Parineeti Chopra परिणीती चोप्रा हिने इंस्टाग्राम स्टोरीद्वारे ही माहिती दिली. तिने सांगितले की, “मम्मी-पप्पांची लव्ह स्टोरी बुक… हे खरंच जादूसारखं आहे. आपल्या मुलाला देण्यासाठी यापेक्षा सुंदर भेटवस्तू काय असू शकते?” परिणीतीच्या या पोस्टनंतर चाहत्यांनी तिच्या या कल्पनेचे कौतुक केले आहे.
मुंबई: येत्या १६ मार्चला राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या ३७ जागांसाठी निवडणूक होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सात जागांचा समावेश आहे. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख ५ मार्च निश्चित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या गोटात आपला उमेदवार निश्चित करण्यासाठी हालचाली सुरु आहेत. विधानसभेतील आमदारांच्या संख्याबळानुसार महाराष्ट्रातील ७ जागांपैकी सहा जागांवर महायुती आणि एका जागेवर महाविकास आघाडीचा खासदार निवडून जाऊ शकतो. शरद पवार यांची राज्यसभेची मुदत संपत असल्याने महाविकास आघाडीकडून त्यांना पाठिंबा दिला जाऊ शकतो. मात्र, शरद पवार सध्या रुग्णालयात आहेत. त्यामुळे राज्यसभेच्या उमेदवाराबाबत चर्चा करण्यासाठी शरद पवार गटाने काँग्रेस आणि ठाकरे गटाकडे वेळ मागितला आहे.राज्यसभा निवडणुकीसाठी ३ मार्चला उमेदवारी अर्ज भरायचा आहे. सध्या अर्ज भरण्यासाठी सहा दिवस राहिलेले असताना महाविकास आघाडीचा राज्यसभा उमेदवार म्हणून कोणते नाव पाठवायचे? यावर अद्याप मविआची एकत्रित चर्चा झालेली नाही. राज्यसभेसाठी महाविकास आघाडी मिळून संख्याबळानुसार एकच उमेदवार राज्यसभेवर जाणार आहे आणि या एकाच जागेवर तिन्ही पक्षांकडून उमेदवार दिला जाईल, अशी चर्चा आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी वेळ मागितला असून शरद पवार व आपल्या पक्षातील इतर नेत्यांसोबत एकत्र चर्चा करून आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती आहे.यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील आणि शशिकांत शिंदे यांनी वेळ मागितल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. शरद पवार यांना आज रुबी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे. त्यानंतर शरद पवारांशी चर्चा करून राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी संदर्भातला पुढचा निर्णय पक्ष महाविकास आघाडीला कळवला जाईल. तर दुसरीकडे काँग्रेस आणि ठाकरे यांची शिवसेना दोन्ही पक्ष राज्यसभेच्या जागेसाठी चर्चा करत असून दोन्ही पक्ष आपल्या पक्षाचे उमेदवार देण्यावर इच्छूक आहेत.राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवड उद्या
Donald Trump Tariffs: डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताला मोठा झटका ; सौर पॅनेलवर लादला तब्बल १२६% टॅरिफ
Donald Trump Tariffs: अमेरिकेने पुन्हा एकदा भारताला मोठा धक्का दिला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला मोठा धक्का देत सौर पॅनेलवर १२६% प्रारंभिक टॅरिफ लादण्याचा निर्णय घेतला आहे.
Amol Mitkari : “दादांचा जीव तुमच्या याच चुकांमुळे गेला”, अमोल मिटकरी DGCA वर आक्रमक
Amol Mitkari : VSRच्या चार लेअरजेट विमानांचे उड्डाण तात्काळ स्थगित करण्यात आले असून पुढील आदेश येईपर्यंत ती विमानं सेवा देऊ शकणार नाहीत.
मुंबई: गावाचा विकास हाच देशाचा विकास असं म्हटलं जातं. सध्या आपल्या देश लोकल ते ग्लोबल अशा मार्गाने काम करीत आहे. गावपातळीवरील जीवनमान सुधारण्यासाठी शिक्षण, आरोग्यसेवा, शेती यासह स्वच्छतेकडेही विशेष लक्ष दिलं जात आहे. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन २०१८-१९, सन २०१९-२०, सन २०२०-२१, सन २०२१-२२, सन २०२२-२३ अंतर्गत विभागस्तरावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा आणि विशेष पुरस्कार देण्यात आला. राज्यातील सहा ग्रामपंचायतींचा सन्मान करण्यात येणार आहे.कोकणातील ग्रामपंचायतीला प्रथम क्रमांकसंत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान सन २०१८-१९ अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा अंतर्गत ग्रामपंचायत हुमरस, ता. कुडाळ यांनी प्रथम क्रमांक तर ग्रामपंचायत आयनोडे हेवाळे ता. दोडामार्ग यांनी तृतीय क्रमांक पटकावला आहे. संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान सन २०१९-२० अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा अंतर्गत ग्रामपंचायत बापर्डे तालुका देवगड प्रथम तर ग्रामपंचायत परुळेबाजार वेंगुर्ला यांनी द्वितीय क्रमांक मिळवला आहे.या सहा ग्रामपंचायतीचा सन्मान २५ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी २ वाजता सिडको कार्यालय सभागृह, सिडको भवन, बेलापुर, नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमांत जिल्ह्यातील सहा ग्रामपंचायतीचा सन्मान होणार आहे. अशी माहिती (पाणी व स्वच्छता) विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य सावंत यांनी दिली आहे.सन २०२०-२१ व २०२१-२२ या कालावधीत संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा अंतर्गत ग्रामपंचायत निरवडे ता. सावंतवाडी यांनी प्रथम क्रमांक तर ग्रामपंचायत परुळेबाजार ता. वेंगुर्ला यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त झाला आहे. पुरस्कार विजेत्या सर्व ग्रामपंचायतीचा पुरस्कार वितरण कार्यक्रम दिनांक २५ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी २ वाजता सिडको कार्यालय सभागृह, सातवा मजला, सिडको भवन, बेलापुर, नवी मुंबई विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला आहे.
India-Bangladesh maitri bus: जवळजवळ १८ महिन्यांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर, भारत आणि बांगलादेशमधील महत्त्वाची आंतरराष्ट्रीय बस सेवा अधिकृतपणे पुन्हा सुरू झाली आहे.
Taapsee Pannu डंकी हा चित्रपट तिच्यासाठी दहा वर्षांच्या कारकिर्दीतील एक मोठी भेट असल्याचे तापसी म्हणाली. ती म्हणाली, “मी मुख्य प्रवाहातील किंवा प्रचंड यशस्वी व्यावसायिक अभिनेत्री नाही. त्यामुळे अशा प्रकारचे मोठे प्रोजेक्ट मला सहज मिळत नाहीत.”
Bapusaheb Pathare : लोहगावमधील डी. वाय. पाटील रस्ता, लोहगाव-निरगुडी रस्ता, लोहगाव-वाघोली ते काळभोर वस्ती रस्ता, माळवाडी रस्ता, पठारे वस्ती रस्ता तसेच पवार वस्ती रस्ता ही कामे अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांसोबत अनेक बैठका तसेच पाच वेळा प्रत्यक्ष स्थळ पाहणी करूनही ठोस कार्यवाही झालेली नाही, येत्या आठ दिवसांत या रस्त्यांची कामे सुरू झाली […]
Top 10 news: झारखंडच्या छपरामध्ये अपघातानंतर एआयबीने तात्काळ कंपनीच्या कार्यालयावर छापा टाकला आणि चौकशी सुरू केली.
Pune-Mumbai Highway: जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर १२ तास वाहतूक कोंडी
Pune-Mumbai Highway: मालवाहू कंटेनर ग्रेड सेपरेटरमध्ये अडकल्याने सकाळपासून केवळ एकच लेन सुरू होती.
Foldable mobiles: फोल्डेबल मोबाईलची कार्यक्षमता वाढणार; आयसरचे नवीन संशोधन
Foldable mobiles: फोल्डेबल उपकरणांच्या दिशेने पुढचे पाऊल
Loan waiver : यंदा अटी-शर्तींच्या निकषानंतरच कर्जमाफी
Loan waiver : शासनाकडून सर्व निकष निश्चित केल्यानंतरच शेतकऱ्यांचे होणार कर्जमाफ
Pune News: पूरस्थितीत मदतीसाठी आता ‘आपदा मित्र’, १५० कर्मचाऱ्यांना देणार प्रशिक्षण
Pune News: महापौर मंजुषा नागपुरे यांचे प्रशासनाला निर्देश
Beed News: दोन बहिणींनी अपहरणाचा कट लावला उधळून
बीड: महिला अत्याचाराच्या घटना राज्यात कुठे ना कुठे होत आहेत. त्यात बीडमध्ये दिवसा-ढवळ्या दोन तरुणींच्या अपहरणाची बातमी समोर आली आहे. विशेष म्हणजे या दोन्ही सख्ख्या बहिणी होत्या. बीडच्या माजलगावमध्ये ही घटना घडली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मात्र या दोन बहिणी मधील लहान बहिणीने दाखवलेलं धाडस आणि प्रसंगावधान कौतूक करण्या सारखेच आहे. त्यामुळे अपहरणाचा डाव उधळला गेला. दोन्ही तरुणी या सुरक्षित आपल्या घरी ही परतल्या.बीड जिल्ह्यात गुन्हेगारीची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. माजलगाव शहरात दिवसाढवळ्या दोन सख्ख्या बहिणींच्या अपहरणाचा थरार उघडकीस आला आहे. सुंदरराव सोळंके महाविद्यालयासमोर तीन आरोपी उभे होते. त्यांचा या दोन बहिणींच्या अपहरणाचा डाव होता. दोन्ही मुली ज्या वेळी त्यांच्या समोर आल्या त्यावेळी या तिघांनी ही त्यांच्यावर झडप टाकली. त्यांना जबरदस्तीने कारमध्ये कोंबण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी लहान बहिणीने डोकं लावलं. तिने त्यांना प्रतिकार केला.शिवाय जोरजोरात आरडाओरड केला. त्यामुळे तिथे एकच गोंधळाची स्थिती निर्माण झाली. मुलींना कारमध्ये टाकायचे आणि पळ काढायचा असा त्यांचा डाव होता. पण त्यांच्या मनासारखे काही झाले नाही. लहान बहिणीने जबर प्रतिकार आणि आरडाओरडा केला. तो ऐकून तिथं नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले. त्यांना हा प्रकार काही तरी भयंकर असल्याचं जाणवलं. नागरिक मदतीला धावले आणि अपहरणकर्त्यांचा डाव उधळला.त्यानंतर संतप्त नागरिकांनी आरोपींना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी तिघांना अटक करून त्यांचे वाहन ही जप्त केले आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या या प्रकारामुळे माजलगावमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे. दरम्यान कौटुंबिक कलहातून हा कट रचला गेला होता हे तपासात समोर आले आहे. याबाबत बीडचे पोलीस अधिक्षक नवनीत काँवत यांनी माहिती दिली आहे. तर सामाजिक कार्यकर्ता सायली पवार यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी उपाय योजना होणं गरजेचं असल्याचं म्हटलं आहे.
सूफी बांगलादेशची रहिवासी आहे. वय अंदाजे 25 वर्षे. मार्च 2024 च्या एका रात्री तिने पहिल्यांदा भारतात पाऊल ठेवले होते. एक मैत्रीणही तिच्यासोबत होती. दोघी चांगल्या आयुष्यासाठी लपूनछपून भारतात आल्या होत्या. दलालाने त्यांना 34 हजार रुपयांना विकले, 18 महिने तुरुंगात काढले. गेल्या 4 महिन्यांपासून सूफीचा नवा पत्ता आसाममधील गोलपाडा येथे असलेले मटिया डिटेंशन सेंटर आहे. हिमंता सरकार याला ट्रान्झिट कॅम्प म्हणते. सूफीसोबत मुख्तार, फूल मियाँ, मानिकजन बेगम हेदेखील आहेत, जे गुन्हेगार नाहीत, पण स्वतंत्रही नाहीत. आसाममध्ये मार्च-एप्रिलमध्ये निवडणुका आहेत. बांगलादेशी घुसखोर हा मुद्दा आहे. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी दावा केला आहे की, आसामच्या मुस्लिम लोकसंख्येपैकी 36% बांगलादेशी आहेत. 20 फेब्रुवारी रोजी गृहमंत्री अमित शाह आसाममध्ये होते. ते म्हणाले की, काँग्रेसच्या राजवटीत जे कोणी बेकायदेशीरपणे देशात घुसले आहेत, त्यांना परत पाठवले जाईल. उंचच उंच भिंती आणि लोखंडी जड गेट असलेलं डिटेंशन सेंटर आसामची राजधानी गुवाहाटीपासून सुमारे १२० किमी दूर आहे. यात कैद असलेल्या १३३ परदेशी 'घुसखोरांपैकी' फक्त ११ बांगलादेशी आहेत. दैनिक भास्कर हे पहिलं मीडिया हाऊस आहे, जे या डिटेंशन सेंटरच्या आत पोहोचलं. भारतातील सर्वात मोठे डिटेंशन सेंटर कसे आहेसुमारे 20 बिघा जमिनीवर बांधलेले हे सेंटर उंच भिंतींनी वेढलेले आहे. लोखंडी मोठ्या गेटमधून प्रवेश होतो. आत शिरताच आधी एक मोकळे मैदान आहे. थोडे पुढे गेल्यावर आणखी एक मोठे गेट आहे. यामधून आत शिरताच अधिकाऱ्यांची कार्यालये आहेत. नंतर एक मैदान आहे, जिथे फुटबॉल खेळण्याची जागा आणि भाज्या पिकवण्यासाठी वाफे बनवलेले आहेत. येथे चार-चार मजली सुमारे 15 इमारती आहेत. यापैकी फक्त 5 वापरल्या जात आहेत. दोन इमारती महिलांसाठी आणि तीन पुरुषांसाठी आहेत. येथे 3 हजार लोक राहू शकतात. कॅम्पसमध्ये शाळा, रुग्णालय, स्वयंपाकघर, शौचालय आणि राहण्यासाठी वेगवेगळे ब्लॉक आहेत. ही जागा एखाद्या तुरुंगासारखी नाही, तर शाळा किंवा वसतिगृहासारखी दिसते. येथे मी काही पात्रांना भेटले. बहुतेक जण पैसे देऊन सीमा ओलांडून आले, पकडले गेले आणि कधीही आपल्या देशात परत जाऊ शकले नाहीत. ओळख उघड होऊ नये म्हणून, या पात्रांची नावे बदलली आहेत. सूफीची पहिली कथा डिटेंशन सेंटरमध्ये पाऊल ठेवताच असं वाटतं, जणू इथे वेळ थोडी हळू चालते. ना जास्त गोंधळ, ना पूर्ण शांतता. इथे एका खोलीत महिला शिवणकाम करत होत्या. एका बाजूला शिवणकाम शिकवणारी मास्टर उभी होती. जवळच एक महिला पोलीस कर्मचारी लक्ष ठेवून होती. खोलीत सूट घातलेल्या, लहान केसांच्या एका बारीक मुलीवर नजर पडली. खूप शांत आणि डोळ्यात खोलवर उदासी. हीच होती सूफी. काही वेळ शांत राहिल्यानंतर सूफीने बोलायला सुरुवात केली. तिच्या आवाजात निराशा आणि स्पष्टवक्तेपणा दोन्ही होते. सूफी सांगते, ‘मी बांगलादेशची रहिवासी आहे. मार्च २०२४ मध्ये मी पहिल्यांदा भारतात आले होते. मी एकटी नव्हते. माझी मैत्रीण रिफतही सोबत होती. अनोळख्या देशात आम्ही दोघी एकमेकींच्या सोबती बनलो.’ ‘एक दलाल आम्हाला मदत करत होता. आम्हाला बसने सीमेच्या जवळ आणले. तिथून मालवाहू गाड्यांमध्ये लपवून सीमेपर्यंत पोहोचवले. उंच काटेरी तार ओलांडणे सोपे नव्हते. दुसऱ्या बाजूला भारतीय दलाल उपस्थित होता. सुरक्षा दलांच्या निगराणीखाली असूनही, कुंपणाच्या मधोमध लाकडी फळी अडकवून मला आणि रिफतला भारतात प्रवेश दिला गेला.’ ‘माझ्याकडे स्मार्टफोन होता. त्यावरच दलाल आम्हाला रस्त्याबद्दल सांगत राहिला. त्याच्या मदतीने आम्ही गुवाहाटीला पोहोचलो. त्याने फोनवर दिल्लीच्या ट्रेनची दोन तिकिटे पाठवली. गुवाहाटी रेल्वे स्टेशनवर आम्हाला बंगाली बोलणारा एक माणूस दिसला. त्याचे नाव रफीक इस्लाम होते. रफीकने सीट शोधण्यात आम्हाला मदत केली. अनोळख्या देशात मदत करणारा रफीक आम्हाला विश्वासार्ह वाटला. आम्ही त्याला सांगितले की आम्ही बांगलादेशातून आलो आहोत. रफीक म्हणाला की, कधी गरज पडल्यास मला फोन कर.’ ‘दोन दिवसांच्या प्रवासानंतर आम्ही दिल्लीला पोहोचलो. स्टेशनवर एक बाई आम्हाला घ्यायला आली होती. तिचं नाव सुमैया होतं. ती आम्हाला तिच्या घरी घेऊन गेली. एक आठवडाभर सुमैया आम्हाला ब्युटी पार्लरमध्ये घेऊन जात राहिली. केस स्ट्रेट करून घेतले, भुवया बनवून घेतल्या आणि मॉल मधून नवीन कपडे घेऊन दिले. सर्व खूप छान वाटत होतं. एक दिवस सुमैया आम्हाला हॉटेलमध्ये घेऊन गेली.’ इथे सूफीचा आवाज कापू लागला. काही क्षण ती शांत राहिली, मग ढसाढसा रडू लागली. ती म्हणाली- ‘हॉटेलमध्ये सर्वजण नग्न होते. चुकीची कामं करत होते. सुमैयाला वाटत होतं की आम्ही पण तेच काम करावं. आम्ही नकार दिला. मग ती आम्हाला घरी घेऊन आली. आम्हाला कळलं की जो दलाल आम्हाला मदत करत होता, त्याने माझा आणि रिफतचा सौदा केला होता. आमच्या बदल्यात त्याला 34 हजार रुपये मिळाले होते.’ ‘त्या रात्री जेवण झाल्यावर सुमैया आणि तिचा नवरा झोपी गेले. मध्यरात्री मी आणि रिफत घरातून पळून गेलो. आम्ही रेल्वे स्टेशनवर भेटलेल्या रफीकला फोन केला आणि त्याच्या सांगण्यावरून गुवाहाटीला आलो. इथे रफीक आम्हाला बसने कुठेतरी घेऊन जात होता. वाटेत बाईकवरून आलेले दोन लोक बससमोर उभे राहिले. दोघे आत आले आणि 30 हजार रुपये मागू लागले. तेवढ्यात पोलीस आले आणि बाईकवाल्यांना अटक केली.’ ‘पोलिसांनी मला विचारले - तू कुठली राहणारी आहेस? मी उत्तर दिले - बांगलादेश. यानंतर माझे आयुष्य न्यायालये आणि तुरुंगात अडकले. कोर्टात खटला चालला. न्यायाधीशांनी 18 महिन्यांची शिक्षा सुनावली. त्यांनी सांगितले होते की शिक्षा भोगल्यानंतर आम्ही घरी जाऊ शकतो. शिक्षा पूर्ण झाल्यावर, 28 ऑक्टोबर 2025 रोजी आम्हाला डिटेंशन सेंटरमध्ये पाठवण्यात आले.’ एवढे बोलून सूफी शांत झाली. तिची बोटे पुन्हा शिलाई मशीनवर चालू लागली, पण डोळ्यांतील अश्रू थांबले नाहीत. सूफीचे लग्न फक्त 15 वर्षांच्या वयात झाले होते. पती सलमानचे वय 18 वर्षे होते. दोघांनी प्रेमविवाह केला होता. लग्नानंतर सासरमध्ये मारामारी सुरू झाली. एके दिवशी सूफी घर सोडून पळून गेली. मागे एक वर्षाचे बाळ राहिले. हेच दुःख आजही तिला सर्वात जास्त सतावते. सूफी पुढे म्हणते, ‘मला घरी जायचं आहे. इथे चांगलं वाटत नाही. मुलाची खूप आठवण येते. इथे चांगलं जेवण मिळत नाही. तुरुंगात जास्त चांगलं होतं. तिथे तर आम्हाला क्लिप, काजळ, समोसा, बिस्किट सगळं मिळत होतं. महिला शिपाईच आणून देत होत्या.’ सूफी हे बोलत असताना, डिटेंशन सेंटरचे अधिकारीही उपस्थित होते. याचा अर्थ स्पष्ट होता की, इथे राहणाऱ्या लोकांवर कोणतीही जबरदस्ती केली जात नाही. ते आपलं म्हणणं मांडू शकतात. सूफीच्या घरी परतण्याच्या प्रश्नावर एका अधिकाऱ्याने सांगितलं की, बांगलादेशचे असिस्टंट हाय कमिश्नर जानेवारीत येणार होते. तिथली परिस्थिती ठीक नसल्यामुळे त्यांचं येणं रद्द झालं. अजूनपर्यंत ते आले नाहीत, त्यामुळे काही बोलणी झाली नाहीत. दुसरी गोष्ट लाल सेर पार आणि इयांगची डिटेंशन सेंटरमध्ये महिलांसाठी 'डेव्हलपमेंट अँड जस्टिस' ही स्वयंसेवी संस्था (NGO) काम करते. स्वयंसेवी संस्थेचे लोक महिलांना शिवणकाम आणि विणकाम शिकवतात. त्यांनी बनवलेले कपडे विकतातही. सूफीशिवाय इतरही मुलींनी आम्हाला त्यांनी बनवलेले कपडे दाखवले. यामध्ये इयांग आणि लाल सेर पार नावाच्या दोन बहिणी होत्या. दोघी सांगतात, 'आम्ही म्यानमारमधून भारतात आलो होतो. आमच्यासोबत आणखी 30 लोकांनी सीमा ओलांडली होती. आमच्या देशात खूप काळापासून गृहयुद्ध सुरू आहे.' म्यानमारमधून आलेल्या लोकांमध्ये चार वर्षांचे एक बाळही आहे. ते आपल्या पालकांसोबत भारतात आले होते. हे लोक आपल्या देशात परत जाऊ इच्छित नाहीत, कारण तेथील परिस्थिती ठीक नाही. संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषद (UNHRC) त्यांना ऑस्ट्रेलियाला पाठवू इच्छिते. प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सर्वजण याच सेंटरमध्ये राहतील. मुख्तारची तिसरी गोष्टआता संध्याकाळचे सुमारे 6 वाजले होते. शिवणकामाचा वर्ग संपला होता. जेवणाची वेळ होणार होती. आता आम्हाला केंद्रातील इतर लोकांना भेटायचे होते. त्यांना भेटण्यासाठी एका दारातून आत जायचे होते. दाराच्या डाव्या बाजूला एका बोर्डवर लिहिले होते - 'आत राहणाऱ्यांची एकूण संख्या 133 आहे.' या लोकांमध्ये वेगवेगळ्या देशांचे आणि आसाममधील काही डी-व्होटर्स (D-Voters) देखील समाविष्ट आहेत. डी-व्होटर्स, म्हणजे 'डाउटफुल व्होटर्स' (संशयास्पद मतदार), असे लोक आहेत ज्यांच्या नागरिकत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. इथून पुढे कॅमेरा घेऊन जाण्यास मनाई आहे. कॅमेरा बाहेर ठेवून आम्ही आत प्रवेश केला. समोर मैदान दिसले. काही लोक फुटबॉल खेळत होते. येथेच तीन तरुण बसलेले दिसले. यापैकी एक आसामचा रहिवासी आहे. भारताचे नागरिकत्व सिद्ध करू न शकल्यामुळे त्याला डी-व्होटर मानले गेले. त्यानंतर तो डिटेंशन सेंटरमध्ये राहत आहे. इतर दोघे बांगलादेशमधून बेकायदेशीरपणे भारतात आले होते. त्यांच्यापैकी एक ३४ वर्षांचे मुख्तार आहेत. मुख्तार शिकलेले नाहीत. ते अडीच वर्षांपासून येथे आहेत. मुख्तार सांगतात, ‘भारतातील एका दलालाने ६ हजार रुपये घेऊन सीमा पार करून दिली. मला गुवाहाटीहून कोलकात्याला जायचे होते. पैसे कमवीन असे वाटले होते, पण स्टेशनवर पोलिसांनी पकडले. २ वर्षे तुरुंगात राहिलो, नंतर डिटेंशन सेंटरमध्ये पाठवण्यात आले.’ चौथी गोष्ट फूल मियांचीबांगलादेशातून आलेले दुसरे व्यक्ती फूल मिया आहेत. ते ५वी पर्यंत शिकलेले आहेत. सीमा पार करण्यासाठी त्यांनी भारतातील एका दलालाला २५ हजार रुपये दिले होते. फूल मियांसोबत त्यांच्या गावातील आणखी २ लोक आले होते. यापैकी एक अल्पवयीन होता. २ वर्षांनंतर तो अल्पवयीन बांगलादेशात परत गेला. फूल मिया आणि त्यांच्या मित्राची सुटका होऊ शकली नाही. फूल मियाँना भेटून आम्ही पुढे निघालो. मैदानाच्या कडेला सुमारे 15 इमारती आहेत. पुरुष आणि महिलांसाठी वेगवेगळ्या इमारती आहेत. आधी आम्ही महिलांना भेटायला पोहोचलो. ग्राउंड फ्लोअर पूर्णपणे रिकामा होता. सोबत असलेल्या एका अधिकाऱ्याने आम्हाला वर जाण्यास सांगितले. आम्ही लोखंडी रुंद पायऱ्यांवरून वर पोहोचलो. येथे एक मुलगा सायकल चालवताना दिसला. अधिकाऱ्याने सांगितले की हा मुलगा म्यानमारमधून आला आहे आणि आईसोबत राहतो. बियाखनचमपरमाची पाचवी कथाआम्ही मुलाच्या आईला भेटायला वर गेलो. आम्ही त्यांना मुलाला भेटवण्याबद्दल सांगितले. तो वडिलांकडे गेला असल्याचे समजले. वडील पुरुषांच्या इमारतीत राहतात. त्याला आई-वडील दोघांसोबत राहण्याची परवानगी आहे. आई बियाखनचमपरमाचे वय 22 वर्षे आहे, वडील 32 वर्षांचे आहेत. आम्ही विचारले- मुलाला घेऊन सीमा ओलांडण्याची काय सक्ती होती? न थांबता, हलक्या हास्याने बियाखनचमपरमाने उत्तर दिले- ‘जीव वाचवण्यासाठी. आणि आम्हाला याचे कोणतेही दुःख नाही. मुलगा आणि पती दोघेही डोळ्यासमोर राहतात. पतीलाही मैदानात भेटता येते. मी येथे आनंदी आहे.’ एका खोलीत 4 ते 5 लोक, शिक्षिका गेल्याने अभ्यास थांबलाआम्ही मुलींच्या खोलीत आत गेलो. एका खोलीत 4 ते 5 लोक राहतात. खोलीला लागून एक छोटे स्वयंपाकघर आहे. एका खोलीत काही पुस्तके ठेवलेली दिसली. विचारल्यावर कळले की आधी येथे अभ्यास होत असे. काही महिन्यांपासून शिक्षिका येत नाहीत. त्यांची नोकरी दुसरीकडे लागली आहे. एक मुलगी म्हणाली, ‘आम्हाला हिंदी आणि इंग्रजी भाषा शिकायची आहे. यासाठी शिक्षिका हवी आहे. आम्ही आधीपासून चांगली हिंदी आणि इंग्रजी बोलू लागलो होतो, पण आता कोणी शिकवायला येत नाही.’ सहावी गोष्ट सिंगतावागसियामचीआणखी एका खोलीत आम्हाला गिटार दिसले. आतापर्यंत मनात डिटेंशन सेंटरचे चित्र एखाद्या कंटाळवाण्या जागेसारखे होते. गिटार पाहून वाटले की येथे संगीतही आहे. हे गिटार सिंगतावागसियामचे आहे. ती म्हणते, ‘बाहेरच्या जगाची खूप आठवण येते. आईची आठवण येते किंवा खूप आनंद होतो, तेव्हा मी गिटार वाजवते.’ आमचं बोलणं सुरू होतं, तेवढ्यात लाईट गेली. सोबत असलेल्या महिला पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्याने फोनचा फ्लॅश लावला. त्या म्हणाल्या, ‘खूप उशीर होत आहे. कुलूप लावण्याची वेळ झाली आहे.’ सातवी गोष्ट मानिकजन बेगमचीआम्ही महिलांच्या दुसऱ्या इमारतीकडे निघालो. येथे आसाममधील 'डी-व्होटर' महिला सर्वाधिक होत्या. त्यापैकी एक मानिकजन बेगम यांच्या मांडीवर 17 महिन्यांची मुलगी होती. त्या म्हणाल्या की, गेल्या अनेक महिन्यांपासून आम्हाला घरापासून दूर राहावे लागत आहे. मानिकजन बेगम यांच्याबद्दल संशय आहे की त्या 1971 नंतर बांगलादेशातून भारतात आल्या आहेत. आधी त्या आसाममधील कोकराझार येथील 7 व्या बटालियनमध्ये बंद होत्या. त्यांच्यासारख्या आणखीही महिला येथे आहेत. सगळ्या म्हणतात की आम्ही बांगलादेशी नाही. यांच्याशिवाय नायजेरियन महिला मिशेल जँडी देखील आहेत. त्या पहिल्यांदा व्हिजिटर व्हिसावर 22 सप्टेंबर, 2017 रोजी दिल्लीत आल्या होत्या. 9 ऑगस्ट, 2023 रोजी त्यांना गुवाहाटी विमानतळावर तपासणीदरम्यान थांबवण्यात आले. त्यांचा व्हिसा बनावट होता. मिशेलने तुरुंगात 2 वर्षांची शिक्षा पूर्ण केली आहे. पुढील प्रक्रिया पूर्ण करून त्यांना परत पाठवले जाईल. केंद्रात तीन वेळा जेवणआम्ही बाहेर पडलो, तोपर्यंत कुलूप लावले गेले होते. थोड्या अंतरावर पुरुषांसाठीची इमारत होती. यात राहणारे बहुतेक लोक बांगलादेशातून सीमा ओलांडून आले होते, पण त्यांना पकडण्यात आले होते. सर्वांनी रात्रीचे जेवण केले होते. जेवणात डाळ, भात, पोळी, भाजी मिळाली. लोकांनी सांगितले की, तीन वेळा जेवण मिळते. आवडीनुसार मासे, मटण, अंडे देखील दिले जातात. डिटेंशन सेंटरमध्ये जाण्यापूर्वी आम्ही आयजी जेल पुलक महंत यांच्याशी बोललो होतो. त्यांनी सांगितले होते की, डिटेंशन सेंटर हे तुरुंग नसून, ते एक होल्डिंग प्लेस आहे. परदेशी नागरिकांना परत पाठवण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यापूर्वी येथे थांबवले जाते. या ठिकाणी त्यांना कोणतीही अडचण येत नाही.
Bar Council : बार कौन्सिलच्या अर्ज भरण्यास दीड लाख लागणार
Bar Council : अनामत रक्कम सव्वा लाख, प्रचारासाठी करावा लागणार वेगळा खर्च
Satara: सातार्यात राहुल गांधींच्या फोटोला जोडे मारो आंदोलन शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आक्रमक
Satara काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या प्रतिमेला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोडो मारो आंदोलन करत दहन केले. दिल्लीतील आंदोलकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी पदाधिकार्यांनी केली.
महापालिका सभागृहात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाहिली श्रध्दांजली
मुंबई: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानिमित्त महापालिका सभागृहात शोक प्रस्तावाद्वारे त्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. यामध्ये महापालिकेच्या सर्व नगरसेवकांनी अजित पवार यांच्या वक्तशीरपणा आणि हजरजबाबीपणासह काम करण्याची कार्यपध्दतीमुळे लोकांना आपलासा वाटणारा नेता कसा असावा अशा शब्दांत त्यांच्या कामाच्या पध्दतीचे कौतूक केले. विशेष म्हणजे अजित दादा हे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या राजकारणातील दादा होते अशाप्रकारच्या भावना सर्वच पक्षाच्या नगरसेवकांनी व्यक्त केल्या.मुंबई महापालिकेच्या पहिल्या वहिल्या सभेची सुरुवात शोक प्रस्तावाद्वारे झाली. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात झालेल्या मृत्यूबाबत शोक प्रस्ताव मांडत श्रध्दांजली मांडताना सभागृहनेते गणेश खणकर यांनी प्रशासनावर उत्तम पकड असणारा असा नेता अशा शब्दांत त्यांच्या कामाचे वर्णन केले. वक्तशीरपणा कसा असावा हे अजित पवार यांच्याकडे पाहिल्यानंतर लक्षात येते,असे सांगत खणकर यांनी हाच वक्तशीरपणा पाळण्यासाठी ते आपल्यातून निघून गेले अशा शब्दांत शोक व्यक्त केला. तर विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी अजित दादांना तीन वेळा भेटण्याचा अनुभव आल्याचे सांगत ज्या दिवशी ते महापालिकेत हेरिटेज वॉकसाठी आले होते, पाच वर्षांनी त्याच दिवशी त्यांचे विमान अपघातात निधन झाले. दादा माणूस कसा असला पाहिजे हे अजित दादांच्या कार्यपध्दतीवरून लक्षात येते. त्यांच्यामुळेच राज्याचा आर्थिक कणा मजबूत असल्याचेही सांगत वय वाढले तरी चालेल, वयाने म्हातारे व्हा, पण विचार म्हातारे होवू देवू नका अशाप्रकारची शिकवण त्यांनी आपल्याला दिली असल्याचे सांगितले.तर शिवसेनेचे गटनेते अमेय घोले यांनी ग्रामीण आणि शहरी विकासाचा समतोल राखणारा असे हे नेता होते, असे सांगत. एखाद्या छोट्यातील छोट्या पदाधिकाऱ्यासोबतही त्यांचा थेट संपर्क असायचा अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या. माझ्या प्रभागातून ते जात असताना त्यांना रस्त्यावर बॅरेकेट्स दिसून आले. त्यावर त्यांनी स्वत: फोन करून याकडे लक्ष द्या नाहीतर अपघात होईल अशी कल्पना दिल्याची आठवण अमेय घोले यांनी सांगितले.स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी अजित पवार यांचा मृत्यूची बातमी एवढ्या भीषणपणे समोर येईल असे वाटले नव्हते. शब्दाचा पक्का आणि शब्दावर जबरदस्त पकड असलेला असा नेता आपल्यातून हिरावून घेतला आहे. दादांनी शेवटच्या क्षणापर्यंत पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न केला. पक्ष वाढवण्यासाठी कार्यकर्त्यांच्या मागे उभे राहिले पाहिजे असा विश्वास बाळगत काम करणारा असा नेता होता, अशा शब्दांत शोक व्यक्त केला.दादा हे आधारस्तंभ नव्हते तर आधारवड होते अशा शब्दांत शिवसेना नगरसेविका यामिनी जाधव यांनी शोक व्यक्त करत त्यांनी दादांचे व्यक्तिमत्व हे संवेदनशीर आणि भावनिक होते आणि कुटुंबापेक्षा पक्षाला आणि पर्यायाने कार्यकर्त्यांनाच अधिक वेळ दिल्याचे सांगत त्यांनी भावना व्यक्त केल्या. शिवसेनेच्या दिक्षा कारकर यांनी अजित दादा हे मंत्र्यांना आणि अधिकाऱ्यांना आदेश देणारेच नव्हते तर सर्वसामान्यांना उपलब्ध होवून आदेश देत काम करणारेही होते अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या. तर भाजपच्या राखी जाधव यांनी आम्ही दादांच्या नेतृत्वाखाली वाढलो, त्यांची कार्यपध्दती न्याहाळण्याची आणि अनुभवण्याची संधी लाभल्याचे सांगत भावना व्यक्त केल्या. तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अजित रावराणे यांनी मुंबईत आपला राष्ट्रवादी पक्ष का वाढत नाही याबाबत दादा कायमच खंत व्यक्त करत असल्याची आठवण सांगत एका फोनवर कोकणातील वैभववाडीतील शेतकऱ्यांच्या विजेचा प्रश्न सोडवण्याचा केलेल्या प्रयत्नांचीही आठवण करून देत शोक व्यक्त केला.तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या डॉ सईदा खान यांच्या दादांवर बोलतांना अश्रु अनावर झाल्या होत्या. अश्रुंना वाट करत देत खान यांनी आम्ही तीन नगरसेविका मुंबईत निवडून आलो, पण आम्हाला दादांची भेट होवू शकली नाही अशा शब्दांत दु:ख व्यक्त केले. यावेळी झालेल्या सभेत श्रध्दा जाधव, अश्रफ आझमी, प्रकाश दरेकर, विशाखा राऊत, सचिन पडवळ, किरण लांडगे विजय उबाळे, दिपक कोतेकर, प्रकाश गंगाधरे, अंकित प्रभू आदींनी भाग घेत शोक व्यक्त केला. महापौरांच्या अनुपस्थितीमध्ये उपमहापौर संजय घाडी यांनी सभागृहाचे कामकाज पाहिले.नवनाथ बन यांच्या भाषणाने गोंधळ
Drink and Drive New Rules Maharashtra: दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर...; परिवहन मंत्र्यांचे निर्देश
मुंबई: राज्यातील महामार्गांवर होणारे अपघात रोखण्यासाठी परिवहन विभागाने आता कंबर कसली आहे. विशेषतः समृद्धी महामार्ग आणि इतर मुख्य रस्त्यांवर खासगी ट्रॅव्हल्सच्या अपघातांचे सत्र थांबवण्यासाठी दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर अत्यंत कठोर कारवाई करण्याचे संकेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत.राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना त्यांनी ही महत्त्वाची माहिती दिली. गेल्या काही काळात झालेल्या भीषण अपघातांमध्ये ड्रायव्हरनं मद्यपान केल्याचे समोर आल्याने आता सरकार तंत्रज्ञानाचा वापर करून अशा चालकांना लगाम घालणार आहे.महामार्गावरील अपघातांचे गांभीर्य लक्षात घेता, आता बसमध्ये ब्रेक ॲनालायझर ही आधुनिक यंत्रणा बसवण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. ही यंत्रणा बसवल्यानंतर ड्रायव्हरनं दारू प्यायली असेल, तर ती बस सुरूच होऊ देणार नाही. या एका यंत्रणेची किंमत साधारण १.५ लाख रुपये इतकी आहे.एसटी महामंडळाच्या ताफ्यात येणाऱ्या नवीन बस तसेच टाटा आणि अशोक लेलँड कंपन्यांकडून घेतल्या जाणाऱ्या वाहनांमध्ये ही यंत्रणा अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खासगी बस मालकांनीही आपल्या गाड्यांमध्ये ही यंत्रणा बसवावी, असे स्पष्ट निर्देश मंत्र्यांनी दिले आहेत.स्लीपर कोच बसमधील अनधिकृत बदलांवर कारवाईअनेक खासगी बस चालक स्लीपर कोचच्या नावाखाली बसच्या रचनेत अनधिकृत बदल करतात, ज्यामुळे अपघाताच्या वेळी प्रवाशांना बाहेर पडणे कठीण होते. पूर्वी एकच स्लीपर कोच असायचा, मात्र आता दोन स्तरांवर स्लीपर कोच बसवले जात आहेत.परदेशात अशा स्लीपर कोचवर बंदी असली तरी भारतात केंद्र सरकारच्या नियमांनुसार ही सेवा सुरू आहे. महाराष्ट्राने यावर बंदी घातली तरी इतर राज्यांत नोंदणी झालेल्या बस राज्यात येऊ शकतात, ही तांत्रिक अडचणही मंत्र्यांनी स्पष्ट केली. मात्र, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आणि प्रवाशांच्या जिवाशी खेळणाऱ्या बसवर कडक नजर ठेवली जात आहे.वेग मर्यादा आणि रस्ते सुरक्षेचा मास्टर प्लॅनबसेसच्या वाढत्या वेगावर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्व बसमध्ये ८० किमी प्रतितास मर्यादेचा स्पीडोमीटर बसवण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. काही खासगी बस १२० ते १४० किमी वेगाने धावत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून, अशा गाड्यांवर कारवाई केली जाणार आहे.याशिवाय राज्यभरातील रस्त्यांसाठी एक विशेष सुरक्षा आराखडा तयार केला जात आहे. यामध्ये रिफ्लेक्टर, ॲरो मार्किंग, यु-टर्न आणि स्ट्रेट लेनसाठी दिशादर्शक फलक लावण्यात येणार आहेत. १००, २००, ३०० आणि ५०० मीटर अंतर दर्शवणारे बोर्ड सर्वच मुख्य रस्त्यांवर आणि महापालिका क्षेत्रांत लावले जाणार आहेत.सांगलीतील प्रकरणात गुन्हे दाखल करण्याचे आदेशसांगली येथे एकाच बसचे चेसी नंबर वेगवेगळ्या प्रकारे वापरून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असून, यात दोषी आढळणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल केले जातील, अशी ग्वाही प्रताप सरनाईक यांनी दिली. राज्यातील अपघातांचे प्रमाण गेल्या वर्षभरात १ टक्क्याने घटले असले तरी, हे प्रमाण शून्यावर आणण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. यासाठी आरटीओ चेकपोस्टवर कडक तपासणी आणि आधुनि
Vidarbha Railway: गोंदिया ते जबलपूर रेल्वे प्रकल्पाला केंद्र सरकारची मंजुरी
मुंबई: गोंदिया ते जबलपूर रेल्वे प्रवासाचा चेहरामोहरा बदलणार असून या मार्गाच्या दुहेरीकरणाला अखेर केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीने रेल्वे मार्गवाढीच्या ३ महत्त्वाच्या प्रकल्पांना मंजुरी दिली असून यात महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या गोंदिया - जबलपूर मार्गाचा समावेश आहे. या निर्णयामुळे विदर्भ आणि मध्य प्रदेशातील रेल्वे कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होणार असून प्रवाशांचा वेळ वाचण्यास मोठी मदत होणार आहे.रेल्वे मार्गाविषयी माहिती
8 वर्षांनंतर पंतप्रधान मोदी 25-26 फेब्रुवारी रोजी इस्रायल दौऱ्यावर जात आहेत. यापूर्वी इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू भारतात येणार होते, परंतु त्यांनी योजना रद्द केली. मोदींचा दौरा अशा वेळी होत आहे, जेव्हा इराणवर कधीही हल्ला होऊ शकतो. इराणनेही इशारा दिला आहे की तोही इस्रायलवरी प्रतिहल्ला करेल. अखेर पंतप्रधान मोदी या धोकादायक दौऱ्यावर का जात आहेत, यामुळे भारताला काय फायदा होईल आणि इराणसह इतर अरब देश या दौऱ्यामुळे नाराज होतील का; जाणून घेऊया आजच्या एक्सप्लेनरमध्ये… प्रश्न-1: पंतप्रधान मोदींच्या इस्रायल दौऱ्यात काय-काय होईल? उत्तर: 22 फेब्रुवारी रोजी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी X वर पोस्ट करत म्हटले, ‘माझे प्रिय मित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रायलच्या ऐतिहासिक दौऱ्यावर येत आहेत.’ त्यांनी पुढे लिहिले, ‘इस्रायल आणि भारत यांच्यातील संबंध दोन जागतिक नेत्यांमधील एक मजबूत युती आहे. आम्ही नवोपक्रम, सुरक्षा आणि धोरणात्मक दृष्टिकोन यामध्ये भागीदार आहोत. जेरुसलेममध्ये तुम्हाला भेटण्याची वाट पाहत आहे, पंतप्रधान मोदी.’ हा पंतप्रधान मोदींचा दुसरा इस्रायल दौरा आहे. 4 ते 6 जुलै 2017 रोजी पंतप्रधान मोदी इस्रायलला गेले होते. ही कोणत्याही भारतीय पंतप्रधानांची पहिली इस्रायल यात्रा होती. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी इस्रायली संसद म्हणजेच 'नेसेट'मध्ये भाषण देऊ शकतात. यावर अनेक देशांचे लक्ष असेल. त्यानंतर दोन्ही नेते इस्रायलच्या होलोकॉस्ट स्मारक 'याद वाशेम'लाही भेट देतील. मोदी राजधानी जेरुसलेममध्ये एका कार्यक्रमातही सहभागी होऊ शकतात, ज्यात तंत्रज्ञानासंदर्भात करार होऊ शकतात. नेतन्याहू यांनी म्हटले आहे की मध्यपूर्वेच्या आसपास किंवा आत स्थिरता आणि विकासासाठी समर्पित अनेक देशांचे गठबंधन (युती) तयार करतील. यात भारत, काही अरब, आशियाई आणि आफ्रिकन देश, ग्रीस आणि सायप्रससारखे देश सामील होतील. या संदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होऊ शकते. याव्यतिरिक्त, भारत आणि इस्त्रायल यांच्यात नवीन क्षेपणास्त्रे, ड्रोन आणि हवाई संरक्षण प्रणाली इत्यादींबाबत अनेक संरक्षण करार होऊ शकतात. स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट (SIPRI) च्या 2024 च्या अहवालानुसार, भारत फ्रान्सनंतर इस्त्रायलकडून सर्वाधिक शस्त्रे खरेदी करतो. 2026 मध्ये इस्त्रायलने भारतासोबत अंदाजे 71,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त संरक्षण करारांवर सहमती दर्शवली आहे. प्रश्न-2: नेतन्याहू भारतात येणार होते, त्यांनी योजना का बदलली? उत्तर: बेंजामिन नेतन्याहू यांनी शेवटचा भारत दौरा जानेवारी 2018 मध्ये केला होता. नोव्हेंबर 2025 मध्ये काही इस्त्रायली मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले होते की नेतन्याहू डिसेंबरमध्ये भारताचा दौरा करणार आहेत. नोव्हेंबरमध्येच भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी त्यांचे इस्त्रायली समकक्ष गिदोन सार यांच्याशी चर्चा केली होती. याला नेतन्याहूंच्या भारत दौऱ्यापूर्वीची तयारी म्हणून पाहिले गेले. तथापि, नंतर अचानक नेतन्याहूंचा भारत दौरा रद्द झाल्याची बातमी आली. इस्रायली मीडिया रिपोर्ट्स, विशेषतः i24NEWS ने सांगितले की, 10 नोव्हेंबर रोजी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या बॉम्बस्फोटामुळे सुरक्षा कारणांमुळे नेतन्याहूंच्या दौऱ्याचा आराखडा बदलला. तथापि, भारतीय अधिकाऱ्यांनी हे रिपोर्ट्स भ्रामक असल्याचे सांगत म्हटले होते की, नेतन्याहूंच्या दौऱ्याला दिल्ली बॉम्बस्फोटाशी जोडणे हे बेजबाबदारपणाचे आहे. 2025 मध्ये ही तिसरी वेळ होती जेव्हा नेतन्याहूंनी भारत दौरा रद्द केला. यापूर्वी एप्रिल आणि सप्टेंबरमध्ये निवडणुकांमुळे नेतन्याहूंचा दौरा पुढे ढकलण्यात आला होता. परराष्ट्र व्यवहार तज्ज्ञ हर्ष व्ही. पंत म्हणतात, 'मध्यपूर्वेत सतत सुरू असलेल्या तणावामुळे कदाचित असे मानले गेले की नेतन्याहूंच्या येण्याऐवजी पंतप्रधान मोदींनी इस्रायलला जावे, कारण त्या प्रदेशात जे काही घडत आहे, त्या दरम्यान दोन्ही नेत्यांची भेट आणि चर्चा आवश्यक होती.' तज्ज्ञांचे असेही म्हणणे आहे की इस्रायलचे अंतर्गत राजकारण, सुरक्षेशी संबंधित आव्हाने आणि प्रदेशातील तणावाचा परदेश दौऱ्यांवर परिणाम होतो. भारताच्या मुत्सद्देगिरीचा हा एक भाग आहे की भारत स्वतः पुढाकार घेऊन धोरणात्मक चर्चा पुढे नेऊ इच्छितो. पंतप्रधान मोदींचा इस्रायल दौरा अशा वेळी होत आहे, जेव्हा मध्यपूर्वेत मोठे युद्ध सुरू होण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांनी इराणला अणुकरार न केल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतील अशी चेतावणी दिली आहे. ट्रम्प यांनी 19 फेब्रुवारी रोजी गाझासाठी स्थापन झालेल्या ‘बोर्ड ऑफ पीस’च्या बैठकीत सांगितले, ‘पुढील 10 दिवसांत तुम्हाला कळेल की काय होणार आहे? एकतर आम्ही करार करू, किंवा त्यांच्यासाठी खूप वाईट होईल.’ यानुसार, इराणला दिलेली अंतिम तारीख 1 मार्च आहे. प्रश्न-3: इराणवर हल्ल्याच्या शक्यतेदरम्यान दोन्ही देशांसाठी पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याचे काय कूटनीतिक अर्थ आहेत? उत्तर: उपग्रह प्रतिमा आणि मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमेरिकन नौदलाने 5 ठिकाणांहून इराणला वेढले आहे, ज्यात 2 विमानवाहू जहाजांसह 14 युद्धनौका तैनात आहेत. इराणने इशारा दिला आहे की, जर त्याच्यावर हल्ला झाला, तर ते अमेरिकन तळ आणि इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला करेल. कौन्सिल ऑन फॉरेन रिलेशन्स म्हणजेच CFR च्या अहवालानुसार, मध्यपूर्वेतील इतर देशांनाही युद्धाची भीती आहे. इस्रायलही आपली तयारी करत आहे. भू-राजकारणाचे जाणकार आणि सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च म्हणजेच CPR मध्ये स्ट्रॅटेजिक स्टडीजचे प्राध्यापक ब्रह्म चेलानी म्हणतात की, जर इराणवर हल्ला झाला, तर इस्रायलही निश्चितपणे मोठ्या संघर्षात अडकेल. या सगळ्यामध्ये भारत-इस्त्रायलसाठी मोदींच्या दौऱ्याचे अनेक कूटनीतिक अर्थ आहेत… ब्रह्म चेलानी म्हणतात, ‘पंतप्रधान मोदींचा दौरा धोकादायक वाटत असला तरी, हा योगायोग नाही, तर एक विचारपूर्वक आखलेली रणनीती आहे. यामागील उद्देश भारताच्या वाढत्या भू-राजकीय प्रभावाला अधोरेखित करणे हा आहे. पंतप्रधान मोदी मध्यपूर्वेत भारताला एक महत्त्वाचा पक्ष म्हणून दाखवू इच्छितात. इस्त्रायली संसदेतील त्यांच्या भाषणामुळे ही गोष्ट अधिक मजबूत होईल की भारत या क्षेत्रातील तणावामुळे विचलित झालेला नाही.' हर्ष पंत यांच्या मते, 'आजच्या परराष्ट्र धोरणात भागीदार देशांच्या शीर्ष नेत्यांच्या स्तरावर सहभाग आवश्यक बनला आहे. भारत-इस्त्रायल दरम्यान बऱ्याच काळापासून अशी उच्च-स्तरीय बैठक झाली नव्हती, या दौऱ्याचा उद्देश हीच पोकळी भरून काढणे हा आहे.' वॉशिंग्टनस्थित क्रायसिस ग्रुपच्या इस्त्रायल-पॅलेस्टाईन विभागाचे प्रकल्प संचालक मॅक्स रोडनबॅक यांच्या मते, 'इस्त्रायली संसदेत पंतप्रधान मोदींचे भाषण खास आहे. हे भाजपच्या काळात भारत-इस्त्रायल संबंधांमध्ये आलेल्या बदलांना दर्शवते. भारताचे धोरण आता इस्त्रायलच्या समर्थनार्थ होत आहे.’ इस्रायली विरोधकांनी नेतन्याहू सरकारविरोधात संसद सत्रावर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली आहे. चेलाणी यांच्या मते, अशा परिस्थितीत नेतन्याहूसाठी मोदींचे यजमानपद भूषवणे वैयक्तिकरित्या फायदेशीर आहे. नेतन्याहू हा संदेश देऊ शकतील की, देशांतर्गत वाद असूनही इस्रायलच्या परदेशी भागीदारी मजबूत आहेत, ज्याला 'हेक्सागॉन ऑफ अलायन्स' म्हटले जाते. रोडेनबॅक म्हणतात की, इस्रायलमध्ये काही महिन्यांत राष्ट्रीय निवडणुका होणार आहेत. ऑक्टोबर 2023 मध्ये गाझावरील हल्ल्यानंतर, ग्लोबल साऊथमधील फार कमी नेत्यांनी इस्रायलला भेट दिली आहे. निवडणूक प्रचाराच्या अगदी आधी मोदींच्या भेटीमुळे नेतन्याहू यांची जागतिक नेत्याची प्रतिमा मजबूत होईल. मात्र, हर्ष पंत म्हणतात, ‘या दौऱ्याला दोन्ही देशांमधील कोणत्याही कराराच्या घोषणेपेक्षा एक धोरणात्मक पाऊल म्हणून पाहिले पाहिजे, कारण या प्रदेशाशी भारताचे आर्थिक हितसंबंध जोडलेले आहेत. भारतासाठी हा प्रदेश तेल, सागरी व्यापार आणि मध्यपूर्वेत राहणाऱ्या भारतीयांमुळे खूप महत्त्वाचा आहे.' प्रश्न-4: तर मोदी इस्रायलमधून मध्यपूर्वेला काही संदेश देऊ इच्छितात का? उत्तर: तज्ज्ञांच्या मते, पंतप्रधान मोदी आपल्या इस्रायल दौऱ्यातून दोन प्रकारचे संदेश देऊ इच्छितात... 1. इस्रायलसोबत उघडपणे चांगले संबंध दाखवणे 2. मध्य पूर्वेत शांततेचे समर्थक देश म्हणून प्रतिमा निर्माण करणे प्रश्न-5: पंतप्रधान मोदींच्या इस्रायल दौऱ्यावर अरब देशांची काय भूमिका असेल? उत्तर: 31 जानेवारी रोजीच नवी दिल्लीत 4 अरब देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांची बैठक झाली आहे. भारताने नुकताच इस्रायलच्या वेस्ट बँकवरील ताब्याच्या प्रयत्नांनाही विरोध केला होता. ब्रह्म चेलानी म्हणतात, 'आता पंतप्रधान मोदी सामंजस्य निर्माण करण्यासाठी आणि मध्य पूर्वेत भारताची संतुलित भूमिका जाहीर करण्यासाठी हा दौरा करत आहेत. जेएनयूचे प्राध्यापक आणि परराष्ट्र व्यवहार तज्ज्ञ राजन कुमार म्हणतात की, इराण पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्याबद्दल निश्चितपणे चिंता करू शकतो, परंतु त्याला माहीत आहे की भारताचा दृष्टिकोन शांततेचाच राहील. ते या प्रदेशातील कोणताही मोठा संघर्ष रोखण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याची आणि चर्चेतून प्रकरण सोडवण्याची गोष्ट सांगतील. भारत कोणत्याही दोन देशांमधील संघर्षाच्या स्थितीत समान संबंध ठेवून चालतो. पंतप्रधान मोदी इस्रायलमध्ये गाझाचा उल्लेख करू शकतात, परंतु हे तटस्थ (न्यूट्रल) पद्धतीने असेल. यामुळे अरब देशही नाराज होणार नाहीत आणि इस्रायलसोबतचे संबंधही टिकून राहतील. प्रश्न-6: या दौऱ्यामुळे भारताला काय-काय फायदे होतील? उत्तर: पंतप्रधान मोदींच्या इस्रायल दौऱ्यामुळे भारताला 3 मोठे फायदे होऊ शकतात… 1. ब्रह्मोसपेक्षा वेगवान क्षेपणास्त्रे, प्रगत ड्रोनसारख्या शस्त्रांवर करार 2. व्यापार कॉरिडॉर तयार करण्यावर करार 3. भारताचा मध्य पूर्वेकडील प्रभाव वाढेल
राजकीय पक्षांमध्ये असलेले वादविवाद किंवा मतभेद आता सगळीकडेच हाणामारीच्या पातळीवर परावर्तित होत आहेत, हे वाढत्या असहिष्णुतेचे प्रतीक असून त्याला वेळीच पायबंद घातला नाही, तर सगळाच सामाजिक तोल बिघडू शकतो.
आर्थिक बेशिस्तीला मुख्यमंत्री फडणवीसांचा लगाम
११ हजार ९९५ कोटींच्या पुरवणी मागण्या सादर; वित्तीय शिस्त राखताना अत्यावश्यक बाबींना दिले प्राधान्यमुंबई : प्रत्येक अधिवेशनात हजारो कोटी रुपयांच्या विक्रमी पुरवणी मागण्या सादर करण्याच्या आर्थिक बेशिस्तीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर लगाम घातला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी दोन्ही सभागृहात ११ हजार ९९५ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या. त्यामुळे सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात पुरवणी मागणीच्या माध्यमातून अर्थसंकल्पीय बाह्य खर्चाचा आकडा १ लाख ४५ हजार कोटीवर पोहचला आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत, तर अर्थ राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी विधान परिषदेत सन २०२५-२६ या वर्षाच्या पुरवणी मागण्या सादर केल्या. या मागण्यांपैकी १ हजार ६७ कोटी मागण्या अनिवार्य खर्चाच्या तर ९ हजार ३२२ कोटीच्या मागण्या कार्यक्रमांतर्गत खर्चाच्या आहेत. या पुरवणी मागण्यांमुळे सरकारवर ४ हजार ६९९ कोटी रुपयांचा निव्वळ भार येणार आहे. या मागण्यांवर २६ आणि २७ फेब्रुवारी रोजी चर्चा होणार आहे.सौर कृषीपंप योजनेसाठी एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेकडून मिळणाऱ्या कर्जाची रक्कम महावितरण कंपनीला हस्तांतरित करण्यासाठी ४ हजार ७९२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. राज्यातील कृषिपंप, यंत्रमाग आणि वस्त्रोद्योग ग्राहकांना विद्युत प्रशुल्कात सवलत देण्यासाठी ३ हजार ११२ कोटी, जलजीवन मिशन योजनेच्या अंतर्गत केंद्र हिश्श्यासाठी १ हजार ४३१ कोटी रुपये पुरवणी मागणीत उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सामूहिक प्रोत्साहन योजनेच्या अंतर्गत लघु, मध्यम आणि मोठ्या उद्योग घटक तसेच विशाल प्रकल्पाना प्रोत्साहन रक्कम म्हणून ८०३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. जलसंपदा विभागाच्या अंतर्गत विविध महामंडळे, पंतप्रधान कृषी सिंचन योजना, राज्यातील आरोग्य संस्था आणि रुग्णलयांच्या बांधकामे, हायब्रीड ऍन्युटीच्या माध्यमातून बांधण्यात येणारे रस्ते, पूल, शिवभोजन योजना , क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना यांच्यासाठी पुरवणी मागणीत एक हजार रुपयांची लाक्षणिक तरतूद करण्यात आली आहे.विभागनिहाय पुरवणी मागण्या (रक्कम कोटी रुपयांत ) उद्योग, ऊर्जा, कामगार आणि खनिकर्म - ९ हजार ९०७ पाणी पुरवठा आणि स्वच्छता -१ हजार ४३१ जलसंपदा - २२२ महसूल आणि वने - १५२ नियोजन - ८०
दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, २५ फेब्रुवारी २०२६
पंचांगआज मिती फाल्गुन शुक्ल नवमी शके १९४७ .चंद्र नक्षत्र रोहिणी ०१.३९ पर्यंत. योग विश्कुंभ. चंद्र राशी वृषभ. भारतीय सौर ६ फाल्गुन शके १९४७. बुधवार दिनांक २५ बुधवार २०२६. मुंबईचा सूर्योदय ०७.०१ मुंबईचा सूर्यास्त ०६.४२ मुंबईचा चंद्रोदय १२.३७ मुंबईचा चंद्रास्त ०२.३६ उद्याची राहू काळ १२.५१ ते ०२.१९ .उत्तम दिवसदैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)
Rahul Gandhi: राहुल गांधींचे मोदींना आव्हान! ‘हिम्मत असेल तर भारत-अमेरिका ट्रेड डील रद्द करून दाखवा’
Rahul Gandhi:
Palakmantri Chashak 2026 : कोयनानगरमध्ये क्रिकेटचा महासंग्राम; पालकमंत्री चषकासाठी जल्लोषमय तयारी
Palakmantri Chashak 2026 : सातारा जिल्ह्यातील कोयनानगर येथे ना. शंभूराज देसाई यांच्या नावाने आयोजित 'पालकमंत्री चषक २०२६' टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला उद्यापासून सुरुवात होत आहे.
Trump Tariffs: भारतावर 18% आयात शुल्क कायम? ट्रम्पांनी चर्चा थांबवणाऱ्या देशांना दिला कडक इशारा
Trump Tariffs: अमेरिका भारता विरोधात 18 टक्के आयात सुरू लावणार आहे. तर भारत अमेरिके विरोधात 0% आयात शुल्क लावणार आहे.
Robert Carradine : अभिनेते रॉबर्ट कॅराडाइन यांचे निधन
प्रसिद्ध असलेले रॉबर्ट कॅराडाइन (Robert Carradine) यांचे प्रदीर्घ आजारानंतर निधन झाले आहे. द लॉन्ग रायडर्स, रिव्हेंज ऑफ द नर्ड्स आणि टेलिव्हिजन मालिका लिझी मॅकग्वायर मधील भूमिकांसाठी ते प्रसिद्ध होते.
Salary Hike Percentage: EY च्या अहवालानुसार, कंपन्या आता स्किल-बेस्ड पेला प्राधान्य देत आहेत. विशेषतः AI आणि डिजिटल कौशल्य असलेल्या कर्मचाऱ्यांना अधिक वेतनवाढ मिळत आहे.
Indian Railways : केंद्रीय मंत्रिमंडळाने महाराष्ट्रासह चार राज्यांतील रेल्वे मार्गवाढीच्या ३ मल्टी-ट्रॅकिंग प्रकल्पांना मंजुरी दिली आहे.
Anti-Ship Missiles: इराणला चीन देणार घातक क्षेपणास्त्रे; अमेरिकेची डोकेदुखी वाढणार
Anti-Ship Missiles: सध्या इराण गंभीर आर्थिक संकट, महागाई आणि बेरोजगारीशी झुंजत आहे. अशा परिस्थितीत अर्थव्यवस्था सुधारण्याऐवजी सरकार परदेशी शस्त्रांवर अब्जावधी डॉलर खर्च करत असल्याने सामान्य जनतेमध्ये नाराजी पसरण्याची भीती आहे.
Ajit Pawar Plane Crash : अजित पवार विमान अपघात प्रकरणी सर्वात मोठी कारवाई
Ajit Pawar Plane Crash : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर DGCA ने VSR एव्हिएशन कंपनीच्या लेअरजेट विमानांवर उड्डाणबंदी घातली आहे.
Rohit Pawar : अजितदादांच्या पावलांवर रोहित पवारांचं पाऊल; घेतला ‘हा’मोठा निर्णय
Rohit Pawar : आमदार रोहित पवार यांनी दिवंगत अजित पवारांच्या कार्यशैलीचा वारसा पुढे चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
मेक्सिकोतील कुख्यात ड्रग तस्कर एल मेंचोचा खात्मा (El Mencho killed) झाल्यानंतर मेक्सिकोच्या प्रमुख शहरांमध्ये हिंसाचार उसळला असून या हिंसाचारात आतापर्यंत डझनभर लोकांचा मृत्यू झाला आहे.
Tej pratap yadav: तेज प्रताप यादव आणि ऐश्वर्या राय यांचा विवाह १२ मे २०१८ रोजी मोठ्या राजकीय थाटामाटात पार पडला होता. तेज प्रताप हे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव व राबड़ी देवी यांचे सुपुत्र, तर ऐश्वर्या या बिहारचे माजी मुख्यमंत्री दरोगा प्रसाद राय यांच्या नात आणि माजी मंत्री चंद्रिका राय यांच्या कन्या आहेत.
उज्ज्वल करिअर घडवण्यासाठी आवश्यक असलेली ५ कौशल्ये: लिंक्डइन
लिंक्डइन स्किल्स ऑन द राइज २०२६ च्या मते, एआय अँड ऑटोमेशन, डेटा अँड अॅनालिटिक्स, आयटी अँड सायबरसिक्युरिटी, बिझनेस अँड ग्रोथ आणि पीपल अँड लीडरशीप ही कौशल्ये तुम्हाला स्पर्धात्मक राहण्यास मदत करतीलअनेक तरूण प्रोफेशनल्ससाठी रोजगार शोधण्यामधील सर्वात आव्हानात्मक बाब म्हणजे त्यांना पुढे काय शिकावे हे माहित नसते. नवीन लिंक्डइन (LinkedIn) डेटानुसार, भारतातील ३८ टक्के नोकरीसाधक म्हणतात की त्यांना तंत्रज्ञानामुळे आजच्या भूमिकांसाठी आवश्यक असलेल्या कौशल्यांमध्ये होत असलेल्या बदलांसाठी तयार नसल्यासारखे वाटते. उमेदवारांना त्यांच्या रोजगारक्षमतेला अधिक निपुण करणाऱ्या बाबीवर लक्ष केंद्रित करण्यास मदत करण्यासाठी लिंक्डइनचा स्किल्स ऑन द राइज २०२६ अहवाल कंपन्या व उद्योगांमध्ये पाच झपाट्याने विकसित होत असलेल्या कौशल्यांना निदर्शनास आणतो. ही पाच कौशल्ये आहेत एआय अँड ऑटोमेशन, डेटा अँड अॅनालिटिक्स, आयटी अँड सायबरसिक्युरिटी, बिझनेस अँड ग्रोथ आणि पीपल अँड लीडरशीप.लिंक्डइन डेटामधून निदर्शनास येते की, जगभरातील ४६ टक्के रिक्रूटर्स आता भूमिकांसाठी नियुक्ती करताना कौशल्यांसंदर्भात असलेल्या डेटावर अवलंबून आहेत. पण, भारतातील ७४ टक्के रिक्रूटर्स म्हणतात की पात्र टॅलेंटचा शोध घेणे पूर्वीपेक्षा अधिक आव्हानात्मक बनले आहे. एआय टूल्ससह काम करू शकणाऱ्या, स्पष्टीकरण देऊ शकणाऱ्या व डेटाचा वापर करू शकणाऱ्या, डिजिटल यंत्रणा समजून घेऊ शकणाऱ्या आणि ऑपरेशनल कार्यक्षमता वाढवू शकणाऱ्या प्रोफेशनल्सला उद्योगामध्ये मोठी मागणी दिसून येत आहे. पण फक्त टेक्निकल क्षमता महत्त्वाची राहिलेली नाही. टीम्स अधिक क्रॉस-फंक्शनल व एआय-सक्षम होत असताना सहयोग, भागधारक व्यवस्थापन आणि प्रकल्प नेतृत्व ही कर्मचारी कौशल्ये म्हणून उदयास येत आहेत, जी टेक्निकल ज्ञानाला विकासात्मक परिणामामध्ये बदलतात.लिंक्डइन करिअर तज्ञ आणि वरिष्ठ व्यवस्थापकीय संपादिका निरजिता बॅनर्जी (Nirajita Banerjee, LinkedIn Career Expert and India Senior Managing Editor) म्हणाल्या, ''वर्षानुवर्षे तरूण प्रोफेशनल्सला विशेषीकृत असण्यास सांगण्यात आले. पण, २०२६ मध्ये हा नियम बदलत आहे. आज उमेदवारांना फक्त विशेषज्ञ म्हणून नाही तर कौशल्यांचे भांडार म्हणून ओळखले जात आहे. त्यांना एआयसह काम करण्याची पद्धत माहित आहे, तसेच ते डेटाबाबत अंदाज लावू शकतात, काम करण्याच्या पद्धतींमध्ये सुधारणा करू शकतात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे टीम्समध्ये सहयोग करू शकतात. या सर्व संयोजनामधून अनुकूलता दिसून येते. झपाट्याने बदलत असलेल्या रोजगार बाजारपेठेत हीच अनुकूलता तुम्हाला रोजगारासाठी नियुक्ती व बढती देते. तुम्हाला या बाजारपेठेत तुमची रोजगारक्षमता वाढवायची असेल तर वेगळ्या कौशल्यांचा पाठलाग करणे थांबवा, तुमचे स्वत:चे अद्वितीय कौशल्य घडवा आणि त्यामध्ये स्पर्धात्मकता वाढवा.''एआय अँड ऑटोमेशन: उत्पादकता नवीन पाया आहेदैनंदिन कामकाजामध्ये एआयला एकीकृत करू शकणारे प्रोफेशनल्स गतीशील विकास व वाढ देण्यासाठी उत्तमरित्या सज्ज आहेत. वर्कफ्लो ऑटोमेशन, एलएलएमऑप्स, ऑटोएमएल आणि एपीआय इंटीग्रेशन यांसारखी कौशल्ये इंजीनिअरिंग व आयटीमध्ये लोकप्रिय आहेत, तरीदेखील आज एचआर, विपणन, विक्री व कन्सल्टिंगमध्ये प्रामुख्याने प्रॉम्प्ट इंजीनिअरिंग कौशल्य आढळून येत आहे, ज्यामधून निदर्शनास येते की एआय निपुणता मुलभूत व्यवसाय कार्यसंचालनांमध्ये एकीकृत होत आहे.डेटा अँड अॅनालिटिक्स: माहितीला प्रत्यक्ष कृतीत आणले पाहिजेनियोक्ते माहिती मिळवत, स्पष्टपणे संवाद साधत आणि निर्णय घेण्यामध्ये माहितीचा वापर करत प्रत्यक्ष विश्लेषणाला उपयोजनामध्ये आणण्याची क्षमता असलेल्या प्रोफेशनल्सना प्राधान्य देत आहेत. डेटा क्षमता इंजीनिअरिंग कार्यामध्ये स्पष्टपणे दिसून येते आहे, जेथे क्वेरिंग मुलभूत कौशल्य म्हणून उदयास येत आहे. आयटीमध्ये डेटा स्टोरीटेलिंगला सर्वाधिक मागणी दिसण्यात येत आहे. डेटा-संचालित निर्णय घेण्याची क्षमता देखील व्यवसाय विकास, विक्री, कन्सल्टिंग, एचआर, शिक्षण व विपणन अशा मुलभूत नसलेल्या तंत्रज्ञान कार्यांमध्ये मुलभूत कौशल्य बनत आहे.आयटी अँड सायबरसिक्युरिटी: विकासासह स्थिरतेची गरजडिजिटल कार्यसंचालन वाढत असताना तंत्रज्ञान वातावरण सुरक्षित करू शकणारे, देखरेख ठेवू शकणारे आणि शक्तिशाली करू शकणारे प्रोफेशनल्स शाश्वत विकासासाठी आवश्यक बनत आहेत. इंजीनिअरिंग व माहिती तंत्रज्ञान कार्यांमध्ये सायबरसिक्युरिटी महत्त्वाचे आहे, तर कन्सल्टिंग भूमिकांमध्ये क्लाऊड इन्फ्रास्ट्रक्चर कौशल्याला प्राधान्य मिळत आहे, जे उद्योगाच्या डिजिटल परिवर्तनाला साह्य करते. याव्यतिरिक्त कंपन्या एआय व क्लाऊड प्लॅटफॉर्म्सचा वापर वाढवत असताना आयटी ऑटोमेशन, इन्सिडण्ट मॅनेजमेंट, रिअल-टाइम मॉनिटरिंग आणि थ्रेट डिटेक्शन यांसारख्या कौशल्यांमधून यंत्रणा स्थिरतेवरील वाढता भर दिसून येतो.बिझनेस अँड ग्रोथ: कार्यक्षमता स्पर्धात्मक फायद्याला चालना देतेनियोक्ते काम करण्याच्या पद्धतींमध्ये सुधारणा करण्यासोबत विकासाला चालना देऊ शकणाऱ्या प्रोफेशनल्सना प्राधान्य देत आहेत. व्यवसाय विकास व विक्रीमध्ये रिलेशनशिप मॅनेजमेंटला वाढती मागणी दिसून येते आहे, तर महसूलसंदर्भात भूमिकांमध्ये नेगोशिएन मुलभूत क्षमता आहे. व्यवसाय विकास, विक्री, इंजीनिअरिंग, माहिती तंत्रज्ञान, कन्सल्टिंग आणि फायनान्स कार्यांमध्ये प्रोसेस ऑप्टिमायझेशन कौशल्य उदयास येत आहे, ज्यामधून ऑपरेशनल कार्यक्षमतेमधील मोठा बदल दिसून येतो. विपणन, आर्ट्स व डिझाइन, शिक्षण आणि व्यवसाय विकास यांमध्ये देखील व्हिज्युअल स्टोरीटेलिंगला प्राधान्य मिळत आहे.पीपल अँड लीडरशीप: सहयोगामुळे व्यवसायाचा अनुकूल परिणाम वाढतोव्यवसाय विकास, विक्री, इंजीनिअरिंग, शिक्षण, आर्ट्स व डिझाइन, माहिती तंत्रज्ञान, कन्सल्टिंग, एचआर, फायनान्स व विपणनामध्ये सतत सहयोग दिसून येत आहे. अशा व्यापक रोजगार कार्यांमधून टीम्सच्या कार्यसंचालन पद्धतींमधील मोठा बदल दिसून येतो. आज काम अधिक एआय-सक्षम व क्रॉस-फंक्शनल होत असताना कर्मचाऱ्यांशी जुडले जाण्याची, गुंतागुंतीचे व्यवस्थापन करण्याची आणि सहयोगाने निष्पत्ती देण्याची क्षमता रोजगारासंदर्भात महत्त्वपूर्ण फायदा बनत आहे.प्रोफेशनल्स ही मागणीमध्ये असलेली कौशल्ये आत्मसात करण्यास मदत करण्यासाठी लिंक्डइनने ३१ मार्च २०२६ पर्यंत निवडक लिंक्डइन लर्निंग कोर्सेस मोफत उपलब्ध करून दिले आहेत, ज्यामध्ये AI agents for every day professionals, learning data analytics, stakeholder management for leaders and managers अशा कोर्सेसचा समावेश आहे.यंदाच्या द राइज इन इंडियामधील ५ स्किल्स ग्रुप्स:1. एआय अँड ऑटोमेशनa. प्रॉम्प्ट इंजीनिअरिंगb. वर्कफ्लो ऑटोमेशनc. लार्ज लँग्वेज मॉडेल ऑपरेशन्स (एलएलएमऑप्स)d. ऑटोमेटेड मशिन लर्निंग (ऑटोएमएल)e. अॅप्लीकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस (एपीआय)2. डेटा अँड अॅनालिटिक्सa. क्वेरिंगb. डेटाबेस ऑप्टिमायझेशनc. डेटा अॅनालिसिसd. डेटा स्टोरीटेलिंगe. डेटा एथिक्स3. आयटी अँड सायबरसिक्युरिटीa. क्लाऊड इन्फ्रास्ट्रक्चरb. आयटी ऑटोमेशनc. इन्सिडण्ट मॅनेजमेंटd. रिअल-टाइम मॉनिटरिंगe. थ्रेट डिटेक्शन4. बिझनेस अँड ग्रोथa. रिलेशनशिप मॅनेजमेंटb. जीटीएम अँड ग्रोथ स्ट्रॅटेजीc. ऑपरेशनल एफिशिएन्सी (किंवा प्रोसेस ऑप्टिमायझेशन)d. नेगोशिएशनe. व्हिज्युअल स्टोरीटेलिंग अँड कम्युनिकेशन5. पीपल अँड लीडरशीपa. कोलॅबोरेशनb. टीम मॅनेजमेंटc. स्टेकहोल्डर मॅनेजमेंटd. बजेट मॅनेजमेंटe. प्रोजेक्ट मॅनेजमेंटलिंक्डइनच्या करिअर तज्ञ निराजिता बॅनर्जी प्रोफेशनल्सना नवीन संधींचा फायदा घेण्यास मदत करण्यासाठी टिप्स सांगत आहेत:● तुमच्यामधील कौशल्यांकडे व्यापक दृष्टिकोनामधून पहा: तुम्ही आत्मसात केलेल्या कौशल्यांची यादी तयार करा. काम करण्यापासून स्वयंसेवेपर्यंत प्रत्येक गोष्टीचा विचार करा. मानवी कौशल्यांना प्राधान्य दिले जात असल्यामुळे तुमच्यामध्ये तुमच्या कल्पनेपेक्षा अधिक कौशल्ये असू शकतात. तुम्हाला वाटत असेल की, तुमच्यामध्ये मागणीमध्ये असलेली कौशल्ये किंवा तुम्हाला ज्या भूमिकेमध्ये/क्षेत्रात जायचे आहे तेथे आवश्यक असलेली कौशल्ये नाहीत, तर ती कौशल्ये आत्मसात करण्याचे नियोजन करा.● शीर्षकांना नाही तर कौशल्ये आत्मसात करण्याला प्राधान्य द्या : हायरिंग मॅनेजरच्या गरजांशी तुमची कौशल्ये जुळणाऱ्या भूमिकांसाठी अर्ज केल्यास तुमची निवड होण्याची शक्यता वाढते. लिंक्डइनच्या AI-powered job search चा वापर करत तुम्हाला पाहिजे असलेल्या गोष्टींबाबत स्पष्टपणे लिहा आणि प्रत्येक पोस्टिंगवरील job match वैशिष्ट्य तपासा, ज्यामुळे तुम्ही त्या कामासाठी पात्र आहात की नाही हे त्वरित समजते.● कौशल्यांबाबत फक्त सांगू नका, तर सिद्ध करून दाखवा: कौशल्यांची फक्त यादी न करता कौशल्यांचा वापर कसा करता याचा देखील उल्लेख करा. हायर्सना तुमच्यामधील कौशल्ये व अनुभव समजण्यासाठी तुम्ही कौशल्यांचा कशाप्रकारे वापर करता, तुम्ही निर्माण केलेला प्रभाव आणि तुम्ही संपादित केलेले निकाल यांचे तुमचे लिंक्डइन प्रोफाइल आणि रिझ्यूमवर स्पष्टपणे वर्णन करा.● परिपूर्ण प्रोफाइलसह संधी मिळवा: तुमचा प्रोफाइल अपडेटेड ठेवा, रिक्रूटर्सना स्पष्टपणे दिसतील अशा किमान पाच संबंधित कौशल्यांचा उल्लेख करा. लिंक्डइनच्या एआय-समर्थित राइटिंग सजेशन्सचा वापर करत लक्षवेधक हेडलाइन, अबाऊट व एक्स्पीरिअन्स सेक्शन्स तयार करा. स्वत:चा फोटो टाकणे आणि तुमच्या माहितीचे सत्यापन करणे यामुळे तुमच्याबाबत लवकर विश्वास निर्माण होण्यास मदत होते आणि हायर्सना तुम्हाला शोधणे सोपे जाते.
फिटनेस स्टार मयांक पवार याचे ३७ व्या वर्षी आकस्मिक निधन
मुंबई : रिअॅलिटी शोच्या दुनियेतून प्रसिद्धी मिळवलेले आणि फिटनेस क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण करणारे स्प्लिट्सविला सीझन ७ मधील स्पर्धक मयंक पवार यांचे निधन झाले आहे. अवघ्या ३७व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतल्याची माहिती समोर आली असून चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.सोशल मीडियावरून दिली माहितीमयंक यांच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवरून त्यांच्या निधनाची बातमी जाहीर करण्यात आली. “भाऊ, मार्गदर्शक आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व” अशा शब्दांत त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. ही पोस्ट काही मिनिटांतच व्हायरल झाली आणि चाहत्यांकडून संवेदना व्यक्त केल्या जाऊ लागल्या.हृदयविकाराचा झटका आल्याची प्राथमिक माहितीप्राथमिक माहितीनुसार हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे समजते. २५ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ५ ते ६ दरम्यान राणा प्रताप बाग येथील संगम पार्क परिसरातील वाल्मिकी मंदिरात प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले आहे.रिअॅलिटी शोमधून लोकप्रियता‘स्प्लिट्सविला ७’मध्ये सहभाग घेतल्यानंतर मयंक प्रेक्षकांच्या नजरेत आले. शांत, संयमी आणि प्रामाणिक व्यक्तिमत्त्वामुळे त्यांना विशेष पसंती मिळाली होती. शोमधून बाहेर पडताना सूत्रसंचालिका सनी लिओनी देखील भावुक झाल्याचीही चर्चा त्यावेळी रंगली होती.फिटनेस क्षेत्रातील दमदार ओळखरिअॅलिटी शोच्या पुढे जात मयंक यांनी बॉडीबिल्डिंग आणि फिटनेस विश्वात स्वतःचे स्थान निर्माण केले. ‘मिस्टर इंडिया’ स्पर्धेत अनेक वेळा विजेतेपद पटकावत त्यांनी फिटनेस आयकॉन म्हणून नावलौकिक मिळवला. सेलिब्रिटी प्रशिक्षक म्हणूनही त्यांनी काम केले होते. अनेक तरुण खेळाडूंना त्यांनी मार्गदर्शन करत होता.त्यांच्या अचानक जाण्याने सोशल मीडियावर विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे. काहींनी फिटनेस क्षेत्रातील आरोग्यविषयक धोके आणि स्टिरॉइड्सच्या वापराबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
Rinku Singh : टीम इंडियाला मोठा धक्का ! रिंकु सिंह संघाची साथ सोडत घरी परतला; नेमकं काय घडलं?
भारतीय संघाला एक मोठा धक्का बसला आहे. संघातील डावखुरा फलंदाज आणि फिनिशर म्हणून ओळखला जाणारा रिंकु सिंह (Rinku Singh) अचानक संघातून बाहेर पडला आहे. त्याला अलिगड येथे घरी परतावे लागले आहे, ज्यामुळे संघातील खेळाडू आणि चाहत्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.
Indian students in iran: विद्यार्थ्यांनी विद्यापीठाशी स्वतः संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, परीक्षांबाबतचा निर्णय हा केवळ विद्यापीठाच्या हाती नसून तो इराण मंत्रालयाच्या अखत्यारीत असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे भारत सरकारने राजनयिक पातळीवर हस्तक्षेप करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
Uday Bhanu Chib : युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष उदयभानू चिब यांना अटक
शर्टलेस निदर्शनांवरून युवक कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदयभानू चिब यांना अटक करण्यात आली. दिल्ली पोलिसांच्या कारवाईने राजकीय वादळ घोंघावू लागले आहे. त्यातून कॉंग्रेस विरूद्ध भाजप असा राजकीय संघर्ष आणखी तीव्र बनण्याची चिन्हे आहेत.
Droupadi Murmu: राष्ट्रपती मुर्मू मंगळवारी दुपारी मुंबईत दाखल झाल्या. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आणि महापौर ऋतु तावडे यांनी त्यांचे स्वागत केले.
इराणशी लढण्याआधी अमेरिकेच्या सैनिकांमध्ये भर समुद्रात टॉयलेटवरून मारामारी
वाशिंग्टन : अमेरिका आणि इराण यांच्यातील वाद काही थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. अमेरिकेने आपल्या युद्धनौका इराणच्या दिशेने रोखल्या आहेत. अमेरिका इराणवर हल्ला करण्याच्या संपूर्ण तयारीत आहेत पण भर समुद्रात लढाईला जायच्या आधीच जगातील मोठ्या युद्धनौकेवर अमेरिकेच्या सैनिकांमध्येच एक वेगळंच युद्ध रंगलय ते म्हणजे 'टॉयलेट वॉर'.यूएसएस जेराल्ड आर. फोर्डवरील बहुतांश स्वच्छतागृह तुंबली आहेत. त्यामुळे सैनिकांची अवस्था बिकट झाली आहे. युद्धनौकेवर ४५०० पेक्षा अधिक सैनिक आहेत. त्यामुळे नौदलातील सैनिकांना दररोज ४५ मिनिटं रांग लागली आहे. युद्धनौकेवरील मलनिस्सारण यंत्रणा पूर्णत: नादुरुस्त झाली आहे. यूएसएस जेराल्ड आर फोर्ड जून २०२५ पासून समुद्रात तैनात आहे. जानेवारीत याच युद्धनौकेनं व्हेनेझुएलाविरुद्धच्या कारवाईत अमेरिकेसाठी महत्त्वाची भूमिका बजावली होती. अमेरिकेनं सैन्यानं व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांना अटक केली होती. आता इराण सोबतचा तणाव वाढलेला असताना अमेरिकेनं हीच युद्धनौका मध्य पूर्वेत तैनात केली आहे.इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव वाढत असताना युद्धनौकेवर सैनिकांसाठी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. शौचालयं तुंबल्यानं सैनिकांसाठी अवघड स्थिती आहे. जगातील सर्वात महागड्या युद्धनौकेवर जवळपास ६५० शौचालयं आहेत. यातील बहुतांश स्वच्छतागृहं वापरण्याच्या स्थितीत नाहीत. वॉल स्ट्रीट जर्नलनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. युद्धनौका दीर्घ काळापासून समुद्रात आहे. त्यामुळे युद्धनौकेची नियमित देखभाल झालेली नाही.स्वच्छतागृहांची संख्या कमी असल्यानं सैनिकांना दररोज पाऊण तास रांगेत उभं राहावं लागत आहे. प्लंबर, डागडुजीचं काम करणारे कामगार आणि सैनिकांमध्ये दररोज शाब्दिक चकमकी झडत आहेत. तंत्रज्ञ दररोज १९ तास काम करत आहेत. यंत्रणा नीट करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. विशेष म्हणजे अशी समस्या पहिल्यांदाच निर्माण झालेली नाही. गेल्या वर्षी मार्चमध्ये अवघ्या चार दिवसांमध्ये २०५ स्वच्छतागृहं खराब झाली होती.जहाजावर अत्याधुनिक सुविधा आहेत. पण ही युद्धनौका एका नाजूक व्हॅक्यूम आधारित मलनिस्सारण यंत्रणेवर चालते. एखादा वॉल्व खराब झाल्यास त्या विभागातील सर्व शौचालयं बंद करावी लागतात. कॅल्शियम तुंबल्यानं पाईप जाम होतात आणि अडचण निर्माण होते. प्रत्येक वेळी यंत्रणा दुरुस्त करण्यासाठी ऍसिड फ्लशवर जवळपास ४ लाख डॉलर खर्च करावे लागतात.युद्धनौकेवर निर्माण झालेली समस्या तांत्रिक स्वरूपाची आहे. ही युद्धनौका जगातील सर्वात मोठी अत्याधुनिक नौका आहे. अश्या युद्धनौकेवर लढाईला जाताना भर समुद्रात अशी परिस्तिथी निर्माण होणे हे भयंकर आणि तितकेच हास्यास्पदही आहे.
लंडन फॅशन वीक २०२६ मध्ये क्रिती सॅनन हिने उधळला ग्लॅमर
लंडन : बॉलिवूडमधील आघाडीची स्टाइल आयकॉन Kriti Sanon हिने पुन्हा एकदा लंडन फॅशन वीकमध्ये आपल्या शानदार उपस्थितीने जागतिक मंचावर ठसठशीत छाप पाडली. आंतरराष्ट्रीय फॅशन विश्वातील या प्रतिष्ठित सोहळ्यात तिची उपस्थिती हा सिझनमधील प्रमुख आकर्षण ठरली. हाय-कॉन्सेप्ट कुट्यूरला सहज आणि परिधान करण्यायोग्य एलिगन्ससह सादर करण्याच्या तिच्या क्षमतेने जगभरातील फॅशन तज्ज्ञांचे लक्ष वेधून घेतले. तिच्या कारकिर्दीच्या शिखरावर, भारतीय चित्रपटसृष्टीतील अग्रगण्य अभिनेत्री म्हणून ही जागतिक ओळख अधिकच अधोरेखित झाली आहे.या प्रसंगी कृतिने Burberry चा पोशाख परिधान करत टेक्स्चरचा समतोल आणि परंपरेची झलक सादर केली. तिने चॉकलेट-तपकिरी रंगाचा आकर्षक ट्रेंच कोट घातला होता, जो तिच्या संपूर्ण लूकचा मुख्य आधार ठरला. संरचित सिल्हूट आणि कंबरेवर बांधलेली बेल्ट यामुळे तिच्या व्यक्तिमत्त्वात कालातीत मोहकता आणि आत्मविश्वासाची भर पडली. मोनोक्रोम रंगसंगतीला ब्रेक देत तिने टील रंगाचा नमुन्यांचा स्कार्फ परिधान केला, ज्यामुळे लूकमध्ये ताजेपणा आणि दृश्यात्मक विविधता आली. यासोबत तिने गुडघ्यांपर्यंतचे स्लीक लेदर बूट्स आणि एक क्लासिक स्ट्रक्चर्ड हँडबॅग कॅरी केली. तिचे केस हाय-फॅशन टॉप-नॉटमध्ये स्टाइल करण्यात आले होते, ज्यामुळे तिचा नितळ चेहरा आणि सुसंस्कृत मेकअप अधिक उठून दिसत होता.फक्त पोशाखापुरतेच मर्यादित न राहता, कृतिची ही उपस्थिती जागतिक मंचावर एक प्रभावी फॅशन स्टेटमेंट ठरली. भारतीय सिनेसृष्टीपासून लंडनच्या प्रतिष्ठित रनवेच्या फ्रंट रोपर्यंतचा तिचा प्रवास आधुनिक “इट-गर्ल” प्रतिमेला एक वेगळा आंतरराष्ट्रीय आयाम देणारा आहे. इंडस्ट्रीतील तिचा दर्जा सातत्याने उंचावत असून, अशा आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांमधील तिची उपस्थिती हे स्पष्ट करते की ती ऑन-स्क्रीन आणि ऑफ-स्क्रीन दोन्ही ठिकाणी ट्रेंडसेटर म्हणून अग्रस्थानी आहे. तिच्या आगामी चित्रपटांबाबतही चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. कृति सेनन लवकरच कॉकटेल 2 मध्ये Shahid Kapoor आणि Rashmika Mandanna यांच्यासोबत झळकणार आहे.
BKC च्या ट्रॅफिकला ब्रेक! मेट्रो 2B चा महत्वाचा टप्पा पूर्ण
मुंबई : वांद्रे–कुर्ला संकुल आणि आसपासच्या भागातील वाहतूक ताण कमी करण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलले गेले आहे. पूर्व आणि पश्चिम उपनगरांना थेट जोडणाऱ्या मुंबई मेट्रो लाईन 2B प्रकल्पातील अत्यंत गुंतागुंतीचा टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण झाला आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या कामाला आता अधिक गती मिळणार आहे.MMRDA ने कुर्ला येथील हलाव पुलावर दोन प्रचंड आकाराचे ‘यू-गर्डर’ अचूकरीत्या स्थापित केले. या कामात सर्वात मोठे आव्हान म्हणजे उंचीची मर्यादा होती. विमानतळ प्राधिकरणाच्या निर्बंधांमुळे मेट्रो मार्ग आणि पुलामधील अंतर कमी होते. अशा परिस्थितीत सुमारे २० मीटर लांबीचे गर्डर उचलून बसवणे ही मोठी तांत्रिक कसोटी ठरली. ५०० मेट्रिक टन क्षमतेच्या क्रेनच्या साहाय्याने हे काम पूर्ण करण्यात आले. त्यानंतर वीजपुरवठा, सिग्नलिंग आणि संप्रेषण यंत्रणांची उभारणी केली जाणार आहे.वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हे संपूर्ण काम पहाटेच्या सुमारास पार पडले. अवजड वाहनांसाठी पर्यायी मार्ग ठेवण्यात आला होता, तर हलक्या वाहनांना नियंत्रित प्रवेश देण्यात आला. त्यामुळे नागरिकांना कमीत कमी अडचण झाली.प्रवाशांसाठी मोठा बदलही मेट्रो लाईन DN नगर, वांद्रे–कुर्ला संकुल, कुर्ला, चेंबूर आणि मंडाले या प्रमुख भागांना जोडणार आहे. रोज लाखो प्रवासी या मार्गावरून प्रवास करतात. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर प्रवासाचा कालावधी कमी होण्यासोबतच रस्त्यावरील वाहनांचा ताणही कमी होण्याची अपेक्षा आहे.लवकरच मेट्रोची चाचणी धाव?या महत्त्वाच्या टप्प्यानंतर संपूर्ण मार्गावरील काम अधिक वेगाने पूर्ण होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सर्व तांत्रिक चाचण्या पूर्ण झाल्यानंतर या मार्गावर मेट्रो सेवा सुरू करण्याचा मार्ग मोकळा होईल. BKC परिसरातील वाहतूक व्यवस्थेत यामुळे मोठा बदल होण्याची चिन्हे आहेत.
मंत्री नितेश राणे यांच्या बंदरे खात्याची उल्लेखनीय कामगिरी
इंडिया मेरिटाईम वीक २०२५ मधील ५६ हजार कोटींचे करार राज्यासाठी ऐतिहासिक यश; आमदार प्रवीण दरेकरबंदरे विभागातील भव्य गुंतवणुकीबद्दल आमदार प्रवीण दरेकर यांच्याकडून विधानपरिषदेत सरकारचे अभिनंदनमुंबई : इंडिया मेरिटाईम वीक २०२५ अंतर्गत महाराष्ट्रासाठी तब्बल ५६ हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार झाल्याने हे राज्यासाठी मोठे यश असल्याचे विधानपरिषद आमदार प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे. बंदरे विकास विभागाच्या माध्यमातून झालेल्या या भव्य गुंतवणुकीबद्दल त्यांनी राज्य सरकारचे अभिनंदन केले.विधानभवन, मुंबई येथे सुरू असलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंगळवारी विधानपरिषद सभागृहात राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा सत्र पार पडले. या चर्चेदरम्यान आमदार प्रवीण दरेकर यांनी मंत्री नितेश राणे यांच्या बंदरे विभागात झालेल्या गुंतवणुकीचा विशेष उल्लेख केला. दावोस येथील गुंतवणुकीची चर्चा नेहमीच होते; मात्र इंडिया मेरिटाईम वीक २०२५ मधून महाराष्ट्रासाठी झालेली ५६ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक ही राज्याच्या आर्थिक विकासाला नवे बळ देणारी असल्याचे त्यांनी नमूद केले.ऑक्टोबर २०२५ मध्ये गोरेगाव (नेस्को) येथे पार पडलेल्या इंडिया मेरिटाईम समिटमध्ये देश-विदेशातील गुंतवणूकदारांनी सहभाग नोंदवला होता. या परिषदेत बंदरे, जलपरिवहन, लॉजिस्टिक्स व किनारपट्टी विकासाशी संबंधित विविध प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणात सामंजस्य करार करण्यात आले. मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली बंदरे खात्यामध्ये सुरू असलेल्या विकासकामांची आणि गुंतवणुकीची दखल घेत आमदार प्रवीण दरेकर यांनी विधानपरिषदेत सरकारचे अभिनंदन केले.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने गोदावरी इम्पॅक्ट इन्व्हेस्टमेंट कॉन्क्लेव्हचे आयोजन
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने उद्योजक आणि इनोव्हेटर्स तसेच स्टार्ट अप्स यांनी नाशिक शहरातील पर्यावरण, आरोग्य, शिक्षणासह विविध सामाजिक घटकांशी संबंधित सेवांमध्ये सहभाग द्यावा. जेणेकरुन या उद्योगांच्या वाढीसह सामाजिक विकासालाही हातभार लागेल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले. नाशिक जिल्हा प्रशासन, सीएसआर बॉक्स आणि कुंभथॉन इनोव्हेशन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने “गोदावरी इम्पॅक्ट इन्व्हेस्टमेंट कॉन्क्लेव्ह”चे आयोजन ताज गेटवे हॉटेल, नाशिक येथे करण्यात आले होते.शाश्वत विकासासाठी नवकल्पना, भागीदारी व गुंतवणूक वाढविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असून त्याच्या शुभारंभप्रसंगी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद बोलत होते. महाराष्ट्र राज्य इनोव्हेटीव सोसायटीचे अध्यक्ष श्रीकांत पाटील, डिआयजीओचे ग्लोबल डायरेक्टर जेम्स आशल, सीएसआर बॉक्सचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी भोमिक शाह यांची यावेळी व्यासपीठावर उपस्थिती होती.जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले की, यापूर्वी प्रयागराज येथे झालेला सिंहस्थ कुंभमेळा आणि नाशिक-त्र्यंबकेश्वर येथील कुंभमेळा यामध्ये मूलभूत फरक आहे. प्रयागराज येथील कुंभमेळा हा नदीकिनारी होता. येथील कुंभमेळा हा दोन शहरांमध्ये आणि मध्यवर्ती भागात आहे. त्यामुळे येथील आव्हाने भिन्न आहेत. येथे आलेल्या भाविकांना सुलभ वातावरण आणि सेवा उपलब्ध करुन देणे, यासाठी प्रशासनाचे प्राधान्य असणार आहे. अर्थात, यासाठी प्रशासनाला विविध घटकांचे सहकार्य अपेक्षित आहे. त्यांच्या माध्यमातून पर्यावरण, नागरी सुविधा, आरोग्य, क्षेत्रातील सहकार्य आवश्यक असल्याचे ते म्हणाले.सध्या अनेक स्टार्ट अप्स हे विशेषतः माहिती तंत्रज्ञान आणि निर्मिती क्षेत्रातील आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांची सेवा ही संधी आहे. या इनोव्हेटर्सच्या विविध संकल्पनांना बळ देणारी आणि सेवेबरोबरच उद्योजकता विकासासाठीचे पूरक वातावरण निर्मिती करणारी ही संधी आहे. दीर्घकालीन लवचिकता आणि समावेशक प्रगतीसाठी जिल्ह्याच्या वचनबद्धतेला बळकटी देणे, गोदावरी खोऱ्यातील जल व्यवस्थापन, हवामान-लवचिक शेती, एमएसएमई वाढ आणि प्रभाव-चलित गुंतवणूक यासारख्या स्केलेबल उपायांना गती देण्यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.नाशिक जिल्ह्यात शाश्वत विकासासाठी नवकल्पना व गुंतवणूक वाढीसाठी शासकीय अधिकारी, उद्योग प्रतिनिधी, गुंतवणूकदार, शैक्षणिक संस्था व तज्ज्ञ यांच्या सहभागातून यावेळी गोलमेज परिषद आयोजित करण्यात आली. या परिषदेत नाशिक जिल्ह्यात शाश्वत विकासासाठी नवकल्पना व गुंतवणूक वाढीसाठी धोरणात्मक चर्चा करण्यात आली. तसेच, शाश्वत विकासाशी संबंधित समस्यांचे व्यावसायिक व प्रभावी उपाय विकसित करण्यावर स्टार्टअप्ससाठी मार्गदर्शन, तांत्रिक सल्ला, तज्ज्ञांचे मार्गदर्शन करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.महाराष्ट्र इनोव्हेटीव्ह सोसायटीचे अध्यक्ष पाटील म्हणाले की, विविध भागातील नाविन्यपूर्ण संकल्पनांना आर्थिक बळ देत त्या प्रत्यक्षात आणण्यास सोसायटीच्या माध्यमातून राज्य शासनाचे प्राधान्य राहिले आहे. त्यामुळे जिल्हापातळीवरील अशा संकल्पनांना मूर्त रुप आणण्यासाठी आता मुंबईपर्यंत पाठपुरावा करावा लागू नये, जिल्हा पातळीवरील अडचणी त्याच पातळीवर सोडवल्या जाव्यात, अशा पद्धतीने इनोव्हेटीव सेलची स्थापना केली जाईल तसेच नाशिकमध्ये लवकरच सर्व प्राथमिकता पूर्ण करुन विभागीय पातळीवरील इनोव्हेटीव हब स्थापन करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.आशल म्हणाले की, पर्यावरण संवर्धनासाठी आणि त्याअनुषंगाने विविध सामाजिक घटकांशी निगडीत उद्योग प्रवाहांना गती देण्यासाठी अशा प्रकारचा उपक्रम होत आहे. सामाजिक विषयांच्या बाबत चर्चा होते. नावीन्यपूर्ण संकल्पना आणि उद्योजकांच्या सहकार्याने त्यासाठी आखणी केली जाते, ही निश्चितच चांगली आणि कौतुकास्पद बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.शाह यांनी या गोदावरी इन्व्हेस्टमेंट आणि इम्पॅक्ट कॉन्क्लेव बाबतची माहिती दिली. शाश्वत विकासासाठी नवकल्पना, भागीदारी व गुंतवणूक वाढविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविला गेला. अभियांत्रिकी व तांत्रिक शिक्षण संस्थांतील विद्यार्थ्यांसाठी शाश्वत विकासाशी संबंधित समस्यांवर नावीन्यपूर्ण उपाय सादर करण्यासाठी हॅकॅथॉन हा उपक्रम राबविला गेला. त्यातील अंतिम विजेत्यांना गौरविण्यात आले. स्टार्ट अप एक्स्पो अंतर्गत शाश्वत विकास, पर्यावरण संवर्धन, कृषी नवकल्पना, शहरी व्यवस्थापन व सार्वजनिक सेवा तंत्रज्ञान या क्षेत्रातील स्टार्टअप्सना त्यांचे नावीन्यपूर्ण प्रकल्प सादर करण्याची संधी दिली गेली. यामुळे उद्योग, गुंतवणूकदार आणि शासन यांच्याशी थेट संवाद साधण्याची संधी 30 हून अधिक स्टार्ट अप्सना मिळाली असल्याचे ते म्हणाले.यावेळी कार्यक्रम स्थळ परिसरात विविध स्टार्ट अप्स आणि इनोवेटर यांच्या उत्पादन आणि संकल्पनांचे स्टॉल्स मांडण्यात आले होते. त्याला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि मान्यवरांनी भेट दिली. या नाविन्यपूर्ण संकल्पनांची त्यांनी आवर्जून आणि आस्थेवाईकपणे माहिती घेतली आणि त्यांचे कौतुक केले.
अलमुरी रत्नमाला इन्स्टिट्यूटमधील गैरव्यवहाराची चौकशी होणार
मुंबई : अलमुरी रत्नमाला इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, सापगाव (ता. शहापूर जि. ठाणे) मधील गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी समिती गठीत केली जाईल, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत सांगितले.सदस्य मनीषा कायंदे यांनी अलमुरी रत्नमाला इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी, सापगाव मधील गैरव्यवहार प्रकरणी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य ज्ञानेश्वर म्हात्रे यांनीही सहभाग घेतला.उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, ही संस्था विना अनुदानित असल्याने या संस्थेवर प्रशासक नेमता येत नाही. मात्र या संस्थेविरुद्ध संस्थेतील माजी विद्यार्थ्याकडून शुल्काबाबतच्या प्राप्त तक्रारी तसेच सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पक्ष, संघटना, संस्थेचे माजी कर्मचारी यांनी केलेल्या तक्रारींची चौकशी गठित समितीमार्फत सखोल चौकशी करून तीन महिन्यात अहवाल सादर केला जाईल.अलमुरी रत्नमाला इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी हे महाविद्यालय मुंबई विद्यापीठाशी संलग्न असल्याने याबाबत संस्थेच्या विरोधात कर्मचाऱ्यांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींची शहानिशा करण्यासाठी मुंबई विद्यापीठानेही त्रिस्तरीय समिती नियुक्ती केली आहे. या समितीचे कामकाज सुरू असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पाटील यांनी सांगितले.
President Draupadi Murmu: राष्ट्रपती २५ फेब्रुवारी रोजी करणार राष्ट्रीय आरोग्य मेळाव्याचे उद्घाटन
अकोला : भारत सरकारचे आयुष मंत्रालय, अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलन यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २५ ते २८ फेब्रुवारी २०२६ दरम्यान बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे चार दिवसांचा राष्ट्रीय आरोग्य मेळावा २०२६ आयोजित करण्यात आला आहे.औषधी वनस्पती लागवड आणि कृषी वनीकरणाद्वारे आयुष औषध प्रणालींबाबत सर्वसामान्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे , सर्वसमावेशक आरोग्य सेवा प्रदान करणे आणि शेतकऱ्यांसाठी उपजीविकेच्या नवीन संधी निर्माण करणे हे या मेळाव्याचे उद्दिष्ट आहे.राष्ट्रीय आरोग्य मेळावा- २०२६ चे उद्घाटन बुधवार २५ फेब्रुवारी २०२६ रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होणार आहे. उद्घाटन समारंभ संत गजानन महाराज संस्थानच्या विसावा मैदानावर होणार आहे. उद्घाटन समारंभ महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार व केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव आणि इतर अनेक मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीत होणार आहे.या संपूर्ण मेळाव्यात नागरिकांना आयुर्वेद, योग आणि निसर्गोपचार, युनानी, सिद्ध, सोवा रिग्पा, होमिओपॅथी आणि इतर पारंपारीक आरोग्यसेवा शाखांसह विविध आयुष प्रणालीं मार्फत मोफत आरोग्य तपासणी, वैद्यकीय सल्ला आणि औषधे घेण्याची संधी मिळेल.आयुष क्षेत्रातील उत्कृष्ट उत्पादन पद्धती, गुणवत्ता मानके आणि अलीकडील संशोधन प्रदर्शित करण्यासाठी अनेक प्रतिष्ठित आयुष औषधनिर्माण आणि वेलनेस कंपन्या या मेळाव्यात सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर दैनंदिन आरोग्य गरजांसाठी औषधी वनस्पती आणि साध्या घरगुती उपचारांचे समर्पित प्रदर्शन देखील या मेळाव्यात भरवले जाणार आहे.बुलढाणा जिल्हा आणि आसपासच्या भागातील शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा शाश्वत आणि लाभदायी स्रोत म्हणून कृषी वनीकरण आणि औषधी वनस्पतींची लागवड स्वीकारण्यास प्रोत्साहन देणारा एक विशेष उपक्रम यावेळी आयोजित करण्यात आला असून,तो या राष्ट्रीय आरोग्य मेळावा -२०२६ चे एक प्रमुख आकर्षण आहे. दि. २७ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ३ .०० वाजता शेगाव येथील विसावा परिसरात आयुर्वेदिक शेती, उत्पादन आणि विपणन या विषयावर विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.या महामेळाव्यात, शेतकऱ्यांना वनोत्पादनांवर आधारित आणि औषधी पिकांची लागवड, प्रक्रिया, मूल्यवर्धन आणि विपणन यावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळेल जेणेकरून पारंपारिक शेती करणाऱ्यांना आयुर्वेदिक शेतीसह ते करता येईल आणि त्यांच्या उत्पन्नात भर पडेल.केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी शेतकऱ्यांना आयुर्वेदिक शेती आणि उत्पादन कार्यक्रमात सक्रियपणे सहभागी होण्याचे आणि पारंपारिक पिकांसोबत औषधी वनस्पती लागवडीची क्षमता शोधण्याचे आवाहन केले आहे.शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनीचा काही भाग औषधी वनस्पतींसाठी राखून ठेवल्याने शेतकऱ्यांना शाश्वत आणि लाभदायी उत्पन्न मिळेल, तर नागरिकांना उच्च दर्जाचे नैसर्गिक उपचार पर्याय उपलब्ध होतील आणि आयुष मूल्य साखळी अधिक मजबूत होईल असे मत त्यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र आणि शेजारील राज्यांमधील नागरिक, शेतकरी, बचत गट, विद्यार्थी, आरोग्य स्वयंसेवक आणि आयुष भागधारक यांनी शेगावला भेट देऊन राष्ट्रीय आरोग्य मेळावा २०२६ चा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि या राष्ट्रीय कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे.
चिंताजनक..! राज्यातील २५५ मराठी शाळा बंद, काय आहे कारण?
Marathi School : कोकण, विदर्भ आणि मराठवाड्या सह राज्यातील २५५ मराठी शाळा बंद झाल्याची माहिती सरकारने लेखी उत्तरात दिली आहे.
Jute Farmers: कच्च्या तागाच्या किमान आधारभूत किमतीत वाढ जाहीर; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
Jute Farmers: शेतकरी संघटना आणि कृषी तज्ज्ञांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. मात्र, काही शेतकरी संघटनांनी सरकारी खरेदी केंद्रांची संख्या वाढवण्याची मागणीही केली आहे.
Anil Deshmukh : मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय ! अनिल देशमुखांशी संबंधित वकिलाविरुद्धचा ‘तो’खटला रद्द
माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्याशी संबंधित नागपूर येथील वकिलाविरुद्ध अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दाखल केलेला मनी लाँड्रिंगचा खटला मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केला आहे. न्यायाधीश अश्विन भोबे यांच्या एकल खंडपीठाने सोमवारी हा आदेश दिला.
गोंदिया-जबलपूर मार्ग दुहेरीकरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मंजुरी
महाराष्ट्रासह चार राज्यात मल्टी-ट्रॅकिंग प्रकल्पनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीने आज रेल्वे मंत्रालयाच्या सुमारे नऊ हजार ७२ कोटी रुपयांच्या तीन महत्त्वाच्या रेल्वे मार्गवाढीच्या प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. या प्रकल्पांमध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रातील गोंदिया – जबलपूर मार्ग दुहेरीकरणाचा समावेश आहे.महाराष्ट्र, मध्य प्रदेश, बिहार आणि झारखंड या चार राज्यांतील आठ जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्पांमुळे भारतीय रेल्वेच्या विद्यमान जाळ्यात सुमारे ३०७ कि.मी.ची भर पडणार आहे. यामध्ये गोंदिया-जबलपूर दुहेरीकरणासोबतच पुनारख-किऊल आणि गम्हरिया-चांडिल या मार्गांच्या तिसऱ्या आणि चौथ्या लाईनच्या कामांचा समावेश आहे.या प्रस्तावित मल्टी-ट्रॅकिंग प्रकल्पामुळे सुमारे ५ हजार ४०७ गावे आणि जवळपास ९८ लाख लोकांचा रेल्वे संपर्क अधिक सुधारेल. रेल्वे मार्गांची वाढलेली क्षमता वाहतूक व्यवस्थेत लक्षणीय सुधारणा घडवून आणेल, ज्यामुळे भारतीय रेल्वेची कार्यक्षमता आणि सेवा विश्वसनीयता वाढेल. या निर्णयामुळे रेल्वे संचालन अधिक सुलभ होईल आणि प्रवासी तसेच मालवाहतुकीतील गर्दी कमी होण्यास मोठी मदत होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘नवीन भारत’ दृष्टिकोनानुसार हे प्रकल्प प्रादेशिक सर्वांगीण विकास साधण्यावर भर देतात, ज्यातून स्थानिक स्तरावर रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी वाढून नागरिक आत्मनिर्भर बनतील.‘प्रधानमंत्री गति शक्ती’ राष्ट्रीय मास्टर प्लॅन अंतर्गत तयार करण्यात आलेल्या या प्रकल्पांचा मुख्य उद्देश एकात्मिक नियोजन आणि विविध घटकांच्या सल्लामसलतीद्वारे बहुमार्गीय संपर्क (Multimodal Connectivity) आणि वाहतूक कार्यक्षमता वाढवणे हा आहे. यामुळे लोक, वस्तू आणि सेवांची अखंडित वाहतूक सुनिश्चित होईल. या क्षमता वाढीमुळे देशातील अनेक महत्त्वाच्या पर्यटन स्थळांपर्यंत रेल्वे संपर्क सुधारेल, ज्यात जबलपूरचे कचनार शिव मंदिर, बालाघाटमधील कान्हा राष्ट्रीय उद्यान, पेंच राष्ट्रीय उद्यान, धुआंधार धबधबा आणि दलमा वन्यजीव अभयारण्य यांसारख्या प्रसिद्ध स्थळांचा समावेश आहे.हे प्रकल्प कोळसा, पोलाद, लोखंड खनिज, सिमेंट, अन्नधान्य आणि खते यांसारख्या अत्यावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी महत्त्वाचे मार्ग उपलब्ध करून देतील. या रेल्वेमार्गांच्या विस्तारामुळे दरवर्षी ५२ दशलक्ष टन (MTPA) अतिरिक्त मालवाहतूक शक्य होईल. रेल्वे हा पर्यावरणपूरक आणि ऊर्जा-कार्यक्षम पर्याय असल्याने, हे प्रकल्प देशाच्या हवामान उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी सहायक ठरतील. यामुळे तेल आयातीत सुमारे ६ कोटी लिटरची बचत होईल आणि ३० कोटी किलोग्रॅम कार्बन उत्सर्जन घटणार आहे, जे सुमारे 1कोटी वृक्ष लागवडीइतके परिणामकारक ठरेल.
अल्लू अर्जुन आणि दीपिका पदुकोण स्टारर ‘AA22xA6’मध्ये नवी जोडी ठरली चर्चेचा विषय
मुंबई : भारतीय सिनेमात पहिल्यांदाच असा काहीतरी मोठा धमाका घडणार आहे, जो खऱ्या अर्थाने भव्य ठरणार आहे. दीपिका पदुकोण आणि अल्लू अर्जुन प्रथमच एकत्र झळकणार असून या ग्रँड चित्रपटाचे दिग्दर्शन Atlee करत आहेत. केवळ घोषणा व्हिडिओवरूनच स्पष्ट होते की हा साधा चित्रपट नसून एक मोठा सिनेमॅटिक इव्हेंट ठरणार आहे.पहिला व्हिडिओ पूर्णपणे अल्लू अर्जुनवर केंद्रित आहे. त्यांना अत्यंत दमदार आणि ‘लार्जर-दॅन-लाईफ’ शैलीत सादर करण्यात आले आहे. तीक्ष्ण सिलुएट्स, फिरणारा कॅमेरा आणि कानठळ्या बसवणारा पार्श्वसंगीत त्यांच्या स्क्रीन ऑराला अधिक प्रभावी बनवतो. प्रत्येक दृश्य त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील करिष्मा अधोरेखित करण्यासाठीच डिझाइन केलेले आहे. त्यांच्यातील तीच ऊर्जा, जोश आणि स्वॅग स्पष्टपणे जाणवतो. चित्रपटाचा स्केल आणि टोन पूर्णपणे एपिक भासतो, जो प्रभावी आणि दीर्घकाळ लक्षात राहणाऱ्या भूमिकेची चाहूल देतो.दुसऱ्या व्हिडिओमध्ये दीपिका पदुकोण यांची एंट्री तितकीच प्रभावी आहे. भव्य आणि उच्च दर्जाच्या प्रॉडक्शन व्हिज्युअल्समध्ये त्या पूर्ण आत्मविश्वास आणि ताकदीने फ्रेममध्ये प्रवेश करतात, ज्यातून चित्रपटाची जागतिक दृष्टी स्पष्ट होते. कॉस्च्युमपासून अॅक्शनपर्यंत प्रत्येक तपशील त्यांच्या भूमिकेतील सामर्थ्य आणि सौंदर्याचा संगम दाखवतो. त्यांच्या नजरेत एक गूढता आहे, त्यांच्या देहबोलीत अधिकार आहे आणि त्यांच्या शांततेत एक बहुपर्यायी, स्तरित कथानकाची झलक दिसते. ग्रीन स्क्रीनसमोर उभे राहणेही येथे एक मोठे विधान ठरते.या जोडीला खास बनवणारी गोष्ट म्हणजे त्यांच्या शैलीतील विरोधाभास. अल्लू अर्जुन त्यांच्या प्रचंड चार्म आणि ऊर्जेसाठी ओळखले जातात, तर दीपिका पदुकोण आपल्या गंभीरता, परिपक्वता आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्क्रीन प्रेझेन्ससाठी प्रसिद्ध आहेत. मोठ्या प्रमाणावर भावनांनी भरलेल्या ब्लॉकबस्टर चित्रपटांसाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक अॅटली यांच्या दिग्दर्शनाखाली हे सहकार्य बॉक्स ऑफिसवरील सर्व विक्रम मोडू शकते, असे दिसते.दोन पॅन-इंडिया सुपरस्टार्स आणि दूरदृष्टी असलेला दिग्दर्शक यांची ही साथ खरोखरच ऐतिहासिक ठरू शकते. घोषणा व्हिडिओंवरून असे जाणवते की हा चित्रपट केवळ दोन मोठ्या कलाकारांना एकत्र आणत नाही, तर भारतीय सिनेमाचा एक नवा अध्याय सुरू करण्याची क्षमता ठेवतो. सध्या हा देशातील सर्वात मोठा प्रकल्प निर्मितीच्या टप्प्यात असून प्रेक्षक त्याच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
महाराष्ट्र हादरला..! जावयाने भरशेतात सासऱ्याचा गळा चिरला; स्वतःवरही केले वार
Solapur Murder Case : सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील इंगळगी गावात जावयाने सासऱ्याची धारदार शस्त्राने हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Lawrence Bishnoi Gang : महाराष्ट्रातील काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांना लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने १० कोटींची खंडणी आणि जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
शाळांमध्ये झळकणार सरकारी योजनांचे फलक; शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश
मुंबई : मुंबई विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या अनेक योजना असून त्यांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. यासाठी सर्व शाळांमध्ये प्रमुख पाच ते सहा योजनांची ठळक माहिती देणारे फलक प्रदर्शित केले जावे, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिले.शालेय शिक्षण विभागाच्या विविध योजनांबाबत आढावा बैठक मंत्रालयात झाली. यावेळी मंत्री श्री.भुसे बोलत होते. बैठकीला शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीतसिंग देओल, शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार बेडसे, शिक्षण संचालक ( एनसीईआरटी) हेमंत वसेकर, शिक्षण संचालक (माध्यमिक) महेश पालकर, शिक्षण संचालक (प्राथमिक) शरद गोसावी, उपसचिव तुषार महाजन व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.मंत्री दादाजी भुसे म्हणाले, विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या वतीने अनेक योजना राबविल्या जातात. या योजनांची माहिती बऱ्याच वेळेला विद्यार्थ्यांना व पालकांना नसते. या योजनांपासून विद्यार्थी वंचित राहू नये म्हणून प्रयत्न केले जावे. प्रमुख योजनांची माहिती ठळक स्वरूपात तीन बाय चार आकाराच्या फलकाद्वारे प्रत्येक शाळेमध्ये दर्शनी जागी लावली जावी.ते म्हणाले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेतून अनाथ विद्यार्थ्यांसह, तसेच ज्याचे दोन्ही पालक अपंग आहेत असे विद्यार्थी, पॉक्सो कायदा अंतर्गत नुसार पिडित विद्यार्थी आदींना शिक्षणासाठी दरमहा २०२५ रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने यासाठी नियुक्त संस्थांनी अशा बालकांचा शोध घेऊन त्यांची परिपूर्ण माहिती द्यावी. जिल्हा न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली समिती कडून यासाठी कार्यवाही केली जाते. एकल पालक असलेल्या विद्यार्थ्यांसाठी कोरोना कालावधी सुरू केलेली योजना आता नियमित स्वरूपात सुरू आहे असे शालेय शिक्षण मंत्री यांनी म्हटले.राज्यातील सर्व अनुदान व विनाअनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक नोंदणी आणि प्रमाणीकरण होणे गरजेचे आहे. एकूण २१५३४१९९ विद्यार्थ्यांपैकी १०४५१२५ विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण होणे बाकी असून त्या साठी कार्यवाही केली जावी अशा सूचना शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिल्या. यावेळी शालेय शिक्षण विभागाच्या संबंधित विविध बाबींची माहिती सादरीकरणाद्वारे देण्यात आली.
ऐन रिलीजच्या तोंडावर केरळ स्टोरी २ सिनेमात सेन्सॉर बोर्डाने सुनावले चक्क १६ बदल
मुंबई : लव्ह जिहाद या मुद्द्यावर आधारित असलेला केरळ स्टोरी या सिनेमाचा दुसरा भाग येत्या शुक्रवारी २७ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. ऐन प्रदर्शनाच्या तयारीत असताना सेन्सॉर बोर्डाने चक्क १६ बदल आणि कट्स सुचवले आहेत.लव्ह जिहाद या विषयावरच्या चित्रपटात बऱ्याच वेळा मुलींना मारहाण, अश्लील कृत्ये, चुंबन यांसारखे दृश्ये दाखवलेली असतात. जी सेन्सॉर बोर्डाच्या मर्यादा ओलांडतात आणि ते भाग सेन्सॉर बोर्ड चित्रपटातून काढून टाकण्याचा किंवा कट् करण्याचा आदेश देतात. असेच काही सीन्स केरला स्टोरी २ या सिनेमात असल्याने बोर्डाने चक्क १६ कट्स सुचवले आहेत. सीन्स जितके वगळता येतील तितके कमी करण्याचे आदेश दिले आहेत.बोर्डाच्या आदेशामुळे या सिनेमातील चुंबन सीन्स ५० टक्क्यांनी कमी करण्यात आले आहेत. बलात्काराची दृश्ये सुद्धा ५० टक्क्यांनी कमी करण्यात आले आहेत, तसेच काही मारहाणीच्या सीन्स मधेही कट्स केले आहेत. काही डायलॉग्स बदलेले गेलेत तर काही शब्दांना म्यूट करण्यात आलंय. तसेच डिस्लेमार स्क्रीन टाइम आणि त्यासोबत व्हॉइस ओव्हर सुद्धा २ मिनिटांनी वाढवण्यास सांगितलं आहे. निर्मात्यांना डायलॉगच्या होशोबाने स्क्रिप्ट जमा करण्याचे आणि चित्रपटात दाखवलेल्या काही सत्य घटनांची योग्य कागदपत्रे जमा करण्याचे आदेश दिले आहेत.विपुल शाहांची निर्मिती आणि कामाख्या नारायण सिंह यांनी दिग्दर्शन केलं आहे. तसेच यामध्ये उल्का गुप्ता, आदिती भाटिया आणि ऐश्वर्या ओझा यांच्या मुख्य भूमिका आहेत. येत्या २७ जानेवारी रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
Rajesh Pande BJP : भाजपा प्रदेश सरचिटणीसपदी राजेश पांडे यांची नियुक्ती
Rajesh Pande BJP : पुण्याचे ज्येष्ठ भाजप नेते राजेश पांडे यांची भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी फेरनिवड करण्यात आली आहे.
Hind di Chadar: 'हिंद-दि चादर' कार्यक्रमास जाणाऱ्या भाविकांसाठी पुणे महानगरपालिका व पिपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून वाहनांची व्यवस्था
राज्य सरकार आणि नागरी प्रशासनाने मुंबईतील वायू प्रदूषणाविरुद्ध कारवाई तीव्र केली आहे. पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल शहरातील १,००० हून अधिक बांधकाम स्थळांना काम थांबवण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत, अशी माहीती राज्यमंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी विधानसभेत दिली आहे.
Platinum rate today: सोन्याच्या तुलनेत प्लॅटिनमकडे कल वाढला; जाणून घ्या आजचा दर
Platinum rate today: प्लॅटिनम दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर सध्याचा दर अनुकूल असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. मात्र खरेदीपूर्वी स्थानिक ज्वेलर्सकडून अद्ययावत दर जाणून घेणे योग्य ठरेल, कारण दागिन्यांवरील घडणावळ आणि करांमुळे किंमत वेगळी असू शकते.
मुंबईत दोन दिवसांची इसेक्टॉन २०२६ परिषद
मुंबई : भारतभरातील संजीवन शास्त्रज्ञ (परफ्यूजन शास्त्र) क्षेत्रातील तज्ञ, संशोधक आणि विद्यार्थी यांना एकत्र आणणारी प्रतिष्ठित परिषद ISECTCON 2026 यंदा Mumbai येथे दिनांक २७–२८ फेब्रुवारी २०२६ रोजी Hotel Aurika Mumbai Skycity येथे सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत आयोजित करण्यात येत आहे. ही परिषद Indian Society of Extra Corporeal Technology (ISECT) तर्फे आयोजित केली जात असून आधुनिक परफ्यूजन सायन्स आणि रुग्णसेवा सुधारणा यांवर सखोल चर्चा होणार आहे. या भव्य परिषदेचे उद्घाटन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.परिषदेमध्ये देशभरातील नामांकित तज्ञ, आंतरराष्ट्रीय वक्ते, वैज्ञानिक सत्रे, ई-पोस्टर सादरीकरण, उद्योग प्रदर्शन तसेच विद्यार्थ्यांसाठी विशेष शैक्षणिक उपक्रमांचा समावेश असेल.कोविड-१९ च्या कठीण काळात आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण निर्माण झाला असताना संजीवन शास्त्रज्ञ आणि संबंधित आरोग्य कर्मचाऱ्यांनी जीवनरक्षक भूमिका बजावली. अतिदक्षता विभागातील गंभीर रुग्णांना कृत्रिम श्वसन, रक्ताभिसरण सहाय्य आणि प्रगत तंत्रज्ञानाच्या मदतीने स्थिर ठेवण्यासाठी त्यांनी अखंड परिश्रम घेतले. अत्यंत जोखमीच्या परिस्थितीतही रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी केलेले त्यांचे योगदान आरोग्यसेवेतील समर्पण, कौशल्य आणि मानवी मूल्यांचे प्रेरणादायी उदाहरण ठरले. लहान मुलांमधील जन्मजात हृदयविकार तसेच हृदय प्रत्यारोपणासारख्या गुंतागुंतीच्या उपचार प्रक्रियांमध्येही त्यांच्या अचूक कौशल्यामुळे अनेक रुग्णांना नवजीवन मिळत आहे.परफ्यूजन विज्ञानातील नव्या संशोधनांना चालना देणे, आरोग्यसेवेची गुणवत्ता उंचावणे आणि तज्ञांमधील ज्ञानविनिमय वाढवणे हा या परिषदेचा प्रमुख उद्देश आहे.या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन रवींद्र शिवाजी सावर्डेकर (ऑर्गनायझिंग सेक्रेटरी), राजेंद्र कोकणे (अध्यक्ष), जगन्नाथ कालुगडे (उपाध्यक्ष), विकास माळी (चेअरमन), योगेश लुडबे (कोषाध्यक्ष), शशिकांत मेमाणे (सहसचिव) आणि रफिक शेख यांच्या नेतृत्वाखाली होत असून देशभरातील तज्ञ, संशोधक आणि विद्यार्थ्यांसाठी ISECTCON 2026 ज्ञान, नवोपक्रम आणि व्यावसायिक सहकार्याचा एक महत्त्वपूर्ण मंच ठरणार आहे.
जन्म आणि मृत्यु प्रमाणपत्रांच्या अनियमिततेच्या संदर्भात गेल्या आठवड्यात अमरावती महानगरपालिकेत (Amravati Municipal Corporation) भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीवर काँग्रेसने तीव्र आक्षेप घेत महानगरपालिका आयुक्तांकडून स्पष्टीकरण मागितले आहे.
Maratha Reservation : मराठा आरक्षणांतर्गत हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याच्या प्रक्रियेत मोठी दिरंगाई समोर आली आहे.
लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! जानेवारी महिन्याचा हप्ता खात्यात जमा होण्यास सुरुवात
मुंबई: 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या लाभार्थी महिलांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. जानेवारी महिन्याचा निधी वितरणाची प्रक्रिया मंगळवारपासून अधिकृतपणे सुरू झाली असून, लवकरच पात्र महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सोशल मीडियाद्वारे ही महत्त्वाची माहिती दिली.मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : जानेवारी महिन्याच्या सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू !मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना जानेवारी महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया २३ फेब्रुवारी पासून सुरू करण्यात आली आहे. पुढील २-३… pic.twitter.com/mycGTG3Bk0— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) February 24, 2026२३ फेब्रुवारीपासून निधी वितरणाची तांत्रिक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पुढील २ ते ३ दिवसांत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या बँक खात्यात सन्मान निधी जमा होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना यशस्वीपणे सुरू असल्याचे तटकरे यांनी नमूद केले.महायुती सरकारचा दृढ निश्चय आणि महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा विश्वास या बळावर या योजनेची दमदार वाटचाल अशीच सुरू राहणार, असा विश्वास मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केला आहे.
विधिमंडळाच्या गतिमान (?) कारभाराविषयी मुनगंटीवारांनी सांगितला भन्नाट किस्सा
फडणवीसांनी आमदार असताना मांडलेल्या कपात सूचनेचे उत्तर मिळाले उपमुख्यमंत्री झाल्यानंतर - विधिमंडळ कामकाजातील दिरंगाईबाबत नाराजी; लवकरच डिजिटलायझेशन करण्याचा विधानसभा अध्यक्षांचा शब्दमुंबई : 'सरकारी काम आणि सहा महिने थांब', अशी एक म्हण महाराष्ट्रात प्रचलित आहे. सर्वसामान्य नागरिकांना दररोज त्याचा प्रत्यय येत असतो. परंतु, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाच सरकारी बाबुंच्या कामचुकारपणाचा फटका बसल्याचे समोर आले आहे. देवेंद्र फडणवीस हे आमदार असताना मांडलेल्या कपात सूचनेचे उत्तर मिळाले ते उपमुख्यमंत्री झाल्यानंतर म्हणजे २०२२ नंतर मिळाले. विशेष म्हणजे त्याआधी त्यांनी पाच वर्षे मुख्यमंत्रीपद भूषवले होते.विधानसभेतील कामकाजाच्या दिरंगाईबाबत भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी प्रश्न उपस्थित केला. कामचुकार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी सभागृहात केली. मुनगंटीवार यांच्या मागणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सहमती दर्शवत विधिमंडळाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली. याबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दखल घेत लवकरच विधानमंडळाचे कामकाज डिजिटायलेजशन होत असल्याची माहिती सभागृहाला दिली.मुनगंटीवार म्हणाले की, कामकाजाचा दर्जा सुधारावा, गुणात्मक बदल व्हावा यासाठी मुख्यमंत्री असो किंवा विधानसभा अध्यक्ष, हे वेळोवेळी निर्देश देत असतात. पुरवणी मागण्या मांडल्यानतर कपात सूचनेचे उत्तर ३० दिवसांमध्ये मिळावे, हा सदस्यांचा अधिकार आहे. मागच्याही अधिवेशनात लक्षवेधीची उत्तरे मिळाली नाहीत. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी सुमोटो घेत मुख्य सचिवांवर हक्कभंग आणण्याची घोषणा केली होती. दि. १६ मार्च २०२२ रोजी मी कपात सूचना मांडली, त्याचे उत्तर १८ फेब्रुवारी २०२६ रोजी आले. या काळात एक विधानसभा बदलली. जर सरकारी कर्मचाऱ्यांच्या मनात विधानसभेत होणाऱ्या कामकाजाबाबत गंभीरता नसेल, कामकाजाबाबत त्यांच्या मनात कुठलीही भीती नसेल, तर या कामकाजाचा गुणात्मक दर्जा बदल घडवण्यासाठी तुम्ही जे काम करताय त्याला काहीही उपयोग नाही, असे मुनगंटीवार विधानसभा अध्यक्षांना उद्देशून म्हणाले.'चिऊ ताई, चिऊ ताई दार उघड', कापूस कोंड्यासारखी आणि अकबर बिरबलाच्या खिचडीसारखी ही कथा आहे. आपण दुसरे तरूण अध्यक्ष आहात. तुमच्या कार्यकाळात गुणात्मक दर्जा राखायचा असेल, तर तुम्हाला समोरील चांदीच्या दंडाचा उपयोग करावाच लागेल. ४ वर्षांनी कपात सूचनेचे उत्तर येते. अजूनही लक्षवेधीची उत्तरे आली नाहीत. मग आपल्याला कमीत कमी अशा कामचुकार कर्मचाऱ्यांसाठी 'ठोको विधेयक २०२६' संमत करावे लागेल. कपात सूचनेच्या उत्तराबाबत आपण चौकशी करून २ दिवसांत अहवाल मागवावा आणि संबंधिताला निलंबित करावे, अशी मागणी मुनगंटीवार यांनी केली.काय म्हणाले मुख्यमंत्री?त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी सुधीरभाऊंच्या मताशी सहमत आहे. ते नशिबबान आहेत की त्यांना ४ वर्षांत उत्तर मिळाले. मी आमदार असताना एक सूचना मांडली होती, त्याचे उत्तर मी जेव्हा उपमुख्यमंत्री झालो तेव्हा माझ्याकडे आले. त्यामुळे यात काहीतरी ऑडिट सिस्टम केली पाहिजे. वेगवेगळी आयुधे, आश्वासने कोणकोणत्या विभागांकडे प्रलंबित आहेत, त्याची वेळोवेळी माहिती घेणे, त्या त्या मंत्र्यांकडे माहिती जाणे, आवश्यक आहे. अधिवेशन नसलेल्या काळात विधान मंडळाचे हेच काम आहे. अधिवेशनाव्यतिरिक्त विधान मंडळाकडे काही काम नाही. त्यामुळे अधिवेशन नसताना विधान मंडळाने या विधानसभेत झालेल्या कामकाजाची मांडणी करणे, त्याचा पाठपुरावा करणे आणि कमिट्यांनी त्याबाबत पूर्ण कार्यवाही करणे, आवश्यक आहे. त्यामुळे या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून, या सर्व गोष्टी ट्रॅकिंग करण्याचा आपण विचार करावा, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केली.
मुंबई : युवा पिढीसमोर अंमली पदार्थांचे मोठे आव्हान आहे. या प्रश्नाबाबत राज्य सरकारची भूमिका अत्यंत कठोर आहे. त्यामुळेच अशा गुन्ह्यातील आरोपींना मकोका कायदा लावण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे. त्यातच गुन्हेगारांची मालमत्ता जप्त करण्याची तरतूद असून, त्यानुसार कारवाई करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत दिली.अंमली पदार्थांच्या विरोधात पोलिसांनी केलेली कारवाई आणि अंमली पदार्थांचा जप्त केलेला साठा यासंदर्भात अमिन पटेल, वरूण सरदेसाई, अस्लम शेख आदी आमदारांनी प्रश्न उपस्थित केले. यावेळी झालेल्या चर्चेला उत्तर देताना राज्यमंत्री योगेश कदम म्हणाले की अंमली पदार्थांच्या संदर्भात राज्य सरकारची भूमिका अत्यंत कठोर आहे. त्यामुळेच अशा गुन्ह्यात पोलीस अधिकाऱ्यांचा सहभाग आढळून आल्यास थेट बडतर्फीच्या कारवाईचा निर्णय करण्यात आला आहे. त्यानुसार आतापर्यंत १५ पोलिस अधिकाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली असून दहाजणांना निलंबित करण्यात आले आहे.कुरिअर कंपनीवरही नजर अंमली पदार्थांच्या विक्रीसाठी वेगवेगळे मार्ग शोधले जात आहेत. इन्स्टाग्रामसारख्या अॅपचा 'मार्केट प्लेस' म्हणून वापर केला जात आहे. तसेच कुरिअर कंपन्यांचाही वापर केला जातो. कुरिअरद्वारे अंमली पदार्थ पाठवले जात असल्याचे आढळून आले आहे. अशा कुरिअरवर कारवाई केली जात आहे. त्यांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे. मोठ्या रकमेचा साठा जप्त करण्यात आल्याच्या घटना समोर येत आहेत. कारण, अगदी छोट्या ठिकाणी कोणताही कारखाना वगैरे नसले तरी मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ तयार करणे शक्य झाले आहे. त्यामुळे अंमली पदार्थ तयार करण्यासाठी जी सामग्री किंवा रसायने लागतात त्या परवानाधारक पुरवठादारांवरही नजर ठेवली जात आहे. अंमली पदार्थांच्या प्रत्येक घटनेत पुढची आणि मागची साखळी उघड करण्याची सरकारची भूमिका आहे. त्यामुळेच मोठ्या प्रमाणावर परराज्यातून गुन्हेगार ताब्यात घेतले. एका प्रकरणात तर परदेशातून गुन्हेगाराला पकडून आणले. अशा प्रकरणात कुठलीही तडजोड केली जाणार नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
राज्यात वर्षभरात दीड हजार ड्रग्ज तस्करांना बेड्या
मुंबई : राज्यात अमली पदार्थांच्या तस्करीचे जाळे दिवसेंदिवस अधिक विस्तारत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. गेल्या वर्षभरात (२०२५) राज्यात अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या १ हजार ४५४ जणांना अटक करण्यात आली असून, एकूण १५ हजार ४०८ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राज्याच्या गृहविभागाने मंगळवारी विधानसभेत एका तारांकित प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरातून ही आकडेवारी समोर आली आहे.राज्यात अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांचे प्रमाण चिंताजनक असून, २०२५ मध्ये अशा १३ हजार ९५४ व्यक्तींवर गुन्हे नोंदवण्यात आले. याची सरासरी पाहिल्यास राज्यात दर महिन्याला अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या १ हजार १६२ जणांना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, अमली पदार्थांच्या सेवनाप्रकरणी गुन्हे दाखल झालेल्या १३ हजार ९५४ व्यक्तींपैकी ३ हजार २६८ जण अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.वर्षभरात अमली पदार्थांच्या वाहतुकीवरही मोठी कारवाई करण्यात आली आहे. तस्करी आणि वाहतूक केल्याप्रकरणी ३ हजार ६५९ गुन्हे दाखल झाले असून, त्यात ५ हजार ३०७ आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. या संपूर्ण कारवायांमध्ये राज्यात तब्बल १ हजार ३४० कोटी ४१ लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.मुंबई 'ड्रग हब' होण्याच्या मार्गावर?राज्याची राजधानी मुंबई अमली पदार्थांचे केंद्र (हब) बनत असल्याचे चित्र या आकडेवारीवरून दिसत आहे. १ जानेवारी ते ११ फेब्रुवारी २०२६ या अवघ्या ४२ दिवसांच्या कालावधीत मुंबईत तस्करीचे ९३ गुन्हे दाखल झाले आहेत. याप्रकरणी ११२ जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून ७ कोटी ९३ लाख रुपयांचे अमली पदार्थ हस्तगत करण्यात आले आहेत.राज्यातील स्थिती (वर्ष २०२५)- एकूण गुन्हे दाखल : १५,४०८- अमली पदार्थ तस्करी (अटक) : १,४५४- अमली पदार्थ सेवन (गुन्हे) : १३,९५४- जप्त मुद्देमाल : १,३४० कोटी ४१ लाख रुपये- फरार आरोपी (सेवन प्रकरणी) : ३,२६८
Gulab Chand Kataria : पाकचा पंजाबला अस्थिर करण्याचा कट; राज्यपाल गुलाबचंद कटारिया यांचा गंभीर आरोप
पंजाबचे राज्यपाल गुलाबचंद कटारिया (Gulab Chand Kataria) यांनी मंगळवारी एका गंभीर आरोपाद्वारे खळबळ उडवून दिली आहे. सीमेपलीकडून पंजाबमध्ये ड्रोनद्वारे होणारी अमली पदार्थ आणि शस्त्रास्त्रांची तस्करी केवळ पाकिस्तानचे काम नसून, यामध्ये मोठ्या परकीय शक्तींचा सहभाग असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
मुंबई : राज्यातील अकृषी विद्यापीठे आणि संलग्नित महाविद्यालयांतील प्राध्यापकांच्या करिअर ॲडव्हान्समेंट स्कीम (CAS) संदर्भात राज्य सरकार सकारात्मक आहे. मात्र, हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असल्याने न्यायालयाचा अंतिम निर्णय आल्यानंतरच याबाबत पुढील कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानपरिषदेत दिली.नेमका विषय काय?प्राध्यापकांच्या करिअर ॲडव्हान्समेंट स्कीम (CAS) लाभांवरून सध्या जो पेच निर्माण झाला आहे, त्यामागे दोन महत्त्वाच्या संस्थांच्या नियमांमधील तफावत हे मुख्य कारण आहे. विधानपरिषदेत जयंत आसगावकर यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी हा तांत्रिक तिढा सविस्तरपणे मांडला.यूजीसीने १८ जुलै २०१८ रोजी घेतलेल्या निर्णयानुसार, प्राध्यापकांच्या हिताचा विचार करून एक स्पष्ट मार्गदर्शक तत्त्व मांडले आहे. त्यानुसार, एखादा प्राध्यापक ज्या तारखेला पदोन्नतीसाठी किंवा ठराविक ग्रेड पेसाठी आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता आणि निकष पूर्ण करतो, त्याच 'पात्रता दिनांकापासून' (Date of Eligibility) त्याला आर्थिक लाभ मिळणे अपेक्षित आहे. प्राध्यापकांच्या सेवा ज्येष्ठतेसाठी आणि आर्थिक फायद्यासाठी हा नियम अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.दुसरीकडे, महाराष्ट्र राज्याच्या अर्थ विभागाने या लाभांबाबत वेगळी भूमिका घेतली आहे. अर्थ विभागाच्या मते, केवळ पात्र असणे पुरेसे नाही, तर निवड समितीची (Selection Committee) मुलाखत होऊन ज्या दिवशी अंतिम नियुक्तीचा किंवा पदोन्नतीचा निर्णय होतो (Date of Approval), त्या दिवसापासून हे लाभ लागू करावेत. यामुळे प्राध्यापकांना त्यांच्या पात्रतेचा दिनांक आणि प्रत्यक्ष निर्णयाचा दिनांक यामधील मधल्या काळातील आर्थिक लाभाला (Arrears) मुकावे लागते. या दोन परस्परविरोधी नियमांमुळे प्राध्यापक वर्गात मोठ्या प्रमाणावर असंतोष निर्माण झाला आहे. यूजीसीचे नियम डावलून अर्थ विभागाच्या अटी लागू केल्यामुळे प्राध्यापकांनी या अन्यायाविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. सध्या हे संपूर्ण प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने, सरकारची इच्छा असूनही न्यायालयाच्या अंतिम निकालाशिवाय कोणतीही ठोस कार्यवाही करणे शक्य नसल्याचे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे. आता न्यायालयाचा निकाल कोणाच्या बाजूने लागतो, यावर राज्यातील हजारो प्राध्यापकांचे आर्थिक भविष्य अवलंबून आहे.समितीची शिफारस का नाकारली?प्राध्यापकांना थेट पदोन्नतीची संधी नसते, त्यामुळे ठराविक शैक्षणिक पात्रता पूर्ण केल्यानंतर त्यांना 'कॅस' (CAS) नुसार वेतनवाढ दिली जाते. १० मे २०१९ च्या शासन शुद्धिपत्रकानुसार घेतलेल्या निर्णयामुळे संबंधित समितीची शिफारस अमान्य करण्यात आली असल्याचेही मंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.मुख्यमंत्र्यांसोबत तातडीची बैठक घेणारया विषयावर तोडगा काढण्यासाठी सदस्य विक्रम काळे, शशिकांत शिंदे आणि अनिल परब यांनी उपप्रश्न उपस्थित करत आक्रमक पवित्रा घेतला. त्यावर उत्तर देताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, प्राध्यापकांचे निवेदन प्राप्त झाले असून, सुरू असलेल्या अधिवेशन काळातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विनंती करून या विषयावर लवकरात लवकर बैठक आयोजित केली जाईल. या निर्णयामुळे राज्यातील हजारो प्राध्यापकांचे लक्ष आता न्यायालयाच्या निकालाकडे आणि सरकारसोबत होणाऱ्या आगामी बैठकीकडे लागले आहे.
बारामती (Baramati News) महिला रुग्णालयाने एप्रिल २०२५ ते जानेवारी २०२६ या कालावधीमध्ये नैसर्गिक प्रसूती २ हजार २१४,सिझेरीयन प्रसुती २ हजार २३९ अशा एकूण ४ हजार ४५३ प्रसूती करुन ग्रामीण भागातील महिलांना दिलासा आहे.
एकनाथ शिंदेचा खासदार अडचणीत? समृद्धी महामार्गात 1,150 कोटींचा घोटाळा? गंभीर आरोपाने खळबळ
Samruddhi Mahamarg Scam : समृद्धी महामार्गावरील जटवाडा येथील जमिनीवरून अंबादास दानवे यांनी खासदार संदीपान भुमरे यांच्यावर १,१५० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे.
Stock Market Crash: सेन्सेक्स 1068 अंकांनी घसरला, शेअर बाजार का कोसळला? जाणून घ्या 5 प्रमुख कारणे
Stock Market Crash: बीएसईवर आज एकूण ४,३६७ समभागांचे व्यवहार झाले, त्यापैकी १,४२२ समभाग तेजीत, तर २,८०२ समभाग घसरणीत बंद झाले. १४३ समभाग स्थिर राहिले. ९१ समभागांनी नवा ५२ आठवड्यांचा उच्चांक, तर ३५७ समभागांनी नवा ५२ आठवड्यांचा नीचांक गाठला.
Rajya Sabha Election : मविआकडून राज्यसभेवर कुणाची लागणार वर्णी? शरद पवार कि आणखी कोण?
निवडणूक आयोगाकडून राज्यसभेच्या 37 जागांसाठी निवडणुकीची (Rajya Sabha Election) घोषणा करण्यात आली आहे. 37 पैकी 7 जागा महाराष्ट्रातील आहेत. त्यामुळे या जागांवर कुणाची वर्णी लागणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
अमेरिकेत जोरदार बर्फवृष्टी; ५,६०० हून अधिक उड्डाणे रद्द आणि शाळा बंद
वॉशिंग्टन : अमेरिकेच्या ईशान्य भागात एका शक्तिशाली हिमवादळाने प्रचंड कहर माजवला आहे. मेरीलँडपासून मेनपर्यंतचे विस्तीर्ण भाग जाड बर्फाच्या चादरीखाली झाकले गेले आहेत. या भीषण हवामानामुळे शनिवार ते मंगळवारदरम्यान १०,००० हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. केवळ सोमवारीच ५,००० पेक्षा जास्त उड्डाणे रद्द झाली, तर मंगळवारसाठी १,३०० हून अधिक उड्डाणे आधीच रद्द करण्यात आली असून हजारो प्रवासी अडकले आहेत. न्यूयॉर्कमधील जॉन एफ. केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळ, लागार्डिया विमानतळ आणि बोस्टनमधील लोगान आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वाधिक प्रभावित झाले आहेत.हवामान तज्ज्ञांनी याला अनेक दशकातील सर्वात शक्तिशाली वादळ म्हटले असून याला ‘बॉम्ब चक्रवात’ असे संबोधले जात आहे. ‘बॉम्ब चक्रवात’ म्हणजे २४ तासांच्या कालावधीत वादळाचा हवेचा दाब झपाट्याने ठरावीक प्रमाणात कमी होणे. हा प्रकार प्रामुख्याने शरद ऋतू आणि हिवाळ्यात घडतो, जेव्हा आर्क्टिकमधील थंड, बर्फाळ हवा दक्षिणेकडील उष्ण हवेच्या संपर्कात येते. अनेक भागांत दोन फूट (६० सेंटीमीटर) पेक्षा अधिक हिमवर्षाव झाला आहे. रोड आयलंड राज्यातील वारविक येथे तर तीन फूटांहून अधिक बर्फ साचला आहे.जोरदार वारे आणि मुसळधार हिमवर्षावामुळे न्यूयॉर्क, न्यू जर्सी आणि मॅसॅच्युसेट्ससह अनेक राज्यांत आपत्कालीन स्थिती जाहीर करण्यात आली आहे. वादळाचा परिणाम इतका तीव्र आहे की संयुक्त राष्ट्रांना सुरक्षा परिषदेची बैठक पुढे ढकलावी लागली तसेच मुख्यालयही बंद ठेवावे लागले. न्यूयॉर्क शहरात सहा वर्षांनंतर प्रथमच हिमवर्षावामुळे शाळा बंद ठेवण्यात आल्या. मात्र महापौर जोहरान ममदानी यांनी मंगळवारपासून शाळा सुरू करण्याची घोषणा केली असून काही अधिकाऱ्यांनी त्याला विरोध दर्शवला आहे.वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. रेल्वे आणि बस सेवा स्थगित करण्यात आल्या आहेत. रस्त्यांवरील घसरडी स्थिती आणि कमी दृश्यमानतेमुळे प्रवास करणे अत्यंत धोकादायक झाले आहे. प्रशासनाने नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन केले आहे. डोअरडॅशसारख्या वितरण सेवांनीही आपली सेवा थांबवली आहे.वादळामुळे वीजपुरवठ्यावरही मोठा परिणाम झाला आहे. पॉवरआउटेज डॉट यूएसच्या माहितीनुसार, पूर्व किनारपट्टीवर ५,७०,००० हून अधिक घरे आणि व्यावसायिक आस्थापनांमध्ये वीज खंडित झाली आहे. मॅसॅच्युसेट्स आणि न्यू जर्सी येथे परिस्थिती सर्वाधिक गंभीर आहे. जोरदार वाऱ्यांमुळे वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी कर्मचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.दरम्यान, काही नागरिक या हवामानाचा आनंद घेतानाही दिसत आहेत. टाइम्स स्क्वेअर येथे पर्यटक नाचताना दिसले, तर काही जण स्लेजिंगचा आनंद घेत होते. मात्र हवामान खात्याने इशारा दिला आहे की धोका अद्याप टळलेला नाही. आठवड्याच्या शेवटी आणखी एक वादळ येण्याची शक्यता असून परिस्थिती आणखी बिघडू शकते. प्रशासनाने नॅशनल गार्डची तैनाती केली असून मदत आणि बचावकार्य सुरू आहे.
मासळी बाजार तळ मजल्यावरच, नको तळघरात! भाजपा नगरसेविका योगिता कोळी यांची महापालिकेत मांडला ठराव
मुंबई :मुंबई महानगरपालिकेच्या मंडयांचा पुनर्विकास करताना कोळी महिलांना तळघरात जागा उपलब्ध करून दिली जात असून यामुळे कोळी महिला यांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत असून पर्यायाने मासे खरेदीला जाणाऱ्या नागरिकांची गैरसोय होते. त्यामुळे मंडईच्या पुनर्विकासात मासे विक्रीसाठी इमारतीच्या तळमजल्यावरच आवश्यक त्या सर्व सोयीसुविधांनी युक्त अशी बाजारासाठी जागा उपलब्ध करुन देण्यात यावी, जेणेकरुन, कोळी महिलांना मासे विक्री करणे आणि ग्राहकांना खरेदी करणे सोयीचे होईल अशी मागणी भाजप नगरसेविका योगिता कोळी यांनी महापालिकेत केली आहे.भाजप नगरसेविका योगिता कोई यांनी महापालिका सभागृहापुढे ठगावाच्या सूचनेद्वारे मागणी करताना असे म्हटले आहे की, महानगरपालिकेच्या अनेक मंडयांचा पुनर्विकास सुरु असून, या पुनर्विकास प्रक्रियेत मासे विक्री करणाऱ्या कोळी महिलांना त्या मंडयांच्या तळघरामध्ये मासे विक्रीसाठी जागा ठेवण्यात येत असल्याचे निदर्शनास येते. परंतु, तळघरात मासे विक्री करताना कोळी महिला आणि मासे खरेदी करणारे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. प्रामुख्याने वयोवृद्ध कोळी महिलांना मासळीची टोपली आणि संबंधित सामान घेऊन तळघरात उतरणे त्रासदायक ठरते. तसेच, तळघरात पुरेशी खेळती हवा नसल्याने, मासळीचा वास पसरुन दुर्गधी पसरते. त्याचप्रमाणे, तेथे सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसल्याने, वारंवार गटार तुंबून दुर्गंधीयुक्त पाणी जमा होत असते. पावसाळ्यात तर तळघरात पाणी साचण्याचा धोका कायमच असतो.मंडयांच्या तळघरामध्ये मासे विक्रीसाठी आवश्यक त्या स्वच्छतेच्या सुविधांचा नेहमीच अभाव दिसून येतो. परिणामी, नागरिक मंडयांच्या तळघरामध्ये मासे खरेदी करण्यासाठी येण्याचे टाळतात व याचा परिणाम कोळी महिलांच्या उपजीविकेवर होत आहे. त्यामुळेमहानगरपालिकेच्या मंडयांचा पुनर्विकास करताना कोळी महिलांना मासे विक्रीसाठी त्या इमारतीच्या तळमजल्यावरच आवश्यक त्या सर्व सोयीसुविधांनी युक्त अशी बाजार उपलब्ध करून देण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्याच्या दृष्टिकोनातून मार्गदर्शक नियमावली बनवण्यात यावी, असे नमूद केले आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आयसीसी महिला टी२० विश्वचषक २०२६ चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले. ही स्पर्धा १२ जून ते ५ जुलै दरम्यान होणार आहे, ज्यामध्ये एकूण १२ संघ विजेतेपदासाठी स्पर्धा करतील. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा महिला टी२० विश्वचषक असेल. १२ जून रोजी उद्घाटन सामन्यात यजमान इंग्लंड श्रीलंकेशी भिडेल. १३ जून रोजी मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड येथे आयर्लंड आणि स्कॉटलंड यांच्यात ऑल-युरोपियन सामना खेळला जाईल. २० जून रोजी हेडिंग्ले येथे इंग्लंड आणि स्कॉटलंड एकमेकांसमोर येतील. इंग्लंडच्या भूमीवर आयसीसी स्पर्धेत हे दोन्ही संघ पहिल्यांदाच आमनेसामने येतील.भारत आणि पाकिस्तान यांच्यातील गट फेरीचा सामना १४ जून रोजी एजबॅस्टन येथे खेळला जाईल. जगभरातील क्रिकेट चाहत्यांचे या हाय-व्होल्टेज सामन्याकडे लक्ष असेल. शिवाय, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका सारख्या बलाढ्य प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध भारताचे सामने देखील रोमांचक होण्याची अपेक्षा आहे.नुकत्याच नेपाळमध्ये झालेल्या आयसीसी महिला टी२० विश्वचषक पात्रता फेरीद्वारे बांगलादेश, आयर्लंड, स्कॉटलंड आणि नेदरलँड्स या संघांनी या स्पर्धेसाठी पात्रता मिळवली. हे चार संघ आता गतविजेते न्यूझीलंड, २००९ मध्ये त्यांचा पहिला विजेता इंग्लंड, २०१६ चा विजेता वेस्ट इंडिज, सध्याचा एकदिवसीय विश्वचषक विजेता भारत आणि सहा वेळा विजेता ऑस्ट्रेलिया यांच्याशी जेतेपदाच्या शर्यतीत सामील होतील.Save the dates ️With all 12 teams locked in, presenting the full fixture list for ICC Women’s #T20WorldCup 2026 Details ➡️ https://t.co/ZijM7mQU38 pic.twitter.com/rH9LyzEo6B— ICC (@ICC) February 24, 2026नेदरलँड्स पहिल्यांदाच आयसीसी महिला टी२० विश्वचषकात सहभागी होणार आहे आणि बांगलादेशविरुद्ध त्यांच्या मोहिमेची सुरुवात करेल. बांगलादेश अपराजित पात्रता फेरीतून पात्र ठरला.आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजोग गुप्ता म्हणाले की, महिला टी२० विश्वचषक २०२६ च्या वेळापत्रकाची घोषणा ही जागतिक क्रीडा स्पर्धेच्या विकासात एक महत्त्वाचा टप्पा आहे. त्यांनी सांगितले की, आयसीसी सहभाग विस्तार, उच्च-कार्यक्षमता पायाभूत सुविधा, कार्यक्रम आणि प्रसारण मानके, बक्षीस रक्कम, मीडिया वितरण आणि व्यावसायिक भागीदारीद्वारे महिला क्रिकेटमध्ये सतत गुंतवणूक करत आहे जेणेकरून खेळाची जागतिक ओळख आणि लोकप्रियता आणखी वाढेल.त्यांनी असेही सांगितले की भारतात झालेल्या महिला क्रिकेट विश्वचषकाने विक्रम मोडले आणि नवीन प्रेरणा दिली आणि जून-जुलैमध्ये होणाऱ्या स्पर्धेत आयसीसी त्या गतीवर काम करण्यासाठी वचनबद्ध आहे. स्पर्धेचा अंतिम सामना ५ जुलै रोजी लंडनमधील ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळवला जाईल.गट अ: ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, भारत, पाकिस्तान, बांगलादेश, नेदरलँड्स.गट ब: वेस्ट इंडिज, इंग्लंड, न्यूझीलंड, श्रीलंका, आयर्लंड, स्कॉटलंड.
Honda CB125 Hornet: 125cc ची नवी स्पोर्टी बाइक, दिल्लीत ऑन-रोड किंमत 1.32 लाखांपर्यंत
Honda CB125 Hornet: Honda CB125 Hornet ची दिल्लीतील एक्स-शोरूम किंमत 1,14,582 रुपये आहे. RTO शुल्क आणि विमा खर्च मिळवल्यानंतर अंदाजे ऑन-रोड किंमत 1.31 ते 1.32 लाख रुपयांदरम्यान राहण्याची शक्यता आहे.
Budget Session : विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापतींनी केली तालिका अध्यक्ष आणि सभापतींची घोषणा
मुंबई : विधानसभा आणि विधानपरिषद सभागृहांचे कामकाज सुरळीत सुरू ठेवण्यासाठी मंगळवारी तालिका अध्यक्ष आणि सभापतींची घोषणा करण्यात आली. अनुक्रमे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी याबाबत घोषणा केली.विधानसभेच्या कामकाजासाठी योगेश सागर, संजय केळकर, समाधान अवताडे, दिलीप लांडे, सुनील प्रभू, चंद्रकांत नवघरे, राजू खरे, अमित झनक यांची नियुक्ती तालिका अध्यक्षपदी करण्यात आली. तर, चित्रा वाघ, कृपाल तुमाने, विक्रम काळे, राजेश राठोड, सुनील शिंदे यांची तालिका सभापती म्हणून नियुक्ती करण्यात आली.राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार २३ फेब्रुवारी पासून सुरु झाले. सकाळी ११ वाजता राज्यपालांच्या अभिभाषणाने या अधिवेशनाची सुरुवात झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ६ मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्पीय सादर करतील.
मुंबई: मुंबईतील जुन्या आणि रखडलेल्या वसाहतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न आज विधान परिषदेत चांगलाच गाजला. माहीम मच्छिमार कॉलनी आणि परिसरातील २४ पोलीस वसाहतींचा पुनर्विकास 'क्लस्टर' (समूह) पद्धतीने करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून, चालू अधिवेशन संपताच यावर तातडीने बैठक बोलावली जाईल, असे आश्वासन मंत्री शंभूराज देसाई यांनी सभागृहात दिले.नेमकी चर्चा काय झाली?प्रसाद लाड यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे माहीम मच्छिमार कॉलनीच्या पुनर्विकासाचा मुद्दा उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, या वसाहतींचा पुनर्विकास क्लस्टर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून केला जाईल. यासाठी म्हाडा (MHADA) आणि एम.एस.आर.डी.सी. (MSRDC) यांचे 'जॉइंट व्हेंचर' (संयुक्त उपक्रम) करण्याबाबत सरकार सकारात्मक आहे. याच चर्चेदरम्यान सुनील शिंदे यांनी वरळी पोलीस वसाहतीचा प्रश्न विचारला असता, मंत्र्यांनी स्पष्ट केले की माहीममधील २४ पोलीस वसाहतींचा प्रश्नही मार्गी लावला जाईल. म्हाडा, एमएमआरडीए किंवा एमएसआरडीसी यांपैकी एका सक्षम यंत्रणेची निवड करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाईल.दरेकरांचा सवाल: यंत्रणांकडे पैसे आहेत का ?पुनर्विकासाच्या या घोषणेवर बोलताना प्रविण दरेकर यांनी सरकारी यंत्रणांच्या आर्थिक क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. म्हाडा, एमएमआरडीए किंवा एमएसआरडीसी यांसारख्या प्राधिकरणांकडे खरोखरच पुनर्विकासासाठी पुरेसा निधी उपलब्ध आहे का? आपण लोकांना केवळ आश्वासन देऊन फसवतोय का? असा रोकडा सवाल त्यांनी केला. प्रविण दरेकर यांनी केवळ सरकारी प्राधिकरणांवर अवलंबून न राहता 'क्लस्टर सेल्फ डेव्हलपमेंट' (समूह स्वयंपूर्ण विकास) हा पर्याय निवडण्याचा आग्रह धरला. क्लस्टर पद्धतीने रहिवाशांनी स्वतःच विकास करणे हा एक नामी आणि शाश्वत पर्याय असू शकतो. शासन या क्लस्टरमध्ये 'स्वयंपूर्ण विकास' मॉडेल राबवणार का? अशी विचारणाही त्यांनी केली.मंत्री शंभूराज देसाई यांनी सभागृहात ग्वाही दिली की, हे अधिवेशन संपल्याबरोबर संबंधित सर्व विभागांची तातडीची बैठक लावली जाईल आणि या प्रकल्पाची प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी करता येईल, याचे धोरण निश्चित केले जाईल.
Budget Session : राज्यात एकाही डान्स बारला परवाना नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नियम मोडणाऱ्या ऑर्केस्ट्रा बारचा परवाना कायमस्वरूपी रद्द करणारमुंबई : राज्यात सद्यस्थितीत कुणालाही 'डान्स बार'चा परवाना देण्यात आलेला नाही, केवळ 'ऑर्केस्ट्रा बार'लाच परवानगी आहे. मात्र, ऑर्केस्ट्राच्या नावाखाली नियमांचे उल्लंघन होत असल्यास अशा बारचे परवाने केवळ निलंबित न करता, ते कायमस्वरूपी रद्द करण्यासाठी सरकार कायद्यात सुधारणा करणार आहे. याच किंवा पुढच्या अधिवेशनात यासंदर्भातील तरतूद करण्याचा आमचा प्रयत्न असेल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (२४ फेब्रुवारी) केली.विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात आमदार सुभाष देशमुख यांनी राज्यातील नियमबाह्य ऑर्केस्ट्रा बार आणि डान्स बारवर कारवाई करण्याची मागणी केली होती. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री आणि गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. भोयर यांनी सांगितले की, न्यायालयाच्या नियमांनुसार ऑर्केस्ट्रा बारला परवाने दिले आहेत. जेथे नियमांची पायमल्ली केली जात असेल, अशा प्रकरणांची गंभीर दखल घेऊन, ज्या बारकडून तीन वेळा नियमांचे उल्लंघन होईल, त्यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.चर्चेदरम्यान आमदार भास्कर जाधव यांनी पनवेलमध्ये रात्री लेडीज बारसारखे प्रकार सुरू आहेत. दिवसा हे ढाबे आणि बार बंद दिसतात, मात्र रात्री दोन्ही बाजूंनी लेडीज बार सर्रास चालताना दिसतात, असे निदर्शनास आणून दिले. यावर सविस्तर भाष्य करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, दिवंगत आर. आर. पाटील यांनी डान्स बार बंदीचे विधेयक आणले होते, जे सर्वोच्च न्यायालयाने निरस्त केले. त्यानंतर माझ्या कार्यकाळात पुन्हा विधेयक आणले गेले, मात्र बार मालकांनी आम्ही डान्स बार नव्हे तर ऑर्केस्ट्रा बार चालवू, असा युक्तिवाद न्यायालयात केला. त्यानुसार सरकारने ऑर्केस्ट्रा बारसाठी कठोर अटीशर्ती लागू केल्या आहेत. यामध्ये जागेचे क्षेत्रफळ, पैसे उडवण्यावर बंदी आणि नियमभंग केल्यास थेट गुन्ह्याची तरतूद आहे.कठोर कायद्याबाबत सूतोवाच :पनवेल भागातून येणाऱ्या तक्रारींची चौकशी करून तातडीने तपास करण्याचे आदेश दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. नियम मोडणाऱ्या बारचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्याबाबत आमची बैठक झाली आहे. तीन किंवा पाच वेळा उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई करण्यासाठी कायद्यात दुरुस्ती केली जाईल. यासंदर्भातील प्रस्ताव लवकरच सभागृहात आणला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Kerala Name Change: केरळचे नाव आता ‘केरळम’; केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
Kerala Name Change: राज्य सरकारचे म्हणणे आहे की 'केरळम' हे या प्रदेशाचे मूळ ऐतिहासिक आणि सांस्कृतिक नाव आहे.
महाराष्ट्र विधानसभा अधिवेशनात मंगळवारी कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून (Threat from Bishnoi Gang) मोठी खळबळ उडाली.
Samsung Galaxy S26 Ultra उद्या भारतात लॉन्च होणार; जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
Samsung Galaxy S26 Ultra:
Tahawwur Rana : कुख्यात दहशतवादी तहव्वुर राणाचे कॅनडियन नागरिकत्व रद्द होणार
कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या प्रस्तावित भारत दौऱ्यापूर्वी कॅनडियन सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. कॅनडियन सरकारने २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यांचा मुख्य आरोपी तहव्वुर हुसेन राणा याच्याबाबत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. कॅनडातील मीडिया अहवालानुसार, कॅनडा सरकारने राणाची कॅनडियन नागरिकत्व रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.अहवालानुसार, कॅनडाच्या ‘इमिग्रेशन, रिफ्युजीज अँड सिटिझनशिप कॅनडा’ (आयआरसीसी) या विभागाने राणाला त्याचे कॅनडियन नागरिकत्व रद्द करण्याचा मानस असल्याची औपचारिक सूचना दिली आहे. मात्र ही कारवाई थेट दहशतवादाच्या आरोपांशी संबंधित नसून, नागरिकत्वासाठी अर्ज करताना दिलेल्या कथित चुकीच्या माहितीसंबंधी आहे.राणा १९९७ मध्ये कॅनडात गेला आणि २००१ मध्ये त्याला कॅनडियन नागरिकत्व मिळाले. आयआरसीसीनुसार, ३१ मे २०२४ रोजी पाठवलेल्या पत्रात नमूद करण्यात आले की, राणाने नागरिकत्वासाठी अर्ज करताना कॅनडातील वास्तव्यासंदर्भात चुकीची माहिती दिली होती. २००० साली अर्ज करताना त्याने चार वर्षे ओटावा आणि टोरोंटो येथे वास्तव्य केल्याचा दावा केला होता. त्या काळात फक्त सहा दिवस अनुपस्थित राहिल्याचे त्याने नमूद केले होते.मात्र ‘रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलिस’ (आरसीएमपी) यांच्या तपासात तो बहुतेक काळ अमेरिकेतील शिकागो येथे असल्याचे उघड झाले. तेथे त्याच्या अनेक मालमत्ता होत्या आणि तो इमिग्रेशन सल्लागार सेवा तसेच इतर व्यवसाय चालवत होता. हे प्रकरण सध्या कॅनडाच्या ‘फेडरल कोर्ट’मध्ये प्रलंबित आहे. इमिग्रेशन विभागाच्या प्रवक्त्यानुसार, चुकीची माहिती देऊन मिळवलेले नागरिकत्व रद्द करणे ही सरकारच्या प्रक्रियेची विश्वासार्हता टिकवण्यासाठी आवश्यक कारवाई आहे.पाकिस्तानी मूळ असलेल्या ६५ वर्षीय तहव्वुर हुसेन राणा सध्या भारतातील कारागृहात असून, २००८ मधील मुंबई दहशतवादी हल्ल्यांमध्ये मदत केल्याच्या आरोपांवर त्याच्यावर खटला चालवण्यात येणार आहे. राणावर डेविड कोलमन हेडली आणि दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा तसेच हरकत-उल-जिहादी इस्लामीशी संबंधित दहशतवाद्यांसोबत मिळून २००८ च्या मुंबई हल्ल्यांची कटकारस्थान रचल्याचा आरोप आहे. २६/११ च्या हल्ल्यांत अधिकृत आकडेवारीनुसार १६६ जणांचा मृत्यू झाला होता, तर शेकडो जखमी झाले होते.अमेरिकेत अटकेनंतर भारताने त्याच्या प्रत्यार्पणाची मागणी केली होती. प्रत्यार्पण थांबवण्यासाठी राणाने अमेरिकन न्यायालयांपासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घेतली, मात्र त्याच्या सर्व याचिका फेटाळण्यात आल्या. एप्रिल २०२५ मध्ये त्याला भारतात आणण्यात आले आणि ‘राष्ट्रीय तपास यंत्रणा’ (एनआयए) ने त्याला अटक केली. मार्क कार्नी यांच्या भारत दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर उचललेले हे पाऊल भारत-कॅनडा संबंधांच्या दृष्टीनेही महत्त्वाचे मानले जात आहे.
चिवडा, वेफर्ससह कुरकुरीत पदार्थांच्या पॅकेजिंगवर बंदी आणा, भाजपा नगरसेविकेची मागणी
मुंबई (विशेष प्रतिनिधी)मुंबई मोठ्या प्रमाणात कचरा होण्यास चिवडा,वेफर्स यांची वेष्टने ही कारणीभूत असतात. याचं पॅकेजिंगच्या कव्हर मुळे अनेकदा पावसाळ्यात नाले तुंबून मुंबई जलमय होते. त्यामुळे वेफर्स, चिवडा, कुरकुरीत खाद्यपदार्थ (स्नॅक्स), इत्यादी खाद्यपदार्थांच्या विक्रीसाठी वापरण्यात येणाऱ्या अविघटनशील प्लास्टीक वेष्टनांवर बंदी घालण्यात येण्याची मागणी करण्यात आली आहे. भाजपच्या नगरसेविका प्रिती सातम यांनी मुंबई महापालिका सभागृहात ठरावाच्या सूचनेद्वारे ही मागणी करत अशा खाद्यपदार्थांच्या उत्पादन कंपन्यांना व वितरकांना विघटनशील तथा पर्यावरणपूरक आवेष्टनाचा (पैकेजिंग) वापर सक्तीने लागू करता येईल अशी नियमावली बनवण्याच्या दृष्टिकोनातून राज्य सरकारशी पाठपुरावा करण्याची सूचना केली आहे.भाजपच्या नगरसेविका प्रिती सातम यांनी महापालिका सभागृहात ठरावची सूचना मांडली आहे. या सूचनेमध्ये त्यांनी असे म्हटले आहे की, सध्या आबालवृद्धांपर्यंत वेफर्स, चिवडा, कुरकुरीत खाद्यपदार्थाच्या पुढया (पॅकेटस) पाच ते दहा रुपयांत सहन उपलब्ध होत असल्याने, अशा उत्पादनांची मोठया प्रमाणावर विक्री होत असते. मात्र, अशा साद्यपदार्थाचे सेवन केल्यानंतर, त्यांचे प्लास्टिक वेष्टन रस्त्यांवर, सार्वजनिक ठिकाणी, पदपथांवर इतस्ततः तसेच, नाल्यांमध्ये टाकण्यात येत असल्याचे सर्रास निदर्शनास येते. त्यामुळे मुंबई शहरामध्ये कचच्याच्या प्रभागात अधिकाधिक वाढ होते.याची प्लास्टिक वेष्टने अविघटनशील असतात आणि ती नाल्यांच्या मुखाशी जाऊन जमा झाल्याने, पाणी तुंबून पावसाळ्यात पूरसदृश स्थिती निर्माण होते. शिवाय, साचलेल्या सांडपाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरुन आरोग्यविधातक परिस्थिती निर्माण होते.त्यामुळे वेफर्स, चिवडा, कुरकुरीत खाद्यपदार्थ (स्नॅक्स), इत्यादी खाद्यपदार्थांच्या विक्रीसाठी वापरण्यात येणाऱ्या अविघटनशील प्लास्टीक वेष्टनांवर बंदी घालण्यात यावी आणि अशा खाद्यपदार्थांच्या उत्पादन कंपन्यांना व वितरकांना विघटनशील / पर्यावरणपूरक आवेष्टनाचा (पैकेजिंग) वापर सक्तीने लागू करता येईल अशी महानगरपालिकेने नियमावली बनवावी असे नमूद केले आहे.
मोठी बातमी…! हेलिकॉप्टरचा भयंकर अपघात; थेट समुद्रात क्रॅश
Helicopter Crash : अंदमानमध्ये मंगळवारी सकाळी पवन हंस कंपनीच्या हेलिकॉप्टरचे समुद्रात आपत्कालीन लँडिंग करण्यात आले.
मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सभागृहात शिक्षकांच्या अशैक्षणिक कामांवरून जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. आमदार विक्रम काळे यांनी शिक्षकांना कुत्रे मोजण्याचे काम दिले जातेय, असा खळबळजनक आरोप केल्यानंतर, राज्यमंत्री पंकज भोयार यांनी वस्तुस्थिती मांडत या आरोपांमधील हवा काढून घेतली. अनुभवी सदस्य असलेल्या विक्रम काळे यांनी 'राईचा पहाड' करू नये, अशा शब्दांत भोयार यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले.कुत्रे मोजण्याचे काम नाही, तर विद्यार्थ्यांची सुरक्षा!विक्रम काळे यांच्या आरोपाला उत्तर देताना पंकज भोयार यांनी स्पष्ट केले की, शासनाने कोणत्याही शिक्षकाला कुत्रे मोजण्याचे काम दिलेले नाही. सार्वजनिक ठिकाणी कुत्र्यांमुळे घडणाऱ्या विपरीत घटना लक्षात घेता, माननीय सर्वोच्च न्यायालयाने स्वच्छतेबाबत काही आदेश दिले आहेत. शाळांच्या परिसरात खाद्यपदार्थ पडलेले नसावेत आणि शाळेला व्यवस्थित कुंपण असावे, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होणार नाही; ही खबरदारी घेण्याच्या सूचना शिक्षण विभागाला आहेत. हे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचे काम आहे, कुत्रे मोजण्याचे नाही, असे स्पष्टीकरण भोयार यांनी दिले.शिक्षकांवर कामाचा अतिरिक्त ताण असल्याचे मान्य करत पंकज भोयार म्हणाले की, शिक्षण हक्क कायदा (RTE) २००९ नुसार जनगणना, आपत्ती निवारण आणि निवडणुकांची कामे करणे शिक्षकांसाठी अनिवार्य आहे. तरीही, २८ ऑगस्ट २०२४ च्या शासन निर्णयानुसार आम्ही शैक्षणिक आणि अशैक्षणिक कामांचे वर्गीकरण केले आहे. इतर विभागांची कामे शिक्षकांना सांगू नयेत, अशा स्पष्ट सूचना आम्ही सर्व विभागांना दिल्या आहेत. शिक्षकांना केवळ शिकवण्यावर लक्ष केंद्रित करता यावे, यासाठी सरकार काही नव्या पर्यायांवर विचार करत असल्याची माहिती मंत्र्यांनी दिली.यामध्ये प्रामुख्याने दोन महत्त्वाच्या पर्यायांचा समावेश आहे, आठवड्यातील एक शनिवार केवळ प्रशासकीय किंवा अशैक्षणिक कामांसाठी द्यावा का? जेणेकरून उर्वरित पाच दिवस शिक्षक पूर्णपणे शिकवण्याचे काम करतील. गावागावातील 'सेतू' किंवा 'सुविधा केंद्रां'मार्फत ही तांत्रिक कामे करता येतील का, याचाही विचार सुरू आहे. या संदर्भात येणाऱ्या आर्थिक भाराचे गणित मांडून आणि शिक्षक लोकप्रतिनिधींचे मार्गदर्शन घेऊन लवकरच अंतिम निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन पंकज भोयार यांनी दिले. मंत्र्यांच्या या अभ्यासपूर्ण उत्तरामुळे शिक्षकांच्या कामाच्या स्वरूपावरून निर्माण झालेला गोंधळ दूर होण्यास मदत झाली आहे.
'स्मार्ट अर्नर्स'गरज नसतानाही कर्ज का घेत आहेत ?
कर्ज केवळ आपत्कालीन परिस्थितीत काढायचे या विचारात मोठा बदल होत आहे; उपभोक्ते मालमत्ता, शिक्षण, प्रवास, आरोग्याची काळजी यांपासून अगदी जीवनशैलीविषयक गरजांपर्यंत विविध कारणांसाठी व्यक्तीगत कर्जे घेत आहेत.व्यक्तीगत कर्जे (पर्सनल लोन्स) घ्यायची ती केवळ 'आणीबाणीच्या परिस्थिती’त ही धारणा भारतात हळूहळू बदलत चालली आहे. स्थिर नोकऱ्या आणि व्यवस्थित पगार असलेल्या उपभोक्तावर्गामध्ये हे स्थित्यंतर विशेषत्वाने दिसत आहे. अनेक वर्षांपासून आर्थिक शिस्त पाळत आलेल्या, दीर्घकालीन बचत उभी करत असलेल्या आणि सातत्याने गुंतवणूक करत असलेल्या वर्गामध्ये हा बदल दिसून आला आहे.विशेषत: कोविड साथीनंतर त्यांची गुंतवणूक करण्याच्या क्षमतेवर परिणाम झाला नसला तरी 'पैसा गुंतवण्याची’ व्याख्या मात्र खरोखर बदलली आहे. आर्थिक भवितव्यासाठी योग्य ती काळजी घेतली जात असली तरी आरोग्य, मन आणि शरीर यांच्यासाठी आवश्यक गुंतवणूकीकडे नकळतच दुर्लक्ष झाल्याचे अनेकांच्या लक्षात आले. त्यानंतरच्या काळात हे आकलन अधिक पक्के होत गेले आहे, कारण कामाच्या दृष्टीने अत्यंत व्यग्र आयुष्य आणि वेगवान दिनक्रम यांमध्ये स्वास्थ्य जपणे, स्वत:ची काळजी घेणे किंवा आयुष्याचा दर्जा सुधारणे यांसारख्या गोष्टींकडे लोक आता स्वत:चे लाड पुरवणे म्हणून बघत नाहीत तर आवश्यक बाबी म्हणून बघू लागले आहेत.परिणामी आजचे कर्जदार अधिक स्पष्टतेने आणि हेतूपूर्वक खर्च करू लागले आहेत. स्वास्थ्य, शिक्षण, अर्थपूर्ण अनुभव, घराची आरामदायकता आणि व्यक्तिगत इच्छाआकांक्षा या दीर्घकाळ दुर्लक्षित राहिलेल्या उद्दिष्टांना त्यांच्याकडून आता प्राधान्य दिले जाऊ लागले आहे. मात्र कष्टाने उभ्या केलेल्या गुंतवणूका या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी वापरण्याची त्यांची इच्छा नाही. ते हप्ते भरण्यास सक्षम आहेत आणि त्यांचे एसआयपी, दीर्घकालीन पोर्टफोलिओ व निवृत्तीनंतरच्या काळासाठी केलेल्या तरतूदींना धक्का न लावता त्यांना अन्य उद्दिष्टांसाठी खर्च करायचा आहे.या परिस्थितीत व्यक्तीगत कर्ज हा व्यवहार्य पर्याय ठरतो. हप्त्याचा (ईएमआय) आकडा माहीत असेल तर तो वजा करून दैनंदिन खर्चांचे नियोजन करता येते आणि दीर्घकालीन गुंतवणूकींना हात न लावता त्या सुरू ठेवता येतात. थोडक्यात, ‘स्वप्नपूर्ती’साठी कर्ज काढण्याबाबतची पारंपरिक कल्पना आता नव्याने केली जाऊ लागली आहे: आज कर्ज काढणाऱ्या अनेकांनी आधीच गुंतवणूका केलेल्या असतात- आपला संपदासंचयाचा प्रवास न थांबवता उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी ते सहजपणे व्यक्तीगत कर्जाचा पर्याय निवडतात.अधिक व्यवहार्य कर्जदार मानसिकता या नवीन प्रवाहाचा गाभा आहे. तात्पुरत्या गरजा पूर्ण करण्यासाठी दीर्घकालीन गुंतवणुकांमधून पैसे काढण्याकडे बहुतेकांचा कल नसतो, कारण त्यामुळे संपदासंचयात खंड पडतो, भविष्यकाळातील लाभ कमी होऊ शकतात आणि काही वेळा तर भांडवलावरील नफ्यावर (कॅपिटल-गेन) कर वगैरे भरावा लागू शकतो. त्याऐवजी निश्चित हप्ता वजा करून अत्यावश्यक गरजा भागवण्याइतपत पैसा हातात राहतो आणि एसआयपी, इक्विटीतील गुंतवणूक आणि निवृत्तीनंतरच्या तरतूदी यांना धक्का लागत नाही.सर्व शहरांमध्ये वास्तव आयुष्यातील गरजांकडे लक्ष देण्याची मानसिकता दिसून येत आहे- काही जण स्वास्थ्यावर लक्ष केंद्रित करतात, तर काही आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्यांना महत्त्व देतात. दीर्घकाळापासूनच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मालमत्ता उभी करण्याचे प्रमाणही वाढत आहे. उपभोक्ते व्यक्तीगत कर्जाचा वापर त्या वेळी आवश्यक असलेल्या गोष्टी पार पाडून आयुष्यात पुढे जाण्यासाठी करत आहेत आणि दीर्घकालीन आर्थिक नियोजनात काहीच बदल न करता हे शक्य होत आहे.*उपभोक्ते व्यक्तीगत कर्जांचा वापर आज कशासाठी करत आहेत ?कर्ज घेण्याच्या नमुन्यांमधून नियोजित वापराचे विस्तृत प्रकार दिसून येतात. ते पुढीलप्रमाणे: ग्राहकांमध्ये विस्तृत 'जीवनविषयक गुंतवणुकीं’साठी व्यक्तीगत कर्जांचा वापर करण्याचे प्रचलन वाढत आहे, यात आकांक्षा आणि स्वास्थ्य यांचा मेळ साधलेला दिसतो: केवळ प्रेक्षणीय स्थळांचे दर्शन घेण्याच्या पलीकडील उपक्रमाभिमुख अनुभवाधारित प्रवासासाठी व्यक्तीगत कर्जे घेतली जात आहेत; निसर्गाचे सान्निध्य, शांतता, ध्यानधारणा व डिजिटल साधनांपासून दूर राहणे अशा पद्धतीने विकसित केलेल्या 'वेलनेस रिट्रीट्स’चा अनुभव घेण्यासाठी व्यक्तीगत कर्जे घेतली जात आहेत; त्वचेवरील उपचार, केसाचे प्रत्यारोपण व निवडक सौंदर्योपचार प्रक्रिया यांसारख्या आत्मविश्वास वाढवणाऱ्या पण अनेक वर्षांपासून पुढे ढकलल्या जाणाऱ्या स्वत:ची काळजी घेण्याच्या पद्धतींसाठी व्यक्तीगत कर्जे घेतली जात आहे. याशिवाय शिक्षण व कौशल्यविकास तसेच घराचे आरामदायीत्व वाढवणे, घरातील दुरुस्त्या यांवर हेतूपूर्वक केल्या जाणाऱ्या खर्चात स्पष्ट वाढ दिसून येत आहे. ज्यात वेळ अत्यंत महत्त्वाची असते अशा आयुष्यांतील महत्त्वाच्या क्षणांवर, मग ते लग्नसोहळे असोत, कौटुंबिक सोहळे असोत किंवा महत्त्वाचे उत्सव असोत, खर्च करण्यासाठी व्यक्तीगत कर्ज काढण्याचे प्रमाण वाढले आहे.व्यक्तीगत कर्जांचा उपयोग व्यवहार्य, दैनंदिन आर्थिक नियोजनासाठीही केला जात आहे. अनेक ग्राहक या कर्जांचा वापर सर्व देय रकमा एका ठिकाणी आणण्यासाठीही (डेट कन्सॉलिडेशन) करत आहेत, त्यामुळे सर्व निश्चित खर्च एका हप्त्यामध्ये सामावले जातात, आर्थिक बाबींवर आपले नियंत्रण वाढते आणि मन:शांतीही मिळते. काही जण व्यक्तीगत कर्जाचा वापर वाहनाशी निगडित पैशाची तफावत भरून काढण्यासाठी तसेच पुढे न ढकलता येणाऱ्या अत्यावश्यक सुधारणांसाठी करतात. आपली पत रूपरेखा (क्रेडिट प्रोफाइल) सुधारण्याही जाणूनबुजून व्यक्तीगत कर्ज काढणाऱ्यांच्या संख्येतही वाढ होत आहे. व्यक्तीगत कर्जे घेऊन ती शिस्तबद्ध, वक्तशीर हप्त्यांद्वारे फेडल्यास कर्जदाराची क्रेडिट प्रोफाइल चांगली होते, भक्कम होते. क्रेडिट प्रोफाइल निकोप असेल भविष्यकाळातील कर्ज मिळवण्याची पात्रता वाढते तसेच भविष्यकाळात कर्जदाराला अनुकूल अटींवर कर्ज घेता येते. महत्त्वाचे निर्णय लांबणीवर टाकल्यास त्याची काय किंमत मोजावी लागू शकते हेही कर्जदारांना पुरते लक्षात आले आहे. मग तो निर्णय दैनंदिन राहणीमानाचा दर्जा सुधारणारी घरातील दुरुस्तीची कामे करण्याचा असो किंवा अत्यंत तणावाच्या दिनक्रमात स्वत:ची काळजी घेण्याचा असो. अनेकांच्या मते व्यक्तीगत कर्ज घेणे म्हणजे आजच्या गरजांचा व उद्याच्या उद्दिष्टांचा तोल जबाबदारीने सांभाळणे होय.आत्मविश्वास वाढण्यामागील कारणे : व्यक्तीगत कर्ज समजून घेण्यासाठी व नियोजनासाठी अधिक सोपे असते.• कर्जाच्या अटी व शुल्के अधिक स्पष्ट व पारदर्शक असतात.• वितरण अधिक वेगाने होते, हे कर्ज उपलब्ध होण्यासाठी अधिक सोपे असते.• हप्त्यांची रचना सुलभ असल्याने त्यानुसार आर्थिक नियोजन करणे सोपे जाते.• डिजिटल प्रवासामुळे ग्राहकांना स्वत:च्या सोयीने प्रक्रिया पूर्ण करण्याची मुभा मिळते.आम्हाला आत्मविश्वासपूर्ण स्थित्यंतर दिसत आहे: उत्तम उत्पन्न आणि शिस्तबद्ध गुंतवणूक सवयी असलेले ग्राहक स्वास्थ्य, आयुष्यातील अनुभव व दीर्घकाळापासून पूर्ण न झालेल्या आकांक्षा आदी अर्थपूर्ण उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी दीर्घकालीन गुंतवणूक न मोडता, व्यक्तीगत कर्जाचा उपयोग करत आहेत. कोविड साथीनंतर अनेक जण स्वत:ची काळजी घेणे व दीर्घकाळ बाळगलेली स्वप्ने पूर्ण करणे या गोष्टींना प्राधान्य देऊ लागले आहेत, या गोष्टींकडे आता चैन म्हणून बघितले जात नाही. अशा ग्राहकांसाठी कोटक पर्सनल लोन्स हा सहज पर्याय ठरत आहे. शिस्तीने उभ्या केलेल्या दीर्घकालीन गुंतवणूका थांबवणे किंवा मोडणे टाळण्यासाठी ते कर्ज काढत आहेत. व्यक्तीगत कर्जामुळे त्यांना वर्तमानकाळ भरभरून जगण्यात आणि त्याच वेळी भविष्यकाळातील नियोजन सुरक्षित राखण्यात मदत होत आहे,” असे कोटक महिंद्रा बँकेच्या पर्सनल लोन्स विभागाचे व्यवसाय प्रमुख अमित पाठक म्हणाले.
राखीव निधीच्या विनियोगात पारदर्शकता आणण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करणारमुंबई : राज्यातील सर्व धर्मादाय रुग्णालयांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या आरोग्य योजना लागू करणे आता बंधनकारक असणार आहे. निर्धन रुग्ण निधी (आयपीएफ) शिल्लक नसल्याच्या कारणावरून कोणत्याही रुग्णाला उपचारापासून वंचित ठेवता येणार नाही. या रुग्णालयांच्या राखीव निधीचा विनियोग पारदर्शकपणे होतो की नाही, हे तपासण्यासाठी याच अधिवेशनात कायद्यात सुधारणा केली जाईल, अशी महत्त्वपूर्ण माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत दिली.महाराष्ट्रातील ४७९ धर्मादाय रुग्णालयांच्या कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी राज्य सरकारने अनेक पावले उचलली आहेत. यापूर्वी ‘सवलत’ या शब्दाची स्पष्ट व्याख्या नसल्याचा फायदा घेत अनेक रुग्णालये कायद्याच्या कचाट्यातून सुटत होती. मात्र, मागील अधिवेशनात कायद्यात सुधारणा करून सवलतीची नवीन व्याख्या निश्चित करण्यात आली आहे. यामुळे आता ही सर्व रुग्णालये धर्मादाय नियमांनुसार खाटा उपलब्ध करून देण्यास कायदेशीररीत्या बांधील आहेत, असे फडणवीस म्हणाले.रुग्णालयांमध्ये खाटांच्या उपलब्धतेबाबत रुग्णांची दिशाभूल होऊ नये, यासाठी सरकारने विशेष ‘डॅशबोर्ड’ आणि ऑनलाइन प्रणाली विकसित केली आहे. यामुळे कोणत्या रुग्णालयात किती खाटा रिक्त आहेत, याची माहिती नागरिकांना घरबसल्या मिळत आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, रुग्णालयांना त्यांच्या एकूण निधीपैकी २ टक्के निधी धर्मादाय कामांसाठी खर्च करणे बंधनकारक आहे. या निधीचा गैरवापर रोखण्यासाठी कायद्यात आणखी कठोर तरतुदी केल्या जाणार आहेत. तसेच, रुग्णालयांना प्रत्येक खाटेचा मूळ दर (बेस रेट) घोषित करणेही आता अनिवार्य करण्यात आले आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.दुर्बल घटकांना मोफत उपचार देणे रुग्णालयांची जबाबदारीविधि आणि न्याय विभागाने २१ एप्रिल २०२५ रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार, राज्यातील सर्व धर्मादाय रुग्णालयांना 'महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना', 'आयुष्मान भारत' आणि 'राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम' लागू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सद्यस्थितीत ४७९ पैकी १३४ रुग्णालये या योजनांशी जोडली गेली आहेत. जे न्यास धर्मादाय रुग्णालय चालवतात, त्यांना सरकारकडून जमीन व अंशदानात सवलत दिली जाते, त्यामुळे निर्धन व दुर्बल घटकांना मोफत उपचार देणे ही त्यांची जबाबदारी असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

31 C