Odisha News : भ्रष्टाचाराविरोधी मोठी कारवाई! खाण अधिकाऱ्याच्या घरातून तब्बल ४ कोटींची रोकड जप्त
ओडिशा : भ्रष्टाचाराविरोधातील कारवायांमध्ये ओडिशा राज्यात मोठी धडक कारवाई समोर आली आहे. ओडिशा दक्षता विभागाने कटक सर्कलमधील खाणींचे उपसंचालक देवव्रत मोहंती यांना लाच स्वीकारताना रंगेहात पकडले असून त्यांच्या ताब्यातून तब्बल चार कोटी रुपयांहून अधिक रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. राज्याच्या इतिहासातील दक्षता विभागाने केलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी रोख जप्ती असल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, कटक सर्कलमध्ये कार्यरत असलेले खाणींचे उपसंचालक देवव्रत मोहंती यांनी एका परवानाधारक कोळसा व्यापाऱ्याकडून त्याचा कोळसा डेपो सुरळीत चालवण्यासाठी आणि कोळशाच्या वाहतुकीला परवानगी देण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. या तक्रारीनंतर ओडिशा दक्षता विभागाने सापळा रचत मंगळवारी (२४ फेब्रुवारी) कारवाई केली आणि मोहंती यांना ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. त्यांच्या ताब्यातून लाचेची संपूर्ण रक्कम जप्त करण्यात आली असून तत्काळ त्यांना अटक करण्यात आली.अटकेनंतर दक्षता विभागाने एकाच वेळी तीन ठिकाणी धाडी टाकल्या. भुवनेश्वर येथील त्यांच्या निवासस्थानी, भद्रक जिल्ह्यातील मथासाही येथील वडिलोपार्जित घरी तसेच कटक येथील कार्यालयातील दालनात झडती घेण्यात आली. भुवनेश्वरमधील पाटिया परिसरातील श्रीविहार नेचर क्रेस्ट अपार्टमेंटमधील त्यांच्या फ्लॅटमध्ये मोठ्या प्रमाणात रोख रक्कम सापडली. ही रक्कम ट्रॉली बॅग आणि कपाटांमध्ये लपवून ठेवण्यात आली होती. प्राथमिक माहितीनुसार, जप्त केलेली रक्कम चार कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे.सध्या जप्त केलेल्या रोकड रकमेची मोजणी सुरू असून अंतिम आकडा मोजणी पूर्ण झाल्यानंतर जाहीर केला जाणार आहे. अधिकाऱ्यांच्या मते, राज्यातील सतर्कता विभागाच्या कारवाईत इतक्या मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम जप्त होण्याची ही पहिलीच वेळ आहे.या धाडीतून मोहंती यांच्या इतर संपत्तीबाबतही माहिती समोर आली आहे. भुवनेश्वरमधील पहाला परिसरात त्यांचे दुमजली घर असल्याचे उघड झाले आहे. याशिवाय सुमारे १३० ग्रॅम सोन्याचे दागिनेही जप्त करण्यात आले आहेत. अधिकाऱ्यांकडून इतर मालमत्ता आणि आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू असून बेहिशोबी संपत्तीबाबत अधिक तपास केला जात आहे.या कारवाईमुळे राज्यातील प्रशासकीय यंत्रणेत खळबळ उडाली असून भ्रष्टाचाराविरोधातील मोहिमेला अधिक वेग मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दक्षता विभागाच्या या मोठ्या कारवाईकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर
- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्टमुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन विभागाने राबविलेल्या सातत्यपूर्ण उपाययोजनांचा सकारात्मक परिणाम दिसून येत असून जानेवारी २०२६ मध्ये अपघाती मृत्यूंमध्ये ८.०५ टक्क्यांची घट नोंदविण्यात आली आहे. जानेवारी २०२५ मध्ये १,४२७ अपघाती मृत्यू झाले होते, तर जानेवारी २०२६ मध्ये ही संख्या १,३१२ वर आली आहे. म्हणजेच ११५ मृत्यूंनी घट झाली आहे. त्याचप्रमाणे अपघातांची एकूण संख्या ३,१६४ वरून ३,१०० वर आली असून त्यात २ टक्क्यांची घट झाली आहे.रस्ता सुरक्षा उपायांमुळे अनेक जिल्ह्यांत मृत्यूदरात लक्षणीय घट झाली आहे. नंदूरबार येथे ५० टक्के, सोलापूर शहर व वाशिम येथे प्रत्येकी ३६ टक्के, सिंधुदुर्ग येथे २९ टक्के, वर्धा येथे २८ टक्के, धाराशिव येथे २४ टक्के, गोंदिया व अमरावती ग्रामीण येथे प्रत्येकी २२ टक्के, तर नांदेड व नागपूर शहर येथे प्रत्येकी २१ टक्क्यांची घट नोंदविण्यात आली आहे.राज्यातील अपघातांची संख्या सन २०३० पर्यंत ५० टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवून परिवहन विभागाने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. राज्य व जिल्हास्तरावर रस्ता सुरक्षा कक्ष स्थापन करण्यात आले असून प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्र रस्ता सुरक्षा आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी सुरू आहे. अपघातप्रवण ‘ब्लॅक स्पॉट्स’वर सुधारणा करण्यात येत आहेत.नियमभंगाविरोधात कारवाईसाठी राज्यात ३३२ पथके कार्यरत असून रडार व इंटरसेप्टर वाहनांच्या मदतीने मोठ्या प्रमाणावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. हेल्मेट नसलेल्या ८९,६५१ चालकांवर , मागे बसलेल्या व हेल्मेट न घातलेल्या १३,३४८ प्रवाशांवर, वेगमर्यादा उल्लंघनाच्या ८,५२० तसेच सीटबेल्ट न वापरणाऱ्या चालकांवर ८,०२४ प्रकरणे नोंदविण्यात आली आहेत. तसेच अवैध पीयूसी, अवैध विमा व ट्रिपल रायडिंगविरोधातही कारवाई करण्यात आली आहे. हेल्मेट व सीटबेल्ट सक्तीकरिता एआय आणि रडार तंत्रज्ञानाचा वापर सुरू करण्यात आला आहे.वाहनांची तांत्रिक स्थिती योग्य राहावी यासाठी ५३ शासकीय व १३ खाजगी स्वयंचलित वाहन तपासणी केंद्रे (एटीएस) सुरू करण्यात येत आहेत. कुशल वाहनचालकांनाच परवाना देण्यासाठी ३८ स्वयंचलित वाहन चाचणी पथ (एडीटीटी) सुरू होणार आहेत. राज्यातील सुमारे २५ हजार किलोमीटर रस्त्यावर आधुनिक वाहतूक व्यवस्थापन प्रणाली (आयटीएमएस) बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ही प्रणाली कार्यान्वित झाल्यानंतर अपघातांत १९ टक्क्यांची घट झाल्याचा दावा विभागाने केला आहे.अपघातग्रस्तांना ‘गोल्डन अवर’मध्ये तात्काळ उपचार मिळावेत यासाठी केंद्र सरकारची ‘पीएम राहत’ योजना राज्यात लागू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र अपघातग्रस्तांना सात दिवसांपर्यंत व दीड लाख रुपयांपर्यंत कॅशलेस उपचार मिळणार आहेत. अपघाताच्या वेळी ११२ या क्रमांकावर संपर्क साधून रुग्णवाहिका व जवळच्या रुग्णालयाची माहिती मिळू शकते. अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या ‘जीवनदूत’ व्यक्तींना २५ हजार रुपयांचे बक्षीस देण्याची तरतूदही करण्यात आली आहे.परिवहन विभागाच्या मते, तंत्रज्ञानाधिष्ठित अंमलबजावणी, कडक कारवाई आणि जनजागृती मोहिमांमुळे राज्यात अपघाती मृत्यू कमी करण्यास यश मिळत असून २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याच्या उद्दिष्टाकडे राज्याची वाटचाल सुरू आहे, असे परिवहन विभागाचे अपर परिवहन आयुक्त भरत कळसकर यांनी कळविले आहे.
Rohit Pawar At Baramati Police Station: पोलिस स्टेशनबाहेर बारामतीकरांनी मोठी गर्दी केली असून एफआयआर दाखल करून घेण्यासाठी बारामतीकर आक्रमक झाले आहेत.
Devdas Movie: ‘मार डाला’च्या शूटिंगवेळी माधुरी-शाहरुख जखमी! भव्य गाण्यामागचं लपलेलं दुःख उघड
Devdas Movie ‘देवदास’मध्ये चंद्रमुखीची भूमिका साकारणाऱ्या माधुरी दीक्षित यांनी अलीकडेच या गाण्याच्या शूटिंगबद्दल एक खुलासा केला. त्यांनी सांगितलं की, ‘मार डाला’चं चित्रीकरण त्यांच्या करिअरमधील सर्वात कठीण अनुभवांपैकी एक होतं.
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; घरमालक-भाडेकरूंसाठी 'हे'नवे नियम लागू
नवी दिल्ली : कर वजावटीत पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि बनावट दावे रोखण्यासाठी केंद्र सरकारने प्राप्तिकर नियमांमध्ये मोठे बदल सुचवले आहेत. सहा दशकांहून अधिक काळ लागू असलेल्या जुन्या कायद्याची जागा घेणारा नवा ‘आयकर कायदा, २०२५’ येत्या १ एप्रिलपासून अंमलात येणार असून, त्यासोबतच कर विवरणपत्रे, लेखा परीक्षण आणि विविध कर दाव्यांसाठी नवे मसुदा अर्ज (फॉर्म्स) प्रसिद्ध करण्यात आले आहेत. या मसुद्यांवर हितधारकांकडून मते मागवण्यात आली असून, पुढील महिन्यात अंतिम नियम अधिसूचित होण्याची शक्यता आहे.नव्या कायद्याअंतर्गत कर वजावटीवर अधिक काटेकोर लक्षनव्या तरतुदीनुसार, कर वजावटीचा दावा करताना भाडेकरू आणि घरमालक यांच्यातील संबंधांची सविस्तर माहिती आता प्राप्तिकर विवरणपत्रात उघड करावी लागणार आहे. आतापर्यंत केवळ भाड्याची रक्कम आणि घरमालकाचा पॅन देणे पुरेसे होते. मात्र नव्या प्रणालीत नातेवाईकांमधील व्यवहारांवर विशेष लक्ष दिले जाणार आहे. यामुळे खोटे किंवा फुगवून सांगितलेले घरभाडे भत्ता (HRA) दावे प्राथमिक टप्प्यातच हेरले जातील, असा कर प्रशासनाचा उद्देश आहे.लेखा परीक्षकांची जबाबदारी वाढणारया नव्या मसुद्यांमुळे सनदी लेखापाल (CA) आणि लेखा परीक्षकांवर अधिक जबाबदारी येणार आहे. विशेषतः परदेशी उत्पन्नावर घेतल्या जाणाऱ्या फॉरेन टॅक्स क्रेडिट (FTC) दाव्यांसाठी स्वतंत्र आणि सखोल पडताळणी बंधनकारक केली जाणार आहे. ‘फॉर्म ४४’ अंतर्गत लेखा परीक्षकांना परदेशी कर कपात प्रमाणपत्रे, प्रत्यक्ष पेमेंटचे पुरावे, चलन विनिमय दराचे अचूक रूपांतर आणि दुहेरी कर टाळण्यासाठी लागू असलेल्या कर करारांच्या अटी तपासाव्या लागणार आहेत.बनावट दावे ओळखण्यासाठी नवे निकषप्रशासकीय दृष्टीने पाहता, या बदलांचा खऱ्या करदात्यांना त्रास होणार नाही, असा दावा तज्ज्ञ करतात. ‘Nangia Global Advisors’चे भागीदार संदीप झुनझुनवाला यांच्या मते, मालकी हक्क किंवा प्रत्यक्ष पेमेंटचा ठोस पुरावा नसलेल्या बनावट दाव्यांची अचूक ओळख पटवणे आता सोपे होईल. आवश्यक असल्यास असे दावे थेट फेटाळले जाऊ शकतील.पॅन कार्ड आणि कर लेखा परीक्षणात कडक नियमनव्या नियमांनुसार, कंपन्यांना पॅन कार्डसाठी अर्ज करताना प्रतिज्ञापत्र द्यावे लागेल की, त्यांच्याकडे आधीपासून कोणताही पॅन अस्तित्वात नाही. एकापेक्षा अधिक पॅन वापरून होणारी फसवणूक रोखणे आणि डेटाबेसची विश्वासार्हता वाढवणे, हा यामागचा उद्देश आहे.तसेच ‘फॉर्म २६’ अंतर्गत कर लेखा परीक्षणात वैधानिक लेखा अहवालातील कोणत्याही प्रतिकूल निरीक्षणांचा कंपनीच्या नफा-तोट्यावर नेमका काय परिणाम झाला आहे, हे स्पष्ट करणे बंधनकारक असेल.डिजिटल माहितीवरही सरकारची नजरकंपन्यांना आता त्यांच्या अकाउंटिंग सॉफ्टवेअरची माहिती, डेटा ज्या क्लाउड सर्व्हरवर साठवला आहे त्याचा आयपी पत्ता, डेटा कोणत्या देशात संग्रहित आहे आणि भारतातील बॅकअप सर्व्हरचा पत्ता देणेही अनिवार्य केले जाणार आहे.एकूणच, नव्या आयकर कायद्याअंतर्गत पारदर्शकता, जबाबदारी आणि डिजिटल नियंत्रण वाढवण्यावर सरकारचा भर असून, कर वजावटीतील त्रुटींना आळा घालण्याचा हा मोठा प्रयत्न मानला जात आहे.
Share Market Today: आठवड्याच्या चौथ्या व्यापारी दिवशी म्हणजेच आज देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात जोरदार झाली. सुरुवातीच्या व्यवहारात बीएसईचा ३० शेअर्सचा सेन्सेक्स २०० अंकांनी म्हणजेच ०.२७% ने वाढून ८२,४१८ वर पोहोचला.
PM Modi New Record: पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रसिद्धी ही जगात पसरली आहे. आता त्यांच्या नावावर आणखी एक विक्रम झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर इतिहास रचला आहे.
Ajit Pawar: “आम्हीही दुःखी आहोत, पण सुनेत्रा पवार यांचं दुःख डोंगराएवढं”…नाना पाटेकर भावूक
Ajit Pawar अभिनेते नाना पाटेकर हे नुकतेच सुनेत्रा पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांना भेटायला गेले होते. अजित पवार आणि नाना पाटेकर यांच्यात अनेक वर्षांची घट्ट मैत्री होती. त्यामुळे या घटनेने नाना पाटेकर यांनाही मोठा धक्का बसला.
Ajit Pawar : आमदार रोहित पवार आणि आमदार अमोल मिटकरी यांनी मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात आक्रमक पवित्रा घेतला.
Inspirational Story: दोन भावांची सोशल मीडियावर तुफान चर्चा, कमी वयात...
मुंबई: किशोर मंडल आणि त्याचा लहान भाऊ कृष मंडलची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे. अतिशय कमी वयात या दोन्ही भावांनी त्यांच्या गायकीने लाखो लोकांची मने जिंकली आहेत. कृष फक्त ७ वर्षांचा आहे. पण त्याच्या आवाजातील पकड आणि गोडवा पाहून लाखो लोक आश्चर्यचकित झालं आहेत. नावलौकीक मिळवण्यासाठी वर्षानुवर्षे मेहनत करावी लागते, असं म्हटलं जातं.पण मंडल ब्रदर्स याला अपवाद आहेत.प्रचंड मेहनतीच्या जोरावर तुम्ही तुमचं कलाकौशल्य सिद्ध केलं,तर वयाचा कोणीही विचार करत नाही. तुमच्या यशाच्या शिखरावर वय कधीच अडथळा ठरत नाही.कृष त्याच्या मोठा भाऊ किशोरसोबत गाणी गातो.दोघेही एकत्र बसून सिंगिंग व्हिडिओ रेकॉर्ड करतात आणि ते सोशल मीडियावर शेअर करतात.त्यांच्या व्हिडीओंना लाखोंच्या संख्येत व्ह्यूज मिळतात. लोक त्यांच्या आवाजावरच नाही,तर त्यांच्या साधेपणावरही फिदा झाले आहेत. कोणताही दिखाऊपणा नाही.साध्या-सरळ पद्धतीने गायलेले त्यांचे गाणे लोकांच्या मनाला भिडतात.मंडल ब्रदर्सची फॅन फॉलोईंग झपाट्याने वाढलीयाच कारणामुळे इंस्टाग्राम,यूट्यूब आणि फेसबुकसारख्या प्लॅटफॉर्मवर त्यांची फॅन-फॉलोइंग झपाट्याने वाढत आहे. अनेक लोक त्यांची गाणी री-शेअर करतात आणि कमेंटमध्ये त्यांचं कौतुक करतात. मंडल ब्रदर्स यांनी अलीकडेच जवळपास ७० लाख रुपयांची लक्झरी SUV Mercedes-Benz GLE खरेदी केली आहे. इतक्या कमी वयात अशी उपलब्धी मिळवणे ही मोठी गोष्ट आहे. सोशल मीडियावर त्यांचे नवीन कारसोबतचे फोटो आणि व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहेत.काही दिवसांपूर्वी मंडल ब्रदर्स यांनी ‘दिल लगाना मना था'हे गाणे आपल्या आवाजात सादर केले होते. हे गाणे सोशल मीडियावर काहीच मिनिटांत व्हायरल झाले. लोकांनी या गाण्यावर प्रचंड रील्स बनवल्या आणि हे गाणे यूट्यूबसोबतच इंस्टाग्रामवरही ट्रेंड होऊ लागले.म्युझिक व्हिडिओमध्ये टीव्ही कलाकार सनम जौहर आणि आशी सिंग दिसले. गाण्यात अधुरी प्रेमकहाणी आणि ब्रेकअपनंतरच्या भावना सुंदररीत्या दाखवण्यात आल्या होत्या. या गाण्याला प्रेक्षकांनी खूप पसंती दर्शवली. ३५ मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळालेल्या या गाण्याच्या यशानंतरच मंडल ब्रदर्स यांनी एक लक्झरी कार खरेदी केली आहे.
Top 10 news: राज्यसभेच्या ३७ जागा रिक्त होत होणार असून यातील ७ जागा महाराष्ट्रातील आहेत. राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सात जागांच्या अनुषंगाने आता घडामोडींना वेग आलाय.
Alpha Movie: २१५ कोटींची ऑफर नाकारून ‘अल्फा’ थेट थिएटरमध्येच! यशराज फिल्म्सचा मोठा निर्णय
Alpha Movie ‘अल्फा’मध्ये आलिया भट्ट, शरवरी वाघ आणि बॉबी देओल मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये आधीपासूनच मोठी उत्सुकता आहे. दरम्यान, नेटफ्लिक्स इंडियाकडून या चित्रपटासाठी थेट डिजिटल रिलीजसाठी तब्बल २१५ कोटी रुपयांची ऑफर देण्यात आल्याची चर्चा होती.
State Government Dearness Allowance: सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; महागाई भत्त्यात वाढ
State Government Dearness Allowance:
Vijay-Rashmika विजय आणि रश्मिकाची प्रेमकथा अगदी चित्रपटातील कथेसारखी आहे. दोघांची पहिली भेट २०१७ मध्ये ‘गीता गोविंदम’ या चित्रपटाच्या सेटवर झाली. हा चित्रपट २०१८ मध्ये प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांनी या जोडीला अक्षरशः डोक्यावर घेतले.
तब्बल २ लाख ४४ हजार कोटींचे पायाभूत सुविधा प्रकल्प, राखीव निधी केवळ ३६ हजार कोटी
मुंबई: मुंबई महापालिच्यावतीने पायाभूत सुविधा प्रकल्प हाती घेण्यात आले असून आता या प्रकल्पांचा खर्च २ लाख ४४ हजार ५५२ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. यंदा सर्व प्रकल्प कामांसाठी ४१ हजार ३९० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, या पायाभूत सुविधा प्रकल्प कामांसाठी राखीव निधी हा केवळ ३६ हजार ६२३ कोटी रुपये एवढाच आहे. त्यामुळे तरतूद केलेल्या निधीपेक्षा राखीव निधीतील तरतुदीची रक्कमेतही पाच हजार कोटी रुपयांची कमतरता दिसून येत आहे.मुंबई महापालिकेच्यावतीने मलनि:सारण प्रकल्प अंतर्गत सात सांडपाणी प्रकल्प,कोस्टल रोड, रस्ते विकास, पुलांचा विकास, रुग्णांचा पुनर्विकास, पाणी पुरवठा प्रकल्प, महापालिका इमारतींचा पुनर्विकास, आश्रय योजना, घनकचरा प्रकल्प, राणी बागेचा विकास, पक्षी उद्यान अशाप्रकारे एकूण २ लाख ४४हजार ५५२ कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. मागील वर्षी या सर्व पायाभूत सुविधा प्रकल्पांचा खर्च २ लाख ३३ हजार कोटी रुपये एवढा होता. त्यामुळे एका वर्षांत ११ हजार कोटी रुपयांच्या विकासकामांना मंजुरी देण्यात आली आहे.या पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी आगामी सन २०२६-२७ या वर्षांत ४१ हजार ३९० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर या प्रकल्प कामांसाठी सध्या उपलब्ध असलेला राखीव निधी हा केवळ ३६ हजार ६२३ कोटी रुपये एवढा आहे. मुंबई महापालिकेकडे पायाभूत सुविधांकरता उपलब्ध राखीव निधी व बांधिल दायित्वापोटी राखीव निधी अशाप्रकारे एकूण ८१ हजार ४४९ कोटी रुपयांचा निधी मुदतठेवीत उपलब्ध आहे. परंतु त्यातील ४४ हजार८२६ कोटी रुपयांचा निधी हा बांधिल दायित्वापोटी अर्थात भविष्य निर्वाहनिधी, निवृत्ती वेतन निधी, उपदान, कंत्राटदारांच्या अनामत रक्कम, निवृत्त वेतन अंतर्गत मुदत ठेवी, चर खणण्याचे पैसे अशाप्रकारे निधी आहे. ज्याला महापालिका हात लावू शकत नाही. त्यामुळे या ८१ हजार ४४९ कोटी रुपयांच्या मुदतठेवींपैंकी केवळ ३६ कोटी ६२६ कोटी रुपयेच खर्च करू शकतो.महापालिका अर्थसंकल्प बनवताना तात्पुरते अंतर्गत हस्तांतरण अंतर्गत १३,७६५ कोटी रुपये आणि विशेष निधी तथा राखीव निधीतून १४,२९५कोटी रुपयांचा निधी अशाप्रकारचा अंतर्गत कर्जाची रक्कम दर्शवली आहे. त्यामुळे हे कर्ज दाखवून अर्थसंकल्पात निधीची तरतूद करत आकडा वाढवला गेला तरी प्रत्येक वेळी अंतर्गत कर्जांची रक्कम वापरलीच जाते असे नाही.मात्र, यासंदर्भात बोलतांना महापालिका आयुक्त डॉ भूषण गगराणी यांनी प्राप्त महसूल आणि तरतूद केलेला निधी यांची सांगड घालण्याचा प्रयत्न केला जातो. जर महसूल अधिक प्राप्त झाला तर मुदत ठेवीतील पैसे किंवा राखीव निधीतील पैसे खर्च करण्याची आवश्यकता नसते. परंतु महसूल वसूलीचे प्रमाण कमी असेल आणि जास्त खर्च असेल तर काही प्रमाणात राखीव निधी किंवा मुदत ठेवींना हात घालावा लागेल. परंतु प्रत्यक्षात स्थिती आर्थििक स्थितीवर अवलंबून आहे.
Satara: कराडमधील यशवंत को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्यात ५० जणांविरुद्ध गुन्हे दाखल
सातारा: कराडमधील गाजलेल्या यशवंत को-ऑपरेटिव्ह बँकेतील ११२ कोटी १० लाख रुपयांच्या अपहार प्रकरणात मुख्य आरोपी आणि सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर याला आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने मध्यरात्री विंग गावातून अटक केली आहे. दीर्घकाळ फरार असलेल्या चरेगावकरचा थांगपत्ता लागत नसल्याने पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं. अखेर गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे.या प्रकरणात यापूर्वीच त्याचा दत्तक भाऊ विठ्ठल कुलकर्णी याला अटक करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण संचालक मंडळ, पाच वरिष्ठ अधिकारी आणि चरेगावकर यांच्या नातेवाईकांसह एकूण सुमारे ५० जणांविरोधात १२ ऑक्टोबर २०२५ रोजी कराड शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.बँकेच्या लेखापरीक्षणात बोगस कर्जप्रकरणाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची अफरातफर झाल्याचे उघड झाले. सनदी लेखापाल मंदार शशिकांत देशपांडे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, तत्कालीन अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ, पाच अधिकारी आणि संबंधित नातेवाईक यांनी संगनमताने बनावट कागदपत्रांच्या आधारे तारण न घेता कर्जवाटप केले. जुनी थकबाकी खाती बंद दाखवून नव्याने कर्जखाती उघडणे, निधीचा उद्देशबाह्य वापर करणे, दस्तऐवजांमध्ये फेरफार करणे आणि खोट्या नोंदी करून ठेवीदार व सभासदांच्या हिताला बाधा पोहोचवणे, असे गंभीर आरोप फिर्यादीत नमूद आहेत.९ ऑगस्ट २०१४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत हा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. भारतीय न्याय संहितेतील कलम ६१, ३१६ (२), ३१६(४), ३१८ (४), ३३६ (३), ३३८, ३३९, ३४० (२) आणि ३ (५) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. संबंधित कलमे अजामीनपात्र असल्याने आरोपींवर अटकेची कारवाई सुरू आहे.दरम्यान, या प्रकरणात प्रवर्तन संचालनालय (ईडी) कडूनही कारवाई करण्यात आली असून, चरेगावकर यांच्या बंगल्यावर तसेच यशवंत बँकेच्या फलटण शाखेवर धाड टाकून कागदपत्रांची तपासणी करण्यात आली आहे. मुख्य आरोपीच्या अटकेनंतर तपासाला वेग आला असून, या घोटाळ्यात आणखी कोणती नावे समोर येणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. सहकार क्षेत्रातील या प्रचंड आर्थिक गैरव्यवहारामुळे ठेवीदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
‘वडिलांनी माझ्या लग्नासाठी दोन एकर जमीन विकली होती. त्यावेळी मी 20 वर्षांची होते. जून महिना होता जेव्हा माझे लग्न झाले आणि मी सासरी आले. मधुचंद्राच्या दुसऱ्या दिवशी सकाळी-सकाळी माझे जेठ आणि नणंदेचे पती (ननदोई) माझ्या खोलीत आले. त्यांनी विचारले- तुझी पहिली रात्र कशी होती? काही अडचण तर नाही आली? ऐकताच माझी नजर लाजेने खाली झुकली. मनातल्या मनात विचार करू लागले की कोणी अशा प्रकारच्या खासगी गोष्टी कशा विचारू शकते! नंतर मला कळले की माझ्या पतीला शारीरिक संबंधांशी संबंधित काही समस्या होत्या. मला दोन मुले आहेत. माझ्या मुलाचे वय 16 वर्षे आहे आणि मुलीचे 10 वर्षे. दोन्ही मुले दोन वेगवेगळ्या पुरुषांपासून आहेत आणि आता वडिलांशिवाय मोठी होत आहेत. त्यांच्यासाठी आता मीच आई-वडील आहे.’, सुनीता आर्या 'ब्लॅकबोर्ड' या 'काळोख्या कथा' मालिकेतील सुनीता आर्याची कहाणी, जिने घुंघट न घेतल्यामुळे मोठ्या दिराने तिला निर्वस्त्र करून मारहाण केली. गर्भवती झाल्यानंतर 3 महिन्यांनी पतीने तिला सोडून दिले. त्यानंतर प्रियकराने तिला गर्भवती केले आणि मुलाला स्वीकारले नाही. सुनीता आर्या सध्या मध्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्यातील गैरतगंज येथे राहतात. सरकारी जमिनीवर बांधलेल्या एका छोट्या घरात त्यांची गुजराण होत आहे. आई आणि दोन्ही मुलेही सोबत राहतात. जेव्हा मी त्यांच्याशी बोलण्यासाठी पोहोचलो, तेव्हा त्यांनी आजूबाजूला नजर फिरवली आणि हळूच म्हणाल्या, ‘मी मुलांना खोलीत पाठवते. आपण शेजारच्या नवीन घराच्या व्हरंड्यात बसून बोलूया. त्यांच्यासमोर या सगळ्या गोष्टी बोलणे योग्य होणार नाही.’ त्यांनी हलकेच इशारा केला, तेव्हा मुले गूपचूप खोलीत निघून गेली. मी त्या व्हरंड्यात त्यांच्यासोबत येऊन बसलो. सुनीताने दीर्घ श्वास घेतला, जणू काही ती गत वर्षांचे थर पुन्हा उलगडण्याची तयारी करत होत्या. त्या सांगतात, ‘2007 सालची गोष्ट आहे. मी माझ्या वडिलांसोबत मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये राहत होते. आई-वडिलांची एकुलती एक मुलगी. एक नातेवाईक घरी आले, तेव्हा ते नेहमी म्हणायचे- मुलगी मोठी झाली आहे. आता लग्न करून टाका. नंतर चांगला मुलगा मिळणार नाही. आपल्या समाजात तर 13-14 वर्षांच्या वयातच लग्न होते.’ उत्तरादाखल वडिलांनी म्हटले, ‘जर एखादा चांगला मुलगा मिळाला तर सांगा.’ त्यांनी माझ्या मामांशीही याबद्दल बोलले. काही दिवसांनी मामा रायसेनहून एक स्थळ घेऊन आले. त्यांनी मुलाबद्दल आणि त्याच्या कुटुंबाबद्दल खूप कौतुक केले - म्हणाले की लोक चांगले आहेत, खानदान चांगले आहे. मग आमच्या कुटुंबाचे एकमेकांना भेटणे-जुळणे सुरू झाले. बघता बघता गोष्ट पुढे सरकली आणि लग्न ठरले. लग्न झाले आणि मी सासरी आले. सुरुवातीला सर्व सामान्य वाटत होते. नवीन वातावरण समजून घेण्याचा आणि त्यात स्वतःला जुळवून घेण्याचा प्रयत्न करत होते. याच दरम्यान जेव्हा पहिल्यांदा गर्भवती झाले, तेव्हा मनात एक वेगळाच आनंद होता. वाटले की कदाचित आता आयुष्यात काही स्थिरता येईल. पण जेव्हा मी ही गोष्ट माझ्या पतीला सांगितली, तेव्हा त्यांचा चेहरा उतरला. त्यांनी मला समजावायला सुरुवात केली- आता मी बाळ जन्माला घालण्यासाठी तयार नाही, आमची परिस्थितीही ठीक नाही. पुढच्या वेळी करू. यावेळी बाळ पाडून टाकूया. ते वारंवार हेच म्हणत राहिले. मी द्विधा मन:स्थितीत होते. एकीकडे माझ्या मनात आई होण्याची इच्छा होती, दुसरीकडे पतीचे बोलणे आणि त्यांचा दबाव. शेवटी, त्यांनी आग्रह केल्यावर मी गर्भपात करून घेतला. याच दरम्यान घरात आणखी एक विचित्र परिस्थिती निर्माण होत होती. जे जेठ मला नेहमी घरात पदर घेण्याचा सल्ला देत होते, त्यांचीच नजर माझ्यावर ठीक नव्हती. ते अनेकदा कागदपत्रे बनवण्याच्या बहाण्याने मला शहरात घेऊन जात. गावातील बसच्या पायऱ्या उंच असत, तेव्हा ते माझ्या कमरेत हात घालून चढवण्याचे निमित्त करत आणि मग सीटवर चिकटून बसत. सुरुवातीला मला वाटले की ते माझी काळजी घेत आहेत, पण हळूहळू त्यांच्या हालचाली स्पष्ट होऊ लागल्या. एक-दोनदा त्यांनी मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न केला, इतकेच काय, माझ्या छातीवरही हात लावला. या घटनांमुळे मी आतून खूप अस्वस्थ होऊ लागले होते, पण पुढे जे घडले, त्याने मला पूर्णपणे हादरवून टाकले. आमचे शहरातही एक घर होते. एक दिवस मी तिथे आराम करत होते. दरवाजा आतून बंद केलेला होता. उन्हाळ्याचे दिवस होते, म्हणून मी हलक्या कपड्यांमध्ये झोपले होते. माझे जेठ शिक्षक होते. त्या दिवशी ते घरी आले. मी झोपले आहे असे समजून दरवाजाच्या वर असलेल्या खिडकीतून डोकावू लागले. अचानक माझी झोप उघडली, तेव्हा पाहिले तर ते दरवाजावर चढलेले होते. त्यांची नजर माझ्यावर पडताच ते लगेच खाली उतरले, जणू काही घडलेच नाही. त्या दिवशी मी खूप घाबरले होते, पण विचार करत राहिले की कदाचित ही एकदाच घडलेली गोष्ट असेल. पण तसे नव्हते. असेच एकदा मी वॉशरूममध्ये अंघोळीला गेले होते. माझे कपडे खोलीत बेडवर ठेवले होते. जेव्हा मी टॉवेल गुंडाळून वॉशरूममधून बाहेर आले, तेव्हा पाहिले तर जेठ समोरच्या खोलीत बसले होते. मी घाबरले. ओरडून म्हणाले- तुम्ही माझ्या खोलीत अचानक कसे आलात? ते इकडे-तिकडे पाहू लागले आणि काहीतरी कामासाठी आलो होतो असे बहाणे करू लागले. त्यावेळी मी कसेबसे स्वतःला सावरले, पण आतून मात्र पूर्णपणे खचून गेले होते. नंतर धीर करून मी ही गोष्ट माझ्या सासूबाईंना आणि पतीला सांगितली. मला आशा होती की ते मला साथ देतील, पण उलट तेच मला समजावू लागले. ते म्हणाले - ते असे करू शकत नाहीत, तू चुकीचे समजत आहेस. घरात थोडेफार चढ-उतार झाले तर बाईने सहन करायला पाहिजे. हे ऐकून मला पहिल्यांदाच जाणवले की या घरात माझे ऐकणारे कोणी नाही. मी त्यांच्या अशा वागण्यामुळे सतत त्रस्त होते. दररोज मला हीच चिंता सतावत असे की, माहीत नाही कधी, कोणत्या बहाण्याने ते पुन्हा माझ्यासमोर येऊन उभे राहतील. शेवटी मी धीर गोळा केला आणि माझ्या जाऊबाईंना सर्व गोष्टी सांगितल्या. त्यांना सांगितले की, ते मला शहरात घेऊन जाण्याच्या बहाण्याने कसे स्पर्श करण्याचा प्रयत्न करतात आणि खोलीत न सांगता येतात. जाऊबाईंनी ही गोष्ट हलक्यात घेतली नाही. त्यांनी दिरांना स्पष्टपणे विचारले - तुम्ही वहिनीला वारंवार शहरात का घेऊन जाता? तिचा नवरा का जात नाही? तुम्ही तिच्यापासून थोडे अंतर ठेवून राहायला पाहिजे. त्यावेळी मला वाटले की कदाचित आता काहीतरी बदलेल. पण तसं झालं नाही. मोठ्या दिराने आपल्या सवयी बदलल्या नाहीत. वरवर ते सामान्यपणे वागत होते, पण त्यांच्या नजरा अजूनही तशाच होत्या- टक लावून, संधी शोधणाऱ्या. एक दिवस मी स्वयंपाकघरात जेवण बनवत होते. काम करता करता नकळत डोक्यावरचा पदर थोडा खाली सरकला. माझ्या लक्षातही आलं नाही. तेव्हा अचानक मोठ्या दिराचा मोठा आवाज ऐकू आला. माझं उघडं डोकं पाहताच ते ओरडू लागले. शिवीगाळ करत म्हणाले- अशीच बाई कुटुंबाची इज्जत मातीत मिळवते. निर्लज्जपणे उघडं डोकं घेऊन पूर्ण अंगणात फिरत राहते. त्यांचा आवाज इतका मोठा होता की घरातील इतर लोकही तिथे पोहोचले. मी घाबरून लगेच पदर नीट करू लागले, पण तोपर्यंत त्यांनी विषय वाढवला होता. त्यांचा आवाज इतका मोठा होता की वातावरण तणावपूर्ण झाले. इतक्या लहान गोष्टीवर ते इतके का रागावत आहेत, हे मला समजत नव्हते. मी वारंवार पदर नीट करत होते आणि म्हणत होते की तो चुकून सरकला, माझा कोणताही चुकीचा हेतू नव्हता. पण जणू काही ते ऐकण्याच्या मन:स्थितीतच नव्हते. असे म्हणत ते रागाने माझ्या दिशेने आले आणि अचानक माझे केस पकडून जोराने ओढू लागले. मी वेदनेने किंचाळले. किंचाळण्याचा आवाज ऐकून माझे पतीही आले. त्यांनी मला वाचवण्याऐवजी आपल्या भावालाच साथ दिली. त्यांनीही माझा हात घट्ट पकडला. दोघे मिळून मला फरपटत खोलीतून अंगणाकडे घेऊन जाऊ लागले. या ओढाताणीत माझी साडी सैल होऊन सुटू लागली. मी स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत राहिले, पण त्यावेळी माझे ऐकणारे कोणीच नव्हते. त्यावेळी असं वाटलं की दुर्योधन द्रौपदीचं वस्त्रहरण करत आहे. आवाज ऐकून आजूबाजूच्या घरातील लोक अंगणात जमा झाले. पण कुणीही एक शब्द बोलणं गरजेचं समजलं नाही. साडी काढल्यामुळे मी फक्त ब्लाउज आणि पेटीकोटमध्ये राहिले होते. दीर आणि माझ्या पतीने माझे केस पकडले आणि बेल्ट व काठीने मारायला सुरुवात केली. अंगणात एक मोठा दगड ठेवला होता. त्यावरच आपटलं. जोराची दुखापत झाली आणि मी वेदनेने विव्हळले. त्यावेळी मी 3 महिन्यांची गर्भवती होते. हात-पाय आपटत दयेची भीक मागत होते, पण दोघांचंही काळीज पाझरलं नाही. त्यावेळी वाटलं की, काश! अशाप्रकारे गर्दीसमोर विवस्त्र होऊन अपमानित होण्यापेक्षा मला मारून टाकलं असतं तर बरं झालं असतं. माझा गळा दाबून टाकला असता. हळूहळू ही गोष्ट नातेवाइकांमध्येही पसरली. कदाचित एखाद्या शेजाऱ्याने माझ्या मामाच्या मुलाला सर्व काही सांगितलं. जेव्हा त्याला सत्य कळलं, तेव्हा तो वेळ न घालवता आला. त्याने माझी अवस्था पाहिली आणि त्याचवेळी निर्णय घेतला की आता तो मला तिथे सोडू शकत नाही. तो मला आपल्यासोबत माहेरी घेऊन आला. त्यावेळी मी गर्भवती होते आणि खूप अशक्तही होते. माहेरी पोहोचल्यावर थोडा दिलासा मिळाला. तिथे 6 महिन्यांनंतर मी एका मुलाला जन्म दिला. रुग्णालयाचा संपूर्ण खर्च माझ्या आई-वडिलांनी उचलला. माझे नातेवाईक वगैरे बघायला आले, पण माझा नवरा ना रुग्णालयात आला, ना कधी मुलाला बघायला. कोणताही खर्चही पाठवला नाही. त्या दिवशी मला स्पष्ट समजले की आता ही जबाबदारी फक्त माझी आहे. त्यानंतर मी मुलाला एकटीने वाढवले. मग ही मुलगी कशी झाली? ‘हो, पुढे तेच सांगणार आहे. 2011 सालची गोष्ट आहे. तोपर्यंत मी माझ्या मुलासोबत माहेरीच राहत होते. वडिलांना एक जमीन विकायची होती. गैरतगंजमध्ये मनीष जैन नावाचा एक व्यक्ती होता, जो जमिनीची खरेदी-विक्री करत असे. जेव्हा त्याला कळले की वडील जमीन विकू इच्छितात, तेव्हा तो माझ्या घरी आला. याच दरम्यान माझी त्याच्याशी पहिली भेट झाली. जमिनीच्या संदर्भात त्याचे घरी येणे-जाणे वाढू लागले. हळूहळू त्याच्याशी बोलणे सुरू झाले आणि तो मला आवडू लागला. माझा मुलगाही त्याला आपलेपणा देऊ लागला. त्याला ‘बाबा’ म्हणून हाक मारत असे. ‘बाबा’ हा शब्द ऐकून त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसायचा. तो विवाहित असूनही, त्याचे आमच्या घरी येणे-जाणे सतत चालू राहिले.’ तो अशा प्रकारे माझ्या माहेरी येऊ लागला. अनेकदा रात्रभर थांबायचा. हळूहळू तो माझ्यासोबत झोपू लागला. एक दिवस मी त्याला स्पष्ट विचारले - तू तुझ्या पत्नीला खोटे बोलून माझ्याकडे येतोस का? त्याने सांगितले - नाही, पत्नीला तुझ्याबद्दल सर्व काही माहीत आहे. तिला कोणतीही अडचण नाही. त्याच्या बोलण्यावर माझा विश्वास बसला नाही. मी त्याच्या पत्नीला फोन केला आणि विचारले - तुमचे पती माझ्यासोबत राहतात, तुम्हाला काही हरकत नाही का? तिने उत्तर दिले - मला माहीत आहे की ते तुमच्याकडे जातात. तुम्ही त्यांची मैत्रीण आहात. हे सर्व ऐकल्यानंतर माझ्या मनातील संकोच काहीसा कमी झाला. हळूहळू तोही मला आवडू लागला. इतक्या संघर्षानंतर मला एका आधाराची गरज भासत होती. जेव्हा तो मला भेटायला यायचा, तेव्हा आम्ही एकमेकांच्या जवळ यायचो आणि आमच्यात शारीरिक संबंध निर्माण होऊ लागले. आमच्यातील जवळीक वाढत गेली आणि भेटीगाठींचा सिलसिला सुरूच राहिला. याच दरम्यान, 2013 मध्ये, मी त्याच्यापासून गर्भवती झाले. जेव्हा त्याला ही गोष्ट कळली, तेव्हा तो घाबरलेला माझ्याकडे आला. त्याच्या चेहऱ्यावर अस्वस्थता होती. तो म्हणाला- मी अजून यासाठी तयार नाही. तू या बाळाला पाडून टाक. नंतर बाळ करू. आता गर्भपात करून घे. त्याचे बोलणे ऐकून मी पुन्हा एकदा द्विधा मनःस्थितीत पडले. मला वाटले की खरोखरच कोणीतरी त्रासलेले असेल, पण त्याच्या शब्दांनी मला आतून हादरवून टाकले. तुम्ही त्या विवाहित पुरुषाशी लग्न करू इच्छित होतात का? ‘नाही, मला त्याच्याशी लग्न करायचे नव्हते. पण मला वाटत होते की त्याने या बाळाला जगात येऊ द्यावे. तरीही, त्याच्या बोलण्यात येऊन शेवटी गर्भपात करून घेतला. 2 वर्षांनी पुन्हा त्याच्यापासून गर्भवती झाले. यावेळी जेव्हा त्याला कळले, तेव्हा त्याचे वर्तन पूर्णपणे बदलले. तो म्हणाला- हे बाळ माझे नाही, ते दुसऱ्या कोणाचे तरी असेल. तू माझ्या पाठीमागे कोणाकोणाला भेटतेस, मला काय माहीत? मी तर महिन्यातून एक-दोनदाच तुला भेटायला येतो. तुझ्या पोटात वाढणारे बाळ माझे नाही. त्याचे हे बोल ऐकून मला खूप मोठा धक्का बसला. ज्या नात्याला मी विश्वासाने जपत होते, त्याच नात्यावर त्याने प्रश्नचिन्ह उभे केले. मी आश्चर्यचकित झाले होते आणि आतून खूप रागातही होते. त्याचे बोल ऐकताच मी खूप तणावात गेले. मी वारंवार हेच विचार करत होते की 4 वर्षांपासून तो माझ्यासोबत संबंध ठेवत होता. दोनदा त्याच्यापासून गर्भवती झाले. पहिल्यांदा त्याच्या सांगण्यावरून मी गर्भपात करून घेतला, आणि आता तो म्हणतोय की हे बाळ दुसऱ्या कोणाचे तरी आहे. त्या क्षणी मला वाटले की माझ्या विश्वासाला काही किंमतच नव्हती. मी विचार करत होते की त्याला फक्त माझ्या शरीराशी मतलब होता, माझ्या भावनांशी नाही. हे म्हणता म्हणता सुनीता आपल्या दोन्ही हातांनी चेहरा झाकून घेते. 15 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे, पण त्या दिवसांची आठवण काढताना आजही तिचा आवाज थरथरतो. ती म्हणते, ‘जेव्हा जेव्हा त्या गोष्टींची आठवण येते, तेव्हा आतून थरथरून जाते.’ ती पुढे सांगते की, त्याच्या आरोपांनंतर आणि नकारानंतर मी ठरवले की आता मागे हटणार नाही. माझ्या पोटात वाढणाऱ्या बाळाला जगात आणीन. त्याला मी स्पष्ट सांगितले - या बाळाला जन्म देईन आणि न्यायालयात सिद्ध करेन की हे तुझेच आहे. तोपर्यंत माझ्या पहिल्या पतीपासून माझा घटस्फोट झाला होता, त्यामुळे मला इतर कोणत्याही बंधनाची भीती नव्हती. शेवटी, मी एका मुलीला जन्म दिला. मुलीच्या जन्मानंतर तिची डीएनए चाचणी करून घेतली. अहवाल घेऊन न्यायालयात पोहोचले. चौकशी झाली आणि सिद्ध झाले की मुलगी त्याचीच आहे. 2015 मध्ये न्यायालयाचा निर्णय माझ्या बाजूने आला. सिद्ध झाले की मुलगी मनीष जैनची आहे. पण मनीषने न्यायालयाचा निर्णय मानण्यास नकार दिला. त्याने या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले. 2018 मध्ये पुन्हा न्यायालयाचा निर्णय माझ्या बाजूने आला. निकाल माझ्या बाजूने लागला. इतक्या कायदेशीर लढाया आणि संघर्षांनंतरही माझे आयुष्य सोपे झाले नाही. आजही दोन्ही मुलांसोबत एकटीच राहते. गप्पा मारताना माझे लक्ष वारंवार त्यांच्या लहान कापलेल्या केसांकडे जात होते. मी काही विचारण्यापूर्वीच त्या स्वतःच म्हणाल्या- ‘2023 मध्ये बाबांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मी त्यांची एकुलती एक मुलगी आहे. मीच त्यांना मुखाग्नी दिली. त्यानंतर मी मुंडण केले होते. गावकऱ्यांनी तर असेही म्हटले होते की मी वेडी झाले आहे, मुलीने मुंडण करू नये. पण मी ऐकले नाही.’ ही खरी कहाणी सुनीता आर्याच्या अंधाऱ्या आयुष्याची आहे, पण ही पराभवाची कहाणी नाही. ज्या परिस्थितीत बहुतेक लोक खचून जातात, त्या परिस्थितीत सुनीता आर्या एकट्या उभ्या राहिल्या.
EPFO 3.0: PF क्लेम आता 3 दिवसांत पूर्ण होणार, कसं ते जाणून घेऊया...
नवी दिल्ली: देशातील लाखो नोकरदारांसाठी श्रम मंत्रालयाने 'EPFO 3.0' ही अत्यंत महत्त्वाची आणि फायदेशीर योजना सुरू केली आहे. अनेकदा कर्मचारी जुनी नोकरी सोडल्यानंतर जुन्या पीएफ खात्यातील शिल्लक रक्कम काढण्यास विसरतात. अशा प्रलंबित रक्कमेसाठी आता सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला असून, ज्या खात्यांमध्ये एक हजार रुपये किंवा त्यापेक्षा कमी रक्कम आहे, ती रक्कम सरकार स्वतःहून कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा करणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.या नव्या सुविधेमुळे कर्मचाऱ्यांना कोणत्याही सरकारी कार्यालयात हेलपाटे मारण्याची किंवा अर्ज भरण्याची गरज भासणार नाही. तुमचे पीएफ पैसे थेट तुमच्या व्हेरिफाईड बँक खात्यात ट्रान्सफर केले जातील. तसेच, ईपीएफओच्या नव्या प्रणालीमुळे क्लेम सेटलमेंटचा कालावधी कमी होऊन तो आता केवळ ३ दिवसांवर आला आहे. ईपीएफओच्या नियमांनुसार, ज्या पीएफ खात्यात सलग ४६ महिने (३ वर्षे) कोणताही नवा हिस्सा जमा होत नाही, ते खाते 'इनऑपरेटिव्ह' मानले जाते.ईपीएफओकडे सध्या अशा ३१.८६ लाख खात्यांमध्ये एकूण १०,९०३ कोटी रुपये पडून आहेत. पहिल्या टप्प्यात १,००० रुपयांपेक्षा कमी शिल्लक असलेली ७.११ लाख खाती निवडण्यात आली असून, त्यातील ३०.५२ कोटी रुपये थेट कर्मचाऱ्यांना परत दिले जाणार आहेत. अनेकजण छोटी रक्कम असल्याने पीएफ काढण्याचा कंटाळा करतात, यामुळे हजारो कोटी रुपये ईपीएफओकडे पडून आहेत. आता सरकारने हे पैसे थेट खातेदारांना देण्याचे अभियान हाती घेतले आहे.इतकेच नाही, तर आता पीएफ क्लेम अवघ्या ७२ तासांत (३ दिवसांत) सेटल होणार आहे. यामुळे तातडीच्या वेळी पैशांची गरज असणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात सरकारने अशा ७.११ लाख खात्यांची ओळख पटवली आहे. ज्यामध्ये १००० रुपयांपेक्षा कमी शिल्लक आहे. या मोहिमेमुळे लाखो कर्मचाऱ्यांच्या खिशात हक्काचे पैसे विनासायास परत येणार आहेत. जर तुमचे खाते ३ वर्षांपासून बंद असेल, तर आता तुमच्या मोबाईलवर लवकरच पैसे जमा झाल्याचा मेसेज येऊ शकतो.
22 फेब्रुवारी 2026‘रात्रीचे साधारण 8 वाजले असतील. मी ओरियन मॉलमध्ये काही कामं आटोपून मित्रासोबत कॅम्पसमध्ये परत येत होते. मी मॉलबाहेर पडताच, मला जाणवले की बाईकवरून 3 लोक माझा पाठलाग करत आहेत. सुरुवातीला मी दुर्लक्ष केले, पण अचानक बाईक माझ्या बाजूला आली. ते लोक फक्त माझा पाठलागच करत नव्हते, तर रस्त्यातभर वर्णद्वेषी आणि अश्लील कमेंट्स करत होते.’ 'त्या मुलांनी दीड किलोमीटरपर्यंत माझा पाठलाग केला. मी आर्मी कॅम्पजवळ कॉलेजच्या गेट नंबर 2 जवळ पोहोचले, तेव्हा त्यापैकी एक मुलगा माझ्या जवळ आला. त्याने मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला आणि स्वतःचे कपडे काढू लागला. मी खूप घाबरले होते, मी मदतीसाठी ओरडले. तेव्हा कॅम्पसमधील लोक तिथे पोहोचले. लोकांची गर्दी पाहून ते मुले तिथून पळून गेले.' ही गोरखपूरच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेतील (AIIMS) एका निवासी डॉक्टरची आपबीती आहे, ज्या नागालँडच्या रहिवासी आहेत. घटनेच्या दुसऱ्या दिवशी, 23 फेब्रुवारी रोजी, पीडितेने एम्स पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. या घटनेच्या 24 तासांच्या आत तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली. दिव्य मराठीच्या टीमने महिला डॉक्टरशी संपर्क साधला आणि गोरखपूर पोलिसांकडून संपूर्ण घटनाक्रम सविस्तरपणे जाणून घेतला. या घटनेव्यतिरिक्त, आम्ही ईशान्येकडील महिलांवर देशभरात झालेल्या वर्णद्वेषी टिप्पणीच्या प्रकरणांचीही यादी केली आहे. संपूर्ण अहवाल वाचा… पीडितेचे सहकारी डॉक्टर म्हणाले- मुले नीचपणाच्या थराला पोहोचलीया घटनेनंतर आम्ही पीडित डॉक्टरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. आम्हाला सांगण्यात आले की त्या घटनेनंतर खूप अस्वस्थ आहेत आणि कोणाशीही बोलू इच्छित नाहीत. पीडितेची सुरक्षा आणि काळजी घेण्यापासून ते तिची कायदेशीर लढाई सध्या नॅशनल फेडरेशन ऑफ ऑल इंडिया रेसिडेंट डॉक्टर्स (NAFORD) ही संघटना लढत आहे. आम्हाला पीडितेची बाजू जाणून घेण्यासाठी संघटनेचे अध्यक्ष डॉ. देवेश दुबे यांचा फोन नंबर देण्यात आला. डॉ. देवेश म्हणतात, ‘घटनेनंतर पीडितेने वसतिगृहात पोहोचून सर्वात आधी NAFORD च्या ग्रुपवर मेसेज केला. ती खूप घाबरली होती, तिने सांगितले की कसे 3 मुलांनी तिला रस्त्यात त्रास दिला.‘ ‘ती मुले नीचपणाच्या अशा थराला पोहोचली होती की त्यांनी डॉक्टरवर केवळ घाणेरड्या कमेंट्स केल्या नाहीत, तर तिच्या शरीराच्या मागील भागावर हात मारला. मग त्यापैकी एकाने पीडितेसमोर आपली टी-शर्ट काढली. त्या मुलांची ही कृती पाहून पीडिता घाबरली नाही, उलट तिने धैर्याने त्यांचा सामना केला.’ NAFORD नुसार, पीडितेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत सांगितले आहे की, त्या रात्री तिन्ही मुलांनी तिचा दीड किलोमीटरपर्यंत पाठलाग केला. यादरम्यान वर्णद्वेषी टिप्पणी करत तिच्याशी गैरवर्तन केले, तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. इतकेच नव्हे तर कपडे काढून तिला खाजगी अवयव दाखवण्याचा प्रयत्न केला. हे पाहून पीडितेने मदतीसाठी आवाज दिला, त्यानंतर मुले तिथून पळून गेली. पीडित डॉक्टर गोरखपूर एम्समध्ये प्रसूती आणि स्त्रीरोग विभागात तिसऱ्या वर्षाची निवासी डॉक्टर आहे. दिव्य मराठीला पीडित डॉक्टरचा तो मेसेज मिळाला आहे, जो तिने घटनेनंतर NAFORD च्या ग्रुपमध्ये शेअर केला होता. पाहूया, पीडितेने मेसेजमध्ये काय लिहिले आहे. ‘मी त्या तिन्ही मुलांना थप्पड मारू शकते का?’गोरखपूर एम्स रुग्णालयाचे डॉक्टर अमित राय NAFORD च्या सतत संपर्कात आहेत. त्यांनी आम्हाला पीडित डॉक्टरच्या स्थितीबद्दल सांगितले, जेव्हा त्या एम्स पोलीस स्टेशनमध्ये जबाब नोंदवण्यासाठी गेल्या होत्या. डॉ. अमित म्हणतात, ‘घटनेनंतर पीडित डॉक्टरने एम्सच्या वरिष्ठ डॉक्टरांना आपली आपबिती सांगितली. दुसऱ्या दिवशी आम्ही सर्व तिला घेऊन पोलीस ठाण्यात गेलो. तिच्या तक्रारीवरून, सीसीटीव्ही फुटेज आणि जबाबांच्या आधारे तिन्ही आरोपी मुलांना अटक करण्यात आली.‘ ‘२२ फेब्रुवारीच्या रात्री घडलेल्या घटनेने पीडितेला मोठा धक्का बसला. ती पोलीस ठाण्यात इतकी संतापली होती की तिने पोलीस अधिकाऱ्याला विचारले, मी त्या तिन्ही मुलांना थप्पड मारू शकते का? तिचे बोलणे ऐकून पोलिसांनी आश्वासन दिले की आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल.‘ घटनेने व्यथित झालेल्या डॉक्टरने म्हटले- ‘हे खूप दुःखद आहे की २०२६ मध्येही महिलांना दररोज अशा घटनांना सामोरे जावे लागत आहे. विशेषतः ईशान्येकडील महिलांना उघडपणे छळ आणि हल्ल्याचा सामना करावा लागतो. आम्ही सन्मान आणि सुरक्षिततेस पात्र आहोत. आम्हाला कोणत्याही भीतीशिवाय फिरण्याचे स्वातंत्र्य मिळायला हवे.‘ कोण आहेत तिन्ही आरोपीगोरखपूरचे एसपी सिटी अभिनव त्यागी यांच्या मते, २३ फेब्रुवारी रोजी आम्हाला महिला डॉक्टरची तक्रार मिळाली. पीडितेच्या जबाबाच्या आधारे एम्स पोलीस ठाण्यात BNS च्या कलम ७४, २९६ ए, ३५२ आणि ३५१ C अंतर्गत एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला आहे. एसपी अभिनव म्हणतात, ‘तक्रार दाखल झाल्यानंतर आम्ही आरोपींना पकडण्यासाठी 4 पोलीस पथके तयार केली. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपींची ओळख पटवण्यात आली आणि 24 तासांच्या आत तिघांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची ओळख सूरज गुप्ता, आदित्य राजपूत आणि अमृत विश्वकर्मा अशी झाली आहे, ज्यांचे वय 21 ते 24 वर्षांच्या दरम्यान आहे. घटनेत वापरलेली बाईकही जप्त करण्यात आली आहे.’ गोरखपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीत असे समोर आले आहे की सूरज आणि अमृत शेजारी आहेत. सूरज फळांचे दुकान चालवतो, तर अमृत देवरियामध्येच एका जनरल मर्चंडाईज स्टोअरमध्ये काम करतो. तिसरा आरोपी आदित्य बीए द्वितीय वर्षाचा विद्यार्थी आहे. मेघालयचे मुख्यमंत्री म्हणाले - ईशान्येकडील महिलांवरील भेदभाव विसरला जातोया घटनेवर मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड के संगमा यांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, 'ईशान्येकडील महिलांवरील वांशिक भेदभाव आणि लैंगिक छळाला केवळ मथळे बनवून विसरून जाऊ नये. एम्स गोरखपूरमध्ये नागालँडच्या एका निवासी डॉक्टरसोबत झालेला वांशिक आणि लैंगिक छळ अत्यंत लाजिरवाणा आहे.' 'कोणत्याही सुसंस्कृत देशात महिलांच्या सन्मानाशी छेडछाड सहन केली जाऊ नये. त्या तुमच्या बहिणी आणि मुलीच आहेत. मी अधिकाऱ्यांना आवाहन करतो की दोषींवर कठोर कारवाई करावी.' ही छेडछाड नाही, तर वर्णद्वेषी आणि लैंगिक छळाचे प्रकरण: NAFORDया प्रकरणी NAFORD सह अनेक वैद्यकीय संघटनांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. संघटनांनी या घटनेनंतर महिला डॉक्टर आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी कडक सुरक्षा व्यवस्थेची मागणी केली आहे. संघटनांनी या घटनेला गंभीर वर्णद्वेषी आणि लैंगिक छळाचे प्रकरण म्हटले आहे. पोस्टमध्ये म्हटले आहे की, ईशान्येकडील असल्यामुळे डॉक्टरांना रूढीवादी टिप्पण्यांचा सामना करावा लागला, ज्यामुळे त्यांना खूप धक्का आणि अपमान वाटला आहे. घटनेत पोलिसांनी तात्काळ कारवाई केल्याबद्दल आणि आरोपींना लवकर अटक केल्याबद्दल NAFORD चे अध्यक्ष डॉ. देवेश दुबे म्हणतात, ‘पीडित डॉक्टरचा मेसेज मिळताच आमच्या संघटनेने याची माहिती गोरखपूर पोलिसांना दिली. याच्या काही तासांतच 2 आरोपींना अटक करण्यात आली. तिसरा आरोपीही 24 तासांच्या आत पकडला गेला. या प्रकरणी कठोर कारवाई केल्याबद्दल आम्ही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि गोरखपूर पोलिसांचे आभार मानतो.‘ दिल्लीत 'मोमो विकणारी' आणि 'मसाज पार्लरवाली' असे म्हटले गेलेगोरखपूर एम्सच्या डॉक्टरशी संबंधित घटनेच्या एक दिवस आधी दिल्लीतील मालवीय नगरमध्येही ईशान्येकडील 3 महिलांवर वर्णद्वेषी टिप्पणी केल्याचा प्रकार समोर आला होता. यात त्यांना 'मोमो विकणारी' आणि '500 रुपयांत मसाज पार्लरमध्ये धंदा करणारी' असे कमेंट्स केले गेले. या प्रकरणातही एफआयआर (FIR) दाखल झाली आहे. हे प्रकरण मालवीय नगरचे आहे, जिथे अरुणाचल प्रदेशातील 3 महिला चौथ्या मजल्यावर एका फ्लॅटमध्ये राहत होत्या. त्यापैकी एक यूपीएससीची तयारी करत होती. त्यांनी त्यांच्या फ्लॅटमध्ये एअर कंडीशनर बसवण्यासाठी मेकॅनिकला बोलावले होते. ड्रिलिंग करताना धूळ आणि कचरा खालच्या मजल्यावर पडला, ज्यामुळे खाली राहणारे शेजारी हर्ष सिंग आणि त्यांची पत्नी रुबी जैन संतापले. सुरुवातीला हा वाद फ्लॅटवरील कचऱ्यावरून सुरू झाला, पण नंतर वाद वाढत जाऊन तो वर्णद्वेषी आणि आक्षेपार्ह बनला. घटनेनंतर इमारतीच्या ब्रोकरने महिलांना सांगितले की त्यांना 2 महिन्यांत फ्लॅट रिकामा करावा लागेल. यामुळे पीडित महिलांमध्ये त्यांच्या सुरक्षिततेबद्दल भीती वाढली. मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड के. संगमा यांनीही या घटनेचा निषेध केला होता. त्यांनी X वर या घटनेबद्दल लिहिले की, ईशान्येकडील लोकांशी होणारा भेदभाव थांबला पाहिजे.
Bhimashankar Temple : २८८ कोटींच्या विकास आराखड्यांतर्गत कामांना वेग; पारंपारिक स्थापत्यशैलीचा वापर करून पुरातत्त्व विभागाचा पहिलाच आगळावेगळा प्रकल्प.
Pune Konkan New Route : जुन्या ताम्हिणी घाटावरचा ताण कमी करण्यासाठी पर्यायी मार्गाची आखणी सुरू; अवजड वाहनांसाठी प्रशस्त रस्ता करण्यावर प्रशासनाचा भर.
ZP President Election : सुरुवातीला पंचायत समिती सभापती-उपसभापती आणि त्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी होणार निवडणूक; जिल्हाधिकारी लवकरच कार्यक्रम करणार जाहीर.
मुंबई: बँकिंग क्षेत्रात सध्या एका मोठ्या घोटाळ्याची जोरदार चर्चा सुरू आहे. आयडीएफसी फर्स्ट बँकेच्या चंदीगड शाखेत तब्बल ५९० कोटी रुपयांची मोठी फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. या संपूर्ण कटाचा मास्टरमाइंड त्या शाखेचा माजी मॅनेजर रिभव ऋषी हा आहे.या घोटाळ्याचा तपास करताना हरियाणाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) आतापर्यंत चार जणांना बेड्या ठोकल्या आहेत. यामध्ये माजी मॅनेजर रिभव ऋषी, माजी रिलेशनशिप मॅनेजर अभय, रिभवची पत्नी स्वाती सिंगला आणि तिचा भाऊ अभिषेक सिंगला यांचा समावेश आहे. या सर्वांनी मिळून सरकारी तिजोरीवर डल्ला मारण्याचा धाडसी पण तितकाच धक्कादायक कट रचला होता.५९० कोटींचा घोटाळाया घोटाळ्याची वाच्यता तेव्हा झाली जेव्हा हरियाणा सरकारच्या एका विभागाने आपले खाते बंद करून त्यातील पैसे दुसऱ्या बँकेत ट्रान्सफर करण्याची विनंती आयडीएफसी फर्स्ट बँकेला केली. जेव्हा बँक अधिकाऱ्यांनी रेकॉर्ड तपासले, तेव्हा त्यांना कागदोपत्री असलेली रक्कम आणि प्रत्यक्षात खात्यात शिल्लक असलेली रक्कम यामध्ये मोठी तफावत दिसून आली.एका खात्याचा तपास सुरू असतानाच हरियाणा सरकारच्या इतर संलग्न खात्यांमध्येही अशाच प्रकारच्या गडबडी असल्याचे बँकेच्या लक्षात आले. यानंतर बँकेने स्वतःहून या प्रकरणाची माहिती नियामक संस्थांना दिली आणि तपास यंत्रणांना पाचारण केले.कुटुंबाच्या नावे कंपनी काढून वळवले सरकारी पैसेतपासादरम्यान असे समोर आले की, रिभव आणि अभय या दोघांनी सुमारे ६ महिने आधीच बँकेचा राजीनामा दिला होता. त्यांनी हरियाणा सरकारच्या खात्यांमधील पैसे स्वास्तिक देश प्रोजेक्ट्स नावाच्या कंपनीच्या खात्यात वळवले होते. ही कंपनी रिभवची पत्नी स्वाती आणि तिचा भाऊ अभिषेक यांच्या मालकीची आहे.या कंपनीमध्ये स्वातीचे ७५ टक्के आणि अभिषेकचे २५ टक्के शेअर्स आहेत. या कंपनीच्या माध्यमातून सुमारे ३०० कोटी रुपये इतरत्र वळवण्यात आले. विशेष म्हणजे चंदीगडमधील बँक आणि हरियाणातील सरकारी खाती असताना हे पैसे मोहाली येथील एयू स्मॉल फायनान्स बँकेच्या शाखेत वळवण्यात आले होते. वेगवेगळ्या राज्यांच्या सीमांचा फायदा घेत हा व्यवहार लपवण्याचा प्रयत्न या आरोपींनी केला होता.बँकेची तत्परताया संपूर्ण प्रकरणात आयडीएफसी फर्स्ट बँकेने अत्यंत सकारात्मक भूमिका घेतली आहे. तपास अद्याप प्राथमिक टप्प्यात असताना आणि प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाही बँकेने हरियाणा सरकारच्या संबंधित विभागांचे नुकसान होऊ दिले नाही. बँकेने अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, आम्ही आमच्या 'कस्टमर फर्स्ट' या तत्त्वाचे पालन करतो. त्यामुळे तपासाची वाट न पाहता हरियाणा सरकारच्या विभागांनी दावा केलेली १०० टक्के रक्कम म्हणजेच व्याजासह सुमारे ५८३ कोटी रुपये बँकेने परत केले आहेत.हरियाणा सरकारने देखील बँकेच्या या तत्परतेचे आणि व्यावसायिक भूमिकेचे कौतुक केले आहे. सध्या या प्रकरणातील मुख्य आरोपींना कोर्टात हजर केले जाणार असून या कटात आणखी कोणाचे हात गुंतले आहेत का, याचा शोध एसीबी घेत आहे.
दिल्लीतील पॉश एरिया मालवीय नगरमधील खिडकी गावात असलेल्या एका पाच मजली इमारतीत शांतता पसरली आहे. तिच्या चौथ्या मजल्यावर राहणाऱ्या अरुणाचल प्रदेशातील तीन मुली तीन दिवसांपासून बाहेर पडलेल्या नाहीत. एसी बसवताना झालेल्या वादामुळे ज्यांना मोमो, पार्लरवाली, धंदा करणारी असे म्हटले गेले, त्या याच मुली आहेत. याच इमारतीत राहणारे हर्ष आणि त्यांची पत्नी रुबी जैन यांच्यावर आरोप आहे. SC-ST कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाल्यामुळे रुबीला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी कठोर कारवाईचे आश्वासन दिले आहे, परंतु तिन्ही मुली अजूनही घाबरलेल्या आहेत. ओळख उघड झाल्यानंतर त्यांनी त्यांचे सोशल मीडिया अकाउंट्स डिलीट केले आहेत. भीती आणि दबावामुळे एका मुलीला तिच्या कुटुंबियांनी शिक्षण सोडून घरी परत येण्यास सांगितले आहे. संपूर्ण प्रकरण समजून घेण्यासाठी आम्ही आरोपी हर्ष आणि रुबी यांच्याव्यतिरिक्त पीडित मुलींच्या वकिलांशी आणि प्रत्यक्षदर्शी एसी मेकॅनिकशी बोललो. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्याने मुली त्रस्तआम्ही पीडित मुलींशी बोलण्याचा प्रयत्न केला. त्यांनी त्यांच्या वकील लीयी मारली नोशी यांच्याशी बोलण्यास सांगितले. लीयी सांगतात की तिन्ही मुलींचे वय 20 ते 23 वर्षे आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून त्या त्रस्त आहेत. त्यांच्यावर खूप जास्त सार्वजनिक आणि सामाजिक दबाव आहे. सर्वजण त्यांचे चेहरे ओळखतात. कुटुंबेही घाबरलेली आहेत. त्यापैकी एकीला तर कुटुंबाने परत बोलावले आहे. मुलीला आता शिक्षण सोडून परत जावे लागेल. लीयी पुढे सांगतात की मुलींना सोशल मीडियावर सतत मेसेज येत होते. त्यामुळे त्यांनी अकाउंट्स डिलीट केले आहेत. AC बसवणाऱ्याशी गैरवर्तन, इथूनच वादाला सुरुवात झालीपीडित मुलींपैकी एक UPSC परीक्षेची तयारी करत आहे. बाकीच्या दोघीही विद्यार्थिनी आहेत आणि खर्च भागवण्यासाठी फ्रीलान्सिंग करतात. त्या त्यांच्या भाड्याच्या फ्लॅटमध्ये AC बसवत होत्या. घराच्या आत कॉरिडॉरमध्येच AC कंप्रेसर बसवण्याची जागा आहे. इथूनच वादाला सुरुवात झाली. वकील लीयी सांगतात, ‘आरोपींनी AC बसवणाऱ्याशी गैरवर्तन केले. ते म्हणत होते की, ड्रिल केल्याने पडलेल्या धुळीमुळे त्यांच्या AC चे नुकसान झाले आहे. मुलींनी सांगितले की, जर तुमच्या AC चे नुकसान झाले असेल, तर आम्ही ते दुरुस्त करून देऊ.’ ‘राहुल गांधींनी भेटायला बोलावले, पण आम्ही गेलो नाही’लीयी सांगतात की, या संपूर्ण प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्नही झाला आहे. वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांनी आमच्याशी बोलले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि अलका लांबा यांचा फोन आला होता. त्यांनी मला आणि मुलींना भेटायला बोलावले. मी स्पष्टपणे नकार दिला की हा राजकीय मुद्दा नाही. लीयी आरोप करतात की, आरोपींनी तडजोडीसाठी दबाव आणला होता. आधी घरमालकाच्या घरी माफी मागून तडजोड करण्याचा प्रयत्न झाला, पण त्यांच्या समुदायाबद्दल ज्या गोष्टी बोलल्या गेल्या आहेत, त्यानंतर कोणतीही तडजोड होणार नाही. AC मेकॅनिक प्रत्यक्षदर्शी, म्हणाला- माझे पाय तोडण्याची धमकी दिलीपीडित मुलींनी खिडकी गावातून सलीमला (बदललेले नाव) AC बसवण्यासाठी बोलावले होते. दुपारी सुमारे 3:30 वाजता AC चा कंप्रेसर लावण्यासाठी सलीमने ड्रिलिंग केली. यामुळे काही कचरा खालील इतर AC आणि कॉरिडॉरमध्ये जाऊन पडला. आम्ही AC मेकॅनिक सलीमला भेटलो. नाव आणि चेहरा लपवण्याच्या अटीवर ते सांगतात, ‘इमारत जुनी आहे, त्यामुळे थोडा कचरा आणि लहान दगड खाली पडले. खालील फ्लॅटमध्ये राहणारा माणूस यामुळे चिडला आणि मला शिवीगाळ करू लागला. मी दोनदा माफी मागितली. यावर तो म्हणाला की, तुझे पाय तोडून टाकीन.’ सलीम पुढे म्हणतात, ‘मी ज्या मॅडमच्या घरी एसी लावत होतो, त्यांनीही सांगितले की एसी लावताना थोडाफार कचरा पडतो. जर जास्त पडला असेल, तर साफसफाई करून देऊ. त्या व्यक्तीने त्यांनाही शिवीगाळ केली. यानंतर वाद वाढला.’ सलीम सांगतात की, सुरुवातीला वाद खालीच मिटला. 20 मिनिटांनंतर आरोपी पती-पत्नीने पोलिसांना बोलावून वर आले. पोलिसांसमोरच नॉर्थ-ईस्टबद्दल उलटसुलट बोलू लागले. मुलींना म्हणाले की, तुम्ही लोक पार्लर चालवता, धंदा करता, तुमच्याकडे ड्रग्ज चालतो. अटकेपूर्वी रुबी म्हणाली- मी माझ्या शब्दांसाठी माफी मागतेआरोपी हर्ष पत्नी रुबीसोबत इमारतीच्या पहिल्या मजल्यावर भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहतो. इमारतीत प्रत्येक मजल्यावर 4 फ्लॅट आहेत. याच इमारतीच्या चौथ्या मजल्यावर पीडित मुलीही भाड्याने राहतात. दोन्ही फ्लॅटचे मालक एकच आहेत. 25 फेब्रुवारी रोजी रुबीला अटक करण्यात आली. दिल्ली पोलिसांनी सांगितले की रुबीविरुद्ध SC-ST कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. 24 फेब्रुवारीच्या संध्याकाळी सुमारे 6 वाजता आम्ही रुबी आणि हर्षच्या घरी पोहोचलो होतो. सुमारे 7 वाजता त्यांच्या घरी अनिल कुमार नावाचे हेड कॉन्स्टेबल आले. त्यांनी रुबी आणि हर्षला मालवीय नगर पोलीस ठाण्यात जाऊन डीसीपींना भेटायला सांगितले. पोलीस ठाण्यात आधी रुबीची आणि नंतर हर्षची स्वतंत्रपणे चौकशी करण्यात आली. रुबी अटकेबद्दल घाबरली होती. हर्ष तिला न घाबरण्याचा सल्ला देत राहिला. सुमारे रात्री 8 वाजता चौकशीनंतर रुबी आणि हर्ष घरी परतले. 25 फेब्रुवारीच्या सकाळी मालवीय नगर पोलिसांनी रुबीला घरातून अटक केली. अटकेपूर्वी रुबीने आम्हाला सांगितले की, सोशल मीडियावर 4 मिनिटांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा भांडणाच्या दुसऱ्या भागाचा आहे. त्याआधी चार मुली माझ्या मजल्यावर आल्या होत्या. मी जिन्यावर उभी राहून त्यांना उत्तर देत होते, तेच रेकॉर्ड करून व्हायरल करण्यात आले, जेणेकरून आमच्या विरोधात मत तयार होईल. व्हायरल व्हिडिओमध्ये रुबीच्या हातात काठी दिसत आहे. यावर ती म्हणाली की, आम्ही पोलिसांना बोलावले होते, तोपर्यंत मुली आमच्या मजल्यावर आल्या होत्या. मी टीबीची रुग्ण आहे, माझ्या शरीराचा एक भाग व्यवस्थित काम करत नाही. म्हणून मी आत्मसंरक्षणासाठी घरात ठेवलेली डॉग स्टिक हातात घेतली होती. ती कोणाला मारण्यासाठी नव्हती. रुबी पुढे म्हणते की, पोलीस आल्यानंतर आम्हाला वर नेण्यात आले. व्हायरल व्हिडिओ त्याच वेळेचा आहे. तिथे मला आणि पोलिसांना धक्के मारण्यात आले. पोलीस अधिकारी माझ्यावर पडले. त्याच वेळी माझ्या तोंडातूनही अपशब्द बाहेर पडले. रुबी जैनने वर्णद्वेषी टिप्पणीसाठी माफी मागितली आहे. तिने म्हटले की, मी माझ्या शब्दांसाठी मनापासून माफी मागते. हे सर्व मी तेव्हा म्हटले, जेव्हा माझ्यासाठी 'धंदेवाली' आणि 'हिजडा' असे शब्द वापरले गेले. त्या परिस्थितीत माझ्याकडून काय अपेक्षा केली जाते? तरीही मी मानते की माझे शब्द चुकीचे होते. हर्ष म्हणाला- वर्णद्वेषी टिप्पणीसाठी आम्ही लज्जित आहोतआम्ही व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या रुबीचा पती हर्ष याच्याशीही बोललो. ३५ वर्षांचा हर्ष इव्हेंट मॅनेजर आहे. तो गेल्या एका वर्षापासून या फ्लॅटमध्ये राहत आहे. हर्ष म्हणतो, ‘आमच्या एसी आणि कॉरिडॉरमध्ये मोठे दगड पडल्याने मी बाहेर आलो होतो. एसीवर मोठे दगड पडले होते. दोनदा मोठा आवाज आला. वरून एक मुलगा डोकावला. मी रागाने दिल्लीच्या बोलीभाषेत एक-दोन गोष्टी बोललो. तेव्हा ती मुलगी आली आणि तिने वाद सुरू केला. दोन्ही बाजूंनी शिवीगाळ झाली.’ हर्ष आरोप करतात की, मुलींनी त्यांच्या पत्नीला जातीवाचक शब्द वापरले. यानंतर आम्ही पीसीआरला कॉल केला. पोलीस दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकत होते, तेव्हाच मुलीने व्हिडिओ बनवला. व्हायरल व्हिडिओ निवडक आहे, त्यात फक्त त्यांचा भाग दाखवला आहे. माझ्या पत्नीसोबत धक्काबुक्की करण्यात आली. आम्ही त्याच दिवशी लेखी तक्रार तयार करून व्हॉट्सअॅप आणि ईमेलद्वारे एसएचओ, डीसीपी आणि जॉइंट सीपी यांना पाठवली होती. गृह मंत्रालयालाही तक्रार पाठवली होती. ४ मिनिटांच्या व्हिडिओमध्ये काय आहे...व्हिडिओमध्ये पीडित मुलींव्यतिरिक्त, हर्ष, रूबी, एक पोलिस कर्मचारी आणि काही शेजारी दिसत आहेत. सुरुवातीला पीडितेचा आवाज ऐकू येतो... पीडित: तुम क्या बोला, हम दारू पीता है। मेरा रूम चेक करो, अगर एक भी चीज मिला न, उसके बाद देखेंगे। रूबी: ऊंगली पीछे करके बात कर। हर्ष: चल, चल, गंदगी मसाज पार्लर। पीडित: मसाज पार्लर तू, बुड्ढा। रूबी: मेरा बेडरूम खाली है, आजमा ले जा। तेरे को पता चलेगा कितना बुड्ढा है। 35 साल का लड़का तेरे यहां बुड्ढा होता होगा, क्योंकि ड्रग्स इतने करते हो तुम लोग, हमारे यहां 35 साल में एक्चुअल जवान होते हैं। पीडित: मसाज पार्लर तू चलाती है न। रूबी: चलाती हूं, तेरे को कराना है, नौकरी चाहिए। तेरी औकात नहीं है, जहां से वो आया है। कस्टम ऑफिसर का बेटा है, पॉलिटिशियन है उसका बाप। पुलिसवाला: आप इन्हें अंदर कर दो, जो समझदार हो, वो बाहर रहो रूबी: तेरे यहां आदमी मसाज पार्लर में काम करते होंगे, हमारे यहां नहीं। एक दुसरी मुलगी रुबीला समजावते. रुबी म्हणते, वो मेरे को बोली कि तेरा आदमी मसाज पार्लर में मिला होगा। हर्षचे भाजप नेत्यांसोबत फोटो, म्हणाला- पक्षाशी संबंधित नाहीहर्षचे भाजप नेत्यांसोबतचे फोटो व्हायरल झाले आहेत. भांडणाच्या व्हिडिओमध्येही रुबी त्याला राजकारण्याचा मुलगा सांगत आहे. यावर हर्ष म्हणतो, ‘मी सामान्य कुटुंबातून आहे. माझा कोणत्याही पक्षाशी संबंध नाही. मी इव्हेंट मॅनेजर आहे. वेगवेगळ्या नेत्यांसोबतचे माझे फोटो व्यावसायिक कामामुळे आहेत. मी कोणत्याही पक्षाकडून थेट पेमेंट घेतले नाही, ना मी कोणत्याही पक्षाचा सदस्य आहे. मी भाजपसाठी इव्हेंट मॅनेज केले आहेत. व्हायरल झालेले फोटोही याचेशी संबंधित आहेत.' घरमालक म्हणाले- ईशान्येकडील लोकांमुळे कधीच अडचण आली नाहीया वादावर आम्ही इमारतीत राहणाऱ्या लोकांशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना बोलायचे नव्हते. यानंतर आम्ही मालवीय नगरमधील प्रॉपर्टी व्यावसायिक विनोद चौहान यांना भेटलो. ते म्हणतात की माझ्या घरांमध्ये ईशान्येकडील लोक भाड्याने राहतात. आतापर्यंत कोणतीही अडचण आली नाही. अशा प्रकारच्या वंशवादी टिप्पणी होऊ नयेत. आमची मुलेही इतर राज्यांमध्ये शिकायला आणि काम करायला जातात. जर त्यांच्यासोबत तिथे भेदभाव झाला, तर आम्हालाही वाईट वाटेल.
PMC News : महापालिकेची ‘रस्ते दत्तक’योजना सपशेल फेल; लाखो रुपये पाण्यात, जबाबदार कोण?
PMC News : रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली लावलेली लाखो रुपयांची झाडे देखभालीअभावी सुकली; अभियंत्यांनीही फिरवली पाठ.
PMC News : महापालिकेचा ‘लेडीज कार्ड’; ३ वर्षांनंतर अचानक जाग, पण ‘या’दोनच ठेकेदारांवर मेहेरनजर का?
PMC News : तीन वर्षांच्या खंडानंतर राणी लक्ष्मीबाई महिला सक्षमीकरण योजना पुन्हा पटलावर; ४ कोटींच्या खर्चाला मंजुरी मिळण्याची शक्यता.
इराणवर हल्ला करण्यासाठी गेलेली सर्वात महागडी अमेरिकन विमानवाहू युद्धनौका USS जेराल्ड अडचणीत सापडली आहे. ही अडचण शत्रूच्या कोणत्याही क्षेपणास्त्रामुळे किंवा पाणबुडीमुळे नाही, तर शौचालये जाम झाल्यामुळे झाली आहे. युद्धनौकेवर तैनात असलेले 4,500 हून अधिक सैनिक 'टॉयलेट वॉर'चा सामना करत आहेत. फ्रेश होण्यासाठी 45 मिनिटांपर्यंत रांगेत उभे राहावे लागत आहे आणि दुरुस्तीवरून सैनिकांमध्ये वाद झाल्याच्याही बातम्या आहेत. अखेर याची शौचालये कशी जाम झाली, आता ते इराणवर हल्ला करू शकणार नाही का आणि USS जेराल्डसारख्या विमानवाहू युद्धनौकेला जग का घाबरते; जाणून घेऊया आजच्या एक्सप्लेनरमध्ये... प्रश्न-1: अमेरिकेच्या सर्वात महागड्या विमानवाहू जहाजाचे शौचालय कसे चोक झाले?उत्तर: यूएसएस जेराल्ड आर. फोर्ड हे अमेरिकेचे सर्वात मोठे आणि सर्वात महागडे विमानवाहू जहाज आहे. त्याचे वजन सुमारे एक लाख टन आणि किंमत सुमारे 1.08 लाख कोटी रुपये आहे. 2009 मध्ये त्याचे बांधकाम सुरू झाले आणि 22 जुलै 2017 रोजी ट्रम्प यांच्या हस्ते ते अमेरिकन नौदलात सामील करण्यात आले. ते अणुऊर्जेवर चालते. यूएसएस जेराल्ड आर. फोर्ड जून 2025 पासून समुद्रात आहे. त्यापूर्वी ते कॅरिबियन समुद्रात होते. जानेवारी 2026 मध्ये अमेरिकेने व्हेनेझुएलावर हल्ला करून त्याचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांना अपहरण केले, तेव्हा या ऑपरेशनमध्ये त्याचा वापर करण्यात आला होता. त्यासोबत 3 गाईडेड मिसाईल डिस्ट्रॉयर आहेत. 19 फेब्रुवारी रोजी हे स्ट्राइक ग्रुप स्पेन आणि मोरोक्कोदरम्यान जिब्राल्टरच्या सामुद्रधुनीमध्ये होते. 22 फेब्रुवारीच्या सकाळपर्यंत ते इस्रायलजवळ पोहोचले होते. इराण-अमेरिका तणावाच्या पार्श्वभूमीवर हे विमानवाहू जहाज मध्यपूर्वेत तैनात करण्यात आले आहे. म्हणजेच, आतापर्यंत हे विमानवाहू जहाज सुमारे 8 महिन्यांपासून समुद्रात आहे आणि पुढे सुमारे 6 महिने ते समुद्रातच राहू शकते. सतत समुद्रात असल्यामुळे त्याची देखभाल होऊ शकत नाही. जेराल्ड फोर्डवर 650 शौचालये 10 वेगवेगळ्या झोनमध्ये विभागलेली आहेत. या शौचालयांमधून कचरा काढण्यासाठी VCHT म्हणजेच व्हॅक्यूम कलेक्शन, होल्डिंग अँड ट्रान्सफर सिस्टीम बसवण्यात आली आहे. VCHT व्हॅक्यूम सिस्टीम निकामी झाल्यामुळे त्याची शौचालये चोक झाली आहेत. तंत्रज्ञ आणि अभियंते या समस्येवर उपाय शोधण्यासाठी 19 तास काम करत आहेत. खरं तर, VCHT सिस्टीम घरांमध्ये वापरल्या जाणाऱ्या व्हॅक्यूम क्लीनरसारखी असते. त्यात शौचालयाचे फ्लश दाबताच पाईपमध्ये व्हॅक्यूम म्हणजेच सक्शन तयार होते. ते घाण खेचून पाईपद्वारे एका मोठ्या स्टोरेज टँकपर्यंत पोहोचवते. स्टोरेजमध्ये पोहोचलेल्या या कचऱ्यावर रसायनांद्वारे प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावली जाते. अमेरिकेच्या मीडिया आउटलेट नॅशनल पब्लिक रेडिओ (NPR) च्या अहवालानुसार, 24 जुलै 2025 रोजी जेराल्ड फोर्ड प्रशांत महासागरातील नॉरफोक बेटावरून युरोप आणि भूमध्य समुद्रासाठी रवाना झाले होते. त्याच्या सुमारे एक महिन्यानंतर जहाजावरील एका खलाशाच्या आईने NPR शी संपर्क साधून जहाजावरील घाण आणि खराब स्वच्छतेबद्दल तक्रार केली होती. यादरम्यान जहाजाशी संबंधित अनेक ईमेल समोर आले, ज्यातून असे दिसून आले की जहाजाचे अधिकारी इंजिनिअरिंग विभागाकडे वारंवार मशीनमध्ये येत असलेल्या बिघाडांबद्दल तक्रार करत होते. अहवालानुसार, अनेक महिन्यांपासून समुद्रात अडकलेल्या सैनिकांना शौचालयासाठी रांगेत उभे राहून 45 मिनिटे वाट पाहावी लागत आहे. यामुळे त्यांच्यात आपापसात भांडणेही होत आहेत. जेराल्ड फोर्डमध्ये शौचालयाशी संबंधित समस्या उद्भवण्याची ही पहिलीच वेळ नाही. 18 मार्च 2025 रोजी जहाजाच्या अभियांत्रिकी विभागाकडून सर्व प्रमुखांना पाठवलेल्या ईमेलमध्ये असे सांगण्यात आले होते की 4 दिवसांत 205 शौचालये खराब झाली आहेत. अभियांत्रिकी संघ या समस्येबद्दल आपल्या अधिकाऱ्यांना स्पष्ट उत्तर देऊ शकला नाही. एका ईमेलमध्ये असे म्हटले होते की या प्रणालीमध्ये हजारो भाग आहेत आणि दररोज कोणता ना कोणता भाग खराब होत आहे. प्रश्न-2: तर काय USS जेराल्ड फोर्डमध्ये सुरुवातीपासूनच काही तांत्रिक बिघाड आहे?उत्तर: जेराल्ड फोर्ड कार्यान्वित होण्यापूर्वी अमेरिकेकडे निमित्झ क्लासची 10 विमानवाहू जहाजे होती, जसे की- USS ड्वाइट डी. आयझेनहॉवर, USS कार्ल विन्सन, USS थिओडोर रूझवेल्ट, USS अब्राहम लिंकन इत्यादी.नवीन जेराल्ड फोर्डच्या डिझाइन आणि ऑपरेशनमध्ये विशेषतः दोन नवीन गोष्टी समाविष्ट करण्यात आल्या होत्या... 1. फायटर जेट्स लॉन्च करण्याची प्रणाली बदलली 2. सीवेज सिस्टिम बदलली जेव्हा ही प्रणाली अनेक महिने प्रवासात असलेल्या जेराल्ड विमानवाहू नौकेत वापरली गेली, तेव्हा त्यात अनेक त्रुटी समोर आल्या आहेत... प्रश्न-3: एअरक्राफ्ट कॅरियरला देखभालीसाठी किनाऱ्यापर्यंत जावे लागेल का?उत्तर: सर्वात मोठी समस्या कॅरियरच्या सांडपाण्याच्या पाईप्समध्ये कॅल्सिफिकेशन म्हणजे कॅल्शियमचा थर जमा होण्याची आहे. NPR च्या अहवालानुसार, देखभाल करणाऱ्या अभियंत्यांना पाईप्समध्ये टी-शर्टपासून ते 4 फूट लांब दोरीपर्यंतच्या वस्तू मिळाल्या आहेत. यामुळे एअरक्राफ्ट कॅरियरच्या पातळ पाईप्स जाम होत आहेत. 2020 च्या अमेरिकन गव्हर्नमेंट अकाउंटेबिलिटी ऑफिस (GAO) च्या अहवालानुसार, पाईपमध्ये साचलेले कॅल्शियम काढण्यासाठी नौदलाला प्रत्येक वेळी सुमारे 4 कोटी रुपये खर्च करून 'ऍसिड फ्लश' म्हणजेच तेजाबाने साफसफाई करावी लागते. 2023 पासून आतापर्यंत जहाजावर किमान 10 वेळा ही प्रक्रिया करण्यात आली आहे. हे काम फक्त बंदरावरच होऊ शकते. युरो न्यूजच्या अहवालानुसार, विमानवाहू जहाजाला 24 फेब्रुवारी 2026 रोजी ग्रीसमधील क्रेट येथील सूडा बे नेव्हल बेसवर नेण्यात आले आहे. डिस्ट्रॉयर USS महान सोबत हे विमानवाहू जहाज इंधन भरण्यासाठी चार दिवस बेसवरच राहील. येथे त्याच्या VCHT प्रणालीची दुरुस्ती आणि पाणीपुरवठा पुन्हा व्यवस्थित करण्याचे काम केले जाईल. या दरम्यान तैनात दलांना आराम करण्याची वेळ देखील मिळेल. प्रश्न-4: एअरक्राफ्ट कॅरियरला युद्धाचे सर्वात मोठे शस्त्र का म्हटले जाते?उत्तर: एअरक्राफ्ट कॅरियरला समुद्रात तरंगणारा एक 'संपूर्ण लष्करी तळ' म्हटले जाते. प्रत्येक एअरक्राफ्ट कॅरियरसोबत अनेक युद्धनौका आणि पाणबुड्या सोबत असतात. यावर प्रत्येक वेळी सुमारे 90 लढाऊ विमाने, इंधन पुरवठा जहाजे, कॉम्बॅट हेलिकॉप्टर आणि हजारो सैनिक तैनात असतात. या संपूर्ण ताफ्याला 'कॅरियर स्ट्राइक ग्रुप' म्हटले जाते, जो सुमारे 3 महिने न थांबता समुद्रात कुठेही जाऊन शत्रूंवर वेगाने हल्ला करू शकतो. तो एकाच वेळी अनेक आघाड्यांवर हल्ला करण्यास, रडारने पाळत ठेवण्यास आणि सागरी सीमेचे संरक्षण करण्यास सक्षम आहे. यूएसएस जेराल्ड फोर्डच्या स्ट्राइक ग्रुपमध्ये 3 गाईडेड मिसाईल डिस्ट्रॉयर आहेत - यूएसएस विन्स्टन एस. चर्चिल, यूएसएस बेनब्रिज आणि यूएसएस महान. हे तिन्ही 2500 किमी रेंजच्या टॉमहॉक क्रूझ मिसाईल आणि अँटी-सबमरीन मिसाईलने सुसज्ज आहेत, जे हवा, जमीन आणि समुद्रातील धोके नष्ट करू शकतात.यूएसएस जेराल्ड फोर्डवर 'कॅरियर एअर विंग-8' नावाचा एअर ग्रुप आहे. त्यात 60 ते 75 विमाने आहेत. यापैकी सुमारे 48 सुपर हॉर्नेट फायटर जेट्स आहेत. EA-18G ग्राउलर विमान शत्रूचे रडार आणि दळणवळण व्यवस्था जाम करू शकते आणि सीहॉक हेलिकॉप्टर समुद्रात पाणबुड्या शोधून हल्ला करू शकते. एअरक्राफ्ट कॅरियरला 3 कारणांमुळे युद्धादरम्यान सर्वात शक्तिशाली मानले जाते: 1. शत्रूच्या कुठेही जवळ पोहोचू शकतो: विमानवाहू नौका समुद्रात जिथे पाहिजे तिथे जाऊन हल्ला करू शकते. यावर तैनात असलेल्या फायटर जेट्सना हवेत कमी अंतर कापावे लागते आणि मिड-एअर रिफ्यूलिंगची गरज कमी होते.2. सतत हल्ला करू शकते: विमानवाहू नौकेवर तैनात विमाने सतत बॉम्ब किंवा क्षेपणास्त्रे डागू शकतात. विमानवाहू नौकेवरून दर 8 मिनिटांनी एक जेट उड्डाण करू शकते. अशा प्रकारे, विमानवाहू नौका एका दिवसात शेकडो हल्ले करू शकते.3. याला बुडवणे कठीण आहे: जेराल्ड फोर्डचे वजन सुमारे 1 लाख टन आहे. मजबूत डिझाइन असलेल्या या विमानवाहू नौकेचे अनेक भाग असे आहेत जे पाणी भरले तरी बुडत नाहीत. अणुबॉम्बशिवाय याला बुडवणे जवळजवळ अशक्य आहे. प्रश्न 5: एअरक्राफ्ट कॅरियर स्ट्राइक ग्रुप युद्ध कसे लढते?उत्तर: प्रश्न-6: USS जेराल्ड फोर्डला किनाऱ्यावर जावे लागले, तर अमेरिकन हल्ला टळेल का?उत्तर: इराण आणि अमेरिका यांच्यात युद्धासारखी परिस्थिती आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 20 फेब्रुवारी रोजी इराणला धमकी देत म्हटले की, पुढील 10 दिवसांत कळेल की अमेरिका एकतर इराणसोबत अणुकरार करेल किंवा लष्करी कारवाई करेल. अमेरिकन फ्लीट फोर्स कमांडचे प्रवक्ते लेफ्टनंट कमांडर डेव्हिड कार्टर यांच्या म्हणण्यानुसार, एका दुरुस्तीला सरासरी 30 मिनिटांपासून दोन तास लागतात. या दरम्यान बाकीची प्रणाली स्वतःहून काम करत राहते. डेव्हिड कार्टर यांचे म्हणणे आहे की, या समस्यांचा जहाजाच्या तयारीवर किंवा मिशनवर कोणताही परिणाम झालेला नाही. या अडचणी सामान्यतः वेगवेगळ्या ठिकाणांपुरत्या मर्यादित असतात आणि संपूर्ण सांडपाणी प्रणालीला प्रभावित करत नाहीत. यूएसएस जेराल्ड फोर्ड व्यतिरिक्त अमेरिकेने इराणला 4 बाजूंनी वेढले आहे. त्यामुळे जेराल्ड फोर्डच्या देखभालीसाठी जाण्याने अमेरिकेच्या मिशनवर विशेष फरक पडणार नाही... पॉइंट-1: अमेरिकन नेव्हीचे एअरक्राफ्ट कॅरियर USS अब्राहम लिंकन अरबी समुद्रात इराणच्या दिशेने पुढे सरकत आहे.पॉइंट-2: सर्वात संवेदनशील सागरी व्यापार मार्ग होर्मुझ स्ट्रेटजवळ अमेरिकेचे 2 डिस्ट्रॉयर- USS मिट्शर, USS मायकल मर्फी आणि 1 कॉम्बॅट शिप USS सांता बार्बरा तैनात आहेत.पॉइंट-3: इराणजवळ पर्शियन गल्फमध्ये अमेरिकेचे 2 कॉम्बॅट शिप USS तुलसा आणि USS कॅनबेरा तळ ठोकून आहेत. अमेरिकन नेव्हीचे हे डिप्लॉयमेंट इराणची राजधानी तेहरानपासून फक्त 931 किमी दूर आहे.पॉइंट-4: रेड सीमध्ये अमेरिकन नेव्हीचे डिस्ट्रॉयर USS डेलबर्ट डी. ब्लॅक तैनात आहे. याशिवाय काही अणु पाणबुड्या देखील या परिसरात आहेत, ज्यांचे स्थान अत्यंत गुप्त आहे. तिसरे विमानवाहू नौका यूएसएस जॉर्ज एच. डब्ल्यू. बुशला देखील मध्य पूर्वेत पाठवण्याची तयारी सुरू आहे. त्यासोबत किमान 2 गाईडेड मिसाईल डिस्ट्रॉयर देखील तैनात असतील. ……………. संशोधन सहकार्य – सोमेश शर्मा
Bopodi Land Scam : बोपोडी कृषी महाविद्यालय जमीन प्रकरणात कुळांची नावे लावल्याचा ठपका; १८ मार्च रोजी होणार पुढील सुनावणी.
PMC News : उत्पन्न मर्यादा आणि मिळकतकराच्या जाचक अटीमुळे अनेक गरजू रुग्ण योजनेपासून वंचित; स्थायी समितीच्या बैठकीकडे शहराचे लक्ष.
Ramtekdi MIDC Accident : कामाच्या ठिकाणी पाणी आणण्यासाठी गेलेल्या वैशाली भोसले यांच्यावर काळाचा घाला; क्रेनने उचललेली सळई थेट डोक्यात पडल्याने जागीच मृत्यू.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन दिवसांच्या इस्त्रायलच्या दौऱ्यामुळे भारत आणि इस्त्रायल या दोन महत्त्वाच्या देशांमधील मैत्रीला एक वेगळे परिमाण मिळणार आहे हे निश्चित. आपल्या अकरा वर्षांच्या पंतप्रधानपदाच्या कालावधीमध्ये दुसऱ्यांदा इस्त्रायल दौऱ्यावर गेलेले नरेंद्र मोदी यांचे इरादे स्पष्ट दिसत आहेत.
Talegaon Dabhade News : २६ डिसेंबर २०२५ रोजी सादर केलेल्या प्रस्तावाला यश; २५०० अर्जांपैकी पहिल्या टप्प्यात ५२८ लाभार्थ्यांची निवड.
PCMC Job Scam : महापालिकेत नोकरीच्या नावाने ‘मोठा खेळ’; तुमच्याकडेही आलंय का ‘ते’नियुक्तीपत्र?
PCMC Job Scam : नियुक्तीची तारीख, पगार आणि महागाई भत्त्याचे आमिष दाखवून तरुणांची फसवणूक; पोलीस तपासात मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता.
PCMC News : सभेत नगरसेवकाने 'टेडी श्वान' भेट देऊन प्रशासनाचा निषेध केला आणि त्यानंतरच ही घटना समोर आल्याने चर्चांना उधाण.
Manchar News : राजश्री गांजाळे आणि लक्ष्मण थोरात यांच्या उपस्थितीत २१५ कोटींच्या अर्थसंकल्पावर शिक्कामोर्तब; शहराच्या सर्वांगीण विकासाचा निर्धार.
Dhairyasheel Mohite Patil : आंतरराष्ट्रीय पातळीवरील संधीमुळे मोहिते-पाटलांच्या संसदीय कारकीर्दीला नवी दिशा; समर्थकांकडून अभिनंदनाचा वर्षाव.
Baramati News : वारंवार बंद पडणाऱ्या गाड्यांमुळे संताप; आगार व्यवस्थापनाविरुद्ध थेट परिवहन मंत्र्यांकडे तक्रार करण्याचा गावकऱ्यांचा पवित्रा.
Indapur News : उजनी धरणग्रस्त बचाव कृती समितीसोबत लवकरच पुण्यात होणार संयुक्त बैठक; विखे पाटलांच्या आश्वासनानंतर सर्वांचे लक्ष बैठकीकडे.
Dimbhe Dam : पिके वाढीच्या टप्प्यात असतानाच पाणी मिळाल्याने उत्पादन वाढणार; भीमाशंकर कारखाना संचालकांकडून निर्णयाचे स्वागत.
Shindawane Ghat Accident : शिंदवणे घाटातील अरुंद रस्ता आणि तीव्र वळणे बनली 'डेथ ट्रॅप'; अपघात रोखण्यासाठी नागरिकांची वेगनियंत्रक बसवण्याची मागणी.
Bhigwan Kidnapping Case : १७ तारखेच्या थरारानंतर जिल्हाभर बंदची हाक; आता तरुणीच्या बदललेल्या भूमिकेमुळे प्रकरणाची कायदेशीर दिशा बदलण्याची शक्यता.
PCMC News : राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुकीत भाग न घेतल्याने भाजपचा मार्ग सुकर; शनिवारी होणार अधिकृत घोषणा.
Matheran News : सलग चार दिवस ई-रिक्षा बंद राहिल्याने स्थानिकांसह पर्यटकांची मोठी ओढाताण; सोशल मीडियावर उमटले पडसाद.
Karjat Murbad Road : सामाजिक कार्यकर्ते उदय पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर एमएसआरडीसीने खड्डे बुजवण्यासाठी कशेळे येथून कामाला केली सुरुवात.
PCMC News : पिंपरी-चिंचवडकरांना मोठा दिलासा! सलग १२ व्या वर्षी कोणतीही करवाढ नाही; जाणून घ्या कारण
PCMC News : महापालिकेची आर्थिक स्थिती डबघाईला असूनही सत्ताधारी भाजपला करवाढ करता येणे अशक्य; अंदाजपत्रकाकडे शहरवासीयांचे लक्ष.
Khalapur News : पंचायत समितीसमोर साखळी उपोषण! गटविकास अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी..नेमकं प्रकरण काय?
Khalapur News : २०२३ पासून निवेदने देऊनही अंमलबजावणी शून्य; लेखी आश्वासनासाठी कार्यकर्त्यांचा खालापूर पंचायत समितीच्या दारात ठिय्या.
Satara News : सत्तेचा दुरुपयोग भोवला! सरपंचासह ९ सदस्य एकाच फटक्यात अपात्र; विभागीय आयुक्तांचा दणका
Satara News : मालमत्ता नोंद रद्द करताना 'नैसर्गिक न्याय' पायदळी तुडवला; विभागीय आयुक्तांनी लोकप्रतिनिधींना दाखवला कायद्याचा बडगा.
Mobile Addiction : सोशल मीडियावरील 'वन-वे कम्युनिकेशन'मुळे स्वभावात हट्टीपणा आणि चिडचिड वाढली; तज्ञांनी व्यक्त केली चिंता.
Satara News : केंद्रीय आयुष मंत्रालयाकडून ५० खाटांच्या जिल्हा एकात्मिक आयुष रुग्णालयास मंजुरी; पंचकर्म, क्षारसुत्र आणि योग सत्रांसह मिळणार अनेक अत्याधुनिक सुविधा.
दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, २६ फेब्रुवारी २०२६
पंचांगआज मिती फाल्गुन शुक्ल दशमी शके १९४७.चंद्र नक्षत्र मृगशीर्ष. योग प्रीती चंद्र राशी मिथुन. भारतीय सौर ७ फाल्गुन शके १९४७,गुरुवार दिनांक २६ फेब्रुवारी २०२६. मुंबईचा सूर्योदय ०७.०० मुंबईचा सूर्यास्त ०६.४२ मुंबईचा चंद्रोदय ०१.३९ मुंबईचा चंद्रास्त ०३.३७ उद्याची राहू काळ ०२.१९ ते ०३.४७ ,उत्तम दिवसदैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)
Shivendrasinhraje Bhosale : “समाजासाठी झटून काम करा..”शिवेंद्रसिंहराजेंचा शिवबा ग्रुपला मोलाचा सल्ला
Shivendrasinhraje Bhosale : शिवबा ग्रुपच्या १५ व्या वर्धापनदिनानिमित्त 'सेवा, सुरक्षा, संस्कार' या नवीन लोगोचे मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते अनावरण.
श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात न्यूझीलंडचा विजय
कोलंबो : आर. प्रेमदासा स्टेडियम येथे आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमधील सुपर ८ फेरीतल्या श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात न्यूझीलंडचा ६१ धावांनी विजय झाला. या सामन्यात नाणेफेक जिंकून श्रीलंकेने गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडने २० षटकांत सात बाद १६८ धावा केल्या. धावांचा पाठलाग करणाऱ्या श्रीलंकेला २० षटकांत आठ बाद १०७ धावा करणेच जमले. न्यूझीलंडचा रचिन रवींद्र सामनावीर झाला, त्याने श्रीलंकेच्या चार फलंदाजांना बाद केले तसेच न्यूझीलंडसाठी ३२ धावांचे योगदान दिले.श्रीलंकेची हाराकिरीन्यूझीलंडने दिलेल्या आव्हानाला सामोऱ्या जात असलेल्या श्रीलंकेच्या फलंदाजांनी हाराकिरी केली. त्यांचा एक फलंदाज शून्यावर बाद झाला तर पाच फलंदाजांनी १० पेक्षा कमी धावा केल्या. पथुम निस्सांकाने शून्य, कुसल मेंडिसने ११, चरिथ असलंकाने ५, पवन रथनायकेने १०, कामिंडू मेंडिसने ३१, दासुन शनाकाने ३, दुषण हेमंथने ३, डुनिथ वेलागेने २९, दुष्मंथ चामीराने नाबाद ७, महेश थीकशनने नाबाद १ धावांचे योगदान दिले. न्यूझीलंडकडून रचिन रवींद्रने ४, मॅट हेन्रीने २, मिचेल सँटनरने १ आणि ग्लेन फिलिप्सने १ विकेट घेतली. मॅट हेन्रीने दोन पैकी एक निर्धाव षटक टाकले आणि फक्त ३ धावा देत सलामीवीर पथुम निस्सांकाला शून्य धावांवर त्रिफळाचीत केले तसेच चरिथ असलंकाला पाच धावांवर डॅरिल मिशेलकरवी झेलबाद केले.https://prahaar.in/2026/02/25/sri-lankas-disappointing-start-as-they-chase-down-new-zealands-challenge/न्यूझीलंडची फलंदाजीप्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडकडून कर्णधार मिचेल सँटनरने सर्वाधिक ४७ धावा केल्या. त्याने २६ चेंडूत ४ षटकार आणि २ चौकार मारले. किवींकडून टिम सेफर्टने ८, फिन ऍलनने २३, रचिन रवींद्रने ३२, ग्लेन फिलिप्सने १८, डॅरिल मिशेलने ३, मार्क चॅपमनने शून्य, मिचेल सँटनरने ४७, कोल मॅककोन्चीने नाबाद ३१ धावा केल्या. श्रीलंकेकडून महेश थीकशनने ४ षटकांत ३० धावा देत ३ बळी घेतले तर दुष्मंथा चामीराने ४ षटकांत ३८ धावा देत ३ बळी घेतले. डुनिथ वेलागेने ४ षटकांत २७ धावा देत एक बळी घेतला.
Zilla Parishad Politics : भाजप-राष्ट्रवादी एकत्र; शिंदेसेनेला डच्चू? सत्तेचा नवा फॉर्म्युला
Zilla Parishad Politics : रायगड जिल्हा परिषदेत भाजपने शिंदेसेनेला बाजूला सारत अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी हातमिळवणी केल्याची चर्चा आहे.
Assam
Hanumant Pawar : काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांना पोलीस संरक्षण
Hanumant Pawar : पुणे पोलिसांनी काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांना पोलीस संरक्षण (गनमॅन) दिले आहे
US Income Tax: अमेरिकेने लावलेले आयात शुल्क परदेशी कंपन्या भरतील. यामुळे आधुनिक जगातील प्राप्ती कर संकल्पना अमेरिकेसाठी संपुष्टात येईल.
ई-गव्हर्नन्स मूल्यमापनात वसई–विरार पालिकेचा ‘नववा क्रमांक’ कायम
पालघर : राज्यातील महानगरपालिकांच्या ई-गव्हर्नन्स कामकाजाच्या मूल्यमापनात वसई–विरार महानगरपालिकाने यंदाही नववा क्रमांक पटकावत सलग दुसऱ्या वर्षी आपले स्थान कायम राखले आहे. सामान्य नागरिकांना ऑनलाइन सेवा सुलभपणे उपलब्ध करून देणे, प्रशासनात पारदर्शकता वाढवणे आणि डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करणे या निकषांवर पालिकेचे मूल्यमापन करण्यात आले.पुणे येथील पॉलिसी रिसर्च ऑर्गनायझेशन (पीआरओ) या संस्थेने राज्यातील २९ महानगरपालिकांचा ई-गव्हर्नन्स निर्देशांक तपासला. सेवा उपलब्धता, प्रशासनातील पारदर्शकता, संकेतस्थळाची उपलब्धता, मोबाईल अॅप, तसेच समाजमाध्यमांचा वापर अशा विविध बाबींचा या सर्वेक्षणात समावेश होता. या सर्व निकषांवर वसई–विरार महानगरपालिकेने ६.४४ गुण मिळवत नववे स्थान मिळवले आहे.पालिकेने ई-गव्हर्नन्सचा प्रभावी वापर करत स्वतःचे स्वतंत्र संकेतस्थळ, मोबाईल अॅप आणि समाजमाध्यमांवरील अधिकृत खाती कार्यान्वित केली आहेत. यामुळे नागरिकांना काही मिनिटांत माहिती मिळणे, तक्रारी नोंदवणे, करभरणा करणे तसेच विविध नागरी सेवांचा लाभ घेणे सुलभ झाले आहे. कोरोना काळानंतर ऑनलाइन सेवा वितरणाचे महत्त्व वाढले असून, शासनाने ई-गव्हर्नन्सला आधुनिक प्रशासकीय व्यवस्थेचा महत्त्वाचा घटक मानले आहे.विशेष म्हणजे, संकेतस्थळाचा वापर, समाजमाध्यमांवरील सक्रियता आणि पारदर्शकता या विभागांत वसई–विरार महानगरपालिकेला सर्वाधिक गुण मिळाले आहेत. सलग दोन वर्षे नवव्या क्रमांकावर कायम राहिल्याने पालिकेच्या डिजिटल प्रशासनाची दखल घेतली जात असून, आगामी काळात या क्रमांकात आणखी सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; तिघे जखमी, दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान
रायगड : माणगाव पोलीस ठाणे हद्दीत मुंबई-गोवा महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात तिघे जखमी झाले असून दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना ढालघर फाटा येथे घडली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे रा. कामेरी, ता. वाळवा, जि. सांगली येथील असून ते त्यांच्या ताब्यातील आयशर ३०१८ टेम्पो (क्र. एमएच १० डीटी ८३२७ ) हा सांगली ते अलिबाग असा मुंबई-गोवा महामार्गावरून माणगावच्या दिशेने चालवीत होते. अपघातस्थळी पोहोचताच समोरून येणारी मारुती सुझुकी वॅगनर (क्र. एमएच ०४ एचएफ ५६१३ ) ही कार अचानक रस्त्याच्या विरुद्ध दिशेला आली.सदर कार चालक (रा. ठाणे) याने वाहन अविचाराने, हयगयीने व बेदरकारपणे चालवून रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष केल्याने कार थेट टेम्पोवर आदळली. या धडकेत कारमधील चालकासह अन्य दोन प्रवाशांना किरकोळ व गंभीर स्वरूपाच्या दुखापती झाल्या. जखमींना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच माणगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तत्काळ पंचनामा करून वाहतूक सुरळीत केली.या प्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात गु.र.नं. ५३ /२०२६ अन्वये मोटार वाहन अधिनियम १९८८ चे कलम १८४ तसेच भा.न्या.स. कलम २८१ , १२५ (अ), १२५ (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सफौ/निमकर करीत आहेत.या अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वेगमर्यादा व सुरक्षित वाहनचालना याबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम पाळून दक्षतेने वाहन चालवावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
न्यूझीलंडने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेची निराशाजनक सुरुवात
कोलंबो : आर. प्रेमदासा स्टेडियम येथे आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमधील सुपर ८ फेरीतला श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड हा सामना सुरू आहे. या सामन्यात न्यूझीलंडने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेची निराशाजनक सुरुवात झाली.नाणेफेक जिंकून श्रीलंकेने गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडने २० षटकांत सात बाद १६८ धावा केल्या. धावांचा पाठलाग करणाऱ्या श्रीलंकेला पहिल्या पाच षटकांत दोन धक्के बसले. सलामीवीर पथुम निस्सांका पहिल्याच चेंडूवर बाद झाला. मॅट हेन्रीने त्याला शून्यावर त्रिफळाचीत केले. नंतर तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर मॅट हेन्रीनेच चरिथ असलंकाला डॅरिल मिशेलकरवी झेलबाद केले. चरिथ असलंका नऊ चेंडूत फक्त पाच धावा करून परतला.याआधी प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडकडून कर्णधार मिचेल सँटनरने सर्वाधिक ४७ धावा केल्या. त्याने २६ चेंडूत ४ षटकार आणि २ चौकार मारले. किवींकडून टिम सेफर्टने ८, फिन ऍलनने २३, रचिन रवींद्रने ३२, ग्लेन फिलिप्सने १८, डॅरिल मिशेलने ३, मार्क चॅपमनने शून्य, मिचेल सँटनरने ४७, कोल मॅककोन्चीने नाबाद ३१ धावा केल्या. श्रीलंकेकडून महेश थीकशनने ४ षटकांत ३० धावा देत ३ बळी घेतले तर दुष्मंथा चामीराने ४ षटकांत ३८ धावा देत ३ बळी घेतले. डुनिथ वेलागेने ४ षटकांत २७ धावा देत एक बळी घेतला.
Solar energy sector shares: ट्रम्प प्रशासनाने भारतीय सौर ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांच्या उत्पादनावर भरमसाठ शुल्क लावले असले तरी त्याचा भारतातील कंपन्यांच्या कामकाजावर किंवा महसुलावर कसलाही परिणाम होणार नसल्याचे या कंपन्यांनी स्पष्ट केले आहे.
Woman Missing : राज्यातून दररोज सरासरी 132 महिला बेपत्ता; महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
राज्यातील महिला आणि बालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून बेपत्ता (Woman Missing) होणाऱ्या महिलांच्या आकड्यांनी धडकी भरवली आहे. एका वर्षात तब्बल 48 हजार 278 महिला बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली.
GCC: अमेरिकन कंपन्यांनी भारतात केली ‘इतकी’मोठी गुंतवणूक; आकडा ऐकून थक्क व्हाल!
GCC: अमेरिकेतील कंपन्या जीसीसीसाठी भारतात प्रयत्न करीत असताना युरोप आणि ब्रिटनमधून मॅन्युफॅक्चरिंग, बीएफएसआय, अभियांत्रिकी इत्यादी क्षेत्रातील कंपन्या कार्यालयासाठी या शहरातील जागा भाड्याने घेण्याचे प्रमाण वेगाने वाढत आहे.
ST employees: एसटी कर्मचाऱ्यांच्या खात्यात थकीत वेतनवाढीचा हप्ता जमा; शासनाने केली 100 कोटींची तरतूद
ST employees: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती; राज्य शासनाकडून १०० कोटींचा निधी तातडीने उपलब्ध
Rohit Pawar : अखेर ! व्हीएसआर व्हेंचर्सविरुद्ध तक्रार दाखल; रोहित पवारांच्या मागणीची घेतली दखल
बारामती येथे झालेल्या विमान अपघातात तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूबाबत व्हीएसआर व्हेंचर्स आणि त्यांच्या संचालकांविरुद्ध आमदार रोहित पवार यांनी केलेल्या तक्रारीवरून मुंबई पोलिसांनी तक्रार दाखल केली.
मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग, आचरा, निवती, वेंगुर्ला, मालवण आणि देवगड पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील समुद्र किनारी राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या कामास तातडीने गती देण्याचे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी बुधवारी दिले. मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीत आयटी विभागाचे विरेंद्र सिंग तसेच सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व्हिडिओ कॉन्फरेन्सिंगद्वारे उपस्थित होते.या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्रकिनारी भागांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स युक्त सीसीटीव्ही सर्व्हेलन्स प्रणाली उभारण्याच्या प्रस्तावाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. राष्ट्रीय सुरक्षेच्या अनुषंगाने महाराष्ट्र सागरी मंडळाच्या माध्यमातून हा प्रकल्प राबविण्यात येणार असून, त्यासाठी आवश्यक असलेल्या प्रशासकीय व तांत्रिक मंजुरीच्या प्रक्रियांना विलंब न लावता पूर्ण करण्याचे स्पष्ट आदेश मंत्री राणे यांनी दिले.मंत्री राणे यांनी सांगितले की, सिंधुदुर्ग जिल्ह्याची भौगोलिक स्थिती आणि विस्तीर्ण किनारपट्टी लक्षात घेता आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे सुरक्षेची भक्कम यंत्रणा उभारणे अत्यावश्यक आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे बेकायदेशीर हालचालींवर नियंत्रण ठेवणे, सागरी गुन्ह्यांना आळा घालणे तसेच आपत्कालीन परिस्थितीत त्वरित प्रतिसाद देणे शक्य होणार आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग किनारपट्टीच्या सुरक्षेसाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा असून, कोणतीही दिरंगाई न करता काम तातडीने सुरू करण्याचे निर्देश मंत्री नितेश राणे यांनी यावेळी दिले.
...तरच भारत सेमी फायनल खेळू शकेल
मुंबई : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये सुपर ८ फेरीचे सामने सुरू आहेत. ग्रुप एक मध्ये वेस्ट इंडिज (धावगती +५,३५०) पहिल्या, दक्षिण आफ्रिका (धावगती +३,८००) दुसऱ्या, भारत (धावगती -३,८००) तिसऱ्या आणि झिम्बाब्वे (धावगती -५.३५०) चौथ्या क्रमांकावर आहे. वेस्ट इंडिजने झिम्बाब्वे विरुद्धचा सामना १०७ धावांनी तर दक्षिण आफ्रिकेने भारताविरूद्धचा सामना ७६ धावांनी जिंकला आहे. आता गुरुवार २६ फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सामना होणार आहे. हा सामना दक्षिण आफ्रिकेने जिंकला आणि भारताने त्याच दिवशी संध्याकाळी सात वाजताच्या सामन्यात झिम्बाब्वेचा पराभव केला तर भारताच्या सेमी फायनल खेळण्याच्या आशा जिवंत राहतील. भारताला झिम्बाब्वेविरुद्ध जिंकल्यानंतर रविवार १ मार्च रोजी वेस्ट इंडिज विरुद्धची मॅच पण जिंकावी लागेल. वेस्ट इंडिजचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभव तसेच भारताचा झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज या दोन संघांविरुद्ध विजय झाला तर टीम इंडिया सेमी फायनलमध्ये खेळू शकेल. यातील एखादा निकाल वेगळा लागला तरी भारताचे सेमी फायनल खेळण्याचे स्वप्न धूसर होण्याची शक्यता आहे.टीम इंडियाला सेमीफायनलमध्ये आपली जागा निश्चित करण्यासाठी झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागेल. त्याचबरोबर भारतीय संघाची हीदेखील इच्छा असेल की, दक्षिण आफ्रिकेच्या संघाने सुपर ८ मधील आपले सर्व सामने जिंकावेत, अन्यथा गणित बिघडू शकते. भारताने याआधी २०२४ मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वात आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकप जिंकला होता.
अनिल अंबानींचे मुंबईतील करोडो रुपयांचे निवासस्थान ईडीकडून जप्त
मुंबई : रिलायन्स अनिल धीरूभाई अंबानी ग्रुपचे (रिलायन्स एडीए ग्रुप) चेअरमन अनिल अंबानी यांचे अॅबोड निवासस्थान अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जप्त केले आहे. मनी लाँडरिंग विरोधी कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. याची किंमत ₹३,७१६ कोटी आहे, अशी माहिती मिळत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील पाली हिल परिसरात हे भव्य ६६ मीटर उंच आणि १७ मजली आहे. त्यांच्या समूह कंपनी, रिलायन्स कम्युनिकेशन्सशी (आरकॉम) संबंधित बँक फसवणूक प्रकरणाच्या संदर्भात बहुमजली घर जप्त करण्यासाठी मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) तात्पुरता आदेश जारी करण्यात आला आहे. अंबानी दुसऱ्या फेरीच्या चौकशीसाठी येथील तपास संस्थेसमोर हजर राहण्याची अपेक्षा आहे. ऑगस्ट २०२५ मध्ये त्यांनी ईडीसमोर पहिल्यांदा साक्ष दिली होती. मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पीएमएलए) त्यांचा जबाब नोंदवण्यात आला. नवीन आदेशामुळे या प्रकरणात जप्त केलेल्या मालमत्तेचे एकूण मूल्य अंदाजे १५,७०० कोटी रुपयांवर पोहोचले आहे.अनिल अंबानींसाठी हा एक मोठा धक्का आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते व्यवसायात अडचणीत आहेत. ईडीच्या या कारवाईमुळे त्यांच्या अडचणी आणखी वाढू शकतात.मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी त्यांच्या आणि रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेडच्या बँक खात्यांना फसवे म्हणून वर्गीकृत करण्याच्या कार्यवाहीला स्थगिती देणारा एकल न्यायाधीशांचा अंतरिम आदेश रद्द केला. मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंखर यांच्या खंडपीठाने डिसेंबर २०२५ मध्ये दिलेल्या एकल खंडपीठाच्या अंतरिम आदेशाविरुद्ध तीन सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि अकाउंटिंग कन्सल्टन्सी फर्म बीडीओ इंडिया एलएलपी यांनी दाखल केलेल्या अपीलांना परवानगी देताना हा निर्णय दिला.
Haryana Secretariat: घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. चंदीगड पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून, याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
केंद्र सरकारने नव्याने लागू केलेल्या जी-रामजी योजनेच्या अंमलबजावणीबाबत राज्य सरकारने भूमिका स्पष्ट केली आहे. या योजनेची राज्यात अंमलबजावणी करताना जुन्या सर्व संबंधित योजनांचा त्यात समावेश केला जाईल.
मुंबई महापालिकेचा महसूल वाढवण्यासाठी प्रशासनाचा पुढाकार
ग्रीन ब्राँड्ससह सदनिकांची विक्री, करमणूक शुल्क, भूखंडाचा लिलावातून वाढवणार महसूलाची रक्कममुंबई (विशेष प्रतिनिधी) :शाश्वत विकासासाठी महानगरपालिका बाँडस् निर्गमित करण्याबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून केंद्रीय अर्थमंत्री यांनी अर्थसंकल्प २०२६ मध्ये अमृत २.० मिशन अंतर्गत अनुदानासह एकाच वेळी निर्गमित केलेल्या ११,००० कोटीच्या महानगरपालिका बाँड करता १०० कोटी एवढे अनुदान जाहीर केले आहे . महानगरपालिकेने क्रेडीट रेटींग एजन्सी नियुक्त करण्याची प्रक्रिया यापूर्वीच सुरु केली असून शाश्वत विकासाकरिता निधी उपलब्ध करण्यासाठी महानगरपालिका ग्रीन बाँडस् निर्गमित करण्याची पुढील प्रक्रिया सुरु करण्यात असल्याची घोषणा महापालिका आयुक्त डॉ भूषण गगराणी यांनी केली आहे .मुंबई महानगरपालिकेने ग्रीन बाँडस निर्गमित करण्याचे योजिले आहे. हा उपक्रम भारताच्या शाश्वत विकास उहिष्टांशी तसेच नेट झिरो या ध्येयाशी सुसंगत असून मुंबईच्या वातावरण कृती आराखड्याची अंमलबजावणी सुलभ होईल. यामुळे, पर्यावरणीय, सामाजिक व प्रशासकीय या बाबींवर लक्ष केंद्रीत करणारे संस्थात्मक गुंतवणूकदार आकर्षित होतील,असे आयुक्तांनी नमुद केले आहे.भाडेतत्वावरील भूखंडावरील पुनर्विकासाच्या अतिरिक्त एफएसआयमधून महसूलमुंबई महानगरपालिकेच्या मक्त्याने दिलेल्या भूभागावरील इमारतींच्या पुनर्विकासातून अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) / हस्तांतरणीय विकास हक्क (टीडीआर) / फंजिबल चटई क्षेत्र निर्देशांक (फंजिबल एफएसआय) यापोटी निवासी वापरासाठी घेतले जाणारे एक वेळ अधिमूल्य ५ टक्के वरुन ७.५ टक्के तसेच अनिवासी वापरासाठी १० टक्के वरुन १२.५ टक्के इतके वाढविण्यात आले आहे. ही सुधारणा केल्यामुळे महापालिकेचा महसूल वाढला जात असून यामुळे महानगरपालिकेच्या मक्त्याने दिलेल्या भूभागाच्या पुनर्विकासातून मोठ्या प्रमाणात महसूल प्राप्त होणे अपेक्षित आहे. , सन २०२५-२६ मध्ये, प्रचलित धोरणाच्या तुलनेत २६ कोटी एवढा अतिरिक्त महसूल प्राप्त झाला आहे.सदनिका विक्रीतून ११५० कोटींची अपेक्षाविकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली २०३४ अंतर्गत निवासी सदनिकांची ऑनलाईन सोडत प्रणालीद्वारे महानगरपालिकेला ४२६ सदनिका प्राप्त झाल्या आहेत. म्हाडाच्या धर्तीवर, अत्यल्प व अल्प उत्पन्न गटाकरिता सदर सदनिका ऑनलाईन सोडत प्रणालीद्वारे विक्री करण्यात येणार आहे . ऑनलाईन सोडत यशस्वीरित्या पार पडली असून त्यानंतरचे वाटप व विक्रीची प्रक्रिया सुरु आहे. या सोडत निकालांनुसार, एकूण २,१५१ पात्र अर्जदारांपैकी ३७३ अर्जदारांना यशस्वी/विजेते ठरविण्यात आले असून ३६२ अर्जदारांची निवड करुन त्यांना प्रतिक्षा यादीत ठेवण्यात आले आहे. सदनिकांची विक्री करण्यासाठी ऑनलाईन सोडत पद्धतीचा उपक्रम राबविण्याची मुंबई महानगरपालिकेमधील ही पहिलीच वेळ आहे. यामधून सन २०२५-२६ च्या सुधारित अंदाजामध्ये सुमारे १३०० कोटी आणि सन २०२६-२७ च्या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये ₹१०० कोटी एवढा महसूल प्राप्त होण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे परवडणाऱ्या घरांच्या उद्दीष्टाला चालना देण्याबरोबरच महानगरपालिकेच्या आर्थिक विकासाला योगदान मिळेल. असा विश्वास व्यक्त केला. महानगरपालिकेला अंदाजे २९६ सदनिका प्राप्त होणे अपेक्षित आहे. या सदनिका विद्यमान धोरणानुसार खुल्या बाजारात विक्री करुन त्यामधून सुमारे ११५० कोटी इतका अतिरिक्त महसूल प्राप्त होणे अपेक्षित आहे.भाडेतत्वावरील भूखंड लिलावातून १३४८ कोटी रुपयांचा महसूलमहानगरपालिकेने छत्रपती शिवाजी महाराज मंडई, मुंबई व अस्फाल्ट प्लांट, वरळी येथील भूखंडांच्या अनुक्रमे ३६९ कोटी रुपये व ७८३ कोटी रुपये एवढ्या किंमतीच्या लिलावाची प्रक्रिया पूर्ण केली आहे. . या व्यतिरिक्त, लोअर परळ विभागातील भू.क्र.१५४६ या मुंबई महानगरपालिकेच्या भूखंडाचा १३४८ कोटी रुपये एवढ्या मूळ तथा आधारभूत किंमतीने लिलाव करण्याकरिता निविदा प्रसारित करण्यात आली असल्याचे आयुक्तांनी नमुद केले आहे.इन्फ्रास्ट्रक्चर इंव्हेंस्टमेंट ट्रस्टमुंबई हानगरपालिकेचा आपल्या महसूल निर्माण करणाऱ्या मालमत्तांचे मुद्रिकरण करूनइन्फ्रास्ट्रक्चर इंव्हेंस्टमेंट ट्रस्टच्या माध्यमातून महत्वाच्या भांडवली प्रकल्पांसाठी निधी उभारण्याचा मानस आहे. याद्वारे रस्ते, महानगरपालिका मंडया, वाहनतळ, व्यावसायिक जागा इत्यादी उत्पन्न देणाऱ्या पायाभूत मालमत्तांचे मालकत्व व संचलन करुन या माध्यमातून कर्ज न वाढवता किरकोळ तसेच संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून निधी उभारला जाईल. हा निधी नवीन मालमत्तेची खरेदी, विद्यमान कर्जाची परतफेड व प्रगतीपथावरील मोठे भांडवली प्रकल्प पूर्ण करण्यासाठी वापरण्यात येईल.करमणूक कराची आठ वर्षांनंतर होणार आकारणीमहाराष्ट्र करमणूक शुल्क अधिनियमात केलेल्या सुधारणेच्या अनुषंगाने, यापूर्वी राज्य शासनाकडून आकारला जाणारा करमणूक कर तथा शुल्क गोळा करण्याची जबाबदारी स्थानिक प्राधिकरणांवर सोपविण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत करमणूक शुल्कातून दिलेली सूट ही १६ सप्टेंबर २०१७ पासून ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत सुरु ठेवण्यात आली आहे. या सवलतीच्या कालावधीनंतर मुंबई महानगरपालिकेमार्फत करमणूक कर वसूल करण्याबाबत अधिसुचना निर्गमित करण्याबाबतचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाकडे सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावास शासनाची मान्यता प्राप्त झाल्यानंतर, अधिसूचना प्रसिध्द होईल त्या तारखेपासून करमणूक शुल्काची वसूली करण्यात येईल.,असे आयुक्तांनीआपल्या अर्थसंकल्पीय भाषणात नमूद केले.
कॅबिनेट मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांनी मानले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे आभारब्रिटिशांच्या आठवणी पुसून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे बेलासीस पुलाला नावदक्षिण मुंबईतील बेलासिस पुलाचे नाव बदलण्यासाठी मंत्री लोढा यांनी केला होता पाठपुरावामुंबई : राज्याचे कौशल्य विकास तथा मुंबईचे सह पालकमंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांच्या प्रयत्नांना यश आले असून दक्षिण मुंबईतील बेलसिस पुलाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी घेतला आहे. यासंदर्भात मंत्री लोढा यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत.ब्रिटिशांच्या खुणा सांगणाऱ्या या पुलाचे नाव मेजर जनरल जॉन बेलासिस असे होते. हे नाव बदलण्यासाठी मंत्री लोढा यांनी सातत्याने मुंबई महापालिकेकडे तसेच राज्य सरकारकडे पाठपुरावा केला होता. मुख्यमंत्री फडणवीस यांनीही या मागणीला मान्यता देऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा सन्मान केला आहे.मोडकळीला आलेल्या या पुलाची पुनर्बांधणी आता पूर्ण झाली असून माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते गुरुवार २६ फेब्रुवारी रोजी ऑनलाईन या पुलाचे उद्घाटन होणार आहे. यासंदर्भात आनंद व्यक्त करताना मंत्री लोढा म्हणाले की, आदरणीय प्रधानमंत्री श्री नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार भारताच्या वसाहतकालीन भूतकाळाची आठवण करून देणाऱ्या पाऊलखुणा पुसून भारतीयत्वाचा सन्मान करणारे आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये महानगरपालिकेने मुंबईतील जुना कोर्नॅक पूल ‘सिंदूर ब्रिज’ असे नामांतरित केले होते. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर भारताने दिलेल्या प्रत्युत्तरार्थ राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’च्या स्मरणार्थ हे नामकरण करण्यात आले होते, अशी माहिती ही मंत्री लोढा यांनी दिली. दरम्यान, कौशल्य विभागानेही राज्यातील सर्व आयटीआयला थोर संत आणि महापुरुषांची नावे देण्याचा निर्णय आधीच घेतला असून त्याची अंमलबजावणी सुरू आहे.
मोठी घडामोड..! राज्यसभेसाठी भाजपचं धक्कातंत्र? बीडच्या ‘या’महिला नेत्याचं नाव चर्चेत
Maharashtra BJP : महाराष्ट्रातील ७ राज्यसभा जागांसाठी १६ मार्च रोजी निवडणूक होत असून भाजपच्या कोअर कमिटी बैठकीत प्रीतम मुंडे यांच्या नावाची चर्चा झाली आहे.
PM Modi Israel Visit : पंतप्रधान मोदी इस्रायलच्या दौऱ्यावर दाखल; इस्रायलच्या संसदेला करणार संबोधित
PM Modi Israel Visit – पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या भेटीसाठी आज इस्रायलमध्ये दाखल झाले. इस्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतान्याहू आणि त्यांच्या पत्नी सारा यांनी यांनी बेन गुरिओन विमानतलावर मोदींचे उत्स्फूर्त स्वागत केले. यावेळी पंतप्रधान मोदी यांच्या स्वागतासाठी पारंपारिक समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. पंतप्रधान मोदी गेल्या ९ वर्षात दुसऱ्यांदा इस्रायलच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याच्यावेळी पंतप्रधान […]
Yashwant Bank scam: मोठा घोटाळा! सातारा जिल्ह्यातील भाजप नेत्याला 2 मार्चपर्यंत पोलीस कोठडी
Yashwant Bank scam: दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने शेखर चरेगांवकर यांना २ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या अटकेमुळे सहकार क्षेत्रात आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
Narendra Modi : पंतप्रधान दबावाखाली काम करत आहेत; ‘या’नेत्याचा मोठा दावा
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी पहिल्यांदाच एकतर्फी भारत-अमेरिका व्यापार करार मंजूर केला होता आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दबावाखाली भारताने रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करणे थांबवण्याचे मान्य केले होते.
Nilesh Rane : “मुंबई -गोवा महामार्ग पूर्ण करावा”–निलेश राणे
राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणात ४,४७८कोटी रुपये रस्ते विकासासाठी उल्लेख आहे.
भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय
पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच केलेल्या एक दाव्यामुळे संपूर्ण प्रकरणाला एक नवे वळण मिळाले आहे.पुणे जिल्ह्यातल्या भिगवणमध्ये एका तरुणीचे अपहरण केल्याचा दावा केला जात होता, विशेष म्हणजे या मुलीचं लग्न दोन दिवसांवर असताना तिचं अपहरण झाल्याची माहिती समोर आली होती. लग्नाची खरेदी करुन ही तरुणी आपल्या आई आणि भावासोबत घरी जात असताना तिचं अपहरण करण्यात आलं, यावेळी तिच्या आईच्या आणि भावाच्या डोळ्यात मिरची पूड देखील टाकण्यात आली असा दावा करण्यात येत होता. या प्रकरणी हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक भूमिका घेत न्यायालयीन चौकशी ची मागणी केली. नंतर या मुलीचा एक व्हिडीओ समोर आला , ज्या व्हिडीओमध्ये बोलताना या मुलीनं मोठा दावा केला होता. मी सबंधित मुलासोबत माझ्या मर्जीने पळून आले, आमचे प्रेमसंबंध आहेत, असं या मुलीने व्हिडीओमध्ये म्हटलं होतं. त्यानंतर ते दोघेही पोलिसांसमोर हजर झाले. माझे अपहरण झाले नसून आमचे एकमेकांवर प्रेम आहे, मी माझ्या मर्जीने आल्याचे तरुणीने सांगितले होते.इंदापूर न्यायालयात सुनावणी दरम्यान मुलीची आई देखील कोर्टात उपस्तिथ होती. मला माझी मुलगी द्या... अशी गयवया केली परंतु मुलीने आईकडे न पाहता आपल्या प्रियकराकडे गेली.याप्रकरणी आता मोठा ट्विस्ट समोर आला आहे, मुलगी आईसोबत जाण्यास तयार नसल्याने हिंदुत्ववादी संघटनेनें आक्रमक पवित्र घेतला. संतप्त नागरिकांनी पुणे - सोलापूर - राष्ट्रीय महामार्ग रोखून तीव्र आंदोलन केले. प्रियकराच्या अटकेची मागणी होऊ लागली. भिगवण बंद ची हाक देण्यात आली. गावकऱ्यांनी न्यायालयाला मुलीला सुधारगृहात ठेवण्याची मागणी केली. सुधारगृहात पाच दिवस राहिल्यानंतर पुन्हा कोर्टात सुनावणी झाली. त्यावेळी मुलीला कोणाकडे जायचे असा प्रश्न पुन्हा विचारला असता अचानक मुलीने प्रियकराकडे न जाता आईकडे जाण्याची ईच्छा व्यक्त केली. त्यामुळे लोक चक्रावून गेले आहेत.
रेल्वे मार्ग शिर्डीमार्गे वळवल्यास हा अडथळा दूर होऊ शकतो का, यावरही आता विचार मंथन सुरू झाले आहे.
'मराठी भाषा गौरव दिन'आणि 'मराठी राजभाषा दिन'यात फरक काय ?
मुंबई : दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी 'मराठी भाषा गौरव दिन' आणि १ मे रोजी 'मराठी राजभाषा दिन' साजरा करतात. ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी अर्थात २७ फेब्रुवारी रोजी 'मराठी भाषा गौरव दिन' साजरा करतात. महाराष्ट्र या राज्याची स्थापना १ मे १९६० रोजी झाली आणि मराठी भाषिकांचे राज्य असलेल्या महाराष्ट्रात १ मे १९६५ पासून दरवर्षी महाराष्ट्र दिनी अर्थात १ मे रोजी मराठी राजभाषा दिन अर्थात मराठी भाषा दिन किंवा 'मराठी राजभाषा दिन' साजरा करतात.'मराठी राजभाषा दिन' साजरा करण्याबाबतचा निर्णय १९६५ मध्ये तत्कालीन वसंतराव नाईक सरकारने घेतला होता. महाराष्ट्राची राजभाषा मराठी असेल असेही वसंतराव नाईक सरकारने जाहीर केले. 'मराठी राजभाषा अधिनियम १९६४' हा ११ जानेवारी १९६५ रोजी प्रसिद्ध झाला. हाच अधिनियम पुढे कायदा म्हणून १९६६ पासून अंमलात आला.मातृभाषेचा गौरव दिनकुसुमाग्रजांची मराठी साहित्य क्षेत्रात नाटककार, कथाकार, कांदबरीकार, कवी आणि समीक्षक म्हणून ख्याती आहे. मराठीचा सन्मान वाढविण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांनी मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले. याच कारणामुळे त्यांच्या सन्मानार्थ २७ फेब्रुवारी रोजी 'मराठी भाषा गौरव दिन' साजरा करतात.
Bill Gates : बिल गेट्स यांनी दिलगिरी व्यक्त करत केला ‘हा’मोठा खुलासा
लैंगिक व्यवहारातील दोषी दलाल जेफ्री एपस्टीन याच्याशी असलेले संबंध उघड झाल्यामुळे अमेरिकेतील तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी उद्योजक आणि अब्जाधीश बिल गेट्स (Bill Gates) यांनी गेट्स फौंडेशनमधील आपल्या कर्मचाऱ्यांची माफी मागितली आहे.
Anil Ambani: अनिल अंबानींना मोठा झटका; EDकडून 3716 कोटींचे ‘अबोड’निवासस्थान जप्त
Anil Ambani: रिलायन्स होम फायनान्स लिमिटेडमधील संशयास्पद कर्जवाढीचाही तपास सध्या सुरू असून अंबानींच्या अडचणीत नजीकच्या काळात मोठी वाढ होण्याची चिन्हे आहेत.
सरकारी योजनांचा लाभ देणाऱ्या रुग्णालयांचा होणार गौरव
मुंबई : विविध योजनांमधून महानगरपालिकेच्या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या रुग्णसेवांवरील खर्चाच्या प्रतिपूर्तीकरिता शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून जे रुग्णालय जास्तीत जास्त प्रमाणात प्रतिपूर्तीची रक्कम प्राप्त करतील त्यांना विशेष प्रोत्साहन देऊन गौरविण्यात येईलअशाप्रकारची घोषणा महापालिका आयुक्त डॉ भूषण गगराणी यांनी व्यक्त केली.मुंबई महापालिकेच्या आरोग्य खात्यासाठभ् २०२६-२७ च्या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये महसुली अर्थसंकल्पांतर्गत एकूण १५२३७.०९ कोटी रुपये व भांडवली अर्थसंकल्पांतर्गत २२१९.७१ कोटी रुपये एवढी तरतूद करण्यात आली आहे. आरोग्य व्यवस्थेतील निरंतर प्रयत्नांद्वारे आम्ही केवळ आजारांवर उपचार करत नसून भविष्याकरिता अधिक निरोगी व आनंदी मुंबई घडवित आहोत असे गगराणी यांनी स्पष्ट केले.रुग्णालयीन नागरी सुविधा केंद्र उभारणीरुग्णालयाच्या आवारामध्ये रुग्णा व रुग्णांच्या नातेवाईकांकरिता विविध मुलभूत सुविधा जसे की स्नानगृह, शौचालय, यांत्रिक धुलाई सेवा, इत्यादी सुविधा सीएसआर मार्फत उभारण्यात येणार आहे. त्यांचे प्रचलन पे अँड पार्कच्या ' धर्तीवर करण्यात येईल. या उपक्रमाच्या क्रॉस सबसिडी मधून रुग्णालयामधील सर्व शौचालयांची सफाई मानकांच्या निकषानुसार करण्यात येईल. त्यामुळे रुग्णालयाच्या आवारामध्ये रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांकरिता उत्तम दर्जाच्या सुविधा उपलब्ध होतील,असा विश्वास गगराणी यांनी व्यक्त केला.जेनेरिक मेडिकल स्टोअर्सएनएसीओएफ संचालित संचलित जेनरिक मेडिकल स्टोअर्स मुंबई महानगरपालिकेच्या धोरणानुसार, नागरिकांना परवडणारी व गुणवत्तापूर्ण नॉन-शेड्युल औषधे उपलब्ध करून देण्यासाठी शहरातील ५० निवडक ठिकाणी नॅशनल ऍग्रीकल्चर को ऑपरेटीव्ह मार्केटींग फेडरेशन ऑफ इंडिया अर्थात एनएसीओएफ संचलित जेनरिक मेडिकल स्टोअर्स सुरु करण्यात येणार आहेत. या उपक्रमामुळे रुग्णांचा औषधांवरील खर्च कमी होईल आणि वाजवी व विश्वासार्ह नागरी आरोग्य सुविधांचे बळकटीकरण होईल.
कधी आहे नृसिंह द्वादशी ? त्या दिवशी नेमके काय करावे ?
भगवान विष्णूचा चौथा अवतार म्हणजेच भगवान नृसिंह यांची द्वादशी ही यंदा शुक्रवार २७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी दहा वाजून ३२ मिनिटांनी सुरू होत आहे आणि शनिवार २८ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री आठ वाजून ४३ मिनिटांनी संपेल. यामुळे यंदा नृसिंह द्वादशी ही शनिवार २८ फेब्रुवारी २०२६ रोजी साजरी केली जाईल. याच दिवशी नृसिंह द्वादशीचा उपवास असेल. रविवार १ मार्च २०२६ रोजी नृसिंह द्वादशीटा उपवास सोडला जाईल. उपवास सोडण्यासाठी १ मार्च रोजी सकाळी सहा वाजून २१ मिनिटांपासून ते सकाळी आठ वाजून ४१ मिनिटांपर्यंतचा काळ हा शुभ आहे.मनापासून केलेले नृसिंह द्वादशीचे व्रत लाभदायी ठरते. असे सांगतात की, हे व्रत केल्यामुळे जीवनातील भीती, चिंता आणि अडथळे दूर होतात. धाडस करण्यासाठी हिंमत वाढते. आत्मविश्वास वाढतो. जीवनात सकारात्मक ऊर्जा येते. शत्रूचा बंदोबस्त करण्यासाठी सामर्थ्य लाभते. माणूस मानसिकदृष्ट्या कणखर होतो.व्रत कसे करावे ?नृसिंह द्वादशीच्या दिवशी सूर्योदयाच्या आधी उठावे. स्नान करुन धूत वस्त्र अथवा सोवळे नेसावे. नृसिंहाच्या प्रतिमेची अथवा मूर्तीची प्रतिष्ठापना करून पूजा करावी. यानंतर, विष्णू सहस्रनाम,नृसिंह स्तोत्र, भगवान विष्णूची आरती, भगवान नृसिंहाची आरती करावी. देवाला प्रसाद दाखवून नंतर सर्वांना वाटावा आणि देवाचे स्मरण करत ग्रहण करावा.श्रीनृसिंहाची आरतीकडकडिले स्तंभ गडगडिलें गगन।अवनी होत आहे कंपायमान।तडतडलीं नक्षत्रे पडताती जाण।उग्ररूपें प्रगटे सिंहवदन।। १ ।।जय देव जय देव जय नरहरिराया।आरती ओवाळू महाराजवर्या।जय देव जय देव ।।एकविस स्वर्गमाळा डळमळली कैसी।ब्रह्मयाच्या वाटे अभिनव चित्तासी।चंद्रसूर्य दोनी लोपति प्रकाशीं।कैलासीं शंकर दचके मानसीं।। २ ।।जय देव जय देव जय नरहरिराया।आरती ओवाळू महाराजवर्या।जय देव जय देव ।।थरथरती त्या जटा जिव्हा लळलळित।तीक्ष्ण नखांनीं दैत्य तो विदारीत।अर्धांगी कमलजा शिरीं छाया धरित।माधवदासा स्वामी नरहरि शोभत।। ३ ।।जय देव जय देव जय नरहरिराया।आरती ओवाळू महाराजवर्या।जय देव जय देव ।।अस्वीकरण / Disclaimer : माहिती संकलित आहे. प्रयोग करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणे हिताचे.
देवनार येथे कचऱ्यापासून वीज निर्मितीचा प्रकल्प जून २०२६ पासून होणार सुरु
मुंबई : मुंबईतील देवनार डम्पिंग ग्राऊंडवरील येथे ६०० टन प्रतिदिन महानगरपालिका घन कचऱ्यापासून ७ मेगावॅट वीज निर्मिती प्रकल्पाच्या बांधकाम व उभारणीचे काम प्रगतीपथावर आहे. या प्रकल्पाचे काम पूर्ण होऊन आता जून २०२६ पर्यंत हा प्रकल्प कार्यान्वित होणे अपेक्षित असल्याचे महापालिका आयुक्त डॉ भूषण गगराणी यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात विश्वास व्यक्त केला.मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन खात्यांतर्गत हाती घेण्यात येणाऱ्या प्रकल्प कामांसाठी सन २०२५-२६ च्या सुधारित अंदाजामध्ये ३६४.६२ कोटी रुपयांची तरतूद केली आहे आणि सन २०२६-२७ च्या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये ५८०.८२ कोटी एवढी तरतूद करण्यात आली आहे.मुलुंड क्षेपणभूमी येथे जमीन पुनः प्रापण करणेमुलुंड डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्याची विल्हेवाट लावून जमिन पुनर्प्राप्त करण्याचे काम सुरु असून ३०. जून २०२५ पर्यंत समारे ४८.१३ लाख मेट्रीक एवढ्या जुन्या साठलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करुन त्याची विल्हेवाट लावण्यात आली. तर मार्च २०२६ पर्यंत उर्वरित सुमारे २२ लाख मेट्रीक टन कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावून डम्पिंग ग्राऊंडची सुमारे २४ हेक्टर जागा पुनः प्राप्त करण्यात येणर आहे.देवनार क्षेपणभूमी येथे बायो - सीएनजी प्रकल्पमुंबई महानगरपालिकेने देवनार डम्पिंग ग्राऊंडवर बायो-सीएनजी प्रकल्प उभारण्यासाठी महानगर गॅस लिमिटेड यांच्यासोबत सामंजस्य करार (एमओयू) केला आहे. सद्यस्थितीत, ५०० टन प्रतिदिन नागरी घन कचऱ्यापर्यंतच्या संबंधीच्या मंजूरीची प्रक्रिया सुरु आहे. हा प्रकल्प ऑक्टोबर २०२७पर्यंत कार्यान्वित होणे अपेक्षित असल्याचे गगराणी नमुद केले.बांधकाम व निष्कासन कचरा प्रकल्पमुंबई महानगरपालिकेने डायघर व दहिसर येथे बांधकाम व निष्कासन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रत्येकी ६०० टन प्रतिदिन क्षमतेचे दोन प्रकल्प उभारले आहेत. या प्रकल्पांतर्गत नोव्हेंबर २०२५ पर्यंत २.३० लाख मे.टन पेक्षा जास्त बांधकाम व निष्कासन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात आली आहे.देवनार क्षेपणभूमी येथे जैविक-शुद्धीकरणमुंबई महानगरपालिकेने देवनार डम्पिंग ग्राऊंड येथे १८५ लाख मेट्रीक टन एवढ्या जुन्या साठलेल्या कचऱ्याचे जैव-शुद्धीकरण करण्यासह खोदकामाद्वारे प्रक्रियायुक्त विलगीकरण केलेल्या साहित्याची विल्हेवाट लावून एकूण ११० हेक्टर जागा पुनःप्रापण करण्याचे काम हाती घेतले आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च ३०३५.५५ कोटी रुपये एवढा इतका असून मार्च २०२९ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित आहे.घन कचरा व्यवस्थापन प्रक्रियेचे आधुनिकीकरण आणि तांत्रिक सुधारणाविभागाची कार्यक्षमता वाढविण्यासाठी आणि आधुनिक कचरा व्यवस्थापन पध्दतींशी सुसंगत राहण्यासाठी, मुंबई महानगरपालिकेने वर्सोवा आणि गोराई येथील कचरा हस्तांतरण केंद्रांचे व्यापक आधुनिकीकरण करण्यात येणार आहे . हे काम जानेवारी २०२८ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.
अक्खा महाराष्ट्र सुन्न..! भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू; २ चिमुकल्यांचा समावेश
Ahilyanagar Accident News : अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर-संगमनेर रस्त्यावर खंडाळा गावाजवळ कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे.
President Draupadi Murmu: यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण, आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव, संत गजानन महाराज संस्थानचे विश्वस्त निळकंठ शिवशंकर पाटील, हरिहर निळकंठ पाटील यांच्यासह आयुष मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
मुंबई : युनिव्हर्सल फुटपाथ पॉलिसी' अंतर्गत अधिक पादचारी अनुकूल व दिव्यांग अनुकूल पदपथ निर्माण करण्यावर महानगरपालिका आता भर देत असून त्यानुसार, शहर, पूर्व व पश्चिम उपनगरांमध्ये काही विद्यमान पदपथांची सुधारणा व दर्जेनतीचे काम प्रायोगिक तत्वावर हाती घेण्यात येणार असल्याची घोषणा महापालिका आयुक्त डॉ भूषण गगराणी यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात केली.मुंबई महापालिकेच्यावतीने रस्ते विभागासाठी सन २०२५-२६ च्या सुधारित अंदाजामध्ये ६००० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून आगामी सन २०२६-२७ च्या अर्थसंकल्पीय अर्थसंकल्पात ६८७५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मुंबईतील सुमारे २,११८ कि.मी. रस्त्यांच्या जाळ्यांचे जबाबदारीने देखभाल व परिरक्षण केले जाते. मुंबई ही देशाचा आर्थिक कणा आणि जागतिक चेहरा असल्याने, आंतरराष्ट्रीय मानकांनुसार शाश्वत, टिकाऊ व पर्यावरणस्नेही रस्ते पायाभूत सुविधा बनविण्याच्या दिशेने सातत्याने पावले टाकत आहे.७०० कि.मी. लांबीच्या रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्याचे काम दोन टप्प्यात हाती घेण्यात आलेले आहे. त्यापैकी, ३४२ कि.मी. रस्त्यांचे काँक्रीटीकरण पूर्ण करण्यात आले असून उर्वरित रस्त्यांची कामे प्रगतीपथावर आहेत. अद्यापपर्यंत, सुमारे १,५६६ कि.मी. रस्ते/रस्त्यांच्या बाजूच्या पट्टयांची सिमेंट काँक्रीटमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. टप्पा-१ मधील ७५ टक्के आणि टप्पा-२ मधील ५० टक्के कामे पूर्ण झाली आहेत. टप्पा-१ मे २०२६ पर्यंत आणि टप्पा-२ डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजिले आहे.वाहतूक कोंडी सोडविण्याकरिता उपाययोजनारस्त्यावरील ६५ ठिकाणी सशुल्क वाहनतळे कार्यान्वित असून त्यांची एकूण वाहनक्षमता ८,२५८ एवढी आहे. याव्यतिरिक्त, ३७ ठिकाणी सार्वजनिक वाहनतळांच्या देखभालीसाठी कामे नेमून देण्यात आली आहेत.. त्यांची एकूण वाहनक्षमता २९,७६९ एवढी आहे.भूमिगत वाहनतळश्री. सिध्दिविनायक गणपती मंदिराच्या सभोवतालच्या परिसराचे सौंदर्याकरण आणि उन्नतीचे काम तीन टप्प्यात करण्याचे नियोजित आहे. पहिल्या टप्पातील इतर कामांसोबतच तळपरात २ मजले भूमिगत वाहनतळ सुविधा उभारण्याच्या कामाचांही समावेश आहे. या भूमिगत वाहनतळ संकल्पना प्रथमतः जी/उत्तर विभागामध्ये राबविण्यात येणार असून त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर विभागातही ही संकल्पना राबविण्यातत येणार आहेस्मार्ट वाहनतळ प्रकल्पमुंबईमध्ये सुव्यवस्थित वाहतूक आणि नागरिकाभिमुख वाहनतळ व्यवस्था निर्माण करण्यासाठी, बृहन्मुंबई महानगरपालिका स्मार्ट वाहनतळ प्रकल्प राबविणार आहे. सद्यस्थितीत, या प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया प्रगतीपथावर आहे. या उपक्रमांतर्गत, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील भागांसाठी मोबाईल पार्किंग अॅप्लिकेशर विकसित करण्यात येणार असून ज्याद्वारे नागरिकांना घरबसल्या मोबाईलवर आपल्या इच्छित स्थळी जाण्यापूर्वी पार्किंगची जागा विशिष्ट वेळेसाठी आगाऊ आरक्षित करण्याचे सुविधा उपलब्ध होणार आहे. हा प्रकल्प सार्वजनिक खाजगी भागिदारी (पीपीपी) तत्वावर राबविण्यात येणार असून त्यामुळे मुंबई महानगरपालिकेवर कोणताही आर्थिक भार येणार नाही तसेच कंत्राटदाराकडून टक्केवारीनुसार महसुलामधील हिस्सा प्राप्त होणार आहे. प्रारंभी, या प्रकल्पाची अंमलबजावणी ५३० नविन वाहतळांवर करण्यात येणार आहे. पुढील टप्प्यांत इतर ऑन स्ट्रीट व ऑफ स्ट्रीट वाहनतळांचाही समावेश करण्याची तरतूद असल्यामुळे प्रवाशांच्या सोयीमध्ये वाढ होईल.
Ahilyabai Holkar : अहिल्यादेवींचा वारसा जपण्यात सरकार अपयशी; ‘या’नेत्याची सरकारवर टीका
उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (Ahilyabai Holkar) यांनी बांधलेला ऐतिहासिक मणिकर्णिका घाट तेथील सरकारने तोडला असून, महाराष्ट्र सरकारने तातडीने यात हस्तक्षेप करून हा घाट पुन्हा पूर्ववत बांधून घ्यावा, अशी मागणी पाटील यांनी विधान सभेत चर्चेदरम्यान केली.
Maharashtra Political : साताऱ्यात भाजपच्या माजी मंत्र्याला अटक; राज्याच्या राजकारणात खळबळ
Maharashtra Political : सातारा पोलिसांनी भाजप नेते आणि राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांना अटक केली आहे.
Railway Job : रेल्वेची मेगा भरती.! ‘या’पदांसाठी मोठी संधी, अर्जाची शेवटची तारीख पाहा…
भरती प्रक्रिया लवकरच सुरू होण्याची अपेक्षा आहे. भरतीची संपूर्ण जबाबदारी आरआरबीची असेल. अर्ज प्रक्रिया ऑनलाइन असेल.

26 C