D Mart Girl Suicide : डी-मार्टमध्ये काम तरुणीने केले विष प्राशन; प्रेमप्रकरणातून टोकाचे पाऊल
D Mart Girl Suicide : कामावर असताना गुपचूप विष प्राशन केले; दुसऱ्या दिवशी रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान मृत्यू.
PCMC News : आयुक्तांचे आदेश धाब्यावर! स्मार्ट सिटीचे हस्तांतरण रखडले; नेत्यांना ‘संचालक’पदाचा मोह?
PCMC News : महापालिकेचा हिस्सा आणि वाढीव खर्चाचा बोजा; यंत्रणा कालबाह्य झाल्याने कोटींच्या प्रकल्पांचे भवितव्य अंधारात.
Koyna Dam Accident : पोहण्याचा मोह जीवावर बोतला! कोयना धरणात तरुणाचा बुडून मृत्यू; नेमकं काय घडलं?
Koyna Dam Accident : महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांनी केले मृत घोषित; कोयना जलाशयाजवळ पर्यटनासाठी आलेल्या तरुणावर काळाचा घाला.
दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ०७ एप्रिल २०२६
पंचांगआज मिती चैत्र कृष्ण प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र चित्रा योग हर्षण. चंद्र राशी तूळ भारतीय सौर १७ चैत्र शके १९४८. मंगळवार दिनांक ७ एप्रिल२०२६. मुंबईचा सूर्योदय ०६.२८ मुंबईचा चंद्रोदय ०८.०३ , मुंबईचा सूर्यास्त ०६.५३ मुंबईचा चंद्रास्त ०७.०५. राहू काळ ११.०७ ते १२.४० . जेष्ठा वर्जदैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)
Shivendrasinhraje Bhosale : 'मास'च्या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात; ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते धैर्यशील भोसले यांना नियुक्तीपत्र.
Wai News : जिल्हा परिषद सभापती निवडीत भाजपला साथ दिल्याचा आरोप; पुतळा दहन करत व्यक्त केला तीव्र निषेध.
KKR vs PBKS : यष्टीरक्षकाने स्टंप सोडून गोलंदाजालाच मारलाच चेंडू, नेमकं काय घडलं, पाहा VIDEO
KKR vs PBKS : पावसाच्या व्यत्ययापूर्वी पंजाबचा वेगवान गोलंदाज झेव्हियर बार्टलेटने आपल्या एकाच षटकात केकेआरच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले.
Opinion Poll 2026: बंगाल ते केरळ… कुठे कोणाचे सरकार? सर्वेक्षणातील धक्कादायक अंदाज
Opinion Poll 2026:
Riyaz Ganji : फॅशन डिझायनर रियाझ गांजीविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी
प्रसिद्ध लिबास ब्रँडचे फॅशन डिझायनर रियाझ गांजी (Riyaz Ganji) यांच्याविरुद्ध मालमत्तेची माहिती उघड न केल्याचा आणि देणी थकवल्याचा आरोप करणाऱ्या एका अवमान याचिकेच्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे.
Maharashtra Crime : महाराष्ट्र हादरला..! ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्याला संपवलं; राजकीय वर्तुळात खळबळ
Maharashtra Crime : नांदेडमध्ये ठाकरे सेनेचे युवा नेते सोनू कल्याणकर यांची हत्या करण्यात आली आहे.
Gold-Silver Rates: सोने-चांदी दरात जोरदार वाढ !
Gold-Silver Rates: दिल्ली सराफात सोन्याचा दर 2,300 रुपयांनी म्हणजे 1.52 टक्क्यांनी वाढवून 1 लाख 53 हजार 800 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. चांदीचा दर...
Pune News : विमाननगरमधील अवैधरित्या सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर गुन्हे शाखेचा छापा
विमाननगर येथील ॲटलान्टिस रुफ टॉप लाऊंज हॉटेलमध्ये अवैधरित्या सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर गुन्हे शाखेच्या (Pune News) अमली पदार्थ विरोधी दोनच्या पथकाने छापा टाकला.
RBI MPC Meeting: तेलदरवाढीचा महागाईवर दबाव; व्याजदर ‘जैसे थे’ ठेवण्याची शक्यता
RBI MPC Meeting: खनिज तेलाचे दर 70 डॉलर वरून 110 डॉलर पर्यंत वाढले आहेत.
दिल्ली वार्ता : राघव चढ्ढा विरुद्ध आप
Raghav Chadha : केंद्र सरकारविरूद्ध उगारलेली तलवार राघव चढ्ढा यांनी म्यान केली म्हणून पक्षाने त्यांच्यावर कारवाई केली. मात्र, चढ्ढा यांनी अशी मवाळ भूमिका का घेतली? हा खरा संशोधनाचा विषय आहे.
मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ८०० कोटी रुपयांच्या अंतर्गत फेरफारीसह स्थायी समितीत मंजुर
मुंबई: मुंबई महापालिकेचा सन २०२६-२७च्या अर्थसंकल्पाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. तब्बल ८०० कोटी रुपयांच्या अंतर्गत निधीची अदलाबदल करत या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. प्रशासनाने सादर केलेल्या अर्थसंकल्पाच्या रकमेशी समतुल्य राखत या अंतर्गत निधीचा फेरफार करण्यात आला असून आता नगरसेवकांनी सूचवलेल्या कामांसाठी या ८०० कोटी रुपयांच्या निधींची तरतूद केली जाणार आहे. त्यामुळे स्थायी समितीच्या स्तरावर किती आणि महापालिका स्तरावर किती कोटी रुपयांची तरतूद केली जाते याकडे सर्वांचे लक्ष आहे.मुंबई महापालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी यांनी २५ फेब्रुवारी २०२६ रोजी सन २०२६-२७ या वर्षांकरता तब्बल ८०,९५२.५६ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प महापालिका स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांना सादर केला होता. तब्बल ८९.८४ कोटी रुपये शिलकीच्या या अर्थसंकल्पांवर मागील काही दिवसांपासून चर्चा सुरु होती. एकूण ६ तास ४७ मिनिटे चर्चा झालेल्या अर्थसंकल्पावर १६ सदस्यांनी भाग घेतला. त्यामुळे प्रशासनाने सादर केलेल्या अर्थसंकल्पाच्या एकूण आकाराच्या ८०० कोटी रुपयांच्या निधीची अंतर्गत फेरबदल करत नगरसेवकांनी सूचवलेल्या कामांसाठी तरतूद केली जाणार आहे. यासाठी स्थायी समितीच्या बैठकीत अर्थसंकल्पाच्या अ आणि ब करता केलेल्या निधीपैंकी ८००कोटी रुपये अंतर्गत वळते करण्यात आले आहे तर अर्थसंकल्प ग अंतर्गत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे आता स्थायी समितीच्या सभेत ८०० कोटी रुपयांच्या अंतर्गत फेरफारांतर्गत प्राप्त होणाऱ्या निधीचे वाटप स्थायी समिती आणि महापालिका स्तरावर महापौरांच्या माध्यमातून केली जाणार आहे. त्यामुळे आता स्थायी समितीच्या स्तरावर सुमारे ६५० कोटी रुपये आणि महापालिका स्तरावर १५० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद नगरसेवकांनी सूचवलेल्या कामांसाठी केली जाणार आहे.महापालिका स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी याबाबत बोलतांना स्पष्ट केले आहे की, अर्थसंकल्पात ८०० कोटी रुपयांची वाढ केली असून ज्या ज्या नगरसेवकांनी आपल्या विभागातील विकासकामांसाठी निधीची मागणीची पत्रे दिली आहे त्या पत्रांचा विचार केला जाईल. विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनाही निधी देण्याचा विचार केला जाईल,असे त्यांनी स्पष्ट केले. महापालिकेच्या नगरसेवकांना ६० लाख रुपयांचा नगरसेवक निधी मिळतो आणि प्रभाग समिती निहाय १ कोटी रुपयांची तरतूद स्थायी समितीच्या माध्यमातून अर्थसंकल्प मंजूर करताना केली जाते. त्यामुळे या व्यतिरिक्त सत्ताधारी पक्षाला आणि विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी सूचवलेल्या विकासकामांसाइी किती कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
महापालिका शाळांमधील वाचन कौशल्य पाहून आयुक्तही भारावले, मुलांच्या पाठीवर मारली कौतुकाची थाप
मुंबई: दादर येथील येथील भवानी शंकर मार्ग शाळेत महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी पूर्व प्राथमिकसह प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांशीही संवाद साधला. यावेळी त्यांनी इयत्ता आठवी, नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांकडून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीबाबत आढावा घेतला. तसेच शाळेतील विविध प्रयोगशाळांनाही भेट दिली. यावेळी इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांना आकाशगंगा , सांकेतिक भाषा , कृत्रिम बुद्धिमत्ता याबाबत परिपूर्ण माहिती दिली. विद्यार्थ्यांनी अवगत केलेल्या गुणांचे कौतुक यावेळी आयुक्त भिडे यांनी केले. तसेच प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांचे वाचन कौशल्य पाहून आयुक्तांनी त्यांचीही कौतुकाने पाठ थोपटली.मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई पब्लिक स्कूलमधील केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पूर्व प्राथमिक शाळांमध्ये प्रवेशोत्सव सोहळा सोमवारी ६ एप्रिल रोजी उत्साहात पार पडला. राजावाडी (घाटकोपर) येथील मुंबई पब्लिक स्कूलमध्ये मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. विक्रोळी येथील हरियाली व्हिलेज सीबीएसई शाळेत शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांनी विद्यार्थ्यांना भेटवस्तू दिल्या. दादर (पश्चिम) येथील भवानी शंकर मार्ग शाळेत महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी गुलाबपुष्प, पेन्सिल आणि चॉकलेट भेट देवून विद्यार्थ्यांचे स्वागत केले. तर गोवंडी येथील नटवर पारेख शाळेत अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे यांनी भेट दिली.दादर येथील शाळेत उपआयुक्त (शिक्षण) डॉ. प्राची जांभेकर, उपशिक्षणाधिकारी श्रीमती ममता राव उपस्थित होते.तर, घाटकोपर येथे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) किर्तीवर्धन किरतकुडवे, उपशिक्षणाधिकारी (पूर्व उपनगरे) सायली सुर्वे आदींसह शिक्षक, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.राजावाडी शाळेतील प्रवेशोत्सवावेळी लेझीम हाती घेऊन, लेझीम पथकामध्ये स्वतः सहभागी होत महापौरांनी चिमुकल्या विद्यार्थ्यांचे स्वागत केले. यानंतर, महापौर रितू तावडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांचा उत्साह वाढवला. विद्यार्थ्यांना पुरवल्या जाणाऱ्या सेवा सुविधा, शैक्षणिक उपक्रम आदींची शिक्षक वृंदाकडून त्यांनी माहिती घेतली.मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने मिशन ॲडमिशन, मिशन मेरिट असे उपक्रम हाती घेतले आहेत. तसेच, विद्यार्थ्यांमध्ये गणित आणि विज्ञान विषयांबाबत अधिक आवड निर्माण व्हावी, यासाठी महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने ‘गणित गुरुवार’ उपक्रम हाती घेतला आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून महानगरपालिकेने खान अकादमीसोबत सामंजस्य करार केला. याबाबत उप आयुक्त (शिक्षण) डॉ. प्राची जांभेकर यांनी माहिती दिली. दादर येथील संगणकीय प्रयोगशाळेत अभ्यास करणाऱ्या अंश पाटील, नील बद्री, आरुष वंगारी (इयत्ता दहावी), अविघ्न शिंदे, श्रीराम चिकुला (इयत्त आठवी) या विद्यार्थ्यांनी महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांना आकाशगंगा , सांकेतिक भाषा , कृत्रिम बुद्धिमत्ता याबाबत परिपूर्ण माहिती दिली. विद्यार्थ्यांनी अवगत केलेल्या गुणांचे आयुक्त भिडे यांनी कौतुक केले. तसेच प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांचे वाचन कौशल्य पाहून आयुक्तांनी त्यांची पाठ थोपटली.राजावाडी (घाटकोपर) या शाळेमध्ये पूर्व प्राथमिक वर्गाचे एकूण ३६० विद्यार्थी आहेत. तसचे इयत्ता पहिली ते दहावीचे ७०० असे एकूण १०६० विद्यार्थी सीबीएसई मंडळाचे शिक्षण घेत आहेत. तर दादर येथील भवानी शंकर मार्ग शाळेत पूर्व प्राथमिक वर्गाचे एकूण २७० विद्यार्थी आहेत. यासह महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामार्फत केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या १९ शाळा आहेत. या शाळांमध्ये पूर्व प्राथमिक वर्गाच्या एकूण १४२ तुकड्या असून, यामध्ये ५ हजार ५७३ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तसेच प्राथमिक शाळांच्या एकूण २७९ तुकड्या असून त्यात १० हजार ७८७ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
Rupee: रिझर्व्ह बँकेच्या उपायांनी रुपयाला आधार; डॉलरसमोर 93.04 वर मजबुती
Rupee: रुपयाचे मूल्य गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला कोसळून 95 रुपये प्रति डॉलर इतक्या निचांंकी पातळीवर गेल्यानंतर रिझर्व्ह बँकेने रुपयाचे मूल्य स्थिर ठेवण्यासाठी उपाययोजना वाढविल्या.
Stock Market: युद्धविरामाच्या आशेने बाजारात उसळी; सेन्सेक्स 787 अंकांनी वाढला, निफ्टी 22,968 वर बंद
Stock Market:
Bank Nifty: बँकिंग शेअर्समध्ये जोरदार खरेदी; बँक निफ्टी 1,060 अंकांनी उसळला
Bank Nifty: बँक ऑफ बडोदाचा शेअर सर्वात जास्त म्हणजे 4.38 टक्क्यांनी वाढला.
Ahilyanagar: लग्नाच्या आमिषाने तरुणीचे लैंगिक शोषण; श्रीरामपूरात गुन्हा दाखल
श्रीरामपूर: लग्नाचे आमिष दाखवून एका २३ वर्षीय तरुणीचे दीर्घकाळ लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अक्षय विश्वनाथ गवळी (रा. संजयनगर, श्रीरामपूर) याच्याविरोधात श्रीरामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही घरकाम करून उदरनिर्वाह करत असून, तिचा २०१९ मध्ये विवाह झाला होता. वैवाहिक आयुष्यातील वाद आणि अत्याचारामुळे ती माहेरी राहत असताना आरोपी अक्षय गवळी याच्याशी तिची ओळख झाली. सुरुवातीला फोनवरून संपर्क साधत आरोपीने तिचा विश्वास संपादन केला. यानंतर आरोपीने लग्नाचे आमिष दाखवत २०२२ पासून वेळोवेळी तिच्याशी जबरदस्तीने तसेच फसवणूक करून शारीरिक संबंध ठेवले. पुढे पीडितेला घटस्फोट घेण्यास प्रवृत्त करून शिरसगाव येथे भाड्याच्या खोलीत पती-पत्नीप्रमाणे राहूनही आरोपीने तिचे शोषण सुरूच ठेवले.दरम्यान, मार्च २०२६ मध्ये आरोपी दुसऱ्या मुलीशी विवाह करत असल्याचे समजताच पीडित तरुणीने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. उपचारादरम्यान आरोपीने दुसरे लग्न केल्याचेही उघड झाले. त्यानंतरही आरोपीने पीडितेला मारहाण करून घराबाहेर काढल्याची तक्रार आहे. या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ६४(2)(m) अन्वये गुन्हा रजि नं. २३६/२०२६ दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दादाभाई मगरे हे करत आहे.
२०२९ चा संकल्प पूर्ण करण्यासाठी भाजपाचा कार्यकर्ता सज्ज; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा विश्वास
मुंबई: देशात आणि महाराष्ट्रात जनतेमध्ये भारतीय जनता पक्षाविषयी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आणि पक्षाच्या विचारधारेविषयी विश्वासाचे, सकारात्मक वातावरण आहे. या वातावरणाचा योग्य वापर करून घेण्यासाठी कालबद्ध रीतीने कार्यक्रम आखून २०२९ चा संपूर्ण यशाचा संकल्प पूर्ण करण्यासाठी काम करावे, आणि देशभक्ती, राष्ट्रीयत्व आणि विकासाची गंगा सर्वांपर्यंत पोहोचवावी, त्यासाठी सक्रिय कार्यकर्त्यांने कामाला लावावे असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सोमवारी केले. पक्षाच्या ४६ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित सक्रिय कार्यकर्ता मेळाव्यात चव्हाण बोलत होते.आपल्या मार्गदर्शनपर भाषणात प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी पक्षाच्या कार्यपद्धतीचा आणि आगामी कार्यक्रमाचा व्यापक आढावा घेतला. पक्षाच्या कार्यपद्धतीचा सकारात्मक परिणाम समाजावर कसा होईल याचा सर्वांगीण विचार पक्ष नेहमीच करत असतो. कार्यकर्त्यानेही तसाच विचार करावा, असेही ते म्हणाले. सेवा आणि समर्पण भावनेतून पक्षाचा कार्यकर्ता काम करत राहिला, त्यामुळेच माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सेवेची संधी प्राप्त झाली. भाजपला अनेक निवडणुकांमध्ये मिळालेले यश प्रचंड आहे. महाराष्ट्रात राजकीयदृष्ट्या पोषक समीकरण तयार करून प्रत्येक बूथची जबाबदारी घेणाऱ्या कार्यकर्त्यांची फळी पुढच्या स्थापना दिनाआधी भक्कम करू या, असे आवाहनही त्यांनी केले.आपली क्षमता, कार्यकर्त्यांच्या ताकद काय आहे, याची आपल्याला कल्पना आहे, त्यामुळे २०२९ ला जे अपेक्षित आहे, ते ध्येय यामुळे सोपे होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वात महाराष्ट्र प्रगतीची वेगवान वाटचाल करत आहे. त्यांची भूमिका स्पष्ट आहे. कार्यकर्त्यांनी केवळ कागदावर किंवा कार्डावर पदाधिकारी म्हणून न राहता सतर्क राहून कार्यपद्धतीची शक्ती सक्रिय ठेवत आपली भूमिका ओळखून कामाला लागले पाहिजे, असे ते म्हणाले.स्वातंत्र्यानंतरचे मोदी सरकार हे एकमेव सरकार असे आहे, जे जगाच्या पाठीवर कोठेही भारतावरील संकटात असेल त्याच्या मदतीसाठी ते धावून जाते. आता देशासमोर जेव्हा संकटे उभी राहतात, तेव्हा देश मदतीसाठी संयुक्त राष्ट्रसंघांकडे पाहात नाही, आता ‘घुसेगा और मारेगा’ ही मोदी सरकारची नीती आहे. कोविडकाळात जगात मोठी लसीकरण मोहीम भारताची होती. जगाच्या पाठीवरील ९२ देशांमध्ये भारतीय कोविड लस पाठवून संकटाशी सामूहिक संघर्ष करण्यासाठी मोदी सरकारने पुढाकार घेतला, व ‘वसुधैव कुटुम्बकम’ ही शिकवण सार्थ केली, असे प्रातिपादन मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी केले. आपण आता जगातील तिसरी सर्वात अर्थव्यवस्था होत आहोत. आपला पक्ष हा जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष आहे, आणि विश्वगुरूचे स्थान मिळेल अशा पक्षाचे आपण कार्यकर्ते आहोत ही अभिमानास्पद बाब आहे. हा कार्यकर्ता पदासाठी नव्हे, तर समाजाच्या सेवेसाठी काम करतो, असे ते म्हणाले.काही राजकीय पक्ष रशियाची विचारसरणी मानतात, काही राजकीय पक्ष केवळ विरोधाच्या राजकारणासाठी निर्माण झाले. महाराष्ट्रात वाटेकरी पक्ष निर्माण होऊन भावकीच्या वाटणीचे राजकारण करू लागले. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष हा वेगळा आणि राष्ट्रीय विचारसरणीतून राष्ट्रासानठी समर्पित असलेला पक्ष आहे, ही आपल्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता हा ‘राष्ट्राय स्वाहा’ या भावनेने काम करतो, प्रसंगी घरादारावर तुळशीपत्र ठेवून पक्षाच्या प्रतिकूल परिस्थितीत योद्धा म्हणून काम करणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांचा हा पक्ष आहे, याचा आम्हाला अभिमान आहे, अशा शब्दांत राज्याचे मंत्री आशीष शेलार यांनी भावना व्यक्त केल्या. छत्रपती शिवराय हे आमचे आदर्श आहेत, आणि छत्रपतींचा विचार हा आमचा संस्कार, आचार आहे. भारतीय जनता पक्ष हा मुंबईच्या मातीत जन्म झालेला पक्ष हे, जगभरात हिंदुत्वाचा डंका वाजविणारा आमचा पक्ष आहे, असे ते म्हणाले.प्रदेश उपाध्यक्ष केशव उपाध्ये यांनी आपल्या भाषणात पक्षाच्या स्थापनाप्रसंगी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी व्यक्त केलेल्या स्वप्नाचा अभिमानास्पद उल्लेख केला. या नेत्यांनी पाहिलेले स्वप्न आज पूर्ण झाले आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. आगामी काळात पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता पक्षाचा विचार आणि संस्कार घेऊन पुढे जात राहील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.पक्षाचे असंख्य सक्रिय कार्यकर्ते, नेते, मंत्री, आमदार, नगरसेवकांच्या उत्साही उपस्थितीत साजऱ्या झालेल्या या समारंभात प्रारंभी पक्षाच्या उभारणीसाठी समर्पित भावनेने काम करणारे माजी मंत्री जगन्नाथ पाटील, ज्येष्ठ नेते मधु चव्हाण, लद्धारामजी नागवाणी, दिलीप हजारे, अरुण मोरसावाला, शरद चव्हाण, श्रीपाद मुसळे, अविनाश दलाल आदी ज्येष्ठ कार्यकर्त्यांना प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. समारंभाच्या प्रारंभी पक्षाच्या वाटचालीचा आढावा घेणाऱ्या चित्रफितीद्वारे जनसंघ ते भाजपा या वाटचालीतील राष्ट्रसमर्पित कार्याचा पट प्रदर्शित करण्यात आला.
KKR vs PBKS : कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि पंजाब किंग्स (PBKS) यांच्यात कोलकात्याच्या ऐतिहासिक ईडन गार्डन्स मैदानावर सुरू झाला, मात्र पावसाने या सामन्यात व्यत्यय आणला आहे.
Sangli Politics : महाराष्ट्रातील बड्या नेत्याचा करेक्ट कार्यक्रम होणार; भाजप नेत्याचा इशारा
Sangli Politics : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगलीत खासदार विशाल पाटील आणि जयंत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
Mumbai-Vijaydurg : मुंबई ते विजयदुर्ग रो-रो सेवा तात्पुरती स्थगित; नेमकं काय घडलं?
महाराष्ट्र सागरी मंडळाच्या वतीने मुंबई ते विजयदुर्ग दरम्यान (Mumbai-Vijaydurg) आशियातील सर्वात जलद एम-टू-एम रो-रो जलवाहतूक सेवा दि. 1 मार्च 2026 पासून सुरू करण्यात आली आहे.
Iran US Israel War Update: जगातील सर्वात मोठ्या गॅस साठ्यावर हल्ला; इराण-इस्त्रायल तणाव वाढला
Iran US Israel War Update: हा हल्ला केवळ लष्करी कारवाई नसून जागतिक ऊर्जा सुरक्षेसाठीही मोठा इशारा मानला जात आहे.
RR vs MI : मंगळवारी ७ एप्रिल रोजी राजस्थान रॉयल्स (RR) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांच्यात हंगामातील १३ वा सामना रंगणार आहे.
Nitesh Rane: मंत्री नितेश राणेंच्या प्रमुख उपस्थितीत साजरा झाला राष्ट्रीय सागरी दिन
मुंबई: भारताच्या आर्थिक महासत्तेकडे होणाऱ्या वाटचालीत सागरी क्षेत्राचा वाटा मोलाचा असून, बंदरांच्या विकासामुळेच देशाच्या प्रगतीला खऱ्या अर्थाने बळ मिळणार आहे, असा विश्वास राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी रविवारी व्यक्त केला. अंधेरी येथील भारतरत्नम सभागृहात आयोजित ६३ व्या 'राष्ट्रीय सागरी दिन' आणि 'मर्चंट नेव्ही सप्ताहा'च्या सांगता समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.यावर्षीचा सागरी सप्ताह 'सागरी भारत, प्रगतीला बळ' या संकल्पनेवर आधारित होता. या सप्ताहाचा प्रारंभ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना समारंभपूर्वक 'लॅपेल पिन' लावून करण्यात आला होता. रविवारी झालेल्या सांगता समारंभात मंत्री राणे यांनी सागरी क्षेत्राच्या राष्ट्रीय महत्त्वावर प्रकाश टाकला. व्यापार सुलभता आणि आर्थिक वृद्धीसाठी सागरी क्षेत्र हे कणा आहे. भारताला जागतिक स्तरावर अग्रगण्य सागरी राष्ट्र बनवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, असे राणे यावेळी म्हणाले.सागरी क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. नाविन्यपूर्ण प्रयोग आणि उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्रे प्रदान करण्यात आली. यावेळी विशेष अतिथी म्हणून केंद्र सरकारचे माजी सचिव तथा नौवहन विभागाचे माजी महासंचालक दीपक शेट्टी उपस्थित होते. या सप्ताहादरम्यान देशभरात विविध परिषदा, रक्तदान शिबिरे आणि जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व उपक्रमांची सांगता या दिमाखदार सोहळ्याने झाली. या सोहळ्याला नौवहन महासंचालक श्याम जगन्नाथन, अतिरिक्त महासंचालक सुशील मानसिंग खोपडे, तसेच 'शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया'चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक बी. के. त्यागी यांच्यासह सागरी क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
बालकांच्या कर्करोग उपचारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचा पुढाकार
मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष पुढाकाराने मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) फाऊंडेशन आणि टाटा मेमोरियल सेंटर यांच्यात बालकांच्या कर्करोगाच्या उपचारासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे.या प्रकल्पाची प्रभावी आणि पारदर्शक अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता कक्ष बीपीसीएल फाउंडेशन आणि टाटा मेमोरियल सेंटर यांच्यात हा त्रिपक्षीय सामंजस्य करार करण्यात आला आहे. या कराराद्वारे सर्व संबंधित घटकांमध्ये समन्वय राखला जाईल आणि प्रकल्पाच्या अंमलबजावणीस गती मिळणार आहे तसेच, प्रस्तावात नमूद केलेल्या कार्यक्षेत्र आणि जबाबदाऱ्यांना सर्व संबंधितांनी मान्यता दिली असून, अंतिम सामंजस्य कराराध्ये ठरविण्यात येणाऱ्या अटी व शर्तींचे पालन करण्याबाबत सहमती दर्शविण्यात आली आहे.लवकर निदान, परवडणारे उपचार आणि जागरूकता आवश्यकया सामंजस्य करारासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुलांचे संरक्षण हे राज्याचे कर्तव्य आहे. कर्करोगाविरुद्ध लढण्यासाठी लवकर निदान , परवडणारे उपचार आणि जागरूकता आवश्यक आहे. शासन आणि समाज दोघांनी मिळून हे काम करणे गरजेचे आहे. टाटा मेमोरियल सेंटर यांनी बालक कर्करोग रुग्णांच्या ऑपरेशनच्या खर्चासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून खर्चाची मागणी केली होती. यासाठी विविध संस्थांनी एकत्रितपणे पुढाकार घेतला आहे. त्यामध्ये बीपीसीएल फाऊंडेशने मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आपला सहभाग नोंदवला आहे. त्यानुसार बीपीसीएल फाऊंडेशन टाटा मेमोरियल सेंटरमध्ये कर्करोगाचे उपचार घेणाऱ्या बालक रुग्णांच्या सहाय्यासाठी योगदान देणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.या करारामुळे बालकांच्या कर्करोग उपचारांतील आर्थिक अडथळे कमीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील सामाजिक दायित्व (सीएसआर) उपक्रमांतर्गत बीपीसीएल फाऊंडेशन यांच्या योगदानाचे कौतुक करण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी बीपीसीएल फाऊंडेशनकडून विशेष निधी सामाजिक दायित्वमध्ये देणार आहे. अशा या सामंजस्य करारामुळे बालकांच्या कर्करोग उपचारांतील आर्थिक अडथळे कमी होतात. गुणवत्तापूर्ण उपचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत असतात. महाराष्ट्रात आरोग्यसेवांचा दर्जा उंचावत आहे. कर्करोगाशी झुंज देणाऱ्या बालकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी या करारामुळे मोठी मदत होत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.मुले हे देशाचे भविष्य आहेत, त्यामुळे त्यांना कर्करोगासारख्या आजाराशी लढण्यासाठी मदत करणे आवश्यक आहे. या हेतूने प्रेरित होउन मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून जेवढी मदत करणे शक्य आहे तेवढी मदत करण्यात येत आहे, असे मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी सांगितले.सामंजस्य करार घडवून आणण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी महत्वाचे योगदान दिले असून मुख्यतः गरीब व गरजू नागरिकांना, विशेषतः रुग्णांना, तातडीची आर्थिक मदत मिळवून देणे आणि संपूर्ण प्रणाली कार्यक्षम बनवणे हे मुख्य उद्दिष्ट असल्याची माहिती कक्षामार्फत देण्यात आली आहे.
Family Court Pune : मुलांच्या शिक्षणासह घरखर्चाची जबाबदारी दोघांची; कौटुंबिक न्यायालयाचे आदेश
दोन्ही मुलांच्या अर्ध्या शिक्षण खर्चाबरोबरच अर्धा घरखर्च करण्याचा आदेश कौटुंबिक न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश शाम रुक्मे यांनी दिला आहे.
Pune News : राज्य वकिल परिषदेच्या मतमोजणीला ब्रेक; उमेद्वारांनी आक्षेप घेतल्यानंतर मतमोजणी थांबविली
महाराष्ट्र आणि गोवा राज्य परिषदेच्या मतमोजणीदरम्यान उमेद्वार प्रतिनीधींनी आक्षेप घेतल्याने पहिल्याच दिवशी मतमोजणी थांबविण्यात आली.
Congress Senior leader Resigned:
Ashok Kharat : भोंदू बाबा अशोक खरातला ईडीचा दणका! मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल
Ashok Kharat : नाशिकच्या अशोक खरातविरोधात ईडीने मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे.
मुंबई: जैवविविधतेने समृद्ध अशा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प परिसरातील जागेचे पर्यावरणीय पुनरुज्जीवन (‘रीवाइल्डिंग’) प्रकल्प राबविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाने झिरोधा कंपनी व संवर्धन भागीदार फार्मर्स फॉर फॉरेस्ट या संस्थांबरोबर सामंजस्य करार केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रोत्साहन आणि पाठबळामुळे हा प्रकल्प साकारणार असून दीर्घकालीन पर्यावरण पुनरुज्जीवन आणि हवामान लवचिकतेसाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे.हा उपक्रम संरक्षित अरण्ये, सामुदायिक जमीन, शेती क्षेत्र, गवताळ प्रदेश आणि जलस्रोत अशा विविध भूप्रकारांचा एकत्रित विचार करणारा राज्यातील पहिलाच सर्वसमावेशक लँडस्केप पुनर्संचय प्रकल्प ठरणार आहे. प्रत्येक भूप्रकारानुसार शास्त्रीय पद्धतीने आखलेल्या उपाययोजना राबवून परिसंस्थेचे पुनरुज्जीवन, जैवविविधतेत वाढ आणि मानव वन्यजीव सहअस्तित्व मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे.जैवविविधतेचा महत्त्वाचा केंद्रबिंदूचंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प हा महाराष्ट्रातील सर्वात जुना आणि सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प मानला जातो. सुमारे १,७२७ चौ.कि.मी. क्षेत्रफळ असलेल्या या प्रकल्पात दक्षिण उष्णकटिबंधीय कोरड्या पानझडी जंगलांचे मुख्य आणि बफर क्षेत्र समाविष्ट आहे. येथे वाघांची संख्या लक्षणीय असून राखीव क्षेत्रात ८० हून अधिक वाघ असल्याचा अंदाज आहे. गेल्या दशकात या परिसरात वाघांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.वाघांव्यतिरिक्त बिबटे, रानकुत्रे (ढोले), अस्वल, गवा, विविध हरिण प्रजाती, साप (यामध्ये संकटग्रस्त भारतीय अजगर) आणि १९५ हून अधिक पक्षीप्रजाती येथे आढळतात. त्यामुळे मध्य भारतातील जैवविविधतेसाठी हा परिसर अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.मात्र, वाघसंख्येतील वाढ आणि बफर क्षेत्रातील मानवी वस्ती यामुळे मानव वन्यजीव संघर्षाची समस्या वाढत आहे. तसेच विकासामुळे अधिवास तुकड्यात विभागले जाण्याची समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे एकात्मिक आणि समुदायाभिमुख पुनर्संचय उपक्रमांची गरज अधोरेखित झाली आहे.रीवाइल्डिंग प्रकल्पाची वैशिष्ट्येया सामंजस्य करारानुसार पुढील उद्दिष्टे साध्य होणार राखीव क्षेत्राभोवती ८०० एकरांहून अधिक अधोगती झालेल्या जमिनीचे पुनर्संचय पुनर्संचय उपक्रम, सामुदायिक रोपवाटिका आणि पर्यावरणीय देखरेखीद्वारे १५,००० पेक्षा अधिक ग्रामीण रोजगार दिवसांची निर्मिती १०० हून अधिक स्थानिक वृक्ष, झुडुपे व गवत प्रजातींची लागवड आणि संवर्धन, ज्यामुळे भक्ष्य प्रजाती व इतर वन्यजीवांना अधिवास उपलब्ध होईलप्रकल्पाची रचना केवळ पारंपरिक वृक्षलागवडीपुरती मर्यादित नसून परिसंस्थेतील नैसर्गिक प्रक्रिया पुनर्संचयित करणे, अधिवासांची जटिलता वाढविणे आणि विविध भूप्रकारांमध्ये वन्यजीवांना मुक्तपणे वावरण्यास सक्षम करणे, या व्यापक उद्दिष्टांवर आधारित आहे. हा उपक्रम वन्यजीव, स्थानिक समुदाय आणि हवामान या तिन्ही घटकांना लाभदायी ठरेल. विविध भूप्रकारांमध्ये समन्वित काम केल्यास अधिवास ऱ्हासाची कारणे दूर करता येतील आणि भविष्यासाठी लवचिकता निर्माण करता येईल, असे वन विभागाने म्हटले आहे.व्यापक प्रादेशिक संवर्धन प्रयत्नांचा भागहा प्रकल्प पूर्व महाराष्ट्रातील सुरू असलेल्या संवर्धन उपक्रमांना पूरक ठरणार आहे. २०२१ पासून ‘फार्मर्स फॉर फॉरेस्ट’ संस्था सुमारे २ लाख हेक्टर वनक्षेत्र, शेती क्षेत्र आणि सामुदायिक जमिनीवर कार्यरत आहे. जंगल संरक्षण, पुनर्वनीकरण, समुदाय सहभाग, रस्त्यावर नाट्यप्रयोगांद्वारे जनजागृती, अग्नि व्यवस्थापन, ऊर्जा कार्यक्षम चुलींचे वितरण आणि अधिवास सुधारणा अशा विविध माध्यमांतून मानवी–वन्यजीव संघर्ष कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नवीन भागीदारीमुळे संस्थात्मक क्षमता आणि तांत्रिक साधनसंपत्ती वाढणार असून ताडोबा परिसरातील पर्यावरण पुनर्संचय प्रयत्नांना नवे बळ मिळणार आहे.झिरोधाची दीर्घकालीन पर्यावरण बांधिलकीझिरोधा ही कंपनी आपल्या एकूण उत्पन्नाच्या १० टक्के रक्कम सामाजिक आणि पर्यावरणीय उपक्रमांसाठी देत आहे. २०२० मध्ये स्थापन करण्यात आलेल्या रेन मॅटर फाऊंडेशन मार्फत हवामान कृती, परिसंस्था पुनर्संचय, शाश्वत उपजीविका आणि विविध क्षेत्रांतील सहकार्याला याद्वारे चालना देण्यात येत आहे.२०२५ मध्ये १५ व्या वर्धापनदिनानिमित्त झिरोधाने ‘झिरोधा रिवाईंड फंड’ची घोषणा केली असून, देशभरातील अधोगती झालेल्या भूभागाच्या पुनर्संचयासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. हा निधी झिरोधामार्फत, रेनमॅटर फाउंडेशनच्या सहकार्याने राबविला जाणार असून मोठ्या प्रमाणावर रीवाइल्डिंग उपक्रमांना चालना देण्याचा उद्देश आहे. या फंडच्या माध्यमातून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कोयना महोत्सवाची यशस्वी सांगता
सातारा: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर अग्रस्थानी नेण्याचा निर्धार व्यक्त करत पर्यटन, शेती आणि रोजगार या त्रिसूत्रीवर आधारित सर्वसमावेशक विकासाचा ठोस रोडमॅप मांडला असून ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी पर्यटनाला चालना देत शेतकऱ्यांना बळ देणे आणि स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देणे हे सरकारचे धोरण असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.'कोयना दौलत डोंगरी महोत्सव २०२६' चा भव्य सांगता सोहळा विकासकामांच्या उद्घाटन, भूमिपूजन आणि सांस्कृतिक जल्लोषात दिमाखात पार पडला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संग्रामपूर व पाटण मतदारसंघातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे उद्घाटन झाल्याने जिल्ह्याच्या विकासाचा नवा अध्याय सुरू झाला.यावेळी कोयना नदीवरील सांगवड येथील मोठ्या पुलाचे, दौलत नगर येथील शिवदौलत स्टेडियम आणि महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारकातील संगीत कारंजे आणि लेझर शोचे, तसेच स्वर्गीय शिवाजीराव देसाई स्मृती भवनाचे उद्घाटन संपन्न झाले. तसेच पाथर्डी येथील जलपर्यटन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.कोयना, सह्याद्री पर्वतरांग, कास पठार, महाबळेश्वर-पाचगणी या नैसर्गिक संपत्तीमुळे साताऱ्यात पर्यटनाची प्रचंड क्षमता असून पर्यटनातून स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. पर्यटनामुळे स्थानिक युवकांना रोजगार, शेतमालाला बाजारपेठ आणि महिला बचत गटांना उत्पन्न मिळणार असून “पर्यटन म्हणजे थेट आर्थिक क्रांती” असे त्यांनी स्पष्ट केले. नवीन महाबळेश्वर हा साडेपाचशेहून अधिक गावांचा पर्यावरणपूरक विकास करणारा 'नवीन महाबळेश्वर' प्रकल्प हा महत्त्वाचा प्रकल्प ठरणार असून या माध्यमातून स्थानिकांचे जीवनमान उंचावणार, रोजगार वाढणार आणि आर्थिक प्रगती साधली जाणार आहे. याचबरोबर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र जोडणारे पूल, १०५ गावांना जोडणारी कनेक्टिव्हिटी, घाट आणि पर्यटन सुविधा यामुळे विकासाला वेग मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवत त्यांनी स्पष्टपणे जाहीर केले की “शेतकऱ्याची एकही इंच जमीन सरकार घेणार नाही” तसेच शेतकऱ्यांनी आपली जमीन विकू नये कारण भविष्यात तिचे सोनं होणार आहे. “महाराष्ट्राच्या तिजोरीवर पहिला हक्क शेतकऱ्याचा आहे” असे सांगत त्यांनी शेती आणि पर्यटन यांच्या संगमातून दुहेरी उत्पन्नाचा मार्ग दाखवला.क्लस्टर शेती, कॉफी, सफरचंद, आंबा, चंदन यांसारख्या पिकांचे प्रयोग, तसेच ८००० एकरवर बांबू लागवड यांचा उल्लेख करत त्यांनी शेतीतील नावीन्यपूर्ण प्रयोगांना चालना दिली. बांबू उद्योग मोठा आर्थिक स्रोत ठरू शकतो असे सांगत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांमुळे या क्षेत्राला चालना मिळाल्याचे नमूद केले. तसेच AI तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती अधिक उत्पादक करण्यावर भर दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले.पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार देण्यावर सरकारचा भर असून होम स्टे, अॅग्रो टुरिझम, बेड अँड ब्रेकफास्ट यांसारख्या योजनांद्वारे गावातच रोजगार उपलब्ध होत आहे. महिला बचत गटांचे स्टॉल, हस्तकला प्रदर्शन यामुळे महिलांनाही आर्थिक संधी निर्माण होत आहेत.कोयना महोत्सवात यंदा लावणी, भजन, पोवाडे, कृषी व पशुपक्षी प्रदर्शन, तसेच आधुनिक AI आधारित कृषी प्रदर्शन अशा विविध उपक्रमांमुळे परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम दिसून आला. जिल्ह्यात आता आरोग्य क्षेत्रात नॅचरोपॅथी सेंटर आणि हेल्थ अँड वेलनेस सेंटर उभारण्यात येत असून पर्यटनासोबत आरोग्य सुविधांनाही चालना दिली जात आहे. याचबरोबर परवडणारी घरे आणि स्थानिकांसाठी गृहनिर्माण योजना राबवून ग्रामीण भागात आधुनिक जीवनमान निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.आपत्तीच्या काळातही निर्णयक्षम नेतृत्व दाखवत एमएमआरडीएकडून १५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घरबांधणी केली असल्याचे त्यांनी सांगितले आणि “माणूस महत्त्वाचा” हा संदेश दिला. विकासाचे आकडे मांडताना त्यांनी ८००० एकर बांबू लागवड, १७५ पेक्षा अधिक सिंचन प्रकल्प, १५ लाखांवरून ३७ लाखांपर्यंत वाढलेले पर्यटक, तसेच ४५० कोटी रुपयांची मदत यांचा उल्लेख करत राज्यात वेगाने विकास होत असल्याचे सांगितले. “मी आरोपांना उत्तर देत नाही, माझं कामच उत्तर देतं” आणि “एकदा शब्द दिला की तो पूर्ण करतो” असे ठाम विधान करत त्यांनी आपल्या नेतृत्वाची भूमिका स्पष्ट केली.शेवटी “माझ्यासाठी सर्वात मोठं पद म्हणजे लाडक्या बहिणींनी दिलेली ‘लाडक्या भावाची’ ओळख” असे सांगत त्यांनी जनतेशी असलेले नाते अधोरेखित केले. कोयना दौलत डोंगरी महोत्सव हा केवळ सांस्कृतिक कार्यक्रम नसून पर्यटन, शेती, रोजगार आणि पायाभूत सुविधांचा संगम असलेला सर्वांगीण विकासाचा मॉडेल असल्याचे स्पष्ट करत साताऱ्याला पर्यटन हब बनवण्याचा निर्धार शिंदे यांनी यावेळी पुन्हा एकदा व्यक्त केला.
Satwiksairaj Chirag Withdraw : भारताची स्टार जोडी सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी दुखापतीमुळे या स्पर्धेतून माघार घेतली आहे.
Impeachment notice:
Satara News : सातारा जिल्ह्याला जागतिक पर्यटन हब बनविणार; एकनाथ शिंदेनी दिली ग्वाही
सातारा (Satara News) जिल्ह्याला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नकाशावर मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी आणि जिल्ह्याला ‘पर्यटन हब’ बनविण्यासाठी आणि स्थानिक भूमिपुत्रांना स्थानिक ठिकाणीच काम मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.
मुंबई: राज्यातील ज्या शहरी भागांमध्ये पाइपद्वारे गॅस (पीएनजी) जोडणीची सुविधा उपलब्ध आहे, तिथे नागरिकांनी पीएनजी जोडणीसाठी येत्या ३० जूनपर्यंत अर्ज किंवा नोंदणी करणे बंधनकारक आहे. पीएनजी वाहिनी कार्यान्वित असूनही नागरिक अर्ज करत नसल्यास, त्या भागातील घरगुती गॅस (एलपीजी) सिलिंडरचा पुरवठा ३० जूननंतर बंद केला जाईल, असा इशारा राज्य सरकारच्या वतीने देण्यात आला आहे. घरगुती आणि व्यावसायिक अशा दोन्ही प्रकारच्या वापरकर्त्यांसाठी हे बंधनकारक असल्याचे नियंत्रक शिधावाटप चंद्रकांत डांगे यांनी सोमवारी स्पष्ट केले.राज्यातील तेल उत्पादनांच्या पुरवठ्याबाबत माहिती देण्यासाठी मंत्रालयातील पत्रकार कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर, उमेश कुलकर्णी (राज्य समन्वयक, तेल उद्योग) आदी उपस्थित होते. आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे पुरवठा साखळीवर ताण असला, तरी राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा साठा मुबलक आहे. इंधन टंचाईमुळे लॉकडाऊन लागणार असल्याच्या अफवा पसरल्याने मागील आठवड्यात रांगा लागल्या होत्या, मात्र आता परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे, असे डांगे यांनी सांगितले. सध्या दररोज १८ हजार ५०० किलोलीटर पेट्रोल आणि ४० हजार किलोलीटर डिझेलचे वितरण सुरू असून मागणी सरासरी इतकीच आहे, अशी माहिती त्यांनी दिली.वाढत्या मागणीला पर्याय म्हणून पीएनजी नेटवर्क गतीने वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यासाठी प्रलंबित अर्जांना २७ मार्च रोजी 'डीम्ड परवानगी' देण्यात आली असून महानगरपालिकांना २४ तासांच्या आत मंजुरी देण्याचे आदेश दिले आहेत. फेब्रुवारी २०२६ पर्यंत राज्यात ४२.३० लाख पीएनजी कनेक्शन्स होती, ज्यात गेल्या एका महिन्यात ७३ हजारांची भर पडली आहे, असेही यावेळी सांगण्यात आलेएलपीजी वितरणाबाबत नवे नियमराज्यातील ३.५ कोटी एलपीजी ग्राहकांसाठी काही महत्त्वाचे नियम लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार, गॅसचे समान वाटप व्हावे यासाठी 'बुकिंग इंटरव्हल' निर्बंध लागू करण्यात आले आहेत. सुरक्षित वितरणासाठी डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड (डीएसी) अनिवार्य करण्यात आला असून ८५ टक्के वितरण या प्रणालीद्वारे होत आहे. रुग्णालये आणि शिक्षण संस्थांना १०० टक्के इंधन पुरवठा केला जाणार आहे.केंद्र सरकारच्या सूचनेनुसार व्यावसायिक गॅसचे चार टप्प्यांत वाटप होत आहे. उद्योग क्षेत्राला बळकटी देण्यासाठी २७ मार्च २०२६ रोजी केंद्र सरकारने आणखी २० टक्के अतिरिक्त कोटा मंजूर केला आहे. या टप्प्यात प्रामुख्याने श्रमप्रधान उद्योगांना प्राधान्य देण्यात आले आहे. यात पोलाद आणि ऑटोमोबाईल, कापड उद्योग, रंग आणि रसायने, प्लास्टिक उद्योग या क्षेत्रांचा समावेश आहे. स्थलांतरित मजुरांसाठी ५ किलोच्या ‘एफटीएल’ सिलिंडरचेही वितरण सुरू आहे.काळाबाजार रोखण्यासाठी कठोर कारवाईइंधनाचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता पथके तैनात करण्यात आली आहेत. ६ एप्रिल २०२६ पर्यंत राज्यभरात १४ हजार ३२९ तपासण्या करण्यात आल्या असून, या कारवाईत ३ हजार ६२८ सिलिंडर आणि ७१ हजार ५६५ किलो गॅस जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी ५३ एफआयआर नोंदवण्यात आले असून ३६ जणांना अटक करण्यात आली आहे. जप्त केलेल्या मालाची किंमत सुमारे २३.८५ कोटी रुपये आहे.प्रति कुटुंब ३ लिटर केरोसीन मिळणारकेंद्र सरकारने राज्याला ३ हजार ७४४ किलोलीटर केरोसीन मंजूर केले असून, प्रति कुटुंब ३ लिटर केरोसीनचे वाटप स्वस्त धान्य दुकानांमार्फत केले जाईल. नागरिकांच्या तक्रारींसाठी ९७६९९१९२२१ हा व्हॉट्सॲप क्रमांक जारी करण्यात आला आहे. चंद्रकांत डांगे यांची राज्यस्तरीय 'नोडल ऑफिसर' म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
Ramdas Athawale: केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज्यसभा खासदार पदाची केली हॅट्ट्रिक
मुंबई: रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची तिस-यांदा राज्यसभेवर बिनविरोध निवड झालेली आहे. सोमवार दिनांक ६ एप्रिल २०२६ रोजी संसदेत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपल्या तिसऱ्या टर्मच्या राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतल्याने त्यांनी राज्यसभा खासदार पदाची हॅट्ट्रिक केली आहे. राज्यसभेतील हॅट्ट्रिकबद्दल रामदास आठवले यांचे देशभरातील दलित बहुजन आंबेडकरी जनतेसह सर्व वर्गातील जनतेने अभिनंदन केले आहे.महाराष्ट्रातून राज्यसभेवर ७ खासदार बिनविरोध निवडून गेलेले आहेत. त्यात रामदास आठवले यांचा समावेश आहे. राज्यसभेवर सलग तिसऱ्यांदा बिनविरोध निवड होऊन रामदास आठवले यांनी राज्यसभा खासदार म्हणून हॅट्रीक केलेली आहे. आपल्या राज्यसभेच्या तिसऱ्या टर्मची सुरुवात रामदास आठवले यांनी आज सोमवार दिनांक ६ एप्रिल २०२६ पासून केली आहे.रामदास आठवले यांची एप्रिल २०१४ ला सर्वप्रथम राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली. त्यानंतर एप्रिल २०२० मध्ये दुसऱ्यांदा राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली. एप्रिल २०२० ते २ एप्रिल २०२६ पर्यंत त्यांच्या दुसऱ्या टर्मची मुदत होती. आज सोमवार दिनांक ६ एप्रिल २०२६ रोजी संसदेत रामदास आठवले आपल्या राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्या तिसऱ्या टर्मला सुरुवात झाली आहे. दिनांक ६ एप्रिल २०२६ ते एप्रिल २०३२ पर्यत रामदास आठवले यांची राज्यसभेत तिसरी टर्म राहणार आहे. तिसऱ्यांदा राज्यसभेत निवड झाल्याबद्दल केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे देशभरातील दलित, बहुजनांनी हार्दिक स्वागत आणि अभिनंदन केले आहे. देशभर ना. रामदास आठवले यांचे सत्कार आणि स्वागत होत आहे. ना.रामदास आठवले यांना तिसऱ्यांदा राज्यसभेवर निवडून दिल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राज्यभरातील आंबेडकरी रिपब्लकन जनतेतर्फे हार्दिक आभार मानले जात आहे.आपल्या तिसऱ्या राज्यसभा सदस्यत्वाची रामदास आठवले यांनी आज सोमवार दिनांक ६ एप्रिल २०२६ रोजी संसदेत शपथ घेतल्यानंतर त्यांच्यावर आंबेडकरी जनतेने शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
Police News: तपासादरम्यान एक निरीक्षक, दोन उपनिरीक्षक आणि इतर पोलिस कर्मचाऱ्यांसह एकूण 10 जणांना अटक करण्यात आली होती. नंतर या सर्वांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
दिल्ली विधानसभेच्या परिसरात एका अज्ञात कारने अचानक व्हीआयपी गेट तोडून आत प्रवेश केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे दिल्लीत एकच खळबळ उडाली आहे.
Ravi Shankar Prasad : बिहारमधून भाजपला गुड न्यूजची प्रतीक्षा; रविशंकर प्रसाद यांचे सूचक वक्तव्य
बिहारमधून गुड न्यूज मिळण्याची भाजपला प्रतीक्षा आहे, असे सूचक वक्तव्य त्या पक्षाचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद (Ravi Shankar Prasad) यांनी सोमवारी केले.
Dinesh Karthik Argument : दिनेश कार्तिक आणि मुख्य प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांचा पंचांशी झालेला वाद सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Sushma Andhare : “एकनाथ शिंदेंना चौकशीला कधी बोलावणार?”अंधारेंचा जळजळीत सवाल
Sushma Andhare : ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी अशोक खरात प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दीपक केसरकर यांच्या चौकशीची मागणी केली आहे.
Chirag Paswan: UP निवडणुकीत चिराग पासवानांचा मोठा निर्णय; सर्व 403 जागांवर एकट्याने लढणार
Chirag Paswan:
Mumbai Local : कल्याण स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, प्रवाशांचा खोळंबा
कल्याण : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी आजचा प्रवास मनस्तापाचा ठरला. कल्याण स्थानकावर अचानक सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे लोकल सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली. याचा सर्वाधिक फटका कसारा दिशेने जाणाऱ्या प्रवाशांना बसला. मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी ४:१४ ची कसारा लोकल अर्ध्या तासाहून अधिक काळ कल्याण स्थानकावरच थांबून होती. ऐन गर्दीच्या वेळी सिग्नल फेल झाल्यामुळे गाड्यांच्या रांगा लागल्या आणि रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले. बराच वेळ लोकल एकाच ठिकाणी उभी राहिल्याने आणि रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट माहिती मिळत नसल्याने प्रवाशांनी स्थानकावर तीव्र संताप व्यक्त केला. सध्या तांत्रिक काम पूर्ण करून वाहतूक पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र गाड्या उशिराने धावत असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.https://prahaar.in/2026/04/06/bihar-crime-three-year-old-girl-physical-assults-by-own-uncle-took-her-farm-along-with-2-friends-heinous-act-against-the-little-child-police-arrested-accused/कसारा लोकल कल्याणमध्ये अडकलीआंबिवली ते टिटवाळा दरम्यान दुपारी ३:३५ च्या सुमारास सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. या बिघाडामुळे दुपारी ४:१४ ची कसारा लोकल कल्याण स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर तब्बल ३० मिनिटांहून अधिक काळ उभी होती. ही ट्रेन प्रवाशांनी पूर्णपणे भरलेली असल्याने, डब्यातील उकाड्यामुळे आणि वाढत्या उशिरामुळे प्रवाशांच्या संयमाचा बांध सुटला. अनेक प्रवाशांनी लोकल खाली उतरून प्लॅटफॉर्मवर गर्दी केली होती. भर उन्हात आणि गर्दीत प्रवासी अडकून पडल्याने रेल्वे प्रशासनाच्या कारभारावर प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सध्या बिघाड दुरुस्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असले तरी, पुढील गाड्यांच्या वेळापत्रकावर याचा मोठा परिणाम झाला आहे.सिग्नल बिघाडामुळे प्रवाशांचा प्रवास 'लेट'मध्य रेल्वेच्या कल्याण ते कसारा मार्गावर सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने रेल्वे वाहतूक पूर्णपणे मंदावली आहे. टिटवाळा ते आंबिवली दरम्यान तांत्रिक बिघाड झाल्यामुळे या मार्गावर धावणाऱ्या लोकल गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. परिणामी, कसाऱ्याकडे जाणाऱ्या गाड्या सध्या नियोजित वेळेपेक्षा अर्धा तास उशिराने धावत आहेत. या तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांना भीषण मनस्तापाचा सामना करावा लागत आहे. कामावरून घरी परतणाऱ्या प्रवाशांची गर्दी असलेल्या या लोकल गाड्यांमध्ये हजारो प्रवासी अडकून पडले आहेत. रेल्वे प्रशासनाकडून युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून, लवकरच ही सेवा पूर्वपदावर येईल असे आश्वासन देण्यात आले आहे. मात्र, तोपर्यंत प्रवाशांना स्थानकांवर आणि गाड्यांमध्ये ताटकळत राहावे लागत आहे.लोकलच्या खोळंब्यामुळे हजारो प्रवाशांचे हालकल्याण जंक्शनवर लोकल सेवा कोलमडल्याने प्रवाशांचा प्रचंड संताप पाहायला मिळत आहे. पहाटे ४ वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत अखंड सेवा देणाऱ्या या स्थानकावर अचानक झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांच्या संयमाचा बांध सुटला आहे. कल्याण स्थानक हे CSMT, कसारा, कर्जत आणि खोपोली या मार्गांना जोडणारा मुख्य दुवा आहे. येथून सुटणाऱ्या जलद (Fast) लोकल अवघ्या ५० ते ६० मिनिटांत मुंबई गाठतात, त्यामुळे नोकरदार वर्गाची या स्थानकावर मोठी भिस्त असते. दररोज शेकडो लोकल आणि एक्सप्रेस गाड्यांची ये-जा असलेल्या या स्थानकावर आज सेवा विस्कळीत झाल्याने प्लॅटफॉर्मवर प्रचंड गर्दी उसळली आहे. ऐन गर्दीच्या वेळी गाड्या थांबल्याने वेळेवर कामावर पोहोचण्याचे गणित बिघडले असून, रेल्वे प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनावर प्रवाशांनी टीकास्त्र सोडले आहे.
मुंबई: मुंबई महानगर प्रदेशातील मेट्रो जाळ्याच्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ८ एप्रिल २०२६ पासून सुधारित व अधिक प्रवासी-अनुकूल वेळापत्रक लागू केले आहे.या अंतर्गत मेट्रो लाईन ९ (दहिसर पूर्व – काशिगाव) आणि मेट्रो लाईन २बी (मंडाळे – डायमंड गार्डन, टप्पा १) या नवीन मार्गिका प्रवाशांसाठी सुरू करण्यात आल्या आहेत. यामुळे ठाणे जिल्ह्यातील पहिली मेट्रो सेवा सुरू झाली असून हार्बर लाईन परिसरालाही मेट्रो कनेक्टिव्हिटी मिळाली आहे.तसेच, मेट्रो लाईन २ए आणि लाईन ७ या आता स्वतंत्रपणे चालवण्यात येणार असून, लाईन ७ ही लाईन ९ सोबत एकत्रितपणे (इंटिग्रेटेड कॉरिडॉर) चालणार आहे, ज्यामुळे अंधेरी पूर्व ते मीरा-भाईंदर (काशिगाव) दरम्यान थेट आणि अखंड प्रवास शक्य होणार आहे.हे सुधारित वेळापत्रक प्रवाशांचा वेळ वाचवण्यासाठी, प्रतीक्षा कालावधी कमी करण्यासाठी आणि भविष्यातील मेट्रो विस्तार लक्षात घेऊन तयार करण्यात आले आहे.महत्वाचे बदल•लाईन ९ व लाईन २बी ८ एप्रिलपासून सेवेत•लाईन ७ आता काशिगावपर्यंत विस्तारित•लाईन २ए व लाईन ७ स्वतंत्र मार्गिका•प्रत्येक मार्गिकेवर वाढीव फेऱ्या व सुधारित वारंवारता•सोपे व समजण्यास सुलभ वेळापत्रकमार्गिकानुसार सेवा तपशीलअ) मेट्रो लाईन २ए (पिवळी लाईन) अंधेरी पश्चिम ते दहिसर पूर्वलाईन २ए आता स्वतंत्र मार्गिका म्हणून कार्यरत राहील.•पहिली गाडी : सकाळी सुमारे ५:५० – ५:५५•शेवटची गाडी: रात्री सुमारे १०:३५ – ११:००•वारंवारता: गर्दीच्या वेळेत: सुमारे ६ मिनिटे इतर वेळेत: ८ ते १० मिनिटे•एकूण फेऱ्या: आठवड्याचे दिवस – २८९, शनिवार – २३१, रविवार – २१३या बदलामुळे मार्गिकेवरील सेवा अधिक कार्यक्षम आणि नियमित होणार आहे.ब) मेट्रो लाईन ७ व लाईन ९ (संयुक्त कॉरिडॉर) गुंदवली ते काशिगावलाईन ९ सुरू झाल्यानंतर लाईन ७ आता विस्तारित स्वरूपात कार्यरत राहील.•मार्ग लांबी: १९.७९ किमी•पहिली गाडी: सकाळी सुमारे ५:५०•शेवटची गाडी: रात्री सुमारे ११:००•वारंवारता: गर्दीच्या वेळेत: सुमारे ५:५० मिनिटे इतर वेळेत: ८ ते १० मिनिटे•एकूण फेऱ्या: आठवड्याचे दिवस – २७६, शनिवार – २२३, रविवार – २०५या एकत्रित मार्गिकेमुळे अंधेरी पूर्व ते काशिगाव दरम्यान थेट प्रवास शक्य होणार असून प्रवास अधिक जलद व सोयीस्कर होईल.क) मेट्रो लाईन २बी (टप्पा १) महाराष्ट्र नगर – मंडाळे ते देशभक्त एन. जी. आचार्य उद्यान – डायमंड गार्डन, चेंबूरलाईन २बी (टप्पा १) मुळे हार्बर लाईन परिसराला मेट्रो जोडणी मिळाली आहे.•मार्ग लांबी: ५.३८ किमी•पहिली गाडी : सकाळी ६:००•शेवटची गाडी: रात्री सुमारे १०:१५ – १०:३०•वारंवारता: सुमारे ९ मिनिटे ३० सेकंद•एकूण फेऱ्या: २०९हा कॉरिडॉर चेंबूर आणि आसपासच्या भागांना अखंड मेट्रो सुविधा प्रदान करतो, ज्यामुळे दैनंदिन प्रवाशांसाठी नवीन प्रवास पर्याय उपलब्ध होतात.इंटरचेंज सुविधादहिसर स्थानकावरून प्रवासी लाईन २ए आणि लाईन ७/९ दरम्यान सहज बदल करू शकतात, त्यासाठी स्टेशनबाहेर जाण्याची आवश्यकता नाही.प्रवाशांसाठी फायदे•कमी प्रतीक्षा वेळ (६–१० मिनिटांत गाडी उपलब्ध)•नव्या भागांना मेट्रो कनेक्टिव्हिटी•अधिक जलद आणि थेट प्रवास•सुलभ आणि समजण्यास सोपे वेळापत्रकप्रवाशांना प्रवासापूर्वी अद्ययावत वेळापत्रक तपासण्याचा सल्ला देण्यात येतो, तसेच अधिक कार्यक्षम, एकात्मिक आणि प्रवासी-अनुकूल मेट्रो सेवेचा लाभ घेता येईल.डॉ. संजय मुखर्जी म्हणाले, “मेट्रो लाईन २ए व लाईन ७ यांचे स्वतंत्र संचालन, तसेच लाईन ९ आणि लाईन २बी (टप्पा १) सुरू होणे हा मुंबई मेट्रोच्या विस्तारातील महत्त्वाचा टप्पा आहे. या बदलांमुळे प्रवाशांच्या हालचाली अधिक सुलभ होतील, प्रतीक्षा वेळ कमी होईल आणि संपूर्ण नेटवर्क अधिक कार्यक्षम होईल.लाईन ७ आणि लाईन ९ यांच्या एकत्रीकरणामुळे उपनगरांमध्ये थेट कनेक्टिव्हिटी मिळेल, तर लाईन २बीमुळे हार्बर लाईन परिसराला मेट्रो जोडणी मिळेल. या सर्व उपक्रमांमुळे प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सोयीस्कर होईल.टप्प्याटप्प्याने आपण ३३७ किमी लांबीच्या एकात्मिक मेट्रो जाळ्याकडे वाटचाल करत आहोत आणि ‘मुंबई इन मिनिट्स’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवत आहोत.”
Iran-US-Israel War : पाकिस्तानकडून आलेल्या युध्दविरामाच्या प्रस्तावाला इराणने दाखवली केराची टोपली
इराणने पाकिस्तानकडून मांडण्यात आलेल्या १५ मुद्द्यांच्या शांतता प्रस्तावाला नकार (Iran-US-Israel War) दिला आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या एका प्रवक्त्याने सांगितले की, मध्यस्थांमार्फत पाठवण्यात आलेला अलीकडील शांतता प्रस्ताव इराणने फेटाळून लावला आहे. युद्धविरामासंदर्भातील कोणतीही चर्चा इराणच्या राष्ट्रीय हितांचा विचार करूनच केली जाईल, अशी भूमिका तेहरानने पुन्हा स्पष्ट केली आहे.वृत्तानुसार, पाकिस्तानने तयार केलेल्या मसुदा प्रस्तावाची प्रत इराण आणि अमेरिका (Iran-US-Israel War) या दोन्ही देशांना पाठवण्यात आली होती. या प्रस्तावात युद्ध समाप्त करण्यासाठी ४५ दिवसांच्या युद्धविरामासह होर्मुज सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्याचा प्रस्ताव होता. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बगाई यांनी सांगितले की, तेहरानने मध्यस्थांमार्फत आपली भूमिका आणि अटी यापूर्वीच स्पष्ट केल्या होत्या. कोणत्याही प्रकारच्या दबाव किंवा धमक्यांखाली इराण चर्चा करणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले.इस्माईल बगाई म्हणाले, “डेडलाइन देणे आणि युद्धाची धमकी देणे हे चर्चेच्या प्रक्रियेशी सुसंगत नाही. तेहरानच्या काही अटी आहेत ज्या पूर्णपणे राष्ट्रीय हितांवर आधारित आहेत आणि त्यांना कोणत्याही तडजोडीचा संकेत म्हणून पाहू नये.” त्यांनी पुढे सांगितले की, “इराण आपल्या योग्य आणि न्याय्य मागण्या स्पष्टपणे मांडण्यास अजिबात कचरात नाही. याकडे तडजोड म्हणून नव्हे, तर आत्मविश्वासाच्या प्रतीक म्हणून पाहिले पाहिजे.” तेहरानने अमेरिकेसाठी (Iran-US-Israel War) आपले राजनैतिक उत्तर तयार केले असून योग्य वेळी त्याची घोषणा केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.दरम्यान, अमेरिकेचे (Iran-US-Israel War) राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ५ एप्रिल २०२६ रोजी आपल्या नेहमीच्या आक्रमक शैलीत विधान करत, मंगळवार (७ एप्रिल २०२६) हा दिवस इराणमध्ये “पॉवर प्लांट डे आणि ब्रिज डे” असेल, असे म्हटले. हे विधान इराणमधील वीज प्रकल्प आणि पुलांवर हल्ल्याची अप्रत्यक्ष धमकी असल्याचे मानले जात आहे. ट्रम्प यांनी अमेरिका-इराण यांच्यात सध्या चर्चा सुरू असल्याचा दावा करत ६ एप्रिल रोजी करार होण्याची शक्यता चांगली असल्याचेही म्हटले.
IAS Tukaram Mundhe : ‘त्या’एका वाक्यानं बदललं तुकाराम मुंढेंचं संपूर्ण आयुष्य
महाराष्ट्रातील शिस्तप्रिय आणि धडाकेबाज IAS अधिकारी तुकाराम मुंढे (IAS Tukaram Mundhe) यांच्या मातोश्री आसराबाई हरिभाऊ मुंढे यांचे नुकतेच निधन झाले.
Bengal Opinion Poll 2026: ममता बॅनर्जी की भाजप, पश्चिम बंगालमध्ये यावेळी कोण स्थापन करणार सरकार?
Bengal Opinion Poll 2026: 2021 मध्ये 8 टप्प्यांत निवडणूक झाली होती. त्यावेळी TMC ने 294 पैकी 215 जागा जिंकून सुमारे 48 टक्के मतांसह स्पष्ट बहुमत मिळवले होते.
Education News : महाराष्ट्र सरकारने मूल्यांकनात अपात्र ठरलेल्या १,२५२ शाळा आणि ८२७ तुकड्या कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
Sharad Pawar : “काँग्रेसला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे”–शरद पवार
काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे. काँग्रेसला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे, त्यांनी निर्णय घेतला. त्याची चर्चा करण्याचे कारण नाही.
MS Dhoni Return : सलग तीन पराभवांमुळे बॅक फूटवर गेलेल्या सीएसके छावणीतून अखेर एक आनंदाची बातमी समोर आली आहे.
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी सोमवारी दिल्ली उच्च न्यायालयात स्वतः हजर राहून न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा यांनी या प्रकरणाच्या सुनावणीतून बाजूला व्हावे, अशी मागणी केली.
IPL 2026 Avesh Khan : लखनऊच्या विजयावरून वाद, आवेश खानच्या 'त्या'कृतीमुळे सनरायझर्स नाराज
मुंबई : रविवार ५ एप्रिल रोजी खेळल्या गेलेल्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६ च्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादवर लखनऊ सुपर जायंट्सच्या विजयावरून वाद निर्माण झाला आहे. या संपूर्ण प्रकरणाच्या केंद्रस्थानी लखनऊचा वेगवान गोलंदाज आवेश खान आहे, ज्याच्या कृतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.वास्तविक, सामन्याच्या शेवटच्या षटकात, जेव्हा ऋषभ पंतने जयदेव उनाडकटच्या गोलंदाजीवर चौकार मारला, तेव्हा लखनऊच्या डगआऊटजवळ उभ्या असलेल्या आवेश खानने चेंडूला आपल्या बॅटने मारले. काहींच्या मते, चेंडूने अद्याप सीमारेषा ओलांडली नव्हती. सनरायझर्स हैदराबादला पाच पेनल्टी धावा द्यायला हव्या होत्या आणि पंचांनी नियम २०.१ (डेड बॉल) आणि नियम ४१ (अनफेअर प्ले) लागू करायला हवे होते, अशी चर्चाही सोशल मीडियावर सुरू झाली आहे.क्रिकेट कायद्याच्या तज्ज्ञांच्या मते, आवेश खानची कृती अन्यायकारक आणि अव्यावसायिक असली तरी, ती क्षेत्ररक्षकाच्या प्रयत्नांमध्ये अडथळा मानली जाऊ शकत नाही, कारण त्यावेळी चेंडू थांबवण्यासाठी कोणताही क्षेत्ररक्षक उपस्थित नव्हता. अशा परिस्थितीत, अन्यायकारक खेळाचे नियम लागू केले जाऊ शकत नाहीत. त्यावेळची सामन्याची परिस्थिती अशी होती की, लखनऊला विजयासाठी फक्त एका धावेची गरज होती आणि धावसंख्या बरोबरीत होती. एका पंचानेही स्पष्ट केले की, या परिस्थितीत चौकार नाकारण्यास कोणताही आधार नव्हता.Why Avesh Khan Is So Annoying First he smashed his helmet, then hit the ball with his bat even though it hadn’t reached the boundary the umpire should ban him for one match Or Umpire Should Do That Delivery Dead Ball pic.twitter.com/3xl2WxJlgh— ValenceCricket (@CricketValence) April 5, 2026सनरायझर्स हैदराबाद या प्रकरणी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे (बीसीसीआय) तक्रार करू शकते. मिळालेल्या माहितीनुसार, संघ आपल्या मागील दोन सामन्यांमधील पंचांच्या निर्णयांवर आधीच असमाधानी आहे.रॉयल चॅलेंजर्स बंगळूरविरुद्धच्या पहिल्या सामन्यात फिल सॉल्टने हेनरिक क्लासेनला सीमारेषेवर घेतलेल्या झेलवर संघाने आक्षेप घेतल्याची माहिती आहे. २ एप्रिल रोजी ईडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध झालेल्या सामन्यातील अभिषेक शर्माच्या बाद होण्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. वरुण चक्रवर्तीनेही ब्लेसिंग मुझारबानीच्या झेलवर असमाधान व्यक्त केले आहे.सनरायझर्सने आपला दुसरा सामना जिंकला असला तरी, २९ मार्च रोजी बंगळूरु येथे खेळला गेलेला सामना त्यांना गमवावा लागला. हे निर्णय किंवा सामन्याचा निकाल बदलण्याची शक्यता नसली तरी, फ्रँचायझी या प्रकरणी बीसीसीआयकडे दाद मागू शकते.
प्राजक्त तनपुरेंनी माघार घेताच शरद पवारांकडून गोविंद मोकाटेंना उमेदवारी
मुंबई: आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत सोमवारी कमालीच्या नाट्यमय घडामोडी घडल्या. महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार प्राजक्त तनपुरे यांनी निवडणुकीतून माघार घेतली. भाजप नेत्यांच्या भेटीगाठी आणि 'वरिष्ठ' स्तरावरील चर्चेनंतर तनपुरेंनी हा निर्णय घेतल्याचे समजते. मात्र, त्यानंतर शरद पवार गटाने तातडीने हालचाली करीत, गोविंद मोकाटे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातली.भाजपने या निवडणुकीत दिवंगत शिवाजीराव कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले यांना उमेदवारी जाहीर आहे. तर, महाविकास आघाडीत राहुरीची जागा शरद पवार यांच्या पक्षाकडे आहे. प्राजक्त तनपुरे यांनी निवडणुकीची जय्यत तयारीही सुरू केली होती. मात्र, सोमवारी सकाळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी थेट तनपुरे यांचे कार्यालय गाठले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर चर्चा झाल्यानंतर तनपुरे यांनी 'वैयक्तिक कारणास्तव' निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होईल, अशी शक्यता असताना, शरद पवार गटाने अन्य उमेदवार रिंगणात उतरवला. दरम्यान, ही पोटनिवडणूक केवळ महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी न राहता तिरंगी होण्याची चिन्हे आहेत. वंचित बहुजन आघाडीने अनिल जाधव या आदिवासी तरुण कार्यकर्त्याला उमेदवारी जाहीर केल्याने अक्षय कर्डिले यांच्यासमोर त्यांचेही आव्हान असेल.शरद पवारांनी उमेदवार का दिला?याविषयी प्रतिक्रिया देताना शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे म्हणाले, सुरुवातीपासूनच निवडणूक न लढण्याची तनपुरे यांची इच्छा होती. कार्यकर्त्यांच्या वाढत्या दबावामुळे त्यांना विश्वासात घेऊन मग निवडणुकीचा निर्णय घेतो, अशी त्यांची भूमिका त्यांनी घेतली होती. तसा निरोपही त्यांनी दिला होता. शेवटी त्यांची मानसिकता नव्हती ही वस्तुस्थिती आहे. म्हणून आम्ही दुसरा पर्याय म्हणून गोविंद मोकाटे यांना संधी दिली. जिल्हा परिषदेत त्यांच्या कन्या दोन वेळा निवडून आलेल्या आहेत. ते स्वतः पंचायत समितीला निवडून आले आहेत. शिक्षण संस्थेमध्ये आणि रयतमध्ये काम करत आहेत. त्यांच्याशिवाय अन्य दोन लोकांनी सुद्धा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली होती. परंतु, आम्ही मोकाटेंना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला, असे शिंदे यांनी सांगितले.
Pune: आकाश ऍडव्हर्टीसिंगचा वर्धापन दिन उत्साहात; मतिमंद विद्यालयात धान्य व खाऊ वाटप
Pune:
Sharad Pawar : राष्ट्रवादी विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले अजितदादांच्या निधनानंतर…
Sharad Pawar : शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
Shirur News : शरदवाडीचा ‘आदर्श पॅटर्न’; 3.70 लाखांची पाणीपट्टी एकरकमी भरून जपली सामाजिक बांधिलकी!
कुकडी प्रकल्पाच्या पाण्यावर शेती करणारे अनेक शेतकरी (Shirur News) मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेत असले तरी पाणीपट्टी भरण्याबाबत अनेकदा उदासीनता दिसून येते.
Crime News : पाटण्यात माणुसकीला काळीमा; सख्ख्या काकाकडूनच ३ वर्षांच्या चिमुकलीवर सामूहिक बलात्कार
पाटणा : बिहारची राजधानी पाटणामध्ये नात्याला काळिमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. परसा बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका ३ वर्षांच्या चिमुकलीवर तिच्या सख्ख्या काकाने आपल्या दोन मित्रांच्या मदतीने सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या अघोरी कृत्यामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पीडित मुलीची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून तिच्यावर पाटणा येथील 'एम्स' रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन नराधम आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. मात्र, यातील तिसरा आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.https://prahaar.in/2026/04/06/green-asha-indian-ship-indias-eighth-ship-safely-leaves-the-strait-of-hormuz-carrying-20000-tonnes-of-lpg/आईशेजारी झोपलेल्या ३ वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण करून...शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास, जेव्हा एक ३ वर्षांची चिमुकली आपल्या आईसोबत गाढ झोपेत होती, तेव्हा तिच्या सख्ख्या काकानेच तिचे अपहरण केले. नराधम काकाने तिला जवळच्या एका शेतात नेले आणि तिथे आपल्या दोन मित्रांच्या मदतीने तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने हालचाल करत पीडितेला रुग्णालयात दाखल केले असून, आरोपी काका आणि त्याच्या एका साथीदाराला बेड्या ठोकल्या आहेत. तिसरा आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.नशेत धुंद काकाचा नराधम अवतार...पीडित मुलीच्या आईने सांगितलं की, मुलगी रात्री घरामध्ये झोपली होती. त्यावेळी तिचा नशेच्या आहारी गेलेला काका घरी आला. त्याने मुलीला उचलून नेले. घरापासून ५०० मीटर अंतरावर असलेल्या एका निर्जन शेतात नेऊन त्याने आपल्या दोन मित्रांसह या निष्पाप बालिकेवर सामूहिक अत्याचार केला. सुदैवाने, जवळच असलेल्या मत्स्यपालन तलावावर राखण करणाऱ्या एका व्यक्तीने चिमुकलीच्या रडण्याचा आवाज ऐकला आणि आरडाओरडा सुरू केला. पकडले जाण्याच्या भीतीने नराधम आरोपी पीडितेला तिथेच सोडून पळून गेले. इकडे आईला जाग आली तेव्हा मुलगी गायब असल्याचे पाहून तिने टाहो फोडला. शोधाशोध केली असता मुलगी रक्ताळलेल्या अवस्थेत शेतात सापडली. पोलिसांनी या प्रकरणी पोक्सो (POCSO) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. एका फरार आरोपीचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे.
बारामती: बारामती हा केवळ मतदारसंघ नसून दादांचा श्वास होता आणि त्या श्वासाशी नाळ जुळलेली प्रत्येक व्यक्ती माझ्यासाठी महत्त्वाची असून ही निवडणूक माझी वैयक्तिक नसून दादांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक बारामतीकरांची आहे, अशा भावना उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजितदादा पवार यांनी व्यक्त केल्या. आज पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २०१ - बारामती विधानसभा मतदारसंघातील महायुतीचा सर्वपक्षीय कार्यकर्ता मेळावा कविवर्य मोरोपंत नाट्यगृह येथे पार पडला.या मेळाव्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह भाजप, शिवसेना, आरपीआय, रयत क्रांती संघटना, भीमशक्ती रिपब्लिकन सेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आजी-माजी मंत्री, खासदार, आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.दोन महिन्यापूर्वी आपण सर्वांनी राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री, लोकनेते, आदरणीय अजितदादांना गमावले, ही केवळ माझ्या कुटुंबाची नाही, तर संपूर्ण बारामतीची मोठी हानी आहे. दादांचे जाणे बारामतीकरांना पोरके करून गेले. त्यांच्या अनुपस्थितीत ही पहिलीच निवडणूक होत असून त्यांच्या विकासदृष्टीला पुढे नेण्यासाठी आपली साथ अत्यंत आवश्यक आहे अशी हाक बारामतीकरांना घातली.बारामती शहर हे जागतिक दर्जाचे शहर बनवण्याचे दादांचे स्वप्न होते. त्यांची जागा कोणीच घेऊ शकत नाही, मात्र त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी प्रामाणिकपणे काम करणे ही, आपली सर्वांची जबाबदारी आहे. संपूर्ण बारामती हे माझे कुटुंब आहे, अशा भावना सुनेत्रा पवार यांनी मेळाव्यात व्यक्त केल्या.दादांचा जनता दरबार जसा सर्वांसाठी खुला होता, तसाच तो पुढेही कायम ठेवत प्रत्येकाच्या अडचणी सोडवण्यासाठी कटिबद्ध राहीन. बारामतीच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने काम करत राहणार असे सांगतानाच शहरात बेकायदेशीर व जनतेला त्रासदायक ठरणाऱ्या कोणत्याही गोष्टींना थारा दिला जाणार नाही. दादांनी सुरू केलेले सर्व विकासकामे पूर्णत्वास नेण्याचा माझा निर्धार आहे, असेही सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने महायुतीतील सर्व नेत्यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत दादांच्या आठवणींना साक्षी ठेवून त्यांच्या विचारांना अनुसरून सतत कार्यरत राहण्याचा संकल्प सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला.गेली अनेक वर्षे दादांनी ज्या जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडल्या, त्याच समर्पणाने आता बारामतीसह महाराष्ट्राच्या विकासाची जबाबदारी उचलण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे सुनेत्रा पवार यांनी बारामतीकरांना शब्द दिला.
अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांमुळे (Iran-US-Israel War) इराणचे मोठे नुकसान झाले आहे. इराणच्या सरकारी माध्यमांच्या माहितीनुसार, इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड्स कॉर्प्स (आयआरजीसी)च्या गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी (Majid Khademi) यांचा मृत्यू झाला आहे.आयआरजीसीने या हल्ल्यासाठी अमेरिका आणि इस्रायलला जबाबदार ठरवले आहे. मात्र, मेजर जनरल माजिद खादेमी यांची हत्या नेमकी कुठे झाली याबाबत आयआरजीसीने सविस्तर माहिती दिलेली नाही.दरम्यान, सोमवारी (६ एप्रिल) पहाटे इराणची राजधानी तेहरानच्या आसपासच्या निवासी भागांना लक्ष्य करून अनेक हवाई हल्ले करण्यात आले. एका न्यूज एजन्सीने सोमवारी प्रसिद्ध केलेल्या गार्ड्सच्या निवेदनानुसार, इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सच्या गुप्तचर संघटनेचे प्रमुख मेजर जनरल माजिद खादेमी यांचा अमेरिकन-इस्रायली हल्ल्यात मृत्यू झाला.माहितीनुसार, माजिद खादेमी यांनी जवळपास पाच दशकांपर्यंत इराणच्या गुप्तचर आणि सुरक्षा व्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावली होती. गुप्तचर आणि सुरक्षा क्षेत्रात त्यांनी प्रामाणिकपणा आणि धैर्याने क्रांती, व्यवस्था आणि इस्लामी मातृभूमीसाठी सुमारे अर्धशतक महत्त्वपूर्ण, दीर्घकालीन आणि प्रेरणादायी योगदान दिले. आयआरजीसीने म्हटले आहे की, त्यांचे कार्य पुढील अनेक वर्षे देशाच्या गुप्तचर समुदायासाठी मार्गदर्शक ठरेल, विशेषतः धोरणात्मक स्तरावर परकीय शत्रूंना सामोरे जाण्यासाठी.सोमवारी इस्रायल आणि अमेरिकेकडून करण्यात आलेल्या सलग हल्ल्यांमध्ये २५ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. याशिवाय इराणनेही इस्रायल आणि त्याच्या शेजारील देशांवर प्रत्युत्तरात्मक हल्ले केले. रविवारी हायफा शहरावर इराणने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला होता.४५ दिवसांचा युद्धविराम होणार ?मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर आता युद्धविराम (सीजफायर) होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, इराण आणि अमेरिका यांच्यात युद्धविरामाचा (Iran-US-Israel War) एक आराखडा तयार झाला आहे. हा आराखडा लवकरच लागू होऊ शकतो, ज्यामुळे इराण होर्मुज सामुद्रधुनी पुन्हा जहाज वाहतुकीसाठी खुली करू शकतो.सूत्रांनी सांगितले की, इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव कमी करण्यासाठीचा फ्रेमवर्क पाकिस्तानने तयार केला असून तो दोन्ही देशांना रातोरात पाठवण्यात आला आहे. या प्रस्तावात तात्काळ युद्धविरामानंतर सर्वसमावेशक करारासाठी दोन-स्तरीय (टू-लेयर) धोरणाची रूपरेषा देण्यात आली आहे.एका सूत्राने सांगितले, “आज सर्व मुद्द्यांवर सहमती होणे अपेक्षित आहे. प्रारंभिक समज पाकिस्तानमार्फत इलेक्ट्रॉनिक पद्धतीने अंतिम करण्यात आली असून आता त्याला सामंजस्य करार (एमओयू)चे स्वरूप दिले जाणार आहे.” या संपूर्ण चर्चाप्रक्रियेत पाकिस्तान एकमेव “संवाद माध्यम” (कम्युनिकेशन चॅनेल) म्हणून काम करत आहे.
उत्कृष्ट शैक्षणिक कार्यासाठी न्यू इंग्लिश स्कूल शिरोली बु॥ चे उपशिक्षक रामचंद्र अय्यर यांना (Ozar News) सोमवार दि ६ रोजी समता प्रतिष्ठानने 'गौरवपत्र' देऊन सन्मानित केले.
Eknath Shinde : भाजपाला रोखण्यासाठी शिंदेनी डाव टाकला ! ‘या’नेत्यावर सोपवली मोठी जबाबदारी
पालघर आणि वसई-विरार भागात पारंपरिकपणे शिवसेनेचा (Eknath Shinde) मजबूत हक्काचा मतदार मानला जात होता.
Umpire Murdered Visakhapatnam : क्रिकेटच्या मैदानावरील किरकोळ वादाचे रूपांतर निर्घृण हत्येत झाल्याने खळबळ उडाली आहे.
देवेंद्र फडणवीसांच्या एका कॉलनं बदलला निर्णय, प्राजक्त तनपुरेंनी राहुरी पोटनिवडणुकीतून घेतली माघार
राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवार अर्ज भरण्याची मुदत सोमवारी संपुष्टात आली आहे. या निवडणुकीत दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिलेंना भाजपकडून उमोदवारी देण्यात आली असून या निवडणुकीत त्यांच्याविरोधात शरद पवार गटाकडून जयंत पाटील यांचे भाचे प्राजक्त तनपुरे रिंगणात उतरणार असल्याची जोरदार चर्चा रंगली होती. राजकारणाचा दीर्घ अनुभव असलेले प्राजक्त तनपुरे यांनी मविआ सरकारच्या काळात राज्यमंत्री म्हणूनही काम केलं होतं. त्यामुळे भाजपचं पाठबळ असतानाही अक्षय कर्डिले यांना राहुरीची पोटनिवडणूक जड जाण्याची शक्यता होती. त्यामुळे भाजपनं सोमवारी सकाळी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी आपला डाव टाकला.सोमवारी सकाळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे दोन अनुभवी नेते प्राजक्त तनपुरे यांच्या भेटीला पोहोचले. यानंतर या तिघांमध्ये बराच काळ बंद दाराआड चर्चा झाली. यानंतर प्राजक्त तनपुरे यांचा राहुरीची पोटनिवडणूक लढवण्याचा विचार १८० अंशांच्या कोनात बदलल्याचे दिसले.रवींद्र चव्हाण आणि राधाकृष्ण विखे पाटीलांनी प्राजक्त तनपुरे यांची भेट घेऊन त्यांचं मन वळवलं असलं तरी यामागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खेळी कारणीभूत असल्याचं सांगितलं जातं. देवेंद्र फडणवीस सध्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी केरळ दौऱ्यावर आहेत. मात्र, आज सकाळी रवींद्र चव्हाण हे तनपुरे यांच्या भेटीला पोहोचले तेव्हा त्यांनी तिथून थेट देवेंद्र फडणवीस यांना फोन लावला. या एका फोन कॉलनं प्राजक्त तनपुरे यांचं मन वळाल्याचं सांगितलं जातं आहे.आगामी काळात प्राजक्त तनपुरे राहुरी मतदारसंघात सांगतील त्या विकासकामांसाठी आणि समस्या सोडवण्यासाठी राज्य सरकार १०० टक्के मदत करेल, असं आश्वासन फडणवीस यांनी तनपुरेंना दिलं. देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या महाराष्ट्राचे संपूर्ण राजकारण चालवणाऱ्या मोठ्या नेत्यानं शब्द दिल्यानं प्राजक्त तनपुरे राहुरी पोटनिवडणुकीत जिंकण्याची चांगली शक्यता असतानाही माघार घ्यायला तयार झाल्याचं राजकीय जाणकारांकडून सांगितलं जात आहे.दुपारी ३ वाजण्यापूर्वी शरद पवार गटाकडून गोविंद मोकाटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. प्राजक्त तनपुरे ऐनवेळी माघार घेऊ शकतात, याची कल्पना असल्यानं शरद पवार गटाच्या मुंबई कार्यालयातून राहुरीत प्राजक्त तनपुरे आणि गोविंद मोकाटे असे २ एबी फॉर्म पाठवण्यात आले होते. पण, दुपारी अडीचच्या सुमारास गोविंद मोकाटे हे शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संदीप वरपे यांच्यासोबत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पोहोचले. तेव्हाच प्राजक्त तनपुरे यांनी माघार घेतल्याचं स्पष्ट झालं.प्राजक्त तनपुरे यांनी रवींद्र चव्हाण आणि राधाकृष्ण विखे पाटीलांच्या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. तेव्हाच त्यांचा सूर बदलल्याचं दिसून आलं. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील इतक्या मोठ्या लोकांनी मला विनंती केली असल्यामुळे मी आता विचार करत आहे. राहुरीतील विकासाचे प्रश्न मार्गी लावण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक आश्वासन दिलं आहे. याबाबत मला कार्यकर्त्यांशी चर्चा करावी लागेल. माझा उमेदवारी अर्ज भरुन तयार आहे. ज्या मुद्द्यावर आपण निवडणूक लढवायचं म्हणतोय, तो मुद्दाच सोडवण्याची तयारी त्यांनी दाखवली असेल तर मला माझ्या सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा लागेल, असं प्राजक्त तनपुरे म्हणाले होते.
बारामती: ज्यांच्या शब्दाला महाराष्ट्राच्या राजकारणात चांद्यापासून बांद्यापर्यंत वजन होतं, ज्यांनी उभं आयुष्य शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहोचवण्यासाठी आणि बारामतीच्या विकासासाठी झोकून दिलं, त्या लाडक्या अजितदादांची उणीव आज पावलापावलावर भासत आहे. मात्र, दादांनी पाहिलेली स्वप्नं आणि त्यांचे संकल्प पूर्ण करण्यासाठी दादांची सावली आणि आता बारामतीची 'माऊली' सुनेत्रा वहिनी खंबीरपणे उभ्या आहेत, अशा शब्दांत राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आयोजित सभेत बावनकुळे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, खासदार प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि महायुतीचे इतर मान्यवर नेते उपस्थित होते.बावनकुळे म्हणाले की, आजचा दिवस ऐतिहासिक आहे, पण तितकाच मनावर दडपण आणणाराही आहे. महाराष्ट्राचे लोकनेते आणि 'विकास पुरुष' अजितदादा आज आपल्यात नाहीत, ही पोकळी कधीच भरून निघणार नाही. गडचिरोलीपासून अमरावतीपर्यंत असा एकही कानाकोपरा नाही जिथे दादांच्या कार्याचा ठसा नाही. शेतकऱ्याच्या शेतात पोहोचलेला पाण्याचा प्रत्येक थेंब हा अजितदादांच्या कर्तृत्वाची साक्ष देत आहे.सुनेत्रा पवार यांच्याबद्दल बोलताना बावनकुळे म्हणाले, माझे दादांशी ३२ वर्षांचे कौटुंबिक संबंध आहेत. दादांच्या निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्र दुःखात असताना, सुनेत्रा वहिनींनी राज्याच्या १४ कोटी जनतेसाठी आणि दादांची स्वप्ने जिवंत ठेवण्यासाठी ही जबाबदारी स्वीकारली आहे. त्या केवळ उपमुख्यमंत्री म्हणून नव्हे, तर अजितदादांच्या सावलीतून बाहेर पडून आता बारामतीकरांच्या 'माऊली' म्हणून खंबीरपणे उभ्या आहेत. विधिमंडळात आणि मंत्रिमंडळात त्यांनी आपल्या कामाची छाप पाडायला सुरुवात केली आहे.काँग्रेसला जाहीर आवाहन: ही निवडणूक प्रतिष्ठेची करू नकाबावनकुळे यांनी विरोधी पक्षांना, विशेषतः काँग्रेसला थेट आवाहन केले. महाराष्ट्राची एक राजकीय संस्कृती आणि संस्कार आहेत. अजितदादांनी आपल्या राजकीय जीवनातील ८० टक्के काळ ज्यांच्यासोबत काम केले, त्या काँग्रेस नेत्यांना माझी विनंती आहे की, या जागेवर निवडणूक लढवून तुम्ही दादांच्या स्मृतींचा अनादर करू नका. महाराष्ट्रातील १४ कोटी जनतेची भावना आहे की ही निवडणूक बिनविरोध व्हावी. जर तुम्ही जनभावनेचा अनादर केला, तर बारामतीकर तुमचा असा दारूण पराभव करतील जो इतिहासात कधी झाला नसेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.बारामतीचा विजय ऐतिहासिक ठरणारबावनकुळे यांनी सुनेत्रा पवार यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. त्याचवेळी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बारामतीचा हा विजय महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय असेल, असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा पाय आणखीच खोलात; ईडीकडून मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल
मुंबई : अशोक खरात प्रकरणात दररोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत असून, स्वतःला आध्यात्मिक गुरु म्हणवणाऱ्या खरातच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. शेकडो महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप असलेल्या खरातविरोधात (Ashok Kharat) आधीच १३ गुन्हे दाखल आहेत. आता या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ED) देखील प्रवेश केला असून, खरातविरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.खरातवर (Ashok Kharat) केवळ लैंगिक अत्याचाराचेच नव्हे, तर फसवणुकीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची संपत्ती उभी केल्याचे आरोपही आहेत. नाशिक पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ईडीने आर्थिक गैरव्यवहाराचा सखोल तपास सुरू केला आहे. पोलिसांनी जमा केलेली महत्त्वाची कागदपत्रे ईडीच्या ताब्यात देण्यात आली असून, खरातचे आर्थिक साम्राज्य नेमके कसे उभे राहिले, याचा तपास सुरू आहे.दरम्यान, या प्रकरणात खरातची (Ashok Kharat) पत्नी कल्पना खरात हिचा शोध घेण्यासाठी विशेष तपास पथक (SIT) सक्रिय झाले आहे. तिच्या अटकेसाठी नाशिक, पुणे आणि अहिल्यानगर या तीन जिल्ह्यांत स्वतंत्र पथके पाठवण्यात आली आहेत.शिर्डी पोलीस ठाण्यात जमीन व्यवहारात फसवणूक केल्याप्रकरणी कल्पना खरातविरोधात (Ashok Kharat) गुन्हा दाखल आहे. सध्या अशोक खरातची चौकशी सुरू असली तरी त्याची पत्नी फरार आहे. तसेच त्यांचा मुलगा हर्षवर्धन याचाही संपर्क होत नसल्याचे समोर आले आहे.तपास यंत्रणा या प्रकरणाचा गोपनीय पद्धतीने तपास करत असून, येत्या काळात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.भोंदू अशोक खरात प्रकरणी बड्या महिला अधिकाऱ्याचे 'पोस्टिंग कनेक्शन' उघड?अशोक खरात या प्रकरणाच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाच्या (SIT) हाती मोठी माहिती लागली असून, एक वरिष्ठ महिला अधिकारी आता थेट तपास यंत्रणेच्या रडारवर आली आहे. नाशिकमध्ये कार्यरत असताना या महिला अधिकाऱ्याने खरातला प्रशासकीय मदत केल्याचा खळबळजनक आरोप होत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या तत्कालीन महिला अधिकाऱ्याने आणि अशोक खरातने एकमेकांना 'कथीत' सहकार्य केल्याचे समोर येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या महिला अधिकाऱ्याने प्रशासकीय पातळीवर खरातचे काम सुलभ केले आणि त्या बदल्यात अशोक खरातने आपले राजकीय व प्रशासकीय नेटवर्क वापरून या महिला अधिकाऱ्याला त्यांच्या पसंतीच्या ठिकाणी पोस्टिंग मिळवून दिल्याची चर्चा सध्या नाशिकच्या वर्तुळात रंगली आहे. केवळ बदली आणि पोस्टिंगच नाही, तर या महिला अधिकारी आणि अशोक खरात यांच्यात मोठे आर्थिक व्यवहार झाले आहेत का? या दिशेनेही एसआयटीने आपला तपास चक्राकार फिरवला आहे. जर या व्यवहारांचे पुरावे सापडले, तर संबंधित महिला अधिकाऱ्याच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
Sanjay Raut : “बारामती हा पवारांचा गड आहे, तिथे काय निकाल लागेल हे सर्वांनाच माहिती…”–संजय राऊत
बारामती पोटनिवडणूक ही केवळ स्थानिक निवडणूक न राहता राज्यातील आघाड्या, राजकीय समीकरणे आणि भविष्यातील रणनीती ठरवणारी लढत ठरण्याची शक्यता आहे.
Marathi artist Death : ज्येष्ठ तमाशा कलावंत आणि आर्यभूषण थिएटरचे संचालक अमन तांबे यांचे वयाच्या ६६ व्या वर्षी निधन झाले.
नवी दिल्ली: लडाखमधील लेह जिल्ह्यातील लोक इराणच्या लोकांना मदत करण्यासाठी पुढे आले आहेत. युद्धाच्या काळात लेहमध्ये इराणी पीडितांसाठी विविध देणग्या दिल्या जात आहेत. याच काळात लेहमध्ये एक अनोखा उपक्रम पाहायला मिळाला. इराणी पीडितांसाठी देणगी गोळा करण्याकरिता एका लिलाव प्रक्रियेचे आयोजन करण्यात आले होते. हा लिलाव एका मोकळ्या जागेत आयोजित करण्यात आला होता, जिथे मोठ्या संख्येने लोक जमले होते. या लिलावात एका अंड्यासाठी २५ हजार रुपयांची बोली लावण्यात आली, तर बाजारात त्याच अंड्याची किंमत फक्त १० रुपये होती.स्थानिक रहिवासी शब्बीर हुसेन यांनी एका लिलावात २५,००० रुपयांना एक अंडे विकत घेतले. ते म्हणाले, सर्वांना माहीत आहे की एका अंड्याची किंमत सुमारे १० रुपये असते, पण मी २५,००० रुपये दिले, कारण आम्हाला हा संदेश द्यायचा आहे की इराणमधील मुलांवर अत्यंत क्रूर अत्याचार होत आहेत. आम्हाला त्यांना आर्थिक मदत करायची आहे.तो पुढे म्हणाला, आम्ही इराणी पीडितांसाठी आमचा जीव द्यायला तयार आहोत. आम्ही याच समाजासाठी जगतो. आमचे नेते आम्हाला जे काही करायला सांगतील, ते आम्ही करू. आतापर्यंत आमच्या नेत्यांनी आम्हाला कोणताही आदेश दिलेला नाही.खाद्यपदार्थांपासून दागिन्यांपर्यंत सर्व वस्तूंचे दान करणेलेहमधील अनेक लोक इराणी पीडितांना मदत करत आहेत. यामध्ये अन्न आणि पेयांपासून ते रोख रक्कम आणि दागिन्यांपर्यंतच्या देणग्यांचा समावेश आहे. असे उपक्रम इराणच्या गरजू लोकांना मदत करण्याचा एक प्रयत्न आहे.
तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री आणि डीएमकेचे नेते उदयनिधी स्टॅलिन यांनी भाषिक मुद्द्यावरून केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.
भारताला बांगलादेशबरोबर (India-Bangladesh) पुन्हा निकटचे संबंध प्रस्थापित करायचे आहेत. बांगलादेशात नियुक्त झालेला भारताचे उच्चायुक्त प्रणव वर्मा यांनी बांगलादेशचे पंतप्रधान तारिक रहमान यांची अनौपचारिक भेट घेऊन ही माहिती दिली आहे.
CSK World Record : चेन्नई सुपर किंग्सने (CSK) टी-२० क्रिकेटच्या इतिहासात एका अद्भूत जागतिक विक्रमाची नोंद केली आहे.
Baramati By Election 2026 : एकूणच, बारामतीत आता राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध काँग्रेस अशी थेट आणि अटीतटीची लढत रंगण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत.
Delhi Assembly : दिल्ली विधानसभा अध्यक्ष विजेंद्र गुप्ता यांच्या गाडीवर अज्ञात व्यक्तीने शाईफेक केली आहे.
फ्लॅट-ट्रॅक रेसिंग स्टाइलवर आधारित असलेली ही आधुनिक क्लासिक बाइक रेट्रो डिझाइन आणि स्पोर्टी रोड-फोकस्ड परफॉर्मन्सचा उत्तम मेळ साधते.
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे बीड कनेक्शन उघड; ‘त्या’पत्रातून धक्कादायक माहिती आली समोर
नाशिकच्या भोंदू अशोक खरात (Ashok Kharat) यांच्या लैंगिक शोषण आणि फसवणुकीच्या प्रकरणात आता बीड कनेक्शन समोर आले आहे.
Delhi: पार्किंगवरून महिला उपनिरीक्षक आणि वृद्ध व्यक्तीमध्ये वाद, पोलिसांनी काय कारवाई केली?
दिल्ली: दिल्लीतील उत्तर रोहिणी परिसरात पोलीस आणि नागरिकांमध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर रोहिणीमध्ये कार पार्किंगवरून दिल्ली पोलिसांच्या एका महिला उपनिरीक्षक आणि एका ज्येष्ठ नागरिकात वाद झाला. यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर अशांतता पसरली. या गोंधळानंतर पोलिसांनी त्या वृद्ध व्यक्तीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, पोलिसांना त्या महिला उपनिरीक्षकाकडूनही एक तक्रार मिळाली आहे.पोलिसांनी काय सांगितले?उत्तर रोहिणीमधील वादासंदर्भात, दिल्ली पोलिसांनी माहिती दिली की, एक महिला उपनिरीक्षक गर्भवती असून त्या एक सामान्य नागरिक म्हणून वैद्यकीय तपासणीसाठी एका क्लिनिकमध्ये आल्या होत्या. त्यांची त्या भागात नियुक्ती नाही आणि त्या जवळच्याच परिसरातील रहिवासी आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे पती होते, त्यांनी सामान्य कपडे घातले होते आणि त्या त्यांच्या खाजगी वाहनाने आल्या होत्या. घटनेच्या वेळी त्या कोणतेही अधिकृत कर्तव्य बजावत नव्हत्या. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, महिला उपनिरीक्षक आणि दुकानाचे मालक, जे एक ज्येष्ठ नागरिक आहेत, यांच्यात पार्किंगवरून वाद झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला उपनिरीक्षक म्हणाल्या की, त्या डॉक्टरांना भेटायला जात असल्याने ५-१० मिनिटांत आपली गाडी बाजूला घेतील.पोलिसांनी आतापर्यंत काय कारवाई केली आहे?मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर रोहिणी पोलीस ठाण्यात दोन्ही पक्षांकडून तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारीच्या आधारे, बीएनएस पोलीस ठाणे उत्तर रोहिणी येथे कलम ११५(२)/१२६/३५१/३(५) अन्वये एफआयआर क्रमांक १८०/२०२६, दिनांक ०५.०४.२०२६ आधीच नोंदवण्यात आला असून, कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, महिला उपनिरीक्षकांच्या तक्रारीचीही चौकशी सुरू आहे.
Rahuri Election 2026 : राहुरी पोटनिवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीने गोविंदराव मोकाटे यांना उमेदवारी दिली आहे.
Sarfaraz Khan Record : सर्फराझने आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती, त्याच मैदानात त्याने ११ वर्षांनंतर एक अद्भूत विक्रम आपल्या नावे केला.
Actress Death : मनोरंजन विश्वात खळबळ ! ‘या’प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने घेतला जगाचा निरोप
तमिळ टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधून (Actress Death) एक दुःखद बातमी समोर आली आहे.
Nagpur Crime : नागपूर हादरलं! पैशांसाठी १४ वर्षीय मित्राची निघृण हत्या
नागपूर : नागपूर शहरात अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. शहराला हादरवून सोडणाऱ्या १४ वर्षीय मुलाच्या अपहरण आणि हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यात नागपूर पोलिसांना यश आलं आहे. या प्रकरणात सोमवारी पहाटे गिट्टीखदान पोलिसांनी ३ आरोपींना अटक केली असून, या प्रकरणात पीडित मुलाच्या परिचित असलेल्या मित्रांनीच हा गुन्ह्या केला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये जयराम गोपाल यादव (१९, रा. गिट्टीखदान), केतन उर्फ कुणाल रमेश शाहू (२२, रा. गिट्टीखदान) आणि आयुष मोहन शाहू (१९, रा. मानकापूर) यांचा समावेश आहे. हे तिन्ही आरोपी भाजीपाल्याचा व्यवसाय करत असून, अथर्वच्या कुटुंबाशी त्यांची ओळख होती.नेमकं काय घडलं ?माहितीनुसार अथर्वच्या वडिलांचा भाजीपाल व्यवसाय असून त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात पैसे असल्याची माहिती आरोपींना होती. त्यानुसार त्यांनी ४० ते ५० लाख रुपयांची खंडणी उकळण्याचा कट रचला. या अपहरणाची योजना ३ दिवसांपूर्वी आखण्यात आली होती.हनुमान जयंतीच्या दिवशी गिट्टीखदान परिसरात निघालेल्या शोभायात्रेदरम्यान अथर्व आईस्क्रीम घेण्यासाठी बाहेर पडला होता. त्यावेळी जयराम यादवनं त्याला बोलावून एका टाटा एस वाहनाजवळ नेलं, जिथे इतर दोन्ही आरोपी आधीच उपस्थित होते. तिघांनी मिळून अथर्वला जबरदस्तीनं गाडीत बसवलं आणि आवाज करू नये म्हणून त्याचं तोंड बांधलं.यानंतर आरोपींनी अथर्वला गोरेवाडा परिसरात नेलं. सुरुवातीला त्याला बेशुद्ध करून खंडणीसाठी ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मात्र तो बेशुद्ध होत नसल्यानं आरोपींनी त्याला मारहाण केली. या मारहाणीमध्येच अथर्वचा मृत्यू झाला. यानंतर घाबरलेल्या आरोपींनी कापडानं गळा दाबून हत्या केल्याचंही समोर आलं आहे. या आरोपींनी हत्येनंतर पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न केला. त्यांनी अथर्वचा मृतदेह कळमेश्वर रेल्वे क्रॉसिंग फ्लायओव्हरजवळ भरतवाडा परिसरात फेकून दिला आणि वापरलेली गाडी धुवून टाकली.दरम्यान, अथर्व बेपत्ता झाल्यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. यामध्ये एक संशयास्पद टाटा एस वाहन दिसून आल्याने या आधारे पोलिसांनी आयुष शाहूला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यानं संपूर्ण गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर इतर दोन्ही आरोपींनाही अटक करण्यात आली. गिट्टीखदान पोलीस आणि गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकानं ही कारवाई केली असून, सध्या या प्रकरणाबाबत आरोपींची अधिक चौकशी सुरू आहे.
बारामती: राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांनी आज बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. हा फक्त एक उमेदवारी अर्ज नाही, तर अजितदादांनी निवडलेल्या विकासाच्या वाटेवर पुढे जाण्याचा निर्धार आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आज आपले विचार मांडले.आजही बारामतीकरांच्या मनात दादांबद्दल अपार प्रेम आणि त्यांच्या विचारांवर अपार श्रद्धा आहे. आजवर जशी साथ बारामतीकरांनी दादांना दिली, तशीच साथ आता वहिनींनाही द्यावी, अशी मनापासून विनंती सुनिल तटकरे यांनी बारामतीकरांना केली.ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी आमच्या सर्वांची इच्छा आहे, त्यासाठी शेवटच्या दिवसापर्यंत प्रयत्न करू. परंतु निवडणूक लादली गेलीच, तर भारताच्या विधानसभा निवडणुकांच्या इतिहासातील सर्वाधिक मताधिक्याने वहिनींना बारामतीकर निवडून देतील. बारामतीकरांचं प्रत्येक मत म्हणजे अजितदादांना वाहिलेली खरी श्रद्धांजली ठरेल असेही सुनिल तटकरे म्हणाले.
Baramati By-Election: “मी अजितदादांचा विचारांचा वारसा पुढे नेईन. चार वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या शरद पवार (Sharad Pawar) साहेबांची सून आणि सहा वेळा उपमुख्यमंत्री राहिलेल्या अजितदादांची पत्नी म्हणून मला राज्य सांभाळण्याची ताकद मिळेल,” असे वक्तव्यही सुनेत्रा पवार यांनी केले.
Narendra Modi : देशाच्या सुरक्षिततेशी कधीच तडजोड नाही; पंतप्रधान मोदींची काँग्रेसवर टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सोमवारी आसाममधील निवडणूक सभेत काँग्रेसवर हल्लाबोल केला.
Bjp Leader Death : भाजपचा बडा नेता हरपला! पक्षाच्या स्थापना दिवशीच माजी आमदाराचे निधन
Bjp Leader Death : जशपूरचे माजी आमदार जागेश्वर राम भगत यांचे ६ एप्रिल रोजी भाजपच्या स्थापना दिनी निधन झाले.
Share Market Rise: दरम्यान, आज फार्मा आणि ऑईल अँड गॅस क्षेत्र वगळता इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांक हिरव्या निशाण्यावर बंद झाले. निफ्टी स्मॉलकॅप-१०० आणि मिडकॅप-१०० मध्ये सुद्धा १ टक्क्यांहून अधिक तेजी नोंदवण्यात आली.
मुंबईतील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीमध्ये रंगणार चित्रपट महोत्सव
मुंबई: राज्य शासनाचा अधिकृत ‘चित्रपताका’ चित्रपट महोत्सव यंदा १२ ते १५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी, मुंबई येथे आयोजित करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी दिली.सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या उपस्थितीत आज पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी, मुंबई येथे सांस्कृतिक कार्य विभागाची आढावा बैठक झाली. या बैठकीत मंत्री ॲड. शेलार यांनी माहिती दिली. या बैठकीस बैठकीस विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील, सह-व्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर, उपसचिव नंदा राऊत तसेच उपसचिव महेश वाव्हळ उपस्थित होते.राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळामार्फत गेल्या वर्षापासून आंतरराष्ट्रीय दर्जाचा ‘चित्रपताका’ मराठी चित्रपट महोत्सव सुरू करण्यात आला आहे. पहिल्याच वर्षी या महोत्सवाला रसिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. त्या यशाच्या पार्श्वभूमीवर यंदा चार दिवसांचा हा महोत्सव अधिक व्यापक स्वरूपात आयोजित करण्याचे निर्देश मंत्री ॲड.शेलार यांनी दिले.
भारताचे आठवे जहाज ‘ग्रीन आशा’ने होर्मुझ सामुद्रधुनी यशस्वीरित्या पार केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय जहाज ‘ग्रीन आशा’वर सुमारे २० हजार टन एलपीजी असल्याचा अंदाज आहे. भारतीय वेळेनुसार रविवारी दुपारी ३:३० वाजता ‘ग्रीन आशा’ हे जहाज इराणच्या लारक, केशम आणि होर्मुझ बेटांदरम्यान असलेल्या इराणी जलक्षेत्रातून मार्गक्रमण करून सामुद्रधुनीच्या पूर्व भागात पोहोचले होते.सूत्रांच्या माहितीनुसार, २८ फेब्रुवारीला युद्ध सुरू झाल्यानंतर एलपीजी वाहून नेणारे होर्मुझ सामुद्रधुनी पार करणारे हे आठवे भारतीय जहाज ठरले आहे. यापूर्वी ‘ग्रीन सांवरी’ या भारतीय जहाजाने शुक्रवारी (३ एप्रिल) रात्री होर्मुझ सामुद्रधुनी सुरक्षितपणे पार केली होती. या जहाजावर सुमारे ४६,६५० मेट्रिक टन एलपीजीचा माल होता.माहितीनुसार, व्यापारी जहाजांना मदत करण्यासाठी भारतीय नौदलाची युद्धनौका पूर्णपणे सज्ज ठेवण्यात आली आहे. पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षामुळे निर्माण झालेल्या समुद्री नाकेबंदीच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकार भारतीय जहाजांना होर्मुझ सामुद्रधुनीतून सुरक्षित मार्ग मिळावा यासाठी इराणी अधिकाऱ्यांशी सातत्याने चर्चा करत आहे.यापूर्वी जहाजरानी मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, फारसी आखातात १८ भारतीय जहाजे आणि सुमारे ४८५ खलाशी उपस्थित आहेत.खाडी प्रदेशातील अलीकडील घडामोडींवर आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत बंदरे, जहाजरानी आणि जलमार्ग मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव मुकेश मंगल यांनी सांगितले की, फारसी आखातात असलेल्या सर्व भारतीय जहाजांवर आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.ते पुढे म्हणाले, “फारसी आखातात असलेले सर्व खलाशी पूर्णपणे सुरक्षित आहेत.” आतापर्यंत एकूण ९६४ हून अधिक खलाशांना भारतात परत आणण्यात आले असून देशातील सर्व बंदरांचे कामकाज सुरळीत सुरू आहे.बंदरांच्या कामकाजाबाबत त्यांनी सांगितले, “बंदरे, जहाजरानी आणि जलमार्ग मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय, परदेशातील भारतीय दूतावास तसेच समुद्री क्षेत्राशी संबंधित इतर घटकांशी आम्ही सातत्याने समन्वय ठेवत आहोत.”

26 C