SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

29    C
...

ओल्या जखमेची वर्षपूर्ती

२२ एप्रिल २०२५ रोजी पहलगामच्या निसर्गरम्य 'बैसारन व्हॅली'त झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश सुन्न झाला होता. २६ निष्पाप पर्यटकांचा बळी घेणाऱ्या या घटनेने माणुसकीला काळिमा फासला, पण त्याच वेळी भारताच्या अदम्य धैर्याची आणि लष्करी सामर्थ्याची नवी ओळख जगाला करून दिली.‘पहलगाम’ शब्द उच्चारला, तरी तो भीषण दहशतवादी हल्ला डोळ्यांंसमोर येतो. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या हल्ल्याला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. काश्मीरच्या सौंदर्यांचे वर्णन करताना 'पृथ्वीवरील नंदनवन' हा शब्द नेहमीच वापरला जातो. मात्र, गेल्या वर्षी याच दिवशी नंदनवनातील पहलगामच्या निसर्गरम्य 'बैसारन व्हॅली'मध्ये रक्ताचे सडे पडले. हा दिवस केवळ त्या २६ निष्पाप जीवांच्या बलिदानाच्या स्मरणाचा नाही, तर दहशतवादाविरोधात भारत देश किती ठामपणे उभा आहे, याचं प्रत्यंतर दर्शवणारा आहे. बैसारन व्हॅलीमध्ये पर्यटक घोडेस्वारीचा आणि निसर्गाचा आनंद घेतात. त्यादिवशी दुपारी १ ते ३ च्या सुमारास अचानक ४ ते ७ सशस्त्र दहशतवादी जंगलातून बाहेर आले आणि त्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले बहुतांश पर्यटक होते. हल्ल्याच्या त्या भीषण क्षणांमध्ये केवळ मृत्यूचे तांडव नव्हते, तर माणुसकीची काही उदाहरणेही जगाला पाहायला मिळाली. आदिल हुसेन शाह नावाच्या एका स्थानिक खेचरस्वाराने पर्यटकांना वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला. या हल्ल्यात महाराष्ट्रातील दिलीप देसले आणि अतुल मोने यांच्यासह देशाच्या विविध भागांतील पर्यटकांना आपले प्राण गमवावे लागले. आपल्या कुटुंबासह सुट्टीचा आनंद घेण्यासाठी गेलेले भारतीय नौदलाचे अधिकारी लेफ्टनंट विनय नरवाल हेदेखील या हल्ल्याचे बळी ठरले. हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली. पाकिस्तान पुरस्कृत 'द रेसिस्टन्स फ्रंट' या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने केवळ निषेध व्यक्त करून थांबायचे नाही, अशी ठाम भूमिका घेतली. दहशतवाद्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्यासाठी भारतीय सशस्त्र दलांनी 'ऑपरेशन सिंदूर' राबवले. ७ मे २०२५ रोजी भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलाने संयुक्त कारवाई करत पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी तळांवर 'सर्जिकल स्ट्राईक' केला, ज्यात सुमारे १००हून अधिक दहशतवादी मारले गेले. जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबा यांसारख्या संघटनांची महत्त्वाची केंद्र उद्ध्वस्त करण्यात लष्कराला यश मिळाले. ही मोहीम केवळ २३ मिनिटांत यशस्वीपणे पूर्ण झाली, ज्यामध्ये 'राफेल' विमानांचा वापर करण्यात आला होता. त्याव्यतिरिक्त भारताने पहिल्यांदाच १९६० चा ऐतिहासिक सिंधू जल करार स्थगित करण्याचा मोठा निर्णय घेतला. जोपर्यंत पाकिस्तान सीमेपलीकडील दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवत नाही, तोपर्यंत हा करार व्यवहारात राहणार नाही, अशी स्पष्ट भूमिका भारत सरकारने घेतली. पाकिस्तानशी व्यापार पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतल्याने आधीच आर्थिक संकटात असलेल्या पाकिस्तानचं कंबरडे मोडलं.https://prahaar.in/2026/04/21/operation-sindoor-dont-cross-the-line-india-doesnt-forget-indian-army-suggestive-tweet-on-the-anniversary-of-the-pahalgam-attack/या हल्ल्यानंतर काश्मीरमधील पर्यटकांच्या सुरक्षेसाठी अनेक मोठे बदल करण्यात आले. क्यूआर कोड आणि डिजिटल ट्रॅकिंगची पद्धत अवलंबली गेली. पर्यटकांच्या प्रत्येक वाहनाला आणि घोडेस्वारांना विशेष क्यूआर कोड दिले जाऊ लागले. त्यामुळे कोणता पर्यटक कोणत्या भागात आहे, याची अचूक माहिती नियंत्रण कक्षाला मिळू लागली. पहलगाम आणि बैसारन व्हॅलीसारख्या दऱ्याखोऱ्यांतील घनदाट जंगलांच्या भागात २४ तास उच्च-गुणवत्तेच्या ड्रोनद्वारे गस्त घातली जात आहे. जंगलात कोणत्याही संशयास्पद हालचाली दिसल्यास तत्काळ अलर्ट दिला जातो. स्थानिक लोकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण करण्यासाठी गावकऱ्यांना संरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात आलं आहे.दहशतवाद्यांना स्थानिक स्तरावर कोणताही आधार मिळणं आता कठीण होत आहे. लष्कर आणि स्थानिक पोलीस यांच्यात समन्वय वाढवण्यासाठी विशेष 'क्विक रिस्पॉन्स टीम्स' तैनात करण्यात आल्या आहेत, ज्या ५ मिनिटांच्या आत कोणत्याही घटनास्थळी पोहोचू शकतात. काश्मीर खोऱ्यातील स्थानिक दहशतवाद्यांचा बिमोड करण्यासाठी लष्कर आणि पोलिसांनी संयुक्त 'ऑपरेशन महादेव' राबवलं. २८ जुलै २०२५ पर्यंत पहलगाम हल्ल्यात थेट सहभागी असलेल्या सुलमान उर्फ फैजल जट आणि हमजा अफगाणी यांसह सर्व प्रमुख दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. पाकिस्तानी नागरिकांसाठी असलेली 'सार्क व्हिसा सवलत योजना' रद्द करण्यात आली असून पूर्वी दिलेले व्हिसाही अवैध ठरवण्यात आले आहेत. अटारी-वाघा सीमा बंद करण्याचा निर्णय घेतल्याने दोन्ही देशांमधील नागरिक आणि मालाची ये-जा थांबली आहे. आज एक वर्षानंतर पहलगाम पुन्हा पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झालं आहे. काश्मीरमधील पर्यटनस्थळांवर क्यूआर कोड आधारित पडताळणी यंत्रणा आणि तंत्रज्ञानावर आधारित कडक निगराणी ठेवली जाते आहे. स्थानिकांच्या मनात अजूनही जखमा ओल्या असल्या तरी दहशतवादाला थारा न देण्याचा त्यांचा निर्धार अधिक पक्का झाला आहे. पहलगामचा हा हल्ला केवळ पर्यटकांवरचा हल्ला नव्हता, भारताच्या अखंडतेवर आणि शांततेवर केलेला आघात होता, अशी भारतीयांची भावना आहे. शहीद झालेल्या २६ जीवांना आदरांजली वाहताना आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे, की अशा भ्याड कृत्यांनी भारताचा विकास आणि काश्मीरची प्रगती यापुढेही थांबणार नाही. दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी संपूर्ण देशाने एकजुटीने उभं राहायला हवं. या दुःखद घटनेतून सावरत असताना आपण त्या बलिदानाचं स्मरण ठेऊया आणि शांततापूर्ण व सुरक्षित भारताच्या निर्माणासाठी कटिबद्ध होऊया. पहेलगाम हल्ल्यातील शहिदांचे बलिदान व्यर्थ जाणार नाहीत. हा देश तुमच्या धैर्याचा आणि त्या भयाण दिवशी दाखवलेल्या माणुसकीचा सदैव ऋणी राहील. दहशतवादाचा अंत आणि शांततेचा सूर्योदय हाच देशवासीयांचा निश्चय आहे. त्या भ्याड हल्ल्यात प्राण गमावलेल्या निष्पाप जीवांना आणि वीर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली!

फीड फीडबर्नर 22 Apr 2026 8:10 am

साठवूया पाणी, वाचवूया पुणे

वार्तापत्र : मध्य महाराष्ट्रवाढत्या लोकसंख्येला पुरेल इतके पाणी उपलब्ध करण्याचे आव्हान प्रशासनासमोर असतानाच, आता 'पाणी कपाती'च्या वादाने शहरात नवा पेच निर्माण केला आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्याच्या पाणीटंचाईचा घेतलेला हा आढावा...पुणे हे महाराष्ट्रातील वेगाने विकसित होणारे शहर म्हणून ओळखले जाते. आयटी हब, शैक्षणिक केंद्र आणि औद्योगिक वाढ यामुळे पुण्याची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. मात्र या विकासासोबतच शहरासमोर एक गंभीर समस्या उभी राहिली आहे, ती म्हणजे दुष्काळ आणि पाणीटंचाई. दरवर्षी उन्हाळा सुरू होताच पुण्यातील अनेक भागांत पाण्याची कमतरता जाणवू लागते आणि नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. शेतीच्या भरण-पोषणापासून अर्थव्यवस्थेपर्यंत प्रत्येक घटकावर परिणाम करणाऱ्या मान्सूनच्या प्रवासात यंदा 'एल निनो'चे विघ्न येण्याची दाट चिन्हे आहेत. ही दुष्काळाची चाहूलच म्हटली पाहिजे. यंदा जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या मान्सून कालावधीत पाऊसमान कमीच राहणार असल्याचा भारतीय हवामान विभागाचा अंदाज चिंता वाढवणारा आहे. या वर्षी नैऋत्य मोसमी पावसावर एल निनोचा प्रभाव राहणार असून, देशभर सरासरीच्या ९२ टक्के पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.राज्यात अलीकडेच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर उद्भवलेली राजकीय परिस्थिती, तसेच सध्या बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने यंदाची 'कालवा समिती'ची बैठक लांबणीवर पडली आहे. परिणामी, पुणे शहर आणि ग्रामीण भागासाठीच्या पाणी वाटपाचे नियोजन रखडले आहे. या बैठकीत होणारा निर्णय हा शहर आणि शेती या दोघांच्याही हिताचा असतो. बैठक जेवढ्या लवकर होईल, तेवढ्या प्रभावीपणे उन्हाळ्यातील पाण्याचे नियोजन करता येते. बारामती पोटनिवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतरच ही बैठक होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत पुणे महापालिका आणि जलसंपदा विभाग यांच्यातील पाणी कपातीचा वाद कसा मिटतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा, बाष्पीभवन आणि शहराची वाढती मागणी यांचा विचार करून पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी निश्चित केले जाते. सध्या अधिकृत निर्णय झाला नसल्याने पुढील नियोजन विस्कळीत होण्याची शक्यता आहे.पुणे शहर आणि ग्रामीण भागात पाणीटंचाईचे संकट गंभीर रूप धारण करत आहे. खडकवासला धरण परिसरातील चार धरणांमध्ये एकूण ४५ टक्के पाणीसाठा उरला आहे. खडकवासला (४३%), पानशेत (५६%), वरसगाव (४६%) आणि टेमघर (११.८८%) यांचा एकूण साठा सध्या सुमारे १४ टीएमसी आहे. गेल्या वर्षी याच तारखेला तो १२.९ टीएमसी होता. म्हणजे यंदा १.२ टीएमसी जास्त पाणी उपलब्ध असले, तरी शहराला दरमहा १.५ टीएमसी पाणी लागते आणि जुलैअखेरपर्यंत ७-८ टीएमसी लागणार आहे. शेतीसाठीही ४ टीएमसी अतिरिक्त पाणी सोडले जाते. शहरात पीएमसी आणि पीसीएमसी दोन्ही ठिकाणी पाण्याचा दाब कमी झाला असून कात्रज, कोंढवा, धायरी, वडगाव बुद्रुक, पाषाण, बावधन यांसारख्या उपनगरांत जानेवारीपासूनच टँकरची मागणी वाढली आहे.उष्णतेची लाट तीव्र होत असल्याने बाष्पीभवन आणि गळती मोठ्या प्रमाणात होत आहे. वाढती मागणी लक्षात घेता पाटबंधारे विभागाने १५ टक्के कपातीची विनंती केली होती, मात्र पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी एक थेंबही कपात न करण्याची आक्रमक भूमिका घेतली आहे. या वादावर जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पाणी कपातीचा निर्णय पालिकेनेच घ्यावा असे स्पष्ट केल्याने पेच वाढला आहे.ही समस्या योग्य नियोजन आणि उपाययोजनांद्वारे कमी करता येऊ शकते. शहरी भागात पावसाच्या पाण्याचे साठवण करणे, पाण्याचा पुनर्वापर करणे आणि पाइपलाइनमधील गळतीवर नियंत्रण मिळवणे अत्यंत आवश्यक आहे. हरित क्षेत्र वाढवणे हाही एक मार्ग आहे. ग्रामीण भागात जलसंधारण, नालेबांध, गाळ साठवण तलाव आणि शेतात तळे तयार करून पाणी साठवता येते. आधुनिक सिंचन पद्धती आणि पीक पद्धतीत बदल केल्यास पाण्याची बचत होईल. नागरिकांची भूमिका यात महत्त्वाची आहे. पाणी वाचवणे, अनावश्यक वापर टाळणे आणि गळती दुरुस्त करणे या सवयी अंगीकारल्यास परिस्थितीत सुधारणा होऊ शकते. शाळा आणि सामाजिक संस्थांनी जनजागृती करणे आवश्यक आहे. हवामान बदल हा दीर्घकालीन घटक असून भविष्यासाठी नवीन जलस्रोत विकसित करणे आणि जलव्यवस्थापन प्रभावी करणे गरजेचे आहे. एकूणच, पुण्यातील पाणीटंचाई ही नैसर्गिक आणि मानवनिर्मित कारणांमुळे वाढलेली आहे. शासन, प्रशासन आणि नागरिक यांच्यात समन्वय आवश्यक आहे. योग्य नियोजन आणि जनजागृतीतूनच यावर नियंत्रण मिळवता येईल. 'जल है तो कल है' हे लक्षात घेऊन पाण्याची बचत हीच काळाची गरज आहे.

फीड फीडबर्नर 22 Apr 2026 8:10 am

चला, पुन्हा जोडू या मातीशी नाते!

जागतिक वसुंधरा दिनजागतिक वसुंधरा दिवसाच्या निमित्ताने यंदा 'आपली शक्ती, आपला ग्रह' ही संकल्पना जगभर राबवली जात आहे. केवळ मेसेज फॉरवर्ड करण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीतून पृथ्वीला हिरवेगार कसे ठेवता येईल? देशी बियाणे, सेंद्रिय कापूस आणि प्लास्टिकमुक्तीच्या वाटेवरचे आपले पाऊल किती महत्त्वाचे आहे? जाणून घेऊ या या लेखातून...कच्च्या तेलाच्या वाढत्या दरामुळे पॉलिस्टर महागले आणि कापसाची मागणी वाढली. काही वर्षांपूर्वी कापसाचे ‘बीटी बियाणे’ (जनुकीय सुधारित) विकसित झाले. या बियाणांमुळे उत्पादन वाढत असले तरी, कालांतराने त्याचे गंभीर दुष्परिणाम समोर येत आहेत. बीटी कापसाचा पालापाचोळा जमिनीत कुजल्यावर मातीतील सूक्ष्म जीवाणूंवर विपरीत परिणाम होतो. दरवर्षी नवीन बियाणे विकत घ्यावे लागते आणि मातीचा कस कमी झाल्याने रासायनिक खतांचा वापर अनिवार्य ठरतो, ज्यामुळे शेतीचा खर्च वाढतो. तसेच, बेकायदा 'एचटी बीटी' बियाणांमुळे ‘ग्लायफोसेट’सारख्या तणनाशकांचा वापर वाढून पर्यावरणास घातक तणे तयार होतात. कापूस म्हणजे “पांढरे सोने”; सिंधू संस्कृतीच्या अभ्यासानुसार भारतात सुमारे ७००० वर्षांपासून कापूस पिकवला जात आहे. हे 'कापूस पुराण' मांडण्याचे कारण म्हणजे २२ एप्रिल रोजी साजरा होणारा 'वसुंधरा दिवस'. पृथ्वीच्या संरक्षणाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि जनजागृती करण्याचा हा एक महत्त्वाचा दिवस.आज आपण वापरतो ते कपडे खरोखरच पर्यावरणस्नेही आहेत का? वस्त्रोद्योगात ७०,००० हून अधिक कृत्रिम रसायने वापरली जातात, त्यापैकी केवळ २ टक्के सुरक्षित आहेत. 'पर्यावरणस्नेही कापड' म्हणजे ते उत्पादनाच्या प्रत्येक टप्प्यावर नैसर्गिक असावे. कॉर्पोरेट कंपन्यांनी ग्राहकांचा जो गोड गैरसमज करून दिला आहे, त्याला ‘बाहेर बरवा, आत हिरवा’ ही म्हण चपखल लागू पडते. या क्षेत्रात श्रीरंग देवबा लाड यांनी स्वतःचे नैसर्गिक तंत्रज्ञान विकसित केले, ज्याबद्दल त्यांना २०२६ मध्ये ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी कापसाच्या फांद्यांचा सखोल अभ्यास करून शेंडा खुडणी, अतिघन लागवड आणि ठिबक सिंचन यांसारख्या नैसर्गिक पद्धती अवलंबल्या. यामुळे बोंडाचे वजन वाढले, किडींचा प्रादुर्भाव कमी झाला आणि मातीचा ओलावा टिकून राहिल्याने शेतकऱ्यांचे उत्पादन खर्च कमी होऊन नफा वाढला.दुसरे उदाहरण व्ही. आर. अनंथू यांचे आहे. त्यांनी शेतकऱ्यांना जनुकीय बियाणे व रसायने सोडून शाश्वत देशी बियाणे वापरण्याचे प्रशिक्षण दिले. देशी कापसाचे ‘सरळ वाण’ संरक्षित करून, सेंद्रिय पद्धतीने कापूस उत्पादन ते कापड विघटनापर्यंतची सर्व प्रक्रिया नैसर्गिक ठेवली. कुशल कामगारांकडून हातमागावर विणलेल्या या कापडाला अपराजिता, हळद, मंजिष्ठा आणि पळस यांसारख्या नैसर्गिक रंगांनी सजवले जाते. अगदी बटणेही नारळाच्या करवंटीपासून बनवली जातात. हे कापड नैसर्गिक असल्याने त्याचे विघटनही सहज होते, अशा प्रकारे खऱ्या अर्थाने वसुंधरेचे देणे वसुंधरेला परत दिले जाते.वसुंधरा दिवसाची सुरुवात १९७० मध्ये अमेरिकेत झाली. युनेस्को परिषदेत शांतता कार्यकर्ते जॉन मॅककॉनेल यांनी मांडलेल्या प्रस्तावानंतर, सिनेट सदस्य गेलॉर्ड नेल्सन यांनी या दिवसाची अधिकृत सुरुवात केली. आज १९० हून अधिक देशांत हा दिवस साजरा होतो.सध्या आपली पृथ्वी हवामान बदल, प्रदूषण आणि जंगलतोड यांसारख्या संकटांचा सामना करत आहे. निसर्गाचे रक्षण ही केवळ सरकारची नाही, तर प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे. या वर्षीच्या वसुंधरा दिनाची संकल्पना ‘आपली शक्ती, आपला ग्रह’ ही आहे. यात 'आपली शक्ती' म्हणजे प्रत्येक मानवाचे वैयक्तिक योगदान. आपण पुढील गोष्टी करू शकतो.१. वृक्षारोपण : केवळ झाडे लावू नका, ती जगवा.२. प्लास्टिक त्याग : एकेरी वापराच्या प्लास्टिकवर बंदी घालून कापडी पिशव्या वापरा.३. बचत : पाणी आणि विजेचा अपव्यय टाळा.४. कचरा व्यवस्थापन : ओला व सुका कचरा वेगळा करून 'पुनर्वापर' संस्कृती रुजवा.५. कमी प्रदूषण : जवळच्या प्रवासासाठी सायकल वापरा किंवा चालत जा.निसर्ग आपली गरज पूर्ण करू शकतो, पण हाव नाही, हे महात्मा गांधींचे विचार आजही लागू होतात. पृथ्वी आपली माता आहे आणि वाढत्या स्वार्थामुळे आपण तिचे शोषण करत आहोत. वसुंधरा दिवस हा केवळ एक दिवसाचा सोहळा न राहता, तो आपल्या जीवनशैलीचा भाग बनायला हवा. आपली पृथ्वी हिरवीगार आणि प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी आपण सदैव कटिबद्ध राहू या.

फीड फीडबर्नर 22 Apr 2026 8:10 am

‘ढोकमध्ये लपले होते पहलगामचे दहशतवादी, भात खाऊ घालून आश्रय दिला’:NIAच्या आरोपपत्रात- खजूर आणि सिगारेट सोबत आणले होते; 1113 लोकांची चौकशी

काश्मीरमध्ये पोनी (म्हणजे घोडा) चालवणारे बशीर अहमद आणि परवेझ अहमद यांनी पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्यांना केवळ आपल्या घरात थांबवले नाही, तर ठिकाणाची माहितीही दिली. आपल्या ढोक (म्हणजे झोपडी) मध्ये दहशतवाद्यांना चहा पाजला, जेवण दिले. पॉलिथीनमध्ये भाजी-पोळी पॅक करून दिली. ते दहशतवादी आहेत हे माहीत असूनही पोलीस किंवा सुरक्षा दलांना माहिती दिली नाही. NIA ने आपल्या आरोपपत्रात हे खुलासे केले आहेत. तपासादरम्यान NIA ने एकूण 1,113 साक्षीदारांचे जबाब नोंदवले. यात 31 शाल विक्रेते, 543 ढोक (म्हणजे झोपडी) मध्ये राहणारे लोक, 117 पोनी चालवणारे, 69 पशु मालक, 42 छायाचित्रकार, 54 ढाबा-भेळपुरी आणि चहा विक्रेते, 36 तिकीट काउंटर-झिपलाइन वाले, 25 टॅक्सी चालक, 19 दुकान मालक, 23 इतर जिल्ह्यांतील संशयित आणि इतर 54 लोक यांचा समावेश होता. चार्जशीटनुसार, हल्ल्याचा कट पाकिस्तानात बसलेल्या साजिद सैफुल्ला जट्ट उर्फ अली भाईने रचला, जो लष्कर-ए-तैयबाशी संबंधित आहे. एनआयएने त्याच्यावर 10 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. त्यानेच हल्ल्यासाठी ठिकाण सांगितले आणि निर्देशांक पाठवले होते. तीन पाकिस्तानी दहशतवादी भारतात घुसले आणि हल्ला केला. पहलगाम हल्ल्याच्या पहिल्या वर्षपूर्तीनिमित्त वाचा इनसाइड स्टोरी… साक्षीदाराचा खुलासा: बशीरला शस्त्रधारी लोकांसोबत जाताना पाहिलेचार्जशीटमध्ये एका साक्षीदाराला X-1 असे नाव देण्यात आले आहे. त्याने खुलासा केला, ‘मी हिल पार्कच्या रस्त्याने घरी परतत होतो. मी बशीर अहमद जोठारला शस्त्रधारी तीन लोकांना इशारा करताना पाहिले. नंतर सर्वांना बशीरचा भाचा परवेझ अहमदच्या झोपडीत जाताना पाहिले. मी परवेझलाही ओळखतो.' 'दुसऱ्या दिवशी म्हणजेच २२ एप्रिल रोजी मी नेहमीच्या कामासाठी बैसरन घाटीत गेलो. अजानच्या वेळेच्या आसपास मी परवेझ अहमद आणि बशीर अहमद जोठार यांना तिथे फिरताना पाहिले.’ हल्ल्याच्या वेळी X–1 घटनास्थळी होता. तिन्ही दहशतवाद्यांनी त्यालाही थांबवले आणि कलमा वाचायला सांगितले. कलमा वाचल्यावर त्याला जाऊ दिले. दूरून त्याने दहशतवाद्यांना गोळीबार करताना पाहिले. X–1 ने तिन्ही दहशतवाद्यांची ओळख पटवली आहे. परवेझ म्हणाला- मामा आत आला आणि आम्हाला गप्प राहायला सांगितलेपरवेझ अहमदने चौकशीत सांगितले, ‘२१ एप्रिल, २०२५ रोजी संध्याकाळी ५ वाजता मी आणि पत्नी घरात चहा बनवण्याची तयारी करत होतो. तेव्हा माझा मामा बशीर अहमद जोठार आत आला आणि आम्हाला गप्प राहायला सांगितले. तो बाहेर गेला आणि काही मिनिटांनी परत आला. त्याच्या मागे तीन लोक होते, ज्यांच्या हातात शस्त्रे होती.’ ‘ते आत येऊन बसले. पाणी मागताना ते म्हणाले की, ते खूप दूरून आले आहेत. थकले आहेत आणि तहानलेले आहेत. पाणी प्यायल्यानंतर ते म्हणाले की, अल्लाहच्या मार्गात लढणाऱ्या आणि काश्मिरी मुस्लिमांच्या स्वातंत्र्यासाठी जिहाद करणाऱ्यांना पाणी पाजल्यास मला सवाब मिळेल.’ ‘ते उर्दू बोलत होते, ज्यात पंजाबी स्पर्श होता. ते काश्मिरी वाटत नव्हते. मला जाणवले की ते मुजाहिद होते. त्यांनी मला बॅग आणि पाऊच लपवायला सांगितले. मी त्यांना ढोकमध्ये पडलेल्या ब्लँकेट्स, बिछान्याखाली लपवले. पत्नी ताहिराला सर्वांसाठी चहा बनवायला सांगितले. तिन्ही मुजाहिद ढोकच्या भिंतीला टेकून बसले होते. ‘ या खुलाशानंतर बशीर अहमद जोठारची चौकशी करण्यात आली. बशीर आणि परवेझला 22 जून, 2025 रोजी अटक करण्यात आली. बशीरचा खुलासा: झाडांच्या मागून तीन सशस्त्र लोक आले बशीर अहमद जोठारने खुलासा केले की, 19 आणि 20 एप्रिल रोजी पाण्यामुळे मी बैसरन घाटीत गेलो नव्हतो. 21 एप्रिल रोजी संध्याकाळी 4 वाजण्याच्या सुमारास मी माझ्या घोड्याला पाहण्यासाठी जंगलात गेलो. तेव्हा झाडांच्या मागून तीन सशस्त्र व्यक्ती समोर आले. त्यांनी मला सांगितले की, आम्हाला सुरक्षित ठिकाणी घेऊन चला आणि अल्लाहच्या नावाने जेवणाची व्यवस्था करा. हे ऐकताच मला जाणवले की हे मुजाहिद आहेत. मी त्यांना परवेजच्या ढोकजवळ घेऊन गेलो आणि सांगितले की, येथे थांबून माझ्या इशाऱ्याची वाट पहा. मी परवेजच्या ढोकमध्ये शिरलो आणि परवेज-ताहिराला शांत राहण्यास सांगितले. आजूबाजूला नजर टाकल्यानंतर मी त्यांना हातांनी इशारा केला. मग ते माझ्या मागोमाग परवेजच्या ढोकमध्ये आत आले. ते एकमेकांना भाईजान म्हणत होते. ताहिराने सर्वांसाठी चहा बनवला. लहान उंचीच्या एका मुजाहिदने जेवण बनवण्यास सांगितले. मी ताहिराला भात आणि कच्चे टोमॅटो बनवण्यास सांगितले. जेवण करत असताना त्यांनी माझ्याशी अमरनाथ यात्रेबद्दल बोलले. सुरक्षा छावण्या आणि परिसरात जवानांच्या हालचालींबद्दल विचारले. ते आमच्याशी उर्दू आणि पंजाबीमध्ये बोलत होते. आपसात पंजाबीमध्ये बोलत होते. त्यांच्या बोलण्यात मी साजिदचे नाव ऐकले. जेवणानंतर त्यांनी ताहिराला पोळ्या बांधायला सांगितल्या. हळद, मिरची आणि मीठही घेऊन गेले होते बशीरने पुढे सांगितले, ‘परवेजने जुन्या कपड्याच्या तुकड्यात 10 पोळ्या बांधल्या आणि एका पॉलिथीनमध्ये भाजी ठेवली. मुजाहिदांनी एका पॉलिथीनमध्ये हळद, मिरची आणि मीठही घेतले. त्यांनी परवेजच्या ढोकवरून एक पातेले आणि पळीही घेतली. मी ढोकला पाण्यापासून वाचवण्यासाठी जी मोठी पॉलिथीन ठेवली होती, ती एका मुजाहिदाने घेतली.’ त्यांच्याकडे सिगारेट, टॉफी आणि खजूरही होते. ते सुमारे 5 तास ढोकमध्ये राहिले आणि रात्री 10 वाजता एक-एक करून बाहेर पडले. बाहेर पडताना लहान उंचीच्या मुजाहिदाने परवेजला 3 हजार रुपये दिले. मुजाहिद गेल्यानंतर 5 मिनिटांनी मीही निघून गेलो. ‘22 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास मी परवेजला हिल पार्क पोनी स्टँडजवळ भेटलो. आम्ही आमच्या घोड्यांवरून दोन पर्यटकांना घेऊन बैसरन घाटीत पोहोचलो. त्यांना मुख्य गेटवर सोडल्यानंतर परवेज आणि मी घोड्यांना मुख्य गेटजवळच बांधले. आम्ही पार्कमध्ये फिरत असताना, आम्हाला तेच तीन लोक पार्कच्या कुंपणाजवळ बसलेले दिसले.’ ‘आम्ही लगेच मुख्य गेटकडे आलो आणि ज्या पर्यटकांना घेऊन गेलो होतो, त्यांच्या येण्याची वाट पाहू लागलो. दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास पोनी स्टँडवरून निघालो. मी पहलगाम मार्केटमध्ये असताना, मला एका पोनीवाल्याने सांगितले की बैसरनमध्ये दहशतवादी हल्ला झाला आहे, ज्यात अनेक पर्यटक मारले गेले आहेत. हल्ल्यानंतर मी हिल पार्कजवळील ढोक सोडून खैय्यारमधील माझ्या घरी स्थलांतरित झालो. पकडले जाण्याच्या भीतीने मी याबद्दल कोणाशीही बोललो नाही.’ चकमकीत तिन्ही दहशतवादी ठार 28 जुलै, 2025 रोजी श्रीनगरमधील डाचीगामच्या महादेव हिल्समध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यात तीन दहशतवादी मारले गेले. त्यांच्याजवळ सापडलेल्या शस्त्रांच्या फॉरेन्सिक तपासणीतून पुष्टी झाली की तीच शस्त्रे बैसरनमध्ये झालेल्या हल्ल्यात वापरली गेली होती. या चकमकीदरम्यान एक GoPro कॅमेरा सापडला. मोबाईल डेटाच्या विश्लेषणातून दहशतवादी नेटवर्कशी संबंध असल्याचे सिद्ध झाले. तपासणीत असे आढळून आले की 21 डिसेंबर 2023 रोजी लष्करी वाहनावर हल्ला, 4 मे 2024 रोजी वायुसेनेच्या वाहनावर हल्ला, 9 जून 2024 रोजी शिव खोरी यात्रेकरूंवर हल्ला, 20 ऑक्टोबर रोजी APCO कंपनीवर हल्ला आणि 22 एप्रिल 2025 रोजी बैसरनमध्ये झालेल्या हल्ल्यात जप्त केलेली शस्त्रे सारखीच होती. चौकशीत हे सिद्ध झाले की तिन्ही दहशतवाद्यांना पाकिस्तानात बसलेल्या लष्कर-ए-तैयबाचा कमांडर साजिद जट्टकडून सूचना मिळत होत्या. हा हल्ला पूर्वनियोजित कट होता, जो पाकिस्तानमधून चालवला गेला आणि स्थानिक पातळीवर मदत घेण्यात आली. साजिद जट्ट थेट दहशतवादी सुलेमानच्या संपर्कात होता. सुलेमानच्या फोनमध्ये 'अल्पाइन क्वेस्ट' (alpine quest) ॲप डाउनलोड होते. यावर इंटरनेटशिवाय कोणत्याही ठिकाणाचे कोऑर्डिनेट्स (निर्देशांक) मिळतात. ॲपमध्ये आधीच बैसरन घाटीचे लोकेशन (स्थान) सेट केले होते. घटनास्थळावरून जप्त केलेल्या ब्लँकेट आणि सामानावर बशीर आणि परवेझचा डीएनए (DNA) आढळला. मोबाइल फोनच्या तपासणीत असे आढळून आले की दहशतवाद्यांचे फोन पाकिस्तानातून खरेदी केले होते आणि त्यात त्यांची छायाचित्रेही होती. कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) वरून हे देखील सिद्ध झाले की बशीर आणि परवेझ घटनेच्या वेळी त्याच परिसरात उपस्थित होते. दोन्ही स्थानिक आरोपींनी आधीच मोठ्या प्रमाणात रेशन खरेदी केल्याचे पुरावेही मिळाले. ते आधीपासूनच दहशतवाद्यांना पाठिंबा देण्याच्या तयारीत असावेत अशी शक्यता आहे. या हल्ल्यात लष्कर-ए-तैयबा आणि द रेसिस्टन्स फ्रंट यांचा सहभाग होता. काश्मीरमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणे, पर्यटन उपक्रम थांबवणे आणि देशविरोधी कारवायांना प्रोत्साहन देणे हा त्याचा उद्देश होता. खटला सध्या ट्रायल स्टेजमध्येNIA पोलीस स्टेशन जम्मू येथे FIR क्रमांक RC-02/2025/NIA/JMU अंतर्गत 27 एप्रिल 2025 रोजी गुन्हा दाखल झाला. हा खटला NIA कायदा 2008 अंतर्गत जम्मू येथील विशेष न्यायालयात सादर करण्यात आला आहे आणि आरोपपत्र क्रमांक 03/2025 दाखल झाले आहे. खटला ट्रायल स्टेजमध्ये आहे. यानंतर आरोप निश्चित केले जातील आणि खटला चालेल, ज्यामध्ये साक्षीदारांचे जबाब आणि पुरावे सादर केले जातील. सर्व पक्षांचे म्हणणे ऐकल्यानंतर न्यायालय निकाल देईल.

दिव्यमराठी भास्कर 22 Apr 2026 7:38 am

पहलगाममध्ये 75% पर्यटक घटले; मार्गदर्शक उद्ध्वस्त, गाड्या-घोडे विकले:6 पर्यटन स्थळे बंद, दहशतवाद्यांशी लढलेल्या आदिलच्या कुटुंबाला एक वर्षानंतर मिळाले घर

पहलगामची बैसरन दरी. हिरव्यागार दऱ्या आणि गवताळ प्रदेशाने भरलेली. काश्मीरला येणारे पर्यटक येथे नक्की यायचे. बरोबर एक वर्षापूर्वी 22 एप्रिल रोजीही आले होते. तेव्हा जंगलातून तीन दहशतवादी आले आणि 13 मिनिटांत 26 लोकांची हत्या केली. बैसरन दरी ओस पडली. पूर्ण वर्ष उलटले, पण अजूनही ओसाडपणा कायम आहे. येथे आता पूर्वीसारखे पर्यटक येत नाहीत. लोकांना दरी फिरवणारे मार्गदर्शक (गाईड) उद्ध्वस्त झाले. त्यांचे घोडे आणि गाड्याही विकल्या गेल्या. पहलगाममध्ये हल्ला करणारे तिन्ही दहशतवादी मारले गेले, भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानकडून सूड घेतला, पण बैसरन दरीत काहीही बदलले नाही. मुंबईची मुनिजा कुटुंबासोबत काश्मीर फिरायला आल्या, तेव्हा पहलगामलाही पोहोचल्या. त्यांना बैसरन दरीत जायचे होते, पण त्या जाऊ शकल्या नाहीत, कारण हल्ल्यानंतर दरी पुन्हा उघडलीच नाही. पहलगाम हल्ल्यानंतर काय बदलले 1. 48 पैकी 6 पर्यटन स्थळे अजूनही बंद, सुरक्षा मंजुरी मिळाल्यानंतर उघडतील हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये 48 पर्यटन स्थळे बंद करण्यात आली होती. यापैकी 42 पुन्हा उघडण्यात आली. 6 अजूनही बंद आहेत. बैसरन खोऱ्याव्यतिरिक्त चंदनवाडी, गुरेज, अथवटो, बंगस आणि रामकुंडचे सुरक्षा पुनरावलोकन (सिक्युरिटी रिव्ह्यू) सुरू आहे. मंजुरी मिळाल्यानंतर (क्लिअरन्स मिळाल्यानंतर) ती उघडली जाऊ शकतात. दहशतवादी हल्ल्यापूर्वी एप्रिल, जून आणि जुलैमध्ये दररोज 10 हजारांहून अधिक पर्यटक पहलगामला येत होते. आता फक्त 2000 ते 2500 येतात. आता बैसरन घाटी कधी उघडेल, हा प्रश्न आम्ही जम्मू-काश्मीर पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांच्या अधिकाऱ्यांना विचारला. त्यांनी अधिकृतपणे (ऑफिशियली) बोलण्यास नकार दिला, परंतु सांगितले की सध्या येथील सुरक्षा तपासली जात आहे. मंजुरी मिळाल्यानंतरच (क्लिअरन्स मिळाल्यानंतरच) निर्णय घेतला जाईल. 2. घोडेवाले, दुकानदारांच्या ओळखीसाठी QR कोड असलेले कार्ड संवेदनशील पर्यटन स्थळांची यादी तयार करण्यात आली आहे. येथे पर्यटकांच्या थेट संपर्कात येणाऱ्या स्थानिक लोकांची पडताळणी केली जाईल. त्यांना QR कोड असलेले कार्ड दिले जात आहे. ते स्कॅन करताच, त्यांची माहिती, फोन नंबर, आधार नंबर आणि पत्त्याची माहिती मिळेल. याची सुरुवात याच आठवड्यात पहलगाममध्ये झाली आहे. मुंबईहून आलेल्या पर्यटक मुनिजा मोहम्मद मेरीशा सांगतात, ‘पहलगाम हल्ल्यामुळे थोडी घाबरले होते. येथे फिरल्यानंतर भीती नाही. सुरक्षिततेवर काम सुरू आहे. प्रत्येक घोडेवाल्याकडे एक QR कोड आहे. तो स्कॅन केल्यावर आपण योग्य व्यक्तीसोबत फिरायला आलो आहोत हे कळते.’ मुनिजा याचा अनुभव सांगतात, ‘मी एका घोडेवाल्याशी बैसरन घाटीला जाण्याबद्दल बोलत होते. त्याने आपली ओळख पटवण्यासाठी QR कोड दाखवला. तो स्कॅन करताच त्याची संपूर्ण माहिती आली. नाव- मोहिद्दीन मागरे. पत्ता- पहलगाम. फोन नंबर 9469******. आधार नंबर 4491********. व्यवसाय-पोनी मॅन. पोलीस पडताळणी- होय.’ टूरिस्ट गाईड जब्बार अहमद मागरे म्हणतात की, QR कोड सुरू करून सरकारने चांगले काम केले आहे. यामुळे घोडेवाले, कॅमेरावाले आणि दुकानदार यांची योग्य ओळख पटत आहे. आतापर्यंत 165 पेक्षा जास्त घोडेवाल्यांना कार्ड जारी करण्यात आले आहेत. आम्ही सर्वात आधी पर्यटकांना कार्डच दाखवतो. गाडीवाले आणि दुकानदार, सर्वांचे वेगवेगळे QR कोड आहेत. 3. दहशतवाद्यांच्या मदतनीसांविरोधात आरोपपत्र पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ओव्हरग्राउंड वर्कर्सविरुद्ध जम्मू NIA कोर्टात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. खटला सुरू झाला आहे. 1300 पानांच्या आरोपपत्रात हल्ल्याचा कट पाकिस्तानात रचल्याचे पुरावे देण्यात आले आहेत. पाकिस्तानी दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा आणि द रेजिस्टेंस फ्रंटसह 7 आरोपी बनवण्यात आले आहेत. आरोपपत्रात पाकिस्तानी हँडलर सज्जाद जट्टचे नावही आहे. 4. दहशतवाद्यांशी भिडलेल्या आदिलच्या पत्नीला नोकरी, कुटुंबाला घर मिळाले काश्मिरी युवक सय्यद आदिल हुसेन 22 एप्रिल, 2025 रोजी पर्यटकांसोबत बैसरन घाटीत गेले होते. दहशतवाद्यांनी हल्ला केला, तेव्हा ते पर्यटकांना वाचवण्यासाठी एका दहशतवाद्याशी भिडले. त्याची रायफल पकडली. आदिलला दहशतवाद्याने तीन गोळ्या मारल्या. कुटुंबाची जबाबदारी 29 वर्षांच्या आदिलवरच होती. जम्मू-काश्मीर सरकारने त्यांची पत्नी गुलनाज अख्तर यांना सरकारी नोकरी दिली आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या हापतनार गावात घर बांधून दिले आहे. आदिलचा भाऊ नौशाद म्हणतो, 'त्याच्या मृत्यूमुळे आम्हाला दुःख होते, पण त्याहून अधिक अभिमान वाटतो. त्याने दहशतवाद्यांसमोर गुडघे टेकले नाहीत.' टूर ऑपरेटर म्हणाले- EMI भरू शकत नाही, बँकवाले गाडी घेऊन जातील जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरपासून सुमारे 90 किमी दूर पहलगाम आणि पहलगामपासून 6 किमी दूर बैसरन व्हॅली आहे. गवताची मोठी मैदाने, देवदारची घनदाट जंगले, बर्फाच्छादित पर्वतांमुळे ही जागा स्वित्झर्लंडची आठवण करून देते. म्हणूनच याला मिनी स्वित्झर्लंड असे नाव पडले. येथे फक्त घोडेस्वारी करून किंवा ट्रेकिंग करूनच जाता येते. ज्या ठिकाणाहून पर्यटक आपला प्रवास सुरू करत असत, तिथे बरेच घोडे आणि मार्गदर्शक उपलब्ध असत. एक वर्षानंतरही ते भेटले, पण आधीपेक्षा खूप कमी. दरीचा रस्ता दाखवणारा फलकही काढून टाकण्यात आला. पहलगामपासून 2-3 किमी दूर कनहमर्ग आहे. आता मार्गदर्शक लोकांना तिथेच फिरवायला घेऊन जातात. बैसरन व्हॅलीकडे कोणीही जाऊ शकत नाही. टूर ऑपरेटर मोहम्मद शफी सांगतात की, बैसरन व्हॅली पहलगाममधील सर्वात आवडते ठिकाण आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर 8-9 महिने पहलगाम पूर्णपणे बंद होते. दीड-दोन महिन्यांपासून पर्यटक यायला सुरुवात झाली आहे. बैसरन व्हॅलीसोबत चंदनवाडीही बंद आहे. त्यामुळे फक्त 20% पर्यटक येत आहेत. स्थळे बंद असल्यामुळे तेही लवकर परत जातात.’ ‘लवकरच दरी उघडली जाईल असे सांगण्यात आले आहे, पण अजून अंतिम निर्णय झालेला नाही. पोलिस आणि एजन्सींनी संपूर्ण सुरक्षा तपासणी करावी. किमान चंदनवाडी तरी उघडायला हवी. चंदनवाडीत बर्फ असतो. पर्यटक तेच पाहण्यासाठी येतात. आमच्या गाड्यांचे हप्ते बाकी आहेत. जर ही पर्यटन स्थळे उघडली नाहीत, तर हप्ते भरता येणार नाहीत. बँकवाले गाडी घेऊन जातील. चंदनवाडीवर पोलिस चौकी आहे, सैन्य तैनात आहे. ते उघडले जाऊ शकते. बैसरन दरी भले बंद ठेवावी.’ पहलगाममधील पोनी मॅन असोसिएशनचे अध्यक्ष बिलाल अहमद म्हणतात, ‘एक वर्षानंतरही आमचे काम बंद आहे. अनेक लोकांनी आपले घोडे आणि गाड्या विकल्या. काही पर्यटन स्थळे उघडल्याने काम सुरू झाले आहे. रोज 200-500 रुपयांची कमाई होत आहे. आम्ही मागणी करत आहोत की आणखी काही स्थळे उघडली जावीत.’ ‘आता पर्यटक येत आहेत. आम्ही त्यांना इकडे-तिकडे फिरवतो. यामुळे पर्यटक खूश होत नाहीत. ते तर बैसरन दरी आणि चंदनवाडी फिरण्यासाठी येतात. यापैकी कोणतेही उघडले, तर चांगले राहील. येथे आता खूप सुरक्षा आहे. आम्ही लोकही समजलो आहोत की कोणत्या प्रकारचे लोक वाईट आहेत आणि त्यांच्यापासून दूर राहायचे आहे.’ 22 एप्रिल 2025 चा दिवस, जेव्हा बैसरन दरीत हल्ला झाला दुपारी साधारण 2 वाजताची गोष्ट आहे. पर्यटकांचे गट दरीत व्हिडिओ-फोटो शूट करत होते. त्याच वेळी तीन दहशतवादी जंगलातून आले आणि गोळ्या झाडू लागले. पहिली गोळी साधारण 2.20 वाजता चालली. सुरुवातीला कोणालाच समजले नाही की काय झाले आहे. जेव्हा मृतदेह पडू लागले, तेव्हा वाटले की हल्ला झाला आहे. लोक वाचण्यासाठी पळाले, पण त्या मैदानात लपण्याची जागाच नव्हती. हल्ल्यात एकूण 26 लोक मारले गेले. पहलगाम हल्ल्याच्या १५ दिवसांनंतर, भारताने ७ मे रोजी रात्री दीड वाजता पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या ९ ठिकाणांवर हवाई हल्ला केला. भारताने कोटली, बहावलपूर, मुरीदके, बाग आणि मुझफ्फराबादमध्ये हवाई हल्ला केला. यात दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाचे मुख्यालय आणि जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहरचे ठिकाण समाविष्ट आहे. मुझफ्फराबाद ही पाकिस्तानव्याप्त काश्मीरची राजधानी आहे आणि येथूनच दहशतवादी नेटवर्क चालवले जाते. ऑपरेशन सिंदूरमध्ये १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले. यात कंदाहार विमान अपहरण, पठाणकोट आणि संसद हल्ल्यात सामील असलेला अब्दुल रऊफ अजहरचाही समावेश आहे. रऊफ जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मौलाना मसूद अजहरचा भाऊ होता.

दिव्यमराठी भास्कर 22 Apr 2026 7:23 am

मुस्लिमबहुल 6 जिल्ह्यांमध्ये आहेत ममतांचे प्राण:TMCच्या निम्म्या जागा येथूनच; ममतांच्या ‘चिकेन नेक’वर भाजप पकड मजबूत करणार का?

तारीख- २५ फेब्रुवारी २०२६, ठिकाण- पूर्णिया विमानतळ. विमानतळाच्या धावपट्टीवर बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी, केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय, भाजप प्रदेशाध्यक्ष संजय सरावगी यांच्यासह अनेक नेते आणि अधिकारी उभे होते. सायंकाळी सुमारे ५ वाजता बीएसएफचे एक विशेष विमान उतरले. पांढरा कुर्ता-पायजमा आणि गमछा परिधान केलेले गृहमंत्री अमित शाह बाहेर आले. एमआय-१७ व्ही५ हेलिकॉप्टरने शाह थेट किशनगंजला पोहोचले. पुढील तीन दिवस शाह यांनी परिसरातील सर्व जिल्हाधिकारी, एसपी, केंद्रीय दल आणि सुरक्षा यंत्रणांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. २७ फेब्रुवारीच्या सायंकाळी ते दिल्लीला परतले. शाह यांच्या या दौऱ्यानंतर एक कटकारस्थान सिद्धांत (कॉन्सपिरेसी थ्योरी) पसरला की, केंद्र सरकार एक केंद्रशासित प्रदेश बनवण्याच्या तयारीत आहे, ज्यात बिहारच्या सीमांचल भागातील 4 जिल्हे आणि पश्चिम बंगालच्या चिकन नेक किंवा सिलीगुडी कॉरिडॉरमधील 8 जिल्ह्यांचा समावेश असू शकतो. पश्चिम बंगाल निवडणुकीच्या अगदी आधी ममता बॅनर्जींना हरवण्यासाठी ही एक रणनीती आहे, असे म्हटले गेले. ही चर्चा इतकी तीव्र झाली की, प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (पीआयबी) ला याला अफवा ठरवून फेटाळून लावावे लागले. या कटकारस्थान सिद्धांताची (कॉन्सपिरेसी थ्योरीची) सत्यता आणि ममतांच्या खऱ्या चिकन नेकची संपूर्ण कहाणी; जाणून घेऊया आजच्या इलेक्शन एक्सप्लेनरमध्ये… चिकन नेकला केंद्रशासित प्रदेश (UT) बनवण्याची मागणी यापूर्वीही झाली होती उत्तर बंगालमधील ८ जिल्हे त्या भौगोलिक प्रदेशात वसलेले आहेत, ज्याला जग सिलीगुडी कॉरिडॉर किंवा चिकन नेक म्हणून ओळखते. केवळ ४० किमी लांब आणि २२ ते ३० किमी रुंद असलेला हा मार्ग ईशान्येकडील सात राज्यांना भारताच्या उर्वरित भागाशी जोडतो. एका बाजूला नेपाळ, दुसऱ्या बाजूला बांगलादेश आणि फक्त २०० किमी अंतरावर चीन आहे. उत्तर बंगाल वेगळा करण्याची मागणी सर्वप्रथम जून २०२१ मध्ये पुढे आली होती, जेव्हा अलीपूरद्वारचे भाजप खासदार जॉन बारला यांनी म्हटले होते की, या जिल्ह्यांना एकत्र करून केंद्रशासित प्रदेश बनवण्यात यावा. ममतांनी तत्काळ विरोध केला. परंतु स्वतः भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी बारला यांच्यापासून हे सांगत स्वतःला दूर केले की, बंगालचे विभाजन करणे हा आमचा अजेंडा नाही. तीन वर्षांनंतर जुलै 2024 मध्ये, गोड्डाचे भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी लोकसभेत हीच मागणी मोठ्या प्रमाणावर मांडली. झारखंडमधील संथाल परगणातील 6 जिल्हे, बिहारमधील सीमांचलचे 4 जिल्हे आणि बंगालमधील मालदा, मुर्शिदाबादसह उत्तर बंगालचे काही भाग - या सर्वांना एकत्र करून केंद्रशासित प्रदेश (UT) बनवण्याची मागणी केली. यामागे तर्क असा होता की या भागांमध्ये मुस्लिम लोकसंख्या वेगाने वाढत आहे. पण संसदेत यावर चर्चा झाली नाही, ना भाजपने याला अधिकृत भूमिका बनवले. आता 2026 मध्ये बंगाल निवडणुकीच्या अगदी आधी शाह यांच्या सीमांचल भेटीनंतर हीच चर्चा तिसऱ्यांदा समोर आली. उत्तर बंगाल ताब्यात घेतल्याने भाजपला विशेष निवडणुकीचा फायदा नाही राजकीयदृष्ट्या हा भाग सध्या भाजपच्या बाजूने झुकलेला आहे. 2021 मध्ये या 8 जिल्ह्यांमधील 54 जागांपैकी भाजपने 30 आणि टीएमसीने 24 जागा जिंकल्या. 2016 मध्ये येथे डाव्या पक्षांनी 25 जागा जिंकल्या होत्या, परंतु 2021 पर्यंत त्यांची जागा भाजपने घेतली. याचे कारण लोकसंख्याशास्त्र आहे. या 8 पैकी 6 जिल्ह्यांमध्ये हिंदू लोकसंख्या 73-81% च्या दरम्यान आहे. फक्त उत्तर दिनाजपूर आणि मालदामध्ये मुस्लिम लोकसंख्या 50% च्या जवळपास आहे आणि तिथे टीएमसी मजबूत आहे. म्हणजेच, उत्तर बंगालमध्ये भाजपची ताकद आणि टीएमसीची कमकुवतता या दोन्हीचे एकच कारण आहे - लोकसंख्याशास्त्र. पण हे अर्धे चित्र आहे. खरे चित्र दक्षिण बंगालमध्ये आहे. ममतांचा खरा ‘चिकन नेक’ आहेत हे 6 मुस्लिमबहुल जिल्हे पश्चिम बंगालमधील 23 जिल्ह्यांपैकी 6 मुस्लिमबहुल जिल्हे आहेत - मुर्शिदाबाद, मालदा, उत्तर दिनाजपूर, दक्षिण 24 परगणा, उत्तर 24 परगणा आणि बीरभूम. विधानसभेच्या 294 पैकी 118 जागा म्हणजेच 40% जागा याच जिल्ह्यांमध्ये आहेत. 2021 मध्ये टीएमसीने एकूण 215 जागा जिंकल्या होत्या - त्यापैकी 103 म्हणजेच 48% जागा याच 6 जिल्ह्यांमधून आल्या. या जिल्ह्यांमध्ये टीएमसीचा विजय दर 87% राहिला. भाजपला केवळ 14 जागा मिळाल्या. ही केवळ संख्या नाही. हा ममताच्या संपूर्ण निवडणूक गणिताचा पाया आहे. जर हा पाया डगमगला, तर ममताचे सरकार डगमगेल. आणि म्हणूनच या व्होटबँकेला समजून घेणे महत्त्वाचे आहे. 15 वर्षांत टीएमसीचा हा गड कसा बनला? डाव्यांच्या 34 वर्षांच्या राजवटीत मुस्लिम मतदार 'लाल झेंड्या'सोबत होते. दोन घटनांनी हे बदलले… 2011 मध्ये सत्तेत आल्यानंतर ममतांनी हे नाते धोरणांमध्ये बदलले. इमाम आणि मोअज्जिन यांच्यासाठी मासिक भत्ता, ऐक्यश्री शिष्यवृत्तीद्वारे लाखो अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना मदत आणि मुस्लिम जातींना ओबीसीमध्ये समाविष्ट करून आरक्षणाचा लाभ दिला. याशिवाय सांस्कृतिक जवळीक, जसे की - हिजाब घालून इफ्तार पार्टीला जाणे, इस्लामिक प्रार्थना करणे. भाजप याला तुष्टीकरण म्हणते, परंतु मुस्लिम मतदार याला त्यांच्या ओळखीचा सन्मान मानतात. जेव्हा NRC-CAA नंतर असुरक्षितता वाढली, तेव्हा ममतांनी स्वतःला मुस्लिमांची एकमेव ढाल असल्याचे सांगितले. हे कथन इतके मजबूत झाले की 2021 मध्ये भाजपने पूर्ण ताकद लावूनही मुस्लिम मतांमध्ये कोणतीही फूट पडली नाही. पश्चिम बंगालचे ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर मणि तिवारी यांचे मत आहे की, यावेळी SIR मध्ये बरीच नावे वगळण्यात आली आहेत. यामुळे थोडा उलटफेर होऊ शकतो. पण इथे भाजपचा एकतर्फी विजय होणार नाही. जर इथे भ्रष्टाचाराच्या मुद्द्याचा परिणाम झाला असता, तर ममता अनेक वर्षांपूर्वीच हरल्या असत्या. पण हा मुद्दा प्रभावी नाही. उत्तर आणि दक्षिण परगणामध्ये ममताच बऱ्याच अंशी मजबूत राहणार आहेत. त्यामुळे भाजपला ममतांच्या बालेकिल्ल्यात आव्हान देणे अजून सोपे नाही. मात्र, उत्तर बंगालमध्ये भाजप निश्चितच मजबूत राहील.

दिव्यमराठी भास्कर 22 Apr 2026 7:12 am

आजचे एक्सप्लेनर:निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल किती महाग होणार; इराण युद्धामुळे पाकिस्तानपासून अमेरिकेपर्यंत 44% वाढल्या किंमती, भारताने कसे रोखले

इराण युद्ध सुरू झाल्यापासून, पाकिस्तानात पेट्रोलची किंमत 320 पाकिस्तानी रुपयांवरून 460 रुपयांपर्यंत वाढली आहे, म्हणजेच केवळ 50 दिवसांत जवळपास 44% वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे, अमेरिकेत तेलाच्या किमती 42% आणि चीनमध्ये 31% नी वाढल्या. मात्र, भारतात याच काळात तेलाच्या किमती स्थिर राहिल्या. यामुळे तेल कंपन्यांना दररोज कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. भारतात तेलाच्या किमती का वाढल्या नाहीत? कंपन्या हे नुकसान कसे भरून काढत आहेत? आणि निवडणुकांनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढणार आहेत का? जाणून घ्या आजच्या एक्सप्लेनरमध्ये... प्रश्न 1: इराण युद्धादरम्यान जगभरात पेट्रोलच्या किमती कशा वाढल्या? उत्तर: 27 फेब्रुवारी रोजी इराणवरील हल्ल्याच्या आदल्या दिवशी, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल सुमारे 67 डॉलर होती. युद्धादरम्यान, ती प्रति बॅरल 120 डॉलरपर्यंत वाढली. मार्चमध्ये, कच्च्या तेलाची सरासरी किंमत प्रति बॅरल 103 डॉलर होती. 21 एप्रिल रोजी, ती प्रति बॅरल सुमारे 87 डॉलर होती. यामुळे, जगभरातील सुमारे 120 देशांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवल्या. अमेरिकेत युद्ध सुरू होण्यापूर्वी, फेब्रुवारीमध्ये, गॅसोलीनची सरासरी किंमत प्रति गॅलन 2.94 डॉलर, म्हणजेच अंदाजे ₹274.54 होती. एप्रिलमध्ये, ती प्रति गॅलन 4.14 डॉलर, म्हणजेच ₹386.6 वर पोहोचली. प्रश्न 2: भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती का वाढत नाहीत? उत्तर: सरकारी नियमांनुसार, 2010 पासून पेट्रोल आणि 2014 पासून डिझेलचे दर नियंत्रणमुक्त करण्यात आले आहेत. याचा अर्थ, त्यांचे विक्री दर सरकार नव्हे, तर तेल कंपन्या ठरवतात. कंपन्या कच्च्या तेलाची किंमत, शुद्धीकरण खर्च, सरकारी कर, उत्पादन खर्च आणि स्वतःचा नफा या घटकांचा विचार करून दैनंदिन दर निश्चित करतात. तथापि, तेल कंपन्यांनी ठरवलेल्या दरांमध्ये सरकारचा सहभाग असतो. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन ही सर्वात मोठी सरकारी तेल विपणन कंपनी आहे. 'द प्रिंट' या इंग्रजी वृत्तपत्रातील एका वृत्तानुसार, इंडियन ऑइलने म्हटले आहे की, दरांसंबंधीचे प्रश्न पेट्रोलियम मंत्रालयाकडे निर्देशित केले पाहिजेत. तेलाच्या संकटातही दरवाढ न होण्याचे कारण पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी येथील विधानसभा निवडणुकांशी जोडले जात आहे. पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतींचा थेट परिणाम जनतेवर होत असल्याने सरकारविरोधात जनतेचा रोष टाळण्यासाठी निवडणुकांदरम्यान तेलाच्या किमती नियंत्रणात ठेवल्या जातात. पश्चिम बंगालमध्ये मतदानाचा दुसरा टप्पा 29 एप्रिल रोजी आहे, तर सर्व राज्यांचे निकाल 4 मे रोजी जाहीर होतील. डीबीएस बँकेच्या कार्यकारी संचालक राधिका राव यांनी गेल्या महिन्यात सांगितले, वाढलेल्या कच्च्या तेलाच्या किमतींचा भार सरकार सर्वसामान्यांवर टाकणार नाही. देशांतर्गत वापर आणि उद्योगांना आधार देण्यासोबतच राज्य निवडणुकांमुळे सरकारचा दृष्टिकोन संयमित राहील. मात्र, निवडणुकांच्या आसपासच्या महिन्यांत तेलाच्या किमती नियंत्रित करण्याची ही पहिली वेळ नाही. 'द प्रिंट'मधील एका अहवालानुसार, तेल मंत्रालयाच्या पेट्रोलियम नियोजन आणि विश्लेषण कक्षाच्या (PPAC) आकडेवारीवरून असे दिसून येते की, विधानसभा निवडणुकांपूर्वी तेलाच्या किमती वाढण्यापासून रोखल्या जातात आणि निवडणुकांनंतर त्या कमी केल्या जातात... जून 2017 पासून तेलाच्या किमतींसाठी ‘डायनॅमिक प्राइसिंग सिस्टीम’ लागू आहे, ज्याअंतर्गत पेट्रोल आणि डिझेलच्या किमती दर 15 दिवसांऐवजी दररोज बदलतात. तत्कालीन पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटले होते की, यामुळे किमतींमध्ये पारदर्शकता येईल. 2014 ते 2019 पर्यंत तेलाच्या किमती स्थिर होत्या. त्यामुळे त्या राजकीय शस्त्र बनल्या नाहीत. त्यानंतर, राष्ट्रीय विधानसभा निवडणुकांदरम्यान तेलाच्या किमती नियंत्रित करण्यास सुरुवात झाली. एप्रिल 2019 ते एप्रिल 2020 पर्यंत कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल 53 डॉलरपर्यंत घसरल्या. त्यानंतर, कोविड-19 आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे, डिसेंबर 2022 पर्यंत तेलाच्या किमती प्रति बॅरल 88 डॉलरपर्यंत वाढल्या. एप्रिल 2019 मध्ये, अरुणाचल प्रदेश, आंध्र प्रदेश आणि सिक्कीममध्ये निवडणुकीच्या पाच दिवस आधीपासून ते निवडणुकीपर्यंत किमती स्थिर राहिल्या. नोव्हेंबर 2020 मध्ये, बिहारमध्ये मतदानाच्या 51 दिवस आधीपासून किमती स्थिर राहिल्या आणि मतदानानंतर बदल सुरू झाला. 2021 मध्ये, पश्चिम बंगालमध्ये मतदानाच्या शेवटच्या दिवसाच्या एक महिना आधीपर्यंत तेलाच्या किमती स्थिर राहिल्या आणि मतदानानंतर पाच दिवसांनी किमती वाढू लागल्या. फेब्रुवारी-मार्च 2022 मध्ये उत्तर प्रदेश, गोवा, मणिपूर, पंजाब आणि उत्तराखंडमध्ये निवडणुका झाल्या. उत्तर प्रदेशात, मतदानाच्या बरोबर चार महिने आधीपर्यंत किमती स्थिर राहिल्या. निवडणुकीनंतर केवळ दोन आठवड्यांत किमती बदलू लागल्या. आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमती वाढत असूनही, किरकोळ तेलाच्या किमती न वाढवल्यामुळे तेल कंपन्यांना तोटा होतो. परिणामी, आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमती कमी झाल्यावरही तेल कंपन्या आपला तोटा भरून काढण्यासाठी विक्री किंमती कमी करत नाहीत. प्रश्न 3: किमती न वाढवल्यामुळे तेल कंपन्यांना किती तोटा होत आहे? उत्तर: भारतात तीन प्रमुख पेट्रोलियम कंपन्या आहेत: इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन. मार्च महिन्यात, या कंपन्यांना दररोज ₹2,400 कोटींचा तोटा झाला. मॅक्वेरी ग्रुप लिमिटेड या ऑस्ट्रेलियन बहुराष्ट्रीय बँकिंग कंपनीनुसार, जेव्हा कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल 10 डॉलरने वाढतात, तेव्हा भारतीय तेल कंपन्यांना प्रति लिटर 6 रुपयांचा तोटा होतो. जेव्हा कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल 135 ते 165 रुपयांच्या दरम्यान असतात, तेव्हा भारतीय कंपन्यांना पेट्रोलवर प्रति लिटर 18 रुपये आणि डिझेलवर प्रति लिटर 35 रुपयांचा तोटा होतो. प्रश्न 4: जर भारताला तोटा होत असेल, तर सरकार हे कसे हाताळत आहे? उत्तर: भारतातील पेट्रोल आणि डिझेलची किंमत रचना बहुस्तरीय आहे. कच्च्या तेलाच्या बाजारभावाव्यतिरिक्त, सरकारी शुल्कांचाही या किमतींवर परिणाम होतो... सर्वप्रथम, कच्च्या तेलावर रिफायनरीमध्ये प्रक्रिया करून त्याचे पेट्रोल आणि डिझेलमध्ये रूपांतर केले जाते. डीलर कमिशन प्रति लिटर 2 ते 4 रुपयांपर्यंत असते. त्यानंतर केंद्र सरकार उत्पादन शुल्क आकारते. सध्या, पेट्रोलवर प्रति लिटर 11.9 रुपये आणि डिझेलवर प्रति लिटर 7.8 रुपये उत्पादन शुल्क आहे. मग, राज्य सरकारे व्हॅट (VAT) लावतात. प्रत्येक राज्याद्वारे आकारला जाणारा कर वेगवेगळा असतो. त्यामुळे, मुंबईत पेट्रोलची किंमत ₹103.5, दिल्लीत ₹94.7 आणि भोपाळमध्ये ₹106.6 आहे. या प्रणालीमुळे, जेव्हा कच्च्या तेलाच्या किमती वाढतात, तेव्हा सरकार लगेचच बाजारभाव वाढवत नाही. ते आधी उत्पादन शुल्क कमी करते किंवा तेल कंपन्यांना थोड्या कालावधीसाठी तोटा सहन करण्यास सांगते. हा तोटा भरून काढण्यासाठी, जेव्हा कच्च्या तेलाच्या किमती कमी होतात, तेव्हा सरकार पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करत नाही. ते तेल कंपन्यांना नफा कमावण्याची संधी देते. इराण युद्धानंतरही, सरकार अशाच प्रकारे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती नियंत्रित करत आहे... युद्ध सुरू होण्यापूर्वी, भारत सरकारने पेट्रोलवर ₹21.9 आणि डिझेलवर ₹17.8 चे उत्पादन शुल्क लावले होते. 27 मार्च रोजी, पेट्रोल आणि डिझेल या दोन्हीवरील शुल्क ₹10 ने कमी करण्यात आले. असे असूनही, एप्रिल महिन्यात तेल कंपन्यांना दररोज 1,600 कोटी रुपयांचा तोटा होत आहे. इराण युद्ध सुरू झाल्यापासून, भारत रशियाकडून दररोज सरासरी 1.5 दशलक्ष बॅरल कच्चे तेल आयात करत आहे. हे प्रमाण 2 दशलक्ष बॅरलपर्यंत वाढवले ​​जाऊ शकते. 2019 नंतर प्रथमच भारताने इराणकडून दोन तेल टँकर खरेदी केले. याव्यतिरिक्त, अमेरिका आणि आफ्रिकन देशांकडूनही तेलाची आयात केली जात आहे. मार्च महिन्यात पेट्रोलियम मंत्रालयाने जाहीर केले की, भारत आपल्या गरजेच्या 70% पर्यंत तेल होर्मुझच्या सामुद्रधुनीव्यतिरिक्त इतर मार्गांनी मिळवत आहे. यापूर्वी, भारताला लागणाऱ्या कच्च्या तेलापैकी 45% ते 50% तेल होर्मुझच्या सामुद्रधुनीतून येत असे. भारत सरकारने फेब्रुवारीमध्ये जाहीर केले की, 1 एप्रिलपासून सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिसळले जाईल. याचा अर्थ पेट्रोलमध्ये 20% अल्कोहोल असेल. प्रश्न 5: निवडणुकीनंतर भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढणार आहेत का? उत्तर: राहुल गांधी यांनी गेल्या महिन्यात X वर एका पोस्टमध्ये म्हटले होते, निवडणुकांनंतर पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीच्या किमती वाढतील. ही केवळ काळाची बाब आहे. निवडणुकांनंतर जनतेला त्याचे परिणाम भोगावे लागतील. टीएमसी नेते अभिषेक बॅनर्जी यांनी एका सभेत केंद्र सरकारला पुढील पाच वर्षांसाठी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती न वाढवण्याचे वचन देण्याचे आव्हान दिले. ब्रोकरेज फर्म मॅक्वेरीने भारतातील तेलाच्या किमतींवरील एका अहवालात म्हटले आहे, एप्रिलमधील निवडणुकांनंतर पेट्रोल पंपांवर तेलाच्या किमती वाढण्याचा धोका आहे. सध्या, निवडणुकांनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती किती वाढतील याचा कोणताही अचूक अंदाज देता येत नाही. तथापि, मॅक्वेरीच्या अहवालाच्या आधारे असे म्हटले जात आहे की, निवडणुकांनंतर पेट्रोल आणि डिझेलवरील सध्याचे नुकसान तितक्याच प्रमाणात वाढू शकते, म्हणजेच पेट्रोलसाठी प्रति लिटर ₹18 आणि डिझेलसाठी प्रति लिटर ₹35 पर्यंत. ब्रिटिश बहुराष्ट्रीय बँक स्टँडर्ड चार्टर्ड पीएलसीच्या भारतातील आर्थिक संशोधन विभागाच्या प्रमुख अनुभूती सहाय यांच्या मते, जर कच्च्या तेलाची सरासरी किंमत प्रति बॅरल 95 डॉलर राहिली, तर सरकारला डिझेल आणि पेट्रोलच्या दरात 8 ते 15 रुपयांनी वाढ करावी लागेल. इतकेच नव्हे, तर जर कच्च्या तेलाची सरासरी किंमत प्रति बॅरल 85 ते 90 डॉलर राहिली, तर पेट्रोलच्या दरात 3 ते 7 रुपयांनी वाढ करावी लागेल. प्रश्न 6: किमती वाढल्यास काय परिणाम होईल? उत्तर: पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्याने सर्वसामान्य माणसाच्या घरगुती खर्चावर थेट परिणाम होईल... भारतातील 70% मालवाहतूक ट्रकद्वारे केली जाते, ज्यात डिझेलचा वापर होतो. डिझेलच्या किमती वाढल्यामुळे फळे, भाजीपाला आणि धान्य यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढतील. यामुळे घरगुती खर्चात 10% ते 15% वाढ होऊ शकते. याशिवाय, एलपीजीच्या किमतीतील वाढीचा अधिक मोठा परिणाम होईल. ट्रॅक्टरचा वापर नांगरणी आणि सिंचनासाठीही केला जातो. डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे शेतकऱ्यांसाठी अन्नधान्य पिकवण्याचा खर्च वाढेल, ज्यामुळे सर्वसामान्य माणसाला ते खरेदी करणे अधिक महाग होईल. टॅक्सी चालक, कॅब चालक आणि सार्वजनिक बसचे भाडेदेखील वाढेल. याचा परिणाम ऑनलाइन शॉपिंग आणि फूड डिलिव्हरीच्या शुल्कावरही होईल. लोक पेट्रोल आणि डिझेल वाहनांऐवजी इलेक्ट्रिक वाहनांकडे वळतील. तज्ञांच्या मते, जेव्हा पेट्रोलच्या किमती 10% ते 15% वाढतात, तेव्हा इलेक्ट्रिक वाहनांमधील (EVs) आवड 20% ते 25% वाढते. वाहतूक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना नोकरी गमवावी लागेल. ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस या वाहतूकदार संघटनेचे सदस्य शैलेंद्र गुप्ता यांच्या मते, पेट्रोल आणि डिझेलच्या संकटामुळे 10% वाहने आधीच सेवेबाहेर आहेत. तेलाच्या किमती वाढल्यास 30% वाहने चालू शकणार नाहीत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमुळे महागाई वाढेल. सध्या भारतातील महागाईचा दर 3.7% आहे. पेट्रोलच्या किमती वाढल्या आणि इराण युद्ध सुरूच राहिल्यास, 2027 पर्यंत तो 4.7% पर्यंत पोहोचू शकतो.

दिव्यमराठी भास्कर 22 Apr 2026 6:00 am

अग्रलेख : पावसाचा घोर

एप्रिल महिना संपत आला तसा विविध संस्थांचे हवामान विषयक अंदाज प्रसिद्ध झाले. यंदाच्या पावसाळ्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस (Rain) पडेल असा सगळ्या संस्थांचा सूर आहे.

दैनिक प्रभात 22 Apr 2026 6:00 am

लक्षवेधी : अर्थव्यवस्थेतील आशा-निराशा

होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून असलेले मतभेद संपले नसले, तरीदेखील युद्धाची तीव्रता कमी झाली आहे. या पार्श्वभूमीवर, भारतीय शेअर बाजारात (Share Market) पुन्हा एकदा उत्साह संचारला असून, जागतिक व्यापार पुनश्च सुरळीत होईल, अशी आशा निर्माण झाली आहे.

दैनिक प्रभात 22 Apr 2026 5:30 am

दिनविशेष : मनोहारी वसुंधरा

आज 22 एप्रिल रोजी वसुंधरा दिन (Earth Day) साजरा केला जातो. आज निसर्गाच्या सान्निध्यात राहून हा दिवस साजरा करा. निसर्ग जसा आपला आहे तसा पशुपक्षी आणि इतर जीवांचाही आहे.

दैनिक प्रभात 22 Apr 2026 5:00 am

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, २२ एप्रिल २०२६

पंचांगआज मिती वैशाख शुद्ध द्वितीया शके १९४८ षष्ठी.चंद्र नक्षत्र कृतिका. योग आयुष्यमान चंद्र राशी वृषभ भारतीय सौर २ वैशाख शके १९४८. बुधवार दिनांक २२ एप्रिल २०२६. मुंबईचा सूर्योदय ०६.१६ मुंबईचा चंद्रोदय ०७.४०, मुंबईचा सूर्यास्त ०६.५७ मुंबईचा चंद्रास्त ०९.११ राहू काळ ०९.२६ ते ११.०२.श्री नृसिंह नवरात्र आरंभ चांगला दिवसदैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)

फीड फीडबर्नर 22 Apr 2026 12:10 am

Borivali : बोरीवलीतील पंजाबी गल्लीतील डायग्नोस्टीक सेंटर खासगी संस्थेकडे

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :मुंबई महापालिकेच्यावतीने अनेक रुग्णालये खासगी संस्थांना चालवण्यास देण्याचा निर्णय घेतला असून त्यातील बोरीवली पश्चिम येथील पंजाबी गल्लीतील महानगरपालिकेच्या मालकीच्या पंजाबी गल्ली डायग्नोस्टिक्स सेंटर हे आता खासगी संस्थेला चालवण्यास देण्यात येणार आहे. यासाठी क्रस्ना डायग्नोस्टिक्स लिमिटेड या कंपनीला चालवण्यास देण्यात येणार आहे. खासगी सहभाग तत्त्वावर या संस्थेची निवड महापालिकेच्यावतीने करण्यात आली आहे.महानगरपालिकेच्या मालकीचे बोरीवली पश्चिम येथे पंजाबी गल्ली डायग्नोस्टिक्स सेंटर हे प्लॉट क्र. एफपी नं. ११या ठिकाणी असून तळमजला अधिक दोन मजले अशी एकूण २९८३.१४ चौ. मिटर इतक्या क्षेत्रफळाची जागा बांधून तयार आहे. या ठिकाणी सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावर या जागेवर बाह्य रुग्ण विभाग, विविध तपासण्या व चाचण्यासाठी प्रयोगशाळा, डायलेसिस केंद्र, सीटी स्कॅन, एमआरआय स्कॅन महानगरपालिकेने निश्चित केलेल्या व महानगरपालिकेच्या रुग्णांना सध्या लागू असलेल्या दराने सुरू करण्यात येणार आहे.क्रस्ना डायग्नोस्टिक्स लिमिटेड संस्थेला, सर्वसामान्य तसेच अत्याधुनिक बाह्य रुग्ण आणि ओटीपीटी विभाग, मूलभूत सोनोग्राफी आणि मेमोग्राफी (पॅथोलॉजी आणि रेडिओलॉजी) निदान सेवा, सी.टी. आणि एम.आर.आय. स्कॅन ह्या सेवा सुविधा सुरू करण्याकरिता नेमणूक करण्यात आली आहे. पुढील ३० वर्षांकरता या संस्थेची निवड करण्यात आली आहे. यासाठी सस्थेला देण्यात येणाऱ्या जागेसाठी प्रत्येक वर्षी २ कोटी ०५ लाख रुपये एवढे अधिमुल्य आकारले जाणार आहे.बोरीवली या क्षेत्रात पूर्व आणि पश्चिम विभाग मिळून जवळपास २० लाख लोकवस्ती असून यासाठी बोरीवली येथे भगवती रुग्णालयात ११० खाटांचे रुग्णालयात सुरू आहेत. या रुग्णालयात बाह्य रुग्णविभाग, विविध तपासण्या व चाचण्यासाठी सर्व सामान्य तसेच अत्याधुनिक प्रयोगशाळा, सी.टी. स्कॅन, एम.आर.आय स्कॅन या विविध सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही. नजीकच्या काळात बोरीवली (पश्चिम) येथे ४९० रुग्णशय्या असलेले नव्याने भगवती रुग्णालय सुरू होणार आहे. परंतु तोपर्यन्त स्थानिक लोकांना कांदिवली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात उपचार घेण्यासाठी दाखल व्हावे लागतात. या रुग्णालयात डहाणू, ठाणे, वसई-विरार, मिरा-भायंदर या परिसरातील रुग्ण तसेच गोराई, दहिसर, कांदिवली, बोरीवली येथील स्थानिक रुग्णपण उपचारासाठी दाखल होतात. या सुविधा महानगरपालिकेतर्फे देण्यासाठी आवश्यक ते डॉक्टर, परिचारिका व इतर कर्मचारी वर्ग यांची नेमणूक करावी लागते व त्यांच्या आस्थापनेसाठी कायम स्वरूपी खर्च करावा लागतो. वरील उपाय म्हणून सद्यस्थितीत ही या संस्थेची निवड करुन त्यांना जागा देण्याचा निर्णय घेतला आहे.

फीड फीडबर्नर 21 Apr 2026 11:10 pm

Mumbai Indians : मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज! ‘हा’मॅचविनर खेळाडू संघात परतला

आयपीएल २०२६ स्पर्धेत मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) सुरुवातीला यश मिळाले होते, पण त्यानंतर सलग चार सामन्यांत पराभव स्वीकारावा लागला. मात्र, अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्सविरुद्ध झालेल्या सामन्यात मुंबईने दमदार पुनरागमन केले.

दैनिक प्रभात 21 Apr 2026 10:55 pm

Tushar Doshi : तुषार दोशी पुन्हा अडचणीत? नव्या कारनाम्याने पोलीस दलात खळबळ

Tushar Doshi : सांगलीचे नूतन एसपी तुषार दोशी यांनी साताऱ्यातून बदली होताना नियमबाह्य बदल्या केल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.

दैनिक प्रभात 21 Apr 2026 10:35 pm

Nari Shakti : संसदेत ३३ टक्के महिला आरक्षण मिळेपर्यंत हा लढा थांबणार नाही!

वरळीतील ‘जन आक्रोश’ मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांना इशारामुंबई : महिला आरक्षण विधेयकाला विरोध करून विरोधकांनी आपला संविधानविरोधी आणि महिलाविरोधी चेहरा उघडा पाडला आहे. हे विधेयक केवळ तांत्रिक कारणास्तव थांबले असले, तरी महिलांची ही लढाई आता थांबणार नाही. ज्या दिवशी संसदेत आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये ३३ टक्के महिला लोकप्रतिनिधी म्हणून बसतील, त्याच दिवशी हा लढा यशस्वी झाला असे आम्ही मानू, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी येथे दिला.https://www.youtube.com/watch?v=eraKtSoPHugलोकसभेत महिला आरक्षण विधेयकाला विरोधी पक्षांनी केलेल्या विरोधाचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पक्षातर्फे वरळी येथे भव्य 'जन आक्रोश महिला संमेलना'चे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनात हजारो महिलांनी सहभाग नोंदवून राहुल गांधी आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या मेळाव्याला भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमित साटम, महापौर रितू तावडे यांच्यासह अनेक मंत्री व पदाधिकारी उपस्थित होते.मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळापासून महिलांना आरक्षण देण्याचा प्रयत्न झाला, मात्र काँग्रेसची नीती नेहमीच अडवणुकीची राहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक निर्णय घेऊन हे विधेयक आणले, पण आपली राजकीय दुकानदारी बंद होईल या भीतीने विरोधकांनी त्याला खो घातला. आता गप्प बसून चालणार नाही. ज्यांना नारीशक्तीचे वावडे आहे, त्यांची झोप उडवण्यासाठी राज्यातील एक कोटी महिलांच्या सह्यांची मोहीम राबवली जाईल. या सह्यांचे निवेदन राहुल गांधी आणि आघाडीच्या नेत्यांना पाठवून महिलांचा संताप त्यांच्यापर्यंत पोहोचवला जाईल.'विरोधकांनी महिलांच्या स्वप्नांचा चक्काचूर केला'भाजप महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनीही आपल्या भाषणात विरोधकांवर सडकून टीका केली. भाषणामध्ये महिला सक्षमीकरणाच्या बाता मारायच्या आणि प्रत्यक्ष कृतीची वेळ आली की पळ काढायचा, ही विरोधकांची जुनी खोड आहे. या विधेयकाला विरोध करून त्यांनी केवळ कागदावरच्या तरतुदीला नव्हे, तर कोट्यवधी महिलांच्या स्वप्नांचा चक्काचूर केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनंतर महिलांचा खऱ्या अर्थाने विचार मोदीजींनी केला, मग विरोधकांच्या पोटात का दुखले? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

फीड फीडबर्नर 21 Apr 2026 10:30 pm

'स्थानिक माथाडी भूमिपुत्रांना रोजगारात प्राधान्य द्या'

मुंबई :राज्यात कुठल्याही आस्थापनेत माथाडी कामगारांची आवश्यकता असल्यास त्या ठिकाणी स्थानिक माथाडी भूमिपुत्र असलेल्या कामगारांना रोजगारात प्राधान्य द्यावे, असे निर्देश कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर यांनी दिले. मंत्रालयात दापिवली (ता पनवेल जि. रायगड) येथील मे. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन या आस्थापनेत स्थानिक माथाडी कामगारांना माथाडी स्वरूपाचे काम मिळण्याबाबत आयोजित बैठकीत बोलत होते. बैठकीला आमदार महेश बालदी, आमदार प्रशांत ठाकूर, अपर मुख्य सचिव आय. ए. कुंदन, कामगार आयुक्त एच.पी तुम्मोड, उपसचिव स्वप्नील कापडणीस, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनचे अधिकारी, माथाडी बोर्डाचे अधिकारी उपस्थित होते.कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर म्हणाले, स्थानिक भूमिपुत्र माथाडी कामगारांना रोजगाराच्या हक्कापासून वंचित ठेवले जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या शासन निर्णयाप्रमाणे ८० टक्के भूमिपुत्रांना रोजगार दिला पाहिजे. या शासन निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करावी. बीपीसीएल कंपनीने आपल्या मालवाहतूकदारांच्या माध्यमातून नवीन माथाडी कामगारांची मागणी करावी. ही मागणी माथाडी बोर्डाने तत्काळ मान्य करीत नवीन स्थानिक माथाडी भूमिपुत्रांना रोजगार द्यावा. तसेच अशा कंपन्यांना माथाडी बोर्डाकडे माथाडी कामगारांची मागणी करण्यासाठी नोंदणी करण्याची तरतूद करण्यात यावी.स्थानिकांवर अन्याय होऊ नये किंवा त्यांना रोजगाराच्या संधींपासून डावलले जाऊ नये. स्थानिकांना डावलल्यास ही बाब कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही कामगार मंत्री फुंडकर यांनी दिला. स्थानिक तरुणांच्या रोजगाराच्या मागण्यांचे गांभीर्य लक्षात घेता, कंपन्यांशी तातडीने समन्वय साधावा. नियमानुसार स्थानिक तरुणांना रोजगारात सामावून घेण्यासाठी जे प्रयत्न आवश्यक आहेत, ते प्राधान्याने करावेत, असेही कामगार मंत्री यांनी सांगितले.

फीड फीडबर्नर 21 Apr 2026 10:30 pm

Mumbai : मौलाना शौकत अली मार्गावरील अनधिकृत फर्निचर विक्रेत्यांवर कारवाई, चालवला बुलडोझर

मुंबई(विशेष प्रतिनिधी) :मुंबई महापालिकेच्या ‘ई’ विभाग अंतर्गत मौलाना शौकत अली मार्गावरील जुने फर्निचर विक्रेत्‍यांवर तसेच इतर अतिक्रमणांवर महानगरपालिकेच्या ‘ई’ विभागाकडून कारवाई करण्यात आली. उपायुक्त (परिमंडळ १) चंदा जाधव यांच्या मार्गदर्शनात आणि सहायक आयुक्त आनंद कंकाळ यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.‘ई’ विभागातील मौलाना शौकत अली मार्गावर विशेषत: मुरली देवरा नेत्र रूग्‍णालयापासून ते जे. जे. रुग्णालय सिग्नलपर्यंतच्‍या परिसरात अतिक्रमण झाल्यामुळे पादचा-यांना चालताना अडथळा निर्माण होत होता. पादचा-यांना रस्त्यावरून चालावे लागत होते. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला होता. ही परिस्थिती लक्षात घेऊन महानगरपालिकेच्या ‘ई’ विभागातील परिरक्षण आणि अतिक्रमण निर्मूलन पथकांनी मुंबई पोलिसांच्या सहकार्याने संयुक्तपणे मोहीम राबवली.या कारवाईदरम्यान फर्निचर विक्रेत्यांवर धडक व कठोर कारवाई करण्यात आली. पदपथांवर अस्ताव्यस्त पसरलेले जुने फर्निचर जेसीबीच्या सहाय्याने जागेवरच नष्ट करण्यात आले. त्याचबरोबर तोडलेल्या फर्निचरांचा कचरा तात्काळ हटविण्यात आला. पदपथावरील सर्व अतिक्रमणे दूर करण्यात आली. तसेच परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांवरही निष्कासनाची कारवाई करण्यात आली. त्यामुळे रस्ता पूर्णपणे वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.या मोहिमेत १ जेसीबी, ४ मजूर, ३ अधिकारी आणि २ अभियंते सहभागी होते. तसेच, नागपाडा पोलीस ठाण्याचे ९ अंमलदार बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते. दरम्यान, अनधिकृत बांधकामे आणि अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात नियमितपणे कारवाई सुरू राहील, असे महानगरपालिकेच्या ‘ई’ विभागाद्वारे या निमित्ताने पुन्हा एकदा स्पष्ट करण्यात येत आहे.

फीड फीडबर्नर 21 Apr 2026 10:30 pm

Abhishek Sharma Record : शतक एक अन् विक्रम अनेक; अभिषेक शर्माने बड्या खेळाडूंच्या पंगतीत मिळवले स्थान

इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धा आता दुसऱ्या टप्प्यात आली असताना सनरायझर्स हैदराबादचा स्टार फलंदाज अभिषेक शर्मा (Abhishek Sharma Record) याला अप्रतिम सूर गवसला आहे.

दैनिक प्रभात 21 Apr 2026 10:04 pm

Masur News : मसूरमध्ये अन्नसुरक्षा विभागाचा छापा! ७८ हजारांचा गुटखा जप्त; पान शॉप चालकावर गुन्हा दाखल

Masur News : कराड तालुक्यातील मसूर येथे २१ एप्रिल रोजी अन्नसुरक्षा विभागाने सागर पान शॉपवर कारवाई करून ७८,९६६ रुपयांचा गुटखा जप्त केला.

दैनिक प्रभात 21 Apr 2026 10:02 pm

Maharashtra Rain Alert : उन्हाच्या तडाख्यात पावसाची हजेरी.! राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा

एकीकडे उन्हाचा चटका वाढत असतानाच, दुसरीकडे अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने धास्ती वाढवली आहे.

दैनिक प्रभात 21 Apr 2026 9:59 pm

John Ternus : अ‍ॅपलचे सीईओ टिम कुक पायउतार होणार; जॉन टर्नस सूत्रे घेणार हाती

आयफोन बनवणार्‍या अ‍ॅपलने कंपनीतील मोठ्या फेरबदलाची घोषणा केली आहे. सीईओ टिम कुक पायउतार होणार असून ते दीर्घकाळ हार्डवेअर प्रमुख असलेल्या जॉन टर्नस (John Ternus) यांच्याकडे सूत्रे सोपवणार आहेत.

दैनिक प्रभात 21 Apr 2026 9:40 pm

Ashok Kharat : भोंदूबाबाचा पाय आणखी खोलात.! अशोक खरात विरोधात ‘हा’गुन्हा दाखल

इतर गुन्ह्यांच्या संदर्भात आधीच पोलीस कोठडीत असलेल्या खरातवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

दैनिक प्रभात 21 Apr 2026 9:22 pm

Maharashtra Politics : मोठा ट्विस्ट..! विधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस उमेदवार देणार; ‘या’नावाची जोरदार चर्चा

Maharashtra Politics : महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक होत आहे. महायुती ८ जागांवर दावा करत असतानाच काँग्रेस आणि ठाकरे गटात एका जागेसाठी संघर्ष सुरू झाला आहे.

दैनिक प्रभात 21 Apr 2026 9:17 pm

Devendra Fadnavis : पंढरपूर विकास आराखड्याच्या कामास गती द्या.! मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश

पालखी मार्गावरील विकास कामे पूर्ण करण्यात येत असून यावर्षी वारकऱ्यांना कोणत्याही अडचणी येणार नाहीत, याची दक्षता घेतली आहे.

दैनिक प्रभात 21 Apr 2026 9:10 pm

Bihar Politics : नारी शक्ती अधिनियमाला विरोध करणाऱ्या खासदाराचे धक्कादायक वक्तव्य, महिलांचे राजकीय करिअर बेडपासून...

बिहारमधील एका अपक्ष खासदाराच्या वक्तव्याने संपूर्ण राजकारण तापलं आहे. नुकताच त्यांनी राजकारणातील महिला आणि त्यांच्या वर्तनाबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. त्यांच्या या विधानाचा संपूर्ण देशातून विरोध केला जात आहे. याप्रकरणी बिहार राज्य महिला आयोगाने त्यांना नोटीस बजावली असून आयोगाने खासदाराकडून त्यांच्या विधानाचे स्पष्टीकरण मागवले आहे.जाणून घ्या नेमकं प्रकरण :बिहारचे पूर्णियाचे खासदार पप्पू यादव यांनी राजकारणात कार्यरत असलेल्या महिलांसंदर्भात अत्यंत आक्षेपार्ह विधान केले होते. त्यांनी असा दावा केला आहे की, तडजोडीशिवाय देशाच्या राजकारणात महिलांना पुढे जाणे जवळजवळ अशक्य झाले आहे आणि त्यांच्या सुरक्षेला गांभीर्याने घेतले जात नाही. प्रसारमाध्यमांशी बोलताना पप्पू यादव म्हणाले की, भारतीय समाजात महिलांना देवी मानले जात असले तरी, वास्तव याच्या अगदी उलट आहे.पप्पू यादव यांच्या मते, राजकारणातील बहुतेक महिला आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात प्रभावशाली लोकांच्या वैयक्तिक वर्तुळातून करतात. त्यांनी असा आरोप केला की, सत्तेच्या वर्तुळात महिलांचे शोषण खोलवर रुजलेले आहे. पप्पू यादव म्हणाले की, कटू सत्य हे आहे की ९०% महिलांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात ही राजकारण्यांच्या बिछान्यातूनच होते. एखाद्या प्रभावशाली नेत्याच्या खोलीत प्रवेश केल्याशिवाय महिला राजकारणात येऊ शकत नाहीत.https://prahaar.in/2026/04/19/dmk-and-congress-did-not-allow-womens-reservation-bill-to-be-passed-amit-shah/या प्रकरणाची स्वतः दखल घेऊन, बिहार राज्य महिला आयोगाने खासदार पप्पू यादव यांना त्यांच्या वक्तव्यासंदर्भात नोटीस बजावली असून त्यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली आहे. तसेच त्यांना तीन दिवसांच्या आत नोटीसला उत्तर देण्यास सांगितले आहे.मोठ्या संख्येने राजकारणी अश्लील गोष्टी पाहतात :पुढे बोलताना पप्पू यादव यांनी राजकारण्यांच्या चारित्र्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की, संसद आणि राज्य विधानसभांमधील अनेक प्रतिनिधी महिलांना आदराने वागवत नाहीत. ते असेही म्हणाले की, मोठ्या संख्येने राजकारणी अश्लील गोष्टी पाहतात आणि याची पडताळणी करण्यासाठी त्यांच्या मोबाईल फोनची तपासणी केली पाहिजे.https://prahaar.in/2026/04/18/defeat-of-the-nari-shakti-vandan-adhiniyam-is-an-insult-to-women/नारी शक्ती वंदन कायदा म्हणजे फक्त एक राजकीय खेळी :पप्पू यादव यांनी महिला आरक्षणाबाबतच्या केंद्र सरकारच्या हेतूंवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, याला केवळ एक राजकीय खेळी म्हटले आहे. त्यांनी नारी शक्ती वंदन कायद्याला केवळ एक राजकीय खेळी म्हटले आणि सरकारकडे पूर्ण बहुमत असताना हा कायदा आधी का आणला नाही, असा प्रश्न विचारला. त्यांच्या मते, या कायद्यात मागासवर्गीय, अत्यंत मागासवर्गीय, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती आणि अल्पसंख्याक महिलांसाठी स्वतंत्र तरतुदींचा समावेश असलाच पाहिजे, अन्यथा त्याचे फायदे केवळ श्रीमंतांपुरतेच मर्यादित राहतील.

फीड फीडबर्नर 21 Apr 2026 9:10 pm

Kerala Massive Explosion : फटाक्यांच्या गोदामात भीषण स्फोट; ६ जणांचा मृत्यू

केरळच्या त्रिशूर जिल्ह्यातील मुंडाथिकोड गावात फटाक्यांच्या गोदामात भीषण आग आणि स्फोटाची घटना घडली आहे. या दुर्घटनेत किमान ६ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.ही घटना वडक्कनचेरी नगरपालिकेअंतर्गत येणाऱ्या मुंडाथिकोड गावात घडली. येथे आगामी २६ एप्रिल रोजी होणाऱ्या प्रसिद्ध त्रिशूर पूरम उत्सवासाठी फटाके आणि कच्चा माल एका शेडमध्ये साठवून ठेवण्यात आला होता. केरळ राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून मिळालेल्या माहितीनुसार, घटनास्थळावरून १३ जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. जखमींपैकी ५ जणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तर २ जणांना रुग्णालयातील वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे. तसेच १७ जणांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत.प्राथमिक अहवालानुसार, स्फोट इतका तीव्र होता की त्याचे धक्के अनेक किलोमीटरपर्यंत जाणवले आणि काहींनी तो भूकंप असल्याचा समज केला. या दुर्घटनेत ४० हून अधिक लोक भाजले गेले असून अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे.https://prahaar.in/2026/04/21/bihar-politics-shocking-statement-by-mp-opposing-nari-shakti-act-womens-political-career-starts-from-the-bed/घटनेनंतर परिसरातील रुग्णालयांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून बचावकार्य वेगाने सुरू आहे. हे फटाक्यांचे गोदाम तिरुवंबाडी देवासम यांच्याशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. तसेच, येथे सुरक्षा नियमांची तपासणी सुरू करण्यात आली आहे.प्रशासनाने या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे संकेत दिले आहेत.

फीड फीडबर्नर 21 Apr 2026 9:10 pm

Baramati : बारामतीच्या सभेत मुख्यमंत्र्यांनी केला अजित पवारांच्या कार्याचा गौरव, सुनेत्रा पवारांसाठी केला जोरदार प्रचार

बारामती : अजित पवारांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात २३ एप्रिल रोजी पोटनिवडणूक होणार आहे. या पोटनिवडणुकीसाठी बारामतीत महायुतीने सभा घेतली. या सभेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बारामतीत आले होते तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बारामतीत सुनेत्रा पवारांचा प्रचार केला. अजित पवारांची चुलत बहीण या नात्याने खासदार सुप्रिया सुळे यांनीही सुनेत्रा पवारांसाठी प्रचार केला. शरद पवारांनी तब्येतीच्या कारणास्तव प्रचार करणे टाळले पण बारामतीकरांना सुनेत्रा अजित पवार यांना मतदान करण्याचे आवाहन केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनीही सुनेत्रा पवारांसाठी प्रचार केला.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारसभेत बोलताना अजित पवारांच्या कार्याचा गौरव केला. आठवणींना उजाळा दिला आणि सुनेत्रा पवारांना मतदान हीच अजित पवारांना खरी श्रद्धांजली असल्याचे भावनिक आवाहन बारामतीकरांना केले. एकनाथ शिंदेंनीही कामाचा माणूस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अजित पवारांच्या कार्याचा गौरव केला. आठवणींना उजाळा दिला आणि सुनेत्रा पवारांना मतदान करण्याचे आवाहन बारामतीच्या मतदारांना केले.काल शरद पवारांनी फोन करून आघाडीचा पाठिंबा सुनेत्रा पवारांनाच असल्याचे सांगितले, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीच्या प्रचारसभेत दिली. सभेत बोलताना सुनेत्रा पवारांना जाहीर केलेल्या पाठिंब्यासाठी मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांचे जाहीर आभार मानले. सुनेत्रा पवार विक्रमी मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रचारसभेत बोलताना व्यक्त केला. अजित पवारांप्रमाणेच सुनेत्रा पवारही ठामपणे राज्याच्या विकासाचा गाडा ओढतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.प्रचारसभेवेळी अजित पवारांवील एक छोटी फिल्म दाखवण्यात आली. ही फिल्म बघताना सुनेत्रा पवारांचे अश्रू दाटून आले होते. अजित पवारांनी बारामतीच्या तीन पिढ्यांना एका कुटुंबासारखं जपलं. राज्याचं काम करणाऱ्या अजित पवारांनी बारामतीविषयीची आपुलकी कायम जपली. अशा या दादा माणसाच्या आकस्मिक जाण्यानं बसलेल्या धक्क्यातून सावरण्यासाठी जशी कुटुंबानं, दोन्ही मुलांनी साथ दिली तशी बारामतीकरांसह पूर्ण राज्यानंही काळजी घेतली. सर्वांनीच माझ्यावर आणि मुलांवर मुलांवर भरभरून प्रेम केले, असे सांगताना राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार भावुक झाल्या होत्या. अजित पवार यांच्या विचारांना उजाळा देताना त्यांच्यासारखेच काम करून दाखवेन, असा विश्वास व्यक्त करत मी संघर्ष योद्ध्याची सहचारिणी असल्याचे सुनेत्रा पवार म्हणाल्या.शरद पवार आजारीशरद पवारांनी तब्येत बरी नसल्यामुळे सुनेत्रा पवारांसाठी प्रचार करणे टाळले. पण बारामतीकरांना सुनेत्रा अजित पवार यांना मतदान करण्याचे आवाहन केले. सध्या शरद पवार रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांनी तब्येत साथ देत नसल्यामुळे इतक्यात बारामतीत येणे शक्य नाही पण बारामतीकरांनी सुनेत्रा पवारांची साथ सोडू नये असे भावनिक आवाहन केले आहे.

फीड फीडबर्नर 21 Apr 2026 9:10 pm

Donald Trump : आता युद्धविराम नाही! डोनाल्ड ट्रम्प यांचा मुदतवाढ देण्यास नकार

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणला कडक इशारा दिला असून, येत्या बुधवारापर्यंत दोन्ही देशांमध्ये कोणताही करार झाला नाही, तर इराणवर थेट हल्‍ला करण्याची धमकी दिली आहे.

दैनिक प्रभात 21 Apr 2026 9:09 pm

Tarapur MIDC : तारापूर औद्योगिक क्षेत्रात चाललंय काय ? अहवाल सादर करण्याचे विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे निर्देश

मुंबई : तारापूर औद्योगिक क्षेत्रातील घातक रासायनिक द्रव स्वरुपातील गैरप्रकाराबद्दल औद्योगिक भूखंडाची प्रत्यक्ष पाहणी करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले आहेत.विधानभवनामध्ये तारापूर औद्योगिक क्षेत्रातील भूखंड क्र८ डी./१ येथे सडेकर इनव्हायरो इंजिनीअर्स प्रा. लि. यांनी अवैधरित्या व बेकायदेशीरपणे घातक रासायनिक द्रव स्वरुपातील गैरप्रकाराची विल्हेवाट लावल्याबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते.औद्योगिक भूखंडाचा करार एमआयडीसीने २०१५ व २०२० मध्येच रद्द केला असतानाही कंपनीकडून बेकायदेशीरपणे काम सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच, उच्च रासायनिक घटक (High COD) असलेले सांडपाणी थेट नाल्यात व समुद्रात सोडले जात असल्याची तक्रार समोर आल्याने या प्रकरणात सविस्तर माहिती घेण्याकरिता प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

फीड फीडबर्नर 21 Apr 2026 8:10 pm

Heatstroke : अतिउष्णतेच्या संकटाचा सामना करण्यासाठी सक्षम उपाययोजना करणार

मुंबई : हवामान बदल या संकटाचा सर्वाधिक फटका शेती क्षेत्राला, विशेषतः अल्प भूधारक शेतकऱ्यांना बसत आहे अतिउष्णतेच्या संकटावर उपाययोजना करण्यासाठी तसेच ‘उष्णता प्रतिसादक्षम व शाश्वत शीतकरणासाठी सेंटर फॉर एक्सलेन्स’चा शुभारंभ करण्यात आला असून हे केंद्र भविष्यात राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्थेचा भाग म्हणून कार्यरत होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.सह्याद्री अतिथीगृह येथून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरदृष्यप्रणालीद्वारे आयआयएम, नागपूर येथील ‘सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर हिट रेसिलियन्स अँड सस्टेनेबल कुलिंग’चे उदघाटन केले. यावेळी आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, नाशिकच्या महापौर हिमगौरी आहेर, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी, नॅचरल रिसोर्सेस डिफेन्स कौन्सिलचे अध्यक्ष मनीष बापना, एनआरडीसी इंडियाच्या कंट्री डायरेक्टर दीपा सिंग बगई, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉक्टर भालचंद्र चव्हाण, नागपूर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे संचालक डॉ. भिमराया मैत्री उपस्थित होते.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की,विदर्भासह राज्याच्या अनेक भागांत अलीकडे उष्णतेच्या लाटेमुळे शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्याची वेळ आली होती. हवामान बदल या संकटाचा सर्वाधिक फटका शेती क्षेत्राला, विशेषतः छोट्या शेतकऱ्यांना बसत आहे. दुष्काळ, गारपीट आणि वाढते तापमान यामुळे समस्याही गंभीर होत आहेत, यावर तोडगा काढण्यासाठी सेंटर फॉर एक्सलन्स उपयुक्त ठरणार आहे. या संस्थेमार्फत सुरुवातीला प्राधान्याने उष्णलाट कृती आराखडा आणि शहरी हवामान कृती आराखड्यांचा आढावा घेऊन प्राधान्य दिलेल्या शहरांना आणि जिल्ह्यांना तांत्रिक अंमलबजावणीसाठी सहाय्य केले जाईल. उष्णलाट कृती आराखड्यासाठी सक्षम योजना तयार करणे, वार्षिक अंमलबजावणीवर भर देणे. त्यासाठी अधिकारी, आरोग्य कर्मचारी, स्थानिक शहरी नागरिकांसाठी प्रशिक्षण आराखडा तयार करण्यात येणार आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शाश्वत विकासासाठी महाराष्ट्र ऊर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होत आहे. २०३० पर्यंत ५२ टक्के ऊर्जा नवीकरणीय स्रोतांमधून, २०३५ पर्यंत ६५ टक्के ऊर्जा अपारंपरिक स्रोतांतून घेण्याचे नियोजन आहे. शेतकऱ्यांना लागणारी १६ हजार मेगावॅट वीज सौर ऊर्जेद्वारे देण्याचा प्रयत्न सुरू आहे. वाढत्या उष्णतेमुळे सर्वत्रच एसी वापर वाढतो त्यामुळे होणारे पर्यावरणाचे नुकसान टाळण्यासाठी यावर उपाय म्हणून राज्यात प्रभावी ‘हीट अ‍ॅक्शन प्लॅन’ राबवला जाईल. बांधकाम क्षेत्रात आणि दैनंदिन वापरात स्थानिक व पर्यावरणपूरक उपाययोजनांना प्राधान्य देऊन विकास साधण्यावर भर देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.आयआयएम नागपूरमध्ये विशेष केंद्रनागपूरसह विदर्भात उन्हाळ्याची तीव्रता अधिक असते. या समस्येला तोंड देण्यासाठी महत्त्वपूर्ण उपक्रम सुरू करण्यात आला आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) नागपूर आणि अमेरिकेतील ‘नॅचरल रिसोर्सेस डिफेन्स कौन्सिल’ (एनआरडीसी) या आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्थेमध्ये सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारानुसार ‘आयआयएम’ नागपूरमध्ये उष्णता प्रतिसादक्षम व शाश्वत शीतकरणासाठी सेंटर फॉर एक्सलेन्स’ या विषयावर उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्यात आले आहे. महाराष्ट्रासह मध्य भारतातील उष्णतेचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन, या केंद्रामार्फत त्यावर उपाय शोधण्याचे काम केले जाणार आहे.राज्यात “राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्था”केंद्र शासनाच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थेच्या धर्तीवर मिहान, नागपूर येथे स्थापन करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. यासाठी शासनाने रु. १८४ कोटी मंजूर केले आहेत. या इमारतीचे बांधकाम महाप्रित यांच्या माध्यमातून करण्यात येणार असून त्यामध्ये आठ सेंटर फॉर एक्सलन्स असणार आहेत. त्यातील एक केंद्र हे सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर हिट रेझिलन्स ॲण्ड सस्टेनेबल कुलिंग हे असणार आहे. यासाठी नॅचरल रिसोर्सेस डिफेन्स कौन्सिल न्यूयॉर्क या स्वयंसेवी संस्थेचे तांत्रिक सहकार्य लाभणार आहे.सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर हिट रेझिलन्स ॲण्ड सस्टेनेबल कुलींग कामकाज राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्था (एसआयडीएम) मिहान, नागपूर येथून चालविण्यात येणार आहे.

फीड फीडबर्नर 21 Apr 2026 8:10 pm

Nitesh Rane : मांडवा-मरीना व रेवस-मांडवा जेट्टी कामांना गती द्या, मंत्री नितेश राणेंचे निर्देश

मुंबई :अलिबाग तालुक्यातील मांडवा मरीना जेट्टी विकास तसेच रेवस-मांडवा प्रवासी जेट्टी दुरुस्ती व मजबुतीकरणाच्या कामांना गती देऊन ही कामे प्राधान्याने पूर्ण करावीत, असे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले.मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीस आमदार महेंद्र दळवी यांच्यासह विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.प्रकल्पामुळे अलिबाग- मुंबई सागरी प्रवास अधिक सुरक्षित व वेगवान होण्यास मदत होणार असून, पर्यटन व स्थानिक अर्थव्यवस्थेलाही मोठा फायदा होणार आहे. कोकणातील सागरी प्रवासी वाहतूक अधिक सुरक्षित, सुलभ आणि सक्षम करण्यासाठी ही कामे पावसाळ्यापूर्वीच प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचनाही मंत्री नितेश राणेंनी दिल्याअप्रोच जेट्टी, स्लोपिंग जेट्टी, मोठ्या व्यासाच्या पाइल्स बसविणे, तसेच अप्रोच चॅनलमध्ये ड्रेजिंग व विद्युत सुविधांची उभारणी यासारखी महत्त्वाची कामे समाविष्ट आहेत. या प्रकल्पाच्या एकंदरीत कामाची सुमारे ५८ टक्के भौतिक प्रगती झाली असल्याचे बैठकीत सांगण्यात आले असता या प्रकल्पाची उर्वरित कामे प्राधान्याने मार्गी लावण्याचे निर्देश मंत्री राणे यांनी दिले. तसेच रेवस येथील जेट्टी मजबुतीकरणाचे कामही तातडीने मार्गी लावण्याबाबत त्यांनी सूचित केले.मांडवा प्रवासी जेट्टीबाबतही बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. वाढती प्रवासी संख्या व बोटींची संख्या लक्षात घेता जेट्टीची दुरुस्ती व मजबुतीकरण आदी कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत. आयआयटी मुंबईच्या तांत्रिक अहवालानुसार जेट्टीच्या संरचनेत तातडीने दुरुस्तीची गरज असून प्राथमिक दुरुस्तीची कामे सुरू आहेत. दोन्ही प्रकल्पांची कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

फीड फीडबर्नर 21 Apr 2026 8:10 pm

Marine Technology : आधुनिक सागरी तंत्रज्ञान महाराष्ट्रात आणणार; मंत्री नितेश राणे

मुंबई :राज्यातील सागरी वाहतूक व्यवस्था अधिक आधुनिक, सुरक्षित आणि प्रवासी-केंद्रित करण्याच्या दृष्टीने मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी महाराष्ट्र सागरी मंडळ (Maharashtra Maritime Board) चे बंदरे निरीक्षक व तत्सम अधिकाऱ्यांची मंत्रालयात बैठक घेतली. या बैठकीत सध्याच्या फेरीबोट व रो-रो सेवांचा सविस्तर आढावा घेत विविध सुधारणा उपायांवर चर्चा करण्यात आली.राज्यातील वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता फेरीबोट सेवांमध्ये अधिक कार्यक्षमतेची गरज असल्याचे अधोरेखित करत मंत्री राणे यांनी तिकीट प्रणाली अधिक पारदर्शक व सुलभ करण्यासाठी डिजिटल अॅप विकसित करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. यामुळे प्रवाशांना जलद, सोयीस्कर आणि विश्वासार्ह सेवा उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.प्रवासी सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असे स्पष्ट करत ओव्हरलोडिंग रोखणे, सुरक्षेचे नियम काटेकोरपणे पाळणे आणि अपघात टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवण्याचे निर्देशही यावेळी मंत्री नितेश राणे यांनी दिले. याशिवाय परदेशातील प्रगत सागरी वाहतूक प्रणालींचा अभ्यास करून त्यातील आधुनिक तंत्रज्ञान महाराष्ट्रात आणण्यासाठी अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, तसेच त्यासाठी ठोस आणि कृतीक्षम प्रस्ताव सादर करावेत, असेही त्यांनी सांगितले.राज्यातील नागरिकांना अधिक सुरक्षित, दर्जेदार व आधुनिक सुविधा दिल्याने शासनाच्या महसुलात वाढ होईल यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश ही या बैठकीत देण्यात आले.

फीड फीडबर्नर 21 Apr 2026 8:10 pm

Kerala Explosion : केरळमध्‍ये पूरम उत्सवापूर्वी स्फोटाचे तांडव; 13 जणांचा जागीच मृत्‍यू

Kerala Explosion : त्रिशूर जिल्ह्यातील फटाका कारखान्यात झालेल्या स्फोटात १३ जणांचा मृत्यू झाला आहे.

दैनिक प्रभात 21 Apr 2026 7:55 pm

Players Banned in PSL : आयपीएलमधील ‘या’ 3 खेळाडूंना पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेत खेळण्यास घातली बंदी; नेमकं काय घडलं?

इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धा सध्या मोठ्या दिमाखात आणि उत्साहात (Players Banned in PSL) सुरू आहे. नव्या दमाच्या खेळाडूंच्या चमकदार कामगिरीने स्पर्धेला वेगळीच रंगत आणली आहे.

दैनिक प्रभात 21 Apr 2026 7:50 pm

महसूलवाढीसाठी कोल्हापूर चित्रनगरी व एन. डी. स्टुडिओचा बहुउद्देशीय वापर करणार

मुंबई :राज्यातील चित्रपट, दूरदर्शन मालिका व जाहिरातींच्या चित्रीकरणास कोणताही अडथळा न आणता कोल्हापूर चित्रनगरी तसेच कर्जत येथील एन. डी. स्टुडिओ परिसरात विवाह सोहळे, सांस्कृतिक कार्यक्रम व इतर समारंभांसाठी जागा भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देता येईल का, याबाबत अभ्यास करून स्वतंत्र धोरण तयार करण्याचे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिले.महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ (फिल्मसिटी) संचालक मंडळाची १६८ वी बैठक आज मुंबईतील पुल देशपांडे कला अकादमी च्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत विविध प्रशासकीय व विकासात्मक मुद्द्यांसह महसूलवाढीच्या दृष्टीने नव्या उपक्रमांवर चर्चा करण्यात आली. यावेळी मंत्री शेलार यांनी उपलब्ध अधोसंरचनेचा अधिक प्रभावी व नियोजनबद्ध वापर करण्यावर भर दिला.चित्रनगरीचा आगामी वर्षांचा १८ कोटी महसूल वाढीचा आर्थिक ताळेबंद मंजूर झाला.राज्यातील चित्रनगरी व स्टुडिओ संकुलांमध्ये आधुनिक सुविधा, प्रशस्त मोकळी जागा आणि आकर्षक लोकेशन्स उपलब्ध आहेत. या सुविधांचा वापर नियोजनपूर्वक केल्यास चित्रीकरणाच्या कामावर परिणाम न होता पूरक स्वरूपात विवाह सोहळे, कॉर्पोरेट कार्यक्रम, सांस्कृतिक उपक्रम आदींसाठी जागा उपलब्ध करून देता येऊ शकते. यामुळे संस्थेच्या महसुलात लक्षणीय वाढ होण्यास मदत होईल, असे यावेळी मंत्री ॲड. आशिष शेलार म्हणाले.यासाठी स्वतंत्र धोरण तयार करताना चित्रीकरणास प्राधान्य देत वेळापत्रकाचे काटेकोर नियोजन, स्वतंत्र झोन निश्चिती, कार्यक्रमांसाठी परवानगी प्रक्रिया, भाडे दरांची पारदर्शक रचना, ऑनलाईन बुकिंग प्रणाली, सुरक्षा व्यवस्था, वाहतूक व पार्किंग नियोजन, स्वच्छता व देखभाल यांसारख्या सर्व बाबींचा सविस्तर विचार करावा, असे निर्देश त्यांनी दिले. तसेच, स्टुडिओमधील तांत्रिक उपकरणे, सेट्स आणि सर्जनशील वातावरण सुरक्षित राहील यासाठी आवश्यक ती काळजी घेणे बंधनकारक राहील, असेही त्यांनी सांगितले.बहुउद्देशीय वापरामुळे चित्रनगरी आर्थिकदृष्ट्या लाभदायी ठरतील. स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी निर्माण होण्यास आणि पर्यटनाला चालना मिळण्यास मदत होईल, असा विश्वास मंत्री शेलार यांनी व्यक्त केला.या बैठकीस सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव किरण कुलकर्णी, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिका स्वाती म्हसे पाटील, सह व्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर, वित्तीय सल्लागार तथा मुख्य लेखा व वित्त अधिकारी चित्रलेखा खातू तसेच बैठकीस महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी, संचालक मंडळाचे सदस्य तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

फीड फीडबर्नर 21 Apr 2026 7:30 pm

‘युवकांमध्ये प्रचंड सृजनशीलता, नाविन्यता, कौशल्यता आणि कल्पकता’

मुंबई :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत आयोजित ‘पीएम व्हिजन टू आर्ट’ या राष्ट्रीय पोस्टर डिझाईन स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर येथे राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी स्पर्धेतील ७५ विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.देशाच्या प्रगतीचा आणि दूरदृष्टीचा कलात्मक पद्धतीने सादरीकरण करून ‘विकसित भारत’ या संकल्पनेला प्रोत्साहन देणे हा या राष्ट्रीय पोस्टर डिझाईन स्पर्धेचा उद्देश होता. ही स्पर्धा २० सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत पार पडली. देशभरातून सुमारे ३ हजार नोंदी प्राप्त झाल्या.आत्मनिर्भर भारत, डिजिटल इंडिया, बेटी बचाओ बेटी पढाओ, स्वच्छ भारत अभियान, योग, वेव्ह्ज समिट, मेक इन इंडिया, स्किल इंडिया आणि हवामान बदल या नऊ विषयांवर कलाकृती सादर करण्यात आल्या.या स्पर्धेचे मूल्यमापन अच्युत पालव, वासुदेव कामत, सुधारक ओलवे, प्रसून जोशी, रवी जाधव, भरत दाभोलकर, गौरव दालमिया आणि श्रीनिवासन स्वामी या मान्यवरांनी केले.कार्यक्रमाची सुरुवात मंत्री आशिष शेलार, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी तसेच दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या व्यवस्थापकीय संचालिका स्वाती म्हसे पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर स्पर्धेतील निवडक कलाकृतींच्या कॉफी टेबल बुकचे अनावरण करण्यात आले.यावेळी मार्गदर्शन करताना मंत्री आशिष शेलार म्हणाले की, देशातील युवक-युवतींमध्ये प्रचंड सृजनशीलता, नाविन्यता, कौशल्यता आणि कल्पकता आहे. भारताची ‘सॉफ्ट पॉवर’ ही मोठी ताकद असून तिचा प्रत्यय या स्पर्धेतील कलाकृतींमधून स्पष्टपणे येतो.ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आयुष्य देशसेवेसाठी समर्पित असून त्यांच्या प्रेरणेने अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. सांस्कृतिक कार्य विभाग आणि चित्रनगरीच्या माध्यमातून हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला.स्पर्धेतील कलाकृतींचे प्रदर्शन राज्यातील विविध ठिकाणी आयोजित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच दादासाहेब फाळके चित्रनगरीमार्फत सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून विविध उपक्रम राबविण्यात येत असून CSR अंतर्गत सात संस्थांना एकूण ६५ लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

फीड फीडबर्नर 21 Apr 2026 7:30 pm

Uddhav Thackeray : ममतांच्या पराभवासाठी 2 लाखांहून अधिक सीआरपीएफ जवान तैनात; उद्धव ठाकरे यांचा दावा

भाजप नेतृत्वातील केंद्र सरकारने पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचा पराभव करण्यासाठी दोन लाखांहून अधिक सीआरपीएफ जवान तैनात केले आहेत, असा आरोप उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केला.

दैनिक प्रभात 21 Apr 2026 7:21 pm

Sunetra Pawar : अजितदादांच्या अपघाताबाबत माझ्याही शंका; बारामतीत सुनेत्रा पवार भावूक

Sunetra Pawar : बारामती पोटनिवडणूक सांगता सभेत सुनेत्रा पवार यांनी अजित पवारांच्या निधनाबाबत संशय व्यक्त केला आहे.

दैनिक प्रभात 21 Apr 2026 7:20 pm

प्रशासनाने ‘स्टार्टअप’सारखे काम करावे : मुख्यमंत्री

मुंबई : राज्यातील प्रशासन अधिक पारदर्शक, गतिमान आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी ‘झिरो ब्युरोक्रसी’ची संकल्पना राबविण्याचा निर्धार व्यक्त करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाने ‘स्टार्टअप’प्रमाणे कार्य करण्याची गरज व्यक्त केली. सुलभ प्रक्रिया, पूर्वानुमेय आणि मानवी हस्तक्षेप कमी करून पात्र नागरिकांना थेट सेवा देणे हेच ‘झिरो ब्युरोक्रसी’चे मूळ तत्त्व असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.नागरी सेवा दिन २०२६ आणि ‘राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा २०२५-२६’ अंतर्गत पारितोषिक वितरण सोहळ्यात ते बोलत होते. या सभारंभास कौशल्य, रोजगार उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव पंकजकुमार तसेच पुरस्कारार्थी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रशासनातील नाविन्यपूर्ण उपक्रमांची ‘स्टार्टअप’शी तुलना करत, प्रत्येक विभागाने स्वतःकडे एक स्वतंत्र स्टार्टअप म्हणून पाहिले पाहिजे, असे सांगितले.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, झिरो ब्युरोक्रसी म्हणजे अधिकारी नसणे नव्हे, तर प्रक्रियांची पुनर्रचना (री-इंजिनिअरिंग) करून त्या अधिक सुलभ आणि पारदर्शक करणे होय. कोणत्याही व्यक्तीच्या पसंती-अपसंतीवर सेवा अवलंबून न राहता, पात्रतेनुसार सेवा मिळाली पाहिजे. या शासनाने शंभर दिवस आणि १५० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत प्रशासनातील कार्यक्षमता वाढवण्यावर भर दिला असून, त्यातील ८५ टक्के उद्दिष्टे पूर्ण करण्यात यश आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून ‘इज ऑफ डुइंग बिझनेस’ सुधारण्यासाठी विविध प्रक्रियांचे सुलभीकरण करण्यात आले आहे.यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘विकसित महाराष्ट्र २०४७’चा आराखडा मांडताना २०२९, २०३५ आणि २०४७ हे तीन टप्पे निश्चित केल्याचे सांगितले. “महाराष्ट्र आता देशांतर्गत नव्हे तर जागतिक पातळीवर स्पर्धा करत आहे. राज्याची अर्थव्यवस्था जगातील 30व्या क्रमांकावर असून, आगामी काळात ती आणखी बळकट होईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.प्रशासनातील सेवा वितरण सुधारण्यासाठी वीस महत्त्वाच्या सेवांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले असून, ‘आपले सरकार २.० च्या माध्यमातून नागरिकांना अधिक सुलभ सेवा देण्याची तयारी सुरू असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, प्रशासनातील प्रत्येक अधिकारी, कर्मचारी यांनी आपल्या कामाकडे ‘स्टार्टअप’च्या दृष्टिकोनातून पाहिल्यास नावीन्य, कार्यक्षमता आणि वेग यांचा संगम साधता येईल. अशा उपक्रमांमुळेच प्रशासन ‘झिरो ब्युरोक्रसी’कडे वाटचाल करू शकते.यावेळी मुख्यमंत्र्यांनी नाविन्यपूर्ण आणि परिवर्तनशील कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांचा गौरव करून “प्रशासनातील कल्पकता आणि नव्या कल्पनांची अंमलबजावणी हीच भविष्यातील बदलाची दिशा ठरेल,” असे सांगत त्यांनी सर्व पुरस्कारार्थ्यांचे अभिनंदन केले.

फीड फीडबर्नर 21 Apr 2026 7:10 pm

आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट

मुंबई :राज्यातील आयटी क्षेत्रातील कामगारांच्या हिताचे रक्षण करणे, त्याकरिता उपाय योजना सुचविणे याबाबत विस्तृत व दूरगामी कार्यवाही अपेक्षित आहे. त्यासाठी अभ्यास गटाची स्सथान करावी, असे निर्देश ॲड आकाश फुंडकर यांनी दिले.मंत्रालयात पुणे शहरातील हिंजवडी येथील आय टी पार्क मधील विविध आय टी कंपन्यांमध्ये असलेल्या कामगारांच्या समस्यांबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी कामगार मंत्री बोलत होते.बैठकीस आमदार शंकर जगताप, अपर मुख्य सचिव श्रीमती आय. ए कुंदन, कामगार आयुक्त एच पी तुम्मोड, उपसचिव स्वप्नील कापडणीस आदींसह आय टी कामगार संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.आयटी कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांवर होणारी जबरदस्ती, अन्यायकारक राजीनामा घेण्याची प्रक्रिया आणि एचआर (HR) नियमांमधील त्रुटी दूर करण्यासाठी उपाय योजना आवश्यक आहे. या संदर्भात सखोल चौकशी करण्यासोबतच विशेष अभ्यास गट गठीत करण्यात यावा. आयटी कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांना लक्ष्य करून त्यांच्यावर जबरदस्तीने राजीनामा देण्याची सक्ती केली जात असल्याच्या तक्रारी वारंवार येत आहेत. या पार्श्वभूमीवर अशा प्रकारच्या घटनांची सखोल चौकशी करावी. एचआर नियम आणि कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याच्या पद्धतींचे नियमन झाले पाहिजे. कर्मचाऱ्यांचे पीएफ खाते असलेले आणि जुन्या कंपनीने ' डी लिंक ' न केलेल्या कर्मचाऱ्यांच्याबाबत भविष्य निर्वाह निधी कार्यालयाला कळविण्यात यावे. याबाबत पत्रव्यवहार करून अशा कर्मचाऱ्यांना मदत करावी, असे कामगार मंत्री ॲड फुंडकर म्हणाले.शॉप ॲक्ट (Shop Act) परवाना असलेल्या प्लेसमेंट एजन्सींची माहिती घ्यावी. अनेकदा प्लेसमेंट एजन्सींच्या माध्यमातून होणाऱ्या नियुक्तीत अनियमितता आढळते. त्यामुळे अशा सर्व एजन्सींच्या कागदपत्रांची पडताळणी करून त्यांची सत्यता तपासण्यात यावी. आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देण्यासाठी विशेष जनजागृती मोहीम राबवावी. कामगार विभागाच्या सीआयएस (CIS) प्रणालीचा वापर करून कर्मचाऱ्यांना त्यांच्या तक्रारी कशा नोंदवता येतील, याची माहिती कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची कार्यवाही करावी, अशा सूचनाही कामगार मंत्री ॲड फुंडकर यांनी दिल्या.

फीड फीडबर्नर 21 Apr 2026 7:10 pm

Eknath Shinde : सुनेत्रा पवारांना बहुमताने निवडून आणणे हीच अजित पवारांना खरी श्रद्धांजली

ठाणे : नेत्रा पवार यांच्यासारख्या सक्षम, संवेदनशील आणि लोकाभिमुख उमेदवाराला प्रचंड बहुमताने निवडून आणण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिकांना केले. तसे करणे हीच स्वर्गीय अजितदादा पवार यांना खरी श्रध्दांजली ठरेल असेही त्यांनी यावेळी सांगितले. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी २३ एप्रिल रोजी मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर बारामती येथे झालेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याला शिंदे यांनी दुरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून मार्गदर्शन केले.शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याला मार्गदर्शन करतांना सुरूवातीला अजित पवारांच्या स्मृतीला अभिवादन केले. अजित पवारांच्या निधनानंतर बारामती मधल्या घराघरांमध्ये आपला माणूस गेल्याची भावना होती. अशा पार्श्वभूमीवर ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी अपेक्षा होती, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.मी तुमच्यासमोर केवळ राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून नाही, तर तुमच्या कुटुंबातील एक सदस्य म्हणून उभा आहे. आपल्याला केवळ लोकप्रतिनिधी निवडायचा नाही, तर आपल्या परिसराचा स्वाभिमान आणि विकासाचा वारसा पुढे नेणारी व्यक्ती निवडायची आहे. अजित पवारांनी बारामतीच्या विकासासाठी कशाप्रकारे मेहनत घेतली आहे हे आपणाला माहितच आहे. आज शिवसेना, महायुतीच्या माध्यमातून आपण सुनेत्रा पवार यांच्यासारख्या सक्षम, संवेदनशील आणि लोकाभिमुख उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी एकत्र आलो असून त्यांना निवडून आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असे आवाहन एकनाथ शिंदे म्हणाले.सुनेत्रा पवार बारामतीच्या प्रत्येक कुटुंबाचा, शेतकऱ्याचा, महिलांचा आणि तरुणांचा आवाज बनतील असा विश्वास यावेळी एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला. सुनेत्रा पवारांना तुम्ही अनेक वर्षांपासून जवळून पाहिलं आहे. सत्तेत असो किंवा नसो, सामान्यांच्या सुखा-दुःखात धावून जाणं आणि संयमाने प्रश्न सोडवणं हा त्यांचा स्वभाव आहे. राजकारणापेक्षा समाजकारणावर त्यांनी नेहमीच भर दिला. घराची जबाबदारी सांभाळत असतानाच, समाजाच्या कल्याणासाठी त्यांनी स्वतःला झोकून दिल्याची भावना एकनाथ शिंदेंनी व्यक्त केली.ही निवडणूक विकासाची आणि विश्वासाची आहे. ज्या हातांनी नेहमी मदतीचा आधार दिला, त्या हातांना आज तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. अजित पवार यांनी बारामतीसाठी केलेल्या विकास कामांची परंपरा अधिक वेगाने पुढे नेण्याचं काम सुनेत्रा पवार करतील. आम्ही सर्वजण एकत्र येऊन बारामतीला आणखी सक्षम, समृद्ध आणि आधुनिक बनवू, अशी ग्वाहीही यावेळी एकनाथ शिंदेंनी दिली.सुनेत्रा पवार या आपल्या भगिनीच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावं. आपल्या डोळ्यासमोर फक्त आपल्या भागाचा विकास आणि येणाऱ्या पिढीचं भविष्य ठेवा. आमचे शिवसैनिक सुनेत्रा वहिनींना प्रचंड बहुमताने विजयी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत, असा विश्वास एकनाथ शिंदेंनी बारामती मधील लाडक्या बहिणी, भावांना दिला. यावेळी मंत्री उदय सामांत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे आणि पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

फीड फीडबर्नर 21 Apr 2026 7:10 pm

World Earth Day 2026 : समुद्रामध्ये तेल सांडलं आणि लाखो लोक रस्त्यावर उतरले..; वाचा ‘वसुंधरा दिना’ची रंजक कहाणी

22 एप्रिल रोजी वसुंधरा दिन साजरा केला जातो. यंदा या दिनाचे 56 वे वर्ष साजरे होत आहे. आज निसर्गाच्या सान्निध्यात राहून हा दिवस साजरा करा.

दैनिक प्रभात 21 Apr 2026 7:09 pm

Khashaba Jadhav : 74 वर्षांची प्रतीक्षा संपणार ! अखेर पैलवान खाशाबा जाधव यांना मिळणार मरणोत्तर पद्मविभूषण

महान पैलवान खाशाबा दादासाहेब जाधव (Khashaba Jadhav) यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार देण्याच्या प्रस्तावाबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने केंद्र सरकारला महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत.

दैनिक प्रभात 21 Apr 2026 6:55 pm

Top 10 News : खर्गेंचं वादग्रस्त विधान ते सुनेत्रा पवारांचं बारामतीकरांना भावनिक आव्हान..: वाचा आजच्या टॉप दहा बातम्या

Top 10 News : प्रभात हा महाराष्ट्रातील आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. राज्य, देश आणि जागतिक पातळीवरील ताज्या घडामोडी आणि सखोल विश्लेषण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो. चला, जाणून घेऊया

दैनिक प्रभात 21 Apr 2026 6:34 pm

Yusuf Pathan : माजी क्रिकेटपटू युसूफ पठाणचे सासरे आणि मेहुण्याला अटक, नेमकं काय घडलं? वाचा…

पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी खालिद खान व अन्य दोघांना ताब्यात घेतले.

दैनिक प्रभात 21 Apr 2026 6:31 pm

Shiv Sena : पहलगाममध्ये पर्यटकांसाठी बलिदान देणाऱ्याला शिवसेनेने दिले नवे घर

पहलगाम : “धर्म, भाषा आणि पंथाच्या पलीकडे जाऊन मानवतेसाठी स्वतःचा जीव अर्पण करणारा आदिल हा केवळ एक तरुण नव्हे, तर देशाच्या अस्मितेचा जाज्वल्य दीप आहे,” असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. “एका आईचा मुलगा, एका कुटुंबाचा आधार क्षणात हिरावला गेला… पण मानवतेसाठी दिलेलं हे बलिदान देश कधीच विसरणार नाही, ते इतिहासात कोरलं गेलं आहे,” असं ते म्हणाले.पहलगाम येथे येथे शहीद झालेल्या सय्यद आदिल हुसेन शाह यांच्या कुटुंबाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आश्वासन पूर्ण करत आर्थिक मदत आणि नवीन घर सुपूर्द केले. या भावनिक आणि अभिमानाच्या क्षणाला आयोजित कार्यक्रमात शिंदे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभाग घेतला.याआधी २२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याची आठवण करून देताना शिंदे म्हणाले की, त्या काळजाला हादरवणाऱ्या प्रसंगात निरपराध पर्यटकांना लक्ष्य करत अंधाधुंद गोळीबार सुरू होता. त्या वेळी आदिलने निर्भीडपणे पुढे जात दहशतवाद्यांच्या हातातील बंदूक हिसकावण्याचा प्रयत्न केला आणि पर्यटकांचे प्राण वाचवण्यासाठी झुंज दिली. स्वतःचा जीव पणाला लावत त्यांनी मानवतेचे रक्षण केले आणि शहीद झाले.“त्या घटनेला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे,” असे सांगत शिंदे पुढे म्हणाले, “मी स्वतः त्या वेळी पहलगामला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. श्रीनगरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीने प्रयत्न केले आणि संपूर्ण ऑपरेशनवर लक्ष ठेवले.”“तो फक्त एका कुटुंबाचा मुलगा नव्हता, तर देशाच्या भविष्याला वाचवणारा खरा योद्धा होता,” असेही त्यांनी अधोरेखित केले. “शिवसेना ही केवळ राजकीय संघटना नाही, तर देशभक्तीची जाज्वल्य ओळख आहे,” असे सांगत त्यांनी संघटनेची भूमिका स्पष्ट केली. शिवसेनेच्यावतीने आदिल यांच्या कुटुंबाला पाच लाख रुपयांची मदत आणि पक्के घर बांधून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. ते वचन पूर्ण करत उभारण्यात आलेल्या नव्या घराला “आनंद नाथ भवन” असे नाव देण्यात आले असून, ते स्वर्गीय आनंद दिघे यांच्या स्मरणार्थ ठेवण्यात आले असल्याचे शिंदे यांनी जाहीर केले.“हे घर केवळ निवारा नाही, तर एका वीराच्या बलिदानाचा सन्मान आहे,” असे त्यांनी सांगितले. “आम्ही जे बोलतो ते करतो आणि जी कमिटमेंट करतो ती पूर्ण करतो, हीच शिवसेनेची ओळख आहे,” असे ठामपणे सांगत शिंदे यांनी आदिल यांच्या कुटुंबाला विश्वास दिला. “तुम्ही एक आधार गमावला आहे, पण संपूर्ण देश तुमच्या पाठीशी उभा आहे.”स्थानिक नागरिकांनी परिसराला पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित करण्याची मागणी केली असता, केंद्र सरकारच्या सहकार्याने सकारात्मक निर्णय घेण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन शिंदे यांनी दिले. तसेच महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात पर्यटक काश्मीरमध्ये येत असून, भविष्यात ही संख्या अधिक वाढवण्यासाठी विशेष लक्ष दिले जाईल, असे त्यांनी सांगितले.दरम्यान, आदिल यांच्या कुटुंबीयांनी भावना व्यक्त करत सांगितले, “एकनाथ शिंदे यांनी दिलेले वचन पूर्ण केले. त्यांनी आम्हाला आर्थिक मदत केली आणि घरही बांधून दिले. हे घर आमच्यासाठी केवळ निवारा नसून सन्मान आणि आधार आहे.” आदिल यांच्या बहिणीने आणि भावाने यावेळी साश्रूपूर्ण नयनांनी शिंदे यांचे आभार मानले.या कार्यक्रमाला मंत्री संजय शिरसाठ, मंत्री योगेश कदम, शिवसेना सचिव कॅप्टन अजित अडसूळ, सरहद्द संस्थेचे संचालक संजय नहार, मराठवाडा युवा सेनेचे बाजीराव चव्हाण, युवासेना सचिव कोकण विभाग विकास गोगावले, युवासेना कोअर कमिटी सदस्य अभिमन्यू खोपकर, अनंतनाग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक रमीज रजा, अप अधीक्षक फारुख अहमद, जम्मू-काश्मीर शिवसेना प्रमुख अश्विनी कुमार गुप्ता, राज्य सचिव मोहम्मद शकील मोगरे यांच्यासह अनेक मान्यवर आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.शिवसेनेच्या वतीने बांधण्यात आलेले घर आदिल सय्यद यांच्या कुटुंबियांना देण्यासाठी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम हे पहलगाम जिल्ह्यातील हाफतनार या त्यांच्या मूळ गावी उपस्थित होते.

फीड फीडबर्नर 21 Apr 2026 6:30 pm

Sharad Pawar : मोठी बातमी..! शरद पवार मतदान करणार नाहीत; कारणही आलं समोर..

Sharad Pawar : प्रकृती अस्वास्थ्यामुळे शरद पवार बारामती पोटनिवडणुकीसाठी मतदान करू शकणार नाहीत.

दैनिक प्रभात 21 Apr 2026 6:17 pm

Pune News : पोलीस भरती झाल्याचे सांगून सोसायटीत पेढे वाटले..; बतावणी करणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

पोलीस भरती झाल्याचे सांगून एका तरुणाने सोसायटीत पेढे वाटले, तसेच अभिनंदन करणारा फलक चौकात लावला.

दैनिक प्रभात 21 Apr 2026 6:15 pm

Pune News : गॅस सिलेंडर वाहतुकीवरून वाद; चालकाला धमकी देत ‘पत्रकार’ असल्याचे सांगून ५ हजारांची खंडणी मागितली

पत्रकार तसेच राजकीय पदाधिकारी असल्याचे सांगत ५ हजार रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

दैनिक प्रभात 21 Apr 2026 6:12 pm

Mumbai Local Train : समोरासमोर धावणाऱ्या लोकलचा थोडक्यात अपघात टळला; CSMT येथे तांत्रिक बिघाडाने खळबळ

मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आज म्हणजेच मंगळवार २१ एप्रिल रोजी दुपारी मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथे सव्वातीनच्या सुमारास बदलापूरहून आलेली जलद लोकल तांत्रिक बिघाडामुळे नियोजित फलाटाऐवजी दुसऱ्याच फलाटावर वळवण्यात आली. मात्र त्या फलाटावर आधीच एक लोकल उभी असल्याने दोन्ही गाड्या समोरासमोर येण्याची धोकादायक स्थिती निर्माण झाली.परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मोटरमनने तत्काळ ब्रेक लावत प्रसंगावधान दाखवले आणि संभाव्य अपघात टळला. या घटनेमुळे रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.घटनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून प्लॅटफॉर्म क्रमांक ५ ते ८ दरम्यानची रेल्वे वाहतूक तात्पुरती थांबवण्यात आली. एकाच ट्रॅकवर आलेल्या लोकलला सुरक्षितपणे मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर हळूहळू सेवा पूर्ववत करण्यात आली.वाहतूक कोलमडली, प्रवाशांचे हाल :ऐन गर्दीच्या वेळेत घडलेल्या या प्रकारामुळे जलद मार्गावरील सेवा विस्कळीत झाली आणि CSMTसह इतर स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी उसळली. अनेकांना दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागली.रेल्वे प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली असून, सिग्नल यंत्रणेत नेमका कोणता बिघाड झाला याचा सखोल तपास सुरू करण्यात आला आहे. सध्या बॅकिंगची प्रक्रिया पूर्ण झाली असून, रखडलेली वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे.

फीड फीडबर्नर 21 Apr 2026 6:10 pm

Chandrashekhar Bawankule : देवस्थान इनाम जमिनींबाबत येत्या अधिवेशनात कायदा - महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

- रोपवाटिकांसाठीच्या मातीला रॉयल्टी माफमुंबई : देवस्थान इनाम जमिनींचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य सरकार विधिमंडळाच्या येणाऱ्या अधिवेशनात कायदा करणार आहे. याबवतची तयारी सुरू झाली असून, नागरिकांनी आपल्या हरकती व सूचना नोंदविण्यासाठी कायद्याचा मसुदा लवकरच संकेतस्थळावर प्रसिद्ध केला जाईल, असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी सांगितले.रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील ऐतिहासिक पेढे परशुराम देवस्थानच्या इनामी जमिनींचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासंदर्भात महसूलमंत्र्याच्या दालनात झालेल्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली. बैठकीला आमदार शेखर निकम, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनुज जिंदाल आणि महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.देवस्थान जमिनींबाबत कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सरकार सकारात्मक आहे. नवीन कायद्याची प्रक्रिया राबवताना लोकभावना आणि तांत्रिक बाबींचा विचार केला जाणार आहे. सर्वसामान्य नागरिकांना आणि संबंधित पक्षकारांना आपली मते मांडता यावीत, यासाठी ही माहिती ऑनलाइन उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे मंत्र्यांनी स्पष्ट केले.फळबागांच्या 'पीकपाणी' नोंदीत बदल :कोकणातील फळबागायतदारांसाठीही या बैठकीत एक दिलासादायक निर्णय घेण्यात आला. फळबागांचे पीकपाणी नोंद दरवर्षी करण्याऐवजी ते दर तीन वर्षांनी करण्यात यावी, यासाठी जमाबंदी विभाग व फलोत्पादन विभागाने संयुक्त प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना महसूलमंत्र्यांनी दिल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांचा दरवर्षीचा प्रशासकीय त्रास कमी होण्याची शक्यता आहे.रोपवाटिकांसाठी मातीवरील रॉयल्टी माफ होणार :जिल्ह्यातील रोपवाटिका चालकांसाठी माती उपलब्ध करून देताना त्यावर कोणतीही रॉयल्टी आकारली जाऊ नये, असा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश महसूलमंत्र्यांनी रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. या निर्णयामुळे जिल्ह्यातील फळबाग लागवडीला आणि रोपवाटिका व्यवसायाला मोठी चालना मिळण्याची चिन्हे आहेत.

फीड फीडबर्नर 21 Apr 2026 6:10 pm

Nitesh Rane : मोरा मच्छीमारांना नुकसानभरपाई द्या; मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई : जे. एन. पी. ए. मार्फत(JNPA) मार्फत चौथ्या बंदराच्या भरावाच्या कामामुळे मोरा गावातील मच्छीमारांचे झालेले नुकसान तातडीने भरून काढावे, असे निर्देश मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी दिले. संबंधित प्रकरणात मत्स्यव्यवसाय विभागाने नियमानुसार आवश्यक कार्यवाही करून हा प्रश्न मार्गी लावावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.मंत्रालयात मंत्री राणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस आमदार महेश बालदी (Mahesh Baldi), मत्स्यव्यवसाय सचिव डॉ. एन. रामास्वामी तसेच आयुक्त प्रेरणा देशभ्रतार आदी उपस्थित होते. मोरा मच्छीमार सोसायटी आणि गावातील इतर मच्छीमारांना नुकसानभरपाई देण्यासाठी त्यांच्या नुकसानीचे योग्य वर्गीकरण करून सविस्तर अहवाल संबंधित विभागाकडे सादर करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.https://prahaar.in/2026/04/21/law-on-temple-land-in-the-upcoming-session-revenue-minister-chandrashekhar-bawankule-royalty-waiver-on-soil-for-nurseries/गस्ती नौका आणि ड्रोन खरेदीचा आढावा :याच बैठकीत मत्स्यव्यवसाय विभागामार्फत खरेदी करण्यात येणाऱ्या पाच गस्ती नौका आणि ड्रोनच्या खरेदी प्रक्रियेचा आढावाही घेण्यात आला. ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश मंत्री राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

फीड फीडबर्नर 21 Apr 2026 6:10 pm

Blast in Palghar : पालघरमध्ये फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; दोघांचा दुर्दैवी मृत्यू

पालघर जिल्ह्यात (Blast in Palghar) मंगळवारी एका फटाका निर्मिती केंद्रात भीषण स्फोट झाला. या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला असून, अन्य चार जण गंभीर जखमी झाले आहेत.

दैनिक प्रभात 21 Apr 2026 5:54 pm

Tilak Varma : शतक झळकावल्यानंतर तिलक वर्माचा हार्दिक बाबत मोठा खुलासा

इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेतील ३०वा सामना काल मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात (Tilak Varma) खेळला गेला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने दमदार फलंदाजी आणि गोलंदाजीच्या जोरावर हंगामातील दुसरा विजय नोंदवला.

दैनिक प्रभात 21 Apr 2026 5:15 pm

लग्न जमेना म्हणून तरुणाची भन्नाट कल्पना, थेट बॅनरवर पठ्ठ्याने लिहिलं असं काही की तुम्हांलाही ऐकून धक्का बसेल

पुणे : लग्न जमत नाही म्हणून अनेक तरुण सध्या नैराश्यात दिसत आहे. मुलीच्या तसेच वडिलांच्या एकंदरीतच कुटुंबियांच्या मुलाकडून वाढलेल्या अपेक्षा या कारणामुळे आज अनेक मुलांना लग्न जमण्यास अडचण येत आहे. यापूर्वी तर मुलांनी लग्नासाठी मुलगी मिळत नाही म्हणून मोर्चे देखील काढलेले आहेत. आता याच सर्व गोष्टी विचारात घेता पुण्यातील एका उत्साही तरुणाने लग्नासाठी मुलगी मिळावी म्हणून अजबच पर्याय शोधला. अर्थात जेव्हा सत्य समोर आले तेव्हा त्याचा प्लॅन चांगलाच फसला.नेमकं प्रकरण काय ?लग्नासाठी उत्साही असलेला २६ वर्षीय तरुण ऋषिकेश राजू जाधव ( rushikesh jadhav ) याने लग्न जमवण्यासाठी आणि इम्प्रेशन” मारण्यासाठी भलताच प्रयोग केला. या तरुणाने स्वतःला पुणे शहर पोलीसमध्ये निवड झाल्याचे भासवण्यासाठी शहरभर फ्लेक्स लावले. लग्न जमत नसल्यामुळे आणि मुलींवर प्रभाव पाडण्यासाठी हा सगळा खटाटोप केल्याची माहिती समोर आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, ऋषिकेशचे ( rushikesh jadhav ) लग्न जमत नव्हते. मुलींच्या घरी प्रभाव पाडण्यासाठी आणि आपली प्रतिष्ठा वाढवण्यासाठी त्याने आपली पुणे शहर पोलीस दलात निवड झाल्याचे खोटे सांगितले. तो इतक्यावरच थांबला नाही तर त्याने थेट पोलीस वर्दीतील फोटो काढून ते आपल्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवर (Whatsapp Status) ठेवले आणि मी पोलीस झालो असा प्रचार सुरू केला.अखेर ऋषिकेशचे बिंग फुटले...विशेष म्हणजे त्याने स्वतःच्या अभिनंदनाचे मोठे फ्लेक्स नऱ्हे परिसरात लावले. या फ्लेक्सवर तो पोलीस वर्दीत (Fake Police) रुबाबदार दिसत होता. मात्र, परिसरातील खऱ्या पोलिसांच्या नजरेत हे फ्लेक्स पडले आणि त्यांना संशय आला. जेव्हा पोलिसांनी अधिकृतपणे या नावाच्या उमेदवाराची चौकशी केली, तेव्हा पुणे पोलीस दलात या नावाची कोणतीही व्यक्ती भरती झाली नसल्याचे (Fake Police) उघड झाले आणि ऋषिकेशचे बिंग फुटले.एवढा खोटा गाजावाजा कशासाठी ?हा सर्व प्रकार आणि खोटा गाजावाजा केवळ मुलींवर प्रभाव पाडण्यासाठी आणि लग्नाची 'लाईन' लावण्यासाठी ऋषिकेशने केल्याचे तपासात निष्पन्न झाले. नऱ्हे पोलीस ठाण्याने या प्रकरणाची गंभीर दखल घेत ऋषिकेश जाधव विरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 204 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान सोशल मीडियावर या घटनेची चर्चा चांगलीच रंगली आहे. दरम्यान एकाबाजूला वाढणाऱ्या अपेक्षा आणि दुसऱ्या बाजूला बेरोजगारीचा मुद्दा यामुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

फीड फीडबर्नर 21 Apr 2026 5:10 pm

Tariff Refund : अमेरिकेचा मोठा निर्णय : भारताला मिळू शकतो तब्बल ₹1 लाख कोटींचा टॅरिफ रिफंड!

अमेरिकेत सुरू असलेल्या व्यापार चर्चांदरम्यान भारतासाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प Donald Trump यांच्या काळात लादण्यात आलेल्या मनमानी टॅरिफबाबत अमेरिकन न्यायालयाने आक्षेप घेतल्यानंतर आता भारतीय वस्तूंवर आकारलेल्या शुल्काच्या परताव्याचा मार्ग मोकळा झाला आहे.त्या काळात भारतीय वस्तूंवर लावण्यात आलेल्या मोठ्या टॅरिफपैकी सुमारे १० ते १२ अब्ज डॉलर्स इतका भाग बेकायदेशीर ठरू शकतो. भारतीय रुपयांत याची किंमत अंदाजे ₹८३,००० ते ₹१,००,००० कोटी इतकी आहे. या रकमेच्या परताव्यासाठी अमेरिकेच्या कस्टम्स विभागाने २० एप्रिल २०२६ पासून CAPE प्लॅटफॉर्मचा पहिला टप्पा सुरू केला आहे.‘रिफंड विंडो’ उघडली कशी?हा संपूर्ण वाद आंतरराष्ट्रीय आपत्कालीन आर्थिक अधिकार कायदा International Emergency Economic Powers Act (IEEPA) अंतर्गत लावलेल्या दंडात्मक शुल्कांशी संबंधित आहे. ‘अमेरिका फर्स्ट’ धोरणांतर्गत अनेक देशांवरील आयातीवर मोठे टॅरिफ लादण्यात आले होते. मात्र, अमेरिकेच्या न्यायालयांनी या निर्णयातील त्रुटी दाखवत हे शुल्क कायद्याच्या मूलभूत तत्त्वांच्या विरोधात असल्याचे नमूद केले.या निर्णयानंतर अमेरिकेने जागतिक स्तरावर सुमारे १६६ अब्ज डॉलर्सच्या टॅरिफ रिफंडसाठी दार उघडले असून, त्यासाठी नवीन ऑनलाइन पोर्टलही सुरू करण्यात आले आहे.https://prahaar.in/2026/04/21/us-india-trade-deal-indian-delegation-to-visit-washington-this-week-for-us-india-trade-deal/भारतीय निर्यातदारांना कसा फायदा?ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्ह Global Trade Research Initiative (GTRI) च्या माहितीनुसार, या रिफंडपैकी मोठा हिस्सा भारतात तयार झालेल्या वस्तूंशी संबंधित आहे.तथापि, हा रिफंड थेट भारतीय निर्यातदारांना मिळणार नाही, कारण दावा करण्याचा अधिकार फक्त अमेरिकन आयातदारांकडे (US importers) आहे. त्यामुळे भारतीय निर्यातदारांना त्यांच्या अमेरिकन खरेदीदारांशी समन्वय साधावा लागेल.भविष्यातील ऑर्डर्समध्ये सवलत, रिफंड शेअरिंग किंवा किंमतीत बदल करून भारतीय कंपन्या या रकमेचा फायदा घेऊ शकतात. विशेषतः टेक्सटाइल, इंजिनिअरिंग वस्तू आणि केमिकल्स क्षेत्रांना यामुळे मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

फीड फीडबर्नर 21 Apr 2026 5:10 pm

Mumbai local : मोठा अपघात टळला.! एकाच ट्रॅकवर समोरासमोर दोन लोकल, नेमकं काय घडलं?

ऐन गर्दीच्या वेळी जलद मार्गावरील सेवा विस्कळीत झाल्याने CSMTसह इतर स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती.

दैनिक प्रभात 21 Apr 2026 4:53 pm

Rule For Gas Cylinder : ‘हा’नंबर नसेल तर सिलिंडर मिळणारच नाही; सरकारकडून नवा नियम लागू

Rule For Gas Cylinder : अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे जागतिक पातळीवर मोठे ऊर्जा संकट (Rule For Gas Cylinder) निर्माण झाले आहे. याचा थेट फटका भारतालाही बसत आहे.

दैनिक प्रभात 21 Apr 2026 4:43 pm

Chhagan Bhujbal : भुजबळ बोलताना सुप्रिया सुळेंची एंट्री; दादांच्या नावाच्या घोषणांनी परिसर दणाणला, पहा भावुक व्हिडीओ

Chhagan Bhujbal : बारामती पोटनिवडणूक सांगता सभेत छगन भुजबळ यांनी सुनेत्रा पवार यांच्या विजयाचे आवाहन केले.

दैनिक प्रभात 21 Apr 2026 4:36 pm

Nitesh Rane : मंत्री नितेश राणे यांच्याकडे रायगड दक्षिणची धुरा

- महाराष्ट्र भाजपकडून जिल्हानिहाय प्रभारी जाहीरमुंबई : संघटन बांधणी मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र भाजपने मंगळवारी जिल्हानिहाय प्रभारींची नियुक्ती केली. राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांच्याकडे रायगड दक्षिण जिल्ह्याच्या प्रभारी पदाची महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. कोकणात पक्षाची पकड अधिक घट्ट करण्याच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.सिंधुदुर्गसाठी आमदार योगेश सागर, रत्नागिरी उत्तरसाठी आमदार प्रशांत ठाकूर आणि रत्नागिरी दक्षिणसाठी निरंजन डावखरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रायगड उत्तर भागाची जबाबदारी अतुल काळसेकर यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. ठाणे आणि नवी मुंबईसाठीही पक्षाने विशेष रणनीती आखली आहे. ठाणे शहरासाठी विक्रांत पाटील, तर ठाणे ग्रामीणच्या प्रभारीपदी उपाध्यक्ष केशव उपाध्ये यांची वर्णी लागली आहे. नवी मुंबईत शशिकांत कांबळे, कल्याणमध्ये जयप्रकाश ठाकूर आणि उल्हासनगरमध्ये नाना सूर्यवंशी संघटनात्मक बांधणीचे काम पाहतील. पालघरसारख्या आदिवासी बहुल आणि संवेदनशील जिल्ह्यासाठी राणी द्विवेदी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.https://prahaar.in/2026/04/21/navi-mumbai-panvel-unseasonal-rains-arrive-relief-from-the-heat-but-citizens-scramble/उत्तर महाराष्ट्रात नाशिक दक्षिण जिल्ह्याची धुरा माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्याकडे सोपवण्यात आली असून, नाशिक शहरासाठी मंगेश चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. धुळे शहरात माजी केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली असून, धुळे ग्रामीणसाठी रवींद्र अनासपुरे यांची नियुक्ती झाली आहे. जळगाव जिल्ह्यातही रोहिणी नायडू, अनुप अग्रवाल आणि प्रदीप पेशकार यांच्याकडे विविध विभागांची जबाबदारी देण्यात आली आहे. तर अहिल्यानगर उत्तर भागात लक्ष्मण सावजी हे पक्षाचे काम पाहतील.

फीड फीडबर्नर 21 Apr 2026 4:30 pm

Ayush Mhatre Injury : CSK ला मोठा धक्का ! आयुष म्हात्रे दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर

Ayush Mhatre Injury : चेन्नई सुपर किंग्स साठी आयपीएल २०२६ चा हंगाम अत्यंत निराशाजनक (Ayush Mhatre Injury) सुरु आहे. या दिग्गज संघाला १९व्या मोसमात अद्याप लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही.

दैनिक प्रभात 21 Apr 2026 4:13 pm

CM Devendra Fadnavis : 'अर्बन नक्षलवाद’ आणि अराजकता पसरवणाऱ्या शक्तींना युवाशक्तीच रोखणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

- भाजयुमोच्या ‘युवाशक्ती जागर यात्रे’चा प्रारंभमुंबई : राज्यात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणि 'अर्बन नक्षलवादा'च्या माध्यमातून तरुणांच्या मनात संविधानाविरुद्ध विष पेरणाऱ्या शक्तींना रोखण्याचे काम 'युवाशक्ती जागर यात्रा' करेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी व्यक्त केला. भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आयोजित या राजव्यापी यात्रेचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.याप्रसंगी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, भाजयुमो प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस आणि रवींद्र चव्हाण यांनी कार रॅलीला हिरवा झेंडा दाखवून यात्रेचा अधिकृत प्रारंभ केला. मुख्यमंत्री म्हणाले की, महाराष्ट्रात ३५ वर्षांखालील तरुणांची लोकसंख्या ६५ टक्के आहे. ही मोठी शक्ती जर संघटित होऊन एका दिशेने चालली, तर राज्यात मोठे परिवर्तन घडून येईल. मात्र, सध्या काही शक्ती युवकांमध्ये संविधानाविरुद्ध कलुषित मते पसरवत आहेत. या तरुणांना संविधानाने दिलेल्या व्यवस्थेप्रती जागृत करण्याची जबाबदारी युवा मोर्चा पार पाडेल.https://prahaar.in/2026/04/21/navi-mumbai-panvel-unseasonal-rains-arrive-relief-from-the-heat-but-citizens-scramble/महिला आरक्षण विधेयकावरून मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर कठोर शब्दांत टीका केली. संसदेत विरोधकांनी महिला आरक्षणाची जणू 'भ्रूणहत्या'च केली. जनगणना आणि पुनर्रचनेच्या (डिलिमिटेशन) नावाखाली विरोधक खोटे बोलून लोकांची दिशाभूल करत आहेत. मुळात त्यांना आरक्षण द्यायचेच नाही, ही त्यांची बुरसटलेली मानसिकता आहे. या यात्रेच्या माध्यमातून नारीशक्तीला जागृत करून विरोधकांना या विधेयकाला पाठिंबा देण्यास भाग पाडले जाईल, असेही फडणवीस यांनी नमूद केले.यात्रेचे स्वरूप आणि उद्दिष्टे : भाजयुमोची ‘युवाशक्ती जागर यात्रा' संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार असून शेतकरी, कामगार आणि आयटी क्षेत्रातील तरुणांपर्यंत पोहोचणार आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यात गेल्यामुळे युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये राजकीय व सामाजिक प्रगल्भता येईल. कृष्णराज महाडिक यांच्या नेतृत्वाखाली युवा मोर्चाला राज्यातील पहिल्या क्रमांकाची संघटना बनवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्य सरकारच्या योजना गावखेड्यातील शेवटच्या तरुणापर्यंत पोहोचवण्यासाठी ही यात्रा मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला. कृष्णराज महाडिक यांनी यात्रेच्या नियोजनाबाबत माहिती देताना सांगितले की, केवळ राज्यातीलच नव्हे तर केंद्रातील नेत्यांचे आणि विद्यार्थी चळवळीतील तज्ज्ञांचे मार्गदर्शन या यात्रेसाठी घेण्यात आले असून, राज्यातील संपूर्ण युवावर्ग या मोहिमेत जोडला जाईल.

फीड फीडबर्नर 21 Apr 2026 4:10 pm

Tej Pratap Yadav : “प्रियांका गांधी देश चालवू शकतात, त्यांच्यात इंदिरा गांधींचे प्रतिबिंब दिसते”–तेज प्रताप यादव

राहुल गांधींना परदेशात जास्त रस वाटू लागला असेल. त्यांना भारताचा कंटाळा आला आहे. ताजी हवा घेण्यासाठी ते परदेशात जातात.

दैनिक प्रभात 21 Apr 2026 3:54 pm

Maharashtra Politics : मोदींना हटवण्यासाठी भाजपमध्येच मोठं षडयंत्र; ‘या’बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

Maharashtra Politics : संजय राऊत यांनी भाजपमध्ये मोठी फूट पडल्याचा दावा केला असून महिला आरक्षण विधेयकाच्या आडून ८५० खासदार करण्याचा डाव असल्याचे म्हटले आहे.

दैनिक प्रभात 21 Apr 2026 3:54 pm

Tamil Nadu Election : तमिळनाडूतील प्रचार थंडावला; बहुपक्षीय लढतीत लक्ष मतदान यंत्रांकडे

Tamil Nadu Election : यावेळची निवडणूक लढत प्रामुख्याने दोन प्रमुख आघाड्यांमधील थेट सामना म्हणून पाहिली जात आहे.

दैनिक प्रभात 21 Apr 2026 3:37 pm

भोंदू अशोक खरातच्या अडचणीत वाढ, कुटुंबियांचीही वाढणार अडचण; कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर..., हालचालींना वेग

नाशिक : संपूर्ण देशालाच हादरवून सोडणाऱ्या भोंदू अशोक खरातच्या (Ashok Kharat) अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. महिलांवरील अत्याचार, आर्थिक फसवणूक, अंधश्रद्धेला खतपाणी घालणे असे गंभीर आरोप खरातवर आहे. सध्या भोंदू खरात कोठडीत असून त्याची कसून चौकशी सुरु आहे. खरात याच्या कथित आर्थिक गैरव्यवहारांप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) कारवाईचा वेग वाढवला असून, त्याच्या बेनामी संपत्तीवर टाच आणण्यासाठी कठोर पाऊल उचलली जात आहेत. त्यामुळे आता अशोक खरातसह त्याच्या कुटुंबीयांचीही अडचण वाढणार आहे.भोंदू खरातकडे कोट्यवधींची मालमत्ता खरातची किमान १५ ते १७ हजार कोटींची संपत्ती असल्याचा अंदाज आहे. यात कोट्यवधीची बेनामी मालमत्ता आहे. प्राथमिक तपासात बेकायदेशीर मार्गाने मिळवलेली मालमत्ता तात्पुरती जप्त (प्रोव्हिजनल अटॅचमेंट) करण्याची प्रक्रिया 'ईडी'कडून राबवली जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. पुढील टप्प्यात खरातला समन्स बजावून चौकशी, बैंक खात्यांची तपासणी, आर्थिक देवाणघेवाणीचे विश्लेषण आणि आवश्यकता असल्यास अटकेची कारवाईही केली जाऊ शकते. त्यामुळे एसआयटीकडून ईडीकडे खरातचा (Ashok Kharat) ताबा काही दिवसांपुरता जाऊ शकतो. त्यासाठी ईडी न्यायालयाची परवानगी मागणार आहे. सध्या खरात पाचव्या गुन्ह्यात पोलिस कोठडीत आहे.ईडीकडून एक स्वतंत्र गुन्हा खरातवर अगोदरच दाखल झालेला आहे. त्यानंतर त्याच्या घरासह कार्यालयावर ईडीने धाड टाकली होती. या चौकशीत खरातचे प्रॉपर्टी रॅकेट समोर आले होते. त्यात आता खरातशी संबंधित शासनातील काही अधिकारी, खासगी ब्रोकर, पुणे व नाशिकमधील काही विकासक रडारवर आहेत. नाशिक-अहिल्यानगर-पुणे (Nashik-Ahilyanagar-Pune) यादरम्यानचे खरातचे प्रॉपर्टी रॅकेट उघड झाल्यानंतर सोलापूरमध्ये देखील खरातने जमीन लाटल्याचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर ईडीकडून अत्यंत सावध पावले उचलली जात असून पहिल्या टप्प्यात खरातचे बँक खाते तात्पुरते सील करण्यात आले.कुटुंबियांचीही होणार अडचणअशोक खरात आधीच अडचणीत असताना ईडीने जर खरातच्या एखाद्या मालमत्तेवर तात्पुरती टाच (प्रोव्हिजनल अटॅचमेंट) आणली तर त्याचे कुटुंबीय देखील अडचणीत येतील. कारण असे झालयास खरातच्या मालमत्तेबाबत आणि व्यवहारांवर अनेक निर्बंध येतील. महत्त्वाचे म्हणजे संबंधित मालमत्ता खरात जरी तुरुंगात असला तरी त्याच्या कुटुंबातील वारसदारास अन्य कोणालाही विकता येणार नाही तसेच दुसऱ्याच्या नावावर हस्तांतरण, गिफ्ट किंवा वसीयतद्वारे बदल करणेही बंद होणार आहे. बँकेत कर्जासाठी खरात व त्याच्या पत्नीच्या नावावर असलेली मालमत्ता गहाण ठेवता येणार नाही. याशिवाय कागदपत्रांमध्ये फेरफार करणे किंवा मालमत्ता लपवण्याचे प्रयत्न केल्यास तो कायदेशीर गुन्हा ठरू शकतो.

फीड फीडबर्नर 21 Apr 2026 3:30 pm

Navi Mumbai- Panvel : नवी मुंबई–पनवेलमध्ये अवकाळी पावसाची हजेरी; उकाड्यातून दिलासा, पण नागरिकांची तारांबळ

नवी मुंबई : गेल्या काही दिवसांपासून तीव्र उकाड्याने हैराण झालेल्या नवी मुंबई आणि पनवेल परिसरातील नागरिकांना आज सकाळी अचानक आलेल्या अवकाळी पावसाने मोठा दिलासा मिळाला. दमट हवामानामुळे पावसाची शक्यता वर्तवली जात असतानाच सकाळी सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास पनवेलसह नवी मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावली. ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह आलेल्या या पावसामुळे कामासाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. रेल्वे स्थानके, मुख्य रस्ते, बाजारपेठा आणि चौकांमध्ये अचानक गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.दुचाकीस्वारांना या पावसाचा सर्वाधिक फटका बसला असून अनेकांनी झाडांच्या आडोशाला किंवा बसथांब्यांवर आसरा घेतला. काही ठिकाणी वाहतुकीवरही तात्पुरता परिणाम झाला. तरीही या सरींसोबत आलेल्या गार वाऱ्यामुळे वातावरणात सुखद गारवा निर्माण झाला आणि उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांनी या पावसाचा मनमुराद आनंद घेतला. लहान मुलांनी तर पावसात भिजत खेळण्याचा आनंद लुटला. मात्र कार्यालयात जाणारे कर्मचारी, शाळकरी विद्यार्थी आणि प्रवासी वर्ग यांना पावसामुळे भिजतच प्रवास करावा लागला.https://prahaar.in/2026/04/21/manipur-earthquake-5-2-magnitude-earthquake-hits-manipur-panic-among-citizens/दरम्यान, हवामान खात्याने आधीच उकाड्यासोबतच काही भागांत पावसाची शक्यता व्यक्त केली होती. बदलत्या हवामानामुळे पुढील दोन ते तीन दिवस अशाच हलक्या सरी पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आजचा पाऊस हा केवळ हवामानातील बदल नसून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांसाठी दिलासादायक ठरला आहे.https://prahaar.in/2026/04/21/ipl-2026-tilak-varma-mumbai-indians-triumph-on-the-back-of-tilak-varmas-magnificent-century/दरम्यान, बदलापूर परिसरातही अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. गेल्या दोन दिवसांपासून तापमान चाळीस अंशांच्या पुढे गेल्याने नागरिक त्रस्त झाले होते. अशातच सकाळी ढग दाटून आले आणि गडगडाटासह पावसाने शहराला झोडपून काढले. अचानक आलेल्या या पावसामुळे कामावर जाणाऱ्या नोकरदार वर्गाची विशेष गैरसोय झाली. अनेकांना भिजतच रेल्वे स्थानक गाठावे लागले, तर ग्रामीण भागातही या पावसाचा परिणाम जाणवला. एकूणच, या अवकाळी पावसाने उकाड्यापासून दिलासा दिला असला तरी दैनंदिन जीवनात काही प्रमाणात विस्कळीतपणा निर्माण केल्याचे चित्र पाहायला मिळाले.

फीड फीडबर्नर 21 Apr 2026 3:30 pm

Mumbai 3.0 : अटल सेतू ते पुणे द्रुतगती जोडमार्ग फेब्रुवारी २०२७ पर्यंत पूर्ण होणार

- ‘मुंबई ३.०’साठी कनेक्टिव्हिटीचे जाळे; जोडमार्गाचे अभियांत्रिकी टप्पे पूर्णत्वाकडेमुंबई : मुंबई आणि पुणे या दोन प्रमुख शहरांमधील प्रवासाचे अंतर अवघ्या काही मिनिटांवर आणणाऱ्या 'अटल सेतू ते मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग' या जोडप्रकल्पाने (कनेक्टर) महत्त्वाचे अभियांत्रिकी टप्पे ओलांडले आहेत. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) या कामाला विशेष गती दिली असून, आतापर्यंत १४३ ठिकाणी पाया उभारणी (फाऊंडेशन) पूर्ण झाली आहे. या प्रकल्पामुळे 'मुंबई ३.०' च्या संकल्पनेला बळ मिळणार असून नवी मुंबई विमानतळ आणि पुण्याकडे जाणारा प्रवास सिग्नलविरहित होणार आहे.७.३५ किमी लांबीच्या या सहा मार्गिकांच्या पुलाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. एकूण १७६ पायाभूत ठिकाणांपैकी १४३ ठिकाणचे काम पूर्ण झाले असून, १४१ ठिकाणी पियर्स (खांब) उभे राहिले आहेत. प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या ८३० प्रीकास्ट गर्डर्सपैकी ६५३ गर्डर्सची उभारणी पूर्ण झाली आहे. पळस्पे परिसरात द्रुतगती मार्गाला जोडण्यासाठी स्लिप रोड्स आणि सर्व्हिस रोड्सच्या रुंदीकरणाचे कामही समांतरपणे सुरू आहे, ज्यामुळे वाहतूक कोंडीविना प्रवाशांना महामार्गावर प्रवेश मिळेल.हा कॉरिडॉर पूर्ण झाल्यानंतर अटल सेतूमार्गे (शिवडी-न्हावा शेवा) चिर्ले आणि पळस्पेवरून थेट पुण्याकडे जाता येईल. यामुळे प्रवासाच्या वेळेत मोठी बचत होणार असून लॉजिस्टिक्स क्षेत्रालाही गती मिळणार आहे. विशेष म्हणजे, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळालाही या मार्गामुळे सुलभ प्रवेश मिळणार असल्याने हा मार्ग भविष्यात मुंबई आणि पुण्याच्या आर्थिक प्रगतीचा कणा ठरणार आहे.https://prahaar.in/2026/04/21/us-india-trade-deal-indian-delegation-to-visit-washington-this-week-for-us-india-trade-deal/नोकरदार आणि विद्यार्थ्यांचा दैनंदिन प्रवास सुलभ होईल : डॉ. संजय मुखर्जी, महानगर आयुक्त, एमएमआरडीएअटल सेतूमार्गे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आता सिग्नलविरहित प्रवास शक्य होईल. यामुळे नोकरदार आणि विद्यार्थ्यांचा दैनंदिन प्रवास सुलभ होईल. 'मुंबई ३.०' घडवताना तासांचा प्रवास मिनिटांत आणण्याचे आमचे 'मुंबई इन मिनिट्स' हे उद्दिष्ट या प्रकल्पाद्वारे पूर्ण होत आहे.गुंतवणुकीला पूरक वातावरण :फेब्रुवारी २०२७ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे एमएमआरडीएचे उद्दिष्ट आहे. हा मार्ग नव्या विकासकेंद्रांना जोडणारा दुवा ठरेल. यामुळे मुख्य मुंबईवरील ताण कमी होऊन नवी मुंबई आणि आसपासच्या भागात औद्योगिक गुंतवणूक आणि रोजगारनिर्मितीला मोठी चालना मिळेल. समुद्री पूल, द्रुतगती मार्ग आणि मेट्रो नेटवर्कचे एकात्मिक जाळे विणण्याच्या एमएमआरडीएच्या योजनेतील हा एक महत्त्वाचा दुवा आहे.प्रकल्पाची वैशिष्ट्ये :लांबी : ७.३५ किलोमीटर.मार्गिका : सहा (११.५ मी. + ११.५ मी. रुंद).प्रमुख जोडणी : अटल सेतू, मुंबई-पुणे एक्सप्रेसवे आणि नवी मुंबई विमानतळ.सद्यस्थिती : १४१ पियर्स आणि ६५३ गर्डर्सची उभारणी पूर्ण.

फीड फीडबर्नर 21 Apr 2026 3:30 pm

आठवणींच्या मैफलीत

आशय : वीणा सानेकर डहाणू जवळ ऐने नावाचे छोटेसे गाव आहे. या गावात वसलेल्या स्नेहनगरीत जाण्याचा योग नुकताच आला. एका बाजूला क्रीडांगण, नवीनच वसलेले कला कुटिर, सर्वत्र हिरवीगार झाडे, सहअध्ययन केंद्र, मध्यभागी बैठक जमवण्यासाठी मस्त जागा…, दुसरीकडे बैठी शाळा, छोटीशी बाग आणि खेळ…! ही स्नेहनगरी वसवणाऱ्या शिक्षणतज्ज्ञ आणि भाषातज्ज्ञ रमेश पानसे यांची भेट म्हणजे समृद्ध करणारा अनुभव! बालशिक्षणात रमलेले पानसे सर शिक्षणाबद्दल तासन् तास बोलू शकतात...’ त्यादिवशी मात्र कवितांच्याच मैफलीचा बेत सरांनी उत्स्फूर्तपणे ठरवला.सगळे नव्याने उभ्या राहिलेल्या पर्णकुटीत जमले. बैठकीची गोल रचना. दिवे लागल्याने प्रकाशाची पखरण वातावरण सुंदर करत होती. सगळे सुचेल तशा कविता म्हणत होते. किती वेगवेगळ्या कवितांचा आनंद सगळे लुटत होते. सोबत अनिताताईंनी केलेली गरमगरम भजी शामदादा समोर ठेवत होते आणि मैफलीला अधिकच रंग चढत होता.यानिमित्ताने आपल्या आवडत्या कविता सगळेच आठवत - शोधत होते.युगामागुनी चालली रे युगे ही कितीदा करावी भास्करा वंचनाकितीकाळ कक्षेत धावू तुझ्या मी कितीदा करू प्रितीची याचनाही कुसुमाग्रजांची पृथ्वीचे प्रेमगीत कविता, कुब्जा ही इंदिरा संतांची कविता, बा.भ . बोरकरांची कविता, पु. शि.रेगे, सदानंद रेगे, वसंत आबाजी डहाके, गदिमा, शांता शेळके यांची कविता अशा वेगवेगळ्या कविता उपस्थित जयेश, ज्योती, सुषमाताई, स्नेहल, ईशा, पानसे सर अशा सर्वांनीच सादर केल्या. अधूनमधून कुणी स्वतःच्या जपून ठेवलेल्या कविताही सादर करीत होते.या रंगलेल्या मैफलीत मोजकेच छोटे प्रेक्षक होते. त्यांच्यासाठी विंदा करंदीकरांच्या ‘एटु लोकांचा देश,’ ‘अबबब अबबब केवढा फणस आई’ या बालकविताही सादर झाल्या. मनमोहन नातू, पद्मा गोळे यांच्या कविता ऐकायला मिळणे हा दुर्मिळ आनंद होता. सेल्युलर तुरुंगाची भिंत आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यातील संवाद मनमोहन नातू यांच्या कवितेतून साकारला तर ‘मी एक पक्षीण आकाश वेडी दुज्याचे मला भान मुळी नसे’ ही कविता समर्थ स्त्रीचा आत्मस्वर टिपत होती.शब्दांमध्ये जगणे पुन्हा, शब्दांमध्ये मरणे पुन्हा हे अंतहीन समुद्रसे माझा परि दुबळा पसा अशी अवस्था कविता ऐकताना होत होती.‘सई माया सजनीले, सैनच पडेना हे व्हराडी लोकगीत’ ऐकणे आणि ताल धरणे हा अत्यंत वेगळाच आनंद होता. लघुअनियतकालिकांच्या चळवळीचे पानसे सर म्हणजे महत्वाचे साक्षीदार. त्या सगळ्या काळातील वाड्मयीन घडामोडीं विषयी पानसे सर मोकळेपणाने बोलत राहिले. सतीश काळसेकर, मनोहर ओक, गुरुनाथ धुरी यांच्यावर सर भरभरुन बोलत. तसेच मराठीच्या विविध प्राध्यापक व लेखक - कवींच्या आठवणी निघत होत्या. शंकर वैद्य सरांचे अध्यापन आणि त्यांची कविता हा सरांचा आवडता विषय. सरांचा ‘दर्शन’ हा कवितासंग्रह या गप्पांमध्ये पुन्हा पुन्हा आठवत राहिला. एम ए च्या वर्गात असताना सरोजिनी बाई वैदय, शंकर वैद्य सर, डहाके सर, गणोरकर बाई, पुष्पा भावेबाई यांचे वर्ग स्मरत होते. अनपेक्षितपणे जमलेली ही मैफिल कवितांची होती, शब्दांची होती, गीतांची आणि गीतकारांची होती, तितकीच ती माणसांच्या अविस्मरणीय आठवणींची होती.

फीड फीडबर्नर 21 Apr 2026 3:10 pm

Santosh Deshmukh : 'त्यांच्यावर कुटुंबीयांचा दबाव'..., मस्साजोगच्या सरपंचपदाच्या उमेदवाराचा खळबळजनक आरोप

संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या सरपंच संतोष देशमुख ( Santosh Deshmukh ) यांच्या मस्साजोग या गावात राजकीय वातावरण रंगले आहे. मस्साजोग गावच्या सरपंच पदाची पोटनिवडणुक ही बिनविरोध होईल अशी चर्चा होती कारण या जागेसाठी संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी संतोष देशमुख या उभ्या होत्या मात्र आता ही निवडणूक बिनविरोध होणार नसून अश्विनी संतोष देशमुख आणि स्वरूपानंद विश्वनाथराव देशमुख यांच्यात आता थेट लढत होणार आहे. आणखी ३ उमेदवार निवडणूक लढवण्यास इच्छुक होते मात्र अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ५ पैकी ३ उमेदवारांनी माघार घेतल्याने ही चुरस अधिकच स्पष्ट झाली आहे.'त्यांच्यावर कुटुंबीयांचा दबाव' - स्वरूपानंद देशमुखदिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या निधनाने रिक्त झालेली जागा ही त्यांच्या पत्नी अश्विनी देशमुख ( Ashwini Santosh Deshmukh )यांना मिळावी यासाठी अनेक जण आग्रही होते मात्र तसे काही घडले नाही. दरम्यान अश्विनी देशमुख यांच्या विरोधात उभे असलेले उमेदवार स्वरूपानंद देशमुख यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. स्वरूपानंद देशमुख यांनी गंभीर आरोप करत म्हटले की, अश्विनी देशमुख या स्वतः हून निवडणूक लढवत नसून त्यांच्यावर त्यांच्या कुटुंबाचा, विशेषतः त्यांच्या दिराचा मोठा दबाव आहे. काहींची राजकीय महत्त्वाकांक्षा आडवी येत असल्याने अश्विनी देशमुख यांना या निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले असल्याचा आरोप त्यांनी केला....तर गावासमोर नाक घासेनसरपंच पदाची पोटनिवडणूक २८ एप्रिल रोजी होणार असून २९ एप्रिल रोजी मतमोजणी होईल. दरम्यान स्वरूपानंद देशमुख हे पोटनिवडणुकीत उभे राहिल्याने त्यांना अनेकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. कोणाच्या तरी सांगण्यावरून किंवा 'डमी' उमेदवार म्हणून स्वरूपानंद देशमुख उभे राहिले आहेत, असा आरोप त्यांच्यावर केला जात होता. या आरोपाला त्यांनी प्रत्युत्तर देत खुले आव्हान देत म्हटले आहे की जर मी कोणाच्या सांगण्यावरून उभा राहिलो आहे हे सिद्ध झाले, तर सर्व गावासमोर नाक घासून त्यांना पाठिंबा द्यायला तयार आहे.हीच त्यांना खरी श्रद्धांजलीयापूर्वी मला ग्रामस्थांनी साडेतीन वर्षे काम करण्याची संधी दिली होती. आता पुढील १८ महिन्यांच्या कार्यकाळात संतोष देशमुख यांचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली असेल, असेही स्वरूपानंद देशमुख यांनी म्हटले आहे. दरम्यान एकीकडे सहानभूतीची लाट आणि दुसरीकडे अनुभवाचा दावा यापैकी ग्रामस्थ कोणाला कौल देतील हे निवडणूक निकालात दिसून येईल. त्यामुळे या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे.

फीड फीडबर्नर 21 Apr 2026 3:10 pm

साध्वी : मिस इंडिया २०२६

सौंदर्य आणि प्रतिभेसाठी भारतातील सर्वात प्रतिष्ठित व्यासपीठ असलेल्या 'मिस इंडिया'च्या ६१ व्या पर्वाचा नुकतेच ऐतिहासिक समारोप झाला. १८ एप्रिल २०२६ रोजी ओडिशाच्या भुवनेश्वर येथील कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजीमध्ये झालेल्या अंतिम सोहळ्यात एका नवीन नावाची सुवर्ण अक्षरात नोंद झाली.गोव्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या साध्वी सतीश सैल हिला 'मिस इंडिया २०२६' चा मुकुट प्रदान करण्यात आला. तिला 'मिस इंडिया २०२४' निकिता पोरवाल हिच्या हस्ते मुकुट प्रदान करण्यात आला. आता ती 'मिस वर्ल्ड २०२७' मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यास सज्ज झाली आहे.गोव्याची रहिवासी असलेली साध्वी सतीश सेल ही केवळ एक मॉडेलच नाही, तर एक उद्योजिकासुद्धा आहे. तिने अनेक मोठ्या फॅशन शोमध्ये रॅम्प वॉक केला आहे आणि अनेक नामांकित ब्रँड्सच्या जाहिरातींचा ती चेहरा राहिली आहे. तिची ओळख केवळ ग्लॅमरच्या जगापुरती मर्यादित नाही; ती बांधकाम आणि विकास क्षेत्रातील एका कंपनीची सह-संस्थापकसुद्धा आहे. तिने अर्थशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध या विषयात पदवी मिळवली आहे. तिला सात भाषाही येतात. मिस इंडिया बनून तिने सिद्ध केले आहे की ती केवळ सुंदरच नाही, तर खूप हुशारही आहे.आपल्या विजयानंतर, साध्वीने एक अत्यंत भावनिक संदेश शेअर केला. ती म्हणाली की, हा अनुभव तिच्यासाठी केवळ एक स्पर्धा नव्हती, तर मैत्री आणि एकत्र प्रगती करण्याचा एक प्रवास होता. आपल्या सर्व सह-स्पर्धकांना विजेते संबोधत ती म्हणाली की, त्या सर्वांचे ध्येय एकच आहे : जागतिक स्तरावर भारताला गौरव मिळवून देणे.ग्रँड फिनालेच्या रात्री, साध्वी सतीश सेलने आपल्या पोशाख आणि शैलीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या भव्य रात्रीसाठी, साध्वीने सिल्व्हर आणि ब्लॅक रंगाच्या मोनोक्रोमॅटिक गाऊनमध्ये एक धाडसी विधान केले. तिचा गाऊन वास्तुशिल्पीय आणि थोडासा हटके होता. गडद रंगाच्या बेस लेयरवर चांदीच्या रंगाच्या धातूच्या मण्यांचे काम होते, ज्यामुळे एक आकर्षक इल्युजन इफेक्ट तयार झाला होता. गाऊनवरील नक्षीकाम ठळक आणि भौमितिक होते, ज्यामुळे ती गर्दीत उठून दिसत होती. हाय-नेक आणि स्लीव्हलेस कटमुळे तिचे खांदे आणि मोहक देहयष्टी अधिकच खुलून दिसत होती. साध्वीने तिच्या केसांसाठी एक आकर्षक आणि नीटनेटका अंबाडा निवडला होता. या हेअरस्टाईलमुळे तिच्या हाय-नेक गाऊनचे तपशील आणि डिझाइन अधिकच उठून दिसत होते.मिस इंडिया २०२६ च्या अंतिम फेरीच्या परीक्षक मंडळात प्रसिद्ध नर्तक आणि नृत्यदिग्दर्शक टेरेन्स लुईस आणि अभिनेत्री-नर्तिका लॉरेन गॉटलिब यांसारख्या दिग्गजांचा समावेश होता. या संध्याकाळने पुन्हा एकदा सिद्ध केले की मिस इंडिया केवळ बाह्य सौंदर्याचे मोजमाप नाही, तर बुद्धिमत्ता आणि नेतृत्वाचा एक उत्सव आहे, ज्याचे प्रतिनिधित्व आता गोव्याची साध्वी सतीश सैल करणार आहे.

फीड फीडबर्नर 21 Apr 2026 3:10 pm

US-India Trade Deal : अमेरिका-भारत व्यापार करारासाठी भारतीय शिष्टमंडळ या आठवड्यात वॉशिंग्टनला भेट देणार

भारत आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय व्यापार करारासंदर्भातील प्रयत्न आता अंतिम आणि सर्वात महत्त्वाच्या टप्प्यात पोहोचले आहे. या कराराला अंतिम स्वरूप देण्यासाठी भारतीय प्रतिनिधीमंडळ या आठवड्यात वॉशिंग्टनला पोहोचत आहे. अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर याबाबत माहिती दिली आहे.सर्जिओ गोर यांनी एका ट्विटद्वारे अधिकृत पुष्टी करत सांगितले की, भारतीय व्यापार प्रतिनिधीमंडळ या आठवड्यात वॉशिंग्टनला पोहोचत आहे. या महत्त्वाच्या दौऱ्याचा मुख्य उद्देश द्विपक्षीय व्यापार कराराला अंतिम स्वरूप देणे हा आहे. भारत- अमेरिका द्विपक्षीय व्यापार कराराशी संबंधित औपचारिकता पूर्ण करण्यासाठी विशेष भारतीय व्यापार प्रतिनिधीमंडळ याच आठवड्यात वॉशिंग्टन दौऱ्यावर जाणार आहे.https://prahaar.in/2026/04/21/share-market-stock-market-rises-in-early-trade-sensex-nifty-gains/अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांनी या दौऱ्याचे स्वागत करत, व्यापार कराराला अंतिम रूप देण्याच्या दिशेने हे मोठे पाऊल असल्याचे म्हटले आहे. या कराराच्या आर्थिक परिणामांवर भाष्य करताना अमेरिकन राजदूत म्हणाले की, हा आगामी करार भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांसाठी ‘विन-विन’ म्हणजेच फायदेशीर ठरणार आहे.अमेरिकन राजदूतांच्या विधानामुळे ट्रम्प प्रशासन हा द्विपक्षीय करार दोन्ही देशांसाठी परस्पर लाभदायक मानत असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता उद्योगजगताचे लक्ष या आठवड्यात वॉशिंग्टनमध्ये होणाऱ्या महत्त्वाच्या बैठका आणि करारावर अंतिम शिक्का कधी बसतो याकडे लागले आहे.

फीड फीडबर्नर 21 Apr 2026 3:10 pm

महाराष्ट्रीय साड्या

महाराष्ट्रीय साड्या या राज्याच्या समृद्ध संस्कृती आणि इतिहासाचा जिवंत पुरावा आहेत. नाजूक जरीकामासाठी ओळखली जाणारी प्रसिद्ध पैठणी साडी असो किंवा पारंपरिक महाराष्ट्रीय शैलीत नेसली जाणारी प्रतिष्ठित नऊवारी साडी असो, या साड्या संपूर्ण भारतातील आणि भारताबाहेरील महिलांना आजही मोहित करत आहेत. त्यांच्यातील अभिजातता आणि परंपरेच्या संगमामुळे, कोणत्याही साडीप्रेमीच्या वॉर्डरोबमध्ये त्या असायलाच हव्यात. या लेखात आपण महाराष्ट्रीय साड्यांचे विविध प्रकार, त्यांचे सांस्कृतिक महत्त्व आणि पारंपरिक तसेच आधुनिक अशा दोन्ही लूक्ससाठी तुम्ही त्या कशा स्टाईल करू शकता, याबद्दल जाणून घेऊ या.महाराष्ट्रातील साड्यांचे प्रकारमहाराष्ट्रातील साड्या अत्यंत वैविध्यपूर्ण आहेत, प्रत्येक साडी राज्याच्या वेगवेगळ्या भागातून उगम पावते आणि सांस्कृतिक जडणघडणीत तिचे एक खास स्थान आहे. येथे काही सर्वात प्रतिष्ठित प्रकार दिले आहेत :१. पैठणी साडीपैठणी ही महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध साडी आहे. ‘रेशीमची राणी’ म्हणून ओळखली जाणारी ही साडी तिच्या आकर्षक रंगांसाठी, नाजूक हाताने विणलेल्या जरीच्या काठांसाठी आणि मोराची नक्षी असलेल्या पदरासाठी प्रसिद्ध आहे. पारंपरिकरीत्या शुद्ध रेशमापासून बनवलेल्या पैठणी साड्या शतकानुशतके ऐश्वर्य आणि परंपरेचे प्रतीक राहिल्या आहेत.२. नऊवारी साडीनऊवारी साडी, जिला ‘कास्ता’ साडी असेही म्हणतात, तिच्या नेसण्याच्या पद्धतीमुळे वैशिष्ट्यपूर्ण आहे. सर्वसाधारण सहा-वारी साडीच्या विपरीत, नऊवारी साडी नऊ-वारी लांब असते आणि तिची नेसण्याची पद्धत पायजम्यासारखी असते, ज्यामुळे महिलांना सहजपणे वावरता येते. ही साडी महाराष्ट्राच्या पारंपरिक संस्कृतीत खोलवर रुजलेली आहे आणि अनेकदा सण-उत्सव व लग्नसमारंभांमध्ये परिधान केली जाते.३. कोल्हापुरी साडीकोल्हापुरी साड्या साध्या, वजनाने हलक्या असून रोजच्या वापरासाठी किंवा लहान-सहान सणासुदीच्या प्रसंगांसाठी उत्तम आहेत. त्यांचे सुज्ञतापूर्ण लालित्य आणि आरामदायीपणा यामुळे, परंपरा आणि व्यावहारिकता यांचा मेळ घालू इच्छिणाऱ्या महिलांमध्ये त्या लोकप्रिय आहेत.४. नारायण पेठ साडीनारायण पेठ या गावातून उगम पावलेल्या या साड्या, त्यांच्या आकर्षक काठांसाठी ओळखल्या जातात; हे काठ सामान्यतः लाल किंवा काळ्या रंगाचे असून त्यावर बारीक सोनेरी जरीकाम केलेले असते. त्या त्यांच्या मजबूत पोत आणि तेजस्वी रंगांसाठी ओळखल्या जातात, ज्यामुळे धार्मिक विधी आणि सणांसाठी त्या एक लोकप्रिय निवड ठरतात.महाराष्ट्रीय साड्यांचे सांस्कृतिक महत्त्वमहाराष्ट्रातील प्रत्येक प्रकारच्या साडीला एक गहन सांस्कृतिक आणि पारंपरिक महत्त्व आहे. या साड्या केवळ वस्त्र नाहीत; त्या राज्याच्या समृद्ध इतिहासाचे आणि कलाकुसरीचे प्रतिबिंब आहेत.हातमागाचा वारसा : पैठणीसारख्या महाराष्ट्रीय साड्या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या प्राचीन तंत्रांचा वापर करून विणल्या जातात. प्रत्येक साडी ही प्रेमाचे प्रतीक असते आणि तिच्या गुंतागुंतीच्या नक्षीकामामुळे व हाताने विणलेल्या स्वरूपामुळे ती पूर्ण होण्यास अनेकदा महिने लागतात.परंपरेचे प्रतीक : लग्न असो, धार्मिक उत्सव असो किंवा सांस्कृतिक कार्यक्रम असो, महाराष्ट्रीय साडी नेसणे हे परंपरेप्रती आदराचे प्रतीक मानले जाते. नऊवारीसारख्या साड्यांना महाराष्ट्रीय विवाहसोहळे आणि विधींमध्ये विशेष महत्त्व असून, त्या शालीनता, सामर्थ्य आणि वारसा यांचे प्रतीक मानल्या जातात.महाराष्ट्रीय साड्या कशा स्टाईल कराव्यातमहाराष्ट्रीयन) साड्या बहुगुणी असून वेगवेगळ्या प्रसंगांनुसार त्या विविध प्रकारे नेसता येतात. तुम्हाला पारंपरिक लूक हवा असो किंवा आधुनिकतेचा स्पर्श, या साड्यांमध्ये असंख्य पर्याय उपलब्ध आहेत.पारंपारिक देखावापारंपरिक महाराष्ट्रीयन लूकसाठी, नऊवारी साडी नेसून त्यासोबत नथ, हिरव्या बांगड्या आणि 'चिंचपेटी' नावाचा पारंपरिक मोत्यांचा हार यांसारखे पारंपरिक महाराष्ट्रीयन दागिने घाला. सांस्कृतिक सौंदर्याचा पुरेपूर अनुभव घेण्यासाठी हा लूक टिकली आणि कोल्हापुरी चपला घालून पूर्ण करा.समकालीन फ्यूजनजर तुम्हाला तुमच्या पैठणी साडीला आधुनिक टच द्यायचा असेल, तर ती एका समकालीन ब्लाउजसोबत परिधान करा -उदाहरणार्थ, कोल्ड शोल्डर किंवा हाय-नेक डिझाइन. लग्नसमारंभ किंवा सणासुदीच्या कार्यक्रमांसाठी योग्य असलेल्या फ्यूजन लूकसाठी तुम्ही कमरेला बेल्ट लावून साडीला आवळू शकता. साडीला अधिक महत्त्व देण्यासाठीकमीत कमी दागिने घाला.सणासुदीचे प्रसंगकोल्हापुरी आणि नारायण पेठ साड्या लहान सणांच्या प्रसंगांसाठी उत्तम आहेत. एक मोहक पण तरीही साधा लूक मिळवण्यासाठी तुम्ही हलका नेकलेस, कानातले आणि साधी टिकली लावू शकता.- प्रतिनिधी

फीड फीडबर्नर 21 Apr 2026 3:10 pm

Water Safety: पाणी दिसायला स्वच्छ म्हणजे सुरक्षित असेलच असं नाही!

Water Safety आपल्या शरीरासाठी पौष्टिक आहार जितका महत्त्वाचा आहे, तितकेच स्वच्छ पाणी, मोकळी हवा आणि स्वच्छ परिसरही गरजेचे आहेत. पाणी स्वच्छ असेल तर आरोग्य चांगले राहते आणि आरोग्य चांगले असेल तर जीवनात प्रगती होते. म्हणूनच प्रत्येकाने पाण्याच्या स्वच्छतेकडे गंभीरपणे लक्ष देणे गरजेचे आहे.

दैनिक प्रभात 21 Apr 2026 2:49 pm

Kalki Koechlin : कल्की कोचलिनने ‘त्या’घटनेनंतर झालेल्या मानसिक आरोग्याबाबत केला खुलासा

Kalki Koechlin : कल्कीचा घटस्फोट झाला तेव्हा तिला भरपूर मानसिक वेदना सहन कराव्या लागल्या.

दैनिक प्रभात 21 Apr 2026 2:48 pm

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर डागली टीकेची तोफ म्हणाले “जर खरोखरच महिलांविषयी कळकळ असेल, तर….”

Uddhav Thackeray : भारतीय कामगार सेनेच्या 58 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला.

दैनिक प्रभात 21 Apr 2026 2:45 pm

Pune Water Supply : पुण्याच्या पाणीकपातीवर प्रशासनाने घेतला हा महत्वाचा निर्णय

पुणे : सूर्याचा प्रकोप हा वाढत जातोय, तापमानाचा पारा इतका वाढलाय की थेट तापमान ४०- ४५ अंशापर्यत जाऊन पोहोचलाय, त्यामुळे पाण्याची वाफ देखील मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे धरणामंधील पाणीसाठा हा कमी होण्याची चिन्हे आहेत. पुण्यात पाणीकपातीबाबत नागरिकांमध्ये संभ्रम असून प्रशासनाने याबाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे.पुण्यात मुबलक पाणीसाठा पाणीकपाती बाबत महत्वाचा निर्णय घेताना पुणे प्रशासनाने धरणांमधील सध्या पाणीसाठ्याची आधारे घेत आकडेवारीनुसार सध्याचा साठा ११.५ टीएमसी ( ३९ % ) असून गेल्या वर्षी हा साथ १०.४ टीएमसी ( ३६ %) होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा १ टीएमसी पाणीसाठा अधिक असल्याने पालिकेचा पाणी कपातीला विरोध आहे. तसेच शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चारही धरणांची स्थिती सध्या समाधानकारक आहे.https://prahaar.in/2026/04/16/heatwave-sop-mandates-12-4pm-break-for-informal-workers/अल निनो च्या प्रभावामुळे कमी पावसाची शक्यता असल्याने जलसंपदा विभागाने पुणे पालिकेला १५ % कपात करण्याचे आवाहन केले होते. समाधानकारक पाऊस पडेपर्यंत पाणीकपात चालू ठेवण्याचा प्रस्ताव त्या पत्रात मांडण्यात आला होता. मात्र पालिकेने प्रस्ताप तूर्तास बाजूला ठेवला आहे.https://prahaar.in/2026/04/21/share-market-stock-market-rises-in-early-trade-sensex-nifty-gains/पालिकेच्या म्हणण्यानुसार शहरातील अनेक भागात कमीदाबाने पाणीपुरवठा होत आहे, यावरून नागरिक प्रचंड तक्रार करत आहेत. पाणीकपात हा उपाय नसून वितरण पद्धत सुधारली पाहिजे हे नागरिकांचे मत आहे. पुण्याच्या पाणीकपातीचा निर्णय सध्या बारामतीच्या पोटनिवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ही बैठक सध्या लांबणीवर आहे. कालवा समितीची बैठक पूर्ण झाल्यानंतरच पुण्यात पाणीकपात करायची की नाही हा प्रश्न मार्गी लागणार आहे.

फीड फीडबर्नर 21 Apr 2026 2:10 pm

ट्रम्पकडून ती आनंदवार्ता आली अन् शेअर बाजाराने मोठी उसळी मारली ; नेमकं काय घडलं ?

अमेरिका इराण युद्धामुळे शेअर बाजारात ( Share Market )मोठ्या घडामोडी घडत होत्या. गुंतवणूकदार यामुळे चांगलेच धास्तावाले होते. त्यामुळे शेअर बाजारात देखील मोठी पडझड पहायला मिळत होती. हे युद्ध लवकरात लवकर थांबावे अशी आशा सर्वानाच होती पण कधी अमेरिकेतून तर कधी इराणमधून निराशा समोर येत होती. असे असले तरी सध्या युद्ध काही दिवसांसाठी बंद आहे. अशातच अमेरिकेतून अशी काही गुडन्यूज समोर आली आहे आहे की शेअर बाजारात ( Share Market ) मोठी उसळी दिसून आली. विशेष म्हणजे आखाती देशातील युद्धाची (war )धग कायम असतानाही शेअर बाजाराने मोठी उसळी मारली आहे.आज सकाळी बाजार उघडताच घडले असे काही...आज सकाळी बाजार उघडताच सकाळी 9:20 वाजता, सेन्सेक्स 430 अंकांच्या तेजीसह 78,950 अंकावर व्यापार करत होता. तर निफ्टी 50 हा 117 अंकांच्या उसळीसह 24,480 च्या स्तरावर ट्रेड करत होता. भारत आणि अमेरिका व्यापार कराराविषयी ( India US Trade Deal) मोठी अपडेट समोर आल्यानंतर आखाती युद्धाची भीती झटक्यात बाजूला झाली आणि गुंतवणूकदारांनी या सोहळ्यात सहभाग घेतला. आणि गुंतवणुकीस पुन्हा समोर आले. जणू आज मंगळवारी शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे मंगलच मंगल झाले. बीएसई बास्केटमध्ये अदानी पोर्ट (Adani Port) , आयसीआयसीआय बँक (ICICI ), एल अँड टी, बजाज फायनान्स हे टॉप गेनर ठरले.आज सेन्सेक्स आणि निफ्टी सुसाट आज बाजार सुरू होताच सेन्सेक्स आणि निफ्टी रॉकेटसारखा उडाला. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा सेन्सेक्सने 500 अंकाहून अधिक उसळी आली. तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज, NSE Nifty ने तेजीचा घोडा दौडवला. 30 शेअर्सचा बीएसई सेन्सेक्स इंडेक्स 96.86 अंक वा 0.12 टक्क्यांच्या तेजीसह उघडला होता. पहिल्या सत्रात सेन्सेक्सने 78,617.16 अंकाची सुरुवात केली. एनएसई निफ्टी 50 ने दिवसाची सुरुवात चांगली झाली. आज निफ्टी 50 हा 9.70 अंक वा 0.04 टक्क्यांच्या उसळीसह 24,374.55 च्या स्तरावर उघडला.अमेरिकेतून आलेल्या वृत्तानुसार, भारत आणि अमेरिकेत व्यापारी करारात ( India US Trade Deal) मोठा बदल पहायला मिळू शकतो. 20 एप्रिलपासूनच याविषयीच्या चर्चा सुरु असून त्याचा सकारात्मक परिणामही दिसून येत आहे. अमेरिकेन न्यायालयाने टॅरिफ हे बेकायदेशीर म्हटले होते. टॅरिफ (tariff ) रद्द करण्याचे आदेश दिले होते. दरम्यान दर्पण जैन यांच्या नेतृत्वात एक डझन भारतीय अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ अमेरिकन दौऱ्यावर असल्याचे आणि ते अनेक विषयावर चर्चा करणार असल्याचे समोर येत आहे.

फीड फीडबर्नर 21 Apr 2026 2:10 pm

सौर ऊर्जेने उजळतोय दक्षिण महाराष्ट्र

वार्तापत्र : दक्षिण महाराष्ट्रजागतिक तापमानवाढ आणि पर्यावरणाच्या ऱ्हासाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जग आता शाश्वत ऊर्जेकडे वळत आहे. भारतानेही अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले असून, यामध्ये महाराष्ट्र राज्य अग्रगण्य भूमिका बजावत आहे.महाराष्ट्रात स्वच्छ आणि शाश्वत ऊर्जेच्या दिशेने मोठी झेप घेतली जात असून सौर ऊर्जेच्या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी भागात मोठी ऊर्जा क्रांती घडत आहे. राज्य शासनाच्या मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्प, सौर कृषी वाहिनी योजना, तसेच महावितरणच्या विविध उपक्रमांमुळे सांगली, सातारा आणि कोल्हापूर या दक्षिण महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये उल्लेखनीय प्रगती दिसून येत आहे.राज्यात सौर ऊर्जेची एकूण क्षमता ८,४५० मेगावॅटपर्यंत पोहोचली असून सातारा हा जिल्हा या क्षेत्रात आघाडीवर असल्याचे दिसत. यामुळे केवळ ऊर्जा उत्पादन वाढले नाही, तर पारंपरिक ऊर्जेवरील अवलंबित्वही कमी झाले आहे. या प्रकल्पांच्या अंमलबजावणीत महावितरण या राज्याच्या प्रमुख वितरण कंपनीची महत्त्वाची भूमिका आहे. ही कंपनी राज्यातील हजारो गावांपर्यंत वीज पुरवठा करते. सौर प्रकल्पांना जोडून ऊर्जा वितरण अधिक सक्षम बनवत आहे.सातारा जिल्हा सौरग्राम संकल्पनेत विशेष अग्रेसर आहे. साताऱ्यातील मान्याचीवाडी हे राज्यातील पहिले सौरग्राम ठरले आहे. येथे संपूर्ण गावाची विजेची गरज सौर ऊर्जेद्वारे पूर्ण केली जाते. या संकल्पनेमुळे ग्रामीण भागात २४ तास वीजपुरवठा शक्य झाला असून शाळा, अंगणवाडी, शेती सिंचन आणि घरगुती वापरासाठी हक्काची वीज उपलब्ध झाली आहे. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्येही सौर कृषी वाहिनी योजना आणि रूफटॉप सोलर प्रकल्पांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर काम सुरू आहे. महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा)मार्फत शेतकऱ्यांना सौर पंप आणि सिंचनासाठी सौर प्रणाली उपलब्ध करून दिली जात आहे. सौर पंपांमुळे शेतकऱ्यांचा वीज खर्च शून्यावर आला असून, विजेसाठी पावसावर किंवा रात्रीच्या वीज पुरवठ्यावर अवलंबून राहण्याची गरज उरलेली नाही.सौर ऊर्जेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे कार्बन उत्सर्जनात होणारी घट आणि पर्यावरण संरक्षण. ग्रामीण भागातील वीज खंडित होण्याचे प्रकार कमी होऊन सातत्यपूर्ण पुरवठा मिळत आहे. तसेच, 'प्रधानमंत्री सूर्यघर योजना' आणि राज्य शासनाच्या अनुदानामुळे घरांवर सौर पॅनल बसवणे सर्वसामान्यांना परवडणारे झाले आहे. ३ किलोवॅटपर्यंतच्या सोलर प्रणालीवर ४०% पर्यंत अनुदान मिळत असल्याने मध्यमवर्गीय कुटुंबांना याचा मोठा आर्थिक लाभ होत आहे.दक्षिण महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये सौर ऊर्जा प्रकल्पांमुळे स्थानिक रोजगारनिर्मितीलाही चालना मिळाली आहे. सोलर पॅनल बसवणे, देखभाल आणि तांत्रिक सेवा या क्षेत्रांत नवीन संधी निर्माण झाल्या आहेत. उद्योग आणि शेती क्षेत्राला स्वस्त वीज उपलब्ध झाल्याने त्यांची उत्पादनक्षमता वाढली आहे. एकूणच, मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्प आणि संबंधित योजनांमुळे दक्षिण महाराष्ट्रात सकारात्मक परिवर्तन होत आहे. येत्या काळात या प्रकल्पांचा विस्तार अधिक वेगाने झाल्यास ऊर्जेत आत्मनिर्भर दक्षिण महाराष्ट्र ही संकल्पना लवकरच वास्तवात येईल.

फीड फीडबर्नर 21 Apr 2026 2:10 pm

Operation Sindoor : “मर्यादा ओलांडू नका, भारत विसरत नाही”; पहलगाम हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्ताने भारतीय लष्कराचे सूचक ट्विट

- भारतीय लष्कराकडून ‘ऑपरेशन सिंदूर’ची आठवणमुंबई : जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ रोजी पाकिस्तानी दहशतवाद्यांनी २६ हिंदू पर्यटकांचे टार्गेट किलींग केले होते. या भ्याड हल्ल्याची उद्या म्हणजेच बुधवार २२ एप्रिल रोजी वर्षपूर्ती असून त्याच्या पूर्वसंध्येला भारतीय लष्कराने ट्विटरव (एक्स) पोस्ट करत “मर्यादा ओलांडू नका, भारत विसरत नाही” असे सांगत ‘ऑपरेशन सिंदूर’ची आठवण करवून दिली आहे.यासंदर्भातील पोस्टमध्ये भारतीय सेनेने नमूद केले की, “जेव्हा मानवतेच्या मर्यादा ओलांडल्या जातात, तेव्हा उत्तरही ठाम आणि निर्णायक असते. न्याय मिळाला आहे. भारत एकजूट आहे.” यासोबतच एका ग्राफिकमध्ये “काही मर्यादा कधीही ओलांडल्या जाऊ नयेत. भारत विसरत नाही,” असा संदेश देण्यात आला.https://prahaar.in/2026/04/21/pune-water-supply-administration-takes-this-important-decision-regarding-water-cuts-in-pune/पहलगाममधील हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानविरुद्ध कठोर कारवाई केली होती. भारतीय सेनेने पाकिस्तान तसेच पाकव्याप्त जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ले चढवले. या कारवाईदरम्यान ९ प्रमुख दहशतवादी लॉन्चपॅड उद्ध्वस्त करण्यात आले आणि लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद व हिज्बुल मुजाहिदीन यांच्या तळांना लक्ष्य करण्यात आले. या लष्करी कारवाईत १०० हून अधिक दहशतवादी ठार झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये ४ दिवस तणावपूर्ण संघर्ष सुरू राहिला. मोठे नुकसान सहन केल्यानंतर पाकिस्तानच्या डीजीएमओने भारताच्या डीजीएमओशी संपर्क साधत युद्धविरामाची विनंती केली. पाकिस्तानच्या विनवणीनंतर अखेर १० मे रोजी दोन्ही बाजूंमध्ये युद्धविरामावर सहमती झाली.When boundaries of humanity are crossed, the response is decisive.Justice is Served.India Stands United.#SindoorAnniversary #JusticeEndures #NationFirst pic.twitter.com/rtgYu9Hg11— ADG PI - INDIAN ARMY (@adgpi) April 21, 2026https://prahaar.in/2026/04/21/iran-us-conflict-will-jd-vance-visit-pakistan-uncertainty-persists-ahead-of-iran-us-talks/सेनाप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’चे कौतुक करत ते स्पष्ट राजकीय निर्देशांखाली तिन्ही सैन्यदलांमधील उत्कृष्ट समन्वयाचे उदाहरण असल्याचे म्हटले होते. तसेच, १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मिशन सुदर्शन चक्र’ची घोषणा केली होती. या मोहिमेचा उद्देश शत्रूच्या घुसखोरीला आळा घालणे आणि भारताच्या आक्रमक क्षमतांमध्ये वाढ करणे हा आहे.

फीड फीडबर्नर 21 Apr 2026 2:10 pm

युद्धज्वराचा हिंदोळा

आखाती युद्ध केवळ भूराजकीय संघर्ष नसून जागतिक अर्थव्यवस्थेच्या मुळावर घाव घालणारे संकट ठरते. तेलाच्या किमतींपासून रोजगारापर्यंत प्रत्येक स्तरावर त्याचे परिणाम दिसून येतात. अशा वेळी दीर्घकालीन उपाययोजना, पर्यायी ऊर्जा स्रोतांचा विकास, आर्थिक स्वावलंबन आणि स्थिर धोरणे यांची गरज अधिक तीव्रतेने जाणवते. अन्यथा, प्रत्येक जागतिक संघर्षासोबत अर्थव्यवस्थेची हीच घसरण पुन्हा पुन्हा अनुभवावी लागेल.आखाती प्रदेशातील युद्ध हे केवळ दोन-तीन देशांपुरते मर्यादित राहात नाही, तर त्याचे पडसाद संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर उमटतात. तेलसंपन्न आखाती देश जागतिक ऊर्जा पुरवठ्याचे केंद्र असल्यामुळे तेथील अस्थिरता ही थेट आर्थिक अस्थिरतेत रूपांतरित होते. अशा युद्धपरिस्थितीत सर्वप्रथम फटका बसतो तो कच्च्या तेलाच्या किमतींना. तेलाच्या किमती झपाट्याने वाढू लागल्या की वाहतूक, उत्पादन, वीजनिर्मिती अशा सर्वच क्षेत्रांवर परिणाम होतो आणि महागाईचा भडका उडतो. भारतासारख्या तेलआयात-निर्भर देशासाठी ही परिस्थिती अधिकच गंभीर ठरते. आयातीवरील खर्च वाढल्याने चालू खाते तुटीवर ताण आता येतो, रुपयाचे अवमूल्यन होते आणि सरकारसमोर आर्थिक संतुलन राखण्याचे मोठे आव्हान उभे राहते. पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढल्याने सर्वसामान्यांच्या खिशावर थेट परिणाम होतो, तर उद्योगक्षेत्रासाठी उत्पादनखर्च वाढतो. परिणामी, बाजारातील मागणी घटते आणि आर्थिक वाढीचा वेग मंदावतो. या पार्श्वभूमीवर कॉर्पोरेट कंपन्यांच्या नफ्यावर मोठा परिणाम दिसून येतो. उत्पादनखर्च वाढणे, कच्च्या मालाच्या पुरवठ्यात अडथळे निर्माण होणे आणि जागतिक मागणीत घट होणे या कारणांमुळे कंपन्यांच्या नफ्याचे प्रमाण कमी होते. अनेक कंपन्यांना खर्च कमी करण्यासाठी उपाययोजना कराव्या लागतात. त्यात नवीन प्रकल्पांना स्थगिती देणे, विस्तार योजनांना ब्रेक लावणे किंवा कर्मचाऱ्यांची कपात करणे यांचा समावेश असतो. अशा परिस्थितीत कॉर्पोरेट क्षेत्राची जोखीम घेण्याची क्षमता कमी होते आणि दीर्घकालीन गुंतवणुकीचे निर्णय पुढे ढकलले जातात. असे गंभीर परिणाम होत असल्याने परिस्थितीचा वेध घ्यायला हवा.युद्धामुळे निर्माण झालेली अनिश्चितता ही गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा अडथळा असते. देशांतर्गत तसेच परदेशी गुंतवणूकदार सुरक्षित पर्यायांकडे वळतात. शेअर बाजारात चढ-उतार वाढतात. भांडवली बाजारातील विश्वास कमी होतो आणि नवीन गुंतवणुकीचा ओघ मंदावतो. परकीय गुंतवणूक घटल्यास तंत्रज्ञान हस्तांतरण, रोजगारनिर्मिती आणि औद्योगिक वाढ यांवरही नकारात्मक परिणाम होतो. या सर्व प्रक्रियेचा फटका बसतो तो रोजगार क्षेत्राला. उद्योगांमध्ये उत्पादन कमी झाले, गुंतवणूक थांबली आणि नफा घटला की कंपन्या सर्वप्रथम मनुष्यबळावर गदा आणतात. नवीन भरती थांबते, कंत्राटी कर्मचाऱ्यांची कपात होते आणि काही वेळा कायमस्वरूपी नोकरकपातही केली जाते. सेवाक्षेत्रातही याचा परिणाम जाणवतो, कारण ग्राहकांचा खर्च कमी झाल्याने व्यवसायांवर ताण वाढतो. परिणामी मध्यमवर्गीय तसेच निम्नवर्गीय कुटुंबांची आर्थिक घडी विस्कटते. युद्धाचा परिणाम केवळ थेट आर्थिक आकड्यांपुरता मर्यादित राहत नाही, तर समाजाच्या मानसिकतेवरही परिणाम करतो. अनिश्चिततेमुळे लोक खर्च करण्यापेक्षा बचतीकडे वळतात. त्यामुळे बाजारातील मागणी आणखी घटते. हीच साखळी अर्थव्यवस्थेच्या मंदीला अधिक गती देते. जागतिक स्तरावर व्यापारमार्गांमध्ये अडथळे निर्माण झाल्यास निर्यात-आयात व्यवहारांवरही परिणाम होतो आणि जागतिकीकरणाच्या प्रक्रियेलाच धक्का बसतो. अशा परिस्थितीत सरकारसमोर मोठे आव्हान उभे राहते. महागाई नियंत्रणात ठेवणे, आर्थिक वाढ टिकवून ठेवणे आणि रोजगारनिर्मितीला चालना देणे या तिन्ही गोष्टी एकाच वेळी साध्य करणे कठीण होते.यातून वित्तीय तूट वाढण्याचा धोका निर्माण होतो, तर सामाजिक कल्याण योजनांवरील खर्च वाढवण्याची गरजही भासते. त्यामुळे आर्थिक धोरणे आखताना संतुलन साधणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. पश्चिम आशियातील इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल यांच्यातील भीषण संकटाच्या छाया आता भारतीय अर्थव्यवस्थेवर पडू लागल्या आहेत. या युद्धाचा फारसा परिणाम होणार नाही आणि आम्ही विशेष काळजी घेतली आहे, असे केंद्र सरकारतर्फे सांगण्यात येत असले, तरी इतर देशांप्रमाणे भारतावरही विपरीत परिणाम होणार आहे, हे स्पष्ट आहे. ‘मूडीज’ या जागतिक पतमानांकन संस्थेने २०२६-२७ साठी भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या, म्हणजेच जीडीपीच्या वाढीचा अंदाज ६.८ टक्क्यांवरून ६ टक्के इतका खाली आणला आहे. याचे कारण या युद्धामुळे होर्मुझ खाडीमधील वाहतूक अनेक देशांसाठी बंद झाली आणि अन्यत्रही क्षेपणास्त्र हल्ले सुरू असल्यामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली. भारताला लागणाऱ्या एकूण कच्च्या तेलापैकी ५५ आणि एलपीजीपैकी ९० टक्क्यांपेक्षा जास्त पुरवठा याच युद्धग्रस्त भागातून होतो. खतांच्या आयातीवर परिणाम झाल्यामुळे खाद्यपदार्थांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे २०२४-२५ मध्ये २.४ टक्के असलेली सरासरी महागाई आता ४.८ टक्क्यांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. यापूर्वी, म्हणजे १९७३ मध्ये तेल निर्यातदार राष्ट्रांनी अचानकपणे इंधनाचे दर वाढवल्यामुळे भारतावर महासंकट कोसळले होते. त्यावेळी याच्या परिणामी, तसेच सातत्याच्या दुष्काळामुळे भाववाढीचे संकट कोसळले होते.आजघडीला भारताची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा खूपच चांगली आहे. अन्नधान्याची टंचाई केव्हाच दूर झाली आहे. परंतु तरीही आताचा काळ जागतिकीकरणाचा असल्यामुळे पूर्वीपेक्षा आता युद्धजन्य स्थितीचे फटकेही जास्त बसण्याची शक्यता असते. याचे कारण परदेशांतून भारतात येणाऱ्या पैशांपैकी ४० टक्के वाटा हा आखाती देशातून येतो. त्याचप्रमाणे उदारीकरणानंतर जागतिक व्यापारातील भारताचा हिस्सा हळूहळू वाढत आहे आणि वेगवेगळ्या वस्तूंची व सेवांची निर्यात भारत करू लागला आहे. युद्धाच्या वणव्यामुळे अमेरिकेतील इंधनदराने सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. युद्धापूर्वी तीन डॉलर प्रति गॅलनच्या खाली असलेले पेट्रोल दर चार डॉलरच्या पार गेले. तर मालवाहतुकीसाठी कणा मानल्या जाणाऱ्या डिझेलच्या किमतीत युद्ध सुरू झाल्यापासून ४७ टक्क्यांची वाढ झाली आणि त्याचे दर ५.५०डॉलर प्रति गॅलनपर्यंत पोहोचले. युरिया आणि खतांच्या किमती वाढल्याने अमेरिकन शेतकऱ्यांवर सुमारे ५० हजार डॉलर्सचा अतिरिक्त बोजा पडला आहे. त्याचप्रमाणे कम्प्युटर चिप्स बनवण्यासाठी लागणाऱ्या हेलियम वायूचा ३५ टक्के पुरवठा कतारमधून होतो. हा पुरवठा थांबल्याने सिलिकॉन व्हॅलीतील टेक कंपन्यांवर मोठे संकट कोसळले आहे. रुग्णालयातील एमआरआय उपकरणासाठी हेलियम अनिवार्य असतो, ज्याची टंचाई आता दूर व्हायला हवी. होर्मुझची नाकेबंदी अधिक काळ सुरू राहिल्यास अमेरिकेमध्ये मंदी येणे अटळ आहे. अमेरिकेचा २०२६ मधील विकासदर २.६ टक्क्यांवरून थेट एक टक्क्यावर येण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. याचा अर्थ अमेरिका पुन्हा एकदा १९७०च्या दशकातील ‘स्टॅगफ्लेशन’सारख्या परिस्थितीत पोहोचू शकते. अशा परिस्थितीत विकासदर कमी आणि महागाई जास्त असते. शिवाय युद्ध थांबले तरी बंद झालेल्या तेलविहिरी पुन्हा सुरू होण्यासाठी अनेक महिने लागतात. तसेच युद्धात उद्ध्वस्त झालेल्या पायाभूत सुविधांच्या दुरुस्तीला काही वर्षे लागू शकतात. त्यामुळे इंधन दर पूर्वीच्या स्तरावर येथे येण्याची शक्यता कमीच आहे. अमेरिकेची स्थिती अशी राहिल्यास भारतासारख्या मोठी अर्थव्यवस्था असलेल्या देशांनाही चटके बसणार, हे स्पष्ट आहे. वास्तविक, यापूर्वी देशांतर्गत अर्थव्यवस्थेमध्ये पैशांचा ओघ वाढला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, सर्वसामान्य नागरिक असो वा मोठे उद्योग समूह, आपल्या गरजा आणि विस्तारासाठी बँकांकडे कर्ज मागणाऱ्यांचे प्रमाण वेगाने वाढत आहे. देशातील ९५ टक्के बाजारपेठ व्यापणाऱ्या ४१ प्रमुख बँकांकडून गोळा केलेल्या माहितीनुसार, उद्योगांना देण्यात येणाऱ्या कर्जामध्ये मोठी झेप पाहायला मिळाली आहे. गेल्या वर्षी उद्योगांची कर्जवृद्धी केवळ साडेसाते टक्के होती. ती आता वाढून १३.५ टक्के झाली आहे. पायाभूत सुविधा अभियांत्रिकी, रसायने, पेट्रोलियम आणि कापड उद्योगांतून कर्जाची सर्वाधिक मागणी दिसून आली आहे. या क्षेत्रात १६.१६ टक्के वाढ झाली असून, प्रामुख्याने एनबीएफसी आणि कमर्शियल रियल इस्टेट क्षेत्राकडून मोठी मागणी आली आहे. वैयक्तिक कर्ज विभागात १५ टक्क्यांची वाढ झाली आहे गृहकर्जामध्ये स्थिरता दिसत असली, तरी वाहनकर्ज आणि गोल्ड लोन घेणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे.अर्थात ही आकडेवारी युद्धापूर्वीची, फेब्रुवारी महिन्यातील आहे. त्यानंतरच्या परिस्थितीत जमीन-अस्मानाचा फरक पडला आहे. त्यामुळे बदलत्या स्थितीत कॉर्पोरेट क्षेत्राचे नफे १५ टक्क्यांनी तरी कमी होतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कंपन्यांचे नफे पावणेतीन लाख कोटी रुपयांनी, म्हणजेच जीडीपीच्या ०.८ टक्क्यांनी घटण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा अंदाज भारतीय स्टेट बँकेने व्यक्त केला आहे.

फीड फीडबर्नर 21 Apr 2026 2:10 pm

Sharad Pawar : शरद पवार पुन्हा रुग्णालयात; सुप्रिया सुळेंनी दिली प्रकृतीबाबत महत्वाची माहिती

Sharad Pawar : ज्येष्ठ नेते शरद पवार यांना प्रकृतीच्या कारणास्तव मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दैनिक प्रभात 21 Apr 2026 1:45 pm

Vidya Balan : “रितेशला मी अभिनेत्री म्हणून पसंत नसावी”; कार्यक्रमादरम्यान विद्या बालनने सांगितला किस्सा

Vidya Balan : चित्रपटात रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे.

दैनिक प्रभात 21 Apr 2026 1:42 pm

रॅपिडो ड्रायव्हरचा तरूणीला आक्षेपार्ह मेसेज, म्हणाला... तुझं वय काय ? एकटी राहतेस ? अन् पुढे धक्कादायक घडलं...

गेल्या काही वर्षात ऑनलाईन व्यवहार असो किंवा वस्तू ने-आण करण्याची पद्धत, सर्व काही बदलले आहे. यासोबतच प्रवासासाठी सुद्धा ऑनलाईन कॅब असेल किंवा बाईक टॅक्सी यांचा वापर देखील सर्रास वाढला आहे. पण हे सर्व होत असताना सुरक्षितरित्या सर्व गोष्टी होणे आवश्यक असते. आपला प्रवास कुठल्याही त्रासाशिवाय होणे हा हेतू डोळ्यसमोर ठेऊन आपण ऑनलाईन कॅब असेल, बाईक असेल टॅक्सी असेल हे बुक करतो मात्र या प्रवासात किंवा प्रवासानंतर प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. असाच रॅपिडो सेवेचा लाभ घेतलेल्या अनुष्का नावाच्या मुलीला याचा अनुभव आला आहे.नेमकं काय घडलं ?उत्तर प्रदेशातील गाझियाबदामध्ये (Uttarpradesh)अनुष्का नावाच्या मुलीसोबत एक विचित्र प्रकार घडला. अनुष्काने इन्स्टाग्रामवरील तिच्या अकाऊंटवरून हा भयावह अनुभव शेअर केला असून त्यामुळे हा मुद्दा चर्चेत आला आहे. तिच्या म्हणण्यानुसार, घटनेच्या रात्री तिची रॅपिडोची राईड पूर्ण झाल्यानंतरही त्या ड्रायव्हरने डायरेक्ट व्हॉट्सॲपवर मेसेज करत तिच्याशी संपर्क साधला. तिला तिच्या ड्रॉप पॉईंटवर सोडल्यावरही त्याने तिला मेसेज केला. ” ओळखलं नाहीस का? आत्ता तर ड्रॉप करून आलो” असं त्याने लिहीलं . त्यावर तरूणीने तू रॅपिडो रायडर आहेस का असा सवाल विचारल्यावर त्याने हो असं उत्तर दिलं. एवढंच नव्हे तर पुढे त्याने आणखीही मेसेज केला. “तू खूप क्युट दिसते. ट्रॅडिनशल कपड्यांत छान दिसत होतीस, तुझं वय काय ?” असे मेसेज त्या ड्रायव्हरने पुढे केले. ती एकटी राहते का असंही त्याने जाणून घेण्याचा प्रयत्न त्याने केला, असा दावा संबंधित तरूणीने केला आहे.

फीड फीडबर्नर 21 Apr 2026 1:31 pm

Share Market : सुरुवातीच्या व्यवहारात शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स-निफ्टीमध्ये वाढ

मुंबई : देशांतर्गत शेअर बाजारात आज (मंगळवार, २१ एप्रिल) सुरुवातीच्या व्यवहारात तेजीचा कल दिसून येत आहे. व्यवहारांची सुरुवात किंचित वाढीने झाली. बाजार उघडल्यानंतर लगेचच खरेदीदारांनी खरेदीचा सपाटा सुरू केला, ज्यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांमध्ये मोठी वाढ झाली. सकाळी १०:०० वाजेपर्यंत, सेन्सेक्स ०.६३ टक्क्यांनी आणि निफ्टी ०.५६ टक्क्यांनी वधारला होता.शेअर बाजारातील दिग्गज कंपन्यांमध्ये, नेस्ले इंडिया, ॲक्सिस बँक, एशियन पेंट्स, अदानी पोर्ट्स आणि टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स यांचे शेअर्स १.६८ टक्के ते ०.७२ टक्क्यांपर्यंतच्या वाढीसह व्यवहार करत होते. दुसरीकडे, एसबीआय लाइफ इन्शुरन्स, एचडीएफसी लाइफ, डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज, इन्फोसिस आणि जिओ फायनान्शिअल यांचे शेअर्स ३.१९ टक्के ते ०.५० टक्क्यांपर्यंतच्या घसरणीसह व्यवहार करत होते.आजच्या व्यवहारानुसार, शेअर बाजारात २,७१७ शेअर्समध्ये सक्रिय व्यवहार सुरू होते. यापैकी २,१६९ शेअर्समध्ये वाढ झाली, तर ५४८ शेअर्समध्ये घट झाली. त्याचप्रमाणे, सेन्सेक्समधील ३० पैकी २७ शेअर्स खरेदीच्या पाठिंब्यामुळे तेजीत राहिले. दुसरीकडे, विक्रीच्या दबावामुळे तीन शेअर्समध्ये घट झाली. निफ्टीमधील ५० पैकी ४२ शेअर्समध्ये वाढ झाली, तर आठ शेअर्समध्ये घट झाली.बीएसई सेन्सेक्स आज ९६.८६ अंकांच्या वाढीसह ७८,६१७.१६ अंकांवर उघडला. व्यवहार सुरू झाल्यानंतर लगेचच खरेदीदारांनी खरेदी सुरू केली, ज्यामुळे निर्देशांकाच्या हालचालीला चालना मिळाली. तथापि, नफावसुलीच्या उद्देशाने अधूनमधून विक्रीचे सत्रही सुरू होते. असे असूनही, निर्देशांकाच्या हालचालीवर लक्षणीय परिणाम झाला नाही. बाजारात सुरू असलेल्या खरेदी-विक्रीच्या पार्श्वभूमीवर, सकाळी १० वाजेपर्यंत सेन्सेक्स ४९२.२७ अंकांनी वाढून ७९,०१२.५७ अंकांवर व्यवहार करत होता.https://prahaar.in/2026/04/21/mumbai-local-update-central-railway-services-disrupted-for-the-second-consecutive-day-massive-crowds-at-diva-station/सेन्सेक्सप्रमाणेच, एनएसई निफ्टीनेही आज ९.७० अंकांच्या किंचित वाढीसह २४,३७४.५५ अंकांवर व्यवहाराला सुरुवात केली. बाजार उघडताच, निर्देशांक घसरून २४,३५४.९० अंकांवर पोहोचला. त्यानंतर, खरेदीदारांनी आपली खरेदी तीव्र करून निफ्टीच्या हालचालीला चालना दिली. खरेदीच्या पाठिंब्याने, निर्देशांक २४,५१२.३५ अंकांपर्यंत उसळी घेऊन पोहोचला. यानंतर, नफावसुलीच्या विक्रीमुळे त्याच्या हालचालीतही किंचित घट झाली. बाजारात सुरू असलेल्या खरेदी-विक्रीच्या पार्श्वभूमीवर, सकाळी १० वाजेपर्यंतच्या व्यवहारानंतर, निफ्टी १३६.३० अंकांच्या वाढीसह २४,५०१.१५ अंकांच्या पातळीवर व्यवहार करत होता.तत्पूर्वी, आदल्या दिवशी, सोमवारी, सेन्सेक्स २६.२७ अंकांच्या म्हणजेच ०.०३ टक्क्यांच्या वाढीसह ७८,५२०.३० अंकांच्या पातळीवर बंद झाला होता. तर निफ्टी सोमवारी ११.३० अंकांच्या म्हणजेच ०.०५ टक्क्यांच्या वाढीसह २४,३६४.८५ अंकांच्या पातळीवर बंद झाला होता.

फीड फीडबर्नर 21 Apr 2026 1:31 pm

Airtel Recharge: एअरटेलचा 84 दिवसांचा प्लान महाग; ग्राहकांना पुन्हा बसला झटका

Airtel Recharge नव्या 899 रुपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना पूर्वीसारखेच फायदे मिळणार आहेत. या प्लानमध्ये 84 दिवसांची वैधता मिळते. तसेच अनलिमिटेड लोकल, एसटीडी आणि नॅशनल रोमिंग कॉलिंगची सुविधा दिली जाते. याशिवाय दररोज 100 एसएमएसही मिळतात.

दैनिक प्रभात 21 Apr 2026 1:16 pm

Yusuf Pathan: माजी भारतीय क्रिकेटपटू युसूफ पठाणच्या सासऱ्यासह मेहुण्याला अटक; किरकोळ कारणावरुन मोठा राडा

Yusuf Pathan : भायखळा पोलिसांनी तात्काळ कारवाई करत खालिद खान, उमरशाद खान आणि शोएब खान यांना अटक केली.

दैनिक प्रभात 21 Apr 2026 1:05 pm

Donald Trump: युद्ध थांबणार की भडकणार? ट्रम्प यांच्या वक्तव्याने वाढली चिंता

Donald Trump ट्रम्प यांच्या या भूमिकेमुळे जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कारण अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष वाढला तर त्याचा परिणाम संपूर्ण जगावर होऊ शकतो. विशेषतः तेलाच्या किमती, व्यापार आणि जागतिक स्थैर्यावर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

दैनिक प्रभात 21 Apr 2026 12:55 pm

Hungary PM Peter Magyar : हंगेरीत सत्तापालट होताच इस्रायलशी संबंध ताणले; नव्या पंतप्रधानांकडून नेतन्याहूना अटकेची धमकी

Hungary PM Peter Magyar : ICC ने बेंजामिन नेतन्याहू आणि इस्रायलचे माजी संरक्षण मंत्री योव गॅलँट यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केले होते.

दैनिक प्रभात 21 Apr 2026 12:32 pm

Mumbai Local Update : दुसऱ्या दिवशीही मध्य रेल्वे विस्कळीत; दिवा स्थानकात प्रचंड गर्दी

ठाणे : मध्य रेल्वेमार्गावरील डोंबिवली रेल्वे स्थानक येथे सोमवारी लोकल ट्रेनचा डबा रुळावरून घसरून झालेल्या अपघाताचा परिणाम दुसऱ्या दिवशीही कायम असल्याचे दिसून आले. या घटनेमुळे मंगळवारी सकाळी ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली असून प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.विशेषतः दिवा रेल्वे स्थानक येथे सकाळपासूनच प्रवाशांची प्रचंड गर्दी उसळलेली पाहायला मिळाली. स्थानकाच्या दोन्ही फलाटांवर टोकापर्यंत खच्चून भरलेली गर्दी दिसून येत होती. महिला प्रवाशांची संख्याही लक्षणीय होती. या गर्दीचे छायाचित्रे सध्या सामाजिक माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर प्रसारित होत असून परिस्थितीची गंभीरता अधोरेखित करत आहेत.https://prahaar.in/2026/04/20/mumbai-local-empty-local-coach-derails-in-dombivli-train-schedule-disrupted/दरम्यान, सकाळपासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने जाणाऱ्या अप मार्गावरील लोकल ट्रेन सुमारे वीस ते पंचवीस मिनिटे उशिराने धावत असल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारी झालेल्या अपघातानंतर रेल्वे वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू असतानाच खर्डी स्थानकाजवळ रात्री आवश्यक दुरुस्ती कामांसाठी विशेष ब्लॉक घेण्यात आला होता. हा ब्लॉक पहाटे तीन वाजता संपून सेवा पूर्ववत होणे अपेक्षित होते, मात्र तो सकाळी सहा वाजेपर्यंत सुरू राहिल्यामुळे लोकल आणि एक्सप्रेस गाड्यांची वाहतूक ठप्प झाली.https://prahaar.in/2026/04/21/mumbai-against-drugs-mumbai-against-drugs-campaign-to-launch-in-mumbai-starting-may-1-2026-decision-reached-today-during-a-meeting-chaired-by-guardian-minister/या सर्व घडामोडींमुळे मंगळवारीही मध्य रेल्वेच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम झाला असून प्रवाशांना उशिरा धावणाऱ्या गाड्यांचा फटका बसत आहे. रेल्वे प्रशासनाने परिस्थिती लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले असले तरी सध्या तरी प्रवाशांना गर्दी आणि विलंबाचा सामना करावा लागत आहे.

फीड फीडबर्नर 21 Apr 2026 12:10 pm