मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये हालचालींना वेग आला असून, राष्ट्रवादी काँग्रेसला वगळून भाजप-शिवसेना-रिपाइंने एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत भाजपचे मंत्री आशिष शेलार आणि मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत घोषणा केली. २२७ पैकी १५० हून अधिक जागा जिंकून मराठी महापौर बसवणे, हाच महायुतीचा फॉर्म्युला असल्याचे त्यांनी सांगितले.मंगळवारी भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांची संयुक्त बैठक भाजपच्या दादर येथील कार्यालयात आयोजित करण्यात आली. या बैठकीला भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम, मंत्री आशिष शेलार, अतुल भातखळकर, प्रविण दरेकर उपस्थित होते, तर शिवसेनेकडून माजी खासदार राहुल शेवाळे, आमदार प्रकाश सुर्वे आणि माजी नगरसेविका शितल म्हात्रे उपस्थित होते. त्याआधी भाजप आणि रिपाइंची बैठक झाली. दोन्ही बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना आशिष शेलार म्हणाले, देशाचा शत्रू दाऊद इब्राहिमशी संबंध असलेल्या व्यक्तीसोबत मांडीला मांडी लावून बसण्याची भाजपची इच्छा नाही. राष्ट्रवादीचे मुंबईतील नेते जर नवाब मलिक असतील तर त्यांच्यासोबत युती होणार नाही, असे बैठकीत ठरल्याचे शेलार यांनी नमूद केले.तर, अमित साटम यांनी सांगितले की, महापालिकेतील २२७ जागांवर महायुती म्हणून निवडणूक लढवली जाईल. जागा वाटपाबाबत कोणताही दावा करण्यात आलेला नाही. महायुतीचा महापौर मुंबईत विराजमान होण्यासाठी आणि १५० हून अधिक जागा जिंकण्यासाठी चर्चा झाली आहे. राष्ट्रवादीसोबत युती न करण्याचे कारण म्हणजे नवाब मलिक यांच्यावरील आरोप असल्याचे साटम यांनी स्पष्ट केले.जागा वाटपात कोणतेही मतभेद नाहीत - राहुल शेवाळेशिवसेना नेते राहुल शेवाळे यांनीही बैठकीनंतर माध्यमांना सांगितले की, महायुतीचा विजय कसा होईल यावर चर्चा झाली. २२७ पैकी १५० पेक्षा अधिक जागा जिंकून महायुतीचाच महापौर बसवणे हा फॉर्म्युला आहे. जागा वाटपात कोणतेही मतभेद नाहीत आणि चांगला समन्वय आहे. कोणत्याही परिस्थितीत महायुतीचाच भगवा फडकणार असल्याचे शेवाळे यांनी सांगितले.मुंबईचा महापौर मराठीच असेल - आशिष शेलारआशिष शेलार यांनी पुढे म्हटले की, मुंबई मराठी माणसांचीच आहे आणि महापौर हा मराठीच असेल. भाजप, शिवसेना आणि रिपाई यांची युती महायुती म्हणून निवडणूक लढेल. जागा वाटप अंतिम करण्यासाठी दोन दिवसांत पुन्हा बैठक होणार आहे. महायुतीने १५० प्लस जागा जिंकण्याचे उद्दिष्ट ठेवले असून, मुंबईकरांचा विश्वास संपादन करून जिंकण्याचा आमचा निर्धार आहे.
नागपूर महापालिका निवडणूक: १५१ जागांसाठी प्रशासन सज्ज, दुबार मतदारांवर विशेष नजर
नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे. मनपा आयुक्त अभिजित चौधरी यांनी आज पत्रकार परिषदेत निवडणुकीच्या तयारीचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी त्यांनी १५१ सदस्यांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत पारदर्शकता राखण्यासाठी आणि बोगस मतदान रोखण्यासाठी प्रशासनाने कंबर कसल्याचे स्पष्ट केले.निवडणूक प्रक्रिया आणि तयारीआगामी निवडणूक ही १५१ जागांसाठी होणार असून, यासाठी अंदाजे २१०० ते ३००० मतदान केंद्रे असण्याची शक्यता आहे. या मतदान केंद्रांची अंतिम यादी येत्या २० तारखेला जाहीर करण्यात येईल, असे आयुक्तांनी सांगितले. विधानसभेच्या मतदार यादीनुसारच महापालिकेची मतदार यादी ग्राह्य धरली जाणार आहे. सध्या ईव्हीएम (EVM) मशीन्स प्राप्त झाल्या नसल्या तरी, प्रत्येक मतदान केंद्रावर ३ बॅलेट युनिट लागतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.९५ हजार दुबार मतदार रडारवरनिवडणुकीतील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे दुबार मतदारांचा (Duplicate Voters). नागपूर शहरात तब्बल ९५ हजार दुबार मतदार आढळून आले आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी आयोगाकडून एक स्वतंत्र यादी मनपाला प्राप्त झाली आहे. याबाबत माहिती देताना आयुक्त चौधरी म्हणाले, दुबार मतदारांची यादी आमच्याकडे असून फोटोद्वारे त्यांचे व्हेरिफिकेशन (Verification) केले जाईल. संबंधित मतदाराला कोणत्याही एकाच केंद्रावर मतदान करण्याची परवानगी असेल. त्यांच्याकडून तसा फॉर्म भरून घेतला जाईल, जेणेकरून ते दुसऱ्या ठिकाणी मतदान करू शकणार नाहीत. प्रशासनाच्या या पवित्र्यामुळे बोगस मतदानाला आळा बसणार आहे.खर्च मर्यादा आणि सोशल मीडियायंदाच्या निवडणुकीत उमेदवारांसाठी खर्चाची मर्यादा १५ लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, सध्याच्या डिजिटल युगात सोशल मीडियावरून होणाऱ्या प्रचारावरही आयोगाचे लक्ष असणार आहे. सोशल मीडियावरील प्रचारासाठी होणारा खर्च उमेदवाराच्या एकूण निवडणूक खर्चात जोडला जाईल, असे स्पष्ट संकेत आयुक्तांनी दिले आहेत.आरक्षण आणि कायदेशीर बाबीही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया न्यायालयाच्या निर्णयाला अधीन राहून पार पडणार आहे. नागपूर महानगरपालिकेत सध्या आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांच्या वर गेली आहे (Crossed 50% reservation limit). मात्र, याबाबत निवडणूक आयोगाकडून अद्याप कोणतीही स्पष्ट सूचना किंवा माहिती आली नसल्याचे आयुक्तांनी सांगितले.आचारसंहिता आणि इतर निर्बंधनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात आचारसंहितेची कडक अंमलबजावणी सुरू झाली आहे. आचारसंहितेचा भंग करणारे होर्डिंग्स आणि बॅनर्स काल सायंकाळपासूनच हटवण्याचे काम वेगाने सुरू आहे. दरम्यान, विधानसभेप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांना 'घरी बसून मतदान' (Vote from Home) करण्याची सुविधा मिळणार की नाही, याबाबत आयोगाकडून अद्याप कोणतीही सूचना प्राप्त झालेली नाही. त्यामुळे तूर्तास तरी मतदारांना मतदान केंद्रावर जाऊनच हक्क बजावावा लागेल, असे दिसते.
मेस्सीला न भेटता अनुष्का आणि विराट कोहली महाराजांच्या भेटीला
वृंदावन : भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी नुकतीच वृंदावनमधील प्रसिद्ध संत प्रेमानंद महाराजांच्या मठाला भेट दिली. या भेटीदरम्यानचे क्षण सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.विराट आणि अनुष्का हे दोघेही प्रेमानंद महाराजांचे भक्त आहेत. नुकत्याच व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दोघेही महाराजांसमोर जमिनीवर बसून हात जोडून संवाद साधताना दिसत आहेत. या भेटीदरम्यान महाराजांनी ईश्वराशी जोडलेले राहण्याचा संदेश दिला. त्यांचे विचार ऐकताना अनुष्का शर्मा भावुक झाल्याचे दिसून आले असून, तिच्या डोळ्यात अश्रू तरळताना स्पष्ट दिसत आहेत.या वेळी दोघांचाही साधेपणा विशेष लक्ष वेधून घेत होता. अनुष्काने साधा ड्रेस, शॉल आणि गळ्यात तुळशीची माळ परिधान केली होती. तर विराट कोहलीही तुळशीची माळ घालून महाराजांसमोर नम्रपणे बसलेला दिसत होता. महाराजांच्या उपदेशानंतर अनुष्काने “तुम्ही आमचे आहात महाराज” असे म्हटले असता, महाराजांनी “आपण सर्व ईश्वराचे आहोत” असे उत्तर दिले.काही दिवसांपूर्वी अनुष्का भारतात आल्याने ती खासगी कारणांसाठी किंवा एखाद्या कार्यक्रमासाठी आले असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र, दरवर्षीप्रमाणे यंदाही हिवाळ्यात विराट आणि अनुष्का प्रेमानंद महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी वृंदावनात आल्याचे स्पष्ट झाले आहे. या भेटीमुळे विराट–अनुष्काच्या अध्यात्मिक जीवनाची पुन्हा एकदा चर्चा रंगली असून, त्यांचा हा व्हिडीओ चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
देवांनाही गरज असते विश्रांतीची.! बांके बिहारी मंदिराबाबत सर्वोच्च न्यायालयाचे विधान
Supreme Court | Banke Bihari temple – मंदिरांमध्ये सशुल्क विशेष पूजा करण्यास परवानगी दिल्याबद्दल आणि त्यामुळे देवतेच्या विश्रांतीच्या वेळेत व्यत्यय येत असल्याबद्दल नाराजी व्यक्त करत, सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी वृंदावन येथील बांके बिहारी जी मंदिरातील दर्शनाच्या वेळा आणि मंदिराच्या प्रथांमधील बदलांना आव्हान देणाऱ्या याचिकेवर अधिकाऱ्यांकडून उत्तर मागवले. सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या मंदिर व्यवस्थापन समितीला आणि उत्तर […] The post देवांनाही गरज असते विश्रांतीची.! बांके बिहारी मंदिराबाबत सर्वोच्च न्यायालयाचे विधान appeared first on Dainik Prabhat .
मुंबई : राज्यात सत्ताधारी महायुती धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन करण्यासाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील युतीपासून जाणीवपूर्वक दूर ठेवत असल्याचा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. वडेट्टीवार म्हणाले, राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुका १५ जानेवारी रोजी होणार आहेत. भाजप आणि शिंदेसेना या निवडणुका एकत्र लढवतील, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या युतीचा […] The post Vijay Wadettiwar : धर्मनिरपेक्ष मतांच्या विभाजनासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला युतीबाहेर ठेवले; विजय वडेट्टीवार यांचा दावा appeared first on Dainik Prabhat .
मोदी सरकारला लागलेले वेड हे घातक, प्रियंका गांधी नेमकं काय म्हणाल्या?
नवी दिल्ली : केंद्र सरकारने ग्रामीण मजुरांना रोजगाराची हमी देत असलेल्या मनरेगा योजनेचे नाव बदलले आहे. पण त्यामुळे मूळ कायद्यांतर्गत अत्यंत गरीब लोकांना मिळणाऱ्या १०० दिवसांच्या रोजगाराची हमी कमकुवत होईल. चांगल्या चाललेल्या योजनांची नावे बदलण्याच्या बाबतीत मोदी सरकारला लागलेले वेड हे आकलनापलिकडचे आहे, असे वक्तव्य काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा यांनी केले आहे. मोदी सरकारने […] The post मोदी सरकारला लागलेले वेड हे घातक, प्रियंका गांधी नेमकं काय म्हणाल्या? appeared first on Dainik Prabhat .
मोठी बातमी : एचडीएफसी बँकेच्या इंडसइंड बँकतील ९.५% हिस्सा खरेदीसाठी आरबीआयकडून मान्यता
मुंबई: एचडीएफसी या देशातील सर्वात मोठ्या बँकेला आरबीआयने इंडसइंड बँकेत ९.५% इतके भागभांडवल खरेदी करण्यासाठी मान्यता दिली आहे. त्यामुळे आता टप्प्याटप्प्याने एचडीएफसी इंडसइंड बँक हे भागभांडवल खरेदी करेल अशी प्राथमिक माहिती पुढे आली आहे. आज १५ डिसेंबरपर्यला आपल्या अधिसूचनेत आरबीआयने हे स्पष्ट केले असून काही अटीशर्तीसह ही मान्यता दिली आहे. १ वर्षाच्या आत हिस्सा खरेदीचा व्यवहार बँकेला करावा लागणार आहे. तो मर्यादित कालावधीत पूर्ण न झाल्यास मात्र हा करार रद्दबादल करण्यात येईल असे आरबीआयने नमूद केले. याशिवाय आरबीआयने दिलेल्या मुख्य अधिसूचनेनुसार एचडीएफसीला इंडसइंड बँकेच्या संचालक मंडळात आपला संचालक (Director) बसवता येणार नाही असेही आरबीआयने स्पष्ट केले.बँकिंग व सिक्युरिटीज रेग्युलेटरीमधील अधिनियमानुसार एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार इंडसइंड बँकेने म्हटले आहे की,'आम्ही तुम्हाला कळवू इच्छितो की भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) १५ डिसेंबर २०२५ रोजीच्या पत्राद्वारे एचडीएफसी बँकेला (अर्जदार) इंडसइंड बँकेच्या पेड-अप शेअर भांडवलाच्या किंवा मतदानाच्या हक्कांच्या ९.५०% 'एकूण हिस्सा' संपादित करण्यास मंजुरी दिली आहे.यासह एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, आरबीआयने दिलेली मंजुरी ही बँकिंग नियमन कायदा १९४९, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (व्यावसायिक बँका - शेअर्स किंवा मतदानाच्या हक्कांचे संपादन आणि धारण) निर्देश, २०२५ दिनांक २८ नोव्हेंबर २०२५ नुसार (ज्यामध्ये वेळोवेळी सुधारणा करण्यात आल्या आहेत),व परकीय चलन व्यवस्थापन कायदा, १९९९ च्या तरतुदी तसेच सेबीने जारी केलेले नियम आणि इतर कोणतेही लागू असलेले कायदे, नियम आणि मार्गदर्शक तत्त्वे यांच्या पालनाच्या अधीन असेल' असेही बँकेंने म्हटले आहे.अर्जदाराने (HDFC) हे सुनिश्चित केले पाहिजे की बँकेतील 'एकूण हिस्सा' कोणत्याही परिस्थितीत बँकेच्या पेड-अप शेअर भांडवलाच्या किंवा मतदानाच्या हक्कांच्या ९.५०% जास्त होणार नाही. जर 'एकूण हिस्सा' ५% पेक्षाही कमी झाला तर तो बँकेच्या एकूण पेडअप शेअर भांडवलाच्या किंवा मतदानाच्या हक्कांच्या ५% किंवा त्याहून अधिक करण्यासाठी आरबीआयची पूर्वपरवानगी आवश्यक असेल असे फायलिंगमध्येम्हटलेआहे.
कोहिनुर ग्रुपतर्फे ‘पुस्तक’प्रतिकृतीतून ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’करत वाचन संस्कृतीचा जागर
खडकी (पुणे) – खडकी शिक्षण संस्थेच्या टिकाराम जगन्नाथ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात (स्वायत्त), खडकी–पुणे येथे पुणे पुस्तक महोत्सवाच्या अंतर्गत वाचनसंस्कृतीला जागतिक व्यासपीठावर नेणारा अभूतपूर्व आणि विश्वविक्रमी उपक्रम कोहिनुर ग्रुपतर्फे साकारण्यात आला. “शांतता पुणेकर वाचत आहेत” या संकल्पनेवर आधारित, वाचन चळवळीत सहभागी झालेल्या वाचकांचे पुस्तक वाचतानाचे छायाचित्र वापरून मराठी देवनागरी लिपीत ‘पुस्तक’ या शब्दाची भव्य […] The post कोहिनुर ग्रुपतर्फे ‘पुस्तक’ प्रतिकृतीतून ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’ करत वाचन संस्कृतीचा जागर appeared first on Dainik Prabhat .
Four-day workweek: भारतातही 4 दिवस काम आणि 3 दिवस सुट्टी? सरकारने जाहीर केली संपूर्ण योजना
Four-day workweek: देशात ‘फोर डे वर्कवीक’ म्हणजेच आठवड्यातून फक्त चार दिवस काम करण्याची आणि तीन दिवस पगारी सुट्टी घेण्याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. याबद्दल कामगार मंत्रालयाने (Labour Ministry) नुकतेच अत्यंत महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे. मंत्रालयाने सांगितले आहे की, नवीन कामगार संहिता (New Labour Codes) लागू झाल्यामुळे कंपन्यांना आठवड्यातील कामाचे तास वेगवेगळ्या पद्धतीने विभागण्याची लवचिकता […] The post Four-day workweek: भारतातही 4 दिवस काम आणि 3 दिवस सुट्टी? सरकारने जाहीर केली संपूर्ण योजना appeared first on Dainik Prabhat .
छत्रपती संभाजीनगर : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्याकांडाला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतरही न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या कुटुंबीयांना नवे संकट उभे राहिले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड याच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आज (१६ डिसेंबर) उर्वरित युक्तिवाद होणार आहे. शुक्रवारी अर्धवट राहिलेल्या सुनावणीनंतर आज निकालाची शक्यता वर्तवली […] The post Santosh Deshmukh Murder Case : वाल्मिक कराड सुटणार अन् त्यांची हत्तीवरुन मिरवणूक काढणार अशा अफवा; धनंजय देशमुखांची तक्रार appeared first on Dainik Prabhat .
तारीख : 16 डिसेंबर, वार: मंगळवार. वेळ: पहाटे 3.33 वाजता. मथुरेतील यमुना एक्सप्रेस-वेवर धुक्यामुळे 8 बस आणि 3 गाड्यांची धडक झाली. धडक होताच गाड्यांना आग लागली. आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला आहे, 66 जखमी आहेत. प्रत्यक्षदर्शींच्या मते, धडक होताच बॉम्बसारखा स्फोट झाला. बसमधील लोक ओरडत राहिले. अनेकांनी काच फोडून खिडकीतून उड्या मारल्या. बचावकार्य एका तासानंतर सुरू झाले. दिव्य मराठीची टीम घटनास्थळी पोहोचली तेव्हा बस जळत होत्या. अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितले- जर पोलिस आणि अग्निशमन दल वेळेवर पोहोचले असते तर अनेक लोकांचे प्राण वाचले असते, मी ज्या बसमध्ये होते, त्यात 8 ते 9 लोक मरण पावले आहेत. 4 मुद्द्यांमध्ये समजून घ्या, बचावकार्य कसे झाले आता प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे वाचा- गावकऱ्यांनी सांगितले- 20 ॲम्ब्युलन्समधून 150 लोकांना पाठवण्यात आले. अपघाताच्या ठिकाणाजवळच्या गावातील रहिवासी भगवान दास यांनी सांगितले- जेव्हा अपघात झाला तेव्हा धुके कमी होते. गाड्या एकमेकांवर आदळल्या तेव्हा असे वाटले, जणू काही बॉम्बच फुटला असेल. मोठा स्फोट झाला. संपूर्ण गाव घाईघाईने येथे धावत आले. सर्व लोक मदतीला धावले. सुमारे 20 ॲम्ब्युलन्समधून 100-150 लोकांना रुग्णालयात नेण्यात आले. दोन-तीन कार आणि 6 बस जळाल्या आहेत. सुनील म्हणाले- गाडीतून आवाज आला म्हणून गाडी थांबवली, मागून अनेक बस एकमेकांवर आदळल्या. प्रत्यक्षदर्शी सुनील कुमार यादव यांनी सांगितले- आम्ही मंत्री गिरीश चंद्र यादव यांच्या वडिलांच्या तेराव्याच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जौनपूरला गेलो होतो, तिथून दिल्लीला परत येत होतो. महामार्गावर खूप अंधार होता. अचानक गाडीतून आवाज येऊ लागला, आम्ही गाडी थांबवली आणि दरवाजा उघडून खाली उतरलो. मागून बस एकामागून एक आदळू लागल्या. घटनास्थळी आरडाओरडा सुरू झाला. कुणी बसमधून उतरण्यासाठी धडपड करत होते, तर कुणी काच फोडून उड्या मारत होते. महिला म्हणाली- धक्का बसला, मग गाड्यांना आग लागली. अपघाताची प्रत्यक्षदर्शी महिला म्हणाली- आधी अचानक जोरदार धक्का बसला आणि बघता बघता गाड्यांना आग लागली. टक्कर झाल्यानंतर एकच गोंधळ उडाला, लोक ओरडू लागले आणि काही क्षणातच बस आणि कारमधून धूर व आगीच्या ज्वाळा बाहेर पडू लागल्या. आसपासच्या लोकांनी तात्काळ मदत सुरू केली आणि जखमींना बाहेर काढण्याचा प्रयत्न करू लागले. सफारीमधील युवक म्हणाला- अयोध्येहून दिल्लीला जात होतो. सफारी कारमधील एका युवकाने सांगितले- मी अयोध्येहून दिल्लीला जात होतो. गाडीत सर्वजण झोपले होते. अचानक जोरदार धक्का बसला आणि कार धडकली. तेव्हा आम्हाला कळले की अपघात झाला आहे. सिलेंडर स्फोटासारखे धमाके होत होते, लोक पळताना दिसले. लखनौहून दिल्लीला जाणाऱ्या प्रशांत सिंह यांनी सांगितले- सकाळी साधारण 4 वाजता आम्ही आग्राच्या पुढे निघालो. अचानक बस थांबली, लोक ओरडू लागले. बसचा दरवाजा अडकला होता, तो ढकलून उघडला. महिला आणि मुलांना मदत केली. खाली येऊन पाहिले तर पुढे अनेक बसेस होत्या. काहींना आग लागली होती. अचानक धमाके होऊ लागले, जसे- सिलेंडर फुटत असावेत. अनेक प्रवाशांचे मोबाईल, लॅपटॉपही बसमध्ये जळून खाक झाले आहेत. तो प्रसंग आठवला की भीती वाटते. बचावकार्यात असलेल्या तरुणाने सांगितले- 8-9 मृतदेह बाहेर काढले. घटनास्थळी प्रशासनाला मदत करणाऱ्या योगेंद्रने सांगितले- रोज धावण्यासाठी येतो. आज आलो तेव्हा हाहा:कार माजला होता, त्यामुळे प्रशासनाच्या मदतीला लागलो. आतापर्यंत 8-9 मृतदेह बाहेर काढले आहेत. ज्यांना आम्ही गाड्यांमधून बाहेर काढले, ते सर्व खूप वाईट रीतीने जळाले होते. अपघाताची आठवण करून साक्षीदार घाबरले, म्हणाले- कधीच विसरू शकणार नाही. बसने दिल्लीला जाणाऱ्या महिमा पांडेने सांगितले- सर्वात आधी इर्टिगा कारची धडक झाली. त्यानंतर बस एकमेकांवर आदळल्या. माझ्या बसला तीन वेळा धडक बसली. मग आग लागली. माझे सर्व सामान जळून खाक झाले. हा भयानक अपघात मी कधीच विसरू शकणार नाही. रेस्क्यूचे 3 फोटो पाहा- अपघाताची बातमी वाचा- मथुरेत 8 बसेस- 3 कारची धडक, 13 जण जिवंत जळाले:शरीराचे तुकडे 17 पॉलिथिन बॅगमध्ये नेले; यमुना एक्सप्रेस- वेवर धुक्यामुळे भीषण अपघात, 70 जखमी मथुरेतील यमुना एक्सप्रेस-वेवर धुक्यामुळे 7 बस आणि 3 गाड्यांची धडक झाली. धडक होताच गाड्यांना आग लागली. 4 जणांचा जळून मृत्यू झाला. मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा आणखी वाढू शकतो, कारण दिव्य मराठीचे रिपोर्टर घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना बसमध्ये मानवी अवयव अडकलेले दिसले. वाचा सविस्तर बातमी...
Nitin Nabin : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्यासमोर आहेत ‘ही’मोठी आव्हाने
नवी दिल्ली : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्यासोबतच उत्तर प्रदेश आणि बिहारसारख्या राज्यांमध्ये अध्यक्षांचीही घोषणा करण्यात आली आहे. पक्षाने ज्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत त्या राज्यांसाठी प्रभारी नियुक्त केले आहेत. पुढील वर्षी आसाम आणि पश्चिम बंगालसारख्या राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या तयारीसाठी हे एक मोठे पाऊल मानले जात आहे. भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष […] The post Nitin Nabin : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्यासमोर आहेत ‘ही’ मोठी आव्हाने appeared first on Dainik Prabhat .
Prajakta Gaikwad । Shambhuraj Khutwad | मराठी मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकार मंडळी विवाहबंधनात अडकत आहे. अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडनेही शंभूराज खुटवड यांच्याशी आपली लग्नगाठ बांधली. त्यांच्या शाहीविवाह सोहळ्याचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. या जोडप्याने एन्ट्री अविस्मरणीय आणि रॉयल होती. मात्र या एण्ट्रीमुळे प्राजक्ताला नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे. प्राजक्ता आणि शंभूराजनं एका अवाढव्य […] The post Prajakta Gaikwad : नंदीवरुन बसून एन्ट्री, शंकराला पायी चालवलं… लग्नातील एन्ट्रीबाबत प्राजक्ताचं स्पष्टीकरण, “आता आमच्या लग्नामुळे हे ट्रेंडमध्ये येईल…” appeared first on Dainik Prabhat .
KKR buys Cameron Green for Rs 25.2 crore : आयपीएलच्या १९ व्या हंगामासाठी अबू धाबी येथे सुरू असलेल्या लिलावात ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू कॅमेरून ग्रीन याच्यावर अपेक्षेप्रमाणे मोठी बोली लागली आहे. कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघाने त्याला आपल्या ताफ्यात सामील केले आहे. या लिलावासाठी सर्वाधिक पर्स असलेल्या केकेआरने ग्रीनला आपल्या संघात घेण्यासाठी तब्बल २५ कोटी २० […] The post IPL Auction 2026 : कॅमेरून ग्रीनला २५.२ कोटींची बोली, पण मिळणार फक्त १८ कोटी; BCCI चा ‘हा’ नियम कारणीभूत! appeared first on Dainik Prabhat .
Madhuri Elephant : नांदणी मठाची माधुरी हत्तीण परत येणार; कोर्टाकडून मिळाली परवानगी
Madhuri Elephant : माधुरी हत्तीणीच्या (Madhuri Elephant) बाबतीत एक मोठी अपडेट समोर आली आहे. माधुरी हत्तीणीला नांदणी मठात आणण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. उच्चाधिकार समितीसमोर आज मुंबईत सुनावणी झाली. या सुनावणीत मठाच्या जागेत पुनर्वसन केंद्र उभारण्यास आवश्यक त्या सर्व परवानग्या देण्यात आल्या आहेत. निर्देशानुसार उच्चस्तरीय समितीकडून डॉक्टर मनोहरण यांच्या अध्यक्षतेखालील तपासणी समितीने माधुरीच्या एकंदरीत […] The post Madhuri Elephant : नांदणी मठाची माधुरी हत्तीण परत येणार; कोर्टाकडून मिळाली परवानगी appeared first on Dainik Prabhat .
दिग्पाल लांजेकर यांच्या श्री शिवराज अष्टकातील सहावे पुष्प भेटीला
‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ चित्रपटाचा दमदार टिझरछत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य उभारणीत त्यांच्या तेजस्वी पराक्रमासोबत त्यांचे बुद्धिचातुर्य हा त्यांच्या संपूर्ण कार्याचा केंद्रबिंदू राहिला आहे. छत्रपती शिवाजी महाराज मुत्सद्दी योद्धे होते. असंख्य मोहिमांमधून ते अनेकदा सिद्ध झाले आहे.महाराजांनी गनिमी कावा ही कूटनीती अत्यंत प्रभावीपणे वापरली. शत्रू सावध नसतानाच त्याच्यावर घाला घालायचा, ही पद्धत तर महाराजांनी अनेक वेळा अतिशय यशस्वीरीत्या वापरली. औरंगजेबाचं मुघल साम्राज्य सर्वात मोठं आणि मजबूत साम्राज्य मानलं जायचं. अशा या साम्राज्याला शिवाजी महाराजांनी केवळ जोरदार हादराच दिला नाही, तर मुघल सम्राट औरंगजेबाची झोपही त्यांनी उडवली. आग्य्राला जाण्याचं निश्चित करणं आणि भर दरबारात मुघल साम्राज्याला निडरपणे आव्हान देणं हा स्वराज्याच्या उभारणीतील महत्त्वाचा अध्याय आहे. यात राजांची विचारसरणी, तल्लख बुद्धीमत्ता, गनिमी कावा, प्रसंगावधान राखून आखलेली रणनीती, शत्रूला गाफील ठेवून रक्ताचा एक थेंब ही न सांडता केलेला पराभव आदी गुण दिसतात. शिवचरित्रातील हा थरारक अध्याय ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ भव्य चित्रपटातून शिवजयंतीदिनी १९ फेब्रुवारीला आपल्यासमोर येणार आहे.महाराजांचा देदिप्यमान इतिहास आणि त्यातील ज्वलंत अध्याय लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या श्री शिवराज अष्टक संकल्पनेअंतर्गत रुपेरी पडद्यावर सादर झाले. या संकल्पनेतील सहावे चित्रपटरुपी पुष्प ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ या चित्रपटाचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. औरंगजेबाच्या बलाढ्य मुघलसत्तेचा पोलादी पहारा भेदून महाराजांनी घेतलेली मोठी जोखीम, औरंगजेबाच्या दरबारातील बाणेदार प्रसंग याची रोमांचकारी झलक या टिझर मधून दिसून येत आहे.पॅनोरमा स्टुडिओज आणि मुगाफी निर्मित ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ या भव्य चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांचे आहे. कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक (पॅनोरमा स्टुडिओज), विपुल अग्रवाल, जेनील परमार (मुगाफी), मुरलीधर छतवानी (पॅनोरमा स्टुडिओज) चित्रपटाचे निर्माते आहेत. सहनिर्माते रवींद्र औटी (पॅनोरमा स्टुडिओज), तान्शा बत्रा,आलोक शर्मा (मुगाफी)आहेत.छत्रपती शिवाजी महाराजांनी अत्यंत कठीण परिस्थितीतही हार मानली नाही, त्यांच्या शौर्याची, धैर्याची आठवण करून देत इतिहासाच्या सुवर्णपानांमध्ये दडलेला हा प्रेरणादायी अध्याय ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ चित्रपटाच्या माध्यमातून भव्य स्वरूपात आणण्याचा आनंद दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी व्यक्त केला आहे. पॅनोरमा स्टुडिओज या चित्रपटाचे जगभरात (वर्ल्ड वाईड) वितरण करणार आहे.
मोहित सोमण:आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात मोठी घसरण झाली आहे. मिड,स्मॉल, बँक, प्रायव्हेट बँक, रिअल्टी, आयटी, फायनांशियल सर्विसेस या क्षेत्रीय व व्यापक निर्देशांकातील घसरणीचा फटका आज मोठ्या प्रमाणात बाजारात बसला होता अखेरच्या सत्रातही तो कायम राहिला आहे. अखेरीस सेन्सेक्स ५३३.६० अंकांने घसरत ८४६७९.८६ व निफ्टी १६७.२० अंकांने घसरत २५८६०.१० पातळीवर स्थिरावला आहे. आज मोठ्या प्रमाणात खाजगी बँकेसह बँक निर्देशांकात घसरण झाल्याने सेन्सेक्स बँक निर्देशांकात ६८५.६३ अंकांनी घसरण झाली असून बँक निफ्टीत ४२७.४० अंकांची घसरण झाली आहे. मोठ्या प्रमाणात रूपयातील घसरणीसह परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी केलेल्या 'सेल ऑफ' चा फटका बाजारात बसला. घरगुती गुंतवणूकदारांना कुठला नवा ट्रिगर नसल्याने अस्थिरतेतून निर्माण झालेली दबाव पातळी कायम राहिली. यासह निफ्टी विकली एक्सपायरीसह सावधगिरीचा फटकाही कायम राहिला असून कमोडिटी बाजारातही मोठ्या प्रमाणात अस्थिरता आढळली. या एकत्रित कारणांमुळे शेअर बाजारात मोठी घसरण नोंदवली गेली आहे.अखेरच्या सत्रात ब्लू चिप्स निर्देशांकातील एचडीएफसी बँक, अँक्सिस बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा मोटर्स, इन्फोसिस, टीसीएस सारख्या शेअर्समध्ये घसरण झाली असून महिंद्रा अँड महिंद्रा, आयसीआयसीआय बँक,भारती हेक्साकॉम, टायटन, सिमेन्स इंजिनिअरिंग इंडस्ट्रीज यांसारख्या दिग्गज शेअर्समध्ये वाढ झाली आहे.विशेष बाब म्हणजे जवळपास सपाट (Flat) पातळीवर असलेला अस्थिरता निर्देशांक (VIX Volatility Index VIX) अखेरच्या सत्रापर्यंत २% घसरला असूनही बाजारातील परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची रोख विक्री शोषून घेण्यास घरगुती गुंतवणूकदार व बाजार अपयशी ठरला आहे. केवळ कंज्यूमर ड्युरेबल्स, व मिडिया निर्देशांकातील तेजीसह सपाट पातळीवर असलेल्या एफएमसीजीमुळे बाजाराला किरकोळ आधार मिळाला आहे.युएस बाजारातील फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपातीनंतर रूपया सातत्याने घसरण असताना युएस बाजारातील टेक शेअर्समध्ये गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढली असली तरी काल आगामी पेरोल रोजगार डेटा जाहीर होण्यापूर्वी गुंतवणूकदार सावध राहिल्याने युएस बाजारातील दोन बाजारात घसरण कायम राहिली होती. आज सुरूवातीच्या कलात युएस बाजारातील आज मात्र नासडाक (०.३६%), एस अँड पी ५०० (०.६८%) निर्देशांकात वाढ झाली असून डाऊ जोन्स (०.०२%) निर्देशांकात घसरण झाली. आशियाई बाजारातील अखेरच्या सत्रात घसरणीचा कल कायम राखला गेला आहे. गिफ्ट निफ्टी (०.६२%) सह जवळपास सगळ्याच निर्देशांकात घसरण झाली आहे. केवळ जकार्ता कंपोझिट (०.४२%) निर्देशांकात अखेरच्या सत्रात वाढ झाली असून सर्वाधिक घसरण निकेयी २२५ (१.४६%), कोसपी (२.२९%), हेंगसेंग (१.५८%) निर्देशांकात झाली आहे.अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ किर्लोस्कर ऑईल (८.०१%), टाटा टेलिकम्युनिकेशन (५.४%), त्रिवेणी इंजिनिअरिंग इंडस्ट्रीज (४.८५%), लीला पॅलेस हॉटेल (४.७६%), एल टी फूडस (४.५७%), सुप्रीम इंडस्ट्रीज (४.०९%), वेदांता (३.६५%), समभागात झाली असून सर्वाधिक घसरण ओला इलेक्ट्रिक (७.७६%), अँक्सिस बँक (५.०७%), इटर्नल (४.६९%), स्विगी (४.१५%), देवयानी इंटरनॅशनल (३.६१%), सन टीव्ही नेटवर्क (३.३०%), किर्लोस्कर ब्रदर्स (३.०४%), ब्रिगेड एंटरप्राईजेस (२.९१%), जेएसडब्लू स्टील (२.८९%) समभागात झाली आहे.आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले आहेत की,'सततच्या एफआयआयच्या विक्रीमुळे आणि जागतिक भावना कमकुवत झाल्यामुळे, भारतीय रुपयाच्या विक्रमी नीचांकी पातळीवर सतत घसरण झाल्याने, देशांतर्गत बाजार नकारात्मक क्षेत्रात ओढले गेले. स्मॉल आणि मिडकॅप्स लार्ज कॅप्सपेक्षा मागे पडले, आयटी, धातू, बँकिंग आणि रिअल्टीमध्ये तोटा झाला, तर उपभोग समभागांना मर्यादित आधार मिळाला. चलनातील चढउतार आणि परकीय गुंतवणूकीवरील अनिश्चिततेमुळे अस्थिरता वाढण्याची अपेक्षा आहे. अमेरिका-भारत व्यापार करार आणि रुपया स्थिरीकरणातील प्रगती महत्त्वाची असेल, तर वस्तूंच्या किमती कमी होणे आणि कमाईची दृश्यमानता सुधारणे ही रचनात्मक मध्यम-मुदतीची पार्श्वभूमी प्रदान करते.'आजच्या बाजारातील विशेषतः घसरलेल्या बँक निर्देशांकातील कामगिरीवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे वरिष्ठ तांत्रिक विश्लेषक वत्सल भुवा म्हणाले आहेत की,'मंगळवारीच्या सत्रात, बँक निफ्टी सावधगिरीने बंद झाला, मंदीचा कॅन्डलस्टिक बनला आणि त्याच्या १०-दिवसांच्या आणि २०-दिवसांच्या एसएमए (Simple Moving Average SMA) च्या खाली बंद झाला, जो अल्पकालीन दबाव दर्शवितो. आरएसआय (Relative Strength Index RSI) कमी टॉप बनवत आहे, जे कमकुवत गती आणि खरेदी शक्तीचा अभाव दर्शवते. एकंदरीत, चार्ट स्ट्रक्चर किंचित कमकुवत दिसते. निर्देशांकाला ५८८०० पातळीवर महत्त्वपूर्ण आधार आहे; याच्या खाली निर्णायक बंद झाल्यास ५८३००-५८२०० झोनमध्ये असलेल्या त्याच्या ५०-दिवसांच्या एसएमए (SMA)कडे नकारात्मक बाजू उघडू शकते. वरच्या बाजूला, तात्काळ प्रतिकार (Immediate Resistance) ५९३०० आणि ५९५०० पातळीवर आहे. जर निर्देशांक ५९५०० पातळीच्या वर बंद झाला तरच शाश्वत तेजीचा दृष्टिकोन सल्ला दिला जातो.'आजच्या बाजारातील निफ्टीतील परिस्थितीवर विश्लेषण करताना एलकेपी सिक्युरिटीजचे वरिष्ठ तांत्रिक विश्लेषक रूपक डे म्हणाले आहेत की,'दिवस मंदीला अनुकूल होता कारण निफ्टी संपूर्ण सत्रात तासिक चार्टवर २०० एसएमएच्या खाली राहिला. याव्यतिरिक्त, निर्देशांक सकाळच्या उच्चांकाची पुन्हा चाचणी घेण्यात अयशस्वी झाला, जो मंदीचे पूर्ण नियंत्रण दर्शवितो. नकारात्मक बाजूने, २५८७० वरील समर्थन भंग झाले, ज्यामुळे बाजारात मंदीची भावना तीव्र झाली. अल्पावधीत, निर्देशांक २५७०० आणि त्याहून कमी दिशेने खाली सरकू शकतो. वरच्या बाजूस, २५९५०-२६००० झोन नजीकच्या काळात एक महत्त्वाचा प्रतिकार म्हणून काम करण्याची शक्यता आहे.'
मोदी सरकार १२५ दिवसांची रोजगार गॅरेंटी देणारी योजना आणणार
दिल्ली : केंद्र सरकार मनरेगाच्या जागी नवीन रोजगार योजना आणण्याच्या तयारीत आहे. नरेंद्र मोदी सरकार महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेऐवजी विकसित भारत – रोजगार आणि आजीविका गॅरंटी मिशन (ग्रामीण) विधेयक २०२५ लोकसभेत मांडणार आहे. या नव्या योजनेला VB-G RAM G बिल असे नाव देण्यात आले आहे. मनरेगा २००५ पासून सुरू असून आता त्यात मोठे बदल करण्यात येणार आहेत.नवीन योजनेत खर्चाची जबाबदारी केंद्र आणि राज्य सरकारांवर असेल. सामान्य राज्यांसाठी खर्चाचा वाटा ६०:४०, तर ईशान्य व हिमालयीन राज्यांसाठी ९०:१० असा असेल. केंद्रशासित प्रदेशांचा संपूर्ण खर्च केंद्र सरकार उचलणार आहे. यामुळे काम आणि निधीच्या वापरावर अधिक नियंत्रण राहील, असा सरकारचा दावा आहे.या योजनेत शेतीच्या हंगामात सार्वजनिक कामे दिली जाणार नाहीत. वर्षातील सुमारे ६० दिवस काम बंद ठेवण्याची तरतूद असेल, जेणेकरून शेतकऱ्यांना मजुरांची कमतरता भासू नये. मात्र रोजगार हमीचे दिवस १०० वरून १२५ करण्यात आले आहेत. वेळेवर काम न दिल्यास मजुरांना बेरोजगारी भत्ता देणे राज्यांना बंधनकारक असेल.डिजिटल हजेरी, आधार आधारित पडताळणी आणि थेट बँक खात्यात पैसे देणे अनिवार्य करण्यात आले आहे. ग्रामपंचायत पातळीवर ‘विकसित ग्राम पंचायत प्लान’ तयार केला जाणार असून कामांच्या आधारे पंचायतांना A, B आणि C श्रेणी दिली जाईल. नैसर्गिक आपत्तीच्या काळातही या योजनेअंतर्गत काम दिले जाईल. यासाठी यंदा १.५१ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
मणिपूरमध्ये १४ दहशतवाद्यांना अटक, मोठा शस्त्रसाठा जप्त
इंफाळ : भारतीय लष्कर, आसाम रायफल्स आणि मणिपूर पोलीस यांनी डोंगराळ भागात संयुक्त कारवाई केली. या कारवाईत सुरक्षा यंत्रणेने १४ दहशतवाद्यांना अटक केली. मणिपूरमधील सहा जिल्ह्यांमधील डोंगराळ भागात सुरक्षा यंत्रणेने एकाचवेळी कारवाई केली. अटक केलेल्या दहशतवादी भारत विरोधी कारवायांमध्ये सहभागी होते, अशी माहिती सुरक्षा यंत्रणेने दिली आहे.सुरक्षा यंत्रणेने अटक केलेल्या दहशतवाद्यांकडून २१ शस्त्रे, स्फोटक साहित्य, बंदी असलेल्या वस्तू आणि युद्धासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त केले आहे. राज्यात सुरू असलेल्या हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यासाठी सुरक्षा यंत्रणेने ठिकठिकाणी धडक कारवाई सुरू केली आहे. या कारवायांना ताज्या जप्ती आणि अटकसत्रामुळे मोठे यश मिळाले आहे.गुप्तचरांनी दिलेल्या माहितीआधारे ही कामगिरी करण्यात आली. अचूक नियोजन केल्यामुळे कमी कालावधीत सुरक्षा यंत्रणेने प्रभावी कामगिरी केली. मणिपूरमध्ये शांतता आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी अशा मोहिमा पुढेही सुरू राहतील, असे सुरक्षादलांनी सांगितले आहे.दरम्यान, मणिपुरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी लष्करी कारवाईसोबतच राजकीय पातळीवरही प्रयत्न सुरू आहेत. मे २०२३ नंतर प्रथमच कुकी आणि मैतेई समुदायातील भाजप आमदारांनी दिल्लीत बैठक घेतली. फेब्रुवारीपासून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू असून या घडामोडींमुळे सरकार स्थापनेबाबत चर्चांना वेग आला आहे.
Pune gramin : तळेगाव ढमढेरेतून देवदर्शनाला गेलेल्या युवकांचा दुर्दैवी मृत्यू
Pune gramin : तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथून नारायणपूर येथे देवदर्शनासाठी गेलेली युवकांच्या दुचाकीला टेम्पोची धडक बसून झालेल्या अपघातात समीर संभाजी ढमढेरे व सार्थक विजय ढमढेरे या दोघा युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तळेगाव ढमढेरे येथील दिपक ढमढेरे, समीर ढमढेरे व सार्थक ढमढेरे हे तिघे युवक दुचाकीहून ११ डिसेंबर रोजी नारायणपूर येथे देवदर्शनासाठी […] The post Pune gramin : तळेगाव ढमढेरेतून देवदर्शनाला गेलेल्या युवकांचा दुर्दैवी मृत्यू appeared first on Dainik Prabhat .
Manikrao kokate : क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंना मोठा धक्का; ‘या’प्रक्ररणात 2 वर्षांची शिक्षा
नाशिक : राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाहीत. ३० वर्षांपूर्वीच्या सदनिका वाटप गैरव्यवहार प्रकरणात नाशिकच्या प्रथम वर्ग न्यायालयाने त्यांना आणि त्यांच्या भावाला प्रत्येकी २ वर्षे कारावास व ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेला आव्हान देत माणिकराव कोकाटे यांनी जिल्हा सत्र न्यायालयात अपील दाखल […] The post Manikrao kokate : क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंना मोठा धक्का; ‘या’ प्रक्ररणात 2 वर्षांची शिक्षा appeared first on Dainik Prabhat .
Shashi Tharoor : रामाचे नाव बदनाम करू नका; शशी थरूर यांचा सरकारवर हल्लाबोल
नवी दिल्ली : विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन (ग्रामीण)’ म्हणजेच ‘व्हीबी-जी राम जी’ विधेयकावरून काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी मंगळवारी लोकसभेत केंद्र सरकारवर तीव्र टीका केली. गांधीजींचे नाव कायद्यातून वगळणे हा केवळ प्रशासकीय बदल नसून योजनेच्या तात्त्विक आणि नैतिक अधिष्ठानावर घाला असल्याचे त्यांनी सांगितले. चर्चेदरम्यान थरूर यांनी १९७१ च्या हिंदी चित्रपटातील गाण्याचा […] The post Shashi Tharoor : रामाचे नाव बदनाम करू नका; शशी थरूर यांचा सरकारवर हल्लाबोल appeared first on Dainik Prabhat .
मुंबई : आगामी महापालिका निवडणुकांचे मैदान महायुतीने विकास कामांच्या बळावर आधीच मारले आहे. मुंबईचा विकास महायुतीच करू शकते हा विश्वास मतदारांना आहे. मतदारांनी महायुतीचा साडेतीन वर्षांचा विकासाचा कारभार आणि गेल्या २५ वर्षांतील मुंबई महापालिकेतील कारभार पाहिलाय. उबाठा सरकारचा अडीच वर्षे घरी बसून केलेला खंडणी गोळा करण्याचा कारभार पाहिला आहे. त्यामुळे विकासासाठी मतदारांचा महायुतीलाच आशीर्वाद मिळेल आणि सर्व २९ महापालिकांवर महायुतीचा झेंडा फडकेल, असा विश्वास भाजपचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी मंगळवारी व्यक्त केला.भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. मराठी माणसांसाठीची शेवटची लढाई आहे असे म्हणत ऊर बडवणा-यांसाठी ही मराठी माणसासाठी ची लढाई नाही तर एका कुटुंबासाठीची शेवटची लढाई आहे अशी टीकाही बन यांनी केली. ते म्हणाले, उबाठा गटाचे नाव लावून पोस्टर लावायची हिंमत नाही. आचार संहितेत पोस्टर्स लावता येत नाहीत, तेव्हा अशा अनौरस पोस्टर्सची चौकशी व्हावी, या बेनामी पोस्टर्सच्या खर्चाकडेही निवडणूक आयोगाने लक्ष द्यावे अशी मागणीही त्यांनी केली. स्वतःच्या भावाच्या मनसे पक्षाचे सात नगरसेवक फोडून त्यांचा पक्ष फोडला तेव्हा पैशांचा बाजार हा उबाठा गटाने मांडला होता याचीही आठवण बन यांनी करून दिली.उबाठाला हिरव्या झेंड्यावरचा चांद प्रियहल्ली उबाठा गटाला सूर्य नाही तर त्यांना चांद जास्त प्रिय झाला आहे. हिरव्या झेंड्यावर असलेला चांद हा त्यांच्या पक्षाचा झेंडा झालेला आहे, म्हणूनच असे बौद्धिक दिवाळखोरी दर्शवणारे वक्तव्य ते करत आहेत. ज्या उद्योगपतींच्या घरच्या लग्नात तुमच्या लोकांनी नाचण्यामध्ये धन्यता मानली त्या उद्योगपतींबद्दल कोणत्या तोंडाने टीका करत आहात. कुठल्याही उद्योगपतीच्या घशात मुंबई जाणार नाही. मुंबई ही सर्वसामान्य नागरिकाची, सर्वसामान्य मराठी माणसाची आहे, असे बन म्हणाले.
Dollar Rupees Rate: डॉलरच्या तुलनेत रूपयाची निचांकी 'परिसिमा'९१ रूपये प्रति डॉलर होण्याकडे वाटचाल!
मोहित सोमण: डॉलरच्या तुलनेत रुपयाची सीमा गाठली आहे. तब्बल दुपारपर्यंत प्रति डॉलर रूपया ९०.९६ पातळीवर पोहोचला असल्याने जवळपास डॉलर ९१ रुपयांच्या घरात पोहोचला आहे. जागतिक अस्थिरतेचा फटका बाजारात बसल्याने आज गुंतवणूकदारांनी खरेदीत पण घट केली असून थोड्याच वेळात युएस पेरोल रोजगार डेटा जाहीर होईल याच धर्तीवर आंतरराष्ट्रीय बाजारातील डॉलरच्या मागणीत दबाव निर्माण झाल्याने डॉलर सुरूवातीच्या सत्रातच ९०.७६ पातळीवर खुला झाला होता. आज दिवसभरात याचीच पुनरावृत्ती होत असल्याने रूपया ९०.९६ रूपयांच्या निचांकी पातळीवर पोहोचला आहे. यासह बाजारातील रूपयांच्या घसरणीमागे आणखी एक कारण म्हणजे युएस फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपातीची घोषणा झाल्यानंतर अद्याप रूपया वापसी करू शकलेला नाही.महत्वाचे म्हणजे गेल्या ४ दिवसात रुपया मोठ्या प्रमाणात घसरला. परकीय बाजारात मात्र डॉलरच्या दरात वाढ झाल्याने आज सोन्याच्या जागतिक किंमतीत घसरण झाली आहे. याच कारणामुळे आज शेअर बाजारातील परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार सावधगिरी बाळगण्याची शक्यता आहे. आरबीआय वेळोवळी रूपयांच्या व्यवहारात हस्तक्षेप करत असली तरी मोठ्या प्रमाणात डॉलरची विक्री घसरल्याने अद्याप परिस्थिती नियंत्रणात आली नाही. तरीही येणाऱ्या काळात मजबूत फंडामेंटलमुळे रूपयात पुन्हा एकदा नवा ट्रिगर येण्याची शक्यता असून तज्ञांच्या मते रूपया नजीकच्या काळात नियंत्रणात येऊ शकतो. परंतु भारतीय युएस बाजारातील करारातील बोलणीच्या अनुषंगाने अद्याप अस्थिरतेचे चटके शेअर बाजारासह रूपयालाही बसला आहे.आजच्या विक्रमी निचांकावर भाष्य करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य गुंतवणूक रणनितीकार डॉ वी के विजयाकुमार म्हणाले आहेत की,' आज रुपयामध्ये आणखी मोठी घसरण अपेक्षित नव्हती, कारण नोव्हेंबर महिन्याची व्यापार आकडेवारी अपेक्षेपेक्षा चांगली आली आहे. शॉर्ट पोझिशन्स कव्हर करणे हे आजच्या घसरणीमागील एक कारण असू शकते. परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांकडून (FII) सुरू असलेली सततची विक्री हे एका दुष्टचक्राप्रमाणे काम करत आहे, ज्यामुळे रुपया खाली खेचला जात आहे. सामान्यतः जेव्हा रुपया घसरतो, तेव्हा रिझर्व्ह बँक रुपयाची घसरण रोखण्यासाठी डॉलर्सची विक्री करून हस्तक्षेप करते. परंतु अलीकडे रिझर्व्ह बँकेचे धोरण चलनाची घसरण होऊ देणे हे आहे. भारतातील कमी महागाई (नोव्हेंबरमध्ये ०.७१%) हेच मध्यवर्ती बँकेच्या या अहस्तक्षेपाचे कारण आहे. रुपयाच्या अवमूल्यनामुळे अर्थव्यवस्थेला नुकसान होत नाहीये.भारताची नोव्हेंबर महिन्यातील व्यापार तूट ऑक्टोबरमधील ४१.६८ अब्ज डॉलर्सवरून २४.५३ अब्ज डॉलर्सपर्यंत कमी होणे, हे रुपयासाठी सकारात्मक आहे.'
Roasted Raisins: हिवाळ्यात भिजवलेली किंवा भाजलेली मनुका जरूर खा, जाणून घ्या त्याचे फायदे
Roasted Raisins: हिवाळ्याच्या दिवसांत सर्दी, खोकला, नाक वाहणं अशा तक्रारी वाढतात. त्यामुळे या काळात आरोग्याकडे विशेष लक्ष देणं गरजेचं असतं. बदलत्या हवामानात योग्य आहार घेतला, तर शरीर निरोगी राहायला मदत होते. तज्ज्ञांच्या मते, हिवाळ्यात मनुका खाणं खूप फायदेशीर ठरतं. भिजवलेली किंवा हलकी भाजलेली मनुका पोषक घटकांनी भरलेली असून ती शरीराला उष्णता आणि ऊर्जा देते. हिवाळ्यात […] The post Roasted Raisins: हिवाळ्यात भिजवलेली किंवा भाजलेली मनुका जरूर खा, जाणून घ्या त्याचे फायदे appeared first on Dainik Prabhat .
प्रतिक्षा संपली! बॅार्डर २ चा दमदार टीझर प्रेक्षकांच्या भेटीला; सनी देओलच्या लूकने वेधले लक्ष
Border 2 Teaser : बॅार्डर २ चित्रपटाचा टीझर कधी प्रदर्शित होणार याची आतुरतेने प्रेक्षक वाट पाहत होते. अखेर चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. भारतीय सैन्याच्या शौर्याची कथा पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात सनी देओल, वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाच्या टीझरने उत्सुकता वाढवली […] The post प्रतिक्षा संपली! बॅार्डर २ चा दमदार टीझर प्रेक्षकांच्या भेटीला; सनी देओलच्या लूकने वेधले लक्ष appeared first on Dainik Prabhat .
भाजप आमदारपुत्राचा शाही विवाह चर्चेत ! केवळ फटाक्यांवर उडवले लाखो रुपये, Video व्हायरल….
lavish wedding । BJP – मध्य प्रदेशातील इंदूर येथील भाजप आमदार राकेश शुक्ला उर्फ गोलू शुक्ला हे सध्या चर्चेत आहेत. इंदूरमध्ये त्यांचा मुलगा अंजनेशच्या लग्नावर कोट्यवधी रुपये खर्च झाल्याचे वृत्त आहे. त्यामध्ये ७० लाख रुपये केवळ फटाक्यांसाठी उडवण्यात आले. या लग्नाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. खजराणा मंदिराजवळच्या भव्य आतषबाजीचे व्हिडिओ देखील व्हायरल होत […] The post भाजप आमदारपुत्राचा शाही विवाह चर्चेत ! केवळ फटाक्यांवर उडवले लाखो रुपये, Video व्हायरल…. appeared first on Dainik Prabhat .
G Ram G bill। लोकसभेत आज केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी “भारताचा विकास – रोजगार आणि उपजीविकेची हमी अभियान (ग्रामीण)” हे विधेयक सादर केले तेव्हा मोठा गोंधळ उडाला. विरोधी पक्ष ज्याला “जी राम जी विधेयक” म्हणत आहेत, ते विधेयक सादर होताच काँग्रेससह विरोधी पक्षांनी तीव्र निषेध केला आणि कामकाजात व्यत्यय आणला. सरकारचा असा दावा […] The post लोकसभेत ‘G Ram G’ विधेयक सादर होताच विरोधकांचा गोंधळ ; प्रियांका गांधी म्हणाल्या, “नाव बदलण्याची क्रेझ…” appeared first on Dainik Prabhat .
‘धुरंधर’बनवून खूप वाईट केले, कारण…श्रद्धा कपूरची पोस्ट; नेमकं काय म्हणाली?
Shraddha Kapoor | अभिनेता रणवीर सिंग, अक्षय खन्ना आणि संजय दत्त यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘धुरंधर’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत आहे. आदित्य धर दिग्दर्शित या स्पाय-थ्रिलर चित्रपटाने केवळ ११ दिवसांत ३०० कोटींहून अधिक रुपयांची कमाई केली आहे. प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद आणि प्रशंसेमुळे चित्रपटाची कमाई दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. अनेक बॉलीवूड कलाकरांनी या चित्रपटाचे […] The post ‘धुरंधर’ बनवून खूप वाईट केले, कारण… श्रद्धा कपूरची पोस्ट; नेमकं काय म्हणाली? appeared first on Dainik Prabhat .
Pathan 2 : बॅालीवडूचा किंग खान अर्थात शाहरुख खान त्याच्या आगामी किंग चित्रपटात व्यस्त आहे. हा चित्रपट शाहरूखचा पुढील वर्षातील मोठा चित्रपट असणार आहे. चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांसमोर आली असून, अभिनेत्याच्या लूकनेही सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. अशातच आता शाहरुखच्या दुसऱ्या एका चित्रपटाबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे. शाहरुख खानचा पठाण हा चित्रपट २०२३ […] The post ‘किंग’च्या चर्चेत ‘पठाण’च्या सिक्वलबाबत मोठी अपडेट; ‘हा’ दाक्षिणात्य अभिनेता शाहरुखसोबत स्क्रीन शेअर करणार? appeared first on Dainik Prabhat .
गवतात दबा धरून बसलेल्या बिबट्याचा वृद्ध महिलेवर हल्ला; पाटण तालुक्यातील भालेकरवाडीतील घटना
संजय पाटील कराड – पाटण तालुक्यातील ढेबेवाडी विभागात असलेल्या भालेकरवाडी येथे मंगळवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास गवतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने वृद्ध महिलेवर हल्ला चढवला. सुदैवाने महिला बिबट्याच्या हल्ल्यातून थोडक्यात बचावली. वृद्धेला किरकोळ जखमा झाल्या असून तिला उपचारासाठी ढेबेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मालन खाशाबा भालेकर (वय ६५) असे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या […] The post गवतात दबा धरून बसलेल्या बिबट्याचा वृद्ध महिलेवर हल्ला; पाटण तालुक्यातील भालेकरवाडीतील घटना appeared first on Dainik Prabhat .
'तारघर'नवी मुंबईच्या भविष्यातील वाहतूक योजनेत एक महत्त्वाचं केंद्र!
नवी मुंबई: मागील काही दिवसांपूर्वी नवी मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी रेल्वे प्रशासनाने जाहीर केली होती. नवी मुंबईच्या बेलापूर–नेरूळ–उरण रेल्वे मार्गावर अतिरिक्त उपनगरीय सेवा, तसेच तारघर आणि गव्हाणे या दोन रेल्वे स्थानकांची काम करणे या दोन महत्त्वाच्या निर्णयांमुळे नवी मुंबईकरांना दिलासा मिळाला. महत्त्वाचे म्हणजे हा निर्णय आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी विशेष ठरला आहे. कारण नवी मुंबई रेल्वे मार्गावर उभारण्यात आलेले तारघर हे नवीन स्थानक नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापासून जवळ आहे. या स्थानकामुळे उरण मार्गावरील रेल्वे प्रवासाला नवी दिशा मिळाली असून, भविष्यात हे स्थानक विमानतळावर जाणाऱ्या प्रवाशांसाठी प्रमुख मार्ग ठरणार आहे.तारघर स्टेशन हे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अगदी जवळ आहे. त्यामुळे विमानतळ सुरू झाल्यावर या परिसरातील लोकसंख्या, व्यावसायिक वसाहती आणि प्रवाशांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. या भागातील वाढत्या गरजा लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने ही पायाभूत सुविधा उभारली आहे. तसेच तारघर हे नवे स्थानक कार्यान्वित झाले आहे.याशिवाय उरण मार्गावर आणखी एक महत्त्वाची सुविधा प्रवाशांच्या सेवेत देण्यात आली आहे. बेलापूर–नेरूळ–उरण मार्गावर लोकलच्या फेऱ्यांमध्येही वाढ करण्यात आली आहे. लोकलच्या फेऱ्या वाढवल्यामुळे प्रवाशांची गर्दी कमी होईल आणि गर्दीच्या वेळेमध्ये प्रवास करणे अधिक सोपे आणि सुखकर होणार आहे. तारघर स्टेशन सुरू झाल्यामुळे कामोठे, उलवे, बामणडोंगरी परिसरातील रहिवाशांना थेट रेल्वे सेवेचा फायदा मिळणार आहे.https://prahaar.in/2025/12/16/sanjay-raut-should-first-recover-completely-from-his-illness-and-then-he-can-take-care-of-the-uddhav-thackeray-faction-minister-sanjay-shirsats-sarcastic-remark/100 कोटी रुपये खर्चून उभारलेलं हे तारघर स्टेशन अत्याधुनिक असून सर्व आधुनिक सुविधांनी सज्ज आहे. स्थानकावर प्रशस्त प्लॅटफॉर्म, सुरक्षित प्रवेश व्यवस्था आहे. भविष्यातील प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन या स्टेशनचं डिझाइन करण्यात आलं आहे. हे स्टेशन केवळ रेल्वे स्थानक नसून, नवी मुंबईच्या विकासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरेल, असे मत अनेक नागरिकांनी व्यक्त केले आहे. या नवीन रेल्वे स्थानकामुळे रस्ते वाहतुकीवरील ताण कमी होण्यास मदत होईल. सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढेल, अशी अपेक्षा आहे. विमानतळ, सिडकोने विकसित केलेले नोड्स आणि उरण मार्ग यांना जोडणारे तारघर स्टेशन नवी मुंबईच्या भविष्यातील वाहतूक योजनेत एक महत्त्वाचं केंद्र ठरेल.
सुप्रिया सुळे घेणार अमित शाहांची भेट; महापालिका निवडणुका जाहीर होताच राजकीय हालचालींना वेग
Supriya Sule Amit Shah Meet | राज्यातील २९ महापालिकांचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. यावेळी सुप्रिया सुळे यांच्यासोबत शरद पवार गटातील सर्व खासदारही उपस्थित असणार आहेत. राज्यातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर भेट घेणार असल्याची माहिती समोर […] The post सुप्रिया सुळे घेणार अमित शाहांची भेट; महापालिका निवडणुका जाहीर होताच राजकीय हालचालींना वेग appeared first on Dainik Prabhat .
“TV ,बाईक अन् १५ हजारासाठी विवाहितेला जिवंत जाळलं” ; प्रकरणाने सर्वोच्च न्यायालयालही स्तब्ध
CJI Surya Kant on Dowry। सर्वोच्च न्यायालयाने देशातील वाढत्या हुंड्याच्या प्रकरणांवर चिंता व्यक्त केली आहे. विद्यमान कायदे कुचकामी असून गैरवापर होण्याची शक्यता आहे तसेच ही दुष्कृत्ये अजूनही व्यापक आहेत असे न्यायालयाने म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयात एका खटल्याची सुनावणी सुरू होती ज्यामध्ये एका २० वर्षीय महिलेला तिच्या पती आणि सासूने हुंड्यासाठी रॉकेल ओतून जिवंत जाळले होते. […] The post “TV ,बाईक अन् १५ हजारासाठी विवाहितेला जिवंत जाळलं” ; प्रकरणाने सर्वोच्च न्यायालयालही स्तब्ध appeared first on Dainik Prabhat .
धक्कादायक! मुंबई उच्च न्यायालयाच्या परिसरात आत्मदहनाचा प्रयत्न; पैशाच्या वादातून उचलले टोकाचे पाऊल
मुंबई: मुंबई उच्च न्यायालयाच्या समोर एका व्यक्तीने स्वत:च्या अंगावर पेट्रोल ओतून जाळून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. या घटनेत ही व्यक्ती गंभीर जखमी झाली असल्याने त्यांना तातडीने जीटी रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई उच्च न्यायालयासमोर काल (१५ डिसेंबर) संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली. प्रकाश सावंत असं आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे.प्रकाश सावंत यांनी मुंबई उच्च न्यायालयासमोर स्वत: च्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेतले त्यावेळी तिथे उपस्थितीत असलेल्या लोकांनी धाव घेत त्यांना वाचवलं.पण, तोपर्यंत प्रकाश सावंत हे ५०-६० टक्के भाजल्याची माहिती समोर आली आहे. सावंत यांनी हे टोकाचे पाऊल उचलण्यामागचे कारण समोर आले आहे. वकिलांसोबत झालेल्या पैशाच्या वादातून त्यांनी स्वतःला जाळून घेतले असल्याचे त्यांनी आत्मदहनाच्या आधी एका नोटमध्ये लिहिले होते.https://prahaar.in/2025/12/16/teachers-will-face-strict-action-if-they-disrespect-students/प्रकाश सावंत यांनी आत्महत्या नोटमध्ये काय लिहले?प्रकाश सावंत हे कणकवलीतील नरडवे मध्यम पाटबंधारे प्रकल्पाचे प्रकल्पग्रस्त आहेत. त्यांनी त्यांच्या नोटमध्ये लिहिले की, कणकवलीचे तहसीलदार रमेश पवार आणि वकील स्नेहा हरणे यांनी ५ ते ६ वेळा हक्कसोड लिहून घेतले, त्याबद्दल कित्येक तक्रारी केल्या. तरी लक्ष दिले गेले नाही. त्यानंतर वकिल स्नेहा हरणे यांना सन २०२१ रोजी ६ लाख ८० हजार इतकी रक्कम या केससाठी दिलेली आहे, मात्र त्या सदरची रक्कम परत करत नाहीत. या विरोधात प्रकाश सावंत यांनी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा इथे वकील स्नेहा हरणे यांच्या विरुद्ध तक्रार केली होती.त्यावेळी जोशी नावाचे वकिल न्यायाधीश होते. त्यांनी सुद्धा वकिल स्नेहा हरणे यांना वॉर्निंग दिली होती आणि सांगितलं होतं की, प्रकाश सावंत यांचे सगळे पैसे व्याजासह द्यावे. तरी स्नेहा हरणे वकील यांनी फक्त ६ लाख इतकी रक्कम परत केली. मात्र ८० हजार ही व्याज रक्कम अजून दिलेली नाही. याबाबतची तक्रार बार कॉऊन्सील येथील रणपिसे सर यांच्याकडे १० ऑक्टोबर, २०२३ रोजीपासून आतापर्यंत ५ ते ६ वेळा केली आहे. मात्र ते सुद्धा लक्ष देत नाहीत. त्यानंतर याबाबतची तक्रार दिल्ली मंत्रालय इथे सुद्धा ५ वेळा केल्यावर, दिल्ली मंत्रालयाने कणकवली पोलिसांना या विषयी सुचित केले. मात्र कणकवली पोलीसही याबाबत कोणतीही कार्यवाही करीत नाहीत.राज्य सरकार आणि दिल्ली मंत्रालय येथे मी अनेक वेळा तक्रार दिली. नरडवे महमदवाडी प्रकल्पामुळे आमची जागा कणकवली सरकार यांनी घेतली आहे. जर या जागा मोबदला आम्हाला न मिळाल्यास कोणतीही अघटित घटना घडल्यास त्यास आमची कोणतीही जबाबदार नसेल.
छत्रपती संभाजीनगर: आगामी निवडणुका आणि मुंबई महापालिकेच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये हालचालींना वेग आला आहे. आज (मंगळवारी) दुपारी शिवसेना आणि भाजपमध्ये जागावाटपाबाबत महत्त्वाची बैठक होणार असून, यासाठी आपण स्वतः भाजप कार्यालयात जाणार असल्याचे राज्याचे मंत्री आणि शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी स्पष्ट केले. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी संजय राऊत, उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर सडकून टीका केली.महायुतीचा 'विनिंग फॉर्म्युला'युतीच्या बैठकीबाबत माहिती देताना शिरसाट म्हणाले की, आज भाजप कार्यालयात संयुक्त बैठक होणार आहे. महायुतीला मिळालेल्या मताचा अनादर होऊ नये, हा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे अहंकाराचा प्रश्न न करता पहिल्या फेरीच्या बोलणीसाठी मी स्वतः भाजप कार्यालयात जाणार आहे. यावेळी त्यांनी जागावाटपाचा फॉर्म्युला देखील स्पष्ट केला. ज्या जागा ज्या पक्षांनी जिंकल्या, त्या जागा त्यांना मिळतील. ज्या मतदारसंघात ज्यांचा आमदार आहे, त्यांना झुकते माप दिले पाहिजे, असा आमचा फॉर्म्युला आहे. शिवसेना युतीत जास्त जागा लढवणार असून, गेल्या निवडणुकीत आम्ही पहिल्या क्रमांकावर होतो, असे त्यांनी नमूद केले.'संजय राऊतांनी आधी तब्येत जपावी'खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करताना शिरसाट यांनी अत्यंत खोचक शब्दांत समाचार घेतला. ते म्हणाले, संजय राऊत जोपर्यंत निगेटिव्ह बोलत नाहीत, तोपर्यंत त्यांना जेवण जात नाही. त्यांनी आधी आपल्या आजारपणातून ठणठणीत बरे व्हावे, तब्येतीची काळजी घ्यावी आणि मग उरल्यासुरल्या 'उबाठा'ची वाट लावावी. अमित शाहांचे काय करायचे ते आमचा पक्ष बघेल.मुंबई महापालिका आणि मराठी माणूसमुंबईतील 'ठाकरे ब्रँड' आणि पोस्टर्सवर बोलताना शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. मराठी माणसाला मुंबईतून हद्दपार करणाऱ्यांनी मराठी माणसासाठी बोलू नये. तुम्ही बिल्डरच्या नादी लागून मराठी माणसाला बेघर केले. मुंबईला 'खड्ड्यांचे शहर' बनवले. महापालिका म्हणजे तुम्ही व्यवसाय आणि उत्पन्नाचे साधन म्हणून पाहता का? असा सवाल त्यांनी केला. तसेच, महायुती पुन्हा मराठी माणसाला मुंबईत आणण्यासाठी काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.विरोधकांवर चौफेर फटकेबाजी* रोहित पवार: हे सर्व विद्वान आहेत. पण निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेणार म्हणजे आचारसंहिता लागणार, हे शेंबड्या पोरालाही कळते, अशा शब्दांत शिरसाटांनी रोहित पवारांची खिल्ली उडवली.* सुप्रिया सुळे: सुप्रिया सुळे यांनी ईव्हीएम (EVM) घोटाळा नाही हे मान्य केले, हे एक परिवर्तनच आहे, असे शिरसाट म्हणाले.* महाविकास आघाडी: काँग्रेसने 'उबाठा' सोबत न जाण्याची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे मुंबईत झालीच तर मनसे आणि उबाठा यांची युती होईल. काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) कुठे जातील, हे सांगता येत नाही, असे भाकीत त्यांनी वर्तवले.पुणे-चिंचवडमध्ये युती नाही?पुणे आणि चिंचवडमध्ये युती होणार नाही, हे जाहीर असल्याचे सांगत, अजित पवार काय करत आहेत याची आपल्याला कल्पना नसल्याचे शिरसाट यांनी स्पष्ट केले. तसेच, एकनाथ शिंदे यांच्यावर भाकरी फिरवण्याचा किंवा निर्णय घेण्याचा सर्वाधिकार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
चंद्रपूर : महाराष्ट्र राज्यातील शेतकरी आत्महत्या हा एक मोठा प्रश्न आहे. शेतकरी शेतीसाठी घेतलेले कर्ज वेळेत भरू शकला नाही, की त्यावरील व्याजाची रक्कम वाढत जाते. परिणामी कर्जाचा डोंगरही वाढत जातो. अखेर वाढलेल्या पैशांचा रक्कमा पाहून बळीराजा आपले मृत्यूला कवटाळतो. सरकार शेतकऱ्यांसाठी योजना राबवत असले तरी त्याचा फायदा सगळ्याच शेतकऱ्यांना होतो असे नाही. अजूनही अनेक शेतकरी […] The post महाराष्ट्रातील संतापजनक प्रकार! एक लाखाचे ७४ लाख झाले; कर्जाचा परतावा देण्यासाठी शेतकऱ्याला किडनी विकायला लावली appeared first on Dainik Prabhat .
वय फक्त एक आकडा! अभिनेत्री रेखा यांचा दिलखेच अंदाज; डान्स व्हिडिओ पाहून चाहते थक्क
Rekha Dance Video | बॉलिवूड इंडस्ट्रीची सदाबहार अभिनेत्री रेखा यांच्या सौंदर्या पुढे अनेक अभिनेत्री फिक्या पडतात. ७१ वर्षांच्या वयातही रेखा यांच्या स्टाइलचे लोक खूप दीवाने आहेत. सध्या रेखा यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात त्या डान्स करताना दिसत आहेत. त्यांच्या डान्स स्टेप्स आणि सुंदर लुकची सर्वत्र चांगलीच चर्चा रंगली आहे. परफॉर्मन्सदरम्यान रेखा यांचा हा […] The post वय फक्त एक आकडा! अभिनेत्री रेखा यांचा दिलखेच अंदाज; डान्स व्हिडिओ पाहून चाहते थक्क appeared first on Dainik Prabhat .
भारतीय जनता पार्टीने नुकतेच बिहारचे कॅबिनेट मंत्री नितीन नवीन यांना कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्त केले. ते आता जेव्हा राष्ट्रीय अध्यक्षांची निवड केली जाईल तेव्हा जे. पी. नड्डा यांची जागा घेतील. पंतप्रधान मोदी यांनी बिहारमध्ये तरुणांना संधी दिली आणि नवीन यांचा तरुण आणि कठोर मेहनती कार्यकर्ता म्हणून स्वभाव लक्षात घेऊन त्यांची या पदासाठी निवड केली. तसेच त्यांचा संघटनात्मक कामाचा अनुभव त्यांच्या कामी आला. जे लोक नवीन यांना शाळेच्या दिवसापासून ओळखतात ते असे सांगतात, की नवीन यांच्या दृष्टीने राजकारण हे त्यांच्यासाठी कधीही महत्त्वाचे नव्हते. सार्वजनिक जीवनातील त्यांचा प्रवेश हा केवळ परिस्थितीने झाला होता आणि त्यांनी कधीही राजकारणात येण्याचे ठरवले नव्हते. २००६ मध्ये त्यांचे वडील नवल सिन्हा यांचा मृत्यू झाला तेव्हा नवीन राजकारणात आले. पाटणा पश्चिमेतील बांकीपोर हा नवीन यांचा मतदारसंघ आणि तो पहिल्यापासून जनसंघाचा राहिला आहे. या मतदारसंघातून ठाकूर प्रसाद यांनी प्रतिनिधित्व केले, जे की रवीशंकर प्रसाद यांचे वडील आहेत. पण जेव्हा राजकारणात प्रवेश करण्याचा नवीन यांनी निर्णय घेतला तेव्हा त्यांना संपूर्ण राजकारणाने व्यापून टाकले होते. राजकारणात संपूर्ण वेढले जाण्याचा अर्थ तुमचे वैयक्तिक आयुष्य वाऱ्यावर सोडण्यासारखे आहे आणि ते नवीन यांनी अनेकदा केले आहे. कारण वैयक्तिक आयुष्यापासून प्रदीर्घकाळ दूर राहावे लागणे आणि ते नवीन यांनी आता स्वीकारले आहे.कार्यकारी अध्यक्ष म्हणून नवीन यांनी पदभार स्वीकारतील तेव्हा ते ४५ वर्षांचे आहेत आणि तुलनात्मकदृष्ट्या ते तरुण आहेत. दोन दशके त्यांची राजकीय कारकीर्द राहिली आहे आणि बांकीपोरमधून ते आमदार राहिले आहेत. अर्थात आता नवीन यांची निवड करून भाजपने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. कारण नवीन हे बिहारी आहेत. सध्याचे अध्यक्ष जे. पी. नड्डा हेही बिहारमध्येच जन्मले आहेत आणि ते नंतर हिमाचलमध्ये गेले. सहसा भाजपमध्ये इतक्या तरुण नेत्याची अध्यक्षपदासाठी निवड केली जात नाही. म्हणून नवीन यांची निवड सर्वांनाच आश्चर्याचा धक्का आहे. कायस्थ असलेले नवीन हे बिहारचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत. बिहारमध्ये नवीन यांची निवड त्वरित लागू करण्यात आली असून बिहारसह राष्ट्रीय राजकारणात भाजपची रणनीती अधिक मजबूत करण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जातो. नितीन नवीन यांची संघटनात्मक अनुभव, स्थानिक पकड आणि प्रशासकीय अनुभव लक्षात घेऊन ही निवड केली आहे, असे मानले जाते. नड्डा यांनाही अध्यक्ष बनवण्यापूर्वी त्यांच्याकडे कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली होती. त्यामुळे नवीन हेच पुढचे राष्ट्रीय अध्यक्ष असतील असे मानण्यास जागा आहे. नितीन नवीन हे पाच वेळा आमदार राहिले असून छत्तीसगढ येथून भाजपचे ते नेते होते. पार्टी विथ डिफरन्स ही उक्ती भाजपने कार्याध्यक्ष निवडीतही सार्थ ठरवली आहे. नितीन नवीन यांनी लो प्रोफाईल राहण्याबद्दल ख्याती प्राप्त केली आहे. बिहारमध्ये तरुणांना संघटनेशी जोडून घेण्याचे काम त्यांनी केले आणि त्यांच्या या कामाची पोहोचपावती त्यांना मिळाली आहे असे म्हणावे लागेल. नितीन नवीन यांच्याकडे अनपेक्षितपणे राष्ट्रीय जबाबदारी सोपवण्यात आली आहे आणि हे काम ते सांभाळतील यात शंका नाही. ते पहिले बिहारी कार्याध्यक्ष असल्याने बिहारसाठी हा आनंदाचा धक्का आहे. भाजपचे सरकार सध्या बिहार आणि आंध्र प्रदेशमुळे टिकून आहे. त्यामुळे या दोन राज्यांना खूश करण्याशियवाय भाजपला पर्याय नाही, असेही बोलले जाते. त्यामुळे त्यांची निवड यातून केली की काय अशीही शंका घेण्यास जागा आहे. नितीन नवीन यांची काम करण्याची पद्धत, त्यांची कार्यशैली ही भाजपच्या कार्यशैलीला जुळती आहे. पण भाजपने नेहमीप्रमाणे साऱ्यांना आश्चर्याचा धक्का दिला. ज्यांची नावे चर्चेत होती त्यापैकी कुणालाही कार्याध्यक्ष पदी भाजपने नेमले नाही. त्यात धर्मेद्र प्रधान आणि उत्तर प्रदेश किंवा ओडिसातून आलेल्या नेत्याची नावे घेतली जात होती. पण या सर्वांना बाजूला टाकून नितीन नवीन हे वेगळेच नाव भाजपने कार्याध्यक्ष म्हणून आणले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच अध्यक्ष आणि तत्सम पदांना समर्पित रूपात पाहू इच्छितो. त्या दृष्टीने नितीन नवीन यांची निवड अत्यंत सार्थ आहे असे म्हणावे लागेल.४५ वर्षांच्या नेत्याकडे भाजपसारख्या विशाल पक्षाच्या नेत्याचे संपूर्ण दायित्व सोपवणे ही अत्यंत अवघड जबाबदारी आहे आणि हे नितीन यांनीही मान्य केले. अर्थात त्यांच्यापुढे सर्वात मोठे आव्हान आहे ते बंगाल विधानसभा निवडणुकीचे. ते लक्षात घेऊन नितीन यांना कार्य करावे लागेल. त्यांनी एका मुलाखतीत सांगितले, की पश्चिम बंगालला अराजकतावादी सरकारच्या तावडीतून सोडवण्यासाठी आम्हाला प्रयत्न करावे लागतील आणि यासाठी आमचा प्रत्येक कार्यकर्ता तयार आहे. पण शॉर्टकट टाळून भाजपला यश मिळवावे लागेल हेच नितीन यांनी सांगितले. भाजपमध्ये या पदासाठी अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती आणि आता ती पूर्ण झाली. अर्थात भाजपने सर्वांना आश्चर्याचा धक्का देत ही नियुक्ती जाहीर केली. मान्यवर नेते या पदासाठी नजर लावून होते पण त्यांची निराशा झाली. अर्थात भाजपमध्ये लगेच कुणी सोडून जात नाही, तर तो निष्ठेने काम करत राहतो. त्यामुळे विरोधी पक्षांसारखे भाजपमध्ये होत नसते. हेही सांगून टाकावे लागेल, की भाजपची सूत्रे ज्याच्या हाती असतील ते नितीन नवीन हे पहिले बिहारी नेते असतील. त्यांच्या या अध्यक्षपदी निवडीमुळे प्रत्येक कार्यकर्त्याचा सन्मान झाला आहे असे जे मोदी यांनी म्हटले आहे ते अगदी रास्त आहे. नितीन नवीन यांना शुभेच्छा. त्याचबरोबर उत्तर प्रदेश राज्यातही २०२७ मध्ये विधानसभा निवडणुकीत तिसऱ्यांदा पुन्हा सत्ता हस्तगत करण्याच्या प्रयत्नात भाजपने १७ वे प्रदेश अध्यक्ष पंकज चौधरी यांना समोर ठेवून जातीय संतुलन राखण्याचा प्रयत्न करत आहे. २०१७ मध्ये भाजपने ३२५ जागांवर विजय मिळवून ऐतिहासिक विजय मिळवला होता. त्याची पुनरावृत्ती करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.
Celina Jaitly: सेलिना जेटलीने पतीकडून १०० कोटींची भरपाई आणि दरमहा १० लाखांचा खर्च मागितला
Celina Jaitly: अभिनेत्री सेलिना जेटली हिने पती पीटर हाग यांच्याविरोधात न्यायालयात गंभीर आरोप करत १०० कोटी रुपयांची भरपाई आणि दरमहा १० लाख रुपये देखभाल खर्च (मेंटेनन्स) देण्याची मागणी केली आहे. अंधेरी येथील महानगर दंडाधिकारी न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली. न्यायालयाने सेलिना आणि पीटर दोघांनाही २७ जानेवारीपर्यंत आपापले उत्पन्न प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत. सेलिनाने […] The post Celina Jaitly: सेलिना जेटलीने पतीकडून १०० कोटींची भरपाई आणि दरमहा १० लाखांचा खर्च मागितला appeared first on Dainik Prabhat .
महसूल विभागाचा प्रताप! मृत व्यक्तीच्या नावाने पाठवली नोटीस, दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
रांजणगाव – कोंढापुरी ता. शिरूर येथील गट नंबर ५३१ मधील जमिनीच्या प्रकरणात महसूल विभागाच्या कारभाराचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रांजणगाव गणपती येथील मंडल अधिकारी व कोंढापुरी येथील कामगार तलाठ्याच्या कार्यपद्धतीमुळे महसूल यंत्रणेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. २०१४ साली मयत झालेल्या कमला तुकाराम ओव्हाळ या महिलेच्या नावाने ३० एप्रिल २०२४ रोजी फेरफार […] The post महसूल विभागाचा प्रताप! मृत व्यक्तीच्या नावाने पाठवली नोटीस, दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी appeared first on Dainik Prabhat .
अंकिताचा व्हिडीओ पाहून माधुरीची आठवण; खलनायक चित्रपटातील गाण्यावर केला सुंदर डान्स
Ankita Lokhande : टेलिव्हिजनवर ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणारी अभिनेत्री अंकिता लोखंडे हिने चित्रपटसृष्टीतही लोकप्रसिद्ध मिळवली आहे. अंकिता तिच्या सोशल मीडियाद्वारे चाहत्यांशी सतत संपर्कात असते. नुकताच तिने एक डान्स व्हिडीओ इंन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ पाहून बॅालीवूडची धकधक गर्ल माधुरी दिक्षित हिची आठवण येत आहे. अंकिता लोखंडेने सोशल मीडियावर एक व्हिडीओ […] The post अंकिताचा व्हिडीओ पाहून माधुरीची आठवण; खलनायक चित्रपटातील गाण्यावर केला सुंदर डान्स appeared first on Dainik Prabhat .
भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाचा परिणाम ; बल्गेरियाचे सरकार कोसळले
Government of Bulgaria। अर्थव्यवस्थेचे व्यवस्थापन आणि सरकारी भ्रष्टाचारावरून मागील काही दिवसापासून बल्गेरियात सुरु असलेल्या जन आंदोलनासमोर तिथल्या सरकारला झुकावे लागले आहे. देशात सुरु असलेल्या जनआंदोलनानंतर, बल्गेरियाचे पंतप्रधान रोसेन झेल्याझकोव्ह यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा केली आहे. राजीनाम्याची घोषणा करताना रोसेन झेल्याझकोव्ह यांनी, “आमच्या आघाडीची बैठक झाली, आम्ही सध्याच्या परिस्थितीवर, आमच्यासमोरील आव्हानांवर आणि आम्हाला जबाबदारीने घ्याव्या लागणाऱ्या […] The post भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाचा परिणाम ; बल्गेरियाचे सरकार कोसळले appeared first on Dainik Prabhat .
Mulshi : शेतात गायी चारण्यासाठी गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू; जामगावमधील घटना
पौड : गायी चरण्यासाठी शेतात गेलेल्या युवकाचा पाण्यात पडून मृत्यू झाल्याची घटना जामगाव, ता.मुळशी इथे घडली आहे. दत्ता एकनाथ सुर्वे (वय अंदाजे ३५, रा.जामगाव, ता.मुळशी, जि. पुणे) असे युवकाचे नाव आहे. या घटनेची माहिती सरपंच विनोद सुर्वे यांनी दिली. दत्ता एकनाथ सुर्वे हा युवक काल दुपारी गायींना चरण्यासाठी शेताकडे गेला होता. रात्री उशिरापर्यंत घरी न […] The post Mulshi : शेतात गायी चारण्यासाठी गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू; जामगावमधील घटना appeared first on Dainik Prabhat .
Pune District : ‘एकल’महिलांसाठी विशेष व परिपूर्ण योजना; पाबळ येथे 400 महिलांचा मेळाव्यात सहभाग
पाबळ : पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ‘एकल’ महिलांसाठी विशेष व परिपूर्ण योजना पुणे जिल्ह्यासाठी प्रस्तावित केली जात असून, या योजनेची शिरूर तालुक्यातील अंमलबजावणी जिल्ह्यासाठी पथदर्शी ठरणार आहे. या योजनेनुसार एकल महिलांना स्वत:चे घर, निरामय आरोग्य, अर्थिक स्थिरता, निश्चित उत्पन्न, व्यवसायासाठी कर्ज, मुलांचे संगोपन व शिक्षण व्यवस्था या सुविधा कसलीही अडवणूक होऊ न देता हेलपाटे न […] The post Pune District : ‘एकल’ महिलांसाठी विशेष व परिपूर्ण योजना; पाबळ येथे 400 महिलांचा मेळाव्यात सहभाग appeared first on Dainik Prabhat .
BMC Election | राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील २९ महापालिकांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या यात मुंबई महापालिकेचाही समावेश असून, सर्वच राजकीय प्रमुख पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. निवडणुकीची घोषणा होताच रात्री ठाकरे बंधुविरोधात मुंबईमध्ये बॅनर्स लावण्यात आले आहेत. हे बॅनर्स कुणी लावले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानेच ठाकरे बंधुंना लक्ष्य […] The post “जे हिंदुत्वाचे नाही झाले, ते मराठी माणसांचे काय होणार!”; महापालिका निवडणुकीची घोषणा होताच ठाकरे बंधुविरोधात मुंबईमध्ये पोस्टर appeared first on Dainik Prabhat .
Biscuits With Tea: चहासोबत टोस्ट-बिस्किट खात असाल तर सावध व्हा; आरोग्यावर होऊ शकतो वाईट परिणाम
Biscuits With Tea: चहासोबत टोस्ट किंवा बिस्किट खाण्याची सवय अनेकांना असते. सकाळी किंवा संध्याकाळी चहा आणि त्यासोबत हा हलका नाश्ता घेतला जातो. मात्र, आरोग्यतज्ज्ञांच्या मते ही सवय आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. टोस्ट आणि बिस्किटांमध्ये मैदा, साखर आणि अपायकारक चरबी मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे अॅसिडिटी, वजनवाढ आणि इतर आजारांचा धोका वाढू शकतो. शरीरावर होणारे परिणाम टोस्ट […] The post Biscuits With Tea: चहासोबत टोस्ट-बिस्किट खात असाल तर सावध व्हा; आरोग्यावर होऊ शकतो वाईट परिणाम appeared first on Dainik Prabhat .
दोन्ही काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला फडणवीसांचा सुरुंग!
वार्तापत्र :दक्षिण महाराष्ट्रमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगली, इचलकरंजी आणि पुण्यात छत्रपती संभाजी महाराज, राजमाता अहिल्यादेवी होळकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांचे लोकार्पण करून महापालिका निवडणुकीची घोषणा होण्याच्या काही तास आधीच प्रचाराचा अनौपचारिक 'नारळ फोडला'. हे केवळ सांस्कृतिक सोहळे नव्हते, तर मराठा आणि धनगर समाजांच्या मतांचा बालेकिल्ला असलेल्या या भागात भाजपने धडक दिल्याचे संकेत देतात. पूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीची मक्तेदारी मानली जाणारी ही जागा आता फडणवीसांच्या नेतृत्वात बदलतेय, असा निष्कर्ष काढायला आता कोणाची हरकत नाही.आधी इचलकरंजी येथे शंभूतीर्थ आणि नंतर सांगलीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकात २१ फूट उंच अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण झाले. फडणवीस म्हणाले, 'अहिल्यादेवींच्या त्रिजन्मशताब्दी वर्षात हा पुतळा मराठा गौरवाचा मानदंड उभा करेल', त्यांच्या सुशासनाने प्रेरित होऊन आम्ही विकासकामांना गती देतोय. या सोहळ्यात मराठा आणि धनगर समाजातील मातब्बर, जसे आमदार गोपीचंद पडळकर, सत्यजीत देशमुख, सदाभाऊ खोत, सुरेश खाडे, स्थानिक आमदार सुधीर गाडगीळ उपस्थित होते. शिवाय राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेस खासदार विशाल पाटील, आमदार विश्वजित कदम प्रोटोकॉल म्हणून व्यासपीठावर होते. पूर्ण कार्यक्रम मंत्री चंद्रकांत पाटील हाताळत होते. धनगरी ढोल वाजवत पडळकरांनी उत्साह दाखवला, तर काँग्रेस-राष्ट्रवादी नेत्यांना समारंभभर बाजूला राहावे लागले. वेब लाइव्ह स्ट्रीमिंगमध्येही लाखो लोकांनी हा सोहळा पाहिला, ज्यात फडणवीस मराठा आणि धनगर विभूतींवर स्तुतिसुमने उधळताना दिसले. आपले विकासाला प्राधान्य असल्याचे त्यांनी सर्व कार्यक्रमात आवर्जून सांगितले आणि तिथल्या तिथल्या विकासकामांची जंत्रीच कार्यक्रमात वाचून दाखवली. या कार्यक्रमात पूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादीत असलेले नेते आता भाजपमध्ये सामील होऊन हिरीरीने सहभागी झालेले दिसले. हे नेते, कार्यकर्ते भाजपच्या विजयाच्या घोषणा देताना आणि त्याचवेळी व्यासपीठावरील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना नमस्कार करून पुढे जाताना लोकांनी पाहिले.दक्षिण महाराष्ट्रातील हा बदल खूप मोठा बदल आहे. येत्या निवडणुकीमध्ये दोन्ही काँग्रेस सोडून गेलेल्या या नेतृत्वाला आणि नगरपालिका, महापालिका निवडणुकांमध्ये नशीब आजमावणाऱ्या छोट्या छोट्या कार्यकर्त्यांना लोक स्वीकारतात का, की दोन्ही काँग्रेसने दिलेल्या त्याच जातीच्या उमेदवारांना साथ देतात हे नजीकच्या काळात दिसेलच. त्या दृष्टीने काँग्रेस नेते पर्यायी नेतृत्व आणि उमेदवार शोधून बसले आहेत. त्यांनीही तेथे आपल्या समर्थकांचा वावर कायम ठेवून आपले आव्हान अजून कायम असल्याचे दाखवले. इचलकरंजी येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण हा सोहळा अधिक भावनिक ठरला. 'श्री शंभू तीर्थ' स्मारकासह झालेल्या या कार्यक्रमात फडणवीस म्हणाले, 'संभाजी महाराज हे तळपती तलवार होते. दगाफटक्यात शहीद न झाले असते तर देशाचा इतिहास वेगळा असता. औरंगजेबाची कबर मराठ्यांनीच खोदली, हा हिंदुत्वाचा अभिमान जागवावा लागेल.' या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांची उपस्थिती होती. सांगली आणि इचलकरंजी दोन्ही कार्यक्रमात हिंदुत्ववादी मतांना सुखावण्याचे काम यानिमित्ताने फडणवीस यांच्याकडून केले गेले हे विशेष आहे. त्यातही वैशिष्ट्य म्हणजे मराठा आणि धनगर वर्गातील इतकेच नव्हे तर जैन आणि इतर जात वर्गातील नेतृत्वही भाजपबरोबर व्यासपीठावर दिसले; तर निवडणुकीपुरते नव्हे तर एरवीच्या समारंभातही होऊ लागले आहे. दक्षिण महाराष्ट्रावर प्रभाव टाकणाऱ्या या तीन महत्त्वाच्या जाती आता बदल स्वीकारत आहेत आणि कधीकाळी सत्यशोधक आणि ब्राह्मणेतर चळवळीचे केंद्रस्थान असलेल्या या क्षेत्रात भाजप दोन्ही काँग्रेसला धक्का देत आहे हे यानिमित्ताने पुन्हा एकदा दिसून आले. इचलकरंजी महापालिकेची ही पहिलीच निवडणूक आहे. आवाडे परिवाराचा इचलकरंजी परिसरावर असलेला एकछत्री अंमल भाजपने सर्वप्रथम हादरवून सोडला. पुढे तोच परिवार भाजपचा भाग बनला. शेजारच्या पन्हाळा तालुक्यात सर्वसमावेशक नेतृत्व असणारे मात्र लिंगायत समाजाचे असलेले विनय कोरे जनसुराज्य शक्ती पक्षाच्या निमित्ताने भाजपबरोबर युती करून आहेत. लोक थेट भाजपला स्वीकारत नसल्याने कोरे यांनी नेहमीच भाजप बरोबर आपल्या पक्षाचे स्वतंत्र अस्तित्व राखून हातमिळवणी केली आहे. आता बदलत्या काळानुसार त्यांचेही राजकारण उघडपणे सुरू झाले आहे.इचलकरंजी या ठिकाणीही मराठा आणि धनगर समाजाचे शेकडो मातब्बर उपस्थित होते. पालकमंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजप नेत्यांनी हा सोहळा भव्य केला. त्याचा प्रभाव जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये सुद्धा दिसेल. फडणवीसांनी मराठा आणि धनगर आरक्षणासंदर्भातील वादग्रस्त मुद्द्यांना टाळून विकासावर आणि महान व्यक्तींच्या कार्यावर भाषण करून आपल्याला अडचणीचा ठरणारा मुद्दा अत्यंत सोयीस्करपणे आणि चलाखपणाने बाजूला ठेवला. त्याची वाच्यता होणार नाही याची दक्षता घेतली गेली आणि त्याला कोणाचा आक्षेपही नव्हता.पुण्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण हा महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेला सोहळा ठरला. यापूर्वी फडणवीसांनी सीएसएमटी स्टेशनवर भव्य पुतळ्याच्या घोषणेचा उल्लेख करत म्हटले आहे की, 'शिवरायांचा इतिहास प्रत्येकापर्यंत पोहोचेल. महापालिका निवडणुकीत विकास आणि सुशासनावर भर देऊ.' निवडणूक आयोगाच्या घोषणेच्या काही तास आधी हा कार्यक्रम होणे हे राजकीय धोरणाचे उदाहरण आहे. फडणवीस म्हणाले, 'महायुती सरकार मराठा-ओबीसी-धनगर सर्वांच्या हितासाठी कार्यरत आहे. इचलकरंजीत संभाजी महाराजांच्या पराक्रमावर बोलताना त्यांनी हिंदुत्व जागरणाची हाक दिली: 'स्वराज्यरक्षकांचा वारसा जपूया.' या दौऱ्याने महापालिका निवडणुकीत (सांगली, इचलकरंजी, कोल्हापूर, सोलापूर,पुणे) महायुतीला फायदा होईल, असा अंदाज आहे. फडणवीसांच्या या दौऱ्याने दक्षिण महाराष्ट्रात विकास आणि गौरवाची लाट उसळली. मराठा-धनगर समाजातील बदल हा राजकीय भूकंप घडवू शकतो. हे केवळ प्रचारापुरते नाही, तर दीर्घकालीन धोरण आहे. महापालिका निवडणुकीत काय घडेल, हे येत्या महिन्यात स्पष्ट होईल. पण यानिमित्ताने फडणवीस यांनी केवळ प्रचाराचा नारळ फोडला नाही तर मराठा, धनगर समाजाबरोबरच जैन आणि लिंगायत समाजाला एकूणच हिंदुत्ववादी मतदारांना सुखावत प्रचाराची सुरुवातच केली. हे सगळे करताना विरोधकांची तयारी सुरू असली तरी भाजपच्या या आक्रमक धोरणामुळे त्यांना आपले पत्ते उघड करणे अवघड झाले आहे. शक्तिपीठ महामार्गापासून शेतकरी, कामगार, सर्वसामान्यांच्या प्रश्नांचे अनेक मुद्दे घेऊन फडणवीस यांना जाब विचारणे विरोधी पक्षांना शक्य होते. मात्र फडणवीसांच्या झंजावातात विरोधकांना त्यांच्या स्वतःच्या भूमिकेचाही विसर पडला असे म्हणावे लागेल.- प्रतिनिधी
आयपीएलचा संपूर्ण लिलाव कधी, कुठे आणि केव्हा? जाणून घ्या सविस्तर
नवी दिल्ली : आयपीएलचा लिलाव आता फक्त काही तासांवर येऊन ठेपला आहे. या लिलावासाठी आयपीएलच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली असून सर्वांचे डोळे लिलावाकडे लागले आहेत. मात्र हा आयपीएलचा लिलाव कुठे आणि कधी लाइव्ह पाहता येणार आहे, याबद्दल सविस्तर जाणून घेण्यासाठी संपूर्ण माहिती वाचा...आयपीएलचा लिलाव कधी होणार?आयपीएलला लिलाव हा मंगळवारी म्हणजेच १६ डिसेंबरला होणार आहे.आयपीएलला लिलाव कुठे होणार?आयपीएलचा लिलाव बहुतांशीपणे भारतात होतो,पण यावर्षी मात्र आयपीएलचा लिलाव हा भारतात होणार नाही.यावेळी आयपीएलचा लिलाव हा संयुक्त अरब अमिराती म्हणजेच युएईमध्ये होणार आहे.आयपीएलचा लिलाव भारतीय वेळेनुसार किती वाजता सुरु होणार?यावेळी आयपीएलचा लिलाव हा युएईमध्ये होणार आहे. युएई आणि भारताच्या वेळेत तफावत आहे. त्यामुळे आयपीएलचा लिलाव हा भारतीय वेळेनुसार दुपारी २.३० वाजता सुरु होणार आहे.आयपीएलचा लिलाव कुठे लाइव्ह पाहू शकता?आयपीएलचा लिलाव हा नेमका कुठे पाहता येणार, हा प्रश्न अनेकांना पडला आहे. कारण सध्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात टी २० सामन्यांची मालिकाही सुरु आहे आणि लिलाव हा युएईमध्ये होणार आहे. पण यावेळी होणारा आयपीएलचा लिलाव हा स्टार स्पोर्ट्सच्या वाहिन्यांवर लाइव्ह पाहायला मिळणार आहे. जर तुम्हाला हा लिलाव मोबाईल किंवा लॅपटॉपवर पाहायचा असेल तर तुम्ही Jio Hotstar वर थेट पाहू शकता. हा लिलाव दुपारी २.३० वाजता सुरु झाला की, दिवसभर असणार आहे. कारण संपूर्ण दिवस फक्त लिलाव चालणार आहे.आयपीएलच्या लिलावाची उत्सुकता सर्वांनाच असते. कारण या लिलावात कोणते खेळाडू कोणत्या संघात जात आहेत, हे जाणून घेणे सर्वांसाठी महत्वाचे असते. त्यामुळे आयपीएच्या लिलावात कोणता महागडा खेळाडू ठरतो, कोणत्या खेळाडूला किती भाव मिळतो आणि कोणते खेळाडू अनसोल्ड राहतात, याची उत्सुकता सर्वांना असणार आहे. त्यामुळे आयपीएच्या लिलावावर सर्वांचे लक्ष असणार आहे.
विद्यार्थ्यांचा अनादर केल्यास शिक्षकांवर होणार कठोर कारवाई
शिक्षण विभागाकडून कठोर नियमावली; सुरक्षेत कसूर झाल्यास शाळा व्यवस्थापन आणि मुख्याध्यापक जबाबदारमुंबई : शाळेतील मुलांना अपमानास्पद बोलणे, मारहाण किंवा मानसिक त्रास देणाऱ्या शिक्षकांवर आता कठोर केली जाणार आहे. शालेय शिक्षण विभागाने याबाबत कठोर नियमावली लागू केली असून, शाळेतील प्रत्येक शिक्षक, मुख्याध्यापक आणि व्यवस्थापनाची जबाबदारी स्पष्ट केली आहे.शाळेत शिकणाऱ्या मुलांना शारीरिक, मानसिक आणि भावनिकदृष्ट्या सुरक्षित ठेवण्यासाठी ही नियमावली लागू करण्यात आली आहे. हे नियम केंद्र सरकारच्या २०२१ च्या 'शाळा सुरक्षा आणि संरक्षण मार्गदर्शक सूचनां'वर आधारित आहेत. त्यात शाळा व्यवस्थापन, मुख्याध्यापक, शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. शाळेत मुलांना कोणत्याही प्रकारची मारहाण (उदा. हाताने मारणे, काठीने फटके मारणे, कान ओढणे, शिक्षा म्हणून उन्हात उभे करणे) किंवा वाईट बोलणे, अपमान करणे, मानसिक छळ किंवा भेदभाव करता येणार नाही.दोन दिवसांच्या आत अहवाल पाठवणे बंधनकारक- कोणतीही अनुचित घटना घडली तर मुख्याध्यापकांना ताबडतोब ती नोंद करावी लागेल आणि दोन दिवसांच्या आत शिक्षण विभागाला अहवाल पाठवावा लागेल. याशिवाय घटनेशी संबंधित सर्व पुरावे, जसे की मुलांची हजेरी, अर्ज, वैद्यकीय रिपोर्ट, सीसीटीव्ही फुटेज इत्यादी नीट जपून ठेवावे लागतील.- जर घटना गंभीर असेल, विशेषतः लैंगिक छळाशी संबंधित, तर पोक्सो कायद्याने आणि बाल न्याय कायद्याने २४ तासांच्या आत पोलिसांत तक्रार करणे अनिवार्य आहे.https://prahaar.in/2025/12/16/the-fire-fighting-system-at-the-trauma-care-hospital-in-jogeshwari-has-become-outdated/शिस्तभंगाची कारवाई होणारहे नियम योग्य रीतीने पाळले जातील याची खात्री करण्यासाठी अधिकारी आणि मुख्याध्यापकांवरही मोठी जबाबदारी टाकण्यात आली आहे. जर कोणी घटना लपवली, पुरावे नष्ट केले किंवा खोटी माहिती दिली, तर त्या व्यक्तीवर शिस्तभंगाची कठोर कारवाई होईल. एखादे वृत्तपत्र किंवा वाहिन्यांमध्ये अशा प्रकारची गंभीर बातमी आली, तर शिक्षण अधिकाऱ्यांनी स्वतःहून चौकशी सुरू करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. शाळेतील मुलांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही ढिलाई खपवली जाणार नाही. सर्व शाळांना हे नियम काटेकोरपणे पाळावे लागतील आणि त्याची अंमलबजावणी नीट होईल यासाठी अधिकाऱ्यांनाही जबाबदार धरले जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
Tejashwi Ghosalkar : राज्यातील २९ महापालिकांचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याअगोदर मुंबईत एक मोठी घडामोड घडली. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या निष्ठावंत समजल्या जाणाऱ्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र करत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. मुंबई भाजपचे शहराध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तेजस्वी घोसाळकर यांनी उद्धव ठाकरे यांची […] The post तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात जाण्याचा निर्णय का घेतला? महत्वाची माहिती समोर; पक्ष प्रवेशाच्या टायमिंगची चर्चा कारण…. appeared first on Dainik Prabhat .
“पृथ्वीराज चव्हाणांना काहीही बोलण्याची सवय लागली, बुद्धिभ्रंश झाला”; चंद्रशेखर बावनकुळेंचा खोचक टोला
Chandrashekhar Bawankule-Prithviraj Chavan | माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी येत्या १९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होईल, भारताचा पंतप्रधान बदलेल आणि मराठी माणूस पंतप्रधान होईल, असा दावा एका कार्यक्रमादरम्यान केला. यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. यावर आता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पृथ्वीराज चव्हाण हे […] The post “पृथ्वीराज चव्हाणांना काहीही बोलण्याची सवय लागली, बुद्धिभ्रंश झाला”; चंद्रशेखर बावनकुळेंचा खोचक टोला appeared first on Dainik Prabhat .
पंजाबमधील ‘या’तीन शहरात मद्य आणि मांस विक्रीवर बंदी ; राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय
Punjab Government। पंजाब सरकारने राज्यातील तीन प्रमुख धार्मिक शहरांबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. अधिकृत अधिसूचनेत अमृतसरचे वॉल्ड सिटी, श्री आनंदपूर साहिब नगर आणि तलवंडी साबो नगर ही राज्यातील पवित्र शहरे म्हणून घोषित करण्यात आली आहेत. या निर्णयानंतर, या भागात दारू, तंबाखू आणि मांस यासारख्या उत्पादनांच्या विक्री आणि सेवनावर कडक निर्बंध लादण्यासाठी पावले उचलली जात […] The post पंजाबमधील ‘या’ तीन शहरात मद्य आणि मांस विक्रीवर बंदी ; राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय appeared first on Dainik Prabhat .
जोगेश्वरीतील ट्रॉमा केअर रुग्णालयातील अग्निशमन प्रणाली झाली जुनी; धुर शोध प्रणालीही नाही अस्तित्वात
मुंबई (सचिन धानजी):मुंबई महापालिकेच्या जोगेश्वरी पूर्व येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयातील विद्यमान अग्निशमन प्रणाली ही जुनी झाली असून याचा योग्यप्रकारे वापर होत नसल्याने आता या इमारतीमध्ये धुर शोध प्रणालीअस्तित्वात नाही.. त्यामुळे या रुग्णालयात आता नव्याने अग्निशमन दलाच्यावतीने यंत्रणा बसवण्याात येणार आहे.जोगेश्वरी (पूर्व) हे मुंबईच्या पश्चिम उपनगरातील रुग्णालयांपैकी एक रुग्णालय असलेल्या या रुग्णालयात एमआयसीयु, एसआयसीयु, एनआयसीयु, एमआरआय आणि सिटी स्कॅन आदी सुविधा उपलब्ध आहेत. मागील काही महिन्यांपूर्वी या रुग्णालयात मुंबई अग्निशमन विभागाच्या वतीनेअग्नि लेखापरिक्षण केले होते. त्यांच्या अहवालानुसार कार्यालयातील यांत्रिक व विद्युत विभागाच्या अभियंत्याने रुग्णालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयाची पाहणी केली.. मुंबई अग्निशमन विभागाच्या अग्नि लेखापरिक्षण अहवालानुसार रुग्णालयात अग्निशामक हायड्रेट, स्प्रिंकलर, फायर अलार्म प्रणाली, फायर पंप इत्यादींची तातडीने स्थापना करण्याची शिफारस करण्यात आली होती. विद्यमान अग्निशमन प्रणाली सन २०१० मध्ये बसविण्यात आली होती, त्यामुळे ती सद्यःस्थितीत जीर्णावस्थेत आहे. तसेच ती सुरळीतपणे कार्यरत ही नाही.https://prahaar.in/2025/12/16/the-cctv-cameras-at-the-election-warehouse-in-vikhroli-were-switched-off/रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांच्या माहिती नुसार , अग्निशमन प्रणाली जुनी असल्याने तसेच धूर शोषक प्रणाली नसल्याने महापालिकेने ही प्रणाली रुग्णालयात बसवणे आवश्यक बनले आहे. तसेच फायर अलार्म प्रणाली सह सार्वजनिक घोषणा प्रणालीही जुनी झाली आहे. त्यामुळे विविध कारणांमळे आगीच्या घटना वाढत त्यामुळे अग्निसुरक्षेच्या जागरुकतेसोबतच योग्य ती प्रतिबंधात्मक खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे टॉमा केअर रुग्णालयामध्ये आवश्यक यंत्रणा उपलब्ध करुन अप्रिय घटना टाळण्यासाठी आवश्यक ती पूर्व खबरदारी घेणे आवश्यक आहे. . आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षितरित्या बाहेर पडण्याकरिता स्वयं चमकणारे चिन्ह फलक बसवण्याचाही निर्णय घेतला आहे. त्यानुसार महापालिकेच्यावतीने आता नवीन अग्निशमन प्रणाली बसवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सव्वा चार कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. यासाठी ओमेक्स कंट्रोल सिस्टीम या कंपनीची निवड करण्यात आली आहे.
National Herald case। नॅशनल हेराल्ड प्रकरणात गांधी कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयाने अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेण्यास नकार दिला आहे. या निर्णयाकडे काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासाठी एक महत्त्वाचा कायदेशीर विजय म्हणून पाहिला जात आहे. न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्ट केले की, गुन्ह्यात योग्य एफआयआर नोंदवल्याशिवाय […] The post गांधी कुटुंबाला मोठा दिलासा ; नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीच्या आरोपपत्राची दखल घेण्यास न्यायालयाचा नकार appeared first on Dainik Prabhat .
Rana Balachauria Firing | प्रसिद्ध कबड्डीपटू कंवर दिग्विजय सिंह ऊर्फ राणा बालाचौरियाची कबड्डीच्या सामन्यादरम्यान गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. पंजाबच्या मोहालीमध्ये सोमवारी सायंकाळी ही घटना घडली आहे. सेल्फी काढण्याच्या बहाण्याने आरोपी कंवर दिग्विजय सिंहजवळ आला आणि त्याने अचानक गोळ्या झाडल्या. डोक्यात आणि चेहऱ्यावर अनेक गोळ्या लागल्याने बालाचौरीया जमिनीवर कोसळले. त्यांना तातडीने मोहाली येथील फोर्टिस […] The post सेल्फीच्या बहाण्याने जवळ आले अन् थेट कबड्डीपटूची गोळ्या झाडून केली हत्या; सिद्धू मुसेवाला प्रकरणाचे कनेक्शन समोर appeared first on Dainik Prabhat .
कफ सिरप रॅकेटमध्ये खळबळजनक खुलासा
७०० कंपन्या फक्त कागदावरच, अब्जावधींची कमाई; ईडीचा दावानवी दिल्ली : सक्तवसुली संचालनालयाने टाकलेल्या छाप्यात कफ सिरप रॅकेट आणि अवैध तस्करी प्रकरणी मोठा पर्दाफाश झाला आहे. ४० तासांपेक्षा अधिक तास ईडीने छापा टाकला. यानंतर मिळालेल्या पुराव्यांनुसार २२० संचालकांच्या नावानं ७०० पेक्षा अधिक कंपन्या बनवण्यात आल्या. या कंपन्यांच्या माध्यमातून अब्जावधी रुपयांची कमाई करण्यात आलीय. धक्कादायक म्हणजे यातील बहुतांश कंपन्या फक्त कागदावरच आहेत.ईडीच्या अधिकाऱ्यांनाही कंपनीच्या कागदपत्रांची तपासणी करताना आश्चर्याचे धक्के बसले. कंपनीत अनेक कर्मचारीही फक्त कागदावरच होते. ईडीच्या सूत्रांनी दावा केलाय की अजूनही अनेक कंपन्यांबाबत पुरावे गोळा केले जात आहेत. ईडीसमोर आलेल्या पुराव्यांच्या आधारे लवकरच संपत्ती जप्त करण्याची कारवाई सुरू केली जाणार आहे.उत्तर प्रदेश, गुजरात आणि झारखंडमधील २५ ठिकाणांवर ईडीने छापा टाकला. यात समोर आलेल्या माहितीमुळे ईडीचे कर्मचारीही चक्रावले आहेत. ईडीने युपीत अशा पद्धतीची फसवणूक पहिल्यांदाच समोर आल्याचं म्हटलंय.फेंसेडिल सिरप बनवणाऱ्या एका कंपनीच्या अनेक अधिकाऱ्यांना याबाबत माहिती होतं पण त्यांनी मौन बाळगलं होतं. एसटीएफच्या एएसपी लाल प्रताप सिंह यांनी सांगितलं की, एका कंपनीतील अनेक अधिकारीही चौकशीच्या फेऱ्यात येतील.एसटीएफची चौकशी झाल्यानंतरही शुभम जयस्वाल, माजी खासदाराचे निकटवर्तीय अलोक सिंह, अमित टाटा यांनी स्वत:ला वाचवण्यासाठी वेगवेगळ्या कल्पना लढवायला सुरुवात केली. अमित आणि अलोक यांना अटक केल्यानंतरही यांना काही अडचण झाली नाही. कोर्टात हे आरोपी निश्चिंत होते. जेव्हा ईडीने अमित, शुभम, अलोक यांच्या ठिकाणांवर छापे टाकायला सुरुवात केली तेव्हा मात्र घाबरले.दुबईत या घोटाळ्याचा सूत्रधार शुभम जयस्वाल लपून बसलाय. तर अलोक सिंह, अमित टाटा यांच्याशिवाय शुभमचा वडील भोला प्रसादच्या खात्यावरही व्यवहार दिसून आले आहेत. यातील अनेक व्यवहारांची पूर्ण माहिती मिळालेली नाही. कंपन्यांच्या नावाने उघडलेल्या खात्यांवरही असे व्यवहार आहेत ज्याची पुढची माहिती नाही. आणखी काही खोट्या कंपन्यांची नावे समोर येण्याची शक्यता आहे. जीएसटी विभागाकडून या कंपन्यांबाबत यादी मिळणार आहे. यामुळे तपासाची व्याप्ती वाढणार आहे.
अवघ्या १३व्या वर्षी शाळकरी मुलांमध्ये व्यसनाची सुरुवात!
दहा शहरांतील अभ्यासातून वास्तव उघड…मुंबई : देशातील शाळेत जाणाऱ्या मुलांमध्ये तंबाखू, धूम्रपान, मद्यपान तसेच अमली पदार्थांचे व्यसन सरासरी १३व्या वर्षीच सुरू होत असल्याची धक्कादायक माहिती एका नव्या अभ्यासातून समोर आली आहे. एम्स दिल्लीच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या अभ्यासात भारतातील १० प्रमुख शहरांतील शाळकरी विद्यार्थ्यांचा समावेश होता.अभ्यासानुसार, इयत्ता ८,९,११ व १२ मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी मोठ्या प्रमाणावर मुलांनी लहान वयातच व्यसनांचा अनुभव घेतल्याचे निदर्शनास आले. एकूण ५,९२० विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या सर्वेक्षणात पदार्थांच्या वापराची सरासरी सुरुवातीची वयोमर्यादा १२.९ वर्षे असल्याचे नोंदले गेले.विशेष म्हणजे, इंहेलंट्स (श्वसनाद्वारे घेतले जाणारे पदार्थ) वापरण्याचे वय सर्वात कमी असून ते सरासरी ११.३ वर्षे असल्याचे आढळले. त्यानंतर हेरॉइन (१२.३ वर्षे) आणि वैद्यकीय औषधांचा गैरवापर (१२.५ वर्षे) यांचा क्रम लागतो. तंबाखू आणि मद्यपान हे सर्वाधिक वापरले जाणारे पदार्थ असल्याचेही अभ्यासात स्पष्ट झाले आहे. अभ्यासात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांपैकी १५ टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांनी आयुष्यात कधी ना कधी व्यसनांचा वापर केल्याचे मान्य केले, तर १०.३ टक्के विद्यार्थ्यांनी मागील एका वर्षात आणि ७.२ टक्के विद्यार्थ्यांनी मागील महिन्यात अशा पदार्थांचा वापर केल्याचे सांगितले.चिंतेची बाब म्हणजे, जवळपास निम्म्या विद्यार्थ्यांनी तंबाखू सहज उपलब्ध असल्याचे, तर ३६ टक्के विद्यार्थ्यांनी मद्य सहज मिळत असल्याचे नमूद केले. यामुळे अल्पवयीन मुलांपर्यंत व्यसनाधीन पदार्थ सहज पोहोचत असल्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.विशेष म्हणजे ९५ टक्के विद्यार्थ्यांना व्यसन हानिकारक असल्याची जाणीव असूनही त्यांचा वापर सुरू असल्याचे दिसून आले. मुलींच्या तुलनेत मुलांमध्ये व्यसनांचे प्रमाण अधिक असल्याचेही अभ्यासात स्पष्ट झाले आहे.अर्थात शहरी भागात मुलींमध्ये मोठ्या प्रमाणात धुम्रपान व मद्यपानाची सवय असल्याचे दिसून आली आहे. गंभीर बाब म्हणजे शासनाने शाळांच्या शंभर मीटर परिसरात पान तंबाखूची दुकाने असू नयेत असे आदेश काढले असले तरी पोलिसांकडूनही याबाबत ठोस कारवाई होताना दिसत नाही.शालेय व महाविद्यालयीन परिसरात केवळ तंबाखूजन्य पदार्थच नव्हे तर अंमली पदार्थही उघडपणे मिळतात असे सूत्रांचे म्हणणे आहे. चरस-गांजापासून विविध अमली पदार्थ विद्यार्थ्यांना सहज उपलब्ध होत असून मोठ्या प्रमाणात तरुण पिढी व्यसनाकडे वळताना दिसत आहे.केवळ जनजागृती नव्हे तर पालक, शाळा, समाज आणि प्रशासन यांच्या एकत्रित प्रयत्नांशिवाय ही समस्या आटोक्यात येणार नाही असा इशाराही अभ्यासकांनी दिला आहे.
घरगुती गुंतवणूकदारांची सत्वपरीक्षा ! शेअर बाजारात सेन्सेक्स व निफ्टीत घसरण 'या,'जागतिक कारणांमुळे
मोहित सोमण : आजही इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सकाळच्या सत्रात अपेक्षित घसरण कायम राहिली असून सेन्सेक्स ३६०.०४ अंकाने व निफ्टी १०५.५० अंकाने घसरला आहे. विशेषतः बँक निर्देशांकात झालेल्या घसरणीसह मेटल (०.७७%), प्रायव्हेट बँक (०.३२%),आयटी (०.७६%), मिडस्मॉल फायनांशियल सर्विसेस एक्स बँक (०.५७%) निर्देशांकात सर्वाधिक घसरण झाली असून वाढ एफएमसीजी (०.६४%), कंज्यूमर ड्युरेबल्स (०.२७%), ऑटो (०.०४%) निर्देशांकात वाढ झाली आहे. व्यापक निर्देशांकात स्मॉलकॅप ५० (०.५०%), मिडकॅप १०० (०.४१%) निर्देशांकात घसरण कायम आहे. विशेषतः आज बाजारातील अस्थिरतेचा फटका गुंतवणूकदारांना बसला असून परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची भूमिका आज बेंचमार्क निर्देशांकातील दृष्टीने महत्वाची ठरणार आहे.युएस बाजारासह आशियाई बाजारातील कमकुवत सुरुवातीचा फटका भारतीय बाजारात कायम राहणार असून आजही अस्थिरतेचे सत्र म्हणून गुंतवणूकदारांना सावधगिरीचे पाऊल उचलावे लागेल असे दिसते. युएस बाजारातील एआय टेक शेअर्समध्ये मोठ्या सेल ऑफ झाल्याने व आज जाहीर होणाऱ्या पेरोल रोजगार डेटामुळे गुंतवणूकदारांनी सावधगिरीचे पाऊल उचललेले दिसते. चीनच्या कमकुवत आकडेवारीचा इफेक्ट म्हणून आशियाई पॅसिफिक बाजारात आज संमिश्र कल बाजारात दिसू शकतो. दुसरीकडे काल भारतीय शेअर बाजारात जवळपास ३०० अंकाने अखेरच्या सत्रात सावरला असल्याने किरकोळ घसरणीसह बंद झाला. कालही झालेल्या रुपयांच्या घसणीसह परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक बाजारातून काढून घेतली.आज आशियाई बाजारातील पहिल्या सत्रातील घसरण कालप्रमाणे आजही कायम राहिली असल्याने गिफ्ट निफ्टी (०.३५%) सह निकेयी २२५ (१.२१%), हेंगसेंग (१.९५%), शांघाई कंपोझिट (१.२२%), तैवान वेटेड (१.५०%) निर्देशांकात घसरण झाली आहे. काल युएस बाजारात डाऊ जोन्स (०.०२%) वगळता एस अँड पी ५०० (०.१६%)सह नासडाक (०.६१%) निर्देशांकात घसरण झाली आहे.आज सुरुवातीच्या सत्रात सर्वाधिक वाढ एफएसीटी (५.५५%), टाटा टेलिकम्युनिकेशन (४.५२%), निवा बुपा हेल्थ (३.१५%), भारती हेक्साकॉम (३.०८%), सिमेन्स इंजिनिअरिंग (२.४५%), सुप्रीम इंडस्ट्रीज (२.३२%), एमआरपीएल (२.२४%),अव्हेन्यू सुपरमार्ट (१.९७%) समभागात झाली आहे असून टीआरआयएल (४.८५%), ओला इलेक्ट्रिक (४.०१%), अँक्सिस बँक (३.७८%), इटर्नल (३.३८%), हिंदुस्थान कॉपर (२.६१%), पीबी फिनटेक (२.५४%), जेएम फायनांशियल (२.४८%), भेल (२.३२%) समभागात झाली आहे.आजच्या सुरुवातीच्या कलावर भाष्य करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य गुंतवणूक रणनितीकार डॉ वी के विजयाकुमार म्हणाले आहेत की,'बाजार जवळच्या काळात एकत्रीकरणाच्या (Consolidation) स्थितीत जात आहे. घरगुती गुंतवणूकदारांनी (DII) खरेदीमुळे सतत परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची विक्री सहजपणे शोषली जात असल्याने आणि आर्थिक मूलभूत घटक लक्षणीय सुधारणा दर्शवत असल्याने, बाजाराला कमकुवतपणावर आधार मिळेल. नोव्हेंबरमधील व्यापार तूट ऑक्टोबरमधील ४१.६४ अब्ज डॉलरवरून २४.५३ अब्ज डॉलरपर्यंत कमी झाल्यामुळे रुपया देखील स्थिर होण्याची शक्यता आहे. यामुळे परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांवरील (FII) विक्रीचा दबाव कमी होईल आणि पुढील घसरणीची अपेक्षा आहे.अमेरिकेत एआयमधील व्यापार कमकुवत होत आहे. शक्यता आहे की २२०६ मध्ये कधीतरी, एआय व्यापार लक्षणीयरीत्या कमकुवत होईल ज्यामुळे भारतासारख्या EMs मध्ये भांडवल प्रवाह सुलभ होईल. तथापि, जर बाजाराला सतत ताकद दाखवायची असेल तर कमाईची पुनर्प्राप्ती आवश्यक आहे. Q3 ची आकडेवारी कमाईची पुनर्प्राप्ती कुठे होत आहे हे दर्शवेल. बँक निफ्टी मजबूत राहील.'
मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महानगरपालिकेने डिजिटल सेवांच्या दिशेने महत्वपूर्ण पाऊल टाकले आहे. नागरिकांच्या आरोग्य सुविधेसाठी ‘हेल्थ चॅटबॉट’ ची सुविधा महानगरपालिकेने उपलब्ध करून दिली आहे. या डिजिटल सुविधांचे लोकार्पण राज्याचे माहिती तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्रीआशिष शेलार यांच्या शुभहस्ते सोमवारी १५ डिसेंबर २०२५ रोजी करण्यात आले.येत्या कालावधीत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून आरोग्य सुविधांबाबतचे समर्पक असे संकेतस्थळ आणि ओपीडी रुग्णशय्या उपलब्धतता डॅशबोर्डही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तंत्रज्ञानावर आधारित सेवांमुळे नागरिकांना आरोग्याशी संबंधित माहिती अधिक सुलभपणे मिळण्यासाठी मदत होणार आहे.महानगरपालिकेच्या वतीने डिजीटल पुढाकार अंतर्गत नागरिकांना आरोग्य क्षेत्रासाठी चॅटबॉटची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या डिजीटल पुढाकाराच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रात पारदर्शकता वाढवतानाच, आरोग्य सुविधांची पोहच आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.सार्वजनिक आरोग्याशी संबंधित माहिती सहजशक्य आणि डिजीटल पद्धतीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासकभूषण गगराणी यांनी दिले होते. डिजीटल पद्धतीने सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे नागरिकांना अतिशय पारदर्शकपणे माहिती उपलब्ध होणार आहे. महानगरपालिकेच्या कामकाजात अधिकाधिक माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग केला जात आहे. याचा एक भाग म्हणून डिजीटल पद्धतीने ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यासह अद्ययावत माहिती उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य विभाग अंतर्गत घेतलेला हा पुढाकार नागरिकांसाठी महत्त्वाचा ठरेल. अधिकाधिक तंत्रज्ञानस्नेही पुढाकारांमुळे नागरिकांच्या वेळेची बचत होईल. तसेच आरोग्य क्षेत्रातील आपत्कालीन प्रसंगीचे निर्णय घेण्यासाठी ही सुविधा महत्वाची ठरेल.बीएमसी हेल्थ चॅटबॉटनागरिकांना आरोग्याच्यादृष्टीने प्रतिबंधात्मक काळजी घेण्यापासून ते संपूर्ण आरोग्य सेवांची माहिती देण्यासाठी 9892993368 हा चॅटबॉट क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. या पुढाकार अंतर्गत आजाराबाबत जनजागृती, आरोग्य क्षेत्रातील मोहीमेची माहिती, नजीकची आरोग्य सुविधा, नोंदणींबाबत माहिती, आरोग्य प्रमाणपत्र तसेच परवान्याबाबतची माहिती, आरोग्य केंद्राच्या ठिकाणी भेटीची ऑनलाईन पद्धतीने नोंदणी इत्यादी सुविधा चॅटबॉटच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. त्यामुळे नागरिकांचा वेळ वाचण्यासाठी मदत होईल. त्यासोबतच आरोग्य यंत्रणेतील कार्यक्षमता वाढीसाठीही मदत होईल.नागरी सेवांमध्ये जन्म आणि मृत्यू दाखल्यासाठी अर्ज करण्याबाबतची माहिती, विवाह नोंदणीची माहिती, अपंगत्व प्रमाणपत्र, आरोग्य परवाने तसेच प्रसूतिगृहाशी संबंधित परवाने मिळवण्याच्या प्रक्रियेची माहितीही या चॅटबॉटच्या माध्यमातून मिळणार आहे.ऑनलाईन नोंदणी आणि सेवा नोंदणीनागरिकांना आरोग्य केंद्राच्या ठिकाणी ऑनलाईन नोंद करण्यासाठी डिजिटल पद्धतीने नोंद करणे शक्य होणार आहे. नागरिकांची वेळेची बचत ऑनलाईन नोंदणी सुविधेमुळे शक्य होईल.राज्यस्तरीय तसेच राष्ट्रीय आरोग्य सेवांसाठीचा पुढाकारराज्य आणि राष्ट्रीय स्थरावरील आरोग्य सुविधा आणि सेवांसाठी महत्वाची माहिती चॅटबॉटच्या माध्यमातून आगामी कालावधीत उपलब्ध होणार आहे. राज्य आणि केंद्र सरकारशी संबंधित विविध आरोग्य योजनांची माहिती याठिकाणी उपलब्ध होईल.
भारतीय रेल्वेने ११ वर्षांत तयार केले ४२ हजारांहून अधिक एलएचबी कोच
नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने गेल्या ११ वर्षांत (२०१४-२०२५) ४२,६०० हून अधिक एलएचबी कोच (लिंके हॉफमन बुश) तयार केले आहेत, जे रेल्वेच्या आधुनिकीकरण, सुरक्षितता आणि प्रवाशांच्या सोयीसुविधा वाढवण्याच्या दिशेने मोठे पाऊल आहे. हे कोच पारंपरिक आयसीएफ कोचपेक्षा अधिक सुरक्षित, आरामदायी आणि कमी देखभालीचे आहेत, तसेच 'आत्मनिर्भर भारत' आणि 'मेक इन इंडिया' अभियानाला पाठिंबा देतात. या उत्पादनामुळे देशांतर्गत उत्पादन क्षमता वाढली असून आयातीवरील अवलंबित्व कमी झाले आहे.चालू आर्थिक वर्ष २०२५-२६ (नोव्हेंबर २०२५ पर्यंत) एकूण ४,२२४ हून अधिक एलएचबी कोच तयार करण्यात आले आहेत. गेल्या वर्षी याच कालावधीत उत्पादित केलेल्या ३,५९० कोचच्या तुलनेत ही १८% वाढ दर्शवते.उत्पादनातील ही वाढ रेल्वे युनिट्समधील उत्पादन क्षमतेतील सतत बळकटीकरण आणि सुधारित उत्पादन नियोजन दर्शवते. एलएचबी कोचमुळे रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित, सुरळीत आणि अधिक कार्यक्षम बनतो.
अहमदाबादच्या भक्तांकडून साईचरणी सोन्याची गणेश मूर्ती
शिर्डी : श्री साईबाबांवर देश-विदेशातील लाखो भाविकांची अढळ श्रद्धा असून, भाविकांकडून श्री साईबाबांच्या चरणी भरभरून दान अर्पण केले जाते. सोमवारी गुजरात राज्यातील अहमदाबाद येथील एका साईभक्ताने श्री साईबाबांच्या चरणी १०२.४५० ग्रॅम वजनाची सोन्याची गणेश मूर्ती अर्पण केली. सदर सोन्याच्या मूर्तीची किंमत रु. १२ लाख ३९ हजार ४४० इतकी असून, दानशूर साईभक्ताने आपले नाव जाहीर न करण्याची विनंती संस्थानकडे केली आहे. ही सोन्याची गणेश मूर्ती श्री साईबाबांच्या चरणी अर्पण केल्यानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांनी देणगीदार साईभक्ताचा सत्कार करून आभार व्यक्त केले.
विक्रोळीतील निवडणूक गोदामातील सीसी टिव्ही कॅमेरे बंद
आता नव्याने सी सी टिव्ही कॅमेरांसह फायर अलार्म प्रणाली बसवणारमुंबई (विशेष प्रतिनिधी): निवडणूक खात्याच्या विक्रोळी पूर्व येथील वर्षांनगर महापालिका शाळेतील ईव्हीएम गोदामातील सीसी टिव्ही कॅमेरे वांरवार बंद पडत असून आता याठिकाणी नव्याने सी सी टिव्ही कॅमेरे तसेच फायर अलार्म सिस्टीम बसवण्यात येणार आहे.. त्यामुळे या सीसी टिव्ही कॅमेरांसह अलार्म सिस्टीम बसवण्याचे काम तातडीने होती घेण्यात आले आहे.विक्रोळी पश्चिम येथील वर्षानगर मनपा शाळा संकुल येथे ई.व्ही.एम गोदाम बनवण्यात आले असून येथील नविन गोदामात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सी. सी. टी. व्ही. सिस्टिम तसेच फायर अलार्म सिस्टिम बसविण्याबाबत उपनिवडणूक अधिकारी यांनी कळविले आहे. या ठिकाणी जागेची पाहणी केल्यानंतर या ठिकाणी ई.व्ही.एम ची योग्य हाताळणी व सुरक्षीत साठा ठेवण्याकरिता नवीन गोदाम उपलब्ध करण्यात आले आहे. परंतु सद्यस्थितीत निवडणूक खात्याच्या पहिल्या मजल्यावरील ई.व्ही.एम गोदामात कोणतीही सी.सी.टी.व्ही. तसेच फायर अलार्म सिस्टिम उपलब्ध नाही. तसेच तळमजला येथे सी.सी.टी.व्ही. सिस्टिम जी उपलब्ध आहे, ती सिस्टिम जुनी झाली आहे. येथील सी.सी.टी.व्ही. कॅमेरे वारंवार बंद पडत आहेत. त्यामुळे नवीन सी.सी.टी.व्ही. तसेच फायर अलार्म सिस्टिम बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.https://prahaar.in/2025/12/16/for-the-convenience-of-mumbai-citizens-a-health-chatbot-has-now-been-launched/त्यामुळे महापालिकेच्या यांत्रिक व विद्युत विभागाच्यावीने नव्याने निविदा प्रक्रिया राबण्यात आली आहे. यामध्ये शिवम कार्पोरेशन यांची निवड करण्यात आली आहे. यासाठी नव्याने सीसी टिव्ही कॅमेरे आणि फायर अलार्म प्रणाली बसवण्यासाठी तब्बल ८८ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.
Bigg Boss Marathi Season 6: अवघ्या महाराष्ट्राने केलं आपल्या लाडक्या रितेश भाऊचं तुफानी स्वागत!
Bigg Boss Marathi Season 6 : ज्याची वाट संपूर्ण महाराष्ट्र आतुरतेने पाहत होता, तो बहुप्रतिक्षित क्षण अखेर साकार झाला आहे. कलर्स मराठीद्वारे बिग बॉस मराठी सिझन ६ चा प्रोमो प्रदर्शित होताच प्रेक्षकांनी त्याला डोक्यावर घेतलं असून, अवघ्या १२ तासांत २.४ Million हून अधिक व्ह्यूज मिळवत हा प्रोमो सोशल मीडियावर ट्रेंड ठरतोय. “स्वागताला मनाची आणि घराची […] The post Bigg Boss Marathi Season 6: अवघ्या महाराष्ट्राने केलं आपल्या लाडक्या रितेश भाऊचं तुफानी स्वागत! appeared first on Dainik Prabhat .
‘इम्रान खान तुरुंगात, मुनीरला आजीवन संरक्षण…’ ; संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताने पाकिस्तानला फटकारले
India UNSC Statement। संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC) भारताने पाकिस्तानवर जोरदार टीका केली आहे. देशांतर्गत राजकीय अशांततेचा संबंध सीमापार दहशतवादाच्या त्यांच्या दीर्घ रेकॉर्डशी जोडला. न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रांमधील भारताचे स्थायी प्रतिनिधी, राजदूत हरीश पर्वथनेनी यांनी पाकिस्तानमधील लोकशाहीची स्थिती, इम्रान खानची अटक, लष्कराची भूमिका आणि दहशतवाद यावर सडेतोड प्रतिक्रिया दिली. “लीडरशिप फॉर पीस” या विषयावरील संयुक्त राष्ट्र […] The post ‘इम्रान खान तुरुंगात, मुनीरला आजीवन संरक्षण…’ ; संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताने पाकिस्तानला फटकारले appeared first on Dainik Prabhat .
Rohit Pawar Tweet : राज्यातील २९ महापालिकांचे निवडणुकांचे बिगुल अखेर वाजले आहे. गेल्या काही दिवसांपासून या निवडणुकांचा कार्यक्रम कधी जाहीर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. अखेर सोमवारी १५ डिसेंबर या दिवशी राज्य निवडणूक आयागाने महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार १५ जानेवारीला मतदान तर १६ जानेवारीला निकाल जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे आता हालचालींना […] The post “नेमकं कोण कोणासाठी काम करतंय आणि…”; महापालिकांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच रोहित पवारांचं ट्वीट चर्चेत appeared first on Dainik Prabhat .
Thane Election BJP | मोक्का अंतर्गत कारवाई आणि गंभीर गुन्ह्यांप्रकरणी तडीपारीची कारवाई झालेला गुंड मयूर शिंदे याचा ठाण्यात भाजपमध्ये पक्षप्रवेशाचा सोमवारी कार्यक्रम होता. सावरकर नगरमधील आर.जे. ठाकूर महाविद्यालयाच्या मैदानावर हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी मयूर शिंदे याने जोरदार तयारी केली होती. मात्र शेवटच्या क्षणी हा पक्षप्रवेश थांबवण्यात आला. ठाण्यातील या कार्यक्रमाला सोमवारी भाजपचे […] The post जोरदार शक्ती प्रदर्शन अन् अखेरच्या क्षणी तडीपार गुंडाचा भाजप प्रवेश रद्द; नेमकं काय घडलं? जाणून घ्या… appeared first on Dainik Prabhat .
जपानपासून कोरियापर्यंतच्या बाजारपेठेत गोंधळ ; सेन्सेक्स-निफ्टी उघडताच धडाम
Stock Market Crash। शेअर बाजारामध्ये आजदेखील मोठी घसरण दिसून आली. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक उघडताच कोसळले. परदेशी बाजारपेठेत सुरू असलेल्या भीतीच्या पार्श्वभूमीवर, मुंबई शेअर बाजाराचा ३० शेअर्सचा सेन्सेक्स उघडताच ३०० पेक्षा जास्त अंकांनी घसरला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांकही मोठ्या घसरणीसह उघडला. सोमवारप्रमाणेच मंगळवारीही आशियाई बाजार गोंधळाच्या स्थितीत आहेत. जपानचा निक्केई, दक्षिण कोरियाचा […] The post जपानपासून कोरियापर्यंतच्या बाजारपेठेत गोंधळ ; सेन्सेक्स-निफ्टी उघडताच धडाम appeared first on Dainik Prabhat .
Mrunal Thakur: मृणाल ठाकुर, अदिवी शेष यांच्या ‘डकैत’चा टीझर कधी येणार? तारीख जाहीर
Mrunal Thakur: अभिनेत्री मृणाल ठाकुर आणि अभिनेता अदिवी शेष यांची आगामी फिल्म ‘डकैत’ सध्या चर्चेत आहे. या चित्रपटाच्या टीझरची रिलीज डेट जाहीर झाल्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. मृणाल ठाकुरने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत माहिती दिली की ‘डकैत’चा दमदार टीझर १८ डिसेंबरला रिलीज होणार आहे. विशेष म्हणजे, टीझर दोन शहरांमध्ये वेगवेगळ्या वेळेला दाखवला जाणार आहे. मुंबईतील […] The post Mrunal Thakur: मृणाल ठाकुर, अदिवी शेष यांच्या ‘डकैत’चा टीझर कधी येणार? तारीख जाहीर appeared first on Dainik Prabhat .
मीरा रोडच्या गुन्हे शाखेने राजस्थानमधील अमली पदार्थांचा कारखाना केला उद्ध्वस्त
१०० कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्तभाईंदर : मीरा रोडच्या काशिगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गुन्ह्याचा तपास करत असताना राजस्थान राज्यातील झुनझुनू गावातील अमली पदार्थ बनविणारा कारखाना उघडकीस आला असून पोलिसांनी १०० कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपीला अटक केली आहे.मीरा रोड येथील काशिगाव पोलीस ठाण्याचे पथक ४ ऑक्टोबर रोजी गस्त घालत असताना ६ इसमांची संशयावरून झडती घेतली. त्यांच्याकडे १ लाख ३२ हजार रुपयांचे अमली पदार्थ आढळले. त्यांना अटक करून तपास करत असताना आणखीन ४ आरोपी असल्याचे निदर्शनास आले. त्यांच्याकडून २० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून त्यांना सुद्धा अटक करण्यात आली. या गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी पोलीस पथक राजस्थान राज्यातील झुनझुनू गावात पोहोचले. तेथे त्यांना अमली पदार्थ बनविण्याचा कारखाना उघडकीस आला.पोलिसांनी सुमारे १० किलो एमडी, एमडीचे प्री-कर्सर रसायने तसेच एमडी बनविण्याची आवश्यक ती साधनसामग्री (फ्लास्क, मिक्सर, ड्रायर मशिन, वजन काटा, हँड ग्लोज, फिल्टर इ) असा १०० कोटी रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून कारखाना चालविणारा अनिल विजयपाल सिहागला अटक केली.ही कारवाई पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उपायुक्त संदिप डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी कक्ष १ चे प्रभारी पोलीस निरीक्षक समीर शेख आणि त्यांच्या पथकाने केली.
भारताचे जॉर्डनसोबत ५ महत्वपूर्ण करार ; पंतप्रधान मोदी आज इथिओपियाला रवाना होणार
India Jordan Relations। भारत आणि जॉर्डन यांच्यात काही महत्वपूर्ण करार झाले आहेत. दोन्ही देशात सोमवारी दहशतवादविरोधी उपाययोजना, गाझासह प्रादेशिक विकास आणि द्विपक्षीय सहकार्य यावर चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राजे अब्दुल्ला द्वितीय यांच्यात अम्मानमध्ये झालेल्या चर्चेनंतर, दोन्ही बाजूंनी पाच सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आली. व्यापार आणि गुंतवणूक, संरक्षण आणि सुरक्षा, दहशतवादविरोधी आणि कट्टरतावादमुक्ती, खते […] The post भारताचे जॉर्डनसोबत ५ महत्वपूर्ण करार ; पंतप्रधान मोदी आज इथिओपियाला रवाना होणार appeared first on Dainik Prabhat .
मध्य रेल्वेच्या विस्कळीत वेळापत्रकावर प्रवाशांचा नवा तोडगा
लोकल उशिरा, तर ईमेलचा मारामुंबई : मध्य रेल्वेवरील लोकल सेवा दररोज उशिराने धावत असल्याने, प्रवाशांचे नियोजन बिघडते. अनेक प्रवासी कामाच्या ठिकाणी विलंबाने पोहोचल्याने त्यांच्या वेतनातून पगार कपात होण्याच्या घटना घडतात. तसेच अनेक रुग्ण, महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थ्यांना लोकलच्या विस्कळीत वेळापत्रकामुळे त्रासास तोंड द्यावे लागते. रेल्वेच्या अशा कारभाराचा निषेध करण्यासाठी आणि उपाययोजना करण्यासाठी सर्वसामान्य प्रवाशांनी मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना ई-मेल करण्यास सुरुवात केली आहे.मध्य रेल्वेवरील लोकल रोजच उशिरा धावतात. त्यामुळे प्रवाशांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. दररोज विलंबाने लोकल धावत असल्याने लोकलमधील गर्दी वाढते, पुढील प्रवासाच्या वेळा चुकतात. लोकल रखडल्याने किंवा उशीरा धावल्याने काही प्रवाशांच्या बाहेरगावच्या गाड्या, विमाने चुकल्याच्याही घटना घडल्या आहेत. प्रवासी वेळेत फलाटावर पोहोचून देखील विलंबाने धावत असलेल्या लोकलने प्रवास करावा लागतो. तसेच प्रवाशांना विलंबाबद्दल, लोकल रद्द झाल्याबाबत, लोकल बिघाडाबाबत अनेकदा माहितीही दिली जात नसल्याने प्रवाशांची परवड होते.मध्य रेल्वे प्रशासनातील अधिकाऱ्यांनी लोकलच्या ढासळणाऱया वक्तशीरपणाकडे लक्ष द्यावे. विलंबाच्या वेळी वेळेवर आणि स्पष्ट घोषणा कराव्यात. बिघाडाच्या घटना कमी होण्यासाठी सुधारणात्मक उपाययोजना कराव्यात, अशा सूचना ई-मेलद्वारे प्रवासी करत आहेत. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक आणि मुंबई विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकासह इतर अधिकाऱ्यांच्या ई-मेलवर प्रवासी तक्रारींचे मेलकरत आहेत.मध्य रेल्वेचे कोलमडलेले वेळापत्रकएप्रिल २०२५ ते नोव्हेंबर २०२५ या आठ महिन्याच्या कालावधीत नोव्हेंबरमध्ये मध्य रेल्वेचा वक्तशीरपणा ढासळला. दर महिना सरासरी वक्तशीरपणा ९२ ते ९३ दरम्यान होता. परंतु, नोव्हेंबरमध्ये ९१.६८ टक्क्यांपर्यंत खाली आला. तसेच गेल्यावर्षीच्या नोव्हेंबरमध्ये ९३.३८ टक्के सरासरी वक्तशीरपणा होता. त्यातुलनेत यावर्षीच्या नोव्हेंबरमध्ये १.७ टक्क्यांची घसरण झाली. त्यामुळे प्रवाशांमध्ये मध्य रेल्वेच्या बेशिस्त कारभाराबाबत संताप व्यक्त करत आहेत.
मध्य प्रदेश, छत्तीसगडसाठी रेल्वेगाड्या कोकण रेल्वेवरून धावणार
नाताळ, नवीन वर्षासाठी विशेष भाडे आकारणारमुंबई : नाताळ आणि नवीन वर्षाच्या काळात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी विभाजित करण्यासाठी, कोकण रेल्वेवरून अतिरिक्त रेल्वेगाड्या धावतील. या रेल्वेगाड्यांसाठी प्रवाशांकडून विशेष भाडे आकारणी केली जाईल. कोकण रेल्वेवरून मध्य प्रदेश, छत्तीसगड, गोवा, कर्नाटक येथे रेल्वेगाड्या धावतील.कोकण रेल्वे आणि पश्चिम रेल्वे यांच्या समन्वयाने मध्य प्रदेशातील डॉ. आंबेडकर नगर ते कर्नाटकातील ठोकूर येथे विशेष रेल्वेगाडी चालवण्यात येईल. गाडी क्रमांक ०९३०४ डॉ. आंबेडकर नगर ते ठोकूर विशेष गाडी २१ आणि २८ डिसेंबर रोजी डॉ. आंबेडकर नगर येथून दुपारी ४.३० वाजता सुटेल. ही गाडी तिसऱ्या दिवशी रात्री ३ वाजता ठोकूर येथे पोहोचेल. गाडी क्रमांक ०९३०३ ठोकूर ते डॉ. आंबेडकर नगर विशेष गाडी २३ आणि ३० डिसेंबर रोजी ठोकूर येथून पहाटे ४.४५ वाजता सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी दुपारी ३.३० वाजता डॉ. आंबेडकर नगर येथे पोहोचेल.या रेल्वेगाड्या इंदौर, देवास, उज्जैन, नागदा, रतलाम, वडोदरा, भरूच, सुरत, वापी, वसई रोड, भिवंडी रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवि, करमळी, मडगाव, काणकोण, कारवार, अंकोला, गोकर्ण रोड, कुमटा, मुरडेश्वर, भटळ, मुकांबिका रोड बायंदूर (एच), कुंदापूर, उडुपी, मुल्की, सुरतकल स्थानकांवर थांबतील.कोकण रेल्वे व दक्षिण पूर्व मध्य रेल्वे यांच्या समन्वयाने छत्तीसगड येथील बिलासपूर ते गोव्यातील मडगाव येथे विशेष रेल्वेगाडी चालवण्यात येईल. गाडी क्रमांक ०८२४१ बिलासपूर ते मडगाव एक्स्प्रेस २० व २७ डिसेंबर, ३ आणि १० जानेवारी रोजी दुपारी २.४५ वाजता बिलासपूरहून सुटेल.इगतपुरी स्थानकांवर अतिरिक्त थांबाया रेल्वेगाडीला भाटापारा, रायपूर, दुर्ग, राजनांदगाव, गोंदिया, नागपूर, वर्धा, बडनेरा, अकोला, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, कल्याण, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवी आणि करमळी स्थानकांवर थांबेल. तसेच गाडी क्रमांक ०८२४२ वरील सर्व स्थानकांवर थांबेल आणि इगतपुरी स्थानकावर तिचा अतिरिक्त थांबा असेल. या रेल्वेगाडीला एकूण १८ एलएचबी डबे असतील. या रेल्वेगाडीचे आरक्षण आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर, प्रवासी आरक्षण प्रणालीवरून सुरू झाले आहे.
फसवणूक प्रकरणात श्रेयस तळपदे, आलोक नाथ यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा
मुंबई : सुप्रीम कोर्टाने सोमवारी अभिनेता श्रेयस तळपदे आणि आलोक नाथ यांना मोठा दिलासा दिला. सहकारी संस्थेशी संबंधित फसवणूक आणि गुन्हेगारी विश्वासघाताच्या प्रकरणात चौकशी पूर्ण होईपर्यंत दोघांच्या अटकेला स्थगिती देण्यात आली आहे. न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना आणि न्यायमूर्ती आर. महादेवन यांच्या खंडपीठाने श्रेयस तळपदे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना, यापूर्वी दिलेले अटकपूर्व संरक्षण कायम ठेवण्याचा निर्णय घेतला.कोर्ट सध्या त्या याचिकांवरही सुनावणी करत आहे, ज्यामध्ये दोन्ही अभिनेत्यांनी वेगवेगळ्या राज्यांमध्ये दाखल झालेल्या एफआयआर एकत्र करण्याची मागणी केली. सुनावणीदरम्यान श्रेयस तळपदे यांच्या वकिलांनी सांगितले की, अभिनेता कंपनीच्या वार्षिक कार्यक्रमाला पाहुणा म्हणून उपस्थित होता. त्यांचा सोसायटीच्या आर्थिक व्यवहारांशी कोणताही संबंध नव्हता, तसेच त्यांनी यातून कोणताही आर्थिक लाभ घेतलेला नाही. दरम्यान, आलोक नाथ यांच्या वकिलांनी सांगितले की, अलोकनाथ कोणत्याही कार्यक्रमाला उपस्थित नव्हते. गेल्या सुमारे दहा वर्षांपासून संबंधित सोसायटी त्यांच्या परवानगीशिवाय त्यांच्या छायाचित्रांचा वापर करत असल्याचा दावाही त्यांनी केला.एखादा अभिनेता किंवा खेळाडू जाहिरातीत दिसला असेल किंवा ब्रँड अँबेसिडर असेल, आणि संबंधित कंपनी नंतर गुन्हेगारी कृत्यात सामील असल्याचे आढळले, तर त्या व्यक्तीला जबाबदार धरता येईल का, असा सवाल न्यायालयाने केला.
ठाण्यात अजित पवार आजमावणार स्वबळ
तिन्ही पक्ष महायुतीत निवडणुका लढणार नाहीतठाणे : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीत लढविल्या जाणार असल्याची घोषणा महायुतीच्या नेत्यांकडून करण्यात येत असली तरी ठाणे महापालिका क्षेत्रात मात्र महायुतीचा घटक पक्ष असलेला राष्ट्रवादी पक्ष स्बळावर निवडणूक लढणार आहे. तशी घोषणा अजित पवार गटाचे ठाणे शहराध्यक्ष नजीब मुल्ला यांनी पत्रकारांशी बोलताना केली असून यानिमित्ताने ठाण्यात अजित पवार गट महायुतीतून बाहेर पडल्याचे चित्र आहे.राज्यात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांच्या महायुतीचे सरकार सत्तेवर आहे. या तिन्ही पक्षांनी लोकसभा आणि त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुका महायुतीत लढविल्या होत्या. लोकसभा निवडणुकीत महायुतीला फारसे यश मिळाले नाही; परंतु विधानसभा निवडणुकीत महायुतीला यश संपादन करत सत्ता स्थापन केली. असे असले तरी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मात्र स्थानिक पातळीवर तिन्ही पक्षातील नेत्यांमधील अंतर्गत वाद चव्हाट्यांवर आले होते.यामुळे हे तिन्ही पक्ष महायुतीत निवडणुका लढणार नाहीत आणि कार्यकर्तेही तसाच सूर लावताना दिसून येत होते. मात्र, दोन दिवसांपुर्वी भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांनी महायुतीतच निवडणुका लढण्याचे जाहीर केले होते. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांप्रमाणेच ठाणे महापालिका निवडणुक महायुतीत लढणार असल्याचे भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. असे असले तरी महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी (अजित पवार गट) हा महायुतीपासून अलिप्त असल्याचे चित्र होते.असे असतानाच, अजित पवार गटाचे ठाणे शहराध्यक्ष नजीब मुल्ला यांनी ठाणे महापालिका स्बळावर निवडणुक लढणार असल्याचे जाहीर केले. आम्ही महायुतीचा घटक पक्ष असून महायुतीचा एक अंग आहोत. असे असले तरी, आम्ही ठाणे महापालिका निवडणुकांबाबत भूमिका मांडली आहे की, आम्ही भाजप आणि सेनेसोबत युती करणार नाही. तशा भावना आम्ही वरिष्ठ नेत्यांना कळविल्या आहेत, असे मुल्ला यांनी स्पष्ट केले.ठाणे महापालिका निवडणुकीत महायुतीच्या जागा वाटपात शिंदेचा शिवसेना पक्ष भाजपला ४० ते ५० जागा सोडण्यास तयार असल्याची चर्चा आहे. तसेच कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघामध्ये मागील निवडणुकीतील अपयश लक्षात घेता, मुस्लिम मतांचे विभाजन होऊ नये यासाठी विशेष रणनिती आखली जात असल्याची चर्चा होती. यातूनच कळवा-मुंब्र्यात शिवसेना आणि भाजप महायुतीत लढणार तर, अजित पवारांचा गट वेगळा लढले अशी चर्चा होती. मात्र, आता अजित पवार गटानेच स्बवळाचा नारा दिल्याने या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
ठाण्यात शुक्रवारपर्यंत पाणीकपात
कल्याण फाटा येथे नादुरुस्त झालेल्या जलवाहिनीचे काम सुरू ठाणे : कल्याण फाटा येथील महानगर गॅसच्या कामांमध्ये ठाणे शहराला पाणीपुरवठा करणारी पिसे बंधारा येथून टेमघर जलशुद्धीकरण केंद्राकडे पाणी वाहून आणणारी १००० मि.मी. व्यासाची जलवाहिनी चार ते पाच वेगवेगळ्या ठिकाणी दिनांक ११ डिसेंबर रोजी नादुरूस्त झाली होती, ही जलवाहिनी दुरूस्त करण्याचे काम सुरू आहे, परंतु या कामासाठी आणखी ४ दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठाण्यात शुक्रवारपर्यंत ५० टक्के पाणीकपात लागू करण्यात येत आहे.पाणीपुरवठा विभागामार्फत जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम तातडीने व जलदगतीने करण्यात येत आहे. मात्र जलवाहिनी जुनी व प्रिस्ट्रेस काँक्रीट पद्धतीची असल्यामुळे दुरुस्तीच्या कामासाठी उशीर होत असून हे काम पूर्ण होण्यास अजून ४ दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.परिणामी, ठाण्यातील पाणीपुरवठा कमी झाला असून शहरांमध्ये ५० टक्के पाणी कपात लागू करण्यात येत आहे. शहरामध्ये पाणी वितरणाचा समतोल ठेवण्यासाठी शुक्रवारपर्यंत प्रत्येक भागात दिवसातून १२ तास झोनिंग पद्धतीने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांना कमी प्रमाणात व अनियमित पाणीपुरवठा होणार आहे. नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा व महापालिकेला सहकार्य करण्याचे आवाहन पाणीपुरवठा विभागामार्फत करण्यात आले.
धक्कादायक! कर्ज फिटवण्यासाठी केला मृत्यूचा बनाव; एक मेसेज आणि सत्याचा उलगडा
लातूर: फायनान्स कंपनीत काम करणाऱ्या गणेश चव्हाण नावाच्या तरुणाने आपल्याच मृत्यूचा बनाव केल्याची धक्कादायक घटना लातूरमधून समोर आली आहे. त्याने तब्बल १२ तास कारमध्ये जळून मृत्यू झाल्याचे नाटक केले. त्याच्या या नाटकाला पोलीस सुद्धा भुलले. पण, जेव्हा तपास सुरू झाला तेव्हा एक मेसेज आणि एका तरुणीचे कनेक्शन समोर आल्याने गणेशचा सर्व डाव उलटला आणि तो पोलिसांच्या गळाला लागला.मिळालेल्या माहितीनुसार, औसा पोलीस स्टेशनच्या हद्दीत शनिवार, १३ डिसेंबर रात्री उशिराने वानवडा भागात एक कारला आग लागली. ज्यात लातूरमधील औसा तालुक्यात वानवडा इथे एका कारमध्ये ५० वर्षीय इसमाचा जळून मृत्यू झाला. पोलीस घटनास्थळी पोहोचताच आग आटोक्यात आणण्याचे काम अग्निशमन दलाकडून करण्यात आले. आग नियंत्रणात येताच पोलिसांनी गाडीची तपासणी केली, ज्यात एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. गणेश चव्हाण असे या तरुणाचे नाव सांगितले जात होते. पण, पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास केला असता मृत व्यक्ती गणेश चव्हाण ही जिवंत असल्याचे समोर आले. तसेच गणेश चव्हाणनेच आपल्याच मृत्यूचा बनाव केल्याचे उघड झाले.मृत्यूचा बनाव करणारे गणेश चव्हाण यांची चौकशी करताना पोलिसांना समजले की, दुपारी घरातून बाहेर गेलेले गणेश दिवसभरात परत आले नव्हते. तसेच त्यांचा मोबाईल सुद्धा बंद होता. त्यामुळे पोलीसांची अशी धारणा झाली की, कारमधील मृत व्यक्ती ही गणेश चव्हाण आहे. त्यामुळे औसा पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या अपघाती मृत्यूची नोंद केली. मात्र घटनेचा तपास सुरू असताना पोलिसांना गणेश चव्हाणवर संशय आल्याने त्यांनी गणेशची इतर माहिती गोळा करण्यास सुरुवात केली असता त्याची एक मैत्रीण सापडली. तिच्याक़डे चौकशी केली असता असं निष्पन्न झाले की, गणेश चव्हाणकडे तिसरा फोन होता. अपघाताची घटना घडून गेल्यानंतरही तिसऱ्या नंबरवरून या तरुणीशी संवाद साधला जात होता. मेसेज, चॅट सुरू होते. त्यामुळे पोलिसांचा गणेशचा तपास सुरू केला.https://prahaar.in/2025/12/16/a-horrific-accident-occurred-on-the-ambejogai-latur-national-highway-three-people-died-on-the-spot/गणेशचा तपास करण्यासाठी लातूर पोलिसांनी त्याचा तिसरा फोन नंबर ट्रेस करण्यास सुरुवात केली. जो आधी कोल्हापूर, नंतर सिंधुदुर्ग आणि विजयदुर्गपर्यंतचे लोकेशन दाखवत होता. लोकेशनच्या आधारे पोलिसांनी गणेश चव्हाणला जिवंत पकडले. त्यामुळे कारमध्ये असलेला मृत व्यक्तीचा सांगाडा हा दुसऱ्याच व्यक्तीचा असल्याचे स्पष्ट झाले. गणेशची चौकशी केल्यावर समोर आले की, गणेशवर फ्लॅटचे कर्ज होते. ते कर्ज कमी करण्यासाठी गणेश चव्हाण याने १ कोटी रुपयांचा टर्म इन्शुरन्स काढण्याचा प्लॅन केला. या टर्म इन्शुरन्ससाठी त्याने मृत्यूचा कट रचला.यासाठी त्याने तुळजापूर टी पॉईंट औसा इथून एका व्यक्तीला लिफ्ट दिली होती. गोविंद यादव असे या व्यक्तीचे नाव होते. गोविंद यादवला गणेशने कारच्या समोरील सिटीवर बसवले आणि कारला आग लागली तरी तो तिथून पळून जाणार नाही, असे नियोजन करून गोविंद यादव यांचा त्याने खून केला. एवढेच नाहीतर मृतदेह हा आपलाच आहे, असे भासावे म्हणून गणेशने आपल्या हातातले कडे गोविंद यादवच्या सीटवर ठेवले. जेणे करून पोलिसांना संशय येणार नाही. त्याच्या कुटुंबीयांनाही हे सत्य असल्याचे वाटले. पण, औसा पोलिसांच्या तपासात सत्य समोर आले आहे. औसा पोलीस स्टेशनमध्ये गोविंद यादव याचा खून केला या प्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल करत आरोपी गणेशला अटक केली आहे.
जगात ऑस्ट्रेलियाची ओळख तीन ठिकाणांमुळे आहे - ओपेरा हाऊस, सिडनी हार्बर ब्रिज आणि बॉन्डी बीच. ओपेरा हाऊस आणि सिडनी हार्बर ब्रिज पूर्वीप्रमाणेच गजबजलेले आहेत, पण सिडनीच्या प्रसिद्ध बॉन्डी बीचवर मात्र शोककळा पसरली आहे. १४ डिसेंबरच्या संध्याकाळी दोन हल्लेखोरांनी ज्यूंना लक्ष्य करून ५० गोळ्या झाडल्या. १५ लोक मारले गेले. ४० लोक जखमी आहेत. हे सर्वजण 'हनुक्का' हा धार्मिक सण साजरा करत होते. मृत्यू झालेल्यांमध्ये सणाचे आयोजन करणारे एली स्लँगर देखील होते. हल्लेखोरांनी सर्वात आधी त्यांनाच गोळी मारली. सिडनीमध्ये राहणारे ४१ वर्षीय एली स्लँगर ऑस्ट्रेलियातील ज्यूंमध्ये एक ओळखीचे नाव होते. मृत्यू झालेल्यांमध्ये १० वर्षांच्या मुलीपासून ते वृद्धांपर्यंत सर्वजण आहेत. दिव्य मराठीने बॉन्डी बीचवरील हल्ल्याचे प्रत्यक्षदर्शी आणि बळी ठरलेल्या काही व्यक्तींशी संवाद साधला. यांकी बर्गरयहूदी नेते आणि एली स्लँगरचे मित्रऑस्ट्रेलियाची राजधानी सिडनीच्या बॉन्डी बीच परिसरात देशातील सर्वात श्रीमंत लोक राहतात. यहूदी समुदायातील बहुतेक लोक मोठे व्यावसायिक आहेत आणि याच परिसरात राहतात. ऑस्ट्रेलियामध्ये यहुद्यांना शांतताप्रिय व्यावसायिक समुदाय म्हणून ओळखले जाते. याच परिसरात राहणारे यांकी बर्गर हे ज्यूंचे नेते आहेत. ते सांगतात, 'बॉन्डी बीचवर माझ्या मित्र एली स्लँगरने हनुक्का महोत्सवाचे आयोजन केले होते. अचानक 2 दहशतवाद्यांनी महोत्सवाला लक्ष्य करून गोळीबार सुरू केला. महोत्सव साजरा करणारे लोक पळू लागले. दहशतवाद्यांनी महिला, मुले, वृद्ध सर्वांना गोळ्या घातल्या.' 'पहिली गोळी एलीलाच लागली. एली ज्यूंचे नेते होते. त्यांना 5 मुले आहेत. एली आनंदी स्वभावाचे व्यक्ती होते. हल्ल्याच्या वेळी ते स्टेजवर उभे होते. तेव्हा हल्लेखोरांनी त्यांच्या डोक्यात गोळी मारली.' हल्ल्याच्या वेळी यांकी बर्गरचा मुलगा आणि नातही महोत्सवात उपस्थित होते. त्यांनी पाहिलेले सांगताना यांकी म्हणतात, 'मुलगा मेंडीने गोळीबाराचा आवाज ऐकला. माझी नात बाथिया त्याच्यासोबत होती. मेंडीने मुलीला कडेवर घेतले आणि वाचण्यासाठी लपला. त्याला जाणवत होते की गोळीबाराचा आवाज वाढत आहे आणि त्याच्या आजूबाजूला गर्दी जमा होत आहे.' ‘मेंडीला वाटले की आता मृत्यू जवळ आहे. तो मुलीसोबत आमच्या धर्मात म्हटली जाणारी शेवटची प्रार्थना करू लागला. त्याने लोकांना गोळ्या लागताना आणि खाली पडताना पाहिले. हल्लाखोरांनाही जवळून पाहिले. या हल्ल्यानंतर लोक भीती आणि धक्क्यात आहेत. दुःखाशी झुंजत आहेत, पण आशा आहे की आम्ही आणखी मजबूत होऊ.’ ‘हमासच्या हल्ल्यानंतर ऑस्ट्रेलियात ज्यूंविरोधी द्वेष वाढला’यांकी ऑस्ट्रेलियाच्या सरकारवर नाराज दिसत आहेत. ते म्हणतात, ‘7 ऑक्टोबर 2023 रोजी इस्रायलवर हमासच्या हल्ल्यानंतर ऑस्ट्रेलियात ज्यूंविरोधी द्वेष वाढला आहे. येथे गर्दी ज्यूंविरोधात निदर्शने करत होती. तरीही सरकार काही करत नव्हते. निदर्शनांमध्ये सहभागी असलेले लोक अनेकदा ज्यूंना मारण्याची भाषा करत होते. एली स्लँगर अशाच प्रकारचे मुद्दे मांडत राहिले.’ ‘यहूदी असल्याने मला वाटते की या हल्ल्यानंतर आमच्या सुरक्षेसाठी ऑस्ट्रेलिया सरकारने पावले उचलणे आवश्यक आहे. एक समुदाय म्हणूनही ही आमच्यासाठी मोठी शिकवण आहे. आपल्याला अधिक एकजूट राहावे लागेल. होलोकॉस्टच्या अवघ्या 3 वर्षांनंतर, 1948 मध्ये आम्ही आमचा स्वतःचा देश इस्रायल बनवला होता.’ ‘संपूर्ण जगाला माहीत आहे की यहुद्यांनी शतकानुशतके खूप काही सहन केले आहे. मला वाटते की आता यहुदी जागे झाले आहेत आणि त्यांच्याविरुद्ध होणाऱ्या अत्याचारांविरुद्ध आवाज उठवायला शिकले आहेत. आम्ही सण साजरा करण्यासाठी एकत्र जमलो होतो. हा प्रकाशाचा सण आहे. तो अंधार दूर करतो आणि जगाला प्रकाशित करण्याचा संदेश देतो.’ एली स्लँगरचा आणखी एक मित्र एलीझर टेवेलने त्यांच्यासाठी लिहिले, ‘ते फक्त त्यांचे काम करत होते. ते कोणत्याही युद्धभूमीवर नव्हते. ते फक्त एका महोत्सवात होते.’ अमित सरवालऑस्ट्रेलिया टुडेचे संपादकअमित सरवाल सांगतात, ‘या घटनेनंतर पोलिसांनी संपूर्ण बॉन्डी बीच रिकामा करून घेतला होता. या परिसरातून एक कार मिळाली आहे. ही हल्लेखोरांची कार असल्याचे सांगितले जात आहे. कारमध्ये बॉम्ब बनवण्याचे साहित्य मिळाले आहे. हल्लेखोरांमध्ये 24 वर्षांचा नवीद अक्रम सामील आहे. त्याचे ड्रायव्हिंग लायसन्सही मिळाले. यानंतर हल्लेखोरांच्या घरावर छापा टाकण्यात आला.’ ‘ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी उच्चस्तरीय सुरक्षा बैठक बोलावली होती. त्यांना बंदूक परवान्याशी संबंधित नियम कठोर करायचे आहेत. एका व्यक्तीकडे 1-2 पेक्षा जास्त शस्त्रे नसावीत, हे सुनिश्चित करण्याबद्दल बोलले जात आहे.’ याला ज्यूविरोधी इस्लामिक हिंसाचार मानले जावे का? अमित उत्तर देतात, ‘सध्या हे निश्चितपणे सांगता येत नाही. हल्लेखोर असे काही बोलत होते किंवा त्यांनी इस्लामचा हवाला देऊन हल्ल्याच्या समर्थनार्थ पोस्टर्स-पत्रके फेकली होती, हे अद्याप निश्चित व्हायचे आहे.’ ‘हे खरे आहे की बॉन्डी बीचवर त्यावेळी खूप लोक होते. लक्ष्य करून फक्त ज्यूंनाच मारण्यात आले. हल्लेखोरांनी दुसऱ्या कॅफेमध्ये बसलेल्या लोकांवर गोळीबार केला नाही. जाणूनबुजून सण साजरा करणाऱ्या ज्यूंवरच गोळीबार केला. पंतप्रधान आणि पोलिसांनीही ही गोष्ट मान्य केली आहे. हल्लेखोरांनी राजकारण किंवा धर्माने प्रेरित होऊन हल्ला केला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.’ ‘ऑस्ट्रेलियाच्या ग्रीन्स पक्षाच्या उपनेत्या महरीन फारुकी बॉन्डी परिसरात गेल्या, तेव्हा लोकांनी त्यांचा विरोध केला. आता लोकांना असे वाटत आहे की 7 ऑक्टोबर 2023 नंतर ग्रीन्स आणि डाव्या पक्षांनी ज्यूविरोधाला इतके जास्त प्रोत्साहन दिले आहे की लोकांमध्ये कट्टर विचारसरणी निर्माण होत आहे. यावर चर्चाही सुरू आहे.’ ज्यू साक्षीदारया व्यक्तीची ओळख पटलेली नाही. त्याने हल्लेखोरांना जवळून पाहिले होते. तो म्हणाला, 'तिथे दोन शूटर होते. एक पुलाखाली आणि वर होता. ते सलग २० मिनिटे गोळीबार करत राहिले. मॅगझिन बदलत आणि पुन्हा गोळीबार सुरू करत होते. २० मिनिटांपर्यंत कोणीही प्रत्युत्तर गोळीबार केला नाही. मी माझ्या मुलांना लपवले. मी त्या हल्लेखोरांनाच पाहत होतो.' 'हल्लेखोर खूप दूर होते, त्यामुळे मला त्यांचा आवाज ऐकू आला नाही. तिथे ४ पोलीसही होते, पण त्यांनी काहीच केले नाही. मी इस्रायली आहे. मी अशा प्रकारची परिस्थिती पाहिली आहे. मी ६ मुलांसोबत आलो होतो, सुदैवाने आम्ही सर्व सुरक्षित आहोत.' ‘उत्सवाचा पहिला दिवस होता. आम्ही त्यासाठी जमलो होतो. दहशतवाद्यांना आम्हाला मारायचे होते. आम्ही इतर नागरिकांसारखेच आहोत, पण आम्हाला अशा प्रकारे मारले जात आहे. मी स्वतः सैनिक राहिलो आहे, मी हे सर्व जवळून पाहिले आहे, पण ऑस्ट्रेलियात असे होईल असे कधीच वाटले नव्हते. दहशतवादी गोळीबार करत राहिले आणि त्यांच्यावर प्रत्युत्तर गोळीबार झाला नाही, ही धक्कादायक बाब आहे.’ अहमद अल अहमदहल्ला करणाऱ्याची बंदूक हिसकावून नायक बनलेसीरियन वंशाचे स्थलांतरित अहमद अल अहमद सिडनीमध्ये दुकान चालवतात. हल्ल्याच्या वेळी ते समुद्रकिनाऱ्यावर उपस्थित होते. त्यांनी पाहिले की एक हल्लेखोर लोकांवर गोळीबार करत आहे. ते गुपचूप गेले आणि त्याला पकडले. त्याची बंदूक हिसकावून घेतली. हल्लाखोराला थांबवण्याच्या प्रयत्नात अहमदला गोळी लागली. ते गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 43 वर्षांच्या अहमदच्या कुटुंबीयांनी सांगितले की त्यांच्या खांद्यात गोळ्या लागल्या आहेत. काही गोळ्या हाडांमध्ये अडकल्या आहेत. अहमदचे कुटुंब काही महिन्यांपूर्वीच सीरियातून सिडनीला स्थलांतरित झाले होते. हल्ला करणारे बाप-बेटे, ISIS शी संबंधित असल्याचा संशयहल्ला करणाऱ्यांची ओळख साजिद अक्रम आणि त्याचा 24 वर्षांचा मुलगा नवीद अशी झाली आहे. त्यांनी कुटुंबाला सांगितले होते की ते वीकेंडला मासे पकडायला जात आहेत. नवीदचा जन्म ऑस्ट्रेलियात झाला होता. ऑस्ट्रेलियाई गुप्तचर पोलिसांनुसार, दोघांवरही दहशतवादी संघटना ISIS शी संबंधित असल्याचा संशय होता. 2019 पासून त्यांच्यावर नजर ठेवली जात होती. आता प्रश्न उपस्थित होत आहेत की प्रशासनाने या माहितीवर कारवाई का केली नाही. साजिदकडे 6 रायफलचे परवाने होते. तो फायरिंग क्लबचा सदस्य होता. त्यामुळे त्याला इतके परवाने मिळाले होते. क्लबमार्फत त्याला शॉटगनचे परवाने मिळाले होते. पोलिसांनुसार, त्याने सामान्य पद्धतीनेच परवाने मिळवले होते. 50 वर्षीय साजिदला घटनास्थळीच ठार करण्यात आले. नवीद जखमी असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. न्यू साउथ वेल्सचे पोलीस आयुक्त माल लॅन्योन यांनी सांगितले की, पोलिसांना एका शूटरबद्दल माहिती होती, परंतु ते हल्ल्याची योजना आखत आहेत हे माहीत नव्हते.
विधानसभेत पुन्हा एकदा घुमला आमदार निलेश राणे यांचा आवाज
कोकणातील सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर वेधले सरकारचे लक्षमुंबई : नागपूर येथे नुकत्याच झालेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आपल्या अभ्यासपूर्ण व मुद्देसूद भाषणांनी सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर सभागृह व सरकाराचे लक्ष वेधत कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांनी पुन्हा एकदा विधानसभेत आपली आगळीवेगळी अशी छाप पाडली. कोकणात अतिवृष्टीमुळे शेतकरी व मच्छीमार बांधवांचे झालेले नुकसान, रस्त्यांची दुरवस्था, रखडलेले सिंचन प्रकल्प, वाळू व्यावसायिकांची प्रशासनाकडून होणारी ससेहोलपट यांसह अन्य प्रश्नांवर सभागृहात आवाज उठवत जनतेला न्याय द्यावा, अशी मागणी यावेळी त्यांनी सरकारकडे केली. त्यांच्या या भाषणाचे व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी देखील सर्वसामान्यांचा बुलंद आवाज अशा प्रतिक्रिया देत आमदार राणे यांचे कौतुक करत त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.विधान भवानातील दमदार एंट्री, मिडियाचा पडणारा गराडा आणि त्या मिडियासमोर आपला मुद्दा तेवढ्याच प्रभावीपणे मांडत रोखठोक बोलणारे आ. निलेश राणे यांनी संपूर्ण अधिवेशनात आपली छाप पाडली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील रणधुमाळीनंतर सुरू झालेल्या या अधिवेशानात आ. राणे हे मिडियाच्या केंद्रस्थानी राहिले.कुडाळ-मालवणचे आमदार म्हणून निवडून आल्यानंतर पहिल्याच झालेल्या नागपूर अधिवेशनात आ. राणे यांनी आपल्या कार्यपद्धतीची झलक दाखविली होती. त्यानंतर मुंबईत झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुरवणी मागण्यांसह अन्य विषयांवर चर्चेत सहभागी होत त्यांनी केवळ आपल्या मतदारसंघातील नाही तर संपूर्ण कोकणातील जनतेचे प्रश्न मांडून सभागृहाचे व सरकाराचे लक्ष वेधले होते.नागपूर येथे ८ ते १४ डिसेंबर या सात दिवसांच्या कमी कालावधीत झालेल्या अधिवेशनातही आ. राणे यांनी आपली छाप पाडली. या अधिवेशनात सातही दिवस हजेरी लावत त्यांनी जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडली. औचित्याचा मुद्दा, अतिवृष्टीवरील २९३ चा प्रस्ताव, लक्षवेधी, पुरवणी मागण्यांवरील चर्चा, प्रश्नोत्तरे, पॉइंट ऑफ इन्फरमेशन अशा विधिमंडळातील लोकप्रतिनिधींना असलेल्या विविध आयुधांचा वापर करत आ. राणे यांनी अनेक प्रश्नांना विधानसभेत वाचा फोडली. सत्ताधारी पक्षातील लोकप्रतिनिधी असूनही कोणतीही तमा न बाळगता त्यांनी सामान्य जनतेचे प्रश्न विधानसभेत लावून धरल्याने त्यांची हीच कृती अनेकांना भावली आहे. एक आक्रमक पण तेवढेच संवेदनशील नेतृत्व अशी आ. राणे यांची ओळख आहे. त्यामुळे या अधिवेशनातही आ. निलेश राणे यांनी सर्वसामान्यांच्या प्रश्नांना फोडलेली वाचा अनेकांना भावली आहे.आ. राणे यांनी सभागृहात जलसिंचन प्रकल्पांबाबत उपस्थित केलेल्या या मुद्यांना चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनीही आपल्या भाषणात दुजोरा देत रत्नागिरीतही हीच अवस्था असल्याचे सांगितले. आपल्या अभ्यासपूर्ण व मुद्देसूद भाषणांनी पुन्हा एकदा आ. राणे यांनी सभागृहात आपली छाप पाडली. यावेळी सभागृहातील अनेक ज्येष्ठ व प्रथमच निवडून आलेल्या अनेक आमदारांनी आ. राणे यांचे कौतुकही केले. जनतेच्या प्रश्नासाठी सभागृहात जास्तीत जास्त वेळ उपस्थित राहून आ. राणे यांनी जनतेच्या प्रश्न व समस्यांप्रती किती संवेदनशीलता आहे हेच दाखवून दिले आहे. तर सभागृहाबाहेरही आ. निलेश राणे चर्चेत राहिले. विधिमंडळात येताना व सभागृहातून बाहेर पडताना मिडियाचा पडणारा गराडा, विचारले जाणारे अनेक प्रश्न व त्यांचे आ. राणे यांच्याकडून दिले जाणारे सडेतोड उत्तर यामुळे ते मिडियामध्येही चांगलेचचर्चेत राहिले.
‘मनरेगा’वरून गोंधळ ; कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान आज लोकसभेत नवीन विधेयक सादर करणार ?
MGNREGA। महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (मनरेगा) रद्द करण्यासाठी आणि रोजगार आणि उपजीविकेसाठी विकास भारत हमी अभियान (ग्रामीण) (VB-G RAM G) हा नवीन कायदा आणण्यासाठी आज संसदेत एक विधेयक मांडले जाण्याची शक्यताआहे. नवीन कायद्यानुसार राज्य सरकारांना अधिक खर्च करावा लागेल आणि कामकाजाच्या दिवसांची संख्या सध्याच्या १०० वरून १२५ पर्यंत वाढवावी लागेल. केंद्रीय कृषी […] The post ‘मनरेगा’वरून गोंधळ ; कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान आज लोकसभेत नवीन विधेयक सादर करणार ? appeared first on Dainik Prabhat .
इमरान हाश्मीसोबत झळकणार मराठमोळी अभिनेत्री; वेब सीरिजमध्ये दिसणार नव्या अंदाजात
Emraan Hashmi | बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मी लवकरच एका नव्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘तस्करी: द स्मगलर्स वेब’ नावाच्या वेब सीरिजमध्ये तो पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर त्याच्यासोबत झळकणार आहे. ‘तस्करी’ वेब सीरिज नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. यात बॉलिवूडचे अनेक मोठे कलाकार पाहायला मिळणार आहे. सीरिजमध्ये झोया […] The post इमरान हाश्मीसोबत झळकणार मराठमोळी अभिनेत्री; वेब सीरिजमध्ये दिसणार नव्या अंदाजात appeared first on Dainik Prabhat .
Sayli Kamble Welcomes Baby Boy: गायिका सायली कांबळे झाली आई; घरी चिमुकल्या बाळाचं आगमन
Sayli Kamble Welcomes Baby Boy: ‘इंडियन आयडल’ फेम लोकप्रिय गायिका सायली कांबळे आई झाली आहे. सायलीच्या घरी चिमुकल्या बाळाचं आगमन झालं असून तिने गोंडस मुलाला जन्म दिला आहे. ही आनंदाची बातमी सायलीने स्वतः इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत चाहत्यांना दिली. सायलीने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे, “एक छोटासा चमत्कार, आयुष्यभराचं प्रेम… आम्हाला मुलगा झाला आहे. तुमच्या सर्व […] The post Sayli Kamble Welcomes Baby Boy: गायिका सायली कांबळे झाली आई; घरी चिमुकल्या बाळाचं आगमन appeared first on Dainik Prabhat .
निवडणूक जाहीर होताच काँग्रेसच्या बड्या नेत्याचा गंभीर आरोप; म्हणाले “आयोगाचा कारभार…”
Balasaheb Thorat : सोमवारी १५ डिसेंबर या दिवशी राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील २९ महापालिका निवडणुकीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार १५ जानेवारीला मतदान घेतले जाणार असून, १६ जानेवारी दिवशी निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. अशातच काँग्रेसच्या एका बड्या नेत्याने राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर हल्ला चढवला आहे. आयोगाचा कारभार ‘रिमोट […] The post निवडणूक जाहीर होताच काँग्रेसच्या बड्या नेत्याचा गंभीर आरोप; म्हणाले “आयोगाचा कारभार…” appeared first on Dainik Prabhat .
देवाला एक मिनीटही विश्रांती घेऊ देत नाहीत...
'पैसेवाल्यांसाठी देवतेला जास्त त्रास'वृंदावनच्या बांके बिहारी मंदिर व्यवस्थापनावर सर्वोच्च न्यायालयाचा संतापनवी दिल्ली : वृंदावनमधील श्री बांके बिहारी मंदिरात व्हीआयपी दर्शन आणि पूजेबाबत सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय घेतला. देवतेला विश्रांती घेण्याची परवानगी नाही. जेव्हा सामान्य भाविक दर्शन घेऊ शकत नाहीत तेव्हा मोठ्या प्रमाणात शुल्क भरणाऱ्यांसाठी विशेष पूजा आयोजित केली जाते यावरून सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. मुख्य न्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती विपुल पंचौली यांच्या खंडपीठासमोर मंदिर सेवकांनी न्यायालयाद्वारे नियुक्त समितीच्या निर्देशांना आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी सुरू होती. समितीने सामान्य भाविकांसाठी दर्शनाचे तास वाढवण्याची विनंती केली. मात्र, सुनावणीच्या शेवटी न्यायालयाने उच्चाधिकार समितीला नोटीस बजावली. या प्रकरणाची सुनावणी आता जानेवारीमध्ये होणार आहे.श्री बांके बिहारी जी मंदिर ट्रस्ट अध्यादेश, २०२५ ला आव्हान देणारी ही याचिका आहे. मंदिराचे सेवक अधिकारी असे म्हणतात की, मंदिराचे व्यवस्थापन १९३९ मध्ये लागू केलेल्या विशेष योजनेअंतर्गत करण्यात आले आहे आणि त्यावर सरकारचा कोणताही अधिकार नाही. याचिकाकर्त्याचे वकील, वरिष्ठ वकील श्याम दिवान यांनी सांगितले की, मंदिरातील विधींचा अविभाज्य भाग असलेल्या दर्शनाच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी विचारले की, दर्शनाच्या वेळा वाढवल्या गेल्या, तर काय समस्या आहे. याचिकाकर्त्याने असा युक्तिवाद केला की दर्शनाच्या वेळा बदलल्याने मंदिरातील विधींमध्येही बदल होतील, ज्यामध्ये देवतांचा विश्रांतीचा वेळ देखील समाविष्ट आहे.सरन्यायाधीश सूर्यकांत म्हणाले, “मंदिर दुपारी १२ वाजता बंद झाल्यानंतर, ते देवतांना एक मिनीटही विश्रांती घेऊ देत नाहीत. त्या काळात, त्यांना सर्वात जास्त त्रास दिला जातो आणि श्रीमंत लोकांसाठी जास्त शुल्क आकारून विशेष पूजा केली जाते. या काळात, फक्त ज्यांना पैसे देणे शक्य आहे त्यांनाच आमंत्रित केले जाते आणि त्यांच्यासाठी विशेष पूजा आयोजित केल्या जातात.”
अंबेजोगाई-लातूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात! तिघांचा जागीच मृत्यू
बीड: अंबेजोगाई-लातूर राष्ट्रीय महामार्गावर स्कॉर्पिओ आणि कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहे. जखमींना तातडीने लातूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या भीषण अपघातावर महामार्गाजवळील स्थानिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.मिळालेल्या माहितीनुसार, बीड- लातूर जिल्ह्याच्या सीमेजवळ काल (१५ डिसेंबर) रात्री स्कार्पिओ गाडी आणि कारचा समोरासमोर धडक झाल्याने हा भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये स्कॉर्पिओ गाडीच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला. तर कारचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अपघातात तीन जण जागीच ठार झाले आहेत. तर दोघे गंभीर जखमी झाले आहे.https://prahaar.in/2025/12/16/cash-seized-as-soon-as-the-code-of-conduct-comes-into-effect-police-raid-on-the-house-of-the-notorious-andekar-in-pune/घटनेची माहिती मिळताच, घटनास्थळी स्थानिकांनी धाव घेऊन चारचाकीमधील अडकलेल्या लोकांना बाहेर काढले. यानंतर माहिती मिळताच तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर अपघातातील जखमींना तातडीने लातूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.दरम्यान, स्कॉर्पिओ आणि अपघातग्रस्त कार महामार्गावरून बाजूला करण्यात आली आहे. कारण अपघातामुळे महामार्गावर काहीकाळ वाहतूककोंडी झाली होती. तसेच या अपघातात मयत कोणत्या गावचे आहेत? त्यांची ओळख काय? याबाबत अद्याप कोणतीच माहिती मिळू शकली नाही आहे. तरी पोलीस वेगाने चौकशी करत आहेत.
यंदा २१ डिसेंबर वर्षातील सर्वात लहान दिवस !
दिवस फक्त १० तास, ४७ मिनिटांचा राहणारअमरावती : वैज्ञानिक आणि खगोलीय घटनांबद्दल सर्वसामान्यांमध्ये नेहमीच कुतूहल आणि उत्सुकता असते. पृथ्वीवर प्रकाश पसरवणारा सूर्य वर्षातील एका दिवशी अत्यंत कमी वेळ दर्शन देत असतो. या दिवशी पृथ्वीशी संबंधित अशी खगोलीय घटना घडत असते की, त्या दिवशी सूर्य लवकर मावळत असतो, त्यामुळे रात्र फार मोठी असते. यंदा २१ डिसेंबरला वर्षातील सर्वात लहान दिवस राहणार आहे.२१ डिसेंबर रोजी सूर्य जास्तीत जास्त दक्षिणेकडे राहील. या बिंदूला ‘विंटर सोल्स्टाईस’ असे म्हणतात. सोलस्टाईस शब्द सोल्सटाइन या लॅटीन शब्दापासून तयार झाला आहे. ‘सूर्य स्थिर आहे’ असा त्याचा अर्थ होतो. भारतात पावसाळ्यानंतर येणाऱ्या हिवाळ्यात रात्र मोठी असते आणि दिवस लहान होत जातो. या बिंदूवर सूर्य असताना दिवस हा वर्षातला सर्वात लहान दिवस व रात्र ही सर्वात मोठी असते. २१ डिसेंबरचा दिवस हा १० तास, ४७ मिनिटांचा राहील. या दिवसांत दरवर्षाला एक दिवसाचा फरक पडू शकतो. दिवस व रात्रीचा कालावधी कमीजास्त होणे आपण नेहमीच अनुभवत असतो. पृथ्वीचा अक्ष २३.५ अंशाने कललेला असल्याने हे घडत असते. व याचाच परिणाम म्हणून सूर्याचे उत्तरायन व दक्षिणायन सुद्धा आपल्याला अनुभवता येते. कोणत्याही वस्तूच्या पडणाऱ्या सावलीचे निरीक्षण केल्यास सूर्याचे दक्षिणायण व उत्तरायण सहज लक्षात येऊ शकते. सर्व खगोल प्रेमींनी व जिज्ञासूंनी २१ डिसेंबर या सर्वात लहान दिवसाचे प्रत्यक्ष कालमापन करावे व या १० तास ४७ मिनिटांच्या सर्वात लहान दिवसाचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा, असे आवाहन मराठी विज्ञान परिषद, अमरावती विभागाचे अध्यक्ष प्रवीण गुल्हाने आणि हौशी खगोल अभ्यासक विजय म. गिरुळकर यांनी केले आहे. पृथ्वीवरील ऋतू सुद्धा पृथ्वीच्या अक्षाच्या कलत्या स्थितीमुळे निर्माण होतात. आकाशात वैषुविक आणि आयनिक वृत्ताचे दोन काल्पनिक छेदन बिंदू आहेत. यापैकी एका बिंदूत २२ मार्च रोजी सूर्य प्रवेश करतो याला ‘वसंत संपात बिंदू’ असे म्हणतात. तर त्याचे विरुद्ध बिंदूत २३ सप्टेंबर रोजी सूर्य प्रवेश करतो याला ‘शरद संपात बिंदू’ असे म्हणतात. या दोन्ही दिवशी रात्रीचा व दिवसाचा कालावधी हा सारखाच असतो. २१ डिसेंबर रोजी सूर्य जास्तीत जास्त दक्षिणेकडे असतो. या बिंदूवर सूर्य असताना दिवस हा वर्षातला सर्वात लहान दिवस व रात्र ही सर्वात मोठी असते. या दिवसाला ‘हिवाळा अयन दिवस’ असे सुद्धा म्हणतात.
New York Mayor। ऑस्ट्रेलियातील सिडनीत बोंडी बीचवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, न्यू यॉर्क शहरात इस्लामोफोबियावरून राजकीय वादविवाद सुरू झाला आहे. १५ जणांचा मृत्यू झालेल्या या हल्ल्यानंतर, रिपब्लिकन न्यूयॉर्क सिटी कौन्सिलवुमन विकी पॅलाडिनो यांनी सोशल मीडियावर पाश्चात्य देशांमधून मुस्लिमांना हद्दपार करण्याचे आवाहन केले, ज्यामुळे तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. न्यू यॉर्क शहरातील नवनिर्वाचित महापौर जोहरान ममदानी यांनी पॅलाडिनो यांच्या […] The post “असा ग्लोबल जिहाद कधीच पाहिला नाही…” ; ट्रम्पच्या पक्षाच्या नेत्याच्या विधानाने नवा वाद, ममदानींचे सडेतोड उत्तर appeared first on Dainik Prabhat .
‘सगळे कामावर जातात तेव्हा मी खाली खुर्ची टाकून बसते. एकटी वर राहू शकत नाही. रात्री १२ वाजेपर्यंत जागी राहते, असं वाटतं की आता मुलगा दरवाजा ठोठावत म्हणेल, मम्मी उघड. जर मला मारलं असतं तर बरं झालं असतं. १४ वर्षांच्या मुलाने काय बिघडवलं होतं?‘ निशा खातून मुलगा साहिलला आठवून भावुक होतात. मुलाच्या मृत्यूच्या धक्क्यातून कुटुंब अजूनही सावरले नाहीये. आरोप आहे की २९ नोव्हेंबर रोजी CISF चे हेड कॉन्स्टेबल मदन गोपाल तिवारी यांनी १४ वर्षांच्या साहिलची गोळी मारून हत्या केली. पोलिसांना मिळालेल्या तक्रारीनुसार, CISF जवान मदनच्या भावाचं लग्न होतं. वरातीत साहिल आपल्या मित्रांसोबत नोटा वेचत होता. यावर चिडलेल्या मदनने साहिलला आधी मारहाण केली आणि नंतर पिस्तुलाने डोक्यात गोळी मारली. मात्र, मदनचे कुटुंब जाणूनबुजून गोळी मारल्याचा आरोप चुकीचा असल्याचे सांगत आहे. आरोपी मदन पोलिसांच्या ताब्यात आहे. साहिलचे कुटुंब न्यायाची मागणी करत आहे. घटनेच्या दिवशी काय झाले होते? साहिलचे कुटुंब कोणत्या परिस्थितीत राहत आहे? आरोपीच्या कुटुंबाचा काय युक्तिवाद आहे? हे जाणून घेण्यासाठी दिव्य मराठी टीम दिल्लीतील शाहदरा येथील घटनास्थळी पोहोचली. सर्वात आधी जाणून घ्या 29 नोव्हेंबर रोजी काय घडलेशाहदरा येथील मानसरोवर पार्क परिसरात डीडीएचे फ्लॅट्स आणि कम्युनिटी हॉल आहेत. पूर्वी याच्या शेजारीच मानसरोवर पार्क पोलीस स्टेशन होते, पण आता ते मागे हलवण्यात आले आहे. येथून सुमारे 500 मीटर दूर, गल्ली क्रमांक-14 मध्ये रेल्वे ट्रॅकच्या कडेला साहिलचे कुटुंब राहते. रेल्वे ट्रॅक आणि घराच्या मध्ये एक भिंत उभी आहे. भिंतीच्या एका बाजूला घर आणि दुसऱ्या बाजूला कचऱ्याचा ढिगारा आहे. या घाणीच्या मधोमध बांधलेल्या 25 गजच्या एका मजली घरात साहिलचे वडील सिराजुद्दीन अन्सारी आणि आई नीशा खातून 3 मुलांसोबत राहतात. खालच्या भागात घरमालकाने सामान भरून ठेवले आहे. कुटुंब पहिल्या मजल्यावर राहते. अरुंद जिन्याने पहिल्या मजल्यावर पोहोचल्यावर एक छोटी खोली आणि शौचालय दिसते. घराचे भाडे 3800 रुपये आहे. घरी आमची पहिली भेट साहिलचे वडील, 42 वर्षीय सिराजुद्दीन अन्सारी यांच्याशी झाली. सहा महिन्यांपूर्वी त्यांच्या शरीराच्या एका भागाला लकवा मारला होता. त्यामुळे ते कामावर जाऊ शकत नव्हते. अशा परिस्थितीत 14 वर्षांचा साहिलच त्यांचा आधार होता. तो किराणा दुकानात दूध पुरवठा करत असे आणि त्याच्या कमाईवरच घर चालत असे. वडील सिराजुद्दीन सांगतात की साहिल दुकानातून रोज रात्री ९ वाजता परत येत असे. त्या रात्रीही तो त्याच वेळी परतला. मोहल्ल्यात लग्न होते आणि इतर मुले वरातीत उधळलेले पैसे गोळा करत होते. साहिलने पैसे गोळा केले नाहीत, पण तो तिथेच उभा राहिला. तेव्हा CISF जवानाने त्याला पकडले आणि लाथा-बुक्क्यांनी मारले. तो जवान दारूच्या नशेत असल्याचे दिसत होते. साहिल म्हणाला की, अंकल, मी काहीही केले नाही. माझी काहीही चूक नाही. तरीही तो साहिलला मारत राहिला. मग पिस्तूल काढले आणि गोळी झाडली. साहिलला गोळी मारून आरोपी मदन गाडीत बसून पळून गेला. पोलिसांनी जेव्हा नवरदेव आणि त्याच्या वडिलांना ताब्यात घेऊन चौकशी केली, तेव्हा आरोपी मदनचा पत्ता लागला. CISF जवान मदन नवरदेवाच्या मामाचा मुलगा आहे आणि सुट्टी घेऊन लग्नात आला होता. तो इटावाच्या भरथना येथील रहिवासी आहे आणि कानपूरमध्ये पोस्टेड आहे. यानंतर मानसरोवर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी आरोपीला दुसऱ्या दिवशी सकाळी भरथना येथून अटक केली. मुलाने दगड मारण्याचा प्रयत्न केला म्हणून गोळी मारलीसिराजुद्दीन दावा करतात, ‘जेव्हा मी आरोपी CISF जवानाला पोलीस ठाण्यात भेटलो होतो, तेव्हा तो साहिलला दोषी ठरवत होता. त्याने सांगितले की साहिल पैसे लुटत होता. मी त्याला पळवून लावले पण तो पळाला नाही. उलट त्याने दगड मारण्याचा प्रयत्न केला, म्हणून गोळी मारली.’ सिराजुद्दीन प्रश्न करत म्हणतात, ‘14 वर्षांचा मुलगा काय करू शकतो. लग्नात मुलाने पैसे लुटणे ही सामान्य गोष्ट आहे.’ आई म्हणाल्या- गोळी आरपार गेली होती, लग्नात नोटा लुटण्याची गोष्ट खोटीसाहिलचे वडील सिराजुद्दीन आणि आई नीशा यांनी यापूर्वी 2020 मध्येही एक मुलगा गमावला आहे. त्यांच्या सर्वात मोठ्या मुलाचा आजारपणामुळे मृत्यू झाला होता. आता साहिलच्या मृत्यूमुळे कुटुंबाला आणखी एक धक्का बसला आहे. साहिलच्या हत्येच्या दिवसाची आठवण करून साहिलची आई नीशा यांच्या डोळ्यात अश्रू येतात. त्या म्हणतात, ‘मी रात्री सुमारे 10 वाजता जेवण बनवत होते. अचानक दोन मुले धावत आली आणि ओरडू लागली की गोळी मारली, गोळी मारली. मला वाटले की कदाचित ते मस्करी करत आहेत. दरवाजा उघडला तर पाहिले की चारी बाजूंनी गर्दी जमली आहे. मी पण धावत लग्नाच्या ठिकाणी पोहोचले.’ ‘तिथे साहिल रस्त्यावर पडला होता. त्याच्या डोक्यात गोळी लागली होती, जी आरपार गेली होती. मी स्पर्श केला तेव्हा श्वास थांबले होते. त्याचा जागीच मृत्यू झाला होता. पोलिसांनी मला बाजूला केले. ॲम्ब्युलन्स आली आणि आम्ही त्याला जीटीबी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. तिथे डॉक्टरांनी सांगितले की, मुलगा गेला आहे.‘ निशा नोटा लुटल्याची गोष्ट चुकीची असल्याचे सांगतात. त्या म्हणतात, ‘साहिल पैसे कमावून माझ्या हातात देत असे. मग मीच त्याला खर्चासाठी पैसे देत असे. त्या दिवशी मी त्याला 50 रुपये दिले होते. पोलिसांनाही खिशातून 60 रुपये मिळाले. पैसे लुटण्याचे निमित्त केले जात आहे, साहिल तर फक्त बाजूला उभा राहून सर्व पाहत होता.‘ घर चालवणे कठीण, साहिलच कमवत होता कुटुंबाची विचारपूस केल्यावर साहिलचे वडील सांगतात, ‘1999 मध्ये झारखंडमधील गोड्डा येथून माझे कुटुंब कमाईच्या आशेने दिल्लीला आले होते. कुटुंबात 7 मुले होती, त्यापैकी 3 मुलींची लग्ने झाली. तर 2020 मध्ये एका मुलाच्या मृत्यूनंतर तीन मुलांचे कुटुंब उरले होते.‘ ‘आता कुटुंबात दोन मुले आणि आम्ही पती-पत्नी आहोत. साहिल आणि मोठा भाऊ मिळून कमवत होते. मी मजुरी करत होते, पण हाताला लकवा मारल्यापासून अडचण झाली. आता हेल्परचे काम करते, ज्यात 400-500 रुपयेच मिळतात. त्यामुळे घराचा खर्च चालवण्यात अडचण येते.‘ घटनेच्या 8-10 दिवसांनंतर आता सिराजुद्दीनने पुन्हा काम सुरू केले. वडील सिराजुद्दीन म्हणतात, 'कामात मन कुठे लागतं? लोक येत-जात राहतात. जग म्हणेल की पोरगा मेला आणि वडील कामावर निघाले, पण गुजराण तर करावी लागते. आम्हाला कोणतीही आर्थिक मदत मिळालेली नाही. गावकऱ्यांनी अंत्यसंस्कारात थोडी मदत केली, पण बाकी कोणीही मदतीचा हात पुढे केला नाही.' दुसऱ्या मुलावरही गोळी झाडली होती, तो थोडक्यात बचावलाया घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यात साहिलच्या डोक्यात गोळी लागली आहे आणि तो रस्त्यावर पडलेला दिसत आहे. घटनेच्या ठिकाणी खाण्यापिण्याची काही दुकाने आहेत. रात्री साडेनऊच्या सुमारास जेव्हा साहिलला गोळी मारण्यात आली, तेव्हा येथे खाण्याचे एक दुकान उघडे होते. जेव्हा आम्ही या दुकानावर पोहोचलो, तेव्हा येथे काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने सांगितले, 'त्या दिवशी जेव्हा गोळी चालली, तेव्हा वाटले की फटाक्यांचा आवाज आहे. लग्नांमध्ये अनेकदा फटाके वाजतात. नंतर जेव्हा मुलाला गोळी लागल्याचे कळले, तेव्हा आम्ही दुकान बंद केले होते. ताबडतोब पोलीसही आले होते.' घटनेच्या वेळी साहिलचा मित्र, 14 वर्षांचा संतोष (बदललेले नाव) देखील ट्यूशनमधून परत येत होता. संतोषचा दावा आहे की तिथे दुसरे एक मूलही होते, जे थोडक्यात बचावले. त्यालाही गोळी मारली होती पण तो खाली झोपल्यामुळे वाचला. संतोष पुढे सांगतो, ’मी ट्यूशनमधून परत येत होतो. रस्त्यात साहिल रस्त्यावर पडलेला होता. मी आणि साहिलचा धाकटा भाऊ साजिम घरी गेलो आणि मावशीला सांगितले. जेव्हा आम्ही परतलो, तेव्हा पोलीस सगळ्यांना हटवत होते. कोणीही त्याला उचलत नव्हते, ना काही करत होते.’ संतोषही पैसे लुटल्याचे मान्य करत नाही. तो म्हणतो की साहिल माझा बालपणीचा मित्र होता. आम्ही 6-7 वर्षांपासून एकत्र होतो. लग्नांमध्ये आम्ही दोघे एकत्र येत-जात होतो. लग्नसराईचा हंगाम सुरू असतो. आम्ही फक्त येऊन पाहत होतो आणि निघून जात होतो. कधीही पैसे लुटले नाहीत. साहिल तर तसा अजिबात नव्हता. पोलिसांनी सांगितले - आरोपीने रागाच्या भरात गोळीबार केल्याचे कबूल केलेआरोपी CISF जवान मदन गोपाल तिवारी सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. शाहदराचे उपायुक्त प्रशांत गौतम यांनी सांगितले की, घटनेनंतर आरोपी तत्काळ फरार झाला होता. तो गाडीत बसून दिल्लीमार्गे इटावाला पळून गेला. पोलिसांनी वराच्या वडिलांची आणि वराची चौकशी केली, तेव्हा आरोपी इटावा येथील भरथना येथे राहत असल्याचे समजले. प्रशांत गौतम सांगतात, ‘माहिती मिळाल्यानंतर, तपासणीसाठी सीमापुरीचे ASP आणि मानसरोवर पोलीस ठाण्याचे SHO यांच्या देखरेखीखाली एक पथक तयार करण्यात आले आहे. स्थानिक पातळीवर चौकशी आणि विवाहस्थळी लावलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने, दुसऱ्याच दिवशी म्हणजेच 30 नोव्हेंबर रोजी उत्तर प्रदेशातून आरोपीला पकडण्यात आले.‘ मानसरोवर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सुनील कुमार भरथना येथे गेलेल्या पथकाचा भाग होते. ते सांगतात की, आरोपीने घटनेत वापरलेली परवानाधारक .32 बोअरची पिस्तूल एक्सप्रेस-वेवर फेकून दिली होती. तथापि, पोलीस रात्रीच आरोपीच्या ठिकाणावर पोहोचले. आरोपीला सोबत दिल्लीला आणताना पिस्तूल आणि गाडीही जप्त करण्यात आली. आरोपीचे कुटुंब म्हणाले - आरोप खोटे आहेत, आम्ही कायदेशीर लढाई लढूआरोपी मदन गोपाल तिवारीचे कुटुंब इटावा येथील भरथना येथे राहते. कुटुंबात त्याच्याशिवाय पत्नी आणि दोन मुले आहेत. इटावा येथील भरथना येथे राहणाऱ्या आरोपीच्या भाऊ सोनूशी आम्ही फोनवर बोललो. ते त्यांच्या भावावरील आरोप चुकीचे असल्याचे सांगतात. सोनू दावा करतो, ‘माझ्या भावाने गोळी जाणूनबुजून चालवली नाही. वरातीत खूप गर्दी होती आणि पिस्तूल लोडेड होती. गर्दीत चुकून पिस्तूल चालले आणि मुलाला गोळी लागली.‘ आरोपी दारूच्या नशेत असल्याची गोष्टही सोनू चुकीची सांगतो. तो म्हणतो की, सगळे म्हणत आहेत की माझा भाऊ दारूच्या नशेत होता पण ही गोष्ट पूर्णपणे चुकीची आहे. माझ्या भावाने कधी दारूला हातही लावला नाही. सोनू म्हणतो की, आता कुटुंब कायदेशीर लढाई लढेल. CISFच्या उत्तराची प्रतीक्षाआरोपी मदन गोपाल तिवारी CISF चा हेड कॉन्स्टेबल आहे. त्याची सध्या कानपूरमध्ये पोस्टिंग होती. आम्ही या प्रकरणात CISF ची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला. CISF च्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या संपर्क क्रमांकावर कॉल उचलला गेला नाही. त्यानंतर आम्ही CISF ला आमचा प्रश्न ईमेल केला आहे. उत्तर आल्यावर बातमीत अपडेट करू. तथापि, CISF च्या नियमांनुसार, जर कोणताही जवान एखाद्या फौजदारी प्रकरणात 48 तासांपेक्षा जास्त काळ कोठडीत राहिला, तर त्याला निलंबित केले जाते.
मिडल ईस्टमध्ये सौदी अरेबिया आणि इस्रायल यांच्यामध्ये एक छोटा देश आहे - जॉर्डन. पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 आणि 16 डिसेंबर रोजी याच देशाच्या दौऱ्यावर आहेत. जॉर्डनचे किंग अब्दुल्ला II यांच्या भव्य हुसैनीया पॅलेसमध्ये सोमवारी संध्याकाळी पंतप्रधान मोदींचे स्वागत झाले. किंग अब्दुल्ला यांना पैगंबर मोहम्मद यांच्या 41व्या पिढीचे वंशज मानले जाते. त्यांचे कुटुंब 1400 वर्षांपासून जॉर्डनवर राज्य करत आहे. अब्दुल्ला यांचे नाव सर्वात श्रीमंत राजांमध्ये आणि त्यांच्या पत्नीचे नाव सर्वात सुंदर राण्यांमध्ये गणले जाते. या कथेत आपण जॉर्डनचे किंग अब्दुल्ला द्वितीय यांची कहाणी आणि त्यांच्याशी संबंधित रंजक किस्से जाणून घेऊया… तारीख 30 जानेवारी 1962 आणि ठिकाण जॉर्डनची राजधानी अम्मान. किंग हुसैन आणि त्यांची दुसरी पत्नी प्रिन्सेस मुना यांच्या घरी एका मुलाचा जन्म झाला. किंग हुसैन यांचे हे पहिले अपत्य होते. त्यांनी आजोबा अब्दुल्ला यांच्या नावावरून त्या मुलाचे नाव अब्दुल्ला द्वितीय इब्न अल हुसैन असे ठेवले. नियमानुसार राजाचा सर्वात मोठा मुलगा क्राउन प्रिन्स बनतो. त्यामुळे अब्दुल्ला द्वितीय जन्मापासूनच क्राउन प्रिन्स बनले. तथापि, जेव्हा ते 3 वर्षांचे झाले, तेव्हा मध्य पूर्वेत राजकीय उलथापालथ सुरू झाली. अशा परिस्थितीत किंग हुसैन यांनी धाकटे भाऊ हसन बिन तलाल यांना क्राउन प्रिन्स बनवले. खरेतर, क्राउन-प्रिन्स राजाच्या मृत्यूनंतर किंवा त्यांनी गादी सोडल्यानंतर देशाचा राजा बनतो. अब्दुल्लाचे सुरुवातीचे शिक्षण अम्मान येथील इस्लामिक एज्युकेशनल कॉलेजमध्ये झाले. त्यानंतर त्यांनी इंग्लंडमधील सेंट एडमंड्स स्कूल आणि अमेरिकेतील डियरफील्ड अकादमीमधून शालेय शिक्षण पूर्ण केले. अब्दुल्ला यांना लहानपणापासूनच सैन्य आणि शस्त्रांमध्ये रुची होती. 1980 मध्ये त्यांनी इंग्लंडमधील ब्रिटिश रॉयल मिलिटरी अकादमीमध्ये प्रशिक्षण घेतले आणि पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी काही काळ ब्रिटिश आर्म्ड फोर्सेसमध्ये काम केले. नंतर जॉर्डन आर्म्ड फोर्सेसमध्ये सामील झाले. 1993 मध्ये स्पेशल फोर्सेसचे उपकमांडर आणि पुढील वर्षी कमांडर बनले. 9 वर्षांनी लहान असलेल्या एका सामान्य मुलीवर पहिल्या नजरेत प्रेम, 6 महिन्यांनंतर लग्न साल १९९२च्या शेवटच्या महिन्यातील ही गोष्ट आहे. एका संध्याकाळी अब्दुल्ला एका डिनर पार्टीला गेले. ते मित्रांसोबत संध्याकाळचा आनंद लुटत होते. तेव्हा तिथे एका पॅलेस्टिनी मुलीने पाऊल ठेवले. नाव होते - रानिया अल-यासीन. पहिल्याच भेटीत ३१ वर्षांच्या अब्दुल्ला यांच्या मनात २३ वर्षांची रानिया घर करून राहिली. रानियालाही त्यांच्यावर प्रेम झाले. दोघांमध्ये बोलणे झाले. मग मैत्री आणि प्रेमापर्यंत गोष्ट पोहोचली. पहिल्या भेटीनंतर ६ महिन्यांनी अब्दुल्ला आणि रानियाने साखरपुडा केला आणि त्यानंतर १० जून १९९३ रोजी अम्मानमधील झहरान पॅलेसमध्ये लग्न केले. लग्नाच्या वेळी अब्दुल्लाने आपला लष्करी गणवेश परिधान केला होता आणि कमरेला तलवार लावली होती. तर रानियाने सोन्याची किनार असलेला लहान बाह्यांचा गाऊन घातला होता. त्यासोबत सोनेरी पट्टा, पांढरे जॅकेट आणि हातमोजे घातले होते. रानिया कोणत्याही शाही कुटुंबातील नव्हती. तरीही अब्दुल्ला यांचे कुटुंब या लग्नासाठी राजी झाले. खरं तर, रानिया यांचा जन्म 31 ऑगस्ट 1970 रोजी वेस्ट बँक येथील एका पॅलेस्टिनी कुटुंबात झाला होता. वडील फैजल डॉक्टर होते. नंतर ते कामाच्या निमित्ताने कुटुंबासह कुवेतला गेले, पण 1990 मध्ये त्यांना कुवेतमधून जॉर्डनला यावे लागले. या काळात रानिया कैरोमधील अमेरिकन युनिव्हर्सिटीतून बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनचे शिक्षण घेत होत्या. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्या जॉर्डनला आल्या. आधी एका बँकेत आणि नंतर ॲपल कंपनीत त्यांनी काम केले. आज रानिया जॉर्डनच्या महाराणी आहेत. त्यांना 4 मुले आहेत - प्रिन्स हुसेन, प्रिन्सेस इमान, प्रिन्सेस सलमा आणि प्रिन्स हाशेम. रानिया महिला आणि मुलांच्या शिक्षण, हक्क आणि पोषणासाठी काम करतात. यासाठी त्या कार्यक्रम राबवतात. सोशल मीडिया आणि जागतिक परिषदांमध्ये त्या सक्रिय असतात. त्या अनेकदा त्यांच्या आधुनिक लूक, डिझायनर कपडे, दागिने आणि मेकअपमुळे चर्चेत असतात. रानिया जगातील सर्वात सुंदर आणि मनमिळाऊ महाराण्यांपैकी एक मानल्या जातात. दुसऱ्यांदा क्राउन प्रिन्स बनले, 2 आठवड्यांनंतर जॉर्डनची गादी मिळाली ही गोष्ट आहे जानेवारी 1999ची. 63 वर्षांचे किंग हुसैन 46 वर्षांपासून जॉर्डनची गादी सांभाळत होते, पण ते कर्करोगाने त्रस्त होते. एके दिवशी अचानक त्यांची तब्येत खूप बिघडली. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण त्यांच्या वाचण्याची आशा दिवसेंदिवस कमी होत होती. मग एके दिवशी रुग्णालयातून एक पत्र आले, ज्याने संपूर्ण देशात खळबळ उडवून दिली. हे पत्र क्राउन प्रिन्स तलाल यांच्यासाठी होते. त्यात लिहिले होते की किंग हुसेन त्यांचे धाकटे भाऊ क्राउन प्रिन्स हसन बिन तलाल यांच्यावर खूप नाराज आहेत. त्यांनी तलाल यांच्यावर सत्तेचा गैरवापर केल्याचा आरोप केला. यामुळे तलाल यांना क्राउन प्रिन्स पदावरून हटवण्यात आले. असे म्हटले जाते की किंग हुसेन यांना त्यांच्या शेवटच्या दिवसांत वाटले की मुलालाच वारसदार बनवणे योग्य राहील. अशा परिस्थितीत त्यांनी त्यांचा मोठा मुलगा अब्दुल्ला द्वितीय याला पुन्हा क्राउन प्रिन्स बनवले. पुन्हा यासाठी, कारण अब्दुल्ला जन्मापासूनच क्राउन प्रिन्स होते. पण जेव्हा ते 3 वर्षांचे झाले, तेव्हा मध्य पूर्वेत अशांतता सुरू झाली. अशा परिस्थितीत किंग हुसेन यांनी 1965 मध्ये धाकटे भाऊ हसन बिन तलाल यांना क्राउन प्रिन्स बनवले. अब्दुल्ला क्राउन प्रिन्स बनल्यानंतर 2 आठवड्यांनी, 7 फेब्रुवारी 1999 रोजी किंग हुसेन यांचे निधन झाले. त्याच दिवशी अब्दुल्ला जॉर्डनचे नवीन राजा बनले. सावत्र भावाला आधी युवराज बनवले, नंतर 5 वर्षांनी हटवले; आज नजरकैदेत अब्दुल्ला यांनी सत्ता हाती घेताच सावत्र भाऊ प्रिन्स हमजा यांना युवराज बनवले. हे भावा-भावाचे प्रेम आहे असे म्हटले गेले. पण गोष्ट काही वेगळीच होती. खरं तर, किंग हुसेन यांनी 4 विवाह केले होते. हमजा त्यांची चौथी बेगम नूर अल-हुसेन यांचा मुलगा होता. नूर यांना वाटत होते की हुसेन यांच्यानंतर हमजा राजा व्हावा आणि त्या स्वतः राजमाता व्हाव्यात. किंग हुसेन यांनाही त्यांच्या 11 मुलांपैकी हमजा सर्वात जास्त प्रिय होता. ते त्याला डोळ्यांचा तारा म्हणत. इतके लाडके असल्यामुळे, किंग हुसेन यांनी मरताना अब्दुल्ला यांना सांगितले की, राजा झाल्यावर त्यांनी हमजाला क्राउन प्रिन्स बनवावे. अब्दुल्ला यांनी तसेच केले, पण ५ वर्षांनंतर सर्व काही बदलले. नोव्हेंबर २००८ मध्ये अब्दुल्ला यांनी हमजाला क्राउन प्रिन्सच्या पदावरून हटवले. अब्दुल्ला यांनी हमजाला एक पत्रही लिहिले, 'या पदामुळे तू काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडू शकत नाहीस. जॉर्डनला तुझी गरज आहे. अशा परिस्थितीत मी तुला क्राउन प्रिन्सच्या पदावरून हटवण्याचा निर्णय घेतला आहे. आशा आहे की तू राजाशी एकनिष्ठ राहशील.' पत्रातील गोष्टी चांगल्या होत्या, पण उद्देश काही वेगळाच होता. खरं तर, अब्दुल्ला हमजाला हटवून आपला मुलगा हुसेनसाठी मार्ग मोकळा करत होते. जुलै 2009 मध्ये त्यांनी हुसेनला क्राउन प्रिन्स बनवलेही. नंतर एप्रिल 2021 मध्ये बातम्या आल्या की माजी क्राउन प्रिन्स हमजा यांना त्यांच्याच घरात नजरकैद करण्यात आले आहे. त्यांची सुरक्षा काढून घेण्यात आली आहे आणि त्यांना घरातून बाहेर पडू दिले जात नाहीये. कोणालाही भेटणे, बोलणे, फोन आणि इंटरनेट वापरण्यावरही बंदी घालण्यात आली. तेव्हा जॉर्डनचे उपपंतप्रधान ऐमान सफादी म्हणाले की प्रिन्स हमजा जॉर्डनच्या सुरक्षा आणि स्थिरतेच्या विरोधात काम करत होते. म्हणून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. हमजावर सत्तापालटाचा आरोप लावण्यात आला. ISIS च्या दहशतवाद्यांना मारण्यासाठी स्वतः फायटर जेट उडवले! वर्ष 2015 आणि तारीख 2 फेब्रुवारी. दहशतवादी संघटना ISIS ने 22 मिनिटांचा एक व्हिडिओ जारी केला. यात जॉर्डनचे पायलट लेफ्टनंट मुआथ अल-कसासबह यांची आधी चौकशी करण्यात आली. नंतर त्यांना पिंजऱ्यात बंद करून जिवंत जाळण्यात आले. खरं तर, गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये 27 वर्षीय मुआथ यांचे F-16 फायटर जेट सीरियामध्ये ISIS विरुद्धच्या एका मोहिमेत क्रॅश झाले होते. त्यानंतर ISIS ने त्यांना पकडले. मुआथच्या मृत्यूचा व्हिडिओ पाहून जॉर्डनमध्ये संतापाचा उद्रेक झाला. लोक रस्त्यावर उतरले. ‘बदला घ्या!’ च्या घोषणा दिल्या जाऊ लागल्या. त्यावेळी किंग अब्दुल्ला अमेरिकेत होते. बातमी मिळताच, ते तत्काळ जॉर्डनला परतले. अम्मान विमानतळावरून अब्दुल्ला थेट मुआथच्या कुटुंबाला भेटायला गेले. तिथे त्यांनी म्हटले, ‘ही भ्याडांची कृती आहे. ISIS केवळ जॉर्डनशीच लढत नाहीये, तर इस्लाम आणि माणुसकीशीही लढत आहे. आम्ही याला इतके जोरदार प्रत्युत्तर देऊ की धरती हादरून जाईल.’ दुसऱ्याच दिवशी जॉर्डनने ISISच्या 2 दहशतवाद्यांना फाशी दिली. यानंतर किंग अब्दुल्ला यांनी 'ऑपरेशन शहीद मुआथ' सुरू केले. 3 दिवसांच्या या ऑपरेशनमध्ये जॉर्डनच्या हवाई दलाने सीरियातील ISIS च्या ठिकाणांवर जोरदार बॉम्बफेक केली. यात 56 दहशतवादी मारले गेले. यादरम्यान किंग अब्दुल्ला यांचा एक फोटो व्हायरल झाला, ज्यात ते युद्धाच्या गणवेशात दिसले. सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली की किंग स्वतः फायटर जेट उडवत आहेत. ते ISIS वर बॉम्ब टाकत आहेत. अब्दुल्ला यांना 'वॉरियर किंग' म्हटले जाऊ लागले. मात्र, काही वेळाने स्पष्ट झाले की हे सर्व अफवा आहे आणि अब्दुल्ला यांनी स्वतः जेट उडवले नाही. त्यांनी फक्त ऑपरेशनची कमान सांभाळली. तरीही या घटनेने किंग अब्दुल्ला यांची प्रतिमा आणखी मजबूत केली. ते असे नेते बनले जे आपल्या देशासाठी आणि सैनिकांसाठी काहीही करू शकतात. जगातील सर्वात श्रीमंत राजांपैकी एक; 6,750 कोटींची संपत्ती, 12 राजवाडे किंग अब्दुल्ला यांची अंदाजित वैयक्तिक मालमत्ता सुमारे 750 दशलक्ष डॉलर म्हणजेच 6,750 कोटी रुपये आहे. यात त्यांचा वारसा, स्थावर मालमत्ता, गुंतवणूक आणि इतर उत्पन्न समाविष्ट आहे. जगातील सर्वात श्रीमंत राजांमध्ये अब्दुल्ला यांचे नाव समाविष्ट आहे. मात्र, त्यांच्या पगाराबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नाही. अब्दुल्ला यांच्याकडे 12 राजवाडे आहेत, ज्यांचा वापर शाही कुटुंब घर आणि कार्यालयासाठी करते. त्यांच्या शाही कुटुंबावर आणि राजवाड्यांवर वर्षाला 35 दशलक्ष डॉलर म्हणजेच 300 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च केले जातात. याशिवाय त्यांच्याकडे एक रॉयल ऑटोमोबाइल म्युझियम आहे, ज्यात 80 पेक्षा जास्त कार आणि बाईक आहेत. यात रोल्स-रॉयस, बुगाटी वेरोन, पॉर्शे, एस्टन मार्टिन, मर्सिडीज यांसारख्या लक्झरी कार्सचा समावेश आहे. तर हार्ले-डेविडसन, BMW, Zundapp KS यांसारख्या आलिशान बाइक आहेत. याशिवाय त्यांच्याकडे 3 एअरक्राफ्ट आणि 1 यॉट आहे. अब्दुल्ला यांना सर्वात आधुनिक राजा देखील मानले जाते. पँडोरा पेपर्स, स्विस सीक्रेट्समधून अब्दुल्लाची 3,200 कोटींची संपत्ती उघड ऑक्टोबर 2021 मध्ये पॅंडोरा पेपर्सचा खुलासा झाला, ज्यात 1.19 लाख दस्तऐवज आणि 2.9 टीबी डेटा लीक झाला. यात असे समोर आले की किंग अब्दुल्ला यांनी 2003 ते 2017 दरम्यान गुप्तपणे अमेरिका आणि ब्रिटनमध्ये 14 आलिशान मालमत्ता खरेदी केल्या. त्यांची किंमत सुमारे 100 दशलक्ष डॉलर म्हणजे सुमारे 900 कोटी रुपये आहे. यात मालिबू बीचवरील 3 आलिशान हवेली, वॉशिंग्टन डीसीमधील 3 लक्झरी अपार्टमेंट, लंडन आणि एस्कॉटमधील अनेक घरांचा समावेश आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये स्वित्झर्लंडच्या 'क्रेडिट सुइस' बँकेच्या 18 हजार खात्यांचा डेटा लीक झाला. याला 'स्विस सीक्रेट्स' असे नाव देण्यात आले. यात किंग अब्दुल्ला यांची 6 गुप्त खाती सापडली, ज्यात सुमारे 250 दशलक्ष डॉलर म्हणजे 2250 कोटी रुपये जमा होते. यावर रॉयल हाशेमाइट कोर्टाने सांगितले की, हे पैसे राजा अब्दुल्ला यांचे वैयक्तिक आहेत. याचा वापर सुरक्षा, शाही प्रकल्प, वैयक्तिक खर्च आणि इस्लामिक पवित्र स्थळांच्या देखभालीसाठी केला जातो. आपल्या आवडत्या 'स्टार ट्रेक' मालिकेत अभिनय केला जेव्हा अब्दुल्ला 34 वर्षांचे होते, तेव्हा त्यांना स्पेस ॲडव्हेंचर, एलियन्स आणि स्टारशिपमध्ये खूप रस होता. यामुळे ते 'स्टार ट्रेक: वॉयजर' या सायन्स फिक्शन मालिकेचे चाहते बनले. एकदा ते याचे शूटिंग पाहण्यासाठी कॅलिफोर्नियातील पॅरामाउंट स्टुडिओमध्ये पोहोचले, तेव्हा मालिकेच्या निर्मात्यांनी त्यांना एक छोटी भूमिका देऊ केली. अब्दुल्लाने आनंदाने ती ऑफर स्वीकारली. 13 मार्च 1996 रोजी प्रदर्शित झालेल्या शोमध्ये अब्दुल्ला एका सायन्स ऑफिसरच्या भूमिकेत दिसले. मात्र, त्यांनी ना संवाद बोलले ना क्रेडिट घेतले. ते काही सेकंदांसाठीच पडद्यावर दिसले. एक चाहते म्हणून अब्दुल्ला इतके आनंदी झाले की त्यांनी शोमधील दोन अभिनेते - इथन फिलिप्स आणि रॉबर्ट पिकार्डो यांना जॉर्डनला येण्याचे आमंत्रण दिले. नंतर ते दोघे जॉर्डनला गेले देखील. कार रेसिंग, स्कूबा डायव्हिंग, स्काय डायव्हिंगचे शौकीन 1980च्या दशकात स्पेशल फोर्सेसचे कमांडो राहिलेले किंग अब्दुल्ला यांना साहसी खेळ खूप आवडतात. त्यांना कार रेसिंगची खूप आवड आहे. ते 1986 आणि 1988 मध्ये जॉर्डनियन डेझर्ट रॅलीमध्ये चॅम्पियन बनले. त्यांनी वाळवंटात अनेक रॅली जिंकल्या. 2000 मध्ये अब्दुल्ला यांनी जॉर्डनमध्ये बनवलेली ‘ब्लॅक आयरीस’ (Black Iris) ही रॅली कार स्वतः चालवली, जी तरुण रॅली चालकांसाठी एक स्वस्त कार होती. आजही ते रॅलीपूर्वी ट्रॅक तपासणारी ‘झिरो कार’ (Zero Car) चालवतात. याशिवाय, ते एक पात्र फ्रॉगमॅन म्हणजेच व्यावसायिक लष्करी पाणबुडे आहेत. रेड सी (Red Sea) वरील अकाबा (Aqaba) हे शहर त्यांची आवडती स्कूबा डायव्हिंगची जागा आहे. ते त्यांचा मुलगा क्राउन प्रिन्स हुसेन (Crown Prince Hussein) यांच्यासोबत समुद्राच्या खोलवर जाऊन कचरा साफ करण्यासाठी क्लीन-अप डायव्ह्स (Clean-up Dives) देखील करतात. अब्दुल्ला यांना स्कायडायव्हिंग आणि पॅराशूटिंगचीही आवड आहे. ते फ्री-फॉल पॅराशूटिस्ट आहेत. म्हणजे, जे विमानातून उडी मारून काही काळ पॅराशूट न उघडता हवेत खाली येतात आणि निश्चित उंचीवर पॅराशूट उघडून जमिनीवर उतरतात. किंग बनण्यापूर्वी ते नियमित स्कायडायव्हिंग करत होते, पण आता सुरक्षा कारणांमुळे ते हा छंद पूर्ण करू शकत नाहीत. मात्र, स्पेशल फोर्सेसच्या प्रशिक्षणात जंप मास्टर बनून ते जवानांचे मनोबल वाढवतात.
दाट धुक्यामुळे यमुना एक्सप्रेसवेवर ८ बस आणि ३ कारची टक्कर ; अपघातात ४ प्रवाशांचा मृत्यू, २५ जण जखमी
Delhi-Agra Expressway। उत्तर प्रदेशातील मथुरा याठिकाणी दिल्ली-आग्रा एक्सप्रेसवेवर एक मोठा अपघात झाला. मंगळवारी पहाटे ४ वाजता दाट धुक्यामुळे सात बस एकामागोमाग आदळल्या, ज्यामुळे बसेस आग लागल्या. यात चार जणांचा मृत्यू झाला आणि २५ जण जखमी झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. मथुराच्या बलदेव पोलीस स्टेशन परिसरात हा अपघात घडला. दाट धुक्यामुळे सात बसेस एकमेकांना भिडल्या, ज्यामुळे […] The post दाट धुक्यामुळे यमुना एक्सप्रेसवेवर ८ बस आणि ३ कारची टक्कर ; अपघातात ४ प्रवाशांचा मृत्यू, २५ जण जखमी appeared first on Dainik Prabhat .

32 C