दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ०१ एप्रिल २०२६
पंचांगआज मिती चैत्र शुद्ध एकादशी शके १९४८. चंद्र नक्षत्र आश्लेषा. योग ब्रह्मा.चंद्र राशी कर्क . भारतीय सौर चैत्र ११ शके १९४८. बुधवार दिनांक १ एप्रिल २०२६. मुंबईचा सूर्योदय ०६.३३ मुंबईचा चंद्रोदय ०२.५६ , मुंबईचा सूर्यास्त ०६.५२ मुंबईचा चंद्रास्त ०४.१५ उद्याची राहू काळ ०९.३७ ते ११.१० . पौर्णिमा प्रारंभ-सकाळी-०७;०७,०७ पर्यन्त चांगलादैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)
Mumbai : जो पुरस्कार मिळवण्याचे स्वप्न बघितले तोच पुरस्कार देणारे हात झाले
मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या हस्ते समाजातील ४४ महिलांचा गौरवमुंबई (विशेष प्रतिनिधी) : क्षेत्र कोणतेही असो सातत्याने परिश्रम घेतले की एक दिवस यश मिळतेच. जेव्हा स्त्री घराबाहेर पडत असते तेव्हा कुटुंबासह समाजानेही तिच्या पाठिशी उभे रहायला हवे. अशी साथ मिळाल्यास प्रत्येक स्त्री ही कुटुंबासह समाजासाठी सतत लढत असते, असे सांगत महापौर रितू तावडे पुरस्कार्थी महिलांची पाठ थोपटत आपल्याही आठवणींना उजाळा देत, आपल्या समाजकार्याची सुरुवात बचत गटापासून झाल्याचे सांगितले. तेव्हा मलाही वाटले होते की, आपल्याला हा पुरस्कार मिळावा. आज त्याच पुरस्काराचे वाटप करण्याची संधी मला मिळाली आहे. बचत गटापासून सुरू झालेला हा प्रवास मुंबईच्या प्रथम नागरिक महापौर पदापर्यंत पोहोचला. या प्रवासात कुटुंबाचा, समाजाचाही तितकाच मोठा वाटा असल्याचे रितू तावडे यांनी आवर्जुन सांगितले. निमित्त होते महापालिकेच्यावतीने ४४ महिलांच्या सन्मान सोहळ्याचे.जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महानगरपालिकेच्या नियोजन विभागाकडून विविध क्षेत्रातील ४४ कर्तृत्ववान महिलांचा मंगळवारी ३१ मार्च २०२६ रोजी सन्मान करण्यात आला. भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयातील पेंग्विन सभागृहात हा सन्मान सोहळा पार पडला. उपमहापौर संजय घाडी, महिला बालकल्याण समितीच्या अध्यक्षा मीनल तुर्डे, ए, बी आणि ई प्रभाग समिती अध्यक्ष ज्ञानराज निकम, स्थापत्य समिती (शहर) अध्यक्षा यामिनी जाधव, स्थापत्य समिती (उपनगरे) अध्यक्षा संगीता शर्मा, विधी समितीच्या अध्यक्षा दीक्षा कारकर, महिला बालकल्याण समितीच्या उपाध्यक्षा रिटा मकवाना, आर मध्य आणि आर उत्तर प्रभाग समितीचे अध्यक्ष प्रकाश दरेकर, सी आणि डी प्रभाग समिती अध्यक्ष आकाश पुरोहित, महानगरपालिकेचे विविध नगरसेवक, नगरसेविका तसेच संचालक (नियोजन) डॉ. प्राची जांभेकर, महानगरपालिका सचिव मंजिरी देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी बोलतांना महापौर रितू तावडे यांनी , सामाजिक, राजकीय, वैद्यकीय, क्रीडा, शैक्षणिक, सांस्कृतिक यासह विविध क्षेत्रात महिलांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या महिलांच्या पाठीशी मुंबई महानगरपालिका सतत उभी असते. सक्षमीकरणाची उंची गाठलेली स्त्री आता अबला नसून सबला झाली आहे, अशा शब्दात मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी स्रीशक्तीचा सन्मान केला. समाजातील सर्व घटकातील महिलांची वाटचाल सुसह्य व्हावी, यासाठी महानगरपालिका नेहमी प्रयत्नशील राहील, असेही नमूद केले.उप महापौर संजय घाडी यांनी याप्रसंगी बोलतांना, समाजातील प्रत्येक क्षेत्रात महिलांचे योगदान आहे. समाजविकासासाठी योगदान देणाऱ्या महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका विविध योजनांच्या माध्यमातून सतत प्रयत्नशील असते. नियोजन विभागाने बचत गटाच्या माध्यमातून सुरू केलेल्या माहिम सी फूड प्लाझाचे कौतूक केले. सी फूड प्लाझामुळे कोकणी खाद्य संस्कृती जोपासली जात असून, पर्यटनातही वाढ होत असल्याचे सांगितले. तर महिला बालकल्याण समितीच्या अध्यक्षा मीनल तुर्डे म्हणाल्या, महिलांच्या कार्याचा गौरव केला तर त्यांना अशा कार्यक्रमातून प्रेरणा मिळत असते. ज्या समाजात स्त्रीयांचा सन्मान होतो तोच समाज पुढे जातो, असेही त्या म्हणाल्या.प्रास्ताविक संचालक (नियोजन) डॉ. प्राची जांभेकर यांनी केले. यावेळी बोलतांना त्यांनी महानगरपालिकेने विविध बँकांच्या माध्यमातून अर्थसहाय्य केलेले आठ हजारांपेक्षा अधिक बचत गट मुंबई कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. आणि या प्रत्येक गटाने विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली आहे. तसेच बचत गट आता पारंपरिक व्यवसायांसोबतच ऑनलाइन व्यवसायातही उतरल्याचे त्यांनी सांगत त्यांचे कौतुक केले.
Santosh Pandit : महिला पत्रकाराशी गैरवर्तन महागात: स्वयंघोषित रील स्टार संतोष पंडितवर गुन्हा दाखल
सोशल मीडियावरील रील स्टार संतोष पंडित (Santosh Pandit) याच्याविरोधात पुण्यातील पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Ritu Tawade : मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी महावीर जयंतीच्या कार्यक्रमात आपल्या घशाचा त्रास गुरुजींच्या आशीर्वादामुळे बरा झाल्याचा दावा केला आहे.
M. K.Stalin : निवडणूक आयोगाच्या पथकाकडून मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या वाहनाची तपासणी
निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने मंगळवारी थेट तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन (M. K.Stalin) यांच्या वाहनाची तपासणी केली. त्या राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे.
Stock Market: फक्त 1 महिन्यात बाजारात हाहाकार! 51 लाख कोटींचा फटका; सेन्सेक्सची मोठी घसरण
Stock Market: आता युद्धाचा भारताच्या स्थूल अर्थव्यवस्थेवरही परिणाम होणार असल्यामुळे आगामी काही काळ भारताच्या विकासदरावर आणि शेअर बाजार निर्देशांकावर याचा परिणाम चालू राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
लोकेश चंद्रा मुख्यमंत्र्यांचे नवे अतिरिक्त मुख्य सचिव
मुंबई :राज्याच्या प्रशासनात वरिष्ठ स्तरावर मंगळवारी मोठे फेरबदल करण्यात आले असून, १० सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री कार्यालयातील अतिरिक्त मुख्य सचिव अश्विनी भिडे यांची मुंबई महानगरपालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, पालिकेची धुरा सांभाळतानाच मुंबई मेट्रो रेल महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदाचा अतिरिक्त कार्यभारही त्यांच्याकडेच कायम ठेवण्यात आला आहे. मावळते मुंबई पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडून अश्विनी भिडे यांनी पदभार स्वीकारला. भिडे यांच्या बदलीनंतर रिक्त झालेल्या मुख्यमंत्री कार्यालयातील अतिरिक्त मुख्य सचिवपदी 'महावितरण'चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दुसरीकडे, आपल्या शिस्तबद्ध आणि धडक कारवाईसाठी प्रसिद्ध असलेले आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. दिव्यांग कल्याण विभागात कार्यरत असताना त्यांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्रे मिळवणाऱ्या शेकडो कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई सुरू केली होती. ही कारवाई सुरू असतानाच आता त्यांची बदली आपत्ती व्यवस्थापन, पुनर्वसन व मदत कार्य विभागाच्या सचिवपदी करण्यात आली आहे. मुंढे यांच्या २० वर्षांच्या कारकिर्दीतील ही २२ वी बदली ठरली आहे.प्रशासकीय कामाचा अनुभव असलेल्या विकास चंद्र रस्तोगी यांची वित्त विभागाच्या (वित्तीय सुधारणा) अतिरिक्त मुख्य सचिवपदी वर्णी लागली आहे. तर, आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल यांची मृद आणि जलसंधारण विभागात बदली करण्यात आली आहे. परिमल सिंग हे कृषी आणि अन्न व औषध प्रशासन विभागाचे सचिव म्हणून कार्यभार सांभाळतील. प्रेरणा देशभ्रतार यांची नियुक्ती मत्स्यव्यवसाय विभागाच्या आयुक्त पदी करण्यात आली आहे. तर, वसई-विरार महानगरपालिकेच्या आयुक्तपदी पृथ्वीराज बी. पी. यांची निवड करण्यात आली आह. तुकाराम मुंढे यांच्या जागी माणिक गुरसळ हेदिव्यांग कल्याण विभाग कारभार पाहतील. शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाची जबाबदारी लहू माळी यांच्याकडे देण्यात आली आहे.
'जागतिक अस्थिरतेच्या काळात महावीरांचा अहिंसेचा मार्गच मानवतेला तारू शकतो'
मुंबई :जागतिक पातळीवर वाढत असलेल्या युद्धजन्य परिस्थिती, हिंसा आणि असहिष्णुतेच्या पार्श्वभूमीवर भगवान महावीरांचा अहिंसा, सत्य आणि करुणेचा संदेश आज अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. भारत जैन महामंडळ आयोजित २६२५ वा श्री श्रमण भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सव दादर, मुंबई येथे उत्साहात पार पडला. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.जैन समाजाच्या कार्याचा गौरव करताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, “जैन समाज नेहमीच सेवा, सहअस्तित्व आणि करुणेचा संदेश देत आला आहे. महाराष्ट्राच्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विकासात जैन समाजाचे मोठे योगदान आहे. विविध आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून समाजहिताचे कार्य सातत्याने केले जात आहे.” त्यांनी अशा संस्थांची भूमिका समाजात नैतिकता आणि संस्कार बळकट करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचेही सांगितले.शिंदे म्हणाले की, “आजच्या परमाणु युगात एक छोटी चूकही संपूर्ण मानवजातीसाठी घातक ठरू शकते. अशा वेळी भगवान महावीरांनी दिलेला ‘जगा आणि जगू द्या’ हा संदेशच जगाला विनाशापासून वाचवू शकतो.” त्यांनी स्पष्ट केले की, हिंसा केवळ शस्त्रांद्वारे होत नाही, तर शब्द, विचार आणि वर्तनातूनही ती प्रकट होते. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या वाणीमध्ये मधुरता, विचारांमध्ये शुद्धता आणि वर्तनात करुणा ठेवणे आवश्यक आहे.यावेळी त्यांनी समाजाभिमुख विचार मांडताना सांगितले की, “मला काय मिळाले यापेक्षा मी समाजाला काय देऊ शकतो, हा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. समाजासाठी, राष्ट्रासाठी आणि देशासाठी योगदान देण्याची वृत्ती जोपासली गेली पाहिजे. हेच भगवान महावीरांचे खरे तत्त्वज्ञान आहे.” त्यांनी पुढे आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षणाची गरज अधोरेखित करत केवळ उत्सव साजरे करण्यापेक्षा त्यांच्या विचारांचे आचरण जीवनात करणे अधिक महत्त्वाचे असल्याचे नमूद केले.ते पुढे म्हणाले की, “जिथे ‘मी’ आणि ‘माझे’ संपते, तिथूनच अहिंसेची सुरुवात होते. महावीरांचा संयम, संतुलन आणि त्यागाचा मार्ग आजच्या काळात अधिक महत्त्वाचा ठरतो. जर व्यक्ती, समाज आणि राष्ट्रांनी हे तत्त्वज्ञान स्वीकारले, तर अनेक संघर्ष आपोआप कमी होतील.” तसेच युवकांना उद्देशून त्यांनी शिक्षण व्यवस्थेत महावीरांच्या विचारांवर विशेष मार्गदर्शन होण्याची गरज व्यक्त केली.कार्यक्रमात विविध आचार्य, साधू-संत तसेच जैन समाजातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारत जैन महामंडळाच्या कार्याचे कौतुक करत त्यांनी या संस्थेने 126 वर्षांपासून समाजात सेवा आणि संस्कारांची परंपरा जपल्याचे सांगितले.शेवटी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सर्वांना महावीर जयंतीच्या शुभेच्छा देत “जय जिनेंद्र, जय महावीर” असा संदेश दिला.यावेळी आचार्य नाथ पद्मसागरजी, आचार्य निरंजन सागरजी, आचार्य विसौम्य सागरजी, गुरुदेव मुनीजी, कुलदीप स्वामी मुनी, मुकुल स्वामी मुनी, भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम, शिवसेना प्रवक्त्या शायना एनसी, ललित डांगी, मेहुल मेहता, ख्यालीलाल तातेड, बाबुलाल बाफना, सुरेश अछलिया आणि जैन बांधव उपस्थित होते.
पहिल्या महिला मुंबई महापालिका आयुक्त म्हणून आश्विनी भिडे यांनी स्वीकारला पदभार
मुंबई (विशेष प्रतिनिधी) :मुंबई महापालिका आयुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतर ज्येष्ठ सनदी अधिकारी आश्विनी भिडे यांनी मावळते महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडून आयुक्त पदाचा पदभार मंगळवारी ३१ मार्च २०२६ रोजी सायंकाळी स्वीकारला. मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी विराजमान होणाऱ्या भिडे या पहिल्या महिला सनदी अधिकारी आहेत. आयुक्त पदाची सुत्रे हाती घेताच भिडे यांनी यापूर्वी या महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून सुमारे चार वर्षे काम केल्यामुळे सर्वांची माहिती मला आहे असे सांगत मुंबईकरांसाठी आणि शहरासाठी चांगले काम करू,असा शब्द देत विश्वास व्यक्त केला.मंगळवारी सायंकाळी महापालिका मुख्यालयात आयुक्त कार्यालयात जात आश्विनी भिडे यांनी आपल्या पदाचा भार स्वीकारत प्रसार माध्यमांशीही चर्चा केली. याप्रसंगीअतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपीन शर्मा, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, उपायुक्त (महानगरपालिका आयुक्त यांचे कार्यालय) प्रशांत गायकवाड यावेळी उपस्थित होते.यावेळी मावळते महापालिका आयुक्त डॉ भूषण गगराणी यांनी महापालिकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वतीने त्यांचे स्वागत केले.तसेच यापुढे महापालिकेच्या कारभाराचे पूर्ण नियोजन आता यापुढे त्या करतील असे सांगत त्यांना मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या. तसेच मला आयुक्त म्हणून ही संधी शासनाने दिली होती, त्यामुळे मी शासनाचा ऋणी आहे. तसेच महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांनी मला दोन वर्षे सांभाळून घेतले. खऱ्या अर्थाने महापालिकेचे अधिकारी कार्यक्षम असून त्यांनी महापालिकेचा पताका उंचावर नेण्याचा प्रयत्न केला आहे,असे सांगत अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.आयुक्तपदाची सुत्रे गगराणी यांच्याकडून स्वीकारल्यानंतर माध्यमांशी बोलतांना आश्विनी भिडे यांनी यापदावर आपल्याला संधी दिल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे आभार मानले तसेच डॉ भूषण गगराणी या पदावर त्यांनी आपली यशस्वी कारकिर्द पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन केले. गगराणी यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपण भारतीय प्रशासकीय सेवेत आला होतो, असे सांगत भिडे यांनी यापूर्वी मी महापालिकेत चार वर्षे काम केले आहे.कोविड काळात काम करण्याची संधी लाभली होती. या महापालिकेने मुंबईकरांचे आयुष्य समृध्द केले. त्यामुळे यापूर्वीच्या सर्वच आयुक्तांनी यात भार टाकली आहे, त्या परंपरेचा भाग होताना आनंद होत असल्याचे त्यांनी सांगितले.नवीन आव्हान येतात, आयुक्त पदाची सुत्रे हाती घेताना यापूर्वीचेही आयुक्त आव्हानांना सामोरे गेले होते. त्यामुळे या आयुक्तपदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर सर्व टिमच्या मदतीने आलेल्या आव्हानांना सामोरे जावू. आजवर महिला अधिकाऱ्याला या पदावर संधी मिळाली नव्हती, म्हणून पहिल्या महिला आयुक्त म्हणता. पण मुंबई महापालिका याभूत सुविधा देण्याचे काम करते तसेच, तसेच मुंबईतील महिलांचे जीवनमान उंचावण्याचाही केला जाईल. मागील अतिरिक्त आयुक्त म्हणून जी चार वर्षे सेवा बजावली त्यातील दोन वर्षे लोकप्रतिनिधींसोबत आणि दोन वर्षे प्रशासक काळातील होती. पण आता नगरसेवक आल्यामुळे आता खऱ्या अर्थाने महापालिका असल्यासारखी वाटते,अशा भावना व्यक्त केल्या.भिडे यांचा परिचयआश्विनी भिडे या भारतीय सनदी सेवेतील १९९५ च्या तुकडीतील अधिकारी असून त्यांना सनदी सेवेचा सुमारे ३१ वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी आतापर्यंत महाराष्ट्रात विविध महत्त्वपूर्ण पदांचा कार्यभार सांभाळला आहे. यामध्ये प्रामुख्याने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, विभागीय आयुक्त कार्यालयाच्या अतिरिक्त विभागीय आयुक्त, महाराष्ट्र शासनामध्ये सह सचिव, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एम.एम.आर.डी.ए.) अतिरिक्त महानगर आयुक्त, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या सचिव, मुख्यमंत्री यांच्या अपर मुख्य सचिव म्हणून आश्विनी भिडे यांनी काम पाहिले आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून त्यांनी मुंबईत मेट्रो रेल्वेचे जाळे निर्माण करण्यात महत्त्वाचे योगदान दिले आहे.आश्विनी भिडे यांनी यापूर्वी मुंबई महानगरपालिकेत ९ मे २०२० ते दिनांक १९ मार्च २०२४ या कालावधीत अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) या पदावर कार्य केले आहे. मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पाच्या पूर्णत्वामध्येही भिडे यांचे महत्वपूर्ण योगदान राहिले आहे.
Narendra Modi : “युद्धाच्या परिस्थितीत भारताने प्रभावीपणे स्थिती हाताळली”–पंतप्रधान नरेंद्र मोदी
युद्ध, अशांतता, इंधनांचे वाढते दर आदी आव्हानांशी सध्या संपूर्ण जगाला झुंजावे लागत आहे. मात्र, भारताने प्रभावीपणे स्थिती हाताळली आहे.
War Impact On India: भारताचे संयुक्त अरब अमीरातीबरोबरच सौदी अरेबिया, कुवेत, कतार, ओमान, बहरीन इत्यादी देशांमध्ये लाखो कर्मचारी कार्यरत आहेत. या सर्वच कर्मचार्यांवर सध्या प्रत्यक्ष- अप्रत्यक्षरीत्या परिणाम झाला आहे. हा परिणाम वाढत जाण्याची शक्यता आहे.
Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांचा सर्वात मोठा निर्णय; ‘त्या’‘सुत्रधाराला’दाखवला बाहेरचा रस्ता
Sunetra Pawar :
PNG Usage increased: सिलेंडरला रामराम? युद्धाच्या पार्श्वभूमीवर PNGकडे झपाट्याने वळतायत नागरिक!
PNG Usage increased
अशोक खरातच्या मुलगा एसआयटीच्या ताब्यात!
नाशिक : अशोक खरात याने महिलांवर केलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाचा तपास सध्या पोलीस आणि एसआयटीमार्फत सुरू आहे. महिलांचे शोषण करण्याबरोबरच खरातने पैसेही उकळल्याचे समोर आले आहे. याच प्रकरणात त्याची पत्नी कल्पना खरातवर गुन्हा दाखल झाला आहे. खरातच्या पत्नीला अटक करण्यासाठी पथक आले होते, मात्र ती फरार झाली आहे. दरम्यान, पथकाने खरातच्या मुलाला ताब्यात घेतले आहे. अशोक खरातची पत्नी कल्पना खरात हिच्यासह पाच जणांविरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे कल्पना खरातही या प्रकरणात आरोपी बनली आहे. कल्पना खरातला अटक करण्यासाठी मंगळवारी सायंकाळी एसआयटी पथक खरातच्या घरी पोहोचले. पण, कल्पना खरात फरार झाल्याचे समोर आले. त्यानंतर पथकाने अशोक खरात यांच्या मुलाला ताब्यात घेतले. पथक अशोक खरातच्या मुलाला घेऊन गेले आहे. या संपूर्ण प्रकरणात त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. शिर्डीतील रावसाहेब गोंदकर यांनी अशोक खरात, त्याची पत्नी कल्पना खरात आणि इतर तिघे अशा पाच जणांविरोधात जमीन बळजबरी खरेदी केल्याची आणि कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली होती.खरातचे कोरेगाव पार्कमध्ये कोट्यवधींचे व्यवहारभोंदू खरात प्रकरणाचा तपास पुढे सरकत असताना त्याचे धागेदोरे कोरेगाव पार्कपर्यंत पोहोचल्याचे समोर आले आहे. एसआयटीच्या तपासात खरातचा निकटवर्तीय सीए प्रकाश पोफळे याच्याकडून २०२४ मध्ये कोट्यवधींची मालमत्ता खरेदी झाल्याचे उघड झाले. माहितीनुसार, कोरेगाव पार्कमध्ये ८ रो-हाऊस आणि सुमारे ४९ गुंठे जागा खरेदी करण्यात आली असून, कागदोपत्री किंमत १९.५६ कोटी रुपये दाखवली आहे. मात्र, बाजारभावानुसार ही किंमत १०० कोटींपेक्षा जास्त असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. त्यामुळे काळा पैसा वापरल्याची शक्यता तपासात आहे. मंत्रतंत्राच्या नावाखाली गोळा केलेला पैसा ट्रस्ट, बेनामी व्यवहार आणि मालमत्ता खरेदीतून पांढरा करण्यात आला का, यावर तपास केंद्रित आहे. काही व्यवहारांमध्ये संशयास्पद पद्धतींचा वापर झाल्याचेही समोर आले आहे. एसआयटीकडून बँक व्यवहार, मालमत्ता नोंदी आणि संबंधितांच्या भूमिकेचा सखोल तपास सुरू असून, या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ई-केवायसी पूर्ण न केल्यास पगार रखडणार
मुंबई :राज्य सरकारने घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयामुळे सर्व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आता पगार मिळवण्यासाठी ईकेवायसी बंधनकारक करण्यात आली आहे. एप्रिलपासून पुढील पगार आता ईकेवायसी केल्यानंतरच कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. लाडकी बहीण योजनेनंतर आता राज्य सरकारने सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी ‘ई-केवायसी’ अनिवार्य करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. पारदर्शकता आणण्यासाठी आणि वेतनातील गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे. ज्या कर्मचाऱ्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होणार नाही, त्यांच्या पुढच्या महिन्याच्या पगारावर टांगती तलवार असणार आहे. वित्त विभागाने यासंदर्भात अधिकृत परिपत्रक जारी करून सर्व विभागांना सूचना दिल्या आहेत.राज्यात सध्या अंदाजे १८ लाख सरकारी कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी 'सेवार्थ' प्रणालीचा वापर केला जातो. तपासणी दरम्यान सेवार्थ प्रणालीमध्ये काही कर्मचाऱ्यांची माहिती दोन वेळा आढळून आली आहे. त्यामुळे एकाच व्यक्तीला दोनदा पगार किंवा चुकीच्या पद्धतीने वेतन दिले जाऊ नये, यासाठी सरकारने आधार आधारित ई-केवायसी सक्तीची केली आहे. कर्मचाऱ्याचा आधार क्रमांक, पॅन कार्ड आणि बँक खाते यांची अचूक पडताळणी व्हावी हा यामागील मुख्य उद्देश आहे. राज्य सरकारच्या नवीन नियमानुसार, कर्मचाऱ्यांना एप्रिल आणि मे महिन्याचे वेतन मिळवण्यासाठी ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. कर्मचाऱ्यांनी आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून त्याचे प्रमाणपत्र संबंधित विभाग प्रमुखांकडे जमा करणे आवश्यक आहे. सेवार्थ प्रणालीतील बँक खाते आणि ई-केवायसी मधील बँक खाते यांची पडताळणी झाल्यानंतरच पगार खात्यात जमा होईल.ई-केवायसी करण्यापूर्वी या गोष्टी तपासा : प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी कर्मचाऱ्यांनी काही महत्त्वाच्या बाबींची खात्री करून घेणे आवश्यक आहे. तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे अनिवार्य आहे. जर लिंक नसेल, तर त्वरित बँकेत जाऊन हे काम पूर्ण करा. आधार कार्डवरील नाव आणि सेवार्थ प्रणालीतील नाव यामध्ये तफावत नसावी. तसेच ई-केवायसी यशस्वी झाल्याचे डिजिटल प्रमाणपत्र आपल्या कार्यालयात वेळेत सादर करणे देखील बंधनकारक करण्यात आले आहे.सेवार्थ प्रणालीत होणार बदल : या निर्णयामुळे आता प्रत्येक कर्मचाऱ्याची माहिती नव्याने अपडेट केली जाणार आहे. यामुळे प्रशासकीय कामात सुसूत्रता येईल आणि सरकारी तिजोरीवर होणारा अनावश्यक बोजा कमी होण्यास मदत होईल. जे कर्मचारी ही प्रक्रिया पूर्ण करणार नाहीत, त्यांना एप्रिल महिन्यापासून पगारासाठी प्रतीक्षा करावी लागू शकते.
महाराष्ट्रात १६ मेपासून जनगणना, देशात प्रथमच डिजिटल पद्धतीचा वापर
मुंबई : २०२७ च्या जनगणनेचे वेळापत्रक देशव्यापी जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्रात जनगणनेचा पहिला टप्पा १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत पार पडेल. स्व-गणना १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत केली जाईल. हा देशव्यापी जनगणना कार्यक्रम १६ एप्रिल २०२६ रोजी सुरू होईल आणि ३० सप्टेंबरपर्यंत चालेल. ही जनगणना प्रथमच डिजिटल पद्धतीने केली जात असून, प्रथमच स्व-गणनेचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. स्व-गणना ही एक सुरक्षित वेब-आधारित सुविधा आहे, ज्याद्वारे प्रतिसादक घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यापूर्वी १६ भाषांमध्ये आपली माहिती ऑनलाइन नोंदवू शकतात. या जनगणनेत डेटाची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सर्व आवश्यक तरतुदी करण्यात आल्या आहेत. देशभरात ३० लाखांहून अधिक गणक, पर्यवेक्षक आणि इतर अधिकारी २०२७ ची जनगणना पार पाडतील. गणक त्यांच्या स्मार्टफोनचा वापर करून एका मोबाईल ॲपद्वारे थेट डेटा गोळा करून सादर करतील.भारताच्या भविष्यातील नियोजनासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली ‘जनगणना २०२७’ आता प्रत्यक्षात सुरू होत आहे. या मोहिमेचा पहिला टप्पा, जो ‘घरयादी व घरगणना’ असा आहे, तो आगामी १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत संपूर्ण राज्यात राबविण्यात येणार आहे. ‘आपली जनगणना – आपला विकास’ या संकल्पनेवर आधारित ही प्रक्रिया राबवण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. या पहिल्या टप्प्यात केवळ घरांची नोंदणी आणि घरांमध्ये उपलब्ध असलेल्या सोयीसुविधांची माहिती संकलित केली जाणार आहे. या टप्प्यात प्रगणक घरोघरी जाऊन घराला क्रमांक देणे, घराचे स्वरूप (कच्चे/पक्के), पिण्याचे पाणी, वीज, शौचालय आणि कुटुंबातील सदस्यांची प्राथमिक माहिती घेतील.माहिती गोपनीय ठेवली जाणार : ‘सार्वजनिक कल्याणासाठी जनगणना’ ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. नागरिकांनी आपल्या घरी येणाऱ्या प्रगणकांना घाबरून न जाता किंवा कोणतीही माहिती न लपवता वस्तुनिष्ठ माहिती द्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दिलेली सर्व माहिती कायदेशीररीत्या गोपनीय ठेवली जाणार असून, तिचा वापर केवळ लोककल्याणाच्या योजना आखण्यासाठीच केला जाणार आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरे कुटुंबप्रमुखाकडून गणनाकाराला दिली जातील. गणनाकार ही माहिती सुरक्षितपणे संग्रहित करेल. ही संपूर्ण प्रक्रिया डिजिटल पद्धतीने पूर्ण केली जाईल.कोव्हिड महामारीमुळे विलंब : नियमानुसार, दर १० वर्षांनी जनगणना होणे अपेक्षित असते, त्यानुसार २०२१ मध्ये जनगणना होणे नियोजित होते. मात्र, कोविड-१९ महामारीच्या संकटामुळे ती पुढे ढकलण्यात आली. २०११ मध्ये झालेली जनगणना ही १५ वी राष्ट्रीय जनगणना होती. त्यावेळी झालेल्या जनगणनेत महाराष्ट्राची लोकसंख्या साधारणपणे ११.२४ कोटी इतकी नोंदवण्यात आली होती. २०२१ ची प्रलंबित जनगणना कोरोना महामारीनंतर विविध तांत्रिक आणि प्रशासकीय कारणांमुळे ही प्रक्रिया अजूनही पूर्ण झालेली नाही.
कुर्ला बस दुर्घटना प्रकरणातील आरोपी बस चालकाला जामीन
मुंबई: सव्वा वर्षापूर्वी कुर्ला पश्चिम येथे बेस्टचा भीषण अपघात झाला होता. या अपघात दुर्घटनेतील आरोपी चालक संजय मोरेला उच्च न्यायालयाने सोमवारी जामीन मंजूर केला. आरोपी चालक मोरेने यापूर्वी जामिनासाठी याचिका दाखल केली होती. ९ डिसेंबर २०२४ रोजी कुर्ला पश्चिम येथे बेस्टचा भीषण अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला, तर ३७ जण जखमी झाले. यासह अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले होते. मोरे हा गेल्या वर्षभरापासून कोठडीत आहे. मोरे हा अनुभवी चालक असून त्याच्यावर सदोष मनुष्यवधाच्या आरोपाखाली खटला चालवण्यात येऊ नये, असा युक्तिवाद मोरेच्या वकिलांनी केला. पण इलेक्ट्रिक बस चालवण्याचे केवळ ३ दिवसांचे प्रशिक्षण त्यामुळे अशा बस चालवण्याचा अनुभवाचा अभाव असल्याचे सरकारी वकिलांनी निरिक्षण नोंदवले. मात्र,अखेर सव्वा वर्षानंतर संजय मोरेला जामीन मंजूर करण्यात आलाय.
India Growth Rate: युद्ध लांबल्यास भारताला मोठा धक्का? विकास दर घटणार, महागाई गगनाला भिडणार!
India Growth Rate :
Stock Market: शेअर बाजारात मोठी घसरण! पण पुढच्या सहा महिन्यांत येणार जबरदस्त तेजी?
Stock Market: युद्धाचा भारताबरोबरच जागतिक शेअर बाजारावर पहिले सहा महिने तरी नकारात्मक परिणाम होणार आहे. कारण सध्या खनिज तेलाचे दर 115 डॉलरवर गेले आहेत.
दुर्दैवी घटना..! पाणी साठवण तलावात तीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू, एकाचा थरारक बचाव
Ghodegaon News :
LPG Cylinder : आनंदाची बातमी.! ‘या’लोकांना दरवर्षी मिळणार २ मोफत गॅस सिलिंडर; वाचा सविस्तर…
सध्या देशभरात गॅस सिलिंडर टंचाईसदृश स्थिती आहे. त्यामुळे एनडीएने मोफत सिलिंडरविषयी दिलेले आश्वासन चर्चेचा विषय ठरणार आहे.
Rahul Gandhi: ‘देशाला दाखवू खरा पंतप्रधान कोण’; राहुल गांधींच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
Rahul Gandhi:
Sunil Tatkare : ‘राष्ट्रवादी विलिनीकरणाला माझा विरोध नव्हता’; सुनील तटकरेंच सर्वात मोठं वक्तव्य
Sunil Tatkare :
Anil Gurav : क्रीडा विश्वावर शोककळा ! दिग्गज क्रिकेटपटू अनिल गुरव यांचे निधन
क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर ज्यांना सर म्हणायचा आणि ज्यांच्या बॅटीने त्याने आपल्या कारकिर्दितील पहिले शतक ठोकले, ते दिग्गज खेळाडू अनिल गुरव (Anil Gurav) यांचे निधन झालं आहे.
रेडी रेकनर दर 'जैसे थे', फडणवीस सरकारचा घर खरेदीदारांना दिलासा
मुंबई : नवीन घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांना राज्य सरकारने एक अत्यंत सुखद वार्ता दिली आहे. २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी रेडी रेकनरच्या दरांमध्ये कोणतीही वाढ न करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय फडणवीस सरकारने घेतला आहे. यामुळे १ एप्रिल २०२६ पासून लागू होणारे रेडी रेकनरचे दर ‘जैसे थे’ राहणार असून, सामान्यांच्या खिशावर पडणारा अतिरिक्त मुद्रांक शुल्काचा बोजा आता टळणार आहे.महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी याबाबत घोषणा केली. या निर्णयामुळे राज्याच्या विकासात महत्त्वाचा वाटा असलेल्या बांधकाम क्षेत्राला मोठी गती मिळणार असल्याचे ते म्हणाले. गेल्या काही वर्षांपासून जागतिक आर्थिक परिस्थिती आणि बांधकाम साहित्याच्या वाढलेल्या किमतींमुळे हे क्षेत्र आव्हानात्मक स्थितीतून जात आहे. या पार्श्वभूमीवर, क्रेडाईसह विविध संघटनांनी दर न वाढविण्याची विनंती शासनाकडे केली होती. जनहिताचा विचार करून शासनाने यंदा दरवाढीची टक्केवारी ‘निरंक’ ठेवली आहे.या संदर्भात माहिती देताना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, मिळकतींचे वास्तव आणि बाजारातील सद्यस्थिती लक्षात घेऊनच हे बाजारमूल्य निश्चित करण्यात आले आहे. दस्त लेखनीक, विविध संघटनांच्या सूचना आणि हरकतींचा यथायोग्य विचार करून बांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी आम्ही हे दर स्थिर ठेवले आहेत.महसूल संकलनात विक्रमी वाढ : दर वाढविले नसले तरी राज्याच्या मुद्रांक शुल्क आणि नोंदणी विभागाने महसूल संकलनात विक्रमी झेप घेतली आहे. सन २०२५-२६ या सरत्या आर्थिक वर्षात ३० मार्च २०२६ पर्यंत राज्याच्या तिजोरीत तब्बल ६० हजार ५६८.९४ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. यापैकी सर्वाधिक ४९ हजार ५३४ कोटींचा वाटा ‘आय-सरिता’ प्रणालीचा आहे. सन २०२३-२४ मध्ये हा महसूल ५० हजार कोटींच्या आसपास होता, जो आता साठ हजार कोटींच्या पार गेला आहे. यावरून दस्त नोंदणीची प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि गतिमान झाल्याचे स्पष्ट होत आहे.दस्त नोंदणीत सुसूत्रता : दर स्थिर ठेवण्यासोबतच प्रशासनाने वार्षिक मूल्य दर तक्त्यांमध्ये तांत्रिक सुसूत्रता आणण्यावर भर दिला आहे. यामध्ये नवीन विकास योजनांची (डीपी) अंमलबजावणी, नवीन सर्व्हे नंबरची नोंद आणि गावांशी संबंधित तांत्रिक दुरुस्त्यांचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे भविष्यात दस्त नोंदणी करताना नागरिकांना होणारा तांत्रिक त्रास कमी होणार असून ही प्रक्रिया अधिक वास्तववादी आणि सुलभ होणार आहे.रेडीरेकनर दर तक्ता - २०१७-१८ : सरासरी ५.८६% वाढ - २०२०-२१ : कोरोना संकटामुळे केवळ १.७४% वाढ - सन २०२२-२३ : ४.८१% वाढ. जी पुढे दोन वर्षे कायम ठेवली गेली. - सन २०२५-२६ : ग्रामीण भागात ३.३६%, नगरपालिका क्षेत्रात ४.९७%, तर महानगरपालिका क्षेत्रात ५.९५% वाढ करण्यात आली होती. तसेच मुंबई महानगरपालिका क्षेत्रासाठी ही वाढ ३.३९% होती.२०२५-२६ मधील महसुलाचे स्त्रोत - आय-सरिता - ४९,५३४.२४ कोटी - अॅडज्युडिकेशन २.० - ४,४२९.७० कोटी - ई-फायलिंग - १,२३८.२६ कोटी - ऑनलाईन लीव्ह अँड लायसन्स - ३१६.६९ कोटी - इतर : ५,०५०.०५ कोटी - एकूण : ६०,५६८.९४ कोटी
मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाचा इशारा; नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
मुंबई :भारतीय हवामान विभागाच्या ३० मार्च २०२६ रोजीच्या पाच दिवसीय अंदाजानुसार मध्य महाराष्ट्रासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वीज चमकणे, गारपीट आणि वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.हवामान विभागाने दिलेल्या सूचनांनुसार, विजेचा कडकडाट ऐकू आल्यास तात्काळ घरात किंवा सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. झाडाखाली, शेतात, पाण्याजवळ किंवा लोखंडी वस्तूंच्या जवळ उभे राहणे टाळावे. मोकळ्या जागेत मोबाईल फोनचा वापर करू नये. तसेच निवाऱ्यापासून दूर असल्यास जमिनीवर न पडता पाय एकत्र करून बसून राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.ग्रामपंचायत, पोलीस आणि आरोग्य विभागामार्फत तातडीने जनजागृती करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. रुग्णवाहिका व अग्निशमन दल सतर्क ठेवण्यात यावेत, तसेच शाळा, सभागृहे व सार्वजनिक इमारती सुरक्षित आश्रयस्थळ म्हणून खुले ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हवामान खात्याचे अद्ययावत संदेश गावपातळीपर्यंत पोहोचवण्यावरही भर देण्यात आला आहे.शेतकरी बांधवांनी विजेच्या इशाऱ्याच्या काळात शेतातील कामे टाळावीत, बांधकाम स्थळांवरील कामकाज तात्पुरते थांबवावे, तसेच यात्रास्थळे व मोठ्या जमावाचे कार्यक्रम तातडीने स्थगित करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे, असे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राच्या वतीने कळविण्यात आले आहे.
अश्विनी भिडेंनी BMC आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला
मुंबई : ज्येष्ठ सनदी अधिकारी अश्विनी भिडे यांनी मुंबई महापालिका आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला. मावळते महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडून त्यांनी कार्यभार स्वीकारला. मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी विराजमान झालेल्या अश्विनी भिडे या पहिल्या महिला सनदी अधिकारी आहेत. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपीन शर्मा, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, उपायुक्त (महानगरपालिका आयुक्त यांचे कार्यालय) प्रशांत गायकवाड यावेळी उपस्थित होते.अश्विनी भिडे या भारतीय सनदी सेवेतील १९९५ च्या तुकडीतील अधिकारी असून त्यांना सनदी सेवेचा सुमारे ३१ वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी आतापर्यंत महाराष्ट्रात विविध महत्त्वपूर्ण पदांचा कार्यभार सांभाळला आहे. यामध्ये प्रामुख्याने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, विभागीय आयुक्त कार्यालयाच्या अतिरिक्त विभागीय आयुक्त, महाराष्ट्र शासनामध्ये सह सचिव, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एम.एम.आर.डी.ए.) अतिरिक्त महानगर आयुक्त, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या सचिव, माननीय मुख्यमंत्री यांच्या अपर मुख्य सचिव म्हणून श्रीमती आश्विनी भिडे यांनी काम पाहिले आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून त्यांनी मुंबईत मेट्रो रेल्वेचे जाळे निर्माण करण्यात महत्त्वाचे योगदान दिले आहे. याआधी अश्विनी भिडेंनी मुंबई महापालिकेत ९ मे २०२० ते १९ मार्च २०२४ या कालावधीत अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) या पदावर काम केले आहे. मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पाच्या पूर्णत्वामध्ये देखील त्यांचे मोठे योगदान आहे. विविध ठिकाणी विविध पदांवर असताना केलेल्या उल्लेखनीय कार्यांबद्दल त्यांना विविध संस्था-संघटनांकडून पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
Pune – Sugar Factories : पुणे - साखर कारखान्यांकडे ४८९८ कोटी एफआरपी थकीत
पुणे : यंदाचा २०२५ -२६ चा ऊस गाळप हंगाम आता जवळपास संपला असून मोजकेच १० ते १२ कारखाने अद्याप सुरु आहेत. तरीसुध्दा साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांच्या एफआरपीची सुमारे ४ हजार ८९८ कोटी रुपये थकीत ठेवण्यात आलेले आहेत. शेतकऱ्यांनी घेतलेले पीक कर्ज वेळेवर परतफेड करण्याची बँकांची ३१ मार्च ही अखेरची तारीख आहे. कारखान्यांनी संपूर्ण रक्कम न दिल्यामुळे विशेषतः ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे पीक कर्ज थकीत राहण्याची दाट शक्यता असून साखर आयुक्तालयाने संबंधित कारखान्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.थकीत एफआरपीप्रश्नी संबंधित कारखान्यांच्या वेळोवेळी सुनावण्या घेण्यात आल्या असून ३१ मार्चअखेरचा थकीतचा आकडा कमी होणे अपेक्षित आहे. कारखान्यांनी सुनावण्यांमध्ये रक्कम देण्याचे कबूल केले होते. एफआरपीची रक्कम वेळेत देण्याचे कारखान्यांवर बंधनकारक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेतही साखर उद्योगाच्या विविध प्रश्नांवर मागील आठवड्यात संयुक्त बैठक झालेली आहे. पुढील आठवड्यात थकीत एफआरपीचा पुन्हा आढावा घेऊन संबंधितांच्या सुनावण्या होतील व पुढील कारवाईची भुमिका ठरवू असे पुणे.साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी सांगितले .
NCP : अजित पवारांच्या राष्ट्रवादीत फूट पाडण्यासाठी रोहित पवारांकडून ५ कोटींचे पॅकेज?
मुंबई : अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत फूट पाडण्यासाठी आणि पक्षाच्या नेत्यांची प्रतिमा मलीन करण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी ५ कोटी रुपयांचे 'पॅकेज' एका खासगी एजन्सीला दिले असल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी मंगळवारी केला. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना पगार देऊन खोटे आरोप करण्यासाठी काही लोकांची विशेष नियुक्ती करण्यात आली असून, यामागे राष्ट्रवादीला बदनाम करण्याचे मोठे षडयंत्र असल्याचा दावाही चव्हाण यांनी केला. मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना चव्हाण म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून शरद पवार गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेसवर सातत्याने चिखलफेक केली जात आहे. तुतारी गटाचे स्वतःच्या पक्षाकडे जेवढे लक्ष नाही, त्यापेक्षा जास्त लक्ष आमच्या पक्षात फूट कशी पडेल आणि आमचे नेते बदनाम कसे होतील, याकडे आहे, असेही ते म्हणाले.राष्ट्रवादी काँग्रेसच्या घटनेतून ओबीसी, सामाजिक न्याय आणि अल्पसंख्याक सेल वगळण्यात आल्याचा दावा नुकताच शरद पवार गटाच्या एका प्रवक्त्याने केला होता. यावर स्पष्टीकरण देताना चव्हाण यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या पत्राची प्रतच माध्यमांना दाखवली. आमच्या घटनेत स्थापनेपासूनच फादर बॉडी, महिला, युवक, विद्यार्थी आणि सेवादल हे पाचच फ्रंटल विभाग आहेत. ओबीसी किंवा सामाजिक न्याय हे विभाग कधीही 'फ्रंटल'मध्ये नव्हते, तर ते 'सेल' म्हणून कार्यरत आहेत. कलम ३० चा संदर्भ देऊन जनतेची दिशाभूल केली जात आहे, मात्र कलम २८.१ मध्ये या सर्व सेलचा स्पष्ट उल्लेख आहे. रोहित पवारांची टीम जाणीवपूर्वक अर्धीच माहिती पसरवून आमची प्रतिमा मलिन करत आहे, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.स्वतःच्या आमदारांकडे लक्ष द्या : रोहित पवार यांनी आमच्या पक्षावर लक्ष देण्याऐवजी आपल्या आमदारांकडे लक्ष द्यावे. मोहोळचे आमदार कोणत्या पक्षाचे कार्यक्रम घेतात आणि सोलापूरचे लोकप्रतिनिधी कोणाच्या बॅनरखाली काम करतात, हे त्यांनी तपासावे, असे ते म्हणाले. तसेच, आमच्या पक्षातील अंतर्गत प्रश्न सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सक्षम आहेत, त्यामुळे त्यात इतरांनी लुडबुड करू नये. यापुढे राष्ट्रवादी काँग्रेसवर विनाकारण टीका केली, तर त्याला 'जशास तसे' उत्तर दिले जाईल, , असा इशाराही त्यांनी दिला.
कॅनडामध्ये भारतीय वंशाच्या तरुणाची गोळ्या घालून हत्या
उटावा : कॅनडातील सरे शहरात भारतीय वंशाच्या एका व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. मृत व्यक्तीची ओळख २७ वर्षीय जसमन सेखों अशी झाली आहे. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, हा हल्ला संघटित गुन्हेगारी अर्थात गँगवॉरशी संबंधित असू शकतो. पोलिसांना संशय आहे की हल्लेखोरांनी पूर्वनियोजित कट रचून ही घटना घडवून आणली.या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना सुलिव्हन हाइट्स येथील एका टाउनहाऊस कॉम्प्लेक्समध्ये घडली. प्रत्यक्षदर्शींच्या मते, एका काळ्या एसयूव्हीने जसमन यांचा पाठलाग केला. त्यानंतर गाडीतून दोन जण खाली उतरले आणि त्यांनी जसमन यांच्यावर अंधाधुंद गोळीबार केला. पोलिस घटनास्थळी पोहोचेपर्यंत जसमन यांचा मृत्यू झाला होता.तपास पथकाच्या माहितीनुसार, जसमन यांचा यापूर्वीही पोलिसांशी संपर्क आला होता आणि त्यांचा अमली पदार्थांच्या तस्करीशी संबंध असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. प्राथमिक तपासात हा प्रकार संघटित गुन्हेगारी आणि गँगवॉरशी संबंधित असल्याचे दिसून येत आहे.घटनास्थळाजवळ पोलिसांना एक जळती कारही आढळून आली असून, हल्लेखोरांनी या वाहनाचा वापर केला होता का याचा तपास सुरू आहे. सरे शहरात मागील ४८ तासांत गोळीबाराची ही चौथी घटना असल्याने परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. सध्या पोलिसांकडून सखोल तपास सुरू असून आरोपींना लवकरात लवकर अटक
युद्धनौका निर्मितीमध्ये आत्मनिर्भरतेला मोठी चालनामुंबई : गार्डन रीच शिपबिल्डिंग अँड इंजिनिअर्स लिमिटेड (जीआरएसई) येथे बांधण्यात आलेली नीलगिरी दर्जाची (प्रकल्प १७ ) पाचवी आणि या वर्गातील दुसरी युद्धनौका, ‘दुनागिरी’ (यार्ड ३०२३ ), ३० मार्च, २०२६ रोजी कोलकाता येथील जीआरएसईमध्ये भारतीय नौदलाकडे सुपूर्द करण्यात आली. युद्धनौकांची रचना बांधणी करण्यामध्ये आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. प्रकल्प 17 ए फ्रिगेट्स या बहुपयोगी आणि बहु-उद्देशीय युद्धनौका असून, सागरी क्षेत्रातील सध्याच्या आणि भविष्यातील आव्हानांना तोंड देण्यासाठी त्यांची रचना करण्यात आली आहे.दुनागिरी ही पूर्वीच्या आयएनएस दुनागिरी या लिअँडर-श्रेणीच्या फ्रिगेटचीच पुढची आवृत्ती आहे. आयएनएसप्रमाणेच दुनागिरीची निर्मिती केली आहे. याआधी ५ मे १९७७ ते १० ऑक्टोबर २०१० पर्यंत दुनागिरी भारतीय नौदलाच्या ताफ्याचा एक भाग होती, आणि तिने राष्ट्राला 33 वर्षांची गौरवशाली सेवा दिली. या अत्याधुनिक फ्रिगेटने नौदल रचना, गुप्तता, मारक क्षमता, स्वचालन आणि टिकाऊपणा यामध्ये एका पिढीची झेप घेतली आहे. त्यामुळे दुनागिरी युद्धनौका बांधणीतील आत्मनिर्भरतेचे एक प्रशंसनीय प्रतीक बनली आहे.डब्ल्यूडीबी म्हणजेच ‘वॉरशिप डिझाइन ब्युरो’ द्वारे डिझाइन केलेली, आणि ‘वॉरशिप ओव्हरसीइंग टीम’ (कोलकाता) द्वारे देखरेख केलेली, पी17 ए फ्रिगेट्स स्वदेशी नौका रचना, गुप्तता, टिकाऊपणा आणि लढाऊ क्षमतेमध्ये एक झेप दर्शवते. एकात्मिक बांधकामाच्या तत्त्वज्ञानाने प्रेरित होऊन, हे जहाज नियोजित वेळेत बांधले गेले आणि सुपूर्द करण्यात आले.पी 17 (शिवालिक) श्रेणीच्या तुलनेत पी17 ए जहाजे प्रगत शस्त्र आणि सेन्सर प्रणालीने सुसज्ज आहेत. या जहाजांमध्ये संयुक्त डिझेल किंवा गॅस (सीओडीओजी) ‘ प्रोपलशन’ प्रणाली बसवलेली आहे. त्यामध्ये प्रत्येक शाफ्टवरील नियंत्रक ‘पिच प्रोपेलर’ चालवणारे एक डिझेल इंजिन आणि एक गॅस टर्बाइन, तसेच अत्याधुनिक एकात्मिक प्लॅटफॉर्म व्यवस्थापन प्रणाली (आयपीएमएस) यांचा समावेश आहे. शक्तिशाली शस्त्र आणि सेन्सर्सच्या संचामध्ये ब्रह्मोस एसएसएम , एमएफस्टार आणि एमआरसॅम कॉम्प्लेक्स, ७६ मिमी एसआरजीएम, आणि ३० मिमी आणि १२.७ मिमी क्लोज-इन वेपन सिस्टीम यांचे मिश्रण आहे. तसेच पाणबुडीविरोधी युद्धासाठी रॉकेट आणि टॉर्पेडो यांचा समावेश आहे.'दुनागिरी' हे गेल्या १६ महिन्यांत भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल होणारे पी 17 ए श्रेणीतील पाचवे जहाज आहे. पहिल्या चार पी 17 ए जहाजांच्या बांधकामातून मिळालेल्या अनुभवांमुळे, 'दुनागिरी'च्या बांधकामाचा कालावधी ९३ महिन्यांवरून (या श्रेणीतील पहिले जहाज - 'निलगिरी' - बांधण्यासाठी लागलेला कालावधी) कमी करून ८० महिन्यांपर्यंत आणणे शक्य झाले आहे.'दुनागिरी'चे नौदलाकडे हस्तांतरण हे देशाची जहाज रचना, जहाज बांधकाम आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील नैपुण्य अधोरेखित करते; तसेच जहाज रचना आणि जहाज बांधणी या दोन्ही क्षेत्रांत नौदलाने सातत्याने 'आत्मनिर्भरते'वर दिलेला भर दिसून येतो.या जहाज बांधणीमध्ये ७५ % स्वदेशी घटकांचा समावेश आहे. या प्रकल्पात २०० पेक्षा जास्त 'एमएसएमई' (सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग) सहभागी झाले आहेत. या प्रकल्पामुळे सुमारे ४.००० व्यक्तींना प्रत्यक्ष आणि १००००पेक्षा जास्त व्यक्तींना अप्रत्यक्षपणे रोजगार निर्मितीचा लाभ मिळाला आहे.
Iran-Israel conflict : मध्य पूर्व युद्धाचा ३२वा दिवस; इराण-इस्रायल संघर्ष अधिक तीव्र
तेहरान : मध्य पूर्वेमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा आज ३२वा दिवस आहे. अमेरिका आणि इस्रायल यांनी २८ फेब्रुवारी २०२६ रोजी इराणवर हल्ला सुरू केल्यानंतर संपूर्ण मध्य पूर्वेमध्ये तणाव कायम आहे. एक महिना उलटल्यानंतरही हल्ले आणि प्रत्युत्तरात्मक कारवाया सुरूच असून सलग ३२व्या दिवशीही स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत. मंगळवारी पहाटे इराणने इस्रायलची राजधानी जेरुसलेमवर हल्ला केला, तर इस्रायलने तेहरानमध्ये हल्ले केल्याने तेथील काही भागांतील वीजपुरवठा खंडित झाला. याशिवाय लेबनानमध्ये लष्करी कारवाईदरम्यान चार इस्रायली सैनिकांचा मृत्यू झाला.इस्फहान प्रांताचे राज्यपाल कार्यालयातील सुरक्षा अधिकारी अकबर सालेही यांच्या हवाल्याने माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात काही लष्करी तळांना लक्ष्य करण्यात आल्याचे समोर आले आहे. मात्र नेमक्या ठिकाणांची माहिती त्यांनी दिलेली नाही. नुकसान किती झाले किंवा कोणती जीवितहानी झाली का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. इस्फहान प्रांत हा इराणच्या संरक्षण उद्योगाचा महत्त्वाचा केंद्रबिंदू मानला जातो. येथे अनेक अणुसंबंधित सुविधा तसेच मोठे लष्करी तळ आहेत, ज्यामध्ये बदर एअरबेस, आठवा फायटर एअरबेस आणि चौथा हवाई दल तळ यांचा समावेश आहे.अमेरिका आणि इस्रायल यांनी इराणच्या अणुस्थळांवरील हल्ले अधिक तीव्र केले आहेत. संयुक्त कारवाईदरम्यान इराणमधील पाच महत्त्वाच्या अणुस्थळांना लक्ष्य करण्यात आले. अराक, अरदकान, इस्फहान, नतांज आणि बुशेहर या महत्त्वाच्या अणु केंद्रांवर हल्ले झाल्याची माहिती आहे.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मध्य पूर्वेमधील संघर्षात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. त्यांनी वारंवार इराणला गंभीर परिणामांचा इशारा दिला असला, तरी युद्धाच्या ३२व्या दिवशी होर्मुझ सामुद्रधुनीच्या मुद्द्यावर ते काहीसे मवाळ झाल्याचे दिसत आहे. ट्रम्प यांनी इराणविरोधातील लष्करी मोहिम चार ते सहा आठवड्यांत संपवण्याचे संकेत दिले आहेत. अमेरिकेला आता मध्य पूर्वेच्या ऊर्जेवर अवलंबून राहण्याची गरज नसल्याने होर्मुझ सामुद्रधुनी उघडल्याशिवायही युद्ध समाप्त करता येईल, असे त्यांचे मत आहे.दरम्यान, युद्धाच्या ३२व्या दिवशी इराणने जेरुसलेमवर मोठा हल्ला केला. मंगळवारी सकाळी शहरातील किमान १० ठिकाणी स्फोटांचे आवाज ऐकू आले. या हल्ल्याची पुष्टी इस्रायली सैन्याने केली आहे. इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) च्या माहितीनुसार, इराणच्या हवाई दलाने मध्य इराणमधील इस्फहान शहराच्या आकाशात अमेरिकन बनावटीचे MQ-9 रीपर लांब पल्ल्याचे ड्रोन पाडले. अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराण खाडी देशांतील अमेरिकन लष्करी तळांना लक्ष्य करत आहे. याच क्रमात इराणने सौदी अरेबियातील अल-खारज प्रांतावर ड्रोन डागला, मात्र सौदीच्या एअर डिफेन्स प्रणालीने तो नष्ट केला. ड्रोनचे अवशेष पडल्यामुळे सहा घरांचे किरकोळ नुकसान झाले, मात्र कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मुंबई :केंद्र सरकारने चार नवीन कामगार संहिता पूर्णपणे अंमलात आणण्यासाठी नियम जवळजवळ अंतिम केले आहेत. यामुळे पगार, ओव्हरटाईम, दैनंदिन कामाचे तास आणि सामाजिक सुरक्षा यासारख्या मूलभूत बाबींमध्ये आमूलाग्र बदल होतील. या बदलांचा प्रत्यक्ष परिणाम लाखो कर्मचारी आणि कंपन्यांवर होणार असल्याने उद्योग क्षेत्रात नवी चर्चा सुरू झाली आहे. देशभरातील कर्मचारी वर्गासाठी हे बदल १ एप्रिल २०२६ पासून अंमलात येणार आहेत.सरकारने वेतन संहिता, सामाजिक सुरक्षा संहिता, औद्योगिक संबंध संहिता आणि व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य व कामाच्या परिस्थिती संहिता अशा चार प्रमुख संहिता तयार केल्या आहेत. या चार संहितांद्वारे पूर्वीचे ४४ वेगवेगळे कामगार कायदे एका सोप्या आणि एकात्मिक चौकटीत आणले गेले आहेत. २१ नोव्हेंबर २०२५ रोजी सरकारने याबाबत अधिसूचना जारी केली होती. त्यानंतर सार्वजनिक सूचना मागवण्यासाठी मसुदा खुला ठेवण्यात आला. जानेवारी महिन्यात आलेल्या सूचनांचा विचार करून कामगार मंत्रालयाने केंद्रीय स्तरावर अंमलबजावणीसाठी नियम निश्चित केले आहेत.कामाच्या तासांबाबत पूर्वीचे नियम कायम राहतील. दररोज ८ तास आणि आठवड्यात ४८ तास एवढेच प्रमाणित कामाचे तास असतील. मात्र, कामाच्या पद्धती अधिक लवचिक करण्यात आल्या आहेत. आता कर्मचाऱ्यांना वैयक्तिक गरजेनुसार कार्यसंस्कृती उपलब्ध करून देऊ शकतील. साप्ताहिक कामाच्या तासांच्या आधारे अतिरिक्त ओव्हरटाईम करण्याचे नवे पर्यायही उपलब्ध झाले आहेत. ही ओव्हरटाईम व्यवस्था आंतरराष्ट्रीय कामगार पद्धतींशी जुळणारी आहे. त्यामुळे कर्मचारी आणि नियोक्ते दोघांनाही आवश्यक लवचिकता मिळेल आणि कामगारांच्या हक्कांचे संरक्षणही सुनिश्चित होईल.नवीन आर्थिक वर्ष १ एप्रिल २०२६ पासून पगारदार कर्मचाऱ्यांच्या आयुष्यात मोठे बदल घेऊन येत आहे. केंद्र सरकारकडून नवीन ‘कामगार संहिता’ (लेबर कोड) आणि ‘आयकर कायदा २०२५’ लागू करण्यात येणार असून, यामुळे कर्मचाऱ्यांच्या ‘पे स्लिप’ गणिते बदलणार आहेत. या बदलांमुळे कर्मचाऱ्यांच्या हातात येणाऱ्या पगारात घट होऊ शकते, मात्र निवृत्तीनंतर मिळणाऱ्या निधीत मोठी वाढ होणार आहे.नवीन नियमांनुसार, कोणत्याही कर्मचाऱ्याचा ‘मूळ पगार’ हा त्याच्या एकूण सीटीसीच्या किमान ५० टक्के असणे बंधनकारक असेल. १ एप्रिलपासून भत्त्यांचे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा जास्त ठेवता येणार नाही. ज्या कंपन्यांचा मूळ पगार सध्या ५० टक्क्यांपेक्षा कमी आहे, त्यांना तो वाढवावा लागेल. तुमचा पीएफ आणि ग्रॅच्युइटीची गणना मूळ पगारावर आधारित असते. नव्या नियमामुळे मूळ पगार वाढल्यास, पीएफमधील तुमचे आणि कंपनीचे योगदानही वाढेल. पीएफचे योगदान वाढल्यामुळे दरमहा हातात मिळणाऱ्या रोख पगारात काही प्रमाणात घट दिसून येईल.अनेक महत्त्वाच्या तरतुदी :महिला आणि ज्येष्ठ कर्मचाऱ्यांसाठीही अनेक महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. सर्व कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्र देणे आता अनिवार्य केले आहे. यामुळे रोजगार प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि औपचारिक होईल. समान कामासाठी समान पगार आणि महिलांसाठी समान संधी यांची हमी देण्यात आली आहे. योग्य सुरक्षा व्यवस्था उपलब्ध असल्यास महिला कर्मचारी विविध शिफ्टमध्ये काम करू शकतील. ४० वर्षे आणि त्यापेक्षा अधिक वयाच्या कर्मचाऱ्यांना दरवर्षी मोफत आरोग्य तपासणीचा अधिकार देण्यात आला आहे. नवीन नियमांमुळे उद्योगांना कामातील चढ-उतार सहजपणे हाताळता येतील.
Donald Trump : फ्लोरिडातील पाम बीच इंटरनॅशनल एअरपोर्टला आता डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव
वॉशिंग्टन : अमेरिकेतील फ्लोरिडा येथील पाम बीच इंटरनॅशनल एअरपोर्टचे नाव बदलून आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावावर ठेवण्यात आले आहे. एरिक ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली. वृत्तांनुसार, फ्लोरिडा राज्यात एक विधेयक मंजूर झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. या कायद्यावर फ्लोरिडाचे राज्यपाल रॉन डीसॅन्टिस यांनी स्वाक्षरी केली असून, त्यामुळे एअरपोर्टला डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव देण्यास औपचारिक मंजुरी मिळाली आहे.ट्रम्प ऑर्गनायझेशनचे अधिकारी एरिक ट्रम्प यांनी एक्स वर पोस्ट करत लिहिले, “पाम बीच इंटरनॅशनल एअरपोर्ट आता अधिकृतपणे ‘प्रेसिडेंट डोनाल्ड जे. ट्रम्प इंटरनॅशनल एअरपोर्ट’ झाला आहे. हे शक्य करण्यात माझी छोटीशी भूमिका असल्याचा मला अभिमान आहे.” या प्रयत्नात सहकार्य केल्याबद्दल त्यांनी फ्लोरिडातील राज्य अधिकाऱ्यांचे, तसेच फ्लोरिडाचे खासदार आणि अटर्नी जनरल जेम्स उथमियर यांचे आभार मानले.फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन (एफएए) ने स्पष्ट केले की एअरपोर्टचे नामकरणाचे निर्णय स्थानिक स्तरावर घेतले जातात आणि त्यासाठी त्यांच्या मंजुरीची आवश्यकता नसते. मात्र, हा बदल पूर्णपणे लागू करण्यापूर्वी काही प्रशासकीय अद्ययावत प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतील, जसे की नेव्हिगेशनल चार्ट आणि डेटाबेसमध्ये आवश्यक बदल करणे.ट्रम्प ऑर्गनायझेशनने सांगितले की फ्लोरिडातील विधेयकामुळे हा अर्ज करण्यात आला होता. तसेच, एअरपोर्टला ट्रम्प यांचे नाव देण्यात आल्याने राष्ट्राध्यक्ष किंवा त्यांच्या कुटुंबाला कोणताही आर्थिक फायदा होणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले. कंपनीने म्हटले आहे की, “यामध्ये कोणतीही रॉयल्टी, परवाना शुल्क किंवा इतर आर्थिक लाभ समाविष्ट नसतील.” अंदाजानुसार, एअरपोर्टचे नवीन नाव १ जुलैपासून लागू होऊ शकते. मात्र, ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अजून काही प्रशासकीय कामे बाकी असल्याचे सांगितले जात आहे.
राज्यात १० वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या
मुंबई : महाराष्ट्राच्या प्रशासनात महत्त्वपूर्ण फेरबदल करत राज्य सरकारने आज, मंगळवारी एकाचवेळी १० वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर केल्या आहेत. या बदल्यांमध्ये विविध महत्त्वाच्या विभागांतील पदांवर नव्या नियुक्त्या करण्यात आल्या असून, प्रशासनात कार्यक्षमता वाढवण्याचा प्रयत्न दिसून येत आहे.यामध्ये विशेष लक्षवेधी बदल म्हणजे अश्विनी भिडे यांची बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती. त्या यापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या अतिरिक्त मुख्य सचिव पदावर कार्यरत होत्या. त्यांच्या जागी १९९३ बॅचचे वरिष्ठ अधिकारी लोकेश चंद्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चंद्रा यापूर्वी महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होते. दरम्यान, भिडे यांच्याकडे मुंबई मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार कायम ठेवण्यात आला आहे.मागील सहा महिन्यांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि हिवाळी अधिवेशनामुळे प्रशासकीय बदल्या रखडल्या होत्या. मात्र मार्च अखेरीस या बदल्या अपेक्षित होत्या. त्यानुसार २८ मार्च रोजी काही बदल्या झाल्यानंतर आज मोठ्या प्रमाणावर फेरबदल जाहीर करण्यात आले.प्रमुख बदल्या पुढीलप्रमाणे :-लोकेश चंद्रा (आयएएस १९९३ ) — मुख्यमंत्री यांचे अतिरिक्त मुख्य सचिव, मुंबईअश्विनी भिडे (आयएएस १९९५ ) — आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिकाविकास चंद्र रस्तोगी (आयएएस १९९५ ) — अतिरिक्त मुख्य सचिव (वित्तीय सुधारणा), वित्त विभागविनिता वैद सिंघल (आयएएस १९९६ ) — प्रधान सचिव, मृद व जलसंधारण विभागपरिमल सिंग (आयएएस २००४ ) — सचिव (कृषी), कृषी व एडीएफ विभागतुकाराम मुंढे (आयएएस २००५ ) — सचिव, आपत्ती व्यवस्थापन व पुनर्वसन विभागलहू माळी (आयएएस २००९ ) — व्यवस्थापकीय संचालक, शिवशाही पुनर्वासन प्रकल्प लिमिटेडमाणिक गुरसाल (आयएएस S २००९ ) — सचिव, दिव्यांग कल्याण विभागप्रेरणा देशभ्रतार (आयएएस २०१०) — आयुक्त, मत्स्यव्यवसाय विभागपृथ्वीराज बी. पी. (आयएएस २०१४ ) — आयुक्त, वसई-विरार महानगरपालिकाया बदल्यांमुळे राज्यातील विविध विभागांमध्ये नवे नेतृत्व निर्माण होणार असून, प्रशासन अधिक गतिमान होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
राज्यात २३ आणि २९ एप्रिल रोजी दोन टप्प्यांत मतदान होणार असून ४ मे रोजी निकाल जाहीर होणार आहेत.
Ashok Kharat Case : SIT च्या चौकशीत मोठा खुलासा ! भोंदू अशोक खरातचे ‘ते’गुपित समोर
लैंगिक अत्याचार आणि जमीन बळकाव प्रकरणात अटकेत असलेल्या ‘भोंदू’ अशोक खरात (Ashok Kharat Case) याच्या पापकर्मांचा कच्चा चिट्ठा आता एसआयटी (SIT) च्या चौकशीत उघड होत चालला आहे.
Arjun khotkar : अर्जुन खोतकर यांना हायकोर्टाचा मोठा दिलासा! कैलास गोरंट्याल यांची ‘ही’याचिका फेटाळली
Arjun khotkar : जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांची आमदारकी कायम राहणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने कैलास गोरंट्याल
भारतामध्ये कामकाजाची बदलती संस्कृती, वाढती अणुकुटुंब व्यवस्था आणि महिलांचा वाढता रोजगार सहभाग लक्षात घेता पितृत्व रजा हा आता सामाजिक नव्हे तर धोरणात्मक मुद्दा बनत चालला आहे.
Toll Tax: टोल नाक्यावर आता रोख रक्कम चालणार नाही; 1 एप्रिलपासून NHAIचा नवा नियम लागू
Toll Tax: डिजिटल इंडियाच्या दिशेने हे एक मोठे पाऊल मानले जात आहे. यामुळे हायवेवरील प्रवास अधिक वेगवान, सोपा आणि शिस्तबद्ध होणार आहे.
SBL Energy Blast : कंपनीचे मालक अजूनही ‘आऊट ऑफ रिच’
महिनाभरात तब्बल २६ कामगारांचा तडफडून मृत्यूनागपूर : नागपूर जिल्ह्यातील राऊळगाव येथे असलेल्या एसबीएल एनर्जी लिमिटेड कंपनीत १ मार्च रोजी झालेल्या भीषण स्फोटात आतापर्यंत २६ कामगारांचा मृत्यू झाला आहे. यापैकी १५ जण घटनास्थळी आणि ११ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. या घटनेला एक महिना उलटून देखील कंपनीचे मालक संजय चौधरी आणि आलोक चौधरी यांचा ठाव ठिकाणी कळलेला नाही. तर कळमेश्वर पोलिसांना चौधरींवर गुन्हा दाखल करण्यापलिकडे अद्याप काहीच ठोस कारवाई करता आलेली नाही.नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर पोलिस ठाण्यातंर्गत येणाऱ्या राहुळगांव येथील एसबीएल एनर्जी लिमिटेड १ मार्च २०२६ रोजी पहाटे ५.३० वाजेच्या सुमाराला भीषण स्फोट झाला. एसबीएल एनर्जी लिमिटेड ही कंपनी खाणी, खनन आणि औद्योगिक वापरासाठी विविध प्रकारची विस्फोटके तयार करते. स्लरी एक्सप्लोसिव्ह्ज, इमल्शन एक्सप्लोसिव्ह्ज, बुल्क विस्फोटके, डेटोनेटर, डेटोनेटिंग फ्युज आणि कम कॉलम चार्ज विस्फोटके आदी उत्पादनात कंपनी कार्यरत आहे.उपलब्ध माहितीनुसार, सदर कंपनी महाराष्ट्रात नोंदणीकृत असून तिचे मुख्यालय नागपूर शहरात आहे. कंपनीचा नोंदणी क्रमांक U24292MH2002PLC134851 असा आहे. कंपनीचे कार्यकारी संचालक तथा मुख्य अधिकृत व्यक्ती म्हणून आलोक चौधरी यांचे नाव नोंद आहे.कंपनीची स्थापना २००२ साली ‘अमिन एक्सप्लोसिव्हज प्रा. लि.’ या नावाने झाली होती. त्यानंतर २०१६ मध्ये चौधरी कुटुंबाने कंपनीचे अधिग्रहण करून तिचे नाव बदलल्याचे आर्थिक अहवालांमधून समोर आलेय.बारूद व स्फोटक उत्पादक कारखान्यांना परवाने देणे, सुरक्षिततेचे निरीक्षण करणे आणि नियमांची अंमलबजावणी करणे ही जबाबदारी “पेट्रोलियम अँड एक्स्प्लोसिव्ह सेफ्टी ऑर्गनायझेशन” (पेसो) यांच्याकडे असून पेसोचे मुख्यालयही नागपूरमध्येच आहे. मात्र, नागपूर जिल्ह्यातील छोट्या-मोठ्या विस्फोटक कारखान्यांमध्ये वारंवार होणारे स्फोट, जीवितहानी आणि जखमींची वाढती संख्या यामुळे पेसोच्या निरीक्षण प्रक्रियेवर आणि नियमांच्या काटेकोर अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. एसबीएल एनर्जी लिमिटेड मधील स्फोटानंतर घटनेच्या सखोल चौकशीची मागणी करण्यात आली. परंतु, अद्याप प्रशासनाला कगदी घोडे नाचवण्यापलिकडे काहीच करता आले नसल्याची खंत स्थानिकांकडून व्यक्त केली जातेय.एसबीएलचे मलक अजूनही परांगदाचगेल्या १ मार्च रोजी झालेल्या भीषण दुर्घटनेनंतर एसबीएल एनर्जी लिमिटेडचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. याप्रकरणी २१ जणांना आरोपी बनवण्यात आले असून ११ जणांना अटक करण्यात आली आहे. परंतु, कंपनीचे मालक संजय चौधरी आणि आलोक चौधरी दोघेही नॉट रिचेबल झालेत. या दुर्घटनेनंतर दोघेही देश सोडून पळल्याचीही शंका व्यक्त होत आहे. कारखान्यातील स्फोटाच्या दिवशी संजय चौधरी आणि आलोक चौधरी हे रविवारीच छत्तीसगडची राजधानी रायपूर येथून नागपूरला निघाले होते. दोघेही सायंकाळपर्यंत पोचतील असा दावा ग्रामीण पोलिस करत होते. मात्र गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच ते नॉट रिचेबल झाले असून अजूनही पोलिसांसाठी आऊट ऑफ रिच आहेत. त्यामुळे या दुर्घटनेत तडफडून प्राण गमावणाऱ्या २६ जणांना नेमका न्याय कधी आणि कसा मिळेल..? असा प्रश्न त्यांचा कुटुंबिय विचारत आहेत.
मुंबई : १४० कोटी भारतीय नेभळट आणि भ्याड नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखे समर्थ नेतृत्व जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे असताना जनतेला कोणाची भीती नाही मात्र विधानसभा, महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये पराभूत करून मतदारांनी उबाठा गट आणि संजय राऊत यांना नामर्द, नेभळट केले आहे असा घणाघात भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी मंगळवारी केला. अमेरिकन जनता ट्रम्प विरोधात रस्त्यावर उतरली म्हणून अमेरिकन जनतेचे कौतुक करून भारतात मात्र भारतीय जनता पार्टीने जनतेला नामर्द, भ्याड बनवले आहे असा आरोप केला होता त्यावर पलटवार करत राऊतांना त्यांनी लक्ष्य केले. भाजपाने जनतेला सक्षम बनवले असल्याचे ते म्हणाले.भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणांमध्ये ‘हमाम मे सब नंगे’ असे म्हणणा-या राऊतांना खडे बोल सुनावत श्री. बन म्हणाले की भोंदूबाबा खरातच्या आश्रमाला पाणी पुरवठा करणा-या, त्याला पायघड्या घालणा-या महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेहेरबानीमुळेच भोंदूबाबाचे फावले होते. त्यामुळे भोंदूबाबा प्रकरणात म्हणजेच या हमाम मध्ये नेमके कोण कोण न्हाऊन निघाले होते असा खोचक सवाल श्री. बन यांनी केला. भोंदूबाबाला मिलिंद नार्वेकर भेटले होते, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी कदाचित नार्वेकरांनी भोंदूबाबाला नवस बोलला असण्याची दाट शक्यता आहे असा सणसणीत टोलाही त्यांनी लगावला. नार्वेकरांनी भोंदूबाबाकडे कोणता नवस बोलला होता हे स्पष्ट करावे असे आव्हान त्यांनी दिले.भोंदूबाबा प्रकरणात थेट राष्ट्रपतींनी बोलावे, पंतप्रधानांनी बोलावे अशी हास्यास्पद मागणी करणा-या राऊतांना खरमरीत प्रश्न विचारत श्री. बन यांनी त्यांची कोंडी केली. भोंदूबाबा प्रकरणात उद्धव ठाकरे चकार शब्द काढत नाहीत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना भोंदूबाबाच्या आश्रमाला शेतक-यांच्या हक्काचे पाणी का दिले या प्रश्नाचे उत्तर आधी उद्धव ठाकरे यांनी द्यावे असे ते म्हणाले. नार्वेकर आणि भोंदूबाबाची भेट का झाली याबद्दल नार्वेकर पत्रकारांसमोर येऊन खुलासा करणार आहेत का? असाही सवाल त्यांनी केला.भोंदूबाबाच्या पापांचा पूर्ण कच्चाचिठ्ठा बाहेर काढल्याशिवाय आणि त्याला फासावर पोहोचवल्याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकार स्वस्थ बसणार नाही. महिलांचे लैंगिक शोषण करणा-या, कोट्यवधींची मालमत्ता जमा करणा-या भोंदूबाबाला बेड्या ठोकण्याचे काम महायुती सरकारने केले. मविआ सरकारमध्ये ती हिंमत नव्हती अशी टीका श्री. बन यांनी केली. जेलमध्ये खरात भोंदूचा घातपात होणार नाही वडेट्टीवार, राऊतांनी निश्चिंत रहावे मात्र या भोंदूबाबाला कायद्यानुसार निश्चित शिक्षा होणार अशी ग्वाही त्यांनी दिली.सेंट्रल फोर्स मध्ये, अधिकाऱ्यांमध्ये, लष्करामध्ये अस्थिरता आहे असा ढोल बडवणा-या राऊतांच्या, भारतात अराजक पसरावे या स्वप्नावर श्री. बन यांनी कोरडे ओढले. राऊत यांच्या स्वप्नांना मुंगेरीलाल के हसीन सपने संबोधत त्यांनी खिल्ली उडवली. पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात कोठेही अस्थिरता नाही, देश मजबूत आहे. मात्र भारताचा होत असलेला विकास, प्रगती बघवत नसल्याने राऊत आणि विरोधक अस्वस्थ आहेत असेही त्यांनी नमूद केले.
नवीन आयकर कायदा आणि अनेक अर्थसंकल्पीय तरतुदी १ एप्रिलपासून होणार लागू
नवी दिल्ली : नवीन आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या सुरुवातीबरोबरच, देशाच्या आयकर रचनेतही १ एप्रिलपासून मोठे बदल होणार आहेत. नवीन आयकर कायदा, २०२५, बुधवारी लागू होईल आणि तो सुमारे सहा दशके जुन्या १९६१ च्या कायद्याची जागा घेईल. हा नवीन कायदा कर प्रणाली, कार्यपद्धती आणि नियमांमध्ये अनेक महत्त्वपूर्ण बदल घडवून आणतो. सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे आर्थिक वर्ष आणि निर्धारण वर्षाऐवजी एकाच 'कर वर्षा'ची सुरुवात, ज्यामुळे कर भरण्याची प्रक्रिया सोपी होईल.आयकर विभागाच्या माहितीनुसार, नवीन आयकर कायदा आणि इतर अर्थसंकल्पीय तरतुदी १ एप्रिलपासून लागू होतील. या अर्थसंकल्पीय तरतुदींमध्ये फ्युचर्स आणि ऑप्शन्स ट्रेडिंगवरील वाढीव सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स आणि वैद्यकीय व शैक्षणिक उद्देशांसाठी परदेशी प्रवास पॅकेजेस आणि एलआरएस रेमिटन्सवरील कमी टीसीएस यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, भारतात डेटा सेंटर सेवा वापरणाऱ्या परदेशी कंपन्यांना २०४७ पर्यंत २० वर्षांची करमाफी आणि सॉफ्टवेअर कंपन्यांसाठी सेफ हार्बर तरतुदींची व्याप्ती वाढवण्यासंबंधीच्या अर्थसंकल्पीय घोषणा देखील बुधवारपासून, २०२६-२७ या आर्थिक वर्षापासून लागू होतील.नवीन कायद्याचा उद्देश तेच कर धोरण अधिक तर्कसंगत, सुलभ आणि वाचकांसाठी सोप्या स्वरूपात सादर करणे हा आहे. संक्रमण कालावधीत, त्याचे ई-फायलिंग प्लॅटफॉर्म जुन्या आणि नवीन दोन्ही आयकर कायद्यांनुसार अनुपालन सुलभ करेल. शिवाय, मागील वर्षांशी संबंधित सर्व मूल्यांकन, अपील आणि इतर कार्यवाही अंतिम निकाल लागेपर्यंत जुन्या कायद्यानुसार सुरू राहतील. २०२६-२७ या मूल्यांकन वर्षासाठी (ज्यात जुन्या कायद्याचा कालावधी समाविष्ट आहे) जुलैमध्ये विवरणपत्र दाखल करणारे करदाते जुन्या कायद्यानुसार विहित केलेले तेच फॉर्म वापरतील. २०२६-२७ या कर वर्षासाठी आगाऊ कर भरणे जूनमध्ये सुरू होईल. आयकर कायदा, २०२५, मूल्यांकन वर्ष आणि मागील वर्ष यांमधील फरक काढून टाकतो आणि एकच कर वर्ष लागू करतो.याव्यतिरिक्त, अंतिम मुदतीनंतर आयकर विवरणपत्र दाखल केले असले तरीही, टीडीएस (स्रोतस्थानी कर कपात) चा परतावा कोणत्याही दंडाशिवाय दिला जातो. १ एप्रिलपासून लागू होणारा आणखी एक मोठा बदल म्हणजे फ्युचर्स आणि ऑप्शन्स (एफअँडओ) व्यवहारांवरील एसटीटीमध्ये वाढ. फ्युचर्स करारांवरील एसटीटी ०.०२ टक्क्यांवरून ०.०५ टक्क्यांपर्यंत वाढेल. ऑप्शन प्रीमियम आणि ऑप्शन्सच्या एक्सरसाइजवरील एसटीटी अनुक्रमे ०.१ टक्के आणि ०.१२५ टक्क्यांवरून ०.१५ टक्क्यांपर्यंत वाढेल. एसटीटीमधील या वाढीचा उद्देश इक्विटी बाजाराच्या एफअँडओ विभागातील सट्टेबाजीला आळा घालणे आणि लहान गुंतवणूकदारांना मोठ्या नुकसानीपासून वाचवणे हा आहे.आकडेवारीनुसार, इक्विटी डेरिव्हेटिव्ह्ज (एफअँडओ) विभागात व्यवहार करणाऱ्या वैयक्तिक गुंतवणूकदारांची संख्या २०२४-२५ मधील १०.६ दशलक्षवरून २०२५-२६ मध्ये (३० डिसेंबर २०२५ पर्यंत) अंदाजे ७५.४३ लाखांपर्यंत घटली आहे. सेबीच्या 'ग्रोथ इन द इक्विटी डेरिव्हेटिव्हज सेगमेंट व्हर्सेस द कॅश मार्केट' या अभ्यासानुसार, २०२४-२५ मध्ये वैयक्तिक गुंतवणूकदारांना १.०५ लाख कोटी रुपयांहून अधिक निव्वळ तोटा झाला. याव्यतिरिक्त, आयटी सेवांसाठी 'सेफ हार्बर' मर्यादा ३०० कोटी रुपयांवरून २,००० कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. यामुळे आयटी/आयटीईएस क्षेत्राला अधिक निश्चितता मिळण्याची आणि कायदेशीर वाद कमी होण्याची अपेक्षा आहे. आयटी सेवांसाठी 'सेफ हार्बर' मर्यादा ही ट्रान्सफर प्राइसिंगचे वाद कमी करण्यासाठी तयार केलेली एक कर यंत्रणा आहे.उदारीकृत रेमिटन्स योजनेअंतर्गत (एलआरएस) परदेशी प्रवास पॅकेजेस आणि वैद्यकीय व शैक्षणिक उद्देशांसाठी पाठवलेल्या रकमेवरील टीसीएस (स्रोतस्थानी गोळा केलेला कर) मधील कपातीचा उद्देश मध्यमवर्गाला दिलासा देणे हा आहे. परदेशी प्रवास पॅकेजेसवरील टीसीएस २० टक्क्यांवरून २ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे. वैद्यकीय आणि शैक्षणिक उद्देशांसाठी पाठवलेल्या रकमेवरील टीसीएस ५ टक्क्यांवरून २ टक्क्यांपर्यंत कमी केला जाईल. याव्यतिरिक्त, केंद्रीय अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या २० वर्षांच्या कर सवलतीमुळे देशांतर्गत डेटा सेंटर कंपन्यांना लक्षणीय फायदा होण्याची अपेक्षा आहे, कारण यामुळे त्यांना जागतिक ग्राहकांना सेवा देताना त्यांच्या परदेशी उत्पन्नावर भारतात कर आकारला जाण्याचा धोका टाळण्यास मदत होईल.२०२६-२७ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात अशी तरतूद आहे की, भारतात डेटा सेंटर सेवांचा वापर करणाऱ्या कोणत्याही परदेशी कंपनीला २०४७ पर्यंत २० वर्षांची कर सवलत मिळेल, ज्यामुळे त्यांच्या जागतिक उत्पन्नावर भारतीय कर अधिकाऱ्यांकडून कर आकारला जाण्याचा धोका नाहीसा होईल. एखादी जागतिक कंपनी भारतात स्वतःचे डेटा सेंटर स्थापन करो किंवा भारतीय डेटा सेंटरच्या सेवांचा वापर करो, करप्रणाली तीच राहील, ज्यामुळे स्पर्धेसाठी समान संधी सुनिश्चित होईल. भारतातील प्रभावी कॉर्पोरेट कर दर २५.१७ टक्के आहे.
Baramati By-Election : बारामतीची पोट निवडणूक बिनविरोध होणार नाही; ‘या’बड्या नेत्याने थोपटले दंड
अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा जागेसाठी (Baramati By-Election) होणाऱ्या पोटनिवडणुकीत बिनविरोध होण्याची शक्यता मावळली आहे.
भाजपचा मास्टरस्ट्रोक! महिलांना दरमहा २५०० रुपये अन् गरीब कुटुंबांना २ सिलिंडर फ्री
kerala election 2026 केरळ विधानसभा निवडणूक २०२६ साठी भाजपने जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यात महिलांना आर्थिक मदत, मोफत सिलिंडर आणि हाय-स्पीड रेल्वेचे आश्वासन दिले आहे.
सोशल मीडियावर ओळख अन् शाळेतून पळवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार
नागपूर : सोशल मीडियावर होणाऱ्या ओळखी या अत्यंत भयानक रूप घेऊ शकतात, याचा प्रत्यय या नागपूरच्या घटनेमधून स्पष्ट होत आहे. इंटरनेट आणि सोशल मीडियाचा वापर हा चांगला जरी असला तरी त्याचे तोटे ही तितकेच वाईट आणि भयानक आहेत. नागपुरात अशाच सोशल मीडियाच्या माध्यमातून एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कदायक घटना घडली आहे.नेमकं काय घडलं?मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही नागपूर शहरातील सिव्हिल लाईन्स हा भागात राहत असून एका नामांकित शाळेत शिक्षण होती. या प्रकरणातील आरोपी करण केशव केशी ( वय २८ ) हा टाईल्स फिटिंगचे काम करतो. त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून या अल्पवयीन मुलीशी ओळख वाढवून तिला आपल्या प्रेमाच्या जाळयात ओढले.हॉटेल मध्ये नेऊन ...त्यानंतर १८ मार्च आणि १७ मार्च या दोन दिवशी आरोपीने पीडितेला शाळेच्या गेटवरून फूस लावून पळवून नेले. ओळख पटू नये म्हणून शाळेचा गणवेश काढून सार्वजनिक सुलभमध्ये तिला कपडे बदलण्यास सांगितले. नागपुरातील फ्रेंड्स कॉलनीतील एका हॉटेलमध्ये नेऊन दुसऱ्याच मुलीचे आधारकार्ड दाखवत रूम बुक केली आणि तिच्यावर अत्याचार केला.आपला सोशल मीडियावरचा चांगला मित्र समजून अल्पवयीन मुलगी या तरुणासोबत गेली होती. परंतु आरोपीने जेव्हा तिला स्पर्श करायला सुरुवात केली तेव्हा तिने या गोष्टीला विरोध करताच आरोपीने तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार केले.मुलगी शाळेत सतत गैरहजर असल्याचे पालकांना मेसेजमुलगी शाळेत अनुपस्थित असल्याचे मेसेज पालकांना मिळत होते. मुलीच्या वागण्यातील बदल आणि शाळेतल्या तिच्या दांड्या यावरून आई बाबांनी विश्वासात घेऊन तिची विचारपूस केली असता घाबरलेल्या मुलीने घडलेला सर्व प्रकार आपल्या पालकांना सांगितला.पोलीस तपासया प्रकारणानंतर पालकांनी ताबडतोब पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. सदर पोलिसांनी आपली चक्र फिरवत आरोपी केशी याला बेड्या ठोकल्या.सोशल मीडियाचा वापर हा किती भयानक ठरू शकतो. हे या घटनेनंतर स्पष्ट झाले आहे. पालकांनी आपल्या मुलांना फोन देण्यासोबतच आपली मुलं सोशल मीडियाचा गैरवापर तर करत नाहीत ना? याकडे ही लक्ष द्यायला हवे. या घटनेवरून सोशल मीडियाचा वापर आणि अल्पवयीन मुलांच्या सुरक्षितेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यासाठी १ व ३ एप्रिल रोजी येलो तर २ एप्रिल रोजी ऑरेंज अलर्ट जारी
चंद्रपूर : नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार चंद्रपूर जिल्ह्यासाठी दिनांक १ व ३ एप्रिल २०२६ रोजी येलो अलर्ट तर २ एप्रिल रोजी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या कालावधीत जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह गडगडाटी वादळ, सोसाट्याचा वारा (ताशी ४० ते ५० किमी वेगाने) तसेच गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.दरम्यान, काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असून नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी केले आहे.संभाव्य आपत्ती टाळण्यासाठी नागरिकांनी मुसळधार पाऊस व जोरदार वाऱ्याच्या वेळी घरात सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. खिडक्या व दरवाजांपासून दूर राहावे तसेच सखल भाग, अंडरपास, ड्रेनेज परिसर किंवा पाणी साचणाऱ्या ठिकाणी जाणे टाळावे. खराब दृश्यमानतेमुळे पावसात वाहन चालवणे टाळावे आणि विजेच्या तारांपासून तसेच पॉवर लाईन्सपासून दूर राहावे.वादळ व विजांच्या कडकडाटाच्या वेळी मोकळ्या जागेत असल्यास सुरक्षित इमारतीचा आसरा घ्यावा. उंच झाडाखाली, लोखंडी वस्तूजवळ किंवा तात्पुरत्या शेडमध्ये थांबू नये. घरात असताना विद्युत उपकरणे बंद ठेवावीत, लँडलाईन फोनचा वापर टाळावा तसेच पाण्याच्या संपर्कात येणे टाळावे. प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे व आवश्यक सूचना पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.दरम्यान, महाकाली यात्रेदरम्यान जिल्ह्यात येणाऱ्या भाविकांनीही हवामानाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी केले आहे. यात्रेसाठी आलेल्या भक्तांनी निवारा क्षेत्राच्या अधिक माहिती करिता मंदिर परिसरातील नियंत्रण कक्षा भेट देऊन अधिक माहिती घ्यावी.
Black Magic on Ajit Pawar: “सत्य लपवण्यासाठी एवढा अट्टहास का? कितीही प्रयत्न केला तरी सत्य लपवता येत नाही, ते कधीतरी बाहेर येते,” असे म्हणत रोहित पवार यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
Tukaram Mundhe : आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची आपत्ती व्यवस्थापन आणि महसूल विभागाच्या प्रधान सचिवपदी बदली झाली आहे.
पोटनिवडणुकीच्या रिंगणात मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि त्यांचे संपूर्ण मंत्रिमंडळ ठाण मांडून बसले आहे. यावरून काँग्रेसला पराभवाची मोठी भीती सतावत असल्याचे स्पष्ट होत आहे
Ashok Kharat Case : अशोक खरातच्या बायकोला अटक होणार? शिर्डीतील ‘ते’प्रकरण भोवणार
लैंगिक अत्याचार प्रकरणात आधीच अटकेत असलेल्या भोंदू अशोक खरात (Ashok Kharat Case) याच्या कुटुंबावर आता नवा गंभीर आरोप समोर आला आहे.
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचा मोठा धमाका; ‘या’३ कॅबिनेट मंत्र्यांवर मोठी जबाबदारी
Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या विभागीय संपर्क प्रमुखांची घोषणा केली आहे.
आयपीएल २०२६ स्पर्धेला स्फोटक सुरुवात झाली आहे. राजस्थान रॉयल्सने (Vaibhav Suryavanshi Record) उद्घाटन सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा ८ विकेट्स आणि ४७ चेंडू राखून दणदणीत पराभव केला.
कलाक्षेत्रात यश मिळवत असतानाच महाराष्ट्राच्या पारंपरिक दागिन्यांना आधुनिक स्वरूप देण्याच्या उद्देशाने तिने ज्वेलरी व्यवसाय सुरू केला.
Devendra Fadnavis : “कॉंग्रेसकडून आसामला ‘सावत्र आई’ची वागणूक”; देवेंद्र फडणवीसांचे गंभीर आरोप
मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भागाला विकासाच्या केंद्रस्थानी आणून राज्याची अस्मिता खऱ्या अर्थाने जपली आहे.
Maharashtra weather update : महाराष्ट्र हवामान अंदाज: पुढील ५ दिवस राज्यात वादळी पावसासह गारपीट होण्याची शक्यता. धाराशिवमध्ये आंब्याचे ५० टक्के नुकसान.
Raigad News : रायगडमध्ये लाच घेताना कनिष्ठ अभियंत्याला अटक
रायगड जिल्ह्यात (Raigad News) सार्वजनिक बांधकाम विभागातील एका महिला कनिष्ठ अभियंत्याला एका कंत्राटदाराकडून कथितरित्या २.५ लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.
पॅनकार्डच्या नियमांमध्ये बदल, १ एप्रिलपासून 'हे'नवे नियम होणार लागू
मुंबई : भारताचे आर्थिक वर्ष हे १ एप्रिल ते ३१ मार्च पर्यंत असते. उद्यापासून नव आर्थिक वर्ष सुरु होतंय. आणि पॅनकार्डच्या बदलत्या नियमानुसार भारतातील मध्यम वर्ग आणि व्यापाऱ्यांच्या हिशोबाच्या गणितातही मोठे आर्थिक बदल होणार आहेत. काय असतील ते नियम, यामुळे कोणते निर्बंध येणार? कोणती कामे सोपी होणार? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.पॅन कार्ड तयार करण्यासाठी लागणार नवी कागदपत्र१ एप्रिल २०२६ पासून तुम्हाला जर नवीन कार्ड तयार करायचे असल्यास आता आधार कार्ड पुरावा म्हणून देणं हे चालणार नाही, त्याऐवजी तुम्हाला बर्थ सर्टिफिकेट, पासपोर्ट किंवा १० विची मार्कशीट यासारखे नवे आणि अधिकृत कागदपत्रेही जमा करावी लागणार आहेत.प्रॉपर्टी खरेदी - विक्रीत मोठा दिलासातुमची १० लाखांहून जास्तीची असणारी स्थिर मालमत्ता म्हणजे घर दुकान किंवा जमिन यांच्या खरेदी विक्रीसाठी आतापर्यंत पॅनकार्ड हे आवश्यक होत, परंतु नवीन नियमानुसार १० लाखाची मुदत ही २० लाखांपर्यंत वाढवली आहे, त्यामुळे मालमत्ता खरेदी - विक्री करणे ही प्रक्रिया जलद आणि अधिक फायदेशीर ठरणार आहे.इन्शुरन्स पॉलिसीसाठी आता पॅनकार्ड होणार गरजेचंआता कोणतीही नवीन विमा पॉलिसी खरेदी करण्यासाठी पॅनकार्ड गरजेचं होणार आहे. मग त्यात प्रीमियम रक्कम कमी असली तरीही तसेच अकाउंट बेस्ड रिलेशनशिप अंतर्गत आता प्रत्येक पॉलिसीला पॅन कार्डने लिंक करणे गरजेचे होणार आहे. पॅनकार्डच्या या नियमामुळे विमा क्षेत्रात गुंतवणूक करण्यांसाठीची पारदर्शकता वाढणार आहे.कार आणि महागड्या गाड्यांची खरेदीवाहनांसाठी नियम हे थोड्या प्रमाणात बदलण्यात आले आहेत. यापूर्वी पॅनकार्डची गरज ही वाहन खरेदी करताना प्रत्येक वेळी लागत होती. पण आता ती गरज भासणार नाही, आता पॅनकार्डची गरज केवळ ५ लाखांहून अधिक किमतीची खरेदी असणाऱ्या ग्राहकांनाच लागणार आहे. आता बजेट सेगमेंटच्या कार आणि बाइक्ससाठी ही प्रोसेस सोपी होईल.हॉटेल आणि रेस्टॉरंटची बिल मर्यादायासाठी नियम हे थोडे शिथिल करण्यात आले आहेत. तुम्ही जर एखाद्या हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये मोठी कॅश पेमेंट केलीत म्हणेजच तुमचं बिल जर १ लाखांपेक्षा वर गेलं तरच तुम्हाला पॅनकार्ड दाखवाव लागणार आहेत. यापूर्वी ही मर्यादा ५०,००० रुपये होती. लग्न समारंभ किंवा एखाद्या कौटुंबिक कार्यक्रमादरम्यान कॅश देताना हा नियम फायदेशीर ठरेल.वार्षिक ट्रान्झॅक्शन नियमबँकिंग मध्ये पॅनकार्ड तेव्हाच महत्वाचं ठरेल जेव्हा एका आर्थिक वर्षात १० लाखांपेक्षा जास्तची रक्कम काढली किंवा जमा केली जाईल. शिवाय लहान व्यापाऱ्यांना लहान सहान ट्रान्झॅक्शनसाठी आता पॅन कार्डची गरज लागणार नाही.क्रेडिट कार्ड साठी पॅनकार्ड हे आवश्यक ठरणार असून आता प्रत्येक नव्या क्रेडिट कार्ड साठी अर्ज देणं अनिर्वाय ठरणार आहे. याशिवाय वर्षभरात १० लाखांहून जास्तीच्या क्रेडिट कार्ड भरण्याची माहिती थेट आयकर विभागाला पाठवली जाईल. या व्यतिरिक्त शेअर बाजार आणि म्युचल फंडमध्येही केवायसी नियमांना जास्त केले जाणार आहे.नाव आणि ओळख समानआयकर विभागाच्या नव्या निर्देशानुसार नावाची आणि ओळखीची स्पेलिंग ही आधार आणि पॅनकार्डमध्ये अगदी सारखीच आहे. दोन्ही कार्डवर नाव वेगवेगळी असतील तर १ एप्रिलनंतर तुमचं ट्रान्झॅक्शन थांबू शकत. या बदलत्या नियमांमुळे पॅनकार्डचा वापर हा अधिक पारदर्शक आणि सोयीस्कर होणार आहे.
Patan news : झाडाच्या फांद्या तोडताना शॉक लागून शेतकर्याचा मृत्यू
patan news : पाटण तालुक्यातील उमरकांचन येथे झाडाच्या फांद्या तोडताना ३३ केव्ही तारेचा शॉक लागून आनंदा विष्णू मोहिते या ५६ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे.
IPL 2026 : IPL स्पर्धेत पहिल्यांदाच पिता –पुत्र येणार आमनेसामने; ‘या’दिवशी होणार लढत
यंदा आयपीएल २०२६ (IPL 2026) मध्ये पहिल्यांदाच पिता-पुत्र एकमेकांच्या विरुद्ध मैदानात उतरणार आहेत. सचिन तेंडुलकर आणि त्यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर यांच्यातील ही लढत क्रिकेटप्रेमींसाठी खास ठरणार आहे.
Accident News : कर्नाटकच्या विजयपूर जिल्ह्यातील सिंदगीजवळ भीषण रस्ते अपघात झाला आहे. अभिषेक नागराळ या तरुणाचा आगीत होरपळून मृत्यू झाला
या प्लॅनमध्ये १ जीबी ४जी डेटा आणि एका महिन्याचे जिओहॉटस्टार मोबाईल सबस्क्रिप्शन मिळते. १ जीबी डेटा अपुरा वाटत असला तरी....
इराणसोबत चर्चेचे दावे सुरू असतानाच डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा इराणला (Iran-US-Israel War) त्याच्या तेलसाठ्यांवर आणि वीज प्रकल्पांवर हल्ला करण्याची धमकी दिली आहे. ट्रम्प यांनी म्हटले आहे की, इराणने होर्मुझ सामुद्रधुनी तात्काळ खुली करावी, अन्यथा अमेरिका इराणचे वीज निर्मिती प्रकल्प, तेलाचे विहिरी आणि खार्ग बेट उध्वस्त करून पूर्णपणे नष्ट करेल.ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘ट्रुथ सोशल’वर लिहिले की, “अमेरिका इराणमधील (Iran-US-Israel War) आपले लष्करी अभियान समाप्त करण्यासाठी नव्या आणि अधिक शहाण्या शासनासोबत गंभीर चर्चा करत आहे. या चर्चेत लक्षणीय प्रगती झाली आहे. मात्र, कोणत्याही कारणामुळे लवकर करार झाला नाही जरी तो होण्याची शक्यता आहे आणि जर होर्मुझ सामुद्रधुनी तात्काळ व्यापारासाठी खुली करण्यात आली नाही, तर आम्ही इराणमधील आमची उपस्थिती त्यांच्या सर्व वीज निर्मिती केंद्रांवर, तेलाच्या विहिरींवर आणि खार्ग बेटावर हल्ले करून पूर्णतः संपवू.” ट्रम्प यांनी पुढे म्हटले, “हे आमच्या त्या अनेक सैनिकांचा आणि इतर लोकांचा बदला असेल, ज्यांची इराणने मागील ४७ वर्षांच्या तथाकथित दहशतीच्या राजवटीत निर्दयपणे हत्या केली.”दरम्यान, इराणने अमेरिकन आणि इस्रायली (Iran-US-Israel War) अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांना लक्ष्य करण्याची धमकी दिली आहे. इराणच्या संयुक्त लष्करी कमांडचे प्रवक्ते इब्राहिम झुल्फिकारी यांनी सांगितले की, अमेरिकन आणि इस्रायली अधिकाऱ्यांची घरे आता वैध लक्ष्य मानली जाऊ शकतात.अमेरिका आणि इराण (Iran-US-Israel War) यांच्यातील तणाव सतत वाढत असून हा संघर्ष आता ३१व्या दिवसात प्रवेश केला आहे. दोन्ही बाजूंपैकी कोणीही माघार घेण्यास तयार नसल्याचे दिसत आहे. मात्र, ट्रम्प यांचा दावा आहे की इराणसोबत चर्चा सुरू असून लवकरच काही तोडगा निघू शकतो.इराणने (Iran-US-Israel War) स्पष्ट केले आहे की, ते अण्वस्त्रे मिळवण्याचा प्रयत्न करत नाहीत; मात्र अण्वस्त्र प्रसारबंदी कराराचा (NPT) भाग राहण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याचा पर्याय ते तपासत आहेत. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बाकाई यांनी म्हटले की, “इराणच्या इस्लामिक प्रजासत्ताकाने कधीही अण्वस्त्रे मिळवण्याची इच्छा व्यक्त केलेली नाही आणि असा कोणताही प्रयत्नही केलेला नाही.”
IAS Tukaram Mundhe: पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांची वसई-विरार महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
IAS Transfers: राज्यातील 10 वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांची बदली; पहा संपूर्ण यादी कोणाची कुठे झाली बदली
IAS Transfers: या बदल्यांमुळे राज्यातील प्रशासकीय कामकाजात नव्या पातळीवर गती येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
BCCI Brand Cast Engineer Death : खळबळजनक! BCCI च्या ब्रँड कास्ट इंजिनिअरचा संशयास्पद मृत्यू
बीसीसीआयच्या ब्रॉडकास्ट टीममधील एका ब्रिटिश नागरिकाचा मृतदेह (BCCI Brand Cast Engineer Death) मुंबईतील प्रसिद्ध ट्रायडंट हॉटेलच्या खोलीत सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
ऍपल आपल्या आगामी 'आयफोन 18 प्रो' च्या डिस्प्ले डिझाइनमध्ये आणखी सुधारणा करण्याची तयारी करत आहे.
Pune: जयराज अँड कंपनीला ‘ग्रेट प्लेस टू वर्क’ प्रमाणपत्र
Pune: जयराज अँड कंपनीकडून कर्मचाऱ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देत विविधता व समावेशकतेसाठी सातत्याने उपक्रम राबवले जात असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
Leander Paes : निवडणुकीपूर्वी तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का ! लिएंडर पेसचा भाजपात प्रवेश
भारतीय टेनिसचे दिग्गज आणि माजी डेव्हिस कप खेळाडू लिएंडर पेस (Leander Paes) यांनी आज भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला आहे.
भाजप नेते आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा समावेश असलेल्या कथित भ्रष्टाचार आणि गैरवर्तनाची प्रकरणे जसजशी समोर येत आहेत, तसतशी पक्षाची प्रतिमा अधिकच खालावत चालली आहे.
Iran-US-Israel War : इराणकडून पाकिस्तानच्या प्रस्तावाला केराची टोपली
पाकिस्तानने दावा केला होता की अमेरिका आणि इराण (Iran-US-Israel War) यांच्यात सुरू असलेले युद्ध थांबवण्यासाठी थेट चर्चेचे आयोजन करण्यास तो तयार आहे. मात्र, पाकिस्तानचा हा प्रस्ताव इराणने पूर्णपणे फेटाळून लावला आहे. मुंबईतील इराणच्या महावाणिज्य दूतावासाने सोमवारी (३० मार्च) स्पष्ट केले की अमेरिकेसोबत कोणतीही थेट चर्चा झालेली नाही. केवळ मध्यस्थांमार्फत अत्यंत जास्त आणि अवास्तव मागण्या पाठवण्यात आल्या आहेत.महावाणिज्य दूतावासाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे, “अमेरिकेसोबत कोणतीही थेट चर्चा झालेली नाही. फक्त मध्यस्थांमार्फत अतिशय जास्त आणि अवास्तव मागण्या पाठवण्यात आल्या आहेत. अमेरिकेची कूटनीती सतत बदलत असते, मात्र आमची भूमिका स्पष्ट आणि ठाम आहे.” (Iran-US-Israel War)इराणच्या मंत्र्यांनी पुढे म्हटले, “पाकिस्तानने उपलब्ध करून दिलेले मंच हे त्यांचे स्वतःचे आहेत; आम्ही त्यात सहभागी झालो नाही. युद्ध समाप्त करण्यासाठी करण्यात येणाऱ्या प्रादेशिक आवाहनांचे आम्ही स्वागत करतो, परंतु हे युद्ध (Iran-US-Israel War) नेमके कोणी सुरू केले, हेही लक्षात ठेवले पाहिजे.”
महाराष्ट्र मत्स्य निर्यातीत देशात 'नंबर २'; कोकणच्या कोळंबीचा रुबाब सातासमुद्रापार!
मुंबई : भारताच्या नीलक्रांतीमध्ये महाराष्ट्राने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले असून, मत्स्य उत्पादनांच्या निर्यातीत राज्याने मोठी ऐतिहासिक कामगिरी बजावली आहे. गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्राच्या समुद्री उत्पादनांच्या निर्यातीत दुपटीने वाढ झाली असून, २०२४-२५ या आर्थिक वर्षात राज्याने ७ हजार ३४३ कोटी ४० लाख रुपयांची विक्रमी निर्यात नोंदवली आहे. भारताच्या मत्स्य व्यवसायात महाराष्ट्राने मोठी झेप घेतली असून, गेल्या पाच वर्षांत राज्याच्या मत्स्य निर्यातीत कमालीची सुधारणा झाली आहे. २०२०-२१ मध्ये ३ हजार ६८४ कोटी रुपये असणारी ही निर्यात आता थेट दुप्पट होऊन २०२४-२५ या वर्षात ७ हजार ३४३ कोटी ४० लाख रुपयांवर पोहोचली आहे. केवळ आर्थिक उलाढालच नव्हे, तर निर्यातीच्या परिमाणातही मोठी वाढ झाली असून राज्याची वार्षिक निर्यात आता २.२७ लाख मेट्रिक टन इतकी झाली आहे. विशेषतः कोकण किनारपट्टीवरील मत्स्यव्यवसायाने जागतिक बाजारपेठेतील मागणी पूर्ण करण्यात सिंहाचा वाटा उचलला आहे. केंद्र सरकारच्या ताज्या आकडेवारीनुसार, या प्रभावी कामगिरीमुळे महाराष्ट्र आता मत्स्य निर्यातीत देशात दुसऱ्या क्रमांकाचे अग्रगण्य राज्य बनले असून, राज्याच्या अर्थव्यवस्थेला यातून मोठी चालना मिळाली आहे.https://prahaar.in/2026/03/31/kalyan-shaken-snake-scare-in-gandhari-area-three-stray-dogs-die-in-quick-succession/कोळंबीसह गोठवलेल्या मासळीचा निर्यातीत वाटामहाराष्ट्राच्या सागरी किनाऱ्यावरील चविष्ट मासळीने आता जागतिक बाजारपेठ काबीज केली असून, प्रामुख्याने कोकणच्या कोळंबीला परदेशी खवय्यांची मोठी पसंती मिळत आहे. राज्यातून होणाऱ्या एकूण मत्स्य निर्यातीत कोळंबी आणि गोठवलेल्या मासळीचा (Frozen Fish) वाटा सर्वाधिक असून, अमेरिका आणि चीन यांसारख्या बलाढ्य देशांमध्ये महाराष्ट्रातील उत्पादनांची मोठी मक्तेदारी निर्माण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किमतींचे चढ-उतार आणि वाढता उत्पादन खर्च यांसारखी आव्हाने समोर असतानाही, महाराष्ट्राने गुजरात आणि आंध्र प्रदेश या राज्यांच्या स्पर्धेत आपले स्थान भक्कम राखले आहे. भारताच्या एकूण निर्यातीचा विचार करता, अमेरिका (२२,७२३ कोटी रुपये) आणि युरोपियन युनियन (९,४२९ कोटी रुपये) या मुख्य बाजारपेठा ठरल्या आहेत. यामध्ये कोकण किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात उत्पादित होणाऱ्या कोळंबीला सर्वाधिक मागणी असून, या 'विदेशी पाहुण्यांच्या' पसंतीमुळे राज्याच्या मत्स्य व्यवसायाला सुवर्णकाळ आला आहे.भारतीय मासळीचा जगभर डंकाभारतीय सागरी उत्पादनांनी जागतिक बाजारपेठेत आपली मोहोर उमटवली असून अनेक देशांमध्ये भारतीय मासळीला विक्रमी मागणी मिळत आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या आकडेवारीनुसार, भारतीय मत्स्य उत्पादनांसाठी अमेरिका ही सर्वात मोठी आणि फायदेशीर बाजारपेठ ठरली असून, एकट्या अमेरिकेला २२ हजार ७२३ कोटी रुपयांची निर्यात झाली आहे. दुसरीकडे, परिमाणाच्या बाबतीत चीनने आघाडी घेतली असून ३.९६ लाख मेट्रिक टन मासळीची आयात केली आहे, ज्याचे मूल्य १० हजार ६६८ कोटी रुपये इतके आहे. केवळ अमेरिका किंवा चीनच नव्हे, तर युरोपियन युनियन (९,४२९.६ कोटी), दक्षिण-पूर्व आशिया (८,१७२.२ कोटी) आणि जपान (३,४५२.९ कोटी) यांसारख्या प्रमुख जागतिक बाजारपेठांमध्येही भारतीय मासळीने आपली चव पोहोचवली आहे. या वाढत्या मागणीमुळे भारतीय मत्स्यव्यवसाय क्षेत्राला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी उभारी मिळाली आहे.
मुंबई : जळगावसह खान्देशातील रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून विशेष गाडी म्हणून धावणारी दादर–भुसावळ एक्सप्रेस (Dadar-Bhusaval Express) आता कायमस्वरूपी करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. ही गाडी आता नव्या १९०४७/४८ या क्रमांकाने नियमितपणे धावणार आहे. खासदार स्मिता वाघ यांनी याबाबत माहिती दिली.तिकिट दरात तब्बल २० ते २५ टक्क्यांपर्यंत कपात :विशेष गाडी (Dadar-Bhusaval Express) असल्यामुळे प्रवाशांना आतापर्यंत अतिरिक्त भाडे मोजावे लागत होते. मात्र, आता नियमित गाडीचा दर्जा मिळाल्यामुळे तिकिट दरात तब्बल २० ते २५ टक्क्यांपर्यंत कपात होण्याची शक्यता व्यक्त होत असून सामान्य प्रवाशांचा आर्थिक भार कमी होऊ शकतो. प्राप्त माहितीनुसार, या गाडीला प्रवाशांचा सातत्याने चांगला प्रतिसाद मिळत असल्यामुळेच तिला कायमस्वरूपी चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रवासी संख्या, मागणी आणि सोयी सुविधांचा विचार करून हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.जळगावच्या खासदार स्मिता वाघ यांनीही या निर्णयाचे स्वागत करत खान्देशातील नागरिकांच्या दीर्घकाळापासून असलेल्या मागणीला न्याय मिळाल्याने समाधान व्यक्त केले आहे. या सुविधेमुळे प्रवास अधिक सुलभ, किफायतशीर आणि सुरक्षित होईल.पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून तूर्त (Dadar-Bhusaval Express) दादर–भुसावळ (०९०४९) आणि भुसावळ-दादर (०९०५०) दरम्यान आठवड्यातून एक दिवस दर शुक्रवारी धावणाऱ्या साप्ताहिक विशेष गाडीचा कालावधी तीन एप्रिलपासून ३१ जुलै २०२६ पर्यंत वाढविण्यात आला आहे. याशिवाय, दादर-भुसावळ (०९०५१) आणि भुसावळ–दादर (०९०५२) दरम्यान आठवड्यातून तीन दिवस सोमवार, बुधवार आणि शनिवारी धावणाऱ्या त्रिसाप्ताहिक विशेष रेल्वे गाड्यांचा कालावधी २९ जुलै २०२६ पर्यंत वाढविण्यात आला आहे.
Kalyan News : कल्याण हादरलं! गांधारी परिसरात नागाचा थरार; एकापाठोपाठ तीन भटक्या कुत्र्यांचा मृत्यू
कल्याण : कल्याण पश्चिम भागातील गांधारी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि भीतीदायक घटना समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून एका गॅरेजमध्ये लपून बसलेल्या विषारी नागाने परिसरात दहशत निर्माण केली असून, या नागाच्या दंशामुळे तीन भटक्या कुत्र्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे गांधारी परिसरातील रहिवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे.नेमकी घटना काय?मिळालेल्या माहितीनुसार, गांधारी परिसरातील एका गॅरेजमध्ये हा नाग गेल्या अनेक दिवसांपासून लपून होता. परिसरात वावरणाऱ्या तीन भटक्या कुत्र्यांवर या नागाने अचानक हल्ला चढवला. नागाने केलेल्या विषारी दंशामुळे या तिन्ही कुत्र्यांची प्रकृती खालावली आणि काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला. एकापाठोपाठ एक अशा तीन कुत्र्यांचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आणि नागरिकांच्या लक्षात आले की परिसरात एखादा विषारी साप वावरत आहे. परिसरात नाग असल्याची खात्री पटताच स्थानिक नागरिकांनी तातडीने सर्पमित्र दत्ता बोंबे यांना पाचारण केले. दत्ता बोंबे यांनी घटनास्थळी धाव घेत अत्यंत कौशल्याने त्या नागाला पकडले. हा नाग प्रचंड विषारी असल्याची माहिती समोर आली आहे. नागाला पकडल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला. पकडलेल्या नागाला सुरक्षितरीत्या वनविभागाच्या मदतीने नैसर्गिक अधिवासात (जंगलात) सोडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.https://prahaar.in/2026/03/31/ravindra-waikar-extend-dadar-ratnagiri-passenger-train-to-dadar-station-in-mp-ravindra-waikar-demand/प्रशासनाचे आणि सर्पमित्रांचे आवाहनया घटनेमुळे गांधारी परिसरात भीतीचे सावट अजूनही कायम आहे. पावसाळा आणि वाढलेले गवत यामुळे सापांचा मानवी वस्तीत वावर वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी आपल्या घराच्या आसपासचा परिसर स्वच्छ ठेवावा, भंगार किंवा गॅरेज सारख्या ठिकाणी अंधारात जाताना काळजी घ्यावी, असे आवाहन सर्पमित्र दत्ता बोंबे आणि प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच साप आढळल्यास त्याला मारू नका, तर तात्काळ सर्पमित्रांशी संपर्क साधावा, अशी विनंतीही करण्यात आली आहे.
Leander Paes : प्रख्यात टेनिसपटू लिअँडर पेसचा भाजपमध्ये प्रवेश; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
भारतीय टेनिस दिग्गज लिअँडर पेसने (Leander Paes) भाजपमध्ये प्रवेश केला आहे .पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी उचललेले हे पाऊल राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनले आहे. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू आणि भाजप नेते सुकांत मजुमदार यांच्या उपस्थितीत पेस यांचा पक्षप्रवेश झाला. पेस यांचे पक्षात सामील होणे पश्चिम बंगालच्या राजकारणात महत्त्वपूर्ण मानले जात आहे. पश्चिम बंगालमधील निवडणुकीचे वातावरण तापत असून, सर्व राजकीय पक्ष आपली रणनीती मजबूत करण्यात व्यस्त आहेत.याप्रसंगी किरेन रिजिजू म्हणाले, लिअँडर पेस (Leander Paes) यांचे भाजप परिवारात सामील होणे ऐतिहासिक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या १२ वर्षांपासून सातत्याने क्रीडा आणि खेळाडूंना प्रोत्साहन दिले आहे. लिअँडर यांनी हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात खास दिवस असल्याचे म्हटले. ते म्हणाले, हा माझ्या आयुष्यातील खूप मोठा दिवस आहे. मला पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि नितीन नवीन यांचे आभार मानायचे आहेत. क्रीडा आणि तरुणांची सेवा करण्याची ही माझ्यासाठी एक मोठी संधी आहे.लिअँडर पेसने (Leander Paes) भारतासाठी ऑलिम्पिक पदके आणि अनेक ग्रँडस्लॅम जिंकले आहेत आणि आता ते राजकारणात एक नवीन इनिंग सुरू करत आहे. त्यांचा भाजपमधील प्रवेश हे दर्शवतो की, क्रीडा जगतातील प्रमुख व्यक्तींना आपल्या पक्षात सामील करून पक्ष आपली पकड मजबूत करू पाहत आहे.आपल्या कारकिर्दीची (Leander Paes) आठवण करून देताना पेस म्हणाले की,ते आता नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्यास तयार आहे. मी ४० वर्षे देशासाठी खेळलो आहे, आता तरुणांची सेवा करण्याची वेळ आली आहे. लिअँडर पेसने केंद्र सरकारच्या क्रीडा योजनांची प्रशंसाही केली. ते म्हणाला, खेलो इंडिया आणि टॉप्स योजना हे उत्कृष्ट उपक्रम आहेत. टोकियो ऑलिम्पिकमध्ये खेळाडूंची कामगिरी सुनिश्चित करण्यासाठी किरेन रिजिजूजींनी किती मेहनत घेतली हे मी पाहिले आहे. पंतप्रधानांनी त्यांना दिलेली भूमिका त्यांनी खूप चांगल्या प्रकारे पार पाडली.यावेळी त्यांनी (Leander Paes) बंगालमधील क्रीडा सुविधांच्या कमतरतेबद्दलही उघडपणे भाष्य केले. ते म्हणाले, भारत हा जगातील सर्वात तरुण देश आहे. पुढील २०-२५ वर्षांत आपण क्रीडा शिक्षणावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. १९८६ मध्ये पश्चिम बंगालमध्ये क्रीडा पायाभूत सुविधांची खूप कमतरता होती. आजही बंगालमध्ये इनडोअर टेनिस कोर्टची कमतरता आहे. बंगाल, तामिळनाडू आणि बिहार यापेक्षा चांगली कामगिरी करू शकतात, पण आपण क्रीडा शिक्षणाच्या माध्यमातून तरुणांना प्रेरणा देण्यावर आणि त्यांना सक्षम करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. भारतातील महिला सक्षमीकरणासाठी समान संधी शिष्यवृत्ती कार्यक्रम सुरू करणे हे माझे स्वप्न आहे.
Digestion Tips उन्हाळ्यात तापमान वाढल्यामुळे शरीराच्या पचनक्रियेवर परिणाम होतो. पचन मंदावते आणि अन्न नीट पचत नाही. त्यामुळे गॅस आणि अॅसिडिटीसारख्या समस्या निर्माण होतात. अशा वेळी दही आणि भाजलेले जिरे एकत्र खाल्ल्यास पचन सुधारण्यास मदत होते.
Aneet padda sister trolled : रीत पड्डाने 'धुरंधर २', 'द काश्मीर फाइल्स' आणि 'द केरळ स्टोरी' या तिन्ही चित्रपटांवर टीका करत त्यांना 'सरकारी प्रोपोगंडा' असे संबोधले.
Global Energy Supply:वाढत्या ऊर्जा संकटाच्या पार्श्वभूमीवर, बांगलादेशने रशियन डिझेल खरेदीवरील अमेरिकेच्या बंदीतून तात्पुरती सूट मागितली आहे.
नालंदा: बिहारमधील शीतला मंदिरात चेंगराचेंगरी झाली. या घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाले आहेत. मंगळवारी, नालंदा जिल्ह्यातील दिपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माघरा गावातील शीतला मंदिरात भाविकांची मोठी गर्दी जमली होती. पूजेदरम्यान गर्दी अनियंत्रित झाली आणि चेंगराचेंगरी झाली. घटनेची माहिती मिळताच, दीपनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना रुग्णालयात पाठवण्यात आले.मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीरमुख्यमंत्र्यांनी दुःख व्यक्त केले. तसेच मुख्य सचिवांना चौकशी करण्याचे निर्देश दिले आणि नुकसान भरपाईची घोषणाही केली.मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. मुख्य सचिवांना चौकशीचे निर्देश देण्यात आले असून, पाटणा आयुक्तांना घटनास्थळी पाठवण्यात आले आहे. नुकसान भरपाईची घोषणाही करण्यात आली आहे. मृतांच्या कुटुंबीयांना आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून प्रत्येकी ४ लाख रुपये आणि मुख्यमंत्री मदत निधीतून प्रत्येकी २ लाख रुपये देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय, पीएमएनआरएफतर्फे प्रत्येक मृताच्या कुटुंबाला २ लाख रुपयांची सानुग्रह रक्कमही दिली जाईल.पंतप्रधान मोदींकडूनही दुःख व्यक्तपंतप्रधान मोदींनीही या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले. ते म्हणाले, बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील अपघात अत्यंत दुःखद आहे. ज्या कुटुंबांनी आपले प्रियजन गमावले आहेत, त्यांच्याप्रती मी माझ्या तीव्र संवेदना व्यक्त करतो. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी मी प्रार्थना करतो. पीएमएनआरएफमधून प्रत्येक मृताच्या कुटुंबीयांना २ लाख रुपयांची सानुग्रह मदत दिली जाईल. जखमींना ५० हजार रुपये दिले जातील.शीतला मंदिरात ही चेंगराचेंगरी झाली, ते बिहार शरीफमधील नालंदा जिल्ह्यातील माघरा येथे आहे. मंगळवारी, माघरा येथील शीतला मंदिरात हजारो लोक दर्शनासाठी जमले होते. दरवर्षी अशी गर्दी जमते, पण असा अपघात यापूर्वी कधीही घडला नव्हता. पोलीस आता या चेंगराचेंगरीचा आणि त्यामागे काही कट आहे का याचा तपास करत आहेत. मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करणे अशक्य आहे.
मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेनेने आतापासूनच कंबर कसली आहे. शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने पक्षाने राज्यातील ४८ लोकसभा मतदार संघांसाठी संपर्कप्रमुखांची घोषणा केली आहे. यात मुंबईत सहा लोकसभा मतदार संघ आणि ठाणे लोकसभेची जबाबदारी शिवसेनेचे संसदीय पक्षाचे नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. भिवंडी व कल्याण लोकसभेच्या संपर्कप्रमुखपदी खासदार नरेश म्हस्केंची निवड करण्यात आली आहे.शिवसेनेकडून राज्यातील सर्व लोकसभा मतदार संघांसाठी संपर्कप्रमुखांची घोषणा केली आहे. यात मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, ईशान्य मुंबई व दक्षिण मुंबई या मुंबईतील सर्व सहा लोकसभा मतदार संघांच्या संपर्कप्रमुख पदाची खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना जबाबदारी सोपवण्यात आली आहे. खासदार डॉ. शिंदेंसोबत मंत्री योगेश कदम, आमदार निलेश राणे, माजी खासदार राहुल शेवाळे यांच्यावर मुंबईच्या लोकसभा मतदार संघांची जबाबदारी असेल. तसेच ठाणे लोकसभेचे संपर्कप्रमुखपद देखील खासदार डॉ. शिंदेंकडे सोपवण्यात आले आहे, असे पक्षाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.लोकसभा मतदार संघनिहाय संपर्कप्रमुख१) मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, ईशान्य मुंबई व दक्षिण मुंबई – खासदार डॉ. श्रीकांत शिंदे२) ठाणे – खासदार डॉ. श्रीकांत शिंदे३) भिवंडी व कल्याण – खासदार नरेश म्हस्के४) नंदुरबार - माजी आमदार शिरीष चौधरी५) धुळे व दिंडोरी - शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी६) जळगाव - आमदार दिलीप लांडे७) रावेर - आमदार तुकाराम काते८) बुलढाणा - संजय सोनार९) अकोला - माजी आमदार राजन साळवी१०) अमरावती - आमदार किशोर अप्पा पाटील११) वर्धा - आमदार डॉ. मनीषा कायंदे१२) रामटेक - अनिल कोकीळ१३) नागपूर - माजी खासदार संजय निरुपम१४) भंडारा-गोंदिया - विलास चावरी१५) गडचिरोली- चिमूर - माजी मंत्री जगदीश गुप्ता१६) चंद्रपूर - आमदार कृपाल तुमाने१७) यवतमाळ - वाशिम - शिवसेना उपनेत्या प्रिती बंड१८) हिंगोली - शिवसेना उपनेते आनंदराव जाधव१९) नांदेड - दत्ता दळवी२०) परभणी - भास्कर आंबेकर२१) जालना – खासदार संदिपान भुमरे२२) छत्रपती संभाजी नगर - विलास पारकर२३) नाशिक – आमदार सुहास कांदे२४) पालघर – पांडुरंग पाटील२५) रायगड - अनिल नवघरे२६) कोल्हापूर, मावळ व पुणे लोकसभा - मंत्री उदय सामंत२७) बारामती – किरण लांडगे२८) शिरुर – आमदार शरद सोनवणे२९) अहिल्यानगर – शिवसेना सचिव राम रेपाळे३०) शिर्डी – खासदार डॉ. ज्योती वाघमारे३१) बीड – मनोज शिंदे३२) धाराशिव – माजी खासदार उन्मेष पाटील३३) लातूर – मंगेश कुडाळकर३४) सोलापूर – खासदार धैर्यशील माने३५) माढा – चंद्रहार पाटील३६) सांगली – योगेश जानकर३७) सातारा – शरद कणसे३८) रत्नागिरी – राजेश मोरे, नगरसेवक३९) सिंधूदुर्ग – बाळा चिंदरकर४०) हातकणंगले – आमदार सुहास बाबर
- शक्य असल्यास ही रेल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत विस्तारित करा- रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे निवेदनाद्वारे खासदार रविंद्र वायकर यांनी केली मागणीनवी दिल्ली : कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या पसंतीची दादर-रत्नागिरी पॅसेंजर रेल (Dadar-Ratnagiri passenger) पुनश्च दादर स्थानकातून सुरु करण्यात यावी तसेच शक्य असल्यास ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) पर्यंत विस्तारित करून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना दिलास द्यावा, अशी मागणी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे खासदार रविंद्र वायकर (Ravindra Waikar) यांनी निवेदनाद्वारे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे.मुंबईहून कोकणात जाणाऱ्या लाखो सामान्य नोकरदार, शेतकरी, विद्यार्थी आणि कुटुंबियांसाठी दादर–रत्नागिरी पॅसेंजर ही केवळ एक रेल्वे नव्हती, तर त्यांच्या दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग होती. मागील २५–३० वर्षांपासून ही गाडी नियमितपणे दादर स्थानकापर्यंत धावत होती. परंतु कोविड काळात ही सेवा बंद करण्यात आली आणि त्यानंतर रेल्वे प्रशासनाने एकतर्फी निर्णय घेत ती फक्त दिवा स्थानकापर्यंतच मर्यादित केली. यामुळे दैनंदिन कामकाज उरकून मुंबईहून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना सोईस्कर ठरणाऱ्या या गाडीची सेवा दिवा पर्यंतच सीमित करण्यात आल्याने त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.दिवा स्थानकापर्यंत पोहोचण्यासाठी प्रवाशांना अतिरिक्त लोकल रेल्वेने प्रवास करावा लागतो, ज्यामुळे वेळ, खर्च आणि शारीरिक त्रास वाढतो. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि रात्रीच्या वेळेत प्रवास करणाऱ्यांसाठी ही अडचण अधिक गंभीर ठरते. रस्त्याने प्रवास करायचा झाल्यास मुंबई–गोवा महामार्गाची स्थिती अनेक ठिकाणी अत्यंत खराब आहे, ज्यामुळे प्रवास कठीण आणि धोकादायक होतो. अशा परिस्थितीत ही पॅसेंजर रेल कोकणातील सामान्य नागरिकांसाठी एक विश्वासार्ह, सोयीस्कर वाहतूक व्यवस्था होती, असे खासदार यांनी रेल्वे मंत्री यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.खासदार वायकर यांनी दिनांक १० जानेवारी २०२५ रोजी या विषयावर सविस्तर निवेदन रेल्वे मंत्री पाठवले होते. परंतु त्यानंतरही रेल्वे विभागाकडून अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. रेल्वे प्रशासनाच्या सततच्या दुर्लक्षामुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी वाढत आहे. हा केवळ रेल्वेचा मुद्दा नसून कोकणातील जनतेच्या भावना आणि त्यांच्या दैनंदिन गरजांशी संबंधित विषय असल्याने, यात लक्ष घालून दादर–रत्नागिरी पॅसेंजर रेल तात्काळ पूर्ववत दादर स्थानकापर्यंत सुरू करण्याचे आदेश द्यावेत. तसेच शक्य असल्यास प्रवाशांच्या सोयीसाठी ही रेल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) पर्यंत वाढवावी, ज्यामुळे मुंबईतील अधिकाधिक प्रवाशांना थेट आणि सुलभ प्रवासाची सुविधा उपलब्ध होईल. यामुळे कोकणात जाणाऱ्या लाखो सामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल, अशी विनंती खासदार वायकर यांनी रेल्वे मंत्री यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
Huma Qureshi Zack Snyder जॅक स्नायडर आणि हुमा कुरेशी यांनी २०२१ साली प्रदर्शित झालेल्या 'आर्मी ऑफ द डेड' या हॉलिवूड चित्रपटात एकत्र काम केलं होतं. या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर जवळपास पाच वर्षांनी जॅक स्नायडर यांनी पुन्हा एकदा या चित्रपटाची आठवण काढत एक पोस्ट शेअर केली.
मुंबई : मुंबईत सध्या लोकलचे वेळापत्रक हे बिघडलेलं दिसत आहे. अनेक लोकल फेऱ्या रद्द झाल्या आहेत आणि बऱ्याच गाड्या या उशिराने येत असल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय उशिरा येणाऱ्या लोकलमुळे स्थानकावर प्रचंड गर्दी देखील वाढत आहे. त्यामुळे ट्रेनमध्येही गर्दी वाढलेली दिसत आहे.नेमकं कारण काय?मुंबईच्या प्रभादेवी उड्डाणपुलाच्या पाडकामामुळे मध्य रेल्वेवर रात्रीच्या वेळेत ब्लॉक घेतले जात आहेत, म्हणून अनेक लोकल गाड्या या उशिराने धावत आहेत. तर काही गाड्यांचे मार्ग बदलले गेले आहेत. त्यामुळे याचा त्रास हा थेट नोकरदार वर्गावर आणि प्रवाशांवर होत आहेबदल केव्हापासून आणि किती वाजता असेलप्रभादेवीचा उड्डाणपूल हा वरळी- शिवडी प्रकल्पाचा भाग असलेला ब्रिटिशकालीन पूल आहे. जो तब्बल ११३ वर्ष जुना आहे. हा पूल पाडून त्याजागी नवीन डबलडेकर पूल उभारण्याचे नियोजन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण ( MMRDA ) यांनी केले आहे. शिवाय या कामाची जबाबदारी महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांच्याकडे आहे.ब्लॉक केव्हापासून होईल सुरुया पाडकामासाठी सोमवार पासून ( ३० मार्च पासून ) मध्य रेल्वेवर दररोज रात्री ब्लॉक हा घेतला जात आहे. सोमवार ते शुक्रवार रात्री ११ : ४० ते पहाटे ३ : ४० या वेळेत सुमारे चार तासांचा हा ब्लॉक असणार आहे. या काळात अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवरील काही गाड्या पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत. शनिवारी मात्र मध्यरात्रीनंतर सलग सहा तासांचा मोठा ब्लॉक घेण्यात येणार असून काम लवकरात लवकर आटोपण्याचे नियोजन आहे.लोकल फेऱ्यांमध्ये केले गेले हे बदलया ब्लॉकचा सर्वाधिक परिणाम सीएसएमटी, कुर्ला, आणि ठाणे दरम्यान धावणाऱ्या लोकल गाड्यांवर होणार आहे. काही लोकल गाड्या पूर्णपणे रद्द करण्यात येणार आहेत. तर काहींचे मार्ग बदलण्यात येणार आहेत. कल्याण, कसारा आणि खोपोलीकडून येणाऱ्या काही गाड्या कुर्ला, ठाणे, किंवा दादरपर्यंतच धावणार आहेत. काही गाड्या सीएसएमटी ऐवजी दादर स्थानकातूनच चालवण्यात येणार आहेत.याशिवाय, शेवटच्या लोकलच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे. त्यामुळे रात्री उशिरा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या अडचणींचा सामना करावा लागणार आहे. काही मेल आणि एक्सप्रेस गाड्यांवरही या कामाचा परिणाम होण्याची शक्यता रेल्वे प्रशासनाने व्यक्त केली आहे.वाढत्या उन्हाचा तडाखा आणि बिघडलेले लोकलच वेळापत्रक, स्टेशनवर होणारी गर्दी त्यामुळे कामावर जाणाऱ्या आणि रात्री घरी परतणाऱ्या नोकरदारांची चांगलीच कसरत होणार आहे. काम पूर्ण होईपर्यंत काही काळ मुंबईकरांना हा त्रास सहन करावा लागणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी वेळ राखून नियोजन करावे.
Bihar Stampede: बिहारच्या शीतला मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत ८ जणांचा मृत्यू, ८ जण जखमी
मुंबई: बिहारमधील नालंदा येथे एक मोठी घटना घडली आहे. शीतला मंदिरात चेंगराचेंगरी झाली आहे. या घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाले आहेत.नेमकं प्रकरण काय?मंगळवारी, नालंदा जिल्ह्यातील दिपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माघरा गावातील शीतला मंदिरात भाविकांची मोठी गर्दी जमली होती. पूजेदरम्यान गर्दी अनियंत्रित झाली आणि चेंगराचेंगरी झाली.घटनेची माहिती मिळताच, दीपनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना रुग्णालयात पाठवण्यात आले.प्रत्यक्षदर्शीने काय सांगितले?घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या एका तरुणाने सांगितले, आज सकाळपासून मंदिरात भाविकांची गर्दी होती. याच दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत अनेक जण मरण पावले आणि बरेच जण जखमी झाले. सर्व काही सुरळीत सुरू होते. अचानक चेंगराचेंगरी झाली आणि असे का घडले हे कळले नाही. लोक इकडेतिकडे धावू लागले. गर्दीच्या व्यवस्थापनासाठी बॅरिकेड आणि रांगा लावल्या होत्या. गर्दीच्या सुरक्षेसाठीही लोक उपस्थित होते. पण मला माहीत नाही की कोणी गोंधळ घातला आणि लोक इकडेतिकडे धावू लागले. ही जत्रा शतकानुशतके सुरू आहे. प्रत्येक वेळी सर्व काही सुरळीत पार पडते. यावेळी ही चेंगराचेंगरी कशी झाली हे मला माहीत नाही.ज्या शीतला मंदिरात ही चेंगराचेंगरी झाली, ते बिहार शरीफमधील नालंदा जिल्ह्यातील माघरा येथे आहे. मंगळवारी, माघरा येथील शीतला मंदिरात हजारो लोक दर्शनासाठी जमले होते. दरवर्षी गर्दी होते, पण असा अपघात यापूर्वी कधीही घडला नव्हता. पोलीस आता या चेंगराचेंगरीचा आणि त्यामागे काही कट आहे का याचा तपास करत आहेत.
IPL 2026 : हंगामातील चौथ्या सामन्यात पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्स आमनेसामने
मुंबई : आयपीएल २०२६ च्या चौथ्या सामन्यात मंगळवारी (३१ मार्च) पंजाब किंग्सचा सामना गुजरात टायटन्सशी होईल. हा सामना मुल्लानपूर येथील महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. आयपीएलमध्ये आतापर्यंत पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात एकूण सहा सामने खेळले गेले आहेत. यापैकी पंजाब किंग्सने तीन, तर गुजरातने तीन सामने जिंकले आहेत.श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली पंजाबने गेल्या हंगामात अंतिम फेरी गाठली होती. पण, विजेतेपदाच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (आरसीबी) कडून संघाला पराभव सहन लागला होता. या हंगामातही पंजाबचा संघ खूप मजबूत दिसत आहे. पंजाब पुन्हा एकदा प्रियांश आर्य आणि प्रभसिमरन सिंग या सलामीच्या जोडीकडून दमदार कामगिरीची अपेक्षा करत आहे. तर कर्णधार श्रेयस अय्यर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीची जबाबदारी सांभाळताना दिसेल. अय्यरने गेल्या हंगामात शानदार फलंदाजी करत १७ सामन्यांमध्ये १७५ च्या स्ट्राईक रेटने ६०४ धावा केल्या होत्या.पंजाब किंग्सला नेहल वाढेरा आणि शशांक सिंग यांच्याकडूनही दमदार कामगिरीची अपेक्षा असेल. आयपीएल २०२५ मध्ये नेहल चांगल्या फॉर्ममध्ये दिसला होता, त्याने १६ सामन्यांमध्ये १४५ च्या स्ट्राईक रेटने ३६९ धावा केल्या होत्या. मार्कस स्टोइनिस, मार्को जानसेन आणि उमरझाई फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देतील. दरम्यान, मिचेल ओवेन आणि कूपर कॉनोली आयपीएल २०२६ मध्ये प्रभावी कामगिरी करून आपली छाप पाडण्याचा प्रयत्न करतील.दुसरीकडे, गुजरात टायटन्सला या हंगामात साई सुदर्शन आणि कर्णधार शुभमन गिल यांच्याकडून दमदार कामगिरीची अपेक्षा असेल. सुदर्शन गेल्या हंगामात १५ सामन्यांमध्ये ७५९ धावा करून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता, तर गिलने ६५० धावा केल्या होत्या. मात्र, जोस बटलरचा अलीकडील फॉर्म संघासाठी निश्चितच चिंतेचा विषय असेल.ग्लेन फिलिप्सच्या कामगिरीवरही बारकाईने लक्ष ठेवले जाईल. वॉशिंग्टन सुंदर, जेसन होल्डर आणि राहुल तेवतिया फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीद्वारे संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न करतील. कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, इशांत शर्मा आणि ल्यूक वूड यांच्या उपस्थितीमुळे संघाचा वेगवान गोलंदाजीचा मारा मजबूत दिसतो. दरम्यान, राशिद खान फिरकी विभागाचे नेतृत्व करेल, त्याला साई किशोर आणि सुंदर यांची साथ मिळणार आहे.संभाव्य प्लेइंग XI :पंजाब किंग्स : प्रबसिमरन सिंग (विकेटकीप), प्रियांश आर्य, श्रेयस अय्यर (कर्णधार), नेहल वढेरा, मार्कस स्टॉइनिस, शशांक सिंग, अजमातुल्ला ओमरझाई, मार्को जॅनसेन, अर्शदीप सिंग, झेवियर बार्टलेट, युझवेंद्र चहलगुजरात टायटन्स : शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, जोस बटलर (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, शाहरुख खान, राहुल तेवतिया, जेसन होल्डर, रशीद खान, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसीद कृष्णा
मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध ट्रायडन्ट हॉटेलमध्ये आयपीएल २०२६ निमित्त भारतात आलेल्या बीसीसीआयच्या ब्रॉडकास्ट इंजिनिअरचा संशयास्पद मृत्यू झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. यान विल्यम लेग्नफोर्ड असे मृत व्यक्तीचे नाव असून ते मूळचे ब्रिटिश नागरिक होते.माहितीनुसार, यान लेग्नफोर्ड हे २४ मार्चपासून आयपीएल हंगामासाठी मुंबईत वास्तव्यास होते. २९ मार्च रोजी वानखेडे स्टेडियम येथे झालेल्या मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्यासाठी ते उपस्थित होते.सामना संपल्यानंतर ते आपल्या हॉटेलमधील २७१५ क्रमांकाच्या खोलीत परतले. मात्र, ३० मार्च रोजी सकाळी रिसेप्शनमधून वारंवार फोन करूनही कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर हॉटेल कर्मचाऱ्यांनी मास्टर कीच्या साहाय्याने दरवाजा उघडला असता, यान लेग्नफोर्ड हे खोलीत खाली पडलेल्या अवस्थेत आढळून आले.तत्काळ हॉटेलच्या डॉक्टरांना पाचारण करण्यात आले, मात्र त्यांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणे येथे मृत्यूची नोंद करण्यात आली असून, नेमकं मृत्यूचं कारण काय याचा तपास पोलीस करत आहेत.
Kubbra Sait : अभिनेत्री कुब्रा सैत फर्जी 2 साठी खूप उत्सुक असून, तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सिरीजवर सविस्तर भाष्य केले आहे.
Vijay Shivtare : गेल्या काही काळापासून विजय शिवतारे गंभीर किडनी आजाराने त्रस्त होते.
Summer Care गॉगल घेताना सर्वात आधी त्याची गुणवत्ता तपासणे गरजेचे आहे. गॉगल काचेचा आहे की प्लास्टिकचा, हे पाहावे. प्लास्टिक असल्यास त्याचा दर्जा चांगला आहे का, हे तपासणे महत्त्वाचे आहे. गॉगलमधून पाहताना वस्तूचा आकार बदलल्यासारखा वाटू नये किंवा हालचाल दिसू नये, याची खात्री करून घ्यावी.
Pakistan Gas Pipeline Attack:पाकिस्तान सध्या एका गंभीर ऊर्जा संकटाशी झुंजत आहे. एलपीजीच्या तुटवड्यामुळे लोक आधीच त्रस्त होते, पण आता एक नवीन समस्येची भर पडली आहे.

28 C