स्मृती मंधानाची ऐतिहासिक कामगिरी, मोडला मिताली राजचा विक्रम
नवी मुंबई : डी. वाय. पाटील स्टेडियम येथे सुरू असलेल्या आयसीसी महिला वर्ल्डकप २०२५ च्या फायनल मॅचमध्ये भारतीय सलामीवीर स्मृती मंधानाने ५८ चेंडूत आठ चौकार मारत ४५ धावा केल्या. ती क्लो ट्रायॉनच्या चेंडूवर सिनालो जाफ्ताकडे झेल देऊन परतली. पण बाद होण्याआधी स्मृती मंधानाने एक ऐतिहासिक कामगिरी केली. स्मृतीने एका महिला वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थान पटकावले. तिने मिताली राजचा विक्रम मोडीत काढला.https://prahaar.in/2025/11/02/indw-vs-saw-in-iccwwc-2025-india-give-big-challenge-to-south-africa/स्मृतीने आयसीसी महिला वर्ल्डकप २०२५ मध्ये ४३४ धावा केल्या. ही कामगिरी करुन स्मृतीने मिताली राजचा २०१७ चा एका महिला वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा कराऱ्या भारतीय खेळाडूचा विक्रम मोडला. मितालीने २०१७ च्या महिला वर्ल्डकपमध्ये ४०९ धावा केल्या होत्या. आता एका महिला वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत स्मृती मंधाना पहिल्या आणि मिताली राज दुसऱ्या स्थानी आहे.https://prahaar.in/2025/11/02/shafali-vermas-strong-innings-in-her-comeback-match-in-the-world-cup-final/एका महिला वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांची यादी स्मृती मंधाना - ४३४ धावा, २०२५ मिताली राज - ४०९ धावा, २०१७ पूनम राऊत - ३८१ धावा, २०१७ हरमनप्रीत कौर - ३५९ धावा, २०१७ स्मृती मंधाना - ३२७ धावा, २०२२
Pune News : पोलीस आयुक्तालयातच उघड झाले ‘बनावट आयपीएस’चे पितळ
पुणे : स्वतःला आयपीएस अधिकारी असल्याचे सांगत थेट पुणे पोलीस आयुक्तालयात पोहोचलेल्या एका तरुणाचे पितळ शेवटी उघड झाले आहे. सागर वाघमोडे असे या बनावट अधिकाऱ्याचे नाव असून, त्याच्याविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मूळचा सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील रहिवासी असलेला सागर वाघमोडे हा स्वतःला आयपीएस अधिकारी असल्याचे भासवून विविध ठिकाणी […] The post Pune News : पोलीस आयुक्तालयातच उघड झाले ‘बनावट आयपीएस’चे पितळ appeared first on Dainik Prabhat .
नवी दिल्ली : भारताने जपान आणि युरोप यांचे उदाहरण डोळ्यांसमोर ठेवले पाहिजे. व्यापारविषयक करार करताना भारताने असे कुठलेही आश्वासन द्यायला नको जे पूर्ण करणे कठीण होईल किंवा असे झाल्यास आपल्या देशापुढील अडचणी वाढू शकतात. जपान आणि युरोपमधील काही देशांनी अशी काही आश्वासने दिली आहेत. मात्र त्याचा फायदा अमेरिकेला जास्त होणार आहे. अशा प्रकाराची आश्वासने देताना […] The post Raghuram Rajan : व्यापारविषयक करारावेळी कुठलेही आश्वासन देऊ नये; RBI चे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी दिला सल्ला appeared first on Dainik Prabhat .
भारताची फटकेबाजी, द. आफ्रिकेला दिले मोठे आव्हान
नवी मुंबई : महिला वर्ल्डकप २०२५ ची फायनल मॅच डी. वाय. पाटील स्टेडियम येथे सुरू आहे. नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेने गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने ५० षटकांत सात बाद २९८ धावा केल्या आणि दक्षिण आफ्रिकेपुढे ५० षटकांत २९९ धावा करण्याचे आव्हान ठेवले आहे.भारताकडूनस्मृती मंधानाने ४५ धावा, शफाली वर्माने ८७ धावा, जेमिमा रॉड्रिग्जने २४ धावा, हरमनप्रीत कौरने २० धावा, दीप्ती शर्माने ५८ धावा, अमनजोत कौरने १२ धावा, रिचा घोषने ३४ धावा, राधा यादवने नाबाद ३ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून अयाबोंगा खाकाने ३ तर नॉनकुलुलेको म्लाबा, नॅडिन डी क्लार्क आणि क्लो ट्रायॉन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.ऐतिहासिक महिला क्रिकेट वर्ल्डकप २०२५यंदाच्या फायनलचा विजेता हा पहिल्यांदाच महिला क्रिकेट वर्ल्डकपवर स्वतःचे नाव कोरणार आहे. यामुळे या ऐतिहासिक सामन्याचे महत्त्व वाढले आहे. भारतीय महिला क्रिकेट संघ तिसऱ्यांदा वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. याआधी २०१७ आणि २००५ मध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाला वर्ल्डकप स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. यामुळे यावेळी तरी भारत विश्वविजेता होईल अशी आशा भारतीय क्रिकेटप्रेमी बाळगून आहेत. महिला क्रिकेट वर्ल्डकपच्या इतिहासात २०१७ मध्ये इंग्लंडमध्ये लॉर्ड्स येथे अंतिम सामना झाला. हा सामना इंग्लंडने नऊ धावांनी जिंकला होता. याआधी २००५ मध्ये दक्षिण आफ्रिकेतील सेंच्युरियनच्या सुपरस्पोर्ट पार्कवर अंतिम सामना झाला होता. हा सामना ऑस्ट्रेलियाने ९८ धावांनी जिंकला होता. या दोन्ही सामन्यांत भारत उपविजेता झाला होता. यामुळे आता तिसऱ्यांदा अंतिम सामन्यात खेळत असलेला भारतीय महिला क्रिकेट संघ यावेळी तरी विश्वविजेता होतो का याबाबत क्रिकेटप्रेमींमध्ये उत्सुकता आहे.Innings Break!A flourish from Deepti Sharma and Richa Ghosh propels #TeamIndia to 2⃣9⃣8⃣/7 after 50 overs Over to our bowlers now! Scorecard ▶ https://t.co/TIbbeE4ViO#WomenInBlue | #CWC25 | #INDvSA | #Final pic.twitter.com/eFNztfR0xQ— BCCI Women (@BCCIWomen) November 2, 2025
विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पुनरागमन करत शफाली वर्माची दमदार खेळी
नवी मुंबई : आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ चा अंतिम सामना टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका महिला संघ यांच्यात सुरू आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. याच सामन्यात प्रतिका रावलच्या जागी आलेल्या शफाली वर्माने अप्रतिम फलंदाजी करत सगळ्यांचे मन जिंकले आहे . आपल्या वनडे करिअरमधील ही सर्वात मोठी खेळी करत शफालीने पुनरागमन केले आहे. टीम इंडिया प्रथम फलंदाजीला उतरली. शेफालीने अवघ्या ७८ चेंडूंमध्ये १११.५४ च्या स्ट्राईक रेटने ८७ धावांची जबरदस्त खेळी साकारली. तिच्या खेळीत ७ चौकार आणि २ षटकार होते. याआधी बांगलादेश विरुद्धच्या लीग स्टेजमधील शेवटच्या सामन्यात फिल्डिंग करताना भारताची सलामी फलंदाज प्रतिका रावल जखमी झाली, त्यामुळे तिला आजचा अंतिम सामना हा खेळता आला नाही, याच्या आधीच्या न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात तिने शतक ठोकले होते. त्यामुळे तिचं बाहेर जाणं हे टीमसाठी मोठा धक्का होतं. त्या जागी बराच काळ संघाबाहेर राहिलेली तरुण खेळाडू शफाली वर्माला पुन्हा संघात स्थान मिळालं. पण तिच्यावर पहिल्याच संधीपासून चांगली कामगिरी करण्याचा दबाव होता . सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध तिने फक्त ५ चेंडूंमध्ये १० धाव केल्या, त्यामुळे काही चाहत्यांनी तिच्या निवडीवर प्रश्न उपस्थित केला पण फायनलमध्ये दमदार खेळी करून तिने सर्वांचीच तोंडे बंद केली आहेत.
Madras High Court : वैयक्तिक हितसंबंधांसाठी पीआयएल नकोत; मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय
चेन्नई : मद्रास उच्च न्यायालयाने म्हटले आहे की वैयक्तिक हितसंबंध मिटविण्यासाठी जनहित याचिका (पीआयएल) दाखल केल्या गेल्या तर त्यांना परवानगी देता येणार नाही. मुख्य न्यायाधीश मनिंद्र मोहन श्रीवास्तव आणि न्या. जी अरुल मुरुगन यांच्या खंडपीठाने एका व्यक्तीने दाखल केलेली जनहित याचिका फेटाळताना ही टिप्पणी केली. या याचिकेत एका फौजदारी प्रकरणात अतिरिक्त सरकारी वकील आणि पोलिस […] The post Madras High Court : वैयक्तिक हितसंबंधांसाठी पीआयएल नकोत; मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय appeared first on Dainik Prabhat .
भारताने ओलांडला २०० धावांचा टप्पा
नवी मुंबई : महिला वर्ल्डकप २०२५ ची फायनल मॅच डी. वाय. पाटील स्टेडियम येथे सुरू आहे. नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेने गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने दमदार सुरुवात केली आहे. टीम इंडियाने ४० षटकांत चार बाद २२९ धावा केल्या. स्मृती मंधानाने ४५ धावा, शफाली वर्माने ८७ धावा, जेमिमा रॉड्रिग्जने २४ धावा, हरमनप्रीत कौरने २० धावा केल्या. क्लो ट्रायॉनने स्मृतीला तर अयाबोंगा खाकाने शफाली आणि जेमिमाला बाद केले. नॉनकुलुलेको म्लाबाने हरमनप्रीतला बाद केले.सध्या दीप्ती शर्मा आणि अमनजोत कौर खेळत आहे.
नाशिक आणि अमरावती जिल्ह्यांसाठी ‘सी-ट्रिपल आयटी’ मंजूर
मुंबई : नाशिक आणि अमरावती या दोन जिल्ह्यांना प्रत्येकी एक ‘सेंटर फॉर इन्व्हेन्शन, इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड ट्रेनिंग (CIIIT)’ म्हणजेच ‘सी-ट्रिपल आयटी’ केंद्र मंजूर करण्यात आले आहे. उद्योग आणि कौशल्य विकास क्षेत्रात महाराष्ट्राला आघाडीवर ठेवण्याच्या प्रयत्नांचा हा महत्त्वपूर्ण टप्पा आहे. उपमुख्यमंत्री पवार यांनी काही दिवसांपूर्वी टाटा टेक्नॉलॉजी कंपनीला पत्र लिहून नाशिक आणि अमरावती जिल्ह्यांमध्ये सी-ट्रिपल आयटी उभारण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. कंपनीकडून पत्रास सकारात्मक प्रतिसाद देत, दोन्ही जिल्ह्यांसाठी ‘सी-ट्रिपल आयटी’ केंद्रे स्थापन करण्यास टाटा टेक्नॉलॉजीने अधिकृत मान्यता दिली आहे.या ‘सीट्रिपलआय’ सेंटरमुळे स्थानिक युवकांसाठी जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मिळणार आहे. या निर्णयामुळे उत्तर महाराष्ट्र (नाशिक) आणि विदर्भ (अमरावती) या दोनही भागातील युवकांना जागतिक दर्जाचे औद्योगिक प्रशिक्षण मिळण्याची दारे उघडली जाणार आहेत. सोबतच आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित कौशल्य, आवश्यक प्रशिक्षण यासारख्या संधी आपल्या जिल्ह्यातच उपलब्ध होतील. या केंद्रांमुळे स्थानिक पातळीवर उद्योगांना कुशल मनुष्यबळ सहज उपलब्ध होईल, नवउद्योगांना चालना मिळेल आणि स्वयंरोजगार व रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील. ‘सी-ट्रिपल आयटी’ केंद्रांमुळे औद्योगिक क्षेत्राला प्रशिक्षित, कुशल आणि तांत्रिकदृष्ट्या समर्थ युवक मिळतील, नवउद्योगांच्या स्थापनेस प्रोत्साहन मिळेल, स्थानिक अर्थव्यवस्था आणि उद्योगविकासाला बळकटी मिळेल, तसेच युवकांना जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान आत्मसात करण्याची संधी मिळेल.राज्यातील युवकांना रोजगारक्षम कौशल्ये आत्मसात करून ‘मेक इन महाराष्ट्र’ या संकल्पनेला बळकटी देण्याचा उपक्रम म्हणून या दोन केंद्रांना मोठे महत्त्व आहे. ‘सी-ट्रिपल आयटी’ केंद्रांमधून विद्यार्थी आणि उद्योग क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाविषयी प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाईल. ‘रोबोटिक्स’, ‘इंटरनेट ऑफ थिंग्स (IoT)’, ‘डेटा ॲनालिटिक्स, ‘इलेक्ट्रिक वाहन तंत्रज्ञान’, ‘ऑटोमेशन’ अशा अत्याधुनिक क्षेत्रांत युवकांना प्रशिक्षण मिळेल. उपमुख्यमंत्री पवार यांच्या पुढाकारातून नाशिक आणि अमरावती जिल्ह्यांना मिळालेली ‘सी-ट्रिपल आयटी’ केंद्रे ही राज्याच्या औद्योगिक आणि कौशल्य विकास क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण टप्पा ठरतील. या माध्यमातून ‘कौशल्यसंपन्न महाराष्ट्र’ घडविण्याच्या दिशेने राज्याने आणखी एक मोठे पाऊल उचलले आहे.
Bachchu Kadu : कर्जमाफीचा मुद्दा आमच्यामुळे जिवंत झाला; बच्चू कडू यांची टीका
नागपूर : राज्यभरात आमच्या आंदोलनाचे कौतुक करण्यापेक्षा बदनामी अधिक केली जात आहे. आम्ही मॅनेज झालो असे बोलतात, शेतकरी आंदोलन बंद करा, असे आमचे कार्यकर्ते म्हणतात. काहीजण मॅसेज करताय, त्यांनी ते केल्यापेक्षा आंदोलनात सहभागी व्हा. आज आम्हाला आनंद आहे कर्जमाफीचा मुद्दा जो संपला होता, तो बच्चू कडूमुळे आज जिवंत झाला आहे. पण आमच्यावर कमेंट, आरोप आणि […] The post Bachchu Kadu : कर्जमाफीचा मुद्दा आमच्यामुळे जिवंत झाला; बच्चू कडू यांची टीका appeared first on Dainik Prabhat .
Maharashtra News : वैद्यकीय प्रवेश निकालाचा घोळ पोहचला हायकोर्टात
मुंबई : वैद्यकीय प्रवेशाच्या गट ब अभ्यासक्रमांच्या तिसऱ्या फेरीच्या निकालांची घोषणा २०२५-२६ शैक्षणिक वर्षाच्या वैद्यकीय प्रवेशाच्या गट अ अभ्यासक्रमांच्या तिसऱ्या फेरीच्या निकालांपूर्वीच करण्यात आली आहे. यावर उच्च न्यायालयात आक्षेप घेण्यात आला आहे. याप्रकरणी राज्य सरकार, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय तसेच राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाविरुद्ध याचिका दाखल करण्यात आली आहे. वैद्यकीय प्रवेश घेऊ इच्छिणारी […] The post Maharashtra News : वैद्यकीय प्रवेश निकालाचा घोळ पोहचला हायकोर्टात appeared first on Dainik Prabhat .
Rahul Gandhi : मोदींचा रिमोट कंट्रोल उद्योगपतींच्या हाती; राहुल गांधी यांची टीका
बेगुसराय : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींना धास्ती वाटते, या टीकेचा कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पुनरूच्चार केला. तसेच, मोदींचा रिमोट कंट्रोल बड्या उद्योगपतींच्या हाती असल्याचा आरोपही केला. बिहारमधील प्रचार सभांमध्ये बोलताना राहुल यांनी प्रामुख्याने मोदींवर निशाणा साधला. मोदी त्यांची छाती ५६ इंची असल्याच्या बढाया मारतात. मात्र, ट्रम्प यांनी सांगितल्यावर मोदींनी तातडीने […] The post Rahul Gandhi : मोदींचा रिमोट कंट्रोल उद्योगपतींच्या हाती; राहुल गांधी यांची टीका appeared first on Dainik Prabhat .
Smriti Mandhana surpasses Mithali Raj most run in World Cup : आयसीसी महिला वनडे विश्व कप २०२५ चा अंतिम सामना नवी मुंबई येथील डॉ. डी.वाय. पाटिल स्पोर्ट्स ॲकॅडमी येथे खेळला जात आहे. या निर्णायक सामन्यात भारत आणि दक्षिण आफ्रिका आमनेसामने आहेत. या महत्त्वपूर्ण सामन्यात दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोलवार्ड्टने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय […] The post IND W vs SA W Final : स्मृतीने फायनलमध्ये रचला नवा इतिहास! मिताली मागे टाकत वर्ल्डकपमध्ये ‘हा’ पराक्रम करणारी पहिलीच खेळाडू appeared first on Dainik Prabhat .
नौदलासाठी इस्रोने प्रक्षेपित केला उपग्रह
श्रीहरिकोटा : भारतीय नौदलाठी इस्रोने LVM3-M5/CMS-03 या रॉकेटमधून एका उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. या उपग्रहामुळे नौदलाची संपर्क यंत्रणा आणखी सक्षम होणार आहे. नागरी जहाज आणि नौदलाचे जहाज यांच्यात आवश्यकतेनुसार संपर्क ठेवणे तसेच या जहाजांमधील फरक ओळखून त्यांचे व्यवस्थित व्यवस्थापन करणे ही कामं आता आणखी प्रभावीरित्या होणार आहेत. इस्रोने रविवार २ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रक्षेपित केलेले रॉकेट ४३.५ मीटर लांबीचे आणि ६४२ टन वजनाचे आहे. याच रॉकेटच्या मदतीने चांद्रयान ३ मोहीम राबवण्यात आली. प्रक्षेपित केलेल्या रॉकेटमधून इस्रोने CMS-03 हा ४४०० किलो वजनाचा उपग्रह अंतराळात पाठवला. हा उपग्रह नौदलासाठी GSAT-7 ची जागा घेणार आहे. भारताने आतापर्यंत प्रक्षेपित केलेल्या संपर्कासाठीच्या उपग्रहांमध्ये CMS-03 हा सर्वात मोठा उपग्रह आहे. नियोजनानुसार संध्याकाळी LVM3-M5 रॉकेट प्रक्षेपित झाले. या मोहिमेदरम्यान अंतराळात इस्रोने C25 इंजिनच्या थ्रस्ट चेंबरला कार्यान्वित करुन इंजिनची कार्यक्षमता, स्थिरता आणि सूक्ष्म गुरुत्वाकर्षण परिस्थितीवरील नियंत्रण याची चाचणी केली. C25 क्रायोजेनिक इंजिनची यशस्वी ग्राउंड टेस्टिंग झाली होती. पण अंतराळातील चाचणी पहिल्यांदाच घेण्यात आली. ही चाचणी यशस्वी झाली, असे इस्रोचे प्रमुख डॉ. व्ही. नारायणन यांनी संगितले. हे यश इस्रोसाठी महत्त्वाचे आहे. यामुळे इस्रोला भविष्यातील प्रक्षेपण कार्यक्रमांमध्ये स्वदेशी C25 क्रायोजेनिक इंजिनचा वापर करण्यासाठी नियोजन करता येणार आहे. मोठ्या वजनाचे उपग्रह प्रक्षेपित करणे सोपे होणार आहे. याचा थेट फायदा भारताच्या मानवी अंतराळ मोहिमेला अर्थात गगनयान आणि प्रस्तावित अंतराळ स्थानक प्रकल्प या महत्त्वाकांक्षी योजनेला होणार आहे.What a moment! #LVM3M5 lifts off with #CMS03, marking another milestone in India’s space journey. Relive the liftoff highlights pic.twitter.com/HOPEvYYljK— ISRO (@isro) November 2, 2025
Maharashtra Politics : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर राजकीय पक्षांत फोडाफोडीचे राजकारण तापले आहे. सत्ताधारी महायुतीतही अंतर्गत स्पर्धा तीव्र झाली असून, एकमेकांना धक्के देण्याचा प्रयत्न सुरू आहे. रायगडमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. जिल्हा परिषदेच्या दासगाव खाडी पट्टा मतदारसंघातील संभाव्य उमेदवार सुशांत जाबरे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी […] The post Maharashtra Politics : निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांचा एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; राजकीय चर्चांना उधाण appeared first on Dainik Prabhat .
रील्सस्टारना मालिका आणि चित्रपटांमध्ये संधी देण्याबाबत 'या'मराठी कलाकाराने व्यक्त केली नाराजी
मुंबई : आजकाल सोशल मीडियाचा जमाना आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत चालले आहेतच. याच रील्स मुळे अनेकांना प्रसिद्धी मिळते आणि ते चर्चेत येतात. मग ते हिंदी मराठी चित्रपटांच्या प्रीमिअर शोला सुद्धा अनेकवेळा आलेले दिसतात. त्यातल्याच काही जास्त फॉलोअर्स असलेल्या इन्फ्लुएन्सर्सना अनेकदा चित्रपटात किंवा मालिकेमध्ये काम दिलं जात. याचं प्रमाण खूप वाढत चाललं आहे. यामुळे अभिनय क्षेत्रात असलेल्या कलाकारांना कामाच्या संधी मिळत नाहीत. अनेक दिग्गज कलाकार याबद्दल मत व्यक्त करतात. आता एका मराठी कलाकाराने याबद्दल आपले मत परखडपणे मांडले आहे. मराठी अभिनेता अजिंक्य जोशीने अनेक गाजलेल्या सिनेमा आणि मालिकांमध्ये काम केलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अजिंक्य जोशी याने त्याचे परखड मत मांडले आहे. अजिंक्य जोशी म्हणले की 'अनेकदा असं झालंय की स्बस्क्रायबर्स आणि फॉलोअर्स बघून अनेकांना कास्ट केलं आणि ज्यांनी कास्ट केलं ते आणि ज्यांचं कास्टिंग झालं ते सुद्धा तोंडघशी पडले आहेत. जे रील्सस्टार म्हणतात ना ! मला ३० सेकंद द्या, ला येते अॅक्टिंग अरे पाठांतराचं काय ? भाषेचं काय ? तुम्ही फक्त लिपसिंग करताय समोरचा जे बोलतोय त्यावर. तुमच्या भाषेचं काय ? बाकीच्या एक्सरसाईझचं काय ? स्पष्ट बोलण्याकरता काय करावं हे माहित नसतं त्यांना. यामुळे ते तोंडघशी पडतात' असं मत अजिंक्य जोशीने परखडपणे मांडले आहे. 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेनंतर मी एका मालिकेसाठी, सावंतवाडीला शूटिंगसाठी गेलो होतो. आता सगळंच बदलत चाललंय, छोट्या गोष्टींसाठी काही कलाकारांना अव्हॉइड केलं जात. माझं आधीचं काम बघून मला पुढची कामं मिळत गेली. पण आता असं झालंय की मोठ-मोठया कलाकारांनाही ऑडिशन द्यावी लागते. मी नाही मानत स्वतः ला मोठा, पण असं झालंय; असंही अजिंक्य जोशी म्हणाला. अजिंक्य जोशी याच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर त्यानं ' ह. म. बने तू. म. बने, 'सातव्या मुलीची सातवी मुलगी', '४०५ आनंदवन, ' मेहंदी है रचनेवली' , 'बेधुंद' , यांसारख्या गाजलेल्या मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये त्याबरोबर चित्रपटांमध्येही काम केलं आहे.
Abhishek Sharma Break Shikhar Dhawan record : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसरा सामना होबार्टच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा ५ विकेट्सनी धुव्वा उडवत मालिकेत १-१ ने बरोबरी साधली. मात्र, भारतीय संघाचा सलामीवीर अभिषेक शर्मा केवळ २५ धावांची खेळी करून बाद झाला, तरीही त्याने एक मोठा विक्रम आपल्या नावे केला. […] The post IND vs AUS : अभिषेक शर्माने मोडला सात वर्षांचा जुना विक्रम! ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू appeared first on Dainik Prabhat .
Maharashtra Weather : महाराष्ट्रातील नागरिकांसाठी नोव्हेंबर महिना ‘थंडी’ऐवजी ‘उष्णता आणि पावसाचा’ सरप्राइज घेऊन येणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे. यंदा हिवाळा सुरू होत असतानाही किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता असल्याने थंडीचा कडाका कमी जाणवेल. त्याचवेळी, राज्यात आणि देशभरात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे. IMD च्या मासिक अंदाजानुसार, नोव्हेंबर महिन्यात देशाच्या बहुतांश […] The post Maharashtra Weather : राज्यात थंडीचा वारा नाही, पावसाचा घाला मात्र नक्की! IMD चा धक्कादायक अंदाज, वाचा… appeared first on Dainik Prabhat .
नवी मुंबई : महिला वर्ल्डकप २०२५ ची फायनल मॅच डी. वाय. पाटील स्टेडियम येथे सुरू आहे. नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेने गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने दमदार सुरुवात केली आहे. टीम इंडियाने १९ षटकांत एक बाद १११ धावा केल्या आहेत. सलामीवीर स्मृती मंधाना ४५ धावा करुन क्लो ट्रायॉनच्या चेंडूवर सिनालो जाफ्ताकडे झेल देऊन परतली. शफाली वर्मा आणि उपांत्य फेरीत सामनावीर झालेली जेमिमा रॉड्रिग्ज या दोघी खेळत आहेत.
M.K.Stalin : एसआयआर विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार; मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी केले जाहीर
चेन्नई : वर्ष २०२६ च्या विधानसभा निवडणुकीनंतर तामिळनाडूमध्ये मतदार यादीची विशेष पुनरावृत्ती (सर) करण्याची विनंती निवडणूक आयोगाला आमच्या पक्षातर्फे करण्यात आली होती. त्यामुळे पुनरावृत्ती प्रक्रिया गोंधळ आणि शंका न घेता पूर्ण करता आला असता. तथापि, आयोगाने ही मागणी फेटाळून लावली. त्यामुळे आता या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्यावाचून पर्याय उरलेला नाही, असे तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन […] The post M.K.Stalin : एसआयआर विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार; मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी केले जाहीर appeared first on Dainik Prabhat .
मोठी बातमी.. ! भाजप नेत्याचा नातू अडचणीत; १० कोटींच्या गंभीर आरोपांनी खळबळ
Raosaheb Danve | महाराष्ट्रातील राजकारणात आणखी एक खळबळजनक घडामोड समोर आली आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांचा नातू शिवम मुकेश पाटील यांच्यासह आठ जणांवर तब्बल १० कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गंभीर गुन्हा दाखल झाला आहे. नाशिक जिल्ह्यातील सातपूर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या या तक्रारीने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, भाजपच्या ‘प्रामाणिक’ […] The post मोठी बातमी.. ! भाजप नेत्याचा नातू अडचणीत; १० कोटींच्या गंभीर आरोपांनी खळबळ appeared first on Dainik Prabhat .
होबार्टमध्ये मारली बाजी, Team India ने साधली बरोबरी
होबार्ट : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या T20 मालिकेत भारताने बरोबरी साधली आहे. मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला. दुसरा सामना ऑस्ट्रेलियाने ४ विकेट राखून आणि तिसरा सामना भारताने ५ विकेट राखून जिंकला. ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीर ट्रॅव्हिस हेड (सहा धावा), जोश इंगलिस (एक धाव) आणि मार्कस स्टोइनिस (६४ धावा) या तिघांना बाद करणारा अर्शदीप सिंग सामनावीर झाला. नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेणे भारतासाठी फायद्याचे ठरले. होबार्ट येथील बेलेरिव्ह ओव्हल स्टेडियममध्ये झालेल्या तिसऱ्या T20 सामन्यात प्रथम फलंदाजी करत असलेल्या ऑस्ट्रेलियाने वीस षटकांत सहा बाद १८६ धावा केल्या. धावांचा पाठलाग करणाऱ्या भारताने १८.३ षटकांत पाच बाद १८८ धावा केल्या. भारताकडून वॉशिंग्टन सुंदरने नाबाद ४९ आणि यष्टीरक्षक असलेल्या जीतेश शर्माने नाबाद २२ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. वॉशिंग्टन सुंदरने २३ चेंडूत चार षटकार आणि तीन चौकारांच्या जोरावर नाबाद ४९ धावा केल्या तर जीतेश शर्माने १३ चेंडूत ३ चौकार मारत नाबाद २२ धावा केल्या. टीम इंडियाकडून अभिषेक शर्माने २५, शुभमन गिलने १५, सूर्यकुमार यादवने २४, तिलक वर्माने २९, अक्षर पटेलने १७ धावांचे योगदान दिले. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन एलिसने ३, झेवियर बार्टलेटने १ आणि मार्कस स्टोइनिसने १ विकेट घेतली. याआधी प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने वीस षटकांत सहा बाद १८६ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून ट्रॅव्हिस हेडने सहा, मिचेल मार्शने ११, जोश इंगलिसने एक, टिम डेव्हिडने ७४, मिचेल ओवेनने शून्य, मार्कस स्टोइनिसने ६४, मॅथ्यू शॉर्टने नाबाद २६, झेवियर बार्टलेटने नाबाद तीन धावांचे योगदान दिले. भारताकडून अर्शदीप सिंगने तीन, वरुण चक्रवर्तीने दोन, शिवम दुबेने एक बळी घेतला.कोणाचेही अर्धशतक नाही पण सर्वाधिक धावांचा यशस्वी पाठलाग १९७ इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज ब्रिस्टल २०२५ (एचएस जोस बटलर ४७) १८७ भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियन होबार्ट २०२५ (एचएस वॉशिंग्टन सुंदर ४९*) * १७९ ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका केपटाऊन २०१६ (एचएस स्टीव्हन स्मिथ ४४)होबार्टमध्ये सहा टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचा पहिला पराभवऑस्ट्रेलियातील सर्वाधिक यशस्वी टी-२० आंतरराष्ट्रीय धावांचा पाठलाग १९८ भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सिडनी २०१६ १९५ भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सिडनी २०२० १८७ भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया होबार्ट २०२५ * १७७ आयर्लंड विरुद्ध स्को होबार्ट २०२२ १७४ श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया जिलोंग २०१७
Rohit Pawar : भाजपसाठी शिंदे-दादांची गरज संपली; रोहित पवार यांची टीका
मुंबई : भाजपला मित्रपक्षांची उपयुक्तता संपली असून त्या कुबड्या आता अडकवल्या जातील की चुलीत घातल्या जातील हे पाहावे लागेल असा टोला राष्ट्रवादी(शप) चे आमदार रोहित पवार यांनी लगावला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युती नसल्याने बोगस मतदारयाद्यांचा फटका आपल्याला बसेल अशी भीती महायुतीतील राष्ट्रवादी आणि शिंदे गटाला आहे. त्यामुळेच त्यांच्या आमदारांची खदखद बाहेर येत असल्याची […] The post Rohit Pawar : भाजपसाठी शिंदे-दादांची गरज संपली; रोहित पवार यांची टीका appeared first on Dainik Prabhat .
जांबुत : शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे भर दिवसा दुपारी पावणे चार वाजण्याच्या सुमारास बिबट्याने रोहन विलास बोंबे या तेरा वर्षांच्या मुलांवर हल्ला करत ऊसाच्या शेतात ओढून नेले. या हल्ल्यात मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने पिंपरखेड परिसर पुन्हा हादरला आहे. पिंपरखेड येथे दुपारी पावणे चारच्या सुमारास रोहन विलास बोंबे (वय १३ […] The post पिंपरखेड येथे बिबट्याच्या हल्ल्यात १३ वर्षीय मुलाचा मृत्यू; संतप्त ग्रामस्थांनी वनविभागाचे वाहन पेटवले appeared first on Dainik Prabhat .
आयसीसी महिला वर्ल्ड कप २०२५ : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका फायनल; जाणून घ्या भारताचे सामर्थ्य
आयसीसी महिला वर्ल्ड कप २०२५ मधला सर्वात मोठा सामना आज, रविवार २ नोव्हेंबर रोजी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळवला जाणार आहे. हा रोमांचक सामना नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर पार पडणार आहे. दोन्ही संघ फायनलसाठी सज्ज आहेत चला, या अंतिम लढतीआधी आपल्या भारतीय स्टार खेळाडूंबद्दल थोडं जाणून घेऊया स्मृती मंधाना भारतीय संघाची स्टार सलामी फलंदाज स्मृती मंधाना तिच्या जबरदस्त फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. तिच्या दमदार कामगिरीमुळेच ती ‘रन मशीन’ म्हणून ओळखली जाते. या वेळी ही ती उत्तम फॉर्ममध्ये आहे. जर फायनलमध्येही तिची बॅटिंग प्रभावी राहिली, तर भारताला विजय निश्चित मिळू शकतो. आत्तापर्यंतच्या सामन्यांमध्ये तिने ८ सामने खेळत ५५.५७ च्या सरासरीने ३८९ धावा झळकावल्या आहेत. सध्या ती सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. हरमनप्रीत कौर भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिच्याकडूनही मोठ्या अपेक्षा आहेत. या स्पर्धेत तिची बॅटिंग सातत्यपूर्ण राहिली आहे. सेमीफायनलमध्ये सुरुवातीच्या गडबडीनंतर तिने जेमिमा रॉड्रिग्जसह डाव सावरत संघाला मजबूत स्थितीत आणलं. आता सगळ्यांच्या नजरा फायनलमध्ये तिच्या बॅटिंगकडे असतील. हरमनप्रीतने ८ सामन्यांत ७ डावांतून ३४.२८ च्या सरासरीने २४० धावा केल्या आहेत. ऋचा घोष भारतीय संघातील पावर हिटर म्हणून ऋचा घोष ओळखली जाते. तिच्या आक्रमक फलंदाजीने जगभरातील क्रिकेटप्रेमी प्रभावित झाले आहेत. जर फायनलमध्ये तिच्या बॅटमधून चौकार-षटकारांचा पाऊस पडला, तर भारताच्या विजयाची शक्यता आणखी वाढेल. तिने ७ सामन्यांत ७ डावांतून ४०.२० च्या सरासरीने २०१ धावा केल्या आहेत, आणि तिचा स्ट्राइक रेट तब्बल १३२.२३ आहे. दीप्ती शर्मादीप्ती शर्मा हा भारतीय संघाचा असा एक्का आहे, जी फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीत तितकीच प्रभावी आहे. ती फॉर्ममध्ये आली, तर भारताला कोणीही रोखू शकत नाही. तिने आतापर्यंत ८ सामन्यांत ६ डावांतून २६.१६ च्या सरासरीने १५७ धावा केल्या आहेत. गोलंदाजीत तिने ८ सामन्यांत २४.११ च्या सरासरीने १७ विकेट घेतल्या आहेत आणि सध्या ती सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूंमध्ये संयुक्तपणे पहिल्या क्रमांकावर आहे. श्री चरणीभारतीय संघातील युवा फिरकीपटू श्री चरणीने या स्पर्धेत आपल्या अप्रतिम गोलंदाजीने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. तिने ८ सामन्यांत २६.०७ च्या सरासरीने १३ विकेट घेतल्या आहेत. तिच्याकडूनही फायनलमध्ये दमदार कामगिरीची अपेक्षा आहे. भारताच्या या पाच स्टार महिला खेळाडूंची कामगिरी आजच्या अंतिम सामन्यात निर्णायक ठरणार आहे. देशभरातील क्रिकेटप्रेमींच्या शुभेच्छा आणि अपेक्षा या ‘ब्लू क्विन्स’सोबत आहेत.
मुंबई : उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांची महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या (एमओए) अध्यक्षपदी सलग चौथ्यांदा सर्वसंमतीने निवड झाली आहे. अजित पवारांच्या या विजयामुळे राजकारणासोबतच त्यांची क्रीडा क्षेत्रावर सुद्धा भक्कम पकड असल्याचं अधोरेखित झालं आहे. एकूण ३१ क्रीडा संघटनांपैकी तब्बल २२ पेक्षा जास्त संघटनांनी अजित पवार यांच्या पॅनेलला पाठिंबा दिला होता. यातुन […] The post Ajit Pawar : अजित पवारांची विजयी घोडदौड कायम! महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी चौथ्यांदा नियुक्ती appeared first on Dainik Prabhat .
Tim David Longest Six Video Viral : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-२० मालिकेतील तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या टिम डेव्हिडने चौकार-षटकारांचा पाऊस पाडत भारतीय गोलंदाजांना घाम फोडला. उजव्या हाताच्या या फलंदाजाने अवघ्या २३ चेंडूत अर्धशतक झळकावले. यासह त्याने १२९ मीटर लांब गगनचुंबी षटकार लगावून टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात लांब षटकाराचा विक्रम आपल्या नावे केला. या षटकाराचा […] The post IND vs AUS : टिम डेव्हिडने गगनचुंबी षटकार ठोकत रचला इतिहास! तब्बल इतक्या मीटरचा लगावला सिक्स, पाहा VIDEO appeared first on Dainik Prabhat .
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांना ‘पद्मविभूषण डॉ. मुरली मनोहर जोशी लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड’ प्रदान
नवी दिल्ली : सुर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन (SEF) चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी चोरडिया यांना शिक्षण व उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘पद्मविभूषण डॉ. मुरली मनोहर जोशी लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड’ ने सन्मानित करण्यात आले. हा सन्मान फेडरेशन फॉर वर्ल्ड अकॅडमिक्स (FWA) आणि एज्युकेशन पोस्ट न्यूज (EPN) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एफडब्ल्यूए च्या ८ व्या “इंडस्ट्री-अकॅडमिया […] The post प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांना ‘पद्मविभूषण डॉ. मुरली मनोहर जोशी लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड’ प्रदान appeared first on Dainik Prabhat .
होबार्टमध्ये चमकला ऑस्ट्रेलियाचा विक्रमवीर फलंदाज टीम डेव्हिड
होबार्ट : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा टी-२० सामना होबार्ट येथे रंगला असून, या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज टीम डेव्हिडने इतिहास रचला आहे. त्याने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात वेगाने १००० धावा पूर्ण केल्या. याआधी हा मान भारताचा टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादवकडे होता. सूर्यकुमारने ५७३ चेंडूत १००० धावा पूर्ण केल्या होत्या, तर टीम डेव्हिडने फक्त ५६९ चेंडूत हा टप्पा गाठत त्याला मागे टाकले.टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेगाने १००० धावा करणारे खेळाडू:५६९ चेंडू – टीम डेव्हिड (ऑस्ट्रेलिया)५७३ चेंडू – सूर्यकुमार यादव (भारत)६०४ चेंडू – ग्लेन मॅक्सवेल (ऑस्ट्रेलिया)६११ चेंडू – फिन एलन (न्यूझीलंड)याशिवाय, टीम डेव्हिड एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक षटकार ठोकणारा ऑस्ट्रेलियन खेळाडू ठरला आहे. त्याने या बाबतीत ट्रेविस हेडचा विक्रम मोडला आहे. हेडने २०२४ मध्ये ३३ षटकार लगावले होते, तर सध्याच्या सामन्यानंतर डेव्हिडच्या खात्यात एकूण ३५ षटकार झाले आहेत.ऑस्ट्रेलियाकडून एक वर्षात टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे खेळाडू:३५ – टीम डेव्हिड (२०२५)३३ – ट्रेविस हेड (२०२४)३१ – अॅरॉन फिंच (२०१८)२९ – मिच मार्श (२०२५)
गुवाहाटीला ‘हा’आमदार हॉटेलवरून मारणार होता उडी; शिंदेंच्या आमदारांनी सांगितला थरारक किस्सा
Mumbai : महाराष्ट्राच्या राजकारणातील २०२२ च्या बंडानंतरचा गुवाहाटी अध्याय आजही चर्चेत आहे. त्या काळात शिवसेना (शिंदे गट) नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेले आमदार गुवाहाटीतील रेडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये दडले होते. या पार्श्वभूमीवर नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांचा एक धक्कादायक प्रसंग उघडकीस आला आहे. हा किस्सा खुद्द मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितला आणि सभागृहात एकच हश्या […] The post गुवाहाटीला ‘हा’ आमदार हॉटेलवरून मारणार होता उडी; शिंदेंच्या आमदारांनी सांगितला थरारक किस्सा appeared first on Dainik Prabhat .
Solapur News : ऑपरेशन लोटसला ऑपरेशन टायगरने उत्तर ! शिंदे गटाने भाजप आमदाराच्या भावालाच लावले गळाला
सोलापूर : जिल्ह्यात भाजप कडून ऑपरेशन लोटसचा दणका विरोधी पक्षांसह मित्र पक्षांना बसण्यास सुरुवात झाली असतानाच शिवसेना शिंदे गटाने ऑपरेशन टायगर सुरू करीत थेट भाजप आमदाराच्या भावालाच गळाला लावले आहे. यामुळे आता जिल्ह्यात भाजप विरुद्ध शिंदेसेना असे चित्र पाहायला मिळणार आहे. कार्तिकी एकादशीच्या पूजेसाठी आलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सायंकाळी सोलापूरहून पंढरपूरकडे येताना शिंदे हे […] The post Solapur News : ऑपरेशन लोटसला ऑपरेशन टायगरने उत्तर ! शिंदे गटाने भाजप आमदाराच्या भावालाच लावले गळाला appeared first on Dainik Prabhat .
Satish Raut : ‘मामुर्डीच्या भूमिपुत्राचा नागरी सन्मान’ ! सतीश राऊत यांना अप्पर जिल्हाधिकारीपदी बढती
देहूरोड – मामुर्डी : मामुर्डी गावचे सुपुत्र सतीश राऊत यांना पुणे अप्पर जिल्हाधिकारी पदावर पदोन्नती मिळाल्याबद्दल मामुर्डी गाव आणि शिवशक्ती तरुण मित्र मंडळ यांच्या वतीने त्यांचा नुकताच नागरी सन्मान करण्यात आला. एका सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेल्या राऊत यांनी आपल्या अथक परिश्रम, जिद्द आणि प्रचंड बुद्धिमत्तेच्या जोरावर शिक्षण पूर्ण केले आणि प्रशासनात उच्च स्थान प्राप्त केले. […] The post Satish Raut : ‘मामुर्डीच्या भूमिपुत्राचा नागरी सन्मान’ ! सतीश राऊत यांना अप्पर जिल्हाधिकारीपदी बढती appeared first on Dainik Prabhat .
IND A vs SA A India A Beat South Africa A by 3 Wickets : कर्णधार ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील भारत अ संघाने अनधिकृत कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात यजमान म्हणून दक्षिण आफ्रिका अ संघाचा तीन गडी राखून पराभव केला. या सामन्यात अखेरच्या दिवशी २७५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारत अ संघाने ७ गडी गमावून विजय मिळवला […] The post IND A vs SA A : ऋषभ पंतचे दमदार कमबॅक अन् कोटियनचा ऑलराऊंड डंका! भारताचा दक्षिण आफ्रिकेवर ३ विकेट्सनी विजय appeared first on Dainik Prabhat .
Dainik Prabhat : आजच्या दिवसभरातील टॉप १० बातम्या, वाचा एका क्लिकवर !
१) एकनाथ शिंदेंच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; नांदेडचे दाम्पत्य ठरले मानाचे वारकरी कार्तिक एकादशीच्या निमित्ताने आज पंढरपुरात पहाटे विठ्ठलाची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या हस्ते विधीवत संपन्न झाली. पहाटे २ वाजून २० मिनिटांनी ही महापूजा सुरू झाली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांचा मुलगा खासदार श्रीकांत शिंदे आणि नातू […] The post Dainik Prabhat : आजच्या दिवसभरातील टॉप १० बातम्या, वाचा एका क्लिकवर ! appeared first on Dainik Prabhat .
नाशिक : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे काउंटडाऊन सुरू झाले असताना, राजकीय पक्षांनी आपली रणनीती आखण्यास जोमाने सुरुवात केली आहे. काही पक्षांमध्ये नेत्यांच्या इनकमिंग आणि आउटगोईंगचा खेळ सुरू असताना, प्रमुख महापालिका निवडणुकांसाठी बड्या नेत्यांनी कंबर कसली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) गटाने नाशिक जिल्ह्यात मोठा राजकीय निर्णय घेतला आहे. या निर्णयाची राजकीय […] The post Nashik Politics : नाशिकच्या राजकारणात मोठी उलथापालथ ! शरद पवार गटाच्या ‘त्या’ निर्णयाने बदलणार समीकरणे appeared first on Dainik Prabhat .
भीषण अग्नितांडव; सुपरमार्केटमधील आगीत लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
मेक्सिको : सणासुदीच्या काळात मेक्सिकोच्या सोनारा राज्यात घडलेल्या भीषण दुर्घटनेने संपूर्ण देशाला हादरवून सोडलं आहे. हार्मोसिलो शहरातील एका सुपरमार्केटला लागलेल्या भीषण आगीत २३ जणांचा मृत्यू झाला असून, त्यात अनेक लहान मुलांचा समावेश आहे. या घटनेत १० हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत.ही दुर्दैवी घटना घडली तेव्हा देशभरात ‘डे ऑफ द डेड’ हा पारंपरिक सण साजरा केला जात होता. आपल्या पूर्वजांच्या स्मरणार्थ कुटुंबं एकत्र येत असतानाच या दुर्घटनेमुळे आनंदाचे वातावरण शोकांतिकेत बदलले.सोनारा राज्याचे अॅटर्नी जनरल गुस्तावो सालास यांनी दिलेल्या माहितीनुसार, बहुतांश मृत्यू विषारी वायूच्या श्वसनामुळे झाल्याची शक्यता आहे. आगीमुळे संपूर्ण इमारतीत दाट धूर पसरल्याने लोकांचा श्वास गुदमरला. घटनास्थळी फॉरेन्सिक पथकं पोहोचली आहेत. त्यांनी तपास सुरू केला आहे.विद्युत बिघाडामुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. हार्मोसिलो नगरपालिकेनं मात्र हा दहशतवादी हल्ला नसल्याचं स्पष्ट केलं आहे.राज्यपाल अल्फोन्सो दुराजो यांनी सखोल तपासाचे आदेश दिले असून, “या घटनेत अनेक मुलांचा मृत्यू झाल्याने ही दुर्घटना अत्यंत वेदनादायक आहे,” असं ते म्हणाले. त्यांनी सोशल मीडियावरून पीडित कुटुंबीयांबद्दल सहवेदना व्यक्त केल्या.दरम्यान, मेक्सिकोच्या अध्यक्षा क्लाऊडिया शीबनाम यांनी एक्सवर पोस्ट करत मृतांना श्रद्धांजली अर्पण केली. “या भीषण आगीत आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावणाऱ्या सर्व कुटुंबांसोबत माझ्या संवेदना आहेत. प्रशासनाचं बचावकार्य सुरू आहे,” असं त्यांनी म्हटलं आहे.सोनारा रेड क्रॉसच्या ४० सदस्यांनी आणि १० रुग्णवाहिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य हाती घेतलं आहे. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवलं असून, अजूनही ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा शोध सुरू आहे.
INDvsAUS T20 : भारतापुढे १८७ धावांचे आव्हान
होबार्ट : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तिसरा टी २० सामना होबार्ट येथील बेलेरिव्ह ओव्हल स्टेडियममध्ये सुरू आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून भारताने गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करत असलेल्या ऑस्ट्रेलियाने वीस षटकांत सहा बाद १८६ धावा केल्या आणि भारतापुढे वीस षटकांत १८७ धावा करण्याचे आव्हान ठेवले. भारत - ऑस्ट्रेलिया टी २० मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला आणि दुसरा सामना जिंकून ऑस्ट्रेलियाने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. यामुळे बरोबरी साधण्यासाठी होबार्टमध्ये विजय मिळवणे भारतासाठी आवश्यक आहे.ऑस्ट्रेलियाकडून ट्रॅव्हिस हेडने सहा, मिचेल मार्शने ११, जोश इंगलिसने एक, टिम डेव्हिडने ७४, मिचेल ओवेनने शून्य, मार्कस स्टोइनिसने ६४, मॅथ्यू शॉर्टने नाबाद २६, झेवियर बार्टलेटने नाबाद तीन धावांचे योगदान दिले. भारताकडून अर्शदीप सिंगने तीन, वरुण चक्रवर्तीने दोन, शिवम दुबेने एक बळी घेतला.
भरधाव पोलो कार थेट धडकली मेट्रोच्या खांबाला ; पुण्यात दोन तरुणांचा जागीच मृत्यू,
पुणे : बंडगार्डन मेट्रो स्टेशनखाली भीषण अपघात झाला. काळ्या रंगाच्या पोलो कारने भरधाव वेगात जाताना अचानक नियंत्रण गमावले आणि ती थेट मेट्रो स्टेशनच्या खांबावर जाऊन आदळली. या धडकेत कारचा चेंदामेंदा झाला असून, दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक तरुण गंभीर जखमी आहे.मृतांमध्ये यश प्रसाद भंडारी (23, थेरगाव) आणि ऋत्विक ऊर्फ ओम विनायक भंडारी (23, पिंपरीगाव) या दोघांचा समावेश असून हे दोघे चुलत भाऊ असल्याची माहिती समोर आली आहे. गंभीर जखमी झालेल्या खुशवंत टेकवाणी याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.अपघाताचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून, फूटेजमध्ये कार अतिवेगाने जाताना थेट खांबाला धडकताना दिसली . या भीषण धडकेत कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आहे.मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. चालक मद्यधुंद अवस्थेत होता का, याचा तपास सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार वाहनावरील ताबा सुटल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पंढरपूर : मतदार यादीतील अनियमिततेबद्दल निवडणूक आयोगाविरुद्ध विरोधकांनी काढलेल्या निषेध मोर्चाच्या एका दिवसानंतर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी सांगितले की, राज्यातील जनता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्यांच्या कामाच्या आणि विकासाच्या अजेंड्यावर आधारित सत्ताधारी महायुतीला पाठिंबा देईल. पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात कार्तिकी एकादशीची पूजा केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना शिंदे म्हणाले की, गेल्या काही महिन्यांत पावसामुळे मोठ्या […] The post Eknath Shinde : विकासाच्या अजेंड्यासाठी जनता महायुतीच्या पाठिशी; उपमुख्यमंत्री शिंदेनी व्यक्त केला विश्वास appeared first on Dainik Prabhat .
Pune News : महापालिका आयुक्त यांची देवाची उरुळी कचरा डेपो परिसराला भेट
पुणे : पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांनी आज (दि. ०२) देवाची उरुळी कचरा डेपो परिसरास भेट देऊन तेथील कामकाजाची सविस्तर पाहणी केली. या भेटीदरम्यान त्यांनी पुणे मनपाच्या बायोमायनिंग प्रकल्प तसेच ५०० मेट्रिक टन क्षमतेच्या मिश्र कचरा प्रक्रिया प्रकल्पाची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी महापालिका आयुक्त यांनी हडपसर आणि घोले रोड […] The post Pune News : महापालिका आयुक्त यांची देवाची उरुळी कचरा डेपो परिसराला भेट appeared first on Dainik Prabhat .
टी-२० वर्ल्डकप तोंडावर असताना केन विल्यमसनचा निवृत्तीचा निर्णय, न्यूझीलंडला मोठा धक्का
मुंबई : टी-२० वर्ल्डकप २०२६ जवळ येत असतानाच न्यूझीलंडचा दिग्गज फलंदाज केन विल्यमसन (३५) याने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. भारत आणि श्रीलंका संयुक्तरित्या टी-२० वर्ल्डकप २०२६ चे आयोजन करणार आहेत. या महत्त्वाच्या स्पर्धेपूर्वी विल्यमसनने घेतलेला निर्णय न्यूझीलंड संघासाठी मोठा धक्का मानला जात आहे.विल्यमसनने आतापर्यंत ९३ टी-२० सामने खेळत २५७५ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याची सरासरी ३३ इतकी आहे. तो न्यूझीलंडच्या वतीने सर्वाधिक धावा करणारा टी-२० खेळाडू ठरला आहे. त्याच्या नावावर १८ अर्धशतक आणि ९५ ही सर्वोच्च धावसंख्या आहे. टी-२० क्रिकेटध्ये २०११ मध्ये पदार्पण करणाऱ्या विल्यमसनने ७५ सामन्यांमध्ये न्यूझीलंडचे नेतृत्व केले. त्याच्या नेतृत्वात संघाने दोनदा टी-२० विश्वचषकाची उपांत्य फेरी (२०१६, २०२२) आणि एकदा अंतिम फेरी (२०२१) गाठली होती.विल्यमसनने सांगितले की, “हा फॉरमॅट सोडण्याची ही योग्य वेळ आहे. आता पुढील पिढीतील खेळाडूंना जागा देणं आणि त्यांना मोठ्या स्पर्धांसाठी तयार करणं गरजेचं आहे.” त्याने पुढे डेरील मिचेलचे कौतुक करत सांगितले की, “तो एक उत्कृष्ट कर्णधार आहे.”विल्यमसन आता डिसेंबरमध्ये होणाऱ्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेवर लक्ष केंद्रीत करणार आहे. तो एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी मेहनत घेणार आहे.
मंचर, (पुणे) : राज्यात मतचोरी विरोधात मुंबईत ऐल्गार सभा रंगत असतानाच माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती आणि महानगरपालिकां निवडणुकीच्या संभाव्य तारखा जाहीर करत त्यांनी कार्यकर्त्यांना लगेच कामाला लागण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. ते मंचर येथे युवक – युवती मेळाव्यात बोलत होते. दिलीप वळसे पाटील म्हणाले, मी तारीख जाहीर करत नाही, […] The post Maharashtra Local Body Elections : निवडणुका नेमक्या कधी होणार? अजित पवारांच्या आमदाराने थेट तारखाच सांगितल्या appeared first on Dainik Prabhat .
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील सोनू फोटोंमुळे ट्रोलर्सच्या निशाण्यावर…
Nidhi bhanushali | ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेत भिडे मास्तरांची मुलगी सोनू भिडेची भूमिका अभिनेत्री निधी भानुशालीने साकारली होती. या मालिकेतील तिच्या भूमिकेला मोठी लोकप्रियता मिळाली. सध्या ती या मालिकेचा भाग नाही. मात्र सोशल मिडियावर तिचा मोठा चाहता वर्ग आहे. निधीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो पोस्ट केले आहे. मात्र या फोटोंवर चाहत्यांकडून नाराजी […] The post ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील सोनू फोटोंमुळे ट्रोलर्सच्या निशाण्यावर… appeared first on Dainik Prabhat .
होबार्ट : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तिसरा टी २० सामना होबार्ट येथील बेलेरिव्ह ओव्हल स्टेडियममध्ये सुरू आहे. याआधी पहिला सामना पावसामुळे रद्द झाला आणि दुसरा सामना जिंकून ऑस्ट्रेलियाने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. यामुळे बरोबरी साधण्यासाठी होबार्टमध्ये विजय मिळवणे भारतासाठी आवश्यक आहे. होबार्टमध्ये सुरू असलेल्या सामन्यात नाणेफेक जिंकून भारताने गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाने नऊ षटकांत चार बाद ७५ धावा केल्या. ट्रॅव्हिस हेड सहा धावा करुन अर्शदीप सिंगच्या चेंडूवर सूर्यकुमार यादवकडे झेल देऊन परतला तर यष्टीरक्षक असलेला जोश इंगलिस फक्त एक धाव करुन अर्शदीप सिंगच्या चेंडूवर अक्षर पटेलकडे झेल देऊन परतला. कर्णधार असलेला मिचेल मार्श अकरा धावा करुन वरुण चक्रवर्तीच्या चेंडूवर तिलक वर्माकडे झेल देऊन परतला. मिचेल ओवेन शून्य धावा करुन वरुण चक्रवर्तीच्या चेंडूवर त्रिफळाचीत झाला. भारतीय संघात तीन बदलआजच्या सामन्यासाठी भारतीय संघात तीन बदल करण्यात आले आहेत. संजू सॅमसनच्या जागी जितेश शर्माला, हर्षित राणाच्या जागी अर्शदीप सिंगला तर कुलदीप यादवच्या जागी वॉशिंग्टन सुंदरला संघात घेतले आहे. तर ऑस्ट्रेलिया त्यांच्या संघात जोश हेझलवूड ऐवजी शॉन अॅबॉटचा समावेश केला आहे. ग्लेन मॅक्सवेल हा सामना खेळणार होता पण तो अजून पूर्णपणे बरा झाला नसल्यामुळे त्याला हा सामना खेळता येणार नाही. दुसऱ्या सामन्यात तीन बळी घेणारा ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड आता मालिकेत खेळणार नाही. नोव्हेंबरच्या अखेरीस सुरू होणाऱ्या अॅशेस मालिकेच्या तयारीसाठी तो शेवटच्या तीन सामन्यांमध्ये नसेल, असे ऑस्ट्रेलियाने जाहीर केले.भारतीय संघ: शुभमन गिल, अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, अक्षर पटेल, शिवम दुबे, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह.ऑस्ट्रेलियाचा संघ: मिचेल मार्श (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), टिम डेव्हिड, मिचेल ओवेन, मार्कस स्टोइनिस, मॅट शॉर्ट, झेवियर बार्टलेट, नॅथन एलिस, शॉन अॅबॉट, मॅट कुह्नेमन.पावसाची शक्यता ?सामन्यादरम्यान खेळ थांबवण्याची शक्यता खूप कमी आहे. तापमान २६ अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. आर्द्रता सुमारे ४५ टक्के असेल. पावसाची शक्यता फक्त दहा टक्के आहे.
Shivajiraje Bhosale box office again : नुकताच बॅाक्स अॅाफिसवर महेश वामन मांजरेकर दिग्दर्शित ‘पुन्हा शिवाराजे भोसले’ सिनेमा प्रदर्शित झाला आहे. ३१ अॅाक्टोबर या दिवशी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने प्रेक्षकांच्या पसंतीची पोचपावती मिळवली असून, बॅाक्स अॅाफिसवर चांगले कलेक्शन गोळा केले आहे. या सिनेमात अभिनेता सिद्धार्थ बोडके छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या सिनेमाची […] The post ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ सिनेमाने दोन दिवसात केली ‘इतक्या’ कोटींची कमाई; पाहा बॅाक्स अॅाफिसची आकडेवारी… appeared first on Dainik Prabhat .
PM Modi on congress। बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी आरा याठिकाणी एका भव्य सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण महाआघाडीवर, ज्यामध्ये आरजेडी आणि काँग्रेसचा समावेश आहे, जोरदार हल्ला चढवला. त्यांनी, आरजेडीने काँग्रेसच्या गळ्यावर बंदूक ठेवून मुख्यमंत्रीपद हिसकावून घेतले” असे म्हणत जोरदार हल्लाबोल केला. पंतप्रधान मोदींनी आरा याठिकाणी सभेला संबोधित करताना महाआघाडीतील अंतर्गत कलह उघडकीस आणला. […] The post “काँग्रेसच्या डोक्यावर बंदूक ताणून राजदने मुख्यमंत्रीपद हिसकावले” ; पंतप्रधानांचा महाआघाडीवर जोरदार हल्ला appeared first on Dainik Prabhat .
Prakash Ambedkar Vs Ajit Pawar | उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून केलेल्या एका विधानामुळे वाद निर्माण झाला आहे. नागपुरात कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनानंतर अजित पवार यांनी ‘सारखंच फुकटात कसं मिळेल?’ शेतकऱ्यांनी कर्ज फुकटात मिळण्याची सवय लावून घेऊ नये. तुम्ही देखील हातपाय हालवा,’ असे विधान केले होते. ज्यावरून विरोधकांनी अजित पवार यांच्यावर टीका केली […] The post “सरकारला शांत झोप मिळावी, म्हणून शेतकऱ्यांनी आत्महत्या कराव्यात का?”; अजित पवारांच्या ‘त्या’ विधानावरून प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल appeared first on Dainik Prabhat .
Chief Election Commissioner। आगामी बिहार विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी कायदा आणि सुव्यवस्था आणि मतदान सुरक्षेबाबत एक मोठे विधान केले आहे. त्यांनी याविषयी बोलताना,” निवडणुकीदरम्यान कोणतीही हिंसक कृती खपवून घेतली जाणार नाही.” असे म्हटले आहे. निवडणूक आयोग कठोर शून्य-सहिष्णुता धोरणावर काम करत आहे आणि प्रत्येक मतदाराला निर्भयपणे मतदानाचा अधिकार बजावता येईल […] The post ‘त्या’ प्रकरणातील कारवाईनंतर ज्ञानेश कुमार म्हणाले,”कोणत्याही प्रकारची हिंसाचाराची कृती खपवून घेणार नाही” appeared first on Dainik Prabhat .
काय सांगता ? २८० किलोच्या हिंदकेसरी कॅप्टन बैलाची इतक्या लाखांना विक्री
छत्रपती संभाजीनगर : फक्त २८० किलो वजन, चमकदार शरीर, मजबूत बांधा, वेगवान चाल यामुळे संपूर्ण मराठवाड्यात लोकप्रिय असलेल्या हिंदकेसरी कॅप्टन बैलाची १६ लाख ५१ हजार रुपयांमध्ये विक्री झाली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील वाकी या गावातील कॅप्टन नावाच्या बैलाची खरेदी मध्य प्रदेशमधील बैतुलच्या पशूप्रेमीने केली आहे. कन्नड तालुक्यातील आदर्श गाव अशी वाकी गावाची ओळख आहे. या वाकी गावात राहणाऱ्या बाजीराव जंजाळ यांनी त्यांच्याकडे असलेल्या कॅप्टन बैलाची १६ लाख ५१ हजार रुपयांमध्ये विक्री केली. काही वर्षांपूर्वीच बाजीराव जंजाळ यांनी कॅप्टनची खरेदी केली होती. कॅप्टन हा मैसूर ठीलारी जातीचा बैल आहे. या बैलाला संतुलित आहार आणि प्रशिक्षण देण्यासाठी तसेच त्याची नियमित देखभाल करण्यासाठी त्यांनी दोन कर्मचारी नियुक्त केले होते. दुधासाठी दोन गायी खरेदी केल्या होत्या. दोन गायी सकाळ-संध्याकाळ पाच पाच लिटर दूध देत. हे दूध कॅप्टनला नियमित दिले जात होते. कॅप्टनला नियमित आंघोळ घातली जात होती. त्याला जमिनीवर चटई अंथरुन कायम त्यावर बसवले जात होते. कॅप्टनचे वजन २८० किलो आणि उंची पाच फूट सहा इंच होती. या सौंदर्यामुळे कॅप्टनची ओळख एक आदर्श बैल म्हणून झाली होती. काही दिवसांपूर्वी हरिदास जंजाळ एका स्पर्धेसाठी कॅप्टन बैलाला घेऊन गेले होते. या स्पर्धेच्या निमित्ताने उत्तर प्रदेश येथील रामप्रसाद राठोड या पशूप्रेमीची नजर कॅप्टन वर पडली. यानंतर रामप्रसाद राठोड यांनी कॅप्टन बैल खरेदी करण्याचा निर्णय घेतला आणि हरिदास जंजाळ यांच्याशी चर्चा केली. चर्चेअंती सौदा निश्चित झाला. अखेर रामप्रसाद राठोड यांनी कॅप्टन बैलाची खरेदी केली.
मुंबई-नाशिक महामार्गावर कंटेनरचा अपघात, चालक जखमी
ठाणे : कॅडबरी जंक्शन उड्डाणपुलाजवळ कंटेनरचा अपघात झाला. या अपघातात कंटेनर चालक जखमी झाला. जखमी चालकाला ठाणे जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. चालकावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कामता पाल (५०) असे अपघातात जखमी झालेल्या कंटेनर चालकाचे नाव आहे. कामता पाल हा रविवारी कळंबोलीहून गुजरातच्या दिशेने कंटेनर घेऊन निघाला होता. कंटेनर मुंबई- नाशिक महामार्गावरील कॅडबरी जंक्शन जवळील उड्डाणपुलाच्या उतरणीवर असताना अपघात झाला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला. कंटेनर रस्ता दुभाजकाला अर्थात डिव्हायडरला धडकला. अपघाताची माहिती मिळताच राबोडी पोलीस, वाहतूक पोलीस, २ हायड्रा मशीन, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी, अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले. जखमी चालकाला रुग्णालयात दाखल केल्यानंतर अपघातग्रस्त वाहन रस्त्यावरुन हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली.
मुंबई: पवईत एका स्टुडिओमध्ये १७ मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्यवर सहाय्यक निरीक्षक अमोल वाघमारे यांनी गोळी झाडली. या कारवाईत रोहितचा मृत्यू झाला. आता या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी होणार असून, गुन्हे शाखेसमोर या चकमकीचे पुरावे गोळा करणे हे मोठे आव्हान असणार आहे. रोहितने राज्य सरकारच्या शिक्षण विभागावर फसवणुकीचा आरोप केला होता, त्यामुळे या प्रकरणाचीही चौकशी होण्याची शक्यता आहे.पवईच्या महावीर क्लासिक इमारतीमधील आर. ए. स्टुडिओमध्ये रोहित आर्य याने १७ मुलांना ओलीस ठेवले होते. यावेळी मुलांना सोडवण्यासाठी स्टुडिओत शिरलेल्या सहाय्यक निरीक्षक अमोल वाघमारे यांनी रोहितवर गोळी झाडली. छातीत गोळी लागल्याने रोहितचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणाच्या तपासणीची जबाबदारी गुन्हे शाखेकडे (क्राइम ब्रँच) सोपवण्यात आली आहे.https://prahaar.in/2025/11/02/container-accident-on-mumbai-nashik-highway-driver-injured/गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांसमोर अनेक प्रश्न आहेत. रोहितवर गोळी झाडण्याची वेळ का आली ? छातीऐवजी इतरत्र गोळी झाडून त्याला रोखता आले नसते का ? क्यूआरटीला बोलावले असताना मुंबई पोलिस आत का शिरले ? यांसारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याचे मोठे आव्हान गुन्हे शाखेसमोर आहे. त्यामुळे गुन्हे शाखेचे पथक बारकाईने तपास करत आहेत.सरकारी अधिकाऱ्यांची चौकशी होणार?रोहित आर्य हा शिक्षण विभागाच्या ‘माझी शाळा, स्वच्छ शाळा’ आणि ‘मुख्यमंत्री माझी शाळा’ या उपक्रमांशी जोडला गेला होता. रोहितचा आरोप होता की, या दोन्ही उपक्रमासाठी सरकारने मी दिलेली संकल्पना वापरली. मात्र त्याचे श्रेय आणि पूर्ण पैसे दिले नाहीत. या आरोपात किती तथ्य आहे, हे तपासण्यासाठी शिक्षण विभागातील काही अधिकाऱ्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. तसेच, शिक्षण विभागाकडून रोहितला काही पैसे येणे बाकी होते का ? हे तपासण्यासाठी रोहितच्या बँक खात्याचीही झाडाझडती घेतलीजाणारआहे.
मेक्सिकोमध्ये भीषण आग ; अनेक मुलांसह २३ जणांचा होरपळून मृत्यू
Mexico Fire। मेक्सिकोच्या सोनोरा राज्यात लागलेल्या भीषण आगीमुळे उत्सवाचा आनंद शोकात बदलला, हर्मोसिलो शहरातील एका डिस्काउंट स्टोअरमध्ये अनेक मुलांसह किमान २३ जणांचा मृत्यू झाला आणि डझनभराहून अधिक जण जखमी झाले. देश ‘डे ऑफ द डेड’ साजरा करत असताना ही घटना घडली, हा पारंपारिक उत्सव कुटुंबे त्यांच्या मृत प्रियजनांचे स्मरण करतात. रंगीबेरंगी मिरवणुका आणि मेणबत्त्यांच्या प्रकाशात, […] The post मेक्सिकोमध्ये भीषण आग ; अनेक मुलांसह २३ जणांचा होरपळून मृत्यू appeared first on Dainik Prabhat .
“लग्न म्हणजे फक्त दोन व्यक्तींचे नाही, तर कुटुंबाचे नातं”; शहनाज गिलने लग्नाबाबत मांडले स्पष्ट मत
Shehnaaz Gill | ‘बिग बॉस 13’मधून अभिनेत्री शहनाज गिलला मोठी लोकप्रियता मिळाली. बिग बॉसच्या घरात शहनाज आणि सिद्धार्थ शुक्ला यांच्यातील केमिस्ट्री खूप गाजली. मात्र, सिद्धार्थच्या अकाली निधनाने शहनाझला मोठा भावनिक धक्का बसला. यातून सावरत शहनाज मोठ्या पडद्यावर दमदाररित्या काम करत आहे. नुकतेच तिने ‘इक कुडी’ च्या प्रमोशन दरम्यान लग्न या विषयावर आपले स्पष्ट मत मांडले. […] The post “लग्न म्हणजे फक्त दोन व्यक्तींचे नाही, तर कुटुंबाचे नातं”; शहनाज गिलने लग्नाबाबत मांडले स्पष्ट मत appeared first on Dainik Prabhat .
Shabana Azmi : ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी सध्या सोशल मीडियावर सतत सक्रिय असतात. त्या घरातील पार्टी, कार्यक्रम आणि खास प्रसंगांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर करतात. नुकताच २०१८ चा एक जुना व्हिडिओ त्यांनी इंन्स्टाग्रामवरून शेअर केला आहे, ज्यामध्ये अभिनेत्री एका वेगळ्याच अंदाजात डान्स करताना दिसत आहे. शबाना यांनी शनिवारी त्यांच्या इंस्टाग्राम पेजवर एक […] The post “आजा आजा तू है प्यार मेरा” गाण्यावर शबाना आझमी यांचा अनोखा डान्स; हातात फुलदाणी घेतली अन्… पाहा व्हिडीओ… appeared first on Dainik Prabhat .
महाराष्ट्रासाठी पुढील २४ तास महत्त्वाचे! कुठे कोसळणार मुसळधार पाऊस, जाणून घ्या सविस्तर
मुंबई: मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशभरात पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. नोव्हेंबर उजाडला तरी पावसाचे प्रमाण कमी होत नसल्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. यात आता महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजामुळे प्रशासनाने पुन्हा एकदा अलर्ट जारी केला असून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा कायम असल्याने पुढील काही दिवस फक्त राज्यातच नाही तर देशातील अनेक भागात पाऊस असण्याचे संकेत आहेत. ज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र, गुजरात, गोवा, पश्चिम बंगाल, सिक्किम,बिहार या भागात जास्त पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच अंदमान निकोबार येथेही अतिमुसळधार पाऊस होणार आहे.राज्यात गेल्या काही दिवसांपासून पाऊस सतत हजेरी लावताना दिसतोय. आज सकाळीसुद्धा अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. तर काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण झाल्याचे दिसले. नोव्हेंबर महिन्याला सुरूवात झाली असून पाऊस अजूनही सुरू असल्याने शेतीची कामे खोळंबली आहेत. तसेच अतिवृष्टी झालेल्या जिल्ह्यात शेती वाहून गेल्याने शेतकरी चिंतेत आहे. दिसतंय. पावसामुळे शेतींचे मोठे नुकसान झाले.https://prahaar.in/2025/11/02/code-of-conduct-to-be-followed-on-this-day-for-local-body-elections-information-on-sources/दरम्यान, मोंथा चक्रीवादळामुळे राज्यात पाऊस असल्याचे सांगितले जात होते. मात्र, मोंथा चक्रीवादळ शांत झाले असूनही देशातील विविध भागांमध्ये पावसाच्या सरी कोसळतानादिसतआहेत.महाराष्ट्रात कुठे पडणार मुसळधार पाऊस ?पुढील २४ तासात कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मध्यम ते मुसळधार पाऊस होऊ शकतो. नंदूरबार, जळगाव, धुळे, आहिल्यानंतर, पुणे, नाशिक, सातारा, कोल्हापूर, बीड, जालना, परभणी, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, लातूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागात पावसाची शक्यता आहे.
Nevase News : महापारेषण विद्युत कंपनीच्या वरिष्ठांनी जपली मानवतेची शिदोरी….
नेवासे : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या महापारेषण वीज कंपनी ही एक राज्यातील अग्रगण्य नावलौकिक कंपनी असून या कंपनीमध्ये अजिंक्य राजे हे सहाय्यक अभियंता या पदावर नुकतेच काही महिन्यापूर्वी कार्पोरेट ऑफिस मुंबई येथे कामावर हजर झालेले आहेत. परंतु एक महिन्यापूर्वीच दादर स्टेशन येथे ते पाय घसरून पडल्यामुळे गंभीर दुखापत होवून त्यांचा पाय फ्रॅक्चर झालेला होता आणि […] The post Nevase News : महापारेषण विद्युत कंपनीच्या वरिष्ठांनी जपली मानवतेची शिदोरी…. appeared first on Dainik Prabhat .
‘डर नही दहशत हूं…’; ‘किंग’चा दमदार प्रोमो रिलीज; शाहरुख खानचे चाहत्यांसाठी खास सरप्राइज
Shahrukh Khan | बॉलीवूडचा ‘किंग’ अर्थात शाहरुख खान आपला ६० वा वाढदिवस साजरा करत आहे. जगभरातील चाहत्यांकडून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. यातच आता तिने वाढदिवसानिमित्त चाहत्यांना सरप्राईज दिले आहे. शाहरुखने त्याच्या आगामी ‘किंग’ सिनेमाचा पहिला प्रोमो रिलीज केला आहे. ज्यात शाहरुखचा चित्रपटातील पहिला लुक दाखवण्यात आला आहे. ‘किती खून केले, आठवत नाही, लोक चांगले […] The post ‘डर नही दहशत हूं…’; ‘किंग’चा दमदार प्रोमो रिलीज; शाहरुख खानचे चाहत्यांसाठी खास सरप्राइज appeared first on Dainik Prabhat .
Crime News : चांडोहमध्ये महिलेस शिवीगाळ करून मारहाण; दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल
शिरूर : चांडोह (ता. शिरूर) येथे किरकोळ वादातून महिलेस व तीच्या मुलाला व सुनेला शिवीगाळ, दमदाटी व धक्काबुक्की केल्याप्रकरणी दोन तरुणांविरुद्ध शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदित्य हरीभाऊ पानंमद आणि ज्ञानेश्वर उर्फ माऊली शिवाजी रोकडे (दोघे रा. चांडोह ता. शिरूर) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चांडोह (ता.शिरूर […] The post Crime News : चांडोहमध्ये महिलेस शिवीगाळ करून मारहाण; दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल appeared first on Dainik Prabhat .
RSS वर बंदी घालण्याच्या खरगेंच्या मागणीवर रामदेव बाबांची प्रतिक्रिया ; म्हणाले,”ज्यांचे विचार…”
Baba Ramdev On Kharge। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्याची मागणी केली होती. योगगुरू रामदेव यांनी आता यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “आरएसएस हा राजकीय पक्ष नाही. जर तुम्हाला लढायचे असेल तर पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्याशी लढा. तुम्ही त्यांच्याशी लढू शकत नाही. तुम्ही त्यांना […] The post RSS वर बंदी घालण्याच्या खरगेंच्या मागणीवर रामदेव बाबांची प्रतिक्रिया ; म्हणाले,”ज्यांचे विचार…” appeared first on Dainik Prabhat .
राष्ट्रवादीच्या दोन बड्या मंत्र्यांची ताकद कमी करण्याचा प्रयत्न? भाजपची नाशिकमध्ये मोठी राजकीय खेळी
Politics of Nashik : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहेत. भाजपने येथे मोठी राजकीय खेळी करून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला धक्का बसला असून, मित्रपक्ष असलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला शह देण्याचा प्रयत्न केला असल्याची जोरदार चर्चा होत आहे. आगामी स्थानिक निवडणुकीच्या अगोदर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून […] The post राष्ट्रवादीच्या दोन बड्या मंत्र्यांची ताकद कमी करण्याचा प्रयत्न? भाजपची नाशिकमध्ये मोठी राजकीय खेळी appeared first on Dainik Prabhat .
पुनीत बालन ग्रुप प्रस्तुत ५२वी राज्यस्तरीय ज्युनियर ज्यूदो स्पर्धेचे जळगावात उद्घाटन
Punit Balan Group | पुनीत बालन ग्रुप प्रस्तुत ५२ वी ज्युनिअर राज्यस्तरीय ज्यूडो क्रीडा स्पर्धेचे जळगावमध्ये आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र ज्यूदो संघटना व जळगाव जिल्हा ज्यूदो हौशी असोसिएशनतर्फे १ नोव्हेंबर आणि २ नोव्हेंबर रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल येथे ही स्पर्धा होत आहे. या स्पर्धेसाठी राज्यभरातून ३० जिल्हयाचे सुमारे ३५० खेळाडू […] The post पुनीत बालन ग्रुप प्रस्तुत ५२वी राज्यस्तरीय ज्युनियर ज्यूदो स्पर्धेचे जळगावात उद्घाटन appeared first on Dainik Prabhat .
जेडी व्हान्सच्या पत्नीच्या धर्मांतराच्या विधानाने खळबळ ; व्हान्स यांच्यावर सर्व स्तरातून टीका
US Vice President। अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स हे त्यांच्या एका विधानामुळे वादात सापडले आहेत. त्यांनी त्यांच्या पत्नी उषा व्हान्स, ज्या एका हिंदू कुटुंबातून आल्या आहेत. त्यांच्याबद्दल म्हटले आहे की, “त्यांना आशा आहे की ती एके दिवशी ख्रिश्चन धर्म स्वीकारेल” त्यांच्या विधानामुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीका झाली आहे. मेहदी हसन यांनी आक्षेप घेतला US Vice […] The post जेडी व्हान्सच्या पत्नीच्या धर्मांतराच्या विधानाने खळबळ ; व्हान्स यांच्यावर सर्व स्तरातून टीका appeared first on Dainik Prabhat .
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी 'या'दिवशी लागणार आचारसंहिता, सूत्रांची माहिती
मुंबई: राज्यात सध्या सर्वांनाच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. त्यात न्यायालयाने निवडणूक आयोगाला ३१ जानेवारी २०२६ पर्यंत निवडणुका घ्याव्या असे आदेश दिले आहेत. त्यामुळे नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या आसपास निवडणुकांचे बिगूल वाजणार असल्याचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने कोणत्याही अधिकृत तारखा जाहीर केल्या नसल्या तरी राज्यातील सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.मागील पाच वर्षांपासून महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुका रखडलेल्या आहेत. न्यायालयाच्या आदेशानंतर या निवडणुका लवकरच पार पडणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, पुढील आठवड्यात निवडणुकांच्या तारखांची घोषणा होण्याची शक्यता आहे. ५ किंवा ६ नोव्हेंबरला निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर होऊ शकते. यानंतर लगेच आचारसंहिता लागणार आहे.https://prahaar.in/2025/11/02/mumbai-municipal-corporations-big-initiative-work-on-goregaon-mulund-link-road-begins/तीन टप्प्यात निवडणुका होण्याची शक्यतासूत्रांच्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यात नगरपालिका, दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आणि तिसऱ्या टप्प्यात महानगरपालिकांच्या निवडणुका होण्याचीशक्यताआहे.
US China Relations। अमेरिका आणि चीनमधील संबंधांमध्ये सुधारणा होण्याची चिन्हे दिसत आहेत. मलेशियातील एका बैठकीदरम्यान, अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ आणि चीनचे संरक्षण मंत्री अॅडमिरल डोंग जून यांनी सांगितले की, दोन्ही देश आता परस्पर संवाद वाढवतील आणि संबंध मजबूत करतील. हेगसेथ यांनी सोशल मीडियावर लिहिले की,”मी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी बोललो आणि आम्हाला दोघांनाही विश्वास आहे […] The post ट्रम्प-शी जिनपिंगच्या भेटीनंतर अमेरिका-चीन संबंध सुधारणार? ; पीट हेगसेथ म्हणाले,”त्यांचे यापूर्वी कधीही असे संबंध…” appeared first on Dainik Prabhat .
“मी केलेल्या कामाच्या २ टक्के कामही सध्याचे लोकप्रतिनिधी करू शकले नाही”; सुजय विखेंचा लंकेंवर निशाणा
Sujay Vikhe Vs Nilesh Lanke | अहिल्यानगर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात अत्याधुनिक ‘कार्डियाक कॅथलॅब’चे उद्घाटन माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार संग्राम जगताप यांची देखील प्रमुख उपस्थिती होती. डॉ. विखे यांनी “मागच्या एका वर्षात मी केलेल्या कामाच्या दोन टक्के कामही सध्याचे लोकप्रतिनिधी करू शकले नाहीत,” असे म्हणत नाव न घेता […] The post “मी केलेल्या कामाच्या २ टक्के कामही सध्याचे लोकप्रतिनिधी करू शकले नाही”; सुजय विखेंचा लंकेंवर निशाणा appeared first on Dainik Prabhat .
टाटा मिनी बसचा अपघात, गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगावला निघालेल्या दोघांचा मृत्यू
कर्जत : समृद्धी महामार्गावर कर्जतजवळ बोगद्यात टाटा मिनी बसचा अपघात झाला. चालकाला डुलकी लागल्यामुळे त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. मिनी बस बोगद्याच्या कडेला असलेल्या साईड बॅरिकेटला जोरात धडकली. हा अपघात झाला त्यावेळी बस वेगात होती त्यामुळे अपघातात जीवितहानी झाली. गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगावला निघालेल्या दोन भाविकांचा या अपघातात मृत्यू झाला आणि तीन भाविक गंभीर जखमी झाले. अपघातामुळे काही काळ समृद्धी महामार्गावर कर्जत बोगदा येथे कोलमडलेली वाहतूक पोलिसांनी सुरळीत केली आहे.टाटा मिनी बस समृद्धी महामार्गावर कर्जतजवळ बोगद्यात कडेला असलेल्या साईड बॅरिकेटला जोरात धडकली. या अपघातात मिनी बसचा चालक दत्ता ढाकवळ याचा जागीच तर प्रवासी सुरेश गौरू लाड यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. सुरेखा लाड, नंदकुमार मोरे आणि राजेश विश्वनाथ लाड हे प्रवासी गंभीर जखमी झाले. जखमी प्रवाशांवर इगतपुरी ग्रामीण रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत. अपघात प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे. आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर मिनी बसचा चालक दत्ता ढाकवळ आणि प्रवासी सुरेश गौरू लाड या दोघांचे पार्थिव नातलगांना सोपवले जाणार आहे.
मुंबई महापालिकेचा मोठा उपक्रम, गोरेगाव-मुलुंड जोड मार्गाच्या कामाला सुरुवात
मुंबई: महापालिकेमार्फत राबविण्यात येणारा गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पांतर्गंत गोरेगावच्या दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात तिहेरी मार्गिका असलेल्या जुळ्या बोगद्याच्या बांधकामासाठी प्राथमिक खोदकाम लवकरच सुरू आहे. गोरेगाव-मुलुंड हा जोड मार्ग प्रकल्प एकूण चार टप्प्यांमध्ये प्रस्तावित असून प्रकल्पाची कामे निर्धारित कालमर्यादेतच पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करावे, असे स्पष्ट निर्देश मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत.भूमिगत जुळ्या बोगद्याच्या बांधकामासाठी दोन अत्याधुनिक बोगदा खनन संयंत्रे आवश्यक आहेत. यापैकी एका बोगदा खनन संयंत्राचे सर्व घटक भाग गोरेगावच्या जोश मैदान या ठिकाणी पोहोचले आहेत. हे सुटे भाग जपानहून एकूण ७७ कंटेनरमधून आयात करण्यात आले आहेत. दुसऱ्या संयंत्राचे घटक भाग डिसेंबर २०२५ पर्यंत कार्यस्थळी पोहोचण्याची अपेक्षा आहे. बोगदा खनन संयंत्राच्या भागांची जोडणी ऑगस्ट २०२६ पर्यंत पूर्ण केली जाणार आहे. तर, दुसऱ्या बोगदा खनन संयंत्राच्या भागांची जोडणी ऑक्टोबर २०२६ पर्यंत पूर्ण केली जाणार आहे. त्यानंतर बोगद्याच्या खोदकामास प्रत्यक्षात सुरुवात होईल.https://prahaar.in/2025/11/02/india-and-south-africa-chase-closure-in-world-cup-final/तिहेरी मार्गिका असलेल्या पेटी बोगद्याचे काम अभियांत्रिकीदृष्ट्या आव्हानात्मक स्वरूपाचे आहे. बोगदा खनन संयंत्रांच्या सहाय्याने एकूण सुमारे ५.३ किलोमीटर लांबीपर्यंत दुहेरी बोगद्यांचे खोदकाम करण्यात येणार आहे. पेटी बोगद्यासह हे एकूण अंतर सुमारे ६.६२ किलोमीटरपर्यंत वाढेल. प्रत्येक बोगद्याचा बाह्य व्यास सुमारे १४.४२ मीटर इतका असेल. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर हे आतापर्यंतचे मुंबई महानगर क्षेत्रातील सर्वांत मोठे बोगदे ठरतील.गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग हा मुंबईमधील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना एकमेकांशी जोडणारा चौथा प्रमुख जोडरस्ता आहे. उत्तर मुंबईतील वाहतुकीस याचा मोठा फायदा होणार आहे. विशेषत: दादासाहेब फाळके चित्रनगरी ते मुलुंडदरम्यान नवीन जोडमार्ग स्थापित होणार आहे. पश्चिमेकडील मुंबई किनारी रस्ता ते मालाड माईंडस्पेस आणि थेट ऐरोलीला हा मार्ग जोडलाजाणारआहे.
MLA Kishore Patil : “महायुतीच्याृ” असे विधान करत शिंदेसेनेच्या आमदाराने आपल्याच सरकारला घरचा आहेर दिला आहे. त्यांनी केलेल्या विधानामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. भाजपच्या बंडखोरांना पुन्हा पक्षात घेतल्याबद्दल शिंदे सेनेचे आमदार किशोर पाटील यांनी मनातली खदखद एका जाहीर कार्यक्रमात बोलून दाखवली. शिवसेनेच्या पाचही आमदारांनी ठरवलं, तर जळगाव परिषदेवर शिवसेनेचा अध्यक्ष बसणार, असा विश्वास त्यांनी […] The post “महायुतीच्या एक वर्षाच्या काळात…”; शिदेंसेनेच्या आमदाराने मनातली खदखद बोलून दाखवली; भाजपवर थेट प्रहार म्हणाले… appeared first on Dainik Prabhat .
Gold-Silver Rate। गेल्या आठवड्यात सोन्याच्या किमतीत लक्षणीय चढ-उतार झाले. काहीवेळा ते ग्रीन झोनमध्ये व्यापार करत होते आणि नंतर दुसऱ्याच दिवशी कोसळले. या चढउतारानंतरही, संपूर्ण आठवड्यात सोन्याच्या किमती घसरल्या. तथापि, ही घसरण आधीच्या तीव्र घसरणीपेक्षा कमी होती. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवरील सोन्याच्या वायदा व्यवहारातच नव्हे तर देशांतर्गत बाजारातही मौल्यवान पिवळ्या धातूची घसरण झाली. जर तुम्ही सोने खरेदी […] The post जोरदार चढ-उतारानंतरही गेल्या आठवड्यात सोन्याच्या किमती घसरल्या ; आज खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या २४ कॅरेटचा दर appeared first on Dainik Prabhat .
पुण्यात आंदेकर टोळीची दहशत! टोळीतील सर्वजण तुरुंगात, हत्या करतंय कोण?
पुणे: पुण्यातील कुख्यात आंदेकर टोळीचा प्रमुख आणि त्याचे इतर साथीदार सध्या तुरुंगात आहेत. तरीसुद्धा वनराज आंदेकरच्या खुनात आरोपी असलेल्या गायकवाड टोळीतील समीर काळेचा भाऊ गणेश काळेची काल कोंढव्यात हत्या करण्यात आली. गणेश काळेवर आंदेकर टोळीतील चार जणांकडून गोळबार करण्यात आला. तसेच कोयत्यानेही वार करण्यात आले. या प्रकरणाबाबत आंदेकर टोळीने तुरुंगात जाण्यापूर्वीच हत्येची सुपारी दिल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच या प्रकरणात आणखी खून होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.वनराज आंदेकर प्रकरणात शस्त्र पुरवल्याप्रकरणी समीर काळे सध्या तुरुंगात आहे. वनराजच्या हत्येशी त्याचा थेट संबंध नसतानाही, केवळ आरोपीचे कुटुंब म्हणून आयुष कोमकरनंतर आता गणेश काळेची हत्या करण्यात आली आहे. वनराज आंदेकरच्या हत्येला एक वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच आंदेकरांनी, गायकवाड कुटुंबीयांच्या हत्येचा कट रचला असल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे.https://prahaar.in/2025/11/02/you-will-get-relief-from-the-stagnant-rainwater-on-s-v-road-in-bandra-west/आंदेकर कुटुंबातील सर्वांना अटक करण्यात आली असून, ते राज्यातील विविध तुरुंगांमध्ये आहेत. मात्र, तुरुंगात असूनही त्यांच्या कारवाया थांबलेल्या नाहीत. बंडू आंदेकरने वनराजच्या खुनाचा बदला घेण्यासाठी वर्षभरात नियोजन केले होते. एका प्रकरणात अटक होईल हे गृहीत धरून, टोळीतील काही जणांवर पुढील जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या होत्या. तसेच मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत पुरवल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली.या सर्व घटनांमुळे गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून, आयुष कोमकर खून प्रकरण आणि त्यानंतर दाखल झालेल्या विविध गुन्ह्यांमध्ये टोळीप्रमुख बंडू आंदेकर, कृष्णा आंदेकर, शिवम आंदेकर यांच्यासह २० हून अधिक जण तुरुंगात आहेत. त्यामुळे सध्या आंदेकर टोळी चालवतेय कोण, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
गणेश काळेच्या हत्येप्रकरणी चौघांना अटक, शस्त्रे जप्त
पुणे : कोंढवा परिसरात गणेश काळे या रिक्षाचलकाची हत्या करण्यात आली. गणेशवर आधी गोळीबार केला गेला नंतर अतिशय जवळून कोयत्याने वार करण्यात आले. या प्रकरणात पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आणि शस्त्रसाठा जप्त केला. अमन मेहमबुब शेख (२२), अरबाज पटेल, आणि दोन अल्पवयीन आरोपींना पोलिसांनी गणेश काळेच्या हत्येप्रकरणी अटक केली. शिवापूर परिसरातून या चौघांना कोंढवा डी बी पथकाने अटक केली आहे.पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यासाठी वापरलेली दोन पिस्तुले आणि दोन इतर शस्त्र अशी एकूण चार शस्त्र जप्त केली आहेत. अटक केलेल्या चौघांची पोलीस चौकशी करत आहेत. हत्या प्रकरणाचा पोलीस तपास सुरू आहे. गणेश काळे याच्यावर हल्लेखोरांनी सहा गोळ्या झाडल्या. त्यानंतर गणेशवर कोयत्याने वार करण्यात आले. गणेशचा मृत्यू झाल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरुन पळून गेले. पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघड झाले की, गणेशचा भाऊ समीर काळे हा वनराज आंदेकर हत्या प्रकरणात सहभागी होता. त्यानेच हत्येसाठी पिस्तुले मध्य प्रदेशमधून आणली होती. समीरसोबत आकाश म्हस्के, संगम वाघमारे आणि आबा खोंड होते. या चौघांनी धुळेमार्गे मध्यप्रदेशमधून पिस्तुले आणल्याची माहिती समोर आली होती.आयुष कोमकरची आदेंकर टोळीकडून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर टोळी प्रमुख सुर्यकांत उर्फ बंडू आंदेकर आणि त्याच्या अनेक साथीदारांना अटक करण्यात आली होती. एवढी कारवाई होऊनही आंदेकर टोळी सक्रिय असल्याचे गणेश काळेच्या हत्येतून दिसून आले आहे. वनराज आंदेकर हत्या प्रकरणी तुरूंगात असणाऱ्या समीर काळेचा गणेश काळे हा भाऊ आहे. त्यामुळे या हत्येमागे टोळीयुद्ध आहे का? याचा तपास पोलिस करत आहेत. गेल्यावर्षी वनराज आंदेकरची हत्या कोमकर टोळीकडून करण्यात आली होती. त्यानंतर त्या हत्येचा बदला म्हणून आयुष कोमकरची हत्या करण्यात आली.
मी दुलारी देवी आहे. मी बिहारमधील मधुबनी येथील रांती गावची आहे. मला मधुबनी चित्रकलेसाठी पद्मश्री मिळाला आहे. मी सध्या मिथिला इन्स्टिट्यूटमध्ये ८० मुलांना प्रशिक्षण देत आहे. माझ्या मुलीने जिथे शेवटचा श्वास घेतला त्या रुग्णालयाच्या भिंतीवर मी चित्रकला केली. लोक विचारतात, दुलारी, तू हे सगळं कसं करतेस? मी फक्त म्हणते, मी माझ्या वेदनांना रंगात बदलते; नाहीतर, मी जगू शकणार नाही. मी प्रत्येक चित्रात एक मूल निर्माण करतो. ती मूल खरंतर माझी मुलगी आहे. अशा प्रकारे, मी तिला रंगांमध्ये जिवंत ठेवते. मी एकदा चेन्नईला गेले होते आणि तिथल्या माझ्या आयुष्याची कहाणी रंगवली होती. ती चित्रे पुस्तकरूपात प्रकाशित झाली आणि मला गेल्या १४ वर्षांपासून रॉयल्टी मिळत आहे. मी माझ्या बालपणापासून सुरुवात करते. आमचा शाळेशी किंवा पुस्तकांशी काहीही संबंध नव्हता. आम्ही आमचे बहुतेक आयुष्य गरिबी आणि कष्टात घालवले. आम्ही मल्लाह समुदायाचे आहोत. आम्ही चार बहिणी, एक भाऊ आणि आमचे पालक होतो. आम्ही आमच्या पालकांसोबत काम करून आमचा रोजचा खर्च भागवत होतो. मी लहान असताना, मी माझ्या वडिलांसोबत मासेमारी करण्यासाठी आणि मखाना गोळा करण्यासाठी तलावावर जायचे. हिवाळा असो, पाऊस असो किंवा उन्हाळा असो, आम्हाला काम करण्यासाठी तलावावर किंवा नदीवर जावे लागायचे. माझे भाऊ आणि बहीण खूप लहान असताना माझे वडील गेले. त्यानंतर, आमच्या अडचणी आणखी वाढल्या. माझी एकटी आई सर्वकाही सांभाळू शकत नव्हती. कधीकधी तर आम्ही उपाशीही राहायचो. मी १२ वर्षांची असताना माझे लग्न झाले. त्यावेळी मी जवळजवळ लहान होते. माझ्या सासरच्या घरी एक मोठे कुटुंब होते. सहा वहिनी, एक भावजय, आणि माझे सासू आणि सासरे. घर चालवण्यासाठी तिथे सर्वजण मजूर म्हणून काम करायचे. मी माझ्या सासरच्या घरी मासे आणि गवत विकण्यासाठी जायचे. माझा नवरा खूप रागीट होता. तो माझ्यावर खूप ओरडायचा. मी अशा वाईट गोष्टी सहन करू शकत नव्हते, पण मी माझ्या नवऱ्याला देव मानून सर्वकाही सहन करत असे. पण जेव्हा तो मला मध्यरात्री घराबाहेर काढायचा तेव्हा मला खूप वाईट वाटायचं. माझे सासरेही त्याला साथ द्यायचे. त्यावेळी मी शेजारच्या घरी राहायला जायचे. एके दिवशी, जेव्हा त्याने मला घराबाहेर काढले, तेव्हा मी माझ्या आईवडिलांच्या घरी आले. माझे लग्न होऊन सात वर्षे झाली होती. त्यानंतर मी कधीही परत गेले नाही. जेव्हा मी माझ्या आईवडिलांच्या घरी परतले तेव्हा एका मुलीचा जन्म झाला. तिच्या जन्माने कुटुंबाला खूप आनंद झाला. एका अर्थाने ती माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंद बनली. मी तिचे नाव शकुंतला ठेवले. माझे सासरे त्यांच्या मुलीला भेटायला आले होते, पण माझ्या नवऱ्याचे वागणे अजिबात बदलले नव्हते. म्हणून मी माझ्या सासरच्या घरी परत न जाण्याचा निर्णय घेतला. मी माझे उर्वरित आयुष्य माझ्या मुलीसोबत घालवीन. जेव्हा माझी मुलगी मोठी झाली, तेव्हा माझी आई दुसऱ्या लग्नासाठी आग्रह करू लागली, पण मी प्रत्येक वेळी नकार दिला. मी विचार करत राहिले, या पहिल्या लग्नात काहीही चांगले घडले नाही. मला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. जर दुसऱ्या लग्नातही असेच झाले तर? म्हणून, मला पुन्हा लग्न करावेसे वाटले नाही. दरम्यान, मुलगी आजारी पडली. तिला रुग्णालयात नेले, जिथे आढळले की तिला टायफॉइड आहे. डॉक्टरांनी औषध लिहून दिले, परंतु तिची प्रकृती खालावत गेली. एका आठवड्यानंतर, ती मरण पावली. मुलीचा मृतदेह समोर होता. जणू काही सर्व काही उध्वस्त झाले आहे असे वाटले. मला वाटलं होतं की जर माझा नवरा विश्वासघातकी निघाला तर एक स्त्री तिच्या मुलांवर अवलंबून राहू शकते. पण आता माझी मुलगीही मला सोडून गेली होती. नंतर, मी माझ्या मुलीच्या मृत्युच्या रुग्णालयात गेले आणि भिंतीवर चित्र काढले माझ्या मुलीच्या जाण्यानंतर, मी खूप अस्वस्थ झाले होते. मी माझे आयुष्य कसे जगावे याचा विचार करत होते. मग मी गावातील कर्पूरी माझीच्या घरी गेले. ते मधुबनी रंगारी होते. मी त्यांच्या घरी स्वयंपाक आणि साफसफाई करायला सुरुवात केली. त्यावेळी माझे आजोबाही तिथे काम करायचे. माझी अवस्था पाहून, एके दिवशी कर्पूरीने मला त्यांच्यासोबत राहण्याचा सल्ला दिला. माझ्या आईने होकार दिला आणि मी त्यांच्यासोबत राहू लागले. माझीने मला राहण्यासाठी एक बेड आणि कंदील दिला. वेळ घालवण्यासाठी रंग आणि ब्रश दिला. ते मला माझ्या कामासाठी दररोज सहा रुपये आणि चार रोट्या देत असे. अशाप्रकारे, त्यांच्या घरी काम करत असताना, मी चित्रकला शिकू लागले. माझी हे गणपतीचे खूप चांगले चित्रकार होते. ते मला कागद, रंग आणि ब्रश देत असे आणि म्हणत असे, त्यावर तुझे नाव लिह आणि फुले आणि इतर गोष्टी काढ. मधुबनी चित्रकला शिक; ही आपल्या मिथिलाची कला आहे. त्यानंतर, मी माझी आणि काकू दाई यांच्या शेजारी दररोज त्यांना रचित्र काढताना पाहत उभी राहायचे. हळूहळू मी रंगकाम करू लागले. सुरुवातीला, मी ग्रीटिंग कार्ड्सवर काम करू लागले. मला त्याच्यासाठी पैसे मिळत होते. त्यांच्यासोबत काम केल्याने मला चित्रकलेची आवड निर्माण होऊ लागली. माझ्या समर्पणाने कर्पुरी माझी खूप खूश झाले. सरकारच्या वतीने काही लोक चित्रकला शिकवण्यासाठी गावात आले होते. माझीने त्यांच्या रजिस्टरमध्ये माझी नोंद केली. तिथे माझा पहिलाच दिवस होता. मला रंगविण्यासाठी एक सॅटिन कापड देण्यात आले. ते खूप चमकदार आणि सुंदर होते. मी यापूर्वी कधीही इतके चमकदार कापड पाहिले नव्हते. घाबरून मी त्यावर रंगवण्यास नकार दिला आणि परतले. जेव्हा कर्पूरीला हे कळले तेव्हा त्यांनी मला फटकारले. ते म्हणाले, हे कसे चालेल? दुसऱ्या दिवशी त्यांनी मला पुन्हा जायला सांगितले. मी तिथे गेले, यावेळी मला सुती कापड देण्यात आले. मी त्यावर एक फूल रंगवले. मग मी साड्यांवर काम करायला शिकू लागले. मी तिथे रंगवायचे आणि नंतर माझींच्या घरी येऊन राहायचे. त्यानंतर, मी चित्रकलेमध्ये मग्न झाले. नंतर, तिथे एक संस्था उघडली आणि मी तिथे एकूण १६ वर्षे काम केले. त्या काळात कर्पूरी माझींने खूप मदत केली. एके दिवशी मी घरी स्वयंपाक करत होते. ते आले आणि म्हणाले, तू एकटी आहेस, तू तुझे आयुष्य कसे जगणार? लग्न कर. पण मी पुन्हा लग्न करण्यास नकार दिला. मी म्हणाले, आता मधुबनी चित्रकला ही माझी एकमेव पूजा आहे. हे रंग माझे जीवन आहेत. मग त्यांनी विचारले, तुला मुलीची आठवण येत नाही का? मी उत्तर दिले, मला तिची आठवण येते, पण जर मी तिच्याबद्दल विचार करत राहिले तर मी चित्र कसे काढू शकेल? हे सर्व करत असताना, मी २५ वर्षे कर्पूरी माझीसोबत राहिले आणि रंगकाम करत राहिले. प्रत्येक चित्रात मी एका मुलाचे चित्रण करते. ती माझी मुलगी आहे. खरंतर, मला मुलं खूप आवडतात. प्रवास करताना जेव्हा जेव्हा मी मुलांचे कपडे पाहते तेव्हा मी ते खरेदी करते. जेव्हा लोक त्यांच्या मुलांना शाळेतून सोडतात किंवा घेऊन जातात आणि जेव्हा मुलीचे लग्न असते तेव्हा मला माझी मुलगी शकुंतलाची खूप आठवण येते. माझ्या प्रत्येक चित्रात नेहमीच एक लहान मूल असते याची हीच कारणे आहेत. एकदा, बिहार सरकारच्या वतीने, आम्ही चेन्नईमध्ये एका चित्रकला स्पर्धेत गेलो होतो. तिथे मला माझ्या जीवनाची कहाणी एका चित्रात चित्रित करण्यास सांगण्यात आले. मी सुरुवात केली. मी घरातील कामे कशी करते, भात लावते, गवत विकायला जाते आणि मासेमारी करते हे मी चित्रित केले. चार दिवस उलटून गेल्यावर, आयोजकांनी ते राहू देण्यास सांगितले. मी त्यांना सांगितले की माझी कथा अजून पूर्ण झालेली नाही. मग मी ते जाड पत्रे घरी आणले आणि संपूर्ण कथा एक-एक करून रंगवली. नंतर, ती चित्रे पुस्तकाच्या रूपात प्रकाशित झाली. मला त्या पुस्तकातून १४ वर्षांपासून रॉयल्टी मिळत आहे. माझ्या घराच्या भिंती पाहा. त्या मधुबनी चित्रांनी मढवलेल्या आहेत. या चित्रांमध्ये नाविक, मासे, मखाना, मखानाची पाने, बांबू आणि होड्या दाखवल्या आहेत. जेव्हा लोक मला भेटायला येतात तेव्हा ते त्यात रंग भरतात. खरं तर, माझ्या आयुष्यात खूप शून्यता होती. या रंगांनी ते भरून काढले. रंग हे या जगात सर्वकाही आहे. रंगाशिवाय जीवन निस्तेज होईल. शेवटी, मी असे म्हणू इच्छिते की माझ्या आयुष्यात खूप दुःख होते. मला अनेक अडचणी आल्या, पण मी त्यावर मात केली. २०२१ मध्ये मला पद्मश्री पुरस्कार मिळाला. त्यानंतर, बिहार संग्रहालयात माझा सन्मान करण्यात आला. त्या दिवशी मी खूप रडले. मला माझ्या अडचणींचा प्रत्येक क्षण आठवतो. सध्या मी मिथिला कला संस्थेत मुलांना मिथिला कला आणि गाणी शिकवते. तिथे ८० मुले आहेत. मला त्यांच्यासोबत काम करायला आवडते. त्यांनी ही कला जपावी अशी माझी इच्छा आहे. (पद्मश्री पुरस्कार विजेत्या दुलारी देवी यांनी भास्करच्या रिपोर्टर मनीषा भल्लासोबत या भावना शेअर केल्या. )
Raigad : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सत्ताधारी महायुती आणि विरोधी बाकावर बसलेली महाविकास आघाडी दोघांसाठी अत्यंत महत्वाच्या असणार आहेत. या निवडणुकीची वेळ जसजशी जवळ येऊन ठेपली आहे, तसतसे तयारीला वेग घेतला आहे. निवडणुकीच्या दृष्टीने स्थानिक पातळीवरील परिस्थिती पाहून निवडणुकांना समोरे जाण्याचा निर्णय घेतला जाईल, असे महायुतीमधील नेत्यांनी स्पष्ट केले होते. पण रायगड जिल्ह्यातून अशी […] The post अजितदादांच्या राष्ट्रवादीचा मोठा निर्णय; ठाकरे गटासोबत युती केली जाहीर; ‘या’ जिल्ह्यातील स्थानिक समीकरणे बदलणार appeared first on Dainik Prabhat .
ब्रिटनमध्ये चालत्या ट्रेनमध्ये गोंधळ! १० जणांवर अज्ञाताकडून चाकूने हल्ला, २ संशयितांना अटक
London Train Stabbing। इंग्लंडमध्ये एका व्यक्तीने लंडनला जाणाऱ्या ट्रेनमध्ये अनेक प्रवाशांवर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अचानक झालेल्या हल्ल्याने लोकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, “सर्वत्र रक्ताचे डाग” होते आणि भीतीने अनेक प्रवासी बाथरूममध्ये लपले होते. डोनकास्टरहून लंडन किंग्ज क्रॉसला जाणाऱ्या ट्रेनमध्ये ही घटना घडली. ब्रिटिश ट्रान्सपोर्ट पोलिसांनी […] The post ब्रिटनमध्ये चालत्या ट्रेनमध्ये गोंधळ! १० जणांवर अज्ञाताकडून चाकूने हल्ला, २ संशयितांना अटक appeared first on Dainik Prabhat .
Kartiki Ekadashi 2025 | कार्तिक एकादशीच्या निमित्ताने आज पंढरपुरात पहाटे विठ्ठलाची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या हस्ते विधीवत संपन्न झाली. पहाटे २ वाजून २० मिनिटांनी ही महापूजा सुरू झाली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांचा मुलगा खासदार श्रीकांत शिंदे आणि नातू रुद्रांश यांच्यासह शासकीय महापूजेसाठी विठ्ठल मंदिरात दाखल झाले होते. […] The post पांडुरंग विठ्ठला…!! एकनाथ शिंदेंच्या हस्ते विठ्ठल-रखुमाईची शासकीय महापूजा संपन्न; नांदेडचे दाम्पत्य ठरले मानाचे वारकरी appeared first on Dainik Prabhat .
“ख्रिश्चनांचा नरसंहार थांबवला नाही तर….” ; नायजेरियाला डोनाल्ड ट्रम्प यांची लष्करी कारवाईची धमकी
Donald Trump Threat। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नायजेरिया सरकारला कडक इशारा दिला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी, “जर ख्रिश्चनांच्या हत्या सुरूच राहिल्या तर अमेरिका नायजेरियाला मिळणारी आर्थिक मदत तात्काळ थांबवेल.” अशी धमकी दिली आहे. यासंदर्भात त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये त्यांनी ही धमकी दिली आहे. ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये, […] The post “ख्रिश्चनांचा नरसंहार थांबवला नाही तर….” ; नायजेरियाला डोनाल्ड ट्रम्प यांची लष्करी कारवाईची धमकी appeared first on Dainik Prabhat .
मी माझ्या मुलाला, राजीवला, गेल्या दोन वर्षांपासून पाहिलेले नाही. तो सौदी अरेबियात काम करण्यासाठी गेला होता, पण खोट्या फसवणुकीच्या आरोपाखाली त्याला तुरुंगात टाकण्यात आले. त्याने सांगितले होते की तो टँकर ड्रायव्हर होईल आणि महिन्याला ३०,००० रुपये कमवेल, पण त्याच्या मालकाने त्याला कचरा वेचायला लावला. जेव्हा माझ्या मुलाने काम करण्यास नकार दिला तेव्हा त्याचा पासपोर्ट काढून घेण्यात आला आणि त्याला अनेक दिवस उपाशी ठेवण्यात आले. राजीवला त्याचा पगार किंवा जेवण मिळत नव्हते. यामुळे निराश होऊन, एके दिवशी त्याने भारतात येण्यासाठी सीमा ओलांडण्याचा प्रयत्न केला, परंतु तेथील सुरक्षा रक्षकांनी त्याला पकडले आणि तुरुंगात टाकले. त्याचा प्रायोजक त्याला मुक्त करू शकला असता, परंतु त्याने त्याच्याविरुद्ध फसवणुकीचा खटला दाखल केला. माझा मुलगा २०२३ पासून सौदी अरेबियात तुरुंगात आहे. त्याचा फोटो पाहून, त्याला उदरनिर्वाहासाठी परदेशात पाठवल्याबद्दल मी स्वतःला शाप देतो. ५९ वर्षीय सूरजकली मुलाचा, राजीवचा फोटो पाहून भावुक होतात. राजीव मे २०२३ मध्ये ड्रायव्हर म्हणून काम करण्यासाठी सौदी अरेबियाला गेला होता, परंतु तिथल्या कफाला पद्धतीला बळी पडला. त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तो रियाधमध्ये तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहे. त्याला १.८ दशलक्ष रुपये दंडही ठोठावण्यात आला आहे. राजीवच्या कुटुंबाला भारतात परतण्यासाठी ही रक्कम उभारणे अशक्य आहे. सौदी सरकारने ७० वर्षे जुनी कफाला पद्धत रद्द करण्याची घोषणा केली असली तरी ती लागू करण्यास वेळ लागेल. ही कहाणी फक्त राजीवची नाही. गेल्या १० वर्षांत २६ लाख भारतीय कामगार सौदी अरेबियात काम करण्यासाठी गेले आहेत, त्यापैकी बरेच जण कफाला पद्धतीचे बळी पडले आहेत. त्यांच्या कहाण्या वेदनादायक आहेत. काहींना शिक्षा म्हणून उजाड वाळवंटात उंट आणि बकऱ्या पाळण्यासाठी पाठवण्यात आले होते, तर काहींना खोट्या आरोपाखाली तुरुंगात टाकण्यात आले होते. काही जण आता हयात नाहीत. दिव्य मराठीने सौदी अरेबियातील कफाला प्रणालीत अडकलेल्या भारतीयांशी आणि त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला. प्रकरण-१ड्रायव्हर म्हणून काम करायला गेला, आता ३६ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा राजीवचा भाऊ अर्जुन सांगतो, २०२३ मध्ये, राजीवला फेसबुकद्वारे सौदी अरेबियात नोकरी देणाऱ्या एका एजंटबद्दल कळले. माझ्या भावाने त्याच्याशी संपर्क साधला आणि नोकरीबद्दल चर्चा केली. त्या एजंटने १,२०,००० रुपये कमिशन घेऊन त्याला सौदी अरेबियात पाण्याचा टँकर चालवण्याची नोकरी मिळवून दिली. पैसे उभे करण्यासाठी आणि राजीवला परदेशात पाठवण्यासाठी माझ्या वडिलांनी त्यांचे शेत गहाण ठेवले. माझा भाऊ सौदी अरेबियात आला तेव्हा त्याला टँकरऐवजी कचरा ट्रक चालवण्याचे काम देण्यात आले. त्याने हे आमच्यापासून गुप्त ठेवले आणि काम करण्यास तयार झाला. त्याने चार महिने गाडी चालवली, पण त्याच्या प्रायोजकाने त्याला पैसे दिले नाहीत. त्याला जेवणाचे पैसेही मिळाले नाहीत. राजीव सीमा ओलांडताना पकडला गेला आणि आता तो रियाध तुरुंगात आहे अर्जुनच्या मते, राजीवने परदेशात काम करण्यासाठी कर्ज घेतले होते, म्हणून त्याला त्याच्या कुटुंबाकडून अधिक पैसे मागणे योग्य वाटले नाही. त्याने घरी परतण्याचा निर्णय घेतला, परंतु त्याच्या प्रायोजकाने त्याचा पासपोर्ट जारी केला नाही. हताश होऊन, त्याने परतण्याचा मार्ग शोधण्यासाठी तिथल्या काही लोकांशी बोलले आणि त्याला कळले की तो येमेनमधून सीमा ओलांडू शकतो. अर्जुन पुढे म्हणतो, माझा भाऊ घरी परतण्याचा दृढनिश्चय करत होता. तो नेहमीप्रमाणे कामावर निघून गेला, त्याची गाडी एका निर्जन भागात सोडून नंतर निघून गेला. सीमा ओलांडताना पोलिसांनी त्याला पकडले. त्याच्याकडे पासपोर्ट नव्हता, म्हणून त्यांनी त्याला तुरुंगात टाकले. नंतर, राजीवच्या मालकाने त्याच्याविरुद्ध फसवणुकीचा खटला दाखल केला. तेव्हापासून, तो सौदी अरेबियात तीन वर्षांचा तुरुंगवास आणि १.८ दशलक्ष रुपयांचा दंड भोगत आहे. वडील म्हणाले- राजीव कुटुंबातील एकमेव कमावणारा सदस्य राजीव २१ महिन्यांपासून रियाध तुरुंगात कैद आहेत. त्यांच्या कुटुंबाने खासदार आणि आमदारांपासून ते परराष्ट्र मंत्रालयापर्यंत सर्वांना त्याला परत आणण्याचे आवाहन केले आहे. आतापर्यंत त्यांना फक्त आश्वासने मिळाली आहेत. राजीव यांना भारतात परत आणण्याची कोणतीही आशा दिसत नाही. राजीवचे वडील म्हणतात, तो सात भावंडांमध्ये मोठा होता. त्याच्यावर कुटुंबाची जबाबदारी होती. तो येथे राहत असताना, तो लखनौ ते दिल्ली पर्यंत वाहतूक वाहन चालवत असे. तो जे काही पैसे कमवत असे ते घर चालवण्यासाठी आणि मुलांना शिक्षण देण्यासाठी वापरत असे. त्याच्या अनुपस्थितीमुळे आम्हाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. घरात दोन वेळचे जेवण खाण्यासाठीही पुरेसे पैसे शिल्लक नाहीत. आम्ही राजीवला परत आणण्यासाठी नातेवाईकांकडे पैसे मागितले आणि ते एका एजंटला दिले. आम्ही राजकारणी आणि अधिकाऱ्यांना भेटलो. आम्ही खूप खर्च केला, पण त्यातून काहीही चांगले झाले नाही. दररोज झोपण्यापूर्वी मला राजीवची आठवण येते. मला फक्त माझ्या मुलाला परत मिळवायचे आहे. 'मोदी आणि योगी भैय्यांना आमची एकच विनंती आहे की त्यांनी कसे तरी माझ्या मुलाला सौदी अरेबियातून सोडवावे आणि परत आणावे, जेणेकरून आपण शांततेत जीवन जगू शकू.' प्रकरण-२पैसे मागितल्याबद्दल कफालाने एका माणसाला बेदम मारहाण केली आणि त्याला ठार मारले झारखंडमधील लोहारदगा जिल्ह्यातील तिग्रा गावातील रहिवासी झाकीर अन्सारी हा सौदी अरेबियातील रियाध येथे ड्रायव्हर म्हणून काम करण्यासाठी गेला होता. त्याच्या प्रायोजकाने त्याला शेळ्या पाळण्याचे काम दिले. झाकीरने तीन महिने काम केले, परंतु जेव्हा त्याला पैसे मिळाले नाहीत तेव्हा त्याने काम करण्यास नकार दिला आणि त्याच्या मालकाला भारतात परतण्यास सांगितले. हे ऐकून त्याचा मालक संतापला. कुटुंबाचा आरोप आहे की झाकीरला अगदी किरकोळ चुकांसाठीही जनावरासारखे मारहाण करण्यात आली, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. झाकीरची मुलगी रुकैया परवीन म्हणते, अब्बू या वर्षी कामासाठी सौदी अरेबियाला गेले होते. ते शेवटचे १३ जून रोजी आमच्याशी बोलले होते. त्यावेळी ते घाबरले होते. ते फक्त सांगत होते की त्यांना इथे पैसे मिळत नाहीत. रुकैया म्हणते, अब्बू त्यांच्या कामावर नाराज होते. त्यांनी आम्हाला सांगितले की जेव्हा त्यांनी त्यांच्या प्रायोजकाकडून पैसे मागितले तेव्हा त्यांना मारहाण करण्यात आली आणि जेवण नाकारण्यात आले. आमच्या काकांनी अब्बूचा मृतदेह भारतात पाठवण्याची विनंती केली, परंतु आम्हाला सांगण्यात आले की त्यांचा मृतदेह जंगलात कुजलेल्या अवस्थेत आढळला आहे, त्यामुळे तो येथे पाठवणे कठीण झाले आहे. माझा भाऊ अपंग आहे आणि त्याच्या उपचारासाठी आम्हाला पैशांची नितांत गरज आहे. माझ्या वडिलांच्या निधनामुळे आमचा आधार हिरावून घेतला आहे. मी सरकारला आमची मदत करण्याची विनंती करते. प्रकरण ३नोकरीच्या नावाखाली उंट पाळण्यासाठी पाठवले, सौदी पोलिस म्हणतात ते बनावट आहे राजीव आणि झाकीर यांच्याप्रमाणेच, प्रयागराजमधील शेखपूर छतौना गावातील रहिवासी अंकित भारती देखील १ ऑक्टोबर रोजी सौदी अरेबियाला काम करण्यासाठी गेला होता. त्याला दरमहा १,००० रियाल देण्याचे आश्वासन देण्यात आले होते, परंतु तेथे पोहोचल्यानंतर अंकितने गैरवर्तनाचे चित्रीकरण केले आणि ते व्हायरल केले. २३ ऑक्टोबरच्या एका व्हिडिओमध्ये अंकित रडत आहे, मला सौदी अरेबियात ओलीस ठेवले जात आहे. माझा पासपोर्ट काढून घेण्यात आला आहे आणि मला एका निर्जन भागात उंट चरण्यास भाग पाडले जात आहे. मला माझ्या आईकडे जायचे आहे. हा व्हिडिओ पंतप्रधानांपर्यंत पोहोचला पाहिजे जेणेकरून मला माझ्या कुटुंबाकडे परत पाठवता येईल. अंकितचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, सौदी अरेबियाच्या पूर्व प्रांतातील पोलिसांनी त्याला चौकशीसाठी बोलावले. पोलिसांनी त्याचा दावा फेटाळून लावत म्हटले की त्याने सोशल मीडिया व्ह्यूज वाढवण्यासाठी व्हिडिओ बनवला होता. चौकशीनंतर आता त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जात आहे. त्याची आई रंजू देवी म्हणाली, अंकित पहिल्यांदाच नोकरीसाठी परदेशात गेला होता. नवीन वातावरणात तो घाबरला होता, म्हणूनच त्याने हा व्हिडिओ बनवला. अंकित म्हणाला की पोलिसांनी त्याच्या प्रायोजकाशी बोलले. आता सर्व काही ठीक आहे. दरवर्षी हजारो भारतीय कामगार कामाच्या शोधात सौदी अरेबियात स्थलांतर करतात. तथापि, अलिकडच्या वर्षांत ही संख्या चढ-उतार झाली आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, २०१९ मध्ये १,६१,००० भारतीय कामगार नोकरीसाठी सौदी अरेबियात गेले होते. दरम्यान, २०२३-२४ मध्ये सौदी अरेबियात गेलेल्या भारतीय कामगारांची संख्या २००,००० पेक्षा जास्त होती. सध्या, सौदी अरेबियात भारतीयांची संख्या सुमारे २.६ दशलक्ष आहे. दिव्य मराठीने कफाला पद्धतीत अडकलेल्यांच्या दुर्दशेबद्दल जाणून घेण्यासाठी सौदी अरेबियातील भारतीय दूतावासाशी संपर्क साधला. तेथील एका अधिकाऱ्याने सांगितले की, क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्या व्हिजन २०३० मध्ये ही क्रूर व्यवस्था रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या वर्षी जूनपासून येथील पोलिस अशा प्रकरणांवर कठोर कारवाई करत आहेत. कफाला किंवा कफील प्रवृत्ती रद्द करण्यामागील उद्दिष्ट सौदी अरेबियाची जागतिक प्रतिमा सुधारणे आहे. सौदी अरेबियामध्ये गेल्या ७० वर्षांपासून सुरू असलेल्या कफाला प्रणालीमुळे लाखो भारतीय कामगारांच्या जीवनावर परिणाम झाला आहे, असे अधिकाऱ्याने स्पष्ट केले. या प्रणालीमुळे किती भारतीयांना त्रास होत आहे याची अचूक आकडेवारी उपलब्ध नसली तरी, त्यावर बंदी घातल्याने तेथे काम करणाऱ्या १.३ कोटी परदेशी कामगारांना निश्चितच दिलासा मिळेल, ज्यामध्ये केवळ २५ लाख भारतीय कामगारांचा समावेश आहे. आखाती देशांमध्ये कफाला प्रणालीच्या उदयास कारणीभूत ठरणारे तीन घटकसौदी अरेबियामध्ये कफाला प्रकरणांच्या वाढत्या संख्येबद्दल आम्ही दक्षिण आशियाई (सार्क) विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय संबंध विभागाचे डीन प्रोफेसर डॉ. धनंजय त्रिपाठी यांच्याशी बोललो. ते यामागील तीन प्रमुख घटक स्पष्ट करतात. १. प्रायोजक आणि स्थानिक एजंट यांच्यातील संगनमतभारतीय एजंट आखाती देशांमधील नियोक्ते किंवा स्थानिक एजन्सींशी संगनमत करतात. ते लोकांच्या सक्ती आणि असुरक्षिततेबद्दल माहिती सामायिक करतात, ज्यामुळे त्यांना त्यांचे शोषण करणे सोपे होते. भारत सरकारने कामगारांच्या संरक्षणासाठी १९८३ मध्ये इमिग्रेशन कायदा लागू केला, ज्यामध्ये भरती एजंटना परराष्ट्र मंत्रालयाकडे नोंदणी करणे आवश्यक होते. हजारो भारतीय एजंट परवान्याशिवाय काम करतात आणि सोशल मीडिया, फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि आकर्षक जाहिरातींद्वारे कामगारांना लक्ष्य करतात. २. पर्यटक व्हिसाचा गैरवापरएजंट अनेकदा लोकांना पर्यटन व्हिसावर आखाती देशांमध्ये काम शोधण्यासाठी पाठवतात, काही दिवसांत त्यांना वर्क व्हिसामध्ये रूपांतरित करण्याचे आश्वासन देतात. एकदा ती व्यक्ती परदेशात पोहोचली की ते त्याकडे फारसे लक्ष देत नाहीत. पर्यटक व्हिसावर जाणाऱ्यांना तिथे काम करणे बेकायदेशीर मानले जाते आणि त्यांना कोणतेही कायदेशीर संरक्षण नसते, ज्यामुळे ते कफालासारख्या प्रणालींमध्ये अडकतात. जेव्हा एखादा कामगार परदेशात अडकतो तेव्हा हे एजंट अनेकदा त्यांचे फोन नंबर बदलतात किंवा त्यांचे कार्यालय बंद करतात, ज्यामुळे त्यांना ट्रॅक करणे जवळजवळ अशक्य होते. ३. कागदपत्रांची हाताळणीलोकांना परदेशात पाठवणारे एजंट अनेकदा क्लायंटच्या कागदपत्रांमध्ये फेरफार करतात, जसे की त्यांच्या संमतीशिवाय त्यांच्या रिज्युम किंवा सीव्हीमध्ये बनावट अनुभव किंवा कौशल्ये जोडणे, जेणेकरून त्यांचा परदेशात रोजगार सुलभ होईल. जेव्हा कामगार परदेशात येतात तेव्हा प्रायोजक त्यांच्याकडे ही कौशल्ये असण्याची अपेक्षा करतो. असे न केल्यास गैरवर्तन होऊ शकते किंवा त्यांना कामावरून काढून टाकण्याची धमकी दिली जाऊ शकते. यामुळे त्यांना दबावाखाली काम करावे लागते. डॉ. धनंजय म्हणतात, कफाला पद्धतीत क्रूरतेचे अनेक प्रकार घडल्याचे वृत्त आहे. काही प्रकरणांमध्ये, काम करताना लोकांनी त्यांचे मानसिक संतुलनही गमावले आहे. अशा घटना देखील घडल्या आहेत जिथे लोक त्यांची बचत सौदी अरेबियाला घेऊन गेले आणि नंतर त्यांना अशा प्रकारे काम करण्यास भाग पाडले गेले की ज्यामुळे त्यांची स्वप्ने चकनाचूर झाली. भारतातील त्यांच्या कुटुंबांनाही यामुळे आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला आहे. परदेशात कफाला प्रणालीत अडकून पडण्यापासून कोणी कसे वाचू शकते? या प्रश्नाचे उत्तर आम्हाला उत्तर प्रदेशातील निवृत्त आयपीएस अधिकारी एसआर दारापुरी यांच्याकडून मिळाले. दारापुरी यांनी खलिस्तान मॉड्यूलशी संबंधित परदेशी एजंट्स आणि परदेशात अडकलेल्यांना मायदेशी परत आणण्याचे असंख्य खटले हाताळले आहेत. दारापुरी म्हणतात, परदेशात नोकरीच्या फसव्या ऑफरच्या घटना वाढत आहेत. यात सहभागी असलेले लोक इतके धूर्तपणे काम करतात की सुशिक्षित लोकही या जाळ्यात अडकतात. तथापि, विवेकबुद्धीने, लोक प्रायोजकांना बळी पडण्याचे टाळू शकतात. हे टाळण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे सौदी अरेबियातील भारतीय दूतावास किंवा जेद्दाह वाणिज्य दूतावासाशी संपर्क साधणे. त्यांचे फोन नंबर आणि ईमेल पत्ते प्रत्येक शहरातील पोलिस स्टेशन आणि सरकारी कार्यालयांमध्ये पोस्ट केलेले आहेत. जर तुमचा प्रायोजक तुम्हाला त्रास देत असेल तर त्यांना थेट कॉल करा आणि अधिकाऱ्याला तुमची परिस्थिती समजावून सांगा. दारापुरी यांच्या मते, तुम्ही तुमच्या प्रायोजकाचा पासपोर्ट जप्त करणे, वेतन रोखणे किंवा हिंसाचाराबद्दल सौदी अरेबियाच्या मानवाधिकार आयोगाकडे किंवा कामगार कार्यालयाकडे तक्रार करू शकता, परंतु तुमचा व्हिसा प्रमाणित असणे आवश्यक आहे. जर तुम्ही पर्यटन व्हिसावर असाल आणि कामाबद्दल तक्रार केली तर तुम्हाला कारवाईला सामोरे जावे लागू शकते.
निघोज कुंड पर्यटनस्थळी वाढली गर्दी; विकासकामांमुळे परिसरात नवचैतन्य
योगेश खाडे निघोज – निसर्गाच्या कुशीत वसलेले पर्यटनाचे नवे केंद्र पारनेर तालुक्यातील निघोज येथील कुंड पर्यटनस्थळ हे सध्या जिल्ह्यातील चर्चेचा प्रमुख विषय ठरत आहे. दिवाळी सुट्ट्यांचा हंगाम, आठवड्याच्या शेवटी येणाऱ्या सुट्ट्या आणि सोशल मीडियावर वाढलेली प्रसिद्धी यामुळे निघोज कुंडावर देशभरातून तसेच राज्यातील विविध भागांतून पर्यटकांची गर्दी होत आहे. या कुंडाची नैसर्गिक रचना, खोल दरीतील वाहते […] The post निघोज कुंड पर्यटनस्थळी वाढली गर्दी; विकासकामांमुळे परिसरात नवचैतन्य appeared first on Dainik Prabhat .
Satara : सातारा जिल्ह्यात दोन्ही शिवसेना ॲक्शन मोडवर
सातारा :जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षानेमहायुतीला ठेंगा दाखवत शक्य असेल तिथे ऑपरेशन लोटस राबवण्याचे धोरण ठेवले आहे. त्या पार्श्वभूमीवर महायुतीतील शिवसेना शिंदे गट जिल्ह्यात चाचपणीनंतर मेळावे घेण्याच्या मूडमध्ये असून शक्य तिथे स्वबळाची ताकद आजमावण्याची चिन्हे आहेत. दुसरीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट सध्या तरी जिल्ह्यामध्ये चाचणी करताना दिसून येत आहे. शिवसेनेची विशेषतः ठाकरे गटाची गेल्या तीन वर्षांमध्ये […] The post Satara : सातारा जिल्ह्यात दोन्ही शिवसेना ॲक्शन मोडवर appeared first on Dainik Prabhat .
Satara : वासोटा किल्ला प्रवेश शुल्कात वाढ
कसबे बामणोली :जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ कसबे बामणोली व वासोटा किल्ला परिसरात पावसाने थंडावा निर्माण केला असला तरी वन विभागाने वाढवलेल्या प्रवेश शुल्कामुळे स्थानिक व्यावसायिक व बोट चालकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. वासोटा किल्ला नुकताच पर्यटकांसाठी खुला करण्यात आला असताना सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांतर्गत प्रवेशासाठी प्रति व्यक्ती १५० रुपयांची वाढीव फी निश्चित करण्यात आली आहे. या […] The post Satara : वासोटा किल्ला प्रवेश शुल्कात वाढ appeared first on Dainik Prabhat .
Satara : एसटी बसस्थानक परिसरात वाढली पोलीस गस्त
सातारा :सातारा मध्यवर्ती एसटी बस स्थानकामध्ये होणाऱ्या वाढत्या चोऱ्या रोखण्यासाठी सातारा शहर पोलिसांनी पाऊल उचलले आहे. गर्दीचे फलाट तसेच विनावाहक विनाथांबा सेवा थांब्याजवळ साध्या वेषातील तसेच वर्दीतील पोलीस तैनात करण्यात आले आहेत. रिमझिम पावसात शनिवारी पोलीस कर्मचारी गर्दीचे नियमन करताना दिसल्याने प्रवासी वर्गाला दिलासा मिळाला. दिवाळीच्या हंगामामध्ये सलग दोन दिवसांत गर्दीचा फायदा घेऊन दोन महिलांच्या […] The post Satara : एसटी बसस्थानक परिसरात वाढली पोलीस गस्त appeared first on Dainik Prabhat .
Satara : शिरवळचा लौकिक वाढविणारा घनकचरा प्रकल्प दिशादर्शक
खंडाळा :शिरवळ समृध्दी अंतर्गत असलेला घनकचरा प्रकल्प व शिरवळचे सरपंच रविराज दुधगावकर यांनी सामाजिक बांधिलकी जोपासून दूरदृष्टी ठेवून उभारलेला प्रकल्प दिशादर्शक असून शिरवळचा नावलौकिक वाढविणारा आहे, असे मत राजस्थानमधील अल्वर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव साळुंखे यांनी व्यक्त केले. राजस्थानमधील पंचायत राज विभाग व महाराष्ट्राचे राज्य पाणी व स्वच्छता मिशन यांच्या निर्देशानुसार जिल्हा परिषदेच्या […] The post Satara : शिरवळचा लौकिक वाढविणारा घनकचरा प्रकल्प दिशादर्शक appeared first on Dainik Prabhat .
Pune : …अन्यथा बेकऱ्यांवर कारवाई होणार
पर्यावरण विभाग उपआयुक्तांचा बैठकीत इशारा पुणे – हरित इंधनाचा वापर न करणाऱ्या बेकऱ्या, हॉटेल्स आणि खाद्यपदार्थ व्यवसायिकांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पुणे महापालिकेच्या पर्यावरण विभागाने दिला आहे. उपआयुक्त (पर्यावरण) रवी पवार यांच्या अध्यक्षतेखाली बेकरी असोसिएशनची बैठक झाली. या बैठकीत स्वच्छ व हरित इंधनाचा वापर करून शहरातील हवा प्रदूषण कमी करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याबाबत चर्चा […] The post Pune : …अन्यथा बेकऱ्यांवर कारवाई होणार appeared first on Dainik Prabhat .
Pune District : इच्छुकांची निवडणूक लढविण्याची तयारी पूर्ण ?
रांजणी : बऱ्याच कालावधीपासून प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा पुढील आठवड्यात राज्य निवडणूक आयोगाकडून करण्यात येणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबतची संदिग्धता आता संपली आहे. त्यामुळे आता जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका व महापालिका निवडणुकीची धामधूम लवकरच सुरू होईल. ग्रामीण भागात तर, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक लढविण्याची तयारी पूर्ण केल्याचे चित्र […] The post Pune District : इच्छुकांची निवडणूक लढविण्याची तयारी पूर्ण ? appeared first on Dainik Prabhat .
Khalapur : ताकईमधील बोंबल्या विठोबाच्या यात्रेवर पावसाचे सावट
खालापूर – धाकटी पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ताकई येथील बोंबल्या विठोबाच्या यात्रेवर सध्या अवकाळी पावसाचे सावट आले असून, यात्रेच्या तयारीवर पावसाने पाणी फेरले आहे. मुसळधार पावसामुळे दुकानांचे गाळे, आकाशपाळणे आणि मनोरंजनाच्या साधनांची उभारणी ठप्प झाली आहे. त्यामुळे यात्रेतील व्यापाऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे. संत तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ताकई गावातील […] The post Khalapur : ताकईमधील बोंबल्या विठोबाच्या यात्रेवर पावसाचे सावट appeared first on Dainik Prabhat .
Pune District : तळेगाव गटात उमेदवारीचा पेच कायम
तळेगाव ढमढेरे : आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरूर तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले आणि राजकीय दृष्ट्या प्रभावशाली ठरलेले तळेगाव ढमढेरे गाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या गावात सर्वच प्रमुख राजकीय पक्षांचे (भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही गट, काँग्रेस, शिवसेना दोन्ही गट, मनसे, आरपीआय, बसप) पदाधिकारी, कार्यकर्ते आणि माजी सदस्य आहेत. तरीदेखील यंदा गावातून एकही उमेदवार […] The post Pune District : तळेगाव गटात उमेदवारीचा पेच कायम appeared first on Dainik Prabhat .
Talegaon Dabhade : तळेगाव दाभाडे नगर परिषद निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी जाहीर
तळेगाव दाभाडे– तळेगाव दाभाडे नगर परिषद निवडणूक २०२५ साठीची अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे. शासनाच्या आदेशानुसार मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी ही यादी नगर परिषद कार्यालयात प्रसिद्ध केली. या यादीत एकूण ६४,६७८ मतदारांची नोंद असून, त्यात पुरुष मतदार ३३,३०१, महिला मतदार ३१,३७५, आणि इतर मतदार २ आहेत. मागील पंचवार्षिक निवडणूक सन २०१६ मध्ये झाली […] The post Talegaon Dabhade : तळेगाव दाभाडे नगर परिषद निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी जाहीर appeared first on Dainik Prabhat .
Pune District : राष्ट्रवादीतील फूट व भाजपची कमी झालेली ताकद
शिक्रापूर : शिरूर तालुक्याच्या राजकारणात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फूट पडलेली असताना, भारतीय जनता पक्षाची स्थानिक पातळीवरील कमकुवत झालेली संघटनात्मक स्थिती, हे दोन प्रमुख घटक आगामी नगरपरिषद, नगरपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये अनिश्चितता निर्माण करत आहेत. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रित असताना, त्यांची लढत भाजप आणि शिवसेनेसोबत होऊन स्थानिक संस्थांवर राष्ट्रवादीचे वर्चस्व राहिले […] The post Pune District : राष्ट्रवादीतील फूट व भाजपची कमी झालेली ताकद appeared first on Dainik Prabhat .
ऐतिहासिक महिला क्रिकेट वर्ल्डकप २०२५ मध्ये प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका
नवी मुंबई : महिला क्रिकेट वर्ल्डकप २०२५ स्पर्धेचा अंतिम सामना (फायनल मॅच) नवी मुंबईच्या डी. वाय पाटील स्टेडियममध्ये आज म्हणजेच रविवार २ नोव्हेंबर २०२५ रोजी रंगणार आहे. या सामन्यासाठी भारत आणि दक्षिण आफ्रिकेचा संघ आमनेसामने असेल. या सामन्याचा विजेता पहिल्यांदाच महिला क्रिकेट वर्ल्डकपवर स्वतःचे नाव कोरणार आहे. यामुळे या ऐतिहासिक सामन्याचे महत्त्व वाढले आहे. भारतीय महिला क्रिकेट तिसऱ्यांदा वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. याआधी २०१७ आणि २००५ मध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाला वर्ल्डकप स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. यामुळे यावेळी तरी भारत विश्वविजेता होईल अशी आशा भारतीय क्रिकेटप्रेमी बाळगून आहेत. महिला क्रिकेट वर्ल्डकपच्या इतिहासात २०१७ मध्ये इंग्लंडमध्ये लॉर्ड्स येथे अंतिम सामना झाला. हा सामना इंग्लंडने नऊ धावांनी जिंकला होता. याआधी २००५ मध्ये दक्षिण आफ्रिकेतील सेंच्युरियनच्या सुपरस्पोर्ट पार्कवर अंतिम सामना झाला होता. हा सामना ऑस्ट्रेलियाने ९८ धावांनी जिंकला होता. या दोन्ही सामन्यांत भारत उपविजेता झाला होता. यामुळे आता तिसऱ्यांदा अंतिम सामन्यात खेळत असलेला भारतीय महिला क्रिकेट संघ यावेळी तरी विश्वविजेता होतो का याबाबत क्रिकेटप्रेमींमध्ये उत्सुकता आहे.भारताकडे स्मृती मंधाना आणि हरमनप्रीत कौर हे दोन अनुभवी खेळाडू आणि जागतिक दर्जाचे फिरकीपटू आहेत. तर ऑस्ट्रेलियाकडे लॉरा वॉल्वार्डट आणि मॅरिझॅन कॅप सारखे उत्तम फलंदाज आहेत. त्यांची फलंदाजी आणि गोलंदाजी खूप चांगली आहे. भारताच्या तुलनेत उत्तम कामगिरीच्या बाबतीत ऑस्ट्रेलियाचे सातत्य दिसून येत. भारत क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत तर ऑस्ट्रेलिया फिरकी मारा करण्याच्या बाबतीत कमकुवत आहे. यामुळे अंतिम सामन्याविषयी उत्सुकता वाढू लागली आहे. भारत : हरमनप्रीत कौर (कर्णधार), रिचा घोष (विकेटकीपर), शफाली वर्मा, स्मृती मंधाना, जेमिमा रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा, अमनजोत कौर, राधा यादव, क्रांती गौड, श्री चरणी, रेणुका सिंग ठाकूर, स्नेह राणा, हरलीन देओल, अरुंधती रेड्डी, उमा छेत्रीऑस्ट्रेलिया : लॉरा वॉल्वार्डट (कर्णधार), सिनालो जाफ्ता (यष्टीरक्षक), तझमीन ब्रिटिश्स, अँनेके बॉश, सुन लुस, मॅरिझॅन कॅप, अँनेरी डर्कसेन, क्लो ट्रायॉन, नॅडिन डी क्लार्क, अयाबोंगा खाका, नॉनकुलुलेको म्लाबा, मसाबाटा क्लास, तुमी सेखुखुने, नोंडुमिसो शांगसे, कराबो मेसोअंतिम सामन्याचे वेळापत्रकदिनांक : रविवार, २ नोव्हेंबरस्थळ : डी. वाय. पाटील स्टेडियम (D. Y. Patil Stadium), नवी मुंबईसामन्याची वेळ : दुपारी ३:०० वाजता (भारतीय वेळेनुसार) टॉस दुपारी २:३० वाजतास्टेडियममध्ये प्रेक्षकांची गर्दी होणे अपेक्षित आहे, कारण याच मैदानावर भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध उपांत्य फेरीत विक्रमी विजय मिळवला होता. भारतीय महिला संघ (Team India) तिसऱ्यांदा वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. यापूर्वी २००५ आणि २०१७ मध्ये भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) हा पहिलाच वर्ल्ड कप फायनल आहे. त्यामुळे, दोन्ही संघांना पहिल्यांदाच जागतिक विजेतेपद जिंकण्याची सुवर्णसंधी (Golden Opportunity) मिळाली आहे. दोन्ही संघ उत्कृष्ट फॉर्ममध्ये असून इतिहास रचण्यासाठी सज्ज आहेत.सामना लाईव्ह कुठे पाहाल ?हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रसारित (Live Telecast) केला जाईल. याव्यतिरिक्त, चाहते हा सामना जिओ सिनेमा (Jio Cinema) आणि हॉटस्टार (Hotstar) ॲपवर 'मोफत लाईव्ह स्ट्रीमिंग' (Free Live Streaming) द्वारे पाहू शकतील.
सोमेश्वरनगर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात काँग्रेस पक्षात मोठी फूट पडत असून अनेक वरिष्ठ पदाधिकारी व तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. या प्रवेशामुळे एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जाणारा पुणे जिल्हा आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात काँग्रेस पक्षाची भक्कम पकड होती. २०१४ च्या […] The post Pune District : काँग्रेसचे पदाधिकारी राष्ट्रवादीच्या वाटेवर; जिल्ह्यात तालुकाध्यक्ष, कार्यकर्ते घड्याळ बांधणार हाती appeared first on Dainik Prabhat .
Pune : कागदी अहवाल नाचविणाऱ्या अधिकाऱ्यांना आयुक्तांनी सुनावले खडेबोल
आयुक्तांनी शहरातील समस्यांबाबतचे तब्बल अडीच हजार पुरावे दिले पुणे – शहरात कोणत्याही समस्या नसल्याचे कागदी अहवाल आयुक्तांच्या पुढ्यात मांडणाऱ्या विभाग प्रमुखांच्या डोळ्यांवरची झापड महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दूर केली आहे. शहराच्या वेगवेगळ्या भागात असलेल्या अडचणी आणि समस्या तब्बल अडीच हजारांहून अधिक फोटोंच्या माध्यमातून सादर करीत अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले तसेच तातडीने या समस्यांचे […] The post Pune : कागदी अहवाल नाचविणाऱ्या अधिकाऱ्यांना आयुक्तांनी सुनावले खडेबोल appeared first on Dainik Prabhat .

26 C