणि तेलंगणाचे आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांनी केला. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर येथे १५ जानेवारी रोजी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोजित सभेत ते बोलत होते. ओवैसी म्हणाले की, महाराष्ट्रातील सत्ताधारी आणि विरोधी दोन्ही […] The post Akbaruddin Owaisi : राज्यातील पक्ष केवळ सत्तेचे भुकेले; अकबरुद्दीन ओवैसी यांची टीका appeared first on Dainik Prabhat .
आमची भूमिका उद्योगविरोधी कधीच नव्हती.! अदानींच नाव घेत संजय राऊत नेमकं काय म्हणाले? पाहाच…
Sanjay Raut | Adani – राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात असताना राजकीय वातावरण तापले आहे. महायुतीकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जोरदार प्रचार करत असताना, पहिल्यांदाच एकत्र निवडणूक लढणारे ठाकरे बंधू महायुतीच्या तुलनेने संयमित प्रचार करताना दिसून आले आहेत. नाशिक आणि दादर येथील दोन संयुक्त सभांमध्ये त्यांनी उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर […] The post आमची भूमिका उद्योगविरोधी कधीच नव्हती.! अदानींच नाव घेत संजय राऊत नेमकं काय म्हणाले? पाहाच… appeared first on Dainik Prabhat .
PMC Election: प्रभाग 24 मध्ये राष्ट्रवादीची ताकद वाढली; काॅंग्रेस उपाध्यक्षांचा ‘एनसीपी’मध्ये प्रवेश
पुणे – प्रभाग क्रमांक २४ ( कसबा गणपती- कमला नेहरू- केईएम हॉस्पिटलमध्ये) राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढली आहे. काँग्रेसचे उपाध्यक्ष उस्मान भाई तांबोळी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पॅनल प्रमुख माजी नगरसेवक सदानंद शेट्टी यांनी हा प्रवेश घडवून आणल्याने राष्ट्रवादीच्या उमेदवार सुजाता शेट्टी यांच्यासह इतर उमेदवारांना तांबोळी यांच्या संघटन कौशल्याचा फायदा होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार […] The post PMC Election: प्रभाग 24 मध्ये राष्ट्रवादीची ताकद वाढली; काॅंग्रेस उपाध्यक्षांचा ‘एनसीपी’मध्ये प्रवेश appeared first on Dainik Prabhat .
मोठी बातमी…! गुंड गजानन मारणेला ‘या’दिवशी पुण्यात येण्याची परवानगी
पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गँगस्टर गजानन मारणे याला दिलेल्या परवानगीमुळे राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर आणि जिल्ह्यात प्रवेशबंदी असलेल्या गजानन मारणे याला मुंबई उच्च न्यायालयाने १५ आणि १६ जानेवारी रोजी पुण्यात येण्याची विशेष परवानगी दिली आहे. गजानन मारणे याची पत्नी जयश्री मारणे या कोथरूड मतदारसंघातून राष्ट्रवादी […] The post मोठी बातमी…! गुंड गजानन मारणेला ‘या’ दिवशी पुण्यात येण्याची परवानगी appeared first on Dainik Prabhat .
मुंबई: उद्योजक व उद्योगपतीनी मोठ्या प्रमाणात आपले लक्ष्य गुजरात राज्यात केंद्रित केले आहे. 'वायब्रंट' गुजरात अंतर्गत रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी येत्या ५ वर्षात ७ लाख कोटी रूपयांची गुंतवणूक सौराष्ट्र कच्छ भागात तंत्रज्ञानात करणार असल्याची घोषणा केली आहे. तसेच अदानी समुहाच्या करन अदानी यांनी १.५० लाख कोटी रूपयांची गुंतवणूक सेझ (Special Economic Zone) मध्ये मुंध्रा कच्छ येथे करण्याची घोषणा केली होती. सीएनसी ऑटो यांनी १०००० कोटीची गुंतवणूक उत्पादन, संशोधन, विकास यामध्ये पुढील ५ वर्षांत करणार असल्याचे स्पष्ट केले. याशिवाय वेलस्पून समुहाने पाइपलाइन उत्पादनात ५००० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली.आज मुकेश अंबानी यांनी सर्वसामान्यांसाठी एआय (Artificial Intelligence AI) पिपल फस्ट या व्यासपीठाची घोषणा केली आहे. गुजरातपासून त्याची सुरुवात होणार असून त्यानंतर इतर क्षेत्रीय भाषेत नागरिकांना एआयचा वापर करता येणार आहे असे जिओकडून स्पष्ट करण्यात आली आहे. मुकेश अंबानी हे भारतातील सर्वात मोठा एआय प्रकल्प सेंटर लवकरच तयार होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. गेल्या पाच वर्षांत ३.५० लाख कोटीची गुंतवणूक करण्यात आली असून ती दुपटीने वाढवत ७ लाख कोटीची गुंतवणूक करण्यात येणार असल्याचे आश्वासन गुजरात राज्याला दिले आहे. अंबानी म्हणाले की, या गुंतवणुकीमुळे मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होतील आणि गुजरात जागतिक नकाशावर ठळकपणे आपले स्थान निर्माण करेल. त्यांनी पाच महत्त्वाच्या घोषणा केल्या, ज्यात जामनगरमध्ये सौर ऊर्जा, ग्रीन हायड्रोजन आणि शाश्वत विमान इंधनाचा समावेश असलेली जगातील सर्वात मोठी एकात्मिक हरित ऊर्जा प्रणाली उभारण्याचा समावेश आहे. ते म्हणाले की जामनगर हे हायड्रोकार्बन केंद्रातून हरित ऊर्जेचे एक प्रमुख निर्यातदार केंद्र म्हणून रूपांतरित होईल.यासह ज्योती सीएनसी ऑटोने ज्योती सीएनसी ऑटोमेशन लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पराक्रमसिंह जडेजा यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना, 'व्हायब्रंट गुजरात' उपक्रम हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सर्वसमावेशक, प्रदेश आधारित विकासाच्या दूरदृष्टीचे प्रतिबिंब आहे आणि राजकोटमधील पहिली व्हायब्रंट गुजरात प्रादेशिक परिषद (VGRC) सौराष्ट्र प्रदेशासाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे असे म्हटले आहे.यापुढे बोलताना ज्योती सीएनसी भारताची औद्योगिक परिसंस्था मजबूत करण्यासाठी पुढील पाच वर्षांत उत्पादन विस्तार आणि संशोधन व विकास (R&D) मध्ये १०००० कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक करेल. तसेच जडेजा म्हणाले की, ज्योती सीएनसीसाठी उत्पादन हे राष्ट्रनिर्माणाप्रती एक जबाबदारी आहे. त्यांनी एरोस्पेस, संरक्षण, इलेक्ट्रॉनिक्स आणि सेमीकंडक्टर उत्पादनावर लक्ष केंद्रित करून, 'आत्मनिर्भर भारत' आणि 'विकसित भारत २०२७' प्रति कंपनीची वचनबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे.अदानी समूहाने पुढील पाच वर्षांत गुजरातच्या कच्छ प्रदेशात १.५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. उद्योग, लॉजिस्टिक्स आणि अक्षय ऊर्जेचे (Renewable Energy) प्रमुख केंद्र म्हणून राज्याचे स्थान अधिक मजबूत होईल असे अदानी पोर्ट्स अँड एसईझेड लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक करण अदानी यांनी प्रसारमाध्यमांना कार्यक्रमात बोलताना सांगितले आहे. ही आगामी गुंतवणूक नवी ऊर्जा क्षमता वाढवण्यासाठी, बंदरांची पायाभूत सुविधा आणि संबंधित औद्योगिक प्रकल्पांच्या विस्तारावर केंद्रित असेल असे त्यांनी म्हटले आहे. ही गुंतवणूक भारताच्या आर्थिक वाढ, शाश्वतता आणि ऊर्जा सुरक्षेच्या दीर्घकालीन प्राधान्यांशी सुसंगत आहे असे ते म्हणाले आहेत. उपलब्ध माहितीनुसार समूह २०३० पर्यंत ३७ गिगावॉटचा खावडा नवीकरणीय ऊर्जा पार्क पूर्ण करेल आणि पुढील दशकात मुंद्रा बंदराची क्षमता दुप्पट करेल असे आश्वासन अदानी समुहाने यावेळी दिले.
मद्यप्रेमींनो लक्ष द्या.! महाराष्ट्रात पुढील ४ दिवस असणार ‘ड्राय डे’; ‘या’शहरांचा समावेश
Dry Day in Maharashtra : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होत आहे. या निवडणूक काळात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाने १३ जानेवारी (मंगळवार) ते १६ जानेवारी (शुक्रवार) या कालावधीत संबंधित शहरांमध्ये ‘ड्राय डे‘ (Dry Day) जाहीर केला आहे. नेमका कालावधी काय असेल? प्रचाराची सांगता होताच दारू दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले […] The post मद्यप्रेमींनो लक्ष द्या.! महाराष्ट्रात पुढील ४ दिवस असणार ‘ड्राय डे’; ‘या’ शहरांचा समावेश appeared first on Dainik Prabhat .
“तुम्ही लोक कर्माला घाबरत नाही,”माही विजने ट्रोल करणाऱ्यांना सुनावले
Mahi Vij | टीव्ही अभिनेत्री माही विज आणि अभिनेता जय भानुशाली यांनी काही दिवसांपूर्वी घटस्फोटाची घोषणा केली होती. दोघांनी एकत्रित स्टोरी शेअर करत चाहत्यांना वेगळे होत असल्याचे सांगितले होते. घटस्फोटाच्या घोषणेनंतर माहीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर तिचा जवळचा मित्र नदीम कुरेशीसोबत एक फोटो शेअर केला होता. नदीम कुरेशी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत माहीने कॅप्शनमध्ये त्याला […] The post “तुम्ही लोक कर्माला घाबरत नाही,” माही विजने ट्रोल करणाऱ्यांना सुनावले appeared first on Dainik Prabhat .
भारत व जर्मनी यांचा व्यापार ५० अब्ज डॉलर पार- पंतप्रधान नरेंद्र मोदी
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी व जर्मन चान्सलर फ्रेडरिक मर्झ (Friedrich Merz) यांनी नवी दिल्लीत भेट घेतल्यानंतर जर्मनी व भारत यांच्यातील द्विपक्षीय आर्थिक संबंध मजबूत करण्यावर भर देणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे दोन्ही देशांनी भारत व जर्मनी यांनी एकूण ५० अब्ज डॉलरचा टप्पा पार केल्या असल्याचेही यावेळी नमूद केले. एका कार्यक्रमात दोन्ही देशांच्या उद्योगपतींनी, विविध कार्यकारी अधिकारी यांनी या सीईओ फोरममध्ये उपस्थिती नोंदवली. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमुळे दिसून आले होते. यावेळी भारतात २००० कंपन्याहून अधिक जर्मन कंपन्यांचा समावेश असल्यामुळे भारत व जर्मनी यांच्या औद्योगिक संबंधांत मजबूती असल्याचे उद्धृत होते असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी व जर्मन चान्सलर फ्रेडरिक मर्झ यांच्या उपस्थितीत दोन्ही देशातील विविध व्यापारी सामंजस्य करारावर (Memoreundum of Understanding MoU) स्वाक्षऱ्या केल्या गेल्या आहेत. तंत्रज्ञान, उद्योग, कौशल्य विकास, विज्ञान, आधुनिक तंत्रज्ञान, रिसर्च, शाश्वत विकास यांसारख्या अनेक क्षेत्रांत दोन्ही देशांच्या संबंधात हितकारक व लाभदायक संबंध प्रस्थापित व्हावेत यासाठी दोन्ही देशांच्या धोरणकर्तांनी प्रयत्न करण्याचे ठरवले होते. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा आत्मविश्वास आज सकाळी भारत-जर्मनी सीईओ फोरममध्ये स्पष्टपणे दिसून आला असे म्हटले. हे केंद्र ज्ञान देवाणघेवाण, तंत्रज्ञान विकास आणि नाविन्यपूर्णतेसाठी एक सामायिक व्यासपीठ म्हणून काम करेल असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले आहेत.तंत्रज्ञान सहकार्याच्या प्रकाश टाकताना, पंतप्रधान मोदींनी नमूद केले आहे की,दोन्ही देशांमधील तंत्रज्ञान सहकार्य वर्षानुवर्षे अधिक मजबूत झाले आहे आणि त्याचा परिणाम आता जमिनीवर स्पष्टपणे दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत आणि जर्मनीची अक्षय ऊर्जा क्षेत्रात समान प्राधान्ये आहेत आणि त्यांनी भारत जर्मनी सेंटर ऑफ एक्सलन्सची स्थापना करण्याच्या निर्णयाची घोषणा यावेळी केली.
अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२६; देशाच्या अर्थकारणाची दिशा ठरवणार
मुंबई : देशाच्या राजकीय आणि आर्थिक हालचालींच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं असलेलं संसदचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्याच्या तयारीत आहे. यंदाचा अर्थसंकल्प केवळ आकड्यांपुरता मर्यादित न राहता, देशाच्या अर्थव्यवस्थेला नवी दिशा देणारा ठरणार असल्याचं मानलं जात आहे. त्यामुळे या सत्राकडं सर्वसामान्य नागरिकांपासून उद्योगविश्वापर्यंत सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.२८ जानेवारी २०२६ पासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार असून, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मंजुरीनंतर हे सत्र दोन टप्प्यांत पार पडणार आहे. पहिला टप्पा २८ जानेवारी ते १३ फेब्रुवारी दरम्यान, तर दुसरा टप्पा ९ मार्च ते २ एप्रिलपर्यंत चालणार आहे.१ फेब्रुवारीकडे देशाचं लक्षया अधिवेशनाचा केंद्रबिंदू ठरणार आहे १ फेब्रुवारी रोजी सादर होणारा केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७. महागाईवर नियंत्रण, रोजगारनिर्मिती, कररचना, शेतकऱ्यांचे उत्पन्न आणि उद्योगांसाठीची धोरण या सगळ्यांचा आराखडा याच अर्थसंकल्पातून स्पष्ट होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन सलग नवव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार असून, त्या ऐतिहासिक विक्रमाच्या उंबरठ्यावर आहेत. याआधी मोरारजी देसाई यांनी सलग दहा वेळा अर्थसंकल्प मांडण्याचा विक्रम केला होता.आकड्यांपलीकडचा अर्थसंकल्प२०२६-२७ चा अर्थसंकल्प हा केवळ उत्पन्न-खर्चाचा ताळेबंद नसेल, तर देशाच्या आर्थिक वास्तवाचं प्रतिबिंब असेल. करदात्यांना करसवलतींची अपेक्षा आहे, तर मध्यमवर्गाला महागाईतून दिलासा हवा आहे. नोकरी करणाऱ्या वर्गासाठी कररचनेत सुधारणा आणि उत्पन्नावरचा ताण कमी होण्याची मागणी आहे.शेतकरी वर्गाला हमीभाव, थेट आर्थिक सहाय्य आणि शेतीपूरक धोरणांची अपेक्षा आहे. उद्योगविश्वाला गुंतवणुकीला चालना देणाऱ्या, रोजगारनिर्मिती वाढवणाऱ्या आणि स्टार्टअप्सना बळ देणाऱ्या घोषणा हव्या आहेत. त्याचबरोबर पायाभूत सुविधा, इलेक्ट्रिक वाहनं, अवकाश संशोधन, हरित ऊर्जा आणि हवामानपूरक गुंतवणुकीसाठी ठोस तरतुदी अपेक्षित आहेत.विकसित भारताचा रोडमॅप?वित्तीय तूट नियंत्रणात ठेवत विकासाला गती देणं, हे सरकारसमोरचं मोठं आव्हान असेल. ‘विकसित भारत’ या संकल्पनेच्या दिशेने वाटचाल करताना राज्यस्तरीय वित्तसंस्था, शहरे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी स्वावलंबी विकास मॉडेल जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.आर्थिक दिशा ठरवणारा क्षण२०२६-२७ चा अर्थसंकल्प हा केवळ आर्थिक दस्तऐवज न राहता, देशाच्या पुढील राजकीय आणि आर्थिक वाटचालीचं दिशादर्शन करणारा ठरू शकतो. भारत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असली, तरी सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षा मोठ्या आहेत. मोदी सरकार या अर्थसंकल्पातून विकासाची आकडेवारी मांडतानाच, सर्व घटकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.अर्थसंकल्प म्हणजे फक्त खर्चाचा हिशोब नसून देशाच्या आशा, अपेक्षा आणि भविष्यातील स्वप्नांचा आराखडा असतो. १ फेब्रुवारीला सादर होणारा अर्थसंकल्प २०२६ भारताच्या पुढील पाच वर्षांचा मार्ग ठरवणारा ठरतो का याकडे सर्वांचं लक्ष लागल आहे.

25 C