Nevasa Accident : महामार्गावर रक्ताचा सडा! एसटी बसची दुचाकीला जोरदार धडक; पती –पत्नी जागीच ठार
Nevasa Accident : छत्रपती संभाजीनगरहून लग्न उरकून परतणाऱ्या वाघमारे दांपत्याचा एसटी बसच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू; नेवासे फाटा परिसरात हळहळ.
PCMC News : पिंपरी चिंचवड महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीसाठी १५ हजार रुपये सण अग्रिम मंजूर.
Bailgada Sharyat : थोरवे फाउंडेशनच्या वतीने 'आमदार केसरी' बैलगाडा शर्यतीचे जंगी आयोजन; प्रथम क्रमांकासाठी आलिशान चारचाकी गाडीचे बक्षीस.
Maval Real Estate : मावळात जमिनीला सोन्याचा भाव, पण शेतकरी होतोय कंगाल? पाहा धक्कादायक वास्तव
Maval Real Estate : सह्याद्रीच्या कुशीतील मावळ तालुका ठरतोय गुंतवणुकीचा हॉटस्पॉट; फार्महाऊस आणि रिसॉर्टच्या नावाखाली शेकडो एकर जमिनी परक्यांच्या घशात.
Dehu Road News : सिस्टीम डाऊन की मुजोरी? गॅस एजन्सीच्या कारभारावर ग्राहकांचा प्रचंड संताप
Dehu Road News : तासनतास रांगेत उभे राहूनही कर्मचाऱ्यांकडून उद्धट वागणूक; कोहली गॅस एजन्सीच्या तक्रारींचा पाढा वाचत ग्राहकांनी केली कठोर कारवाईची मागणी.
Fake Baba Arrested : खालापूर हादरलं! भोंदू बाबाचा अघोरी विधीच्या नावाखाली महिलांवर अत्याचार
Fake Baba Arrested : काळी जादू आणि जादूटोण्याची भीती दाखवून महिलांचे लैंगिक शोषण; खालापूर आणि कळंबोलीत गुन्हे दाखल, आणखी पीडित समोर येण्याची शक्यता.
Satara Zilla Parishad : विधानसभा पुनर्रचनेनंतर विखुरलेल्या खटाव तालुक्याला मिळाले मोठे राजकीय प्रतिनिधित्व; आमदार महेश शिंदे यांच्या रणनीतीने विरोधक चितपट.
Gas Cylinder Scam : ग्राहकांची लूट आणि कर्मचाऱ्यांची अरेरावी महागात; जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडून विक्रम गॅस एजन्सीला ४ लाख रुपयांचा दंड.
दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ०६ एप्रिल २०२६
पंचांगआज मिती चैत्र पौर्णिमा शके १९४८.चंद्र नक्षत्र हस्त. योग व्याघात. चंद्र राशी कन्या. भारतीय सौर १६ चैत्र शके १९४८ . सोमवार दिनांक ६ एप्रिल २०२६. मुंबईचा सूर्योदय ०६.२८ मुंबईचा चंद्रोदय ०७.०८ , मुंबईचा सूर्यास्त ०६.५३ मुंबईचा चंद्रास्त ०६.३० राहू काळ ०२.१४ ते ०३.४७ . १५ पर्यन्त चांगलादैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)
Crop Damage : रहिमतपूर परिसरात निसर्गाचा कोप; अवकाळीने शेतकर्यांचे प्रचंड नुकसान
Crop Damage : काढणीला आलेली पिके जमिनीला टेकली! बांध फुटल्याने शेतजमीन वाहून गेली, सरकारने तातडीने पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी.
RCB vs CSK : गतविजेत्या आरसीबीने चेन्नई सुपर किंग्सचा ४३ धावांनी पराभव करत सलग दुसरा विजय नोंदवला.
Bhuvneshwar Kumar Record : चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या हाय-व्होल्टेज सामन्यात भुवीने विकेट्सचे 'द्विशतक' पूर्ण करत इतिहास रचला आहे.
Virat Kohli Record : बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर विराटने रोहित शर्माचा विक्रम मोडीत काढत पुन्हा एकदा नंबर-१ चे स्थान पटकावले आहे.
Eknath Shinde : जगाला युद्धाची नव्हे, बुद्धाची गरज! कर्मकांडात अडकू नका : एकनाथ शिंदे
Eknath Shinde : ठाण्यात आयोजित ८ व्या आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुद्धांच्या शांततेच्या विचारांचे महत्त्व पटवून दिले.
Pune News : पुण्यात भरधाव टँकरचा थरार; मोहम्मदवाडीत १९ वर्षीय तरुणाचा चिरडून मृत्यू
Pune News : पुण्याच्या मोहम्मदवाडी परिसरात टँकरने दुचाकीला धडक दिल्याने आरिफ शेख या १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे.
मुंबई: राज्याचं प्रशासन सेवेतलं सर्वोच्च स्थान, केंद्रबिंदु असलेल्या मंत्रालयात काही दिवसांपूर्वी एका अधिकाऱ्यास, मंत्र्याच्या स्वीय सहायकास लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली होती. त्यानंतर, मंत्रालयातल्या आणखी एका अधिकाऱ्याला लाच घेतला लाच लुचपत प्रतिबंधन विभागाने अटक केली आहे. खारघर परिसरात लाच घेताना सापळा रचून एसीबीकडून लाचखोर अधिकाऱ्यास बेड्या ठोकण्यात आल्या. अर्थ व नियोजन विभागात कक्ष अधिकारी म्हणून असणारे विलास लाड यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. निधी मंजूर करून देण्यासाठी तब्बल ६ लाख ३७ हजार रुपयांची मोठी लाच घेताना अटकेची कारवाई करण्यात आली.मंत्रालयातल्या कामासाठी लाच घेण्याचा प्रयत्न केल्याचं दुसर मोठ प्रकरण समोर आलं असून मंत्रालयातल्या लाचखोरीला चाप बसवण्यासाठी एसीबीने पुन्हा एकदा मोठी कारवाई केली आहे. विशेष म्हणजे मार्च महिन्यात एसीबीने कारवाईचा धडाका लावला होता, तेव्हा मार्च एन्डमुळे ही कारवाई होत असल्याची चर्चा प्रशासकीय वर्तुळात होती. मात्र, आता एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात एसीबीने पुन्हा एकदा आपला मोर्चा थेट मंत्रालयात वळवला आहे. मंत्रालयातील कक्ष अधिकारी असलेल्या विलास लाड याला रंगेहाथ अटक करण्यात आली. विशेष म्हणजे सर्वसामान्य माणसांचा एका वर्षाचा पगारही नसतो, तेवढी मोठी रक्कम लाच स्वरुपात हा अधिकारी एका दिवसात घेत होता. त्यामुळे, प्रशासन आणि सरकारी कार्यालयातील भ्रष्टाचार व सर्वसामान्यांची होणारी पिळवणूक हा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे.ग्रामविकास विभागाचा निधी मंजूर करुन देण्यासाठी या अधिकाऱ्याने लाच मागितली होती, त्यानुसार ६ लाख ३७ हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीने लाचखोर आरोपीस अटक केली. खारघर परिसरात एसीबीने ट्रॅप रचून ही कारवाई केल्याने मंत्रालयातील प्रशासकीय वर्तुळात आणि प्रशासनात खळबळ उडाली आहे.
Pakistan : पाकमध्ये अतिवृष्टीचे ४५ बळी; मृतांमध्ये २३ लहान मुलांचा समावेश
पाकिस्तानातील खैबर पख्तुनक्वा प्रांतात गेल्या १० दिवसात झालेल्या अतिवृष्टीशी संबंधित विविध दुर्घटनांमध्ये किमान ४५ जणांचा मृत्यू झाला आहे.
हे दोन्ही पक्ष सध्या महायुतीच्या सत्तेत सहभागी आहेत. मात्र उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अद्याप पूर्णपणे सावरलेला (Shivsena Operation Tiger) नाही.
Viral Video : “बाप असावा तर असा”; मुलीच्या घटस्फोटानंतर केलं अनोखं स्वागत, व्हिडिओ व्हायरल
Viral Video : मेरठमध्ये एका वडिलांनी आपल्या मुलीचा घटस्फोट झाल्यानंतर तिचे जल्लोषात स्वागत केले.
Congress: काँग्रेसकडून बारामती पोटनिवडणुकीत उमेदवार जाहीर
मुंबई: अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत अखेर राजकीय संघर्षाची ठिणगी पडली आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी महायुतीने शेवटपर्यंत प्रयत्न केले असले, तरी काँग्रेसने आपला उमेदवार रिंगणात उतरवत थेट आव्हान देण्याचे निश्चित केले आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बारामतीसाठी आकाश विश्वनाथ मोरे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले असून, यामुळे आता सुनेत्रा पवार विरुद्ध आकाश मोरे असा अधिकृत सामना रंगणार आहे.बारामती हा पवार कुटुंबाचा अभेद्य गड मानला जातो. अजित पवार यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी महायुतीतील घटक पक्षांनी मोर्चेबांधणी केली होती. मात्र, काँग्रेसने उमेदवार देण्याचा निर्णय घेतला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत सोमवारी सकाळी ११ वाजता आकाश मोरे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
Sanjiv Goenka Emotional : राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या अटीतटीच्या लढतीत कर्णधार ऋषभ पंतने आपल्या बॅटने टीकाकारांची बोलती बंद केली आहे.
उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. सीबीगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परधोली जवळ झालेल्या एका भीषण रस्ते अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव वेगाने येणाऱ्या एका बोलेरो गाडीने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका टँकरला धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की गाडी पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. अपघातानंतर, मृतदेह बाहेर काढण्यासाठी बोलेरो गाडी तोडावी लागली. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. जखमींना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.बोलेरोने टँकरला मागून दिली धडकमिळालेल्या माहितीनुसार, लखनौहून भरधाव वेगाने येणाऱ्या एका बोलेरो कारने बरेलीच्या सीबीगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परधोलीजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका टँकरला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, अनेक जणांचा जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, बोलेरो अतिशय भरधाव वेगाने धावत होती. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि गाडी थेट टँकरला धडकली. या धडकेनंतर वाहनाचा पुढचा भाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आणि गाडीतील प्रवासी आत अडकले.अति वेगामुळे झाला अपघातअपघाताची माहिती मिळताच, पोलिसांचे एक पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले, मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी पाठवले. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. अपघातानंतर एक मुलगा गाडीत अडकला होता. त्याला बाहेर काढण्यासाठी पोलीस व वाटसरूंनी बचावकार्य सुरू केले. कटर आणि इतर उपकरणांच्या साहाय्याने गाडी कापून मुलाला बाहेर काढण्यात आले. तसेच धडक बसल्यानंतर लगेचच मागून येणाऱ्या एका मोटरसायकलनेही गाडीला धडक दिली, ज्यामुळे अपघाताची तीव्रता आणखी वाढली. पोलिसांनी अपघाताच्या कारणांचा तपास सुरू केला आहे. प्राथमिक तपासानुसार, अतिवेग आणि निष्काळजीपणा ही अपघाताची कारणे असल्याचा संशय आहे.
Baramati Election 2026 : बारामती पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली आहे. बिनविरोध निवडणुकीचे प्रयत्न फसले असून आता बारामतीत तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या मृत्यूची अफवा.! व्हाइट हाउसने केले खंडन
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रकृतीबाबत उलट सुलट चर्चा सुरू असतानाच रविवारी सोशल मीडियावर ट्रम्प यांच्या मृत्यूची अफवा पसरली.
पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे देशातील एलपीजी (LPG Gas Cylinder) पुरवठा विस्कळीत झालेला असताना वितरक केंद्रांवर वैध ओळखपत्र दाखवून थेट (काउंटरवरून) खरेदी करता येणाऱ्या ५ किलोच्या लहान गॅस सिलिंडर्सची विक्री वाढवण्यात आली आहे.
Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 'बुद्ध रत्न'पुरस्कार प्रदान
- युद्ध नको, बुद्ध हवा; ठाण्यात आठव्या आंतरराष्ट्रीय धम्म परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिला समतेचा संदेशठाणे : बौद्ध धम्म हा केवळ धर्म नसून एक व्यापक सामाजिक विचारसरणी आणि परिवर्तनाची चळवळ आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केले. सम्राट अशोक जयंतीनिमित्त आयोजित आठव्या आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेत ते बोलत होते.बुद्धरत्न सागर वेलफेअर फाउंडेशनतर्फे (Buddharatna Sagar Welfare Foundation) गडकरी रंगायतन येथे हा भव्य कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात “नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय” या मंत्रोच्चारांनी झाली. गौतम बुद्ध (Gautama Buddha) आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून शिंदे यांनी उपस्थित भिक्खू संघ, विद्वान आणि धम्मप्रेमींचे स्वागत केले.या कार्यक्रमाला खासदार ज्योती वाघमारे, महापौर शर्मिला पिंपळोलकर, तसेच विविध देशांतून आलेले भिक्खू उपस्थित होते. ठाण्याच्या ऐतिहासिक वारशाचा उल्लेख करताना शिंदे म्हणाले की, सम्राट अशोक आणि सातवाहन काळात या भागात बौद्ध धर्माचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला होता. कान्हेरी लेणी आणि प्राचीन सोपारा येथील स्तूप हे त्याचे महत्त्वाचे पुरावे आहेत.धम्म परिषद ही सामाजिक परिवर्तनाची महत्त्वाची पायरी असल्याचे सांगत त्यांनी आयोजकांचे कौतुक केले. या वेळी शिंदे यांना ‘बौद्ध रत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. “अशा सन्मानांमुळे जबाबदारी वाढते आणि समाजासाठी अधिक काम करण्याची प्रेरणा मिळते,” असे त्यांनी नमूद केले. #ठाणे |सम्राट अशोक जयंतीचे औचित्य साधून आज आठव्या आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेचं आयोजन ठाणे शहरातील गडकरी रंगायतन येथे करण्यात आले होते. बुद्धरत्न सागर वेलफेअर फाउंडेशन आयोजित या कार्यक्रमाला उपस्थित राहून माझे मनोगत सादर केले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला “नमो बुद्धाय, नमो… pic.twitter.com/YhxRZN01i8— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) April 5, 2026शिंदे यांनी महाकवी वामनदादा कर्डक Waman Dada Kardak यांच्या ओळी उद्धृत करत बौद्ध विचारांचे महत्त्व अधोरेखित केले. “बौद्ध धम्म हा दुःखातून मुक्ती देणारा मार्ग असून तो सत्य, अहिंसा आणि करुणेवर आधारित जीवनपद्धती आहे,” असे त्यांनी सांगितले.१४ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घेतलेल्या धम्मदीक्षेमुळे लाखो लोकांना समानता आणि स्वाभिमानाचा मार्ग मिळाला, असेही त्यांनी स्पष्ट केले. “बुद्ध पेरला की बाबासाहेब उगवतात,” असे म्हणत त्यांनी गौतम बुद्धांच्या विचारांचा समाजावर झालेला प्रभाव अधोरेखित केला.जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शांततेचा संदेश देताना “जगाला युद्ध नको, बुद्ध हवा,” असे सांगितले. “द्वेषाने द्वेष संपत नाही, प्रेमानेच तो संपतो,” हा बुद्धांचा संदेश आजच्या काळात अधिक महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले.भाषणाचा समारोप करताना त्यांनी, “न तलवार की धार से, न गोलियों की बौछार से… दुनिया बदलेगी तो सिर्फ बुद्ध के विचार से,” या ओळींमधून शांततेचा आणि मानवतेचा संदेश दिला.
Baramati Assembly by-election : बारामती पोटनिवडणुकीत महायुती सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी
- निवडणूक बिनविरोध करण्याचे उपमुख्यमंत्री शिंदेंचे इतर सर्व पक्षांना आवाहनठाणे : बारामती विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी महायुतीकडून सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ही जागा दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झाली आहे.दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सर्व पक्षांनी सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देत ही निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले आहे. ठाणे येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, अशा परिस्थितीत महाराष्ट्रात पोटनिवडणुका बिनविरोध करण्याची परंपरा राहिली आहे. महायुती सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना याच भावनेतून सर्व पक्षांनी सकारात्मक विचार करावा, असे आवाहन केले.महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) बारामती पोटनिवडणूक लढवणार नसेल तर काँग्रेस महायुतीच्या विरोधात उमेदवार देणार असल्याचे यापूर्वीच स्पष्ट करण्यात आले आहे. याबाबत दिल्लीतील नेत्यांची देखील परवानगी मिळाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे बारामतीमधून काँग्रेसकडून उमेदवार निश्चित करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.एकीकडे काँग्रेसने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले असताना दुसरीकडे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी देखील आपण उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे सांगितले आहे. ते उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार असून विविध राजकीय पक्षांचा पाठिंबा असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
SRH vs LSG : कर्णधार ऋषभ पंतने एकाकी झुंज देत लखनऊला या हंगामातील पहिला विजय मिळवून दिला.
राज्याच्या राजकारणात गेल्या चार वर्षांपासून सत्तेसाठी फोडाफोडीचे राजकारण (Maharashtra Politics) सुरू असल्याचे चित्र आहे. जून २०२२ मध्ये शिवसेना फुटली, जेव्हा एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंड केले.
Sambhajinagar News : महाराष्ट्र हळहळला ..! पोहायला गेलेल्या 4 तरुणांचा बुडून मृत्यू, परिसरात शोककळा
Sambhajinagar News : हर्सूल तलावात ४ तरुणांचा बुडून मृत्यू झाला आहे. अग्निशमन दलाने शोधमोहीम राबवून मृतदेह बाहेर काढले
आयपीएल २०२६ स्पर्धेत रविवारी (५ एप्रिल) डबल हेडर सामन्यांचा थरार रंगला असून हैदराबादच्या मैदानावर झालेल्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) संघाने दमदार सुरुवात केली. कर्णधार रिषभ पंत (Rishabh Pant) याने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि गोलंदाजांनी तो सार्थकी लावला.या सामन्यात मोहम्मद शामी (Mohammed Shami) याने अप्रतिम कामगिरी करत इतिहास रचला. त्याने अवघ्या ४ षटकांत केवळ ९ धावा देत २ बळी घेतले. त्याची इकॉनॉमी २.२० इतकी प्रभावी होती. या कामगिरीमुळे तो लखनऊसाठी ४ षटकांच्या स्पेलमध्ये सर्वात कमी धावा देणारा गोलंदाज ठरला.गेल्या काही महिन्यांपासून मोहम्मद शामीच्या निवृत्तीची चर्चा रंगल्या होत्या. मात्र त्याने आयपीएलच्या १९ व्या हंगामातील पहिल्या दोन सामन्यांमध्येच आपल्या गोलंदाजीच्या जोरावर निवृत्तीच्या चर्चांना चोख उत्तर दिलं आहे.Shamifesting more wickets pic.twitter.com/UwhVVxIM1b— Lucknow Super Giants (@LucknowIPL) April 5, 2026शमीने आपल्या स्पेलची सुरुवातच आक्रमक पद्धतीने केली. पहिल्याच षटकात त्याने अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) याला बाद केले, तर पुढील षटकाच्या पहिल्याच चेंडूवर स्फोटक फलंदाज ट्रॅव्हिस हेड (Travis Head) याला माघारी पाठवले. यापूर्वीच्या सामन्यात त्याने के एल राहुल (KL Rahul) याला पहिल्याच चेंडूवर बाद केले होते. या कामगिरीमुळे त्याने पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या यादीत जाहीर खान (Zaheer Khan) याला मागे टाकत सातव्या स्थानावर झेप घेतली. या यादीत भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) अव्वल स्थानावर आहे.☝️ Abhishek Sharma☝️ Travis HeadVintage #MohammadShami! #SRH’s dangerous duo is gone, and #LSG are off to a great start! #TATAIPL 2026 | #SRHvLSG | LIVE NOW https://t.co/X6t7Rxs79d pic.twitter.com/CnjvNzYwqv— Star Sports (@StarSportsIndia) April 5, 2026विशेष म्हणजे, शमी मागील हंगामात सनरायझर्स हैद्राबाद (Sunrisers Hyderabad) संघाचा भाग होता. २०२५ मध्ये त्याचा फॉर्म खराब राहिला होता. त्याने ९ सामन्यांत फक्त ६ विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे त्याला ट्रेडद्वारे एलएसजीमध्ये आणण्यात आले. मात्र, यंदा त्याने आपल्या जुन्याच संघाविरुद्ध शानदार कमबॅक करत सर्वांना प्रभावित केले.दरम्यान, एलएसजीचे मालक संजीव गोएंका (Sanjiv Goenka) सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित होते. शमीची घातक गोलंदाजी पाहून त्यांनी तिरुपती बालाजींचा फोटो डोक्याला लावत आनंद व्यक्त केल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
Air India : एअर इंडियाकडून ३१ पर्यंत इस्रायलची विमानसेवा स्थगित
या भारतीय नागरिकांना वैयक्ति किंवा व्यवसायिक कारणांसाठी भारतात परत येणे यामुळे अवघड झाले आहे.
Rishabh Pant Catches : ऋषभ पंतने यष्टीमागे हवेत झेपावत दोन असे झेल टिपले, ज्यामुळे हैदराबादच्या मोठ्या धावसंख्येच्या मनसुब्यांना सुरुंग लागला.
IAS Tukaram Mundhe : माजी सचिव तुकाराम मुंढे यांनी आपल्या आईच्या निधनानंतर पारंपरिक प्रथा बाजूला ठेवून पर्यावरणपूरक पद्धतीने अस्थी विसर्जन केले.
केरळमधील शबरीमला मंदिर (Sabarimala Temple) प्रवेश प्रकरणावर आता सर्वोच्च न्यायालयात ९ न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर ७ एप्रिलपासून अंतिम सुनावणी होणार आहे.
पुढील काही दिवसांनंतर कुणाचा चेहरा पुढे करायचा का याविषयीचा निर्णय सर्वस्वी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा असेल.
मुंबई–पुणे एक्सप्रेसवे होणार १० पदरी; टोल वसुली....
२०६० पर्यंत टोल वसुली सुरूचमुंबई : वाढत्या वाहतुकीमुळे कायम कोंडीचा सामना करणाऱ्या मुंबई–पुणे एक्सप्रेसवे वर आता मोठा बदल होणार आहे. मागेच घाटात एक प्रोपोलिन गॅस ने भरलेला टेम्पो उलटला होता त्यामुळे प्रचंड ट्रॅफिक झाले आणि नागरिकांना तिकडेच २ दिवस अडकून राहावे लागले. अनेक पर्यायी मार्गांचा शोध घेत नागरिकांनी आपली सुटका करून घेतली, अशी परिस्थिती पुन्हा उदभवू नये म्हणून सरकारने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे. महामार्गाचे १० पदरीकरण करण्याचा महत्त्वाचा निर्णय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) घेतला असून, यामुळे प्रवास अधिक वेगवान आणि सुरक्षित होणार आहे.प्रकल्पाला लवकरच गतीमिळालेल्या माहितीनुसार, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम येत्या पावसाळ्यानंतर सुरू होणार आहे. टप्प्याटप्प्याने काम पूर्ण करत पुढील ३ वर्षांत, म्हणजेच २०२९-३० पर्यंत संपूर्ण विस्तार पूर्ण करण्याचे उदिष्ठ आहे. सध्या असलेल्या मार्गावर वाढत्या वाहनसंख्येमुळे निर्माण होणारी कोंडी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.टोल वसुलीचा कालावधी वाढणारया प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर निधी लागणार असून, तो वित्तीय संस्थांकडून कर्जाच्या माध्यमातून उभारला जाणार आहे. या कर्जाची परतफेड करण्यासाठी सध्याच्या टोल वसुलीची मुदत १५ वर्षांनी वाढवण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे आता या मार्गावर टोल वसुली २०४५ ऐवजी २०६० पर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे.मिसिंग लिंक प्रकल्पही निर्णायकदरम्यान, एक्सप्रेसवेवरील महत्त्वाचा १३ किमीचा ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास घाटातील वळणे आणि अपघातप्रवण भाग टाळून प्रवास अधिक सुरक्षित आणि जलद होणार आहे. शिवाय मुंबई–पुणे अंतर कमी होऊन वेळेची बचत होईल.वाहतुकीवर परिणाम टाळण्याचा प्रयत्नविस्तारीकरणाचे काम सुरू असताना वाहतूक विस्कळीत होऊ नये यासाठी विशेष नियोजन करण्यात येणार आहे. टप्प्याटप्प्याने काम करून प्रवाशांना कमीत कमी अडचण येईल, याची काळजी MSRDC कडून घेतली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.एकीकडे १० पदरीकरण दुसरीकडे टोल वसुलीचा कालावधी वाढणार असला, तरी मिसिंग लिंक प्रकल्पामुळे मुंबई–पुणे प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सुलभ होणार आहे. भविष्यातील वाहतूक लक्षात घेता हा प्रकल्प महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
Abhishek Sharma Record : या सामन्यात अवघ्या २ चेंडूंत शून्यावर बाद झाल्याने अभिषेकच्या नावावर एका नकोशा विक्रमाची नोंद झाली आहे.
Iran Attack on Kuwait : इराणचा कुवैतमधील मंत्रालयाच्या इमारतींवर हल्ले
इराणने रविवारी (५ एप्रिल) कुवैतमधील अनेक इमारतींना लक्ष्य केले. कुवैतच्या वित्त मंत्रालयाने सांगितले की, तेल क्षेत्रात असलेल्या मंत्रालयाच्या एका कॉम्प्लेक्सवर हल्ला करण्यात आला. हा हल्ला इराणच्या आक्रमक भूमिकेचे द्योतक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ड्रोनच्या माध्यमातून हे हल्ले करण्यात आले असून त्यामध्ये मोठे नुकसान झाले आहे.या हल्ल्याचा एक व्हिडिओही शेअर करण्यात आला आहे. त्यामध्ये शुवैख तेल क्षेत्रातील कॉम्प्लेक्सचा एक भाग जळताना दिसत आहे. कॉम्प्लेक्समधून आगीच्या मोठ्या ज्वाला उसळताना दिसत आहेत. अधिकाऱ्यांनी पुष्टी केली आहे की, या हल्ल्यात आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. आपत्कालीन पथके आणि संबंधित अधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी प्रतिसाद दिला आहे.दरम्यान, वित्त मंत्रालयाने ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर याबाबत अधिकृत निवेदन जारी केले. कुवैतच्या सैन्यानेही सांगितले की, त्यांची हवाई संरक्षण प्रणाली येणाऱ्या क्षेपणास्त्र आणि ड्रोनना सक्रियपणे अडवत आहे. इराणने अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देत खाडी प्रदेशात आपले हल्ले सुरूच ठेवले आहेत.कुवैतच्या सैन्याने ‘एक्स’ वर पोस्ट करत म्हटले, “सध्या कुवैतची हवाई संरक्षण प्रणाली शत्रूच्या क्षेपणास्त्र आणि ड्रोनमधून निर्माण झालेल्या धोक्यांना प्रत्युत्तर देत आहे.” तसेच, जर कोणालाही स्फोटांचे आवाज ऐकू आले, तर ते हवाई संरक्षण प्रणालीने क्षेपणास्त्रे अडवल्यामुळे होत असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.कुवैतसह खाडीतील अनेक देश २८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या हल्ल्यांच्या प्रत्युत्तरात इराणच्या हल्ल्यांच्या कक्षेत आले आहेत. तेव्हापासून हे हल्ले वाढत जाऊन आता व्यापक प्रादेशिक संघर्षाचे रूप धारण करत आहेत.
Nanded Crime : टोळीयुद्धाने नांदेड शहर हादरले; एकाचा थेट रुग्णालयात घुसून खून
नांदेड शहरात शनिवारी (४ एप्रिल) मध्यरात्री पुन्हा एकदा टोळीयुद्धाचा भडका उडाला. येथील कुख्यात साईलाला आणि सदा गैंगमध्ये वर्चस्वाच्या वादातून मध्यरात्री झालेल्या संघर्षात तीन जणांची हत्या झाली. धक्कादायक बाब म्हणजे एकाची तर चक्क शासकीय रुग्णालयात घुसून हत्या करण्यात आली.अरिजितसिंग गजानन चव्हाण (२५, रा. बालाजीनगर, नांदेड) तर दुसऱ्या टोळीतील सय्यद आवेज सय्यद खलील (२७) आणि मोहम्मद अरबाज मोहम्मद फारुख (२३, रा. देगलूर नाका, नांदेड) यांचा मृतांमध्ये समावेश आहे. नांदेड शहर या टोळीयुद्धाने हादरले असून शहराच्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा एरणीवर आला आहे.घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेड शहरातील साईलाला आणि सदा टोळीत गेल्या अनेक महिन्यांपासून वर्चस्ववादाची लढाई सुरू आहे. या दोन्ही टोळ्यांमध्ये यापूर्वीही अनेकवेळा संघर्ष उडालेला आहे. दरम्यान सदा टोळीचा अरिजितसिंग चव्हाण हा शुक्रवारी रात्री कॅनाल रोडावील ई-स्क्वेअर परिसरात आपल्या दोन साथीदारांसह धुरंदर हा चित्रपट पाहण्यासाठी गेला होता. रात्री दीड वाजता चित्रपट संपल्यानंतर तो साथीदारांसह घराकडे निघताच आधीपासून तेथेच दबा धरून बसलेल्या साईलाला टोळीच्या आरोपींनी आवेज आणि अरचाजने अरिजितसिंगला आडविले आणि अचानक त्याच्यावर खंजरने हल्ला चढविला. काही क्षणातच अरिजितसिंग रक्ताच्या थारोळ्यात पडला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याचवेळी अरिजितच्या साथीदारांनीही धारदार शस्त्राने हल्ले केले.रुग्णालयात बेडवरच केली हत्या :अरिजितसिंगवर हल्या झाल्याची माहिती मिळताच त्याचा भाऊ राजेश चव्हाण हा टोळीतील काही साथीदारांसह रुग्णालयात दाखल झाला. आपल्या भावाचा मृत्यू झाल्याचे त्याला कळताच त्याच्या बाजूच्याच बेडवर उपचारासाठी ठेवलेला आवेज जिवंत असल्याचे कळताच चाकू काडून आवेजवर रुग्णालयातच सपासप वार केले. या हल्ल्यात आवेजचाही मृत्यू झाला.आधी रस्त्यावर आणि नंतर रुग्णालयातच घडलेल्या या हत्याकांडाने एकच खळबळ उडाली. रुग्णालयात एकच धावपळ उडाली. परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर तेथे उपस्थित पोलिसांनी हल्लेखोरांना पकडले. नंतर रुग्णालयात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला.
Top 10 News : मंत्रालयात लाचखोर अधिकारी जाळ्यात ते खरात प्रकरणात मुख्यमंत्र्यांची घोषणा..; वाचाच आजच्या १० टॉप बातम्या...
World Cup 2027 : एकदिवसीय विश्वचषकासाठी कर्णधाराची घोषणा! ‘या’खेळाडूकडे सोपवली मोठी जबाबदारी
World Cup 2027 : २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी आतापासूनच क्रिकेट विश्वात हालचाली सुरू झाल्या आहेत.
रॉयल एनफील्ड भारतीय बाजारपेठेतील तरुणांमध्ये खूप लोकप्रिय आहे. ही कंपनीच्या सर्वात परवडणाऱ्या बाईक्सपैकी एक आहे.
Akhilesh Yadav : जनगणनेशिवाय महिला आरक्षण नको; अखिलेश यादव यांचा केंद्र सरकारवर निशाणा
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला घेरले असून, संसदेत आणि विधानसभांमध्ये महिलांना आरक्षण देण्यापूर्वी नवीन जनगणना करणे अनिवार्य असल्याचे प्रतिपादन केले.
Mohammed Shami Record : हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर शमीने आपल्या अचूक माऱ्याने हैदराबादच्या फलंदाजांना गुडघे टेकण्यास भाग पाडले.
२०२६ आणि २०२७ ही वर्षेही अशीच असणार आहेत, कारण इंडस्ट्रीमध्ये अनेक मोठे आणि मेगा-बजेट चित्रपट रांगेत आहेत, ज्यामुळे प्रदर्शनापूर्वीच प्रचंड चर्चा निर्माण झाली आहे.
Ashok Kharat Case :
Middle East War : मध्य-पूर्व आशियातील युद्धामुळे युक्रेनवरील अमेरिकेचा वरदहस्त कमी होणार ?
झेलेन्स्की यांना व्यक्त केली भीतीकीव : पश्चिम आशियातील संकटाचा परिणाम जागतिक स्तरावर दिसून येत असून संपूर्ण जगात याबाबत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र या युद्धामुळे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की विशेषतः तणावाखाली आहेत. झेलेन्स्की यांनी अशी भीती व्यक्त केली आहे की अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष दीर्घकाळ चालल्यास युक्रेनला मिळणारा अमेरिकेचा पाठिंबा कमकुवत होऊ शकतो. त्यांनी सांगितले की वॉशिंग्टनच्या प्राधान्यक्रमात बदल झाल्यामुळे युक्रेनला अत्यंत आवश्यक असलेल्या पॅट्रियट एअर डिफेन्स क्षेपणास्त्रांच्या पुरवठ्यात घट होऊ शकते.इस्तंबूलमध्ये माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत झेलेन्स्की म्हणाले की, रशियाकडून दररोज होत असलेल्या हल्ल्यांना तोंड देण्यासाठी युक्रेनला अमेरिकेत तयार होणाऱ्या पॅट्रियट एअर डिफेन्स प्रणालीची अत्यंत गरज आहे. रशियाने चार वर्षांपूर्वी सुरू केलेल्या आक्रमणानंतर अग्रिम मोर्च्यासोबतच शहरी भागांवरही मोठ्या प्रमाणात हल्ले झाले असून हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. रशियाने युक्रेनच्या ऊर्जा पुरवठ्यालाही लक्ष्य केले आहे, ज्यामुळे ड्रोन आणि क्षेपणास्त्र उत्पादनात अडथळे निर्माण झाले आहेत आणि हिवाळ्यात नागरिकांना हीटिंग व पाण्यासारख्या मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागले.झेलेन्स्की म्हणाले, “आपल्याला हे मान्य करावे लागेल की सध्या आम्ही प्राधान्यक्रमात नाही. त्यामुळे इराण युद्ध दीर्घकाळ चालल्यास आम्हाला मिळणारा पाठिंबा कमी होईल, अशी मला भीती वाटते.” मॉस्को आणि कीव यांच्या प्रतिनिधींमध्ये अमेरिकेच्या मध्यस्थीने झालेली ताजी चर्चा फेब्रुवारीमध्ये कोणताही ठोस निष्कर्ष न निघता संपली. झेलेन्स्की यांनी रशियावर चर्चा लांबवण्याचा आरोप करत सांगितले की युक्रेन अजूनही संभाव्य करारासाठी अमेरिकन मध्यस्थांशी संपर्कात आहे आणि मजबूत सुरक्षा हमीची मागणी करत आहे. मात्र त्यांनी हेही मान्य केले की या चर्चांकडून जागतिक लक्ष काही प्रमाणात हटले आहे.ते पुढे म्हणाले की त्यांची सर्वात मोठी चिंता पॅट्रियट प्रणालीबाबत आहे, कारण रशियन बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांना रोखण्यासाठी ती अत्यंत महत्त्वाची असून सध्या युक्रेनकडे त्याचा प्रभावी पर्याय नाही. झेलेन्स्की यांच्या मते, सुरुवातीपासूनच या प्रणालींचा पुरेसा पुरवठा झाला नाही आणि इराणमधील युद्ध लवकर संपले नाही तर परिस्थिती आणखी कठीण होईल.झेलेन्स्की यांना आशा होती की युरोपीय देश पॅट्रियट प्रणाली खरेदी करण्यासाठी मदत करतील. मात्र आता सहाव्या आठवड्यात प्रवेश केलेल्या इराण युद्धामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का बसला असून पश्चिम आशियातील मोठा भाग त्याच्या प्रभावाखाली आला आहे. त्यामुळे मर्यादित संसाधनांवर अतिरिक्त दबाव निर्माण झाला आहे, शस्त्रसाठे इतर दिशेकडे वळवले जात आहेत आणि युक्रेनमधील शहरे बॅलिस्टिक हल्ल्यांसाठी अधिक असुरक्षित बनत आहेत.युक्रेनच्या रणनीतीचा एक महत्त्वाचा उद्देश मॉस्कोची अर्थव्यवस्था कमकुवत करणे आणि युद्ध महागडे बनवणे हा आहे. मात्र इराणने होर्मुझ सामुद्रधुनी बंद केल्यामुळे तेलाच्या किमती वाढल्या आहेत, ज्यामुळे रशियाचे उत्पन्न वाढत असून त्याची युद्धक्षमता मजबूत होत आहे. झेलेन्स्की म्हणाले की मध्यपूर्वेतील युद्धामुळे रशियाला आर्थिक फायदा होत आहे. त्यांनी रशियन तेलावरील अमेरिकन निर्बंधांमध्ये मर्यादित सवलत दिल्याचाही उल्लेख केला. ते म्हणाले, “रशियाला यामुळे अतिरिक्त पैसा मिळत आहे आणि त्याचा त्यांना फायदा होत आहे.”
Ashok Kharat Case : भोंदूबाबा अशोक खरातची ईडी चौकशी होणार - मुख्यमंत्री फडणवीस
सध्या राज्यासह देशात चर्चेत असलेल्या नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात (Ashok Kharat) याच्या काळ्या साम्राज्याचा पर्दाफाश करण्यासाठी विशेष तपास पथक (SIT) अहोरात्र प्रयत्न करत आहे. शिर्डीतील जमीन फसवणूक प्रकरणात अशोक खरातची पत्नी कल्पना खरातला ताब्यात घेण्यासाठी एसआयटीचे पथक गेले असता ती पथकाला गुंगारा देण्यात यशस्वी ठरली. मात्र, यावेळी खरातचा मुलगा हर्षवर्धन खरात याला एसआयटीने चौकशीसाठी ताब्यात घेतले. SIT ने त्याची कसून चौकशी केली.सध्या अशोक खरात प्रकरणाबद्दल रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. अशातच आता या प्रकरणाबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना मोठं वक्तव्य केलं आहे.भोंदू अशोक खरात प्रकरणातील सर्व व्यवहारांची ईडी चौकशी (ED) होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तसेच भोंदू अशोक खरातवर आतापर्यंत एकूण १२ गुन्हे दाखल झाले असल्याची माहिती देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे.मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?“अशोक खरात प्रकरणाचा तपास सुरू आहे. अशोक खरातच्या संपत्तीची आणि गैरव्यवहारांची चौकशी केली जाईल. अशोक खरात प्रकरणात काही लोक राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण मी स्पष्ट सांगतो की अशा प्रकरणाबाबत सरकारला जे करायला पाहिजे ते सरकार करत आहे”, असं मुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटलं आहे.अशोक खरातची ईडी चौकशी होणार का?अशोक खरात प्रकरणातील सर्व व्यवहारांची ईडी चौकशी होणार का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, “खरात प्रकरणातील व्यवहारांबाबत नक्कीच ईडी चौकशी होणार आहे. त्याबाबत ईडीने या गोष्टीची माहिती घेतली आहे. ईडीनेही त्यांची कारवाई सुरू केलेली आहे. एकदा खरातच्या जमिनी कुठे-कुठे आहेत, याची माहिती समजली की नियमानुसार जे-जे करावं लागेल ते आम्ही करणार आहोत”, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.सीडीआर कोणी लीक केला? चौकशी होणार“अशोक खरात प्रकरणातील सीडीआर कोणालाही प्राप्त करून घेण्याचा अधिकार नाही. तो अधिकार फक्त ज्या तपास यंत्रणा आहेत त्यांनाच तो अधिकार आहे. मात्र, या प्रकरणातील सीडीआर कसा लीक झाला? तो सीडीआर कोणी लीक केला? या संदर्भातील चौकशी राज्य सरकार करणार आहे. मला असं वाटतं की अशा प्रकारच्या प्रकरणात फक्त आरोप-प्रत्यारोप करून चालत नाही. ज्यांच्या विरोधात सबळ पुरावा असेल त्यांच्यावर कारवाई होईलच. मात्र, कोण-कोणाशी बोललं या आधारावर आपली क्रिमिनल जस्टिस सिस्टम चालत नाही”, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
पगारातून जास्त पीएफ कापला जाणार? नवीन नियमांमुळे वेतन रचनेत झाले मोठे बदल
मुंबई : १ एप्रिल २०२६ पासून लागू झालेल्या नवीन कर आणि श्रम नियमांमुळे कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या रचनेत मोठे बदल होण्याची शक्यता आहे. यामुळे “पगारातून जास्त पीएफ कापला जाणार का?” असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मात्र, मते थेट पीएफ दर वाढवण्यात आलेला नसला तरी पगाराच्या संरचनेतील बदलांमुळे पीएफ आणि ग्रॅच्युइटीमध्ये वाढ होऊ शकते.पगार रचनेत काय बदल?नवीन आयकर नियमांनुसार, कर्मचाऱ्यांच्या पगारातील भत्ते, सुविधा आणि इतर लाभ यांचे मूल्यांकन अधिक स्पष्टपणे केले जाणार आहे. यामुळे आधी करमुक्त असलेले अनेक भत्ते आता करपात्र ठरण्याची शक्यता आहे. परिणामी, कंपन्यांना कर्मचाऱ्यांच्या CTC (Cost to Company) मध्ये बदल करावे लागू शकतात.पीएफ आणि ग्रॅच्युइटीवर परिणामनवीन श्रम संहितेनुसार, कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन (Basic Salary) किमान CTC च्या ५०% असणे आवश्यक आहे. त्यामुळे बेसिक पगार वाढल्यास त्यावर आधारित PF (Provident Fund) आणि ग्रॅच्युइटीचे योगदान आपोआप वाढते. यामुळे कर्मचार्यांच्या पगारातून जाणारी रक्कम वाढल्याचे दिसू शकते.टेक-होम सॅलरी कमी होणार?पगारात कोणतीही वाढ न होता, रचना बदलल्यामुळे टेक-होम सॅलरीवर परिणाम होऊ शकतो. कारणकरपात्र भत्ते वाढतीलPF योगदान वाढेलकाही सुविधा करपात्र ठरतीलयामुळे हातात मिळणारा पगार कमी झाल्याचे वाटू शकते.सुविधा आणि भत्त्यांवर करनवीन नियमांनुसार, कंपनीकडून मिळणाऱ्या अनेक सुविधा आता करपात्र ठरू शकतात. उदाहरणार्थ:कंपनीची कार वापरघरभाडे किंवा निवास सुविधावीज, पाणी, गॅस बिलमुलांचे शिक्षण शुल्कगिफ्ट्स आणि क्लब सदस्यत्वयामुळे करपात्र उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे.जुनी की नवी कर प्रणाली?कर्मचाऱ्यांसाठी अजूनही जुनी आणि नवी कर प्रणाली निवडण्याचा पर्याय उपलब्ध आहे.जुनी प्रणाली : वजावट आणि सूट जास्तनवी प्रणाली : कर दर कमी पण सवलती कमीएकूणच, १ एप्रिलपासून लागू झालेल्या नवीन नियमांमुळे थेट पीएफ दर वाढलेला नाही. मात्र, पगाराच्या रचनेतील बदलांमुळे PF आणि करपात्र उत्पन्न वाढून टेक-होम सॅलरीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कर्मचार्यांनी आपली वेतन स्लिप नीट तपासून, आवश्यक असल्यास आर्थिक सल्लागारांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
Himachal Pradesh Avalanche : अटल बोगद्याजवळ हिमस्खलन; सुदैवाने, कोणतीही जीवितहानी झाली नाही
हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळ असलेल्या अटल टनल रोहतांगच्या टोकाजवळ हिमखंड कोसळल्याची घटना घडली आहे. दोन दिवसांच्या हिमवृष्टीनंतर रविवारी (५ एप्रिल) ऊन पडताच दुपारच्या सुमारास अटल टनलच्या उत्तर पोर्टलजवळ पीर पंजाल पर्वतरांगांमध्ये हिमस्खलन झाले. हिमस्खलनाचा वेग इतका प्रचंड होता की हवेत उडणारे बर्फाचे तुकडे पर्यटकांपर्यंत पोहोचले.पर्यटकांसाठी हे दृश्य रोमांचक ठरले; मात्र कोणी या हिमस्खलनाच्या विळख्यात सापडले असते तर मोठे नुकसान होऊ शकले असते. हिमखंड कोसळताना पाहून स्थानिकांनी शिट्ट्या वाजवत आणि आवाज करून पर्यटकांना सावध केले. रविवारी सकाळी ऊन पडताच पर्यटक फोर-बाय-फोर वाहनांमधून अटल टनल रोहतांग येथे पोहोचले होते. या हिमस्खलनात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र त्यातून उडालेला बर्फाचा प्रचंड ढग पर्यटकांपर्यंत पोहोचला.दोन दिवसांपूर्वीच सीमा सडक संघटना (बीआरओ) यांच्या शिफारसीनुसार लाहौल-स्पीती प्रशासनाने अटल टनलच्या उत्तर पोर्टललगतच्या परिसरात पर्यटन उपक्रमांवर बंदी घातली होती. तसेच हिमखंड कोसळण्याचा इशाराही आधीच देण्यात आला होता. एप्रिल २०२६ च्या सुरुवातीला लाहौल-स्पीती तसेच मनाली परिसरातील पर्यटनस्थळांवर झालेल्या अवेळी हिमवृष्टी आणि बदलत्या हवामानामुळे लाहौल व मनाली खोऱ्यात हिमस्खलनाचा धोका वाढला आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार, सतत सुरू असलेल्या हिमवृष्टीमुळे मनाली–केलंग मार्गावर हिमस्खलनाचा धोका अधिक वाढला आहे.
Shubman Gill Injury : गिल नक्की कधी पुनरागमन करणार, या प्रश्नाने चाहत्यांना काळजीत टाकले असतानाच आता संघाचे सहाय्यक प्रशिक्षक पार्थिव पटेल यांनी यावर मोठे अपडेट दिले आहे.
Mamata Banerjee : मतदानातून सूड उगवा; मतदार यादीतील नाव कपातीवरून ममता बॅनर्जींचे मतदारांना आवाहन
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी मुर्शिदाबादमधील समशेरगंज येथील सभेत केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगावर जोरदार हल्लाबोल केला.
Devendra Fadnavis : “अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करणार”; देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन
गहू, हरभरा, ज्वारी आणि बाजरी यांसारखी कापणीसाठी सज्ज असलेली पिके अनेक ठिकाणी भुईसपाट झाली आहेत.
Riyan Parag Captaincy : भारताचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाण याने राजस्थानचा नवा कर्णधार रियान पराग याच्या नेतृत्वाचे भरभरून कौतुक केले आहे.
Raghav Chadha : “खरे चित्र अजून समोर यायचे आहे…”; राघव चड्ढा यांचं जोरदार प्रत्युत्तर
पण आम आदमी पक्षाचे नेते अनधिकृत माहितीवर विश्वास ठेवून कारवाई करतात, हे मात्र न समजण्यासारखे आहे, असे प्रतिपादन आम आदमी पार्टीचे राज्यसभा सदस्य राघव चढ्ढा यांनी केले आजे.
Abhishek bachchan : अखेर ऐश्वर्यासोबतच्या नात्याबाबत अभिषेकनं सोडलं मौन
मुंबई : बॉलिवूडमधील प्रसिद्ध जोडी ऐश्वर्या राय (Aishwarya Rai ) आणि अभिषेक बच्चन (Abhishek bachchan ) अनेक कारणांमुळे सतत चर्चेत असतात. अलीकडेच त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चाही जोरदार रंगल्या होत्या. त्यावेळी अभिषेकने या केवळ अफवा असल्याचं म्हटलं होतं. नुकताच अभिषेकनं एका मुलाखतीत ऐश्वर्या आणि त्याच्या नात्याबाबत आणि दोघेही आपली मुलगी आराध्याचा सांभाळ कसे करतात याबद्दलची माहिती दिली असून यावेळी अभिषेक ऐश्वर्याच्या स्टारडमवरही प्रतिक्रिया दिली.ज्यावेळी ऐश्वर्या आणि अभिषेकचं लग्न झालं होतं, त्यावेळी ऐश्वर्या राय खूप मोठी स्टार होती. या मुलाखतीत, जेव्हा अभिषेकला विचारण्यात आलं की, त्याला पत्नीच्या स्टारडममुळे आधी असुरक्षित वाटलं का? यावर त्यानं उत्तर दिलं असून या मुलाखतीत पत्नी ऐश्वर्या रायच्या स्टारडमबद्दल वाटणाऱ्या इनसिक्योरिटीबाबत खुलासा केला असून यावेळी मुलाखतीत त्यानं आपल्या आई - वडिलांचं उदाहरण दिलं आहे.या मुलाखतीत बोलताना अभिषेक म्हणाला 'जेव्हा माझ्या आई वडिलांचं लग्न झालं. तेव्हा माझी आई माझ्या वडिलांपेक्षा मोठी स्टार होती. त्यामुळे यामध्ये काही विचित्र वाटण्यासारखं नाही. वर्चस्व गाजवलं पाहिजे, अशा मानसिकतेनं माझं संगोपन झालेलं नाही. ही एक पार्टनरशिप आहे. मी ऐश्वर्याला करिअरच्या सुरुवातीपासून ओळखत असून माझी दुसरी फिल्म मी ऐश्वर्यासोबत केली होती. त्यावेळी आम्ही रिलेशनशिपमध्ये नव्हतो. आम्ही फक्त चांगले मित्र होतो', असं अभिषेकनं म्हटलं आहे.ऐश्वर्यासोबतच्या नात्याबद्दल बोलताना अभिषेक पुढे म्हणाला, 'जेव्हा आम्ही प्रेमसंबंध, एंगेजमेंट आणि नंतर लग्नाच्या माध्यमातून एकत्र आलो, तेव्हा आमच्यात एक पार्टनरशिप तयार झालं. आमच्यात असं कधी बोलणं नाही झालं की, मी कमवेन आणि तू घराची काळजी घेशील. अशी चर्चा आमच्यात कधीच झालेली नाही. हे खूप नैसर्गिकरित्या घडतं. पण माझ्यासाठी हे खूप अहंकारातून येतं', असं अभिषेक यावेळी म्हणाला आहे. तसेच, यावेळी अभिषेक म्हणाला, 'मी इगोबाबत उल्लेख केला कारण, शर्यत जिंकण्यासाठी समोरच्या व्यक्तीनं पराभव पत्कारावा किंवा धावणं थांबवावं, अशी माझी मानसिकता नाही', असं अभिषेकनं स्पष्ट केलं असून 'मला अशा नात्यात राहायचं नाही, जिथे मला पुरुषी वाटावं म्हणून माझ्या पत्नीला एखादी गोष्ट करणं सोडावं लागेल. सुदैवानं माझ्या पत्नीलाही तसं वाटत नाही', असं यावेळी या मुलाखतीत अभिषेकनं त्यांच्या नात्याबद्दल बोलताना स्पष्ट केलं आहे.
U-17 National Boxing Championship : गडकरींच्या हस्ते बॉक्सिंग स्पर्धेचा दमदार शुभारंभ!
- स्टेजवरूनच दिला जोशाचा पंच… नागपूरमध्ये बॉक्सिंगचा थरार रंगात!- ग्लोव्हज हातात… स्टेजवरून दिला जोशपूर्ण संदेश, खेळाडूंमध्ये उत्साहाची लाट!नागपूर : नागपूरमध्ये सुरू असलेल्या U-17 राष्ट्रीय बॉक्सिंग चॅम्पियनशिपला आज एक वेगळीच उंची मिळाली, जेव्हा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून स्पर्धेचा भव्य शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात होताच संपूर्ण वातावरण उत्साहाने भारून गेले, आणि गडकरी यांनी स्टेजवरून खेळाडूंना दिलेल्या प्रेरणादायी संदेशाने स्पर्धेला नवा जोश मिळाला.मान्यवरांची दमदार उपस्थिती :या प्रसंगी प्रमोद कुमार बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडिया चे महासचिव, राहुल शेवाळे महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष, रणजीत सावरकर महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष, राकेश तिवारी महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे सचिव, मिलन वैद्य महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे कोषाध्यक्ष यांच्यासह आशिष जयस्वाल, कृपाल तुमाने, दीपक सावंत, संजय निरुपम, मनीषाताई कायंदे, किरण पांडव, श्रीमती देवांग आणि अर्जुन अवॉर्ड विजेते गोपाल देवांग यांची उपस्थिती लाभली. यावेळी बोलताना गडकरी म्हणाले,“खासदार चषकाच्या माध्यमातून आम्ही ६५ विविध खेळांना प्रोत्साहन देत आहोत. बॉक्सिंगसारखा दमदार खेळही त्यात महत्त्वाचा भाग आहे.” त्यांच्या या वक्तव्याने खेळाडूंमध्ये नवचैतन्य निर्माण झाले.स्टेजवरून दिला जोशाचा ‘पंच’ :विशेष म्हणजे, गडकरी यांनी बॉक्सिंगचे ग्लोव्हज परिधान करून खेळाडूंना प्रोत्साहन दिले. त्यांच्या या कृतीने आणि संदेशाने उपस्थित खेळाडू व प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला.देशभरातून आलेल्या सर्व खेळाडूंना शुभेच्छा देत गडकरी म्हणाले,“ही स्पर्धा तुमच्यासाठी मोठं व्यासपीठ आहे. मेहनत करा, देशाचं नाव उज्वल करा.”या भव्य उद्घाटनामुळे नागपूर शहरात बॉक्सिंगचा उत्साह शिगेला पोहोचला असून, देशभरातील युवा बॉक्सर आता रिंगमध्ये आपली ताकद दाखवण्यासाठी सज्ज झाले आहेत.
Nitish Kumar : नितीश कुमार १० एप्रिल रोजी राज्यसभा सदस्यत्वाची घेणार शपथ
पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार राज्यसभेत प्रवेश करण्यास सज्ज झाले आहेत. त्यांच्या शपथविधीची तारीखही निश्चित झाली आहे. बिहार भाजपचे प्रदेशाध्यक्ष संजय सरावगी यांनी नितीश यांच्या शपथविधीची तारीख जाहीर केली. ते म्हणाले, मुख्यमंत्री नितीश कुमार १० तारखेला राज्यसभा खासदार म्हणून शपथ घेतील. त्यांच्या शपथविधीनंतर भाजपचे केंद्रीय नेतृत्व, एनडीए आणि मुख्यमंत्री संयुक्तपणे निर्णय घेतील. परिणामी, बिहारच्या पुढील मुख्यमंत्र्यांबाबतचा निर्णय लवकरच घेतला जाऊ शकतो, असे मानले जात आहे.बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार ९ एप्रिल रोजी दिल्लीसाठी रवाना होतील. ते १० एप्रिल रोजी राज्यसभा सदस्य म्हणून शपथ घेतील. शपथविधीनंतर ते १० तारखेच्या संध्याकाळपर्यंत किंवा ११ एप्रिलच्या सकाळपर्यंत पाटण्याला परततील. राज्यसभेची जागा घेतल्यानंतर ते मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊ शकतात, अशी जोरदार चर्चा आहे. १० एप्रिलनंतर नवीन सरकार स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू होईल. एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात, म्हणजेच खरमासनंतर, बिहारला नवीन सरकार आणि नवीन मुख्यमंत्री मिळू शकतात. पण पुढील मुख्यमंत्र्यांच्या नावाबाबतचा अंतिम निर्णय एनडीएचे सर्वोच्च नेतृत्व घेणार आहे.बिहार भाजपचे अध्यक्ष संजय सरावगी म्हणाले, मुख्यमंत्री नितीश कुमार १० तारखेला राज्यसभेचे खासदार म्हणून शपथ घेतील. त्यांच्या शपथविधीनंतर भाजपचे केंद्रीय नेतृत्व, एनडीए आणि मुख्यमंत्री संयुक्तपणे निर्णय घेतील. संजय सरावगी यांच्या वक्तव्यामुळे राजकीय खळबळ उडाली आहे. नवीन मुख्यमंत्र्यांच्या घोषणेबाबत राज्याच्या राजकारणात चर्चा सुरू झाली आहे. इतर एनडीए नेत्यांनीही एका बैठकीनंतर नवीन मुख्यमंत्री लवकरच निश्चित होतील, असे म्हटले आहे.
Bangladesh Cricket Board : बांगलादेश क्रिकेट बोर्डात खळबळ, तीन संचालकांचा राजीनामा
बांगलादेश क्रिकेट बोर्डात (बीसीबी) गोंधळाचे वातावरण आहे. ढाका येथे झालेल्या प्रदीर्घ संचालक मंडळाच्या बैठकीनंतर काही तासांतच बीसीबीच्या तीन संचालकांनी राजीनामा दिला. बैठकीनंतर लगेचच फय्याझुर रहमान यांनी आपल्या निर्णयाची माहिती मंडळाला दिली, तर त्यानंतर थोड्याच वेळात शानियान तनिम आणि मेहराब आलम चौधरी यांनीही राजीनामा दिला. यामुळे बीसीबीच्या निवडणुकांनंतर सहा महिन्यांपेक्षा कमी कालावधीत राजीनामा देणाऱ्या संचालकांची एकूण संख्या सहा झाली आहे.या वर्षी जानेवारीमध्ये इश्तियाक सादिक यांनी वैयक्तिक कारणांचा हवाला देत सर्वप्रथम राजीनामा दिला होता. गेल्या महिन्यात, मीडिया अध्यक्षपदावरून हटवल्यानंतर काही दिवसांनी अमजद हुसेन यांनी मंडळाला आपली नोटीस पाठवली होती. सरकारने नामनिर्देशित केलेले बीसीबी संचालक यासिर मोहम्मद फैसल यांनी गुरुवारी राजीनामा दिला, त्यानंतर इतर तीन संचालकांनीही राजीनामा दिला.अध्यक्ष अमीनुल इस्लाम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत नेमके काय घडले, ज्यामुळे फय्याझुर, तनिम आणि चौधरी यांनी हा निर्णय घेतला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. बैठकीनंतर, नवीन मीडिया अध्यक्ष मोहम्मद मोखसेदुल कमाल यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले की, त्यांना फय्याझूर यांच्या राजीनाम्याबद्दल वृत्तांमधून समजले. इतर दोघांनी पत्रकार परिषदेनंतर राजीनामा दिला. ते म्हणाले, आम्ही यावर मंडळात चर्चा केलेली नाही. ज्यांनी राजीनामा दिला आहे, त्यांनी त्यांच्या निर्णयामागे वैयक्तिक कारणे दिली आहेत. हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. तुम्ही ज्यांचा उल्लेख करत आहात (फय्याझूर), ते आमच्यासोबत बैठकीला उपस्थित होते. आम्हाला त्यांच्या राजीनाम्याबद्दल बैठकीनंतर समजले. ढाका मेट्रोपोलिस क्रिकेट समितीचे उपाध्यक्ष असलेल्या फय्याझूर यांनी, ढाका लीग सुरळीतपणे चालवण्यासाठी पुढाकाराच्या अभावाबद्दल अलीकडेच बीसीबीवर टीका केली होती.सहा महिन्यांपेक्षा कमी कालावधीत सहा राजीनामे ही एक लक्षणीय संख्या आहे, आणि ज्या मंडळात निवडून आलेले संचालक त्यांच्या पूर्ण कार्यकाळासाठी पदावर राहतात, तिथे तर ही संख्या अधिकच लक्षणीय आहे. बीसीबीमधील सध्याचे वातावरण पाहता, एकाच संध्याकाळी त्यापैकी तिघांचे राजीनामे अधिकच चिंताजनक आहेत. सरकार सध्या एका समितीमार्फत गेल्या ऑक्टोबरमध्ये झालेल्या बीसीबी निवडणुकांची चौकशी करत असून, ही समिती पुढील आठवड्यात क्रीडा मंत्रालयाला आपला अहवाल सादर करेल अशी अपेक्षा आहे.
अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर बारामती विधानसभा मतदारसंघ (Baramati By Election) रिक्त झाला असून, या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे.
Mantralaya Bribe Case : मंत्रालयातील अर्थ व नियोजन विभागाचे कक्ष अधिकारी विलास लाड यांना ६ लाख ३७ हजार रुपयांची लाच घेताना खारघरमध्ये अटक करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित जपण्यासाठी परीक्षा आणि निकाल प्रक्रिया आता 'मिशन मोड'वर!
उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे बाटु विद्यापीठ प्रशासनाला कडक निर्देशमुंबई: राज्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी आणि त्यांना देश-विदेशातील उच्च शिक्षणाच्या संधी वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन ठोस उपाययोजना करत आहे.. विशेषतः लोणेरे (जि. रायगड) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाअंतर्गत महाविद्यालयांच्या (DBATU) परीक्षा आणि निकाल प्रक्रियेतील अडचणी दूर करण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ठोस पावले उचलली आहेत.बाटु विद्यापीठाकडून परीक्षांचे वेळापत्रक आणि गुणपत्रिका तसेच पदवी प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत असल्याच्या तक्रारी विद्यार्थी,संस्थाचालक आणि लोकप्रतिनिधींकडून मोठ्या प्रमाणावर प्राप्त झाल्या आहेत. तसेच या सर्व कोलमडलेल्या वेळापत्रकामुळे अनेक महाविद्यालये व संस्थाचालकांनी विद्यापीठापासून विसंलग्निकरणाचीही मागणी केली आहे. या सर्व शैक्षणिक बाबींची विचार करून प्रशासकीय अडचणी दूर करण्यासाठी कालबद्ध आराखडा तयार करण्याचे निर्देश देऊन परीक्षा आणि निकाल प्रक्रिया आता 'मिशन मोड'वर मार्गी लावण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत.नव्या नेतृत्वावर मोठी जबाबदारीपरीक्षा सुधारणांचा दांडगा अनुभव असलेल्या प्रभारी कुलगुरूंची नियुक्ती विद्यापीठात करण्यात आली आहे. राजेश अग्रवाल समितीसह विविध शासकीय समित्यांवर काम केलेले आहे.या अनुभवातून प्रभारी कुलगुरूंनीपुढील ३ ते ६ महिन्यांत सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लावावे आणि विद्यार्थी हिताला सर्वोच्च प्राधान्य द्यावे असे निर्देश मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिले आहेत.विद्यापीठाच्य प्रशासकीय सुधारणा करण्याचे शासनाचे 'व्हिजन'निकाल प्रक्रिया कालबद्ध करण्यासाठीपरीक्षा वेळेत घेऊन निकाल विहित मुदतीत जाहीर करण्याला सर्वोच्च प्राधान्यएआय (AI) सक्षम महाविद्यालये : विद्यापीठाशी संलग्न असलेली सर्व महाविद्यालये कृत्रिम बुद्धिमत्तेने (AI) सज्ज करण्याची योजना तयार करण्यात आली आहे.सेंटर्स ऑफ एक्सलन्स (Centers of Excellence): सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) मॉडेलद्वारे उत्कृष्टता केंद्रे उभारली जातील. यासाठी CSR निधी आणि शासकीय अनुदानातून तरतूद केली जाणार आहे.तसेच प्रभारी कुलगुरूंना परीक्षा आणि निकाल प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी स्पष्ट आणि कडक सूचना देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांचे हित राज्य शासनाचे सर्वोपरी असून, शैक्षणिक नियोजन सुस्थितीत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. परीक्षा व निकाल प्रक्रिया सुरळीत सुरू झाली की विसंलग्निकरणाचा प्रश्नच उद्भवणार नाही, असेही मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी यावेळी सांगितले.
Google Gemma 4 : एआय क्षेत्रात गुगलचा मोठा धमाका; GPT-5 आणि Llama 4 ला तगडी स्पर्धा
मुंबई : तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी Google ने आपले अत्याधुनिक आणि ‘ओपन-सोर्स’ कृत्रिम बुद्धिमत्ता मॉडेल Gemma 4 अधिकृतपणे सादर केले आहे. एप्रिल २०२६ मध्ये झालेली ही घोषणा संपूर्ण एआय उद्योगासाठी महत्त्वाचा टप्पा मानली जात आहे. विशेष म्हणजे, हे मॉडेल महागड्या सर्व्हरवर अवलंबून न राहता थेट स्मार्टफोनवर ऑफलाइन कार्य करू शकते, ही याची सर्वात मोठी जमेची बाजू आहे.इंटरनेटशिवायही हे मॉडेल काम करणार :Gemma 4 हे गुगलच्या प्रगत Gemini 3 Flash तंत्रज्ञानावर आधारित असून ते वेग, अचूकता आणि कार्यक्षमतेच्या बाबतीत अत्यंत प्रभावी आहे. याचे सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे ऑन-डिव्हाइस प्रोसेसिंग यामुळे इंटरनेटशिवायही हे मॉडेल काम करते आणि वापरकर्त्यांचा डेटा अधिक सुरक्षित राहतो.मराठीसह १४० पेक्षा अधिक भाषांचा समावेश :हे मॉडेल मल्टिमोडल क्षमतेसह येते, म्हणजेच ते मजकूर, फोटो, ऑडिओ आणि व्हिडिओ यांचे विश्लेषण करू शकते. याशिवाय, प्रगत ‘रीझनिंग मोड’मुळे जटिल गणिते किंवा कोडिंग समस्या सोडवताना ते अधिक अचूक आणि सखोल उत्तरे देते. भारतीय वापरकर्त्यांसाठी आनंदाची बाब म्हणजे हे मॉडेल मराठीसह १४० पेक्षा अधिक भाषांमध्ये सहज संवाद साधू शकते.GPT-5 आणि Llama 4 ला थेट आव्हान :स्पर्धेच्या दृष्टीने पाहता, GPT-5 आणि Llama 4 यांसारख्या मॉडेल्सना हे थेट आव्हान देत आहे. GPT-5 साठी महागडे सबस्क्रिप्शन आणि सतत इंटरनेट आवश्यक असते, तर Llama 4 मुख्यतः डेव्हलपर्ससाठी उपयुक्त आहे. याउलट Gemma 4 हलके आणि सर्वसामान्य डिव्हाइसवर सहज चालणारे आहे.गुगलने Gemma 4 चे विविध व्हेरिएंट्स देखील सादर केले आहेत. 2B आणि 4B हे स्मार्टफोनसाठी, 26B MoE लॅपटॉपसाठी, तर 31B Dense हे कोडिंग आणि रिसर्चसाठी डिझाइन केले आहे.भारतीय स्टार्ट-अप्स आणि डेव्हलपर्ससाठी मोठी संधी :ओपन-सोर्स स्वरूपामुळे भारतीय स्टार्ट-अप्स आणि डेव्हलपर्ससाठी हे मॉडेल मोठी संधी निर्माण करणार आहे. स्थानिक भाषांमध्ये ॲप्स, शेतीसाठी सल्ला देणारे बॉट्स आणि सरकारी सेवांसाठी डिजिटल सोल्यूशन्स विकसित करण्यासाठी Gemma 4 मोलाची भूमिका बजावू शकते. गुगलच्या या पावलामुळे एआय तंत्रज्ञान आता सामान्य लोकांपर्यंत अधिक वेगाने पोहोचण्याची शक्यता आहे.
Ashok Choudhary : बिहारच्या राजकारणात मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या राज्यसभा उमेदवारी आणि त्यांच्या उत्तराधिकाऱ्याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे.
Sunil Tatkare : खरात असो कोणीही असो विकृत मनोवृत्तीच्या लोकांना ठेचून फाशीची शिक्षा द्यावी - सुनील तटकरे
Chand Mera Dil Poster : ‘चांद मेरा दिल’चे पोस्टर रिलीज; अनन्या-लक्ष्यच्या रोमँटिक जोडीची चर्चा
Chand Mera Dil Poster : अभिनेत्री अनन्या पांडे एका नवीन सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाचे नाव चांद मेरा दिल असून, सिनेमाचे पहिले पोस्टर रिलीज करण्यात आले आहे.
रस्ते तसेच रेल्वे कन्व्हर्टची सफाई रिमोट कंट्रोल मशिन्सद्वारे
मुंबई :मुंबई महापालिकेच्यावतीने रस्ते आणि रेल्वे कल्व्हर्ट यांच्या सफाईसाठी रिमोट कंट्रोल स्वींग लोडर मशीनचा वापर करण्यात येणार आहे. ही मशीन कॉम्पॅक्ट असून नाल्याच्या बाहेरुन ऑपरेट केली जावू शकते आणि नाल्यातील माती, दगड तसेच लाकूड यासारख्या मोठ्याप्रमाणात कचरा याद्वारे बाहेर काढता येवू शकतो.मुंबई शहर व उपनगरात पावसाच्या पाण्याचा निचरा होण्याकरीता पर्जन्य जलवाहिन्यांचे जाळे याची सफाई करण्यासाठी विविध प्रकारची वाहनरुद्ध मशीन्स आहेत. ज्यांचा वापर शहरातील ९ आणि १५ उपनगरीय वॉर्डामध्ये मॅनहोल, पाण्याचे प्रवेशद्वार साफ करण्यासाठी तथा गाळ काढण्यासाठी केला जात आहे.परंतु मुंबई शहर व उपनगरामध्ये रस्ते आणि रेल्वे कल्व्हर्ट्स आहेत. अशा रस्ते आणि रेल्वे कल्व्हर्टची साफसफाई तथा गाळ काढण्यासाठी विशेष यंत्रसामग्रीची आवश्यकता होती. या रस्ते आणि रेल्वे ट्रॅकच्या खाली कल्व्हर्ट बंदिस्त असल्यामुळे मोठ्या प्रमाणात गाळ आणि कचरा तिथे साचतो. पण या विभागाकडे उपलब्ध असलेल्या वाहनांवर बसवलेल्या वाहनरुढ मशिन्सच्या सहाय्याने तेथील गाळ काढणे शक्य होत नाही. त्यामुळे पर्जन्य जलवाहिनी विभागाने सन २०१९ मध्ये रिमोट कंट्रोल्ड स्विंग लोडर मशीन खरेदी केली होती आणि त्यांच्या देखभाल दुरुस्तीचेकाम कंत्राटदाराला तीन वर्षांसाठी देण्यात आले होते. मात्र, याबाबतचे कंत्राट संपुष्टाता आल्याने आता नव्याने देखभाल व दुरुस्तीसाठी कंत्राटदाराची निवड करण्यात येत आहे.मुंबई महापालिकेच्या अपुऱ्या कर्मचाऱ्यांअभावी ही महापालिका प्रशासनाला या २४ मशिन्सच्या देखभालीसाठी नव्याने तीन वर्षांकरता नेमणूक करण्याचा निर्णय घ्यावा लागला. या साठी तीन वर्षांकरता सुमारे अडीच कोटी रुपये खर्च केले आहेत. यासाठी एच ई सी एन्व्हारो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची निवड करण्यात आली आहे.
Baramati Assembly by-election : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार
मुंबई : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सोमवारी (६ एप्रिल) बारामती विधानसभेच्या पोटनिवडणूकीसाठी (Baramati Assembly by-election) आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली असून सोमवार ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख आहे.उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी अजित पवार यांच्या जागेवर निवडणूक लढविण्याचा निर्णय राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने (NCP) घेतला आहे. त्यानुसार सुनेत्रा पवार सोमवारी अर्ज दाखल करणार आहेत. राष्ट्रवादीचे बहुसंख्य मंत्री, आमदार, पदाधिकारी, पवार कुटुंबिय या प्रसंगी उपस्थित असतील.पवार कुटुंबियांच्या परंपरेनुसार सकाळी श्री क्षेत्र कण्हेरी येथील मारुतरायाचे दर्शन घेत त्या विद्या प्रतिष्ठानवरील अजित पवार यांच्या स्मृतीस्थळी वंदन करण्यासाठी जाणार आहेत. तेथून बारामतीतील कसब्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या व त्या नंतर इंदापूर रस्त्यावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकस्थळी त्या अभिवादन करतील. त्या नंतर साडेदहा वाजता कविवर्य मोरोपंत सभागृहात मेळावा होणार असून तेथे त्या कार्यकर्त्यांशी संवाद साधतील. तेथून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी प्रशासकीय भवन येथे जातील.पोटनिवडणुकीसाठी सर्व पक्षांनी एकत्र यावे - मुख्यमंत्रीदिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निधनानंतर आता बारामती विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीत सुनेत्रा पवार या महायुतीच्या उमेदवार आहेत. या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देणार असल्याचं मातोश्रीवरून शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. दरम्यान, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सर्वच पक्षांनी सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देत ही निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले आहे.काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस ?सुनेत्रा पवार यांना सर्वच पक्षांनी पाठिंबा द्यावा. महाराष्ट्रात यापूर्वीही पोटनिवडणुका बिनविरोध करण्याची परंपरा राहिली आहे. जेव्हा आर. आर. आबांचे दुःखद निधन झाले होते, तेव्हा भाजपने मोठेपणा दाखवत निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता आणि ती निवडणूक बिनविरोध केली होती, अशी आठवण फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी करून दिली.
Vardha Crime News : वर्ध्यात लग्नाच्या वरातीत हत्याकांड; सक्खा काका आणि भाऊ....
वर्धा : आनंद, उत्साह आणि जल्लोषात सुरू असलेला लग्नसोहळा क्षणात शोकांतिकेत बदलल्याची धक्कादायक घटना वर्धा जिल्ह्यात घडली आहे. बँडच्या तालावर नाचत पुढे सरकणारी वरात, मंदिरात दर्शनासाठी थांबलेले वर्हाडी आणि त्याच वेळी झालेला अचानक चाकूहल्ला.या सर्वांनी उपस्थितांना हादरवून सोडले. संपत्तीच्या वादातून अल्पवयीन पुतण्याने स्वतःच्या काकावर आणि चुलत भावावर जीवघेणा हल्ला केल्याचे निष्पन्न झाले आहे.मंदिराजवळ हल्ल्याची थरारक घटनाही घटना वर्ध्यातील महिला आश्रमसमोरील हनुमान मंदिराजवळ घडली. वरात मंदिरात दर्शनासाठी थांबली असताना आरोपीने अचानक चाकू काढून प्रभाकर भलमे आणि नितीन भलमे यांच्यावर सपासप वार केले. हल्ला इतका तीव्र होता की दोघेही गंभीर जखमी झाले. तत्काळ त्यांना सेवाग्राम रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारांपूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.पोलीस तपास पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, बरबडी येथील भलमे कुटुंबात संपत्तीच्या कारणावरून दीर्घकाळ वाद सुरू होता. सुमारे आठ महिन्यांपूर्वीही आरोपी आणि मृतकांमध्ये वाद झाला होता. त्यानंतर आरोपीच्या मनात बदल्याची भावना निर्माण झाली होती. विशेष म्हणजे, हल्ल्यासाठी त्याने आधीच ऑनलाईन चाकू मागवून ठेवला होता, यावरून हल्ला पूर्वनियोजित असल्याचे स्पष्ट होत आहे.आनंदावर विरजण, परिसरात खळबळलग्नाच्या जल्लोषात अचानक घडलेल्या या घटनेने संपूर्ण परिसरात भीती आणि खळबळ पसरली आहे. वर्हाड्यांमध्ये एकच गोंधळ उडाला, तर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. आनंदाचा क्षण काही सेकंदांत दुःखद आठवणीत बदलला.पोलिसांची कारवाई सुरूघटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपी अल्पवयीन पुतण्याला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, हल्ल्यामागील नेमके कारण आणि इतर बाबींची चौकशी केली जात आहे.कौटुंबिक वाद किती टोकाला जाऊ शकतो, याचे हे एक उदाहरण आहे, किरकोळ वादातून सुरू झालेला संघर्ष थेट हत्येपर्यंत पोहोचल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
- शाहीन ३ मिसाइलच्या जोरावर पाकिस्तानचा भारताला धमकी देण्याचा नाहक प्रयत्नमुंबई : पाकिस्तानकडून कोलकात्यावर हल्ल्याची दिलेली धमकी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी सियालकोट येथे पत्रकारांशी संवाद साधताना हे विधान केल्याने तणाव वाढला आहे. विशेष म्हणजे सियालकोट ते कोलकाता हे हवाई अंतर सुमारे १६०० ते १७०० किमी असून रस्त्याने ते २ हजार किमीपेक्षा अधिक आहे. तरीही पाकिस्तानकडे इतक्या लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे असल्याचा दावा करण्यात आला आहे.‘शाहीन-३’ हे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र :या दाव्याचा आधार म्हणजे ‘शाहीन-३’ हे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र. सुमारे २,७५० किमी रेंज असलेले हे पाकिस्तानचे सर्वात लांब पल्ल्याचे शस्त्र मानले जाते. २०१५ मध्ये याची पहिली चाचणी घेण्यात आली होती आणि आता ते पूर्णपणे कार्यान्वित असल्याचे सांगितले जाते. सॉलिड फ्यूलवर चालणारे हे क्षेपणास्त्र ट्रान्सपोर्टर इरेक्टर लाँचरद्वारे प्रक्षेपित केले जाऊ शकते. पारंपरिक तसेच आण्विक वॉरहेड वाहून नेण्याची क्षमता त्यात आहे.शाहीन-३ व्यतिरिक्त पाकिस्तानकडे शाहीन-२ (१८०० किमी), शाहीन-१ (७५० किमी), गौरी (१५०० किमी) आणि बाबुर क्रूझ मिसाइल यांसारखी इतर क्षेपणास्त्रेही आहेत. ‘अबाबिल’ हे MIRV तंत्रज्ञान असलेले क्षेपणास्त्र एकाच वेळी अनेक लक्ष्यांवर मारा करू शकते. या सर्व क्षेपणास्त्रांमुळे भारतातील अनेक मोठी शहरे त्यांच्या टप्प्यात येतात, असा पाकिस्तानचा दावा आहे.‘शाहीन-३’ ला ‘अग्नी-५’ चोख उत्तर देणार :मात्र तज्ज्ञांच्या मते, पाकिस्तानकडून अशा प्रकारच्या धमक्या प्रामुख्याने सामरिक प्रतिबंधासाठी दिल्या जातात. भारताकडेही अत्याधुनिक आणि अधिक लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे उपलब्ध आहेत. ‘अग्नी-५’सारख्या मिसाइलची रेंज सुमारे ७००० किमी आहे. याशिवाय भारताची मल्टी-लेयर्ड एअर डिफेन्स सिस्टम शत्रूच्या क्षेपणास्त्रांना हवेतच नष्ट करण्यास सक्षम आहे.त्यामुळे पाकिस्तानच्या धमकीकडे गांभीर्याने पाहिले जात असले तरी भारताची संरक्षण क्षमता लक्षात घेता कोणतीही संभाव्य परिस्थिती हाताळण्याची तयारी मजबूत असल्याचे स्पष्ट होते.
Donald Trump: ‘इराणचा वरिष्ठ कमांडर ठार’ ; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, शेअर केला व्हिडिओ
Donald Trump: मध्य पूर्वेतील वाढत्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला आहे की, तेहरानवर झालेल्या एका मोठ्या हल्ल्यात इराणचे अनेक वरिष्ठ लष्करी अधिकारी मारले गेले.
Actress Rashmika Mandana : रश्मिका मंदाना तिच्या आगामी राणाबली सिनेमामुळे चर्चेत असून तिच्या आणखी एका सिनेमाचे पोस्टर समोर आले आहे. या पोस्टरमधून रश्मिका खतरनाक लूकमध्ये पाहायला मिळत आहे.
iPhone 18 Pro Max : नवीन सेन्सरपासून ते DSLR सारख्या फीचर्सपर्यंत अनेक मोठे बदल यात पाहायला मिळू शकतात.
Suvendu Adhikari: पश्चिम बंगालमधील निवडणुकीच्या वातावरणात निवडणूक आयोगाने मोठी कारवाई केली आहे.
IPL 2026 : शुभमन गिलच्या दुखापतीमुळे गुजरात टायटन्सच्या चिंतेत वाढ
मुंबई : गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिल (Shubman Gill) आयपीएल २०२६ च्या राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या (Rajsthan Royals) सामन्यात खेळू शकला नाही. त्याच्या अनुपस्थितीमुळे संघाला पराभव स्वीकारावा लागला. जर तो राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात संघात असता, तर निकाल कदाचित वेगळा लागला असता. सामना संपला आहे आणि संघ पुढील सामन्यावर लक्ष केंद्रित करत आहे. पण चाहत्यांना अजूनही एक प्रश्न पडला आहे की, गिल मैदानावर कधी परतणार? .सध्या सुरू असलेल्या आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सचा तिसरा सामना ८ एप्रिल २०२६ रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होणार आहे. या महत्त्वपूर्ण सामन्यापूर्वी, सहाय्यक प्रशिक्षक पार्थिव पटेल यांनी गिलच्या पुनरागमनावर मौन सोडले आहे. ते म्हणाले की, संघ गिलच्या लवकरच परतण्याची आशा बाळगून आहे. पटेल म्हणाले, नोव्हेंबर २०२५ मध्ये खेळल्या गेलेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेदरम्यान त्याच्या मानेला दुखापत झाली होती. अलीकडेच त्याला पुन्हा त्रास जाणवू लागला. आम्हाला आशा आहे की, तो आगामी सामन्यासाठी तंदुरुस्त होईल. ही दुखापत फार गंभीर दिसत नाही. दुखापतींचे व्यवस्थापन हे माझ्या कौशल्याचे क्षेत्र नाही, पण मी तुम्हाला खात्री देतो की तो लवकरच बरा होईल. राजस्थान रॉयल्सविरुद्ध शुभमन गिलच्या अनुपस्थितीत राशिद खानने गुजरातचे नेतृत्व केले.रवी बिश्नोईच्या (Ravi Bishnoi) भेदक गोलंदाजीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने गुजरात टायटन्सवर विजय मिळवला. राजस्थानने हा रोमांचक सामना ६ धावांनी जिंकला. पंजाब किंग्सविरुद्धचा सलामीचा सामना गमावल्यामुळे गुजरातची आयपीएल २०२६ मध्ये सुरुवात खराब झाली. दुखापतीमुळे शुभमन गिल संघाबाहेर होता आणि त्याच्या जागी राशिद खानने (Rashid Khan) संघाचे नेतृत्व केले.नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर राजस्थान रॉयल्सने दमदार सुरुवात केली. यशस्वी जयस्वाल आणि वैभव सूर्यवंशी यांनी शानदार फलंदाजी करत ६.२ षटकांत पहिल्या विकेटसाठी ७० धावा जोडल्या. वैभवने १८ चेंडूंमध्ये पाच चौकार आणि एका षटकारासह ३१ धावा केल्या. यशस्वीने ३६ चेंडूंमध्ये ५५ धावांची शानदार खेळी केली.
Sanjay Raut: महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून उमेदवार देण्याचा विचार केला जात आहे.
Sanjay Raut : “मुख्यमंत्री कार्यालयाच्या पाठिंब्याशिवाय खरातचे सीडीआर लीक होणे अशक्य”–संजय राऊत
बलात्कार प्रकरणी अटकेत असलेल्या अशोक खरातचे कॉल रेकॉर्ड्स, ज्यामध्ये त्याच्या आणि एकनाथ शिंदे यांच्यात झालेल्या अनेक संभाषणांची नोंद आहे
Ranveer Singh : धुरंधर 2 च्या अभूतपूर्व यशानंतर अभिनेता रणवीर सिंग नवीन सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Ratnagiri : संकष्टी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळे मंदिरात आकर्षक फुलांची सजावट; भाविकांची मोठी गर्दी
रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध गणपतीपुळे मंदिरात संकष्टी चतुर्थी निमित्त अत्यंत देखणी आणि मनमोहक अशी फुलांची आरास करण्यात आली आहे. मंदिराच्या गाभाऱ्याला विविध रंगीबेरंगी फुलांनी सजवण्यात आले असून या आकर्षक सजावटीने भाविकांचे लक्ष वेधून घेतले आहे. या सुंदर सजावटीची एक झलक पाहण्यासाठीही भाविक मोठ्या संख्येने मंदिरात दाखल होत आहेत.संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातून हजारो भाविक गणपतीपुळे येथे दर्शनासाठी येत आहेत. भक्तीमय वातावरणात गणरायाच्या दर्शनाचा आनंद भाविक घेत असून मंदिर परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.गणपतीपुळे मंदिराच्या गाभाऱ्यात यंदा विशेष फुलांची सजावट करण्यात आली आहे. विविध प्रकारच्या सुगंधी आणि रंगीबेरंगी फुलांनी साकारलेली ही आरास अत्यंत मनमोहक आणि देखणी आहे. या सजावटीमुळे संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय आणि प्रसन्न वातावरणाने न्हाऊन निघाला आहे.संकष्टी चतुर्थी निमित्ताने भाविकांची मोठी गर्दी होत असून शिस्तबद्ध पद्धतीने दर्शन व्यवस्था करण्यात आली आहे. दूरदूरवरून आलेले भाविक गणरायाच्या दर्शनासाठी रांगा लावताना दिसत आहेत.'या' चतुर्थीला विकट संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखले जातेगणेशाला विघ्नहर्ता आणि पहिले पूजनीय दैवत मानले जातात. संकष्टी चतुर्थीचा उपवास प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला केला जातो. हा एक विशेष उपवास असून तो गणेशाला समर्पित आहे. या दिवशी भक्त उपवास करून भगवान गणेशाची पूजा करतात. सूर्यास्तानंतर चंद्राला प्रार्थना करून हा उपवास संंपन्न होतो. वैशाख महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला विकट संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखले जाते. हा उपवास केल्याने जीवनातील अडथळे आणि अडचणी दूर होतात.
Sunil Tatkare : सुनेत्रा पवारांंना MVA तील त्या बड्या नेत्याचा पाठिंबा; सुनील तटकरेंनी दिली माहिती
Sunil Tatkare : बारामती पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील दोन पक्षांनी सुनेत्रा पवार यांना पाठिंबा दर्शवला असून, उमेदवार देणार नसल्याचे जाहीर केले आहे. पण काँग्रेसची भूमिका निवडणूक लढण्यावर ठाम आहे.
IPL 2026 : रोमांचक मुकाबल्यात राजस्थानचा गुजरातवर ’रॉयल’ विजय
अहमदाबाद: रवी बिश्नोईच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने गुजरात टायटन्सवर विजय मिळवला. राजस्थानने हा रोमांचक सामना ६ धावांनी जिंकला. पंजाब किंग्सविरुद्धचा सलामीचा सामना गमावल्यामुळे गुजरातची आयपीएल २०२६ मध्ये सुरुवात खराब झाली. दुखापतीमुळे शुभमन गिल संघाबाहेर होता आणि त्याच्या जागी राशिद खानने संघाचे नेतृत्व केले.२११ धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना, गुजरातने दमदार सुरुवात केली आणि शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रोमांचक ठेवला. गुजरात टायटन्सने चांगली सुरुवात केली. कुमार कुशाग्र आणि साई सुदर्शन यांनी ७.६ षटकांत पहिल्या विकेटसाठी ७८ धावा जोडल्या. कुशाग्र १८ धावांवर बाद झाला, पण सुदर्शनने आपली प्रभावी फलंदाजी सुरूच ठेवली. त्याने ४४ चेंडूंमध्ये ९ चौकार आणि ३ षटकारांसह ७३ धावा केल्या. जोस बटलर (२६ धावा, १४ चेंडू) आपल्या चांगल्या सुरुवातीचे मोठ्या खेळीत रूपांतर करू शकला नाही. ग्लेन फिलिप्स अवघ्या तीन धावांवर बाद झाला, तर वॉशिंग्टन सुंदर केवळ चार धावाच जोडू शकला. राहुल तेवतियाने १२ धावा आणि शाहरुख खानने ११ धावा करून संघाला उभारी दिली.शेवटच्या षटकांमध्ये, रशीद खान आणि कागिसो रबाडा यांनी ३० चेंडूंमध्ये ४३ धावांची जलद भागीदारी करून सामना रोमांचक बनवला. रशीदने १६ चेंडूंमध्ये २४ धावा केल्या, तर रबाडा १६ चेंडूंमध्ये २३ धावांवर नाबाद राहिला. पण, शेवटच्या दोन षटकांमध्ये जोफ्रा आर्चर आणि तुषार देशपांडे यांच्या अचूक गोलंदाजीने सामन्याचे चित्र पालटले.यापूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर राजस्थान रॉयल्सने दमदार सुरुवात केली. यशस्वी जयस्वाल आणि वैभव सूर्यवंशी यांनी शानदार फलंदाजी करत ६.२ षटकांत पहिल्या विकेटसाठी ७० धावा जोडल्या. वैभवने १८ चेंडूंमध्ये पाच चौकार आणि एका षटकारासह ३१ धावा केल्या. यशस्वीने ३६ चेंडूंमध्ये ५५ धावांची शानदार खेळी केली.तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला ध्रुव जुरेल उत्कृष्ट फॉर्ममध्ये होता आणि त्याने ४२ चेंडूंमध्ये ७५ धावा केल्या. जुरेलने आपल्या खेळीत पाच चौकार आणि पाच षटकार मारले. जुरेल आणि यशस्वीने दुसऱ्या विकेटसाठी ५६ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. शिमरॉन हेटमायरने आठ चेंडूंमध्ये १८ धावा केल्या.कर्णधार रियान पराग फलंदाजीत फारसा प्रभाव पाडू शकला नाही आणि तो आठ धावांवर बाद झाला. रवींद्र जडेजा सात धावांवर नाबाद राहिला. जुरेल आणि यशस्वी यांच्या शानदार खेळीमुळे राजस्थान रॉयल्सने २० षटकांत सहा गडी गमावून २१० धावा केल्या. गुजरात टायटन्सकडून कागिसो रबाडाने सर्वाधिक दोन बळी घेतले.
Raghav Chadha: आम आदमी पार्टीचे (आप) राज्यसभा खासदार राघव चड्ढा आणि त्यांच्या पक्षात आता मतभेद निर्माण होत आहेत.
Priyanka Chopra On Raghav Chadha : राघव चढ्ढा यांना प्रियंका चोप्राचा पाठिंबा…
Priyanka Chopra On Raghav Chadha : प्रियांका चोप्राने मेहुणा राघव चढ्ढा यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.
8 वर्षांपासून हिंदी चित्रपट पाहिले नाहीत. कसे पाहू? ज्या चित्रपटात 7-8 वर्षांचे कोणतेही मूल दिसते, माझा स्वतःचा मुलगा ‘माही’ त्यात दिसू लागतो. रस्त्यात चालताना-फिरतानाही जर एखादे गोरे-पान मूल दिसले, तर मन करते - धावत जाऊन त्याला मिठी मारू. माझी अशी एकही रात्र जात नाही, जेव्हा अश्रूंनी उशी ओली होत नाही. गेल्या चार वर्षांपासून मी कुठेही जाते तेव्हा मला अनेकदा विचारले जाते - रश्मी, तुम्हाला किती मुले आहेत? दोन मुले… असे म्हणायचे असते, पण ही गोष्ट ओठांवर येता-येता थांबते. मग मी बोलते - एक मुलगी आहे. मी विचार करते - दोन मुले आहेत असे सांगितले तर लोक प्रश्न विचारतील की - दुसरे मूल कुठे आहे? पती काय करतात आणि कुठे राहतात? पण सत्य हे आहे की माझ्या गर्भातून दोन मुलांना जन्म दिला. दुसऱ्या मुलाची आई होण्याचे सुख पतीने हिरावून घेतले. मी रश्मी सहगल, दिल्लीची रहिवासी आहे. जन्म तर एका मोठ्या कुटुंबात झाला, पण 15 वर्षांच्या वयानंतर अनाथाश्रमात वाढले. चौथ्या वर्गात होते, तेव्हाच वडिलांचा मृत्यू झाला होता. कसा झाला होता, माहीत नाही. काही लोकांनी तर इथपर्यंत म्हटलं- तुमच्या आईने पैशांसाठी तुमच्या वडिलांना मारलं. तर आई सांगते की वडिलांना कॅन्सर होता. बरं… वडिलांच्या मृत्यूनंतर आईने एका श्रीमंत माणसाशी दुसरं लग्न केलं. त्यांच्यासोबत सावत्र वडिलांच्या घरी राहायला लागली होती. 5वी ते 10वीचं शिक्षण तिथेच पूर्ण केलं. तिथे मला रोज याची जाणीव करून दिली जायची की मी सावत्र वडिलांकडे राहत आहे. प्रत्येक गोष्टीवर टोकलं जायचं. कुठेही जाण्या-येण्यावर बंदी होती. अनेकदा तर एखादी वस्तू नकळत तुटली, तर खूप मारहाण केली जायची. मी लहान मुलगी होते, कमी समजत होते म्हणून वाटायचं की आई-वडील मुलांना मारतातच. मोठी झाल्यावर कळलं की सावत्र वडील मला जाणूनबुजून मारत होते. अनेकदा ते मला वाईट पद्धतीने स्पर्शही करत होते. एक दिवस त्यांनी मला खूप मारलं. बेल्टने मारलं. एका हाताची त्वचा सोलून निघाली. मारताना आईला म्हणाले- हिला आत्ताच घरातून बाहेर काढ, नाहीतर तुलाही घरात राहू देणार नाही. त्यावेळी रात्रीचे 10 वाजले होते. आईने माझा रक्ताने माखलेला हात पकडला आणि मला घरातून बाहेर काढले. लगेच आतून दरवाजा बंद करून घेतला. कदाचित आईचे मन द्रवेल आणि ती मला आत बोलावेल या आशेने मी रात्रभर घराबाहेर बसून राहिले. सकाळचे साधारण 4 वाजले होते, पण दरवाजा उघडला नाही. माझ्या हातातून अजूनही रक्त येत होते. मी माझा दुपट्टा फाडला आणि हाताला गुंडाळला. घरापासून काही किलोमीटर अंतरावर आमच्या मोलकरणीचे घर होते. सकाळ होताच मी त्यांच्या घरी गेले. मला पाहून मोलकरीण घाबरली. ती म्हणाली- काय झाले रश्मी? तू इथे काय करत आहेस? माझ्या तोंडातून आवाजच निघत नव्हता. मी अडखळत म्हणाले, आई-वडिलांनी घरातून काढून टाकले आहे. काही दिवस तुम्ही मला तुमच्या घरी राहू द्याल का? थोड्या वेळाने मोलकरीण म्हणाली- नाही, नाही. तू तरुण आहेस. अशा प्रकारे कोणाच्या घरी कशी राहू शकतेस? जा, तुझ्या घरी जा. असे म्हणत तिनेही दरवाजा बंद करून घेतला. त्यानंतर घराच्या जवळ एक अनाथालय होते, तिथे मी पोहोचले. अनाथाश्रमात मला राहण्यासाठी जागा मिळाली. मग मी तिथेच राहिले आणि 12वी पर्यंत शिक्षण घेतले. एका कंपनीत रिसेप्शनिस्टची नोकरी लागली. इथेच एका काश्मिरी मुलाशी माझी भेट झाली. तो खूप देखणा मुलगा होता. त्या ऑफिसमधील सर्व मुली त्याच्यावर फिदा होत्या. 2014 सालची गोष्ट आहे. हळूहळू आमच्या दोघांमध्ये जवळीक वाढली. आम्ही एकमेकांना भेटू लागलो. लहानपणी वडिलांचा मृत्यू झाला, आणि आई असूनही मी अनाथासारखं आयुष्य जगले होते. मला वाटले की - आता प्रत्येक सुख मिळणार आहे - पत्नीचे सुख. आई होण्याचे स्वप्न आणि स्वतःचे घर-कुटुंब, पण कोणाला माहीत होते की हे सुख जास्त दिवस टिकणार नाही. त्या मुलाने सांगितले - जर तुला माझ्याशी लग्न करायचे असेल, तर इस्लाम धर्म स्वीकारावा लागेल. माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता - मी हो म्हटले. त्यानंतर बुरखा, पाच वेळा नमाज... सर्व काही करू लागले. मग आम्ही दोघे काश्मीरला गेलो. तिथे मुस्लिम रितीरिवाजानुसार आमचे लग्न झाले. काही महिने तिथे राहिले, मग पतीसोबत दुबईला गेले. तिथे पोहोचताच पतीचे वर्तन बदलू लागले. रोज शिवीगाळ, मारहाण करू लागले. घरातून निघून जाण्यास सांगत. मनातल्या मनात विचार करत असे - हे देवा! आयुष्य किती परीक्षा घेईल! आधी सावत्र वडिलांनी मारहाण करून हाकलून दिले आणि आता पती हाकलून देऊ इच्छितो. कसेबसे मी हे नाते निभावत राहिले. 2015 येईपर्यंत मी गर्भवती झाले. पतीला कळल्यावर ते म्हणाले - आता बाळ जन्माला घालायचे नाहीये. याला पाडून टाक. ऐकून मी घाबरून गेले की - एक बाप गर्भात वाढत असलेल्या आपल्याच बाळाला पाडून टाकण्यास सांगत आहे! पण मी ठाम राहिले, म्हणाले - मी बाळ जन्माला घालीन. मी 6-7 महिन्यांची गर्भवती असताना पती माझ्यासोबत संबंध ठेवण्याचा हट्ट करत होते. म्हणत - मी नवरा आहे, जेव्हा पाहिजे तेव्हा संबंध ठेवू शकतो. मी नकार देऊ शकत नव्हते. हट्ट करून माझ्यासोबत संबंध ठेवत असे. त्यामुळे माझ्या गर्भधारणेत अडचण आली. बाळ जन्माला येण्याची तारीख जवळ आली आणि जेव्हा तीव्र वेदना झाल्या तेव्हा हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. डॉक्टरांनी तात्काळ सांगितले - शस्त्रक्रिया करून बाळ बाहेर काढावे लागेल. त्यावेळीही माझे पती वारंवार म्हणत होते- डॉक्टर, नॉर्मल डिलिव्हरी होऊ द्या. डॉक्टरांनी समजावले की, नॉर्मल डिलिव्हरीची वाट पाहिली तर आई आणि बाळ दोघांचाही जीव जाऊ शकतो. तेव्हा माझे पती सहमत झाले. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केली. मुलगी जन्माला आली, हे ऐकताच पतीला धक्का बसला. तो म्हणाला- काय जन्माला घातले आहेस तू. मुलगी जन्माला घातली आहेस. माझे सासू-सासरेही काश्मीरहून दुबईला आले. शस्त्रक्रियेच्या दुसऱ्याच दिवशी मी रुग्णालयातून घरी आले. मुलीला दूध पाजण्यापासून ते डायपर आणण्यापर्यंत सर्व कामे करावी लागत होती. पोटातील टाके कच्चे होते, जखम उघडली आणि त्यात पू भरला. त्या काळातही सासू-सासरे कोणतीही मदत करत नव्हते. एके दिवशी मी माझ्या पतीला डायपर आणायला सांगितले, तेव्हा त्यांनी रागाने माझ्या तोंडावर थुंकले आणि म्हणाले- तुला माहीत आहे का तुझी लायकी काय आहे? तुझ्या वडिलांचा पत्ता नाही, ना घराचा. रस्त्यावरून उठून महालात आली आहेस. त्या दिवशी मला समजले की मी अजूनही एकटीच आहे. पतीला मुलीबद्दल काहीही आपुलकी नव्हती. ते काही निश्चित रक्कम देत असत. त्यातच मी मुलाची आणि स्वतःची काळजी घेत असे. दोन वर्षांनंतर, 2017 मध्ये मुलगा माहीचा जन्म झाला. तेव्हा वाटले की आता कदाचित सर्व काही ठीक होईल. काळजी घेण्यासाठी पुन्हा माझी सासू दुबईला आली. ती नेहमी म्हणायची- तुमची मुले माझ्या हाताने काही खात नाहीत, तुम्हीच त्यांना सांभाळा. दोन्ही मुलांची जबाबदारी माझ्यावरच होती. आजही तो हिजाब माझ्याकडे आहे, ज्यात गाठ बांधून मी माझ्या मुलाला पोटाला बांधून ठेवत असे. पोटाला बांधून त्याला दूध पाजत असे आणि मुलीला जेवण भरवत असे. एकदाही सासू म्हणाली नाही की, 'आणा मी सांभाळते.' फक्त मला एवढा विश्वास होता की मुलगा आता मोठा होत आहे, कदाचित सर्व काही ठीक होईल. 2022 ची गोष्ट आहे. त्यावेळी आम्ही पती-पत्नी सिंगापूरला गेलो. तिथे रोज दोन्ही मुलांना शाळेत सोडायला जावे लागत असे. सकाळी पतीला उठवले की ते भांडायचे. एके दिवशी मी पतीला म्हणाले- मला ड्रायव्हिंग शिकवा, जेणेकरून मी मुलांना शाळेत सोडू शकेन. त्यानंतर मी ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज केला. ज्या दिवशी ड्रायव्हिंग टेस्ट होती, त्या दिवशी माझ्या पतीने मला कार देण्यास नकार दिला. मी कारसमोर उभी राहून विनवणी करत राहिले. चावी देण्यास सांगत राहिले, पण त्याने ऐकले नाही. जाताना माझ्या पायावर गाडी चढवून ऑफिसला निघून गेले. विचार केला की ज्या व्यक्तीला माझी अजिबात किंमत नाही, त्याच्यासोबत राहणे व्यर्थ आहे. 2021 येईपर्यंत परिस्थिती आणखी बिघडली. पोलिसांकडेही जाऊ शकत नव्हते. गेले असते, तर त्याच घरात परत यावे लागले असते आणि पुन्हा तीच मारहाण झाली असती. मुलगा नेहमी पतीसोबतच राहायचा. एका रात्री पतीने मला आणि माझ्या मुलीला घरातून ढकलून बाहेर काढले. त्याला वाटले की दरवेळेप्रमाणे मी रडेन आणि परत येईन, पण त्या दिवशी मी तसे केले नाही. रात्रीच मित्रांना फोन करून उसने पैसे मागितले. विमानाचे तिकीट काढले आणि मुलीसोबत दिल्लीला परत आले. काही दिवस माझ्या एका ओळखीच्या व्यक्तीकडे राहिले, नंतर नोकरी करू लागले. कुणीही भाड्याने घर द्यायला तयार नव्हते. विचारत होते - पती काय करतात? कुठे राहतात? मी सांगायचे - आम्ही आई आणि मुलगी आहोत. पती नाहीत. घरमालक खोली देण्यास नकार देत असे. मोठ्या मुश्किलीने एक फ्लॅट मिळाला. जी मुलगी सिंगापूरमध्ये शिकत होती, तिला दिल्लीत कोणतेही शाळा प्रवेश द्यायला तयार नव्हती. सर्व शाळा मुलाच्या वडिलांचे तपशील मागत होत्या. खूप प्रयत्नांनी एका शाळेत प्रवेश मिळाला. तिथे महिन्याची फी 15 हजार होती आणि माझा पगार 30 हजार होता. जवळपास एक वर्ष तिथे शिकवले, नंतर शाळेने फी न भरल्यामुळे मुलीला काढून टाकले. त्यानंतर मुलगी आजारी पडू लागली. माझ्याकडे जे काही पैसे होते आणि दागिने होते, ते विकून मी तिच्यावर उपचार करू लागले. प्रत्येक रात्री मुलीसोबत मुलगा माहीची आठवण येते. मी अनेकदा त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण पती बोलू देत नाही. धमकी देत म्हणतो- दिल्लीत आहेस, शांत राहा, नाहीतर इतके तुकडे करेन की मोजताही येणार नाहीत. त्याच दरम्यान माझीही तब्येत खूप खराब झाली. रुग्णालयात दाखल होण्याची वेळ आली. मी मुलीला काही दिवसांसाठी माझ्या आईकडे सोडण्यासाठी लाजपत नगरला गेले, पण आईने दरवाजा बंद केला आणि सरळ नकार दिला- इथे येऊ नकोस. आजारी असल्यामुळे माझी नोकरी सुटली. त्यावेळी लोक सल्ला देऊ लागले - दुसरे लग्न कर. मुलीच्या नादात आयुष्य का खराब करत आहेस, ज्याचे बाळ आहे, त्याला देऊन टाक, पण त्यांना काय माहीत, मी माझ्या मुलीसाठीच जगत आहे. त्यावेळी मुलगी काही मागायची, तर मी काहीतरी कारण सांगायची. तिला सत्य सांगण्याची हिंमत होत नव्हती. जेव्हा मी नोकरीसाठी मुलाखत द्यायला जायची तेव्हा मुलगी फोन करून विचारायची - आई, नोकरी लागली? मी हसून म्हणायची - नाही बेटा. मनातल्या मनात विचार करायची - आज पुन्हा तिला पिझ्झा खाऊ घालण्याचे आणि चित्रपट दाखवण्याचे वचन पूर्ण करू शकणार नाही. असेच चार महिने निघून गेले. तेव्हा कुठे पुन्हा एक नोकरी लागली. आता फक्त मुलीसाठी जगत आहे. सिंगल मदर आहे. अनेकदा विचार करूनच थरथर कापते- जर मला काही झाले, तर माझ्या 10 वर्षांच्या मुलीचे काय होईल? मुलीचे नाव लॉरिन आहे. माझे फक्त एकच स्वप्न आहे की तिला शिकवून-सवरून मोठे करावे, तिच्यासाठी एक घर बनवावे, ज्याच्या गेटच्या बोर्डवर लिहिलेले असेल- ‘लॉरिन हाऊस’, जेणेकरून कधी कोणी तिला टोमणा मारला, घरातून बाहेर काढले तर ती म्हणू शकेल- माझे स्वतःचेही घर आहे. मुलाचे तोंड पाहून अनेक वर्षे झाली आहेत. तो कुठे आहे? कोणत्या देशात आहे? हे मला माहीत नाही. पतीने दुसरे लग्न केले आहे. कदाचित आता तो ऑस्ट्रेलियात राहत आहे. मी अनेकदा काश्मीरला जाऊन मुलाला शोधण्याचा प्रयत्न केला. खूप वर्षांपूर्वी तो एकदा भेटलाही होता. काश्मीर मानवाधिकार आयोगाच्या मदतीने. तेव्हा मी त्याला मिठी मारून म्हटले होते- मी तुझ्या दृष्टीने गुन्हेगार असू शकते. जेव्हा कधी परत येण्याची इच्छा होईल तेव्हा परत ये. मला जेवढे मारायचे असेल तेवढे मारून घे. आहे तर तुझी आईच. जिथे राहशील तिथे आनंदी राहा. माझ्याकडे त्याचा एकही फोटो नाही. 5 वर्षे झाली आहेत, त्याचे तोंड पाहिले नाही. रोज हेच विचार करते की आजही मुलाची काही बातमी नाही. पतीने घरातून काढताना धमकी दिली होती की मुलीवरच समाधान मान, नाहीतर तिलाही हिसकावून घेईन. (रश्मी सहगल यांनी आपल्या या भावना भास्कर रिपोर्टर नीरज झा यांच्याशी शेअर केल्या)
Bigg Boss Marathi 6 : घरातून बाहेर पडला 'हा'सदस्य, प्रेक्षक म्हणाले...
मुंबई : बिग बॉस मराठी सीझन ६ (Big boss Marathi 6) यंदा अनेक गोष्टींमुळे सतत चर्चेत आहे. आता या सीझनचे काही दिवसच शिल्लक राहिले असून बिग बॉसच्या घरातून कोण बाहेर जाणार ? याची उत्सुकता प्रचंड वाढलीय. 'बिग बॉस मराठी ६'चा वीकेंड अर्थात भाऊचा धक्का म्हटलं की घरातील सदस्य बाहेर जाणार. बिग बॉस आता शेवटच्या टप्प्यात असताना घराबाहेर पडणाऱ्या त्या सदस्याचं नाव समोर आलं आहे.बिग बॉसच्या घरात आता एकूण ८ सदस्य आहेत. यामध्ये रेवा कौरासे, राखी सावंत, तन्वी कोलते, अनुश्री माने, राकेश बापट, सागर कारांडे, दिपाली सय्यद, विशाल कोटियन यांचा समावेश आहे. यापैकी सागर, राखी, राकेश, अनुश्री, रेवा आणि विशाल हे सदस्य नॉमिनेट आहेत.या आठवड्यात रेवा कॅप्टन झाली, त्यामुळे ती सेफ आहे. त्यानंतर राखीच्या नावाची चर्चा होती. पण राखीही नाही. मग बिग बॉसच्या घरातून कोण एलिमिनेट झालं ? तर बिग बॉसच्या घरातून या आठवड्यात बाहेर पडणारा सदस्य सागर कारंडे आहे. अनेकांनी सागरला सीझनमध्ये ट्रोल केलं आणि त्याला घरातून बाहेर काढण्याची मागणी सतत होत होती.सागर घराबाहेर गेल्याचं समजताच प्रेक्षकांनी फायनली गेला, बरं झालं, सगळ्यात बेस्ट एव्हिक्शन अशा कमेंट केल्या आहेत. सागरला ३ वर्षांपासून बिग बॉसचं आमंत्रण मिळत होतं, यावेळी त्यानं ते स्वीकारलं. पहिल्याच आठवड्यात रितेशनं त्याचा खेळ टॉप क्लास असल्याचं म्हणत कौतुक केलं होतं.रितेशनं एंटरटेनमेंटचे नवे फंडे, नाटकाप्रमाणेच घराचा खेळ 'हाऊसफुल्ल' असं म्हणत सागरच्या अभिनयाचं कौतुक केलं होतं. तेव्हा सागर भावुक झाला होता. सागर कारंडे एलिमिनेट झाल्यानंतर बेस्ट एव्हिक्शन असं म्हणत प्रेक्षकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
मुंबई : नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने आता अधिक गंभीर वळण घेतले आहे, भोंदूबाबा सोबतचे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओंमुळे पीडित महिलांवर मानसिकदृष्ट्या मोठा परिणाम झाला आहे. आरोपीकडून झालेल्या शोषणानंतर आता त्याच्याशी संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने पीडिता मानसिक धक्क्यात गेल्या आहेत.व्हायरल व्हिडिओंमुळे ओळख उघडगेल्या काही दिवसांत अशोक खरातच्या केबिनमधील काही आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. या व्हिडिओंमध्ये महिलांचे चेहरे स्पष्ट दिसत असल्याने त्यांच्या ओळखी उघड होण्याची भीती निर्माण झाली आहे. पोलिसांनी वारंवार व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांवर गुन्हा नोंदवला जाईल असे इशारे देऊनही हे व्हिडिओ शेअर केले जात असल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे.पीडित महिलांवर मानसिक परिणामया प्रकरणातील किमान आठ ते नऊ महिलांनी मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेतल्याची माहिती समोर आली आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या महिला नैराश्य, भीती आणि असुरक्षिततेच्या भावनेत सापडल्या आहेत. अनेकांना समाजात वावरताना लाज, अपमानित वाटत असून एकटेपणाची भावना सतावत असल्याचे समजते.पोलिसांची कारवाई आणि आवाहनया प्रकरणाच्या तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाकडून पीडित महिलांना पूर्ण सुरक्षा दिली जात आहे. तसेच कोणत्याही प्रकारचा दबाव न घेता पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. त्यांच्याकडून माहिती जाणून घेताना चौकशीची जागा ही पूर्णपणे गुप्त ठेवली जात आहे. सायबर पोलिसांकडून व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर लक्ष ठेवले जात असून, अशा व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.कुटुंबीयांवरही संशयाची साखळीदरम्यान, तपासादरम्यान अशोक खरात याचा मुलगा हर्षवर्धन हा फरार झाल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी त्याची चौकशी करून त्याला सोडण्यात आले होते. मात्र सध्या त्याचा संपर्क होत नसल्याने तो पळून गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यापूर्वीच त्याची पत्नी कल्पना खरातही फरार झाली आहे.दुहेरी संकटात अडकलेल्या पीडित महिलाया प्रकरणात पीडित महिलांना आधी शारीरिक आणि आर्थिक शोषणाचा सामना करावा लागला, तर आता व्हिडिओ व्हायरलमुळे मानसिक छळ सहन करावा लागत आहे. त्यामुळे या प्रकरणात केवळ आरोपींवर कठोर कारवाईच नव्हे, तर स्त्रियांची आणखी बदनामी होणार नाही याची देखील काळजी घेतली गेली पाहिजे.
नवी मुंबई: राज्यात सध्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. अशातच आता नवी मुंबईतून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कळंबोलीत असणाऱ्या अब्दुल रशीद उर्फ बाबाजान या भोंदूबाबाने काही महिलांवर काळी जादू करण्याच्या बहाण्याने लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी दोन महिलांनी या भोंदूबाबाविरोधात पोलिसांत गुन्हे दाखल केले आहेत.अब्दुल रशीद उर्फ बाबाजान लोकांना अल्लाचे महत्व पटवून देत विश्वास मिळवायचा. तर कधी काळ्या जादूची भीती दाखवायचा तसेच गोड बोलून महिलांवर छाप पाडायचा. आर्थिक, वैवाहित समस्या दूर करतो सांगून लोकांना फसवायचा. काळी जादू करण्याच्या बहाण्याने त्याने खालापूर येथे विवाहित महिलेवर अत्याचार केला.काळी जादू करण्याचे सांगून अब्दुल रशीद महिलांना एकट्यात बोलावत होता. खालापूर येथे निर्जस्थळी बांधलेल्या फार्महाऊसवर तो महिलांना घेऊन जात होता. तसेच मध्यरात्री काळी जादू करण्याचे सांगत तो महिलांच्या अंगावरील वस्त्रे काढायला सांगायचा आणि पूजा करायला भाग पाडायचा. महिलांनी विरोध केला तर त्यांना जीवे मारण्याची धमकी देत हा भोंदूबाबा त्यांच्यावर अत्याचार करत होता.अब्दुल रशिद उर्फ बाबाजान हा गेल्या अनेक वर्षापासून लोकांना चुना लावण्याचे काम करीत होता. गोड बोलून , आल्लातालाचे गारूड करून भक्तांना आपलस करीत होता. यामुळे महिलांबरोबर पुरूषही त्याच्या तत्वज्ञानाला बळी पडले आहेत. अनेक पुरूषांकडून त्यांने पैसे उकळलेले आहेत. सद्या दोन महिलांनी तक्रार दिली असली तरी अजून बऱ्याच महिला त्याच्या वासनेच्या शिकार झाल्याचा दावा करण्यात येतोय.कळंबोलीत सुद्धा तो भोंदूबाबा महिलांना भेटायला बोलवायचा. समस्या दूर होतील या आशेने मोठ्या संख्येने लोक त्याला भेटायला जात होते. लोकांची वाढती गर्दी पाहून त्याला सोसायटीतून हाकलून दिले. गुन्हे दाखल झाल्यावर भोंदूने कुटंबासह पळ काढला. अब्दुल रशिद उर्फ बाबाजान हा गेल्या अनेक वर्षापासून लोकांना चुना लावत होता. त्याने महिलांसह पुरुषांचीही आर्थिक फसवणूक केली. अब्दुल रशिद उर्फ बाबाजान विरोधात दोन महिलांनी तक्रार दिली आहे. तसेच बऱ्याच महिलांवर भोंदूबाबाने अत्याचार केला असल्याचा दावा करण्यात येत आहे.
Prajakta Tanpure : राहुरी विधानसभा पोटनिवडणूक माजी आमदार प्राजक्त तनपुरे हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लढणार की अपक्ष हा सस्पेन्स कायम आहे.
Iran US Conflict:इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव वाढतच चालला आहे.

27 C