सन २०२५-२६ पासून भारताने कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे एआय या क्षेत्रात आपले स्थान मजबूत केले. केंद्रीय चौकट जी २०२५ मध्येच निश्चित करण्यात आली होती. तिला आता व्यापक स्वरूप देण्यात आले. दिल्लीच्या भारत मंडपम येथे परिषद भरत आहे. एआय तंत्रज्ञानाचा उपयोग केवळ तंत्रज्ञान म्हणून न करता तिचा उपयोग लोकांच्या कल्याणासाठी आणि विकास करण्याचा उद्देश आहे.सुरुवातीला या एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी १०,३७१.९२ कोटी रुपये मंजूर करण्यात आले. या द्वारे एआय संपूर्ण भारतासाठी कसे उपयुक्त ठरेल आणि मूलभूत मॉडेल्स आणि डेटा बेसेसाठी एआय तंत्रज्ञान कसे उपयुक्त ठरेल हे या परिषदेतून सांगितले जाईल. विषय सर्वसामान्यांना थोडा कळण्यास अवघ़ड आहे. पण यासाठीच परिषद आहे. एआयचा उपयोग करून सामान्यांचे जीवन कसे सुसह्य करता येईल. लोकसमूह, ग्रह आणि प्रगती ही ती सूत्रे आहेत. ज्यांच्या भोवती परिषदेत काम केले जाईल आणि ही सूत्रे समावेशकता, शाश्वत आणि मानवी केंद्रीत एआय या भोवती रचना तयार करण्यात आली.लोकसमूह याचा अर्थ मानव केंद्रित एआय असून मानवतावादाची सेवा मानवांचे हक्क आणि सार्वजनिक सेवांप्रती सर्व लोकांना अधिकार तसेच विश्वासाची बांधणी करून देता येतो यावर हे सूत्र आधारलेले आहे. एआय समावेशक आणि मानवी प्रतिष्ठा यांना आणि भारतातील सांस्कृतिक वैविध्याचा आदर राखून जपवणूक करेल असे दुसरे सूत्र आहे. आपला ग्रह पर्यावरणीयदृष्ट्या शाश्वत एआय पद्धतींना अनूकूल राहील असाही उद्देश आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ऊर्जा सक्षम तंत्रज्ञान आणि जबाबदारीने वापर करून हवामान कृतींना पाठिंबा देईल अशी लवचिकता प्रदान करेल असे तंत्रज्ञान उभारणे असा आहे. भारतात भरणाऱ्या परिषदेची व्याप्ती इतकी मोठी आहे, की भारत मंडपम येथे भरणाऱ्या परिषदेत २.५ लाख प्रतिनिधी उपस्थित राहणार आहे. यात परदेशातून फ्रान्सचे ईमॅन्युएल मॅक्रॉन, ब्राझिलचे लुला डासिल्व्हा, स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सँचेझ आदींसह उपस्थित रहाणार आहेत आणि परदेशातून तज्ज्ञ या परिषदेसाठी उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यात सुंदर पिचाई, सेमी कंडक्टर आणि फाईव्ह जी तंत्रज्ञान राबवण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेले क्रिस्तियानो एमोन आदींचा समावेश आहे.नवी दिल्लीत सुरू होणारी परिषद ही भारतासाठी अशा प्रकारची पहिलीच परिषद आहे आणि एआय धोक्यांचे कसे व्यवस्थापन करायचे हे शिकवणारी आहे. तसेच नावीन्यपूर्ण संशोधनाला रुळावर व्यवस्थित कसे ठेवायचे याचाही विचार केला जाणार आहे. याची जी चौकट आखली आहे ती एआयचा वापर करताना पक्षपात आणि गैरवापराला आळा घालणे आणि तसे करतानाही भारताचे हेतू जबाबदार एआय व्यवस्थापन करणे यापुरते मर्यादित आहे. या परिषदेतून भारताचा हेतू हा स्पष्ट होतो, की जबाबदार एआय गव्हर्नन्सला आकार देण्याचा आहे. पण यातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे, की एआयच्या मार्गदर्शक तत्त्वे जी आहेत ती आरोग्य, शिक्षण, कृषी आणि वित्त यात कशी उपयोगात आणली जातील यावर विचार करण्याचा आहे. कठोर नियंत्रणाशिवाय चौकटीने सात व्यापक सूत्रे निश्चित केली आणि जी धोरणकर्ते आणि उद्योग या दोघांनाही मार्गदर्शन करतील. यामध्ये विश्वास हा पाया, पीपल फर्स्ट म्हणजे लोक सर्वोपरी, संशोधनापेक्षा संयम महत्त्वाचा आणि समानता आणि जबाबदारी यांचा समावेश आहे. या सूत्रांचा यावर भर आहे, की एआय सिस्टीमनी मानवी निर्णय प्रक्रियेला पाठिंबा दिला पाहिजे आणि तरीही ते पारदर्शक आणि कोणतेही पक्षपात टाळून साध्य करता आले पाहिजे. या परिषदेचे सर्वात प्रमुख वैशिष्ट्य हे आहे, की सध्याच्या कायद्यावरील अवलंबितता. अधिकाऱ्यांनी सांगितले आहे, की अनेक एआयशी संबंधित धोके हे सध्याच्या कायदेशीर चौकटीत समाविष्ट आहेत आणि त्यात आयटी नियमावली आणि गुन्हेगारी कायदे यांचा समावेश आहे. या मार्गदर्शक तत्वांत असे सांगितले आहे, की एआय डेव्हलपर्स आणि डिप्लॉयर्सकडून काय अपेक्षा आहे. संशोधनाला प्राधान्य देऊन सरकारने केवळ ते एआयचा प्रमुख वापर करणारे नाही तर जबाबदार आणि समावेशक कारभार जो भारताचा २०४७ साली साकार होणारा विकसित भारत दृष्टिकोन साध्य करणारा असेल असे सिद्ध करू पाहत आहे.एआयचा उपयोग विविध कारणांसाठी होतो आणि हेच या परिषदेचे सार आहे. रोजगार, भाषा, नवीन रोजगार मिळवणे, सार्वजनिक सेवा आणि सामान्य लोकांना लाभप्रद होतील अशा योजना राबवणे यासाठी एआयचा उपयोग कसा करता येईल या दृष्टीने या परिषदेत विचार केला जात आहे. ब्रिटनचे उपपंतप्रधान डेव्हीड लॅमी आणि एआय मंत्री कनिष्क नारायण हे भारतात आलेल्या शिष्ट मंडळात आहेत. त्यांनी सांगितले, की एआयचा उपयोग करून रोजच्या जीवनात कसा सामान्याना लाभ करून देता येईल आणि जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात एआयचा उपयोग करून डॉक्टर त्वरीत रोगनिदान करतील, शिक्षक शिकवण्यात नवनवीन पद्धती आणतील आणि परिषदा सेवा झटपट देऊन उद्योग नवीन जनरेशनचे रोजगार तयार करतील हे पहाण्यासाठी एआयचा वापर केला जाईल. एआय हे अभूतपूर्व वचन देते की जागतिक आव्हानांना जसे की सार्वजनिक आरोग्य आणि शिक्षण आणि शेतीत उत्पादकता वाढवणे आणि त्यासोबतच मानवी हक्कांचा आदर करणे याबाबत क्रांतिकारी आहे. एआय पद्धतींचा वापर जर उपयोगकर्ते आणि विकासक यांच्यामार्फत झाला तर समाजाला त्याचा शेवटी प्रचंड लाभ होऊ शकतो. जगात सर्वात जास्त लोकसंख्या असूनही भारतात सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे आणि डिजिटल बाजारपेठांपैकी ती सर्वात वेगाने वाढणारी आहे. मानवता, समावेशक वाढ आणि शाश्वत विकासासाठी एआयचा उपयोग केला पाहिजे असे जे भारताचे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले ते अगदीच योग्य आहे. ही शिखर परिषद राष्ट्रीय क्षमता, आर्थिक लवचिकता आणि दीर्घकालीन क्षमतांचा सक्षम देश म्हणून भारताची ओळख निश्चित करेल. अत्यंत झपाट्याने बदलत असलेल्या एआयचे जग समजण्यासाठी आणि एआयचा उद्देश्य सामान्य जनांपर्यंत पोहोचवणे हा या परिषदेचा हेतू आहे. भारत भरवत असलेल्या या परिषदेची संकल्पना आहे. सर्वजन हिताय सर्वजन सुखाय. हा हेतू सर्व काही सांगून जाणारा आहे. यावेळी परिषदेचा हेतू एआयपासून धोका हा केवळ नाही तर एआयपासून सामान्य लोकांना होणारा फायदा हाही आहे.
मिनी विधानसभेनिमित्ताने मोठी घुसळण
वार्तापत्र : दक्षिण महाराष्ट्रदक्षिण महाराष्ट्रातील (कोल्हापूर-सांगली) स्थानिक राजकारणात, विशेषतः सहकारी संस्था आणि पंचायत समित्यांमध्ये मोठी उलथापालथ होत आहे. स्थानिक नेत्यांचे गट बदलणे, नवीन आघाडी तयार होणे यामुळे अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीची प्रक्रिया अत्यंत चुरशीची बनली आहे. सत्तासंघर्षात बाजी मारण्यासाठी दोन्ही बाजूंनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे.सांगली, सातारा आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यांच्या जिल्हा परिषद निवडणुकीचे निकाल ९ फेब्रुवारी २०२६ रोजी जाहीर झाल्यानंतर दक्षिण महाराष्ट्राच्या राजकारणात नवी उलथापालथ सुरू झाली आहे. आता अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू असून, प्रत्येक जिल्ह्यात पक्षीय आकडेवारी, आरक्षण आणि गुप्त चर्चा यांचा मेळ घालून सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न सुरू आहेत. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील खेळीमेळी, फुटीर गट आणि स्थानिक नेत्यांची प्रतिष्ठा यामुळे तीनही जिल्हे ‘मिनी विधानसभे’सारखे वाटत आहेत. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्ता स्थापनेसाठी चुरस वाढली आहे. उलथापालथ: दिग्गज नेत्यांच्या निर्णयामुळे समीकरणे बदलत असून अनेक ठिकाणी नवीन गट (आघाडी) तयार होत आहेत. अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडीसाठी बैठका आणि गुप्त चर्चांचा वेग वाढला आहे. सत्ता टिकवण्यासाठी किंवा मिळवण्यासाठी फोडाफोडीचे राजकारण पाहायला मिळत आहे. या उलथापालथीत कोणता गट बाजी मारतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.सांगली: त्रिशंकू परिस्थिती, जयंत पाटलांचा दबदबासांगली जिल्हा परिषदेच्या ६१ जागांपैकी कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत (३१) मिळाले नाही. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) १८ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला, तर भाजपला १६ जागा मिळाल्या. काँग्रेसचे ११ उमेदवार विजयी झाले. वाळवा तालुक्यात जयंत पाटलांनी बालेकिल्ला राखला, तर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नांनंतरही भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही. दहा पंचायत समित्यांपैकी भाजप, शिंदेसेना, राष्ट्रवादी (शरद), राष्ट्रवादी (अजित) आणि काँग्रेस यांना प्रत्येकी दोन समित्यांवर सत्ता मिळाली. अध्यक्षपदासाठी आता पोस्ट-पोल आघाडीची चर्चा सुरू आहे. जयंत पाटलांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी शरद पवार, काँग्रेस व अन्य छोट्या गटांसोबत सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न करत आहे. दुसरीकडे भाजप महायुतीच्या साथीने बहुमत गोळा करण्याचा दावा करत आहे. सांगली ही पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणाची ‘बारोमीटर’ मानली जाते. येथील अध्यक्ष निवड आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महत्त्वपूर्ण ठरेल.सातारा: भाजपचा दावा, ओबीसी महिला आरक्षणाचा ट्विस्टसातारा जिल्हा परिषदेच्या ६५ जागांपैकी भाजप २७ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला, तर राष्ट्रवादी काँग्रेसला २० आणि शिवसेनेला १५ जागा मिळाल्या. राष्ट्रवादी (अजित पवार गट) ची कामगिरी चांगली दिसली, परंतु स्पष्ट बहुमत (३३) कोणालाही नाही. अध्यक्षपद ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव असल्याने ९ ओबीसी महिला सदस्यांमधून एकाची निवड होणार आहे. ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी स्पष्ट केले की, “साताऱ्यात भाजपचाच अध्यक्ष होईल.” शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाने रणनीती आखली आहे. शंभूराज देसाई (शिवसेना) यांच्यासोबत ‘पॅचअप’ करून बहुमत गोळा करण्याची शक्यता आहे. अर्थात शंभूराज देसाई यांच्या अटी शर्तीवर ते ठरेल. राष्ट्रवादी-शिवसेना आघाडीला बहुमत असतानाही दावा न करता भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. सातारा जिल्हा परिषदेत प्रथमच भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असून, तीन पंचायत समित्यांवरही त्यांची सत्ता आली आहे. यामुळे स्थानिक नेतृत्व बळकट होण्याची शक्यता आहे.कोल्हापूर: महायुतीचे बहुमत, राष्ट्रवादीचा दावाकोल्हापूर जिल्हा परिषदेच्या ६८ जागांपैकी महायुतीला ५१ जागा मिळून स्पष्ट बहुमत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) २० जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला, तर काँग्रेस १४ जागांसह दुसऱ्या क्रमांकावर. हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने उच्चांकी कामगिरी केली. अध्यक्षपद शाहूवाडी तालुक्यासाठी राखीव असल्याचे संकेत मिळत आहेत. राजकुंवर गायकवाड यांचे नाव सर्वाधिक चर्चेत आहे. महायुतीत अध्यक्षपद वाटपाची चर्चा सुरू आहे – प्रथम राष्ट्रवादी, नंतर भाजप किंवा शिवसेना अशी वाटणी होईल. महानगरपालिकेप्रमाणे सव्वा वर्षाचा रोटेशन फॉर्म्युला येथेही लागू होण्याची शक्यता aahe. काँग्रेसचे सतेज पाटील यांनी महायुतीतील गोंधळ हेरून दुरावलेल्या नेत्यांशी संपर्क साधला असल्याचेही बोलले जाते. कोल्हापूर जिल्हा परिषदेत आतापर्यंत २० अध्यक्ष काँग्रेस-राष्ट्रवादीचे होते; यंदा महायुती ही परंपरा मोडण्याच्या तयारीत आहे.प्रादेशिक परिणाम आणि भविष्यातील चित्रतीनही जिल्ह्यांतील अध्यक्ष निवडीचा फैसला केवळ स्थानिक सत्तेसाठी नाही, तर पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे ठरवेल. सांगलीत जयंत पाटलांचा प्रभाव, साताऱ्यात गोरे-भोसले यांची रणनीती आणि कोल्हापुरात मुश्रीफ-महायुती यांचा खेळ यामुळे मविआ आणि महायुती यांच्यातील संघर्ष तीव्र होणार आहे. ओबीसी आरक्षण, महिला प्रतिनिधित्व आणि स्थानिक नेत्यांच्या मेळ घालणे नेत्यांसमोर आव्हान आहे. दक्षिण महाराष्ट्र हा राज्याच्या राजकारणाचा ‘स्विंग’ विभाग मानला जातो. येथील निकाल २०२९ च्या विधानसभा निवडणुकीसाठी संकेत देणारे ठरतील. सध्या चर्चा, बैठका आणि गुप्त सौदे यांचा काळ सुरू आहे. अंतिम निकाल येताच दक्षिण महाराष्ट्राचे राजकीय चित्र स्पष्ट होईल.
Top 10 news: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना पुण्यातील मुंढवा जमीन घोटाळाप्रकरणी चौकशी समितीकडून क्लीन चिट देण्यात आल्याची माहिती समोर आलीय.
Nafisa Begum Abdul Sattar : आमदार अब्दुल सत्तार यांच्या पत्नी नफिसाबेगम यांचे निधन झाल्याचे वृत्त आहे.
दिल्ली: बांगलादेशच्या १३ व्या संसदीय निवडणुकीत मिळालेल्या प्रचंड विजयानंतर, बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (BNP) चे अध्यक्ष तारिक रहमान मंगळवारी पंतप्रधान म्हणून शपथ घेतील. शपथविधी सोहळा पारंपारिक स्थळ बंगघवनाऐवजी राष्ट्रीय संसदेच्या दक्षिण प्लाझा येथे होणार आहे.राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन हे संध्याकाळी ४ वाजता नवीन मंत्रिमंडळाची शपथ घेणार आहेत. सकाळी मुख्य निवडणूक आयुक्त एएमएम नासिर उद्दीन हे सर्व २९७ नवनिर्वाचित खासदारांना शपथ देणार आहेत.यानंतर, बीएनपी संसदीय पक्षाच्या बैठकीत अधिकृतपणे आपला नेता निवडेल आणि त्यानंतर अध्यक्ष त्यांना सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित करतील. बीएनपीने २९७ पैकी २०९ जागा जिंकल्या, तर जमात-ए-इस्लामीने ६८ जागा जिंकल्या.शेख हसीना यांच्या अवामी लीगला सार्वत्रिक निवडणुकीत भाग घेण्याची परवानगी नव्हती. आता, तारिक रहमान पहिल्यांदाच पंतप्रधान म्हणून काम पाहतील, ते अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांच्या जागी येतील.तारिक रहमान यांचे दोन प्रमुख आव्हानांवर लक्ष
Pune Land Scam :पुण्यातील मुंढवा जमीन प्रकरणाचा खारगे समितीचा अहवाल समोर आला असून, पार्थ पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मुंबई: खगोलीय घटनांच्या दृष्टीने २०२६ हे वर्ष विशेष ठरणार आहे. या वर्षात दोन सूर्यग्रहण आणि दोन चंद्रग्रहण लागणार आहेत. वर्षातील पहिले सूर्यग्रहण १७ फेब्रुवारी २०२६ रोजी लागणार आहे. हे सूर्यग्रहण कंकणाकृती असेल. कंकणाकृती ग्रहणात चंद्र सूर्याला पूर्णपणे झाकत नाही, तर सूर्याची कडा अंगठीसारखा (रिंगसारखा) दिसते. याच दिवशी माघ महिन्यातील अमावस्या असल्याने ग्रहणाच्या वेळी अमावस्येची पूजा करता येईल का? याबद्दल जाणून घेऊयात...सूर्यग्रहण २०२६ची वेळवर्षाचे पहिले सूर्यग्रहण १७ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ३:२६ वाजता (IST) सुरू होईल आणि संध्याकाळी ७:५७ वाजता समाप्त होईल. सूर्यग्रहणाचा एकूण कालावधी सुमारे ४ तास ३२ मिनिटांचा असेल. पण हे ग्रहण भारतात दिसणार नाही.माघ अमावस्या आणि ग्रहणाचा योगमाघ अमावस्या १६ फेब्रुवारी २०२६ रोजी संध्याकाळी ५:३५ वाजता सुरू होईल आणि १७ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ५.३१ वाजता समाप्त होईल. उदया तिथीनुसार अमावस्या १७ फेब्रुवारीलाच मानली जाईल. म्हणजेच अमावस्या आणि सूर्यग्रहण एकाच दिवशी येत आहेत.ग्रहणाच्या वेळी पूजा करू शकतो का?धार्मिक मान्यतेनुसार, जेव्हा ग्रहण भारतात दृश्यमान असते तेव्हाच सूतक काळ लागू होतो. हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नसल्यामुळे सूतक काळ लागू होणार नाही. त्यामुळे माघ अमावस्येच्या व्रताचे पालन करता येईल आणि पूजा-पाठही करता येईल. कोणत्याही शुभ कार्यात अडथळा मानला जाणार नाही.माघ अमावस्येचे महत्त्वअमावस्या हा दिवस पितरांना समर्पित मानला जातो. या दिवशी पवित्र नदीत स्नान, दान आणि तर्पण करणे शुभ मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार ज्यांच्या कुंडलीत पितृदोष आहे, त्यांनी या दिवशी तर्पण अवश्य करावे. पितरांना संतुष्ट केल्यास घरात सुख-शांती आणि समृद्धी येते. रखडलेली कामेही पूर्ण होऊ लागतात, असे मानले जाते.ग्रहणाच्या वेळी काय खावे, काय टाळावे?सूर्यग्रहण असो वा चंद्रग्रहण, कोणत्याही ग्रहणाच्या काळात शिजवलेले अन्न, तामसिक पदार्थ जसे मांस, मासे, कांदा, लसूण आणि पचनास जड अन्नपदार्थ खाणे टाळावे, अशी मान्यता आहे. कारण हे पदार्थ अशुद्ध आणि नकारात्मक ऊर्जेने प्रभावित होतात, असे म्हणतात. उत्तम आरोग्यासाठी ग्रहणाच्या वेळी उपवास करणे चांगले मानले जाते. काही खाणे आवश्यक असल्यास त्यात तुळशीपत्र ठेवावे आणि द्रवयुक्त पदार्थांचे सेवन करावे. तसेच पचनास हलके आणि सात्त्विक अन्नाचे सेवन करावे.
Mumbai Municipal Corporation :मुंबई महापालिकेच्या महापौर निवडीनंतर आता विविध समित्यांवरील सदस्यांची नावे जाहीर करण्यात आली आहे.
दिल्ली: फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन सोमवारी रात्री तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर प्रथम महिला ब्रिजिट मॅक्रॉन यांच्यासह मुंबईत दाखल झाले आहेत. महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई विमानतळावर फ्रान्सचे अध्यक्ष आणि प्रथम महिला यांचे स्वागत केले.या भेटीदरम्यान, मॅक्रॉन पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार आहेत. तसेचच कृत्रिम बुद्धिमत्ता आणि धोरणात्मक सहकार्यावर चर्चा करण्याची शक्यता आहे. हेलिकॉप्टर आणि हॅमर प्रिसिजन-मार्गदर्शित क्षेपणास्त्रांच्या संयुक्त निर्मितीसह द्विपक्षीय संरक्षण सहकार्यासाठी नवीन प्रोत्साहन देणे हे मुख्य लक्ष केंद्रित केले जाईल.उल्लेखनीय म्हणजे, पंतप्रधान मोदींच्या निमंत्रणावरून मॅक्रॉन यांचा हा चौथा देश दौरा आहे, जो भारत-फ्रान्स धोरणात्मक भागीदारीमध्ये सातत्यपूर्ण गती दर्शवितो, ज्यामध्ये विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) सहकार्य आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित केले जाईल.मुख्यमंत्री फडणवीसांकडून फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचे स्वागतराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्स पोस्ट करत फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष आणि प्रथम महिला यांचे स्वागत केले आहे. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले की, मुंबईला दोन वर्षे पूर्ण! फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष महामहिम इमॅन्युएल मॅक्रॉन आणि प्रथम महिला ब्रिजिट मॅक्रॉन यांचे मुंबईत आगमन झाल्यावर त्यांचे हार्दिक स्वागत!महाराष्ट्र तुमचे स्वागत करतो! माननीय राष्ट्रपती मॅक्रॉन आणि संपूर्ण फ्रेंच शिष्टमंडळाला आनंददायी वास्तव्य आणि यशस्वी भेटीसाठी शुभेच्छा! माननीय राज्यपाल आचार्य देवव्रत जी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, मंत्री, अधिकारी देखील स्वागतासाठी उपस्थित होते. Bienvenue Mumbai!A very warm welcome to the President of France, H.E. Emmanuel Macron and First Lady Brigitte Macron as they arrive in Mumbai!Maharashtra welcomes you!Wishing Hon President Macron and the entire French delegation a pleasant stay and a successful… pic.twitter.com/h0CrOc90OG— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 16, 2026मुंबई विमानतळावर राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडून फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचे स्वागत
16 जानेवारी 2026 रोजी, हरिद्वारमधील गंगा घाटांवर जागोजागी फलक लावण्यात आले होते. त्यावर लिहिले होते- ‘हर की पौडीवर गैर-हिंदूंना प्रवेश निषिद्ध आहे.’ फलकावर कोणत्याही संस्थेचे नाव नव्हते. खाली फक्त एवढेच लिहिले होते की, हरिद्वार म्युनिसिपल ॲक्टच्या आदेशानुसार. त्यानंतर उत्तराखंडमध्ये केदारनाथ, बद्रीनाथसह 47 तीर्थक्षेत्रांवर गैर-हिंदूंना प्रवेशबंदी करण्याच्या मागणीने जोर धरला. यासाठी प्रस्ताव आणला जात आहे. हर की पौडीची जबाबदारी सांभाळणाऱ्या श्री गंगा सभेने गंगा घाटांवर फलक लावून याची सुरुवात केली. चारधाममध्येही लवकरच असे फलक दिसणार आहेत. चारधाम बोर्ड किंवा समित्यांनीच नव्हे, तर सरकारनेही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मुख्यमंत्री पुष्कर धामी यांनी सांगितले आहे की, चारधामच्या समित्या, संत समाज आणि तीर्थक्षेत्रांसाठी जबाबदार असलेले लोक जे काही सांगतील, तेच आम्ही करू. यासाठी 1916 च्या हरिद्वार म्युनिसिपल ॲक्ट/बाय-लॉजवर अभ्यासही सुरू आहे. प्रश्न असा आहे की, हिंदूंच्या तीर्थक्षेत्रांवर गैर-हिंदू जातात का किंवा त्यांच्याशी किती गैर-हिंदूंची रोजीरोटी जोडलेली आहे? दैनिक भास्करच्या टीमने या प्रश्नांची उत्तरे, बंदीच्या मागणीचे कारण आणि गरज समजून घेण्यासाठी गंगा सभेचे अध्यक्ष नितीन गौतम आणि बद्रीनाथ-केदारनाथ समितीचे अध्यक्ष हेमंत द्विवेदी यांच्याशी संवाद साधला. 'बंदी घातली नसती तर काय देवांच्या भूमीला इस्लामचे घर बनताना पाहिले असते का?' हरिद्वारमधील सर्व तीर्थक्षेत्रांवर गैर-हिंदूंना प्रवेशबंदी घालण्याची मागणी केली जात आहे. हर की पैडी येथे फलकही लावण्यात आला आहे. आता इतर ठिकाणच्या धार्मिक समित्याही लवकरच औपचारिकपणे याची घोषणा करणार आहेत. आम्ही हरिद्वारमधील सर्वात जुनी धार्मिक संस्था आणि हर की पौडीची जबाबदारी सांभाळणारी संस्था श्री गंगा सभेचे अध्यक्ष नितीन गौतम यांना विचारले की बंदी घालण्याची मागणी करण्याची गरज का पडली? नितीन म्हणतात, 'ही नवीन मागणी नाही. हा त्या कायद्याबद्दल आहे, जो याच ठिकाणासाठी बनवला होता. तो लागूही आहे, फक्त त्याचे पालन होत नाहीये. आम्ही त्या कायद्यानुसार हिंदूंच्या तीर्थस्थळांवर गैर-हिंदूंना बंदी घालू इच्छितो. हर की पौडीमध्ये हे झाले आहे. आता इतर ठिकाणीही होईल.' नितीन गौतम पुढे म्हणतात, 'सर्वात मोठा धोका कोण आहे, हे सर्वजण जाणतात. कुराणमध्ये लिहिले आहे - आधी दारुल अमन करा, मग दारुल हरम आणि नंतर दारुल इस्लाम. म्हणजे जिथे ही समुदाय (मुस्लिम) खूप कमी संख्येत असेल, तिथे बंधुत्वाची गोष्ट करा, गंगा-जमुनी संस्कृती दाखवा. लोकसंख्या वाढल्यास दारुल हरम म्हणजे दंगल-फसाद करा.' 'यानंतर दारुल इस्लाम हे अंतिम उद्दिष्ट पूर्ण करा. म्हणजे त्या जागेला-जमिनीला इस्लामचे घर बनवा. हरिद्वारच नाही, तर उत्तराखंडमध्ये जिथे पाहाल तिथे मुस्लिम दंगल-फसाद करत आहेत. ते दारुल हरमच्या स्थितीपर्यंत पोहोचले आहेत.' दावा- मुस्लिमांमुळे हरिद्वारमध्ये गुन्हे वाढलेया मागणीवर सरकारची भूमिका काय आहे? नितीन गौतम सांगतात, 'मुख्यमंत्री पुष्कर धामी यांचे विधान तुम्ही ऐकले असेल. त्यांनी सांगितले की, संत समाज आणि तीर्थक्षेत्रांशी संबंधित समित्या या प्रकरणांमध्ये निर्णय घेतील. सरकारची टीम 1916 च्या हरिद्वार म्युनिसिपल ॲक्ट किंवा बायलॉजचा गांभीर्याने अभ्यास करत आहे.' गैर-हिंदू देखील हिंदूंच्या तीर्थक्षेत्रांवर येतात का? 'ते तीर्थयात्री म्हणून येत नाहीत, पण पैसे कमवण्यासाठी येतात. हर की पैडी किंवा मंदिरांच्या आसपास चहाची दुकाने, सलून आणि फळांची दुकाने यांचीच असतात. ते तात्पुरते ठिकाण तर बनवतातच.' ‘गेल्या काही वर्षांत हरिद्वारमध्ये यांच्यामुळे अचानक गुन्हेगारी वाढली आहे. जर यांना थांबवले नाही, तर हे लोक याला इस्लामचे घर म्हणजेच दारुल इस्लाम बनवूनच सोडतील, म्हणूनच हे आवश्यक आहे.’ कुंभ क्षेत्रातही गैर-हिंदूंना प्रवेशबंदी आहे का? यावर नितीन म्हणतात, 'सध्या अधिकृतपणे नाही, पण तिथेही बंदी असेल. हे रुद्रप्रयागपासून हरिद्वारपर्यंतचे सुमारे 75-80 किलोमीटरचे क्षेत्र आहे. येथेही तोच कायदा लागू आहे, जो इतर तीर्थक्षेत्रांवर आहे. म्हणून येथेही बंदी असेल.' बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडण्यापूर्वी गैर-हिंदूंना प्रवेशबंदीचार धामांपैकी दोन धाम बद्रीनाथ-केदारनाथ आहेत. हर की पैडी आणि कुंभ क्षेत्रात गैर-हिंदूंना प्रवेशबंदीचे फलक लावल्यानंतर, येथेही याची मागणी वाढत आहे. आम्ही बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीचे अध्यक्ष हेमंत द्विवेदी यांच्याशी बोललो. ते उत्तराखंड सरकारमध्ये राज्यमंत्री आहेत. ते स्पष्टपणे म्हणतात, ‘गैर-हिंदूंना बंदी घालणे हा मुद्दाच बनू नये, कारण ही हिंदूंसाठी तीर्थक्षेत्रे आहेत, पर्यटन स्थळे नाहीत. येथे फक्त हिंदूच येतील. आम्ही प्रस्ताव तयार केला आहे. सर्वांची सहमतीही आहे. बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडण्याची तारीख येताच, त्यापूर्वी आम्ही बोर्डाची बैठक घेऊ आणि यावर शिक्कामोर्तब होईल.’ ते पुढे म्हणतात, 'येथे आदि शंकराचार्यांनी स्थापित केलेल्या वैदिक सनातन परंपरेनुसार, पूजा पद्धती आणि नियम आहेत. त्यांची पवित्रता आणि प्राचीनता टिकवून ठेवणे हा आमचा धर्म आहे. परदेशी आणि गैर-आस्था असलेल्या लोकांच्या प्रवेशाचा येथे कधीच नियम नव्हता.' तर या वर्षी बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडण्यापूर्वी हरिद्वार म्युनिसिपल ॲक्ट कठोरपणे लागू होईल का? उत्तर मिळाले, 'होय, नक्कीच.' ‘परिसर प्रतिबंधित, तरीही दर्गे बांधले गेले, नमाज पठण सुरू झाले’ बद्रीनाथ आणि केदारनाथसारख्या प्रमुख मंदिरांमध्येही गैर-हिंदू येतात का? हेमंत उत्तर देताना म्हणतात, 'येथे सातत्याने अनेक अवैध दर्गे बांधले गेले आहेत, त्यामुळे एक गोष्ट स्पष्ट आहे की हे लोक येथे येतात. त्यांचा येथे येण्याचा उद्देश तो नाही, जो आमचा आहे, म्हणून त्यांच्यापासून धोकाही आहे.' बद्रीनाथ किंवा केदारनाथ धामच्या आसपासही नवीन दर्गे बांधले गेले आहेत का? उत्तरादाखल ते म्हणतात, 'होय, दोन वर्षांपूर्वीपासून हे लोक येथे नमाज पठण करू लागले, जो परिसर प्रतिबंधित आहे. नंतर हर की पौडीमध्येही असेच प्रकरण समोर आले, त्यामुळे त्यांना थांबवावेच लागेल.' सरकार याला सहमत आहे का? हेमंत म्हणाले, 'सरकारच्या सहमती किंवा असहमतीचा प्रश्नच का, राज्य तर कायद्याने चालते. हरिद्वार म्युनिसिपल ॲक्ट तेच सांगतो, जे आम्ही म्हणत आहोत. हा ॲक्ट अजूनही लागू आहे, आम्ही फक्त याची आठवण करून देत आहोत.' गैर-हिंदूंमध्ये जैन, शीख आणि बौद्ध नाहीत तर मग कोण?राज्यमंत्री हेमंत द्विवेदी यांना आम्ही विचारले की तुमच्या मते हिंदू कोण आहे? ते म्हणतात, 'संविधानाच्या कलम-25 मध्ये स्पष्ट लिहिले आहे - शीख, जैन, बौद्ध हे हिंदू आहेत.' ख्रिश्चन आणि मुस्लिमांसाठी बंदीचा प्रस्ताव सरकारनेही मान्य केला आहे का? उत्तर मिळाले- 'अशा मुद्द्यांवर सर्वोच्च न्यायालयानेही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. उज्जैन महाकालच्या गर्भगृहात प्रवेशाचे एक प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले होते, परंतु न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले की हा मंदिर समितीचा विषय आहे. कोण जाईल आणि कोण नाही हे ती (समिती) ठरवेल. येथेही तीच परिस्थिती आहे. तीर्थक्षेत्रे, मंदिरांबद्दल जे काही ठरवायचे आहे, ते समितीच ठरवेल. हे सरकारही मान्य करते.' 2027 चा अर्धकुंभ मुस्लिम-ख्रिश्चनांसाठी प्रतिबंधित असेल का? हेमंत द्विवेदी यांना विचारण्यात आले की, यावेळी 2027 चा अर्धकुंभ गैर-हिंदूंसाठी म्हणजेच मुस्लिम आणि ख्रिश्चनांसाठी प्रतिबंधित असेल का, तेव्हा त्यांचे उत्तर होते, 'नक्कीच असेल. नियम नेहमीच सर्वांसाठी असतात.' मग काय आर्थिक घडामोडींमध्येही मुस्लिमांचा सहभाग संपेल का? उत्तर मिळालं- 'तसं नाहीये. प्रतिबंधित क्षेत्राबाहेर जे काही करायचं असेल ते करा, पण आत येण्याची परवानगी नसेल.' वक्फ बोर्ड म्हणाला- यात चुकीचं काय, मक्कामध्येही गैर-मुस्लिमांना बंदी आहे उत्तराखंड वक्फ बोर्डाचे अध्यक्ष शादाब शम्सही या बंदीचे समर्थन करतात. ते म्हणतात, 'तुम्ही कधी मक्का येथे गेला आहात का, गेला नसाल. जर तुम्ही जाण्याचा प्रयत्न केला असता, तरी जाऊ शकला नसता. तिथे हिंदूंना जाता येत नाही. ते मुस्लिमांचे सर्वात मोठे धार्मिक स्थळ आहे. त्यामुळे जर उत्तराखंडमधील तीर्थक्षेत्रांमध्ये गैर-हिंदूंना बंदी घातली जात असेल, तर यात मला काहीही गैर दिसत नाही.' ‘जर कोणाला हिंदू धर्मात इतकी रुची असेल, तर तो धर्म बदलून या तीर्थक्षेत्रांना भेट देऊ शकतो. देशात अशी अनेक प्रकरणे आली, जसे की- गर्भगृहात प्रवेशाचे असो किंवा कोणत्या मंदिरात प्रवेशाचे, जवळपास सर्वच ठिकाणी धार्मिक समित्यांची बाजू कोर्टाने स्वीकारली. येथेही आपण दुसऱ्याच्या धर्माच्या श्रद्धा आणि नियमांचा आदर केला पाहिजे.’ बंदी घातल्यास, गैर-मुस्लिमांच्या कामावर परिणाम होईल का? उत्तराखंडमधील चारधाम तीर्थक्षेत्रात यात्रेदरम्यान लाखो लोक काम करतात. यात 10 ते 12 हजारांहून अधिक लोक थेट जोडलेले आहेत. यात घोडा-खेचर चालक, हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये काम करणारे कर्मचारी, वाहतुकीशी संबंधित लोक आणि सुरक्षा कर्मचारी यांचा समावेश आहे. एकट्या गौरीकुंडसारख्या परिसरात 350 हून अधिक हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि तंबू निवासस्थानं आहेत. त्याचबरोबर, प्रवासादरम्यान भाविकांना चढाईसाठी घोडे, खेचर, पालखी किंवा डांडी-कंडीची गरज भासते. केदारनाथमध्येच जवळपास 8,000 हून अधिक डांडी-कंडी, टट्टू आणि घोडे-खेचर ऑपरेटर नोंदणीकृत आहेत. काही कुटुंबांमध्ये असे खेचर आणि कंडीवाले आहेत, जे नोंदणीकृत नाहीत. अशा परिस्थितीत त्यांची खरी संख्या 12 ते 15 हजार दरम्यान असू शकते. यामध्ये मुस्लिम कर्मचाऱ्यांची मोठी संख्या आहे. जर बंदी घातली तर त्यांच्या रोजगारावर थेट परिणाम होईल. त्याचबरोबर चार धामच्या यात्रा मार्गावर असलेल्या हॉटेल-रेस्टॉरंटमध्ये काम करणारेही 2 हजारांहून अधिक आहेत, यामध्येही बरेच मुस्लिम लोक आहेत. त्यांचे कामही प्रभावित होईल.
MD Drugs Seized : खराडीत गस्तीदरम्यान सापडला तपासाचा धागा; १ किलो ९६० ग्रॅम एमडी आणि कारसह ४ कोटी २७ लाखांचा मुद्देमाल जप्त.
Pune Police : आता ‘या’ठिकाणी आंदोलनांवर बंदी! काँग्रेस भवन राड्यानंतर पोलीस आयुक्तांचा कडक निर्णय
Pune Police : भाजप-काँग्रेस शहराध्यक्षांसह कार्यकर्त्यांवर गुन्हे; पोलीस आयुक्तांनी फेटाळले पक्षपातीपणाचे सर्व आरोप.
सुमारे 1.76 लाख रुपयांच्या सर्वकालीन उच्चांकानंतर सोन्याची किंमत सतत चढ-उतार होत आहे. किंमत 1 लाख रुपयांच्या खाली येऊ शकते असा अंदाज बांधला जात आहे. सोन्याच्या दरातील ही घट रशियाने अमेरिकेला दिलेल्या ऑफरमुळे असल्याचे मानले जाते. जर हा करार अमेरिका आणि रशिया यांच्यात अंतिम झाला, तर त्यामुळे बाजारात मोठे बदल होऊ शकतात. अखेर रशिया-अमेरिका करार काय आहे, तो सोन्याच्या दरात कशी घट करेल आणि कधी? आजच्या एक्सप्लेनरमध्ये जाणून घेऊया... प्रश्न 1: रशिया अमेरिकेशी कोणता करार करणार आहे?उत्तर: रशिया लवकरच व्यापारासाठी अमेरिकन डॉलरचा वापर पुन्हा सुरू करू शकतो. ब्लूमबर्गनुसार, रशिया-युक्रेन युद्धाच्या समाप्तीनंतर रशियाने अमेरिकेशी करार करण्यासाठी वाटाघाटी करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. त्यात सात मुद्दे आहेत ज्यावर रशिया आणि अमेरिका सहमत होऊ शकतात. यापैकी एक आहे - डॉलरचा वापर पुन्हा सुरू करणे. रशिया, जो भागीदार देशांसोबत डॉलरऐवजी स्थानिक चलनात व्यापार करतो, तो आता डॉलर सेटलमेंट प्रणालीमध्ये परत येण्याचा विचार करत आहे. यात तेल आणि नैसर्गिक वायू खरेदी करण्यासाठी डॉलरचा वापर करण्याचाही समावेश असेल. हा प्रस्ताव वरिष्ठ रशियन अधिकाऱ्यांमध्ये सामायिक करण्यात आला आहे. रशिया तेल आणि गॅसचा व्यापार पुन्हा डॉलरमध्ये सुरू करेल प्रश्न 3: रशियाद्वारे डॉलरचा वापर डी-डॉलरकरणवर कसा परिणाम करेल?उत्तर: डी-डॉलरकरण म्हणजे जागतिक व्यवसायासाठी डॉलरऐवजी पर्यायी चलनांचा वापर करणे. अमेरिकेने रशियाचे 300 अब्ज डॉलर जप्त करणे हा संपूर्ण जगासाठी एक मोठा धक्का होता. तेव्हापासून अनेक देशांनी डी-डॉलरकरणावर भर देण्यास सुरुवात केली आहे... रशियाच्या पुढाकाराने जगभरात डॉलरमुक्तीला गती मिळाली होती. आता, जर रशिया स्वतः डॉलरचा वापर सुरू करेल, तर डॉलरमुक्तीची गती मंदावू शकते. मात्र, रशियाची सरकारी वृत्तसंस्था TASS सोबतच्या एका मुलाखतीत क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी सांगितले की, अमेरिकेसोबतच्या द्विपक्षीय व्यापारात डॉलरचा वापर केल्याने रशियाच्या व्यापारात स्थानिक चलनांना प्रोत्साहन देण्याच्या तत्त्वावर कोणताही परिणाम होणार नाही. पेस्कोव्ह यांच्या मते, रशियाचे आपल्या भागीदार देशांसोबत स्थानिक चलनांमध्ये व्यापार करण्याचे धोरण कायम राहील. जर डॉलर फायदेशीर ठरला, तर त्याचा वापर पुन्हा सुरू होईल, परंतु केवळ इतर चलनांच्या संयोगानेच. केवळ डॉलरमध्येच व्यवसाय होईल असे नाही. प्रश्न 4: जर रशियाने डॉलरचा वापर केला तर सोन्याच्या दरात घट होईल का? जर होय, तर कसे? उत्तर: डॉलरवरील त्यांचे अवलंबित्व कमी करण्यासाठी जगभरातील अनेक देश, विशेषतः ब्रिक्स देश, त्यांच्या गंगाजळीतून डॉलर कमी करत आहेत आणि सोन्याचा साठा वाढवत आहेत. 2005 मध्ये भारताचे परकीय चलन साठा (फॉरेन रिझर्व्ह) फक्त 4.3% सोने होते. ते 2025 पर्यंत वाढून 15% झाले आहे. 2000 ते 2025 दरम्यान चीनचा सोन्याचा साठा 483% वाढला. ब्राझीलने 2025 मध्ये 16 टन सोने खरेदी केले होते, मागील चार वर्षांत कोणतेही सोने खरेदी केले नव्हते. गेल्या वर्षी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आल्यानंतर त्यांच्या टॅरिफमुळे जगभरात आर्थिक अस्थिरतेची भीती आहे. अनेक देशांच्या केंद्रीय बँकांनी अधिक सोने खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. विशेषतः ब्रिक्स देशांकडे आता जगातील 20% सोन्याचा साठा आहे. असेट मॅनेजमेंट कंपनी पेस 360 चे संस्थापक अमित गोयल यांच्या मते, रशियाचा निर्णय डी-डॉलरकरण प्रक्रियेत मोठा बदल घडवून आणेल. जगभरातील केंद्रीय बँका घाबरून त्यांच्या सोन्याच्या साठ्यात वेगाने घट करू शकतात. यामुळे बाजारात सोन्याचा पुरवठा वाढेल. जेव्हा एखाद्या वस्तूचा पुरवठा मागणीपेक्षा जास्त होतो, तेव्हा त्याची किंमत कमी होऊ लागते. येत्या काळात सोन्यासोबतही असेच काहीसे होऊ शकते. एचडीएफसी सिक्युरिटीजचे कमोडिटी आणि करन्सीचे प्रमुख अनुज गुप्ता म्हणतात, जगभरातील केंद्रीय बँका सोन्याची खरेदी कमी करू शकतात. यामुळे सोन्याच्या दरात लक्षणीय घट होऊ शकते. शक्य आहे की केंद्रीय बँका बाजारात त्यांचे सोने विकायला सुरुवात करू शकतात. अनुज गुप्ता म्हणतात की, जर रशिया डॉलरकडे परतला, तर सोन्याच्या गुंतवणुकीच्या प्रतिमेवर परिणाम होईल. यामुळे सोन्याची मागणी कमी होईल आणि डॉलरमधील गुंतवणूक वाढू शकते. प्रश्न 5: तर, सोने खरोखरच 1 लाख रुपयांपेक्षा खाली जाईल का?उत्तर: अमित गोयल यांच्या मते, भारतात सोन्याचे दर त्यांच्या सर्वकालीन उच्चांकावरून आधीच 15% कमी झाले आहेत आणि ते आणखी कमी होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात ते प्रति औंस 3,000 डॉलरपर्यंत पोहोचू शकते. दरम्यान, भारतात सोन्याचे दर प्रति किलोग्राम 1 लाख रुपयांपेक्षा खाली येऊ शकतात. 2027 पर्यंत भारतात सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 90 हजार ते 1 लाख रुपयांच्या दरम्यान स्थिर होऊ शकतात. अनुज गुप्ता सोन्याच्या दरातील चढ-उतारासाठी इतर शक्यता देखील स्पष्ट करतात: सोन्याच्या दरातील घट लोकांना त्यांच्या दीर्घकालीन गुंतवणुकीत वाढ करण्यास प्रवृत्त करू शकते. अमेरिका आणि इराण यांच्यातील अणुशस्त्रांचा मुद्दा अजूनही अनुत्तरित आहे. हे घटक सोन्याच्या दरावरही दबाव आणू शकतात. अमेरिकेच्या येल विद्यापीठातील अर्थशास्त्राचे प्राध्यापक नौरिएल रुबिनी यांचे मत आहे की सध्याच्या परिस्थितीत डॉलरची घसरण स्वाभाविक आहे. जरी त्याच्या घसरणीची गती खूपच कमी असली तरी, डॉलरचा पर्याय निश्चितपणे कधीतरी उदयास येईल. प्रश्न 6: 2026 मध्ये आतापर्यंत सोन्याच्या दरात कशी चढ-उतार झाली आहे?उत्तर: इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार 1 जानेवारी 2025 रोजी 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमचा भाव ₹76,162 होता, जो त्यावेळी भारतात सर्वकालीन उच्चांक होता. वर्षाच्या अखेरीस सोन्याचे दर ₹1.33 लाखांवर पोहोचले होते. सोन्याच्या दरातील ही वाढ 2026 मध्येही सुरू राहिली. 29 जानेवारी रोजी सोने ₹1,76,121 च्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचले होते. परंतु, अवघ्या तीन दिवसांनंतर 1 फेब्रुवारी रोजी ते घसरून ₹1,48,697 झाले. 12 फेब्रुवारी रोजी रशिया-अमेरिका करार झाल्याच्या बातमीनंतर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव 3% नी घसरले. दुसऱ्या दिवशी भारतीय बाजारातही सोन्याचे भाव ₹2,885 नी घसरून ₹1,52,765 प्रति 10 ग्रॅम झाले. मात्र, 16 जानेवारी रोजी जेव्हा बाजार उघडला, तेव्हा सोन्याचे भाव 1,315 रुपयांनी वाढून 1,54,080 रुपयांवर पोहोचले. डिसक्लेमर : ही बातमी केवळ माहितीच्या उद्देशाने आहे. गुंतवणूकदार आणि व्यापाऱ्यांनी कोणताही गुंतवणुकीचा निर्णय घेण्यापूर्वी स्वतः विश्लेषण करावे आणि तज्ञांचा सल्ला घ्यावा.
Baramati Plane Crash : विमान अपघातापूर्वी ‘मेडे कॉल’का दिला नाही? तपासाची सुई आता ‘या’दिशेला
Baramati Plane Crash : नागरी उड्डाण मंत्रालयाच्या 'AAIC' कडून तांत्रिक चौकशी सुरू; विमानात बिघाड होता की मानवी चूक? अहवालाकडे सर्वांचे लक्ष.
Pune Water Crisis : मंजूर कोट्यापेक्षा ८.८४ टीएमसी अतिरिक्त पाणीवापर; दंडामुळे थकबाकीचा आकडा गेला ९०० कोटींच्या पार.
MPSC Result : ९ नोव्हेंबरला झाली परीक्षा, पण अंतिम निकालाचा पत्ता नाही; मुख्य परीक्षेसाठी केवळ ४० दिवस उरल्याने विद्यार्थ्यांमध्ये घबराट.
Pune News : मोठी बातमी! बारामतीला मिळणार अपर जिल्हाधिकारी, तर चाकणला अपर तहसील कार्यालय
Pune News : पुणे जिल्ह्याचा भौगोलिक विस्तार अन् कामाचा डोंगर; ग्रामीण जनतेची पायपीट थांबवण्यासाठी महसूल विभागाचा मोठा निर्णय.
Pimpri Chinchwad Power Cut :
PMC Action : महापालिकेचा दणका! सोसायटीला दूषित पाणी; नामांकित बिल्डरला १ लाखाचा दंड
PMC Action : पाणीपुरवठा यंत्रणा नसताना दूषित पाणी का पाजले? म्हाळुंगे येथील गृहनिर्माण प्रकल्पातील गंभीर प्रकार उघड.
विकसित भारताच्या गप्पा सध्या सगळीकडे जोरात सुरू आहेत. आणि हे लक्ष्य आता नजरेच्या टप्प्यात आल्याचेही दावे केले जात आहेत, पण हे सगळे दावे वस्तुस्थितीच्या पातळीवर तद्दन बोगस ठरत असल्याचे लक्षात येते आहे
Kalakar Katta Pune : पुण्याची वैचारिक आणि सांस्कृतिक ओळख जपण्यासाठी 'कलाकार कट्टा' आहे त्याच ठिकाणी ठेवावा; कार्यकर्त्यांची भावना.
लक्षवेधी : महागाईचे नवे मोजमाप
महागाईची मोजणी करण्याच्या पद्धतीत बदल झाल्यामुळे, अर्थव्यवस्थेतील बदलांचे अधिक ठळक प्रतिबिंब पडेल. धोरणविषयक प्रतिसादात त्यामुळे अचूकता येण्याची शक्यता आहे.
Pune Congress : पुणे पोलीस भाजपधार्जिणे? काँग्रेस पोलीस आयुक्तालयावर काढणार मोर्चा..वाचा सविस्तर
Pune Congress : आंदोलनाला परवानगी दिलीच कशी? पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत काँग्रेस हायकोर्टात जाणार.
दखल : चाबहारमधून माघार की विराम?
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2026-2027 वर्षासाठी सादर केलेल्या अर्थसंकल्पात खटकण्यासारखी एक बाब होती. ती बाब म्हणजे अर्थसंकल्पात इराणमधील चाबहार बंदरासाठी एका रुपयाचीही तरतूद केलेली नाही.
Saswad News : पुरंदरच्या विकासाचा नवा ‘रोडमॅप’; नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा सासवडमध्ये सत्कार
Saswad News : पारदर्शक कारभार आणि लोकाभिमुख निर्णयावर भर; जालींदर कामठे यांनी नवनिर्वाचित सदस्यांना दिल्या शुभेच्छा.
Belhe Yatra 2026 : ४३० गाडे अन् सेकंदांची लढत! बेल्हे यात्रेत ‘घाटाचा राजा’कोण ठरलं? वाचा सविस्तर
Belhe Yatra 2026 : जुन्नर, पारनेरसह पाच तालुक्यांतील शौकिनांची मांदियाळी; ४३० बैलगाड्यांच्या सहभागाने बेल्हे घाट दुमदुमला!
Yashwant Sugar Factory : थेऊरचा ‘यशवंत’पुन्हा संकटात? १०० एकरनंतर आता यंत्रसामग्रीही विकण्याचा घाट?
Yashwant Sugar Factory : १०० एकरचा व्यवहार प्रलंबित असतानाच उर्वरित जमिनीचा घाट; नियम धाब्यावर बसवून व्यवहार होत असल्याचा आरोप.
Parth Pawar : अजितदादांचीच छबी! पूर्वसूचना न देता पार्थ पवार थेट कामाच्या ठिकाणी; काय घडलं?
Parth Pawar : बारामतीचा विकास वेगाने पुढे नेण्याचा निर्धार; शिवसृष्टी आणि ॲडव्हेंचर पार्क प्रकल्पांची पार्थ पवारांकडून विशेष पाहणी.
Indapur News : इंदापूरच्या ऊस आंदोलनाचा निकाल! राजू शेट्टी, सदाभाऊ खोतांसह २१ जण निर्दोष मुक्त
Indapur News : २०१२ मधील ऊस दराच्या संघर्षाला अखेर पूर्णविराम; इंदापूर न्यायालयात राजू शेट्टी आणि सहकाऱ्यांची निर्दोष मुक्तता.
Shivner Bhushan Award 2026 : शिवजयंती सोहळ्यात मान्यवरांच्या मांदियाळीत रंगणार सोहळा; जुन्नर तालुक्यात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण.
Dumburwadi Toll Naka : स्थानिक वाहनधारकांच्या संतापाचा उद्रेक; आमदार शरद सोनवणे यांचा टोल प्रशासनासोबत बैठकीत पाठपुरावा.
Alandi News : भक्तीचा जागर, पण नदीचा विसर? आळंदीतील इंद्रायणीच्या स्वच्छतेसाठी आता ‘हा’मोठा प्लॅन
Alandi News : महाआरतीच्या दिवशीच होणार 'स्वच्छतेची वारी'; प्रशासन आणि भाविक एकत्र येऊन इंद्रायणीचं पावित्र्य जपणार का?
Rural Migration : घामाचा दाम की केवळ कर्जाचा डोंगर? जुन्नरच्या शेतकरी पुत्राने शेतीकडे फिरवली पाठ
Rural Migration : उत्पादन खर्च गगनाला, पण पदरात फक्त निराशा; जुन्नरमधील तरुण शेतकरी आता रोजगाराच्या शोधात शहराकडे.
Junnar News : कीटकनाशकांचा अतिवापर नडला! मधमाशांनी फिरवली पाठ; कांदा उत्पादकांसमोर मोठं संकट
Junnar News : जुन्नर तालुक्यात कांदा बीजोत्पादनाला मोठा आर्थिक फटका; परागीभवन न झाल्याने ३० ते ४० टक्के उत्पादनात घटीची शक्यता.
Khalapur News : दहा-वीस नव्हे तर १०१ एकरचा महाप्रकल्प वादाच्या भोवऱ्यात; पाणी चोरी आणि नदी प्रदूषणावरून माणकिवली ग्रामपंचायत आक्रमक.
PCMC Garden : सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर! घसरगुंडीचे धारदार भाग आणि तुटलेल्या साखळ्यांमुळे अपघाताची भीती; पालकांकडून दुरुस्तीची मागणी.
Pimpri Chinchwad News : धुळीचे लोट आणि श्वसनाचे आजार; कामाच्या संथ गतीने नागरिक आणि दुकानदार हैराण, प्रशासनाचे सोयीस्कर दुर्लक्ष.
Construction Site Accident : सुरक्षा जाळी आणि हेल्मेट नसल्याने मजुराचा बळी; रावेत पोलिसांकडून कॉन्ट्रॅक्टरसह संबंधितांचा शोध सुरू.
Wai News : मेणवलीत ३४ लाभार्थ्यांना मिळणार हक्काचे घरकूल; प्रशासनाचा मोठा निर्णय
Wai News : श्रमिक जनता विकास संस्थेच्या पाठपुराव्याला यश; पंडित दीनदयाळ उपाध्याय जमीन खरेदी योजनेतून ३४ लाभार्थ्यांना प्रत्येकी १ लाखाचे अर्थसहाय्य उपलब्ध.
Patan Election Results : अहिल्यादेवी होळकर स्मारकाच्या घोषणेने धनगर समाज शिवसेनेच्या पाठीशी ठाम; ऐतिहासिक विजयाने राजकीय समीकरणे बदलली.
Satara News : शिवजयंतीला निघणार भव्य ‘मेगा पदयात्रा’; जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची मोठी घोषणा
Satara News : जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन बैठक संपन्न; प्रत्येक विभागाला सोपवल्या विशेष जबाबदाऱ्या, चोख बंदोबस्त आणि स्वच्छतेवर राहाणार भर.
SL vs AUS : या दणदणीत विजयासह श्रीलंकेने 'ग्रुप बी' मधून सुपर-८ फेरीसाठी आपली पात्रता निश्चित केली आहे.
राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार; २६ फेब्रुवारीला होणार औपचारिक घोषणा
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर रिक्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) राष्ट्रीय अध्यक्षपदाचा सस्पेन्स आता संपला आहे. येत्या २६ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अधिकृत घोषणा केली जाणार आहे. सोमवारी मुंबईत झालेल्या पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकीत सुनेत्रा पवार यांच्या नावावर सर्वसंमतीने शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत माध्यमांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू होत्या. मात्र, सोमवारी झालेल्या बैठकीत या विषयावर तूर्तास पडदा टाकण्यात आला आहे. विलीनीकरणाच्या संदर्भात तूर्तास कोणतीही चर्चा नको. पक्षाच्या नेत्यांनी आणि आमदारांनी या विषयावर माध्यमांसमोर कोणतेही भाष्य करू नये, अशा सूचना आमदारांना देण्यात आल्या आहेत. सध्या केवळ पक्ष संघटना वाढवणे आणि आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनावर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना नेतृत्वाने दिल्या आहेत.दरम्यान, २६ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या कार्यकारिणीच्या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष निवडीची केवळ औपचारिकता बाकी आहे. याच दिवशी पक्षाच्या पुढील वाटचालीची दिशा स्पष्ट केली जाईल. या निर्णयामुळे राष्ट्रवादीतील अध्यक्षपदावरून सुरू असलेल्या सर्व चर्चांना आता पूर्णविराम मिळणार आहे.
मुंबईच्या सभागृहनेते गणेश खणकर, विरोधी पक्षनेतेपदी किशोरी पेडणेकर
महापालिकेच्या गटनेत्यांची नावे केली महापौरांनी जाहीरमुंबई (विशेष प्रतिनिधी) :मुंबई महापालिकेत अखेर सभागृहनेते आणि विरोधी पक्षनेत्यांची अधिकृत नावे जाहीर झाली. सभागृहनेतेपदी गणेश खणकर आणि विरोधी पक्षनेतेपदी किशोरी पेडणेकर यांच्या नावाची अधिकृत घोषणा महापौर रितू तावडे यांनी सभागृहात केली. याबरोबरच प्रत्येक पक्षाच्या गटनेत्यांच्या नावाचीही अधिकृत घोषणा सभागृहात करण्यात आली.मुंबई महापालिकेच्या विशेष सभेमध्ये सभागृहनेते आणि विरोधी पक्षनेतेपदाच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. सत्ताधारी भाजपच्यावतीने गणेश खणकर यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली होती. त्यामुळे सभागृहनेतेपदासाठी त्यांच्या नावाची शिफारस पक्षाच्यावतीने करण्यात आली होती. तर उबाठा पक्ष हा विरोधीपक्ष असून या पक्षाच्यावतीने गटनेतेपदी किशोरी पेडणेकर यांची निवड करण्यात आली होती. त्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या गटनेत्यांची सभागृहनेतेपदी तर विरोधी पक्षाच्या गटनेत्याची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात येत असल्याचे सभागृहात जाहीर करण्यात आले.यानंतर शिवसेना पक्षाच्यावतीने अमेय घोले यांची गटनेतेपदी तसेच काँग्रेसच्या गटनेतेपदी अश्रफ आझमी, मनसेच्या गटनेते पदासाठी यशवंत किल्लेदार आणि एमआयएमच्या गटनेतेपदी विजय उबाळे यांच्या नावाची अधिकृत घोषणा महापालिका सभागृहात करण्यात आली. शिवसेनेचे गटनेते अमेय घोले यांच्या नावाची गटनेतेपदी निवड झाल्याचे जाहीर करताच उबाठाच्यावतीने पन्नास खोके, एकदम ओके अशाप्रकारच्या घोषणा देण्यास सुरुवात केली. याला शिवसेनेच्या तृष्णा विश्वासराव यांनी हरकत घेतली. वारंवार या घोषणा आपल्याकडून दिल्या जात असून सभागृहाचे कामकाज चांगल्याप्रकारे चालवणे हे आपले कर्तव्य आहे, पण जर विरोधकांकडून अशाप्रकारच्या घोषणा होत असतील तर खिचडीपासून डेडबॅगपर्यंतचे सर्वच आम्ही बाहेर काढून, मग आम्हाला थांबवायचे नाही असा गर्भित इशारा विश्वासराव यांनी दिला. त्यानंतरही या घोषणा सुरुच राहिल्यामुळे साहेबांचा विजय असो अशाप्रकारच्या घोषणा देण्यास सुरुवात केली.यावर महापौर रितू तावडे यांनी उबाठाच्या नगरसेवकांना समज देत सभागृहाचे काम नीट चालवण्यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे सांगितले.
सुधार समिती अध्यक्षपदाची माळ अमेय घोलेंच्या गळ्यात, तर बेस्ट समिती अध्यक्षपदी तृष्णा विश्वासराव?
मुंबई (विशेष प्रतिनिधी) :मुंबई महापालिकेच्या चार वैधानिक समित्यांपैंकी सुधार आणि बेस्ट समितीही शिवसेनेच्या वाट्याला आल्या असून सुधार समिती अध्यक्षपदी अमेय घोले आणि बेस्ट समिती अध्यक्षपदी तृष्णा विश्वासराव यांच्या नावाची चर्चा आहे. शिवसेनेकडून अनुक्रमे अमेय घोले आणि तृष्णा विश्वासराव यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. बेस्ट समिती अध्यक्षपदी तृष्णा विश्वासराव यांची वर्णी लागल्यास बेस्टच्या पहिल्या अध्यक्ष त्या ठरल्या जाणार आहेत.मुंबई महापालिकेच्या सुधार समिती आणि बेस्ट समिती सदस्यपदाची नावे महापौर रितू तावडे यांनी सभागृहात जाहीर केली. भाजपकडून सुधार समितीत तेजस्वी घोसाळकर, चंदन शर्मा यांना संधी दिली आहे. यापूर्वीचे भाजपचे या समिती वर सदस्य कायम ठेवले आहे. तर शिवसेनेकडून संध्या दोशी आणि अजित रावराणे यांनाही संधी देण्यात आली आहे.तर बेस्ट समितीमध्ये भाजपकडून आकाश पुरोहितसह संतोष मेढेकर, अजय सिंग,रमाकांत गुप्ता यांना संधी देण्यात आली आहे तर शिवसेनेने उपेंद्र सावंत आणि तृष्णा विश्वासराव यांची नियुुक्ती केली आहे.सुधार समिती :भाजप: प्रकाश गंगाधरे,अलका केरकर, शर्मा चंदन , महादेव शिवगण, दिपक (बाळा) तावडे, स्वप्ना म्हात्रे, अनिष मकवानी, तेजस्वी घोसाळकर,साक्षी दळवी,संदिप पटेलशिवसेना: अमेय घोले,संध्या दोशी, किरण लांडगे, अजित रावराणे,उबाठा: विशाखा राऊत,सचिन पडवळ, रोना रावत, विठ्ठल लोकरे, जितेंद्र वळवी, मिलिंद वैद्य, उर्मिला पांचाळकाँग्रेस: अश्रफ आझमी, राजा रहेबर खान,मेहेर हैदरमनसे : सुप्रिया दळवीएमआयएम : शबाना शेखबेस्ट समिती :भाजप: आकाश पुरोहित, सुनिल गणाचार्य, संतोष मेढेकर ,अजय सिंग ,प्रमोद वाकोडे, रमाकांत गुप्ताशिवसेना: तृष्णा विश्वासराव, उपेंद्र सावंतउबाठा: प्रविणा मोरजकर, सुनील अहिर, नितीन नांदगावकर, सचिन पाटील, सुनील मोरेकाँग्रेस:आशा कोपरकर, चंद्रकांत मचीगरएमआयएम : फैसल खान
विरोधी पक्षनेत्यालाच उबाठाने स्थायी समितीत डावलले, स्थायी आणि शिक्षण समिती सदस्यांची नावे जाहीर
मुंबई(विशेष प्रतिनिधी) :मुंबई महापालिकेच्या शिक्षण आणि स्थायी समिती सदस्यांच्या नावाची अधिकृत घोषणा सोमवारी महापालिका सभागृहात करण्यात आली आहे. मात्र, महापालिकेच्या इतिहासात प्रथमच विरोधी पक्षनेत्याला स्थायी समितीमध्ये स्थान देण्यात आलेले नाही. विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांची स्थायी समिती सदस्यपदी नियुक्ती न करता उबाठाने आजवरच्या प्रथा परंपरेलाच छेद दिला असून एकप्रकारे उबाठाने पेडणेकर यांच्यावर या माध्यमातून अविश्वासच दाखवला आहे. दरम्यान, स्थायी समिती अध्यक्षपदासाठी आता कुणाची वर्णी लागणार याकडे लक्ष असून भाजप पुन्हा एकदा प्रस्थापित व्यक्तीऐवजी नवीन चेहऱ्याला संधी देण्याची शक्यता आहे.मुंबई महापालिकेच्या शिक्षण आणि स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक येत्या २० फेब्रुवारी रोजी होणार असून यासाठी येत्या १८ फेब्रुवारी रोजी उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. या दोन्ही समित्यांवर सदस्यांची नावे प्रत्येक पक्षाच्या गटनेत्यांनी महापौरांना बंद लिफाफ्यात सादर केली. त्यानुसार या लिफाफ्यातील नावे महापौरांनी जाहीर करून त्यांची स्थायी आणि शिक्षण समितीवर नियुक्ती झाल्याचे जाहीर केले.स्थायी समिती अध्यक्षपदासाठी शिंदे, नार्वेकर, भांदिर्गे यांच्यात स्पर्धास्थायी समितीवरील सदस्यांची नावे जाहीर करण्यात आली असून भाजपने शितल गंभीर, प्रकाश दरेकर, प्रिती सातम, तेजिंदर तिवाना आदींना संधी दिली आहे. त्यामुळे भाजपच्यावतीने प्रभाकर शिंदे, ऍड मकरंद नार्वेकर आणि हरिष भांदिर्गे यांच्यात स्पर्धा आहे.महापालिकेच्या इतिहासात प्रथमच असे घडलेविरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांना उबाठाने स्थायी समिती सदस्यपदी डावलले आहे. महापालिकेत नियम नसला तरी आजवरच्या प्रथा आणि परंपरेनुसार विरोधी पक्षनेत्याला स्थायी समितीत स्थान दिले जाते. परंतु प्रथमच विरोधी पक्षनेत्याला स्थायी समितीमध्ये डावलले गेले आहे. महापौरपदाच्या कालावधीमध्ये ज्याप्रकारे पेडणेकर यांनी केलेला कारभार आणि भाजपकडून होत असलेले आरोप पाहता उबाठाने पेडणेकर यांना या महत्वाच्या समितीतून बाहेर केले असल्याचे बोलले जात आहे. आजवरच्या महापालिकेच्या इतिहासात प्रथमच घडत असले तरी मी स्वत: हे पद न घेवून या समिती सदस्यपदी पक्षाच्या एका सदस्याची वर्णी लावली असल्याचे किशोरी पेडणकर यांनी स्पष्ट केले.स्थायी समिती:भाजप: गणेश खणकर, प्रभाकर शिंदे,राखी जाधव, अॅड. मकरंद नार्वेकर, हरिष भांदिर्गे, शिवकुमार झा, शितल गंभीर, प्रकाश दरेकर, प्रिती सातम, तिवाना ताजिंदरसिंगशिवसेना: अमेय घोले,यामिनी जाधव, अंजली नाईक,डॉ सईदा खानउबाठा : श्रध्दा जाधव, यशोधर फणसे, दिपमाला बढे, लक्ष्मी भाटीया, रमाकांत रहाटे, टी जगदीश, मिनाक्षी पाटणकरकाँग्रेस: अश्रफ आझमी, तुलीप मिरांडा, अजंता यादवएमआयएम: कुरेशी जमिरीमनसे : यशवंत किल्लेदारशिक्षण समिती:भाजप: राजेश्री शिरवडकर, स्वप्ना म्हात्रे, सुषम सावंत, शिवानंद (शिवा) शेट्टी,योगिता कोळी, डॉ. नील किरीट सोमैया , रोहन राठोड, पिल्ले श्रीकला , राजपूत विक्रम , बिगर मनपा सदस्य: निखिल व्यास, योजना ठोकळेशिवसेना:अंजली नाईक, वर्षा टेंबवलकर,धनश्री भरडकर, बिगर मनपा सदस्य चंद्रावती मोरेउबाठा: अंकित प्रभू, गीता भंडारी,पुजा महाडेश्वर, चित्रा सांगळे, सोनाली साबे, प्रमोद सावंत, सोनाली साबेकाँग्रेस: कॅरेन डिमेलो, कमरजहाँ सिद्दीकी, बिगर मनपा सदस्य प्रियंका राऊत,एमआयएम : मेहजाबीन अतिक अहमदमनसे : ज्योती राजभोज
Narendra Modi : दिल्लीत ‘एआय’चा महाकुंभ; पंतप्रधान मोदींच्या हस्ते झाले उद्घाटन
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) क्षेत्रात भारताचे वाढते वर्चस्व सिद्ध करणारे इंडिया एआय इम्पॅक्ट समिट २०२६ आजपासून देशाच्या राजधानीत सुरू झाले. या परिषदेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
Pathum Nissanka Catch : श्रीलंकेच्या पथुम निस्सांकाच्या नावाचाही समावेश झाला आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका यांच्यातील 'ग्रुप बी' च्या निर्णायक सामन्यात निस्सांकाने मैदानात अशी काही किमया केली की, ज्याने प्रेक्षकांसह समालोचकही चकीत झाले.
Bangladesh: भारतीय सागरी सीमा ओलांडून घुसखोरी करणाऱ्या एका बांगलादेशी ट्रॉलवर भारतीय तटरक्षक दलाने झडप घालत २८ मच्छिमारांना ताब्यात घेतले आहे.
Sugar export: साखरेच्या विक्रमी निर्यातीमुळे ऊस शेतकर्यांची चांदी, पाहा केंद्र सरकारचा मोठा निर्णय
Sugar export: आता साखर निर्यातदार ही पाच लाख टन साखर थेट निर्यात करू शकतात. यासाठी त्यांना साखर कारखान्यांना प्रीमियम देण्याची गरज नसल्याचे या संघटनेने म्हटले आहे.
'अल्पसंख्याक समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी ठोस पावले उचला'
अल्पसंख्याक समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी ठोस पावले उचलावीत;अल्पसंख्यांक संस्था दर्जा प्रमाणपत्र प्रकरणाची सखोल चौकशी करून कठोर कारवाई करा;उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे निर्देशमुंबई - अल्पसंख्याक समाजासाठी असलेला निधी प्रत्येक घटकाला समप्रमाणात आणि पारदर्शकपणे वितरित व्हावा, तसेच विभागाचे कामकाज अधिक लोकाभिमुख व समाजाप्रती उत्तरदायी राहण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री तथा अल्पसंख्याक विकास मंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी दिल्या. तसेच शाळांना चुकीच्या पद्धतीने अल्पसंख्याक दर्जाचे प्रमाणपत्र वितरित करण्यात आलेल्या प्रकरणांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश सुनेत्रा पवार यांनी दिले.उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली अल्पसंख्याक विकास विभागाची आढावा बैठक सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी अल्पसंख्याक विकास विभागाचे सचिव रुचेश जयवंशी, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, सहसचिव मनोज जाधव, उपसचिव मि. प. शेणाॅय, अवर सचिव सारंगकुमार पाटील, अवर सचिव जहांगीर खान, अवर सचिव विशाखा आढाव तसेच अवर सचिव मेघना शिंदे उपस्थित होत्या.राज्यातील अल्पसंख्याक समुदायाच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उन्नतीसाठी शासन कटिबद्ध आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री आदरणीय दादांनी ठरवून दिलेल्या ध्येयधोरणांनुसारच विभागाची वाटचाल व्हावी. सच्चर समितीच्या शिफारशीनुसार २१ फेब्रुवारी २००८ रोजी राज्यात स्वतंत्र अल्पसंख्याक विकास विभागाची स्थापना करण्यात आली. या विभागामार्फत शैक्षणिक शिष्यवृत्ती, वसतीगृहे, मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ यांच्या कर्ज योजना, जैन आर्थिक विकास महामंडळाच्या थेट कर्ज व व्याज परतावा योजना, स्वयंसहायता बचत गट, कौशल्य विकास व पायाभूत सुविधा योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना सुनेत्रा पवार यांनी यावेळी दिल्या.मौलाना आझाद महामंडळाच्या शैक्षणिक कर्जाची मर्यादा ५ लाखांवरून २० लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आल्याचे सांगून, या योजनेचा लाभ प्रत्यक्ष गरजूंनाच मिळेल याची काटेकोर दक्षता घ्यावी, असेही सुनेत्रा पवार यांनी बजावले. तसेच राज्यातील ‘डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना’ अंतर्गत पायाभूत सुविधांचे अनुदान २ लाखांवरून १० लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आले असून, पात्र संस्थांची निवड करताना पूर्ण पारदर्शकता राखावी, असे निर्देशही सुनेत्रा पवार यांनी दिले.अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी उभारण्यात येणारी वसतीगृहे तातडीने पूर्ण करून कार्यान्वित करावीत. अल्पसंख्याक बहुल क्षेत्रातील विकासकामांसाठी वितरित होणाऱ्या निधीचे समप्रमाणात वाटप होऊन कामांचा उत्कृष्ट दर्जा राखला जावा, याची जबाबदारी विभागाने घ्यावी, असे निर्देश सुनेत्रा पवार यांनी दिले. नांदेड, सोलापूर आणि मालेगाव येथील उर्दू घरे कार्यान्वित असून, इतर प्रस्तावित उर्दू घरांची कामेही विहित मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. विभागातील रिक्त पदांमुळे प्रशासकीय कामकाजावर विपरीत परिणाम होत असल्याचे निदर्शनास आणून देत त्यांनी वक्फ मंडळातील १७९ मंजूर पदांपैकी ९६, वक्फ न्यायाधिकरणातील ३४ पैकी २५ आणि हज समितीतील १३ पैकी १० रिक्त पदे तातडीने भरण्याची कार्यवाही करावी, असे आदेश दिले. यावेळी त्यांनी संभाजीनगर विभागीय आयुक्तांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून आवश्यक त्या सूचना दिल्या. छत्रपती संभाजीनगर येथे नव्याने स्थापन करण्यात आलेल्या अल्पसंख्याक आयुक्तालयासाठी आवश्यक अधिकारी व कर्मचारी उपलब्ध करून देत आयुक्तालय सशक्त करावे, असेही सुनेत्रा पवार यांनी सांगितले.बार्टी व सारथीच्या धर्तीवर स्थापन झालेल्या ‘मार्टी’ (MRTI)च्या कामकाजाचा नियमित आढावा घेऊन प्रगती अहवाल सादर करावा. अल्पसंख्याक समाजातील बेरोजगारीचे प्रमाण लक्षात घेता तरुणांसाठी मोठ्या प्रमाणावर कौशल्यवृद्धी कार्यक्रम राबवून त्यांना रोजगारक्षम बनविण्यासाठी विभागाने सक्रिय पुढाकार घ्यावा, असे सुनेत्रा पवार यांनी नमूद केले. खारघर, नवी मुंबई येथे प्रस्तावित ‘श्री गुरु तेग बहादूर साहिबजी ३५० वा शाहिदी समागम’ कार्यक्रमाच्या आयोजनासंदर्भातील सर्व प्रशासकीय प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही यावेळी दिले.
गांधीनगर : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, युगपुरुष शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते मंगळवार १७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता गांधीनगर ( गुजरात) येथे करण्यात येणार आहे. हा पुतळा गांधीनगरमधील समस्त महाराष्ट्र समाज मंडळाच्या वतीने उभारण्यात आला आहे.केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमाला गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, उपमुख्यमंत्री हर्ष संघवी, तसेच गुजरात भाजप प्रदेशाध्यक्ष जगदीश पंचाळ आदींची उपस्थिती असेल. यावेळी पुण्यातील लोकमान्य बहुउद्देशीय सहकारी संस्था शिवाजी महाराजांच्या जीवनावरील शिवप्रताप महानाटक हे नाटक सादर करेल.महाराष्ट्र समाज मंडळाच्या वतीने उभारण्यात आलेला सदर पुतळा एकूण २० फूट उंचीचा असून पुतळ्याचे वजन ८५० किलो आहे. पुतळ्याचा चौथारा ८ फुटाचा असून ७ फुटाचा घोडा तर पाच फुटांची शिवरायांची प्रतिकृती आहे. या पुतळ्यासाठी संपूर्ण फायबर साहित्याचा वापर करण्यात आला आहे. या पुतळ्याच्या अनावरणासाठी अहमदाबाद, गांधीनगर, राजकोट, सुरत, कलोल, दोड्डासह गुजरातमधील समस्त मराठी जन उपस्थित राहणार आहेत.छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यामागे स्वराज्य, पराक्रम, राष्ट्रप्रेम आणि न्यायाचे प्रतीक म्हणून त्यांच्या स्मृती चिरंतन ठेवण्याची, तसेच भावी पिढीला प्रेरणा मिळावी अशी आमची भावना आहे. हा पुतळा शिवरायांचे नेतृत्व, दूरदृष्टी आणि मराठी अस्मितेची आठवण करून देणारे एक सांस्कृतिक व ऐतिहासिक प्रतीक म्हणून स्थापित करत आहोतच परंतु हा पुतळा अन्यायाविरुद्ध लढण्याची, प्रगत विचारांची आणि स्वदेशाभिमानाची ऊर्जा देणारा ठरेल. महाराजांचे कार्य, वीरता आणि शौर्य यांची भावी पिढीला जाणीव व्हावी, आणि त्यातून देशभक्तीची भावना निर्माण व्हावी, हा मुख्य उद्देश आहे. शिवाजी महाराजांचा हा केवळ पुतळा नसून, तो एका महान नेतृत्वाच्या विचारांचे आणि कार्याचे प्रतीक म्हणून तो आम्ही गांधीनगर मध्ये उभा करीत आहोत असे गांधीनगर मराठी समाज मंडळाचे विश्वस्त दत्ताजी पाटील यांनी सांगितले.
8th Pay Commission: ३१ डिसेंबर २०२५ किंवा त्यापूर्वी सेवानिवृत्त झालेले कर्मचारी नवीन पेन्शन सुधारणेच्या कक्षेत येतील का? या गोंधळावर आता अर्थ मंत्रालयाने संसदेत आपली भूमिका स्पष्ट केली असून, पेन्शनधारकांना मोठा दिलासा दिला आहे.
Suryakumar Yadav : पाकिस्तानचा शेवटचा फलंदाज बाद झाल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव हा कुलदीप यादववर संतापलेला पाहून चाहत्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती
केरळच्या शबरीमला मंदिरात (Sabarimala Temple) महिलांना प्रवेशाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्या राज्यातील विधानसभा निवडणूक जवळ येऊन ठेपली आहे. त्यामुळे संबंधित मुद्दा आगामी निवडणूक प्रचाराच्या केंद्रस्थानी येण्याचे संकेत मिळू लागले आहेत
Digital Currency of India: हा डिजिटल रुपया म्हणजे तुमच्या खिशातील कागदी नोटा आणि नाण्यांचे डिजिटल स्वरूप आहे. अनेकदा लोक याला बिटकॉइन किंवा यूपीआय (UPI) समजतात, परंतु हे पूर्णपणे वेगळे आहे.
ENG vs ITA : खेरच्या षटकांत सॅम करनने केलेल्या टिच्चून माऱ्यामुळे इंग्लंडने २४ धावांनी विजय मिळवत सुपर-८ फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे.
मुंबई : मुंबई – नागपूर/सावंतवाडी रोड / बनारस /गोरखपूर / समस्तीपूर /दानापूर तसेच पुणे – नागपूर /हजरत निजामुद्दीन / दानापूर दरम्यान एकूण १८६ विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत. यामध्ये ९४ होळी विशेष गाड्या आणि ९२ विशेष गाड्या यांचा समावेश आहे.तपशील पुढीलप्रमाणे:१. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – नागपूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस द्वि-साप्ताहिक विशेष (१० सेवा)ट्रेन क्रमांक 02141 द्वि-साप्ताहिक विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दर रविवार व मंगळवारी २२.०२.२०२६ ते ०८.०३.२०२६ दरम्यान ००.२० वा. सुटेल व नागपूर येथे त्याच दिवशी १५.१० वा. पोहोचेल.ट्रेन क्रमांक 02142 नागपूर येथून दर रविवार व मंगळवारी २०.०० वा. सुटेल व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी १३.३० वा. पोहोचेल.या गाड्या दिनांक २२.०२.२०२६ व २४.०२.२०२६ रोजी विशेष गाड्या (४ सेवा) आणिदिनांक ०१.०३.२०२६, ०३.०३.२०२६ व ०८.०३.२०२६ रोजी होळी विशेष (६ सेवा) म्हणून चालवण्यात येतील.संरचना: १ वातानुकुलीत द्वितीय, ६ वातानुकुलीत तृतीय, ९ शयनयान, ४ सामान्य द्वितीय व २ सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन.थांबे: दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव व वर्धा.२. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – सावंतवाडी रोड – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साप्ताहिक विशेष (४ सेवा)ट्रेन क्रमांक 01171 दि. २६.०२.२०२६ व ०५.०३.२०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दर गुरुवारी ००.२० वा. सुटेल व सावंतवाडी रोड येथे १२.३० वा. पोहोचेल.ट्रेन क्रमांक 01172 दि. २६.०२.२०२६ व ०५.०३.२०२६ रोजी सावंतवाडी रोड येथून १७.२० वा. सुटेल व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी ०३.४५ वा. पोहोचेल.या गाड्या दिनांक २६.०२.२०२६ रोजी विशेष गाड्या (२ सेवा) व दिनांक ०५.०३.२०२६ रोजी होळी विशेष (२ सेवा) म्हणून चालवण्यात येतील.संरचना: १ वातानुकुलीत द्वितीय, ६ वातानुकुलीत तृतीय, ९ शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी व २ गार्ड ब्रेक व्हॅन.थांबे: दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग व कुडाळ.३. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई) – गोरखपूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दैनिक विशेष (३२ सेवा)ट्रेन क्रमांक 01079 दैनिक विशेष दि. २१.०२.२०२६ ते ०८.०३.२०२६ दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दररोज २२.३० वा. सुटेल व गोरखपूर येथे तिसऱ्या दिवशी १०.०० वा. पोहोचेल.ट्रेन क्रमांक 01080 विशेष २३.०२.२०२६ ते १०.०३.२०२६ दरम्यान गोरखपूर येथून दररोज १४.३० वा. सुटेल व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे तिसऱ्या दिवशी ००.४० वा. पोहोचेल.या गाड्या दिनांक २१.०२.२०२६ ते ०२.०३.२०२६ विशेष गाड्या (१६ सेवा) आणि दिनांक ०१.०३.२०२६ ते १०.०३.२०२६ होळी विशेष (१६ सेवा) म्हणून चालवण्यात येतील.संरचना: १ वातानुकुलीत द्वितीय, ६ वातानुकुलीत तृतीय, ९ शयनयान, ४ सामान्य द्वितीय व २ सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन.थांबे: दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी, ओरई, कानपूर सेंट्रल, लखनौ, गोंडा, बस्ती व खलीलाबाद.४. लोकमान्य टिळक टर्मिनस – सावंतवाडी रोड – लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष (४ सेवा)ट्रेन क्रमांक 01119 विशेष दि. २६.०२.२०२६ व ०५.०३.२०२६ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथूनदर गुरुवारी २२.१५ वा.सुटेल व सावंतवाडी रोड येथे दुसऱ्या दिवशी ०९.३० वा. पोहोचेल.ट्रेन क्रमांक 01120 विशेष दि. २७.०२.२०२६ व ०६.०३.२०२६ रोजी सावंतवाडी येथून दर शुक्रवारी १७.२० वा. सुटेल व लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी ०४.०५ वा. पोहोचेल.या गाड्या दिनांक २६.०२.२०२६ व २७.०२.२०२६ रोजी विशेष गाड्या (२ सेवा) आणि दिनांक ०५.०३.२०२६ व ०६.०३.२०२६ रोजी होळी विशेष गाड्या (२ सेवा) म्हणून चालवण्यात येतील.संरचना: १ प्रथम वातानुकुलीत, ३ वातानुकुलीत द्वितीय, ७ वातानुकुलीत तृतीय, ८ शयनयान, १ पॅन्ट्री कार व २ जनरेटर कार.थांबे: ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग व कुडाळ.५. लोकमान्य टिळक टर्मिनस – बनारस – लोकमान्य टिळक टर्मिनस द्विसाप्ताहिक विशेष (८ सेवा)ट्रेन क्रमांक. 01073 द्विसाप्ताहिक विशेष दिनांक २५.०२.२०२६, २६.०२.२०२६, ०४.०३.२०२६ व ०५.०३.२०२६ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दर बुधवार व गुरुवारी १२.१५ वाजता सुटेल व बनारस येथे तिसऱ्या दिवशी ०१.१० वाजता पोहोचेल.ट्रेन क्रमांक. 01074 द्विसाप्ताहिक विशेष दिनांक २७.०२.२०२६, २८.०२.२०२६, ०६.०३.२०२६ व ०७.०३.२०२६ रोजी बनारस येथून दर शुक्रवार व शनिवारी ०६.३५ वाजता सुटेल व लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी १६.४० वाजता पोहोचेल.या गाड्या दिनांक २५.०२.२०२६, २६.०२.२०२६, २७.०२.२०२६ व २८.०२.२०२६ रोजी विशेष गाड्या (४ सेवा) आणि दिनांक ०४.०३.२०२६, ०५.०३.२०२६, ०६.०३.२०२६ व ०७.०३.२०२६ रोजी होळी विशेष गाड्या (४ सेवा) म्हणून चालवण्यात येतील.संरचना: १ वातानुकुलीत द्वितीय, ६ वातानुकुलीत तृतीय, ९ शयनयान, ४ सामान्य द्वितीय आणि २ सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन.थांबे: ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, राणी कमलापती जं., बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी, ओरई, गोविंदपुरी, फतेहपूर, सुबेदारगंज आणि वाराणसी जं. (फक्त 01073 साठी).६. लोकमान्य टिळक टर्मिनस – समस्तीपूर – लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष (४ सेवा)ट्रेन क्रमांक. 01043 साप्ताहिक विशेष दिनांक २४.०२.२०२६ व ०३.०३.२०२६ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दर मंगळवारी १२.१५ वाजता सुटेल व समस्तीपूर येथे दिवशी २३.४५ वाजता पोहोचेल.ट्रेन क्रमांक. 01044 साप्ताहिक विशेष दिनांक २६.०२.२०२६ व ०५.०३.२०२६ रोजी समस्तीपूर येथून दर गुरुवारी ०३.०० वाजता सुटेल व लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी १६.२५ वाजता पोहोचेल.या गाड्या दिनांक २४.०२.२०२६ व २६.०२.२०२६ रोजी विशेष गाड्या (२ सेवा) आणि दिनांक ०३.०३.२०२६ व ०५.०३.२०२६ रोजी होळी विशेष गाड्या (२ सेवा) म्हणून चालवण्यात येतील.संरचना: १ प्रथम वातानुकुलीत, ३ वातानुकुलीत द्वितीय, १५ वातानुकुलीत तृतीय, १ पॅन्ट्री कार आणि २ जनरेटर कार.थांबे: ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पं. दीनदयाळ उपाध्याय जं., बक्सर, आरा, दानापूर, पाटलीपुत्र, सोनपूर, हाजीपूर आणि मुजफ्फरपूर.७. लोकमान्य टिळक टर्मिनस – दानापूर – लोकमान्य टिळक टर्मिनस दैनिक विशेष (३२ सेवा)ट्रेन क्रमांक. 01143 दैनिक विशेष दिनांक २१.०२.२०२६ ते ०८.०३.२०२६ पर्यंत लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दररोज १०.३० वाजता सुटेल व दानापूर येथे दुसऱ्या दिवशी १८.४५ वाजता पोहोचेल.ट्रेन क्रमांक. 01144 दैनिक विशेष दिनांक २२.०२.२०२६ ते ०९.०३.२०२६ पर्यंत दानापूर येथून दररोज २१.३० वाजता सुटेल व लोकमान्य टिळक टर्मिनस येथे तिसऱ्या दिवशी ०७.४५ वाजता पोहोचेल.या गाड्या दिनांक २१.०२.२०२६ ते ०१.०३.२०२६ पर्यंत विशेष गाड्या (१६ सेवा) आणि दिनांक ०१.०३.२०२६ ते ०९.०३.२०२६ पर्यंत होळी विशेष गाड्या (१६ सेवा) म्हणून चालवण्यात येतील.संरचना: १ वातानुकुलीत द्वितीय, ६ वातानुकुलीत तृतीय, ९ शयनयान, ४ सामान्य द्वितीय आणि २ सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन.थांबे: ठाणे, कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पं. दीनदयाळ उपाध्याय जं., बक्सर आणि आरा.८. पुणे – नागपूर – पुणे साप्ताहिक विशेष (४ सेवा)ट्रेन क्रमांक. 01469 साप्ताहिक विशेष दिनांक २४.०२.२०२६ व ०३.०३.२०२६ रोजी पुणे येथून दर मंगळवारी १५.५० वाजता सुटेल व नागपूर येथे दुसऱ्या दिवशी ०६.३० वाजता पोहोचेल.ट्रेन क्रमांक. 01470 साप्ताहिक विशेष दिनांक २५.०२.२०२६ व ०४.०३.२०२६ रोजी नागपूर येथून दर बुधवारी ०८.०० वाजता सुटेल व त्याच दिवशी २३.३० वाजता पुणे येथे पोहोचेल.या गाड्या दिनांक २४.०२.२०२६ व २५.०२.२०२६ रोजी विशेष गाड्या (२ सेवा) आणि दिनांक ०३.०३.२०२६ व ०४.०३.२०२६ रोजी होळी विशेष गाड्या (२ सेवा) म्हणून चालवण्यात येतील.संरचना: ३ वातानुकुलीत द्वितीय, १५ वातानुकुलीत तृतीय, १ सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर व्हॅन.थांबे: उरुळी, दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा.९. पुणे – नागपूर – पुणे साप्ताहिक विशेष (४ सेवा)ट्रेन क्रमांक 01457 साप्ताहिक विशेष दिनांक २५.०२.२०२६ व ०४.०३.२०२६ रोजी पुणे येथून दर बुधवारी १५.५० वा. सुटेल व नागपूर येथे दुसऱ्या दिवशी ०६.३० वा. पोहोचेल.ट्रेन क्रमांक 01458 साप्ताहिक विशेष दिनांक २६.०२.२०२६ व ०५.०३.२०२६ रोजी नागपूर येथून दर गुरुवारी ०८.०० वा. सुटेल व पुणे येथे त्याच दिवशी २३.३० वा. पोहोचेल.या गाड्या दिनांक २५.०२.२०२६ व २६.०२.२०२६ रोजी विशेष गाड्या (२ सेवा) आणि दिनांक ०४.०३.२०२६ व ०५.०३.२०२६ रोजी होळी विशेष गाड्या (२ सेवा) म्हणून चालवण्यात येतील.संरचना: १ प्रथम वातानुकुलीत, १ वातानुकुलीत द्वितीय, २ वातानुकुलीत तृतीय, ५ शयनयान, ६ सामान्य द्वितीय व २ सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन.थांबे: उरुळी, दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धमणगाव व वर्धा.१०. पुणे – दानापूर – पुणे द्वि-साप्ताहिक विशेष (८ सेवा)ट्रेन क्रमांक 01481 द्वि-साप्ताहिक विशेष दिनांक २३.०२.२०२६ ते ०६.०३.२०२६ दरम्यान पुणे येथून सोमवार व शुक्रवारी १९.५५ वा. सुटेल व दानापूर येथे तिसऱ्या दिवशी ०८.०० वा. पोहोचेल.ट्रेन क्रमांक 01482 द्वि-साप्ताहिक विशेष दिनांक २५.०२.२०२६ ते ०८.०३.२०२६ दरम्यान दानापूर येथून बुधवार व रविवारी १०.०० वा. सुटेल व पुणे येथे दुसऱ्या दिवशी १८.१५ वा. पोहोचेल.या गाड्या दिनांक २३.०२.२०२६ ते ०१.०३.२०२६ दरम्यान विशेष गाड्या (४ सेवा) आणि दिनांक ०२.०३.२०२६ ते ०८.०३.२०२६ दरम्यान होळी विशेष गाड्या (४ सेवा) म्हणून चालवण्यात येतील.संरचना: १ वातानुकुलीत द्वितीय, ५ वातानुकुलीत तृतीय, ६ शयनयान, ४ सामान्य द्वितीय व २ सामानासह गार्ड ब्रेक व्हॅन.थांबे: दौंड कॉर्ड केबिन, अहिल्यानगर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पं. दीन दयाल उपाध्याय जं., बक्सर व आरा.११. पुणे – दानापूर – पुणे दैनिक विशेष (३२ सेवा)ट्रेन क्रमांक 01449 दैनिक विशेष दिनांक २१.०२.२०२६ ते ०८.०३.२०२६ दरम्यान पुणे येथून दररोज १५.३० वा. सुटेल व दानापूर येथे तिसऱ्या दिवशी ०२.४५ वा. पोहोचेल.ट्रेन क्रमांक 01450 दैनिक विशेष दिनांक २३.०२.२०२६ ते १०.०३.२०२६ दरम्यान दानापूर येथून दररोज ०५.०० वा. सुटेल व पुणे येथे दुसऱ्या दिवशी १८.१५ वा. पोहोचेल.या गाड्या दिनांक २१.०२.२०२६ ते ०२.०३.२०२६ दरम्यान विशेष गाड्या (१६ सेवा) आणि दिनांक ०१.०३.२०२६ ते १०.०३.२०२६ दरम्यान होळी विशेष गाड्या (१६ सेवा) म्हणून चालवण्यात येतील.संरचना: १ वातानुकुलीत द्वितीय, ५ वातानुकुलीत तृतीय, ६ शयनयान, ४ सामान्य द्वितीय व २ सामानासह गार्ड ब्रेक व्हॅन.थांबे: दौंड कॉर्ड केबिन, अहिल्यानगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पं. दीन दयाल उपाध्याय जं., बक्सर व आरा.१३. पुणे – गोरखपूर – पुणे दैनिक विशेष (३२ सेवा)ट्रेन क्रमांक 01415 दैनिक विशेष दिनांक २१.०२.२०२६ ते ०८.०३.२०२६ दरम्यान पुणे येथून दररोज ०६.५० वा. सुटेल व गोरखपूर येथे दुसऱ्या दिवशी १६.०० वा. पोहोचेल.ट्रेन क्रमांक 01416 दैनिक विशेष दिनांक २२.०२.२०२६ ते ०९.०३.२०२६ दरम्यान गोरखपूर येथून दररोज १७.३० वा. सुटेल व पुणे येथे तिसऱ्या दिवशी ०३.१५ वा. पोहोचेल.या गाड्या दिनांक २१.०२.२०२६ ते ०१.०३.२०२६ दरम्यान विशेष गाड्या (१६ सेवा) आणि दिनांक ०१.०३.२०२६ ते ०९.०३.२०२६ दरम्यान होळी विशेष गाड्या (१६ सेवा) म्हणून चालवण्यात येतील.संरचना: १ वातानुकुलीत द्वितीय, ६ वातानुकुलीत तृतीय, ९ शयनयान, ४ सामान्य द्वितीय व २ सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन.थांबे: दौंड कॉर्ड केबिन, अहिल्यानगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, राणी कमलापती, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झांसी, ओरई, कानपूर सेंट्रल, लखनौ, गोंडा व बस्ती.१४. पुणे – हजरत निजामुद्दीन – पुणे साप्ताहिक विशेष (४ सेवा)ट्रेन क्रमांक 01491 साप्ताहिक विशेष दिनांक २७.०२.२०२६ व ०६.०३.२०२६ रोजी पुणे येथून दर शुक्रवारी १७.३० वा. सुटेल व हजरत निजामुद्दीन येथे दुसऱ्या दिवशी २०.०० वा. पोहोचेल.ट्रेन क्रमांक 01492 साप्ताहिक विशेष दिनांक २८.०२.२०२६ व ०७.०३.२०२६ रोजी हजरत निजामुद्दीन येथून दर शनिवारी २१.२५ वा. सुटेल व पुणे येथे दुसऱ्या दिवशी २३.५५ वा. पोहोचेल.या गाड्या दिनांक २७.०२.२०२६ व २८.०२.२०२६ रोजी विशेष गाड्या (२ सेवा) आणि दिनांक ०६.०३.२०२६ व ०७.०३.२०२६ रोजी होळी विशेष गाड्या (२ सेवा) म्हणून चालवण्यात येतील.संरचना: २ वातानुकुलीत द्वितीय, ४ वातानुकुलीत तृतीय, ८ शयनयान, ४ सामान्य द्वितीय, १ सामानासह गार्ड ब्रेक व्हॅन व १ जनरेटर कार.थांबे: लोणावळा, कल्याण, भिवंडी रोड, वसई रोड, वापी, सुरत, वडोदरा, गोध्रा, रतलाम, शामगढ, भवानी मंडी, रामगंज मंडी, कोटा, सवाई माधोपूर, गंगापूर सिटी, भरतपूर व मथुरा जंक्शन.आरक्षण:विशेष गाडी क्रमांक 02141, 02142, 01171, 01079, 01119, 01073, 01043, 01143, 01469, 01470, 01457, 01458, 01481, 01449, 01431, 01415 व 01491 यांचे आरक्षण दिनांक १८.०२.२०२६ पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर तसेच www.irctc.co.in या संकेतस्थळावर आगाऊ आरक्षण कालावधी (ARP) अंतर्गत उपलब्ध होईल.आगाऊ आरक्षण कालावधी (ARP) नंतरच्या प्रवासासाठी आरक्षण संबंधित पुढील ARP तारखेनुसार उपलब्ध होईल.अनारक्षित डब्यांसाठी सामान्य शुल्कासह UTS प्रणालीद्वारे आरक्षण करता येईल.प्रवासी तिकीट बुकिंगसाठी RailOne ॲप डाउनलोड करू शकतात.या विशेष गाड्यांच्या थांब्यांवरील सविस्तर वेळापत्रकासाठी www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा. सदर बातमी पत्रक डॉ. स्वप्निल निला, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून जारी केले आहे.
आसावरी जगदाळे यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
विशेष बाब म्हणून पुणे महानगरपालिकेत सामावून घेण्याचा निर्णयमुंबई : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले पुण्यातील संतोष जगदाळे यांची मुलगी आसावरी जगदाळे हिला शासकीय सेवेत सामावून घेण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे मनपा आयुक्तांना दिले आहेत.पहलगाम हल्ल्यानंतर या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना आधार देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील जगदाळे कुटुंबीयांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी संतोष जगदाळे यांच्या पत्नी प्रगती जगदाळे आणि आसावरी जगदाळे यांचे सांत्वन करून या कुटुंबाला आर्थिक आधार मिळावा यासाठी आसावरीला शासकीय सेवेत सामावून घेण्याचे आश्वासन दिले होते.त्यानुसार आज शिंदे यांनी पुणे मनपा आयुक्त नवलकिशोर राम यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. यावेळी त्यांनी आसावरी हिला बोलवून तिच्याशी बोलून तिच्या शिक्षणाला समकक्ष असे पद महानगरपालिकेत निर्माण करून तिला सेवेत सामावून घेण्याचे निर्देश दिले. तसेच शासन सहानुभूतीपूर्वक हा निर्णय घेत असून विशेष बाब म्हणून तिच्या नेमणुकीला मंजुरी देण्यात येईल असेही शिंदे यांनी स्पष्ट केले. त्यानुसार लवकरच आसावरी जगदाळे हिला शासकीय सेवेमध्ये सामावून घेण्याची प्रकिया पूर्ण केली जाणार आहे.
Sunetra Pawar : सुनेत्रा पवार राष्ट्रवादीच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्ष? बैठकीत मोठा निर्णय
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (अजित पवार गट) एक महत्त्वपूर्ण नेतृत्व बदल घडत आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर नेमण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.
इंग्लंडचा इटलीवर २४ धावांनी विजय
नवी दिल्ली : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या सुपर ८ मध्येप्रवेश करणारा इंग्लंड हा चौथा संघ ठरला आहे. क गटातून वेस्ट इंडिजने आधीच पुढच्या फेरीत प्रवेश निश्चित केला होता आणि इंग्लंडने सोमवारी इटलीवर विजय मिळवून आगेकूच केली. पहिलाच वर्ल्ड कप खेळणाऱ्या इटलीने त्यांच्या प्रदर्शनाने क्रिकेट चाहत्यांचे मन मात्र जिंकले. नेपाळला पराभूत केल्यानंतर इटलीचा आत्मविश्वास कमालिचा वाढलेला पाहायला मिळाला. त्यामुळेच समोर २०३ धावांचे आव्हानात्मक लक्ष्य असूनही हा संघ डगमगला नाही. शेवटपर्यंत त्यांनी विजयासाठी जोर लावला, परंतु इंग्लंडचा अनुभव कामी आला व २४ धावांनी इटलीचा संघ पराभूत झाला.क गटातून सुपर ८ चे स्थान निश्चित करण्यासाठी मैदानावर उतरलेल्या इंग्लंडला कोलकाताच्या इडन गार्डनवर इटलीने जेरीस आणले होते. फुटबॉलच्या मैदानावर या दोन्ही देशांमधील लढती रोमहर्षक राहिल्या आहेत आणि क्रिकेटच्या मैदानावर तिच ठसन पाहायला मिळाली. नेपाळला पराभूत करून वर्ल्ड कपमधील पहिला विजय मिळवल्यानंतर इटलीचा आत्मविश्वास किती वाढलाय, हे इंग्लंडविरुद्ध पाहायला मिळाला. इंग्लंडचा निम्मा संघ त्यांनी १०५ धावांत तंबूत पाठवला होता.जॉस बटलर ( ३), जेकब बेथेल ( २३), फिल सॉल्ट ( २८), कर्णधार हॅरी ब्रूक ( १४) व टॉम बँटन ( ३०) यांना इटलीच्या गोलंदाजांनी शांत ठेवले. पण, सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या विल जॅक्सने सामना ३६० डिग्री कोनात फिरवला. त्याने २१ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले, जे ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमधील इंग्लंडकडून झालेले वेगवान अर्धशतक ठरले. त्याने इयॉन मॉर्गनचा विक्रम मोडला. जॅक्सने २२ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांसह नाबाद ५३ धावा करताना संघाला ७ बाद २०२ धावांपर्यंत पोहोचवले.इटलीच्या ग्रांट स्टीवर्ट व क्रिशन कलनगामागे यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. इटलीची सुरुवात काही खास झाली नाही. जोफ्रा आर्चरने पहिल्याच षटकात अँथोनी मोस्का ( ०) व जेजे स्मट्स ( ०) यांना बाद केले. त्यानंतर जेमी ओव्हरटनने कर्णधार हॅरी मॅनेटीला ( १२) माघारी पाठवून इटलीची अवस्था ३ बाद २२ अशी केली. आता इथून इटली काय डोकं वर काढत नाही, असे इंग्लंडला वाटले. पण, जस्टीन मोस्का व बेन मॅनेटी ही जोडी मैदानावर उभी राहिली.बेनने २२ चेंडूंत अर्धशतक ठोकले आणि इडन गार्डनचे सर्व कोपरे चौकार-षटकारांनी व्यापले. विल जॅक्सने टाकलेल्या १२ व्या षटकात मॅनेटीने ४,६,६,४ असे फटके खेचले. पण, शेवटच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नान मॅनेटी झेलबाद झाला. त्याने २५ चेंडूंत ४ चौकार व ६ षटकारांसह ६० धावांची वादळी खेळी केली. मोस्का व मॅनेटी जोडीने पाचव्या विकेटसाठी ४८ चेंडूंत ९२ धावा जोडल्या. या दोघांनी इंग्लंडच्या नाकी नऊ आणले होते. मोस्काने इंग्लंडच्या गोलंदाजांना चांगला चोप दिला, परंतु आदिल राशिदच्या गोलंदाजीवर तो फसला. मोस्का ३४ चेंडूंत ७ चौकारांसह ४३ धावांवर बाद झाला.इटलीला ३० चेंडूंत ६१ धावा हव्या होत्या आणि इंग्लंडने शेवटच्या पाच षटकांतच ७१ धावा चोपल्या होत्या. त्यामुळे इटलीसाठीही हे लक्ष्य शक्य होते. पण, सॅम कुरनने एकाच षटकात त्यांना दोन धक्के दिले. मार्कस कॅम्पोपियानो ( २) व जिएय-पिएरो मीड ( ०) हे बाद झाले. १८व्या षटकात ग्रांट स्टीवर्टने २१ धावा कुटल्या आणि सामना १२ चेंडूंत ३० धावा असा जवळ आणला. सॅम करन पुन्हा एकदा इंग्लंडसाठी संकटमोचक ठरला. त्याने १९ व्या षटकात फक्त ५ धावा देत १ विकेट घेतली. स्टीवर्ट २३ चेंडूंत २ चौकार व ५ षटकारांसह ४५ धावांची खेळी केली. करनने २३ धावांत ३ विकेट्स घेतल्या. इटलीचा संघ १७८ धावांत ऑल आऊट झाला. ओव्हरटनने तीन बळी टिपले.
२०२६ मध्ये पदवीधरांसाठी मोठी संधी; रिझर्व्ह बँकेत ६५० सहाय्यक पदांची भरती जाहीर
बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरूमुंबई : बँकिंग क्षेत्रात नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. भारतीय रिझर्व्ह बँक ने सहाय्यक पदांच्या तब्बल ६५० रिक्त जागांसाठी अधिकृत भरती जाहीर केली आहे. देशातील विविध कार्यालयांमध्ये या जागा भरल्या जाणार असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.इच्छुक उमेदवारांनी केवळ अधिकृत संकेतस्थळावरूनच ((www.rbi.org.in) अर्ज करावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे. इतर कोणत्याही माध्यमातून पाठवलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.महत्त्वाच्या तारखा जाहीरऑनलाईन अर्ज कालावधी : १६ फेब्रुवारी २०२६ ते ८ मार्च २०२६शुल्क भरण्याची अंतिम मुदत : ८ मार्च २०२६पूर्व परीक्षा (अंदाजे) : ११ एप्रिल २०२६मुख्य परीक्षा (अंदाजे) : ७ जून २०२६परीक्षेच्या तारखांमध्ये आवश्यकतेनुसार बदल करण्याचा अधिकार बँकेकडे राखीव असल्याचे नमूद करण्यात आले आहे.देशातील विविध शहरांत भरतीअहमदाबाद, बंगळुरू, भोपाळ, चंदीगड, चेन्नई, गुवाहाटी, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कानपूर, लखनऊ, कोलकाता, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, पाटणा आणि तिरुवनंतपुरम येथे या जागा भरल्या जाणार आहेत. गरजेनुसार पदसंख्येत वाढ किंवा घट होऊ शकते.पात्रता आणि नागरिकत्व निकषउमेदवार भारताचा नागरिक असावा. तसेच नेपाळ किंवा भूतानमधील नागरिक, १ जानेवारी १९६२ पूर्वी भारतात स्थायिक झालेले तिबेटी निर्वासित आणि भारतीय वंशाचे नागरिक ज्यांना भारतात कायमस्वरूपी राहण्याची परवानगी आहे, तेही पात्र ठरतील. संबंधित उमेदवारांकडे शासनमान्य प्रमाणपत्र आवश्यक राहील.वयोमर्यादा आणि सवलतीकिमान वय : २० वर्षेकमाल वय : २८ वर्षे(जन्म २ फेब्रुवारी १९९८ ते १ फेब्रुवारी २००६ दरम्यान असावा)आरक्षणानुसार सवलतअनुसूचित जाती / जमाती : ५ वर्षेइतर मागासवर्गीय : ३ वर्षेदिव्यांग : १० ते १५ वर्षेमाजी सैनिक : नियमांनुसारविधवा / घटस्फोटित महिला : ३५ ते ४० वर्षांपर्यंतबँक कर्मचारी : सेवेप्रमाणे (कमाल ३ वर्षे)शैक्षणिक अटकोणत्याही शाखेतील पदवी किमान ५० टक्के गुणांसह आवश्यक आहे. अनुसूचित जाती, जमाती आणि दिव्यांग उमेदवारांसाठी केवळ उत्तीर्ण श्रेणी ग्राह्य धरली जाईल.संगणकावर शब्द प्रक्रिया ज्ञान आवश्यक असून संबंधित राज्याची प्रादेशिक भाषा लिहिता, वाचता आणि बोलता येणे बंधनकारक राहील. संरक्षण सेवेत १५ वर्षे पूर्ण केलेल्या माजी सैनिकांसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आवश्यक आहे.निवड प्रक्रिया तीन टप्प्यांत१) पूर्व परीक्षा२) मुख्य परीक्षा३) भाषा प्राविण्य चाचणीस्थानिक भाषेचे ज्ञान तपासण्यासाठी अंतिम टप्प्यात चाचणी घेतली जाईल. या चाचणीत अपात्र ठरल्यास उमेदवाराची निवड रद्द होईल.परीक्षेचे स्वरूपपूर्व परीक्षाइंग्रजी : ३० प्रश्नगणित : ३५ प्रश्नबुद्धिमत्ता : ३५ प्रश्नएकूण : १०० प्रश्न, १०० गुणकालावधी : ६० मिनिटेमुख्य परीक्षाबुद्धिमत्ताइंग्रजीगणितसामान्य ज्ञानसंगणक ज्ञान(प्रत्येकी ४० प्रश्न, एकूण २०० प्रश्न, २०० गुण)दोन्ही परीक्षांमध्ये चुकीच्या उत्तरांसाठी गुण वजा करण्यात येणार आहेत.अर्ज शुल्कसर्वसाधारण आणि इतर मागासवर्गीय : ४५० रुपयेअनुसूचित जाती, जमाती, दिव्यांग, माजी सैनिक आणि बँक कर्मचारी : ५० रुपये शुल्क केवळ ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारले जाणार आहे.बँकिंग क्षेत्रात स्थिर आणि प्रतिष्ठेची नोकरी शोधणाऱ्या पदवीधरांसाठी ही मोठी संधी मानली जात आहे. पात्र उमेदवारांनी अंतिम मुदतीपूर्वी अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
भिवंडी महापालिका निवडणुकीत (Bhiwandi Municipal Corporation) एकाही राजकीय पक्षाला बहुमत न मिळाल्यामुळे तब्बल एक महिन्यानंतर ही कोणत्याच पक्षाच्या उमेदवाराकडून संख्याबळाचे गणित जुळून येण्यात अपयश आले आहे.
Tariq Rahman oath ceremony: या निर्णयामागे भाजपची आंतरराष्ट्रीय स्तरावरील 'ट्रंप कार्ड' चाल आणि सूक्ष्म कूटनीति असल्याचे बोलले जात आहे.
मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेता सचिन पिळगांवकर हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे अनेकदा सोशल मीडियावर ट्रोल होतात.
Pakistan fans reaction : हमीप्रमाणे भारत-पाक सामन्यानंतर पाकिस्तानात टीव्ही फुटण्याच्या बातम्या येत असतात, मात्र यावेळेस चाहत्यांच्या आक्रमकतेने सर्व मर्यादा ओलांडल्याचे चित्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हे मजबूत सरकार आहे की मजबूर सरकार? आत्मनिर्भर भारत की अमेरिका-निर्भर भारत? असा सवाल उपस्थित करत काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सूरजेवाला (Randeep Surjewala) यांनी कराराच्या अटी सार्वजनिक करण्याची मागणी करताना केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
पुणे–कोल्हापूर प्रवासाला वेग; राष्ट्रीय महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात
पुणे : पुणे आणि कोल्हापूर दरम्यानचा रस्तेप्रवास लवकरच अधिक जलद आणि सुलभ होणार असल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या देखरेखीखाली सुरू असलेल्या NH 48 या पुणे–बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरण व सुधारणा कामांना वेग आला आहे.प्रकल्पात कोणते भाग समाविष्ट?पुणे–सातारा–कराड–कोल्हापूर हा संपूर्ण मार्ग या योजनेत अंतर्भूत आहे. काही ठिकाणी रस्ता चार पदरी, तर काही भागात सहा पदरी करण्यात येत आहे. उड्डाणपूल, सेवा रस्ते आणि भूमिगत मार्ग उभारले जात आहेत. खंबाटकी घाटात नव्या बोगद्याचे काम पूर्ण झाले असून एका दिशेने वाहतूक सुरू करण्यात आली आहे.पेठ नाका ते कराड या सुमारे २७ किलोमीटरच्या टप्प्याचे काम अदानी रोड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीकडे आहे. तर पेठ नाका ते कोल्हापूर या सुमारे ४५ किलोमीटरच्या मार्गाची जबाबदारी रोडवेज सोलुशन इंडिया इन्फ्रा लिमिटेड सांभाळत आहे. कराड येथील उड्डाणपूलही लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.केव्हा पूर्ण होणार महामार्ग बहुतांश कामे शेवटच्या टप्प्यात असून जून २०२६ पर्यंत संपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. केंद्रीय मंत्रीनितीन गडकरी यांच्या पाठपुराव्यामुळे कामांना गती मिळाल्याचे सांगितले जाते. स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार काही ठिकाणी अतिरिक्त भूमिगत मार्गांना मान्यता देण्यात आली आहे.प्रवासाच्या वेळेत घटसध्या पुणे ते कोल्हापूर प्रवासाला साधारण चार ते पाच तास लागतात. मात्र काम पूर्ण झाल्यानंतर हा कालावधी अंदाजे ३ तासांपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे. यामुळे वाहनचालकांचा वेळ वाचेल, इंधन खर्चात बचत होईल आणि अपघातप्रवण ठिकाणी सुरक्षितता वाढेल.
Rajendra Dheringe Bribe Case : लाचखोर राजेंद्र ढेरिंगेच्या घरावर एसीबीचा छापा
राष्ट्रवादीचे नेते व अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयात एसीबीने छापा टाकला होता. या कारवाईत लिपीक राजेंद्र ढेरंगे (Rajendra Dheringe Bribe Case) याला ३५ हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले होते.
मुंबई :Salman Khan Films ने ‘बैटल ऑफ गलवान’च्या प्रदर्शनापूर्वी एक खास व्हिडिओ मालिका प्रदर्शित केली असून, यात खऱ्या आयुष्यातील लष्करी वीर आणि त्यांच्या कुटुंबियांचा सन्मान करण्यात आला आहे.‘बैटल ऑफ गलवान’च्या टीझरला मिळालेल्या जबरदस्त प्रतिसादानंतर Salman Khan Films प्रेक्षकांच्या मनाला सतत स्पर्श करत आहे. अलीकडेच प्रदर्शित झालेली ‘मातृभूमी’ आणि ‘मैं हूँ’ ही गीते देशभक्तीची भावना अधिक तीव्र करत असून, त्यांना सर्वत्र मोठा प्रतिसाद मिळत आहे. आता निर्मात्यांनी खऱ्या लष्करी दिग्गज आणि त्यांच्या कुटुंबियांच्या भावनिक आठवणींची खास व्हिडिओ मालिका सादर केली आहे, जी प्रत्येक सैनिकामागे उभी असलेल्या शांत पण खंबीर शक्तीला सलाम करते.हे व्हिडिओ शेअर करताना निर्मात्यांनी लिहिले, “बैटल ऑफ गलवान त्या आर्मी व्हेटरन्सच्या कुटुंबियांना सलाम करते, ज्यांनी प्रत्येक पोस्टिंग, प्रत्येक निरोप आणि प्रत्येक घरी परतण्याचा क्षण जगला आहे
टी-२० मध्ये रशीद खानचा ७०० बळींचा वर्ल्ड रेकॉर्ड!
ऐतिहासिक पराक्रम करणारा जगातील पहिला गोलंदाजमुंबई : टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये सोमवारी पहिला सामना अफगाणिस्तान व युएई यांच्यात खेळवला गेला. या सामन्यात अफगाणिस्तानच्या संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. दरम्यान पहिल्या डावात खेळत असताना संघाचा कर्णधार रशीद खानने एक विकेट घेताच टी-२० इतिहासात विश्वविक्रम आपल्या नावे केला आहे.रशीद खानच्या गोलंदाजीवर युएईचा फलंदाज मुहम्मद अरफान हिट विकेट होत बाद झाला. रशीदच्या फिरकीविरूद्ध खेळताना त्याचा तोल गेला आणि थेट विकेटवर बॅट मारली. या सामन्यातील रशीदची ही पहिली विकेट होती. यासह रशीदने टी-२० क्रिकेटमध्ये ७०० विकेट्सचा मोठा टप्पा गाठला.रशीद खान हा टी-२० इतिहासात ७०० विकेट्स घेणारा जगातील पहिला गोलंदाज ठरला आणि हा अनोखा विश्वविक्रम त्याने आपल्या नावे केला. रशीद टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटशिवाय जगभरात विविध टी-२० लीग खेळतो. जिथे त्याने आपल्या फिरकीने मैदान गाजवलं आहे आणि यासह त्याने ७०० विकेट्सचा टप्पा गाठला. रशीद खानने ५१२ टी-२० डावांमध्ये ६.५९च्या इकॉनॉमीने व १८.५०च्या उत्कृष्ट सरासरीसह ७०० विकेट्स पूर्ण केल्या. यादरम्यान त्याची उत्कृष्ट गोलंदाजी कामगिरी ही १७ धावा देत ६ विकेट्स अशी आहे.रशीद खानच्या आधी ड्वेन ब्रावोच्या सर्वाधिक विकेट्सचा विक्रम होता, जो रशीदने फार पूर्वीच आपल्या नावे करत त्याला मागे टाकलं होतं. रशीद खान आता फक्त २७ वर्षांचा असून टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्सचा मोठा आकडा रशीद गाठू शकतो, यात शंकाच नाही. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डानेही रशीद खानच्या ७००० विकेट्स पूर्ण झाल्याची पोस्ट शेअर केली आहे.टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाजरशीद खान – ७०० विकेट्सड्वेन ब्रावो – ६३१ विकेट्ससुनील नरेन – ६१३ विकेट्सइमरान ताहिर – ५७२ विकेट्सआंद्रे रसेल – ५०८ विकेट्स
अफगाणिस्तानने संयुक्त अरब अमीरातला दाखविले आसमान
ओमरझाईचे चार बळी, इब्राहिम झद्रानच्या अर्धशतकी खेळीने मिळाला विजयनवी दिल्ली : मुख्य गोलंदाज अझमतुल्ला ओमरझाईने चार षटकात अवघ्या १५ धावांमध्ये घेतलेले चार बळी व इब्राहिम झद्रान आणि सलामीवीर इब्राहिम झद्रानच्या ४१ चेंडूतील ५३ धावांची अर्धशतकी खेळी व त्यास इतर फलंदाजांनी दिलेली साथ यामुळे अफगाणिस्तानने संयुक्त अरब अमीरातचा पाच विकेट राखून विजय मिळविला.विजयासाठी १६१ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या अफगाणिस्तानचा सलामीवीर रहमानउल्ला गुरबाज हा डावातील दुसऱ्याच चेंडूवर शून्यावर बाद झाला. त्यानंतर दुसरा सलामीवीर इब्राहिम झद्रानने ४१ चेंडूत ५३ धावा करत संघाच्या धावसंख्येला आकार दिला. वनडाऊन खेळण्यासाठी आलेल्या गुलबदीन नायबने १२ चेंडूत १३ धावा करत दुसऱ्या विकेटसाठी ४० धावांच्या भागिदारीत आपले योगदान दिले. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या सेदिकुल्ला अटलने १४ चेंडूत १६ धावा, दारविश रसूलने २३ चेंडूत ३३ धावा आणि अझमतुल्ला ओमरझाईने २१ चेंडूत नाबाद ४० धावा करत संघाला विजय मिळवून दिला. मोहम्मद नबी ३ धावांवर नाबाद राहिला. अमीरातीकडून जुनैद सिद्दीकीने २३ धावांत दोन बळी, मुहम्मद अरफानने ३० धावांत दोन बळी, मुहम्मद जवादुल्लाने ३९ धावांत एक बळी घेतला.संयुक्त अरब अमीरातने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांमध्ये ९ बळी गमावत प्रति षटकामागे आठ धावांच्या सरासरीने १६० धावा केल्या. अवघ्या १३ धावांमध्ये संयुक्त अरब अमीरातचे दोन्ही सलामीवीर बाद झाल्याने शंभरच्या आत डाव संपणार असल्याची चिन्हे निर्माण झाली होती. संघाचा यष्टीरक्षक असलेला सलामीवीर आर्यांश शर्मा हा शून्यावर तर दुसरा सलामीवीर कर्णधार मुहम्मद वसीम हादेखील शून्यावर बाद झाला. त्यानंतर तिसऱ्या विकेटसाठी अलिशान शराफू आणि सोहेब खान यांनी ८४ धावांची भागिदारी करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. अलिशान शराफूने ३१ चेंडूमध्ये ४० धावा तर सोहेब खानने ४८ चेंडूमध्ये ६८ धावा करत संघाची पडझड रोखण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अमीरातची फलंदाजी गडगडली व ठराविक अंतराने विकेट पडत गेल्या. केवळ सय्यद हैदर (१३ धावा)आणि हैदर अलीच्या (१३ धावांचा) अपवाद वगळता अमीरातीच्या एकाही फलंदाजाला दोन आकडी धावसंख्या गाठता आली नाही. मुजीब उर रहमानने ३१ धावांत दोन बळी तर रशीद खानने २४ धावांत एक बळी घेत अमीरातीच्या धावसंख्येला लगाम घातला.
Gargi Sapkal : वडिलांसाठी लेक मैदानात.! हर्षवर्धन सपकाळांच्या मुलीचे टीकाकारांना जोरदार उत्तर
आपल्या वडिलांवरती होत असलेल्या टीकेला आता हर्षवर्धन सपकाळ यांची लेक गार्गी सपकाळ यांनी विरोधकांना उत्तर दिले आहे.
Assam Politics:
Harshwardhan Sapkal : सपकाळांनी भाजपला अनावश्यकपणे मुद्दा दिला; ठाकरेसेनेचा दावा
छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना टिपू सुलतानशी करून महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनी भाजपसाठी अनावश्यकपणे मुद्दा निर्माण केला आहे, असे ठाकरेसेनेने म्हटले आहे.
Karnataka Politics:
Vaibhav Suryavanshi : वैभवने परीक्षेसाठी अर्ज भरला होता, मात्र क्रिकेटच्या व्यग्र वेळापत्रकामुळे तो परीक्षेला बसू शकणार नाही.
निवृत्ती घेतलेल्याना लाभ मिळणार की नुकसान होणार?; आयोगाबाबत केंद्राचा मोठा खुलासा
नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या सेवेतून २०२५ अखेरपर्यंत निवृत्त झालेल्यांना नव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू होणार नाहीत, अशी चर्चा काही दिवसांपासून सुरू होती. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने अधिकृत भूमिका स्पष्ट करत निवृत्त कर्मचाऱ्यांच्या हक्कांबाबत कोणतीही कपात किंवा भेदभाव होणार नसल्याचे सांगितले आहे.केंद्रीय अर्थमंत्र्यांची माहितीकेंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सांगितले की सध्याचा आठवा वेतन आयोग हा केंद्रातील कर्मचारी व निवृत्तिवेतनधारकांच्या वेतनरचनेचा आणि भत्त्यांचा सर्वांगीण आढावा घेणार आहे. अर्थसंकल्प २०२५ मधील तरतुदींमुळे सध्या लागू असलेल्या पेन्शन नियमांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. नागरी तसेच संरक्षण क्षेत्रातील माजी कर्मचाऱ्यांनाही समान तत्त्वांवर लाभ लागू राहतील, असे त्यांनी स्पष्ट केले.शिफारशींसाठी तुम्ही इथे आपले मत नोंदवू शकताआयोगाच्या कामकाजासाठी शासनाने अधिकृत संकेतस्थळ सुरू केले असून नागरिक सहभागासाठी MyGov या मंचाद्वारे मते मागवण्यात येत आहेत. वेतनवाढ, भत्त्यांची पुनर्रचना, तसेच निवृत्तिवेतनातील सुधारणा याबाबत सूचना नोंदवता येणार आहेत.सहभागाची मुदतसंबंधित अभिप्राय १६ मार्चपर्यंत सादर करता येणार असून कर्मचारी, निवृत्तिवेतनधारक तसेच इच्छुक नागरिकांना प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी देण्यात आली आहे. शासनाच्या मते, जास्तीच्या सहभागामुळे आयोगाच्या शिफारशी अधिक सर्वसमावेशक ठरतील.निवृत्तिवेतनधारकांबाबत स्पष्टता३१ डिसेंबर २०२५ पूर्वी सेवामुक्त झालेल्यांनाही आयोगाच्या अंतिम शिफारशी लागू होतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. शिफारशी मंजूर झाल्यानंतर सर्वसाधारण आदेशाद्वारे त्यांची अंमलबजावणी होईल. त्यामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांच्या आर्थिक हितांवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे सरकारने अधोरेखित केले आहे. या स्पष्टीकरणानंतर कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झालेली अनिश्चितता मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
Supreme Court on Live-in Relationship: कदाचित आमचे विचार जुन्या वळणाचे असू शकतात, पण लग्नाआधी मुले आणि मुली अनोळखी असतात. अशा परिस्थितीत लग्नाआधी ते शारीरिक संबंध कसे काय ठेवू शकतात, हे आम्हाला समजत नाही, अशा शब्दांत न्यायालयाने आपले मत व्यक्त केले.
जर तुम्ही बँकेत नोकरीचे स्वप्न पाहत असाल आणि पदवी पूर्ण केली असेल, तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आली आहे.
Bangladesh PM Swearing-In Ceremony: १७ फेब्रुवारी २०२६ रोजी 'बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी' (BNP) चे अध्यक्ष तारिक रहमान पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत.
ऊर्जा सुरक्षा आणि पर्यावरण रक्षण ही लोकचळवळ व्हावी; मंत्री भरत गोगावले यांचे विधान
'सक्षम २०२५-२६' अभियानाचा समारोपमुंबई : इंधनाची बचत ही केवळ गरज नसून ती एक देशसेवा आहे. ऊर्जा सुरक्षा आणि पर्यावरण रक्षण ही आता एक लोकचळवळ झाली पाहिजे, असे प्रतिपादन फलोत्पादन, रोजगार हमी योजना आणि खार जमीन विकास मंत्री भरत गोगावले यांनी केले.केंद्र शासनाच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली देशभर राबविण्यात आलेल्या 'संरक्षण क्षमता महोत्सव (सक्षम) २०२५-२६' या महाराष्ट्र राज्य स्तरीय अभियानाचा सांगता समारंभ यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पार पडला, त्यावेळी ते बोलत होते.मंत्री गोगावले म्हणाले की, वाढते प्रदूषण ही जागतिक समस्या असून त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी नैसर्गिक आणि हरित इंधनाचा वापर वाढवणे आवश्यक आहे. कच्च्या तेलाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करून देशाचे परकीय चलन वाचवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने इंधन बचतीचे कर्तव्य पार पाडावे.सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचा पुढाकार १ ते १५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत राबविण्यात आलेल्या या अभियानाचे मुख्य घोषवाक्य ‘तेल आणि वायू वाचवा, हरित ऊर्जेचा स्वीकार करा’ असे होते. जनसामान्यांमध्ये इंधन बचतीचा संदेश पोहोचवणे, परकीय चलनाची बचत करणे आणि हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करून निसर्गाचे रक्षण करणे. या अभियानात बीपीसीएल, एचपीसीएल, आयओसी आणि गेल इंडिया यासारख्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांनी पुढाकार घेतला.विविध उपक्रमांनी गाजला महोत्सवगेल्या १५ दिवसांत राज्यात विविध स्तरांवर प्रबोधनपर उपक्रम राबवण्यात आले. यामध्ये सायकल रॅली, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, आणि वाहनचालकांसाठी विशेष तांत्रिक कार्यशाळांचा समावेश होता. या अभियानाच्या माध्यमातून शालेय विद्यार्थी, शेतकरी आणि गृहिणींपर्यंत इंधन बचतीचे तंत्र पोहोचवण्यात आले.यावेळी मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते अभियानातील विविध स्पर्धांमध्ये यशस्वी ठरलेल्या शालेय विद्यार्थ्यांचा आणि मार्गदर्शक शिक्षकांचा सन्मान चिन्ह व पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्यस्तरीय समन्वयक उमेश कुलकर्णी यांनी केले. या सोहळ्याला बीपीसीएलचे थॉमस जेम्स, एचपीसीएलचे मुकुंद जवंजल, आयओसीएलचे संतोष दैत, गेल इंडियाचे मोहम्मद शफी, मुख्य प्रबंधक दीपक वाघ, वरिष्ठ प्रबंधक रितेश जाधव यांसह तेल कंपन्यांचे अधिकारी, इंधन वितरक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन मुख्य प्रबंधक दीपक वाघ यांनी केले.
पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटनस्थळांची प्रचार प्रसिध्दी करावी; पर्यटनमंत्री शंभूराज देसाई
यंदा डोंगरी महोत्सव एप्रिल मध्येमुंबई : राज्यातील पर्यटनस्थळांची प्रचार प्रसिध्दी होण्यासाठी पर्यटन विभागाने काटेकोरपणे प्रसिद्धीचे नियोजन करावे. राज्यात, देशात व आंतरराष्ट्रीय स्तरावर राज्यातील पर्यटनस्थळांची प्रसिध्दी प्रभावीपणे करावी. डोंगरी महोत्सवाचे एप्रिल मध्ये आयोजन करावे, असे निर्देश पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.सह्याद्री अतिथीगृह येथे पर्यटन विभागाच्या विविध विषयाच्या अनुषंगाने बैठक झाली. त्यावेळी पर्यटनमंत्री शंभूराज देसाई बोलत होते. यावेळी पर्यटन विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे,पर्यटन संचालक डॉ.बी.एन.पाटील, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक निलेश गटणे उपस्थित होते.पर्यटनमंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, पर्यटन विभागातंर्गत विविध महोत्सवांचे आयोजन करण्यात येत आहे. आगामी कालावधीत डोंगरी महोत्सवाचे एप्रिल महिन्यात नियोजन करावे. या महोत्सवात स्थानिक संस्कृतीचे दर्शन घडविणारे कार्यक्रम, नामांकित कलाकारांचे सांस्कृतिक कार्यक्रम, कृषी पर्यटन, आई पर्यटन धोरणावर केंद्रित स्थानिक महिला सशक्तीकरण कार्यक्रमांचे आयोजन, गड-किल्ले दर्शन, विविध साहसी उपक्रम, पॅराग्लायडींग, पॅरामोटरिंग, रॉक क्लायबींग, सीप्लॅन राईड हे उपक्रम आयोजित करण्यात यावेत. स्थानिक ठिकाणी पर्यटनाला चालना देण्यासाठी हे उपक्रम असतील असे पहावे असे निर्देश त्यांनी दिले.पर्यटनमंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, राज्यातील ७५ पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पर्यटकांसाठी आधुनिक मुलभूत सोयी-सुविधायुक्त नमो पर्यटन केंद्र व माहिती सुविधा केंद्र स्थापन करण्याबाबत मान्यता देण्यात आली असून पहिल्या टप्प्यातील प्रतापगड, शिवनेरी, साल्हेर व रायगड येथील कामे गतीने करावीत. राज्यात नमो पर्यटन कौशल्य कार्यक्रमासाठी ७५०० प्रशिक्षणार्थ्यांपैकी प्रथम २५०० व उर्वरित ५००० प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण देण्याबाबतच्या कामाला गती देण्यात यावी, असे निर्देशही पर्यटनमंत्री देसाई यांनी दिले.
प्रवासी आणि पादचाऱ्यांसाठी अतिक्रमण हटवून रस्ते मोकळे करणार; मंत्री मंगलप्रभात लोढा
याबाबत कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पश्चिम रेल्वेचे मुख्य व्यवस्थापक विजय कुमार यांची घेतली भेटमुंबई सेंट्रल, ग्रँट रोड आणि चर्नी रोड स्थानकात लवकरच सरकते जिने, सुशोभीकरण ही होणारमुंबई : दक्षिण मुंबईतील पश्चिम रेल्वे वरील महत्वाची स्थानके लवकरच अतिक्रमण मुक्त आणि सुशोभित होणार आहेत. मुंबई सेंट्रल, ग्रांट रोड आणि चर्नी रोड स्थानकात लवकरच सरकते जिने बसवण्यात येणार असून स्थानकांचे सुशोभीकरणही करण्यात येणार आहे. कॅबिनेट मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांनी स्थानिकांसह आज चर्चगेट येथील पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयात मुख्य व्यवस्थापक श्री. विजयकुमार यांची त्यांच्या दालनात भेट घेतली. या भेटीनंतर लवकरच स्थानिकांच्या तक्रारी नुसार योग्य कार्यवाही करण्यात येणार असल्याचे कुमार यांनी सांगितले.राज्याचे कॅबिनेट मंत्री श्री मंगलप्रभात लोढा यांनी दक्षिण मुंबईतील मुंबई सेंट्रल,ग्रँट रोड आणि चर्नी रोड स्थानक परिसरातील विविध समस्यांबाबत पश्चिम रेल्वेचे मुख्य व्यवस्थापक श्री. विजयकुमार यांची भेट घेतली. मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी घुसखोरी वाढत असून अनधिकृत फेरीवाल्यांचा विळखा पडला आहे. यातले अनेक फेरीवाले बांगलादेशी रोहिंगे असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे स्थानक परिसरात अनधिकृत फेरीवाल्यावर कारवाई करावी. तसेच रस्त्यावर अनेक ठिकाणी गर्दुल्ले वावरताना दिसत आहेत. त्यामुळे प्रवाश्यांना आणि पादचार्यांनाही विनाकारण याचा उपद्रव सहन करावा लागत आहे. स्थानिकांच्या या समस्या गांभीर्याने घेऊन पश्चिम रेल्वेने याबाबत त्वरित कारवाई करावी अशी मागणी यावेळी मंत्री लोढा यांनी कुमार यांच्याकडे केली. त्याचबरोबर चर्नी रोड स्थानक ते गिरगावला जोडणारा पूल रखडला असून यातही रेल्वेने सहकार्याची भूमिका घ्यावी. त्याचबरोबर स्थानकात सरकते जिने बसवून वयोवृद्ध प्रवाश्यांना लवकरात लवकर सुविधा उपलब्ध करून द्यावी असेही मंत्री लोढा यांनी म्हटले आहे.दरम्यान, पश्चिम रेल्वेचे मुख्य व्यवस्थापक श्री. विजयकुमार यांनी समस्या जाणून घेतल्यानंतर यावर लगेचच अहवाल तयार करण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले आहेत. हा अहवाल आल्यानंतर यावर त्वरित कार्यवाही करून प्रवाश्यांच्या समस्यांचे निराकरण करू असे सांगितले. स्थानकांच्या सुशोभीकरणाच्या प्रस्ताव ही प्रलंबित असल्याचे त्यांनी मान्य केले असून लवकरात लवकर स्थानकाचा परिसर स्वच्छ आणि सुशोभित करू असे आश्वासन दिले आहे. या बैठकीला कौशिकजी शाह यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते.
नाशिक मनपाच्या स्थायी समिती सदस्यांची बिनविरोध निवड
नाशिक : नाशिक महापालिकेच्या सर्व स्थायी समिती सदस्यांची बिनविरोध निवड झाली. पक्षांच्या गटनेत्यांनी सुचवलेली नावे महापौर हिमगौरी आहेर-आडके यांना सादर करण्यात आली. जेवढ्या जागा तेवढेच उमेदवार असल्यामुळे सदस्यांची निवड बिनविरोध करण्यात आली. महापौरांनी निवड झालेल्या सदस्यांच्या घोषणेची औपचारिकता केली आणि स्थायी समितीवर नव्या सदस्यांचे स्वागत केले.महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी निवड झालेल्या सदस्यांच्या नावांची घोषणा केली. या घोषणेनुसार नाशिक महापालिकेच्या स्थायी समितीवर भारतीय जनता पक्षाच्या अर्थात भाजपच्या नऊ जणांची तर शिवसेनेच्या चार जणांची, उबाठाच्या दोन जणांची आणि राष्ट्रवादीच्या एकाची निवड झाली आहे. अपक्ष नगरसेवक मुकेश शहाणे यांना राष्ट्रवादीकडून संधी मिळाली आहे तर मनसेच्या एकमेव नगरसेविका मयुरी पवार यांना शिवसेनेकडून स्थायी समितीवर संधी मिळाली आहे.नाशिक महापालिका स्थायी समिती सदस्य भाजप : माधुरी बोलकर, नितीन निगळ, पल्लवी गणोरे, दीपाली कुलकर्णी, इंदूबाई खेताडे, आदिती पांडे, सरिता सोनवणे, जयश्री गायकवाड, मच्छिंद्र सानप शिवसेना : मयुरी पवार (मनसे), किरण गामने, राहुल दिवे, रंजना बोराडे राष्ट्रवादी काँग्रेस : मुकेश शहाणे (अपक्ष) उबाठा : योगेश गाडेकर, भारती ताजनपुरे मनसेच्या मयुरी पवार यांनी शिवसेना नगरसेवकांसोबत नोंदणी केल्यामुळे त्यांना सत्ताधारी गटाकडून संधी मिळाली आहे.
मुंबई : महाराष्ट्र विधानमंडळाच्या २०२६ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची अधिकृत दिनदर्शिका जाहीर झाली आहे. हे अधिवेशन २३ फेब्रुवारी ते २५ मार्च २०२६ या कालावधीत मुंबई येथील विधानभवनात पार पडणार आहे. राज्याचा अर्थसंकल्प कधी सादर होणार आणि महिनाभर चालणाऱ्या या अधिवेशनात नेमके कोणते महत्त्वाचे टप्पे असतील, याचा सविस्तर तपशील समोर आला आहे.अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी, सोमवार, २३ फेब्रुवारी रोजी राज्यपालांच्या अभिभाषणाची प्रत सभागृहाच्या पटलावर ठेवली जाईल, शोक प्रस्ताव मांडले जातील आणि सन २०२५-२०२६ च्या पुरवणी मागण्या सादर केल्या जातील. त्यानंतर २४ आणि २५ फेब्रुवारी रोजी राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा होईल, तर २६ व २७ फेब्रुवारीला पुरवणी मागण्यांवर चर्चा आणि मतदान होऊन २७ फेब्रुवारीला पुरवणी विनियोजन विधेयक मांडले जाईल. २८ फेब्रुवारी रोजी देखील शासकीय कामकाज सुरू राहील.https://prahaar.in/2026/02/16/3-year-old-bengaluru-boy-drowns-during-mothers-maternity-photoshoot/बजेट कधी सादर होणार ?मार्च महिन्यातील कामकाजाचा विचार करता, १ मार्च (रविवार) आणि २ मार्च रोजी बैठक होणार नाही, तर ३ मार्चला होळीनिमित्त सार्वजनिक सुट्टी असेल. या अधिवेशनातील सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे शुक्रवार, ६ मार्च २०२६ असून, या दिवशी दुपारी २:०० वाजता राज्याचा सन २०२६-२०२७ चा अर्थसंकल्प सादर केला जाईल. त्यानंतर ९ आणि १० मार्च रोजी अर्थसंकल्पावर सर्वसाधारण चर्चा होईल. १ मार्च ते १६ मार्च या कालावधीत अर्थसंकल्पीय मागण्यांवर चर्चा आणि मतदान पार पडेल, ज्यामध्ये १६ मार्च रोजी विनियोजन विधेयक सादर केले जाईल.अधिवेशनाच्या उत्तरार्धात, १९ मार्चला गुढीपाडव्याची सुट्टी असेल आणि २० मार्चला बैठक होणार नाही. २४ मार्च रोजी अंतिम आठवडा प्रस्ताव मांडला जाईल आणि २५ मार्च रोजी शासकीय कामकाजासह अधिवेशनाची सांगता होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, या संपूर्ण अधिवेशनात प्रश्नोत्तराच्या तासासाठी मंत्र्यांची पाच गटांत विभागणी करण्यात आली असून, संबंधित दिवशी त्या त्या गटातील मंत्री प्रश्नांना उत्तरे देतील. या नियोजित वेळापत्रकात कामकाजाच्या गरजेनुसार फेरफार होऊ शकतो, असे विधानसभा सचिवालयाचे सचिव जितेंद्र भोळे यांनी १० फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात नमूद केले आहे.
एमएमआरडीएचा २०१७–१८ नंतर प्रथमच अधिशेष अर्थसंकल्प
₹४८,०७२.५७ कोटींच्या आराखड्यामुळे आर्थिक परिवर्तनाचा नवा टप्पा आणि पायाभूत सुविधांना गतीप्रकल्पांसाठी ८७% भरघोस तरतूद , प्रादेशिक विकासाला चालनामुंबई, १६ फेब्रुवारी, २०२६ : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) आज सन 2026–27 या आर्थिक वर्षासाठी रु. 48,072.57 कोटींचा अर्थसंकल्प सादर केला आहे. सन 2017–18 नंतर प्रथमच हा अर्थसंकल्प शिल्कीचा असून रु.१७ लाखांचा अधिशेष साध्य करण्यास प्राधिकरणास यश आले आहे. विशेष म्हणजे गेल्या तीन वर्षात घेतलेल्या अथक परिश्रम, वित्तीय शिस्त यामुळे सन २०२४-२५ मध्ये रु.७४६८ तूटीचा अर्थसकंल्प या आर्थिक वर्षात वित्तीय अधिक्याचा करण्यात यश आले आहे.पहिल्यांदा मांडला गेला आहे. सन 2024–25 मध्ये प्राधिकरणावर रु. 7,468 कोटींची तूट होती; मात्र अवघ्या तीन वर्षांत रु. 17 लाखांचे अधिशेष साध्य करण्यास प्राधिकरणास यश आले असून यामुळे प्राधिकरणाच्या वित्तीय स्थितीत झालेला निर्णायक बदल अधोरेखित झाला आहे.या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून केवळ महसूल-खर्चातील समतोलच नव्हे, तर संस्थात्मक शिस्त अधिक मजबूत झाल्याचे, महसूल उभारणीत सुधारणा झाल्याचे, कर्जउभारणीचा संतुलित दृष्टिकोन स्वीकारल्याचे आणि जागतिक स्तरावरील विश्वासार्हता वाढल्याचे संकेत मिळतात. देशातील सर्वांत मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या आराखड्याचा विस्तार सुरू ठेवतानाच आर्थिक समतोल पुन्हा प्रस्थापित झाल्याने, भारतातील आर्थिकदृष्ट्या सर्वाधिक स्थिर प्रादेशिक विकास प्राधिकरण म्हणून एमएमआरडीएची भूमिका अधिक ठळक झाली आहे.₹४८,०७२.५७ कोटींचा अपेक्षित आर्थिक प्राप्ती आणि ₹४८,०७२.४० कोटींच्या प्रस्तावित खर्चामुळे अर्थसंकल्पात ₹१७ लाखांचा अधिशेष दर्शविण्यात आला आहे. जमिनीच्या वापरातून संरचित निधी उभारणी, अर्बन ट्रान्सपोर्ट फंड (यूटीएफ) बळकटीकरण, प्रकल्पांशी संबंधित महसूलात झालेली सुधारणा, तसेच आंतरराष्ट्रीय भागीदारी आणि संस्थात्मक वित्तपुरवठ्याच्या माध्यमातून उभारलेले भांडवल यामुळे हा अधिशेष साध्य झाल्याचे दिसून येते.प्रकल्पांसाठी अर्थसंकल्पातील ८७ टक्के तरतूद : विकासाला प्राधान्य देणाऱ्या कारभाराचे ठळक दर्शन घडवताना, विकास प्रकल्प व योजनांसाठी एकूण खर्चाच्या ८७.४२ टक्के इतकी म्हणजेच ₹४२,०२६.१४ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे भांडवली गुंतवणुकीच्या व्यापक अंमलबजावणीबाबत एमएमआरडीएची बांधिलकी अधोरेखित होते.₹४८,०७२.५७ कोटींची प्रस्तावित अर्थसंकल्पीय तरतूद २०२५–२६साठीच्या ₹३०,३१६.१८ कोटींच्या सुधारित अंदाजापेक्षा ५८.५७% अधिक आहे. तसेच ₹४८,०७२.४० कोटींचा प्रस्तावित खर्च मागील वर्षातील ₹३१,३१३.१३ कोटींच्या सुधारित अंदाजाच्या तुलनेत ५३.५२% जास्त आहे.अधिशेष स्थिती तसेच विस्तारी व्याप्ती पाहता एमएमआरडीएच्या आर्थिक वाटचालीतील संरचनात्मक बदलाचा टप्पा दिसून येतो.आर्थिक वर्ष २०१७–१८ ते २०२६–२७ या कालावधीत प्राधिकरणाला बहुतांश वर्षे तुटीचा सामना करावा लागला. या काळात काही वर्षांत तूट खूपच मोठी होती. मात्र, सातत्याने प्रयत्न केल्यानंतर अखेर आर्थिक वर्ष २०२६–२७ मध्ये प्राधिकरणाने आर्थिक समतोल साधत ₹०.१७ कोटी इतका किरकोळ अधिशेष नोंदवला.मुंबई महानगर प्रदेशाचे परिवर्तन :२०२६–२७ च्या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून प्रादेशिक पातळीवर समन्वयित परिवर्तन धोरणाला वेग देण्यात आला आहे. यामध्ये वाहतूक व्यवस्था, आर्थिक विकेंद्रीकरण, जल सुरक्षा, हवामान बदलांशी सामना करण्याची क्षमता तसेच गृहनिर्माणातील सुधारणा या घटकांचे एकत्रित नियोजन करण्यात आले आहे.माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले : “२०१७–१८ नंतर प्रथमच सादर झालेला एमएमआरडीएचा अधिशेष अर्थसंकल्प हा संस्थात्मक वाटचालीतील महत्त्वाचा टप्पा आहे. या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून जागतिक पातळीवरील गुंतवणूकदारांचा विश्वास आणि पायाभूत सुविधांवर आधारित दीर्घकालीन विकासदृष्टी प्रतिबिंबित होते. यामुळे मुंबई महानगर प्रदेशाला आधुनिक, गुंतवणुकीसाठी सज्ज आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणूक आकर्षित करू शकणारा शहरी प्रदेश म्हणून स्थान प्राप्त झाले आहे.”माननीय उपमुख्यमंत्री आणि एमएमआरडीएचे अध्यक्ष एकनाथ शिंदे म्हणाले : “अर्थसंकल्पातील ८७ टक्के तरतूद थेट प्रकल्पांसाठी करण्यात आल्याने प्राधान्यक्रम स्पष्ट असलेला आणि जबाबदारीचे भान असलेले प्रशासन दिसून येते. ग्रोथ हब संकल्पनेअंतर्गत एमएमआरडीएने नियोजित प्रादेशिक विस्ताराचा नवा मापदंड प्रस्थापित केला आहे.”एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी (भा. प्र. से.) म्हणाले : “हा अधिशेष अर्थसंकल्प वित्तीय शिस्त, संतुलित भांडवल उभारणी आणि सातत्यपूर्ण पायाभूत सुविधा अंमलबजावणीचा परिणाम आहे. एकीकडे वाहतूक जोडणी विस्तारत असताना, मुंबई ३.०च्या माध्यमातून विकासाचे विकेंद्रीकरण आणि प्रादेशिक शाश्वततेचे बळकटीकरणही करण्यात येत आहे. या अर्थसंकल्पामुळे आर्थिक ताणाच्या टप्प्यातून आर्थिक स्थैर्याकडे संक्रमण होत असून, विकासाचा वेगही व्यापक पातळीवर कायम राखण्यात आला आहे.”एमएमआरचा पुनर्रचना टप्पा : भुयारी दळणवळण मार्ग आणि धोरणात्मक जोडणी : शहराच्या मध्यवर्ती भागावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी आणि शहरांतर्गत प्रवास अधिक जलद करण्यासाठी एमएमआरडीएकडून उच्च क्षमतेच्या भुयारी दळणवळण पायाभूत सुविधांचा विस्तार करण्यात येत आहे.तरतूद (₹ कोटींमध्ये)* ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह कोस्टल रोड भुयारी मार्ग – ₹१,२५०.००* गायमुख ते फाउंटन हॉटेल भुयारी मार्ग – ₹७५.००* ठाणे ते बोरिवली चार पदरी भुयारी मार्ग – ₹३,०२९.५१* मुंबई इंटिग्रेटेड टनेल (बीडब्ल्यूएसएल–बीकेसी–एचएसआर–टी२ जोडणी) – ₹१,१८९.००एकूण – ₹५,५४३.५१दीर्घकालीन वाहतूक कोंडी कमी करणे आणि पूर्व–पश्चिम जोडणी बळकट करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा आधार ठरणार आहे.मुख्य वाहतूक मार्गांची जोडणी आणि मल्टि-रिंग रोड नेटवर्क : अर्थसंकल्पाच्या माध्यमातून मल्टि-रिंग रोड धोरणाला बळकटी देण्यात आली असून, यामुळे वाहतूक कोंडीचा ताण कमी होऊन आर्थिक विकासाला पूरक ठरणाऱ्या कॉरिडॉरना सहाय्य होणार आहे.तरतूद (₹ कोटींमध्ये)* अटल सेतू ते मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग जोडणी – ₹६०३.००* आनंद नगर ते साकेत उन्नत मार्ग – ₹८८०.१२* ठाणे कोस्टल रोड (बाळकुम–गायमुख) – ₹१,०२५.७७* फाउंटन हॉटेल ते भाईंदर उन्नत मार्ग – ₹७५.००* कल्याण रिंग रोड – ₹६००.००* वरळी–शिवडी उन्नत कॉरिडॉर – ₹९३६.०७* विस्तारित मुंबई शहरी पायाभूत सुविधा प्रकल्प – ₹२,३६२.२०* मुंबई–वाढवण द्रुतगती मार्ग कॉरिडॉर (उत्तन–विरार सी लिंक) – ₹२,०००.००* मुंबई ते समृद्धी द्रुतगती मार्ग : साकेत ते आमणे जोड रस्ता – ₹५००.००* पूर्व मुक्त मार्ग विस्तार (छेडा नगर, घाटकोपर ते ठाणे) – ₹१,१०६.७५* कल्याण–मुरबाड ते बदलापूर रस्ता (वालधुनी नदीलगत उन्नत रस्ता) – ₹२००.००* गायमुख ते पायगाव खाडी पूल – ₹६८२.१०* कसारवडवली, ठाणे ते खारबाव खाडी पूल – ₹८४०.७१* कोळशेत, ठाणे ते काल्हेर, भिवंडी खाडी पूल – ₹१०५.५१* राष्ट्रीय महामार्ग–४ ते काटई नाका उन्नत रस्ता – ₹९००.००एकूण – ₹१२,८१६.५३ग्रोथ हबच्या माध्यमातून एमएमआरला नवा आकार देणे (मुंबई ३.०) : अर्थसंकल्पाच्या माध्यमातून ग्रोथ हब संकल्पनेअंतर्गत नियोजित शहर विस्ताराला चालना देण्यात आली असून, त्यामुळे आर्थिक विकेंद्रीकरणाच्या प्रक्रियेला ठोस गती मिळाल्याचे दिसून येते.तरतूद (₹ कोटींमध्ये)* केएससी (कर्नाळा–साई–चिरनेर) नवी वसाहत – ₹४,०००.००* रायगड पेण विकास केंद्र – ₹५००.००* खारबाव एकात्मिक बिझनेस पार्क – ₹१००.००एकूण – ₹४,६००.००मुंबई ३.० साठीच्या ₹४,००० कोटींच्या तरतुदीमुळे एमएमआरमधील पुढील शहरी विस्ताराची दिशा प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या टप्प्यात प्रवेश करत असल्याचे स्पष्ट होते. या संकल्पनेच्या माध्यमातून मुंबईवरील ताण कमी करणे, जागतिक गुंतवणूक आकर्षित करणे आणि रोजगारनिर्मितीसाठी नियोजित परिसंस्था उभारणे हा उद्देश ठेवण्यात आला आहे. नीती आयोगाच्या ‘ग्रोथ हब’ संकल्पनेशी सुसंगत अशी ही मांडणी असल्याचेही यातून दिसून येते.एमएमआर एकात्मिक मेट्रो नेटवर्क : एकाच संस्थेमार्फत राबविण्यात येत असलेल्या देशातील सर्वात मोठ्या मेट्रो विस्तार प्रकल्पाची अंमलबजावणी एमएमआरडीएकडून करण्यात येत आहे.प्रमुख मार्गिका :* मेट्रो २अ मार्गिका (डी. एन. नगर ते दहिसर) – ₹४५.१९ कोटी* मेट्रो २ब मार्गिका (डी. एन. नगर ते मंडाळे) – ₹१,२२४.६० कोटी* मेट्रो ४ मार्गिका (वडाळा–कसारवडवली) – ₹३,६३०.७१ कोटी* मेट्रो ४अ मार्गिका (कसारवडवली–गायमुख) – ₹१७६.५४ कोटी* मेट्रो ५ मार्गिका (ठाणे–भिवंडी–कल्याण) – ₹१,३०९.३० कोटी* मेट्रो ५अ मार्गिका (विस्तार) (दुर्गाडी ते उल्हासनगर) – ₹१८३.३५ कोटी* मेट्रो ६ मार्गिका (स्वामी समर्थ नगर–कांजुरमार्ग) – ₹२,४०७.७८ कोटी* मेट्रो ७ मार्गिका (अंधेरी (पूर्व) ते दहिसर (पूर्व)) – ₹२४.०५ कोटी* मेट्रो ९ आणि ७अ मार्गिका (दहिसर–मिरा–भाईंदर / अंधेरी–सीएसटी विमानतळ) – ₹१,१५१.८७ कोटी* मेट्रो १० मार्गिका (गायमुख ते मिरा रोड) – ₹१००.०० कोटी* मेट्रो १२ मार्गिका (कल्याण ते तळोजा) – ₹१,०५४.५४ कोटी* मेट्रो १३ मार्गिका (घोडबंदर ते विरार) – ₹२००.०० कोटी* मेट्रो १४ मार्गिका (कांजुरमार्ग ते बदलापूर) – ₹५००.०० कोटी* मंडाळे मेट्रो भवन – ₹४०३.३१ कोटी* मालवणी, मालाड व मंडाळे येथील कर्मचारी निवास – ₹२४८.९१ कोटी* कल्याण शिळफाटा जंक्शन ते राजनोली चौक, भिवंडी उड्डाणपूल – ₹१५०.०० कोटी* ट्रान्सपोर्ट स्टॅक: डिजिटल मोबिलिटी प्लॅटफॉर्म – ₹२५.०० कोटी* मेट्रो नियोजन व मल्टि-मॉडेल एकत्रीकरण डिझाइन – ₹९१९.६३ कोटी* मेट्रो ७ उन्नत पादचारी पूल (एफओबी) – ₹८४.१० कोटीएकूण – ₹१३,८३८.८८ कोटीया मेट्रो विस्ताराच्या माध्यमातून संपूर्ण प्रदेशात उच्च क्षमतेची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक बळकट होत असून, भविष्यात वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दिशेने ठोस पावले टाकण्यात येत आहेत.सामाजिक पायाभूत सुविधा आणि सर्वसमावेशक शहरी विकासझोपडपट्टी पुनर्वसन आणि गृहनिर्माण* माता रमाबाई आंबेडकर नगर एसआरए – ₹५५१.०० कोटी* पुनर्वसन व पुनर्स्थापना – ₹१५०.०० कोटी* परवडणारी भाडेतत्त्वावरील घरे – ₹३०.३३ कोटीएकूण – ₹७३१.३३ कोटीजल स्रोत आणि प्रादेशिक शाश्वतताप्रकल्पांमध्ये पुढील समावेश आहे :* सूर्या प्रादेशिक जलपुरवठा योजना – ₹२६७.०० कोटी* देहरजी मध्यम प्रकल्प – ₹२४७.०७ कोटी* पोशीर धरण व अन्य प्रकल्प – ₹४६६.८० कोटीएकूण तरतूद – ₹९८०.८७ कोटीया प्रकल्पांच्या माध्यमातून मिरा–भाईंदर, वसई–विरार, पालघर आणि लगतच्या परिसरात दीर्घकालीन जलसुरक्षा अधिक मजबूत होण्याची अपेक्षा आहे.हरित एमएमआर : हवामान बदल सक्षम भविष्यमुख्य भर :* ब्ल्यू–ग्रीन पायाभूत सुविधा* एकात्मिक कचरा व्यवस्थापन* नवीकरणीय ऊर्जेचा समावेश* शाश्वत दळणवळण* मुंबई क्लायमेट वीकएकूण तरतूद – ₹२५०.०० कोटीभांडवली अर्थसंकल्पात हवामान बदल सक्षमतेला संस्थात्मक स्वरूपात मुख्य प्रवाहात आणल्याचे यातून दिसून येते.महान नेत्यांच्या स्मारकांची उभारणी* इंदू मिल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भव्य स्मारक – ₹४००.०० कोटी* स्व. बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक (भाग १ व २), महापौर निवास, मुंबई – ₹१७१.५० कोटीएकूण तरतूद – ₹५७१.५० कोटीमाहिती तंत्रज्ञानमुख्य भर :* एकात्मिक डिजिटल डिलिव्हरी कार्यक्रम (आयडीडीपी), प्रादेशिक माहिती प्रणाली (आरआयएस), ईआरपी प्रणाली आणि इतर उपक्रमएकूण तरतूद – ₹२३५.३४ कोटीमहसूल संरचना₹४८,०७२.५७ कोटींच्या अपेक्षित आर्थिक उत्पन्नात पुढील घटकांचा समावेश आहे :* जमीन विक्री – ₹११,१७७.९५ कोटी* अर्बन ट्रान्सपोर्ट फंड – ₹६,३६८.४२ कोटी* कर्जउभारणी – ₹२३,७११.१६ कोटी* राज्य अधीनस्थ कर्जे – ₹३,५२०.०० कोटी* प्रकल्प संचालनातून मिळणारा महसूल – ₹४४१.७१ कोटी* शासकीय अनुदाने आणि टीडीआर – ₹१,१८९.१४ कोटी* भूभाडे आणि व्याज उत्पन्न – ₹१,६६४.१९ कोटीही अधिशेष स्थिती पाहता जमिनीच्या नियोजित वापरातून महसूलनिर्मिती, अर्बन ट्रान्सपोर्ट फंडचे बळकटीकरण आणि शिस्तबद्ध आर्थिक नियोजन प्रतिबिंबीत होते.एमएमआरसाठी संरचनात्मक वळणाचा टप्पा२०२६–२७च्या अर्थसंकल्पातून एमएमआरडीएच्या संस्थात्मक वाटचालीतील एकत्रीकरणाचा टप्पा दिसून येतो. या ठिकाणी आर्थिक शिस्त आणि अभूतपूर्व पायाभूत गुंतवणूक यांची सांगड घालण्यात आली आहे.या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून पुढील दिशा स्पष्ट होते :* पाच वर्षांनंतर आर्थिक स्थैर्यतेचा ठोस टप्पा* दळवळणाच्या महत्त्वाच्या कॉरिडॉरना गती* मुंबई ३.०ची प्रत्यक्ष अंमलबजावणी* जल व्यवस्थापन आणि हवामान-सक्षमतेचे बळकटीकरण* आर्थिक उपक्रमांचे विकेंद्रीकरणहा अर्थसंकल्प म्हणजे केवळ आकड्यांची मांडणी न राहता, मुंबई महानगर प्रदेशाला आधुनिक, गुंतवणुकीसाठी सक्षम आणि दीर्घकालीन शाश्वत विकासाच्या दिशेने नेणारा दिशादर्शक ठरतो.
Pune News : राजकीय आंदोलनातील दगडफेक प्रकरणात पोलीस आयुक्तांनी भूमिका स्पष्ट करत दिले ‘हे’निर्देश
शहरात नुकत्याच झालेल्या राजकीय आंदोलनादरम्यान उद्भवलेल्या तणावपूर्ण परिस्थितीबाबत पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या घटनेला “अत्यंत दुर्दैवी” संबोधत पोलिसांनी वेळेवर मध्यस्थी करून कायदा व सुव्यवस्था राखल्याचे स्पष्ट केले.
Rashid Khan World Record : टी-२० क्रिकेटमध्ये ७०० विकेट्सचा पल्ला गाठणारा राशिद खान हा जगातील पहिला गोलंदाज ठरला आहे.
मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव (Mohan Yadav ) खंडवा जिल्ह्याच्या दौ-यावर असताना त्यांचे हेलिकॉप्टर हवेत असंतुलित झाल्याची घटना घडली.

26 C