SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

28    C
...

अमेरिकेचा नेदरलँडवर ९३ धावांनी विजय

नवी दिल्ली : आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील २१ वा सामना अमेरिका आणि नेदरलँड्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना सैतेजा मुक्कामल्लाने दमदार अर्धशतकी खेळी केली. तर शुभम रांजणेने शेवटी फलंदाजी करताना नाबाद ४८ धावा केल्या. या खेळीच्या बळावर अमेरिकेने ६ गडी बाद १९६ धावांचा डोंगर उभारला. या धावांचा पाठलाग करताना नेदरलँड्स संघाचा डाव अवघ्या १०३ धावांवर आटोपला. यासह अमेरिकेने हा सामना ९३ धावांनी आपल्या नावावर केला आहे.या सामन्यात नेदरलँड्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय फसला. कारण अमेरिकेच्या फलंदाजांनी तुफान फटकेबाजी केली. सलामीला आलेल्या मोनांक पटेलने ३६ धावांची खेळी केली. तर जहागीरने २० धावा केल्या. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या सैतेजा मुक्कामल्लाने ५१ चेंडूत ७९ धावांची दमदार खेळी केली. तर शेवटी शुभम रांजणेने २४ चेंडूत नाबाद ४८ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ३ चौकार आणि २ षटकार खेचले. या खेळीच्या बळावर अमेरिकेने २० षटकांअखेर ६ गडी बाद १९६ धावांचा डोंगर उभारला.नेदरलँड्स संघाला हा सामना जिंकण्यासाठी १९७ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना नेदरलँड्स संघाला हवी तशी सुरुवात करता आली नाही. मायकल लेव्हिटने अवघ्या ३ धावा केल्या. तर मॅक्स ओ डाऊडने अवघ्या १३ धावा केल्या. तर बस डी लीडने २३ धावा केल्या. कर्णधार स्कॉट एडवर्ड्सने जोर लावला. पण तो २० धावांवर माघारी परतला. नेदरलँड्स संघाचा डाव १०३ धावांवर आटोपला.या सामन्यातील पहिल्या डावात अमेरिकेच्या फलंदाजांनी दमदार कामगिरी केली. तर दुसऱ्या डावात गोलंदाजांनी नेदरलँड्सच्या फलंदाजांवर दबाव टाकला. नेदरलँड्सकडून हरमित सिंगने सर्वाधिक ४ गडी बाद केले. तर मोहम्मद मोहसीनने २ आणि शाल्क्विकचा शेडलीने ३ गडी बाद केले. अमेरिकेच्या फिरकी गोलंदाजांनी शेवटपर्यंत नेदरलँड्सच्या फलंदाजांवद दबाव बनवून ठेवला. परिणामी नेदरलँड्सचा डाव अवघ्या १०३ धावांवर आटोपला. हा अमेरिकेचा या स्पर्धेतील पहिलाच विजय ठरला आहे.

फीड फीडबर्नर 13 Feb 2026 11:10 pm

‘नरेगा’ अंतर्गत मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद रस्त्यांना मोठा दिलासा

नवी दिल्ली :ग्रामीण भागातील शेतमाल वाहतूक अधिक सुलभ आणि सुरक्षित करण्यासाठी ‘नरेगा’ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘मातोश्री ग्रामसमृद्धी’ पाणंद रस्ता कामांवर असलेली 'दहा कामांची मर्यादा' आता लवकरच हटवण्यात येणार आहे. केंद्र सरकारने या प्रस्तावाला तत्त्वतः मंजुरी दिली असून, यामुळे कामांना गती मिळणार असल्याचे रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांनी सांगितले.राज्यात मागील काही महिन्यांपासून एका गावात दहापेक्षा अधिक कामे सुरू करण्यास मर्यादा असल्याने अनेक ठिकाणी पाणंद रस्त्यांची कामे प्रलंबित होती. या पार्श्वभूमीवर रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. केंद्रीय मंत्री चौहान यांनी पाणंद रस्त्यांच्या कामांना तातडीने गती देण्यास होकार दर्शवला असून राज्यात लागू असलेली मर्यादा लवकरच पूर्णपणे उठवली जाईल, असे आश्वासन यावेळी दिले.या निर्णयामुळे राज्यभर पाणंद रस्त्यांची कामे सुरळीतपणे सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला असून ग्रामीण अर्थव्यवस्थेला यामुळे चालना मिळणार आहे. शेतकऱ्यांना शेतमाल बाजारपेठेत जलद आणि. सुरक्षितरित्या पोहोचवता येईल, वाहतूक खर्च कमी होईल तसेच गावांच्या दळणवळण व्यवस्थेत लक्षणीय सुधारणा होईल. मातोश्री ग्रामसमृद्धी उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यास हा निर्णय महत्त्वाचा ठरेल असा विश्वास रोहयो मंत्री भरत गोगावले यांनी व्यक्त केला.

फीड फीडबर्नर 13 Feb 2026 10:30 pm

जेव्हा झिम्बाब्वे हरते तेव्हा भारत वर्ल्ड चॅम्पियन होतो, यंदाही होणार इतिहासाची पुनरावृत्ती ?

कोलंबो : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ मध्ये शुक्रवार १३ फेब्रुवारी रोजी ऐतिहासिक घटना घडली. कोलंबोमधील आर प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या सामन्यात झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलिया विरुद्धचा सामना २३ धावांनी जिंकला. हा निकाल पाहून भारतीय क्रिकेटप्रेमींना प्रचंड आनंद झाला आहे. याला कारणही विशेष असेच आहे.झिम्बाब्वेने तब्बल १९ वर्षांनंतर वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. याआधी २००७ मध्ये झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता, त्यावेळी भारत जगज्जेता झाला होता. यामुळे आता इतिहासाची पुनरावृत्ती होणार असल्याची चर्चा भारतीय क्रिकेटप्रेमींमध्ये सुरू झाली आहे. याआधी १९८३ मध्येही झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. त्यावेळी झिम्बाब्वे १३ धावांनी जिंकली होती. नंतर २००७ मध्ये झिम्बाब्वे ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाच विकेट राखून जिंकली होती. विशेष म्हणजे २००७ आणि त्याआधी १९८३ मध्येही भारत विश्वविजेता झाला होता. यामुळे आता २०२६ मध्येही भारत विश्वविजेता होणार का ? याविषयी क्रिकेटप्रेमींमध्ये उत्सुकता वाढली आहे.झिम्बाब्वेने बलाढ्य ऑस्ट्रेलियाला पाजले पराभवाचे पाणीफलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा तिन्ही आघाड्यांवर सर्वोत्तम खेळ करत झिम्बाब्वेने टी२० वर्ल्डकप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाला हरवण्याची किमया केली. झिम्बाब्वेने कोलंबोतल्या आर. प्रेमदासा स्टेडियमच्या आव्हानात्मक खेळपट्टीवर झिम्बाब्वेने सर्वांगीण सुरेख खेळ करत ऑस्ट्रेलियाला निष्प्रभ ठरवले. झिम्बाब्वेने प्रथम फलंदाजी करताना १६९ धावांची मजल मारली. याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा डाव १४६ धावांतच आटोपला. झिम्बाब्वेने २३ धावांनी विजय मिळवला.मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना जोश इंगलिस ८ धावा करून तंबूत परतला. मुझाराबानीने त्याला बाद केले. कॅमेरुन ग्रीनला इव्हान्सने बाद केले. तो भोपळाही फोडू शकला नाही. मुझाराबानीच्या उसळत्या चेंडूवर टीम डेव्हिड भोपळाही न फोडता तंबूत परतला. इव्हान्सने कर्णधार हेडला त्रिफळाचीत करत ऑस्ट्रेलियाची अवस्था २९/४ अशी केली. यानंतर ग्लेन मॅक्सवेल आणि मॅट रेनशॉ यांनी पाचव्या विकेटसाठी ५९ चेंडूत ७७ धावांची भागीदारी केली. मॅक्सवेल सामना जिंकून देणार, असे चित्र असताना बर्लच्या चेंडूवर तो त्रिफळाचीत झाला. त्याने ३१ धावांची खेळी केली. दुखापतीमुळे गोलंदाजी अर्धवट सोडलेला मार्कस स्टॉइनस फलंदाजीला आला. चौकारासह त्याने चांगली सुरुवात केली. मात्र मासाकाटझाने त्याला बाद करत ऑस्ट्रेलियाच्या डावाला खिंडार पाडले. स्टॉइनसने ६ धावा केल्या. बेन ड्वारशियसने लगावलेल्या फटक्याचे मुनयोंगाने अफलातून झेलात रुपांतर केले. रेनशॉकडे सूत्रे होती. धावगतीचे आव्हान १५ च्या पलिकडे गेल्यामुळे रेनशॉने धोका पत्करला. मात्र तो रायन बर्लच्या हातात जाऊन विसावला. रेनशॉने ४४ चेंडूत ६५ धावांची खेळी साकारली. मात्र त्याला दुसऱ्या बाजूने साथ मिळू शकली नाही. रेनशॉ बाद होताच ऑस्ट्रेलियाच्या विजयाच्या आशा मावळल्या. झिम्बाब्वेतर्फे ब्लेसिंग मुझाराबानीने ४ तर ब्रॅड इव्हान्सने ३ विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाच्या डावाला खिंडार पाडले.झिम्बाब्वेने ब्रायन बेनेटच्या अर्धशतकाच्या बळावर १६९ धावांची मजल मारली. बेनेट आणि ताडिवानाशे मारुमानी यांनी ६१ धावांची सलामी दिली. स्टॉइनसने मारुमानीला बाद करत ही जोडी फोडली. त्याने ३५ धावा केल्या. रायन बर्लने बेनेटला चांगली साथ दिली. या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी ५१ चेंडूत ७० धावांची भागीदारी केली. बर्लला ग्रीनने बाद केले. त्यानेही ३५ धावा केल्या. यानंतर बेनेटला सिकंदर रझाची साथ मिळाली. या जोडीने २४ चेंडूत ३८ धावा कुटल्या. बेनेटने ५६ चेंडूत ७ चौकारांसह नाबाद ६४ धावांची खेळी केली. बेनेटने सूत्रधाराची भूमिका स्वीकारत खेळी केली. मात्र २० षटकं खेळूनही त्याच्या नावावर अर्धशतकच असल्याने स्ट्राईकवरून टीकाही झाली. त्याने ११४च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या.झिम्बाब्वेच्या दर्जेदार खेळापुढे ऑस्ट्रेलिया निरुत्तरझिम्बाब्वेने सगळ्या आघाड्यांवर दर्जेदार खेळ करत ऑस्ट्रेलियाला निरुत्तर केले. या विजयासह ब गटाची गुणतालिका रंजक झाली आहे. श्रीलंकेने दोन लढतीत विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाने आयर्लंडचा धुव्वा उडवला मात्र झिम्बाब्वेविरुद्ध त्यांना पराभवाचा धक्का बसला आहे. त्यांची तिसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. झिम्बाब्वेने दोन सामने खेळून दोन्ही जिंकले आहेत. त्यांचे ४ गुण झाले आहेत. ते दुसऱ्या स्थानी आहेत. झिम्बाब्वेने आणखी एक विजय मिळवल्यास ऑस्ट्रेलियाला स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागू शकतो. नियमांनुसार, प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ बादफेरीसाठी पात्र ठरतील.वनडेत झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला केले आहे चीतपटझिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ३३ लढतींपैकी ३ मध्ये विजय मिळवला आहे. १९८३ वनडे वर्ल्डकपमध्ये झिम्बाब्वेने १३ धावांनी थरारक विजय मिळवला होता. २०१४ आणि अगदी अलीकडे म्हणजे २०२२ मध्ये झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला धूळ चारली होती.

फीड फीडबर्नर 13 Feb 2026 10:10 pm

सुनेत्रा पवार राष्ट्रवादीच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षा होणार, प्रफुल्ल पटेलांची घोषणा

नवी दिल्ली : अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाच्या नेतृत्वाबाबत सुरू असलेल्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. सुनेत्रा पवार या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षा म्हणून लवकरच पदभार स्वीकारणार असल्याची घोषणा पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी शुक्रवारी केली. येत्या पंधरा दिवसांत त्यांच्या निवडीची औपचारिक प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. अजित पवारांच्या आकस्मिक जाण्याने पक्षात निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी आणि संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. या पदासाठी त्या एकमेव उमेदवार असून, पक्षातील सर्व स्तरांतून त्यांना पाठिंबा मिळत आहे. सध्या आमचे सर्वोच्च प्राधान्य सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला पुन्हा उभारी देणे आणि संघटन अधिक मजबूत करणे हेच आहे, असे पत्रकारांशी बोलताना पटेल म्हणाले. नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने दमदार कामगिरी केली आहे. पुणे जिल्हा परिषदेतील दणदणीत विजयासोबतच कोल्हापूर आणि अन्य जिल्हा परिषदांमध्येही पक्षाने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. या यशाच्या पार्श्वभूमीवर, आगामी काळात गावपातळीवरील कार्यकर्त्यांना बळ देऊन पक्षाचा पाया विस्तारण्यावर आमचा भर असेल, असे पटेलांनी नमूद केले.कोण आहेत सुनेत्रा पवार ?सुनेत्रा पवार यांचा जन्म १८ ऑक्टोबर १९६३ रोजी तेर (जि. धाराशिव) येथे झाला. माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्या त्या बहीण असून, त्यांना मोठा राजकीय वारसा लाभला. १९८५ मध्ये अजित पवार यांच्याशी त्यांचा विवाह झाला. लग्नानंतर काटेवाडी (ता. बारामती) येथे स्थायिक झाल्यानंतर त्यांनी सामाजिक कार्याला सुरुवात केली.काटेवाडीमध्ये ग्रामस्वच्छता चळवळीची मुहूर्तमेढ रोवण्याचे श्रेय सुनेत्रा पवार यांना जाते. पहाटेपासून स्वतः हातात खराटा घेऊन कामाला सुरुवात करत त्यांनी संपूर्ण गावाला या अभियानात सहभागी करून घेतले. त्यांच्या नेतृत्वाखाली काटेवाडीने ग्रामस्वच्छता अभियानात राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. या कामाची दखल घेत देश-विदेशातील अभ्यासकांनी काटेवाडीला भेट दिली. याच कार्यामुळे त्यांना सार्क देशांच्या 'साकोसान' परिषदेत सहा राष्ट्रप्रमुखांसमोर भाषण करण्याची संधी मिळाली आणि त्यांच्या सामाजिक कार्याची दखल व्यापक पातळीवर घेतली गेली.बारामतीमध्ये ‘एनव्हायर्नमेंट फोरम ऑफ इंडिया’च्या माध्यमातून मोतीबिंदू शस्त्रक्रिया, वृक्षारोपण, ओढा खोलीकरण तसेच महिलांमध्ये कर्करोगाविषयी जनजागृती असे विविध उपक्रम त्यांनी राबवले. या सर्व उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय व नेतृत्वात्मक सहभाग राहिला. बारामती टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून त्यांनी हजारो महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या.लग्नानंतर शेतकाम, पोल्ट्री व्यवसाय, गाईगुरे सांभाळणे आणि दूध काढणे अशी कामे त्यांनी आवडीने केली. अजित पवार यांच्या राजकीय वाटचालीत घर सांभाळणे, नातेसंबंध जपणे, सामाजिक कार्य करणे तसेच कठीण प्रसंगी त्यांना साथ व सल्ला देणे, ही जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताच त्यांच्या नावावर राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होण्याचा विक्रम नोंदवला जाणार आहे.राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांनी प्रत्यक्ष राजकारणात प्रवेश केला. त्यापूर्वी त्या पवार कुटुंबातील सदस्यांसाठी प्रत्येक निवडणुकीत सक्रिय प्रचार करत असत आणि बारामतीतील अनेक विक्रमी विजयांमध्ये त्यांचा मोलाचा वाटा राहिला. पक्षफुटीनंतर त्यांनी सुप्रिया सुळे यांच्याविरोधात लोकसभा निवडणूक लढवली; मात्र त्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला. तरीही त्या खचल्या नाहीत आणि जनसेवेत सक्रिय राहिल्या.यानंतर त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात आले. राज्यसभा खासदार म्हणून काम करत असतानाच त्यांच्याकडे तालिका सभापतीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आणि देशाच्या सर्वोच्च सभागृहाच्या आसनावर विराजमान होण्याचा मान त्यांना मिळाला. आता अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.

फीड फीडबर्नर 13 Feb 2026 9:30 pm

बांगलादेशी, रोहिंग्या घुसखोरांविरोधात कारवाईला वेग

मुंबई :मुंबई उपनगरचे सहपालक मंत्री गेल्या पाच वर्षापासून सातत्याने बांगलादेशी, रोहिंग्या घुसखोरांच्या विरोधात कार्यवाही करत असून उपनगर जिल्हा नियोजन बैठकीनंतर या कारवाईला अधिक वेग येणार आहे. मुंबई उपनगरचे सह पालकमंत्री यांच्या सूचनेनुसार मुंबईत आता मुंबईची सुरक्षा धोक्यात घालणाऱ्या घुसखोरीला आळा घालण्यासाठी ' जनहित सुरक्षा समित्या' स्थापन होणार आहेत. मंत्री लोढा यांनी नुकत्याच झालेल्या उपनगर जिल्हा नियोजन बैठकीत बांगलादेशींच्या शोध घेऊन कडक कारवाईच्या पाठपुराव्यासाठी जनहित सुरक्षा समित्या स्थापन करण्याची सूचना केली होती.मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मालवणी परिसरात बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांचा आणि तिथल्या अमलीपदार्थ माफियांचा मुद्दा सातत्याने उचलून धरला होता. मुंबई उपनगर जिल्हा नियोजन बैठकीतही प्रामुख्याने हा मुद्दा चर्चिला गेला. मुंबईला बसत असलेला घुसखोरांचा विळखा आणि धोक्यात येत असलेली मुंबईची सुरक्षितता यावर गांभीर्याने चर्चा झाल्यानंतर जिल्हा नियोजन बैठकीतच मंत्री लोढा यांनी जनहित सुरक्षा समिती स्थापन करण्याबाबतची आपली भूमिका मांडली. घुसखोरीची समस्या अक्राळ विक्राळ रूप धारण करून असून शहराच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच यासंदर्भात मंत्री लोढा यांनी म्हटले की, मुंबई हे जागतिक दर्जाचे शहर असून देशाची आर्थिक राजधानी आहे. बांगलादेशी, रोहिंग्या घुसखोरीमुळे इथली सुरक्षा धोक्यात आली आहे. घुसखोरांवर कारवाई ही काळाची गरज आहे. नाहीतर पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही. सरकारने हा विषय गांभीर्याने घेतला असून प्रशासन जनहित सुरक्षा समितीच्या स्थापने संदर्भात त्वरित कार्यवाही करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.जनहित सुरक्षा समितीच्या कार्याचे स्वरूपविधानसभा मतदारसंघाच्या पातळीवर ही समिती स्थापन करण्यात येईल. या समितीच्या माध्यमातून शहरातल्या विविध भागात बनावट आधार कार्ड आणि बनावट रेशन कार्ड देणाऱ्यांचा विशेष मोहिमेद्वारे शोध घेण्यात येईल. या शोधानंतर संबंधितांची माहिती समितीकडून पोलिसांना दिली जाईल. मुंबई उपनगरांतील सरकारी जमिनींवर असणारी अतिक्रमणे शोधण्यासाठीही समिती मदत करणार आहे. यासंदर्भातील सविस्तर अहवाल समितीकडून पोलिसांना दिला जाईल. या जनहित सुरक्षा समितीत मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिकारी, पोलिस विभागातील अधिकारी आणि स्वयंसेवी संस्थेतील सदस्यांचा समावेश असेल, अशी माहिती मंगलप्रभात लोढा यांनी दिली आहे. त्याचबरोबर राज्यात इतरत्र ही समिती स्थापन करण्यासंदर्भात प्रस्ताव देण्याचा विचार असल्याचेही लोढा यांनी स्पष्ट केले.मंत्री लोढा यांच्या पाठपुराव्याने हजार कोटींची जमीन पुन्हा सरकारी ताब्यातमालाड मालवणी भागात मोठ्याप्रमाणात बांगलादेशी आणि रोहिंग्याची घुसखोरी असल्याच्या तक्रारी स्थानिक नागरिकांनी केल्या होत्या. यावर तातडीने कारवाई करण्याचे आदेश मंत्री लोढा यांनीच दिले होते. गेल्या वर्षभरात सातत्याने त्यांनी या कारवाईचा पाठपुरावा केला असून अनधिकृत बांधकामावर कारवाई अद्यापही सुरूच आहे. आतापर्यंत गेल्या वर्षभरात केवळ पश्चिम उपनगरात १५ एकर जमिनींवरील अनधिकृत बांधकामावर हातोडा पडला असून या जमिनी पुन्हा सरकारी ताब्यात आल्या आहेत. एक हजार कोटींपेक्षा जास्त या जमिनीची किमती असल्याची माहिती पश्चिम उपनगर (अतिक्रमण निष्कासन) अतिरिक्त आयुक्त श्री.गणेश मिसाळ यांनी ही माहिती दिली. धडक मोहीम अद्यापही सुरूच असल्याचे मिसाळ म्हणाले. दरम्यान सहपालकमंत्री लोढा यांनी स्पष्ट केले की, जनहित सुरक्षा समितीच्या या निर्णयामुळे घुसखोरीला प्रतिबंध होण्यास मदत मिळणार असून मुंबईकरांसाठी हा मोठा दिलासा असेल. याबाबत प्रशासन अधिक जबाबदारीने काम करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

फीड फीडबर्नर 13 Feb 2026 9:30 pm

विरोधी पक्षात बसताच उबाठाच्या नगरसेवकांना आसने टोचू लागली

महापालिका सभागृहातील आसन व्यवस्थेत होणार सुधारणारगटनेत्यांच्या अनौपचारिक बैठकीत प्रशासनाला दिल्या सूचनामुंबई (विशेष प्रतिनिधी) :मुंबई महापालिका सभागृहात आजवर सत्तेत बसणाऱ्या उबाठालाच्या नगरसेवकांना विरोधी पक्षात बसताच तेथील आसनाचा त्रास होऊ लागला आहे. ज्या आसनांवर मागील २००२पासुुन बसून सत्ता उपभोगणाऱ्या माजी महापौर आणि उबाठाच्या गटनेत्या किशोरी पेडणेकर यांना आता या आसनावर बसण्यास आणि उठण्यास त्रास जाणवू लागला आहे. त्यामुळे महापौरांच्या दालनात झालेल्या अनौपचारिक बैठकीत सदस्यांना सुलभपणे बसता आणि उठता यावे अशा पध्दतीने आसन व्यवस्थेत बदल करण्याची शिफारस करण्यात आली. त्यामुळे मागील २००२पासून महापालिकेचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या सदस्यांना जो त्रास झाला नाही तो त्रास आता विरोधी पक्षात बसल्यावर उबाठाच्या नगरसेवकांना होवू लागल्याचे दिसून येत आहे.महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीत महापालिका सभागृहात काँग्रेसच्या नगरसेवकांना बसण्यास जागा नसल्याने त्यांना उभेच राहावे लागले. त्यामुळे महापालिका सभागृहातील नगरसेवकांच्या आसन व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित झाला आहे. या अनुषंगाने महापौरांच्या दालनात भाजप, उबाठा, शिवसेना, मनसे, एमआयएम आदींच्या गटनेत्यांच्या समवेत बैठक घेवून महापालिका सभागृहातील आसन व्यवस्थेबाबत चर्चा केली.मुंबई महापालिकेचे २२७ अधिक पाच स्वीकृत नगरसेवक अशाप्रकारे २३२ नगरसेवकांची आसन व्यवस्था आहे. आणि आजही तेवढेच नगरसेवक आहेत. तसेच भविष्यात आणखी पाच स्वीकृत नगरसेवकांची संख्या वाढणार आहे. याअनुषंगाने झालेल्या बैठकीत विद्यमान आसन व्यवस्थेमध्ये सुसुत्रता आणली जावी अशाप्रकारची सूचना करण्यात आली. यामध्ये लटकते माईक ही व्यवस्था काढून प्रत्येक बाकांवर कॉडलेस माईकची अद्यायावत सुविधा देण्यात यावी. तसेच ध्वनीक्षेपकाच्या आवाजाचे नियंत्रण करणाऱ्या साऊंड सिस्टीम कंट्राेल मशीन्सची जागा इतर ठिकाणी बसवण्यात यावी.जेणेकरून तिथे महापालिका सचिव विभागाचे कर्मचारी बसून त्या जागांवर नगरसेवक बसू शकतील.तसेच सभागृहातील पुतळ्यांनी जागा अडवली असली तर त्या राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यांचे सौदर्य अबाधित राखून नगरसेवकांच्या आसनाची व्यवस्था करण्यात यावी अशीही सूचना गटनेत्यांच्या बैठकीत करण्यात आल्याची माहिती भाजपाचे महापालिका गटनेते आणि भावी सभागृहनेते गणेश खणकर यांनी माहिती दिली.तसेच सभागृहातील आसनाची जागा बसण्यास योग्य नसून एकदा बसल्यानंतर उठणे कठिण होवू बसते. काही ज्येष्ठ नगरसेवकांना बसताना आणि उठतानाही त्रास होत आहे. मऊशाल आसने ही दिसायला योग्य असली तरी त्यावर अडीच ते तीन तास बसणे योग्य ठरत नाही.त्यामुळे मऊशाल आसन व्यवस्था सुधारण्यात यावी,जेणेकरून सदस्यांना तिथे बसल्यानंतर उठताना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही अशाप्रकारची भावना किशोरी पेडणेकर यांच्यासह गणेश खणकर यांनी गटनेत्यांच्या बैठकीत मांडला.मात्र, २००२पासून मुंबईत महापालिकेतील या नुतनीकरण केलेल्या सभागृहात नगरसेवक बसत आहेत. सत्ताधारी पक्षाचे नगरसेवकांनी याच सभागृहात सत्तेचा गाढा हाकला आहे. परंतु, सत्ताकाळात उबाठा आणि पहारेकरी असताना भाजपच्या नगरसेवकांना जेवढा त्रास झाला नाही तेवढा त्रास आत्ताच जाणू लागला आहे. त्यामुळे यापूर्वीच्या नगरसेवकांना सभागृहात बसण्याचा त्रास होत नव्हता का? सभागृह उशिरा सुरु करून नगरसेवकांना प्रतीक्षेत बसायला भाग पाडणाऱ्या उबाठाच्या नगरसेवकांना विरोधी पक्षात बसल्यानंतर मऊशाल आसनाचा त्रास होऊ लागला आहे का असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. त्यामुळे प्रथम उजव्या बाजुला बसताना न टोचणारी आसने आता डाव्या बाजुला बसायला लागल्यानंतर आसने टोचू लागली का असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

फीड फीडबर्नर 13 Feb 2026 9:30 pm

उस्मान तारीकची गोलंदाजी भारतीय संघासाठी धोक्याची घंटा!

कोलंबो : पाकिस्तानचा संघ गेल्या दोन आठवड्यांपासून श्रीलंकेत आहे आणि तिथल्या वातावरणाशी जुळवून घेतले आहे. तर भारतीय संघ नामिबियाला पराभूत करून नुकताच श्रीलंकेला पोहोचला आहे. त्यामुळे भारताला या सामन्यात ताकही फुंकून प्यावे लागणार आहे. असे असताना भारतीय संघाला २८ वर्षीय पाकिस्तानी फिरकीपटू उस्मान तारिकची भीती आहे. कारण त्याची अनोखी गोलंदाजी शैली फलंदाजांना कळणे कठीण जात आहे.टी २० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत उस्मान तारिकने या स्पर्धेत एकच सामना खेळला आहे आणि तीन विकेट घेतल्या आहेत. त्यात भारतीय फलंदाज फिरकीचा सामना करताना अडचणीत येत असल्याचे दिसून आले आहे. त्यात उस्मानची गोलंदाजी शैली भारतीय फलंदाजांना अडचणीत आणू शकते. गोलंदाजी करताना त्याचा हात खालून येतो. त्याला साइट आर्म असे म्हटले जाते. तसेच चेंडू सोडताना थोडा थांबतो. त्यामुळे चेंडू सावकाश येतो. पण या दरम्यान, वेगाने टाकण्याची कलाही त्याने आत्मसात केली आहे. इतकेच काय चेंडू वळतो देखील. त्यामुळे फलंदाजी करताना त्याचा अभ्यास करणे कठीण जाणार आहे.उस्मान तारिकने एका मुलाखतीत सांगितले की, ‘माझ्या हातात दोन कोपरं आहे. त्यामुळे माझा हात नैसर्गिकरित्या वाकतो. माझी चाचणी झाली असून मी निर्दोष ठरलो आहे. प्रत्येकाला वाटते की, मी हात वाकवतो. पण माझा हात जैविक कारणाने वाकतो.’ हातातलं वेगळेपण त्याला इतर गोलंदाजांपेक्षा वेगळे करते. त्याचा उस्मान तारिक पुरेपूर फायदा घेत आहे. दुसरीकडे, उस्मान दुबईत सेल्समनचे काम करत होता. त्याच्याकडे चांगली नोकरी होती. पण क्रिकेटचे वेड काही सुटत नव्हते. यावेळी त्याने एमएस धोनीचा बायोपिक पाहिला आणि त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. धोनीने तिकीट कलेक्टरची नोकरी सोडून क्रिकेटकडे लक्ष केंद्रीत केले होते. तसेच उस्मान नोकरी सोडून पाकिस्तानला परतला आणि क्रिकेट खेळू लागला.

फीड फीडबर्नर 13 Feb 2026 8:30 pm

संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज ९ मार्चपर्यंत स्थगित

नवी दिल्ली : लोकसभेतील अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा शुक्रवारी संपला. पीठासीन अधिकारी संध्या राय यांनी सभागृहाचे कामकाज ९ मार्चपर्यंत तहकूब केले. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा आता ९ मार्चपासून सुरू होईल आणि २ एप्रिलपर्यंत चालेल. दरम्यान लोकसभेपाठोपाठ राज्यसभेचे देखील कामकाज ९ मार्चपर्यंत स्थगित करण्यात आले.लोकसभेचे कामकाज सकाळी ११ वाजता सुरू झाले तेव्हा काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांच्या सदस्यांनी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांच्या राजीनाम्याची मागणी करत गोंधळ घातला. परिणामी, कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. दुपारी १२ वाजता कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर, पीठासीन अधिकारी संध्या राय यांनी जाहीर केले की अनेक सदस्यांनी स्थगन प्रस्तावासाठी सूचना सादर केल्या आहेत, ज्या फेटाळण्यात आल्या. त्यानंतर त्यांनी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे नाव घेतले.प्रधान यांनी त्यांच्या मंत्रालयाशी संबंधित प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी सभागृहाचे कामकाज सादर केले. यानंतर, केंद्रीय संस्कृती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत, महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी, कायदा आणि न्याय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) अर्जुन राम मेघवाल, आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रतापराव जाधव, वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री जितिन प्रसाद, गृह राज्यमंत्री नित्यानंद राय आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी त्यांच्या संबंधित मंत्रालयांशी संबंधित प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी सभागृहात मांडले.लोकसभेचे सरचिटणीस उत्पल कुमार सिंह यांनी माहिती दिली की औद्योगिक संबंध संहिता (सुधारणा) विधेयक, २०२६ राज्यसभेने १२ फेब्रुवारी रोजी कोणत्याही सुधारणांशिवाय मंजूर केले. हे विधेयक यापूर्वी लोकसभेत मंजूर करण्यात आले होते. त्यानंतर पीठासीन अधिकारी संध्या राय यांनी सभागृहाचे कामकाज ९ मार्चपर्यंत तहकूब केले

फीड फीडबर्नर 13 Feb 2026 8:30 pm

Riyan Parag RR Captain : राजस्थान रॉयल्समध्ये ‘नवं’पर्व सुरू! सॅमसननंतर ‘या’युवा खेळाडूकडे सोपवलं कर्णधारपद; जडेजाच्या चर्चांना पूर्णविराम

Riyan Parag RR Captain : आरआर फ्रँचायझीने भविष्याचा विचार करून रियान परागची कर्णधार म्हणून निवड केली आहे. पराग २०१९ पासून या संघाचा अविभाज्य भाग आहे.

दैनिक प्रभात 13 Feb 2026 8:12 pm

टी ट्वेंटी वर्ल्डकपमधील भारत - पाकिस्तान मॅचवर पावसाचे सावट

कोलंबो : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये रविवार १५ फेब्रुवारी २०२६ रोजी कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियममध्ये भारत आणि पाकिस्तान यांचा सामना होणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना संध्याकाळी सात वाजता सुरू होणार आहे. हा यंदाच्या वर्ल्डकपमधील २७ वा साखळी सामना असेल. क्रिकेटप्रेमींचे लक्ष असलेल्या या हायव्होल्टेज सामन्याआधीच एक चिंता वाढवणारी बातमी आली आहे. टी ट्वेंटी वर्ल्डकपमधील भारत - पाकिस्तान सामन्यावर पावसाचे सावट घोंगावत आहे. यामुळे क्रिकेटप्रेमी चिंतेत आहेत.भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ यंदाच्या वर्ल्डकपसाठी ए ग्रुप अर्थात अ गटामध्ये आहेत. भारताने अमेरिकेविरुद्धच्या सामना २९ धावांनी आणि नामिबियाविरुद्धचा सामना ९३ धावांनी जिंकला आहे. दोन्ही साखळी सामने जिंकल्यामुळे भारत चार गुण आणि +३.०५० च्या नेट रनरेटसह गटात अव्वलस्थानी आहे. पाकिस्तानने नेदरलँड विरुद्धचा सामना ३ विकेट राखून आणि अमेरिकेविरुद्धचा सामना ३२ धावांनी जिंकला आहे. हे दोन्ही साखळी सामने जिंकल्यामुळे पाकिस्तान चार गुण आणि +०.९३२ च्या नेट रनरेटसह गटात दुसरे स्थान पटकावले आहे.नेदरलँडने नामिबिया विरुद्धचा सामना सात विकेट राखून जिंकल्यामुळे ते दोन गुण आणि +०.३५६ च्या नेट रनरेटसह गटात तिसऱ्या स्थानी आहेत. अमेरिका शून्य गुण आणि -१.५२५ च्या नेट रनरेटसह गटात चौथ्या स्थानी तर नामिबिया शून्य गुण आणि -२.८८४ च्या नेट रनरेटसह गटात पाचव्या स्थानी आहे.भारताचा रविवार १५ फेब्रुवारी रोजी पाकिस्तान विरुद्ध आणि बुधवार १८ फेब्रुवारी रोजी नेदरलँड विरुद्ध खेळणार आहे. नेदरलँड विरूद्धच्या सामन्यात भारत जिंकण्याची शक्यता गृहित धरली तरी गटातले अव्वल स्थान राखण्यासाठी आणि सुपर ८ फेरीकरिता लिलया पात्र होण्यासाठी भारताला पाकिस्तान विरुद्ध विजय मिळवणे आवश्यक आहे. यामुळेच पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यासाठी भारतीय संघ तयारीला लागला आहे.आयसीसीच्या स्पर्धांमध्ये भारताने आतापर्यंत १२ वेळा पाकिस्तानचा पराभव केला आहे. तर पाकिस्तानने भारताचा ३ वेळा पराभव केला आहे. फक्त एकदाच भारत - पाकिस्तान दरम्यानचा सामना बरोबरीत सुटला आहे. यामुळे रविवारच्या सामन्याआधीच भारताचे पारडे जड असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. पण सामना होण्याआधीच हवामान विभागाने पावसाचे भाकीत वर्तविल्यामुळे क्रिकेटप्रेमी चिंतेत आहेत.श्रीलंकेच्या हवामान विभागाने भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यादरम्यान पावसाची शक्यता वर्तविली आहे. आग्नेय बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. यामुळे कोलंबोत पावसाची ९३ टक्के शक्यता आहे. सामन्याच्या वेळेत म्हणजेच संध्याकाळी सात पासून पुढे पावसाची शक्यता फक्त नऊ टक्के आहे. पण संध्याकाळपर्यंत पावसाची शक्यता ४९ टक्के आहे. तापमान २६ ते २८ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. जर सामन्यावेळी किंवा सामन्याआधी पाऊस पडल्यामुळे सामन्याच्या नियोजनावर परिणाम झाला तर हायव्होल्टेज सामन्याची मजा कमी होण्याची भीती व्यक्त होत आहे.

फीड फीडबर्नर 13 Feb 2026 8:10 pm

यूएईच्या कॅनडावरील थरारक विजयाने अफगाणिस्तानवर संकट!

नवी दिल्ली : कॅनडा विरुद्ध युनायटेड अरब अमिराती यांच्यातला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील ड गटातील सामना रोमहर्षक राहिला. कॅनडाच्या १५१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना यूएईची गाडी रुळावरून घसरली होती, परंतु आर्यांश शर्मा आणि सोहैब खान यांच्या अर्धशतकी खेळीने यूएईला थरारक विजय मिळवून दिला.https://prahaar.in/2026/02/13/rain-threatens-india-pakistan-match-in-t20-world-cup/हर्ष ठाकेरने ४१ चेंडूंत २ चौकार व ३ षटकार मारून ५० धावांची खेळी केली. त्याला नवनीत धलिवाल ( ३४) व श्रेयस मोव्वा ( २१) यांची साथ मिळाली आणि कॅनडाने ७ बाद १५० धावांपर्यंत मजल मारली. जलदगती गोलंदाज जुनैदने ३५ धावांत ५ विकेट्स घेतल्या आणि वर्ल्ड कपमध्ये पाच विकेट्स घेणारा तो यूएईचा पहिला गोलंदाज ठरला. ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये पाच विकेट्स घेणारा तो दुसरा संलग्न देशाचा गोलंदाज ठरला. यापूर्वी नेदरलँड्सच्या अहसान मलिकने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १९ धावांत ५ बळी टिपले होते.लक्ष्याचा पाठलाग करताना यूएईने ६६ धावांत ४ विकेट्स गमावल्या होत्या. साद बिन जाफरने तीन विकेट्स घेतल्या. पण, आर्यांश शर्मा व सोहैब खान यांनी पाचव्या विकेटसाठी ९४ धावांची भागीदारी केली. शेवटच्या दोन षटकांत यूएईला विजयासाठी १२ चेंडूंत २६ धावांची गरज होती. कलीम सनाने १९व्या षटकात १८ धावा दिल्या आणि सामन्याला कलाटणी मिळाली. शर्माने पहिल्या ४ चेंडूंत ११ धावा जोडल्या आणि त्यानंतर खानने ७ धावा जोडल्या.२० व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर षटकार खेचून शर्माने यूएईचा विजय पक्का केला. विजयासाठी एक धाव हवी असताना खान बाद झाला. त्याने २९ चेंडूंत ४ चौकार व ४ षटकारासह ५१ धावांची खेळी केली. जस्करन सिंगने विजयी धाव घेतली. आर्यांश ५३ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकारांसह ७४ धावांवर नाबाद राहिला. यूएईने या विजयासह ड गटात तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका प्रत्येकी दोन विजय मिळवून अव्वल दोन क्रमांकावर आहेत. अफगाणिस्तानची चौथ्या क्रमांकावर घसरण झाली आहे. आफ्रिकेविरुद्धचा सामना डबल सुपर ओव्हरमध्ये गमावल्यानंतर अफगाणिस्तानचा स्पर्धेतील मार्ग खडतर झाला होता. त्यात यूएईच्या विजयाने त्यांना सुपर ८ च्या शर्यतीतून बाहेर फेकले आहे. अफगाणिस्तानला उर्वरित दोन सामन्यांत यूएई व कॅनडा यांचा सामना करायचा आहे. त्यांना या दोन्ही लढती जिंकाव्या लागतील आणि त्याचवेळी किवी व आफ्रिका यांच्या पराभवाची प्रार्थना करावी लागेल.https://prahaar.in/2026/02/13/t20-world-cup-2026-zim-vs-aus-zimbabwes-historic-win-over-australia/झिम्बाब्वेने बलाढ्य ऑस्ट्रेलियाला पाजले पराभवाचे पाणीफलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा तिन्ही आघाड्यांवर सर्वोत्तम खेळ करत झिम्बाब्वेने टी२० वर्ल्डकप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाला हरवण्याची किमया केली. झिम्बाब्वेने कोलंबोतल्या आर. प्रेमदासा स्टेडियमच्या आव्हानात्मक खेळपट्टीवर झिम्बाब्वेने सर्वांगीण सुरेख खेळ करत ऑस्ट्रेलियाला निष्प्रभ ठरवले. झिम्बाब्वेने प्रथम फलंदाजी करताना १६९ धावांची मजल मारली. याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा डाव १४६ धावांतच आटोपला. झिम्बाब्वेने २३ धावांनी विजय मिळवला. झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ३३ लढतींपैकी ३ मध्ये विजय मिळवला आहे. १९८३ वनडे वर्ल्डकपमध्ये झिम्बाब्वेने १३ धावांनी थरारक विजय मिळवला होता. २०१४ आणि अगदी अलीकडे म्हणजे २०२२ मध्ये झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला धूळ चारली होती.

फीड फीडबर्नर 13 Feb 2026 8:10 pm

कांजूरमार्ग कारशेडच्या जागेबाबत खासगी विकासकांची याचिका फेटाळली

मुंबई : ‘स्वामी समर्थ नगर – विक्रोळी मेट्रो ६’ मार्गिकेच्या कारशेडसाठी हस्तांतरित करण्यात आलेल्या कांजूरमार्ग येथील १५ हेक्टर जागेवरून केंद्र आणि राज्य सरकारमधील न्यायालयीन वाद राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर मिटला होता. त्याचाच भाग म्हणून जागा कारशेडसाठी देण्याच्या निर्णयाविरोधात केलेली याचिका केंद्र सरकारने मागे घेतली होती. तथापि, या जागेबाबत खासगी विकासक आणि राज्य सरकारमधील वाद कायम होता. या वादावर उच्च न्यायालयाने शुक्रवारी निर्णय देताना खासगी विकासकांची याचिका फेटाळली. या निर्णयामुळे राज्य सरकारला दिलासा मिळाला आहे. ही जागा यथास्थिती ठेवण्याबाबत दिलेला अंतरिम आदेशही मुख्य न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने रद्द केला.या जागेबाबतचा वाद केंद्र व राज्य सरकारने मिटवला असला आणि केंद्र सरकारने राज्य सरकारच्या निर्णयाविरोधातील याचिका मागे घेतली असली तरी आपली यासंदर्भातील याचिका प्रलंबित आहे, असे खासगी विकासक महेश गोराडिया यांच्या वतीने न्यायालयाला सांगण्यात आले होते. तसेच, अंतरिम आदेश आपल्या आणि केंद्र सरकारच्या याचिकांवर एकत्रित सुनावणी घेताना देण्यात आला होता हेही गोराडिया यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले होते. या पार्श्वभूमीवर मुख्य न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील खंडपीठापुढे या प्रकरणी तिन्ही पक्षकारांच्या वकिलांनी सविस्तर युक्तिवाद केला होता. त्यानंतर, न्यायालयाने डिसेंबरमध्ये या प्रकरणाचा निर्णय राखून ठेवला होता.दरम्यान, मेट्रो ६ मार्गिकेच्या कारशेडसाठी हस्तांतरित करण्यात आलेली कांजूरमार्ग येथील १५ हेक्टर जागा केंद्र सरकारने आधीच राज्य सरकारला उपलब्ध केली आहे, अशी माहिती राज्य सरकारने यापूर्वीच न्यायालयाला दिली होती. ही जागा परवडणाऱ्या घरांसाठी केंद्र सरकराने राज्य सरकारला उपलब्ध केली होती. त्यामुळे, ही जागा कारशेडसाठी वापरू देण्याच्या विनंतीबाबत केंद्र सरकारशी बोलणी सुरू असल्याचेही सरकारने न्यायालयाला सांगितले होते. त्यामुळे, जागेच्या मालकीवरून सुरू असलेला वाद सोडवण्यासाठी न्यायालयानेही केंद्र व राज्य सरकारला वेळ दिला होता. त्यानंतर, केंद्र सरकारने भूमिका स्पष्ट करताना राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात केलेली याचिका मागे घेत असल्याचे न्यायालयाला सांगितले होते. परंतु, गरोडिया यांनी या प्रकरणी आपली याचिका प्रलंबित असल्याचे सांगून त्यावर सुनावणी घेण्याची मागणी केली होती.

फीड फीडबर्नर 13 Feb 2026 8:10 pm

मध्य, हार्बरसह पश्चिम रेल्वेवर ब्लॉक

खारबाव येथील नियोजित रात्रकालीन मेगाब्लॉक रद्दमुंबई (प्रतिनिधी) : रेल्वे रूळ, ओव्हर हेड वायर, सिग्नल यंत्रणा आणि अभियांत्रिकी कामे करण्यासाठी रविवारी मध्य आणि पश्चिम रेल्वेवर ब्लॉक घेण्यात येईल. हार्बर मार्गावरील कुर्ला – वाशीदरम्यान ब्लॉक असल्याने प्रवाशांचा प्रवास रखडण्याची शक्यता आहे. तर, मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गिकेवर जलद मार्गावर ब्लॉक असल्याने, सर्व लोकल धीम्या मार्गावर धावतील. त्यामुळे रविवारी प्रवाशांचा प्रवासाचा वेग मंदावण्याची चिन्हे आहेत. खारबाव येथे शनिवारी घेण्यात आलेला नियोजित रात्रकालीन मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे.मध्य रेल्वेवर माटुंगा – मुलुंडदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.४५ दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी सीएसएमटी येथून सकाळी १०.३६ ते दुपारी ३.१० दरम्यान सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील लोकल माटुंगा स्थानकात डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. या लोकल माटुंगा – मुलुंडदरम्यान त्यांच्या निर्धारित थांब्यांवर थांबतील. ठाण्यापलीकडे जाणाऱ्या जलद लोकल मुलुंड स्थानकात पुन्हा डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. ठाणे येथून सकाळी ११.०३ ते दुपारी ३.३८ दरम्यान सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील लोकल मुलुंड स्थानकात अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. या लोकल मुलुंड – माटुंगादरम्यान त्यांच्या निर्धारित थांब्यांवर थांबतील आणि माटुंगा स्थानकात पुन्हा अप जलद मार्गावर वळवण्यात येतील.हार्बर मार्गावर कुर्ला – वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार असून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३६ दरम्यान सुटणाऱ्या वाशी / बेलापूर / पनवेलकडे जाणाऱ्या डाऊन मार्गावरील लोकल, तसेच पनवेल / बेलापूर / वाशी येथून सकाळी १०.१७ ते दुपारी ३.४७ दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे येणाऱ्या अप हार्बर मार्गावरील लोकल रद्द करण्यात येणार आहेत. ब्लॉक कालावधीत प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कुर्ला आणि पनवेल – वाशीदरम्यान विशेष लोकल चालविण्यात येतील. ब्लॉक कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ६ दरम्यान हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे – वाशी / नेरुळ स्थानकांदरम्यान प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे.पश्चिम रेल्वे मार्गावर राम मंदिर – बोरिवली रेल्वे स्थानकांदरम्यान अप जलद मार्गिका आणि पाचवी मार्गिका दरम्यान सकाळी १० ते दुपारी २ दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी बोरिवली – अंधेरीदरम्यान अप जलद मार्गिकेवरील सर्व लोकल सेवा अप धीम्या आणि सहाव्या मार्गिकेवर चालवण्यात येईल. पाचव्या मार्गिकेवरील सर्व लोकल डाऊन जलद मार्गावर चालवण्यात येतील. ब्लाॅकमुळे काही अप आणि डाऊन मार्गावरील लोकल रद्द असतील. तसेच काही लोकल सेवा हार्बर मार्गावरील गोरेगावपर्यंत चालवण्यात येईल.

फीड फीडबर्नर 13 Feb 2026 8:10 pm

Praful Patel : सुनेत्रा पवार राष्ट्रवादीच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षा होणार; प्रफुल्ल पटेलांची घोषणा

अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाच्या नेतृत्वाबाबत सुरू असलेल्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. सुनेत्रा पवार या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षा म्हणून लवकरच पदभार स्वीकारणार असल्याची घोषणा पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी शुक्रवारी केली

दैनिक प्रभात 13 Feb 2026 7:55 pm

UK High Court : पॅलेस्टिनी ॲक्शनवरील बंदी बेकायदेशीर; ब्रिटनमधील उच्च न्यायालयाने सरकारची कारवाई ठरवली अवैध

पॅलेस्टिनी ॲक्शन या गटावर बंदी घालण्याच्या ब्रिटनच्या सरकारच्या निर्णयाला ब्रिटनमधील उच्च न्यायालयाने (UK High Court) बेकायदेशीर ठरवले आहे.

दैनिक प्रभात 13 Feb 2026 7:45 pm

AUS vs ZIM : झिम्बाब्वेचा १८ वर्षांनंतर विश्वचषकात ऐतिहासिक विजय! ऑस्ट्रेलियाला २३ धावांनी चारी मुंड्या केलं चित

AUS vs ZIM : १८ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर झिम्बाब्वेने विश्वचषकात ऑस्ट्रेलियाला हरवण्याची किमया साधली आहे.

दैनिक प्रभात 13 Feb 2026 7:36 pm

Gurmeet Singh Khuddian : पीएम-आशा योजनेला पंजाबचा विरोध; कृषी मंत्री गुरमीत सिंग खुदियान यांचे मोठे वक्तव्य

पिकांना फायदेशीर किमती सुनिश्चित करणारे आणि बाजारातील अस्थिरतेपासून संरक्षण करणारे केंद्राचे प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षक अभियान (पीएम-आशा) स्वीकारू नये असा निर्णय पंजाब सरकारने (Gurmeet Singh Khuddian) घेतला आहे.

दैनिक प्रभात 13 Feb 2026 7:20 pm

Narendra Modi: अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या 'सेवा तीर्थ'चे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (१३ फेब्रुवारी) अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या सेवा तीर्थ संकुलाचे उद्घाटन केले. या संकुलामध्ये पंतप्रधान कार्यालयासह (पीएमओ) राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालय आणि कॅबिनेट सचिवालय देखील आहे. नवीन संकुलात सेवा तीर्थच्या फलकाचे मोदींनी आज अनावरण केले.या संकुलाच्या भिंतीवर देवनागरी लिपीत नावे लिहिली असून त्याखाली 'नागरिक देवो भव' (नागरिक देवासारखे आहे) हे ब्रीदवाक्य कोरलेले आहे. पंतप्रधान कार्यालय रायसीना हिलवरील साउथ ब्लॉकमधून सेवा तीर्थ येथे हलवले जाईल, ज्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी असलेली कॅबिनेट सचिवालय आणि राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयाची कार्यालये एकत्र येतील.या इमारतींची रचना ४-स्टार GRIHA मानकांनुसार केली आहे आणि त्यात अक्षय ऊर्जा प्रणाली, जलसंवर्धन उपाय आणि डिजिटली एकात्मिक कार्यालये समाविष्ट आहेत. मोदींनी नवीन इमारतीचे उद्घाटन केले तेव्हा गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री मनोहर लाल, पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री जितेंद्र सिंह आणि पंतप्रधान कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते.देशवासियों की सेवा के अटूट संकल्प और 'नागरिक देवो भव' की पावन भावना को साथ लेकर, आज ‘सेवा तीर्थ’ को राष्ट्र को समर्पित करने का सौभाग्य मिला।‘सेवा तीर्थ’ कर्तव्य, करुणा और ‘राष्ट्र प्रथम’ के लिए हमारी प्रतिबद्धता का सशक्त प्रतीक है।मेरी कामना है कि यह आने वाली पीढ़ियों को… pic.twitter.com/YWYUuSHtsD— Narendra Modi (@narendramodi) February 13, 2026२०१४ पासून, मोदी सरकारने भारताच्या वसाहतवादी भूतकाळातील प्रतीकांपासून दूर जाण्यासाठी आणि मानसिकतेत बदल घडवून आणण्यासाठी सातत्याने पावले उचलली आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यांनी निदर्शनास आणून दिले की पंतप्रधान कार्यालयाला आता सेवा तीर्थ असे नाव देण्यात येईल, केंद्रीय सचिवालयाच्या इमारतींना कर्तव्य भवन असे नाव देण्यात आले आहे आणि राजपथाचे कर्तव्य पथ असे नाव देण्यात आले आहे. त्याच भावनेने, पंतप्रधानांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या रेसकोर्स रोडचे नाव बदलून लोक कल्याण मार्ग आणि राजभवन आणि राज निवास यांचे नाव अनुक्रमे लोकभवन आणि लोकनिवास असे करण्यात आले आहे.दशकांपासून, सेंट्रल व्हिस्टा परिसरातील अनेक ठिकाणी पसरलेल्या तुटलेल्या आणि जुन्या पायाभूत सुविधांमधून अनेक प्रमुख सरकारी कार्यालये आणि मंत्रालये कार्यरत होती.

फीड फीडबर्नर 13 Feb 2026 7:10 pm

Valentines Day: अभिनेत्री नम्रता गायकवाड 'काहीतरी वेगळे'करणार? चर्चांना उधाण

मुंबई: काही दिवसांपूर्वी अभिनेत्री नम्रता गायकवाड हीने अभिनेता तुषार कावळे यांच्यासोबतचे काही फोटो शेअर करून 'काहीतरी वेगळे' असं म्हंटल होतं. त्यामुळे हे दोघे एकमेकांच्या प्रेमात असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.फेब्रुवारी महिन्याची सुरुवात होताच वातावरणात प्रेमाचे वारे हळुवारपणे मनाला स्पर्श करू लागतात आणि या भावनांना शब्द देण्यासाठी येतो तो खास दिवस १४ फेब्रुवारी, व्हॅलेंटाईन डे. एरवी मनातच दडवून ठेवलेल्या भावना, न बोललेले शब्द आणि व्यक्त न झालेलं प्रेम या दिवशी धाडस करून समोर येतं. आपल्या आवडत्या व्यक्तीसमोर प्रेमाची कबुली देणं, नात्याला नवी सुरुवात देणं किंवा जुन्या नात्यांमध्ये पुन्हा एकदा प्रेमाची ऊब निर्माण करणाऱ्यांसाठी हा दिवस खास ठरतो. अशातच नम्रता गायकवाड आणि तुषार कावळे एकमेकांच्या प्रेमात आहेत का? असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला आहे.मात्र नम्रता आणि तुषार यंदाच्या व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने ‘काहीतरी वेगळे’ प्रेक्षकांसाठी घेऊन येणार आहे. या दोघांचं एक ‘काहीतरी वेगळे’ हे नवं, फ्रेश सोलो गाणं ‘व्हॅलेंटाइन डे’ च्या मूहूर्तावर रसिकांच्या भेटीला येत आहे. या दोघांची जोडी खूपच उत्तम दिसत असून, चाहते त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.हे गाणं केवळ एका जोडप्याची कथा सांगत नाही, तर आजच्या तरुणाईच्या नातेसंबंधांचा आरसा दाखवणारं हे गाणं आहे. आपण खरंच क्षण जगतोय… की फक्त त्यांना पोस्ट करतोय? हा महत्त्वाचा प्रश्न हे गाणं प्रभावीपणे अधोरेखित करतं. युथफूल आणि भावस्पर्शी असलेलं ‘काहीतरी वेगळे’ हे गाणं अभिनेत्री नम्रता गायकवाड आणि अभिनेता तुषार कावळे यांच्यावर चित्रित करण्यात आलं आहे.फ्लॉसम एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली साकारलेल्या या गाण्याचं संगीत दिग्दर्शन, लिरीक्स आरोह कांगो यांनी केलं असून, देव आहिरराव आणि साक्षी यांच्या आवाजात हे गाणं स्वरबद्ध झालं आहे.

फीड फीडबर्नर 13 Feb 2026 7:10 pm

Anil Deshmukh : लीलावती रुग्णालय प्रकरणाची सखोल चौकशी करा; माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची मागणी

मी गृहमंत्री असताना परमबीर सिंग यांनी माझ्यावर खोटे आरोप करून मला बदनाम करण्याचा कट रचला होता. मात्र आता त्यांचे भ्रष्टाचाराचे प्रकार एकामागून एक उघड होत आहेत.

दैनिक प्रभात 13 Feb 2026 7:07 pm

Ambernath traffic: महाशिवरात्रीनिमित्त अंबरनाथच्या वाहतुकीत बदल; जाणून घ्या पर्यायी मार्गांबद्दल

अंबरनाथ : महाशिवरात्री उत्सवानिमित्त अंबरनाथमधील प्राचीन अंबरेश्वर शिवमंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होत असते. त्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. याच पार्श्वभूमीवर आता १४ ते १६ फेब्रुवारीदरम्यान शहरातील वाहतुकीत काही तात्पुरते बदल करण्यात आले आहेत.हे मार्ग राहतील बंद:मिळालेल्या माहितीनुसार, काही मुख्य मार्गांवर वाहनांना प्रवेशबंदी लागू असेल. वैभव हॉटेलकडून शहरात थेट प्रवेश बंद राहील. संबंधित वाहनांना हिंदू स्मशानभूमी, वडवली सेक्शन आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकमार्गे वळवण्यात येईल. स्वामी समर्थ चौकातून गोविंद तीर्थ पुलाकडे जाणाऱ्या वाहनांनाही ‘नो एन्ट्री’ असेल.अवजड वाहनांची सोय:अवजड वाहनांना शहराच्या मध्यवर्ती भागात येण्यास मनाई करण्यात आली आहे. एमआयडीसी आणि अन्य जड वाहनांसाठी आनंदनगर टी-जंक्शन, फॉरेस्ट नाका आणि लादीनाका हे पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत.पार्किंगची सुविधा:लहान वाहनांसाठी हिंदू स्मशानभूमी ते गोविंद तीर्थ पुलादरम्यान पार्किंगची सोय करण्यात आली आहे. बस व मोठ्या वाहनांसाठी लोकनगरी मैदान उपलब्ध करून देण्यात आले आहे. भाविकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

फीड फीडबर्नर 13 Feb 2026 6:10 pm

Stock Market Crash : शेअर बाजारात मोठी घसरण, एका झटक्यात सात लाख कोटींचे नुकसान

मुंबई : AI चे वाढते महत्त्व, अमेरिकेच्या शेअर बाजारांमध्ये झालेली घसरण आणि डॉलरच्या तुलनेत वाढत असलेले सोन्याचांदीचे महत्त्व यामुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अनेक बड्या कंपन्यांच्या शेअरमध्ये शुक्रवारी घसरण झाली. आयटी कंपन्यांचे शेअर आपटले. या घडामोडींचा एकत्रित परिणाम दिसून आला. मुंबईचा शेअर बाजार अर्था बीएसई आणि निफ्टी फिफ्टी अर्थात राष्ट्रीय शेअर बाजार या दोन्हीत घसरण झाली. बीएसई सेन्सेक्स ८२,७२६.७६ वर बंद झाला. घसरणीमुळे बीएसई सेन्सेक्स १०४८.१६ अंशांनी अर्थात सुमारे सव्व्या टक्यांची घसरण झाली.निफ्टी 50 मध्ये बीएसई सेन्सेक्स प्रमाणेच घसरण झाली. दिवसअखेर निफ्टी 50 हा २५,४७१.१० वर बंद झाला. निफ्टी 50 मध्ये ३३६.१० अंशांनी अंशांनी अर्थात सुमारे १.३० टक्क्यांची घसरण झाली. बॅक निफ्टी ५५३ अंशांनी घसरला. सुरुवातीला आयटी शेअरच्या दरांमध्ये घसरण झाली. हळू हळू इतर उद्योग क्षेत्रांतील शेअरमध्येही घसरण झाली. मोठ्या प्रमाणात शेअरची विक्री झाली.बीएसईच्या टॉप ३० शेअर्सपैकी, बजाज फायनान्स आणि एसबीआय वगळता सर्व शेअर्स तोट्यात गेले आणि बंद झाले. सेन्सेक्समधील २८ शेअरना मोठा मोठा तोटा झाला. हिंदुस्तान युनिलिव्हर, इटरनल, टायटन, टाटा स्टील आणि टीसीएसमध्ये सर्वात जास्त घसरण झाली, जवळजवळ ५% घसरण झाली. आयटी व्यतिरिक्त, धातू, ग्राहक उत्पादने, रिअल इस्टेट, ऊर्जा, बँकिंग आणि वित्तीय सेवांनीही घसरणीला हातभार लावला. यावरून स्पष्ट होते की ही घसरण व्यापक होती.'एआय'च्या प्रगतीमुळे आयटी कंपन्यांच्या अर्थकारणावर प्रतिकूल परिणाम होण्याची भीती तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. आयटी क्षेत्राची तांत्रिक प्रगती होईल पण रोजगारांच्या संख्येवर प्रतिकूल परिणाम होईल अशी भीती व्यक्त होत आहे. यामुळेच आयटी कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण झाली आहे. गुरुवारी बीएसई मार्केट कॅप ४७२.४८ लाख कोटी होता, जो ६.८३ लाख कोटींनी घसरून ४६५.३१ लाख कोटींवर आला. एका अहवालानुसार, तीन दिवसांत अंदाजे ९० लाख कोटींचे नुकसान झाले आहे.

फीड फीडबर्नर 13 Feb 2026 6:10 pm

रिलायन्सला मिळाला व्हेनेझुएलातून तेल खरेदीचा परवाना

मुंबई : व्हेनेझुएलाच्या अध्यक्षांचे अमेरिकेने लष्करी बळावर अपहरण केले. यानंतर अमेरिकेने व्हेनेझुएलातील तेलाच्या उत्खननासाठी सरकारी आणि खासगी कंपन्यांना परवाने देण्यास सुरुवात केली आहे. भारतातल्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीला व्हेनेझुएलातील तेलाच्या उत्खननासाठी परवाना मिळाला आहे. हा परवाना मिळाल्यामुळे भारतीय उद्योजक मुकेश अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ही कंपनी व्हेनेझुएलात तेलाचे उत्खनन करू शकेल.व्हेनेझुएलाच्या तेलात सल्फरचे प्रमाण जास्त आहे. या तेलाचे शुद्धीकरण करण्याचे तंत्रकौशल्य रिलायन्सच्या रिफायनरीकडे आहे. यामुळे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीला परवाना मिळवणे सोपे झाले. अब्जाधीश मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स समुहाच्या रिफायनरी व्हेनेझुएलाच्या तेलाचे शुद्धीकरण करण्यासाठी सर्वाधिक सक्षम आहेत. यामुळे व्हेनेझुएलाचे स्वस्त तेल शुद्धीकरणासाठी मोठ्या प्रमाणात भारतात येण्याची शक्यता आहे. शुद्धीरणानंतर हे तेल भारतात तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात विक्रीसाठी जाईल. यामुळे भारतातील इंधनाचे दर कमी होण्याची शक्यता आहे.व्हेनेझुएलातून भारतापर्यंत कच्च्या तेलाचा पुरवठा विना अडथळा सुरू ठेवण्यासाठी नियोजन सुरू आहे. एप्रिल २०२६ पासून व्हेनेझुएलाचे तेल मोठ्या प्रमाणात शुद्धीरणासाठी भारतात येणार आहे. सूत्रांच्या मते व्हेनेझुएलाच्या कच्च्या तेलामुळे रिलायन्सला मोठा आर्थिक फायदा अपेक्षित आहे.

फीड फीडबर्नर 13 Feb 2026 5:30 pm

Water Metro Project: मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार; लवकरच सुरु होणार 'जल मेट्रो प्रकल्प'

मुंबई: मुंबईच्या दैनंदिन वाहतूक कोंडीतून मुंबईकरांची लवकरच सुटका होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. खासदार रविंद्र वायकर यांनी लोकसभेत नियम ३७७ अन्वये केलेल्या मागणी नुसार मुंबई महानगर क्षेत्रात “जल मेट्रो प्रकल्प” सुरु करण्यासाठी मे. कोची मेट्रो लि. ने तयार केलेल्या फिजीबिलीटी अहवालानुसार सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. यासाठी मे. कोची रेल लि. यांची सल्लागार पदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही संस्था प्रस्तावित जलवाहतुकीच्या दृष्टीने, वाहतूक अभ्यास, पायुभूत सुविधा, नौकानयनविषयक बाबी, कनेकटीव्हिटी, जलयान, जलवाहतुकीचे कार्यचालन व व्यवस्थापन, खर्चाची अंदाजपत्रके, वित्तीय पृथ:क्करण, अंमलबजावणीचा आराखडा यांचा अभ्यास करून अहवाल देणार असल्याचे लेखी पत्राद्वारे महाराष्ट्र सागरी मंडळाचे नौकानयन सल्लागार व मुख्य बंदर अधिकारी कॅ. प्रवीण खरा यांनी खासदार वायकर यांना कळवले आहे. याप्रश्नी खासदार वायकर यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही पत्र पाठवले होते.मुंबईच्या लोकसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामानाने मुंबईतील अंतर्गत रस्ते पायाभूत सुविधा यात म्हणावा तसा बदल झालेला नाही. वाढत्या लोकसंख्येमुळे मुंबईच्या वाहतुकीवर याचा परिणाम होत असून मुंबईकरांना दरदिवशी तासनतास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. यामुळे मोठ्याप्रमाणात इंधन वाया जात आहे. एमएमआरची लोकसंख्या २०२३ मध्ये २.५८ कोटीवरून २०३० पर्यंत अंदाजे ३ कोटीच्या वरती जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार समितीचा सदस्य म्हणून कोची येथील अभ्यास दौरानिमित्त “जल मेट्रो प्रकल्प” प्रणालीचा अनुभव व अभ्यास करण्याची संधी मिळाली तसेच बैठकाही घेण्यात आल्या. सागरमाला योजना २.० अंतर्गत मुंबई महानगर क्षेत्रात जल मेट्रो प्रकल्प सुरु करण्याची योजना तयार करण्यात यावी. यात ६० टक्के केंद्र सरकार व ४० टक्के राज्य सरकार निधीची गुंतवणूक करेल. त्यामुळे मुंबईतील वाहतूक कोंडीतून मुंबईकरांची सुटका करण्यासाठी पर्याय म्हणून कोची जल मेट्रो प्रकल्पाच्या धर्तीवर मुंबई महानगर क्षेत्रात “जल मेट्रो प्रकल्प” सुरु करण्याची मागणी खासदार वायकर यांनी लोकसभेत नियम ३७७ च्या अंतर्गत मुंबईसाठी विशेष इन्फ्रास्ट्रक्चर पकेजची मागणी केली आहे. ज्यामध्ये मुंबई मेट्रो आणि मुंबई रेल्वे कनेक्टीव्हिटीचा उल्लेख करण्यात आला आहे. या मागणीवर वित्त राज्यमंत्री यांनी केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारला इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्पासाठी तीन वर्षांसाठी ३,८३,१४७ कोटी रुपयांची तरतूद केली असल्याचे लेखी उत्तर दिले आहे. केंद्र सरकारच्या या निधीचा उपयोग हा प्रकल्प राबवण्यासाठी प्राधान्य द्यावे, अशी विनंती खासदार रविंद्र वायकर यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांना केली आहे.यासाठी संबंधित अधिकारी यांच्या समवेत एक विशेष बैठक आयोजित करून कोची मेट्रो प्रकल्पाच्या टीमला आणि त्यांना स्वत: बोलवावे, अशी पत्राद्वारे विनंती केली होती. त्यानुसार मुंबई व आसपासच्या नवी मुंबई, ठाणे, कल्याण, वसई, मीरा-भाईन्दर या शहरांभोवती असलेल्या जलमार्गाचा वापर करून प्रवासी जलवाहतूक सुरु करण्याबरोबरच प्रवासी वाहतुकीचा अभ्यास करण्यासाठी मे. कोची मेट्रो रेल लि. यांची सल्लागार म्हणून नियुक्ती केली होती. त्यांनी ऑगस्ट २०२५ मध्ये फिजीबिलीटी अहवाल सरकारला सदर केला असून यात जलवाहतुकीसाठी २१ ठिकाणे निवडण्यात आली असून, १० नवीन जलमार्गावर जलवाहतूक सुरु करण्याचे प्रस्तावित केले आहे. याचा सविस्तर प्रकल्प आहवाल तयार करण्यासाठी मे. कोची मेट्रो रेल लि. यांची सल्लागार संस्थेची नियुक्ती केली आहे. या प्रकल्पाचा अंमलबजावणीचा आराखडा तयार करण्याचे काम सुरु असल्याचे लेखी उत्तर महाराष्ट्र सागरी मंडळातील नौकानयन सल्लागार व मुख्य बंदर अधिकारी कॅ. प्रवीण खरा यांनी यांनी खासदार वायकर यांनी पाठवले आहे.

फीड फीडबर्नर 13 Feb 2026 5:30 pm

ISRO Science Trip: अंतराळ संशोधन क्षेत्रात ग्रामीण विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी इस्रो विज्ञान सहल

- विज्ञान प्रेरणा अभियानांतर्गत आश्रमशाळेतील १०० विद्यार्थी सहलीत सहभागी होणारमुंबई : इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या “विज्ञान प्रेरणा अभियान” अंतर्गत विजाभज आश्रमशाळांमधील १०० गुणवंत विद्यार्थ्यांना भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) येथे विशेष शैक्षणिक विज्ञान सहलीचे १५ ते २० फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आयोजन करण्यात असल्याची माहिती इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिली.मंत्री सावे म्हणाले, ग्रामीण व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयाविषयी जिज्ञासा, संशोधनाची वृत्ती आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे आवश्यक आहे. आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात अंतराळ संशोधन क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध असून त्या संधी ग्रामीण विद्यार्थ्यांना प्राप्त होण्यासाठी शासनाने विशेष उपक्रम हाती घेतला.मंत्री सावे म्हणाले, राज्यातील विविध ‘विजाभज’ आश्रमशाळांमधून गुणवत्ता परीक्षेद्वारे १०० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना इस्रो येथे भेट देऊन उपग्रह निर्मिती, प्रक्षेपण तंत्रज्ञान, प्रत्यक्ष रॅाकेटचे प्रक्षेपण पाहणे आणि अंतराळ संशोधन प्रकल्पांविषयी प्रत्यक्ष माहिती घेण्याची संधी मिळणार आहे. तसेच विज्ञानविषयक कार्यशाळा आणि शास्त्रज्ञांशी, तज्ज्ञांशी संवादाच्या माध्यमातून त्यांना अनुभवाधारित शिक्षणाचा लाभ होणार आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील वैज्ञानिक संस्थांशी जोडणे, त्यांचा आत्मविश्वास वाढविणे आणि उच्च शिक्षणाच्या संधींबाबत जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.या सहलीदरम्यान विद्यार्थ्यांचा प्रवास विमानाने होणार असून त्यांच्या सुरक्षित व सुसूत्र प्रवासाची विशेष काळजी घेण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांसाठी उत्कृष्ट दर्जाची निवास व्यवस्था करण्यात आली असून दररोज आवश्यक सर्व सुविधा व साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती विभागामार्फत देण्यात आली आहे. असा उपक्रम विभागामार्फत पहिल्यांदाच राबविण्यात येत आहे.९८० शाळांतून निवडलेले १०० गुणवंत विद्यार्थी:- राज्यातील ९८० विजाभज आश्रमशाळांमधून इयत्ता ९ वी व ११ वीच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता परीक्षा घेण्यात आली. त्यातून ५० विद्यार्थी व ५० विद्यार्थीनी अशा एकूण १०० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.सहलीचे नियोजन:विद्यार्थी १५ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी या कालावधीत पुणे, बेंगलुरू, त्रिवेंद्रम, कन्याकुमारी या शहरातील विविध ठिकाणांना भेटी देणार आहेत.- १५ फेब्रुवारी रोजी पुणे - पिंपरी-चिंचवड सायन्स पार्क व नॅशनल वॉर मेमोरियल येथे भेट. १६ फेब्रुवारी पुणे - भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था येथे प्रयोगाधारित विज्ञान कार्यशाळा व शास्त्रज्ञांशी संवाद.- १६ फेब्रुवारी रोजी पुणे विमानतळावर मंत्री अतुल सावे व विभागाचे सचिव आप्पासाहेब धुळाज विद्यार्थ्यांशी संवाद साधणार असून इस्त्रो दौऱ्यासाठी हिरवी झेंडी दाखवणार आहेत.- १७ फेब्रुवारी बंगळुरू – विश्वेश्वरय्या औद्योगिक व तंत्रज्ञान संग्रहालय, हिंदुस्तान विमान निर्मिती वारसा संग्रहालय व लालबाग वनस्पती उद्यान भेट.- १८ फेब्रुवारी तिरुवनंतपुरम (थुंबा) - भारतीय अंतराळ संशोधन संस्था केंद्र, उपग्रह प्रदर्शन विभाग व प्रक्षेपण तंत्रज्ञान गॅलरी भेट; रॉकेट प्रक्षेपणाचे अवलोकन. तसेच नेपियर संग्रहालय व कोवलम समुद्रकिनारा भेट.- १९ फेब्रुवारी कन्याकुमारी - पद्मनाभपुरम राजवाडा, विवेकानंद शिला स्मारक, तिरुवल्लुवर पुतळा, गांधी स्मारक तसेच सूर्यास्त दर्शन.

फीड फीडबर्नर 13 Feb 2026 5:10 pm

Devendra Fadnavis: तंत्रज्ञान, उत्पादन आणि सेवा उद्योग क्षेत्रासाठी वाकायामा प्रांताशी सहकार्य अधिक दृढ करणार - मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई: महाराष्ट्र आणि जपानच्या वाकायामा प्रांतामधील संबंध मैत्रीपूर्ण आहेत. तंत्रज्ञान, उत्पादन आणि सेवा उद्योग क्षेत्रात सहकार्य अधिक वाढवून हे संबंध येणाऱ्या काळात अधिक दृढ करण्यात येतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.जपानसोबतचे आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध अधिक मजबूत करण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला.जपानच्या वाकायामा प्रांताचे राज्यपाल मियाझाकी इजुमी यांनी जपानच्या शिष्टमंडळासह हॉटेल ताजमहल येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, जपानचे मुंबईतील महावाणिज्यदूत यागी कोजी, वाकायामा विधानसभेचे उपाध्यक्ष अकिझुकी फुमिनारी यांच्यासह जपानचे शासन, विधिमंडळ, सांस्कृतिक, क्रीडा, उद्योग आदी विविध क्षेत्रातील प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुंबई ही भारताची आर्थिक, व्यावसायिक, सांस्कृतिक आणि मनोरंजन व्यवसायाची राजधानी आहे. ‘सिस्टर स्टेट’ असलेल्या महाराष्ट्राचे आणि वाकायामा प्रांताचे अनेक वर्षांपासून मैत्रीचे संबंध आहेत. महाराष्ट्र आणि वाकायामा प्रांतादरम्यान २०१३ मध्ये सहकार्याचा सामंजस्य करार झाला होता आणि २०२३ मध्ये त्याचे नूतनीकरण करण्यात आले. या कालावधीत दोन्ही राज्यांमध्ये सांस्कृतिक, क्रीडा, पर्यटन आणि शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय देवाणघेवाण झाली आहे. वाकायामा प्रांताच्या सहकार्याने जपानी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले असून अजिंठा परिसरातही जपानी पर्यटकांसाठी सुविधा उभारण्यात आल्या आहेत.दोन वेळा झालेल्या जपान दौऱ्यादरम्यान वाकायामा आणि कोयासन येथे भेट दिल्याच्या आठवणी सांगून कोयासन विद्यापीठात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले, हे दोन्ही देशांतील मैत्रीचे प्रतीक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. २०२३ मध्ये वाकायामाचे दिवंगत राज्यपाल यांच्या उपस्थितीत सुमो पहेलवानांचा संघ मुंबईत आला होता. गेटवे ऑफ इंडिया परिसरात सुमो आणि भारतीय कुस्तीचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले, ज्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याची आठवण त्यांनी सांगितली. सध्या जपानचे सुमो पहेलवान पुण्यातील बालेवाडी क्रीडा संकुलात प्रशिक्षण घेत आहेत. या क्रीडा क्षेत्रातील देवाणघेवाणीमुळे दोन्ही देशांना उत्कृष्ट खेळाडू घडविण्यास मदत होईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.जपानचे दिवंगत पंतप्रधान शिंजो आबे यांची आठवण करीत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, त्यांनी भारताशी मैत्री अधिक दृढ केली. त्यांच्या कार्यकाळात मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू झाले. मुंबईत ४० कि.मी. लांबीची भूमिगत मेट्रो, २२ कि.मी. लांबीचा देशातील सर्वात मोठा समुद्री पूल उभारण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.नागपूर येथे बामियानच्या बुद्ध पुतळ्याची प्रतिकृती उभारणार:अफगाणिस्तानातील बामियानच्या गौतम बुद्धांच्या पुतळ्याच्या विध्वंसाला 25 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर नागपूर येथे त्या पुतळ्याची प्रतिकृती उभारण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यपालांना दिला. नागपूर शहर डॉ.आंबेडकर यांनी बौद्ध धर्म स्वीकारून पुनरुज्जीवन घडवून आणलेले ऐतिहासिक ठिकाण आहे. या उपक्रमातून जगाला शांततेचा संदेश जाईल आणि भारत-जपान मैत्रीचे प्रतीक निर्माण होईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.विविध क्षेत्रातील शिष्टमंडळाने मुंबईस भेट दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी ‘अरिगातो गोझायमास’ असे जपानी भाषेत आभार मानले.महाराष्ट्र-वाकायामा संबंध नव्या उंचीवर नेणार - राज्यपाल मियाझाकी इजुमीमहाराष्ट्र आणि वाकायामा दरम्यान कराराचे २०२८ मध्ये नूतनीकरण करून नवनवीन क्षेत्रात सहकार्य वाढविण्याचा मानस वाकायामाचे राज्यपाल मियाझाकी इजुमी यांनी व्यक्त केला. ‘वाकायामा हे जपानमधील महाराष्ट्राचे प्रवेशद्वार आहे’ असे सांगून महाराष्ट्र-वाकायामा मधील संबंध नव्या उंचीवर जातील, असे त्यांनी सांगितले.राज्यपाल मियाझाकी इजुमी यांनी २०१३ मधील पर्यटन आणि अन्न प्रक्रिया क्षेत्रातील करारानंतर दोन्ही राज्यांमध्ये पर्यटन, क्रीडा, सांस्कृतिक देवाण-घेवाण, जागतिक वारसा स्थळांचे संवर्धन, तसेच व्यापार आणि उद्योग क्षेत्रात सातत्याने सहकार्य सुरू असल्याचे नमूद केले. डिसेंबर २०२३ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोयासन विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आल्याचा उल्लेख करत त्यांनी आनंद व्यक्त केला. वाकायामा प्रांतीय विधानसभेतील सदस्यांनी भारत-जपान मैत्री वृद्धिंगत करण्यासाठी विशेष गट स्थापन केला असल्याचे त्यांनी सांगितले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा जपानला भेट द्यावी, विशेषतः कोयासन आणि वाकायामातील निसर्गरम्य स्थळांना भेट द्यावी, असे निमंत्रण देत त्यांनी भविष्यातील सहकार्याबद्दल आशावाद व्यक्त केला.

फीड फीडबर्नर 13 Feb 2026 5:10 pm

T20 WOrld Cup 2026 ZIM vs AUS: झिम्बाब्वेचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय

श्रीलंका: आयसीसी टी२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये (T20 WOrld Cup 2026) झिम्बाब्वेने सर्वात मोठा उलटफेर करून ऑस्ट्रेलियाला २३ धावांनी पराभूत केलं आहे.अंडर डॉग समजल्या जाणाऱ्या झिम्बाब्वे सारख्या संघाने क्रिकेटमधील बलाढ्य संघ समजल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्याने क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे. यापूर्वी २००७ मध्ये झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला एका रोमांचक सामन्यात पराभूत केलं होतं. त्यानंतर आता वर्ल्ड कप २०२६ मध्ये झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला दुसऱ्यांदा पराभूत करून एक नवीन इतिहास रचला आहे.झिम्बाब्वेच्या गोलंदाजी समोर कांगारू सरेंडर :श्रीलंकेच्या कोलंबोमध्ये झिम्बाब्वे विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात शुक्रवारी (१३ फेब्रुवारी) सामना खेळवला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला आणि त्यांनी प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. तर २० ओव्हरमध्ये झिम्बाब्वेने २ विकेट गमावून १६९ धावा केल्या. तर ऑस्ट्रेलियाला विजयासाठी १७० धावांचं टार्गेट दिलं होतं. मात्र मैथ्यू रेनेशॉच्या अर्धशतकीय खेळीनंतर सुद्धा ऑस्ट्रेलियाचा संघ १९.२ ओव्हरमध्ये १४६ धावांवर ऑलआउट झाला. अनुभवी खेळाडूंशिवाय झिम्बाब्वेने वर्ल्ड कप सामन्यात बलाढ्य ऑस्ट्रेलिया विरुद्ध केलेली ही कामगिरी अतिशय कौतुकास्पद ठरली.Blessing Muzarabani's four-wicket haul powers Zimbabwe to a win over Australia He wins the @aramco POTM : https://t.co/DGcVByz7gH pic.twitter.com/d6xZOZCtl1— ICC (@ICC) February 13, 2026कांगारूंचा डाव कोसळला:१७० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची खराब सुरुवात झाली. झिम्बाब्वेच्या भेदक गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाचे दिग्गज फलंदाज एकामागून एक तंबूत परतले. संपूर्ण ऑस्ट्रेलियन संघ १४६ धावांत गारद झाला. झिम्बाब्वेच्या कमालीच्या फिल्डिंग आणि बॉलिंगमुळे कांगारूंचा २३ धावांनी पराभव झाला.OH THAT’S OUTRAGEOUS! Munyonga flies across and plucks a stunner out of thin air! ✨Zimbabwe’s fielding has been top-tier and AUS are now seven down! ICC Men’s #T20WorldCup | #AUSvZIM | LIVE NOW https://t.co/WBa4qbbxs0 pic.twitter.com/4RlkjdsSGY— Star Sports (@StarSportsIndia) February 13, 2026गुणतालिकेतील समीकरण बदलले:या ऐतिहासिक विजयानंतर 'ग्रुप बी' मध्ये मोठे फेरबदल झाले आहेत. झिम्बाब्वेने दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. तर ऑस्ट्रेलिया थेट तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. झिम्बाब्वेसाठी हा केवळ विजय नसून जागतिक क्रिकेटमध्ये आपला दबदबा निर्माण करण्याची मोठी संधी ठरली आहे.

फीड फीडबर्नर 13 Feb 2026 4:30 pm

The Lalla Anthem: अनिल कपूर आणि हरभजन सिंह यांचा दमदार संदेश – इंडियन क्रिकेट टीमशी भिडलात तर परिणाम भोगावे लागतील!

अनिल कपूर आणि राधिका मदान अभिनित ‘लल्ला अँथम – अ वॉर्निंग फ्रॉम सूबेदार’ या गाण्यात भारताचे माजी क्रिकेटपटू हरभजन सिंह विशेष उपस्थितीत झळकले आहेत. तसेच यात ‘भारत आर्मी’ आणि शेफाली बग्गा देखील दिसणार आहेत. हे गाणे रोहन-विनायक यांनी संगीतबद्ध केले असून गीतकार ऋषी उपाध्याय आहेत. तर प्रसिद्ध गायक विशाल ददलानी यांनी आपल्या दमदार आवाजात हे गाणे सादर केले आहे.संपूर्ण देश टीम इंडियाला पाठिंबा देत असताना प्राइम व्हिडिओने ‘द लल्ला अँथम – अ वॉर्निंग फ्रॉम सूबेदार’च्या माध्यमातून उत्साह आणखी वाढवला आहे. हा एक हाय-एनर्जी अँथम असून आगामी अ‍ॅक्शन-ड्रामा चित्रपट ‘सूबेदार’मधील ‘लल्ला’ या मूळ गाण्यावर आधारित आहे.https://www.instagram.com/reels/DUsDRHrCJHG/‘सूबेदार’ ही कथा भारताच्या ग्रामीण पार्श्वभूमीवर आधारित असून अर्जुन मौर्य (अनिल कपूर) या व्यक्तिरेखेचा प्रवास दाखवते. तो शिस्त, अभिमान आणि अढळ नैतिक मूल्यांवर जगणारा व्यक्ती आहे. लवचिकता, सन्मान आणि कोणत्याही आव्हानांना धैर्याने सामोरे जाण्याची ताकद या चित्रपटातून अधोरेखित केली आहे — ज्या भावना मोठ्या जागतिक स्पर्धेदरम्यान प्रत्येक भारतीय अनुभवतो.या म्युझिक व्हिडिओत स्टेडियममधील उत्साह आणि सिनेमॅटिक तीव्रतेचा सुरेख मिलाफ दिसतो. हरभजन सिंह यांच्यासह अनिल कपूर आणि राधिका मदान झळकतात. ‘भारत आर्मी’ आणि शेफाली बग्गा यांच्या उपस्थितीमुळे गाण्यात आत्मविश्वास, स्वॅग आणि अभिमानाची झलक दिसते.रोहन-विनायक यांच्या संगीतासह ऋषी उपाध्याय यांच्या प्रभावी गीतांनी आणि विशाल ददलानी यांच्या दमदार आवाजामुळे हे गाणे सध्याच्या क्रिकेट सीझनमधील जोशपूर्ण वातावरण उत्तमरीत्या पकडते. ‘आपल्या जागी ठाम रहा आणि कधीही मागे हटू नका’ हा चित्रपटाचा संदेशही या गाण्यातून ठळकपणे मांडला आहे.अनिल कपूर म्हणाले, “‘सूबेदार’ ही एका अशा व्यक्तीची कथा आहे ज्याला त्याच्या कर्तव्याची जाणीव आणि अंतर्मनातील ज्वाळा यांतून शक्ती आणि ध्येय मिळते. ‘लल्ला अँथम’ त्या ज्वाळेचे प्रतिबिंब आहे. सूबेदार अर्जुन मौर्य शांत आणि संयमी असला तरी योग्य वेळी ठामपणे उभा राहतो. या गाण्याचे शूटिंग करताना सेटवरील ऊर्जा अप्रतिम होती. टीम इंडियाला पाठिंबा देण्यासाठी सूबेदारच्या टीमकडून हा एक छोटासा प्रयत्न आहे.”हरभजन सिंह म्हणाले, “‘लल्ला अँथम – अ वॉर्निंग फ्रॉम सूबेदार’चा भाग होणे हा खरोखरच खास अनुभव होता. अनिल कपूर यांच्यासोबत काम करणे म्हणजे एका संस्थेसोबत काम करण्यासारखे आहे. त्यांची ऊर्जा आणि करिष्मा प्रत्येकाला प्रेरणा देतो. या गाण्याची बीट अत्यंत दमदार आहे आणि क्रिकेटच्या सध्याच्या उत्साहाशी पूर्णपणे सुसंगत आहे. टीम इंडिया आणि टीम सूबेदारला माझ्याकडून शुभेच्छा.”‘भारत आर्मी’ने म्हटले, “आमच्यासाठी क्रिकेट म्हणजे उत्कटता, विश्वास आणि प्रत्येक परिस्थितीत संघाच्या पाठीशी उभे राहणे. ‘लल्ला – अ वॉर्निंग फ्रॉम सूबेदार’मध्येही तीच ज्वाला आणि अभिमान दिसतो.”‘सूबेदार’चे दिग्दर्शन सुरेश त्रिवेणी यांनी केले असून त्यांना ‘तुम्हारी सुलु’, ‘जलसा’ आणि ‘दलदल’ यांसारख्या उत्कृष्ट कथांसाठी ओळखले जाते. या चित्रपटाची निर्मिती विक्रम मल्होत्रा, अनिल कपूर आणि सुरेश त्रिवेणी यांनी केली आहे. हा चित्रपट ५ मार्च रोजी प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार असून भारतासह २४० हून अधिक देशांमध्ये हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये पाहता येणार आहे.

फीड फीडबर्नर 13 Feb 2026 3:10 pm

रायगड जिल्ह्यात १५ दिवस ध्वनीवर्धकांना मध्यरात्रीपर्यंत सूट

जिल्हाधिकारी किशन जावळे यांचे आदेश, शांतता क्षेत्रात सूट लागू नाहीरायगड: केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या ध्वनीप्रदूषण (नियमन व नियंत्रण) सुधारित नियम, २०१७ अन्वये जिल्ह्याच्या निकडीनुसार वर्षातील १५ दिवस ध्वनीवर्धक (स्पीकर) व ध्वनीक्षेपक वापरास सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत सूट देण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी रायगड, किशन जावळे यांनी १ जानेवारी २०२६ ते ३१ डिसेंबर २०२६ या कालावधीत १५ दिवसांकरिता ध्वनीवर्धक व ध्वनीक्षेपक वापरास सूट दिल्याची अधिसूचना जारी केली आहे.या आदेशानुसार श्रोतृगृहे, सभागृहे, सामूहिक सभागृहे व मेजवानी कक्ष यांसारख्या बंद जागांखेरीज इतर ठिकाणी ध्वनीची विहित मर्यादा पाळून सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनीवर्धक व ध्वनीक्षेपक वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे.सूट देण्यात आलेले दिवस : शिवजयंती १९ फेब्रुवारी (१ दिवस), होळी पौर्णिमा २ मार्च (१ दिवस), डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती १४ एप्रिल (१ दिवस), ईद-ए-मिलाद २६ ऑगस्ट (१ दिवस), गणपती उत्सव १५ सप्टेंबर (दुसरा दिवस), १९ सप्टेंबर (गौरी विसर्जन), २५ सप्टेंबर (अनंत चतुर्दशी) ३ दिवस, गणपती (साखरचौथ विसर्जन) ३० सप्टेंबर (१ दिवस), नवरात्री उत्सव १७ ते २० ऑक्टोबर (४ दिवस), दिवाळी (लक्ष्मीपूजन) ८ नोव्हेंबर (१ दिवस), ख्रिसमस २५ डिसेंबर (१ दिवस),३१ डिसेंबर – (१ दिवस)दरम्यान ही सूट राज्य शासनाने घोषित केलेल्या शांतता क्षेत्रात लागू राहणार नाही. ध्वनीप्रदूषण नियम, २००० मधील तरतुदींचे उल्लंघन झाल्यास महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याकडून पर्यावरण संरक्षण कायदा, १९८६ च्या कलम १९ (अ) अन्वये आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

फीड फीडबर्नर 13 Feb 2026 3:10 pm

डिझेल गाड्या कायमच्या होणार बंद ? काय सांगतो नीती आयोगाचा अहवाल?

मुंबई: भारतात प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र सरकार २०२७ पर्यंत १० लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये डिझेलवर चालणाऱ्या प्रवासी वाहनांवर बंदी घालण्याचा विचार करत आहे. पेट्रोलियम मंत्रालयाच्या समितीने या संदर्भात शिफारस केली आहे, ज्यामुळे डिझेल वाहनांचे उत्पादन आणि वापर टप्प्याटप्प्याने बंद होऊन इलेक्ट्रिक आणि सीएनजी वाहनांना चालना मिळण्याची शक्यता आहे.भारताने २०७० पर्यंत 'शुद्ध-शून्य उत्सर्जन' लक्ष्य गाठायचे असेल, तर वाहतूक क्षेत्रात आमूलाग्र बदल अपरिहार्य असल्याचे नीती आयोगच्या ताज्या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. डिझेल वाहनांना टप्प्याटप्प्याने हटवून सीएनजी, हायब्रिड आणि इलेक्ट्रिक वाहनांचा वेगाने स्वीकार करणे ही पहिली आणि महत्त्वाची पायरी ठरेल, असे आयोगाने नमूद केले आहे.अहवालानुसार, शहरी प्रदूषण आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी डिझेल वाहनांची संख्या कमी करणे आवश्यक आहे. त्याऐवजी सीएनजी, हायब्रिड आणि इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवावा. यासोबतच इथेनॉल मिश्रित इंधनावर चालणाऱ्या फ्लेक्स-फ्युएल वाहनांना, उच्च बायो-सीएनजी मिश्रणाला आणि हायब्रिड फ्लेक्स-फ्युएल मॉडेल्सना प्रोत्साहन देण्याची शिफारस करण्यात आली आहे.आता पुढे काय बदलणार?ग्राहकांसाठी : आगामी काळात डिझेल गाड्यांची खरेदी महाग पडू शकते किंवा त्यांचे उत्पादन थांबविले जाऊ शकते,पर्याय : हायब्रिड आणि फ्लेक्स फ्यूल इंजिन असलेल्या गाड्यांकडे कल वाढणार.उद्योग : ऑटोमोबाईल कंपन्यांना आता बॅटरी निर्मितीसोबतच हायड्रोजन आणि बायोगॅस तंत्रज्ञानावर गुंतवणूक करावी लागेल.

फीड फीडबर्नर 13 Feb 2026 2:10 pm

बांगलादेशात तारिक रहमान PM होणार हे निश्चित:हे पाक-चीनसाठी धक्का आणि भारतासाठी चांगले आहे का ? 6 महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे

बांगलादेशमध्ये तारिक रहमान यांचे सरकार स्थापन होणार आहे. त्यांच्या BNP पक्षाने 299 पैकी 165 जागा जिंकून बहुमत मिळवले आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही बीएनपीच्या विजयाबद्दल अभिनंदन केले आहे. तारिक रहमान यांच्यासमोरील मोठ्या आव्हानांपैकी एक म्हणजे शेजारील भारतासोबतचे संबंध पूर्ववत करणे हे असेल. दशकांपासून भारताचा मित्र असलेला बांगलादेश, शेख हसीना यांच्या सत्तापालटानंतर चीन आणि पाकिस्तानसोबत उभा असलेला दिसत आहे. बांगलादेशमधील नवीन सरकारशी संबंधित 6 महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे आजच्या एक्सप्लेनरमध्ये जाणून घेऊया… प्रश्न-1: बांगलादेश निवडणुकीत कोणाला किती जागा मिळाल्या? उत्तर: 12 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4:30 वाजेपर्यंत 299 जागांवर मतदान झाले. सुमारे 55% मतदान झाले. त्यानंतर मतमोजणी सुरू झाली आणि 13 जानेवारीच्या सकाळपर्यंत निकाल आले… बीएनपीचे तारिक रहमान पंतप्रधानपदाचे सर्वात प्रबळ दावेदार मानले जात आहेत. त्यांच्या पक्षाला १६५ जागा मिळाल्या आहेत. २० नोव्हेंबर १९६५ रोजी जन्मलेले तारिक रहमान माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचे पुत्र आहेत. १७ वर्षांच्या वनवासानंतर ते २५ डिसेंबर २०२५ रोजी लंडनहून परतले. परतल्यानंतर अवघ्या ५ दिवसांनी त्यांच्या आई खालिदा झिया यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यानंतर बीएनपीची सूत्रे पूर्णपणे तारिक यांच्या हातात आली. त्यांच्याच नेतृत्वाखाली बीएनपी निवडणुकीत उतरली. तारिक यांनी स्वतः ढाका-१७ आणि बोगरा-६ या दोन जागांवरून निवडणूक लढवली आणि दोन्ही जागांवर विजय मिळवला. खरं तर, तारिकने स्वतःला तरुण आणि मध्यमवर्गीय मतदारांशी जोडले. त्यांनी स्वतःला शांत, ऐकणारे आणि धोरणांवर लक्ष केंद्रित करणारे नेते म्हणून सादर केले. याव्यतिरिक्त, तारिकला त्यांच्या आईच्या निधनानंतर मिळालेली सहानुभूती आणि त्यांच्या राजकीय पुनर्रप्रस्थापनेचाही फायदा झाला. प्रश्न-2: तारिक रहमान भारतासोबतचे संबंध सुधारतील का? उत्तर: शेख हसीना यांच्या सत्तापालटानंतर भारत आणि बांगलादेश यांच्या संबंधांमध्ये घसरण झाली. अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांनी भारताचे पारंपरिक विरोधक पाकिस्तान आणि चीन यांच्याशी मैत्री वाढवली. अशा परिस्थितीत भारताला आशा होती की बांगलादेशच्या नवीन सरकारशी संबंध सुधारले जातील. बीएनपी (BNP) भारताचा पसंतीचा पर्याय मानला जातो आणि ते संपर्कातही आहेत. जेव्हा खालिदा झिया यांचे निधन झाले, तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली. खालिदा यांच्या निधनावर परराष्ट्र मंत्री डॉ. जयशंकर ढाका येथे पोहोचले आणि तारिक यांना भेटले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही नवी दिल्लीतील बांगलादेश उच्चायोगात जाऊन शोक व्यक्त केला. बीएनपीने आपल्या जाहीरनाम्यात परराष्ट्र धोरण 'बांगलादेश फर्स्ट' आणि 'फ्रेंड येस, मास्टर नो' या घोषणांभोवती तयार केले आहे. एका निवडणूक रॅलीत तारिक रहमान म्हणाले, 'ना दिल्ली, ना पिंडी, बांगलादेश सर्वोच्च'. म्हणजेच त्यांनी भारत आणि पाकिस्तानच्या प्रभावापासून मुक्त राहण्याबद्दल सांगितले. माजी उच्चायुक्त रीवा गांगुली दास यांचे मत आहे की आपण शेजारी आहोत आणि शेजारी बदलता येत नाहीत. आपल्याला एकमेकांसोबत काम करावेच लागते. भारत सरकारने आधीच स्पष्ट केले आहे की कोणतेही सरकार सत्तेत आले तरी आम्ही त्यांच्यासोबत काम करण्यास तयार आहोत. बीएनपीने निवडणुकीत वचन दिले आहे की… बांगलादेशमधील भारताचे उच्चायुक्त राहिलेले हर्षवर्धन श्रृंगला यांचे म्हणणे आहे की, तारिक रहमान यांना समजले आहे की एक यशस्वी पंतप्रधान होण्यासाठी त्यांना भारताच्या पाठिंब्याची गरज आहे, किंवा किमान भारताचे शत्रुत्व त्यांना परवडणारे नाही. आता हे पाहणे महत्त्वाचे ठरेल की त्यांचे बोलणे आणि कृती जुळतात की नाही. अमेरिकन थिंकटँक अटलांटिक कौन्सिलमधील दक्षिण आशिया केंद्राचे वरिष्ठ फेलो मायकेल कुगेलमॅन यांचे मत आहे की, भारताला आशा आहे की नवीन सरकार चर्चेसाठी तयार असेल. ते अशा घटकांपासून प्रभावित होणार नाहीत, जे भारताच्या हितासाठी धोकादायक आहेत. बीएनपी आणि भारत दोन्ही एकमेकांसोबत काम करण्यास तयार आहेत. 13 फेब्रुवारीच्या सकाळी पंतप्रधान मोदींनी तारिक रहमान यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी सोशल मीडिया X वर लिहिले, हा विजय दर्शवतो की बांगलादेशच्या जनतेचा तुमच्या नेतृत्वावर विश्वास आहे. भारत नेहमीच एका लोकशाहीवादी आणि प्रगतीशील बांगलादेशसोबत उभा राहील. मी दोन्ही देशांमधील संबंध अधिक मजबूत करण्यासाठी आणि विकासासाठी एकत्र काम करण्यास तयार आहे. प्रश्न-३: भारत आणि बांगलादेशचे संबंध सुधारणे दोघांसाठी का महत्त्वाचे आहे? उत्तर: बांगलादेशची ९४% सीमा भारताला लागून आहे. बांगलादेश जवळपास चारही बाजूंनी भारताने वेढलेला आहे, म्हणून याला 'इंडिया लॉक्ड' देश म्हटले जाते. अशा परिस्थितीत बांगलादेश सुरक्षा आणि व्यापाराच्या बाबतीत भारतावर अवलंबून आहे. ईशान्येकडील राज्यांना उर्वरित भारताशी जोडण्यात बांगलादेशची महत्त्वाची भूमिका आहे. शेख हसीना सत्तेत असताना भारताला ईशान्येकडील राज्यांबाबत बांगलादेशकडून कोणत्याही अडचणींची चिंता करावी लागली नाही, परंतु त्यांच्या सत्तापालटानंतर एक सुरक्षा धोका निर्माण झाला. मार्च 2025 मध्ये बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांनी चीन दौऱ्यात म्हटले, 'भारताची ईशान्येकडील राज्ये भूभागाने वेढलेली आहेत. समुद्रापर्यंत पोहोचण्यासाठी बांगलादेश हाच त्यांचा एकमेव मार्ग आहे.' याशिवाय अनेक बांगलादेशी नेत्यांनी 'सेव्हन सिस्टर्स'ना वेगळे करण्याची धमकी दिली आणि त्यांना बांगलादेशचा भाग असल्याचे सांगितले. ईशान्येकडील 7 राज्यांना उर्वरित देशाशी सिलीगुडी कॉरिडॉर जोडतो, जो फक्त 40 किमी लांब आणि 22 ते 30 किमी रुंद आहे. यालाच चिकन नेक म्हणतात. याच्या एका बाजूला नेपाळ आणि दुसऱ्या बाजूला बांगलादेश आहे. येथून चीन फक्त 200 किमी दूर आहे. मनोहर पर्रिकर इन्स्टिट्यूट फॉर डिफेन्स स्टडीज अँड ॲनालिसिसच्या वरिष्ठ फेलो स्मृती पटनायक यांच्या मते, ईशान्येकडील सुरक्षेबाबत भारत थोडीही ढिलाई करणार नाही. हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि यावर भारत कोणतीही तडजोड करणार नाही. हा संदेश बांगलादेशच्या संपूर्ण नेतृत्वापर्यंत पोहोचवण्यात आला आहे. निवृत्त ब्रिगेडियर रणजीत बरठाकूर यांचे मत आहे की, बांगलादेशमध्ये चिकन नेकशी छेडछाड करण्याची ताकद नाही. तो कट्टरवाद्यांना मदत करून आणि घुसखोरी करून भारताला त्रास देऊ शकतो, पण चिकन नेकला लक्ष्य करण्याची हिंमत करणार नाही. खरी समस्या चीन आहे आणि आपल्याला तयार राहावे लागेल. बांगलादेशमधील भारताचे माजी राजदूत अनिल त्रिगुणायत यांचे मत आहे की, तारिक रहमान सत्तेत आल्यास भारतासमोरील सर्वात मोठे आव्हान बांगलादेशात घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तान आणि इतर भारतविरोधी दहशतवादी गटांवर लक्ष ठेवणे हे असेल. प्रश्न-४: तारिक सरकार पाकिस्तानशी अधिक जवळीक वाढवेल का? उत्तर: १९७१ मध्ये बांगलादेशची निर्मिती झाल्यापासून पाकिस्तानसोबतचे त्याचे संबंध दीर्घकाळ तणावपूर्ण राहिले. बीएनपीच्या मागील सरकारांच्या काळात, म्हणजे खालिदा झिया यांच्या काळात, पाकिस्तानसोबतचे संबंध सुधारले, परंतु शेख हसीना यांनी पुन्हा अंतर ठेवले. हसीना यांच्या सत्तापालटानंतर मोहम्मद युनूस यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची ३ वेळा भेट घेतली. दोन्ही देशांचे नेते आणि लष्करी अधिकारीही भेटले. पाक लष्करप्रमुख आसिम मुनीर यांनीही भेट घेतली. दशकांनंतर दोन्ही देशांमध्ये थेट सागरी सेवा सुरू झाली. संरक्षण भागीदारी वाढवण्यावर चर्चा झाली. संयुक्त लष्करी सराव आणि शस्त्रनिर्मितीवर विचार करण्यात आला. माजी उच्चायुक्त हर्षवर्धन श्रृंगला यांच्या मते, 2001-2006 च्या बीएनपी (BNP) राजवटीत बांगलादेशने भारतविरोधी भूमिका घेतली आणि पाकिस्तानच्या खूप जवळ गेला. त्यावेळी तारिक रहमान सरकारमधील एक महत्त्वाचे व्यक्ती होते आणि त्यांचा प्रभाव खूप जास्त होता. खरं तर, त्यावेळी भारतात भाजपचे अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार होते. तर बांगलादेशात बीएनपीच्या खालिदा झिया सरकार चालवत होत्या. दोन्ही देशांमध्ये व्यापार, सीमा, नदी पाणी वाटप, अल्पसंख्याकांविरुद्ध हिंसाचार, स्थलांतर आणि सशस्त्र बंडखोरी यांसारख्या मुद्द्यांवर मतभेद होते. तेव्हा भारताने बीएनपीवर पाकिस्तानी गुप्तचर संस्थांना मदत केल्याचा आरोपही केला होता, ज्याचे ढाकाने खंडन केले होते. ढाका विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय संबंध विभागाचे प्राध्यापक डेलवर हुसेन मानतात की, सत्तेत कोणीही आले तरी बांगलादेश-पाकिस्तान संबंध अधिक चांगले होतील आणि अचानक बदलाची कोणतीही शक्यता नाही. बीएनपी सरकारचे पाकिस्तानशी मजबूत संबंध असण्याचा इतिहास आहे. मात्र, पाकिस्तानसाठी नवीन सरकार हा मुद्दा नाही. ते पाहतील की नवीन सरकारचे भारताबाबत काय धोरण असेल आणि पाकिस्तानला ते किती प्रमाणात पाठिंबा देतील? आंतरराष्ट्रीय संबंध तज्ज्ञ स्मृती पटनायक मानतात की, बांगलादेश पाकिस्तानशी कितीही मजबूत संबंध ठेवू दे, त्यांना सुरक्षा तपासणीशिवाय बांगलादेशात बोलावू दे. हा भारताच्या चिंतेचा विषय नाही. खरं तर, पाकिस्तान बांगलादेशसोबत मिळून सार्कला पुन्हा सक्रिय करू इच्छितो. तर, आंतरराष्ट्रीय मंचांवर नवीन सरकारकडून काश्मीरसारख्या मुद्द्यावर सोबत राहण्याची किंवा तटस्थ राहण्याची अपेक्षा करतो. प्रश्न-५: तारिक रहमान चीनसोबत कसे संबंध ठेवतील? उत्तर: बांगलादेशवर भारताचा प्रभाव जसा कमी होत गेला, ती पोकळी चीनने भरून काढली. सामान्यतः बांगलादेशी नेते शपथ घेतल्यानंतर पहिला परदेश दौरा भारताचा करतात, पण युनूसने चीनची निवड केली. २६ ते २९ मार्च २०२५ पर्यंत त्यांनी चीनचा दौरा केला. या दरम्यान त्यांनी चीनसोबत ९ करारांवर स्वाक्षरी केली. यामध्ये तीस्ता नदी प्रकल्प, ९८% उत्पादनांवर शून्य शुल्क, संरक्षण लॉजिस्टिक्स, डिजिटल कनेक्टिव्हिटी आणि लालमोनिरहाट विमानतळाचे नूतनीकरण यांसारख्या करारांचा समावेश आहे. भारतीय थिंकटँक सेंटर फॉर सोशल अँड इकॉनॉमिक प्रोग्रेसचे कॉन्स्टँटिनो झेवियर यांचे म्हणणे आहे की, चीन भारत-बांगलादेश संबंधांमधील संकटाचा फायदा घेत उघडपणे आणि पडद्यामागे अशा दोन्ही प्रकारे आपला प्रभाव सातत्याने वाढवत आहे. अमेरिकन थिंकटँक 'कौन्सिल ऑन फॉरेन रिलेशन्स'चे फेलो जोशुआ कुर्लांट्झिक यांचे मत आहे की, बंगालच्या उपसागराच्या बाबतीत चीनच्या रणनीतीचे बांगलादेश केंद्र बनले आहे. चीनला विश्वास आहे की बांगलादेश त्याला यात मदत करेल. चीनमध्ये बांगलादेशचे राजदूत राहिलेले मुन्शी फैज अहमद यांच्या मते, बांगलादेशसाठी चीनचे स्थान इतर कोणत्याही देशाने बदलले जाऊ शकत नाही. कारण गेल्या काही वर्षांत चीन एक मोठा गुंतवणूकदार तसेच व्यापार भागीदार म्हणून उदयास आला आहे. बांगलादेशच्या राष्ट्रीय महसूल मंडळाच्या मते, 2024-25 मध्ये बांगलादेशचा चीनसोबतचा व्यापार 21.3 अब्ज डॉलरपेक्षा जास्त होता. तर भारतासोबत सुमारे 11.5 अब्ज डॉलरचा व्यापार झाला. अहमद यांचे मत आहे की, जरी लोकांना वाटत होते की भारत आपल्या खूप जवळ आहे, तरी व्यापार आणि वाणिज्यच्या बाबतीत चीनसोबतचे आपले संबंध सतत वाढत आहेत. आपल्या विकास प्रकल्पांमध्ये चीनचे पैसे गुंतले आहेत. बांगलादेश दीर्घकाळ चीनसोबतचे संबंध कायम ठेवेल, कारण चीन जे देऊ शकतो, ते इतर कोणीही देऊ शकत नाही. प्रश्न-६: बांगलादेशमध्ये सार्वमतचा निकाल काय लागला आणि याचा काय परिणाम होईल? उत्तर: सार्वमताच्या बाजूने ६६.७% लोकांनी मतदान केले. तर याच्या विरोधात ३२.२७% मते पडली. म्हणजेच आता बांगलादेशमध्ये जुलै चार्टर लागू झाला. नवीन संसद पहिल्या १८० दिवसांपर्यंत एक 'घटनात्मक सुधार परिषद' म्हणून काम करेल आणि चार्टरच्या शिफारसींना कायद्यात रूपांतरित करेल. खरेतर, बांगलादेशमध्ये राजकीय आणि घटनात्मक सुधारणा घडवून आणण्यासाठी नॅशनल कन्सेंशस कमिशन (राष्ट्रीय सहमती आयोग) स्थापन करण्यात आले. अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस याचे अध्यक्ष बनले. या कमिशनच्या ५ वेगवेगळ्या आयोगांनी ३३ राजकीय पक्ष आणि आघाड्यांसोबत ७२ बैठका घेऊन १६६ शिफारसींवर चर्चा केली. यानंतर ‘नॅशनल चार्टर ऑफ जुलै २०२५’ तयार झाला, ज्यात ८४ शिफारसींचा समावेश होता. यात काही बदल होणार आहेत…

दिव्यमराठी भास्कर 13 Feb 2026 1:44 pm

Pakistan Hockey Team: पाकिस्तानची पुन्हा नाचक्की; हॉटेलचे बिल न भरल्याने खेळाडू रस्त्यावर

पाकिस्तानी खेळाडूंची आंतरराष्ट्रीय स्तरावर नाचक्की झाली आहे. खेळाडूंच्या हॉटेलचं बिल न भरल्याने खेळाडूंना बराच वेळ रस्त्यावर बसून राहावे लागले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी हॉकी टीम ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबेरा येथे आपल्या स्पर्धेसाठी गेले असताना ते ज्या हॉटेलमध्ये थांबणार होते त्या हॉटेलचं पाकिस्तान हॉकी फेडरेशनने बिल न भरल्यामुळे त्यांना तिथे प्रवेश नाकारण्यात आला.होबार्ट येथे होणाऱ्या एफआयएच प्रो लीग स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी पाकिस्तानी हॉकी संघ ऑस्ट्रेलियात आहे. पाकिस्तान संघाला प्रो लीगमध्ये आतापर्यंत खेळलेल्या सर्व म्हणजेच सहा मॅचमध्ये हार पत्करावी लागली आहे.वृत्तानुसार, संघाला सांगण्यात आले की त्यांनी खेळाडू आणि व्यवस्थापन कर्मचाऱ्यांसाठी कॅनबेरा येथील एका चार स्टार हॉटेलमध्ये खोल्या बुक केल्या आहेत आणि बिले भरण्यात आली आहेत. परंतु जेव्हा संघ आला तेव्हा त्यांना कळले की हॉटेलचं बिल भरलेलंच नाही, त्यामुळे त्यांचं बुकिंग रद्द झालं आहे. वेळेच्या फरकामुळे संघाचे प्रशिक्षक ताहिर जमान हॉकी फेडरेशनच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधू शकले नाहीत.काही तासांनंतर, हॉटेल कर्मचाऱ्यांनी अखेर थकलेल्या खेळाडूंना काही खोल्या दिल्या. फक्त काही खोल्या असल्याने, संघाला त्यानुसार खोल्या विभागून घ्याव्या लागल्या. दुसऱ्या दिवशी, पाकिस्तान संघाने पुन्हा संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना २-३ ने गमावला.काही स्थानिक पाकिस्तानी नागरिकांशी संपर्क साधल्यानंतर आणि त्यांनी आर्थिक मदत करण्यासाठी पुढे आल्यानंतर हॉकी संघाला अखेर हॉटेलचे बिल भरता आले, असे वृत्त आहे.आर्थिक कारणांमुळे संघाला फटका बसण्याची ही पहिलीच वेळ नाही. अहवालानुसार, अर्जेंटिनामध्ये झालेल्या FIH प्रो लीगच्या पहिल्या टप्प्यात, कथित 'निधीअभावी' खेळाडूंना त्यांचे दैनिक भत्तेही देण्यात आले नव्हते.

फीड फीडबर्नर 13 Feb 2026 1:30 pm

Gold-Silver Rate: सलग दुसऱ्या दिवशी सोने आणि चांदीच्या दरात लक्षणीय घसरण; जाणून घ्या आजचे दर

मुंबई: शुक्रवार १३ फेब्रुवारी रोजी सलग दुसऱ्या दिवशी सोने आणि चांदीच्या दरात लक्षणीय घसरण झाली आहे.मल्टी-कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, एकाच दिवसात सोने आणि चांदीच्या किमती ३२ हजार रुपयांपर्यंत घसरल्या. १२ फेब्रुवारी २०२६ रोजी, सोन्याची किंमत १,५२,३०० रुपयांपर्यंत घसरली, ती ४.० टक्क्यांची लक्षणीय घट होती. दरम्यान,चांदी २ लाख ३७ हजार, १३६ वर बंद झाली.आज, शुक्रवार, कमोडिटी मार्केटसाठी आठवड्याचा शेवटचा दिवस आहे. आज सोने आणि चांदीच्या किमती आणखी कमी होतील की त्यांना काही शॉर्ट-कव्हरिंग दिसेल? हा मोठा प्रश्न आहे.सोनं-चांदीच्या किमतींमध्ये सध्या एवढे चढउार पहायला मिळत आहे की गुंतवणूकदार आणि खरेदी करणारे ग्राहक, दोघेही प्रचंड हैराण झालेआहेत. आज जो दर आहे, उद्या तोच कायम तर सोडाच, पणत्याच्या आसपासही असेल की नाही ही शंका रोजच्या रोज सतावते. २९ जानेवारी रोजी, चांदीने प्रति किलो ४.२० लाख रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठला, तर सोन्याने १.९३ लाखांपर्यंत उसळी मारत २ लाखांच्या जवळ झेप घेतली होती. मात्र आता सोनं आणि चांदी दोन्ही त्यांच्या विक्रमी उच्चांकावरून लक्षणीयरीत्या घसरले आहेत.

फीड फीडबर्नर 13 Feb 2026 1:10 pm

मुंबई–नाशिक महामार्गावरील कोंडी लवकरच इतिहास जमा होणार? मार्च २०२६ पर्यंत .....

ठाणे : मुंबई–नाशिक दरम्यान प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. माजिवडा ते वडपे या दरम्यान सुरू असलेल्या रुंदीकरणाच्या कामाला वेग आला असून मार्च २०२६ पर्यंत हा मार्ग पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील जिल्हा नियोजन समिती बैठकीनंतर दिली.सध्या या पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असून प्रवाशांना तासन्‌तास अडकून राहावे लागत आहे. रस्त्याच्या विस्तारीकरणानंतर वाहतूक सुरळीत होईल, असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे.अधिकाऱ्यांना कडक सूचनाबैठकीदरम्यान शिंदे यांनी विकासकामांचा आढावा घेतला. मंजूर निधीचा योग्य वापर न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला. प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.ठाणे परिसरातही प्रकल्पांना गतीठाण्यातील साकेत उड्डाणपूलाचे काम अंतिम टप्प्यात असून पुढील महिन्यात तो वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे. तसेच कळवा–खारीगाव खाडी पुलाच्या रुंदीकरणाचे काम पूर्ण झाले असून तोही लवकरच नागरिकांसाठी सुरू करण्यात येणार आहे.पावसाळ्यापूर्वी रस्ते दुरुस्तीचे आदेशपावसाळ्याआधी सर्व महापालिका आणि नगरपालिकांनी रस्त्यांची दुरुस्ती व देखभाल पूर्ण करावी, जेणेकरून खड्डे आणि अपघात टाळता येतील, असे निर्देशही देण्यात एकनाथ शिंदे यांच्याकडून आले. ग्रामीण भागातील शैक्षणिक व आरोग्य सुविधांच्या उन्नतीसाठी सुमारे १७०० कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव ठेवण्यात आल्याची माहितीही बैठकीत देण्यात आली.

फीड फीडबर्नर 13 Feb 2026 1:10 pm

Silver Price: चांदीच्या किमतीत मोठी घसरण, ४.२० लाख रुपयांवरून २.५० लाख रुपये प्रति किलो, पुढे काय होणार?

Silver Price: विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर चांदीच्या किमतीत आता लक्षणीय घसरण होत आहे, ज्यामुळे गुंतवणूकदारांची चिंता वाढत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया (MCX) वर चांदी सुमारे ₹२.५ लाख प्रति किलोवर घसरली आहे.

दैनिक प्रभात 13 Feb 2026 12:53 pm

विमानात मोठ्या आवाजात गाणी ऐकणार तर......; विमान वाहतूक मंत्रालयाने जारी केले नवे नियम

मुंबई : लांबच्या ठिकाणी जलद पोहोचण्यासाठी आजकाल सर्रास विमानांचा वापर केला जातो. ट्रेन किंवा बसने प्रवास करताना आपल्याला खिडकीच्या बाहेर पाहता येत, अनेक लोकांमुळे मनोरंजन होत असत. पण विमानाचा प्रवास हा कंटाळवाणा असतो. त्यामुळे अनेक जण जास्त करून संगीताचा किंवा चित्रपटाचा आधार घेतात. याच गोष्टींवर विमान वाहतूक मंत्रालयाने आता एक नवीन नियम जारी केला आहे . या नव्या नियमच उल्लंघन केल्यास थेट जेलची वारीही घडू शकते.अनेक जण आपल्या मनोरंजनासाठी मोठ्या आवाजात गाणी लावतात, त्यामुळे इतर प्रवाश्यांसाठी ते गैरसोयीचे आणि त्रासदायक होते. याच प्रवाश्यांची दखल विमान वाहतूक विभागाने घेतली आहे. सार्वजनिक ठिकाणी असे मोठ्या आवाजात गाणी लावणे हे नियमांचे उल्लंघन असल्याचे सरकारचे म्हणणे आहे.केंद्रीय विमान वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी लोकसभेत याबद्दल सविस्तर माहिती दिली. त्यांनी स्पष्ट केले की बेशिस्त प्रवाशांना रोखण्यासाठी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने ( DGCA ) जारी केलेल्या 'नागरी विमान वाहतूक आवश्यता' यानुसार ही कारवाई केली जाईलविमान नियम १९३७ च्या अंतर्गत तरतुदीनियम २२ : नियमानुसार, जर एखादा प्रवासी सुरक्षा किंवा शिस्तीचे उल्लंघन करत असेल, तर विमान कंपनी त्या प्रवाशाला विमानात प्रवेश नाकारू शकते किंवा विमानातून उतरवूही शकतेनियम २३ : हा नियम 'पायलट - इन - कमांड' यांना विशेष अधिकार देतो. विमानाची सुरक्षा किंवा शिस्त धोक्यात आणणाऱ्या कोणत्याही प्रवाशांविरुद्ध आवश्यक ती कारवाई करण्याचे अधिकार वैमानिकाकडे असतात.नियम २९ : वरील नियमांचे उल्लंघन केल्यास प्रवाश्यांसाठी विशिष्ठ शिक्षेची आणि दंडाची तरतूद करण्यात आली आहे.

फीड फीडबर्नर 13 Feb 2026 12:30 pm

T20 World Cup 2026 Ind vs Pak: पाकविरुद्ध अभिषेक शर्मा खेळणार ? सूर्यकुमारने स्पष्टच सांगितलं...

नवी दिल्ली : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये भारताने अमेरिकेविरुद्धच्या सामना २९ धावांनी जिंकला. पाठोपाठ नामिबिया विरुद्धचा सामना भारताने ९३ धावांनी जिंकला. सलग दोन साखळी सामने जिंकल्यामुळे भारत ए ग्रुप अर्थात अ गटात चार गुण आणि +३.०५० च्या नेट रनरेटसह अव्वलस्थानी आहे. गटात दुसऱ्या स्थानावर असलेल्या पाकिस्तानचेही चार गुण आहेत पण त्यांचा नेट रनरेट +०.९३२ आहे. यामुळे रविवारी (१५ फेब्रुवारी) होणाऱ्या भारत - पाकिस्तान सामन्याचे महत्त्व आणखी वाढले आहे.अशातच या सामन्यात सलामीवीर अभिषेक शर्मा खेळणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असताना कर्णधार सूर्यकुमार यादव याचा विधानाने चाहत्यांना टेन्शन आलं आहे. सूर्याने नामिबिया विरुद्धच्या टॉस वेळी अभिषेकच्या प्रकृतीची माहिती दिली. तो म्हणाला की; अभिषेक अजून पूर्णपणे बरा झालेला नाही, त्याला अजून दोन-चार मॅच खेळता येणार नाही. त्याच्या जागी संजू सॅमसन खेळेल.त्यामुळे भारत विरुद्ध पाकिस्तान या मॅच मध्ये चाहत्यांना अभिषेकाची बॅटिंग पाहता येणार नाही. भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना रविवार १५ फेब्रुवारी रोजी कोलंबो येथे होणार आहे.

फीड फीडबर्नर 13 Feb 2026 12:30 pm

मुंबईतील गोरेगावात ४५ मजली इमारतीला भीषण आग

मुंबई: मुंबईतील गोरेगाव परिसरात असलेल्या ४५ मजली इमारतीला भीषण आग लागली आहे. या इमारतीच्या नवव्या मजल्यावर अचानक आग भडकली आणि काही क्षणांतच धुराचे मोठे लोट संपूर्ण परिसरात पसरले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.अडकलेल्या रहिवाशांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्नआग लागल्याचे समजताच इमारतीतील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. काहींनी तातडीने जिन्यांचा वापर करून खाली धाव घेतली तर काहींना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू करण्यात आले. सुरक्षारक्षक आणि स्थानिक नागरिकांनीही मदतकार्याला हातभार लावला.

फीड फीडबर्नर 13 Feb 2026 12:10 pm

Narhari Zirwal: चौकशीत नाव आलं तर...; ACB च्या छाप्यानंतर नरहरी झिरवाळ यांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) छापा टाकत दोन कर्मचाऱ्यांना अटक केली. या प्रकरणावर मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकारच्या चौकशीत माझं नाव आलं तर मी राजीनामा देईन, अशा शब्दांमध्ये त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.नेमकं काय म्हणाले नरहरी झिरवाळ ?नरहरी झिरवाळ यावेळी दिल्लीत असून त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जर या प्रकरणाशी आपला कोणताही संबंध आढळला तर राजीनामा देणार असं जाहीर केलं आहे. तसंच आपल्याला टार्गेट केलं जात असल्याचे दावे फेटाळून लावले. आपण मुंबईत गेल्यावर बैठक घेणार असून, इतर कोणी दोषी आढळलं तर त्यांच्यावरही कारवाई करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.मी तर परवापासून येथे आहे. हा प्रकार चुकी़चा असून, असं व्हायला नको होतं. ढेरंगे हे आपल्याकडे क्लर्क म्हणून काम करतात. सुनावणीते पेपर बनवण्याचं काम ते करतात. तसे ते मूळचे अन्न, नागरी पुरवठा विभागाचे आहेत. त्यांना उसणवारीवर घेतललं होतं. आम्ही त्यांना पाठीशी घालणार नाही. त्याला जाब द्यावा लागणार आहे, असं नरहरी झिरवाळ यांनी सांगितलं आहे.नेमकं प्रकरण काय ?अन्न व औषध प्रशासन विभागातील लिपिकाला लाच घेताना मंत्रालयात सापळा रचून मोठी कारवाई केली. राजेंद्र ढेरंगे असे अटक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. औषध दुकानाचा निलंबित परवाना पूर्वरत करून देण्यासाठी त्याने ५० हजारांची लाच मागितली होती. तडजोडीअंती ३५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आली. मंत्रालयातल्या दुसऱ्या मजल्यावर ही कारवाई झाल्याने चर्चांना उधाण आले आहे. तक्रार आल्यानंतर मंत्री नरहरी िझरवाळ यांच्या कार्यालयात अँटी करप्शन ब्युरोचे सहा अधिकारी पोहोचले होते. कारवाई करताना झिरवाळ यांचं कार्यालय पूर्ण ताब्यात घेतले. तपास झाल्यानंतर मग या संबंधित लिपिकाला ताब्यात घेतले. त्यानंतर कार्यालय उघडण्यात आले.

फीड फीडबर्नर 13 Feb 2026 12:10 pm

हिंदू-अवामी लीगची मते BNPला मिळाली, जमातला हरवले:हसीना सरकार पाडणारे हरले, हिंदू लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यांमध्ये BNPचा एकतर्फी विजय

सुमारे अडीच महिन्यांपूर्वीच लंडनहून बांगलादेशात परतलेले तारिक रहमान पंतप्रधान होणार हे निश्चित आहे. सकाळी 9:30 वाजेपर्यंत आलेल्या निकालानुसार, त्यांच्या BNP म्हणजेच बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीने 299 पैकी 209 जागा जिंकल्या आहेत. सरकार स्थापन करण्यासाठी 150 जागांची आवश्यकता होती. कट्टरपंथी पक्ष जमात-ए-इस्लामीचा दारुण पराभव झाला आहे. त्यांच्या आघाडीला फक्त 70 जागा मिळाल्या आहेत. शेख हसीनांचे सरकार पाडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नॅशनल सिटीझन पार्टी म्हणजेच NCP ला देखील बांगलादेशींनी नाकारले. तज्ज्ञ BNPच्या एकतर्फी विजयाची तीन कारणे सांगतात… 1. माजी पंतप्रधान शेख हसीनांच्या अवामी लीग पक्षाची मते, विशेषतः हिंदू मतदारांची मते BNP कडे वळली. BNPला अवामी लीगचा बालेकिल्ला असलेल्या गोपालगंज व्यतिरिक्त खुलना, सिलहट, चटगाव, ठाकूरगंज येथे विजय मिळाला आहे. 2. जमातचा भूतकाळ आडवा आला, लोकांना आठवले की त्यांनी बांगलादेशच्या मुक्तिसंग्रामाला विरोध केला होता. जमात हा डाग पुसू शकली नाही. 3. विद्यार्थ्यांच्या नॅशनल सिटीझन पार्टीला आपसातील फूट आणि जमातसोबत युती करणे महागात पडले. त्यांना लोकांनी पूर्णपणे नाकारले. बीएनपीच्या विजयाचे सर्वात मोठे घटक तारिक रहमानतारिक रहमान हे माजी राष्ट्रपती झियाउर रहमान आणि माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचे पुत्र आहेत. बीएनपीच्या विजयाचे संपूर्ण श्रेय तारिक रहमान यांना जाते. 2008 मध्ये तारिक रहमान यांना देश सोडून पळून जावे लागले होते. सुमारे 17 वर्षांच्या वनवासानंतर ते 25 डिसेंबर 2025 रोजी लंडनहून बांगलादेशात परतले होते. शेख हसीना सरकारने त्यांच्यावर 80 हून अधिक गुन्हे दाखल केले होते. त्यांना वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये जन्मठेपेव्यतिरिक्त 17 वर्षांची शिक्षा झाली होती. रहमान लंडनमधूनच पक्षाचे काम सांभाळत राहिले. निवडणुकांपूर्वीच त्यांचे परत येणे बीएनपीसाठी मोठ्या राजकीय बूस्टरसारखे ठरले. तारिक रहमान 2018 पासून पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष होते. 9 जानेवारी 2026 रोजी त्यांना अध्यक्ष बनवण्यात आले. पक्षाच्या अध्यक्षा बेगम खालिदा झिया यांच्या निधनानंतर हे पद रिक्त झाले होते. खालिदा झिया यांचे निधन 30 डिसेंबर 2025 रोजी झाले होते. देशात परतल्यावर तारिक रहमान यांचे स्वागत नायकासारखे झाले. ढाका येथे पोहोचल्यावर त्यांनी मातीला स्पर्श करून सलाम केला. याचे फोटो खूप व्हायरल झाले होते. परतल्यानंतर रहमान यांनी संपूर्ण देशाचा दौरा केला. ते लोकांशी थेट बोलत असत. त्यांना मंचावर बोलावले. त्यांनी देशाची अर्थव्यवस्था सुधारण्याचा रोडमॅप सादर केला. तारिक रहमान यांच्या परतण्याव्यतिरिक्त, खालिदा झिया यांच्या निधनामुळे निर्माण झालेली सहानुभूती, अवामी लीगने निवडणूक न लढवणे, विद्यार्थी नेत्यांकडून लोकांना मिळालेली निराशा आणि जमातवरील राग, हे सर्व बीएनपीच्या बाजूने गेले. ढाका विद्यापीठाचे प्राध्यापक आणि राजकीय विश्लेषक सैफुल आलम चौधरी म्हणतात, ‘बीएनपीने या निवडणुकीत काही वेगळे किंवा खास केले नाही. बीएनपीच्या विजयामागे एक मोठे कारण हेदेखील होते की अवामी लीगच्या सुमारे 10% मतदारांनी त्यांना मतदान केले.’ जमातचा भूतकाळ आणि खराब प्रतिमेमुळे ती बुडालीजमात-ए-इस्लामी यावेळी 10 पक्षांसोबत युती करून निवडणूक लढली. यात विद्यार्थ्यांचा पक्ष एनसीपीचाही समावेश आहे. तरीही जमातचा दारुण पराभव झाला. तज्ञांचे मत आहे की जमातचा भूतकाळ आणि कट्टरपंथी प्रतिमा लोकांना कधीच आवडली नाही. लोकांना आठवते की जमातने बांगलादेशच्या स्वातंत्र्याला विरोध केला होता. सैफुल आलम चौधरी जमातच्या पराभवाची सध्याची कारणे सांगतात. ते म्हणतात, 'निवडणुकीच्या दोन दिवस आधी असे व्हिडिओ व्हायरल होत होते, ज्यात जमातचे लोक पैसे वाटताना दिसत होते. यामुळे लोकांमध्ये असा संदेश गेला की जमात चुकीच्या पद्धतीने निवडणूक लढवत आहे. बॅलेट पेपरमध्येही फेरफार करण्याचा प्रयत्न झाल्याच्या बातम्या आल्या. यामुळे जमातचे नुकसान झाले.' 'प्रत्येक वर्गाला खुश करणे, जमातची सर्वात मोठी चूक'चौधरी पुढे म्हणतात, 'जमात इस्लामिक राज्याचे समर्थन करते. यावेळी निवडणुकीपूर्वी त्यांनी सांगितले की सरकार बनले तरी ते शरिया कायदा आणणार नाहीत. यामुळे जमातचा मूळ मतदार दुरावला. जमातने स्वतःला उदारमतवादी पक्ष सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक वर्गाला खुश करण्याचा प्रयत्न केला, पण लोकांना समजले की या केवळ निवडणुकीच्या गोष्टी आहेत. जमातने निवडणुकीपूर्वी स्वतःला बऱ्याच अंशी बदलण्याचा प्रयत्न केला, पण ती लोकांमध्ये विश्वास निर्माण करू शकली नाही.' बीएनपी नेते फजीउल रहमान यांना एकतर्फी विजय मिळाला आहे. त्यांनी स्वातंत्र्याची लढाई लढली होती. लोकांनी स्वातंत्र्याच्या लढाईच्या बाजूने मतदान केले आणि स्वातंत्र्याचा विरोध करणाऱ्यांना नाकारले हे स्पष्ट दिसते. तर, ज्येष्ठ पत्रकार मॉन्जरूल आलम पन्ना म्हणतात, ‘लोकांचा कल स्पष्ट आहे. त्यांना जमातला नाकारायचे होते, त्यामुळे दुसरा पर्याय बीएनपीच आहे. हिंदू मतदारांनी मोठ्या संख्येने बीएनपीला मतदान केले आहे. हिंदू मतदार जमातला मतदान करणार नाहीत, असा अंदाज आधीच होता.’ ‘अवामी लीगने निवडणूक लढवली असती, तर जमातला फायदा झाला असता’सैफुल आलम चौधरी म्हणतात की, अवामी लीगने निवडणूक न लढवणे जमातसाठी अडचणीचे ठरले. जमातने अंतरिम सरकारवर दबाव आणला की अवामी लीगला निवडणूक लढवू दिली जाऊ नये. अशा परिस्थितीत, ती नकळतपणे गेल्या 18 महिन्यांपासून बीएनपीसाठी जमीन तयार करत होती. जर अवामी लीगने निवडणूक लढवली असती तर जमातला फायदा झाला असता. अवामी लीग आणि बीएनपीमध्ये मते विभागली गेली असती. दुसरीकडे, जमात आपल्या युतीसोबत मते एकत्र करू शकली असती. विद्यार्थी नेते नाहिद इस्लाम विजयी झाले, पण पक्ष हरलाशेख हसीनांचे सरकार पाडणाऱ्या विद्यार्थ्यांचा पक्ष NCP काही विशेष कामगिरी करू शकला नाही. तरीही, पक्षाचे सर्वात मोठे नेते नाहिद इस्लाम ढाका-11 मतदारसंघातून जिंकले आहेत. NCP ने 30 जागांवर निवडणूक लढवली होती, पण फक्त 4 जागा जिंकू शकला. पक्षाच्या पराभवाची 5 कारणे… 1. आंदोलनाचा प्रभाव संपला आणि अंतर्गत फूटऑगस्ट 2024 मध्ये झालेल्या विद्यार्थी आंदोलनाचा प्रभाव गेल्या दीड वर्षात खूप कमी झाला आहे. शेख हसीनांविरोधात आंदोलन करणाऱ्या अनेक विद्यार्थी नेत्यांनी पक्ष सोडला. NCP ने जमातसोबत युती केली तेव्हा पक्षांतर्गत मतभेद निर्माण झाले. 2. कार्यकर्त्यांची कमतरताNCP काही महिन्यांपूर्वी स्थापन झालेला पक्ष आहे. त्यांच्याकडे सरकारविरोधी आंदोलनात सहभागी झालेले विद्यार्थी होते, पण मते मिळवून देणारी निवडणूक यंत्रणा नव्हती. दुसरीकडे, BNP आणि जमात यांच्याकडे जुने कार्यकर्ते आहेत, जे प्रत्येक बूथवर उपस्थित होते. NCP फक्त जेन झेड मतदारांवर अवलंबून होती. 3. मतांचे विभाजन अवामी लीगच्या विरोधात लोकांकडे दोनच पर्याय होते, BNP किंवा NCP. लोकांनी नवीन पक्षाऐवजी अनुभवाला पसंती दिली. त्यांना वाटले की, देश चालवण्यासाठी जुना पक्ष विद्यार्थ्यांपेक्षा चांगला पर्याय आहे. 4. शहरी पक्षाची प्रतिमाNCPची ओळख सोशल मीडिया आणि ढाका विद्यापीठापुरती मर्यादित आहे. देशाच्या इतर भागांमध्ये मतदार तारिक रहमान यांच्या वारशाशी किंवा जमातच्या इस्लामिक कार्डशी अधिक जोडले गेलेले आहेत. विद्यार्थ्यांचा 'सुधारणा अजेंडा' तिथे पोहोचू शकला नाही. 5. अनुभवाच्या कमतरतेची भीतीअनुभव नसलेले विद्यार्थी देशाची कमकुवत होत असलेली अर्थव्यवस्था आणि सुरक्षा व्यवस्था सांभाळू शकणार नाहीत, अशी भीती लोकांना होती. म्हणून त्यांनी BNP ला निवडले. राष्ट्रीय सरकार बनण्याची शक्यता संपलीबीएनपीला बहुमत मिळाल्यानंतर प्रश्न असा आहे की बीएनपी आपल्या राजकीय अजेंड्यावर चालेल की अंतरिम सरकार सांभाळणारे डॉ. मोहम्मद युनूस यांच्या दबावाखाली काम करेल. मात्र, बीएनपी ज्या ताकदीने निवडणूक जिंकली आहे, युनूससाठी दबाव निर्माण करणे सोपे नसेल. निवडणुकीपूर्वी जमातने प्रस्ताव दिला होता की सर्वांच्या सहमतीने राष्ट्रीय सरकार स्थापन केले जावे. तारिक रहमान यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला. जमातने स्वतःला विरोधी पक्ष म्हणून स्थापित केले आहे. अशा परिस्थितीत, बीएनपीसाठी त्यांच्यासोबत सरकार स्थापन करणे धोकादायक ठरू शकते. बीएनपीसाठी हेच अधिक चांगले आहे की जमात विरोधी पक्षात राहावी. ………………………… बांगलादेश निवडणुकीवर ही बातमी देखील वाचा...20 वर्षांनंतर BNP चा विजय, तारिक रहमान पंतप्रधान होणार हे निश्चित निवडणुकीतील विजयासह 20 वर्षांनंतर BNP सत्तेत परत येत आहे. माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचे पुत्र आणि BNP अध्यक्ष तारिक रहमान पंतप्रधान होणार हे जवळपास निश्चित आहे. तारिक यांनी दोन जागांवरून निवडणूक लढवली होती आणि दोन्ही जागांवर ते विजयी झाले. बांगलादेशमध्ये 35 वर्षांनंतर एखादा पुरुष पंतप्रधान होईल. 1988 मध्ये काझी जफर अहमद पंतप्रधान झाले होते. संपूर्ण बातमी वाचा…

दिव्यमराठी भास्कर 13 Feb 2026 11:44 am

Pune: बांगलादेशच्या झेंड्यावरून फूड स्टॉल्सची तोडफोड; पुण्यातील MIT कॉलेजमध्ये राडा

पुणे: पुण्यातील कोथरुड येथील एमआयटी महाविद्यालयात आयोजित वर्ल्ड कल्चरल फेस्टिवलमध्ये मोठा राडा झाला आहे. फूड फेस्टिवलमध्ये बांगलादेशी विद्यार्थ्यांनी लावलेल्या झेंड्यांच्या स्टिकर्सवरून वाद निर्माण झाला आहे. ज्याचे रूपांतर नंतर तोडफोडीत झाले. या घटनेमुळे कॅम्पसमध्ये काही वेळ तणावाचे वातावरण होते. अखिल भारतीय युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी हा राडा केल्याचं समजत आहे. या घटनेनंतर फेस्टिवलच्या ठिकाणी एकच गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं.एमआयटी कॉलेजमध्ये दरवर्षीप्रमाणे विविध देशांतील संस्कृतीचे दर्शन घडवणारा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात सहभागी झालेल्या बांगलादेशी विद्यार्थ्यांनी आपल्या खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर बांगलादेशच्या झेंड्याचे स्टिकर्स लावले होते. या स्टिकर्सवर काही विद्यार्थ्यांनी तीव्र आक्षेप घेतला. या वादाचे रुपांतर आंदोलनात झाले. भाजप युवा मोर्चाशी संबंधित असल्याचा दावा करणाऱ्या काही कार्यकर्त्यांनी आणि विद्यार्थ्यांनी तिथे धाव घेत बांगलादेशचे झेंडे असलेले स्टिकर जाळल्याचा आरोप आहे.संतापलेल्या आंदोलकांनी बांगलादेशी विद्यार्थ्यांचे फूड स्टॉल्स पाडून तिथे तोडफोड केली. यावेळी दोन्ही गटात बाचाबाची झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच पुणे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी दोन्ही बाजूंना शांत राहण्याचे आवाहन केले आहे. सध्या कॅम्पसमध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सध्याच्या स्थितीत तेथे तणाव पूर्ण शांतता आहे.

फीड फीडबर्नर 13 Feb 2026 11:30 am

US India Trade Deal: भारत आता डोनाल्ड ट्रम्पसोबत करणार ‘हा’करार ; केंद्र सरकारकडून LNG खरेदी ?

US India Trade Deal: भारत आणि अमेरिका यांच्यातील ५०० कोटी रुपयांच्या व्यापार कराराव्यतिरिक्त, भारत सरकार द्रवीभूत नैसर्गिक वायू (एलएनजी) साठी देखील करार करू शकते.

दैनिक प्रभात 13 Feb 2026 11:26 am

लोणावळातील लायन्स पॉइंट परिसरात पुन्हा आढळला मृतदेह; पोलिस तपास सुरू

लोणावळा : पुण्यातील लोणावळा हे ठिकाण महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांपैकी एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे, पण हेच ठिकाण सध्या एकामागोमाग एक घडणाऱ्या आत्महत्यांच्या घटनांमुळे हादरून गेले आहे. मागे मुंबईतील कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या मुलीने या ठिकाणी आत्महत्या केली होती आणि आता लोणावळ्यातील लायन्स पॉइंट परिसरात गुरुवारी सकाळी एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने पुन्हा एकदा खळबळ माजली आहे.नेमकं काय घडलं?मिळालेल्या माहितीनुसार, वीरेंद्र सिंह (३४) असं मृत तरुणाचं नाव असून तो आयटी कंपनीत कार्यरत होता. पहाटे ४: ३० च्या सुमारास लायन्स पॉइंटजवळ एक चारचाकी वाहन संशयास्पदरीत्या उभे असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. वाहन चालकाचा शोध घेतला असता तिथे कोणीच दिसले नाही, त्यामुळे पोलिसांनी गाडी तपासली त्यात संबंधित मृत व्यक्तीचा फोन सापडला. वीरेंद्र याने आत्महत्या करण्यापूर्वी बायकोला आणि जवळच्या व्यक्तींना ई-मेल आणि मेसेजद्वारे आपण आत्महत्या करणार आहोत याचे संकेत दिले होते. यावरून पोलिसांचा संशय अधिक बळावला.स्थानिक पोलिसांनी शोधमोहीम सुरू केलीपोलिसांनी शिवदुर्ग रेस्क्यू टीमच्या मदतीने मृतदेहाचा दरीत शोध घेतला. ज्या ठिकाणी गाडी उभी होती त्याच दिशेने २५० फूट खोल दरीत संबंधित व्यक्ती आढळून आली. शिवदुर्ग टीम आणि वन्यजीव रक्षक मावळ यांच्या सहकार्याने मृतदेह बाहेर काढून पुढील तपासासाठी पाठविण्यात आला. प्राथमिक तपासात आत्महत्येचा संशय व्यक्त केला जात असला तरी अधिक कारण स्पष्ट करण्यासाठी पोलिस तपास सुरू आहे.आठवड्याभरात ही दुसरी धक्कादायक घटना घडली त्यामुळे पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेलं ठिकाण हे मृत्यूचं ठिकाण तर बनणार नाही ना? याविषयी स्थानिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, अलीकडच्या काळात टायगर पॉइंट आणि लायन्स पॉइंट परिसरात घडलेल्या घटनांमुळे सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.अश्याच घटना सर्रास घडत असतील तर पर्यटनस्थळांवर सुरक्षाव्यवस्था अधिक कडक करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.

फीड फीडबर्नर 13 Feb 2026 11:10 am

एडिट केलेलं फुटेज जाहीर करा’; ‘बिग बॉस मराठी’च्या निर्मात्यांना दिव्या शिंदेचा कायदेशीर इशारा

मुंबई : बिग बॉस मराठी’मधून बाहेर पडल्यानंतर स्पर्धक दिव्या शिंदेने निर्मात्यांवर गंभीर आरोप करत कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. शोदरम्यान घडलेल्या वादानंतर तिला बाहेरचा मार्ग दाखवण्यात आला होता. मात्र, घराबाहेर आल्यानंतर तिने पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडत बिग बॉस च्या प्रसारित करण्यात आलेल्या काही भागांविषयी प्रश्न उपस्थित केले.दिव्या शिंदेचा आरोप आहे की, प्रेक्षकांसमोर तिची केवळ आक्रमक बाजू दाखवण्यात आली, तर त्या प्रसंगांआधी काय घडले होते हे प्रसारित करण्यात आले नाही. “पूर्ण फुटेज जाहीर करण्यात यावे,” अशी तिची मागणी असून, अन्यथा पुढील पावले उचलण्याचा इशारा तिने दिला आहे.नेमकं काय घडलं?एका टास्कदरम्यान झालेल्या वादानंतर दिव्याने सहस्पर्धकांना उद्देशून केलेल्या वक्तव्यावर आक्षेप घेतला गेला. तिच्या बोलण्यातून धमकीचा अर्थ निघाल्याचा आरोप इतर स्पर्धकांनी आणि बिग बॉस या शोद्वारे करण्यात आला. त्यानंतर कार्यक्रम व्यवस्थापनाने कारवाई करत तिला शोमधून तात्काळ बाहेर काढले.दिव्याची भूमिकाआपल्या वक्तव्याचा गैरसमज झाल्याचे दिव्याने स्पष्ट केले आहे. तिच्या मते, तिच्या विधानाचा अर्थ प्रत्यक्ष हिंसेशी जोडणे चुकीचे आहे. तसेच तिने स्वतः कार्यक्रम सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती, असा दावा देखील तिने केला आहे.दरम्यान, या आरोपांवर शोच्या निर्मात्यांकडून अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. संपूर्ण प्रकरणामुळे रिअ‍ॅलिटी शोमधील संपादन प्रक्रियेवर आणि पडद्यामागील घडामोडींवर चर्चा सुरू झाली आहे.

फीड फीडबर्नर 13 Feb 2026 11:10 am

Tariq Rahman: बांगलादेशची सत्ता तारिक रहमान यांच्या हाती ; बीएनपीला दोन तृतीयांश बहुमत, जमात-ए-इस्लामीचा सुपडा साफ

Tariq Rahman: बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) १३ व्या सार्वत्रिक निवडणुकीत बहुमताचा आकडा ओलांडला आहे. या विजयानंतर २० वर्षांच्या सत्तेच्या प्रतीक्षेचा अंत करत पुढील सरकार स्थापन करण्यास सज्ज झाली आहे.

दैनिक प्रभात 13 Feb 2026 10:44 am

Bengaluru: अंधश्रद्धेच्या पायात घेतला आईचा बळी, ज्योतिषाच्या दाव्यानंतर रचला हत्येचा कट

मुंबई: कर्नाटकातील तुमकूर जिल्ह्यात अंधश्रद्धमधून एक भयावह घटना घडली आहे. आपल्या वडिलांच्या निधनाला आईचं जबाबदार आहे आणि तिने करणी ( 'ब्लॅक मॅजिक') केली होती. या संशयावरून मुलीने आईची निर्घृण हत्या केली आहे. पुष्पावती असे मृत महिलेचे नाव असून, तिच्या ३३ वर्षीय सुचित्रा नावाच्या मुलीला पोलिसांनी अटक केली आहे.ज्योतिषाच्या दाव्यानंतर रचला हत्येचा कटसुचित्रा ही तुमकूर शहरात आपल्या पतीसोबत राहत होती. सुमारे १८ महिन्यांपूर्वी तिच्या वडिलांचे निधन झाले होते. वडिलांच्या निधनाचे दुःख पचवू न शकलेल्या सुचित्राने एका ज्योतिषाचा सल्ला घेतला. ज्योतिषाने सुचित्राला सांगितले की, तिच्या वडिलांचा मृत्यू नैसर्गिक नसून तिच्या आईने केलेल्या करणीमुळे झाला आहे. या शब्दांवर आंधळा विश्वास ठेवून सुचित्राने आईच्या घरी जाऊन, ती गाढ झोपेत असताना उशीने तिचे तोंड दाबून तिची हत्या केली.पोलीस घटनास्थळी पोहोचताच...आईची हत्या केल्यानंतर सुचित्राने हे प्रकरण नैसर्गिक मृत्यूचे असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला. पुरावे नष्ट करण्यासाठी तिने घाईघाईने अंत्यसंस्काराची तयारीही सुरू केली. परंतु पुष्पावती यांचा मृत्यू संशयास्पद वाटल्याने गावकऱ्यांनी अंत्यसंस्कार थांबवले. गावकऱ्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून सुचित्राची चौकशी केली असता, तिने आपला गुन्हा कबूल केला.याप्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून सुचित्राच्या पतीलाही चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या हत्येच्या कटात पतीचा सहभाग होता का, किंवा त्याला याबद्दल माहिती होती का, याचा तपास पोलीस करत आहेत. ज्या ज्योतिषाने सुचित्राला प्रवृत्त केले, त्याचाही शोध पोलीस घेत असल्याची माहिती समोर आली आहे.

फीड फीडबर्नर 13 Feb 2026 10:10 am

जे जे उड्डाणपूलाखाली परिसरातील वर्षानुवर्षांच्या कचऱ्यांसह अतिक्रमणांची जळमटेही केली दूर

मुंबई :दक्षिण मुंबईतील जे जे उड्डाणपूलाखालील भागात मागील काही वर्षांपासून अतिक्रमण होऊन मोठ्याप्रमाणात अस्वच्छता पसरलेली आहे. उड्डाणपुलाखाली अतिक्रमणांसह साचलेली कचरा आणि त्यापासून पसरलेली दुर्गंधीची जळमटेच आता महापालिकेने हटवून या पुलाचा परिसर स्वच्छ आणि सुंदर करण्यास सुरुवात केली आहे. महापालिकेच्या बी विभागाच्या हद्दीतील पूलाच्या खालील भाग साफ करण्यात आल्याने कधी नव्हेतर जे जे उड्डाणपूलाच्या खाली भाग जळमटे दूर केल्याने सुंदर दिसू लागला आहे.मुंबई महापालिकेच्यावतीने फेरीवाल्यांसह पदपथांवरील अतिक्रमण हटवण्याची मोहिम हाती घेण्यात आल्यानंतर महापालिकेच्या बी विभागाच्यावतीनेही डोंगरी,मोहमद अली रोड, मस्जिद बंदर परिसरात फेरीवाल्यांवर कारवाई हाती घेण्यात आली आहे. बी विभागाच्या सहायक आयुक्त योगेश देसाई यांनी महापालिका परिमंडळ एकच्या उपायुक्त चंदा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मागील आठवड्यापासून या मुस्लिम बहुल परिसरात जिथे महापालिकेच्यावतीने कारवाई करण्याची हिंमत दाखवली जात नाही तिथे आता कारवाई केली जात आहे. त्यामुळे फेरीवाल्यांसह पदपथावरील वाढीव बांधकामे हटवण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये शरीफ देवजी स्ट्रीट अर्थात चकला स्ट्रीट येथील वाढीव बांधकामे तसेच पदपथ अडवून केलेले बांधकामे हटवण्यास सुरुवात केली आहे. एवढे मस्जिद बंदर येथीलही बांधकामे आणि अतिक्रमण हटवतानाच मकदुम अली महिमी उड्डाणपूल अर्थात जे जे उड्डाणपूलाखाली सर्व अतिक्रमणांपासून तो तिथे वर्षांनुवर्षे जमा झालेला कचरा हटवून पुलाखालील परिसर स्वच्छ सुंद करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे महापालिकेच्या बी विभागाच्या हद्दीत पुलाखालील परिसरात जो बकालपणा दिसत होता, तो बी विभागाचे सहायक आयुक्त योगेश देसाई यांनी आपल्या चमुसह दूर करण्याचा प्रयत्न केल्यामुळे आता वाहनातून प्रवास करतानाही पुलाखालील परिसराचे स्वच्छ आणि सुंदर दर्शन होताना दिसणार आहे. तसेच पुलाखालील भागांमधील पदपथांवर अनावश्यक कठडे बांधून ठेवले आहेत तेही तोडून टाकण्यावर भर दिला आहे.

फीड फीडबर्नर 13 Feb 2026 10:10 am

पहिल्या महापालिका सभेत मुख्यमंत्र्यांच्या समक्ष भाजप नगरसेवकांचे घडले असे दर्शन

मुंबई : मुंबई महापालिकेत मागील पाच वर्ष केवळ पहारेकरी म्हणून काम करणाऱ्या भाजपने खऱ्या अर्थाने विरोधी पक्षाची भूमिका बजावली. परंतु, आता भाजप शिवसेना महायुतीची सत्ता येवूनही भाजप नगरसेवकांच्या अंगात भिनलेला विरोधी पक्षाचा स्वभाव काही गेलेला नाही. महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षात बसूनही भाजपच्या नगरसेवकांनी विरोधी पक्षाप्रमाणे वर्तन करत आपण सत्तेत नाही तर विरोधी पक्षातच आहोत हे दाखवून दिले. विशेष म्हणजे भाजपचा काही नगरसेवकांनी चक्क महापौरांसमोरील वेलमध्ये जावून काँग्रेस आणि उबाठाच्या नगरसेवकांशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला.त्यामुळे नियमानुसार महापौरांच्या समोरील जागेत प्रवेश करण्याचा अधिकार कोणत्याही सदस्यांना नसतानाही सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक हे वेलमध्ये जावून पिठासीन अधिकारी आणि नवनिर्वाचित महापौरांच्यासमोरुन ये जा करत होते. याप्रकारे बेशिस्त वर्तन भाजपच्या नगरसेवकांकडून होत असताना प्रेक्षक गॅलरीमध्ये बसून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सर्व पाहत होते. त्यामुळे भाजपच्या या बेशिस्त नगरसेवकांना पक्ष काय शिस्त लावणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.मुंबई महापालिका सभागृहामध्ये महापोर आणि उपमहापौरपदाच्या निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर महापौरांच्या भाषणा दरम्यान काँग्रेसच्या नगरसेवकांनी बसण्यास जागा नसल्यामुळे जोरदार घोषणाबाजी देण्यास सुरुवात केली. त्यानंतर घोषणाबाजी देतच त्यांनी सभागृहात महापौरांसमोरील वेलमध्ये धाव घेत तिथे उभे राहतच घोषणा देण्यास सुरुवात केली. याच वेळी भाजपच्या वांद्रे पश्चिम येथील नगरसेविकेने चक्क पिठासीन अधिकाऱ्यांच्या समोरील जागेत अर्थात वेलमध्ये चालत जात चक्क काँग्रेसच्या नगरसेवकांसोबत समझोता करण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसच्या नगरसेवकांची समझूत काढताना, त्या भाजपच्या नगरसेवकांना 'तुम्ही शांत बसा मी सर्व बघते’,असे सांगण्याचा प्रयत्न करत होत्या. पण हे करताना त्या महापौरांसमोरील प्रतिबंधित क्षेत्र असलेल्या वेलमधून वावरत आहोत, याचा त्यांना विसर पडला होता. तसेच गल्लीतील भांडण सोडवावे, त्याप्रकारे त्या प्रयत्न करताना दिसत होत्या. त्यामुळे भाजप नगरसेविकेचे हे वर्तन सभागृहाच्या कार्यपध्दती शिस्त मोडणारे होते. परंतु त्यांना बाजुला करावे किंवा समज द्यावी अशाप्रकारे कोणत्याही सूचना पिठासीन अधिकारी यांनी त्यांना दिली नाही.एकाबाजुला दुसऱ्यांदा निवडून आलेल्या नगरसेवकाकडून अशाप्रकारचे बेशिस्तीचे वर्तन होत असतानाच दुसरीकडे मालाड भागातील एका प्रथमच निवडून आलेला नगरसेवकही भाजपच्या गटनेत्यांच्या समोरुन वेलमध्ये जावून उबाठाच्या आणि काँग्रेसच्या नगरसेवकांविरोधात घोषणा देत होते. महापौर तथा पिठासीन अधिकाऱ्यांच्या समोरील जागेत जाण्यास कोणत्याही महापालिका सदस्याला अधिकार नसतानाही अशाप्रकारचे बेशिस्तीचे वर्तन खुद्द सत्ताधारी पक्षाच्या भाजपच्या नगरसेवकांकडून झाले होते. महापालिका सभागृहात त्याच वेळी प्रेक्षागॅलरीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विराजमान होत सभागृहाचे कामकाज न्याहाळत होते. त्यामुळे महापौर तथा पिठासीन अधिकाऱ्यांच्या समोरील जागेत प्रवेश करत अशाप्रकारे आपल्याच पक्षाच्या नगरसेवकांकडून झालेले बेशिस्त वर्तन त्यांना पटले असेल का असा प्रश्न निर्माण होत आहे. एवढेच नाहीतर उबाठा आणि काँग्रेसकडून होणाऱ्या विरोधातील घोषणाबाजीला प्रत्युत्तर देण्यासाठी खुद्द भाजपचे गटनेते गणेश खणकर हे प्रोत्साहित करत होते. महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक निर्विघ्नपणे पार पाडणे हे सत्ताधारी पक्षाच्या गटनेत्याची जबाबदारी असताना त्यांनी आपल्या सदस्यांना शांत राहायला सांगून महापौर आणि उपमहापौर यांना आपली भाषणे करण्यास अनुकूल वातावरण निर्माण करणे आवश्यक होते. पण भाजपच्या गटनेत्याला आपल्याच नगरसेवकांवर लगाम घालता येत नव्हता,असे दिसून आले.पहिल्याच सभेत भाजप, उबाठाचे गटनेते ठरले फेलमहापालिकेच्या पहिल्या सभेमध्ये निवडून आलेल्या नगरसेवकांची आसन व्यवस्था ही गटनेत्यांनी ठरवून त्यांना तिथे बसवणे ही त्यांची जबाबदारी असते. परंतु पहिल्याच सभेत भाजपचे गटनेते गणेश खणकर आणि उबाठाच गटनेत्या किशोरी पेडणेकर हे अपयशी ठरले. खणकर यांनी आपल्या नगरसेवकांना ज्येष्ठतेप्रमाणे प्रत्येकाची आसन व्यवस्था केली नाही, तसेच सभागृह सुरळीत चालवून घेण्यासाठी काँग्रेसच्या नगरसेवकांच्या आसनाची व्यवस्था करून देण्याची सूचना पिठासीन अधिकाऱ्यांकडे न केल्यामुळे सभागृहात विरोधी पक्षाच्या गोंधळ वाढला गेला.तसेच उबाठाच्या नगरसेवकांनाही किशोरी पेडणेकर यांना गटनेत्या म्हणून आसनाच्या व्यवस्थेप्रमाणे कुठे कुणी बसावे याची व्यवस्था करता आलेली नाही. तसेच हरकतीचा मुद्दाही त्यांना प्रखरपणे मांडता न आल्यामुळे सभागृहातील भावी विरोधी पक्षनेता आणि भावी सभागृहनेत्यांची पुढील वाटचाल कशी असेल याची खात्री पटली आहे.

फीड फीडबर्नर 13 Feb 2026 10:10 am

BNP Election Victory Bangladesh: ‘भारत पुरोगामी बांगलादेशच्या पाठीशी’ ; पंतप्रधान मोदींकडून तारिक रहमान यांचे ऐतिहासिक विजयाबद्दल अभिनंदन

BNP Election Victory Bangladesh: बांगलादेशातील १३ व्या संसदीय निवडणुकीत बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (BNP) च्या प्रचंड विजयानंतर, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तारिक रहमान यांचे हार्दिक अभिनंदन केले.

दैनिक प्रभात 13 Feb 2026 9:55 am

राज्यात हवामानात बदलाचे संकेत; फेब्रुवारीत 'या दिवशी'काही भागांत कोसळणार पावसाच्या सरी

मुंबई : फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात कोरडे वातावरण राहिल्यानंतर आता राज्यात हवामानाची घडी बदलताना दिसत आहे. उत्तर भारतात सक्रिय झालेल्या वातावरणाचा परिणाम महाराष्ट्रावरही जाणवू लागणार असून येत्या १७ आणि १८ फेब्रुवारीदरम्यान काही भागांत हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.हवामान तज्ज्ञांच्या मते, समुद्राकडून येणाऱ्या ओलसर वाऱ्यांचा आणि जमिनीवरील तापमानातील फरकाचा परिणाम म्हणून कमी दाबाची रेषा तयार होत आहे. या परिस्थितीमुळे पुणे विभागासह मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहू शकते. काही ठिकाणी किरकोळ सरी पडण्याची शक्यता आहे. हा पाऊस जास्त वेळ राहणारा नसला तरी स्थानिक पातळीवर बदल जाणवू शकतो.दरम्यान, राज्यात उत्तर दिशेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रभाव कायम आहे. त्यामुळे किमान तापमानात किंचित घट झाली असून रात्रीचा गारवा वाढला आहे. विशेषतः उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि खान्देश भागात सकाळ-संध्याकाळ थंडीची जाणीव होत आहे. पुढील एक-दोन दिवस ही स्थिती कायम राहू शकते.दक्षिणेकडे मात्र परिस्थिती वेगळी आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण होत असलेली कमी दाबाचा पट्टा तीव्र होण्याची शक्यता असून त्याचा परिणाम तामिळनाडू आणि केरळ राज्यांवर होऊ शकतो. काही भागांत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.राज्यातील शेतकऱ्यांनी पुढील काही दिवस हवामानातील बदल लक्षात घेऊन शेतीची कामे नियोजनपूर्वक करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. ढगाळ वातावरणामुळे काही पिकांवर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे आवश्यक ती काळजी घेण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

फीड फीडबर्नर 13 Feb 2026 9:30 am

भारतीय कापडाला मिळणार अमेरिकेत ‘ड्यूटी-फ्री’ प्रवेश

नवी दिल्ली : बांगलादेशला ज्याप्रमाणे अमेरिकन कापूस आणि सुतापासून तयार केलेल्या कपड्यांवर सवलती मिळतात, तशाच प्रकारच्या सवलती अमेरिका आणि भारत यांच्यात होऊ घातलेल्या आगामी व्यापारी करारामुळे आता भारतालाही मिळणार असल्याची माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी गुरुवारी दिली.

फीड फीडबर्नर 13 Feb 2026 9:10 am

पंतप्रधानांच्या हस्ते आज सेवा तीर्थ, कर्तव्य भवनाचे उद्घाटन

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी 'सेवा तीर्थ' आणि 'कर्तव्य भवन-१ आणि २'चे उद्घाटन करणार आहेत. नव्याने बांधलेल्या सेवा तीर्थ संकुलात पंतप्रधान कार्यालय, राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालय आणि कॅबिनेट सचिवालय असेल.'कर्तव्य भवन-१ आणि २ मध्ये अर्थ मंत्रालय, संरक्षण मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, शिक्षण मंत्रालय, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, संस्कृती मंत्रालय, कायदा आणि न्याय मंत्रालय, माहिती आणि प्रसारण मंत्रालय, रसायने आणि खते मंत्रालय आणि आदिवासी व्यवहार मंत्रालय यांसह अनेक मंत्रालये असतील.पंतप्रधान मोदी दुपारी १.३० वाजता नव्याने बांधलेल्या पंतप्रधान कार्यालय संकुलाचे औपचारिक नाव 'सेवा तीर्थ' असे ठेवतील, त्यानंतर सेवा तीर्थ आणि कर्तव्य भवन-१ आणि २ चे उद्घाटन करतील. सायंकाळी ६ वाजता, पंतप्रधान सेव तीर्थ येथे एका सार्वजनिक सभेला संबोधित करतील. अनेक दशकांपासून, केंद्रीय मंत्रालये आणि कार्यालये सेंट्रल व्हिस्टा परिसरातील विविध इमारतींमध्ये विखुरलेली होती. यामुळे कार्यक्षमता कमी होणे, समन्वय आव्हाने, वाढता देखभाल खर्च आणि योग्य कामाच्या वातावरणाचा अभाव यांसारख्या समस्या निर्माण झाल्या होत्या. नवीन इमारतींच्या बांधकामामुळे या समस्यांचे निराकरण होईल.

फीड फीडबर्नर 13 Feb 2026 9:10 am

रेस्टॉरंट्सकडून 'सर्व्हिस चार्ज'आकारणी; मुंबई ग्राहक पंचायतीची कारवाईची मागणी

मुंबई : 'सर्व्हिस चार्ज देणे हे सक्तीचे नसून तो देणे हा ग्राहकांच्या पूर्णपणे स्वेच्छेवर अवलंबून असताना मुंबईतील अनेक रेस्टॉरंट्समध्ये ५ ते १० टक्के सर्व्हिस चार्ज बिलामध्ये आकारला जात असल्याचे आढळून आले आहे. मुंबई ग्राहक पंचायतीच्यावतीने संबंधित रेस्टॉरंट्सवर कडक कारवाईची मागणी करण्यात आली आहे.मुंबई ग्राहक पंचायतीने नुकत्याच केलेल्या तपासणीत असे आढळून आले आहे की, केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने ४ जुलै २०२२ रोजी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व्हिस चार्ज कोणत्याही प्रकारे वा कोणत्याही नावाने आकारणे ही अनुचित व्यापारी पद्धती घोषित करून त्यावर स्पष्टपणे बंदी घातली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने डिसेंबर २०२५ मध्ये दोन हॉटेल व रेस्टॉरंट संघटनांची या मार्गदर्शक सूचनांना आव्हान देणारी अपिले फेटाळून लावत या मार्गदर्शक सूचनांना वैध ठरवले असून, ग्राहकांच्या इच्छेविरुद्ध सक्तीने सर्व्हिस चार्ज आकारणे हे अनुचित व्यापारी पद्धती व करारातील अनुचित अटी असल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे. तरीदेखील रेस्टॉरंट्सकडून या कायदेशीर आदेशाचे सरसकट उल्लंघन सुरूच आहे. त्यामुळे मुंबई ग्राहक पंचायतीने केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाच्या अध्यक्षांना तक्रारपत्र पाठवून काही रेस्टॉरंट्सची बिलं व मेन्यू काईस जोडून कारवाईची मागणी केली आहे.संबंधित रेस्टॉरंट्सच्या मागील तीन आर्थिक वर्षांचे रेकॉर्ड तपासून त्यांनी सर्व्हिस चार्ज किंवा तत्सम नावाने किती रक्कम गोळा केली आहे ते शोधून ती रक्कम दंडात्मक व्याजासह केंद्रीय ग्राहक कल्याण निधीत जमा करण्याचे निर्देश द्यावेत. सक्तीचे सर्व्हिस चार्ज बेकायदेशीर असल्याचे पुन्हा एकदा जाहीर करून त्याला ठळक प्रसिद्धी द्यावी, असे पत्रात नमूद केले आहे.

फीड फीडबर्नर 13 Feb 2026 9:10 am

Bangladesh: तारिक रहमानच्या नेतृत्वात नवं सरकार स्थापन होण्याची शक्यता

दिल्ली: बांगलादेशातील राजकीय अस्थिरतेनंतर पार पडलेल्या ऐतिहासिक निवडणुकीत जनतेने तारिक रहमान यांच्या नेतृत्वाखालील बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीला (BNP) कौल दिल्याचे चित्र दिसत आहे. बांगलादेशात ३५० जागांपैकी ५० जागा महिलांसाठी राखीव आहेत. तर उर्वरित ३०० पैकी एकाचा मृत्यू झाल्याने २९९ जागांवर मतदान पार पडले. निवडणूक निकालानंतर प्रत्येक पक्षाला त्याच्या विजयी उमेदवारांच्या प्रमाणात महिलांच्या राखीव जागांचा कोटा मिळणार आहे. बांगलादेशात गुरुवारी सकाळी साडेसात संध्याकाळी साडेचार या वेळेत मतदान झाले. त्यानंतर लगेच मतमोजणीला सुरूवात झाली. शुक्रवारी १३ फेब्रुवारी २०२६ रोजी म्हणजेच आज सकाळी ११ वाजेपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान ३०० सदस्यीय संसदेत बीएनपीने १५१ जागांचा बहुमताचा आकडा सहज ओलांडत आतापर्यंत १९७ जागांवर विजय मिळवला आहे. ही निवडणूक बांगलादेशच्या लोकशाही पुनर्स्थापनेसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.तारिक रहमान यांचा दोन मतदारसंघातून विजयमाजी पंतप्रधान खालिदा झिया यांचे सुपुत्र आणि बीएनपीचे अध्यक्ष तारिक रहमान यांनी दोन मतदारसंघातून निवडणूक लढवली होती आणि दोन्ही ठिकाणी त्यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. ढाका १७ या मतदारसंघातून त्यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला. बोगुरा-६ या परंपरागत बालेकिल्ल्यातही त्यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्याचा पराभव केला. तारिक रहमान हे आता बांगलादेशचे पुढील पंतप्रधान म्हणून सूत्रे हाती घेणार आहेत.'जमात-ए-इस्लामी' मुख्य विरोधी पक्ष होणारएकेकाळी बीएनपीची सहयोगी असलेल्या पण आता स्वतंत्र लढणाऱ्या 'जमात-ए-इस्लामी'ला या निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नाही. जमातचे अध्यक्ष शफीकुर रहमान यांनी ढाका-१५ मधून विजय मिळवला असला, तरी त्यांच्या पक्षाला केवळ ६३ जागांवर समाधान मानावे लागले आहे. जमातचे महासचिव मिया गोलाम पोर्वार यांना बीएनपीच्या उमेदवाराकडून पराभवाचा धक्का सहन करावा लागला. दरम्यान जमात-ए-इस्लामी मुख्य विरोधी पक्ष होण्याची चिन्हे आहेत.भारतासाठी ही निवडणूक का महत्त्वाची?बांगलादेश हा भारताचा महत्त्वाचा शेजारी देश असून ४ हजार किमीची सीमा सामायिक करतो. बीएनपीच्या सत्तेतील पुनरागमनामुळे भारतापुढील काही आव्हाने आणि संधी असतील. घुसखोरी, ड्रग्ज तस्करी आणि दहशतवादावर नियंत्रण मिळवण्यासाठी नवीन सरकारसोबत समन्वय साधणे भारतासाठी गरजेचे असेल. शेख हसीना यांच्या काळात भारत-बांगलादेश व्यापारात मोठी वाढ झाली होती. ती गती कायम राखण्याचे आव्हान तारिक रहमान सरकारसमोर असेल. 'जमात-ए-इस्लामी'सारख्या कट्टरपंथी संघटनांच्या प्रभावावर नियंत्रण मिळवणे भारताच्या अंतर्गत सुरक्षेसाठी महत्त्वाचे आहे.

फीड फीडबर्नर 13 Feb 2026 9:10 am

मंत्रालयात लाच घेताना लिपिकाला अटक

मुंबई : अन्न व औषध प्रशासन विभागातील लिपिकाला लाच घेताना मंत्रालयात सापळा रचून मोठी कारवाई केली. राजेंद्र ढेरंगे असे अटक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. औषध दुकानाचा निलंबित परवाना पूर्वरत करून देण्यासाठी त्याने ५० हजारांची लाच मागितली होती. तडजोडीअंती ३५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आली. मंत्रालयातल्या दुसऱ्या मजल्यावर ही कारवाई झाल्याने चर्चांना उधाण आले आहे. तक्रार आल्यानंतर मंत्री नरहरी िझरवाळ यांच्या कार्यालयात अँटी करप्शन ब्युरोचे सहा अधिकारी पोहोचले होते. कारवाई करताना झिरवाळ यांचं कार्यालय पूर्ण ताब्यात घेतले. तपास झाल्यानंतर मग या संबंधित लिपिकाला ताब्यात घेतले. त्यानंतर कार्यालय उघडण्यात आले.

फीड फीडबर्नर 13 Feb 2026 9:10 am

Rajpal Yadav's Brother Statement: अभिनेता राजपाल यादवच्या भावाने केले मोठे खुलासे; काय म्हणाले श्रीपाल यादव?

मुंबई: बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव नऊ कोटी रुपयांच्या कथित आर्थिक वाद प्रकरणी न्यायालयीन कोठडीत आहे. ५ फेब्रुवारी रोजी त्याने न्यायालयाच्या आदेशानुसार आत्मसमर्पण केले. त्यानंतर समाज माध्यम आणि माध्यमांमध्ये अशी चर्चा सुरू झाली की, राजपाल यादवनं म्हटले होते, ना माझ्याकडे पैसे आहेत आणि ना माझे मित्र आहेत. यानंतर चित्रपटसृष्टीतील अनेक नामवंत चेहरे त्याच्या मदतीसाठी पुढे आले आणि फिल्म असोसिएशन FWICEनेही फिल्म इंडस्ट्रीला राजपाल यादवला मदत करण्याचे आवाहन केले. राजपाल यादवचे मोठे भाऊ श्रीपाल यादव यांनी एका वृत्तनाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सत्य समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे.राजपाल यादवच्या भावाने केले मोठे खुलासेराजपाल यादव जेलमध्ये जाताना रडत होता आणि म्हणत होता की त्याचे कोणी मित्र नाहीत आणि त्याच्याकडे पैसे नाहीत. या गोष्टीवर बोलताना श्रीपाल यादव म्हटले की, आमच्या अनुभवावरून आम्ही सांगू शकतो की या गोष्टी खऱ्या वाटत नाहीत. तो माझा धाकटा भाऊ आहे. आम्ही एकत्र शिकलो, एकाच खोलीत राहिलो, एकाच बिछान्यावर झोपलो आहोत. मला पूर्ण विश्वास आहे की कितीही मोठी अडचण आली तरी तो कोणासमोर गयावया करणार नाही किंवा रडणार नाही आणि अशा प्रकारच्या गोष्टी तर नक्कीच बोलणार नाही. जाण्यापूर्वी त्याने मला फोन करून सांगितले होते. दादा, 'कोणतीही चिंता करू नको' त्यानं आम्हाला खात्री दिली की पैसे कर्ज म्हणून घेतले नव्हते, तर गुंतवणूक म्हणून दिले गेले होते. त्याने काही कागदपत्रांवर सही केली होती, ज्याबाबत आम्हाला सांगण्यात आले होते की ती कागदपत्रे गुंतवणुकीशी संबंधित आहेत. नंतर जेव्हा चित्रपट पुढे जाऊ शकला नाही, तेव्हा त्या कागदपत्रांच्या आधारे त्याला कर्ज म्हणून दाखवण्यात आले आणि परतफेडीची मागणी सुरू झाली. आम्ही चित्रपटाच्या क्रेडिट्समध्ये संबंधित व्यक्तीचे नाव निर्माता म्हणूनही पाहिलंय. सोशल मीडिया आणि माध्यमांमध्ये जे बोलले जात आहे की तो रडत होता किंवा म्हणत होते की त्याचे कोणी नाही- आम्ही मानू शकत नाही की, त्यानं असे काही म्हटले असेल.जेलमध्ये जाताना राजपाल भावाला काय सांगितलं?जेलमध्ये जाताना राजपालनं सांगितलं की, न्यायालयीन प्रक्रियेनुसार त्याला एक दिवसासाठी जावे लागेल आणि पुढे कायदेशीर प्रक्रिया सुरू राहील. त्याने आम्हाला पूर्ण विश्वास दिला की, दादा, कोणतीही गोष्ट चिंता करण्यासारखी नाही. आम्ही सिद्ध करू की पैसे गुंतवणुकीसाठी होते, कर्ज घेतलेले नव्हते. आम्हाला चित्रपटसृष्टीबद्दल फार माहिती नाही, पण आम्हाला सांगण्यात आले की चित्रपटांमध्ये अनेक जण गुंतवणूक करतात आणि ही एक सामान्य प्रक्रिया आहे.'आम्ही देवाकडे प्रार्थना करतोय की...'माझ्या मनात पूर्ण विश्वास आहे की, तो उद्या बाहेर येईल. आमच्या मुलीचे लग्न आहे आणि त्याची पूर्ण तयारी सुरू आहे. कोणीतरी पत्रकार आला आणि म्हणाला की घरात नैराश्य पसरलंय. अरे जिथे ५०-५० कामगार काम करत आहेत आणि आम्ही सर्व त्यात गुंतलोय. दुपारची वेळ होती, काम करणारे लोक जेवत असतील आणि घरी कोणी दिसलं नसेल तर त्याने फोटो काढून टाकला असेल की इथे नैराश्य पसरलंय वगैरे. कोणत्याही प्रकारे नैराश्य पसरलेले नाही. आम्ही पूर्ण धैर्याने काम करत आहोत आणि आम्हाला ठाऊक आहे की, तो उद्या बाहेर येईल आणि आम्ही लग्नसोहळा जल्लोषात साजरा करू. लग्न होणारच, कोणतीही अडचण नाही. त्यामुळे लग्नात त्याची उपस्थिती खूप महत्त्वाची आहे. यासाठी आम्ही देवाकडे प्रार्थना करतोय की तो लवकर बाहेर येवो.१९ फेब्रुवारीला राजपाल यादवच्या पुतणीचे लग्न आहे आणि कुटुंबाला पूर्ण आशा आहे की तो लग्नसमारंभात नक्की सहभागी होतील. तसेच चित्रपटसृष्टीनेही राजपाल यादवला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

फीड फीडबर्नर 13 Feb 2026 9:10 am

राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्याची मागणी

नवी दिल्ली : भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधींच्या संसद सदस्यत्व रद्द करण्याची मागणी करत लोकसभेत प्रस्ताव मांडला आहे. यामुळे राहुल गांधी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.राहुल गांधींनी संसदेत निराधार विधाने करून देशाची दिशाभूल केल्याचा गंभीर आरोप निशिकांत दुबे यांनी केला आहे. राहुल गांधींचे संसदेचे सदस्यत्व त्वरित रद्द करण्यात यावे आणि त्यांच्यावर निवडणूक लढवण्यास कायमची बंदी घालण्यात यावी, अशी मागणी निशिकांत दुबे यांनी केली आहे. दुबे यांनी यासाठी लोकसभेत ‘स्वतंत्र प्रस्ताव’ सादर केला आहे. यामुळे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.हक्कभंग ऐवजी स्वतंत्र प्रस्तावराहुल गांधी यांनी लोकसभेत भाषण करताना केंद्र सरकारने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत करारात देश विकला, असा आरोप केला होता. यानंतर आक्रमक झालेल्या भाजपने त्यांच्याविरोधात मांडलेल्या प्रस्तावामुळे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील संघर्ष तीव्र होणार आहे. सभागृहात निराधार विधाने करून लोकसभेची दिशाभूल केल्याचा आरोप करत केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू यांनी राहुल गांधींविरोधात ‘हक्कभंग नोटीस’ दाखल करण्याचे संकेत दिले होते. पण, दुबेंनी हक्कभंग ऐवजी ‘स्वतंत्र प्रस्ताव’ मांडण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रस्तावाद्वारे गंभीर विषयावर सभागृहात सविस्तर चर्चा घडवून आणता येते.याबाबत दुबे यांनी सांगितले की, राहुल गांधी देशाला दिशाभूल करत आहेत. या प्रस्तावात मागणी केली आहे की या प्रकरणावर चर्चा व्हावी, राहुल गांधींचे संसद सदस्यत्व रद्द करावे आणि त्यांना आयुष्यभर निवडणूक लढण्यावर प्रतिबंध लावावा. दुबे यांनी स्पष्ट केले की राहुल गांधींविरुद्ध कोणताही विशेषाधिकार प्रस्ताव आणण्याचा त्यांचा मानस नाही. हा एक स्वतंत्र प्रस्ताव असून, गांधींचे संसदेतून निलंबन करण्याची मागणी त्यात केली आहे. राहुल गांधी जॉर्ज सोरोससारख्या बाह्य शक्तींच्या पाठिंब्याने देशाची दिशाभूल करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.दरम्यान, राहुल गांधी यांच्या म्हणण्यानुसार, आम्ही एखाद्या देशाकडून तेल खरेदी करू शकत नाही, असे अमेरिका सांगते त्यावेळी भारताची ऊर्जा सुरक्षा बाह्यशक्तीच्या हातात आहे असा त्याचा अर्थ होतो.अमेरिकेने भारतावरील २५ टक्के टॅरिफ कमी केले, त्यावेळी ट्रम्प यांनी भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद करावी असे सांगितले. राहुल गांधी यांनी याचाच संदर्भ देऊन सभागृहात सरकारला धारेवर धरले होते.

फीड फीडबर्नर 13 Feb 2026 8:30 am

विजय मल्ल्या भारतात परतणारच नसतील, तर आम्ही याचिका का ऐकावी?

मुंबई उच्च न्यायालयाचा सवालमुंबई : फरार आर्थिक गुन्हेगार विजय मल्ल्याने आधी भारतात परत यावे. आम्ही तातडीने त्यांच्या याचिकेवर सुनावणी सुरू करू. जर ते परत येणारच नसतील तर आम्ही ही याचिका का ऐकावी?, यातून काय साध्य होईल?, अशी स्पष्ट भूमिका गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने घेतली.केंद्र सरकारच्यावतीनंही हीच भूमिका मांडत विजय मल्ल्याने भारतात परत येऊन चर्चा करावी, त्यांचा काय दावा आहे?, ते कुठलं कर्ज मान्य करतात, कुठलं नाही?, ते कधी आणि कसे पैसे परत करणार?, आम्ही त्यांचं म्हणणे ऐकून घेण्यास तयार असल्याचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी स्पष्ट केले.विजय मल्ल्या सध्या लंडनमध्ये असल्याचे त्यांच्यातर्फे ज्येष्ठ वकील अमित देसाई यांनी उच्च न्यायालयात सांगितले. त्यावर, आर्थिक घोटाळा करून परदेशात पसार झालेल्यांनी तिथं बसून याचिका करू नये. आधी भारतात कधी येणार ते सांगा?, मग आम्ही त्यांची याचिका ऐकू, असे स्पष्ट करत समाधानकारक उत्तर मिळेपर्यंत कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेला स्थगिती दिली जाणार नाही. तसेच तुमची याचिका फेटाळून लावत आम्ही तुम्हाला ही अखेरची संधी देत आहोत, असे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अखंड यांच्या खंडपीठाने गुरुवारी स्पष्ट केले.भारतीय बँकांचे हजारो कोटी बुडवून परदेशात पसार झालेल्या विजय मल्ल्याला ब्रिटनहून भारतात परत आणण्याची प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. त्याने या कायदेशीर प्रक्रियेचा ब्रिटनमधील कोर्टात गैरवापर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही याचिका फेटाळून लावावी, अशी मागणी केंद्र सरकारतर्फे न्यायालयाकडे केली. १८ फेब्रुवारीच्या पुढील सुनावणीत फरार मल्ल्या भारतात परत कधी येणार?याची माहिती त्यांच्या वकिलांना सादर करण्याचे निर्देश जारी केले.

फीड फीडबर्नर 13 Feb 2026 8:30 am

Ginny Wedss Sunny 2 First Look : ‘गिनी वेड्स सनी 2’चा फर्स्ट लूक समोर; ‘या’दिवशी येणार भेटीला

Ginny Wedss Sunny 2 First Look : या पोस्टरमध्ये अविनाश तिवारी एका कुस्तीगीराची भूमिका साकारताना दिसत आहे.

दैनिक प्रभात 13 Feb 2026 8:15 am

एकत्रिकरणाचं भवितव्य

ज्यांच्या आग्रहाखातर दादा वेगळे झाले, त्या बहुतेक सगळ्या नेत्यांचा दोन्ही पक्षांच्या एकत्रिकरणाला विरोध होता, हे त्यांनाही माहीत होतं. त्यांचा तो विरोध आजही दिसतो आहेच. या विरोधाला काही तात्त्विक, वैचारिक आधार आहे, असं नाही. शुद्ध व्यावहारिक आहे. अजितदादांच्या वारसदारांना याची व्यवस्थित कल्पना आहे.२८जानेवारीच्या सकाळी बारामतीत दुर्दैवी विमान अपघात झाला नसता, त्यात अजितदादा पवार यांचं निधन झालं नसतं, तर आज कदाचित सर्व वृत्तपत्रांत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रिकरणाच्या बातम्यांचे मथळे असते. 'कदाचित' म्हणण्याचं कारण एवढंच, की दिशा निश्चित होती; पण प्रक्रियेचे तपशील ठरत होते. दोन्ही राष्ट्रवादी एकमेकांविरोधात सर्वोच्च न्यायालयात पोहोचले असल्याने काही तांत्रिक बाबी आडव्या येऊ शकल्या असत्या. शिवाय, राजकीय घडामोडींत कधी कोणते फाटे फुटतील, हे सांगता येत नसतं. त्यामुळे, एखादी गोष्ट प्रत्यक्ष घडत नाही, तोपर्यंत त्याबाबत खात्रीने बोलण्याला काही अर्थ नसतो. 'घड्याळ'वाल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते 'अशी काही चर्चा सुरू असल्याचं आम्हाला माहीत नव्हतं. तसं असतं, तर दादा आमच्याशी बोलले असते' असं सुरुवातीला म्हणाले. पण, त्यानंतर संबंधितांकडून चर्चेच्या फेऱ्यांचे अनेक तपशील, चित्रफितीच दाखवल्या गेल्याने या नेत्यांकडून पुन्हा तशा प्रकारचं वक्तव्य झालं नाही. आता उघड झालेल्या एकूण तपशिलावरून अशी चर्चा सुरू होती आणि खुद्द अजितदादाच त्यासाठी आग्रही होते, असं दिसतं. या चर्चेतील खाचाखोचा ते आपल्या पक्षातील सहकाऱ्यांना किती सांगत असतील, हा प्रश्न आहे. कारण, ज्यांच्या आग्रहाखातर दादा वेगळे झाले, त्या बहुतेक सगळ्या नेत्यांचा दोन्ही पक्षांच्या एकत्रिकरणाला विरोध होता, हे त्यांनाही माहीत होतं. त्यांचा तो विरोध आजही दिसतो आहेच. या विरोधाला काही तात्त्विक, वैचारिक आधार आहे, असं नाही. शुद्ध व्यावहारिक आहे. अजितदादांच्या वारसदारांना याची व्यवस्थित कल्पना आहे. सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्री म्हणून निवड, पदग्रहणापूर्वीचे सोपस्कार, दिल्ली भेटीसाठीचा आग्रह या वारसदारांना समजत नाही, असं नाही. पण, आत्ताच काही भूमिका जाहीर करण्याची गरज नाही. सगळ्यांचं ऐकून, प्रत्येकाची पावलं कुठे पडतात हे नीट समजावून घेऊन मगच आपली भूमिका स्पष्ट करण्याचं त्यांनी ठरवलं असावं. कुठेही काहीही न बोलता सरकारमधील, पक्षातील; अगदी पक्ष संघटनेतील घडी बसवण्याला त्यांनी प्राधान्य दिलेलं दिसतं. आजच्या घडीला हेच धोरण योग्य आहे. अजितदादांचे वारसदार नवखे किंवा अपरिपक्व आहेत, त्यांना आपल्यालाच पुढे घेऊन जायचं आहे, असा समज कोणी करून घेतला असेल, तर त्यांना लवकरच ठेच लागण्याची शक्यता यावरून दिसते.दोन राष्ट्रवादी वेगळ्या झाल्या, तेव्हांही त्याबाबतच्या चर्चा वेगवेगळ्या पातळ्यांवर कितीतरी दिवस सुरू होत्या. तेव्हांही पक्षात आणि पवार कुटुंबात अशा दोन्ही आघाड्यांवर स्वतंत्रपणे बोलणी होत होती. दोन्ही बाजूला अग्रभागी पवार कुटुंबातील व्यक्तीच असल्याने साहजिकच त्यावेळीही 'केवळ पक्षात फूट, की कुटुंबात दरी?' अशा प्रकारच्या चर्चा झाल्या होत्या. भारतीय जनता पक्षाबरोबर जाण्यासाठी जे आग्रही होते, त्यातील प्रत्येकाची त्या आग्रहामागे वेगवेगळी कारणं होती. त्याची चर्चाही त्यानंतर पुष्कळ झाली होती. पण, तो निर्णय घेण्याच्या काळात स्वतः अजितदादा किती तणावात होते, याची कल्पना भारतीय जनता पक्षातील वरिष्ठ नेत्यांसह राजकीय वर्तुळालाही आहे. दोन राष्ट्रवादी स्वतंत्र झाल्यानंतरही सुरुवातीचे काही महिने सोडले, तर नंतर दोन्ही बाजूंनी परस्परांवरचे वार थांबले होते. विधिमंडळाच्या अधिवेशन काळात दोन्ही पक्षांचे नेते आणि आमदार किती समन्वयाने वावरायचे, हे तर जगजाहीर आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दोन्ही पक्षांनी अनेक ठिकाणी आघाडी करण्याचा निर्णय घेतला होता. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिल्लीत शहा यांची भेट घेऊन त्यांना त्याची कल्पनाही दिली होती. भाजपसारख्या तगड्या पक्षाच्या युतीत असताना त्यांच्या संमतीशिवाय असा काही निर्णय कोणी पक्ष परस्पर घेईल, हे संभवत नाही. म्हणजे, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने केलेली निवडणूक आघाडी ही भाजपला पूर्ण अवगत होती आणि त्यांची त्याला मूळ संमती होती, असं मानायला जागा आहे. भाजपचं केंद्रीय नेतृत्व राजकीय परिणामांचा विचार केल्याशिवाय आणि एखाद्या राजकीय घडामोडीचं पूर्ण तार्किक चित्र स्पष्ट असल्याशिवाय गाफीलपणे परवानगी देणंही शक्य वाटत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमधील घडामोडींची माहिती महायुतीतल्या अन्य पक्षांच्या वरिष्ठ वर्तुळात असणार असा निष्कर्ष यावरूनच काढला जातो आहे. राष्ट्रवादीतल्या नेत्यांनी याही गोष्टीचा विचार उघड वक्तव्य करण्याआधी करायला हवा. अर्थात याविषयी आता कोणी उघड कबुली देण्याचा किंवा दुजोरा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कारण, त्या अपघाताने सर्व समीकरणंच बदलून गेली आहेत. एकत्रिकरणाचा विचार करणारे आपापला विचार करताहेत; पण हे एकत्रिकरण ज्या राजकीय चित्राचा भाग होतं, त्या चित्रातल्या अनेक घटकांची आताच्या घडीची गरज, सोय काय आहे, याचा विचार कोणी करतं आहे, असं दिसत नाही. सुनेत्रा पवार यांच्या दिल्ली भेटीतही या विषयावर चर्चा झाल्याचं काही ठिकाणी प्रसिद्ध झालं आहे. त्याचे तपशील एक - दोन दिवसात कळतील. जर चर्चा झालीच असेल, तर बदललेल्या परिस्थितीत भाजपची भूमिका काय आहे, त्यांचा कल कुठे आहे, हे तिथे उपस्थित असलेल्यांना कळलंच असेल. राष्ट्रवादीतले प्रमुख चार-पाच नेते या एकत्रिकरणाला जो विरोध करताहेत, त्याची दखल भाजप कशी घेणार आहे, यावरच या 'चर्चेतल्या एकत्रिकरणा'चं भवितव्य अवलंबून आहे. अजितदादा या एकत्रिकरणाला तयार होते, त्यामागे राजकीय कारणांपेक्षा भावनिक कारणं जास्त होती, असं म्हणतात. ती भावनिक कारणं त्यांच्या वारसांच्या दृष्टीने किती महत्त्वाची ठरतात, हा मुद्दा आहेच. शिवाय, ही प्रक्रिया नेटाने पुढे नेण्याएवढी तीव्र इच्छाशक्ती आता कुणाकडे असण्याचं कारण नाही, ही वस्तुस्थितीही लक्षात घ्यावी लागेल. आधी कुटुंब; मग पक्ष याच क्रमाने ही दुरुस्ती व्हायची तेव्हां होईल.

फीड फीडबर्नर 13 Feb 2026 8:10 am

Nashik MNS Protest: शिक्षकाने मराठी बोलण्यास विरोध केल्याने मनसे कार्यकर्त्यांचा राडा

नाशिक: नाशिकमध्ये मराठीच्या मुद्द्यावरून वातावरण तापलं आहे. एका प्रसिद्ध कोचिंग क्लासमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी राडा केल्याची घटना समोर आली आहे. मराठी भाषेचा अवमान केल्याचा आरोप करत मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी फिजिक्सवाला या कोचिंग क्लासमधील कर्मचाऱ्यांना मारहाण केली. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी क्लासच्या मॅनेजरने सरकारवाडा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली असून, पोलिसांनी मनसेच्या पाच पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे.नेमकं प्रकरण काय ?नाशिकमधील शरणपूर रोड परिसरात फिजिक्सवाला हे प्रसिद्ध कोचिंग सेंटर आहे. या क्लासमध्ये शिक्षण घेणारे बहुतांश विद्यार्थी हे मराठी भाषिक आहेत. मात्र, या ठिकाणी शिकवणारे अनेक शिक्षक हे परराज्यातील असून त्यांना मराठी भाषेचे ज्ञान नसल्याने विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये भाषेवरून वारंवार खटके उडत होते.काही विद्यार्थ्यांना हिंदी विषय समजण्यास अडचण येत होती, त्यातूनच वादाची ठिणगी पडली. एका शिक्षकाने विद्यार्थ्यांना चक्क हिंदीतच शिकावे लागेल, असे बजावत मराठी भाषेला गावठी म्हणून हिनवल्याचा खळबळजनक आरोप महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने केला आहे.मनसे पदाधिकाऱ्यांचा क्लासमध्ये राडामराठी भाषेचा अपमान होत असल्याची माहिती मिळताच मनविसेचे शहराध्यक्ष ललित वाघ, उमेश भोई, बाजीराव मते, नितीन धानापुणे, अक्षय कोंबडे आणि रोहित उगावकर यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी थेट फिजिक्सवाला क्लास गाठला. तिथे त्यांनी व्यवस्थापनाला जाब विचारत गोंधळ घातला. संबंधित पांडे नामक शिक्षकाला समोर आणण्याची मागणी यावेळी करण्यात आली. विद्यार्थ्यांवर दादागिरी करणे आणि मराठी बोलण्यास मज्जाव करणे यावरून वाद विकोपाला गेला. यावेळी संतापलेल्या कार्यकर्त्यांनी एका कर्मचाऱ्याला मारहाण केली, ज्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.मनसे पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखलया आंदोलनादरम्यान मनसे कार्यकर्त्यांनी क्लास व्यवस्थापनाला एक गंभीर इशाराही दिला आहे. क्लासमधील सर्व परप्रांतीय शिक्षकांचे येत्या ७ दिवसांत राजीनामे घ्यावेत आणि त्यांच्या जागी मराठी शिक्षकांची नियुक्ती करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. ही मागणी पूर्ण झाली नाही, तर क्लासची तोडफोड करून पुन्हा मनसे स्टाईलने आंदोलन केले जाईल, असा इशारा देण्यात आला. या प्रकारानंतर क्लासच्या मॅनेजरने सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी मारहाण, धमकी आणि सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी मनसेच्या पाच पदाधिकाऱ्यांवर गुन्हा नोंदवला असून पोलीस आता या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

फीड फीडबर्नर 13 Feb 2026 8:10 am

परभणीत महापौर इक्बाल, तर उपमहापौर देशमुख

वार्तापत्र : मराठवाडामराठवाड्यातील परभणी महानगरपालिकेत ठाकरेंच्या शिवसेनेने मुस्लीम महापौर खुर्चीवर बसविला. सय्यद इक्बाल यांची परभणीच्या महापौरपदी निवड झाली, तर काँग्रेसचे गणेश देशमुख हे उपमहापौर म्हणून निवडून आले. परभणीमधील मतदारांनी ठाकरेंच्या शिवसेनेला मतदान करताना स्वप्नातही मुस्लीम महापौरांचा विचार केला नसेल. मतदारांची ठाकरेंच्या शिवसेनेकडून चक्क फसवणूक झाल्याची भावना मराठवाड्यात निर्माण झाली आहे.हिंदुत्वाची कास धरून स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. ठाकरेंच्या शिवसेनेचा दबदबा हा केवळ हिंदुत्ववाद या मुद्द्यामुळेच होता. एकेकाळी महाराष्ट्रात ठाकरेंचे नाव घेताच समोरच्यांचा थरकाप उडत असे. मराठवाड्यात देखील ठाकरेंच्या शिवसेनेचा एक वेगळाच वलय होता. ठाकरेंच्या शिवसेनेला मतदान करताना मतदार नेहमी स्वतःची सुरक्षा व हिंदुत्ववाद जपणारा पक्ष म्हणून ठाकरे ब्रँडकडे पाहत होते. काही दिवसांपूर्वी झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत भाजपचे मराठवाड्यात सर्वाधिक नगरसेवक निवडले गेले.'मराठवाड्यातील परभणी महानगरपालिकेत एकूण ६५ जागांसाठी निवडणूक झाली. त्या ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेचे बंडू जाधव हे खासदार आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली ६५ पैकी २५ नगरसेवक ठाकरेंच्या शिवसेनेचे निवडून आले. तसेच काँग्रेसचे १२ नगरसेवक निवडून आल्याने ठाकरेंची शिवसेना व काँग्रेस या दोघांकडे सत्तेची सूत्रे आली. ज्या ज्या मतदारांनी हिंदुत्वाचा पक्ष म्हणून ठाकरेंच्या शिवसेनेला मतदान केले, त्यांना वाटले असेल की मराठवाड्यात आता ठाकरेंचा महापौर हा हिंदू असेल; परंतु चक्क मतदारांच्या काळजाला लागणारी बाब महापौर निवडीवरून समोर आली. ठाकरेंच्या शिवसेनेने परभणीत महापौरपदावर बसण्याची संधी सय्यद इक्बाल यांना दिली. त्यांना काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी साथ दिली. ३९ मते घेऊन मुस्लीम समुदायाचे सय्यद इकबाल हे महापौर म्हणून विराजमान झाले.१९४७ मध्ये भारत स्वतंत्र झाला; परंतु मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळण्यासाठी एक वर्ष वाट पाहावी लागली. १७ सप्टेंबर १९४८ रोजी मराठवाडा स्वतंत्र झाला. मराठवाड्यावर एकेकाळी मुघलांचे राज्य होते. पूर्वी मुस्लिमांच्या तावडीत असलेला मराठवाडा आता हळूहळू पुन्हा मुस्लीम नगरसेवक ताब्यात घेत आहेत, अशी धारणा मराठवाड्यातील नागरिकांची होत आहे. तेलंगणा राज्यातील एमआयएम या पक्षाने नांदेड महानगरपालिका निवडणुकीच्या माध्यमातून मराठवाड्याच्या राजकारणात प्रवेश केला. एमआयएम या पक्षाने महानगरपालिकेत मते मिळविण्यासाठी मुस्लीमबहुल भागाची निवड केली व स्वतःची ताकद दाखवून दिली. सध्या राज्यसभेचे खासदार असलेले नांदेडचे अशोक चव्हाण यांनीच एमआयएम पक्षाला नांदेड महापालिकेत आणले असे बोलले जाते. मत विभागणीसाठी खासदार अशोक चव्हाण यांनी केलेला तो प्रयत्न स्थानिक राजकारणासाठी यशस्वी ठरला असला तरी भविष्यात मराठवाड्यात हिंदू विरुद्ध मुस्लीम असेच मतदान पाहावयाला मिळणार आहे. परभणी हा जिल्हा ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी ओळखला जात असला तरी त्या ठिकाणी असलेले मतदार हे कट्टर हिंदुत्ववादी आहेत. त्यांना मुस्लीम महापौर मान्य असेल असे अनेकांना वाटत नाही. परभणीतील ठाकरेंच्या शिवसेनेने निवडलेला महापौर हा भविष्यात मराठवाड्यातील राजकीय चित्र नक्कीच बदलविणारा निर्णय ठरणार आहे. ज्याप्रमाणे छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिका निवडणुकीत थेट हिंदू विरुद्ध मुस्लीम असे वातावरण निर्माण केले जाते. तीच परिस्थिती आता भविष्यात परभणी येथे दिसणार यात कोणाचेच दुमत नाही. यंदाच्या महानगरपालिका निवडणुकीत नांदेडमध्ये देखील एमआयएम पक्षाने चांगलेच यश मिळविले. नांदेड महानगरपालिकेत एमआयएम हा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. एमआयएम पक्षाचे निवडून आलेले जवळपास सर्वच नगरसेवक हे पूर्वी खासदार अशोक चव्हाण यांच्या काँग्रेस पक्षाचेच नेतृत्व करत होते. परभणी महानगरपालिकेच्या महापौर निवडीवरून भविष्यात ठाकरेंच्या शिवसेनेला मराठवाड्यात थारा मिळणार नाही, हे मात्र आता उघड होत आहे. चंद्रपूरमध्ये काँग्रेसची सत्ता येईल असे वाटत असताना ऐन वेळेला त्या ठिकाणी भाजपचा महापौर खुर्चीवर बसविण्यात श्रेष्ठींना यश आले. तसाच प्रयोग परभणीत होईल की काय, अशी अपेक्षा व्यक्त केली जात असताना या ठिकाणी मात्र ठाकरेंच्या शिवसेनेला महापौरपदाची खुर्ची मिळविण्यात यश मिळाले. ठाकरे यांच्या शिवसेनेने खुर्ची मिळविली असली तरी हिंदुत्ववादी मतांचा विश्वास त्यांनी नक्कीच गमावला, असे मराठवाड्यातून बोलले जात आहे. ठाकरेंनी सय्यद इक्बाल यांची महापौर पदासाठी निवड करून नेमका महाराष्ट्राला काय संदेश दिला? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.ज्या मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेने मुंबईत तसेच ठाण्यात निवडणुकीचा प्रचार केला, त्याच मराठीच्या मुद्द्याला परभणीत मात्र मुस्लीम महापौर निवडीने काळिमा फासल्याची भावना परभणीकरांच्या मनात निर्माण झाली आहे. परभणीतील हिंदुत्ववादी मतांना आकर्षित करण्यासाठी भाजपला ही एक आयती संधी आलेली आहे. भविष्यात परभणीला भाजपचा गड बनविण्यासाठी त्या ठिकाणी भाजपने आपले पाय रोवणे आवश्यक आहे. राज्यात नेतृत्व करत असलेल्या मेघना बोर्डीकर यांना भाजपने बळ दिले असले तरी त्यांच्यात परभणी व परिसरातील मतदारांना भाजपकडे ओढण्याची ताकद नाही, हे देखील तेवढेच खरे आहे. त्यामुळे त्यांच्याऐवजी इतर अन्य नेत्यांवर परभणीची जबाबदारी टाकल्यास भविष्यात भाजपला ते फायद्याचे ठरणार आहे. ठाकरेंच्या शिवसेनेवर असलेला हिंदुत्ववादी मतदारांचा विश्वास संपल्यात जमा आहे. त्यामुळे आता मराठवाड्यात उरली-सुरली ठाकरेंची शिवसेना भविष्यात दिसणार नाही, असे बोलले जात आहे.

फीड फीडबर्नर 13 Feb 2026 8:10 am

Krystle D’Souza: साडीमध्ये घाबरलेली क्रिस्टल डिसूजा; रणवीर सिंह म्हणाला…“हा तुझा क्षण आहे”

क्रिस्टलने सांगितले की, ‘शरारत’ गाण्याच्या लॉन्चवेळी स्टेजवर जाऊन परफॉर्म करण्याचा तिचा अजिबात विचार नव्हता. गाणे गायिका जॅस्मिन सँडलास आणि मधुबंती बागची यांनी सादर केले. गाणे सुरू होताच प्रेक्षकांनी जबरदस्त प्रतिसाद दिला आणि संपूर्ण वातावरण उत्साहाने भरून गेले.

दैनिक प्रभात 13 Feb 2026 8:09 am

Ambegaon News : कळंब, महाळुंगे की मंचर? आंबेगाव पंचायत समितीच्या सत्तेचे केंद्र कोण? ‘या’नावांची जोरदार चर्चा

Ambegaon News : दिलीप वळसे पाटील आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यातील समन्वय सभापती निवडीत ठरणार निर्णायक; कार्यकर्त्यांमध्ये कमालीची उत्सुकता.

दैनिक प्रभात 13 Feb 2026 8:00 am

Khed News : खेडमध्ये ‘मशाल’धगधगली! नवनिर्वाचित शिलेदारांचा ‘मातोश्री’वर सत्कार; उद्धव ठाकरें यांचे मार्गदर्शन

Khed News : पक्षाच्या ध्येयधोरणांशी तडजोड नको, कार्यकर्त्यांना उद्धव ठाकरेंचा महत्त्वाचा सल्ला; आगामी आव्हानांसाठी सज्ज राहण्याचे आदेश.

दैनिक प्रभात 13 Feb 2026 7:30 am

मुंबईतील नौदल गोदीमध्ये लागलेली आग नियंत्रणात, जीवितहानी नाही

मुंबई: दक्षिण मुंबईतील नौदल डॉकयार्डमध्ये गुरुवारी रात्री आग लागली, ज्यामुळे परिसरात काही काळासाठी वाहतूक विस्कळीत झाली. डॉकयार्डमधील कचरा साठवणुकीच्या ठिकाणी ही आग लागली. रात्री १०.२५ च्या सुमारास ही आग लागली.एका वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, कुलाबा येथील गेटवे ऑफ इंडियासमोर तिरप्या दिशेने आग लागली. घटनेची माहिती मिळताच नौदलाच्या अग्निशमन दलाची टीम घटनास्थळी पोहोचली आणि त्यांनी आग विझवण्याचे काम जलद गतीने सुरु केले. आग वेळेत पसरण्यापासून रोखण्यात आली आणि थोड्याच वेळात त्यावर नियंत्रण मिळवण्यात आले.मुंबई नौदल डॉकयार्ड आगीत कोणतीही जीवितहानी नाही

फीड फीडबर्नर 13 Feb 2026 7:30 am

Ajit Pawar : नियोजन समिती बैठकीत ‘दादां’ची उणीव! पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली कामकाज

Ajit Pawar : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत भावपूर्ण श्रद्धांजली; पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह लोकप्रतिनिधी उपस्थित.

दैनिक प्रभात 13 Feb 2026 7:20 am

PMC Fine 10 Lakhs : नदीत राडारोडा टाकणे पडले महागात! १० लाखाच्या दंडासह गुन्हा दाखल; कसा लागला छडा..वाचा

PMC Fine 10 Lakhs : शिवाजीनगर तोफखाना भागातून रात्रीच्या वेळी राडारोडा नदीत टाकल्याचे फुटेज समोर; महापालिका आयुक्तांकडून तत्काळ कठोर कारवाईचे आदेश.

दैनिक प्रभात 13 Feb 2026 7:15 am

Pune Crime : शेअर मार्केटच्या नावाखाली कोट्यवधींचा गंडा; कोरेगाव पार्कच्या ‘या’मोठ्या कंपनीवर गुन्हा दाखल

Pune Crime : दरमहा ४ ते १० टक्के परतावा देण्याचे प्रलोभन; कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा नोंद.

दैनिक प्रभात 13 Feb 2026 7:15 am

आजचे एक्सप्लेनर:राहुल गांधींच्या कोणत्या मुद्द्यांवर संतापले सरकार, खासदारकी काढण्यासाठी आणि निवडणूक लढण्यापासून रोखण्यासाठी प्रस्ताव; पुढे काय?

11 फेब्रुवारी रोजी लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणामुळे सरकार संतप्त झाले आहे. भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी राहुल यांचे संसद सदस्यत्व रद्द करण्यासाठी आणि त्यांना निवडणूक लढवण्यापासून रोखण्यासाठी सबस्टँटिव्ह मोशन सादर केले आहे. संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनीही सांगितले आहे की ते राहुल यांच्या विरोधात विशेषाधिकार प्रस्ताव आणतील. मात्र, सध्या सरकार यात घाई करणार नाही, असे अहवाल आहेत. शेवटी लोकसभेत राहुल गांधींच्या कोणत्या गोष्टींमुळे सरकार संतप्त झाले, खरंच भाषणामुळे राहुल यांचे खासदार पद हिरावले जाऊ शकते का; जाणून घेऊया आजच्या एक्सप्लेनरमध्ये… प्रश्न-1: राहुल गांधींच्या कोणत्या गोष्टींवर भाजप आणि सरकारला आक्षेप आहे? उत्तर: 11 फेब्रुवारी रोजी लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अर्थसंकल्पावर भाषण देताना अनेक असे आरोप केले, ज्यावर सरकारला आक्षेप आहे.... राहुल यांनी भारत-अमेरिका यांच्यातील व्यापार कराराला एकतर्फी म्हटले आणि सांगितले की पंतप्रधानांनी या कराराने 'भारत मातेला विकले आहे.' राहुलने केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांचा उल्लेख एपस्टीन फाइल्सच्या संदर्भात केला. त्यांनी म्हटले, 'अनिल अंबानींना तुरुंगवास का झाला नाही? कारण त्यांचे नाव एपस्टीन फाइल्समध्ये आहे. मला माहीत आहे की त्यांना एपस्टीनशी कोणी भेटवले होते. हरदीप पुरींनाही माहीत आहे की कोणी भेटवले होते.' संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, राहुल गांधींनी सभागृहाची प्रतिष्ठा बाजूला ठेवून पंतप्रधान आणि सरकारविरुद्ध उघड खोटे बोलले आहे, ज्यासाठी भाजप त्यांच्याविरुद्ध विशेषाधिकार भंगाची नोटीस आणणार आहे. 'एकतर पुरावे द्या किंवा माफी मागा.' केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्यावरही कोणतीही नोटीस न देता गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी राहुल यांच्या विधानांना संसदेच्या कामकाजातून काढून टाकण्याचीही मागणी केली आहे. 12 फेब्रुवारीच्या सकाळी सभागृहाची कार्यवाही सुरू होण्यापूर्वी भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी राहुल गांधींचे संसद सदस्यत्व रद्द करण्यासाठी आणि त्यांना निवडणूक लढवण्यापासून रोखण्यासाठी एक सबस्टँटिव्ह मोशन (मूलभूत प्रस्ताव) सादर केले आहे. हा एक स्वतंत्र प्रस्ताव असतो, जो सभागृहाच्या मंजुरीसाठी सादर केला जातो. निशिकांत दुबे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, 'मी आज लोकसभेत राहुल गांधींविरोधात एक प्रस्ताव सादर केला आहे की, ते सोरोससारख्या शक्तींच्या मदतीने देशाला कसे चुकीच्या मार्गावर नेत आहेत. मी जो प्रस्ताव सादर केला आहे, त्यात मी विनंती केली आहे की, राहुल गांधींचे सदस्यत्व रद्द करण्यात यावे आणि त्यांना आजीवन निवडणूक लढवण्यापासून रोखण्यात यावे.' प्रश्न-2: विशेषाधिकार भंग म्हणजे काय, ज्याचा राहुल यांच्या विरोधात सरकार वापर करू शकते? उत्तर: भारत एक लोकशाही देश आहे, जिथे प्रत्येकाला समान अधिकार मिळाले आहेत. परंतु भारतीय संसद आणि राज्यांच्या विधानसभेचे सदस्य आपली जबाबदारी कोणत्याही अडथळ्याशिवाय पार पाडू शकतील, यासाठी त्यांना काही विशेष सवलती देण्यात आल्या आहेत. हे त्यांचे विशेषाधिकार आहेत. राज्यघटनेत खासदारांना विशेषाधिकार देण्यासोबतच, त्यांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर करू नये याचीही काळजी घेण्यात आली आहे. जेव्हा एखादा खासदार दुसऱ्या सदस्याविरुद्ध, एखाद्या समितीविरुद्ध किंवा संपूर्ण सभागृहाविरुद्ध असे काही बोलतो, ज्यामुळे त्यांची बदनामी होते, तेव्हा तो अधिकारांचा भंग असतो. याशिवाय, सभागृहाच्या नियमांनुसार कामकाज चालू न देणे, अध्यक्षांच्या (स्पीकरच्या) निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे हे देखील अधिकारांचा भंग मानले जाते. जर खासदार या विशेष अधिकारांचा गैरवापर करत असेल, तर कोणताही अन्य सदस्य त्यांच्याविरुद्ध नोटीस देऊन चौकशीची मागणी करू शकतो. प्रश्न-3: विशेषाधिकार भंगाची सिद्ध करण्याची संपूर्ण प्रक्रिया काय आहे? उत्तर: विशेषाधिकार भंग सिद्ध करण्याचे 5 मुख्य टप्पे आहेत… 1. विशेषाधिकार भंगाची नोटीस 2. नोटिशीची छाननी 3. विशेषाधिकार समितीची चौकशी 4. चौकशी समितीच्या शिफारसी समिती चौकशीच्या आधारावर आरोपीच्या शिक्षेची शिफारस करते... 5. प्रस्ताव मंजूर करणे प्रश्न-4: तर काय राहुल गांधींचे खासदार पद जाऊ शकते? उत्तर: जर अध्यक्षांनी राहुल गांधींविरुद्ध दाखल केलेली नोटीस स्वीकारली आणि चौकशीसाठी समिती स्थापन केली, तर ही समिती आरोपांची चौकशी करेल. जर समितीने राहुल गांधींना तुरुंगात पाठवण्याची शिफारस केली, तर सभागृहात यावर चर्चा होईल आणि मतदान घेतले जाईल. लोकसभेत सध्या एकूण 543 खासदार आहेत. जर सर्वजण उपस्थित असतील, तर प्रस्ताव मंजूर करण्यासाठी सरकारला 272 खासदारांची गरज भासेल. भाजप आणि NDA च्या त्यांच्या मित्रपक्षांसह एकूण 293 खासदार आहेत. तर काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या त्यांच्या मित्रपक्षांसह एकूण 235 खासदार आहेत. अशा परिस्थितीत, जर चौकशी समितीने राहुल गांधींना निलंबित करण्याची, सदस्यत्व रद्द करण्याची किंवा तुरुंगात पाठवण्याची शिफारस केली, तर सरकार ती मंजूर करू शकते. मात्र, यापूर्वीही राहुल गांधींविरोधात 5 वेळा विशेषाधिकार भंगाची नोटीस दाखल करण्यात आली आहे, परंतु कधीही कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. प्रश्न-5: यापूर्वीही राहुल गांधींविरोधात विशेषाधिकार नोटीस आणली गेली आहे का? उत्तर: यापूर्वी संसदेत राहुल गांधींविरोधात 6 वेळा विशेषाधिकार नोटीस दाखल करण्यात आली आहे… 1. 2017: डिसेंबर 2017 मध्ये राहुल गांधींनी सोशल मीडियावर अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याबद्दल एक पोस्ट केली होती. त्यात त्यांनी इंग्रजीमध्ये जेटलींच्या स्पेलिंगमध्ये Jaitlie असे लिहिले होते. इंग्रजीमध्ये lie चा अर्थ खोटे असा होतो. भाजप खासदार भूपेंद्र यादव यांनी आरोप केला की राहुल गांधींनी जाणूनबुजून असे केले आणि त्यांच्याविरुद्ध विशेषाधिकार भंगाची नोटीस दाखल केली. मात्र, या प्रकरणात कोणतीही गंभीर कारवाई झाली नाही. 2. 2018: 2018 च्या लोकसभेत अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान राहुल गांधींनी राफेल करारावर आरोप केला होता की, UPA सरकारच्या काळात विमानाचा करार 520 कोटी रुपयांना निश्चित झाला होता, तर NDA सरकारच्या काळात किंमत वाढून 1,600 कोटी रुपये झाली. भाजप खासदार अनुराग ठाकूर, निशिकांत दुबे आणि संजय जयस्वाल यांनी त्यांच्यावर सभागृहाला चुकीच्या मार्गावर नेल्याचा आरोप करत विशेषाधिकार भंगाची नोटीस दिली. मात्र, हे प्रकरण पुढे सरकू शकले नाही. 3. 2021: राहुल गांधींनी शेतकरी आंदोलनात जीव गमावलेल्या शेतकऱ्यांसाठी लोकसभेत 2 मिनिटे मौन पाळण्याची विनंती केली. त्यांच्यासोबत टीएमसी आणि डीएमकेचे खासदारही उभे राहिले. यासाठी अध्यक्षांची परवानगी घेण्यात आली नव्हती. भाजप खासदार संजय जयस्वाल, राकेश सिंह आणि पी. पी. चौधरी यांनी राहुल यांच्या या कृतीला सभागृहाच्या नियमांविरुद्ध ठरवले आणि विशेषाधिकार भंगाची नोटीस दिली. या प्रकरणातही कोणतीही मोठी कारवाई झाली नाही. 4. 2022: लोकसभेत राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर आरोप केला होता की ते इस्रायलला जाऊन लोकांची हेरगिरी करण्याचे सामान आणतात. ते म्हणाले की, 'न्यायव्यवस्था, निवडणूक आयोग, पेगासस, हे सर्व आवाज दाबण्याचे साधन बनले आहेत.' खासदार निशिकांत दुबे म्हणाले की राहुल गांधींनी संविधानाबद्दल चुकीचे सांगितले आणि लोकांना भडकवण्याचा प्रयत्न केला, जो विशेषाधिकारांचा भंग आहे. मात्र, यावरही विशेष कारवाई झाली नाही. 5. 2023: राहुल गांधींनी हिंडेनबर्ग अहवालाच्या आधारे पंतप्रधान मोदींवर आरोप केला होता की ते उद्योगपती गौतम अदानींना फायदा पोहोचवत आहेत. भाजप खासदार निशिकांत दुबे आणि संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी राहुल गांधींविरोधात विशेषाधिकार भंगाची नोटीस दिली. त्यांच्या विधानाला खोटे आणि दिशाभूल करणारे म्हटले, परंतु कोणतीही शिक्षा झाली नाही. 6. 2025: लोकसभेत राहुल गांधींनी दावा केला की चीनची सेना भारतीय भूभागात घुसली आहे, 'मेक इन इंडिया'चे अपयश हे त्याचे कारण आहे. भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना विशेषाधिकार भंगाची नोटीस दिली. किरेन रिजिजू आणि एस. जयशंकर यांनीही त्यांच्या विधानाला खोटे म्हटले. या प्रकरणातही मोठी कारवाई झाली नव्हती. मात्र, 2023 मध्ये एकदा राहुल गांधींचे सदस्यत्व रद्द झाले आहे. खरं तर, 2019 मध्ये कर्नाटकातील सभेत त्यांनी म्हटले होते की, 'सर्व चोरांचे आडनाव मोदी का असते?' त्यानंतर राहुल गांधींविरोधात मानहानीचा खटला दाखल झाला. मार्च 2023 मध्ये सुरतच्या मॅजिस्ट्रेट कोर्टाने त्यांना दोषी ठरवत 2 वर्षांची शिक्षा सुनावली. निकाल आल्यानंतर त्यांनी लगेच जामिनासाठी अपील केले होते, ज्यामुळे राहुलला तुरुंगात जावे लागले नाही. काही तासांनंतरच लोकसभा सचिवालयाने राहुलचे सदस्यत्व रद्द केले. खरं तर, लोकप्रतिनिधित्व अधिनियम (RP Act) 1951 नुसार, जर कोणताही खासदार गुन्हेगारी प्रकरणात दोषी आढळला आणि त्याला किमान दोन वर्षांची शिक्षा झाली, तर त्याचे सदस्यत्व रद्द केले जाते. राहुलने या निर्णयाविरुद्ध आधी उच्च न्यायालयात आणि नंतर सर्वोच्च न्यायालयात अपील केले. ऑगस्टमध्ये सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयाला स्थगिती दिली, ज्यामुळे त्यांचे सदस्यत्व पुन्हा बहाल झाले. प्रश्न-6: सबस्टँटिव्ह मोशन काय आहे, ज्या अंतर्गत राहुल गांधींचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे? उत्तर: अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची निवड, राष्ट्रपतींचे अभिभाषण, सार्वजनिक हिताच्या मुद्द्यांवर चर्चा, अविश्वास प्रस्ताव, अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष यांना पदावरून दूर करण्यासाठी सामान्यतः सबस्टँटिव्ह मोशन आणले जाते. सबस्टँटिव्ह मोशन एक स्वतंत्र आणि पूर्ण प्रस्ताव आहे. तो मंजूर करण्यासाठी सभागृहात सामान्य बहुमत आवश्यक आहे, म्हणजेच सभागृहात उपस्थित सदस्यांच्या 50%+1 मतांनी हा प्रस्ताव मंजूर होईल. जर अध्यक्षांनी प्रस्ताव मांडण्याची परवानगी दिली, तर स्वतः निशिकांत दुबे यांना तो सादर करावा लागेल. 2005 मध्ये 11 खासदारांवर आरोप होता की त्यांनी पैसे घेऊन सभागृहात प्रश्न विचारले आहेत. त्यांना निलंबित करण्यासाठी सभागृहात एक 'सबस्टँटिव्ह मोशन' (मूलभूत प्रस्ताव) आणण्यात आला होता, जो बहुमताने मंजूर झाला. लोकसभेचे माजी सरचिटणीस पी. डी. टी. आचार्य यांनी निशिकांत दुबे यांच्या नोटिशीच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आचार्य यांच्या मते, 'सर्व प्रस्ताव (मोशन) मूलभूत (सबस्टँटिव्ह) असतात. प्रस्ताव एखाद्या नियमाखाली आणला जातो. ते कोणत्या नियमाखाली प्रस्ताव आणत आहेत? जर सभागृहाचा अवमान केला असेल, तर अवमानाची नोटीस असायला पाहिजे. त्यानंतर विशेषाधिकार समिती (प्रिव्हिलेज कमिटी) त्याची चौकशी करेल आणि आपला अहवाल देईल. या अहवालावर सभागृहात चर्चा होईल. खासदाराच्या निलंबनाचा हाच मार्ग आहे, याशिवाय दुसरा कोणताही मार्ग नाही.'

दिव्यमराठी भास्कर 13 Feb 2026 7:11 am

Professor Recruitment : यूजीसीचे नियम धाब्यावर? प्राध्यापक भरतीचा नवा अध्यादेश वादाच्या भोवऱ्यात; वाचा काय आहे नवा पेच

Professor Recruitment : शासनाचा नवा अध्यादेश जारी, मात्र NIRF रँकिंगच्या अटीमुळे नामांकित विद्यापीठांतील विद्यार्थ्यांनाच फायदा मिळणार असल्याचा आरोप.

दैनिक प्रभात 13 Feb 2026 7:10 am

Pune DPC Meeting : पुणे जिल्हा नियोजन समितीचा १ हजार ३२ कोटींचा आराखडा मंजूर; कोणत्या कामांना मिळणार प्राधान्य? पाहा

Pune DPC Meeting : प्रशासकीय मान्यता ते निविदा प्रक्रिया; कामांचा दर्जा आणि कालमर्यादा पाळण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश.

दैनिक प्रभात 13 Feb 2026 7:01 am

Shirur Crime : शिरूरच्या ग्रामीण भागात चोरट्यांचा हैदोस! ५ रोहित्र फोडली, भरदिवसा घरफोडी; नागरिकांमध्ये दहशत

Shirur Crime : मलठण ते सविंदणे परिसरात चोरीच्या घटना वाढल्याने नागरिक संतापले; नियमित रात्रगस्त आणि कडक बंदोबस्ताची मागणी.

दैनिक प्रभात 13 Feb 2026 7:00 am

PMC Abhay Yojana : फक्त ४८ तास शिल्लक! महापालिकेची अभय योजना संपणार; कर भरा नाही तर, मिळकत होणार जप्त

PMC Abhay Yojana : थकबाकीदारांच्या सोयीसाठी शनिवारी आणि रविवारी रात्री ८ वाजेपर्यंत कर संकलन केंद्रे खुली; ऑनलाइन पेमेंटचा पर्यायही उपलब्ध.

दैनिक प्रभात 13 Feb 2026 7:00 am

Pune News : अखेर नगर विकास विभागाचा आदेश निघाला! २३ गावांच्या बांधकाम परवानगीचे अधिकार आता महापालिकेकडे

Pune News : २३ गावांचे विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून महापालिकेची नियुक्ती, नगर विकास खात्याकडून शिक्कामोर्तब.

दैनिक प्रभात 13 Feb 2026 7:00 am

यूपी निवडणुकीपूर्वी मायावतींना मोठा बंगला का मिळाला?:अखिलेश यांना सर्वात मोठा शत्रू म्हटले, योगींच्या भेटीनंतर काय बदलले!

एप्रिल, २०२४ ची गोष्ट आहे. लोकसभा निवडणुका होणार होत्या. मायावतींचे पुतणे आकाश आनंद उत्तर प्रदेशातील सीतापूर येथे रॅली घेण्यासाठी पोहोचले होते. त्यांनी भाजपला द्वेष पसरवणारा आणि दहशतवाद्यांचा पक्ष म्हटले. यामुळे बुआ मायावती इतक्या नाराज झाल्या की त्यांनी तत्काळ आनंद यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले. मायावतींनी आकाश यांना पदावरून हटवण्याची गोष्ट केवळ कार्यालयात जारी केलेल्या पत्रापुरती मर्यादित ठेवली नाही, तर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिले, 'आकाश आनंदकडून पद काढून घेण्यात आले आहे. त्यांना अजून पूर्णपणे परिपक्व होण्यासाठी वेळ लागेल.' आकाश समाजवादी पक्षाच्या विरोधातही खूप बोलत होते, पण मायावती त्यावर गप्प राहिल्या. संदेश स्पष्ट होता की मायावती भाजपवर हल्ला करणे टाळत होत्या. होय, राजकीय विधान करण्याची सूट होती. मायावती स्वतः रॅलींमध्ये भाजपच्या विरोधात राजकीय विधान करत होत्या. यानंतर त्यांची भाजपशी जवळीक असल्याचे संकेत येऊ लागले. 9 ऑक्टोबर 2025 रोजी एका रॅलीत त्यांनी भाजपचे आभार मानले आणि मुख्यमंत्री योगींचे आभार व्यक्त केले. जानेवारी 2026 मध्ये मायावतींना दिल्लीत आणखी एक बंगला मिळाला आहे. हा टाईप-8 बंगला आहे, तर राष्ट्रीय पक्षाच्या अध्यक्षा असल्याने त्यांना टाईप-6 किंवा 7 बंगलाच मिळू शकतो. भाजप आणि मायावती यांच्यात काहीतरी शिजत आहे का, दोघांमध्ये अधिकृत युती नसली तरी, आतून काहीतरी साटंलोटं झाले आहे का, मायावतींना मिळालेला बंगला याचंच परिणाम आहे का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. लोकसभा निवडणुकीपासून आतापर्यंत बसपा-भाजपचे समीकरण समजून घ्या… नेत्यांना आदेश - भाजपवर तीव्र टीका करू नकालोकसभा निवडणुकीदरम्यान आकाश आनंद भाजपवर जोरदार टीका करत होते. एका सभेत त्यांनी म्हटले, ‘भाजपने केंद्रातील बहुतेक तपास यंत्रणांचे राजकीयीकरण केले आहे.’ दुसऱ्या सभेत ते म्हणाले, ‘सवर्ण जातींमधील गरिबांची अवस्था भाजपच्या राजवटीत खूप वाईट आहे. जर निष्पक्ष निवडणुका झाल्या तर भाजप सत्तेतून बाहेर पडेल.’ 28 एप्रिल 2024 रोजी सीतापूरच्या निवडणूक रॅलीत आकाशने भाजपला द्वेष पसरवणारे पक्ष म्हटले, तेव्हा त्यांना पक्षातून बाहेर काढण्यात आले. मात्र, माफी मागितल्यानंतर त्यांना पुन्हा पक्षात स्थान मिळाले. येथे मायावतींचा दृष्टिकोन स्पष्ट दिसला की भाजपवर तीव्र हल्ले करणे टाळावे. यावर भाजपच्या प्रदेश स्तरावरील एका नेत्याने सांगितले, 'लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजपला लक्ष्य करून तीव्र विधाने करण्यावर बंदी होती. आम्हाला फक्त राजकीय विधाने करण्यास सांगितले होते. भाजपच्या राष्ट्रभक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करू नका आणि त्याला जातीयवादीही म्हणू नका. माध्यमांमध्ये जी विधाने सुरू आहेत, ती देऊ शकता. आम्ही समजलो होतो की आम्हाला समाजवादी पक्षाला लक्ष्य करायचे आहे. भाजपबद्दल बहनजींचा दृष्टिकोन नरम आहे.' ‘तरीही बहनजी कधी, कोणता निर्णय घेतील, हे कोणालाच माहीत नाही. हे निश्चित आहे की आता अखिलेशसोबत तर त्या समझोता करणार नाहीत. मात्र त्यांचे भाजपसोबत खूप चांगले संबंध नसले तरी त्या सामान्य संबंध ठेवू इच्छितात.‘ भाजप आणि बसपा यांच्यात काही साटंलोटं झालं आहे का? सूत्रांनुसार, ‘नाही, असा कोणताही थेट संदेश नाही पण भाजपवर हल्ला करण्याचा कोणताही आदेश नाही.‘ बसपाच्या मोठ्या रॅलीपूर्वी मायावती योगींना भेटल्याबसपाने 9 ऑक्टोबर 2025 रोजी लखनौमध्ये अनेक वर्षांनंतर मोठी रॅली काढली. तेव्हा कांशीराम यांची पुण्यतिथी होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'मायावती आणि त्यांचे जवळचे सतीश चंद्र मिश्रा या रॅलीच्या सुमारे 15 दिवसांपूर्वी यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना भेटले होते. त्यांच्यात काय चर्चा झाली, हे माहीत नाही. मात्र, या भेटीनंतर रॅलीचा कार्यक्रम आणखी मोठा करण्यात आला. यानंतर कोणत्याही अधिकृत युतीवर चर्चा झाली नाही.' ‘रॅलीत मायावतींनी समाजवादी पक्षावर जोरदार टीका केली. त्या म्हणाल्या की, सपा सरकारमध्ये असताना पीडीए (मागास-दलित-अल्पसंख्याक) ला आठवत नाही. कांशीराम यांची जयंती विसरतात, पण सत्तेतून बाहेर पडल्यावर त्यांना कांशीराम आठवतात.‘ रॅलीमध्ये कार्यकर्त्यांना सांगण्यात आले की, मायावती त्यांच्या मतदारांना (दलितांना) संदेश देतील की त्यांची थेट लढत समाजवादी पक्षाशी आहे. काँग्रेसवरही त्यांची वक्रदृष्टी आहे. तर भाजपसाठी त्यांची भूमिका आभार व्यक्त करणारी होती. सूत्रांनी सांगितले की, 'रॅलीनंतर बहनजींचा संदेश तळागाळापर्यंत पोहोचला आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी आम्ही घरोघरी जाण्याची योजना आखत आहोत. काही भागांमध्ये तर 'घरोघरी जा' अभियान सुरूही झाले आहे.' निवडणूक रणनीती बनवण्यात RSS बीएसपीचा मदतगार ठरला का?आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या यूपीमधील एका सक्रिय पदाधिकाऱ्याला विचारले की बीएसपी अचानक भाजपवर इतकी मवाळ का झाली? उत्तर मिळाले, ‘बीएसपीची सध्याची स्थिती पाहता, तिच्या जिंकण्याची शक्यता खूप कमी आहे. जर ती योग्य रणनीतीने लढली, तर काही जागा जिंकू शकते.‘ ‘दुसरीकडे समाजवादी पक्ष यावेळी पूर्णपणे तयार आहे. अशा परिस्थितीत बीएसपी जितकी सक्रिय होईल, तितके नुकसान समाजवादी पक्षाचे होईल. जर मायावती भाजपवर मवाळ राहिल्या, तर त्यांचे मतदारही भाजपवर मवाळ राहतील.' यावेळी RSS बीएसपीला रणनीती बनवण्यात मदत करत आहे का? यावर पदाधिकाऱ्याचे उत्तर थेट नव्हते. ते म्हणतात, 'RSS चे दरवाजे सर्वांसाठी खुले आहेत. जो मदत मागेल, त्याला ती दिली जाईल.' यावेळी बीएसपी शांतपणे काम करत आहे. पक्षाचे कार्यकर्ते मतदारांच्या घरोघरी जात आहेत. योजना अशी आहे की मायावती स्वतः यूपीच्या प्रत्येक मंडळात जातील आणि तिथेच रात्री थांबतील. त्या मार्चपासून हे अभियान सुरू करतील. यादरम्यान चौपाळ (ग्रामसभा) आयोजित केल्या जातील.' पक्षाच्या निवडणूक रणनीतीवर बसपाचे एक नेते म्हणतात, ‘आरएसएसचे लोक रणनीती बनवण्यात सहभागी दिसले नाहीत, पण जी रणनीती बनवली आहे, ती आरएसएसच्या मॉडेलवर आधारित आहे. यावेळी घरोघरी जाऊन प्रचार करण्यावर भर दिला जात आहे.’ मायावतींना लुटियन दिल्लीत मोठा बंगला कसा मिळाला?मायावतींना 7 डिसेंबर 2021 रोजी दिल्लीतील लोधी रोडवर टाइप-6 चा बंगला क्रमांक- 29 मिळाला होता. काही महिन्यांनंतर त्यांनी त्याचे केंद्रीय कार्यालयात रूपांतर केले. सुमारे दोन वर्षांनंतर फेब्रुवारी 2024 मध्ये मायावतींना याच रोडवर आणखी एक बंगला मिळाला. हा टाइप-7 चा बंगला क्रमांक-35 होता. हे देखील मायावती आणि भाजप यांच्यातील चांगल्या संबंधांचे संकेत मानले गेले. मे-जून 2024 मध्ये त्या बंगल्यात शिफ्ट झाल्या, पण एका वर्षानंतर 20 मे 2025 रोजी त्यांनी तो रिकामा केला. समोर असलेल्या शाळेमुळे मायावतींना त्रास होत असल्याचे कारण सांगण्यात आले. मात्र, मायावतींनी बंगला घेतला तेव्हाही ही शाळा तिथेच होती. सूत्रांचे म्हणणे आहे की मायावतींनी बंगला रिकामा केला नाही, तर तो त्यांच्याकडून रिकामा करून घेण्यात आला होता. गृहनिर्माण आणि शहरी मंत्रालयाने त्यांच्याकडे दोन बंगले असल्याचे कारण देत तो रिकामा करून घेतला होता. मायावतींना तो रिकामा करायचा नव्हता, कारण त्यांनी तो आपल्या आवडीनुसार नूतनीकरण करून घेतला होता. तसेच, सांगितलेले कारणही त्यांना योग्य वाटले नव्हते. ‘विभागाकडून आदेश आला, मायावतींसाठी मोठा बंगला शोधा’जेव्हा त्यांना बंगला अलॉट करण्यात आला होता, तेव्हाही मंत्रालयाला माहीत होते की त्यांच्याकडे आधीच एक बंगला आहे. मग इतक्या महिन्यांनंतर विभागाला अखेर दोन बंगल्यांवर आक्षेप का आला? आम्ही हा प्रश्न गृहनिर्माण आणि शहरी मंत्रालयाच्या अधिकृत सूत्रांना विचारला. ते सांगतात, ‘ऑक्टोबर 2025 च्या शेवटच्या आठवड्यात विभागाकडे मायावतींसाठी टाइप-8 बंगल्याच्या शोधाचा आदेश आला. तेव्हा विभागाकडे कोणताही बंगला रिकामा नव्हता. विभागाला एक महिन्यापूर्वी सप्टेंबरमध्येच आणखी एका माजी पदाधिकाऱ्यासाठी टाइप-8 बंगला शोधण्याचा आदेश मिळाला होता. त्यांना एपीजे अब्दुल कलाम रोडवरील बंगला क्रमांक-34 वाटपही करण्यात आला होता. सूत्रांनुसार, बंगल्यात दुरुस्तीचे बरेच काम व्हायचे होते. यासाठी आदेशही जारी करण्यात आला होता. तेव्हा वरून सांगण्यात आले की, आता दुरुस्ती करायची नाही. त्यानंतर या वर्षी 20-21 जानेवारी रोजी आदेश निघाला की, हा बंगला मायावतींच्या नावावर वाटप केला जाईल.' आम्ही गृहनिर्माण आणि शहरी मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याला विचारले की नियमानुसार मायावतींना कोणत्या प्रकारचा बंगला मिळायला हवा? उत्तर मिळाले, ‘राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष किंवा संयोजक आणि केंद्रातील मंत्र्याला विभाग टाइप 6 किंवा 7 बंगला देतो.’ मग टाइप-8 बंगला कसा अलॉट झाला? ते म्हणाले- हे विशेष शिफारसीने दिले जाऊ शकते. असे असू शकते की कोणताही टाइप-7 बंगला रिकामा नसेल. म्हणून टाइप-8 अलॉट करण्यात आला. मायावतींच्या बंगल्यावर होती केजरीवाल यांची नजर, मोदींच्या मंत्र्याला मिळालासूत्रांनी सांगितले की मायावतींकडून लोधी रोडवरील बंगला क्रमांक-35 घेऊन केंद्रीय मंत्री आणि नंतर यूपीचे अध्यक्ष बनलेल्या पंकज चौधरी यांना देण्यात आला. या बंगल्यावर आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांचीही नजर होती. मायावतींनी बंगला रिकामा केल्यावर अरविंद केजरीवाल यांनी राष्ट्रीय पक्षाचे संयोजक असल्याच्या हक्काने हाच बंगला अलॉट करण्याची विनंती केली होती. त्यांना बंगला मिळाला नाही. ऑक्टोबर 2025 मध्ये त्यांना लोधी रोडवर बंगला क्रमांक- 95 अलॉट करण्यात आला. मायावतींच्या नवीन बंगल्याचे नूतनीकरण सुरूगृहनिर्माण आणि शहरी मंत्रालयाच्या GRPA विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, बंगल्याचे नूतनीकरण सुरू झाले आहे. मे महिना संपण्यापूर्वी बंगल्याची दुरुस्ती पूर्ण करण्याचे आदेश आहेत. बसपाच्या सूत्रांनुसार, मायावती ठरवतील की त्यांना येथे कधीपर्यंत स्थलांतरित व्हायचे आहे. आधी या बंगल्याचे नूतनीकरण होईल. त्यानंतर मायावती स्वतः एकदा बंगला पाहण्यासाठी आणि त्यांच्या सोयीनुसार नूतनीकरणाचे निर्देश देण्यासाठी येऊ शकतात.

दिव्यमराठी भास्कर 13 Feb 2026 6:51 am

Shirur News : शिरूर तालुक्यात राजकीय भूकंप! ७१ ग्रामपंचायतींवर येणार प्रशासक; तुमचं गाव या यादीत आहे का?

Shirur News : मुदत संपणाऱ्या ७१ ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचे आदेश; राज्य सरकारच्या भूमिकेमुळे तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलली.

दैनिक प्रभात 13 Feb 2026 6:30 am

अग्रलेख : कोंडी टाळली

राहुल गांधी यांच्या विरोधात विशेषाधिकार प्रस्ताव न आणण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. तसे करून सरकारने संभाव्य कोंडीतून आपली सुटका करून घेतली. त्याचे कारण म्हणजे मागच्या काही दिवसांतील घडामोडी सरकारला बॅकफूटवर नेणार्‍या होत्या

दैनिक प्रभात 13 Feb 2026 6:00 am

Agriculture News : कांदा, गहू की हरभरा? धुक्यामुळे कोणत्या पिकाचा घास हिरावणार? शेतकऱ्यांची धाकधूक वाढली

Agriculture News : खरिपाच्या अवकाळीतून सावरण्यापूर्वीच रब्बीवर धुक्याचे सावट; कांद्याची रोपे आणि गव्हाच्या ओंब्यांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.

दैनिक प्रभात 13 Feb 2026 6:00 am

Jejuri News : शिखर लिंग ते गुप्त लिंग..महाशिवरात्रीला जेजुरी न्हाऊन निघणार! भाविकांच्या सोयीसाठी प्रशासनाचे तगडे नियोजन

Jejuri News : खंडोबा मंदिराच्या कळसातील शिवलिंग आणि स्वयंभू लिंग दर्शनासाठी खुले होणार; लाखो भाविकांच्या उपस्थितीची शक्यता.

दैनिक प्रभात 13 Feb 2026 5:30 am

लक्षवेधी : भूसंपादनाला गती

आता जमिनीच्या संपादनाचा अंतिम निवाडा, भरपाईची रक्कम आणि संपूर्ण कार्यवाहीचा सारांश जिल्हाधिकार्‍यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे बंधनकारक केले आहे

दैनिक प्रभात 13 Feb 2026 5:30 am

Maval Panchayat Samiti : सुनीता येवले मावळच्या नव्या ‘सभापती’! साहेबराव कारके उपसभापती; आमदारांनी केली घोषणा

Maval Panchayat Samiti : जिल्हा परिषदेच्या पाचही जागांवर राष्ट्रवादीचा विजय; मावळचे राजकीय वजन वाढले, जिल्हा पातळीवर मोठ्या पदाची अपेक्षा.

दैनिक प्रभात 13 Feb 2026 5:00 am