SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

30    C
...

​PMMSY : मत्स्यपालन क्षेत्राला केंद्राचे बळ; 'प्रधानमंत्री मत्स्य संपदा'योजनेला मुदतवाढ

नवी दिल्ली : देशातील मत्स्यपालन क्षेत्राचा शाश्वत विकास साधण्यासाठी आणि 'नील क्रांती' अधिक प्रभावीपणे तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. 'प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेला' (PMMSY) ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत तात्पुरती मुदतवाढ देण्याचा निर्णय शुक्रवारी घेण्यात आला. या निर्णयामुळे महाराष्ट्रासह देशभरातील लाखो मच्छिमार आणि मत्स्य व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला असून, या संक्रमण काळासाठी १,२५० कोटी रुपयांच्या केंद्रीय अर्थसंकल्पीय तरतुदीला प्रशासकीय मान्यताही प्रदान करण्यात आली आहे.​भारत सरकारच्या मत्स्यपालन, पशुपालन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाचे सहायक आयुक्त (मत्स्यपालन) जी. रामकृष्ण राव यांनी २२ एप्रिल २०२६ रोजी यासंदर्भातील अधिकृत आदेश निर्गमित केले आहेत. विशेष म्हणजे, १६ व्या वित्त आयोग चक्रातील 'PMMSY टप्पा-२' आणि 'फिशरीज अँड एक्वाकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड (FIDF) टप्पा-२' ला अद्याप अंतिम मंजुरी मिळालेली नाही. या दुसऱ्या टप्प्याच्या प्रक्रियेला तांत्रिक मान्यता मिळेपर्यंत योजनेतील सातत्य टिकवून ठेवण्यासाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे.​योजनेची पार्श्वभूमी आणि विस्तारपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून १२ जून २०२० रोजी ही योजना आर्थिक वर्ष २०२०-२१ ते २०२४-२५ या पाच वर्षांच्या कालावधीसाठी सुरू करण्यात आली होती. यामध्ये एकूण २०,०५० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यानंतर या योजनेची व्याप्ती वाढवून ती ३१ मार्च २०२६ पर्यंत विस्तारित करण्यात आली होती. सध्या १६ व्या वित्त आयोगाच्या शिफारशींनुसार योजनेचा दुसरा टप्पा सुरू करण्याची प्रक्रिया खर्च वित्त समितीकडे (EFC) प्रलंबित आहे. ही तांत्रिक अडचण लक्षात घेऊन केंद्र सरकारने ३० सप्टेंबरपर्यंत ही विशेष मुदतवाढ दिली आहे.​राज्यांसाठी कठोर आर्थिक नियमावलीकेंद्र सरकारने ही मुदतवाढ देतानाच सर्व राज्यांच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना आणि मत्स्यपालन विभागांना कडक सूचनाही दिल्या आहेत. मुदतवाढीच्या काळात योजनेची व्याप्ती आणि खर्चाचे निकष १५ व्या वित्त आयोगाच्या नियमांनुसारच राहतील. तसेच, सर्व आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता राखण्यासाठी ते पीएफएमएस (PFMS) आणि थेट लाभ हस्तांतरण (DBT) प्लॅटफॉर्मद्वारेच करणे अनिवार्य करण्यात आले आहे. अंमलबजावणी संस्थांना खर्चाच्या नोंदीसाठी 'ईएटी' (EAT) मॉड्यूलचा वापर करावा लागणार असून, डिजिटल स्वरूपात नसलेली उपयोगिता प्रमाणपत्रे (UC) स्वीकारली जाणार नाहीत, असेही केंद्राने स्पष्ट केले आहे.​महाराष्ट्रातील प्रकल्पांना गती मिळणारया निर्णयाची अधिकृत प्रत महाराष्ट्राच्या कृषी, पशुसंवर्धन आणि मत्स्यपालन विभागाचे सचिव तसेच मत्स्यपालन आयुक्तांना (तारापोरवाला मत्स्यालय) पाठवण्यात आली आहे. या मुदतवाढीमुळे महाराष्ट्रातील मत्स्यव्यवसाय विभागाला रखडलेल्या आणि सुरू असलेल्या प्रकल्पांसाठी तातडीने निधी उपलब्ध करून घेता येणार आहे. राज्यातील सागरी आणि गोड्या पाण्यातील मत्स्यशेतीला यामुळे नव्याने उभारी मिळण्याची चिन्हे आहेत.

फीड फीडबर्नर 22 Apr 2026 9:30 pm

Pune News : डेअरी उद्योगाचे आधुनिक शिल्पकार ‘नानासाहेब चितळे’

देशातील डेअरी उद्योगाला विकास व तंत्रज्ञानाची दिशा देणारे परशुराम अर्थात् नानासाहेब चितळे,हे खऱ्या अर्थाने या क्षेत्राचे आधुनिक शिल्पकार आहेत.

दैनिक प्रभात 22 Apr 2026 9:26 pm

Rain Updates: महाराष्ट्रात पुढील चार दिवस वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस; ‘या’जिल्ह्यांना अलर्ट जारी

Rain Updates: पुणे आणि सातारा जिल्ह्यात आज काही ठिकाणी पाऊस पडला. साताऱ्यात दुपारच्या सुमारास अचानक ढग दाटून आले आणि विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली.

दैनिक प्रभात 22 Apr 2026 9:23 pm

Cyber Fraud : बँकेच्या अधिकाऱ्याची शेअर ट्रेडिंगमध्ये ९८ लाखांची फसवणूक

Cyber Fraud : चेंबूर येथील एका अग्रगण्य बँकेच्या सहाय्यक उपाध्यक्षाची ९७.७८ लाख रुपयांची सायबर फसवणूक झाली आहे.

दैनिक प्रभात 22 Apr 2026 9:14 pm

N. Bhaskar Rao : आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन.भास्कर राव यांचे निधन

अविभाजित आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन.भास्कर राव (N. Bhaskar Rao) यांचे बुधवारी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. आंध्रमधील विद्यमान मंत्री आणि जनसेना पक्षाचे नेते नादेंदा मनोहर यांचे ते वडील होत.

दैनिक प्रभात 22 Apr 2026 9:13 pm

K Srikkanth Apology : मला माफ कर रोहित! माजी निवडकर्त्यांनी ‘हिटमॅन’समोर जोडले हात; १५ वर्षांनंतर २०११ च्या त्या जखमेवर झाली मलमपट्टी

K Srikkanth Apology : २०११ मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने २८ वर्षांनंतर विश्वचषक जिंकला. मात्र, आजचा स्टार फलंदाज रोहित शर्मा त्यावेळी या ऐतिहासिक क्षणाचा भाग नव्हता.

दैनिक प्रभात 22 Apr 2026 8:14 pm

BJP : भाजपकडून २३ प्रदेश प्रवक्ते आणि विभागीय प्रसिद्धी प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर

मुंबई : पक्षाची भूमिका आक्रमकपणे मांडण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते आणि विभागीय प्रसिद्धी प्रमुखांच्या नावाची अधिकृत घोषणा केली. यामध्ये अनुभवी नेत्यांसोबतच नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना संधी देत पक्षाने २३ प्रवक्त्यांची मोठी फौज मैदानात उतरवली आहे.प्रदेश प्रवक्त्यांच्या यादीत विश्वास पाठक, प्रमोद जठार, अजित चव्हाण, अवधूत वाघ, गणेश खणकर, श्वेता शालिनी, शिवराय कुलकर्णी, राम कुलकर्णी, अतुल शाह, विनोद वाघ, गणेश हाके आणि कुणाल टिळक यांचा समावेश आहे. यासोबतच विनायक आंबेकर, राजीव पांडे, पंकज मोदी, आसिफ भामला, जितेन गजारिया, प्रमोद राठोड, प्रीती गांधी, शिवानी दाणी, अजय पाठक, लक्ष्मण सावजी आणि समीर बाकरे अशा अनुभवी नेत्यांकडेही प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.स्थानिक स्तरावरही पक्षाचा प्रचार आणि प्रसिद्धी प्रभावी व्हावी, यासाठी सात विभागांमध्ये 'विभागीय प्रसिद्धी प्रमुख' नियुक्त करण्यात आले आहेत. यामध्ये कोकण विभागाची धुरा सतीश धारप यांच्याकडे, तर ठाणे विभागाची जबाबदारी दीपेश म्हात्रे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. पालघरसाठी समीर पाटील, पूर्व विदर्भासाठी कल्पना नालस्कर, पश्चिम विदर्भासाठी अन्नू शर्मा, उत्तर महाराष्ट्रासाठी गोविंद बोरसे आणि पश्चिम महाराष्ट्र विभागासाठी संजय मयेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

फीड फीडबर्नर 22 Apr 2026 8:10 pm

Pankaja Munde : पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येक नागरिकाने ‘वसुंधरा रक्षका’ची भूमिका बजावावी

मुंबई : वाढते प्रदूषण, बदलते हवामान आणि वेगाने होणारे शहरीकरण याच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येक नागरिकाने ‘वसुंधरा रक्षक’ म्हणून पुढे यावे, असे आवाहन राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी केले. ‘वसुंधरा रक्षक’ ही संकल्पना केवळ उपक्रम नसून एक जनआंदोलन बनवण्याचा संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केला.जागतिक वसुंधरा दिनानिमित्त राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागातर्फे आयोजित समारंभात पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते ‘वसुंधरा रक्षक अभियान २०२६’, ‘महा-आरपीईटी अभियान, राज्य वातावरणीय कृती कक्षाच्या संकेतस्थळाचे अनावरण तसेच ‘इमिशन ट्रेडिंग स्कीम प्रशिक्षणाचा शुभारंभ करण्यात आला. वसुंधरा रक्षक अभियानाच्या लोगोचेही यावेळी अनावरण करण्यात आले. या लोगोची निर्मिती स्वतः मंत्री पंकजा मुंडे यांनी तयार केली आहे.यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम आणि विभागाच्या सचिव जयश्री भोज यांच्यासह कोकाकोला कंपनीचे वरिष्ठ अधिकारी, विविध संस्थांचे प्रतिनिधी तसेच विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी उपस्थित होते. ‘वसुंधरा रक्षक’ या संकल्पनेला मातृत्वाची जोड देत मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, वसुंधरा म्हणजे केवळ पृथ्वी नव्हे, तर आपली आई आहे. तिचे संरक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. विकास, औद्योगिकीकरण आणि जागतिकीकरणाबरोबर प्रदूषणही वाढत आहे. त्यामुळे संतुलित विकासाचा मार्ग स्वीकारत पर्यावरण रक्षणासाठी ठोस पावले उचलावी लागतील.‘वसुंधरा रक्षक अभियाना’च्या माध्यमातून राज्यभर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांसारखे ‘वसुंधरा वॉरियर्स’ तयार केले जाणार आहेत. गावागावांत, वॉर्डावॉर्डात ही चळवळ पोहोचली पाहिजे. हे रक्षक प्रदूषणाविरुद्ध लढतील. प्रत्येक नागरिकाने झाडे लावणे, कचरा वर्गीकरण, प्लास्टिकचा वापर कमी करणे अशा कृतींमधून सर्व नागरिकांनीही वाटा उचलावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.प्रदूषणाचा परिणाम प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय त्याची तीव्रता जाणवत नाही. लोकांच्या आरोग्यावर होणारे परिणाम पाहून बदलाची गरज अधिक प्रकर्षाने जाणवत असल्याचे सांगून आजच्या पिढीला पर्यावरणातील बदल समजावून सांगण्यासाठी ‘आज-काल-उद्या’ या संकल्पनेवर आधारित माहिती आणि डेटा उपलब्ध करून दिला जाईल. आजची पिढी तंत्रज्ञानात पुढे आहे; मात्र पर्यावरणाची जाणीवही तितकीच महत्त्वाची आहे. पुढच्या पिढीला संपत्ती नव्हे, तर स्वच्छ हवा आणि पाणी देणे ही आपली जबाबदारी आहे.‘महा-आरपीईटी’ अभियानाबाबत मंत्री पंकजा मुंडे यांनी प्लास्टिक कचऱ्याच्या पुनर्वापरावर भर देत ‘रिड्यूस, रियूज, रिसायकल आणि रिथिंक’ या तत्वांचा अवलंब करण्याचे आवाहन केले. अनावश्यक पॅकेजिंग कमी करणे, वस्तूंचा पुनर्वापर करणे आणि पुनर्निर्मितीला प्राधान्य देणे ही काळाची गरज आहे. प्लास्टिकच्या बाटल्या गोळा करून त्याचा उत्पादकांकडून पुन्हा वापर करण्याची संकल्पना पर्यावरणपूरक आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर आहे. राज्यात या प्रकारचा उपक्रम राबवणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असल्याचेही त्यांनी नमूद केले.औद्योगिक प्रदूषण नियंत्रणासाठी राबविण्यात येणाऱ्या उत्सर्जन व्यापार योजना इमिशन ट्रेडिंग स्कीमबाबत मंत्री मुंडे यांनी सांगितले की, कार्बन ट्रेडिंगप्रमाणेच सल्फर डायऑक्साईड उत्सर्जन नियंत्रणासाठी ही योजना महत्त्वाची आहे. उद्योगांनी उत्सर्जन कमी करण्यासाठी परस्पर सहकार्याचा मार्ग स्वीकारल्यास पर्यावरण संरक्षणाला चालना मिळेल.वसुंधरा रक्षक अभियानाअंतर्गत वसुंधरा रक्षक व्हॉट्सअप कम्युनिटी तयार करण्यात आली आहे. या कम्युनिटीद्वारे या अभियानामध्ये सहभागी होता येणार आहे. या कार्यक्रमात क्यूआर कोडद्वारे मंत्री पंकजा मुंडे, एमपीसीबीचे अध्यक्ष सिद्धेश कदम व सचिव जयश्री भोज यांनी या कम्युनिटीमध्ये सहभाग नोंदवत वसुंधरा रक्षक झालो असल्याचे जाहीर केले. तसेच वसुंधरा अभियानाच्या लिंक व क्यूआर कोडद्वारे या अभियानात सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी केले.

फीड फीडबर्नर 22 Apr 2026 8:10 pm

Maharashtra : महाराष्ट्रात ₹२.५६ लाख कोटींची गुंतवणूक आणि एक लाखांहून अधिक रोजगारनिर्मितीचे लक्ष्य

मुंबई :राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आकर्षित करून रोजगारनिर्मितीला चालना देण्यासाठी तब्बल ₹२,५६,१३७.०१ कोटींच्या अठरा विशाल व अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्यास मान्यता देण्यात आली. यामुळे सुमारे एक लाखांहून अधिक प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगारनिर्मिती होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीची चौदावी बैठक झाली. बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ.उदय सामंत, ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ.पी.अन्बळगन, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.वेलारासू तसेच विकास आयुक्त दिपेंद्रसिंह कुशवाह उपस्थित होते.या बैठकीमध्ये थ्रस्ट सेक्टर तथा उच्च तंत्रज्ञानावर आधारित सोलर सेल, मॉडयुल, इग्नॉट, वेफर्स, ग्रीन स्टील, हरित अमोनिया, इलेक्ट्रॉनिक्स उत्पादने, अवकाश व संरक्षण साहित्य, लिथियम आयन बैटरी, इलेक्ट्रीक वाहन निर्मिती/साहित्य, स्टील व गॅस टू केमिकल निर्मितीचे विशाल व अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहने मंजूर करण्यासाठीच्या 18 प्रस्तावांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी मान्यता दिली.यामध्ये नाशिकमधील व्हर्च्युओसो कॉम्प्रेसर्स प्रा. लि. आठशे कोटींची गुंतवणूक करून पाचशे जणांना रोजगार देणार आहे. अमरावती येथे टेंबो डिफेन्स प्रोडक्ट प्रा. लि.एक हजार कोटींची गुंतवणूक करत आहे.तर छत्रपती संभाजीनगरमधील नायडेक ग्लोबल अप्लायन्सेस इंडिया प्रा. लि. एक हजार कोटींची गुंतवणूक करून एक हजार नवीन रोजगार निर्माण करेल.पुण्याच्या शिरूर भागात जबिल सर्किट इंडिया प्रा. लि. पंधराशे कोटींच्या गुंतवणुकीतून तीन हजार लोकांना संधी देणार आहे.गडचिरोली सारख्या नक्षलग्रस्त भागात हरिओम पाईप इंडस्ट्रीज लि. ३,१३५ कोटींची गुंतवणूक करून आठ हजार जणांना रोजगार देणार आहे.अहिल्यानगरमध्ये निबे स्पेस चार हजार कोटींच्या गुंतवणुकीसह एक हजार रोजगार निर्माण करेल.पुण्याच्या तळेगाव भागात युरोबस इंडिया प्रा. लि. ४२०० कोटींची गुंतवणूक आणि १२ हजर रोजगार निर्मिती करेल. चंद्रपूरमध्ये मिलीयन स्टील प्रा. लि. २५६.०१ कोटींच्या गुंतवणुकीतून ३६० रोजगार देणार आहे.भंडारा जिल्ह्यात अशोक लेलँड लि. दहा हजार कोटींची मोठी गुंतवणूक करून एक हजार रोजगार उपलब्ध करेल. नागपूरच्या बुटीबोरी येथे अॅकमे क्लीनटेक सोल्युशन प्रा.लि. ११,४०० कोटींची गुंतवणूक आणि सात हजार रोजगार निर्माण करेल.तर याच कंपनीचा रायगड/पालघरमधील ग्रीन स्टील प्रकल्प अकरा हजार कोटींची गुंतवणूक आणि २५०० रोजगार देईल.नागपूरमधील सोलार डिफेन्स अँड एरोस्पेस लि. १२,७८० कोटींच्या गुंतवणुकीतून ६८२५ जणांना काम देणार आहे. ग्लोब फोर्ज लिमिटेड, अहिल्यानगर आणि धाराशिवमध्ये १५,४३० कोटींची गुंतवणूक करून ३६०० रोजगार निर्माण करेल. रायगड येथे बालासोर अलॉयज १७,४७९ कोटींची गुंतवणूक आणि 3३२०० रोजगार देणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये गोदावरी न्यु एनर्जी प्रा. लि. २७,५१५ कोटींची गुंतवणूक करून चार हजार रोजगार निर्माण करेल. रायगड/पालघरमध्ये अॅकमे क्लीनटेक प्रा.लि.चा ग्रीन अमोनिया प्रकल्प ३७,८०० कोटींची गुंतवणूक आणि ४५०० रोजगार घेऊन येत आहे. गडचिरोलीत रश्मी मेटलर्जिकल इंडस्ट्री प्रा. लि. ४० हजार कोटींची भव्य गुंतवणूक आणि २० हजार रोजगार निर्माण करेल. सर्वात मोठी गुंतवणूक एस्सार एक्सप्लोरेशन अँड प्रोडक्शन लि. कडून रायगडमध्ये ५६,८५२ कोटींच्या रूपात होणार असून, त्यातून २५ हजार जणांना रोजगार मिळणार आहे.या प्रकल्पांमुळे कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि राज्यातील इतर भागांत औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार असून स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल. तसेच तांत्रिक नवकल्पना, संशोधन-विकास आणि मजबूत पुरवठा साखळी निर्माण होण्यास मदत होईल. सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांनाही याचा लाभ होणार आहे. याशिवाय, स्थानिक कामगारांसाठी प्रशिक्षण व कौशल्यविकासाच्या संधी उपलब्ध होऊन त्यांच्या रोजगारक्षमतेत वाढ होणार आहे.

फीड फीडबर्नर 22 Apr 2026 8:10 pm

Biogas : प्रत्येक जिल्ह्यात कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती, राज्याकडून ५०० कोटींच्या तरतुदीसह हरित ऊर्जेला बळ

मुंबई : राज्यातील वाढत्या शहरीकरणासोबत निर्माण होणारी कचऱ्याची समस्या आता रोजगाराची आणि स्वच्छ ऊर्जेची संधी ठरणार आहे. राज्याच्या नागरी भागातील कचऱ्याचे शाश्वत व्यवस्थापन करण्यासाठी आणि हरित ऊर्जेला चालना देण्यासाठी राज्य सरकारने 'महाराष्ट्र राज्य कॉम्प्रेस्ड बायोगॅस (सीबीजी) धोरण २०२६' जाहीर केले आहे. या महत्त्वाकांक्षी धोरणासाठी पहिल्या टप्प्यात ५०० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली असून, आता प्रत्येक जिल्ह्यात कचऱ्यापासून ऊर्जा निर्मितीचे प्रकल्प उभारले जाणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या महत्त्वपूर्ण धोरणासह आयटी पार्क आणि जमीन धारणा कायद्यातील बदलांबाबत मोठे निर्णय घेण्यात आले.राज्यातील शहरांमधील कचऱ्याची विल्हेवाट लावताना होणारे पाण्याचे प्रदूषण आणि आरोग्याचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी हे धोरण गेमचेंजर ठरणार आहे. या धोरणांतर्गत नागरी सेंद्रिय कचरा, शेतातील अवशेष आणि पशुधनाचा कचरा यांपासून कॉम्प्रेस्ड बायोगॅस तयार केला जाईल. यामुळे जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी होऊन कार्बन उत्सर्जनात मोठी घट होईल. विशेष म्हणजे, हे प्रकल्प सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) आणि हायब्रीड अॅन्युइटी मॉडेलवर राबवले जाणार असून, मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील सुकाणू समिती यावर देखरेख ठेवणार आहे. किमान २०० टन प्रतिदिन क्षमतेचे हे प्रकल्प ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागांत रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.साताऱ्यात 'आयटी पार्क'ला मंजुरीकचरा व्यवस्थापनासोबतच माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला बळ देण्यासाठी सातारा जिल्ह्यातील नागेवाडी येथे ४२.५५ हेक्टर जमिनीवर नवीन 'आयटी पार्क' उभारण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. ही जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला (एमआयडीसी) हस्तांतरित केली जाणार असून, यामुळे सातारा परिसरातील अभियांत्रिकी आणि आयटी पदवीधरांना स्थानिक पातळीवरच मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होणार आहे. तसेच, राज्यातील सात 'आदर्श महाविद्यालयां'मध्ये कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या शिक्षकांना मोठा दिलासा देत, त्यांना युजीसीनुसार मूळ वेतन आणि आगामी पदभरतीत अतिरिक्त १० गुण देण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.भूमिहीन आणि माजी सैनिकांना दिलासामहसूल विभागानेही एक ऐतिहासिक निर्णय घेत महाराष्ट्र शेतजमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियमांतर्गत वाटप केलेल्या जमिनींच्या भोगवटादार वर्गात बदल करण्यास मान्यता दिली आहे. सुमारे ४०-५० वर्षांपूर्वी भूमिहीन आणि माजी सैनिकांना वाटप केलेल्या या जमिनी आता २५ ते ३० टक्के अधिमूल्य भरून 'भोगवटादार वर्ग-१' (मालकी हक्क) मध्ये रूपांतरित करता येणार आहेत. या निर्णयामुळे राज्यातील १ लाख ९ हजारांहून अधिक लाभार्थ्यांना जमिनीचा बिगरशेती वापर किंवा हस्तांतरण करताना जिल्हाधिकाऱ्यांच्या वारंवार लागणाऱ्या परवानगीतून मुक्तता मिळणार आहे. ५० लाख रुपयांपर्यंतच्या मूल्यांकनाची प्रकरणे निकाली काढण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

फीड फीडबर्नर 22 Apr 2026 8:10 pm

केंद्र सरकारच्या iGOT–‘Sadhana Saptah 2026’ मध्ये महाराष्ट्र अव्वल

मुंबई : केंद्र सरकारच्या ‘मिशन कर्मयोगी’ अंतर्गत आयोजित ‘साधना सप्ताह २०२६ मध्ये राज्याने देशात प्रथम क्रमांक पटकावत नवा मानदंड प्रस्थापित केला असून या अध्ययन सप्ताहात उत्स्फूर्त सहभाग नोंदवत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील या उपक्रमात सहभागी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करत, या सर्वांच्या प्रयत्नाचे कौतुक केले आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्ञानोपासना, क्षमताविकास आणि उत्तम सार्वजनिक सेवा देण्याच्या दृष्टीने मिशन कर्मयोगी हे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आणि सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि पाठबळ उपलब्ध करून दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचेही आभार मानले आहेत.महाराष्ट्रातील अधिकारी- कर्मचाऱ्यांनी ‘आयगॉट कर्मयोगी’ प्लॅटफॉर्मवर एकूण ४६ लाख ९४ हजार ५९७ अभ्यासक्रम पूर्ण करत ६ लाख ५९ हजार ७५९ एआय-विशिष्ट प्रमाणपत्रे प्राप्त केली आहेत. हे आधुनिक सुशासन आणि क्षमता विकासाबाबत राज्याच्या दृढ वचनबद्धतेचे द्योतक, असल्याचे मुख्यमंत्री यांनी म्हटले आहे.देशभरातील सुमारे ३३ लाख ४ हजार शासकीय अधिकारी- कर्मचाऱ्यांनी ‘साधना सप्ताहा’त सहभाग घेत ‘iGOT कर्मयोगी’ प्लॅटफॉर्मवर सुमारे चार तासांचा अभ्यासक्रम पूर्ण केला. यामध्ये राज्यातील ५ लाखांहून अधिक अधिकारी - कर्मचारी सहभागी झाले होते. या उपक्रमात महाराष्ट्राने केलेली कामगिरी ही राज्याच्या प्रशासनिक कार्यक्षमतेचा उत्कृष्ट नमुना असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.

फीड फीडबर्नर 22 Apr 2026 8:10 pm

MegaBlock: पुणे-मुंबई एक्सप्रेस-वेवर दोन दिवस ‘मेगाब्लॉक’; दुपारी 12 ते 3 या वेळेत वाहतूक पूर्णपणे बंद, पर्यायी मार्ग पहा

MegaBlock: प्रवाशांनी या बदलाची नोंद घेऊन आपल्या प्रवासाचे योग्य नियोजन करावे, असे आवाहन रस्ते विकास महामंडळाने केले आहे. प्रवासादरम्यान कोणतीही अडचण किंवा आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास वाहनचालकांनी नियंत्रण कक्षाच्या ९८२२४९८२२४ किंवा महामार्ग पोलीस विभागाच्या ९८३३४९८३३४ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे सूचित करण्यात आले आहे.

दैनिक प्रभात 22 Apr 2026 8:09 pm

Devendra Fadnavis : “पाणी टंचाईचा मुकाबला करता यावा, यासाठी पाणी जपून वापरा”– CM देवेंद्र फडणवीस

राज्यातील विविध धरणांमध्ये सुमारे ६५३.६३ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आली.

दैनिक प्रभात 22 Apr 2026 8:04 pm

Legislative Council Election: विधानपरिषदेसाठी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीच्या उमेदवारांची संभाव्य नावे समोर, पहा यादी

Legislative Council Election: उद्धव ठाकरे, नीलम गोऱ्हे, शशिकांत शिंदे, अमोल मिटकरी, गोपीचंद पडळकर, रणजितसिंह मोहिते-पाटील, राजेश राठोड, प्रवीण दटके आणि रमेश कराड यांचा कार्यकाळ संपणार आहे.

दैनिक प्रभात 22 Apr 2026 7:57 pm

Axar Patel Captaincy : कर्णधाराचाच स्वतःवर विश्वास नाही? अभिषेक शर्माच्या वादळात अक्षर पटेलने टाकली नांगी; माजी खेळाडूचं वक्तव्य

Axar Patel Captaincy : माजी ऑस्ट्रेलियन खेळाडू कुलदीप आणि अक्षरसारखे प्रीमियर फिरकीपटू असताना पार्ट-टाईम ऑफ स्पिनर नितीश राणाकडून ४ षटके टाकून घेणे अनाकलनीय आहे.

दैनिक प्रभात 22 Apr 2026 7:46 pm

A Journey Called Donald : टिम कुक आणि ट्रम्प यांच्यातील ‘डोनाल्ड’कनेक्शन.! दोघांच्या नावामध्ये ‘डोनाल्ड’का आहे? वाचा भन्नाट स्टोरी…

टीम कुक हे नाव जगभर परिचित असलं तरी त्यांचं पूर्ण नाव 'टिमोथी डोनाल्ड कुक' असं आहे. डोनाल्ड हा शब्द त्यांच्या नावात का आहे?

दैनिक प्रभात 22 Apr 2026 7:46 pm

Newasa: तेलकुडगावात तणावपूर्ण शांतता; गावाला पोलीस छावणीचे स्वरूप!

Newasa: 'पुतळा विटंबना' नाही, तर ती व्यथा होती; पीडित पत्नीचा ग्रामपंचायतीवर गंभीर आरोप

दैनिक प्रभात 22 Apr 2026 7:42 pm

Jamkhed Water Crisis: 20 गावांचा सरकारला ‘अल्टिमेटम’; उजनीच्या पाण्यासाठी साखळी उपोषणाचा इशारा

Jamkhed Water Crisis: या निवेदनाच्या प्रती विधान परिषद सभापती राम शिंदे, आमदार रोहित पवार, जिल्हाधिकारी आणि संबंधित विभागांच्या अधीक्षक अभियंत्यांना पाठवण्यात आल्या आहेत. आता सरकार या गंभीर प्रश्नावर काय भूमिका घेते आणि जामखेडची तहान भागवते का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

दैनिक प्रभात 22 Apr 2026 7:33 pm

Speak Marathi : मराठी बोला नाहीतर रिक्षा, टॅक्सी चालवणं सोडा; परिवहन खात्याचा इशारा

मुंबई : महाराष्ट्रातील रिक्षा, टॅक्सी तसेच ओला ,ऊबर इ-बाईक टॅक्सी सारख्या इतर व्यावसायिक अमराठी वाहनचालकांनी प्रवाशांशी मराठीतून संवाद साधणे अनिवार्य करण्याच्या निर्णयाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य शासनाने ठोस पावले उचलली आहेत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञ, साहित्यिक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत विशेष बैठक आयोजित केली आहे. गुरुवार २४ एप्रिल रोजी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ११ वाजता ही बैठक होणार आहे. परिवहन आयुक्तही उपस्थित राहणार आहेत.शासनाने २०१९ मध्ये घेतलेल्या निर्णयानंतरही अनेक ठिकाणी त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. विशेषतः परप्रांतीय वाहनचालकांकडून प्रवाशांशी मराठीत संवाद साधला जात नसल्यामुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निदर्शनास आले आहे. याच पार्श्वभूमीवर हा विषय गांभीर्याने घेत राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे.परिवहन विभागाच्या वतीने ‘महाराष्ट्र दिना’चे औचित्य साधत या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. मराठी भाषेला नुकताच ‘अभिजात भाषा’ दर्जा मिळाल्याने या उपक्रमाला अधिक महत्त्व प्राप्त झाले असून, हा निर्णय केवळ प्रशासकीय न राहता अमराठी वाहनचालकांमध्ये मराठी भाषेबद्दल आत्मीयता निर्माण करणारा ठरावा, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. अमराठी वाहनचालकांना मराठी भाषेचे प्रशिक्षण देण्यासाठी अभ्यासक्रम तयार करण्यावर भर दिला जाणार आहे. मुंबई मराठी साहित्य संघाच्या अध्यक्षा उज्ज्वला मेहेंदळे तसेच ज्येष्ठ साहित्यिक प्रदीप ढवण, महेश केळुसकर, संतोष राणे, अशोक बागवे, बाळ कांदळकर, सुनील तांबे, शिवाजी गावडे, सतीश सोळांकुरकर, अरुण म्हात्रे, एकनाथ आव्हाड, प्रसाद कुलकर्णी, प्राचार्य अशोक चिटणीस, ज्येष्ठ साहित्यिका अनुपमा उजगरे, दीपा ठाणेकर आणि मनीषा राजपूत आदी मार्गदर्शन करणार आहेत.

फीड फीडबर्नर 22 Apr 2026 7:30 pm

Nitesh Rane : महिला आरक्षण विधेयकामुळे विरोधकांचा खरा चेहरा समोर आला

मुंबई : महिला आरक्षण विधेयकाला विरोध करून विरोधकांनी आपला महिलाविरोधी चेहरा पुन्हा एकदा उघड केला असून, हिंदुत्वाचा विचार सोडून लाचारी पत्करणारे उद्धव ठाकरे आता पुन्हा आमदारकीसाठी धडपडत आहेत, अशा शब्दांत मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी बुधवारी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. उद्धव ठाकरे यांचा उल्लेख थेट ‘उद्धव खान’ असा करत, राणे यांनी त्यांच्या राजकीय भूमिकेवर आणि वर्तणुकीवर बोचरी टीका केली.मंत्रालयात बुधवारी माध्यमांशी संवाद साधताना नितेश राणे यांनी हिंदुत्व, महिला आरक्षण आणि ‘कॉर्पोरेट जिहाद’ यांसारख्या विषयांवरून विरोधकांना लक्ष्य केले. उद्धव ठाकरे पुन्हा एकदा विधान परिषदेसाठी इच्छुक असल्याच्या वृत्ताचा संदर्भ देत राणे म्हणाले की, “उद्धव ठाकरे हा अत्यंत लाचार माणूस आहे. ज्यांनी एकेकाळी विधान परिषदेचा राजीनामा देण्याची भाषा केली होती, तेच आता त्याच पदासाठी नेत्यांचे उंबरठे झिजवत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर नेत्यांना ते चोरून फोन करत आहेत. उद्या हेच उद्धव ठाकरे सरपंच पदासाठीही उभे राहिले, तरी नवल वाटायला नको”, अशी बोचरी टीका राणे यांनी केली.विरोधकांना पाकिस्तानातून ‘स्क्रिप्ट’नितेश राणे म्हणाले, “ज्या खासदारांना 'फतव्यां'च्या जोरावर मते मिळाली आहेत, तेच या ऐतिहासिक विधेयकाला विरोध करत आहेत. राहुल गांधी आणि काँग्रेसची संपूर्ण ‘स्क्रिप्ट’ पाकिस्तानातून येते,” असे ते म्हणाले. खासदार सुप्रिय सुळे यांच्यावर निशाणा साधताना त्यांनी, सुळे यांची भूमिका ही नेहमीच ‘लव्ह जिहाद’च्या समर्थनाची राहिली असल्याची टीकाही केली.‘भगवा कधीच दहशतवादी नसतो’मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींच्या निर्दोष सुटकेच्या पार्श्वभूमीवर बोलताना राणे यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. “भगवा कधीच दहशतवाद करत नाही, हे आता न्यायालयानेही सिद्ध केले आहे. केवळ हिंदूंना बदनाम करण्यासाठी काँग्रेसने ‘भगवा दहशतवाद’ हा शब्दप्रयोग जाणीवपूर्वक पेरला होता. काँग्रेस आणि पाकिस्तानची विचारधारा एकच आहे, हेच यातून स्पष्ट होते,” असे त्यांनी नमूद केले.‘कॉर्पोरेट जिहाद’वर हल्लाबोलनाशिक आणि पुण्यातील बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये धार्मिक कारणांसाठी विश्रांती कक्षाचा गैरवापर होत असल्याचा मुद्द्यावरही नितेश राणे यांनी भाष्य केले. “शाळांप्रमाणेच कॉर्पोरेट कार्यालयांतही हिजाब आणि बुरख्यावर बंदी घातली पाहिजे. जर लेन्सकार्ट सारख्या नामांकित कंपन्यांमध्ये कपाळाला टिळा लावण्यावर बंदी असू शकते, तर बुरख्याला परवानगी का? हा एक प्रकारचा ‘कॉर्पोरेट जिहाद’ असून याविरोधात हिंदुत्ववादी सरकार ठाम भूमिका घेणार आहे,” असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

फीड फीडबर्नर 22 Apr 2026 7:30 pm

ZP Election : 22 जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचं बिगुल वाजणार; शिवसेनेने ‘या’शिलेदारांवर सोपवली मोठी जबाबदारी

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी (ZP Election) शिवसेनेने आता कंबर कसली असून 'आर या पार'ची भूमिका घेत थेट मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

दैनिक प्रभात 22 Apr 2026 7:29 pm

Wagholi Accident: वाघोली येथे खड्ड्यात डंपर पलटी

Wagholi Accident:

दैनिक प्रभात 22 Apr 2026 7:23 pm

Home Minister Resignation : आर्थिक वादामुळे गृहमंत्र्यांचा तडकाफडकी राजीनामा; राजकीय वर्तुळात खळबळ

Home Minister Resignation : नेपाळचे गृहमंत्री सुदान गुरुंग यांनी २२ एप्रिल २०२६ रोजी राजीनामा दिला. आर्थिक आरोपांच्या चौकशीसाठी आणि नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी हे पाऊल उचलले आहे.

दैनिक प्रभात 22 Apr 2026 7:11 pm

Rinku Singh Video : मैदानावर षटकार ठोकणारा रिंकू आता चढणार बोहल्यावर? प्रिया सरोजसोबत गंगा आरतीला हजेरी लावल्याने लग्नाच्या चर्चांना उधाण

Rinku Singh Video : दोघांनीही श्री काशी विश्वनाथ मंदिरात जाऊन विधिवत पूजा-अर्चा केली. सुमारे अर्धा तास मंदिर परिसरात थांबून त्यांनी महादेवाचा आशीर्वाद घेतला.

दैनिक प्रभात 22 Apr 2026 7:07 pm

Strait of Hormuz Crisis: भारताकडे येणाऱ्या जहाजावर होर्मुझच्या सामुद्रधुनीत हल्ला; गुजरातला पोहोचण्यापूर्वी केले जप्त

Strait of Hormuz Crisis: एपामिनोड्स (Epaminodes) हे जहाज लायबेरियाच्या ध्वजाखाली कार्यरत असून ते दुबईहून भारताकडे येत होते. गुजरातच्या मुंद्रा बंदरात हे जहाज पोहोचण्यापूर्वीच इराणने ते ताब्यात घेतले. एमएससी फ्रांसेस्का (MSC Francesca) या जहाजावर पनामाचा ध्वज असून ते देखील इराणच्या ताब्यात आहे.

दैनिक प्रभात 22 Apr 2026 7:01 pm

RBI Rule Change : आरबीआयकडून नियमात बदल; ऑटो-पेमेंटची ‘ती’अट केली बंद

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI Rule Change) डिजिटल पेमेंट्सच्या क्षेत्रात महत्त्वाचा बदल केला आहे. २१ एप्रिल २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या ‘डिजिटल पेमेंट्स – ई-मँडेट फ्रेमवर्क, २०२६’ नुसार, वारंवार होणाऱ्या पेमेंट्ससाठी नवीन एकत्रित नियम लागू झाले आहेत.

दैनिक प्रभात 22 Apr 2026 6:59 pm

Kagiso Rabada Smoking : कगिसो रबाडाचं हॉटेलमध्ये ‘धुंआ-धुंआ’? सिगारेट ओढतानाचा VIDEO व्हायरल झाल्याने क्रिकेट विश्वात खळबळ

Kagiso Rabada Smoking : गुजरात टायटन्सचा प्रमुख वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा याचा एक कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.

दैनिक प्रभात 22 Apr 2026 6:34 pm

Satara IT Park : सातारा जिल्ह्यात आयटी पार्क उभारणार

मुंबई : सातारा जिल्ह्यातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला चालना देण्यासाठी मौजे नागेवाडी (ता. सातारा, जि. सातारा) येथील गट क्रमांक ३०८/१ मधील सुमारे ४२.५५ हेक्टर आर (आरक्षित) शासकीय जमिनीवर अत्याधुनिक आयटी पार्क उभारण्यास राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोंसले यांनी पुढाकार घेतला होता. उद्योगमंत्री उदय सामंतांशी चर्चा केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळेच या महत्वपूर्ण कामाला गती मिळाली. आयटी पार्कमुळे सातारा जिल्हा तसेच परिसरातील युवकांना स्थानिक पातळीवर रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार असून, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी हा प्रकल्प महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. तसेच, पुणे-मुंबईसारख्या महानगरांवरील आयटी क्षेत्रातील ताण कमी करण्यास मदत होणार आहे.प्रस्तावीत आयटी पार्कमध्ये आयटी कंपन्यांसाठी आवश्यक असलेल्या सर्व आधुनिक पायाभूत सुविधा — प्रशस्त रस्ते, वीज, पाणीपुरवठा, इंटरनेट कनेक्टिव्हिटी, तसेच कार्यालयीन इमारतींची उभारणी करण्यात येणार आहे. यासोबतच स्टार्टअप्स आणि नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्याचाही प्रयत्न सुरू आहे. या प्रकल्पामुळे सातारा जिल्ह्याची ओळख एक उदयोन्मुख आयटी हब म्हणून निर्माण होण्याची शक्यता असून, स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. तसेच, उद्योग, सेवा क्षेत्र आणि पायाभूत सुविधा विकासालाही या प्रकल्पामुळे बळकटी मिळणार आहे.

फीड फीडबर्नर 22 Apr 2026 6:30 pm

Harshwardhan Sapkal : भाजपचे वैचारिक ग्रंथ महिलांना दुय्यम मानतात; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा दावा

Harshwardhan Sapkal : भाजपला महिला आरक्षणावर बोलण्याचा कोणताही अधिकार नाही. त्यांनी सर्वप्रथम मनुस्मृतीसह त्यांचे वैचारिक ग्रंथ नाकारावेत. भाजपची विचारसरणी याच ग्रंथांमध्ये रुजलेली आहे.

दैनिक प्रभात 22 Apr 2026 6:25 pm

Mohammed Ayaan : परतवाडा–अचलपूरमध्ये काढली आरोपी अयानची धिंड

अमरावती : परतवाडा–अचलपूर शहरांतील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण व अश्लील व्हिडिओ व्हायरल प्रकरणात मुख्य आरोपी मोहम्मद अयान (Mohammed Ayaan) याच्या अडचणी कायम असून, न्यायालयाने त्याला पुन्हा सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांकडून अद्याप ठोस व निर्णायक पुरावे सादर करण्यात अपयश आल्याची नोंद न्यायालयाने केली. त्यामुळे पुढील तपासासाठी व आवश्यक पुरावे गोळा करण्यासाठी पोलिसांना अतिरिक्त वेळ देण्यात आला आहे.या प्रकरणाने संपूर्ण अमरावती जिल्ह्यात खळबळ उडवली असून, नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे. न्यायालयीन सुनावणी दरम्यान पोलिसांनी तपास सुरू असल्याचे सांगितले, मात्र प्रकरणाचे गांभिर्य लक्षात घेता ठोस पुरावे सादर करणे अत्यावश्यक असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. त्यामुळे तपास यंत्रणांवर आता अधिक जबाबदारी आली आहे.दरम्यान, कोठडीच्या पहिल्याच दिवशी पोलिसांनी आरोपीची परतवाडा व अचलपूर शहरातून धिंड काढत जनजागृती मोहीम राबवली. या कृतीमागील उद्देश नागरिकांमध्ये भीती निर्माण करणे नसून, अशा गुन्ह्यांविरोधात सामाजिक जागरूकता वाढवणे हा असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच या प्रकरणातील पीडित व संभाव्य साक्षीदारांनी पुढे येऊन माहिती द्यावी, असे आवाहनही करण्यात आले. पोलिसांच्या या कारवाईमुळे काही प्रमाणात समाजात चर्चा रंगली असून, गुन्हेगारांना कठोर संदेश देण्याचा प्रयत्न असल्याचे मत व्यक्त होत आहे. मात्र दुसरीकडे, आरोपीची धिंड काढण्याच्या पद्धतीवरही काही सामाजिक व कायदेशीर प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रकरणात डिजिटल पुरावे, मोबाईल डेटा, तसेच संबंधित ठिकाणांवरील माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. तपासाची दिशा निश्चित करण्यासाठी पोलिसांकडून तांत्रिक विश्लेषणालाही महत्त्व दिले जात आहे. आगामी काळात या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एकूणच, अयान प्रकरणाने केवळ कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला नसून, समाजातील सुरक्षेच्या दृष्टीनेही गंभीर चिंता निर्माण केली आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास जलद गतीने व पारदर्शकपणे पूर्ण करून दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.‘फंडिंग’च्या मागावर तपास; पडद्यामागचे सूत्रधार लवकरच उघड होणारया प्रकरणातील तपासाला आता वेग आला असून आरोपींचे बँक व्यवहार आणि संशयास्पद ‘फंडिंग’चे जाळे पोलिसांच्या रडारवर आले आहे. शहरातील आणखी काही पांढरपेशा चेहरे या चौकशीत अडकण्याची शक्यता व्यक्त होत आहे. प्रकरणाची पाळेमुळे खणून काढण्याचा निर्धार पोलिसांनी केला असून, लवकरच या गुन्ह्यामागील पडद्यामागचे खरे सूत्रधारांना बेड्या ठोकले जातील, अशी जोरदार चर्चा पोलीस वर्तुळात रंगू लागली आहे.

फीड फीडबर्नर 22 Apr 2026 6:10 pm

Rohit Pawar : रोहित पवारांची ‘त्या’खटल्यातून निर्दोष मुक्तता; कोर्टाने थेट आदेश दिले

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील (एमएससीबी) कथित २५ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दाखल केलेल्या खटल्यातून एका विशेष न्यायालयाने बुधवारी राष्ट्रवादीचे(शप) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) आणि इतरांची निर्दोष मुक्तता केली आहे.

दैनिक प्रभात 22 Apr 2026 5:56 pm

Maharashtra Cabinet Decisions : महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने घेतले चार महत्त्वाचे निर्णय

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चार महत्त्वाचे निर्णय झाले. या निर्णयांची माहिती शासनाच्यावतीने प्रसारमाध्यमांना देण्यात आली. राज्य मंत्रिमंडळाने घेतलेल्या या चार निर्णयांमुळे ग्रामीण क्षेत्राला सर्वाधिक लाभ होणार आहे.शासनाने राज्यासाठीचे कॉम्प्रेस्ड बायोगॅस धोरण अर्थात सीबीजी जाहीर केले आहे. मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब झाल्यानंतर हे धोरण जाहीर करण्यात आले. या धोरणानुसार प्रत्येक जिल्ह्यात समन्वय समिती स्थापन केली जाणार आहे. बायोगॅस प्रकल्प पीपीपी, हायब्रीड अन्युईटी तत्वावर राबवले जाणार आहेत. बायोगॅस धोरण राबवण्यासाठी राज्य शासनाने यंदाच्या वर्षी पाचशे कोटी रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय घेतला आहे. घनकचऱ्याचे पर्यावरणपूरक व्यवस्थापन करणे आणि हरित गृह वायू उत्सर्जन कमी करणे यासाठी बायोगॅस धोरण लाभदायी ठरणार आहे.राज्यातील सात आदर्श महाविद्यालयातील शिक्षकांना विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार मूळ वेतन देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. लाभार्थी शिक्षकांना उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या पद भरतीमध्ये अतिरिक्त गुण मिळणार आहेत.सातारा जिल्ह्यातील मौजे नागेवाडी येथे आय. टी. पार्कला जमीन देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला आहे. या निर्णयानुसार महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास ४२. ५५ हेक्टर जमीन देण्यात येणार आहे. आय. टी. पार्कमुळे सातारा जिल्हा आणि परिसरातील आयटी क्षेत्राला प्रोत्साहन मिळणार आहे. स्थानिक युवकांना रोजगार - व्यवसायाच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.राज्यातील कमाल जमीन धारणा मर्यादा नियमानुसार भोगवटादार वर्ग – २ मधून भोगवटादार वर्ग – १ मध्ये रुपांतरणाच्या अधिमुल्याची पुनर्रचना करण्यासाठी अधिसूचना काढण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.

फीड फीडबर्नर 22 Apr 2026 5:30 pm

Mumbra Corporator Sahar Shaikh : मुंब्राची नगरसेविका सहर शेखच्या अडचणीत वाढ; मराठी येत नाही म्हणून झाली ट्रोल

मुंबई : 'कैसे हराया' या वाक्याने प्रसिद्ध झालेली मुंब्राची एमआयएमची नगरसेविका सहर शेख सध्या मराठीच्या कात्रीत अडकली आहे. इतकी वर्ष मुंबईत राहूनही मुंब्र्याच्या नगरसेविकेला मुंबई भाषाच मराठी येऊ नये ही खरंच लज्जास्पद गोष्ट आहे.मराठी ही मुंबईची भाषा आहे, इथे राहणारे प्रत्येक धर्माचे लोक अस्खलीत मराठी बोलतात, इतकी वर्ष महाराष्ट्रात राहूनही सहरला मराठी बोलता येत नाही. मुंब्रामध्ये वर्षनुवर्षं राहणारी एमआयएमची नगरसेविका सहर शेख हिलाच जर मराठी येत नसेल तर ती मुंब्राचा काय विकास करणार असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.https://prahaar.in/2026/04/15/sahar-sheikh-mim-fake-caste-certificate-scam-thane-mumbra-jitendra-awhad/सहर शेख हिने नुकतीच पत्रकार परिषद घेतली, त्यात एका पत्रकाराने मराठीतून प्रश्न विचारला, मराठी वाहिनीसाठी मराठीतून उत्तर द्या अशी विनंती केली असताना मी मराठीतून उत्तर देणार नाही, मला मराठी येत नाही नाही, माझी मराठी चुकली तर मला भीती वाटते की मी ट्रोल होईन, माझ्या तोंडातून जर काही चुकीचे बाहेर पडेल याची मला प्रचंड भीती वाटते म्हणून मी मराठी बोलणार नाहीhttps://prahaar.in/2026/04/15/sahar-shaikh-mumbra-aimim-complaint-filed-alleging-that-mim-corporator-sahar-shaikh-obtained-a-fake-caste-certificate/सहर शेखच्या या वक्तव्यानंतर तिच्यावर सोशल मीडियातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. मुंबईत राहून मराठी येत नाही बोलायला लाज वाटते का? असे प्रश्न विचारले जात आहेत.सहर शेख यापूर्वी आणखी एका वादात पूर्णपणे अडकली आहे, ते म्हणजे जातीचे प्रमाणपत्र, तिने निवडणूक लढवण्यासाठी वापरलेला OBC जातीचा दाखला बनावट असल्याचा आरोप विरोधकांनी केला. ठाणे तहसीलदारांच्या चौकशीच्या अहवालानुसार तिच्या वडिलांवर गुन्हा दाखल करण्याची शिफारस करण्यात आली आहे.आरोप कितीही फेटाळले जात असले तरी सत्य लवकलरच बाहेर येईल. जातीचा दाखला अवैध ठरल्यास तिचे नगरसेवक पदाला ती कायमची मुकणार आहे.

फीड फीडबर्नर 22 Apr 2026 4:30 pm

Rajnath Singh : भारत भविष्यात इराण-अमेरिका यांच्यात मध्यस्थीची भूमिका निभावू शकतो - राजनाथ सिंह

नवी दिल्ली : जर्मनीच्या तीन दिवसीय दौऱ्यावर गेलेले संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी इराण-अमेरिका यांच्यातील युद्धावर भविष्यात भारताच्या भूमिकेबाबत मोठे विधान केले आहे. त्यांनी सांगितले की भारताने नेहमीच शांततेचा प्रयत्न केला आहे आणि भविष्यात इराण-अमेरिका यांच्यात मध्यस्थी करण्याची भूमिका निभावू शकतो. त्यांनी स्पष्ट केले की योग्य वेळ आल्यावर भारत पुढे येऊ शकतो. संरक्षण मंत्र्यांनी जर्मनीतील आपल्या तीन दिवसीय दौऱ्याच्या पहिल्या दिवशी बर्लिन येथे भारतीय समुदायाशी संवाद साधला.संरक्षण मंत्री राजनाथ सिंह मंगळवारी जर्मनीच्या तीन दिवसीय दौऱ्यावर बर्लिन येथे पोहोचले. त्यांना जर्मन वायुदलाच्या विशेष विमानातून नेण्यात आले. म्युनिकहून बर्लिनकडे त्यांच्या उड्डाणादरम्यान लढाऊ विमानांनी त्यांना एस्कॉर्ट केले. बर्लिनमध्ये पोहोचल्यावर त्यांना लष्करी सन्मान देण्यात आला. या दौऱ्यात ते भारत आणि जर्मनी यांच्यातील संबंध अधिक मजबूत करण्यासाठी जर्मनीचे संरक्षण मंत्री बोरिस पिस्टोरियस आणि इतर वरिष्ठ नेत्यांसोबत द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. या दरम्यान ‘मेक इन इंडिया’ उपक्रमांतर्गत संयुक्त विकास आणि सहउत्पादनाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने जर्मनीतील उद्योग प्रतिनिधींशीही चर्चा होण्याची अपेक्षा आहे.https://prahaar.in/2026/04/22/us-iran-ceasefire-trump-extends-us-iran-ceasefire-credits-pakistan/जर्मनीत असताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्टपणे सांगितले की सध्याच्या परिस्थितीत भारत थेट मध्यस्थी करत नसला तरी भविष्यात याची शक्यता नाकारता येत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही पक्षांना युद्ध थांबवण्याचे आवाहन केले आहे, मात्र प्रत्येक गोष्टीची योग्य वेळ असते. पुढे जाऊन असा वेळ येऊ शकतो, जेव्हा भारत आपली भूमिका पार पाडेल आणि त्यात यशही मिळेल. राजनाथ सिंह यांचे हे विधान अशा वेळी आले आहे, जेव्हा पाकिस्तानमध्ये अमेरिका आणि इराण यांच्यात संवाद साधण्याचे प्रयत्न विशेष यशस्वी होताना दिसत नाहीत.संरक्षण मंत्र्यांनी जर्मनीतील आपल्या दौऱ्याच्या पहिल्या दिवशी बर्लिनमध्ये भारतीय समुदायाशी संवाद साधला. त्यांनी सुमारे ३ लाख भारतीय प्रवासी समुदायाचे कौतुक केले आणि त्यांना दोन्ही देशांमधील सर्वात मजबूत दुवा असे संबोधले. त्यांनी सांगितले की व्यापार, तंत्रज्ञान, आरोग्य सेवा, शिक्षण आणि कला अशा विविध क्षेत्रांत त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. त्यांनी असेही नमूद केले की पूर्वी आंतरराष्ट्रीय मंचांवर भारताच्या मतांकडे दुर्लक्ष केले जात असे, मात्र आज संपूर्ण जग भारताचे विचार लक्षपूर्वक ऐकते. त्यांनी जर्मनीतील भारतीयांना जागतिक स्तरावर भारताच्या दृष्टीकोनाचा प्रसार करण्याचे आणि आर्थिक संबंध अधिक मजबूत करण्याचे आवाहन केले.https://prahaar.in/2026/04/21/iran-us-conflict-will-jd-vance-visit-pakistan-uncertainty-persists-ahead-of-iran-us-talks/राजनाथ सिंह यांनी सांगितले की २०२६ हे जर्मनीसोबतच्या राजनैतिक संबंधांच्या ७५ वर्षांच्या पूर्णतेचे प्रतीक आहे, जे विश्वास, परस्पर सन्मान आणि समान लोकशाही मूल्यांवर आधारित आहेत. त्यांनी भारतीय प्रवाशांना आपल्या सांस्कृतिक वारशाशी जोडलेले राहून भारत-जर्मनी भागीदारी अधिक बळकट करण्यासाठी योगदान देत राहण्याचे आवाहन केले. त्यांनी जगभरातील भारतीय प्रवाशांना सरकारकडून सतत पाठिंबा आणि संरक्षण दिले जाईल, असे आश्वासन दिले आणि त्यांच्याप्रती देशाची बांधिलकी पुन्हा अधोरेखित केली.संरक्षण मंत्र्यांनी भारताच्या जलद आर्थिक वाढीचा आणि तांत्रिक प्रगतीचा उल्लेख करत पायाभूत सुविधा, स्टार्टअप, अंतराळ आणि डिजिटल नवोपक्रमातील प्रगतीवर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेचा उद्देश देशांतर्गत क्षमता मजबूत करणे, उत्पादनाला चालना देणे आणि आयातीवरील अवलंबित्व कमी करणे हा आहे. राजनाथ सिंह यांनी या संवादाला विशेष क्षण असल्याचे सांगत, व्यावसायिक जबाबदाऱ्यांनंतरही उपस्थित राहिलेल्या सर्वांचे आभार मानले. त्यांनी सांगितले की त्यांचे आणि त्यांच्या प्रतिनिधीमंडळाचे झालेले उत्साही स्वागत भारत-जर्मनीच्या मजबूत आणि वाढत्या भागीदारीचे प्रतीक आहे. त्यांनी स्पष्ट केले की कूटनीतिक बाबींमध्ये भारताचा दृष्टिकोन नेहमी संतुलित राहतो, त्यामुळे भारत सतत हेच इच्छितो की अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध संपावे आणि शांतता प्रस्थापित व्हावी.

फीड फीडबर्नर 22 Apr 2026 4:10 pm

Share Market Update : जागतिक बाजारपेठांमध्ये कमजोरीची चिन्हे; आशियामध्ये संमिश्र व्यवहार

मुंबई : आज जागतिक बाजारपेठांमध्ये कमजोरीची चिन्हे दिसत आहेत. मागील सत्रात अमेरिकन बाजारपेठा घसरणीसह बंद झाल्या. तथापि, आज डाऊ जोन्स फ्युचर्समध्ये जोरदार व्यवहार होत आहे. मागील सत्रात युरोपियन बाजारपेठांवरही दबाव कायम होता. आज आशियाई बाजारपेठांमध्ये संमिश्र व्यवहार होत आहे.पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर, इराणने शांतता चर्चेच्या दुसऱ्या फेरीचा प्रस्ताव नाकारल्यामुळे मागील सत्रात अमेरिकन बाजारपेठेवर दबाव कायम होता. डाऊ जोन्स इंडस्ट्रियल एव्हरेज २९२.९६ अंकांनी, म्हणजेच ०.५९ टक्क्यांनी घसरून ४९,१४९.६० अंकांवर बंद झाला. त्याचप्रमाणे, एस अँड पी ५०० निर्देशांक ०.६३ टक्क्यांनी घसरून ७,०६४.०१ अंकांवर आला. याव्यतिरिक्त, नॅसडॅक १४४.४३ अंकांनी, म्हणजेच ०.५९ टक्क्यांनी घसरून २४,२५९.९६ अंकांवर बंद झाला. डाऊ जोन्स इंडस्ट्रियल एव्हरेज (DJIA) फ्युचर्स सध्या ४९,३६९.६५ वर व्यवहार करत असून, त्यात २२०.२७ अंकांची किंवा ०.४५ टक्क्यांची वाढ झाली आहे.https://prahaar.in/2026/04/22/rajnath-singh-india-could-play-the-role-of-a-mediator-between-iran-and-the-us-in-the-future-rajnath-singh/मागील सत्रात युरोपियन बाजारपेठांमध्येही कमजोरी कायम होती. एफटीएसई निर्देशांक ११०.९९ अंकांनी किंवा १.०६ टक्क्यानी घसरून १०,४९८.०९ वर बंद झाला. त्याचप्रमाणे, सीएसी निर्देशांक ९५.३३ अंकांनी किंवा १.१६ टक्क्यांनी घसरून मागील सत्र ८,२३५.७२ वर संपले. डॅक्स निर्देशांकही १४६.९३ अंकांनी किंवा ०.६१ टक्क्यांनी घसरून २४,२७०.८७ वर बंद झाला.आज आशियाई बाजारपेठांमध्ये संमिश्र व्यवहार होत आहेत. नऊ आशियाई बाजार निर्देशांकांपैकी पाच निर्देशांक घसरणीत आहेत, तर चार निर्देशांक वाढीत मजबूत आहेत. तैवान भारित निर्देशांक ३८,०१५.२७ वर व्यवहार करत असून, त्यात ४१०.१६ अंकांची किंवा १.०९ टक्क्यांची वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे, निक्केई निर्देशांक २३२.८३ अंकांनी, म्हणजेच ०.३९ टक्क्यांनी वाढून ५९,५८२ अंकांवर पोहोचला आहे. याशिवाय, शांघाय कंपोझिट निर्देशांक ०.२४ टक्क्यांनी वाढून ४,०९५.०७ अंकांवर, तर एस अँड पी कंपोझिट निर्देशांक ०.१९ टक्क्यांनी वाढून १,४८६.३७ अंकांवर पोहोचला आहे.https://prahaar.in/2026/04/22/iaf-aircraft-lands-on-ups-purvanchal-expressway-to-test-wartime-preparedness/दुसरीकडे, गिफ्ट निफ्टी १७४ अंकांनी, म्हणजेच ०.७१ टक्क्यांनी घसरून २४,४०१ अंकांवर व्यवहार करत आहे. त्याचप्रमाणे, स्ट्रेट्स टाइम्स निर्देशांक ०.४६ टक्क्यांनी घसरून ४९९२.०५ अंकांवर आला आहे. हँग सेंग निर्देशांक आज मोठी कमजोरी दर्शवत आहे. सध्या, हा निर्देशांक २९९.४८ अंकांनी किंवा १.१४ टक्क्यांनी घसरून २६,१८८ अंकांवर आहे. त्याचप्रमाणे, जकार्ता कंपोझिट इंडेक्स ०.१३ टक्क्यांनी घसरून ७,५४९.२७ अंकांवर आला असून, कोस्पी इंडेक्स ०.०२ टक्क्यांच्या नाममात्र घसरणीसह ६,३८७.२४ अंकांवर व्यवहार करत आहे.

फीड फीडबर्नर 22 Apr 2026 4:10 pm

Shivsena : शिवसेनेकडून सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार

आगामी २२ जिल्हा परिषद आणि २२५ पंचायत समिती निवडणुकांसाठी १२ मंत्र्यांवर २२ जिल्ह्यांची जबाबदारीमुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी शिवसेनेने आक्रमक मोर्चेबांधणी सुरू केली असून, २२ जिल्हा परिषदा आणि २२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी पक्षाने आपली ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार केली आहे. शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी रात्री उशिरा आपल्या ‘नंदनवन’ या निवासस्थानी घेतलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत १२ प्रमुख मंत्र्यांकडे २२ जिल्ह्यांची जबाबदारी सोपवली आहे.मागील निवडणुकांमध्ये राज्यात दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून स्थान मिळवल्यानंतर, आता पहिल्या क्रमांकावर झेप घेण्याचे लक्ष्य पक्षाने ठेवले आहे. यासाठी प्रभावी प्रचारासह संघटनात्मक बांधणी, प्रशासनावर प्रभाव अशा त्रिस्तरीय रणनीतीवर काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याअंतर्गत ‘संपर्क मंत्री अभियान’ राबवण्यात येणार असून, प्रत्येक मंत्र्याला दोन जिल्ह्यांची जबाबदारी विभागून दिली आहे.https://prahaar.in/2026/04/22/mallikarjun-kharge-called-modi-a-terrorist-did-kharges-tongue-truly-slip-or-was-it-a-political-ploy/या नव्या जबाबदाऱ्यांनुसार, उत्तर महाराष्ट्रात गुलाबराव पाटील (जळगाव, नंदुरबार) आणि दादा भुसे (धुळे, बुलढाणा) खिंड लढवतील. उदय सामंत यांच्याकडे नाशिक व अहिल्यानगरची धुरा असेल, तर योगेश कदम ठाणे आणि पालघरमध्ये पक्षाचे वर्चस्व टिकवतील. मराठवाड्यात प्रकाश आबिटकर (नांदेड, हिंगोली) आणि आशिष जयस्वाल (जालना) काम पाहतील. विदर्भात संजय राठोड (यवतमाळ, वाशिम), संजय शिरसाट (भंडारा, गोंदिया), प्रतापराव जाधव (नागपूर, वर्धा) आणि शंभूराज देसाई (गडचिरोली, चंद्रपूर) यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर पश्चिम महाराष्ट्र व इतर भागांसाठी प्रताप सरनाईक (अमरावती, अकोला) आणि भरतशेट गोगावले (बीड) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.https://prahaar.in/2026/04/21/struggle-will-not-cease-until-33-percent-reservation-for-women-is-secured-in-parliament-of-india/युतीधर्मातही मागे हटायचे नाहीया बैठकीत एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, ज्या जिल्ह्यांमध्ये भाजप किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) पालकमंत्री आहेत, तिथेही शिवसेनेने मागे न हटता शासकीय समित्यांमध्ये आपल्या पदाधिकाऱ्यांना स्थान मिळवून द्यावे, असे स्पष्ट सांगण्यात आले आहे. जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीडिसी) निधीतून स्थानिक कार्यकर्त्यांना बळ देणे आणि प्रशासनावर प्रभाव निर्माण करून शासकीय योजनांचा लाभ थेट जनतेपर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.निवडणूक यंत्रणा सज्ज करण्यावर भर- संघटनात्मक बांधणीसाठी विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या नियुक्त्या, बीएलए याद्यांचे अद्ययावतीकरण आणि तालुका स्तरावर प्रशिक्षण शिबिरे घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. निवडणुकीसाठी जिंकण्याची क्षमता असलेले उमेदवार शोधणे आणि त्यांना संपूर्ण ताकद देणे ही या संपर्क मंत्र्यांची प्राथमिक जबाबदारी असणार आहे.- या बैठकीला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आनंदराव अडसूळ, प्रकाश पाटील, सचिव संजय मोरे, भाऊसाहेब चौधरी यांसह मंत्रिमंडळातील अनेक सदस्य प्रत्यक्ष व ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते.

फीड फीडबर्नर 22 Apr 2026 3:30 pm

Fighter Jets Landing : एक्सप्रेस वे वर उतरली लढाऊ विमानं, भारताच्या हवाई दलाचं शक्ती प्रदर्शन

सुलतानपूर : उत्तर प्रदेशमधील सुलतानपूर येथे पूर्वांचल एक्सप्रेस वे वर भारताची लढाऊ विमानं एकामागून एक या पद्धतीने उतरली. नंतर या विमानांनी तिथून विमानतळाच्या दिशेने परत उड्डाण केले. हा प्रयोग करून आणीबाणीच्या प्रसंगी लढाऊ विमानं विमानतळाव्यतिरिक्त एक्सप्रेस वे वर पूर्वांचल एक्सप्रेस वे वर उतरवणे शक्य आहे याची चाचपणी करण्यात आली. हा प्रयोग यशस्वी झाला. या निमित्ताने उपस्थितांना भारताच्या हवाई दलाचं सामर्थ्य बघण्याची संधी मिळाली. हवाई दलाची ताकद बघण्यासाठी पूर्वांचल एक्सप्रेस वे जवळ स्थानिकांनी तुफान गर्दी केली होती. एक्सप्रेस वे वर होणारे लँडिंग आणि तिथून थोड्या वेळाने होणारे टेक ऑफ हे बघून उपस्थितांनी वारंवार टाळ्यांचा कडकडाट केला. भारत माता की जय, जय हिंद, वंदे मातरम अशा घोषणांनी आसमंत निनादून गेला.एक्सप्रेस वे वर चाचणीसाठी तीन तात्पुरत्या धावपट्ट्या तयार केल्या होत्या. या धावपट्ट्यांचा वापर हवाई दलाने प्रयोगासाठी केला. पूर्वांचल एक्सप्रेस वे तयार झाल्यापासून तिसऱ्यांदा हवाई दलाने यशस्वी प्रयोग केला आहे. यावेळी सुखोई, मिराज, जॅग्वार, LCA तेजस या विमानांनी पूर्वांचल एक्सप्रेस वे वरील तात्पुरत्या धावपट्ट्यांचा वापर केला. नंतर पूर्वांचल एक्सप्रेस वे वर एमआय १७ हेलिकॉप्टर उतरवण्यात आले. सी २९५ आणि एएन ३२ ही दोन मालवाहक विमानंही पूर्वांचल एक्सप्रेस वे वर उतरवण्यात आली. या सर्व विमानांनी लँडिंग नंतर पूर्वांचल एक्सप्रेस वे वरून टेक ऑफचाही यशस्वी प्रयोग केला.युद्धकाळात शत्रूच्या हल्ल्यात विमानतळाचे नुकसान झाले तर एक्सप्रेस वे चा वापर करून विमानांचे टेक ऑफ आणि लँडिंग करता आले तर हवाई दलाला विमानतळ दुरुस्त करण्यास वेळ मिळतो आणि शत्रू विरोधातील हवाई कारवाया थांबत नाहीत. यामुळे पूर्वांचल एक्सप्रेस वे वरील चाचणी लष्करीदृष्ट्या महत्त्वाची होती. ही चाचणी तब्बल तीन वेळा यशस्वी झाल्यामुळे हवाई दलात आनंदाचे वातावरण आहे. शत्रूच्या चिंतेत भर पडली आहे.केंद्र सरकार विमानतळाव्यतिरिक्त वापरण्यासाठी देशात २० एक्सप्रेस वे सज्ज करत आहे. या नियोजनाचा भाग म्हणूनच पूर्वांचल एक्सप्रेस वे वर लँडिंग आणि टेक ऑफची चाचणी घेण्यात आली आहे. या चाचणीला टच अँड गो टेस्ट असेही म्हणतात. ही टेस्ट यशस्वी झाल्यामुळे हवाई दलाच्या सामर्थ्यात वाढ झाली आहे. आणखी काही काळ या चाचण्या सुरू राहणार आहेत. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार एक्सप्रेस वे चा ठराविक भाग पुढील कही दिवस अधूनमधून चाचणीसाठी वापरला जाणार आहे. यामुळे एक्सप्रेस वे च्या ठराविक भागातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. ही व्यवस्था २ मे पर्यंत असेल. या व्यवस्थेत काही बदल करण्याचा निर्णय झाल्यास प्रशासन त्याची माहिती सोशल मीडियाद्वारे तसेच प्रसारमाध्यमांद्वारे देईल, असेही सांगण्यात आले आहे.पंतप्रधान मोदींनी पूर्वांचल एक्सप्रेस वे चे उद्घाटन २०२१ मध्ये केले . उद्घाटन झाल्यापासून आतापर्यंत तिसऱ्यांदा हवाई दलाने प्रयोग करण्यासाठी पूर्वांचल एक्सप्रेस वे चा प्रभावी आणि यशस्वी वापर केला आहे.

फीड फीडबर्नर 22 Apr 2026 3:30 pm

US-Iran Ceasefire : ट्रम्प यांनी अमेरिका-इराण युद्धविराम वाढवला, पाकिस्तानला दिले श्रेय

वॉशिंग्टन : अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धविरामाची मुदत संपण्यास काही तास बाकी असतानाच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविराम पुढे वाढवला आहे. बुधवारी ट्रम्प यांनी घोषणा केली की, इराणकडून अधिकृत प्रस्ताव सादर होईपर्यंत युद्धविराम कायम ठेवण्यात येईल. या युद्धविरामाचे श्रेय ट्रम्प यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि फील्ड मार्शल आसिम मुनीर यांना दिले आहे.ट्रम्प म्हणाले की, गंभीर अंतर्गत मतभेदांनी ग्रासलेल्या इराणी सत्तेला स्थायी शांतता करारासाठी एकसंघ प्रस्ताव सादर करण्यासाठी वेळ द्यायचा आहे. अमेरिकेने प्रथमच इराणच्या पुढील भूमिकेसाठी कोणतीही निश्चित वेळमर्यादा ठेवलेली नाही. या धोरणातील बदलाचे श्रेय ट्रम्प यांनी पाकिस्तानी नेतृत्वासोबत झालेल्या चर्चेला दिले.ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘ट्रुथ’वर लिहिले, “इराण सरकार गंभीरपणे विभागलेले आहे, हे अपेक्षितच होते. पाकिस्तानचे फील्ड मार्शल आसिम मुनीर आणि पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या विनंतीवरून आम्ही हल्ला थांबवला आहे. इराणचे नेते आणि प्रतिनिधी एकसंघ प्रस्ताव घेऊन समोर येईपर्यंत हा हल्ला स्थगित राहील.”https://prahaar.in/2026/04/21/iran-us-conflict-will-jd-vance-visit-pakistan-uncertainty-persists-ahead-of-iran-us-talks/मात्र, ट्रम्प यांनी स्पष्ट केले की होर्मूज सामुद्रधुनीत इराणच्या किनाऱ्यावरील बंदरांची नाकेबंदी कायम राहील, तर अमेरिकन सैन्य इतर सर्व बाबतीत सज्ज आणि सक्षम राहील. त्यांनी सांगितले की, प्रस्ताव सादर होईपर्यंत आणि चर्चा कोणत्यातरी निष्कर्षापर्यंत पोहोचेपर्यंत युद्धविराम वाढवला जाईल.दरम्यान, पाकिस्ताननेही युद्धविराम वाढवण्याच्या विनंतीला मान्यता दिल्याबद्दल आणि आपल्या राजनैतिक प्रयत्नांना पाठिंबा दिल्याबद्दल ट्रम्प यांचे आभार मानले. आसिम मुनीर यांनी ‘एक्स’वर लिहिले, “मी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे आभार मानतो की त्यांनी सुरू असलेल्या राजनैतिक प्रयत्नांना पुढे जाण्याची संधी देण्यासाठी युद्धविराम वाढवण्याच्या आमच्या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद दिला. पाकिस्तान संघर्षाच्या चर्चात्मक तोडग्यासाठी आपले प्रामाणिक प्रयत्न सुरू ठेवेल.”ते पुढे म्हणाले, “मला पूर्ण विश्वास आहे की दोन्ही बाजू युद्धविरामाचे पालन करतील आणि इस्लामाबाद येथे होणाऱ्या चर्चेच्या दुसऱ्या फेरीत संघर्ष कायमस्वरूपी संपवण्यासाठी व्यापक शांतता करारापर्यंत पोहोचतील.”https://prahaar.in/2026/04/20/iran-america-war-irgcs-dominance-in-irans-decision-making-process-possibility-of-talks-with-america-low/जागतिक शांतिदूत म्हणून स्वतःची नवी प्रतिमा निर्माण करण्याच्या प्रयत्नात पाकिस्तान अमेरिका आणि इराणमधील मतभेद कमी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. यामागे स्वतःची राजनैतिक प्रतिमा उंचावणे आणि परदेशी व्यापार व गुंतवणूक आकर्षित करणे हा उद्देश आहे. अलिकडच्या काळात पाकिस्तानची आर्थिक कमजोरी स्पष्टपणे समोर आली आहे. देशात खर्च वाचवण्यासाठी दररोज वीज कपातीचा सामना करावा लागत आहे, तसेच सौदी अरेबियाकडून ३ अब्ज डॉलर्सचे आपत्कालीन कर्ज घ्यावे लागले आहे. जर इस्लामाबादने खरोखरच इराणवरील पुढील हल्ले रोखण्यासाठी ट्रम्प यांच्यावर दबाव टाकला असेल, तर त्यामुळे पाकिस्तानच्या राजनैतिक प्रतिमेला मोठा फायदा होईल आणि जागतिक स्तरावर त्याची विश्वासार्हता अधिक मजबूत होईल.

फीड फीडबर्नर 22 Apr 2026 2:10 pm

MI- CSK IPL 2026 : मुंबई-चेन्नई सामन्यात धोनी खेळण्याची शक्यता; विल जॅक्स मुंबई इंडियन्स संघात दाखल

मुंबई : वानखेडे स्टेडियमवर गुरुवारी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होणाऱ्या आयपीएल २०२६ च्या सामन्यात एम.एस. धोनी आणि विल जॅक्स मैदानात दिसू शकतात.मंगळवारी रात्री धोनी वानखेडेवर सराव करताना दिसला, तर विल जॅक्स मुंबईच्या संघात दाखल झाला आहे. चेन्नई सध्या गुणतालिकेत आठव्या स्थानावर असून त्यांना विजयाची नितांत गरज आहे.हंगामापूर्वी एम.एस. धोनी पोटरीच्या स्नायूंच्या दुखापतीशी झुंज देत होता. मंगळवारी, त्याने वानखेडेवर अर्धा तास यष्टीरक्षण आणि ३० मिनिटे फलंदाजी केली. या दरम्यान, ४४ वर्षीय धोनी कोणत्याही त्रासाशिवाय मोठे फटके मारताना दिसला. जर तो उद्या खेळला, तर चेन्नईच्या फलंदाजीला बळ मिळेल. संघाने सहापैकी दोन सामने जिंकले आहेत.https://prahaar.in/2026/04/21/ipl-2026-tilak-varma-mumbai-indians-triumph-on-the-back-of-tilak-varmas-magnificent-century/इंग्लंडचा क्रिकेटपटू विल जॅक्स भारतात दाखल झाला आहे. वैयक्तिक कारणांमुळे तो पहिल्या सहा सामन्यांमधून बाहेर होता. २०२६ च्या टी२० विश्वचषकात चार वेळा 'सामनावीर' ठरलेल्या जॅक्सने सोमवारी आणि मंगळवारी मुंबईच्या नेट्समध्ये सराव केला. त्याने सुमारे एक तास फलंदाजी केली आणि ऑफ-स्पिन गोलंदाजीही केली. त्याच्या आगमनामुळे मुंबईची मधली फळी आणि फिरकी गोलंदाजी विभाग मजबूत होईल. तो अंतिम ११ खेळाडूंमध्ये मिचेल सँटनर किंवा अल्लाह गझनफर यांची जागा घेऊ शकतो.चेन्नईला काहीसा दिलासा मिळाला आहे. ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज स्पेन्सर जॉन्सन संघात सामील झाला आहे. दुखापतग्रस्त नॅथन एलिसच्या जागी त्याचा संघात समावेश करण्यात आला आहे. जॉन्सनने मंगळवारी वानखेडेवर संघासोबत सराव केला. गेल्या आठवड्यात संघाबाहेर गेलेल्या खलील अहमदची जागा तो घेण्याची शक्यता आहे. गेल्या सामन्यात हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे आयुष म्हात्रे संपूर्ण हंगामासाठी संघाबाहेर गेल्याने, चेन्नईसाठी हा हंगाम कठीण ठरला आहे.https://prahaar.in/2026/04/20/bccis-new-plan-two-teams-will-play-simultaneously-in-t20-shreyas-iyer-to-be-captain/मुंबई इंडियन्सने आपल्या मागील सामन्यात गुजरात टायटन्सचा ९९ धावांनी पराभव केला. या विजयामुळे संघाचे मनोधैर्य वाढले आहे. विल जॅक्सच्या आगमनामुळे फिनिशिंग विभाग मजबूत होईल. दुसरीकडे, चेन्नई सुपर किंग्सला प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी हा सामना जिंकावाच लागेल. धोनीच्या उपस्थितीमुळे संघाच्या धावसंख्येलाच नव्हे, तर त्याच्या कर्णधारपदालाही मदत होईल.

फीड फीडबर्नर 22 Apr 2026 1:30 pm

AI Labels Mandatory : सोशल मिडीया प्लॅटफॉर्मसना एआय व्हिडीओवर लेबल अनिवार्य

आयटी नियमांमध्ये सुधारणा करण्यासाठी केंद्राचा मसुदा जाहीरमुंबई : आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा (एआय) वापर करून बनवलेले व्हिडीओ किंवा इतर साहित्य सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होते. अशा एआय साहित्यावर लेबल लावणे सोशल मिडीया साईटसना अनिवार्य केले जाणार आहे. यासाठी आयटी-नियम 2021 मध्ये सुधारणा सूचवल्या असून निवीन मसूदा बनवण्यात आला आहे.https://prahaar.in/2026/04/22/kedarnath-temple-the-gates-of-kedarnath-temple-opened-amidst-chants-of-har-har-mahadev/केंद्र सरकारने आयटी नियम 2021 मध्ये काही महत्त्वपूर्ण सुधारणा सुचवत नवा मसुदा जाहीर केला असून, यावर सर्वसामान्य नागरिकांकडून अभिप्राय मागवला आहे. गेल्या 30 मार्च रोजी जाहीर केलेल्या मूळ मसुद्यात 21 एप्रिल रोजी अतिरिक्त बदलही करण्यात आले आहेत. नव्या प्रस्तावानुसार, एआयच्या मदतीने तयार केलेले व्हिडिओ, डीपफेक, तसेच व्हॉइस क्लोनिंगसारख्या कंटेंटवर स्पष्टपणे लेबल लावणे अनिवार्य करण्यात येणार आहे. म्हणजेच, जे कोणतेही कंटेंट खरे असल्यासारखे दिसते पण प्रत्यक्षात एआयद्वारे तयार किंवा बदललेले आहे, त्याबाबत स्पष्ट माहिती देणे आवश्यक असेल.या नियमांतर्गत डीपफेक व्हिडिओ, बनावट फोटो आणि एआयद्वारे तयार केलेले आवाज (व्हॉइस क्लोनिंग) यांचा समावेश होणार आहे. यामुळे वापरकर्त्यांना खऱ्या आणि कृत्रिम कंटेंटमधील फरक ओळखणे सोपे होईल, असा सरकारचा उद्देश आहे.https://prahaar.in/2026/04/21/americas-big-decision-india-may-get-a-tariff-refund-of-as-much-as-%e2%82%b91-lakh-crore/सरकारने सर्व सोशल मीडिया मध्यस्थ (इंटरमीडियरी) प्लॅटफॉर्मसाठी या नियमांचे पालन बंधनकारक करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. यामध्ये बातम्या आणि चालू घडामोडींशी संबंधित कंटेंटचाही समावेश होऊ शकतो. मात्र, सामान्य वापरकर्त्यांना ‘न्यूज पब्लिशर’ म्हणून गणले जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.तसेच, माहिती व प्रसारण मंत्रालयाला कंटेंटविषयी कारवाई करण्याच्या प्रक्रियेत भूमिका देण्यात आली आहे. काही प्रकरणांमध्ये कोणतीही तक्रार नोंदवली नसतानाही चौकशी सुरू करण्याचा अधिकार देण्याचा प्रस्ताव आहे.याशिवाय, सोशल मीडिया कंपन्यांना किमान 180 दिवसांपर्यंत डेटा सुरक्षित ठेवणे बंधनकारक करण्याचा प्रस्तावही या मसुद्यात समाविष्ट करण्यात आला आहे.

फीड फीडबर्नर 22 Apr 2026 1:30 pm

Vijay Verma: तमन्ना भाटियासोबत ब्रेकअपनंतर विजय वर्मा ‘मिस्ट्री गर्ल’सोबत स्पॉट; नात्याच्या चर्चांना उधाण

Vijay Verma माहितीनुसार, विजय वर्मा आणि तमन्ना भाटिया जवळपास दोन वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, मार्च २०२५ मध्ये त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याचे समोर आले. त्यांच्या ब्रेकअपमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दोघांनीही या विषयावर फारसे भाष्य केले नाही, त्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले होते.

दैनिक प्रभात 22 Apr 2026 1:20 pm

Sachin Pilgaonkar and Madhurani Gokhale : सचिन पिळगांवकर आणि मधुराणी गोखले 22 वर्षानंतर पुन्हा मोठ्या पडद्यावर झळकणार

Sachin Pilgaonkar and Madhurani Gokhale : ‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटात सचिन पिळगांवकर आणि मधुराणी गोखले एकत्र दिसले होते.

दैनिक प्रभात 22 Apr 2026 1:16 pm

US-Iran ceasefire : ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाची मुदत वाढ; इराणने शस्त्रसंधी धुडकावली; म्हणाले ‘पराभूत असलेले अटी लादू शकत नाही’

US-Iran ceasefire : इराण-अमेरिकेतील चर्चेसंदर्भातील चित्र अजूनही स्पष्ट नाही.

दैनिक प्रभात 22 Apr 2026 12:40 pm

Genelia Deshmukh: ‘राजा शिवाजी’ ट्रेलर लाँचमध्ये जिनिलीया देशमुखचा मराठमोळा जलवा; गुलाबी नऊवारीतील लूक व्हायरल

Genelia Deshmukh ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये एकाच वेळी तयार करण्यात आला आहे. त्यामुळे हा चित्रपट केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता देशभर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे. चित्रपटाची भव्यता आणि ऐतिहासिक विषय लक्षात घेता याबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

दैनिक प्रभात 22 Apr 2026 11:43 am

Kedarnath Mandir : हर हर महादेवच्या गजरात उघडले केदारनाथ मंदिराचे द्वार

देहरादून : केदारनाथ धामाचे द्वार आज, बुधवारी सकाळी आठ वाजता शुभ मुहूर्तावर विधी-विधान आणि पूजा-अर्चना करून भाविकांसाठी खुले करण्यात आले. द्वार उघडताच मंदिर परिसर ‘हर हर महादेव’ आणि ‘जय बाबा केदार’च्या जयघोषांनी दुमदुमून गेला. हजारो भाविक या पवित्र क्षणाचे साक्षीदार ठरले. राज्याचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी धामात पोहोचून विशेष पूजा-अर्चना केली आणि राज्यातील जनतेच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.https://prahaar.in/2026/04/22/mallikarjun-kharge-called-modi-a-terrorist-did-kharges-tongue-truly-slip-or-was-it-a-political-ploy/बाबा केदार यांच्या धामाला सुमारे ५१ क्विंटल फुलांनी भव्य सजावट करण्यात आली होती, ज्यामुळे भाविक मंत्रमुग्ध झाले. देश-विदेशातून हजारो भाविक आधीच धामात दाखल झाले होते आणि द्वार उघडण्याच्या या अद्भुत क्षणाचे साक्षीदार बनले.यापूर्वी बाबा केदार यांच्या पंचमुखी चल विग्रह उत्सव पालखीने मंगळवारी सायंकाळी साडेचार वाजता केदारनाथ धामात प्रवेश केला. ओंकारेश्वर मंदिर, उखीमठ येथून रवाना झालेली ही डोली १७ किलोमीटरची कठीण पायी यात्रा पूर्ण करत जंगलचट्टी, रामबाडा, लिनचोली आणि बेस कॅम्प मार्गे केदारपुरीत पोहोचली. धामात पोहोचताच भाविकांनी पुष्पवृष्टी करून डोलीचे भव्य स्वागत केले.https://prahaar.in/2026/04/21/kerala-massive-explosion-in-firecracker-warehouse-6-dead/पालखीने मंदिराची प्रदक्षिणा करून भंडारगृहात प्रवेश केला, जिथे विधिवत पूजा-अर्चना पार पडली. यावेळी ८वी सिखलाई रेजिमेंटच्या बँडच्या मधुर सुरांनी आणि डमरूच्या निनादाने संपूर्ण वातावरण शिवमय झाले.दरम्यान सुरक्षेचे कडक बंदोबस्त करण्यात आले होते आणि पोलीस तसेच आयटीबीपीचे जवान तैनात करण्यात आले होते. द्वार उघडताच केदारनाथ यात्रेचा विधिवत शुभारंभ झाला. देशाच्या विविध भागांतून आलेले भाविक बाबा केदार यांच्या भक्तीत तल्लीन झालेले दिसून आले. या प्रसंगी अनेक मान्यवर आणि मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.

फीड फीडबर्नर 22 Apr 2026 11:30 am

आयटी क्षेत्रातील अदृश्य बेड्या

प्रदेश सरचिटणीस - किरण मिलगीरभारताच्या आर्थिक प्रगतीचा कणा मानल्या जाणाऱ्या आयटी (Information Technology) क्षेत्रातून येणाऱ्या बातम्या अत्यंत चिंताजनक आहेत. नाशिक येथील टीसीसीमध्ये झालेल्या जबरदस्ती धर्मांतराच्या प्रयत्नांबरोबरच लैंगिक छळ आणि नोकरीतील असुरक्षितता ही केवळ गुन्हेगारी घटना नसून आधुनिक गुलामगिरी आणि सत्तेच्या गैरवापराचे भयावह रूप आहे.जेव्हा रक्षकच भक्षक बनतो कोणत्याही संस्थेमध्ये कर्मचाऱ्यांच्या कल्याण व सुरक्षेची जबाबदारी एचआर विभागावर असते; परंतु नाशिकमध्ये या गंभीर गुन्ह्यांचे नेतृत्व स्वतः एचआर विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केले, ही बाब अत्यंत धक्कादायक आहे. तेथे असे वातावरण निर्माण करण्यात आले की, कर्मचारी ना आपल्या श्रद्धेचे संरक्षण करू शकत होते, ना सन्मानाने काम करू शकत होते. नोकरी जाण्याची आणि करिअर उद्ध्वस्त होण्याची भीती दाखवून कर्मचाऱ्यांवर लैंगिक शोषण व धर्मांतरासाठी दबाव टाकणे हे लोकशाही देशासाठी लाजिरवाणे आहे.युनियनचा अभाव : शोषणाला खतपाणीआयटी क्षेत्रात एवढ्या मोठ्या प्रमाणावर मानवी हक्कांचे उल्लंघन का होत आहे? याचे मुख्य कारण म्हणजे या क्षेत्रात मजबूत कामगार संघटनांचा अभाव आहे.संघटित आवाजाचा अभाव : इतर क्षेत्रातील कामगारांकडे त्यांच्या समस्या मांडण्यासाठी सशक्त संघटना आहेत; परंतु आयटी कर्मचारी अनेकदा वैयक्तिक पातळीवर एकटे पडतात.तक्रार निवारण यंत्रणेचे अपयश :कंपन्यांमधील अंतर्गत तक्रार समित्या (आयसीसी) अनेकदा व्यवस्थापनाच्या हिताचे रक्षण करणारे साधन बनतात.भीतीचे वातावरण :नोकरी जाण्याच्या भीतीमुळे अनेकजण तक्रार करण्यास घाबरतात, कारण त्यामुळे त्यांचे करिअर धोक्यात येऊ शकते. नाशिकमध्ये घडलेली घटना ही एकट्या कंपनीपुरती मर्यादित नाही. जर तेथे मजबूत संघटना असती तर कर्मचारी अशा प्रकारच्या घटनांना सुरुवातीलाच आळा घालू शकले असते.व्यापक चौकशी आवश्यक : नाशिक प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे की, जिल्हा साधा एक बाब आहे. मात्र ही घटना केवळ एका कंपनीपूर्ती मर्यादित आहे का याचा गंभीरपणे विचार करणे गरजेचे आहे. आयटी क्षेत्रातील इतर कंपन्यांमध्येही अशी प्रवृत्ती आहे का? याची चौकशी होणे आवश्यक आहे. सर्व विभागाच्या नेतृत्वाखाली आयटी कंपन्यांमध्ये आपक चौकशी आणि सोशल ऑडिट ही काळाची गरज आहे.भारतीय मजदूर संघाची भूमिकाभारतीय मजदूर संघ हा कामगारांच्या सन्मान व हक्कांच्या संरक्षणासाठी नेहमीच कटिबद्ध आहे. आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसमोरील अशा आव्हानांमध्ये त्यांच्यासोबत उभे राहून आवश्यक कायदेशीर मदत देण्यास बी. एम. एस. सज्ज आहे. नाशिक पिढीतांना न्याय मिळेपर्यंत आणि दोशींना योग्य शिक्षा होईपर्यंत बी एम. एस. चा लढा सुरूच राहील. हायटेक क्षेत्रातील चमकदार कार्यालयांमध्ये दडलेल्या काळ्या वास्तवाला समोर आणण्याची गरज आहे. प्रत्येक व्यवस्थापनाने हे समजून घ्यायला हवे की कामगार हे यंत्र नाहीत तर सन्मानाने जगणारे मानव आहेत.कार्यस्थळी सुरक्षितता आणि वैयक्तिक स्वातंत्र्य सुनिश्चित करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी संघटित होण्याची हीच योग्य वेळ आहे, असे आवाहन भारतीय मजूर संघाचे प्रदेशाध्यक्ष अनिल मुळे आणि प्रदेश सरचिटणीस किरण मिलगीर यांनी केले.

फीड फीडबर्नर 22 Apr 2026 11:10 am

Mallikarjun Kharge : मोदींना म्हणाले दहशवादी; खर्गेंची जीभ खरंच घसरली की राजकीय डाव?

मुंबई : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केलेल्या आरोपामुळे राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी बोलताना दहशतवादी असा उल्लेख केला असून भाजपने आक्रमक भूमिका घेत जाहीर माफी मागण्याची मागणी केली आहे.देशातील स्त्रियांच्या हक्काचा आणि सन्मानाचा निर्णय मोदी सरकारने होता. संसदेत नारी शक्ती वंदन हे विधेयक मांडण्यात आले, हे विधेयक विरोधकांनी पाडले, यावरून पंतप्रधान मोदींनी देशातील महिलांना जागृत करत, विरोधकांना यांना खडेबोल सुनावले, विरोधकांचे कान उपटले.https://prahaar.in/2026/04/21/struggle-will-not-cease-until-33-percent-reservation-for-women-is-secured-in-parliament-of-india/देशात काही ठिकाणी सध्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत. भाजपचे बडे नेते विविध राज्यात जाऊन प्रचार करत आहेत. तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने अण्णाद्रमुकशी युती केली आहे . त्यावरून चेन्नईतील पत्रकार परिषदेत खर्गे यांनी पंतप्रधानांवर बोलताना त्यांची जीभ घसरली 'अण्णाद्रमुकचे लोक त्यांच्या प्रचारफलकांवर अण्णादुराई यांचे फोटो लावतात. ते मोदींबरोबर कसे जाऊ शकतात? ते दहशतवादी आहेत असे खर्गे म्हणाले.पत्रकारांनी दहशवादी या मुद्द्यावरून खर्गे यांना धारेवर धरले असता खर्गे यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. आपला बोलण्याचा अर्थ सांगत मोदी दहशतवादी आहेत असे मी म्हणालो नाही .काँग्रेसचा कट भाजपने देखील यावर जोरदार टीका करत मल्लिकार्जुनच्या त्या वक्तव्याचा निषेध केला आहे. ही बोलण्यातील चूक नसून जाणूनबुजून केलेला कट आहे, काँग्रेस हा शहरी माओवाद्यांचा पक्ष असून या या पक्षाचा रिमोट कन्ट्रोल राष्ट्रदोही लोकांच्या हातात आहे अशी जळजळीत टीका भाजपचे प्रवक्ते प्रदीप भंडारी आणि संबित पात्रा यांनी केली आहे.https://prahaar.in/2026/04/21/at-the-baramati-rally-the-chief-minister-lauded-ajit-pawars-work-and-campaigned-vigorously-for-sunetra-pawar/काँग्रेसने माफी मागावी खर्गे यांनी केवळ पंतप्रधान मोदींचा अपमान केला नसून त्यांनी संपूर्ण १४० कोटी जनतेचा अपमान केला आहे. राहुल गांधी आणि तामिळनाडूतील मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी जाहीर माफी ,लागावी अशी मागणी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी केली आहे.

फीड फीडबर्नर 22 Apr 2026 11:10 am

Jackfruit Pickle Recipe: उन्हाळ्यात करा खास फणसाचं लोणचं! एकदा खाल तर पुन्हा पुन्हा मागाल

Jackfruit Pickle Recipe लोणचं बनवण्यासाठी सर्वात आधी कच्चे फणस घ्यावे. तो आतून पांढरा आणि ताजा असावा. फणस स्वच्छ धुवून कोरडा पुसून घ्या. हाताला थोडं तेल लावून त्याची साल काढा आणि त्याचे छोटे-छोटे तुकडे करा. त्यानंतर हे तुकडे थोडे मऊ होईपर्यंत वाफवून घ्या.

दैनिक प्रभात 22 Apr 2026 10:37 am

थंडीच्या कुशीत वॉर्मीचं ऊबदार साम्राज्य

दी लेडी बॉस - अर्चना सोंडे२००९ साल. स्वित्झर्लंडमधील कडाक्याच्या थंडीत ‘ती’ आपल्या पती आणि मुलासोबत सुट्टीसाठी गेली होती. पण ती थंडी त्यांच्यासाठी बोचरी ठरली. बाहेर फिरण्याऐवजी त्यांना अनेकदा घरातच थांबावे लागत होते. त्याचवेळी एका कॅफेमध्ये बसलेल्या ‘ती’च्या मनात एक विचार चमकून गेला. “असं काही उत्पादन का नसावं, जे विजेशिवाय किंवा गरम पाण्याशिवाय लोकांना ऊबदार ठेवू शकेल?” हीच कल्पना पुढे ‘वॉर्मी’च्या रूपात साकार झाली. ही अनोखी कल्पना प्रत्यक्षात अवतरणारी ‘ती’ म्हणजे वॉर्मी’ (Warmee) या अनोख्या बॉडी वॉर्मर ब्रँडची सह-संस्थापिका भावना व्होरा.भावनाचे वडील आणि काका चारचाकी वाहनांच्या ॲक्सेसरीजचा व्यवसाय चालवत होते. त्यांची मुंबईभर सुमारे १७ दुकाने होती. मुंबईतील मालाड येथील पी. डी. लायन्स दालमिया कॉलेजमधून वाणिज्य शाखेत पदवी घेतल्यानंतर, भावनाने सुरुवातीला दुचाकी वाहनांचे डीलरशिप दुकान चालवले. या डीलरशिपचा विस्तार तिने मुंबईत पाच मल्टी-ब्रँड दुकानांपर्यंत केला. मात्र, तिने २००५ मध्ये व्यवसाय बंद केला. व्यवसायाची पार्श्वभूमी असल्याने, तिला उद्योजकतेची नेहमीच आवड होती. स्वतंत्र होण्याच्या इच्छेने प्रेरित होऊन तिने लहान वयातच व्यवसाय सुरू केला. सिटीबँक आणि आयसीआयसीआय बँकेसाठी दुचाकींच्या बाबतीत मुंबईतील पहिली महिला डायरेक्ट सेलिंग एजंट म्हणून ती एक अग्रणी होती. वाहन वित्तपुरवठ्यासाठी तिने या बँकांचे प्रतिनिधित्व केले. मुलगा झाल्यावर, त्याला वेळ देण्यासाठी तिला व्यवसाय बंद करावा लागला. व्यवसाय बंद करेपर्यंत तिच्या व्यवसायाची वार्षिक उलाढाल सुमारे २ कोटी रुपये होती. डीलरशिप चालवणे थांबवले असले तरी भावनाने आपल्या मुलाचे संगोपन करत असताना स्वतःच्या शेअर गुंतवणुकीचे आणि ट्रेडिंगचे व्यवस्थापन करण्यासाठी आपल्या विश्लेषणात्मक कौशल्यांचा वापर सुरू ठेवला. याच काळात ती कुटुंब सहलीसाठी स्वित्झर्लंडला गेली आणि तिला कल्पना सुचली.भावनांचे पती केमिकल इंजिनिअर असल्याने त्यांनी या कल्पनेवर प्रयोग सुरू केले. विविध रसायनांवर संशोधन करत अखेर त्यांनी असे काही फॉर्म्युले विकसित केले, जे हवेच्या संपर्कात येताच उष्णता निर्माण करतात. २०१३ मध्ये त्यांनी वॉर्मी या उत्पादनांची अधिकृतपणे बाजारात सुरुवात केली. सुरुवातीला लोकांना ही संकल्पना समजावून सांगणे मोठे आव्हान होते, पण जसजसे लोकांनी याचा अनुभव घेतला, तसतशी त्याची लोकप्रियता वाढू लागली.‘वॉर्मी’ उत्पादने म्हणजे हँड वॉर्मर्स, बॉडी वॉर्मर्स, फूट वॉर्मर्स आहेत. ही सर्व उत्पादने विजेशिवाय काम करतात. हवेच्या संपर्कात येताच गरम होतात. सुमारे ८ तास उष्णता देतात. सहज बाळगता आणि वापरता येतात. आज ‘वॉर्मी’ केवळ एक उत्पादन नसून, प्रवास करणाऱ्या आणि थंड हवामानात राहणाऱ्या लोकांसाठी एक आवश्यक साधन बनले आहे. भावना आणि तिच्या पतीने पँथियन फार्मकेम’ अंतर्गत हा ब्रँड लाँच केला. वॉर्मी केवळ भारतात विकले जाते, जे थंड प्रदेशात राहणाऱ्या किंवा प्रवास करणाऱ्या लोकांसाठी आहे. त्यांची बहुतेक विक्री मुंबई, बंगळूरु, चेन्नई, कोलकाता, दिल्ली आणि अहमदाबाद यांसारख्या शहरांमधून होते. ज्यांना थंड हवामानाची सवय नाही, पण सुट्टीमध्ये मौज करण्यासाठी, काम किंवा शिक्षणासाठी थंड प्रदेशात ज्यांना प्रवास करावा लागतो. ते ‘वॉर्मी’चे लक्षयित ग्राहक आहेत. सुरुवातीला, या जोडप्याने विविध दुकानांमध्ये आपल्या उत्पादनांचा प्रचार केला. वर्तमानपत्रांमध्ये जाहिरात दिली. अनेक ठिकाणी पॉप-अप स्टोअर उभारले.भारतात ही एक नवीन संकल्पना असल्याने, ही उत्पादने कशी वापरायची हे लोकांना समजावून सांगण्यासाठी त्यांना अनेक प्रात्यक्षिके घ्यावी लागली. सुरुवातीला, त्यांची उत्पादने भारतातील सुमारे ४०० दुकानांमध्ये, प्रामुख्याने हिमाचल प्रदेश आणि हरियाणात उपलब्ध होती. पहिल्याच वर्षात कंपनीने २ कोटी रुपयांची उलाढाल केली. आज हा व्यवसाय सुमारे १५ कोटी रुपयांच्या वार्षिक महसुलापर्यंत पोहोचला आहे. २०२२ मध्ये त्यांनी ब्ल्यूहीट ही नवीन श्रेणी सुरू केली, जी शरीरातील वेदना कमी करण्यासाठी हीट थेरपी पॅचेस प्रदान करते. तसेच त्यांनी स्वतःचे ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Nysh.in सुरू करून व्यवसायाला डिजिटल दिशा दिली. दरमहा फक्त १०० ऑर्डर्स मिळायच्या आता त्यात ५०० पट वाढ झाली आहे. अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर आपल्या उत्पादनांचा दबदबा निर्माण केला आहे. त्याचसोबत इतरही ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर त्यांची उत्पादने उपलब्ध आहेत. मुंबईतील लोअर परळ येथे वॉर्मीचे कार्यालय आहे, तर त्यांचा उत्पादन कारखाना मुंबईपासून १२० किमी अंतरावर, बोईसर जिल्ह्यातील तारापूर येथे आहे. त्यांच्याकडे १०० हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत.कोणतीही कल्पना छोटी नसते. त्या कल्पनेवर विश्वास ठेवून तिला जर कृतीची जोड दिली, तर कोटींचा व्यवसाय देखील उभारता येतो हे भावना व्होरा यांच्या ‘वॉर्मी’ने सिद्ध केले आहे.

फीड फीडबर्नर 22 Apr 2026 10:30 am

Central Railway : मध्य रेल्वे सलग तिसऱ्या दिवशी ४५ मिनिटे उशिराने; प्रवाशांचे हाल

ठाणे : डोंबिवली स्थानकावर रिकाम्या रेल्वेचा डब्बा घसरला आणि संपूर्ण मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले, त्या दिवसापासून लोकल या उशिराने धावत आहेत, आज तिसरा दिवस उजाडला तरी लोकल चे वेळापत्रक सुधारलेले दिसत नाही आहे, त्यामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. कोणताही अधिकृत मेगाब्लॉक जाहीर केलेला नसताना लोकलची वेळ बिघडल्यामुळे लोकलचा पुरता बोजवारा उडाला आहे.https://prahaar.in/2026/04/20/mumbai-local-empty-local-coach-derails-in-dombivli-train-schedule-disrupted/सोमवारची ती दुर्घटना आणि तीन दिवस मनस्तापसोमवारी डोंबिवली स्थानकात कळवा कारशेडमधून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या रिकाम्या लोकलचा एक डबा रुळावरून घसरला, आणि याच घटनेनंतर मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले, काही लोकल रद्द झाल्या तर काही लोकलचा मार्ग बदलावा लागला, कमी काही तासातच पूर्ण होईल असे आश्वासन रेल्वे प्रशासनाने दिले होते परंतु काम पूर्ण झाले तरीही अद्याप रेल्वेचे वेळापत्रक सुधारलेले नाही. कल्याण ते ठाणे दरम्यान स्थानकांवर प्रवाशांची तुफान गर्दी पाहायला मिळत असून गाड्या अत्यंत धीम्या गतीने धावत आहेत.मेगाब्लॉकच्या वावड्या उठल्यासकाळची पहिलीच लोकल कासाराहून पाऊण तास उशिराने धावली. मिळालेल्या माहितीनुसार आसनगाव दरम्यान लोकल फास्ट ट्रॅकवर वळवण्यात आली होती. मात्र ठाण्यापासून पुन्हा ती स्लो ट्रॅकवर चालवण्यात आली. जेव्हा प्रवाशांनी याबाबत विचारणा केली असता रेल्वे प्रशासनाकडून मेगाब्लॉकचे कारण पुढे करण्यात आले.https://prahaar.in/2026/04/21/diagnostic-center-in-borivalis-punjabi-galli-handed-over-to-a-private-entity/प्रवाशांचा तीव्र संतापसलग तीन दिवस मध्य रेल्वेची वाहतूक गर्दीच्या वेळेला विस्कळीत असल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. या त्रासामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी दिसत आहे. आमच्या वेळेला किंमत नाही का ? असा सवाल प्रवासी विचारू लागले आहेत.

फीड फीडबर्नर 22 Apr 2026 10:10 am

दशकानंतरचं जग

डॉ. दीपक शिकारपूर माणसाला सर्वात हवीशी वाटणारी आणि अत्यावश्यक असलेली एक बाब नाहीशी होण्याच्या मार्गावर आहे. ती म्हणजे व्यक्तिगत गुप्तता उर्फ ‘प्रायव्हसी’! तसे पाहिले तर ती आताच हाताबाहेर जात आहे. दुकानांमध्ये, रस्त्यावर कॅमेरे असतातच. शिवाय संगणकांमध्ये, हँडसेटमध्ये, गाडीमध्ये ‘जीपीएस’ असते. पण स्मृतिभ्रंशासारख्या रोगांचे प्रमाणदेखील वाढत असल्याने आपले काय हरवले आहे, तेच बहुधा आपण विसरून जाऊ!माझ्याकडे १८८० मधले एक दुर्मीळ पुस्तक आहे!’ एखादा संग्राहक अभिमानाने सांगतो. आपल्यालाही त्याचे कौतुक वाटते, कारण इतकी जुनी वस्तू त्याने जीवापाड जपलेली असते आणि पुढच्या पिढ्यांना ऐतिहासिक संदर्भ म्हणून तिचा (कदाचित) उपयोग होणार असतो... ‘कदाचित’ असे म्हटले कारण चक्रावणाऱ्या वेगाने तांत्रिक प्रगती होण्याच्या या दिवसांमध्ये बदलती जीवनशैली आणि संकल्पनांमध्ये कोण जाणे किती व्यक्तींना अशा संग्राहकांचे आणि त्यांच्याकडे असलेल्या वस्तूंचे महत्त्व वाटेल! हे झाले वस्तूंचे उदाहरण. तंत्रज्ञानातील बदलांसोबत संबंधित उपकरणांचे दृश्य रूप आणि कार्यपद्धतीदेखील किती आणि कशी बदलते पाहा. तसेच होणारे सर्वच बदल चांगलेच असतील असेही नाही; परंतु त्या दिशेने प्रवास सुरू आहे हे नक्की!२०३५ पर्यंतच्या अत्याधुनिक काळात सर्वात आधी बळी पडणार आहे टपाल आणि तार खात्याचा म्हणजेच पोस्टाचा. गंमत पाहा, फक्त दहा-पंधरा वर्षांपूर्वी हे विधान अतिशयोक्तीपूर्ण वाटले असते. कारण शहरी भाग वगळला तरी खेड्यापाड्यांमधील लोक तोपर्यंत संवादाच्या विविध माध्यमांसाठी पोस्टावर अवलंबून असत; परंतु मोबाइल फोनच्या क्रांतीने हे भाकीत पार उलटे करून टाकले. शिवाय येणारा जमाना तत्काळ उर्फ ‘इंस्टंट’चा आहे. मोबाइल फोन, संगणक, इंटरनेटच्या वापराने लगेचच संभाषण आणि संदेशवहन होत असताना उशिराने मिळणाऱ्या टपालसेवेवर कोण अवलंबून राहील? तसेच तंत्रज्ञानाबरोबरच खासगी कुरियर सेवेने टपाल खात्याचा महसूल बऱ्यापैकी खाल्ला आहे. ही सेवा चालवणे सरकारला दिवसागणिक न परवडणारे होत चालले आहे, हे तर आपण पाहतोच आहोत. खरे तर, हळूहळू का होईना, पोस्ट ऑफिसचे रूपांतर बँकेमध्ये होऊ लागले आहे. बँकेवरून आठवले, चेकदेखील पोस्टाच्याच वाटेने जात आहे, हे वाचून बहुतेकांना आश्चर्य वाटेल; पण ते खरे आहे. चेकवरील प्रशासकीय प्रक्रिया करण्यामागचा खर्च अनेक बँका आणि वित्तसंस्थांना दिवसेंदिवस न पेलवणारा होत आहे. खुद्द ग्रेट ब्रिटनमध्ये २०२८ पर्यंत धनादेशाला त्याच्या सिंहासनावरून पायउतार करण्याबाबतची योजना कार्यान्वित झाली आहे. ‘प्लास्टिक मनी’ म्हणजेच विविध क्रेडिट-डेबिट-प्रीपेड कार्डे, फोन बँकिंग आणि इंटरनेट याद्वारे होणाऱ्या आर्थिक व्यवहारांची संख्या जगभर विलक्षण वेगाने वाढत असल्याचाही हा परिणाम आहे.या यादीमध्ये पुढचे नाव आहे वृत्तपत्रांचे. वाचक म्हणतील आता हे फारच झाले, आपल्याकडे असे होणे शक्यच नाही. शिवाय गरम चहाचे घुटके घेत पेपर वाचण्याची मजा कोण सोडेल? हे घडून येण्यासाठी कदाचित जरा वेळ लागेल (भारतामध्ये २०३५ पर्यंत वृत्तपत्रांचा खप उतरणीला लागलेला असेल असा काहीजणांचा अंदाज आहे.) पण जागतिक पातळीवरचा कल तसा आहे खरा. जगभरातील अनेक युवक-युवतींनी दररोजचे वृत्तपत्र विकत घेणे बंद केले आहे. (अर्थात आपल्याकडच्या तुलनेने बाहेरच्या देशांमध्ये वृत्तपत्रे खूपच महाग असतात हेदेखील तितकेच खरे.) त्यांचे म्हणणे बातम्या काय, इंटरनेट, रेडिओ किंवा मोबाइल फोनवर मिळतातच. शिवाय वृत्तपत्रांच्या मालकांनीही हे वारे ओळखून ई-आवृत्त्या सुरू केल्या आहेतच. त्यावर जास्त तत्परतेने ताज्या बातम्या कळण्याची शक्यता असल्याने त्या लोकप्रिय होत आहेत. छापील वृत्तपत्रांकडून आपला विषय पुस्तकांकडे जाणे नैसर्गिक आणि अपरिहार्य आहे, नाही का? वैयक्तिक तसेच सार्वजनिक पातळीवरचे छापील पुस्तकांचे साम्राज्य प्रचंड असले तरी त्याला दोन अंगभूत मर्यादा आहेत. पुस्तकांचे वजन आणि त्यांना लागणारी जागा. शिवाय देखभाल आहेच. दोन-तीन हजार पुस्तके सहज घरी बाळगणाऱ्या खऱ्या पुस्तकप्रेमींना या अडचणींचा चांगलाच अनुभव असतो. तसेच नव्या पिढीचे वाचन एकंदरीतच कमी झाले आहे, असेही दिसते. त्यामागची कारणे काहीही असोत.बरे, आजकाल पुस्तके ऑनलाइन खरेदी करता येतात. ‘अमेझॉन’वर मिळणाऱ्या ‘किंडल’ सारख्या इलेक्ट्रॉनिक साधनामध्ये हजारो पुस्तके मावतात. अशी साधने स्वतःच्या बॅटरीवर सात-आठ दिवसदेखील चालतात. कुठेही बसून कितीही वाचा! बोटांना पाने उलटण्याऐवजी ‘पेज डाउन’चे बटन दाबण्याची सवय लागली की झाले! दूरध्वनीच्या लँडलाइन जोडणीबाबत मात्र कोणाचे दुमत असेल, असे वाटत नाही. जगात तर सोडाच, भारतातदेखील अनेक कुटुंबांमध्ये मुले लहान असल्याने अशांनी लँडलाइन जवळजवळ नाइलाजानेच सांभाळली आहे. काहींनी तर कित्येक वर्षांची दोन पिढ्यांची सवय आहे म्हणूनच बहुधा लँडलाइन ठेवली असावी. मोबाइल फोनच्या सेवेतील तांत्रिक प्रगती, ‘नंबर पोर्टेबिलिटी’ अशा सुविधांमुळे लँडलाइनचे अस्तित्वच धोक्यात येणार हे उघड दिसते आहे.संगीत अर्थातच नष्ट होणार नाही; परंतु त्याच्या उपलब्धतेचे मार्ग आणि पद्धती बदलतील. खरे तर संगीत उद्योगातील फायदा दिवसेंदिवस कमी होत आहे. पायरसी उर्फ अनधिकृत वापर आणि वितरण, हे त्यामागील एक मोठे कारण आहेच; परंतु (जरा वादाचा मुद्दा असलेली) आणखी एक गंभीर बाबदेखील यात समाविष्ट आहे. संगीतातील सर्जनशीलता, उत्स्फूर्तता आणि नवनिर्मिती कमी होत आहे. सध्याच्या ‘रीमिक्स’च्या संख्येवरून हे सहज समजून येईल. शिवाय फाइल शेअरिंग आणि सुलभ डाउनलोडिंगच्या तंत्रामुळे ‘सीडी’च्या जमान्यात भरपूर व्यवसाय करणारा संगीतउद्योग, आता आर्थिकदृष्ट्या मेटाकुटीला आला आहे.इंटरनेटमार्फत मिळणाऱ्या सुविधा आणि त्यांचा प्रसार अनंत असल्याने रेकॉर्ड्स, कॅसेट आणि सीडी असा प्रवास करून आलेला संगीत उद्योग- त्याने स्वतःचीच भविष्यकालीन धोरणे तपासून न पाहिल्याने सध्या तरी जरा गोंधळलेल्या अवस्थेत आहे. याबाबत ‘रोलिंग स्टोन्स’ या जगप्रसिद्ध वाद्यवृंदाशी संबंधित असलेल्या स्टीव्ह नॉपरने एक पुस्तकही लिहिले आहे. आपल्याकडे दूरचित्रवाणीच्या विविध वाहिन्या, डीटीएच आदींचे प्रस्थ सध्या वाढत असले तरी जागतिक पातळीवर पारंपरिक अर्थाने टीव्ही पाहणे कमी होत आहे. याची कारणे दोन. एक तर ‘लाइव्ह स्ट्रीमिंग’ सारख्या तंत्रांमुळे संगणकावर तसेच सेलफोनमार्फत थेट टीव्ही उपलब्ध होण्याचे प्रमाण आणि वेग वाढतो आहे. तसेच कॉम्प्युटर गेम्ससारखे करमणुकीचे इतर प्रकारही संगणकावर मिळत असल्याने त्यापासून दूर जाऊन वेगळे माध्यम वापरण्याची गरज कमी होत आहे. ‘नेटफ्लिक्स’सारख्या सुविधेमुळे प्रेक्षकाला काय पाहावे, याबाबतचे निर्णयस्वातंत्र्य मिळू लागले आहे. शिवाय टीव्हीवरील वाढत्या जाहिरातींमुळे मूळ कार्यक्रमाचा एकंदर कालावधी वाढत चालला आहे. बरे, जाहिराती न दाखवण्याने वाहिन्यांची पंचाईत होते. कारण प्रक्षेपणाचा वाढता खर्च. असे हे दुष्टचक्र किती काळ नीट चालते ते पहायचे!आता आपल्या ध्यानात आले असेल, की भविष्यात संगणक वा तत्सम सुविधा खरेदी करण्याची किंवा सीडीवरचे सॉफ्टवेअर, पुस्तके वा संगीत जवळ बाळगण्याची कदाचित गरजच भसणार नाही. विशिष्ट सेवाशुल्क देऊन आपण क्लाउडमध्ये मिळणारी सर्व पूरक साधने आणि उपकरणे वापरू शकू. कोणत्याही लॅपटॉप वा हँडसेटमार्फत आपण महाजालात ‘ठेवलेल्या’ आपल्या वस्तूंपर्यंत ‘पोहोचू’ शकू. ‘मायक्रोसॉफ्ट विंडोज’ आणि ‘ॲपल मॅक’ हे ओएसचे प्रमुख उत्पादक आणि ‘गूगल’ यांनी एकत्र येऊन, इंटरनेटच्या माध्यमाद्वारे, अशी सेवा पुरवण्याच्या दृष्टीने फार मोठी पावले यापूर्वीच टाकली आहेत. अर्थात यामुळे मानवी मनातल्या ‘हे माझे आहे!’ या स्वामित्वाच्या कल्पनेला कदाचित तडा जाईल. कारण महाजालावरच्या आपल्या वस्तू प्रत्यक्ष नाही, तर आभासी (व्हर्चुअल) स्वरूपात असतील! आत्तापर्यंतच्या भविष्यकथनात वर्णिलेल्या वस्तू गेलेल्या परवडल्या, असे म्हणण्याची पाळी कदाचित २०३५ पर्यंत येणार आहे. कारण माणसाला सर्वात हवीशी वाटणारी (आणि अत्यावश्यक असलेली) बाब नाहीशी होण्याच्या मार्गावर आहे. ती म्हणजे व्यक्तिगत गुप्तता उर्फ ‘प्रायव्हसी’! तसे पाहिले तर ती आत्ताच जाऊ लागली आहे. दुकानांमध्ये, रस्त्यावर कॅमेरे असतातच. शिवाय संगणकांमध्ये, हँडसेटमध्ये, गाडीमध्ये ‘जीपीएस’ असते. पण याचीही चिंता करायचे फारसे कारण नाही. स्मृतिभ्रंशासारख्या (अल्झायमर्स) रोगांचे प्रमाणदेखील वाढत असल्याने आपले काय हरवले आहे, तेच बहुधा आपण विसरून जाऊ!

फीड फीडबर्नर 22 Apr 2026 10:10 am

Pahalgam Attack Anniversary :”दहशतवाद्यांचे घृणास्पद मनसुबे…”; पहलगाम हल्ल्याला एक वर्ष पूर्ण होताच पंतप्रधान मोदींचा इशारा

Pahalgam Attack Anniversary : पहलगाममधील भीषण दहशतवादी हल्ल्यात २६ जणांना आपला जीव गमवावा लागला

दैनिक प्रभात 22 Apr 2026 9:47 am

Oily Skin Tips: ऑयली स्किनचा त्रास? या सोप्या टिप्सने मिळवा फ्रेश, चमकदार आणि तरुण त्वचा!

Oily Skin Tips तज्ज्ञांच्या मते, उन्हाळ्यात तापमान वाढल्याने त्वचेतील तेलनिर्मिती वाढते. हे अतिरिक्त तेल, घाम आणि धूळ यांच्यासोबत मिसळून त्वचेचे पोर्स ब्लॉक करतात. त्यामुळे त्वचा अधिक तेलकट दिसते आणि त्वचेच्या समस्या वाढतात.

दैनिक प्रभात 22 Apr 2026 9:28 am

Top 10 News: पहलगाम दहशतवादी हल्ल्याला एक वर्ष पूर्ण ते ‘भाजपा भगाओ, देश बचाओ!’ काँग्रेस नेत्याचा हल्लाबोल; जाणून घ्या आजच्या TOP 10 News

Top 10 News: राज्य, देश-विदेश, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी....

दैनिक प्रभात 22 Apr 2026 9:13 am

Kritika Kamra: “मला कोणावर अवलंबून राहायचं नाही!”…कृतिका कामराचं करिअर आणि लग्नाबद्दल स्पष्ट मत

Kritika Kamra कृतिका कामराने ३७ व्या वर्षी गौरव कपूरसोबत लग्न केलं. उशिरा लग्न केल्याबद्दल ती म्हणते की, “लहान वयात लग्न न केल्याचा मला खूप आनंद आहे. त्या वयात आपली विचारसरणी पूर्ण विकसित झालेली नसते.” ती सांगते की, तिच्या कुटुंबाने कधीही लग्नासाठी दबाव टाकला नाही.

दैनिक प्रभात 22 Apr 2026 8:31 am

KEM Hospital in Parel : परळच्या केईएम रुग्णालयाचे नाव बदलणार, तरीही इंग्रजी संशिप्त नाव तेच राहणार

मुंबई :मुंबईतील ब्रिटीशकालिन रस्त्यांची तसेच वास्तूंची नावे बदलण्याचा सपाटा सुुर असतानाच आता केईएम रुग्णालयाचेही नाव बदलण्यात येणार आहे. परळ येथील किंग एडवर्ड मेमोरियल अर्थात के. ई. एम. रुग्णालय रुग्णालयाचे नामकरण 'कौशल्यश्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय' केले जाणार आहे. मात्र हे नामकरण केले जाणार असले तरी इंग्रजीतील संशिप्त नाव हे के.ई.एम असेच राहणार आहे.राज्याच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्य मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी महापालिका सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्षांना पत्र लिहून स्वदेशी वारसांच्या सुसंगततेसाठी केईएम रुग्णालयाचे पुनर्नामकरण करण्याची मागणी केली आहे. हे पत्र आता सार्वजनिक आरोग्य समितीच्या बैठकीपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहे. या पत्रामध्ये लोढा यांनी असे म्हटले आहे की, स्वदेशी' या प्रेरणादायी संकल्पनेच्या प्रभावाखाली आपला देश समृध्द स्वदेशी वारसा पुनर्प्रस्थापित आणि गौरव करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यादृष्टीने सार्वजनिक संस्थांच्या परकीय नावांचे पुनर्नामकरण करणे आवश्यक आहे. आजमितीपर्यंत अनेक संस्था वसाहतवादी काळातील नावांचा वापर करत आहे. जे दास्याच्या काळाची आठवण करून देतात. या वास्तुंना देण्यात येणाऱ्या नावांची जागा ही आपली संस्कृती, मुल्ये आणि प्रेरणादायी इतिहास जपण्याच्या दृष्टीने ऐतिहासिक व्यक्तींना सन्मान देणाऱ्या नावांनी घेतली पाहिजे. याकरता , किंग एडवर्ड मेमोरियल (के.ई.एम.) रुग्णालय या मुंबईतील संस्थेचे पुनर्नामकरण झाल्यास भारतीय इतिहास आणि संस्कृतीतून निवडलेले नाव भविष्यातील पिढ्यांना प्रेरणा देत राहील.त्यामुळे , किंग एडवर्ड मेमोरियल (के. ई. एम. रुग्णालय) रुग्णालयाचे 'कौशल्यश्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय' (केईएम) असे पुनर्नामकरण करण्यात यावे,असे म्हटले आहे.

फीड फीडबर्नर 22 Apr 2026 8:30 am

Mulnd Stray Dog Shelters : आणिक आणि मुलुंडमधील भूखंडांचे भटक्या श्वानांच्या निवारासाठी वगळणार आरक्षण

मुंबई :महापालिकेच्या एम पूर्व विभागातील आणिक भूखंडावरील रुग्णालय आणि टी विभागातील मुलुंडमधील घनकचरा व्यवस्थापन सुविधा ही आरक्षणे वगळून आता त्याठिकाणी जनावरांचे रुग्णालय तथा पशुनिवारा याबाबतचे आरक्षण टाकण्यात येणार आहे. या दोन्ही ठिकाणचे आरक्षण वगळून त्याठिकाण भटक्या श्वान निवारा केंद्र आणि निर्बिजीकरण केंद्र बांधण्यात येणार आहे.सर्वोच्च न्यायालयाने ०७ नोव्हेंबर २०२५ रोजी दिलेले निर्णय आणि शासनाच्या निर्णयानुसार शैक्षणिक संस्था, रुग्णालये, रेल्वे स्थानके, बस स्थानके व आगार, क्रीडा संकुले इ. परिसरातील भटक्या श्वानांची नसबंदी करून श्वान निवारागृहात कायमस्वरूपी ठेवण्याबाबत निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार पशुवैद्यकीय आरोग्य खाते तथा देवनार पशुवधगृहाने आदींच्या परिसरातील भटक्या श्वानांची नसबंदी करून श्वान निवारागृहात कायमस्वरूपी ठेवण्यासंदर्भात महानगरपालिका विभागाअंतर्गत जागांचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्याप्रमाणे महापालिकेच्या एम पूर्व विभागातील आणिक भूखंडावरील रुग्णालय आणि टी विभागातील मुलुंडमधील घनकचरा व्यवस्थापन सुविधा ही आरक्षण वगळून आता त्याठिकाणी जनावरांचे रुग्णालय तथा पशुनिवारा याबाबतचे आरक्षण टाकण्याचा निर्णय घेतला आहे.https://prahaar.in/2026/04/21/bmc-news-live-telecast-of-house-proceedings-in-the-153-year-history-of-the-mumbai-municipal-corporation/क्षेत्रात भटक्या श्वानांसाठी निवारागृहे स्थापन करण्यासाठी महानगरपालिकेच्या अखत्यारीत असलेल्या पि शोध घेण्यासाठी प्रमुख अभियंता (विकास नियोजन) कार्यालयास अवगत केले. मुंबई महापालिकेच्या मंजूर विकास आराखडा २०३४ नुसार जनावरांचे तथा गुरांचे रुग्णालय या करीता एक भूखंड एफ/ दक्षिण विभागात आरक्षित असून विकास नियोजन विभागाने ताब्यात घेतलेल्या भुखंडांपैकी या प्रयोजनाकरिता वापरता येऊ शकणार आहे. तसेच'पी/उत्तर' विभागातील ५ टक्के सुविधा भुखंड असुन हा भूखंड कोणत्याही सार्वजनिक प्रयोजनाकरीता आरक्षित नाही. याशिवाय 'एम/पूर्व' विभागातील भुखंड रुग्णालयाकरिता आरक्षित असुन 'एम/पश्चिम' येथील भुखंड महानगरपालिका प्रसुतीगृह महानगरपालिका दवाखाना व आरोग्य केंद्र याकरीता आरक्षित आहे. त्यामुळे 'एम/पूर्व' किंवा 'एम/पश्चिम' येथील भूखंड श्वान निवारागृहाकरिता वापरावयाचा असल्याबाबत 'ना-हरकत' प्राप्त करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागास पत्रव्यवहार करण्यात आला असता, त्यानुसार 'एम/पूर्व' विभागातील आणिक येथील स्थित अंदाजे ८४११.५० चौ.मी. इतके क्षेत्रफळ असलेली जागा श्वान निवारागृहासाठी वापराबाबत 'ना-हरकत' दिलेली आहे.'टी' विभागातील न.भू.क्र. १३०८ मौजे मुलुंड (पुर्व) या आरक्षित भूखंडावर या पूर्वीच मा. महानगरपालिका आयुक्त ह्यांनी मंजूरी दिल्यानुसार ४२२ चौ. मी. इतके क्षेत्रफळ असलेल्या जागेत महापालिकेने श्वान निंबीजीकरण केंद्र व्ही- टिम या प्राणी कल्याण संस्थेमार्फत् स्थापित केले आहे. तेथेच लगत असलेल्या अंदाजे ३००० चौ.मी. इतके क्षेत्रफळ असलेला भूखंड महानगरपालिकेच्या श्वान निवारागृहे करिता पशुवैद्यकीय आरोग्य खाते तथा देवनार पशुवधगृहाला 'मा-हरकत' प्राप्त झाली आहेत.https://prahaar.in/2026/04/20/bmc-all-assistant-commissioners-must-prioritize-cleanliness-in-their-respective-zones-additional-commissioners-directive/भूखंडावर श्वान निवारागृहे महानगरपालिकेमार्फत बांधण्यास किंवा सार्वजनिक भागीदारी तत्वावर कमीत कमी १० वर्षासाठी स्वारस्य अभिव्यक्ती मागवून या प्रकल्पाची उभारणी केली जाणार आहे. त्यामुळे 'टी' विभागातील न. भू. क्र. १३०१ ऐवजी न. भू. क्र. १३०८ हा भूखंड सद्यस्थितीतील वापरानुसार प्रस्तावित श्वान निवारागृह या प्रयोजनाकरिता योग्य असल्याचे सबंधित अधिकाऱ्यांना सांगितले. परंतु, या भूखंडापर्यंत पोहचण्याकरिता थेट प्रवेश मार्ग अस्तित्वात नाही. त्यामुळे या भूखंडालगतचा भूखंड न.भू.क्र.१३०४ (भाग) व न.भू.क्र.१३०५ (भाग) हा २७.४५मी. रुंद प्रस्तावित विकास नियोजन रस्त्याने बाधित असल्याकारणाने मुलुंड पूर्व येथील हे तीनही भूखंड मिळून एकूण ३०००.०० चौ. मी. क्षेत्रावर श्वानांचे निवारा केंद्र उभारण्यात येणार आहे.

फीड फीडबर्नर 22 Apr 2026 8:30 am

Bhabha hospital : वांद्रे भाभा, कुर्ला भाभा आणि भगवती रुग्णालयांत कॅथलॅब

पुढील ३० वर्षांसाठी संस्थांची केली निवडरुग्णालयातील जागा भाडेतत्वावर देण्यात येणारमुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या वांद्रे के. बी. भाभा रुग्णालय, कुर्ला के. बी. भाभा रुग्णालय, आणि बोरीवलीतील हरीलाल भगवती रुग्णालय या तीन उपनगरीय रुग्णालयांमध्ये कॅथ लॅब सुरु करण्यात येणार आहे. यासाठी अनुक्रमे रुबी ऐल केअर सर्विसेस प्रा. लिमिटेड व सुराना चेरीटेबल ट्रस्ट या संस्थेची निवड करण्यात आली असून प्रत्येकी दहा याप्रमाणे तीस वर्षांकरता या संस्थेच्यावतीने कॅथ लॅब चालवण्यासाठी जागा भाडेतत्वावर दिली जाणार आहे.मुंबई महानगरपालिकेच्या वांद्रे के. बी. भाभा रुग्णालय, कुर्ला के. बी. भाभा रुग्णालय, आणि बोरीवलीतील हरीलाल भगवती रुग्णालय या ३ उपनगरीय रुग्णालयांमध्ये कॅथ लँब या रुग्णोपयोगी सुविधा सार्वजनिक खाजगी सहभाग प्रोत्साहन धोरणांतर्गत प्रथम १० वर्षाकरिता व नंतर सेवा समाधानकारक असल्यास दहा अधिक दहा वर्षासाठी नूतनीकरणास सापेक्ष अशा एकूण ३० वर्षाकरिता सुरु करण्याबाबत महापालिकेच्यावतीने निविदा मागण्यात आली होती. त्यानुसार प्राप्त संस्थेची कॅथलॅब करता निवड करून संबंधित रुग्णालयांमध्ये जागा उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यासाठी ही जागा देण्याबाबत प्रशासनाच्यावतीने प्रस्ताव सुधार समितीत सादर करण्यात आला अहे.केईएम, शीव, नायर, आणि कूपर या प्रमुख रुग्णालयांमध्ये कॅथलॅब सुविधा उपलब्ध आहेत. केईएम रुग्णालयात नुकतीच 'रॅडियल लाऊंज'सह अत्याधुनिक सुविधा सुरू करण्यात आली आहे.कॅथलॅब ही हृदयविकाराचे निदान आणि उपचारांसाठी वापरली जाणारी अत्याधुनिक प्रयोगशाळा आहे, जिथे अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी आणि स्टेंटिंग यांसारख्या प्रक्रिया कमीत कमी चिरफाड करून केल्या जातात. वाढत्या हृदयविकार रुग्णांमुळे सरकारी रुग्णालयांमध्ये पीपीपी तत्त्वावर कॅथलॅब सुरू करण्यात येत आहेतया कॅथ लॅबसाठी अशाप्रकारे केली संस्थांची निवडके. बी. भाभा रुग्णालय, वांद्रेएकूण क्षेत्रफळ : ४८९.१० चौरस मीटरवार्षिक शुल्क : १३ लाख १२ हजार ०९० रुपयेसंस्थेची नेमणूक : रुबी ऐल केअर सर्विसेस प्रा. लि.के. बी. भाभा रुग्णालय, कुर्लाएकूण क्षेत्रफळ : २१०.६१ चौ. मीटरवार्षिक शुल्क : २ लाख ८५ हजार रुपयेसंस्थेची नेमणूक : रुबी ऐल केअर सर्विसेस प्रा. लिबोरीवली हरीलाल भगवती रुग्णालय, बोरीवलीएकूण क्षेत्रफळ : ७३०.७३ चौ. मीटरवार्षिक शुल्क : ९ लाख रुपयेसंस्थेची नेमणूक : सुराना चेरीटेबल ट्रस्ट

फीड फीडबर्नर 22 Apr 2026 8:30 am

ओल्या जखमेची वर्षपूर्ती

२२ एप्रिल २०२५ रोजी पहलगामच्या निसर्गरम्य 'बैसारन व्हॅली'त झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश सुन्न झाला होता. २६ निष्पाप पर्यटकांचा बळी घेणाऱ्या या घटनेने माणुसकीला काळिमा फासला, पण त्याच वेळी भारताच्या अदम्य धैर्याची आणि लष्करी सामर्थ्याची नवी ओळख जगाला करून दिली.‘पहलगाम’ शब्द उच्चारला, तरी तो भीषण दहशतवादी हल्ला डोळ्यांंसमोर येतो. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या हल्ल्याला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. काश्मीरच्या सौंदर्यांचे वर्णन करताना 'पृथ्वीवरील नंदनवन' हा शब्द नेहमीच वापरला जातो. मात्र, गेल्या वर्षी याच दिवशी नंदनवनातील पहलगामच्या निसर्गरम्य 'बैसारन व्हॅली'मध्ये रक्ताचे सडे पडले. हा दिवस केवळ त्या २६ निष्पाप जीवांच्या बलिदानाच्या स्मरणाचा नाही, तर दहशतवादाविरोधात भारत देश किती ठामपणे उभा आहे, याचं प्रत्यंतर दर्शवणारा आहे. बैसारन व्हॅलीमध्ये पर्यटक घोडेस्वारीचा आणि निसर्गाचा आनंद घेतात. त्यादिवशी दुपारी १ ते ३ च्या सुमारास अचानक ४ ते ७ सशस्त्र दहशतवादी जंगलातून बाहेर आले आणि त्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले बहुतांश पर्यटक होते. हल्ल्याच्या त्या भीषण क्षणांमध्ये केवळ मृत्यूचे तांडव नव्हते, तर माणुसकीची काही उदाहरणेही जगाला पाहायला मिळाली. आदिल हुसेन शाह नावाच्या एका स्थानिक खेचरस्वाराने पर्यटकांना वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला. या हल्ल्यात महाराष्ट्रातील दिलीप देसले आणि अतुल मोने यांच्यासह देशाच्या विविध भागांतील पर्यटकांना आपले प्राण गमवावे लागले. आपल्या कुटुंबासह सुट्टीचा आनंद घेण्यासाठी गेलेले भारतीय नौदलाचे अधिकारी लेफ्टनंट विनय नरवाल हेदेखील या हल्ल्याचे बळी ठरले. हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली. पाकिस्तान पुरस्कृत 'द रेसिस्टन्स फ्रंट' या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने केवळ निषेध व्यक्त करून थांबायचे नाही, अशी ठाम भूमिका घेतली. दहशतवाद्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्यासाठी भारतीय सशस्त्र दलांनी 'ऑपरेशन सिंदूर' राबवले. ७ मे २०२५ रोजी भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलाने संयुक्त कारवाई करत पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी तळांवर 'सर्जिकल स्ट्राईक' केला, ज्यात सुमारे १००हून अधिक दहशतवादी मारले गेले. जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबा यांसारख्या संघटनांची महत्त्वाची केंद्र उद्ध्वस्त करण्यात लष्कराला यश मिळाले. ही मोहीम केवळ २३ मिनिटांत यशस्वीपणे पूर्ण झाली, ज्यामध्ये 'राफेल' विमानांचा वापर करण्यात आला होता. त्याव्यतिरिक्त भारताने पहिल्यांदाच १९६० चा ऐतिहासिक सिंधू जल करार स्थगित करण्याचा मोठा निर्णय घेतला. जोपर्यंत पाकिस्तान सीमेपलीकडील दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवत नाही, तोपर्यंत हा करार व्यवहारात राहणार नाही, अशी स्पष्ट भूमिका भारत सरकारने घेतली. पाकिस्तानशी व्यापार पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतल्याने आधीच आर्थिक संकटात असलेल्या पाकिस्तानचं कंबरडे मोडलं.https://prahaar.in/2026/04/21/operation-sindoor-dont-cross-the-line-india-doesnt-forget-indian-army-suggestive-tweet-on-the-anniversary-of-the-pahalgam-attack/या हल्ल्यानंतर काश्मीरमधील पर्यटकांच्या सुरक्षेसाठी अनेक मोठे बदल करण्यात आले. क्यूआर कोड आणि डिजिटल ट्रॅकिंगची पद्धत अवलंबली गेली. पर्यटकांच्या प्रत्येक वाहनाला आणि घोडेस्वारांना विशेष क्यूआर कोड दिले जाऊ लागले. त्यामुळे कोणता पर्यटक कोणत्या भागात आहे, याची अचूक माहिती नियंत्रण कक्षाला मिळू लागली. पहलगाम आणि बैसारन व्हॅलीसारख्या दऱ्याखोऱ्यांतील घनदाट जंगलांच्या भागात २४ तास उच्च-गुणवत्तेच्या ड्रोनद्वारे गस्त घातली जात आहे. जंगलात कोणत्याही संशयास्पद हालचाली दिसल्यास तत्काळ अलर्ट दिला जातो. स्थानिक लोकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण करण्यासाठी गावकऱ्यांना संरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात आलं आहे.दहशतवाद्यांना स्थानिक स्तरावर कोणताही आधार मिळणं आता कठीण होत आहे. लष्कर आणि स्थानिक पोलीस यांच्यात समन्वय वाढवण्यासाठी विशेष 'क्विक रिस्पॉन्स टीम्स' तैनात करण्यात आल्या आहेत, ज्या ५ मिनिटांच्या आत कोणत्याही घटनास्थळी पोहोचू शकतात. काश्मीर खोऱ्यातील स्थानिक दहशतवाद्यांचा बिमोड करण्यासाठी लष्कर आणि पोलिसांनी संयुक्त 'ऑपरेशन महादेव' राबवलं. २८ जुलै २०२५ पर्यंत पहलगाम हल्ल्यात थेट सहभागी असलेल्या सुलमान उर्फ फैजल जट आणि हमजा अफगाणी यांसह सर्व प्रमुख दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. पाकिस्तानी नागरिकांसाठी असलेली 'सार्क व्हिसा सवलत योजना' रद्द करण्यात आली असून पूर्वी दिलेले व्हिसाही अवैध ठरवण्यात आले आहेत. अटारी-वाघा सीमा बंद करण्याचा निर्णय घेतल्याने दोन्ही देशांमधील नागरिक आणि मालाची ये-जा थांबली आहे. आज एक वर्षानंतर पहलगाम पुन्हा पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झालं आहे. काश्मीरमधील पर्यटनस्थळांवर क्यूआर कोड आधारित पडताळणी यंत्रणा आणि तंत्रज्ञानावर आधारित कडक निगराणी ठेवली जाते आहे. स्थानिकांच्या मनात अजूनही जखमा ओल्या असल्या तरी दहशतवादाला थारा न देण्याचा त्यांचा निर्धार अधिक पक्का झाला आहे. पहलगामचा हा हल्ला केवळ पर्यटकांवरचा हल्ला नव्हता, भारताच्या अखंडतेवर आणि शांततेवर केलेला आघात होता, अशी भारतीयांची भावना आहे. शहीद झालेल्या २६ जीवांना आदरांजली वाहताना आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे, की अशा भ्याड कृत्यांनी भारताचा विकास आणि काश्मीरची प्रगती यापुढेही थांबणार नाही. दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी संपूर्ण देशाने एकजुटीने उभं राहायला हवं. या दुःखद घटनेतून सावरत असताना आपण त्या बलिदानाचं स्मरण ठेऊया आणि शांततापूर्ण व सुरक्षित भारताच्या निर्माणासाठी कटिबद्ध होऊया. पहेलगाम हल्ल्यातील शहिदांचे बलिदान व्यर्थ जाणार नाहीत. हा देश तुमच्या धैर्याचा आणि त्या भयाण दिवशी दाखवलेल्या माणुसकीचा सदैव ऋणी राहील. दहशतवादाचा अंत आणि शांततेचा सूर्योदय हाच देशवासीयांचा निश्चय आहे. त्या भ्याड हल्ल्यात प्राण गमावलेल्या निष्पाप जीवांना आणि वीर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली!

फीड फीडबर्नर 22 Apr 2026 8:10 am

चला, पुन्हा जोडू या मातीशी नाते!

जागतिक वसुंधरा दिनजागतिक वसुंधरा दिवसाच्या निमित्ताने यंदा 'आपली शक्ती, आपला ग्रह' ही संकल्पना जगभर राबवली जात आहे. केवळ मेसेज फॉरवर्ड करण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीतून पृथ्वीला हिरवेगार कसे ठेवता येईल? देशी बियाणे, सेंद्रिय कापूस आणि प्लास्टिकमुक्तीच्या वाटेवरचे आपले पाऊल किती महत्त्वाचे आहे? जाणून घेऊ या या लेखातून...कच्च्या तेलाच्या वाढत्या दरामुळे पॉलिस्टर महागले आणि कापसाची मागणी वाढली. काही वर्षांपूर्वी कापसाचे ‘बीटी बियाणे’ (जनुकीय सुधारित) विकसित झाले. या बियाणांमुळे उत्पादन वाढत असले तरी, कालांतराने त्याचे गंभीर दुष्परिणाम समोर येत आहेत. बीटी कापसाचा पालापाचोळा जमिनीत कुजल्यावर मातीतील सूक्ष्म जीवाणूंवर विपरीत परिणाम होतो. दरवर्षी नवीन बियाणे विकत घ्यावे लागते आणि मातीचा कस कमी झाल्याने रासायनिक खतांचा वापर अनिवार्य ठरतो, ज्यामुळे शेतीचा खर्च वाढतो. तसेच, बेकायदा 'एचटी बीटी' बियाणांमुळे ‘ग्लायफोसेट’सारख्या तणनाशकांचा वापर वाढून पर्यावरणास घातक तणे तयार होतात. कापूस म्हणजे “पांढरे सोने”; सिंधू संस्कृतीच्या अभ्यासानुसार भारतात सुमारे ७००० वर्षांपासून कापूस पिकवला जात आहे. हे 'कापूस पुराण' मांडण्याचे कारण म्हणजे २२ एप्रिल रोजी साजरा होणारा 'वसुंधरा दिवस'. पृथ्वीच्या संरक्षणाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि जनजागृती करण्याचा हा एक महत्त्वाचा दिवस.आज आपण वापरतो ते कपडे खरोखरच पर्यावरणस्नेही आहेत का? वस्त्रोद्योगात ७०,००० हून अधिक कृत्रिम रसायने वापरली जातात, त्यापैकी केवळ २ टक्के सुरक्षित आहेत. 'पर्यावरणस्नेही कापड' म्हणजे ते उत्पादनाच्या प्रत्येक टप्प्यावर नैसर्गिक असावे. कॉर्पोरेट कंपन्यांनी ग्राहकांचा जो गोड गैरसमज करून दिला आहे, त्याला ‘बाहेर बरवा, आत हिरवा’ ही म्हण चपखल लागू पडते. या क्षेत्रात श्रीरंग देवबा लाड यांनी स्वतःचे नैसर्गिक तंत्रज्ञान विकसित केले, ज्याबद्दल त्यांना २०२६ मध्ये ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी कापसाच्या फांद्यांचा सखोल अभ्यास करून शेंडा खुडणी, अतिघन लागवड आणि ठिबक सिंचन यांसारख्या नैसर्गिक पद्धती अवलंबल्या. यामुळे बोंडाचे वजन वाढले, किडींचा प्रादुर्भाव कमी झाला आणि मातीचा ओलावा टिकून राहिल्याने शेतकऱ्यांचे उत्पादन खर्च कमी होऊन नफा वाढला.दुसरे उदाहरण व्ही. आर. अनंथू यांचे आहे. त्यांनी शेतकऱ्यांना जनुकीय बियाणे व रसायने सोडून शाश्वत देशी बियाणे वापरण्याचे प्रशिक्षण दिले. देशी कापसाचे ‘सरळ वाण’ संरक्षित करून, सेंद्रिय पद्धतीने कापूस उत्पादन ते कापड विघटनापर्यंतची सर्व प्रक्रिया नैसर्गिक ठेवली. कुशल कामगारांकडून हातमागावर विणलेल्या या कापडाला अपराजिता, हळद, मंजिष्ठा आणि पळस यांसारख्या नैसर्गिक रंगांनी सजवले जाते. अगदी बटणेही नारळाच्या करवंटीपासून बनवली जातात. हे कापड नैसर्गिक असल्याने त्याचे विघटनही सहज होते, अशा प्रकारे खऱ्या अर्थाने वसुंधरेचे देणे वसुंधरेला परत दिले जाते.वसुंधरा दिवसाची सुरुवात १९७० मध्ये अमेरिकेत झाली. युनेस्को परिषदेत शांतता कार्यकर्ते जॉन मॅककॉनेल यांनी मांडलेल्या प्रस्तावानंतर, सिनेट सदस्य गेलॉर्ड नेल्सन यांनी या दिवसाची अधिकृत सुरुवात केली. आज १९० हून अधिक देशांत हा दिवस साजरा होतो.सध्या आपली पृथ्वी हवामान बदल, प्रदूषण आणि जंगलतोड यांसारख्या संकटांचा सामना करत आहे. निसर्गाचे रक्षण ही केवळ सरकारची नाही, तर प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे. या वर्षीच्या वसुंधरा दिनाची संकल्पना ‘आपली शक्ती, आपला ग्रह’ ही आहे. यात 'आपली शक्ती' म्हणजे प्रत्येक मानवाचे वैयक्तिक योगदान. आपण पुढील गोष्टी करू शकतो.१. वृक्षारोपण : केवळ झाडे लावू नका, ती जगवा.२. प्लास्टिक त्याग : एकेरी वापराच्या प्लास्टिकवर बंदी घालून कापडी पिशव्या वापरा.३. बचत : पाणी आणि विजेचा अपव्यय टाळा.४. कचरा व्यवस्थापन : ओला व सुका कचरा वेगळा करून 'पुनर्वापर' संस्कृती रुजवा.५. कमी प्रदूषण : जवळच्या प्रवासासाठी सायकल वापरा किंवा चालत जा.निसर्ग आपली गरज पूर्ण करू शकतो, पण हाव नाही, हे महात्मा गांधींचे विचार आजही लागू होतात. पृथ्वी आपली माता आहे आणि वाढत्या स्वार्थामुळे आपण तिचे शोषण करत आहोत. वसुंधरा दिवस हा केवळ एक दिवसाचा सोहळा न राहता, तो आपल्या जीवनशैलीचा भाग बनायला हवा. आपली पृथ्वी हिरवीगार आणि प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी आपण सदैव कटिबद्ध राहू या.

फीड फीडबर्नर 22 Apr 2026 8:10 am

‘ढोकमध्ये लपले होते पहलगामचे दहशतवादी, भात खाऊ घालून आश्रय दिला’:NIAच्या आरोपपत्रात- खजूर आणि सिगारेट सोबत आणले होते; 1113 लोकांची चौकशी

काश्मीरमध्ये पोनी (म्हणजे घोडा) चालवणारे बशीर अहमद आणि परवेझ अहमद यांनी पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्यांना केवळ आपल्या घरात थांबवले नाही, तर ठिकाणाची माहितीही दिली. आपल्या ढोक (म्हणजे झोपडी) मध्ये दहशतवाद्यांना चहा पाजला, जेवण दिले. पॉलिथीनमध्ये भाजी-पोळी पॅक करून दिली. ते दहशतवादी आहेत हे माहीत असूनही पोलीस किंवा सुरक्षा दलांना माहिती दिली नाही. NIA ने आपल्या आरोपपत्रात हे खुलासे केले आहेत. तपासादरम्यान NIA ने एकूण 1,113 साक्षीदारांचे जबाब नोंदवले. यात 31 शाल विक्रेते, 543 ढोक (म्हणजे झोपडी) मध्ये राहणारे लोक, 117 पोनी चालवणारे, 69 पशु मालक, 42 छायाचित्रकार, 54 ढाबा-भेळपुरी आणि चहा विक्रेते, 36 तिकीट काउंटर-झिपलाइन वाले, 25 टॅक्सी चालक, 19 दुकान मालक, 23 इतर जिल्ह्यांतील संशयित आणि इतर 54 लोक यांचा समावेश होता. चार्जशीटनुसार, हल्ल्याचा कट पाकिस्तानात बसलेल्या साजिद सैफुल्ला जट्ट उर्फ अली भाईने रचला, जो लष्कर-ए-तैयबाशी संबंधित आहे. एनआयएने त्याच्यावर 10 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. त्यानेच हल्ल्यासाठी ठिकाण सांगितले आणि निर्देशांक पाठवले होते. तीन पाकिस्तानी दहशतवादी भारतात घुसले आणि हल्ला केला. पहलगाम हल्ल्याच्या पहिल्या वर्षपूर्तीनिमित्त वाचा इनसाइड स्टोरी… साक्षीदाराचा खुलासा: बशीरला शस्त्रधारी लोकांसोबत जाताना पाहिलेचार्जशीटमध्ये एका साक्षीदाराला X-1 असे नाव देण्यात आले आहे. त्याने खुलासा केला, ‘मी हिल पार्कच्या रस्त्याने घरी परतत होतो. मी बशीर अहमद जोठारला शस्त्रधारी तीन लोकांना इशारा करताना पाहिले. नंतर सर्वांना बशीरचा भाचा परवेझ अहमदच्या झोपडीत जाताना पाहिले. मी परवेझलाही ओळखतो.' 'दुसऱ्या दिवशी म्हणजेच २२ एप्रिल रोजी मी नेहमीच्या कामासाठी बैसरन घाटीत गेलो. अजानच्या वेळेच्या आसपास मी परवेझ अहमद आणि बशीर अहमद जोठार यांना तिथे फिरताना पाहिले.’ हल्ल्याच्या वेळी X–1 घटनास्थळी होता. तिन्ही दहशतवाद्यांनी त्यालाही थांबवले आणि कलमा वाचायला सांगितले. कलमा वाचल्यावर त्याला जाऊ दिले. दूरून त्याने दहशतवाद्यांना गोळीबार करताना पाहिले. X–1 ने तिन्ही दहशतवाद्यांची ओळख पटवली आहे. परवेझ म्हणाला- मामा आत आला आणि आम्हाला गप्प राहायला सांगितलेपरवेझ अहमदने चौकशीत सांगितले, ‘२१ एप्रिल, २०२५ रोजी संध्याकाळी ५ वाजता मी आणि पत्नी घरात चहा बनवण्याची तयारी करत होतो. तेव्हा माझा मामा बशीर अहमद जोठार आत आला आणि आम्हाला गप्प राहायला सांगितले. तो बाहेर गेला आणि काही मिनिटांनी परत आला. त्याच्या मागे तीन लोक होते, ज्यांच्या हातात शस्त्रे होती.’ ‘ते आत येऊन बसले. पाणी मागताना ते म्हणाले की, ते खूप दूरून आले आहेत. थकले आहेत आणि तहानलेले आहेत. पाणी प्यायल्यानंतर ते म्हणाले की, अल्लाहच्या मार्गात लढणाऱ्या आणि काश्मिरी मुस्लिमांच्या स्वातंत्र्यासाठी जिहाद करणाऱ्यांना पाणी पाजल्यास मला सवाब मिळेल.’ ‘ते उर्दू बोलत होते, ज्यात पंजाबी स्पर्श होता. ते काश्मिरी वाटत नव्हते. मला जाणवले की ते मुजाहिद होते. त्यांनी मला बॅग आणि पाऊच लपवायला सांगितले. मी त्यांना ढोकमध्ये पडलेल्या ब्लँकेट्स, बिछान्याखाली लपवले. पत्नी ताहिराला सर्वांसाठी चहा बनवायला सांगितले. तिन्ही मुजाहिद ढोकच्या भिंतीला टेकून बसले होते. ‘ या खुलाशानंतर बशीर अहमद जोठारची चौकशी करण्यात आली. बशीर आणि परवेझला 22 जून, 2025 रोजी अटक करण्यात आली. बशीरचा खुलासा: झाडांच्या मागून तीन सशस्त्र लोक आले बशीर अहमद जोठारने खुलासा केले की, 19 आणि 20 एप्रिल रोजी पाण्यामुळे मी बैसरन घाटीत गेलो नव्हतो. 21 एप्रिल रोजी संध्याकाळी 4 वाजण्याच्या सुमारास मी माझ्या घोड्याला पाहण्यासाठी जंगलात गेलो. तेव्हा झाडांच्या मागून तीन सशस्त्र व्यक्ती समोर आले. त्यांनी मला सांगितले की, आम्हाला सुरक्षित ठिकाणी घेऊन चला आणि अल्लाहच्या नावाने जेवणाची व्यवस्था करा. हे ऐकताच मला जाणवले की हे मुजाहिद आहेत. मी त्यांना परवेजच्या ढोकजवळ घेऊन गेलो आणि सांगितले की, येथे थांबून माझ्या इशाऱ्याची वाट पहा. मी परवेजच्या ढोकमध्ये शिरलो आणि परवेज-ताहिराला शांत राहण्यास सांगितले. आजूबाजूला नजर टाकल्यानंतर मी त्यांना हातांनी इशारा केला. मग ते माझ्या मागोमाग परवेजच्या ढोकमध्ये आत आले. ते एकमेकांना भाईजान म्हणत होते. ताहिराने सर्वांसाठी चहा बनवला. लहान उंचीच्या एका मुजाहिदने जेवण बनवण्यास सांगितले. मी ताहिराला भात आणि कच्चे टोमॅटो बनवण्यास सांगितले. जेवण करत असताना त्यांनी माझ्याशी अमरनाथ यात्रेबद्दल बोलले. सुरक्षा छावण्या आणि परिसरात जवानांच्या हालचालींबद्दल विचारले. ते आमच्याशी उर्दू आणि पंजाबीमध्ये बोलत होते. आपसात पंजाबीमध्ये बोलत होते. त्यांच्या बोलण्यात मी साजिदचे नाव ऐकले. जेवणानंतर त्यांनी ताहिराला पोळ्या बांधायला सांगितल्या. हळद, मिरची आणि मीठही घेऊन गेले होते बशीरने पुढे सांगितले, ‘परवेजने जुन्या कपड्याच्या तुकड्यात 10 पोळ्या बांधल्या आणि एका पॉलिथीनमध्ये भाजी ठेवली. मुजाहिदांनी एका पॉलिथीनमध्ये हळद, मिरची आणि मीठही घेतले. त्यांनी परवेजच्या ढोकवरून एक पातेले आणि पळीही घेतली. मी ढोकला पाण्यापासून वाचवण्यासाठी जी मोठी पॉलिथीन ठेवली होती, ती एका मुजाहिदाने घेतली.’ त्यांच्याकडे सिगारेट, टॉफी आणि खजूरही होते. ते सुमारे 5 तास ढोकमध्ये राहिले आणि रात्री 10 वाजता एक-एक करून बाहेर पडले. बाहेर पडताना लहान उंचीच्या मुजाहिदाने परवेजला 3 हजार रुपये दिले. मुजाहिद गेल्यानंतर 5 मिनिटांनी मीही निघून गेलो. ‘22 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास मी परवेजला हिल पार्क पोनी स्टँडजवळ भेटलो. आम्ही आमच्या घोड्यांवरून दोन पर्यटकांना घेऊन बैसरन घाटीत पोहोचलो. त्यांना मुख्य गेटवर सोडल्यानंतर परवेज आणि मी घोड्यांना मुख्य गेटजवळच बांधले. आम्ही पार्कमध्ये फिरत असताना, आम्हाला तेच तीन लोक पार्कच्या कुंपणाजवळ बसलेले दिसले.’ ‘आम्ही लगेच मुख्य गेटकडे आलो आणि ज्या पर्यटकांना घेऊन गेलो होतो, त्यांच्या येण्याची वाट पाहू लागलो. दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास पोनी स्टँडवरून निघालो. मी पहलगाम मार्केटमध्ये असताना, मला एका पोनीवाल्याने सांगितले की बैसरनमध्ये दहशतवादी हल्ला झाला आहे, ज्यात अनेक पर्यटक मारले गेले आहेत. हल्ल्यानंतर मी हिल पार्कजवळील ढोक सोडून खैय्यारमधील माझ्या घरी स्थलांतरित झालो. पकडले जाण्याच्या भीतीने मी याबद्दल कोणाशीही बोललो नाही.’ चकमकीत तिन्ही दहशतवादी ठार 28 जुलै, 2025 रोजी श्रीनगरमधील डाचीगामच्या महादेव हिल्समध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यात तीन दहशतवादी मारले गेले. त्यांच्याजवळ सापडलेल्या शस्त्रांच्या फॉरेन्सिक तपासणीतून पुष्टी झाली की तीच शस्त्रे बैसरनमध्ये झालेल्या हल्ल्यात वापरली गेली होती. या चकमकीदरम्यान एक GoPro कॅमेरा सापडला. मोबाईल डेटाच्या विश्लेषणातून दहशतवादी नेटवर्कशी संबंध असल्याचे सिद्ध झाले. तपासणीत असे आढळून आले की 21 डिसेंबर 2023 रोजी लष्करी वाहनावर हल्ला, 4 मे 2024 रोजी वायुसेनेच्या वाहनावर हल्ला, 9 जून 2024 रोजी शिव खोरी यात्रेकरूंवर हल्ला, 20 ऑक्टोबर रोजी APCO कंपनीवर हल्ला आणि 22 एप्रिल 2025 रोजी बैसरनमध्ये झालेल्या हल्ल्यात जप्त केलेली शस्त्रे सारखीच होती. चौकशीत हे सिद्ध झाले की तिन्ही दहशतवाद्यांना पाकिस्तानात बसलेल्या लष्कर-ए-तैयबाचा कमांडर साजिद जट्टकडून सूचना मिळत होत्या. हा हल्ला पूर्वनियोजित कट होता, जो पाकिस्तानमधून चालवला गेला आणि स्थानिक पातळीवर मदत घेण्यात आली. साजिद जट्ट थेट दहशतवादी सुलेमानच्या संपर्कात होता. सुलेमानच्या फोनमध्ये 'अल्पाइन क्वेस्ट' (alpine quest) ॲप डाउनलोड होते. यावर इंटरनेटशिवाय कोणत्याही ठिकाणाचे कोऑर्डिनेट्स (निर्देशांक) मिळतात. ॲपमध्ये आधीच बैसरन घाटीचे लोकेशन (स्थान) सेट केले होते. घटनास्थळावरून जप्त केलेल्या ब्लँकेट आणि सामानावर बशीर आणि परवेझचा डीएनए (DNA) आढळला. मोबाइल फोनच्या तपासणीत असे आढळून आले की दहशतवाद्यांचे फोन पाकिस्तानातून खरेदी केले होते आणि त्यात त्यांची छायाचित्रेही होती. कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) वरून हे देखील सिद्ध झाले की बशीर आणि परवेझ घटनेच्या वेळी त्याच परिसरात उपस्थित होते. दोन्ही स्थानिक आरोपींनी आधीच मोठ्या प्रमाणात रेशन खरेदी केल्याचे पुरावेही मिळाले. ते आधीपासूनच दहशतवाद्यांना पाठिंबा देण्याच्या तयारीत असावेत अशी शक्यता आहे. या हल्ल्यात लष्कर-ए-तैयबा आणि द रेसिस्टन्स फ्रंट यांचा सहभाग होता. काश्मीरमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणे, पर्यटन उपक्रम थांबवणे आणि देशविरोधी कारवायांना प्रोत्साहन देणे हा त्याचा उद्देश होता. खटला सध्या ट्रायल स्टेजमध्येNIA पोलीस स्टेशन जम्मू येथे FIR क्रमांक RC-02/2025/NIA/JMU अंतर्गत 27 एप्रिल 2025 रोजी गुन्हा दाखल झाला. हा खटला NIA कायदा 2008 अंतर्गत जम्मू येथील विशेष न्यायालयात सादर करण्यात आला आहे आणि आरोपपत्र क्रमांक 03/2025 दाखल झाले आहे. खटला ट्रायल स्टेजमध्ये आहे. यानंतर आरोप निश्चित केले जातील आणि खटला चालेल, ज्यामध्ये साक्षीदारांचे जबाब आणि पुरावे सादर केले जातील. सर्व पक्षांचे म्हणणे ऐकल्यानंतर न्यायालय निकाल देईल.

दिव्यमराठी भास्कर 22 Apr 2026 7:38 am

पहलगाममध्ये 75% पर्यटक घटले; मार्गदर्शक उद्ध्वस्त, गाड्या-घोडे विकले:6 पर्यटन स्थळे बंद, दहशतवाद्यांशी लढलेल्या आदिलच्या कुटुंबाला एक वर्षानंतर मिळाले घर

पहलगामची बैसरन दरी. हिरव्यागार दऱ्या आणि गवताळ प्रदेशाने भरलेली. काश्मीरला येणारे पर्यटक येथे नक्की यायचे. बरोबर एक वर्षापूर्वी 22 एप्रिल रोजीही आले होते. तेव्हा जंगलातून तीन दहशतवादी आले आणि 13 मिनिटांत 26 लोकांची हत्या केली. बैसरन दरी ओस पडली. पूर्ण वर्ष उलटले, पण अजूनही ओसाडपणा कायम आहे. येथे आता पूर्वीसारखे पर्यटक येत नाहीत. लोकांना दरी फिरवणारे मार्गदर्शक (गाईड) उद्ध्वस्त झाले. त्यांचे घोडे आणि गाड्याही विकल्या गेल्या. पहलगाममध्ये हल्ला करणारे तिन्ही दहशतवादी मारले गेले, भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानकडून सूड घेतला, पण बैसरन दरीत काहीही बदलले नाही. मुंबईची मुनिजा कुटुंबासोबत काश्मीर फिरायला आल्या, तेव्हा पहलगामलाही पोहोचल्या. त्यांना बैसरन दरीत जायचे होते, पण त्या जाऊ शकल्या नाहीत, कारण हल्ल्यानंतर दरी पुन्हा उघडलीच नाही. पहलगाम हल्ल्यानंतर काय बदलले 1. 48 पैकी 6 पर्यटन स्थळे अजूनही बंद, सुरक्षा मंजुरी मिळाल्यानंतर उघडतील हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये 48 पर्यटन स्थळे बंद करण्यात आली होती. यापैकी 42 पुन्हा उघडण्यात आली. 6 अजूनही बंद आहेत. बैसरन खोऱ्याव्यतिरिक्त चंदनवाडी, गुरेज, अथवटो, बंगस आणि रामकुंडचे सुरक्षा पुनरावलोकन (सिक्युरिटी रिव्ह्यू) सुरू आहे. मंजुरी मिळाल्यानंतर (क्लिअरन्स मिळाल्यानंतर) ती उघडली जाऊ शकतात. दहशतवादी हल्ल्यापूर्वी एप्रिल, जून आणि जुलैमध्ये दररोज 10 हजारांहून अधिक पर्यटक पहलगामला येत होते. आता फक्त 2000 ते 2500 येतात. आता बैसरन घाटी कधी उघडेल, हा प्रश्न आम्ही जम्मू-काश्मीर पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांच्या अधिकाऱ्यांना विचारला. त्यांनी अधिकृतपणे (ऑफिशियली) बोलण्यास नकार दिला, परंतु सांगितले की सध्या येथील सुरक्षा तपासली जात आहे. मंजुरी मिळाल्यानंतरच (क्लिअरन्स मिळाल्यानंतरच) निर्णय घेतला जाईल. 2. घोडेवाले, दुकानदारांच्या ओळखीसाठी QR कोड असलेले कार्ड संवेदनशील पर्यटन स्थळांची यादी तयार करण्यात आली आहे. येथे पर्यटकांच्या थेट संपर्कात येणाऱ्या स्थानिक लोकांची पडताळणी केली जाईल. त्यांना QR कोड असलेले कार्ड दिले जात आहे. ते स्कॅन करताच, त्यांची माहिती, फोन नंबर, आधार नंबर आणि पत्त्याची माहिती मिळेल. याची सुरुवात याच आठवड्यात पहलगाममध्ये झाली आहे. मुंबईहून आलेल्या पर्यटक मुनिजा मोहम्मद मेरीशा सांगतात, ‘पहलगाम हल्ल्यामुळे थोडी घाबरले होते. येथे फिरल्यानंतर भीती नाही. सुरक्षिततेवर काम सुरू आहे. प्रत्येक घोडेवाल्याकडे एक QR कोड आहे. तो स्कॅन केल्यावर आपण योग्य व्यक्तीसोबत फिरायला आलो आहोत हे कळते.’ मुनिजा याचा अनुभव सांगतात, ‘मी एका घोडेवाल्याशी बैसरन घाटीला जाण्याबद्दल बोलत होते. त्याने आपली ओळख पटवण्यासाठी QR कोड दाखवला. तो स्कॅन करताच त्याची संपूर्ण माहिती आली. नाव- मोहिद्दीन मागरे. पत्ता- पहलगाम. फोन नंबर 9469******. आधार नंबर 4491********. व्यवसाय-पोनी मॅन. पोलीस पडताळणी- होय.’ टूरिस्ट गाईड जब्बार अहमद मागरे म्हणतात की, QR कोड सुरू करून सरकारने चांगले काम केले आहे. यामुळे घोडेवाले, कॅमेरावाले आणि दुकानदार यांची योग्य ओळख पटत आहे. आतापर्यंत 165 पेक्षा जास्त घोडेवाल्यांना कार्ड जारी करण्यात आले आहेत. आम्ही सर्वात आधी पर्यटकांना कार्डच दाखवतो. गाडीवाले आणि दुकानदार, सर्वांचे वेगवेगळे QR कोड आहेत. 3. दहशतवाद्यांच्या मदतनीसांविरोधात आरोपपत्र पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ओव्हरग्राउंड वर्कर्सविरुद्ध जम्मू NIA कोर्टात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. खटला सुरू झाला आहे. 1300 पानांच्या आरोपपत्रात हल्ल्याचा कट पाकिस्तानात रचल्याचे पुरावे देण्यात आले आहेत. पाकिस्तानी दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा आणि द रेजिस्टेंस फ्रंटसह 7 आरोपी बनवण्यात आले आहेत. आरोपपत्रात पाकिस्तानी हँडलर सज्जाद जट्टचे नावही आहे. 4. दहशतवाद्यांशी भिडलेल्या आदिलच्या पत्नीला नोकरी, कुटुंबाला घर मिळाले काश्मिरी युवक सय्यद आदिल हुसेन 22 एप्रिल, 2025 रोजी पर्यटकांसोबत बैसरन घाटीत गेले होते. दहशतवाद्यांनी हल्ला केला, तेव्हा ते पर्यटकांना वाचवण्यासाठी एका दहशतवाद्याशी भिडले. त्याची रायफल पकडली. आदिलला दहशतवाद्याने तीन गोळ्या मारल्या. कुटुंबाची जबाबदारी 29 वर्षांच्या आदिलवरच होती. जम्मू-काश्मीर सरकारने त्यांची पत्नी गुलनाज अख्तर यांना सरकारी नोकरी दिली आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या हापतनार गावात घर बांधून दिले आहे. आदिलचा भाऊ नौशाद म्हणतो, 'त्याच्या मृत्यूमुळे आम्हाला दुःख होते, पण त्याहून अधिक अभिमान वाटतो. त्याने दहशतवाद्यांसमोर गुडघे टेकले नाहीत.' टूर ऑपरेटर म्हणाले- EMI भरू शकत नाही, बँकवाले गाडी घेऊन जातील जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरपासून सुमारे 90 किमी दूर पहलगाम आणि पहलगामपासून 6 किमी दूर बैसरन व्हॅली आहे. गवताची मोठी मैदाने, देवदारची घनदाट जंगले, बर्फाच्छादित पर्वतांमुळे ही जागा स्वित्झर्लंडची आठवण करून देते. म्हणूनच याला मिनी स्वित्झर्लंड असे नाव पडले. येथे फक्त घोडेस्वारी करून किंवा ट्रेकिंग करूनच जाता येते. ज्या ठिकाणाहून पर्यटक आपला प्रवास सुरू करत असत, तिथे बरेच घोडे आणि मार्गदर्शक उपलब्ध असत. एक वर्षानंतरही ते भेटले, पण आधीपेक्षा खूप कमी. दरीचा रस्ता दाखवणारा फलकही काढून टाकण्यात आला. पहलगामपासून 2-3 किमी दूर कनहमर्ग आहे. आता मार्गदर्शक लोकांना तिथेच फिरवायला घेऊन जातात. बैसरन व्हॅलीकडे कोणीही जाऊ शकत नाही. टूर ऑपरेटर मोहम्मद शफी सांगतात की, बैसरन व्हॅली पहलगाममधील सर्वात आवडते ठिकाण आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर 8-9 महिने पहलगाम पूर्णपणे बंद होते. दीड-दोन महिन्यांपासून पर्यटक यायला सुरुवात झाली आहे. बैसरन व्हॅलीसोबत चंदनवाडीही बंद आहे. त्यामुळे फक्त 20% पर्यटक येत आहेत. स्थळे बंद असल्यामुळे तेही लवकर परत जातात.’ ‘लवकरच दरी उघडली जाईल असे सांगण्यात आले आहे, पण अजून अंतिम निर्णय झालेला नाही. पोलिस आणि एजन्सींनी संपूर्ण सुरक्षा तपासणी करावी. किमान चंदनवाडी तरी उघडायला हवी. चंदनवाडीत बर्फ असतो. पर्यटक तेच पाहण्यासाठी येतात. आमच्या गाड्यांचे हप्ते बाकी आहेत. जर ही पर्यटन स्थळे उघडली नाहीत, तर हप्ते भरता येणार नाहीत. बँकवाले गाडी घेऊन जातील. चंदनवाडीवर पोलिस चौकी आहे, सैन्य तैनात आहे. ते उघडले जाऊ शकते. बैसरन दरी भले बंद ठेवावी.’ पहलगाममधील पोनी मॅन असोसिएशनचे अध्यक्ष बिलाल अहमद म्हणतात, ‘एक वर्षानंतरही आमचे काम बंद आहे. अनेक लोकांनी आपले घोडे आणि गाड्या विकल्या. काही पर्यटन स्थळे उघडल्याने काम सुरू झाले आहे. रोज 200-500 रुपयांची कमाई होत आहे. आम्ही मागणी करत आहोत की आणखी काही स्थळे उघडली जावीत.’ ‘आता पर्यटक येत आहेत. आम्ही त्यांना इकडे-तिकडे फिरवतो. यामुळे पर्यटक खूश होत नाहीत. ते तर बैसरन दरी आणि चंदनवाडी फिरण्यासाठी येतात. यापैकी कोणतेही उघडले, तर चांगले राहील. येथे आता खूप सुरक्षा आहे. आम्ही लोकही समजलो आहोत की कोणत्या प्रकारचे लोक वाईट आहेत आणि त्यांच्यापासून दूर राहायचे आहे.’ 22 एप्रिल 2025 चा दिवस, जेव्हा बैसरन दरीत हल्ला झाला दुपारी साधारण 2 वाजताची गोष्ट आहे. पर्यटकांचे गट दरीत व्हिडिओ-फोटो शूट करत होते. त्याच वेळी तीन दहशतवादी जंगलातून आले आणि गोळ्या झाडू लागले. पहिली गोळी साधारण 2.20 वाजता चालली. सुरुवातीला कोणालाच समजले नाही की काय झाले आहे. जेव्हा मृतदेह पडू लागले, तेव्हा वाटले की हल्ला झाला आहे. लोक वाचण्यासाठी पळाले, पण त्या मैदानात लपण्याची जागाच नव्हती. हल्ल्यात एकूण 26 लोक मारले गेले. पहलगाम हल्ल्याच्या १५ दिवसांनंतर, भारताने ७ मे रोजी रात्री दीड वाजता पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या ९ ठिकाणांवर हवाई हल्ला केला. भारताने कोटली, बहावलपूर, मुरीदके, बाग आणि मुझफ्फराबादमध्ये हवाई हल्ला केला. यात दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाचे मुख्यालय आणि जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहरचे ठिकाण समाविष्ट आहे. मुझफ्फराबाद ही पाकिस्तानव्याप्त काश्मीरची राजधानी आहे आणि येथूनच दहशतवादी नेटवर्क चालवले जाते. ऑपरेशन सिंदूरमध्ये १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले. यात कंदाहार विमान अपहरण, पठाणकोट आणि संसद हल्ल्यात सामील असलेला अब्दुल रऊफ अजहरचाही समावेश आहे. रऊफ जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मौलाना मसूद अजहरचा भाऊ होता.

दिव्यमराठी भास्कर 22 Apr 2026 7:23 am

मुस्लिमबहुल 6 जिल्ह्यांमध्ये आहेत ममतांचे प्राण:TMCच्या निम्म्या जागा येथूनच; ममतांच्या ‘चिकेन नेक’वर भाजप पकड मजबूत करणार का?

तारीख- २५ फेब्रुवारी २०२६, ठिकाण- पूर्णिया विमानतळ. विमानतळाच्या धावपट्टीवर बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी, केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय, भाजप प्रदेशाध्यक्ष संजय सरावगी यांच्यासह अनेक नेते आणि अधिकारी उभे होते. सायंकाळी सुमारे ५ वाजता बीएसएफचे एक विशेष विमान उतरले. पांढरा कुर्ता-पायजमा आणि गमछा परिधान केलेले गृहमंत्री अमित शाह बाहेर आले. एमआय-१७ व्ही५ हेलिकॉप्टरने शाह थेट किशनगंजला पोहोचले. पुढील तीन दिवस शाह यांनी परिसरातील सर्व जिल्हाधिकारी, एसपी, केंद्रीय दल आणि सुरक्षा यंत्रणांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. २७ फेब्रुवारीच्या सायंकाळी ते दिल्लीला परतले. शाह यांच्या या दौऱ्यानंतर एक कटकारस्थान सिद्धांत (कॉन्सपिरेसी थ्योरी) पसरला की, केंद्र सरकार एक केंद्रशासित प्रदेश बनवण्याच्या तयारीत आहे, ज्यात बिहारच्या सीमांचल भागातील 4 जिल्हे आणि पश्चिम बंगालच्या चिकन नेक किंवा सिलीगुडी कॉरिडॉरमधील 8 जिल्ह्यांचा समावेश असू शकतो. पश्चिम बंगाल निवडणुकीच्या अगदी आधी ममता बॅनर्जींना हरवण्यासाठी ही एक रणनीती आहे, असे म्हटले गेले. ही चर्चा इतकी तीव्र झाली की, प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (पीआयबी) ला याला अफवा ठरवून फेटाळून लावावे लागले. या कटकारस्थान सिद्धांताची (कॉन्सपिरेसी थ्योरीची) सत्यता आणि ममतांच्या खऱ्या चिकन नेकची संपूर्ण कहाणी; जाणून घेऊया आजच्या इलेक्शन एक्सप्लेनरमध्ये… चिकन नेकला केंद्रशासित प्रदेश (UT) बनवण्याची मागणी यापूर्वीही झाली होती उत्तर बंगालमधील ८ जिल्हे त्या भौगोलिक प्रदेशात वसलेले आहेत, ज्याला जग सिलीगुडी कॉरिडॉर किंवा चिकन नेक म्हणून ओळखते. केवळ ४० किमी लांब आणि २२ ते ३० किमी रुंद असलेला हा मार्ग ईशान्येकडील सात राज्यांना भारताच्या उर्वरित भागाशी जोडतो. एका बाजूला नेपाळ, दुसऱ्या बाजूला बांगलादेश आणि फक्त २०० किमी अंतरावर चीन आहे. उत्तर बंगाल वेगळा करण्याची मागणी सर्वप्रथम जून २०२१ मध्ये पुढे आली होती, जेव्हा अलीपूरद्वारचे भाजप खासदार जॉन बारला यांनी म्हटले होते की, या जिल्ह्यांना एकत्र करून केंद्रशासित प्रदेश बनवण्यात यावा. ममतांनी तत्काळ विरोध केला. परंतु स्वतः भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी बारला यांच्यापासून हे सांगत स्वतःला दूर केले की, बंगालचे विभाजन करणे हा आमचा अजेंडा नाही. तीन वर्षांनंतर जुलै 2024 मध्ये, गोड्डाचे भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी लोकसभेत हीच मागणी मोठ्या प्रमाणावर मांडली. झारखंडमधील संथाल परगणातील 6 जिल्हे, बिहारमधील सीमांचलचे 4 जिल्हे आणि बंगालमधील मालदा, मुर्शिदाबादसह उत्तर बंगालचे काही भाग - या सर्वांना एकत्र करून केंद्रशासित प्रदेश (UT) बनवण्याची मागणी केली. यामागे तर्क असा होता की या भागांमध्ये मुस्लिम लोकसंख्या वेगाने वाढत आहे. पण संसदेत यावर चर्चा झाली नाही, ना भाजपने याला अधिकृत भूमिका बनवले. आता 2026 मध्ये बंगाल निवडणुकीच्या अगदी आधी शाह यांच्या सीमांचल भेटीनंतर हीच चर्चा तिसऱ्यांदा समोर आली. उत्तर बंगाल ताब्यात घेतल्याने भाजपला विशेष निवडणुकीचा फायदा नाही राजकीयदृष्ट्या हा भाग सध्या भाजपच्या बाजूने झुकलेला आहे. 2021 मध्ये या 8 जिल्ह्यांमधील 54 जागांपैकी भाजपने 30 आणि टीएमसीने 24 जागा जिंकल्या. 2016 मध्ये येथे डाव्या पक्षांनी 25 जागा जिंकल्या होत्या, परंतु 2021 पर्यंत त्यांची जागा भाजपने घेतली. याचे कारण लोकसंख्याशास्त्र आहे. या 8 पैकी 6 जिल्ह्यांमध्ये हिंदू लोकसंख्या 73-81% च्या दरम्यान आहे. फक्त उत्तर दिनाजपूर आणि मालदामध्ये मुस्लिम लोकसंख्या 50% च्या जवळपास आहे आणि तिथे टीएमसी मजबूत आहे. म्हणजेच, उत्तर बंगालमध्ये भाजपची ताकद आणि टीएमसीची कमकुवतता या दोन्हीचे एकच कारण आहे - लोकसंख्याशास्त्र. पण हे अर्धे चित्र आहे. खरे चित्र दक्षिण बंगालमध्ये आहे. ममतांचा खरा ‘चिकन नेक’ आहेत हे 6 मुस्लिमबहुल जिल्हे पश्चिम बंगालमधील 23 जिल्ह्यांपैकी 6 मुस्लिमबहुल जिल्हे आहेत - मुर्शिदाबाद, मालदा, उत्तर दिनाजपूर, दक्षिण 24 परगणा, उत्तर 24 परगणा आणि बीरभूम. विधानसभेच्या 294 पैकी 118 जागा म्हणजेच 40% जागा याच जिल्ह्यांमध्ये आहेत. 2021 मध्ये टीएमसीने एकूण 215 जागा जिंकल्या होत्या - त्यापैकी 103 म्हणजेच 48% जागा याच 6 जिल्ह्यांमधून आल्या. या जिल्ह्यांमध्ये टीएमसीचा विजय दर 87% राहिला. भाजपला केवळ 14 जागा मिळाल्या. ही केवळ संख्या नाही. हा ममताच्या संपूर्ण निवडणूक गणिताचा पाया आहे. जर हा पाया डगमगला, तर ममताचे सरकार डगमगेल. आणि म्हणूनच या व्होटबँकेला समजून घेणे महत्त्वाचे आहे. 15 वर्षांत टीएमसीचा हा गड कसा बनला? डाव्यांच्या 34 वर्षांच्या राजवटीत मुस्लिम मतदार 'लाल झेंड्या'सोबत होते. दोन घटनांनी हे बदलले… 2011 मध्ये सत्तेत आल्यानंतर ममतांनी हे नाते धोरणांमध्ये बदलले. इमाम आणि मोअज्जिन यांच्यासाठी मासिक भत्ता, ऐक्यश्री शिष्यवृत्तीद्वारे लाखो अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना मदत आणि मुस्लिम जातींना ओबीसीमध्ये समाविष्ट करून आरक्षणाचा लाभ दिला. याशिवाय सांस्कृतिक जवळीक, जसे की - हिजाब घालून इफ्तार पार्टीला जाणे, इस्लामिक प्रार्थना करणे. भाजप याला तुष्टीकरण म्हणते, परंतु मुस्लिम मतदार याला त्यांच्या ओळखीचा सन्मान मानतात. जेव्हा NRC-CAA नंतर असुरक्षितता वाढली, तेव्हा ममतांनी स्वतःला मुस्लिमांची एकमेव ढाल असल्याचे सांगितले. हे कथन इतके मजबूत झाले की 2021 मध्ये भाजपने पूर्ण ताकद लावूनही मुस्लिम मतांमध्ये कोणतीही फूट पडली नाही. पश्चिम बंगालचे ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर मणि तिवारी यांचे मत आहे की, यावेळी SIR मध्ये बरीच नावे वगळण्यात आली आहेत. यामुळे थोडा उलटफेर होऊ शकतो. पण इथे भाजपचा एकतर्फी विजय होणार नाही. जर इथे भ्रष्टाचाराच्या मुद्द्याचा परिणाम झाला असता, तर ममता अनेक वर्षांपूर्वीच हरल्या असत्या. पण हा मुद्दा प्रभावी नाही. उत्तर आणि दक्षिण परगणामध्ये ममताच बऱ्याच अंशी मजबूत राहणार आहेत. त्यामुळे भाजपला ममतांच्या बालेकिल्ल्यात आव्हान देणे अजून सोपे नाही. मात्र, उत्तर बंगालमध्ये भाजप निश्चितच मजबूत राहील.

दिव्यमराठी भास्कर 22 Apr 2026 7:12 am

आजचे एक्सप्लेनर:निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल किती महाग होऊ शकते; इराण युद्धात पाकिस्तानपासून अमेरिकेपर्यंत 44% किमती वाढल्या, भारताने दर कसे रोखले?

इराण युद्ध सुरू झाल्यापासून पाकिस्तानात तेलाच्या दरात 44% आणि चीनमध्ये 31% वाढ झाली आहे. सर्वाधिक पेट्रोल आणि डिझेल उत्पादन करणाऱ्या अमेरिकेतही पेट्रोल 42% महाग झाले आहे. मात्र, भारतात किमती स्थिर आहेत. तेल कंपन्यांना दररोज कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. तरीही किमती वाढवण्यात आलेल्या नाहीत. भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर का वाढत नाहीत? सरकार 5 राज्यांमधील निवडणुका संपण्याची वाट पाहत आहे का? निवडणुकीनंतर दर किती वाढू शकतात? आजच्या एक्सप्लेनरमध्ये जाणून घेऊया... प्रश्न- 1: युद्धादरम्यान जगभरात पेट्रोलच्या किमती वाढत आहेत का?उत्तर : इराण युद्ध सुरू झाल्यापासून जागतिक स्तरावर तेलाची टंचाई आहे. 28 फेब्रुवारी रोजी अमेरिकेने इराणवर हल्ला करण्याच्या एक दिवस आधी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा भाव सुमारे 67 डॉलर प्रति बॅरल होता. युद्धानंतर तो वाढून 120 डॉलर प्रति बॅरल झाला. मार्चमध्ये कच्च्या तेलाचा सरासरी भाव 103 डॉलर प्रति बॅरल होता. यामुळे सुमारे 120 देशांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली. अमेरिकेचे युद्ध सुरू होण्यापूर्वी, म्हणजेच फेब्रुवारीमध्ये, पेट्रोलचा सरासरी दर 2.94 डॉलर प्रति गॅलन, म्हणजे सुमारे 274.54 रुपये होता. एप्रिलमध्ये तो 4.14 प्रति गॅलन, म्हणजे 386.6 रुपयांवर पोहोचला आहे. प्रश्न- 2: मग भारत सरकार दर का वाढवत नाही?उत्तर : सरकारी नियमांनुसार, 2010 पासून पेट्रोल आणि 2014 पासून डिझेलचे नियंत्रणमुक्त करण्यात आले आहे, म्हणजेच त्याचे विक्री दर सरकार नव्हे तर तेल कंपन्यांद्वारे निश्चित केले जातात. कंपन्या कच्च्या तेलाचे दर, रिफायनिंग खर्च, सरकारी कर, इनपुट खर्च आणि त्यांचा स्वतःचा नफा विचारात घेऊन दररोजचे दर निश्चित करतात. तरीही, तेल कंपन्यांद्वारे निश्चित केलेल्या किमतींमध्ये सरकारचा हस्तक्षेप असतो. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन ही सर्वात मोठी सरकारी मालकीची तेल विपणन कंपनी आहे. द प्रिंटनुसार, इंडियन ऑइलने सांगितले होते की किमतींशी संबंधित प्रश्न पेट्रोलियम मंत्रालयाला विचारले पाहिजेत. पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतींचा थेट जनतेवर परिणाम होत असल्याने, या किमतींना मुख्य निवडणूक मुद्दा मानले जाते. त्यामुळे सरकारविरुद्धचा सार्वजनिक रोष रोखण्यासाठी निवडणुकीदरम्यान तेलाच्या किमती नियंत्रणात ठेवल्या जातात. तेलाचे संकट असूनही तेलाच्या किमतींमध्ये वाढ न झाल्याने, हा मुद्दा पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरीमधील विधानसभा निवडणुकांशी जोडला जात आहे. पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदान 29 एप्रिल रोजी आहे, तर सर्व राज्यांचे निकाल 4 मे रोजी जाहीर केले जातील. DCS बँकेच्या कार्यकारी संचालक राधिका राव यांनी गेल्या महिन्यात सांगितले होते की, अधिकारी कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याचा परिणाम सामान्य लोकांवर टाकणे टाळतील. स्थानिक वापर आणि उद्योगांना पाठिंबा देण्याव्यतिरिक्त, राज्य निवडणुकांमुळे सरकारचा दृष्टिकोन संयमित राहील. मात्र, निवडणुकांच्या आसपासच्या महिन्यांत तेलाच्या किमती नियंत्रित करण्याची ही पहिलीच वेळ नाही. इंग्रजी वृत्तपत्र 'द प्रिंट'च्या अहवालानुसार, तेल मंत्रालयाच्या पेट्रोलियम प्लॅनिंग अँड ॲनालिसिस सेल (PPAC) च्या आकडेवारीवरून हे सिद्ध होते की, विधानसभा निवडणुकीपूर्वी तेलाच्या किमती वाढण्यापासून रोखल्या जातात आणि निवडणुकीनंतर त्या वाढतात... आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती वाढूनही किरकोळ दरात वाढ न केल्यामुळे तेल कंपन्यांना नुकसान होते, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती कमी होतात तेव्हाही तेल कंपन्या विक्री किंमत कमी करत नाहीत जेणेकरून त्यांचे नुकसान भरून काढता येईल. प्रश्न- 3 : किंमत न वाढल्याने तेल कंपन्यांना किती नुकसान होत आहे?उत्तर : भारतात पेट्रोलचे दर शेवटचे मे 2022 मध्ये वाढले होते. इराण युद्धामुळे गेल्या 50 दिवसांपासून तेलाचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. तरीही, सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केलेली नाही. मात्र, प्रीमियम पेट्रोलच्या दरात ₹2.35 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. खाजगी पुरवठादार नायरा एनर्जीने मार्चमध्ये पेट्रोलच्या दरात ₹5 आणि डिझेलच्या दरात ₹3 प्रति लिटरने वाढ केली आहे. मात्र, बाजारात सरकारशी संबंधित तेल कंपन्यांचे वर्चस्व आहे, ज्यांनी दरात वाढ केलेली नाही. या तीन कंपन्यांमध्ये प्रामुख्याने इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन यांचा समावेश आहे. मार्चमध्ये या कंपन्यांना दररोज ₹2,400 कोटींचे नुकसान झाले होते. ऑस्ट्रेलियन मल्टीनॅशनल बँकिंग कंपनी मॅक्वेरी ग्रुप लिमिटेडच्या मते, जेव्हा कच्च्या तेलाच्या किमतीत प्रति बॅरल ₹10 ची वाढ होते, तेव्हा भारतीय तेल कंपन्यांना प्रति लिटर ₹6 चे नुकसान होते. जेव्हा कच्च्या तेलाची किंमत $135 ते $165 प्रति बॅरलपर्यंत असते, तेव्हा भारतीय कंपन्यांना पेट्रोलवर ₹18 आणि डिझेलवर ₹35 चे नुकसान होईल. सवल- 4 : जर नुकसान झाले तर सरकार ते कसे व्यवस्थापित करते?उत्तर : भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर निश्चित करण्यासाठी संरचनेचे अनेक स्तर आहेत. कच्च्या तेलाच्या बाजारभावाव्यतिरिक्त सरकारी शुल्क देखील या दरांवर परिणाम करतात. या प्रणालीमुळे असे होते की जेव्हा कच्च्या तेलाच्या किमती वाढतात, तेव्हा सरकार तत्काळ बाजारातील किमती वाढवत नाही. त्याऐवजी, ती आधी उत्पादन शुल्क कमी करते किंवा तेल कंपन्यांना थोड्या काळासाठी नुकसान सहन करण्यास सांगते. हे नुकसान भरून काढण्यासाठी, जेव्हा कच्च्या तेलाच्या किमती कमी होतात, तेव्हा सरकार बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करत नाही. ती तेल कंपन्यांना नफा कमावण्याची परवानगी देते. इराण युद्धानंतरही सरकार अशा प्रकारे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती व्यवस्थापित करते... प्रश्न- 5: तर मग निवडणुकीनंतर भारतात पेट्रोल-डिझेलचे दर वाढू शकतात?उत्तर : राहुल गांधींनी गेल्या महिन्यात X वर एका पोस्टमध्ये म्हटले होते की, निवडणुकीनंतर पेट्रोल, डिझेल आणि LPG चे दर वाढतील. ही फक्त वेळेची बाब आहे. निवडणुकीनंतर जनतेला त्याचे परिणाम भोगावे लागतील. TMC नेते अभिषेक बॅनर्जी यांनी एका रॅलीत केंद्र सरकारला आव्हान दिले होते की त्यांनी पुढील पाच वर्षांपर्यंत पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवणार नाही असे वचन द्यावे. ब्रोकरेज फर्म मॅक्वेरीने भारतात तेलाच्या दरांबाबतच्या एका अहवालात म्हटले होते की, एप्रिलमध्ये निवडणुकीनंतर पेट्रोल पंपावर तेलाचे दर वाढण्याचा धोका आहे. ट्रान्सपोर्टर असोसिएशन, ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे सदस्य शैलेंद्र गुप्ता यांच्या मते, निवडणुकीनंतर डिझेलच्या दरात वाढ केली जाईल. सुमारे 10% ट्रक निष्क्रिय उभे आहेत. जर किमती वाढल्या तर 30% ट्रक बंद स्थितीत उभे राहतील. सध्या निवडणुकीनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात किती वाढ होईल याचा कोणताही निश्चित अंदाज देता येत नाही. तथापि, मॅक्वेरी रिपोर्टनुसार, असे म्हटले जात आहे की निवडणुकीनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सध्याच्या नुकसानीइतकीच वाढ होऊ शकते, म्हणजेच, पेट्रोलसाठी ₹18 प्रति लिटर आणि डिझेलसाठी ₹35 प्रति लिटर. तथापि, असे होण्याची शक्यता कमी आहे कारण पेट्रोल आणि डिझेलच्या दरात इतकी मोठी वाढ यापूर्वी कधीही झाली नाही. ब्रिटिश बहुराष्ट्रीय बँक स्टँडर्ड चार्टर्ड पीएलसीच्या इंडिया इकॉनॉमिक रिसर्चच्या प्रमुख अनुभूती सहाय यांच्या मते, जर कच्च्या तेलाची किंमत सरासरी $95 प्रति बॅरल असेल, तर सरकारला डिझेल आणि गॅसोलीनच्या दरात ₹8 ते ₹15 ची वाढ करावी लागेल. जर कच्च्या तेलाची किंमत सरासरी $85 ते $90 प्रति बॅरल असेल, तरीही पेट्रोलच्या दरात ₹3 ते ₹7 ची वाढ करावी लागेल. प्रश्न- 6 : भाव वाढले तर त्याचा काय परिणाम होईल?उत्तर : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाल्याने सामान्य माणसाच्या घरगुती खर्चावर थेट परिणाम होईल...

दिव्यमराठी भास्कर 22 Apr 2026 6:57 am

आजचे एक्सप्लेनर:निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल किती महाग होणार; इराण युद्धामुळे पाकिस्तानपासून अमेरिकेपर्यंत 44% वाढल्या किंमती, भारताने कसे रोखले

इराण युद्ध सुरू झाल्यापासून, पाकिस्तानात पेट्रोलची किंमत 320 पाकिस्तानी रुपयांवरून 460 रुपयांपर्यंत वाढली आहे, म्हणजेच केवळ 50 दिवसांत जवळपास 44% वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे, अमेरिकेत तेलाच्या किमती 42% आणि चीनमध्ये 31% नी वाढल्या. मात्र, भारतात याच काळात तेलाच्या किमती स्थिर राहिल्या. यामुळे तेल कंपन्यांना दररोज कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. भारतात तेलाच्या किमती का वाढल्या नाहीत? कंपन्या हे नुकसान कसे भरून काढत आहेत? आणि निवडणुकांनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढणार आहेत का? जाणून घ्या आजच्या एक्सप्लेनरमध्ये... प्रश्न 1: इराण युद्धादरम्यान जगभरात पेट्रोलच्या किमती कशा वाढल्या? उत्तर: 27 फेब्रुवारी रोजी इराणवरील हल्ल्याच्या आदल्या दिवशी, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल सुमारे 67 डॉलर होती. युद्धादरम्यान, ती प्रति बॅरल 120 डॉलरपर्यंत वाढली. मार्चमध्ये, कच्च्या तेलाची सरासरी किंमत प्रति बॅरल 103 डॉलर होती. 21 एप्रिल रोजी, ती प्रति बॅरल सुमारे 87 डॉलर होती. यामुळे, जगभरातील सुमारे 120 देशांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवल्या. अमेरिकेत युद्ध सुरू होण्यापूर्वी, फेब्रुवारीमध्ये, गॅसोलीनची सरासरी किंमत प्रति गॅलन 2.94 डॉलर, म्हणजेच अंदाजे ₹274.54 होती. एप्रिलमध्ये, ती प्रति गॅलन 4.14 डॉलर, म्हणजेच ₹386.6 वर पोहोचली. प्रश्न 2: भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती का वाढत नाहीत? उत्तर: सरकारी नियमांनुसार, 2010 पासून पेट्रोल आणि 2014 पासून डिझेलचे दर नियंत्रणमुक्त करण्यात आले आहेत. याचा अर्थ, त्यांचे विक्री दर सरकार नव्हे, तर तेल कंपन्या ठरवतात. कंपन्या कच्च्या तेलाची किंमत, शुद्धीकरण खर्च, सरकारी कर, उत्पादन खर्च आणि स्वतःचा नफा या घटकांचा विचार करून दैनंदिन दर निश्चित करतात. तथापि, तेल कंपन्यांनी ठरवलेल्या दरांमध्ये सरकारचा सहभाग असतो. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन ही सर्वात मोठी सरकारी तेल विपणन कंपनी आहे. 'द प्रिंट' या इंग्रजी वृत्तपत्रातील एका वृत्तानुसार, इंडियन ऑइलने म्हटले आहे की, दरांसंबंधीचे प्रश्न पेट्रोलियम मंत्रालयाकडे निर्देशित केले पाहिजेत. तेलाच्या संकटातही दरवाढ न होण्याचे कारण पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी येथील विधानसभा निवडणुकांशी जोडले जात आहे. पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतींचा थेट परिणाम जनतेवर होत असल्याने सरकारविरोधात जनतेचा रोष टाळण्यासाठी निवडणुकांदरम्यान तेलाच्या किमती नियंत्रणात ठेवल्या जातात. पश्चिम बंगालमध्ये मतदानाचा दुसरा टप्पा 29 एप्रिल रोजी आहे, तर सर्व राज्यांचे निकाल 4 मे रोजी जाहीर होतील. डीबीएस बँकेच्या कार्यकारी संचालक राधिका राव यांनी गेल्या महिन्यात सांगितले, वाढलेल्या कच्च्या तेलाच्या किमतींचा भार सरकार सर्वसामान्यांवर टाकणार नाही. देशांतर्गत वापर आणि उद्योगांना आधार देण्यासोबतच राज्य निवडणुकांमुळे सरकारचा दृष्टिकोन संयमित राहील. मात्र, निवडणुकांच्या आसपासच्या महिन्यांत तेलाच्या किमती नियंत्रित करण्याची ही पहिली वेळ नाही. 'द प्रिंट'मधील एका अहवालानुसार, तेल मंत्रालयाच्या पेट्रोलियम नियोजन आणि विश्लेषण कक्षाच्या (PPAC) आकडेवारीवरून असे दिसून येते की, विधानसभा निवडणुकांपूर्वी तेलाच्या किमती वाढण्यापासून रोखल्या जातात आणि निवडणुकांनंतर त्या कमी केल्या जातात... जून 2017 पासून तेलाच्या किमतींसाठी ‘डायनॅमिक प्राइसिंग सिस्टीम’ लागू आहे, ज्याअंतर्गत पेट्रोल आणि डिझेलच्या किमती दर 15 दिवसांऐवजी दररोज बदलतात. तत्कालीन पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटले होते की, यामुळे किमतींमध्ये पारदर्शकता येईल. 2014 ते 2019 पर्यंत तेलाच्या किमती स्थिर होत्या. त्यामुळे त्या राजकीय शस्त्र बनल्या नाहीत. त्यानंतर, राष्ट्रीय विधानसभा निवडणुकांदरम्यान तेलाच्या किमती नियंत्रित करण्यास सुरुवात झाली. एप्रिल 2019 ते एप्रिल 2020 पर्यंत कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल 53 डॉलरपर्यंत घसरल्या. त्यानंतर, कोविड-19 आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे, डिसेंबर 2022 पर्यंत तेलाच्या किमती प्रति बॅरल 88 डॉलरपर्यंत वाढल्या. एप्रिल 2019 मध्ये, अरुणाचल प्रदेश, आंध्र प्रदेश आणि सिक्कीममध्ये निवडणुकीच्या पाच दिवस आधीपासून ते निवडणुकीपर्यंत किमती स्थिर राहिल्या. नोव्हेंबर 2020 मध्ये, बिहारमध्ये मतदानाच्या 51 दिवस आधीपासून किमती स्थिर राहिल्या आणि मतदानानंतर बदल सुरू झाला. 2021 मध्ये, पश्चिम बंगालमध्ये मतदानाच्या शेवटच्या दिवसाच्या एक महिना आधीपर्यंत तेलाच्या किमती स्थिर राहिल्या आणि मतदानानंतर पाच दिवसांनी किमती वाढू लागल्या. फेब्रुवारी-मार्च 2022 मध्ये उत्तर प्रदेश, गोवा, मणिपूर, पंजाब आणि उत्तराखंडमध्ये निवडणुका झाल्या. उत्तर प्रदेशात, मतदानाच्या बरोबर चार महिने आधीपर्यंत किमती स्थिर राहिल्या. निवडणुकीनंतर केवळ दोन आठवड्यांत किमती बदलू लागल्या. आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमती वाढत असूनही, किरकोळ तेलाच्या किमती न वाढवल्यामुळे तेल कंपन्यांना तोटा होतो. परिणामी, आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमती कमी झाल्यावरही तेल कंपन्या आपला तोटा भरून काढण्यासाठी विक्री किंमती कमी करत नाहीत. प्रश्न 3: किमती न वाढवल्यामुळे तेल कंपन्यांना किती तोटा होत आहे? उत्तर: भारतात तीन प्रमुख पेट्रोलियम कंपन्या आहेत: इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन. मार्च महिन्यात, या कंपन्यांना दररोज ₹2,400 कोटींचा तोटा झाला. मॅक्वेरी ग्रुप लिमिटेड या ऑस्ट्रेलियन बहुराष्ट्रीय बँकिंग कंपनीनुसार, जेव्हा कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल 10 डॉलरने वाढतात, तेव्हा भारतीय तेल कंपन्यांना प्रति लिटर 6 रुपयांचा तोटा होतो. जेव्हा कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल 135 ते 165 रुपयांच्या दरम्यान असतात, तेव्हा भारतीय कंपन्यांना पेट्रोलवर प्रति लिटर 18 रुपये आणि डिझेलवर प्रति लिटर 35 रुपयांचा तोटा होतो. प्रश्न 4: जर भारताला तोटा होत असेल, तर सरकार हे कसे हाताळत आहे? उत्तर: भारतातील पेट्रोल आणि डिझेलची किंमत रचना बहुस्तरीय आहे. कच्च्या तेलाच्या बाजारभावाव्यतिरिक्त, सरकारी शुल्कांचाही या किमतींवर परिणाम होतो... सर्वप्रथम, कच्च्या तेलावर रिफायनरीमध्ये प्रक्रिया करून त्याचे पेट्रोल आणि डिझेलमध्ये रूपांतर केले जाते. डीलर कमिशन प्रति लिटर 2 ते 4 रुपयांपर्यंत असते. त्यानंतर केंद्र सरकार उत्पादन शुल्क आकारते. सध्या, पेट्रोलवर प्रति लिटर 11.9 रुपये आणि डिझेलवर प्रति लिटर 7.8 रुपये उत्पादन शुल्क आहे. मग, राज्य सरकारे व्हॅट (VAT) लावतात. प्रत्येक राज्याद्वारे आकारला जाणारा कर वेगवेगळा असतो. त्यामुळे, मुंबईत पेट्रोलची किंमत ₹103.5, दिल्लीत ₹94.7 आणि भोपाळमध्ये ₹106.6 आहे. या प्रणालीमुळे, जेव्हा कच्च्या तेलाच्या किमती वाढतात, तेव्हा सरकार लगेचच बाजारभाव वाढवत नाही. ते आधी उत्पादन शुल्क कमी करते किंवा तेल कंपन्यांना थोड्या कालावधीसाठी तोटा सहन करण्यास सांगते. हा तोटा भरून काढण्यासाठी, जेव्हा कच्च्या तेलाच्या किमती कमी होतात, तेव्हा सरकार पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करत नाही. ते तेल कंपन्यांना नफा कमावण्याची संधी देते. इराण युद्धानंतरही, सरकार अशाच प्रकारे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती नियंत्रित करत आहे... युद्ध सुरू होण्यापूर्वी, भारत सरकारने पेट्रोलवर ₹21.9 आणि डिझेलवर ₹17.8 चे उत्पादन शुल्क लावले होते. 27 मार्च रोजी, पेट्रोल आणि डिझेल या दोन्हीवरील शुल्क ₹10 ने कमी करण्यात आले. असे असूनही, एप्रिल महिन्यात तेल कंपन्यांना दररोज 1,600 कोटी रुपयांचा तोटा होत आहे. इराण युद्ध सुरू झाल्यापासून, भारत रशियाकडून दररोज सरासरी 1.5 दशलक्ष बॅरल कच्चे तेल आयात करत आहे. हे प्रमाण 2 दशलक्ष बॅरलपर्यंत वाढवले ​​जाऊ शकते. 2019 नंतर प्रथमच भारताने इराणकडून दोन तेल टँकर खरेदी केले. याव्यतिरिक्त, अमेरिका आणि आफ्रिकन देशांकडूनही तेलाची आयात केली जात आहे. मार्च महिन्यात पेट्रोलियम मंत्रालयाने जाहीर केले की, भारत आपल्या गरजेच्या 70% पर्यंत तेल होर्मुझच्या सामुद्रधुनीव्यतिरिक्त इतर मार्गांनी मिळवत आहे. यापूर्वी, भारताला लागणाऱ्या कच्च्या तेलापैकी 45% ते 50% तेल होर्मुझच्या सामुद्रधुनीतून येत असे. भारत सरकारने फेब्रुवारीमध्ये जाहीर केले की, 1 एप्रिलपासून सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिसळले जाईल. याचा अर्थ पेट्रोलमध्ये 20% अल्कोहोल असेल. प्रश्न 5: निवडणुकीनंतर भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढणार आहेत का? उत्तर: राहुल गांधी यांनी गेल्या महिन्यात X वर एका पोस्टमध्ये म्हटले होते, निवडणुकांनंतर पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीच्या किमती वाढतील. ही केवळ काळाची बाब आहे. निवडणुकांनंतर जनतेला त्याचे परिणाम भोगावे लागतील. टीएमसी नेते अभिषेक बॅनर्जी यांनी एका सभेत केंद्र सरकारला पुढील पाच वर्षांसाठी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती न वाढवण्याचे वचन देण्याचे आव्हान दिले. ब्रोकरेज फर्म मॅक्वेरीने भारतातील तेलाच्या किमतींवरील एका अहवालात म्हटले आहे, एप्रिलमधील निवडणुकांनंतर पेट्रोल पंपांवर तेलाच्या किमती वाढण्याचा धोका आहे. सध्या, निवडणुकांनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती किती वाढतील याचा कोणताही अचूक अंदाज देता येत नाही. तथापि, मॅक्वेरीच्या अहवालाच्या आधारे असे म्हटले जात आहे की, निवडणुकांनंतर पेट्रोल आणि डिझेलवरील सध्याचे नुकसान तितक्याच प्रमाणात वाढू शकते, म्हणजेच पेट्रोलसाठी प्रति लिटर ₹18 आणि डिझेलसाठी प्रति लिटर ₹35 पर्यंत. ब्रिटिश बहुराष्ट्रीय बँक स्टँडर्ड चार्टर्ड पीएलसीच्या भारतातील आर्थिक संशोधन विभागाच्या प्रमुख अनुभूती सहाय यांच्या मते, जर कच्च्या तेलाची सरासरी किंमत प्रति बॅरल 95 डॉलर राहिली, तर सरकारला डिझेल आणि पेट्रोलच्या दरात 8 ते 15 रुपयांनी वाढ करावी लागेल. इतकेच नव्हे, तर जर कच्च्या तेलाची सरासरी किंमत प्रति बॅरल 85 ते 90 डॉलर राहिली, तर पेट्रोलच्या दरात 3 ते 7 रुपयांनी वाढ करावी लागेल. प्रश्न 6: किमती वाढल्यास काय परिणाम होईल? उत्तर: पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्याने सर्वसामान्य माणसाच्या घरगुती खर्चावर थेट परिणाम होईल... भारतातील 70% मालवाहतूक ट्रकद्वारे केली जाते, ज्यात डिझेलचा वापर होतो. डिझेलच्या किमती वाढल्यामुळे फळे, भाजीपाला आणि धान्य यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढतील. यामुळे घरगुती खर्चात 10% ते 15% वाढ होऊ शकते. याशिवाय, एलपीजीच्या किमतीतील वाढीचा अधिक मोठा परिणाम होईल. ट्रॅक्टरचा वापर नांगरणी आणि सिंचनासाठीही केला जातो. डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे शेतकऱ्यांसाठी अन्नधान्य पिकवण्याचा खर्च वाढेल, ज्यामुळे सर्वसामान्य माणसाला ते खरेदी करणे अधिक महाग होईल. टॅक्सी चालक, कॅब चालक आणि सार्वजनिक बसचे भाडेदेखील वाढेल. याचा परिणाम ऑनलाइन शॉपिंग आणि फूड डिलिव्हरीच्या शुल्कावरही होईल. लोक पेट्रोल आणि डिझेल वाहनांऐवजी इलेक्ट्रिक वाहनांकडे वळतील. तज्ञांच्या मते, जेव्हा पेट्रोलच्या किमती 10% ते 15% वाढतात, तेव्हा इलेक्ट्रिक वाहनांमधील (EVs) आवड 20% ते 25% वाढते. वाहतूक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना नोकरी गमवावी लागेल. ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस या वाहतूकदार संघटनेचे सदस्य शैलेंद्र गुप्ता यांच्या मते, पेट्रोल आणि डिझेलच्या संकटामुळे 10% वाहने आधीच सेवेबाहेर आहेत. तेलाच्या किमती वाढल्यास 30% वाहने चालू शकणार नाहीत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमुळे महागाई वाढेल. सध्या भारतातील महागाईचा दर 3.7% आहे. पेट्रोलच्या किमती वाढल्या आणि इराण युद्ध सुरूच राहिल्यास, 2027 पर्यंत तो 4.7% पर्यंत पोहोचू शकतो.

दिव्यमराठी भास्कर 22 Apr 2026 6:00 am

अग्रलेख : पावसाचा घोर

एप्रिल महिना संपत आला तसा विविध संस्थांचे हवामान विषयक अंदाज प्रसिद्ध झाले. यंदाच्या पावसाळ्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस (Rain) पडेल असा सगळ्या संस्थांचा सूर आहे.

दैनिक प्रभात 22 Apr 2026 6:00 am

लक्षवेधी : अर्थव्यवस्थेतील आशा-निराशा

होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून असलेले मतभेद संपले नसले, तरीदेखील युद्धाची तीव्रता कमी झाली आहे. या पार्श्वभूमीवर, भारतीय शेअर बाजारात (Share Market) पुन्हा एकदा उत्साह संचारला असून, जागतिक व्यापार पुनश्च सुरळीत होईल, अशी आशा निर्माण झाली आहे.

दैनिक प्रभात 22 Apr 2026 5:30 am

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, २२ एप्रिल २०२६

पंचांगआज मिती वैशाख शुद्ध द्वितीया शके १९४८ षष्ठी.चंद्र नक्षत्र कृतिका. योग आयुष्यमान चंद्र राशी वृषभ भारतीय सौर २ वैशाख शके १९४८. बुधवार दिनांक २२ एप्रिल २०२६. मुंबईचा सूर्योदय ०६.१६ मुंबईचा चंद्रोदय ०७.४०, मुंबईचा सूर्यास्त ०६.५७ मुंबईचा चंद्रास्त ०९.११ राहू काळ ०९.२६ ते ११.०२.श्री नृसिंह नवरात्र आरंभ चांगला दिवसदैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)

फीड फीडबर्नर 22 Apr 2026 12:10 am

Borivali : बोरीवलीतील पंजाबी गल्लीतील डायग्नोस्टीक सेंटर खासगी संस्थेकडे

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :मुंबई महापालिकेच्यावतीने अनेक रुग्णालये खासगी संस्थांना चालवण्यास देण्याचा निर्णय घेतला असून त्यातील बोरीवली पश्चिम येथील पंजाबी गल्लीतील महानगरपालिकेच्या मालकीच्या पंजाबी गल्ली डायग्नोस्टिक्स सेंटर हे आता खासगी संस्थेला चालवण्यास देण्यात येणार आहे. यासाठी क्रस्ना डायग्नोस्टिक्स लिमिटेड या कंपनीला चालवण्यास देण्यात येणार आहे. खासगी सहभाग तत्त्वावर या संस्थेची निवड महापालिकेच्यावतीने करण्यात आली आहे.महानगरपालिकेच्या मालकीचे बोरीवली पश्चिम येथे पंजाबी गल्ली डायग्नोस्टिक्स सेंटर हे प्लॉट क्र. एफपी नं. ११या ठिकाणी असून तळमजला अधिक दोन मजले अशी एकूण २९८३.१४ चौ. मिटर इतक्या क्षेत्रफळाची जागा बांधून तयार आहे. या ठिकाणी सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावर या जागेवर बाह्य रुग्ण विभाग, विविध तपासण्या व चाचण्यासाठी प्रयोगशाळा, डायलेसिस केंद्र, सीटी स्कॅन, एमआरआय स्कॅन महानगरपालिकेने निश्चित केलेल्या व महानगरपालिकेच्या रुग्णांना सध्या लागू असलेल्या दराने सुरू करण्यात येणार आहे.क्रस्ना डायग्नोस्टिक्स लिमिटेड संस्थेला, सर्वसामान्य तसेच अत्याधुनिक बाह्य रुग्ण आणि ओटीपीटी विभाग, मूलभूत सोनोग्राफी आणि मेमोग्राफी (पॅथोलॉजी आणि रेडिओलॉजी) निदान सेवा, सी.टी. आणि एम.आर.आय. स्कॅन ह्या सेवा सुविधा सुरू करण्याकरिता नेमणूक करण्यात आली आहे. पुढील ३० वर्षांकरता या संस्थेची निवड करण्यात आली आहे. यासाठी सस्थेला देण्यात येणाऱ्या जागेसाठी प्रत्येक वर्षी २ कोटी ०५ लाख रुपये एवढे अधिमुल्य आकारले जाणार आहे.बोरीवली या क्षेत्रात पूर्व आणि पश्चिम विभाग मिळून जवळपास २० लाख लोकवस्ती असून यासाठी बोरीवली येथे भगवती रुग्णालयात ११० खाटांचे रुग्णालयात सुरू आहेत. या रुग्णालयात बाह्य रुग्णविभाग, विविध तपासण्या व चाचण्यासाठी सर्व सामान्य तसेच अत्याधुनिक प्रयोगशाळा, सी.टी. स्कॅन, एम.आर.आय स्कॅन या विविध सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही. नजीकच्या काळात बोरीवली (पश्चिम) येथे ४९० रुग्णशय्या असलेले नव्याने भगवती रुग्णालय सुरू होणार आहे. परंतु तोपर्यन्त स्थानिक लोकांना कांदिवली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात उपचार घेण्यासाठी दाखल व्हावे लागतात. या रुग्णालयात डहाणू, ठाणे, वसई-विरार, मिरा-भायंदर या परिसरातील रुग्ण तसेच गोराई, दहिसर, कांदिवली, बोरीवली येथील स्थानिक रुग्णपण उपचारासाठी दाखल होतात. या सुविधा महानगरपालिकेतर्फे देण्यासाठी आवश्यक ते डॉक्टर, परिचारिका व इतर कर्मचारी वर्ग यांची नेमणूक करावी लागते व त्यांच्या आस्थापनेसाठी कायम स्वरूपी खर्च करावा लागतो. वरील उपाय म्हणून सद्यस्थितीत ही या संस्थेची निवड करुन त्यांना जागा देण्याचा निर्णय घेतला आहे.

फीड फीडबर्नर 21 Apr 2026 11:10 pm

Mumbai Indians : मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज! ‘हा’मॅचविनर खेळाडू संघात परतला

आयपीएल २०२६ स्पर्धेत मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) सुरुवातीला यश मिळाले होते, पण त्यानंतर सलग चार सामन्यांत पराभव स्वीकारावा लागला. मात्र, अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्सविरुद्ध झालेल्या सामन्यात मुंबईने दमदार पुनरागमन केले.

दैनिक प्रभात 21 Apr 2026 10:55 pm

Tushar Doshi : तुषार दोशी पुन्हा अडचणीत? नव्या कारनाम्याने पोलीस दलात खळबळ

Tushar Doshi : सांगलीचे नूतन एसपी तुषार दोशी यांनी साताऱ्यातून बदली होताना नियमबाह्य बदल्या केल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.

दैनिक प्रभात 21 Apr 2026 10:35 pm

Latur News : लातूरमध्ये उष्माघाताचा तीव्र झटका; शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !

शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे त्यांना उष्माघाताचा तीव्र झटका बसला, जो त्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरला आहे.

दैनिक प्रभात 21 Apr 2026 10:32 pm

Nari Shakti : संसदेत ३३ टक्के महिला आरक्षण मिळेपर्यंत हा लढा थांबणार नाही!

वरळीतील ‘जन आक्रोश’ मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांना इशारामुंबई : महिला आरक्षण विधेयकाला विरोध करून विरोधकांनी आपला संविधानविरोधी आणि महिलाविरोधी चेहरा उघडा पाडला आहे. हे विधेयक केवळ तांत्रिक कारणास्तव थांबले असले, तरी महिलांची ही लढाई आता थांबणार नाही. ज्या दिवशी संसदेत आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये ३३ टक्के महिला लोकप्रतिनिधी म्हणून बसतील, त्याच दिवशी हा लढा यशस्वी झाला असे आम्ही मानू, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी येथे दिला.https://www.youtube.com/watch?v=eraKtSoPHugलोकसभेत महिला आरक्षण विधेयकाला विरोधी पक्षांनी केलेल्या विरोधाचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पक्षातर्फे वरळी येथे भव्य 'जन आक्रोश महिला संमेलना'चे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनात हजारो महिलांनी सहभाग नोंदवून राहुल गांधी आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या मेळाव्याला भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमित साटम, महापौर रितू तावडे यांच्यासह अनेक मंत्री व पदाधिकारी उपस्थित होते.मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळापासून महिलांना आरक्षण देण्याचा प्रयत्न झाला, मात्र काँग्रेसची नीती नेहमीच अडवणुकीची राहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक निर्णय घेऊन हे विधेयक आणले, पण आपली राजकीय दुकानदारी बंद होईल या भीतीने विरोधकांनी त्याला खो घातला. आता गप्प बसून चालणार नाही. ज्यांना नारीशक्तीचे वावडे आहे, त्यांची झोप उडवण्यासाठी राज्यातील एक कोटी महिलांच्या सह्यांची मोहीम राबवली जाईल. या सह्यांचे निवेदन राहुल गांधी आणि आघाडीच्या नेत्यांना पाठवून महिलांचा संताप त्यांच्यापर्यंत पोहोचवला जाईल.'विरोधकांनी महिलांच्या स्वप्नांचा चक्काचूर केला'भाजप महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनीही आपल्या भाषणात विरोधकांवर सडकून टीका केली. भाषणामध्ये महिला सक्षमीकरणाच्या बाता मारायच्या आणि प्रत्यक्ष कृतीची वेळ आली की पळ काढायचा, ही विरोधकांची जुनी खोड आहे. या विधेयकाला विरोध करून त्यांनी केवळ कागदावरच्या तरतुदीला नव्हे, तर कोट्यवधी महिलांच्या स्वप्नांचा चक्काचूर केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनंतर महिलांचा खऱ्या अर्थाने विचार मोदीजींनी केला, मग विरोधकांच्या पोटात का दुखले? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

फीड फीडबर्नर 21 Apr 2026 10:30 pm

'स्थानिक माथाडी भूमिपुत्रांना रोजगारात प्राधान्य द्या'

मुंबई :राज्यात कुठल्याही आस्थापनेत माथाडी कामगारांची आवश्यकता असल्यास त्या ठिकाणी स्थानिक माथाडी भूमिपुत्र असलेल्या कामगारांना रोजगारात प्राधान्य द्यावे, असे निर्देश कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर यांनी दिले. मंत्रालयात दापिवली (ता पनवेल जि. रायगड) येथील मे. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन या आस्थापनेत स्थानिक माथाडी कामगारांना माथाडी स्वरूपाचे काम मिळण्याबाबत आयोजित बैठकीत बोलत होते. बैठकीला आमदार महेश बालदी, आमदार प्रशांत ठाकूर, अपर मुख्य सचिव आय. ए. कुंदन, कामगार आयुक्त एच.पी तुम्मोड, उपसचिव स्वप्नील कापडणीस, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनचे अधिकारी, माथाडी बोर्डाचे अधिकारी उपस्थित होते.कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर म्हणाले, स्थानिक भूमिपुत्र माथाडी कामगारांना रोजगाराच्या हक्कापासून वंचित ठेवले जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या शासन निर्णयाप्रमाणे ८० टक्के भूमिपुत्रांना रोजगार दिला पाहिजे. या शासन निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करावी. बीपीसीएल कंपनीने आपल्या मालवाहतूकदारांच्या माध्यमातून नवीन माथाडी कामगारांची मागणी करावी. ही मागणी माथाडी बोर्डाने तत्काळ मान्य करीत नवीन स्थानिक माथाडी भूमिपुत्रांना रोजगार द्यावा. तसेच अशा कंपन्यांना माथाडी बोर्डाकडे माथाडी कामगारांची मागणी करण्यासाठी नोंदणी करण्याची तरतूद करण्यात यावी.स्थानिकांवर अन्याय होऊ नये किंवा त्यांना रोजगाराच्या संधींपासून डावलले जाऊ नये. स्थानिकांना डावलल्यास ही बाब कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही कामगार मंत्री फुंडकर यांनी दिला. स्थानिक तरुणांच्या रोजगाराच्या मागण्यांचे गांभीर्य लक्षात घेता, कंपन्यांशी तातडीने समन्वय साधावा. नियमानुसार स्थानिक तरुणांना रोजगारात सामावून घेण्यासाठी जे प्रयत्न आवश्यक आहेत, ते प्राधान्याने करावेत, असेही कामगार मंत्री यांनी सांगितले.

फीड फीडबर्नर 21 Apr 2026 10:30 pm

Mumbai : मौलाना शौकत अली मार्गावरील अनधिकृत फर्निचर विक्रेत्यांवर कारवाई, चालवला बुलडोझर

मुंबई(विशेष प्रतिनिधी) :मुंबई महापालिकेच्या ‘ई’ विभाग अंतर्गत मौलाना शौकत अली मार्गावरील जुने फर्निचर विक्रेत्‍यांवर तसेच इतर अतिक्रमणांवर महानगरपालिकेच्या ‘ई’ विभागाकडून कारवाई करण्यात आली. उपायुक्त (परिमंडळ १) चंदा जाधव यांच्या मार्गदर्शनात आणि सहायक आयुक्त आनंद कंकाळ यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.‘ई’ विभागातील मौलाना शौकत अली मार्गावर विशेषत: मुरली देवरा नेत्र रूग्‍णालयापासून ते जे. जे. रुग्णालय सिग्नलपर्यंतच्‍या परिसरात अतिक्रमण झाल्यामुळे पादचा-यांना चालताना अडथळा निर्माण होत होता. पादचा-यांना रस्त्यावरून चालावे लागत होते. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला होता. ही परिस्थिती लक्षात घेऊन महानगरपालिकेच्या ‘ई’ विभागातील परिरक्षण आणि अतिक्रमण निर्मूलन पथकांनी मुंबई पोलिसांच्या सहकार्याने संयुक्तपणे मोहीम राबवली.या कारवाईदरम्यान फर्निचर विक्रेत्यांवर धडक व कठोर कारवाई करण्यात आली. पदपथांवर अस्ताव्यस्त पसरलेले जुने फर्निचर जेसीबीच्या सहाय्याने जागेवरच नष्ट करण्यात आले. त्याचबरोबर तोडलेल्या फर्निचरांचा कचरा तात्काळ हटविण्यात आला. पदपथावरील सर्व अतिक्रमणे दूर करण्यात आली. तसेच परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांवरही निष्कासनाची कारवाई करण्यात आली. त्यामुळे रस्ता पूर्णपणे वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.या मोहिमेत १ जेसीबी, ४ मजूर, ३ अधिकारी आणि २ अभियंते सहभागी होते. तसेच, नागपाडा पोलीस ठाण्याचे ९ अंमलदार बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते. दरम्यान, अनधिकृत बांधकामे आणि अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात नियमितपणे कारवाई सुरू राहील, असे महानगरपालिकेच्या ‘ई’ विभागाद्वारे या निमित्ताने पुन्हा एकदा स्पष्ट करण्यात येत आहे.

फीड फीडबर्नर 21 Apr 2026 10:30 pm

Masur News : मसूरमध्ये अन्नसुरक्षा विभागाचा छापा! ७८ हजारांचा गुटखा जप्त; पान शॉप चालकावर गुन्हा दाखल

Masur News : कराड तालुक्यातील मसूर येथे २१ एप्रिल रोजी अन्नसुरक्षा विभागाने सागर पान शॉपवर कारवाई करून ७८,९६६ रुपयांचा गुटखा जप्त केला.

दैनिक प्रभात 21 Apr 2026 10:02 pm

Maharashtra Rain Alert : उन्हाच्या तडाख्यात पावसाची हजेरी.! राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा

एकीकडे उन्हाचा चटका वाढत असतानाच, दुसरीकडे अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने धास्ती वाढवली आहे.

दैनिक प्रभात 21 Apr 2026 9:59 pm

John Ternus : अ‍ॅपलचे सीईओ टिम कुक पायउतार होणार; जॉन टर्नस सूत्रे घेणार हाती

आयफोन बनवणार्‍या अ‍ॅपलने कंपनीतील मोठ्या फेरबदलाची घोषणा केली आहे. सीईओ टिम कुक पायउतार होणार असून ते दीर्घकाळ हार्डवेअर प्रमुख असलेल्या जॉन टर्नस (John Ternus) यांच्याकडे सूत्रे सोपवणार आहेत.

दैनिक प्रभात 21 Apr 2026 9:40 pm

Ashok Kharat : भोंदूबाबाचा पाय आणखी खोलात.! अशोक खरात विरोधात ‘हा’गुन्हा दाखल

इतर गुन्ह्यांच्या संदर्भात आधीच पोलीस कोठडीत असलेल्या खरातवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

दैनिक प्रभात 21 Apr 2026 9:22 pm

Reva Diamond : रेवा डायमंडची अक्षय्य तृतीयेला जोरदार विक्री; महसूलात वार्षिक पातळीवर 2.67 पट वाढ

पु ना गाडगीळ आणि सन्स समूहाच्या 190+ वर्षांच्या परंपरेचा वारसा लाभलेल्या रेवा डायमंड (Reva Diamond) या प्रमाणित नैसर्गिक डायमंड ज्वेलरी ब्रँडने, यंदाच्या अक्षय्य तृतीया (19 एप्रिल 2026) निमित्त उत्कृष्ट विक्री कामगिरी नोंदवत आर्थिक वर्ष 2026-27 ची दमदार सुरुवात केली आहे.

दैनिक प्रभात 21 Apr 2026 9:21 pm

Maharashtra Politics : मोठा ट्विस्ट..! विधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस उमेदवार देणार; ‘या’नावाची जोरदार चर्चा

Maharashtra Politics : महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक होत आहे. महायुती ८ जागांवर दावा करत असतानाच काँग्रेस आणि ठाकरे गटात एका जागेसाठी संघर्ष सुरू झाला आहे.

दैनिक प्रभात 21 Apr 2026 9:17 pm

Devendra Fadnavis : पंढरपूर विकास आराखड्याच्या कामास गती द्या.! मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश

पालखी मार्गावरील विकास कामे पूर्ण करण्यात येत असून यावर्षी वारकऱ्यांना कोणत्याही अडचणी येणार नाहीत, याची दक्षता घेतली आहे.

दैनिक प्रभात 21 Apr 2026 9:10 pm

Bihar Politics : नारी शक्ती अधिनियमाला विरोध करणाऱ्या खासदाराचे धक्कादायक वक्तव्य, महिलांचे राजकीय करिअर बेडपासून...

बिहारमधील एका अपक्ष खासदाराच्या वक्तव्याने संपूर्ण राजकारण तापलं आहे. नुकताच त्यांनी राजकारणातील महिला आणि त्यांच्या वर्तनाबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. त्यांच्या या विधानाचा संपूर्ण देशातून विरोध केला जात आहे. याप्रकरणी बिहार राज्य महिला आयोगाने त्यांना नोटीस बजावली असून आयोगाने खासदाराकडून त्यांच्या विधानाचे स्पष्टीकरण मागवले आहे.जाणून घ्या नेमकं प्रकरण :बिहारचे पूर्णियाचे खासदार पप्पू यादव यांनी राजकारणात कार्यरत असलेल्या महिलांसंदर्भात अत्यंत आक्षेपार्ह विधान केले होते. त्यांनी असा दावा केला आहे की, तडजोडीशिवाय देशाच्या राजकारणात महिलांना पुढे जाणे जवळजवळ अशक्य झाले आहे आणि त्यांच्या सुरक्षेला गांभीर्याने घेतले जात नाही. प्रसारमाध्यमांशी बोलताना पप्पू यादव म्हणाले की, भारतीय समाजात महिलांना देवी मानले जात असले तरी, वास्तव याच्या अगदी उलट आहे.पप्पू यादव यांच्या मते, राजकारणातील बहुतेक महिला आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात प्रभावशाली लोकांच्या वैयक्तिक वर्तुळातून करतात. त्यांनी असा आरोप केला की, सत्तेच्या वर्तुळात महिलांचे शोषण खोलवर रुजलेले आहे. पप्पू यादव म्हणाले की, कटू सत्य हे आहे की ९०% महिलांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात ही राजकारण्यांच्या बिछान्यातूनच होते. एखाद्या प्रभावशाली नेत्याच्या खोलीत प्रवेश केल्याशिवाय महिला राजकारणात येऊ शकत नाहीत.https://prahaar.in/2026/04/19/dmk-and-congress-did-not-allow-womens-reservation-bill-to-be-passed-amit-shah/या प्रकरणाची स्वतः दखल घेऊन, बिहार राज्य महिला आयोगाने खासदार पप्पू यादव यांना त्यांच्या वक्तव्यासंदर्भात नोटीस बजावली असून त्यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली आहे. तसेच त्यांना तीन दिवसांच्या आत नोटीसला उत्तर देण्यास सांगितले आहे.मोठ्या संख्येने राजकारणी अश्लील गोष्टी पाहतात :पुढे बोलताना पप्पू यादव यांनी राजकारण्यांच्या चारित्र्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की, संसद आणि राज्य विधानसभांमधील अनेक प्रतिनिधी महिलांना आदराने वागवत नाहीत. ते असेही म्हणाले की, मोठ्या संख्येने राजकारणी अश्लील गोष्टी पाहतात आणि याची पडताळणी करण्यासाठी त्यांच्या मोबाईल फोनची तपासणी केली पाहिजे.https://prahaar.in/2026/04/18/defeat-of-the-nari-shakti-vandan-adhiniyam-is-an-insult-to-women/नारी शक्ती वंदन कायदा म्हणजे फक्त एक राजकीय खेळी :पप्पू यादव यांनी महिला आरक्षणाबाबतच्या केंद्र सरकारच्या हेतूंवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, याला केवळ एक राजकीय खेळी म्हटले आहे. त्यांनी नारी शक्ती वंदन कायद्याला केवळ एक राजकीय खेळी म्हटले आणि सरकारकडे पूर्ण बहुमत असताना हा कायदा आधी का आणला नाही, असा प्रश्न विचारला. त्यांच्या मते, या कायद्यात मागासवर्गीय, अत्यंत मागासवर्गीय, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती आणि अल्पसंख्याक महिलांसाठी स्वतंत्र तरतुदींचा समावेश असलाच पाहिजे, अन्यथा त्याचे फायदे केवळ श्रीमंतांपुरतेच मर्यादित राहतील.

फीड फीडबर्नर 21 Apr 2026 9:10 pm

Kerala Massive Explosion : फटाक्यांच्या गोदामात भीषण स्फोट; ६ जणांचा मृत्यू

केरळच्या त्रिशूर जिल्ह्यातील मुंडाथिकोड गावात फटाक्यांच्या गोदामात भीषण आग आणि स्फोटाची घटना घडली आहे. या दुर्घटनेत किमान ६ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.ही घटना वडक्कनचेरी नगरपालिकेअंतर्गत येणाऱ्या मुंडाथिकोड गावात घडली. येथे आगामी २६ एप्रिल रोजी होणाऱ्या प्रसिद्ध त्रिशूर पूरम उत्सवासाठी फटाके आणि कच्चा माल एका शेडमध्ये साठवून ठेवण्यात आला होता. केरळ राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून मिळालेल्या माहितीनुसार, घटनास्थळावरून १३ जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. जखमींपैकी ५ जणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तर २ जणांना रुग्णालयातील वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे. तसेच १७ जणांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत.प्राथमिक अहवालानुसार, स्फोट इतका तीव्र होता की त्याचे धक्के अनेक किलोमीटरपर्यंत जाणवले आणि काहींनी तो भूकंप असल्याचा समज केला. या दुर्घटनेत ४० हून अधिक लोक भाजले गेले असून अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे.https://prahaar.in/2026/04/21/bihar-politics-shocking-statement-by-mp-opposing-nari-shakti-act-womens-political-career-starts-from-the-bed/घटनेनंतर परिसरातील रुग्णालयांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून बचावकार्य वेगाने सुरू आहे. हे फटाक्यांचे गोदाम तिरुवंबाडी देवासम यांच्याशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. तसेच, येथे सुरक्षा नियमांची तपासणी सुरू करण्यात आली आहे.प्रशासनाने या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे संकेत दिले आहेत.

फीड फीडबर्नर 21 Apr 2026 9:10 pm

Baramati : बारामतीच्या सभेत मुख्यमंत्र्यांनी केला अजित पवारांच्या कार्याचा गौरव, सुनेत्रा पवारांसाठी केला जोरदार प्रचार

बारामती : अजित पवारांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात २३ एप्रिल रोजी पोटनिवडणूक होणार आहे. या पोटनिवडणुकीसाठी बारामतीत महायुतीने सभा घेतली. या सभेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बारामतीत आले होते तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बारामतीत सुनेत्रा पवारांचा प्रचार केला. अजित पवारांची चुलत बहीण या नात्याने खासदार सुप्रिया सुळे यांनीही सुनेत्रा पवारांसाठी प्रचार केला. शरद पवारांनी तब्येतीच्या कारणास्तव प्रचार करणे टाळले पण बारामतीकरांना सुनेत्रा अजित पवार यांना मतदान करण्याचे आवाहन केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनीही सुनेत्रा पवारांसाठी प्रचार केला.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारसभेत बोलताना अजित पवारांच्या कार्याचा गौरव केला. आठवणींना उजाळा दिला आणि सुनेत्रा पवारांना मतदान हीच अजित पवारांना खरी श्रद्धांजली असल्याचे भावनिक आवाहन बारामतीकरांना केले. एकनाथ शिंदेंनीही कामाचा माणूस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अजित पवारांच्या कार्याचा गौरव केला. आठवणींना उजाळा दिला आणि सुनेत्रा पवारांना मतदान करण्याचे आवाहन बारामतीच्या मतदारांना केले.काल शरद पवारांनी फोन करून आघाडीचा पाठिंबा सुनेत्रा पवारांनाच असल्याचे सांगितले, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीच्या प्रचारसभेत दिली. सभेत बोलताना सुनेत्रा पवारांना जाहीर केलेल्या पाठिंब्यासाठी मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांचे जाहीर आभार मानले. सुनेत्रा पवार विक्रमी मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रचारसभेत बोलताना व्यक्त केला. अजित पवारांप्रमाणेच सुनेत्रा पवारही ठामपणे राज्याच्या विकासाचा गाडा ओढतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.प्रचारसभेवेळी अजित पवारांवील एक छोटी फिल्म दाखवण्यात आली. ही फिल्म बघताना सुनेत्रा पवारांचे अश्रू दाटून आले होते. अजित पवारांनी बारामतीच्या तीन पिढ्यांना एका कुटुंबासारखं जपलं. राज्याचं काम करणाऱ्या अजित पवारांनी बारामतीविषयीची आपुलकी कायम जपली. अशा या दादा माणसाच्या आकस्मिक जाण्यानं बसलेल्या धक्क्यातून सावरण्यासाठी जशी कुटुंबानं, दोन्ही मुलांनी साथ दिली तशी बारामतीकरांसह पूर्ण राज्यानंही काळजी घेतली. सर्वांनीच माझ्यावर आणि मुलांवर मुलांवर भरभरून प्रेम केले, असे सांगताना राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार भावुक झाल्या होत्या. अजित पवार यांच्या विचारांना उजाळा देताना त्यांच्यासारखेच काम करून दाखवेन, असा विश्वास व्यक्त करत मी संघर्ष योद्ध्याची सहचारिणी असल्याचे सुनेत्रा पवार म्हणाल्या.शरद पवार आजारीशरद पवारांनी तब्येत बरी नसल्यामुळे सुनेत्रा पवारांसाठी प्रचार करणे टाळले. पण बारामतीकरांना सुनेत्रा अजित पवार यांना मतदान करण्याचे आवाहन केले. सध्या शरद पवार रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांनी तब्येत साथ देत नसल्यामुळे इतक्यात बारामतीत येणे शक्य नाही पण बारामतीकरांनी सुनेत्रा पवारांची साथ सोडू नये असे भावनिक आवाहन केले आहे.

फीड फीडबर्नर 21 Apr 2026 9:10 pm

Donald Trump : आता युद्धविराम नाही! डोनाल्ड ट्रम्प यांचा मुदतवाढ देण्यास नकार

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणला कडक इशारा दिला असून, येत्या बुधवारापर्यंत दोन्ही देशांमध्ये कोणताही करार झाला नाही, तर इराणवर थेट हल्‍ला करण्याची धमकी दिली आहे.

दैनिक प्रभात 21 Apr 2026 9:09 pm

Tarapur MIDC : तारापूर औद्योगिक क्षेत्रात चाललंय काय ? अहवाल सादर करण्याचे विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे निर्देश

मुंबई : तारापूर औद्योगिक क्षेत्रातील घातक रासायनिक द्रव स्वरुपातील गैरप्रकाराबद्दल औद्योगिक भूखंडाची प्रत्यक्ष पाहणी करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले आहेत.विधानभवनामध्ये तारापूर औद्योगिक क्षेत्रातील भूखंड क्र८ डी./१ येथे सडेकर इनव्हायरो इंजिनीअर्स प्रा. लि. यांनी अवैधरित्या व बेकायदेशीरपणे घातक रासायनिक द्रव स्वरुपातील गैरप्रकाराची विल्हेवाट लावल्याबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते.औद्योगिक भूखंडाचा करार एमआयडीसीने २०१५ व २०२० मध्येच रद्द केला असतानाही कंपनीकडून बेकायदेशीरपणे काम सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच, उच्च रासायनिक घटक (High COD) असलेले सांडपाणी थेट नाल्यात व समुद्रात सोडले जात असल्याची तक्रार समोर आल्याने या प्रकरणात सविस्तर माहिती घेण्याकरिता प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

फीड फीडबर्नर 21 Apr 2026 8:10 pm