IND vs ZIM : भारताचा दणदणीत विजय; २२ वर्षाचा नाबाद ९७ ठोकणारा युवा खेळाडून कोण?, जाणून घ्या...
मुंबई: वर्ल्ड कप २०२६ मध्ये भारतीय संघाने सुपर ८ फेरीमध्ये झिम्बाब्वे संघाचा पराभव केला आहे. भारताने ७२ धावांनी विजय मिळवत सेमी फायनलसाठी आपले आव्हान कायम ठेवले. हा विजय भारतासाठी महत्त्वाचा होता, कारण दोन्ही संघांसाठी 'करो या मरो; अशी परिस्थिती होती. परंतु भारताने आज आपल्या लौकिकेला साजेसा खेळ करत जगाला ताकद दाखवून दिली. या सामन्यामध्ये भारताने २० ओव्हरमध्ये २५६-४ धावा केल्या होत्या. झिम्बाब्वे संघानेही चांगली झुंज देत २० ओव्हरमध्ये १८४-६ धावा केल्या. या सगळ्यामध्ये २२ वर्षाच्या युवा खेळाडूने सर्व जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. पठ्ठ्याने भारताविरुद्ध खेळताना नाबाद ९७ धावांची खेळी करत शेवटपर्यंत टिकून राहिला होता. अवघ्या तीन धावांनी त्याचे शतक हुकले, नेमका कोण आहे ब्रायन बेनेट त्याच्याविषयी माहिती जाणून घ्या.झिम्बाब्वेच्या ब्रायन बेनेट याचा जन्म १० नोव्हेंबर २००३ साली हरारे येथे झाला होता. युवा प्रतिभाशाली खेळाडूंमध्ये ब्रायनचा समावेश होतो. त्याचा जुळा भाऊ सुद्धा क्रिकेटर आहे. ब्रायन याचे वडील केली बेनेट हे शेतकरी आहेत. आपल्या मुलाच्या स्वप्नासाठी त्यांनी ब्रायनला पीटर हाऊस बॉईज स्कूलमध्ये त्यांनी त्याला ठेवले होते. ही शाळा आंतरराष्ट्रीय क्रिकेटर होण्यासाठी महत्त्वाची शिडी असल्यासारखी आहे. कारण या शाळेमधून अनेक आंतरराष्ट्रीय क्रिकेटर घडले आहेत.ब्रायन हा २०२२ साली अंडर १९ वर्ल्ड कप मध्ये झिम्बाब्वे संघाचा उपकर्णधार होता. सहा सामन्यांमध्ये ४५ च्या सरासरीने २७३ धावा त्यांनी बनवल्या, ज्यामध्ये तीन अर्धशतक होते. त्यानंतर त्याने २०२२ मध्येच प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि त्यानंतर मागे वळून पाहिलेच नाही. आपल्या प्रदर्शनाच्या जोरावर एक एक यशाची शिडी चढत गेला आणि आज वर्ल्ड कप मध्ये पोराने इतिहास रचला. भारताविरूद्ध त्याने ५९ बॉलमध्ये ९७ धावा केल्या. यामध्ये त्याने ८ चौकार आणि ६ षटकारांची आतषबाजी केली. इतकंच नाहीतर आणखी एक खास रेकॉर्ड म्हणजे गडी या वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये आऊटच झाला नाही. वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या यादीमध्ये ५ सामन्यात २७७ धावांसह दुसऱ्या स्थानी आहे.दरम्यान, भारताविरूद्ध टी-२० वर्ल्ड कपमध्ये भारताविरूद्ध वैयक्तिक सर्वाधिक धावांची खेळी करणारा दुसरा खेळाडू ठरला आहे. याआधी ख्रिस गेलने ९८ धावा भारताविरूद्ध २०१० साली केल्या आहेत.भारत वि. झिम्बाब्वे दोन्ही संघांची प्लेइंग ११संजू सॅमसन (WK), अभिषेक शर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव (C), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती आणि जसप्रीत बुमराह.तादिवानाशे मारुमणी (WK), ब्रायन बेनेट, डायन मायर्स, रायन बर्ल, सिकंदर रझा (C), टोनी मुन्योंगा, ताशिंगा मुसेकिवा, ब्रॅड इव्हान्स, टिनोटेंडा मापोसा, ब्लेसिंग मुझाराबानी आणि रिचर्ड नागरावा.
महापालिका सभागृहात गुंजणार ‘जय जय महाराष्ट्र माझा’; महापालिका सभागृहात एकमताने ठराव मंजूर
मुंबई: महाराष्ट्राचे अधिकृत राज्यगीत असलेल्या ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ या गीताची धून आता महापालिका सभागृहातही लावली जाणार आहे. भाजपच्या नगरसेविका आणि शिक्षण समिति अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांनी केलेल्या सूचनेला मंजुरी देत महापालिका सभागृहात एकमताने याचा ठराव करण्यात आला. त्यामुळे आता महापालिका सभागृहात या राज्यगीताची धून ऐकायला मिळणार आहे.महाराष्ट्राचे अधिकृत राज्यगीत असलेल्या ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ हे गीत महाराष्ट्रातील जनतेच्या अभिमानाचे प्रतीक असून ते ऐकताच प्रत्येक मराठी मन अभिमानाने भरून येते. शासनाच्या निर्णयानुसार हे गीत शासकीय कार्यक्रमांमध्ये तसेच राज्यातील सर्व शाळांमध्ये सकाळच्या परिपाठाचा अनिवार्य भाग करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात राष्ट्रप्रेम, मराठी अस्मिता आणि संस्कृतीची जपणूक यांची भावना अधिक दृढ होत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे.मराठी भाषा संवर्धन आणि सांस्कृतिक अस्मितेच्या जतनासाठी कवी राजा बढे यांच्या ओजस्वी शब्दरचनेतून आणि शाहीर साबळे यांच्या दमदार आवाजातून साकारलेले हे गीत नव्या पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे गरजेचे असल्याचे ठरावात नमूद करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर, मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहात राष्ट्रगीतानंतर ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताची धून वाजविण्यात यावी, अशी मागणी ठरावाच्या सूचनेद्वारे शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांनी महापालिका सभागृहात केली. ही सूचना महापौरांनी गुरुवारी झालेल्या बैठकीत मंजूर केली.या प्रस्तावामुळे महानगरपालिकेच्या कामकाजात महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अभिमानाची नवी भर पडेल, असा विश्वास शिरवडकर यांनी व्यक्त केला होता. या ठरावामुळे याची अंमलबजावणी लवकरच महापालिका सभागृहात केली जाणार आहे.
मुंबई: मुंबई महापालिकेचे कामकाज हे शंभर टक्के मराठीतून असतानाही आजही कामगारां विषयांच्या तसेच इतर बाबींची परिपत्रके ही इंग्रजी भाषेतून काढली जात आहे. त्यामुळे २७ फेब्रुवारी या मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून महापौरांनी मुंबई महापालिकेच्यावतीने काढली जाणारी सर्व प्रकारची परिपत्रके ही मराठी भाषेतूनच काढली जावीत अशाप्रकारचे निर्देश देण्याची मागणी महापालिका सभागृहात भाजपचे स्वीकृत नगरसेवक प्रविण छेडा यांनी केली.मुंबई महापालिकेच्या सभेपुढे महापालिका अतिरिक्त आयुक्त डॉ अश्विनी जोशी यांनी प्रशसनाच्यावतीने अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीच्या प्रस्तावाला अग्रक्रम देण्याचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला महापौरांनी परवानगी दिल्यानंतर या प्रस्तावावर विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी अभियंत्याच्या बढतीचे प्रस्ताव स्थापत्य शहर समितीपुढे मांडले जात असताना इथे का मांडले आणि २१ अधिकाऱ्यांच्या जागा रिक्त् असताना सहा अधिकाऱ्यांच्या बढतीचे प्रस्ताव का आणले असा सवाल केला. यावर स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी २१ जणांच्या नावाचे प्रस्ताव येणे गरजेचे असताना सहा जणांच्या बढतीचे प्रस्ताव आले, मग उर्वरीतांच्या बढतीचे प्रस्ताव का आले नाही याबाबत शंका उपस्थित करत मग इतर अधिकाऱ्यांवर हा अन्याय नाही का असा सवाल त्यांनी केला.तर भाजपचे स्वीकृत नगरसेवक प्रविण छेडा यांनी हा प्रस्ताव म्हणजे सलिम जावेदची पटकथा असल्याचे सांगत साडेचार वर्षांत किती अधिकाऱ्यांना बढती दिली गेली याची माहिती दिली जावीत,तसेच न्यायप्रविष्ठ प्रकरणे किती आहेत याचीही दिली जावी अशी मागणी केली.तसेच या अधिकाऱ्यांच्या बढतीसह कामगारांसंदर्भात परिपत्रकेही इंग्रजी भाषेत काढली जात असल्याने छेडा यांनी खंत व्यक्त केला. त्यामुळे महापौरांनी आजच प्रशासनाला निर्देश देत यापुढे सर्व प्रकारचे परिपत्रके ही मराठी भाषेतूनच काढली जावीत,असे सांगावे आणि मराठी भाषा दिनाचे औचित साधून हे निर्देश तात्काळ देवून यापुढे शुध्द मराठीतून परिपत्रक काढली जातात का हेही पाहावे अशा प्रकारच्या सूचना केल्या. यावर सभागृहात सर्वच नगरसेवकांनी टाळ्या वाजवून या सूचनेचे कौतूक केले.
26 फेब्रुवारीची सकाळ. राष्ट्रीय महामार्ग-5 वर दिल्ली पोलिसांचा ताफा हिमाचल प्रदेशातील शोघी परिसरातून जात होता. ते दिल्लीत AI परिषदेदरम्यान शर्टलेस निदर्शने करणाऱ्या तीन आरोपींना अटक करून दिल्लीला घेऊन जात होते. अचानक हिमाचल पोलिसांनी रस्ता अडवला आणि दिल्ली पोलिसांच्या 15 कर्मचाऱ्यांना अपहरणाच्या आरोपाखाली ताब्यात घेतले. ताफ्यातील एक गाडीही जप्त करण्यात आली. दिल्ली पोलिसांचे एसीपी विक्रम आणि हिमाचल पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये जोरदार वाद झाला. ज्यात प्रत्येकाने एकमेकांवर सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोप केला. दिल्ली आणि हिमाचल पोलीस आमनेसामने का आले? दुसऱ्या राज्यात पोलीस कारवाईसाठीचे नियम काय आहेत? आणि या प्रकरणात पुढे काय होईल? जाणून घ्या आजच्या एक्सप्लेनरमध्ये... प्रश्न-1 : दिल्ली आणि हिमाचल प्रदेश पोलिसांमध्ये 24 तास काय रस्सीखेच सुरू होती?उत्तर : 20 फेब्रुवारी रोजी दिल्लीतील भारत मंडपममध्ये AI इम्पॅक्ट समिटदरम्यान युवक काँग्रेसच्या सदस्यांनी शर्टलेस आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान दिल्ली आणि इतर राज्यांमधील अनेक आंदोलकांनी अचानक आपले टी-शर्ट काढले आणि पंतप्रधान मोदींविरोधात घोषणाबाजी सुरू केली. त्यांनी काढलेल्या टी-शर्टवर पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांचे फोटो आणि भारत-अमेरिका व्यापार करार, एपस्टीन फाइल्स आणि पंतप्रधान तडजोड केलेले आहेत (PM इज कॉम्प्रोमाइज्ड) असे संदेश लिहिले होते. या परिषदेत अनेक देशांचे प्रतिनिधी आणि उद्योजक उपस्थित होते. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणात युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब यांना मुख्य सूत्रधार मानले असून, आतापर्यंत एकूण 11 जणांना अटक करण्यात आली आहे. याच प्रकरणात दिल्ली पोलीस हिमाचल प्रदेशात इतर 3 लोकांच्या अटकेसाठी गेली होती, जिथे त्यांची हिमाचल प्रदेश पोलिसांसोबत सुमारे 24 तास रस्सीखेच सुरू होती... मात्र, हिमाचल पोलिसांनी नंतर एक निवेदन जारी करून सांगितले की, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दिल्ली आणि हरियाणा पोलिसांच्या पथकांना आरोपींसह दिल्लीला जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. अपहरण आणि डीव्हीआर बेकायदेशीरपणे जप्त केल्याच्या आरोपांची चौकशी केली जाईल. हिमाचल प्रदेशात सध्या मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुक्खू यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे सरकार आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि भाजपचे माजी मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी एक निवेदन जारी करून म्हटले होते की, हिमाचल प्रदेशबाहेरील अशा आरोपींना संरक्षण देणे लाजिरवाणे आहे, ज्यांनी जागतिक स्तरावर देशाची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रश्न-2 : इतर राज्यांमध्ये पोलिसांच्या कारवाईचे काय नियम आहेत, दिल्ली पोलिसांनी कोणताही कायदा मोडला आहे का?उत्तर : पोलीस हे संविधानाच्या राज्य सूची अंतर्गत येतात. याचा अर्थ पोलिसांचे अधिकार राज्यापुरते मर्यादित आहेत, परंतु ते त्यांच्या स्वतःच्या राज्यातील आरोपीची किंवा घटनेत सामील असलेल्या दुसऱ्या राज्यातील आरोपीची चौकशी करू शकतात किंवा त्यांचा पाठलाग करू शकतात. यामुळे पोलिसांना आंतरराज्यीय अधिकार मिळतात. दुसऱ्या राज्यातील आरोपीला अटक करण्याबाबत दोन मुख्य कायदे आहेत... जर वॉरंट असेल तर… जर कोणतेही वॉरंट नसेल तर… याशिवाय, संविधानाच्या अनुच्छेद 22 च्या कलम 2 नुसार, कोणत्याही व्यक्तीला अटकेच्या 24 तासांच्या आत जवळच्या न्यायालयात दंडाधिकाऱ्यासमोर हजर करणे आवश्यक आहे आणि ट्रान्झिट रिमांड मिळवणे आवश्यक आहे. जरी अटक एका राज्यात दुसऱ्या राज्याच्या पोलिसांनी केली असली तरी. हा नियम अनेक न्यायिक निर्णय आणि पोलीस मॅन्युअलमध्ये देखील आहे. अटक केलेल्या व्यक्तीला राज्याबाहेर नेण्यापूर्वी त्याच्या वकिलाचा सल्ला घेण्याची संधी दिली पाहिजे. मात्र, 'अत्यावश्यक' प्रकरणांमध्ये, जसे की, आरोपी पळून जाण्याची किंवा पुरावा नष्ट करण्याची भीती असेल तेथे सूचना किंवा वॉरंटशिवाय कारवाई केली जाऊ शकते. न्यायालयाने 'अत्यावश्यक'ची नेमकी व्याख्या दिलेली नाही. मात्र, अशा प्रकरणांमध्ये नियमांचे कठोर पालन करण्याचा सल्ला दिला होता. दरम्यान, हरियाणा पोलिसांचा आरोप आहे की दिल्ली पोलिसांच्या पथकाने कोणतीही सूचना दिली नव्हती आणि ते साध्या वेशात होते. प्रश्न-3: दोन राज्यांमधील राजकीय तणावामुळे अशी कोणती कारवाई होते का?उत्तर : अनेकदा जेव्हा दोन राज्यांमध्ये वेगवेगळ्या पक्षांची सरकारे असतात तेव्हा अशा राजकीय मुद्द्यांशी संबंधित फौजदारी खटले देखील राजकीयदृष्ट्या प्रभावित होतात. ही भिन्न सरकारी व्यवस्था अनेकदा दोन्ही राज्यांच्या पोलिसांमध्ये परस्पर सहकार्याऐवजी कायदेशीर संघर्षाकडे नेते. याची काही उदाहरणे वाचा... 1. भाजप नेते तेजिंदर बग्गा यांची अटक 2. पत्रकार रोहित रंजन यांची अटक 3. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूची चौकशी 4. उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये उत्तराखंड पोलिसांचा छापा प्रश्न-4 : CBI, CID आणि ED सारख्या एजन्सींसाठी कारवाईचे नियम काय आहेत?उत्तर : या सर्व एजन्सींच्या अधिकार आणि कार्यपद्धतीच्या नियमांमध्ये काही मुख्य फरक आहेत... प्रश्न-5 : दिल्ली आणि हिमाचल पोलिसांमध्ये या प्रकरणात पुढे काय होईल?उत्तर : रिसॉर्ट मालकाच्या तक्रारीच्या आधारे चिरगाव पोलीस ठाण्यात एफआयआर (FIR) दाखल करण्यात आली होती, ज्यात दिल्ली पोलीस पथकाला अज्ञात व्यक्ती म्हणून नमूद करण्यात आले होते. तथापि, न्यायालयाने आरोपींना ट्रान्झिट रिमांड दिल्याने दिल्ली पोलिसांविरुद्धची एफआयआर (FIR) कमकुवत होते, ज्यामुळे त्यांची कारवाई वैध मानली गेली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे वकील विराग गुप्ता सांगतात की, जर हिमाचल पोलिसांनी तपास पुढे नेला, तर ते दिल्ली पोलिसांना चौकशीसाठी बोलावू शकतात. रिसॉर्ट मालक आणि साक्षीदारांच्या निवेदनांवर किंवा पुराव्यांवर आधारित आरोपपत्र देखील दाखल केले जाऊ शकते. तथापि, हिमाचल पोलीस थेट अटक करू शकत नाहीत. त्यांना यासाठी न्यायालयाचे वॉरंट मिळवावे लागेल. दरम्यान, दिल्ली पोलीस सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याबद्दल सूड घेण्यासाठी हिमाचल पोलिसांविरुद्ध क्रॉस-एफआयआर देखील दाखल करू शकतात. प्रश्न-6 :या प्रकरणात केंद्र सरकारला हवे असल्यास कारवाई करू शकते का?उत्तर : पोलीस हा राज्याचा विषय आहे, परंतु केंद्र सरकार देखील अशा प्रकरणांमध्ये हस्तक्षेप करू शकते. केंद्र सरकारचे गृह मंत्रालय दिल्ली आणि हिमाचल प्रदेशला परस्पर पोलीस सहकार्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी करू शकते. ही मार्गदर्शक तत्त्वे कायदेशीररित्या बंधनकारक नाहीत, परंतु ती राज्यांवर राजकीय आणि प्रशासकीय दबाव आणतात. वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या केडरवर केंद्र सरकारचे नियंत्रण आहे. केंद्र सरकार या प्रकरणात सामील असलेल्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या कारवाईची नोंद घेऊ शकते आणि त्यांना सूचना जारी करू शकते. जर केंद्र सरकारला हवे असेल, तर ते उच्च न्यायालयाची संमती मिळाल्यानंतर हिमाचल पोलिसांच्या वर्तनाची सीबीआय चौकशी करण्याची शिफारस देखील करू शकते.
Haveli News : हवेलीकरांसाठी मोठी बातमी! जमिनीच्या वादातून मिळणार सुटका; सरकारचा मोठा निर्णय..वाचा
Haveli News : वाढते नागरीकरण आणि जमिनींच्या वादांमुळे हवेली भूमिअभिलेख कार्यालयावर कामाचा प्रचंड ताण; लवकरच दोन स्वतंत्र कार्यालयांतून होणार कारभार.
Pune Railway Station : दीड लाख प्रवाशांच्या दैनंदिन गर्दीला मिळणार सुखद अनुभव; पादचारी पुलाजवळ अत्याधुनिक ४ लिफ्ट प्रवाशांच्या सेवेत रुजू.
SPPU News : वारंवार पाठपुरावा करूनही कुलगुरू आणि कुलसचिवांकडून दखल नाही; सजग नागरिक मंच आता आक्रमक पवित्र्यात.
लोकसभेची निवडणूक 2024 मध्ये झाली. त्याच्या काही महिने अगोदर विरोधी पक्ष एकत्र आले होते. त्यांनी देशपातळीवर इंडिया किंवा भारतीय जनता पार्टीच्या भाषेत इंडी नावाची अथवा आयएनडीआयए नामक आघाडी स्थापन केली होती.
Pune News : प्रकल्पांना विलंब लावणाऱ्या विकासकांविरुद्ध जिल्हा प्रशासनाचा अॅक्शन मोड; दोन महिन्यांत वसुली पूर्ण करण्याचे प्रांताधिकारी व तहसीलदारांना आदेश.
PMC News : पुणेकरांना मोठा दिलासा! शहरी गरीब योजनेतील ‘ती’जाचक अट रद्द; कोणाला मिळणार लाभ?
PMC News : खोटी कागदपत्रे देणाऱ्यांना चाप लावण्यासाठी लावलेला निकष मागे; श्रीनाथ भिमाले यांनी स्पष्ट केली महापालिकेची भूमिका.
लक्षेवधी : शाश्वत टेक्स्टाइल उत्पादन
युरोपियन युनियनला निर्यात सुरू करण्यासाठी लहान आणि मोठ्या कापड निर्यातदारांना ईयू शाश्वतता मानके अर्थात सस्टेनेबिलिटी स्टँडर्ड्सच्या अटी पूर्ण कराव्या लागतील. या ईयू शाश्वतता मानकांच्या विविध पैलूंवर नजर टाकूया.
PMC News : ऐनवेळी निविदा अन् नगरसेवकांचा विरोध; तरीही महिला सक्षमीकरणाचा ‘हा’प्रस्ताव मंजूर
PMC News : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ८ ते १४ मार्च दरम्यान होणार कार्यक्रमांची मेजवानी; श्रीनाथ भिमालेंनी दिली सविस्तर माहिती.
PMC News : भाजपचे १४ प्रभाग समित्यांवर वर्चस्व! राष्ट्रवादी-काॅंग्रेस एकत्र आल्यास एका समितीवर संधी
PMC News : ३६ लाख लोकसंख्येचे १५ विभाग; प्रशासकीय रचनेचा भाजपला बंपर फायदा, तर राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
Bank Fraud : राजणगाव हादरले! बनावट बँक शिक्क्याने ३३ लाखांचा गंडा; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
Bank Fraud : बँकेचा बनावट शिक्का वापरून ३३ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार राजणगाव गणपती येथे उघडकीस आला आहे.
Bhima River : भीमा नदीने तळ गाठल्याने बळीराजा चिंतेत; शेतीपंप खाली घेण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ
Bhima River : ऐन पीक काढणीच्या वेळी पाण्यासाठी वणवण; भीमा नदीने तळ गाठल्याने दौंडच्या पूर्व भागात दुष्काळाच्या झळा तीव्र.
Indapur News : माजी मंत्री हर्षवर्धन पाटलांच्या नेतृत्वाखाली एकहाती सत्ता; अनुभवाला पसंती मिळणार की नव्या चेहऱ्याला संधी?
Rohit Pawar : मुंबईनंतर आता बारामतीतही पोलिसांची टाळाटाळ; युगेंद्र पवार आणि रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन.
Baramati News : बारामतीतही एफआयआर घेतली नाही! आमदार रोहित पवार आक्रमक; पाहा काय घडलं?
Baramati News : दीड तासाची चर्चा, पुराव्यांची शिदोरी पण पदरी निराशाच; अजित पवार विमान दुर्घटना प्रकरणाचा तपास सीबीआयच्या हाती असल्याची पोलिसांची माहिती.
Baramati Municipal Council : झेरॉक्ससाठी २७ लाख? बारामती नगरपरिषदेच्या अर्थसंकल्पात धक्कादायक खुलासे
Baramati Municipal Council : बारामती नगरपरिषदेच्या अर्थसंकल्प बैठकीत घरपट्टी, पाणीपट्टी, झेरॉक्स खर्च आणि शाळांच्या दर्जावरून नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले.
Shirur News : शाळेत पिण्याचं पाणीही मिळेना; चिमुकल्यांनी थेट तहसील कार्यालयाबाहेरच भरवली शाळा
Shirur News : प्रशासनाला जाग आणण्यासाठी म्हसोबावाडीतील विद्यार्थ्यांनी पालकांसह पुकारले आंदोलन; तहसीलदारांकडून गटविकास अधिकाऱ्यांना जाब विचारणारे पत्र.
Smart Meter : अन्यथा ‘स्मार्ट मीटर फोडो’ आंदोलन! ग्रामीण भागात महावितरणच्या विरोधात संतापाचा उद्रेक
Smart Meter :
Satara News : अंमली पदार्थांचे ‘नेटवर्क’उद्ध्वस्त होणार; नार्को बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांचे कडक निर्देश
Satara News : पर्यटनाच्या नावाखाली होणाऱ्या 'रेव्ह पार्ट्या' रोखण्यासाठी प्रशासन सज्ज; हॉटेल आणि रिसॉर्टवर पोलिसांची करडी नजर राहाणार.
Kalewadi Murder Case : काळेवाडीतील विजयनगर परिसरातील घटना; जुन्या पैशांच्या व्यवहारातून आरोपींनी चुलत भावांवर केला हल्ला, एकाचा जागीच मृत्यू.
Pimpri Chinchwad News : दुर्गादेवी टेकडीचे नाव बदलणार? महापौरांनी अखेर मौन सोडले; वाचा काय म्हणाले
Pimpri Chinchwad News : शहरात नामांतराचे राजकारण पुन्हा सक्रिय? दुर्गादेवी टेकडीवरील 'ऑक्सिजन पार्क' वरून नागरिक आणि राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा.
PCMC News : बिल्डरांनो नियम पाळा अन्यथा..कठोर कारवाई; महापालिकेचा कडक इशारा
PCMC News : धूळ नियंत्रण आणि उत्सर्जन व्यवस्थापनात ढिलाई नको; कचरा जाळणाऱ्या आणि प्लास्टिक वापरणाऱ्यांविरुद्ध महापालिकेची मोहीम अधिक तीव्र.
Pimpri Chinchwad News : इतिहासात पहिल्यांदाच सांगवीत पाणी विक्री केंद्रांवर रांगा; प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह.
Talegaon Dabhade : तळेगावकरांनो सावधान! घरपट्टी अन् पाणीपट्टी न भरल्यास थेट जप्ती; नगरपरिषदेचा इशारा
Talegaon Dabhade : ३१ मार्चपूर्वी कर भरणाऱ्यांना व्याजात २ टक्के सवलतीचा प्रस्ताव; ऑनलाईन आणि ऑफलाईन पेमेंटसाठी शनिवार-रविवारीही सुविधा उपलब्ध.
Junnar News : कागदपत्रांच्या नावाखाली वसुली करणाऱ्या एजंटांच्या मालमत्तेची चौकशी करण्याची मागणी; काही प्रभावशाली कुटुंबांचे नाव चर्चेत.
Junnar Road Accident : कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; धडकेत एकाचा मृत्यू, ९ जण गंभीर जखमी
Junnar Road Accident : रात्री १० च्या सुमारास महामार्गावर अपघात हा अभघात घडला; बोलेरो चालकाविरुद्ध पोलीस ठाण्यात गुल्हा दाखल करण्यात आला आहे.
दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, २७ फेब्रुवारी २०२६
पंचांगआज मिती फाल्गुन शुक्ल एकादशी शके १९४७.चंद्र नक्षत्र आर्द्रा. योग आयुष्यमान ०७.४३ पर्यंत.नंतर सौभाग्य. चंद्र राशी कर्क. भारतीय सौर ८ फाल्गुन शके १९४७. शुक्रवार दिनांक २७ फेब्रुवारी २०२६. मुंबईचा सूर्योदय ०६.५८ मुंबईचा सूर्यास्त ०६.४३,मुंबईचा चंद्रोदय ०३.४८ , मुंबईचा चंद्रास्त ०५.१९ उद्याची राहू काळ ०९.५५ ते ११.२३,आमलकी एकादशी,१२ पर्यन्त चांगलादैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)
महापालिका शाळांमध्ये वर्षातून दोनदा भरवा विज्ञान प्रदर्शन
मुंबई :विद्यार्थ्यांमधील चिकित्सक वृत्तीला वाव देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने आयोजित केलेले ‘विज्ञान प्रदर्शन व माझी परसबाग प्रकल्प’ सारखे अभिनव उपक्रम अतिशय कौतुकास्पद आहेत. अशा उपक्रमांतून विद्यार्थ्यांच्या मनातील वैज्ञानिक संकल्पनांना व्यासपीठ मिळते. आजचे विद्यार्थी हे भविष्यातील विकसित भारताचा पाया आहेत. विज्ञान हा विषय पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रात्यक्षिकातून जास्त उमगतो. त्यामुळे अशा प्रकारचे प्रदर्शन वर्षातून किमान दोनदा आयोजित करण्यासाठी शिक्षण विभागाने प्रयत्नशील राहावे, असे मत मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण समिती अध्यक्ष राजेश्री शिरवडकर यांचे व्यक्त केले.मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्यावतीने महानगरपालिका शाळांतील प्रशासकीय विभाग (वॉर्ड) स्तरावर विजेत्या शाळांचे ‘विज्ञान प्रदर्शन व माझी परसबाग’ आणि पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन करी रोड येथील ना. म. जोशी शाळा संकुल येथे गुरुवारी २६ फेब्रुवारी २०२६ रोजी करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रामुख्याने प्रशासकीय विभाग (वॉर्ड) स्तरावर आयोजित विज्ञान प्रदर्शन स्पर्धांमधून विजेत्या ठरलेल्या एकूण २३ शाळांचे विज्ञान प्रकल्प प्रदर्शनार्थ मांडण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून शिक्षण समितीच्या अध्यक्ष राजेश्री शिरवडकर या बोलत होत्या.उप आयुक्त (शिक्षण) डॉ. प्राची जांभेकर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सुजाता खरे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) कीर्तीवर्धन किरतकुडवे, शाळा अक्षीक्षक छाया साळवे, सर्व उप शिक्षण अधिकारी, विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि सहभागी विद्यार्थी या कार्यक्रमास उपस्थित होते.महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाकडून आयोजित करण्यात आलेले हे विज्ञान प्रदर्शन पाहून अतिशय आनंद होत आहे. मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या सहभागाने या प्रदर्शनातून अनेक वैज्ञानिक कल्पनांना मूर्त रुप आले आहे. हे प्रदर्शन खरोखरच अतिशय उत्कृष्ट आहे. आजचे विद्यार्थी हे भविष्यातील विकसित भारताचा पाया आहेत. विज्ञान हा विषय पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रात्यक्षिकातून जास्त उमगतो. त्यामुळे अशा प्रकारचे प्रदर्शन वर्षातून किमान दोनदा आयोजित करण्यासाठी शिक्षण विभागाने प्रयत्नशील राहावे, असेही त्यांनी नमूद केले.या प्रदर्शनात प्रामुख्याने शून्य कचरा नियोजन, गणितीय सूत्रांवर आधारित प्रकल्प, ई-सायकल मिशन, सेंद्रीय शेती, स्मार्ट सिटी, हायड्रोईलेक्ट्रीक पॉवर जनरेटर, वैद्यकीय कचरा व्यवस्थापन, पूर सूचना प्रणाली, अग्निरोधक यंत्रणा प्रणाली व सुरक्षा उपाययोजना यासह विविध विषयांवरील विज्ञान प्रकल्पांचा समावेश होता.विज्ञान प्रदर्शनात शालेय खुला गटामध्ये पी/दक्षिण विभागातील मिठानगर मुंबई पब्लिक स्कूल (इंग्रजी माध्यम) शाळेने कचरा व्यवस्थापन विषयावरील प्रकल्प सादर करुन प्रथम क्रमांक पटकावला. एन विभागातील पंतनगर मुंबई पब्लिक स्कूल (इंग्रजी माध्यम) शाळेने ‘SMART SPIKE DEFFENCE SYSTEM’ या विषयावरील प्रकल्प सादर करुन द्वितीय क्रमांक पटकावला, तर एफ उत्तर विभागातील सायन मुंबई पब्लिक स्कूलने अग्निशमन यंत्रणा नियोजन विषयावरील प्रकल्प सादर करुन तृतीय क्रमांक पटकावला. तिन्ही शाळांना अनुक्रमे ११ हजार, ८ हजार आणि ५ हजार रुपयांचे रोख रक्कम स्वरुपात बक्षिस प्रदान करण्यात आले.परसबाग प्रकल्प शालेय खुला गटामध्ये ई विभागातील मोमीनपुरा मुंबई पब्लिक स्कूल (सेमी इंग्रजी माध्यम) शाळेने प्रथम क्रमांक पटकावला. एन विभागातील बर्वेनगर मराठी शाळेने द्वितीय तर पी दक्षिण विभागातील आय. बी. पटेल मुंबई पब्लिक स्कूलने तृतीय क्रमांक पटकावला. तिन्ही शाळांना अनुक्रमे ११ हजार, ८ हजार आणि ५ हजार रुपयांचे रोख रक्कम स्वरुपात बक्षिस प्रदान करण्यात आले.
IND vs ZIM : टी-२० वर्ल्ड कप २०२६ च्या सुपर-८ फेरीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मिळालेल्या पराभवाचा वचपा काढत भारतीय संघाने झिम्बाब्वेचा ७२ धावांनी धुव्वा उडवला.
भारताने झिम्बाब्वे विरूद्धच्या सामन्यात उभारला धावांचा डोंगर
चेन्नई : आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ मध्ये झिम्बाब्वे विरूद्धच्या सुपर एट फेरीतील सामन्यात भारताने धावांचा डोंगर रचला. टीम इंडियाने टी ट्वेंटी वर्ल्डकपमधील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी धावसंख्या उभारली. भारताने २० षटकांत चार बाद २५६ धावा केल्या. भारताच्या सहा फलंदाजांनी मिळून तब्बल १७ षटकार मारले. विशेष म्हणजे भारताच्या प्रत्येक फलंदाजाने आज १५० पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने धावा काढल्या आणि झिम्बाब्वेच्या प्रत्येक गोलंदाजाची धुलाई केली. टी ट्वेंटी वर्ल्डकपमधील एका सामन्यातील एका डावातल्या सर्वाधिक षटकारांच्या बाबतीत भारताने विक्रम नोंदवला.भारताकडून संजू सॅमसनने १५ चेंडूत २ षटकार आणि १ चौकार मारत २४ धावा केल्या. अभिषेक शर्माने ३० चेंडूत प्रत्येकी ४ षटकार आणि ४ चौकार मारत ५५ धावा केल्या. ईशान किशनने २४ चेंडूत ३८ धावा करताना १ षटकार आणि ४ चौकार मारले. कर्णधार सूर्यकुमार यादवने १३ चेंडूत २ षटकार आणि ३ चौकार मारत ३३ धावा केल्या. हार्दिक पांड्याने २३ चेंडूत ४ षटकार आणि २ चौकार मारत नाबाद ५० धावा केल्या तर तिलक वर्माने १६ चेंडूत ४ षटकार आणि ३ चौकार मारत नाबाद ४४ धावा केल्या. हार्दिक आणि तिलकने ३१ चेंडूत १६.२५ च्या रनरेटने ८४ धावांची नाबाद भागीदारी केली. झिम्बाब्वेने टाकलेल्या एवढ्या चेंडूंपैकी फक्त २६ चेंडू निर्धाव होते उर्वरित प्रत्येक चेंडूवर भारताने किमान एक धाव काढली होती.सूर्यकुमार यादवने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चार हजार धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. सूर्याने आतापर्यंत १४८ आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या १४० डावांत ३४.१ च्या सरासरीने ४०२४ धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर चार शतके आणि २९ अर्धशतके आहेत.
भारताचा विजय, पुढील फेरीची आशा कायम; दक्षिण आफ्रिका सेमी फायनलमध्ये आणि झिम्बाब्वेचे आव्हान संपले
चेन्नई : आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ मध्ये सुपर एट फेरीचे आजचे दोन्ही सामने सुपरहिट झाले. दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिज विरुद्धचा सामना ९ विकेट राखून जिंकला तर भारताने झिम्बाब्वे विरुद्धचा सामना ७२ धावांनी जिंकला. यामुळे ग्रुप एक मधून दक्षिण आफ्रिका सेमी फायनलमध्ये पोहोचली आहे. भारताची पुढील फेरीत जाण्याची आशा कायम आहे. आता वेस्ट इंडिज विरुद्धचा रविवारचा सामना जिंकल्यास भारत पुढल्या फेरीत जाईल. पण झिम्बाब्वेचे वर्ल्डकप २०२६ मधील आव्हान संपले आहे.नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेणे झिम्बाब्वेला भोवले. भारताने २० षटकांत ४ बाद २५६ धावा केल्या तर झिम्बाब्वेला २० षटकांत ६ बाद १८४ धावा करणेच जमले. भारताकडून नाबाद अर्धशतक झळकावणारा हार्दिक पांड्या सामनावीर झाला.झिम्बाब्वेची फलंदाजीझिम्बाब्वेकडून ब्रायन बेनेटने नाबाद ९७, तदिवानाशे मारुमणीने २०, डायन मायर्सने ६, सिकंदर रझाने ३१, रायन बर्लने शून्य, टोनी मुनयोंगाने ११, ताशिंगा मुसेकिवाने ७, ब्रॅड इव्हान्सने नाबाद १ धावांचे योगदान दिले. भारताच्या अर्शदीपने ३, वरुण चक्रवर्तीने १, अक्षर पटेलने १, शिवम दुबेने १ विकेट घेतल्या.भारताची फलंदाजीभारताकडून संजू सॅमसनने १५ चेंडूत २ षटकार आणि १ चौकार मारत २४ धावा केल्या. अभिषेक शर्माने ३० चेंडूत प्रत्येकी ४ षटकार आणि ४ चौकार मारत ५५ धावा केल्या. ईशान किशनने २४ चेंडूत ३८ धावा करताना १ षटकार आणि ४ चौकार मारले. कर्णधार सूर्यकुमार यादवने १३ चेंडूत २ षटकार आणि ३ चौकार मारत ३३ धावा केल्या. हार्दिक पांड्याने २३ चेंडूत ४ षटकार आणि २ चौकार मारत नाबाद ५० धावा केल्या तर तिलक वर्माने १६ चेंडूत ४ षटकार आणि ३ चौकार मारत नाबाद ४४ धावा केल्या. हार्दिक आणि तिलकने ३१ चेंडूत १६.२५ च्या रनरेटने ८४ धावांची नाबाद भागीदारी केली. झिम्बाब्वेने टाकलेल्या एवढ्या चेंडूंपैकी फक्त २६ चेंडू निर्धाव होते उर्वरित प्रत्येक चेंडूवर भारताने किमान एक धाव काढली होती. झिम्बाब्वेकडून सिकंदर रझा, ब्लेसिंग मुजराबानी, रिचर्ड नगारावा आणि टिनोटेंडा मापोसाने प्रत्येकी १ विकेट घेतली.सूर्यकुमार यादवचा पराक्रमसूर्यकुमार यादवने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चार हजार धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. सूर्याने आतापर्यंत १४८ आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या १४० डावांत ३४.१ च्या सरासरीने ४०२४ धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर चार शतके आणि २९ अर्धशतके आहेत.https://prahaar.in/2026/02/26/india-set-a-record-against-zimbabwe/भारत - झिम्बाब्वे सामन्यात षटकारांचा पाऊसभारत - झिम्बाब्वे सामन्यात षटकारांचा पाऊस पडला. भारताने १७ तर झिम्बाब्वेने ११ षटकार मारले. विशेष म्हणजे भारताच्या प्रत्येक फलंदाजाने आज १५० पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने धावा काढल्या आणि झिम्बाब्वेच्या प्रत्येक गोलंदाजाची धुलाई केली. टी ट्वेंटी वर्ल्डकपमधील एका सामन्यातील एका डावातल्या सर्वाधिक षटकारांच्या बाबतीत भारताने विक्रम नोंदवला. झिम्बाब्वेने टाकलेल्या एवढ्या चेंडूंपैकी फक्त २६ चेंडू निर्धाव होते उर्वरित प्रत्येक चेंडूवर भारताने किमान एक धाव काढली होती.
MP Sanjay Deshmukh Accident:
US-India trade deal: 2021 ते 25 या कालावधीत भारताने अमेरिकेला आपल्या एकूण निर्यातीच्या 18% निर्यात केली. तर एकूण आयातीच्या 6.22% आयात केली. भारताच्या एकूण व्यापारात अमेरिकेबरोबरच्या व्यापाराचा वाटा 10.73% आहे.
IND vs ZIM : कॅप्टन सूर्याचा ‘विराट’पराक्रम! आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गाठला खास पल्ला
IND vs ZIM : या खेळीदरम्यान त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या ४००० धावा पूर्ण केल्या. त्याने १४८ सामन्यांच्या १४० डावांमध्ये ३४ च्या सरासरीने सूर्याने आता ४०२४ धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर ४ शतके आणि २९ अर्धशतके आहेत.
US 126% tariff on solar firms: वारी एनर्जीजसारख्या इतर भारतीय कंपन्यांनी चौकशीत सहभाग घेतला होता, तरीही त्यांनाही सध्या हाच १२६ टक्क्यांचा कर लागू आहे. ही चौकशी अमेरिकन सौर उत्पादकांच्या एका संघटनेने ऑगस्ट २०२४ मध्ये केलेल्या तक्रारीनंतर सुरू झाली होती.
कनिष्ठ अभियंता संवर्गातील भरतीबाबत न्यायालयात सक्षम बाजू मांडा
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या नगर अभियंता विभाग अंतर्गत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/यांत्रिकी व विद्युत) या संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी परीक्षा झाली असली तरी न्यायप्रविष्ठ प्रकरणामुळे या परीक्षेचा निकाल अद्याप जाहीर झालेला नाही. सबब, या प्रकरणी अंतिम सुनावणी लवकर घेण्याबाबत न्यायालयास विनंती करावी, योग्य ती बाजू खंबीरपणे मांडावी, असे निर्देश मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी प्रशासनास दिले आहेत. तसेच, दुय्यम अभियंता भरती प्रक्रियेत छाननी प्रक्रियेत अपात्र तथा अनुपस्थित उमेदवारांमुळे ज्या जागा रिक्त आहेत, त्या जागी प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची नियुक्ती होण्याच्या दृष्टिने प्रशासकीय कार्यवाही वेगाने करावी, असे निर्देशही महापौरांनी दिले आहेत.मुंबई महानगरपालिकेच्या नगर अभियंता विभाग अंतर्गत कनिष्ठ अभियंता व दुय्यम अभियंता संवर्गातील भरती संदर्भात प्रलंबित बाबींच्या अनुषंगाने, महापौर रितू तावडे यांनी महानगरपालिका मुख्यालयातील महापौर दालनात गुरुवारी २६ फेब्रुवारी २०२६ रोजी बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले.अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, नगर अभियंता रामचंद्र कदम, कायदा अधिकारी कोमल पंजाबी, संयुक्त कायदा अधिकारी सुखश्री मोदले, इतर संबंधित अधिकारी तसेच म्युनिसिपल इंजिनिअर्स असोसिएशनचे पदाधिकारी यांच्यासह भरती प्रक्रियेतील उमेदवारांचे निवडक प्रतिनिधी बैठकीस उपस्थित होते. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या संवर्गातील २५० पदे तर कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी व विद्युत) या संवर्गातील १३० पदे भरण्यासाठी १५ ऑक्टोबर २०२४ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यासाठी जवळपास पन्नास हजार उमेदवारांनी परीक्षा दिली आहे. मात्र, जवळपास एक वर्ष उलटूनही परीक्षेचा निकाल जाहीर न झाल्याने उमेदवारांमध्ये अनिश्चिततता आहे. न्यायालयात प्रकरण प्रविष्ठ असल्याने एकूणच प्रक्रिया खोळंबली आहे. असे असले तरी, निकाल जाहीर करण्यास न्यायालयाने रोखलेले नाही, अशी भूमिका उमेदवारांनी मांडली. तसेच, दुय्यम अभियंता भरती प्रक्रियेत छाननी अंती अपात्र तथा अनुपस्थित उमेदवारांच्या जागी प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना पडताळणीसाठी निमंत्रित करावे, अशी मागणीही त्यांनी केली.या चर्चेवर, महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने भूमिका मांडताना अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे म्हणाले की, कनिष्ठ अभियंता संवर्गातील भरतीसाठी प्रसिद्ध जाहिरातीमध्ये - फक्त पदविकाधारक पात्र आहेत – असे नमूद होते. तथापि, पदविका समवेत पदवी देखील ग्राह्य धरावी, या कारणासाठी पदवीधारक उमेदवारांनी माननीय उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर माननीय उच्च न्यायालयाने पदवीधारक उमेदवारांना संधी देण्याबाबत अंतरिम आदेश ११ डिसेंबर २०२४ रोजी दिले. त्यानुसार परीक्षाही झाली. पण, पुन्हा त्याविरोधात माननीय सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आणि उच्च न्यायालयाच्या निर्णयास स्थगिती देण्यात आली आहे. एकूणच, पद भरतीची प्रशासकीय प्रक्रिया आणि न्यायप्रविष्ठ प्रकरणे लक्षात घेता, प्रशासनाकडून वरिष्ठ विधीज्ज्ञ नेमून माननीय न्यायालयासमोर खंबीरपणे बाजू मांडण्यात येत आहे. आता ९ मार्च २०२६ रोजी पुढील सुनावणी होणार आहे, असे त्यांनी नमूद केले.दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर, महापौर रितू तावडे म्हणाल्या की, पद भरती हा उमेदवारांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. त्यात दिरंगाई झाली तर उमेदवारांचे भवितव्य टांगणीला लागते. त्यासोबतच, प्रशासनाला देखील सर्व नियम, कायदे पाळून भरती प्रक्रिया अचूक होईल, याकडे कटाक्षाने लक्ष पुरवावे लागते, जेणेकरुन कोणावरही अन्याय होवू नये. या दोन्ही बाजू लक्षात घेता प्रशासनाने माननीय न्यायालयासमोर अधिकाधिक खंबीरपणे बाजू मांडून, अंतिम सुनावणी लवकर होवून निर्णय देण्याची विनंती न्यायालयास करावी. अन्यथा उन्हाळी सुटी कालावधी सुरु झाला तर आणखी विलंब होवू शकतो. त्यामुळे नगर अभियंता विभाग व कायदा विभागाने योग्य समन्वय साधावा, अशी सूचना महापौर रितू तावडे यांनी केली.
मासिक पाळी दरम्यान रजा योग्य की अयोग्य?
राज्य महिला आयोगाच्या वतीने चर्चासत्राचे आयोजनमुंबई : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून मासिक पाळी दरम्यान पगारी रजा योग्य की अयोग्य याविषयी चर्चासत्राचे आयोजन शुक्रवार, दिनांक २७ फेब्रुवारी २०२६ रोजी सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे करण्यात आले आहे.या चर्चासत्रास महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.चर्चासत्र दरम्यान विविध क्षेत्रातील मान्यवरांसह संवाद साधण्यात येणार आहे. अपर पोलीस महासंचालक अश्वती दोर्जे, मुंबईच्या माजी महापौर निर्मला सामंत - प्रभावळकर, कामगार उपायुक्त निलांबरी भोसले, आरोग्य सेवा संचालनालय आयुक्त कादंबरी बलकवडे, स्त्रीरोगतज्ञ राजश्री कटके, आरोग्य सेवा संचालनालय संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, मनोविकार तज्ञ डॉ. अलका सुब्रमण्यम, सामाजिक कार्यकर्ता ॲड लक्ष्मी यादव, पत्रकार श्रीमती शर्मिला कलगुटकर आणि क्रिडा प्रशिक्षक पुजा सुर्वे यांच्याशी मजलिस संस्थेच्या अँड्र्यू डिमेलो या संवाद साधणार आहेत.या चर्चासत्राच्या आयोजनाबाबत आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर म्हणाल्या, मासिक पाळी दरम्यान पगारी रजा असावी किंवा नाही याबाबत चर्चा करताना समानता, मूलभूत हक्क, महिलांचे आरोग्य, रजेचे होणारे फायदे - तोटे, मासिक पाळी रजेतून लिंग समानता आणण्यासाठी कृती कार्यक्रम या अनुषंगाने ही सविस्तर चर्चा होणार आहे. विविध क्षेत्रातील तज्ञांना यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. तसेच विधी व न्याय विभाग, समाजसेवी संस्था, शिक्षण संस्था, मनुष्यबळ विकास तज्ञ अशा घटकांचीही यावेळी उपस्थिती असणार आहे. सखोल चर्चेनंतर याबाबत राज्य शासनास अहवाल सादर करण्यात येणार आहे.
शाळा दत्तक धोरण रद्द करण्याची काँग्रेस आमदार पुत्राची मागणी नामंजूर
मुंबई (विशेष प्रतिनिधी) :मुंबई महापालिकेने खासगी संस्था, स्वयंसेवी संस्था आदींना महापालिकेच्या दिलेल्या दत्तक तत्वावर दिलेल्या शाळांचे धोरण तातडीने रद्द करण्याची मागणी मालाडमधील काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांचे पुत्र नगरसेवक हैदरअली शेख यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली होती. मात्र, ही मागणी म्हणजे कई पे इशारा कई पे निगाहें अशाप्रकारची असून मालाडमधील एका शाळेला डोळयासमोर ठेवून ही मागणी काँग्रेसच्या नगरसेवकाने केल्याची बाब निदर्शनास आणताच भाजपचे सर्व नगरसेवक आक्रमक होत सभागृहाला त्याचा खरा आरसा दाखवला. याला उबाठासह इतरांचीही साथ लाभल्याने काँग्रेस पक्षाचे नगरसेवक एकाकी पडला आणि ही ठरावाची सूचना बहुमताने फेटाळली गेली.मुंबई महापालिकेने सन २००७ पासून खासगी संस्था, स्वयंसेवी संस्था यांना महापालिकेच्या शाळा दत्तक देण्याचे धोरण राबवत आहे, या धोरणांतर्गत महापालिकेच्या शाळज्ञंची पायाभूत सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता आणि प्रशासन सुधारणे हे मुख्य उद्दिष्ट्य आहे. महापालिकेच्या शाळा दत्तक घेणाऱ्या संस्थांना शाहांची दुरुस्ती, रंगरंगोटी व स्वच्छता, संगणकीय लॅब, शैक्षणिक साहित्य पुरवणे, प्रशिक्षित शिक्षकांची नेमणूक करणे यासर्व जबाबदाऱ्या पार पाडताच असे नाही असे सांगत ही मागणी ठरावच्या सूचनेद्वारे हैदरअली शेख यांनी केली होती.महापालिका सभागृहात ही मागणी केल्यानंतर, स्वीकृत नगरसेवक प्रविण छेडा यांनी अनेक सेवाभावी शिक्षण संस्था या धोरणांतर्गत चांगल्याप्रकारे काम करत असून जर ही मागणी मान्य केली तर मुलांना शिक्षण देणाऱ्या संस्था पुढे येणार नाहीत. यामाध्यमातून शिक्षण देणाऱ्या संस्थांना मदतच होत आहे असे सांगत विरोध केला. त्यानंतर मालाडमधील भाजपचे नगरसेवक योगेश वर्मा यांनी ही मागणी म्हणजे कहीं पें इशारा, कहीं पें निगाहे असल्याचे सांगत मालाडमधील एका चांगल्या संस्थेमार्फत चालणाऱ्या शाळेला समोर ठेवून ही मागणी झाली आहे. पण ज्या संस्थेला काढून सध्या ज्या संस्थेला दिले, त्या संस्थेला दिल्यानंतर शिक्षणाची प्रगती होवून निकाल ८० टक्क्यांवर पोहाचला आहे, यापूर्वीच्या संस्थेचा निकाल ५० टक्क्क्यांच्या खाली होता. त्यामुळे ही शाळा बंद करण्याचा घाट असून याला आमचा विरोध असल्याचे सांगितले. यावर काँग्रेसच्या नगरसेवकांनी एकच गोंधळ घालण्यास सुरुवात केली.यावर विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी कोणत्याही ठरावाच्या सूचनेमुळे सभागृहात गोंधळ तथा वाद होणार नाही याची काळजी प्रत्येक पक्षाने गटनेत्यांनी घ्यायला हवी असे सांगत काँग्रेस गटनेत्यांची अप्रत्यक्ष कानउघडणी केली.यावर सभागृहनेते गणेश खणकर यांनी हा विषय म्हणावा तेवढा साधा नसून जर अशाप्रकारे शाळांच्या संस्थांबाबत शंका उपस्थित केली जात असेल तर यापूर्वीच्या संस्था आणि आताच्या संस्था यांच्या कामगिरीचे ऑडीट करण्यात यावे म्हणजे कोणती संस्था किती चांगली कामगिरी करते समजून येईल असे सांगत या ठरावाच्या सूचनेला विरोध केला. यावर महापौरांनी ठरावाची सूचना मंजुरीला टाकली. पण काँग्रेस वगळता कुणीही पाठिंबा दिला नाही. त्यामुळे बहुमताच्या आधारे महापौरांनी ठरावाची सूचना नामंजूर केली. त्यामुळे नामंजूर ठरेली ही या महापालिकेतील पहिली ठरावाची सूचना आहे.
तुमच्यापेक्षा सभागृहात गोंधळ घालण्यात आम्ही एक्सपर्ट
मुंबई (विशेष प्रतिनिधी) :मुंबई महापालिकेचे सर्व पक्षांच्या नगरसेवकांना सोबत घेवून चांगल्याप्रकारे कामकाज क करायचा हाच मानस आमचा सत्ताधारी पक्षाचा आहे. परंतु काँग्रेस पक्षाचे नगरसेवक सातत्याने प्रत्येक विषयांवर जागा सोडून जर पुढे येत असतील तर त्यावर रिऍक्शन ही होणारच. सभागृहात तुम्हालाच गोंधळ घालता येतो असे नाही तर आम्हालाही गोंधळ घालता येतो, आतापर्यंंत आम्ही विरोधी पक्षातच होतो आणि गोंधळ कसा घालायचा याचेही आम्हाला चांगलेच माहिती आहे. आम्ही त्यात एक्सपर्ट आहोत अशा शब्दांत महापालिका सभागृहात गोंधळ घालणाऱ्या काँग्रेसच्या गटनेत्यासह नगरसेवकाची कानउघडणी केली.मुंबई महापालिकेच्या सभेत हैदर शेख यांनी मांडलेल्या ठरावाच्या सूचनेवर भाजपचे प्रविण छेडा यांनी हरकत घेतली. यावर काँग्रेसचे गटनेते अश्रफ आझमी यांनी ठरावाच्या सूचनेचे समर्थन करत हरकतीच्या मुद्दयाला विरोध करण्याचा प्रयत्न केला. यावर भाजपचे योगेश वर्मा यांनी सत्यस्थिती मांडण्याचा प्रयत्न केल्यानंतर काँग्रेसचे नगरसेवक आक्रमक झाले आणि त्यांनी जागा सोडून गोंधळ घालण्यास सुरुवात केली. काँग्रेसच्या नगरसेवकांकडून हा गोंधळ सुरुच असल्यामुळे अखेर सभागृहनेते गणेश खणकर यांनी शेलक्या शब्दांत काँग्रेस नगरसेवकांचा समाचार घेतला.गणेश खणकर यांनी आपल्या भाषणात प्रत्येक पक्षाला आपल्या पक्षाचे मत मांडायचा अधिकार असून प्रत्येक पक्षाची मत मांडावे. तसेच या सभागृहात आम्ही मुंबईकरांची अपेक्षा पूर्ण करायला आलो आहोत, त्यामुळे या सभागृहाचे नियम न मोडत आपल्या सर्वांंना सोबत घेवून काम करायचे आहे. त्यामुळे कुठल्याही पक्षाने आधी गैरसमज करून घेवू नये. आणि आपल्याला जर गोंधळ घालायचा असेल तर आम्ही आपल्यापेक्षा एक्सपर्ट आहोत, अनेक वर्षे आम्ही विरोधी पक्षातच होतो. त्यामुळे काँग्रेसच्या नगरसेवकांनी आधी हे लक्षात घ्यावे आणि गोंधळ घालण्याचा पुन्हा प्रयत्न करावा, पण त्यानंतर जी प्रतिक्रिया उमटेल ती सहन करण्याचीही तयारी ठेवावी अशाप्रकारचाही इशारा त्यांनी दिला.महापौरांनीही झापले नगरसेवकांनासभागृहातील नियमित तिसऱ्या सभागृहात उपस्थित नगरसेवकांकडून नाव न पुकारण्याआधीच बोलण्यासाठी उभे राहत असल्याची बाबत निदर्शनास आल्यानंतर महापौर रितू तावडे यांनी सर्वच पक्षाच्या नगरसेवकांना चांगलीच समज दिली. जोवर मी आपले नाव पुकारत नाही,तोवर कुठल्याही सदस्याने उभे राहून बोलण्याचा प्रयत्न करू नये. तसेच सभागृहामध्ये व्हिडीओ चित्रण करण्यात येवू अशाप्रकारच्या सूचना करत चांगलेच झापले. त्यामुळे महापौरांच्या सूचनेनंतर तरी सभागृहात नगरसेवकांकडून चांगल्याप्रकारची वर्तवणूक होईल अशाप्रकारचा आशा व्यक्त केली जात आहे.
Summer : उन्हाळ्यात फ्रिज वापरताना ‘या’चुका टाळा; नाहीतर अन्नासह आरोग्यालाही होईल मोठा धोका
उन्हाळ्यात जशी एसी किंवा कूलरची काळजी घेतो, तशीच फ्रिजची देखील घ्या.
IND vs ZIM : झिम्बाब्वेविरुद्धच्या या 'करो या मरो'च्या लढतीत टी-२० वर्ल्ड कपच्या इतिहासातील भारताची ही दुसरी सर्वात यशस्वी पॉवरप्ले कामगिरी केली आहे.
Indapur News : सोलापूर–पुणे महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा दुर्दैवी मृत्यू
सोलापूर–पुणे राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर (Indapur News) तालुक्यातील डाळज नं. २ परिसरात मंगळवारी सायंकाळी सुमारे ५ वाजता भीषण अपघात घडला. या दुर्घटनेत इको गाडीतील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे.
खोट्या गुन्ह्यांमुळे निरपराध व्यक्तींचे आयुष्य उद्ध्वस्त होण्याच्या वाढत्या घटनांची सर्वोच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे.
मुंबईतील फेरीवाला माफियाराज कायमचेच उखडून टाका
मुंबई (विशेष प्रतिनिधी) :मुंबईतील वाढत्या फेरीवाल्यांवरील कारवाई सध्या प्रशासनाने कडक केली असली तरी या फेरीवाल्यांचे प्रस्थ वाढवणाऱ्या माफियांविरोधात महापालिका सभागृहात प्रचंड गरमागरमी झाली. उबाठाच्या नगरसेवकाने फेरीवाला माफियाच्या विरोधात उपस्थित केलेल्या हरकतीच्य मुद्दयाला भाजपनेही पाठिंबा देत फेरीवाल्यांचे माफिया राज कायमच उखडून टाका अशी मागणी सभागृहात केली. रोटी,कपडा मकानचा अधिकार देतानाच शहराचा बेरंग होत असेल तर ते आम्ही खपवून घेणार नाही. रोटी कपडा मकानची काळजी घेणाऱ्यांनी घ्यावी आम्हाला मुंबईची काळजी असल्याचे सांगत फेरीवाल्यांच्या माफियांवर कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान महापौरांनी यासाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगत हा महापौरांनी हरकतीचा मुद्दा राखून ठेवला.मुंबई महापालिका सभागृहात उबाठाचे नगरसेवक शैलेश फणसे यांनी हरकतीच्या मुद्दयाद्वारे फेरीवाल्यांमधील माफियाराजवर चिंता व्यक्त करत प्रशासनाच्यावतीने कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नसल्याची नाराजी व्यक्त केली. महापालिका आयुक्तांनी मुंबईतील काही भाग फेरीवाला मुक्त करण्याची घोषणा केली असे सांगत फणसे यांनी मुंबईत जसे भूमाफिया असतात तसेच आता फेरीवाला माफिया तयार आहेत. वर्सोवा येथील दादाभाई नौरोजी उद्यानाला फेरीवाल्यांनी विळखा घातला आहे.नागरिकांना उद्यात शिरता येत नाही. आणि या फेरीवाल्यांचे माफिया आता ऑफिस टाकून बसले आहेत. त्यांना तीन ते चार नोटीस देवूनही त्यांच्या कार्यालयावर कारवाई झालेली नाही. त्यांचे रॅकेट एवढे आहेत, त्यांच्या फेरीवाल्यांचे सामान आणि हातगाडी तात्काळ सोडली जाते. त्यामुळे महापालिका कारवाई करत असताना या माफियांवर कधी कारवाई करणार असा सवाल त्यांनी केला.यावर काँग्रेसचे अश्रफ आझमी यांनी माफियांवर न बोलता फेरीवाल्यांवरील कारवाईमुुळे त्यांचे संसार चालणार नसल्याबाबत चिंता व्यक्त केली.यावर स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी उबाठाच्या फणसे यांच्या हरकतीच्या मुद्दयाला राष्ट्रभक्त नागरिक म्हणून मी याला पाठिंबा देत असल्याचे स्पष्ट केले. परवाना विभागाचे अधिकारी यांची माफियांसोबत मिलीभगत असल्याचे सांगत शिंदे यांनी फेरीवाल्यांकडून महापालिकेच्या तिजोरीत येणार पैसा माफियांकडे जात आहे. त्यामुळे यापूर्वी ज्याप्रकारे ट्रेड रिफ्युज चार्जेस आकारायचो, त्याच धर्तीवर पुन्हा फेरीवाल्यांकडून हे शुल्क वसूल करावे जेणेकरून महापाालिकेच्या तिजोरीत याचा महसूल जमा होईल. हे फेरीवाल्यांचे माफिया मुंबईचे चित्र असून भविष्य लोकसंख्येचे चित्र बदलण्याचाही त्यांचा प्रयत्न असल्याचे सांगत शिंदे यांनी फेरीवाल्यांच्या माफियांवर कारवाई व्हायलाच हवी अशी मागणी केली.शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांनी मुंबईकरांना पदपथ चालण्यासाठी चांगल्या दर्जाचे बनवण्याची स्वप्ने दाखवली जात आहे. पण सध्या पदपथ अडवून बसलेल्या फेरीवाल्यांवर कारवाई होणार नसेल तर त्याचा उपयोग काय असा सवाल केला. शिवसेनेच्या संध्या दोशी यांनी रस्ते अडवून बसलेल्या पात्र फेरीवाल्यांचे पुनर्वसन मोकळ्या जागांवर करून फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. तर उबाठाच्या नगरसेविका आणि माजी महापौर श्रध्दा जाधव यांनी रेल्वे स्थानक परिसरासह गर्दीची ठिकाणे फेरीवाला मुक्त व्हायला हवी अशी मागणी करतानाच ही कारवाई मुंबईत तीव्र करणाऱ्या अतिरिक्त आयुक्त डॉ अश्विनी जोशी यांचे अभिनंदन केले. त्यांनाही ही मोहिम राबवताना सुरुवातीला पाठिंबा मिळाला नाही. आयुक्तांचा ना खालच्या अधिकाऱ्यांचा. तरीही त्यांनी कारवाई सुरुच ठेवली. त्यामुळे जिथे कारवाई झाली आहे, तिथे जर पुन्हा फेरीवाले बसत असतील तर तेथील महापालिकेच्या अधिकाऱ्याला निलंबित करावे अशी मागणी केली. यावेळी झालेल्या चर्चेत अनेक सदस्यांनी भाग घेतला.
Hingoli: खैरी घुमट येथील कानिफनाथ गडावर शिखरी काट्याचा नेत्रदीपक रिंगण सोहळा उत्साहात संपन्न
Hingoli : दरवर्षी नवस फेडण्यासाठी येणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेऊन सेनगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक दीपक मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
WEF CEO Borge Brende: अमेरिकेच्या न्याय विभागाने एपस्टाईनशी संबंधित ३० लाखांहून अधिक पानांचे दस्तऐवज सार्वजनिक केले आहेत. फेडरल लैंगिक तस्करीच्या आरोपाखाली खटला सुरू असताना २०१९ मध्ये तुरुंगात एपस्टाईनने आत्महत्या केली होती.
फ्लाइट टिकट रद्द करण्यावर आता शुल्क लागणार नाही; डीजीसीएने केला रिफंड नियमांमध्ये मोठा बदल
नवी दिल्ली : विमान प्रवाशांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. आता विमान प्रवाशांना प्रवासी बुकिंगच्या ४८ तासांच्या आत कोणत्याही अतिरिक्त शुल्काविना आपले तिकीट रद्द करणे किंवा बदलून घेता येईल. त्यासाठी काही अटींचे पालन करावे लागेल. डायरेक्टर जनरल ऑफ सिविल एविएशनने (डीजीसीए) रिफंड नियमांमध्ये केलेल्या बदलांमुळे हवाई प्रवाशांसाठी मोठी सोय होणार आहे.सार्वजनिक वाहतूक कंपन्यांच्या प्रवाशांना बदललेल्या सिव्हिल एविएशन नियमांनुसार, एअरलाइन तिकिट रिफंडसाठी, प्रवाशांच्या नावात सुधारणा करण्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारू शकणार नाही, जर बुकिंगच्या चोवीस तासांच्या आत चुका सांगितल्या गेल्या आणि तिकीट थेट एअरलाइनच्या वेबसाइटवरून खरेदी केलेले असेल. याबाबत डीजीसीएने सांगितले की, ट्रॅव्हल एजंट किंवा पोर्टलद्वारे तिकीट खरेदी केल्यास रिफंडची जबाबदारी एअरलाइनची राहील, कारण एजंट हे त्यांच्या नेमलेल्या प्रतिनिधी असतात. एअरलाइनला हे सुनिश्चित करावे लागेल की रिफंड प्रक्रिया १४ कार्यदिवसांच्या आत पूर्ण होईल. मंगळवारी २४ फेब्रुवारीला जारी करण्यात आलेल्या सुधारित सीएआरमध्ये प्रवाशांच्या वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत तिकीट रद्द करण्याच्या नियमांमध्येही बदल केला आहे. हे बदल रिफंड प्रक्रियेत होणाऱ्या विलंबामुळे प्रवाशांच्या वाढत्या तक्रारींमुळे करण्यात आले आहेत. हा विषय डिसेंबर २०२५ मध्ये इंडिगोशी संबंधित एका फ्लाइटमध्ये अडचणींच्या दरम्यानही समोर आला होता, जेव्हा सिव्हिल एविएशन मंत्रालयाने एअरलाइनला ठरलेल्या वेळेत पेंडिंग रिफंड पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. या नवीन बदलांचा उद्देश रिफंड प्रक्रिया प्रवाशांसाठी सुलभ करणे आणि एअरलाइनच्या जबाबदारीची खात्री करणे आहे.
राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची अशी झाली निवड
मुंबई : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनस महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची गुरुवारी एकमताने निवड करण्यात आली. कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत हा प्रस्ताव मांडला. उपस्थित सर्व नेत्यांनी हात उंचावून आणि टाळ्यांच्या कडकडाटात या प्रस्तावाला संमती दिली.मुंबईत पार पडलेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीला सुनेत्रा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, पार्थ पवार यांच्यासह देशभरातील पदाधिकारी उपस्थित होते. अजित पवारांच्या आठवणींना उजाळा देताना प्रफुल्ल पटेल भावूक झाले. ते म्हणाले, अजितदादा वेगळ्या मातीचे बनले होते. त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केले आणि पक्षाला राष्ट्रीय ओळख मिळवून दिली. २८ जानेवारीचा तो दिवस आपल्या सर्वांसाठी धक्कादायक होता. दादा आपल्यातून निघून गेले, पण त्यांनी शिकवलेला लढा आणि त्यांचा निश्चय आपल्याला पुढे न्यायचा आहे. आता सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वाखाली हा पक्ष अधिक जोमाने काम करेल, असा विश्वास पटेल यांनी व्यक्त केला.मागच्या काही दिवसांत पक्षांतर्गत घडामोडींवरून टीका करणाऱ्यांनाही पटेल यांनी प्रत्युत्तर दिले. काही लोक पोटात एक आणि ओठात एक ठेवून बोलत होते. मात्र, आम्ही योग्य वेळी योग्य निर्णय घेतला. सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करून आम्ही आमची दिशा स्पष्ट केली होती. आता त्या पक्षाच्या सर्वोच्च पदी विराजमान झाल्या आहेत, असे पटेल म्हणाले.https://prahaar.in/2026/02/26/sunetra-pawar-elected-as-ncp-president-by-voice-vote/बैठकीत काय घडले?प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. सर्व प्रांतांतील प्रतिनिधींनी त्याला पाठिंबा दिला. या बैठकीत पार्थ पवार यांच्याकडेही लवकरच मोठी संघटनात्मक जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष आता नव्या जोमाने कामाला लागणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.अजितदादांनी माझ्यावर विश्वास टाकून मला कार्याध्यक्ष केले होते. आज त्यांच्या अनुपस्थितीत पक्षाला खंबीर नेतृत्वाची गरज आहे. सुनेत्रा पवार या सक्षमपणे ही जबाबदारी पेलतील. - प्रफुल्ल पटेल, कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
मुंबई : प्रलोभने दाखवून किंवा बळजबरीने केल्या जाणाऱ्या धर्मांतराच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी राज्य सरकार आता कठोर पावले उचलण्याच्या तयारीत आहे. राज्यात लवकरच ‘धर्मांतरबंदी कायदा’ लागू करण्याचे संकेत गृहराज्यमंत्री (ग्रामीण) पंकज भोयर यांनी गुरुवारी विधानभवन परिसरात माध्यमांशी बोलताना दिले.धर्मांतराच्या तक्रारींची दखल घेत सरकार यासंदर्भातील कायद्याचा मसुदा आणि अंमलबजावणीबाबत गांभीर्याने विचार करत आहे. कोणाचेही नुकसान करण्याचा आमचा हेतू नाही, मात्र कायद्याचा धाक असणे आवश्यक आहे, असे भोयर म्हणाले. राज्यातील मदरशांमध्ये चालणाऱ्या उपक्रमांबाबतही त्यांनी महत्त्वपूर्ण विधान केले. मदरशांमधील कामाची आणि तिथे घडणाऱ्या प्रकारांची सखोल पडताळणी केली जाईल. त्यानंतर पुढील योग्य तो कायदेशीर निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका मदरशात दोन लहान मुलांना अमानुष मारहाण होत असल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित झाला आहे. या प्रकरणाची सत्यता पडताळण्याचे आदेश सिंधुदुर्ग पोलिसांना देण्यात आले असून, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.ऑर्केस्ट्रा बारचा परवाना जप्त करणारराज्यात ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली चालणाऱ्या अवैध धंद्यांवर सरकारने चाप बसवण्याचे ठरवले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बारचा परवाना पहिल्यांदा काही दिवसांसाठी निलंबित केला जाईल. मात्र, वारंवार नियमांची पायमल्ली होत असल्याचे आढळल्यास, संबंधित बारचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असा इशारा भोयर यांनी दिला.मंत्रालय हे अन्यायाचे केंद्र नाहीमराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मंत्रालयाबाबत केलेल्या विधानांचाही पंकज भोयर यांनी समाचार घेतला. मंत्रालय हे कोणाच्या विरोधात कट रचण्याचे ठिकाण नसून सर्वसामान्यांना न्याय देणारे केंद्र आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांनी मंत्रालयाविषयी चुकीची विधाने करणे टाळावे, असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.
पिंट्या’ फेम रोहन गुजर होणार बाबा; आठ वर्षांनंतर आयुष्यातआला आनंद
मुंबई : 'होणार सून मी या घरची' या मालिकेतून घराघरात पोहोचलेला पिंट्या म्हणजेच अभिनेता रोहन गुजर लवकरच बाबा होण्याचा आनंद अनुभवणार आहे. लग्नानंतर तब्बल आठ वर्षांनी त्याच्या कुटुंबात चिमुकल्या पाहुण्याचे आगमन होणार असल्याची गोड बातमी त्याने चाहत्यांसोबत शेअर केली आहे. या खास क्षणाचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.डोहाळे जेवणाचा सोहळारोहनची पत्नी स्नेहल हिच्या डोहाळेजेवणाचा कार्यक्रम नुकताच पार पडला. स्नेहलने पारंपरिक साडी आणि फुलांचे दागिने परिधान केले होते, तर रोहनने देखील समारंभाला साजेसा पोशाख केला होता. कुटुंबीय आणि जिवलग मित्रांच्या उपस्थितीत हा सोहळा रंगला.सोशल मीडियावरून दिली खुशखबरअभिनेत्याने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर व्हिडिओ शेअर करत या विशेष क्षणाबद्दल भावना व्यक्त केल्या. “हा दिवस आणखी खास बनवणाऱ्या सगळ्यांचे आभार,” असे कॅप्शन देत त्याने चाहत्यांचे प्रेम स्वीकारले. पोस्टवर चाहत्यांसह अनेक कलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.रोहन आणि स्नेहल यांनी २०१७ मध्ये विवाह केला होता. कोरोनाकाळात स्नेहलने आरोग्याशी संबंधित गंभीर लढा दिला होता. त्या कठीण काळात रोहन तिच्यासोबत ठामपणे उभा राहिला. आता या नव्या टप्प्यामुळे त्यांच्या आयुष्यात आनंदाची नवी पहाट उगवली आहे.कारकिर्दीचा प्रवासरोहनने 'होणार सून मी या घरची' या मालिकेत साकारलेल्या पिंट्याच्या भूमिकेमुळे लोकप्रियता मिळवली. नंतर लव्ह लग्न लोचा, सांग तू आहेस ना, नवी जन्मेन मी यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केलं . एकांकिकेपासून मालिका, चित्रपट असा प्रवास करणारा अभिनेता रोहन गुजर 'आमने सामने' नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.
मुंबई : ऊर्जा क्षेत्रात कार्यरत असलेल्या बाजारपेठेचा लाभ उठवित महावितरणने आयपीओ (इनिशियल पब्लिक ऑफरिंग) आणत उत्पन्नाचा कायमस्वरूपी स्रोत निर्माण करून तोट्याकडून नफ्याकडे वळावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दिले. तसेच कंपनीने आपल्या कारभारात ' कॉर्पोरेट गव्हर्नन्स' चा अंमल करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.विधानभवनात आयोजित महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या बैठकीत ते बोलत होते. फडणवीस म्हणाले, ऊर्जा विभागाने एमएसईबी सोलर अॅग्रो पॉवर लिमिटेड कंपनी निर्माण केली आहे. नवीन कंपनीमुळे कृषी क्षेत्राच्या दायित्वापोटी सध्या तोट्यात असलेल्या महावितरण कंपनीचे विभाजन झाल्यामुळे कंपनी नफ्यात आलेली दिसेल. या कंपनीचे कार्यान्वयन सुरू करण्याची सूचनाही त्यांनी दिली.कृषी क्षेत्राच्या राज्य शासनाच्या हमीची रक्कम कंपनीला येणाऱ्या वित्त आयोगाच्या निधीतून देण्यात यावी. नवीन सोलर ॲग्रो पावर लिमिटेड कंपनीला ठराविक मर्यादेपर्यंत आणि कालावधीसाठी शासनाच्या वतीने अनुदान देण्यात येईल. त्यानंतर कंपनीला स्वतःच्या उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करावे लागतील. जेणेकरून भविष्यात शासनाकडे निधी मागणीची वेळ येणार नाही, असेही फडणवीस यावेळी म्हणाले.फायदा काय होणार?- भांडवली बाजारात कंपनीने ' आयपीओ' च्या माध्यमातून प्रवेश केल्यास मोठ्या प्रमाणावर समभाग धारकांकडून गुंतवणूक होऊन कंपनीसाठी निधी उपलब्ध करता येईल. सध्या कंपनीची ७६ हजार १८९ कोटी रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये ५९ हजार ५२७ कोटी रुपये कृषी क्षेत्राशी सबंधित आहेत. कंपनीला स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी आर्थिक पुनर्रचनेची गरज आहे.- शासनाकडून हमी स्वरूपात असलेल्या ३२ हजार ६७९ कोटी देण्याबाबत टप्प्याटप्प्याने कार्यवाही करण्यात यावी, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. भारत सरकारच्या प्रस्तावित योजनेनुसार राज्य शासन जीएसडीपीच्या (सकल राज्य देशांतर्गत उत्पादन) ०.५ टक्के रक्कम महावितरणला मिळण्यासाठी प्रयत्न करावे.- प्रस्तावित पुनर्रचना योजनेच्या अंमलबजावणीनंतर निधी मागण्याची आवश्यकता राहणार नसल्याने शासनाची बचत होणार आहे. यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करून कार्यवाही पूर्ण करावी, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
IND vs ZIM : संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा या जोडीने ४८ धावांची सलामी देत या स्पर्धेतील भारताची सर्वात मोठी ओपनिंग पार्टनरशिप नोंदवली आहे.
PM Kisan 22nd Installment Date: पीएम किसानचा 22वा हप्ता लवकरच; अनेकांची नावे यादीतून वगळली
PM Kisan 22nd Installment Date:
Anil Ambani : अनिल अंबानी ईडीसमोर हजर; मनी लॉंड्रिंग प्रकरणी दुसऱ्यांदा चौकशी
रिलायन्स ग्रुपचे माजी अध्यक्ष अनिल अंबानी हे आज दिल्लीतील अंमलबजावणी संचालनालयासमोर हजर झाले.
मुंबई : मनोरंजन क्षेत्रातील सर्वांची आवडती जोडी आणि चाहते ज्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत होते असे दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा आणि रश्मीका मंदाना अखेर विवाह बंधनात अडकले आहेतआज २६ फेब्रुवारी २०२६ ला राजस्थानच्या उदयपूरमध्ये दोघांनी आयटीसी मेमेंटोज येथे लग्नगाठ बांधली. विवाह सोहळा हा दोघांच्या रितीरिवाजने संपन्न झाला आहे. सकाळी पारंपरिक तेलगू पद्धतीने तर संध्याकाळी रश्मिकाचा कोडवा पद्धतीने करण्यात आला. लग्न अगदीच जवळच्या मोजक्या पाहुण्यांच्या उपस्तिथीत पार पडले. अत्यंत साध्या आणि पारंपरिक पद्धतीने, शांततेत विवाह सोहळा संपन्न झाला.
सरकारी पदांवर भरतीसाठी दबाव वाढत असताना आणि निषेध तीव्र होत असताना, राज्य सरकार जवळजवळ ६०,००० रिक्त जागा भरण्याची योजना आखत (Protest of Unemployed People) आहे आणि नेमकी संख्या अंतिम करण्यासाठी विविध विभागांसोबत काम करत आहे.
NCERTच्या पुस्तकात “न्यायव्यवस्थेतील भ्रष्टाचार”धडा; सर्वोच्च न्यायालयाने घेतला मोठा निर्णय
NCERT: दरम्यान, गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने सदर पाठ्यपुस्तकाच्या पुढील मुद्रण, प्रकाशन तसेच डिजिटल प्रसारावर संपूर्ण बंदी घातली आहे.
Rajya Sabha elections : महाराष्ट्र विधानसभेतील पक्षबळाच्या आधारे भाजप चार उमेदवार निवडून आणू शकतो, तर मित्रपक्ष शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (राकाँप) प्रत्येकी एक जागा मिळवू शकतो.
SA vs WI : दक्षिण आफ्रिकेच्या या विजयाचा मोठा फायदा भारतीय संघाला झाला असून, भारतासाठी आता सेमीफायनलची समीकरणे सोपी झाली आहेत.
दक्षिण आफ्रिकेचा वेस्ट इंडिजवर दणदणीत विजय
अहमदाबाद : वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ अंतर्गत सुपर ८ फेरीचा सामना दक्षिण आफ्रिकेने नऊ विकेट राखून जिंकला. या विजयामुळे दक्षिण आफ्रिकेचे सेमी फायनलच्या दिशेने आणखी एक दमदार पाऊल पडले आहे. वेस्ट इंडिजच्या सेमी फायनल खेळण्याच्या आशा धूसर झाल्या आहेत. भारताची सेमी फायनल खेळण्याची आशा जिवंत राहिली आहे.सुपर ८ मध्ये सुरुवातीला झिम्बाब्वे विरुद्धचा सामना १०७ धावांनी तर दक्षिण आफ्रिकेने भारताविरूद्धचा सामना ७६ धावांनी जिंकला आहे. यामुळे वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना दक्षिण आफ्रिकेने जिंकला तरच भारताची सेमी फायनल खेळण्याची आशा जिवंत राहणार होती. आता टीम इंडियाला झिम्बाब्वे विरुद्धचा सामना जिंकल्यास रविवारी वेस्ट इंडिजविरुद्ध विजय मिळवत सेमी फायनल गाठणे शक्य होणार आहे.वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या सामन्यात नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेने गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या वेस्ट इंडिजने २० षटकांत आठ बाद १७६ धावा केल्या तर दक्षिण आफ्रिकेने १६.१ षटकांत एक बाद १७७ धावा करून सामना ९ विकेट राखून आरामात जिंकला. दक्षिण आफ्रिकेने २३ चेंडू आणि ९ विकेट राखून वेस्ट इंडिज विरुद्ध विजय मिळवला. या विजयामुळे सुपर ८ फेरीत चार गुण आणि दोन विजयांसह दक्षिण ग्रुप एकमध्ये पहिल्या स्थानावर आहे. त्यांची धावगती +२,८९० आहे. भारताने झिम्बाब्वे विरुद्धचा सामना जिंकल्यास दक्षिण आफ्रिका सेमी फायनलसाठी पात्र होणार आहे.दक्षिण आफ्रिकेने अचूक टप्प्यावर गोलंदाजी करुन वेस्ट इंडिजला २०० चा टप्पा ओलांडू दिला नाही. कागिसो रबाडा आणि लुंगी न्गिडीने वेस्ट इंडिजला हुशारीने सापळ्यात अडकवले. याउलट वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांना दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजीला आळा घालणे जमले नाही. दक्षिण आफ्रिकेने सर्वांगीण खेळ कायम राखत टी२० वर्ल्डकपमध्ये वेस्ट इंडिजवर ९ विकेटनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने सेमी फायनल फेरीतले स्थान जवळपास पक्कं केलं आहे.गुरुवारी वेस्ट इंडिजने दक्षिण आफ्रिकेसमोर १७७ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग दक्षिण आफ्रिकेने एकच विकेट गमावत १६.१ षटकात पूर्ण केला. दक्षिण आफ्रिकेसाठी कर्णधार एडेन मार्करमने अर्धशतकी खेळी केली. दक्षिण आफ्रिकेकडून मार्करम आणि क्विंटन डी कॉक यांनी आक्रमक सुरुवात केली होती. डी कॉकने स्फोटक फलंदाजी करताना मार्करमसोबत पहिल्या विकेटसाठी ८ षटकातच ९५ धावांची भागीदारी केली. ८ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर डी कॉकला रोस्टन चेसने जेसन होल्डरच्या हातून झेलबाद केले. डी कॉकने २४ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकारांसह ४७ धावांची खेळी केली. त्यानंतरही रायन रिकल्टनने कर्णधाराची दमदार साथ देत संघाला विजयापर्यंत पोहचवले. वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांना विकेट्स पटकावणं आणि धावा रोखणं या दोन्ही आघाड्यांवर अपयश आलं. एडन मारक्रमलाच सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.आफ्रिकेचा कर्णधार एडन मारक्रमने टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या. मात्र त्यांच्या गोलंदाजांनी अत्यंत शिस्तबद्ध मारा करत वेस्ट इंडिजच्या ताकदवान फटकेबाजांना रोखलं. कर्णधार शे होपने चांगली सुरुवात केली होती. मात्र कागिसो रबाडा आणि लुंगी एन्गिडी यांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना सापळ्यात रचलं. शिमोरन हेटमायरला पहिल्याच चेंडूवर जीवदान मिळाले. मात्र तो त्याच षटकात तंबूत परतला.टी-२० विश्वचषकाच्या सुपर-८ फेरीतील अत्यंत महत्त्वाच्या लढतीत वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी आपल्या जिद्दीचे दर्शन घडवले. दक्षिण आफ्रिकेच्या भेदक माऱ्यामुळे ७१ धावांवर ६ गडी गमावलेल्या वेस्ट इंडिजने जेसन होल्डर आणि रोमॅरियो शेफर्ड यांच्या ‘रेस्क्यू ऑपरेशन’च्या जोरावर २० षटकांत ८ बाद १७६ धावांची आव्हानात्मक धावसंख्या उभारली.नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या वेस्ट इंडिजची सुरुवात एखाद्या दुस्वप्नासारखी झाली. सलामीवीर शाई होप (१६) आणि आक्रमक ब्रँडन किंग (२१) स्वस्तात बाद झाले. पाठोपाठ शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल आणि रोस्टन चेस हे तंबूत परतल्याने विंडीजचा डाव पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळणार असे वाटत होते. आफ्रिकेच्या लुंगी एनगिडी आणि कागिसो रबाडा यांनी विंडीजच्या फलंदाजीला खिंडार पाडले होते.जेव्हा विंडीजची अवस्था ६ बाद ७१ अशी बिकट होती, तेव्हा अनुभवी जेसन होल्डर मैदानात उतरला. त्याने केवळ बचाव न करता आफ्रिकेच्या गोलंदाजांवर प्रतिहल्ला चढवला. होल्डरने ३१ चेंडूत ३ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ४९ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्याला रोमॅरियो शेफर्डने मोलाची साथ दिली. शेफर्डने २३ चेंडूत नाबाद ३७ धावा फटकावत धावगती वाढवली. या दोघांनी आठव्या गड्यासाठी अवघ्या ५७ चेंडूत ८९ धावांची ऐतिहासिक भागीदारी करत सामन्याचे चित्र पालटले.
लहान जिल्ह्यांना सरसकट ५०० कोटी, तर मोठ्या जिल्ह्यांना १ हजार कोटींचा निधी द्यामुंबई : जिल्हा नियोजन निधी केवळ नकाशावरील आकारमानावर ठरवू नये, तर त्या-त्या जिल्ह्यांच्या प्रत्यक्ष गरजा, भौगोलिक अडचणी आणि खर्च क्षमतेचा वस्तुनिष्ठ विचार करूनच वाटप करावे, अशी आग्रही मागणी कुडाळ-मालवण मतदारसंघाचे शिवसेना आमदार निलेश राणे यांनी गुरुवारी विधानसभेत केली. पुरवणी मागण्यांवरील चर्चेत ते बोलत होते.राणे म्हणाले, आज ज्या पुरवणी मागण्यांवर चर्चा होत आहे, त्या १ हजार ५६६ कोटींच्या जवळपास आहेत. पण, १० हजार ४८२ कोटींच्या मंजूर नियतव्ययाविषयी चर्चाच होणार नाही. म्हणजे या १० हजार ४८२ कोटींच्या पुरवणी मागण्या चर्चेविना पुढे जाणार आहेत. हे ठरवतो कोण, हे समजण्यापलिकडे आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा प्रारुप आराखडा ७०० कोटींच्या जवळ आहे. प्रत्यक्षात मंजुरी कमी मिळते. 'तुमचा मागच्या वर्षीचा खर्च अखर्चित आहे, एका मर्यादेनंतर तुमच्या जिल्ह्यात खर्च पडत नाही', अशी वेगवेगळी कारणे जिल्हा नियोजन अधिकारी आमदारांना सांगतात. ही परिस्थितीत सर्वच जिल्ह्यांत आहे. आमचा जो आमदार निधी खर्चाला टाकतो, तो ५ कोटींचा असतो. जेव्हा आर्थिक वर्ष संपते, तेव्हा आमदार निधी साडेचार कोटींच्यावर खर्च होत नाही, याकडे लक्ष वेधत त्यांनी प्रशासकीय अनागोंदीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.कोकणात सरासरी चार हजार मिलिमीटर पावसामुळे सलग चार महिने विकासकामे ठप्प असतात. अशा परिस्थितीत प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठी दीड-दोन महिने वाट पाहावी लागते. ऑक्टोबरमध्ये मंजुरी, नोव्हेंबरअखेर कामाचे आदेश आणि मार्चमध्ये नवे अर्थसंकल्पीय वर्ष, अशा चक्रात प्रत्यक्ष कामासाठी केवळ तीन महिने उरतात, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे प्रशासकीय मान्यता कमाल १० दिवसांत आणि वर्क ऑर्डर पुढील १५ दिवसांत द्यावी. जेणेकरून किमान एका महिन्याचा अतिरिक्त कालावधी कामासाठी उपलब्ध होईल, अशी मागणी त्यांनी सर्व आमदारांच्या वतीने केली.प्रारूप आराखडा आणि प्रत्यक्ष निधीत तफावतप्रारूप आराखडा आणि राज्य नियोजन मंडळाकडून मिळणारा प्रत्यक्ष निधी यात २०० ते ३०० कोटींची तफावत दिसते, असे सांगत राणे यांनी राज्याच्या ७ लाख ५७ हजार कोटींच्या मूळ अर्थसंकल्पाच्या आणि १ लाख ४४ हजार कोटींच्या पुरवणी मागण्यांच्या पार्श्वभूमीवर जिल्हानिहाय किमान निधी ठरवण्याची सूचना केली. लहान जिल्ह्यांना सरसकट ५०० कोटी आणि मोठ्या जिल्ह्यांना १ हजार कोटी रुपयांचा नियोजन निधी ‘फिक्स इन्कम’ म्हणून द्यावा. काळ बदलला आहे, त्यामुळे आर्थिक व्यवस्थेतही बदल आवश्यक आहेत, असे ते म्हणाले.सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा बोजवारासार्वजनिक आरोग्य विभागाच्या पुरवणी मागण्यांत कंत्राटी सेवांसाठी ३२.८८ कोटी रुपयांची तरतूद सुचविण्यात आली आहे. या कंत्राटदारांकडून नेमक्या कोणत्या सेवा दिल्या जातात, यावर स्वतंत्र चर्चा व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. “आमच्या जिल्ह्यात कंत्राटदारांची सुमारे चार कोटींची थकबाकी आहे. वरच्या स्तरावर देयके दिली जातात; मात्र खालच्या कर्मचाऱ्यांना पैसे मिळतात का, हे तपासावे. माझ्या मतदारसंघात ३६ प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत; काही ठिकाणी एमबीबीएस डॉक्टरच नाहीत. सर्पदंशावरील विषविरोधी औषधेही उपलब्ध नाहीत. ३५८ प्रकारची औषधे जिल्ह्यांना आवश्यक असतात; मात्र औषधांच्या बिलांची थकबाकी आठ कोटींच्या पुढे गेली आहे. माझ्या मतदारसंघातील सरकारी रुग्णालयांत ७० टक्के औषधे उपलब्ध नाहीत. अशा स्थितीत रुग्ण बरे कसे होणार?” असा सवाल त्यांनी केला.आर्थिक व्यवस्थेत बदल आवश्यकराणे म्हणाले, माझा जिल्हा लहान दिसतो; पण गावे डोंगर-दऱ्यांत पसरलेली आहेत. एखादी वाडी डोंगरावर, तर दुसरी त्याही पुढे. मुलांना शाळेत जाण्यासाठी दोन-दोन किलोमीटर चालावे लागते. त्यामुळे निधीचे वाटप भूगोलावर नव्हे, तर प्रत्यक्ष गरजांवर ठरवावे. २०२५-२६ मधील ही शेवटची पुरवणी मागणी आहे. त्यातून आपल्या मतदारसंघासाठी काहीतरी मिळावे, याहेतूने प्रत्येक आमदार प्रयत्नशील आहे. पण, इतकी कमी तरतूद असेल, तर समस्या कशा सोडवणार? त्यामुळे काळानुरूप आर्थिक व्यवस्थेत बदल करणे आवश्यक आहे, असे त्यांनी नमूद केले.
Yashwant Varma : न्या. वर्मांवरील चौकशी समितीची पुनर्रचना; ‘एवढ्या’महिन्यांची दिली मुदतवाढ
अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा (Yashwant Varma) यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करणाऱ्या तीन सदस्यीय समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे.
‘नॅशनल क्रश’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अभिनेता विजय देवरकोंडा अखेर विवाहबंधनात अडकले आहेत.
Mayor Ritu Tawde: दरम्यान, या प्रकरणावर महापौर रितू तावडे यांच्याकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
महाविकास आघाडीमध्ये राज्यसभेच्या एकमेव जागेवरून घटक पक्षांमध्ये संघर्ष सुरू असल्याचे पहायला मिळत आहे.
Teacher died in road accident: ट्रॅक्टरच्या धडकेत शिक्षिकेचा जागीच मृत्यू; सहा वर्षांचा मुलगा गंभीर
Teacher died in road accident: पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून ट्रॅक्टर जप्त केला आणि चालकाला ताब्यात घेतले आहे. स्थानिक रहिवाशांनी त्या वळणावर तातडीने दिशादर्शक फलक लावण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.
City Name Change : केरळनंतर आता ‘या’शहराचे नाव बदलणार? थेट अमित शहांकडे केली मागणी
केंद्र सरकारने दक्षिण भारतातील केरळ राज्याचे अधिकृत नाव 'केरळ' वरून 'केरळम' असे बदलण्याच्या (City Name Change) प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. हा प्रस्ताव स्वतः केरळ राज्य सरकारने केंद्राकडे पाठवला होता.
WI vs SA : या जोडीने आठव्या विकेटसाठी ८९ धावांची विश्वविक्रमी भागीदारी करत वेस्ट इंडिजचा डाव सावरला आणि संघाला आव्हानात्मक धावसंख्या गाठून दिली.
Todays Top 10 News : मराठी शाळांचा वाद, सुनेत्रा पवारांची अध्यक्षपदी निवड आणि शेतजमिनींचे नवे नियम; सोन्याच्या दरात मोठी घसरण तर सॅमसंगचा नवा फोन लाँच. राजकीय घडामोडींसह क्रीडा आणि मनोरंजन विश्वातील 'टॉप' बातम्या वाचा एकाच ठिकाणी.
Devendra Fadanvis : विरोधी पक्ष हा गोंधळलेल्या अवस्थेत; देवेंद्र फडणवीस यांची टीका
दावोसमध्ये भारतीय कंपन्यांसोबत सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यावरून झालेल्या टीकेचे खंडन करत, आर्थिक जगात प्रासंगिक राहण्यासाठी उपस्थिती आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी म्हटले आहे.
दहिसर नदी प्रदूषण रोखण्यासाठीच्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार
मुंबई : दहिसर नदीतील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार आहे, असे राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले. दहिसर (मुंबई) नदीतील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत आमदार अबू आझमी यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नास उत्तर देताना राज्यमंत्री माधुरी मिसाळ बोलत होत्या.राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले की, दहिसर नदी परिसरातील गोठ्यांच्या स्थलांतराची प्रक्रिया सुरू असून त्यासाठी जागाही निश्चित करण्यात आली आहे. महसूल विभागाने संबंधित नकाशा जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला असून आर्थिक तरतूदही करण्यात आली आहे. गोठे हलविण्याबाबत मुंबई महानगरपालिकेला निर्देश देण्यात आले असून, नोटिस देऊन स्थलांतराची कारवाई सुरू आहे.विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांनी, मुंबई प्रदूषण नियंत्रण मंडळाने नदी प्रदूषण रोखण्यासाठी आतापर्यंत कोणती कारवाई केली, याची माहिती सभागृहात सादर करण्याचे निर्देश दिले. त्यांनी सांगितले की, मंडळाने त्वरित जबाबदारी घ्यावी आणि एका आठवड्यात अहवाल सादर करावा.राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी माहिती दिली की, दहिसर, पोयसर, ओशिवरा आणि वालभट नद्या यांचे पुनरुज्जीवन कार्य सुरू आहे. दहिसर नदीसाठी दोन मलजल प्रक्रिया केंद्रांचे काम पूर्ण झाले असून प्रकल्प ३१ मार्च २०२६ पर्यंत कार्यान्वित होईल. पोयसर नदीसाठी १० मलजल प्रक्रिया केंद्रांपैकी नऊ केंद्रांचे काम प्रगतीपथावर आहे. ओशिवरा आणि वालभट नदीसाठी पाच प्रक्रिया केंद्रांची कामे सुरू असून तीही प्रगतीपथावर आहेत.राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले की, नदीकिनारी असलेल्या गोठ्यांवर आत्तापर्यंत दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तथापि, अनेक गोठ्यांची नोंदणी अद्याप न झाल्याने कारवाईत विलंब होत आहे. दहिसर नदी प्रकल्पात १३०, पोयसरमध्ये २,५५४ आणि ओशिवरा नदी प्रकल्पात ७०० घरे व दुकाने बाधित असून, पात्र बांधकामांच्या पर्यायी सदनिकांअभावी अतिक्रमण हटविण्याची प्रक्रिया प्रलंबित असल्याचेही त्यांनी सांगितले.या चर्चेत विधानसभा सदस्य मनिषा चौधरी, योगेश सागर, दिलीप लांडे, अस्लम शेख यांनी सहभाग घेतला.
बारावीचा पेपर दिला आणि आत्महत्या केली; चिठ्ठीत केले 'ते'खुलासे
कल्याण : गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात परीक्षेचा काळ सुरु आहे. वर्षभर अभ्यासासाठी केलेल्या मेहनतीची परीक्षा चालू आहे. लाखोंच्या संख्येने विविध राज्यातून विद्यार्थी पेपर देत आहेत. अशातच आपण नापास होणार या भीतीने घाबरून कल्याणमधील एका मुलीने आपले जीवन संपवले आहे.कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरात बुधवारी ही घटना उघडकीस आली. संबंधित विद्यार्थिनी वाणिज्य शाखेत बारावीचे शिक्षण घेत होती. नुकतेच दिलेले पेपर अपेक्षेप्रमाणे न झाल्याची खंत तिच्या मनात होती. ‘आपण परीक्षेत नापास होऊ’ या भीतीसोबतच घरच्यांची नाराजी सहन करावी लागेल, या विचारांनी ती तणावाखाली होती, अशी माहिती समोर येत आहे.परीक्षेच्या निकालाबाबत सतत मनात चाललेल्या भीतीमुळे विद्यार्थिनी मानसिकदृष्ट्या खचली होती. याच अवस्थेत तिने घरातच गळफास घेऊन जीवन संपवले. घटनेची माहिती मिळताच परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली.नैराश्यातून उचलले टोकाचे पाऊलघटनास्थळी सापडलेल्या चिठ्ठीत विद्यार्थिनीने, “माझे पेपर चांगले गेले नाहीत. मला आई-वडिलांना त्रास द्यायचा नाही,” असे शब्द लिहिले होते. या ओळींमधून तिच्या मनातील भीती आणि अपराधीपणाची भावना स्पष्ट होत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.या घटनेमुळे परीक्षा काळात विद्यार्थ्यांवर होणारा मानसिक दबाव पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. गुण, निकाल आणि अपेक्षांच्या ओझ्याखाली विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य धोक्यात येत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसर शोकसागरात बुडाला आहे.
Holi School Holiday: होळीनिमित्त शाळेला सुट्टी कधी? 2, 3 की 4 मार्च…. जाणून घ्या
Holi School Holiday: यंदा होळी 2 मार्च रोजी साजरी होणार असून, दुसऱ्या दिवशी म्हणजे 3 मार्च, मंगळवारी रंगपंचमी (धुलीवंदन) निमित्त सार्वजनिक सुट्टी असेल.
Manoj Jarange : माझ्याविरोधात मंत्रालयात स्टिंग ऑपरेशन सुरू आहे; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
माझ्या विरोधात कट रचला जात आहे. कारण काय तर मी गरिबांसाठी लढा देत आहे. मंत्रालयात स्टिंग ऑपरेशन सुरू आहे, असा खळबळजनक दावा मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी केला आहे.
नागपूर AIMS मधील विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या चक्क अळ्या..... सोशल मीडियावर चर्चेला उधाण
नागपूर : अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असतात. अशावेळी जेवणाची सोय होते ती खाणावळीतून किंवा कॉलेजच्या मेस मधून. मात्र याच मेसमधील जेवण तुमच्या आरोग्यासाठी धोक्याचं ठरलं तर ?नागपूर AIMS मधील विद्यार्थ्यांच्या मेसच्या जेवणात चक्क अळ्या आणि वेगवेगळे छोटे किडे आढळून आले आहेत. त्याचे काही फोटो सध्या सोशल मीडियावरून व्हायरल होत आहेत. विशेष म्हणजे मेडिकल कॉलेजच्या पदवीधर विद्यार्थ्यांच्या जेवणात हे कीडे आढळून आले .नेमका आरोप काय?२५ फेब्रुवारी रोजी दुपारच्या जेवणादरम्यान काही विद्यार्थ्यांच्या ताटात अळी दिसल्याचा आरोप आहे. फळांच्या तुकड्यांवर मृत किडा आढळल्याचेही सांगितले जात आहे. भाजीमध्ये अळ्या तसेच मशरूमच्या पदार्थात किडे असल्याची चर्चा विद्यार्थ्यांमध्ये रंगली. विशेष म्हणजे, काहींना जेवण संपल्यानंतर हा प्रकार लक्षात आल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे आरोग्य सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.महाविद्यालय प्रशासनाचे स्पष्टीकरणमहाविद्यालय प्रशासनाने या आरोपांवर प्रतिक्रिया देताना सांगितले की, त्यांच्याकडे अद्याप कोणतीही लेखी तक्रार प्राप्त झालेली नाही. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोंची सत्यता तपासण्याची प्रक्रिया सुरू आहे. संस्थेतील प्राध्यापक, डीन आणि वरिष्ठ अधिकारीही त्याच मेसमध्ये जेवण घेतात, असेही प्रशासनाने नमूद केले. स्वच्छतेबाबत संस्थेचे धोरण कठोर असल्याचे सांगत, मेस व्यवस्थापन करणाऱ्या कंत्राटदाराकडून त्रुटी आढळल्यास कडक कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.विद्यार्थी परिषदेची भूमिकाविद्यार्थी परिषदेच्या सदस्यांनी प्रशासनाला कळवले की, त्यांच्या पातळीवर अधिकृत तक्रार आलेली नाही. काही विद्यार्थ्यांनी मात्र मेसमधील मर्यादित जागा आणि कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे वाढणाऱ्या गर्दीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. प्रशासनानेही एका काउंटरवर कर्मचारी अनुपस्थित असल्याची बाब मान्य केली असून संबंधित कंत्राटदाराला तातडीने सुधारणा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.सध्या संपूर्ण प्रकरणाची पडताळणी केली जात असून, आरोपांमध्ये तथ्य आहे की नाही? याचा तपास सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्न असल्याने या घटनेकडे गांभीर्याने पाहिले जात आहे. अंतिम अहवालानंतरच पुढील कारवाई स्पष्ट होणार आहे.
DY Patil T20 Cup 2026 : या दोघांनी मिळून केवळ ४८ चेंडूंमध्ये ११८ धावा कुटत डी.वाय. पाटील 'ब्लू' संघाला 'इंडियन नेव्ही' विरुद्ध अविश्वसनीय विजय मिळवून दिला.
शिक्षण क्षेत्रात काम करणारे सामाजिक कार्यकर्ते या निर्णयाचे स्वागत करत आहेत.
Sunetra Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवारांची निवड
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (एनसीपी) राष्ट्रीय कार्यकारिणीच्या महत्वाच्या बैठकीत आज एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांची पार्टीच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षा म्हणून औपचारिक घोषणा करण्यात आली आहे.
घर खरेदीत फसवणूक करणाऱ्या बिल्डरांची मालमत्ता जप्त होणार
मुंबई : राज्यात आपले गृहस्वप्न साकार करू पाहणाऱ्या हजारो सर्वसामान्यांची बिल्डरांकडून होणारी फसवणूक आता राज्य सरकारने गंभीरपणे घेतली आहे. महारेराने घरखरेदीदारांच्या नुकसानभरपाईपोटी जारी केलेल्या आदेशांची पायमल्ली करणाऱ्या आणि वसुलीस दाद न देणाऱ्या विकासकांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. फसवणूक करणाऱ्या अशा बिल्डरांची मालमत्ता जप्त करून त्यातून ग्राहकांची थकीत रक्कम वसूल केली जाईल, अशी घोषणा प्रभारी गृहनिर्माण मंत्री शंभूराज देसाई यांनी गुरुवारी विधानसभेत केली.आमदार अतुल भातखळकर, जितेंद्र आव्हाड, सुलभा खोडके, प्रताप पाटील चिखलीकर यांसह अन्य सदस्यांनी महारेराच्या कारभारावर जोरदार ताशेरे ओढले. मुंबई, ठाणे आणि पुण्यात सुमारे १ हजार २०० ग्राहकांची ७९२ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक आकडेवारी सभागृहात मांडण्यात आली. महारेरा स्थापन झाल्यापासून १ हजार २९१ तक्रारदारांच्या बाजूने ७९२ कोटींचे वसुली आदेश देण्यात आले. मात्र, यातील २०० कोटींचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी 'वसुली शक्य नाही' असे कारण देत परत पाठवले आहेत. यावरून सदस्यांनी संताप व्यक्त करत, 'महारेरा हे घरखरेदीदारांना न्याय देण्याऐवजी विकासकांना मुदतवाढ देणारे एक्स्टेंशन काउंटर झाले आहे का?' असा संतप्त सवाल केला.सभागृहात झालेल्या चर्चेला उत्तर देताना मंत्री शंभूराज देसाई यांनी वस्तुस्थिती मान्य केली. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून काही तांत्रिक कारणांमुळे वसुली रखडल्याचे त्यांनी सांगितले. लिलाव यशस्वी न होणे, मालमत्ता न सापडणे, बँकांकडे तारण असलेली मालमत्ता किंवा न्यायालयीन स्थगिती यामुळे वसुलीत अडथळे येत आहेत. मात्र, यावर आता ठोस उपाययोजना केली जाईल, असे देसाई म्हणाले.अशी होणार कारवाईप्रभारी मंत्री शंभुराज देसाई म्हणाले, ज्या विकासकांनी ग्राहकांचे पैसे परत केलेले नाहीत, त्यांच्या मालमत्ता जप्त करून त्यांचा लिलाव केला जाईल. थकीत वसुलीच्या आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सविस्तर सूचना देण्यात आल्या आहेत. करारातील नमूद क्षेत्रापेक्षा कमी जागा देणाऱ्या बिल्डरांचीही चौकशी केली जाणार आहे. घरखरेदीदारांची फसवणूक करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. वसुलीसाठी लवकरच व्यापक मोहीम हाती घेऊन सर्वसामान्यांना त्यांचा हक्काचा पैसा मिळवून दिला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
Daisy Shah : तो खूप चांगला माणूस आहे..! वादात अडकलेल्या ‘पलाश मुच्छल’ला अभिनेत्री डेझी शाहचा पाठिंबा
संगीतकार पलाश मुच्छल याच्या वैयक्तिक आयुष्याभोवती निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर बॉलिवूड अभिनेत्री डेझी शाह हिने त्याला उघड पाठिंबा दिला आहे.
Mahabaleshwar Shri 2026 : सांगलीचा अर्षद मेवेकरी ठरला ‘महाबळेश्वर श्री 2026’चा मानकरी
महाबळेश्वर येथील सुभाषचंद्र बोस चौक येथे आयोजक नगरसेवक ॲड. संजय जंगम व मसल फॅक्टरी यांच्या वतीने भव्य शरीरसौष्ठव स्पर्धा ‘महाबळेश्वर श्री २०२६ (Mahabaleshwar Shri 2026) पर्व ६ वे’ उत्साहात पार पडले.
मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाचे नामकरण; आता होणार 'पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर'पूल
- मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाच्या पुनर्बांधणी कामाचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पणमुंबई : विकासकामांची गुणवत्ता राखत कामे गतीने पूर्ण करण्यास राज्य शासनाचे प्रथम प्राधान्य आहे. त्याच पद्धतीने बृन्हमुंबई महानगरपालिकेने गती आणि गुणवत्तेसह विहीत मुदतीच्या चार महिने आधीच मुंबई सेंट्रल रेल्वस्थानकालगतच्या पुलाच्या पुनर्बांधणीचे काम केवळ १५ महिन्यात पूर्ण केले आहे, ही निश्चितच अभिनंदनीय बाब आहे. या पुलाचे नामकरण पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर असे करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.बृन्हमुंबई महानगरपालिकेच्यावतीने आयोजित मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकालगतच्या पुलाच्या कामाच्या लोकार्पण कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. या लोकार्पण कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. लोकार्पण कार्यक्रमस्थळी विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे, कौशल्यविकास मंत्री मंगलप्रभात लोढा, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार अमिन पटेल, महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी, विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांच्यासह लोकप्रतिनिधी, महापालिका पदाधिकारी व अन्य संबंधित मान्यवर उपस्थित होते.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मुंबई सेंट्र्ल रेल्वेस्थानकाजवळच्या या १३० वर्ष जुन्या पुलाची कालमर्यादा संपली होती आणि वाहतूकीच्या दृष्टीने अतिशय उपुयक्त असलेल्या या पुलाचे पुनर्बांधणी काम गतीने पूर्ण करणे गरजेचे होते. हे लक्षात घेऊन बृहृन्मुंबई महानगरपालिकेने कालबद्ध नियोजनद्वारे अतिशय वेगाने या पुलाची पुर्नबांधणी विहीत मुदतीच्या चार महिने आधी पूर्ण केल्याबद्दल मुंबई महानगरपालिकेचे पदाधिकारी, अधिकारी वर्ग यांचे अभिनंदन मुख्यमंत्री यांनी केले. मुंबईतील अजून जवळपास सहा पूल आता तयार होत असून त्यांचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे येत्या दोन तीन महिन्यात इतर सहा पुलांचे लोकार्पण ही महानगर पालिकेच्या माध्यमातून होईल. महानगरपालिकेत निर्वाचित प्रतिनिधी आल्याने महानगरपालिकेच्या कामाला अधिक गती आणि अधिक लोकाभिमुखता येईल, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.पुलाचे नामकरण पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर असे करण्यात येणारमुख्यमंत्री म्हणाले की, महानगरपालिकेशी चर्चा करुन आपण या पुलाचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असे करणार आहोत, ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. पुण्यश्लोक अहिल्यामाता यांनी या देशामध्ये एक उत्कृष्ट प्रशासक कसा असला पाहिजे याचा आदर्श आपल्या कामातुन निर्माण केला आहे. त्यांची संवेदनशीलता, धर्मपरायणता, कार्यकुशल प्रजाहितदक्ष राज्यकारभार, कायदा सुव्यवस्थेवर असेलली पकड, त्यांनी तयार केलेली मंदीरे आणि महिलांची पहिली तुकडी, त्यांनी तयार केलेले कारखाने, लघुउद्योग, त्यांनी निर्माण केलेले मंदिरे, घाट, या सर्व कामातून राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्यासमोर आदर्श निर्माण केला आहे. त्यामुळे तीन दशकांनंतरही त्यांचे नाव आपण घेतो कारण त्यांच्यासारखे जे उत्कृष्ट प्रशासक आपल्याकडे होऊन गेले त्यांच्या कामातून आपली संस्कृती आणि आपली गुणवत्ता आपल्याला आजही पाहायला मिळते.मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकालगतच्या पुलाच्या पुनर्बांधकामाच्या (ऑनलाईन) लोकार्पण कार्यक्रमातील संबोधन...(मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकालगतच्या पुलाच्या पुनर्बांधकामाचे लोकार्पण | मुंबई | 26-02-2026)#Maharashtra #Mumbai #Infrastructure pic.twitter.com/TbF4fw2O3G— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 26, 2026म्हणूनच पुण्यश्लोक अहिल्यामातेचे नाव या पुलाला देण्याचा निर्णय आपल्या सर्वानाचं अतिशय गौरन्वावित आहे. त्यांच्या कामातून प्रेरणा घेऊन यापुढे राज्य शासन आणि महानगरपालिका कार्य करतचं राहतील, असे मुख्यमंत्री म्हणाले.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मुंबई महानगरपालिकेने विहीत मुदतीच्या आत यशस्वरित्या या पुलाचे काम पूर्ण केले आहे.नागरिकांसाठी हा पूल खुप उपयुक्त ठरणारा आहे. सुरळित वाहतुकीसाठी या पुलाची आवश्यकता आहे. त्यापार्श्वभूमीवर महानगरपालिकेने या पुलाचे काम गतीने पूर्ण केले आहे. यासाठी महानगरपालिकेचे अभिनंदन करत उपमुख्यमंत्री म्हणाले की, राज्यातील अनेक रखडलेले प्रकल्प या शासनाने वेगाने पूर्ण केलेली आहेत. मुंबईकरांना अपेक्षित विकासकामे यापुढेही महानगरपालिका करत राहिल,असा विश्वास व्यक्त करत महानगरपालिकेने अशाच पद्धतीने गतीने आणि दर्जदार कामे करावीत.
११ वर्षांत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था तिपटीने वाढवली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
राज्यातील विरोधी पक्ष भ्रमित आणि संभ्रमित असल्याचा टोलामुंबई : महाराष्ट्राची अर्थव्यवस्था २०१२-१३ साली १३ लाख कोटी होती. गेल्या ११ वर्षांत ती ५१ लाख कोटींपर्यंत आली. आम्ही राज्याची अर्थव्यवस्था तिपटीने वाढवली. आता ९० लाख कोटींचा टप्पा गाठायचा आहे. महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे, ज्याने ६६० बिलियनचा टप्पा पार केला आहेत. इतर कुठलेही राज्य अर्थव्यवस्थेच्या बाबतीत आपल्याइतके पुढे नाही. त्यामुळे राज्य दिवाळखोरीत निघाल्याचे सांगून विरोधक जनतेची दिशाभूल करीत आहेत, असा हल्लाबोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत केला.राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, देशाच्या जीडीपीमधील महाराष्ट्राचा वाटा सातत्याने वाढत आहे. २०२१-२२ मध्ये हा वाटा १३.१ टक्के होता, २०२३-२४ मध्ये १३.५ टक्के, २०२४-२५ मध्ये १३.८ टक्के झाला असून आता तो १४ टक्क्यांच्या जवळपास जाईल, असा प्राथमिक अंदाज आहे. राज्याचे जीएसटी संकलन जवळपास ३ लाख ६० हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचले असून कृषी निर्यातीत १२ टक्के आणि सेवा क्षेत्रात २४ टक्के वाटा आहे. जीडीपीच्या तुलनेत कर्जाचे प्रमाणही नियंत्रित ठेवण्यात महाराष्ट्र यशस्वी ठरल्याचा दावा त्यांनी केला.२०२९-३० पर्यंत १ ट्रिलियन डॉलर आणि २०४७ पर्यंत ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था उभारण्याचा रोडमॅप तयार करण्यात आला आहे. या आराखड्यासाठी ३ लाख ८० हजार नागरिकांचा सहभाग आणि ७ लाखांहून अधिक सूचनांचा विचार करण्यात आला. प्रगतशीलता, शाश्वतता, सर्वसमावेशकता आणि सुशासन या चार तत्वांवर १६ प्रमुख थीम आणि १०० उपक्रम निश्चित करण्यात आले आहेत. दरवर्षी १० लाख रोजगारनिर्मिती, दरडोई उत्पन्नात दहापट वाढ आणि मोठ्या प्रमाणावर परकीय गुंतवणूक आकर्षित करण्याचे उद्दिष्ट त्यांनी स्पष्ट केले.दावोसबाबतच्या टीकेला दिले सडेतोड उत्तर- दावोस येथे होणाऱ्या करारांवरून विरोधकांनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्री फडणवीसांनी सडेतोड उत्तर दिले. ते म्हणाले, दावोसमध्ये होणाऱ्या करारांबद्दलही बरेच बोलले गेले. अनेकवेळा तिथे जाऊन करार का करता, इथेच का करत नाही, असे सांगितले जाते. दावोस छोटे गाव आहे. पण दोन-दोन दिवस तिथे ट्रम्प येऊन राहतात. त्याकाळात जगातील सगळ्या अर्थव्यवस्था, सगळे व्यवसाय तिथे असतात. जर तुम्हाला आर्थिक जगात प्रासंगिक राहायचे असेल, तर तिथे असले पाहिजे. दावोसमध्ये असलेल्या वेगवेगळ्या चर्चांमध्ये महाराष्ट्राची चर्चा असते. आपण त्यांना इथे बोलवूनही गुंतवणूकीचे करार करू शकतो. पण आपण हे दावोसला करावे अशी त्यांची अपेक्षा असते. आजूबाजूच्या सगळ्या युरोपीय देशांमध्ये असलेल्या सगळ्या परदेशी व्यावसायिक दावोसमध्ये आपली वार्षिक मिटींग ठेवतात. ज्यामध्ये परकीय गुंतवणूक नाही तो करार दावोसला करणार नाही असा निर्णय आम्ही केला होता. उत्सव केला की, जास्त लोक येतात, आपल्या राज्याची ताकद लोकांपर्यंत पोहोचते. त्यामुळे आपण दावोसला करार करतो.लोढांच्या मुलासोबत दावोसला करार का केले?मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मंत्री मंगलप्रभत लोढा यांच्या सुपुत्रांसोबत केलेल्या करारावरही अनेकांनी प्रश्न उपस्थित केला. पण त्यांचे सुपुत्र हे देशातील एक मोठे उद्योजकही आहेत. आपण त्यांच्यासोबत डेटा सेंटरमधील गुंतवणूकीचा १ लाख कोटींचा करार केला आहे. जागा आणि सगळ्या व्यवस्था करणे, हे लोढा यांचे काम आहे. मात्र, जगातील सगळ्यात मोठ्या कंपन्या यात गुंतवणूक करणार आहेत. त्यामुळे हा त्यांच्यासोबत केलेला करार आहे. मंगलप्रभात लोढांसोबत केलेला करार नाही. टीका होत असली तरी जागतिक गुंतवणूकदार एकत्र येतात त्या मंचावर उपस्थित राहणे आवश्यक असल्याचे फडणवीस म्हणाले.८८ टक्के करारांची अंमलबजावणीदावोसमध्ये २०२३ साली १९, २०२४ मध्ये २४ आणि २०२५ मध्ये ४८ करार झाले असून त्यापैकी ८८ टक्के करारांची अंमलबजावणी विविध टप्प्यांवर आहे. २०२६ साली ३१ लाख २५ हजार कोटी रुपयांचे करार झाले असून त्यापैकी ८३ टक्के परकीय गुंतवणूक आहे. देशातील एकूण थेट परकीय गुंतवणुकीपैकी ३९ टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात येत असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.बेरोजगारीचा दर कमी करण्यात यश- बेरोजगारीबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, २०२१-२२ मध्ये बेरोजगारी दर ४ टक्के होता, २०२३-२४ मध्ये तो ३.३ टक्क्यांवर आला आणि २०२५ मध्ये ३.१ टक्के आहे. महायुती सरकारच्या कार्यकाळात १ लाख २० हजार ४४९ जणांना सरकारी नियुक्त्या देण्यात आल्या असून लवकरच हा आकडा दीड लाखांवर जाईल.- गडचिरोलीतील स्टील हबसंदर्भात २ लाख ६१ हजार ८३९ कोटी रुपयांची गुंतवणूक आणि सुमारे ७० हजार ८९५ रोजगारनिर्मिती होणार असल्याचे त्यांनी सांगितले. जल, जमीन आणि जंगलाचे संवर्धन करत ५ कोटी झाडे लावण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. स्थानिक आदिवासींना प्राधान्य देत विकास साधला जात असल्याने नक्षलवाद आटोक्यात आल्याचा दावा त्यांनी केला.- स्टार्टअप क्षेत्रात महाराष्ट्र देशात आघाडीवर असून देशातील नोंदणीकृत स्टार्टअपपैकी २० टक्के महाराष्ट्रात आहेत. १४६ पेक्षा अधिक इन्क्युबेटरचे जाळे उभारण्यात येत आहे. त्यामुळे महाराष्ट्राला ‘स्टार्टअप कॅपिटल’ म्हणून ओळख मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.कुंभमेळा हा केवळ धार्मिक मेळा नव्हेनाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्या संदर्भात बोलताना त्यांनी सांगितले की, हा केवळ धार्मिक मेळा नसून शाश्वत पायाभूत सुविधांच्या उभारणीची संधी आहे. गोदावरी स्वच्छता, सांडपाणी प्रक्रिया, रस्ते रुंदीकरण आणि रिंगरोड यांसारख्या कामांमुळे दीर्घकालीन विकास साधला जाईल आणि नाशिकचे जागतिक ब्रँडिंग होईल.शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी?- शेतकऱ्यांसाठी पीक विमा पद्धतीत बदल करण्यात आला असून अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना १५ हजार ४७२ कोटी रुपये थेट खात्यात जमा करण्यात आले. कर्जमाफीसंदर्भात समिती स्थापन केली असून अॅग्रीस्टॅकद्वारे डिजिटल नोंदींच्या आधारे निर्णय घेतला जाईल. कर्जमाफी आम्ही करणारच आहोत, त्याबाबतचा निर्णय योग्यवेळी जाहीर करून, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मागेल त्याला कृषीपंप योजनेत ८५ टक्के मागण्या पूर्ण केल्या असून २०२२ ते २०२५ दरम्यान १० लाख ६३ हजार पंप बसवले. एका महिन्यात ५० हजार पंप बसवण्याची नोंद गिनीज बुकमध्ये झाल्याचे त्यांनी सांगितले.- भ्रष्टाचाराविरुद्ध झिरो टॉलरन्स धोरण अवलंबले असून एसीबीला स्वतंत्र कारवाईचे अधिकार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विरोधकांनी वारंवार टीका करण्याऐवजी शांतपणे अभ्यास करून मते मांडावीत, असे आवाहन करत “महाराष्ट्र देशातील पहिली ३ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनेल आणि भारत ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनेल, याबाबत शंका नाही,” असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
सकारात्मक निर्णय घेण्याचे संसदीय कार्यमंत्र्यांचे आश्वासनमुंबई : भारतीय स्वातंत्र्यचळवळीतील क्रांतिकारकांचे मुकुटमणी, द्रष्टे समाजसुधारक, प्रखर राष्ट्रभक्त स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार द्यावा, अशी मागणी भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी गुरुवारी विधान परिषदेत केली. संसदीय कार्यमंत्र्यांनी तसा प्रस्ताव केंद्रशासनाकडे पाठवावा आणि सभापतींनी हा ठराव एकमताने संमत करून घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.या मागणीवर संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. ते म्हणाले, ‘‘शासनाला असा प्रस्ताव आणावा लागेल. मी या परिषदेत असा प्रस्ताव मांडतो आणि त्यानंतर सभापतींनी त्यावर योग्य तो निर्णय घ्यावा’’, असे त्यांनी नमूद केले.गेल्या १० वर्षांहून अधिक काळापासून केंद्रात आणि राज्यातही स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या हिंदुत्वनिष्ठ विचारांवर चालणारे सरकार सत्तेत आहे. असे असूनही अद्याप विनायक दामोदर सावरकर यांना ‘भारतरत्न’ मिळालेला नाही. याविषयी हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून वारंवार खंत व्यक्त केली जात आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतकोत्सवी कार्यक्रमात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनीही या विषयावर भाष्य केले होते. आता विधान परिषदेत ही मागणी झाल्याने सावरकरप्रेमींच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
India Deaf Team : अंतिम सामन्यात भारताने श्रीलंका डेफ संघाचा ६ गडी राखून पराभव करत या स्पर्धेचे पहिले विजेतेपद पटकावले
Marathi School: मराठी शाळांचे अस्तित्व टिकवत असतानाच विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषेचे ज्ञानही आत्मसात करणे तेवढेच आवश्यक असल्याचे नमूद करत मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांचा समतोल शिक्षणात महत्त्वाचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Amit Shah : “पश्चिम बंगालमध्ये भाजपचेच सरकार येणार”–अमित शाह
बंगालमध्ये सत्ता स्थापन होताच राज्यातील प्रत्येक घुसखोराला बाहेर काढण्याचे काम भाजप सरकार प्राधान्याने करेल.

24 C