Vehicle Sale :
Chemical Smoke : हाल गावाजवळील भंगार दुकानाला लागलेल्या आगीचा ५ दिवसांनंतरही नागरिकांना त्रास; केमिकलयुक्त धुराने श्वसनाचे विकार वाढण्याचा धोका.
Pimpri Chinchwad News : मंदिरात वाहनांची पूजा अन् मिठाईच्या दुकानांत झुंबड; नववर्षाच्या सुरुवातीलाच बाजारपेठेत चैतन्याचे वातावरण.
PCMC News : पिंपरी-चिंचवडमधील ८ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत ३२ प्रभागांमध्ये 'वेस्ट टू वंडर' स्पर्धेचे आयोजन; टाकाऊ वस्तूंना मिळणार नवसंजीवनी.
Pune Metro : पुणेकरांसाठी गुड न्यूज! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो कधी धावणार? नवी डेडलाईन आली समोर
Pune Metro : ९४ टक्क्यांहून अधिक काम पूर्ण, सिग्नलिंग चाचणी सुरू; हिंजवडी आयटी पार्कला जोडणारी 'मेट्रो ३' अंतिम टप्प्यात.
PCMC News : महापालिकेला लवादाचा दणका! ठेकेदाराला द्यावे लागणार ५२८ कोटी; धक्कादायक माहिती समोर
PCMC News : मुंबई स्टॉक एक्सचेंजच्या (BSE) नियमावलीमुळे महापालिकेची आर्थिक स्थिती उघड; थकबाकी आणि दायित्वाचा आकडा ५ हजार कोटींच्या पार.
PCMC News : अभय योजनेला शहरवासीयांचा प्रतिसाद! महापालिकेच्या तिजोरीत १० दिवसांत ८० कोटी जमा
PCMC News : पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून मालमत्ता कर विलंब शुल्कावर ९० टक्के सवलत; अभय योजनेला नागरिकांचा उदंड प्रतिसाद.
Dhangar Vithoba Yatra : महिलांसाठी 'होम मिनिस्टर' खेळ पैठणीचा तर पुरुषांसाठी निकाली कुस्त्यांचे मैदान; भाविकांमध्ये उत्साहाचे उधाण.
Phaltan Crime : गावच्या यात्रेला गालबोट! अळजापुरात दोन गटात तुफान हाणामारी; नेमकं काय घडलं?
Phaltan Crime : फलटण तालुक्यातील अळजापूर गावात यात्रा कमिटीच्या निवडीवरून दोन गट भिडले; परिसरात तणावाचे वातावरण.
Mahesh Shinde : आमदार महेश शिंदे यांच्याकडून मुस्लिम समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव निधीचे आश्वासन; कोरेगावात सामाजिक ऐक्याचे दर्शन.
ठाणे आणि डोंबिवली स्थानकाच्या विस्तारासाठी विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक
मुंबई : मध्य रेल्वेचा मुंबई विभाग हा १५ डब्यांच्या गाड्या सामावून घेण्यासाठी ठाणे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ३ व ४ आणि डोंबिवली स्थानकावरील प्लॅटफॉर्म १ए, १ व २ यांच्या विस्तारासाठी शनिवार २१ मार्च २०२६ रोजी (शनिवार/रविवारच्या मध्यरात्रीपासून ते रविवारच्या सकाळपर्यंत) एक विशेष 'ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक' घेणार आहे. ब्लॉकचा दिनांक: २१/२२.०३.२०२६ (शनिवार/रविवार मध्यरात्रीपासून ते रविवार सकाळपर्यंत) ब्लॉकचा कालावधी: दिनांक २२.०३.२०२६ रोजी ००.०० वाजल्यापासून १०.०० वाजेपर्यंत ब्लॉकचा विभाग: मुलुंड ते ठाणे आणि दिवा ते डोंबिवली (अप व डाऊन धीम्या मार्गांवर) — (क्रॉस ओव्हर्स वगळून).परिणामब्लॉकच्या कालावधीत काही उपनगरीय सेवा रद्द राहतील. तसेच २१ मार्च रोजी १०.४९ वाजता परळ येथून सुटणाऱ्या ट्रेन पासून २२ मार्च रोजी रात्री १२.१२ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणाऱ्या 'डाऊन धीम्या' सेवा; तसेच २२ मार्च रोजी विद्याविहार येथून ०४.४५ वाजता सुटणाऱ्या ते ०९.०५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या सेवा मुलुंड स्थानकावर 'डाऊन जलद' मार्गावर वळवण्यात येतील आणि पुढे ठाणे स्थानकावर पुन्हा 'डाऊन धीम्या' मार्गावर वळवण्यात येतील. काही 'डाऊन धीम्या' सेवा दिवा स्थानकावर 'डाऊन जलद' मार्गावर वळवण्यात येतील आणि त्या कोपर व ठाकुर्ली स्थानकांवर थांबणार नाहीत.नियोजनानुसार २१ मार्च रोजी ११.२६ ते ११.५२ या वेळेत आणि २२ मार्च रोजी पहाटे ०३.२३ ते सकाळी ०९.५५ या वेळेत कल्याण येथून सुटणाऱ्या 'अप धीम्या' मार्गावरील गाड्यांना कल्याण येथे 'अप जलद' मार्गावर वळवण्यात येतील; त्यामुळे या गाड्या ठाकुर्ली आणि कोपर स्थानकांवर थांबणार नाहीत. पुढे दिवा आणि ठाणे स्थानकांदरम्यान या गाड्यांना पुन्हा 'अप धीम्या' मार्गावर वळवण्यात येईल. तसेच, ठाणे आणि मुलुंड स्थानकांदरम्यान 'अप धीम्या' मार्गावरील पुढील गाड्यांना 'अप जलद' मार्गावर वळवण्यात येईल.* ब्लॉक कालावधीत, 'अप' आणि 'डाऊन' जलद गाड्या त्यांच्या नियोजित थांब्यांव्यतिरिक्त कळवा, मुंब्रा आणि दिवा या स्थानकांवरही थांबतील.* रविवार २२ मार्च रोजी डोंबिवली येथे समाप्त होणाऱ्या किंवा तिथूनच सुरू होणाऱ्या सर्व गाड्या रद्द राहतील.* ब्लॉक कालावधीत, मुलुंड-ठाणे आणि दिवा-कल्याण या स्थानकांदरम्यानच्या 'अप' आणि 'डाऊन' दिशेकडील सर्व उपनगरीय गाड्या रद्द राहतील.* ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/दादर येथून सुटणाऱ्या 'डाऊन' मेल आणि एक्सप्रेस गाड्यांना विद्याविहार/ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यानच्या ५ व्या मार्गावरून वळवण्यात येईल.* ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/दादर येथे येणाऱ्या 'अप' मेल आणि एक्सप्रेस गाड्यांना कल्याण आणि ठाणे/विद्याविहार स्थानकांदरम्यानच्या ६ व्या मार्गावरून वळवण्यात येईल.पायाभूत सुविधांची देखभाल आणि सुरक्षिततेसाठी हा 'मेगाब्लॉक' अत्यंत आवश्यक आहेत. यामुळे प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे.
Factory Fire : दक्षिण कोरियाच्या डेजॉन शहरातील कारखान्यात लागलेल्या आगीत ५५ जण जखमी झाले असून १४ जण बेपत्ता आहेत.
Maharashtra Kesari 2026 : वाघोली येथे रंगलेल्या महाराष्ट्र केसरी मैदानात गतविजेत्या सिकंदर शेख, शिवराज राक्षे, पृथ्वीराज मोहोळ, पृथ्वीराज पाटील, हर्षवर्धन सदगीर यांनी स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत मजल मारली आहे.
Pune Police Bharti : पुणे शहर पोलीस भरती प्रक्रियेत उद्या लेखी परीक्षा
पुणे शहर पोलीस शिपाई भरती प्रक्रियेत लेखी परीक्षेचे आयोजन रविवारी (२२ मार्च) आयोजन करण्यात आले आहे.
विक्रोळी पूर्व - पश्चिम उड्डाणपुलावर तेल गळती, दुचाकीस्वार घसरून पडले; महापौरांनी केली मदत
महापौरांनी ताफा थांबवून यंत्रणांना केल्या सूचनामुंबई (विशेष प्रतिनिधी) :विक्रोळी पूर्व - पश्चिम जोडणाऱ्या उड्डाणपुलावर वाहनातील तेल गळती झाल्याने तेथून जाणाऱ्या काही दुचाकी घसरून पडण्याच्या घटना शुक्रवारी संध्याकाळी घडल्या. या घटनेमध्ये दुचाकीस्वारांना किरकोळ इजा झाली असून. सुदैवाने कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही. विशेष म्हणजे मुंबईच्या महापौर रितू तावडे या एका सोहळ्यासाठी विक्रोळी येथून पवईकडे जात असताना त्यांच्या वाहनाच्या ताफ्यापासून काही अंतरावर ही घटना घडली.पुलावरील तेल गळतीच्या घटनेमुळे संभाव्य मोठ्या अपघाताची शक्यता लक्षात घेता, महापौर रितू तावडे यांनी ताबडतोब वाहनांचा ताफा थांबवून या दुचाकीस्वारांची विचारपूस केली. तसेच वाहतूक पोलिसांना तत्काळ पाचारण करून त्यावर तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करून वाहतूक सुरक्षित करण्याचे निर्देश दिले. तसेच, संबंधित दुचाकीस्वारांना आवश्यक ते प्रथमोपचार त्वरीत करण्यासाठीच्याही सूचना केल्या.त्याचप्रमाणे, महानगरपालिकेचे प्रशासकीय विभाग कार्यालय, अग्निशमन दल आणि पूल विभाग यांच्याशी महापौरांनी संपर्क साधला. सर्व संबंधित खात्यांनी आपसात समन्वय साधून, पुलावरून वाहतूक निर्धोक व्हावी, यासाठी तत्काळ उपाययोजना करण्याचेही निर्देश महापौरांनी दिले. यांनतर या पुलावरील निसरडा झालेला भाग कोरडा करून स्वच्छ करण्यासाठी कार्यवाही करण्यात आली आहे.
सुनेत्रा पवार यांनी स्वीकारला चाकणकर यांचा राजीनामा
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आदेशानंतर, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी शुक्रवारी रात्री उशिरा उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन आपला राजीनामा सोपवला. सुनेत्रा पवार यांनी हा राजीनामा स्वीकारला असून, आता तो औपचारिक मंजुरीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आला आहे.https://prahaar.in/2026/03/20/cm-fadnavis-orders-rupali-chakankar-to-resign-orders-issued-after-few-video-goes-viral/नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांचे नाव आल्यापासून राजकीय वातावरण तापले होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी राजीनाम्याचे आदेश दिल्यानंतर चाकणकर तातडीने उपमुख्यमंत्र्यांच्या 'देवगिरी' या शासकीय निवासस्थानी दाखल झाल्या. या भेटीत चाकणकर यांनी प्रकरणाबाबत आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला; मात्र प्रकरणाचे गांभीर्य आणि वाढता दबाव पाहता, पक्ष आणि सरकारची प्रतिमा जपण्यासाठी त्यांचा राजीनामा घेण्याचा निर्णय सुनेत्रा पवार यांनी घेतला.https://prahaar.in/2026/03/20/resign-chief-minister-orders-rupali-chakankar/सुनेत्रा पवार यांनी स्वीकारलेला हा राजीनामा आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत राज्यपालांकडे पाठवला जाईल. राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर रुपाली चाकणकर यांचा राजीनामा अधिकृतपणे मंजूर होईल.
Dhananjay Munde : धनंजय मुंडेही भोंदूबाबाच्या संपर्कात? ‘या’महिलेच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
Dhananjay Munde :
सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी हा दावा फेटाळून लावत हा प्रकल्प प्रवासाचा वेळ आणि वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी अनिवार्य असल्याचे सांगितले.
सर्वात मोठी बातमी! अखेर रुपाली चाकणकरांचा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
Rupali Chakankar Resigns : नाशिकमधील अशोक खरात बलात्कार प्रकरणानंतर रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.
Maharashtra Kesari 2026 : या स्पर्धेत पुण्याच्या अमोल वालगुडेने सलग तिसऱ्यांदा सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे, तर सोलापूरच्या बिरुदेव बनसोडेने शेवटच्या क्षणी बाजी मारत सुवर्णपदक पटकावले.
Apps banned : कायदा जुगार आणि सट्टेबाजीच्या ३०० वेबसाइट आणि ॲप्सवर बंदी
ऑनलाइन गेमिंग कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीनंतर सरकारने आतापर्यंत एकूण ८,४०० हून अधिक संशयास्पद वेबसाइट बंद केल्या आहेत.
केंद्र सरकारचा बेटिंग आणि जुगाराच्या अॅप्सवर स्ट्राईक
नवी दिल्ली : देशातील वाढत्या बेकायदेशीर ऑनलाइन जुगार आणि सट्टेबाजीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने आता अत्यंत कठोर पाऊल उचलले आहे. माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने एका मोठ्या कारवाईत ३०० हून अधिक बेकायदेशीर बेटिंग वेबसाइट्स आणि मोबाइल अॅप्सवर बंदी घातली आहे. केंद्र सरकारच्या या धडक कारवाईमुळे ऑनलाइन जुगार चालवणाऱ्या जाळ्यांचे कंबरडे मोडले असून, डिजिटल माध्यमांतून होणाऱ्या आर्थिक फसवणुकीला लगाम बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.केंद्र सरकारकडून बेकायदेशीर सट्टेबाजींविरोधातील मोहीम गेल्या काही काळापासून सातत्याने राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत ८ हजार ४०० वेबसाइट्सवर कारवाई करण्यात आली आहे. विशेषतः सरकारने लागू केलेल्या नवीन 'ऑनलाइन गेमिंग' नियमानंतर ही प्रक्रिया अधिक गतिमान झाली आहे. या नव्या कायद्याचा आधार घेत प्रशासनाने तब्बल ४,९०० वेबसाइट्स आणि अॅप्स पूर्णपणे ब्लॉक केली आहेत. यामध्ये अनेक परदेशी अॅप्सचाही समावेश असून, जे भारतीय चलनामध्ये सट्टा लावण्यासाठी प्रवृत्त करत होते.सरकारने केलेल्या या कारवाईची व्याप्ती मोठी आहे. यामध्ये प्रामुख्याने ऑनलाइन स्पोर्ट्स बेटिंग प्लॅटफॉर्म्सचा समावेश आहे, जे क्रिकेट, फुटबॉल आणि इतर मोठ्या क्रीडा स्पर्धांवर सट्टा लावण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देत होते. यासोबतच ऑनलाइन कॅसिनो, स्लॉट्स, रूलेट आणि लाईव्ह डीलर गेम्स चालवणाऱ्या वेबसाइट्सवरही बंदी घालण्यात आली आहे.
मुंबईतील १३ नवीन मराठी शाळांना अनुदान मंजूर
प्रथमच अनुदान मंजूर झालेल्या २२ शाळांमध्ये १३ मराठी माध्यमांच्या शाळांचा समावेशमुंबई (विशेष प्रतिनिधी) :मुंबई महानगरपालिका शिक्षण समितीच्या माध्यमातून मनपा शाळांच्या अनुदान प्रक्रियेला गती देण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आणि सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे. शिक्षण समितीच्या अध्यक्षा राजश्री राजेश शिरवडकर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर २२ शाळांना प्रथमच अनुदान मंजूर करण्यात आले, त्यात १३ मराठी माध्यमाच्या शाळांचा समावेश आहे. या माध्यमातून एकप्रकारे मराठी माध्यमाच्या शाळांना आधार देत प्रकारे मराठी शाळांची संख्या अधिकाधिक वाढवण्यासाठी पुढाकार घेतला जात आहे.मुंबई महापालिकेच्या वतीने प्राथमिक शाळांना अनुदान देण्याच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी शिक्षण समितीमार्फत टप्प्याटप्प्याने कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. या प्रक्रियेअंतर्गत पहिल्या टप्प्यात ७ शाळांना अनुदान मंजूर करण्यात आले, त्यापैकी ३ शाळा या मराठी माध्यमाच्या आहेत. महापालिका अस्तित्वात आल्यानंतर आणि शिक्षण समिती अध्यक्षांची निवड झाल्यानंतर पहिल्या शिक्षण समितीच्या बैठकीत २२ शाळांना प्रथमच अनुदान मंजूर करण्यात आले, यामध्ये १३ शाळा मराठी माध्यमाच्या असल्याने मराठी माध्यमाच्या शिक्षणाला मोठा आधार मिळाला आहे.तसेच १२ शाळांच्या मान्यता मुदतवाढ प्रस्तावांना शिक्षण समितीने मंजुरी दिली असून, त्यामध्ये ५ शाळा मराठी माध्यमाच्या आहेत. यामुळे या शाळांच्या शैक्षणिक कामकाजाला आवश्यक स्थैर्य आणि पाठबळ मिळणार आहे.याशिवाय सध्या ४५ शाळांचे प्रस्ताव प्रशासकीय तसेच शिक्षण समितीच्या मंजुरीसाठी प्रक्रियेत असून, ते लवकरच मंजुरीसाठी ठेवले जाणार आहेत.महापालिका शिक्षण विभागाकडून ही संपूर्ण प्रक्रिया नियमांनुसार आणि पारदर्शक पद्धतीने राबवली जात असून, पात्र शाळांना टप्प्याटप्प्याने अनुदान देण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. शिक्षण क्षेत्रात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी आणि महापालिका शाळांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षण समिती सातत्याने प्रयत्नशील असल्याची माहिती शिक्षण समितीच्या अध्यक्ष राजेश्री शिरवडकर यांनी दिली.
Assembly Election 2026 : पुद्दुचेरीत एनडीएचे जागावाटप फायनल! एआयएनआरसी १६ तर भाजप १० जागा लढवणार
Assembly Election 2026 : पुद्दुचेरी विधानसभा निवडणूक २०२६ साठी एआयएनआरसी आणि भाजपमध्ये जागावाटपावर शिक्कामोर्तब झाले आहे.
काळजाचा थरकाप! चेंडू काढायला गेला अन् खड्ड्यात पडला; ८ वर्षांच्या चिमुकल्याचा अंत
Mumbai News : मुंबईतील मालाड पूर्व परिसरात बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून दिव्यांश मौर्य या ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला.
Nitish Kumar : नितीश कुमार पुन्हा बनणार जेडीयूचे अध्यक्ष; पुढील राजकीय वाटचालीविषयी उत्सुकता
नितीश यांची बिनविरोध निवड निश्चित मानली जात आहे. त्याविषयीची औपचारिक घोषणा पुढील काही दिवसांत होईल.
पश्चिम आशियातील युद्धामुळे प्रीमियम पेट्रोल आणि औद्योगिक डिझेल महागले
नवी दिल्ली : पश्चिम आशियात अमेरिका आणि इस्रायल विरुद्ध इराण असे युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे प्रीमियम पेट्रोल तसेच औद्योगिक डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. तेल कंपन्यांनी शुक्रवारी प्रीमियम पेट्रोलच्या किमतीत वाढ करण्याची घोषणा केली आहे. युद्धाचा भडका उडाल्याने जागतिक ऊर्जा पुरवठा विस्कळीत झाला आहे. परिणामी २० मार्चपासून भारतात प्रीमियम पेट्रोलच्या दरात २.३५ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.प्रीमियम पेट्रोलच्या दरात वाढ झाल्यामुळे औद्योगिक डिझेलही महाग झाले आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने औद्योगिक डिझेलच्या दरात लक्षणीय सुधारणा केली आहे. तो प्रति लिटर ८७.६७ रुपयांवरून १०९.५९ रुपयांपर्यंत वाढवला आहे. या निर्णयाचा औद्योगिक क्षेत्र, लॉजिस्टिक्स आणि वाहतूक खर्चावर परिणाम होण्याची शक्यता आहे. औद्योगिक डिझेल सामान्य पेट्रोल पंपांवर विकले जात नाही. ते थेट कारखाने, मोठे जनरेटर, खाण कंपन्या, बांधकाम स्थळे आणि वीज प्रकल्पांकडून खरेदी केले जाते. यापूर्वी, तेल कंपन्यांनी ब्रँडेड आणि हाय-ऑक्टेन प्रीमियम पेट्रोलच्या दरात प्रति लिटर अंदाजे २ रुपयांनी वाढ केली होती. मात्र, सामान्य पेट्रोलचा दर मात्र स्थिर राहिल्याने ग्राहकांना तात्काळ दिलासा मिळाला आहे.सामान्य ग्राहकांसाठी दिलासादायक बाब म्हणजे नियमित पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही. विश्लेषकांच्या मते, इंधनाच्या किमतीतील अशा वाढीचा सर्वसामान्य ग्राहकांवर अप्रत्यक्ष परिणाम होऊ शकतो. जेव्हा औद्योगिक उत्पादन आणि मालवाहतुकीचा खर्च वाढतो, तेव्हा त्याचा परिणाम अखेरीस वस्तू आणि सेवांच्या किमतींवर होतो, ज्यामुळे महागाईचा दबाव वाढण्याची शक्यता असते.भारत आपल्या तेलाच्या गरजेचा मोठा भाग आयात करतो, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ-उतारांचा देशांतर्गत इंधन दरांवर थेट परिणाम होतो. सध्या, पेट्रोल आणि डिझेलच्या स्थिर किमतींमुळे सर्वसामान्य वाहनचालकांना काहीसा तात्काळ दिलासा मिळाला आहे, परंतु ऊर्जा बाजारातील अनिश्चितता पाहता, आणखी बदलांची शक्यता नाकारता येत नाही.अन्नाचा तुटवडा निर्माण होण्याची भीती : पश्चिम आशियातील रणधुमाळीमुळे केवळ कच्च्या तेलाचे दर कडाडले आहेत असे नाही, तर याचे पडसाद आता जागतिक अन्नसुरक्षेवर उमटू लागले आहेत. ‘वर्ल्ड फूड प्रोग्राम’च्या धक्कादायक अहवालानुसार, येत्या काही महिन्यांत कोट्यवधी लोकांना अन्नासाठी संघर्ष करावा लागू शकतो. इंधन महागल्याने शेतीचा खर्च वाढून महागाईचा भडका उडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम तेलासह इतर अनेक जीवनावश्यक वस्तू व सेवांवर होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तेलाचे भाव वाढल्याने महागाई वाढण्याची शक्यता आहे. जून महिन्यापर्यंत जगातील ४ कोटी ५० लाख लोकांना अन्न मिळवण्याची समस्या भेडसावणार आहे. पश्चिम आशियातील युद्धाने आता अन्नाचा तुटवडा निर्माण होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.सोन्या-चांदीच्या दरात घसरण : भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात शुक्रवारी मोठी घसरण झाली. २४ कॅरेट सोन्याचे दर सुमारे १५ हजार रुपयांनी प्रति १० ग्रॅमच्या आसपास, तर २२ कॅरेट सोने १३ हजार ७०० रुपये १३ हजार ८०० प्रति ग्रॅमच्या पातळीवर आले. चांदीमध्येही मोठी घसरण होऊन दर २ लाख ५५ हजार ते २ लाख ६५ हजार प्रति किलोपर्यंत खाली आले, ज्यामुळे नवरात्रीच्या काळात खरेदीदारांना दिलासा मिळाला आहे.
Mohan Bhagwat : नागपूरमध्ये विश्व हिंदू परिषदेच्या नवीन कार्यालयाचे भूमिपूजन करताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी जागतिक शांतता आणि भारताच्या नैतिक जबाबदारीवर भाष्य केले
IPL Ranked Third : वर्ल्ड क्रिकेट असोसिएशनच्या (WCA) रँकिंगमध्ये आयपीएलला अनपेक्षित निकालाचा सामना करावा लागला आहे.
British naval base : ब्रिटनच्या नाविक तळावर घुसखोरीचा प्रयत्न; एक पुरुष आणि एका महिलेला अटक
ब्रिटनच्या नविक तळावर घुसखोरी करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल एक पुरुष आणि एका महिलेला अटक करण्यात आली आहे.
Rupali Chakankar : अशोक खरात प्रकरण रुपाली चाकणकरांना भोवले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चाकणकर यांना तात्काळ राजीनामा देण्याचे आदेश
खरातच्या 'पाद्यपूजे'चे व्हिडीओ Viral, चाकणकरांना राजीनामा देण्याचे आदेश
मुंबई : नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात ऊर्फ 'कॅप्टन' याच्या अघोरी कृत्यांचे आणि लैंगिक शोषणाचे धक्कादायक वास्तव समोर आल्यानंतर, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना आपल्या पदाचा तात्काळ राजीनामा देण्याचे आदेश दिले आहेत. महिलांच्या हक्कांचे रक्षण करणाऱ्या घटनात्मक पदावर असताना एका अत्याचार प्रकरणातील संशयित व्यक्तीशी इतके घनिष्ठ संबंध असणे नैतिकदृष्ट्या अयोग्य असल्याने मुख्यमंत्र्यांनी ही कठोर भूमिका घेतल्याचे समजते.भोंदूबाबा अशोक खरात विरोधातील तक्रारींनंतर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात स्वतः लक्ष घालून पोलिसांना सखोल तपासाचे निर्देश दिले होते. पुराव्यांची खातरजमा झाल्यानंतरच पोलीस महासंचालकांच्या आदेशाने खरातवर अटकेची कारवाई करण्यात आली. पोलिसांनी खरातच्या ताब्यातून काही महत्त्वाच्या चित्रफिती आणि माहिती आधीच जप्त केली होती. त्यामुळे तपासाला गती मिळाली. दरम्यान, मर्चंट नेव्हीमधून निवृत्त झालेला अशोक खरात सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथे ‘श्री शिवानिका संस्थान’ नामक ट्रस्ट चालवत होता. या संस्थेच्या कार्यकारी मंडळात रुपाली चाकणकर यांचा समावेश असल्याचे समोर आले. चाकणकर या खरातच्या मागे छत्री धरून उभ्या असतानाचे फोटो आणि त्याची 'पाद्यपूजा' करतानाचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाले आहेत. याशिवाय, त्यांनी खरातचा ‘पितृतुल्य गुरूमाऊली’ असा उल्लेख केल्याचेही समोर आले आहे.दरम्यान, अशोक खरातच्या कार्यालयातून पोलिसांनी ५८ आक्षेपार्ह चित्रफिती जप्त केल्या आहेत. यामध्ये राजकीय क्षेत्रातील मंडळींसह विविध क्षेत्रांतील नामांकित महिलांची माहिती असल्याने पोलिसांनी कमालीची गोपनीयता बाळगली आहे. या प्रकरणाची वाढती व्याप्ती आणि आंतरराज्य लागेबांधे पाहता, राज्य सरकारने आयपीएस अधिकारी तेजस्विनी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली 'विशेष तपास पथक' (एसआयटी) स्थापन केले आहे.https://prahaar.in/2026/03/20/resign-chief-minister-orders-rupali-chakankar/अनेक बड्या नेत्यांशी संबंधअंकशास्त्राच्या आधारे भविष्य सांगणाऱ्या खरातकडे महाराष्ट्र आणि इतर राज्यांतील अनेक उच्चपदस्थांची ये-जा होती. २०२२ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि दीपक केसरकर यांनीही या मंदिरात भेट दिली होती. मात्र, चाकणकर या थेट संस्थेच्या विश्वस्त असल्याने त्यांना हे प्रकरण भोवले आहे. खरातवर अत्याचार, खंडणी आणि धमकी दिल्याप्रकरणी नाशिक, वावी आणि शिर्डी पोलीस ठाण्यात एकूण तीन गुन्हे दाखल आहेत. त्याला २४ मार्चपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.चाकणकर यांनी घेतली पोलीस महासंचालकांची भेटरुपाली चाकणकर यांनी शुक्रवारी पोलीस महासंचालकांची भेट घेऊन या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली. मी माझी भूमिका लवकरच पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट करेन, असे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. राष्ट्रवादीच्या नेत्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची आपण सध्या भेट घेणार नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
राजीनामा द्या, मुख्यमंत्र्यांचा रुपाली चाकणकरांना आदेश
मुंबई : बलात्कार, महिलांचे लैंगिक शोषण, महिलांची फसवणूक अशा गंभीर आरोपांमध्ये भोंदू बाबा आणि स्वयंघोषीत कॅप्टन अशोक खरात याला अटक झाली आहे. अशोक खरातसोबत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचे व्हिडीओ आणि फोटो समोर आले आहेत. अशोक खरातचे पाय धुतानाचे तसेच त्याच्या सोबत कार्यक्रमस्थळी वावरत असतानाचे रुपाली चाकणकर यांचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. हे व्हायरल होत असताना चाकणकरांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांची भेट घेतली आहे. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रुपाली चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा आदेश दिला आहे.पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाची निःपक्षपाती चौकशी करावी अशी मागणी रुपाली चाकणकर यांनी केली आहे. तर पोलीस कारवाई निःपक्षपाती व्हावी यासाठी रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा ताबडतोब राजीनामा द्यावा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आदेशामुळे रुपाली चाकणकर यांच्या अडचणीत वाढ झाल्याची चर्चा आहे.
बाजार समित्यांचे आधुनिकीकरण व ‘मॅग्नेट’ प्रकल्पासाठी एडीबी सहकार्य करणार
मुंबई : महाराष्ट्रातील कृषी बाजार व्यवस्थेच्या आधुनिकीकरणाला गती देण्यासाठी आशियाई विकास बँकेचे (एडीबी) सहकार्य मिळण्याच्या दृष्टीने पणन मंत्री जयकुमार रावल यांचा मनीला दौरा महत्त्वपूर्ण ठरला आहे. आशियाई विकास बँकेच्या मुख्यालयात आयोजित ‘आशिया आणि पॅसिफिक अन्न प्रणाली मंच २०२६’ मध्ये सहभागी होत मंत्री जयकुमार रावल यांनी राज्यातील महाराष्ट्र ॲग्रीबिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्प, मुंबई आंतरराष्ट्रीय कृषी बाजार (एमआयएएम) आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या (एपीएमसी) बळकटीकरणावर लक्ष केंद्रित केले. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे सरव्यवस्थापक व मॅग्नेट प्रकल्पाचे संचालक विनायक कोकरे यावेळी उपस्थित होते.
बोरिवलीत तीन दिवसांचा मिलेट महोत्सव
मुंबई : राज्यात ज्वारी, बाजरी, नाचणी ही प्रमुख तृणधान्ये (मिलेट्स) आहेत. कमी पाण्यावर येणारी तसेच पर्यावरणपूरक असण्याबरोबरच आरोग्यासाठी लाभदायी असणाऱ्या मिलेट्सना शेतातून थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या वतीने मिलेट्स महोत्सवाचे आयोजन मुंबईत करण्यात आले आहे. टप्प्याटप्प्याने मिलेट्स महोत्सव राज्यातील इतरही जिल्ह्यांमध्ये आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा करून या महोत्सवास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा असे आवाहन पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केले.बोरिवली पश्चिम येथील कोरा केंद्र मैदानावर आयोजित तिसऱ्या मिलेट्स महोत्सवाचे उद्घाटन पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी आमदार मनीषा चौधरी, नगरसेवक शिवानंद शेट्टी, कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम, सर व्यवस्थापक विनायक कोकरे आदी उपस्थित होते. महोत्सव २२ मार्च २०२६ पर्यंत नागरिकांसाठी खुला असणार आहे.जगभरातील तृणधान्य लागवडीला प्रोत्साहन मिळावे, या भूमिकेतून भारताने संयुक्त राष्ट्रात २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य (मिलेट) वर्ष म्हणून साजरे करावे, असा ठराव मांडला होता. या ठरावाला ७१ सभासद देशांनी पाठिंबा दिल्याने संयुक्त राष्ट्राच्या वतीने जगभरात २०२३ हे वर्ष 'आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे करण्यात आले. त्याचप्रमाणे संयुक्त राष्ट्रांनी (यूएन) २०२६ हे वर्ष 'आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष' म्हणून घोषित केले आहे. या उपक्रमाद्वारे राज्य शासन कृषी आणि अन्न प्रणालीतील महिलांचे अमूल्य योगदान, सक्षमीकरण आणि त्यांच्यासमोरील आव्हानांना जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्याचा प्रयत्न करीत आहे. या निमित्ताने राज्यात 'महाराष्ट्र श्री अन्न (मिलेट) अभियान' सुरू करण्यात आल्याचे पणन मंत्री जयकुमार रावल म्हणाले. ते उद्घाटनपर भाषणात बोलत होते.बदलत्या जीवनशैलीमुळे जगभरातील लोकांना स्थूलपणाचा तसेच त्यासोबत येणारा उच्च रक्तदाब, मधुमेहासारख्या आजारांचा सामना करावा लागत आहे. त्यावर 'पौष्टिक तृणधान्य' रामबाण उपाय ठरू शकतात. आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षामुळे देशभर तृणधान्याबाबत जागरूकता निर्माण झाली आहे. विशेषतः सामान्य ग्राहकांमधूनही मागणी वाढत आहे. यामुळे राज्यात तृणधान्यापासून उत्पादने तयार करणारे नवउद्योजक मोठ्या प्रमाणात तयार झाले आहेत. तथापि या उत्पादनांची प्रसिद्धी, ग्राहकांमध्ये जागरुकता व बाजार साखळी तयार करणे आवश्यक असल्याचे मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.आशियाई विकास बँक (एडीबी) अर्थसहाय्यित महाराष्ट्र ऍग्रीबिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्पांतर्गत, राज्यातील प्रमुख १५ फलोत्पादन पिकांसाठी उत्पादन ते ग्राहकांपर्यंत वितरण अशा एकात्मिक मूल्य साखळीचा विकास करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. मॅग्नेट प्रकल्पाच्या विस्तारीत टप्पा २.० अंतर्गत, पौष्टीक घटकावर विशेष भर देण्यात येणार असून फलोत्पादन पिके तसेच मिलेट उत्पादनांचा वापर वाढविणे, मूल्यवृद्धी व व्यवसायवृद्धीसाठी ब्रॅण्डिंग व प्रोत्साहन उपक्रमांद्वारे महाराष्ट्र शासनामार्फत आशियाई विकास बँकेचे सहकार्याने विशेष प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.कृषी पणन मंडळातर्फे दरवर्षी विविध फळ व धान्य महोत्सवांचे एकत्रितपणे आयोजन केले जाते. तथापि असे एकत्रित महोत्सव न घेता, मिलेटचे आरोग्यविषयक असलेले महत्व व मिलेट उत्पादकांना एक व्यासपीठ देण्याच्या दृष्टिकोनातून गतवर्षीपासून स्वतंत्रपणे मिलेट महोत्सवाची सुरूवात करण्यात आली आहे. मागील वर्षी पुणे शहरात यास चांगला प्रतिसाद मिळाल्याने या वर्षी मुंबईत आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात राज्यभरातून उत्पादक, प्रक्रियादार, नवउद्योजक सहभागी झाले असून या अभियानाची व्याप्ती वाढविण्याकरिता पणन मंडळामार्फत आगामी काळात राज्यात पुणे, कोल्हापूर, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, लातूर या ठिकाणी मिलेट महोत्सवाचे आयोजन करण्यात येईल, असे मंत्री रावल यांनी यावेळी जाहीर केले.आमदार मनिषा चौधरी यांनी महोत्सवात सहभागी महिला शेतकरी तसेच उत्पादकांचे कौतुक केले. शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून सर्वांनी मिळून विशेषतः महिला शेतकऱ्यांच्या उत्थानासाठी काम करूया, असे सांगून स्थानिक नागरिकांनी महोत्सवास प्रतिसाद द्यावा, असे आवाहन केले. कार्यकारी संचालक संजय कदम यांनी प्रास्ताविकाद्वारे महोत्सव आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. तर, सरव्यवस्थापक विनायक कोकरे यांनी महोत्सवास पाठबळ दिलेल्या सर्वांचे आभार व्यक्त केले.
Laxman Sivaramakrishnan : आयपीएल २०२६ चा हंगाम अवघ्या आठवड्यावर आलेला असताना भारतीय क्रिकेट वर्तुळातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे.
Pune Police : पुण्यातील आंबेगाव पोलिसांनी कात्रज बोगद्याजवळील डोंगराच्या कड्यावरून एका महिलेचा जीव वाचवला आहे.
भारतातील विशाखापट्टणम येथे आयोजित करण्यात आलेल्या नौदल ताफ्याच्या संचलन सरावानंतर ते जहाज मायदेशी परतत होते.
Matthew Short Injured : वेगवान गोलंदाज नाथन एलिस स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर, आता आणखी एका अष्टपैलू खेळाडूच्या उपलब्धतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
१८ मार्च रोजी कॅप्टन सिंह यांची प्रकृती अचानक खालावली. जहाजावरील अधिकाऱ्यांनी तात्काळ दुबई एटीसीशी संपर्क साधून एअर अॅम्ब्युलन्सची विनंती केली, पण युद्धजन्य परिस्थितीमुळे परवानगी नाकारण्यात आली.
मुंबई : क्रेडिट सुईस दिवाळखोरीत निघाली. नंतर यूबीएस या बँकिंग कंपनीने क्रेडिट सुईस विलीन करून घेतली. ही प्रक्रिया झाल्यानंतर 'क्रेडिट सुईस'चे बाँड रद्द करण्यात आले. पण याच बाँड्सच्या खरेदी - विक्रीवरून एचडीएफसी बँकेत गदारोळ माजला आहे.एचडीएफसी बँकेचे अर्धवेळ अध्यक्ष अतनु चक्रवर्ती यांनी “मूल्ये आणि नैतिकते”वरून झालेल्या मतभेदांचे कारण देत राजीनामा दिला. या नंतर एचडीएफसी बँकेच्या व्यवस्थापनाने तडकाफडकी तीन उच्चाधिकाऱ्यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले आहेत. वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या बाँड्सच्या खरेदी - विक्रीची अंतर्गत चौकशी सुरू आहे. एचडीएफसी बँकेने बँकिंगचे समूह प्रमुख संपत कुमार, मध्य पूर्व, आफ्रिका आणि एनआरआय ऑनशोर व्यवसायाचे कार्यकारी उपाध्यक्ष हर्ष गुप्ता आणि वरिष्ठ उपाध्यक्ष पायल मनध्यान यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले आहेत.बाँड्सच्या खरेदी - विक्री घोटाळ्याप्रकरणी दुबई वित्तीय सेवा प्राधिकरणाने एचडीएफसी बँकेला नवीन ग्राहक जोडण्यास बंदी घातली आहे. ही बंदी असतानाच एचडीएफसी बँकेने तीन उच्चाधिकाऱ्यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच बाँड्सच्या खरेदी - विक्रीची अंतर्गत चौकशी सुरू केली आहे. या सर्व घडामोडींचा परिणाम 'एचडीएफसी बँक लिमिटेड' या शेअरवर झाला आहे. आज (शुक्रवार २० मार्च २०२६) हा शेअर २.१५ टक्के घसरून अर्थात १७.२० अंकांनी घसरून ७८१ रुपयांवर बंद झाला आहे.एचडीएफसी बँकेत गदारोळ माजला असला आणि पश्चिम आशियात युद्ध सुरू असले तरी बीएसई सेन्सेक्स आज (शुक्रवार २० मार्च २०२६) संध्याकाळी ०.४४ टक्क्यांनी (३२५.७२ अंकांनी) वधारला आणि ७४,५३२.९६ वर बंद झाला. निफ्टी फिफ्टी आज (शुक्रवार २० मार्च २०२६) संध्याकाळी ०.४९ टक्क्यांनी (११२.३५ अंकांनी) वधारला आणि २३,११४.५० वर बंद झाला.१ अमेरिकन डॉलर - ९३.५७ रुपये२४ कॅरेट शुद्ध १० ग्रॅम (१ तोळा) सोने - १,५०,९३० रुपये (गुरुवारच्या तुलनेत ६५० रुपयांची वाढ)२२ कॅरेट शुद्ध १० ग्रॅम (१ तोळा) सोने - १,३८,३५० रुपये (गुरुवारच्या तुलनेत सहाशे रुपयांची वाढ)१ किलो चांदी - २,५५,००० रुपये (गुरुवारच्या तुलनेत पाच हजार रुपयांची घट)
Rupali Chakankar : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातला बलात्काराच्या आरोपाखाली अटक झाली आहे.
Dukes Ball Shortage : इंग्लंडमधील आगामी काउंटी क्रिकेट हंगामावर चक्क 'चेंडू' संपल्यामुळे मोठे संकट ओढवले असून, खेळाडूंसमोर एक विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे.
बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवार देणार
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध होईल, असा कयास बांधला जात असताना, काँग्रेसने या निवडणुकीत उमेदवार देण्याची भूमिका घेतली आहे. शरद पवार गट ही निवडणूक लढवणार नसेल, तर त्यांनी भूमिका स्पष्ट करावी, आमच्याकडे पर्याय तयार आहे, असे विधान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे.महाड येथील चवदार तळे सत्याग्रह दिन कार्यक्रमाच्या निमित्ताने रायगडमध्ये माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. सपकाळ म्हणाले, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत बारामतीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने लढवली होती. त्यामुळे पोटनिवडणूक लढवण्याबाबत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. ते जर लढत नसतील, तर आमच्याकडे अनेक पर्याय आहेत. अंतिम निर्णय हा महाविकास आघाडी घेईल, असेही त्यांनी सांगितले. केंद्रीय निवडणूक आयोगाने बारामती विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक जाहीर केली असून, ६ एप्रिलपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. २३ एप्रिलला मतदान होईल, तर ४ मे रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडेल.राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार उमेदवार असतील, हे निश्चित आहे. त्याचबरोबर काँग्रेससह ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीही ही पोटनिवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. “सुनेत्रा पवार यांना विधान परिषदेवर घ्यावे आणि बारामतीत पवार घराण्याव्यतिरिक्त अन्य कोणताही उमेदवार द्यावा”, असे हाके म्हणाले.
पाकिस्तानातही धुरंधरची क्रेझ,बंदी असूनही टीव्हीवर झळकतोय धुरंधर २
जगभरातील प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा रणवीर सिंहचा 'धुरंधर २' सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. १९ मार्च २०२६ रोजी प्रदर्शित झालेल्या रणवीरच्या या सिनेमानं पहिल्याच दिवशी १०० कोटींहून अधिक कमाई करून ऐतिहासिक विक्रम रचला आहे.रणवीर सिंहच्या धुंरधर द रिव्हेंज सिनेमाचं भारतात कौतुक होतच आहे. मात्र, आता पाकिस्तानमध्येही या सिनेमाची क्रेझ पाहायला दिसून येत आहे.सध्या पाकिस्तानात भारतीय सिनेमांच्या प्रदर्शनावर अधिकृतपणे बंदी आहे. विशेषतः 'धुरंधर २' हा सिनेमा पाकिस्तानातील दहशतवादावर आधारित असल्यानं हा सिनेमा पाकिस्तानात रिलीज झालेला नाही. पण, असं असतानाही पाकिस्तानातील प्रेक्षक हा सिनेमा पाहण्यासाठी उत्सुक आहेत.या सिनेमाला अधिकृतपणे बंदी असतानाही पाकिस्तानमधील लोक या सिनेमाचं 'पायरेटेड व्हर्जन' डाऊनलोड करून धुरंधर २ सिनेमा पाहत असल्याचं ट्विट एका पाकिस्तानी पत्रकारानं केलं आहे.सध्या ट्विटरवर एका पाकिस्तानी पत्रकाराचे ट्विट व्हायरल झालं असून यामध्ये हा पत्रकार लाहोरमधील आपल्या घरी बसून टीव्ही स्क्रीनवर 'धुरंधर २' चा आनंद घेताना पाहायला मिळत आहे. तसेच, या ट्विटमध्ये पत्रकारनं म्हटलं आहे की, हे अत्यंत दुर्दैवी आहे की सिनेमाच्या प्रदर्शनाच्या दिवशीच त्याचं पायरेटेड व्हर्जन पाकिस्तानमध्ये पोहोचलं असून पाकिस्तानी लोक भारतीय सिनेमाशिवाय राहू शकत नाहीत, मग तो सिनेमा पाकिस्तानशी संबंधित दहशतवादावर आधारित असला तरीही ही तो सिनेमा ते बघतीलच.''त्यामुळे आता 'धुरंधर'नंतर धुरंधर द रिव्हेंज पाहण्यासाठी जगभरातील प्रेक्षक उत्सुक असल्याचं पाहायला मिळत आहे. आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर २' या सिनेमानं भारतात पहिल्याच दिवशी १०२.५५ कोटी रुपयांची जबरदस्त ओपनिंग केली असून रणवीर सिंहच्या या सिनेमानं पाकिस्तानमधील प्रेक्षकांनाही भूरळ पाडली आहे.
Petrol Price Hike : मध्यपूर्वेतील संघर्षामुळे पुणे शहरात प्रीमियम पेट्रोलचे दर ११३.७७ रुपयांवर पोहोचले आहेत.
या संपूर्ण प्रकरणाला वाचा फोडण्याचे काम आमदार अमोल मिटकरी यांच्या सोशल मीडिया पोस्टने केले.
Baramati By Election : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
IPL 2026 : तब्बल ७ दिग्गज वेगवान गोलंदाज दुखापत आणि वैयक्तिक कारणांमुळे स्पर्धेतून बाहेर पडले आहेत.
Top 10 News : पेट्रोलच्या दरात मोठी वाढ, अशोक खरातचा धक्कादायक मोडस ऑपरेंडी उघड ते इराणला मोठा धक्का..; वाचा आजच्या टॉप १० बातम्या
'कोकण रेल्वेच्या गाड्यांना दिवा ऐवजी दादरचाच थांबा द्यावा'
खेड : रत्नागिरी - दादर या पॅसेंजर गाडीला मागील काही महिन्यांपासून दादर ऐवजी दिवा हाच शेवटचा थांबा देण्यात आला आहे. यामुळे कोकणातून मुंबईत येणाऱ्या असंख्य प्रवाशांचे हाल होत आहेत. यावर उपाय म्हणून रत्नागिरी - दादर या पॅसेंजर गाडीला दादर येथे थांबा द्यावा, अशी मागणी भाजपच्या वैभव खेडेकर यांनी केली आहे. पॅसेंजर गाडीच्या बदललेल्या वेळा आणि दादर ऐवजी दिवा हाच शेवटचा थांबा देण्याचा निर्णय यामुळे कोकणवासियांची प्रचंड गैरसोय झाली आहे. प्रवाशांचे प्रश्न समजून घेऊन रेल्वेने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी खेडेकर यांनी केली.मधु दंडवते आणि जॉर्ज फर्नांडिस यांच्या दूरदृष्टीतून कोकणातील दुर्गम भागात रेल्वेचे स्वप्न साकार झाले. कठीण भौगोलिक परिस्थितीत उभारलेली ही रेल्वे कोकणवासीयांसाठी विकासाची नवी दिशा घेऊन आली. या प्रकल्पासाठी स्थानिकांनी आपल्या जमिनी अत्यल्प दरात दिल्या, ज्यामुळे हा ऐतिहासिक प्रकल्प शक्य झाला.एकेकाळी केवळ ३५ रुपयांत कोकणातून मुंबईत पोहोचणे शक्य होते. कोकण रेल्वेच्या १९९४ साली सुरू झालेल्या खेड - दादर आणि रत्नागिरी - दादर या दोन्ही पॅसेंजर गाड्यांनी कोकणवासीयांसाठी मोठा दिलासा होती. मात्र, सध्या दादर स्थानकावरील कोकण रेल्वेचा थांबा काढण्यात आल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्याऐवजी गोरखपूरकडे जाणाऱ्या गाड्यांना प्राधान्य दिल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना भेटून वस्तुस्थिती समजावून सांगणे आवश्यक असल्याचे खेडेकर म्हणाले.
भोंदू बाबा अशोक खरातशी संबंधित नेत्यांवर कारवाई करणार, प्रफुल्ल पटेलांनी दिली माहिती
मुंबई : भोंदू बाबा अशोक खरातप्रकरणी राज्यातील विविध नेत्यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांनी भूमिका स्पष्ट केली असून, याप्रकरणात ज्यांची नावे आहेत, त्यांच्यावर पक्षाकडून कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया दिली आहे.माध्यमांशी संवाद साधताना पटेल म्हणाले, “याप्रकरणी चौकशी केली जाईल. चौकशीदरम्यान ज्या कोणाची नावे समोर येतील, त्यांच्यावर तातडीने आणि सक्तीने कारवाई केली जाईल. काही राजकीय नेत्यांची नावे त्यांच्याशी (भोंदू बाबा अशोक खरात) जोडली गेली आहेत. त्यामुळे त्यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून कारवाई केली जाईल. ही कारवाई पुढील दोन-तीन दिवसांत दिसेल”, असेही त्यांनी स्पष्ट केले.नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात उर्फ कॅप्टन याच्या पेन ड्राईव्हमध्ये सापडलेल्या ५८ व्हिडिओमुळे खबळबळ उडाली आहे. बलात्काराच्या आरोपांखाली त्याला अटक करण्यात आली असून, २४ मार्चपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. ज्योतिष, अंकशास्त्र, तंत्रमंत्राच्या आडून त्याने महिलांचे शोषण केल्याचा आरोप आहे. दरम्यान, सिन्नर तालुक्यातील त्याच्या मंदिर ट्रस्टवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर संचालक आहेत. चाकणकर या अशोक खरातसाठी छत्री पकडून उभ्या असल्याचे फोटो सुरुवातीला समोर आले. त्यानंतर अशोक खरातची पाद्यपूजा केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यामुळे विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.
Jharkhand : झारखंड हादरलं.! उत्खननात सापडला अमेरिकन बॉम्ब; सांकेतिक खुणांनी वाढलं रहस्य
अशा जड आणि जुन्या स्फोटकाला हाताळणे हे एक जोखमीचे काम आहे. दोन स्तरांवर तयारी सुरू आहे.
भोंदू बाबा प्रकरणात दोषींवर कारवाई होणारच !
मुंबई : उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राच्या प्रतिमेला डाग लावण्याचे काम झाले. “वाझे काय लादेन आहे का...” हे वाक्य कोणाच्या तोंडचे आहे हे संजय राऊत विसरले असले तरी महाराष्ट्र विसरलेला नाही. मविआ सरकारच्या कार्यकाळात प्रसिद्ध उद्योगपतीच्या घराच्या बाहेर बॉम्ब ठेवण्याची हिंमत पोलिसांना झाली होती, गिरीश महाजनांना अटक करण्याची योजना आखली गेली होती. आता गुन्हेगारांना पाठीशी घालणारे सरकार नसल्यामुळे खरात बाबा प्रकरणी सर्व दोषींवर कठोर कारवाई होईल, याची संजय राऊतांनी खात्री बाळगावी, अशी खोचक टिप्पणी भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शुक्रवारी केली. भाजपा प्रदेश कार्यलयात झालेल्या पत्रकार परिषदेत बन बोलत होते. यावेळी बन म्हणाले की, फडणवीस मंत्रीमंडळातील मंत्र्यांवर बिनबुडाचे आरोप करण्याचा अधिकार राऊतांना नाही. एखाद्या मंत्र्याचे त्या भोंदू बाबा सोबत फोटो आहेत म्हणून लगेच तो मंत्री दोषी ठरतो असे नाही. कसून तपास केला जाईल आणि दोषींवर निश्चितपणे कारवाई होईल.अपुऱ्या आणि अर्धवट माहितीच्या आधारे राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवर टीका करू नये असे सुनावत श्री. बन म्हणाले की, संपूर्ण माहिती राज ठाकरे यांनी करून घ्यावी. केवळ कर्ज किती आहे हे न बघता त्या कर्जाच्या तुलनेमध्ये आपली अर्थव्यवस्था तिपटीने मोठी झाली आहे हे ही बघावे. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते तेव्हा महाराष्ट्राची अर्थव्यवस्था साडेसोळा लाख कोटी इतकी होती मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वात गेल्या दहा वर्षात अर्थव्यवस्थेत तिपटीने वाढ होत तब्बल ५४ लाख कोटींवर पोहोचली आहे. आता २०२९ पर्यंत ‘ट्रिलियन डॉलर’ अर्थव्यवस्थेचे लक्ष्य डोळ्यासमेर ठेवून मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकार काम करत आहे. सर्वाधिक विदेशी गुंतवणूक आज महाराष्ट्रात होत आहे याचे स्मरण राज ठाकरे यांना करून देत, बन यांनी राज्याच्या या विकास यात्रेमध्ये राज ठाकरे यांचेही स्वागत आहे असा टोला लगावला.राज्यातील मेट्रो आणि इतर पायाभूत सुविधाविकासाचा फायदा सर्वांनाच होत असतो. पायाभूत सुविधा कोणत्याही एका भाषिक गटासाठी नसतात, तर सर्व नागरिकांसाठी असतात याचा विसर राज ठाकरे यांना पडला आहे म्हणूनच यामध्येही भाषिक मुद्दा आणून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे अशी टीका बन यांनी केली. राज यांनी आधी कोस्टल रोड आणि पुणे मेट्रोवर टीका केली होती, पण प्रत्यक्षात पुणे मेट्रोला मोठा प्रतिसाद मिळत असून ती भरगच्च धावते आहे. त्याचप्रमाणे कोस्टल रोडमुळे मुंबईत प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचला आहे. बिनबुडाची टीका न करता वास्तव पाहण्याची गरज असून राज ठाकरे यांनी स्वतः मेट्रोने प्रवास करून जनतेचा अनुभव समजून घ्यावा, अशी खोचक विनंती ही त्यांनी केली.बन यांनी सांगितले की, खरात प्रकरणाची पाळेमुळे उखडून काढण्यासाठी मुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलीस गृहखात्याने जी मोहीम राबवली त्याबद्दल संजय राऊतांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले. राऊतांना हे उशिराने का होईना सुचलेले शहाणपण आहे. गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर राऊतांच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडल्याचे दिसत आहे, म्हणूनच राऊतांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे कौतुक केले असावे असा टोमणा बन यांनी लगावला. खरात फाईल्स असो अथवा पाटकर फाईल्स असोत, कोणाचे कितीही राजकीय लागेबांधे असले तरी दोषींवर कठोर कारवाई मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात केली जाईल असेही त्यांनी नमूद केले.
मराठी सिनेसृष्टीला 'बाईपण भारी देवा' आणि 'अगंबाई...अरेच्चा!' सारखे ब्लॉकबस्टर चित्रपट देणारे दिग्गज दिग्दर्शक केदार शिंदे पुन्हा एकदा एका अनोख्या विषयावर 'प्रहार' करायला सज्ज झाले आहेत. नेहमीच स्त्रीप्रधान आणि कौटुंबिक विषयांना आपल्या खास शैलीत मांडणाऱ्या केदार शिंदेंनी त्यांच्या आगामी चित्रपटाचे शीर्षक जाहीर केले असून, संपूर्ण महाराष्ट्रात या नावाची चर्चा रंगली आहे. ‘आई भाड्याने हवी?’ असे या चित्रपटाचे नाव असून, यातील ‘भाड्याने’ या शब्दाने प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्न आणि उत्सुकता निर्माण केली आहे. नात्यांमधील ओलावा आणि सामाजिक विषयांची उत्तम सांगड घालणारे शिंदे यावेळी पडद्यावर नक्की काय नवीन मांडणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागलं आहे.https://prahaar.in/2026/03/20/tumbadchi-manjula-will-soon-be-coming-to-meet-the-audience/सनफ्लॉवर स्टुडिओ निर्मित या चित्रपटाची कथा आणि लेखन वैशाली शशी नाही आणि ओंकार वसुंधरा दत्त यांनी केलं आहे, तर या चित्रपटाचं छायांकन आणि संकलनाची जबाबदारी मयूर संजीवनी हरदास यांनी सांभाळली आहे. विशेष म्हणजे, ‘अगं अगं सुनबाई! काय म्हणताय सासूबाई?’नंतर निर्माती सना शिंदे, दिग्दर्शक केदार शिंदे, लेखिका वैशाली शशी नाईक आणि लेखक ओंकार वसुंधरा दत्त ही यशस्वी टीम पुन्हा एकदा एकत्र येत असल्याने चित्रपटाकडून अपेक्षा आणखी वाढल्या आहेत.'आई भाड्याने हवी?' मधून उलगडणार नात्यांमधील भावनिक गुंताकेदार शिंदे यांच्या मते, जोपर्यंत कथा काळजाला भिडत नाही, तोपर्यंत ती पडद्यावर आणण्यात अर्थ नाही. या चित्रपटात प्रेक्षकांना प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्या चित्रपटांची झलक अनुभवायला मिळेल. म्हणजेच, पोट धरून हसवतानाच हा चित्रपट प्रेक्षकांच्या डोळ्यांत पाणी आणेल आणि एक अत्यंत प्रभावी सामाजिक संदेश देऊन जाईल. ‘आई’ या नात्यातील मायेचा ओलावा आणि सध्याच्या पिढीतील या नात्याची उणीव यावर हा चित्रपट भाष्य करेल. चित्रपटाची निर्माती सना शिंदे हिने या चित्रपटाबद्दल मोठी माहिती दिली आहे. हा एक 'मल्टीस्टारर' चित्रपट असून, यात मनोरंजनासोबतच भावना आणि विनोदाचा त्रिवेणी संगम पाहायला मिळेल. आधुनिक जीवनशैलीत माणसांमधील संवाद हरवत चालला आहे आणि अशा परिस्थितीत एका 'आई'ची गरज कशी भासते, हे या वेगळ्या शीर्षकातून अधोरेखित करण्यात आलं आहे. सध्या या बिग बजेट चित्रपटासाठी कलाकारांची निवड प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, विविध वयोगटातील 'आई'च्या भूमिकांसाठी मोठे चेहरे पाहायला मिळण्याची शक्यता आहे. चित्रपटाच्या चित्रीकरणाला येत्या जून-जुलै महिन्यापासून सुरुवात होणार आहे. 'बाईपण भारी देवा'च्या ऐतिहासिक यशानंतर केदार शिंदे पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर नवे रेकॉर्ड रचणार का? याकडे संपूर्ण सिनेसृष्टीचे डोळे लागले आहेत.
Pune News : रमजान ईदनिमित्त पुण्यातील ‘या’चौकातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल
रमजान ईदनिमित्त शनिवारी (२१ मार्च) लष्कर भागातील ईदगाह मैदान येथे सामुहिक नमाज पठण करण्यात येणार आहे.
Glenn Phillips Flying Aircraft : फिलिप्सने ऑकलंडच्या आकाशात स्वतः विमान उडवल्याचा एक थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्याच्या अष्टपैलू प्रतिभेने चाहते थक्क झाले आहेत.
Mumbai Press Club : ‘मुंबई प्रेस क्लब’ला बॉम्बची धमकी; ई-मेलमुळे मोठी खळबळ, पोलिस यंत्रणा सतर्क
मुंबईतील 'मुंबई प्रेस क्लब'ला बॉम्बस्फोटाची धमकी देणारा ईमेल प्राप्त झाल्याने खळबळ उडाली आहे.
ऊर्जा क्षेत्रात गुंतवणुकीसाठी पंतप्रधान मोदींचे जागतिक गुंतवणूकदारांना आमंत्रण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक गुंतवणूकदारांना भारताच्या ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी भारतात उत्पादन, गुंतवणूक, नवकल्पना आणि ऊर्जा क्षेत्राचा व्यापक विस्तार करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन करत, “विकासासाठी विद्युतीकरण आणि शाश्वततेसाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक आहेत,” असे नमूद केले.इंडियन इलेक्ट्रिसिटी समिट २०२६ मध्ये गुरुवारी केंद्रीय ऊर्जा सचिव पंकज अग्रवाल यांनी वाचून दाखवलेल्या लिखित संदेशात पंतप्रधानांनी सांगितले की, भारत आपल्या ऊर्जा प्रवासातील निर्णायक टप्प्यावर उभा आहे. जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक म्हणून भारत ऊर्जा क्षेत्रात मोठ्या बदलांच्या दिशेने वाटचाल करत आहे. या शिखर परिषदेचे उद्दिष्ट संपूर्ण ऊर्जा परिसंस्थेला एका मंचावर आणून विचारांची देवाणघेवाण करणे आणि ऊर्जा विकासासाठी सामूहिक मार्ग निश्चित करणे आहे. पंतप्रधानांनी सांगितले की, देशात पायाभूत सुविधा मजबूत केल्या जात असून सर्वांसाठी विश्वासार्ह ऊर्जा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे.नवीकरणीय ऊर्जेच्या क्षेत्रात भारताने मोठी प्रगती केली असून २०३० पर्यंत ५०० गीगावॅट क्षमतेचे उद्दिष्ट ठेवले आहे. यापैकी ५० टक्क्यांहून अधिक गैर-जीवाश्म इंधन क्षमता आधीच साध्य करण्यात आली आहे.“एक सूर्य, एक जग, एक ग्रिड” यांसारख्या उपक्रमांद्वारे जागतिक सहकार्याचा दृष्टिकोन स्पष्ट होत असल्याचे त्यांनी सांगितले. भारत मजबूत पुरवठा साखळी निर्माण करत विश्वासार्ह ऊर्जा भागीदार म्हणून उदयास येत आहे. बॅटरी उत्पादन, रोजगारनिर्मिती आणि सुधारित धोरणांमुळे गुंतवणुकीला चालना मिळत आहे.तसेच, ‘शांती अधिनियम २०२५’मुळे अणुऊर्जा क्षेत्रात नवीन संधी निर्माण होत असून ‘पीएम सूर्य घर मोफत वीज योजना’मुळे वितरित ऊर्जा उत्पादन आणि शाश्वत वापराला प्रोत्साहन मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
Maharashtra Kesari 2026 : नेक मल्लांनी १०-० आणि ११-० अशा एकतर्फी गुणफरकाने विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली आहे, तर काही ठिकाणी दुखापतीमुळे मल्लांना माघार घ्यावी लागली.
पश्चिम आशियातील तणावाचा मानवी परिणाम समोर आला असून होर्मुझच्या सामुद्रधुनीत अडकलेल्या ‘अवाना’ जहाजाचे कॅप्टन राकेश रंजन सिंह (Rakesh Ranjan Singh) यांचे निधन झाले आहे. २८ फेब्रुवारीपासून जहाज समुद्रात अडकले होते आणि तब्बल १८ दिवस तेथेच थांबावे लागले.मूळचे बिहारमधील नालंदा जिल्ह्यातील रहिवासी असलेले सिंह यांचे कुटुंब सध्या रांची येथे राहते. त्यांच्या निधनाची बातमी समजताच कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे.माहितीनुसार, १८ मार्च रोजी त्यांची प्रकृती अचानक बिघडली. जहाजावरील अधिकाऱ्यांनी दुबई एटीसीकडे एअर अॅम्ब्युलन्सची मागणी केली, मात्र युद्धजन्य परिस्थितीमुळे परवानगी मिळू शकली नाही. त्यानंतर बोटीने किनाऱ्यावर आणण्याचा प्रयत्न झाला, पण तोपर्यंत उशीर झाला होता. अखेरीस हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.‘अवाना’ जहाजावर कॅप्टन सिंह यांच्यासह सुमारे ३५ कर्मचारी अडकले होते. या काळात त्यांना आवश्यक वैद्यकीय सुविधा मिळू शकल्या नाहीत, ज्यामुळे ही दुर्दैवी घटना घडल्याचे बोलले जात आहे.
उपराष्ट्रपतींच्या उपस्थितीत रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचा पहिला दीक्षांत सोहळा
मुंबई : रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचा पहिला दीक्षांत सोहळा शनिवार, २१ मार्च २०२६ रोजी दुपारी २ वाजता लोकभवन येथील ऐतिहासिक दरबार हॉल येथे होणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्यास भारताचे उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कौशल्याधारित शिक्षणाला चालना देणाऱ्या या विद्यापीठाचा हा पहिलाच दीक्षांत समारंभ आहे. या समारंभाला राज्यपाल जिष्णु देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार असतील, अशी माहिती राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. शनिवारी होत असलेला दीक्षांत सोहळा म्हणजे राज्यातील कौशल्य विकास क्षेत्रातील एक नवा टप्पा असल्याचे लोढा म्हणाले.पंतप्रधान मोदींनी देशातल्या तरुण पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी कौशल्य विकासावर विशेष भर दिला आहे. मोदी यांच्या नेतृत्वात देश महासत्तेच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. कौशल्याधारित शिक्षण आणि प्रशिक्षण या वाटचालीत महत्वाचे योगदान देणार आहे. तसेच मुख्यमंत्र्यांच्या रूपात राज्याला दूरदृष्टीचे नेतृत्व लाभले असून त्यांच्या मार्गदर्शनात राज्यातील कौशल्य विभाग तरुणांसाठी विविध रोजगाराभिमुख उपक्रम राबवत आहे. रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ हे उद्योगाभिमुख शिक्षण देणारे अग्रगण्य संस्थान म्हणून ओळखले जाते. या विद्यापीठात विविध अत्याधुनिक विषयांवरील अभ्यासक्रम राबवले जात असून विद्यार्थ्यांच्या करिअरला नवी दिशा मिळत आहे, असे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले.रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाची जुलै २०२२ मध्ये स्थापना झाली आहे. उच्च दर्जाचे कौशल्यपूर्ण आणि रोजगारक्षम तरुण घडवण्यासाठी, रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी हे विद्यापीठ कार्यरत आहे. स्टार्टअप्स, इनक्युबेशन, रोजगारक्षमता, प्रशिक्षण, समुपदेशन या विशेष बाबींवर विद्यापीठाने लक्ष केंद्रित केले आहे. लवकरच पनवेल येथे विद्यापीठाची भव्य इमारत उभी राहत असून विद्यापीठाची नवी मुंबई, ठाणे, पुणे आणि नागपूर येथे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या आवारात आणि खासगी आस्थापनेत केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. या केंद्रात खालील अभ्यासक्रम शिकविले जातात.* स्कूल ऑफ सायन्स इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी कौशल्य* व्यवस्थापन आणि वाणिज्य कौशल्य शाळा* डिझाईन आणि सर्जनशील कौशल्ये विद्यालय* अल्प कालावधीचे कौशल्य प्रमाणपत्रे* आंतरराष्ट्रीय नोकऱ्या आणि त्यासंदर्भातील कौशल्यया सगळ्या अभ्यासक्रमांना उद्योगांची जोड देण्यात आली आहे. यात विद्यापीठाची पार्टनरशिप ही पर्सिस्टन्ट सिस्टिम, किर्लोस्कर ग्रुप, मायक्रोसॉफ्ट इत्यादी कंपन्यांशी केलेली आहे. अत्याधुनिक कौशल्याधारित 'बॅचलर ऑफ डीझाईन' हा अभ्यासक्रम 'रुबिक फ्रांस' या युरोपातील प्रख्यात संस्थेसोबत करार करुन चालविण्यात आला आहे. याचप्रमाणे विद्यापीठात आरोग्य सेवेतील वैद्यकीय सहाय्यक कौशल्य अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहेत.रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्याच्या निमित्ताने राज्यभरात आयटीआयसाठी सहकार्य करणाऱ्या संस्थांच्या उपक्रमाचे प्रदर्शन याठिकाणी होणार आहे. भारतीय विज्ञान आणि तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी जयंत सहस्रबुद्धे यांनी जीवन समर्पित केले. लेखक आणि विज्ञान प्रसारक म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांचे कार्य स्वदेशी विज्ञान आणि राष्ट्र उभारणीसाठी तरुणांना प्रेरित करण्यावर केंद्रीत होते, ज्यात भारतीय शास्त्रज्ञांचे योगदान आणि पारंपरिक ज्ञानाचा समावेश होता. अशा महान विभुती जयंतराव सहस्रबुद्धे यांचे नाव या प्रदर्शनाला देण्यात आल्याची माहिती मंत्री लोढा यांनी यावेळी दिली. तसेच विभागाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप्स योजनेतील लाभार्थी युवतींच्या यशाचे प्रतिबिंब या सोहळ्यात उमटणार असून त्यांच्या उपक्रमांचाही या प्रदर्शनात समावेश असणार आहे. विद्यापीठाच्या उल्लेखनीय कौशल्य उपक्रमांसह उद्योगक्षेत्रात आघाडीच्या कंपन्यांचे मिळून एकूण बारा स्टॉल्स या ठिकाणी लागणार आहेत. यात टोयोटा किर्लोस्कर , ऍटलास, हिंदुस्थान एरोनॉटिक्स, दासयू एव्हिएशन तसेच प्रसिद्ध फिल्म निर्माते रॉनी स्क्रूवाला यांच्या स्वदेश फॉऊंडेशनचा ही यात समावेश असणार आहे. त्याचबरोबर अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांच्या रूरल डेव्हलपमेंट ट्रस्टचाही यात समावेश असणार आहे. विद्यार्थ्यांच्या कौशल्य कक्षा वाढवण्यासाठी या प्रदर्शनाचा लाभ होणार असल्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी यावेळी सांगितले.त्याचबरोबर विद्यापीठात उद्योगस्नेही अशा विविध विषयांतर्गत पदविका, पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाची आखणी केलेली आहे. यासाठी प्रयोग शाळाही उभारण्यात आल्या आहेत. तसेच रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ द्वारा कोड विदाउट बॅरियर उपक्रमांतर्गत “मायक्रोसॉफ्ट इंडिया ” च्या सहकार्याने राज्यातील दहा हजार महिला शिक्षक आणि विद्यार्थिनींना “एआय कौशल्य” प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. या उपक्रमांतर्गत राज्यातील महिलांना जनरेटिव्ह एआय कौशल्ये प्रदान करून, उच्च शिक्षणातील शिक्षक, उच्च शिक्षणातील महिला विद्यार्थी आणि महिला उद्योजकांवर लक्ष केंद्रित करून त्यांना सक्षम करण्यासाठी हा कार्यक्रम उपक्रमात संरेखित केलेला होता. या दीक्षांत सोहळ्यात विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यासोबतच मान्यवरांच्या हस्ते आदिवासी, ग्रामीण भागातील उत्कृष्ट औद्योगिक संस्थांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. याप्रसंगी रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्यविद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्व पालकर आणि व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाचे प्रभारी संचालक श्री. सतीश सूर्यवंशी यांनी दीक्षांत कार्यक्रमाची रूपरेषा आणि विविध उपक्रमाची माहिती यावेळी दिली. विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा हा केवळ विद्यार्थ्यांच्या यशाचा सन्मान नसून, आधुनिक तंत्रज्ञान आणि जागतिक दर्जाच्या कौशल्यांच्या बळावर आपल्या युवकांना देश-विदेशात रोजगार आणि स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचा हा एक महत्त्वाचा टप्पा आहे, असे ही कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.
सातारा जिल्हा परिषदेवर पहिल्यांदाच भाजपचा झेंडा
सातारा : राज्याच्या स्थापनेनंतर प्रथमच सातारा जिल्हा परिषदेत भारतीय जनता पक्षाने सत्ता स्थापनेत यश मिळवले आहे. विशेष म्हणजे, राज्यभरात दिसून आलेला भाजपचा करिश्मा आता सातारा जिल्ह्यातही स्पष्टपणे पाहायला मिळाला आहे. या निवडणुकीत भाजपचे संख्याबळ केवळ २८ सदस्यांपर्यंत मर्यादित असताना, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे यांच्या नेतृत्नात स्थानिक भाजपने केलेल्या प्रयत्नांना उल्लेखनीय यश मिळाले आणि भाजपच्या पाठिंब्यात वाढ झाली. जिल्हा परिषदेत ३३ सदस्यांचा पाठिंबा मिळवत भाजपने सत्ता मिळवली. विरोधकांना ३० मते मिळाली.निर्णायक बहुमताच्या जोरावर भाजपच्या प्रिया शिंदे यांची सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसेच उपाध्यक्षपदी राजू भोसले यांना संधी मिळाली आहे. या विजयामुळे केवळ सत्ता परिवर्तन झाले नाही, तर साताऱ्यासारख्या पारंपरिक राजकीय बालेकिल्ल्यात भाजपाने आपली मजबूत पकड निर्माण केली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कॅबिनेट मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली घडलेली ही राजकीय खेळी सातारा जिल्ह्यासह राज्याच्या राजकारणात महत्त्वपूर्ण ठरली आहे. स्थानिक पातळीवरील सूक्ष्म नियोजन, प्रभावी संवाद आणि संघटन कौशल्य यामुळे भाजपला हा ऐतिहासिक विजय मिळवता आला. सातारा जिल्हा परिषदेत पहिल्यांदाच भाजपचा झेंडा फडकला असून, यामुळे आगामी काळात जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. तसेच, या निकालामुळे राज्यातील राजकीय समीकरणांवरही दूरगामी परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Bijapur students : विजापूरच्या वसतिगृहातील तीन विद्यार्थिनी गरोदर? छत्तीसगड विधानसभेत गदारोळ
शिक्षणमंत्र्यांनी सभागृहाला माहिती दिली की, त्या विद्यार्थीनींपैकी दोघी पोर्टा केबिन सुविधेचे रहिवासी नव्हत्या; तर तिसरी विद्यार्थीनी दिवाळीच्या सुट्ट्यांसाठी घरी गेली होती.
Ashok Kharat Case : अशोक खरात अतिशय घाणेरडा, रुपाली चाकणकर वादावर प्रफुल पटेल यांचं मोठं विधान
Ashok Kharat Case : रुपाली चाकणकर यांच्यासोबतचे खरातचे फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांच्यावर टीका वाढली आहे. त्यांच्या राजीनाम्याची मागणीही जोर धरत आहे. या संदर्भात प्रश्न विचारला असता सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ केली.
Rahul Gandhi : राहुल गांधींचं नागरिकत्व रद्द होणार? न्यायालयाने स्पष्टच सांगितलं…
Rahul Gandhi : राहुल गांधी हे ब्रिटिश नागरिकही आहेत, हे दर्शवणारी कागदपत्रे आणि युके सरकारकडून आलेले काही गोपनीय ईमेल्स आपल्याकडे आहेत.
'तारक मेहता...'मधून मराठी संस्कृतीचा गौरव
मुंबई : गेल्या काही वर्षांत, असित कुमार मोदी यांची मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (TMKOC) ही केवळ एक 'सिटकॉम' (विनोदी मालिका) न राहता त्यापलीकडे बहरली आहे. गोकुळधाम सोसायटीच्या उत्साही रहिवाशांच्या माध्यमातून भारताची विविधता प्रतिबिंबित करणारी ही मालिका आता एक सांस्कृतिक घटनाच बनली आहे. या मालिकेतील कथांमधून उजळून निघणाऱ्या अनेक समुदायांपैकी, मराठी संस्कृती ठळकपणे उठून दिसते; जिचे प्रतिनिधित्व केवळ पात्रांद्वारेच नव्हे, तर त्यांच्या मूल्यांद्वारे, भाषेद्वारे आणि आपुलकीद्वारेही केले जाते.या प्रतिनिधित्वाला खऱ्या अर्थाने विशेष बनवणारी गोष्ट म्हणजे त्याची सातत्यता. १७ हून अधिक वर्षांपासून, 'TMKOC' ने आपल्या मराठी पात्रांची सांस्कृतिक जडणघडण आणि त्यांच्या वर्तणुकीतील बारकावे अत्यंत प्रामाणिकपणे आणि प्रेमाने जपले आहेत. ही मूल्ये केवळ संहितेत लिहिलेली नाहीत, तर पात्रांच्या दैनंदिन निवडी, चालीरीती आणि नातेसंबंधांतून ती प्रत्यक्ष जगली जातात. या मालिकेचा साधेपणा आणि मनमोहक कथाकथन शैली, पिढ्यानपिढ्या आणि विविध भौगोलिक प्रदेशांतील प्रेक्षकांच्या मनाला आजही खोलवर भिडत आहे.'एकमेव सेक्रेटरी' म्हणून प्रेमाने ओळखल्या जाणाऱ्या भिडे यांच्या पात्राद्वारे, ही मालिका अस्सल महाराष्ट्रीय संस्कृतीला—म्हणजेच शिस्त, शिक्षण, कौटुंबिक मूल्ये आणि भाषेचा अभिमान—आदरांजली अर्पण करते. पेशाने शिक्षक असलेले आणि सुव्यवस्था व परंपरांवर ठाम विश्वास असणारे भिडे, अनेकदा जेठालालच्या निवांत आणि बेफिक्री स्वभावाच्या अगदी विरुद्ध भासतात; परंतु त्यांच्या विनोदी तक्रारींच्या मागे एक अत्यंत तत्त्वनिष्ठ आणि समाजभान असलेला व्यक्ती दडलेला असतो.या मालिकेचे निर्माते आणि संकल्पक असित कुमार मोदी यांनी यावर सांगितले, सुरुवातीपासूनच, 'तारक मेहता का उल्टा चष्मा'बाबतची माझी दृष्टी अशी होती की, एक अशी मालिका निर्माण करावी जी भारताचा खरा आत्मा प्रतिबिंबित करेल. एक अशी मालिका, जिथे प्रत्येक संस्कृतीला, भाषेला आणि परंपरेला दैनंदिन विनोदाच्या माध्यमातून आदर आणि प्रतिनिधित्व मिळेल. भिडे यांच्यासारख्या पात्रांद्वारे मराठी संस्कृतीचे चित्रण करणे हे केवळ मनोरंजनापुरते मर्यादित नाही. तर ते शिस्त, शिक्षण आणि सामाजिक बांधिलकी यांसारख्या मूल्यांचा गौरव करण्याविषयी आहे—जी मूल्ये आपल्या समाजाचा भक्कम आधारस्तंभ आहेत. माझा असा विश्वास आहे की, जेव्हा लोकांना त्यांचे स्वतःचे जीवन, चालीरीती आणि भाषा पडद्यावर सन्मानाने चित्रित झालेली दिसते, तेव्हा त्यांच्या मनात एक शक्तिशाली भावनिक नाते निर्माण होते. हेच आमच्या कथाकथनाचे खरे यश आहे.मराठी संस्कृती या मालिकेत केवळ उपस्थितच नाही, तर ती मालिकेच्या अगदी गाभ्याशी, तिच्या प्रत्येक धाग्याशी अत्यंत सहजपणे आणि एकजीव होऊन विणली गेली आहे. मग ती भिडे यांची मराठीतील आवेशपूर्ण भाषणे असोत, गणेश चतुर्थीचा त्यांचा भक्तीपूर्ण उत्सव असो, किंवा माधवीने घरी बनवलेल्या पोहे, कोथिंबीर वडी आणि कांदा भजींची ती दिलासा देणारी दृश्ये असोत—हा कार्यक्रम हे सर्व सांस्कृतिक तपशील कोणत्याही साचेबद्धपणाचा किंवा केवळ दिखाऊपणाचा आधार न घेता, अत्यंत सहजपणे आणि आदराने आपल्या कथानकात गुंफतो.या शोमधील गुढीपाडव्याचा, म्हणजेच मराठी नववर्षाचा, भव्य सोहळा हे या अस्सलतेचे आणखी एक उदाहरण आहे. भिडे यांच्या बाल्कनीबाहेरच्या सुंदर सजवलेल्या गुढीच्या दृश्यापासून ते पारंपरिक फणसाच्या पाककृतींमधून बनवलेल्या सणासुदीच्या पदार्थांच्या सुगंधापर्यंत, हे क्षण महाराष्ट्रीयन घराण्यांमधील आनंद, श्रद्धा आणि पाककलेचा वारसा टिपतात. ही दृश्ये केवळ एका सणाचाच नव्हे, तर गुढीपाडव्याचे प्रतीक असलेल्या नव्या सुरुवातीच्या आणि कृतज्ञतेच्या भावनेचा उत्सव साजरा करतात.सर्वात हृदयस्पर्शी क्षणांपैकी एक म्हणजे गोकुळधाम सोसायटीचा गणेशोत्सव. येथे, विधी, भक्तीगीते, सामुदायिक जिव्हाळा आणि पर्यावरणपूरक विसर्जनाबद्दलची चिंता या गोष्टी केवळ एक सणासुदीची पार्श्वभूमी म्हणून नव्हे, तर एक अर्थपूर्ण सांस्कृतिक अनुभव म्हणून अधोरेखित केल्या जातात. भिडे यांनी अत्यंत प्रामाणिकपणे सादर केलेले हे भाग, महाराष्ट्रीयन परंपरांना परिभाषित करणाऱ्या स्नेह आणि श्रद्धेची खरी झलक देतात.कोणत्याही एका दृश्यापलीकडे किंवा पात्रापलीकडे जाऊन, हा शो समाजाच्या व्यापक सांस्कृतिक विविधतेशी सुसंगतपणे साधेपणा, शिक्षण, परस्पर आदर आणि नागरिक जबाबदारी यांसारखी महाराष्ट्रीयन मूल्ये सातत्याने चित्रित करतो. विनोद आणि माणुसकीच्या माध्यमातून, हा शो प्रादेशिक मतभेद दूर करतो आणि एका सामायिक भावनिक भाषेवर जोर देतो.'तारक मेहता का उल्टा चश्मा' आपला वारसा पुढे नेत असताना, मराठी संस्कृतीचे त्याचे चित्रण अस्सलपणा आणि सर्वसमावेशकतेचा एक उत्कृष्ट नमुना ठरते. टाळ्या मिळवण्यासाठी संस्कृतीला प्रकाशात आणण्याचा त्याचा उद्देश नाही; उलट, तो वास्तविक जीवनाचे प्रतिबिंब दाखवणाऱ्या कथांमधून तिला नैसर्गिकरित्या श्वास घेऊ देतो. आणि असे करताना, तो आपल्याला आठवण करून देतो की गोकुळधामच्या प्रत्येक कोपऱ्यात, भारत आपल्या सर्व भाषा, रीतिरिवाज, वैशिष्ट्ये आणि आपुलकीसह वसलेला आहे.
‘दहशतवादाचा नकाशा बदलला’; जागतिक दहशतवाद निर्देशांकात पाकिस्तान जगात अव्वल
- जीटीआय अहवालातून समोर आले धक्कादायक आकडेजागतिक दहशतवादाच्या चित्रात मोठा बदल होत असून पाकिस्तान आता जगातील सर्वाधिक दहशतवादग्रस्त देश ठरला आहे. इन्स्टिट्यूड फॉर इकोनॉमिक्स अँड पीस (Institute for Economics and Peace) च्या ग्लोबल टेररिझम इंडेक्स (GTI) २०२६ अहवालानुसार, यापूर्वी अव्वल असलेला पश्चिम आफ्रिकेतील बुर्किना फासो हा देश दुसऱ्या क्रमांकावर घसरला असून नायजर तिसऱ्या स्थानावर आहे.अहवालानुसार, २०२५ मध्ये पाकिस्तानमध्ये तब्बल १,०४५ दहशतवादी घटना घडल्या. या हल्ल्यांमध्ये १,१३९ जणांचा मृत्यू झाला, तर १,५९५ जण जखमी झाले. हा गेल्या दशकातील सर्वात गंभीर आकडा मानला जातो.तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (Tehrik-i-Taliban Pakistan) (TTP) या संघटनेच्या हल्ल्यांमध्ये मोठी वाढ झाली असून २०२५ मध्ये घटनांमध्ये २४ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. अफगाणिस्तानातील तळांचा वापर करून या संघटनेने सातत्याने हल्ले केल्याचे अहवालात नमूद आहे.तसेच बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (Balochistan Liberation Army) च्या कारवायाही वाढल्या आहेत. क्वेटा जवळ ‘जाफर एक्सप्रेस’चे अपहरण ही त्यातील ठळक घटना ठरली, ज्यात शेकडो प्रवाशांना ओलीस ठेवण्यात आले.दरम्यान, भारत ६.४२८ गुणांसह जागतिक स्तरावर १३व्या क्रमांकावर असून २०२५ मध्ये दहशतवादी घटनांमध्ये ४३ टक्क्यांची घट नोंदवत परिस्थितीत सुधारणा दिसून आली आहे.
गिरगावच्या शोभायात्रेत स्वॅग दाखवणं व्हायरल गर्लला पडलं महागात; पोलिसांसह नागरिकही संतापले
गिरगावच्या शोभायात्रेत स्वॅग दाखवणं व्हायरल गर्लला पडलं महागात; पोलिसांसह नागरिकही संतापलेमुंबईतील गिरगावसह अनेक ठिकाणी गुढीपाडव्याच्या दिवशी शोभायात्रा निघतात. तसेच, मुंबईतील गिरगावची शोभायात्रा ही प्रसिद्ध असून ही शोभायात्रा पाहण्यासाठी फार लांबून नागरिक गिरगाव येथे येत असतात.गिरगावची शोभायात्रा म्हणजे मुंबईची शान आहे. मात्र, यंदा या मिरवणुकीत कावासाकी निन्जा H2 सारख्या हायपर स्पोर्ट्स बाईकचा त्रासदायक आवाज घुमला. या बाइकला रेस करत असताना गौरी या तरुणीला महिला पोलिसांनी बजावलं आणि तिथे वाद झाला. प्रसिद्ध इन्फ्लुएन्सर गौरी मोरे आपल्या महागड्या बाईकला गर्दीत रेस' देत असतानाच एका महिला पोलीसाने तिला कडक शब्दांत बजावलं.बाइक रेस करताना पाहून पोलिसांचा संताप :मिरवणुकीसाठी गिरगावमध्ये मोठ्या संख्येने लोकांची गर्दी उसळलेली असते. अशा संवेदनशील ठिकाणी गौरी मोरे आपल्या स्पोर्ट्स बाईकचा एक्सलेटर जोरात फिरवून सायलेन्सरचा मोठा आवाज काढत होती. त्यामुळे हा गोंधळ पाहून तिथे तैनात असलेल्या महिला पोलीस अधिकारी धावत आल्या. त्यांनी थेट गाडीसमोर उभं राहून, अशा प्रकारे बाईक रेस करणं लोकांच्या जिवावर बेतू शकतं, असं सांगत त्यांनी गौरीला आणि तिथल्या तरुणांना चांगलच बजावलं.तसेच, या महागड्या बाईकला 'नंबर प्लेट' नसल्याचा मुद्दाही पोलिसांनी यावेळी उपस्थित केला. पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेताच तिथल्या काही स्थानिक नागरिकांनीही संताप व्यक्त करत त्यांची चावी काढून घेण्याची मागणी केली.परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं पाहून पोलिसांनी गर्दी मागे हटवली आणि संबंधित बाईकस्वारांना तिथून बाजूला व्हायला भाग पाडलं असून हा
Liver Infection अशाच एका प्रकरणात एका महिलेने पार्लरमध्ये आयब्रो थ्रेडिंग केल्यानंतर तिला हेपेटायटिसचा संसर्ग झाल्याचे आढळले होते. तपासानंतर समजले की वापरलेला धागा आधी संक्रमित व्यक्तीसाठी वापरला गेला होता. त्यामुळे हा संसर्ग झाला.
Pune News : कृतीचे परिणाम समजण्याचा समज असतानाही तिने वारंवार शारीरिक संबंध ठेवले आहेत. यावरून दोघातील संबंध संमतीने झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचे नमुद करत आरोपीच्या अटकेला रोखले.
Bengal elections : ऐन निवडणुकीच्या तोंडावर ममता सरकारने वाढवला पोलीसांचा बोनस
पात्र कर्मचाऱ्यांच्या श्रेणींमध्ये समानता सुनिश्चित करणे आणि त्यांच्या योगदानाला मान्यता देणे, हा या निर्णयाचा उद्देश आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.
Saleh MohammadI: इराणमध्ये जागतिक कुस्तीपटूसह ३ तरुणांना फाशीची शिक्षा ; सर्वत्र भीतीचे वातावरण
Saleh MohammadI: इराणमधून आलेल्या एका धक्कादायक बातमीने क्रीडा जगताला हादरवून सोडले आहे. १९ वर्षीय कुस्तीपटू सालेह मोहम्मदीच्या फाशीच्या बातमीने जगभरात संताप, भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
Sunil Tatkare : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर अशोक खरात प्रकरणामुळे अडचणीत सापडल्या आहेत. या प्रकरणावर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी भाष्य करणे टाळले आहे.
Nayyi Navelli Movie: ‘धुरंधर २’नंतर यामी गौतमचा नवा धमाका; ‘नई नवेली’ OTT वर घालणार धुमाकूळ!
Nayyi Navelli Movie ‘नई नवेली’ हा चित्रपट प्रसिद्ध निर्माते आनंद एल राय यांच्या बॅनरखाली तयार होत आहे, तर दिग्दर्शनाची जबाबदारी बालाजी मोहन यांनी सांभाळली आहे. या चित्रपटात भारतीय पौराणिक कथांचा हलक्याफुलक्या कॉमेडी शैलीत समावेश करण्यात येणार आहे, जे प्रेक्षकांसाठी एक वेगळा अनुभव ठरेल.
भारती सिंहच्या काजूला पाहिलं का?
- तीन महिन्यानंतर भारतीनं दाखवला दुसऱ्या मुलाचा चेहराप्रसिद्ध कॉमेडी क्विन भारती सिंह हिने नुकताच तिच्या दुसऱ्या बाळाला जन्म दिला असून भारतीचा दुसरा मुलगा काजू अर्थात यशवीरचा चेहरा पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक होते. मात्र, आता भारतीच्या फॅन्सची प्रतीक्षा संपली असून अखेर भारतीने आपला दुसरा मुलगा काजूचा चेहरा चाहत्यांना दाखवला आहे.भारती सिंह आणि हर्ष या कपल्सनं एक फॅमिली युट्यूब चॅनेल सुरू केलं असून या चॅनलच्या माध्यमातून भारती आणि हर्ष आपल्या कुटुंबाशी संबंधित व्हिडीओ पोस्ट करत असतात. यावरच त्यांनी आपल्या दुसऱ्या मुलाचा चेहरा चाहत्यांना दाखवला आहे. View this post on Instagram A post shared by Bharti Siingh (@bharti.laughterqueen)
पुणे-सोलापूर महामार्गावर एसटी बसचा भीषण अपघात, ओव्हरटेकच्या नादात...
पुणे: पुणे-सोलापूर महामार्गावर पाटसजवळ एका भीषण अपघाताने प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला. सोलापूरहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बसला एका सुसाट कंटेनरने ओव्हरटेक करण्याच्या नादात जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, एसटी बस महामार्गाच्या कडेला जाऊन थेट उलटली. मात्र, या भीषण अपघातात नियतीने साथ दिली आणि बसमधील ४४ प्रवासी मृत्यूच्या दाढेतून सुखरूप बाहेर पडले.मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर-पुणे ही एसटी बस आपल्या मार्गाने जात असताना एका भरधाव कंटेनरने चालकाच्या बाजूने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. यावेळी कंटेनरची एसटीला इतकी जोरात धडक बसली की एसटी चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. महामार्गावर सध्या रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली. बसच्या पुढच्या आणि मागच्या भागाचं मोठं नुकसान झालं आहे.अपघात होताच प्रवासी किंचाळले घाबरले. बस पलटी झाल्याचे पाहताच जवळच असलेल्या हॉटेलमधील कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. बसच्या खिडक्यांमधून आणि दरवाजातून प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. सुदैवाने, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. केवळ २ ते ३ प्रवासी किरकोळ जखमी झाले असून, त्यांना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. ४४ जणांचा जीव अगदी थोडक्यात वाचला.पुणे-सोलापूर महामार्गावर अनेक ठिकाणी कामे सुरू आहेत, ज्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. अशातच अवजड वाहनांची ओव्हरटेक करण्याची घाई प्रवाशांच्या जिवावर बेतत आहे. पाटस परिसरात झालेल्या या अपघातामुळे महामार्गावरील वाहतुकीच्या नियोजनाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून कंटेनर चालकावर कारवाईची प्रक्रिया सुरू केली.
डिझेल खरेदीतून वर्षाला २४१ कोटी रुपयांची बचत होणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली माहिती
मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एसटी) आर्थिक स्थिती सक्षम करण्यासाठी पर्यायी उत्पन्न स्रोत निर्माण करण्याबरोबरच खर्च नियंत्रणासाठी ठोस व दूरदृष्टीपूर्ण निर्णय घेतले जात असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. डिझेल खरेदीची निविदा प्रक्रिया कोणताही हस्तक्षेप न सहन करता पारदर्शक पद्धतीने राबविल्यामुळे केवळ डिझेल खरेदीतून दरवर्षी सुमारे २४१ कोटी रुपयांची बचत होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.मंत्री सरनाईक म्हणाले की, सध्या एसटी महामंडळावर सुमारे १२ हजार कोटी रुपयांचा संचित तोटा आहे. चालू आर्थिक वर्षातही फेब्रुवारी २०२६ अखेर सुमारे ७५० कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे. दररोज एसटीच्या उत्पन्नापेक्षा १ ते २ कोटी रुपये अधिक खर्च होत असल्याने केवळ तिकीट विक्रीवर अवलंबून राहणे शक्य नाही. त्यामुळे पर्यायी उत्पन्न स्रोत निर्माण करणे ही काळाची गरज बनली आहे. चालू आर्थिक वर्षात डिझेल बचतीबरोबरच जाहिरातीतून सुमारे २५० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे.... आणि तेल कंपन्यांचे नाक दाबलेडिझेल खरेदी प्रक्रियेविषयी माहिती देताना मंत्री सरनाईक म्हणाले की, यापूर्वी अनेक वर्षे ठराविक सवलतीवर डिझेल खरेदी केली जात होती. मात्र स्पर्धात्मक निविदा प्रक्रियेद्वारे अधिक सवलत मिळवण्याच्या उद्देशाने ही प्रक्रिया राबविण्यात आली. ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक, नियमबद्ध आणि निष्पक्ष पद्धतीने पार पडली असून कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप सहन केला जाणार नाही, अशी आमची ठाम भूमिका होती.काही कंपन्यांनी माध्यमांद्वारे चुकीची माहिती पसरवून निविदा प्रक्रियेवर परिणाम करण्याचा प्रयत्न केला; मात्र असे प्रयत्न हाणून पाडण्यात आले. एका कंपनीने न्यायालयात धाव घेतली होती; मात्र न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास नकार दिल्याने निविदा प्रक्रिया योग्य असल्याची पुष्टी मिळाली, असेही त्यांनी नमूद केले.सध्या एसटीला दररोज सुमारे १०.८७ लाख लिटर डिझेलची आवश्यकता असून वर्षाकाठी सुमारे ४० कोटी लिटर डिझेल खरेदी केली जाते. यासाठी दरवर्षी सुमारे ३,४०० कोटी रुपये खर्च होतो. भविष्यात ८ हजार नवीन डिझेल बसेस ताफ्यात दाखल झाल्यानंतर हा खर्च सुमारे ४,७०० कोटी रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. यापूर्वी प्रति लिटर सुमारे २.७० रुपयांची सवलत मिळत होती, ती वाढवून ३ रुपये करण्यात आली होती. मात्र स्पर्धात्मक निविदेनंतर प्रति लिटर ५.१३ रुपयांची सवलत मिळाली असून ही सध्याच्या दरापेक्षा २.१३ रुपयांनी अधिक आहे. या निर्णयामुळे एसटी महामंडळाला दरवर्षी सुमारे २४० ते २४१ कोटी रुपयांची बचत अपेक्षित आहे.व्यवसायिक इंधन विक्रीत एसटीचा प्रवेशएसटीच्या महसूलवाढीसाठी इंधन विक्री क्षेत्रातही महामंडळ प्रवेश करत आहे. डिझेल, पेट्रोल, सीएनजी, एलएनजी तसेच भविष्यात इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर १०० ते ११० ठिकाणी मल्टी-मोडल इंधन पंप उभारण्याची प्रक्रिया सुरू आहे. या उपक्रमातून दरवर्षी सुमारे १०० कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. धुळे येथे अशा प्रकारचा प्रकल्प आधीच कार्यान्वित करण्यात आला आहे.प्रत्येक इंधन टाकीला सेन्सर बसविणारइंधन गळती रोखण्यासाठी तसेच इंधन भरण्यातील अनियमितता टाळण्यासाठी एसटीच्या प्रत्येक पंपावर इंधन टाकी व नोझलला कृत्रिम बुद्धिमत्ता (AI Technology) आधारित सेन्सर बसविण्यात येणार असल्याची माहिती मंत्री सरनाईक यांनी दिली. सध्याच्या पारंपरिक पद्धतीमुळे दर १०० लिटरमागे ४ ते ५ लिटर तुट होत असल्याची बाब समोर आल्याने ही उपाययोजना करण्यात येत आहे.जाहिरात उत्पन्नातून २५० कोटी रुपयांचे लक्ष्यजाहिरात महसूल वाढवण्यासाठीही मोठा निर्णय घेण्यात आला आहे. एसटीच्या २५१ आगारांद्वारे आणि ६०० हून अधिक बसस्थानकांद्वारे दररोज ५० ते ५५ लाख प्रवाशांपर्यंत पोहोचणाऱ्या या माध्यमाचा प्रभावी वापर करण्यात येणार आहे. बसेसच्या आतील व बाहेरील भाग, बसस्थानके तसेच परिसरात डिजिटल फलक, उद्घोषणा आदींच्या माध्यमातून जाहिरात करून पुढील ५ वर्षांत सुमारे २५० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. यापूर्वी हे उत्पन्न दरवर्षी केवळ २० ते २२ कोटी रुपये होते.सौरऊर्जा निर्मितीला चालनाऊर्जा बचतीसाठी एसटी महामंडळाने सौर रूफटॉप प्रकल्प हाती घेतला आहे. विविध आगार, बसस्थानके आणि कार्यशाळांच्या छतांवर सौर प्रकल्प उभारून वीज निर्मिती करण्यात येणार आहे. स्थानिक गरज भागवून उर्वरित वीज विक्रीतून दरवर्षी १० ते १५ कोटी रुपयांची बचत व उत्पन्न मिळणार आहे. तसेच एसटीच्या मोकळ्या जागेवर सौर शेतीद्वारे वीज निर्मिती करून ती महावितरण कंपनीला विकण्यात येणार असून त्यातून शाश्वत उत्पन्न निर्माण होईल.असे मंत्री सरनाईक म्हणाले.“एसटीमध्ये आर्थिक शिस्त, पारदर्शकता आणि स्वावलंबन वाढवणे हे आमचे उद्दिष्ट आहे. पर्यायी उत्पन्न स्रोत निर्माण करून एसटीला सक्षम व टिकाऊ बनवण्याचा आमचा निर्धार आहे,” असे मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, पुढील आर्थिक वर्षात स्क्रॅपिंग प्रकल्प, चालक-वाहकांच्या ड्युटीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून अतिकालीन भत्त्यावर नियंत्रण, तसेच इतर उपाययोजना राबवून किमान ५०० कोटी रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
अस्पृश्यता आणि विषमता हा मानवतेविरुद्धचा सर्वात मोठा अपराध
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; चवदार तळे सत्याग्रह शताब्दी वर्षानिमित्त विविध प्रकल्पांचे भूमिपूजनमुंबई : माणसाला मानवतेची जाणीव करून देणारा चवदार तळ्याचा सत्याग्रह हा भारताच्या इतिहासातील एक निर्णायक क्षण होता. ज्या विषमतेने आणि अनिष्ठ प्रथांनी विखंडित समाज निर्माण केला, त्याच व्यवस्थेमुळे देशाला शेकडो वर्षे गुलामगिरी सोसावी लागली. मुळात अस्पृश्यता आणि विषमता हा सर्वात मोठा अपराध असून, भावी पिढीला समतेचे मूल्य आणि विषमतेमुळे झालेले नुकसान या दोन्ही गोष्टी समजणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केले.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २० मार्च १९२७ रोजी महाड येथे केलेल्या ऐतिहासिक सत्याग्रहाला १०० वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने आयोजित शताब्दी सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चवदार तळे जलशुद्धीकरण आणि परिसर सुशोभीकरण प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. या सोहळ्याला केंद्रीय राज्यमंत्री डॉ. रामदास आठवले, सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट, उद्योगमंत्री उदय सामंत, भरत गोगावले, आमदार प्रवीण दरेकर आदी उपस्थित होते.ऐतिहासिक संदर्भांचा दाखला देत मुख्यमंत्री म्हणाले की, ३ एप्रिल १९२७ च्या 'बहिष्कृत भारत'मध्ये बाबासाहेबांनी या आंदोलनाची तुलना फ्रेंच राज्यक्रांतीशी केली होती. ज्याप्रमाणे त्या क्रांतीने जगाचा इतिहास बदलला, त्याचप्रमाणे या सत्याग्रहाने भारताचे भविष्य बदलले. आपण वारंवार गुलाम का झालो, याचा विचार केला तर त्या मुळाशी आपल्या समाजातील जातीभेद आणि अस्पृश्यतेसारख्या कुप्रथा होत्या. असा विखंडित समाज नेहमीच पराभूत होतो. जर या प्रथा नसत्या, तर भारत कधीच गुलाम झाला नसता.सर्वांगीण विकासाचा आराखडा :या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी सरकार चवदार तळ्याच्या जतन आणि संवर्धनासाठी कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. केवळ जलशुद्धीकरणच नव्हे, तर या परिसराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सरकारने विशेष आराखडा तयार केला आहे. ज्या ठिकाणी बाबासाहेबांनी समतेचा मंत्र दिला, त्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी हे सुशोभीकरण केले जात आहे, असे त्यांनी सांगितले.
Balen Shah: नेपाळच्या राजकारणात सध्या मोठी घडामोडी घटना दिसून येत आहेत. नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाने प्रस्थापितांना धक्का देत (आरएसपी) ऐतिहासिक विजय मिळवला आहे.
Droupadi Murmu: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रेमानंद महाराज यांनी राधा केली कुंज आश्रमात सुमारे २७ मिनिटे संभाषण केले. त्यांच्या चर्चेदरम्यान, त्यांनी अध्यात्म, सेवा आणि लोककल्याण यांसारख्या विषयांवर चर्चा केली.
पश्चिम आशियात तणाव वाढला; पंतप्रधान मोदींनी केली आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
- ऊर्जा प्रकल्पांवरील हल्ल्यांचा भारताकडून तीव्र निषेधपश्चिम आशियातील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी कतार, फ्रान्स, जॉर्डन, ओमान आणि मलेशिया या देशांच्या नेत्यांशी महत्त्वपूर्ण चर्चा करत परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली.या संवादांदरम्यान मोदी यांनी ऊर्जा पायाभूत सुविधांवरील हल्ल्यांचा तीव्र निषेध नोंदवला आणि तणाव कमी करण्यासाठी संवाद व राजनैतिक मार्गाचाच अवलंब करण्यावर भर दिला. तसेच, होर्मुझ सामुद्रधुनीत सुरक्षित आणि मुक्त जलवाहतुकीचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.कतारचे अमीर, जॉर्डनचे राजा आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष यांच्याशी बोलताना मोदी यांनी शांतता आणि स्थैर्य पुनर्स्थापित करण्यासाठी सहकार्याची गरज व्यक्त केली.ओमानचे सुलतान आणि मलेशियाचे पंतप्रधान यांच्याशीही त्यांनी संवाद साधत तणाव कमी करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज अधोरेखित केली.या चर्चांमधून भारताने पुन्हा एकदा शांतता, सुरक्षितता आणि जागतिक स्थैर्यासाठी आपली ठाम भूमिका स्पष्ट केली आहे.
टेलिव्हिजन विश्वातील 'ही'प्रसिद्ध अभिनेत्री होणार आई, सोशल मिडियावर फोटो व्हायरल
टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीनं नुकताच आपल्या फॅन्सना गुड न्यूज दिली आहे. नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर, अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीनं आपल्या चाहत्यांसोबत ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीच्या लग्नाला 10 वर्ष झाली असून वयाच्या 41 व्या वर्षी दिव्यांका आई होणार आहे.नुकताच आपल्या इन्सटाग्रामवर काही फोटो शेअर करत दिव्यांकानं ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. या फोटोजमध्ये दिव्याकानं तिच्या नवऱ्यासोबत आपला बेबी बंप फ्लॉन्ट केला आहे. तसेच, या फोटोजमध्ये दिव्यांका आणि तिचा पती अभिनेता विवेक दहिया या दोघांनी पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले असून या कपल्सनं एकमेकांसोबत Twinning केल्याचं पाहायला मिळत आहे.
Praful Patel : रुपाली चाकणकरांवर कारवाई करण्याचे संकेत देणारे मोठं विधान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले आहे.
Dhurandhar 2: ‘धुरंधर २’वर ध्रुव राठीचा निशाणा; “प्रोपेगेंडा फिल्म” म्हणत आदित्य धरवर टीका
Dhurandhar 2 रिपोर्टनुसार, धुरंधर २ ने पहिल्याच दिवशी सुमारे १०२ कोटी रुपयांची कमाई करत विक्रम प्रस्थापित केला आहे. मात्र, काही लोकांनी या चित्रपटाला “प्रोपेगेंडा फिल्म” असे संबोधले आहे. याच मुद्द्यावर ध्रुव राठी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत दिग्दर्शक आदित्य धर यांच्यावर टीका केली.
Benjamin Netanyahu: जागतिक गॅस आणि तेल संकटाच्या पार्श्वभूमीवर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू जगाला दिलासा देणारी बातमी दिली आहे. त्यांनी या युद्धाविषयी बोलताना, इराणसोबतचे युद्ध लोकांच्या अपेक्षेपेक्षा खूप लवकर संपू शकते. असे म्हटले आहे.
गडचिरोली : ११ जहाल माओवाद्यांनी केले आत्मसमर्पण
- गडचिरोली पोलीस सीआरपीएफ यांच्या संयुक्त प्रयत्नांना मोठे यशएकेकाळी माओवाद्यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात आता या चळवळीचे अस्तित्व संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. गुरुवार, १९ मार्च रोजी, गडचिरोली पोलीस दल आणि सीआरपीएफ (CRPF) यांच्या संयुक्त प्रयत्नांना मोठे यश आले असून, ११ जहाल माओवाद्यांनी हिंसेचा मार्ग सोडून लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. आत्मसमर्पण केलेल्या या माओवाद्यांवर महाराष्ट्र शासनाने एकूण ६८ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.आत्मसमर्पण केलेल्यांमध्ये अनेक वरिष्ठ कॅडरच्या सदस्यांचा समावेश आहे, ज्यामुळे नक्षलवादी संघटनांच्या कार्यप्रणालीला मोठा तडा गेला आहे. आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांमध्ये सोनी ऊर्फ बाली वत्ते मट्टामी (DVCM): १६ लाख रुपयांचे बक्षीस (कुतुल दलम), बुदरी ऊर्फ रामबत्ती आयतु मट्टामी (क्षेत्र समिती सचिव): १६ लाख रुपयांचे बक्षीस, सुखलाल बोळगा कोक्सा (कमांडर): ८ लाख रुपयांचे बक्षीस, शांती ऊर्फ सोमरी गंगा तेलामी (PPCM): ८ लाख रुपयांचे बक्षीस, यमुनक्का ऊर्फ रुखमाक्का पेंदाम (ACM): ६ लाख रुपयांचे बक्षीस होते.विशेष म्हणजे, यमुनक्का पेंदाम हिच्यावर २७ गंभीर गुन्हे दाखल असून ती १९८२ पासून चळवळीत सक्रिय होती. याशिवाय गणेश कोवासी, मिनको मट्टामी, धनु वेळंजे, सुनिता होयाम, रमेश मडावी आणि किशोर वासम या सदस्यांनीही शरणागती पत्करली आहे.गडचिरोली पोलीस दलाच्या प्रभावी मोहिमांमुळे एकेकाळी जिल्ह्यातील १० उपविभागांत पसरलेली ही चळवळ आता केवळ भामरागड उपविभागाच्या सीमावर्ती भागापुरती मर्यादित राहिली आहे. विशेष म्हणजे १५ ऑक्टोबर २०२५ रोजी पोलीत ब्युरो सदस्य, केंद्रीय समिती सदस्य, प्रवक्ता-सिपीआय माओवादी तसेच सचिव-केंद्रीय रिजनल ब्युरो मल्लोजुला वेनुगोपाल राव ऊर्फ भुपती ऊर्फ सोनू याच्यासह एकूण ६१ माओवाद्यांनी ५४ अग्निशस्त्रांसह मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर आत्मसमर्पण केल्यामुळे गडचिरोली आणि संपूर्ण दंडकारण्य विभागातील माओवादी चळवळीला मोठा हादरा बसलेला होता. सन २०२५ पासून आतापर्यंत एकूण १२३ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे, तर आजवरची ही संख्या ७९४ वर पोहोचली आहे.शासनाच्या आत्मसमर्पण योजनेअंतर्गत या सर्वांना सन्मानाने जगण्यासाठी आर्थिक मदत दिली जाणार आहे. वैयक्तिक मदत: आत्मसमर्पित माओवाद्यांना त्यांच्या पदानुसार ४ ते ८.५ लाख रुपयांपर्यंतचे पुनर्वसन बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. जोडीदारांसाठी अतिरिक्त मदत: सुखलाल कोक्सा-शांती तेलामी आणि गणेश कोवासी-मिनको मट्टामी या पती-पत्नी जोड्यांनी एकत्रित आत्मसमर्पण केल्यामुळे त्यांना अतिरिक्त १.५ लाख रुपयांची मदत मिळेल. गट आत्मसमर्पण: सामूहिकरीत्या शरण आल्यामुळे या गटाला १० लाख रुपयांचे अतिरिक्त बक्षीस दिले जाणार आहे.“उर्वरित माओवाद्यांनीही हिंसेचा त्याग करून, शस्त्रे खाली ठेवावीत आणि लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात सामील होऊन शांततेचा मार्ग स्वीकारावा.” असे आवाहन विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) संदीप पाटील यांनी केले आहे.याप्रसंगी विशेष पोलीस महानिरीक्षक संदिप पाटील, पोलीस उप-महानिरीक्षक अंकित गोयल, सीआरपीएफचे डीआयजी अजय कुमार शर्मा, पोलीस अधीक्षक नीलोत्पल आणि इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.
Sushma Andhare : कॅप्टन अशोक खरात प्रकरणावर सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेत रुपाली चाकणकरांवर धक्कादायक आरोप केले आहेत.
'जल जीवन मिशन २.०’ साठी केंद्र आणि राज्य शासनात सामंजस्य करार
- मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या करारावर स्वाक्षऱ्याराज्यातील प्रत्येक ग्राम पंचायतीचे डिसेंबर २०२८ पर्यंत ‘हर घर जल’ प्रमाणीकरण साध्य करणे तसेच पाणी पुरवठा योजनांचे सक्षम संचलन आणि देखभाल सुनिश्चित करण्याची प्रमुख उद्दिष्टे डोळ्यापुढे ठेऊन केंद्र सरकारचे जलशक्ती मंत्रालय आणि महाराष्ट्र शासन यांच्यात गुरुवारी नवी दिल्ली येथे सामंजस्य करार पार पडला.याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपुरातून ऑनलाईन सहभागी झाले होते. केंद्रीय मंत्रिमंडळाने अलिकडेच ‘जल जीवन मिशन’ कार्यक्रमास डिसेंबर २०२८ पर्यंत मुदतवाढ दिली असून या नवीन टप्प्याला ‘जल जीवन मिशन-2.0’ असे संबोधण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने राज्यांनी संरचनात्मक सुधारणा, कालमर्यादेचे पालन, योजनांची शाश्वतता आणि नागरीक-केंद्रित सेवांचे वितरण सुनिश्चित करण्यासाठी हा सामंजस्य करार पार पडला.या करारात काही प्रमुख उद्दिष्टे ठेवण्यात आली आहेत. त्यात प्रामुख्याने जल जीवन मिशन अंतर्गतच्या कामांची प्रभावी अंमलबजावणी आणि देखरेख करणे, ग्रामीण भागातील नळ पाणी पुरवठा पायाभूत सुविधा पूर्ण करून त्या ग्राम पंचायतींकडे हस्तांतरित करणे तसेच डिसेंबर २०२८ पर्यंत राज्यातील प्रत्येक ग्राम पंचायतीने ‘हर घर जल’ प्रमाणीकरण साध्य करणे या मुद्यांचा प्रामुख्याने समावेश आहे. याशिवाय पाणी पुरवठा योजनांचे सक्षम संचालन आणि देखभाल सुनिश्चित करण्यासह जिल्हा व राज्यस्तरावर संरचनात्मक सुधारणा घडवून आणण्यासाठी पेयजल शाश्वतता आराखडा स्वीकारणे या उद्दिष्टांचाही समावेश या सामंजस्य करारात आहे.याप्रसंगी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर.पाटील, पेयजल आणि स्वच्छता विभागाचे सचिव अशोक मीना, केंद्रीय जल जीवन मिशनचे संचालक व अतिरिक्त सचिव कमल किशोर सोन, सह सचिव (जल) स्वाती मीना नाईक, संचालक प्रदीप सिंह यांच्यासह नवी दिल्ली येथील महाराष्ट्र परिचय केंद्राच्या निवासी आयुक्त आर. विमला यांच्यासह प्रमुख वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
'डोरेमॉन'चे दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड
नव्वदच्या दशकापासून आजच्या पिढीपर्यंत लहान मुलांच्या मनावर राज्य करणाऱ्या डोरेमॉन (Doraemon) या लोकप्रिय कार्टून शोमागील महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व असलेले दिग्दर्शक शिबायामा त्सुतोमू (Shibayama Tsutomu) यांचे वयाच्या ८४व्या वर्षी निधन झाले आहे.फुफ्फुसांच्या कॅन्सरमुळे त्यांचे निधन झाले असून, त्यांनी दोन दशकांहून अधिक काळ ‘डोरेमॉन’चे दिग्दर्शन आणि अॅनिमेशनची जबाबदारी सांभाळली होती. त्यांच्या कामामुळे या शोला जागतिक स्तरावर प्रचंड लोकप्रियता मिळाली, ज्यात भारताचाही मोठा वाटा आहे.त्यांच्या निधनाची अधिकृत माहिती Shin-Ei Animation या स्टुडिओकडून १७ मार्च २०२६ रोजी देण्यात आली. मात्र, त्यांचे निधन ६ मार्च रोजीच झाल्याचेही स्पष्ट करण्यात आले.शिबायामा यांच्या निधनामुळे मनोरंजनसृष्टीत मोठी पोकळी निर्माण झाली असून, ‘डोरेमॉन’सारख्या अजरामर कलाकृतीत दिलेल्या त्यांच्या योगदानाची कायम आठवण राहील.

27 C