वर्ल्डकपमध्ये संजू सॅमसनचे दमदार पदार्पण
नवी दिल्ली : अरुण जेटली स्टेडियममध्ये सुरू असलेल्या नामिबिया विरुद्धच्या सामन्यात भारताने दमदार सुरुवात केली आहे. आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकप स्पर्धेतील १८ व्या साखळी सामन्यात नामिबियाने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय खेळाडू प्रथम फलंदाजीसाठी मैदानात आले. अभिषेक शर्मा रुग्णालयात असल्यामुळे ईशान किशन आणि संजू सॅमसन ही जोडी सलामीला आली. संजू सॅमसनने वर्ल्डकपमध्ये दमदार पदार्पण केले. त्याने आठ चेंडूत तीन षटकार आणि एक चौकार मारत २७५ च्या स्ट्राईक रेटने २२ धावा केल्या. संजूचा हा झंझावत बेन शिकोंगोच्या चेंडूवर लॉरेन स्टीनकॅम्पने कॅच पकडल्यामुळे थांबला.ईशान किशनने २४ चेंडूत पाच षटकार आणि सहा चौकार मारत २५४.१७ च्या स्ट्राईक रेटने ६१ धावांची वेगवान खेळी केली. गेरहार्ड इरास्मसच्या चेंडूवर बेन शिकोंगोने त्याचा कॅच पकडला. तिलक वर्मा २१ चेंडूत ३ चौकार मारत ११९.०५ च्या स्ट्राईक रेटने २५ धावा केल्यानंतर गेरहार्ड इरास्मसच्या चेंडूवर स्मिट बोल्डकडे कॅच देऊन परतला. कर्णधार सूर्यकुमार यादव (९२.३१ स्ट्राईक रेट) १३ चेंडूत १२ धावा करून बर्नार्ड स्कोल्झच्या चेंडूवर झेन ग्रीनने यष्टीचीत केल्यामुळे परतला.भारत : संजू सॅमसन , इशान किशन (यष्टीरक्षक) , तिलक वर्मा , सूर्यकुमार यादव (कर्णधार) , हार्दिक पांड्या , शिवम दुबे , रिंकू सिंग , अक्षर पटेल , अर्शदीप सिंग , वरुण चक्रवर्ती ,जसप्रीत बुमराहनामिबिया : लॉरेन स्टीनकॅम्प , जॅन फ्रायलिंक , जॅन निकोल लॉफ्टी-ईटन , गेरहार्ड इरास्मस (कर्णधार) , जेजे स्मित , मालन क्रुगर , झेन ग्रीन (यष्टीरक्षक) , रुबेन ट्रम्पेलमन , बर्नार्ड स्कोल्झ , बेन शिकोंगो , मॅक्स हींगो
अपात्र ठरलेल्या ९०० संस्थांवर विभागाची कारवाई; दिव्यांग क्षेत्रातील संस्थांसाठी नोंदणी बंधनकारक
मुंबई :राज्यात दिव्यांग व्यक्ती अधिनियम अंतर्गत दिव्यांगासाठी कार्यरत संस्थांना दिव्यांग कल्याण आयुक्त यांच्याकडे नोंदणी असणे अनिवार्य आहे. राज्यात साधारणत: दोन हजारांहून अधिक संस्था दिव्यांगांच्या कल्याणासाठी कार्यरत आहेत. यापैकी सुमारे ९०० संस्था विविध कारणांमुळे अपात्र ठरल्याने त्यांच्यावर विभागाने कारवाई करून त्यांची नोंदणी रद्द केली असल्याचे दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी सांगितले. विशेष म्हणजे सन २०२५ या वर्षातच ३६३ संस्थांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे. नोंदणी रद्द केलेल्या संस्थांमध्ये कोकण ५२, नाशिक ४९, पुणे ६०, नागपूर ४९, अमरावती ५० आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील १०३ संस्थांचा समावेश आहे.सचिव तुकाराम मुंढे म्हणाले, संस्था सोसायटी नोंदणी कायदा १८६०, बॉम्बे पब्लिक ट्रस्ट कायदा,१९५० किंवा कंपनी कायदा (कलम ८) अंतर्गत नोंदणीकृत असल्यानंतरसुद्धा दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ च्या कलम ५० अंतर्गत नोंदणी बंधनकारक आहे. विभागाने केलेल्या कारवाईमुळे शासनाचा निधी योग्य संस्थांवर खर्च होईल. ज्या संस्था दिव्यांग क्षेत्रात कार्यरत आहेत किंवा कार्य करू इच्छितात त्यांनी दिव्यांग कल्याण आयुक्तालयाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. अशा सर्व संस्थांनी २८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत divyangkalyan.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी पूर्ण करणे आवश्यक आहे. नोंदणी न केल्यास संबंधित संस्थांवर अधिनियमातील कलम ९१ नुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले आहे.सचिव मुंढे म्हणाले, दिव्यांग क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व नागरी समाज संघटनांच्या, संस्थांच्या कामकाजात एकसमानता यावी. तसेच त्यांची जबाबदारी आणि सेवांची गुणवत्ता सुनिश्चित करणे, नागरी समाज संघटना, संस्थांची नोंदणी, तपासणी, देखरेख, नूतनीकरण, जबाबदारी व पारदर्शकता निश्चित करण्यासाठी कार्यप्रणाली १७ ऑक्टोबर २०२५ च्या शासन निर्णयानुसार निश्चित करण्यात आली आहे. यानुसार संस्थांनी शासनाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या सुगम्यता तत्त्वे व इतर मानकांचे पालन करणे आवश्यक आहे.दिव्यांग कल्याण विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आरोग्य, कौशल्य विकास, व्यावसायिक प्रशिक्षण, पुनर्वसन, संशोधन व विकास, शिक्षण-प्रशिक्षण किंवा दिव्यांगांच्या कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सर्व संस्थानी शासनाने निश्चित केलेल्या निकषांचे पालन करून दिव्यांग कल्याण विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन प्रणालीद्वारे नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी. याद्वारे दिव्यांग व्यक्तींची प्रतिष्ठा, हक्क आणि सुरक्षा यांचे संरक्षण होईल आणि त्यांना सन्मानजनक आयुष्य जगता येईल.संस्थानी दिव्यांग कल्याण आयुक्तालयाकडे नोंदणी केल्यामुळे त्यांच्यामार्फत दिव्यांग व्यक्तींचे सक्षमीकरण व पुनर्वसन करणे शक्य होईल. हे कार्य करताना दिव्यांगांच्या हक्कांचे, अधिकारांचे उल्लंघन होणार नाही व त्यांना न्याय दिला जाईल याबाबत दक्षता घेतली जाईल. त्यामुळे सर्व संस्थानी नोंदणी करून, दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ नुसार त्याअंतर्गत नियमावली व शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या योजना व धोरणानुसार कार्य करणे अपेक्षित आहे. जेणेकरून दिव्यांगांचे पुनर्वसन व सक्षमीकरण साध्य करणे शक्य होईल, असेही सचिव तुकाराम मुंढे यांनी सांगितले.
नव्या आकर्षक पोस्टरसह ‘द पॅराडाईज’ची घोषणा
मुंबई :२०२६ मधील सर्वाधिक प्रतिक्षित चित्रपटांपैकी एक म्हणून द पॅराडाईजची ओळख निर्माण झाली आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. ‘दसरा’ या मोठ्या यशानंतर दिग्दर्शक श्रीकांत ओडेला पुन्हा एकदा नॅचरल स्टार नानीसोबत या चित्रपटातून काम करत आहेत. ‘दसरा’नंतर ही जोडी पुन्हा एकत्र येत असल्याने अपेक्षा आणखी वाढल्या आहेत.
सॅमसंगच्या गॅलेक्सी अनपॅकचे २५ फेब्रुवारी रोजी आयोजन
मुंबई :सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स २५ फेब्रुवारी २०२६ रोजी सॅन फ्रान्सिस्को येथे ‘गॅलेक्सी अनपॅक’चे आयोजन करणार असून या मंचावर ब्रॅण्डची नवीन गॅलेक्सी एस सिरीज सादर केली जाणार आहे. एआयच्या युगात मोबाईल इनोव्हेशनचा नवा टप्पा गाठण्याच्या दिशेने हा कार्यक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.नवीन गॅलेक्सी एस सिरीज वापरकर्त्यांच्या दैनंदिन जीवनातील टास्क्स अधिक सुलभ करण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे. रोजच्या परस्परसंवादांमधील व्यत्यय दूर करत, आत्मविश्वास वाढवणारा आणि अधिक स्मार्ट अनुभव देणारा हा मोबाइल अनुभव ‘गॅलेक्सी एआय’च्या सक्षम एकत्रीकरणासह येणार आहे. ही एआय क्षमता अधिक वैयक्तिक आणि अनुकूल (पर्सनल व अॅडॅप्टिव्ह) बनत असून, वापरकर्त्यांच्या गरजेनुसार अनुभव घडवेल.गॅलेक्सी अनपॅक कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण २५ फेब्रुवारी रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ११.३० वाजता सॅमसंगडॉटकॉम, सॅमसंग न्यूजरूम इंडिया आणि सॅमसंगच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर करण्यात येणार आहे.ग्राहक आणि तंत्रज्ञानप्रेमींनी सॅमसंगडॉटकॉमअनपॅक येथे नोंदणी करून कार्यक्रमापूर्वी येणारे सर्व टीझर्स, ट्रेलर्स, अपडेट्स तसेच विशेष फायदे याबाबत माहिती मिळवावी, असे आवाहन कंपनीने केले आहे
वर्ल्ड क्लास मुंबईसाठी सर्वसमावेशक अॅक्शन प्लॅन
मुंबई :मुंबईला ड्रग्स-फ्री, झोपडपट्टीमुक्त व अतिक्रमणमुक्त करून जागतिक दर्जाचे शहर बनवण्यासाठी राज्य सरकारने व्यापक अॅक्शन प्लॅन जाहीर केला असून प्रत्येक महापालिका रुग्णालयात डी-अॅडिक्शन सेंटरपासून पुनर्विकास, प्रदूषण नियंत्रण व पायाभूत सुविधांपर्यंत सर्वसमावेशक निर्णय घेण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मुंबई शहर जिल्हा नियोजन समिती (DPDC) बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.विकासकामांमध्ये पक्षीय राजकारण आणले नाही, लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या प्रश्नांना न्याय देणे ही शासनाची जबाबदारी असल्याचे सांगत मंजूर आर्थिक तरतुदींना मान्यता देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एसआरए प्रकल्पांना गती देत रखडलेले प्रकल्प मार्गी लावले जाणार असून वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे ४० लाख घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. रमाबाई आंबेडकरनगर येथील १७ हजार घरांच्या प्रकल्पाला एमएमआरडीएकडून चालना देण्यात आली असून धोकादायक इमारती व क्लस्टर पुनर्विकासालाही वेग देण्याच्या सूचना देण्यात आल्या.पावसाळ्यापूर्वी शहरातील रस्ते, नाले व पूरनियंत्रणाची सर्व कामे पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले असून पहिल्या टप्प्यातील काँक्रीट रस्ते पूर्ण झाले आहेत, दुसरा टप्पा सुमारे ९० टक्के पूर्ण असून तिसरा टप्पा लवकर सुरू होणार आहे. डांबरी रस्ते दुरुस्त करणे, नालेसफाई, पाणी साचणाऱ्या ठिकाणी यंत्रणा बसवणे व होल्डिंग पाँड कार्यान्वित ठेवणे याबाबत सर्व यंत्रणांना निर्देश देण्यात आले.फुटपाथ अतिक्रमणमुक्त ठेवण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाणार असून पादचाऱ्यांचा चालण्याचा हक्क सुरक्षित ठेवण्यावर भर देण्यात येणार आहे; फेरीवाल्यांमुळे नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घेण्यासही सांगण्यात आले. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी संयुक्तपणे उपाययोजना कराव्यात, रेल्वे स्टेशन व बाजारपेठ परिसरात मोबाईल टॉयलेट आणि महिलांसाठी पिंक टॉयलेट उभारावेत तसेच सर्व सार्वजनिक शौचालये स्वच्छ ठेवावीत, असे निर्देश देण्यात आले.मुंबई प्रदूषणमुक्त करण्यासाठी बांधकामस्थळी स्प्रिंकलर, नेट व धूळ नियंत्रण उपाय अनिवार्य करण्यात येणार असून हे नियम खासगीप्रमाणेच सरकारी प्रकल्पांनाही लागू राहतील. ड्रग्स-फ्री मुंबई मोहिम राबवून प्रत्येक महापालिका रुग्णालयात डी-अॅडिक्शन, समुपदेशन व पुनर्वसन कक्ष सुरू करण्याचे आदेश देण्यात आले. बेकायदेशीर बांगलादेशी नागरिकांचा शोध घेऊन त्यांची कागदपत्रे व आधार रद्द करून हद्दपार करण्यासाठी जिल्हाधिकारी व पोलिसांना सूचना देण्यात आल्या.आरोग्य सेवांबाबत महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेत एन्जिओग्राफी, स्टेंट व महागड्या शस्त्रक्रियांचा समावेश करण्याचा प्रस्ताव असून सर्व सरकारी रुग्णालयांत रुग्णांना १०० टक्के मोफत औषधे मिळावीत, असे निर्देश देण्यात आले. केईएम रुग्णालयातील अचानक भेटीदरम्यान औषधे विकत घ्यावी लागत असल्याच्या तक्रारीनंतर कारवाई करण्यात आली असून सध्या सुमारे ८० टक्के रुग्णालयांत औषधे मोफत मिळत आहेत, ती पूर्णतः मोफत करण्याचे आदेश देण्यात आले. मराठी भवनसह सांस्कृतिक प्रकल्पांना गती देण्याचेही निर्देश देण्यात आले.निधी वाटप करताना कधीही दुजाभाव केला नसून नागरिकांना तात्काळ दिलासा देणे ही कार्यपद्धती असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. मुंबई अतिक्रमणमुक्त, सुरक्षित आणि सर्व सुविधा असलेले ‘वर्ल्ड क्लास’ शहर बनवण्यासाठी राज्य सरकार पूर्ण सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी मुंबईतील सर्व खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, पोलिस अधिकारी उपस्थित होते.
Shirur News : सरदवाडी येथे तरुणाची हत्या; दोघांना अटक
शिरूर तालुक्यातील (Shirur News) मौजे सरदवाडी हद्दीत आयएफबी कंपनीजवळ बुधवारी उशिरा रात्री धारधार शस्त्राने केलेल्या हल्ल्यात २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
स्थलांतरीत उसतोड कामगारांच्या मुलांसाठी ११ शासकीय वसतिगृहांच्या बांधकामासाठी १५९ कोटींचा निधी
मुंबई :स्थलांतरीत ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी संत भगवान बाबा शासकीय वसतिगृह योजनेंतर्गत बीड जिल्ह्यातील ११ वसतिगृहांच्या बांधकामासाठी १५९ कोटी ३६ लाख ६० हजार इतक्या रकमेच्या बांधकाम अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आली असल्याची माहिती, उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिली.आज बीड जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. यावेळी विकासकामांसाठीचा संपूर्ण निधी योग्य व काटेकोर पद्धतीने खर्च व्हावा, ठरलेल्या वेळेत सर्व कामे पूर्ण व्हावीत, बांधकामांचा दर्जा उत्कृष्ट असावा आणि कोणतीही कामे अर्धवट राहू नयेत, अशा स्पष्ट सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.… pic.twitter.com/UbowCAqIhU— Sunetra Ajit Pawar (@SunetraA_Pawar) February 12, 2026ऊसतोड कामगारांच्या मुलांची शिक्षणाबाबतची आस्था वाढीस लावून त्यांचा पुढील शिक्षणाचा मार्ग सुकर करण्यासाठी स्थलांतरित ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेंतर्गत राज्यातील ऊसतोड कामगारांची संख्या अधिक असलेल्या ४१ तालुक्यांच्या ठिकाणी मुलांसाठी ४१ व मुलीसाठी ४१ अशी एकूण ८२ (प्रत्येकी १०० विद्यार्थी क्षमता) शासकीय वसतिगृह सुरू करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. त्यानुसार प्रथम टप्प्यात मुलांसाठी १० व मुलींसाठी १० अशी एकूण २० शासकीय वसतिगृहे सुरू करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. या योजनेंतर्गत मान्यता देण्यात आलेल्या ८२ शासकीय वसतिगृहापैकी पहिल्या टप्प्यात सुरू करण्यात आलेली २० शासकीय वसतिगृहे वगळता उर्वरित ६२ शासकीय वसतिगृह सुरू करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.या योजनेंतर्गत बीड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात ०२ (मुलांचे १ व मुलीचे १) प्रत्येकी १०० विद्यार्थी क्षमता) अशी एकूण २२ शासकीय वसतिगृहे सुरु करण्यास सामाजिक न्याय विभागाच्या शासन निर्णयाद्वारे यापूर्वीच मान्यता देण्यात आली आहे.ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींनी शिकले पाहिजे, शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आले पाहिजे असे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वप्न होते.त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केले आणि या मुला- मुलींसाठी वसतिगृह बांधण्यासाठी पाठपुरावा केला आणि ते पालकमंत्री असताना अनेक ठिकाणी जागाही निश्चित करण्यात आल्या होत्या.सारथी संस्थेच्या वतीने मराठा समाजातील मुलांसाठी विभागीय मुख्यालयाच्या ठिकाणी बांधण्यात येणाऱ्या वसतिगृहांच्या धर्तीवर बीड जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी वसतिगृहांचे दर्जेदार बांधकाम करावे,अशा सूचना दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांना वेळेवेळी दिल्या होत्या,अशी माहितीही उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिली.ही सर्व शासकीय वसतिगृहे शासकीय इमारतीत सुरु करावयाची आहेत. सद्यस्थितीत केवळ ३ ठिकाणी शासकीय जागा उपलब्ध झाली असून त्या ठिकाणी वसतिगृहाचे बांधकाम प्रगतिपथावर आहे. उर्वरीत १९ वसतिगृहांपैकी ११ जागा उपलब्ध असलेल्या वसतिगृहांच्या बांधकाम अंदाजपत्रकास आज प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून त्याबाबतचा शासन निर्णय सामाजिक न्याय विभागातर्फे जारी करण्यात आला आहे.यामध्ये पाटोदा, केज, परळी, गेवराई, माजलगाव येथे प्रत्येकी २ (मुलांसाठी १ व मुलींसाठी १) आणि बीड येथील मुलींच्या शासकीय वसतिगृहाचा समावेश आहे.
बांगलादेशमध्ये सार्वत्रिक निवडणुकीत ४७.९१ टक्के मतदान, मतमोजणीला सुरुवात
ढाका : बांगलादेशमध्ये २०२४ मध्ये मोठी दंगल उसळली आणि शेख हसीना यांनी देश सोडला. सध्या त्या भारतात सुरक्षित ठिकाणी वास्तव्यास आहेत. शेख हसीनांनी देश सोडल्यानंतर अमेरिकेच्या पाठिंब्याच्या जोरावर नोबेल पुरस्कार विजेते मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वात एक हंगामी व्यवस्था निर्माण झाली. पण जनतेचा दबाव वाढू लागल्यामुळे निवडणुकीची घोषणा करण्यात आली. या घोषणेनुसार बांगलादेशमध्ये आज म्हणजेच गुरुवार १२ फेब्रुवारी रोजी मतदान झाले.बांगलादेशच्या निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या प्राथमिक आकडेवारीनुसार सार्वत्रिक निवडणुकीत ४७.९१ टक्के मतदान झाले. मतदानाची नेमकी आकडेवारी लवकरच जाहीर केली जाणार आहे. पण मतदान संपताच नियोजनानुसार मतमोजणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. शुक्रवार १३ फेब्रुवारीच्या सकाळपर्यंत बांगलादेशमध्ये कोणाची सत्ता येणार हे स्पष्ट होणार आहे.मतदानादरम्यान ठिकठिकाणी हिंसेच्या घटना घडल्या आहेत. बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) आणि इस्लामी जमात-ए-इस्लामी या माजी मित्रपक्षांच्या नेतृत्वाखालील दोन आघाड्या निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. बांगलादेशच्या राजकारणाचे अभ्यासक यंदाच्या निवडणुकीत बीएनपीला फायदा होण्याची शक्यता व्यक्त करत आहेत.बांगलादेशमध्ये १२ कोटी ७० लाखांपेक्षा जास्त पात्र मतदार आहेत. पण मतदानाचा आतापर्यंतचा उत्साह बघता सार्वत्रिक निवडणुकीतले एकूण मतदान हे ५० टक्क्यांपेक्षा कमी राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे. स्थानिक वेळेनुसार सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेचार या वेळेत मतदान झाले. भारतीय वेळेनुसार बांगलादेशमध्ये संध्याकाळी पाच वाजता मतदानाची वेळ संपली आहे. यंदा सहा लाख ४८ हजार जणांनी बांगलादेशच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी टपालाद्वारे मतदान केले आहे. बांगलादेशमध्ये १३ व्या संसदीय निवडणुकीची सर्वत्र चर्चा सुरू आहे.ढाका येथे असलेल्या बांगलादेशच्या संसदेत एकूण ३५० जागा आहेत. यापैकी ५० महिलांसाठी राखीव असून त्यावर नामनिर्देशीत पद्धतीने विजयी पक्ष त्यांचे प्रतिनिधी पाठवतील. यासाठीचा प्रत्येक पक्षाचा कोटा त्यांना निवडणुकीत किती जागा मिळतात यावर अवलंबून असेल. संसदेतील ३०० जागांसाठी मतदान होणार होते. पण एका उमेदवाराचे निधन झाल्यामुळे २९९ जागांसाठीच मतदान झाले. एका जागेसाठी नव्याने निवडणूक प्रक्रिया राबवली जाणार आहे.बांगलादेशच्या संसदेतील २९९ जागांसाठी १९८१ उमेदवार रिंगणात होते. पात्र मतदारांनी या उमेदवारांमधून त्यांच्या पसंतीचा उमेदवार निवडण्यासाठी मतदान केले तसेच मुहम्मद युनूस यांच्या हंगामी सरकारने सादर केलेल्या ८४ कलमी सुधारणा कार्यक्रमासाठीही मतदान केले. निकाल शुक्रवार १३ फेब्रुवारीच्या सकाळपर्यंत येणार आहेत.
आशिष शेलार युनेस्को मुख्यालयात
युनेस्को :छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना युनेस्को ने जागतिक वारसा स्थळांच्या यादीत स्थान दिले आहे. त्यासंदर्भातील युनेस्को चे अधिकृत प्रमाणपत्र आज राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अँड. आशिष शेलार यांनी युनोस्कोच्या फ्रान्स येथील कार्यालयात जाऊन स्वीकारले.युनेस्को मुख्यालयामध्ये महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे भारतरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळ्याला उभारण्यात आला असून आज मंत्री आशिष शेलार यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन ही केले.सुमारे दीड वर्षांच्या प्रदीर्घ प्रक्रियेनंतर गतवर्षी ११ जुलै २०२५ रोजी, युनेस्कोच्या ४७व्या अधिवेशनात, ‘मराठा मिलिटरी लँडस्केप्स ऑफ इंडिया’ या नावाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील १२ किल्ल्यांना जागतिक वारसा यादीत स्थान देण्यात आले. या मानांकनाचे अधिकृत प्रमाणपत्र महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ पॅरिस येथे स्वीकारले.छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीय आक्रमणाशी लढून उभारलेल्या हिंदवी स्वराज्याच्या रक्षणाकरता, सुरक्षित शासनव्यवस्था आणि लोककल्याण, यासाठी साकारलेली गड-किल्ल्यांची साखळी हा भारतीय इतिहासातील अद्वितीय लष्करी व राज्यकारभाराचा नमुना मानला जातो.रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी आणि तामिळनाडूमधील जिंजी असा १२ किल्ल्यांचा समूह आज “जागतिक वारसा स्थळ” म्हणून संपूर्ण जगासमोर उभा राहिला आहे.या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर फेब्रुवारी २०२५ मध्ये अॅड. शेलार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारचे चार सदस्यीय प्रतिनिधीमंडळ पॅरिसमध्ये युनेस्कोसमोर तांत्रिक आणि धोरणात्मक मांडणी करून या मानांकनासाठी सादरीकरण आणि युक्तीवाद करून आले होते. आता प्रत्यक्ष मानांकन-पत्र मिळाले आहे.छत्रपती शिवाजी महाराज यांचा पराक्रमाचा आणि मराठा साम्राज्याच्या वारशाचा जागतिक सन्मान स्विकारताना आज ऊर भरून आला आहे. या संपूर्ण प्रक्रियेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले मार्गदर्शन आणि परिश्रम तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या योगदानाबद्दल मंत्री शेलार यांनी आभार मानले आहेत. भारताचे युनेस्कोमधील स्थायी प्रतिनिधी श्री. विशाल शर्मा यांनी ही परिश्रमपूर्वक केलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांचेही तमाम महाराष्ट्रातर्फे मंत्री शेलार यांनी आभार मानले. तसेच हा महाराष्ट्रासाठी, देशासाठी शिवप्रेमींनसाठी गौरवाचा क्षण असल्याचे ही त्यांनी म्हटले आहे.दरम्यान, भारताचे संविधानाला ७५ वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धपुतळा युनेस्को मुख्यालयाला भेट दिला असून, २६ नोव्हेंबर २०२५ रोजी संविधान दिनानिमित्त या पुतळ्याची स्थापना पॅरिसमध्ये युनेस्को मुख्यालयात झाली आहे. सामाजिक न्याय, समानता, बंधुता आणि शिक्षणाद्वारे सक्षमीकरण यांची डॉ. आंबेडकरांनी दिलेली शिकवण ही युनेस्कोच्या मुलभूत ध्येयाशी सुसंगत आहे. पॅरीसमधील त्यांच्या या स्मारकाला आज मंत्री शेलार यांनी अभिवादन केले. यावेळी विशाल शर्मा यांच्यासह विभागाचे सचिव किरण कुलकर्णी, पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक हेमंत दळवी आणि मान्यवर उपस्थित होते.
राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील ५,०१२ सहायक प्राध्यापक पद भरतीस मान्यता
मुंबई :राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्राला बळकटी देण्यासाठी आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP 2020) ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांशी संलग्न असलेल्या मान्यताप्राप्त अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमधील सहायक प्राध्यापक संवर्गातील ५ हजार १२ रिक्त पदे भरण्यास शासनाने मान्यता दिली आहे.अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी सुरू असून.विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (UGC) निर्देशानुसार प्राध्यापकांची रिक्त पदे भरणे अनिवार्य होते. याच पार्श्वभूमीवर हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.भरती प्रक्रियेच्या प्रमुख अटी व शर्ती:- विद्यार्थी संख्येवर आधारित पदे दि.१ ऑक्टोबर २०२५ रोजीच्या विद्यार्थी संख्येनुसार निश्चित झालेल्या कार्यभाराच्या आधारे ही ५,०१२ पदे भरली जातील. ही भरती प्रक्रिया विहित कालमर्यादेत आणि पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने राबवण्याची जबाबदारी उच्च शिक्षण संचालक (पुणे) आणि विभागीय सहसंचालकांची असेल. NAAC मानांकन अनिवार्य ज्या शैक्षणिक संस्थांकडे 'नॅक' (NAAC) मान्यता आहे, त्यांनाच नवीन पदनिर्मितीचा लाभ मिळेल. मात्र, ज्यांचे मूल्यांकन कमी आहे, त्यांना सुधारणेसाठी ३ वर्षांचा सवलतीचा कालावधी (Grace Period) देण्याबाबत शासन स्वतंत्र धोरण आखणार आहे. आचारसंहितेचे पालन- भरती प्रक्रियेदरम्यान राज्यात आचारसंहिता लागू असल्यास, निवडणूक आयोगाच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.सूचनांचे काटेकोर पालन करण्याची जबाबदारी संचालक,उच्च शिक्षण पुणे व संबंधित विभागीय सहसंचालक यांची राहील. नवीन शैक्षणिक धोरणानुसार पदांचा सुधारित आराखडा (आकृतीबंध) निश्चित करण्यासाठी उच्च शिक्षण संचालकांच्या स्तरावर एक समिती नियुक्त केली जाणार आहे. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर (www.maharashtra.gov.in) उपलब्ध आहे.
मुंबई :मत्स्यव्यवसाय प्रशासनात आमूलाग्र सुधारणा, महसूल वृद्धी आणि Intelligent Governance प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने “मत्स्यवाणी” – एआय (AI) तंत्रज्ञानावर आधारित भारतातील पहिला व्हॉईस गव्हर्नन्स प्लॅटफॉर्म राबविण्याचा प्रस्ताव मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सादर करण्यात आला. १२-०२-२०२६ | मंत्रालय, मुंबई‘मत्स्यवाणी' - एआय (AI) तंत्रज्ञानावर आधारित भारतातील पहिला व्हॉईस गव्हर्नन्स प्लॅटफॉर्म राबवून मत्स्यव्यवसाय प्रशासनात आमूलाग्र सुधारणा, महसूल वृद्धी व Intelligent Governance प्रस्थापित करण्यासंदर्भात आज मंत्रालयात माझ्या अध्यक्षतेखाली बैठक पार… pic.twitter.com/X5DhWvdbkY— Nitesh Rane (@NiteshNRane) February 12, 2026मंत्री नितेश राणे यांनी मत्स्यव्यवसाय क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रशासन अधिक परिणामकारक, जलद आणि पारदर्शक करण्यावर भर दिला. “मत्स्यवाणी” प्लॅटफॉर्ममुळे शासकीय यंत्रणा, मच्छीमार व उद्योग यांच्यातील संवाद सुलभ होऊन महसूल वृद्धीसोबतच सशक्त शासकीय प्रणाली प्रस्थापित होईल, असे मंत्री नितेश राणे म्हणाले.बैठकीत मच्छीमार समुदायांसाठी जलसुरक्षा उपाययोजना अंतर्गत पर्यावरणीय जलजनक तंत्रज्ञानाचा (हवेतील आद्रतेपासून जल तयार करणे) पायलट प्रकल्प राबविण्याबाबतही चर्चा झाली. तसेच “महाराष्ट्र एकात्मिक किनारी, सीमा व जिल्हा वैज्ञानिक अंमलबजावणी व सुरक्षा अभियान” या प्रस्तावावर सविस्तर विचारविनिमय करण्यात आला. तटीय सुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी आवश्यक धोरणात्मक उपायांवरही बैठक झाली.मंत्री राणे यांनी नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून मत्स्यव्यवसाय क्षेत्रात शाश्वत विकास आणि सागरी सुरक्षेला प्राधान्य देण्याचे निर्देश दिले.या बैठकीस मत्स्यआयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, वैभव ढसाळ (संचालक – Dawell Life Science Pvt. Ltd.), तसेच संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
सिंधुदुर्गात पर्यटनविकासाला चालना; ५ स्टार हॉटेल प्रकल्पाला गती द्यावी; मंत्री नितेश राणेंचे निर्देश
मुंबई :सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनवाढीसोबत स्थानिक रोजगारनिर्मिती व आर्थिक विकासाला चालना मिळावी, या दृष्टीने ५ स्टार हॉटेल उभारण्याबाबतचा प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पाला गती द्यावी, असे प्रतिपादन मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी केले.सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन विकासाला गती देण्यासाठी तसेच उच्च दर्जाच्या पर्यटन सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने मंत्रालयात बैठक पार पडली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमीसे, सिस्टुला ट्यूलिप पीएलसीचे अध्यक्ष माइक बेरी, संचालक अमित कामत आदी उपस्थित होते.राज्याचे पर्यटन मंत्री श्री.शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली २३ डिसेंबर २०२५ रोजी झालेल्या बैठकीत दिलेल्या निर्देशांचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत प्रकल्पाच्या प्रलंबित बाबींवर सखोल चर्चा करून प्रकल्प लवकर मार्गी लावण्यासाठी संबंधित यंत्रणांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.या बैठकीत जिल्ह्यातील पर्यटनविकास उपक्रमांबाबत सादरीकरण करण्यात आले. जिल्ह्यात पर्यटनवाढीसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा सविस्तर आढावा घेऊन त्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसंबंधी चर्चा झाली.
भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी इंडिया आघाडी, मविआ, लोकशाही तसेच संविधानासाठी काँग्रेसच्या सर्व 12 नगरसेवकांनी ठाकरेसेनेला मतदान केले, असे म्हणत कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनी ठाकरेसेनेचे नेते संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिले.
Sale of children: या प्रकरणी डॉ. नितेश बाजपेयी, ललेश्वरी सादेपाच, मालती वाघमारे, पौर्णिमा धुर्वे आणि उमेशसिंग गहलोत या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Vande Mataram: ‘मुसलमानांच्या मानेवर सुरी…’; केंद्र सरकारच्या नव्या नियमावलीवरून AIMIM आक्रमक
Vande Mataram: पीटीआयशी बोलताना शोएब जमई यांनी केंद्र सरकारचा हा निर्णय म्हणजे हुकूमशाही आणि दमनकारी वृत्ती असल्याचे म्हटले.
Todays Top 10 News: पार्थ पवार यांचा राज्यसभा प्रवेश निश्चित?, अजित पवारांच्या अपघाताभोवती संशयाचे जाळे, नांदेडच्या मुखेड तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के, दूरदर्शनचा आश्वासक चेहरा हरपला, भ्रष्टाचार निर्देशांकात भारताची कामगिरी सुधारली, किम जोंग उन यांनी निवडला वारसदार, टोयोटा फॉर्च्युनरला टक्कर, iPhone 18 Pro सीरीजच्या चर्चांना उधाण, राजपाल यादवचा मुक्काम तुंगातच, श्रीलंकेचा ओमानवर दिमाखदार विजय...
Supriya Sule : “अजितदादांची स्वप्ने पूर्ण करणे ही नैतिक जबाबदारी”–सुप्रिया सुळे
दिवंगत नेते अजित पवार यांची अपूर्ण स्वप्ने पूर्ण करणे ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी असल्याचे, राष्ट्रवादी(शप) पक्षाच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
Raj Thackeray : नाशिकमधील मनसेच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा; कर्मचाऱ्यांना केली जबर मारहाण
नाशिक – शहरातील फिजिक्सवाला या खाजगी कोचिंग क्लासमधील कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना नाशिकमधील शरणपूर रोडवरील फिजिक्सवाला कोचिंग क्लासमध्ये घडली. मराठी भाषेचा अवमान झाल्याचा आरोप करत, मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी कोचिंग क्लासमध्ये जाऊन गोंधळ घातल्याचा आरोप आहे. याप्रकरणी क्लास मॅनेजरच्या तक्रारीवरून सरकारवाडा पोलीस ठाण्यात पाच पदाधिकारी व कार्यकर्त्यांविरोधात […]
Vijay Mallya : विजय मल्ल्या भारतात येत नाही तोपर्यत सुनावणी होणार नाही; मुंबई हायकोर्टाने दिला इशारा
फरार उद्योजक विजय मल्ल्या (Vijay Mallya) याने फरार आर्थिक गुन्हेगार कायद्यातील तरतुदींना आव्हान देणाऱ्या त्याच्या याचिकेवर तो भारतात परत येईपर्यंत विचार करणार नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा म्हटले आहे.
कोकणातील कातळशिल्पांच्या संशोधनासाठी 'वर्ल्ड हेरिटेज डेस्क'
राज्य सरकारचा निर्णय; शिल्पांचे पुरातत्त्वीय, सांस्कृतिक आणि जैविक महत्त्व जगासमोर आणणारमुंबई : आद्य मानवी संस्कृतीची साक्ष देणाऱ्या कोकणातील कातळशिल्पांना जागतिक वारशाचा दर्जा मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या कातळशिल्पांच्या शास्त्रोक्त संशोधनासाठी आणि युनेस्को नामांकन प्रक्रियेला गती देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने ‘वर्ल्ड हेरिटेज डेस्क’ स्थापन करण्यास प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्याचप्रमाणे या प्रकल्पासाठी १४ कोटी ६२ लाख ३२ हजार ६७१ रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.कोकणात आढळलेली हजाराहून अधिक कातळशिल्पे आद्य ऐतिहासिक काळातील मानवी संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जातात. या शिल्पांचे पुरातत्त्वीय, सांस्कृतिक आणि जैविक महत्त्व जागतिक पातळीवर अधोरेखित करण्यासाठी केंद्र सरकारने यापूर्वीच युनेस्कोकडे प्रस्ताव सादर केला आहे. राज्य सरकारने स्थापन केलेल्या नव्या डेस्कमुळे या प्रक्रियेला संस्थात्मक बळ मिळणार आहे.‘वर्ल्ड हेरिटेज डेस्क’ २०२६ ते २०२९ या कालावधीत कार्यरत राहणार असून त्याच्या मुंबई आणि रत्नागिरी अशा दोन शाखा असतील. मुंबई शाखा संशोधन आणि समन्वयाची जबाबदारी सांभाळेल. भारतीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील कातळशिल्पांवरील साहित्याचा सखोल आढावा घेणे, ऐतिहासिक नकाशे व उपग्रह प्रतिमांच्या साहाय्याने तांत्रिक अभ्यास करणे आणि कातळशिल्पांचा अद्ययावत माहितीकोश तयार करणे ही या शाखेची प्रमुख कामे असतील. तसेच, युनेस्कोच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार सर्वेक्षण, नोंदणी आणि संवर्धनासाठी मानके निश्चित केली जातील. संशोधन लेखन, जागतिक परिषदांसाठी सादरीकरणे आणि धोरणात्मक अहवाल तयार करण्याचे कामही या शाखेकडे सोपविण्यात आले आहे.रत्नागिरी शाखा क्षेत्रीय कार्य आणि जनसहभागावर लक्ष केंद्रित करणार आहे. कातळशिल्पांचे प्रत्यक्ष स्थळी जाऊन शास्त्रोक्त सर्वेक्षण, जीपीएस आधारित नकाशांकन, ड्रोनद्वारे छायाचित्रण व व्हिडिओ दस्तऐवजीकरण ही कामे या शाखेतर्फे केली जाणार आहेत. स्थानिक परंपरा, लोककथा आणि स्थाननामांचा अभ्यास व संकलन करून सांस्कृतिक संदर्भही नोंदवले जातील. नैसर्गिक क्षरण किंवा मानवी हस्तक्षेपामुळे होणाऱ्या नुकसानीचे मूल्यमापन करून संवर्धनासाठी शिफारसी देण्याची जबाबदारीही या शाखेवर असेल. स्थानिक समुदायांशी संवाद साधून वारसा जतनासाठी जनजागृती आणि लोकसहभाग वाढविण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.१४.६२ कोटींची तरतूदप्रकल्पांतर्गत वैज्ञानिक चाचण्या आणि सहकार्यासाठी ६ कोटी ३८ लाख २२ हजार रुपये, मनुष्यबळासाठी २ कोटी ९४ लाख ६६ हजार ७९२ रुपये, उपकरणे व पायाभूत सुविधांसाठी २ कोटी ६० लाख ५० हजार रुपये आणि १० टक्के प्रशासकीय अधिभारासाठी १ कोटी ३२ लाख ९३ हजार ८७९ रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. एकूण खर्च १४ कोटी ६२ लाख ३२ हजार ६७१ रुपये इतका आहे.या प्रकल्पाचे नियंत्रण अधिकारी म्हणून मुंबईच्या पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाचे संचालक काम पाहणार असून दर सहा महिन्यांनी शासनाला प्रगती अहवाल सादर केला जाणार आहे. कोकणच्या या अमूल्य वारशाला जागतिक नकाशावर स्थान मिळवून देण्यासाठी राज्य सरकारचा हा निर्णय महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
ओमानविरुद्धच्या सामन्यात श्रीलंकेचा विजय, पवन रथनायके सामनावीर
पल्लेकेले : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये गुरुवारी दुपारी झालेल्या साखळी सामन्यात श्रीलंकेने ओमानचा पराभव केला. ओमान विरुद्धचा सामना श्रीलंकेने १०५ धावांनी जिंकला. या सामन्यात श्रीलंकेचा पवन रथनायके सामनावीर झाला. त्याने २८ चेंडूत २१४.२९ च्या स्ट्राईक रेटने एक षटकार आणि आठ चौकार मारत ६० धावा केल्या.नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेणे ओमानला भोवले. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या श्रीलंकेने २० षटकांत पाच बाद २२५ धावा केल्या तर ओमानला २० षटकांत ९ बाद १२० धावा करणे जमले. ओमानकडून मोहम्मद नदीमने नाबाद ५३ धावा केल्या. वसीम अलीने २७ धावा केल्या. इतर फलंदाज दोन आकडी वैयक्तिक धावा करू शकले नाही. श्रीलंकेकडून महेश थीकशन आणि दुष्मंथा चामीराने प्रत्येकी दोन तर डुनिथ वेलागे, दुषण हेमंथ आणि कमिंडू मेंडिसने प्रत्येकी एक विकेट घेतली.याआधी श्रीलंकेकडून कुसल मेंडिसने ६१, पवन रथनायकेने ६० तर कर्णधार असलेल्या दासुन शनाकाने ५० धावा केल्या. कमिंडू मेंडिसनेने नाबाद १९ आणि पथुम निस्सांकाने १३ धावांचे योगदान दिले. कामिल मिश्राराने ८ धावा केल्या तर डुनिथ वेलागेने नाबाद ६ धावा केल्या. ओमानकडून जितेन रामानंदीने २ तर जय ओडेद्रा आणि सुफियान मेहमूदने प्रत्येकी एक विकेट घेतली.श्रीलंकेसाठी मोठा विजयओमान विरुद्धचा श्रीलंकेचा विजय हा यंदाच्या वर्ल्डकपमधील लंकेचा सर्वात मोठा विजय आहे. श्रीलंकेच्या एकूण टी ट्वेंटी क्रिकेट कारकिर्दीचा विचार केल्यास हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा विजय आहे. तसेच ओमानचा हा टी ट्वेंटी क्रिकेटमधील सर्वात मोठा पराभव आहे. याआधी त्यांचा पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात ९३ धावांनी पराभव झाला होता.श्रीलंकेने मोठ्या फरकाने मिळवलेले सर्वोत्तम चार विजय १७२ धावांनी विजय विरुद्ध केनिया, जोबर्ग, २००७ विश्वचषक १०५ धावांनी विजय विरुद्ध ओमान, पल्लेकेले, २०२६ विश्वचषक* ८३ धावांनी विजय विरुद्ध नेदरलँड, ग्रोस आयलेट, २०२४ विश्वचषक ८२ धावांनी विजय विरुद्ध झिम्बाब्वे, हंबनटोटा, २०१२ विश्वचषक
टी ट्वेंटी वर्ल्डकपच्या इतिहासातील सर्वात संथ अर्धशतक
पल्लेकेले : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये गुरुवारी दुपारी झालेल्या साखळी सामन्यात श्रीलंकेने ओमानचा पराभव केला. ओमान विरुद्धचा सामना श्रीलंकेने १०५ धावांनी जिंकला. या सामन्यात ओमानच्या मोहम्मद नदीमने ५६ चेंडूत १ षटकार आणि ३ चौकार मारत नाबाद ५३ धावा केल्या. हे टी ट्वेंटी वर्ल्डकपच्या इतिहासातील सर्वात धीम्या गतीने केलेले अर्धशतक आहे. त्याने ५२ वा चेंडू खेळत अर्धशतक केले.टी ट्वेंटी वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वात संथ अर्धशतक करणाऱ्यांच्या यादीत ओमानचा मोहम्मद नदीम दुसऱ्या स्थानी आहे. या यादीत पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान पहिल्या तर दक्षिण आफ्रिकेचा डेव्हिड मिलर तिसऱ्या स्थानी आहे.https://prahaar.in/2026/02/12/sri-lanka-won-by-105-runs-against-oman-in-16th-match-group-b-icc-mens-t20-world-cup-2026/टी ट्वेंटी वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वात संथ अर्धशतक करणारे फलंदाज ५२ चेंडूत ५० धावा – मोहम्मद रिझवान (पाकिस्तान) विरुद्ध कॅनडा, न्यू यॉर्क, २०२४ ५२ चेंडूत ५० धावा – मोहम्मद नदीम (ओमान) विरुद्ध श्रीलंका, पल्लेकेले, २०२६* ५० चेंडूत ५० धावा – डेव्हिड मिलर (दक्षिण आफ्रिका) विरुद्ध नेदरलॅंड्स, न्यू यॉर्क, २०२४ ४९ चेंडूत ५० धावा – डेवॉन स्मिथ (वेस्ट इंडिज) विरुद्ध बांग्लादेश, जोहान्सबर्ग, २००७ ४९ चेंडूत ५० धावा – डेविड हसी (ऑस्ट्रेलिया) विरुद्ध इंग्लंड, ब्रिजटाऊन, २०१० ४९ चेंडूत ५० धावा – सूर्यकुमार यादव (भारत) विरुद्ध यूएसए, न्यू यॉर्क, २०२४ओमानविरुद्धच्या सामन्यात श्रीलंकेचा विजयओमान विरुद्धचा सामना श्रीलंकेने १०५ धावांनी जिंकला. या सामन्यात श्रीलंकेचा पवन रथनायके सामनावीर झाला. त्याने २८ चेंडूत २१४.२९ च्या स्ट्राईक रेटने एक षटकार आणि आठ चौकार मारत ६० धावा केल्या. नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेणे ओमानला भोवले. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या श्रीलंकेने २० षटकांत पाच बाद २२५ धावा केल्या तर ओमानला २० षटकांत ९ बाद १२० धावा करणे जमले.
Shridatta Vidyalaya : श्रीदत्त विद्यालयाचे रमण स्पेस मंथन परीक्षेत घवघवीत यश
या परीक्षेत श्रीदत्त (Shridatta Vidyalaya) विद्यालयातील इयत्ता सातवीचा विद्यार्थी आर्यन सूर्यकांत चव्हाण याने सहावा क्रमांक मिळवून अप्रतिम यश संपादन केले आहे. संपूर्ण भारतातून सुमारे ७ लाख ६० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती.
Mohammad Nadeem record : वयाच्या ४३ व्या वर्षी आयसीसी (ICC) स्पर्धेत अर्धशतक झळकावणारा तो जगातील सर्वात वयस्कर खेळाडू ठरला.
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांनी मागे घेतली ‘ती’याचिका
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बजावलेल्या समन्सला आव्हान देणारी आपली याचिका गुरुवारी दिल्ली उच्च न्यायालयातून मागे घेतली.
Nishikant Dubey : राहुल गांधींची खासदारकी रद्द करा; निशिकांत दुबेंची मागणी
भारतीय जनता पक्षाचे खासदार निशिकांत दुबे (Nishikant Dubey) यांनी गुरुवारी काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे.
बांगलादेशच्या सार्वत्रिक निवडणुकीत ५० टक्क्यांपेक्षा कमी मतदान ?
ढाका : बांगलादेशमध्ये २०२४ मध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली. हिंसक आंदोलन सुरू झाल्यानंतर पंतप्रधान शेख हसीना यांनी देश सोडला. सध्या त्या भारतात सुरक्षित ठिकाणी वास्तव्यास आहेत. शेख हसीनांनी देश सोडल्यानंतर अमेरिकेच्या पाठिंब्याच्या जोरावर एक हंगामी व्यवस्था निर्माण करण्यात आली. नोबेल पुरस्कार विजेते मुहम्मद युनूस या व्यवस्थेचे प्रमुख झाले. पण जनतेचा दबाव वाढू लागल्यामुळे निवडणुकीची घोषणा करण्यात आली. या घोषणेनुसार बांगलादेशमध्ये आज म्हणजेच गुरुवार १२ फेब्रुवारी रोजी मतदान सुरू आहे.आतापर्यंत ठिकठिकाणी हिंसेच्या घटना घडल्या आहेत. बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) आणि इस्लामी जमात-ए-इस्लामी या माजी मित्रपक्षांच्या नेतृत्वाखालील दोन आघाडी निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. बांगलादेशच्या राजकारणाचे अभ्यासक यंदाच्या निवडणुकीत बीएनपीला फायदा होण्याची शक्यता व्यक्त करत आहेत. निवडणुकीचा निकाल शुक्रवार १३ फेब्रुवारी २०२६ रोजी जाहीर होणार आहे.बांगलादेशमध्ये १२ कोटी ७० लाखांपेक्षा जास्त पात्र मतदार आहेत. पण मतदानाचा आतापर्यंतचा उत्साह बघता सार्वत्रिक निवडणुकीतले एकूण मतदान हे ५० टक्क्यांपेक्षा कमी राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे. स्थानिक वेळेनुसार सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेचार या वेळेत मतदान होणार आहे. भारतीय वेळेनुसार बांगलादेशमध्ये संध्याकाळी पाच वाजता मतदानाची मुदत संपणार आहे.यंदा सहा लाख ४८ हजार जणांनी बांगलादेशच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी टपालाद्वारे मतदान केले आहे. बांगलादेशमध्ये १३ व्या राष्ट्रीय संसदीय निवडणुकीची सर्वत्र चर्चा सुरू आहे.
पनवेलमध्ये स्कूल बसला अपघात, विद्यार्थी जखमी
पनवेल : पनवेलमध्ये पळस्पे फाटा परिसरात ओएनजीसीच्या सीबीएसई बोर्डाच्या (केंद्रीय विद्यालयाच्या) स्कूल बसला अपघात झाला. स्कूल बस आणि टेम्पो यांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात स्कूलबसमधील तीन विद्यार्थी जखमी झाले.अपघात दुपारी झाला. अपघातात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. वेळेत उपचार मिळाल्यामुळे सर्व जखमींची प्रकृती स्थिर आहे. पोलीस अपघाता प्रकरणी तपास करत आहेत. दोषींवर नियमानुसार कारवाई केली जाणार असल्याचे वृत्त आहे.याआधी ११ फेब्रुवारी रोजी कर्जत चौक रोडवर एसटी बस आणि अर्टिगा कार यांची समोरासमोर धडक झाली, ज्यात कारमधील दोघे गंभीर जखमी झाले. लागोपाठ दोन दिवसांत पनवेल जवळ दोन मोठे अपघात झाले आहेत.
Stock Market: राष्ट्रीय शेअर बाजारचा निर्देशांक 'निफ्टी'मध्येही १४६.६५ अंकांची घसरण होऊन तो २५,८०७.२० च्या पातळीवर स्थिरावला. बाजारातील या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे सुमारे २.५ लाख कोटी रुपये एकाच दिवसात बुडाले आहेत.
SL vs OMA : यजमान श्रीलंकेने टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये आपला दबदबा निर्माण करत ओमानवर १०५ धावांनी ऐतिहासिक विजय नोंदवला आहे.
Ranka Jewellers: रांका ज्वेलर्सच्या 16 व्या भव्य दालनाचे भोसरी येथे उद्घाटन
Ranka Jewellers: राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी या नूतन शोरूमचे भव्य उद्घाटन करण्यात आले.
मुंबई: मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी (१२ फेब्रुवारी) फरार उद्योगपती विजय मल्ल्या यांच्याविरुद्ध कडक टिप्पणी केली आणि म्हटले की, जर तो भारतात परतला तरच त्याची याचिका ऐकली जाईल. न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले की, मल्ल्या भारतीय न्यायालयातून दिलासा मागत असताना कायदेशीर प्रक्रियेपासून वाचू शकत नाही. तुम्हाला परत यावे लागेल. जर तुम्ही परत येऊ शकत नसाल, तर आम्ही ही याचिका ऐकू शकत नाही, असे उच्च न्यायालयाने मल्ल्याला सांगितले आणि हे स्पष्ट केले की हे प्रकरण पुढे जाण्यासाठी त्याचे भारतात परत येणे ही एक पूर्वअट आहे.न्यायालयाने पुढे म्हटले की; मल्ल्या कायदेशीर प्रक्रियेला टाळत आहेत आणि देशाबाहेर राहून याचिका दाखल करण्याचा फायदा घेऊ शकत नाहीत. न्यायालयासमोरील याचिका फरार आर्थिक गुन्हेगार (FEO) कायद्याच्या तरतुदींना आव्हान देते. मल्ल्या स्वतःला भारतीय अधिकारक्षेत्रात सादर करत नाही तोपर्यंत ते याचिकेवर विचार करणार नाही असे उच्च न्यायालयाने सूचित केले.२०१६ पासून युकेमध्ये वास्तव्य करणाऱ्या विजय मल्ल्याने मुंबई उच्च न्यायालयात दोन याचिका दाखल केल्या आहेत, त्यापैकी एक त्यांना फरार आर्थिक गुन्हेगार घोषित करण्याच्या आदेशाला आव्हान देणारी आहे आणि दुसरी फरार आर्थिक गुन्हेगार (FEO) कायदा, २०१८ च्या घटनात्मक वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आहे. ७० वर्षीय मद्यसम्राटावर भारतात फसवणूक आणि मनी लाँड्रिंगशी संबंधित अनेक खटले दाखल आहेत.१८ फेब्रुवारी रोजी पुढील सुनावणीसाठी खंडपीठाने सांगितले की, मल्ल्याला भारतात परतण्यास इच्छुक आहे की नाही हे स्पष्ट करण्यासाठी ते आणखी एक संधी देत आहेत.तुम्ही न्यायालयाच्या प्रक्रियेला टाळाटाळ करत आहात हे आम्हाला नोंदवावे लागू शकते. तुम्ही कार्यवाहीचा फायदा घेऊ शकत नाही. तुमच्याशी पूर्णपणे निष्पक्ष राहून, आम्ही याचिका फेटाळत नाही आहोत तर तुम्हाला आणखी एक संधी देत आहोत, असे न्यायालयाने निरीक्षण नोंदवले.डिसेंबर २०२५ मध्ये झालेल्या मागील सुनावणीदरम्यान, खंडपीठाने आधीच सूचित केले होते की जर मल्ल्या भारतात परतले तरच ते याचिकेवर सुनावणी करतील आणि त्यांच्या वकिलांनाही ते स्पष्ट करण्यास सांगितले होते.गुरुवारी, खंडपीठाने मल्ल्या यांना परत येण्याचा त्यांचा हेतू आहे की नाही हे स्पष्टपणे सांगणारे प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश दिले. तुम्ही कधी येणार आहात? तुम्ही (मल्ल्या) आधीच असा युक्तिवाद केला आहे की तुम्हाला न्यायालयात प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय सुनावणीचा अधिकार आहे. पण प्रथम ते स्पष्टपणे सांगणारे प्रतिज्ञापत्र दाखल करा, असे मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर म्हणाले.मल्ल्याचे वकील अमित देसाई यांनी असा युक्तिवाद केला की न्यायालयीन उदाहरणे याचिकाकर्त्याच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय अशा याचिकांवर सुनावणी करण्याची परवानगी देतात.या याचिकेला विरोध करताना सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी असा युक्तिवाद केला की मल्ल्याने फरार घोषित झाल्यानंतरच एफईओ कायद्यातील तरतुदींना आव्हान दिले होते.
Pune: कला, कर्तृत्व आणि गुणवत्तेचा संगम म्हणजे खरा शिक्षणोत्सव – कृष्णकुमार गोयल
Pune: खडकी शिक्षण संस्थेचे टिकाराम जगन्नाथ महाविद्यालय आयोजित वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
यंदाच्या व्हॅलेंटाईन डेला केसांना ब्राऊन रंग देण्यामागील खास कारण जाणून घ्या
यंदाच्या प्रेम व्यक्त करण्याच्या मोसमात सर्वांच्या हृदयाचे ठोके पुन्हा वाढलेले दिसतील. प्रेमाच्या ऋतुमानात सौंदर्यही खुलेल. या सौंदर्यात दरवेळचा ट्रेण्ड मोडित काढत नवे काहीतरी पाहायला मिळेल. यंदा व्हेलेंटाईन डे साजरा करताना केसांना सर्वात रोमँटिक रंग देता येईल. यंदा इतरांना थक्क करण्यासाठी केसांना ब्राऊन (तपकिरी) रंग देणे उचित ठरेल. हा गंर केवळ साधा तपकिरी नसून, त्यात अनेक विविध छटा आहेत. एका प्रकारची कमालीची आकर्षकता दडलेली आहे. गोदरेज प्रोफेशनलचे नॅशनल टेक्निकल हेड शैलेश मूलिया यांच्या मते, या मोसमात ब्राऊन हा ख-या अर्थाने प्रेमाचा रंग ठरेल. या रंगातील नैसर्गिक चमक, सुटसुटीत लेयर्स केसांचे सौंदर्य अधिक खुलवतात. केसांना रोमँटिक लूक येतो. हा रंग प्रत्येक व्यक्तिमत्त्वाला साजेसा ठरत असल्याने सध्या हा रंग सर्वांच्या आवडीचा असल्याचे त्यांनी सांगितले.ब्राऊन रंग नैसर्गिक सौंदर्याशी मिळताजुळता असल्याने अधिक प्रभावी ठरतो. रोस्टेड आलमंड, हॉट चॉकलेट आणि बटरस्कॉच ब्लॉन्ड यांसारख्या शेड्समध्ये उबदारपणा आणि सुसंस्कृतपणा यांचा उत्तम मेळ दिसतो. या रंगांत दडलेल्या साधेपणामुळेच लोक आपोआप ब्राउन हेअर कलरकडे आकर्षित होतात. सलोन व्यावसायिक आणि ग्राहक या दोघांसाठीही ब्राउन हा रंग उत्तम पर्याय आहे. हा रंग भारतीय त्वचेच्या विविध छटांवर सहज उठून दिसतो. वेगवेगळ्या प्रकाशझोतात या रंगाचे सौंदर्य अधिकच बहरते. नवे केस आल्यानंतरही हा रंग मूळ रंगाशी साधर्म्य साधतो. या सर्व कारणांमुळे हा रंग सर्वांच्या पसंतीस उतरतो. ब्राऊन रंगामुळे केसांच्या सौंदर्याला आगळीवेगळी ओळख मिळते.तांत्रिक दृष्टीकोनातून विचार केल्यास ब्राऊन रंग ख-या अर्थाने कारागिरीचा उत्कृष्ट नमुना आहे. भडक रंगाच्या तुलनेत ब्राऊन शेडमध्ये केसाच्या रंगाचा समतोल राखला जातो. या रंगात केसाच्या नैसर्गिक छटांना महत्त्व दिले जाते. उदाहरणार्थ, हलका सोनेरी चमक असलेला रोस्टेड आलमंड ब्राऊन रंग चेह-याची ठेवण अधिक मृदू आणि आकर्षक बनवतो. हॉट चॉकलेटसारखी गडद शेड केसांना जाडपणा देत नाही. या रंगामुळे केसांमध्ये वेगळीच चमक आणि समृद्धी दिसून येते. बटरस्कॉच ब्लॉन्डचा वापर योग्य पद्धतीने केल्यास केसांचा नैसर्गिक तजेलपणा कायम राहतो. केसांसाठी हे रंग तयार करण्यासाठी तज्ज्ञ कोणतीही घाई करत नाहीत. याकरिता अचूकता आणि तांत्रिक कौशल्य आत्मसात करावे लागते.शास्त्रीय कारणाच्या आधारावरही ब्राऊन रंगाचे सौंदर्य अधिक खुलून दिसते. या रंगामुळे केस सुदृढ दिसतात. ब्राऊन रंगाच्या विविध छटांवर प्रकाश सर्व बाजूंनी समान रीतीने परावर्तित होतो. केसांना नैसर्गिक चमक मिळते. केसांचा पोतही मऊ आणि गुळगुळीत होतो. केसांमधील नैसर्गिक मेलॅनिनच्या छटांशी जुळणाहा हा रंग असल्याने केसांचा दाटपणा टिकून राहण्यास मदत होते. फिकट किंवा हाय-लिफ्ट शेड्समध्ये केस पातळ वाटू शकतात. यामुळेच ब्राऊन रंगामुळे केसांना योग्यरितीने लवचिकता येते. बरेचदा केसांना रंग लागल्यावर निस्तेजपणा दिसून येतो. मात्र ब्राऊन रंग केसांना समृद्धी देतो.सांस्कृतिकदृष्ट्या विचार केल्यास ब्राऊन रंग आधुनिक प्रेमाच्या बदलत्या स्वरुपाशी अगदी चपलख बसतो. आजच्या काळातील व्हलेंटाईन डे हा केवळ मोठ्या थाटामाटाच्या प्रदर्शनापुरता मर्यादित नसून, हा दिवस कॉफी डेट, शांतपणे एकत्रित घालवलेली रात्रीच्या जेवणाची वेळ आणि रोजच्या जगण्यातील जिव्हाळ्याच्या क्षणांवर आधारित आहे. हा सौम्य आणि मोहक रंग नेमका याच बदलास साजेसा ठरतो. यामध्ये कोणताही बडेजाव किंवा देखावा नसून, एका प्रकारचा आत्मविश्वास आणि नैसर्गिक आकर्षक आहे. या रंगामुळे तुमचे व्यक्तिमत्त्व प्रभावीपणे दिसून येते.ब्राऊन रंग वैयक्तिक आवडीनुसार बदलता येतो. केसांना अधिक चमक देण्यासाठी ग्लॉसिंग, गडद ब्राऊन रंग दिसावा याकरिता लो-लायटिंग किंवा चेह-याची ठेवण उठून दिसावी याकरिता सॉफ्ट कॉन्टूरिंग असे पर्याय उपलब्ध आहेत. हे रंग केसांचे सौंदर्य वाढवण्यासह रोजच्या वापरासाठीही अत्यंत उपयुक्त ठरतात. केसांसाठी हा रंग स्विकारताना तुम्हांला तुमच्या मूळ व्यक्तिमत्त्वात कोणताही बदल करण्याची गरज भासत नाही. ब्राऊन रंग तुमच्या नैसर्गिक सौंदर्याला प्रखरतेने सर्वांसमोर मांडतो.यंदाच्या व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने ब्राऊन रंगाच्या विविध छटा प्रेमाच्या बदलत्या स्वरुपाचे दर्शन घडवत आहेत. हे रंग अधिक मवाळ, वैयक्तिक आणि नैसर्गिक रंगाशी साधर्म्य साधतात. कोणत्याही अट्टाहासाशिवाय समोरच्या व्यक्तीवर कायमस्वरुपी प्रभाव टाकणारे हे सौंदर्य ख-या अर्थाने मनाला आकर्षित करते. केसांच्या सौंदर्याच्या भाषेत सांगायचे झाले तर हा रंग संबंधिताचा आत्मविश्वास द्विगुणित करतो, त्याच्या व्यक्तिमत्त्वाला उबदारपणा देतो. हा रंग खानदानी सौंदर्याचे प्रतीक आहे. ब्राऊन रंग संबंधिताची वेगळी आणि प्रभावी ओळख निर्माण करण्यास मदत करतो.
T20 World Cup 2026: 'या'खेळाडूला अंपायरशी वाद घालणं पडलं महागात
श्रीलंका: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात पंचांच्या निर्णयाचे उल्लंघन केल्याबद्दल अफगाणिस्तानचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू मोहम्मद नबी याला त्याच्या सामन्याच्या शुल्काच्या १५ टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. अफगाणिस्तानच्या डावाच्या १४ व्या षटकाच्या सुरुवातीला ही घटना घडली, जेव्हा नबी आणि गोलंदाज लुंगी न्गिडी यांच्या मनगटाच्या पट्ट्यावरून पंचांमध्ये बराच वेळ वाद झाला. मोहम्मद नबीने खेळाडू आणि खेळाडूंच्या सहाय्यक कर्मचाऱ्यांसाठी आयसीसीच्या आचारसंहितेच्या कलम २.४ चे उल्लंघन केले.आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान पंचांच्या सूचनांचे उल्लंघन करणे हे आयसीसीच्या आचारसंहितेच्या कलम २.४ चे उल्लंघन करणे आहे असे आयसीसीने आपल्या निवेदनात म्हटले आहे.यानंतर नबीने आपला गुन्हा कबूल केला आणि आयसीसी आंतरराष्ट्रीय सामनाधिकारी पॅनेलच्या डेव्हिड गिल्बर्टने सुचवलेला दंड स्वीकारला, त्यामुळे औपचारिक सुनावणीची आवश्यकता नव्हती, असे आयसीसीने निवेदनात म्हटले आहे. मैदानावरील पंच जयरामन मदनगोपाल आणि शरफुद्दौला इब्ने शाहिद, तिसरे पंच नितीन मेनन आणि चौथे पंच के.एन. अनंतपद्मनाभन यांनी मोहम्मदवर हा आरोप लावला होता.बुधवारी (११ फेब्रुवारी) झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानला दोन सुपर ओव्हरमध्ये हरवले.
मुंबई: कला संचालनालयामार्फत आयोजित ‘६५ वे महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन (विद्यार्थी विभाग)’ यंदा सांगली येथे आयोजित करण्यात येत असून, दि. १६ ते २२ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत कलाविश्व महाविद्यालय, शांतिनिकेतन आवार येथे हे प्रदर्शन पार पडणार आहे. शालेय विद्यार्थ्यांचा विशेष गौरव हे यंदाच्या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण ठरणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, राज्यातील शासकीय व खासगी कला संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला व्यासपीठ मिळावे या उद्देशाने हे प्रदर्शन दरवर्षी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आयोजित केले जाते. यंदा राज्यभरातून ३ हजार ,४९० विद्यार्थ्यांच्या एकूण ५ हजार ६८० कलाकृती प्राप्त झाल्या असून, त्यापैकी निवड समितीने १,२७५ उत्कृष्ट कलाकृतींची प्रदर्शनासाठी निवड केली आहे.या प्रदर्शनादरम्यान ज्येष्ठ कलावंत जी. एस. माजगावकर यांच्या दीर्घकालीन कलात्मक आणि शैक्षणिक योगदानाचा गौरव करत महाराष्ट्र शासनाच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.शालेय विद्यार्थ्यांसाठी यंदापासून एक नवा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यापूर्वी केवळ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी मर्यादित असलेल्या या व्यासपीठावर आता शासकीय रेखाकला परीक्षा (ग्रेड परीक्षा) आणि बालचित्रकला स्पर्धेतील गुणवंत शालेय विद्यार्थ्यांचाही गौरव केला जाणार आहे. शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांना थेट राज्याच्या मुख्य कला प्रवाहात सहभागी करून घेण्याचा हा निर्णय कला क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तसेच महाराष्ट्राचा समृद्ध कला वारसा पुढील पिढीकडे पोहोचविण्यासाठी हे प्रदर्शन महत्त्वाचे ठरेल.सांगलीकर कलाप्रेमी, विद्यार्थी आणि शिक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कलाविष्काराचा आनंद घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
Parth Pawar : भाजप नेतृत्वाने पार्थ पवार यांना राज्यसभेवर पाठवण्याच्या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवला आहे, अशा चर्चा रंगत आहेत.
Jasmine Sandlas : म्युझिक कॉन्सर्टमध्ये महिला सुरक्षित नसल्याचे अनेकदा समोर आले आहे. यातच आता पंजाबी गायिका जास्मिन सँडलासच्या कॉन्सर्टमध्ये देखील असा प्रकार घडला आहे. ज्यावेळी तिला तेथे आलेल्या काही महिलांसोबत दोन पुरुष गैरवर्तन करत असल्याचे दिसले. त्यावेळी गायिकेने कॉन्सर्ट मधेच थांबवले आणि तातडीने सुरक्षा रक्षकाला बोलावले आणि त्यांना बाहेर काढले. तिच्या ह्या कृतीचे आता सोशल […]
UBT: उबाठाकडून बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली; परभणीत बसवला मुस्लिम महापौर
मुंबई : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर ज्या प्रखर हिंदुत्वाचा आणि मराठी अस्मितेचा विचार जपला, त्या विचारांना पूर्णपणे तिलांजली देण्याचे काम उद्धव ठाकरेंनी केले आहे. ज्या परभणीने आजवर शिवसेनेच्या भगव्याला भक्कम साथ दिली, त्याच शहरात आता केवळ सत्तेच्या लांगुलचालनासाठी उबाठा गटाने मुस्लिम महापौर बसवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे 'मुंबईत जर उबाठाची सत्ता आली असती, तर तिथेही बुरखेवालीच महापौर दिसली असती', या भाजपच्या दाव्यावर आता परभणीच्या निमित्ताने शिक्कामोर्तब झाले आहे.भाजप मुंबईचा महापौर हा हिंदू आणि मराठीच देणार, हे स्पष्ट असतानाही उबाठा गटाने मुंबईकरांच्या मनात सातत्याने 'फेक नॅरेटिव्ह' पसरवण्याचे काम केले. मात्र, आता त्यांनी परभणीत मुस्लिम महापौर देऊन स्वतःचा खरा चेहरा उघड केला आहे. प्रखर हिंदुत्ववादी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परभणी शहरात उबाठा गटाने महापौरपदासाठी सय्यद इकबाल यांची निवड केली. याउलटज्या काँग्रेसवर लांगुलचालनाचा आरोप होतो, त्यांनी मात्र उपमहापौरपदासाठी गणेश देशमुख यांना संधी दिली आहे. या निर्णयामुळे परभणीच्या राजकीय वर्तुळात आणि निष्ठावान शिवसैनिकांमध्ये तीव्र आश्चर्य व संताप व्यक्त केला जात आहे.बाळासाहेबांना साथ देणारे शहरपरभणी हे शहर नेहमीच हिंदुत्ववादी विचारांशी जोडलेले राहिले आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या शब्दावर विश्वास ठेवून इथल्या मतदारांनी सातत्याने शिवसेनेला भरभरून मतांचे दान दिले. ज्या शहरात शिवसेनेची वाढच मुळी प्रखर हिंदुत्वाच्या जोरावर झाली, तिथे केवळ राजकीय तडजोडीपोटी मुस्लिम महापौर लादणे, हा सामान्य हिंदू मतदारांचा विश्वासघात असल्याची भावना जनमानसात उमटत आहे.हिंदू मतदारांमध्ये नाराजीचा सूरउद्धव ठाकरेंनी स्वतःच्या राजकीय सोयीसाठी मूळ विचारांना बाजूला सारल्याचे चित्र गेल्या काही वर्षांत दिसले आहे. मात्र, परभणीतील या निर्णयाने 'जनाब सेने'चा खरा चेहरा समोर आला आहे. बाळासाहेबांचे विचार आता फक्त नावालाच उरले असून, प्रत्यक्षात उबाठा गट केवळ विशिष्ट मतांच्या राजकारणासाठी लांगुलचालन करत आहे, अशी टीका भाजपचे माध्यम विभाग प्रमुख नगरसेवक नवनाथ बन यांनी केली. दरम्यान, उबाठाच्या या निर्णयामुळे परभणीतील हिंदू मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी पसरली असून, आगामी निवडणुकांमध्ये याचे पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Riteish Deshmukh post :अभिनेता रितेश देशमुख याने सोशल मीडियावरून पत्नी जेनिलियासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे.
India-France Rafale Deal: फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या दिल्ली भेटीपूर्वी दोन्ही देशांमधील राफेल लढाऊ विमानांच्या मेगा-डीलबद्दल एक आनंदाची बातमी समोर आली आहे.
Bus Accident : ओतूर टोलनाक्याजवळ सहलीच्या बसचा अपघात; १४ विद्यार्थी जखमी
Bus Accident :अहिल्यानगर- कल्याण महामार्गावर ओतूर हद्दीत खामुंडी (डुंबरवाडी) येथील टोलनाक्याच्या पुढे आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास सहलीच्या एसटी बसचा अपघात झाला. यात १४ विद्यार्थी जखमी झाले आहेत. ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांनी याबाबत माहिती दिली आहे. नेवासा तालुक्यातील पिंपरी शहाले येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या सहलीच्या बसचा गुरुवारी […]
Vijaynagar: संसदेत विजयनगरचा मुद्दा; ‘भारताच्या पहिल्या गावात’ लवकरच मोबाइल नेटवर्क
भाजप खासदार तापिर गाओ यांनी संसदेत विजयनगरमधील खराब दूरसंचार सेवेचा प्रश्न मांडला. त्यांनी सांगितले की, या भागातील स्थानिक नागरिकांसोबतच तेथे तैनात असलेल्या भारतीय सेना आणि अर्धसैनिक दलांनाही नेटवर्कअभावी मोठ्या अडचणी येत आहेत.
Supriya Sule On Rohit Pawar : 'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी सविस्तर चौकशी करणार असल्याचं आश्वासन दिलं आहे.'
Actress Prarthana Behere : प्रार्थना वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांसमोर आली. तिची खऱ्या आयुष्यातील आलिशान लाईफस्टाईलचीही नेहमीच चर्चा होते.
Jaahnavi Kandula Accident Case: अमेरिकेत २०२३ मध्ये रस्ता ओलांडताना एका वेगवान पोलिस वाहनाने धडक दिल्याने तिचा मृत्यू झाला होता. अमेरिकेतील सिएटल शहराने २३ वर्षीय भारतीय विद्यार्थिनी जान्हवी कंदुला हिच्या कुटुंबासोबत २९ दशलक्ष डॉलर्सच्या तडजोडीवर सहमती दर्शवली आहे.
Kiren Rijiju: काँग्रेसच्या खासदारांकडून लोकसभा अध्यक्षांना शिवीगाळ; भाजपा नेत्याकडून व्हिडीओ शेअर
मुंबई: केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी गुरुवारी (१२ फेब्रुवारी) लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या सभागृहातील एक व्हिडिओ शेअर केला. ४ फेब्रुवारी रोजी संसदेत विरोधी पक्ष आणि सरकार यांच्यात झालेल्या संघर्षादरम्यान काँग्रेस खासदारांच्या एका मोठ्या गटाने त्यांना शिवीगाळ केली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना धमकावले असा आरोप त्यांनी केला. या व्हिडिओमध्ये लोकसभा अध्यक्षांच्या दालनात काँग्रेस पक्षाच्या महिला खासदार दिसत आहेत, जिथे त्या भाजप मंत्र्यांशी वाद घालताना दिसत आहेत.केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी १० फेब्रुवारी रोजी लोकसभेतील गोंधळाचा व्हिडीओ पोस्ट केला होता. पंतप्रधान मोदींचे राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर उत्तराचे भाषण होणार होते. पण, काँग्रेसच्या महिला खासदार पंतप्रधानांच्या आसनाजवळ गेल्याने गोंधळ झाला होता.व्हिडिओ क्लिप शेअर करताना, रिजिजू यांनी X वर लिहिले, ही एक बेकायदेशीर व्हिडिओ क्लिप आहे जी एका काँग्रेस खासदाराने घेतली होती जेव्हा २०-२५ काँग्रेस खासदार माननीय सभापतींच्या दालनात घुसले, त्यांना शिवीगाळ केली आणि माननीय पंतप्रधानांना धमकी दिली.This is the illegal video clip taken by a Congress MP when 20-25 Congress MPs entered the Chamber of Hon’ble Speaker, abused him and threatened Honb'le Prime Minister. Our party believes in debate & discussion and never encourage MPs to threaten physically. https://t.co/bezzALc7D3 pic.twitter.com/iM0a50Z4rg— Kiren Rijiju (@KirenRijiju) February 12, 2026आम्ही वादविवाद आणि चर्चेवर विश्वास ठेवतो:किरेन रिजिजू यांनी गुरूवारी (१२ फेब्रुवारी) नवीन व्हिडीओ शेअर केला आहे. जेव्हा काँग्रेसचे २० ते २५ खासदार लोकसभा अध्यक्षांच्या कार्यालयात गेले होते, तेव्हा बेकायदेशीरपणे काँग्रेस खासदाराने हा व्हिडीओ बनवला आहे. काँग्रेस खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना शिवीगाळ केली. त्यांनी पंतप्रधान मोदींना धमकी दिली. आमचा पक्ष चर्चा आणि वादविवादावर विश्वास ठेवतो आणि खासदारांना धमक्या देण्यासाठी प्रोत्साहन देत नाही, असा गंभीर आरोप रिजिजू यांनी केला आहे.काँग्रेस महिला खासदारांकडून गोंधळ:मंगळवारी लोकसभेत काँग्रेस खासदारांनी आक्रमक निषेध केल्याचा व्हिडिओ शेअर केल्यानंतर रिजिजू यांनी हा व्हिडिओ शेअर केला. लोकसभेतील आतील दृश्यांमध्ये ४ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान मोदी भाषण देण्याच्या काही मिनिटांपूर्वीच त्यांच्या आसनाजवळ महिला काँग्रेस खासदार जमल्याचे नाट्य दिसून आले.काँग्रेसच्या महिला खासदार पंतप्रधानांच्या आसनाजवळ जमल्या, त्यांच्या हातात एक मोठा बॅनर होता ज्यावर जो अच्छा समझो, वही करो असे लिहिले होते.विशेष म्हणजे, त्यांनी धरलेल्या बॅनरवरील मजकूर जनरल (निवृत्त) एमएम नरवणे यांच्या 'फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी' या अप्रकाशित पुस्तकावर आधारित लेखातील एका वाक्याचा संदर्भ होता.२०२० च्या भारत-चीन संघर्षावर माजी लष्करप्रमुख जनरल एमएम नरवणे यांच्या अप्रकाशित आत्मचरित्राचे वाचन करण्यास काँग्रेस नेते राहुल गांधी यांना गेल्या आठवड्यात परवानगी नाकारण्यात आल्यानंतर ही घटना घडली.
PMO Office Shift: तब्बल ७८ वर्षांनंतर पंतप्रधान कार्यालयाचा पत्ता बदलणार
दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या म्हणजेच शुक्रवार १३ फेब्रुवारी रोजी दुपारी पंतप्रधान कार्यालयचा (पीएमओ) पत्ता बदलणार आहेत. तब्बल ७८ वर्षांनंतर पीएमओचं ऑफिस स्थलांतरित करण्यात येणार आहे.मिळालेल्या माहितीनुसार साउथ ब्लॉकमधून 'सेवा तीर्थ' नावाच्या नवीन बांधलेल्या इमारतीत हे ऑफिस हलवण्यात येणार आहे. त्यापूर्वी पंतप्रधान मोदी साउथ ब्लॉकमध्ये झालेल्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवतील. या बैठकीनंतर, केंद्रीय मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी रायसिना हिलवरील एक किलोमीटरपेक्षा कमी अंतरावर असलेल्या नवीन संकुलात जातील.मिळालेल्या माहितीनुसार; मागील ५ दशकांपासून सरकारच्या सर्व महत्त्वाच्या निर्णयाचं केंद्र राहिलेले साऊथ ब्लॉकमधील पंतप्रधानांचे कार्यालय आता ब्रिटीश कालीन इमारतीतून नव्या सेवा तीर्थ येथे शिफ्ट होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी साऊथ ब्लॉकमध्ये होणाऱ्या कार्यालयात अखेरची कॅबिनेट बैठक घेतील. त्यानंतर नव्या प्रशासकीय भवनाचे उद्घाटन करण्यात येईल. रायसीना हिलजवळ नवी प्रशस्त इमारत साऊथ ब्लॉकपासून काहीच अंतरावर आहे.या कॅबिनेट बैठकीनंतर केंद्रीय मंत्री आणि अधिकाऱ्यांसोबत पंतप्रधान साऊथ ब्लॉकपासून सेवा तीर्थला जातील. जिथे पंतप्रधान कार्यालय, कॅबिनेट सचिवालय, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांचे कार्यालय आणि इंडिया हाऊस आहे. इंडिया हाऊसमध्ये उच्चस्तरीय शिष्टमंडळाचा पाहुणचार करण्यासाठी बनवलेले नवीन ठिकाण आहे. देशाच्या स्वातंत्र्यानंतर पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वात पहिली कॅबिनेट बैठक साऊथ ब्लॉकमध्येच झाली होती.
Navnath Ban: काँग्रेसची गुलामगिरी करणाऱ्या राऊतांनी स्वाभिमानाची भाषा करू नये; नवनाथ बन यांचा घणाघात
मुंबई: वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचे हिंदुत्वाचे विचार विसरून काँग्रेसची गुलामगिरी करणाऱ्या राऊतांनी स्वाभिमानाची भाषा करू नये, असा घणाघात भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी गुरुवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अमेरिकेबरोबरचा व्यापार करार स्वाभिमानाने करण्यात आला असून त्यातून देशाचा फायदाच होणार असल्याचेही बन यांनी नमूद केले.भारत- अमेरिका व्यापार करार भारताच्या वाढत्या सामर्थ्याचा पुरावाभारत-अमेरिका व्यापार करार करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने भारतमाता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या चरणी गुलाम ठेवली असा आरोप करणा-या राऊतांचा खरपूस समाचार घेत बन म्हणाले की, भारत-अमेरिका व्यापार करार हा ताठ मानेने, देशहिताला प्राधान्य देत करण्यात आलेला आहे. त्यात कोणतीही गुलामगिरी नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वामुळे जागतिक स्तरावर भारताच्या वाढत्या सामर्थ्याचा पुरावा आहे.महापालिकेमध्ये दाऊदच्या घोषणा द्यायच्या का?महापालिका सभागृहात घुमलेल्या ‘मोदी, मोदी’ आणि ‘देवाभाऊ’च्या घोषणांनी राऊतांना आणि विरोधकांना कानठळ्या बसल्या. कारण भाजपा महायुती सरकारच्या विकास, पारदर्शकता आणि ठाम निर्णयक्षम नेतृत्वावर असलेल्या विश्वासाची पोचपावती या घोषणांतून दिसली. महापालिकेमध्ये पंतप्रधान मोदी आणि देवा भाऊंच्या घोषणा द्यायच्या नाही तर काय राऊत किंवा दाऊदच्या घोषणा द्यायच्या का? असा खोचक सवालही बन यांनी केला .अजितदादांच्या अपघाताबाबत रोहित पवारांचे राजकारणअजित दादांचा विमान अपघात हा अत्यंत दुर्दैवी होता. या अपघाताची गंभीर दखल केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोन्ही स्तरांवर घेतली गेली आहे. केंद्र सरकार, एअरपोर्ट अथॉरिटी तसेच राज्य सरकारकडून उच्चस्तरीय चौकशी सुरू आहे. शरद पवार यांनीही या अपघातात घातपाताची शक्यता फेटाळून लावली असताना अशा संवेदनशील प्रकरणात रोहित पवार जाणीवपूर्वक खोटे आणि निराधार आरोप करून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत अशी टीका बन यांनी केली.संजय राऊत यांनी केलेले आरोप निराधारअजित दादांनी शेवटच्या दिवशी कोणत्या फाईलवर स्वाक्षरी केली, याची अधिकृत माहिती राज्य सरकारकडून मिळेल. भाजपाच्या भ्रष्टाचाराच्या फाइल्स स्व. अजितदादांकडे होत्या अशी आरडाओरड करत नाहक पत्रकार परिषदांमधून हवेत तीर मारण्याऐवजी राऊतांकडे या संदर्भात कोणतेही ठोस पुरावे असतील, तर ते संबंधित तपास यंत्रणांकडे सादर करावेत असे आव्हान बन यांनी दिले. योग्य तपास करून सत्य समोर आणले जाईल अशी ग्वाही बन यांनी दिली.माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याबद्दल अतिशय घाणेरड्या शब्दांत राऊतांनी केलेल्या टीकेवर पलटवार करत बन म्हणाले की, कोविड काळात राऊत आणि उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्रासमोर उघडे करण्याचे काम तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले होते. कोश्यारी नसते तर कोविड काळात महाराष्ट्राचे वाटोळे तुम्ही केले असते असा हल्लाबोल बन यांनी केला.
BJP Files Notice Against Rahul Gandhi: काँग्रेस खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे संसदेतील सदस्यत्व रद्द करण्याची मागणी करणारा प्रस्ताव भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी लोकसभेत मांडला आहे.
संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजनेतून बीड जिल्ह्यात आणखी ११ वसतिगृहे उभारणीस शासनाकडून १५९.३६ कोटी रुपये निधी उपलब्ध!दिवंगत अजित पवार यांनी बीड येथील ऊसतोड कामगार मेळाव्यात धनंजय मुंडेना दिला होता शब्द!मुंबई (प्रतिनिधी) - लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या अंतर्गत तत्कालीन सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी सुरू केलेल्या संत भगवान बाबा शासकीय वसतीगृह योजनेला व्यापक स्वरूप प्राप्त होत असून धनंजय मुंडे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश आले आहे.धनंजय मुंडे यांनी सामाजिक न्याय मंत्री असताना २५ जून, २०२१ रोजी या योजनेची घोषणा करून प्रत्यक्षात अंमलबजावणी सुरू केली होती. त्यामुळे मुंडे जनक असलेल्या संत भगवान बाबा शासकीय वसतीगृह योजनेच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील सर्व ११ तालुक्यांमध्ये शंभर क्षमतेचे मुलींसाठी एक व मुलांसाठी एक असे एकूण २२ वसतीगृह मंजूर करून भाड्याच्या जागेत सुरू करण्यात आलेले आहेत. दरम्यान त्यापैकी आतापर्यंत तीन वसतीगृहांना स्वतःची जागा व निधी मिळालेला असून त्याचे बांधकाम प्रगतीपथावर असून, उर्वरित १९ पैकी ११ वसतीगृहांसाठी जागेसह १५९ कोटी छत्तीस लाख रुपयांचा निधी राज्य शासनाने उपलब्ध करून दिला आहे. याबाबतचा शासन निर्णय सामाजिक न्याय विभागाच्या वतीने निर्गमित करण्यात आला आहे.ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या हातात भविष्यात कोयत्याच्या ऐवजी वही, पुस्तक आणि पेन यावेत असे स्वप्न उराशी बाळगून धनंजय मुंडे यांनी सामाजिक न्याय मंत्री असताना संत भगवान बाबा शासकीय वसतीगृह योजनेची घोषणा करत सुरुवात केली होती. त्या अंतर्गत ऊसतोड कामगारांची सर्वाधिक संख्या असलेल्या राज्यातील ४१ तालुक्यांमध्ये ८२ वसतीग्रह सुरू करण्याची घोषणा धनंजय मुंडे यांनी करून बीड जिल्ह्यातील सर्व ११ तालुक्यांमध्ये प्रत्येकी दोन याप्रमाणे २२ वसतीग्रहे भाड्याच्या जागेत सुरू केली होती.दरम्यान यापैकी तीन वसतीगृहे ही स्वतःच्या जागेमध्ये उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला असून आता आणखी उर्वरित १९ पैकी ११ वसतीगृहांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यामध्ये परळी सह पाटोदा, गेवराई, केज, माजलगाव या तालुक्यातील प्रत्येकी दोन तर बीड तालुक्यातील एक वसतिगृह उभारले जाणार आहे. तर प्रयत्न वसतिगृह उभारणीसाठी सुमारे १४ कोटी ५५ लाख रुपये इतका निधी खर्च केला जाणार आहे.अजितदादांचा शब्द अन् मुंडेंची कृतज्ञता:काही दिवसांपूर्वी बीड जिल्हा दौऱ्यावर असताना बीड जिल्ह्याचे पालकमंत्री दिवंगत नेते अजित पवार यांनी बीड येथे आयोजित एका ऊसतोड कामगारांच्या मेळाव्यामध्ये धनंजय मुंडे यांनी आजपर्यंत ऊसतोड कामगारांसाठी केलेल्या कामाचे कौतुक करतानाच संत भगवान बाबा शासकीय वसतीगृह योजनेतून सर्व ११ तालुक्यांमध्ये बावीस वसतीगृह ही स्वतःच्या जागेत उभारून देऊ व त्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही असा शब्द दिला होता, तो शब्द आता पूर्णत्वाकडे जात असून धनंजय मुंडे यांनी अजितदादा पवार यांची आठवण काढत त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचेही आभार व्यक्त केले आहेत.
Uddhav Thackeray :जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालावर उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे
Social Media Ban: रशियामध्ये सोशल मीडियावर मोठा हल्ला झाला आहे. पुतिन सरकारने व्हॉट्सअॅप, युट्यूब आणि इंस्टाग्रामसह अनेक परदेशी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातली आहे.
Surbhi Jyoti : अभिनेत्री सुरभी ज्योतीने दिली गुडन्यूज; लग्नाच्या दीड वर्षानंतर होणार आई
Surbhi Jyoti :
Gold-Silver Rate: आनंदवार्ता! बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या आजचे भाव
मुंबई: गुरुवार १२ फेब्रुवारी रोजी बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. चांदीच्या दरात तब्बल २,५०० रुपयांनी तर सोन्याच्या दरात १००० रुपयांची घसरण झाली आहे.गुरुवारी कमोडिटी बाजारात व्यवहार सुरू झाले तेव्हा केवळ चांदीच्या किमतीतच घसरण झाली नाही तर सोन्याच्या किमतीतही घसरण झाली. चांदीप्रमाणेच, सोन्याच्या किमतीनेही २९ जानेवारी रोजी विक्रमी उच्चांक गाठला होता.गुरुवार, १२ फेब्रुवारीला मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया (MCX) वर सोने आणि चांदीच्या किमती घसरल्या आहेत. ही घसरण प्रामुख्याने अमेरिकन डॉलरची मजबूती आणि आंतरराष्ट्रीय किमतीतील कमकुवतपणामुळे झाली आहे. सोन्याच्या किमती ०.४७% घसरून प्रति १० ग्रॅम १,५८,००० वर आल्या. सध्या सोने प्रति १० ग्रॅम १,५८,०७९ वर व्यवहार करत होते, म्हणजेच ०.४३% ची घसरण झाली आहे.सोने १,५७,७०१ रुपयांवर आणि चांदी २,६०,४५३ रुपयांवर घसरली आहे. अमेरिकन डॉलर मजबूत झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्थरावर सोने-चांदी देखील कमकुवत झाले आहे. या सोने-चांदीच्या घसरत्या दरामुळे गुंतवणूकदार सावध राहून खरेदी-विक्री करत आहेत. आणि व्यापाऱ्यांमध्ये आणि ग्राहकांमध्ये या चढ – उतारामुळे संमिश्र वातावरण आहे.तज्ञांचे म्हणणे आहे की, गुंतवणूकदार आता शुक्रवारी येणाऱ्या अमेरिकन चलनवाढीच्या आकडेवारीवर लक्ष केंद्रित करत आहेत, जे चलनविषयक धोरणाच्या दिशेचे संकेत देतील. जानेवारीतील मजबूत रोजगार आकडेवारी आणि डॉलरच्या तेजीमुळे सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण झाली आहे.
WhatsApp ban in Russia: पुतिन सरकारकडून व्हॉट्सअॅपसह अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी
रशियामध्ये अनेक प्रमुख आंतरराष्ट्रीय डिजिटल प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्यात आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, व्हॉट्सअॅप, यूट्यूब, इंस्टाग्राम आणि फेसबुक सारखे लोकप्रिय प्लॅटफॉर्म आता रशियात वापरण्यास बंदी आहे.अहवालांनुसार, केवळ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच नाही तर अनेक आंतरराष्ट्रीय मीडिया संस्थांच्या वेबसाइट्सवरही सरकारकडून बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये बीबीसी, ड्यूश वेले, रेडिओ फ्री युरोप आणि रेडिओ लिबर्टी सारख्या साइट्सचा समावेश आहे. अनामिक ब्राउझिंगसाठी वापरला जाणारा टॉर ब्राउझर देखील ब्लॉक करण्यात आला आहे.डिजिटल क्षेत्राच्या सुरक्षिततेसाठी:रशियाने आपल्या डिजिटल क्षेत्राला सुरक्षित करण्यासाठी आणि स्थानिक प्लॅटफॉर्मना प्रोत्साहन देण्यासाठी व्हॉट्सअॅपवर (WhatsApp) निर्बंध कडक केले आहेत. बुधवार (११ फेब्रुवारी २०२६) रोजी समोर आलेल्या माहितीनुसार, रशियन अधिकाऱ्यांनी व्हॉट्सअॅप पूर्णपणे ब्लॉक करण्याच्या दिशेने पावले उचलली आहेत.स्वदेशी 'MAX' या अॅपचा वापर वाढवण्यासाठी:यामागील उद्देश सुमारे १० कोटी वापरकर्त्यांना रशियाच्या स्वदेशी 'MAX' या अॅपकडे वळवणे हा आहे. क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेसकोव यांनी स्पष्ट केले की, व्हॉट्सअॅपला रशियात कार्यरत राहायचे असल्यास देशाच्या कायद्यांचे पालन करणे आवश्यक आहे. त्यांनी सांगितले की मेटा (Meta) चर्चा आणि नियमांचे पालन करण्यास तयार असेल तरच यावर काही तोडगा निघू शकतो.रशियाची संचार नियामक संस्था रोसकोमनादजोरने व्हॉट्सअॅपला आपल्या अधिकृत सेवा नोंदणी यादीतूनही काढून टाकले आहे. रशियन अधिकाऱ्यांचा आरोप आहे की परदेशी तंत्रज्ञान कंपन्या स्थानिक कायद्यांचे पालन आणि डेटा शेअरिंगबाबत सहकार्य करत नाहीत.हा निर्णय सुरक्षा आणि फसवणूक रोखण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे.
Uttar Pradesh: तीन बहिणींच्या आत्महत्या प्रकरणात नवा ट्विस्ट, पोलिसांनी केला वडिलांचा फोन जप्त
उत्तर प्रदेशा: गाझियाबादमधील एका घराच्या नवव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करणाऱ्या तीन बहिणींच्या प्रकरणात पोलिसांना एक महत्त्वाचा धागा सापडला आहे. घटनेच्या सुमारे १५ दिवस आधी मुलींच्या वडिलांनी एका दुकानदाराला १५ हजार रुपयांना विकलेला मोबाईल फोन पोलिसांनी जप्त केला आहे. हा फोन दिल्लीच्या शालीमार गार्डन परिसरात सापडला.पोलिस उपायुक्त निमिश पाटील म्हणाले की, मोबाईल डेटा रिकव्हर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यामुळे आत्महत्येचा संबंध टास्क-आधारित ऑनलाइन कोरियन गेमशी आहे की नाही हे निश्चित होण्यास मदत होईल. कुटुंब आणि जवळच्या काही लोकांनी असा दावा केला की तिन्ही बहिणींना अशा गेमचे व्यसन होते.४ फेब्रुवारी रोजी, १६ वर्षीय निशिका, १४ वर्षीय प्राची आणि १२ वर्षीय पाखी यांनी त्यांच्या इमारतीच्या नवव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. या घटनेनंतर, त्यांचे वडील चेतन कुमार म्हणाले की, त्यांच्या मुली सुमारे तीन वर्षांपासून कोरियन गेम खेळत होत्या आणि त्यातच रमल्या होत्या. त्यांनी असाही दावा केला की यामुळेच त्या शाळा चुकवत होत्या.तथापि, सुरुवातीच्या पोलीस तपासात कोणत्याही विशिष्ट कोरियन टास्क-आधारित अॅपच्या वापराचे कोणतेही ठोस पुरावे आढळले नाहीत. सत्य उघड करण्याचा प्रयत्न करण्यासाठी पोलीस आता मोबाइल डेटा तपासत आहेत.डायरीने केली अनेक गुपिते उघडतिन्ही बहिणींच्या खोलीत नऊ पानांची एक छोटी डायरी देखील सापडली. त्यात त्यांचे विचार आणि भावना होत्या. त्यातून कोरियन संस्कृतीबद्दलचे त्यांचे प्रेम दिसून येते, ज्यामध्ये 'आम्हाला कोरियन आवडते' असे शब्द वारंवार लिहिलेले आहेत.या डायरीत असाही आरोप आहे की, त्यांचे कुटुंब त्यांच्यावर कोरियन पद्धती सोडून भारतीय लग्न करण्यासाठी दबाव आणत होते. मुलींनी लिहिले की कोरियन हे त्यांचे जीवन आहे आणि ते त्या सोडू शकत नाहीत. तिच्या वडिलांनी तिचा फोन जप्त केल्यानंतर ती खूप दुःखी झाल्याचे तपासात समोर आले. ती ऑनलाइन गेम खेळू शकत नव्हती आणि तिचा कोरियन मित्रांशी संपर्क तुटला होता. डायरीमध्ये शारीरिक शिक्षेचाही उल्लेख आहे. शेवटी, ती तिच्या वडिलांची माफी मागते आणि लिहिते, तुमच्या मारहाणीपेक्षा माझ्यासाठी मृत्यू बरा... माफ करा, बाबा.पोलिस सध्या मोबाईल फोन डेटाची फॉरेन्सिक तपासणी करत आहेत. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, संपूर्ण सत्य समोर आल्यानंतरच या दुःखद कृत्यामागील खरे कारण काय होते हे स्पष्ट होईल.
PM Modi Office:
Ankush Kakade : “दादा तुम्ही आज महत्त्वाचा निर्णय…”; राष्ट्रवादीच्या नेत्याची पोस्ट
Ankush Kakade : 'दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण करण्यासाठी १२ फेब्रुवारी ही तारीख खुद्द अजित पवार यांनीच चर्चेअंती ठरवली होती.'
Sanjay Raut :महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला.
Kiara Advani : मात्र कियारा पुन्हा मोठ्या पडद्यावर झळकण्यासाठी तयार असल्याची चर्चा आहे. माध्यमांतील माहितीनुसार, मुलीच्या जन्मानंतर सुमारे सात महिन्यांनी तिने नव्या स्क्रिप्ट्स ऐकायला सुरुवात केली आहे. प्रसिद्ध दिग्दर्शिका अश्विनी अय्यर तिवारी यांच्यासोबत ती नव्या चित्रपटासाठी हातमिळवणी करू शकते, अशी माहिती आहे.
Bangladesh General Elections: बांगलादेशमध्ये आज सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होत आहे. या निवडणुकीबाबत, शेख हसीना यांचा पक्ष, अवामी लीग, यांनी बांगलादेशचे विभाजन होण्यापासून वाचवण्यासाठी, ते आंतरराष्ट्रीय समुदायाला आवाहन करतात
ठाणे: शहापूर नगरपंचायतीच्या वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना पुरेसे व स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲड. निरंजन डावखरे यांनी ठाणे येथे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले.शहापूर नगरपंचायत महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेनुसार स्थापन झाल्यानंतर शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. सन १९८३ मधील जुनी पाणीपुरवठा योजना कालबाह्य झाल्याने नागरिकांना पुरेसे व स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे कठीण झाले आहे. शहराची भावी वाढ व सन २०४४ पर्यंतची पाण्याची गरज लक्षात घेऊन भातसा नदी या स्त्रोतावर आधारित नवीन पाणीपुरवठा योजना प्रस्तावित करण्यात आली असल्याचे आमदार डावखरे यांनी निवेदनात नमूद केले.नगरपंचायतीने आवश्यक ठराव करून पाणी आरक्षणाचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला असून, काही खासगी प्रकल्पांचे पाणी आरक्षण रद्द झाल्यानंतर उपलब्ध झालेल्या सुमारे २.५७ दलघमी/वर्ष पाणी आरक्षण शहापूर नगरपंचायतीस देण्याबाबतचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात आलेला आहे.आमदार डावखरेंनी निवेदनात काय म्हटले?आमदार निरंजन डावखरे यांनी निवेदनात म्हटले की, शहापूर नगरपंचायत ही महाराष्ट्र शासनाच्या दि. ११ मार्च २०१५ च्या अधिसूचनेनुसार नव्याने स्थापन झालेली नगरपंचायत असून शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. सन १९८३ मध्ये अस्तित्वात आलेली जुनी पाणीपुरवठा योजना कालबाह्य झाल्याने नागरिकांना पुरेसे व स्वच्छ पिण्याचे पाणी पुरविणे शक्य होत नाही. शहराची भावी वाढ व सन २०१४ पर्यंतची पाण्याची गरज लक्षात घेता, भातसा नदी या खात्रीशीर उद्भवावरून नवीन पाणीपुरवठा योजना प्रस्तावित करण्यात आलेली आहे. नगरपंचायतीने याबाबत आवश्यक ठराव करून पाणी आरक्षणाचा प्रस्ताव सादर केला आहे. संदर्भीय पत्रानुसार काही खासगी प्रकल्पांचे पाणी आरक्षण रद्द झालेले असून त्यापैकी २.५५ दलघमी/वर्ष पाणी आरक्षण शहापूर नगरपंचायतीस देण्याबाबतचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात आलेला आहे. सदर प्रस्ताव अत्यंत लोकहिताचा असल्याने त्यास तातडीने मंजुरी देण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी, ही विनंती.
Sanjay Raut : चंद्रपूर महापालिकेतील भाजप-उबाठा गटाच्या युतीवर खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे.
मरोळ येथे आंतरराष्ट्रीय दर्जाची उभारणीमासेमारी बंद कालावधीत २,८१६ मच्छीमार लाभार्थ्यांना उपजीविका व पोषण सहाय्याचा समावेश – PMMSY अंतर्गत महत्त्वपूर्ण निर्णय
मुंबई: बिग बॉस मराठीचा सहावा सीझन सध्या जोरदार चर्चेत आहे. अशातच बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वात घरातील सदस्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दिव्या शिंदेची बिग बॉसच्या घरातून हाकालपट्टी करण्यात आली. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडलेल्या दिव्या शिंदेनं नुकतीच एक पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली आहे. तसेच तिने अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. तसेच बिग बॉस मराठीच्या टीमवरही गंभीर आरोप केले आहेत.काय म्हणाली दिव्या शिंदे ?बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनमध्ये सहभागी झालेली स्पर्धक दिव्या शिंदे बिग बॉसच्या घरात जाण्यासाठी निवड कशी केली जाते? याबाबत बोलताना म्हणाली की, त्यांची टीम माझ्याकडे आलेली. तीन मिटिंग झालेल्या. मी काही अटी ठेवलेल्या. त्यांनी त्या मान्यसुद्धा केल्या. मी माझ्या आजारपणाबद्दलही त्यांना सांगितलेलं. मला आराम करायला वेळ मिळाला नव्हता. मी त्यांना सांगितलेलं, मी फिजिकली फिट नाहीये. त्यावर त्यांनी मला सांगितलं, 'नाही नाही ताई...आम्ही काळजी घेऊ...पुढे बोलताना, माझी काही काळजी घेतली नाही. जेव्हा मी मरणाच्या दारात होते तेव्हा दोन दिवसांनी मला इंजेक्शन दिलं. हल्ली माझा ऑक्सिजन कमी होत होता. दोन दिवसानंतर मला इंजेक्शन देण्यात आलं. तेव्हा मी रडत होते जोर-जोरात. माझी काही काळजीच त्यांनी घेतलेली नाहीये..., असं दिव्यानं सांगितलं.'बिग बॉसनं खरं फुटेज दाखवलंच नाही'बिग बॉसनं टास्क दरम्यान दिव्या आणि इतर स्पर्धकांमध्ये झालेल्या शाब्दिक बाचाबाचीचं सर्व फुटेज काही दाखवलं नाही, असा आरोप केला आहे. तसेच, स्पष्टीकरण देताना तिनं सांगितलं की, ज्यावेळेस मी कन्फेशन रूममध्ये होते, त्यावेळी मी म्हणालेली मला शो सोडायचाय. मी हा शो पुढे करू शकत नाही. माझ्या मान-सन्मानावर गोष्टी यायला लागल्या आहेत. हे कायम मला Poke करतायत. त्यामुळे मी बाहेर जाण्यासाठी इच्छुक आहे आणि मला कळून गेलेलं, या गोष्टी आपल्यासाठी नाहीयेत. तेव्हा मी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. हे त्यांनी दाखवलं नाहीये. त्याचबरोबर बाकीचे स्पर्धक माझ्याकडे आले, ही धमकी आहे धमकी आहे म्हणत, त्यामध्ये जे संभाषण आहे, तिथेही मी माझा मुद्दा मांडलेला. पण, त्यांनी ते दाखवलं नाही...\प्राजक्ता शुक्रेनं मला सांगितलं की तू म्हण 'शब्दांची तलवार' त्यावर मी तिला म्हटलं, 'अगं, तू मला हे सांगायची गरज नव्हती, कारण माझ्या डोक्यातच हे होतं. मी तेच बोलणार होते, पण थांबून बोलणार होते. हेही त्यांनी दाखवलं नाही. राकेश बापट, प्राजक्ता शुक्रे, ओमकार राऊत, करण सोनावणे यांच्यासोबत माझं बोलणं झालेलं, कन्फेशन रूममध्ये जाण्याअगोदर, पण त्यांनी ते फुटेजसुद्धा दाखवलं नाही. मी राकेश बापटला माझा मुद्दा स्पष्ट केला, त्यांनी बिग बॉसला समजावण्याचा प्रयत्न केला..., असं दिव्या शिंदेनं सांगितलं.
New Labor Code : ‘आठवड्यात ४८ तास काम करा आणि सुट्टी घ्या’; विकसित देशातील पॅटर्न राज्यात लागू होणार
New Labor Code : इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, जपान यांसारख्या विकसित देशांत प्रचलित असलेली पद्धत
Accident News : या अपघाताची माहिती मिळताच शहाली पिंप्री गावचे सरपंच सतिष चंदन यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमी विद्यार्थी व शिक्षकांची भेट घेवून मदतीचा हात दिला.
NCMC Card: एनसीएमसी कार्ड असेल तरच मिळणार एसटी बस प्रवासात सवलत; जाणून घ्या एनसीएमसी कार्ड बद्दल
मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) प्रवाशांना पारदर्शक आणि सोयीस्कर सेवा देण्यासाठी 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' म्हणजेच 'एनसीएमसी' लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. परिवहन मंत्री आणि राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, विविध सामाजिक सवलतींचा लाभ घेण्यासाठी आता हे स्मार्ट कार्ड आवश्यक असेल.एनसीएमसी कार्ड अनिवार्य:हा केवळ तांत्रिक बदल नाही तर प्रवाशांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी उचलेलं एक पाऊल आहे. हे कार्ड सवलती, कॅशलेस पेमेंट आणि पारदर्शक प्रणालीचे अचूक रेकॉर्ड सुनिश्चित करेल. या प्रकल्पासाठी एसटीने एबिक्स टेक्नॉलॉजीज लिमिटेड आणि एनएसडीएल पेमेंट्स बँकेसोबत भागीदारी केली आहे.सर्व डेपोमध्ये लवकरच नोंदणी मोहीम सुरू होईल. प्रताप सरनाईक यांच्या घोषणेनंतर, आता प्रत्येकाकडे हे कार्ड असणे आवश्यक असेल.कोणाला मिळणार एनसीएमसी कार्ड ?मिळालेल्या माहितीनुसार, या नवीन योजनेत विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि दिव्यांग प्रवाशांचा समावेश आहे. अपंग प्रवासी, स्वातंत्र्यसैनिक, मान्यताप्राप्त पत्रकार आणि राज्यस्तरीय पुरस्कार विजेत्यांना एनसीएमसी कार्ड दिले जातील. विद्यार्थ्यांचे कार्ड त्यांच्या शाळेच्या क्रमांकाशी, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांचे कार्ड त्यांच्या आधार क्रमांकाशी आणि अपंग प्रवाशांचे कार्ड त्यांच्या UDID क्रमांकाशी जोडले जातील. या कार्डची किंमत ₹१९९ आहे (GST सह), परंतु जुने स्मार्ट कार्ड सादर केल्यावर ते ₹१४९ मध्ये उपलब्ध असेल.प्रवास सोपा आणि सुरक्षित होण्याकडे भर:कार्डमध्ये किमान १०० रुपये शिल्लक असणे आवश्यक आहे. यामध्ये तुम्ही ५० रुपयांच्या पटीत रिचार्ज करू शकता. हा रिचार्ज तुम्हाला ईटीआयएम मशीन, वेबसाइट, मोबाईल अॅप किंवा अधिकृत एजंटद्वारे करता येईल. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या सोयीसाठी ३,००० हून अधिक एजंट नियुक्त करण्यात आले आहेत. तर ग्रामीण भागातील प्रवाशांनाही बसस्थानकावर नोंदणी करण्याच्या सुविधेचा फायदा होईल. राज्य परिवहन प्राधिकरणाच्या (एसटी) या उपक्रमामुळे प्रवास सोपा आणि सुरक्षित होईल.
Crime: प्रिन्सिपल सुनेसोबत सासऱ्याचे नको ते प्रकार, नात्याला काळिमा फासणारी घटना समोर
मुंबई: नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. समाजात आदराचे स्थान असलेल्या एका प्रतिष्ठित पदावर काम करणाऱ्या महिलेला स्वत:च्याच घरात ज्या छळाचा सामना करावा लागला, ते ऐकून कोणाचेही मन विषण्ण होईल. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला हा भयानक प्रकार आता चव्हाट्यावर आला असून, यामुळे शिक्षण क्षेत्रातही मोठी खळबळ उडाली आहे. एका महिलेने तिच्याच सासर्यावर अत्यंत गंभीर आणि संतापजनक आरोप केले आहेत.नेमकं प्रकरण काय ?हे संतापजनक प्रकरण कर्नाटकची राजधानी असलेल्या बेंगलुरु शहरातून समोर आले आहे. येथील नॉर्थ बेंगलुरु भागात राहणाऱ्या एका खाजगी शाळेच्या महिला प्रिन्सिपलने आपल्या सासर्याविरुद्ध लैंगिक छळाची तक्रार नोंदवली आहे. मागील ६ वर्षांपासून आपला शारीरिक आणि मानसिक छळ होत असल्याचे या महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.मागील ६ वर्षांपासून छळही पीडित महिला २००७ पासून शिक्षण क्षेत्रात सक्रिय असून एका प्रसिद्ध शाळेत प्रिन्सिपल म्हणून कार्यरत आहे. तिच्या तक्रारीनुसार, लग्नानंतरची सुरुवातीची काही वर्षे सुखात गेली, मात्र २०२० पासून तिच्या सासर्याने तिच्याशी गैरवर्तन करण्यास सुरुवात केली. संपूर्ण कुटुंब एकाच अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये वेगवेगळ्या घरात राहत होते. पीडित महिला घरी एकटी असायची, तेव्हा तिचा सासरा घरात घुसून तिच्याशी अश्लील चाळे आणि शारीरिक शोषण करायचा, असा गंभीर आरोप तिने केला आहे.पीडित महिला गप्प का होती?आपल्यासोबत घडणारा हा प्रकार कोणाला सांगितल्यास मुलांना इजा पोहचवू, अशी धमकी आरोपी सासरा वारंवार देत होता. आपल्या मुलांच्या सुरक्षेसाठी आणि घराची अब्रू वाचवण्यासाठी ही महिला इतके दिवस गप्प राहिली. परिस्थिती कधीतरी सुधारेल अशी तिला आशा होती, परंतु सासर्याचा त्रास कमी होण्याऐवजी वाढतच गेला. अखेर सहनशक्ती संपल्यावर तिने हा सर्व प्रकार नवऱ्याला सांगितला. त्यानंतर घरातील मोठ्या व्यक्तींनी मध्यस्थी करून आरोपीला ताकीद दिली होती, ज्यामुळे काही काळ हा त्रास थांबला होता.सासर्याची मजल इतकी वाढली होती की, त्याने घरच नाही तर पीडित महिलेच्या कामाच्या ठिकाणी म्हणजेच शाळेत जाऊनही तिला त्रास देण्यास सुरुवात केली. शाळेच्या केबिनमध्ये आणि अपार्टमेंटच्या लिफ्टजवळ सासर्याने अनेकदा छळ केल्याचे महिलेने तक्रारीत स्पष्ट केले आहे. आरोपी तिला वारंवार अश्लील मजकूर असलेली हाताने लिहिलेली पत्रे द्यायचा आणि ती वाचायला लावून पुन्हा स्वतःकडे परत घ्यायचा. हा सर्व प्रकार २०२० पासून डिसेंबर २०२५ पर्यंत सातत्याने सुरू होता.या प्रकरणाने गंभीर वळण १५ डिसेंबर २०२५ रोजी घेतले. सकाळी ७.३० च्या सुमारास महिला जेव्हा कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडली, तेव्हा अपार्टमेंटच्या लिफ्टजवळ सासर्याने पुन्हा तिच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा महिलेने याला कडाडून विरोध केला, तेव्हा संतापलेल्या सासर्याने तिच्या पोटावर जोरात ठोसा मारला आणि तिथून पळ काढला. या शारीरिक हल्ल्यानंतर महिलेने अखेर पोलिसांत धाव घेण्याचा निर्णय घेतला.याप्रकरणी पोलिसांनी एफआयआर नोंदवला असून तपास सुरू केला आहे. या प्रकरणातील गंभीर स्वरूप लक्षात घेता राज्य महिला आयोगानेही या घटनेची दखल घेतली आहे. एका जबाबदार पदावर असलेल्या महिलेला जर घरातच अशा संकटाचा सामना करावा लागत असेल, तर सामान्य महिलांच्या सुरक्षिततेचे काय, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. पोलीस सध्या या प्रकरणातील संबंधित व्यक्तींची चौकशी करत आहेत.
Pak on UNSC: : संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या (UNSC) १२६७ प्रतिबंध देखरेख समितीच्या नवीन अहवालात पाकिस्तानबद्दल महत्त्वाची माहिती उघड झाली आहे.
Jamkhed News : भाग्यश्री गोरे लोकसेवा आयोग MPSC मार्फत तालुका कृषी अधिकारीपदी
Jamkhed News : भाग्यश्री चे वडील आरटीओ चे काम करत असून चुलते अशोक गोरे शेतकरी यांनीही, मोठ्या कष्टाने व त्यागाने त्यांनी आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी दिलेले पाठबळ निश्चितच प्रेरणादायी आहे.
Ritu Tawde : मुंंबई महापालिकेचा महापौर पदाचा पदभार स्विकारल्यानंतर रितू तावडेंकडून पाच मोठ्या घोषणा
Ritu Tawde :मुंबई महापालिकेच्या महापौर पदाचा पदभार स्विकारल्यानंतर महापौर रितू तावडे यांनी पाच मोठ्या घोषणा जाहीर केल्या आहेत.
Stock Market Today: शेअर बाजारात धुमाकूळ! सेन्सेक्स ४२५ अंकांनी घसरला; निफ्टीलाही धक्का
Stock Market Today: भारतीय शेअर बाजाराने गुरुवार, १२ फेब्रुवारी रोजी व्यापार दिवसाची सुरुवात नकारात्मकतेने केली. प्रमुख बेंचमार्क निर्देशांक, बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी ५०, लाल रंगात उघडले.
Allergy Awareness: खाद्यपदार्थांतील रसायने आणि वाढती ऍलर्जी; सतर्क राहणं का गरजेचं?
साखर शुद्ध करण्याच्या प्रक्रियेत काही रसायनांचा वापर केला जातो. काही संवेदनशील व्यक्तींमध्ये यामुळे त्वचेवर पुरळ, खाज, लाल चट्टे किंवा श्वसनाचा त्रास दिसू शकतो. तसेच वनस्पती तूप, हायड्रोजेनेटेड तेल (डालडा) किंवा रिफाइंड तेल तयार करताना विविध रासायनिक प्रक्रिया केल्या जातात. या तेलांचा अतिरेक केल्यास पचनाच्या तक्रारी, घशात खवखव किंवा अॅसिडिटीसारखे त्रास होऊ शकतात. त्यामुळे शक्यतो ताजं, घरगुती आणि कमी प्रक्रियायुक्त तेल वापरण्याचा सल्ला दिला जातो.
मुंबई: प्रसिद्ध मराठमोळा रीलस्टार प्रथमेश कदम याचं २६ जानेवारी रोजी निधन झालं. प्रथमेश कदमच्या अकाली निधनाच्या बातमीने त्याचे चाहते आणि फॉलोअर्सना मोठा धक्का बसला होता. त्याच्या अकाली झालेल्या निधनामुळे प्रथमेशला नेमकं काय झालं होतं? त्याच्या मृत्यूमागील नेमकं काय कारण आहे? यासह काही लोक तर प्रथमेशने आत्महत्या केल्याचंही म्हणत आहेत. समाज माध्यमांवर होणाऱ्या या सर्व चर्चांणा प्रथमेशच्या आईने पूर्णविराम दिला आहे. तसेच त्यांनी प्रथमेशच्या मृत्यूचं कारण सांगितलंय. प्रथमेशच्या आईने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत ही माहिती दिली आहे.प्रथमेशच्या आईने त्याच्या मृत्यूचं कारण सांगितलं?प्रथमेशच्या आईने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत म्हटलं की, नमस्कार मी प्रज्ञा प्रकाश कदम, प्रथमेशची मम्मी. काही दिवसांपासून मला खूप म्हणजे खूप त्रास होत होता, म्हणजे असे व्हिडीओ येत होते की प्रथमेशने आत्महत्या केली, प्रथमेशला हे झालं, प्रथमेशला ते झालं. त्याला असं काहीही झालं नव्हतं. त्याचं खरं कारण एकच होतं, त्याच्या ब्लडमध्ये रक्ताची कावीळ मिसळली होती. ती कावीळ म्हणजे सफेद कावीळ असते, ती कोणालाही कळत नाही. जेव्हा मी त्याला अॅडमिट केलं डॉक्टरांनी मला गॅरेंटी दिली होती, डॉक्टर म्हणाले दोन-तीन दिवसांत तो कव्हर होऊन जाईल, रिपोर्ट सर्व नॉर्मल आहेत, पण कावीळने माझ्या मुलाचा घात केला.चाहत्यांना अफवा न पसरवण्याचे केले आवाहनपुढे बोलताना, डॉक्टरांनाही कळलं नाही , शेवटच्या क्षणी डॉक्टरांना कळतंय की त्याच्या रक्तामध्ये व्हाइट कावीळ मिसळली. त्याच्या पूर्ण शरीरात रक्ताची कावीळ मिसळली, तेव्हा डॉक्टर मला म्हणाले की, आता तुम्ही देवाला प्रार्थना करा. तेव्हा मी खचून गेले की आता माझ्या मुलाची काही गॅरेंटी नाही. ती कावीळ रक्तात मिसळली की माणूस शेवटी एंडच होतो आणि तेच झालं. २६ जानेवारीला सकाळी प्रथमेशने या जगाचा निरोप घेतला. खूप त्रास झाला मला. मी सर्वांना हात जोडून विनंती करते, कोणतीही खोटी अफवा पसरवू नका. कोणीही काहीही बोलेल त्यावर लक्ष ठेवू नका. काय झालं, कसं झालं हे मला आणि माझ्या मुलीला मेसेज करून विचारू नका. गैरसमज दूर करण्यासाठी हा व्हिडीओ केला.
Amol Mitkari : 'रोहित पवारांनी मागणी केल्याप्रमाणे तत्काळ एका बाह्य संस्थेकडून सदर प्रकरणाची चौकशी ही झालीच पाहिजे'
Bangladesh Election 2026: बांगलादेशमध्ये अनेक महिन्यांच्या हिंसाचार, रस्त्यावरील निदर्शने आणि राजकीय गोंधळानंतर, अखेर निवडणुकांची वेळ आलीय. २०२४ च्या सत्तापालटानंतर आणि माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या भारत भेटीनंतर, बांगलादेशात आज निवडणुका पार पडत आहेत.
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरातील एका नामांकित इंग्रजी शाळेमध्ये चार मुलांनी त्यांच्याच वर्गमित्रावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हे सर्व विद्यार्थी सहावीच्या वर्गात शिकत घेत आहेत. सप्टेंबर महिन्यामध्ये ही घटना घडल्याची माहिती पीडित मुलाच्या पालकांनी दिली. याप्रकरणी चार मुलांविरोधात फुलंब्री पोलीस ठाण्यात पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमून प्रकरणाची चौकशी सुरू केली. दुसरीकडे, शाळेने मात्र संबंधित मुलांवर कोणतीही कारवाई केली नाही. उलट पालकांवरच दबाव आणल्याची माहिती समोर आली आहे.हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागानं त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमून प्रकरणाची चौकशी सुरू केली. मात्र शाळेकडून संबंधित मुलांवर कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप पीडित मुलाच्या वडिलांनी केला. उलट पीडित मुलावर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप संबंधित मुलाच्या वडिलांनी केला.राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसेंनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. दादा भुसे म्हणाले की, या संदर्भात मी स्वत: माहिती घेणार आहे आणि त्यावर योग्य ती कारवाई करेन. शिक्षण विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून यामध्ये हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई करणार आहेत.शाळकरी मुलांमध्ये अशा प्रकारची विकृत मानसिकता येते कुठून असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावर मानसोपचार तज्ज्ञ किशोर शितोळे यांनी सांगितलं की, मोबाईलचा अतिवापर, पॉर्न व्हिडीओ पाहणे, एका विशिष्ट विचारसरणीच्या मुलांचा एकत्र ग्रुप होणे, अशा कारणामुळे या घटना घडू शकतात. यावर उपाय म्हणजे पालकाने विद्यार्थ्यांशी संवाद साधला पाहिजे.सध्या आरोप असलेल्या चार अल्पवयीन मुलांवर पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाळेत घडणारे असे प्रकार भविष्यात थांबावेत यासाठी शाळा प्रशासन, शिक्षण विभाग काय कारवाई करणार, हे पाहावं लागेल.
काँग्रेसने पहिल्याच सभागृहात उबाठाचा मीटर केला डाऊन
मुंबई: मुंबई महापालिकेत उबाठा पक्ष हा प्रमुख विरोधी पक्षनेता असला प्रत्यक्षात उबाठाला विरोधी पक्षनेत्याची भूमिका बजावण्याची संधी दिली नाही. सभागृहात बसण्यास जागा नसल्यामुळे काँग्रेसच्या नगरसेवकांनी महापौर निवडीच्या प्रक्रियेपासूनच घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली आणि काँग्रेसच्या या घोषणाबाजीला उबाठाला बळ देत होते. परंतु काँग्रेसला बळ देतानाच आपलाच मीटर कधी डाऊन कधी टाकला हेच उबाठाला कळले नाही.मुंबई महापालिका सभागृहात महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीच्या विशेष सभेमध्ये काँग्रेसचे २४ नगरसेवक सभागृहात वंदे मातरमचे गीत संपल्यानंतर दाखल झाले. परंतु तोपर्यंत सभागृहात सर्वच पक्षांच्या नगरसेवक हे आसनांवर बसलेले होते. त्यामुळे त्यांना बसण्यास जागा शिल्लक राहिले नाही. त्यामुळे बसण्यास जागाच नसल्यामुळे काँग्रेसचे नगरसेवक हे मधल्या रांगेत प्रथम उभे राहत त्यांनी घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यानंतर काँग्रेसचे नगरसेवक महापौरांच्या भाषणावेळी महापौरासमोरील जागेमध्ये जावून तिथे उभे राहून घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यामुळे भाजपच्या नगरसेवकांनीही त्यांना विरोध दर्शवल्यानंतर त्यांना मागे सरायला लागले.त्यानंतर काँग्रेसच्या मेहेरअली हैदरसह काही नगरसेवकांनी सभागृहात जमिनीवर बसण्यास सुरुवात केली. आपले सदस्य जमिनीवर बसल्याचे दाखवून काँग्रेसच्या नगरसेवकांनीही मुख्यमंत्र्यांची लाडकी बहिण खुर्चीवर आणि लाडकी बहिण जमिनीवर अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यानंतरही काँग्रेसचे नगरसेवक हे घोषणाबाजी देत होते आणि उपमहापौरांच्या भाषणा दरम्यान गोंधळ निर्माण करण्याचा डाव रचणाऱ्या उबाठाचा डावच काँग्रेसने उधळवून लावला. त्यामुळे उबाठाला सभागृहात विरोधक आक्रमक झाल्याचे चित्रच निर्माण करता न आल्यामुळे अखेर उपमहापौरपदाच्या भाषणादरम्यान त्यांनी सभात्याग केला. त्यानंतरही काँग्रेसचे नगरसेवक घोषणा देत राहिले.विशेष म्हणजे काँग्रेसने, शिवसेनेला प्रमुख विरोधक होवू न देता प्रमुख विरोधक आपण आहोत हे दाखवण्यासाठी ते उशिरा सभागृहात दाखल झाले आणि बसायला जागा नाही या मुद्दयावरून घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे सुरुवातीपासूनच काँग्रेसने उबाठाला प्रमुख विरोधी पक्ष म्हणून न स्वीकारता आपणच विरोधी पक्ष आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करत विरोधी पक्षाची प्रतिमा आणि त्यांचा विरोध झाकोळण्याचा प्रयत्न केला.
Priyanka Chopra: अचानक मावशी आल्या आणि सगळं उघड झालं! प्रियंकाचा शाळेतील किस्सा
त्या वेळी प्रियांका अमेरिकेत तिची मावशी किरण यांच्याकडे राहत होती. आई-वडील कामानिमित्त दूर होते. शाळेत असतानाच तिला एका मुलावर क्रश आला. पुस्तकात तिने त्याचं खरं नाव न सांगता ‘बॉब’ असं नाव दिलं आहे. तो मुलगा १०वीत शिकत होता. तो मजेदार स्वभावाचा होता आणि प्रियांकाला लहानसहान गिफ्ट देत असे. दोघं शाळेत भेटायचे, बोलायचे. मात्र मावशींनी डेटिंगला परवानगी दिली नव्हती.
Top 10 news: अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार, अशी चर्चा रंगली होती. आता या प्रश्नाचे उत्तर मिळाले असून अध्यक्ष निवडीचा मुहूर्तही ठरल्याची माहिती मिळालीय.
Shambhuraj Desai : “अति तिथे माती, योग्य संधीची…”; शंभूराज देसाईंचा थेट भाजपवर निशाणा
Shambhuraj Desai : जिल्हा परिषदच्या निकालानुसार साताऱ्यात भाजप 27 जागेवर सर्वात मोठा पक्ष ठरला. मात्र, बहुमतासाठीचा आवश्यक असलेला आकडा गाठण्यात भाजप अपयशी.
Sunil Tatkare :आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांचा विमान अपघात घातपात असल्याचा संशय व्यक्त केला होता, यावर आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आता शाळांमध्ये ‘जन गण मन’ आधी ‘वंदे मातरम्’ देखील गायले जाईल. तीदेखील पूर्ण 6 कडवी, ज्यांना गाण्यासाठी 190 सेकंद लागतील. गृह मंत्रालयाने 28 जानेवारी 2026 रोजी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली, ज्यात राष्ट्रगीताशी संबंधित असे अनेक नियम बनवण्यात आले आहेत. शेवटी राष्ट्रगीताशी संबंधित नवीन नियम काय आहेत, ते कुठे लागू होतील, कोणाला सूट मिळाली, न पाळल्यास शिक्षा काय असेल आणि या गीतावरून दशकांपासून वाद का निर्माण होत आहेत; जाणून घेऊया आजच्या एक्सप्लेनरमध्ये… प्रश्न-1: वंदे मातरम् गाण्याचे नवीन नियम कुठे-कुठे लागू होतील, कुठे सूट देण्यात आली आहे?उत्तर: केंद्रीय गृह मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार… कुठे लागू होणार नाहीत हे नियम प्रश्न-2: ‘जन गण मन’ आणि ‘वंदे मातरम्’मध्ये आता काय फरक राहिला?उत्तर: 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताच्या स्वातंत्र्यानंतर, ऑल इंडिया रेडिओवर जे पहिले गाणे वाजले ते वंदे मातरमच होते. 24 जानेवारी 1950 रोजी संविधान सभेच्या शेवटच्या सत्रात अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी घोषणा केली-'रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेले जन गण मन हे भारताचे राष्ट्रगीत असेल. स्वातंत्र्य संग्रामात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या वंदे मातरम् गीतालाही तेवढाच दर्जा दिला जाईल.' यानंतर संविधान सभेच्या सर्व सदस्यांनी जन गण मन आणि वंदे मातरम् ही दोन्ही गीते गायली. अधिकृतपणे राष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये, जसे की- राष्ट्रपती आणि राज्यपालांना सलामी, परेड, राष्ट्रध्वज फडकवणे इत्यादी प्रसंगी राष्ट्रगीत गाण्याचा नियम आहे. वंदे मातरम् साठी अशी कोणतीही सक्ती नव्हती. आधी फक्त राष्ट्रगानासाठी उभे राहणे अनिवार्य होते, परंतु आता राष्ट्रगीताच्या सन्मानार्थही तसे करण्याच्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. मात्र, राष्ट्रगानाबाबत स्पष्ट कायदेशीर प्रोटोकॉल आहे. अपमान केल्यास 3 वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे. सध्या राष्ट्रगीताबाबत असे काही नाही. 2019 मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने वंदे मातरमला जन गण मन इतका दर्जा देणारी याचिका फेटाळून लावली होती. प्रश्न-3: राष्ट्रगीताशी संबंधित नियम न पाळल्यास काय होईल?उत्तर: वंदे मातरमला घेऊन सरकारने सध्या फक्त मार्गदर्शक तत्त्वे (गाइडलाइन्स) जाहीर केली आहेत. सध्या यात नियम न पाळल्यास शिक्षा किंवा दंडाची तरतूद करण्यात आलेली नाही. जर सरकारने कोणताही कायदा बनवला किंवा नियम जाहीर केला, तेव्हा हे स्पष्ट होईल की राष्ट्रगीताशी संबंधित मार्गदर्शक तत्त्वे न पाळल्यास काय होईल. दुसरीकडे, राष्ट्रगानाला ‘प्रिव्हेंशन ऑफ इन्सल्ट्स टू नॅशनल ऑनर ॲक्ट, 1971’ अंतर्गत समाविष्ट केले आहे. राष्ट्रगानाचा अपमान केल्यास तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा दंडाची तरतूद आहे. 2017 मध्ये ‘अश्विनी कुमार उपाध्याय विरुद्ध भारत संघ’ या खटल्याच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले होते की, संविधानात 'राष्ट्रगीता'ची कोणतीही अनिवार्य संकल्पना नाही. त्यामुळे शाळा किंवा कार्यालयांमध्ये ते सक्तीने गाण्यासाठी कोणालाही भाग पाडले जाऊ शकत नाही. सर्वोच्च न्यायालयाचे तत्कालीन न्यायमूर्ती दीपक मिश्रा, न्यायमूर्ती ए.एम. खानविलकर आणि न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठाने याचिकेवर सुनावणी करताना सांगितले की, अनुच्छेद 51A (मूलभूत कर्तव्ये) मध्ये केवळ राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगानाच्या सन्मानाचा उल्लेख आहे. त्यात 'राष्ट्रगीत'चा उल्लेख नाही. प्रश्न-4: ‘वंदे मातरम्’ला मुसलमानांचा काय आक्षेप आहे, त्याला मुस्लिमविरोधी का म्हटले जाते?उत्तर: प्रसिद्ध बंगाली लेखक आणि कवी बंकिमचंद्र चॅटर्जी यांचे वंदे मातरम् गीत पहिल्यांदा 7 नोव्हेंबर 1875 रोजी 'बंगदर्शन' या साहित्य मासिकात प्रकाशित झाले होते. तथापि, त्यावेळी त्याची विशेष चर्चा झाली नव्हती. 7 वर्षांनंतर 1882 मध्ये बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी हे गीत त्यांच्याच 'आनंदमठ' या कादंबरीत समाविष्ट केले. कादंबरीत संन्यासी वंदे मातरम्चा नारा देतात, ज्याचा अर्थ आहे - आईला नमन. हे संन्यासी देशाच्या भूमीलाच आपली आई मानत होते. यानंतर हे गीत खूप लोकप्रिय झाले, परंतु मुस्लिम नेत्यांनी याला विरोध करण्यास सुरुवात केली… मुस्लिम लीगला वंदे मातरम्मुळे दोन समस्या होत्या...पहिली: यात हिंदू देवी-देवतांचा उल्लेख आहे आणि मूर्ती पूजेला प्रोत्साहन दिले जात आहे, जे इस्लाममध्ये अस्वीकार्य आहे आणि धर्मनिरपेक्ष नाही.दुसरी: ज्या आनंदमठ कादंबरीतून हे घेतले आहे, त्यात मुसलमानांना देशाचे शत्रू मानून मारले गेले आहे. इतिहासकार आर. सी. मजुमदार वंदे मातरम्ला मुस्लिमविरोधी मानत नाहीत, परंतु ते म्हणतात, 'आनंदमठमध्ये बंकिमचंद्र यांनी ज्या प्रकारे देवी कालीचे चित्रण केले आहे, त्यावरून हे स्पष्ट होते की त्यांचा राष्ट्रवाद हिंदू होता, भारतीय नाही.' इतिहासकार राम पुनियानी सांगतात, 'मुसलमानांच्या एका गटाला वंदे मातरम्मुळे त्रास त्याच्या नंतरच्या 4 श्लोकांमुळे आहे, ज्यात हिंदू देवी-देवतांचा उल्लेख आहे. याशिवाय आनंदमठमध्ये मुसलमानांप्रती ज्या प्रकारचे हिंसेचे भाव लिहिले आहेत, ते त्रासदायक आहेत.' वर्ष 1998 मध्ये उत्तर प्रदेश सरकारने सर्व सरकारी शाळांमध्ये वंदे मातरम् गाण्याचा आदेश जारी केला. विरोध म्हणून मुसलमानांनी आपल्या मुलांना शाळेतून काढायला सुरुवात केली. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींच्या हस्तक्षेपानंतर हा आदेश मागे घेण्यात आला. 2006 मध्ये इस्लामिक संघटना जमात उलमा-ए-हिंदने म्हटले होते की, कोणताही खरा मुसलमान वंदे मातरम कधीही गाऊ शकत नाही. उत्तर प्रदेशातील देवबंदमध्ये वंदे मातरम गाण्याविरुद्ध एक फतवा देखील जारी करण्यात आला होता. प्रश्न-5: वंदे मातरम गाण्यावर किंवा वाजवण्यावर कधी बंदी घालण्यात आली होती का?उत्तर: 1905 मध्ये लॉर्ड कर्झनने बंगालच्या फाळणीचा आदेश दिला, तेव्हा हजारो लोक रस्त्यावर उतरले होते. फाळणीच्या विरोधात उतरलेल्या लोकांनी 'वंदे मातरम'चा नारा दिला होता आणि त्याचा 'युद्धघोष' म्हणून वापर केला होता. ब्रिटिश सरकार या गाण्यामुळे इतकी घाबरली होती की, त्यांनी विशेष आदेश काढून 'वंदे मातरम' बोलण्यावर आणि गाण्यावर बंदी घातली होती. हे गाणाऱ्यांना लाठीने मारले जात असे आणि तुरुंगात टाकले जात असे. इंग्रजांच्या या दडपशाहीच्या निर्णयामुळेच हे गाणे स्वदेशी आंदोलनाचा आधार बनले आणि घरोघरी प्रचलित झाले. तथापि, यानंतर धार्मिक कारणांमुळे 1920-30 च्या दशकात वंदे मातरमचा विरोध झाला. 1937 मध्ये याच्या विरोधात एक ठराव देखील मंजूर करण्यात आला. त्यावेळी रवींद्रनाथ टागोर, सुभाषचंद्र बोस, अबुल कलाम आझाद आणि जवाहरलाल नेहरू यांनी एकत्र येऊन एक काँग्रेस समिती स्थापन केली. सर्वांनी असा निर्णय घेतला की राष्ट्रीय कार्यक्रमात वंदे मातरमचे पहिले दोन कडवेच गायले जातील. इतिहासकार सब्यसाची भट्टाचार्य त्यांच्या ‘वंदे मातरम: बायोग्राफी ऑफ अ सॉन्ग’ या पुस्तकात लिहितात की, शेवटचे चार श्लोक काढून टाकल्यानंतर रवींद्रनाथ टागोर यांनी नेहरू यांना सल्ला दिला की, याचे सुरुवातीचे दोन श्लोक खूप प्रभावी आहेत आणि त्यामुळे कोणालाही समस्या येऊ शकत नाही. मात्र, यानंतरही त्याच्या पार्श्वभूमीमुळे वंदे मातरम नेहमीच वादात राहिले, जे आजही कायम आहे. वंदे मातरमची 150 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त केंद्र सरकारने यासंबंधी अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले आणि ते गाणे अनिवार्य केले. राजकीय विश्लेषकांचे मत आहे की, काही महिन्यांत पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका आहेत. कारण वंदे मातरम्चे रचयिता देखील बंगाली होते, त्यामुळे त्याला बंगाल निवडणुकीपर्यंत जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. दुसरे म्हणजे, या गीताची ऐतिहासिक पार्श्वभूमी देखील भाजपला राजकीय फायदा मिळवून देऊ शकते.
मुंबईतील भायखळ्यात लिफ्ट कोसळून पाच जण जखमी
मुंबई: भायखळ्यातील जयकृपा टॉवरमध्ये लिफ्ट कोसळली आहे. या लिफ्ट अपघातात पाच जण जखमी झाले असून त्यांना तात्काळ रुग्णालयात हलविण्यात आले आहे. ११ फेब्रुवारी रोजी रात्री भायखळ्यातील जयकृपा टॉवरमधील घोडापदेव क्रॉस लेन क्रमांक १ येथे ही दुर्घटना घडली आहे.भायखळ्यातील जयकृपा टॉवरमध्ये केबल तुटल्यामुळे लिफ्ट चौथ्या मजल्यावरुन खाली कोसळली. यानंतर तात्काळ मुंबई अग्निशमन दल, पोलिस, बेस्ट, १०८ रुग्णवाहिका सेवा आणि बीएमसीचे वॉर्ड कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. यानंतर जखमींना रुग्णालयात नेण्यात आले.भायखळ्यातील लिफ्ट अपघातात एकूण पाच जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. जखमींपैकी तीन जणांना जे.जे. रुग्णालयात, एकाला बालाजी रुग्णालयात तर एकाला जसलोक रुग्णालयात हलवण्यात आले. जे. जे रुग्णालयात कल्पिता पवार, यश बालविकर आणि उषा गुप्ता यांच्यावर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली आहे. बालाजी रुग्णालयात जमुना प्रसाद शिवहरे तर जसलोक रुग्णालयात शिल्पा मोरे यांच्यावर उपचार केले जात असून त्यांचीही प्रकृती ठिक असल्याची माहिती मिळाली आहे.
तीन दिवस सीतादेवींचा मृतदेह अंथरुणावर पडून होता. त्यांचा 38 वर्षांचा मनोरुग्ण मुलगा शेजारी बसून ओरडत राहायचा - आई, जेवण बनव. तो आपल्या आईला हलवून पाहायचा, पण काही वेळ हालचाल न झाल्यावर त्याला वाटायचे की आई गाढ झोपेत आहे. मग तो घरातून निघून जायचा. रात्री घरी परतल्यावर तो पुन्हा आईला उठवायचा. काही वेळाने थकून तो आईच्या मृतदेहाशेजारी झोपून जायचा. सीतादेवींच्या मृतदेहावर माश्या घोंघावू लागल्या. मुंग्यांनी मृतदेहाचे हात-पाय आणि चेहरा खाल्ला. सुमारे तीन महिन्यांपूर्वी ही घटना उत्तराखंडमधील श्रीनगर येथील लोयगड नावाच्या भुताटकीच्या गावात घडली. या घटनेने आसपासच्या गावांनाही हादरवून सोडले. रिकाम्या झालेल्या लोयगड गावात सीतादेवी आपल्या मनोरुग्ण मुलासोबत राहत होत्या. सरकारी आकडेवारीनुसार, उत्तराखंडमध्ये अशा ओसाड गावांची संख्या 1700 आहे. ब्लॅकबोर्डच्या या भागात उत्तराखंडमधील अशाच रिकाम्या झालेल्या ओसाड गावांची भयाण कथा, जिथे लोकांनी आपले घर, शेती-वाडी सर्व सोडून दिले आहे… ही संपूर्ण कथा जाणून घेण्यासाठी मला लोयगड गावी जायचे होते. ज्याचा रस्ता अस्वल आणि वाघांनी भरलेल्या घनदाट जंगलातून जातो. रस्त्याचा तर काही नामोनिशाण नाही. चालण्यासाठी पायवाटही नाही. श्रीनगरहून मोठ्या मुश्किलीने एक टॅक्सी चालक मलछोडा गावी जाण्यास तयार झाला. खरं तर, महामार्गावरून खाली उतरल्यावर मलछोडा गाव आहे. हे गाव ओलांडून एक डोंगर चढावा लागतो, ज्याच्या पलीकडे लोयगड गाव आहे. महामार्गावर टॅक्सीतून उतरून एक लांबचा रस्ता पायीच कापायचा होता. काटेरी झुडपे ओलांडत मी ड्रायव्हरसोबत पायीच निघाले. पायवाटेने खाली उतरण्यास सुरुवात केली. जिथेपर्यंत नजर जाईल तिथे फक्त डोंगरच दिसत होते. चालता-चालता मी एका ठिकाणी थांबले तेव्हा ड्रायव्हर म्हणाला- येथे थांबणे धोक्याचे आहे. वाघ हल्ला करू शकतात. म्हणून आम्ही पुन्हा चालायला सुरुवात केली. सुमारे अर्ध्या तासानंतर आम्ही मलछोडा गावात पोहोचलो. येथील गावकऱ्यांनी सांगितले की लोयगड गावात वाघही असू शकतात. कारण जी गावे रिकामी होतात, वाघ त्याला आपले ठिकाण बनवतात. सीतादेवीबद्दल विचारल्यावर गावकऱ्यांनी सांगितले की तिथे फक्त सीतादेवीचा मुलगा भीरू राहतो. बाकी प्रत्येक घराला कुलूप आहे. काही वेळ इथे बसल्यानंतर आम्ही लोयगडसाठी निघालो. मलछोडा पार केल्यानंतर आम्ही लोहगडाकडे डोंगर चढू लागलो. जंगल घनदाट होत चालले होते आणि चढण एकदम उभी होती. चढता चढता दम लागू लागला, पण इथे थांबता येत नव्हते. शेवटी एक छोटी सपाट जागा आली, जिथे गवत उगवले होते. ड्रायव्हरने सांगितले की ही लोहगड गावातील लोकांची शेती आहे, जी आता पडीक झाली आहे. आम्ही पुन्हा चालायला सुरुवात केली. थोडे आणखी वर गेल्यावर एक पाण्याची पाईप दिसली. घनदाट झुडपे आली की ड्रायव्हर मोठ्या आवाजात बोलू लागला किंवा शिट्टी वाजवू लागला. त्याचे म्हणणे होते की अशा आवाजांनी वाघ दूर जातात. सुमारे 45 मिनिटे चढण चढल्यानंतर एक घर दिसले. हे लोहगड गावातील पहिले घर आहे. या घराच्या जवळ पोहोचल्यावर पाहिले की, पडझड झालेल्या घराशेजारी एक पांढऱ्या रंगाने रंगवलेले दोन मजली घर खूप सुंदर बनवले आहे. दगडाचे छत आणि बाहेर मोकळे अंगण आहे. निळ्या आणि हिरव्या रंगाच्या दरवाजाला कुलूप लावले आहे. थोडे पुढे गेल्यावर एकाच वेळी दोन घरे दिसली. येथेही कुलूप लावले आहे. एका घरात डिश अँटेना देखील लावलेला आहे. काही घरे पडझड झाली आहेत. त्यांच्या छतांवर आणि भिंतींवर तर झाडे-झुडपे उगवली आहेत. काही घरे पडण्याच्या मार्गावर आहेत. हे सर्व बघत मी गावातील शेवटच्या घरात पोहोचले. जिथे चुलीत राख आहे. लाकडे ठेवली आहेत. अंगणात उखळ आहे. घराच्या भिंतीवर एक मळके जॅकेट टांगलेले आहे. घर उघडे आहे, दरवाजा उघडून मी पाहिले की तिथे काही भांडी ठेवली आहेत. अंगणात माल्ट्याचे झाड आहे. वांग्याची रोपेही लावलेली आहेत. हेच सीतादेवींचे घर आहे. त्यांचा मनोरुग्ण मुलगा भीरू इथेच राहतो. सध्या भीरू घरी नाही. याशिवाय गावात सुमारे दहा घरे आहेत. सर्वांना गंज लागलेली कुलुपे लावलेली आहेत. येथे स्थलांतराचे सर्वात मोठे कारण म्हणजे येण्या-जाण्यासाठी रस्ता नाही. कुणी आजारी पडल्यास त्याला बरे होण्यासाठी एखाद्या चमत्काराची वाट पाहावी लागते. गावात पाण्याची पाईपलाईन आहे पण पाणी नाही. ना शाळा आहे, ना दुकान, ना अंगणवाडी आणि ना प्राथमिक आरोग्य केंद्र. या संपूर्ण गावात आम्हाला एकही माणूस भेटला नाही. आम्ही परत मलछोडा गावाकडे निघालो. येथे आमची भेट स्थानिक पत्रकार गंगाशी झाली. लोयगडबद्दल विचारल्यावर गंगा सांगते, 'त्या गावात फक्त भीरू नावाचा माणूस उरला आहे. तोही लोकांना पाहून लपून बसतो. त्याची आई सीतादेवीचा मृतदेह अशा स्थितीत सापडला होता की त्यावर माश्या घोंघावत होत्या. मृतदेहाचे हात-पाय आणि चेहरा मुंग्यांनी खाल्ले होते. भीरू मनोरुग्ण आहे, त्यामुळे त्याला कळलेच नाही की आई जिवंत आहे की मेली. आईच्या मृत्यूनंतर तीन दिवसांनी तो मलछोडा येथे आला आणि येथील महिलांना म्हणाला की, माझ्या आईने तीन दिवसांपासून जेवण केले नाही. गावकऱ्यांना संशय आला. तिथे जाऊन पाहिले असता कळले की सीतादेवी मरण पावली होती. भीरूची पत्नीही त्याला सोडून आपल्या चार मुलांसोबत हरिद्वारला गेली आहे.‘ मी विचारले- ‘भीरूच्या जेवणाची व्यवस्था कशी होते?’ यावर गंगा म्हणते की, ‘जवळच एक छोटेसे डोंगराळ बाजार आहे. दिवसभर तो तिथेच असतो. त्याची पत्नी तिथे एका दुकानदाराला पैसे देऊन जाते, जेणेकरून तो भीरूला जेवण देईल.’ गंगा पुढे म्हणते की, ‘लोक आपली जमीन सोडून गेले आहेत. काही लोकांच्या जमिनीवर पाइनची झाडे उगवली आहेत. सरकारने ती जमीन वन विभागाकडे सोपवली आहे. जेव्हा ते लोक परत येऊ लागले, तेव्हा सरकारने त्यांना झाडे तोडण्याची परवानगीही दिली नाही. म्हणून आता कोणीही परत येऊ इच्छित नाही.’ गंगा नंतर माझी भेट मलछोडा गावातील गुड्डी देवी यांच्याशी झाली. त्या सांगतात की, ‘आम्ही लयोगढमध्ये गवत कापायला जात होतो. सीतादेवींना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्या आजारी होत्या, पण त्यांना ना औषध मिळाले ना अन्न. त्यांना कोणी बघायला नव्हते. सीतादेवीच्या मृत्यूची बातमी मिळाल्यावर आमच्या गावातील लोकच गेले होते. आम्ही घरी पोहोचलो तेव्हा भीरूच्या आईच्या मृतदेहाला मुंग्या लागल्या होत्या, माश्या घोंघावत होत्या. तो आपल्या आईचा मृतदेह सोडून फिरायला निघून जात असे. पावसाळ्याचे दिवस होते त्यामुळे झुडपे अधिकच दाट झाली होती. खांद्यावर तिचा मृतदेह ठेवून स्मशानात घेऊन गेले होते. मृत्यूनंतरही त्यांची सून आली नाही.’ मलछोडा गावाचे रहिवासी सतीशचंद्र पांडे सांगतात की, 'लोयगड गावापर्यंत जाण्यासाठी ना रस्ता आहे ना गावात पाणी आहे. अशा परिस्थितीत तिथे कोण राहणार? गरजेच्या कामासाठी पाणी घेण्यासाठी डोंगर उतरून नदीजवळ जावे लागते. काही वर्षांपूर्वीपर्यंत लोक आपले घर बघायला येत असत पण आता तेही बंद झाले आहे. अशीच परिस्थिती राहिली तर लवकरच मलछोडा गावही रिकामे होईल. मलछोडा गावाचे राकेश पांडे सांगतात की, आमच्या गावातही आता बहुतेक वृद्धच राहतात. आमचे गावही रिकामे होण्याच्या मार्गावर आहे. कोणी आजारी पडल्यास रुग्णालयात नेणे कठीण आहे. डोकेदुखीची गोळी घेण्यासाठीही चार किलोमीटर पायी जावे लागते.’
Non-Agricultural Tax : नगर रचना विभागाची परवानगी हीच आता अधिकृत 'एनए' परवानगी; ७/१२ उताऱ्यात संगणकीय प्रणालीद्वारे होणार थेट फेरफार.
Illegal Hoardings Pune : अनधिकृत होर्डिंगविरोधात पुन्हा कारवाई; तपासणीसाठी पाच पथकांची नियुक्ती
Illegal Hoardings Pune : पहिल्याच दिवशी पथकाने पाडले ७ अनधिकृत होर्डिंग; नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आता आर्थिक कारवाईचा बडगा.
Pune Traffic Police : बेशिस्त दुचाकीस्वारांमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला.

28 C