Devendra Fadnavis : शेवटच्या तासांत राजकीय हालचालींना वेग; आता CM फडणवीसांचा ‘या’नेत्याला फोन
Devendra Fadnavis : बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगवान घडामोडी घडताना दिसत आहेत. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन केल्याची माहिती समोर आली आहे.
Nashik Fake Police : AI,पोलीस आणि स्त्रियांची लाखोंची फसवणूक; तोतया पोलीस अटकेत
नाशिक : नाशिक जिल्ह्यात तंत्रज्ञानाचा गैरवापर करून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) च्या मदतीने स्वतःला पोलीस अधिकारी म्हणून सादर करत महिलांना जाळ्यात ओढून आर्थिक लूट करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.AI च्या मदतीने बनावट ओळखआसिफ तडवी असे आरोपीचे नाव असून, त्याने AI तंत्रज्ञानाचा वापर करून स्वतःचे पोलीस वर्दीतील बनावट फोटो तयार केले होते. हे फोटो इतके वास्तवदर्शी होते की, सोशल मीडियावर पाहणाऱ्या महिलांना तो खरा पोलीस अधिकारी असल्याचा विश्वास बसत होता. इंस्टाग्रामवर सक्रिय राहून तो महिलांशी संपर्क साधत असे.प्रेमाच्या जाळ्यात अडकवून लूटसिन्नरमधील एका महिलेला त्याने अशाच प्रकारे जाळ्यात ओढले. विश्वास संपादन केल्यानंतर विविध कारणे सांगत त्याने तिच्याकडून सुमारे 3 लाख रुपये उकळले. घरगुती अडचणी आणि पोलीस प्रशिक्षणाच्या नावाखाली पैशांची मागणी केली जात होती. पीडित महिलेने पुढे पैसे देण्यास नकार दिल्यानंतर आरोपीने धमक्यांचा मार्ग अवलंबला. AI च्या मदतीने महिलेचे आक्षेपार्ह फोटो तयार करून ते व्हायरल करण्याची धमकी दिली. या प्रकारामुळे घाबरलेल्या महिलेने पोलिसांकडे धाव घेतली.पोलिसांचा सापळा आणि अटकतक्रारीनंतर वावी पोलिसांनी सापळा रचून आरोपीला पकडले. महिलेच्या माध्यमातून भेटण्याचे आमिष दाखवून त्याला बोलावण्यात आले आणि अटक करण्यात आली. आरोपीच्या मोबाईलमधून मोठ्या प्रमाणावर बनावट फोटो, चॅट्स आणि आक्षेपार्ह व्हिडिओ जप्त करण्यात आले आहेत.अनेक महिलांची फसवणूक?पोलिसांच्या प्राथमिक तपासात आरोपीने अशाच प्रकारे अनेक महिलांना जाळ्यात ओढल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मोबाईलमधील डेटाच्या आधारे पुढील तपास सुरू असून, आणखी पीडित महिला समोर येण्याची शक्यता आहे.नाशिक ग्रामीण पोलिसांनी नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. सोशल मीडियावर कोणीही पोलीस असल्याचा दावा करत असल्यास त्याची खातरजमा करणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.एकूणच, तंत्रज्ञानाचा गैरवापर करून फसवणूक करण्याच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज अधोरेखित झाली आहे. या प्रकरणातून डिजिटल सुरक्षा आणि जागरूकतेचे महत्त्व पुन्हा एकदा समोर आले आहे.
Watermelon Side Effects: रिकाम्या पोटी कलिंगड खाणं ठरू शकतं धोकादायक; जाणून घ्या ५ मोठे तोटे
Watermelon Side Effects तज्ज्ञांच्या मते, कलिंगड मध्ये नैसर्गिक साखरेचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे रिकाम्या पोटी ते खाल्ल्यास रक्तातील साखर झपाट्याने वाढू शकते. विशेषतः मधुमेह किंवा प्रीडायबिटीज असलेल्या लोकांसाठी हे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे अशा लोकांनी सकाळी उठल्यावर लगेच कलिंगड खाणे टाळावे.
Congress on Baramati Election : विजय वडेट्टीवार यांनी बारामती विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातून आज दुपारपर्यंत काँग्रेस उमेदवारी अर्ज माघार घेईल, अशी माहिती दिली.
Love and War Movie Update: ‘लव्ह अँड वॉर’ सेटवर कडक नियम; संजय लीला भन्साळींचा फोन बॅन निर्णय चर्चेत
Love and War Movie Update चित्रपट मोठ्या प्रमाणावर आणि भव्य स्वरूपात तयार केला जात असल्याने, त्यातील कोणतीही माहिती किंवा दृश्ये लीक होऊ नयेत यासाठी निर्मात्यांनी कडक नियम लागू केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सेटवर मोबाइल फोन पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत.
Akash More : काँग्रेस उमेदवारी अर्ज माघारी घेणार? दिल्लीत खलबंत; अंतिम निर्णयाकडे लक्ष
Akash More : बारामती पोटनिवडणुकीसाठी वेगवान हालचाली घडत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांनी मोठं विधान केले आहे.
Sharad Pawar : बारामती पोटनिवडणूकीसाठी शरद पवारांचा काँग्रेसला सल्ला; म्हणाले “एका अपघाताने…”
Sharad Pawar : बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज 9 एप्रिल शेवटचा दिवस
Cucumber Health Benefits उन्हाळ्यात जास्त घाम आल्यामुळे शरीरातील पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्स कमी होतात. अशा परिस्थितीत काकडी खाल्ल्याने शरीराला नैसर्गिकरीत्या पाणी मिळते आणि शरीराचे तापमान नियंत्रणात राहते. नियमितपणे काकडी खाल्ल्यास उष्माघात होण्याचा धोका कमी होतो आणि शरीर दिवसभर ताजेतवाने राहते.
Stock Market Today: शेअर बाजारातील तेजी थांबली ! सेन्सेक्स २७३ अंकांनी घसरला ; निफ्टीदेखील लाल रंगात
Stock Market Today: आज आठवड्याच्या चौथ्या व्यापार दिवशी भारतीय शेअर बाजारात घसरण दिसून आली. प्रमुख निर्देशांक, बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी ५०, घसरले.
मुंबई : भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांच्या नात्याबाबत पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. मुंबईत बांद्र्यातून समोर आलेल्या एका व्हिडिओमुळे दोघांमध्ये पॅचअप झाल्याच्या आणि पुन्हा लग्न ठरण्याच्या चर्चा जोर धरत आहेत. १४ २०००बांद्र्यातील व्हिडिओमुळे चर्चांना वेगसोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये स्मृती मानधनाचे वडील श्रीनिवास मानधना एका रेस्टॉरंटबाहेर दिसत आहेत. विशेष म्हणजे, त्यांच्या सोबत पलाश मुच्छलची बहीण आणि गायिका पलक मुच्छल तसेच तिचा पती मिथुनही उपस्थित असल्याचे दिसते. या भेटीत पलकने स्मृतीच्या वडिलांचा आशीर्वाद घेतल्याचेही व्हिडिओत पाहायला मिळते.नात्यात दुरावा का आला ?भारतीय महिला क्रिकेट प्लेअर स्मृती मंधाना आणि संगीतकार पलाश मुच्छल मागच्या वर्षी २३ नोव्हेंबर २०२५ मध्ये विवाहबंधनात अडकणार होते. हळदीचे, संगीताचे अनेक फोटो समोर आले, त्यामुळे चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. पण अचानक स्मृतीच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला आणि लग्न पुढे ढकलले आहे हे जाहीर करण्यात आले. परंतु त्या नंतर सोशल मीडियावर अनेक दावे प्रतिदावे झाले, ज्या वरून चाहत्यांना स्पष्ट झाले की यांचे लग्न मोडले आहे.संगीत सोहळा संपल्यानंतर महिला टीमच्या मुलींनी पलाशला एका मुलीसोबत त्या अवस्थेत पहिले, त्यावरून पलाशवर फसवणुकीचे अनेक आरोप करण्यात आले, पलाश प्ले बॉय आहे, त्याने स्मृतीला फसवले अश्या अनेक गोष्टी समोर आल्या, दोघांनीही आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून आपले लग्न मोडले असल्याचे स्पष्ट केले होते.सोशल मीडियावर प्रतिक्रियासोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होताच आता या घडामोडींमुळे जुने वाद मिटले आहेत का? स्मृती आणि पलाश खरंच लग्न करणार आहेत का ? असे प्रश्न चाहत्यांना पडले आहेत. काहींनी दोघांच्या नात्याला दुसरी संधी मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. तर काहींनी हा व्हिडिओ जुना असण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे या चर्चांबाबत अद्याप स्पष्टता नाही.एकूणच, बांद्र्यातील या भेटीमुळे स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्या नात्याबाबत नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. मात्र या सर्व चर्चांमध्ये किती तथ्य आहे, हे येत्या काळातच स्पष्ट होणार आहे.
Rakesh Gidde : क्षणात होत्याचं नव्हतं झालं ; भीषण अपघातात केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा मृत्यू
Rakesh Gidde : बीड जिल्ह्यातील केज तालुक्याचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. त्यांच्या अकाली जाण्याने केजमध्ये शोककळा पसरली आहे.
Coconut Water Benefits उन्हाळ्यात शरीरातून घामाद्वारे मोठ्या प्रमाणात पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्स बाहेर पडतात. नारळपाणी हे नैसर्गिकरित्या इलेक्ट्रोलाइट्सने भरलेले असते, जे शरीराला पटकन हायड्रेट करते. त्यात सब्जा बिया घातल्यास शरीरातील पाण्याची कमतरता लवकर भरून निघते. त्यामुळे उष्णतेमुळे येणारा थकवा आणि अशक्तपणा कमी होतो.
Samay Raina : “…तरी तुमच्या मुलाला पायावर का उभं केलं नाही?”समय रैनाची अमिताभ बच्चन यांच्यावर टीका
Amitabh Bachchan and Samay Raina: अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या पोलिओ जाहिरातींचा संदर्भ देत समय रैनाने अभिषेक बच्चनच्या करिअरवर टीका केली.
Assembly Election 2026 Voting: आसाम, केरळ आणि पुदुचेरी याठिकाणी आज विधानसभा निवडणुकांसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे.
Ramdas Athawale : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची भेट
मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल महामहीम जिष्णू देव वर्मा यांची रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी लोकभवन येथे सदिच्छा भेट घेतली.बुद्धमूर्ती आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा भेट देऊन राज्यपालांचा शाल पुष्पगुच्छ देऊन ना. रामदास आठवले यांनी सत्कार केला.महाराष्ट्रातील धर्मांतरित बौद्धांची जनगणनेत अनुसूचित जातीत नोंद करण्यात यावी.राज्यात ज्यांनी अनुसूचित जातीतून बौद्ध धम्मात धर्मांतर केले आहे अशा नवबौद्ध समाजाची नोंद जनगणनेत अनुसूचित जातीत व्हावी या मागणीबाबत ना. रामदास आठवले यांनी महामहीम राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्याशी सविस्तर चर्चा करून महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या धर्मांतराचा इतिहास सांगितला.तसेच अनुसूचित जाती जमाती; इतर मागासवर्गीय सरकारी कर्मचाऱ्यांना - अधिकाऱ्यांना पदोन्नती मधील आरक्षण लागू करावे आणि गायरान जमिनीवरील १४ एप्रिल २००० सालापर्यंत चे अतिक्रमण नियमित करावे या मागण्यांचे निवेदन ना. रामदास आठवले यांनी राज्यपालांना दिले. या निवेदनातील विषयांवर राज्यसरकारला निर्देश देण्याची मागणी ना. रामदास आठवले यांनी राज्यपालांना केली.त्यावर निवेदन वाचून प्रश्नांचा अभ्यास करून निर्णय घेणार असल्याचे आश्वासन राज्यपाल महामहीम जिष्णू देव वर्मा यांनी ना.रामदास आठवले यांना दिले. यावेळी पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या शिष्टमंडळाने ही ना. रामदास आठवले यांच्या नेतृत्वात राज्यपालांची भेट घेतली.त्यात पी ए सोसायटीचे उपाध्यक्ष पद्मश्री सुखदेव थोरात; वासुदेव गाडे; चंद्रशेखर कांबळे यांचा समावेश होता.यावेळी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर ;राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे; मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे; युवक आघाडी अध्यक्ष पप्पू कागदे; कांतिकुमार जैन; अल्पसंख्यांक आघाडी मुंबई अध्यक्ष सोहेल शेख; चंद्रपूर चे रिपाइं नेते अशोक घोटेकर; सुनील बन्सी मोरे; आदी मान्यवर उपस्थित होते.
Iran US Ceasefire Controversy: इराण आणि अमेरिका यांच्यातील शस्त्रसंधी कराराबाबत एक नवीन वाद निर्माण झाला आहे.
तेहरान : अमेरिका आणि इराण यांच्यातील शस्त्रसंधीनंतर मध्यपूर्वेतील तणाव कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र इस्रायलच्या लष्करी कारवाईनंतर परिस्थिती पुन्हा चिघळली असून, इराणने जगातील अत्यंत महत्त्वाचा तेलमार्ग असलेली होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.होर्मुझ बंद करण्यामागील कारणलेबनॉनमधील इस्रायलच्या हल्ल्यांच्या निषेधार्थ इराणने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. इस्रायलने कारवाई थांबवली नाही, तर तेल टँकर्सना या मार्गाने जाऊ दिले जाणार नाही, असा स्पष्ट इशारा इराणकडून देण्यात आला आहे.जागतिक बाजारपेठेवर परिणामया निर्णयाचा तात्काळ परिणाम जागतिक ऊर्जा बाजारावर दिसून आला आहे. कच्च्या तेलाच्या किमतींनी प्रति बॅरल 97 डॉलरचा टप्पा ओलांडला असून, अनेक देशांमध्ये इंधन पुरवठ्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. जागतिक शेअर बाजारातही अस्थिरता वाढली आहे.शस्त्रसंधी धोक्यातअमेरिकेच्या मध्यस्थीने झालेल्या शस्त्रसंधीनंतर काही काळासाठी परिस्थिती स्थिर होती. मात्र इस्रायलने लेबनॉनमध्ये हल्ले सुरू ठेवल्याने या करारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. इराणने स्पष्ट केले आहे की, शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरू राहिल्यास ते करारातून बाहेर पडतील.इस्रायलची भूमिकाइस्रायलने लेबनॉन हा शस्त्रसंधीचा भाग नसल्याचे सांगत आपली कारवाई योग्य ठरवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या संघर्षात आणखी गुंतागुंत निर्माण झाली आहे आणि तणाव वाढत आहे.अमेरिका आणि आंतरराष्ट्रीय प्रतिक्रियाअमेरिकेने इराणचा निर्णय अस्वीकार्य असल्याचे म्हटले आहे. तसेच या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी राजनैतिक पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. पाकिस्तानकडूनही शस्त्रसंधी सर्व भागांमध्ये लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे.या आठवड्यात इस्लामाबाद येथे अमेरिका आणि इराण यांच्यात चर्चा होण्याची शक्यता आहे. मात्र जमिनीवर परिस्थिती अजूनही तणावपूर्ण असल्याने या चर्चेचा काय परिणाम होतो, याकडे जगाचे लक्ष लागले आहे. एकूणच, इस्रायलच्या कारवाईनंतर इराणने घेतलेल्या या निर्णयामुळे मध्यपूर्वेतील संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत. विशेषतः तेल पुरवठ्यावर होणारा परिणाम लक्षात घेता, या घडामोडींचे जागतिक परिणाम किती व्यापक असतील, याची चिंता व्यक्त केली जात आहे.
Pune Water Park : वॅाटर पार्कमधील स्लाइटरुन आदळून झालेल्या अपघातात एका महिलेचे अर्धांग निकामी झाले आहे. ही घटना पुणे जिल्ह्यात घडली आहे.
Middle East War : इस्रायलचा लेबनॉनवर हल्ला; ८९ ठार, इराणचा अमेरिकेला थेट इशारा
तेहरान : मध्यपूर्वेतील तणाव पुन्हा एकदा चिघळताना दिसत आहे. इस्रायलने लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांमध्ये मोठी जीवितहानी झाली असून, या पार्श्वभूमीवर इराणने आक्रमक भूमिका घेत अमेरिकेलाही थेट इशारा दिला आहे. त्यामुळे आखाती देशांमध्ये परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे.इस्रायलची आक्रमक भूमिका कायमलेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये किमान ८९ जणांचा मृत्यू झाला असून ७०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. जखमींची संख्या मोठी असल्याने रुग्णालयांवर ताण वाढला आहे. अनेक जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात शस्त्रसंधी जाहीर झाल्यानंतरही इस्रायलने आपली लष्करी कारवाई सुरूच ठेवली आहे. लेबनॉनमधील लक्ष्यांवर हल्ले करत इस्रायलने आपली आक्रमक भूमिका कायम असल्याचे संकेत दिले आहेत.अमेरिकेची भूमिका स्पष्टया घडामोडींवर अमेरिकेकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. व्हाइट हाऊसकडून सांगण्यात आले की, लेबनॉनमधील लष्करी कारवाईचा त्यांच्या इराणसोबतच्या शस्त्रसंधीशी थेट संबंध नाही. त्यामुळे या संघर्षात अमेरिका वेगळ्या पातळीवर भूमिका घेत असल्याचे स्पष्ट झाले आहे.इराणचा कडक इशाराइस्रायलने हल्ले सुरूच ठेवल्यास शस्त्रसंधीतून बाहेर पडण्याचा इशारा इराणने दिला आहे. इराणच्या या भूमिकेमुळे परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच, इराणने या हल्ल्यांविरोधात आक्रमक प्रतिक्रिया नोंदवली आहे. इराणने होर्मुझ सामुद्रधुनीवर नियंत्रण कडक करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. या मार्गाने जाणाऱ्या जहाजांना इराणची परवानगी घेणे आवश्यक असल्याचा इशारा देण्यात आला आहे. आदेश न पाळणाऱ्या जहाजांवर कारवाई करण्याची धमकीही देण्यात आली आहे. यामुळे जागतिक व्यापारावर परिणाम होण्याची शक्यता आहे.दरम्यान, अमेरिकेने इराणला शस्त्रपुरवठा करणाऱ्या देशांवर ५० टक्के टॅरिफ लावण्याचा इशारा दिला आहे. यामुळे आर्थिक पातळीवरही तणाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.अमेरिका आणि इराण यांच्यात ४० दिवसांच्या संघर्षानंतर शस्त्रसंधी झाली असली, तरी ती फक्त दोन आठवड्यांसाठी मर्यादित आहे. दरम्यान काही ठिकाणी पुन्हा हल्ल्यांच्या घटना घडल्याने ही शस्त्रसंधी टिकणार का, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.एकूणच, इस्रायल-लेबनॉन संघर्ष आणि इराण-अमेरिका तणाव यामुळे मध्यपूर्वेतील परिस्थिती अधिकच अस्थिर होत आहे. येत्या काही दिवसांत हा संघर्ष शांत होणार की आणखी तीव्र होणार, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
Tukaram Mundhe : प्रशासकीय वर्तुळात तुकाराम मुंढे यांना ‘सिंघम’ या नावाने ओळखले जाते.
Bhondubaba Ashok Kharat : भोंदू खरातविरोधात तक्रारींचा महापूर, लैंगिक शोषणाचे आणखी ११ आरोप
मुंबई : वासनांध अशोक खरात प्रकरण दिवसेंदिवस अधिक गंभीर होत असून, तक्रारींची संख्या सातत्याने वाढताना दिसत आहे. आधीच लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यांमध्ये अटकेत असलेल्या खरातविरोधात आता आणखी ११ महिलांनी पुढे येत तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे या प्रकरणाचा व्याप आणि गंभीरता अधिकच वाढली आहे.तक्रारींचा वाढता आकडाअशोक खरातविरोधात आधीच अनेक गुन्हे दाखल असताना, नव्या ११ महिलांच्या तक्रारींमुळे एकूण तक्रारींचा आकडा २२ वर पोहोचला आहे. यापैकी बहुसंख्य तक्रारी लैंगिक शोषणाशी संबंधित असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे तपास यंत्रणांसमोर आव्हान अधिक वाढले आहे.महिलांना जाळ्यात ओढण्याची पद्धततक्रारदार महिलांच्या म्हणण्यानुसार, खरात हा ‘ऊर्जादान’ आणि ‘शरीरशांती’च्या नावाखाली महिलांशी संपर्क साधत असे. विश्वास संपादन केल्यानंतर त्यांना जाळ्यात ओढून त्यांचे शोषण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. काही महिलांनी विरोध करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना धमक्या दिल्याचाही दावा करण्यात आला आहे.SIT हेल्पलाईननंतर तक्रारींचा ओघया प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने (SIT) महिलांना पुढे येण्यासाठी हेल्पलाईन सुरू केली होती. त्यानंतर तक्रारींचा ओघ वाढला असून, अनेक पीडित महिला पुढे येऊन आपली बाजू मांडत आहेत. यामुळे प्रकरणातील अनेक पैलू उघड होत आहेत. आतापर्यंत दाखल १२ गुन्ह्यांपैकी ८ गुन्हे लैंगिक शोषणाशी संबंधित असून, ४ प्रकरणे आर्थिक फसवणुकीची आहेत. या सर्व प्रकरणांचा तपास SIT कडून सुरू आहे. तसेच आर्थिक व्यवहारांच्या अनुषंगाने अंमलबजावणी संचालनालय (ED) देखील तपास करत आहे. समता पतसंस्थेशी संबंधित व्यवहारांची स्वतंत्र चौकशीही सुरू आहे.न्यायालयीन प्रक्रिया सुरूअशोक खरातची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले. एका प्रकरणात त्याला न्यायालयीन कोठडी मिळाली असून, इतर प्रकरणांमध्ये पुढील चौकशीसाठी पुन्हा पोलीस कोठडीची मागणी केली जाण्याची शक्यता आहे.राजकीय वर्तुळातही चर्चाया प्रकरणामुळे राजकीय वर्तुळातही चर्चा सुरू झाली आहे. विरोधकांनी तपासाच्या गती आणि पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित करत सखोल चौकशीची मागणी केली आहे. संपूर्ण प्रकरणाचा निष्पक्ष तपास व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.या घटनेमुळे अंधश्रद्धा आणि महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे. समाजात अशा प्रकारच्या भोंदूगिरीमुळे होणाऱ्या शोषणाविरोधात अधिक जागरूकता आणि कठोर कारवाईची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे. तक्रारींचा वाढता आकडा आणि समोर येणारे आरोप पाहता अशोक खरात प्रकरण आणखी गंभीर वळण घेण्याची शक्यता आहे. येत्या काळात तपासातून आणखी महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Swara Bhaskar: स्वरा भास्कर पुन्हा चर्चेत; ‘महाभारत’पासून ‘जौहर’पर्यंत वक्तव्यांवरून वादांची मालिका
Swara Bhaskar स्वरा भास्कर ने अनेक सामाजिक आणि राजकीय विषयांवर मोकळेपणाने मत व्यक्त केले आहे. मात्र, या मतांमुळे तिला अनेकदा सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे.
Sushma Andhare : उद्धव ठाकरे गटाच्या आक्रमक महिला नेत्या सुषमा अंधारे यांना मुंबईतील ग्लोबल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आता त्यांच्या प्रकतीबाबत अपडेट समोर आली आहे.
Dacoit Trailer Review: सुनील शेट्टीही झाले फॅन; ‘डकैत’ ट्रेलरला जबरदस्त प्रतिसाद
Dacoit Trailer Review ४ एप्रिल रोजी प्रदर्शित झालेल्या या ट्रेलरमध्ये प्रेम, फसवणूक आणि सूड यांची कथा प्रभावीपणे दाखवण्यात आली आहे. कथानक एका प्रेमात पडलेल्या व्यक्तीभोवती फिरते, ज्याला प्रेमात धोका मिळाल्यानंतर तो सूडाच्या भावनेने पेटून उठतो.
Santosh Deshmukh :
Baramati by-election : बारामती पोटनिवडणुकीसाठी सहा जणांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतले आहेत. आज 9 एप्रिल उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
प्रकल्प कामात रस्ते सुरक्षेसह पर्यावरण आणि आरोग्याचा मुद्दा बनतो जटीलमुंबई :मुंबई महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात आलेल्या पूर्व आणि पश्चिम उपनगराला जोडणाऱ्या गोरेगाव मुलंड लिंक रोडच्या कामांमध्ये गोरेगाव परिसरात कंत्राटदाराकडून नियमांचे उल्लंघन केले जात असून महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. परिणामी या प्रकल्प कामामुळे नागरिकांना प्रचंड त्रास तसेच गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे प्रकल्पाचे काम करताना जनतेला कोणताही त्रास होवू नये याची काळजी घेण्यात यावी अशी सूचना करत भाजपच्या नगरसेविका प्रिती सातम यांनी अशाप्रकारे कंत्राटदारांना मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी स्थायी समितीच्या बैठकीत हरकतीच्या मुद्दयाद्वारे केली. त्यामुळे या कामांबाबत सदस्याने उपस्थित केलेला मुद्दा महत्वाचा असून त्यांच्या सर्व मुद्दयांची माहिती पुढील बैठकीत सादर करत त्यांचा हरकतीचा मुद्दा समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी राखून ठेवला.स्थायी समितीच्या बैठकीत भाजप नगरसेविका प्रिती सातम यांनी हकरतीचा मुद्दा उपस्थित करत गोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रकल्पांतर्गत गोरेगाव परिसरात सुरु असलेल्या कामांमध्ये कोणत्याही प्रकारची सुरक्षेची काळजी घेतली जात नसल्याने नागरिकांना प्रचंड त्रास होत असल्याची तक्रार केली. या प्रकल्पांतर्गत अनेक ठिकाणी खोदकाम करण्यात आले आहे, परंतु त्याभाेवती सुरक्षा कठडे नाहीत, खोदलेल्या खड्डयातील साचलेल्या पाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे. तसेच या खोदकामामुळे माती सर्वत्र पसरुन धुळीचे साम्राज्य पसरले आहे. परंतु याठिकाणी कोणत्याही प्रकारे पर्यावरणाच्या नियमांचे पालन केले जात नाही. सेवा रस्त्याचे काम यामुळे असमांतर झाल्यामुळे अनेकदा याठिकाणी वाहतूक कोंडी तसेच अपघात होण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे याबाबत मागील एक ते दीड वर्षांपासून नागरिकांच्या तक्रारींनुसार अधिकाऱ्यांकडे गाऱ्हाणी मांडल्यानंतरही त्यांच्याकडून दखल घेतली जात नसल्याने स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड रोष वाढत आहे.या प्रकल्प कामांत कंत्राटदार योग्यप्रकारे नियमांचे पालन करत नाही आणि महापालिकेचे अधिकारी नागरिकांच्या तक्रारींची दखल घेवून त्यांच्याकडून योग्यप्रकारे काम करून घेत नाही. परिणामी ही समस्या दिवसेंदिवस वाढत जात असून नागरिकांमधील वाढता रोष पाहता मला स्थायी समितीत हा मुद्दा मांडण्याची वेळ आली आहे. महापालिकेचा हा प्रकल्प पूर्ण व्हायला हवा, परंतु नागरिकांना सेवा देण्यासाठी हा प्रकल्प उभारताना जनतेला कोणताही त्रास होणार नाही याची काळजी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी घ्यायला हवी आणि कंत्राटदाराकडून तसे काम करून घ्यायला हवे.पण याकडे दुर्लक्ष होत असून येणाऱ्या पावसाळ्यापूर्वी याचे निवारण न केल्यास तेथील नागरिकांना जगणेही मुश्किल होईल.त्यामुळे या प्रकल्प कामांमध्ये ज्या आवश्यक सुधारणा करून जनतेला कमीत कमी त्रास होईल अशाप्रकारे उपाययोजना महापालिका प्रशासनाकडून केल्या जाव्यात.आणि भविष्यात अशाप्रकारच्या घटना पुन्हा घडू नये यासाठी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जावी अशाप्रकारची मागणी सातम यांनी आपल्या हरकतीच्या मुद्दयाद्वारे केली. याला शिवसेनेच्या अंजली नाईक यांनी पाठिंबा देत मानखुर्द भागात रस्ते कामांमध्ये कोणत्याही प्रकारची काळजी घेतल नसल्याची तक्रार केली.त्यानंतर स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी हा हरकतीचा मुद्दा राखून ठेवला.
BMC News : ओसीविना इमारतींसाठी अभय योजनेचा प्रस्ताव निर्णयाविना..
उबाठाला विकासक दिसतात, तर महायुतीला फसवणूक झालेले रहिवाशीमुंबई : मुंबईत आज मोठ्याप्रमाणात इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) नसून विकासकांनी हात वर केल्यामुळे अशा इमारतींमध्ये राहायला गेलेल्या रहिवाशांची मोठी फसवणूक झाली आहे. त्यामुळे अखेर १७ नोव्हेंबर २०१६च्या पूर्वीपासूनच्या विना भोगवटा प्रमाणपत्र नसलेल्या इमारतींकरता भोगवटा प्रमाणपत्र देण्याकरता महापालिका प्रशासनाच्यावतीने अभय योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीमध्ये राखून ठेवण्यात आलेला असतानाच उबाठाने मात्र हा योजना विकासकांसाठी आणल्याचा आरोप केला आहे. तर ही योजना फसवणूक झालेल्या रहिवाशांसाठी असून असा मोठा निर्णय घेताना यात कोणत्याही प्रकारच्या उणीवा तथा चुका राहू नये यासाठी यावर कोणताही निर्णय न घेता तो प्रस्ताव राखून ठेवला असल्याचे स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी स्पष्ट केले.मुंबईतील १७ नोव्हेंबर २०१६च्या पूर्वीपासूनच्या विना भोगवटा प्रमाणपत्र नसलेल्या इमारतींकरता भोगवटा प्रमाणपत्र देण्याकरता प्रशासनाने आणलेल्या प्रस्तावावर बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत चर्चा होण्याची दाट शक्यता होती. परंतु स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी यावर चर्चा न करता प्रस्ताव पुढील बैठकीपर्यंत राखून ठेवला. त्यामुळे विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी स्थायी समिती सदस्यांसह पत्रकार परिषद घेवून ही योजना केवळ आणि केवळ विकासकांसाठी असल्याचा आरोप केला. स्थायी समिती सदस्य यशोधर फणसे यांनी या पत्रकार परिषदेत बोलतांना ओसी घेण्याची जबाबदारी विकासकाची आहे.पण या योजनेतंर्गत ओसी देताना ५० टक्के सवलत दिली जाणार आहे. त्यामुळे ही सवलत विकासकाला दिली जाणार आहे. मंजूर आराखड्यापेक्षा अतिरिक्त बांधकाम तसेच फायर एनओसी आणि इतर नियमांचे पालन न केल्यास ओसी दिली जात नाही. मात्र, काही विकासक पार्ट ओसीच्या नावाखाली अनेक मजले चढवून इमारत बांधतात आणि तिथे रहिवाशांना घरे विकतात. त्यामुळे ओसी घेण्याची जबाबदारी विकासकाची असल्यामुळे या योजनेला आमचा विरोध असल्याचे विरोधी पक्षनेते किशोरी पेडणेकर आणि यशोधर फणसे यांनी सांगितले. त्यामुळे आम्ही चुकीच्या गोष्टी होवू देणार नाही असा इशारा त्यांनी दिला.यावर प्रतिक्रिया देताना स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी मुंबईतील अनेक ओसी नसलेल्या इमारतींना ओसी देण्यासाठीची अभय योजना ही रहिवाशांसाठी आहे. विकासकांकडून घरे खरेदी केल्यानंतर ज्या रहिवाशांची फसवणूक झाली आहे त्यांना दिलासा देणारी ही योजना आहे. परंतु याबाबत एवढा मोठा आणि महत्वपूर्ण निर्णय घेतात यामध्ये काही त्रुटी राहू नये तसेच कोणत्याही चुका होवू नये यासाठी समितीच्या बैठकीत कोणत्याही चर्चेविना प्रस्ताव राखून ठेवला. परंतु विरोधी पक्षनेत्यांना प्रत्येक विषयांचे भांडवल करायचे आहे. विशेष म्हणजे ज्या ओसी नसलेल्या इमारतींमधील रहिवाशांना दिलासा दिला जाणार आहे त्या १७ नोव्हेंबर २०१६ पूर्वीच्या इमारती आहेत. म्हणजे महापालिकेत यापूर्वीच्या काळात कुणाची सत्ता होती. ज्यांना आपल्या सत्ता काळात विकासकांना मदत केली आणि या विकासकांच्या माध्यमातून रहिवाशांची फसवणूक केली आहे, त्या रहिवाशांना दिलासा देण्यासाठी म्हणून ही योजना आणली असली तरी याचा सर्वकर्ष विचार होवून निर्णय घेणे आवश्यक असते, त्यामुळे पुढील बैठकीत यावर साधक बाधक चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाईल.
Mankhurd News : मानखुर्दमधील १४०० अनधिकृत झोपड्या जमीनदोस्त
बॉम्बे सोप फॅक्टरीच्या जागेवरील अतिक्रमणाचा डाव हाणून पडलामहानगरपालिका आणि उपनगरे जिल्हाधिकारी कार्यालय यांची संयुक्त कारवाईएकाच दिवशी १४४ झोपड्या पाडण्याची मुंबईच्या इतिहासातील पहिली घटनामुंबई : मुंबईतील अनधिकृत बांधकामांचा सफाया करण्याचे काम महापालिकेच्या वतीने हाती घेण्यात आले असून मानखुर्द मधील मोकळ्या भूखंडावर एक विशिष्ट समाजाच्या लोकांनी अतिक्रमण करून ही जागा बळकावण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे या भूखंडावरील तब्बल चौदाशे झोपड्यांवर महापालिकेने कारवाई करून हा भूखंड मोकळा केला. या माध्यमातून एका विशिष्ट समाजाकडून होत असलेला हा प्रयत्न उत्तर प्रदेश पॅटर्न नुसार हाणून पडण्यात महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयाला यश आले आहे. एकाच दिवशी चौदाशे झोपड्यांवर कारवाई करणे हे मुंबई महापालिका इतिहासातील आजवरची मोठी घटना आहे.घाटकोपर-मानखुर्द जोड मार्गालगत असलेल्या मानखुर्द येथील बॉम्बे सोप फॅक्टरी (डब्बा कंपनी) या शासकीय जागेवरील १४०० अनधिकृत झोपड्यांचे बुधवारी ८ एप्रिल २०२६ रोजी बुलडोझर चढवून कारवाई करण्यात आली. मुंबई महानगरपालिकेचे ‘एम पूर्व’ प्रशासकीय विभाग आणि मुंबई उपनगरे जिल्हाधिकारी कार्यालय यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.‘एम पूर्व’ प्रशासकीय विभागातील घाटकोपर-मानखुर्द या जोड मार्गालगत असलेल्या मानखुर्द (ता. कुर्ला) येथील नगरभूमापन क्रमांक १/२ (पै) या मिळकतीवर बॉम्बे सोप फॅक्टरी (डब्बा कंपनी) हे सुमारे २२ एकर जमीन क्षेत्र असून त्यावर अनधिकृतपणे झोपड्या बांधण्यात आल्या होत्या.महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम ५० अन्वये घाटकोपर-मानखुर्द जोड मार्गालगत असलेल्या मानखुर्द येथील बॉम्बे सोप फॅक्टरी (डब्बा कंपनी) या शासकीय जागेवरील झोपड्यांवर कारवाई करण्यासंदर्भात अपर जिल्हाधिकारी (अतिक्रमण निष्कासन) पूर्व उपनगरे यांनी निर्देशित केले होते.त्यानुसार, महानगरपालिकेचे सह आयुक्त (परिमंडळ-५) देविदास क्षीरसागर, सहायक आयुक्त (एम पूर्व) उज्ज्वल इंगोले यांच्या नेतृत्वात मुंबई महानगरपालिकेच्या ‘एम पूर्व’ प्रशासकीय विभागाने ही कारवाई केली. इमारत व कारखाना विभागातील सहायक कनिष्ठ आणि दुय्यम अभियंत्यांची या कारवाईसाठी नेमणूक करण्यात आली होती. तसेच, सुमारे २०० कामगारांसह ३ पोकलेन, ७ जेसीबी, १० डंपर, २ ड्रोन कॅमेरे आदी यंत्रसामग्री पुरविण्यात आली. यावेळी पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात होता.
खासगी कंत्राटदार कचरा पेट्या देणार तर अधिक पेट्यांची खरेदी कशाला?पेट्या खरेदीचा प्रस्ताव अध्यक्षांनी ठेवला राखूनमुंबई :मुंबईतील विविध भागांसाठी महापालिकेच्यावतीने तब्बल १३,५०० मोठ्या आकाराच्या कचरा पेट्या खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून यापूर्वी खरेदी केलेल्या कचरा पेट्या कुठे गेल्या आणि कुणाकुणाला दिल्या गेल्या याचा हिशोब आधी द्या अशी मागणीच स्थायी समिती सदस्यांनी केली. एवढेच नाहीतर कचऱ्याच्या खासगीकरणाचा कंत्राट मंजूर करताना कंपनीच्यावतीने मनुष्यबळ, वाहने तसेच कचरा पेट्यांचेही वाटप होणार आहे, तर मग या कचरा पेट्या कशासाठी खरेदी केल्या जात आहे असा सवाल समितीने केल्यानंतर स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी सदस्यांच्या प्रश्नांची उत्तरे येईपर्यंत हा प्रस्ताव राखून ठेवला.मुंबईतील मोठ्या आकाराच्या कचरा कुंड्या हटवून रस्त्यांवरील सार्वजनिक कचरा कुंडयांचे संख्या कमी केली जात असतानाच आता महापालिका प्रशासन तब्बल १३ हजार ५०० कचरा कुंड्यांची खरेदी करणार आहे.मुंबई महापालिकेच्यावतीने सध्या २४० लिटर क्षमतेच्या कचरा पेट्यांची खरेदी करण्यात येत असून या कचरा पेट्यांसाठी मागवलेल्या निविदेमध्ये पात्र ठरलेल्या प्रायमा प्लास्टिक्स लिमिटेड कंपनीची निवड करण्यात येत आहे. त्यामुळे तब्बल २०३९ दराने २४० लिटर क्षमतेच्या या १३,५०० कचरा पेट्यांची खरेदी केली जाणार आहे.याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत आला असता शिवसेनेचे गटनेते अमेय घोले यांनी याची खरेदी जेम पोर्टलवरुन का केली नाही असा सवाल करत कुठल्या विभागाला किती आणि नगरसेवकांना किती मिळणार याची कुठेच या प्रस्तावात माहिती देण्यात आली नसल्याने पूर्ण माहितीसह प्रस्ताव आणला जावा अशी मागणी केली. यात उत्पादक कंपन्यांनी भाग घेतला ही चांगली बाब आहे. मग मागील वर्षी जास्त दरात या कचरा पेट्यांची खरेदी करण्यात आली होती, तेव्हा कोणत्या कंपनीकडून घेतली जात आहे आणि आता कमी दराने खरेदी केली जात आहे, त्यामुळे या पेट्यांचा दर्जा कसा असेल असा सवाल शीतल गंभीर यांनी केला.तर भाजपच्या प्रिती सातम यांनी आरे कॉलनीला कचऱ्याचे डम्पिंग ग्राऊंड केले जात असल्याचा आरोप करत याठिकाणी कचरा पेट्याही आहेत आणि गाड्याही येतात. परंतु उचलला जाणारा कचरा येथील जंगलात नेऊन टाकला जातो. त्यामुळे एकप्रकारे आरे कॉलनीला भविष्यात डम्पिंग ग्राऊंड बनवले जात असल्याचा आरोप केला. तसेच कचऱ्याच्या खासगी कंत्राट कामांमध्ये कचर पेट्यांचे वितरण जर संबंधित कंपनी करणार असेल तर या पेट्यांची खरेदी का आणि कुणासाठी केली जात आहे याची माहिती देण्याची मागणी त्यांनी केली. डॉ सईदा खान यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागाची मानसिकता बदलण्याची गरज असल्याचे सांगितले. तर मागील चार वर्षांत वितरण झालेल्या कचरा पेट्यांची वार्डनिहाय माहिती देण्याची मागणी केली. तर काँग्रेसचे अश्रफ आझमी यांनी घरोघरी कचरा पेट्यांची देण्याची मागणी केली. तर यामिनी जाधव यांनी सुमारे ५० लाखांचे काम आधीच देण्यात आल्याची बाब निदर्शनास आणून दिली. त्यामुळे अखेर स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी सर्व प्रश्नांची उत्तरे प्रशासनाकडून येईपर्यंत हा प्रस्ताव राखून ठेवण्याचा निर्णय जाहीर केला.
“जेडीयू नेता मुंशीकडून रोज रात्री माझ्या मुलीला बोलावून घेत असे. मुलगी सांगायची की तिथे एक स्वीमिंग पूल आहे. जिथे कपडे काढून अंघोळ करायला सांगायचे. मालक बागेत बसून आम्हाला अंघोळ करताना बघायचे. इकडे-तिकडे स्पर्श करायचे. पोलीस आणि मोठ्या-मोठ्या गाड्यांमधून लोकही तिथे यायचे.” हे म्हणणे आहे 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीच्या आईचे, जिला आसाममधून जेडीयू नेता ओवैस करनी उर्फ चुन्ना मिया यांच्याकडे मजुरीसाठी आणले होते. माहिती मिळाल्यानंतर भास्कर तपास पथक जेडीयू नेत्याच्या फार्म हाऊसवर पोहोचले. ते अगदी निर्जन ठिकाणी बांधलेले आहे. तिथे आम्हाला ते सर्व मिळाले जे पीडित मुलीच्या आईने सांगितले होते. 3 आलिशान खोल्यांना लागून असलेला स्वीमिंग पूल. स्वीमिंग पूलच्या आजूबाजूला उंच-उंच भिंती बांधलेल्या होत्या. जणू काही आत जे काही घडेल ते कोणी पाहू नये म्हणून योजनाबद्ध पद्धतीने ते बांधले होते. या पूलला लागून एक बाग होती. याचबद्दल मुलीच्या आईने सांगितले होते. येथे बसून जेडीयू नेता मुलींना अंघोळ करताना बघत असे. याच फार्म हाऊसवरून 29 मार्च रोजी 14 ते 16 वयोगटातील 7 मुलींची सुटका करण्यात आली होती. भास्करच्या तपासात वाचा आणि पाहा JDU नेत्याचे डर्टी आणि लक्झरी जीवन... भास्करची तपास टीम पाटण्यापासून 250 किलोमीटर दूर सहरसा येथील नया टोला येथे पोहोचली. येथे आम्हाला एका निर्जन ठिकाणी बांधलेला JDU नेते ओवैस करनी उर्फ मुन्ना मुखिया यांचा विटांचा भट्टी (ईंट भट्ठा) सापडला. त्याच्या जवळच एक आलिशान फार्म हाऊस बांधलेले होते. बाहेरून सर्व काही सामान्य दिसत होते, पण आतमध्ये सर्व हायटेक व्यवस्था करण्यात आली होती. तपासादरम्यान आमची भेट मकबूलशी झाली. मकबूलला आसाममधून मजुरीसाठी आणले होते. त्याने JDU नेत्याबद्दल मोठे खुलासे केले. मकबूलने सांगितले, “आम्हाला आत जाण्याची परवानगी नव्हती. तिथे फक्त महिलांनाच प्रवेश होता. संध्याकाळी वातावरणच बदलून जायचे. गाड्यांची रांग लागायची. कोण येत-जात होते, हे माहीत नाही, पण दर संध्याकाळी लहान मुलींना आत बोलावले जायचे. बाहेरूनही मुली यायच्या, पण त्या थेट गाड्यांमधूनच फार्म हाऊसमध्ये जायच्या. आत खूप काही घडायचे, रात्री मुलींसोबत खेळले जायचे. आम्ही बाहेरचे लोक होतो, त्यामुळे फक्त बघत राहायचो, काही बोलण्याचा काही अर्थ नव्हता. लहान मुलींना बोलावून त्यांच्याकडून कपड्यांशिवाय नाच करवून घेतला जायचा. मुली येऊन सांगायच्या की, त्यांच्या शरीराला स्पर्श केला जायचा, पण मालकाचे प्रकरण होते, विरोध केला असता तर कामावरून काढून टाकले असते. साहेब, मजबुरी काय नाही करवत, डोळ्यासमोर सर्व काही पाहूनही डोळे मिटून घ्यावे लागत होते.” लहान लहान मुलींना कपड्यांशिवाय नाचायला लावत असे आसाममध्ये राहणाऱ्या मकबूलने सांगितले की JDU नेता लहान लहान मुलींना फार्म हाऊसवर बोलावून त्यांचे कपडे काढून नाचायला लावत असे. रिपोर्टर - तुम्हाला माहीत होतं का इथे हे सर्व घडत होतं?मकबूल - सर्व आतमध्ये घडत होतं, आम्हाला आतमध्ये जाऊ दिलं जात नव्हतं. रिपोर्टर - आतमध्ये हे सर्व काम होत होतं हे कसं कळलं?मकबूल - मुली सांगायच्या की शरीराला कसं स्पर्श केला जातो. रिपोर्टर - फार्म हाऊसमध्ये कोण-कोण लोक जात होते?मकबूल - आत फक्त मुली जात होत्या, लहान मुलींना जास्त मागणी होती. रिपोर्टर - याला कोणी विरोध करत नव्हते का?मकबूल - तो धमकी देत होता की मारून टाकेल, म्हणत होता की तो इथला डॉन आहे. रिपोर्टर - तुम्ही किती दिवसांपासून इथे राहत आहात?मकबूल - 6 महिने झाले, रोज हेच काम असायचे. रिपोर्टर - तुम्ही आसाममधून इथे कसे आलात?मकबूल - होय, आम्ही सर्वजण एकत्रच आलो होतो. रिपोर्टर - तुम्ही यापूर्वीही इथे आला आहात का?मकबूल - नाही, यापूर्वी कधीच आलो नाही, ही पहिलीच वेळ आहे. आता या घाणेरड्या ठिकाणी यायचे नाही. रिपोर्टर - तुम्हाला बोलावण्यासाठी कोण गेले होते?मकबूल - एक ठेकेदार घेऊन आला होता, तो अशा कुटुंबांना आणतो ज्यात मुली असतात. रिपोर्टर - तुम्हाला याबद्दल आधीपासून काही माहिती होती का?मकबूल - नाही, आम्ही यापूर्वी कधीच इथे आलो नव्हतो, त्यामुळे याबद्दल काहीच माहिती नव्हती. रिपोर्टर - तुम्हाला नाचण्याच्या गोष्टीची माहिती होती का?मकबूल - नाही, आम्हाला आतली माहिती नव्हती, मुली पूर्ण खेळ सांगायच्या. रिपोर्टर - मुली कधीच विरोध करत नव्हत्या का?मकबूल - कोणी करूच शकत नव्हतं, तो जीवे मारण्याची धमकी द्यायचा. मुलींचे व्हिडिओ ठेवून घ्यायचा. रिपोर्टर - त्याच्याकडे गुंडही होते का, जे धमक्या देत होते?मकबूल - तो या कामासाठी खूप लोकांना ठेवत असे, मुन्शीही लोकांना मारहाण करत असे. रिपोर्टर - येथे मोठे आणि व्हीआयपी लोकही येत होते का?मकबूल - होय, खूप लोक येत होते, मोठ्या-मोठ्या गाड्या येत होत्या. रिपोर्टर - त्यांच्यासोबत गार्ड आणि पोलीसही असायचे का?मकबूल - मोठे लोक येत होते, रात्री दोन वाजेपर्यंत जल्लोष चालायचा. कोळसा व्यापारी येत होते. रिपोर्टर - पोलिसांच्या गाड्याही येत होत्या का?मकबूल - अनेकदा पोलिसांच्या गाड्या येत असत, काही भेटायला तर काही खाण्यापिण्यासाठी येत असत. रिपोर्टर - आता येथे मन लागत नसेल?मकबूल - आमच्याकडे निवडणूक आहे, आम्हाला मतदान करायला जायचे होते. येथून जाऊच दिले नाही. रिपोर्टर - आतमध्ये स्विमिंग पूलमध्ये गेला आहेस का?मकबूल - एकदा गेलो होतो, तिथे कोणी जाऊच शकत नाही असे काम होते. तिथे तिचे कपडे काढून तिला नाचायला लावले जात असे. संध्याकाळी मालक मुन्शीला पाठवत असे, तो तिला सोबत घेऊन जात असे. मुलगी सांगायची की, कपडे काढून मालक तिला आपल्या मांडीवर बसवत असे. तासभर तिला नाचवले जात असे. माझ्या मुलीला भोजपुरी गाणीही समजत नव्हती, त्याच गाण्यांवर तिला नाचायला सांगितले जात असे. आम्हाला सांगायला लाज वाटत आहे, मुलगी ज्या-ज्या गोष्टी येऊन सांगायची. कपड्यांमध्ये हात घालून मालक बसलेला असे, ती विरोध करायची तेव्हा तो म्हणायचा की सगळ्यांना मारून टाकेन.” मालकाच्या खोलीत दररोज लहान मुलींकडून घाणेरडे काम संवादादरम्यान पीडितेची आई सरिता (काल्पनिक नाव) यांनी सांगितले की, फार्म हाऊसमध्ये JDU नेत्याच्या खोलीत दररोज घाणेरडे काम होत असे. एक-दोन नव्हे, तर डझनभर लोकांच्या अय्याशीचा अड्डा होता. विरोध यासाठी होत नव्हता कारण मुली बाहेरच्या होत्या, आणि परिसरही पूर्णपणे सुनसान होता. पीडितेच्या आईने हे देखील सांगितले की, जिथे फक्त महिलांना प्रवेश असतो, तिथे काय घडत असेल याचा अंदाज लावता येतो. रिपोर्टर - तुमच्या इथलीही कोणती मुलगी आहे का, जिच्यासोबत घाणेरडे काम झाले आहे?सरिता - हो आहे, तिच्यासोबत तर खूप काही घडले आहे. रिपोर्टर - मालक याआधीही मुलींना बोलावतो होता का?सरिता - हो बोलावतो होता, कपड्यांशिवाय नाचही करत होता. रिपोर्टर - त्या दिवशी काय झाले होते, जेव्हा पोलीस आले?सरिता - माझ्या मुलीला त्या दिवशी बोलावले नव्हते. रिपोर्टर - आता तर खूप अडचण झाली असेल?सरिता - हो, खूप त्रास झाला आहे, ती आता कुठे आहे? रिपोर्टर - तो तुरुंगात आहे, आता बाहेर येणार नाही. सरिता - (घाबरून) तुरुंग किती दूर आहे, आम्हाला आधी पळावे लागेल. रिपोर्टर - दूर आहे, तो आता लवकर येणार नाही.सरिता - ठीक आहे, पण काही बोललो तर तो मारून टाकेल. रिपोर्टर - आता तुमच्यात किती लोक आहेत?सिपाली - आता बरेच लोक आहेत, पण सगळे घाबरलेले आहेत. तपासादरम्यान, JDU नेत्याच्या स्टाफमधील बबलू मुंशीची माहिती मिळाली. माहिती मिळाल्यानंतर आम्ही त्याच्या शोधात लागलो. अनेक वेळा फोन केल्यानंतर मुंशीने रिपोर्टरला भेटण्यासाठी फार्म हाऊसवर बोलावले. त्यानेही दबक्या आवाजात सांगितले की रात्री फार्म हाऊसमध्ये खूप काही घडत असे. रिपोर्टर - इथे काय व्हायचं, मुली गंभीर आरोप करत आहेत?बबलू - बरेच लोक येत-जात होते, पण आम्ही आमच्या कामाशी मतलब ठेवत होतो. रिपोर्टर - इथे काय झालं होतं?बबलू - जे काही आहे, इथले लोक सांगतील, आम्ही काय बोलू शकतो. रिपोर्टर - तुम्ही आधीपासून इथे राहत होता का?बबलू - नाही, आम्ही 3 महिन्यांपासून इथे काम करत आहोत. रिपोर्टर - इथे कोण-कोण येत होतं?बबलू - याबद्दल आम्हाला जास्त माहिती नाही. रिपोर्टर - जे आरोप होत आहेत, त्याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे?बबलू - आम्हाला काही खास माहिती नाही, मालकाला माहीत काय व्हायचं ते.बबलू - डान्स तर व्हायचा, आम्ही दिवसा काम करून घरी निघून जायचो. रात्री काय व्हायचं, माहीत नाही. रिपोर्टर - इथे कोण-कोण लोक येत होते?बबलू - बरेच लोक येत-जात होते, पण आम्ही आमच्या कामाशी मतलब ठेवत होतो. रिपोर्टर - इथे कोळशाचेही काम होत असे का?बबलू - आम्ही सकाळी यायचो आणि संध्याकाळपर्यंत काम करून निघून जायचो. रिपोर्टर - इथे मुलीही काम करत होत्या का?बबलू - हो, मुली त्यांच्या कुटुंबासोबत काम करत होत्या. भास्करच्या तपास पथकाला चौकशीदरम्यान दिलीप सादाचा पत्ता लागला. दिलीपला JDU नेत्याबद्दल खूप काही माहिती आहे. त्याने तिथे बराच काळ काम केले आहे, त्याला अनेक रहस्ये माहीत आहेत. माहिती मिळाल्यानंतर आम्ही दिलीप सादाचा शोध घेतला आणि त्याला भेटून संपूर्ण कहाणी समजून घेतली. दिलीप यांनी सांगितले की, JDU नेत्याला मुलींची खूप आवड होती, आधी स्थानिक मुली येत असत, पण त्या सुंदर नसायच्या म्हणून आता तो ईशान्येकडील मुलींना बोलावतो. दिलीपच्या तोंडून JDU नेत्याच्या आलिशान आयुष्याची कहाणी.. “मी 6 वर्षे JDU नेत्याकडे काम केले आहे. तिथे खूप चुकीची कामे होत असत. कर्मचाऱ्यांच्या मुलींवर नजर असायची. संधी मिळताच त्यांना कपड्यांशिवाय नाचवले जात असे. संध्याकाळी गाड्यांची रांग लागायची. पैशाच्या जोरावर बाहेरूनही मुलींना बोलावले जात असे. बाहेरून मोठ्या मुलींना बोलावले जात असे, आतमध्ये तर खूप लहान मुली सहज मिळत असत. रात्रभर खेळ चालायचा. त्याचे घर असे होते की विचारू नका, प्रत्येक सुख-सुविधा होती. मुलींना बोलावून मजा केली जात असे. बहुतेक 16 वर्षांच्या मुली असायच्या.” कुटुंबाला अडकवून मुलींना लक्ष्य केले जात असे संभाषणादरम्यान दिलीप ने अनेक खुलासे केले. दिलीप येथे बऱ्याच काळापासून काम करत आहे, त्यामुळे त्याला संपूर्ण खेळ माहीत आहे. दिलीप ने एक-एक करून जेडीयू नेत्याच्या संपूर्ण काळ्या कृत्यांवरून पडदा उचलला. रिपोर्टर - तुम्ही तिथे काय काम करत होता?दिलीप - तिथे खूप काही पाहत होतो, अनेक जबाबदाऱ्या दिल्या होत्या. रिपोर्टर - तुम्ही इथे कधीपासून काम करत होता, तुम्हाला काय काय माहीत आहे?दिलीप - मी 6 वर्षे सतत काम केले, 2 वर्षांपूर्वी तिथून काम सोडले आहे. रिपोर्टर - इथे लोकांसोबत कसं वागलं जायचं?दिलीप - काम करून घेण्यासोबतच बरंच काही करून घेतलं जायचं, पैसेही अडवून ठेवले जायचे. रिपोर्टर - काही जबरदस्ती किंवा दबावही टाकला जायचा का?दिलीप - हो, मजुरांना अशा प्रकारे अडकवून ठेवलं जायचं की ते दुसरीकडे कामावर जाऊ शकत नव्हते. रिपोर्टर - मुलींबद्दल ज्या गोष्टी समोर येत आहेत, त्याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे?दिलीप - बाहेरून मुलींना बोलावले जायचे, पैशांच्या जोरावर खूप मजा केली जायची. रिपोर्टर - किती वयाच्या मुली असायच्या?दिलीप - 16 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींना लक्ष्य केले जायचे. रिपोर्टर - तुम्ही स्वतः असं काही पाहिलं आहे का?दिलीप - आम्ही कामावर असायचो, पण मुलींना आत घेऊन जायचे. रिपोर्टर - तिथे काही खास व्यवस्था होती का?दिलीप - होय, आतमध्ये आलिशान व्यवस्था होती, संपूर्ण खेळ तिथेच चालायचा. सध्या JDU नेता ओवैस करणी तुरुंगात 29 मार्च रोजी बिहारमधील सहरसा येथील नया टोला येथील विटभट्टीमधून पोलिसांनी 75 मजुरांची सुटका केली होती. ही विटभट्टी ओवैसची आहे. सर्व मजुरांना एजंटमार्फत आसाममधून येथे कामासाठी आणण्यात आले होते. पोलिसांच्या चौकशीत 7 अल्पवयीन मुलींनी सांगितले आहे की, ओवैस त्यांना फार्म हाऊसवर घेऊन जाऊन वाईट काम करायचा. सर्व मुलींचे वय 14 ते 16 वर्षे आहे. चौकशीदरम्यान मुलींनी JDU नेत्यावर लैंगिक शोषणापासून अनेक गंभीर आरोप केले. पोलिसांनी आरोपी JDU नेता ओवैस आणि त्याचा सहकारी मुन्शी यांना अटक करून तुरुंगात पाठवले आहे. नजरुल हक नावाच्या एजंटने या कुटुंबांना आसाममधून येथे आणले होते. तो पळून आपल्या घरी आसामला गेला आहे. भास्करशी बोलताना त्याने सांगितले की, ओवैस त्याला अशा कुटुंबांना लक्ष्य करायला लावायचा ज्यांच्या मुली सुंदर असतील. सर्व मुलींना सध्या चाइल्ड लाइनमध्ये ठेवण्यात आले आहे. पोलिस तपासासाठी सर्व कुटुंबे त्याच विटांच्या भट्टीजवळच्या घरांमध्ये राहत आहेत. सर्वांचा असाही आरोप आहे की आज आसाममध्ये मतदान आहे आणि पोलिसांनी तपासाच्या नावाखाली त्यांना थांबवून ठेवले आहे. आता ओवैसच्या राजकीय प्रभावाची 4 छायाचित्रे पाहा.., जेडीयू नेता नग्न मुलींना पाहण्याचा शौकीन होता. स्वतःही कपड्यांशिवाय त्यांच्यासमोर फिरत असे. उद्या बघा ऑपरेशन डर्टी फार्म हाऊस भाग-३
57 वर्षांचे आझाद खान त्यांच्या भावाच्या किराणा दुकानात सुन्न बसले आहेत. तीन महिन्यांपूर्वीच 25 वर्षांनंतर ते तुरुंगातून सन्मानपूर्वक निर्दोष सुटून आले आहेत. एकटेच काहीतरी पुटपुटत आहेत. विचारल्यावर म्हणतात - 'संपूर्ण आयुष्य तुरुंगाच्या अंधार कोठडीत घालवले. आता कोणाशी काय बोलू, काय उरले आहे!' मी विचारले - 'संपूर्ण आयुष्य तुरुंगात घालवले, कोणाचा खून केला होता का?' 'नाही-नाही, दरोड्याचा खोटा खटला होता. न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. जरा विचार करा - दरोड्याच्या प्रकरणात जन्मठेप!' तेव्हाच मागून आझादची वहिनी आशा बेन बोलतात, 'ते निर्दोष होते. खोट्या खटल्यात गावातील एका कुटुंबाने त्यांना फसवले होते. सर्व काही उद्ध्वस्त झाले.' ब्लॅकबोर्ड या काळ्याकभिन्न कथांच्या मालिकेत आज अशा लोकांची कहाणी, ज्यांना खोट्या खटल्यांमध्ये फसवले गेले, ज्यांचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झाले आणि शेवटी न्यायालयाने त्यांना सन्मानपूर्वक निर्दोष मुक्त केले. मी उत्तर प्रदेशातील मैनपुरी शहरापासून २२ किलोमीटर दूर असलेल्या ब्योंती कटरा गावात पोहोचलो आहे. २५ वर्षांनंतर तुरुंगातून सन्मानपूर्वक निर्दोष सुटून आलेल्या आझाद खान यांना भेटण्यासाठी. येथे एका अरुंद गल्लीत आणि उघड्यावर वाहणाऱ्या एका घाणेरड्या नाल्याच्या मधोमध आझाद खान यांचे झोपडीवजा घर आहे. त्याची अवस्था इतकी वाईट आहे की, हलके वादळ आले तरी ते उडून जाईल. याला लागूनच त्यांचे भाऊ मस्तान खान यांचे घर आहे. एक छोटेसे, प्लास्टर नसलेले विटांचे बनलेले. समोर दोन-तीन गुरे बांधलेली आहेत. इथेच मस्तान खान यांचे दुकान आहे. मी त्याच्या बाहेर बसतो आणि माझे भाऊ आझाद खान यांना बोलावण्यास सांगतो, पण आझाद माझ्याशी बोलण्यासाठी समोर येत नाहीत. आधी त्यांच्या भावाने बोलावले आणि मग पुतण्या अनेकदा बोलावण्यासाठी गेला तेव्हा ते यायला तयार झाले. दुकानातून बाहेर येऊन येथे ठेवलेल्या तख्तावर बसतात. आताही ते खूप घाबरलेले दिसत आहेत. वारंवार इकडे-तिकडे पाहत आहेत. त्याच तख्ताच्या शेजारी बसलेल्या त्यांच्या वहिनी आशाबेन म्हणतात- जेलमध्ये गेल्याने मानसिक स्थिती बिघडली आहे. तीन महिन्यांपूर्वी २१ जानेवारी २०२६ रोजी जेव्हा सकाळी-सकाळी माझा मुलगा आणि पती त्यांना जेलमधून सोडवून घरी घेऊन आले, तेव्हा गावातील बदललेली गल्ली आणि घर पाहून ते थक्क झाले. त्यांना सर्व काही बदललेले वाटत होते. हळू आवाजात म्हणाले- वहिनी, सर्व बदलले ना! मी त्यांच्या पाठीवरून हात फिरवत म्हणाले- हो, सर्व बदलले. आता जेलमधून सुटून आले आहात. घाबरू नका. मी तुमच्या आईसारखी आहे. जेव्हा ते तुरुंगात गेले होते, तेव्हा ते 30 वर्षांचे होते. 25 वर्षे तुरुंगात राहिल्यानंतर ते 55 वर्षांचे झाले आहेत. त्यांचे संपूर्ण आयुष्य तुरुंगात उद्ध्वस्त झाले. हे सांगताना आशाबेनच्या डोळ्यात पाणी येते आणि त्या पदराने अश्रू पुसू लागतात. थोडा वेळ थांबून त्या पुन्हा म्हणतात- मला लग्न होऊन 10 वर्षे झाली होती. आझाद त्यांच्या 5 भावांमध्ये सर्वात लहान आहेत. सुरुवातीपासूनच ते थोडे हट्टी स्वभावाचे होते. कोणालाही घाबरत नव्हते. याच कारणामुळे ते गाववाल्यांच्या नजरेत होते. 22 ऑक्टोबर 2000 रोजी दिवाळीचा दिवस होता. आम्ही गाढ झोपेत होतो. आझाद त्यावेळी दिल्लीत शिवणाचे काम करत होते. सकाळी 3 वाजता, अचानक गावात गोंधळ माजला की- दरोडा पडला आहे. चोरी झाली आहे. गोंधळ ऐकून आम्हीही उठून धावलो. आमच्या गावातील एका ब्राह्मण कुटुंबाकडे चोरी झाली होती. त्यांच्याकडे लग्नाची तयारी सुरू होती, त्यामुळे त्यांच्या घरात बरेच दागिने ठेवले होते, जे चोरीला गेले होते. प्रकरणाची पोलिसांकडे तक्रार करण्यात आली. ताबडतोब आमच्या एऊल पोलीस ठाण्याचे पोलीस तपासामध्ये गुंतले. तीन-चार दिवसांनंतर अचानक पोलीस आमच्या घरी आले. शिवीगाळ करत म्हणाले - त्या रात्रीच्या दरोड्यात तुमचा दीर आझाद खान देखील सामील होता. हे ऐकून आम्ही थक्क झालो. मी म्हणालो - साहेब, ते तर दिल्लीत शिवणाचे काम करतात. ते इथे कसे आले? पोलीस म्हणू लागले - खोटे बोलू नका. तुम्ही लोकांनी त्याला इथून पळवून लावले. त्याच्या विरोधात साक्ष मिळाली आहे. ताबडतोब त्याला बोलावून पोलीस ठाण्यात हजर करा, नाहीतर सर्वांना तुरुंगात टाकीन. आम्ही लोक शिकलेले नाही. मेहनत-मजुरी करून घर चालवतो. त्यावेळी गावकरी आमची चेष्टा करू लागले. म्हणू लागले - आणि चला ऐटीत! आता भोगा तुमच्या कर्माचे फळ. शेवटी गावकरी देखील आम्हालाच चुकीचे मानत होते. त्यानंतर आम्ही आझादला पत्र लिहिले आणि सांगितले - पोलीस तुम्हाला शोधत आहेत. घरी या. तुमच्यावर गावातील घरात दरोडा टाकल्याचा गुन्हा दाखल आहे. या संभाषणादरम्यान तख्तावरच निस्तेज चेहरा घेऊन, मळकट पिवळ्या बनियान आणि पायजमामध्ये आशा बेनचे पती मस्तान खानही बसले आहेत. ते म्हणाले- आझादने आपल्या उत्तराच्या पत्रात लिहिले- मी तर दिल्लीत आहे. मी कोणता गुन्हा केला आहे, की मी पोलिसांसमोर शरण जाऊ? आझाद अजून घरी आले नव्हते. याच दरम्यान, पोलीस घराच्या जप्तीचे नोटीस घेऊन आले. भिंतीवर नोटीस चिकटवताच घरात आरडाओरडा सुरू झाला. आम्ही पाच भाऊ, माझी तीन मुले. कुठे जाणार होतो. घर वाचले नसते, तर रस्त्यावर आलो असतो. त्यानंतर आम्ही कर्ज घेतले आणि वकिलाला 20 हजार रुपये दिले, तेव्हा काही दिवसांसाठी जप्तीपासून मुदत मिळाली. त्यानंतर लगेचच आपल्या भाऊ आझाद खानला भेटायला दिल्लीला निघून गेलो. त्याला संपूर्ण गोष्ट सांगितली, तेव्हा तो कोर्टात शरण जाण्यास तयार झाला. तो आला आणि कोर्टात शरण गेला. सुमारे महिनाभरानंतर नोव्हेंबर 2001 मध्ये पोलिसांनी त्याला अटक केली आणि तुरुंगात पाठवले. नंतर सुनावणी झाली आणि सत्र न्यायालयाने 25 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. आता कुठे तीन महिन्यांपूर्वी तो निर्दोष सुटून बाहेर आला आहे. आझादचे लग्न झाले नाही, घरही वसले नाही. पूर्ण तारुण्य त्याने तुरुंगात घालवले. आता तो कोणत्याही कामाचा राहिला नाही. विचार करून करून तो मानसिकदृष्ट्या आजारी पडला आहे. असे म्हणत मस्तान खान ढसाढसा रडू लागतात. डोळे पुसत ते म्हणतात, ‘तुरुंगात त्याला भेटण्यासाठी हजार-पाचशे रुपये पोलिसांना द्यावे लागत होते. माझ्याकडे जेव्हाही काही रुपये जमा होत, तेव्हा मी त्याला भेटायला जात असे. शेवटी तो माझा धाकटा भाऊ आहे. तुरुंगात असताना मी अनेकदा कोर्टात जामिनासाठी अर्ज केला, पण तो फेटाळला जात राहिला. वकिलाने सांगितले- 50 हजार रुपये द्या, मग मी जामीन मिळवून देईन, पण त्यावेळी माझ्याकडे तेवढे पैसे नव्हते. कशाबशा जमीनदारांच्या शेतात रोजंदारी करून पैसे जमा करत असे, मग एक-दोन वर्षांनी वकिलाकडे जाऊ शके. वकील पैसे तर घ्यायचा, पण जामीन करून देत नव्हता. एकदा तर रमजानचा महिना होता. 5 हजार रुपये घेऊन मैनपुरी शहरातून खाण्यापिण्याचे काही सामान खरेदी करायला गेलो होतो. सोबतच भावाच्या जामिनासाठी वकिलाला भेटून बोलायचे होते. त्या दिवशी वकिलाने माझे सगळे पैसे घेतले. सणाचे कोणतेही सामान खरेदी करू शकलो नाही. इतकेच काय तर इतकेही पैसे उरले नाहीत की बसचे भाडे देऊ शकेन. त्या दिवशी चालतच मैनपुरीहून माझ्या गावी आलो होतो. या संभाषणादरम्यान मध्येच आझाद खान काहीतरी पुटपुटत होते. त्यांच्याशी बोलायला सुरुवात केली तेव्हा ते म्हणाले- कारागृहात मी क्रूर कैद्यांमध्ये राहत होतो. एकदा तर ते सगळे मिळून मला मारण्याचा कट रचला होता. त्यांनी एका पिशवीत अनेक खुरपी जमा केल्या होत्या. एका कैद्याने तर माझ्या हातावर खुरपीने हल्लाही केला होता. घटनास्थळी कारागृह अधिकारी पोहोचले होते आणि कसेबसे वाचवले होते. त्या दिवशी वाचलो होतो, पण इतका घाबरलो की मानसिकदृष्ट्या आजारी पडू लागलो. मनात एक भीती घर करून राहिली. प्रत्येक वेळी असे वाटू लागले की- कोणीतरी मला मारायला येत आहे. असे वाटू लागले की तुरुंगातून बाहेर पडलो तर गावकरी मला मारून टाकतील. माझी तब्येत बिघडत गेली. त्यानंतर तुरुंग प्रशासनाने मला बरेली सेंट्रल जेलमधून बनारसच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये नेले. तिथे माझे दोन वर्षे उपचार चालले. हातात कोर्ट-कचेरीचे कागद चाळत आझाद खान या गोष्टी सांगतात. यावेळी ते इकडे-तिकडे बघत अनेकदा 'मुठभेड़-मुठभेड़' असे म्हणतात. विचारल्यावर काहीच सांगत नाहीत. मग थोडा जोर दिल्यावर ते म्हणतात- आमच्या गावात दोन समुदायांमध्ये अनेकदा भांडणे होत असत. 1999 सालची गोष्ट आहे. गावात भांडण झाले आणि पोलीस पोहोचले. आमची पोलिसांशी झटापट झाली. माझ्या काही साथीदारांनी पोलिसांवर गोळीबार केला. खुनाचा प्रयत्न केल्याचा खटला चालला, मलाही 10 वर्षांची शिक्षा झाली होती. काही महिने तुरुंगात राहिलो होतो, मग जामिनावर सुटून आलो होतो. त्यानंतर दिल्लीला पैसे कमवायला गेलो होतो आणि मग हा दरोड्याचा खोटा खटला माझ्यावर लादण्यात आला. असे म्हणत आझाद खान विचित्र गोष्टी बोलू लागतात. काहीतरी वेगळंच सांगू लागतात. जवळच बसलेली त्यांची वहिनी म्हणते- आता तुम्ही यांच्याशी बोलू नका. यांची मानसिक स्थिती ठीक नाही. अनेकदा शिवीगाळही करू लागतात. 25 वर्षे तुरुंगात असताना त्यांना एकांतवासात ठेवण्यात आले होते. तिथे त्यांना छळण्यात आले होते, त्यानंतर ते बडबडू लागले आहेत. आम्ही काहीच करू शकत नव्हतो. एका स्वयंसेवी संस्थेने (NGO) आम्हाला मदत केली. प्रकरण उच्च न्यायालयात पोहोचले, जिथे प्रकरण खोटे असल्याचे आढळले. विचार करा, एका खोट्या प्रकरणात माणसाचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त केले गेले. त्याला वेडे बनवले गेले. जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत, तोपर्यंत त्यांची काळजी घेऊ, आमच्या मृत्यूनंतर त्यांचे काय होईल, माहीत नाही. आझाद खानची ही काळी कहाणी जाणून घेतल्यानंतर मी मैनपुरीहून दिल्लीला पोहोचलो. येथे किराडी परिसरातील प्रेम नगरमध्ये रामदासचे कुटुंब राहते. रामदास येथे चप्पलच्या एका कारखान्यात काम करतात. 9 हजार रुपये महिना कमावतात. शेजाऱ्यांनी एका मुलीवर बलात्कार केल्याच्या खोट्या प्रकरणात त्याला फसवले. पॉक्सो कायद्यांतर्गत तो तुरुंगात गेला. 7 वर्षे तुरुंगात काढली आणि 2021 मध्ये निर्दोष सुटून बाहेर आला आहे. रामदास सांगतात- माझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल होता. आता मी 60 वर्षांचा आहे. जेव्हा तुरुंगात गेलो होतो, तेव्हा 50 वर्षांचा होतो. माझे दोन मुलगे-दोन मुलींसह संपूर्ण कुटुंब आहे. शेजारी माझ्या जातीचा द्वेष करत होते, म्हणून त्यांनी मला खोट्या प्रकरणात फसवले. माझ्याकडे तेवढे पैसे नव्हते. देऊ शकलो नाही आणि पोलिसांनी केस मोठी करून मला तुरुंगात पाठवले. यानंतर तारखेवर तारखा सुरू झाल्या. मी कधी पॉक्सो कायद्याबद्दल ऐकलेही नव्हते. इकडे, मी तुरुंगात जाताच माझा मुलगा, सून, पत्नी सर्वजण दारोदार भटकू लागले. त्यावेळी सून गर्भवती होती. केस लढण्यासाठी माझ्या मुलाने सुनेचे सर्व दागिने एक-एक करून विकले. प्रत्येक तारखेला 3 ते 5 हजार रुपये खर्च होत होते. जेव्हा दागिन्यांचे पैसे संपले तेव्हा मी न्यायाधीशांना सांगितले होते की- साहेब, जो काही निर्णय द्यायचा आहे तो द्या, नाहीतर मी आत्महत्या करेन. जवळ बसलेले रामदास यांचे पुत्र जोगिंदर दासही हे बोलणे ऐकत होते. ते म्हणतात- एकीकडे माझी पत्नी गर्भवती होती, दुसरीकडे वडील तुरुंगात होते. जेव्हाही वकिलाकडे जामिनासाठी जात असे, तेव्हा तो म्हणायचा- 50 हजार रुपये द्या, तरच जामिनाचा अर्ज दाखल करेन. जेव्हा पत्नीचे सर्व दागिने विकले गेले, तेव्हा कारखान्यातील 5 शिलाई मशीनही विकल्या. त्यानंतर पैसे कमी पडू लागले. मग गावात जाऊन घराची जमीन विकली. या प्रकरणात 10 लाखांहून अधिक खर्च झाले होते. जेव्हा तुरुंगात वडिलांना भेटायला जात असे, तेव्हा आम्ही एकमेकांना पाहून रडत असू. त्यावेळी मी हेच विचार करत असे की कसेही करून वडिलांना तुरुंगातून बाहेर काढेन. शेवटी, कसेबसे पैसे देऊन अंतिम सुनावणी झाली. तीस हजारी कोर्टाने 2021 मध्ये वडिलांना 7 वर्षांच्या तुरुंगवासानंतर निर्दोष मुक्त केले. दिल्ली सरकारला एक लाख रुपये नुकसान भरपाई देण्यासही सांगितले. पण जेव्हा आम्ही हे पैसे घेण्यासाठी दिल्ली सचिवालयात गेलो, तेव्हा तेथील अधिकाऱ्यांनी आम्हाला एका ऑफिसमधून दुसऱ्या ऑफिसमध्ये चकरा मारायला लावल्या. आता हे प्रकरण हायकोर्टात पोहोचले आहे. हे एक लाख रुपये मिळवण्याच्या प्रयत्नात आमचे अडीच लाख रुपये खर्च झाले आहेत. फक्त अपीलवर अपील सुरू आहे. जोगिंदरचे हे बोल ऐकून रामदास दीर्घ श्वास घेत म्हणाले - तुरुंगात गीता वाचून आणि पेंटिंग करून मी आयुष्य काढत होतो. तिथे इतर कैदी मला पाहून विचारत - काका, तुम्ही कोणत्या गुन्ह्यात तुरुंगात आला आहात? मी जसा म्हणतो- बलात्कार प्रकरणात. ते पोलिसांना शिव्या देत म्हणतात- तुमचं वय तरी बघायला पाहिजे होतं पोलिसांनी. त्यांनी अशाच खोट्या प्रकरणात अडकवून आम्हाला गुन्हेगार बनण्यास भाग पाडले आहे. रामदास म्हणतात- अशा प्रकारे 7 वर्षे तुरुंगात निर्दोष असूनही काढले. आता तुरुंगातून बाहेर आल्यावरही काय उरले आहे? जमीन, दागिने विकले गेले. संपूर्ण कमाई कोर्ट-कचेरीत गमावली.
‘पहिल्यांदा भेटली, तेव्हा म्हणाला की तू माझी मुलगी आहेस. तुझं कन्यादान मी स्वतः करेन. लग्नाआधी मला ऑफिसमध्ये बोलावून बलात्कार केला.’ ही आपबीती कॅप्टन बाबा ऊर्फ अशोक खरात याच्या विरोधात पहिली एफआयआर दाखल करणाऱ्या महिलेची आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पीडित महिला आणि तिचं कुटुंब बदनामीच्या भीतीने समोर येऊ इच्छित नाही. बहुतेक जणी घर सोडून निघून गेल्या आहेत. खरात यांच्यावर आतापर्यंत 12 एफआयआर दाखल झाल्या आहेत. यापैकी 8 लैंगिक छळाच्या आहेत. पोलिसांना 58 अश्लील व्हिडिओ मिळाले आहेत. तपासात समोर आले आहे की, 150 हून अधिक महिला बलात्कार आणि लैंगिक छळाच्या बळी ठरल्या असाव्यात. दिव्य मराठीने नाशिक एसआयटीकडून बाबांविरोधात तक्रार करणाऱ्या पहिल्या पीडितेची आपबीती जाणून घेतली आणि वकिलांशी संवाद साधला. पहिल्या पीडितेशी संपर्क साधताना पोलिसांचा फोन आला, म्हणाले- त्यांच्याशी बोलू नकानाशिक पोलिसांनी अशोक खरातला 18 मार्च रोजी अटक केली होती. त्याच्या विरोधात पहिली एफआयआर एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या 30 वर्षीय महिलेने दाखल केली होती. महाराष्ट्र पोलिसांशी संबंधित एका सूत्राद्वारे आम्हाला पीडितेचे ठिकाण आणि फोन नंबर मिळाला. जेव्हा संपर्क साधला, तेव्हा घरच्यांनी चुकीचा नंबर सांगून फोन कट केला. फोन कटल्यानंतर काही वेळाने एसआयटीमधील एका निरीक्षकाचा फोन आला. त्यांनी आमची ओळख विचारली आणि पीडितेला फोन करण्यामागचे कारण जाणून घेतले. त्या म्हणाल्या, ‘नाशिक पोलीस प्रत्येक महिलेच्या गोपनीयतेची काळजी घेत आहे. त्यांच्याशी संपर्क साधू नका. पीडितांसोबत झालेला गुन्हा अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे कुटुंबांचे सातत्याने समुपदेशन केले जात आहे.’ पोलिसांनी इशारा दिला आहे की, जर कोणाकडे या प्रकरणाशी संबंधित व्हिडिओ असतील, तर ते त्वरित हटवावे आणि फॉरवर्ड करू नयेत. असे केल्यास लोकांविरुद्ध अटक आणि खटल्याची तरतूद आहे. मुलगी बोलून विश्वास संपादन केला, 78 हजार रुपयांना दोन दगड दिले, नंतर बलात्कारपहिली एफआयआर दाखल करणाऱ्या महिलेपर्यंत पोहोचणे कठीण होते, त्यामुळे आम्ही त्यांच्या वकिलांनी आणि पोलिसांनी दिलेल्या जबाबांची तपासणी केली. याद्वारे कॅप्टन बाबा महिलांना कसे फसवतो, हे समजून घेण्याचा प्रयत्न केला. आम्हाला त्याची 17 मार्चची एफआयआर मिळाली. पोलिसांना दिलेल्या जबाबात महिलेने 4 महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत: 1. पीडिता 2019 मध्ये नातेवाईकाच्या माध्यमातून बाबाला भेटली. ती लग्नाबद्दल चिंतेत होती.2. खरातने दैवी शक्ती असल्याचा खोटा दावा केला आणि मुलगी म्हणून विश्वास संपादन केला.3. 50 हजार आणि 28 हजार रुपयांचे खास दगड दिले. दोन्ही ताबीजसारखे (गळ्यात घालण्यासाठी) घालायला सांगितले.4. नशीला पदार्थ पाजून नोव्हेंबर 2022 ते डिसेंबर 2025 पर्यंत बलात्कार केला. पीडितेने पुढे सांगितले, 'मी 2019 मध्ये पहिल्यांदा खरातला भेटले. बाबा म्हणाला की, तू काळजी करू नकोस, तुला पुखराज दगड देतो. तो खंडोबा मंदिरात घेऊन जा. तिथे देवाला 11 नारळ अर्पण करून तो दगड गळ्यात लॉकेट बनवून घाल. तुझे लग्न चांगल्या ठिकाणी होईल.' 'नोव्हेंबर 2022 मध्ये माझी साखरपुडा झाला. भावी पतीसोबत बाबांचे आशीर्वाद घेण्यासाठी गेले होते. बाबांनी सांगितले की, लग्नापूर्वी ईशान्येश्वर महादेव मंदिरात सिद्धपूजा करावी लागेल. मंदिरात होणाऱ्या पूजा विधीबद्दल सांगण्यासाठी ऑफिसमध्ये बोलावले. तिथेच पहिल्यांदा बलात्कार केला. त्यानंतर तीन वर्षांपर्यंत अनेकदा बलात्कार केला.’ पीडितेनुसार, लग्नानंतरही पतीच्या मृत्यूची आणि बदनामीची भीती दाखवून खरात धार्मिक पूजेसाठी ऑफिसमध्ये बोलावत होता. कंटाळून 17 मार्च 2026 रोजी मी सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये FIR दाखल केली. खरात ताब्यात पण भीती कायम, पीडिता समोर येत नाहीतनाशिक कोर्टात वकिलांमार्फत आम्हाला पीडित महिलेचे वकील एम.वाय. काळे यांचा नंबर मिळाला. त्यांचे म्हणणे आहे की, या प्रकरणामुळे पीडित महिलांच्या आयुष्यावर खूप खोलवर परिणाम झाला आहे. भीतीमुळे अनेक साक्षीदार आणि पीडिता गप्प आहेत, त्यामुळे तपासात अडथळा येत आहे. काळे दावा करतात की खरातविरुद्ध जेवढे गुन्हे समोर आले आहेत, ते त्याच्या गुन्ह्यांच्या तुलनेत खूप कमी आहेत. सध्या त्याच्यावर दाखल झालेल्या पहिल्या एफआयआरवरच चौकशी सुरू झाली आहे. आम्ही खरातवर लावलेल्या आरोपांवर त्याचे वकील सचिन भाटे यांच्याशीही बोललो. त्यांनी प्रकरण न्यायालयात असल्याचे कारण देत काहीही बोलण्यास नकार दिला. खरातचं ऑफिस, जिथे 58 महिलांचे अश्लील व्हिडिओ बनवले गेले…10x12 चं ऑफिस, भिंतीवर लिहिलेलं- ‘प्रयत्न करणाऱ्यांचा कधी पराभव होत नाही’आम्ही नाशिक शहरातील खरातच्या ऑफिसमध्ये पोहोचलो, जिथे तो महिलांना बोलावून घेत असे. त्याच्याशी संबंधित 58 अश्लील व्हिडिओ याच ऑफिसमधील आहेत. हे ऑफिस नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरात आहे. इथे मोठ्या अक्षरात लिहिले आहे- 'ओकस प्रॉपर्टी डीलर्स अँड डेव्हलपर्स'. 1998 मध्ये खरात रिअल इस्टेट एजंट म्हणून काम करत होता. जमिनीच्या व्यवहारांदरम्यान तो प्रभावशाली लोकांच्या संपर्कात आला. त्याला अंकशास्त्रात रुची होती. हळूहळू त्याने भविष्य सांगायला सुरुवात केली. 2014 मध्ये खरातने कॅनडा कॉर्नर परिसरात 10 बाय 12 चे हे कार्यालय उघडले. 6 वर्षांत तो नाशिकचा एक प्रसिद्ध भविष्यवेत्ता बनला. कोरोना काळात 2021 मध्ये त्याच्याकडे येणाऱ्यांची संख्या वाढू लागली. 2024 मध्ये परिस्थिती अशी झाली की तो अपॉइंटमेंटसाठी 10 ते 25 हजार रुपये घेऊ लागला. तरीही भेटण्यासाठी 3 महिन्यांनंतर नंबर लागत असे. खरातच्या कार्यालयासमोर एसएस कन्स्ट्रक्शन नावाचे एक रिअल इस्टेट फर्म आहे. येथे भेटलेले सागर डाऊकर म्हणतात, ‘खरातच्या कार्यालयात दर शनिवारी सकाळी 8 वाजल्यापासूनच लोकांची रांग लागायला सुरुवात होत असे. संपूर्ण कार्यालय 2 भागांमध्ये विभागलेले आहे. पहिला प्रतीक्षा कक्ष आहे. खरातचे केबिन याला लागून आहे. केबिनच्या चारही बाजूंनी काळ्या रंगाच्या काचेच्या भिंती आहेत. त्यामुळे आत काय चालले आहे, हे बाहेर बसलेल्या लोकांना दिसत नव्हते.’ आजूबाजूच्या लोकांनी सांगितले की, खरातच्या कार्यालयात प्रवेशद्वारावर तिरंगा लावला होता. भिंतीवर ‘लाटांना घाबरून नौका पार होत नाही’ यासारखी प्रेरणादायी ओळ लिहिली होती. 28 मार्च रोजी एसआयटीने कार्यालय सील केले. ऑफिस स्टाफने बाबाच्या ऑफिसमध्ये लावला गुप्त कॅमेराआम्ही अशोक खरातच्या जुन्या ऑफिस स्टाफशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तो गेल्या वर्षापर्यंत अशोक खरातच्या ऑफिसमध्ये असिस्टंट होता. खरात त्याला 8 हजार रुपये पगार देत होता. SIT ला दिलेल्या निवेदनात कर्मचाऱ्याने सांगितले, ‘2023 मध्ये मी माझ्या गर्भवती पत्नीला घेऊन खरातकडे गेलो होतो जेणेकरून बाळ निरोगी जन्माला यावे. त्याने धार्मिक पूजेच्या बहाण्याने पत्नीची छेड काढली. या घटनेनंतर मी खरातच्या कृत्यांवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. त्याचा पर्दाफाश करण्यासाठी मित्राच्या मदतीने ऑफिसमध्ये एक हिडन कॅमेरा लावला. त्यानंतर बाबाचे सत्य समोर आले.’ ‘कॅप्टन बाबा 100 रुपये प्रति किलो दराने चिंचेच्या बिया विकत घेत असे. त्यानंतर त्यांना पॉलिश करून भक्तांना 10 हजार ते एक लाख रुपये प्रति मूठ दराने विकत असे. त्याने धर्माच्या नावाखाली अनेक महिलांसोबत गैरवर्तन केले.’ महाराष्ट्र पोलिसांशी संबंधित एका स्रोतानुसार, 29 डिसेंबर 2025 रोजी खरातने 2 लोकांविरुद्ध पाच कोटी रुपयांच्या खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. खरातने आरोप केला होता की काही लोक त्याचा अश्लील AI मॉर्फ व्हिडिओ बनवून त्याला ब्लॅकमेल करत आहेत. तेव्हा बाबाच्या असिस्टंटवरही संशय व्यक्त करण्यात आला होता. खरातच्या एफआयआरनंतर दीड महिन्याने, 18 फेब्रुवारी रोजी 24 वर्षीय तरुणीने त्याच असिस्टंटविरुद्ध एफआयआर दाखल केला होता. तिने असिस्टंटवर तिचे अश्लील फोटो शेअर केल्याचा आरोप केला होता. तेव्हापासून खरातचा असिस्टंट महाराष्ट्र पोलिसांच्या निगराणीखाली आहे. 18 दिवसांत 12 एफआयआर, महिलांना अडकवण्याचा विशिष्ट नमुनानाशिक एसआयटीशी संबंधित एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ‘अशोक खरातविरुद्ध दाखल झालेल्या बलात्काराच्या सर्व तक्रारींमध्ये एक समान नमुना आहे. गुन्हा दाखल करणाऱ्या बहुतेक महिलांचे म्हणणे आहे की, बाबा तंत्रपूजा केल्यानंतर त्यांना धमकावत असे. तो त्यांच्या मनात ही गोष्ट बिंबवण्याचा प्रयत्न करत असे की, जर त्यांनी ही गोष्ट कोणाला सांगितली, तर त्यांच्या मुलांसोबत काहीतरी वाईट घडेल किंवा कुटुंबात काहीतरी अनिष्ट घटना घडू शकते.’ अशोक खरात प्रकरणाच्या तपासासाठी नाशिक पोलिसांनी स्थापन केलेल्या एसआयटी पथकात 24 जणांचा समावेश आहे. यात 2 डीएसपी, 3 एसआय, 3 एएसआय, 10 इन्स्पेक्टर आणि 6 अतिरिक्त पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. हे पथक तांत्रिक पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे खरातचे जाळे आणि गुन्हेगारी तपासत आहे.
ही गोष्ट 18 ऑक्टोबर 1954 ची आहे. सकाळची वेळ होती आणि ठिकाण पुडुचेरीमधील कीझूर परिसर. एका सरकारी इमारतीच्या खोलीत बरीच गडबड होती. एका कोपऱ्यात पप्पा गौबार्ट या नावाने प्रसिद्ध असलेले इंडो-फ्रेंच नेते एडौर्ड गौबार्ट उभे होते. पांढऱ्या खादीच्या कुर्त्यात असलेले गौबार्ट एकेकाळी फ्रेंच प्रशासनाचा उजवा हात मानले जात होते. त्यांच्यासमोर फ्रेंच आयुक्तांचा प्रतिनिधी घाम पुसत फाईल्समध्ये गुंतला होता. बाहेर हजारो लोकांचा जमाव देशभक्तीच्या घोषणा देत होता. 178 लोक रांगेत उभे होते. सर्वांच्या हातात मतपत्रिका होती. ते एकेक करून पेटीत मतदान करत होते. शेवटचे मत पडताच, गौबार्ट बाहेर आले, त्यांनी आपला हात हवेत फिरवला आणि बघता बघता कीझूरचा धुळीने माखलेला रस्ता ‘जय हिंद’च्या घोषणांनी दुमदुमून गेला. 178 पैकी 170 लोकांनी पुडुचेरीच्या भारतात विलीनीकरणासाठी मतदान केले. त्यानंतर पुडुचेरी भारताचा भाग बनले, परंतु फ्रेंच सरकारला त्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 8 वर्षे लागली. 1962 मध्ये पुडुचेरी कायदेशीररीत्या भारतात समाविष्ट झाले. आज, म्हणजेच 9 एप्रिल रोजी पुडुचेरीमध्ये मतदान आहे. अशा परिस्थितीत आज मिनी फ्रान्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुडुचेरी, म्हणजेच पाँडिचेरीची गोष्ट, जे वर्षातून दोनदा स्वातंत्र्य साजरे करते… 1498 मध्ये पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा यांनी भारताचा मार्ग शोधला. यानंतर युरोपमध्ये स्पर्धा सुरू झाली. कारण होते - भारताचे मसाले, रेशीम, सोने आणि संपत्ती. डच, इंग्रज आणि फ्रेंचही या शर्यतीत सामील झाले. 1665 मध्ये फ्रेंच अधिकारी फ्रान्सिस कॅरो भारतात आले. 1668 मध्ये फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीने सुरतमध्ये पहिले व्यापार केंद्र उघडले. यानंतर फ्रेंच लोक पाँडिचेरीकडे वळले. तेव्हा पाँडिचेरी हे मासेमारी करणारे एक छोटे गाव होते. ते विजापूर रियासतीच्या अखत्यारीत येत होते. 1673 मध्ये फ्रेंच अधिकारी फ्रान्सुआ मार्टिन यांनी विजापूरच्या सुलतानाच्या सुभेदार शेर खान लोधी यांच्याकडून पाँडिचेरी भाडेपट्ट्यावर घेतले. त्यांनी येथे व्यापार केंद्र उघडले. हळूहळू ते शहर बनले. 18 व्या शतकाच्या अखेरीस फ्रेंचांनी पाँडिचेरीसोबतच यनम, माहे आणि कराईकलवरही कब्जा केला. हे भाग दूर होते, पण समुद्राच्या किनाऱ्यावर होते. पुदुच्चेरीवर इंग्रजांनीही अनेक वेळा राज्य केले, पण प्रत्येक वेळी फ्रेंच ते परत मिळवत असत. शेवटी 1816 मध्ये फ्रेंचांनी पुदुच्चेरीमध्ये पाय रोवले आणि ते पुन्हा कधीही इंग्रजांच्या हाती लागले नाही. फ्रेंचांनी पुदुच्चेरीला एका कालव्याच्या साहाय्याने दोन भागांमध्ये विभागले. पहिला- 'विले ब्लांश' म्हणजे व्हाईट टाऊन, जिथे फ्रेंच अधिकारी, व्यापारी आणि भारतीय ख्रिश्चन राहत होते. दुसरा- 'विले नोयर' म्हणजे ब्लॅक टाऊन, जिथे सामान्य भारतीय राहत होते. फ्रेंचांनी पाँडिचेरीमध्ये नौदल तळ (नेव्हल बेस) उभारला. टेक्सटाईल इंडस्ट्री (वस्त्रोद्योग) सुरू केली, ज्यामुळे फ्रान्सला मोठा नफा झाला. वार्षिक 1.95 लाख डॉलरची कमाई होत असे. म्हणजे आजच्या हिशोबाने सुमारे 40 कोटी रुपये. 17 वर्षांच्या मुलाने सुरू केले आंदोलन फ्रेंच अधिकारी पाँडिचेरीतील कापड गिरणीतील मजुरांकडून आठवडाभर खूप मेहनत करून घेत आणि महिन्याला जेमतेम 1 रुपया पगार देत. मजूर संतापले होते. त्यांच्या मनात क्रांतीची आग धुमसत होती. 1908 मध्ये, प्रसिद्ध लेखक आणि क्रांतिकारक सुब्रमण्यम भारती इंग्रजांपासून वाचण्यासाठी मद्रासमधून पळून पाँडिचेरीला आले. फ्रेंच वसाहत असल्यामुळे, ते ब्रिटिश राजवटीच्या अधिकारक्षेत्राबाहेर होते. याचा फायदा भारतीय क्रांतिकारकांनी घेतला. सुब्रमण्यम यांनी पाँडिचेरीतून 'इंडिया' नावाचे साप्ताहिक मासिक काढले. यामुळे ब्रिटिश भारतासोबत पाँडिचेरीमध्येही क्रांतीची ज्योत पेटली. 1910 मध्ये पाँडिचेरीतील सवाना कापड गिरणीतील कामगारांनी वेतनवाढीसाठी संप केला, परंतु फ्रेंच पोलिसांनी तो निर्दयपणे चिरडून टाकला. 17-18 वर्षे असेच चालले, पण कामगारांची स्थिती सुधारली नाही. मग आले 1928 साल, 10वीत शिकणाऱ्या 17 वर्षांच्या एका मुलाने पाँडिचेरीच्या कालवे कॉलेजमध्ये विद्यार्थी आंदोलन उभे केले. त्याचे नाव होते - वरदराजुलु सुब्बैया उर्फ व्ही. सुब्बैया. ते जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी आणि रशियन क्रांतीच्या विचारांनी प्रेरित होते. आंदोलन 3 महिने चालले. ते संपल्यावर सुब्बैया यांना 6 महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले. कसेबसे त्यांना 10वीची परीक्षा देता आली. नंतर ते नोकरीसाठी मद्रासला गेले. जेव्हा 12 कामगारांच्या मृत्यूनंतर त्यांना हक्क मिळाले 1933 मध्ये व्ही. सुब्बैया पांडिचेरीला परतले. त्यांनी महात्मा गांधींच्या 'हरिजन सेवक संघ'ची एक शाखा पांडिचेरीमध्ये उघडली. त्यांनी दलित आणि कामगारांना एकत्र केले. त्याचबरोबर 'सुदंतीरम' नावाचे मासिक सुरू केले. 14 फेब्रुवारी 1935 रोजी सुब्बैया यांनी सवाना मिलमध्ये संप सुरू केला. त्यांनी मागणी केली की कामाचे 10 तास निश्चित करावेत, बालमजुरी थांबावी, वेतन 6 आणे असावे आणि गर्भवती महिलांना वेतनासह सुट्टी मिळावी. 84 दिवसांच्या संपानंतर कामगारांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या. सुब्बैया दलित आणि कामगारांमध्ये प्रसिद्ध झाले. जुलै 1936 मध्ये सुब्बैया यांनी पांडिचेरीतील रोडिए, सवाना आणि एली मिलमधील कामगारांसोबत आंदोलन सुरू केले. त्यांची मागणी होती की कामगारांना कामगार संघटना (ट्रेड युनियन) स्थापन करण्याचा अधिकार मिळावा. 29 जुलै रोजी सुब्बैया यांच्या भाषणादरम्यान फ्रेंच पोलिसांनी गोळीबार केला. 12 कामगार मारले गेले. संतप्त कामगारांनी सवाना मिलला आग लावली. जगभरात याची चर्चा झाली. निदर्शने झाली. फ्रेंच पंतप्रधान लिओन ब्लम यांच्याकडे हस्तक्षेपाची मागणी करण्यात आली. फ्रेंच संसदेतही हा मुद्दा उपस्थित झाला. सरकारने सुब्बैया यांना भेटीसाठी बोलावले. जवाहरलाल नेहरूंच्या सल्ल्यानुसार सुब्बैया पॅरिसला गेले. फ्रेंच सरकारने मागण्या मान्य केल्या. कामगारांना ट्रेड युनियनचा अधिकार मिळाला. पांडिचेरी हे आशियातील पहिले ठिकाण बनले, जिथे कामाचे 8 तास निश्चित झाले. ‘पप्पा गौबार्ड’च्या बंडामुळे फ्रेंच कमकुवत झाले व्ही. सुब्बय्या स्वातंत्र्यासाठी रणनीती आखत होते, पण 1938 मध्ये त्यांना अटक करण्यात आली. 1942 मध्ये सुटका झाल्यानंतर त्यांनी पॉंडिचेरीची कम्युनिस्ट पार्टी स्थापन केली, पण एका वर्षासाठी त्यांना पॉंडिचेरीतून हाकलून देण्यात आले. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. आता पॉंडिचेरीमध्येही स्वातंत्र्याचे आंदोलन तीव्र झाले. पॉंडिचेरीचे भारतात विलीनीकरण व्हावे अशी मागणी होती, पण फ्रेंच लोक ते सोडायला तयार नव्हते. जानेवारी 1950 मध्ये फ्रेंच पोलीस पॉंडिचेरीच्या रस्त्यांवर उतरले. सुब्बय्या यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले. कम्युनिस्ट कार्यकर्त्यांना अटक करण्यास सुरुवात झाली. सुब्बय्यांचे घर जाळण्यात आले, जिथे कम्युनिस्ट पार्टीचे कार्यालयही होते. सुब्बय्या भूमिगत राहून अनेकदा भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या सर्वोच्च नेतृत्वाला भेटले. त्यांना आंदोलन गाव-गावपर्यंत पसरवण्याची सूचना मिळाली. 1952 मध्ये त्यांनी परत येऊन सशस्त्र पथके तयार केली. आंदोलन गाव-गावपर्यंत पसरवले. याच दरम्यान आणखी एक मोठी घटना घडली. फ्रेंच नॅशनल असेंब्लीमध्ये पॉंडिचेरीचे प्रतिनिधी एडौर्ड गौबार्ट यांची फ्रेंच अधिकाऱ्यांशी मतभेद झाले. नाराज गौबार्ट यांनी बंड केले. मार्च 1954 मध्ये गौबार्ट फ्रान्समधून पाँडिचेरीला आले. त्यांनी ‘समांतर सरकार’ स्थापन केले. वैचारिक मतभेद असूनही सुब्बैया यांनी या सरकारला पाठिंबा दिला. येथून पाँडिचेरीवरील फ्रान्सची पकड ढिली पडू लागली. 7 एप्रिल 1954 रोजी कम्युनिस्ट पक्षाने 'डायरेक्ट ॲक्शन'ची घोषणा केली. कम्युनिस्टांनी तिरुबुवानी परिसर स्वतंत्र केला. पोलिसांकडून शस्त्रे हिसकावून घेतली आणि पोलीस ठाण्यावर राष्ट्रीय ध्वज फडकवला. हळूहळू अनेक परिसर स्वतंत्र केले. भारताच्या स्वातंत्र्यानंतर 15 वर्षांनी पाँडिचेरी स्वतंत्र झाले भारताचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना हा प्रश्न मुत्सद्देगिरीने सोडवायचा होता, जेणेकरून फ्रान्सशी संबंध बिघडणार नाहीत. त्यामुळे भारत, फ्रान्स आणि पाँडिचेरी यांच्यात अनेक बैठका झाल्या. अखेरीस 13 ऑक्टोबर 1954 रोजी फ्रेंच पंतप्रधान पियरे मेंडेस फ्रान्स पाँडिचेरी सोडण्यास तयार झाले. 18 ऑक्टोबर 1954 रोजी पाँडिचेरीच्या कीझूर येथे भारतासोबत विलीनीकरणासाठी मतदान झाले. 178 स्थानिक प्रतिनिधींपैकी 170 जणांनी विलीनीकरणाच्या बाजूने मतदान केले. 1 नोव्हेंबर 1954 रोजी फ्रान्सने पाँडिचेरी, येनम, माहे आणि कराईकल या प्रदेशांचे प्रशासकीय नियंत्रण भारताला दिले. पाँडिचेरीला 'डी फॅक्टो' स्वातंत्र्य मिळाले. म्हणजेच, ते प्रत्यक्षात किंवा व्यवहारात स्वतंत्र झाले, परंतु फ्रान्सने अजूनही कायदेशीर सार्वभौमत्व सोडले नव्हते. या दरम्यान फ्रान्समध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली. सरकारे वेगाने बदलू लागली. त्याच वेळी अल्जेरियामध्ये स्वातंत्र्याची मागणी होऊ लागली. युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली. परंतु तरीही कायदेशीर बाब पूर्ण झाली नाही. नंतर जनरल चार्ल्स डी गॉल फ्रान्सच्या सत्तेवर आले. त्यांना वाटले की फ्रेंच वसाहतींना जास्त काळ नियंत्रणात ठेवता येणार नाही. यामुळे मे 1956 मध्ये भारत-फ्रान्स दरम्यान एक करार झाला, ज्यात फ्रान्सने भारताला आपल्या ताब्यात असलेले प्रदेश सोपवण्यास सहमती दर्शविली. परंतु याला फ्रेंच संसदेची मंजुरी मिळायला 6 वर्षे लागली. मे 1962 मध्ये फ्रेंच संसदेने यावर शिक्कामोर्तब केले. 16 ऑगस्ट 1962 रोजी फ्रान्सने ही कागदपत्रे भारताला सोपवली. याच दिवशी पाँडिचेरीला 'डी ज्यूर' स्वातंत्र्य मिळाले. म्हणजेच, कायदेशीररित्या पाँडिचेरी स्वतंत्र झाले आणि भारताचा भाग बनले. तत्कालीन पंतप्रधान नेहरूंनी पाँडिचेरीच्या जनतेला वचन दिले होते की, कोणताही बाहेरील व्यक्ती त्यांच्यावर राज्य करणार नाही. म्हणूनच पाँडिचेरीला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला आणि विधानसभा स्थापन करण्यात आली. गौबार्ट पाँडिचेरीचे पहिले मुख्यमंत्री बनले, तर सुब्बैया विरोधी पक्षात बसले. पिवळे फ्रेंच क्वार्टर, फ्रेंच भाषा, फ्रेंच खाद्यपदार्थ आजही अस्तित्वात आहेत जसे दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी संपूर्ण भारतात स्वातंत्र्याचा उत्सव साजरा केला जातो, तसेच पाँडिचेरीमध्येही होतो. तथापि, 16 ऑगस्ट रोजी 'डी ज्यूर ट्रान्सफर डे' आणि 1 नोव्हेंबर रोजी 'लिबरेशन डे' देखील साजरा केला जातो. ऑक्टोबर 2006 मध्ये पाँडिचेरीचे नाव 'पुडुचेरी' असे करण्यात आले. हे दोन तमिळ शब्दांनी बनले आहे - 'पुदु' म्हणजे नवीन आणि 'चेरी' म्हणजे गाव. प्राचीन तमिळ साहित्यात या भागाचे नाव 'पुडुचेरी' असेच होते, परंतु फ्रेंच अधिकाऱ्यांना बोलण्यात अडचण येत असल्याने त्यांनी ते बदलून पाँडिचेरी केले. आजही येथे फ्रेंच वसाहतीचे अवशेष अस्तित्वात आहेत. 'व्हाईट टाऊन'मध्ये आजही पिवळ्या भिंती, उंच खिडक्या आणि बोगनवेलियाच्या फुलांनी भरलेल्या बाल्कनींसह फ्रेंच क्वार्टर अस्तित्वात आहेत. गल्ल्यांची नावे आजही 'रुई'ने सुरू होतात, जसे की 'रुई ड्यूमास' किंवा 'रुई रोमां रोलां'. फ्रेंच भाषेत रस्त्यांना 'रुई' म्हणतात. पुदुचेरीमधील कॅफे, रेस्टॉरंट, हॉटेलमध्ये दक्षिण भारतीय इडली-डोसासोबत फ्रेंच डिश क्रॉसों, बॅगेट, क्रेप्स आणि रॅटटौई इत्यादीही मिळतात. फ्रेंच वाईन आजही येथील लोकांची आवड आहे. फ्रेंच वसाहतीच्या काळात येथील पोलीस 'कॅपी' नावाच्या प्रसिद्ध लाल टोप्या घालत असत. आजही ती कायम आहे. तामिळ ही जरी येथील प्राथमिक अधिकृत भाषा असली तरी, इंग्रजी आणि फ्रेंचलाही हा दर्जा मिळाला आहे. येथे राहणारे लोक फ्रेंच, तामिळ, हिंदी आणि इंग्रजी बोलू शकतात. पुदुचेरीमध्ये रुजलेल्या फ्रेंच संस्कृतीमुळे लोक बोलचालीत याला 'मिनी फ्रान्स' असेही म्हणतात. केंद्रशासित प्रदेश आणि तीन राज्यांमध्ये पसरलेले असल्यामुळे, पुडुचेरीचे राजकारण केंद्र सरकारच्या प्रभावाखाली आणि स्थानिक युतीनुसार चालते. येथे 30 विधानसभा जागा आहेत, ज्यासाठी मतदान होते. तर इतर 3 जागांवर केंद्र सरकारचे नामनिर्देशित आमदार असतात. सध्या येथे एन. रंगासामी यांचे सरकार आहे. त्यांच्या AINRC पक्षाची भाजपसोबत युती आहे, म्हणजेच ते NDA मध्ये आहेत. AINRC कडे 10 आणि भाजप कडे 6 जागा आहेत. भाजपजवळ 3 नामनिर्देशित आमदार देखील आहेत, म्हणजेच भाजपजवळ एकूण 9 आमदार आहेत. तर एम.के. स्टालिन यांच्या DMK कडे 6 आणि काँग्रेसकडे 2 जागा आहेत. 6 जागांवर अपक्ष आमदार आहेत. काल, म्हणजेच 9 एप्रिल रोजी पुडुचेरीमध्ये मतदान होणार आहे. एनडीएच्या विरोधात काँग्रेस आणि एमके स्टालिन यांच्या डीएमकेची युती निवडणुकीच्या मैदानात आहे. तरीही, 'एआयएनआरसी-भाजप विरुद्ध काँग्रेस-डीएमके' यांच्यातच लढत होण्याची शक्यता आहे, पण तमिळ अभिनेता विजय यांच्या टीव्हीके पक्षाच्या प्रवेशामुळे समीकरणे बदलू शकतात असे मानले जात आहे.
MPSC Result 2024 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून ४६१ पदांसाठी शिफारसपात्र उमेदवारांची यादी जाहीर; २० संवर्गातील पदांचा समावेश.
Pune Water Cut : अल-निनोच्या प्रभावामुळे यंदा मान्सून कमी राहण्याची शक्यता; ३१ ऑगस्टपर्यंत साठा पुरवण्यासाठी जलसंपदा विभाग अॅक्शन मोडमध्ये.
Pune Crime : विद्या प्रतिष्ठानच्या ऑडिटमध्ये फुटले क्लार्कचे भांडे; बनावट नोंदी करून आर्थिक गैरव्यवहार लपवण्याचा केला होता प्रयत्न.
Sharad Pawar : संधी द्या, महिला सोनं करून दाखवतील! शरद पवारांकडून स्त्री शक्तीचे कौतुक
Sharad Pawar : ११ आणि १२ एप्रिल रोजी दिल्लीत रंगणार महिला शासकीय अधिकाऱ्यांचे पहिले साहित्य संमेलन; संकेतस्थळावर सर्व माहिती उपलब्ध.
अमेरिका आणि इराण यांच्यातील गेले 40 दिवस सुरू असलेल्या लष्करी संघर्षाला युद्धविराम (Donald Trump) मिळाल्यामुळे जगाने काही काळासाठी का होईना सुटकेचा निःश्वास टाकला आहे.
Katraj Kondhwa Road : आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांचे प्रयत्न अपुरे? ३१ मार्चपूर्वी भूसंपादन पूर्ण करण्याच्या आश्वासनाला प्रशासकीय दिरंगाईचा फटका.
PMC News : महापालिकेचा ‘अजब’कारभार! पावसानं दाणादाण उडवल्यानंतर निविदांविनाच सफाई कामांना सुरुवात
PMC News : निविदा प्रक्रियेला फाटा देत १५ क्षेत्रीय कार्यालयांत नाले सफाईला सुरुवात; स्थायी समितीच्या मान्यतेआधीच कामे वाटप केल्याने वाद चिघळणार.
खासगी शाळांपुढे मराठी शाळा वाचवण्याच्या नावाखाली मराठी शाळांना सेमी-इंग्लिश (Semi - English) करण्याचा घाट घातला जात आहे.
Revenue Department : महसूलमधील ४० अधिकाऱ्यांवर कारवाई? दोन ते तीन दिवसांत अंमलबजावणीची शक्यता
Revenue Department : कलम १५५ च्या अधिकाराचा चुकीचा वापर करून क्षेत्र कमी-जास्त केल्याचा ठपका; ४० अधिकाऱ्यांची जिल्ह्याबाहेर बदली होणार.
Leopard News : वर्षभरापासून ‘चकवा’देणारा बिबट्या अखेर जेरबंद; शिरूरमध्ये वनविभागाची मोठी कारवाई
Leopard News : आंबेवाडी परिसरात पशुधनावर हल्ले करणाऱ्या बिबट्याला वनविभागाने धाडसाने पकडले; वर्षभरापासून हुलकावणी देणारा बिबट्या अखेर जाळ्यात.
राघव चढ्ढा (Raghav Chadha) आणि अरविंद केजरीवाल यांच्यातील भांडण किंवा पक्षांतर्गत वाद हा सध्याचा मोठा राजकीय विषय आहे. हा वाद आम आदमी पक्षाच्या अंतर्गत तणावामुळे उफाळून आला आहे की वेगळेच काही कारण आहे?
Ranjangaon MIDC : अपघात दडपण्यासाठी ठेकेदारांची ‘फौज’; रांजणगाव एमआयडीसीतील धक्कादायक वास्तव समोर
Ranjangaon MIDC : टार्गेटच्या नावाखाली जीविताशी खेळ; कामगार संघटनांकडून उच्चस्तरीय चौकशीची मागणी, तीव्र आंदोलनाचा इशारा.
Mulshi News : मुळशी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या बिलांबाबत तक्रारींचा पाढा; अवाजवी शुल्क आकारल्यास कठोर कारवाईचे संकेत.
Bhalgudi Lavhalwadi Fire : मुळशीत आगीचा तांडव! लव्हाळवाडीत एकापाठोपाठ ८ घरे खाक; नेमकं काय घडलं?
Bhalgudi Lavhalwadi Fire : शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागल्याचा प्राथमिक अंदाज; मुळशी आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशामक दलाकडून आग आटोक्यात.
Sugar Industry : साखर विकास निधी (SDF) कर्जावरील ५० टक्के व्याज माफ करण्याची मागणी; ६५ साखर कारखान्यांच्या भवितव्याचा प्रश्न.
Rationing Black Market : केडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाडोत्री गाळ्यातून चालत होता काळाबाजार; १० लाख ६९ हजारांचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात.
Aam Aadmi Party : राज्याच्या कानाकोपऱ्यात युवक आघाडीचे जाळे विणण्याचे आव्हान; सुशिक्षित बेरोजगारांचे प्रश्न मांडण्यासाठी 'आप' अॅक्शन मोडमध्ये.
PCMC News : महापालिकेत ५२ कोटींचा दरोडा? मुख्य वित्त अधिकाऱ्यांवर सभापतींचे गंभीर आरोप
PCMC News : मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांनी प्रशासकीय शिस्त मोडल्याचा सभापती अभिषेक बारणे यांचा आरोप; फौजदारी कारवाईची मागणी.
Garbage Burning : पुणे-मुंबई महामार्गावर ‘धुराचे लोट’; प्रवाशांचा जीव धोक्यात, प्रशासनाचे दुर्लक्ष
Garbage Burning : कामशेतसह महामार्गालगतच्या भागात कचरा आणि प्लास्टिक जाळण्याचे प्रकार वाढले; विषारी धुरामुळे स्थानिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम.
Student Accident : औंध-रावेत बीआरटी रोडवर भीषण अपघात; २० वर्षीय इंजिनिअरिंग विद्यार्थ्याचा मृत्यू
Student Accident : औंध-रावेत बीआरटी रोडवर अज्ञात वाहनाचे थरार; भरधाव धडकेत डेटा सायन्सच्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू, चालक फरार.
Satara Municipal Council : भाजपच्या अंतर्गत समन्वयाचा अभाव उघड; पार्टी मीटिंगला दांडी मारल्याचा परिणाम सभागृहातील गोंधळात दिसला.
Satara Civil Hospital : जिल्ह्याला मंत्रिपदाची ताकद असूनही रुग्णालयात सोयी-सुविधांचा अभाव; टक्केवारीच्या चर्चेने आणि ढिसाळ कारभाराने जनता त्रस्त.
Drugs Seized : गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी लावला सापळा; शेंद्रे-सोनगाव रस्त्यावर थरारक पाठलाग करत आरोपींना घेतलं ताब्यात.
दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार , ०९ एप्रिल २०२६
पंचांगआज मिती चैत्र कृष्ण तृतीया शके १९४८ . चंद्र नक्षत्र विशाखा . योग सिद्धी . चंद्र राशी तूळ. भारतीय सौर १९ चैत्र शके १९४८. गुरुवार दिनांक ९ एप्रिल २०२६. मुंबईचा सूर्योदय ०६.२६ मुंबईचा चंद्रोदय ०९.५९, मुंबईचा सूर्यास्त ०६.५४ मुंबईचा चंद्रास्त ००८.२४ ,राहू काळ ०५.२० ते ०६.५४. ०८ पर्यन्त चांगला दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)
DC vs GT : दिल्लीच्या मैदानावर प्रेक्षकांना श्वास रोखून धरायला लावणारा सामना पाहायला मिळाला, ज्यामध्ये गुजरातने बाजी मारली.
Shubman Gill Record : गुजरात टायटन्स (GT) संघाचा कर्णधार शुबमन गिल याने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध तुफानी फलंदाजी करत एका खास विक्रमाला गवसणी घातली आहे.
पुणे : पुणे जिल्ह्यात आयोजित करण्यात येणाऱ्या ‘पुणे ग्रँड टूर – 2027’ (सीझन 2) या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सायकल स्पर्धेचा शुभारंभ प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने 26 जानेवारी 2027 रोजी होणार असून समारोप 31 जानेवारी रोजी होणार आहे. स्पर्धेची सुरुवात आणि समारोप दोन्ही टप्पे सुट्टीच्या दिवशी ठेवण्यात आले असून यामुळे पुणेकरांना कोणतीही गैरसोय होणार नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.जिल्हाधिकारी कार्यालयात रस्ते, वाहतूक व्यवस्थापन आणि स्पर्धेच्या मार्गनिश्चितीसंदर्भात आयोजित प्राथमिक बैठकीत ते बोलत होते.नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होऊ नये आणि पुणेकरांना स्पर्धेचा आनंद मनमुराद घेता यावा, या उद्देशाने नियोजनात महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार स्पर्धेचा पहिला टप्पा मुळशी प्राधिकरणातील आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर ते हिंजवडी असा निश्चित करण्यात आला आहे.या मार्गामुळे आधुनिक आयटी हब आणि निसर्गरम्य मुळशी परिसर यांचा सुंदर संगम अनुभवता येणार आहे.स्पर्धेचे टप्पे पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहेत –पहिला टप्पा (मुळशी ते हिंजवडी) – दि. 26 जानेवारी 2027 (मंगळवार)दुसरा टप्पा (बारामती ते सासवड) – दि. 27 जानेवारी 2027 (बुधवार)तिसरा टप्पा (जुन्नर ते राजगुरुनगर) – दि. 28 जानेवारी 2027 (गुरुवार)चौथा टप्पा (आळंदी ते लोणावळा/खंडाळा) – दि. 29 जानेवारी 2027 (शुक्रवार)पाचवा टप्पा (लोणावळा/खंडाळा ते हिंजवडी) – दि. 30 जानेवारी 2027 (शनिवार)सहावा व अंतिम टप्पा (पीसीएमसी ते बाळगंधर्व रंगमंदिर) – दि. 31 जानेवारी 2027 (रविवार)या स्पर्धेमुळे पुणे जिल्ह्याच्या ऐतिहासिक, धार्मिक आणि नैसर्गिक वैभवाची झलक एकाच व्यासपीठावर अनुभवायला मिळणार आहे. सिंहगड परिसर, सासवडचा वारसा, जुन्नर-राजगुरुनगरचा ऐतिहासिक पट्टा तसेच लोणावळा-खंडाळ्याचा निसर्गरम्य घाट यामुळे स्पर्धेला विशेष आकर्षण लाभणार आहे.स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर वाहतूक नियोजन, सुरक्षा व्यवस्था, वैद्यकीय सुविधा आणि स्वयंसेवक व्यवस्थापनाबाबत सर्व संबंधित यंत्रणांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांना वाहतूक खोळंबा जाणवू नये यासाठी प्रशासनाकडून आतापासूनच नियोजनबद्ध तयारी सुरू असून त्याचा वेळोवेळी आढावा घेतला जाणार असल्याचेही जिल्हाधिकारी डुडी यांनी स्पष्ट केले.यावर्षी झालेल्या स्पर्धेमुळे पुण्याची ओळख जागतिक स्तरावर अधोरेखित झाली आहे. आगामी ‘पुणे ग्रँड टूर – 2027’ ही स्पर्धा त्यापेक्षाही अधिक भव्य, नियोजनबद्ध आणि यशस्वी करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असून ही स्पर्धा केवळ क्रीडा उपक्रम न राहता पुणे जिल्ह्याच्या पर्यटन, क्रीडा आणि आर्थिक विकासाला चालना देणारा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
Jasprit Bumrah Wicketless : जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाज मानला जाणारा जसप्रीत बुमराह या हंगामात आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करू शकलेला नाही.
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेणार? ‘या’मंत्री आणि आमदारांचा पत्ता होणार कट
Maharashtra Politics : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना डच्चू देण्याचे संकेत दिले आहेत.
War Updates: युद्ध पुन्हा पेटले! 10 मिनिटांत 160 बॉम्ब फेकले; 89 जणांचा मृत्यू, सुमारे 700 जण जखमी
War Updates: इराणच्या लावन बेटावरील तेल शुद्धीकरण प्रकल्पालाही हल्ल्याचा फटका बसला असून तेथे आग लागली आहे. सुदैवाने जीवितहानी झाल्याची माहिती नाही.
Dharavi Koliwada : धारावी कोळीवाड्याच्या सीमा निश्चित करा!
महसूलमंत्री बावनकुळे यांचे आदेश; विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती, तीन महिन्यात अहवाल सादर करणारमुंबई : अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या धारावी कोळीवाड्याच्या ‘बाह्य सीमांकन’चा प्रश्न फडणवीस सरकारने मार्गी लावला असून, या भागाची सीमा निश्चित करण्यासाठी कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी दिले. येत्या तीन महिन्यांत समितीने सविस्तर अहवाल शासनाला सादर करावा, असेही त्यांनी बैठकीत स्पष्ट केले.मंत्रालयातील महसूल मंत्र्यांच्या दालनात आज धारावी कोळीवाड्याच्या विविध प्रश्नांबाबत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला आमदार डॉ. ज्योती गायकवाड आणि महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मंत्री बावनकुळे म्हणाले, विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील या समितीमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त, मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, जमाबंदी आयुक्त अथवा मुंबई विभागीय उपसंचालक, धारावी संबंधित सार्वजनिक प्राधिकरणाचे प्रतिनिधी अधिकारी यांचा समावेश असेल. ही समिती कोळीवाड्याच्या बाह्य सीमांकनाच्या मंजुरीबाबतच्या मागणीचा सर्वंकष विचार करून तसेच धारावी कोळीवाड्यातील प्रतिनिधींशी चर्चा करून येत्या तीन महिन्यात शासनास अहवाल सादर करेल. त्यानंतर शासन पुढील निर्णय घेईल, असे त्यांनी स्पष्ट केले.धारावी कोळीवाडा हा मुंबईतील भूमिपुत्रांचा १२ व्या शतकापासूनचा ऐतिहासिक वारसा असलेला मच्छिमार गाव (कोळीवाडा) आहे. त्यामुळे या भागाला धारावी पुनर्वसन प्रकल्पातून पूर्णपणे वगळून त्याचे स्वतंत्र बाह्य सीमांकन करावे, अशी आग्रही मागणी करण्यात आली.निर्णय काय झाले?- कोळीवाड्यातील विभक्त कुटुंब पद्धतीचा विचार करून रहिवाशांना 'विस्तारित जमीन हक्क' देण्यात यावा. कोळीवाड्याची सध्या दाखवण्यात आलेली हद्द चुकीची असून ती दुरुस्त करावी आणि कोळी समाजाच्या जमिनी प्रकल्पातून वगळून कोळीवाड्याच्या क्षेत्रात समाविष्ट कराव्यात. ग्रामदैवत 'खंडोबा बाबा' मंदिर परिसर, पारंपारिक सण-उत्सव साजरे करण्याची जागा आणि होळी मैदान यांचे अस्तित्व अबाधित राखून त्यांना धार्मिक स्थळांचा दर्जा द्यावा.- माहीमच्या खाडीत मासेमारी करणाऱ्या कोळी बांधवांच्या उदरनिर्वाहासाठी असलेल्या व्यवसायावर गदा येऊ नये, यासाठी 'ग्रीन झोन'मधील आरक्षणे रद्द करावीत. कोळीवाड्याच्या वहिवाटीतील जमिनीचा ताबा खासगी डेव्हलपर्सना देण्यास स्थानिकांनी तीव्र विरोध दर्शवला असून, तो ताबा रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.- महसूल मंत्री बावनकुळे यांनी सर्व मागण्यांकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहत, कोळी बांधवांच्या भावनांचा आणि त्यांच्या न्याय हक्कांचा विचार केला जाईल असे आश्वासन दिले. या परिसरातील सीमांकनाबाबतची तांत्रिक प्रक्रिया गतीने राबवण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.
तेहरान : युद्धविरामाची घोषणा झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच इराणच्या लावन बेटावरील तेल रिफायनरीवर हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. इराणी सरकारी दूरदर्शनच्या हवाल्याने ही बातमी दिली आहे. अहवालानुसार, अग्निशमन दल आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहे. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. मात्र हा हल्ला नेमका कुणाकडून करण्यात आला, याबाबत अद्याप माहिती देण्यात आलेली नाही.वृत्तानुसार, संयुक्त अरब अमिरातीने (यूएई) देखील सांगितले की, इराणकडून येणाऱ्या क्षेपणास्त्रांना प्रत्युत्तर देताना त्यांच्या हवाई संरक्षण प्रणालीने गोळीबार केला. युद्धविराम लागू असतानाही इराणने कुवैतमध्ये ड्रोन हल्ला केल्याची माहिती आहे. या हल्ल्यात तेल आणि वीज क्षेत्राशी संबंधित महत्त्वाच्या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले.कुवैतच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते कर्नल सऊद अब्दुलअजीज अल-ओतैबी यांनी सांगितले की, पहाटे पाच वाजल्यानंतर इराणचे 28 ड्रोन पाडण्यात आले. त्यांनी हा हल्ला शत्रूकडून करण्यात आलेला मोठा आणि भीतीदायक हल्ला असल्याचे म्हटले. मोठ्या संख्येने ड्रोन पाठवण्यात आले होते, मात्र हवाई संरक्षण यंत्रणेने त्यांना रोखले. काही ड्रोन देशाच्या दक्षिण भागातील तेल प्रकल्प आणि वीज निर्मिती केंद्रांच्या दिशेने जात होते, असा दावा त्यांनी केला. या हल्ल्यांमुळे तेल संरचना, वीज केंद्रे आणि पाणी प्रकल्पांचे मोठे नुकसान झाले आहे.दरम्यान, अमेरिका आणि इराण यांच्यात मंगळवार-बुधवारच्या मध्यरात्री दोन आठवड्यांच्या तात्पुरत्या युद्धविरामावर सहमती झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सतत इराणला कठोर इशारे देत असतानाच हा करार झाला. तीन दिवसांपूर्वी ट्रम्प यांनी कठोर शब्दांत इशारा देत म्हटले होते की, जर तेहरानने होर्मुज सामुद्रधुनी खुली केली नाही आणि अमेरिकेसोबत करार केला नाही, तर त्याचे गंभीर परिणाम होतील.ट्रम्प यांनी इशारा देताना सांगितले होते की, 7 एप्रिल रात्री 8 वाजेपर्यंत (भारतीय वेळेनुसार 8 एप्रिल सकाळी 5.30 वाजता) युद्ध सुरू होऊ शकते आणि अशा परिस्थितीत अमेरिका इराणमधील ऊर्जा प्रकल्प (पॉवर प्लांट्स) आणि पूल यांना लक्ष्य करेल.
मुंबई : क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची २०० वी जयंती व महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने राज्यभर कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी दिली.दिनांक ११ एप्रिल रोजी क्रांतीसूर्य महात्मा फुले यांची २०० वी जयंती तर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १४ एप्रिल रोजी १३५ वी जयंती देशभर साजरी केली जाणार आहे. त्यामुळेच समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाच्या मुल्यांवर उभ्या असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस या महामानवांचे कार्य व विचार घेऊन काम करत आहे. म्हणून पक्षाच्यावतीने राज्यभर संघटनात्मक पातळीवर प्रभावीपणे जयंती साजरी केली जाणार आहे.प्रत्येक जिल्ह्यात पक्षाचे जिल्हाध्यक्ष महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक आहे त्याठिकाणी अभिवादन कार्यक्रम आयोजित करतील तर पक्षाच्या कार्यालयात दिनांक ११ एप्रिल रोजी महात्मा फुले यांना अभिवादन करण्यात येईल तर १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा, तालुका, शहर व गाव स्तरावर अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात येतील.महामानवांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या विचारांना उजाळा देण्यासाठी व्याख्यान, परिसंवाद, किंवा विचारमंथन कार्यक्रम आयोजित करण्यात यणार आहेत असेही सुनिल तटकरे यांनी सांगितले.
BCCI New Rules : मैदानावरील शिस्त अधिक कडक करण्यासाठी बीसीसीआयने 'बेंच'वर बसणाऱ्या खेळाडूंसाठी नवे नियम लागू केले आहेत.
Crude Oil Price Crash: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण; पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार का?
Crude Oil Price Crash: कच्च्या तेलाच्या किमतीत घट झाल्याने भविष्यात पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता आहे. मात्र, यावर सरकारी कर, रुपयाचा डॉलरसमोरील दर आणि तेल कंपन्यांची किंमत धोरणे यांचा मोठा प्रभाव असतो. त्यामुळे लगेच दरकपात होईलच, असे निश्चितपणे सांगता येत नाही.
Politics News : राजकारणात मोठी उलथापालथ; मुख्यमंत्री राजीनामा देणार, नवे सरकार स्थापन होणार
Politics News : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार लवकरच राजीनामा देऊन केंद्रात जाणार आहेत. १० एप्रिलला ते राज्यसभेची शपथ घेणार असून १५ एप्रिलपर्यंत नव्या सरकारचा शपथविधी होण्याची शक्यता आहे.
Jos Buttler Record : जोस बटलरने रचला इतिहास! टी-२० क्रिकेटमध्ये प्रस्थापित केला षटकारांचा नवा विक्रम
Jos Buttler Record : गुजरात टायटन्सने दिल्ली कॅपिटल्ससमोर २११ धावांचे लक्ष्य ठेवले. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना गुजरातने २० षटकांत चार गडी गमावून २१० धावा केल्या.
US-Israel-Iran War : भारताकडून युद्धविरामाचे स्वागत.! परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केली भूमिका
या युद्धविरामाचे भारताने स्वागत करत पश्चिम आशियामध्ये शाश्वत शांतता सुनिश्चित करण्यासाठी तणाव कमी करणे, संवाद आणि मुत्सद्देगिरी यांचा अवलंब करण्याचे आवाहन केले.
Electricity Board :
Baramati Election : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतून ‘या’ 6 जणांची माघार
राज्यातील विधानसभा निवडणुकांपेक्षा सध्या बारामती (Baramati Election) आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुका अधिक चर्चेत आहेत.
मुंबई : आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनात 'अध्यात्म' हा शब्द ऐकला की, अनेकांना वाटते की यासाठी घरदार सोडून हिमालयात जावे लागेल किंवा तासनतास कठीण तपश्चर्या करावी लागेल. मात्र, सुप्रसिद्ध आध्यात्मिक गुरु आणि प्रेरणादायी वक्ते गौर गोपाल दास यांनी हा समज मोडीत काढला आहे. अध्यात्म म्हणजे जगापासून दूर पळणे नसून, जीवनातील प्रत्येक क्षणात अधिक जागरूकतेने उपस्थित राहणे होय, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. आपल्या व्यस्त जीवनशैलीत कोणताही मोठा बदल न करता, लहान आणि सातत्यपूर्ण सवयींच्या माध्यमातून आपण आध्यात्मिक होऊ शकतो, असे सांगत त्यांनी ५ सोपे मार्ग सुचवले आहेत.https://prahaar.in/2026/03/21/the-king-of-konkan-injured/दैनंदिन जीवनात अध्यात्म रुजवण्याचे ५ प्रभावी मार्ग
Mockdrill In Navi Mumbai : नवी मुंबईत नागरी संरक्षण दलाचा भव्य 'मॉकड्रिल'सराव
नवी मुंबई : आपत्ती काळात नागरिकांचे संरक्षण आणि विविध यंत्रणांमधील समन्वय तपासण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागांतर्गत येणाऱ्या 'नागरी संरक्षण दल' (Civil Defence) वतीने नवी मुंबईत एका विशेष 'मॉकड्रिल'चे (प्रात्यक्षिक सराव) आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी नागरी संरक्षण दलाला नवी मुंबई महानगरपालिकेचे सहकार्य लाभणार आहे. हे प्रात्यक्षिक गुरुवार, ९ एप्रिल २०२६ रोजी आयोजित करण्यात आले आहे. कोपरखैरणे येथील सेक्टर-११, बोनकोडे गाव येथील 'माजी सरपंच स्व. गणपतशेठ फकीरजी नाईक मैदान' येथे हा प्रात्यक्षिक सराव संपन्न होणार असून दुपारी २:०० ते ५:०० (दोन ते पाच) या वेळेत हे मॉकड्रिल पार पडणार आहे. या सरावामध्ये केवळ नागरी संरक्षण दलच नाही, तर विविध शासकीय विभागांचा सक्रिय सहभाग असणार आहे. यामध्ये विविध शासकीय कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी, होमगार्ड्स आणि स्वयंसेवक, T.D.R.F. (ठाणे आपत्ती प्रतिसाद दल) आणि N.D.R.F. (राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल), पोलीस प्रशासन, प्रसारमाध्यमे याशिवाय परिसरातील मान्यवर देखील या मोहिमेचे साक्षीदार होण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. या मॉकड्रिलसाठी साधारणपणे २०० ते ३०० स्वयंसेवक आणि जवानांची उपस्थिती अपेक्षित आहे. केंद्र आणि राज्य सरकारद्वारे आयोजित हा एक राष्ट्रीय उपक्रम आहे. आपत्कालीन परिस्थितीत विविध यंत्रणा कशा प्रकारे धावून येतात, नागरिकांना सुरक्षित स्थळी कसे हलवले जाते आणि तातडीने मदत कार्य कसे राबवले जाते, याचा थेट सराव या निमित्ताने केला जाणार आहे. यामुळे स्थानिक प्रशासनाची सज्जता तपासण्यास मदत होणार आहे. बोनकोडे आणि कोपरखैरणे परिसरातील नागरिकांनी या सरावामुळे गोंधळून न जाता प्रशासनाला सहकार्य करावे, तसेच या राष्ट्रीय उपक्रमाच्या यशस्वीततेसाठी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने मैदानावर उपस्थित राहावे, असे आवाहन उपनियंत्रक, नागरी संरक्षण (नवी मुंबई समूह) विजय ब. जाधव यांनी केले आहे.
Israel US Iran War: इराणने होर्मुझमध्ये तेल टँकर रोखला; इस्रायलला दिली थेट धमकी, युद्धबंदी धोक्यात?
Israel US Iran War: दरम्यान, एकीकडे शांततेसाठी कूटनीतिक प्रयत्न सुरू असताना, दुसरीकडे प्रत्यक्षातील लष्करी कारवाया आणि 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मधील इराणची आक्रमकता यामुळे हे युद्ध पुन्हा एकदा भडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शिवसेनेचे संघटनात्मक बळकटीकरण व सक्षमीकरण पर्व सुरू
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या संघटनबांधणीचा नवा टप्पा आकार घेत आहे. शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे कर्तबगार उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे साहेब आणि उच्चविद्याविभुषित तसेच तीन टर्म लोकसभा निवडणूकीत प्रचंड मताधिक्याने जनतेने जिंकवून दिलेले युवा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने महाराष्ट्र राज्यात घराघरात व शेवटचा घटक असलेल्या तळागाळापर्यंत पोहोचण्याचा निर्धार केला आहे. विशेषतः Mumbai Metropolitan Region (एमएमआर) हा या रणनीतीचा केंद्रबिंदू ठरत आहे.मुंबई व एमएमआर रीजन हा केवळ आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा भाग नसून, तो सामाजिक आणि भाषिक विविधतेने नटलेला प्रदेश आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली अशा शहरांमध्ये मराठीसोबत हिंदी, गुजराती, उर्दू, दक्षिण भारतीय भाषिक आणि इतर अनेक समाजघटक मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहेत. या बहुभाषिक मतदारसंघात प्रभावी संवाद साधणे हे कोणत्याही पक्षासाठी मोठे आव्हान असते. शिवसेनेने याच वास्तवाचा स्वीकार करून बहुभाषिक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी नव्या पद्धतींचा अवलंब सुरू केला आहे.या पार्श्वभूमीवर डॉ. श्रीकांत शिंदे यांचे कल्पक राजकिय संघटनकौशल्य विशेष अधोरेखित होते. युवा नेतृत्व म्हणून त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, कार्यकर्त्यांशी थेट संवाद, तसेच विविध समाजघटकांशी सुसंवाद साधण्याची शैली विकसित केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली बूथ लेव्हलवर सर्व समाजघटकांना सोबत घेऊन संघटना उभारण्यावर दिला जाणारा भर हा केवळ पारंपरिक राजकारणाचा भाग नसून, अत्याधुनिक पद्धतीचे डेटा-आधारित आणि नियोजनबद्ध दृष्टिकोनाचे उदाहरण आहे. मतदारयादीचे पुनर्निरीक्षण तसेच प्रत्येक घरापर्यंत महिला सेना, युवा सेना तसेच विविध अंगीकृत व संलग्न संघटना यांच्या सांघिक कार्यपद्धतीने ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह पोहोचवणे आणि स्थानिक नागरी व सामाजिक प्रश्नांवर तत्पर प्रतिसाद देणे—या सर्व गोष्टींमुळे पक्षाची पकड अधिक मजबूत होताना दिसून यायला लागलीय.याचबरोबर “जे काम करतील तेच टिकतील” हा संदेश सुद्धा पक्ष संघटनेत स्पष्टपणे दिला जात आहे. वेळ पडल्यास कामचुकारांना डच्चू देण्याची भूमिका ही संघटनेत शिस्त आणि कार्यक्षमतेला चालना देणारी असेल असेही समजते. या प्रक्रियेमुळे निष्ठावान आणि सक्रिय कार्यकर्त्यांना संधी मिळेल, तर निष्क्रियतेचे प्रमाण आपोआप कमी होईल असे दिसतेय.एमएमआरसारख्या गतिमान आणि स्पर्धात्मक क्षेत्रात केवळ संघटनबांधणी पुरेशी नसते; तर विकासकामांची प्रभावी मांडणीही तितकीच महत्त्वाची असते. नागरी विकास, पायाभूत सुविधा, तसेच लोककल्याणकारी योजनांद्वारे करण्यात आलेल्या कामांचा ठसा जनतेच्या मनावर ठोसपणे उमटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. या माध्यमातून शिवसेना पक्ष केवळ राजकीय नव्हे, तर सर्वसमावेशी विकासाभिमुख पर्याय म्हणून स्वतःची ओळख मजबूत करण्याच्या प्रयत्नात आहे.देशातील व राज्यातील २०२९ ला होणा-या आगामी सार्वत्रिक निवडणुका आणि संभाव्य मतदारसंघ पुनर्रचनेच्या पार्श्वभूमीवर ही संपूर्ण रणनीती अत्यंत महत्त्वाची ठरतेच परंतु सूक्ष्म पातळीवरील नियोजन, बहुभाषिक मतदारांशी संवाद, सक्षम युवा नेतृत्व आणि ठोस विकासकामांची जोड या सर्व घटकांच्या आधारे शिवसेना एमएमआरमध्ये आपली ताकद अधिक भक्कम करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे हे वास्तविक रूपात दिसून येत आहे.एकूणच, मजबूत संघटना, बहुविध समाजघटकांशी सुसंवाद आणि कार्यक्षम नेतृत्व या त्रिसूत्रीवर उभा असलेला हा प्रयत्न यशस्वी ठरताना, जनतेचा विश्वास आणि मतदारांचा पाठिंबा निश्चितच अधिक दृढ होईल यात शंका येण्याचे कारण नाही. आगामी काळात या रणनीतीची खरी परीक्षा लागणार असली, तरी सध्या तरी पक्षाने सक्रिय कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण करत योग्य दिशेने पाऊल टाकल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे.
Deputy Collectors : राज्यातील ५१ तहसीलदार होणार उपजिल्हाधिकारी
महसूल विभागात हालचाली; 'एमपीएससी'ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संधी हुकणार?मुंबई : राज्याच्या महसूल विभागात तहसीलदार संवर्गातील अधिकाऱ्यांना थेट उपजिल्हाधिकारी पदी पदोन्नती देण्याच्या हालचालींना वेग आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी १०८ तहसीलदारांना पदोन्नती दिल्यानंतर, आता पुन्हा ५१ तहसीलदारांची उपजिल्हाधिकारी पदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. मात्र, या मोठ्या प्रमाणावरील पदोन्नतीमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) माध्यमातून थेट उपजिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून, त्यांच्या संधीवर गदा येण्याची भीती व्यक्त होत आहे.तहसीलदार संवर्गातील ५१ अधिकाऱ्यांची पदोन्नतीने नियुक्ती करण्याचा प्रस्ताव महसूल विभागाने अंतिम टप्प्यात आणला आहे. लवकरच हा प्रस्ताव मुख्यमंत्री कार्यालयाच्या मान्यतेसाठी पाठवला जाणार आहे. राज्यात उपजिल्हाधिकारी संवर्गातील एकूण ६०० पदे मंजूर आहेत. सेवा प्रवेश नियमांनुसार, यातील ३०० पदे ही 'एमपीएससी'मार्फत थेट भरतीद्वारे, तर उर्वरित ३०० पदे पदोन्नतीने भरली जाणे बंधनकारक आहे. हा ५०-५० टक्क्यांचा समतोल राखणे आवश्यक असताना, प्रत्यक्षात पदोन्नतीचा कोटा पूर्ण भरलेला असतानाही नवीन नियुक्त्या केल्या जात असल्याची ओरड विद्यार्थ्यांकडून होत आहे. जर ही पदे पदोन्नतीनेच भरली गेली, तर आगामी काळात 'एमपीएससी'कडे या पदांची मागणीच केली जाणार नाही, ज्यामुळे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांच्या जागा कमी होण्याचा धोका निर्माण झाला आहे.विद्यार्थ्यांचा वाढता विरोध- राज्यात स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक आधीच विस्कळीत असल्याने विद्यार्थी हवालदिल आहेत. त्यातच महसूल विभागाने यापूर्वी १०८ जणांना दिलेल्या पदोन्नतीवर विद्यार्थ्यांनी तीव्र आक्षेप नोंदवला होता. आता पुन्हा ५१ पदांची प्रक्रिया राबवली जात असल्याने 'एमपीएससी'च्या माध्यमातून होणाऱ्या थेट पदभरतीवर संक्रांत येईल, अशी भावना उमेदवारांमध्ये आहे.- महसूल विभागाच्या या प्रस्तावामुळे प्रशासकीय स्तरावर हालचाली सुरू असल्या, तरी विद्यार्थ्यांचा विरोध पाहता मुख्यमंत्री कार्यालय यावर काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उपजिल्हाधिकारी पदाचा कोटा शिल्लक नसतानाही ही प्रक्रिया राबविली जात असल्याची चर्चा सध्या महसूल वर्तुळात रंगली आहे.
नाशिक : मंदिरांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना उघडकीस आली आहे. एका प्रसिद्ध बहुराष्ट्रीय कंपनीत (MNC) काम करणाऱ्या तरुणींना अत्यंत भयानक अनुभवांना सामोरे जावे लागल्याचे समोर आले आहे. आर्थिक अडचणीत असलेल्या आणि नोकरीची नितांत गरज असलेल्या गरजू महिलांचा गैरफायदा घेत, त्यांच्यावर केवळ लैंगिक अत्याचारच करण्यात आले नाहीत, तर त्यांच्या धार्मिक भावनांनाही जाणीवपूर्वक ठेच पोहचवण्यात आली आहे. या संतापजनक प्रकारामुळे शहरात तीव्र संताप व्यक्त होत असून, पीडित महिलांना देण्यात आलेल्या या 'नरकयातनां'ची तक्रार प्राप्त होताच प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यासाठी प्रशासनाने आता पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. एका नामांकित कंपनीच्या आवारात घडलेल्या या प्रकारामुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.धर्मांतराचा दबाव आणि अघोरी छळयेथील एका नामांकित कंपनीत गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेल्या महिलांच्या शोषणाचे धक्कादायक वास्तव आता समोर आले आहे. प्रामुख्याने १८ ते २५ वयोगटातील तरुण आणि गरजू महिलांना लक्ष करून त्यांचे मानसिक व शारीरिक खच्चीकरण केले जात असल्याचे उघड झाले आहे. आर्थिक ओढग्रस्ततेमुळे नोकरीची गरज असलेल्या या तरुणींचा फायदा घेत, २०२२ पासून हा अमानवीय प्रकार सुरू असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. केवळ कामाच्या ठिकाणचे शोषणच नव्हे, तर या तरुणींवर विशिष्ट धार्मिक कृत्ये करण्यासाठी सक्ती केली जात होती. यामध्ये नमाज पठणाची सक्ती, धर्मांतरासाठी दबाव आणणे आणि इतकेच नव्हे तर आहारविषयक धार्मिक भावना पायदळी तुडवत 'बीफ' खाण्यास भाग पाडणे अशा संतापजनक प्रकारांचा समावेश आहे. सुरक्षित वातावरणाऐवजी नरकयातना देणाऱ्या या कंपनी प्रशासनाविरोधात आता संतापाची लाट उसळली असून, या 'धार्मिक आणि शारीरिक' छळाची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे.https://prahaar.in/2026/04/08/eknath-shinde-elections-are-over-now-focus-on-party-expansion-deputy-chief-minister-eknath-shinde-directs-state-liaison-chiefs/सहा नराधमांना बेड्या, नऊ गुन्हे दाखल...या धक्कादायक घटनेत आतापर्यंत नऊ स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिसांनी सहा मुख्य आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. यामध्ये मुंबई नाका पोलीस ठाण्यात विनयभंग, धार्मिक भावना दुखावणे आणि अत्याचाराचे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत, तर देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणात आसिफ अन्सारी, शफी शेख, शाहरुख कुरेशी, रजा मेमन आणि तौसिफ अत्तार या पाच पुरुष आरोपींसह एका साथिदाराला अटक केली आहे. या टोळीतील एक महिला आरोपी सध्या पोलिसांना गुंगारा देत असून तिचा शोध सुरू आहे. अटक केलेल्या सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता, त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या कारवाईमुळे पीडित महिलांना न्याय मिळण्याच्या आशा पल्लवीत झाल्या असून, पोलीस या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाण्यासाठी कसून तपास करत आहेत.तपासासाठी 'SIT' तैनातप्रसिद्ध बहुराष्ट्रीय कंपनीतील अमानवीय छळ आणि धार्मिक शोषणाचे गांभीर्य लक्षात घेऊन नाशिक पोलिसांनी आता 'विशेष तपास पथकाची' (SIT) स्थापना केली आहे. सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली हे पथक या प्रकरणाच्या मुळाशी जाणार आहे. तपासादरम्यान केवळ महिलाच नाही, तर एका पुरुष कर्मचाऱ्यालाही जबरदस्तीने धर्मांतर करण्यास भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाल्याने या रॅकेटची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या घटनेचे पडसाद उमटल्यानंतर प्रशासनाने शहरातील सर्व खासगी कंपन्यांना कडक निर्देश दिले आहेत. प्रत्येक कंपनीत 'अंतर्गत तक्रार निवारण समिती' तात्काळ सक्रिय करणे अनिवार्य करण्यात आले आहे. दरम्यान, पोलीस प्रशासनाने पीडित महिलांना न घाबरता पुढे येण्याचे आवाहन केले आहे. तक्रारदाराची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल, अशी ग्वाही स्वतः पोलीस आयुक्तांनी दिली आहे. कोणत्याही पीडित महिलेला तक्रार करायची असल्यास त्यांनी पोलीस आयुक्तांच्या व्हॉट्सॲप क्रमांकावर किंवा 112 या कंट्रोल रूम क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. पोलीस आयुक्तांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घातले असून, पीडित महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस दल कटीबद्ध असल्याचे सांगितले आहे.
Raigad News : रायगड जिल्ह्यात नियम पूर्तता करणाऱ्या दगडखाणींना उत्खननाची परवानगी: महसूल मंत्री
मुंबई : आवश्यक सर्व कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या खाणींना सरसकट बंदी न घालता उत्खननासाठी परवानगी द्यावी, मात्र कोणत्याही परिस्थितीत अवैध उत्खनन होणार नाही याची काटेकोर खबरदारी घ्यावी, असे स्पष्ट निर्देश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिले.रायगड जिल्ह्यातील गौण खनिज उत्खनन अंतर्गत मौजे श्रीवर्धन मतदारसंघातील दगडखाणींसंदर्भात महसूलमंत्री दालनात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, रायगडचे जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते.खाण मालकांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता, ज्यांनी पर्यावरणीय परवानगीसाठी अर्ज केला आहे, त्यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. अशा खाण मालकांकडून 'पुढील तीन महिन्यांच्या आत ही परवानगी मिळवू' असे प्रतिज्ञापत्र लिहून घेऊन त्यांना तात्पुरती उत्खनन परवानगी देण्याचे निर्देश मंत्र्यांनी दिले. तसेच शासनस्तरावर पर्यावरणीय परवानग्यांची प्रक्रिया अधिक वेगवान करण्याचे आदेशही त्यांनी दिले.उत्खननाला परवानगी देतानाच महसूल मंत्र्यांनी प्रशासनाला अवैध प्रकारांबाबत सतर्क राहण्याचा इशारा दिला. जेवढा परवाना दिला आहे, तेवढ्याच मर्यादेत उत्खनन होत आहे का, याची काटेकोर पडताळणी करावी. कोणत्याही परिस्थितीत अवैध उत्खनन होणार नाही, याची खबरदारी जिल्हा प्रशासनाने घ्यावी, असे मंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
GI Tag White Onion Production : जीआय टॅग मिळूनही अडचण; पांढऱ्या कांद्याच्या उत्पादनात मोठी घट
रायगड : बदलत्या हवामानाचा मोठा फटका यंदा अलिबाग तालुक्यातील पांढरा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. यावर्षी कांद्याच्या उत्पादनात सुमारे २५ टक्क्यांनी घट झाल्याची माहिती समोर आली असून, बाजारात तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी, कांदा उत्पादक शेतकरी गंभीर आर्थिक अडचणीत सापडल्याचे चित्र दिसत आहे.अलिबाग तालुक्यातील कार्ले, खंडाळे आणि परिसरातील भागातील पांढरा कांदा हा चविष्ट व औषधी गुणधर्मांनी समृद्ध म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या कांद्याला मुंबई, पुण्यासह राज्यातील तसेच देश-विदेशातून मोठ्या प्रमाणावर मागणी असते. नेहुली, खंडाळे, कार्ले, मुळे, वाडगाव, तळवली या गावांमध्ये प्रामुख्याने या कांद्याची लागवड केली जाते.दोन वर्षांपूर्वी अलिबागच्या पांढऱ्या कांद्याला भौगोलिक मानांकन (जीआय टॅग) मिळाल्यानंतर शेतकऱ्यांचा उत्साह वाढला होता. त्यामुळे यंदा २२१ हेक्टरवरून तब्बल ३१६ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली. मात्र, पावसाचे आगमन उशिरा झाल्याने लागवडीवर विपरीत परिणाम झाला. त्यातून सावरण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी केला असला तरी बदलत्या हवामानाचा परिणाम पिकावर झाला.गतवर्षीच्या तुलनेत यंदा कांदा उशिरा तयार झाला आणि उत्पादनातही लक्षणीय घट झाली. सुमारे २५ टक्के उत्पादन घटल्याने बाजारात कांद्याचा तुटवडा जाणवू लागला आहे. सध्या बाजारात काही ठिकाणी २०० रुपये, तर काही ठिकाणी २५० ते ३०० रुपये प्रतिमाळ दराने कांद्याची विक्री होत आहे. मागणी जास्त आणि पुरवठा कमी अशी परिस्थिती निर्माण झाली असून, आकारानुसार दर ठरवले जात आहेत. सध्याची परिस्थिती कायम राहिल्यास पुढील महिन्यात पांढरा कांदा बाजारात उपलब्ध होणे कठीण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे दरात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.यंदा अलिबागच्या पांढऱ्या कांद्याला दुबईसह आखाती देशांतून मोठी मागणी आली होती. दोन टनांहून अधिक कांद्याची मागणी नोंदवली गेली होती. मात्र, आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे ही मागणी अचानक रद्द करण्यात आली. त्यामुळे निर्यातीवर परिणाम झाला असून, शेतकऱ्यांना अपेक्षित बाजारपेठ गमवावी लागल्याची माहिती कांदा उत्पादकांनी दिली आहे.
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंची बदली रद्द करा; दिव्यांग बांधवांनी काढला धडक मोर्चा
नुकतेच दिव्यांग कल्याण विभागाच्या सचिव पदावरुन बदली करण्यात आलेले सनदी अधिकारी तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांची बदली रद्द करण्याच्या मागणीसाठी दिव्यांग बांधवांनी नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन सूरू केले.
Vaibhav Suryavanshi Crying : १५ वर्षीय वंडरबॉय वैभव सूर्यवंशीने आपल्या स्फोटक फलंदाजीने चाहत्यांची मने तर जिंकलीच, पण त्यानंतर तो भावुक झाला.
Leopard Captured: वनविभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. बिबट्या दिसल्यास तात्काळ वनविभागाला कळवावे, तसेच आवश्यक त्या ठिकाणी पिंजरे लावून कारवाई सुरू ठेवली जाईल, असे सहायक वनसंरक्षक स्मिता राजहंस यांनी सांगितले.
Fire News: मुळशीतील भालगुडी-लव्हाळवाडीत भीषण आग; आठ घरे जळून खाक
Fire News: शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आग वेगाने पसरल्याने काही वेळातच अनेक घरे आगीच्या भक्ष्यस्थानी गेली.
Maharashtra Politics : मोठी बातमी..! अखेर भाजपनं डाव टाकलाच; अजित पवारांचा विश्वासू शिलेदार फोडला
Maharashtra Politics : महाराष्ट्र सरकारने 'मुख्यमंत्री फेलोशिप २०२६' सुरू केली आहे. २१ ते २६ वयोगटातील पदवीधर तरुणांना प्रशासनाचा अनुभव घेण्याची ही सुवर्णसंधी आहे.
निष्कासित जागांवर विधायक उपक्रम, नागरिकांसाठी उभारणार अत्याधुनिक 'विज्ञानपार्क'मुंबई : मुंबई उपनगरचे सह पालकमंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे मानखुर्द येथील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथे सरकारी जमिनीवर असलेल्या अनधिकृत तब्बल बाराशे झोपड्यांवर पालिकेचा हातोडा पडला आहे. या निष्कासित जागेवर आता नागरिकांसाठी 'विज्ञान पार्क ' उभारण्यात येणार आहे. मुंबईला अनधिकृत बांधकामांचा विळखा पडला असून त्यातून देशाची आर्थिक राजधानी मुंबईच्या सुरक्षेला धोका निर्माण होत असल्याने पडताळणी करून सरकारी जमिनी ताब्यात घेतल्या पाहिजेत, असे उपनगरचे सह पालकमंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांनी म्हटले आहे.मानखुर्द येथील शासकीय जमिनीवरील अनधिकृत अतिक्रमणाबाबत, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या मार्गदर्शनाखाली अनधिकृत बांधकामाचे निष्कासन करण्यात आले. पोलिस उपायुक्त श्री. समीर शेख ,अपर जिल्हाधिकारी (अति/निष्का) पूर्व उपनगरे श्री. पद्माकर रोकडे यांच्यासह पूर्व उपनगरातील अतिक्रमण निष्कासन विभाग तसेच सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ अधिकऱ्यांसह ४०० कर्मचाऱ्यांच्या पथकाने या धडक कारवाईत सहभाग घेतला. या मोहिमेव्दारे आतापर्यंत 1200 हून अधिक झोपड्यांचे निष्कासन करण्यात आले असून, 11 एकर शासकीय जमीन मोकळी करण्यात आली आहे. मोकळ्या केलेल्या जागेवर परत अतिक्रमण होऊ नये या करिता संरक्षक भिंत बांधण्यात येत असून, अतिक्रमण होणार नाही याबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत.मुंबई महापालिकेच्या उपनगर अनधिकृत बांधकाम निष्कासन विभागाने केलेल्या कारवाई बाबत मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांनी समाधान व्यक्त केले आहे. राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी मुंबईला अधिक सुरक्षित, सुविधाजनक आणि सुंदर करण्याचा संकल्प केला आहे. या अनुषंगाने सह पालकमंत्री या नात्याने कब्जा केलेल्या सरकारी जमिनी पुन्हा मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे मंत्री लोढा यांनी यावेळी सांगितले.मुंबई परिसरात गेल्या काही वर्षांपासून भूमाफियांनी सरकारी जमिनींवर अनधिकृत बांधकामे करून मोकळ्या जागा हडप करण्याचा उद्योग सुरु केला असल्याचे शासनाच्या निदर्शनाला आले आहे. त्यातूनच अनेकदा बांगलादेशी आणि रोहिंग्यांना ही स्थानिक नेत्यांच्या मदतीने संरक्षण मिळत असल्याचे चित्र आहे. अशा परिसरात मोठ्या प्रमाणात अमलीपदार्थांचा गोरखधंदा तसेच समाजविघातक कृत्याला खतपाणी मिळत असते. मालाड आणि मालवणी परिसरातही सरकारी जमिनीवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे निदर्शनाला आली असून तिथे ही अनधिकृत बांधकामाच्या विरोधात कडक कारवाई सुरु असल्याची माहिती मंत्री लोढा यांनी दिली.अतिक्रमण मुक्त ५०० एकर जमिनीवर विधायक उपक्रम राबवणारमुंबई आणि उपनगर मिळून हजारो एकर सरकारी जमिनीवर अनधिकृत बांधकामे असल्याचे शासनाच्या निदर्शनाला आले आहे. या सर्व जमिनींवरील अनधिकृत बांधकामावर कारवाई करून पुन्हा त्या जमिनी सरकारच्या ताब्यात आणण्याची कार्यवाही सुरु आहे. त्यापैकी निवडक अतिक्रमण मुक्त ५०० एकर जमिनीवर मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनात विधायक उपक्रम राबवणार आहोत. मानखुर्द येथील सध्या अतिक्रमण मुक्त करण्यात आलेल्या जमिनीवर नागरिकांसाठी सेवाभावी संस्थांच्या मदतीने अत्याधुनिक 'विज्ञान पार्क' उभारणार असल्याचेही मंत्री लोढा यांनी स्पष्ट केले. दरम्यान, मुंबईच्या सुरक्षेच्या दृष्टीने मुंबई उपनगरातील अनधिकृत बांधकामाच्या विरोधातील कारवाई अधिक कडक करण्यात येत असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
Varsha Gaikwad : वरळीतील भूखंड वाटपात घोटाळा; वर्षा गायकवाड यांचा आरोप
मुंबई महानगरपालिकेने वरळी परिसरातील एक अत्यंत मोक्याचा भूखंड एका मर्जीतील विकसकाला पंचतारांकित हॉटेल उभारण्यासाठी कवडीमोल दरात देण्याचा प्रस्ताव मांडला आहे, असा आरोप मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी केला.
Zareen Khan Mother Parveen Khan Death: या दुःखद घटनेनंतर सोशल मीडियावर चाहत्यांकडून आणि चित्रपटसृष्टीतील व्यक्तींनी झरीन खानसाठी संवेदना व्यक्त केल्या असून, या कठीण काळात तिला धैर्य मिळावे अशी प्रार्थना करण्यात येत आहे.

28 C