प्रसिद्ध मॉडेलसोबत लाइव्ह शोमध्ये घडला 'हा'धक्कादायक प्रकार, सोशल मिडियावर व्हिडिओ व्हायरल
आपण सोशल मिडिया वापरत असताना आपल्याला यावर कधी काय पाहायला मिळेल हे सांगता येत नाही या सोशल मिडियावर बऱ्याचदा अनेक गोष्टींचे व्हिडिओ जोरदार व्हायरल होत असतात. अशातच सध्या एका प्रसिद्ध मॉडेलच्या व्हायरल व्हिडिओनं सोशल मीडियावर धूमाकूळ घातलाय.या मॉडेलसोबत लाइव्ह शोमध्ये असं काही घडलं जे प्रत्येकासाठी अनअपेक्षित होतं. पण, या मॉडेलचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. कारण या मॉडेलनं सहजरित्या हा प्रसंग सांभाळून घेतला आहे. यामुळे तिचं सोशल मीडियावर प्रचंड कौतुक होत आहे.नुकताच मिस ग्रँड थायलंड २०२६चं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत अनेक मॉडेल सहभागी झाल्या होत्या. या स्पर्धेत 'कमोलवन चानागो' हिनं देखील सहभाग घेतला होता. दरम्यान, या स्पर्धेत मॉडेल स्वत:बद्दल माहिती देत असताना तिचे नकली दात अचानक पडले.
Indoor Plants: एसीशिवाय घर ठेवा कूल! या ‘५’इनडोअर झाडांनी मिळवा नैसर्गिक थंडावा
Indoor Plants घरात ठेवलेली इनडोअर झाडं केवळ सौंदर्य वाढवत नाहीत, तर हवा शुद्ध करून वातावरण थंड ठेवण्यासही मदत करतात.
IPL 2026 : पहिल्या सामन्याआधीच RCB ला धक्का! 'हा'स्टार खेळाडू बाहेर
मुंबई : आयपीएल २०२६ च्या थराराला २८ मार्चपासून सुरुवात होत आहे. सलामीच्या सामन्यात आरसीबी (Royal Challengers Bengaluru) आणि हैद्राबाद (Sunrisers Hyderabad) आमनेसामने येणार आहेत. हा सामना बंगळूरमधील चिन्नास्वामी मैदानावर रंगणार आहे. मात्र या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी आरसीबीला मोठा धक्का बसला आहे.आरसीबी संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जॉश हेझलवूड (Josh Hazlewood) हा पहिला सामना खेळणार नसल्याची माहिती मुख्य प्रशिक्षकांनी दिली आहे. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की, “हेझलवूड अद्याप पूर्ण तंदुरुस्त नाही. आम्ही त्याच्या फिटनेसवर लक्ष ठेवून आहोत आणि त्याच्या पुनरागमनाची वाट पाहत आहोत.”हेझलवूडच्या अनुपस्थितीमुळे आरसीबीची गोलंदाजी कमकुवत होण्याची शक्यता आहे. गेल्या हंगामात त्याने १२ डावांत २२ विकेट्स घेत संघाच्या यशात मोठा वाटा उचलला होता. त्याची ४/३३ ही सर्वोत्तम कामगिरी ठरली होती, तर इकॉनॉमी रेट ८.७७ होता.दरम्यान, मुख्य प्रशिक्षक यांनी विराटच्या फॉर्मचेही कौतुक केले. ते म्हणाले, “जसे मी पूर्वी सचिन तेंडुलकरचा सराव पाहायचो, तसेच आता विराटचा सराव पाहणे आनंददायी आहे. तो सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये असून खूप फिट आणि निर्धाराने खेळताना दिसतो.”जाणून घ्या आरसीबीचे यंदाच्या हंगामातील वेळापत्रक : २८ मार्च : RCB vs SRH – बंगळूर ५ एप्रिल : RCB vs CSK – बंगळूर १० एप्रिल : RCB vs RR – गुवाहाटी १२ एप्रिल : RCB vs MI – मुंबई १५ एप्रिल : RCB vs LSG – बंगळूर १८ एप्रिल : RCB vs DC – बंगळूर २४ एप्रिल : RCB vs GT – बंगळूर २७ एप्रिल : RCB vs DC – दिल्ली ३० एप्रिल : RCB vs GT – अहमदाबाद ७ मे : RCB vs LSG – लखनौ १० मे : RCB vs MI – रायपूर १३ मे : RCB vs KKR – रायपूर १७ मे : RCB vs PBKS – धर्मशाला २२ मे : RCB vs SRH – हैदराबादपहिल्याच सामन्यापूर्वी आलेल्या या धक्क्यामुळे आरसीबीसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. आता संघ या परिस्थितीत कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Bigg Boss Marathi 6 : बिग बॉसच्या घरातील 'हा'सदस्य बाहेर जाणार ?
मुंबई : बिग बॉस मराठी ६ सीझन सध्या दोरदार चर्चेत आहे. बिग बॉस मराठीला ७० दिवस झाले आहेत. तर, आता शेवटचे ३० दिवस राहिले असून दिवसेंदिवस गेम अधिकच कठीण होत चालला आहे. त्यामुळे प्रत्येक स्पर्धक घरात टिकून राहण्यासाठी आपआपला गेम दाखवत असल्याचे पाहायला मिळत आहे.बिग बॉस मराठीचे ७० दिवस होऊन आता शेवटचे ३० दिवस राहिले असतानाच प्रेक्षकांमध्ये यंदा बिग बॉस मराठी कोण जिंकणार याची उत्सुकता प्रचंड वाढली आहे. नुकताच बिग बॉसमध्ये फॅमिली विक पार पडला. या फॅमिली विकमध्ये प्रेक्षकांनी प्रभू शेळकेचा त्याचा कुटुंबासोबत भावनिक क्षण पाहिला होता.प्रभू सध्या अजून एक दोन आठवडे घराबाहेर जाणार नाही असं प्रेक्षकांना वाटत होतं. पण, आता प्रभू शेळकेचं एलिमिनेशन होणार असल्याच्या जोरदार चर्चा सोशल मीडियावर रंगत असल्याचं पाहायला मिळत आहे.प्रभू शेळके हा बिग बॉसच्या घरात छोटा डॉन म्हणून ओळखला जातो. त्याची विनोदी आणि हटके स्टाईल कायम चर्चेत असते. प्रभू जालना जिल्ह्यातील परतुर तालुक्याचा असून अत्यंत गरीब कुटुंबातून आलेला आहे. प्रभूनं सोशल मीडियावर स्वतःची एक वेगळी ओळख तयार केली. प्रभूला थॅलेसेमिया नावाचा गंभीर आजार आहे. या आजाराच्या उपचारांसाठी मोठा खर्च करावा लागतो. पण त्याच्या आई-वडिलांनी त्याच्या उपचारांसाठी वावर विकल्याचंही तो अनेकदा सांगताना दिसतो.बिग बॉस मराठीच्या ११व्या आठवड्यात प्रभू एलिमिनेट झाल्याची चर्चा जोरात रंगली आहे. मात्र, बिग बॉसकडून किंवा कलर्स मराठीकडून प्रभू घराबाहेर जाण्याविषयी कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
Sanjay Raut : भोंदू अशोक खरातांकडे जाणारे ‘ते’ 40 आमदार कोण? संजय राऊतांच्या सवालाने खळबळ
Sanjay Raut : अशोक खरात प्रकरणावर भाष्य करताना संजय राऊत यांनी 40 आमदारांची नावे जाहीर करण्याची मागणी केली आहे. ज्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
Sanjay Raut : अशोक खरात प्रकरणावर भाष्य करताना संजय राऊत यांनी 40 आमदारांची नावे जाहीर करण्याची मागणी केली आहे. ज्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
Sonalee Kulkarni: सोनाली कुलकर्णी नव्या अंदाजात; ‘मंजुळा’ गाण्यातील बोल्ड लुक समोर
Sonalee Kulkarni: ‘मंजुळा’ हे आयटम साँग आकर्षक कोरिओग्राफी आणि भन्नाट स्टेप्समुळे विशेष ठरणार आहे. या गाण्याची कोरिओग्राफी फुलवा खामकर यांनी केली आहे.
KP Sharma Oli Arrested ही कारवाई ‘जेन-जी आंदोलन’ दरम्यान झालेल्या हिंसाचाराशी संबंधित आहे. या आंदोलनात झालेल्या गंभीर घटनांबाबत ओली आणि लेखक यांच्यावर निष्काळजीपणा आणि जबाबदारी न पाळल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. या प्रकरणात दोषी ठरल्यास त्यांना १५ वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते.
Pune Crime News : अशोक खरात याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पुण्यातील महिलेने हिमंत करुन हा सर्व प्रकार आपल्या पतीला सांगितला. पिडित महिला ही मुळची पुण्यातील आहे.
Sandeep Karnik : अशोक खरातला पोलिसांनी कशी अटक केली? प्रकरणातील व्हिडिओ कसे व्हायरल झाले? याविषयी नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी मुलाखतीत महत्वाची माहिती दिली आहे.
नेपाळमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली असून माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांना पोलिसांनी अटक केली आहे. भक्तपूरमधील गुंडू येथील त्यांच्या निवासस्थानातून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. ‘झेन-जी’ आंदोलनादरम्यान झालेल्या मृत्यू प्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचे वृत्त आहे.या प्रकरणात नेपाळचे माजी गृहमंत्री रमेश लेखक यांनाही अटक करण्यात आली आहे. नव्याने सत्तेवर आलेल्या पंतप्रधान बालेन शाह (Balen Shah) यांच्या नेतृत्वाखालील सरकारने ही मोठी कारवाई करत कठोर संदेश दिला आहे.शुक्रवारी (२७ मार्च) ३५ वर्षीय बालेन शाह यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. रॅपर ते महापौर आणि आता देशाचे पंतप्रधान असा त्यांचा प्रवास असून ते नेपाळच्या इतिहासातील सर्वात तरुण पंतप्रधान ठरले आहेत. शपथविधीनंतर लगेचच झालेल्या या अटकेमुळे देशात मोठी राजकीय खळबळ उडाली आहे.सप्टेंबर २०२५ मध्ये नेपाळमध्ये ‘झेन-जी’ आंदोलन उसळले होते. या आंदोलनादरम्यान हिंसाचार भडकला आणि अवघ्या दोन दिवसांत ७० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. त्या वेळी सत्तेवर असलेल्या ओली सरकारवर या प्रकरणात जबाबदारी निश्चित करण्याची मागणी होत होती. आता याच प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे.दोषी ठरल्यास ओली यांना १० वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते. नेपाळच्या राजकारणातील प्रभावी नेते म्हणून ओळख असलेल्या ओली यांनी यापूर्वी गृहमंत्री, उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री अशी महत्त्वाची पदे भूषवली आहेत.२०२६ मधील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात असून पुढील काळात नेपाळच्या राजकारणात मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Rupali Chakankar : खोटे, असत्य व कुठलाही पुरावा नसताना जे आरोप माध्यमांमधून होत आहेत, ते वेदनादायक आहे. सत्य प्रखरतेने सिद्ध होईलच - रुपाली चाकणकर
Thyroid Control Tips: फक्त १ चमचा धण्याचे बीज; थायरॉइड कंट्रोलसाठी घरगुती उपाय ठरतोय प्रभावी!
Thyroid Control Tips धण्याच्या बियांमध्ये शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्याची क्षमता असते. त्यामुळे शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते. यामुळे मेटाबॉलिज्म सुधारतो आणि शरीरात ऊर्जा टिकून राहते. नियमितपणे हे पाणी पिल्यास शरीरातील सूज आणि जळजळ कमी होण्यासही मदत मिळते.
Weather Update : हवामानाचा ‘डबल अटॅक’! मुंबईत उकाड्याचा कहर तर विदर्भात वादळी पावसाचा इशारा
मुंबई : राज्यात हवामानाने अचानक कोंडी केली असून एका बाजूला मुंबई (Mumbai) मध्ये उकाड्याने अक्षरशः घामाच्या धारा सुरू आहेत, तर दुसरीकडे विदर्भात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील २४ तासांसाठी सतर्कतेचा इशारा जारी केला आहे.पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या दिशेने येणाऱ्या वाऱ्यांमुळे देशातील हवामानात मोठा बदल झाला आहे. इस्लामाबादकडून सरकणाऱ्या वाऱ्यांमुळे सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झाले असून त्याचा परिणाम महाराष्ट्रासह कर्नाटकावर होत आहे. तसेच बंगालच्या उपसागराकडूनही हवामान प्रणाली सक्रिय झाली आहे, तर वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे उत्तरेकडून थंड वाऱ्यांचा प्रभाव जाणवत आहे.यामुळे पुढील काही दिवस राज्यात मिश्र हवामान पाहायला मिळणार आहे. पुढील २४ तासांत किमान तापमानात सुमारे ४ अंशांनी घट, तर कमाल तापमानात ४ अंशांनी वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यानंतर दोन दिवस तापमानात चढ-उतार सुरूच राहतील.आज विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज असून पश्चिम आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक सरी कोसळण्याची शक्यता आहे. २९ मार्च रोजी कोकण वगळता राज्यभर मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.३०,३१ मार्च आणि १ एप्रिलदरम्यान राज्यभर विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता असून IMD ने अलर्ट जारी केला आहे.
Nepal News : बालेन शाह यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर अवघ्या २४ तासांत ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.
नालेसफाईतील हातसफाई एआयमुळे समोर, मागील वर्षी तब्बल १२ ते १५ कोटींचा झाला कंत्राटदारांना दंड
मुंबई (विशेष प्रतिनिधी)मुंबई महापालिकेच्यावतीने मागील वर्षी दोन वर्षांच्या कालावधीसाठी छोट्या,मोठ्या आणि मिठी नदीतील गाळाची सफाई करण्यासाठी कंत्राटदारांची निवड करण्यात आली होती. कंत्राटदारांच्या कार्यपध्दतीवर लक्ष ठेवण्यासाठी मागील वर्षीपासून एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असला या तंत्रज्ञानामुळे महापालिकेचे तब्बल १२ ते १५ कोटींची रक्कम दंड स्वरुपात आकारण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे एआय तंत्रज्ञानामुळे नालेसफाईच्या कामांमध्ये मोठ्याप्रमाणात पारदर्शक येत असून त्याच माध्यमातून त्यांची प्रत्येक चोरी पकडून त्यांना दंड आकारला जात आहे.मुंबई महापालिकेच्यावतीने मागील वर्षी छोट्या,मोठ्या आणि मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी सन २०२५ आणि २०२६ या कालावधीमध्ये कंत्राटदारांची निवड करण्यात आली होती. मात्र, या नालेसफाईच्या या कंत्राट कामांमध्ये यंदा एआय तंत्रज्ञानाचा वापर करता जिओ फेन्सिंगचा अवलंब केल्यामुळे गाळ काढण्यापासून ते गाळाची विल्हेवाट लावण्यापर्यंत आणि गाळाच्या वजनापासून ते त्यांच्या देयकांपर्यंत विशेषत: एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. ज्यामुळे प्रत्येक बाबींचा डेटाबेस तयार झाला आणि या डेटाबेसचे सविस्तर विश्लेषण केल्यानंतर कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. ही दंडाची रक्कम १२ ते १५ कोटींचा दंड लावला असल्याचे स्थायी समितीच्या सभेत सादरीकरणादरम्यान अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली. त्यामुळे यातील सक्रिय गैरप्रकार यामाध्यमातून कमी झाला असून असे प्रकार जिथे आढळून येतो, तिथे एआय प्रणालीच ती निदर्शनास आणून देत असल्यामुळे त्यातून असे प्रकार उघडकीस येत त्यांना दंड आकारला जातो .त्यातूनच असे प्रकार वारंवार झाल्यास सबंधित कंपनीला काळ्या यादीत टाकले जाते.मिठी नदीतील गाळ काढल्यानंतर त्याचे वजन काट्यावर वजन केल्यानंतर नियोजित डम्पिंग ग्राऊंडवर त्याची विल्हेवाट लावली जाते. यामध्ये जिओ फेन्सिंग केल्यामुळे वाहनात गाळ अपलोड झाल्यापासून वाहन निघालेला मार्ग आणि डम्पिंग ग्राऊंड याचा मार्ग हा जीआयएस प्रणालीद्वारे दिसत असल्यामुळे यामध्ये कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होत असल्यास दिसून येते.आज जेवढा गाळ वजन काट्यावर मापन केला जातो, तेवढ्याच गाळाचे पैसे दिले जातात. त्यामुळे नाल्यातून अथवा मिठी नदीतून गाळ काढल्यानंतर ४८ तासांमध्ये तो सुकल्यानंतर उचलून नेणे बंधनकारक आहे. कारण मिठी नदीतून किती गाळ काढला यापेक्षा तो वाहून किती नेला याचा आकडा वजन काट्यावर दिसेल, त्याच आधारे त्यांच्या देयकांचे अधिदान केले जाते. नाल्यासह मिठी नदीतील गाळ काढल्यानंतर त्यांचे फोटो व व्हिडीओ अपलोड करण्यासाठी मोबाईल अॅप्लिकेशन्सही उपलब्ध करून दिले आहेनव्याने जिथे जिथे नाले सफाईची कामे हाती घेतल्यानंतर याची माहिती संबंधित लोकप्रतिनिधींना देण्याचे निर्देश दिले असून त्यानुसार प्रत्येक नाल्याच्या कामांमध्ये याची माहिती लोकप्रतिनिधींना दिली जाईल असे आश्वासनही बांगर यांनी दिले.
Iran-US-Israel War : इराणने केले अमेरिका-इस्रायलवर गंभीर आरोप
इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी शुक्रवारी (२७ मार्च) अमेरिका आणि इस्रायलवर तीव्र टीका केली. संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेला (यूएनएचआरसी) पाठवलेल्या व्हिडिओ संदेशात त्यांनी मिनाब शहरातील एका शाळेवर ‘पूर्वनियोजित हल्ला’ झाल्याचा आरोप केला. त्यांनी या घटनेला ‘मानवतेविरुद्धचा गुन्हा’ असे संबोधले. अराघची यांनी सांगितले की, शजराह तैय्यबेह प्राथमिक शाळेवर झालेल्या या हल्ल्यात १७५ हून अधिक विद्यार्थी आणि शिक्षकांचा मृत्यू झाला.अराघची म्हणाले की, अमेरिका आणि इस्रायल स्वतःकडे अत्याधुनिक तंत्रज्ञान असल्याचा दावा करतात, त्यामुळे शाळेवर झालेला हल्ला चुकून झाला असे मानता येणार नाही. त्यांनी याला युद्धगुन्हा तसेच मानवतेविरुद्धचा गंभीर गुन्हा ठरवले. अशा कृत्याचा संपूर्ण जगभर निषेध व्हायला हवा आणि दोषींना शिक्षा झाली पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.ते पुढे म्हणाले की, या अत्याचाराचे समर्थन करता येणार नाही, तो लपवता येणार नाही आणि त्यावर शांतता किंवा उदासीनता दाखवणेही योग्य नाही. हा हल्ला केवळ ‘घटना’ किंवा ‘चूक’ नव्हती, असा त्यांनी जोर देऊन उल्लेख केला. अमेरिकेकडून दिली जाणारी परस्परविरोधी विधाने ही आपला गुन्हा झाकण्याचा प्रयत्न असल्याचा आरोपही त्यांनी केला आणि अशा विधानांमुळे जबाबदारीपासून सुटका होऊ शकत नाही, असे सांगितले.अहवालानुसार, मिनाबमधील या शाळेवर २८ फेब्रुवारी २०२६ रोजी हल्ला झाला होता, जो युद्धाचा पहिलाच दिवस होता. २७ मार्च रोजी युद्धाला एक महिना पूर्ण होत असताना अराघची यांनी ही प्रतिक्रिया दिली.२८ फेब्रुवारी २०२६ रोजी इराण-अमेरिका युद्धाच्या पहिल्याच दिवशी अमेरिकेच्या टोमहॉक क्रूझ क्षेपणास्त्राने दक्षिण इराणमधील मिनाब येथील शजराह तैय्यबेह प्राथमिक शाळेला लक्ष्य केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात किमान १७५ जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये बहुसंख्य विद्यार्थी आणि शिक्षकांचा समावेश होता, तर अनेक जण जखमी झाले.
BMC : मुंबई महापालिकेच्या सहआयुक्त पदी एम. देवेंदर सिंह, गंगाधरण यांची बदली
मुंबई (विशेष प्रतिनिधी)मुंबई महापालिकेतील सर्वात निष्क्रिय अधिकारी म्हणून ओळखले जाणारे सहआयुक्त गंगाधरण डी, यांची बदली झाली असून त्यांच्या रिक्त जागी एम. देवेंदर सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आय ए एस अधिकारी असलेले डी. गंगाधरण यांची नियुक्ती मुंबई महापालिकेच्या सह आयुक्तपदी झाल्यानंतर त्यांच्याकडे शिक्षण आणि दक्षता विभागाचा भार सोपवला होता. पण नंतर त्यांच्याकडील शिक्षण विभागाची जबाबदारी काढून केवळ त्यांच्याकडे केवळ दक्षता विभागाची जबाबदारी होती. पण त्यांना महापालिकेत आपल्याला सिद्ध करता आले नाही आणि हे पद एका सनदी अधिकाऱ्याच्या हाती असूनही त्या पदाला न्याय मिळत नव्हता. त्यामुळे गंगधरण यांच्या विरोधात प्रचंड नाराजी होती.राज्याच्या सामान्य प्रशासनाच्या वतीने सनदी अधिकारी एम. देवेंदर सिंह यांची नियुक्ती केल्याचे आदेश प्राप्त झाले असून त्यांना त्वरित गंगाधरण याच्याकडून त्वरित पदभार स्वीकारण्याचे कळवले आहे.महापालिकेत यापूर्वी नियुक्त सनदी अधिकारी अजित कुंभार यांची बदली झाल्यानंतर गंगाधरण यांची नियुक्ती मुंबई महापालिकेत सह आयुक्त पदी झाली होती. पण आपल्या या सेवा कालावधीत कुठेही त्यांना चमक दाखवता आली नाही. किंबहूना सनदी अधिकारी नियुक्त असूनही या खात्यांचा कारभारात बदल घडवून आणता आला नाही. या पदावर या पूर्वी सनदी अधिकारी आर. ए राजीव,डॉ. सतीश भिडे, व्हि. राधा. विकास खरगे,निधी चौधरी, अजित कुंभार, आशुतोष सलील अशा काही अधिकाऱ्यांनी नियुक्ती झाल्यानंतर या पदाचा भार स्वीकारत या पदाला न्याय दिला होता आणि आपले नाव वेगवेगळ्या माध्यमातून महापालिकेत कोरले होते. त्यामुळे त्यांच्या कामाच्या पद्धतीमुळे आजही त्यांच्या कामाची दखल आणि त्याचे नाव अधिकाऱ्यांसह जनतेच्या मुखावर आहेत.
मुंबईतील भूजलात खारटपणा वाढण्याचा धोका
- राष्ट्रीय जलभांडार नकाशांकन व व्यवस्थापन कार्यक्रम अंतर्गत निष्कर्षमुंबई (विशेष प्रतिनिधी)पाण्याचे नैसर्गिक स्रोत, भूगर्भातील पाण्याचा साठा, भविष्यासाठी त्याचे नियोजन आणि व्यवस्थापनावर मुंबई महानगरपालिका मुख्यालयात शुक्रवारी २७ मार्च २०२७ रोजी बैठक पार पडली. या बैठकीमध्ये मुंबई महानगरासाठीचे राष्ट्रीय जलभांडार नकाशांकन व व्यवस्थापन कार्यक्रम अंतर्गत निष्कर्ष मांडले. देशभरात जमिनीखालील पाण्याचे साठे कुठे आहेत, किती आहेत आणि त्यांचा योग्य वापर कसा करायचा याबाबत त्यांनी माहिती दिली. मुंबईच्या शाश्वत विकासासाठी पाण्याचे व्यवस्थापन अत्यावश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. भूगर्भातील पाण्याचा वाढता उपसा नियंत्रणात आणणे, प्रदूषणाचे प्रमाण कमी करणे आवश्यक आहे असून समुद्रकिनारी भाग असल्याने भूजलातील खारटपणा वाढण्याचा धोका अधिक असल्याचाही निष्कर्ष मांडण्यात आला आहे.मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी तसेच अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे यांच्या मार्गदर्शनानुसार ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत महानगरपालिका उप आयुक्त (पर्यावरण व वातावरणीय बदल) अविनाश काटे, उप मुख्य अभियंता अजय राणे यांच्यासह बैठकीस भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, जलसंपदा विभाग तसेच नियोजन विभाग, जल अभियांत्रिकी, पर्यावरण विभागासह विविध विभाग तसेच खासगी जल-पर्यावरण संस्थांचे एकूण ३१ प्रतिनिधी प्रत्यक्ष आणि २५ प्रतिनिधी ऑनलाइन सहभागी झाले.या बैठकीत केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालय अधिनस्थ केंद्रीय भूजल मंडळाचे वरिष्ठ भूजल वैज्ञानिकउपेंद्र धोंडे यांनी भूजलाची माहिती दिली. भूजलाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे आणि तिचा उपयोग कसा करायचा यावर शुक्रवारच्या कार्यशाळेत सविस्तर चर्चा करण्यात आली.‘केंद्रीय भूजल विभागाचे भूजल माहिती भांडार तसेच जलधर नकाशाकरण अभ्यास प्रकल्पांचे उपयोग’ या विषयावरील या कार्यशाळेत भूजलाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे आणि तिचा उपयोग कसा करायचा यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. कार्यशाळेत केंद्रीय भूजल मंडळाचे वरिष्ठ भूजल वैज्ञानिक उपेंद्र धोंडे यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे भूजल व्यवस्थापनाबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांनी राष्ट्रीय माहिती प्रसारण धोरण यावर सादरीकरण केले. तसेच मुंबई महानगरासाठीचे राष्ट्रीय जलभांडार नकाशांकन व व्यवस्थापन कार्यक्रम अंतर्गत निष्कर्ष मांडले. देशभरात जमिनीखालील पाण्याचे साठे कुठे आहेत, किती आहेत आणि त्यांचा योग्य वापर कसा करायचा याबाबत त्यांनी माहिती दिली. मुंबईच्या शाश्वत विकासासाठी पाण्याचे व्यवस्थापन अत्यावश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. भूगर्भातील पाण्याचा वाढता उपसा नियंत्रणात आणणे, प्रदूषणाचे प्रमाण कमी करणे आवश्यक आहे तसेच समुद्रकिनारी भाग असल्याने भूजलातील खारटपणा वाढण्याचा धोका याकडेही त्यांनी लक्ष वेधले.वरिष्ठ भूजल वैज्ञानिक उपेंद्र धोंडे यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे मुंबईच्या शाश्वत विकासासाठी पाण्याचे व्यवस्थापन करणे गरजेचे असल्याचे सांगितले. यासोबत भूगर्भात असलेल्या पाण्याचा वाढता उपसा कसा नियंत्रणात आणता येईल, प्रदूषणाचे प्रमाण कसे कमी करता येईल आदींवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. मुंबईचा बहुतांश भाग समुद्र किनाऱ्याचा आहे. येथील भूजलात खारटपणा वाढण्याचा धोका असल्याचेही धोंडे यांनी सांगितले. केंद्र शासनाच्या अटल भूजल योजना, जलशक्ती अभियान, जलसंचय जन भागीदारी, मिशन अमृत सरोवर आदी योजनांचीही यावेळी बैठकीत माहिती देण्यात आली.
मुंबईत डासांचा प्रादुर्भाव, पण मशिन्स पडल्या बंद
- प्रशासनाने दिली कबुली, म्हणाले देखभालीचे कंत्राट संपलेमुंबई (विशेष प्रतिनिधी)मुंबईतील विविध भागांमध्ये सध्या डासांचा उपद्रव वाढत चालला असून या वाढत्या उपद्रवाला प्रतिबंध करण्यासाठी महापालिकेच्यावतीने धूर फवारणी तसेच औषध फवारणीचे प्रयोग केले जातात. मात्र, मुंबईतील अनेक भागांमध्ये याप्रकारच्या धूर फवारणीची मशिन्सच बंद पडत असल्यामुळे मोठ्याप्रमाणात धुम्र फवारणी केली नाही. परिणामी मुंबईतील डास प्रतिबंधक उपायोजना प्रभावी राबवली जात नसून यामुळे मोठ्याप्रमाणात नागरिकांना डासांचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे समोर आले आहे.मुंबई महापालिकच्या एस विभागातील किटक नियंत्रण अधिकारी खात्यांतर्गत अळीनाशक फवारणी, धुम्रफवारणी, मक्षिका नियंत्रण, मुषक नियंत्रण इत्यादी प्रकारचे कामे करण्यासाठी संस्थेला मान्यता देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत आला असता, शिवसेनेचे अमेय घोले यांनी एका प्रभागासाठी दोन धुम्र फवारणी मशिन देण्याची मागणी केली. सध्या एकच मशिन असल्यामुळे सर्वच परिसरात धुम्र फवारणी करता येत नाही असे सांगितले. झोपडपट्टी भागांमध्ये मुषकांचा उपद्रव अधिक असून त्या डासांचाही प्रार्दुभाव अधिक आहे. परंतु यातील काही मशिन्स या आग निघत असल्यामुळे त्या बंद आहेत. तर प्रिती सातम यांनी यापूर्वी न्यायालयाने किंवा अन्य प्राधिकरणाने धूर फवारणी करण्यास काही प्रतिबंध करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले होते का आणि त्यामुुळे धूर फवारणीचे प्रमाण कमी केले का असा सवाल केला. तर सभागृहनेतेे गणेश खणकर यांनी पूर्वी धूर फवारणीबरोबरच बादलीमध्ये औषध घेवून खाकी वर्दीतील कामगार यायचे. पण ते आता मुंबईतून गायब झाले आहेत. त्यामुळे यातील बऱ्याचशा मशिन्स या बंद असून हे धडगे खांद्यावर घेवून ते फिरत आहेत. त्यामुळे याचे देखभाल करण्याचे कंत्राट बंद झाले का असा सवाल महापालिका कधीतरी मुंबईकरांचा विचार करणार आहे की नाही. यावर श्रध्दा जाधव, डॉ सईदा खान, जमीर कुरेशी, अश्रफ आझमी आणि अजंता यादव यांनी विभागातील डासांच्या प्रादुर्भाव आणि धुम्र फवारणीची समस्या मांडण्याचा प्रयत्न केला. यावेळी प्रशासनाच्यावतीने अतिरिक्त आयुक्त डॉ विपीन शर्मा यांनी या धुर फवारणीच्या मशीन्सची खरेदी सन २००८ साली करण्यात आली होती. त्यामुळे याला १८ वर्षे झाली आहेत.त्यामुळे २२७ मशिन्सच्या वार्षिक देखभालीकरता असलेले कंत्राट सपुष्टात आले असून यासाठीची निविदा प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळे एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत या मशिन्सचा वापर पूर्ण क्षमतेने होईल,असे स्पष्ट केले.
IAS Transfer : मोठी बातमी! 8 बड्या आयएएस अधिकाऱ्यांची बदली, वाचा.. कुणाची कुठे नियुक्ती?
IAS Transfer : बहुचर्चित भोंंदू अशोक खरात प्रकरणाचा तपास सुरु असतानाचा राज्यातील 8 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
Akshay Khanna: कमबॅक असा असावा! अक्षय खन्नाने पुन्हा सिद्ध केलं आपलं टॅलेंट
Akshay Khanna अक्षय खन्ना हा दिग्गज अभिनेता विनोद खन्ना यांचा मुलगा आहे. वडिलांप्रमाणेच त्यानेही अभिनय क्षेत्रात आपली छाप सोडली. मात्र, त्याचा सुरुवातीचा प्रवास सोपा नव्हता. वयाच्या १९व्या वर्षी त्याला केस गळण्याची समस्या सुरू झाली, ज्यामुळे तो मानसिकदृष्ट्या खूप अस्वस्थ झाला होता. पण त्याने ही गोष्ट स्वीकारली आणि आत्मविश्वासाने पुढे वाटचाल केली.
- पहिलाच सामना हायस्कोरिंग होणार ?मुंबई : आजपासून म्हणजेच शनिवार २८ मार्च रोजी आयपीएलच्या १९व्या हंगामाची धमाकेदार सुरुवात होत आहे. या हंगामातील पहिला सामना विराटच्या RCB आणि नवोदित कर्णधार ईशान किशनच्या SRH मध्ये रंगणार आहे. हा सामना बंगळुरूतील चिन्नास्वामी मैदानावर (Chinnaswamy Stadium) संध्याकाळी ७:३० पासून सुरु होईल. या दोन्ही संघांनी आपला पहिल्या सामन्यासाठी प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली जोरदार सराव केला आहे.गतविजेता आरसीबी या सामन्यात विजयी सलामी देण्याच्या निर्धाराने उतरणार आहे. तर दुसरीकडे, ईशान किशन (Ishan Kishan) कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात संघाला विजय मिळवून देतो का, याकडे सर्वांचे लक्ष असेल.फलंदाजीचा फटाकेबाज जल्लोष :एम. चिन्नास्वामी स्टेडियम हे फलंदाजांसाठी अनुकूल मैदान मानले जाते. त्यामुळे घरच्या मैदानावर विराट (Virat Kohli) कडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. त्याचबरोबर रजत पाटीदार, टीम डेव्हिड आणि रोमारियो शेफर्ड यांसारखे आक्रमक फलंदाज आरसीबीला बळ देणार आहेत.तर हैद्राबादकडून अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, ईशान किशन आणि हेनरिक क्लासेन यांसारखे विस्फोटक फलंदाज मैदान गाजवू शकतात. त्यामुळे चाहत्यांना हायस्कोरिंग सामन्याची मेजवानी मिळण्याची दाट शक्यता आहे.गोलंदाजीही तोडीसतोड :आरसीबीकडून भुवनेश्वर कुमार, सुयश शर्मा आणि रोमारियो शेफर्ड यांच्यावर गोलंदाजीची जबाबदारी असेल. तर एसआरएचकडून जयदेव उनडकट, हर्षल पटेल, शिवम मावी आणि ब्रायडन कार्स यांच्याकडून जोरदार आव्हान अपेक्षित आहे.दोन्ही संघाची संभाव्य प्लेइंग XI :रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु :फिल सॉल्ट, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), जितेश शर्मा (विकेटकीपर), टीम डेव्हिड, कृणाल पांड्या, रोमारियो शेफर्ड, भुवनेश्वर कुमार, सुयश शर्मा, जेकब डफीसनरायजर्स हैदराबाद :हेनरिक क्लासेन, ईशान किशन (कर्णधार), अनमोलप्रीत सिंग, ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, नितीश कुमार रेड्डी, लियाम लिव्हिंगस्टोन, हर्षल पटेल, जयदेव उनडकट, ब्रायडन कार्स, शिवम मावीया दमदार लढतीत कोण बाजी मारणार, याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.
Rajshri Deshpande : अभिनेत्री राजश्री देशपांडे हिला ब्रेस्ट कॅन्सरचे निदान झाले होते. तिच्यावर शस्त्रक्रिया झाली असून, तिने सोशल मीडियावरुन एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
Anjali Damania : रुपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोशल मीडिया एक्स अकाऊंटवरुन ट्वीट करत टीका केली आहे.
CM Devendra Fadnavis : राज्यात पीएनजीला वेग, खतसाठ्यावर सतत नजर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : जागतिक संकटाच्या पार्श्वभूमीवर भारताने संतुलित आणि प्रभावी धोरण अवलंबले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितले. राज्यात पीएनजी (पाईप्ड नॅचरल गॅस) वितरणाला गती देण्यात आली असून खतांच्या उपलब्धतेवर सातत्याने आढावा घेतला जात असल्याची माहिती त्यांनी दिली.पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या वतीने विविध मुद्दे मांडले. बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah), संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.पश्चिम आशियातील युद्धस्थितीमुळे निर्माण झालेल्या जागतिक संकटाचा देशातील नागरिकांवर विपरीत परिणाम होऊ नये, यासाठी केंद्राने घेतलेल्या निर्णयांबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी पंतप्रधानांचे आभार मानले.राज्यातील उपाययोजनांची माहिती देताना त्यांनी सांगितले की, खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असून आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांना अडचण भासू नये यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे. काळाबाजार आणि साठेबाजी रोखण्यासाठी कठोर कारवाई केली जात असून ‘अॅग्रीस्टॅक’ प्रणालीद्वारे शेतीशी संबंधित प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्याचे काम सुरू आहे.मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या अध्यक्षतेखाली विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत सहभागी झालो. या बैठकीस मा केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाह, मा केंद्रीय रक्षा मंत्री राजनाथ सिंहजी, केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव तसेच केंद्रशासित प्रदेशांचे नायब राज्यपाल उपस्थित… pic.twitter.com/XXIR4fxxU8— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 27, 2026मुख्यमंत्री म्हणाले की, केंद्राच्या सर्व सूचनांचे पालन करत राज्य शासन पीएनजी वितरण अधिक वेगाने करत आहे. ‘ईज ऑफ डुइंग बिझनेस’ अंतर्गत प्रक्रिया सुलभ केल्या जात असून संकटकाळातही राज्य आपली जबाबदारी प्रभावीपणे पार पाडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.जागतिक परिस्थितीबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, अनेक देशांमध्ये गंभीर निर्बंध लागू करण्यात आले असताना भारतात परिस्थिती तुलनेने नियंत्रणात ठेवण्यात यश आले आहे. इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर केंद्राने उत्पादन शुल्कात केलेली कपात सर्वसामान्यांसाठी दिलासादायक ठरली आहे.ऊर्जा क्षेत्रात गेल्या काही वर्षांत करण्यात आलेल्या सुधारणांचा सध्याच्या परिस्थितीत मोठा फायदा होत असल्याचे नमूद करत, इंधन आयात करणाऱ्या देशांची संख्या वाढविल्यामुळे पुरवठा खंडित होण्याचा धोका कमी झाल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच सौरऊर्जा, ई-बस यांसारख्या पर्यायी स्रोतांवर दिलेला भरही उपयुक्त ठरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मध्यपूर्वेतील परिस्थिती आणि केंद्र सरकारने घेतलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.
Ashok Kharat Case : अशोक खरात प्रकरणाला वेग; एसआयटीकडून पुन्हा कार्यालयाची झडती
नाशिक : भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात तपास यंत्रणांनी पुन्हा एकदा हालचालींना वेग दिला आहे. शुक्रवारी (२७ मार्च) विशेष तपास पथक (SIT) आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने खरात यांच्या प्रॉपर्टी खरेदी-विक्री कार्यालयात जाऊन झडती घेतली. यावेळी काही महत्त्वाची माहिती आणि कागदपत्रे हाती लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.भोंदू बाबा अशोक खरात याच्या पोलीस कोठडीची मुदत रविवारी संपणार असल्याने तपास यंत्रणा अधिक सक्रिय झाल्या आहेत. विविध प्रकरणांच्या अनुषंगाने तपास सुरू असून, त्यात वनविभागाच्या कायद्यांनुसारही स्वतंत्र तपास करण्यात येत आहे. तसेच, या प्रकरणांमध्ये नियमांचे उल्लंघन झाले आहे का, याचीही चौकशी केली जात आहे.दरम्यान, तपास पथकाने पूर्वी सील केलेले कार्यालय पुन्हा उघडून तपास केला आणि काही महत्त्वाची कागदपत्रे जप्त केल्याचे सांगितले जात आहे. जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांचा सध्या सखोल अभ्यास सुरू आहे. मात्र, याबाबत पोलिसांकडून अधिकृत दुजोरा अद्याप मिळालेला नाही.या प्रकरणातील तपास पुढील काही दिवसांत आणखी वेगाने होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Varun Dhawan Daughter Health लारा धवनचा जन्म ३ जून २०२४ रोजी झाला होता. या वर्षी ती दोन वर्षांची होणार आहे. मात्र, तिच्या चालण्यामध्ये अडचणी येत असल्याचं लक्षात आल्यानंतर डॉक्टरांकडे तपासणी केली असता हा आजार असल्याचं निदान झालं.
'मला बांदा तुरुंगात जीवाला धोका आहे. नसांमध्ये वेदना आहेत, हात-पाय थंड पडले आहेत. कर्मचारी मला जेवणात स्लो पॉयझन देत आहेत. कोणत्याही क्षणी मृत्यू येईल असे वाटत आहे.' माफिया आणि आमदार राहिलेल्या मुख्तार अन्सारीची यूपीच्या बाराबंकी दिवाणी न्यायालयात दाखल केलेली ही शेवटची याचिका होती. 21 मार्च 2024 रोजी याचिका न्यायालयात पोहोचली आणि 28 मार्च रोजी मुख्तारचा मृत्यू झाला. त्यावेळी ते बांदा तुरुंगात बंद होते. मुख्तारला जाऊन 2 वर्षे झाली आहेत. कुटुंब अजूनही खटला लढत आहे. त्यांचे वकील रणधीर सिंह सुमन दावा करतात की तुरुंग कर्मचाऱ्यांनी कट रचून मुख्तारचा जीव घेतला. ते मृत्यूपूर्वीचे फोटो, न्यायालयात दिलेले जबाब आणि कागदपत्रांचा हवाला देतात. मॅजिस्ट्रेट चौकशीला बनावट ठरवत सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी करत आहेत. 172 दिवस चाललेल्या चौकशीत मुख्तारच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगण्यात आले. कायदेशीर प्रक्रियेमुळे तुरुंगात मुख्तारच्या कपड्यांपासून ते बॅरेकपर्यंत सर्व काही सील आहे. त्याचे मोठे भाऊ आणि गाझीपूरचे सपा खासदार अफजाल अन्सारी देखील या मृत्यूला सरकार आणि तुरुंग प्रशासनाची मिलीभगत मानतात. मुद्दा 1: मुख्तारचा मृत्यू नैसर्गिक होता की नियोजित खून?मुख्तारच्या मृत्यूनंतर दुसऱ्या दिवशी 29 मार्च 2024 रोजी, यूपी सरकारने दंडाधिकारी चौकशीचे आदेश दिले होते. चौकशी पथकात बांदाच्या जिल्हाधिकारी दुर्गा शक्ती नागपाल आणि एसपी अंकुर अग्रवाल यांचा समावेश होता. अपर मुख्य न्यायिक दंडाधिकारी गरिमा सिंह यांना तपास अधिकारी बनवण्यात आले. पथकाने 5 महिने तपास केला. 16 सप्टेंबर 2024 रोजी आलेल्या अहवालात असे सांगण्यात आले की, मुख्तारचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने म्हणजेच मायोकार्डियल इन्फार्क्शनमुळे झाला. चौकशी अहवालातून 3 गोष्टी स्पष्ट झाल्या…1. कारागृहातील जेवणात विष नव्हते. बॅरेक क्रमांक-16 मध्ये मिळालेल्या गूळ, चणे आणि मिठाच्या नमुन्यांमध्ये विषाचे कोणतेही पुरावे आढळले नाहीत. 2. कारागृह नियमावलीनुसार कैद्यांना जेवण देण्यापूर्वी कर्मचारी आणि स्वयंपाकी ते चाखतात.3. मृत्यूच्या दिवशी आणि त्यापूर्वी 2-3 दिवस कारागृहात ज्या लोकांनी जेवण केले, त्यापैकी कोणाचीही तब्येत बिघडली नव्हती. मुख्तार पक्षाचा प्रतिवाद: वकील रणधीर सुमन हे दावे खोडून काढण्यासाठी 2 युक्तिवाद करतात. पहिला: मृत्यूच्या 2 आठवडे आधीपासून मुख्तारची तब्येत खराब होती. 20 मार्च रोजी सुनावणी होती. तेव्हा त्याने पहिल्यांदा सांगितले की 19 मार्चच्या रात्री त्याला जेवणात विष देण्यात आले.दुसरा: मुख्तारने मृत्यूच्या 7 दिवसांपूर्वी 21 मार्च रोजी बाराबंकी दिवाणी न्यायालयात याचिका दाखल करून सांगितले होते की त्याला 40 दिवसांपूर्वी जेवणात स्लो पॉयझन देण्यात आले होते. हे जेवण बांदा तुरुंगातील कर्मचारी बनवत होते. कर्मचाऱ्यांनीही जेवण केले होते, त्यानंतर अनेक कर्मचारी आणि मुख्तारची तब्येत बिघडली होती. मुद्दा 2: मृत्यूपूर्वी तुरुंगात मुख्तारची सुरक्षादंडाधिकारी चौकशीनुसार, तुरुंगातील प्रत्येक सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. अहवालात 28 मार्च 2024 रोजी संध्याकाळी मुख्तार बॅरेकमध्ये बेशुद्ध पडल्याचे मिनिट-दर-मिनिट तपशील आहे. तुरुंग प्रशासनाने गोल्डन अवरमध्ये, म्हणजेच तुरुंगातून रुग्णालयात नेईपर्यंतच्या वेळेत कोणताही विलंब केला नाही. मुख्तार पक्षाचा प्रतिवाद16 ऑगस्ट 2021 रोजी मुख्तारने बाराबंकीच्या खासदार/आमदार न्यायालयात सांगितले होते की बांदा तुरुंगात त्याची हत्या करण्याचा कट रचला जात आहे. अधिकारी आणि संशयित लोक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची दिशा बदलून आत येतात. काही कैद्यांना माझ्या हत्येच्या बदल्यात 5 कोटी रुपये आणि सर्व खटल्यातून सुटका करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मुद्दा 3: बॅरेक क्रमांक-16 मध्ये मुख्तारची वैद्यकीय स्थितीतपास पथकानुसार, दंडाधिकारी चौकशी केवळ डॉक्टरांच्या वैद्यकीय अहवालावर आधारित नव्हती, तर त्यात मुख्तारसोबत बंद असलेल्या कैद्यांसह 100 हून अधिक लोकांचे जबाब आणि व्हिसेराचा लॅब रिपोर्ट समाविष्ट आहे. मुख्तारच्या हृदयाच्या स्नायूंमध्ये पिवळे डाग आणि ब्लॉकेज आढळले. हा पुरावा आहे की मृत्यू अचानक झाला नाही, तर जुना आजार वाढल्यामुळे झाला. मुख्तारच्या बाजूने प्रतिवाद मुख्तारचा मुलगा उमर अन्सारी याने न्यायालयात सांगितले होते की, वडिलांच्या मृतदेहावर जखमांच्या खुणा होत्या. नाक-कानांतून आलेले रक्त स्पष्ट दिसत होते. डोळे सुजलेले होते आणि पोट फुगलेल्या फुग्यासारखे दिसत होते. त्यामुळे मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला असे वाटत नाही. भाऊ अफजाल म्हणाले- मृत्यूचे सत्य समोर आणूगाझीपूरचे खासदार अफजाल अंसारी प्रश्न उपस्थित करत म्हणाले, ‘मुख्तार यांच्या मृत्यूआधी त्यांच्याशी फोनवर बोलणे झाले होते. त्यांची तब्येत बिघडत चालली होती. ते फक्त एवढेच म्हणत होते की तुरुंगात विष देण्यात आले आहे, ज्यामुळे शरीर कमजोर होत चालले आहे.’ वकील म्हणाले- दंडाधिकारी चौकशी केवळ औपचारिकता, केस पुन्हा उघडेलअधिवक्ता रणधीर म्हणतात, ‘मृत्यूच्या सुमारे 10 दिवसांपूर्वी मुख्तार व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर झाले होते. त्यांनी तुरुंगात हळू विष (स्लो पॉइजन) दिल्याचा आरोप केला होता. मी 19 मार्च रोजी त्यांच्या सुरक्षेसाठी न्यायालयात अर्ज दिला होता, परंतु आदेश असूनही तुरुंग कर्मचारी आणि प्रशासनाचा निष्काळजीपणा सुरूच राहिला.’ नैसर्गिक मृत्यूच्या दाव्यावर ते म्हणतात, ‘उत्तर प्रदेशात कोठडीतील मृत्यूवर (कस्टोडियल डेथ) जितक्याही दंडाधिकारी चौकशा होतात, त्या केवळ औपचारिकता आहेत. मुख्तार जिवंत असताना, त्यांना त्रास देण्यासाठी दिवसातून चार ते पाच वेळा बॅरेकची तपासणी केली जात असे. तपासणीच्या बहाण्याने अन्न आणि वैयक्तिक सामान बाहेर फेकले जात असे. रात्री 1 वाजताही तपासणी होत असे. हे शारीरिक शोषणासारखेच होते.’ अॅडव्होकेट रणधीर मुख्तार यांच्या मृत्यूसाठी बांदाचे तत्कालीन जेल सुपरिटेंडेंट विरेश राज शर्मा आणि जेल स्टाफला जबाबदार धरले जाते. ते म्हणतात की, विरेश राज यांनी कोर्टात मृत्यूबाबतच्या चौकशीदरम्यान प्रत्येक प्रश्नाचे गोलमाल उत्तर दिले. यावरून हे सिद्ध होते की ते सत्य लपवत होते. आम्ही बांदा जेलचे माजी सुपरिटेंडेंट विरेश राज यांच्याशी फोनवर बोललो. त्यांनी सांगितले की, प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयाच्या प्रक्रियेत आहे, त्यामुळे काहीही बोलणे योग्य नाही. यानंतर आम्ही सध्याचे सुपरिटेंडेंट आलोक कुमार यांच्याशी बोललो. आलोक म्हणतात, ‘तपासासाठी बॅरेक नंबर-16, मुख्तारचे कपडे, पुस्तके आणि वैयक्तिक सामान सील ठेवण्यात आले आहे. आम्ही त्यांचे वैयक्तिक सामान कुटुंबाला सुपूर्द करण्यास सांगितले होते, परंतु कोणीही घेण्यासाठी आले नाही. दोन वर्षांनंतरही बॅरेक त्याच स्थितीत आहे. हे प्रोटोकॉल केसच्या तपासाचा भाग आहे.’ क्रिमिनल लॉयर म्हणाले- विष देण्याचे आणि सुपारीचे दावे कमकुवतमुख्तारचे वकील रणधीर यांच्या दाव्यांची पडताळणी करण्यासाठी आम्ही सर्वोच्च न्यायालयाचे क्रिमिनल लॉयर शाश्वत आनंद यांच्याशी बोललो. 1. मुख्तारला जेवणात विष दिले गेले असेल का?उत्तर: मुख्तारचे वकील न्यायालयात त्यांचा अर्ज दाखवत आहेत. मुख्तारच्या अर्जावर काय कारवाई करण्यात आली, हे पाहणे महत्त्वाचे आहे. विष दिल्याबद्दलच्या तक्रारीपासून ते मृत्यूच्या दरम्यान 9 दिवसांचा कालावधी होता. हा मोठा फरक आहे. या दरम्यान त्यांच्या वकिलांनी कारागृह प्रशासनाकडे 'स्टमक फूड पंपिंग'ची विनंती केली असती तर मुख्तारच्या शरीरातून खराब अन्न काढून ते तपासले जाऊ शकले असते की त्यांना कोणते विष दिले गेले आहे. मृत्यूनंतर त्यांचा न्यायालयीन अर्ज दाखवण्याचा काही अर्थ दिसत नाही. 2. मुख्तारला मारण्यासाठी कारागृहात सुपारी दिली गेलीउत्तर: फक्त हे म्हणणे, खूप कमकुवत बाजू आहे की कारागृहात हत्येची सुपारी दिली जात आहे किंवा बॅरेकमध्ये कोणी ये-जा करत आहे. त्यांच्या वकिलांकडे काही पुरावे आहेत का? मुख्तार उच्च सुरक्षा बॅरेकमध्ये होते. यावर पाळत कारागृहासोबतच पोलीस मुख्यालयापर्यंत असते. त्यामुळे त्यांना सुपारी देऊन कारागृहात मारणे कमी शक्य वाटते. 3. मुख्तारच्या शरीरावर जखमांचे निशाणउत्तर: जर मृतदेहावर जखमांचे निशाण किंवा काही दिसत होते, तर उच्च न्यायालयात दुसऱ्या शवविच्छेदनासाठी (पोस्टमॉर्टम) अपील करायला पाहिजे होते. उच्च न्यायालय दुसऱ्या राज्यातील डॉक्टर आणि पोलिसांकडून शवविच्छेदन करून घेऊ शकले असते, पण तसे झाले नाही. आताही जर कुटुंब किंवा वकिलांकडे मृतदेहावरील जखमांचे फोटो असतील, तर याचा आधार घेऊन उच्च न्यायालयात नवीन याचिका दाखल करू शकतात. मात्र, प्रश्न अजूनही उपस्थित होतील की जर आधीपासून पुरावे होते, तर आतापर्यंत काहीच का केले नाही. माजी IPS अधिकारी म्हणाले- मुख्तारचा अध्याय संपला, मृत्यू आजारामुळे झालायूपीचे माजी IPS अधिकारी राजेश कुमार पांडे यांनी 2016 मध्ये मुख्तारवर पत्रकाराला मारहाण केल्याचा गुन्हा दाखल केला होता. ते मुख्तार टोळीविरुद्धच्या ऑपरेशनमध्ये सहभागी होते. राजेश म्हणतात, ‘हे प्रकरण पूर्णपणे उघड झाले आहे. विष दिल्यासारखी कोणतीही गोष्ट समोर आलेली नाही. मुख्तारचा भाऊ अफजालने अनेकदा विष दिल्याबद्दल सांगितले आहे, पण सत्य हेच आहे की मुख्तारचा मृत्यू आजारामुळे झाला.’ मात्र, 1972 च्या बॅचचे निवृत्त आयपीएस अधिकारी एसआर दारापुरी राजेश पांडे यांच्या मताशी सहमत नाहीत. ते म्हणतात, ‘जर एखाद्या कैद्याने मृत्यूच्या काही दिवसांपूर्वी हत्येची शक्यता व्यक्त केली आणि आठवड्याभरात त्याचा मृत्यू झाला, तर यातून काहीतरी गडबड असल्याचे सिद्ध होते. सरकारने दंडाधिकारी चौकशी केली, ती निरर्थक होती.‘ दारापुरी पुढे म्हणतात की, सामान्यतः असे दिसून येते की दंडाधिकारी राज्य सरकारच्या दबावाखाली काम करतात. योगी सरकारची मुख्तारबद्दलची भूमिका कशी होती, हे सर्वांना माहीत आहे. चौकशी एखाद्या स्वतंत्र तपास संस्थेकडे सोपवायला हवी होती.
Pune Temperature : शिवाजीनगर, पाषाण आणि तळेगावमध्येही पारा ३८ अंशांच्या वर; वाढत्या उष्णतेने पुणेकरांचे हाल.
1 एप्रिल 2026 पासून 2025 मध्ये बनवलेल्या नवीन आयकर कायद्यांतर्गत काही नवीन नियम लागू होत आहेत. या अंतर्गत फॉर्म-16 रद्द करण्यात आले आहे. HRA, मुलांचे शिक्षण आणि वसतिगृह यांसारखे भत्ते वाढवण्यात आले आहेत. तज्ञांचे म्हणणे आहे की नवीन नियमांनुसार जुनी कर प्रणाली (ओल्ड टॅक्स रिजीम) निवडणाऱ्यांना अधिक फायदा होऊ शकतो. शेवटी या नवीन नियमांमध्ये काय-काय बदल होणार आहेत, त्यामुळे तुम्हाला काय फायदा-तोटा होईल, हे आजच्या एक्सप्लेनरमध्ये जाणून घेऊया... 1. नोकरदार कर्मचाऱ्यांसाठी नवीन नियम सध्या काय नियम आहे? काय फायदा-तोटा 2. शिक्षण, HRA सारखे भत्ते वाढवण्यात आले. सध्या काय नियम आहे? काय फायदा-तोटा 3. पॅनची माहिती देण्यासाठी पेमेंट रकमेची मर्यादा वाढवली सध्या काय नियम आहे? जुन्या नियमांनुसार PAN देण्याचे नियम काहीसे असे होते- बँकेत एका दिवसात 50 हजार रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम जमा केल्यास. दुचाकी वाहने वगळता कोणतेही वाहन खरेदी केल्यास, हॉटेल्स इत्यादींचे बिल 50 हजार रुपयांपेक्षा जास्त असल्यास आणि जमीन-मालमत्तेशी संबंधित 10 लाख रुपयांपेक्षा जास्त व्यवहारांवर PAN देणे आवश्यक आहे. काय फायदा-तोटायामुळे लहान रकमेच्या व्यवहारांवर PAN ची सक्ती संपुष्टात आली आहे. हॉटेल्सच्या बिलांवर आणि जमिनीच्या व्यवहारांवर मर्यादा दुप्पट झाली आहे. 4. TDS कापण्यासाठी युनिफाइड चलन प्रणाली, कमी फॉर्म भरावे लागतील आत्ता काय नियम आहे? काय फायदा-तोटा 5. नियम लागू करण्याबाबत पूर्वीपेक्षा कठोर नियम सध्या काय नियम आहे? काय फायदा-तोटा प्रश्न-1: आयकर भरताना जुन्या प्रणालीचा (ओल्ड रिजीम) फायदा होईल का?उत्तर: तज्ञांच्या मते, ज्या कर्मचाऱ्यांचा पगार जास्त आहे, त्यांनी जर आपले खर्च आणि इतर गोष्टींचे अधिक चांगल्या प्रकारे नियोजन केले, तर जुन्या कर प्रणालीमध्ये (ओल्ड टॅक्स रिजीम) अधिक फायदा होऊ शकतो… कमी उत्पन्न असलेल्यांना नवीन कर प्रणालीमुळे फायदा प्रश्न-2: नवीन नियम लागू झाल्यानंतरही काय-काय बदलणार नाही?उत्तर: नवीन नियम लागू झाल्यानंतरही काही गोष्टी बदलणार नाहीत…1. टॅक्स स्लॅब: यात कोणताही बदल होणार नाही. नवीन आणि जुन्या दोन्ही प्रणालींमध्ये उत्पन्नाच्या मर्यादा आणि ब्रॅकेट पूर्वीसारखेच राहतील.2. टॅक्स दर: दोन्ही प्रणालींमध्ये प्रत्येक उत्पन्न ब्रॅकेटनुसार टॅक्सचे दर पूर्वीसारखेच राहतील.3. कोणताही नवीन टॅक्स नाही: नवीन कायद्यात कोणताही नवीन किंवा अतिरिक्त टॅक्स जोडण्यात आलेला नाही. सध्याच्या उत्पन्नावर पूर्वीपासून लागू असलेले टॅक्सच लागतील.4. जुने अधिकार लागू राहतील: 196 च्या आयकर कायद्यांतर्गत तुमचे जे अधिकार आणि जबाबदाऱ्या होत्या, त्या नवीन कायद्यातही वैध राहतील. भत्ते, HRA सारख्या मूलभूत सुविधा मिळत राहतील. यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
Pune Traffic Fine : वाहतूक पोलिसांचा दंड वेगळा आणि पालिकेचा वेगळा; मुंबई उच्च न्यायालयाने पुणे महापालिकेकडून मागवले स्पष्टीकरण.
Revenue Department Action : सूक्ष्म चौकशीनंतर १३ अतिगंभीर गुन्हे उघड; खासगी हितासाठी सरकारी दप्तरात बेकायदेशीर बदल केल्याचा ठपका ठेवत महसूल विभागाचा कठोर निर्णय.
PMC News : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या कार्यालयात शुक्रवारी संध्याकाळी दोन कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या वादाचे पर्यवसन हाणामारीत झाले.
इराणने पाच देशांच्या जहाजांना होर्मुझ सामुद्रधुनीतून जाण्यास परवानगी दिली. ही पाच आपली (Editorial) मित्र राष्ट्रे असल्याचे इराणचे म्हणणे आहे.
PMC News : महापालिकेत निधीचा खडखडाट? प्रशासनाच्या ‘या’निर्णयामुळे नगरसेवक आक्रमक
PMC News : नियोजनाचा अभाव की आर्थिक शिस्तीचे उल्लंघन? ७२ (ब) अंतर्गत तरतूद नसतानाही पालिकेकडून मोठ्या प्रकल्पांचा धडाका.
Mundhwa Land : ‘बॉटॅनिकल गार्डन’च्या जमिनीचा वाद मिटणार? खारगे समितीचा मोठा निर्णय..वाचा सविस्तर
Mundhwa Land : दुर्मिळ वनस्पतींच्या जतनासाठी केंद्र सरकारच्या संस्थेला बळकटी; जमिनीच्या मालकी हक्काबाबतचा संभ्रम अखेर मिटणार.
Trump Iran Conflict : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इराणसोबतच्या संघर्षात अडकले आहेत. इराणच्या अटी आणि जागतिक तेल बाजारातील अस्थिरता यामुळे ट्रम्प यांच्या राजकीय भविष्यावर टांगती तलवार आहे.
राजकीय : राजकारणातील कांशीरामपर्व
नुकतीच बहुजन समाज पक्षाचे संस्थापक स्वर्गीय कांशीराम यांची जयंती (Editorial) साजरी झाली. त्यानिमित्ताने आजच्या राजकारणाची मीमांसा...
Bhor Forest Fire : भोर तालुक्यातील डोंगरांमध्ये वणव्याचे थैमान; हजारो झाडेझुडपे आणि वन्यप्राणी आगीच्या भक्ष्यस्थानी, पर्यावरणाची मोठी हानी.
Illegal Liquor Raid : थेऊरमध्ये पोलिसांचे धडक कारवाई! दोन दिवसांत ३ ठिकाणी छापे, दारू माफियांना दणका
Illegal Liquor Raid : थेऊर परिसरात अवैध मद्यविक्रीविरोधात पोलिसांची मोठी कारवाई; हातभट्टीची दारू आणि ताडी जप्त करत तिघांविरुद्ध गुन्हे दाखल.
Kailas Patil : ९५ टक्के कर्जपरतफेड असूनही मराठा तरुणांच्या रोजगारावर गदा; ट्रॅक्टर, टुरिस्ट गाड्या आणि जेसीबीसाठी कर्ज मिळणे झाले कठीण.
Makrand Patil : गुंजवणी, पानशेत आणि वरसगाव प्रकल्पबाधित १८ गावांमधील नागरी सुविधांच्या अभावावर खडाजंगी; आमदार शंकर मांडेकरांच्या उपस्थितीत प्रलंबित मागण्यांवर चर्चा.
Dahiwadi Murder Case : दहिवडी येथील दोन बालकांच्या हत्येप्रकरणी मुख्य आरोपी अक्षय मांजरेला न्यायालयीन कोठडी; येरवडा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्याचे आदेश.
Jejuri News : जेजुरीतील धार्मिक विधींमध्ये वापरल्या जाणाऱ्या भंडाऱ्यात मोठ्या प्रमाणावर भेसळ; कपाळाला लावल्यास त्वचा जळजळणे आणि डोळे लाल होण्याचे प्रकार वाढले.
Kukadi Project : अवर्षणप्रवण क्षेत्रातील सात तालुक्यांतील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण; राम शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे कालव्याच्या दुरवस्थेवर अखेर मात.
PCMC News : महापालिकेत ४० लाखांचा ‘कचरा’? आधीच कोट्यवधींचा खर्च, आता रेडिओवर उधळपट्टी कोणासाठी?
PCMC News : शहरात जागोजागी कचऱ्याचे साम्राज्य, मात्र प्रशासनाला जाहिरातबाजीचा मोह; 'स्वच्छ भारत' मोहिमेतील खर्चाच्या मार्गावर तज्ज्ञांनी उपस्थित केले प्रश्न.
Pimpri Chinchwad Crime : दापोडी येथील जयभीम नगरमध्ये जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी सशस्त्र हल्ला; फिर्यादी महेश गुळवे आणि आकाश पिंजन गंभीर जखमी.
PCMC News : खेळाडू आणि साहित्यिकांना अच्छे दिन; महापालिकेचा मोठा निर्णय, पाहा काय बदलणार?
PCMC News : महापालिकेच्या कला, क्रीडा व साहित्य समितीची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न; खेळाडू आणि कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी नवीन धोरणांवर शिक्कामोर्तब.
Ekvira Devi Temple : एकविरा गडावर दोन गट भिडले! पालखी सोहळ्याला गालबोट; नेमकं काय घडलं?
Ekvira Devi Temple : कार्ला गडावर पालखी सोहळ्यादरम्यान पनवेल आणि कल्याण कोळीवाडा गटात राडा; दगडफेकीमुळे काही काळ भीतीचे वातावरण.
Gas Shortage : सिलिंडर मिळेना म्हणून चुली पेटल्या! महाप्रसादासाठी भाविकांनी लढवली अनोखी शक्कल
Gas Shortage : आखाती देशातील युद्धामुळे व्यावसायिक गॅसचा तुटवडा; स्वामी समर्थ प्रकट दिन आणि रामनवमीला आचाऱ्यांनी पेटवल्या लाकडांच्या चुली.
Fuel Shortage : पेट्रोल-डिझेल संपणार? लॉकडाऊनच्या अफवांनी शहरात खळबळ; पेट्रोल पंपांवर लागल्या रांगा
Fuel Shortage : आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅस आणि इंधन तुटवड्याच्या अफवांचे पेव; सोशल मीडियावर जुने आणि एआय निर्मित फोटो व्हायरल झाल्याने गोंधळ.
Satara Water Scarcity : मार्चअखेर उन्हाची तीव्रता वाढल्याने भूजल पातळीत मोठी घट; ६ गावे आणि २२ वाड्यांना सध्या टँकरने पाणीपुरवठा.
Sajjangad Suicide Case : विवाहित तरुणाची सज्जनगडावरून उडी घेत आत्महत्या; नेमकं कारण काय?
Sajjangad Suicide Case : माची पेठ येथील ३५ वर्षीय विवाहित तरुणाने संपवले जीवन; आत्महत्येचे गूढ कायम, सातारा तालुका पोलिसांकडून तपास सुरू.
दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, २८ मार्च २०२६
पंचांगआज मिती चैत्र शुद्ध दशमी शके १९४८. चंद्र नक्षत्र पुष्य योग सुकर्मा चंद्र राशी कर्क भारतीय सौर ७ चैत्र शके १९४५. मंगळवार दिनांक २८ मार्च २०२३. मुंबईचा सूर्योदय ०६.३६ मुंबईचा चंद्रोदय ०२.४१ पीएम ,मुंबईचा सूर्यास्त ०६.५१ मुंबईचा चंद्रास्त ०४.०० उद्याची ,राहू काळ ०९.४० ते ११.१२ एकवीरा देवी पालखी सोहळा कार्ला.दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)
अशोक खरात प्रकरण भोवलं; रुपाली चाकणकरांचा राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील भोंदूबाबा अशोक खरात याला बलात्कार, महिलांशी गैरवर्तन, महिलांची फसवणूक अशा गंभीर आरोपांत अटक झाली आहे. या प्रकरणात विशेष तपास पथक तपास करत आहे. याच अशोक खरातची पाद्मपूजा करताना आणि त्याच्या डोक्यावर छत्री धरताना तसेच अनेक कार्यक्रमात खरात सोबत वावरताना रुपाली चाकणकरांचे फोटो समोर आले. एका ट्रस्टमध्ये खरात आणि रुपाली चाकणकर हे दोघेही ट्रस्टी असल्याची माहिती समोर आली. यानंतर मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आणि रुपाली चाकणकरांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. आता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा दिला आहे.खरात प्रकरणाबाबत पहिल्या दिवशीच मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे.त्याच्या आर्थिक व्यवहारात,त्याच्या गैरकृत्यात दुरान्वये संबंध नाही,आजही तीच स्पष्ट व ठाम भूमिका आहे.तपासादरम्यान या सर्व बाबी निष्पन्न होतीलच. खोटे,असत्य व कुठलाही पुरावा नसताना जे आरोप माध्यमांमधून होत आहेत,ते… pic.twitter.com/9awsGZmgJL— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) March 27, 2026महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनाम्यानंतर रुपाली चाकणकर यांना राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा द्यावा लागल्यामुळे त्यांना अशोक खरात प्रकरण भोवल्याचीच चर्चा राजकीय वर्तुळात आहे. राजीनाम्याबाबत रुपाली चाकणकर यांनी एक्स पोस्ट करून माहिती दिली आहे.'खरात प्रकरणाबाबत पहिल्या दिवशीच मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे. त्याच्या आर्थिक व्यवहारात, त्याच्या गैरकृत्यात दुरान्वये संबंध नाही, आजही तीच स्पष्ट व ठाम भूमिका आहे. तपासादरम्यान या सर्व बाबी निष्पन्न होतीलच. खोटे, असत्य व कुठलाही पुरावा नसताना जे आरोप माध्यमांमधून होत आहेत, ते वेदनादायक आहे. सत्य प्रखरतेने सिद्ध होईलच. हा तपास पारदर्शकपणे व निष्पक्षपणे व्हावा, ही माझी मागणी मी यापूर्वीच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालक यांच्याकडे केली आहे. आज सकाळी फोनद्वारे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार मी राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे'; अशी एक्स पोस्ट रुपाली चाकणकर यांनी केली आहे.
चार सहायक आयुक्तांच्या बदल्या, गजानन बेल्लाळे यांची घाटकोपर मधून बदली, कुलाबा,नरिमन पॉइंटची जबाबदारी
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या सहायक आयुक्तांची खांदे पालट करण्यात आली असून मुंबईच्या महापौर प्रतिनिधित्व करत असलेल्या एन प्रशासकीय कार्यालयाचे सहायक आयुक्त गजानन बेल्लाळे यांची बदली ए विभागाच्या सहायक आयुक्तपदी करण्यात आली आहे. तर त्यांच्याकडील करनिर्धारण व संकलन विभागाचा अतिरिक्त कार्यभार कायम ठेवला आहे. तर तीन कार्यकारी अभियंता यांच्यापैकी दोघांना नगर अभियंता विभागात परत पाठवले आहे. एकाची बदली करण्यात आली आहे तर एका नवीन कार्यकारी अभियंत्यावर सहाय्यक आयुक्त पदाचा प्रभारी भार सोपवण्यात आला आहे.मुंबई महापालिका आयुक्त डॉ.भूषण गगराणी येत्या ०१ एप्रिल रोजी सेवानिवृत्त होत असून निवृत्ती पूर्वी त्यांनी काही सहाय्यक आयुक्त पदावरील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार करण्यात आलेल्या बदल्यांमध्ये सहाय्यक आयुक्त गजानन बेल्लाळे यांच्याकडील ‘एन’ विभागाची जबाबदारी काढून ए विभागाची जबाबदारी सोपवली आहे. मात्र, या कार्यभारासोबतच करनिर्धारक व संकलक पदाचा अतिरिक्त कार्यभार कायम ठेवण्यात आला आहे.‘ई’ विभागातील सहाय्यक आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार असलेल्या कार्यकारी अभियंता रोहित त्रिवेदी यांची व बदली ‘आर/उत्तर’ विभागात करण्यात आली आहे.घनकचरा व्यवस्थापन खात्याचे कार्यकारी अभियंता आनंद कंकाळ यांच्यावर ‘ई’ विभागाच्या सहाय्यक आयुक्त पदाचा पूर्णकालिक कार्यभार सोपविण्यात आला आहे.याशिवाय, कार्यकारी अभियंता नयनीश वेंगुर्लेकर यांच्याकडे आर उत्तर विभागाचा अतिरिक्त कार्यभार होता, तर कार्यकारी अभियंता जयदीप मोरे यांच्याकडे ए विभागाचा अतिरिक्त कार्यभार होता. त्या दोघांकडून अनुक्रमे दोन्ही विभागाच्या सहायक आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार काढून त्यांना पुन्हा नगर अभियंता म्हणजे त्यांच्या मूळ जागेवर परत पाठवले आहे.सहायक आयुक्त रूपाली सरमळकर यांच्याकडे अतिक्रमणाची विभागमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून शिफारस करण्यात आलेल्या, रुपाली प्रसाद सरमळकर (पूर्वाश्रमीच्या रुपाली अशोक शिंदे) यांची सहायक्त आयुक्तपदी निवड झाल्यानंतर आता त्यांच्यावर अतिक्रमण निर्मूलन (शहर) विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.अधिकारी आणि बदलीची जागा गजानन बेल्लाळे, बदलीचे ठिकाण सहायक आयुक्त (ए विभाग) तसेच करनिर्धारण व संकलन पदाचा अतिरिक्त कार्यभार रोहित त्रिवेदी, सहायक आयुक्त (आर/उत्तर विभाग) अतिरिक्त कार्यभार आनंद कंकाळ (कार्यकारी अभियंता) बदलीचे ठिकाण सहाय्यक आयुक्त (ई विभाग) पूर्णकालिक कार्यभार नयनीश वेंगुर्लेकर, बदलीचे ठिकाण:नगर अभियंता विभागाकडे परत जयदीप मोरे , बदलीचे ठिकाण: यांना नगर अभियंता विभागाकडे परत
कर्नाटकमध्ये प्रत्येक आमदाराला शुभारंभाच्या सामन्याचे VIP पास मिळणार
बंगळुरू : कर्नाटकमध्ये प्रत्येक आमदाराला आयपीएलच्या राज्यातील शुभारंभाच्या सामन्याचे VIP पास मिळणार आहेत. आयपीएलसाठी कर्नाटक सरकारने धोरण निश्चित केले आहे. या धोरणानुसार कर्नाटकच्या प्रत्येक आमदाराला शुभारंभाच्या सामन्याचे प्रत्येकी दोन VIP पास मिळणार आहेत. सर्व VIP पासधारकांची एकाच ठिकाणी बसण्याची व्यवस्था केली जाणार आहे.विधानसभेत VIP पाससाठी अनेक आमदारांनी आग्रही मागणी केली. विधानसभाध्यक्षांनी समजूत काढूनही आमदार शांत होत नसल्याचे बघून उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी पुढाकार घेतला. त्यांनी सर्व व्हीआयपींसाठी एका स्टँडची व्यवस्था केली. यानंतर प्रत्येक आमदाराला शुभारंभाच्या सामन्याचे प्रत्येकी दोन VIP पास मिळतील, अशी घोषणा कर्नाटक सरकारने केली.कर्नाटक क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष व्यंकटेश प्रसाद यांच्याशी चर्चा करून उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी आमदारांच्या VIP पासची सोय केली. नंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याशी स्वतंत्रपणे चर्चा केली. यानंतर कर्नाटक सरकारने आमदारांच्या VIP पासबाबत अधिकृत घोषणा केली. उर्वरित सामन्यांबाबत नंतर चर्चा करून निर्णय घेऊ, असे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार म्हणाले.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ३०० आमदार पाससाठी आग्रही होते. या सर्व आमदारांना प्रत्येकी दोन प्रमाणे ६०० पास मिळणार आहेत. या ६०० व्हीआयपींसाठी विशेष स्टँडची व्यवस्था करण्यात आली आहे.आमदारांनी व्हीआयपी पासची मागणी केली आणि रांगेत उभे राहून तिकिटांची खरेदी करणार नाही, असे ठामपणे सांगितले. लोकप्रतिनिधी म्हणून मान राखला गेला पाहिजे अशी आमदारांची भूमिका होती. अखेर उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी कर्नाटक क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष व्यंकटेश प्रसाद यांच्याशी चर्चा करून आमदारांच्या पासची सोय केली.
PM Narendra Modi: पंतप्रधानांनी स्पष्ट केले की कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात कोणतीही कमतरता नाही आणि नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही. कोविड-१९ काळातील ‘टीम इंडिया’च्या धर्तीवर केंद्र आणि राज्ये मिळून या परिस्थितीचा सामना करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Alandi Ram Navami 2026: अलंकापुरीत हरिनाम गजरात रामजन्मोत्सव सोहळ्याची सांगता
Alandi Ram Navami 2026: रामरायांच्या पालखीचे माऊली मंदिरात स्वागत; विविध धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल
Josh Hazlewood : चिन्नास्वामी स्टेडियमवर सराव सत्रादरम्यान एक भीषण अपघात होता होता टळला, ज्यामध्ये संघाचा स्टार वेगवान गोलंदाज थोडक्यात बचावला आहे.
लडाखमध्ये हिमस्खलन, सात जणांचा मृत्यू; श्रीनगर-लेह महामार्ग बंद
लडाख : लडाखमधील झोजी ला येथे श्रीनगर-लेह महामार्गावर झालेल्या हिमस्खलनात अनेक वाहने बर्फाखाली गाडली गेली. बर्फात गाडले गेल्यामुळे सात जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. महामार्ग बंद झाला. सोनमर्ग आणि द्रास जिल्हा प्रशासन, पोलीस, लष्कर, बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन आणि एसडीआरएफ यांच्या सहकार्याने प्रशासनाने मदतकार्य सुरू केले आहे. यंत्रांचा आणि मनुष्यबळाचा वापर मोठ्या प्रमाणात करून बर्फ उपसण्याचे काम वेगाने सुरू आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी मदतकार्याचा आढावा घेतला तसेच मृतांना श्रद्धांजली वाहिली.द्रासमधील झोजी ला पास येथील कॅप्टन-टर्न महामार्गावर हिमस्खलन झाले. वाहने बर्फाखाली गाडली गेली. या दुर्घटनेत तीन पुरुष, एक महिला आणि एका मुलाचा मृत्यू झाला. काही वाहने बर्फाखाली पूर्णपणे गाडली गेल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे, असे द्रासचे एसडीएम विशाल अत्री यांनी सांगितले. महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी बचावकार्य सुरू असल्याची माहिती अत्री यांनी दिली. बचावकार्य काश्मीरमधील सोनमर्ग बाजूने आणि लडाखमधील द्रास बाजूने सुरू असल्याचे ते म्हणाले. महामार्गाचा मोठा भाग हिमस्खलनामुळे प्रभावित झाला. अद्याप किमान १५ वाहने बर्फाखाली पूर्णपणे गाडली गेली असल्याचेही त्यांनी सांगितले.बर्फ हटविणारी यंत्र, पोलीस, एसडीआरएफ, बीआरओ आणि लष्कराच्या रुग्णवाहिका मदतकार्यात गुंतल्या आहेत. सध्या १०० जणांचे मनुष्यबळ मदतकार्यात गुंतले असल्याचे द्रासचे एसडीएम विशाल अत्री म्हणाले. मेघा टनेलच्या कर्मचाऱ्यांचीही मदत घेत असल्याचे त्यांनी सांगितले.हिमस्खलन झोजिलाच्या 'झिरो पॉइंट'जवळ झाले. या उंच भागातून जाणारी बर्फाखाली गाडली गेली. ही घटना अचानक आणि वेगाने घडली. अनेकांना सावरण्याची संधीच मिळाली नाही, असे अत्री म्हणाले.श्रीनगर-लेह महामार्गश्रीनगर-लेह महामार्ग हा एनएच-१ म्हणून ओळखला जाणारा ४३४ किलोमीटरचा एक महत्त्वाचा मार्ग आहे, जो श्रीनगर आणि लेह यांना जोडणारा मुख्य दुवा आहे. हा ११,५७५ फूट उंचीवरील झोजिला खिंडीतून जाणारा रस्ता त्याच्या भोवतालच्या निसर्गरम्य दृश्यांसाठी आणि उंचीवरील आव्हानांसाठी प्रसिद्ध आहे.
मराठी रंगभूमीवर आता चालणार 'दाभोळकरी पॅटर्न'; 'कॅरी ऑन स्पायगिरी'मधून भरत दाभोळकर यांचा धमाका!
मुंबई: अनेक दशके इंग्लिश, हिंदी आणि गुजराती रंगभूमीवर अधिराज्य गाजवणारे, 'हिंग्लिश' नाटकांचे प्रणेते आणि प्रसिद्ध 'अॅड गुरु' भरत दाभोळकर प्रथमच मराठी रंगभूमीवर लेखक-दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून एक आगळेवेगळे नाटक घेऊन येत आहेत. 'सवाईगंधर्व' निर्मित 'कॅरी ऑन स्पायगिरी' हे नाटक लवकरच रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.इंग्रजीतील गाजलेलं नाटक आता मराठमोळ्या ढंगात :आतापर्यंत भरत दाभोळकर यांनी पु.ल. देशपांडे, वसंत कानेटकर, जयवंत दळवी यांसारख्या दिग्गज मराठी लेखकांची नाटकं इंग्रजीत नेली आणि ती गाजवली. अनेकदा हलके-फुलके विषय घेऊन स्वतः दाभोळकरांनीही आपल्या लेखन-दिग्दर्शनाने हिन्दी, इंग्रजी, गुजराती प्रेक्षकांचे मनोरंजन केले. यावेळीही ते स्वतःचं मूळ इंग्रजी नाटक मराठीत घेऊन येत आहेत. यापूर्वी इंग्रजीत हे नाटक विजू खोटे, किशोर प्रधान, विहंग नायक, वृषाली गोखले, अतुल परचुरे, अतुल काळे यांसारख्या दिग्गज कलाकारांनी हे नाटक अजरामर केले होते. आता हेच नाटक मराठीत आणण्याचे धाडस निर्माते आकाश भडसावळे यांनी केले आहे.आता 'मराठमोळं' कुटुंब पाकिस्तानात! :मूळ इंग्रजी नाटकात एक गुजराती कुटुंब दाखवण्यात आले होते, मात्र मराठी प्रेक्षकांची नस ओळखून लेखनात महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. नाटकाचा मूळ गाभा तोच ठेवून संपूर्ण नाटक आता 'मराठमोळ्या' पद्धतीने सादर होणार आहे. भरत दाभोळकर म्हणतात, मराठीत आतापर्यंत विनोद, सस्पेन्स आणि ऐतिहासिक नाटकं प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली आहेत. इंटरनेटमुळे आजच्या पिढीला जगभरातील गोष्टी ठाऊक आहेत. अशातच एखादं मराठमोळं कुटुंब जेव्हा पाकिस्तानात जातं, तेव्हा तिथे उडणारी त्यांची धांदल आणि तो 'अॅडव्हेंचरस' प्रवास पाहायला प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.भन्नाट टीम आणि भन्नाट अनुभव :या नाटकाच्या निमित्ताने भरत दाभोळकर आणि अभिनेते-निर्माते आकाश भडसावळे ही जोडी एकत्र आली आहे. आकाशबद्दल बोलताना दाभोळकर सांगतात की, आकाश हा एक अत्यंत ऑर्गनाइज आणि प्रो-अॅक्टिव्ह प्रोड्युसर आहे, त्याच्यासोबत काम करण्याचा अनुभव खूपच छान आहे. या नाटकात भरत दाभोळकर यांच्यासोबत त्यांचे इंग्लिश-हिन्दी नाटकातील अनेक वर्षांचे जुने सहकारी आणि ज्येष्ठ अभिनेते मोहन आझाद ही जोडी पुन्हा एकदा रंगमंचावर कमाल करताना दिसेल.ओटीटीला कंटाळलेला प्रेक्षक आता नाटकाकडे! :सध्या मराठी नाटकांना मिळणारा प्रतिसाद अत्यंत उत्साहवर्धक आहे. भरत दाभोळकर यांच्या मते, जेव्हा मराठी माणूस ओटीटीवरील साचेबद्ध कंटेट पाहून कंटाळतो, तेव्हा तो ताज्या दमाच्या अनुभवासाठी नाटकाकडे वळतो. म्हणूनच 'कॅरी ऑन स्पायगिरी' सारखा हलका-फुलका आणि साहसी विषय प्रेक्षकांसाठी एक पर्वणी ठरेल.शुभारंभाचे प्रयोग:१० एप्रिल २०२६ रोजी श्री शिवाजी मंदिर नाट्यगृह, दादर, मुंबई. तर १८ एप्रिल २०२६ रोजी बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे या नाटकाचे शुभारंभाचे प्रयोग होणार आहेत. अस्सल 'दाभोळकरी' शैलीतील हे स्पाय-कॉमेडी नाटक मराठी रंगभूमीवर एक नवा इतिहास घडवण्यासाठी सज्ज झाले आहे.
मुंबईतील घरांसाठी म्हाडा लॉटरी
मुंबई : मुंबईमध्ये स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठी संधी उपलब्ध होणार आहे. म्हाडाच्या मुंबईत मंडळामार्फत या आठवड्यात सुमारे २५०० घरांसाठी सोडतीची जाहिरात काढण्याची शक्यता आहे. या सोडतीत मुंबईतील विविध भागांतील घरे उपलब्ध होणार असून, अनेकजण या लॉटरीची आतुरतेने वाट पाहत आहेत. या लॉटरीमध्ये विक्रोळी, पहाडी गोरेगाव, पवई, जुहू, ताडदेव, बोरिवली आणि पंतनगर या भागांचा समावेश आहे. विशेष म्हणजे विक्रोळीतील कन्नमवार नगर येथे सुमारे १२०० घरे उपलब्ध होणार आहेत, यामुळे या भागाकडे अधिक लक्ष लागले आहे.यंदाच्या लॉटरीतील घरे थोडी महागडी ठरण्याची शक्यता आहे. घरांच्या किंमती अंदाजे ३२ लाख रुपयांपासून सुरू होऊन तब्बल ८ कोटी रुपयांपर्यंत जाणार आहेत. पहाडी गोरेगावमधील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत काही घरे सुमारे ३२ लाख रुपयांत मिळणार आहेत, मात्र इतर बहुतांश घरे कोटींच्या घरात असल्याने सर्वसामान्यांसाठी ती परवडणारी नसल्याची चर्चा आहे. ३१ मार्च रोजी लॉटरीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. त्यानंतर ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू होईल. अर्जदारांनी वेळेत अर्ज सादर करणे आवश्यक आहे, कारण संगणकीय पद्धतीने पारदर्शक सोडत काढली जाते.अर्ज करण्यासाठी काही अटीही ठरवण्यात आल्या आहेत. अर्जदाराचे वय किमान १८ वर्षे असणे आवश्यक आहे. विवाहित असल्यास पती-पत्नीचे आधार आणि पॅन कार्ड आवश्यक आहे, तर अविवाहित व्यक्तींनी स्वतःची कागदपत्रे सादर करावी लागतील. याशिवाय अर्जदाराने महाराष्ट्रात किमान १५ वर्षे वास्तव्य केल्याचा अधिवास प्रमाणपत्र (डोमिसाईल) असणे बंधनकारक आहे. या लॉटरीत मुख्यतः मध्यम आणि उच्च उत्पन्न गटासाठी जास्त घरे असणार आहेत. त्यामुळे कमी उत्पन्न गटातील नागरिकांमध्ये काही प्रमाणात नाराजीही व्यक्त होत आहे. तरीही, मुंबईसारख्या महागड्या शहरात स्वतःचे घर मिळवण्याची ही एक मोठी संधी मानली जात आहे. यापूर्वी २०२४ मध्ये म्हाडाने सुमारे २००० घरांसाठी लॉटरी काढली होती, ज्यात घरांच्या किंमती २९ लाख ते ६.८२ कोटी रुपयांदरम्यान होत्या. २०२५ मध्ये लॉटरी न झाल्याने यंदाच्या सोडतीकडे विशेष लक्ष लागले आहे. मुंबईत घर खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी ही लॉटरी महत्त्वाची ठरणार असून, इच्छुकांनी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवून वेळेत अर्ज करणे गरजेचे आहे.
ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह बोगदा रस्ता प्रकल्पाच्या मुख्य कामाला सुरुवात
मुंबई : देशातील सर्वात जटिल नागरी रस्ता बोगदा प्रकल्पांपैकी एक असलेल्या ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह बोगदा रस्ता प्रकल्पाने आणखी एक ऐतिहासिक टप्पा गाठला, असून आता प्रकल्पाच्या मुख्य टनलिंग ड्राइव्हच्या कामाला सुरुवात झाली. मुंबईच्या भूमिगत गतिशील जाळे विस्तारीकरणाच्या अनुषंगाने हा एक अत्यंत महत्त्वाचा क्षण आहे.मुंबईच्या किनारी भूभागातील मिश्र व खडतर भूस्तरासाठी अचूक व सुरक्षित खोदकाम करण्यासाठी खास तयार करण्यात आलेल्या देशातील सर्वात मोठ्या स्लरी-शील्ड टनल बोरिंग मशीनने (टीबीएम) नुकताच हा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला. त्यानंतर काही दिवसांतच ७० मीटरपर्यंत खोदकाम पूर्ण करून जलद गतीने काम पुढे नेले जात आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री तथा एमएमआरडीएचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते ३ डिसेंबर २०२५ रोजी या टीबीएमचे लॉन्चिंग करण्यात आले होते. या प्रकल्पाच्या अंतर्गत अत्याधुनिक टीबीएम तंत्रज्ञानाचा वापर करून दोन बोगदे उभारले जाणार असून, त्यांची एकूण लांबी जवळपास ७ किमी आहे. त्यापैकी सध्या सुरू असलेला पहिला बोगदा हा ३.४५ किमी लांबीचा असून त्याची खोली जमिनीच्या पृष्ठभागापासून कमाल ५२ मीटर असेल. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी कौशल्याच्या बळावर हा बोगदा पश्चिम आणि मध्य रेल्वे लाईन तसेच त्यांच्याही खाली असलेल्या मेट्रो ३ लाईनच्या खालून जाणार आहे.प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह दरम्यानचा प्रवास केवळ ५ मिनिटांत पूर्ण होईल. यामुळे पूर्व-पश्चिम दळणवळण सुलभ होईल, तसेच कोस्टल रोड आणि अटल सेतू यांच्याशी थेट जोडणी निर्माण होईल. परिणामी वाहतूक कोंडी, इंधनाचा वापर आणि प्रदूषण यामध्ये लक्षणीय घट होण्यास मदत होणार आहे. टीबीएमच्या लॉन्चिंगनंतर प्रकल्पाने अनेक महत्त्वाचे टप्पे यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत. त्यामध्ये टीबीएमच्या बॅकअप प्रणालीचे घटक खाली उतरवून त्यांचे टीबीएम शील्डशी संयोजन, तसेच प्रारंभिक टनलिंग ड्राइव्हच्या टप्पा पूर्ण करणे यांचा समावेश आहे. सद्यस्थितीला प्रकल्पातील मुख्य ड्राईव्हचे काम वेगाने सुरू आहे.
मुंबई महानगर क्षेत्रात २०२५ मध्ये १.३३ लाख कोटी रुपयांची घरविक्री
मुंबई : भारतीय रिअल इस्टेट क्षेत्रात मुंबई महानगर क्षेत्राने अर्थात MMR ने २०२५ या वर्षात ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे. प्रीमियम आणि मध्यम उत्पन्न गटातील घरांच्या वाढत्या मागणीमुळे एमएमआर हे देशातील सर्वात यशस्वी निवासी बाजार ठरले आहे, असे क्रेडाई–लायसेस फोरास यांच्या वार्षिक अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. या अहवालानुसार, केवळ ग्रेटर मुंबईने १,३३,००५ कोटी रुपयांची निवासी विक्री मूल्य नोंदवून देशाला थक्क केले आहे. यामध्ये विशेषतः २ कोटी ते ५ कोटी रुपयांच्या उच्च-मूल्य श्रेणीतील घरांना सर्वाधिक पसंती मिळाली असून, मुंबईत प्रीमियम हाऊसिंगची लाट असल्याचे यातून अधोरेखित झाले आहे.पुरवठा ट्रेंड्सकडे पाहता, १ कोटी रुपये ते ५ कोटी रुपये किमतीतील २बीएचके घरांना मोठी मागणी असून, १बीएचके युनिट्सची मागणी मुख्यतः ५० लाख रुपये ते २ कोटी रुपये या श्रेणीत केंद्रित असल्याचे दिसून येते. सध्या ग्रेटर मुंबईत २,६६३ प्रकल्पांचे काम सुरू असून, सुमारे २० महिन्यांचा 'इन्व्हेंटरी' (शिल्लक घरे) उपलब्ध आहे, ज्यामुळे मागणी आणि पुरवठ्यात उत्तम संतुलन दिसून येत आहे. सुधारित कनेक्टिव्हिटी आणि पायाभूत सुविधांमुळे ठाणे आणि नवी मुंबईत घरांच्या किमतीत ४.५% वाढ नोंदवण्यात आली आहे. उच्च-मध्यम आणि प्रीमियम सेगमेंटमध्ये ठाणे आघाडीवर आहे. तर मध्यम-आय आणि नवीन प्रीमियम प्रकल्पांसाठी नवी मुंबई हे ग्राहकांचे आवडीचे केंद्र बनले आहे. २०२५ मध्ये एमएमआरमध्ये घरांच्या किमतीत होणारी वाढ स्थिर राहिली आहे.कल्याण-डोंबिवली हा भागही उपनगरीय हब म्हणून वेगाने विकसित होत असून, २०२५ मध्ये येथे एचपीआय ३.०% पर्यंत पोहोचला. परवडणाऱ्या किमती आणि सुधारित पायाभूत सुविधांमुळे या भागात ₹७५ लाखांपर्यंतच्या घरांना विशेष मागणी आहे. याशिवाय, वसई–विरार आणि मीरा-भायंदरसारख्या परिघीय भागांतही स्थिर मागणी कायम आहे. २०२५ मध्ये या बाजारांत एचपीआय २.१% नोंदवला गेला असून, परवडणाऱ्या आणि मध्यम-आय गटातील घरांकडे खरेदीदारांचा कल दिसून येतो.ग्रेटर मुंबईत हाऊसिंग प्राईस इंडेक्स ३.४% नोंदवण्यात आला, जो या क्षेत्राचा मजबूत आर्थिक पाया आणि गुंतवणूकदारांचा विश्वास दर्शवतो.अहवालात नमूद केल्याप्रमाणे, एमएमआरमधील ही सातत्यपूर्ण वाढ प्रामुख्याने सुरू असलेल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे, सुधारित कनेक्टिव्हिटीमुळे आणि मजबूत आर्थिक आधारामुळे शक्य झाली आहे. यामुळे प्रमुख मायक्रो-मार्केट्समध्ये एंड-यूजर्स आणि गुंतवणूकदारांची मागणी पुढील काळातही कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Women Maharashtra Kesari : सलग तीनदा हा किताब पटकावणाऱ्या भाग्यश्री फंड हिने यंदाच्या स्पर्धेतून माघार घेतल्याने कुस्ती क्षेत्रात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
Gopinath Munde : करुणा मुंडेंनी गोपीनाथ मुंडें यांच्या निधनाबाबत केला ‘हा’खळबळजनक दावा
स्वर्गीय गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्या कन्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी नुकतेच पाटोदा तालुक्यातील भायाळा गावात गणेशानंद गडाच्या नारळी सप्ताहाला भेट दिली.
Pune News :
Strait of Hormuz: चीन प्रमाणे भारताचीजी जहाजे अडवली जातील का की मुभा मिळेल हे पाहणे महत्वाचे आहे. जर भारताचीही जहाजे बंद केली तर मोठी इंधन टंचाई आणि दीर्घकाळ महागाईला देशाला सामोरे जावे लागेल.
Donald Trump : सबकुछ ट्रम्प.! अमेरिकन डॉलरवर आता ट्रम्प यांची स्वाक्षरी असणार
अमेरिकेचे चलन असलेल्या डॉलरच्या नोटेवर आता अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची स्वाक्षरी असणार आहे. डॉलर हे चलन अमेरिकेत १८६१ पासून अस्तित्वात आले.
नगर पथ विक्रेता समिती'निवडणूक निकाल होणार जाहीर
मुंबई : नगर पथविक्रेत्यांची (फेरीवाला) शिखर समिती आणि परिमंडळीय समिती निवडणुकीबाबतचा पेच अखेर सुटला आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, या निवडणुकीची मतमोजणी उद्या, शनिवार २८ मार्च २०२६ रोजी पार पडणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर करण्यात येणार आहेत. न्यायालयाच्या निर्देशानुसार शुक्रवारी झालेल्या गटनेत्यांच्या सभेत चर्चा झाल्यानंतर महापौरांनी दिलेल्या आदेशानंतर प्रशासनाने याबाबतची कार्यवाही केली आहेमुंबईतील नगर पथविक्रेत्यांची एक शिखर समिती आणि सात परिमंडळाच्या प्रत्येकी एक याप्रमाणे (सात समित्या) एकूण आठ समित्यांच्या निवडणुकीसाठी २९ ऑगस्ट २०२४ रोजी शांततेत आणि सुरळीतपणे मतदान पार पडले. त्यात सरासरी ४९.४६ टक्के मतदान झाले होते. न्यायालयात दाखल विविध याचिकांमुळे, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांनुसार, मतदान प्रक्रिया राबवून मतमोजणी आणि निकाल राखून ठेवण्यात आले होते. दरम्यान, सर्व मतपेट्या स्ट्राँग रुममध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्या होत्या. परिणामी, मागील दीड वर्ष मतपेट्या मोहोरबंद अवस्थेत होत्या.सोमवार, २३ मार्च २०२६ रोजी मुंबई उच्च न्यायालयाने (याचिका क्रमांक २९३३९/२०२४ व इतर) या प्रकरणावर अंतिम निकाल दिला. माननीय न्यायालयाने सन २०२४ मध्ये पार पडलेली निवडणूक प्रक्रिया 'विधिग्राह्य' ठरवत, मतमोजणीवरील स्थगिती उठवली आहे. तसेच, विनाविलंब निकाल जाहीर करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. त्यानुसार आता मतमोजणी प्रक्रिया तातडीने करण्यात येणार आहे.या निवडणुकीशी संबंधित सर्व उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी, याचिकाकर्ते, संबंधित संघटना आणि इतर भागधारकांनी या प्रक्रियेसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.दरम्यान, नगर पथविक्रेता समिती निवडणूक निकालाबाबत न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार महापालिका प्रशासनाच्यावतीने तत्काळ निकाल जाहीर करण्याबाबतच महापौरांच्या अध्यक्षतेखाली गटनेत्यांच्या सभेत चर्चा करण्यात आली होती. यामध्ये नगर पथविक्रेता समितीमध्ये नगसेवकांना सदस्य म्हणून घेण्याची मागणी गटनेत्यांनी केली असून त्याबरोबरच या सभेमध्ये फेरीवाला समितीच्या निवडणुकीचा निकालासोबतच ९९,४३५ अर्जदारांच्या पात्रतेबाबतही चर्चा करून यावर त्वरीत निर्णय घेण्यासाठी महापौर रितू तावडे यांनी प्रशासनाकडे अभिप्रायसाठी प्रस्ताव पाठवला होता.मतमोजणीसाठी खालीलप्रमाणे नियोजन केले आहे:मतमोजणी दिनांक: शनिवार, २८ मार्च २०२६मतमोजणी वेळ: दुपारी १२.०० वाजतामतमोजणी स्थळ: महानगरपालिका समिती सभागृह क्रमांक १ व २, बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय, महापालिका मार्ग, मुंबई - ४०० ००१.
Chandrapur Crime News : चंद्रपूरमधील रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुलगी आर्या बाल्लावार हिने प्रियकरासह मिळून वडिलांना विष देऊन मारले.
Electricity Bill : वीज बिलाचा भार होणार हलका; ‘या’तारखेपासून नवीन दर होणार लागू
ऐन उन्हाळ्यात वीज दरात कपातीचा निर्णय वीज कंपन्यांनी (Electricity Bill) घेतल्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यभरात 1 एप्रिलपासून नवीन दर लागू होणार आहे.
ग्राहकांच्या फीडबॅकचा विचार करून कंपनीने या मॉडेलला अधिक रोड-ओरिएंटेड, स्पोर्टी आणि दैनंदिन वापरासाठी सोयीस्कर बनवले आहे.
सिंहस्थापूर्वी कुशावर्त कुंडासाठी जलशुद्धीकरण प्रकल्प
नाशिक : त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त कुंड येथे सिंहस्थ कुंभमेळा २०२७च्या पार्श्वभूमीवर नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण मार्फत जलशुद्धीकरण व पुनरुज्जीवन प्रकल्प राबविण्यात येत आहे. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अंतर्गत साकारण्यात येणाऱ्या या प्रकल्पामुळे कुंभमेळ्यादरम्यान कुंडातील पाणी स्नानयोग्य आणि स्वच्छ राखण्यास मदत होणार आहे.त्र्यंबकेश्वर शहराच्या मध्यवर्ती भागात असलेले कुशावर्त कुंड हे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाला भेट देणाऱ्या भाविकांसाठी प्रमुख स्नानस्थळ आहे. सध्या या कुंडातील पाण्याचा पुनर्वापर चक्र कालावधी सुमारे ९ तासांचा आहे. प्रस्तावित जलशुद्धीकरण यंत्रणेमुळे हा कालावधी ३ तासांपेक्षा कमी करण्याचे उद्दिष्ट आहे. तसेच, निर्माल्य थेट कुंडात विसर्जित होऊ नये यासाठी उपाययोजना करण्यात येणार असून स्वतंत्र देखभाल व संचालन व्यवस्था उभारली जाणार आहे. या प्रकल्पाचे काम ऑगस्ट २०२६ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह म्हणाले, ‘‘कुशावर्त कुंडाला प्रत्येक भाविकासाठी विशेष आध्यात्मिक महत्त्व आहे. माननीय मुख्यमंत्री यांनी पवित्र स्थळांवरील पाणी केवळ स्वच्छच नव्हे, तर स्वच्छ दिसणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे स्पष्ट केले आहे. भाविकांना ते स्नान करत असलेल्या पाण्याची निर्मळता प्रत्यक्ष दिसली पाहिजे. सिंहस्थ २०२७च्या अनुषंगाने कुशावर्त कुंडात ही अपेक्षा पूर्ण करण्यासाठी हा प्रकल्प राबविला जात आहे.’’दरम्यान, राज्य पुरातत्त्व विभागाकडून कुशावर्त परिसराचे जतन व संवर्धन तीन टप्प्यांत करण्यात येत आहे. यामध्ये कुंड परिसरातील मंदिरे व प्लॅटफॉर्मचे जीर्णोद्धार, गंगा-गोदावरी मंदिर प्रांगण, कुंडाच्या पायऱ्या, कपडे बदलण्याच्या खोल्या तसेच संपूर्ण परिसरातील प्रकाशयोजना यांचा समावेश आहे.त्र्यंबकेश्वर परिसरातील एकूण नऊ पवित्र स्थळांच्या पुनरुज्जीवनासाठी कुंभमेळा प्राधिकरण प्रयत्नशील असून यात इंद्र कुंड, बिल्व तीर्थ, प्रयाग तीर्थ, मुकुंदेश्वर तीर्थ, संगम तीर्थ, गौतमेश्वर मंदिर आणि गौतमेश्वर तलाव यांचा समावेश आहे.
Sion Hospital मुळे मुंबईसह राज्यातील नागरिकांना आधुनिक, दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध होणार
मुंबई : लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयाच्या टप्पा-२ च्या भूमिपूजनमुळे मुंबईसह राज्यातील नागरिकांना आधुनिक आणि दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध होणार आहेत. सध्या असलेल्या १९०० खाट संख्येवरून ३,२८६ खाटांची क्षमता रुग्णांसाठी उपलब्ध होणार आहे. रुग्णालयात मुख्य इमारत, कर्करोग, आपत्कालीन सेवा व बाह्यरुग्ण विभाग उभारले जाणार आहेत. यासाठी २५०० कोटी खर्च होणार असून २०३० पर्यंत बांधकाम पूर्ण होणार आहे. राज्य शासन व मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून मुंबईतील प्रत्येक नागरिकाला मोफत व दर्जेदार आरोग्यसेवा देण्याचा संकल्प असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शीव (सायन) येथील लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय पुनर्विकास टप्पा दोनच्या रुग्णालय इमारतीचा भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी महापौर रितू तावडे, आमदार कॅप्टन तमिल आर. सेल्वन, आमदार कालिदास कोळबकर, आमदार प्रसाद लाड, आमदार सुनील शिंदे, उपमहपौर संजय घाडी, माजी महापौर किशोरी पेडणेकर, नगरसेवक, महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या रुग्णालयाची सुरुवात १९४७ मध्ये केवळ ६० खाटांपासून झाली होती. आज हे रुग्णालय सुमारे १९०० खाटांपर्यंत पोहोचले असून, विस्तारानंतर ही क्षमता ३,२८६ खाटांपर्यंत वाढणार आहे. आशियातील मोठ्या ट्रॉमा केअर सेंटरपैकी एक, तसेच ह्युमन मिल्क बँक आणि भाजलेल्या रूग्णांकरिता स्किन बँक सारख्या सुविधा असलेले हे रुग्णालय आधीच विशेष मानले जाते. सध्याच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे रुग्णालय व्यवस्थेवर असल्यने रुग्णालयाचे आधुनिकीकरण आणि विस्तार अत्यावश्यक होता.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या प्रकल्पासाठी सुमारे २,५०० कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार असून, यात २५ मजली निवासी टॉवर (डॉक्टर व नर्सेससाठी), १३ मजली कॅन्सर केअर सुविधा, १५ मजली मुख्य रुग्णालय इमारत, १४ मजली आपत्कालीन विभाग, १३ मजली बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) आणि ४० हून अधिक ऑपरेशन थिएटर्सचा समावेश असेल. एमआरआय, सीटी स्कॅनसह अत्याधुनिक निदान सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत. भविष्यात आरोग्यसेवेमध्ये तंत्रज्ञानाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असेल आणि या रुग्णालयात आधुनिक तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जाईल.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महात्मा फुले जन आरोग्य योजनांच्या माध्यमातून नागरिकांना ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार दिले जात आहेत. सुमारे २,४०० आजारांवर मोफत उपचार उपलब्ध असून ४,५०० रुग्णालये या योजनांमध्ये सहभागी आहेत. काही गंभीर ९ आजारांसाठी २२ लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाते. प्रधानमंत्री जनकल्याण योजना, महात्मा फुले जनआरोग्य योजना व मुंबई महापालिकेच्या आरोग्ययंत्रणेच्या माध्यमातून दर्जेदार आरोग्य सेवा देत आहोत. या प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे आमदार कॅप्टन तमिल आर. सेल्वन यांनी लोकप्रतिनिधी म्हणून केलेला पाठपुरावा अत्यंत महत्त्वाचा आहे.सायन रुग्णालयाचा पुनर्विकास म्हणजे आरोग्य व्यवस्थेच्या नव्या युगाची सुरुवात – महापौर रितू तावडेमहापौर रितू तावडे म्हणाल्या की, आजचा हा प्रकल्प केवळ इमारतीचा विस्तार नसून आरोग्य व्यवस्थेच्या नव्या युगाची सुरुवात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात आरोग्य आणि पायाभूत सुविधांचा मोठ्या प्रमाणात विकास होत आहे. ‘इन्फ्रा मॅन’ म्हणून ओळख असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात मुख्यमंत्री सहायता निधीमुळे लाखो रुग्णांना उपचार मिळाले असून, ही सुविधा आता नागरिकांच्या हक्काची बनली आहे. या पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत सायन रुग्णालयात अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर्स, हृदयविकार उपचार सुविधा, तसेच वाढीव रुग्णखाटा उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे रुग्णालयाची क्षमता आणि गुणवत्ता दोन्ही वाढणार आहेत. मुंबई महानगरपालिका देशातील एकमेव अशी संस्था आहे जी प्राथमिक, दुय्यम आणि तृतीय अशा तिन्ही स्तरांवर आरोग्य सेवा पुरवते. दरवर्षी सुमारे ७५ लाख बाह्यरुग्ण आणि २५ लाखांहून अधिक रुग्णांना उपचार दिले जातात. वन सिटी, वन हेल्थ सिस्टीम उभारत असून यामुळे मुंबईतील कोणत्याही महानगरपालिका रुग्णालयात रुग्णांना सुलभ आणि समन्वित सेवा मिळेल. तसेच, आरोग्य व्यवस्थेचा खरा विकास केवळ इमारतींमध्ये नसून, सेवाभाव, पारदर्शकता आणि रुग्णांचा विश्वास यामध्ये आहे. प्रत्येक रुग्णामागे एक कुटुंब आणि अपेक्षा असते, त्या पूर्ण करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. ‘फाईव्हस्टार सुविधा, पण सर्वांसाठी’ या ध्येयाने महानगरपालिका काम करत आहे.लोकमान्य टिळक रुग्णालयाचा पुनर्विकास – टप्पा २ मध्ये होणार विविध कामे शीव (सायन) येथील लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयाचा पुनर्विकास टप्पा २ मध्ये रुग्णालयाची मुख्य इमारत, कर्करोग उपचार सेवा, आपत्कालीन सेवा व बाह्यरुग्ण विभाग उभारले जाणार आहेत. सध्या १९०० वरून नव्याने होणाऱ्या रुग्णालयात एकूण ३,२८६ खाटांची क्षमता असेल. १५ मजली मुख्य इमारत २,२०० खाटांची क्षमता. २४ तास आपत्कालीन सेवा व ऑपरेशन थिएटरची संख्या १२ वरून २४. रेडिओलॉजी सुविधा एक्स-रे, सिटीस्कॅन एम. आर. आय., सोनोग्राफी न्यूमॅटिक शूट प्रणाली – नमुने जलद पाठवण्यासाठी उपलब्ध असतील. एकाच छताखाली विशेष सेवा देण्यात येणार आहेत. महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी आरोग्य योजना, प्रधानमंत्री जीवनदायी आरोग्य योजना यांचे कार्यालय देखील मुख्य रुग्णालय इमारतीमध्ये असणार आहे. अत्याधुनिक प्रयोगशाळा, फार्मसी, कॅथलॅब, रुग्ण आहारगृह, रुग्णांच्या नातेवाईकांसाठी उपाहारगृह, रुग्णांच्या नातेवाईकांसाठी सुसज्ज प्रतीक्षा कक्ष असेल. कर्करोग रूग्णांसाठी १३ मजली स्वतंत्र इमारत असेल यामध्ये २०० खाटा असतील. केमोथेरपी, रेडिओथेरपी, पेट स्कॅन, एमआरआय, सिटीस्कॅन सुविधा असेल. कर्करुग्णांसाठी अल्पदरात व मोफत उपचार उपलब्ध होतील. आपत्कालीन सेवा इमारत ही १४ मजली इमारत असेल, यामध्ये ६०० खाटा असतील. ट्रॉमा मास कॅज्युलिटी, ६ ऑपरेशन थिएटर, ॲडव्हान्स लाइफ सपोर्ट सुविधा, तास सुविधा उपलब्ध, सहा ऑपरेशन थिएटर असेल. बाह्यरुग्ण विभागासाठी १४ मजली स्वतंत्र इमारत असेल.यामध्ये दररोज सुमारे १६,००० रुग्णांची क्षमता, १००+ तपासणी कक्ष, रक्तपेढी व प्रयोगशाळा असेल. आमदार कॅप्टन तमिल आर. सेल्वन यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. रुग्णालयात रुग्णांना ये जा करण्यासाठी ई बग्गी रुग्णवाहिकेचे लोकार्पण मुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले. लोकमान्य टिळक महापालिका सर्वसाधारण रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ प्रमोद इंगळे यांनी प्रास्ताविक केले. आभार अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा यांनी मानले.
नवी दिल्ली : केंद्र सरकारने, पंधराव्या वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार, आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी, महाराष्ट्र आणि गोवा राज्यासाठीचे मुक्त अनुदान मंजुर करून जारी केले आहे. पंचायत राज संस्था/स्थानिक स्वराज्य संस्था अधिक बळकट करण्यासाठी मंजूर झालेल्या या निधी अंतर्गत, महाराष्ट्राला पंधराव्या वित्त आयोगाच्या वित्त वर्ष २०२४ - २५ साठीच्या मुक्त अनुदानाच्या पहिल्या टप्याच्या राखून ठेवलेल्या निधीपोटी ७९.८२ कोटी रुपये मिळाले आहे. हा निधी, १२ पात्र जिल्हा पंचायती, १२५ पात्र तालुका पंचायती आणि २७ पात्र ग्रामपंचायतीसाठी मिळाला आहे.त्याशिवाय, २०२४ - २५ साठी दुसऱ्या टप्प्याचे मुक्त अनुदान म्हणून, २२१.८२ कोटी रुपये, राखून ठेवलेला हिस्सा म्हणून मिळाले आहेत, जे, अतिरिक्त १२ जिल्हा पंचायती, १२५ तालुका पंचायती आणि ५२४९ ग्रामपंचायतीसाठी आहेत. वित्त वर्ष, २०२३ - २४ साठीचे बद्ध अनुदान (tied grants) देखील दिले आहे. यात, पंधराव्या वित्त आयोगाचा राखून ठेवलेला पहिला हप्ता, १५९.३२ कोटी रुपयांचा समावेश आहे. जो, १२ पात्र जिल्हा पंचायती, १२५ पात्र तालुका पंचायती आणि ११२० पात्र ग्रामपंचायतीसाठी मिळाला आहे. त्याशिवाय, दुसऱ्या हप्त्यातील राखून ठेवलेला ११८.६९ कोटी रुपयांचा निधी देखील जारी करण्यात आला असून तो १२ पात्र जिल्हा पंचायती, १२५ पात्र तालुका पंचायती आणि १८३ पात्र ग्रामपंचायतीसाठी खर्च केला जाणार आहे.तर गोव्यासाठी, वित्त वर्ष २०२४ - २५ च्या मुक्त अनुदानाच्या पहिल्या हप्त्यापोटी, १२.४० कोटी रुपये जारी करण्यात आले आहेत. हे २ पात्र जिल्हा पंचायती आणि सर्व १९१ पात्र ग्रामपंचायतीसाठी खर्च केले जाणार आहेत. केंद्र सरकारकडून, पंचायती राज मंत्रालय आणि जल शक्ती मंत्रालय (पेयजल व स्वच्छता विभाग) यांच्या माध्यमातून ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी पंधराव्या वित्त आयोगानुसार, अनुदानाची रक्कम राज्यांना देण्याची शिफारस केली जाते. हे अनुदान वित्त मंत्रालयाद्वारे राज्यांना वितरित केले जाते. एका आर्थिक वर्षात दोन हप्त्यांमध्ये हे अनुदान शिफारसी नुसार वितरित केले जाते.मुक्त अनुदान पंचायती राज संस्था/ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था त्यांच्या स्थानिक गरजांनुसार, संविधानाच्या अकराव्या अनुसूचीतील २९ विषयांअंतर्गत वापरू शकतात. मात्र, हे अनुदान पगार आणि इतर प्रशासकीय खर्चासाठी वापरता येत नाही.तर बद्ध अनुदान, अ) स्वच्छता आणि उघड्यावर शौचमुक्त गावाची स्थिती टिकवून ठेवणे, यामध्ये घरगुती कचऱ्याचे व्यवस्थापन आणि प्रक्रिया, सांडपाणी आणि मैला व्यवस्थापनाचा समावेश असला पाहिजे . तर ब) पेयजल पुरवठा -यात पावसाचे पाणी साठवण आणि पाण्याचा पुनर्वापर असे प्रकल्प राबवले जातात.
महाराष्ट्र राज्य दिव्यांग निधीची स्थापना; २० कोटीची तरतूद
राज्यातील दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी शासनाने धोरणात्मक निर्णय घेत “महाराष्ट्र राज्य दिव्यांग निधी” स्थापन करण्यास मंजुरी दिली असून, या निधीसाठी प्रारंभी २० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या निधीमुळे दिव्यांगांच्या हक्काधारित, सर्वसमावेशक आणि परिणामकारक सक्षमीकरणाला आर्थिक पाठबळ मिळणार असल्याचे दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी सांगितले.सचिव तुकाराम मुंढे म्हणाले, दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ मधील कलम ८८ नुसार स्थापन होणारा हा निधी दिव्यांगांच्या हक्काधारित सक्षमीकरणासाठी आर्थिक पाठबळ देणार आहे. राज्य शासनाने दिव्यांग कल्याण विभागाची पुनर्रचना करून त्याला ‘दिव्यांग सक्षमीकरण विभाग’ असे स्वरूप दिले असून, कल्याणकेंद्री दृष्टिकोनाऐवजी हक्काधारित व्यवस्थेकडे वाटचाल सुरू केली आहे.नियमित योजनांबाहेरील उपक्रमांना प्राधान्यराज्य निधीच्या माध्यमातून नियमित योजनांच्या चौकटीत न बसणारे किंवा निधीअभावी अपूर्ण राहिलेले उपक्रम राबविण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. पुनर्वसन, रोजगार व उपजीविका, कौशल्य विकास, शिक्षण, आरोग्य सेवा, सहाय्यक साधनांची उपलब्धता तसेच समुदायाधारित समावेशक विकास या क्षेत्रांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.२० कोटींची प्रारंभिक तरतूदया निधीसाठी राज्य शासनाकडून २० कोटी रुपयांची प्रारंभिक तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय व्यावसायिक सामाजिक दायित्व (सीएसआर) देणग्या, अनुदान तसेच इतर विविध स्रोतांमधून प्राप्त होणारा निधीही या निधीत समाविष्ट केला जाणार आहे. विशेषतः सीएसआरच्या माध्यमातून अतिरिक्त निधी उभारण्यावर विभागाचा भर राहणार आहे.निधी व्यवस्थापनासाठी नियामक मंडळनिधीच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव (दिव्यांग सक्षमीकरण) यांच्या अध्यक्षतेखाली नियामक मंडळ स्थापन करण्यात आले आहे. या मंडळात वित्त व नियोजन विभागाचे वरिष्ठ अधिकारी सदस्य म्हणून कार्यरत राहतील, तर आयुक्त, दिव्यांग सक्षमीकरण हे सदस्य-सचिव म्हणून निधीचे कार्यभार पाहतील.जिल्हा ते राज्यस्तरीय सुसूत्र प्रक्रियानिधीच्या विनियोगासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समित्यांकडून प्रस्ताव प्राप्त केले जातील. हे प्रस्ताव आयुक्त, दिव्यांग सक्षमीकरण यांच्याकडे सादर होऊन त्यांची सखोल छाननी करण्यात येईल. त्यानंतर अभिप्राय व शिफारशींसह प्रस्ताव दिव्यांग सक्षमीकरण विभागामार्फत नियामक मंडळासमोर सादर केले जातील. नियामक मंडळाच्या मान्यतेनंतरच निधीचा अंतिम विनियोग करण्यात येणार असून, यामुळे निधीचा पारदर्शक, गरजाधारित आणि परिणामकारक वापर सुनिश्चित होणार आहे.मार्गदर्शक सूचनानिधीच्या अंमलबजावणीसंदर्भात स्वतंत्र मार्गदर्शक सूचना लवकरच जारी करण्यात येणार आहेत. लाभार्थ्यांची पात्रता, आवश्यक कागदपत्रे तसेच निधी वितरणाची प्रक्रिया याबाबत स्पष्ट आणि सुस्पष्ट नियमावली निश्चित करण्यात येणार आहे‘सर्वसमावेशक महाराष्ट्र – सक्षम महाराष्ट्र’कडे वाटचाल“सर्वसमावेशक महाराष्ट्र – सक्षम महाराष्ट्र” या संकल्पनेशी सुसंगत असलेला हा उपक्रम दिव्यांगांसाठी सामाजिक-आर्थिक समता, अडथळामुक्त पायाभूत सुविधा तसेच डेटा-आधारित धोरणनिर्मितीला चालना देणारा ठरणार आहे. हा निर्णय दिव्यांग सक्षमीकरणाच्या दिशेने उचललेले पाऊल असून, नियमित योजनांमधून वंचित राहणाऱ्या दिव्यांग व्यक्तींना प्रभावी सहाय्य मिळवून देण्यात हा निधी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
कुंभपूर्व विकास कामांना गती; मंत्री गिरीश महाजन यांची अचानक पाहणी
नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात सुरू असलेल्या विकास कामांना गती देण्यात आली असून, शासन व प्रशासन ‘ॲक्शन मोड’मध्ये कार्यरत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी आज नाशिक दौऱ्यादरम्यान विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावल्यानंतर शहरातील महत्त्वाच्या विकास कामांची अचानक पाहणी करून कामांच्या गुणवत्तेबाबत कडक निर्देश दिले.यावेळी त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, रस्त्यांच्या कामांमध्ये कोणत्याही प्रकारची कुचराई सहन केली जाणार नाही. शहरातील नागरिकांना दीर्घकाळ टिकणारे, अत्यंत दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण रस्ते उपलब्ध व्हावेत, यासाठी प्रशासन व संबंधित ठेकेदारांनी प्रामाणिकपणे काम करावे. कामाच्या प्रत्येक टप्प्यावर गुणवत्ता नियंत्रण राखले जावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. मंत्री महाजन यांनी नाशिक शहरातून त्र्यंबकेश्वरकडे जाणाऱ्या महत्त्वाच्या मार्गांपैकी गरवारे पॉईंट ते अंबड लिंक रोड या रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाची पाहणी केली. हा मार्ग कुंभमेळ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असून, वाहतूक सुलभतेसाठी या कामाला प्राधान्य दिले जात आहे.तसेच त्र्यंबक नाका परिसरातील जिल्हा रुग्णालयासमोरील काँक्रिटीकरणाच्या (व्हाईट टॉपिंग) कामाचीही त्यांनी पाहणी केली. या ठिकाणी कामाची गती, दर्जा आणि नियोजन याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली व तसेच काँक्रिटीकरण करणासाठी आवश्यक खडी,सिमेंट व इतर आवश्यक साधनसामग्री तितक्याच गुणवत्तापूर्ण असावी याबाबत आवश्यक ते निर्देश त्यांनी यावेळी दिलेत. या पाहणी दौऱ्यावेळी महापौर हिमगौरी आडके, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, महापालिका आयुक्त मनीषा खत्री, शहर अभियंता संजय अग्रवाल, संदेश शिंदे ,कार्यकारी अभियंता मनपा, निलेश साळी उपकार्यकारी अभियंता, मनपा यांच्यासह महापालिका व प्रशासनातील संबंधित अधिकारी उपस्थित होते.सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात रस्ते, पायाभूत सुविधा आणि नागरी सोयीसुविधांच्या उभारणीसाठी मोठ्या प्रमाणावर कामे सुरू असून, या कामांची वेळेत व गुणवत्तापूर्ण पूर्तता करण्यासाठी शासन स्तरावरून सातत्याने आढावा घेतला जात आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्या या पाहणीमुळे संबंधित यंत्रणांना अधिक वेगाने व काटेकोरपणे काम पूर्ण करण्याचा संदेश मिळाला आहे.
एस-400 मिसाइलसह संरक्षण उपकरणांच्या खरेदीस मंजुरी
नवी दिल्ली : भारतीय संरक्षण मंत्रालयाने हवाई दलासाठी रशियाकडून एस-400 एअर डिफेन्स सिस्टमची अतिरिक्त बॅटरी खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे. रक्षा मंत्रालयाच्या डिफेन्स एक्विझिशन कौन्सिलने (डीएसी) आज या प्रस्तावाला मान्यता दिली. भारताने २०१८ मध्ये रशियाशी एस-400 एअर डिफेन्स मिसाईल सिस्टम खरेदी करण्यासाठी ४०,००० कोटी रुपयांची करार केलेली होती. या करारानुसार भारताला ५ स्क्वॉड्रन्स मिळणार आहेत, ज्याची डिलिव्हरी २०२१ पासून सुरू झाली होती.संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झालेल्या डीएसीच्या बैठकीत सुमारे २.३८ लाख कोटी रुपयांच्या विविध हत्यारं आणि विमान खरेदीच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली.बैठकीत रक्षा मंत्री राजनाथ सिंग यांनी भारतीय हवाई दलासाठी रशियाकडून लांब पल्ल्यावरील सतह-हवेत मार करणारी एस-400 मिसाईल सिस्टम, मिडियम ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट, रिमोटली पायलटेड स्ट्राईक एअरक्राफ्ट आणि एसयू-30 एयरो इंजिन एग्रीगेट्सच्या ओव्हरहॉलच्या प्रस्तावांना देखील मंजुरी दिली. भारतीय हवाई दलात मिडियम ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट एएन-32 आणि आयएल-76 बेडेच्या जागी समाविष्ट केले जातील. यामुळे हवाई दलाच्या धोरणात्मक, सामरिक आणि ऑपरेशनल एअरलिफ्ट गरजा पूर्ण होतील. रिमोटली पायलटेड एअरक्राफ्ट आक्रमक प्रतिसादासह समन्वित हवाई ऑपरेशन्सची क्षमता वाढवेल. तसेच हे विमान स्टेल्थ इंटेलिजन्स, देखरेख आणि टोही उपक्रमांनाही महत्त्वपूर्ण समर्थन देईल.भारतीय हवाई दलासोबतच या बैठकीत भारतीय सैन्याच्या गरजेनुसारही अनेक हत्यारांची खरेदी मंजूर करण्यात आली. भारतीय सैन्यासाठी एयर डिफेन्स ट्रॅक्ड सिस्टम, आर्मर-पिअसिंग टँक म्युनिशन, हाई-कॅपेसिटी रेडिओ रिले, धनुष्य गन सिस्टम आणि रनवे इंडिपेंडेंट एरियल सर्व्हिलन्स सिस्टमसाठीही मंजुरी देण्यात आली.एयर डिफेन्स ट्रॅक्ड सिस्टम भारतीय सैन्याला रिअल-टाइम वायुदल संरक्षण नियंत्रण आणि अहवाल क्षमतेसाठी मदत करेल, तर हाई-कॅपेसिटी रेडिओ रिले विश्वासार्ह आणि अखंड संपर्क सुनिश्चित करेल. धनुष्य गन सिस्टम सेना क्षमतेत वाढ करून भारतीय सैन्याला विविध प्रदेशांमध्ये दीर्घ अंतरावर अचूक लक्ष्य साध्य करण्यास मदत करेल.याशिवाय, डीएसीने भारतीय तटरक्षक दलासाठी हेवी ड्यूटी एअर कुशन वाहनांच्या खरेदीलाही मंजुरी दिली आहे. या वाहनांचा उपयोग मल्टी-पर्पस समुद्री तटीय मोहिमा, उच्च गती तटीय पेट्रोलिंग, टोही आणि बचाव मोहिमा, जहाजांना सहाय्य व कर्मचाऱ्यांसह लॉजिस्टिक वाहतुकीसाठी केला जाईल
सिंहस्थ कुंभमेळा अंतर्गतची कामे गुणवत्तेसह पूर्ण करण्यास गती द्यावी - मंत्री शिवेंद्रराजे भोसले
नाशिक : नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणारा आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यातंर्गत सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत प्रस्तावित व सुरू असलेली सर्व कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्वक होतील यावर अधिक भर देत कामांना गती द्यावी, असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी केले.सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक कार्यालयात आयोजित सिंहस्थ कुंभमेळा बैठकीत ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता प्रशांत औटी, उपवनसंरक्षक (पश्चिम) सिद्धेश सावर्डेकर, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धने, महावितरणचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.मंत्री भोसले म्हणाले की, सिंहस्थ कुंभमेळादृष्टीने करण्यात येणारी सर्व कामे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्राधान्य क्रमातील कामे आहेत. ही सर्व कामे दर्जात्मक होण्यासाठी त्रयस्थ पक्षाकडून कामांची वेळोवेळी तपासणी केली जाणार आहे. सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणानेही त्यांच्या स्तरावर या कामांची त्रयस्थ पक्षाकडून तपासणी केल्यास कामे गुणवत्तापूर्वक होतील यासाठी दक्ष रहावे. ज्या कामांना मंजूरी मिळाली आहे व कोणत्याही स्वरूपाची अडचण नाही ती कामे तातडीने पूर्ण करण्यात यावी. वन विभाग व जलसंपदा विभाागने रस्त्यांच्या कामांसाठी आवश्यक परवानग्या देण्यासाठी कार्यवाही सत्वर करावी. ठेकेदारांनीही विहित मुदतीत कामे पुर्ण करण्यावर अधिक भर द्यावा. पहिल्या टप्प्यातील कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याच्या दृष्टीने आवश्यक मनुष्यबळ नियुक्त करावे तसेच रात्रीच्या वेळीही कामे सुरू ठेवावीत. कामे विहित मुदतीत पूर्ण न झाल्यास दंडात्मक कारवाईबाबत अवगत करण्यात यावे. अशा सूचना त्यांनी दिल्या.सिंहस्थ कुंभमेळादृष्टीने नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्ता तयार करतांना सुशोभिकरणावर भर द्यावा. तसेच ठिकाठिकाणी भाविकांच्या सोयीच्या दृष्टीने लावण्यात येणारे दिशादर्शक फलक यांच्या आकारात एकसमानता असावी, असेही मंत्री श्री. भोसले यांनी सूचित केले.यावेळी विभागीय आयुक्त डॉ.गेडाम यांनी सिंहस्थ कुंभमेळा आराखड्यातील नाशिक व त्र्यंबकेश्वर येथील प्रस्तावित व मंजूर कामांची माहिती दिली. आयुक्त शेखर सिंह यांनी त्र्यंबकेश्वर व नाशिक येथील कुंभमेळा प्रस्तावित आवश्यक परवानग्या व त्याबाबत करावयाची कार्यवाही याबाबत चर्चा केली. जिल्हाधिकारी श्री प्रसाद यांनी या कामांसाठी आवश्यक भूसंपादन व इतरबाबत बैठकीत माहिती दिली. अधीक्षक अभियंता अरूंधती शर्मा यांनी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांच्या सद्यस्थितीबाबत आराखड्याद्वारे सादरीकरण केले. तसेच प्रत्येक कामासाठी नियुक्त केलेल्या संस्था व ठेकेदार यांच्याशी कामांबाबत असलेल्या अडीअडचणींबाबत मंत्री श्री .भोसले यांनी चर्चा केली.
Ashok Kharat Case : डॉक्टरांकडून अशोक खरातची HIV टेस्ट; समोर आला धक्कादायक रिपोर्ट
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण (Ashok Kharat Case) मोठ्या चर्चेचे केंद्र बनले आहे.
राज्यात जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी असे आहे नियोजन
मुंबई : राज्यामध्ये प्राथमिक आरोग्य सुविधेपासून संदर्भीय सेवेपर्यंत आरोग्य व्यवस्था कार्यरत आहे. या व्यवस्थेला अधिक सक्षम, बळकट करण्यासाठी शासन आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून काम करीत आहे. जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा असलेला संपन्न महाराष्ट्र निर्माण करण्याचा मानस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त करीत आरोग्य, औषध निर्माण क्षेत्रातील कंपन्यांनी शासनासोबत भागीदारी करण्याचे आवाहनही यावेळी केले. जिओ वर्ल्ड सेंटर येथे पल्स २०२६ वैद्यकीय परिषदेच्या निमित्ताने यूएस -इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरमच्या वतीने विविध औषध निर्माण, आरोग्य क्षेत्रातील कंपन्यांसोबत 'भारतासाठी भविष्य-सज्ज आरोग्यसेवा आणि कौशल्य विकास परिसंस्था' या विषयावर आयोजित राऊंड टेबल चर्चेप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. या चर्चासत्राला उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ , वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ, उद्योग विभागाचे प्रधान सचिव पी. अन्बळगण, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरज कुमार, आयुक्त अनिल भंडारी, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी राजेश गवांदे आदी उपस्थित होते. चर्चासत्रदरम्यान विविध कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, व्यवस्थापकीय संचालक यांनी उपस्थित केलेल्या विविध मुद्द्यांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तरे दिली.औषध निर्माण क्षेत्रामध्येही ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटरबऱ्याच क्षेत्रांमध्ये देशात महाराष्ट्राने ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटरची क्षमता निर्माण केली आहे. आता औषध निर्माण क्षेत्रामध्येही ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर निर्माण करण्यावर शासनाचा भर आहे. ताण तणाव आणि या धकाधकीच्या जीवनात मानसिक आरोग्य अत्यंत महत्त्वाचे झाले आहे. मानसिक आरोग्याच्या उपचार सुविधा राज्यात निर्माण करण्यासाठी शासन काम करीत आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.आरोग्य क्षेत्रामध्ये 'डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर'औषध निर्माण आरोग्य क्षेत्रात आवश्यक असलेले संशोधन आणि कुशल मनुष्यबळासाठी कौशल्य विकास, दर्जेदार वैद्यकीय शिक्षणावर भर देण्यात येत आहे. याकरिता कृत्रीम बुद्धिमत्तेच्या उपयोगाने प्लॅटफॉर्म तयार करण्यात येईल. आरोग्य क्षेत्रामध्ये 'डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर' उभारण्यात येत आहे. यासाठी राज्यात अनुकूल धोरण निर्मिती करण्यात येत आहे. भविष्यातील आजारांच्या संकटांवर यशस्वीपणे मात करण्यासाठी जीवशास्त्रामध्ये संशोधन वाढविणे आवश्यक आहे. या क्षेत्रात प्रोत्साहन देऊन नवनवीन विषयांबाबत पीएचडी स्वरूपात संशोधनाला चालना देण्यात येणार आहे,असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.शासनाकडे आरोग्य, वैद्यकीय शिक्षण संबंधित मोठ्या प्रमाणावर डेटा आहे. या डेटाला कृत्रिम बुद्धिमत्तेशी संलग्नित करून आरोग्य क्षेत्राशी संबंधित विविध समस्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना करणे शक्य होणार आहे. कर्करोगाचे लवकर निदान करण्याची व्यवस्था निर्माण करण्यात येत असून उपचार सुविधांचा विस्तार करण्यात येत आहे. कर्करोगावर प्रभावी, कमी खर्चिक असलेल्या उपचार पद्धती निर्माण करणाऱ्या संशोधनासाठी राज्य शासन निश्चितच भरीव सहकार्य करेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.वैद्यकीय आणि आरोग्य क्षेत्रातील कंपन्यांसोबत भागीदारीडावोस येथे झालेल्या गुंतवणूक करारांमध्ये आरोग्य क्षेत्रातील गुंतवणुकीचाही समावेश आहे. यामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणा निश्चितच बळकट होणार आहे. वैद्यकीय शिक्षणामध्ये नवनवीन तंत्रज्ञान येत आहे. या तंत्रज्ञानाचा पुरेपूर उपयोग करून ' युनिफाईड लर्निंग प्लॅटफॉर्म' बनविण्यात येणार आहे. महाराष्ट्र हे वेलनेस क्षेत्रात आपला ठसा उमटवीत आहे. मेडिकल टूरिझम राज्यात वाढत असून शासन गतीने पावले पुढे टाकत आहे. वैद्यकीय व आरोग्य क्षेत्रातील नवनवीन कल्पनांवर काम करण्यासाठी राज्य शासन या क्षेत्रातील कंपन्यांसोबत भागीदारी करण्यास तयार आहे असे मुख्यमंत्री म्हणाले. 'डेंग्यू फ्री' राज्यासाठी या आजारावर संशोधित होत असलेल्या लसीचा उपयोग होणार आहे. औषध निर्माण, आरोग्य या क्षेत्रात गुंतवणूक करण्यास इच्छुक असलेल्या कंपन्यांना शासनाकडून आवश्यक सहकार्य करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.राऊंड टेबल चर्चासत्राचे यूएस -इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरमच्या व्यवस्थापकीय संचालक निवेदिता मेहरा यांनी संचलन केले. उद्योग विभागाचे प्रधान सचिव पी अन्बळगण यांनी उद्योग विषयक शासनाचे धोरण अधोरेखित केले. तसेच सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी मेडिसिटी, एज्युसिटी संदर्भात माहिती दिली. चर्चासत्रात जीएसके कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक भूषण अक्षीकर, आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टच्या संस्थापक व अध्यक्ष नीरजा बिर्ला, दनेहार इंडिया कंपनीचे क्षेत्रीय अध्यक्ष संजय मुर्डेश्वर, जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक पुष्कर कुलकर्णी, रेव्हिटी इंडिया लाईफ सायन्सेस आणि डायग्नोस्टिक्स कंपनीचे भारतातील अध्यक्ष श्रीपाद जोशी, आमदार तथा भारती विद्यापीठाचे उप कुलसचिव विश्वजीत कदम, टाकेडा इंडियाच्या कॉर्पोरेट अफेअर्सचे प्रमुख प्रभात सिन्हा, हिंदुजा समूहाचे पी. सी. सूद, अजिलास डायग्नोस्टिकचे अविनाश फडके, विश्वकर्मा विद्यापीठाचे अध्यक्ष भारत अग्रवाल, एडवर्ड्स लाइफसाइंसेज संचालक ( गवर्नमेंट अफेयर्स ) डॉ. निरंजन पै, चैतन्य सरावते, सानोफी कंपनीच्या सीएसआर शाखेच्या उपसंचालक डॉ. कविता चौधरी आदींनी सहभाग घेतला.
मुंबईतील गरजूंचे स्वप्न होणार साकार महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा अभूतपूर्व निर्णय
मुंबई : राज्यातील लाखो गरीब आणि गरजू कुटुंबांचा निवासस्थानाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने महत्वाकांक्षी पाऊल उचलले. सन २०११ पर्यंत झालेली व सध्या केवळ निवासासाठी अस्तित्वात असलेली अतिक्रमणे नियमानुकूल करण्याचा निर्णय महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला. याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला.या निर्णयानुसार, कोणत्याही परिस्थितीत भारताचा नागरिक नसलेल्या व्यक्तीचे अतिक्रमण नियमित होणार नाही. याची दक्षता अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्याने घ्यायची आहे. असे अतिक्रमण आढळल्यास पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तथापि, हा निर्णय मुंबई व मुंबई उपनगर जिल्हा वगळून संपूर्ण राज्यासाठी लागू आहे.या आदेशानुसार, ५०० चौरस फुटांपर्यंतचे निवासी अतिक्रमण पूर्णपणे विनामूल्य नियमानुकूल करण्यात येणार आहे. तर उर्वरित क्षेत्रासाठी प्रचलित बाजारमूल्याच्या केवळ दहा टक्के रक्कम कब्जेहक्काची रक्कम म्हणून आकारली जाईल.नदीपात्र, नाले, गायरान, सार्वजनिक रस्ते, वने, स्मशानभूमी, खेळण्याचे मैदान किंवा शाळा/रुग्णालयासाठी आरक्षित असलेल्या जमिनींवरील अतिक्रमणे कोणत्याही परिस्थितीत नियमित केली जाणार नाहीत. अशा बाधित कुटुंबांना 'प्रधानमंत्री आवास योजने'तून पर्यायी घरे उपलब्ध करून देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.विकसित महाराष्ट्राच्या दिशेने पाऊल'सर्वांसाठी घरे' हे धोरण आणि 'विकसित महाराष्ट्र २०४७' चे उद्दिष्ट गाठण्यासाठी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवणे हा या निर्णयाचा मुख्य उद्देश आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. यामुळे वेगवेगळ्या शासन मान्यतेची गरज पडणार नाही. या समित्याच निर्णय घेतील. जिल्हास्तरावर पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली १७ सदस्यांची समिती असून, विधानसभा क्षेत्रनिहाय आमदारांच्या अध्यक्षतेखाली समित्या स्थापण्यात येणार आहेत.अतिक्रमण नियमित करण्यासाठीची पात्रता, अटी व शर्ती, जागेची मर्यादा व शुल्क आकारणी, अंलबजावणीची कार्यपद्धती, अर्जासाठीची मुदत, पडताळणी, अंमलबजावणी यंत्रणा अशी सर्व यंत्रणा सज्ज करण्यात येणार आहे.महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्तिगत लक्ष घालून गरीब व गरजूंना घरे मिळावीत यासाठी बैठकी घेतल्या.प्रमुख वैशिष्ट्ये व अटीजमीन पती -पत्नी यांच्या संयुक्त नावाने 'भोगवटादार वर्ग-२' म्हणून दिली जाईल.ग्रामीण तसेच शहरी भागात जास्तीत जास्त १५०० चौ. फुटापर्यंतचे क्षेत्र नियमितजास्त असलेले अतिक्रमण पाडण्यात येईल.५०० चौ. फुटापर्यंतची सर्व निवासी अतिक्रमणे पूर्णपणे विनामूल्य नियमितघराचा काही भाग व्यवसायासाठी वापरत असल्यास, बाजारमूल्याच्या २५% रक्कमजमिनीच्या नोंदणीसाठी १००० चौ. फुटापर्यंत १००० रुपये शुल्क१ जानेवारी २०११ पूर्वीच्या वास्तव्यासाठी मतदार यादी, वीज बिल, मालमत्ता पावती ग्राह्यगेल्या १ वर्षातील रहिवासाचा पुरावा बंधनकारकराज्यातील एकही गरजू कुटुंब निवाऱ्याविना राहू नये, ही सरकारची भूमिका असल्याने, एक जानेवारी २०११ पर्यंतची अतिक्रमणे नियमानुकूल करून आम्ही गरीब व गरजू कुटुंबांना दिलासा दिला आहे. यामुळे लाखो कुटुंबांच्या आयुष्यात स्थिरता येईल. दर तीन महिन्याने या संदर्भातील आढावा घेतला जाईल.”
Donald Trump : इराणला आणखी दहा दिवसांची मुदत.! अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक दावा
इराणच्या सरकारने विनंती केल्यानंतर आम्ही त्यांच्या ऊर्जा प्रकल्पांवरील हल्ले 10 दिवसांपर्यंत पुढे ढकलले आहेत.
War Updates: या संदेशांमध्ये भारताचा उल्लेख होण्यामागे काही कारणे पुढे आली आहेत. अलीकडेच इराणने होर्मूझ सामुद्रधुनीतून भारतीय जहाजांना सुरक्षित मार्ग देण्याची परवानगी दिली आहे. इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी भारताला ‘मैत्रीपूर्ण देश’ म्हणून संबोधले आहे.
Abhishek Porel Video : जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट लीगचा थरार २८ मार्चपासून सुरू होत आहे. मात्र, त्याआधीच चाहत्यांना मनोरंजनाचा डोस मिळायला सुरुवात झाली आहे.
Nitish Kumar : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार ‘या’दिवशी राजीनामा देणार
नितीश कुमार (Nitish Kumar) १६ मार्च २०२६ रोजी राज्यसभा सदस्य म्हणून निवडून आले होते.
India Defence: 2.38 लाख कोटींची शस्त्रखरेदी मंजूर; S-400 आणि नवी विमानं मिळणार
India Defence: S-400 प्रणालीमुळे शत्रूचे हवाई हल्ले लांबूनच रोखता येतील. ड्रोनमुळे गुप्त माहिती गोळा करणे आणि हल्ले करणे अधिक सोपे होणार आहे. एकूणच, या निर्णयामुळे भारताची संरक्षण ताकद आणखी वाढणार आहे.

32 C