Dilip Walse Patil : आंबेगाव तालुक्यातील प्रलंबित कामे तत्परतेने मार्गी लावण्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे प्रशासनाला सक्त निर्देश.
Anganwadi Accident : धक्कादयक! अंगणवाडीच्या छताचं प्लास्टर कोसळलं; चिमुकले थोडक्यात वाचले
Anganwadi Accident : अवघ्या चार वर्षांपूर्वी बांधलेल्या इमारतीची दुरवस्था; संतापलेल्या पालकांनी प्रशासनाला धरले धारेवर, दुरुस्तीची केली मागणी.
BJP Protest In PCMC : महिला आरक्षणावरील आघाताचा निषेध करण्यासाठी एप्रिल महिन्याची सभा ५ मे पर्यंत तहकूब; योगिता नागरगोजे यांनी मांडला निषेधाचा ठराव.
Temple Theft : पांडवकालीन सिद्धेश्वर मंदिरात चोरी! यात्रेचा उत्साह संपताच चोरट्यांचा डल्ला
Temple Theft : भोपाळबुवा आणि सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेनंतर अवघ्या काही तासांतच चोरी; अज्ञात चोरट्यांनी दोन दानपेट्या फोडून रोकड केली लंपास.
PCMC Nominated Member : भाजपला नक्की कोणाची भीती? ‘या’फायरब्रँड महिलेला रोखण्यासाठी भाजपचा मोठा गेम
PCMC Nominated Member : राष्ट्रवादीचं एक नाव बदलण्याच्या नादात भाजपच्या सात स्वीकृत सदस्यांची नावेही रखडली; कालावधी कमी होत असल्याने भाजपमध्येच धुसफूस.
Red Cliff School : चोविसावाडी येथील रेड क्लिप शाळेच्या शुल्कवाढी विरोधात संताप; आरटीई विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्याची मागणी.
PCMC BJP Slogan : “अरे या सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय..”भाजप नगरसेवकांची जीभ घसरली
PCMC BJP Slogan : महापालिका प्रवेशद्वारावर रंगलेल्या आंदोलनात प्रशांत शितोळे यांच्यासह कार्यकर्त्यांचा गोंधळ; चूक लक्षात येताच बदलली घोषणा.
Pimpri Chinchwad : काटे वस्ती परिसरातील मुख्य रस्ता गेल्या अनेक दिवसांपासून अपूर्ण; एका लेनच्या कामामुळे धूळ आणि चिखलाचे साम्राज्य.
Khalapur News : बाजारपेठेत माकडांचा थरार! घरात घुसून वस्तूंची फेकाफेक; नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण
Khalapur News : चौक बाजारपेठ परिसरात माकडांच्या टोळ्यांचा घरांमध्ये शिरकाव; अन्नधान्य पळवणे आणि भांडी फोडण्याच्या प्रकारांमुळे गृहिणींमध्ये संतापाची लाट.
Eknath Shinde : साताऱ्यात बालकांसाठी हृदय शस्त्रक्रिया शिबिर; चिमुकल्यांसाठी एकनाथ शिंदेंची मोठी भेट
Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ६२ व्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेतर्फे मोफत हृदय तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन.
Pangolin Smuggling : खवले मांजराच्या तस्करीचं ‘डोंबिवली कनेक्शन’! एकाला अटक, मोठं रॅकेट उघड होणार
Pangolin Smuggling : चिपळूणहून आलेल्या बसमध्ये दबा धरून बसलेला डोंबिवलीचा तस्कर वन विभागाच्या जाळ्यात; ५.९८० किलो खवले जप्त.
Jaykumar Gore : राजकारणात नवी खेळी! स्वीकृत सदस्यांचा मार्ग मोकळा; आठ दिवसांत होणार मोठा निर्णय
Jaykumar Gore : जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्ये स्वीकृत सदस्यांची नियुक्ती होणार; विधानसभेच्या मंजुरीनंतर आता शासन निर्णयाची प्रतीक्षा.
Shivendrasinhraje Bhosale : कुमठ्यात शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते विविध दाखल्यांचे आणि कृषी साहित्याचे वाटप; प्रशासनाला दिले जनतेचे प्रश्न सोडवण्याचे कडक निर्देश.
GT vs MI : या सामन्यात मुंबईने गुजरातचा ९९ धावांनी धुव्वा उडवत हंगामातील आपला दुसरा विजय नोंदवला आहे.
Kagiso Rabada Record : २० एप्रिल रोजी झालेल्या सामन्यात रबाडाने पॉवरप्लेमध्येच मुंबईच्या तीन दिग्गज फलंदाजांना बाद करून श्रीलंकेचा महान गोलंदाज लसिथ मलिंगा याचा एक मोठा विक्रम मोडीत काढला आहे.
Satara News : धक्कादायक ! 10 दिवसांपूर्वी विवाह झालेल्या नवदाम्पत्यावर काळाचा घाला
कराड– चिपळूण मार्गावर येरफळे गावच्या हद्दीत गारवा हॉटेलसमोर सोमवारी दुपारी (Satara News) दोन वाजण्याच्या सुमारास ट्रकला ओलांडून पुढे जात असताना समोरून येणाऱ्या पिकअप गाडीची दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक झाल्याने अपघात झाला.
US - Iran Talk 2nd Round: दोन्ही देशांमध्ये गेल्या ४९ वर्षांपासून नसलेला संवाद आता सुरू झाला आहे. दोन्ही बाजूंनी चर्चेची तयारी दर्शवली असली तरी, अनेक दशकांपासूनचा अविश्वास हा या प्रक्रियेतील सर्वात मोठा अडथळा आहे.
Narendra Modi : पंतप्रधान मोदींचा मोठा निर्णय! शरद पवारांच्या खासदारावर सोपवली महत्त्वाची जबाबदारी
Narendra Modi : महात्मा ज्योतिबा फुले यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त केंद्र सरकारने स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची सदस्य म्हणून निवड झाली आहे.
India - South Korea:
Bank of Maharashtra : बँक ऑफ महाराष्ट्रच्या नफ्यात 35 टक्क्यांची भरघोस वाढ
Bank of Maharashtra : सोमवारी एनएसईवर, या बँकेचा शेअर 3.86 टक्क्यांनी वाढून 75.54 रुपयांवर बंद झाला. कंपनीचे बाजारमूल्य 2,261.32 कोटी रुपयांनी वाढून 58,194.30 कोटी रुपयांवर पोहोचले.
Dasun Shanaka Ban : या कारवाईनंतर दासुन शनाकाने आपली चूक मान्य करत जाहीर माफी मागितली आहे.
Water Cut : दक्षिण मुंबईत बुधवारी पाणीकपात होणार, नागरिकांचे हाल होणार
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेतर्फे शिवडी येथील टनल भंडारवाडा टेकडी जलाशय वाहिनीवर हाजीबंदर मार्ग एफ दक्षिण विभागात दोन नग १५०० मिलीमीटर व्यासाचे बटरफ्लाय व्हॉल्व बसविण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. हे काम भंडारवाडा टेकडी जलाशय, फॉसबेरी टेकडी जलाशय आणि गोलंजी टेकडी जलाशय यांचा पाणीपुरवठा सुव्यवस्थित करण्यासाठी केले जाणार आहे. ही कार्यवाही बुधवार, २२ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजल्यापासून गुरूवारी, २३ एप्रिल २०२६ रोजी पहाटे ४ वाजेपर्यंत एकूण १८ तास सुरु राहणार आहे. परिणामी, ए, बी, सी, ई आणि एफ दक्षिण विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर काही भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.कृपया संबंधित विभागातील नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. पाणीपुरवठा बंदच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, तसेच नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पुढील ४ ते ५ दिवस पाणी उकळून - गाळून प्यावे, महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.कोणत्या परिसरात असेल कपात ?‘ए’ विभाग - पी.डि'मेलो मार्ग रहिवासी, रामगड झोपडपट्टी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी), सेंट जॉर्ज रुग्णालय, शासकीय दंत महाविद्यालय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय), नौदल डॉकयार्ड‘बी’ विभाग - उमरखाडी, नूरबाग, चिंचबंदर, वालपाखाडी, कारागृह मार्ग (जेल रोड), रामचंद्र भट्ट मार्ग, आनंदराव सुर्वे मार्ग, समंतभाई नानजी मार्ग, डॉ. महेश्वरी मार्ग, केशवजी नाईक, भाग एस. व्ही. पी., शायदा मार्ग, फ्लँक रोड नवरोजी हिल, टंडेल (उ), निशाणपाडा स्ट्रीटटँडेल, तंतनपुरा, सॅम्युएल मोहम्मद उमर कोकील मार्ग, आय. एम. एम., वाय. एम. रोड, डोंटाड, खडक, इस्तायल मोहल्ला, धोबी मार्ग, शेरिफ देवजी, व्ही. व्ही. चंदन, दरियास्थान, काजी सय्यद, सय्यद मुखरी, इस्साजी, नृसिंहनाथ, जंजीकार, रघुनाथ महाराज, जुना बंगालीपुरा, भंडारी, अभयचंद गांधी मार्ग, लोकमान्य टिळक मार्ग (एल. टी. रोड), निशाणपाडा, मशिद बंदर.इमामवाडा, आय. आर. मार्ग, मोहम्मद अली, मेमनवाडा, पिरु गल्ली, कंबेकर, नखोडा, कोलसा, नारायण धुरु, अब्दुल रहमान स्ट्रीटनंदलाल जानी मार्ग, लीलाधर साह मार्ग, दाणाबंदर, संत तुकाराम मार्ग, पी.डिमेलो मार्ग, वाडीबंदररेल्वे परिसर , मुंबई बंदर परिसरसी’ विभाग -बॅनियन स्ट्रीट, इस्माईल कर्टे रोड, एसबीयूटी क्षेत्र, बोरा बाजार रस्ता, सरदार वल्लभभाई रस्ता, काजी रस्ता, अली उमर रस्ता, बापू कोटे मार्ग, झाम रस्ता, मशीद रस्ता, चिमना बुचर रस्ता, मटन रस्ता, धाबू रस्ता, पाकमोडिया स्ट्रीटई’ विभाग - १. नेसबिट रोड, एन. एम. जोशी मार्ग, मदनपुरा, बदलूपुरा, नागपाडा, शेख हाफिझुद्दीन मार्ग, मेघराज शेट्टी मार्ग, गणेश हरि पारुंडेकर मार्ग, पाईस रस्ता, मुसा किल्लेदार रस्ता, सोफिया जुबेर मार्ग, डिमटिमकार मार्ग, एम. ए. मार्ग, टँकपाखाडी मार्ग, क्लिअर रोड, बी. जे. मार्ग, के. के. रोडडिमटिमकर मार्ग, उंद्रिया रस्ता, खंडिया रस्ता, टेमकर रस्ता, शेख कमरूद्दीन रस्ता, मस्तान टँक मार्ग, टँक रस्ता, काझीपुरा, डंकन मार्ग, जे. जे. रस्ताम्हातारपाखाडी मार्ग, सेंट मेरी मार्ग, नेसबिट मार्ग, ताडवाडी, रेल्वे संकुल, शिवदास चापसी मार्ग (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ - सकाळी ६.३५ ते ८.१५ वा.)एम. एस. अली मार्ग, बेलासिस मार्ग, कामाठीपुरा, एस. पी. मार्ग, शुक्लाजी रस्ता, मनाजी राजूजी मार्ग, आग्रीपाडादत्ताराम लाड मार्ग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, भाई बाल मुकुंद मार्ग, काळाचौकी, चिंचपोकळी, टी. बी. कदम मार्गमाझगाव कोळीवाडा, नरसू नाखवा विठोबा मार्ग, ब्रह्मदेव खोद मार्ग, दरगाह गली, बॅ. नाथ पै मार्ग, दिलीमा स्ट्रीट, रुग्णालय गल्ली, चर्च लेन, बेकर्स लेन, नवाब टँक पूल, गन पावडर मार्ग, नवा नगर, डॉकयार्ड रोडहाथीबाग जागा, शेठ मोतिशाह गल्लीमुंबई बंदर क्षेत्रजे. जे. रुग्णालयरामभाऊ भोगले मार्ग, फरबंदर नाका, वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय, घोडपदेव नाका, म्हाडा संकुल, शेठ मोतिशाह गल्ली, टी. बी. कदम मार्ग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, डॉ. मस्कारहन्स मार्ग, डी. पी. वाडी, काळाचौकी, नारियल वाडी, संत सावता मार्ग, चंपी भिमजी मार्ग, ए. जी. पवार गल्ली, वीर तानाजी मालुसरे मार्गबॅ. नाथ पै मार्ग, मोदी कंपाउंड, अँटलस मिल कंपाउंड, घोडपदेव क्षेत्रशिवदास चापशी मार्गदारूखाना, लाकूड बंदर, कोळसा बंदर, दरगाह गली, क्वे स्ट्रीटकस्तुरबा रुग्णालय नायर रुग्णालय‘एफ दक्षिण’ विभाग - अभ्युदय नगर , शिवडी, वडाळा (पूर्व) , डॉ. ई. बोर्जेस मार्ग, बुस्टिंगलालबाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, चिवडा गल्ली, डॉ. एस. एस. राव मार्ग, दत्ताराम लाड मार्ग, जिजीभॉय गल्ली, महादेव पालव मार्ग, साने गुरुजी मार्ग, गॅस कंपनी गल्लीदादर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, जगन्नाथ भातणकर मार्ग, बी. जे. देवरुखकर मार्ग, गोविंदजी केणी मार्ग, हिंदमाता जेरबाई वाडिया मार्ग, स्प्रिंग मिल चाळ, गं. द आंबेकर मार्ग, गोविंदजी केणी मार्ग, शेटे मार्केट, भोईवाडा गाव, हाफकीन इन्स्टिट्यूट गं. द आंबेकर मार्ग ते ५० टेनामेंट्स, एकनाथ घाडी मार्ग, परळ गाव मार्ग, नाना भाई परळकर मार्ग, भगवानराव परळकर मार्ग, विजयकुमार वाळींबे मार्ग, एस. पी. कंपाऊंड (काही भागात)आचार्य दोंदे मार्ग, टी. जे. रोड, झकेरिया बंदर मार्ग, शिवडी छेद मार्ग, शिवडी किल्ला मार्ग, गाडी अड्डा, शिवडी कोळीवाडा,मुंबई बंदर परिक्षेत्रपरशुराम नगर, जिजामाता नगर, अंबेवाडी (काही भाग), साईबाबा मार्ग, मिंट वसाहत, राम टेकडीके. ई. एम. रुग्णालय, टाटा रुग्णालय, जेरबाई वाडिया रुग्णालय, एमजीएम रुग्णालय
India-US FTA: अमेरिकेसोबतचा मुक्त व्यापार करार जवळपास अंतिम; वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची माहिती
India-US FTA: गेल्या आर्थिक वर्षात देशाची अमेरिकेला होणारी निर्यात 0.92 टक्क्यांनी वाढून 87.3 अब्ज डॉलर्सवर पोहोचली, तर आयात 15.95 टक्क्यांनी वाढून 52.9 अब्ज डॉलर्स झाली.
Infrastructure sector : फेब्रुवारी 2026 मध्ये, आठ मुख्य पायाभूत सुविधा क्षेत्रांमध्ये 2.8 टक्क्यांनी वाढ झाली होती.
Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंचा भाजपला जबर धक्का; ‘या’बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
Maharashtra Politics : कोरेगावचे माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे.
Chandukaka Saraf: 19 एप्रिल ते 9 मे 2026 या कालावधीत ग्राहकांना सोन्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर 60% पर्यंत, तर हिर्यांच्या दागिन्यांच्या घडणावळीवर 100% पर्यंत सूट मिळणार आहे.
IRAN : इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला इराणचा ताबा
तेहरान : इराणमध्ये पडद्यामागे सुरू असलेल्या हालचाली आता समोर आल्या आहेत. अमेरिकेने केलेली युद्धबंदी बुधवारी संपत असताना आणि पाकिस्तानात चर्चेच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात होत असताना इराणमध्ये 'इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स' राजसत्तेवर पूर्णपणे कब्जा मिळविला आहे. आयआरजीसीचे मेजर जनरल अहमद वाहिदी हे इराणचे सर्वात शक्तिशाली नेते बनले आहेत. यामुळे जगावर महायुद्धाचे संकट घोंघावू लागले आहे. अमेरिकेने होर्मुझच्या सामुद्रधुनीत नाकेबंदी केल्यानंतर इराणने पुन्हा एकदा ही सामुद्रधुनी बंद केली आहे. त्यामुळे अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष नव्या वळणावर पोहोचला आहे. दोन्ही देशांतील हा संघर्ष मिटवण्यासाठी पाकिस्तानात चर्चेची दुसरी फेरी आयोजित करण्यात आली आहे. परंतु या बैठकीचे भवितव्य अधांतरीच आहे. इराणने यावेळी होर्मुझच्या सामुद्रधुनीत आक्रमक पवित्रा धारण केलेला असतानाच आता इराणमधून जगाला हादरवून टाकणारी एक माहिती समोर आली आहे.इराणची सत्ता आता कट्टरंपती इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स अर्थात आयआरजीसीच्या हाती आल्याचा दावा केला जात आहे. आता इराणमध्ये सर्व महत्त्वाचे निर्णय आयआरजीसीकडून घेतले जात आहेत, असे या वृत्तात सांगण्यात आले आहे. गेल्या आठवड्याभरात हा बदल झाल्याचे सांगण्यात येत आहे. या बदलाअंतर्गत आयआरजीसीचे कमांडर अहमद वाहिदी आणि त्यांचे जवळचे सहकारीच आता देशाचे प्रमुख नेतृत्त्व म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. अमेरिकेने होर्मुझमध्ये इराणच्या जहाजावर हल्ला करून पुन्हा युद्धाला तोंड फोडले आहे. अमेरिकेचा अशाप्रकारे चीनहून इराणला येत असलेल्या जहाजावर ताबा मिळविणे इराणला पटलेले नाही. अमेरिकन थिंक टँक ‘इन्स्टिट्यूट फॉर द स्टडी ऑफ वॉर’च्या मते, जनरल वाहिदी यांनी इराणच्या लष्करी तंत्रासह राजनैतिक वाटाघाटींची सूत्रेही आपल्या हाती घेतली आहेत. याला सर्वोच्च नेते मोज्तबा खामेनेई यांची मूक संमती असल्याचे सांगितले जात आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची हे हॉर्मुझचा समुद्री मार्ग उघडण्यास अनुकूल होते. मात्र, आयआरजीसीने हा निर्णय धुडकावून लावत उलट आपल्या 'फास्ट अटॅक शिप्स'च्या माध्यमातून हा मार्ग पूर्णपणे ब्लॉक केला आहे.परराष्ट्रमंत्र्यांना केले बाजूला?वॉशिंग्टन येथील ‘इन्स्टिट्यूट ऑफ द स्टडी ऑफर वॉर’च्या मतानुसार आयआरजीसीने इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांना बाजूला केले आहे. तसेच वरिष्ठ पातळीवर घेतले जाणारे सर्व निर्णय आता आयआरजीसीकडून घेतले जात आहेत. अमेरिकेसोबतच्या पहिल्या बैठकीनंतर अराघची यांनी होर्मुझची सामुद्रधुनी खोलण्याची घोषणा केली होती. परंतु हा निर्णय बदलून अमेरिकेला प्रत्युत्तर देण्यासाठी होर्मुझ बंदच असणे गरजेचे आहे, अशी भूमिका आयआरजीसीकडून घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.शेवटच्या क्षणी इराणचा अमेरिकेसोबतच्या चर्चेत सहभागी होण्यास नकारपाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये अमेरिका आणि इरान यांच्यातील शांतता चर्चेच्या दुसऱ्या फेरीची तयारी अंतिम टप्प्यात आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण इस्लामाबादला छावणीचे स्वरूप आले असून कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. मात्र, या सगळ्यात इराणने पाकिस्तान आणि अमेरिकेला मोठा झटका दिला आहे. सध्या या चर्चेत सहभागी होण्याची कोणतीही योजना नाही, असे इराणने स्पष्ट केले आहे. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी सोमवारी सांगितले की, ‘इराण अद्याप अमेरिकेसोबतच्या या चर्चेसाठी कोणताही विचार केलेला नाही’. इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धविराम संपण्यासाठी ४८ तासांपेक्षा कमी वेळ शिल्लक असताना हा मोठा पेच निर्माण झाला आहे. इराणनने चर्चेत मध्यस्थी करणाऱ्या पाकिस्तानच्या भूमिकेवरही संशय व्यक्त केला आहे. नव्या फेरीसाठी आपले प्रतिनिधी इस्लामाबादला पाठवण्याचा सध्या कोणताही विचार नसल्याचे संकेत इराणने दिले आहेत. मात्र, असे असले तरी आपला मित्र देश असलेल्या पाकिस्तानला इराणने १० कलमी प्रस्ताव पाठवला आहे. पाकिस्तान निष्पक्ष राहण्याऐवजी अमेरिका आणि सौदी अरेबियाकडे झुकत असल्याची भीती इराणला आहे. यातच भर म्हणून, अमेरिकन नौदलाने इराणी मालवाहू जहाजे जप्त केल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
मुंबई : कोकण रेल्वेच्या काही गाड्यांच्या आणि सीएसएमटी- हुजूर साहेब नांदेड 'वंदे भारत'च्या वेळेत बदल करण्यात आला आहे. प्रवाशांनी या बदलांची नोंद घेऊन प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.कोकण रेल्वेच्या काही गाड्यांच्या वेळेत बदल : मडगाव जिल्ह्यातील रावणफोंड येथे पुलाच्या बांधकामासाठी कंपोझिट गर्डर टाकण्याकरिता मंगळवार (२१ एप्रिल) ते २४ एप्रिल दरम्यान ट्रॅफिक ब्लॉक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. मंगळवारी गाडी क्र. २०६४६ मंगळूरू सेंट्रल - मडगाव जंक्शन वंदे भारत एक्सप्रेस बल्ली स्थानकावर १० मिनिटांसाठी थांबवण्यात येईल. बुधवारी (२२ एप्रिल) गाडी क्र. १२६१९ लो.टि.टर्मिनस- मंगळूरू सेंट्रल एक्सप्रेस मडगाव जंक्शन स्थानकावर २० मिनिटांसाठी थांबवण्यात येईल. गाडी क्र. २०९३२ इंदूर - तिरुवनंतपुरम नॉर्थ एक्सप्रेस मडगाव जंक्शन स्थानकावर ३५ मिनिटांसाठी थांबवण्यात येईल. गुरूवारी २३ एप्रिल गाडी क्र. १६३३८ एर्नाकुलम जंक्शन- ओखा एक्सप्रेस बल्ली स्थानकावर २० मिनिटांसाठी थांबवण्यात येईल, असे कोकण रेल्वेतर्फे कळवण्यात आले आहे.सीएसएमटी- हुजूर साहेब नांदेड 'वंदे भारत'च्या वेळेत बदल : मध्य रेल्वेने गाडी क्रमांक २०७०५/२०७०६ सीएसएमटी- हुजूर साहेब नांदेड ते सीएसएमटी 'वंदे भारत एक्सप्रेस'च्या वेळेत बदल केला आहे. सुधारित वेळा ३ मे २०२६ पासून लागू होतील. ही गाडी सीएसएमटी, दादर, संभाजी नगर, जालना, परभणी, हुजूर साहेब नांदेड येथे थांबेल तसेच हुजूर साहेब नांदेडहून पुन्हा सीएसएमटी असा प्रवास करेल. ठाणे, कल्याण, नाशिक आणि मनमाड येथे वेळेत कोणताही बदल होणार नाही. गाडी क्रमांक १२१४२ पाटलीपुत्र ही गाडी लो.टि.टर्मिनस स्थानकावर दुपारी २:१० ऐवजी २:२० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक २२१८०एम. जी. रामचंद्रन चेन्नई ही गाडी लो. टि. टर्मिनस येथे दुपारी २:२५ ऐवजी २:३० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ११०१२ धुळे -सीएसएमटी एक्सप्रेस सीएसएमटी येथे २.१५ ऐवजी २.२५ ला पोहोचेल.
Latur Crime : लातूर हादरलं ! चाकूरमध्ये चुलतीकडून पुतण्याची निर्घृण हत्या
जमिनीच्या वाटणीच्या वादातून हृदय पिळवटून टाकणारी घटना चाकूर येथे (Latur Crime) उघडकीस आली आहे. एका चुलतीने स्वतःच्या एकुलत्या एक ७ वर्षांच्या पुतण्याचा जीव घेतल्याने संपूर्ण परिसर हादरला आहे.
Gold-Silver : ‘या’कारमाणुळे सोने-चांदीच्या दरात झाली वाढ; पहा ताजे दर
Gold-Silver : दिल्ली सराफात चांदीचा दर 4 हजार 300 रुपयांनी वाढून 2 लाख 57 हजार 300 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला. दिल्ली सराफात सोन्याचा दर 800 रुपयांनी वाढून 1 लाख 57 हजार रुपये प्रति किलो या पातळीवर गेला.
Tilak Varma Century : तिलकने मैदानाच्या चहूबाजूला फटकेबाजी करत अवघ्या ४५ चेंडूंमध्ये आपले धमाकेदार शतक पूर्ण केले.
Corporator Salary : समाजवादी पक्षाच्या नगरसेविका अमरीन अब्राहानी यांनी मुंबई महापालिका नगरसेवकांसाठी १ लाख रुपये मानधनाची मागणी केली आहे.
Delhi High Court:
Rahul Gandhi : ट्रम्प यांच्या सूचनेवरून मोदींचा इस्त्रायल दौरा; राहुल गांधी यांचा दावा
Rahul Gandhi : पश्चिम आशियातील युद्धाला तोंड फुटण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्त्रायलचा दौरा केला. तो दौरा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सूचनेवरून झाला, असा आरोपवजा दावा कॉंग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केला.
‘विकसित महाराष्ट्र २०४७’साठी ठोस कृती आराखडा; प्रादेशिक तफावत कमी करण्यावर सरकारचा भर
राज्यातील प्रादेशिक तफावत कमी करून सर्व जिल्ह्यांचा समतोल आणि सर्वांगीण विकास साधण्यासाठी प्रत्येक विभागाने निश्चित कालमर्यादेत ठोस कृती आराखडा तयार करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.‘विकसित महाराष्ट्र २०४७’ या व्हिजन मॅनेजमेंट नियामक मंडळाच्या आढावा बैठकीत त्यांनी विविध विभागांच्या कामांचा सखोल आढावा घेतला आणि पुढील टप्प्यात प्रभावी अंमलबजावणीवर भर देण्याचे स्पष्ट केले. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या बैठकीस कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे, वित्त राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, मुख्य सचिव राजेश अग्रवाल (ऑनलाइन), तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त असले तरी ११ जिल्हे अजूनही मागे आहेत. या जिल्ह्यांना ‘विकासाचे इंजिन’ मानून त्यांचा वेगाने विकास केल्यास राज्याच्या एकूण प्रगतीला चालना मिळेल. केंद्राच्या आकांक्षी जिल्ह्यांच्या धर्तीवर राज्यात १० आकांक्षी जिल्हे आणि १७४ आकांक्षी तालुके निश्चित करण्यात आले असून, स्थानिक पातळीवर विकासाचे मापदंड उंचावण्याचा प्रयत्न सुरू आहे.https://prahaar.in/2026/04/20/mumbai-crime-fake-fakir-arrested-in-mumbai-accused-of-torturing-women-in-the-name-of-treatment/शाश्वत विकास उद्दिष्टांच्या निर्देशांकात महाराष्ट्राला पुन्हा आघाडीवर आणण्यासाठी विभागनिहाय कृती आराखडे तयार करण्यावर त्यांनी भर दिला. नियोजन विभागाने तत्काळ मार्गदर्शक सूचना जारी कराव्यात, तर वित्त विभागाने ३० एप्रिलपर्यंत प्रकल्पांचे आर्थिक मूल्यमापन पूर्ण करावे, असेही त्यांनी सांगितले. निधी उभारणीसाठी केंद्र-राज्य योजना, जिल्हा योजना, वित्त आयोग अनुदान आणि कर्ज पर्यायांचा योग्य समन्वय साधण्याचे निर्देश देण्यात आले.‘इज ऑफ डुईंग बिझनेस’ सुधारण्यासाठी सार्वजनिक-खासगी भागीदारी आणि जमीन मूल्य धोरणांचा प्रभावी वापर करण्यावर भर देण्यात आला. केंद्राकडील निधी मिळवण्यासाठी उपयोगिता प्रमाणपत्रे वेळेत सादर करण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. तसेच खाजगी गुंतवणूक, निर्यात आणि उपभोग वाढवण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.https://prahaar.in/2026/04/20/chhattisgarh-plane-crashes-into-mountain-pilot-dies/विभागांमध्ये समन्वय वाढवून जबाबदारीने काम करण्याचे निर्देश देत त्यांनी प्रगतीचे नियमित मूल्यमापन करण्याची गरजही अधोरेखित केली. ‘विकसित महाराष्ट्र’ या उद्दिष्टाशी सुसंगत असलेले प्रस्तावच पुढे स्वीकारले जातील आणि प्रत्येक प्रस्तावास त्याचे स्पष्टीकरण जोडणे बंधनकारक राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.दरम्यान, मंत्री अतुल सावे यांनी निधी वेळेत खर्च होण्यासाठी स्पष्ट नियमावलीची गरज व्यक्त केली. मंत्री नितेश राणे यांनी भविष्यातील क्षेत्रांचा विचार करून थेट परकीय गुंतवणुकीचे नियोजन करण्याचा सल्ला दिला. तसेच प्रादेशिक समतोल राखत किल्ल्यांच्या संवर्धनासाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्याची मागणी केली. वित्त राज्यमंत्री ॲड. जयस्वाल यांनी अनुसूचित जाती-जमातींच्या गरजांनुसार जिल्हानिहाय निधी नियोजन करण्याचे सुचवले.बैठकीत विविध विभागांच्या सचिवांनी पुढील चार वर्षांच्या विकास आराखड्यांचे सादरीकरण केले.
मुंबई : राज्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा देत राज्य सरकारने शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर आकारले जाणारे नोंदणी शुल्क संपूर्ण माफ केले आहे. याबाबतचे परिपत्रक महसूल विभागाकडून आज जारी करण्यात आले आहे.आता महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ च्या कलम ८५ अंतर्गत येणाऱ्या प्रकरणांसह, आपसातील संमतीने थेट दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणीसाठी येणाऱ्या वडिलोपार्जित शेतजमिनीच्या वाटणीपत्रांनाही नोंदणी शुल्कातून पूर्णपणे माफी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री ददेवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय घेतला आहे.शासनाने २३ जून २०२५ रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार, कलम ८५ अन्वये एकाच कुटुंबातील सदस्यांनी केलेल्या शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर कोणतेही नोंदणी शुल्क आकारले जाणार नाही, अशी तरतूद करण्यात आली होती. या कलमांतर्गत वाटणीपत्राचे अधिकार तहसीलदारांना आहेत. परंतु, अनेक नागरिक तहसीलदारांकडे न जाता थेट दुय्यम निबंधक कार्यालयात आपसातील संमतीने वाटणीपत्र नोंदणीसाठी सादर करत होते. अशा वेळी मूळ अधिसूचनेत स्पष्ट तरतूद नसल्याचे कारण देत दुय्यम निबंधक कार्यालयांकडून नोंदणी शुल्क आकारले जात असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले होते.शेतकऱ्यांचा होणारा हा गोंधळ दूर करण्यासाठी शासनाचे महत्वाचे पाऊल उचलले असून महसूल विभागाने आता याबाबत स्पष्ट आदेश दिले आहेत. नवीन स्पष्टीकरणानुसार कलम ८५ अंतर्गत तहसीलदार स्तरावरून होणाऱ्या वाटणीपत्रांच्या नोंदणीसाठी कोणतेही शुल्क लागणार नाही. वडिलोपार्जित शेतजमिनीबाबत वारसा हक्क प्राप्त झालेल्या सर्व सहधारकांनी एकत्र येऊन थेट नोंदणी कार्यालयात सादर केलेल्या वाटणीपत्रालाही आता नोंदणी शुल्कातून सूट मिळेल.https://prahaar.in/2026/04/20/mumbai-crime-fake-fakir-arrested-in-mumbai-accused-of-torturing-women-in-the-name-of-treatment/एकाच कुटुंबातील सदस्यांमध्ये झालेल्या शेतजमिनीच्या वाटप दस्तावरही कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. या निर्णयामुळे शेतजमिनीच्या वाटणीसाठी होणारा खर्च वाचणार असून प्रलंबित वादांचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे.राज्यातील सर्व शेतकऱ्यांना फायदा होणार आहे : चंद्रशेखर बावनकुळेएकाच कुटुंबातील सदस्यांनी आपसात वडिलोपार्जित जमीनीचे वाटप केल्यास त्याचे नोंदणी शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. हे अधिकार तहसीलदारांना होते. पण, काही लोक थेट दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन नोंदणी करत होते. त्यासाठीच्या नियमात स्पष्टता नसल्याने नोंदणी फी आकारली जात होती. ही अडचण दूर करण्यासाठी नव्याने हे स्पष्टीकरण देण्यात आले असून आता तहसीलदार किंवा नोंदणी कार्यालयात कुठेही गेला तरी नोंदणी फी भरावी लागणार नाही. याचा राज्यातील सर्व शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
Chhattisgarh Plane crashes : डोंगराला धडकून विमानाचा अपघात; वैमानिकांचा मृत्यू
छत्तीसगडच्या जशपूर जिल्ह्यात आज, (सोमवार, २० एप्रिल) भीषण विमान अपघात झाला. नारायणपूर पोलीस ठाणे क्षेत्रातील खुर्सागढा गावाजवळ रतनपहली जंगलात हा अपघात घडला. एका डोंगराला विमान धडकल्यामुळे झालेल्या या अपघातात वैमानिक आणि सहवैमानिकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. अपघाताच्या वेळी हे विमान ३० फूट उंचीवरून उड्डाण करीत होते.अपघाताची माहिती मिळताच प्रशासनाची टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली आणि बचाव व मदतकार्य सुरू करण्यात आले. अपघातानंतर परिसरातून धुराचे लोट उठताना दिसत असल्याचा व्हिडिओही समोर आला आहे. यापूर्वी महाराष्ट्रातील बारामती येथे २८ जानेवारी २०२६ रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह ५ जणांचा प्रायव्हेट जेट दुर्घटनेत मृत्यू झाला होता. लँडिंगच्या प्रयत्नात असलेले विमान दुर्घटनाग्रस्त होऊन कोसळले होते.https://prahaar.in/2026/04/20/a-modern-fish-market-will-be-built-in-kolhapur/तसेच २३ फेब्रुवारी २०२६ रोजी झारखंडची राजधानी असलेल्या रांची येथे एक एअर अॅम्ब्युलन्स कोसळली होती. या अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला होता. दिल्लीकडे जाणारे हे विमान उड्डाण केल्यानंतर अवघ्या १७ मिनिटांत कोसळले होते. त्यात रुग्ण, वैद्यकीय कर्मचारी आणि क्रू सदस्य होते. दरम्यान छत्तीसगडमध्ये झालेल्या अपघातात २ वैमानिकांच्या मृत्यूला दुजोरा मिळाला असला तर अपघातची विस्तृत माहिती अद्याप पुढे आलेली नाही.
Mumbai Crime : मुंबईत भोंदू फकीर अटकेत; उपचाराच्या नावाखाली महिलांवर अत्याचाराचा आरोप
मुंबई : नाशिक आणि संगमनेरमधील भोंदूबाबांच्या प्रकरणांची चर्चा अजून थंड झालेली नसतानाच मुंबईतही अशाच प्रकारचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. स्वतःला फकीर बाबा म्हणवून महिलांची फसवणूक करणाऱ्या एका भोंदू फकीराला पोलिसांनी अटक केली आहे. महिलांना त्यांच्या वैयक्तिक समस्या आणि दुःखावर उपाय सांगण्याच्या नावाखाली जाळ्यात ओढून त्यांना बेशुद्ध करून अत्याचार केल्याचा गंभीर आरोप या आरोपीवर करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपीचे नाव इरफान नियाज अहमद (वय ३४) असून तो मूळचा उत्तर प्रदेशातील बहराइच येथील रहिवासी आहे.मात्र, गेल्या काही वर्षांपासून तो मुंबईत वास्तव्यास होता. कांदिवली परिसरात स्वतःला फकीर बाबा म्हणून ओळख निर्माण करून लोकांचा विश्वास संपादन करत होता. विशेषतः महिलांच्या अडचणी जाणून घेऊन त्यावर धार्मिक विधी आणि उपचार करण्याचे आमिष दाखवत तो त्यांना फसवत असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.कांदिवलीत राहणाऱ्या एका महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपीने तिच्या पतीच्या मृत्यूबाबत अचूक माहिती सांगून तिचा विश्वास जिंकला. त्यानंतर तिच्यावर काही दोष असल्याचे सांगत तो दोष दूर करण्यासाठी विशेष विधी करण्याची गरज असल्याचे सांगितले. या बहाण्याने आरोपीने त्या महिलेला आणि तिच्या दोन मुलींना एका ठिकाणी बोलावून धार्मिक विधी सुरू केला. या विधीदरम्यान तिघींनाही बेशुद्ध करण्यात आले, असा आरोप करण्यात आला आहे.https://prahaar.in/2026/04/20/uae-demands-compensation-from-us-for-war-costs-due-to-iran-war/बेशुद्ध अवस्थेचा फायदा घेत आरोपीने एका मुलीचा विनयभंग केल्याचा अत्यंत गंभीर प्रकार समोर आला आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर संबंधित महिलेनं तात्काळ कांदिवली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) अंतर्गत कलम ७४, ७८, १२३ तसेच ३(२) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी इरफान नियाज अहमद याला अटक केली असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. या प्रकरणामागे आणखी काही पीडित महिला असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून अधिक तपास सुरू आहे. आरोपीने अशा प्रकारे किती जणांना फसवले आहे, याचा शोध घेतला जात आहे.या घटनेमुळे मुंबईत एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. धार्मिक श्रद्धा आणि अंधविश्वासाचा गैरफायदा घेऊन महिलांची फसवणूक करणाऱ्या अशा भोंदूबाबांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. पोलिसांनी नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले असून अशा प्रकारच्या व्यक्तींवर सहज विश्वास ठेवू नये, असेही सांगितले आहे.
BCCI Two Teams Plan : वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धा आणि वेस्ट इंडिजविरुद्धची टी-२० मालिका एकाच वेळी पार पडणार असल्याने, मंडळाने ३० ते ३५ खेळाडूंचा एक तगडा 'पूल' तयार केला आहे.
Kolhapur : कोल्हापूरमध्ये आधुनिक मासळी बाजार उभारणार
मुंबई : कोल्हापूर शहरातील राजोपाध्येनगर येथे आधुनिक मासळी बाजार उभारण्यासाठी आवश्यक मदत आणि निधी उपलब्ध करून दिला जाईल. मासळी बाजाराची इमारत अर्थात फिश मार्केट बिल्डिंग उभारण्यासाठी आवश्यक प्रकिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी दिले. मंत्रालयात मत्स्य व्यवसायात मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस आमदार अमल महाडिक, आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. कोल्हापूरच्या मासळी बाजाराला मत्स्य व्यवसाय विभागाकडील अन्य योजनांचाही लाभ मिळवून देण्यासाठी काय करता येईल याची चाचपणी करण्याचे निर्देशही मंत्री नितेश राणे यांनी दिले.बैठकीत प्रस्तावित भव्य, आधुनिक इमारतीच्या आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले. मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी तसेच विक्रेत्यांना सुसज्ज सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हे मार्केट उभारण्यात येणार असून, त्यासाठी आवश्यक बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. कामास गती देण्यासाठी लवकरात लवकर भूमिपूजन करून प्रत्यक्ष काम सुरू करण्याबाबत संबंधितांना सूचना देण्यात आल्या.प्रस्तावित मार्केटमध्ये स्वच्छता, कोल्ड स्टोरेज, पिण्याचे पाणी, सांडपाणी व्यवस्थापन आणि ग्राहकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या प्रकल्पामुळे स्थानिक विक्रेत्यांना नियोजित बाजारपेठ मिळणार असून ग्राहकांनाही दर्जेदार सेवा मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. बैठकीनंतर गिरगाव चौपाटी येथे मासेमारी करणाऱ्या कोळी बांधवांच्या समस्यांसंदर्भात बैठक झाली. या प्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालय, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त आणि मत्स्यव्यवसाय विभागाने एकत्रित बैठक घ्यावी आणि प्रश्न सोडवावे अशी सूचना मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी दिली.
Vasai : वसईत मत्स्य प्रशिक्षण केंद्रासाठी जागा निश्चिती करण्याचे मंत्री नितेश राणेंचे निर्देश
मुंबई : पालघर जिल्ह्यातील वसई येथे मत्स्य प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी जागा निश्चित करावी. या केंद्रासाठी आवश्यक जागा मागणीचा प्रस्ताव महसूल विभागाकडे पाठवावावा अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्या.पालघर जिल्ह्यातील वसई येथे मत्स्य प्रशिक्षण केंद्र स्थापन करणे या विषयी मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. बैठकीस आमदार स्नेहा दुबे, मत्स्यव्यवसाय आयुक्त प्रेरणा देशभ्रतार आदी उपस्थित होते.वसईतील केंद्रामुळे स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील यासाठी प्रकल्पाची अंमलबजावणी लवकर होणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना ही एक महत्त्वाची योजना असून या योजनेच्या जनजागृतीसाठी शिबिरांचे आयोजन करून जास्तीत जास्त लाभार्थी पर्यंत ही योजना पोचवावी, अशा सूचना ही मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्या. यानंतर मुरुड-जंजिरा नगरपरिषद हद्दीत कोळी समाजाच्या विविध मागण्या संदर्भात मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश गाणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली. या बैठकीस पर्यटन विभागाचे सचिव संजय खंदारेही उपस्थित होते. बैठकीत मच्छी सुकविण्यासाठी जागा, जाळी व बोटी दुरुस्ती केंद्रे, कोळी खेड्यांचा विकास तसेच पर्यटनाला चालना देणारे प्रकल्प यावर चर्चा झाली. यावेळी 'बॅक वॉटर' प्रकल्पाच्या माध्यमातून आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी पर्यटन विभाग व मत्स्य व्यवसाय विभागाकडे प्रस्ताव सादर करावा. याबाबत जिल्हाधिकारी रायगड यांनी सर्व संबंधितांची बैठक घ्यावी असे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले. मच्छीमार संस्थांना मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेची माहिती देण्यात यावी. त्यासाठी शिबिरांचेही आयोजन करण्यात यावे अशा सूचनाही मत्स्यव्यवसाय मंत्री राणे यांनी दिल्या.
Nashik TCS Case : निदा खानच्या अडचणीत वाढ ! अटकेपासून अंतरिम संरक्षण देण्यास कोर्टाचा नकार
नाशिक येथील टीसीएस कंपनीमध्ये (Nashik TCS Case) घडलेल्या लैंगिक छळ आणि धार्मिक सक्तीच्या प्रकरणात आरोपी असलेल्या निदा खानला स्थानिक न्यायालयाने सोमवारी अटकेपासून कोणतेही अंतरिम संरक्षण देण्यास नकार दिला.
IPS Tushar Doshi : साताऱ्यात जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या वेळी मोठा गदारोळ झाला होता. या गोंधळात साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांना पोलिसांकडून धक्काबुक्की झाल्याचा प्रकार घडला होता.
Transfers of IPS Officer : पुण्यातील 2 वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बदली
राज्यातील पोलिस प्रशासनात महत्त्वाच्या बदल्या (Transfers of IPS Officer) जाहीर करण्यात आल्या असून, पुणे शहर गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांची सातारा जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
IPS Transfer : मोठी उलथापालथ..! राज्यातील ९ वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पहा कोणाची कुठे बदली?
IPS Transfer : महाराष्ट्र गृह विभागाने २० एप्रिल २०२६ रोजी ९ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.
Blessing Muzarabani Statement : पीएसएल (PSL) सोडून आयपीएलला पसंती दिल्याने संतापलेल्या पीसीबीने मुजरबानीवर २ वर्षांची बंदी घातली आहे, ज्याला आता मुजरबानीच्या एजंटने चोख प्रत्युत्तर दिले आहे.
भारत आणि दक्षिण कोरिया यांनी त्यांच्या व्यापक आर्थिक भागीदारी कराराला (सीईपीए) अद्ययावत करण्यासाठी चर्चा सुरू करण्यास सहमती दर्शवली आहे. जागतिक स्तरावर वाढत्या भूराजकीय तणाव आणि व्यापारातील अडथळ्यांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांच्या आर्थिक सहकार्याला नवी दिशा देण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली जे-म्युंग यांच्यात सोमवारी हैदराबाद हाऊसमध्ये झालेल्या द्विपक्षीय बैठकीनंतर ही घोषणा करण्यात आली. या दरम्यान दोन्ही देशांमध्ये अनेक सामंजस्य करार (एमओयू) आणि इतर महत्त्वपूर्ण करारांची देवाणघेवाण करण्यात आली.हैदराबाद हाऊसमध्ये संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “चिप्सपासून जहाजांपर्यंत, कौशल्यापासून तंत्रज्ञानापर्यंत, मनोरंजनापासून ऊर्जेपर्यंत—भारत आणि कोरिया मिळून सहकार्याच्या नव्या संधी साकार करतील.” त्यांनी या भेटीला द्विपक्षीय संबंधांसाठी “महत्त्वपूर्ण टप्पा” असे संबोधत सांगितले की दोन्ही देश आपली भागीदारी “भविष्योन्मुख” दिशेने पुढे नेत आहेत.https://prahaar.in/2026/04/20/share-market-stock-market-plunges-investors-lose-rs-19000-crore-in-a-single-day/पंतप्रधानांनी सांगितले की भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यातील द्विपक्षीय व्यापार सध्या सुमारे 27 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचला आहे आणि 2030 पर्यंत तो 50 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी दोन्ही देशांनी अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलण्यावर सहमती दर्शवली असून त्यामध्ये “भारत-कोरिया वित्तीय मंच” स्थापन करण्याचाही समावेश आहे.डिजिटल आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्य अधिक मजबूत करण्यासाठी “इंडिया-कोरिया डिजिटल ब्रिज” ही पुढाकार योजना सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. या अंतर्गत कृत्रिम बुद्धिमत्ता, सेमीकंडक्टर आणि माहिती तंत्रज्ञान यांसारख्या क्षेत्रांत संयुक्त प्रयत्न केले जाणार आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही देशांमधील सांस्कृतिक संबंधांचा उल्लेख करत सांगितले की भारत आणि कोरिया यांच्यात हजारो वर्षांपासून ऐतिहासिक संबंध आहेत. त्यांनी अयोध्येची राजकुमारी सूरीरत्ना आणि कोरियाचे राजा किम-सुरो यांची कथा सांगत ती सामायिक सांस्कृतिक वारशाचे प्रतीक असल्याचे नमूद केले. त्यांनी असेही सांगितले की भारतात कोरियन पॉप संस्कृती आणि मालिका यांची लोकप्रियता वाढत आहे, तर कोरियामध्ये भारतीय चित्रपट आणि संस्कृतीबद्दल आकर्षण वाढत आहे. दोन्ही देशांनी 2028 मध्ये “भारत-कोरिया मैत्री महोत्सव” आयोजित करण्याची घोषणा केली असून यामुळे सांस्कृतिक देवाणघेवाण अधिक वाढीस लागेल.https://prahaar.in/2026/04/20/uae-demands-compensation-from-us-for-war-costs-due-to-iran-war/जागतिक मुद्द्यांवर चर्चा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की सध्याच्या काळात जागतिक शांतता आणि स्थैर्य सुनिश्चित करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यांनी सांगितले की भारत आणि कोरिया इंडो-पॅसिफिक प्रदेशात समान दृष्टिकोन ठेवतात आणि प्रादेशिक शांतता, स्थैर्य तसेच सर्वसमावेशक विकासासाठी एकत्रितपणे कार्य करतील.या प्रसंगी दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली जे-म्युंग यांनी सांगितले की दोन्ही देशांचे उद्दिष्ट 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार 50 अब्ज डॉलर्सपर्यंत नेण्याचे आहे. त्यांनी असेही नमूद केले की दोन्ही नेत्यांनी मध्य पूर्वेतील परिस्थितीवर चर्चा केली आणि तेथे शांतता व स्थैर्य पुनर्स्थापित करणे जागतिक अर्थव्यवस्था आणि सुरक्षेसाठी अत्यावश्यक असल्याचे मान्य केले. राष्ट्राध्यक्ष ली यांनी माहिती दिली की दोन्ही देशांदरम्यान इलेक्ट्रॉनिक पेमेंट प्रणाली जोडण्यासाठी करार करण्यात आला असून यामुळे दोन्ही देशांतील नागरिकांना एकमेकांच्या देशात प्रवास करताना स्थानिक क्यूआर कोडद्वारे पेमेंट करता येईल.दोन्ही नेत्यांनी आंतरराष्ट्रीय मंचांवर सहकार्य वाढवण्यावर आणि जागतिक संस्थांमध्ये सुधारणा करण्याच्या गरजेवरही भर दिला. बदलत्या जागतिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी समन्वित प्रयत्न आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
Kolhapur : भिंत कोसळून प्राध्यापिकेसह विद्यार्थिनीचा अंत
Kolhapur : ४५ वर्षीय प्राध्यापिका ज्योती नितीन कुंभार आणि सहावीत शिकणारी १४ वर्षीय विद्यार्थिनी वैष्णवी तुकाराम भोसले यांच्या अंगावर अचानक भिंतीचा मोठा भाग आणि मातीचा ढिगारा कोसळला.
Pune Crime : लोणीकाळभोर परिसरात दहशत माजविणाऱ्या दोघांना अटक
लोणीकाळभोर परिसरातील माईल्सस्टोन हॉटेलजवळ दहशत माजवणाऱ्या दोन सराईत आरोपींना खंडणी विरोधी पथक २, गुन्हे शाखा, पुणे शहर (Pune Crime) यांनी धाडसी कारवाई करत शस्त्रांसह अटक केली आहे.
Maharashtra Politics : कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी आपण मूळचे भाजपचे असल्याचे सांगत शिवसेनेतील प्रवेशावर मोठे विधान केले आहे.
Share Market : शेअर बाजारात दाणादाण; गुंतवणूकदारांचे एका दिवसात १९ हजार कोटींचे नुकसान
अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता चर्चेच्या दुसऱ्या फेरीच्या पार्श्वभूमीवर, देशांतर्गत शेअर बाजारात दिवसभर सतत चढ-उतार दिसून आले. व्यवहारांची सुरुवात वाढीने झाली. बाजार उघडल्यानंतर तेजीवाले आणि मंदीवाले यांच्यात रस्सीखेच सुरू झाली, ज्यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांमध्ये चढ-उतार झाले. दिवसअखेरीस, सेन्सेक्स ०.०३ टक्क्यांच्या आणि निफ्टी ०.०५ टक्क्यांच्या किरकोळ वाढीसह बंद झाला.ऑटोमोबाइल आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकिंग क्षेत्रातील शेअर्समध्ये स्थिर खरेदी सुरू राहिली. त्याचप्रमाणे, भांडवली वस्तू, टिकाऊ ग्राहक वस्तू, तेल आणि वायू, आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम निर्देशांकही वाढीसह बंद झाले. दरम्यान, आयटी, रिअल्टी आणि टेलिकॉम शेअर्सवर विक्रीचा दबाव कायम होता. त्याचप्रमाणे, एफएमसीजी, आरोग्यसेवा, धातू आणि तंत्रज्ञान निर्देशांकही घसरणीसह बंद झाले. आज व्यापक बाजारात विक्रीचा दबाव कायम राहिल्याने, निफ्टी मिडकॅप निर्देशांकात सामान्य घसरण झाली आणि तो ०.१८ टक्क्यांनी खाली बंद झाला. त्याचप्रमाणे, स्मॉलकॅप निर्देशांक ०.४५ टक्क्यांनी खाली येऊन बंद झाला.आज शेअर बाजारात माफक वाढ होऊनही, मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समधील विक्रीमुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या संपत्तीत अंदाजे २०,००० कोटी रुपयांची घट झाली. आजच्या व्यवहारानंतर बीएसई-सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल ४६५.४५ लाख कोटी रुपयांपर्यंत (तात्पुरते) घसरले. गेल्या आठवड्यातील शेवटचा व्यवहार दिवस असलेल्या शुक्रवारी, त्यांचे बाजार भांडवल ४६५.६४ लाख कोटी रुपये होते. परिणामी, आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांना अंदाजे १९ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले.https://prahaar.in/2026/04/20/uae-demands-compensation-from-us-for-war-costs-due-to-iran-war/दिवसभरातील व्यवहारादरम्यान, बीएसईवर ४,५७८ शेअर्सचा सक्रियपणे व्यापार झाला. यापैकी १,८४० शेअर्स वाढीसह बंद झाले, २,५४८ शेअर्समध्ये घट झाली आणि १९० शेअर्समध्ये कोणताही बदल झाला नाही. आज एनएसईवर सक्रिय व्यवहार झाले, ज्यात २,९७८ शेअर्समध्ये वाढ झाली. यापैकी १,१२३ शेअर्स वाढीसह बंद झाले, तर १,८५५ शेअर्स घसरणीसह बंद झाले. त्याचप्रमाणे, सेन्सेक्सच्या ३० शेअर्सपैकी १२ शेअर्स वाढीसह बंद झाले, तर १८ शेअर्स घसरणीसह बंद झाले. निफ्टीच्या ५० शेअर्सपैकी २३ शेअर्स वाढीसह बंद झाले, तर २७ शेअर्स घसरणीसह बंद झाले.बीएसई सेन्सेक्स १३९.३६ अंकांच्या वाढीसह ७८,६३२.९० अंकांवर उघडला.व्यवहार सुरू होताच, खरेदीदार आणि विक्रेत्यांमध्ये जोरदार लढाई सुरू झाली. खरेदीच्या जोरावर सेन्सेक्स ४४८.९१ अंकांनी वाढून ७८,९४२.४५ अंकांवर पोहोचला. विक्रीच्या दबावामुळे २९०.२४ अंकांची घसरण झाली, ज्यामुळे तो ७८,२०३.३० अंकांवर पोहोचला. दिवसभराच्या व्यवहारानंतर, सेन्सेक्स २६.७६ अंकांच्या किरकोळ वाढीसह ७८,५२०.३० अंकांवर बंद झाला.https://prahaar.in/2026/04/20/iran-america-war-did-america-seize-an-iranian-cargo-ship/सेन्सेक्सप्रमाणेच, एनएसई निफ्टीने ३७.९५ अंकांच्या वाढीसह २४,३९१.५० अंकांवर दिवसाची सुरुवात केली. बाजार उघडल्यानंतर लगेचच तेजीवाले आणि मंदीवाले यांच्यात रस्सीखेच सुरू झाली, ज्यामुळे निफ्टीमध्ये चढ-उतार झाला. खरेदीच्या पाठिंब्याने, निफ्टी १२७.१० अंकांनी वाढून २४,४८०.६५ अंकांवर पोहोचला. विक्रीच्या दबावामुळे ११२.३० अंकांची घसरण होऊन तो २४,२४१.२५ अंकांवर पोहोचला. दिवसभराच्या व्यवहारानंतर, निफ्टी ११.३० अंकांच्या किरकोळ वाढीसह २४,३६४.८५ अंकांवर बंद झाला.दिवसभरातील खरेदी-विक्रीनंतर, शेअर बाजारातील मोठ्या शेअर्सपैकी, ट्रेंट लिमिटेड (३.२९ टक्के वाढ), जेएसडब्ल्यू स्टील (२.७६ टक्के वाढ), स्टेट बँक ऑफ इंडिया (२.५५ टक्के वाढ), एशियन पेंट्स (२.१४ टक्के वाढ) आणि ग्रासिम इंडस्ट्रीज (१.४६ टक्के वाढ) यांचा आजच्या टॉप ५ सर्वाधिक वाढ झालेल्या शेअर्सच्या यादीत समावेश होता. दुसरीकडे, जिओ फायनान्शियल (२.७५ टक्के घट), हिंडाल्को इंडस्ट्रीज (२.२९ टक्के घट), टीएमपीव्ही (१.२२ टक्के घट), कोटक महिंद्रा (१.१५ टक्के घट) आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स (१.१२ टक्के घट) यांचा आजच्या टॉप ५ सर्वाधिक घसरण झालेल्या शेअर्सच्या यादीत समावेश होता.
Chandrashekhar Bawankule: यापूर्वी शेतजमिनीच्या वाटणीचा दस्त तयार करताना जमिनीच्या एकूण बाजारमूल्याच्या १ टक्का इतके नोंदणी शुल्क आकारले जात होते. ही रक्कम मोठी असल्याने अनेक शेतकरी अधिकृत दस्तनोंदणी करणे टाळत असत.
Chris Gayle Team : वेस्ट इंडिजचा दिग्गज फलंदाज ख्रिस गेल याने युरोपियन टी-२० प्रीमियर लीगमध्ये या संघाचा सह-मालक म्हणून क्रिकेटच्या मैदानातून आता 'बिझनेस'च्या मैदानात एन्ट्री घेतली आहे.
Umar Khalid : उमर खालिदला सर्वोच्च न्यायालयाचा दणका! ‘ती’याचिका फेटाळली
२०२० मधील दिल्ली दंगल कटाप्रकरणी अटकेत असलेला कार्यकर्ता उमर खालिद (Umar Khalid) याला सर्वोच्च न्यायालयाने मोठा झटका दिला आहे.
El Nino : 'एल निनो’च्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ‘टास्क फोर्स’
मुंबई : यंदा ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात ‘एल निनो’चा प्रभाव वाढण्याची शक्यता असून पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या संभाव्य नैसर्गिक आपत्तीचे सौम्यीकरण करण्यासाठी सर्व विभागांनी तत्काळ पूर्वतयारी आणि प्रभावी अंमलबजावणी करावी. विशेषतः पाण्याचे सुयोग्य नियोजन, जलसंधारणाच्या कामांना गती आणि जुन्या जलस्त्रोतांचे पुनरुज्जीवन यावर भर द्यावा, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिले.राज्यातील संभाव्य एल निनोच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीला कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, आशिष जयस्वाल यांच्यासह विविध विभागांचे सचिव आणि हवामान विभागाचे तज्ज्ञ उपस्थित होते. पावसातील संभाव्य घट लक्षात घेता पिण्याचे पाणी आणि सिंचनासाठी पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरणे आवश्यक आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी, सिंचन विभाग आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींचा समावेश असलेला ‘टास्क फोर्स’ स्थापन करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. केवळ चालू वर्षाचा नव्हे, तर पुढील उन्हाळ्याचाही विचार करून आतापासूनच पाणी साठवणुकीचे नियोजन करावे, असेही त्यांनी अधोरेखित केले.कमी पावसात पिके वाचवण्यासाठी संरक्षित सिंचन हाच एकमेव पर्याय आहे. त्यामुळे ‘जलयुक्त शिवार’ आणि ‘गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार’ या योजनांची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जुन्या जलस्त्रोतांच्या दुरुस्तीवर भर दिल्यास कमी खर्चात जास्त पाणी साठा उपलब्ध होईल. या कामांसाठी वित्त विभागाने तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.वैरण विकासासाठी बॅक वॉटरचा वापर : पशुधनासाठी चारा टंचाई भासू नये म्हणून बाहेरील राज्यांवर अवलंबून न राहता राज्यातच वैरण विकास कार्यक्रम राबवावा. विशेषतः धरणांच्या बॅक वॉटर क्षेत्रात चारा लागवडीवर भर देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सोलापूर, सांगली आणि मराठवाडा या भागांकडे चारा उपलब्धतेसाठी विशेष लक्ष देण्याचे निर्देश फडणवीस यांनी दिले.खत वितरणावर ‘एआय’ची नजर : खते आणि बियाण्यांची कृत्रिम टंचाई रोखण्यासाठी ‘अॅग्रीस्टॅक’ प्रणालीचा वापर केला जाणार आहे. खत वितरणामध्ये पारदर्शकता राखण्यासाठी आणि तपासणी यंत्रणा मजबूत करण्यासाठी ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (एआय) म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत घेण्यावर मुख्यमंत्र्यांनी भर दिला.
UAE Demands Compensation From US : इराण युद्धामुळे यूएईची अमेरिकेकडे युद्ध खर्च भरपाईची मागणी
इराण-अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या भीषण संघर्षामुळे मध्यपूर्वेतील देश आता अमेरिकेपासून अंतर ठेवत असल्याचे दिसून येत आहे. संयुक्त अरब अमिरातीने (यूएई) वॉशिंग्टनलाच युद्ध सुरू करण्यासाठी जबाबदार धरत अमेरिकेकडे युद्धाचा खर्च उचलण्याची मागणी केली आहे. कारण स्पष्ट आहे की या युद्धात यूएईसह मध्यपूर्वेतील इतर देशांच्या मालमत्तांचे मोठे नुकसान झाले आहे. वृत्तानुसार, यूएईने इराण युद्धात झालेल्या नुकसानीसाठी अमेरिकेकडून आर्थिक हमी मागितली आहे. ही मागणी वॉशिंग्टनसाठी आर्थिक संकटाचे दार उघडू शकते, कारण इतर खाडी देशही नुकसानभरपाईच्या रांगेत उभे राहू शकतात. अमेरिकेसाठी हे युद्ध महागडा व्यवहार ठरू शकतो. कारण युद्धानंतरचे पुनर्बांधकाम अधिक खर्चिक ठरते.अहवालानुसार, इराणविरुद्ध २८ फेब्रुवारीपासून युद्ध सुरू झाल्यानंतर अमेरिका दररोज ८९ कोटी ते १ अब्ज डॉलर खर्च करत आहे. तर इस्त्रायलने आतापर्यंत एकूण ११.२ अब्ज डॉलर खर्च केले असून, त्यापैकी निम्म्याहून अधिक म्हणजे ६.२ अब्ज डॉलर फक्त पहिल्या २० दिवसांत खर्च झाले. युद्धानंतरच्या खर्चात सौदी अरेबियासारख्या खाडी देशांतील नागरी आणि ऊर्जा पायाभूत सुविधांच्या दुरुस्तीचा समावेश असून, त्याचा खर्च ६० अब्ज डॉलरपेक्षा अधिक असेल असा अंदाज आहे. यात फक्त तेल आणि वायू सुविधांच्या पुनर्बांधणीसाठी ५० अब्ज डॉलर लागतील असे सांगितले जात आहे. खाडी देशांमध्ये यूएईला सर्वाधिक फटका बसला आहे.इराणी क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांमुळे दुबईतील फेअरमाँट द पाम हॉटेलसारख्या नागरी इमारतींना तसेच फुजैराह तेल निर्यात टर्मिनलसारख्या ऊर्जा सुविधांना मोठे नुकसान झाले आहे. दोन अमेझॉन डेटा सेंटर्सनाही फटका बसला असून त्यामुळे संपूर्ण प्रदेशातील बँकिंगशी संबंधित क्लाउड सेवा आणि संगणकीय सुविधा विस्कळीत झाल्या आहेत. त्यामुळे यूएईने अमेरिकेकडे आर्थिक संरक्षण कवचाची मागणी सुरू केली आहे, विशेषतः शांतता चर्चेत कोणतीही प्रगती होत नसताना.वृत्तानुसार, गेल्या आठवड्यात यूएई सेंट्रल बँकेचे गव्हर्नर खालिद मोहम्मद बलामा यांनी अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडे करन्सी स्वॅपची मागणी केली. यात इराणी हल्ल्यांमुळे तेल-वायू क्षेत्रातील नुकसानीचा आणि होर्मुझ सामुद्रधुनीच्या नाकेबंदीमुळे डॉलर उत्पन्नात झालेल्या घटेचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. अद्याप औपचारिक विनंती करण्यात आलेली नसली तरी अनौपचारिक चर्चा सुरू झाली आहे.https://prahaar.in/2026/04/20/iran-america-war-did-america-seize-an-iranian-cargo-ship/यूएईच्या अधिकाऱ्यांनी हेही संकेत दिले आहेत की, अमेरिकेने हा युद्धनिर्णय आपल्या प्रादेशिक मित्रदेशांशी चर्चा न करता घेतला. त्यामुळे युद्धाचा खर्चही अमेरिकेनेच उचलावा, अशी यूएईची भूमिका आहे. ही मागणी राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील मानली जात आहे, कारण अमेरिकेने ३० मार्च रोजी खाडी देशांकडून युद्धखर्चासाठी पैसे मागण्याचा विचार सुरू असल्याचे म्हटले होते. व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या कॅरोलाइन लेविट यांनी सांगितले होते की राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना या योजनेत “मोठी रुची” आहे. १९९१ च्या खाडी युद्धात सौदी अरेबियाने १६.८ अब्ज डॉलर आणि कुवैतने १६ अब्ज डॉलर अमेरिकेला दिले होते. मात्र आता यूएईची मागणी ही संपूर्ण परिस्थिती उलटवणारी ठरत आहे.इराण युद्ध लांबल्यामुळे ट्रम्प यांच्या अडचणी वाढल्या आहेत. जर अमेरिकेने यूएईला आर्थिक संरक्षण दिले तर इतर खाडी देशही अशीच मागणी करू शकतात. इराणी क्षेपणास्त्रांनी कतारमध्येही मोठी हानी केली असून त्याच्या एलएनजी निर्यात क्षमतेपैकी १७ टक्के क्षमता नष्ट झाली आहे. तर सौदी अरेबियाला आपली रास तनुरा तेल शुद्धीकरण प्रकल्प बंद करावा लागला आहे.गेल्या आठवड्यात तेहरानने यूएई, सौदी अरेबिया, बहरेन, कतार आणि जॉर्डन यांच्यावर “आंतरराष्ट्रीय जबाबदाऱ्यांचे उल्लंघन” केल्याचा आरोप करत २७० अब्ज डॉलर नुकसानभरपाईची मागणी केली आहे. सौदी अर्थमंत्री मोहम्मद अल-जदान यांनी सांगितले की खाडी देशांतील ऊर्जा उत्पादन, खतनिर्मिती आणि इतर औद्योगिक क्षेत्रांना युद्धपूर्व स्थितीत परत यायला “आठवडे नव्हे तर महिने” लागू शकतात. अमेरिका-इराण यांच्यातील दोन आठवड्यांचा युद्धविराम २२ एप्रिलला संपत आहे. पाकिस्तानमध्ये झालेली एकमेव शांतता चर्चा निष्फळ ठरली. या आठवड्यात दुसऱ्या फेरीच्या चर्चेची शक्यता असली तरी खाडी देश प्रत्यक्ष प्रगतीबाबत सावध आहेत.ट्रम्प यांच्यासमोर आणखी एक चिंता म्हणजे यूएईने अमेरिकेला स्पष्ट इशारा दिला आहे की, जर डॉलरची उपलब्धता प्रभावित झाली तर तेल निर्यात आणि इतर व्यवहारांसाठी चीनच्या युआनसह इतर चलनांचा वापर करावा लागू शकतो. वृत्तानुसार, यूएई सेंट्रल बँकेचे गव्हर्नर खालिद मोहम्मद बलामा यांनी गेल्या आठवड्यात वॉशिंग्टनमध्ये अमेरिकन ट्रेझरी आणि फेडरल रिझर्व्ह अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यांनी डॉलर उपलब्धतेसाठी करन्सी स्वॅप लाईनची मागणी केली. यूएईच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की युद्ध दीर्घकाळ चालल्यास आणि डॉलर टंचाई निर्माण झाल्यास तेल विक्रीसाठी युआनचा वापर करावा लागू शकतो. हे अमेरिकन डॉलरला अप्रत्यक्ष धोका मानले जात आहे.
Rashid Khan Citizenship Offer : अफगाणिस्तानचा स्टार लेग-स्पिनर राशिद खान याने आपल्या आगामी आत्मचरित्रात एक खळबळजनक खुलासा केला आहे.
Manipur News : मणिपूर पुन्हा पेटले ! मशाल रॅली हिंसाचारात 21 जणांना अटक
मणिपूरमध्ये (Manipur News) शटडाउन सुरू असताना रविवारी रात्री अनेक ठिकाणी निदर्शने करण्यात आली. इंफाळ पूर्वमधील कोइरेंगेई, इंफाळ पश्चिममधील उरिपोक आणि काकचिंग जिल्ह्यात मशाल रॅली करण्यात आली.
Renault Duster Bharat NCAP Rating: मध्यम आकाराच्या एसयूवी श्रेणीतील ही कार आता ग्राहकांसाठी सुरक्षिततेचा एक खात्रीशीर पर्याय म्हणून समोर आली आहे.
Devendra Fadnavis : एल निनोच्या धोक्यावर मुख्यमंत्र्यांचा ‘ॲक्शन प्लॅन’! प्रशासनाला दिले ‘हे’आदेश
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलसंधारण आणि पाणी नियोजनासाठी उच्चस्तरीय बैठक घेऊन निर्देश दिले आहेत.
BCCI New Plan : एकाच वेळी दोन मोठ्या स्पर्धांमध्ये उतरणार भारतीय संघ; श्रेयस अय्यर करणार नेतृत्व?
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) एकाच वेळी दोन स्पर्धात्मक टी-२० स्पर्धांमध्ये सहभागी होऊ शकतील अशा ३० ते ३५ क्रिकेटपटूंची एक निवडक यादी तयार करत आहे. भारतीय संघ वर्षाच्या अखेरीस एकाच वेळी दोन आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळणार आहे. आशियाई खेळ आणि भारत विरुद्ध वेस्ट इंडिज टी-२० मालिका एकाच वेळी आयोजित केल्या जात आहेत.त्यामुळे दोन टी-२० संघांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी बोलावता येईल अशा ३० ते ३५ क्रिकेटपटूंचा एक गट तयार करणे महत्त्वाचे आहे. आयर्लंडच्या आगामी दौऱ्यासाठी, यूकेच्या बहुतेक दौऱ्यांप्रमाणेच, संघाकडे क्रिकेटपटूंचा एक मोठा गट असेल, जो आशियाई खेळांपर्यंत कायम राहील.https://prahaar.in/2026/04/20/pachpadra-refinery-fire-massive-fire-breaks-out-at-pachpadra-refinery-ahead-of-inauguration-by-prime-minister-modi-uncertainty-over-programme/आयर्लंडचा आगामी दौरा एक चाचणी म्हणून उपयुक्त ठरू शकतो. अशा दौऱ्यांचा उपयोग पारंपरिकरित्या नवीन क्रिकेटपटूंना आजमावण्यासाठी केला जातो. या दौऱ्यात आता एक मोठा संघ असू शकतो, जो आशियाई खेळांच्या पार्श्वभूमीवर अधिक प्रतिभावान खेळाडूंचा समावेश करण्याच्या दीर्घकालीन दृष्टिकोनाचे द्योतक आहे. भारत सप्टेंबरमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध तीन सामन्यांची टी-२० मालिकाही खेळणार आहे. पण या स्पर्धेचे वेळापत्रक अद्याप निश्चित झालेले नाही.ज्या क्रिकेटपटूंचा विचार केला जात आहे, ते सध्या आयपीएलमध्ये आपली छाप पाडत आहेत. फलंदाजीमध्ये, वैभव सूर्यवंशी, यशस्वी जैस्वाल, प्रियांश आर्य आणि अंगक्रिश रघुवंशी यांसारख्या प्रतिभावान क्रिकेटपटूंनी आपल्या निर्भीड फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले आहे. रजत पाटीदार आणि आयुष बडोनी यांसारखे क्रिकेटपटूंही निवड समितीच्या नजरेत आहेत.https://prahaar.in/2026/04/20/iran-america-war-did-america-seize-an-iranian-cargo-ship/अष्टपैलू क्रिकेटपटूंची जागा, जी अनेकदा टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांचा कणा असते, तिथे शशांक सिंग आणि अनुकूल रॉय यांसारख्या क्रिकेटपटूंना संधी मिळू शकते, जे आपले कौशल्य, प्रतिभा आणि कोणत्याही परिस्थितीत जुळवून घेण्याची क्षमता दाखवतात.गोलंदाजी विभागात युवा आणि अनुभवी क्रिकेटपटूंचे मिश्रण आहे. रवी बिश्नोई व्हाईट-बॉल क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे, तर खलील अहमद (उपलब्धतेनुसार), प्रसिद्ध कृष्णा, अशोक शर्मा आणि कार्तिक त्यागी हे वेगवान गोलंदाजीचे पर्याय उपलब्ध करून देतात.यष्टीरक्षकपदासाठी ध्रुव जुरेल प्रमुख दावेदारांपैकी एक आहे. पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यर संघाचे नेतृत्व करण्याची शक्यता आहे. आयपीएलमध्ये मोठ्या संख्येने तरुण क्रिकेटपटू उपलब्ध आहेत आणि भारतीय क्रिकेट विजेतेपद जिंकण्यास व त्याचे रक्षण करण्यास सक्षम अशी एक समांतर शक्ती तयार करून त्यांच्या सेवांचा उपयोग करण्याची तयारी करत आहे.आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आणि बदललेल्या आंतरराष्ट्रीय वेळापत्रकाच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी दोन मजबूत टी-२० संघांची गरज लवकरच एक आवश्यकता बनू शकते.
Praniti Shinde : दक्षिणेतील राज्यांना शिक्षा का देता? प्रणिती शिंदे यांचा केंद्र सरकारला सवाल
महिला आरक्षणाच्या नावाखाली सरकारला मतदारसंघ पुनर्रचनेचे विधेयक पारित करायचे होते, परंतु काँग्रेसने भाजपचा खरा चेहरा उघडकीस आणला आहे, अशा शब्दात खासदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी केंद्र सरकारवर टीका केली.
Hardik Pandya Captaincy Record : गुजरात टायटन्सला पहिल्याच प्रयत्नात जेतेपद मिळवून देणारा हार्दिक मुंबईच्या निळ्या जर्सीत मात्र सपशेल अपयशी ठरताना दिसत आहे.
Eknath Shinde Politics : सरकारला जेरीस आणणाऱ्या ‘त्या’नेत्याचे पुनर्वसन होणार? शिंदेकडून मोठी ऑफर
2024 च्या विधानसभा निवडणुकीत (Eknath Shinde Politics) अनेक प्रमुख नेत्यांना अनपेक्षित पराभव स्वीकारावा लागला. यात माजी मंत्री आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांचाही समावेश होता.
Loan Waiver : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ३० जूनच्या आधी कर्जमाफी मिळणार, कृषीमंत्र्यांनी दिले संकेत
मुंबई : आगामी खरीप हंगामावर ‘एल निनो’चे सावट असून यंदा राज्यात दीर्घकालीन सरासरीच्या ९२ टक्केच पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर यंदा १४५.२० लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोमवारी दिली. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात घोषित केलेली ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना’ ३० जूनच्या आत राबवली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.पुण्यातील शिवाजीनगर भागात नव्याने बांधण्यात आलेल्या ‘सारथी’च्या सभागृहात खरीप हंगाम २०२६-२७ च्या पूर्वतयारीसाठी राज्यस्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत भरणे बोलत होते. यावेळी कृषी आयुक्त सूरज मांढरे, महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप स्वामी यांच्यासह विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.यंदा खरिपासाठी २०.१७ लाख क्विंटल बियाण्यांची गरज असून, २८.०५ लाख क्विंटल साठा उपलब्ध आहे. खतांच्या बाबतीतही राज्य सुरक्षित असून, ४८.८० लाख मेट्रिक टन खतांचे आवंटन मंजूर झाले आहे. सद्यस्थितीत २५.१७ लाख मेट्रिक टन खत उपलब्ध असून, टंचाई भासणार नाही याची खबरदारी घेतल्याचे भरणे यांनी स्पष्ट केले.दुष्काळाचा सामना करण्यासाठी तंत्रज्ञानाचा आधारकमी पावसाच्या अंदाजामुळे कृषी विभागाने हवामान प्रतिरोधक बियाण्यांचा वापर, उताराला आडवी पेरणी आणि ‘बीबीएफ’ तंत्रावर भर देण्याचे ठरवले आहे. शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी ‘महाकृषी’ आणि ‘महाविस्तार’ ॲपसह सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. तसेच नुकसानग्रस्त १३६ लाख शेतकऱ्यांसाठी २० हजार १९६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, अलीकडील अवकाळी पावसाचे पंचनामेही युद्धपातळीवर सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
Plane crash : छत्तीसगडच्या डोंगराळ भागात कोसळले खासगी विमान
जशपूर : छत्तीसगडमधील जशपूर जिल्ह्यात आरा पर्वतरांगेत खासगी विमान कोसळले. कोसळलेले चार्टर्ड प्लेन जशपूर जिल्ह्यातील नारायणपूरमधील रतनपहली जंगलात झाडांना धडकले आणि कोसळले. विमान कोसळताच आग लागली. आकाशाच्या दिशेने जात असलेल्या धूर दूरून स्पष्ट दिसू लागला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासन घटनास्थळाच्या दिशेने रवाना झाले आहे. थोड्याच वेळात मदतकार्य सुरू होईल, असे पोलिसांनी सांगितले. विमानात किती प्रवासी होते ? विमानातल्या प्रवाशांची नावं आदी माहिती अद्याप मिळालेली नाही.विमान जमिनीपासून ३० फुटांवर उडत असताना अचानक डोंगराळ भागातील जंगलाच्या दिशेने गेले आणि झाडांवर आदळले. डोंगराळ भाग असल्याने मदतकार्यात अडचणी येत आहेत पण परिस्थिती लवकरच नियंत्रणात येईल, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. एसएसपी लाल उमेद सिंह अपघातस्थळाकडे रवाना झाले आहेत.
Fuel prices : ‘या’तारखेपासून इंधन दरात प्रतिलिटर 8 ते 15 रुपयांपर्यंत वाढ होणार?
Fuel prices : तामिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, पुद्दुचेरी येथे निवडणुका सुरु असून 29 एप्रिलला शेवटचे मतदान होईल आणि 4 मेला निकाल जाहीर होतील. अंदाजानुसार 29 एप्रिलनंतर किंवा 4 मेला निकाल जाहीर झाल्यानंतर दरवाढ लागू होऊ शकते.
राजस्थानमधील पाचपद्रा Pachpadra येथे उभारण्यात आलेल्या बहुप्रतिक्षित रिफायनरीत आज म्हणजेच सोमवार २० एप्रिल रोजी दुपारी अचानक भीषण आग लागली. विशेष म्हणजे, मंगळवार (२१ एप्रिल) रोजी सकाळी ११:३० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन होणार होते. मात्र या घटनेमुळे आता उद्घाटनाच्या कार्यक्रमावर अनिश्चिततेचे सावट आले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, रिफायनरीच्या मुख्य प्रोसेसिंग युनिटपैकी एका भागात आग लागली. आगीची तीव्रता इतकी होती की, काळ्या धुराचे लोट सुमारे एक किलोमीटर अंतरावरूनही दिसत होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या २० हून अधिक गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या असून, आग इतर युनिट्समध्ये पसरू नये यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.https://prahaar.in/2026/04/20/japan-earthquake-tsunami-natural-disaster-in-japan-80-cmt-sunami-hits-after-7-4-magnitude-earthquake-administration-issues-alert/आग शॉर्ट सर्किटमुळे लागली की अन्य काही कारण आहे, याचा तपास तांत्रिक तज्ञ आणि सुरक्षा यंत्रणांकडून सुरू आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या अवघ्या २४ तास आधी ही घटना घडल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. कडक सुरक्षा व्यवस्था असूनही आग लागल्याने व्यवस्थापनावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.https://prahaar.in/2026/04/20/iran-america-war-irgcs-dominance-in-irans-decision-making-process-possibility-of-talks-with-america-low/सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू असून, झालेल्या नुकसानीचा आढावा घेतल्यानंतरच उद्घाटन सोहळ्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
Iran - America War : अमेरिकेने जप्त केले इराणी मालवाहू जहाज ?
ओमान सागरातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा उघडपणे समोर आला आहे. इराणने अधिकृतपणे पुष्टी केली आहे की अमेरिकेने त्याच्या मालवाहू जहाज तोस्कावर हल्ला करून ते ताब्यात घेतले आहे. तेहरानने या कारवाईला समुद्री दरोडा ठरवत कठोर प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला आहे.इराणच्या लष्करी मुख्यालय हजरत खातम अल-अंबिया कडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अमेरिकन सैन्याने ओमान सागरातील आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रात इराणी जहाजावर हल्ला केला. निवेदनानुसार, अमेरिकन मरीन दलाने जहाजावर चढाई करून त्याची नेव्हिगेशन प्रणाली निष्क्रिय केली आणि जहाज जप्त केले.दरम्यान, अमेरिकन सैन्याच्या युनायटेड स्टेट्स सेंट्रल कमांड (सेंटकॉम) ने या कारवाईचे समर्थन केले आहे. अमेरिकेचा दावा आहे की हे मालवाहू जहाज अमेरिकेच्या नौदल नाकेबंदीचे उल्लंघन करत होते. सेंटकॉमनुसार, गाइडेड-मिसाइल डेस्ट्रॉयर यूएसएस स्प्रूअन्स (DDG-111) ने जहाजाला अडवले आणि अनेकदा इशारा दिला. मात्र जहाजाच्या कर्मचाऱ्यांनी आदेशांचे पालन न केल्याने अमेरिकन युद्धनौकेने गोळीबार करून त्याचे इंजिन निष्क्रिय केले. त्यानंतर अमेरिकन मरीन दलाने जहाजावर चढाई करून ते ताब्यात घेतले.https://prahaar.in/2026/04/20/pachpadra-refinery-fire-massive-fire-breaks-out-at-pachpadra-refinery-ahead-of-inauguration-by-prime-minister-modi-uncertainty-over-programme/अमेरिकेने ही संपूर्ण कारवाई व्यावसायिक आणि संतुलित असल्याचे म्हटले आहे. तसेच जहाजावर अमेरिकन मरीन तैनात असून, त्यामध्ये कोणता माल आहे याची तपासणी सुरू असल्याचेही सांगितले आहे. या जहाजाचे नाव तोस्का असल्याचे सांगितले जात आहे.डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर म्हटले की, हे जहाज अमेरिकन नौदलाच्या गाइडेड-मिसाइल डेस्ट्रॉयरने ओमानच्या आखातात अडवले. त्याला थांबण्याचा इशारा देण्यात आला होता, मात्र जहाजाने आदेश पाळले नाहीत. त्यानंतर नौदलाने थेट कारवाई करत इंजिन कक्षाला लक्ष्य केले आणि जहाज थांबवले.https://prahaar.in/2026/04/20/iran-america-war-irgcs-dominance-in-irans-decision-making-process-possibility-of-talks-with-america-low/ही घटना अशा वेळी समोर आली आहे, जेव्हा ट्रम्प यांनी यापूर्वी घोषणा केली होती की अमेरिकन प्रतिनिधीमंडळ सोमवारी पाकिस्तानमध्ये जाऊन इराणसोबत दुसऱ्या फेरीची चर्चा करणार आहे. त्यामुळे दोन आठवड्यांच्या तात्पुरत्या युद्धविरामाला मुदतवाढ मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. व्हाईट हाऊसनुसार, उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स अमेरिकन प्रतिनिधीमंडळाचे नेतृत्व करणार आहेत. त्यांच्या सोबत स्टीव्ह विटकॉफ आणि जेरेड कुशनर हेही असणार आहेत. या दोघांनी पहिल्या फेरीतील दीर्घ चर्चेतही सहभाग घेतला होता.
Crime News : गोरेगावमधील नेस्कोतल्या ड्रग्जचे टिटवाळा कनेक्शन
मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातील गोरेगाव येथे नेस्को मैदानात एका ट्रान्स म्युझिकल कॉन्सर्टचे (सांगितिक कार्यक्रम) आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ड्रग्जची विक्री आणि सेवन मोठ्या प्रमाणात झाले. कार्यक्रमादरम्यान ड्रग्ज घेतलेल्यांपैकी दोन तरुणांचा मृत्यू झाला आणि एकाला रुग्णालयात दाखल करावे लागले. यामुळे ड्रग्जचा वापर झाल्याची बाब उघड झाली आणि पोलीस तपासाला सुरुवात झाली. पोलिसांनी धडक कारवाई करुन या ड्रग्ज रॅकेटचे टिटवाळा कनेक्शन शोधून काढले आहे.पोलिसांनी साकीनाका परिसरातील घरातून इरफान अन्सारी याला २०० एक्स्टेसी गोळ्यांसह (Ecstasy Pills) अटक केली. इरफानच्या चौकशीतून टिटवाळ्यातील हाय प्रोफाईल सोसायटीत राहणाऱ्या पॉल नावाच्या महिलेचे नाव पोलिसांना समजले. ही महिला दोन महिन्यांपूर्वीच कल्याण सोडून टिटवाळा येथे स्थलांतरित झाली होती. या महिलेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनात तपास पथकाने सलग तीन दिवस टिटवाळा येथील एका कॉम्प्लेक्समध्ये तिचा शोध घेतला. शनिवारी रात्री पोलिसांनी तिच्या घरावर धाड टाकली. पोलिसांनी पॉलच्या घरातून सुमारे सहा कोटी रुपयांच्या पाच हजार एक्स्टेसी गोळ्यांचा साठा जप्त केला.पॉलला मुंबईत इरफानला अटक झाल्याचे माहिती नव्हते, त्यामुळे ती बिनधास्त वावरत होती. घरातला ड्रग्जचा साठा तिने स्थलांतरित केला नव्हता. यामुळे पोलिसांचे काम सोपे झाले. घरावर धाड टाकताच पोलिसांना डोळे विस्फारून टाकेल असा मोठा ड्रग्जचा साठा सापडला. इरफान आणि पॉल यांच्यातील दुवा असलेल्या सुफियान नावाच्या आरोपीलाही पोलिसांनी अटक केली आहे.पोलिसांनी पॉलच्या घरातून जप्त केलेल्या काही एक्स्टेसी गोळ्यांवर 'मर्सिडीज' आणि काहींवर 'डॉलर'ची चिन्हे होती. यापूर्वी नेस्को पार्टीत 'मर्सिडीज' तर वरळीत 'ऑडी' चिन्हांच्या एक्स्टेसी गोळ्या सापडल्या होत्या.पॉल सतत नवनव्या सीमकार्डचा वापर करून ड्रगशी संबंधित व्यवहार हाताळत होती. पोलिसांनी पॉलकडून पाच मोबाईल आणि आठ सीमकार्ड जप्त केली आहेत. जप्त केलेल्या मोबाईलची तज्ज्ञ तपासणी करत आहेत तसेच जप्त केलेल्या सीमशी संबंधित माहितीची तपासणी सुरू आहे. पॉल कोणाच्या संपर्कात होती आणि तिने नेमक्या कोणत्या माहितीची देवाणघेवाण केली हे तपासले जात आहे.पॉल आधी मुंबईतच एका डान्सबारमध्ये काम करत होती. तिथून ती ड्रग्जच्या नेटवर्कमध्ये शिरली. तिची दोन लग्ने झाली असून, तिचा एक पती गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. पोलीस सध्या तिच्या जुन्या गुन्ह्यांची माहिती घेत आहेत. जुन्या आणि नव्या गुन्ह्यांमध्ये काही कनेक्शन आहे का हे तपासत आहेत.
Vaibhav Sooryavanshi Emotional : केकेआरविरुद्धच्या सामना राजस्थान रॉयल्सचा दुसरा पराभव झाल्याने वैभव सूर्यवंशी भावुक झाल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
Plane Crash : मोठी दुर्घटना..! खासगी विमानाचा भीषण अपघात; थेट डोंगराला जाऊन धडकलं, परिसरात खळबळ
Plane Crash : एका खासगी विमानाचा भीषण अपघात झाला आहे. आरा टेकड्यांमध्ये विमान डोंगराला धडकल्याने मोठी जीवितहानी झाल्याची भीती आहे
Hingoli: दुष्काळाच्या झळांनी ‘पानकनेरगाव’ची ओळख पुसली; 400 पानमळ्यांचा इतिहास काळाच्या पडद्याआड
Hingoli: आज गावात एकही पानमळा शिल्लक नसून, परंपरेचा हा धागा पूर्णपणे तुटला आहे.
Maharashtra Politics : शिवसेनेत मोठा संघर्ष..! आमदार महेश शिंदेंची शंभूराज देसाईंवर सडकून टीका
Maharashtra Politics : सातारा शिवसेनेतील अंतर्गत वाद उफाळून आला आहे. आमदार महेश शिंदे यांनी पालकमंत्री शंभूराज देसाईंवर आपल्याला डावलल्याचा आरोप करत नाराजी व्यक्त केली आहे.
NCP News : राष्ट्रवादीमध्ये खळबळ ! 35 पदाधिकाऱ्यांनी दिला तडकाफडकी राजीनामा
अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्यानंतर बारामती विधानसभा मतदारसंघाची (NCP News) जागा रिक्त झाली होती. या रिक्त जागेसाठी महायुतीकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
Stock Market: दरम्यान, आज बीएसईवर एकूण ४,५७८ शेअर्समध्ये व्यवहार झाला, ज्यामध्ये २,५४८ शेअर्स घसरणीसह बंद झाले, तर १८४० शेअर्समध्ये वाढ पाहायला मिळाली. विशेष म्हणजे, बाजारातील या अनिश्चिततेतही १९९ शेअर्सनी त्यांच्या ५२ आठवड्यांचा उच्चांक गाठला आहे.
MI Playoff Scenarios : सलग चार पराभवांमुळे मुंबईचे प्ले-ऑफचे स्वप्न भंगणार की संघ पुन्हा उभारी घेणार, याबाबत क्रिकेट विश्वात चर्चांना उधाण आले आहे.
Mallikarjun Kharge : महिला आरक्षण मोदींनीच हाणून पाडले; मल्लिकार्जुन खर्गे यांचा पलटवार
महिला आरक्षण विधेयकाच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर केलेल्या आरोपांना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी सोमवारी चोख प्रत्युत्तर दिले.
मुंबई : संसदेत महिला आरक्षण विधेयकाच्या विरोधात मतदान करून विरोधकांनी देशातील नारीशक्तीचा अपमान केला असून, या मानसिकतेचा 'बुरखा' फाडण्यासाठी महायुतीतर्फे राज्यव्यापी आंदोलन छेडले जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे केली. १७ एप्रिल रोजी संसदेत जे घडले, तो देशाच्या इतिहासातील काळा दिवस असून महिलांच्या हक्कांची भ्रूणहत्या करणाऱ्या मारेकऱ्यांना जनता कदापि माफ करणार नाही, अशा तिखट शब्दांत मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस आणि मित्रपक्षांवर हल्ला चढवला.https://www.youtube.com/watch?v=Zo8OI0xoLOoमुंबईत आयोजित एका विशेष पत्रकार परिषदेत फडणवीस बोलत होते. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मंत्री पंकजा मुंडे, आदिती तटकरे, मेघना बोर्डीकर, चित्रा वाघ, खा. ज्योती वाघमारे यांच्यासह महायुतीतील महिला नेत्यांची उपस्थिती होती. २०२३ मध्ये महिला आरक्षण विधेयक जनगणना आणि परिसीमनानंतर लागू होईल, हे मान्य करणाऱ्या विरोधकांनी आता सरकारकडे दोन-तृतीयांश बहुमत नसल्याचे पाहून सरड्यासारखा रंग बदलला आहे, असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. ते पुढे म्हणाले की, संसदेत मांडण्यात आलेली विधेयके ही २०२३ च्या घटनादुरुस्तीचाच भाग होती. २०२९ च्या निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त महिला संसदेत असाव्यात, या शुद्ध हेतूनेच ही रचना केली होती, मात्र केवळ राजकीय स्वार्थापोटी विरोधकांनी महिलांच्या हक्कावर घाला घातला.या विधेयकाच्या समर्थनार्थ आता महाराष्ट्रातून एक कोटी महिलांच्या स्वाक्षऱ्या गोळा करण्यात येणार असून राज्यभर मेळावे आयोजित करून काँग्रेस, शरद पवार यांचा पक्ष आणि उबाठा गटाचा महिलाविरोधी चेहरा उघडा केला जाईल. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोवर स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. राहुल गांधींवर टीका करताना मुख्यमंत्री म्हणाले की, खोटे बोलण्याच्या जर ऑलिम्पिक स्पर्धा झाल्या, तर त्याचे सुवर्णपदक राहुल गांधींनाच मिळेल. संविधानाने दिलेल्या संकेतानुसारच हे विधेयक असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशी प्रतारणा करणाऱ्या या नेत्यांनी महिलांची साष्टांग दंडवत घालून माफी मागायला हवी.महात्मा फुले यांच्या विचारांना तिलांजलीमहात्मा फुलेंच्या २०० व्या जयंती वर्षातच त्यांच्या विचारांना तिलांजली देण्याचे काम विरोधकांनी केले आहे. १९७१ ची लोकसंख्या गोठवून करण्यात आलेल्या रचनेत बदल करणे आणि प्रत्येक राज्याला समान संधी देणे हे पंतप्रधान मोदींचे उद्दिष्ट होते. या नवीन रचनेमुळे दक्षिण भारतातील राज्यांवर अन्याय होणार नव्हता, उलट त्यांचे प्रतिनिधित्व वाढणार होते, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. प्रियंका गांधींवर बोलताना त्यांनी नमूद केले की, त्या राजकारणात नव्या असल्याने कदाचित त्यांना त्यांच्या लोकांनी पूर्ण माहिती दिली नसेल, त्यामुळे मी त्यांना दोष देत नाही. मात्र, २०११ च्या जनगणनेनुसार २०२९ ला हे विधेयक लागू व्हावे ही सरकारची शुद्ध भावना होती, जिला विरोधकांनी खीळ घातली. आता जनमताचा असा अभूतपूर्व रेटा उभा केला जाईल की, विरोधकांना गुडघे टेकून महिलांच्या हक्कांना मान्यता द्यावी लागेल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
सोमवारी जपानच्या ईशान्य किनाऱ्याजवळ पॅसिफिक महासागरात ७.४ रिश्टर स्केल तीव्रतेचा जोरदार भूकंप झाला. जपानच्या हवामान विभागाने Japan Meteorological Agency (JMA)ने याला दुजोरा दिला आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू उत्तर इवाते प्रांताजवळ समुद्रात होता. स्थानिक वेळेनुसार दुपारी ४:५३ वाजता या भूकंपाचा धक्का जाणवला. भूकंपाची खोली १० किलोमीटर असल्याने त्याची तीव्रता अधिक जाणवली.या भूकंपाचे धक्के केंद्रापासून शेकडो किलोमीटर दूर असलेल्या टोकियो पर्यंत जाणवले. टोकियोमधील उंच इमारती हलल्या, तर अनेक भागांमध्ये नागरिकांना तीव्र कंप जाणवले. सध्या मोठ्या प्रमाणात जीवित किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याची माहिती नसली, तरी प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. दरम्यान, क्योडो वृत्तसंस्थेनुसार, टोकियो-आओमोरी बुलेट ट्रेन मार्गावरील सेवा तात्पुरती थांबवण्यात आली आहे.https://prahaar.in/2026/04/20/we-will-teach-a-lesson-to-those-who-trample-upon-womens-rights-and-launch-a-statewide-agitation-to-expose-the-true-faces-of-our-opponents-says-cm-devendra-fadnavis/एकीकडे भूकंप तर दुसरीकडे त्सुनामीचे संकट :भूकंपानंतर उत्तर जपानमधील एका बंदरावर ८० सेंटीमीटर (३१ इंच) उंचीची त्सुनामी लाट धडकली. जेएमएने सांगितले की, इवातेमधील कुजी येथील बंदरावर सायंकाळी ५:३४ वाजता (०८३४ जीएमटी) ही लाट दिसून आली. यापूर्वी सायंकाळी ५:३२ वाजता ७० सेंटीमीटर उंचीची लाट धडकल्याचे सांगण्यात आले होते.त्सुनामीच्या सर्वात आधीच्या लाटा उत्तरेकडील किनारपट्टीवर तात्काळ पोहोचू शकतात, असे हवामान संस्थेने म्हटले आहे.NHKच्या वृत्तानुसार, काही किनारी भागांमध्ये त्सुनामीच्या लाटा आधीच नोंदवण्यात आल्या आहेत. हवामान संस्थेने इशारा दिला आहे की, लाटा वारंवार येऊ शकतात, त्यामुळे अधिकृत इशारा मागे घेईपर्यंत नागरिकांनी सुरक्षित ठिकाण सोडू नये.
Pachpadra Refinery : पाचपद्रा रिफायनरीला भीषण आग; पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार होते उदघाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ज्या बहुप्रतिक्षित रिफायनरीचे (Pachpadra Refinery) उद्घाटन होणार होते, त्याच ठिकाणी चोवीस तास आधी भीषण आग लागल्याने खळबळ उडाली आहे.
Japan earthquake: 7.5 तीव्रतेचा भीषण भूकंप; जपानमध्ये त्सुनामीचा इशारा
Japan earthquake: सध्या परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवले जात असून तटीय भागातील लोकांना समुद्रापासून दूर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
Bus Accident : धमपूर जिल्ह्यात २० एप्रिल रोजी झालेल्या बस अपघातात २१ जणांचा मृत्यू झाला आहे.
Congress MLA : अंमलबजावणी संचालनालयाने (ED) काँग्रेस आमदार एन. ए. हॅरिस यांच्या मुलांच्या घरावर छापे टाकले आहेत.
Singer Asha Bhosle : फिरुनी नवी जन्मेन मी…..
Singer Asha Bhosle : एकाहून एक सुरेल श्रवणीय आणि दर्जेदार गाणी ओपींनी आशाला दिली आणि आशाने अक्षरशा त्या संधीचं सोनं केलं.
US-Iran War : मोदींच्या परराष्ट्र धोरणाचे मोठे अपयश, काँग्रेसचा घणाघात
Kara Trailer Out: ‘कारा’चा थरारक ट्रेलर रिलीज! युद्धाच्या संकटात धनुष बनला बँक लुटारू
Kara Trailer Out ट्रेलरची सुरुवात त्या काळातील वृत्तपत्रांच्या मथळ्यांनी होते, ज्यात युद्ध आणि त्यातून निर्माण झालेल्या परिस्थितीचे चित्रण आहे. त्यानंतर भारतातील नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीती आणि अस्वस्थता दाखवण्यात आली आहे. या कठीण परिस्थितीत जगण्यासाठी लोकांना कोणते निर्णय घ्यावे लागतात, याची झलक ट्रेलरमध्ये दिसते.
Iran - America War : इराणच्या निर्णयप्रक्रियेत आयआरजीसीचा दबदबा, अमेरिकेसोबत चर्चेची शक्यता कमी
इराणच्या सत्ताकेंद्रावर आता कट्टरपंथी इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (आयआरजीसी) यांचे वर्चस्व निर्माण झाल्याचे म्हटले जात आहे. अहवालानुसार, तेथील लष्कर आणि परराष्ट्र धोरणावर आता आयआरजीसी यांचे पूर्ण नियंत्रण झाले असून कमांडर अहमद वाहिदी आणि त्यांचे सहकारी आता देशाचे महत्त्वाचे निर्णय घेत आहेत, तर यापूर्वी संवाद आणि शांततेचे प्रयत्न करणाऱ्या नेत्यांना बाजूला करण्यात आले आहे.या अहवालानुसार, इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची हे अमेरिकेसोबत चर्चा करून परिस्थिती सामान्य करण्याच्या प्रयत्नात होते. त्यांनी होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्याबाबतही सहमती दर्शवली होती. हा मार्ग जगासाठी अत्यंत महत्त्वाचा तेलवाहतूक मार्ग मानला जातो. मात्र, आयआरजीसीने हा निर्णय मान्य करण्यास नकार देत हा मार्ग बंदच राहील, असे स्पष्ट केले.परिस्थिती तेव्हा अधिक तणावपूर्ण झाली, जेव्हा इराणने या जलमार्गातून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या अनेक जहाजांना लक्ष्य केले. त्यामुळे फारसच्या आखातात शेकडो जहाजे अडकली असून जागतिक स्तरावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. हा निर्णय आयआरजीसीची ताकद आणि त्यांची कठोर भूमिका दर्शवणारा मानला जात आहे.https://prahaar.in/2026/04/20/etpl-abhishek-bachchans-team-etpl-announces-glasgow-franchise-led-by-abhishek-bachchan-chris-gayle-and-mugafi-group-own-the-team/अहवालात असेही समोर आले आहे की, आयआरजीसीमध्ये अहमद वाहिदी यांना मोहम्मद बाघेर झोलघाद्र यांसारख्या प्रभावशाली नेत्यांचा पाठिंबा मिळाला आहे. त्यामुळे त्यांची पकड अधिक मजबूत झाली आहे. या नेत्यांचा प्रभाव आता केवळ लष्करापुरता मर्यादित नसून ते थेट राजनैतिक निर्णयांमध्येही हस्तक्षेप करत आहेत.याशिवाय, इराणच्या चर्चापथकातही मतभेद समोर आले आहेत. काही नेत्यांनी परराष्ट्र मंत्र्यांवर त्यांच्या अधिकारक्षेत्रापेक्षा जास्त जाऊन नरम भूमिका घेतल्याचा आरोप केला. त्यानंतर संपूर्ण पथकाला तेहरानला परत बोलावण्यात आले. यावरून स्पष्ट होते की, आता देशात कठोरता वाढत असून वेगळी भूमिका मांडणाऱ्यांसाठी जागा कमी होत चालली आहे. या संपूर्ण घडामोडींचा परिणाम आंतरराष्ट्रीय स्तरावरही दिसून येत आहे.https://prahaar.in/2026/04/20/bmc-news-massive-enforcement-drive-in-the-bandra-to-santacruz-east-area-water-pipeline-encroachments-cleared-in-bandra/अहवालानुसार, आता अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चेच्या शक्यता मोठ्या प्रमाणात कमी झाल्या आहेत, कारण चर्चेची जबाबदारी असलेल्या नेत्यांकडे निर्णय घेण्याची ताकदच उरलेली नाही. सध्या परिस्थिती अत्यंत नाजूक आहे. संघर्षविराम किती काळ टिकेल, याबाबतही अनिश्चितता कायम आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत दोन्ही देशांतील तणाव कमी होणार की परिस्थिती आणखी बिघडणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Ajanta Caves : जगप्रसिद्ध अजिंठा लेणीला भूतानचे गृहमंत्री लिओन पो शेरिंग यांनी दिली भेट
जगप्रसिद्ध अजिंठा लेणीला भूतानचे गृहमंत्री लिओनपो शेरिंग यांनी भेट देत येथील अद्वितीय कला, इतिहास आणि निसर्गसौंदर्याचा मनमुराद आस्वाद घेतला. त्यांचे अजिंठा परिसरात आगमन झाले. भारतीय पुरातत्त्व विभागाच्या वतीने त्यांचे औपचारिक स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांनी लेणी क्रमांक १, २, ५, ९, १०, १२, १६, १७ आणि २६ यांचे सविस्तर अवलोकन केले.अजिंठा लेणीतील भित्तिचित्रांची मोहकता, रंगछटांची सूक्ष्मता आणि प्राचीन कलाकारांच्या कल्पकतेचा अप्रतिम आविष्कार पाहून ते विशेष प्रभावित झाले. शेकडो वर्षांपूर्वी नैसर्गिक रंगांद्वारे साकारलेली चित्रशैली आजही तितकीच जिवंत भासते, याबाबत त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. दगडात कोरलेली सूक्ष्म शिल्पकला, बुद्धमूर्तींची शांत मुद्रा आणि स्थापत्यकलेतील अचूकता यामुळे लेणींचा प्रत्येक कोपरा इतिहासाची साक्ष देताना दिसतो.https://prahaar.in/2026/04/20/jammu-and-kashmir-accident-passenger-bus-falls-into-a-ditch-in-udhampur-15-dead-many-injured/गाईडने त्यांना अजिंठा लेणीतील चित्रशैली, शिल्पकला आणि बौद्ध धर्माशी संबंधित जातक कथांचे सविस्तर विवेचन केले. चित्रांमधून उलगडणाऱ्या जातक कथा, त्यातील भावभावना आणि जीवनमूल्यांचा संदेश याने गृहमंत्री शेरिंग भारावून गेले. हा केवळ ऐतिहासिक वारसा नसून निसर्ग आणि कलेचा अद्वितीय संगम असल्याची भावना भूतानच्या गृहमंत्र्यांनी व्यक्त केली.
Supriya Sule : शरद पवार गटाचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे हे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यावर पत्रकार परिषदेत खासदार सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारण्यात आला. या चर्चेवर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

29 C