SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

29    C
... ...View News by News Source

नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला गुजरात पोलिसांनी केली अटक

नंदुरबार : नवापूर नगरपालिकेतच्या निवडणुकीसाठी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने नगराध्यक्षांसह पूर्ण पॅनल उभे केले आहे. यात अचानकपणे जिल्हा विकास आघाडीने नगराध्यक्षसह पूर्ण पॅनल उभे केले. मात्र नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढविणारे विश्वास बडोगे या अपक्ष उमेदवाराला गुजरात पोलिसांच्या विशेष पथकाने २० नोव्हेंबर २०२५ रोजी अटक केली.नवापूर पालिकेसाठी राष्ट्रवादीतर्फे जयंत जाधव, भाजपतर्फे अभिलाषा वसावे पाटील तर काँग्रेसतर्फे दिपचंद जयस्वाल यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळाली आहे. दुसरीकडे जिल्हा विकास आघाडीतर्फे विश्वास बडोगे यांनी नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष उमेदवारी दाखल करत पूर्ण पॅनल निवडणूक रिंगणात उतरवले. माजी आमदार शरद गावित यांनी त्यांच्या पॅनलला पाठिंबा दिला. शक्तिप्रदर्शन करत जिल्हा विकास आघाडीने प्रचारफेरी काढली. प्रचाराला जोर चढू लागला असताना धक्कादायक घटना घडली. उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी जिल्हा विकास आघाडीतर्फे अपक्ष लढणाऱ्या विश्वास बडोगे यांना गुजरात पोलिसांनी अटक केली.गुजसी टॉक अर्थात गुजरात दहशतवाद आणि संघटीत गुन्हे नियंत्रण कायदा (G.C.T.O.C.) कायदा २०१५ च्या कलम ३(१)(२) आणि कलम ३(२) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला. यानंतर गुजरात पोलिसांच्या गांधीनगर पथकाने विश्वास बडोगे यांना अटक केली आहे. माघार घेतली नाही म्हणून गुजरात पोलिसांकरवी विश्वास बडोगे यांना अटक करण्यात आल्याची चर्चा स्थानिक पातळीवर रंगली आहे. दरम्यान बडोगेंना सुडबुद्धीनने अटक केली आहे. कॅप्टन आऊट झाला तरी कोच अजून रिंगणात आहे, त्यामुळे कोणीही निश्चिंत राहू नये असे माजी आमदार शरद गावित म्हणाले.

फीड फीडबर्नर 22 Nov 2025 9:10 pm

डोनाल्ड ट्रम्प ज्युनिअरकडून अनंत अंबानींच्या ‘वनतारा’संवर्धन प्रयत्नांची प्रशंसा

Donald Trump Jr visits Anant Ambani’s Vantara : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे ज्येष्ठ पुत्र डोनाल्ड ट्रम्प ज्युनिअर यांनी नुकतीच रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी यांच्या ‘वनतारा’ (Vantara) वन्यजीव बचाव आणि पुनर्वसन केंद्राला भेट दिली. जामनगर येथील या सुविधेचा दौरा करून त्यांनी अनंत अंबानींच्या प्राणी कल्याण आणि संवर्धनाच्या कामाचे कौतुक केले. […] The post डोनाल्ड ट्रम्प ज्युनिअरकडून अनंत अंबानींच्या ‘वनतारा’ संवर्धन प्रयत्नांची प्रशंसा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Nov 2025 9:00 pm

ताडोबा व्याघ्र प्रकल्प परिसरातील ८०० एकर जागेचे होणार पर्यावरणीय पुनरुज्जीवन

मुंबई :विदर्भातील विविध विकास कामांबरोबरच तेथील जंगल संपदा राखण्यासाठी व त्याच्या वाढीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नेहमीच आग्रही आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प परिसरातील ८०० एकर जागेचा पर्यावरणीय पुनरुज्जीवन प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाला झिरोधा कंपनी व रेन मॅटर फाऊंडेशन सामाजिक उत्तरदायित्वातून सहकार्य करणार आहेत.रिवाईल्डिंग म्हणजे जंगल, गवताळ प्रदेश किंवा जलक्षेत्रात मानवी हस्तक्षेप कमीत कमी ठेवून तेथील नैसर्गिक भूभाग, वन्यजीव आणि जैवविविधतेचे पर्यावरणीय पुनरुज्जीवन करणे होय. या संकल्पनेनुसार ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या परिसरातील ८०० एकर क्षेत्राचे पर्यावरणीय पुनरुज्जीवन करण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. महाराष्ट्रातील हा पहिलाच प्रकल्प ताडोबामध्ये राबविण्यात येणार असून यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाबरोबरच फार्मर्स फॉर फॉरेस्ट यांच्या सहकार्याने झिरोधा व रेनमॅटर फाऊंडेशन ही संस्था काम करणार आहे. यासाठी सुमारे १०० कोटी रुपयांच्या झिरोधा रिवाइल्डिंग फंड हा विशेष निधी तयार करण्यात आला आहे. या प्रकल्पासंदर्भातील औपचारिक घोषणा लवकरच होणार आहे.झिरोधा आणि ‘रेनमॅटर फाउंडेशन’ या संस्थांच्या माध्यमातून पर्यावरणीय व सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. रेनमॅटर फाउंडेशनमार्फत हवामान बदल व पर्यावरणीय ऱ्हास या समस्यांवर कामे करण्यात येतात. यासाठी झिरोधा ही कंपनी आपल्या नफ्यातील १० टक्के निधी सामाजिक उत्तरदायित्व व पर्यावरणीय कामांसाठी राखीव ठेवते. या राखीव निधीतून झिरोझाने संस्थेच्या १५ व्या वर्धापन दिनानिमित्त १०० कोटी रुपये गुंतवणुकीचा ‘झिरोधा रीवाइल्डिंग फंड’ जाहीर केला आहे. या उपक्रमांतर्गत देशातील पर्यावरणीय दृष्टिकोनातून महत्त्वाच्या परिसरातील निसर्गाचे पुनरुज्जीवन करण्यात येणार आहे. त्यामध्ये देशात विविध ठिकाणी मोनोकल्चर वृक्षलागवडी ऐवजी जैवविविधता टिकवणाऱ्या पद्धतीने निसर्गाचा समतोल राखण्याचे उद्दिष्ट आहे. यामध्ये विदर्भातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या परिसरातील ८०० एकरच्या प्रकल्पाचा समावेश आहे.विदर्भातील पर्यावरणाच्या संवर्धनासाठी रिवाइल्डिंग सारखे प्रकल्प उपयुक्त आहे. अशा कामांमध्ये झिरोधासारख्या कार्पोरेट कंपन्या सहभागी होत असून हा पर्यावरणपूरक उपक्रम केवळ महाराष्ट्रासाठीच नव्हे, तर देशातील कॉर्पोरेट क्षेत्रासाठीही एक आदर्श ठरणार आहे. या उपक्रमाबद्दल अत्यंत उत्साही आहोत. महाराष्ट्र शासन आणि वन विभागासोबतचे हे सहकार्य फलदायी ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

फीड फीडबर्नर 22 Nov 2025 8:30 pm

AUS vs ENG : ट्रॅव्हिस हेडचा ऐतिहासिक तडाखा! १२३ वर्षांचा विक्रम मोडत रचले चार मोठे कीर्तिमान

Travis Head smashes 123-year-old record : ऑस्ट्रेलियाचा फलंदाज ट्रेव्हिस हेडने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या ॲशेस कसोटीत पर्थ येथे वादळी खेळी करत इतिहास रचला. अवघ्या दोन दिवसांत संपलेल्या या सामन्यात, हेडने ८३ चेंडूत १६ चौकार आणि ४ षटकारांसह अविश्वसनीय १२३ धावांची तुफानी खेळी केली. त्याने केवळ ६९ चेंडूत शतक पूर्ण केले. यासह त्याने पाच मोठे विक्रम रचत १२३ […] The post AUS vs ENG : ट्रॅव्हिस हेडचा ऐतिहासिक तडाखा! १२३ वर्षांचा विक्रम मोडत रचले चार मोठे कीर्तिमान appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Nov 2025 8:10 pm

नागपूरमध्ये अतिविशेषोपचार वैद्यकीय अभ्यासक्रमांसह ६१५ खाटांचे रुग्णालय

नागपूर : नागपूर येथे वैद्यकीय उपचाराच्या दर्जेदार सुविधा रुग्णांना उपलब्ध व्हाव्यात आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी नवे पदव्युत्तर आणि अतिविशेषोपचार अभ्यासक्रम सुरू व्हावेत यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वैद्यकीय विभागाला निर्देश दिले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आता ६१५ खाटांच्या अद्ययावत रुग्णालयासह नवे पदव्युत्तर आणि अतिविशेषोपचार अभ्यासक्रम सुरू करण्याचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाशी संलग्न असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्राची श्रेणीवाढ करुन तेथे ही व्यापक व्यवस्था उभारण्यात येणार आहे.वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभागाने यासंदर्भात नुकताच शासन निर्णय निर्गमित केला आहे. शासन निर्णयानुसार या श्रेणीवर्धनाअंतर्गत १९ पदव्युत्तर, ११ अतिविशेषोपचार अशा एकूण ३० अभ्यासक्रमाची भर पडणार आहे. यामुळे पदव्युत्तरच्या ११० जागा व अतिविशेषोपचारच्या ४१ जागा निर्माण होतील. याशिवाय, रुग्णालयीन प्रशासन, व्यवस्थापन विभाग व दंत बाह्यरुग्ण विभाग तसेच अभ्यासक्रमांशी संबंधित ६१५ खाटांचे रुग्णालय सुरू करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे.या नव्या वैद्यकीय सुविधामुळे नागपूरमध्ये अतिविशेषोपचारांची अतिरिक्त सुविधा उपलब्ध होत आहे. याचबरोबर या संस्थेचे नामकरण “डॉ. बाबासाहेब आंबेडकर अतिविशेषोपचार, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संस्था (Dr. Babasaheb Ambedkar Super Speciality Institute of Medical Education and Research (BASIMER))” असे करण्यात आले आहे.या प्रकल्पाच्या उभारणीसाठी सुमारे ९८९.०३ कोटी रुपयांचा अनावर्ती खर्च तसेच पहिल्या तीन वर्षाचा १७६.६२ कोटी रुपयांचा आवर्ती खर्च राहणार आहे. या एकूण ११६५.६५ कोटी रुपयांच्या खर्चास तसेच त्यानंतर या संस्थेला दरवर्षी येणाऱ्या ७८.८० कोटी रुपयांच्या आवर्ती खर्चासही राज्य सरकारने मान्यता दिली आहे. या प्रकल्पाच्या उभारणीसाठी येणाऱ्या एकूण ११६५.६५ कोटी रुपयांच्या खर्चाचे दायित्व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग यांनी अनुक्रमे ७५ टक्के आणि २५ टक्के या प्रमाणात विभागण्यात आले आहे. यापैकी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या दायित्व स्वीकृतीच्या प्रमाणातील (७५ टक्के) ८७४.२३ कोटी रुपयांचा निधी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या ‘अनुसूचित जाती घटक’ कार्यक्रमाच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे.प्रकल्पाच्या उभारणी खर्चाचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे दायित्व संपुष्टात आल्यावर प्रकल्पासाठी आवश्यक असणारा अनावर्ती व आवर्ती खर्च वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग करणार आहे. प्रकल्पासाठी तातडीने पदनिर्मिती प्रक्रिया हाती घेतली जाणार आहे. त्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीने ही प्रक्रिया तातडीने सुरू करुन ती वेळेत पूर्ण करण्याच्या आणि संस्थेच्या श्रेणीवर्धनात येणारे बांधकाम कालबद्धरित्या पूर्ण करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. हा प्रकल्प अंशतः अथवा पूर्णतः सार्वजनिक- खासगी भागीदारी (पीपीपी) तत्वावर उभारण्याची शक्यता पडताळून पाहण्यात येणार आहे. बांधकाम नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत होणार आहे.

फीड फीडबर्नर 22 Nov 2025 8:10 pm

नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराची भाजपच्या नेत्यांनी काळजी करू नये; शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे

सातारा : सुवर्णाताई पाटील यांना स्वगृही बोलवणे म्हणजे भाजपच्या नेत्यांना आमच्या उमेदवाराच्या विजयाची खात्री आहे का? तसे त्यांनी गृहीत धरले आहे का? त्यांना महाविकास आघाडीने न्याय दिला आहे. तुम्हाला निष्ठावान उमेदवाराची काळजी असती तर तुम्ही त्यांना वेळीच थांबवले असते. आमच्या उमेदवाराची काळजी करायचे सोडून द्या, असा टोला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे […] The post नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराची भाजपच्या नेत्यांनी काळजी करू नये; शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Nov 2025 8:02 pm

8th Pay Commission : ‘8 व्या वेतन आयोगा’च्या ‘या’अटी आणि शर्ती बदलण्याची मागणी; PM, FM यांना पत्र

8th Pay Commission : केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या ८ व्या वेतन आयोगाच्या (8th Pay Commission) कार्यकक्षेतील (Terms of Reference – ToR) अनेक अटी आणि शर्ती बदलण्याची मागणी नॅशनल कौन्सिल (स्टाफ साईड) ऑफ द जॉईंट कन्सल्टेटिव्ह मशिनरी (NC JCM) या संघटनेने केली आहे. या संदर्भात NC JCM ने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री […] The post 8th Pay Commission : ‘8 व्या वेतन आयोगा’च्या ‘या’ अटी आणि शर्ती बदलण्याची मागणी; PM, FM यांना पत्र appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Nov 2025 7:31 pm

AUS vs ENG : ‘तो ट्रेनसारखा धावत होता…’, ट्रॅव्हिस हेडच्या वादळी शतकावर बेन स्टोक्सची प्रतिक्रिया

Ben Stokes Statement on Travis Head : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील ॲशेस मालिकेतील पहिला कसोटी सामना पर्थच्या ऑप्टस स्टेडियमवर अवघ्या दोन दिवसांत संपला. ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर ८ विकेट्सने दणदणीत विजय मिळवत मालिकेत १-० ने आघाडी घेतली. या लाजिरवाण्या पराभवानंतर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने ऑस्ट्रेलियाचा फलंदाज ट्रेव्हिस हेडच्या तुफानी खेळीचे कौतुक करताना तो कसा ‘अविश्वसनीय’ होता, याबद्दल […] The post AUS vs ENG : ‘तो ट्रेनसारखा धावत होता…’, ट्रॅव्हिस हेडच्या वादळी शतकावर बेन स्टोक्सची प्रतिक्रिया appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Nov 2025 7:29 pm

उदयपूरमध्ये ‘हॉलिवूड-बॉलीवूड’चा जलवा! अमेरिकन अब्जाधीश राजू मन्तेना यांच्या लेकीचा शाही विवाह सोहळा

उदयपूर (राजस्थान): अमेरिकेतील प्रसिद्ध फार्मा उद्योजक राम राजू मन्तेना यांची कन्या नेत्रा मन्तेना आणि उद्योजक वम्सी गदिराजु यांचा शाही विवाह सोहळा सध्या ‘सिटी ऑफ लेक्स’ (सरोवरांचे शहर) उदयपूरमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. २१ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या या चार दिवसीय सोहळ्यामुळे हे शहर आंतरराष्ट्रीय व्हीव्हीआयपी गेस्टसाठी एका ग्लॅमरस डेस्टिनेशनमध्ये बदलले आहे. या सोहळ्याला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड […] The post उदयपूरमध्ये ‘हॉलिवूड-बॉलीवूड’चा जलवा! अमेरिकन अब्जाधीश राजू मन्तेना यांच्या लेकीचा शाही विवाह सोहळा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Nov 2025 7:18 pm

अल्पवयीन मुले इसिसच्या रडारवर, ‘ऑपरेशन सिंदूर’चा नकाशा पाठविण्याचा आरोप

रायपूर (वृत्तसंस्था): छत्तीसगडमधील दहशतवादविरोधी पथकाने रायपूर आणि भिलाई येथून दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. दहावी आणि अकरावीत शिकणारे हे दोन्ही उच्च माध्यमिक विद्यार्थी दहशतवादी संघटना ‘आयएसआयएस’(इसिस) हँडलर्सच्या थेट संपर्कात होते. त्यांना ऑनलाइन माध्यमातून कट्टरपंथी सामग्रीद्वारे पद्धतशीरपणे भडकावले जात होते.दोन्ही अल्पवयीन शस्त्रे उचलण्यास तयार होते आणि त्यांनी हँडलर्सना ‘ऑपरेशन सिंदूर’ संबंधित नकाशाची एक क्लिपिंग (नमुना) पाठवली होती. एटीएसने त्यांच्यावर अनलॉफुल ॲक्टिव्हिटीज (प्रिव्हेन्शन) ॲक्ट (उप्पा), १९६७ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून त्यांच्या कारवायांची सखोल चौकशी सुरू आहे. अल्पवयीन मुलांचे कुटुंब तपास यंत्रणांना सहकार्य करत असून, त्यांच्या मानसिक पुनर्वसनासाठी पाऊले उचलली जात आहेत, असे छत्तीसगड एटीएसने स्पष्ट केले आहे.एटीएस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आक्षेपार्ह सोशल मीडियावरील तक्रारीनंतर हे प्रकरण समोर आले. देखरेखीदरम्यान अधिकाऱ्यांना आयएसआयएसशी जोडलेला एक गोपनीय इंस्टाग्राम ग्रुप आढळला. पाकिस्तानी हँडलर्स कट्टरपंथी सामग्री अपलोड करत होते. हे दोन भारतीय अल्पवयीन मुले या ग्रुपमध्ये सक्रिय सहभागी होते. गेल्या दीड वर्षांपासून एटीएसने या अल्पवयीन मुलांवर लक्ष ठेवले होते. डिजिटल देखरेख टाळण्यासाठी पाकिस्तानी हँडलर्स वारंवार ग्रुप्स बदलत असत. ग्रुपमध्ये जास्त ट्रॅफिक आढळले किंवा यंत्रणांची पाळत असल्याचा संशय आला, तर तो ग्रुप अचानक डिलीट केला जात असे.तणावाच्या काळात, पाकिस्तानी हँडलर्सनी संपर्क वाढवलाया अल्पवयीन मुलांना ‘डिजिटल मॉड्यूल’द्वारे प्रशिक्षण दिले जात होते. यामध्ये डार्क वेब, टीओआर, व्हीपीएन आणि बनावट आयपी ॲड्रेस यांसारख्या तंत्रांचा समावेश होता. ही सर्व तंत्रे कट्टरपंथी ऑनलाइनच्या माध्यमातून पुरवली जातहोती. कायदा अंमलबजावणी संस्थांना त्यांचा मागोवा घेणे शक्य होऊ नये यासाठी हे प्रशिक्षण दिले जात होते.भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या काळात, पाकिस्तानी हँडलर्सनी अल्पवयीन मुलांशी संपर्क वाढवला. याच दरम्यान, भारताचे ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि दोन्ही देशांनी लादलेली ‘मीडिया ब्लॅकआऊट’ची परिस्थिती होती. या माहितीच्या दरीचा फायदा घेत हँडलर्सनी मुलांना सक्रिय केले आणि त्यांना हवाई हल्ल्यांच्या नकाशांच्या क्लिपिंग्स भारतीय वृत्तवाहिन्यांकडून मिळवून पाकिस्तानला पाठवण्याची सूचना केल्याचेही तपासात स्पष्ट झाले आहे. छत्तीसगड एटीएसने अल्पवयीन मुलांच्या कुटुंबांना चॅट लॉग्स, स्क्रीनशॉट्स, हिंसक सामग्रीचे पुरावे आणि हँडलर्ससोबतच्या संवादाचे रेकॉर्ड दिले आहेत. आपले मुले एवढ्या मोठ्या प्रमाणात कट्टरपंथी कार्यात गुंतलेले आहेत हे पाहून कुटुंबांना धक्का बसला.

फीड फीडबर्नर 22 Nov 2025 7:10 pm

शालेय विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी एसटीची हेल्पलाईन

धाराशिव (प्रतिनिधी) - शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी - विद्यार्थिनींना घरातून शाळेला जाताना अथवा शाळेतून घरी येताना एसटी प्रवासात काही अडचण आल्यास अथवा एसटी बसेस वेळेवर न आल्यास, अचानक रद्द करण्यात आल्यास त्यांना योग्य ती मदत मिळावी यासाठी लवकरच एसटी महामंडळाची ‘हेल्पलाइन’ सुरू करण्यात येत आहे. अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.राज्य शासनाच्या समाज कल्याण विभागाकडून मानव विकास निधी अंतर्गत राजाच्या दुर्गम व आदिवासीबहुल भागामध्ये शालेय विद्यार्थिनींना प्रवासी सेवा देण्यासाठी ‘मानव विकास बसेस’ उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्या बसेस विशेषत: शालेय विद्यार्थिनींची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात याव्यात. अशा सक्त सूचना देण्यात आलेले असतात. परंतु अनेक आगारात या नियमाची पायमल्ली केलेली दिसून येते. धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना मंत्री सरनाईक यांनी धाराशिव मध्यवर्ती बसस्थानकाला भेट दिली असता, तेथे उपस्थित असणाऱ्या विद्यार्थ्यांनी अनेक समस्या व तक्रारी सरनाईक यांच्यासमोर मांडल्या.अनेक शालेय बसेस वेळेवर न सुटणे, गर्दी असल्यामुळे थांब्यावर न थांबणे, बसेस उशिरा येणे अथवा अचानक रद्द होणे यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची तक्रार त्यातील काही विद्यार्थ्यांनी केल्या. संध्याकाळच्या वेळी शाळा -महाविद्यालय सुटल्यानंतर किमान एक तासात मुले आपल्या घरी जाणे अपेक्षित असते. याबाबत एसटीच्या स्थानिक प्रशासनाने अतिशय गांभीर्याने या गोष्टी घेणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी यावेळी केले.शालेय विद्यार्थी -विद्यार्थिनींना आपल्या घरातून शाळेत जात असताना अथवा शाळेतून घरी येत असताना बसेस उशिरा सुटणे, त्या अचानक रद्द होणे ,तांत्रिक बिघाडामुळे बस नादूरूस्त झाल्याने घरी पोहोचण्यास अडचण निर्माण झाल्यास त्यांनी तातडीने एसटीच्या हेल्पलाइन क्रमांक वर संपर्क करून मदत घ्यावी या हेतूने लवकरच एक हेल्पलाइन क्रमांक प्रदर्शित करण्यात येईल.विद्यार्थ्यांच्या शालेय नुकसानीची जबाबदारी आगार व्यवस्थापकावरएसटी बसेस उशिरा सुटणे, अचानक रद्द होणे अथवा अन्य कारणामुळे शालेय विद्यार्थी- विद्यार्थिनींचे तास चुकतात किंवा परीक्षेला ते वेळेवर पोहोचू शकत नाहीत, काही वेळेला त्यांची परीक्षा बुडते . विद्यार्थ्यांच्या नुकसानीला संबंधित क्षेत्रातील आगार व्यवस्थापक व त्यांचे पर्यवेक्षक यांना जबाबदार धरण्यात येईल. शालेय बस फेऱ्यांच्या गैरव्यवस्थापनामूळे विद्यार्थ्यांचे जितक्या दिवसाचे शालेय नुकसान होईल, तितके दिवस यास जबाबदार असणारे पर्यवेक्षक अथवा अधिकाऱ्यांना निलंबित अथवा सक्तीचे रजेवर पाठवण्यात यावे, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटीच्या महाव्यवस्थापक (वाहतूक) यांना दिले आहेत.

फीड फीडबर्नर 22 Nov 2025 7:10 pm

‘तिरुपती’च्या २० कोटी लाडूंसाठी वापरले ‘भेसळयुक्त’ तूप

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): तिरुपती मंदिरात भेसळयुक्त तूप वापरून अंदाजे २० कोटी लाडू तयार करण्यात आले होते. २०१९-२०२४ दरम्यान वाटण्यात आलेल्या एकूण ४८.७६ कोटी लाडूंपैकी हे लाडू होते, अशी माहिती श्री वेंकटेश्वर मंदिराचे व्यवस्थापन करणाऱ्या तिरुमला तिरुपती देवस्थानम (टीटीडी) ट्रस्ट बोर्डाचे अध्यक्ष बीआर नायडू यांनी दिली आहे. ही आकडेवारी २०१९ ते २०२४ दरम्यान वाटण्यात आलेल्या प्रसादाच्या एकूण ४८७.६ दशलक्ष लाडूंपैकी २० कोटी लाडू हे भेसळयुक्त तुपाचा वापर करुन बनवले होते, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.मंदिरात दररोज येणाऱ्या भाविकांची संख्या, खरेदीची माहिती आणि उत्पादन आणि विक्रीचे आकडे यांचा विचार करून साध्या गणनेच्या आधारे हे आकडे काढण्यात आले आहेत. एसआयटीने अलीकडेच या प्रकरणासंदर्भात टीटीडीचे माजी अध्यक्ष आणि वायएसआरसीपी खासदार वायव्ही सुब्बा रेड्डी यांची आठ तास चौकशी केली. प्रयोगशाळेने नमुन्यांमध्ये भेसळ आढळून आली असूनही त्यांनी तूपाच्या टँकरना परवानगी का दिली असे विचारले असता, त्यांनी दावा केला की अहवाल त्यांच्यासमोर कधीही सादर करण्यात आला नाही. खरेदी तांत्रिक समितीच्या शिफारशींनुसार केली गेली.त्यांचे माजी सहाय्यक चिन्ना अप्पाना यांना अटक करण्यात आली आहे.एसआयटीने टीटीडीचे माजी कार्यकारी अधिकारी एव्ही धर्मा रेड्डी यांचीही चौकशी केली आहे. नेल्लोर येथील न्यायालयात त्यांनी आपले महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले आहे, १५ डिसेंबरपर्यंत पुरवणी आरोपपत्र सादर होण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, सूत्रांनी असे म्हटले आहे की, या पाच वर्षांत अंदाजे ११ कोटी भाविकांनी मंदिराला भेट दिली होती. मात्र भेसळयुक्त तुपापासून बनवलेले लाडू नेमके कोणी घेतले हे निश्चित करण्याचा कोणताही मार्ग नाही. तिरुमला तिरुपती देवस्थानम (टीटीडी) ट्रस्ट बोर्डाचे स्पष्ट केले आहे की, व्हीव्हीआयपी लाडू देखील वेगळे ओळखता येत नव्हते.

फीड फीडबर्नर 22 Nov 2025 7:10 pm

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिकच्या ६६ किमी परिक्रमा मार्गाला ‘हिरवा कंदील’

भूसंपादनासह रस्त्याच्या उभारणीकरिता सात हजार ९२२.११ कोटी रुपयांचा निधी मंजूरनाशिक (प्रतिनिधी): आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहराभोवती ६६ किलोमीटर लांबीच्या परिक्रमा मार्गाला (बाह्य रिंगरोड) राज्य शासनाने ‘हिरवा कंदील’ दाखविला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी भूसंपादनासह रस्त्याच्या उभारणीकरिता तब्बल ७ हजार ९२२.११ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निर्णयामुळे सिंहस्थात येणाऱ्या भाविकांचा प्रवास सुखकर होणार असून, नाशिकच्या विकासाला आणि दळणवळणाला मोठी चालना मिळणार आहे.निधीची आणि नियोजनाची स्थिती नाशिक- त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याचे वेध आता प्रशासनाला लागले आहेत. वर्षभरावर येऊन ठेपलेल्या या सोहळ्यासाठी प्रशासकीय पातळीवर वेगाने हालचाली सुरू आहेत. गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सिंहस्थाशी संबंधित ५ हजार ६०० कोटींच्या कामांचे भूमिपूजन पार पडले. त्यानंतर आता शासनाने प्रस्तावित रिंगरोडला मंजुरी देत निधीची उपलब्धता करून दिली आहे.भूसंपादनासाठी ३ हजार ६५९.४७ कोटी रुपये तर रस्ता उभारणीसाठी ४ हजार २६२.६४ कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी दिली आहे. रिंगरोडची गरज आणि पार्श्वभूमी शहरातील वाढती वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हा रिंगरोड उभारण्याचा प्रस्ताव दिला होता. त्याअनुषंगाने सर्वेक्षणही पूर्ण झाले होते; मात्र, निधीअभावी हा प्रस्ताव मागे पडला होता. अखेर मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पाला मंजुरी दिल्याने सिंहस्थापूर्वी हा मार्ग उभा राहणार आहे.केंद्राच्या मंजुरीची प्रतीक्षारिंगरोड उभारण्यासाठी केंद्र सरकारच्या ‘राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणा’ ची अंतिम मंजुरी मिळणे आवश्यक आहे. विभागीय आयुक्त तथा कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम यांनी याबाबत भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणला आठ दिवसांत मंजुरी देण्याची विनंती केली आहे. ही मंजुरी मिळताच कामाचा शुभारंभ होईल. दरम्यान, या रस्त्यावर टोल वसुली करायची झाल्यास, त्यासाठीही शासनाने तरतूद ठेवली आहे.असा असेल ६६ किमीचा मार्गडीआरडीओ जंक्शन (आडगाव) ते सिन्नर फाटा : डीआरडीओ जंक्शन -दिंडोरी रोड (ढकांबे शिवार) -राष्ट्रीय महामार्ग क्र. ८४८ (पेठ) -गवळवाडी -गंगापूर रोड -गोवर्धन -त्र्यंबक महामार्ग -बेळगाव ढगा -नाशिक-मुंबई महामार्ग -विल्होळी (रा.म.क्र. ६०) -सिन्नर फाटा -आडगाव.भूसंपादनासाठी प्रशासन सज्जप्रकल्पाच्या उभारणीत भूसंपादन हा सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. हे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. यासाठी खास आठ अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून, त्यात भूसंपादनासाठी पाच स्वतंत्र अधिकारी तसेच नाशिक, निफाड व दिंडोरीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

फीड फीडबर्नर 22 Nov 2025 7:10 pm

मुंबईत राडा, काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने

मुंबई : काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्यामुळे मुंबईत राडा झाला. मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांच्या कार्यालयाबाहेर ही घटना घडली. मागील काही दिवसांपासून काँग्रेस नेते अस्लम शेख आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांच्यात राजकीय संघर्ष सुरू आहे. अलिकडेच भाजपच्या मंगलप्रभात लोढा यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना एक पत्र पाठवले. या पत्रात त्यांनी अस्लम शेख धमकावत असल्याचे नमूद करून कारवाईची मागणी केली. लोढा यांच्या मागणीला मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी जाहीर पाठिंबा दिला होता. धमकी देणारे अस्लम शेख आणि त्यांच्या बेकायदा वर्तन करणाऱ्या समर्थकांवर कायदेशीर कारवाई व्हायलाच हवी तसेच अस्लम शेख यांनी मालाडमध्ये उभारलेली रोहिंग्या आणि बांगलादेशी मुसलमानांची वस्ती पाडून घुसखोरांना त्यांच्या देशात परत पाठवून द्यावे, अशीही मागणी अमित साटम यांनी घेतली होती. या पार्श्वभूमीवर मुंबईत आज म्हणजेच शनिवार २२ नोव्हेंबर २०२५ रोजी राडा झाला.अंधेरी पश्चिम येथील अमित साटम यांच्या कार्यालयावर काँग्रेसने मोर्चा नेला होता. यावेळी अमित साटम यांच्या कार्यालयाबाहेर काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले. काँग्रेसचा आक्रमक पवित्रा बघून भाजपचे कार्यकर्तेही पुढे सरसावले आणि त्यांनी अमित साटम आणि त्यांच्या ऑफिसला काहीही होऊ नये यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांना रोखून धरण्यासाठी आवश्यक हालचाली केल्या. या दरम्यान काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये थेट संघर्ष झाला. पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. पोलिसांनी काँग्रेसचा मोर्चा आल्यामुळे तणाव वाढेल ही शक्यता गृहित धरुन पुरेशी खबरदारी घेतली होती. अमित साटम यांच्या कार्यालयाबाहेर पोलिसांनी बॅरिकेटिंग करुन बंदोबस्त ठेवला होता. यामुळे परिस्थिती नियंत्रणात राहिली.काय म्हणाले अमित साटम ?अस्लम शेख यांना सांगू इच्छितो, आपल्या सारख्या पाकिस्तानच्या औलादींना आम्ही अजिबात भीक घालत नाहीत. तुम्ही मालाडमध्ये ज्याप्रकारे मालवणी पॅर्टन चालवेला आहे तो उखडून फेकल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाहीत. येणाऱ्या काळात तुमच्यासारखी हिरवी पिलावळं या मुंबईत गाडल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत. त्यामुळे अशाप्रकारचे आरोप आणि वल्गना कदापी करु नये. कायद्याच्याआधीन राहून तुमच्यावर कारवाई होईल, असं अमित साटम म्हणाले होते.

फीड फीडबर्नर 22 Nov 2025 7:10 pm

Sheikh Hasina : शेख हसीना यांच्या फाशीच्या शिक्षेवर पाकिस्तानने दिली ‘ही’प्रतिक्रिया

ढाका/इस्लामाबाद: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर आणि त्यांचे संभाव्य प्रत्यार्पण हा पूर्णपणे बांगलादेशचा अंतर्गत मामला असल्याचे मत पाकिस्तानने व्यक्त केले आहे. पाकिस्तानने या प्रकरणावर थेट भाष्य करणे टाळले असून, हा बांगलादेशच्या संविधान आणि कायद्याचा भाग असल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाचे स्पष्टीकरण – शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाचे […] The post Sheikh Hasina : शेख हसीना यांच्या फाशीच्या शिक्षेवर पाकिस्तानने दिली ‘ही’ प्रतिक्रिया appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Nov 2025 6:45 pm

AUS vs ENG : ऑस्ट्रेलियाने केला ‘वर्ल्ड रेकॉर्ड’! इंग्लंडचा धुव्वा उडवत ‘या’मोठ्या विक्रमांची केली नोंद

Australia set fastest ever 200+ chase in Test history : ॲशेस मालिकेतील पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला ८ विकेट्सने पराभूत करत मालिकेत दमदार सुरुवात केली आहे. ज्या खेळपट्टीवर पहिल्याच दिवशी १९ विकेट्स पडल्या होत्या आणि फलंदाजांसाठी धावा करणे अत्यंत कठीण झाले होते, त्याच खेळपट्टीवर दुसऱ्या दिवशी ट्रॅव्हिस हेडने आपल्या बॅटने धुमाकूळ घालत ऑस्ट्रेलियाला सहज लक्ष्य गाठून […] The post AUS vs ENG : ऑस्ट्रेलियाने केला ‘वर्ल्ड रेकॉर्ड’! इंग्लंडचा धुव्वा उडवत ‘या’ मोठ्या विक्रमांची केली नोंद appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Nov 2025 6:42 pm

पश्चिम बंगालमध्ये महिला बूथ लेव्हल ऑफिसरने का केली आत्महत्या? कुटुंबियांचा धक्कादायक दावा

कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये विशेष सघन पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) चे काम सुरू असतानाच, कामाच्या कथित ताणामुळे एका महिला बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) ने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नदिया जिल्ह्यातील रिंकू तरफ़दार (Rinku Tarafdar) असे आत्महत्या केलेल्या बीएलओचे नाव आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी एसआयआरच्या कामाचा प्रचंड दबाव हेच आत्महत्येचे कारण असल्याचा दावा […] The post पश्चिम बंगालमध्ये महिला बूथ लेव्हल ऑफिसरने का केली आत्महत्या? कुटुंबियांचा धक्कादायक दावा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Nov 2025 6:40 pm

Palghar Leopard Attack |११ वर्षांच्या मुलाची बिबट्याशी झुंज; शाळेच्या बॅगेने जीव वाचवला

पालघर : एका ११ वर्षांच्या शाळकरी मुलाने त्याच्या मित्राच्या मदतीने एका बिबट्याशी धैर्य दाखवत झुंज दिली आहे. शुक्रवारी संध्याकाळी माला पडवीपाडा परिसरात शाळेतून परतत असताना एका बिबट्याने पाचवीच्या वर्गातील मयंक कुवरावर हल्ला केला. त्याने आणि दुसऱ्या मुलाने धाडसाने ओरडून त्या बिबट्याच्या दिशेने दगड फेकले. बिबट्याने मयंक कुवरावर जेव्हा झडप घातली तेव्हा, त्याची स्कूल बॅग संरक्षण […] The post Palghar Leopard Attack | ११ वर्षांच्या मुलाची बिबट्याशी झुंज; शाळेच्या बॅगेने जीव वाचवला appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Nov 2025 6:35 pm

पहिल्या दिवसअखेर दक्षिण आफ्रिका ६ बाद २४७

गुवाहाटी (वृत्तसंस्था): गुवाहाटीतील एसीए स्टेडियमवर सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीत भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट नियंत्रण व अचूकतेच्या बळावर पहिल्याच दिवशी सामना आपल्या पकडीत आणला. दक्षिण आफ्रिकेनं पहिला दिवस संपेपर्यंत २४७ धावांवर सहा गडी गमावले असून भारताला स्पष्टपणे वरचष्मा मिळवून दिला आहे.मैदानावरील पीच जरी फलंदाजांसाठी अडचणीची नव्हती, तरी खेळपट्टीवर टिकून राहण्यासाठी संयम आणि शिस्त आवश्यक होती. जसप्रीत बुमराह (१/३८) आणि कुलदीप यादव (३/४८) यांनी त्या दिशेने कसून मारा केला. रवींद्र जडेजाने (१/३०)ही आपापल्या स्पेलमध्ये कर्णधार तेंबा बावुमा याचे महत्त्वपूर्ण यश मिळवून दिले.द. आफ्रिकेने सावध सुरुवात करत १६६/२ अशी मजबूत स्थिती मिळवली होती. बावुमा (४१) आणि ट्रिस्टन स्टब्स (४९) या जोडीने ८४ धावांची भागीदारी करत डाव उभा केला होता. पण बावुमाने लोफ्टेड ड्राइव्ह करण्याचा चुकीचा प्रयत्न केल्यानंतर खेळ पलटला. यशस्वी जैस्वालने झेल टिपत तो परतला, आणि त्यानंतर लगेचच स्टब्सही कुलदीपच्या चतुराईला बळी पडला. सलग दोन विकेटीनंतर वियान मुल्डरही (१३) मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात माघारी परतला आणि एका टप्प्यावर स्थिर वाटणारा आफ्रिकी डाव २०१/५ असा ढासळला.शेवटच्या सत्रात मोहम्मद सिराजनं टोनी डे झोर्जी (२८) याला मागे झुकणाऱ्या सुंदर चेंडूवर बाद करत भारताला दिवसअखेरी जिंकून दिला. यापूर्वी बुमराहच्या लयबद्ध सुरुवातीच्या स्पेलनं एइडन मार्करम (३८) याला वारंवार त्रास दिला होता. मार्करमनं संयम दाखवला असला तरी चहापानाआधी अनावश्यक ड्राइव्ह करत तो बाद झाला. रायन रिक्लेटन (३५) यानाही कुलदीपनं दोन चेंडूंमध्येच बाद करत भारताच्या यशाची मालिका कायम ठेवली.कर्णधार ऋषभ पंतच्या अचूक क्षेत्ररचना आणि वेळेवर केलेल्या गोलंदाजांच्या बदलांचं विशेष कौतुक करावं लागेल. पहिल्या सत्रात बुमराहची धार, नंतर स्पिनचा प्रभाव – भारतीय संघाने गोलंदाजीमध्ये सतत दबाव ठेवत धावा रोखल्या.एकूणच, दक्षिण आफ्रिकेच्या शीर्ष सहा फलंदाजांनी ८० पेक्षा जास्त चेंडू खेळूनही मोठ्या धावा उभारण्यात अपयश आल्याने त्यांना त्याची किंमत मोजावी लागू शकते. पिचवर अजून झीज दिसत नसली तरी अधूनमधून चेंडू हालचाल करत आहे, त्यामुळे भारताला दुसऱ्या दिवशी लवकर आफ्रिकी डाव गुंडाळण्याची मोठी संधी आहे.खेळ थांबला तेव्हा सेनुरान मुथुसामी २५ आणि काइल व्हेर्रेन १ धावांवर नाबाद होते. दक्षिण आफ्रिकेच्या डावात १७ अतिरिक्त धावा (८ बाय, ६ लेगबाय आणि २ नो-बॉल) मिळाल्या. त्यांच्या डावातील ८१.५ षटकांत २४७ धावा झाल्या असून आतापर्यंत त्यांच्या ६ विकेट पडल्या आहेत. विकेट्स पडण्याचा क्रम अनुक्रमे – ८२, ८२, १६६, १८७, २०१ आणि २४६ असा होता.भारताच्या गोलंदाजांमध्ये कुलदीप यादवने १७ षटकांत ४८ धावांत ३ बळी घेत सर्वाधिक प्रभाव टाकला. बुमराहने १ बळी घेताना १७ षटकांत फक्त ३८च धावा दिल्या. मोहम्मद सिराजने ५९ धावांत १, तर जडेजाने ३० धावांत १ विकेट घेत दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजीला अधूनमधून धक्का दिला. वॉशिंग्टन सुंदर आणि नितीश कुमार रेड्डीला मात्र यश मिळाले नाही.

फीड फीडबर्नर 22 Nov 2025 6:30 pm

रायगडमध्ये भाजप - राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अशी रंगणार लढत, थंडीत रंगणार मित्रपक्षांचा सामना

अलिबाग (प्रतिनिधी) : रायगड जिल्ह्यातील दहा नगर परिषदांमधील लढतींचे चित्र स्पष्ट झाले आहे. बहुतांश नगरपालिकेत भाजप अजित पवार राष्ट्रवादी युती विरुद्ध शिंदेंची शिवसेना अशी लढत होत आहे. अलिबाग, रोहा, कर्जत आणि माथेरान या चार नगर परिषदांमध्ये दुरंगी, तर मुरुड व पेण नगरपरिषदेत तिरंगी लढती होणार आहेत. उरण आणि श्रीवर्धन नगर परिषदांमध्ये चौरंगी, महाड नगर परिषदेत पंचरंगी, तर खोपोली नगर परिषदेत बहुरंगी सामने होत असले, तरी खरा सामना हा युतीतील मित्र पक्षात असणार आहे.अलिबाग नगर परिषदेत नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अॅड. कविता प्रविण ठाकूर यांनी आपला अर्ज मागे घेतला आहे. परिणामी नगराध्यक्ष पदासाठी आता शेकाप, काँग्रेस, मनसे आघाडीच्या उमेदवार अक्षया प्रशांत नाईक आणि भाजपा, शिंदे शिवसेनेच्या उमेदवार तनुजा पेरेकर यांच्यात थेट दुरंगी लढत होणार आहे. नगरसेवकांच्या २० जागांपैकी एका जागी शेकापचे प्रशांत नाईक बिनविरोध विजयी झाल्याने आता १९ जागांकरिता ४१ उमेदवार रिंगणात आहेत.रोहा अष्टमी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वनश्री शेडगे विरुद्ध शिवसेना पक्षाच्या शिल्पा धोत्रे अशी थेट लढत होणार आहे. नगरसेवक पदाच्या २० उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने नगरसेवक पदाच्या १९ जागांसाठी ५० उमेदवार रिंगणात आहेत. प्रभाग क्रमांक २ ब मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजेंद्र जैन हे बिनविरोध आले आहेत. नगरसेवक पदाच्या १९ जागेसाठी विविध पक्षाच्या निवडणुकीसाठी उभे असलेल्या उमेदवारांमध्ये शिवसेना १३, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी १९, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टी ५, शिवसेना ४, भारतीय जनता पार्टी ३, अपक्ष ६ हे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.महाड नगर परिषदेत चेतन उर्फ बंटी गजानन पोटफोडे शिवसेना उबाठा गट, सुदेश शंकर कलमकर राष्ट्रवादी काँग्रेस, सुनील वसंत कविस्कर शिवसेना व अन्य दोन अपक्ष उमेदवार अशी पंचरंगी लढत होणार आहे, तर नगरसेवक पदाच्या २० पदांकरिता ४८ उमेदवार रिंगणात आहेत.माथेरान नगरपालिका निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी व महायुती यांच्यामध्येच खरी लढाई असल्याचे चित्र आता स्पष्ट झाले असून, अंतर्गत तिकीट नाकारलेल्या उमेदवारांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने अधिकृत उमेदवारांना त्याचा थेट फटका काही प्रभागांमध्ये बसणार आहे. राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना ठाकरे गट व आरपीआय राष्ट्रवादी शरद पवार गट यांचे शिवराष्ट्र पॅनेल निवडणुकीच्या रिंगणात असून, त्यांच्यासमोर शिवसेना शिंदे गट, भाजपा आरपीआय पक्षाचा एक गट अशी महायुती या निवडणुकी सामोरे जाणार आहे. नगराध्यक्ष पदाकरिता महायुतीकडून चंद्रकांत चौधरी, तर शिवराष्ट्र पॅनलकडून अजय सावंत यांच्यामध्ये ही निवडणूक होणार हे स्पष्ट झाले आहे. नगरसेवक पदाच्या २० जागांकरिता ४६ उमेदवार रिंगणात आहेत.कर्जतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उबाठा गट यांच्या महापरिवर्तन विकास आघाडीच्या पुष्पा दगडे आणि भाजपा, भाजप शिवसेना पक्ष या युतीच्या डॉ. स्वाती लाड यांच्यात थेट लढत होणार आहे. नगरसेवक पदाच्या २१ जागांकरिता ४२ उमेदवार रिंगणात आहेत.पेणमध्ये भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध पेणकर आघाडी पेण नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी भाजप आणि राष्ट्रवादी आघाडीच्या प्रितम पाटील, पेणकर आघाडीच्या रिया धारकर आणि काँग्रेसच्या नंदा म्हात्रे यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. भाजप-राष्ट्रवादी एकत्र येत असताना शिवसेना शिंदे गट स्वतंत्र लढत आहे. पेण नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत पहिल्यांदाच सहा नगरसेवक बिनविरोध विजयी झाले आहेत. हे सहाही नगरसेवक भाजप आणि राष्ट्रवादी युतीचे आहेत. यामुळे आता १८ नगरसेवक पदासाठी ४६ उमेदवार रिगंणात आहेत.मुरुडमध्ये थेट नगराध्यक्षा पदासाठी शिंदे शिवसेना पक्षांच्या कल्पना पाटील, शेकापच्या अंकिता माळी आणि अजित पवार राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या आराधना दांडेकर यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. नगरसेवक पदाच्या २० जागांकरिता ५८ उमेदवार आता रिंगणात आहेत.श्रीवर्धनमध्ये नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जितेंद्र सातनाक, भाजप शिवसेना पक्षाच्या अक्षता श्रीवर्धनकर, शिवसेना उबाठा पक्षाचे अतुल चौगुले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रविंद्र चौलकर अशी चौरंगी लढत होणार आहे, तर नगरसेवक पदाच्या २० जागांसाठी ६० उमेदवार रिंगणात आहेत.उरण नगर परिषदेत नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून शोभा कोळी, महाविकास आघाडीकडून भावना घाणेकर, भाजप शिवसेना पक्षाकडून रुपाली ठाकूर, तर अपक्ष शेख नसरीन इसरार अशी चौरंगी लढत होणार आहे. नगरसेवक पदाच्या २१ जागांसाठी ४८ उमेदवार रिंगणात आहेत. येथे भाजपा आमदार महेश बालदी यांच्या प्रतिष्ठेची ही निवडणूक आहे.खोपोली नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व भाजपा विरुद्ध शिवसेना (शिंदे) पक्ष अशी लढत होत आहे. येथे राष्ट्रवादीचे सुनील पाटील आणि भाजप शिवसेना पक्षाचे कुलदीप शिंदे यांच्यात खरी लढत होणार आहे. अन्य सात अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. नगरसेवक पदाच्या ३१ जागांकरिता १५४ उमेदवार रिंगणात आहेत.

फीड फीडबर्नर 22 Nov 2025 6:30 pm

New labour codes: नवीन कामगार कायद्यांना संघटना का करत आहेत विरोध? जाणून घ्या सर्वकाही

New labour codes: भारत सरकारने सुमारे २९ जुन्या कामगार कायद्यांचे एकत्रीकरण करून त्याऐवजी चार नवीन लेबर कोड्स लागू केले आहेत. केंद्र सरकार या बदलांना कामगार आणि मजुरांच्या हितासाठी केलेले महत्त्वपूर्ण आणि ‘प्रगतिशील सुधार’ मानत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कोड्सना “स्वातंत्र्यानंतरच्या मजुरांसाठीचे सर्वात मोठे आणि प्रगतिशील सुधारणांपैकी एक” असे म्हटले आहे. सरकारच्या मते, यामुळे […] The post New labour codes: नवीन कामगार कायद्यांना संघटना का करत आहेत विरोध? जाणून घ्या सर्वकाही appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Nov 2025 6:22 pm

‘रावणाची लंकाही अहंकारामुळे जळून खाक…’; एकनाथ शिंदेंची भाजपवर नाव न घेता टीका

पालघर: पक्ष फोडाफोडीच्या कथित नाराजीनाट्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालघरमधील डहाणू नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारात भाजपवर पहिल्यांदाच नाव न घेता प्रहार केल्याचं दिसून आलं आहे. डहाणूमध्ये “आपण अहंकाराविरोधात एकत्र आलो आहोत, रावणाची लंकाही अहंकारामुळे जळून खाक झाली होती,” असे सूचक विधान करून शिंदे यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. डहाणू नगरपरिषदेत भाजपचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत […] The post ‘रावणाची लंकाही अहंकारामुळे जळून खाक…’; एकनाथ शिंदेंची भाजपवर नाव न घेता टीका appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Nov 2025 6:06 pm

Motor Insurance: ‘या’कारणांमुळे वाहन विमा आहे अत्यंत आवश्यक, ‘हे’ 4 मोठे फायदे तुम्हाला माहिती असले पाहिजे…

Motor Insurance : सध्याच्या धावपळीच्या जीवनात कार, बाईक किंवा अन्य कोणतेही वाहन आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. सुरक्षितता, आराम आणि गरजेच्या दृष्टीने ही वाहने महत्त्वाची आहेत. अशा परिस्थितीत, वाहन खरेदी करताना ‘मोटर इन्शुरन्स’ (Motor Insurance) कडे दुर्लक्ष करणे, केवळ कायदेशीर चूक नाही, तर अत्यंत धोकादायक देखील आहे. वाहन विमा का महत्त्वाचा आहे आणि त्याचे […] The post Motor Insurance: ‘या’ कारणांमुळे वाहन विमा आहे अत्यंत आवश्यक, ‘हे’ 4 मोठे फायदे तुम्हाला माहिती असले पाहिजे… appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Nov 2025 5:53 pm

IND vs SA : कुलदीपची जादू अन् भारताचा जबरदस्त पलटवार! पहिल्या दिवसाखेर द. आफ्रिका २४७/६

IND vs SA 2nd Test Day 1 Updates : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस अत्यंत चुरशीचा ठरला. गुवाहाटी येथे सुरू असलेल्या या सामन्यात पाहुण्या दक्षिण आफ्रिकेने पहिल्या दिवसाच्या खेळाअखेर ६ बाद २४७ धावा केल्या आहेत. सुरुवातीच्या दोन सत्रांमध्ये आफ्रिकेच्या फलंदाजांनी वर्चस्व गाजवले असले, तरी अंतिम सत्रात भारतीय गोलंदाजांनी जोरदार मुसंडी […] The post IND vs SA : कुलदीपची जादू अन् भारताचा जबरदस्त पलटवार! पहिल्या दिवसाखेर द. आफ्रिका २४७/६ appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Nov 2025 5:53 pm

New Labour Code: पीएफ, ग्रॅच्युइटी वाढणार, मग हातात येणारा पगार कमी होणार का? जाणून घ्या सर्वकाही…

New Labour Code: केंद्र सरकारने नवीन कामगार संहिता (New Labour Code) लागू करण्याची घोषणा केली असून, याचा थेट परिणाम कोट्यवधी नोकरदारांच्या वेतन रचनेवर (Salary Structure), कपातीवर आणि भविष्यातील फायद्यांवर होणार आहे. हा बदल तुमच्या हातात येणाऱ्या पगाराच्या गणिताला कसे बदलेल, याबद्दल कर्मचारी वर्गात मोठी चर्चा आहे. बेसिक सॅलरीचा नवा नियम आणि पगारावर परिणाम – नवीन […] The post New Labour Code: पीएफ, ग्रॅच्युइटी वाढणार, मग हातात येणारा पगार कमी होणार का? जाणून घ्या सर्वकाही… appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Nov 2025 5:38 pm

गवईंच्या कार्यकाळात २१ मागासवर्गीय न्यायाधीशांची नियुक्ती; अनुसूचित जातींमधून १०, तर १५ महिलांची नियुक्ती

नवी दिल्ली : भारताचे सरन्यायाधीश बीआर गवई यांच्या सुमारे सहा महिन्यांच्या कार्यकाळात देशाच्या विविध उच्च न्यायालयांमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गातील दहा, इतर मागासवर्गीय आणि मागासवर्गीय प्रवर्गातील अकरा न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली. देशाचे पहिले बौद्ध आणि दुसरे दलित सरन्यायाधीश असलेले न्यायमूर्ती गवई यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय मंडळाचे नेतृत्व केले. या मंडळाने अर्थात कॉलेजीयमने विविध उच्च न्यायालयांचे […] The post गवईंच्या कार्यकाळात २१ मागासवर्गीय न्यायाधीशांची नियुक्ती; अनुसूचित जातींमधून १०, तर १५ महिलांची नियुक्ती appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Nov 2025 5:31 pm

तळेगाव दाभाडेमध्ये अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी महायुतीत राडा; कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की

मावळ : तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेवटच्या दिवशी अर्ज मागे घेण्यासाठी उमेदवार आणि कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. याच वेळी नगरपरिषद कार्यालयात अनपेक्षितरित्या तणाव वाढला आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि भारतीय जनता पक्ष (BJP) यांच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्कीची घटना घडली. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती शांत केली, मात्र शहरातील काही भागांत तणावाचे वातावरण दिसून आले.तळेगाव नगरपरिषदेची निवडणूक महायुतीच्या माध्यमातून लढवली जात असली तरी भाजप–राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमधील मतभेद आता उघडपणे समोर येत आहेत. नेतृत्वपातळीवर दोन्ही पक्षांनी युती कायम ठेवली असली तरी स्थानिक पातळीवर उमेदवारी वाटप, प्रभाग रचना आणि पक्षांतर्गत गटबाजी यामुळे नाराजीत भर पडली आहे.https://youtube.com/shorts/VVpXM48oJzo?si=FnJGJMqlu3fqAja4तळेगावमध्ये तब्बल १९ उमेदवार बिनविरोध निवडून येण्याची स्थिती निर्माण झाली असून त्यात राष्ट्रवादीचे १० आणि भाजपचे ९ उमेदवारांचा समावेश आहे. बिनविरोध निवडणुकीनंतरही उर्वरित जागांवर तणाव कायम असल्याचे चित्र दिसत आहे.अर्ज मागे घेण्याच्या दिवशी झालेली धक्काबुक्की ही किरकोळ चकमक नसून युतीतील विसंवाद आणखी वाढत असल्याचा इशारा असल्याचे स्थानिकांचे मत आहे. काही ठिकाणी कार्यकर्त्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केल्याचेही समजते. पोलिसांनी वेळेत कारवाई केल्याने परिस्थिती बिघडली नाही, परंतु पुढील टप्प्यांत हा अंतर्गत संघर्ष आणखी तीव्र होतो का, की समन्वय साधून महायुती निवडणुकीत एकत्रितपणे लढते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

फीड फीडबर्नर 22 Nov 2025 5:30 pm

अदानी समुहाकडून आणखी एक कंपनी १००% खरेदी 'ही'मोठी माहिती समोर

प्रतिनिधी: मूलभूत पायाभूत सुविधा उभारणी व डेटा सेंटर विस्तृत करण्यासाठी अदानी समुहाने आणखी एक मोठे पाऊल उचलले आहे. अदानी समुहाची मुख्य कंपनी अदानी एंटरप्राईजेस व ऐजकॉनेक्स (EdgeConneX) यांच्यातील भागीदारी असलेल्या 'अदानी ऐजकॉनेक्स' या कंपनीचे संपूर्णपणे १००% भागभांडवल अदानी समुहाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. किंबहुना तो व्यवहारही पूर्ण केलेला आहे. एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीत समुहाने या अधिग्रहणाबाबत म्हटले आहे. मोठ्या प्रमाणात डेटा सेंटर निर्मितीसाठी अदानी समुहाने हे अधिग्रहण केले आहे.आपल्या डेटा इन्फ्रास्ट्रक्चर पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी कंपनीने ही योजना आखली होती अखेर याची अंमलबजावणी झाली आहे. हैद्राबाद, पुणे, नवी मुंबई यासह इतर शहरातही कंपनी आपल्या व्यवसायाची व्याप्ती वाढवणार आहे. कंपनीने हे देखील म्हटले आहे की, सध्या अस्तित्वात असलेले ट्रेडकॅसेल पार्क (Trade Castle Park) ऑक्टोबर २०२३ मध्ये सुरू होणार होते मात्र ते आता सुरू होऊ शकते. हे अद्याप ऑपरेशनल झाले नसले तरी लवकरच या प्रकल्पाची सुरूवात होऊ शकते. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात गौतम अदानी यांचे पुत्र व अदानी सेझ कंपनीचे संचालक करण अदानी यांनी केलेल्या घोषणेत गुगलच्या सहाय्याने जगातील सर्वात मोठ्या ग्रीन डेटा सेंटरपैकी एक सेंटर उभे करणार आहेत.अदानी एंटरप्रायझेसचा संयुक्त उपक्रम (Joint Venture) 'अदानी ऐजकॉनेक्सने २३१.३४ कोटींना ट्रेड कॅसल टेक पार्क विकत घेऊन त्यांच्या पायाभूत सुविधा विस्तार धोरणात एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. हे संपादन तंत्रज्ञान पायाभूत सुविधा क्षेत्रातील क्षमता वाढवण्याच्या कंपनीच्या प्रयत्नांमध्ये एक उल्लेखनीय पाऊल आहे.

फीड फीडबर्नर 22 Nov 2025 5:30 pm

G20 परिषदेत PM मोदींनी मांडले 3 महत्त्वाचे प्रस्ताव; अमली पदार्थ-दहशतवाद, कौशल्य वृद्धीवर लक्ष

जोहान्सबर्ग (दक्षिण आफ्रिका): जी-२० परिषदेत सदस्य राष्ट्रांचे प्रतिनिधी महत्त्वपूर्ण समस्यांवर चर्चा करत असतात. नोव्हेंबर महिन्यात सर्व राष्ट्रांचे प्रमुख वार्षिक शिखर परिषदेसाठी भेटतात. यावर्षी आफ्रिकेत आयोजित करण्यात आलेल्या या महत्त्वाकांक्षी परिषदेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन नवीन महत्त्वपूर्ण उपक्रम/प्रस्तावांची रूपरेषा मांडली, ज्यामुळे जागतिक स्तरावर विविध समस्यांवर उपाय शोधले जातील. या प्रस्तावांमध्ये प्रामुख्याने अमली पदार्थ आणि […] The post G20 परिषदेत PM मोदींनी मांडले 3 महत्त्वाचे प्रस्ताव; अमली पदार्थ-दहशतवाद, कौशल्य वृद्धीवर लक्ष appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Nov 2025 5:25 pm

पुण्यातील कचरावेचक कामगार अंजू माने यांनी १० लाखांची बॅग परत करून दिला मानवतेचा संदेश

पुणे : जिथे दैनंदिन जीवनात पैशासाठी लोक अनेकदा अनैतिक मार्ग स्वीकारताना दिसतात, तिथे पुण्यातील एका मेहनती महिलेने समाजासमोर प्रामाणिकतेचे उत्तम उदाहरण ठेवले आहे. कचरावेचक कामगार अंजू माने यांनी दाखवलेली सचोटी खरोखर प्रेरणादायी आहे. रोजच्या जगण्यासाठी कष्ट करणाऱ्या या महिलेला कचरा वेचताना १० लाखांहून अधिक रक्कम असलेली बॅग सापडली, तरीही पैशाच्या मोहापुढे झुकण्याऐवजी त्यांनी ती बॅग तिच्या मूळ मालकाकडे सुरक्षितरित्या परत केली.अंजू माने या स्वच्छ संस्थेत कचरावेचक म्हणून काम करतात. त्यांच्या तीन पिढ्या हेच काम करत आल्या असून, स्वतः अंजू गेली तब्बल २० वर्षं पुण्यातील सदाशिव पेठ परिसरात कचरा गोळा करण्याचे काम करत आहेत. नेहमीप्रमाणे त्या सकाळी सात वाजता दारोदार कचरा गोळा करत होत्या. आठच्या सुमारास फिडर पॉइंटकडे कचरा नेत असताना रस्त्याच्या कडेला एक मोठी पिशवी पडलेली त्यांना दिसली. परिसरात औषधांची दुकाने असल्याने अशा पिशव्या आधीही मिळाल्याचा अनुभव त्यांना होता. म्हणून मालक परत येईल या विश्वासाने त्यांनी ती पिशवी सुरक्षित ठेवली. नंतर त्यात औषधांसोबत मोठी रोकड असल्याचे दिसताच त्यांनी तातडीने परिसरातील लोकांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली.त्या परिसरात अनेक वर्षं काम केल्यामुळे अंजू सर्वांना ओळखतात. शोध घेत असताना एक डिलिव्हरी बॉय अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत काहीतरी शोधताना दिसला. चौकशी केल्यानंतर तीच बॅग त्याची असल्याची खात्री झाली आणि अंजूंनी क्षणाचाही विलंब न करता ती बॅग त्याला परत केली. अत्यंत मौल्यवान रक्कम परत मिळाल्याने त्याला दिलासा मिळाला आणि त्याने कृतज्ञतेच्या भावनेतून अंजूंना ६०० रुपये बक्षीस दिले.अंजूताई म्हणाल्या, “आपल्याकडचे काहीशे रुपये हरवले तरी मनातून जात नाही. इथे दहा लाखांची रक्कम होती. ती व्यक्ती किती चिंतेत असेल, याचाच विचार माझ्या मनात होता.”अंजू माने यांना तीन मुली आणि एक मुलगा आहे. तिन्ही मुलींना त्यांनी शिक्षण दिले असून मुलगा वैद्यकीय क्षेत्रात काम करतो. पती बाळासाहेब मानेही त्यांना कामात मदत करतात. हातात फक्त आठ हजार रुपयांचे मासिक उत्पन्न असतानाही पैशांचा लालच न ठेवता अंजू माने यांनी दाखवलेली निस्वार्थ भावना आज सर्वांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.

फीड फीडबर्नर 22 Nov 2025 5:10 pm

हार्बरच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, बेलापूर-पनवेलदरम्यान १२ तासांचा ब्लॉक

बेलापूर : हार्बर मार्गावरील पनवेल येथे विविध अभियांत्रिकी कामं करायची असल्यामुळे बेलापूर ते पनवेल दरम्यान बारा तासांचा ब्लॉक घेतला जाणार आहे. या ब्लॉकमुळे बेलापूर ते पनवेल दरम्यान रेल्वे सेवा उपलब्ध नसेल. पनवेलकडे जाणाऱ्या लोकल बेलापूर, नेरळ, वाशी तसेच ट्रान्सहार्बर मार्गावरील लोकल नेरुळ, वाशी येथे रद्द केल्या जातील.https://prahaar.in/2025/11/22/mega-block-between-thane-kalyan/पनवेल स्थानकाच्या प्लॅटफॉर्म दोन वर पायाभूत कामांसाठी बेलापूर ते पनवेल दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर शनिवारी रात्री ११.४५ पासून रविवारी सकाळी ११.४५ पर्यंत ब्लॉक आहे. या ब्लॉकमुळे रविवारी सकाळी ५.१८, ७.२६, ०८.५४ , १०.१० आणि ११.२६ वाजताच्या सीएसएमटी-पनवेल लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच सकाळी ८.२०, ८.५८, ११.३० वाजताच्या सीएसएमटी-वडाळा लोकलही रद्द करण्यात आल्या आहेत.https://prahaar.in/2025/11/22/mumbai-massive-fire-breaks-out-near-at-dharavi-near-mahim-railway-station-multiple-explosion-heard-videos/ शनिवारी रात्री १०.५०ची सीएसएमटी-पनवेल लोकल बेलापूरपर्यंत शनिवारी रात्री १०.५५ची ठाणे-पनवेल लोकल रद्द रविवारी सकाळी ९.२८, ११.२८ची पनवेल-सीएसएमटी लोकल वाशी येथून सुटेल रविवारी सकाळी ११.५२ची पनवेल-सीएसएमटी लोकल बेलापूर येथून सुटेल रविवारी सकाळी ८.४१, १०.०१ ची ठाणे-पनवेल लोकल, सकाळी ९.०४, ११.४२ ची ठाणे-नेरूळ लोकल, सकाळी १०.२०ची ठाणे-वाशी लोकल रद्द विवारी सकाळी १०.५८ वाजताची वाशी-ठाणे, सकाळी ९.४२ ची नेरुळ-ठाणे, सकाळी ७.४३, ८.०४, ९.०१, १०.४१ आणि ११.०२ पनवेल-ठाणे लोकल रद्दhttps://prahaar.in/2025/11/22/mumbai-local-train-block-for12-days-central-railwaynight-mega-block-know-time-table-schedule-changes/मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर अर्थात मेन लाईनवर रविवार २३ नोव्हेंबर २०२५ रोजी मेगाब्लॉकठाणे ते कल्याण दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी १०.४० ते दुपारी ३.४० पर्यंत मेगाब्लॉक आहे. या ब्लॉकच्या काळात ठाणे ते कल्याण दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. या लोकल नियोजित थांब्यासह कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकात थांबतील.

फीड फीडबर्नर 22 Nov 2025 5:10 pm

AUS vs ENG : १०४ वर्षांनंतर पहिल्यांदाच घडलं असं! दोन दिवसांतच ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला चारली धूळ

AUS vs ENG 1st Test Highlights : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील ॲशेस मालिकेतील पहिली कसोटी अत्यंत थरारक आणि ऐतिहासिक ठरली आहे. ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर ८ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. विशेष म्हणजे, हा कसोटी सामना अवघ्या दोन दिवसांत संपला. ॲशेसच्या इतिहासात १९२१ नंतर, म्हणजेच तब्बल १०४ वर्षांनंतर असे पहिल्यांदाच घडले आहे, जेव्हा कसोटी सामन्याचा निकाल केवळ […] The post AUS vs ENG : १०४ वर्षांनंतर पहिल्यांदाच घडलं असं! दोन दिवसांतच ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला चारली धूळ appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Nov 2025 5:05 pm

New labour code: आता एक वर्षाच्या सेवेनंतर ग्रॅच्युइटी: निश्चित कालावधीच्या कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन नियम कधी लागू होणार?

New labour code: केंद्र सरकारने जाहीर केलेल्या चार नवीन कामगार संहिता (लेबर कोड्स) २१ नोव्हेंबरपासून प्रभावी झाल्या आहेत. या व्यापक कामगार सुधारणांमध्ये अनेक महत्त्वाचे आणि दूरगामी बदल करण्यात आले आहेत. यातील एक उल्लेखनीय बदल म्हणजे ग्रॅच्युइटी मिळण्यासाठी असलेल्या सेवेच्या कालावधीत झालेली कपात. या बदलामुळे, आता कर्मचाऱ्यांना केवळ एका वर्षानंतरच ग्रॅच्युइटीचा लाभ मिळणार आहे, जो आजवर […] The post New labour code: आता एक वर्षाच्या सेवेनंतर ग्रॅच्युइटी: निश्चित कालावधीच्या कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन नियम कधी लागू होणार? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Nov 2025 5:00 pm

निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंचा भाजपला मोठा धक्का; रवींद्र चव्हाण यांचा जवळ नेता फोडला

मुंबई : राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणुका डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात पार पडणार आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यभर पक्षफोडीचे राजकारण तापले असून, भाजपमध्ये इनकमिंगचा धडाका सुरू असला तरी आता आऊटगोइंगचीही सुरुवात झाली आहे. डोंबिवली-कल्याण परिसरात भाजपला मोठा धक्का बसला असून, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे निकटवर्तीय व माजी नगरसेवक सुरेश भोईर यांनी भाजपची साथ सोडून शिवसेना (ठाकरे गट) […] The post निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंचा भाजपला मोठा धक्का; रवींद्र चव्हाण यांचा जवळ नेता फोडला appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Nov 2025 4:50 pm

बुडत्याचा पाय खोलात! युएस न्यायालयाचा BYJUs सर्वेसर्वा रविंद्रन यांच्या विरोधात धक्कादायक निकाल एडटेक कंपनीचे अस्तित्त्वच धोक्यात?

प्रतिनिधी: बायजूज (BYJUs) कंपनीचे सर्वेसर्वा व संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी बायजूज रविंद्रन यांना युएस न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. निकालातील माहितीनुसार न्यायमूर्तींनी रविंद्रन यांना १ अब्ज डॉलर कर्जदात्या परत करण्याचे आदेश दिले आहेत. युएस स्थित GLAS Trust Company LLC व Alpha BYJUs या दोन्ही कंपन्यांनी याचिका दाखल केली होती. त्यावरील आपल्या निष्कर्षात युएस न्यायालयाने कंपन्यांच्या बाजूने निकाल देत रविंद्रन यांना मोठा धक्का दिला आहे.'न्यायालय प्रतिवादी (Defendant) रवींद्रन विरुद्ध $५३३०००००० $ रकमेचा आणि अंक II,V आणि VI वर ५४०६४७१०९.२९ $रकमेचा निर्णय देईल' असे निकालात म्हटले गेले आहे. २० नोव्हेंबर २०२५ च्या निकालानुसार, डेलावेअर दिवाळखोरी (Bankruptcy) न्यायालयाला असे आढळून आले की रवींद्रन त्यांच्या शोध आदेशाचे पालन करण्यात अयशस्वी ठरले आहेत आणि अनेक वेळा त्यांनी तरतूदीसाठी टाळाटाळ केली.यापूर्वी युएस दिवाळखोरी न्यायालयाने रविंद्रन यांना अनेकदा अल्फा (BYJUs) कंपनीच्या ताळेजमा खात्याच्या अकाऊंटची माहिती उघड करण्यास आहे. रविंद्रन यांनी मुख्य कंपनी असलेल्या थिंक अँड लर्न प्रायव्हेट लिमिटेड (Think and Learn Private Limited) कंपनी BYJUs नावाखाली आपला ब्रँड चालवत होते. कंपनीने युएस करदात्यांकडून १ अब्ज डॉलरचे मुदत कर्ज (Term Loan) घेतले होते. असे सांगण्यात येत आहे की टीएलपीएल या अमेरिकेतील कर्जदारांकडून $1 अब्ज टर्म लोन बी मिळवले होते. कर्जदारांनी नंतर आरोप केला होता की BYJUs च्या अल्फाने कर्जाच्या अटींचे उल्लंघन केले असून एकूण कर्जापैकी ५३३ दशलक्ष डॉलर्स बेकायदेशीरपणे अमेरिकेतून बाहेर काढले आहेत. गेल्या वर्षी कंपनीवर याच प्रकरणात फेमा (Foreign Exchange Management Act FEMA) कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला होता. पुन्हा ग्लास ट्रस्टने डेलावेअर न्यायालयात धाव घेतली आणि BYJU च्या अल्फाचे नियंत्रण घेण्यासाठी अनुकूल आदेश मिळाला आहे. BYJU च्या अल्फा आणि ग्लास ट्रस्ट दोघांनीही ५३३ दशलक्ष डॉलर्स आणि संबंधित व्यवहारांच्या शोधासाठी डेलावेअर दिवाळखोरी न्यायालयात धाव घेतली होती.२० नोव्हेंबर रोजीच्या ताज्या निकालानुसार, न्यायालयाने असे आढळून आले की रवींद्रनला डिस्कव्हरी ऑर्डरची माहिती होती परंतु त्यांनी त्याचे पालन करण्यास नकार दिला न्यायालयाने या प्रकरणात अवमान आदेश देखील जारी केला होता परंतु रवींद्रन डिस्कव्हरी विनंत्यांना प्रतिसाद देण्यास किंवा त्याच्यावर लादलेल्या निर्बंधांची भरपाई करण्यास नकार देत असल्याचे नमूद केले. 'या प्रकरणातील तथ्ये आणि परिस्थिती दर्शवितात की रवींद्रन यांनी शोध विनंत्यानंतरही योग्य प्रतिसाद देण्यात सातत्याने अपयशी ठरणे हा रवींद्रन यांचा स्वतःचा वैयक्तिक निर्णय आहे' असे निकालात नमूद केले आहे. न्यायालयाने रवींद्रन यांचा युक्तिवाद फेटाळून लावला की GLAS ट्रस्टला BYJU'S Alpha च्या पुस्तकांमधून ज्या माहितीची आवश्यकता आहे त्यावरील कागदपत्रे उपलब्ध आहेत. GLAS ला संबंधित कागदपत्रे उपलब्ध आहेत या दाव्याला समर्थन देण्यासाठी रेकॉर्डमध्ये काहीही नाही असे नमूद केले आहे.न्यायालयाने आधीच ठरवले आहे की रवींद्रन मागील आदेशांचा सातत्याने अवमान करत आहेत आणि जोपर्यंत तो त्याचा अवमान पूर्ण करत नाही तोपर्यंत त्यांना दररोज १०००० डॉलरचे निर्बंध लादले आहेत. रवींद्रन परदेशात राहतात आणि त्यांचा आर्थिक दंड पूर्ण करण्याचा किंवा शोध आदेशांचे पालन करण्याचा कोणताही हेतू नसल्याचे दिसून येते. त्यानुसार आर्थिक निर्बंधांनी प्रभावी उपाय प्रदान केलेला नाही, ज्यामुळे या प्रकरणात डिफॉल्ट निर्णयासारख्या कठोर शिक्षेला योग्य बनवले आहे असे निकालात म्हटले आहे.आर्थिक वर्ष २०२३ नोव्हेंबरच्या महिन्यात एकूण कर्जातील ५३३ डॉलरचा हप्ता अद्याप मिळालेला नाही असे युएस कंपनीने स्पष्ट केले होते. एप्रिल २०२४ मध्ये रविंद्रन यांच्याच कंपनी अल्फा व युएस स्थित कर्ज देणारी कंपनी जीएलएएस (GLAS) यांनी रविंद्रन व इतर काहींवर चोरी आणि फसवणूकीचा आरोप करत खटला दाखल केला होता.न्यायालयीन दाखल्यांमध्ये असा आरोप करण्यात आला आहे की ५३३ दशलक्ष डॉलर्स रवींद्रन आणि त्यांच्या सहयोगींना अनाधिकृत राउंड-ट्रिप (वळवण्यात) करण्यात आले होते परंतु रविंद्रन आणि सहकारी यांनी संबंधित कंपनीच्या दाव्याचे खंडन करते म्हटले होते की हे पैसे कायदेशीर व्यावसायिक खर्चासाठी होते. हस्तांतरणात वापरल्या जाणाऱ्या ओसीआय लिमिटेड या कंपनीच्या प्रमुखांनी दिलेल्या शपथपत्रात हे स्पष्ट केले आहे की निधी वेगवेगळ्या संस्थांमधून कसा हलवला गेला आणि रवींद्रनशी जोडलेल्या सिंगापूरच्या एका संस्थेकडे कसा गेला. बायजू'ज आणि रवींद्रन यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत, असा दावा केला आहे की हा निधी मूळ कंपनी, थिंक अँड लर्न प्रायव्हेट लिमिटेड (टीएलपीएल) साठीच वापरला गेला. १ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त रकमेच्या निकालामुळे रवींद्रन वैयक्तिकरित्या जबाबदार आहेत, कर्जदार आता त्यांच्याकडे असलेल्या अधिकारक्षेत्रात अंमलबजावणी कारवाई करू शकतात.प्रत्युत्तरात, रवींद्रन यांनी या निर्णयाला अपील करण्याचा आपला हेतू व्यक्त केला, निकाल हा घाईघाईने केलेले आणि अन्याय्यकारक असल्याचे म्हटले आणि बचाव सादर करण्याचा अधिकार आपल्याला नाकारण्यात आला असा युक्तिवाद केला आहे दरम्यान त्यांनी कर्जदारांविरुद्ध स्वतंत्र खटला चालवण्याची योजना देखील दर्शविली आहे अशी माहिती मिळाली आहे.

फीड फीडबर्नर 22 Nov 2025 4:30 pm

शरद पवारांचे ठाकरेसेनेशी युतीचे संकेत; काँग्रेससोबत जाण्यास नकार

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस(शप) पक्षाने आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याशी युती करण्याचे संकेत दिले आहेत. मुंबईत शरद पवारांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक पार पडली. युतीसाठी शिवसेना (उबाठा) शी चर्चा करण्याचा एकमताने घेण्यात निर्णय आला. भाजप सोडून इतरांसोबत युती करण्यास हरकत नाही. समाजवादी पक्ष किंवा […] The post शरद पवारांचे ठाकरेसेनेशी युतीचे संकेत; काँग्रेससोबत जाण्यास नकार appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Nov 2025 4:20 pm

AUS vs ENG : ट्रॅव्हिस हेडच्या तुफानी खेळीने इंग्लंडचा उडवला धुव्वा, ६९ चेंडूत शतक झळकावत लावली विक्रमाची रांग

Travis Head smashed fastest Test century in AUS vs ENG 1st Test : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील प्रतिष्ठेच्या ॲशेस २०२५-२६ मालिकेची सुरुवात अतिशय थरारक झाली आहे. पर्थ स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा ८ विकेट्सनी धुव्वा उडवला. या विजयात मिचेल स्टार्क आणि ट्रॅव्हिस हेडने महत्त्वाची भूमिका बजावली. यासह ऑस्ट्रेलियाने पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० […] The post AUS vs ENG : ट्रॅव्हिस हेडच्या तुफानी खेळीने इंग्लंडचा उडवला धुव्वा, ६९ चेंडूत शतक झळकावत लावली विक्रमाची रांग appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Nov 2025 4:12 pm

मोठी बातमी: या हिवाळी अधिवेशनात सरकार जुन्या पुराण्या १२० कायद्यांना तिलांजली देणार अनेक आर्थिक सुधारणावादी 'ही'बिले मांडणार

प्रतिनिधी:संसदेचे हिवाळी अधिवेशन १ डिसेंबरपासून सुरु होत आहे. ज्यामध्ये महत्वाच्या विषयावर चर्चा अपेक्षित आहे. खासकरून हे हिवाळी अधिवेशन आर्थिक घडामोडीसाठी महत्वाचे सत्र असेल. या सत्रात बहुप्रतिक्षित अणुऊर्जा विधेयक, २०२५, मार्केट्स कोड बिल आणि विमा कायदा सुधारणा विधेयक (Atomic Energy Bill 2025, Market Code Bill, Insurance Law Amendment Bill) ही विधेयके सादर (Tabled) केली जातील त्यावर महत्वाची चर्चाही अपेक्षित आहे. माहितीनुसार या कालावधीत अनेक इतर बील सादर केली जाऊ शकतात. याशिवाय सरकार १२० पेक्षा अधिक जुन्या पुराण्या कायद्यांना तिलांजली देणार असून हे कालबाह्य कायदे काढून टाकण्यासाठी एक रद्द आणि सुधारणा विधेयक देखील मांडणार आहे अशी प्राथमिक माहिती पुढे आली आहे.उदाहरणार्थ यंदा प्रलंबित सिक्युरिटीज मार्केट कोड बील (SMC 2025) सादर केले जाणार आहे. २०२१-२२ मधील अर्थसंकल्पात यांचा गोषवारा प्रसिद्ध झाला होता. मात्र यावर अद्याप सरकारने मंजूरी दिली नव्हती. किंबहुना सरकारने यात पुन्हा फेरबदल करत यांचे नवीन विधेयक प्रस्तुत केले जाईल. विमा क्षेत्रातील नियमांवरही या सत्रात भाष्य केले जाईल व बहुपर्यायी वस्तुनिष्ठ चर्चा होऊन विमा कायदे (सुधारणा) विधेयक २०२५ सादर केले जाईल. याखेरीज विमा क्षेत्र मजबूत करताना त्यातील अडचणी, विस्तार, इज ऑफ डुईंग बिझनेस या कारणासाठी नव्या सुधारणा सुचवल्या जाणार आहेत.तसेच वित्तीय क्षेत्रातील अर्थात भांडवली बाजारात नवे बदल अपेक्षित आहे. सेबी १९९२ नंतर पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात नियमनात बदल करणार आहे. त्याप्रमाणे सेबी बिल १९९२, डिपोझिटरी अँक्ट १९९६, सिक्युरिटी कॉन्ट्रॅक्ट रेग्युलेशन अँक्ट १९५६ हे कायदे सोपे व अत्याधुनिक व कठोर होऊ शकतात.पायाभूत सुविधा आणि वाद निवारण सुधारणा (Infrastructure and Dispute Resolution Reform) देखील दिसून येतात. राष्ट्रीय महामार्ग (सुधारणा) विधेयकाचे उद्दिष्ट रस्ते प्रकल्पांसाठी भूसंपादनाला गती देणे आहे, तर लवाद आणि सामंजस्य (सुधारणा) (Arbitration and Conciliation Amendment Bill) विधेयक १९२६ च्या चौकटीला अद्ययावत करण्याचा आणि लवाद परिसंस्था (Arbitration Ecosystem) मजबूत करण्याचा प्रयत्न करते.

फीड फीडबर्नर 22 Nov 2025 4:10 pm

Local Train Block : मध्य रेल्वेवर आजपासून १२ दिवसांचा ब्लॉक! चाकरमान्यांसाठी महत्त्वाची बातमी: 'या'लोकल रद्द, घरातून निघण्यापूर्वी 'हे'वेळापत्रक तपासा!

मुंबई : मुंबईच्या लाखो चाकरमान्यांसाठी मध्य रेल्वेच्या लोकल वाहतुकीत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. रेल्वे मार्गावर अभियांत्रिकी कामे आणि अत्यावश्यक दुरुस्तीसाठी मेगाब्लॉक आणि रात्रीचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ठाणे ते कल्याणदरम्यान अप (Up) आणि डाऊन (Down) जलद मार्गावर रविवारी (२३ नोव्हेंबर) सकाळी १०:४० वाजल्यापासून ते दुपारी ३:४० वाजेपर्यंत, म्हणजेच पाच तासांसाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे. या वेळेत ठाणे ते कल्याण धावणाऱ्या अप आणि डाऊन जलद लोकल गाड्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर (Slow Line) वळवण्यात येणार आहेत. यामुळे जलद लोकलच्या वेळेत बदल होणार असून, काही लोकल फेऱ्या रद्द देखील केल्या जाणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते पनवेल मार्गावर (हार्बर लाईन) कोणताही ब्लॉक नसला तरी बेलापूर ते पनवेलदरम्यान ब्लॉक असणार आहे. मध्य रेल्वेवर आजपासून (२२ नोव्हेंबर) ते ३ डिसेंबरपर्यंत अभियांत्रिकी काम सुरू राहणार आहे. बदलापूर स्टेशन परिसरात मध्यरात्रीनंतर २ ते ३:३० वाजेपर्यंत स्टेशन परिसरात गर्डर उभारणीचे महत्त्वाचे काम करण्यात येणार आहे. बदलापूर स्टेशनवरील रात्रीच्या ब्लॉकमध्ये प्रवाशांची संख्या कमी असली तरी, लांब पल्ल्याच्या आणि शेवटच्या लोकल फेऱ्यांच्या वेळापत्रकावर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. प्रवाशांनी या बदलांची नोंद घेऊन त्यानुसार आपल्या प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.पादचारी पुलाचे गर्डर उभारणीचे महत्त्वाचे काम सुरुप्रवाशांची सुरक्षितता आणि सोय लक्षात घेऊन या परिसरात महत्त्वाच्या पादचारी पुलाच्या गर्डर उभारणीचे काम सुरू करण्यात येणार आहे. बदलापूर स्थानक परिसरात हा पादचारी पूल उभा करण्यासाठी अभियांत्रिकी पातळीवर मोठे आणि महत्त्वाचे काम केले जाणार आहे. या कामामध्ये ३७.२ मीटर लांबीचे असे तब्बल १८ स्टील गर्डर उभारण्यात येणार आहेत. हे विशाल गर्डर सुरक्षितपणे आणि अचूकपणे बसवण्यासाठी ३५० मेट्रिक टन क्षमतेची विशेष क्रेन वापरली जाणार आहे. हे काम सुरळीत आणि सुरक्षितपणे पार पडावे यासाठी शनिवार, २२ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून ते ३ डिसेंबरपर्यंत लोकल मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक मुख्यतः रात्री उशिरा ते पहाटेच्या वेळेत असणार आहे (मध्यरात्रीनंतर २ ते ३:३० पर्यंत), जेणेकरून दिवसा प्रवाशांची होणारी गैरसोय टाळता येईल. या कामामुळे बदलापूर स्टेशनवर प्रवाशांसाठी आधुनिक आणि सुरक्षित पादचारी पूल उपलब्ध होईल, ज्यामुळे त्यांची सोय वाढेल. प्रवाशांनी या १२ दिवसांदरम्यान रात्रीच्या लोकलच्या वेळापत्रकात होणाऱ्या बदलांची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.https://prahaar.in/2025/11/22/mumbai-massive-fire-breaks-out-near-at-dharavi-near-mahim-railway-station-multiple-explosion-heard-videos/सीएसएमटीहून शेवटची कर्जत लोकल रात्री ११.३० वाजताब्लॉक कालावधीत मध्यरात्री १२.१२ वाजता सुटणारी कर्जत-सीएसएमटी (Karjat-CSMT) लोकल आता अंबरनाथपर्यंतच धावेल. म्हणजेच, ती कर्जत ते अंबरनाथ दरम्यान रद्द राहील. या बदलामुळे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) हून कर्जतपर्यंत जाणारी शेवटची लोकल रात्री ११.३० वाजताची असणार आहे. कर्जतहून पहाटे २.३० वाजता सुटणारी लोकल आता कर्जत ऐवजी अंबरनाथ येथून पहाटे ३.१० वाजता सीएसएमटीसाठी रवाना होईल. ही लोकल देखील कर्जत ते अंबरनाथदरम्यान रद्द राहील. दोन्ही दिशांना म्हणजेच अप आणि डाऊन मार्गावर कर्जत ते अंबरनाथ दरम्यान मध्यरात्रीच्या लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. कर्जत आणि अंबरनाथ दरम्यान रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी या बदलांची गांभीर्याने नोंद घ्यावी आणि आपल्या प्रवासाचे नियोजन त्यानुसार करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.कधीपर्यंत असेल विशेष रात्रकालीन ब्लॉकमध्य रेल्वेने पनवेल-कळंबोली कोचिंग कॉम्प्लेक्स येथे सुरू असलेल्या बांधकामातील यांत्रिक अडथळे दूर करण्यासाठी एक विशेष रात्रकालीन ब्लॉक घेण्याचे निश्चित केले आहे. या ब्लॉकमुळे अनेक मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे. २१ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२५ पर्यंत, म्हणजेच तब्बल १२ दिवसांसाठी हा विशेष ब्लॉक असेल. हा ब्लॉक दररोज रात्री १:३० वाजल्यापासून ते पहाटे ३:३० वाजेपर्यंत या दोन तासांच्या कालावधीत घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे पनवेल आणि कळंबोलीदरम्यानच्या अनेक महत्त्वाच्या मार्गिकांचा वापर पूर्णपणे बंद राहणार आहे, ३ प्लॅटफॉर्म अप आणि डाऊन मार्गिका, ट्रेन उभ्या करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या अप आणि डाऊन मार्गिका, इंजिन वळविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मार्गिका, रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या रात्रकालीन ब्लॉकमुळे २० मेल-एक्स्प्रेस गाड्यांना त्यांच्या नियमित वेळेपेक्षा विलंब होण्याची शक्यता आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आणि सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हे काम अत्यंत महत्त्वाचे असल्याने, रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना घरातून निघताना किंवा लोकल प्रवास करताना रेल्वेचे अद्ययावत वेळापत्रक तपासूनच निघावे, असे आवाहन केले आहे.

फीड फीडबर्नर 22 Nov 2025 4:10 pm

भेंडा-कुकाणा परिसरात लंम्पी नियंत्रणासाठी खासगी डॉक्टरांचा गौरव

नेवासा : नेवासे तालुक्यातील भेंडा-कुकाणा परिसरात लंम्पी आजाराने थैमान घातलेल्या सुमारे दोन हजार जनावरांवर यशस्वी नियंत्रण मिळविल्याबद्दल परिसरातील खासगी पशुवैद्यकांचा सन्मान करण्यात आला. पशुवैद्यकीय दवाखाना कुकाणा अंतर्गत कार्यरत असणारे डॉ. मनोज शिंदे (एम.व्ही.एस्सी) यांनी या संकटात पुढाकार घेतला. त्यांनी स्वखर्चाने औषधे तयार करून आणि उपचारपद्धतीचे मार्गदर्शन करून जवळपास ३० ते ४० खासगी डॉक्टरांना मोफत औषधांचे […] The post भेंडा-कुकाणा परिसरात लंम्पी नियंत्रणासाठी खासगी डॉक्टरांचा गौरव appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Nov 2025 4:00 pm

मालेगाव अत्याचार प्रकरण: ‘या’मागणीसाठी सकल मराठा समाजाचे नेवासे फाट्यावर तीव्र आंदोलन

नेवासा: नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील डोंगराळे गावात एका चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून करणाऱ्या नराधमास तत्काळ फाशीची शिक्षा द्यावी, अन्यथा आरोपीस समाजाच्या ताब्यात द्यावे, या मागणीसाठी नेवासे तालुका सकल मराठा समाजाने शनिवार (दि. २२) रोजी नेवासे फाटा येथील राजमुद्रा चौकात तीव्र आंदोलन केले. अहिल्यानगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर सकाळी ११ वाजता झालेल्या या आंदोलनात […] The post मालेगाव अत्याचार प्रकरण: ‘या’ मागणीसाठी सकल मराठा समाजाचे नेवासे फाट्यावर तीव्र आंदोलन appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Nov 2025 3:55 pm

Solapur Accident : सोलापूर-हैद्राबाद महामार्गावर भीषण अपघात; टायर फुटल्याने क्रुझर पलटी, ५ भाविक ठार

Solapur-Hyderabad highway tyre burst accident full report : सोलापूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर अणदुर गावाजवळ शनिवारी सकाळी देवदर्शनाला जात असलेल्या भाविकांच्या क्रुझर गाडीचा भीषण अपघात झाला. गाडीचा पुढचा टायर अचानक फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि क्रुझर रस्त्यावर पलटी झाली. यावेळी समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरला जोरदार धडक बसल्याने अपघाताची तीव्रता वाढली. या दुर्दैवी अपघातात पाच भाविकांचा जागीच मृत्यू झाला, […] The post Solapur Accident : सोलापूर-हैद्राबाद महामार्गावर भीषण अपघात; टायर फुटल्याने क्रुझर पलटी, ५ भाविक ठार appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Nov 2025 3:45 pm

शिरूर नगरपरिषद निवडणूक : अलका खांडरे यांना महाविकास आघाडीची अधिकृत उमेदवारी

शिरूर – शिरूर नगरपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीने अनुभवी नेत्या अलका सुरेश खांडरे यांच्या नावावर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून अधिकृत शिक्कामोर्तब केले आहे. दोन वेळा नगरसेविका आणि दोन वेळा उपनगराध्यक्ष म्हणून कार्य केलेल्या अलका यांनी शहराचा चेहरामोहरा बदलण्यात महत्त्वाचा वाटा उचलला आहे. त्यांची ओळख सर्वसमावेशक नेतृत्व करणारी संवेदनशील लोकप्रतिनिधी म्हणून आहे. स्व. रसिकभाऊ धारीवाल यांच्या नेतृत्वाखाली […] The post शिरूर नगरपरिषद निवडणूक : अलका खांडरे यांना महाविकास आघाडीची अधिकृत उमेदवारी appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Nov 2025 3:34 pm

एलियन्स पृथ्वीवर येणार, एआय अनियंत्रित होणार, जगात विनाशकारी युद्ध होणार आणि बरंच काही... काय सांगते बाबा वेंगांची भविष्यवाणी

यावर्षाचा उत्तर काळ सुरू झाला असून नवीन वर्षाच्या स्वागताला काहीच दिवस बाकी आहेत. त्यामुळे २०२६ वर्ष कसे असेल? यावर्षात काय होणार? याबद्दल सर्वांनाच उत्सूकता लागली आहे. भविष्य वर्तवणाऱ्या व्यक्तीसुद्धा आता यावर अभ्यास करत आहेत. प्रसिद्ध भविष्य वर्तवणाऱ्या व्यक्तींच्या नावात बल्गेरियन महिला बाबा वेंगा अव्वल स्थानावर आहे. बाबा वेंगाचे निधन झाले असले तरी २०२६ मध्ये काय होणार याबद्दल त्यांनी भविष्य वर्तवले आहे. ज्यात त्यांनी सांगितले होते की, मनुष्य पहिल्यांदाच थेट एलियन्सला भेटणार आहे. जाणून घेऊया बाबा वेंगांच्या भविष्यवाणीबद्दल सविस्तर...बाबा वेंगांच्या भविष्यवाणीनुसार, २०२६ सालासाठी सर्वात महत्त्वाच्या भाकितांपैकी एक म्हणजे जगाच्या पूर्व भागात एक मोठे आणि विनाशकारी युद्ध सुरू होईल. जे हळूहळू संपूर्ण जगात पसरून यामध्ये जगाचा पश्चिम भाग सर्वाधिक प्रभावित होईल. या युद्धामुळे संपूर्ण जागतिक सत्ता परिवर्तन आणि व्यापक जीवितहानी होऊ शकते. तसेच रशियाचा एक शक्तिशाली नेता संपूर्ण जगावर वर्चस्व गाजवू शकतो. त्याला एक वैश्विक देव मानले जाऊ शकते.बाबा वेंगांनी नैसर्गिक आपत्तीबाबतही भाकीत केले आहे. २०२६ मध्ये लोकांना अनेक गंभीर नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागू शकतो. एका अहवालानुसार, तिने असा दावाही केला आहे की २०२६ हे वर्ष भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक आणि अतिवृष्टी यासारख्या नैसर्गिक आपत्तींचे वर्ष असेल, ज्यामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होईल..सध्या एआयचा वापर एवढा वाढला आहे की, भविष्यातील एआयचे धोकेसुद्धा बाबा वेंगांनी सांगितले आहेत. भविष्यात एआय इतके शक्तिशाली होईल की मानवांना त्यावर नियंत्रण ठेवणे कठीण होईल, असे भाकित वांगा यांनी केले आहे. एआय स्वतःहून मोठे निर्णय घेण्यास सुरुवात करेल, ज्याचा आपल्या जीवनाच्या प्रत्येक पैलूवर थेट परिणाम होईल. एआयचे हे एक पाऊल मानवी निर्मिती, यंत्र स्वायत्तता आणि सर्व नैतिक जबाबदाऱ्यांमधील रेषा पुसून टाकणारे असेल. हे भाकित सध्याच्या काळात एआयच्या वेगाने होणाऱ्या वाढीच्या चिंतेशी अगदी साम्य असल्याचे दिसते.

फीड फीडबर्नर 22 Nov 2025 3:30 pm

Mahim Station Fire : हार्बर लाईन सेवा ठप्प! माहिम रेल्वेस्थानकाजवळ नवरंग कंपाऊंडमध्ये मोठी आग; लोकल वाहतुकीवर परिणाम, व्हिडिओ व्हायरल

मुंबई : मुंबईतील धारावी परिसरात आज, २२ नोव्हेंबर रोजी माहिम रेल्वे स्थानकाजवळ एक मोठी आग लागल्याची गंभीर घटना घडली आहे. दुपारी १२ वाजून २९ मिनिटांनी ही आग लागल्याची माहिती मिळाली. ही आग एका तळमजला अधिक एक मजली (Ground plus one) झोपडीवजा घरात लागली. आगीची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल (Mumbai Fire Brigade), रुग्णवाहिका (Ambulance) आणि बीएमसीचे वॉर्ड कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अनेक माध्यमांच्या वृत्तानुसार, आग लागलेल्या ठिकाणी किमान दोन मोठे स्फोट ऐकू आल्याने परिसरामध्ये मोठी घबराट पसरली होती. आग रेल्वे ट्रॅकच्या जवळ असल्याने, याचा परिणाम तात्काळ रेल्वेच्या वाहतुकीवर झाला. पश्चिम रेल्वे नियंत्रण कक्षाने (Western Railway Control Room) दिलेल्या माहितीनुसार, आगीच्या घटनेमुळे हार्बर लाईनवरील सीएसटी (CST) कडे जाणारी रेल्वे वाहतूक दुपारी १२ वाजून ४३ मिनिटांपासून थांबवण्यात आली आहे. रेल्वे सेवा विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले असून, अग्निशमन दलाचे जवान आग पूर्णपणे विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. सध्या या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

फीड फीडबर्नर 22 Nov 2025 3:10 pm

‘द फॅमिली मॅन’च्या तिसऱ्या सीझनमध्ये अभिनेत्री निमरत कौरची एन्ट्री; भूमिकेला मिळालेल्या प्रतिसादावर म्हणाली…

Actress Nimrat Kaur : गेल्या काही दिवसांपासून द फॅमिली मॅन सीझन ३ ची जोरदार चर्चा होती. अखेर या वेबसिरीजचा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या नव्या सीझनमध्ये अभिनेत्री निमरत कौर प्रमुख भूमिकेत असून, तिने एका मुलाखीत आपल्या भूमिकेबद्दल अनेक गोष्टी उघड केल्या आहेत. तिच्या मते, ‘द फॅमिली मॅन’च्या नवीन सीझनमध्ये मीराची भूमिका साकारणे ही […] The post ‘द फॅमिली मॅन’ च्या तिसऱ्या सीझनमध्ये अभिनेत्री निमरत कौरची एन्ट्री; भूमिकेला मिळालेल्या प्रतिसादावर म्हणाली… appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Nov 2025 3:05 pm

Sonam Kapoor: दुसऱ्या गर्भधारणेची घोषणा केल्यानंतर सोनम कपूरचा ग्लॅमरस लूक; स्टायलिश फोटोमध्ये दिसला बेबी बंप

Sonam Kapoor: बॉलिवूडची फॅशन आयकॉन सोनम कपूर पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. नुकतीच तिने आपल्या दुसऱ्या प्रेग्नन्सीची घोषणा केल्यानंतर शनिवारी सकाळी इंस्टाग्रामवर काही जबरदस्त स्टायलिश फोटो शेअर केले. क्षणात हे फोटो व्हायरल झाले आणि चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला. प्रत्येक वेळेसारखीच सोनमची मॅटरनिटी स्टाइल याही वेळी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. ब्लॅक–व्हाईट प्रिंटेड […] The post Sonam Kapoor: दुसऱ्या गर्भधारणेची घोषणा केल्यानंतर सोनम कपूरचा ग्लॅमरस लूक; स्टायलिश फोटोमध्ये दिसला बेबी बंप appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Nov 2025 2:54 pm

Pune : सराफी पेढीत खरेदीच्या बहाण्याने महिलांकडून दागिन्यांची चोरी

पुणे– खरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीत शिरलेल्या महिलांनी दागिने चोरून नेल्याची घटना बंडगार्डन रस्ता, तसेच कोंढवा भागात घडल्या. याप्रकरणी कोेरेगाव पार्क आणि कोंढवा पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सराफी पेढीत चोरी करणाऱ्या महिलांनी बुरखा परिधान केल्याचे चित्रीकरणात आढळून आले. बंडगार्डन स्त्यावरील एका प्रसिद्ध सराफी पेढीत शिरलेल्या महिलांनी खरेदीच्या बहाण्याने पावणेपाच लाख रुपयांचे सोन्याचे […] The post Pune : सराफी पेढीत खरेदीच्या बहाण्याने महिलांकडून दागिन्यांची चोरी appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Nov 2025 2:53 pm

पुतणीसाठी चुलतीची माघार; अवघ्या २१ व्या वर्षी महाराष्ट्राला मिळाली सर्वात तरुण नगरसेविका, कोण आहे स्नेहा तमशेट्टे?

Sneha Tamashette : राज्यातील २४६ नगपरिषदा आणि ४२ नगरपंचायत निवडणुका होण्याअगोदरच अनेक ठिकाणी बिनविरोध निवडणूक झाली आहे. अशातच आता नांदेड जिल्ह्यातील मुखेड नगरपरिषद निवडणुकीतून एका तरुणीची नगरसेवक पदी अवघ्या २१ व्या वर्षी बिनविरोध निवड झाली आहे. या तरुणीचे नाव स्नेहा तमशेट्टे असून तिने नगरसेवक पदी झालेल्या बिनविरोध निवडणुकीची जोरदार चर्चा जिल्ह्यात होत आहे. या निवडणुका […] The post पुतणीसाठी चुलतीची माघार; अवघ्या २१ व्या वर्षी महाराष्ट्राला मिळाली सर्वात तरुण नगरसेविका, कोण आहे स्नेहा तमशेट्टे? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Nov 2025 2:44 pm

Dharashiv Accident : सोलापूर-हैदराबाद महामार्गावर क्रुझरचा भीषण अपघात; धाराशिवमध्ये ५ जणांचा जागीच मृत्यू

धाराशिव : सोलापूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर धाराशिव जिल्ह्यात आज शनिवारी (२२ नोव्हेंबर २०२५) सकाळी एक भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून, काहीजण जखमी झाले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, ही क्रुझर जीप सोलापूरहून नळदुर्ग येथे देवदर्शनासाठी निघाली होती. क्रुझर गाडी सोलापूर-हैदराबाद (Solapur Hyderabad Highway) महामार्गावरून जात असताना, धाराशिवमधील (Dharashiv news) अणदूर परिसरामध्ये त्यांच्या जीपचे टायर्स अचानक फुटले. यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. नियंत्रण सुटलेल्या या जीपने एका ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली आणि त्यानंतर ती रस्त्यावर पलटी झाली. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. याशिवाय गाडीतील इतर काही प्रवासी जखमी झाले असून, त्यांना तात्काळ उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. टायर्स फुटल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटणे हे या भीषण अपघाताचे प्राथमिक कारण मानले जात आहे. देवदर्शनासाठी निघालेल्या प्रवाशांवर काळाने घाला घातल्याने अणदूर आणि सोलापूर परिसरात शोककळा पसरली आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.https://prahaar.in/2025/11/22/nashik-ring-road-approved-8000-crore-project-to-end-city-traffic-woes-before-2027-kumbh-mela/भीषण अपघातात तीन महिलांसह ५ जणांचा मृत्यूसोलापूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील धाराशिवजवळ झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण परिसराला हादरवून सोडले आहे. या अपघातात आतापर्यंत पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे, ज्यात तीन महिलांचा समावेश आहे. या दुर्घटनेत सात ते आठ जण गंभीर जखमी झाले असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. सोलापूरहून नळदुर्ग येथील देवदर्शनासाठी निघालेली ही क्रुझर जीप टायर्स फुटल्यामुळे अनियंत्रित झाली आणि तिने रस्त्यावरील एका ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की, क्रुझर गाडीच्या एका भागाचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला. अपघाताच्या वेळी गाडीत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी कोंबून बसवले होते, ज्यामुळे अपघाताची तीव्रता वाढली आणि जीवितहानी अधिक झाली. अपघात होताच आजूबाजूचे नागरिक तातडीने मदतीसाठी धावले. त्यांनी जीवावर उदार होऊन जोर लावून क्रुझर गाडी सरळ केली आणि आत अडकलेले मृतदेह व जखमींना बाहेर काढण्यास मदत केली. अपघातातील सर्व जखमींना तातडीने पुढील उपचारांसाठी सोलापूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. मृत आणि जखमी झालेले सर्व प्रवासी हे दक्षिण उळे सोलापूर येथील रहिवासी असल्याचे समजते. सध्या अपघातस्थळी पोलीस आणि स्थानिक प्रशासनाकडून बचावकार्य आणि पंचनामा सुरू आहे. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्याने झालेली ही मोठी दुर्घटना वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे करत आहे.

फीड फीडबर्नर 22 Nov 2025 2:30 pm

Special Stock Market Outlook: गेल्या आठवड्यात बाजारात सकारात्मकत आठवड्यात काय काय घडले? पुढील आठवड्यात काय निरिक्षण महत्वाचे जाणून घ्या एका क्लिकवर

मोहित सोमण: शेअर बाजारात सकारात्मकता कायम असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. सलग दुसऱ्यांदा शेअर बाजारात निर्देशांकात वाढ झाली असल्याचे आकडेवारीत स्पष्ट झाले. जागतिक अस्थिरता, शेवटच्या दोन दिवशी वाढलेली परदेशी गुंतवणूकदारांची विक्री, तिमाही निकालातील अस्थिरता असे अनेक घटक असूनही एकूणच पाहिल्यास तरीही निर्देशांकात सुधारणा कायम आहे. आकडेवारीनुसार, सेन्सेक्स आठवड्यात ०.५०% व निफ्टी ०.३९% वाढला आहे. प्रामुख्याने चांगल्या बँकिग, फायनांशियल सर्विसेस, आयटी, एफएमसीजी या शेअर्सच्या जोरावर निर्देशांकाने तेजी दर्शविली आहे. दरम्यान प्रायव्हेट बँक,ऑटो, मेटल, रिअल्टी, कंज्यूमर ड्युरेबल्स, केमिकल्स या शेअर्समध्ये झालेल्या घसरणीचा फटकाही बाजारात बसला. प्रामुख्याने या निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी आपली रोख गुंतवणूक सुरूवातीला काढून घेतली होती. आठवड्याच्या मध्यात पुन्हा गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक वाढवली दरम्यान घरगुती गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक आठवड्यातील अखेर वगळता कायम राखली आहे. अद्याप भारताबद्दल युएस टॅरिफ शुल्काबाबत अनिश्चितता, तसेच मध्यपूर्वेतील, रशिया युक्रेन संघर्ष व त्यातून कच्च्या तेलाचा वाद अशा आव्हानांचाही बाजारात सामना करावा लागला आहे. एकूणच पाहता बाजारात सकारात्मकता भावना कायम होत्या. विशेषतः सत्राच्या अखेरीस गुंतवणूकदारांनी आठवड्यात मोठा प्रतिसाद दिला.तत्पूर्वी अमेरिकेतील महागाई, रोजगाराची आकडेवारी खराब आली असली तरी फेड व्याजदरात कपातीवरील अनिश्चितेमुळे व युएस शटडाऊनमुळे आकडेवारी पुढे ढकलली गेली. परंतु नुकत्याच जाहीर झालेल्या विना शेती (Non Farm) पेरोल रोजगार आकडेवारी जाहीर झाल्याने पुन्हा एकदा डिसेंबर व्याजदरकपातीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. तर सोन्याच्या चांदीच्या दरात मोठी अस्थिरता कायम राहिली. तर रशिया युक्रेन समेट घडवण्यासाठी युएस प्रयत्नशील असल्याने कच्च्या तेलाच्या किंमती नियंत्रित राहून किंबहुना मोठ्या प्रमाणात घसरल्या. भारतीय बाजारात रुपया मात्र डॉलरच्या मागणीमुळे सातत्याने घसरत आहे. आरबीआयच्या हस्तक्षेप भूमिकेनंतर त्यात आता सकारात्मक बदल होऊ शकतो परंतु परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक काढून घेतल्याने एकूण निर्देशांकात तयणख फटका बसला. परवा निफ्टीने २६२०० पातळी पार केली असली तरी पुन्हा एकदा ती २६१०० पातळीपेक्षा खाली आली होती. सेन्सेक्सनेही परवा ४४६.२१ अंकांने उसळत ८५६३२ आकडा पार केला होता. प्रोविजनल आकडेवारीनुसार, काल घरगुती गुंतवणूकदारांनी (Domestic Institutional Investors) १४९०८ कोटींची गुंतवणूक केली असून परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून १४५८५ कोटींची विक्री केली. त्यामुळे रोख विक्री घरगुती गुंतवणूकदारांकडून ३१६१ कोटींची झाली असून रोख विक्री परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून १७६६ कोटींची झाली आहे.या आठवड्यातील एफआयआय गुंतवणूकीबाबत आम्हाला प्रतिक्रिया देताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य गुंतवणूक रणनितीकार डॉ वी के विजयाकुमार म्हणाले आहेत की,'नोव्हेंबरमध्ये काही दिवसांतच एफआयआयने मोठी विक्री कमी केली आणि खरेदीदारही झाले असले तरी एफआयआयच्या क्रियामध्ये कोणताही स्पष्ट ट्रेंड नाही. २२ नोव्हेंबरपर्यंत एकूण एफआयआय विक्रीचा आकडा १५२४३ कोटी रुपये होता.नोव्हेंबरमध्ये आतापर्यंत ११४५४ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह प्राथमिक बाजारपेठेतून एफआयआय खरेदी/गुंतवणूक करण्याचा दीर्घकालीन ट्रेंड सुरू आहे. २०२५ साठी आतापर्यंत एक्सचेंजेसद्वारे एकूण एफआयआय विक्रीचा आकडा २०९४४४ कोटी रुपये आहे. आणि प्राथमिक बाजारपेठेसाठी एकूण खरेदीचा आकडा ६५७४७ कोटी रुपये आहे. (सर्व डेटासाठी स्रोत: एनएसडीएल) इतर बाजारपेठांच्या तुलनेत भारताच्या कमी कामगिरीमुळे भारतातील विक्री व्यापार आणि इतर बाजारपेठांमध्ये खरेदी व्यापाराला गती मिळाली, विशेषतः अमेरिका, चीन, तैवान आणि दक्षिण कोरिया यासारख्या बाजारपेठांमध्ये, ज्यांना सध्या सुरू असलेल्या एआय व्यापाराचे लाभार्थी मानले जाते. तथापि, नॅस्डॅकमध्ये अलिकडच्या काळात झालेल्या तीव्र सुधारणा, विशेषतः एआय-संबंधित स्टॉकमध्ये, एआय स्टॉकमधील बबल चिंतेला बळकटी मिळाली आहे.पुढे जाऊन, एफआयआय एआय ट्रेड कमी होत चालल्याने आणि भारतीय इक्विटीजच्या सुधारत्या शक्यतांमुळे विक्री कमी होण्याची शक्यता आहे. भारतातील कॉर्पोरेट कमाईला तिसऱ्या तिमाहीच्या निकालांच्या हंगामात गती मिळण्याची आणि २०२६ मध्ये वेग येण्याची शक्यता आहे. या घटकांच्या संयोजनामुळे परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (FII) ची जावक (Outflow) उलटण्याची क्षमता आहे. निफ्टी लवकरच नवीन उच्चांक गाठेल आणि अमेरिका आणि भारत यांच्यातील व्यापार करारामुळे परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार पुन्हा भारतीय बाजारात येऊ शकतात.'भारतातील अर्थव्यवस्था तेजीत असल्याचे वेळोवेळी स्पष्ट झाले होते. उदाहरणार्थ अमेरिकेने ५०% कर लादला असला तरी आयएमएफच्या अहवालात भारताच्या आर्थिक वर्ष २६ च्या जीडीपी वाढीचा अंदाज ६.४% वरून ६.६% पर्यंत वाढवला होता. तसेच देशांतर्गत चलनवाढ ०.२५% च्या विक्रमी नीचांकी पातळीवर घसरली आहे हे देखील सकारात्मकतेचे लक्षण आहे.मात्र त्या तुलनेत युएस एप्रिलच्या नीचांकी पातळीपेक्षा अमेरिकन बाजार २५-३०% पेक्षा जास्त चढताना आपण पाहिले आहे आणि भारताने विकसित बाजारपेठांपेक्षा कमी कामगिरी केली असली तरी मोठ्या प्रमाणात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार भारताकडे आकर्षित होत आहे. व्यापारी गरजा, मोठी संधी, उदयोन्मुख बाजारपेठ परवडणारे मूल्यांकन अशा अनेक कारणांमुळे भारताचे बाजारपेठ वाढत आहे. आकर्षक मूल्यांकन, मजबूत कमाई आणि एफआयआयच्या परताव्याने निर्देशांकातील मजबूत बदल दर्शवते यांचे उत्तम उदाहरण म्हणजे नुकत्याच झालेल्या एका अहवालातील माहितीनुसार भारतातील सेन्सेक्समध्ये आगामी काळात मोठ्या प्रमाणात वाढ होईल. 'इंडिया स्ट्रॅटेजी' या नव्या अहवालात मॉर्गन स्टॅनले जागतिक गुंतवणूक रिसर्च संस्थेने म्हटले आहे. सेन्सेक्स डिसेंबर २०२६ पर्यंत १०७००० पातळी पार करेल व बेस लाईन टार्गेट किमान ९५००० पातळी असेल असे अहवालात म्हटले गेले आहे. आर्थिक वर्ष २०२५-२८ या कालावधीत कंपाऊंड ग्रोथ (वाढ) इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) १९% वाढेल असेही अहवालात म्हटले गेले होते. निफ्टीतही मोठी वाढ अपेक्षित आहे.सध्या युएस बाजारातील मोठी हालचाल आयटी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स शेअर्समध्ये सुरु आहे. मोठ्या प्रमाणात या तंत्रज्ञान शेअर्समध्ये वाढ झाल्याने युएस बाजारातील वाढ होत असली तरी अनिश्चिततेमुळे तितक्यात वेगाने घसरणही झाली आहे. गुंतवणूकदार आता या क्षेत्रातील अनिश्चितता आणि संभाव्य अतिमूल्यांकनामुळे पैसे गुंतवण्याबद्दल चिंतेत आहेत ज्यामुळे जागतिक बाजारपेठेत चिंतेचे वातावरण आहे तथापि मोतीलाल ओसवालने आपल्या अहवालात म्हटले होते की,'भारतीय बाजारपेठांसाठी, कोणत्याही एआयला चिंतेचे कारण म्हणून पाहू नये कारण जर आपण नोव्हेंबर महिन्यात आपल्या बाजाराच्या कामगिरीकडे पाहिले तर ते चांगले कामगिरी करत आहे परंतु वर्षभर आपण कमी कामगिरी करत आहोत कारण आपण एआय थीम चुकवली आहे तर इतर सर्व बाजारांनी चांगली कामगिरी केली आहे परंतु आता आपल्याला भीती आणि अतिमूल्यांकनाची चिन्हे दिसत असल्याने, ते आपल्यासाठी सकारात्मक असू शकते.'तथापि, गुंतवणूकदार उत्साहित नाहीत कारण पोर्टफोलिओ तितके चांगले काम करत नाहीत. गेल्या काही दिवसांपासून निवडक ब्लू चिप स्टॉकमध्येच तेजी असली तरी एकूण हेवी वेट शेअरमध्ये हालचाल पास्ता व्यापक बाजारात स्मॉल आणि मिडकॅप स्टॉक चालू असलेल्या रॅलीमध्ये भागीदार नव्हते. परंतु तरीही तिमाही कमाई, जीएसटी कपातीमुळे मागणी आणि धोरण स्थिरतेतील आणखी परिवर्तन या पार्श्वभूमीवर मोतीलाल ओसवाल रिसर्च मते, गुंतवणूकदारांचा दृष्टीकोन सकारात्मक राहतो. जोपर्यंत निफ्टी २५७००/२५८०० पातळीपेक्षा जास्त राहतो, तोपर्यंत डिप्सवर खरेदी करण्याची रणनीती नाकारता येत नाही. यासह मी तुम्हाला आमचा साप्ताहिक पोर्टफोलिओ आढावा सादर करतो.पुढील आठवड्यात बाजारात काय महत्वाचे?कमाईचा हंगाम संपल्यानंतर खास ट्रिगर नसताता. असतात जे बाजाराच्या कामगिरीवर परिणाम करतात. सध्या विशेष ट्रिगर नसले तरी सुध्दा नवीन घडामोडींचा बाजारात परिणाम होईल विशेषतः सर्वाधिक परिणाम भूराजकीय कारणांमुळे होऊ शकतो. पीएमआयची किरकोळ घसरणीची आकडेवारी असली तरी अद्याप अनेक रिपोर्ट येणे व डिसेंबरची दरकपात, आरबीआयचे रेपो दर कपातीबाबत नवे भाष्य यावर अद्याप नवा कल स्पष्ट झालेला नाही. त्यामुळे आताच बाजाराचा मूड स्पष्ट करणे संयुक्तिक ठरणार नाही.पहिल्या तिमाहीत भारताची अर्थव्यवस्था ७.८% ने वाढली ती पाच तिमाहींमधील ती सर्वात वेगवान ठरली होती. ती अपेक्षेपेक्षाही वाढली होती परंतु बाजार करेक्शनसह नवे ट्रिगर नसल्याने तिमाहीच्या दुसऱ्या तिमाहीत आता वाढ मंदावण्याची अपेक्षा आहे परंतु ती तज्ञांच्या अजूनही ७% पातळीच्यावर राहण्याची शक्यता आहे जी सकारात्मक ठरू शकते. एचएसबीसी कंपोझिट (एकत्र)उत्पादन,सेवा पीएमआय,परकीय चलन साठा, औद्योगिक उत्पादन, बँककर्ज वाढ आणि पायाभूत सुविधा उत्पादन यासारख्या इतर डेटा रिलीझवर बारकाईने बाजार लक्ष ठेवणार आहे.फेडचे अधिकृत भाषण, एस अँड पी ग्लोबल कंपोझिट/मॅन्युफॅक्चरिंग पीएमआय, रिटेल सेल्स, प्रोड्यूसर प्राइस इंडेक्स, हाऊसिंग प्राइस इंडेक्स, पर्सनल कंझम्प्शन एक्सपेंडिचर बेरोजगारीचे दावे या जागतिक आकडेवारीचे निकाल इत्यादी ट्रिगरही बाजारातील चाचपणीसाठी मूलभूत ठरतील.नुकतेच वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी सकारात्मक घडामोडींचे संकेत दिले आहेत. संतुलित दृष्टिकोन सिद्ध झाल्यानंतर लवकरच चांगली बातमी येईल असे ते म्हणाले होते.मार्चपासून आतापर्यंत वाटाघाटीच्या सहा फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. अद्याप निकाल स्पष्ट झालेला नाही.मोठी अपडेट म्हणजे युक्रेनचे अध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांनी रशियासोबत शांतता योजनेवर काम करण्यास सहमती दर्शविल्याने ब्रेंट क्रूड ऑइलमध्ये आठवड्यात सर्वात मोठी घसरण झाली होती .बाजारात कुठल्या निर्देशांकात लक्षपुर्वक पाहणे महत्त्वाचे!इतर ट्रिगरसह आयटी, तेल व गॅस, एफएमसीजी, बँक व फायनांशियल सर्विसेस क्षेत्रीय शेअर्समध्ये लक्ष घालणे गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर ठरेल.

फीड फीडबर्नर 22 Nov 2025 2:10 pm

पुणे पोलिसांची मोठी कारवाई; मध्य प्रदेशातील शस्त्र बनविणाऱ्या ५० भट्टयांवर बुलडोझर

पुणे : पुणे शहर पोलिसांनी संघटित गुन्हेगारीविरोधात मोठी मोहीम राबवत आंतरराज्य पातळीवरील अवैध शस्त्रउद्योगाचा पर्दाफाश केला आहे. शहरातील विविध भागातून २१ अवैध पिस्तुले आणि दारूगोळा जप्त करण्यात आला असून, पुढील तपासात मिळालेल्या माहितीच्या आधारे मध्यप्रदेशात छापा टाकून ३६ संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. मागील तीन आठवड्यांपासून विमानतळ, काळेपडळ, गुन्हे शखा आणि एईसी पथकांनी केलेल्या धडक […] The post पुणे पोलिसांची मोठी कारवाई; मध्य प्रदेशातील शस्त्र बनविणाऱ्या ५० भट्टयांवर बुलडोझर appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Nov 2025 1:46 pm

श्रद्धा कपूरला ‘ईठा’सिनेमाच्या शूटिंगदरम्यान दुखापत; नेमकं काय घडलं?

Shraddha Kapoor injured | अभिनेत्री श्रद्धा कपूर लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘ईठा’ सिनेमात लवकरच पाहायला मिळणार आहे. प्रसिद्ध लावणी आणि तमाशा कलाकार विठाबाई नारायणगांवकर यांच्या आयुष्यावर हा सिनेमा आधारित आहे. मात्र या चित्रपटाच्या शुटिंगवेळी श्रद्धाला दुखापत झाल्याचे वृत्त समोर आले आहे. सध्या ‘ईठा’ सिनेमाचं शूट सध्या नाशिकजवळील एका गावात सुरु आहे. मात्र तिला फ्रॅक्चर झाल्यामुळे आता […] The post श्रद्धा कपूरला ‘ईठा’ सिनेमाच्या शूटिंगदरम्यान दुखापत; नेमकं काय घडलं? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Nov 2025 1:41 pm

Nashik Ring Road : नाशिककरांना 'ट्रॅफिक जॅम'मधून मुक्ती! ६६ किमी लांबीचा रिंग रोड कसा असेल? ८,००० कोटींचा प्रोजेक्ट पूर्ण आराखडा!

नाशिक : नाशिक शहराचा जसजसा विकास झाला, तसतशी शहरात वाहतूककोंडीची समस्या देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गेल्या काही महिन्यांपासून मुंबई नाका, द्वारका, संभाजीनगर रोड, पुणे रोड यांसारख्या प्रमुख भागांत नाशिककरांना वाहतूककोंडीचा तीव्र सामना करावा लागत आहे. केवळ १० मिनिटांच्या प्रवासासाठी अर्धा तास ते एक तास वेळ लागत असल्याने नाशिककर अक्षरशः वैतागले आहेत. नजीकच्या काळात नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. या काळात देशभरातील लाखो भाविक नाशिकमध्ये दाखल होतात, ज्यामुळे वाहतूककोंडीची समस्या आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारने मोठे आणि महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. वाढत्या वाहतूककोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आणि सिंहस्थ कुंभमेळ्यात भाविकांची सोय व्यवस्थित व्हावी यासाठी सरकारने नाशिकमध्ये ६६ किलोमीटर लांबीचा रिंग रोड बांधण्याचा निर्णय घेतला आहे. नुकतीच मंत्रिमंडळाने या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी अंदाजे ८ हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. हा रिंग रोड केवळ सध्याची वाहतूककोंडीच कमी करणार नाही, तर तो भविष्यातल्या नाशिकच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. सरकारने या रिंग रोडसाठी मास्टरप्लॅन तयार केला असून, २०२७ च्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आधी हा रिंग रोड पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यामुळे नाशिकची वाहतूक व्यवस्था सुधारेल आणि शहराच्या विकासाला नवी गती मिळेल.https://prahaar.in/2025/11/22/dondaicha-nagar-parishad-election-unopposed-for-first-time-in-73-year-history-all-bjp-candidate-wins-jaykumar-rawal-politics-dhule/एमएसआरडीसी नाही, तर एमएसआयडीसी करणार कामनाशिकमधील वाहतूककोंडी आणि २०२७ च्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेल्या ६६.१५ किलोमीटर लांबीच्या रिंग रोड प्रकल्पाच्या अंमलबजावणीला आता मोठी गती मिळाली आहे. ₹८,००० कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी: अंदाजे ८ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित असलेल्या या प्रकल्पाला नुकतीच सरकारने मान्यता दिली आहे. या प्रकल्पातील महत्त्वाचा अडथळा दूर करण्यासाठी राज्य पायाभूत सुविधा विषयक मंत्रिमंडळ समितीने मोठे पाऊल उचलले आहे. या समितीने रिंग रोडसाठी लागणाऱ्या भूसंपादन खर्चाला मंजुरी दिली आहे. भूसंपादनासाठी सुमारे ₹३,६५९.४७ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे, ज्याला राज्य सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे.भूसंपादनासाठी लागणारा हा निधी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणामार्फत उपलब्ध करून दिला जाईल. रिंग रोडच्या अंदाजे ₹४,२६२.६४ कोटी रुपयांच्या बांधकाम खर्चाबाबत सध्या केंद्र सरकारसोबत, म्हणजेच रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाशी (MoRTH) चर्चा सुरू आहे. ही चर्चा पूर्ण झाल्यानंतर, राज्य आणि केंद्र सरकार यांच्यात सामंजस्य करार (MoU) होणार आहे, ज्यामुळे या प्रकल्पाचे काम प्रत्यक्षात सुरू होईल. या प्रकल्पाची अंमलबजावणी एमएसआरडीसी (MSRDC) ऐवजी एमएसआयडीसी (MSIDC) मार्फत केली जाणार आहे. भूसंपादन खर्चाला मान्यता मिळाल्यामुळे, नाशिक रिंग रोडचे काम आता वेगात सुरू होण्याची चिन्हे आहेत, ज्यामुळे नाशिककरांना वाहतूककोंडीतून मोठा दिलासा मिळेल.

फीड फीडबर्नर 22 Nov 2025 1:30 pm

Lifestyle: हिवाळ्यात मुलांना हेल्दी ठेवतील या दूध ड्रिंक्स; जाणून घ्या बनवण्याची सोपी पद्धत

Lifestyle: हिवाळा सुरू झाला की थंड हवा मुलांच्या आरोग्यावर पटकन परिणाम करते. त्यांची रोगप्रतिकारक शक्ती मोठ्यांपेक्षा कमी असते, त्यामुळे या काळात मुलांच्या आहाराची खास काळजी घ्यावी लागते. हिवाळ्यात दूधापासून बनणाऱ्या काही हेल्दी, टेस्टी ड्रिंक्स मुलांसाठी सर्वात चांगले पर्याय ठरतात. या ड्रिंक्समुळे शरीराला उष्णता मिळते आणि इम्युनिटीही मजबूत होते. मोठ्यांनीसुद्धा या ड्रिंक्सचा आनंद घ्यायला हवा. दूधात […] The post Lifestyle: हिवाळ्यात मुलांना हेल्दी ठेवतील या दूध ड्रिंक्स; जाणून घ्या बनवण्याची सोपी पद्धत appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Nov 2025 1:24 pm

शरद पवारांनी ‘असं’काय केलं? मनसेला सोबत घेण्याबाबत काँग्रेसकडून मोठं विधान; पडद्यामागच्या राजकारणाची जोरदार चर्चा

Vijay Vadettiwar : राजकारणात कोणी कुणाचा कायमच शत्रू किंवा मित्र नसतो अशी जुनी म्हण आहे. त्यामुळेच निवडणुकीत राजकीय परिस्थिती पाहून निर्णय घ्यावे लागतात. सध्या राज्यात नगपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. महायुती आणि महाविकास आघाडीकडून उमेदवार रिंगणात उतरविण्यात आले आहेत. मात्र, ही निवडणूक स्थानिकची असल्याने विचित्र प्रकाराच्या युती आघाड्या झाल्याचे दिसत आहे. यानंतर लागणाऱ्या […] The post शरद पवारांनी ‘असं’ काय केलं? मनसेला सोबत घेण्याबाबत काँग्रेसकडून मोठं विधान; पडद्यामागच्या राजकारणाची जोरदार चर्चा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Nov 2025 1:22 pm

मुलाच्या एअर-शोचे व्हिडीओ YouTube वर शोधत असताना निधनाचे वृत्त समोर; कोण होते विंग कमांडर नमांश सियाल?

Tejas Crash In Dubai | दुबई एअर शो मध्ये हवाई कसरती दाखवताना तेजस फायटर जेटचा अपघात होऊन 34 वर्षीय विंग कमांडर नमांश सियाल शहीद झाले. उड्डाण करताना तेजसचं हवाई कौशल्य दाखवत असताना त्यांचं विमान कोसळलं. शुक्रवारी स्थानिक वेळेनुसार दुपारी २:१० वाजता तेजस विमान कोसळले. नमांश स्याल हे मूळचे हिमाचल प्रदेशचे होते. या बातमीनंतर हिमाचल प्रदेशमधील […] The post मुलाच्या एअर-शोचे व्हिडीओ YouTube वर शोधत असताना निधनाचे वृत्त समोर; कोण होते विंग कमांडर नमांश सियाल? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Nov 2025 1:17 pm

कालच्या रुपयांच्या ८८.६३ निच्चांकी पातळीवरून आज केवळ १ पैशाने वाढ 'या'परिस्थितीजन्य अर्थशास्त्रीय कारणांमुळे

मोहित सोमण: कालच्या डॉलरच्या निर्देशांकात व मागणीत मोठी वाढ झाल्याने रुपयांत निच्चांकी पातळीवर (All time Low) घसरण झाली होती. काल थेट रूपया प्रति डॉलर ८८.६३ रुपयांवर युएस बाजारातील सुरूवातीच्या सत्रात व्यवहार करत होता मात्र सकाळी रूपयाने रिकव्हरी प्राप्त केली आहे. एक पैशांनी रूपयात सुधारणा झाल्याने आज सकाळच्या सत्रात रूपया प्रति डॉलर ८९.६४ पातळीवर व्यवहार करत आहे. प्रामुख्याने जगभरातील अस्थिरतेचा फटका इतर करन्सी बास्केटला बसत आहे व सातत्याने डॉलरच्या मागणीत वाढ होत असल्याने त्याचा आर्थिक फटका व्यापारांसह शेअर बाजारात देखील काल बसला होता. मात्र आज नवीन कुठला ट्रिगर नसला तरी डॉलरच्या मागणीत कुठलीही विशेष कपात झाली नसल्याने रूपया केवळ १ पैशाने वधारला असला तरी निचांकी स्तरावर कायम आहे.काल डॉलर निर्देशांक (Dollar Index DXY) १०० पेक्षा अधिक पातळीवर व्यवहार करत होता. तर आशियाई बाजारातील चलन ०.१ ते ०.३% घसरून व्यवहार करत होते त्याचा वास्तविक चलनी व्यवहारात मोठा फटका बसल्याने आज बाजारात रूपयात फारशी सुधारणा झालेली नाही. किंबहुना युएस फेडरल रिझर्व्ह बँकेच्या मिनिटमधील माहितीनुसार काही फेड सदस्यांनी विरोध केल्याने अद्याप बाजारातील धोरणाबाबत स्पष्टता नाही. त्यामुळे अनिश्चितता अधिक प्रमाणात वाढल्याने डॉलरमध्येही वाढ होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील माहितीनुसार, कालपर्यंत मनी मार्केटमध्ये ५०% वरून ३०% व्याजदरातील शक्यता वर्तवली जात आहे. असे असताना रुपया कमकुवत झाल्याने आजही तो 'डाऊन' साईड व्यवहारात कायम आहे. भारतीय सेंट्रल बँकेने डॉलरची विक्री वाढवल्यामुळे गुंतवणूक वाढली होती. अमेरिकेशी व्यापार करार करण्यास विलंब, इराणी तेल खरेदीवरून काही भारतीय कंपन्यांवर निर्बंध आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीची शक्यता कमी होत चालल्याने रुपया आणखी कमकुवत झाला.तज्ञांच्या मते, काल शेवटच्या व्यापारी तासात चलनाने ८९.५/$ चा टप्पा ओलांडला होता. चलनाचे रक्षण करण्यात मध्यवर्ती बँकेची अनुपस्थिती यामुळे 'शॉर्ट स्क्विज' निर्माण झाली होती असेही तज्ञांनी आपल्या निरीक्षणात म्हटले आहे. ज्यामुळे घसरण आणखी वाढली. रुपयाच्या घसरणीनंतर बाँडच्या किमतीही घसरल्या, १० वर्षांच्या बेंचमार्क सरकारी पेपरवरील उत्पन्न मागील बंदपेक्षा ४ बेसिस पूर्णांकाने अधिक बंद झाले.एका डीलर्सनी सांगितले की, सेंट्रल बँकेने प्रति डॉलर ८८.८० चा टप्पा ओलांडल्यानंतर साईड लाईन्सवर राहण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे स्टॉप लॉस झाला आणि चलन दिवसाच्या नीचांकी पातळीवर घसरले होते. आज मात्र किरकोळ स्थिरतेने रूपया १ पैशाने स्थिरावला असला तरी अद्याप स्थिती बदललेली नाही.

फीड फीडबर्नर 22 Nov 2025 1:10 pm

छापेमारी करत वणीमध्ये मिश्रित कोळसा बनवणाऱ्या माफियांवर मोठी कारवाई

यवतमाळ : वणी परिसरातील लालपुलिया भागात निकृष्ट आणि प्रदूषणकारक कोळशाची खुलेआम विक्री करणाऱ्या कोळसा माफियांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली. केंद्र सरकारच्या कोळसा मंत्रालयाच्या निर्देशानुसार, यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने १९ नोव्हेंबरला अचानक छापा टाकत अनेक डेपोंची तपासणी केली आणि गुणवत्ता तपासणीसाठी नमुने जप्त केले. या कारवाईमुळे स्थानिक कोळसा व्यापाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, छत्तीसगडमधून अत्यंत स्वस्त दरात खरेदी केलेला निकृष्ट दर्जाचा कोळसा चांगल्या प्रतीच्या कोळशात मिसळून तो बाजारात उच्च दरात विकला जात असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. मंत्रालयाच्या नियमांनुसार अशा कोळशाची विक्री केवळ निश्चित ‘एंड यूजर’लाच करण्याची परवानगी असताना काही व्यापाऱ्यांनी हे नियम धाब्यावर बसवून हा बेकायदेशीर प्रकार सुरु ठेवला होता.या गंभीर गैरव्यवहाराची दखल घेऊन पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी विशेष पथकाला तत्काळ कारवाईचे आदेश दिले. तर गुणवत्ता अहवाल आल्यानंतर संबंधितांवर अतिशय कठोर पाऊले उचलली जातील, असा अंदाज वर्तवला जात आहे.या रॅकेटचे धागेदोरे नागपूर आणि चंद्रपूरमधील काही मोठ्या कोळसा व्यापाऱ्यांपर्यंत पोहोचू शकतात, अशी माहिती समोर येत आहे. छत्तीसगडमधून येणाऱ्या कोळशात वणीमध्ये भेसळ करून तो विविध ठिकाणी रवाना केला जात असल्याचा संशय होता. मात्र तपासाचा वेग आणि मिळणारे पुरावे यावरून लवकरच या रॅकेटमध्ये असणाऱ्या बड्या व्यापारांची नावे उघड होण्याची शक्यता आहे. दरम्यान प्रशासनाने उशिरा या होईना पण या रॅकेटवर कारवाई केल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

फीड फीडबर्नर 22 Nov 2025 1:10 pm

Dondaicha Nagar parishad Election : ७३ वर्षांचा इतिहास मोडला! दोंडाईचा नगर परिषद पहिल्यांदाच बिनविरोध; रावल यांनी कोणते 'गुप्त राजकारण'केले?

धुळे : राज्याचे पणन व राज शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल (Jaykumar Rawal) यांनी धुळे (Dhule News) जिल्ह्यातील राजकारणात एक नवा इतिहास रचला आहे. जवळपास ७० हजार लोकसंख्या असलेल्या दोंडाईचा-वरवाडे नगरपरिषदेची निवडणूक त्यांनी पूर्णतः बिनविरोध करण्यात यश मिळवले आहे. या नगरपरिषदेत नगराध्यक्षांसह एकूण १३ प्रभागांतील सर्व २६ जागांवर भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. १९५२ साली स्थापन झालेल्या दोंडाईचा नगरपरिषदेच्या इतिहासात ही निवडणूक प्रथमच बिनविरोध पार पडली आहे. हे भाजपचे १००% बिनविरोध यश मंत्री जयकुमार रावल यांच्या राजकीय कौशल्याची पोचपावती मानली जात आहे. या निवडणुकीत भाजपसमोर शिवसेना (उबाठा गट), काँग्रेस, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार गट), एम.आय.एम., समाजवादी पार्टी आणि अनेक अपक्ष उमेदवारांनी आव्हान उभे केले होते. मात्र, अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी सर्वच विरोधी उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. जयकुमार रावल यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या सामुहिक प्रयत्नांमुळे ही सर्व जागांवर बिनविरोध निवड झाली असून, यामुळे भाजपचे संघटन बळ पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. या ऐतिहासिक विजयामुळे धुळे जिल्ह्यातील स्थानिक राजकारणावर भाजपची पकड आणखी मजबूत झाली आहे.https://prahaar.in/2025/11/22/find-out-exactly-what-are-the-fundamental-and-revolutionary-changes-made-by-the-modi-government-in-new-labour-laws/रावल यांनी ४० वर्षांचा तिढा सोडवलाधुळे जिल्ह्यातील दोंडाईचा-वरवाडे नगरपरिषदेची निवडणूक बिनविरोध करण्यात राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल (Jaykumar Rawal) यांना जे यश मिळाले आहे, त्यामागे त्यांची कुशल राजकीय रणनीती (Masterstroke Strategy) आणि दोन गटांना एकत्र आणण्याचे कौशल्य कारणीभूत ठरले आहे. या विजयातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट म्हणजे दोंडाईचा नगरपरिषदेत गेली चार दशके भाजपचा कट्टर विरोधक मानला जाणारा डॉ. हेमंत देशमुख यांचा गट भाजपमध्ये सामील करण्यात मंत्री रावल यांना यश आले. रावल यांच्या नेतृत्वाखाली आणि पक्षाच्या उच्चस्तरीय नेत्यांच्या चर्चेनंतर हा ऐतिहासिक राजकीय तिढा अखेर सुटला. या महत्त्वपूर्ण बदलामुळे दोंडाईचातील दीर्घकाळ चाललेला राजकीय संघर्ष संपुष्टात आला. डॉ. देशमुख गटाला भाजपवासी केल्यानंतर, मंत्री रावल यांनी रणनिती आखून निवडणूक बिनविरोध करण्याच्या दिशेने पाऊल उचलले. सुरुवातीलाच नगराध्यक्ष नयनकुंवरताई रावल यांच्यासह ७ जागा बिनविरोध निवडून आणण्यात यश मिळाले. त्यानंतर माघारीच्या शेवटच्या दिवशी उर्वरित सर्व १९ जागांवरही भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आले. यामुळे दोंडाईचा नगरपरिषदेची निवडणूक प्रथमच पूर्णतः बिनविरोध पार पडली आणि भाजपची 'बिनविरोध सेंच्युरी' मजबूत झाली. जयकुमार रावल यांच्या या नेतृत्वाने राजकीय स्थैर्य आणि बिनविरोध निवडणूक प्रक्रियेचा मजबूत पाया घातल्याचे बोलले जात आहे.रावल यांचा करिष्मा की महाविकास आघाडीची माघार?धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा नगरपरिषदेची निवडणूक मंत्री जयकुमार रावल यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध पार पडली असली तरी, या अभूतपूर्व यशामागे राजकीय वर्तुळात नवी चर्चा रंगली आहे. एका बाजूला मंत्री रावल यांच्या राजकीय कौशल्याचा करिष्मा दिसत असला तरी, दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीसह (MVA) सर्व विरोधी पक्षांच्या कार्यपद्धतीवरच मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. सर्वांत मोठा प्रश्न असा आहे की, मंत्री जयकुमार रावल यांनी अशी नेमकी कोणती राजकीय समीकरणे फिरवली, ज्यामुळे महाविकास आघाडीतील पक्ष (शिवसेना उबाठा, काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार) तसेच एमआयएम आणि समाजवादी पार्टीसारख्या सर्वच विरोधी पक्षांच्या उमेदवारांना शेवटच्या क्षणी आपले उमेदवारी अर्ज मागे घ्यावे लागले? विरोधी पक्षांचा दबाव कमी? एकीकडे डॉ. हेमंत देशमुख यांच्या कट्टर विरोधी गटाला भाजपमध्ये सामील करून रावल यांनी जुना संघर्ष संपवला. पण दुसरीकडे, स्थानिक पातळीवर मजबूत मानले जाणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आणि त्यांच्या उमेदवारांनी एकत्रितपणे लढण्याऐवजी अर्ज मागे घेण्याचा निर्णय का घेतला? राजकीय जाणकारांच्या मते, रावल यांनी केवळ सामंजस्य करारच नाही, तर प्रभावी राजकीय दबावतंत्राचा वापर केला असावा, ज्यामुळे विरोधकांना बिनविरोध प्रक्रियेत सहभागी होणे भाग पडले.धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा-वरवाडे नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपने इतिहास रचला असून, नगराध्यक्षांसह सर्व २६ जागांवर आपले उमेदवार बिनविरोध निवडून आणले आहेत. राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या नेतृत्वाखाली भाजपला हे ऐतिहासिक १००% यश मिळाले आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, नगराध्यक्ष पदासाठी मंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री श्रीमती सी. नयनकुंवरताई रावल यांची बिनविरोध निवड झाली आहे. दोंडाईचा नगरपरिषदेच्या १३ प्रभागातून बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांची नावे पुढीलप्रमाणे आहेतनगराध्यक्षा पदासाठी मंत्री जयकुमार रावल यांच्या आई सी. नयनकुंवरताई रावल, प्रभाग क्र.१ मध्ये मुकेश गणसिंग देवरे, रविना महेशकुमार कुकरेजा, प्रभाग क्र.२ मध्ये सरलाबाई छोटू सोनवणे व शेख शिबान अहमद रियाज अहमद, प्रभाग क्र.३ मध्ये अक्षय वसंत चव्हाण, सुपौयाबी मेहमुद बागवान, प्रभाग क्र.४ मध्ये कल्पनाबाई गोपाल नगराळे, पिंजारी शेख नबु शेख बशिर, प्रभाग क्र.५ मध्येविजय जिजाबराव पाटील व भारती विजय मराठे, प्रभाग क्र.६ मध्ये वैशाली शरद कागणे व सुभाष कांतीलाल धनगर, प्रभाग क्र.७ मध्ये देवयानी संजोग रामोळे व चतूर जिभाऊ पाटील, प्रभाग क्र.८ मध्ये नरेंद्र नथ्थुसिंग गिरासे व राणी राकेश अग्रवाल, प्रभाग क्र.९ मध्ये वैशाली प्रवीण महाजन व निखीलकुमार रविंद्रसिंग जाधव, प्रभाग क्र.१० मध्ये अपूर्वा चिरंजीवी चौधरी व जितेंद्र धनसिंग गिरासे, प्रभाग क्र.११ मध्ये भावना हितेंद्र महाले व रविंद्र भास्कर देशमुख, प्रभाग क्र.१२ मध्ये सरजू वेडू भिल व सुवर्णा युवराज बागुल, प्रभाग क्र.१३ मध्ये भरतरी पुंडलिक ठाकुर व ललिता जितेंद्र गिरासे आदी नगरसेवक म्हणून बिनविरोध निवडुन आले आहेत.

फीड फीडबर्नर 22 Nov 2025 1:10 pm

दिल्ली क्राईम ब्रँचची धडक कारवाई, आयएसआयशी संबंधित ४ आंतरराष्ट्रीय शस्त्र तस्करांना अटक

नवी दिल्ली: दिल्ली गुन्हे शाखेने पाकिस्तानी आयएसआयशी जोडलेल्या आंतरराष्ट्रीय शस्त्र तस्करीच्या टोळीतील चार आरोपींना अटक केली आहे. तुर्की आणि चीनमध्ये बनवलेल्या उच्च दर्जाच्या पिस्तूल पाकिस्तानमार्गे भारतात पुरवठा करण्यासाठी ही टोळी काम करत होती. महत्त्वाचे म्हणजे ही शस्त्रे पाकिस्तानमधून ड्रोनद्वारे पंजाबमध्ये टाकली जात होती आणि नंतर पुन्हा विकली जात होती.याप्रकरणात अजय, मनदीप, दलविंदर आणि रोहन अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. अटक केलेल्या आरोपींपैकी दोघेजण पंजाबचे आहेत. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले तेव्हा १० महागड्या परदेशी पिस्तूल आणि ९२ जिवंत काडतुसे जप्त केली. ज्याचा पुरवठा दिल्ली आणि आसपासच्या राज्यांमधील गुन्हेगार आणि गुंडांना केला जात होता.https://prahaar.in/2025/11/22/find-out-exactly-what-are-the-fundamental-and-revolutionary-changes-made-by-the-modi-government-in-new-labour-laws/गुन्हे शाखेचे म्हणणे आहे की, हे संपूर्ण नेटवर्क पाकिस्तानी आयएसआयशी संबंधित व्यक्तींच्या इशाऱ्यावर कार्यरत होते. शस्त्रे प्रथम पाकिस्तानात नेली जात होती आणि नंतर तेथून भारतात तस्करी केली जात होती. या व्यक्तींनी आतापर्यंत भारतात किती शस्त्रे विकली आहेत आणि कोणत्या टोळ्यांना किंवा व्यक्तींना ती मिळाली आहेत याचा तपास पोलिस करत आहेत. शस्त्रे शोधण्यासाठी तपास यंत्रणा मोबाईल फोन, बँक तपशील आणि सोशल मीडियाचा वापर करत आहेत.

फीड फीडबर्नर 22 Nov 2025 1:10 pm

India's Forex Reserves: भारताच्या परदेशी चलनसाठ्याचे मजबूत कमबॅक थेट ५.३२७ अब्ज डॉलरने 'इतक्या'वर वाढ

मुंबई: परदेशी चलन साठ्यात (Foreign Exchange Reserves) गेल्या आठवड्यातील घसरणीनंतर या आठवड्यात जोरदार वाढ झाली आहे. आरबीआयने सोन्याच्या साठ्यात वाढवलेल्या साठ्यामुळे झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्याच्या वाढलेल्या किंमतीचा परिणामही सोन्याच्या आंतरराष्ट्रीय विक्रीत झाला. भारतातील मोठ्या प्रमाणात सोन्यात आगमन झाल्याने सोन्याच्या भांड्यातील मूल्यांकनात वाढ झाली आहे. आकडेवारीनुसार, भारताच्या सोन्याच्या साठ्यात ५.३२७ अब्ज डॉलरने वाढ झाल्याने एकूण सोन्याचा साठा १०६.८५७ अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. गेल्या आठवड्यात हा साठा २.६९९ अब्ज डॉलरने घसरून ६८७.०३४ अब्ज डॉलरवर घसरला होता. प्रामुख्याने एफसीए (Foreign Currency Assets FCA) हा सोन्याच्या साठ्यातील प्रमुख घटक आहे. तो १५२ दशलक्ष डॉलर्सने वाढला आहे. त्यामुळे तो साठा आता ५६२.२९ अब्ज डॉलरवर पोहोचला. एसडीआर (Special Drawing Rights SDRs) हे ५६ दशलक्ष डॉलर्सने वाढत १८.६५ अब्ज डॉलरवर पोहोचले आहे. तर आकडेवारीनुसार, १४ नोव्हेंबरपर्यंत आयएमएफकडील भारताचा राखीव साठा अथवा ठेव ८ दशलक्ष डॉलर्सने वाढत ४.७७९ अब्ज डॉलरवर पोहोचला.

फीड फीडबर्नर 22 Nov 2025 1:10 pm

“तुम्ही काट मारली तर…”; अजित पवारांच्या वक्तव्याचा विरोधकांनी घेतला समाचार: वडेट्टीवार, दानवे म्हणाले…

Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार हे नेहमी त्यांच्या रोखठोक विधानांमुळे अडचणीत सापडतात. त्यांनी केलेली विधानांची जोरदार चर्चा राज्याच्या राजकारणात होत असते. आता पुन्हा एकदा अजित पवार हे एका विधानामुळे चर्चेत आले आहेत. त्यांनी केलेल्या विधानाचा समाचार विरोधी पक्षातील नेत्यांनी घेतला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ बारामतीमधील माळेगावातून काल शुक्रवारी २१ नोव्हेंबर २०२५ […] The post “तुम्ही काट मारली तर…”; अजित पवारांच्या वक्तव्याचा विरोधकांनी घेतला समाचार: वडेट्टीवार, दानवे म्हणाले… appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Nov 2025 12:38 pm

कामगार कायद्यात मोदी सरकारकडून मुलभूत व क्रांतीकारक बदल नक्की काय बदल जाणून घ्या...

प्रतिनिधी: सरकारने १९३० पासून पुढे सुरू असलेल्या कामगार कायद्यात बदल केले आहेत. त्यामुळे नव्या विस्तृत मांडणीसह काही नवे कायदे व काही जुन्या कायद्यात बदल करत सरकारने नव्या कामगार कायद्यावर अंतिम मोहोर उमटवली आहे. प्रस्तावित कायद्यासाठी संसदेत पाच वर्षांपूर्वीच विधेयक पारित करण्यात आले होते. आज त्याला अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी मोदी 'श्रमेव जयते' म्हणत बोलकी प्रतिक्रिया दिली आहे. नव्या कायद्यातील तरतुदीनुसार आता अनेक मोठे बदल केले गेले आहेत. प्रामुख्याने कामगार आणि रोजगार मंत्रालयाने शुक्रवारी चार स्वतंत्र राजपत्र अधिसूचना जारी करून चार कामगार संहिता लागू केल्या त्या वेतन संहिता (२०१९), औद्योगिक संबंध संहिता (२०२०), सामाजिक सुरक्षा संहिता (२०२०) आणि व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामाच्या परिस्थिती संहिता (२०२०) असतील. कामगारांच्या दृष्टीने हिताचे सामाजिक आर्थिक सुरक्षितता व मालक अथवा नियोक्ता (Employer) यांच्यासाठी 'इज ऑफ डुईंग बिझनेस' फ्रेमवर्क अशा गोष्टी धान्यात ठेवून मोठे बदल करण्यात आले आहेत. तसेच यांची अंमलबजावणीही काटेकोरपणे होणार आहे.नव्या न्याय तरतुदीनुसार आता मालकांना आपल्या कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्र देणे बंधनकारक असणार आहे जे पूर्वी आवश्यक नव्हते. वेळेवर पगार, सामाजिक सुरक्षितता, न्याय वागणूक, कामाच्या ठिकाणी समानता, स्त्री पुरूष एका पदासाठी समान वेतन, एक वर्षानंतर अथवा विशिष्ट कालावधीनंतर ग्रॅच्युटी पेमंट, ४० वर्षावरील कामगारांना वर्षातून एकदा फ्री चेकअप, ओव्हरटाईम केल्यास डबल वेतन असे मूलभूत बदल केले गेले आहेत. केंद्रीय कामगार व श्रममंत्री मनसुख मंडाविया यांनी यावर आपले स्पष्टीकरण देत वरील निर्णयांची घोषणा केली आहे.तसेच विशेष म्हणजे औद्योगिक क्षेत्रातील क्षेत्रीय रचना या निर्णयात मूलभूत म्हणून स्विकारण्यात आली आहे. उदाहरणार्थ गिग वर्कर्स, टेक वर्कर्स, प्लॅटफॉर्म वर्कर्स अशी स्पष्ट रचना कामगार विभागणी व्याख्येत करण्यात आली आहे. त्यामुळे मूलरचनेतील सामाजिक न्याय व हक्क कायदे तसेच ठेवता त्या क्षेत्रातील मागण्या, गरजा, स्वरूप लक्षात घेता त्यानुसार नियमावली या क्षेत्रातील कामगारांसाठी जाहीर झाली आहे. त्यामुळे आता या टेक अथवा प्लॅटफॉर्म व गिग वर्कर्स (कामगारांसाठी) कायद्यात बदल झाले आहेत. जुने कायदे स्वातंत्र्य काळातील अथवा स्वातंत्र्यपूर्व काळात तयार झालेले आहेत. त्यामुळे काळानुरूप केंद्र सरकारने यात बदल केले आहेत.कामगार अर्थशास्त्रज्ञ श्याम सुंदर यांच्या मते, 'कामगारांपर्यंत हे फायदे पोहोचवणे हे मोठे आव्हान आहे, ज्यासाठी त्यांच्या अंमलबजावणीला सुलभ करणाऱ्या संस्थात्मक संरचनांची आवश्यकता असेल. उदाहरणार्थ, बांधकाम कामगार गेल्या दोन दशकांपासून इमारत आणि बांधकाम कामगार उपकर निधीचा प्रभावीपणे लाभ घेऊ शकले नाहीत कारण ते नोंदणीकृत होऊ शकले नाहीत.' केंद्र सरकारने मात्र या कायद्याला नवे ऐतिहासिक बदल म्हटले आहे. या कायद्यांमुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक सुधारणा कामगार नियमप्रणालीत व औद्योगिक क्षेत्रात होणार आहेत.सरकारच्या मते 'भारत या विखुरलेल्या चौकटीखाली काम करत राहिला, ज्यामध्ये अनेक दशकांपासून परस्परावलंबी अनुपालन, कालबाह्य प्रक्रिया आणि कामगारांसाठी मर्यादित संरक्षण होते, विशेषतः औपचारिक क्षेत्राबाहेरील कामगारांसाठी कायदे होते.चार कामगार संहिता पॅचवर्क जागा आता एकसमान, आधुनिक कायदेशीर प्रणालीकडे घेण्याच्या दिशेने एक पाऊल आहे. सरकार म्हणते हे एक असे कार्यबल तयार करेल जे संरक्षित, उत्पादक आणि कामाच्या विकसित होत असलेल्या जगाशी सुसंगत असणार आहे ‌जे अधिक लवचिक, स्पर्धात्मक आणि स्वावलंबी राष्ट्रासाठी मार्ग मोकळा करेल' असे त्यात म्हटले आहे.किंबहुना भारताच्या नवीन कामगार संहितेच्या अंमलबजावणीबद्दल बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या एक्स पोस्टमध्ये 'श्रमेव जयते!' असे लिहून आज आमच्या सरकारने चार कामगार संहिता लागू केल्या आहेत. स्वातंत्र्यानंतरच्या सर्वात व्यापक आणि प्रगतीशील कामगार-केंद्रित सुधारणांपैकी ही एक आहे. ते आमच्या कामगारांना मोठ्या प्रमाणात सक्षम करते. ते अनुपालन लक्षणीयरीत्या सोपे करते आणि 'व्यवसाय सुलभते'ला प्रोत्साहन देते.' असे म्हटले.नव्या कायद्यानुसार आता ईएसआयसी (Employees State Insurance Corporation ESIC) कव्हरेज संबंधित क्षेत्रातील मर्यादित असलेले सगळ्याच क्षेत्रांना लागू केले गेले आहे. दहा कामगार अथवा कर्मचाऱ्यांपेक्षा कमी कर्मचारी असलेल्या कंपन्यांना देखील हे फायदे कामगारांकडे पोहोचवणे बंधनकारक केले आहे. याशिवाय कोड १ - पेमेंट ऑफ वेजेस अँक्ट १९३६, मिनिमम वेजेस अँक्ट १९४८, इक्वल रेमुनरेशन अँक्ट १९७६ या कायद्यांमध्ये सोपे सरल बदल करण्यात आले आहेत. कोड २ - इंडस्ट्रीयल रिलेशन कोड २०२०, इंडस्ट्रीयल एम्प्लॉयमेंट डिसफ्युट अँक्ट १९४७, कोड ३ - कोड ऑफ सोशल सिक्युरिटी २०२०, कोड ४(ऑक्यूपेशनल सेफ्टी हेल्थ वर्किंग कंडिशन २०२० या न्याय संहितेत विस्तृत बदल करण्यात आले आहेत.

फीड फीडबर्नर 22 Nov 2025 12:30 pm

परळीमध्ये महायुतीचा गुलाल! शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या दोन उमेदवारांची बिनविरोध निवड

परळी: राज्यभरात नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. उमेदवारांनी निवडणूकीसाठी भरलेला अर्ज मागे घेण्याची मुदतसुद्धा आता संपली आहे. त्यामुळे आता कोणते उमेदवार कोणत्या प्रभागातून उभे राहणार याचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. तर काही ठिकाणी विरोधकांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने बिनविरोध उमेदवार निवडून आले आहेत. ज्यात भाजप अव्वल स्थानावर आहे. मात्र भाजपसाठी महत्त्वाच्या असलेल्या बीड जिल्ह्यातील परळी नगर परिषद निवडणुकीत भाजपसोडून महायुतीतील इतर दोन मित्रपक्षांचे उमेदवार विजयी झाले आहे.बीडमधली परळी नगरपरिषद निवडणुकीमध्ये शेवटच्या दिवशी विरोधी उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे दोन उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. यामुळे निवडणूक होण्यापूर्वीच महायुतीच्या दोन नगरसेवकांना गुलाल लागला आहे. ज्यात राष्ट्रवादीच्या प्रभाग क्रमांक १३ मधील रेश्मा बळवंत आणि प्रभाग क्रमांक ११ मधील शिवसेनेच्या जयश्री गीते या दोघींची नावे नगरसेवक पदासाठी बिनविरोध जाहीर झाले आहेत.https://prahaar.in/2025/11/22/battle-will-be-fought-between-ubatha-and-shiv-sena-in-byculla-in-which-seats-will-it-be-whose-address-will-be-cut-off-find-out/स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका एकूण तीन टप्प्यांमध्ये होणार आहेत. ज्यातील पहिल्या टप्प्यात राज्यातील २४६ नगर परिषदा आणि ४२ नगर पंचायतींसाठी येत्या २ डिसेंबरला मतदान होणार असून लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे ३ डिसेंबरला मतमोजणी आणि निकाल लागणार आहे. यानंतर दुसऱ्या टप्प्यातील निवडणूकांना सुरूवात होईल.

फीड फीडबर्नर 22 Nov 2025 12:30 pm

घटस्फोटानंतर ‘संगीत देवबाभळी’ फेम अभिनेत्रीची नवी सुरुवात; केळवणाचा शेअर केला व्हिडिओ

Shubhangi Sadavarte | ‘संगीत देवबाभळी’ फेम अभिनेत्री शुभांगी सदावर्ते दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधणार आहे. नुकतेच तिने होणाऱ्या पतीबरोबरचा केळवणाचा व्हिडीओ समोर तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. शुभांगी सदावर्तेने सप्टेंबर, २०२५ मध्ये प्रसिद्ध संगीतकार आनंद ओकसोबत विभक्त होत असल्याचं सोशल मीडियावर जाहीर केलं होतं. लग्नाच्या पाच वर्षांतच त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. मात्र […] The post घटस्फोटानंतर ‘संगीत देवबाभळी’ फेम अभिनेत्रीची नवी सुरुवात; केळवणाचा शेअर केला व्हिडिओ appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Nov 2025 12:29 pm

पवई तलावातील जल प्रदूषण रोखणार, ईस्ट इंडिया कंपनीची महापालिकेने केली निवड

मुंबई (सचिन धानजी): पवई तलावात होणारे मलमिश्रित सांडपाण्याचे प्रदुषण कमी करण्यासाठी आता पवई येथील सध्या बंद असलेल्या पंपिंग स्टेशनच्या जागेवर मलजल प्रक्रिया केंद्र उभारण्यात येणार आहे. आठ दशलक्ष लिटर क्षमतेचे हे मलजल पंपिंग स्टेशन उभारण्यात येणार असून हे काम पूर्ण झाल्यावर पवई तलावातील जाणारे जल प्रदुषण थांबवता येणार आहे. तर मलजल प्रक्रिया केंद्र उभारुन प्रक्रिया केलेले पाणी पवई तलावात सोडल्याने पाण्याचे संतुलन राखता येईल आणि तलावातील जलचर तथा जैव विविधता जपता येईल,असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या कामासाठी ईस्ट इंडिया उद्योग लिमिटेड या कंपनीची निवड करण्यात आली आहे.महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निर्देशानुसार मुंबईतील नद्या तथा तलाव किंवा खाडी यामध्ये बिनपावसाळी अंतर्गत प्रवाह, सांडपाणी तसेच विनाप्रक्रिया मलप्रवाह तथा अर्धवट प्रक्रिया केलेले पाणी सोडले जात जात असल्याने जल प्रदूषण होते. त्यामुळे यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे पवई तलावात येणाऱ्या बिना पावसाळी प्रवाह अर्थात सांडपाण्याचा शोध घेणे, त्याला अटकाव करणे तसेच दुसरीकडे वळवणे आणि सांडपाण्याचा अटकाव करण्यासाठी प्रयोगिक तत्वावर अभ्यास करून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे. त्यात पहिल्या टप्प्यात बिना पावसाळी प्रवाहाचा अर्थात सांडपाणी रोखण्यासाठी खुल्या चर आणि एचडीडी पध्दतीने विविध व्यासाची मलवाहिनी टाकणे आणि इंटरसेप्टरच्या गाळणी व द्वारांचे सहा वर्षांकरता देखभाल करणे आदी कामाला सुरुवात करण्यात आली आहे.https://prahaar.in/2025/11/22/municipal-corporations-lottery-for-426-houses-postponed-date-to-be-announced-next-week/तर आता दुसऱ्या टप्प्यात पवई येथील वापरात नसलेल्या उदंचन केंद्राच्या अर्थात पंपिंग स्टेशनच्या जागेवर आधुनिक आणि पूर्णपणे स्वयंचलित असे ८ दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेचे मलजल प्रक्रिया केंद्र उभारण्यात येणार आहे. याचे बांधकाम करून पुढील ६ वर्षाच्या कालावधीसाठी देखभाल करण्यासाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्यात येत आहे. या केंद्र उभारणीसह देखभालीच्या कामांसाठी सुमारे ६६ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. या कामांसाठी ईस्ट इंडिया उद्याेग लिमिटेड आणि एसएसजी इन्फ्राटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ही पात्र ठरली आहे. या कंपनीने बांमरोळी येथे अस्तित्वात असलेल्या १०० दशलक्ष क्षमतेच्या सांडपाणी शुध्दीकरण केंद्राचा विस्तार करून ते २१५ दशलक्ष क्षमतेपर्यंत वाढवण्याचे काम केले आहे.तसेच त्याची पुढील दहा वर्षे देखभाल करण्याची जबाबदारी आहे.

फीड फीडबर्नर 22 Nov 2025 12:10 pm

भायखळ्यात उबाठा आणि शिवसेनेतच होणार लढाई, कोणत्या जागांवर असेल, कुणाचा पत्ता कापला जाणार? जाणून घ्या

मुंबई (सचिन धानजी) : दक्षिण मुंबईतील भायखळा विधानसभेत उबाठाचे मनोज जामसूतकर हे आमदार म्हणून निवडून आले. लोकसभा निवडणुकीत भायखळा विधानसभेत जेवढी मते उबाठाला मिळाली तेवढीच मते उबाठाने कायम राखण्याचा प्रयत्न केला. परंतु या विधानसभा क्षेत्रात लोकसभेच्या तुलनेत आठ हजार मतांशिवाय शिवसेनेच्या उमेदवाराला मतांची आकडेवारी वाढवता आलेली नाही. त्यामुळे भायखळा विधानसभेत प्रभाग आरक्षणानंतर तीन प्रभागांचे आरक्षण कायम राखले गेले. त्यात उबाठाच्या दोन विद्यमान नगरसेवक आणि अभासेच्या एक नगरसेवकाचा समावेश आहे.भायखळा विधानसभेत सहा नगरसेवक असून त्यात भाजपाचा एक, शिवसेनेचा एक, उबाठाचे दोन, अभासेचा एक आणि समाजवादी पक्षाच्या नगरसेवकाचा समावेश आहे. त्यातील उबाठाचे विद्यमान नगरसेवक रमाकांत रहाटे आणि सोनम जामसूतकर यांचे प्रभाग सुरक्षित राहिले आहे, तर अभासेच्या गीता गवळी यांचाही प्रभाग सुरक्षित झाला आहेे. समाजवादी पक्षाचे रईस शेख यांच प्रभाग खुला झाला असला तरी ते आमदार असल्याने समाजवादी पक्षांतच मोठी स्पर्धा आहे. तर प्रभाग २१०मध्ये उबाठाच्या सोनम जामसूतकर यांचा प्रभाग झाल्याने माजी नगरसेवक आणि उपनेते राम सावंत यांनी इच्छा प्रकट केली आहे.त्यामुळे तसे झाल्यास सोनम जामसूतकर यांना प्रभाग २०९मध्ये जावे लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर प्रभाग क्रमांक २०८ हा मनसेचा बालेकिल्ला असला तरी उबाठाचे विद्यमान नगसेवक असल्याने जागा वाटपात मनसेला हा प्रभाग सोडणे शक्य नाही, त्याऐवजी मनसेला प्रभाग २०९ सोडला जाण्याची शक्यता आहे. पण युती न झाल्यास मनसेला सहा पैंकी चार ते पाच जागांवर उमेदवार उभा करता येईल.लोकसभेतील भायखळा विधानसभेतील मतदानअरविंद सावंत(उबाठा) : ८६,८८३यामिनी जाधव(शिवसेना) : ४०,८१४भायखळा विधानसभा निकालमनोज जामसूतकर (उबाठा) : ८०,१३३यामिनी जाधव (शिवसेना) : ४८,७७२प्रभाग २०७ (खुला प्रवर्ग)या प्रभागातून भाजपाच्या लोखंडे या प्रथमच निवडून आल्य होत्या. परंतु आता प्रभाग सर्वसाधारण खुला झाल्याने रोहिदास लोखंड यांच्यासाठी हा प्रभाग अनुकूल झाला आहे. त्यामुळे या प्रभागावर भाजपाची दावेदारी असल्याने भाजपाचे रोहिदास लोखंडे यांच्यासह युवा मोर्चाचे कमलेश डोके यांचेही नाव इच्छुकांच्या यादीत आहे. तर उबाठाकडून काका चव्हाण तर अभासेकडून योगिता गवळी यांची नावे चर्चेत आहेत. तर काँग्रेसकडून समीर चव्हाण यांचेही नाव चर्चेत आहे.प्रभाग २०८ (ओबीसी)हा प्रभाग आधी खुला होता, पण आता ओबीसी झाल्याने विद्यमान उबाठाचे नगरसेवक रमाकांत रहाटे हे सेफ झोनमध्ये आहेत. रहाटे ओबीसी असल्याने उबाठाकडून त्यांची उमेदवारी निश्चित मानली जातअसली तरी अॅड मंगेश बनसोड यांचेही नाव चर्चेत आहे. तर या प्रभागातून शिवसेनेचे विजय लिपारे तर भाजपाकडून विजय बनकर आणि मनसेकडून किरण टाकळे, अमोल लोगे यांची नावे इच्छुकांच्या यादीत आहेत. परंतु युती न झाल्यास हा प्रभाग उबाठाला आणि महायुतील शिवसेनेला सोडला जावू शकतो. त्यामुळे या प्रभागात उबाठा आणि शिवसेना थेट लढत होईल.प्रभाग २०९ (महिला)हा प्रभाग खुला असला तरी आगामी निवडणुकीत तो महिला राखीव झाल्याने विद्यमान नगरसेवक आणि शिवसेनेचे महापालिका स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांना दुसऱ्या प्रभागाचा शोध घेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शिवसेनेच्यावतीने या प्रभागात माजी आमदार यामिनी जाधव यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तर उबाठाकडून शाखाप्रमुख लिंगाप्पा यांची पत्नीला निवडणूक रिंगणात उतरवले जाण्याची शक्यता आहे. तर मनसेला हा प्रभाग सोडल्यास माजी नगरसेविका समिता नाईक यांना या प्रभागात उतरावे लागणार आहे अशी चर्चा आहे.प्रभाग क्रमांक २१० (खुला )हा प्रभाग यापूर्वी अनुसूचित जातीकरता महिला करता आरक्षित होता. त्यामुळे काँग्रेसच्या तिकीटावर लढलेल्या परंतु आता उबाठामध्ये असलेल्या सोनम मनोज जामसूतकर या नगरसेविका आहेत. त्यामुळे उबाठाकडून सोनम जामसूतकर यांच्या नावाची चर्चा असली तरी प्रभाग खुला झाल्याने माजी नगरसेवक राम सावंत हेही इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. तसेच शिवसेनेच्यावतीने संतोष राणे यांच्या नावाची चर्चा आहे.प्रभाग क्रमांक २११(खुला)हा प्रभाग ओबीसी होता, पण आता खुला प्रवर्गकरता राखीव झाला आहे. याठिकाणी समाजवादी पक्षाचे रईस शेख हे नगरसेवक होते.परंतु ते आमदार बनल्याने या या प्रभागात समाजवादी पक्षाकडून मोठी यादी आहे.ज्यात नदीम सिद्दीकी, आलाद युसुफ अब्राहनी आणि फैय्याज अहमद यांच्या नावाची चर्चा आहे. काँग्रेसकडून जावेद जुनेजा आणि उबाठाकडून पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. तर शिवसेनेच्यावतीने यशवंत जाधव हेही या प्रभागासाठी प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे.प्रभाग क्रमांक २१२(महिला)हा प्रभाग महिला राखीव होता, पुन्हा एकदा तो महिला राखीव झाला आहे. त्यामुळे अभासेच्या गीता गवळी या सुरक्षित क्षेत्रात आहे. काँग्रेसकडून पुन्हा नाझिया मोहम्मद आशफाक सिद्दीकी आणि शिवसेना उबाठाच्या शाखाध्यक्षा सोनल सायगावकर यांच्या नावाची चर्चा आहे,मात्र गीता गवळी यांचे सातत्यपूर्ण कामामुळे या विभागात दोन्ही पक्षाची झलक दिसून येत नाही, त्यात महिला आरक्षित झाल्या या दोन्ही पक्षांची मोठी अडचण झाल्याचे दिसून येत आहे.

फीड फीडबर्नर 22 Nov 2025 12:10 pm

“हिंदू राहिला नाही, तर जगही राहणार नाही, जग टिकवून ठेवण्यासाठी…”मोहन भागवत यांचे विधान

Mohan Bhagwat | मणिपूर भेटीदरम्यान एका सभेला संबोधित करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रमुख मोहन भागवत यांनी हिंदूंशिवाय जगाचे अस्तित्व संपून जाईल, असे मत व्यक्त केले आहे. हिंदू राहिला नाही तर जग राहणार नाही, हिंदू समाज जग चालवण्यात अत्यंत महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच यूनान (ग्रीक), मिस्र (इजिप्त) आणि रोम यासारखी साम्राज्य नष्ट झाली पण […] The post “हिंदू राहिला नाही, तर जगही राहणार नाही, जग टिकवून ठेवण्यासाठी…” मोहन भागवत यांचे विधान appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Nov 2025 12:04 pm

“डोळ्यांवर चष्मा हातात बॅग…”; रेखाच्या हटके लूकवर चाहते झाले फिदा! व्हिडीओ पाहा…

Rekha video : बॉलीवूडची एव्हरग्रीन अभिनेत्री म्हणून रेखाला ओळखले जाते. वयाच्या ७१ व्या वर्षात पदार्पणातही रेखा विविध कार्यक्रमांना हजेरी लावत असते. तिच्या अभिनयाबरोबरच तिच्या सौंदर्यांचे देखील नेहमी कौतुक होते. अनेकदा चाहत्यांनी तिला साडीतल्या लूकमध्येच पाहिले आहे. पण सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला असून, या व्हिडीओत अभिनेत्रीचा हटके लूक पाहून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. […] The post “डोळ्यांवर चष्मा हातात बॅग…”; रेखाच्या हटके लूकवर चाहते झाले फिदा! व्हिडीओ पाहा… appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Nov 2025 11:59 am

“धनंजय मुंडे स्टार प्रचारक म्हणून मतदारसंघात आले तर..”; राष्ट्रवादीच्या आमदाराला वेगळीच शंका, थेट अजितदादांना निरोप

Prakash Solanki : बीडमधील माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी ‘स्टार प्रचारक’ म्हणून आमदार धनंजय मुंडे यांना माझ्या मतदारसंघात पाठवू नका’, असा थेट निरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठवला आहे. त्यांनी केलेल्या मागणीमुळेआता विविध प्रकाराच्या चर्चांना उधाण आले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणुकीच्या अनुषंगाने स्टार प्रचारकांची नियुक्ती […] The post “धनंजय मुंडे स्टार प्रचारक म्हणून मतदारसंघात आले तर..”; राष्ट्रवादीच्या आमदाराला वेगळीच शंका, थेट अजितदादांना निरोप appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Nov 2025 11:34 am

parineeti chopra: लाडक्या मावशीचं प्रेम! परिणीतीच्या बाळासाठी प्रियांका चोप्राकडून खास भेट; फोटो झाले व्हायरल

parineeti chopra: अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि तिचा पती राघव चड्ढा यांनी ऑक्टोबरमध्ये पालकत्वाचा आनंद जाहीर केला होता. १९ ऑक्टोबरला परिणीतीला गोंडस मुलगा झाला आणि संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीतून शुभेच्छांचा वर्षाव झाला. परिणीतीची चुलत बहीण, ग्लोबल आयकॉन प्रियांका चोप्राने देखील त्यांना मनापासून शुभेच्छा दिल्या होत्या. आता प्रियांकाने लाडका भाचा ‘नीर’ साठी पाठवलेली खास भेटवस्तू सोशल मीडियावर व्हायरल […] The post parineeti chopra: लाडक्या मावशीचं प्रेम! परिणीतीच्या बाळासाठी प्रियांका चोप्राकडून खास भेट; फोटो झाले व्हायरल appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Nov 2025 11:32 am

कोट्यावधींच्या सायबर फसवणुकीचा दिल्ली पोलिसांकडून पर्दाफाश; गुन्हेगारीचे मुळ उद्ध्वस्त करणाच्या हेतूने कारवाई

मुंबई : दिल्ली पोलिसांनी गेल्या ४८ तासांत मोठ्या प्रमाणावर सायबर गुन्हेगारीविरोधात मोहीम राबवत शेकडो फसवणूक रॅकेट्सचा पर्दाफाश केला आहे. ‘ऑपरेशन सायहॉक’ असे नाव असलेल्या या कारवाईत तब्बल ४,४६७ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून तांत्रिक पुरावे आणि विश्लेषणाच्या आधारावर ८७७ जणांना अटक करण्यात आली.ही कारवाई केंद्रीय गृहमंत्रालयाच्या भारतीय सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटरच्या समन्वयाने पार पडली. नवी दिल्ली परिसरात चालणारे सायबर फसवणूक रॅकेट्स, म्यूल अकाउंट्स, रोख रक्कम काढणारे एजंट आणि बेकायदा कॉल सेंटर्स यांच्यावर ही धडक मोहीम लक्ष्यित करण्यात आली होती. गुन्हा घडल्यानंतरच्या प्रतिक्रियेऐवजी, गुन्हेगारीचे मूळ उद्ध्वस्त करण्यासाठी ही महत्वाची प्रक्रीया असल्याचे पोलिसांनी सांगितले.या तपासणीदरम्यान १,००० कोटींहून अधिक रकमेचे संशयास्पद आर्थिक व्यवहार उघड झाले. हे व्यवहार दिल्लीतील संघटित सायबर सिंडिकेट्सकडून चालवल्या जाणाऱ्या म्यूल अकाउंट्समधून फिरवल्याचा संशय असल्याची माहिती संयुक्त पोलीस आयुक्त (इंटेलिजन्स फ्युजन अँड स्ट्रॅटेजिक ऑपरेशन्स) रजनीश गुप्ता यांनी दिली.दोन दिवस चाललेल्या या मोहिमेत ३६० नवीन गुन्हे दाखल झाले. नोकरीच्या आमिषाने फसवणूक, गुंतवणूक घोटाळे, ग्राहकसेवा प्रतिनिधींचे खोटे रूप धारण करणे, टेक-सपोर्ट फसवणूक अशा विविध प्रकारच्या गुन्ह्यांत वापरली जाणारी अनेक बेकायदा कॉल सेंटर उद्ध्वस्त करण्यात आली आहेत. दरम्यान मोबाइल फोन, लॅपटॉप, हार्ड ड्राइव्ह, सिम कार्डस्, आर्थिक नोंदी आणि डिजिटल पुरावे असे मोठ्या प्रमाणात साहित्य पोलिसांनी जप्त केले असून पुढील तपास सुरू आहे.

फीड फीडबर्नर 22 Nov 2025 11:30 am

लॉजिस्टिक्स आणि स्थानिक वितरण सेवांवर जीएसटी आकारणीतील स्पष्टतेसाठी फर्स्ट इंडियाचे अर्थ मंत्रालयाला आवाहन

मुंबई: भारतातील ई-कॉमर्स आणि रिटेल लॉजिस्टिक्स क्षेत्राला वाहतूक सेवांबाबतच्या अलीकडील जीएसटी सुधारणांमुळे अनिश्चिततेचा सामना करावा लागत आहे ज्यामुळे तातडीने उद्योग हस्तक्षेप करावा लागत आहे. ३०० हून अधिक ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म, लॉजिस्टिक्स स्टार्टअप्स आणि डिजिटल मार्केटप्लेसचे प्रतिनिधित्व करणाऱ्या फोरम फॉर इंटरनेट रिटेलर्स, सेलर्स अँड ट्रेडर्स (फर्स्ट इंडिया) ने केंद्रीय अर्थ मंत्रालयाशी संपर्क साधून गुड्स ट्रान्सपोर्ट एजन्सी (GTA) सेवा आणि स्थानिक वितरण ऑपरेशन्सवरील जीएसटी परिणामांबद्दल त्वरित स्पष्टीकरण मागितले आहे.अलीकडील बदलांमुळे (सूचना क्रमांक १७/२०२५ केंद्रीय कर, दिनांक १७ सप्टेंबर २०२५) स्थानिक वितरण आणि जीटीए सेवांमध्ये संदिग्धता निर्माण झाली आहे. सीजीएसटी कायद्याच्या कलम ९(५) अंतर्गत नवीन तरतुदीनुसार ई-कॉमर्स ऑपरेटरना स्थानिक वितरण सेवांवर १८% जीएसटी भरावा लागेल, सेवा प्रदाते कलम २२(१) अंतर्गत नोंदणीकृत नसतानाही असे या क्षेत्रातील तज्ज्ञांनी म्हटले आहे. तथापि, स्थानिक वितरण म्हणजे काय याची स्पष्ट व्याख्या नसल्यामुळे, एमएसएमई कमी अंतराच्या किंवा शहरांतर्गत वाहतूक सेवांचे वर्गीकरण करण्यास संघर्ष करत आहेत.५६ व्या जीएसटी कौन्सिल बैठकीनंतर झालेल्या सुधारणांचा उद्देश वाहतूक सेवा कर आकारणी सुलभ करणे होता, त्यानंतरच्या अधिसूचनांमुळे इकोसिस्टम सहभागींमध्ये अनवधानाने मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. विशेष चिंतेची बाब म्हणजे ई-कॉमर्स ऑपरेटर, लॉजिस्टिक्स सेवा प्रदाते आणि भारताच्या डिजिटल रिटेल पायाभूत सुविधांचा कणा असलेल्या हजारो एमएसएमई विक्रेत्यांवर होणारा परिणाम असेल असे क्षेत्रातील जाणते म्हणत आहेत.संस्थेने म्हटल्याप्रमाणे, स्पष्टतेच्या या अभावामुळे लॉजिस्टिक्स मूल्य साखळीत ऑपरेशनल आणि अनुपालन (Regulatory) आव्हाने निर्माण झाली आहेत. कर भरण्याची प्राथमिक जबाबदारी कोणाची आहे हे व्यवसायांना स्पष्ट नाही ईकॉमर्स प्लॅटफॉर्म, लॉजिस्टिक्स भागीदार किंवा विक्रेता, आणि कागदपत्रे आणि इनव्हॉइसिंगमध्ये विसंगतींना तोंड द्यावे लागते. दुहेरी कर आकारणीचा धोका मोठा आहे, विशेषतः अशा प्रकरणांमध्ये जिथे शिपमेंटमध्ये आंतरराज्यीय आणि स्थानिक हालचालींचा समावेश असतो, ज्या वेगवेगळ्या सेवा प्रदात्यांद्वारे हाताळल्या जातात. लहान लॉजिस्टिक्स सेवा प्रदाते मोठ्या ई-कॉमर्स खेळाडूंच्या वेगवेगळ्या मॉडेलशी झुंजत आहेत. अर्थ लावण्यात विसंगतींमुळे प्रमुख ई-कॉमर्स कंपन्यांमध्ये वेगवेगळे दृष्टिकोन निर्माण झाले आहेत, ज्यामध्ये फ्लिपकार्टने GTA सूट देण्याचा दावा केला आहे तर मिशो सारख्या इतर महत्त्वाच्या प्लॅटफॉर्मना हा फायदा मिळत नाही, कारण त्यांना वाटते की ते सूट श्रेणी अंतर्गत पात्र नाहीत.FIRST इंडियाच्या महासंचालक सुषमा मोर्थनिया म्हणाल्या आहेत की,'जीएसटी कौन्सिलने अनुपालन सुलभ करण्यासाठी आणि त्रुटी दूर करण्यासाठी घेतलेले पाऊल चांगले आहे, परंतु ‘स्थानिक वितरण सेवा’ म्हणून काय पात्र आहे याबद्दल ऑपरेशनल स्पष्टतेच्या अभावामुळे व्यापक गोंधळ निर्माण झाला आहे. ई-कॉमर्स लॉजिस्टिक्स ही भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेत MSME सहभागाचा कणा आहे. वेळेवर स्पष्टीकरण दिल्यास एकसमान अनुपालन सुनिश्चित करण्यास, लहान विक्रेत्यांना अनपेक्षित कराच्या भारांपासून संरक्षण करण्यास आणि हजारो लॉजिस्टिक्स भागीदार आणि डिजिटल किरकोळ विक्रेत्यांसाठी व्यवसाय सातत्य राखण्यास मदत होईल.'या संदर्भात, FIRST इंडियाने मंत्रालयाकडून खालील बाबींवर स्पष्टीकरण मागितले आहे-स्थानिक वितरण सेवाची भौगोलिक आणि ऑपरेशनल व्याख्या आणि GTA आणि कुरिअर सेवांपासून त्याचे वेगळेपण -ग्राहकांना थेट वस्तू वितरित केल्यावर (अधिसूचना क्रमांक १२/२०१७) अंतर्गत GTA सेवांसाठी विद्यमान B2C सूट लागू -ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मद्वारे सुविधा दिलेल्या राज्यांतर्गत GTA सेवांचा व्यवहार; आणि कॅश-ऑन-डिलिव्हरी हाताळणी किंवा डिलिव्हरी पॉइंट्सवर उत्पादन पडताळणी यासारख्या सहाय्यक सेवा GTA सेवांचा भाग म्हणून मानल्या पाहिजेत की स्वतंत्रपणे करपात्र व्यवहार म्हणून मानल्या पाहिजेत यावर FIRST इंडिया भर देते अनुपालन आणि निष्पक्ष स्पर्धा सुनिश्चित करण्यासाठी मंत्रालयाकडून निश्चित स्पष्टीकरण महत्त्वाचे आहे यावर संघटना भर देते असे संघटनेने म्हटले आहे. संघटनेचा दावा आहे की, GTA सूट मागण्याचा फ्लिपकार्टचा दृष्टिकोन किंवा मीशो सारख्या इतर प्रमुख खेळाडूंनी घेतलेली भूमिका योग्य आहे की नाही याबद्दल स्पष्ट मार्गदर्शन अमूल्य असेल यावर संघटना भर देते. अशा स्पष्टतेमुळे FIRST इंडियाच्या सदस्यांना कायद्याच्या खऱ्या भावनेनुसार देशाची सेवा करण्यास सक्षम केले जाईल, चांगल्या हेतूने केलेल्या नियमांचे कोणतेही संभाव्य चुकीचे अर्थ लावणे टाळले जाईल. हे केवळ समान क्षेत्र वाढवेल असे नाही तर सुधारित जीएसटी तरतुदींच्या अस्पष्ट अर्थ लावण्यामुळे व्यवसायांना अनवधानाने होणारे पालन टाळण्यास देखील मदत करेल असे संस्थेने आपल्या निवेदनात म्हटले आहे.FIRST इंडिया नक्की काय करते?FIRST इंडियाची कार्यवाही रणनीती गुंतवणूक, अहवाल देणे आणि संवाद साधण्यावर आधारित आहे. त्याच्या सदस्यांसह, ते क्षेत्राच्या विकासात अडथळा आणणाऱ्या अडथळ्यांचे मुद्दे आणि पुरावे गोळा करते आणि त्यांना प्राधान्यक्रमांमध्ये रूपांतरित करते. इतर संबंधित भागधारकांशी सहकार्य करून आणि त्यांच्या सदस्यांच्या कौशल्याचा वापर करून, FIRST India भारतीय रिटेल आणि ई-कॉमर्स उद्योगाच्या वाढीला चालना देण्यासाठी कायदेकर्त्यांसमोर कार्यक्षम उपाय प्रस्तावित करते आणि त्यांची भूमिका विकसित करते. FIRST India डिजिटल कॉमर्समधील उर्वरित अडथळे जलदगतीने दूर करण्यासाठी सर्व भारतीय भागधारकांसोबत एकत्र काम करते. दरम्यान व्यापार आणि वाणिज्य बाजारपेठेतील समस्या ओळखणे तसेच प्रगती मोजणे हे त्याचे कर्तव्य आहे असे त्यांनी आपल्या अहवालात म्हटले आहे.

फीड फीडबर्नर 22 Nov 2025 11:10 am

कसोटी सामन्यानंतर लगेचच भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका टी-20 मालिका! दक्षिण आफ्रिकेच्या संघात होणार अनेक खेळाडूंचे पुनरागमन

मुंबई: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या दुसऱ्या कसोटी सामन्याला आजपासून गुवाहाटीमध्ये सुरूवात होणार आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर दोन्ही संघांमध्ये तीन एकदिवसीय आणि पाच टी-20 सामन्यांची मालिका होणार आहे. कसोटी मालिकेत दक्षिण आफ्रिका सध्या १-० ने आघाडीवर आहे. तर ३० नोव्हेंबरपासून दोन्ही संघांमध्ये एकदिवसीय सामनांची मालिका खेळवली जाणार आहे. या एकदिवसीय मालिका आणि त्यानंतर होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेच्या टीमची घोषणा करण्यात आली आहे.एकदिवसीय मालिकेत वेगवान गोलंदाज म्हणून ओळख असलेला कागिसो रबाडा खेळणार नाही. कारण कसोटी मालिकेपूर्वी सराव करताना रबाडाला दुखापत झाल्यामुळे तो दक्षिण आफ्रिकेला परतला आहे. तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर यष्टीरक्षक क्विंटन डिकॉकचे दक्षिण आफ्रिकेच्या संघात पुनरागमन झाले आहे. नुकत्याच पाकिस्तानविरुद्ध झालेल्या एकदिवसीय मालिकेमध्ये डिकॉकने उत्कृष्ट कामगिरी केली होती.पाकिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत दक्षिण आफ्रिकेकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या लुहान डि प्रिटोरियसला भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी संघात स्थान देण्यात आले नाही. तर एडन मार्करमचे टी-20 संघात पुनरागमन झाले आहे. डोनोवन फरेराऐवजी मार्करम संघाचे नेतृत् करणार आहे. तर पाकिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत न खेळलेला केशव महाराज भारताविरुद्ध वनडे खेळणार आहे. मागच्या वर्षी भारताविरुद्ध टी-20 विश्वचषकचा अंतिम सामना खेळल्यानंतर एकही आंतरराष्ट्रीय सामना न खेळलेला वेगवान गोलंदाज एनरिक नॉर्कियाचे सुद्धा टी-20 संघात पुनरागमन झाले आहे.https://prahaar.in/2025/11/22/only-129-objections-were-received-on-municipal-election-ward-reservation/दक्षिण आफ्रिकेची एकदिवसीय मालिकेसाठी खेळाडूटेम्बा बऊमा (कर्णधार), ओटिनिल बार्टमन, मॅथ्यू ब्रीट्जके, डेवाल्ड ब्रेविस, नांद्रे बर्गर, क्विंटन डिकॉक, टोनी डि जॉर्जी, रुबिन हरमन, मार्को यानसन, केशव महाराज, एडन मार्करम, लुंगी एनगिडी, रियान रिकलटन, प्रेनेलन सुब्रायनदक्षिण आफ्रिकेचा टी-20 संघएडन मार्करम (कर्णधार), ओटिनिल बार्टमन, कॉर्बिन बॉश, डेवाल्ड ब्रेविस, क्विंटन डिकॉक, टोनी डी जॉर्जी, डोनोवन फरेरा, रिझा हेन्ड्रिक्स, मार्को यानसन, जॉर्ज लिंडे, केशव महाराज, क्वेना मफाका, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, एनरिक नॉर्किया, ट्रिस्टन स्टब्स

फीड फीडबर्नर 22 Nov 2025 11:10 am

“भाजपमध्ये निवडणूक लढण्यासाठी…”; माजी खासदाराच्या विधानाने खळबळ

BJP MP Madhukar Kukde : नगरपरिषदा आणि नगरपंचातीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हालचालींना वेग आहे. काल उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा अंतिम दिवस होता, या दिवशी अनेकांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतले आहेत. अशातच भंडारा जिल्ह्यातील एक मोठी बातमी समोर आली आहे. भंडाऱ्यातील नगरपरिषद निवडणुकीसाठी ऐनवेळी पक्षाने पुतण्याचे तिकीट कापल्याने काकाने आपल्याच पक्षाला घराचा आहेर दिला असून, भाजपला […] The post “भाजपमध्ये निवडणूक लढण्यासाठी…”; माजी खासदाराच्या विधानाने खळबळ appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Nov 2025 10:57 am

farah khan: चित्रपटांपेक्षाही यूट्यूबवरून जास्त कमाई करते फराह खान? स्वतःच केला मोठा खुलासा!

farah khan: बॉलीवूडची लोकप्रिय दिग्दर्शिका फराह खान आता चित्रपटांपेक्षा सोशल मीडियावर जास्त चर्चेत असते. २०२४ मध्ये तिने सुरू केलेल्या यूट्यूब चॅनेलमुळे ती फॅन्समध्ये प्रचंड लोकप्रिय झाली आहे. सेलिब्रिटी मुलाखती, कुकिंग व्लॉग्स, आणि तिच्या मदतनीस दिलीपसोबतचे मजेदार व्हिडीओ यामुळे फराहचं चॅनेल सतत ट्रेंडमध्ये असतं. यूट्यूब चॅनेल का सुरू केलं? फराह सांगते की, “नवीन चित्रपटाचं शूट एक […] The post farah khan: चित्रपटांपेक्षाही यूट्यूबवरून जास्त कमाई करते फराह खान? स्वतःच केला मोठा खुलासा! appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Nov 2025 10:48 am

स्पॉटलाइट: राज शमानीचा आवाज, नावाचा करता येणार नाही वापर:पर्सनॅलिटी राइट्स म्हणजे काय? ऐश्वर्या राय, सुधीर चौधरी यांनीही दाखल केला होता खटला

राज शमानी हे भारतातील पहिले डिजिटल कंटेंट क्रिएटर बनले आहेत ज्यांनी न्यायालयात वैयक्तिक हक्कांचा खटला दाखल केला आणि जिंकला. वैयक्तिक हक्क म्हणजे काय? त्यांनी हा खटला का दाखल केला? आता त्यांच्याबद्दल कोणतेही मीम्स बनवता येत नाहीत का? अधिक माहितीसाठी, व्हिडिओ पाहण्यासाठी वरील प्रतिमेवर क्लिक करा.

दिव्यमराठी भास्कर 22 Nov 2025 10:33 am

महापालिका निवडणूक प्रभाग आरक्षणावर आल्या फक्त १२९ हरकती सूचना

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेची सार्वत्रिक निवडणुकी करता प्रभाग आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली होती. यासाठी १४ ते २० नोव्हेंबर या कालावधीत हरकती - सूचना मागविल्या होत्या. त्यानुसार, २० नोव्हेंबर रोजी शेवटच्या दिवसापर्यंत सर्व प्रशासकीय विभागातून १२९ हरकती - सूचना दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५ करता मागील ११ नोव्हेंबर रोजी २२७ पैकी एसटी, एससी, ओबीसी, महिला वर्ग तसेच खुला प्रवर्ग याकरता आरक्षण सोडत काढण्यात आली. मुंबई महापालिकेच्या २२७ जागांपैकी आरक्षित जागांसाठी ११ नोव्हेंबर रोजी वांद्रे येथील बालगंधर्व रंगमंदिरात सोडत काढण्यात आली होती. त्यामध्ये, २२७ जागांमधून एसटी - २ , एससी - १५ , ओबीसी - ६१ , महिलांसाठी ११४ जागांसाठी काढण्यात आलेली सोडत जाहीर करण्यात आली होती.https://prahaar.in/2025/11/22/municipal-corporations-lottery-for-426-houses-postponed-date-to-be-announced-next-week/त्यामुळे विविध राजकीय पक्षांच्या दिग्गजांना धक्का बसला. अनेकांचे प्रभाग महिला आरक्षित तसेच ओबीसी झाल्याने अनेकांना घरी बसणे नाहीतर आसपासच्या प्रभागाचा शोध घेण्याची वेळ आली. या आरक्षण सोडतीबाबत निवडणूक विभागाने १४ ते २० नोव्हेंबर या कालावधीत हरकती - सूचना मागविल्या होत्या. त्यानुसार, २० नोव्हेंबर रोजी शेवटच्या दिवसापर्यंत विविध विभागातून १२९ हरकती - सूचना दाखल झाल्या झाल्याची माहिती मिळत आहे.यावर महापालिका आयुक्त भूषण गगराणी हे २१ ते २७ नोव्हेंबर या कालावधीत सदर हरकती आणि सूचना यांवर योग्य तो निर्णय घेतील. त्यानंतर २८ नोव्हेंबर रोजी अंतिम आरक्षण विहित नमुन्यात शासन राजपत्रात प्रसिध्द करण्यात येणार आहे.

फीड फीडबर्नर 22 Nov 2025 10:30 am

रायगडमध्ये निवडणूक रिंगणात वारसदारांचीच चलती

राजकीय गड सांभाळण्यासाठी राजकारणात लेकी-सुनांचा सहभागसुभाष म्हात्रे अलिबाग : रायगड जिल्ह्यात दहा नगरपालिकांच्या रिंगणात दोन लेकी, दोन सुना आपल्या कुटुंबाचा राजकीय वारसा सांभाळण्यासाठी रिंगणात उतरल्या आहेत. यामध्ये अलिबागमधून माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांची कन्या अक्षया नाईक, मुरुडला माजी नगराध्यक्ष मंगेश दांडेकरांची कन्या आराधना नाईक, पेणमध्ये आमदार रवींद्र पाटील यांची सून प्रीतम पाटील आणि कर्जतला माजी आमदार सुरेश लाड यांची सून डॉ. स्वाती पाटील निवडणुकीत उतरल्या आहेत.अलिबाग नगरपालिकेत शेकाप, काँग्रेस आघाडीतर्फे अक्षया प्रशांत नाईक या प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आहेत. अक्षया नाईक या माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, माजी नगराध्यक्षा स्व. नमिता नाईक यांच्या कन्या आहेत, तर माजी नगराध्यक्षा सुनीता नाईक यांची नात आहे. नाईक घराण्याचे अलिबाग नगरपालिकेवर नेहमीच प्राबल्य राहिलेले आहे. त्यामुळे नाईक परिवाराच्या वारसदार म्हणूनच अक्षया यांच्याकडे पाहिले जाते. शिवाय राजिपच्या माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील यांच्या त्या भाची आहेत. पाटील, नाईक परिवाराचा राजकीय वारसा त्यांना लाभलेला आहे. शेकापचे पाठबळ आणि काँग्रेसची साथ त्यांना मिळणार आहे. त्यांच्या विरोधात शिवसेना, भाजपतर्फे तनुजा पेरेकर या उभ्या आहेत. यापूर्वी त्या शिवसेनेतर्फे नगरसेविका म्हणून विजयी झालेल्या आहेत. तिसऱ्या अपक्ष उमेदवार कविता ठाकूर यांनीही अर्ज दाखल केलेला आहे. अलीकडेच त्यांनी आणि प्रवीण ठाकूर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. माजी आमदार मधूशेठ ठाकूर यांचा राजकीय वारसा त्यांनाही लाभला आहे. यापूर्वीही त्यांनी नगरसेविका म्हणून काम पाहिलेले आहे.मुरुड नगरपालिकेत माजी नगराध्यक्ष मंगेश दांडेकर यांचे प्रभुत्व राहिलेले असून, दांडेकर परिवाराचा राजकीय प्रवास काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस असा झालेला आहे. यावेळी मुरुडचे नगराध्यक्षपद हे महिलांसाठी राखीव असल्याने हीच संधी साधत मंगेश दांडेकर यांनी आपली सुकन्या आराधना दांडेकर यांना प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात उतरवून आपल्या वारसदारासाठी राजकारणाचे दरवाजे खुले केलेले आहे. त्यांच्या विरोधात शिवसेनेतर्फे कल्पना पाटील या उभ्या आहेत. यापूर्वीही त्यांनी नगराध्यक्ष म्हणून चांगले काम केलेले आहे. त्यांनाही राजकीय पार्श्वभूमी आहे. यामुळे मुरुडला तुल्यबळ लढत अपेक्षित आहे. पेण नगरपालिकेवर गेल्या काही वर्षात आमदार रवीशेठ पाटील यांनी आपले वर्चस्व अबाधित ठेवलेले आहे. काँग्रेसमध्ये असतानाही त्यांनी आपल्या स्नुषा प्रीतम पाटील यांना नगराध्यक्षपदी विराजमान केलेले होते. आता सुद्धा भाजपतर्फे त्याच पुन्हा मैदानात उतरलेल्या आहेत. सासऱ्यांची राजकीय पुण्याई, कुटुंबाचे पाठबळ, भाजपची साथ या जोरावर त्या भविष्य अजमावित आहेत. त्यांच्या विरोधात शहर विकास आघाडीतर्फे रिया धारकर यांना उतरविण्यात आलेले आहे. रिया धारकर यांनी यापूर्वीही पेणचे नगराध्यक्षपद भूषविलेले आहे. रिया धारकर या माजीमंत्री स्व. प्रभाकर तथा आप्पासाहेब धारकर यांच्या स्नुषा आहेत. कधीकाळी रविशेठ पाटील आणि आप्पा धारकर हे परस्परांच्या विरोधात उभे ठाकलेले होते. तीच परंपरा आताही दिसून येत आहे.कर्जतमध्ये भाजपाने डॉ. स्वाती लाड यांना प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात उतरविलेले आहे. स्वाती लाड या माजी आमदार सुरेश लाड यांच्या स्नुषा आहेत. सुरेश लाड यांनी कर्जतचे दोनवेळा आमदार म्हणून प्रतिनिधीत्व केले आहे. त्यांचाही राजकीय प्रवास काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप असा झालेला आहे. सध्या ते तसे राजकीय घडामोडींपासून काहीसे अलिप्त आहेत. पण आता सुनबाईच रिंगणात उतरल्याने सासरेबुवाही प्रचारात उतरल्याचे दिसत आहेत. त्यांच्या विरोधात शिवसेनेने पुष्पा तगडे यांना उमेदवारी दिलेली आहे. विशेष म्हणजे तगडे या माजी नगरसेविका आहेत. महाड नगरपालिकेतही निवडणुकीची चुरस पाहायला मिळत आहे. येथे शिवसेना विरोधात राष्ट्रवादी, भाजप अशी युती झालेली आहे. शिवसेनेने माजी नगराध्यक्ष सुनील कविस्कर यांना उमेदवार दिली आहे, तर राष्ट्रवादीने सुरेश कळमकर यांना रिंगणात उतरविले आहे. कविस्कर हे काँग्रेस, शिवसेनेकडून नगराध्यक्ष झालेले आहेत. गेली तीन दशके ते महाडच्या राजकारणात सक्रिय आहेत. यामुळे या लढतीकडे महाडचे लक्ष लागलेले आहे.

फीड फीडबर्नर 22 Nov 2025 10:10 am

नवी मुंबईत सिडकोच्या ४ हजार ५०८ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध

नवी मुंबई : सिडकोच्या इतिहासात प्रथमच ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ तत्त्वावर ४ हजार ५०८ घरांची गृहनिर्माण योजना जाहीर करण्यात आली असून शनिवार, दि. २२ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजल्यापासून योजनेच्या ऑनलाइन अर्ज नोंदणीस सुरुवात होणार आहे. या योजनेंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गट यांकरिता नवी मुंबईतील तळोजा, द्रोणागिरी, घणसोली, खारघर आणि कळंबोली येथील सिडकोच्या गृहसंकुलांतील ४ हजार ५०८ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अर्जदारांना प्रथमच स्वत:च्या पसंतीची सदनिका निवडण्याचे स्वातंत्र्य हे या योजनेचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.या योजनेंतर्गत तळोजा, द्रोणागिरी, घणसोली, खारघर आणि कळंबोली येथील सिडकोच्या गृहसंकुलांतील उर्वरित ४ हजार ५०८ सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. एकूण ४,५०८ सदनिकांपैकी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाकरिता १,११५ तर अल्प उत्पन्न गटाकरिता ३,३९३ सदनिका उपलब्ध आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या सदनिकांकरिता प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत रु. २.५० लाख अनुदान उपलब्ध आहे.सदर योजनेतील सदनिका या तयार (रेडी टू मूव्ह) असून अर्जदारांना त्यांच्या पसंतीची सदनिका निवडण्याचे स्वातंत्र्य आहे. ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर सदनिकांची विक्री करण्यात येणार आहे. सदनिकेच्या किंमतीच्या संपूर्ण रकमेचा भरणा केल्यानंतर अर्जदारांना लगेच सदनिकेचा ताबा देण्यात येणार आहे. कागदपत्रांची तपासणी पूर्ण झाल्यानंतर पात्र अर्जदारांना त्यांच्या पसंतीची सदनिका निवडण्याची संधी मिळणार आहे. ऑनलाइन अर्ज नोंदणीकरिता cidcofcfs.cidcoindia.com हे संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. ऑनलाइन अर्ज नोंदणी दि. २२ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजल्यापासून सुरू होणार आहे. दि. २१ डिसेंबरपर्यंत नोंदणी केलेल्या पात्र अर्जदारांना दि. २८ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजल्यापासून त्यांच्या पसंतीच्या सदनिकेची निवड करता येणार आहे. उपरोक्त कालावधीमध्ये, लवकरात लवकर अर्ज करून आपल्या घराचे स्वप्न पूर्ण करावे, असे आवाहन सिडकोतर्फे करण्यात आले आहे.

फीड फीडबर्नर 22 Nov 2025 10:10 am

व्याजाचा आणि घराच्या रकमेचा परतावा न केल्यास विकासकाला तुरुंगवास

मुंबई : महारेराने एक महत्त्वपूर्ण आणि घरखरेदीदारांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार महारेराच्या वसुली आदेशानंतरही तक्रारदाराला व्याजाचा आणि घराच्या रकमेचा परतावा न करणाऱ्या विकासकाला आता थेट तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. तसेच महारारेराच्या वसुली आदेशाचे पालन न करणाऱ्या विकासकांविरोधात मालमत्ता जप्ती, बँक खाती गोठवणे यासह आता थेट तुरुंगवासाच्या शिक्षेचीही तरतूद करण्यात आली आहे. महारेराने यासंबंधीचे परिपत्रक नुकतेच प्रसिद्ध केले आहे.महारेराकडे विकासकांविरोधात मोठ्या संख्येने तक्रारी दाखल होतात. विकासकाकडून ग्राहकांची झालेली फसवणूक वा विकासकाकडून रेरा कायद्याचे झालेले उल्लंघन यासंदर्भात तक्रारींचा त्यात समावेश आहे. या तक्रारींवरील सुनावणीत रेरा कायद्याचे उल्लंघन झाल्याचे सिद्ध झाल्यास विकासकांविरोधात कारवाई करण्यात येते. त्यानुसार तक्रारदाराने मालमत्तेसाठी (घर) विकासकाकडे भरलेली रक्कम व्याजासकट परत करण्याचे आदेश दिले जातात. मात्र या आदेशाचे पालन बहुसंख्य विकासक करीत नाहीत. त्यामुळे अशा विकासकांविरोधात महारेराकडून वसुली आदेश अर्थात रिकव्हरी वॉरंट काढले जातात.या वसुली आदेशाची अंमलबजावणी त्या त्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केली जाते. त्यानुसार विकासकाची मालमत्ता जप्त करून, त्याचा लिलाव करून त्यातून येणारी निश्चित रक्कम संबंधित तक्रारदाराला देण्यात येते. पण आता मात्र महारेराच्या नवीन परिपत्रकानुसार मालमत्ता जप्ती, लिलावासह तुरुंगवासाच्या शिक्षेचेही प्रावधान असणार आहे.महारेराचा महत्वपूर्ण निर्णयकारवाई प्रक्रिया : महारेराने वसुलीचे आदेश दिल्यापासून ६० दिवसांत घराची रक्कम व्याजासह परत न केल्यास तक्रारदाराला महारेराच्या पोर्टलवर विकासकाने रक्कम परत न केल्याबद्दलची तक्रार वा अर्ज करावा लागेल. अर्ज केल्यानंतर चार आठवड्यात या प्रकरणावर महारेराकडून सुनावणी होईल. या सुनावणीदरम्यान विकासकाला रक्कम परत करण्यासाठीची संधी दिली जाईल. शेवटच्या संधीनंतरही रकमेचा परतावा न केल्यास विकासकांना शपथपत्राद्वारे आपल्या संपत्ती, बँक खात्यांची आणि गुंतवणुकीची माहिती द्यावी लागेल. शपथपत्र सादर न केल्यास संबंधित विकासकाविरोधात समन्स जारी केले जाईल. त्यानंतर त्याच्याविरोधात कारवाई केली जाईल.

फीड फीडबर्नर 22 Nov 2025 10:10 am

भारतात नवीन कामगार कायदे लागू, आत्मनिर्भर भारताच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल! काय होणार लाभ, जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली: केंद्रीय श्रममंत्री मनसूख मांडवीय यांनी देशात चार नवीन कामगार कायदे लागू करत असल्याची मोठी घोषणा केली आहे. या चार संहितांमध्ये द कोड ऑन वेजेस २०१९, द इंडस्ट्रीयल रिलेशन्स कोड २०२०, द कोड ऑन सोशल सिक्युरिटी २०२० आणि द ऑक्युपेशनल सेफ्टी, हेल्थ अँड वर्किंग कंडिशन्स कोड २०२० यांचा समावेश आहे. सध्या कामगारांसाठी अस्तित्वात असलेल्या २९ कायद्यांमधील सुधारणांच्या पार्श्वभूमीवर या संहितांमध्ये बदल करत नवीन कायदा लागू करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री मनसूख मांडवीय यांनी आपल्या ट्विटर खात्यावर याबद्दल पोस्ट करत माहिती दिली आहे.नवीन कामगार कायद्यांनुसार मिळणारा लाभ- सर्व कामगारांना वेळेवर किमान वेतनाची हमी मिळणार आहे- युवकांना नियुक्ती पत्र मिळण्याची हमी मिळेल

फीड फीडबर्नर 22 Nov 2025 10:10 am

डहाणूत थेट, तर तीन ठिकाणी तिरंगी लढत

महायुतीचे उमेदवार आले आमने-सामनेगणेश पाटील पालघर/ वाडा : उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर जिल्ह्यातील नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदांच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. डहाणू नगर परिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी दोन उमेदवारांमध्ये थेट लढत होत आहे. तर पालघर, जव्हार आणि वाडा येथे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांची संख्या जास्त असली तरी ,या ठिकाणी तिरंगी लढत होणार असल्याची चिन्हे दिसून येत आहेत. या निवडणुकीत प्रामुख्याने भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांचे उमेदवार एकमेकांविरुद्ध निवडणूक रिंगणात आहेत. डहाणू येथे भाजपच्या उमेदवाराविरुद्ध शिवसेना शिंदे गट आणि महाविकास आघाडीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी एकत्र मुठ्ठ बांधली आहे.जिल्ह्यात होणाऱ्या तीन नगरपरिषद आणि एका नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया शुक्रवारी पूर्ण करण्यात आली आहे. पालघर, वाडा आणि डहाणू येथे नगराध्यक्ष पदाच्या काही उमेदवारांचे अर्ज मागे घेण्यात राजकीय पक्षाच्या नेत्यांना यश आले आहे. जव्हार येथे मात्र नगराध्यक्षपदाचा एकही उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आलेला नाही.पालघर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजप, शिवसेना शिंदे गट शिवसेना उभाठा गटाच्या तीन उमेदवारांमध्ये प्रामुख्याने तिरंगी लढत होणार असल्याचे चित्र आहे. माजी नगराध्यक्षांचे पती केदार काळे यांचा आणि प्रशांत पाटील यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यात नेतेमंडळींना यश आले आहे. येथील नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपकडून कैलास म्हात्रे, शिवसेना शिंदे गट उत्तम घरत आणि शिवसेना उभाठा गटाकडून उत्तम पिंपळे निवडणूक रिंगणात आहेत. काँग्रेसकडून प्रीतम राऊत यांची उमेदवारी कायम असल्याने महायुतीप्रमाणेच महाविकास आघाडीमध्ये सुद्धा या ठिकाणी फूट दिसून आली आहे.राहुल ठाकरे आणि जावेद लुलानिया हे देखील नगराध्यक्ष पदाच्या निवडणूक रिंगणात आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी नगरसेवक पदाच्या तब्बल १९ उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. पालघर मधील प्रभाग क्रमांक पाच आणि प्रभाग क्रमांक आठ मध्ये प्रत्येक तीन उमेदवार निवडणूक लढवित असून, इतर प्रभागांमध्ये मात्र एका जागेसाठी चार किंवा त्यापेक्षा अधिक उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.डहाणूत नगराध्यक्ष पदासह प्रभागांमध्येही सरळ लढतीडहाणू नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भरत सिंह राजपूत यांच्याविरुद्ध शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राजेंद्र माछी यांना महाविकास आघाडीच्या सर्वच पक्षांनी पाठिंबा दिला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी संजय पाटील आणि हाफिजूर रहमान खान यांचे उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले आहेत. त्यामुळे या ठिकाणी भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांमध्ये नगराध्यक्ष पदासाठी थेट लढत होत आहे. विशेष बाब म्हणजे डहाणू येथील प्रभाग क्रमांक दोन, तीन, पाच, सात, अकरा आणि बारा या प्रभागांमध्ये नगरसेवक पदाच्या उमेदवारांमध्ये सुद्धा थेट लढत होणार आहे. इतर प्रभागांमध्ये सुद्धा एका जागेसाठी तीन किंवा चार यापेक्षा जास्त उमेदवार निवडणूक लढवत नसल्याचे चित्र या ठिकाणी आहे.वाड्यात नगरसेवक पदाच्या ७ अपक्ष उमेदवारांचा अर्ज मागेवाड्यात उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रिद्धी भोईर व रंजिता पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. तर नगरसेवक पदाच्या ७ अपक्ष उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली. वाडा नगरपंचायतीची निवडणूक येत्या २ डिसेंबर रोजी होत आहे. या निवडणूकीसाठी नगराध्यक्ष पदासाठी ७ वैध उमेदवारी अर्ज दाखल होते. त्यापैकी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या उमेदवार रिध्दी भोईर व रंजिता पाटील तसेच अपक्ष उमेदवार ज्योती आघाव या तिघींनी अर्ज मागे घेतल्याने आता नगराध्यक्ष पदाकरिता ४ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. तर १७ प्रभागांमध्ये नगरसेवक पदाकरिता ७४ वैध उमेदवारी अर्ज होते. त्यापैकी प्रभाग क्रमांक २ मधून सुनिता जाधव, प्रभाग क्रमांक ९ जोया शेख, प्रभाग क्रमांक १० मधून रोहन पाटील, प्रभाग क्रमांक १२ कुणाल साळवी, प्रभाग क्रमांक १३ अजहर शेख, प्रभाग क्रमांक १५ मधून ज्योती आघाव, प्रभाग क्रमांक १६ विराज पाटील यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे १७ प्रभागात ६७ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात राहिले आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आपले बळ कोणाच्या पाठीशी उभे करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.जव्हारमध्ये नगराध्यक्ष पदासाठी पाच उमेदवारजव्हार नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी पाच उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. रेखा दोडे, नुरी पठाण यांच्यासह,भाजपकडून पूजा उदावंत, शिवसेना शिंदे गटाकडून पद्मा राजपूत, राष्ट्रवादी शरद पवार यांच्याकडून रश्मीमन मणियार या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत आपले नशीब आजमावत आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी या ठिकाणी पाच उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. प्रभाग क्रमांक ६ मधील ब जागेसाठी ३ उमेदवारांनी माघार घेतल्याने या ठिकाणी आता चार उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. प्रभाग ९ मधील ब जागेसाठी एका उमेदवाराने उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने या ठिकाणी पाच तर प्रभाग क्रमांक दहा अ मधील एका उमेदवाराने माघार घेतली. २० जागांसाठी एकूण ७४ उमेदवार या निवडणुकीत उभे होते. त्यापैकी पाच उमेदवारांनी माघार घेतल्याने आता ६९ उमेदवार रिंगणात आहेत.

फीड फीडबर्नर 22 Nov 2025 10:10 am

'डॉ. आंबेडकर ना दलित, ना त्यांनी संविधान लिहिले':कोण आहे बाबासाहेबांना ब्रिटिश एजंट म्हणणारा वादग्रस्त वकील अनिल मिश्रा?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे फक्त एक सामान्य व्यक्ती आहेत, महापुरुष नाहीत. निश्चितच संविधानाचे शिल्पकार नाहीत आणि ते दलितही नाहीत. त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. म्हणून, त्यांच्याबद्दल काहीही बोलल्याबद्दल मी एससी/एसटी कायद्याच्या अधीन राहणार नाही. ग्वाल्हेरमधील वकील अनिल मिश्रा हे केवळ संविधानाचे शिल्पकार म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यावरच नव्हे तर त्यांच्या दलित ओळखीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. डॉ. आंबेडकरांबद्दल अपमानास्पद टिप्पणी केल्यानंतर ते सोशल मीडियावर वादग्रस्त ठरले आहेत. तरीही ते वक्तव्ये करत सुटले आहेत. अ‍ॅडव्होकेट मिश्रा हे एससी/एसटी कायद्याला एक आंधळा कायदा म्हणतात आणि या कायद्याच्या अधीन असलेल्यांसाठी मोफत खटले लढण्याचे आश्वासन देतात. त्यांनी यापूर्वी मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या ग्वाल्हेर खंडपीठात डॉ. आंबेडकरांचा पुतळा बसवण्यास विरोध केलेला आहे आणि त्यांना ब्रिटिश एजंटही म्हटले आहे. आम्ही त्यांच्याशी त्यांचे हेतू, पार्श्वभूमी आणि ते डॉ. आंबेडकरांना प्रश्न का विचारत आहेत याबद्दल थेट सवाल केले. प्रश्न: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याबाबत तुम्हाला काय अडचण आहे?उत्तर: न्यायालयाच्या आवारात बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसवण्यासाठी उच्च न्यायालयाकडून कोणताही विशिष्ट आदेश नव्हता. अशा कामासाठी आदेशाची आवश्यकता असते. आदेशाशिवाय काही लोक देणग्या गोळा करून उच्च न्यायालयात पुतळा बसवण्यासाठी आले. आदेशाशिवाय पुतळा बसवता येत नाही. मी याबद्दल केवळ निवेदनच दिले नाही, तर पंतप्रधान कार्यालयाला पत्रही लिहिले. प्रश्न: डॉ. आंबेडकर हे संविधानाचे शिल्पकार आहेत, तुम्ही कोणत्या आधारावर याला आव्हान देत आहात?उत्तर: पाहा, जर काही सत्य समोर आले तर ते स्थापित केले पाहिजे. मी अनेक पुस्तके आणि लेख वाचले आहेत. मी आंबेडकरांबद्दल देखील वाचले आहे. म्हणून, मी असे म्हणत आहे की संविधानाचे शिल्पकार आंबेडकर नव्हे तर बी.एन. राव होते. बी.एन. राव यांनी ६० देशांना भेटी देऊन त्यांच्या संविधानांचा तुलनात्मक अभ्यास केला. संविधान सभा स्थापन होण्यापूर्वीच त्यांना हे काम देण्यात आले होते. संविधान सभेचे सदस्य झाल्यानंतरच आंबेडकर संविधानात सहभागी झाले. मग, ते त्याचे शिल्पकार कसे असू शकतात? जर एखाद्या व्यक्तीने संविधानासाठी ६० देशांना भेट दिली, तुलनात्मक अभ्यास केला आणि त्यानंतर दुसरी व्यक्ती प्रवेश केली, तर त्याचा निर्माता कोण असेल, पहिला की दुसरा. संविधान तज्ज्ञांच्या मते आणि मी जे वाचले आहे त्यानुसार, आंबेडकरांनी संविधानाचा एकही कलम तयार केला नाही. मी एआयला विचारले की आंबेडकरांनी संविधानाचा कोणताही कलम तयार केला आहे का? उत्तर नाही असे होते. या विषयावर अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. १९६३ मध्ये प्रकाशित झालेल्या द इंडियन कॉन्स्टिट्यूशन इन द मेकिंगसारख्या पुस्तकात संविधान कोणी लिहिले याचा प्रामाणिक वृत्तांत देण्यात आला आहे. माझ्याकडे सर बी.एन. राव यांच्या मसुद्याची प्रमाणित प्रतही आहे. आंबेडकरांनी त्यांच्या पुस्तकात म्हटले आहे की ते संविधानाशी असहमत होते, मग ते त्याचे लेखक कसे बनले? मी चर्चेसाठी तयार आहे. माझा मुद्दा सिद्ध करण्यासाठी माझ्याकडे सर्व युक्तिवाद आहेत, पण वादविवाद निष्पक्ष असावा. आजकालच्या रूढीप्रमाणे अपशब्दांनी नव्हे. ही चर्चा संसदेतही व्हायला हवी. हा एक राष्ट्रीय मुद्दा आहे. मला दररोज हजारो शिव्या आणि जीवे मारण्याच्या धमक्या मिळतात. मला माझा फोन बंद करून झोपावे लागते. यापैकी काहीही मला त्रास देत नाही. प्रश्न: पण आताच ही चर्चा का?उत्तर: माझा निषेध त्या दिवसापासून सुरू झाला नव्हता जेव्हा मी उच्च न्यायालयात पुतळा बसवण्यास विरोध केला होता. मी अनेक वर्षांपासून या मोहिमेत सहभागी आहे. माध्यमांनी आता हा मुद्दा उपस्थित केला आहे. माझा हेतू कधीही व्हायरल होण्याचा नव्हता आणि आताही नाही. माध्यमांनी ते कव्हर केले किंवा न केले तरी मी सत्य बोलत राहीन. मी सतत यावर चर्चा करत आहे. फक्त माध्यमांच्या उपस्थितीमुळे ते व्हायरल झाले आहे. प्रश्न: एससी/एसटी कायद्याला आंधळा कायदा म्हणण्याचे कारण काय?उत्तर: या कायद्यामुळे, सनातनी, सामान्य आणि ओबीसी प्रवर्गातील लोकांवर असंख्य खोटे खटले दाखल केले जात आहेत. जर तुम्ही डेटा शोधला तर तुम्हाला आढळेल की देशभरात या कायद्याअंतर्गत दाखल होणाऱ्या ९०% खटल्यांमधून निर्दोष मुक्तता होते. हे लोक काय करतात ते पाहा. त्यांनी त्यांच्याच महिलांना पोलिस स्टेशनबाहेर बसवले, स्टेशनला घेराव घातला आणि गुन्हा दाखल केला. एससी/एसटी कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करून कथित पीडितेला २५ ते ५०% भरपाई मिळते. त्यानंतर, आरोपपत्र दाखल झाल्यानंतर, त्यांना आणखी २५ ते ५०% मिळते. आरोप सिद्ध झाल्यास उर्वरित भरपाई दिली जाते. जर कोणी खरोखरच पीडित असेल तर त्याला सरकारी पैसे मिळाले पाहिजेत, पण ज्या प्रकरणांमध्ये आरोपी नंतर निर्दोष सुटतो त्यांचे काय? हे पैसे वसूल करण्याची तरतूद का नाही? हे पैसे कोणाचे आहेत? ते जनतेचे आहेत, नाही का? दुसरीकडे, आरोपीला निर्दोष सोडल्यानंतर त्याला कोणतीही भरपाई मिळत नाही. त्याचे काम आणि नोकरी विस्कळीत होते. त्याच्या कुटुंबाची प्रतिमा खराब होते. सरकार त्याला भरपाई देत नाही. मी मध्य प्रदेशचा एक डेटाबेस तयार केला आहे. मी तो लवकरच बाहेर काढेन. या डेटाबेसमध्ये एससी-एसटी कायद्यांतर्गत नोंदवलेल्या सर्व प्रकरणांचा समावेश असेल. त्यात किती आरोपींना शिक्षा झाली आणि किती निर्दोष सुटले याची माहितीदेखील असेल. हा डेटा पाहून लोक आश्चर्यचकित होतील. एससी-एसटी कायद्यांतर्गत आतापर्यंत कथित पीडितांना किती पैसे मिळाले आहेत हेदेखील मी उघड करेन. प्रश्न: तुम्ही म्हणता, माझ्यावर एक नाही तर हजार खटले दाखल करा, पण मी घाबरत नाही. तुम्हाला कायद्याची भीती वाटत नाही का?उत्तर: मी का घाबरेन? मला आता सरकारी नोकरी नको आहे, किंवा मला सरकारकडून कोणतेही फायदे नको आहेत. जर माझ्यावर खटला झाला तर मी काही दिवस तुरुंगात राहीन आणि नंतर परत येईन. मी जे काही बोलत आहे ते मी बोलण्याच्या अधिकाराखाली बोलत आहे. या अधिकाराखाली, मी पंतप्रधानांच्या धोरणांना चुकीचे देखील म्हणू शकतो. मी त्यांना बरोबर किंवा चूक म्हणू शकतो. माझ्याविरुद्ध कोणताही एफआयआर दाखल केला जाणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे भीमराव आंबेडकरांबद्दल बोलल्याबद्दल माझ्यावर एससी/एसटी कायद्यांतर्गत निश्चितच आरोप लावले जाणार नाहीत, कारण ते दलित नव्हते. त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि हिंदू धर्म सोडला. बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर ते दलित राहिले नाहीत. या कायद्यांतर्गत माझ्याविरुद्ध कोणताही एफआयआर दाखल करता येणार नाही. प्रश्न: तुम्ही डॉ. भीमराव आंबेडकरांसारख्या महापुरुषावर प्रश्न उपस्थित करत आहात, तुम्हाला भीती वाटत नाही का?उत्तर: भीमराव हे ज्यांना ओळखतात त्यांच्यासाठी ते एक आख्यायिका असू शकतात. मी त्यांना फक्त एक सामान्य व्यक्ती मानतो. आपल्या राष्ट्राने त्यांना कुठेही संविधानाचे शिल्पकार म्हणून नियुक्त केलेले नाही. अशी कोणतीही घोषणा लेखी स्वरूपात नाही. मला रात्रभर फोन येतात. मी माझा फोन बंद ठेवून झोपू लागलो आहे. मला दररोज जीवे मारण्याच्या धमक्या आणि गैरवर्तन येत आहे. माझ्या कुटुंबाला आणि मित्रांनाही सतत फोन येतात. मी खूप सामान्य कुटुंबातून आलो आहे. माझे वडील डॉक्टर होते. मी वकील आहे. माझी मुलेही भविष्यात वकील होतील. मी बार असोसिएशनचा माजी अध्यक्ष आहे. मी कोणत्याही पार्श्वभूमीमुळे हे करत नाहीये. खरं तर, मला माहिती आहे की माझ्याविरुद्ध कोणताही ठोस खटला चालवला जाणार नाही. आपले संविधान बोलण्याच्या अधिकाराची हमी देते. प्रश्न: तुमचे माजी सरन्यायाधीश अरुण मिश्रा यांच्याशी संबंध आहेत, हे खरे आहे का?उत्तर: ते माझे गुरू आहेत. मी १९८८ ते १९९९ पर्यंत त्यांच्या हाताखाली सराव केला. मी त्यांचा नातेवाईक नाही, तर त्यांचा शिष्य आहे. सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवली जात आहे. ज्यांना वाटते की मला राजकीय पाठिंबा आहे ते चुकीचे आहेत. माझी कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही. मी त्यांच्याशी (अरुण मिश्रा) बोलतो. आम्ही सणांच्या वेळी नक्कीच बोलतो. हे प्रकरण अचानक इतके वाढले की आम्हाला बोलण्याची संधीच मिळाली नाही. जर त्यांना काही आक्षेप असता तर ते कदाचित माझ्याशी बोलले असते. आतापर्यंत त्यांनी कोणताही आक्षेप व्यक्त केलेला नाही. सोशल मीडिया पोस्टवरून वाद सुरू झाला५ ऑक्टोबर रोजी वकील अनिल मिश्रा यांच्याभोवती वाद सुरू झाला. ग्वाल्हेर गुन्हे शाखेच्या सोशल मीडिया मॉनिटरिंग टीमला एका व्हॉट्सअप ग्रुपमध्ये एक आक्षेपार्ह व्हिडिओ आढळला. पोस्टमध्ये डॉ. आंबेडकरांना ब्रिटिश एजंट म्हणून वर्णन केले होते. पोस्टमध्ये एक छेडछाड केलेला फोटोदेखील होता. यामुळे अनिल मिश्रा यांच्याविरुद्ध निदर्शने सुरू झाली. गुन्हे शाखेने तपास सुरू केला. अनिल मिश्रा यांच्या मोबाइल नंबरवरून हा कंटेंट अपलोड करण्यात आल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. एफआयआरनुसार, ही कारवाई २०२३ मध्ये जिल्हाधिकारी आणि दंडाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करून करण्यात आली. ग्वाल्हेरचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी यांनी भारतीय नागरी संरक्षण संहिता, २०२३च्या कलम १६३ अंतर्गत हा आदेश जारी केला. त्यात म्हटले आहे की, जिल्हा हद्दीत सामाजिक, धार्मिक किंवा सांप्रदायिक सलोखा बिघडेल असे कोणतेही काम, पोस्टर, व्हिडिओ किंवा सोशल मीडिया क्रियाकलाप केले जाणार नाहीत.​​​​​

दिव्यमराठी भास्कर 22 Nov 2025 10:03 am

“बिनविरोधसाठी एवढा अट्टहास का? विकली गेलेली यंत्रणा आणि…”; जामनेर निवडणुकीवरून रोहित पवारांचा भाजपच्या नेत्यावर हल्लाबोल

Rohit Pawar | जामनेर नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्षपदी मंत्री गिरीश महाजन पत्नी साधना महाजन यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर भाजपचे आणखी 9 उमेदवारही बिनविरोध निवडून आले. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी (दि. 21) जामनेर नगरपरिषद क्षेत्रातील 9 जागांवरील प्रतिस्पर्धी उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. परंतु, अर्ज मागे घेण्याच्या या प्रक्रियेत भाजपकडून मोठ्या प्रमाणात दडपशाही करण्यात आल्याचा […] The post “बिनविरोधसाठी एवढा अट्टहास का? विकली गेलेली यंत्रणा आणि…”; जामनेर निवडणुकीवरून रोहित पवारांचा भाजपच्या नेत्यावर हल्लाबोल appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Nov 2025 9:56 am

निवडणुकीपूर्वीच भाजपने उधळला विजयाचा गुलाल! २४६ नगरपरिषदांपैकी १०० जागांवर बिनविरोध कमळ फुलले

मुंबई: राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी पहायला मिळत आहे. निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यात नगरपंचायत आणि नगरपरिषदेच्या निवडणूका होणार आहेत. यासाठी इच्छूक उमेदवारांनी अर्ज देखील भरले आहेत. तर १९ ते २१ नोव्हेंबर दरम्यान अर्ज माघारी घेण्याची अखेरची तारीख होती. या दिवसात अनेक उमेदवारांनी अर्ज माघे घेतल्यामुळे बरेच नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहे. बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांमध्ये भाजपच्या उमेदवारांचा सर्वाधिक समावेश आहे. नगरपंचायत व नगरपरिषद निवडणुकीची रिंगणात मतदानापूर्वीच भाजपने नगरसेवकांचे शतक पूर्ण केले आहे. याबद्दल भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी माहिती दिली आहे.भाजपचे बिनविरोध जिंकलेले नगरसेवक – १००भाजपचे बिनविरोध निवडून आलेले नगराध्यक्ष – ३कुठल्या विभागात किती नगरसेवक बिनविरोध?- कोकण-४- उत्तर महाराष्ट्र-४९- पश्चिम महाराष्ट्र-४१- मराठवाडा-३- विदर्भ-३दोंडाईचा नगरपालिकेत भाजपचे २६ नगरसेवक बिनविरोधधुळ्यातील दोंडाई नगरपालिकेत नगराध्यक्षसह भाजपचे एकूण सर्व २६ नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. अर्ज माघारीच्या दिवशी भाजप विरोधातल्या सर्व उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने निवडणूक बिनविरोध झाली आहे. राज्याच्या इतिहासात असा प्रकार पहिल्यांदा घडला आहे.जामनेर नगरपालिकेत भाजपचे १० नगरसेवक बिनविरोधजळगावच्या जामनेर नगरपालिकेतही भाजपचे १० नगरसेवक बिनविरोध विजयी झाले आहेत. गेल्या दहा वर्षांपासून जामनेर नगरपालिकेवर भाजपची सत्ता असून यावर्षी देखील विरोधकांनी माघार घेतल्याने भाजपचे १० नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत.https://prahaar.in/2025/11/22/driver-suffers-heart-attack-and-shocking-accident-in-ambernath/राज्यात २४६ नगर परिषदा आणि ४२ नगर पंचायतींसाठी येत्या २ डिसेंबरला मतदान होणार आहे. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी ३ डिसेंबरला मतमोजणी आणि निकाल लागणार आहे. दरम्यान अर्ज माघार घेण्याच्या प्रक्रियेमध्ये भाजपचे १०० नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत.

फीड फीडबर्नर 22 Nov 2025 9:30 am

नवी मुंबईत वर्षभर वाहतुकीत बदल

खारघर-तुर्भे लिंक रोड भूमिगत बोगदा प्रकल्पाचे काम सुरूनवी मुंबई : सिडकोच्या भूमिगत खारघर-तुर्भे लिंक रोड (केटीएलआर) प्रकल्पाच्या बांधकामास कालपासून (२० नोव्हें) सुरूवात करण्यात आली आहे. १.७६३ किमी लांबीच्या या प्रकल्पाचे तुर्भे वाहतूक विभागाच्या हद्दीत खारघर गुरुद्वारा ते जुईनगर रेल्वे स्थानकापर्यंत या प्रकल्पाचे काम सुरू झाले आहे. वाहनचालकांची होणारी गैरसोय लक्षात घेता नवी मुंबई वाहतूक पोलीस विभागाने एक वर्षासाठी वाहतूक वळवण्याचा आराखडा तयार केला आहे. कालपासून प्रकल्पाचे काम सुरु झाले असून पुढील वर्षी १६ नोव्हेंबरपर्यंत हे वाहतुकीत बदल लागू असणार आहेत. प्रकल्पाच्या कामादरम्यान, वाहनचालकांसाठी पर्यायी मार्ग आखण्यात आले आहेत. सध्या तुर्भे आणि खारघर दरम्यान प्रवासास ४० मिनिट लागत असूनलिंक रोडमुळे १० मिनिटांपर्यंत कमी होईल. त्याचबरोबर सायन-पनवेल महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत मिळणार आहे.डीसीपी (वाहतूक) तिरुपती काकडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ''तुर्भे वाहतूक युनिटच्या हद्दीत खारघर गुरुद्वारा ते जुईनगर रेल्वे स्थानकापर्यंत भूमिगत केटीएलआर प्रकल्पाचे बांधकाम २० नोव्हेंबर रोजी सुरू झाले आहे. सायन-पनवेल महामार्गावरील शिरवणे पुलाच्या सुमारे १०० मीटर आधी बांधकाम सुरू केले जाईल.''एकेरी वाहतूक सेवा :सायन-पनवेल महामार्गाच्या पुणे कॅरेजवेवरील सावन नॉलेज पार्क कंपनी ते शिरवणे एमआयडीसी ते डेल्टा स्टेलर कंपनीकडे जाणारा सेवा रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी 'एकेरी' असेल, ज्यामध्ये पोलिस, अग्निशमन दल, रुग्णवाहिका आणि सरकारी वाहने यासारख्या आपत्कालीन आणि अत्यावश्यक सेवा वाहने वगळता इतर सर्व प्रकारच्या वाहनांसाठी 'एकेरी' असेल.वाहतूक बंद आणि पर्यायी मार्ग :उरण फाट्यावरून येणारी वाहने तुर्भे एमआयडीसी रस्त्यावर वळवली जातील. नेरुळहून अंतर्गत रस्त्यांनी येणारी वाहने सायन-पनवेल महामार्गावर वळवली जातील. तर, शिरवणे गावातून एमआयडीसीकडे येणारी वाहने प्रवेशद्वाराजवळील सुरू असलेल्या भूमिगत बोगद्याच्या कामाकडे जाणारी वाहने प्रकल्पाचे काम पूर्ण होईपर्यंत पूर्णपणे बंद राहतील. शिरवणे गावातून येणारी वाहने जुईनगर रेल्वे स्टेशन सर्व्हिस रोडकडे वळवली जातील. तर, शिरवणे गावातून नेरुळमधील एलपी ब्रिजकडे येणारी वाहने एलपी ब्रिज सर्व्हिस रोडकडे वळवली जातील. तसेच, नेरुळ आणि शिरवणे गावातून जाणारी वाहने सायन-पनवेल महामार्गाच्या मुंबई कॅरेजवेकडे वळवली जातील.

फीड फीडबर्नर 22 Nov 2025 9:30 am

पत्नीने मुलाच्या मदतीने केली पतीची हत्या

भाईंदर : भाईंदर येथे सोन्याचे दागिने तयार करणाऱ्या कारागिराला कारखान्यात धारदार शस्त्राने ठार मारणाऱ्या पत्नीला आणि मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. भाईंदर पूर्वेकडील एस. व्ही. रोड येथील सोनल पार्क सोसायटीच्या दुकान नं. १ मध्ये ५१ वर्षीय सुशांतो अबोनी पॉल यांचा सोन्याचे दागिने तयार करण्याच्या कारखान्यात धारदार शस्त्राने हल्ला करून खून झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस उपायुक्त संदीप डोईफोडे आणि सहा. पोलिस आयुक्त सोहेल शेख यांच्या मार्गदर्शनाखाली नवघर पोलीस ठाण्याचे व. पो. नि. धीरज कोळी यांनी तक्रारदार व गुप्त बातमीदार यांनी दिलेल्या माहितीनुसार तपास सुरू केला. हत्येच्या आदल्या रात्री मयत सुशांतो पॉल यांच्या कारखान्यात त्यांची पत्नी अमृता सुशांतो पॉल व दोन मुले भांडण करत होते अशी माहिती मिळाली. त्याअानुषंगाने तपासाची दिशा ठरवून मयत यांची पत्नी अमृता सुशांतो पॉल व त्यांची दोन मुले यांचा शोध घेऊन गुन्हयाबाबत विचारपूस केली. तेव्हा त्यांनी गुन्हयाची कबुली दिली. अमृता पॉल व मुलगा सुमित पॉल यांना पोलिसांनी अटक केली असुन बालकासही तपासकामी ताब्यात घेतले. अधिक तपास पोलीस निरीक्षक तृप्ती देशमुख करत आहेत.

फीड फीडबर्नर 22 Nov 2025 9:30 am

कॅप्सुल गोळ्यांमध्ये अळ्या!

महिला रुग्ण हादरली, डॉक्टरही थक्ककल्याण : कल्याणमध्ये अॅसिडिटीच्या त्रासासाठी दिलेल्या गोळ्यांमध्ये अळ्या असल्याचे समोर आले आहे. या प्रकाराने सायली पनवेलकर या महिला रुग्णासह संबंधित डॉक्टरही हादरले आहेत. पनवेलकर अॅसिडिटीच्या उपचारासाठी डॉ. केदार भिडे यांच्याकडे उपचारासाठी आल्या होत्या. त्यांनी दिलेल्या औषधाच्या स्ट्रिपमधील एका गोळीमध्ये त्यांना अळ्या दिसल्या. असा प्रकार अन्य कोणासोबत होऊ नये यासाठी डॉक्टर भिडे यांनी तातडीने प्राईड हेल्थ केअरशी संपर्क साधला. या प्रकरणी गोळ्यांची कंपनी 'रोनपोली' यांच्याकडे संपर्क साधून घडला प्रकार त्यांच्या निदर्शनास आणला.कल्याण, प. येथील प्रथमेश इमारती राहणाऱ्या सायली पनवेलकर यांचा खांदा दुखत होता. त्यांची मुलगी मानसी राणे यांच्यासह त्या डॉक्टर केदार यांच्याकडे उपचारासाठी गेल्या. डॉक्टरांनी त्यांना गोळ्या दिल्या. त्या गोळ्यामध्ये अॅसिडिटीवर ओमे कैप-२० ही गोळी देखील होती. सायली यांनी गोळ्या खाण्यासाठी घेतल्या. तेव्हा त्या गोळ्या काळपट असल्याचे दिसून आले. गोळ्या अशा का दिसतात म्हणून त्यांना शंका आली. त्यांनी गोळ्या निरखून पाहिल्या. त्यावेळी त्यांना त्या गोळ्यात अळ्या दिसल्या. सायली आणि त्यांची मुलगी मानसी यांना गोळ्यांच्या पाकिटावर गोळ्यांची मॅन्युफॅक्चर डेट ही २०२५ सालची आढळली. त्या गोळ्यांची मुदत २०२७ सालपर्यंत असल्याचेही त्यावर नमूद करण्यात आले होते. मुदत संपलेली नसताना गोळ्या काळपट आणि त्यात अळ्या कशा आल्या असा प्रश्न त्यांना पडला. हा प्रकार एखाद्या रुग्णांच्या जिविताशी खेळण्याचा आहे. त्यामुळे गोळ्यांच्या कंपनीविरोधात कारवाई झाली पाहिजे अशी मागणी मानसी यांनीकेली आहे. त्यांना अळ्या आढळून आलेल्या गोळ्या पाठवून द्या असे सांगितले गेले. जर कंपनीने दाद दिली नाही, तर या प्रकरणात ग्राहक न्यायालयाकडे दाद मागण्यात येईल असे डॉक्टर भिडे यांनी सांगितले आहे.

फीड फीडबर्नर 22 Nov 2025 9:30 am