Shirur News: घोड नदीवरील बंधाऱ्याची गळती रोखण्यात यश; दैनिक प्रभातच्या बातमीची प्रशासनाकडून दखल
प्रभात वृत्तसेवा टाकळी हाजी – घोड नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यातून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत असल्याबाबत दैनिक प्रभातने प्रसिद्ध केलेल्या बातमीची प्रशासनाने दखल घेतली आहे. बातमी प्रसिद्ध होताच कुकडी पाटबंधारे विभागाने तातडीने कार्यवाही करत बंधाऱ्याची दुरुस्ती केली आहे. या तत्पर कारवाईमुळे परिसरातील संभाव्य उन्हाळी पाणी टंचाई टळली असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. काही दिवसांपूर्वी […] The post Shirur News: घोड नदीवरील बंधाऱ्याची गळती रोखण्यात यश; दैनिक प्रभातच्या बातमीची प्रशासनाकडून दखल appeared first on Dainik Prabhat .
Shaurya Din 2026: १ जानेवारीला जयस्तंभाचे रूप पालटणार; पाहा यंदा काय असणार आहे खास सजावट?
प्रभात वृत्तसेवा शिक्रापूर – कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे १ जानेवारी २०२६ रोजी २०८ वा शौर्यदिन साजरा होत असताना, यावर्षी जयस्तंभाला अत्यंत आकर्षक आणि अर्थपूर्ण सजावट करण्यात येणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या विशेष परवानगीने या सजावटीमध्ये भारतीय संविधान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तेलचित्र, अशोक चक्र असलेला निळा ध्वज आणि राजमुद्रेचा समावेश असणार आहे. कोरेगाव भीमा शौर्यदिन समन्वय […] The post Shaurya Din 2026: १ जानेवारीला जयस्तंभाचे रूप पालटणार; पाहा यंदा काय असणार आहे खास सजावट? appeared first on Dainik Prabhat .
प्रभात वृत्तसेवा आळंदी – नगरपरिषदेच्या नुकत्याच झालेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचे युवा उमेदवार प्रशांत कुऱ्हाडे पाटील यांनी १२,७४२ मते मिळवून ऐतिहासिक विजय संपादन केला आहे. हा विजय शिस्तबद्ध प्रचार, सूक्ष्म नियोजन आणि कार्यकर्त्यांच्या अहोरात्र मेहनतीचा परिणाम असल्याचे मानले जात आहे. या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत सामाजिक कार्यकर्ते चेतन नाना कुऱ्हाडे यांनी आखलेली रणनीती आणि जय गणेश ग्रुपने […] The post Alandi News: आळंदीत प्रशांत कुऱ्हाडेंचा दणदणीत विजय! सूक्ष्म नियोजन आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे फळ appeared first on Dainik Prabhat .
प्रभात वृत्तसेवा शिक्रापूर – रामानंद सांप्रदायाच्या माध्यमातून धार्मिक आणि सामाजिक बांधिलकी जपत शिरूर तालुक्यात जलसंवर्धनाचा मोठा उपक्रम राबविला जात आहे. जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शनाखाली तालुक्यातील अनुयायांनी श्रमदानातून आत्तापर्यंत ३१ कच्चे बंधारे यशस्वीपणे पूर्ण केले आहेत. वाढती पाणीटंचाई आणि घटती भूजल पातळी लक्षात घेऊन राबविलेली ही मोहीम आता लोकचळवळ ठरत आहे. तालुक्यातील […] The post Shirur News: शिरूरमध्ये भक्तीला मिळाली शक्तीची जोड; नरेंद्रचार्य महाराजांच्या भक्तांनी उभारले तब्बल ३१ बंधारे appeared first on Dainik Prabhat .
वनविभागाचे मोठे यश! ओतूरमध्ये धुमाकूळ घालणारे दोन बिबटे जेरबंद; माणिकडोह केंद्रात रवानगी
प्रभात वृत्तसेवा ओतूर – परिसरात बिबट्यांची वाढती संख्या आणि मानवी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर वनविभागाने मोठी कारवाई केली आहे. अमीरघाट परिसरात लावलेल्या पिंजऱ्यात अवघ्या ४८ तासांच्या अंतराने दोन बिबट्यांना जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. यामध्ये एका सहा ते सात वर्षे वयोगटातील मादीचा आणि एका सात महिने वयाच्या बछड्याचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ४ डिसेंबर रोजी या […] The post वनविभागाचे मोठे यश! ओतूरमध्ये धुमाकूळ घालणारे दोन बिबटे जेरबंद; माणिकडोह केंद्रात रवानगी appeared first on Dainik Prabhat .
नाताळ सुट्टीचा फिव्हर! भीमाशंकर हाऊसफुल्ल; पार्किंग फुल्ल अन् रस्त्यावर वाहनांची गर्दीच गर्दी
प्रभात वृत्तसेवा मंचर – नाताळ सुट्टीनिमित्त श्री क्षेत्र भीमाशंकर येथे ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या गर्दीचा थेट परिणाम वाहतुकीवर झाला असून भीमाशंकरकडे येणाऱ्या वाहनांच्या तब्बल चार ते साडेचार किलोमीटरपर्यंत लांब रांगा लागल्याचे चित्र दिसून आले.त्यामुळे काही काळ वाहतूक कोंडी निर्माण होऊन भाविकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. दर्शनासाठी आलेल्या खासगी वाहने, […] The post नाताळ सुट्टीचा फिव्हर! भीमाशंकर हाऊसफुल्ल; पार्किंग फुल्ल अन् रस्त्यावर वाहनांची गर्दीच गर्दी appeared first on Dainik Prabhat .
Talegaon Dabhade News: १ जानेवारीपासून दाढी-कटिंग महागणार; नाभिक संघटनेचा मोठा निर्णय
प्रभात वृत्तसेवा तळेगाव दाभाडे – तळेगाव शहर नाभिक विकास संघटनेच्या सर्व सलून आणि पार्लरमध्ये १ जानेवारी २०२६ पासून नवीन दर लागू करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे शहराध्यक्ष ओंकार शिंदे यांनी दिली.गेल्या पाच वर्षांमध्ये वीजदर, कामगारांचे वेतन तसेच प्रसाधन साहित्याच्या किमतींमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. या वाढत्या खर्चामुळे नाभिक व्यावसायिकांचा उदरनिर्वाह आणि व्यवसाय टिकवणे कठीण झाले […] The post Talegaon Dabhade News: १ जानेवारीपासून दाढी-कटिंग महागणार; नाभिक संघटनेचा मोठा निर्णय appeared first on Dainik Prabhat .
प्रभात वृत्तसेवा देहूरोड – ऐतिहासिक धम्मभूमीच्या ७१ व्या वर्धापन दिनानिमित्त गुरुवारी (दि. २५) भक्तिभावपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. धम्मजागृती अभियान, महाबुद्धवंदना, पंचशील ध्वजारोहण, धम्मदिशा, धम्मप्रवचन, विविध धार्मिक विधी तसेच सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून हा ऐतिहासिक दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिस्तूपाच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच लाखो बांधवांनी ऐतिहासिक […] The post Dehuroad News: धम्मभूमीचा ७१ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात; महाबुद्धवंदना आणि धम्मप्रवचनाला मोठी गर्दी appeared first on Dainik Prabhat .
Maval Politics: निवडणुकीची धामधूम अन् महिलांना अच्छे दिन; प्रचारातून मिळतोय रोजगार आणि आत्मविश्वास
प्रभात वृत्तसेवा कामशेत – जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वत्र जोरदार प्रचारमोहीम सुरू आहेत. या प्रचारातून अनेक महिलांना थेट रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे. निवडणूक प्रचार ही केवळ राजकीय प्रक्रिया न राहता, महिलांसाठी उत्पन्नाचे आणि अनुभवाचे साधन ठरत असल्याचे वास्तव समोर येत आहे. निवडणुकींच्या पार्श्वभुमीवर विविध राजकीय […] The post Maval Politics: निवडणुकीची धामधूम अन् महिलांना अच्छे दिन; प्रचारातून मिळतोय रोजगार आणि आत्मविश्वास appeared first on Dainik Prabhat .
PCMC Election: महायुतीत बिघाडी? भाजप-शिंदे गटात ३२ जागांवरून रस्सीखेच; युती तुटण्याच्या मार्गावर
प्रभात वृत्तसेवा पिंपरी – महापालिका निवडणुकीसाठी राजकीय समीकरणे जुळविण्याचे काम सुरू असतानाच भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे समीकरण बिघडले असल्याचे समोर आले आहे. खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडून जादा जागांची मागणी होत असून त्याला भाजपाने नकार दिला आहे. त्यामुळे शिवसेना स्वबळाची चाचपणी करत असून भाजपाने आरपीआयला सोबत घेत लढण्याचा निर्धार केला असल्याची माहिती मिळाली आहे. […] The post PCMC Election: महायुतीत बिघाडी? भाजप-शिंदे गटात ३२ जागांवरून रस्सीखेच; युती तुटण्याच्या मार्गावर appeared first on Dainik Prabhat .
PCMC Election: बंडखोरी रोखताना होणार दमछाक! काहीही करून निवडणूक लढविण्यावर इच्छुक ठाम
प्रभात वृत्तसेवा पिंपरी – महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. दोन्हीही पक्षांनी एकमेकांचे उमेदवार फोडत त्यांना आपल्या पक्षात स्थान दिले आहे. मात्र, यामुळे निष्ठावंताच्या पायाखालची जमिन सरकली असून त्यांनाच उमेदवारीसाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. उमेदवारी नाही मिळाली तर इतर पक्षातून लढण्यासाठी हे निष्ठावंत आता चाचपणी करत आहेत. त्यामुळे […] The post PCMC Election: बंडखोरी रोखताना होणार दमछाक! काहीही करून निवडणूक लढविण्यावर इच्छुक ठाम appeared first on Dainik Prabhat .
प्रभात वृत्तसेवा हिंजवडी – वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट तर्फे दिला जाणारा मध्य विभाग तांत्रिक कार्यक्षमतेचा पुरस्कार यंदा कासारसाई तील श्री संत तुकाराम सह. साखर कारखान्याला जाहीर झाला आहे.सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.सोमवारी( दि.२९) वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट मांजरी बु. येथे व्हीएसआयचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार […] The post VSI Awards: श्री संत तुकाराम कारखान्यास वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटचा तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार जाहीर appeared first on Dainik Prabhat .
PCMC News: आयुक्तांनी घातलं कर्मचाऱ्यांच्या चुकांवर पांघरूण? कारवाईबद्दल विचारताच दिले ‘हे’उत्तर
प्रभात वृत्तसेवा पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेने तयार केलेल्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादीत कर्मचार्यांकडून मोठ्या प्रमाणात चुका करण्यात आल्याने गोंधळ निर्माण झाला होत्या. त्यामुळे दहा हजारांपेक्षा अधिक हरकती दाखल झाल्या होत्या. त्या प्रकरणात एकही अधिकारी व कर्मचार्यांवर कारवाई करण्यात आली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. प्राप्त हरकतींचा योग्य प्रकारे निपटारा केल्याने कारवाई केली नाही, असे […] The post PCMC News: आयुक्तांनी घातलं कर्मचाऱ्यांच्या चुकांवर पांघरूण? कारवाईबद्दल विचारताच दिले ‘हे’ उत्तर appeared first on Dainik Prabhat .
प्रभात वृत्तसेवा भुईंज – मर्ढे ता. सातारा येथील थोर कवी बा. सी. मर्ढेकर स्मारकास पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत कुलकुंडवार यांनी नुकतीच भेट दिली. या भेटीदरम्यान ग्रामस्थांनी, स्मारकाचे काम पूर्ण होऊनही आजपर्यंत उद्घाटन झाले नसल्याबाबत नाराजी व्यक्त केली. तसेच हे स्मारक तात्काळ ग्रामस्थांच्या ताब्यात देण्याची ठाम मागणी केली. ग्रामस्थांची भावना लक्षात घेत आयुक्त पुलकुंडवार यांनी तत्काळ […] The post Satara News: बा. सी. मर्ढेकर स्मारक आठवडाभरात ग्रामस्थांच्या स्वाधीन; विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांचा निर्णय appeared first on Dainik Prabhat .
Ladki Bahin Yojana: फक्त ६ दिवस उरले! लाडकी बहीण योजनेचा लाभ हवा असेल तर ‘ही’चूक करू नका
प्रभात वृत्तसेवा सातारा – लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीची मुदत संपायला अवघे सहा दिवस बाकी आहेत. सुरुवातीला सर्व्हर डाउन असल्याने, केवायसी करायला अडचण येत होती. आता हा अडथळा दूर झाला असला, तरी घटस्फोटीत व विधवा महिलांना कागदपत्रांसाठी कसरत करावी लागत आहे. ऑनलाइन केवायसी अद्याप न झालेल्या महिलांची अंगणवाडी सेविकांकडे फॉर्म भरण्यासाठी आणि कागदपत्रे देण्यासाठी धावपळ सुरू […] The post Ladki Bahin Yojana: फक्त ६ दिवस उरले! लाडकी बहीण योजनेचा लाभ हवा असेल तर ‘ही’ चूक करू नका appeared first on Dainik Prabhat .
सुरेश वांदिलेमुंबईमध्ये २७ ते ३१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ‘मेरीटाइम वीक’ ही आतंरराष्ट्रीय परिषद पार पडली. स्वत: पंतप्रधानांनी या परिषदेला हजेरी लावली. या परिषदेत मेरिटाइम क्षेत्रातील करिअर संधींवर भर देण्यात आला. पुढील काळात या क्षेत्रात १० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून त्यातून ७ लाख नवीन रोजगार निर्माण होणार असल्याची घोषणा केंद्रीय बंदरे व जलवाहतूक मंत्र्यांनी केली.पुढील काळात भारतात सागरी क्षेत्रात काम करणाऱ्या सीफेअरर्स (समुद्रमार्गाने वाहतूक करणारे कर्मचारी) यांची संख्या लक्षणीयरीत्या वाढणार आहे. देशातील बंदरांची क्षमता जवळपास दुप्पट झाली असून त्यामुळे कार्गो(माल वाहतूक) हाताळण्याची क्षमता वाढेल. भारतातील बंदरे आता जागतिक पातळीवर स्पर्धक ठरली आहेत. पंतप्रधानांनी या परिषदेत पुढील २५ वर्षांत नीलक्रांती घडवण्याचे उद्दिष्ट मांडले, यामुळे भारतास मेरिटाइम क्षेत्रात जागतिक नेतृत्वाची संधी मिळेल. ही परिषद ८५ देशांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत पार पडली. ६८० सामंजस्य करार झाले. या सर्व बाबी लक्षात घेता सागरी क्षेत्रातील शिक्षण, प्रशिक्षण हे भविष्यात उत्तम करिअरसाठी उपयुक्त ठरू शकते. या परिषदेत इंडियन मेरिटाइम युनिव्हर्सिटीचा (आयएमयू) महत्त्वाचा सहभाग होता. ही युनिव्हर्सिटी भारत सरकारच्या बंदरे, जहाज वाहतूक आणि जलमार्ग मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत एक राष्ट्रीय विद्यापीठ आहे. तिचा उद्देश भारतात मेरिटाइम शिक्षण, प्रशिक्षण, संशोधन आणि विकासाला चालना देणे हा आहे.भविष्यात मेरिटाइम उद्योगासाठी कुशल मनुष्यबळ पुरवण्यासाठी आयएमयूला महत्त्वाची भूमिका बजावावी लागणार आहे. या परिषदेत आयएमयूने डिजिटल शिपिंग, ग्रीन पोर्ट्स, आणि स्मार्ट लॉजिस्टिक्स यासारख्या विषयांवर सत्रांचे आयोजन केले. यामुळे विद्यार्थ्यांना भविष्यातील या क्षेत्रातील रोजगार संधीची माहिती मिळाली. तसेच जवळपास १०० आंतरराष्ट्रीय मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या फोरममध्येही आयएमयूने सहभाग घेतला. यामुळे विद्यार्थ्यांना उद्योगातील थेट संपर्क आणि नोकरीच्या संधी मिळण्यासाठी एक सक्षम संपर्क साखळी निर्माण होण्यास साहाय्य झाले. या परिषदेमध्ये आयएमयूने आपले अभ्यासक्रम, संशोधन प्रकल्प, आणि विद्यार्थ्यांचे नवकल्पनात्मक मॉडेल्स प्रदर्शित केले, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय उद्योग प्रतिनिधींना भारतातील मेरिटाइम शिक्षणाची गुणवत्ता समजली.आयएमयूचे कॅम्पस आणि अभ्यासक्रम(१) चेन्नई कॅम्पस – बी.एस्सी इन नॉटिकल सायंस, बी.टेक मरीन इंजिनीअरिंग, एम.बी.ए पोर्ट अॅण्ड शिपिंग मॅनेजमेंट, एम.बी.ए इंटरनॅशनल ट्रान्सपोर्टेशन अॅण्ड लॉजिस्टिक्स, (२) मुंबई पोर्ट कॅम्पस – डिप्लोमा इन नॉटिकल सायन्स, (३) नवी मुंबई कॅम्पस – बी.बी.ए मॅरिटाइम लॉजिस्टिक्स (अप्रेंटिससह), डिप्लोमा इन नॉटिकल सायन्स, (४) कोलकाता कॅम्पस – बी.टेक नेव्हल आर्किटेक्चर अॅण्ड ओशन इंजिनीअरिंग, डिप्लोमा इन नॉटिकल सायन्स, बी.एस्सी इन नॉटिकल सायन्स, (५) कोचीन कॅम्पस – बी.टेक मरीन इंजिनीअरिंग, डिप्लोमा इन नॉटिकल सायन्स, बी.बी.ए लॉजिस्टिक्स, रिटेलिंग अॅण्ड ई-कॉमर्स, एम.टेक मरिन इंजिनीअरिंग अॅण्ड मॅनेजमेंट, (६) विशाखापट्टणम कॅम्पस – बी.टेक नेव्हल आर्किटेक्चर अॅण्ड शिप बिल्डिंग इंजिनीअरिंग, डिप्लोमा इन नॉटिकल सायन्स, एम.टेक नेव्हल आर्किटेक्चर अॅण्ड ओशन इंजिनीअरिंग, एम.टेक ड्रेजिंग ॲण्ड कोस्टल इंजिनीअरिंगकरिअर संधी : आयएमयूमधून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना पुढील क्षेत्रांमध्ये करिअर संधी उपलब्ध होतात- (१) जहाज चालवणे (२) मरीन इंजिनीअरिंग (३)पोर्ट मॅनेजमेंट (४) लॉजिस्टिक्स आणि सप्लाय चेन (५) शिपिंग कंपन्या (६) कोस्ट गार्ड (७)आंतरराष्ट्रीय मरीन उद्योग ओशन इंजिनीअरिंग. या शाखेत या बाबींच्या शिक्षण-प्रशिक्षणावर भर दिला जातो. या अभ्यासक्रमात सागरी वाहतूक आणि सागरीय पर्यावरणाच्या अानुषंगाने डिझाइन, निर्मिती, विकास, कार्यान्वयन, नियोजन यांचं प्रशिक्षण दिलं जातं. नॅव्हल आर्किटेक्चर ही ओशन इंजिनीअरिंगची उपशाखा असली तरी आता त्याकडे स्वतंत्रपणे लक्ष पुरवलं जातं. (अपूर्ण)
Satara News: २ जानेवारीपर्यंत साताऱ्याचा पाणीपुरवठा विस्कळीत? ‘हे’आहे कारण.
प्रभात वृत्तसेवा सातारा – सातारा पालिकेच्या कास धरण उद्भव पाणीपुरवठा योजनेअंतर्गत शहराला पाणीपुरवठा केला जातो. मात्र, कास परिसरात 2 ते 3 ठिकाणी मोठ्या प्रमाणात गळती लागल्याने संबंधित गळती काढण्याचे काम नगरपरिषदेमार्फत सुरू करण्यात आले आहे. या दुरुस्ती कामासाठी सुमारे एक आठवड्याचा कालावधी लागणार असून कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याची माहिती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनी दिली […] The post Satara News: २ जानेवारीपर्यंत साताऱ्याचा पाणीपुरवठा विस्कळीत? ‘हे’ आहे कारण. appeared first on Dainik Prabhat .
मराठवाड्यातील महापालिका कोणाच्या?
डॉ. अभयकुमार दांडगे, abhaydandage@gmail.comमहानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया मंगळवारपासून सुरू झाली; परंतु राज्याच्या सत्तेत असणाऱ्या शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील युतीच्या चर्चा आणि गुऱ्हाळ काही केल्या संपत नाहीये. मराठवाड्यातील जालना, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणीत युतीसाठीच्या आतापर्यंतच्या बैठका वांझोट्या ठरल्या आहेत. मात्र लातूरमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीचे जमतेय असे चित्र आहे.मराठवाड्यात असलेल्या आठ जिल्ह्यांपैकी पाच ठिकाणी महानगरपालिका अस्तित्वात आहे. छत्रपती संभाजीनगर, नांदेड, लातूर, परभणी व जालना या ठिकाणी निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. मराठवाड्यात नगर परिषद व नगरपंचायत निवडणुकीचा आखाडा चांगलाच रंगला होता. आता महापालिका निवडणुकीतही तसेच चित्र पाहावयाला मिळणार आहे. महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने राज्यात राजकीय पटलावर रोज चित्र बदलत आहे. त्यामुळे मराठवाड्यातही वेगवेगळ्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे. मराठवाड्यातील महानगरपालिका ताब्यात घेण्यासाठी सत्ताधारी व विरोधी पक्षांमध्ये चुरस निर्माण झाली आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका वगळता अन्य ठिकाणी त्या त्या महानगरपालिकांची आर्थिक स्थिती कमकुवत आहे. त्यामुळे महानगरपालिका क्षेत्रातील विकासासाठी राज्याच्या निधीवर अन्य महापालिकांना अवलंबून राहावे लागते. त्याचा फटका निवडणुकीत उमेदवारांना बसतो. गेल्या चार वर्षांपासून प्रशासक असल्याने अनेकदा नगरसेवकांची कमतरता जाणवली नाही. असे असले तरी महानगरपालिकेचा आखाडा मराठवाड्यात कोण पटकावणार याकडे सर्वांचे लक्षलागले आहे.निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकांची घोषणा करताच आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्यानुसार, राज्यातील २९ महापालिकांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. मराठवाड्यातील सर्वात मोठी महानगरपालिका म्हणून छत्रपती संभाजीनगरची महापालिका आहे. संभाजीनगर महापालिकेतील सदस्य संख्या ११३ एवढी असून त्यापाठोपाठ नांदेड-वाघाळा महापालिका ८१, लातूर ७० आणि परभणीसाठी ६५ सदस्यसंख्या आहे, तर नव्याने झालेल्या जालना महापालिकेतील सदस्य संख्या ६५ एवढी आहे. महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानुसार नामनिर्देशन पत्र ३० डिसेंबरपर्यंत दाखल करता येणार आहेत. अर्जाची छाननी ३१ डिसेंबर, उमेदवारी माघारीची मुदत २ जानेवारी, चिन्ह वाटप आणि अंतिम उमेदवार यादी ३ जानेवारी रोजी जाहीर करण्यात येणार आहे, तर मतदान १५ जानेवारी रोजी होणार आहे, तर निकाल १६ जानेवारी रोजी जाहीर करण्यात येणार आहे. नगर परिषद व नगरपंचायत निवडणुकीत मराठवाड्यात सत्ताधारी भाजप, एकनाथ शिंदे गट तसेच राष्ट्रवादी काँग्रेसने चांगलीच मजल गाठली. त्यामुळे पुन्हा या पक्षातील उमेदवारच मराठवाड्यात सर्वाधिक संख्येने निवडून येतील, असे मानले जात आहे; परंतु या तिन्ही पैकी कोणत्या पक्षाचे नगरसेवक व महापालिका विजयात पुढे राहतील याबद्दल मराठवाड्यात उत्सुकता आहे. उद्धव ठाकरे व राज ठाकरे हे एकत्र महानगरपालिका निवडणूक लढविणार असले तरी त्या दोघांची शक्ती मराठवाड्यात काही वेगळी जादू करेल असे वाटत नाही. शेवटी राज्यात व केंद्रात कोणाची सत्ता आहे व मराठवाड्यातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्या महानगरपालिका परिसरांचा विकास निधी कुठून येणार आहे, याचाही सजग मतदार नक्कीच विचार करेल यात शंका नाही. शेवटी महानगरपालिका निवडणूक असल्याने आपल्याला कोणता नगरसेवक कामाचा राहील याचाही विचार मतदार राजा करणार आहे.पैशातून सत्ता आणि सत्तेतून पुन्हा पैसा हे आजच्या राजकारणाचे मूळ सूत्र झाले आहे. त्यामुळे कोणतीही निवडणूक म्हटली की, त्यामध्ये पैशाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. मराठवाड्यातील पाच महानगरपालिका आपल्या ताब्यात याव्यात यासाठी सर्वच पक्षांकडून 'लक्ष्मी दर्शनाची' सोय केली जात आहे. नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुका कार्यकर्त्यांच्या असल्या तरी त्यामध्ये नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आपल्या ताब्यात सत्ता घ्यावी, या उद्देशाने साम-दाम-दंड-भेद या नीतीचा वापर करण्यात आला. मराठवाड्यात नगर परिषद व नगरपंचायत निवडणुकीत काही राजकीय पक्षांकडून पैसे वाटप करताना टोकन पद्धती अवलंबण्यात आली होती.मराठवाड्यात पाच ठिकाणी महानगरपालिका निवडणुकीत प्रत्येक झोनसाठी निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. त्यांना स्वतंत्र कार्यालय व सोयी-सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. निवडणुकीसाठीच्या उमेदवारी अर्जाचे वितरण आणि स्वीकृतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. प्रत्येक ठिकाणी इच्छुक उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. संपूर्ण मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर येथील महानगरपालिका ही मराठवाड्याच्या तुलनेतील श्रीमंत महापालिका म्हणून ओळखली जाते; परंतु अन्य महापालिकांच्या बाबतीत विकासाचा वेग मंद आहे. आर्थिक स्थैर्य नसल्याने प्रशासनात हवी तशी कार्यक्षमता दिसून येत नाही. विकास निधीसाठी नेहमीच मुंबईकडे नजरा लावून बसाव्या लागतात. तेथून निधी मंजूर झाला तरच मराठवाड्याच्या महानगरपालिकेत विकासाची चक्रे सुरू होतात. त्यामध्येही भ्रष्टाचाराचे प्रमाण जास्त असल्याने विकासकामे कोणत्या दर्जाची होतील, याचा अंदाज लावता येतो. म्हणून निवडणुका आल्यावर उमेदवारांना राज्यातील शासनकर्त्यांच्या भरोशावर आश्वासन द्यावे लागतात.मराठवाड्यातील महापालिका ताब्यात घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी यंत्रणा कामाला लावली आहे. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी देखील आपापल्या पदाधिकाऱ्यांना तसेच आमदारांना यासाठी कानमंत्र दिला आहे. दुसऱ्या बाजूने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मराठवाड्यात विशेष लक्ष केंद्रित करत स्वतःचे दौरे वाढविले आहेत. काँग्रेसचे खासदार तसेच आमदार महानगरपालिका निवडणुकीत विशेष लक्ष देत आहेत. जाती-धर्माच्या आधारावर मतांची विभागणी होणार असल्याने एमआयएम या पक्षाने मराठवाड्यातील नांदेड तसेच छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीत स्वतःच्या उमेदवारांची यादी जवळपास निश्चित केली आहे. त्यामुळे भाजप-शिंदे गट-अजित पवार यांची राष्ट्रवादी यांच्यासह सत्ताधारी पक्षातील मित्रपक्ष, काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट व एमआयएम अशी चुरस या निवडणुकीत दिसणार आहे. या पक्षाकडून तिकीट न मिळाल्याने अनेक जण अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याची तयारी करत आहेत. या सर्व राजकीय आखाड्यात मराठवाड्यातील पाच महानगरपालिका कोणाच्या? हे जानेवारी महिन्यात निकालानंतरच स्पष्ट होणार आहे, हे मात्र निश्चित.
भारत-न्यूझीलंड करार: शेतीपासून कारखान्यांपर्यंत रोजगार
पीयूष गोयल (लेखक केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री आहेत. )न्यूझीलंड भारताच्या १००% निर्यातींना शून्य शुल्काचा प्रवेश देणार असून, त्यामुळे वस्त्रोद्योग, चामडे, तयार कपडे, पादत्राणे, सागरी उत्पादने, रत्ने व आभूषणे, हस्तकला आणि अभियांत्रिकी वस्तू यांसारख्या श्रमप्रधान क्षेत्रांना मोठी चालना मिळेल. याचा थेट लाभ भारतीय कामगार, कारागीर, महिला उद्योजक, युवा आणि एमएसएमई क्षेत्राला होईल. यासोबतच, भारताने आतापर्यंतचा सर्वोत्तम बाजारपेठ प्रवेश आणि दूरसंचार, बांधकाम, माहिती तंत्रज्ञान, वित्तीय सेवा, प्रवास आणि पर्यटन यांसह ११८ सेवा क्षेत्रांचा समावेश असलेली सेवांची संधीदेखील मिळवली आहे. या विस्तारित प्रवेशामुळे भारतीय व्यावसायिक आणि व्यवसायांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होईल तसेच विकासाचे नवे मार्ग निर्माण होतील.भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार करार (एफटीए) हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यापार मुत्सद्देगिरीमधील एक धोरणात्मक झेप असून तो रोजगार निर्मितीला गती देणारा, गुंतवणुकीला चालना देणारा आणि संपूर्ण देशभरातील लहान व्यवसाय, विद्यार्थी, महिला, शेतकरी आणि तरुणांसाठी परिवर्तनकारी संधी खुल्या करणारा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन यांनी संयुक्तपणे घोषित केलेला हा करार मोदी सरकारने वाटाघाटी केलेला सातवा मुक्त व्यापार करार असून २०२५ मध्ये युनायटेड किंगडम आणि ओमानसोबत पूर्णत्वास पोहोचलेल्या महत्त्वपूर्ण, परस्पर फायदेशीर करारांनंतर झालेला तिसरा मोठा व्यापार करार आहे. विशेष म्हणजे, हे सर्व मुक्त व्यापार करार भारतापेक्षा लक्षणीयरीत्या जास्त दरडोई उत्पन्न असलेल्या विकसित अर्थव्यवस्थांसोबत झाले आहेत आणि यातून जागतिक व्यापार वाटाघाटींमध्ये भारताची वाढती ताकद आणि विश्वासार्हता अधोरेखित होते. प्रत्येक करारावर सर्व भागधारकांशी विस्तृत विचारविनिमय केल्यानंतरच वाटाघाटी करण्यात आल्या आहेत, ज्यामुळे संतुलित परिणाम आणि विकसित जगासोबत खरा परस्पर फायदेशीर सहभाग सुनिश्चित झाला आहे. रोजगार, वाढ आणि बाजारपेठेतील प्रवेश या मुक्त व्यापार कराराचा एक प्रमुख आधारस्तंभ रोजगार निर्मिती आहे. न्यूझीलंड भारताच्या १००% निर्यातींना शून्य शुल्काचा प्रवेश देणार असून, त्यामुळे वस्त्रोद्योग, चामडे, तयार कपडे, पादत्राणे, सागरी उत्पादने, रत्ने व आभूषणे, हस्तकला आणि अभियांत्रिकी वस्तू यांसारख्या श्रमप्रधान क्षेत्रांना मोठी चालना मिळेल. याचा थेट लाभ भारतीय कामगार, कारागीर, महिला उद्योजक, युवा आणि एमएसएमई क्षेत्राला होईल. यासोबतच, भारताने आतापर्यंतचा सर्वोत्तम बाजारपेठ प्रवेश आणि दूरसंचार, बांधकाम, माहिती तंत्रज्ञान, वित्तीय सेवा, प्रवास आणि पर्यटन यांसह ११८ सेवा क्षेत्रांचा समावेश असलेली सेवांची संधीदेखील मिळवली आहे. या विस्तारित प्रवेशामुळे भारतीय व्यावसायिक आणि व्यवसायांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होईल तसेच विकासाचेनवे मार्ग निर्माण होतील.रोजगार वाढ, बाजारपेठेतील प्रवेशहा करार भारतीय व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांसाठी प्रवेश आणि वास्तव्याच्या सुधारित तरतुदी प्रदान करतो. यामुळे शिकत असताना काम करण्याची संधी, शिक्षणानंतर रोजगार आणि एक संरचित वर्किंग-हॉलिडे व्हिसा चौकट शक्य होते. विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित (STEM) पदवीधर आणि पदव्युत्तर पदवीधर आता तीन वर्षांपर्यंत काम करू शकतील, तर डॉक्टरल स्कॉलर्स चार वर्षांपर्यंत काम करू शकतील. यामुळे भारतातील तरुणांसाठी अभूतपूर्व जागतिक अनुभव आणि करिअरचे मार्ग खुले होतात. एक नवा तात्पुरता रोजगार प्रवेश व्हिसा आंतरराष्ट्रीय संधी शोधणाऱ्या कुशल भारतीय व्यावसायिकांना आणखी पाठबळ पुरवतो.शेतकऱ्यांची भरभराटभारतीय शेतकऱ्यांनी जागतिक पातळीवर महत्त्वपूर्ण भूमिका बजावायला हवी, असे पंतप्रधान मोदी यांना ठामपणे वाटते. ही वचनबद्धता या एफटीएमधून प्रतिबिंबित होते. हा करार सफरचंद, किवी आणि मध यांचा समावेश असलेली कृषी उत्पादकता भागीदारी स्थापित करतो, ज्याचा उद्देश देशांतर्गत उत्पादकता वाढवणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे हा आहे. न्यूझीलंडने बासमती तांदळासाठी भौगोलिक संकेतक (GI) स्तरावरील संरक्षणासाठी देखील वचनबद्धता दर्शविली आहे. यामुळे भारतीय तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आधार मिळेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, भारताने हे सुनिश्चित केले आहे, की तांदूळ, दुग्धजन्य पदार्थ, गहू, सोया आणि इतर प्रमुख कृषी उत्पादनांसारखी संवेदनशील क्षेत्रे पूर्णपणे संरक्षित राहतील आणि देशांतर्गत उपजीविकेला हानी पोहोचवणारी कोणतीही बाजारपेठ खुली केली जाणार नाही.नवोन्मेषीएफटीए, गुंतवणूक वचनबद्धताभारताचे मुक्त व्यापार करार आज केवळ शुल्क कपातीपुरते मर्यादित नाही. राष्ट्रहित जपत, ते शेतकरी, एमएसएमई, महिला आणि युवांसाठी नव्या संधी खुल्या करण्याचे साधन आहे. विविध व्यापार करारांमुळे भारतीय निर्यातींना त्वरित सीमाशुल्क निर्मूलनाचा लाभ मिळत आहे, तर भारताकडून बाजारपेठ उघडण्याची प्रक्रिया संतुलित आणि टप्प्याटप्प्याने ठेवण्यात आली आहे. न्यूझीलंडने पुढील १५ वर्षांत २० अब्ज अमेरिकी डॉलर्स इतकी परदेशी थेट गुंतवणूक करण्याची वचनबद्धता व्यक्त केली आहे. ही तरतूद स्वित्झर्लंड, नॉर्वे, आइसलँड आणि लिक्टन्स्टाईन या इएफटीए देशांसोबतच्या भारताच्या मुक्त व्यापार करारातील नवोन्मेषी, गुंतवणूक-संलग्न तरतुदींच्या धर्तीवर आहे. न्यूझीलंडसाठी भारतातील परदेशी थेट गुंतवणुकीत ही एक मोठी झेप आहे. गेल्या २५ वर्षांत न्यूझीलंडने भारतात सुमारे ₹६४३ कोटींची गुंतवणूक केली होती. नवी वचनबद्धता, १५ वर्षांत सुमारे ₹१.८ लाख कोटींची असून प्रचंड मोठी वाढ दर्शवते आणि ठरवलेली गुंतवणूक उद्दिष्टे पूर्ण न झाल्यास क्लॉबॅक तंत्राची तरतूद यात आहे. या गुंतवणुकीचा बराचसा भाग कृषी, दुग्धव्यवसाय, एमएसएमई, शिक्षण, क्रीडा आणि युवाविकासासाठी वापरला जाणार असून, यामुळे व्यापक आणि समावेशक विकासाला चालना मिळेल.महिलांच्या नेतृत्वातील पहिला करारहा करार आणखी एका अर्थाने ऐतिहासिक आहे. हा भारताचा महिलांच्या नेतृत्वातील पहिला मुक्त व्यापार करार आहे. वाटाघाटी करणारी टीम - मुख्य मसलतकारापासून ते वस्तू, सेवा, गुंतवणूक विभागांच्या उपमुख्य मसलतकारांपर्यंत आणि न्यूझीलंडमधल्या आपल्या राजदूतांपर्यंत - बहुतांशकरून महिलांची होती.पंतप्रधानांच्या विकास कार्यक्रमात आपल्या कर्तृत्ववान महिला अधिकाधिक नेतृत्व भूमिका बजावत आहेत.भारताची एफटीए धोरणनीतीभारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार करार हा भारताच्या स्पष्ट धोरणाचे उत्तम उदाहरण आहे. भारतीय उत्पादनांशी अन्यायकारक स्पर्धा न करता, भारताच्या श्रम-केंद्रित उद्योगांसाठी आपली बाजारपेठ खुली करणाऱ्या विकसित अर्थव्यवस्थांसोबत भागीदारी करणे, हे भारताचे धोरण आहे. मोदी सरकारच्या नेतृत्वात झालेले व्यापार करार, केवळ व्यवहारापुरते मर्यादित नाहीत, तर ते अर्थव्यवस्था मजबूत करण्याच्या आणि भारतीयांचे, विशेषतः गरीब लोकांचे जीवनमान सुधारण्याच्या व्यापक ध्येयाचा एक भाग आहेत. २०१४ मध्ये भारताची गणना “फ्रॅजाइल फाइव्ह” देशांमध्ये होत होती. आज भारताचे, जागतिक विकासाचे इंजिन आणि जगभरातील व्यापार व गुंतवणुकीसाठी एक पसंतीचा भागीदार बनण्यापर्यंतचे परिवर्तन या धोरणाने घडवले आहे. आज भारत आत्मविश्वासाने आणि ठामपणे वाटाघाटी करतो. कृषी, दुग्धव्यवसाय आणि इतर संवेदनशील क्षेत्रांच्या पूर्ण संरक्षणाची सुनिश्चिती करतो आणि परस्पर लाभाचे असतील तरच करारांवर स्वाक्षरी करतो.व्यापार प्रशासनातील सकारात्मक परिवर्तनभारताचा सध्याचा दृष्टिकोन पूर्वीच्या दृष्टिकोनापेक्षा वेगळा आहे. पूर्वीच्या व्यापार धोरणांमुळे भारतीय बाजारपेठा कमी किमतीच्या आयातीसाठी बेफिकीरपणे खुल्या केल्या गेल्या, ज्यामुळे लहान व्यवसाय आणि रोजगारांना धोका निर्माण झाला आणि हे अनेकदा पुरेशा विचारविनिमयाशिवाय केले गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णायक नेतृत्वामुळे भारताची प्रतिष्ठा, विश्वासार्हता आणि जागतिक पातळीवरील वाटाघाटी करण्याची ताकद पुन्हा प्रस्थापित झाली आहे. भारतीय उद्योगविश्वाकडून कौतुकास पात्र ठरलेला भारत–न्यूझीलंड एफटीए हा २०१४ पासूनच्या प्रशासनातील सकारात्मक बदलाचे फलित आहे. राष्ट्रीय हितांचे संरक्षण करत वस्तू, सेवा, गुंतवणूक आणि गतिशीलता एकात्मिक करणारा हा करार भारताच्या आधुनिक, समावेशक आणि संतुलित व्यापार मुत्सद्देगिरीचे प्रतिबिंब आहे. भारत आणि न्यूझीलंडमधील आर्थिक एकात्मता अधिक दृढ होत असताना, हा मुक्त व्यापार करार, बाजारपेठा खुल्या करतानाच मानवी-केंद्रित विकास आणि सीमापार सामायिक समृद्धी, व्यापारामुळे कशी साधता येते, हे दर्शवतो.
गेल्या विधानसभा निवडणुकांपासून एकत्र येणार होते, ते दोन भाऊ शुक्रवारी अधिकृतरीत्या एकत्र आले. राज्यात बऱ्याच काळापासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका विधानसभा निवडणुकीनंतर होणार हे उघड होतं. विधानसभा निवडणुकात हाती काही लागणार नाही, हे लक्षात आल्यानंतर निदान मुंबई महापालिकेसाठी तरी आपण एकत्र आलं पाहिजे, हे दोन्ही भावांना कळून चुकलं. अमित ठाकरे यांच्या माहीम मतदारसंघातील पराभवाने त्याला बळ पुरवलं. मूळ शिवसेनेने आधी मुंबई महापालिका जिंकली आणि त्यानंतर तिचा महाराष्ट्रात विस्तार झाला. त्यामुळे, कसंही करून मुंबई महापालिकेची निवडणूक प्रतिष्ठेने लढायलाच हवी; अन्यथा आपलं नांवच पुसलं जाईल, या भीतीने दोन्ही भाऊ एकत्र आले आहेत. त्यांच्या एकत्र येण्याचं वर्णन 'भीतीसंगम' असं करण्यात आलं आहे, ते शंभर टक्के खरंच आहे. ही स्थिती फक्त ठाकरे बंधूंची नाही, आधी विधानसभा आणि नंतर नगर परिषदा-नगरपंचायतींच्या निवडणुकीत भाजप-शिवसेनेचा जो झंझावात दिसला, त्यातून सर्वच विरोधी पक्षांची ही अवस्था झाली आहे. महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून या गोंधळलेल्या पक्षांची जी पळापळ सुरू आहे, त्यातून निवडणुकीनंतर त्यांची स्थिती काय असेल, याचा अंदाज आताच आल्याशिवाय राहात नाही. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला तर आपण कुठे आहोत, कोणाबरोबर आणि कुठपर्यंत जाणार आहोत हेच कळेनासं झालं आहे. मुंबईत ठाकरे बंधूंनी नाकारल्यानंतर त्यांची आता काँग्रेसकडे 'घेता का बरोबर?' अशी विचारणा सुरू आहे. मुंबईबाहेर पुतणे अजित पवार यांच्यामार्फत त्यांनी महायुतीशी गुपचूप संधान बांधलं आहेच!काँग्रेसला नगरपालिका निवडणुकीत अपेक्षेपेक्षा बरं यश मिळालं असलं, तरी महापालिका निवडणुकीत काय होईल, याची कल्पना त्या पक्षात कोणालाच नाही. त्या पक्षाचे जिल्हावार नेते अधांतरी लटकत असल्यासारखी विधानं करताहेत ती त्यामुळेच. पदामुळे राज्य पातळीवरचे नेते झालेल्या प्रदेशाध्यक्षांचा आणि या नेत्यांचा संवाद अशक्य आहे. त्या पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते आणि मतदार काय करतील, यावर त्यांचं निवडणुकीतलं भवितव्य अवलंबून आहे. अशा बेभरवशाच्या, कोणतीही शाश्वती नसलेल्या, 'लॉटरी'सम यशासाठीही उबाठाचे शक्यते सगळे प्रयत्न करून झाले. 'मनसेसह आपली आघाडी शक्य नाही' असं काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सुनावल्यानंतरच ते थोडे थंड पडले. अन्यथा,' मरता, क्या नहीं करता?' या न्यायाने जमेल तिथून ताकद मिळवण्याचे उबाठाचे प्रयत्न सुरूच आहेत. कारण, त्याशिवाय निवडणुकीत आपला निभाव लागणार नाही, याची त्यांना पूर्ण खात्री आहे! भाऊ म्हणून दोघे एकत्र आले, कुटुंबच्या कुटुंब एकत्र दिसायला लागली, हे सगळं ठीक आहे. पण, हा राजकीय देखावा किती आणि त्यात कुटुंबातल्या प्रेमाचा ओलावा किती? परस्परांविषयी विश्वास किती? मनसैनिकांना विचारा. मागच्या अनुभवांवरून त्यांचं आजही म्हणणं आहे, कधी-कुठे दगाफटका होईल, सांगता येत नाही. एकत्र येणं खरंच इतकं खरं असतं, तर जागावाटपाच्या चर्चेला इतकी लांबण लागलीच नसती. जागावाटपाच्या चर्चेत दोन्ही कुटुंबं एवढी गुंतली होती, की दोन्ही कुटुंबातल्या एकालाही नगरपालिका-नगर परिषद निवडणुकीसाठी प्रचाराला घराबाहेर पडता आलं नाही! या निवडणुका 'कार्यकर्त्यांच्या' म्हटल्या जातात. त्या निवडणुकीसाठी, कार्यकर्त्यांसाठी कोणा एकालाही थोडा वेळ काढता आला नाही. आता युतीची एकत्र गोष्ट झाली, पण जागावाटपाचं गुर्हाळ अजून संपलेलं नाही. जिथे मोठा गाजावाजा करूनही दोन भाऊ मनाने, विश्वासाने एक होऊ शकत नाहीत; तिथे पक्ष कधी विश्वासाने एकत्र येणार? सगळीकडे दोन भाऊ एकत्र आल्याची, कुटुंब एक झाल्याची चर्चा; पण पक्ष वेगवेगळेच राहणार असल्याची आणि व्यवहारात पुन्हा पूर्वीसारखंच कटकपट होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे याचं कारण तेच आहे.सगळा आटापिटा आहे, तो मुंबई - ठाणे - पुणे - नाशिक- संभाजीनगरमधल्या मतांसाठी. तिथल्या मतदारांनी यांना मत का द्यावं? या प्रश्नाला यांच्याकडे उत्तर नाही. मराठी मतांच्या ध्रुवीकरणावर यांची सगळी भिस्त आहे. पण, दोघे एकत्र येऊनही ते शक्य नाही. कारण, यांच्याच कारकिर्दीत मुंबईची किती वाट लागली, नाशिकचं काय झालं ते मराठी माणसाने पाहिलं आहे. यांच्याच धोरणाने मराठी माणूस मुंबईबाहेर फेकला गेला. ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांत ढकलला गेलेला मराठी माणूस तिथे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसोबत आहे. मुंबईतले शिवसेनेचे निम्म्यापेक्षा जास्त माजी नगरसेवक, शाखाप्रमुख, गटप्रमुख शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मूळ शिवसेनेत आहेत. ज्यांच्या कार्यकर्तृत्वाने मुंबईतला मराठी टक्का घसरला, तिथे उर्वरित मराठी माणसाला आता स्वतःच्या अस्तित्वाची काळजी आहे. अडचणीला जो पक्ष आपल्या दाराशी येईल, अशा पक्षांकडेच मुंबईतला मतदार वळला आहे. त्याची हिंदू अस्मिता जागृत आहे. विविध प्रांतातून आलेल्या हिंदू बांधवांबरोबर तो कामधामाने जोडलेला आहे. गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशा, झारखंड... जिथून कुठून हिंदू बांधव मुंबईत आला, तो मुंबईत राहतो; पण त्याचं नातं त्याच्या मूळ प्रदेशातील भारतीय जनता पक्षाच्या राजवटीशी जोडलेलं आहे. मतदाराचे अनेक हितसंबंध असतात. वेगवेगळ्या कारणांनी त्याची राजकीय मतं तयार होत असतात. त्यातून तो मतदान करत असतो. त्या सगळ्या गणितात कुठल्या कुटुंबातलं कोण एकत्र आलं म्हणून किती टक्के फरक पडणार आहे? आजवरचा इतिहास काय आहे? तुम्ही लोकांसाठी, आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्यासाठी काय केलं? हा आहे. तिथे सारं शून्य आहे. त्यामुळे, अशा कितीही शून्यांची बेरीज केली, तरी त्याने काय होणार?
‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ ३० जानेवारीपासून चित्रपटगृहात
नाताळच्या निमित्ताने मराठी प्रेक्षकांसाठी एक जबरदस्त हास्याची भेट समोर आली आहे! प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ‘कुरळे ब्रदर्स’ पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर धमाल करण्यासाठी सज्ज झाले आहेत. ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ या बहुप्रतिक्षित चित्रपटाचं नवं पोस्टर नुकतंच सोशल मीडियावर झळकलं असून हा चित्रपट येत्या ३० जानेवारी २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अंकुश चौधरी यांच्यासारख्या अनुभवी दिग्दर्शकाच्या हातात ही कथा पुन्हा एकदा साकारली जात असल्यामुळे, या वेळी हास्याबरोबरच कथेतली पकडही तितकीच भक्कम असणार, यांचा अंदाज येतोय. सुशीलकुमार अग्रवाल आणि अल्ट्रा मीडिया ॲण्ड एंटरटेनमेंट प्रस्तुत, उषा काकडे प्रॉडक्शन्स, ईओडी. मीडिया उदाहरणार्थ निर्मित आणि अमेय विनोद खोपकर पिक्चर्स यांच्या सहकार्याने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे उषा काकडे, पुष्कर यावलकर, सुधीर कोलते, स्वाती खोपकर आणि निनाद नंदकुमार बत्तीन हे निर्माते आहेत. मोहसिन खान, यशराज टिळेकर, सौरभ ललवाणी आणि धनविक एंटरटेनमेंट सहनिर्माते असून स्मिथ पीटर तेलगोटे सहायक निर्माता आहेत.
झी स्टुडिओजच्या ‘रुबाब’ या आगामी मराठी चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून, पहिलीच झलक आणि ‘तुझ्यासारखी नको… तूच पाहिजे’ ही टॅगलाईन प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे.टीझरमधून समोर येणारी कथा ही एका डॅशिंग, रुबाबदार नायकाची आणि त्याच्या ड्रीम गर्लची आहे. मात्र ही केवळ गोडगुलाबी प्रेमकहाणी नसून, एक रुबाबदार प्रेमकहाणी आहे. प्रेमासाठी कोणतीही किंमत मोजायला तयार असलेला, स्वतःचे नियम स्वतः ठरवणाऱ्या या नायकाची प्रेमकहाणी सगळ्यांनाच जबरदस्त आवडेल हे नक्की. दिग्दर्शक शेखर बापू रणखांबे म्हणतात, “ ‘रुबाब’ हा चित्रपट स्वतःचा ठाम आवाज असलेल्या तरुणाईची कथा आहे. आजच्या पिढीचे प्रेम प्रामाणिक असते मात्र त्यात एक स्वॅग असतो. तोच रुबाब आम्ही या चित्रपटात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.” झी स्टुडिओज प्रस्तुत आणि झणकर फिल्म्स निर्मित ‘रुबाब’ या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन शेखर बापू रणखांबे यांनी केले असून संजय झणकर आणि गौरी झणकर निर्माते आहेत तर उमेश कुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर प्रस्तुतकर्ता आहेत. या चित्रपटात संभाजी ससाणे व शितल पाटील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. येत्या ६ फेब्रुवारीपासून हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.https://www.youtube.com/watch?v=VczAIOmNJ38
नृत्य, संगीत आणि प्रकाशाचा अद्भुत त्रिवेणी संगम!
नेहमीच्या सादरीकरणापेक्षा काहीतरी नवीन आणि अविस्मरणीय अनुभव देणारा 'रिदम ऑन फायर' हा खास डान्सिकल कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'शिवमनी वर्ल्ड एंटरटेनमेंट' निर्मित आणि मानसी टाकणे यांची पहिली निर्मिती असलेला हा कार्यक्रम रंगभूमीवर नृत्य, प्रकाश आणि ध्वनी यांच्या समन्वयाने एक वेगळा प्रयोग सादर करणार आहे. या कार्यक्रमाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तो अत्यंत वेगळ्या पद्धतीने सादर होणार आहे आणि यात केवळ तीन कलाकार नृत्य सादर करणार आहेत. शिवानी कथले यांनी सांगितले, रिदम ऑन फायर डान्स शो ची संकल्पना वेगळी आहे. या कार्यक्रमाची 'वर्ल्ड टूर' करण्याचं आमच्या संपूर्ण टीमचं स्वप्न आहे. ‘रिदम ऑन फायर’ मध्ये लाईट्स आणि साऊंड या घटकांचे महत्व खूप मोठे आहे आणि या दोन तांत्रिक बाजूंच्या मदतीने संपूर्ण कार्यक्रम एका वेगळ्या स्तरावर नेला जाणार आहे. कार्यक्रमात निकिता मानकामे, ऐश्वर्या शिंदे आणि शिवानी कथले या तीन गुणी नृत्यांगना नृत्य सादर करणार आहेत. या कार्यक्रमाची संकल्पना साई पीयूष यांची आहे, ज्यांनी या डान्सिकलसाठी थीम साँगदेखील तयार केले आहे. नृत्य दिग्दर्शनाची जबाबदारी विश्वास नाटेकर आणि मयूर वैद्य यांनी सांभाळली असून, त्यांनी या सादरीकरणात खास 'वेगळेपण' जपले आहे. या डान्सिकल शोच्या दिग्दर्शनाची बाजू प्रशांत विचारे यांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे. कार्यक्रमाचे नियोजन आणि निवेदन मनोज टाकणे करत आहेत. त्यांच्या निवेदनाचे वैशिष्ट्य म्हणजे ते प्रेक्षकांशी थेट संवाद साधून कार्यक्रमाला अधिक रंगतदार बनवतील. शीतल तळपदे यांची प्रकाश योजना 'नेत्रदीपक' असून, मयूरा रानडे यांनी खास आणि वेगळी वेशभूषा तयार केली आहे. रविवार, २८ डिसेंबर रोजी रात्री ८.३० वाजता वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह पनवेल येथे रिदम ऑन फायरचा प्रयोग आहे.
Ben Stokes admits this is the most challenging period : अॅशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या ३-० अशा मानहानीकारक पराभवानंतर इंग्लंडचा संघ सध्या दुहेरी संकटात सापडला आहे. एकीकडे मैदानावरील खराब कामगिरी आणि दुसरीकडे खेळाडूंच्या शिस्तीबाबत निर्माण झालेले प्रश्न, यामुळे कर्णधार बेन स्टोक्स कमालीच्या दबावाखाली आहे. या पार्श्वभूमीवर स्टोक्सने आपली बाजू मांडताना, हा आपल्या कारकिर्दीतील सर्वात कठीण काळ […] The post Ben Stokes : ‘कारकीर्दीतील सर्वात कठीण काळ!’, स्टोक्सची कबुली; बेन डकेटच्या मद्यधुंद व्हिडीओने पेटला वाद appeared first on Dainik Prabhat .
सेमीकंडक्टर क्षेत्रात चीनला ‘वेगळा न्याय’; अमेरिकेचे शुल्क धोरण पुढे ढकलले
वाशिंग्टन – अमेरिकेने विविध देशाबरोबर व्यापार युद्ध सुरू केले असून एकतर्फी आयात शुल्क लावले आहे. मात्र चीन अमेरिकेबरोबरचा व्यापार असंतुलित पद्धतीने करत असूनही अमेरिकेने आतापर्यंत चीनविरोधात आयात शुल्काची अंमलबजावणी टाळली आहे. सेमीकंडक्टर संदर्भातही अमेरिकेने चीनसाठी वेगळा न्याय देण्याचे धोरण चालूच ठेवले आहे. प्राप्त माहितीनुसार सेमीकंडक्टर क्षेत्रात चीन अयोग्य व्यापार धोरण राबवतो असा निष्कर्ष अमेरिकेतील चौकशी […] The post सेमीकंडक्टर क्षेत्रात चीनला ‘वेगळा न्याय’; अमेरिकेचे शुल्क धोरण पुढे ढकलले appeared first on Dainik Prabhat .
रखडलेल्या गृह प्रकल्पासाठी केंद्र सरकारची योजना; एक लाख घरे उपलब्ध होणार
नवी दिल्ली – बर्याच मध्यमवर्गियांनी घराची नोंदणी करून कर्जाचे हप्ते देण्यास सुरुवात केली आहे. मात्र संबंधित गृह प्रकल्प विविध टप्प्यात रखडले आहेत. अशा प्रकल्पांच्या पूर्णत्वासाठी केंद्र सरकार पुन्हा एकदा 15,000 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करणार आहे. त्यामुळे ही घरे संबंधित ग्राहकांना लवकर मिळण्यास मदत होईल. बर्याच ग्राहकांनी सरकारकडे या संदर्भात विचारणा केल्यानंतर काही वर्षांपूर्वी केंद्र […] The post रखडलेल्या गृह प्रकल्पासाठी केंद्र सरकारची योजना; एक लाख घरे उपलब्ध होणार appeared first on Dainik Prabhat .
Chandrapur kidney racket : चंद्रपूरमधील किडनी रॅकेटच्या सूत्रधाराला पोलीस कोठडी
Chandrapur kidney racket : चंद्रपूरमधील युवा शेतकऱ्याच्या कर्जफेडीसाठी त्याची किडनी काढण्याची घटना नुकताच उघडकीस आली होती. या प्रकरणात सोलापूरमध्ये एकाला सूत्रधाराला अटक करण्यात आली असून त्याची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हे एक आंतरराष्ट्रीय रॅकेट असून सूत्रधाराचीही किडनी काढण्यात आली आहे. असे असूनही तो इतरांनाही याच मार्गावर ढकलून परदेशात किडनी काढण्याचे रॅकेट […] The post Chandrapur kidney racket : चंद्रपूरमधील किडनी रॅकेटच्या सूत्रधाराला पोलीस कोठडी appeared first on Dainik Prabhat .
अदानी समूहाची अधिग्रहण मोहीम वेगात; 2023 नंतर 80 हजार कोटींची 33 कंपन्यांची खरेदी
नवी दिल्ली – भांडवल सुलभता आणि वाढलेला आत्मविश्वास या आधारावर अदानी समूहाने कंपनी अधिग्रहणाची मोहीम तीव्र केली आहे. 2023 पासून या समूहाने 80 हजार कोटी रुपये म्हणजे 9.6 अब्ज डॉलर मोजून 33 कंपन्यांचे अधिग्रहण केले आहे. मध्यंतरी या कंपनीवर गैरप्रकाराचा आरोप अमेरिकेतून झाल्यावर अल्प काळ या मोहिमेवर परिणाम झाला होता. मात्र आता हा समूह अधिक […] The post अदानी समूहाची अधिग्रहण मोहीम वेगात; 2023 नंतर 80 हजार कोटींची 33 कंपन्यांची खरेदी appeared first on Dainik Prabhat .
Petrol pumps: देशात पेट्रोल पंपांची संख्या एक लाखांवर; भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर
नवी दिल्ली – भारतात वाहन घेऊ इच्छिणार्यांची संख्या शहराबरोबरच खेड्यातही वाढत आहे. रस्त्यांची संख्या आणि दर्जा वाढत आहे. अशा परिस्थितीत वाढलेल्या ग्राहकांना पेट्रोल पुरविण्यासाठी तेल कंपन्यांनी नवीन पेट्रोल पंप उघडण्याची मोहीम सुरू केली आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये देशातील पेट्रोल पंपांची संख्या पन्नास हजारावरून एक लाखावर गेली आहे. तेल मंत्रालयाच्या पेट्रोल पंपासंदर्भातील विभागाने जारी केलेल्या माहितीत […] The post Petrol pumps: देशात पेट्रोल पंपांची संख्या एक लाखांवर; भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर appeared first on Dainik Prabhat .
सातारा : ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन समीप येऊन ठेपल्याने संपूर्ण महाराष्ट्राच्या साहित्यिक वर्तुळाच्या नजरा साताऱ्याकडे लागून राहिल्या आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पदाधिकारी संयोजन मंडळासह साताऱ्यातील साहित्य प्रेमींनी संमेलनात सक्रिय सहभाग नोंदवला असून या साहित्य संमेलनावर सातारकरांची छाप कशी राहील यावर कटाक्ष ठेवला आहे. अगदी प्रकाशन कट्ट्यापासून ते निमंत्रित साहित्यिकांपर्यंत सातारकर […] The post Marathi Sahitya Sammelan : साहित्य संमेलनावर राहणार सातारकरांची छाप; संमेलनाच्या वॉर रुममध्ये संयोजक आणि साहित्यिक मंडळींची वर्दळ सुरु appeared first on Dainik Prabhat .
मुंबई झाली पूर्णपणे बॅनर,फलकमुक्त, दहा दिवसांमध्ये ७६५१ जाहिरातींवर कारवाई
मुंबई (विशेष प्रतिनिधी) :मुंबई महापालिकेची निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यांनतर मुंबईला विद्रुप करणाऱ्या राजकीय जाहिरातींवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.आतापर्यंत साडेसात हजारांहूना अधिक बॅनर, पोस्टर, झेंडे आदींवर कारवाई करून ते हटवण्यात आले आहे. मुंबईतील खासगी जागांवरच सर्वांधिक ही बॅनरबाजी करण्यात आली होती. परंतु निवडणूक आचारसंहितेमुळे मुंबईला बकाल स्वरुप देणाऱ्या या पोस्टरबाजीवर कारवाई करण्यात आल्यामुळे मुंबई आता बॅनर आणि पोस्टरमुक्त झालेले पहायला मिळत आहे.मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणुकीकरता आचांरसहिता लागू झाल्यांनंतर मुंबईतील विविध राजकीय पक्ष आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांकडून लावण्यात आलेले फलक, बॅनर, पोस्टर तसेच झेंडे हटवण्यास सुरुवात झाली आहे. १५ डिसेंबरला झालेल्या पहिल्या दिवशीच्या कारवाईमध्ये तब्बल १८१३ अनधिकृत बॅनर व फलकांसह झेंड्यांवर कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर १६ डिसेंबर रोजी सर्वाधिक ३७५० जाहिरातींवर कारवाई करण्यात आली. त्यामुळे प्रत्येक दिवशी ही कारवाई तीव्र करत अखेर २५ डिसेंबर २०२५ रोजी एकाही पोस्टर,बॅनर तसेच झेंड्यांवर कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे परवाना विभागाच्या सातत्यपूर्ण कारवाईनंतर मुंबईत आजमितीस एकही राजकीय बॅनर, फलक आणि पोस्टर तसेच झेंडे नसल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.दिनांक १५ ते २५ डिसेंबर २०२५ पर्यंतची कारवाई भिंती रंगवणे : २७ पोस्टर :९२५ कटआऊट होर्डींग :६९८ बॅनर : ४८७३ झेंडे : ११२८ एकूण : ७६५१
माजी खासदार राहुल शेवाळेंची वहिनी थेट धारावीतून लढणार
मुंबई (विशेष प्रतिनिधी) :शिवसेनेचे सरचिटणीस आणि माजी खासदार राहुल शेवाळे यांची वहिनी वैशाली शेवाळे या महापालिकेच्या एम पूर्व विभागातील मानखुर्दमधील प्रभाग १४२मधून तब्बल २१९० मतांनी निवडून आल्या होत्या. मात्र, मागील काही वर्षांत हा प्रभाग शेवाळेंनी बांधल्यानंतर आता या प्रभागातून वैशाली शेवाळे यांनी चक्क धारावीत मोर्चा वळवला आहे.धारावीतील प्रभाग क्रमांक १८३ हा अनुसूचित जाती महिला प्रवर्गाकरता राखीव झाल्याने शेवाळेंचे बालपण गेलेल्या या धारावीतून त्यांनी आता निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. सध्या वैशाली शेवाळे यांनी प्रभाग १८३मध्ये शाखा उघडून त्यातून प्रचाराला सुरुवातही केली आहे. त्यामुळे शेवाळेंच्या माध्यमातून शिवसेनेचे खाते खोलले जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.सन २०१७च्या सार्वत्रिक निवडणुकीत मानखुर्दमधील प्रभाग क्रमांक १४२ हा अनुसूचित जाती महिला प्रवर्गाकरता आरक्षित झाल्याने शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी आपल्या वहिनीला निवडणूक रिंगणात उतरवले होते. तर राहुल शेवाळे यांची पत्नी कामिनी शेवाळे या प्रभाग क्रमांक १४४मधून उमेदवारी दिली होती. परंतु वैशाली शेवाळे यांनी भाजपाच्या उमेदवाराचा २१९० मतांनी पराभव करून त्या विजयी झाल्या. तर प्रभाग क्रमांक १४४मधून कामिनी मयेकर शेवाळे यांचा केवळ ४९१ मतांनी पराभव झाला होता. भाजपाच्या अनिता पांचाळ या विजयी झाल्या होत्या. मात्र, आता वैशाली शेवाळे यांचा प्रभाग क्रमांक १४२ हा आता महिला राखीव झाला. तर प्रभाग क्रमांक १४४ हा सर्वसाधारण प्रवर्गाकरता राखीव झाला आहे.त्यामुळे वैशाली शेवाळे यांचा महिला राखीव झाल्याने यावर शिवसेनेचा दावा असून वैशाली शेवाळे या अनुसूचित जाती महिला असल्याने त्यांना धारावीतील प्रभाग क्रमांक १८३मध्ये उतरवण्याचा निर्णय घेण्यता आला आहे. राहुल शेवाळे आणि त्यांचे बंधू नवीन शेवाळे यांचे बालपण धारावीतच गेले आहे. त्यामुळे आपले बालपण गेलेल्या धारावीतून राहुल शेवाळेंनी आपल्या वहिनीला निवडणूक रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. याप्रभागातून परंपार नरेश पेहलवान आणि त्यांची सून निवडून आली आहे. परंतु यंदा प्रथमच हा प्रभाग अनुसूचित जाती महिलाकरता राखीव झाल्याने शिवसेनेकडे सक्षम उमेदवार नसल्याने शिवसेनेला मानखुर्दमधून धारावीत आणण्याची वेळ आली आहे. गंगा माने आणि कुणाल माने यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे त्यांची मदत शिवसेनेला होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या प्रभागात शिवसेनेला चांगली मदत मिळण्याची शक्यता आहे. तसेच धनुष्यबाण चिन्ह असल्याने वैशाली शेवाळे यांच्यासाठी हा प्रभाग पुरक ठरण्याची शक्यता आहे. मानखुर्दमधील भागांत डॉ नवीन शेवाळे यांनी वैद्यकीय सेवा देत विभागात आपली सेवा सुरु केली होती. आता ही सेवा धारावीतील जनतेला मिळण्याची शक्यता आहे. धारावीमध्ये वकील शेख हे एकमेव शिवसेनेत असल्यामुळे भविष्यात शिवसेनेला धारावीतून अपेक्षितपणे नगरसेवक निवडून आणता येवू शकतो असे बोलले जात आहे.
Share Market: 2025 मध्ये स्मॉल कॅप–मिडकॅप मागे, ब्लूचिपकडे गुंतवणूकदारांचा कल
मुंबई – सरलेल्या 2025 या वर्षात स्मॉल कॅप आणि मिडकॅप मधील कंपन्यांनी मुख्य निर्देशांकांच्या तुलनेत कमी परतावा दिला. 2022 व 23 मध्ये स्मॉल कॅप व मिडकॅप मधील कंपन्यांच्या शेअरच्या भावात आवश्यकतेपेक्षा जास्त वाढ झाल्याची भावना निर्माण झाल्यामुळे गुंतवणूकदारांनी 2025 मध्ये या कंपन्यांच्या शेअरची विक्री करून नफा काढून घेतला. रुपयाच्या मूल्यात झालेली मोठी घट, भारत -अमेरिका […] The post Share Market: 2025 मध्ये स्मॉल कॅप–मिडकॅप मागे, ब्लूचिपकडे गुंतवणूकदारांचा कल appeared first on Dainik Prabhat .
खासदार, आमदार, माजी आमदारांची आपल्या नातेवाईकांसाठी तिकीटाकरता फिल्डींग
मुंबई (विशेष प्रतिनिधी) :मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी महायुती आणि ठाकरे बंधूंची युतीची झालेली असून आता उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाल्यानंतर वशिला लावत आपल्या पदरी उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, या इच्छुकांच्या रांगेत काही पक्षांचे आमदार आणि माजी आमदार व खासदार हे आपल्या मुलांचे तसेच नातेवाईकांची वर्णी लावण्याचा प्रयत्न करत आहेत. यामध्ये उबाठा शिवसेनेचे सुनील प्रभू, अजय चौधरी, माजी आमदार दगडू सकपाळ, भाजपाचे आमदार मनिषा चौधरी, शिवसेनेचे खासदार रविंद्र वायकर, आमदार अशोक पाटील आदी लोकप्रतिनिधी आपल्या मुलांची आणि नातेवाईकांना या माध्यमातून उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती मिळत आहे.मुंबई महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीकरता उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली असून प्रत्येक पक्षाकडून इच्छुक उमेदवारांची यादीही निश्चित करण्यात आली आहे. परंतु कोणत्याही प्रकारे पक्षामध्ये बंडखोरी होवू नये यासाठी उमेदवारी यादी जाहीर करण्यास विलंब केला जात आहे. मात्र, यामध्ये काही पक्षाच्या आमदार आणि खासदारांच्या उमेदवारांना महापालिकेच्या माध्यमातून संसदीय राजकारणाच्या अभ्यासाची पहिली पायरी चढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. यापूर्वी आमदार अमित साटम यांचे मेव्हणे रोहन राठोड, आमदार भारती लव्हेकर यांचे नातेवाईक योगीराज दाभाडकर, विद्या ठाकूर यांचे पुत्र दिपक ठाकूर, पराग अळवणी यांची पत्नी ज्योती अळवणी, खासदार राहुल शेवाळे यांची वहिनी वैशाली शेवाळे, आमदार नवाब मलिक यांची बहिण डॉ सईदा खान, भाऊ कप्तान मलिक, माजी आमदार सुरेश गंभीर यांची कन्या शितल, माजी आमदार राज पुरोहित यांचे पुत्र आकाश, आमदार राहुल नार्वेकर यांचे बंधू मकरंद नार्वेकर आणि वहिनी हर्षिता नार्वेकर, माजी खासदार किरीट सोमय्या यांचे पुत्र नील आदी आमदार आणि माजी आमदार यांचे नातेवाईक हे महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेतमात्र, आता आगामी निवडणुकीत उबाठा शिवसेनेचे सुनील प्रभू यांचे पुत्रे अंकित, आमदार अजय चौधरी यांची सून गौरी, माजी आमदार दगडू सकपाळ यांची कन्या रेश्मा, शिवसेना आमदार अशोक पाटील यांचे पुत्र रुपेश, खासदार रविंद्र वायकर यांची कन्या दिप्ती तसेच माजी खासदार मनोज कोटक यांचे बंधू केतन आदी लोकप्रतिनिधी हे आपल्या नातेवाईकांना निवडणूक रिंगणात उतरवण्यास इच्छुक आहेत. परंतु बऱ्याचे ठिकाणी आरक्षणाचा फटका बसल्याने यांचे पुनर्वसन करण्यासाठी आसपासच्या प्रभागांमध्ये शोधाशोध तसेच चाचपणी करून वर्णी लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. आमदार सुनील प्रभू यांचे पुत्र अंकित( इच्छुक प्रभाग ५१) आमदार अजय चौधरी यांची सून गौरी( इच्छुक प्रभाग २०३, प्रभाग २०५) माजी आमदार दगडू सकपाळ यांची कन्या रेश्मा(इच्छुक प्रभाग २०३) आमदार अशोक पाटील यांचे पुत्र रुपेश (इच्छुक प्रभाग ११३) आमदार मनिषा चौधरी यांची कन्या अंकिता (इच्छुक प्रभाग ०८) खासदार रविंद्र वायकर यांची कन्या दिप्ती ( इच्छुक प्रभाग ७४) खासदार संजय पाटील यांची कन्या राजुल(इच्छुक प्रभाग ११५) माजी खासदार मनोज कोटक यांचे बंधू केतन( इच्छुक प्रभाग १०७)
संपलेल्या पक्षासोबत युती, तब्बल ८० जागा टाकणार झोळीत
उबाठा पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी, बंडखोरी होण्याची शक्यतामुंबई (विशेष प्रतिनिधी) :उबाठा आणि मनसेची युती झाल्यामुळे मनसेला किती जागा सोडल्या जातील याकडे सर्वांचे लक्ष आहे. मात्र, शिवसेनेला टक्कर देण्यासाठी पुन्हा सज्ज होत उबाठाने आपला जम बसवण्यासाठी २२७ प्रभागांमध्ये पुन्हा कामाला सुरुवात केली. मात्र, युतीमध्ये उबाठा १३५ मनसे ८० आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आल्यास त्यांना १० ते १२ जागा सोडल्या जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मनसेसोबतच्या युतीत काही जागांवर उबाठाच्या शाखाप्रमुख, महिला शाखाप्रमुख, विभाग प्रमुख आणि उपविभाग प्रमुखांसह अनेकांना आपल्या काही जागांवर पाणी सोडाव्या लागणार आहे. त्यामुळे आता उबाठामध्ये मनसेच्या दुसऱ्या भिडूमुळे तीव्र नाराजी पसरली आहे. याचा परिणाम येत्या काही दिवसांमध्ये बंडखोरीच्या माध्यमातून दिसण्याची शक्यता आहे. आम्ही मेहनत करून वॉर्ड बांधलेत आणि आता या संपलेल्या पक्षाच्या उमेदवाराला आम्ही निवडून द्यायचे का अशा प्रकारच्या तीव्र भावना विभागाविभागांमधून ऐकायला येत आहे.उबाठा शिवसेना आणि मनसेची युती झाल्यानंतर दोन्ही ठाकरेंनी जागा वाटपांचा आकडा जाहीर केलेला नाही. त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये किती जागा आणि कुठल्या जागांवर अंतिम शिक्कामोर्तब झाला आहे याची माहिती त्यांनी दिलेली नाही. मात्र,सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार २२७ पैंकी उबाठा १३५ आणि मनसे ८० जागांवर निवडणूक लढवेल अशाप्रकारची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे ८० जागांवर मनसेचे उमेदवार निश्चित झाल्यास उबाठाला शिवसेनेत निष्ठेने राहत पक्ष संघटना वाढवण्यासाठी ज्यांनी अथक मेहनत केली आहे, त्या उबाठा शिवसैनिकांवर अन्याय होणार आहे. या अन्यायाचे पडसाद दबक्या आवाजात ऐकायला मिळत आहेउबाठाच्या काही नेत्यांच्या म्हणण्यानुसार, मनसेसोबत युती झाली याचे समाधान असले तरी ही युती लोकसभेपासूनच जर झाली असती आज महापालिकेवरील ठाकरे बंधूच्या युतीचा झेंडा निश्चितच पहायला मिळाला असता. आता आम्ही निष्ठेने काम करून संघटना वाढवली, प्रसंगी शिंदे शिवसेनेला अंगावरही घेतले आणि आता आयत्यावर कोयता मारावा त्याप्रमाणे मनसेला जर जागा सोडल्या जात असतील तर निश्चितच निष्ठेने काम करणाऱ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर तो अन्याय करणारा ठरणार आहे.आज मनसेचे अस्तित्व काय? यापेक्षा काँग्रेससोबत आघाडीत राहिलो असतो तरी किमान निवडून येण्याची शाश्वती तरी होती, काँग्रेसमुळे आमच्या काही जागाही वाढल्या असत्या, पण संपलेल्या मनसेमुळे उबाठाच्या जागा वाढणार नसून मनसेचाच आकडा वाढला जाईल. त्यामुळे मनसेला देवू केलेल्या जागा किंवा भविष्यात जागा दिल्यास तिथे निश्चितच बंडखोरी होईल अशी भीती उबाठाच्या पदाधिकाऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे.
Hardik Pandya video viral : भारतीय संघाचा स्टार ऑलराउंडर हार्दिक पंड्या सध्या त्याच्या कारकिर्दीतील सुवर्णकाळातून जात आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत बॅट आणि बॉलने चमकदार कामगिरी केल्यानंतर हार्दिक सध्या आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. मात्र, गुरुवारी दिल्लीतील एका घटनेमुळे हार्दिकच्या संयमाची जोरदार चर्चा रंगली आहे. ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. नेमकं काय घडलं? मिळालेल्या माहितीनुसार, […] The post Hardik Pandya : ‘भाड में जा…!’, सेल्फी न दिल्याने संतापला चाहता, मग हार्दिक पंड्याने पुढे काय केलं? पाहा VIDEO appeared first on Dainik Prabhat .
IndiGo : धुक्यामुळे इंडिगोची 67 उड्डाणे रद्द
नवी दिल्ली : देशातील आघाडीची देशांतर्गत विमान कंपनी इंडिगोने गुरुवारी धुक्यामुळे ६७ उड्डाणे रद्द केली. एअरलाइनच्या वेबसाइटनुसार, यापैकी फक्त चार उड्डाणे ऑपरेशनल कारणांमुळे रद्द करण्यात आली होती. तर उर्वरित खराब हवामानामुळे रद्द करण्यात आली होती. प्रभावित विमानतळांमध्ये आगरतळा, चंदीगड, देहरादून, वाराणसी आणि बेंगळुरू यांचा समावेश आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने या हिवाळ्यासाठी १० डिसेंबर ते […] The post IndiGo : धुक्यामुळे इंडिगोची 67 उड्डाणे रद्द appeared first on Dainik Prabhat .
इंदापूर (प्रतिनिधी) : श्री वर्धमान विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२४-२५ चे वार्षिक पारितोषिक वितरण उपजिल्हाधिकारी तथा विद्यालयाचे माजी विद्यार्थी नामदेव टिळेकर यांच्या शुभहस्ते जल्लोषात पार पडले. इयत्ता पाचवी ते बारावीतील शैक्षणिक गुणवंत विद्यार्थी तसेच विभागीय व राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये यश संपादन करणाऱ्या खेळाडूंना प्रशस्तीपत्रक व रोख बक्षिसांनी गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना टिळेकर यांनी आपल्या शालेय […] The post Indapur News : शिस्त,संस्कार,सातत्य हाच यशाचा महामंत्र; उपजिल्हाधिकारी नामदेव टिळेकर यांनी विद्यार्थ्यांना दिला सल्ला appeared first on Dainik Prabhat .
T.T.V. Dhinakaran : अम्मा मक्कल मुन्नेत्र कळघम एनडीएत नाही; टीटीव्ही दिनकरन यांचे स्पष्टीकरण
चेन्नई : अम्मा मक्कल मुन्नेत्र कळघम (एएमएमके) 2026 च्या विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या युतीची भूमिका फेब्रुवारीनंतरच ठरवेल, असे पक्षाचे सरचिटणीस टीटीव्ही दिनकरन यांनी सांगितले. अंडिपट्टी येथे माजी मुख्यमंत्री एम. जी. रामचंद्रन यांच्या पुण्यतिथीनिमित्त दिनकरन यांनी आदरांजली वाहिली. त्यानंतर ते म्हणाले की. एएमएमके राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) सामील झाली असून तिला विधानसभेच्या सहा जागा मिळाल्या आहेत, या […] The post T.T.V. Dhinakaran : अम्मा मक्कल मुन्नेत्र कळघम एनडीएत नाही; टीटीव्ही दिनकरन यांचे स्पष्टीकरण appeared first on Dainik Prabhat .
बिनधास्त करा नववर्षाचे सेलिब्रेशन, मध्य रेल्वे मध्यरात्री सोडणार विशेष लोकल
मुंबई : नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईत ठिकठिकाणी रात्री उशिरापर्यंत कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. रात्री जागरण करुन नववर्षाचा जल्लोष केला जातो. मुंबईतील सर्व समुद्र किनारे, हॉटेल, पर्यटनस्थळे मध्यरात्रीपर्यंत सुरू असतात. सर्वच ठिकाणी प्रचंड गर्दी असते. ही बाब विचारात घेऊन नववर्षाचे सेलिब्रेशन करणाऱ्यांना मध्यरात्री पण आरामात घरी जाता यावे यासाठी मध्य रेल्वेने चार विशेष लोकल चालवण्याचा निर्णय घेतला आहे.मुंबईतील हजारो नागरिक दरवर्षी नववर्षाच्या स्वागतासाठी मरिन ड्राइव्ह, गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी, जुहू चौपाटी, गेट वे ऑफ इंडिया, बॅण्ड स्टॅण्ड येथे जातात. तसेच हजारो नागरिक १ जानेवारीच्या सकाळी सिद्धिविनायकाचे दर्शन घेण्यासाठी पहाटेच घर सोडून प्रभादेवीच्या दिशेने प्रवास करतात. या सर्व बाबी विचारात घेऊन मध्य रेल्वेने चार विशेष लोकल चालवण्याचा निर्णय घेतला आहे.मध्य रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवार १ जानेवारी २०२६ रोजी मध्यरात्री दीड वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अर्थात सीएसएमटी येथून विशेष लोकल सुटेल आणि कल्याण येथे मध्यरात्री तीन वाजता पोहोचेल. तसेच गुरुवार १ जानेवारी २०२६ रोजी मध्यरात्री दीड वाजता कल्याण येथून विशेष लोकल सुटेल आणि मध्यरात्री तीन वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अर्थात सीएसएमटी येथे पोहोचेल. याच पद्धतीने गुरुवार १ जानेवारी २०२६ रोजी मध्यरात्री दीड वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अर्थात सीएसएमटी येथून विशेष लोकल सुटेल आणि पनवेल येथे मध्यरात्री दोन वाजून ५० मिनिटांनी पोहोचेल. तसेच गुरुवार १ जानेवारी २०२६ रोजी मध्यरात्री पनवेल येथून विशेष लोकल सुटेल आणि मध्यरात्री दोन वाजून ५० मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अर्थात सीएसएमटी येथे पोहोचेल. या सर्व विशेष लोकल मार्गातील सर्व स्थानकांवर थांबतील.
Pune : ‘पुण्याच्या क्रीडा विश्वाला नवा आयाम देणार’ –मुरलीधर मोहोळ
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या संकल्पनेतील खासदार क्रीडा महोत्सव ही केवळ एक स्पर्धा नसून तरुणाईला क्रीडा प्रकारांच्या माध्यमातून आरोग्य, शिस्त, आत्मविश्वास आणि नेतृत्वाची संधी देणारी चळवळ आहे. पुणे हे क्रीडा संस्कृती असलेले वैभव संपन्न असून केंद्र-राज्य सरकार तसेच ऑलिम्पिक असोसिएशनच्या माध्यमातून पुण्याच्या क्रीडा विश्वाला नवा आयाम देणार असल्याचे खासदार आणि केंद्रीय सहकार आणि […] The post Pune : ‘पुण्याच्या क्रीडा विश्वाला नवा आयाम देणार’ – मुरलीधर मोहोळ appeared first on Dainik Prabhat .
भारतीय लष्कराचे नवे सोशल मीडिया धोरण: जवानांना ‘इन्स्टाग्राम’वापरता येणार, पण पोस्ट आणि लाईकवर बंदी
नवी दिल्ली: माहिती तंत्रज्ञानाच्या युगात बदलत्या गरजा लक्षात घेऊन भारतीय लष्कराने आपल्या सोशल मीडिया धोरणात मोठे बदल केले आहेत. नव्या नियमांनुसार, आता लष्करी अधिकारी आणि जवानांना ‘इन्स्टाग्राम’वर आपले खाते उघडता येणार आहे. मात्र, राष्ट्रीय सुरक्षा आणि गोपनीयतेचा विचार करून या वापरावर कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. फक्त ‘प्रेक्षक’ म्हणून परवानगी – भारतीय लष्कराने जारी केलेल्या […] The post भारतीय लष्कराचे नवे सोशल मीडिया धोरण: जवानांना ‘इन्स्टाग्राम’ वापरता येणार, पण पोस्ट आणि लाईकवर बंदी appeared first on Dainik Prabhat .
Punjab Government : राज्यव्यापी छाप्यांत 115 अंमली पदार्थ तस्कर अटकेत; पंजाब सरकारची मोठी कारवाई
चंदीगड : नशेखोरांविरुद्ध युद्ध या अंमली पदार्थविरोधी मोहिमेअंतर्गत पंजाब पोलिसांनी गुरुवारी राज्यभरात २८५ ठिकाणी छापे टाकून ११५ अंमली पदार्थ तस्करांना अटक केली असून या कारवाईत ८७ एफआयआर नोंदवण्यात आल्या आहेत, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. अटक केलेल्यांकडून २६८ ग्रॅम हेरॉईन, १,८६० अंमली पदार्थांच्या गोळ्या व कॅप्सूल तसेच अंमली पदार्थांच्या विक्रीतून मिळालेले ६,७०० रुपये जप्त […] The post Punjab Government : राज्यव्यापी छाप्यांत 115 अंमली पदार्थ तस्कर अटकेत; पंजाब सरकारची मोठी कारवाई appeared first on Dainik Prabhat .
Virat Rohit Matches Live Telecast Updates : भारतीय क्रिकेटचे दोन दिग्गज खेळाडू, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी प्रदीर्घ काळानंतर देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आहे. विजय हजारे करंडक स्पर्धेत या दोघांनीही झंझावाती शतके झळकावून आपण आजही ‘किंग’ असल्याचे सिद्ध केले. मात्र, या दिग्गजांची फलंदाजी टीव्हीवर पाहता येत नसल्यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. विराट आणि […] The post Virat Rohit Matches : विराट-रोहित सामन्याच्या लाईव्ह टेलिकास्टवरील सस्पेन्स संपला! चाहत्यांसाठी एक मोठी अपडेट appeared first on Dainik Prabhat .
शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक जाहीर
पुणे : मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रातील २९ महापालिकांसाठी १५ मे रोजी मतदान आणि १६ मे रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकांसाठी प्रचाराचा धुरळा उडवण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेसने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. याआधी २४ डिसेंबर २०२५ रोजी शिवसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर झाली. राष्ट्रवादी काँग्रेसने ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी ही यादी जाहीर केली. अजित पवार, प्रफुल पटेल, सुनील तटकरे यांचा या यादीत समावेश आहे. मुंबई पुणे आणि पिंपरी चिंचवडसह महत्त्वाच्या महापालिकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या युती-आघाडीसंदर्भात इतर पक्षांसोबत चर्चा सुरू आहेत. येत्या दोन दिवसांत आघाडीच्या घोषणेसह जागा वाटपही जाहीर करण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले.राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारकराष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, माजी मंत्री धनंजय मुंडे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक, माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम, माजी मंत्री अनिल भाईदास पाटील, माजी मंत्री संजय बनसोडे, आमदार प्रतापराव चिखलीकर पाटील, नवाब मलिक, सयाजी शिंदे, अल्पसंख्याक महामंडळाचे अध्यक्ष मुश्ताक अंतुले, माजी खासदार समीर भुजबळ, आमदार अमोल मिटकरी, आमदार सना मलिक-शेख, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, आमदार इद्रीस नायकवडी, माजी आमदार अनिकेत तटकरे, माजी आमदार झिशान सिद्दिकी, माजी आमदार राजेंद्र जैन, शरद पाटील, मुंबई कार्याध्यक्ष सिध्दार्थ कांबळे, प्रदेश सरचिटणीस सूरज चव्हाण, लहू कानडे, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे, सामाजिक सेलचे प्रदेशाध्यक्ष सुनिल मगरे, अल्पसंख्याक सेलचे प्रदे
आणखी एका कलाकाराच्या घराला आग! बॉलिवूड दिग्दर्शकालाही आगीच्या विळख्याचा धक्का
मुंबई: आज सकाळी मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील सोरेंटो अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली. ही दुर्घटना अपार्टमेंटच्या १२ व्या, १३ व्या आणि १४ व्या मजल्यांवर घडली. ज्यात चित्रपट निर्माते संदीप सिंह यांचे घर अपार्टमेंटच्या १४ व्या मजल्यावर असल्याने त्यांनाही या आगीच्या दुर्घटनेचा फटका बसला. संदीप सिंघ नुकतेच हर्नियावर उपचार घेऊन कोकिलाबेन रुग्णालयातून डिस्चार्ज घेतल्यानंतर घरी परतले होते. मात्र या आग अपघातात सिंघ यांना कोणतीच दुखापत झालेली नाही. तरी अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिचा पती विक्की जैन यांनी संदीप सिंघ यांना तातडीने आपल्या घरी नेले आणि त्यांना कोणता त्रास झाला नसल्याचे तपासले.या घटनेत संदीप सिंघ सुरक्षित असल्याची बातमी कळताच त्यांच्या कुटुंबियांना, मित्रांना आणि चाहत्यांना सुटकेचा नि:श्वास सोडावा लागला. संदीप सिंघ यांची चित्रपटसृष्टीत दीर्घ आणि यशस्वी कारकीर्द आहे. त्यांनी पत्रकारितेतून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि नंतर भन्साली प्रॉडक्शनमध्ये सामील झाले. त्यानंतर त्यांनी स्वतःची निर्मिती कंपनी, लेजेंड स्टुडिओजची स्थापना केली. त्यांनी निर्मिती केलेले चित्रपट केवळ बॉक्स ऑफिसवर यशस्वी झाले नाहीत तर समीक्षकांनीही कौतुकास्पद कामगिरी केली.https://prahaar.in/2025/12/25/after-waiting-for-a-staggering-eight-hours-at-the-hospital-for-treatment-the-young-indian-mans-battle-with-death-ultimately-proved-unsuccessful/संदीप सिंघ हे 'मेरी कोम', 'सरबजीत', 'अलिगढ', 'झुंड', 'स्वातंत्र वीर सावरकर', 'सफेद' आणि 'छत्रपती शिवाजी महाराज'सारख्या अनेक लोकप्रिय हिंदी चित्रपटांचे निर्माते आणि दिग्दर्शक आहेत. त्यांच्या 'मेरी कोम' मधील प्रियांका चोप्राच्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घातली, तर 'सरबजीत' आणि 'अलिगढ' सारख्या चित्रपटांनी सामाजिक मुद्द्यांना स्पर्श केला. त्यांच्या 'झुंड' आणि 'स्वातंत्र वीर सावरकर'सारख्या चित्रपटांमध्येही इतिहासाबद्दलची संवेदनशीलता दिसून येते. याप्रमाणेच त्यांनी नथुराम गोडसेवर आधारित 'गोडसे' हा चित्रपटही दिग्दर्शित केला आहे.दरम्यान दुसरीकडे मराठी सिनेक्षेत्रातील अभिनेता पुष्कर जोगच्या बिल्डींगला देखील आग लागल्याची घटना आज सकाळी घडली. यावेळी पुष्कर आणि त्याची मुलगी घरात अडकले होते. त्यामुळे मदतीसाठी पुष्करने सोशल मीडिया पोस्ट केली आणि त्याच्यासाठी अनेक हात पुढे आले. यामुळे पुष्करला घराबाहेर पडण्यास आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यास मदत मिळाली. या घटनेनंतर पुष्करने झालेल्या नुकसानाचा व्हिडीओ सोशल मीडीयावर शेअर केला आहे. मात्र आग का लागली याचे कोणतेच कारण अद्याप समोर आले नाही.
PMC Election: पुण्यात भाजपचा उमेदवारी वाटपाचा फॉर्म्युला ठरला, जुन्याच चेहऱ्यांवर पुन्हा विश्वास
पुणे : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने पुण्यात आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. पुण्यात पुन्हा एकदा एकहाती सत्ता मिळवण्यासाठी भाजपने ‘जुने ते सोने’ या सूत्राचा वापर करण्याचे ठरवले असून, २०१७ मधील तब्बल १०० माजी नगरसेवकांना पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी केली असल्याची माहिती समोर येत आहे. कोअर कमिटीच्या बैठकीत नावांवर शिक्कामोर्तब – पुणे […] The post PMC Election: पुण्यात भाजपचा उमेदवारी वाटपाचा फॉर्म्युला ठरला, जुन्याच चेहऱ्यांवर पुन्हा विश्वास appeared first on Dainik Prabhat .
उपचारासाठी रुग्णालयात तब्बल आठ तास प्रतीक्षा! अखेर भारतीय तरुणाची मृत्यूशी झुंज ठरली अपयशी
एडमोंटन: उपचारासाठी तब्बल आठ तास प्रतीक्षा पाहिल्यानंतर अखेर मृत्यूला जवळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना कॅनडामध्ये घडली आहे. कॅनडातील एका ४४ वर्षीय भारतीय वंशाच्या व्यक्तीचा रुग्णालयात तब्बल आठ तासांहून अधिक काळ उपचारांसाठी वाट पाहिल्यानंतर मृत्यू झाला आहे. प्रशांत श्रीकुमार असे या व्यक्तीचे नाव आहे. प्रशांत यांना २२ डिसेंबर रोजी कामावर असताना अचानक छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या. यानंतर त्यांना एडमोंटन येथील ग्रे नन्स कम्युनिटी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र रुग्णालय प्रशासनाने उपचारांमध्ये दाखवलेल्या निष्काळजीपणामुळे त्यांचा मृत्यू झाला.मिळालेल्या माहितीनुसार, श्रीकुमार यांनी त्यांच्या कार्यालयात छातीत दुखत असल्याची तक्रार केली होती. त्यानंतर एका व्यक्तीने त्यांना एडमोंटन येथील ग्रे नन्स रुग्णालयात नेले. तिथे त्यांचे प्राथमिक उपचार सुरू झाले पण नंतर वेटिंग रूममध्ये बसवण्यात आले. यानंतर काही वेळातच रुग्णाचे वडील देखील तात्काळ रुग्णालयात पोहोचले. यावेळी रुग्णाने आपल्या वडिलांकडे 'बाबा, मी हे दुखणे सहन करू शकत नाही,' अशी आर्त साद घातली. यामुळे श्रीकुमार यांच्या वडिलांनी रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांना सांगितले.वेदनेची माहिती दिल्यानंतर, रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी श्रीकुमार यांच्या हृदयाची स्थिती तपासण्यासाठी इलेक्ट्रोकार्डियोग्राम (ईसीजी) केला. त्यानंतर रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांना सांगण्यात आले की, काही विशेष अडचण नसून थोडा वेळ वाट पाहावी. त्यानंतर रुग्णालय कर्मचाऱ्यांनी श्रीकुमार यांना वेदना कमी करण्यासाठी टायलेनॉलच्या काही गोळ्या दिल्या. मात्र त्यांचा रक्तदाब वाढतच होता.https://prahaar.in/2025/12/25/aap-leaders-saurabh-bhardwaj-sanjay-jha-booked-for-santa-claus-skit/श्रीकुमार यांच्या वडिलांनी सांगितल्यानुसार, दुखणे वाढतच गेले. आठ तासांहून अधिक काळ वाट पाहिल्यानंतर अखेर त्याला उपचारांसाठी बोलावण्यात आले. जवळपास १० सेकंदांचा वेळ गेल्यानंतर त्याने माझ्याकडे पाहिले आणि तो उठून आपल्या छातीवर हात ठेवताच अचानक खाली कोसळला. यानंतर मी नर्सला मदतीसाठी बोलावले आणि त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला, परंतु खूप उशीर झाला होता. रुग्णालयाने दाखवलेल्या निष्काळजीपणामुळे अखेर प्रशांत श्रीकुमार यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यांच्यामागे त्यांची पत्नी आणि तीन मुले आहेत, ज्यांचे वय तीन, दहा आणि चौदा वर्षे आहे.दरम्यान, ग्रे नन्स रुग्णालयाने या घटनेबाबत दिलेल्या एका निवेदनात, रुग्णाच्या काळजीशी संबंधित तपशीलांवर भाष्य करण्यास नकार दिल्याचे दिसले. तर आम्ही रुग्णाच्या कुटुंबियांप्रति आणि मित्रांप्रति आमच्या संवेदना व्यक्त करतो. आमच्या रुग्णांची आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा आणि काळजी यापेक्षा अधिक महत्त्वाचे काहीही नाही, असे सांगितले. मात्र वास्तविक पाहता श्रीकुमार यांच्या प्रकरणानंतर रुग्णालयात रुग्णांची काळजी घेत नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
आधी निवडणुकीचा गुलाल, मग मुलाला खांदा; नवनिर्वाचित नगरसेवकावर कोसळला दु:खाचा डोंगर
बीड: निवडणुकीच्या विजयी गुलालात बापाला खांद्यावर घेऊन नाचला आणि मग बापानेच मुलाला खांदा दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बीडमधील नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीत विजयी झालेल्या नवनिर्वाचित नगरसेवकाच्या ३२ वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या धक्कादायक घटनेवर शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.मिळालेल्या माहितीनुसार, बीड शहरातील जालना रोडच्या काझीनगर भागात ही घटना घडली. बीड नगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक १ मध्ये राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे विजयी उमेदवार अशोक काळे नगरसेवक म्हणून विजयी झाले. वडीलांच्या विजयाचा आनंदोत्सव साजरा केल्यानंतर काळे यांच्या ३२ वर्षीय मुलाने गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली. पवन अशोक काळे असे या तरुणाचे नाव असून वयाच्या ३२व्या वर्षी त्याने हा टोकाचा निर्णय घेतल्याने कुटुंबावर दु:खाचे सावट पसरले आहे.पवन काळे यांनी बीड येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. यामुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. मात्र, पवन काळेने आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल का उचचले? याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. दरम्यान मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला असून या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.https://prahaar.in/2025/12/25/which-railway-ticket-prices-in-the-country-will-increase-from-december-26/बीड नगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक १ मध्ये पवनचे वडील अशोक काळे २१ डिसेंबरला लागलेल्या नगरपालिका निवडणुकीच्या निकालात विजयी झाले होते. निवडणुकीच्या दरम्यान पवन वडिलांच्या विजयासाठी प्रचारात सक्रिय होता. निकालानंतर अशोक काळे विजयी झाल्यानंतर सगळ्यांनीच जल्लोष केला होता. यावेळी विजयी मिरवणुकीत पवन सुद्धा सामील होता. मात्र नगर परिषदेतील विजयामुळे घरात आनंदाचं वातावरण असताना पण अचानक पवनने टोकाचे पाऊल का उचलले, हा प्रश्न सर्वांना पडला आहे.
धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आपच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर गुन्हा दाखल
नवी दिल्ली : धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आम आदमी पार्टीच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर दिल्ली पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. सौरभ भारद्वाज, संजय झा आणि आदिल अहमद खान कायद्याच्या कचाट्यात सापडले आहेत. ख्रिश्चनांच्या धार्मिक भावना दुखावण्यासाठी मुद्दाम द्वेषपूर्णपणे वर्तन करण्यात आल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी 'आप'च्या नेत्यांवर गुन्हा दाखल केला आहे.आम आदमी पार्टीच्या नेत्यांनी १७ आणि १८ डिसेंबर २०२५ रोजी अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून एक व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिडीओत नाताळचे प्रतिक असलेल्या सांताक्लॉजचे आक्षेपार्ह पद्धतीने चित्रिकरण करण्यात आल्याचा आरोप आहे. व्हिडीओत सांताक्लॉजला रस्त्यावर बेशुद्ध पडताना आणि राजकीय संदेश देण्यासाठी त्याचा आधार म्हणून वापर करताना दाखवण्यात आले होते. तसेच व्हिडिओमध्ये बनावट सीपीआर देताना दाखवून सांताक्लॉजची थट्टा करण्यात आली आहे, ज्यामुळे सेंट निकोलस आणि ख्रिसमसचे पावित्र्य दुखावल्याचा आरोप आम आदमी पार्टीच्या नेत्यांवर आहे.
Chandrapur – चंद्रपूरच्या राजुरा तालुक्यातील सोंडो गावाजवळ पहाटेच्या सुमारास मोठा कार अपघात झाला आहे. या अपघातात तेलंगणा राज्यातील चार महिलांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. ही दुर्घटना चालकाला लागलेल्या एका डुलकीमुळे घडल्याची प्राथमिक माहिती समजते. सलमा बेग, उकसा सकरीन, अफजल बेग आणि सहिरा बेगम अशी मृतांची नावे आहेत. […] The post Chandrapur : चालकाला लागलेली एक डुलकी ठरली जीवघेणी; चंद्रपुरमध्ये अपघातात माय-लेकीसह चौघांचा मृत्यू appeared first on Dainik Prabhat .
बांगलादेशात आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, पोलिसांचा धक्कादायक दावा
Bangladesh News: बांगलादेशात अल्पसंख्याक हिंदू समाजावरील हल्ल्यांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. राजबारी जिल्ह्यातील पांगशा भागात एका हिंदू तरुणाची संतप्त जमावाने बेदम मारहाण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (२४ डिसेंबर) घडली. मृत तरुणाचे नाव अमृत मंडल उर्फ सम्राट असे आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण असून, ही हत्या खंडणीखोरीच्या रागातून झाल्याचा प्राथमिक दावा स्थानिक […] The post बांगलादेशात आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, पोलिसांचा धक्कादायक दावा appeared first on Dainik Prabhat .
Bihar Politics : बिहारमध्ये खेला होबेची शक्यता? मित्रपक्षांच्या आमदारांनी घेतली नितीन नबीन यांची भेट
पाटणा : बिहार निवडणूकीत भाजप व जेडीयूसह मित्रपक्षांनी जोरदार मुसंडी मारताना, पुन्हा एकदा बिहार काबिज केले होते. त्यानंतर आता एनडीएतील सहकारी मित्र असलेल्या आरएलएमचे तीन आमदार थेट भाजपाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नितीन नबीन यांची भेट घेतल्याने बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ माजल्याचे दिसून आले आहे. राष्ट्रीय लोक मोर्चाचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाह यांनी आपल्या निवासस्थानी लिट्टी […] The post Bihar Politics : बिहारमध्ये खेला होबेची शक्यता? मित्रपक्षांच्या आमदारांनी घेतली नितीन नबीन यांची भेट appeared first on Dainik Prabhat .
Shreyas Iyer Injury Updates : भारतीय क्रिकेट संघाचा मधल्या फळीतील स्फोटक फलंदाज श्रेयस अय्यर सध्या दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. मात्र, क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. श्रेयस अय्यरच्या फिटनेसबाबत एक मोठे अपडेट मिळाले असून, तो वेगाने बरा होत असल्याची माहिती समोर आली आहे. फिटनेसमध्ये सुधारणा; बॅटिंग सराव सुरू ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वन-डे सामन्यादरम्यान श्रेयसच्या बरगडीला […] The post Shreyas Iyer Injury : श्रेयस अय्यरच्या दुखापतीबाबत मोठी अपडेट आली समोर; मैदानात कधी परतणार? जाणून घ्या appeared first on Dainik Prabhat .
Rahul Gandhi : राहुल गांधींच्या परदेश दौ-यावर पाळत; कॉंग्रेसचा केंद्र सरकारवर आरोप
नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेतील विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांच्या परदेश दौ-यांवरून देशातील राजकीय वर्तुळात नेहमीच चर्चा आणि आरोप प्रत्यारोप होत असतात. दरम्यान, इंडियन ओव्हरसिज काँग्रेसचे अध्यक्ष आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सॅम पित्रोदा यांनी राहुल गांधी यांच्या परदेश दौ-यांवरून केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहे. परदेश दौ-यांदरम्यान राहुल गांधींवर केंद्र सरकारकडून पाळत […] The post Rahul Gandhi : राहुल गांधींच्या परदेश दौ-यावर पाळत; कॉंग्रेसचा केंद्र सरकारवर आरोप appeared first on Dainik Prabhat .
Nylon Manja : नायलॉन मांजाच्या वापरावर न्यायालयाने उचलले कडक पाऊल; दोषी आढळल्यास होणार मोठी कारवाई
Nylon Manja – नायलॉन मांजाच्या वापराविरूद्ध न्यायालयाने कडक पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. वेळोवेळी कडक निर्बंध घालुनही नायलॉन मांजाचा सर्रास वापर अजूनही सुरू असल्याने उच्च न्यायालयाने यात आता दोषी आढळल्यास मोठ्या आर्थिक शिक्षेचा प्रस्ताव ठेवला आहे. नायलॉन मांजाला विरोध करत काही नागरिकांनी न्यायालयात धाव घेतली आहे. आता, न्यायालयाने देखील ही बाब गंभीरतेने घेत नागरिकांच्या सूचना […] The post Nylon Manja : नायलॉन मांजाच्या वापरावर न्यायालयाने उचलले कडक पाऊल; दोषी आढळल्यास होणार मोठी कारवाई appeared first on Dainik Prabhat .
Year Ender 2025 Most impressive comeback : भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळवणे हे कोणत्याही खेळाडूसाठी सोपे नसते. दरवर्षी अनेक तरुण खेळाडू संघात येतात, तर अनेक दिग्गजांना बाहेरचा रस्ता दाखवला जातो. मात्र, २०२५ हे वर्ष अशा काही खेळाडूंसाठी अत्यंत खास ठरले, ज्यांनी प्रदीर्घ काळानंतर भारतीय संघात पुनरागमन करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. करुण नायर: ८ वर्षांची […] The post Year Ender 2025 : करुण ते इशानपर्यंत; २०२५ मध्ये ‘या’ पाच भारतीय खेळाडूंनी दमदार कमबॅकने सिद्ध केली आपली जिद्द! appeared first on Dainik Prabhat .
बॅंकॉक: थायलंड आणि कंबोडिया यांच्यातील सीमावादावरून थाई लष्कराने भगवान विष्णूंची एक मूर्ती पाडल्याची घटना काही दिवसांपूर्वी समोर आली होती. धार्मिक बाबींशी छेडछाड केल्याच्या कृत्यांमुळे जगभरातील भाविकांच्या भावना दुखावल्या गेल्यामुळे, या घटनेचा भारताने कठोर शब्दांत विरोध दर्शवला होता. मात्र यावर थायलंडने, ही मूर्ती ज्या ठिकाणी स्थापित केली होती, ते स्थळ धार्मिक कार्यासाठी अधिकृतपणे नोंदणीकृत नव्हते, असे स्पष्टीकरण दिले आहे.यासंदर्भात स्पष्टिकरण देताना थाई-कंबोडियन बॉर्डर प्रेस सेंटरने म्हटले आहे की, ही मूर्ती ज्या ठिकाणी स्थापन करण्यात आली होती, ते ठिकाण धार्मिक कार्यासाठी अधिकृतपणे नोंदणीकृत नव्हते. मूर्ती पाडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर सुरक्षेचे कारण होते. आपण हिंदू धर्मासह सर्वच धर्माचा आदर करतो. थायलंडच्या मते, ही मूर्ती नंतरच्या काळात स्थापित करण्यात आली होती आणि कंबोडिया या मूर्तीचा वापर वादग्रस्त जमिनीवर आपला दावा सांगण्यासाठी करत होता. जर ही मूर्ती हटवली नसती, तर संवेदनशील सीमेवर तणाव वाढण्याची शक्यता होती. यामुळे मूर्ती पाडण्यात आलेच्या सांगितले आहे.https://www.youtube.com/shorts/cgcJ-Hk-B3Mदुसरीकडे या घटनेसंदर्भात बोलताना, भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल म्हणाले, हिंदू आणि बौद्ध देवतांना संपूर्ण प्रदेशात अत्यंत श्रद्धेने आणि भक्तिभावाने पूजले जाते आणि हा आपल्या सामायिक सभ्यतेचा वारसा आहे. प्रादेशिक वादांमुळे, जेव्हा अशी कृत्यं होतात, तेव्हा श्रद्धाळूच्या भावना दुखावल्या जातात. दरम्यान, दोन्ही देशांनी हा सीमावाद संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून सोडवायला हवा, असे आवाहनही यावेळी जायसवाल यांनी केले.दरम्यान कंबोडियानेही या घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. प्रीह विहार प्रांताचे प्रवक्ते किम चानपनहा यांनी दावा केला की, ही मूर्ती २०१४ मध्ये थायलंडच्या सीमेपासून १०० मीटर दूर कंबोडियाच्या हद्दीत उभारण्यात आली होती, जी थायलंडने बेकायदेशीरपणे पाडली आहे.
ढाका: बांगलादेशच्या राजकारणात तब्बल १७ वर्षांनंतर एक मोठे वादळ परतले आहे. बांगलादेश नॅशनल पार्टीचे (BNP) कार्यवाह अध्यक्ष आणि माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचे पुत्र तारिक रहमान हे २५ डिसेंबर २०२५ रोजी लंडनहून ढाका येथे परतले. शेख हसीना यांच्या राजवटीत भ्रष्टाचाराचे आरोप आणि शिक्षेच्या भीतीमुळे देश सोडून गेलेले रहमान आता १२ फेब्रुवारी २०२६ रोजी होणाऱ्या निवडणुकीत […] The post Tarique Rahman: बांगलादेशच्या राजकारणात तब्बल 17 वर्षांनंतर परतले एक मोठे वादळ; तारिक रहमान नेमके कोण? का सोडला होता देश? appeared first on Dainik Prabhat .
Odisha News : ओडिशात माओवादी आणि सुरक्षा दलात मोठी चकमक ! 6 जण ठार
कंधमाल (ओडिशा) : ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यात गुरुवारी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत माओवादी नेता गणेश उईकेसह सहा नक्षलवादी ठार झाले. राज्यातील नक्षलविरोधी कारवाईचे नेतृत्व करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की ही चकमक चकपाडा पोलिस स्टेशन परिसरातील घनदाट जंगलात घडली. मारलेला गणेश उईके (वय ६९) हा सीपीआय (माओवादी) च्या केंद्रीय समितीचा सदस्य आणि ओडिशातील या बंदी घातलेल्या संघटनेचा […] The post Odisha News : ओडिशात माओवादी आणि सुरक्षा दलात मोठी चकमक ! 6 जण ठार appeared first on Dainik Prabhat .
पिंपरी, दि. २५ (प्रतिनिधी) – महापालिका निवडणुकीसाठी राजकीय समीकरणे जुळविण्याचे काम सुरू असतानाच भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे समीकरण बिघडले असल्याचे समोर आले आहे. खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडून जादा जागांची मागणी होत असून त्याला भाजपाने नकार दिला आहे. त्यामुळे शिवसेना स्वबळाची चाचपणी करत असून भाजपाने आरपीआयला सोबत घेत लढण्याचा निर्धार केला असल्याची माहिती मिळाली […] The post भाजपा- शिंदेसेनेच जुळेना? appeared first on Dainik Prabhat .
Devendra Fadnavis : “मुंबई महापालिका जिंकणे हीच वाजपेयींना श्रद्धांजली…”–देवेंद्र फडणवीस
Mumbai Municipal Corporation | Atal Bihari Vajpayee | Devendra Fadnavis – मुंबई महानगरपालिकेत महायुतीचे सरकार स्थापन करण्याचा आणि अंधार दूर होईल, सूर्य उगवेल आणि कमळ फुलेल हे घोषवाक्य सत्यात उतरवण्याचा निर्धार आहे. महानगरपालिकेवर महायुतीचा झेंडा फडकवणे हीच माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त म्हटले आहे. […] The post Devendra Fadnavis : “मुंबई महापालिका जिंकणे हीच वाजपेयींना श्रद्धांजली…” – देवेंद्र फडणवीस appeared first on Dainik Prabhat .
बीएमसी निवडणुकीत गुणरत्न सदावर्तेंची एन्ट्री? कमळाच्या खुर्चीमुळे राजकीय चर्चांना उधाण मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजले असतानाच, ठाकरे बंधूंच्या युतीनंतर आता वकील गुणरत्न सदावर्ते चर्चेच्या केंद्रस्थानी आलेत. सदावर्ते यांच्या परळ येथील कार्यालयातील नव्या ‘कमळ’ सदृश राजेशाही खुर्चीने सर्वांचे लक्ष वेधले असून, ते भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार का, अशा चर्चा रंगू लागल्यात. सदावर्ते नेहमीच ठाकरे गटावर […] The post Today TOP 10 News: ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का ते गुणरत्न सदावर्तेंची राजकारणात एन्ट्री… वाचा आजच्या टाॅप 10 बातम्या एका क्लिकवर appeared first on Dainik Prabhat .
Boxing Day Test : बॉक्सिंग डे टेस्ट म्हणजे काय? ही कसोटी कधी आणि का खेळली जाते? जाणून घ्या इतिहास
What Is Boxing Day Test : जागतिक क्रिकेटमध्ये २६ डिसेंबर हा दिवस ‘बॉक्सिंग-डे’ (Boxing Day) म्हणून ओळखला जातो. ऑस्ट्रेलियामध्ये ख्रिसमसच्या दुसऱ्या दिवशी सुरू होणारा हा कसोटी सामना केवळ एक खेळ नसून ऑस्ट्रेलियन क्रिकेट परंपरेचा एक अविभाज्य भाग आहे. या ऐतिहासिक सामन्यामागील इतिहास आणि ऑस्ट्रेलियाचे या मैदानावरील वर्चस्व अत्यंत रंजक आहे. ‘बॉक्सिंग-डे’ म्हणजे नक्की काय? ख्रिसमसच्या […] The post Boxing Day Test : बॉक्सिंग डे टेस्ट म्हणजे काय? ही कसोटी कधी आणि का खेळली जाते? जाणून घ्या इतिहास appeared first on Dainik Prabhat .
देशातील कोणकोणत्या रेल्वेच्या तिकिटांच्या दरांत शुक्रवार २६ डिसेंबरपासून वाढ होणार ?
नवी दिल्ली : भारतीय रेल्वे प्रशासनाने शुक्रवार २६ डिसेंबरपासून देशातील निवडक रेल्वे सेवांच्या दरात वाढ केली आहे तर काही सेवांच्या दरांमध्ये कोणताही बदल केलेला नाही. रेल्वे तिकिटांच्या दरांवरुन असलेला संभ्रम दूर करण्यासाठी प्रशासनाने ही माहिती प्रसारमाध्यमांना दिली आहे. रेल्वेने लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या प्रवासी भाड्यात वाढ केली आहे. पण देशातील कोणत्याही उपनगरीय सेवेत अर्थात लोक ट्रेन सर्व्हिसमध्ये दरवाढ केलेली नाही. जाणून रेल्वेने कोणत्या गाड्यांच्या भाड्यात बदल केला आहे आणि कोणत्या सेवेत बदल केलेला नाही. सामान्य (नॉन-एसी) गाड्यांमध्ये बदल,द्वितीय श्रेणी सामान्य २१५ किमी पर्यंत : वाढ नाही.२१६–७५० किमी : ५ रुपयांची वाढ७५१–१२५० किमी : १० रुपयांची वाढ१२५१–१७५० किमी : १५ रुपयांची वाढ१७५१–२२५० किमी : २० रुपयांची वाढस्लीपर क्लास - प्रति किलोमीटर १ पैसे वाढस्लीपर क्लास, प्रथम श्रेणी (सामान्य) - प्रति किलोमीटर १ पैसे वाढस्लीपर क्लास, मेल/एक्सप्रेस (नॉन-एसी) गाड्यांमध्ये बदलसेकंड क्लास, स्लीपर क्लास आणि फर्स्ट क्लास - २ पैसे प्रति किलोमीटर वाढएसी क्लासमध्ये बदलएसी चेअर कार, एसी ३ टियर / ३ई, एसी २ टियर, एसी फर्स्ट क्लास / एक्झिक्युटिव्ह क्लास - प्रति किमी २ पैसे भाडेया गाड्यांमध्येही बदल लागू होतील.राजधानी, शताब्दी, दुरांतो, वंदे भारत, तेजस, हमसफर, अमृत भारत, गरीब रथ, जन शताब्दी, अंत्योदय, गतिमान, युवा एक्स्प्रेस, नमो भारत रॅपिड रेलसह इतर विशेष गाड्यांमध्येही हीच वर्गवारी भाडेवाढ लागू होईल.काही महत्त्वाच्या गोष्टीआरक्षण शुल्क, सुपरफास्ट शुल्क इत्यादींमध्ये कोणताही बदल नाही. जीएसटी पूर्वीप्रमाणेच लागू राहीलभाडे पूर्वीप्रमाणेच पूर्णांकित केले जाईल -२६ डिसेंबर २०२५ पूर्वी बुक केलेल्या तिकिटांवर नवीन भाडे लागू होणार नाही.२६ डिसेंबर २०२५ नंतर टीटीईने बुक केलेली तिकिटे नवीन भाड्याने असतील.माहिती आणि व्यवस्थास्थानकांवर लावलेल्या भाडे यादी अपडेट केल्या जातीलपीआरएस, यूटीएस आणि मॅन्युअल तिकीट प्रणालींमध्ये आवश्यक बदल केले जातीलरेल्वे कर्मचाऱ्यांना आगाऊ सूचना दिल्या जातील.
Odisha : ओडिशातील सुरक्षा दलांची मोठी कारवाई.! कोटींचे बक्षीस असलेला टॉप कमांडर गणेश उइके चकमकीत ठार
Odisha : ओडिशा पोलीस आणि केंद्रीय सुरक्षा दलांनी राबवलेल्या एका धाडसी संयुक्त कारवाईत नक्षलवादी संघटनेचा सेंट्रल कमिटी सदस्य आणि ओडिशातील नक्षलवादी चळवळीचा मास्टरमाईंड गणेश उइके याला यमसदनी धाडले आहे. या चकमकीत एकूण चार नक्षलवादी ठार झाले असून, यामध्ये दोन महिला नक्षलवाद्यांचाही समावेश आहे. गुप्त माहितीच्या आधारे ‘मेगा ऑपरेशन’ : स्पेशल इंटेलिजन्स विंगकडून (SIW) मिळालेल्या माहितीनुसार, […] The post Odisha : ओडिशातील सुरक्षा दलांची मोठी कारवाई.! कोटींचे बक्षीस असलेला टॉप कमांडर गणेश उइके चकमकीत ठार appeared first on Dainik Prabhat .
निहाल पानसरे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
पिंपरी, दि. २५ (प्रतिनिधी) – पिंपरी चिंचवड शहरातील ज्येष्ठ नेते व माजी महापौर आझम पानसरे यांचे पुत्र निहाल पानसरे यांनी अजित पवार यांच्या उपस्थितीत गुरूवारी (दि. २५) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. अनेकांचा भाजपामध्ये प्रवेश सुरू असताना पानसरे यांच्या प्रवेशामुळे पिंपरी चिंचवड भाजपाला मोठा धक्का बसला आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी राजकीय आखाडा रंगला आहे. भाजप […] The post निहाल पानसरे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश appeared first on Dainik Prabhat .
अयोध्येतील राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! भाविकांसाठी मंदिर बंद... जाणून घ्या सविस्तर
अयोध्या: अयोध्येतील राम मंदिराचे काम संपूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर २५ नोव्हेंबर, २०२५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते धर्म ध्वज स्थापन करण्यात आला. या दिवसानंतर राम मंदिर परिसर अधिक भव्य आणि आकर्षक झाल्याने दररोज लाखो भाविक अयोध्येत रामललाचे दर्शन करण्यासाठी येतात. तर दुसरीकडे ख्रिसमस आणि नववर्षाच्या सुट्ट्यांमुळेही भाविकांनी राम मंदिर दर्शनाचे नियोजन केले होते. मात्र तिथीनुसार ३१ डिसेंबरला राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन साजरा केला जाणार असल्याने मंदिर दर्शनासाठी बंद राहणार की खुले असणार याबाबत भाविकांना प्रश्न पडला होता. ज्यावर मंदिर संस्थानाने उत्तर दिले आहे.२२ जानेवारी २०२४ रोजी पौष शुक्ल द्वादशी तिथीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी रामललाची प्राणप्रतिष्ठा करून राम मंदिराचे लोकार्पण केले होते. यंदा हा दिवस ३१ डिसेंबर २०२५ रोजी येत आहे.त्यामुळे तिथीनुसार राम मंदिराच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त अयोध्येत पुन्हा एकदा पाच दिवसांचे सांस्कृतिक आणि धार्मिक विधी होत आहेत. २८ डिसेंबर २०२५ ते ०२ जानेवारी २०२६ पर्यंत राम मंदिराचा दुसरा वर्धापन साजरा केला जाणार आहे. या आनंदात भाविकांनाही सामावून घेण्यासाठी मंदिर संस्थानाने दर्शनासाठी राम मंदिर खुले ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.https://prahaar.in/2025/12/25/five-naxalites-including-ganesh-uike-killed-big-success-for-security-teams/अयोध्येत प्राणप्रतिष्ठा द्वादशीनिमित्त राम मंदिर परिसरात पाच दिवसांचा सांस्कृतिक आणि धार्मिक विधी होणार आहे. हा कार्यक्रम राम मंदिरातून बाहेर पडण्याच्या ठिकाणी म्हणजेच अंगद टीला येथे होणार आहेत. सामान्य रामभक्तही या कार्यक्रमात सहभागी होऊ शकणार आहेत. तसेच ३१ डिसेंबर रोजी राम मंदिर आणि श्रीरामांचा दरबार नेहमीप्रमाणे रामभक्तांच्या दर्शनासाठी खुला राहणार असून भाविकांना ३१ तारखेला रामललाची विशेष पूजा आणि आरास पाहायला मिळणार आहे. राम मंदिर ट्रस्टने यासाठी व्यापक तयारी केली आहे.गेल्या वर्षी प्रतिष्ठा द्वादशीचा दिवस ११ जानेवारी रोजी होता. यावर्षी हा दिवस ३१ डिसेंबर रोजी आहे. या खास दिवसानिमित्त मंदिरात सकाळी ९.३० वाजता विशेष पूजन होणार आहे. तर जे भाविक अयोध्येत येऊ शकत नसतील, त्यांना हा मंगल सोहळा घरातून पाहण्यासाठी राम मंदिर ट्रस्टने दूरदर्शनला या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्याची परवानगी दिली आहे.
प्रभात वॉच: नागरिकांनो सावधान! ‘डिजिटल अरेस्ट’नंतर आता CBIच्या नावाने नवा ‘ईमेल स्कॅम’
पुणे (संजय कडू) – डिजिटल सुविधांचा विस्तार होत असतानाच सायबर गुन्हेगारांची हिंमतही वाढत चालली आहे. डिजिटल अरेस्ट, क्रेडिट कार्ड घोटाळे आणि नेटबँकिंग फसवणुकीनंतर आता सीबीआय, गृह मंत्रालय आणि इंटरपोलच्या नावाने नागरिकांना घाबरवणारा नवा ई-मेल स्कॅम समोर आला आहे. तुम्ही अश्लील व्हिडीओ पाहत असून, तुमच्या आयपी अॅड्रेसवरून बाल लैंगिक गुन्ह्यांशी संबंधित हालचाली आढळल्या आहेत, असा गंभीर […] The post प्रभात वॉच: नागरिकांनो सावधान! ‘डिजिटल अरेस्ट’नंतर आता CBIच्या नावाने नवा ‘ईमेल स्कॅम’ appeared first on Dainik Prabhat .
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंना बालेकिल्ल्यातच मोठा धक्का ! ‘या’जवळच्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा
ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर असताना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना त्यांच्या बालेकिल्ल्यातच मोठा धक्का बसला आहे. शिवसेना महिला आघाडी प्रमुख आणि माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीचा विचार करून या पदावर काम करण्यास असमर्थ असल्याचे त्यांनी आपल्या राजीनाम्यात म्हंटले आहे. एकनाथ शिंदेसाठी मोठा […] The post Eknath Shinde : एकनाथ शिंदेंना बालेकिल्ल्यातच मोठा धक्का ! ‘या’ जवळच्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा appeared first on Dainik Prabhat .
Jammu-Kashmir : काश्मीर खोऱ्यात हिमस्खलनाचा धोका.! हवामान खात्याने जारी केला इशारा
Jammu-Kashmir : जम्मू आणि काश्मीरच्या पाच जिल्ह्यांमध्ये हिमस्खलनाचा धोका आहे. त्यामध्ये गंदरबल, डोडा, किश्तवार, पूंछ आणि रामबन जिल्ह्यांचा समावेश आहे. पर्वतीय भागात अलिकडच्या काळात झालेल्या मुसळधार बर्फवृष्टीच्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने हा इशारा जारी केला. पुढील २४ तासांत पाचही जिल्ह्यांमध्ये कमी जोखमीचे हिमस्खलन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकांनी हिमस्खलन होण्याची शक्यता असलेल्या भागात जाणे टाळावे. जम्मू […] The post Jammu-Kashmir : काश्मीर खोऱ्यात हिमस्खलनाचा धोका.! हवामान खात्याने जारी केला इशारा appeared first on Dainik Prabhat .
Ravi Shastri : अॅशेस मालिकेतील पराभवानंतर ‘बॅझबॉल’चा अंत जवळ; रवी शास्त्री होणार इंग्लंडचे नवे कोच?
Ravi Shastri England Cricket Team Coach : ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या ‘ॲशेस २०२५-२६’ मालिकेत इंग्लंड संघाची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली आहे. सलग तीन सामने गमावल्यानंतर इंग्लंडने ही मालिका आधीच गमावली असून सध्या संघ ०-३ ने पिछाडीवर आहे. आता इंग्लंडवर ५-० अशा ‘व्हाईट वॉश’चे संकट घोंगावत असून, या मानहानिकारक पराभवानंतर प्रशिक्षक ब्रँडन मॅक्क्युलम आणि त्यांच्या ‘बॅझबॉल’ नीतीवर […] The post Ravi Shastri : अॅशेस मालिकेतील पराभवानंतर ‘बॅझबॉल’चा अंत जवळ; रवी शास्त्री होणार इंग्लंडचे नवे कोच? appeared first on Dainik Prabhat .
Raosaheb Danve : राज आणि उद्धव ठाकरे यांच्या टीकेला रावसाहेब दानवेंकडून प्रत्युत्तर; म्हणाले…
मुंबई : दीर्घकाळाच्या राजकीय वैरानंतर ठाकरे कुटुंबातील दोन मोठे नेते – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे – यांनी मुंबई महानगरपालिका (बीएमसी) निवडणुकीसाठी अधिकृत युती जाहीर केली आहे. २४ डिसेंबर रोजी मुंबईत झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत दोन्ही नेत्यांनी ही घोषणा केली. ही युती मुंबईसह नाशिक आणि […] The post Raosaheb Danve : राज आणि उद्धव ठाकरे यांच्या टीकेला रावसाहेब दानवेंकडून प्रत्युत्तर; म्हणाले… appeared first on Dainik Prabhat .
सयाजी शिंदेंच्या ‘सह्याद्री देवराई ’ प्रकल्पाला आग! नेमकं कारण काय?
बीड: एखाद तान्ह बाळ जन्माला आल्यापासून त्याची सर्व निगा राखायची, वाढ पाहायची, आपल्यासोबत खुलताना त्याला जवळ करायचं आणि आपल्या आधीच त्याचं जाणही आपणच बघायचं. हा दुर्दैवी प्रवास महाराष्ट्रातील एका वृक्ष संवर्धकासोबत घडला आहे. मराठी-हिंदी सिनेसृष्टीतील वृक्ष संवर्धनाच्या लढ्यासाठी सयाजी शिंदे यांचे नाव जोडले जाते. सयाजी शिंदेंच्या पर्यावरण संवर्धनाचा महाराष्ट्रातील एक वस्तुपाठ मानल्या जाणाऱ्या बीड तालुक्यातील पालवन परिसरातील ‘सह्याद्री देवराई ’ प्रकल्पाला २४ डिसेंबरच्या संध्याकाळी भीषण आग लागली.
शिक्षक, कर्मचारी वेतनापासून वंचितच; सेवार्थ प्रणालीची प्रकरणे रखडल्याचा फटका
पुणे – वरिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या वेतनासाठी आवश्यक असलेली एचटीई सेवार्थ प्रणालीची प्रकरणे उच्च शिक्षण विभागाकडून लवकर मार्गी लागत नाहीत. काही ना काही कारणे दाखवित संबंधित प्रकरणे प्रलंबित ठेवली जात असल्याने शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना काही महिने वेतनापासून वंचितच रहावे लागत आहे. वेतनच मिळत नसल्याने आर्थिक अडचणी निर्माण होत असून कुटुंबाचा […] The post शिक्षक, कर्मचारी वेतनापासून वंचितच; सेवार्थ प्रणालीची प्रकरणे रखडल्याचा फटका appeared first on Dainik Prabhat .
तारिक रहमान १७ वर्षांनी मायदेशी परतले; बांगलादेशातील राजकीय चर्चांना उधाण
ढाका: बांगलादेशमध्ये मागील अनेक दिवसांपासून राजकीय गोंधळ सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या सर्व गोंधळात एक अनोखी गोष्ट घडली आहे. बांगलादेशचे माजी राष्ट्रपती झियाउर रहमान आणि माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचे पुत्र तारिक रहमान तब्बल १७ वर्ष लंडनमध्ये निर्वासित म्हणून राहिल्यानंतर मायदेशी परतले आहेत. ढाका विमानतळावर बांगलादेश नॅशनल पार्टीच्या हजारो समर्थकांनी हातात बॅनर घेऊन तारिक रहमान आणि त्यांच्या कुटुंबाचे जंगी स्वागत केले. त्यामुळे अचानक १७ वर्षांनंतर तारिक रहमान स्वगृही का आले? हा प्रश्न राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा ठरतो.तारिक रहमान यांच्या बांगलादेशात घरवापसीनिमीत्त बीएनपी समर्थक आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बनानी एअरपोर्ट रोडवरून ढाका विमानतळाच्या दिशेने पायी रॅली देखील काढली. त्यांच्या स्वागतासाठी हजारोंच्या संख्येने समर्थक रस्त्यांवर उतरल्याचे पाहायला मिळाले. यापूर्वी तारिक रहमान हे पत्नी झुबेदा रहमान आणि मुलगी झेमा रहमान यांच्याबरोबर लंडनच्या हीथ्रो विमानतळावरून ढाकाकडे रवाना होतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ढाक्यात तारिक रेहमान यांच्या उपस्थित महारॅली घेण्यासाठी बीएनपी तयारी सुरू केली होती.रहमान हे स्वतःहून निर्वासित म्हणून २००८ ते २०२५ च्या अखेरपर्यंत लंडन येथे राहिले आहेत. त्यांनी सप्टेंबर २००८ मध्ये बांगलादेश सोडला होता. यानंतर डिसेंबर २००९ मध्ये ढाका येथे आयोजित केलेल्या बीएनपीच्या ५ व्या राष्ट्रीय परिषदेत त्यांची पक्षाच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली, मात्र तेव्हापासून त्यांनी परदेशातूनच पक्षाचे नेतृत्व केले. यूकेमधील कंपनीज हाऊसमध्ये सादर केलेल्या कागदपत्रांनुसार, सुरुवातीला त्यांनी आपले राष्ट्रीयत्व 'ब्रिटीश' असे नमूद केले होते. मात्र, २०१६ मध्ये त्यांनी या कागदपत्रांत सुधारणा केली आणि आपले राष्ट्रीयत्व 'बांगलादेशी' असल्याचे जाहीर केले. तर २०२४ मध्ये शेख हसीना यांचे सरकार कोसळल्यानंतर तारिक यांच्यावरील खटले रद्द करण्यात आले आणि त्यानंतर त्यांनी बांगलादेशमध्ये परत येणार असल्याचे जाहीर केले होते.https://prahaar.in/2025/12/25/should-you-invest-in-gold-and-silver-in-the-new-year-or-not-what-do-experts-think/तारिक रहमान कोण आहेत?तारिक रहमान हे बांगलादेश नॅशनल पार्टीच्या कार्यकारी अध्यक्षा आणि बांगलादेशच्या माजी पंतप्रधान झिया खलिदा यांचे पुत्र आहेत. तारिक रहमान यांना बांगलादेशच्या राजकारणात क्राऊन प्रिन्स असे म्हटले जाते. बांगलादेशचे संस्थापक आणि लष्कराचे प्रमुख तसेच माजी राष्ट्रपती जियाउर रहमान यांचे ते सर्वात लहान पुत्र आहेत. त्यांची आई खलिदा झिया या तीनदा बांगलादेशच्या पंतप्रधान झाल्या होत्या. २००० च्या दशकाच्या सुरुवातीला तारिक बीएनपीमध्ये एक महत्त्वाचा चेहरा म्हणून उदयास आले. यानंतर खलिदा झियांचे राजकीय उत्तराधिकारी म्हणून त्यांच्याकडेच पाहिले जाऊ लागले. कारण युवक वर्गात त्यांची लोकप्रियता वाढली होती.
Sayaji Shinde | Devrai Project : पालवन शिवारातील ज्या ओसाड डोंगराला हिरवेगार करण्यासाठी अभिनेते सयाजी शिंदे आणि वनविभागाने गेल्या सात वर्षांपासून अहोरात्र कष्ट घेतले, त्या ‘सह्याद्री देवराई’ प्रकल्पाला बुधवारी सायंकाळी भीषण आग लागली. या आगीत अनेक दुर्मिळ झाडे, औषधी वनस्पती जळून खाक झाल्या असून, असंख्य पक्षी आणि सरपटणाऱ्या प्राण्यांचा होरपळून मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली […] The post Sayaji Shinde : ‘सह्याद्री देवराई’ जळून खाक झाल्यानंतर सयाजी शिंदेंचा प्रश्नांचा भडीमार; प्रशासनाला धारेवर धरले ! appeared first on Dainik Prabhat .
Virat Kohli Santa Claus Video Viral : आज २५ डिसेंबर, संपूर्ण देशभरात ख्रिसमसचा उत्साह पाहायला मिळत आहे. या निमित्ताने सोशल मीडियावर भारतीय क्रिकेटचा सुपरस्टार विराट कोहलीचा एक हृदयस्पर्शी व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो चक्क सांताक्लॉज बनून लहान मुलांच्या इच्छा पूर्ण करताना दिसत आहे. दुसरीकडे, मैदानातही विराटने आपल्या बॅटने धावांचा पाऊस पाडत चाहत्यांना ख्रिसमसची […] The post Virat Kohli Santa : विराटने सांताक्लॉज बनून दिलं सरप्राइज, मुखवटा काढताच मुलांनी काय केलं? पाहा VIDEO appeared first on Dainik Prabhat .
‘मी नाराज नाही, पण…’नाशिकमधील पक्षप्रवेशावरून भाजप आमदार देवयानी फरांदे भावूक; डोळ्यात अश्रू
नाशिक: आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिक भाजपमध्ये मोठे फेरबदल पाहायला मिळत आहेत. माजी आमदार आणि माजी महापौरांसह पाच बड्या नेत्यांनी आज भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. मात्र, या पक्षप्रवेशावरून भाजपमधील स्थानिक गटबाजी आणि नाराजी चव्हाट्यावर आली आहे. भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी या प्रक्रियेवर जाहीर नाराजी व्यक्त केली असून, माध्यमांशी बोलताना त्यांना अश्रू अनावर झाले. भाजप […] The post ‘मी नाराज नाही, पण…’ नाशिकमधील पक्षप्रवेशावरून भाजप आमदार देवयानी फरांदे भावूक; डोळ्यात अश्रू appeared first on Dainik Prabhat .
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही ‘राष्ट्रवादी’एकत्र लढणार; शरद पवार गटाने मागितल्या ‘इतक्या’जागा
पुणे: राज्यभरात महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजल्यानंतर राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. पुण्याच्या राजकारणात एक मोठी आणि महत्त्वाची उलथापालथ पाहायला मिळत असून, आगामी महापालिका निवडणुकीसाठी शरद पवार आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र निवडणूक लढवणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. या संदर्भात दोन्ही गटांची पहिली महत्त्वाची बैठक पार पडली असून, जागावाटपाचा प्राथमिक आकडाही […] The post पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही ‘राष्ट्रवादी’ एकत्र लढणार; शरद पवार गटाने मागितल्या ‘इतक्या’ जागा appeared first on Dainik Prabhat .
Indian Army | Social Media Policy : भारतीय लष्कराने आपल्या जवानांसाठी आणि अधिकार्यांसाठी सोशल मीडिया वापराच्या धोरणात मोठे बदल केले आहेत. लष्करी गुप्तचर महासंचालनालयाने (DGMI) जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, सैनिकांना आता इन्स्टाग्राम (Instagram) वापरण्याची मुभा देण्यात आली आहे, मात्र त्यावर अनेक कडक निर्बंध कायम आहेत. इन्स्टाग्रामसाठी ‘व्ह्यू ओन्ली’ (View Only) नियम : लष्कराने स्पष्ट […] The post Indian Army : भारतीय सैनिकांसाठी सोशल मीडिया नियमांमध्ये मोठा बदल; फक्त ‘या’ व्यक्तींशी संपर्क ठेऊ शकतात… appeared first on Dainik Prabhat .
Nanded News : नांदेडमध्ये सामूहिक आत्महत्या? एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
नांदेड : नांदेड जिल्ह्यात मुदखेड तालुक्यातील जवळा मुरार गावातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी एका शेतकऱ्यासह त्याच्या पत्नी आणि दोन मुलांचे मृतदेह आढळले आहेत. ही सामूहिक आत्महत्या असल्याचा पोलिसांना संशय आहे. सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास, जवळा मुरार गावातील त्यांच्या घरात रमेश सोनाजी लाखे (५१) आणि त्यांची पत्नी राधाबाई लाखे (४५) यांचे मृतदेह आढळून आले. त्यानंतर त्यांचा मुले […] The post Nanded News : नांदेडमध्ये सामूहिक आत्महत्या? एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू appeared first on Dainik Prabhat .
नवी दिल्ली : उद्योगपती संजय कपूरची ३० हजार कोटी रुपयांची मालमत्ता कोणाच्या मालकीची होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. न्यायालयासमोर आलेल्या याचिकेमुळे एक मोठा ट्विस्ट आला आहे. संजय कपूर यांनी एकूण तीन वेळा लग्न केले. पहिले लग्न फॅशन डिझायनर नंदिता महातानिशीशी केले. काही काळानंतर घटस्फोट घेतला आणि बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरसोबत लग्न केले. या लग्नानंतर त्याला समायरा ही मुलगी आणि कियान हा मुलगा झाला. नंतर २०१४ मध्ये करिश्मा आणि संजय यांनी परस्पर संमतीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. यानंतर संजयने प्रिया सचदेवशी लग्न केलं. त्यांना अझारियस हा मुलगा झाला. संजयने प्रिया सचदेवचा पहिला पती विक्रम चटवालपासून झालेली मुलगी सफिरा चटवाल हिलाही दत्तक घेतलं. यानंतर काही काळाने संजय मृत्यू झाला. संजयच्या पश्चात त्याच्या संपत्तीवरुन वाद सुरू झाला आहे.काय आहे वाद ?संजय आणि करिश्माच्या मुलांनी म्हणजेच समायरा आणि कियानने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका केली आहे. करिश्माच्या मुलांनी दावा केला की त्यांचे वडील संजय कपूर यांचं मृत्यूपत्र बनावट आहे, ते जिवंत असतानाच त्यात छेडछाड करण्यात आली होती आणि बदल करण्यात आले होते. गेल्या सुनावणीत वकील महेश जेठमलानी यांनी युक्तीवाद केला की, संजय त्यांच्या मुलांसोबत सुट्टीवर असताना मृत्यूपत्र बदलण्यात आलं होतं. मृत्यूपत्रात सुधारणा करणाऱ्या व्यक्तीला संजय कपूरच्या मृत्यूच्या एक दिवसानंतर लगेच कंपनीचा संचालक बनवण्यात आलं.संजयची पत्नी प्रिया सचदेव कपूर यांनी मृत्यूपत्रात बदल केल्याच्या आरोपात तथ्य नसल्याचा दावा केला आहे. आता समायरा आणि कियानने मृत्यूपत्राच्या फॉरेन्सिक तपासणीची मागणी केली आहे. समायरा आणि कियानच्या दाव्यानुसार संजय कपूर यांनी त्यांना मालमत्तेत हक्क देणार असल्याचे सांगितले होते. पण न्यायालयापुढे आलेल्या मृत्यूपत्रात उल्लेखच दिसत नाही. यामुळे प्रियाने संजयच्या मृत्यूपत्रात छेडछाड करुन स्वार्थ साधल्याचा आरोप समायरा आणि कियानने केला आहे. फॉरेन्सिक तपासणीच्या मागणीला प्रियाच्या वकिलाने विरोध केला आहे. या प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. यामुळे पुढील सुनावणीत काय होणार ? दिल्ली उच्च न्यायालय काय निर्णय किंवा निर्देश देणार याकडे संजय कपूरच्या नातलगांचे लक्ष आहे.
ताडोबातल्या तारा वाघीणीचा पाटणमध्ये मुक्त संचार, नागरिकामध्ये भीतीचं वातावरण
पाटण : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात एक वाघीण मुक्त संचार करताना आढळली. ही तारा नावाची वाघीण ताडोबा अभयारण्यातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाशी संबंधित आहे. या वाघिणीचा मुक्त संचार सकाळी मांगडेवाडी परिसरात दिसून आला. मांगडेवाडी ते जिंती दरम्यान सकाळी सातच्या सुमारास तारा वाघिणीचा मुक्त संचार सुरू होता. राज्य परिवहनची बस मांगडेवाडी ते जिंती दरम्यानच्या रस्त्यावरुन जात असताना चालक संदीप जाधव यांनी रस्त्याजवळ वाघीण बघितली. चतुराईने चालक संदीप जाधव यांनी बस थांबवली आणि सर्व प्रवाशांना शांत राहण्यास बजावले. प्रवाशांनी शांत राहून आपापल्या मोबाईलमध्ये तारा वाघिणीचे फोटो, व्हिडीओ काढून घेतले. तारा वाघिणीच्या गळ्यात रेडिओ कॉलर आयडी दिसला. यामुळे ही ताडोबा अभयारण्यातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाशी संबंधित तारा वाघीण असल्याचे अनेकांच्या लक्षात आले. वन विभागाने काही दिवसांपूर्वीच ताडोबा अभयारण्यातून तारा वाघिणीला चांदोलीच्या जंगलात सोडले आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या वाढवण्यासाठी हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवण्यात येत आहे. यातील पहिला टप्पा यशस्वी झाल्याचे वन विभागाने सांगितले. ताराच्या हालचालींवर वनविभाग सातत्याने नजर ठेवून आहे. चांदोली परिसरात मुक्त संचार करतानाचे अनेक व्हिडिओ याआधीही समोर आले आहेत. मात्र आज सकाळी पाटण तालुक्यातील मांगडेवाडी परिसरातच तारा दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे, तर वन्यजीव आणि निसर्गप्रेमींमध्ये मात्र आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. ‘तारा वाघिणीने चांदोलीमध्ये उत्कृष्ट क्षमता दाखवली आहे. ती जंगलातील स्वावलंबी जीवनासाठी पूर्णपणे सिद्ध आहे,’असं वनविभागाकडून सांगण्यात आलं आहे.नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क राहावं आणि वाघीण दिसल्यास तात्काळ वनविभागाला माहिती द्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.
श्रीरामपूर: दत्तनगर परिसरात धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद; नागरिकांनी सोडला सुटकेचा निश्वास
श्रीरामपूर | गेल्या अनेक दिवसांपासून दत्तनगर आणि आगाशे नगर परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला अखेर यश आले आहे. बुधवारी (दि. २४) पहाटेच्या सुमारास हा बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. यामुळे संपूर्ण परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला असून भीतीचे सावट दूर झाले आहे. झाडीचा घेतला होता आश्रय नेवासा–संगमनेर रस्त्यालगत असलेल्या आगाशे नगर […] The post श्रीरामपूर: दत्तनगर परिसरात धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद; नागरिकांनी सोडला सुटकेचा निश्वास appeared first on Dainik Prabhat .
Mithun Chakraborty : बंगालचा बांगलादेश बनू देऊ नका; मिथुन चक्रवर्ती यांचा तृणमूल काँग्रेसवर हल्लाबोल
कोलकता : अभिनेते आणि भाजप नेते मिथुन चक्रवर्ती यांनी तृणमूल काँग्रेस (टीएमसी) विरोधात तीव्र हल्ला चढवला आहे. मिथुन यांनी पश्चिम बंगालच्या लोकांना बंगालला बांगलादेश बनू देऊ नका असे आवाहन केले आहे. त्यांच्या विधानामुळे राजकीय वातावरण तापले आहे. चक्रवर्ती यांच्या विधानावर काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी प्रत्युत्तर दिले आहे. मिथुन चक्रवर्ती यांनी डावे, काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसच्या […] The post Mithun Chakraborty : बंगालचा बांगलादेश बनू देऊ नका; मिथुन चक्रवर्ती यांचा तृणमूल काँग्रेसवर हल्लाबोल appeared first on Dainik Prabhat .
Rohit Sharma : ‘रोहित भाई, वडापाव खाणार का?’चाहत्याच्या ऑफरवर हिटमॅनने काय दिली रिऍक्शन? पाहा VIDEO
Rohit Sharma Vadapav Video Viral : भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज फलंदाज रोहित शर्मा सध्या विजय हजारे ट्रॉफी २०२५-२६ मुळे चर्चेत आहे. तब्बल सात वर्षांनंतर या स्पर्धेत पुनरागमन करणाऱ्या रोहितने केवळ बॅटनेच नव्हे, तर आपल्या खिलाडूवृत्तीनेही चाहत्यांची मने जिंकली आहेत. सध्या सोशल मीडियावर रोहितचा एक मजेशीर व्हिडीओ वेगाने व्हायरल होत असून, त्यात चाहते त्याला ‘वडापाव’ची ऑफर […] The post Rohit Sharma : ‘रोहित भाई, वडापाव खाणार का?’ चाहत्याच्या ऑफरवर हिटमॅनने काय दिली रिऍक्शन? पाहा VIDEO appeared first on Dainik Prabhat .
पुणे – राज्यात महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजले असून, प्रचाराचे नारळ फुटू लागले आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून या निवडणुकांसाठी ४० स्टार प्रचारकांची यादी प्रसिध्द केली आहे. त्यामध्ये पुणे जिल्ह्यातून शिवसेना नेत्या व विधानपरिषद उपसभापती डाॅ. नीलम गोऱ्हे आणि उपनेते व खासदार श्रीरंग बारणे यांची स्टार प्रचारक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे […] The post शिवसेनेकडून 40 स्टार प्रचारकांची यादी प्रसिध्द; पुण्यातून डाॅ. नीलम गोऱ्हे आणि श्रीरंग बारणे यांचा समावेश appeared first on Dainik Prabhat .
'वेलकम ३'चे शूटिंग संपले , वेगवेगळ्या लूक मध्ये दिसणार अक्षय कुमार
Welcome 3 : बॉलिवूडच्या वेलकम ३ या चित्रपटाचे शूटिंग नुकतेच संपले आहे. या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार एक महत्त्वाची भूमिका बजावत आहे.अक्षय कुमारने चाहत्यांना नाताळच्या शुभेच्छा देण्यासाठी एक सोशल मीडिया पोस्ट केली. ही पोस्ट करत असतानाच त्याने वेलकम ३ हा हिंदी चित्रपट कधी प्रदर्शित होणार याबाबतही थोडक्यात महिती दिली आहे.बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमार २०२५ मध्ये चार चित्रपटांत दिसला होता. आता २०२६ मध्ये अक्षय कुमार निवडक चित्रपटांमध्ये दिसणार आहे. यात वेलकम ३ हा पण एक हिंदी चित्रपट असेल.अलिकडेच, हैवान चित्रपटातील अक्षय कुमारचा लूक समोर आला आहे. आता अक्षय कुमारने वेलकम टू द जंगल (वेलकम ३) या चित्रपटाबद्दल एक मोठी अपडेट दिली आहे. अभिनेत्याने वेलकम ३ चे शूटिंग पूर्ण झाल्याची घोषणा करणारा एक व्हिडिओ शेअर केला आहे.अक्षय कुमारने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये सर्व कलाकार चालताना दिसत आहेत. सुनील शेट्टी आणि रवीना टंडन व्यतिरिक्त, इतर अनेक कलाकार देखील दिसत आहेत. अभिनेत्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, वेलकम टू द जंगलच्या सर्व कलाकारांच्या वतीने, आम्ही तुम्हाला सर्वांना नाताळच्या खूप खूप शुभेच्छा देतो. २०२६ मध्ये थिएटरमध्ये. मी कधीही इतक्या मोठ्या प्रोजेक्टचा भाग नव्हतो... आमच्यापैकी कोणीही नाही. आम्ही तुम्हाला आमची भेट देण्यासाठी उत्सुक आहोत. शूटिंग पूर्ण झाले आहे. शाब्बास मित्रांनो. हे प्रत्यक्षात आणण्यात सहभागी असलेल्या प्रत्येकाला खूप यश मिळाले आहे. आमच्या संपूर्ण टीमच्या वतीने, आम्ही तुम्हाला २०२६ साठी शुभेच्छा देतो.अक्षयसोबत कलाकारअक्षयने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सर्व कलाकारांची माहिती मिळते. त्यात अक्षय दोन वेगवेगळ्या लूकमध्ये दिसत आहे. एका लूकमध्ये तो दाढी आणि मिशा नसलेल्या तरुण लूकमध्ये दिसतो, तर दुसऱ्या लूकमध्ये अभिनेता लांब, पांढरे केस आणि जाड दाढी असलेला दिसतो. त्याच्यासोबत सुनील शेट्टी, रवीना टंडन, तुषार कपूर, पुनीत इस्सर, अर्शद वारसी, दिशा पटानी, राजपाल यादव, जॉनी लिव्हर आणि आफताब शिवदासानी असे कलाकार आहेत.
रफी पुरस्कार माझ्यासाठी देवाचा प्रसाद
जेष्ठ गायिका उत्तरा केळकरमुंबई : महान गायक मोहम्मद रफी यांच्या नावाने मला मिळालेला पुरस्कार हा माझ्यासाठी देवाचा प्रसादच आहे तो मी भक्तीभावाने स्विकारते, अशा भावना ज्येष्ठ गायिका उत्तरा केळकर यांनी आज येथे व्यक्त केल्या.सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड आशिष शेलार यांच्या स्पंदन आर्ट या संस्थेतर्फे मोहम्मद रफी यांच्या वाढदिवसा दिवशी त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ दरवर्षी एका संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ कलावंताला जीवन गौरव व मोहम्मद रफी पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. यावेळचा १९ वा मोहम्मद रफी जीवन गौरव पुरस्कर ज्येष्ठ संगीतकार ओ. पी. नय्यर यांना मरणोत्तर तर मोहम्मद रफी पुरस्कार सुप्रसिध्द गायिका उत्तरा केळकर यांना बुधवारी रंग शारदा येथे झालेल्या सोहळयात प्रदान करण्यात आला.सांस्कृतीक कार्य तथा माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी हे पुरस्कार प्रदान केले. जीवन गौरव पुरस्कर एक लाख रुपये रोख आणि स्मृतीचिन्ह अशा स्वरुपात असून ओ.पी नय्यर यांना अखेरच्या दिवसात सांभाळणाऱ्या राणी कोळी यांना पुरस्कार स्विकारला. तर ५१ हजार रुपये रोख आणि स्मृतीचिन्ह असे मोहम्मद पुरस्कराचे स्वरुप आहे.यावेळी ॲड प्रतिमा आशिष शेलार यांच्यासह रफी यांच्या कन्या व जावई हेही उपस्थित होत्या. यावेळी त्यांच्या कुटुंबाने प्रसिध्द केल्या महोमद रफी यांच्यावरील कॅलेंडरचे प्रकाशन ही मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी जीवनगाणी तर्फे फीर रफी हा कार्यक्रम सादर करण्यात आला. गायक श्रीकांत नारायण यांनी रफी यांची गाणी सादर केली तर आरजे गौरव यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले.

24 C