कर्नाटक काँग्रेसमध्ये कधीही उडू शकतो भडका? ; मुख्यमंत्रीपदाच्या वादात राहुल गांधी गप्प का? वाचा
Karnataka politics। कर्नाटकातील काँग्रेसमध्ये कधीही भडका उडण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांच्यातील संघर्ष आता शेवटच्या टप्पयात येऊन पोहचला असल्याचे दिसत आहे. राज्यातील काँग्रेस सदस्य पक्षाच्या हायकमांडने वेळीच यावर तोडगा काढण्याची मागणी करत आहेत, परंतु सर्वात मोठे संकटमोचक असणारे राहुल गांधी हे या मुद्दयावर काहीही बोलत नसल्याचे दिसत आहे. ही केवळ हायकमांडची भूमिका […] The post कर्नाटक काँग्रेसमध्ये कधीही उडू शकतो भडका? ; मुख्यमंत्रीपदाच्या वादात राहुल गांधी गप्प का? वाचा appeared first on Dainik Prabhat .
आजपासून मदर 'शक्ती' सबस्क्रिप्शन यामध्ये गुंतवणूक करावी का? जाणून घ्या इत्यंभूत माहिती एका क्लिकवर!
मुंबई: भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणीसंग्रहालय म्हणजेच राणीच्या बागेतून एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे. प्राणीसंग्रहालयातील शक्ती वाघाचा मृत्यू झाल्याचे आज सकाळी घोषिक करण्यात आले. खरंतर या वाघाचा मृत्यू १७ नोव्हेंबर रोजी झाला होता. परंतू आज सकाळी तब्बल आठ दिवसांनंतर मृत्यूबाबत सांगण्यात आले आहे. यामुळे वाघाच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला जात असून प्राणीसंग्रहालाच्या कामकाजावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.भायखळ्याच्या प्राणीसंग्रहालयातील शक्ती वाघ २०२०मध्ये छत्रपती संभाजीनगरच्या प्राणीसंग्रहालयातून आणण्यात आलेला होता. जेव्हा या वाघाला संग्रहालयात आणले गेले तेव्हा तो अवघ्या साडेतीन वर्षांचा असून आता त्याचे वय १० वर्ष होते. या वाघाचा मृत्यू अपस्माराचे झटके आल्याने झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला असल्याची माहिती मिळली आहे. मात्र उद्यान व्यवस्थापनाकडून वाघाच्या मृत्यूची माहिती आठ दिवस का लपवली गेली यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.शक्ती वाघाला राहण्यासाठी प्रशासनाने उद्यानात नैसर्गिक अधिवास केला होता. वाघाला खाण्यासाठी मांसाहार आणि मुबलक पाणी असायचे. तसेच बसण्यासाठी आणि फिरण्यासाठी ठिक-ठिक ठिकाणी लहानसे पाणवठेही तयार करण्यात आले होते. शक्ती वाघासोबत 'जय' नावाचा दुसरा वाघ आणि करिश्मा वाघीण एकत्र राहत होते. परंतू १७ नोव्हेंबर रोजी शक्ती वाघाला श्वसनाचा त्रास जाणवू लागला आणि त्यानंतर फिट्स आल्याने मृत्यू झाला असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आलेले आहे.https://prahaar.in/2025/11/26/a-girl-who-was-begging-at-the-railway-station-was-used-for-physical-pleasure-and-her-body-was-found-in-the-creek-shocking-incident-in-dombivli-revealed/भायखळ्याच्या राणी बागेत घडलेल्या या प्रकरणानंतर माहिती अधिकार कार्यकर्ते प्रथमेश जगताप यांनी दावा केला आहे की, शक्ती वाघाचा मृत्यू मांस खाताना हाड श्वसननलिकेत अडकल्यामुळे झालेला आहे. तसेच ज्या वेळेस वाघाचा मृत्यू झाला त्याची माहिती कायद्यानुसार महाराष्ट्र झू अथोरिटी आणि सेंट्रल झू अथोरिटीला सविस्तर सांगणे आवश्यक होते, मात्र ही माहिती फक्त ई-मेलने कळवण्यात आलेली होती. यामुळे संग्रहालय व्यवस्थापनाच्या कामकाजावर प्रश्न निर्माण होत आहे.
सातारा : साताऱ्यातून (Satara) एक अत्यंत धक्कादायक आणि भयंकर अपघाताची घटना समोर आली आहे. फलटण तालुक्यातील बरड येथे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावर (Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Mahamarg) भरधाव मिनी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला, ज्यात एका व्यक्तीला आपले प्राण गमवावे लागले, तर चौघे जण गंभीर जखमी झाले आहेत.https://prahaar.in/2025/11/26/chhatrapati-sambhajinagar-sambhajinagar-hostel-food-issue-lizard-found-in-meal-students-hospitalised/मिळालेल्या माहितीनुसार, बरड येथे मिनी ट्रॅव्हल बसवरील चालकाचे नियंत्रण सुटले. अनियंत्रित झालेल्या या बसने महामार्गावर रस्ता ओलांडणाऱ्यांना चिरडले. या अपघातामध्ये एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून, मिनी ट्रॅव्हल्समधील चार जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात इतका भीषण होता की, महामार्गाच्या कडेला असलेल्या एका हॉटेलच्या सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यामध्ये हा संपूर्ण थरार कैद झाला आहे. हा हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अपघातानंतर तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले. जखमींना उपचारासाठी फलटण येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे संत ज्ञानेश्वर महामार्गावरील वाहतुकीच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
मोहित सोमण: जगभरात प्रभावशाली ठरणाऱ्या युएस अर्थव्यवस्थेतील फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात होईल या आशावादाचा जागतिक विश्वात मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे. याच धर्तीवर युरोप व जपानमधील वाढत्या आकडेवारीसह आशियाई बाजारात सकाळच्या सत्रात वाढ झाली हीच परिस्थिती भारतीय शेअर बाजारात दिसत आहे. दुपारी १२.२९ वाजेपर्यंत बीएसई व एनएसईवर सेन्सेक्स व निफ्टीत तुफान वाढ झाली आहे. सेन्सेक्स ८६३ व निफ्टी २७३ अंकाने उसळला असल्याने दोन्ही निर्देशांकात १% हून अधिक वाढ झाली असल्याचे या निमित्ताने स्पष्ट झाले आहे. सकाळी मिड व स्मॉल कॅप शेअर्समध्ये ब्लू चिप्स कंपनीच्या शेअर पेक्षा अधिक वाढ झाली होती. तसेच बँक, मेटल, फायनांशियल सर्विसेस शेअर्समध्ये झालेल्या वाढीमुळे बाजारात रॅली झाली.एचडीएफसी (१.२५%), रिलायन्स इंडस्ट्रीज (१.२८%), आयसीआयसीआय सिक्युरिटीज (०.८९%),बजाज फायनान्स (२.५०%), श्रीराम फायनान्स (१.७२%), अदानी एंटरप्राईजेस (०.१८%), अदानी पोर्ट (२.०२%), टाटा स्टील (१.७७%), पीएमपीवी (१.३८%) यांसारख्या बड्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाल्याने बाजारात मोठी वाढ झाली आहे. तज्ञांच्या मते कच्च्या तेलाच्या किंमती जागतिक बाजारपेठेत घसरल्याने परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी आज मोठ्या प्रमाणात बाजारात गुंतवणूक केली. तज्ञांच्या मते ७८५.३० कोटींची गुंतवणूक वाढल्याने त्याचा फायदा बाजारात होत आहे. अर्थात भारती एअरटेल (१.४२%), महिंद्रा अँड महिंद्रा फिनसर्व्ह (१.६२%),बजाज होल्डिंग्स (०.०५%), बर्जर पेंटस (०.६०%) यांसारख्या शेअर्समध्ये घसरण झाल्याने अतिरिक्त रॅली रोखली गेली.जिओजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडचे मुख्य गुंतवणूक रणनितीकार डॉ. व्ही.के. विजयकुमार यांनी अलीकडील अस्थिरतेचे कारण फ्युचर्स एक्सपायरी अॅक्टिव्हिटीला दिले त्यांच्या मते, 'काल निफ्टीमध्ये ७४ अंकांची घसरण झाली असूनही ४६९७ कोटी रुपयांचा सकारात्मक संस्थात्मक खरेदीचा आकडा असूनही काल ही एक्सपायरीशी संबंधित अशा अस्थिरतेचे उदाहरण आहे.'किरकोळ गुंतवणूकदारांसाठी सर्वोत्तम रणनीती म्हणजे व्यापार करण्यापासून दूर राहणे आणि हळूहळू बऱ्यापैकी मूल्यवान उच्च दर्जाचे ग्रोथ स्टॉक जमा करणे.' असे ते पुढे म्हणाले आहेत.काल परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी ७८५.३० कोटींच्या गुंतवणुकी केली होती तर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी अंदाजे ३९१२ कोटींची गुंतवणूक केली होती ज्यामुळे देशांतर्गत सहभाग मजबूत असल्याचे दिसून आले. युक्रेन-रशिया यांच्यातील तीढा सुटत आल्याने तेलाच्या किमती प्रति बॅरल $५७.२ पर्यंत घसरल्या होत्या ज्यामुळे बाजारांना अतिरिक्त आधार मिळाला. असे असताना युएस बाजारातील फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपातीशिवाय आगामी किरकोळ विक्री (Retail Sales) डेटा, पीएमआय डेटा, रोजगार आकडेवारी, उत्पादन निर्मिती निर्देशांक अशा विविध आगामी आकडेवारींची प्रतिक्षा गुंतवणूकदार करत असल्याने सोन्यासह बाजारालाही आधार मिळत आहे.आज दिवसभरात अस्थिरता निर्देशांक (VIX Volatility Index) हा १.४७% घसरला आहे. सुरूवातीच्या कलात तो २% पेक्षा अधिक पातळीवर घसरला होता. त्यामुळे एकूणच बाजारात आज स्थैर्यता असल्याचे स्पष्ट होत आहे. दुपारी नेक्स्ट ५० (१.२७%), बँक निफ्टी (१.२७%), फायनांशियल सर्विसेस (१.२५%), मिडकॅप सिलेक्ट (१.१६%) निर्देशांकात मोठी वाढ झाल्याने बाजार मोठ्या प्रमाणात आणखी उसळत आहे.काल युएस बाजारात अखेरच्या सत्रात डाऊ जोन्स (०.२९%), एस अँड पी ५०० (०.९३%), नासडाक (०.७१%) निर्देशांकात वाढ झाली. आशियाई बाजारात आज दुपारपर्यंत सेट कंपोझिट (०.३१%), शांघाई कंपोझिट (०.१५%) वगळता इतर निर्देशांकात मोठी वाढ झाली आहे. सर्वाधिक वाढ तैवान वेटेड (१.८१%), निकेयी २२५ (१.९३%), गिफ्ट निफ्टी (१.१९%) निर्देशांकात झाली आहे.
Hibiscus Tea: जास्वंदीचे फूल दिसायला जितके सुंदर, तितकेच ते आरोग्यासाठीही अतिशय उपयुक्त मानले जाते. देवी-देवतांना अर्पण केल्या जाणाऱ्या या फुलाला धार्मिक महत्त्वाबरोबरच औषधी मूल्यही आहे. आयुर्वेदात याला जपा पुष्प म्हटले जाते. हे फूल शीतल, रक्तवर्धक, बलवर्धक आणि सूजन कमी करणारे म्हणून ओळखले जाते. जास्वंदीची पाने, फुले आणि मुळे सगळ्यांची औषधी गुणधर्म आहेत, तर फुलांमध्ये एंटीऑक्सिडेंट, […] The post Hibiscus Tea: जास्वंदीच्या फुलांच्या चहाचे आश्चर्यकारक फायदे; डायबिटीज, कोलेस्ट्रॉलसह अनेक आजारांवर नियंत्रण appeared first on Dainik Prabhat .
Isha Keskar | ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ मालिकेला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेतील अद्वैत-कलाची जोडीला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. मालिकेत सुकन्या नावाच्या नव्या पात्राची एन्ट्री झाली आहे. या मालिकेत कलाचा अपघात झाल्याचे दाखवण्यात आला होता. ज्यानंतर कला ही व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री ईशा केसकर हिनं मालिका सोडल्याचं बोललं जात होतं. अखेर या चर्चा खऱ्या ठरल्या आहेत. […] The post “…म्हणून मालिकेतून बाहेर पडायचं ठरवलं,” ईशा केसकरने ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ मालिकेतून बाहेर पडण्यामागचे सांगितले कारण appeared first on Dainik Prabhat .
“पहिल्यांदा मतदान करणाऱ्या मतदारांचा आदर करा” ; संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे पत्र
Constitution Day of India। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नागरिकांना त्यांची संवैधानिक कर्तव्ये पार पाडण्याचे आवाहन केले, ते एका मजबूत लोकशाहीचा पाया असल्याचे सांगत त्यांनी देशवासियांसाठी एक पत्र लिहिले. या आजच्या संविधान दिनानिमित्त जनतेला लिहिलेल्या पत्रात, पंतप्रधान मोदींनी मतदानाचा अधिकार वापरून लोकशाही मजबूत करण्याच्या जबाबदारीवरही भर दिला. १८ वर्षांचे झालेल्या आणि पहिल्यांदाच मतदान करणाऱ्यांचा सन्मान […] The post “पहिल्यांदा मतदान करणाऱ्या मतदारांचा आदर करा” ; संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे पत्र appeared first on Dainik Prabhat .
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर बातमी समोर येत आहे. किल्लेआर्क (Killeark) येथील समाज कल्याण विभागातर्फे चालवल्या जाणाऱ्या एका शासकीय वसतिगृहातील (Government Hostel) विद्यार्थ्यांच्या जेवणात पाल (Lizard) शिजलेली आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. रात्रीच्या जेवणात एका विद्यार्थ्याच्या ताटात गवारीच्या भाजीत शिजलेली पाल सापडली. हे जेवण खाल्लेल्या अनेक विद्यार्थ्यांना याचा त्रास सुरू झाला. सुमारे १० ते १५ विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याने त्यांना तातडीने उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दूषित जेवणामुळे विद्यार्थ्यांना मळमळ आणि उलट्या (Nausea and Vomiting) झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. वसतिगृहाच्या या भोंगळ कारभारावर विद्यार्थ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. संतप्त विद्यार्थ्यांनी रात्री उशिरा, म्हणजेच ११.३० वाजेपर्यंत वसतिगृहासमोर धरणे आंदोलन (Protest) केले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त आर.एम. शिंदे यांनी तात्काळ वसतिगृहाला भेट देऊन विद्यार्थ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे शासकीय वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या गुणवत्तेवर आणि स्वच्छतेच्या प्रश्नावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी जोर धरू लागली आहे.https://prahaar.in/2025/11/26/2611-mumbai-terror-attack-know-what-happend-17-years-ago/दूषित जेवणामुळे विद्यार्थ्यांना मळमळ, उलट्यांचा त्रासछत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) शहरातील समाज कल्याण विभागाच्या किल्लेआर्क युनिट क्रमांक १ मधील १००० मुलांच्या वसतिगृहात काल सायंकाळी एक अत्यंत गंभीर आणि धक्कादायक घटना घडली. या वसतिगृहातील भोजनात थेट पाल (Lizard) आढळल्याने मोठी खळबळ उडाली.सोमवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास विद्यार्थी जेवण करत असताना, त्यांना गवारीच्या शेंगांच्या भाजीमध्ये शिजलेली पाल आढळली. या घटनेनंतर विद्यार्थ्यांमध्ये एकच आरडाओरडा झाला. दूषित जेवण केल्यामुळे काही विद्यार्थ्यांना लगेचच मळमळ आणि उलट्या (Nausea and Vomiting) होण्याचा त्रास सुरू झाला. त्रास होत असलेल्या सुमारे १० विद्यार्थ्यांना तातडीने घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेच्या निषेधार्थ, सायंकाळी ७:३० वाजल्यापासूनच विद्यार्थ्यांनी वसतिगृहासमोर आंदोलन सुरू केले. वसतिगृहातील असुविधांचा पाढा वाचत त्यांनी संताप व्यक्त केला. समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त आर.एम. शिंदे यांनी आंदोलकांची भेट घेतली. यावेळी मेस चालक योगिराज गोरशेटे यांनी आपली चूक मान्य करत माफी मागितली आणि भविष्यात असा प्रकार होणार नाही, अशी ग्वाही दिली. मात्र, मेस चालकाच्या ग्वाहीनंतरही विद्यार्थी आंदोलनावर ठाम राहिले. या घटनेमुळे शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेआधी अळ्या, आता पाल... वारंवार तक्रारी करूनही कारवाई नाहीछत्रपती संभाजीनगरमधील शासकीय वसतिगृहात जेवणात पाल आढळल्याच्या घटनेनंतर विद्यार्थ्यांनी वसतिगृहातील निकृष्ट आणि आरोग्यास अपायकारक जेवणाचा पाढाच वाचला आहे. विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, ही केवळ एकच घटना नाही, तर वसतिगृहात सातत्याने खराब दर्जाचे जेवण दिले जाते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळपास ४० ते ५० मुलांनी दूषित जेवण केले होते. त्यापैकी बहुतेकांना पोटदुखी (Stomach Ache) आणि डोळे लाल होण्यासारखा (Red Eyes) त्रास जाणवत आहे. विद्यार्थ्यांनी जेवणाच्या गुणवत्तेवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांना सातत्याने कच्च्या पोळ्या, पाण्यात केवळ दूध पावडर मिसळून दिलेले दूध आणि खराब अंडी व फळे दिली जातात. वसतिगृहाच्या भोंगळ कारभाराला कंटाळून विद्यार्थ्यांनी प्रशासनाकडे आता थेट आणि कठोर मागणी केली आहे. सर्व मेस (Mess) त्वरित बंद करून जेवणाचे पैसे विद्यार्थ्यांच्या अकाउंटला जमा करण्यात यावे, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. यापूर्वीही जेवणात अळ्या निघाल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या होत्या. मात्र, त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी प्रशासनाला थेट इशारा दिला आहे की, जर त्यांच्या मागण्यांकडे लक्ष दिले नाही, तर समाजकल्याण कार्यालयावर मोठे आंदोलन करण्यात येईल.
मॉर्निंग वॉकला गेलेल्या काँग्रेस जिल्हाध्यक्षाचे अपहरण; गाडीत जबरदस्तीने बसवले… CCTV फुटेज समोर
Ahilyanagar News | एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून प्रचारसभांनी देखील वेग धरला आहे. याचदरम्यान अहिल्यानगरमध्ये काँग्रेस जिल्हा अध्यक्षाचे अपहरण करुन बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या अपहरणाचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावरून आता काँग्रेस नेत्यांकडून कायदा-सुव्यस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत. या घटनेनंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी […] The post मॉर्निंग वॉकला गेलेल्या काँग्रेस जिल्हाध्यक्षाचे अपहरण; गाडीत जबरदस्तीने बसवले… CCTV फुटेज समोर appeared first on Dainik Prabhat .
रशिया-युक्रेन युद्ध संपवण्याबद्दल ट्रम्प म्हणाले,”पुतीन यांच्याशी चांगले संबंध असल्यामुळे मला…“
Donald Trump on Putin । अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेन आणि रशियामधील युद्ध संपवण्यासाठी त्यांच्याकडे एक योजना तयार आहे. असे सांगितले. त्यानुसार “ते त्यांचे राजदूत स्टीव्ह विटकॉफ यांना युक्रेनियन अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि लष्कर सचिव डॅन ड्रिस्कॉल यांच्याकडे पाठवत आहेत” अशी माहिती देखील त्यांनी दिली. डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतिन आणि […] The post रशिया-युक्रेन युद्ध संपवण्याबद्दल ट्रम्प म्हणाले,”पुतीन यांच्याशी चांगले संबंध असल्यामुळे मला… “ appeared first on Dainik Prabhat .
Rahi Anil Barve : गेल्या काही दिवसांपूर्वीच तुबांड चित्रपटाचा दिग्दर्शक राही अनिल बर्वे याने त्याच्या आगामी मयसभा चित्रपटाची घोषणा केली होती. सोशल मीडियावर या चित्रपटाचे पहिले पोस्टरही राहीने शेअर केले होते. पोस्टर पाहिल्यानंतर मयसभा चित्रपटाची मोठी उत्सुकता चाहत्यांमध्ये होती. अशातच आता या चित्रपटाचा पहिला व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओने देखील चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढवली […] The post ‘तुबांड’च्या दिग्दर्शकाचा नवीन चित्रपट; पोस्टरनंतर व्हिडीओ समोर, ‘मयसभा’त मराठी अभिनेत्रीला मिळाली मोठी संधी appeared first on Dainik Prabhat .
भारतीय क्रिकेट संघाची स्टार खेळाडू स्मृती मंधाना (Smriti Mandhana) आणि लोकप्रिय म्युझिक कंपोजर पलाश मुच्छल (Palaash Muchhal) दोघेही सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जोरदार चर्चेत आहेत. त्यांच्या नात्यात आलेल्या एका वादळामुळे अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. सर्वात मोठी बातमी म्हणजे, २३ नोव्हेंबर २०२५ रोजी नियोजित असलेला या दोघांचा ग्रँड वेडिंग सोहळा (Grand Wedding) अचानकपणे पुढे ढकलण्यात आला. यानंतर दोघांच्या नात्यात काहीतरी बिनसले असल्याच्या चर्चांना उधाण आले. या वादळाचे कारण म्हणजे पलाश मुच्छलच्या खासगी चॅट्सचे काही स्क्रीन शॉर्ट्स व्हायरल झाले, ज्यामुळे दोघांच्या नात्यात मोठी दरी निर्माण झाली. या प्रकरणात आता एका व्यक्तीचे नाव समोर आले आहे, ती म्हणजे कोरिओग्राफर मेरी डि'कोस्टा (Mary D'Costa). 'ग्रहण' लागण्याचे कारण मेरी डि'कोस्टा? सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पलाश मुच्छलच्या व्हायरल झालेल्या चॅट्समधील मुलगी ही कोरिओग्राफर मेरी डि'कोस्टा आहे. यामुळे स्मृती मंधाना आणि पलाश मुच्छल यांच्या लग्नाला 'ग्रहण' लागण्याचे कारण मेरी डि'कोस्टा आहे का? या एका प्रश्नाभोवती सध्या सोशल मीडियावर आणि बी-टाऊनमध्ये जोरदार चर्चा रंगल्या आहेत. या संवेदनशील मुद्द्यावर अजूनही स्मृती मानधना किंवा पलाश मुच्छल यांनी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.https://prahaar.in/2025/11/26/net-household-financial-assets-increased-by-rs-9-9-lakh-crore-nirmala-sitharaman/लग्न रद्द होण्यामागचं पलक मुच्छलने सांगितले वेगळेच कारणक्रिकेटर स्मृती मंधाना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचे अचानक रद्द झालेले लग्न सध्या बॉलिवूड आणि क्रीडा जगतात चर्चेचा विषय बनले आहे. सुरुवातीला या दोघांचे लग्न रद्द होण्यामागे वेगळे कारण सांगितले जात होते, मात्र आता समोर आलेले सत्य खरोखरच धक्कादायक आहे. या दोघांचे लग्न रद्द झाल्यावर, सुरुवातीला स्मृती मंधानाच्या वडिलांची तब्येत बिघडल्यामुळे लग्न पुढे ढकलण्यात आले, असे सांगण्यात आले होते. इतकंच नाही, तर पलाशची बहिण आणि सुप्रसिद्ध गायिका पलक मुच्छलनेही याच कारणांवर शिक्कामोर्तब केले होते. पण, काही काळानंतर या प्रकरणात एकापाठोपाठ एक असे धक्कादायक खुलासे समोर येऊ लागले. यानुसार, लग्न रद्द होण्यामागे स्मृतीच्या वडिलांची तब्येत नसून, पलाश मुच्छलचे इंटरनेटवर व्हायरल झालेले काही खासगी चॅट्स असल्याचे बोलले जात आहे. या व्हायरल चॅट्समुळे दोघांच्या नात्यात मोठे वादळ आले आणि त्यामुळेच २३ नोव्हेंबरला नियोजित असलेले ग्रँड वेडिंग रद्द झाले. या तणावामुळे पलाश मुच्छलची तब्येतही बिघडली आणि त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले. व्हायरल चॅट्समुळे लग्न रद्द झाले असावे, असा कयास आता सर्वत्र लावला जात आहे. या गंभीर विषयावर मंधाना किंवा मुच्छल कुटुंबाकडून कोणतीही स्पष्ट प्रतिक्रिया अजून आलेली नाही.पलाश मुच्छलवर स्मृती मंधानाला फसवल्याचा गंभीर आरोपपलाश मुच्छलवर थेट स्मृती मंधानाला 'धोका' दिल्याचा गंभीर आरोप लावण्यात आल्यामुळे हे संपूर्ण प्रकरण वादग्रस्त बनले आहे. या प्रकरणाला वाचा फोडणारी व्यक्ती म्हणजे कोरिओग्राफर मेरी डि'कोस्टा (Mary D'Costa). मेरीने पलाश मुच्छलसोबतच्या तिच्या कथित 'फ्लर्टी चॅट्स'चे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर केले आहेत, जे सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या व्हायरल झालेल्या चॅट्सनुसार, पलाश वारंवार मेरीला भेटण्याचा आग्रह धरत असल्याचे दिसून येते. सर्वात गंभीर बाब म्हणजे, जेव्हा मेरीने त्याला स्मृती मंधानासोबतच्या त्याच्या नात्याबद्दल विचारले, तेव्हा पलाशने त्यांच्या नात्याला 'मृत' (Dead) आणि केवळ एक 'लाँग डिस्टन्स' रिलेशनशिप म्हणून वर्णन केल्याचे समोर आले आहे. या चॅट्समुळे पलाश मुच्छल फसवणुकीच्या आरोपांमुळे अडचणीत आला आहे. या स्क्रीनशॉट्सची अद्याप अधिकृत पुष्टी केलेली नसली तरी, सोशल मीडियावर हे चॅट्स वेगाने व्हायरल होत आहेत आणि याच कारणामुळे मंधाना-मुच्छल यांचे लग्न मोडले असावे, अशी चर्चा आता रंगू लागली आहे.मेरी डि'कोस्टा कोण?क्रिकेटर स्मृती मंधाना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांच्या लग्न रद्द होण्यामागील वादग्रस्त प्रकरणामुळे आता कोरिओग्राफर मेरी डि'कोस्टा (Mary D'Costa) हे नाव चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. पलाशचे 'फ्लर्टी चॅट्स' लीक करणारी ही व्यक्ती कोण आहे, याबद्दल आता माहिती समोर आली आहे.मीडिया रिपोर्टनुसार, पलाश मुच्छल आणि स्मृती मंधानाच्या वैयक्तिक आयुष्यात वादळ आणणारी, स्क्रीनशॉट व्हायरल करणारी ही महिला एक व्यावसायिक कोरिओग्राफर आहे. धक्कादायक बाब म्हणजे, मेरी डि'कोस्टा ही केवळ बाहेरची व्यक्ती नव्हती, तर ती या दोघांच्या लग्नाच्या तयारीमध्ये सक्रियपणे सहभागी होती! सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्मृती मंधाना आणि पलाश मुच्छल यांच्या संगीत सोहळ्यातील डान्सची कोरिओग्राफी करण्याची जबाबदारी मेरी डि'कोस्टा हिच्याकडेच होती. जी व्यक्ती अत्यंत खासगी आणि आनंदाच्या सोहळ्याची तयारी करत होती, त्याच व्यक्तीने पलाश मुच्छलचे फ्लर्टी चॅट्स सार्वजनिक केल्याने मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. यामुळे स्मृती मंधाना आणि पलाश मुच्छल यांच्या लग्नाला ग्रहण लागले असावे, अशी चर्चा रंगली आहे. मेरी डि'कोस्टाच्या भूमिकेमुळे पलाश मुच्छलवर फसवणुकीचे गंभीर आरोप होत आहेत.रेडिटवर धक्कादायक दावेसुरुवातीला स्मृतीच्या वडिलांची तब्येत बिघडल्यामुळे लग्न पुढे ढकलण्यात आले, असे सांगण्यात आले होते. मात्र, आता रेडिटवरील काही युजर्सनी या तब्येतीच्या बिघाडामागील वेगळे कारण समोर आणले आहे. रेडिटवरील युजर्सनी आरोप केला आहे की, स्मृती मंधानाच्या वडिलांनी लग्नापूर्वीच्या काही सोहळ्यांमध्ये पलाश मुच्छलला कोरिओग्राफर मेरी डि'कोस्टासोबत पाहिले होते. हे दृश्य पाहिल्यानंतर त्यांना मोठा धक्का बसला आणि याच कारणामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगितले जात आहे. जरी हे दावे रेडिटवर काही काळानंतर काढण्यात आले असले, तरी यामुळे या संपूर्ण प्रकरणाची गंभीरता वाढली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, पलाशचे व्हायरल चॅट्स आणि वडिलांची तब्येत बिघडणे या दोन्ही दाव्यांवर मंधाना किंवा मुच्छल कुटुंबातील कुणीही अद्याप अधिकृत वक्तव्य केलेले नाही. या मौनामुळे या आरोपांवर अधिक चर्चा रंगत आहेत.
रशिया-युक्रेन युद्ध लवकरच संपणार? अमेरिकेच्या करार आराखड्यावर दोन्ही देशांची सहमती
अमेरिका: रशियासोबत युद्ध संपवण्यासाठी प्रस्तावित अमेरिकेच्या करार आराखड्यावर युक्रेनने सहमती दर्शविली आहे. यामुळे मागील दोन वर्षांपेक्षा जास्त काळ सुरु असलेले रशिया-युक्रेन युद्ध आता लवकरच संपेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी सांगितले की अनेक मुद्दे अद्याप अनुत्तरित आहेत. अबू धाबीमध्ये अमेरिकेचे लष्कर सचिव डॅन ड्रिस्कॉल आणि रशियन प्रतिनिधी यांच्यातील चर्चेदरम्यान हे विधान आले आहे. दरम्यान, रशिया-युक्रेन युद्ध संपवण्याची बहुचर्चित योजना आता सुव्यवस्थित आणि अंतिम झाली आहे, असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे.अमेरिकेचे लष्कर सचिव डॅन ड्रिस्कॉल यांनी अबुधाबीमध्ये रशियन अधिकाऱ्यांशी दोन दिवसीय चर्चा केली. या चर्चेत काही किरकोळ मुद्दे अजूनही सोडवायचे असले तरी युक्रेनने शांतता करारावर सहमती दर्शविली असल्याचे सांगितले जात आहे. याव्यतिरिक्त युक्रेनचे राष्ट्रीय सुरक्षा सचिव रुस्तम उमरोव यांनी सोशल मीडीयावर पोस्ट करत सांगितले आहे की, जिनेव्हा येथे झालेल्या युक्रेनियन आणि अमेरिकन शिष्टमंडळांमधील उत्पादक आणि रचनात्मक बैठका आणि युद्ध संपवण्यासाठी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या अथक प्रयत्नांचे आम्ही कौतुक करतो. जिनेव्हा येथे चर्चा झालेल्या कराराच्या मुख्य अटींवर दोन्ही बाजूंनी एकमत झाले आहे.https://prahaar.in/2025/11/26/a-girl-who-was-begging-at-the-railway-station-was-used-for-physical-pleasure-and-her-body-was-found-in-the-creek-shocking-incident-in-dombivli-revealed/अमेरिकेने तयार केलेल्या शांतता योजनेत अनेक गोष्टींचा समावेश होता. ज्या युक्रेनने मागील वाटाघाटींमध्ये नाकारल्या होत्या. युक्रेनला त्याच्या सशस्त्र दलांच्या आकारावरील मर्यादा स्वीकारणे, नाटोमध्ये सामील होण्याचे प्रयत्न सोडून देणे आणि काही प्रदेश रशियाला देण्यास सांगितले होते. या सर्व रशियाच्या दीर्घकालीन मागण्या आहेत, कारण राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन जास्तीत जास्त सवलती मागत आहेत. मात्र युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कीने रशियाच्या मागण्या नाकारल्या. या ठरावात डोनबास प्रदेशातील मुख्य भाग कीवला सोपवण्याची मागणी देखील करण्यात आली आहे. ज्यावर रशियाने कब्जा केला असला तरी हा भाग ते पूर्णपणे नियंत्रित करत नाही. या भागात अशी शहरे आहेत जी युक्रेनच्या संरक्षण धोरणाचा केंद्रबिंदू आहे.
मुंबई : आजचा दिवस २६ नोव्हेंबर भारतीय आणि विशेषतः मुंबईच्या इतिहासातील सर्वात भयानक आणि वेदनादायी दिवसांपैकी एक आहे. आजच्या दिवशी, म्हणजेच २६ नोव्हेंबर २००८ रोजी, देशाने आणि मुंबईने सर्वात मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा (26/11 Terror Attack) थरार अनुभवला होता. या हल्ल्याच्या जखमा आजही ताज्या आहेत. २६/११ च्या रात्री मुंबईतील प्रतिष्ठित ताज महाल हॉटेलला दहशतवाद्यांनी लक्ष्य केले. या ठिकाणी मोठा बॉम्बस्फोट घडवण्यात आला. या स्फोटामुळे ताज महालाचा भव्य घुमट चहूबाजूंनी आगीच्या ज्वालात लपेटलेला होता. मुंबईच्या या ऐतिहासिक वास्तूमधून सर्वत्र धुराचे तांडव सुरू होते, ज्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. हा भारतावरील सर्वात मोठा आणि सुनियोजित दहशतवादी हल्ला होता. या हल्ल्यात अनेक निष्पाप नागरिकांनी आपला जीव गमावला, तर अनेक शूर जवान शहीद झाले. आज २६ नोव्हेंबरच्या निमित्ताने संपूर्ण देश त्या शहिदांना आणि पीडितांना श्रद्धांजली वाहत आहे.तीन दिवस चाललेल्या २६/११ हल्ल्यात १६६ जणांनी गमावले प्राणतीन दिवस चाललेल्या या हल्ल्यात दहशतवाद्यांनी मुंबईला वेठीस धरले होते, ज्यात १६६ जणांनी आपले प्राण गमावले, तर ३०० हून अधिक लोक जखमी झाले होते. दहशतवाद्यांनी मुंबईतील गर्दीच्या आणि महत्त्वाच्या अनेक ठिकाणांना लक्ष्य केले. यामध्ये ताज महाल हॉटेल, ओबेरॉय-ट्रायडेंट हॉटेल, छत्रपती शिवाजी टर्मिनस (CST), कामा हॉस्पिटल आणि प्रसिद्ध लिओपोल्ड कॅफे यांचा समावेश होता. दहशतवाद्यांनी सीएसटी स्थानकावर अंदाधुंद गोळीबार करत मोठा नरसंहार घडवला, ज्यात ५८ लोक मृत्यूमुखी पडले. याचबरोबर, त्यांनी गर्दीत घुसून मुंबईच्या अनेक भागांमध्ये धुमाकूळ माजवला. ताज हॉटेलच्या लॉबी, बार, ट्रायडेंट परिसर आणि अनेक रेस्टॉरंटमध्ये गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात अनेक विदेशी नागरिक आणि भारतीय नागरिक ताजच्या आत अडकले होते. मुंबईची लोकप्रिय टिफिन रेस्टॉरंट देखील दहशतवाद्यांच्या क्रूरतेची शिकार झाली. याशिवाय, वाडी आणि विलेपार्ले येथील टॅक्सींमध्येही बॉम्बस्फोट घडवण्यात आले. लोकांवर ग्रेनेड बॉम्ब फेकून मारण्यात आले, ज्यामुळे अनेक निरपराध नागरिकांचा बळी गेला. या हल्ल्याने मुंबईच्या इतिहासावर आणि लोकांच्या मनावर न मिटणारी जखम केली आहे.https://prahaar.in/2025/11/26/will-the-russia-ukraine-war-end-soon-both-countries-agree-on-the-us-agreement-draft/२६/११ हल्ल्यात मुंबई पोलिस, कमांडो आणि ताज कर्मचाऱ्यांचे धैर्यमुंबईवरील २६/११ च्या भयंकर दहशतवादी हल्ल्यादरम्यान, अनेक ठिकाणी क्रूरता पाहायला मिळाली, पण त्याचवेळी मानवी शौर्य आणि धैर्याची अविस्मरणीय उदाहरणेही पाहायला मिळाली. दहशतवाद्यांनी ताज महाल हॉटेलमध्ये अडकलेल्या अनेक लोकांना ओलीस (Hostage) बनवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, ताजच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या प्राणांची पर्वा न करता, मोठ्या धैर्याने सुमारे २०० हून अधिक लोकांचे प्राण वाचवले. त्यावेळेचे हेड शेफ हेमंत ओबेरॉय आणि अन्य कर्मचाऱ्यांनी लोकांना सुरक्षित मार्गाने बाहेर काढले. या हल्ल्यात मुंबई पोलिसांच्या अनेक शूर अधिकाऱ्यांनी आपल्या जीवाची बाजी लावली. कामा हॉस्पिटलच्या परिसरात अतिमहत्वाचे अधिकारी हेमंत करकरे, अशोक कामटे आणि विजय साळसकर यांनी दहशतवाद्यांना थेट सामोरे जात त्यांचा मुकाबला केला आणि या लढ्यात ते शहीद झाले. सुरक्षा दलांनी आणि कमांडोजनी तातडीने हॉटेलमध्ये प्रवेश करत लोकांना वेगाने बाहेर काढले. त्यांच्या या शौर्यामुळे अनेक लोक ओलिस होण्यापासून वाचले. या ऑपरेशनमध्ये अनेक मुंबई पोलीस अधिकारीही जखमी झाले होते. याच रात्री दहशतवाद्यांनी ज्यू आउटरीच सेंटरवरही हल्ला केला होता. तिथे उपस्थित असलेल्या एका भारतीय आयाने (Nanny) आपला जीव धोक्यात घालून दोन वर्षांच्या चिमुकल्याचा जीव वाचवला होता. या सर्वांचे शौर्य आणि बलिदान आजही मुंबईकरांच्या आणि संपूर्ण देशाच्या कायम स्मरणात राहील.१७ वर्षांनंतरही २६/११ चा तपास सुरुचमुंबईवरील २६/११ च्या क्रूर दहशतवादी हल्ल्याला आज १७ वर्षे पूर्ण झाली आहेत. तरीही, या हल्ल्याचा तपास आजही पूर्ण झालेला नाही आणि अनेक रहस्ये अजूनही गुलदस्त्यात आहेत. या तपासात उघड झालेल्या एका मोठ्या रहस्याने पाकिस्तानच्या भूमिकेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे केले आहे. या हल्ल्याच्या तपासात साजिद मीर नावाच्या एका महत्त्वाच्या दहशतवाद्याची ओळख पटली होती. हा दहशतवादी २६/११ हल्ल्याच्या कटातील एक प्रमुख सूत्रधार असल्याचे मानले जाते. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, आंतरराष्ट्रीय गुप्तचर संस्थांच्या दाव्यानुसार, पाकिस्तान आपल्या भूमीवर साजिद मीरला गेल्या १७ वर्षांपासून संरक्षण देत आहे. यावरून पाकिस्तान दहशतवाद्यांना आश्रय देत असल्याचे स्पष्ट होत असले, तरी पाकिस्तानने मात्र हा दावा सातत्याने नाकारला आहे. आज या भयानक हल्ल्याला १७ वर्षे पूर्ण झाली असली तरी, या हल्ल्याबद्दल बोलताना किंवा लिहिताना आजही प्रत्येक भारतीयाच्या अंगावर काटा येतो आणि या हल्ल्यातील न्याय अपूर्ण राहिल्याची भावना कायम राहते.
Bobby Deol : दाक्षिणात्य अभिनेता प्रभासने पुढच्या वर्षासाठी आधीच जोरदार तयारी केली आहे. तो दोन मोठ्या चित्रपटांमुळे चर्चेत आहे. एक म्हणजे ‘राजा साब’ आणि दुसरा म्हणजे ‘स्पिरीट’. राजा साब चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून, त्यानंतर स्पिरीट येणार आहे. बहुचर्चित स्पिरीट चित्रपटात अभिनेता बॅाबी देओल खलनायकाच्या भूमिकेत दिसणार होता. पण आता त्याचा पत्ता कट करण्यात आला […] The post स्पिरीटमधून बॅाबीचा पत्ता कट? ‘या’ अभिनेत्याच्या एंन्ट्रीची जोरदार चर्चा; संदीप रेड्डी वांगाच्या मनात काय? appeared first on Dainik Prabhat .
urmilla kothare: सोशल मीडियामुळे सेलिब्रिटींना नेहमीच ट्रोलिंग आणि चर्चा यांचा सामना करावा लागतो. मराठी अभिनेत्री उर्मिला कानेटकर कोठारेही याला अपवाद नाही. तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक अंदाज, चर्चा, अफवा ऑनलाइन दिसतात. पण या सगळ्याविषयी उर्मिलाने अतिशय स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे. अपघातानंतर उर्मिला पुन्हा कामावर काही महिन्यांपूर्वी झालेल्या अपघातात उर्मिलाला दुखापत झाली होती. आता ती पूर्णपणे सावरली […] The post urmilla kothare: उर्मिला कोठारे म्हणते, “काही गोष्टी खऱ्या, तर काही नाहीत…” वैयक्तिक आयुष्यावरील चर्चांना दिलं स्पष्ट उत्तर appeared first on Dainik Prabhat .
मोहित सोमण: आज टाटा इन्व्हेसमेंट कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअर्समध्ये तुफान वाढ झाली आहे. सातत्याने रेकॉर्ड ब्रेक पातळीवर शेअर घसरत असताना बदलत्या आर्थिक संकेतामुळे व बाजारातील तेजीमुळे कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी खरेदी झाली व शेअर आज ८.३१% इंट्राडे उच्चांकावर (Intradday All time High) व्यवहार करत होता. हा शेअर ८.३१% उसळल्याने ७८६.९१ रूपये प्रति शेअरवर व्यवहार करत होता. सकाळी १०.५५ वाजेपर्यंत कंपनीचा शेअर ७.०३% उसळत ७७७.६० रूपये प्रति शेअरवर व्यवहार करत आहे. प्रामुख्याने शेअर्समध्ये मोठी प्राईज करेक्शन झाली आहे.यापूर्वी कंपनीचा शेअर सातत्याने ७ सत्रात घसरला होता. परवा शेअर २५% कोसळला होता तर कालही शेअर ५ ते ६% कोसळला होता. एकूण सात सत्रात शेअर ३ ऑक्टोबर रोजी असलेल्या इंट्राडे उच्चांकावर (११८४ प्रति शेअर) वरून ३३.७५% कोसळला होता.तांत्रिक दृष्ट्या टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनची किंमत सध्या त्यांच्या ५-दिवस (5Days) १००-दिवस (100 Days) आणि २००-दिवसांच्या (200 Days) एमवीए (Moving Average) मूव्हिंग अँव्हरेजपेक्षा जास्त आहे. कंपनीच्या शेअरने अल्पकालीन आणि दीर्घकालीन तांत्रिक दृष्ट्या समर्थन पातळी (Support Level) राखण्यास यश प्राप्त केले आहे तथापि, शेअर याच्या २० दिवस आणि ५० दिवसांच्या मूव्हिंग अँव्हरेजपेक्षा कमी आहे, जे मध्यम कालावधीत काही प्रतिकार (Resistance) दर्शवत आहे हे तांत्रिकदृष्ट्या मिश्र तांत्रिक चित्र काही काळाच्या घसरणीनंतर शेअरच्या अलीकडच्या रिकवरीशी जुळत आहे.एकूणच गेल्या पाच दिवसांत कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण झाली असूनही शेअरने १.६६% वाढ नोंदवली असून संपूर्ण महिनाभरात ७.२६% घसरण नोंदवली आहे. संपूर्ण ६ महिन्याचा कालावधी पाहता २३.७१% व संपूर्ण वर्षात १६.३६% वाढ नोंदवली आहे. गेल्या वर्षीच्या तिमाहीतील तुलनेत या एनबीएफसी (Non Banking Financial Services NBFC) कंपनीला १९.७८% अधिक निव्वळ नफा (Net Profit) मिळाला होता. तर कंपनीच्या कामकाजातून मिळणाऱ्या महसूलात (Revenue from Operations) ८.०७% वाढ कंपनीने नोंदवली.
दिल्ली बॉम्बस्फोट : दहशतवादी उमर नबीला आश्रय देणाऱ्या शोएबला NIA कडून अटक
Delhi Red Fort blast। दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार बॉम्बस्फोट प्रकरणात NIA ने मोठी कारवाई केली आहे. या प्रकारांत NIA ने आणखी एका आरोपीला अटक केली आहे. तपास यंत्रणेनुसार, या आरोपीने स्फोटापूर्वी मुख्य दहशतवादी उमर उन नबीला पाठिंबा दिला होता आणि त्याला लपण्याची जागा आणि आवश्यक मदत पुरवली होती. दहशतवाद्याला आश्रय दिल्याचा आरोप Delhi Red […] The post दिल्ली बॉम्बस्फोट : दहशतवादी उमर नबीला आश्रय देणाऱ्या शोएबला NIA कडून अटक appeared first on Dainik Prabhat .
Celina Jaitley : अभिनेत्री आणि माजी मिस इंडिया सेलिना जेटली तिच्या खाजगी आयुष्यातील एका गोष्टीमुळे चर्चेत आली आहे. तिच्या वैवाहिक जीवनातील होणारी उलथापालथ आता सगळ्यांसमोर आली आहे. मंगळवारी सेलिना जेटलीने तिचा पती पीटर हागविरुद्ध घरगुती हिंसाचाराचा खटका दाखल केल्याचे वृत्त आहे. यासंबंधी आता सेलिनाने सोशल मीडियाच्या माध्यमातून घटस्फोटाबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. मी कधीच […] The post “मी कधीच कल्पना केली…”; कौटुंबिक हिंसाचार प्रकरणानंतर सेलिना जेटलीची पहिली पोस्ट चर्चेत; कोण आहे पीटर हाग? appeared first on Dainik Prabhat .
Salil Kulkarni | भारतीय महिला संघाची उपकर्णधार स्मती मानधना आणि म्युझिक कंपोझर पलाश मुच्छल यांचा लग्नसोहळा २३ नोव्हेंबरला पार पडणार होता. मात्र, स्मृतीच्या वडिलांची प्रकृती बिघडल्यामुळे लग्न तात्पुरता रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. पण, याचदरम्यान स्मृतीने लग्नासंदर्भातील पलाशबरोबरचे फोटो इन्स्टाग्रामवरून डिलीट केल्याने सोशल मीडियावर सध्या विविध चर्चांना उधाण आलं आहे. याबाबत आता अनेक तर्क-वितर्क […] The post “चर्चा करणं थांबवा आणि तिला तिचं आयुष्य जगू द्या!”; स्मृती मानधनासाठी सलील कुलकर्णींचे नेटकऱ्यांना आवाहन appeared first on Dainik Prabhat .
निव्वळ घरगुती वित्तीय मालमत्ता ९.९ लाख कोटींनी वाढली - निर्मला सीतारामन
मोहित सोमण: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी निव्वळ घरगुती वित्तीय मालमत्ता (Net Financial Household Assets) आधारित मोठे वक्तव्य केले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटल्याप्रमाणे, या आर्थिक वर्षात गेल्या वर्षीच्या तुलनेत मोठी वाढ झाल्याने निव्वळ घरगुती वित्तीय मालमत्ता ९.९ लाख कोटींनी वाढली आहे. त्यामुळे यावर्षी एकूण जीडीपीतील (सकल देशांतर्गत उत्पादन GDP) ६% हिस्सा या मालमत्तेचा आहे ' असे विधान त्यांनी केले. गेल्या वर्षी ते १५.५ लाख कोटी किंवा एकूण जीडीपीतील ५.३% होते ते यंदा मोठ्या प्रमाणात वाढल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.तत्पूर्वी आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये घरगुती मालमत्ता पाच वर्षांतील सर्वाधिक खालच्या पातळीवर (All time Low घसरली होती. त्यावर्षी ती १३.३ लाख कोटीवर पोहोचली होती जी तत्कालीन एकूण जीडीपीतील ४.९% होती. मोठ्या प्रमाणातील संतुलित आर्थिक धोरणे व घरगुती उत्पन्नातील वाढती बचत पाहता ही वाढ झाल्याचे जाणवते. विशेषतः कोविड काळ सावरल्यानंतर वाढलेल्या बचतीमुळे दिसून येते. या तिमाहीत आर्थिक देय (Financial Debt) गेल्या तिमाहीतील १८.८ लाख कोटीवरूश १५.७ लाख कोटींवर घसरली आहे. या वर्षी क्रेडिट वाढ (Credit Growth) मोठ्या प्रमाणात वाढल्याचे यापूर्वी आपण आकडेवारीतून पाहिले होते. आकडेवारीनुसार, गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी १२% वाढ झाली होती त्यामुळे मोठ्या प्रमाणात चलनी तरलता बाजारात निर्माण झाली असताना उपभोग (Consumption), व एकूणच घरगुती मालमत्तेत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे स्पष्ट होते.मात्र महत्वाची बाब म्हणजे बँकांच्या ठेवीत (Bank Deposits) गुंतवणूकीत घसरण सुरू झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या तिमाहीत ३५.२% घसरण झाली. त्याऐवजी गुंतवणूकदारांचा कल हा इक्विटी मार्केट लिंक गुंतवणूकीत अधिक जाणवत आहे.सोन्याच्या आधारावर कर्जांमध्ये सतत वाढ होत असतानाही, जलद, सुरक्षित कर्ज घेण्याला प्राधान्य गुंतवणूकदार देत आहे.
मोहित सोमण: एक्सेलसॉफ्ट टेक्नॉलॉजीज लिमिटेडचे आज चांगले पदार्पण शेअर बाजारात झाले आहे. आज शेअर बाजारात सूचीबद्ध झाला असून १५% प्रिमियमसह दाखल झाला आहे. ५०० कोटींचा हा आयपीओ २१ ते २४ नोव्हेंबरपर्यंत बाजारात गुंतवणूकदारांसाठी खुला झाला होता. आज सकाळी बीएसई व एनएसईवर शेअर सूचीबद्ध झाला आहे. माहितीनुसार १२० रूपये प्रति शेअर प्राईज बँडच्या तुलनेत हा शेअर १५.६१% १३८.७१ रूपये प्रति शेअरसह व्यवहार करत आहे. यापूर्वी शेवटची जीएमपी (Grey Market Price GMP) ७ रूपये प्रिमियमसह १२७ रूपये प्रति शेअर होती. अपेक्षेपेक्षाही चांगले लिस्टिंग बाजारात झाल्याने शेअरकडून गुंतवणूकदारांच्या अपेक्षा वाढू शकतात.कंपनीच्या आयपीओत १.५० कोटी इक्विटी शेअर (१८० कोटी), व ऑफर फॉर सेल (OFS) साठी २.६७ शेअर (३२० कोटी) बाजारात उपलब्ध होते. किरकोळ गुंतवणूकदासाठी एकूण आयपीओतील ३५% वाटा उपलब्ध होता. तर किमान गुंतवणूक किरकोळ गुंतवणूकदारांसाठी १५००० रुपये (१२५ शेअर) निश्चित करण्यात आली होती. कंपनीला एकूण ४५.४६ पटीने सबस्क्रिप्शन मिळाले होते त्यापैकी किरकोळ गुंतवणूकदारांकडून १६.४४ पटीने, पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून (QIB) ५०.०६ पटीने, विना संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून (NII) ,१०७.०४ पटीने सबस्क्रिप्शन मिळाले होते. कंपनीने आयपीओआधी अँकर गुंतवणूकदारांकडून १५० कोटींचा निधी प्राप्त केला होता.२००० साली या कंपनीची स्थापना झाली होती. कंपनी प्रामुख्याने जागतिक सास (SaaS) या आयटी तंत्रज्ञानात कार्यरत आहे. ए आय (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) मार्फत कंपनी नवी सोलूशन बाजारात आणते. कंपनीचे SARAS LMS तंत्रज्ञान आहे ज्यात EnablED LXP आणि OpenPage डिजिटल पुस्तकेही समाविष्ट आहेत शैक्षणिक संस्था आणि कॉर्पोरेशनना त्यांच्या प्रशिक्षण, शिक्षण आणि विकासाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक ते शिक्षण प्रशिक्षण कंपनी देते. एक्सेलसॉफ्ट शैक्षणिक प्रकाशक, विद्यापीठे, शाळा, सरकारी संस्था, संरक्षण संस्था आणि व्यवसायांसह विविध प्रकारच्या इतर सेवा क्लायंटना सेवा देते.कंपनीला या आर्थिक वर्षात इयर ऑन इयर बेसिसवर २४% अधिक महसूल प्राप्त झाला असून इयर ऑन इयर बेसिसवर कंपनीच्या करोत्तर नफ्यात (Profit after tax PAT) मध्ये १७२% वाढ नोंदवली होती.भारत, मलेशिया, सिंगापूर, यूके आणि यूएसए मध्ये कार्यरत असलेली ही कंपनी २०० हून अधिक संस्थांशी सहयोग करते आणि जगभरातील ३० दशलक्षाहून अधिक विद्यार्थ्यांना सोलूशन पुरवते. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या आयपीओतील मिळणाऱ्या निधीचा वापर कंपनी भांडवली खर्चासाठी, नव्या भांडवली खर्चासाठी, अत्याधुनिकीकरणासाठी, व दैनंदिन कामकाजासाठी करणार आहे.
Dharmendra: बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र आता आपल्या सोबत नाहीत. 24 नोव्हेंबर रोजी या ‘ही-मॅन’चे निधन झाले आणि त्यांच्या जाण्याने संपूर्ण देशात शोकाची लहर पसरली आहे. चाहत्यांपासून ते बॉलिवूडमधील अनेक कलाकारांपर्यंत सर्वांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित केली. सोशल मीडियावर त्यांच्या अंत्ययात्रेचे आणि श्रद्धांजली कार्यक्रमाचे अनेक व्हिडिओही दिसून आले. दरम्यान, लोकांच्या मनात धर्मेंद्र यांच्याबद्दल अनेक प्रश्न निर्माण […] The post Dharmendra: धर्मेंद्र यांना ‘ही-मॅन’ हे नाव कसे मिळाले? जाणून घ्या धर्मेंद्र यांच्याबद्दल आणखी रोचक माहिती appeared first on Dainik Prabhat .
अलीकडेच झालेल्या उदयपूरच्या शाही विवाह सोहळ्यात ट्रम्प ज्युनियरपासून जस्टिन बीबरपर्यंत 60 हून अधिक जागतिक तारे उपस्थित होते. पण राम राजू मंटेना कोण आहेत, ज्यांच्या मुलीचे लग्न आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत आहे? जाणून घेण्यासाठी वरील प्रतिमेवर क्लिक करा.
Raksha Khadse : राज्यात २ डिसेंबर २०२५ रोजी होणाऱ्या नगरपरिषदा आणि नगरपंचयातीच्या निवडणुकीची रंगत वाढताना दिसत आहे. जळगाव जिल्ह्यातील राजकीय वातावरण निवडणुकीच्या अनुषंगाने चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. एकेकाळी एकाच पक्षात सोबत काम केलेले एकनाथ खडसे आणि गिरीष महाजन एकमेकांवर टीका करत आहेत. दोन्ही नेते जळगाव जिल्ह्यातून येत असल्याने त्यांचा स्थानिक पातळीवर देखील वरचष्मा आहे. […] The post “दोघांच्या वादामुळे…”; गिरीश महाजन एकनाथ खडसे यांच्या वादावर मंत्री रक्षा खडसे यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाल्या? appeared first on Dainik Prabhat .
Justice BR Gavai। न्यायमूर्ती बी.आर. गवई आता भारताचे मुख्य न्यायाधीश (सीजेआय) या पदावरून निवृत्त झाले आहेत. नवे सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी पदभार स्वीकारला आहे. यावेळी न्यायमूर्ती गवई यांनी सर्वोच्च न्यायालयातील त्यांच्या प्रवासाबद्दल स्पष्टपणे सांगितले. निवृत्तीनंतर राजकारणात प्रवेश करण्याबाबतच्या चर्चांनाही त्यांनी उत्तर दिले. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश असताना न्यायमूर्ती गवई यांचा ३३० हून अधिक निर्णयांमध्ये सहभाग […] The post “राज्यपालपद स्वीकारणार नाही, मी राज्यसभा..” ; निवृत्तीनंतर राजकारणातील प्रवेशावर न्यायमूर्ती गवई यांचे मोठे विधान appeared first on Dainik Prabhat .
Raj Thackeray | केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञानमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी मुंबईच्या नावावरुन केलेल्या विधानामुळे वाद निर्माण झाला आहे. ‘आयआयटी बॉम्बेचं नाव बदलून मुंबई केलं नाही, याचा मला आनंद आहे’, असे जितेंद्र सिंह यांनी मुंबईतील आयआयटीच्या कार्यक्रमात म्हंटले होते. यावरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी डॉ. जितेंद्र सिंह यांच्या विधानाचा चांगलाच समाचार घेतला आहे. “जितेंद्र सिंग यांचं […] The post “…असाच काहीतरी डाव मुंबईच्या बाबतीत १००% शिजत असणार”; केंद्रीय मंत्र्यांच्या ‘त्या’ विधानाचा राज ठाकरेंनी घेतला समाचार appeared first on Dainik Prabhat .
Stock Market Today। भारतीय शेअर बाजाराची सुरुवात आज आठवड्यातील तिसऱ्या ट्रेडिंग सत्रात खराब झाली. मात्र, बाजार लवकर सावरला. बेंचमार्क निर्देशांक बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी ५० लाल रंगात उघडले. ३० शेअर्सचा बीएसई सेन्सेक्स निर्देशांक ८३.५७ अंकांनी म्हणजेच ०.१० टक्क्यांनी घसरून ८४,५०३.४४ वर पोहोचला, तर एनएसई निफ्टी ५० ४१.८५ अंकांनी म्हणजेच ०.१६ टक्क्यांनी घसरून २५,८४२.९५ वर […] The post खराब सुरुवातीनंतर शेअर बाजार पुन्हा एकदा तेजीत ; सेन्सेक्सने २७५ अंकांची वाढ तर निफ्टीने २५,९७३ चा टप्पा ओलांडला appeared first on Dainik Prabhat .
Aneet Padda: ‘सैयारा’ चित्रपटातून लोकप्रिय झालेली अभिनेत्री अनीत पड्डाने अलीकडेच एका मुलाखतीत भावूक अनुभव शेअर केला. तिने सांगितले की ती फॅन्सकडून मिळणाऱ्या प्रेमामुळे आठवड्यातून किमान एकदा रडते. का भावूक होते अनीत? 23 वर्षांची अभिनेत्री अनीत पड्डाने मीडियाशी बोलताना सांगितले, “मी खूप संवेदनशील स्वभावाची आहे. फॅन्सकडून मिळणारे प्रेम अफाट आहे, पण त्याचवेळी त्या प्रेमाला न्याय देण्याची […] The post Aneet Padda: फॅन्समुळे आठवड्यातून एकदा रडते अनीत पड्डा; अभिनेत्री म्हणाली, “फॅन्सकडून मिळणाऱ्या प्रेमामुळे”… appeared first on Dainik Prabhat .
मोहित सोमण: युएस बाजारातील तेजी व फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपातीची जोरदार चर्चा यामुळे युएससह आशियाई शेअर बाजारातील मोठी वाढ झाल्याने आज भारतीय बाजारातही रॅलीची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे सकाळच्या सत्रात आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात अपेक्षेप्रमाणे वाढ झाली आहे. सेन्सेक्स २७०.५० अंकाने व निफ्टी ८९.२५ अंकांने उसळला आहे. सेन्सेक्स बँक व बँक निफ्टीतही चांगली वाढ झाल्याने आज बाजारात सपोर्ट लेवल मिळण्यास मदत झाली आहे. एकूणच मिड व स्मॉल कॅप सह बँक, मेटल, फायनाशियल सर्विसेस शेअर्समध्ये झालेल्या वाढीचा फायदा बाजारात झालेला दिसतो. विशेषतः सकाळी लार्जकॅप निर्देशांकापेक्षा मिड व स्मॉल कॅप शेअर्समध्ये अधिक वाढ झाली आहे. निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात सर्वाधिक वाढ मेटल (१.७०%), कंज्यूमर ड्युरेबल्स (०.८०%),मिड स्मॉल फायनांशियल सर्विसेस (१.०९%) निर्देशांकात मोठी वाढ झाली आहे. निफ्टी व्यापक निर्देशांकात निफ्टी स्मॉलकॅप ५० (१.१२%), निफ्टी स्मॉलकॅप १०० (१.००%), मिडकॅप १०० (०.६५%), मायक्रोकॅप २५० (०.८४%) निर्देशांकात वाढ झाली आहे.सुरूवातीच्या कलात टाटा इन्व्हेसमेंट कॉर्पोरेशन (८.१३%), रिलायन्स पॉवर (४.६०%), सम्मान कॅपिटल (४.५३%),नुवामा वेल्थ (४.१९%), सीईएससी (३.३४%), ग्राविटा इंडिया (३.१७%), जेएम फायनांशियल (३.११%), टाटा मोटर्स पीव्ही व्हेईकल (२.७७%), अनंत राज (२.६२%) समभागात सर्वाधिक वाढ झाली आहे तर सर्वाधिक घसरण सीपीसीएल (४.६५%), भारती एअरटेल (२.१७%), टीआरआयएल (२.१२%), असाही इंडियन ग्लास (१.९७%), एमआरपीएल (१.८०%), दीपक फर्टिलायजर (१.३१%), भारती हेक्साकॉम (१.४८%), ज्योती सीएनसी ऑटो (१.२९%), बालकृष्ण इंडस्ट्रीज (१.२७%), बर्जर पेंटस (१.१७%) समभागात झाली आहे.बाजार सत्रपूर्व परिस्थितीवर भाष्य करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य गुंतवणूक रणनितीकार डॉ वी के विजयाकुमार म्हणाले आहेत की,'कधीकधी बाजार कोणत्याही स्पष्ट तर्क आणि कारणाशिवाय घसरतो. अल्पकालीन हालचाल उदयोन्मुख मूलभूत गोष्टींविरुद्ध असू शकते. या अनिर्णीत हालचालीचे स्पष्टीकरण फ्युचर्स एक्सपायरी डेटशी संबंधित तांत्रिक आणि बाजार स्थितीमध्ये आढळू शकते. बहुतेकदा, एक्सपायरी डेटवर शॉर्ट आणि लॉंग पोझिशन्स कव्हर करण्याशी संबंधित सट्टेबाजीच्या क्रियाकलापांना प्रतिसाद म्हणून बाजार उच्च अस्थिरता पाहतो. काल निफ्टीमध्ये ४६९७ कोटी रुपयांचा सकारात्मक संस्थात्मक खरेदीचा आकडा असूनही कालची ७४ अंकांची घसरण ही अशाच समाप्तीशी संबंधित अस्थिरतेची उदाहरण आहे. संबंधित प्रश्न असा आहे: बाजारातील अशा अनिर्णीत हालचालींदरम्यान गुंतवणूकदारांनी काय करावे. किरकोळ गुंतवणूकदारांसाठी सर्वोत्तम धोरण म्हणजे व्यापार करण्यापासून परावृत्त करणे आणि हळूहळू परी-मूल्यांकित उच्च दर्जाचे वाढीचे स्टॉक जमा करणे जे वाढत्या अस्थिरतेमुळे आकर्षक मूल्यांकनांवर उपलब्ध असतील. असे स्टॉक लवकरच परत येतील. अशा संदर्भात गुंतवणूकदारांचे मानसिक वर्तन अधिक महत्त्वाचे आहे.मूलभूत गोष्टी सूचित करतात की बाजार एका नवीन उच्चांकाकडे जात आहे: हा फक्त वेळेचा प्रश्न आहे. गुंतवणूकदारांचा प्रतिसाद या समजुतीवर आधारित असावा.'सकाळच्या सत्रातील टेक्निकल पोझिशनवर भाष्य करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य बाजार रणनीतीकार आनंद जेम्स म्हणाले आहेत की,'गेल्या गुरुवारपासून सुरू झालेली घसरण आता आमच्या २५८२६ पातळीच्या घसरणीच्या दिशेने पसरली आहे. येथून आम्ही २६५५० किंवा त्याहून अधिकचे लक्ष्य ठेवून उलट दिशेने वाटचाल करत आहोत. पर्यायी, २६०७० पातळीच्यावर तरंगण्यास असमर्थता ही घसरणीची पुष्टी करेल, सुरुवातीला २५७५०-२५४६० चे लक्ष्य ठेवले आहे.'
तुम्ही बाहेर ड्रिंक करून मूड बनवून घ्या. आरामात बसून डान्स बघा. दीडशे डान्सर्सपैकी जी आवडेल, ती कॉटेजमध्ये जाईल. तुमची एंट्री मागच्या दाराने करून घेऊ. बाहेर कोणाला काही कळणार नाही आणि तुम्ही आत मजा करा. पैसे खर्च करा, सगळी व्यवस्था होऊन जाईल. इथे तर पोलीसवालेही डान्सर्ससोबत मजा करतात, त्यामुळे पकडले जाण्याची चिंता अजिबात करू नका. सोनपूर यात्रेत ही ऑफर देणारे थिएटरशी संबंधित एजंट दिव्य मराठीच्या कॅमेरात कैद झाले आहेत. थिएटरच्या नावाखाली दारू पार्टी आणि सेक्स रॅकेटच्या माहितीवर दिव्य मराठीने ऑपरेशन सोनपूर राबवले. पहिल्या एपिसोडमध्ये वाचा आणि बघा डान्सर्सची पूर्ण डील..। 5 एजंट्सकडून डान्सर्सची ऑन कॅमेरा डील सोनपूर मेळ्याची ओळख देशासोबत जगभरात आहे. या मेळ्यात दिव्य मराठीच्या तपास पथकाला थिएटरच्या नावाखाली डान्सर्सच्या सेक्स रॅकेट आणि दारूच्या तस्करीची माहिती मिळाली होती. प्राथमिक तपासणीत ही माहिती खरी ठरली. हे उघड करण्यासाठी दिव्य मराठीच्या तपास पथकाने 'ऑपरेशन सोनपूर'ची योजना आखली आणि मेळ्यात पोहोचून एजंट्ससोबत डील केली. यावेळी 5 एजंट्स कॅमेऱ्यावर डान्सर्स आणि मुलींची डील करताना कैद झाले आहेत. सोनपूर मेळ्यातील गर्दीच्या ठिकाणी एजंट्स अशा लोकांना लक्ष्य करतात जे खूप सक्रिय दिसतात. दिव्य मराठी रिपोर्टरही सोनपूर मेळ्यात पोहोचून घोडा बाजाराच्या आसपास फिरू लागले. यावेळी दोन एजंट्सनी आम्हाला थांबवले. यामध्ये राजू खूप सक्रिय दिसला आणि त्याने थेट आमच्याशी मुलींची डील केली. राजूने मुलीसाठी ऑफर दिली, म्हणाला- बाहेरून आला असाल तर मेळ्याचा आनंद घेऊन जा. रिपोर्टर - व्यवस्था होईल का? राजू - मुलगी आणि दारूची व्यवस्था होईल. रिपोर्टर - कोणत्या थिएटरमध्ये? राजू - संध्याकाळी 7 वाजता सम्राट थिएटरबाहेर भेटा. रिपोर्टर - कुठे यावे लागेल? राजू - सम्राट थिएटरच्या समोर या, सर्व व्यवस्था होईल. रिपोर्टर - किती लागतील? राजू - एका मुलीसाठी 2500 रुपये लागतील. रिपोर्टर - आधी भेटवून द्या, आवडली तर पैसे देईन. राजू - त्याच वेळी भेट करून देईन, तुम्ही पसंत करून घ्या. राजूने सम्राट थिएटरचे नाव घेतले होते, त्यामुळे आम्ही राजूशी डील केल्यानंतर सम्राट थिएटरला पोहोचलो. थोडा वेळ इकडे-तिकडे फिरल्यानंतर सम्राट थिएटरच्या बाहेर रोहन भेटला. रोहनने फक्त मुलींची डीलच केली नाही तर थिएटरमधील डान्सर कॉटेजसाठी कशा सेट होतात, याची संपूर्ण सिस्टिम सांगितली. रिपोर्टर - डान्सशिवाय दुसरी कोणती सेटिंग होईल का? रोहन - सर्व काही होतं, पैशांसाठीच तर नाचत आहेत. रिपोर्टर - मुलगी तर यात ठीक नसेल ना? रोहन - बाहेरच्या आहेत मुली, सर्व एकाहून एक सरस आहेत. रिपोर्टर - बाहेर मिळत नसेल. रोहन - मिळतात, पैसे द्या. रिपोर्टर - कसे? रोहन - संपर्क करावा लागेल. रिपोर्टर - सर्व सेटिंग होते का? रोहन - बाहेर येईल तेव्हा भेटून घ्या. रिपोर्टर - किती पैसे घेईल? रोहन - एका रात्रीचे ५००० रुपये लागतील. रिपोर्टर - सहज मिळाली असती तर ठीक राहिलं असतं. रोहन - दीडशे आहेत, सर्व सेट होतात. स्टेजच्या मागे कॉटेजसारखं बनवलं आहे, त्यातच होईल. रिपोर्टर - ५००० रुपयांत पूर्ण होईल ना? रोहन - हो, होईल, खुश होतील. रिपोर्टर - या सर्व मुली कुठल्या आहेत? रोहन - मुंबई, दिल्ली, कोलकाता, बेंगळुरूच्या आहेत. रिपोर्टर - यात सर्व सेट होईल का? रोहन - पसंती करा, रात्री मिळतील. रोहनसोबत डान्सर्सचा व्यवहार केल्यानंतर आम्ही थोड्याच अंतरावर असलेल्या पायल थिएटरमध्ये पोहोचलो. थिएटरसमोरच आमची भेट अभिषेकशी झाली. तो दिसण्यातच बराच चाणाक्ष वाटत होता. बोलतांना अभिषेकने दावा केला की थिएटरमध्ये त्याचे पैसे गुंतले आहेत. तो देखील भागीदारीत आहे. अभिषेकने फक्त डान्सर्सचा व्यवहारच केला नाही तर आत घेऊन जाऊन संपूर्ण व्यवस्था समजावून सांगितली. रिपोर्टरसमोरच त्याने दोन डान्सर्सना पुरवण्यासाठी बाहेर नेले. रिपोर्टर - किती रुपयांचे तिकीट आहे? अभिषेक - सर्वात पुढे 600 रुपयांचे आहे, येथून मुलींना स्पर्श करू शकता. रिपोर्टर - सर्व स्थानिक मुली असतील का? अभिषेक - एकही स्थानिक नाही, दिल्ली, मुंबई आणि कोलकाता येथील आहेत. रिपोर्टर - पैसे दिल्यावर आणखी काय सुविधा मिळेल? अभिषेक - एन्जॉय करा, मजा करा. रिपोर्टर - आणखी काय असेल? मागची व्यवस्था आहे का? रिपोर्टर - एन्जॉयमध्ये असेल, पैसे दिले तर कॉटेजमध्ये व्यवस्था होईल. अभिषेक - मोबाईल नंबर घ्या, रात्री या, सर्व काही होईल. रिपोर्टर - किती लागेल? अभिषेक - रात्री या, डान्सर पसंत करा, तिच्यासमोर ठरवले जाईल. रिपोर्टर - तुम्ही पण असाल का? अभिषेक - इथेच असेन… तुम्ही फक्त फोन करा. रिपोर्टर - हीच मुलगी मिळेल का? अभिषेक - हिच्यापेक्षा चांगल्या-चांगल्या असतील. पायल थिएटरसमोर अभिषेकशी बोलत असताना संजय भेटला. तोही थिएटरमध्ये काम करतो. संजयने डान्सर्ससोबत दारूचीही पूर्ण डील केली. बिअरपासून वाइनपर्यंतच्या व्यवस्थेचा दावा करत संजयने मुलींची पूर्ण डील केली. रिपोर्टर - डान्सर्सकडून काही अतिरिक्त व्यवस्था होते का? संजय - हो मिळतील, पैसे खर्च केले तर सर्व व्यवस्था होईल. रिपोर्टर - ही जी डान्स करत आहे, कधी येईल? संजय - 3 ते 4 वाजेच्या दरम्यान मिळतील. रिपोर्टर - डान्सर स्थानिक आहेत का? संजय - नाही, सर्व बाहेरच्या आहेत. रिपोर्टर - (एका डान्सरला दाखवत) अशी पाहिजे, किती लागतील? संजय - 5 हजार रुपये लागतील, सर्व व्यवस्था होईल. रिपोर्टर - सेटिंग कशी होते? संजय - बाहेर दारूची व्यवस्था करून देतो, मुलगी पसंत करून आत पाठवतो. रिपोर्टर - मुलगी बाहेर जात नाही का? संजय - जातात, दोन डान्सरची बुकिंग आहे, घेऊन जात आहोत. रिपोर्टर - कुठे घेऊन जात आहात? संजय - कुठे घेऊन जात आहोत, हे विचारू नका. तुम्ही तुमचं सांगा, संध्याकाळी भेटा. (संजय थिएटरमधून बाहेर आलेल्या दोन मुलींना घेऊन बाईकवरून सप्लाय करण्यासाठी निघून गेला) आत घेऊन जाऊन एजंटने कॉटेजसोबत डान्सर्सना दाखवले एजंट अभिषेकने डान्सर्सची डील केल्यानंतर विश्वासासाठी रिपोर्टरला थिएटरमध्ये तिथे नेले जिथे बाहेरच्या लोकांची ये-जा नसते. तिथे फक्त स्टाफच जातात. अभिषेकने डान्सर्सना दाखवून सांगितले, संध्याकाळ होताच मैफिल सजते. तुम्ही या, पसंत करा, मग कॉटेजमध्ये जा. रिपोर्टर - डान्सर्सना दाखवाल का? अभिषेक - चला, माझ्यासोबत बघून घ्या. रिपोर्टर - कुठे आहेत सगळे? अभिषेक - माझ्यासोबत आत चला. रिपोर्टर - ठीक आहे. अभिषेक - कोणी विचारल्यास सांगा, अभिषेकसोबत आहोत. रिपोर्टर - ठीक आहे, मुलींना कुठे घेऊन जात आहात? अभिषेक - दीघवाराला घेऊन जाऊ, छपरापासून दोन स्टेशन आधी मागणी आहे. रिपोर्टर - तुमच्याकडे किती मुली आहेत? अभिषेक - एक-दोन नाही, दीडशे मुली आहेत. रिपोर्टर - पोलिसांची भीती नाही ना? अभिषेक - पोलीसवाले स्वतः इथे मजा करायला येतात. रिपोर्टर - अच्छा, मग भीती नसेल. अभिषेक - पोलीसवाल्यांना पैसे देतो, मजाही करतात. यानंतर काय करू शकतो. रिपोर्टर - दारू पण मिळेल का? अभिषेक - बाहेरच व्यवस्था करून देऊ, पिऊन डान्सरकडे जा. रिपोर्टर - काही होणार नाही ना? अभिषेक - काही होणार नाही, सगळं सेट असतं. रिपोर्टर - मागे सगळी व्यवस्था आहे ना? अभिषेक - सर्व आहे, खोलीसारखे बनवले आहे. अभिषेक आणि संजयकडून डान्सर्सची डील केल्यानंतर आम्ही गुलाब थिएटरजवळ पोहोचलो. येथे एका चहा दुकानदाराने, ज्ञानूने, संपूर्ण डील केली. ज्ञानूने सांगितले की, मेळ्यात रात्र नसते. मुली आणि डान्सर्सची डील नेहमीच होते. पहाटेही डान्सर हे सर्व करतात. सेट करा आणि पैसे खर्च करा, येथे सर्व काही मिळेल. रिपोर्टर - थिएटरमध्ये काय-काय व्यवस्था होईल? ज्ञानू - पैशांसाठीच तर सर्व काही होत आहे. रिपोर्टर - डान्सर्ससोबत सेटिंग कशी होईल? ज्ञानू - सर्व होईल, येथे २४ तास सेटिंग होते. रिपोर्टर - पैशांची सेटिंग कुठे आणि कशी होते? ज्ञानू - तुम्ही तयार तर व्हा, सगळं सेटिंग होऊन जाईल. रिपोर्टर - बाहेरच डील होते की सगळं आतमध्ये होतं? ज्ञानू - बाहेरपासून आतपर्यंत प्रत्येक ठिकाणी एजंट असतात. रिपोर्टर - कसं होतं हे, पोलीस पकडत नाहीत का? ज्ञानू - पोलीसवाले पैसे घेतात, त्यामुळे कोण कुठे पकडलं जातं? रिपोर्टर - ऐकतोय की पोलीसवाले पण आतमध्ये डान्सर्सकडे जातात. ज्ञानू - कोणत्याही थिएटरमध्ये जा, पोलीसवाला बसलेला दिसेल. रिपोर्टर - पोलीसवाले आत जाऊन काय करतात? ज्ञानू - सगळे ऐश करतात, दबावाखाली थिएटर मालक मुली देतात. ड्यूटी नाही, मजा करत आहेत पोलीस जवान एजंट्सकडून भास्कर रिपोर्टरला पोलिसांच्या सेटिंगची माहिती मिळाली. रिपोर्टरने सोनपूर मेळ्यात सुरू असलेल्या 6 थिएटरची चौकशी केली असता, माहिती पूर्णपणे खरी वाटली. पोलीस जवान ड्युटी सोडून थिएटरमध्ये जाताना दिसले. रात्रीच्या वेळी पोलीस प्रवेश करत नसलेले असे एकही थिएटर दिसले नाही. प्रत्येक थिएटरमध्ये दोन-चार पोलीस बसलेले आढळले. रस्त्यावर पोलिसांची ड्युटी मेळ्यात लागली होती, पण ते थिएटरचा आनंद घेत होते. थिएटरमध्ये मागच्या आणि बाजूच्या गेटमधून प्रवेश होतो आशियातील सर्वात मोठ्या सोनपूर पशुमेळ्यात यावेळी 6 थिएटर सुरू आहेत. गुलाब विकास थिएटर, न्यू इंडिया थिएटर, शोभा सम्राट थिएटर, पायल एक नजर थिएटर, विकास थिएटर आणि सम्राट थिएटर. भास्करच्या तपासणीत गेटचाही मोठा खेळ समोर आला. थिएटरचा मुख्य प्रवेशद्वार बाहेरूनच आहे आणि यासोबतच येथे मध्यभागी नर्तकांसाठी स्टेज सजवण्यात आला आहे. प्रत्येक थिएटरमध्ये मागून बॅक आणि साइड गेट आहे. याबद्दल चौकशी करताना असे समजले की बॅक गेट ग्राहकांसाठीच ठेवला जातो. साइड गेट तर लोकांच्या येण्या-जाण्यासाठी आणि सामान आत पोहोचवण्यासाठी बनवला जातो. ‘ऑपरेशन सोनपुर’ च्या भाग-२ मध्ये बघा एका झटक्यात डोके धडापासून वेगळे करणाऱ्या शस्त्रास्त्रांचा मोठा व्यवहार
Pankaja Munde : महाराष्ट्रात खळबळ उडणारी एक घटना नुकतीच घडली. भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नी डॅा. गौरी गर्जे (पालवे) यांनी २२ नोव्हेंबरच्या दिवशी वरळी येथील राहत्या घरी आपल्या आयुष्याचा शेवट केला. गौरी यांच्या मृत्यू प्रकरणाने सर्वांनाच हादरवून सोडले आहे. या प्रकरणात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. पालवे कुटुंबीयांनी […] The post “….तर मी अनंत गर्जेच्या दोन कानाखाली…”; पालवे कुटुंबीयांच्या भेटीवेळी पंकजा मुंडेंची संतप्त प्रतिक्रिया म्हणाल्या “मी या प्रकरणात…” appeared first on Dainik Prabhat .
Pema Wang Thongdok। चीनमध्ये छळ सहन करावा लागलेल्या अरुणाचल प्रदेशातील एका महिलेने शांघाय विमानतळाच्या घटनेनंतर आता ट्रोलर्सना लक्ष्य केले आहे. तिने “भारत सरकारने केलेली कोणतीही कारवाई केवळ तिच्या स्वतःच्याच नव्हे तर सर्व भारतीयांच्या हितासाठी आहे” असे म्हटले आहे .अशा प्रकारे तिने सर्व भारतीयांमध्ये एकतेचा संदेश दिला आहे. पेमा वांग थोंगडोक यांनी आरोप केला की, २१ […] The post चीनने १८ तासांसाठी ताब्यात ठेवलेल्या भारतीय मुलीची नवीन पोस्ट ; पोस्टमध्ये भारताबद्दल काय म्हणाली? वाचा appeared first on Dainik Prabhat .
“जातीपातीचं राजकारण करणाऱ्यांना मतदानातून उत्तर द्या”; नाना पाटेकरांचे परखड भाष्य
Nana Patekar | ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आपल्या स्पष्ट वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. नुकतेच छत्रपती संभाजीनगर येथे एमजीएम विद्यापीठात आयोजित सेंट्रल झोन युवा महोत्सव कार्यक्रमात त्यांनी सामाजिक आणि राजकीय विषयावर रोखठोक भाष्य केले आहे. तरुणांना आवाहन करत नाना पाटेकर म्हणाले की, “सध्या आपल्या अवतीभोवती जे सामाजिक आणि राजकीय घडत आहे, ते पाहून घुसमट होत असल्याचं […] The post “जातीपातीचं राजकारण करणाऱ्यांना मतदानातून उत्तर द्या”; नाना पाटेकरांचे परखड भाष्य appeared first on Dainik Prabhat .
अमरावती : राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर पहिल्या टप्प्यातील निवडणूकांसाठी प्रचार सुरू आहे. यासाठी सर्व पक्षाचे नेते महाराष्ट्रभर प्रचारासाठी दौरे करत आहेत. याप्रमाणेच नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारानिमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमरावतीमधील धारणी येथे गेले होते. यावेळी, स्थानिक प्रश्न सांगून त्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न एका महिलेने केला आहे. महत्त्वाचे म्हणजे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सभा आटोपल्या नंतर परतीसाठी निघतानाच्या दरम्यान 'देवेंद्र' अशी हाक या महिलेने दिली.राज्याच्या मुख्यमंत्र्यांना देवेंद्र म्हणून हाक दिल्याने सगळे अधिकारी, कर्मचारी, सोबतचे नेतेही एकमेकांकडे पाहू लागले. मुख्यमंत्री फडणवीस यांनीही तत्काळ मागे वळून पाहिले. त्यावेळी शेजारी उभा राहिलेल्या महिलेने त्यांना नारळ आणि शाल देऊन त्यांचा सन्मान करत काही मिनिटांच्या भेटीत मेळघाटातील समस्यांकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.मुख्यमंत्र्यांचा शब्दया महिलेने मुख्यमंत्र्यांना मेळघाटातील समस्यांबाबत सांगितले. मेळघाटात रस्ता, नाले आणि पाण्याची समस्या सर्वात जास्त आहे. नागरिकांना याच तीन समस्या प्रामुख्याने भेडसावतात, हा समस्यांकडे सरकारने लक्ष द्यावे, असे या महिलेने मुख्यमंत्र्यांना सांगितले. यावर , मला त्यांना एवढेच सांगायचे होते की मेळघाटात असे मी त्यांना सांगितले. यावर मुख्यमंत्र्यांनी लवकरच समस्यांवर मार्ग काढण्यात येईल असा शब्द दिला.मुख्यमंत्री आणि 'त्या' महिलेचे नाते काय?संबंधित महिला हि मुळची धारणी गावची असून मेळघाटातील सर्वसामान्य सामाजिक कार्यकर्ती आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील मूल हे देवेंद्र फडणवीस यांचे मूळगाव आणि या महिलेचे माहेर आहे.यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बहिणी या महिलेच्या शालेय मैत्रीणी होत्या. एकाच वर्गात असल्यामुळे त्यांच्या कुटुंबामध्येसुद्धा सर्वांसोबत ओळख होती. त्यामुळे लहानपणी घरी येणंजाणं असल्याने मुख्यमंत्र्यांना अंगाखांद्यावर खेळवले असल्याचे महिलेने सांगितले. याच नात्यातील आपुलकीने या महिलेने मुख्यमंत्र्यांना देवेंद्र अशी हाक दिली. आमची ओळख असल्यामुळे मी त्याला आवाज दिला आणि म्हणूनच तो आला नाहीतर आला नसता, असेही शेवटी या महिलेने मिश्किलपणे सांगितले.
pune : कोण भेदणार भाजपचा बालेकिल्ला?
नवीन चेहर्यांना संधी, की अनुभवी उमेदवारांनाच प्राधान्य पुणे – शहराच्या मध्यवर्ती पेठांचा समावेश असलेला आणि भाजपचा पारंपरिक बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा कसबा विधानसभा मतदारसंघातील प्रभाग 25 शनिवार पेठ- महात्मा फुले मंडई, आगामी महापालिका निवडणुकीत सर्वांच्या नजरेत आहे. 2017 च्या निवडणुकीत या प्रभागातून चारही भाजप उमेदवार मोठ्या मतांनी विजयी झाले होते. त्यानंतर गेल्या आठ वर्षांत कसबा […] The post pune : कोण भेदणार भाजपचा बालेकिल्ला? appeared first on Dainik Prabhat .
pune : अपक्ष उमेदवारांना आज चिन्हांचे वाटप
नगरपरिषद निवडणुकीत आजपासून प्रचाराला अधिक रंगत फुरसुंगी – नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांमध्ये उभे असलेल्या अपक्ष उमेदवारांना अधिकृत निवडणूक चिन्हांचे वाटप बुधवारी (दि. 26) होणार आहे. चिन्ह मिळाल्यानंतर प्रचार रंगात येणार असून आपले चिन्हे मतदारांपर्यंत पोहचविण्यासाठी उमेदवारांना चार दिवसच मिळणार आहेत. फुरसुंगी आणि उरूळी देवाची परिसरातही अपक्षांच्या प्रचाराचा धुरळा उद्या दुपारपासूनच उडणार आहे. राज्यस्तरीय पक्षांचे उमेदवार […] The post pune : अपक्ष उमेदवारांना आज चिन्हांचे वाटप appeared first on Dainik Prabhat .
pune : पुढील आठवाड्यात थंडीचा जोर वाढणार
पुणे – शहरातील थंडीचा कडाका कमी झाल्याने पुणेकरांना काहीसा दिलासा मिळाला. मागील दोन दिवसांपासून शहरासह जिल्ह्यातील किमान तापमान १४ ते १५ अंशाच्या पुढे गेले आहे. मात्र, पहाटे धुक्यांची चादर आणि रात्री हलकीसी थंडी जाणवत आहे. विशेषत: डोंगरभाग आणि धरणक्षेत्र परिसरात थंडी चांगलीच जाणवत आहे. पुढील आठवाड्यात थंडीचा काहीसा जोर वाढण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे. […] The post pune : पुढील आठवाड्यात थंडीचा जोर वाढणार appeared first on Dainik Prabhat .
जागतिक स्थूलता विरोधी दिन: फास्ट फूडचा विळखा, वाढतोय स्थूलपणा
पिंपरी – भारतामध्ये बालस्थूलत्व एक मोठी समस्या बनत चालली आहे. सध्या देशात 1.44 कोटींपेक्षा जास्त मुले स्थूलत्वाच्या श्रेणीत असून भारत भारत जगातील सर्वाधिक स्थूल मुलांचा दुसरा मोठा देश ठरला आहे. पुण्यातील आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलचे मुख्य आहारतज्ज्ञ डॉ. संजय कुमार मिश्रा यांच्या मते, या चिंताजनक वाढीच्या मुळाशी फास्ट फूडची वाढती सवय, पोषकतत्त्वांची कमतरता, घरातील बदललेली […] The post जागतिक स्थूलता विरोधी दिन: फास्ट फूडचा विळखा, वाढतोय स्थूलपणा appeared first on Dainik Prabhat .
pune : फळ, भाजीपाला विभागातील अतिक्रमणे हटवा
बाजार समितीचे विभाग प्रमुखांना आदेश पुणे – संचालक मंडळाच्या कार्यकाळात सुरू केलेले अनियमित स्टॉल, टपऱ्या, दुकानांचे वाटप, मोकळ्या जागांचा दुरूपयोग आदींबाबत कारवाई करून अहवाल सादर करण्याचे आदेश फळ, भाजीपाला विभाग प्रमुखांना दिले आहेत. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रकाश जगताप आणि सचिव डॉ. राजाराम धोंडकर यांनी बाजार आवारातील अतिक्रमण काढण्याचा आदेश दिला आहे. हा […] The post pune : फळ, भाजीपाला विभागातील अतिक्रमणे हटवा appeared first on Dainik Prabhat .
pune : महापालिकेचे मेल बॉक्स फुल्ल
अभियंत्रिकीच्या परीक्षा पुढे ढकलण्यासाठी हजारो ई-मेल पुणे – महापालिकेकडून रिक्त असलेल्या कनिष्ठ अभियंता पदासाठी येत्या १ डिसेंबर रोजी परीक्षा ठेवली आहे. ही परीक्षा पुढे ढकलावी, या मागणीसाठी अर्ज भरलेल्या हजारो विद्यार्थ्यांनी एकाच वेळी महापालिकेच्या विविध विभागांच्या ई-मेल आयडीवर परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारे ई-मेल पाठवले आहेत. त्यामुळे अनेक विभागांचे मेल बॉक्स पूर्णपणे भरून गेले असून, […] The post pune : महापालिकेचे मेल बॉक्स फुल्ल appeared first on Dainik Prabhat .
pune : खासदार क्रीडा महोत्सवाचा गुरुवारी समारोप
सुपरस्टार अक्षयकुमारची विशेष उपस्थिती पुणे – पुण्याचे खासदार आणि केंद्रीय सहकार व नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकाराने आयोजित खासदार क्रीडा महोत्सवाचा येत्या गुरुवारी (२७ नोव्हेंबर) समारोप होणार आहे. खासदार क्रीडा महोत्सवांतर्गत दोन आठवडे विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. बालगटापासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत आणि महिलांपासून दिव्यांगांपर्यंत अशा सर्वांचा मोठा प्रतिसाद या स्पर्धेला लाभला. […] The post pune : खासदार क्रीडा महोत्सवाचा गुरुवारी समारोप appeared first on Dainik Prabhat .
pune : विमानतळावरील बिबट्या शोधमोहीम तीव्र करा
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे निर्देश पुणे : लोहगांव येथील विमानतळ परिसरात बिबट्या दिसल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर नागरी उड्डाण वाहतूक राज्यमंत्री तथा पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी शोधमोहीम अधिक परिणामकारक करण्यासाठी विमानतळ प्रशासन आणि वन विभागाला सूचना दिल्या आहेत. त्यासाठी एअर फोर्सच्या सहाय्य घ्यावे, असेही सुचविले आहे. विमानतळ हा अत्यंत संवेदनशील […] The post pune : विमानतळावरील बिबट्या शोधमोहीम तीव्र करा appeared first on Dainik Prabhat .
pune : आता खड्डे दुरुस्तीची जीआयएस नोंदणी
दुबार कामे लक्षात येणार, प्रत्येक कामाची तपासणी होणार पुणे : महापालिकेने शहरात खड्डेमुक्त अभियान सुरू केले असून नोव्हेंबर अखेर सर्व रस्ते खड्डेमुक्त करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. या मोहिमेतील कामांची नोंदणी आता गुगल मॅपवरील जीआयएस प्रणालीमध्ये होणार आहे. त्यामुळे प्रत्येक कामाची तपासणी प्रशासनास सोयीस्कर होणार असून दुबार कामे सहज लक्षात येणार आहेत. तसेच दोषदायित्व कालावधीत ही […] The post pune : आता खड्डे दुरुस्तीची जीआयएस नोंदणी appeared first on Dainik Prabhat .
Pune District : सासवड पुण्याचे उपनगर उदयास येईल : आनंदीकाकी जगताप यांनी व्यक्त केला विश्वास
सासवड : सासवड नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय वातावरण तापले असून भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आनंदीकाकी जगताप यांनी माध्यमांशी संवाद साधताना विविध विकासकामांबाबत सविस्तर माहिती दिली. पुरंदर तालुक्यात उभारण्यात येत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे सासवडचे महत्त्व आगामी काळात अधिक वाढणार असून पुण्याचे उपनगर म्हणून सासवडची ओळख निर्माण होणार आहे, असे त्यांनी सांगितले. स्व. चंदूकाका जगताप […] The post Pune District : सासवड पुण्याचे उपनगर उदयास येईल : आनंदीकाकी जगताप यांनी व्यक्त केला विश्वास appeared first on Dainik Prabhat .
Khopoli : खोपोली नगरपरिषद निवडणुकीत पोलिसांची कडक तयारी
खालापूर – खोपोली नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ शांततेत, पारदर्शक आणि गैरप्रकारमुक्त पार पडावी, यासाठी रायगड जिल्हा पोलीस प्रशासनाकडून युद्धपातळीवर तयारी सुरू आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल नेहुल यांनी सोमवारी (दि. २४) खोपोली शहरातील सर्व प्रभागांची निवडणूकपूर्व सुरक्षा पाहणी केली. निरीक्षणादरम्यान डॉ. नेहुल यांनी कायदा व सुव्यवस्था […] The post Khopoli : खोपोली नगरपरिषद निवडणुकीत पोलिसांची कडक तयारी appeared first on Dainik Prabhat .
पुणे : जेजुरी नगरपरिषदेची ५ किलोमीटरपर्यंत हद्दवाढ करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू ,असे प्रतिपादन नगराध्यपदाचे उमेदवार जयदीप बारभाई यांनी केले. जेजुरी नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जेजुरी शहरातील विविध प्रभागातील मतदारांच्या भेटीगाठी दरम्यान जयदीप बारभाई यानी वरील प्रतिपादन केले. जयदीप बारभाई पुढे म्हणाले की, जेजुरी शहरातील नागरिकांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नगरपरिषदेचे वार्षिक बजेट आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि […] The post Pune District : जेजुरीची हद्दवाढ करण्यासाठी प्रयत्नशील : राष्ट्रवादी काॅग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार जयदीप बारभाई याचे प्रतिपादन appeared first on Dainik Prabhat .
– गेल्या काही वर्षांत वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. ती सोडविण्यासाठी विकास आराखड्यातील आरक्षित पार्किंगची आरक्षणे विकसित करण्यावर भर राहणार आहे. पेठांचा भाग असल्याने रस्ते छोटे आहेत. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यावर आपला भर असणार आहे. मागील पाच वर्षांत प्रभागातील रस्ते, ड्रेनेज, पाण्याची समस्या सोडविण्यावर विशेष भर दिला आहे. – गायत्री खडके (माजी नगरसेविका, […] The post pune : माझी नगरसेवक म्हणतात…. appeared first on Dainik Prabhat .
Vadgaon Maval : सत्तेसाठी युती-आघाडीचे खेळ; चार नगर प्रशासकीय पट्ट्यात अनोख्या संगती
वडगाव मावळ – पंचायत समिती आणि नगरपरिषदेच्या निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था सत्ता मिळविण्यासाठी राजकीय पक्षांनी चंग बांधला आहे. विचारधारांना तिलांजली देत सत्तेची समीकरणे जुळविली आहेत. एका स्थानिक स्वराज्य संस्थेत मित्र असलेला पक्ष दुसऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेत विरोधी आहे. राज्य आणि देश पातळीवर विचारधारांच्या आधारे बनविलेल्या युती-आघाडीच्या उद्देशाला देखील स्थानिक राज्यकत्र्यांना […] The post Vadgaon Maval : सत्तेसाठी युती-आघाडीचे खेळ; चार नगर प्रशासकीय पट्ट्यात अनोख्या संगती appeared first on Dainik Prabhat .
Pune District : विकासाच्या जोरावर पुन्हा संधी मिळेल : संपदा सांडभोर
राजगुरुनगर : राजगुरुनगर नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीत प्रभाग क्रमांक 4 मधून माजी नगरसेविका तसेच आरोग्य समितीच्या अध्यक्षा संपदा अमोल सांडभोर यांना राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तर्फे अधिकृत उमेदवारी जाहीर झाली असून, त्यांच्या कामावर समाधानी असलेल्या मतदारांमुळे त्यांचा विजय निश्चित असल्याची चर्चा प्रभागात जोर धरू लागली आहे. नगरसेविका असताना संपदा सांडभोर यांनी प्रभागातील रस्ते, पाणी, सांडपाणी, […] The post Pune District : विकासाच्या जोरावर पुन्हा संधी मिळेल : संपदा सांडभोर appeared first on Dainik Prabhat .
pune : भटक्या कुत्र्यांचे होणार पुनर्वसन
महापालिकेला तब्बल २०० कोटींच्या निधीची आवश्यकता पुणे – सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेने सार्वजनिक ठिकाणी असलेली भटकी कुत्री पकडून त्यांच्यासाठी निवारे उभारण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार शहरात शासनाकडून निश्चित केलेल्या सुमारे २ हजार ८४३ ठिकाणी एक ते सव्वा लाख भटकी कुत्री असून, त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी महापालिकेला दीडशे ते दोनशे कोटी रुपयांचा खर्च करावा लागणार असल्याचा प्राथमिक […] The post pune : भटक्या कुत्र्यांचे होणार पुनर्वसन appeared first on Dainik Prabhat .
Pimpri : वाहतूक कोंडीने ग्रासले पुनावळे
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेत समाविष्ट झालेल्या पुनावळे परिसरातील नागरिकांना वाहतूक कोंडी, निकृष्ट रस्ते, अपुरा पाणीपुरवठा आणि आरोग्याच्या समस्यांचा दररोज सामना करावा लागत आहे. लोकसंख्या लाखाच्या घरात पोहोचलेल्या या वेगाने वाढणाऱ्या उपनगरातील पायाभूत सुविधांचे प्रश्न सोडवण्याऐवजी वर्षानुवर्षे तीच कामे प्रलंबित राहत असल्याने नागरिकांचा संताप वाढत आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे मुद्दे प्रखरपणे ऐरणीवर येण्याची चिन्हे आहेत. गायकवाड […] The post Pimpri : वाहतूक कोंडीने ग्रासले पुनावळे appeared first on Dainik Prabhat .
Pune District : आश्वासनांपेक्षा कृतीवर भर; आळंदी शिवसेना उमेदवार संगिता चव्हाण यांचा जोरदार प्रचार
आळंदी : येथील प्रभाग क्र. 10 ब मध्ये शिवसेनेच्या उमेदवार संगीता राहुल चव्हाण यांनी केवळ आश्वासने नव्हे, तर कृती आणि समर्पण या बळावर आपल्या उमेदवारीची पावती दिली आहे. त्यांचे पती, शिवसेना शहर प्रमुख राहुल चव्हाण यांच्यासह त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून प्रभागाच्या सुख-दुःखात सक्रिय सहभाग घेतला आहे. देहूफाटा ते पुणे रस्त्यावरील वाहतूक कोंडी आणि खड्डेमुक्त रस्त्यांसाठी […] The post Pune District : आश्वासनांपेक्षा कृतीवर भर; आळंदी शिवसेना उमेदवार संगिता चव्हाण यांचा जोरदार प्रचार appeared first on Dainik Prabhat .
pune : मतदारयादी दुरुस्तीचे अधिकार आयुक्तांना
राज्य निवडणूक आयोगाचा खुलासा, पुण्यातून सर्वाधिक ७७७ तक्रारी पुणे : आगामी महापालिका निवडणुकीच्या प्रारूप मतदार यादीतील चुका दुरुस्त करण्याचे अधिकार आयुक्तांना असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. याबाबत राज्य निवडणूक आयोगाचे सचिव काकाणी यांनी पत्र जारी केले आहे. यामुळे नागरिकांच्या हरकती, प्रशासनाच्या निदर्शनास आलेल्या चुकांचे निराकरण पालिका आयुक्तांनी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महापालिकेने […] The post pune : मतदारयादी दुरुस्तीचे अधिकार आयुक्तांना appeared first on Dainik Prabhat .
Pune District : शिरूरमध्ये ऐश्वर्या पाचर्णे यांचा प्रचार रंगात
शिरूर : शिरूर नगरपरिषद निवडणुकीत यंदा नगराध्यक्षपदासाठी पंचरंगी लढत होणार असून प्रत्येक पक्षाकडून ताकत लावली जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार ऐश्वर्या अभिजीत पाचर्णे यांनी प्रचारात लक्षणीय आघाडी घेतली आहे. आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा प्रचार जोमात सुरू असून तरूण, महिला आणि बुद्धिजीवी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, नगराध्यक्षपदासाठी मैदानात उतरलेल्या […] The post Pune District : शिरूरमध्ये ऐश्वर्या पाचर्णे यांचा प्रचार रंगात appeared first on Dainik Prabhat .
pune : कमला नेहरु रुग्णालयाचा कायापालट
पहिल्या टप्प्यात १३ कोटींचा खर्च पुणे – मंगळवार पेठेतील महापालिकेचे मोठे रुग्णालय असलेल्या कमला नेहरू रुग्णालयाची अवस्था अत्यंत दयनीय झाल्याची कबुली महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली आहे. अनेक आवश्यक सुविधा येथे नसल्याने रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे. या रुग्णालयाचा पूर्ण कायापालट करण्याचा निर्णय घेण्यात आला असून पहिल्या टप्प्यात १३ कोटी रुपयांचा खर्च […] The post pune : कमला नेहरु रुग्णालयाचा कायापालट appeared first on Dainik Prabhat .
pune : झाडणकामाच्या निविदांची होणार चौकशी
महापालिका आयुक्तांकडून आदेश पुणे : शहरातील सार्वजनिक ठिकाणांच्या झाडणकामांसाठी प्रशासनाने काढलेल्या निविदा पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. परिमंडळ चार अंतर्गत काढलेल्या निविदांसाठी सुरू असलेल्या प्रक्रियेत काळ्या यादीत टाकलेले ठेकेदार, आर्थिक क्षमता नसलेल्या कंपन्यांना पात्र ठरविले गेले असल्याच्या तक्रारी आल्यानंतर याची तातडीनं चौकशी करण्याचे आदेश दिल्याची माहिती आयुक्त नवल किशोर राम यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. तसेच […] The post pune : झाडणकामाच्या निविदांची होणार चौकशी appeared first on Dainik Prabhat .
इंदापूर : नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी तापली असताना,राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने आज प्रभाग क्रमांक 1 व 2 मध्ये प्रचंड ताकद दाखवत प्रचारात तुफानी झंकार निर्माण केली.कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सुविद्य पत्नी सारिका भरणे आणि माजी नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या घरभेटी मोहिमेला मतदारांकडून उत्स्फूर्त आणि जबरदस्त प्रतिसाद मिळाला. या प्रचारदौर्यात प्रभाग 1 चे […] The post Pune District : इंदापूरमध्ये राष्ट्रवादीची धडाडी : सारिका भरणे-अंकिता शहा यांच्या घरभेटींना उस्फूर्त प्रतिसाद appeared first on Dainik Prabhat .
Pune : मैदान, उद्यानासाठीच्या जागेवर बांधकाम
फॉरेस्ट ट्रेल्स रहिवाशांचा परांजपे स्कीमवर आरोप, पीएमआरडीए नाचवते कागदी घोडे पुणे – भूगाव (ता.मुळशी) येथे परांजपे स्कीम कन्स्ट्रक्शन लिमिटेडच्या फॉरेस्ट ट्रेल्स या प्रकल्पात शासनाच्या नियमानुसार सुमारे ३५ एकर इतकी या मैदाने, उद्याने आदींसाठी राखीव ठेवण्यात येणार असल्याचे बांधकाम आराखड्यात दाखविले होते. प्रत्यक्षात, या राखीव जागांवरच बांधकाम उभारल्याचा दावा फॉरेस्ट ट्रेल्समधील रहिवाशांनी केला आहे. तसेच याबाबत […] The post Pune : मैदान, उद्यानासाठीच्या जागेवर बांधकाम appeared first on Dainik Prabhat .
सासवड : -सासवड शहरातील मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष करून जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप करत, सासवड शहर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहरप्रमुख राजेंद्र जगताप यांनी नगराध्यक्ष पदासाठी उभे असलेले अभिजीत जगताप यांच्या प्रचारसभेत सत्ताधार्यांवर जोरदार टीका केली. शहरातील वर्षानुवर्षे प्रलंबित कामांना वर्षपूर्तीत मार्गी लावू, असा विश्वास राजेंद्र जगताप यांनी व्यक्त केला. नागरिकांना येणार्या अडचणींचा विचार करता […] The post Pune District : प्रलंबित कामांना वर्षपूर्तीत मार्गी लावू : शिवसेना (ठाकरे) शहरप्रमुख राजेंद्र जगताप यांचे प्रचारसभेत आश्वासन appeared first on Dainik Prabhat .
phaltan: दोन दिवसात ३५०० रूपये दर जाहीर करावा अन्यथा साखर कारखान्यासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात येणार असल्याचा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला. दरम्यान, फलटण तालुक्यातील शेतकरी संघटित झाला असून यावेळेस ३५०० रूपये दर घेतल्याशिवाय मागे हटायची नाही, असा निर्धार शेतक-यांनी मेळाव्यात केला आहे. साखरवाडी, ता. फलटण येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने ऊस उत्पादक […] The post phaltan: ३५०० रूपये दर जाहीर करा अन्यथा आंदोलन करू राजू शेट्टी यांचा इशारा; साखरवाडीत ऊस उत्पादक शेतक-यांचा मेळावा appeared first on Dainik Prabhat .
Pune District : विकासकामांना निधी कमी पडू देणार नाही :माजी आमदार योगेश टिळेकर
जेजुरी : भाजप विचारांचा नगराध्यक्ष निवडून दिल्यास शहरातील विकासकामांसाठी कोणताही निधी अपुरा पडू देणार नाही, अशी ग्वाही माजी आमदार योगेश टिळेकर यांनी दिली. जेजुरीतील विविध विभागांतील भाजप समर्थित उमेदवारांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून जेजुरी शहरात आवश्यक असलेल्या पाणी, वीज, रस्ते आदी सुविधांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देता येईल. […] The post Pune District : विकासकामांना निधी कमी पडू देणार नाही :माजी आमदार योगेश टिळेकर appeared first on Dainik Prabhat .
Pune : पहिल्याच दिवशी ११० वाहनांना दंड
कात्रज बायपास मार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन पुणे – कात्रज बायपास मार्गावर वाहनांच्या वेगावर नियंत्रणसाठी नव्या आदेशाची अंमलबजावणी आज (मंगळवार) पासून सुरू झाली. पहिल्याच दिवशी वेगमर्यादा ओलांडणाऱ्या ११० वाहनांवर वाहतूक शाखेने कारवाई केली. दरम्यान, महामार्गावर स्वामी नारायण मंदिर ते वडगाव पुलापर्यंत वेगमर्यादेचे फलक लावले आहेत. भूमकर चौकाच्या पुढे पोलिसांनी गाडीमध्ये एक स्पीडगन बसवली आहे. त्याद्वारे ही कारवाई […] The post Pune : पहिल्याच दिवशी ११० वाहनांना दंड appeared first on Dainik Prabhat .
Pune : एक डिसेंबरपासून रास्ता रोको ; पीएमपीएमएल कामगार संघाचा प्रशासनाला इशारा
पुणे – पीएमपीएमएलमधून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबद्दल ३० नोव्हेंबरपर्यंत आवश्यक ती पावले न उचलल्यास १ डिसेंबरपासून पीएमपीएमएलच्या स्वारगेट मुख्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पीएमपीएमएल कामगार संघाने दिला आहे. अनेक वेळा आंदोलने, निदर्शने, निवेदने अशा अनेक मार्गांनी मागण्या केल्यानंतरही दुर्लक्ष होत असल्याने हे पाऊल उचलण्यास प्रवृत्त होत असल्याचे संघाने म्हटले. १ एप्रिल […] The post Pune : एक डिसेंबरपासून रास्ता रोको ; पीएमपीएमएल कामगार संघाचा प्रशासनाला इशारा appeared first on Dainik Prabhat .
Pune : मुंढवा जमीन गैरव्यवहाराची चार डिसेंबर रोजी सुनावणी
पुणे – मुंढवा शासकीय जमीन गैरव्यवहार प्रकरणात अमेडिया एंटरप्राइझेस कंपनीला 21 कोटी रुपये मुद्रांक शुल्क भरण्याची नोटीस पाठविली होती. या कंपनीने आपली बाजू मांडण्यासाठी 15 दिवसांची मुदत मागितल्यानंतर नोंदणी व मुद्रांक विभागाने चार डिसेंबर रोजी सुनावणी ठेवली आहे. मुंढवा येथील शासकीय जमिनीच्या खरेदी विक्रीचे प्रकरण उघडकीस आले आहे. त्यामध्ये पार्थ पवार यांची भागीदारी असलेल्या अमेडिया […] The post Pune : मुंढवा जमीन गैरव्यवहाराची चार डिसेंबर रोजी सुनावणी appeared first on Dainik Prabhat .
‘मी असे औषध बनवत आहे, ज्याने संपूर्ण कुटुंब श्रीमंत होईल.’ हैदराबादच्या राजेंद्रनगरमध्ये राहणाा डॉ. अहमद सय्यद मोईनुद्दीनने हे भाऊ उमर फारुकी यांना सांगितले होते. 13 नोव्हेंबर रोजी गुजरात एटीएसने मोईनुद्दीनच्या घरावर छापा टाकला, तेव्हा असे समोर आले की श्रीमंत बनवणारे ते औषध धोकादायक रसायन 'रिसिन' आहे, ज्याचा वापर दहशतवादी संघटना ISIS लोकांना मारण्यासाठी करते. एटीएसच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मते, मोईनुद्दीन ISIS च्या दहशतवादी मॉड्यूलचा भाग आहे आणि देशात मोठ्या रासायनिक हल्ल्याची तयारी करत होता. यासाठी तो 'रिसिन' नावाचे रसायन बनवत होता, जे एरंडीच्या बियांपासून मिळते. एटीएसने 8 नोव्हेंबर रोजी गुजरातच्या बनासकांठा येथून मोईनुद्दीनसोबत उत्तर प्रदेशातील शामली येथे राहणाऱ्या आझाद सुलेमान शेख आणि लखीमपूर खेरी येथील मोहम्मद सुहैल सलीम खान यांना पकडले होते. दोघांचे वय फक्त 20 आणि 23 वर्षे आहे. मोईनुद्दीनने चीनमधून वैद्यकीय शिक्षण घेतले आहे. तो रासायनिक तज्ज्ञ आहे. ATS नुसार, आझाद सुलेमान आणि सुहैल यांनी गेल्या 7 महिन्यांत लखनऊमधील RSS मुख्यालय, अहमदाबादमधील नरोडा फळ मंडी, दिल्लीतील आझादपूर मंडी आणि हरिद्वारमधील मंदिरांची रेकी केली होती. त्या दोघांचे पाकिस्तानातील संपर्क सापडले आहेत. ते राजस्थानमध्ये भारत-पाकिस्तान सीमेवर ड्रोनने टाकलेली शस्त्रे आणि पैसे गोळा करून मोइनुद्दीनपर्यंत पोहोचवत होते. रिसिन हल्ल्याची जगात 40 प्रकरणे, भारतात पहिल्यांदाच उघडकीस ATS ला 7 नोव्हेंबरचे CCTV फुटेज मिळाले होते, ज्यात डॉ. मोइनुद्दीन आझाद सुलेमान आणि मोहम्मद सुहैलसोबत अहमदाबादच्या हॉटेल ग्रँड एम्बियन्स मधून बाहेर पडताना दिसले होते. याच फुटेजच्या आधारावर तिघांचे कनेक्शन समोर आले. टेरर मॉड्यूलचा मास्टरमाईंड मोईनुद्दीन आहे. तो अहमदाबादला शस्त्रे घेण्यासाठी गेला होता, तिथेच एटीएसने त्याला अटक केली असे सांगितले जात आहे. तेलंगणाच्या सायबराबाद पोलीस आणि गुजरात एटीएसला हैदराबादमधील मोईनुद्दीनच्या फ्लॅटमधून बॉक्समध्ये साठवलेले साहित्य मिळाले, ज्यातून रिसिन रसायन बनवले जाणार होते. जगभरात रिसिनचा वापर 1978 पासून 2025 पर्यंत 40 मोठ्या कटांमध्ये झाला आहे. भारतात आतापर्यंत याची कोणतीही घटना समोर आली नव्हती. हे पहिल्यांदाच आहे, जेव्हा ते पकडले गेले आहे. या रासायनिक शस्त्राचा वापर इस्लामिक स्टेटशी संबंधित संघटना करत आल्या आहेत. त्यामुळे, सुरक्षा यंत्रणा ISIS शी संबंधित ISKP आणि ISHP मॉड्यूल्सचीही चौकशी करत आहेत. आता तिन्ही संशयित दहशतवाद्यांबद्दल जाणून घ्या डॉ. अहमद सय्यद मोईनुद्दीन जनरल फिजिशियन आहे. तो हैदराबादमधील राजेंद्रनगरमध्ये फोर्ट व्ह्यू कॉलनीतील असद मंझिल अपार्टमेंटमध्ये राहत होता. मोईनुद्दीनने चीनमधून MBBS चे शिक्षण घेतले होते. तो कोणत्याही हॉस्पिटल किंवा क्लिनिकशी संबंधित नाही आणि रुग्णांना इंटरनेटवर मोफत आरोग्य सल्ला देत होता. गुजरात एटीएसच्या सूत्रांनी सांगितले की, ‘मोइनुद्दीनच्या अटकेनंतर असे समोर आले की तो एका संशयित दहशतवादी टोळीचा भाग आहे आणि घातक बायो-केमिकल पदार्थांचा वापर करून मोठ्या प्रमाणावर रासायनिक हल्ला करण्याच्या तयारीत होता. त्याला अफगाणिस्तानात राहणाऱ्या अबू खलेजाकडून सूचना मिळत होत्या, जो इस्लामिक स्टेट खुरासान प्रोव्हिन्स या दहशतवादी संघटनेशी संबंधित आहे.’ ‘एटीएसला मोइनुद्दीन आणि त्याच्या हँडलरच्या सोशल मीडियावर केलेल्या चॅटचे आणि ChatGPT वर धोकादायक रसायने बनवण्याचे मार्ग शोधल्याचे पुरावे मिळाले आहेत.’ तपास यंत्रणेनुसार, मोइनुद्दीन 2007 मध्ये एमबीबीएस करण्यासाठी चीनला गेला. 2012–13 मध्ये तो भारतात परतला आणि काही काळ कुटुंबासोबत तेलंगणातील खम्मम येथे राहिला. त्यानंतर राजेंद्रनगरमध्ये राहू लागला. त्याचे शेवटचे लोकेशन अहमदाबादमध्ये सापडले होते. मोइनुद्दीनचा भाऊ उमर फारुकी याला त्याच्या गुजरातला जाण्याबद्दल विचारले असता, त्याने सांगितले की तो व्यवसायाच्या निमित्ताने गेला होता. एटीएसनुसार, मॉड्यूलमध्ये सामील असलेल्या मोहम्मद सुहैल आणि आझाद सुलेमान यांनी मोइनुद्दीनला शस्त्रांनी भरलेली बॅग पोहोचवली होती. एका पार्सलमध्ये दीड लाख रुपयेही होते, जे पाकिस्तानी एजंटच्या सांगण्यावरून पाठवले गेले होते. मोइनुद्दीनचा भाऊ फारुकीने पोलिसांना सांगितले की, फ्लॅटवर येणाऱ्या पार्सलबद्दल विचारल्यावर मोइनुद्दीन म्हणायचा की तो असे औषध बनवत आहे, ज्यामुळे संपूर्ण घर श्रीमंत होईल. सुरक्षा एजन्सीशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, 'मॉड्यूलमध्ये सामील असलेला आझाद सुलेमान शेख दहशतवादी हल्ल्याच्या उद्देशाने जम्मू-काश्मीरमधील बारामुला येथे गेला होता. तिथे त्याला कोणतेही लक्ष्य मिळाले नाही, म्हणून तो दिल्लीला परत आला. दिल्लीत असताना त्याने हरिद्वारला जाऊन मोठ्या मंदिरांची रेकी केली होती. तर, सुहैलच्या घरातून आयएसआयएसचे साहित्य आणि झेंडे मिळाले आहेत. गुजरात एटीएसचे डीआयजी सुनील जोशी म्हणतात, ‘8 नोव्हेंबर रोजी एटीएसचे एसपी के. सिद्धार्थ यांच्या पथकाने अहमदाबाद-मेहसाणा महामार्गावरील अडालज टोल प्लाझाजवळून डॉ. मोइनुद्दीन यांना अटक केली होती. यानंतर रिसिन हल्ल्याच्या कटाचा पर्दाफाश झाला. त्यांचे पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयशी संबंध असल्याचे समोर आले आहे.’ 'तिघांनी सांगितले की ते एरंडेल तेलाच्या मदतीने रिसिन नावाचे विषारी द्रव्य (टॉक्सिन) बनवत होते. त्यांनी हल्ल्याची पद्धत निश्चित केली नव्हती. रिसिन तयार झाल्यावर हल्ल्याचा आराखडा बनवणार होते. एटीएस आता या मॉड्यूलच्या इतर सदस्यांचा शोध घेत आहे. त्याचे पथक आता मोइनुद्दीन, सुहैल आणि आझाद भेटलेल्या सर्व ठिकाणी जाईल. काही अधिकाऱ्यांना पुरावे गोळा करण्यासाठी लखीमपूर खेरी आणि शामली येथेही पाठवण्यात आले आहे.' प्राणघातक रिसिनवर कोणताही उपचार नाही, हल्ल्यांमध्ये वापरण्याचा इतिहासरिसिनचा शोध 1888 मध्ये जर्मन शास्त्रज्ञ पीटर हर्मन स्टिलमार्क यांनी लावला होता. पहिल्या महायुद्धात जर्मनीच्या सैन्याने याचा शस्त्रास्त्र म्हणून वापर केला. हे सायनाइडपेक्षाही अधिक घातक मानले जाते. शेवटी हे किती धोकादायक आहे, हे जाणून घेण्यासाठी आम्ही लखनऊचे केमिकल एक्सपर्ट आनंद अस्थाना यांच्याशी बोललो. आनंद सांगतात की, रिसिन हे एक प्रकारचे पोटेंट टॉक्सिन म्हणजे खूप धोकादायक विष आहे. हे एरंडीच्या लहान बिया रिफाइन करून तयार केले जाते. ही एक पांढरी पावडर असते. हे जितके जास्त बारीक केले जाईल, तितके ते अधिक धोकादायक बनते. हे दोन प्रकारे विध्वंस घडवू शकते.पहिला: जर परिसरात धूळ (बारीक कण) असेल आणि रिसिनची पावडर तिथे पसरवली गेली, तर याचा परिणाम त्या भागात राहणाऱ्या मोठ्या लोकसंख्येवर होऊ शकतो. याचा परिणाम लगेच नाही, पण दोन-तीन दिवसांत दिसू लागतो. रासायनिक अभिक्रियेमुळे जीव जाऊ शकतो. दुसरा: रिसिन पाण्यात मिसळून किंवा सिरिंजद्वारे इंजेक्ट करून घातक बनवता येते. हे पाण्यात सहज विरघळू शकते. इंजेक्शनद्वारे ते लगेच रक्ताच्या संपर्कात येते. जर ते पाण्याद्वारे सेवन केले गेले असेल, तर काही तासांनंतर त्याचा परिणाम दिसू लागतो. तर, बनारस हिंदू विद्यापीठातील वनस्पतिशास्त्र विभागाचे ज्येष्ठ प्राध्यापक आरएन खरवार म्हणतात, 'रिसिनची विषारीता सायनाइडपेक्षाही जास्त असते. डॉ. मोइनुद्दीनकडे 3 किलो एरंडेल लगदा सापडला आहे. जर हा शुद्ध एरंडेल लगदा असेल, तर यातून 100 ग्रॅमपेक्षा जास्त रिसिन बनवता आले असते. यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की, इतक्या प्रमाणात रिसिन मिळणे किती मोठ्या लोकसंख्येला प्रभावित करू शकले असते.' अमेरिका, भारत आणि UN ने बंदी घातलीमनोहर पर्रिकर इन्स्टिट्यूट फॉर डिफेन्स स्टडीज अँड ॲनालिसिसच्या अहवालानुसार, यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनने रिसिनला श्रेणी B बायोटेरेरिझम एजंट म्हणून वर्गीकृत केले आहे. युनायटेड नेशन्स सिक्युरिटी कौन्सिल रिझोल्यूशन (UNSCR) ने या रसायनावर बंदी घातली आहे. भारताच्या वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन ॲक्ट-2005 मध्ये देखील अशा कोणत्याही बायोटॉक्सिनच्या उत्पादनावर किंवा ते साठवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. असे असूनही रिसिन सहज उपलब्ध होते. यावर प्रक्रिया करणे देखील सोपे आहे. मनोहर पर्रिकर इन्स्टिट्यूट फॉर डिफेन्स स्टडीज अँड ॲनालिसिसच्या अहवालानुसार, रिसिन टॉक्सिनचा वापर शीतयुद्धात झाला होता. याशिवाय अल-कायदा आणि ISIS सारख्या दहशतवादी संघटनांनी याचा वापर केला आहे. मात्र, अद्याप कोणताही दहशतवादी गट शस्त्रात वापरता येईल इतके रिसिन बनवण्यात यशस्वी झालेला नाही. पत्रकाराची हत्या, ओबामांना पाठवलेली रिसिन असलेली पत्रेरिसिनचे पहिले प्रकरण शीतयुद्धादरम्यान 1978 मध्ये समोर आले होते. हे रशियाच्या गुप्तहेर संस्था KGB ने घडवून आणले होते. रिसिनचा वापर एका सुधारित छत्रीत करण्यात आला होता. याद्वारे लंडनमध्ये बल्गेरियाचे पत्रकार जॉर्जी मार्कोव यांची हत्या करण्यात आली होती. त्याच वर्षी पॅरिसमध्येही एका हत्येमध्ये रिसिनचा वापर करण्यात आला होता. 1980 च्या दशकात इराकच्या जैविक शस्त्र कार्यक्रमात रिसिन विषारी पदार्थ सापडल्याचा दावा करण्यात आला होता. 2013 मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि काही अधिकाऱ्यांना रिसिन असलेली पत्रे पाठवण्यात आली होती. मात्र, यामुळे कोणतेही नुकसान झाले नव्हते. 2018 मध्ये ISIS ने ट्युनिशियामध्ये याचा वापर केला होता. 2025 मध्ये जर्मनीमध्ये घरगुती प्रयोगशाळेत रिसिन तयार केल्याची माहिती मिळाली आहे. आतापर्यंतच्या तपासात दावा करण्यात आला आहे की, हैदराबादमध्ये अटक होण्यापूर्वी भारतात रिसिनशी संबंधित दहशतवादी कटाचे कोणतेही प्रकरण समोर आले नव्हते. दहशतवादी मॉड्यूलच्या तपासाशी संबंधित अधिकारी सांगतात की, इस्लामिक स्टेटशी संबंधित गट जसे की ISKP आणि त्याची भारतीय उप-युनिट इस्लामिक स्टेट-हिंद प्रोव्हिन्स बऱ्याच काळापासून अशा रासायनिक किंवा जैविक दहशतवादी हल्ल्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे हे प्रकरण खूप महत्त्वाचे ठरले आहे.
अग्रलेख : घोळाची मालिका पुण्यापर्यंत
मतदार यादीतील घोळ हा राष्ट्रव्यापी विषय आहे. त्या विषयाची धग आतापर्यंत पुणेकरांना बसली नव्हती, पण अखेर तो विषय पुणेकरांपर्यंत येऊन ठेपला आहे. पुण्याच्या मतदार यादीतही अनेक प्रकारचे घोळ आहेत. ते सगळे विषय महापालिकेच्या निवडणूक शाखेपुढे उपस्थित करण्यात आले असून निवडणूक शाखेच्या अधिकार्यांनी यातील आपली जबाबदारी झटकत हा सगळा घोळ निवडणूक आयोगाकडून आलेल्या सॉफ्टवेअरमधून झाला असल्याचे […] The post अग्रलेख : घोळाची मालिका पुण्यापर्यंत appeared first on Dainik Prabhat .
२३ नोव्हेंबर रोजी, १२,००० वर्षांच्या विलंबानंतर इथिओपियाच्या हेले गुब्बी ज्वालामुखीचा उद्रेक झाला. २४ तासांच्या आत, ज्वालामुखीच्या राखेचे आणि धुराचे ढग दिल्लीसह अनेक भारतीय शहरांच्या आकाशात पसरले. दिल्लीहून येणारी सात आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द करावी लागली. हजारो वर्षांनंतर अचानक ज्वालामुखीचा उद्रेक होणे असामान्य असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. गेल्या आठवड्यात, इंडोनेशियामध्येही माउंट सेमेरूचा उद्रेक झाला. ही खरोखरच एका नवीन ज्वालामुखी युगाची सुरुवात आहे का? इथिओपियापासून ४३०० किलोमीटर अंतरावर असलेल्या दिल्लीत ज्वालामुखीची राख कशी पोहोचली आणि त्यामुळे विमानांना कोणता धोका निर्माण होतो? जाणून घ्या… प्रश्न-1: इथिओपियामध्ये 12 हजार वर्षांनंतर ज्वालामुखीचा उद्रेक का झाला?उत्तर: सुमारे 12 हजार वर्षांपूर्वीपर्यंत पृथ्वीवर हिमयुग म्हणजेच आइस एज होते. संपूर्ण जगात हिमनदी पसरलेल्या होत्या. त्याच काळात इथिओपियातील हेली गुब्बी ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता. शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की सुमारे १५,००० वर्षांपूर्वी, पृथ्वीची सूर्याभोवतीची कक्षा बदलली, ज्यामुळे पृथ्वीवर अधिक सूर्यप्रकाश पोहोचू लागला आणि हिमनद्या वितळू लागल्या. यामुळे हिमयुगाचा अंत झाला आणि होलोसीन युग सुरू झाले, जे आजही चालू आहे. ज्वालामुखी बराच काळ निष्क्रिय राहिल्यानंतरही, पृथ्वीवरील टेक्टोनिक प्लेट्स एकमेकांवर आदळत राहतात, ज्यामुळे मॅग्मा तयार होतो. नॉर्थ कॅरोलिना स्टेट युनिव्हर्सिटीमधील ज्वालामुखीशास्त्रज्ञ अरियाना सोल्दाती त्यांच्या मते, जर मॅग्मा तयार होण्याची परिस्थिती कायम राहिली तर एक हजार किंवा दहा हजार वर्षांनंतरही ज्वालामुखीचा उद्रेक होऊ शकतो. १२,००० वर्षांनंतर पुन्हा एकदा या ज्वालामुखीचा उद्रेक होण्याचे आणखी एक कारण सांगितले जात आहे. खरं तर, जुलैमध्येली गुब्बी ज्वालामुखीपासून फक्त १५ किलोमीटर अंतरावर 'एर्टा आले' ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता. यामुळे मॅग्मा सुमारे २९ किमी खोलवर ढकलले, ज्यामुळे आत दाब वाढला आणि हेली गुब्बीचा स्फोट झाला. २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ८:३० वाजता, हेली गुब्बी येथे एक मोठा स्फोट झाला. स्फोटामुळे राख आणि धुराचे लोट बाहेर पडले.ते आकाशात सुमारे १४ किमी उंचावर गेले आणि येमेन आणि ओमान मार्गे ४३०० किमी अंतरावर दिल्लीला पोहोचले. प्रश्न-2: 4300 किलोमीटर दूर दिल्लीपर्यंत लाव्हाची राख कशी पोहोचली?उत्तर: हेली ज्वालामुखीच्या लाव्हाची राख हजारो किलोमीटर दूर पोहोचण्याचे कारण उच्च-उंचीवरील वारे (हाय-अल्टिट्यूड विंड्स) किंवा उच्च स्तरावरील वारे असल्याचे सांगितले जात आहे. भारतीय हवामान विभाग (IMD) चे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांच्या मते, अधिक उंचीवरील वाऱ्यांमुळे राखेचे ढग इथिओपियापासून लाल सागर, येमेन आणि ओमानमार्गे अरबी समुद्र आणि भारतीय प्रदेशापर्यंत पोहोचले. खरं तर, पृथ्वीपासून 15 किलोमीटर वरच्या वाऱ्याला जेट स्ट्रीम म्हणतात, ज्याचा वेग सुमारे 150 किलोमीटर प्रति तास असतो. ज्वालामुखीच्या राखेमध्ये सिलिकाचे कण म्हणजेच खडकांचे बारीक कण असतात. त्यांचा आकार 1 मायक्रॉन ते 1 मिलीमीटरपर्यंत असतो. या कणांच्या आत सल्फर डायऑक्साइडसारख्या वायूंचे बुडबुडे असतात, त्यामुळे त्यांचे वजन खूप कमी असते. हलके असल्यामुळे हे कण खाली पडत नाहीत आणि हवेतच तरंगत राहतात. स्फोटामुळे हे कण पृथ्वीपासून 14 किलोमीटर उंचीपर्यंत पोहोचले आणि पश्चिमेकडे वाहणाऱ्या जेट स्ट्रीमने त्यांना आपल्यासोबत 4300 किमी दूर दिल्लीपर्यंत आणले. हवामान विभागाच्या मते, हा धूर चीनमधून प्रशांत महासागराकडे पुढे सरकेल, जिथे सबट्रॉपिकल जेट स्ट्रीम किंवा वरचे वारे राखेचे कण अनेक दिवस हवेत वाहत ठेवतील. प्रश्न-3: दिल्लीत ज्वालामुखीच्या राख आणि धुराच्या ढगांचा काय परिणाम झाला?उत्तर: राखेचे ढग 24 नोव्हेंबरच्या रात्री उत्तर-पश्चिम भारताच्या मोठ्या भागात पसरले. गुजरात, राजस्थान, दिल्ली-NCR, पंजाब, हरियाणा आणि महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये राख आणि धुराचे ढग दिसले. मृत्युंजय मोहपात्रा यांच्या मते, राखेचा परिणाम वरच्या ट्रोपोस्फियरमध्ये म्हणजेच सुमारे 25 हजार ते 40 हजार फूट उंचीवरच दिसून आला. त्यानंतर मंगळवारी संध्याकाळी 7:30 वाजेपर्यंत ही राख हिमालय आणि नेपाळच्या टेकड्यांमधून चीनकडे वळली. विमानं देखील साधारणपणे 30 ते 40 हजार फूट उंचीवर उड्डाण करतात. त्यामुळे 25 नोव्हेंबर रोजी एअर इंडिया, इंडिगो आणि आकासा सारख्या अनेक एअरलाईन्सनी त्यांची डझनभर उड्डाणे रद्द केली. त्यापैकी 7 आंतरराष्ट्रीय उड्डाणे होती, जी दिल्लीहून जेद्दाह, कुवेत, अबू धाबी आणि युरोपला जात होती. अहवालांमध्ये असेही म्हटले आहे की राखेमुळे हवेतील सल्फरचे प्रमाण थोडे वाढले, परंतु हवामान विभागाचे म्हणणे आहे की राख जमिनीजवळील हवेपर्यंत पोहोचली नाही आणि एअर क्वालिटी इंडेक्स म्हणजेच AQI वर त्याचा परिणाम नगण्य राहिला. मात्र, दिल्लीतील हवा आधीच खराब आहे. सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड (CPCB) नुसार, 20 नोव्हेंबर रोजी दिल्लीचा AQI 360 होता. हे 'अत्यंत खराब हवा' या श्रेणीत येते. दिल्लीच्या अनेक भागांमध्ये AQI 400 च्या वर देखील नोंदवला गेला आहे. हिवाळ्यात धुकं वाढल्याने दरवर्षी दिल्लीतील हवेतील सूक्ष्म प्रदूषकांचे प्रमाण वाढते आणि त्यामुळे AQI वाढतो. धुक्यात समाविष्ट असलेल्या या प्रदूषकांमुळे दिल्लीत धुरके (smog) वाढते. यामुळे दृश्यमानता खूप कमी होते आणि हवा श्वास घेण्यायोग्य राहत नाही. 25 डिसेंबर रोजी दिल्लीत किमान तापमान 9 अंश सेल्सिअस नोंदवले गेले, जे सरासरीपेक्षा 2.3 अंश कमी आहे. हवामान विभागाचे म्हणणे आहे की, येत्या काही दिवसांत दिल्लीतील AQI आणखी वाढू शकतो. हवामान विभागाच्या मते, ज्वालामुखीच्या राखेचा परिणाम केवळ विमानांवर झाला नाही, तर अनेक छायाचित्रे समोर आली, ज्यात राख जमिनीपासून खूप कमी उंचीवरही दिसली. प्रश्न-4: ज्वालामुखीवरून विमान उडवल्यास काय धोका असतो?उत्तर: ज्वालामुखीची राख सामान्य मातीची धूळ नसते. त्यात वितळलेल्या मॅग्माचे बारीक सिलिका आणि लोह, मॅग्नेशियमसारख्या खनिजांचे कण असतात. विमानाचे इंजिन दर सेकंदाला 1 टन हवा आत ओढते. विमान जितके वेगाने उडते, तितक्याच वेगाने हवा इंजिनमध्ये प्रवेश करते. जेव्हा एखादा ज्वालामुखी फुटल्यानंतर विमान त्याच्या राखेच्या ढगातून जाते, तेव्हा विमानाचे इंजिन राखेचे कण आत ओढते. इंजिनच्या उष्णतेमुळे हे कण आत चिकटून राहतात आणि त्यामुळे इंजिन बंद पडते. 1982 मध्ये, ब्रिटिश एअरवेजचे बोइंग 747 विमान इंडोनेशियातील माउंट गलुंगगुंग ज्वालामुखीच्या राखेच्या ढगातून गेले. थोड्याच वेळात विमानाची चारही इंजिने एकाच वेळी बंद पडली. विमान 23 मिनिटे पतंगासारखे ग्लाइड करत राहिले. शेवटी, जेव्हा ते राखेच्या बाहेर आले, तेव्हा इंजिने पुन्हा सुरू झाली. विमानांना ज्वालामुखीच्या राखेच्या धोक्यापासून वाचवण्यासाठी जगभरात 9 व्होल्कॅनिक ॲश ॲडव्हायझरी सेंटर्स आहेत, जे 24 तास देखरेख ठेवतात. जर एखाद्या ज्वालामुखीची राख 20000 फुटांपेक्षा जास्त उंचीवर गेली, तर तात्काळ त्या भागातून जाणाऱ्या विमानांसाठी धोक्याची सूचना जारी केली जाते. प्रश्न-5: ज्वालामुखी कसे तयार होतात?उत्तर: आपली पृथ्वी 7 मोठ्या टेक्टॉनिक प्लेट्समध्ये विभागलेली आहे. जमिनीखालील या प्लेट्स वार्षिक 2 ते 10 सेंटीमीटर वेगाने सरकत असतात. प्लेट्सच्या याच हालचालीमुळे ज्वालामुखी तयार होतात. खरं तर, आफ्रिकन खंड तीन प्लेट्समध्ये विभागलेले आहे - पश्चिमेला न्युबियन प्लेट, पूर्वेला सोमाली प्लेट आणि ईशान्येला अरेबियन प्लेट. या तिन्ही प्लेट्स दरवर्षी 1-2 सेमी एकमेकांपासून दूर जात आहेत. याला ‘ईस्ट आफ्रिकन रिफ्ट’ म्हणतात. पूर्व इथिओपिया सोमाली प्लेटवर आहे, जिथे ही रिफ्ट म्हणजेच प्लेट्सचे दूर सरकणे सर्वात वेगाने होत आहे. जेव्हा प्लेट्स दूर जातात, तेव्हा खालचा मॅन्टल म्हणजे पृथ्वीचा खडकाळ भाग वर येतो. यामुळे दाब वाढतो आणि खडक वितळून मॅग्मा बनतो. त्यामुळे पूर्व इथिओपियाच्या प्रदेशात एर्टा एले, दल्लोल आणि हेली गुब्बी नावाचे जगातील सर्वात सक्रिय आणि धोकादायक ज्वालामुखी उपस्थित आहेत. मॅग्माचा दाब वाढल्याने त्यात स्फोट होतो. यापूर्वी 19 नोव्हेंबर रोजी इंडोनेशियातील जावा बेटावरील माउंट सेमेरू ज्वालामुखीमध्येही स्फोट झाला आहे. प्रश्न-6: इथिओपियातील ज्वालामुखीचा स्फोट एखाद्या आपत्तीचे संकेत आहे का?उत्तर: हेली गुब्बी ज्वालामुखीमध्ये 12 हजार वर्षांनंतर झालेल्या स्फोटाला अनेक वैज्ञानिक असाधारण मानत आहेत. एरियाना सोल्डाती यांच्या मते, ‘इतक्या वर्षांनंतर अचानक स्फोट होणे सामान्य नाही. आश्चर्याची गोष्ट अशी आहे की या प्रदेशात उपस्थित ज्वालामुखींच्या ॲक्टिव्हिटी (गतिविधी) वर खूप कमी संशोधन केले गेले आहे.’ खरं तर, इथिओपियामध्ये हेली गुब्बी ज्वालामुखीव्यतिरिक्त इतरही अनेक ज्वालामुखी फुटत असतात, परंतु ज्वालामुखींवर लक्ष ठेवणाऱ्या संस्थांच्या मते, या स्फोटांच्या संख्येत कोणतीही असामान्य वाढ नोंदवली गेलेली नाही. येथे जगभरातील केवळ 3% सक्रिय ज्वालामुखी आहेत, जे टेक्टॉनिक प्लेट्स दूर सरकल्यामुळे तयार होतात. तर इंडोनेशियामध्ये टेक्टॉनिक प्लेट्स एकमेकांच्या खाली सरकल्यामुळे ज्वालामुखी तयार झाले आहेत. येथे 130 हून अधिक सक्रिय ज्वालामुखी आहेत आणि दरवर्षी किमान 4-5 ज्वालामुखी फुटतात. हे प्रशांत महासागराच्या चारही बाजूंनी असलेल्या 'रिंग ऑफ फायर'च्या अगदी मध्यभागी येते, ज्याला ज्वालामुखी स्फोटांच्या दृष्टीने संवेदनशील मानले जाते. म्हणूनच जगातील 75-80% ज्वालामुखी याच भागात आहेत. जगातील 90% पर्यंतचे भूकंपही याच भागात येतात.
लक्षवेधी : नील अर्थव्यवस्थेचे महत्त्व
– हेमंत देसाई मेरिटाइम इंडिया व्हिजन अंतर्गत दीडशेहून जास्त उपक्रम राबवले गेले. किनारी भागांत प्रचंड रोजगार निर्मिती झाली. समुद्र, किनारे, नद्या व जलस्रोत यांचा वापर करून आर्थिक विकास साधणे म्हणजे ‘ब्लू इकॉनॉमी’ची प्रगती करणे. सागरी संपत्तीतून राष्ट्रविकास साधण्यासाठी केंद्र सरकारने ‘मेरिटाइम इंडिया व्हिजन 2030’ हा उपक्रम सुरू केला आहे. त्याकरिता ‘मेरिटाइम डेव्हलपमेंट फंड’ही उभारण्यात आला […] The post लक्षवेधी : नील अर्थव्यवस्थेचे महत्त्व appeared first on Dainik Prabhat .
शरद पवार गटाच्या सूर्यकांत मोरेंकडून विधिमंडळ सभागृहाचा अवमान
मुंबई : शरद पवार गटाचे सूर्यकांत मोरे यांनी दोन दिवसांपूर्वी अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड येथे झालेल्या सभेत विधानपरिषदेचे सर्व सदस्य, सभापती व राज्याचे सर्वोच्च मानले जाणारे विधानसभा सभागृह याबद्दल आक्षेपार्ह आणि अवमानजनक विधान केले होते. त्यांच्या या विधानाचा व्हिडीओही समाजमाध्यमात व्हायरल झाला होता. मोरे यांनी केलेल्या विधानाबद्दल भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर आणि आ. श्रीकांत भारतीय यांनी विशेषाधिकार भंग नोटीस दाखल केली आहे.सूर्यकांत मोरे यांनी जाहीर सभेत बोलताना तांबड्या रंगाच्या बिल्ल्याला कुणी विचारत नाही व हिरव्या रंगाच्या पिलावळीला मंत्रालयात सचिव लगेच बसा म्हणतात.उडालेले बल आपण ज्याला म्हणतो असे सगळे पुढे बसलेले असतात. कुणी पिक्चर मधून आलेला, कुणी नाटकातून, कुणी क्रिकेटमधून आलेला तर कुणी म्हाताऱ्या माणसातून निवडून गेलेला असे सर्व उडालेले बल तिथे आहेत. तसेच सभापतींबाबत बोलताना त्यांनी म्हटले कि, सभापतींचे काम हे सभागृहातील मत मोजणी करण्याएवढेच आहे. पंचायत समितीच्या सभापतीला जे अधिकार आहेत ते अधिकार देखील विधानपरिषदेच्या सभापतींना नाही. सभापतींसमोर २८८ सदस्य बसत नाहीत. केवळ ७०-७५ सदस्य बसतात. सभापती कायदे बनवीत नाहीत. अधिवेशनाचे कामकाज वर्षभरातून केवळ तिसच दिवस होते. विधानपरिषद सभागृहाचे कार्पेट व एकूणच सभागृहाची रचना ही लाल रंगात असून विधानसभेची हिरव्या रंगात आहे. विधानपरिषदेचा लाल रंग हा दुष्काळाचे प्रतिक असल्याचे विधानही त्यांनी केले होते.
ह्रदयद्रावक..! लग्नानंतर अर्ध्या तासातच नवरदेव कोसळला; लग्नमांडवात शोककळा, नेमकं काय घडलं?
अमरावती : लग्न हा आयुष्यातील सगळ्यात आनंदाचा क्षण मानला जातो, पण अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील पुसला गावात आज हा आनंद काही क्षणांतच विरून गेला. लग्नविधी पूर्ण होऊन अवघ्या अर्ध्या तासात नवविवाहित अमोल गोड (वय ३२) यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि ते नवरीसमोरच कोसळले. रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. पुसला येथील तलाठी कार्यालयात कोतवाल म्हणून […] The post ह्रदयद्रावक..! लग्नानंतर अर्ध्या तासातच नवरदेव कोसळला; लग्नमांडवात शोककळा, नेमकं काय घडलं? appeared first on Dainik Prabhat .
ठाण्यात बेकायदेशीर डान्स बारवर छापा; ६ जणांना अटक
ठाणे – ठाणे जिल्ह्यात महात्मा फुले चौक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कल्याण परिसरात बेकायदेशीरपणे चालवल्या जाणाऱ्या डान्स बारवर पोलिसांनी छापा टाकत, मालक आणि व्यवस्थापकासह सहा जणांना अटक केली आहे. अश्लील नृत्य सादरीकरणाबाबत मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी हा छापा टाकला. बारच्या हॉलमध्ये १५ महिला जमल्या होत्या. तसेच मालक, व्यवस्थापक, कॅशियर, वेटर आणि इतर कर्मचाऱ्यांसह १३ जण बेकायदेशीर कृत्यांना […] The post ठाण्यात बेकायदेशीर डान्स बारवर छापा; ६ जणांना अटक appeared first on Dainik Prabhat .
सायन प्रतीक्षा नगर येथील चार इमारती अतिधोकादायक घोषित
सायन प्रतीक्षानगर येथील म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या संक्रमण शिबिरातील चार इमारती अतिधोकादायक असल्याचे आयआयटी, पवईच्या संरचनात्मक तपासणी अहवालात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता या चार इमारती रिकाम्या करुन त्यांचा मुंबई मंडळाच्या माध्यमातून पुनर्विकास करण्याचा निर्णय म्हाडा प्राधिकरणाने घेतला. त्यानुसार या चारही इमारतीतील संक्रमण शिबिरांचे गाळे रिकामे करण्याच्या नोटीसा रहिवाशांना बजावण्यात आल्या आहेत. मात्र रहिवाशांनी यास विरोध दर्शवला आहे.सायन प्रतिक्षानगर म्हाडा संक्रमण शिबिरातील टी-३६, टी-३७, टी-५३ आणि टी-५४ या इमारती धोकादायक असून 'गाळे तात्काळ रिकामी' करण्याचा फ्लेक्सद्वारे जाहीर केल्यानंतर रहिवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या फ्लेक्स मध्ये आयआयटीद्वारे या इमारतींचा स्ट्रक्चरल ऑडिटचा करण्यात आल्याचा उल्लेख करण्यात आला असून या इमारती राहण्यासाठी धोकादायक असल्याचे फ्लेक्समध्ये नमूद करण्यात आले आहे. अचानक आणि कोणतीही पूर्वसूचना न देता अशा प्रकारचे फ्लेक्स लावून म्हाडाने रहिवाश्यांवर बिल्डिंग रिकामी करा असा दबाव टाकत असल्याचा आरोप रहिवाशांमार्फत करण्यात येत आहे.रहिवाशांच्या मते, इमारती धोकादायक असल्याचे सांगत म्हाडाने फ्लेक्सवरून तात्काळ गाळे रिकामे करण्याचे आवाहन केले असले तरी प्रत्यक्षात स्थलांतराची कोणतीही पारदर्शक प्रक्रिया, योग्य बैठक, लेखी हमी किंवा संवाद साधला गेलेला नाही. त्यातच फ्लेक्सवर दिलेले पर्याय; संक्रमण शिबिरातील गाळे किंवा २० हजार रुपये प्रतिमहिना भाडे, हे अपुरे, अव्यवहार्य आणि रहिवाशांच्या संख्येच्या तुलनेत अत्यंत कमी असल्याची भावना रहिवाशांनी व्यक्त केली. रहिवाश्यांनी म्हाडाला मागणी केली आहे की, अचानक फ्लेक्स लावून लोकांमध्ये भीती निर्माण करणे थांबवावे. पुनर्विकासाची अधिकृत माहिती, दस्तऐवज, वेळापत्रक व हमीपत्र द्यावे. प्रत्यक्ष सर्वसामान्यांशी चर्चा करून लोकशाही पद्धतीने निर्णय घ्यावा. दरम्यान म्हाडाच्या निर्णयाविरोधात रहिवाश्यांनी एकजुटीने पुढील आंदोलनाची तयारी सुरू केली आहे.आयआयटीच्या अहवालानुसार आता म्हाडाच्या उपाध्यक्षांनी या चारही इमारतींचा पुनर्विकास मुंबई मंडळाच्या माध्यमातून करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार कार्यवाही सुरू आहे. दुसरीकडे दुरुस्ती मंडळाने या अतिधोकादायक इमारतीतील २५० ते २७५ रहिवाशांना गाळे रिकामे करण्याच्या नोटीसा बजावल्या आहेत. इतर संक्रमण शिबिरातील गाळे वा महिना २० हजार रुपये घरभाडे असे दोन पर्यायही दुरुस्ती मंडळाने रहिवाशांना दिले आहेत. तेव्हा आता हे गाळे रिकामे करुन पुनर्विकासाचे काम हाती घेण्याचे आव्हान दुरुस्ती मंडळासह मुंबई मंडळासमोर असेल. दरम्यान दुरुस्ती मंडळाकडून देण्यात आलेल्या पर्यायांपैकी कोणताही एक पर्याय निवडून गाळे रिकामे न केल्यास आणि भविष्यात कोणतीही पडझड वा दुर्घटना झाल्यास त्यात जिवितहानी, वित्तहानी झाल्यास दुरुस्ती मंडळ जबाबदार राहणार नाही, असे दुरुस्ती मंडळाने इमारतीबाहेर लावलेल्या आवाहनात नमूद केले आहे
बॉलिवूड ड्रग प्रकरण ; सिद्धांत कपूरची ANC कडून चौकशी
मुंबई : बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा ड्रग्ज सिंडिकेटचे सावट गडद होताना दिसत आहे. मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी विभागाने (ANC) अलिकडील काही दिवसांत अनेक कलाकारांना चौकशीसाठी नोटिसा पाठवल्यानंतर या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. याच पार्श्वभूमीवर अभिनेता आणि दिग्दर्शक शक्ती कपूर यांचा मुलगा सिद्धांत कपूर आज चौकशीसाठी घाटकोपर येथील एएनसी कार्यालयात पोहोचला.एएनसीच्या घाटकोपर युनिटने सिद्धांत कपूरला अधिकृतरीत्या समन्स बजावले होते. याच प्रकरणात सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ऑरीलाही बुधवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दुबईमधून आणण्यात आलेल्या मुख्य ड्रग सप्लायर मोहम्मद सलीम सोहेल शेख उर्फ ‘लॅविश’ यांच्या चौकशीत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींची नावे समोर आल्यामुळे पोलिसांनी संबंधितांना चौकशीसाठी बोलावण्यास सुरुवात केली आहे. सिद्धांत कपूर हा पहिला अभिनेता आहे, ज्याचा या प्रकरणी अधिकृतपणे जबाब नोंदवला जात आहे.सुत्रांनुसार, महाराष्ट्रातील सांगली येथील एका औद्योगिक युनिटमध्ये जवळपास २५२ कोटी रुपये किमतीचे मेफेड्रोन (MD) जप्त झाल्यानंतर पोलीस तपासाचा फोकस या रॅकेटकडे वळला आहे. चौकशीत मुख्य आरोपी शेखने भारतात आणि विदेशात आयोजित करण्यात आलेल्या मोठ्या ड्रग पार्ट्यांबद्दल माहिती दिली असून, त्यात बॉलिवूड कलाकार, मॉडेल, रॅपर्स, निर्माते आणि अंडरवर्ल्ड दाऊद इब्राहिमशी संबंधीत लोकही उपस्थित असायचे, असा दावा केला आहे.सिद्धांत कपूरला चौकशीसाठी का बोलावले ?पोलीस तपासात मिळालेल्या काही दस्तऐवजांमध्ये सिद्धांत कपूरचे नाव त्या हाय-प्रोफाइल पार्ट्यांच्या उपस्थितांच्या यादीत असल्याचे आढळून आल्याची माहिती आहे. एएनसीने मात्र स्पष्ट केले की, केवळ नाव आढळल्यावर चौकशीसाठी बोलावणे म्हणजे व्यक्ती दोषी आहे, असे नाही. सध्या सिद्धांतला फक्त स्पष्टीकरण आणि माहिती घेण्यासाठी समन्स देण्यात आले आहे.
मुंबई : मुंबईच्या चेंबूर परिसरात एका मंदिरात घडलेल्या विचित्र घटनेने मोठा धार्मिक वाद निर्माण केला आहे. वाशी नाका भागातील काली मातेच्या मूर्तीला ‘मदर मेरी’ प्रमाणे पोशाख घालण्यात आल्यानंतर हिंदू संघटनांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. मूर्तीवरील पोशाख बदलाचा हा प्रकार उघडकीस येताच पोलिसांनी मंदिरातील पुजारीला तातडीने ताब्यात घेतले असून त्याच्यावर भारतीय दंडसंहिता कलम २९५ अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मंदिरातील पुजारी रमेश याने स्वतःच काली मातेच्या मूर्तीला मदर मेरीसारखा पोशाख परिधान केला होता. मूर्तीचे संपूर्ण रूपच वेगळ्या धार्मिक प्रतिकासारखे दिसत असल्याने स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली. चौकशीत पुजाऱ्याने दावा केला की, “देवीने स्वप्नात येऊन मदर मेरीचा पोशाख घालण्यास सांगितले.” मात्र हिंदू संघटनांनी हा दावा तात्काळ फेटाळून लावत, हा जाणीवपूर्वक केला गेलेला अवमान असल्याचे सांगितले.वाद वाढताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुजारी रमेशला ताब्यात घेतले. न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांच्या तपासात या कृतीमागे काही मिशनरी लोकांनी प्रलोभन अथवा आर्थिक मदत दिल्याचा आरोपही समोर आला असून, त्या दिशेनेही चौकशी सुरू आहे.घटनेनंतर बजरंग दलासह विविध हिंदुत्ववादी संघटनांनी या कृत्याचा तीव्र निषेध केला. संघटनांनी मंदिर परिसरात आंदोलन करून, प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली. या संपूर्ण प्रकरणामुळे चेंबूर परिसरात धार्मिक वातावरण तापले असून पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आहे. पुढील चौकशी सुरू आहे.
लाडकी बहीण योजना कायम राहणार; नगरपालिकांवर भगवा फडकवण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे आवाहन
अकोला : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोला जिल्ह्यातील हिवरखेड येथील सभेत मतदारांना उद्देशून मोठी घोषणा केली. अयोध्या राममंदिरातील कळस व धर्मध्वज अनावरणाचा उल्लेख करत त्यांनी नगरपालिकांवरही भगवा झेंडा फडकवण्याचे आवाहन केले. “अयोध्येच्या मंदिरावर भगवा फडकला, तसाच भगवा हिवरखेड, तेल्हारा आणि अकोट नगरपालिकांवरही फडकला पाहिजे,” असे फडणवीस म्हणाले.मुख्यमंत्री म्हणाले की, भाजपने प्रत्येक शहराच्या विकासासाठी स्पष्ट आराखडा तयार केला आहे. राज्यातील अनेक गावांवर लक्ष दिले गेले, मात्र शहरांच्या मूलभूत सुविधांकडे दीर्घकाळ दुर्लक्ष झाल्याने शहरी भाग बकाल झाले आहेत. पारदर्शक आणि जबाबदार कामकाजासाठी भाजपचे उमेदवार पुढे केले असल्याचे त्यांनी नमूद केले.“जोपर्यंत मी मुख्यमंत्री आहे, लाडकी बहीण योजना बंद होणार नाही”फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेवरही भाष्य करत महत्त्वाचा संदेश दिला. “निवडणुकांच्या काळात विरोधकांनी पसरवले की सरकार ही योजना थांबवेल. पण माझ्या बहिणींना मी स्पष्ट सांगतो, तुमचा ‘देवाभाऊ’ मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजना कधीच बंद होऊ देणार नाही,” असे त्यांनी आश्वासन दिले.ते पुढे म्हणाले की, गेल्या वर्षभरात सरकारने कोणतीही योजना बंद केली नाही; उलट लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांना मोफत वीज, पिकविमा, आणि कृषीविषयक अनेक निर्णय सातत्याने राबवले जात आहेत. “आम्ही फक्त आश्वासनाची राजकारण करणारे नसून लोकांच्या जीवनात प्रत्यक्ष बदल घडवण्यावर आमचा भर आहे,” असे ते म्हणाले.अयोध्येतील राममंदिराच्या कळस व धर्मध्वज अनावरणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री म्हणाले की, मंदिराचे काम पूर्णत्वास येते तेव्हा कळस बांधला जातो. “आज अयोध्या पूर्ण झाली, आता तुमच्या परिसरात विकासाचा कळस चढवण्याची जबाबदारी तुमच्या हातात आहे,” असे ते म्हणाले.सभेनंतर मुख्यमंत्री बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे जाऊन ११ नगरपरिषदांच्या भाजप उमेदवारांच्या प्रचाराला संबोधित केले.
भोरमधील ‘नाटंबी’देवराई धोक्यात! महादेवाच्या टेकडीवर बेकायदा वृक्षतोड; ग्रामस्थांची वनविभागाकडे धाव
पुणे/भोर : भोर तालुक्यातील नाटंबी येथील नीरा नदीच्या काठावर असलेल्या महादेवाच्या मंदिराच्या टेकडीवरील देवराई वनखात्याची कोणतीही परवानगी न घेता तोडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. साईबेज कंपनी आणि काही व्यक्तींनी संगनमत करून ही छोटी-मोठी झाडे तोडली असून, यामुळे संपूर्ण देवराई धोक्यात आली आहे. ग्रामस्थांची लेखी तक्रार: कारवाईकडे लक्ष या गंभीर घटनेनंतर नाटंबी येथील ग्रामस्थांनी तातडीने […] The post भोरमधील ‘नाटंबी’ देवराई धोक्यात! महादेवाच्या टेकडीवर बेकायदा वृक्षतोड; ग्रामस्थांची वनविभागाकडे धाव appeared first on Dainik Prabhat .
“हरकती आणि सूचनांसाठी १५ दिवसांची मुदत वाढवावी”; काँग्रेसची निवडणुक आयोगाकडे मागणी
मुंबई – प्रारूप मतदार यादीतील अनियमिततेचा आरोप करत, काँग्रेसने राज्य निवडणूक आयोगाकडे हरकती आणि सूचना सादर करण्याची अंतिम मुदत १५ दिवसांनी वाढवण्याची मागणी केली आहे. प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, नेते विजय वडेट्टीवार आणि सतेज पाटील यांनी स्वाक्षरी केलेले पत्र आयोगाला सादर केले. पक्षाने पत्रात म्हटले की, प्रारूप मतदार यादी २० नोव्हेंबर रोजी प्रकाशित झाली. […] The post “हरकती आणि सूचनांसाठी १५ दिवसांची मुदत वाढवावी”; काँग्रेसची निवडणुक आयोगाकडे मागणी appeared first on Dainik Prabhat .
अलिबाग-मुरुड बस सेवा ठप्प ; प्रवाशांचा खोळंबा
नांदगाव मुरुड ( वार्ताहर): अलिबाग आगारातून मुरुडकडे जाणाऱ्या एसटी बस सेवेत मंगळवारी गंभीर गफलत पाहायला मिळाली. दुपारी तीन ते सव्वा सहा दरम्यान मुरुडसाठी एकही बस न सुटल्याने या मार्गावरुन प्रवास करणार्या प्रवाशांना तीन साडेतीन तास खोळंबून रहावे लागले. या ताणतणावामुळे प्रवाशांचा गोंधळ उडाला आणि त्यांनी वाहतूक प्रशासनाच्या या गलथान कारभारावर संतापासह नाराजी व्यक्त केली. प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी दुपारी तीन वाजल्यापासून सव्वा सहापर्यंत अलिबाग आगारात प्रवाशी बसची वाट पाहत उभे होते, परंतु मुरुडकडे जाणारी एकही बस फलाटावर आली नाही. अनेक प्रवाशांना कामावर, मुलांच्या शाळेत किंवा वैद्यकीय कारणास्तव मुरुडला जायचे होते. परंतु बस न सुटल्याने त्यांना त्रास सहन करावा लागला असे त्यांनी सांगितले.मुरुड आगार प्रमुख राहुल शिंदे यांनी याबाबत विचारणा केली असता, 'अलिबाग आगारातून मुरुडला जाणारी बस पाच वाजता सुटली आहे,' असा दावा केला. मात्र, प्रवाशांचा अनुभव आणि आगारातील परिस्थिती यानुसार बस वेळेवर निघालेली नव्हती. अलिबाग आगारात चौकशी केली असता तेथील अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार मुरुडकडे जाणाऱ्या बसेस मुख्यतः मुरुड आगारातून निघालेल्या असतात, अलिबाग आगाराची बस या मार्गावर नियमित निघत नाही. त्यामुळे प्रवाशांना वेळेवर मुरुडला पोहोचण्यासाठी अतिरिक्त व्यवस्था करावी लागते. स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनी या परिस्थितीवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. प्रवाशांना वेळेवर माहिती देणे आणि वाहतूक व्यवस्थापन मजबूत करण्याची आवश्यकता असल्याचेही मत व्यक्त केले जात आहे.यामुळे अलिबाग-मुरुड मार्गावर बस सेवा सुधारण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे.
रोहित शर्मा टी-२० विश्वचषकाचा ब्रँड अॅम्बेसेडर
दुबई : भारताच्या माजी कर्णधार आणि दोन वेळा टी-२० विश्वचषक विजेता रोहित शर्मा याची आगामी टी-२० विश्वचषक २०२६ साठी ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भारत आणि श्रीलंका येथे ७ फेब्रुवारीपासून ८ मार्चपर्यंत होणाऱ्या या स्पर्धेत रोहित या नव्या भूमिकेतून सहभागी होणार आहेत. रोहितने २०२४-मध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करत त्यांना टी-२० विश्वचषक जिंकवला होता. याआधी २००७ मध्येही तो विजयी संघाचा भाग होता. त्यामुळे दोन वेळा विश्वविजेता संघाचा अनुभव असलेल्या मोजक्या खेळाडूंपैकी तो एक आहे.टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांत रोहितने तब्बल ४२३१ धावा केल्या आणि त्याची स्ट्राईक रेट १४०.८९ आहे. त्याच्या आक्रमक सुरुवातीमुळे भारतीय संघाला अनेक विजय मिळाले आहेत. २००७ च्या स्पर्धेत दक्षिण आफ्रिका व पाकिस्तानविरुद्ध त्याच्या नाबाद भूमिका चर्चेत आल्या. त्यानंतर २०२४मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४१ चेंडूंत ९२ धावा आणि इंग्लंडविरुद्ध ३९ चेंडूंत ५७ धावा करून तो चमकला. विश्वविजयानंतर रोहितने टी-२० क्रिकेटपासून निवृत्ती घेतली होती. परंतु आता “अॅम्बेसेडर” म्हणून जागा घेत असून तो या स्पर्धेशी नव्या भूमिकेत उभा राहणार आहे.या नियुक्तीबाबत बोलताना रोहित म्हणाला की, “हा विश्वचषक पुन्हा भारतात होतोय याचा आनंद मोठा आहे. नव्या भूमिकेत मन लावून सहभागी होणार असून सर्व खेळाडूंना शुभेच्छा देतो. भारताच्या आदरातिथ्याचा अनुभव खेळाडूंना मिळो आणि त्यांच्याकडे संस्मरणीय अभिज्ञता घेऊन जातील अशी आशा आहे.”
मुंबई : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या पीए अनंत गर्जे यांच्या पत्नी गौरी गर्जे यांच्या मृत्यू प्रकरणात खुलासे होऊ लागले आहेत. गौरीचे वडील अशोक पालवे यांनी पत्रकार परिषद घेऊन अनंत गर्जे व त्यांच्या कुटुंबियांवर गंभीर आरोप करत तपास प्रक्रियेतील अनेक त्रुटींचा पाढा वाचला.अशोक पालवे यांनी सांगितले की, गौरीचा मृत्यू आत्महत्येमुळे नसून मारहाणीमुळे झाल्याचा त्यांना ठाम संशय आहे. गळ्यावर गळफासाचे व्रण नसताना तिच्या छातीवर व डोक्यावर जखमांचे ठसे स्पष्ट दिसत होते, असा दावा त्यांनी केला. या खुणा असूनही तपास अधिकारी यादव यांनी काहीही नसल्याचे सांगितल्याचा त्यांनी आरोप केला. पोस्टमॉर्टेम ‘इन-कॅमेरा’ करण्यात आला, कुटुंबियांना आत प्रवेश दिला नाही, सही घेण्यात आली नाही आणि पंचनामा कुटुंबीय पोहोचण्यापूर्वीच झाला, यावर त्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले.घटनेच्या वेळी अनंत गर्जेच्या वर्तनाबाबतही पालवे यांनी संशय व्यक्त केला. घटनेनंतर तो अचानक गायब झाल्याने शंका अधिकच वाढत असल्याचे ते म्हणाले. “जर काही गुन्हा केला नसेल, तर पती घटनास्थळ व कुटुंबियांपासून दूर का राहिला?” असा सवाल पालवे यांनी उपस्थित केला.अशोक पालवे यांनी पत्रकार परिषदेत आणखी एक महत्त्वपूर्ण दावा केला. घर बदलताना गौरीला काही महत्त्वाचे कागदपत्रे सांभाळायला दिली होती. त्यात तिला २०२१ मध्ये अंबाजोगाईतील एका मुलीच्या सोनोग्राफी व गर्भपाताचा रिपोर्ट सापडला. त्या रिपोर्टवर “पती – अनंत गर्जे” असे नाव असल्याचा दावा पालवे यांनी केला. हा रिपोर्ट त्यांनी पोलिसांना दिल्याचेही त्यांनी सांगितले.पंकजा मुंडे यांनी दुसऱ्या दिवशी फोन करून निष्पक्ष तपासाचे आश्वासन दिल्याचे अशोक पालवे यांनी सांगितले. “ताईंच्या विश्वासाने आम्ही मुलगी दिली; आज आम्हाला न्याय हवा आहे,” असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.गौरी आत्महत्या करण्यासारखी व्यक्ती नव्हती, ती मानसिकदृष्ट्या सक्षम होती आणि तिच्या सहकाऱ्यांनीही तसेच सांगितल्याचा उल्लेख करत पालवे यांनी हा मृत्यू आत्महत्येचा नसून संशयास्पद असल्याचे पुन्हा अधोरेखित केले. त्यांनी तात्काळ, वेगवान आणि निष्पक्ष तपासाची मागणी केली आहे.
ममता बॅनर्जींच्या हेलिकॉप्टर उड्डाणाला नकार; भाजपवर ‘राजकीय घातपात’चा आरोप
कोलकता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे हेलिकॉप्टर उड्डाण मंगळवारी अचानकपणे रद्द झाले. त्यामुळे संतापलेल्या ममतांनी भाजपवर निशाणा साधत राजकीय घातपाताचा आरोप केला. ममतांच्या बोनगांव दौऱ्यासाठी भाडेकरारावर हेलिकॉप्टर निश्चित करण्यात आले. मात्र, परवान्याची मुदत संपली असल्याने आणि विमाविषयक त्रुटींमुळे त्या हेलिकॉप्टरच्या उड्डाणास परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे ममतांना कारने प्रवास करणे भाग पडले. संबंधित ठिकाणी […] The post ममता बॅनर्जींच्या हेलिकॉप्टर उड्डाणाला नकार; भाजपवर ‘राजकीय घातपात’चा आरोप appeared first on Dainik Prabhat .
वसईत विषारी वायूची गळती ; १३ जण बाधित
वसई : पाण्याच्या टाकीजवळ असणाऱ्या वायूच्या सिलेंडरमधून विषारी वायूची गळती झाली. या वायू गळतीमुळे परिसरातील नागरिकांना श्वास घेण्यास त्रास झाला असून, एकूण १३ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वसई पश्चिमेच्या दिवाणमान परिसरात ही घटना उघडकीस आली आहे. दक्षता म्हणून महापालिका अधिकाऱ्यांनी पाण्याच्या टाकी समोरील दोन इमारती खाली केल्या आहेत. दिवाणमान परिसरात महापालिकेच्या पाण्याची टाकी आहे.मंगळवारी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास या पाण्याच्या टाकीजवळ असणाऱ्या क्लोरिनच्या टाकीतून अचानक वायूची गळती सुरू झाली. यामुळे परिसरात वेगाने हिरवा विषारी वायू पसरू लागला. या ठिकाणी दाट नागरी वस्ती असल्याने अनेक नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. अधिक त्रास असणाऱ्या १३ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.यापैकी ३ जणांची प्रकृती गंभीर आहे. रूग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांमध्ये स्थानिक नागरिकांसह महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. दरम्यान, महापालिका आरोग्य विभाग आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी क्लोरिनचा सिलेंडर त्या परिसरातून हटवला आहे. मात्र, वायू विषारी असल्यामुळे बाधित परिसर सील करण्यात आला असून नागरिकांना या परिसरात जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. तसेच क्लोरिन वायूची टाकी गास परिसरातील नाल्यात टाकून टाकीची विल्हेवाट लावण्यात आली आहे.अशाप्रकारे झाली विषारी वायुगळतीदिवाणमान येथील पाण्याच्या टाकीतून आसपासच्या परिसरात पाणीपुरवठा केला जातो. गेल्या काही दिवसांपासून या टाकीचा व्हॉल्व बिघडल्यामुळे पाण्याची गळती सुरू होती. त्यामुळे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून पाण्याच्या टाकीच्या व्हॉल्व दुरुस्तीचे काम सुरू होते. दुरुस्ती ज्या भागात सुरू आहे. त्याच्या मागच्या बाजूस असणाऱ्या खोलीत १० ते १५ वर्ष जुनी क्लोरिन वायूची टाकी ठेवण्यात आली होती. व्हॉल्व दुरुस्तीसाठी आलेल्या एका कर्मचाऱ्याचा धक्का या टाकीला लागला आणि टाकी जमिनीवर कोसळली. आणि टाकीतून वायू वळती सुरू झाली.
नवनीत राणांनी व्यक्त केली खासदार होण्याची इच्छा, मुख्यमंत्र्यांनी दिलं हे उत्तर
अमरावती : अमरावतीच्या धारणी नगरपंचायतीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुनील चोथमल आणि धारणीमधील भाजपच्या सर्व उमेदवारांच्या प्रचार सभेत माजी खासदार नवनीत राणा यांनी मी पुन्हा येईन, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच पुन्हा खासदार होण्याची इच्छा व्यक्त केली. नवनीत राणा यांनी इच्छा व्यक्त केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी त्यावर सूचक वक्तव्य केले आहे.आमची माजी खासदार आता तुमच्या आशीर्वादाने माजी खासदार राहणार नाही, असे म्हणत नवनीत राणांच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांनी दुजोरा दिला. धारणी येथील नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारसभेत देवेंद्र फडणवीसांनी नवनीत राणांच्या खासदारपदाविषयी सूचक वक्तव्य केल्यानंतर आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. नवनीत राणा यांना राज्यसभेवर पाठवणार किंवा एखादी मोठी जबाबदारी देणार अशी चर्चा आहे.मुख्यमंत्र्यांच्या सूचक वक्तव्यावर नवनीत राणा काय म्हणाल्या ?'देवा भाऊ राज्यातील सगळ्या महिलांच्या डोक्यावर हात ठेवून महिलांना विश्वास दिला आहे. सर्व महिलांच्या पाठीशी ते उभे आहेत.भावासमोर बहिणींनी बोलणं काही नवल नाही. यापूर्वी देवा भाऊंनी शायरी केली होती. मेरा पाणी उतरता देख किनारे पे घर मत बांध लेना,मै समंदर हू मै फिर लोट के आऊंगा...मी त्याच पद्धतीने देवा भाऊ समोर माझ मत व्यक्त केलं आहे. मै फिर के आऊंगी.. मी पुन्हा येईल असं म्हटलं यात काही चुकीचं नाही...आणि माझ्या भावाने सांगितलं की माजी खासदार नवनीत राणा या माजी राहणार नाही, माझ्या माहेरी येऊन शब्द दिलेला आहे आणि देवा भाऊ हे शब्द पाळणारे आहेत.'
टी-२० विश्वचषक २०२६चे वेळापत्रक जाहीर, १५ फेब्रुवारीला भारत-पाकिस्तान सामना
दुबई : आयसीसीने २०२६ च्या पुरुष टी-२० विश्वचषकाचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले असून, भारताचा पहिला सामना ७ फेब्रुवारीला अमेरिकेविरुद्ध मुंबईत होणार आहे. सर्वांच्या लक्षात असलेल्या भारत-पाकिस्तान लढतीची तारीखही निश्चित झाली आहे. हा सामना १५ फेब्रुवारी रोजी कोलंबो येथे सायंकाळी होणार असून, पुन्हा एकदा दोन्ही प्रतिस्पर्ध्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.भारत, पाकिस्तान, अमेरिका, नेदरलँड्स आणि नामिबिया असा एकूण पाच संघांचा ग्रुप ‘अ’ तयार करण्यात आला आहे. भारत आपले चारही सामने मुंबई, दिल्ली, कोलंबो आणि अहमदाबाद या मैदानांवर खेळणार आहे.या स्पर्धेसाठी भारतातील मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई, अहमदाबाद तसेच श्रीलंकेतील कोलंबो आणि कँडी अशी आठ स्थळे निवडली आहेत. अंतिम सामना ८ मार्चला अहमदाबाद किंवा कोलंबो येथे आयोजित होईल. दोन सेमीफायनल ४ आणि ५ मार्च रोजी कोलकाता/कोलंबो आणि मुंबई येथे होणार आहेत.या सोहळ्यात माजी कर्णधार रोहित शर्मा यांना विश्वचषकाचे दूत म्हणून जाहीर करण्यात आले. २०२४ मध्ये विश्वविजेतेपद मिळवल्यानंतर भारतीय संघावर देशभरातून अपेक्षांची पहाडाएवढी जबाबदारी आहे. आता सूर्यकुमार यादव संघाचे नेतृत्व करणार आहे.या स्पर्धेत एकूण २० संघ नव्या आवृत्तीमध्ये खेळणार असून, गटपुढारीतून मिळणारे गुण आणि नॉकआऊट फेरीतील ताणांनी ही स्पर्धा अधिक थरारक होणार आहे. भारताने दशकानंतर पुन्हा आपल्या भूमीत टी-२० विश्वचषक आयोजित केला आहे, त्यामुळे चाहत्यांमध्ये उत्साह ओसंडून वाहत आहे.भारताच्या लढती:७ फेब्रुवारी - भारत विरुद्ध अमेरिका, मुंबई१२ फेब्रुवारी - भारत विरुद्ध नामिबिया, दिल्ली१५ फेब्रुवारी - भारत विरुद्ध पाकिस्तान, कोलंबो१८ फेब्रुवारी - भारत विरुद्ध नेदरलँड्स, अहमदाबाद--------------------गटग्रुप एभारत, पाकिस्तान, अमेरिका, नेदरलँड्स, नामिबियाग्रुप बीइंग्लंड, वेस्ट इंडिज, बांगलादेश, नेपाळ, इटलीग्रुप सीश्रीलंका, ऑस्ट्रेलिया, आयर्लंड, झिंबाब्वे, ओमानग्रुप डीदक्षिण आफ्रिका,न्यूझीलंड, अफगाणिस्तान, यूएई, कॅनडा---------------------------------संपूर्ण वेळापत्रकतारीख सामना स्थळ वेळ७ फेब्रु पाकिस्तान वि. नेदरलँड्स कोलंबो ११:००७ फेब्रु वेस्ट इंडिज वि. बांगलादेश कोलकाता ३:००७ फेब्रु भारत वि. अमेरिका मुंबई ७:००८ फेब्रु न्यूझीलंड वि. अफगाणिस्तान चेन्नई ३:००८ फेब्रु इंग्लंड वि. नेपाळ मुंबई ७:००८ फेब्रु श्रीलंका वि. आयर्लंड कोलंबो ७:००९ फेब्रु बांगलादेश वि. इटली कोलकाता ११:००९ फेब्रु झिंबाब्वे वि. ओमान कोलंबो ३:००९ फेब्रु दक्षिण आफ्रिका वि. कॅनडा अहमदाबाद ७:००१० फेब्रु नेदरलँड्स वि. नामिबिया अहमदाबाद ११:००१० फेब्रु न्यूझीलंड वि. यूएई चेन्नई ३:००१० फेब्रु पाकिस्तान वि. यूएई कोलंबो ७:००११ फेब्रु दक्षिण आफ्रिका वि. अफगाणिस्तान अहमदाबाद ३:००११ फेब्रु ऑस्ट्रेलिया वि. आयर्लंड कोलंबो ७:००११ फेब्रु इंग्लंड वि. वेस्ट इंडिज मुंबई ७:००१२ फेब्रु श्रीलंका वि. ओमान कँडी ३:००१२ फेब्रु नेपाळ वि. इटली मुंबई ७:००१२ फेब्रु भारत वि. नामिबिया दिल्ली ७:००१३ फेब्रु ऑस्ट्रेलिया वि. झिंबाब्वे कोलंबो ३:००१३ फेब्रु कॅनडा वि. नामिबिया कोलंबो ७:००१३ फेब्रु अमेरिका वि. नेदरलँड्स चेन्नई ७:००१४ फेब्रु आयर्लंड वि. ओमान कोलंबो ११:००१४ फेब्रु इंग्लंड वि. बांगलादेश कोलकाता ३:००१४ फेब्रु न्यूझीलंड वि. दक्षिण आफ्रिका अहमदाबाद ७:००१५ फेब्रु वेस्ट इंडिज वि. नेपाळ मुंबई ११:००१५ फेब्रु अमेरिका वि. नामिबिया चेन्नई ३:००१५ फेब्रु भारत वि. पाकिस्तान कोलंबो ७:००१६ फेब्रु अफगाणिस्तान वि. यूएई दिल्ली ११:००१६ फेब्रु इंग्लंड वि. इटली कोलकाता ३:००१६ फेब्रु ऑस्ट्रेलिया वि. श्रीलंका कँडी ७:००१७ फेब्रु न्यूझीलंड वि. कॅनडा चेन्नई ३:००१७ फेब्रु आयर्लंड वि. झिंबाब्वे कँडी ७:००१८ फेब्रु बांगलादेश वि. नेपाळ मुंबई ११:००१८ फेब्रु दक्षिण आफ्रिका वि. यूएई दिल्ली ३:००१८ फेब्रु पाकिस्तान वि. नामिबिया कोलंबो ३:००१८ फेब्रु भारत वि. नेदरलँड्स अहमदाबाद ७:००१९ फेब्रु इटली वि. वेस्ट इंडिज कोलकाता ३:००१९ फेब्रु श्रीलंका वि. झिंबाब्वे कोलंबो ७:००२० फेब्रु अफगाणिस्तान वि. कॅनडा चेन्नई ३:००२० फेब्रु ऑस्ट्रेलिया वि. ओमान कँडी ७:००२२ फेब्रु वाय१ वि. वाय४ कँडी ३:००२३ फेब्रु एक्स२ वि. एक्स३ अहमदाबाद ७:००२४ फेब्रु वाय२ वि. वाय३ मुंबई ७:००२५ फेब्रु एक्स१ वि. एक्स४ कोलंबो ७:००२६ फेब्रु वाय३ वि. वाय४ अहमदाबाद ३:००२७ फेब्रु एक्स२ वि. एक्स४ चेन्नई ७:००२८ फेब्रु वाय१ वि. वाय२ कोलंबो ३:००१ मार्च एक्स१ वि. एक्स३ कोलकाता ७:००४ मार्च उपांत्य सामना १ कोलकाता/कोलंबो वेळ – पुढे जाहीर५ मार्च उपांत्य सामना २ मुंबई वेळ – पुढे जाहीर८ मार्च महाअंतिम सामना अहमदाबाद/कोलंबो वेळ – पुढे जाहीर
जिहेकठापूर बाबत सेवागिरी मंदिरात खुली चर्चा करा : आ. शशिकांत शिंदे
पुसेगाव : खटाव तालुक्याला वरदान ठरणाऱ्या जिहेकठापूर उपसा सिंचन योजनेचे श्रेय माझ्यासह अनेकांचे आहे. मी जलसंपदा मंत्री असताना या योजनेच्या रखडलेल्या कामांना मोठा निधी मिळवला होता. नेर धरणाच्या वरच्या भागातील आणि खाली दरजाईपर्यंतची गावे या योजनेत घेण्याचा ठराव माझ्या मंत्रीपदाच्या कार्यकाळात करुन सर्वेक्षणासाठी निधीही आम्ही मंजूर केला होता. मात्र कावळा बसायला आणि फांदी मोडायला अशा […] The post जिहेकठापूर बाबत सेवागिरी मंदिरात खुली चर्चा करा : आ. शशिकांत शिंदे appeared first on Dainik Prabhat .
मुंबईतील ३८८ म्हाडा पुनर्रचित इमारतींचा पुनर्विकास समूह पुनर्विकासाच्या माध्यमातून होणार
मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं/समूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी म्हाडातील त्यांच्या दालनात मुंबईतील म्हाडा पुनर्रचित ३८८ इमारतींचा पुनर्विकास तसेच मुंबईतील १३,८०० उपकरप्राप्त व जुन्या चाळी आणि इमारतींच्या पुनर्विकासातील अडचणींसंदर्भात बैठक पार पडली. या इमारतींच्या पुनर्विकासातील अडथळ्यांबाबत बैठकीत सविस्तर चर्चा झाली. या बैठकीला म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जैस्वाल, म्हाडाचे मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर, उत्तर मुंबईचे माजी खासदार गोपाळ शेट्टी, आमदार प्रसाद लाड, म्हाडाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल वानखेडे, संघर्ष समितीच्या विनिता राणे यांची उपस्थिती होती.म्हाडाच्या ३८८ पुनर्रचित इमारतींचा पुनर्विकास समूह पुनर्विकासाच्या माध्यमातून होणारजवळपास ६० ते ७० इमारती या शिवडी विधानसभा व वडाळा विधानसभा क्षेत्रात तर ६० ते ७० इमारती ह्या भायखळा विधानसभा या भागात आहेत. यापैकी अनेक म्हाडा इमारती समूह पुनर्विकास याअंतर्गत विकसित होऊ शकतात. म्हणजेच अनेक ठिकाणी फक्त म्हाडा इमारतींचाच एकत्रित क्लस्टर तयार होत आहे. या इमारती म्हाडा दुरुस्ती मंडळाच्या असून कुठेही उपकर प्राप्त इमारतीचा समावेश नाही. त्यामुळे या सर्व इमारतींचा समूह पुनर्विकास म्हाडा दुरुस्ती मंडळाने करावा. रहिवाशांमधील अंतर्गत वादामुळे विकासक निवडीच्या प्रक्रियेचा प्रदीर्घ कालावधी वाचेल आणि म्हाडाच्या माध्यमातून पारदर्शक पद्धतीने, योग्य व सक्षम, सुरक्षित व कालबद्ध पुनर्विकास होऊन मूळ मुंबईकरांना घरे मिळतील. अशाच प्रकारे लोअर परळ, प्रभादेवी, दादर, माहीम, वडाळा, मानखुर्द, सायन, गिरगाव, भायखळा, उमरखाडी, मदनपुरा, माझगाव, डोंगरी, ग्रॅन्ट रोड या सर्व विभागात देखील म्हाडा इमारतींचे क्लस्टर आहेत; ही बाब दरेकर यांनी बैठकीत निदर्शनास आणून दिली.म्हाडा पुनर्रचित ३८८ इमारतींपैकी ज्या इमारती सलग आहेत, अशा इमारतींचा एकत्रित पुनर्विकास करावयाचा असेल तर अशा इमारतीतील रहिवाशांनी सभा घेऊन विकासकाची निवड करावी व तशा प्रकारचा प्रस्ताव म्हाडाला सादर करावा. म्हाडानेच अशा इमारतींचा समूह पुनर्विकास करावा, अशाप्रकारचा निर्णय सभेत घेतल्यास तशा प्रकारचा प्रस्ताव म्हाडाला सादर करावा. म्हाडाकडून या प्रस्तावांना मंजुरी दिली जाईल; असे म्हाडातर्फे भूमिका मांडताना म्हाडा उपाध्यक्ष संजीव जैस्वाल म्हणाले.उपकरप्राप्त १३,८०० आणि जुन्या चाळी आणि इमारतींचा पुनर्विकासदक्षिण आणि दक्षिण मध्य मुंबईतील १३,८०० जुन्या व मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त इमारती साधारणपणे १९७० ते १९९० च्या दरम्यान बांधलेल्या आहेत. बऱ्याच इमारती रस्ता रुंदीकरण, रेल्वे बफर झोन, रोड कटिंग, अरुंद गल्ली किंवा रस्ता यामुळे बाधित होत आहेत. काही इमारती एकल स्वरूपाच्या आहेत. इमारतींचे चाळ मालक अनेक वर्षे संपर्कात नाहीत. भारतात वास्तव्यास नाहीत. बहुसंख्य इमारतींच्या चाळ मालकांनी भाडे वसुलीसाठी प्रतिनिधि नेमलेला आहे. परंतु इमारतींच्या संदर्भात कोणताही निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना नाही. काही इमारती चाळ मालकांच्या आर्थिक गैरव्यवहारामुळे किंवा वारसाहक्काच्या वादामुळे वर्षानुवर्षे न्यायालयाच्या, कोर्ट रिसिव्हर किंवा कोर्ट लिक्विडेटरच्या ताब्यात आहेत. सुमारे ३५ ते ४० वर्षांपूर्वी तत्कालीन सरकारने चॅप्टर ८ (अ) मधील १०३ (ब) नियमानुसार १०० पट भाडे भरुन चाळीचे मालक व्हा, असा कायदा भाडेकरुंसाठी जाहीर झाला. परंतु, चाळ मालकांनी त्याला विरोध केला. उच्च न्यायालयात चाळ मालकांच्या विरुध्द निर्णय झाल्यानंतर आता गेली चाळीस वर्षे हा खटला सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. महायुती शासनाने या उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकासासाठी २०२२ ला राष्ट्रपतींनी स्वाक्षरी करून म्हाडा कायद्यात ७९ (अ) हा नवीन कायदा आणला. हा कायदाही सर्वोच्च न्यायालयात चाळ मालकांच्या विरोधामुळे प्रलंबित आहे. मुंबईतील चाळीत राहणारा २० ते ३० लाख मध्यमवर्गीय पुनर्विकासापासून वंचित आहे. वर्षानुवर्षे शासन निर्णय कायद्याच्या कचाट्यात अडकून आहेत. मोडकळीस आलेले घर, छोट्याशा खोल्या, गळकी सार्वजनिक शौचालये, अशी या घरांची अवस्था आहे. या शिवाय मोठ्या प्रमाणात मुंबईकर मुंबईबाहेर निघून गेले आहेत. त्यामुळे या बाधित इमारतींचा समावेश या इमारतींच्या आजूबाजूच्या इमारतींच्या पुनर्विकास करता येईल का, या इमारतींच्या जवळच्या परिसरात जर कोणत्याही इमारतींचा पुनर्विकास होणार असेल तर त्या प्रकल्पात या इमारतींचा समावेश बंधनकारक करता येईल का, असा मुद्दा दरेकर यांनी बैठकीत उपस्थित केल्यानंतर ही बाब तपासून घेतली जाईल, असे जैस्वाल यांनी सांगितले.बैठकीतील इतर निर्णय१) एकल इमारतींचे ४ प्रस्ताव म्हाडाला सादर करण्यात आले असून या प्रस्तावांना एका आठवड्यात म्हाडा मंजुरी प्रदान करील.२) ३३ (२४) बाबतचा कन्सेंट फॉर्म म्हाडा उपलब्ध करुन देईल.३) म्हाडा पुनर्विकास योजनेत एकाच मालकाच्या दोन रुम असतील तर पुनर्विकासात एक घर मोफत व एक घर बांधकाम खर्च आकारुन दिले जाते. तेही मोफत मिळावे, ही मागणी म्हाडा तपासून घेण्यात येईल.४) म्हाडाने ३३ (२४) बाबत महत्वाचा व चांगला निर्णय घेतला आहे. परंत, रहिवाशांना या योजनेची कोणतीही माहिती नाही. या योजनेचा प्रचार व प्रसार रहिवाशांमध्ये होण्यासाठी म्हाडातर्फे इमारतींमध्ये फ्लेक्स लावण्यात येतील.
पुणे – भूगाव (ता.मुळशी) येथे परांजपे स्कीम कन्स्ट्रक्शन लिमिटेड निर्मित फॉरेस्ट ट्रेल्स या टाऊनशीप प्रकल्प उभारता शासनाच्या नियमानुसार सुमारे 35 एकर इतकी जागा या टाऊनशीपमध्ये मैदाने, उद्याने आदींसाठी राखीव ठेवण्यात येणार असल्याचे बांधकाम आराखड्यात दाखविले होते. प्रत्यक्षात मात्र या राखीव ठेवलेल्या जागांवरच बांधकाम उभारण्यात आल्याचा दावा फॉरेस्ट ट्रेल्स मधील रहिवाशांनी केला आहे. तसेच याबाबत पुणे […] The post Pune News : ‘फॉरेस्ट ट्रेल्स’ टाऊनशीपमध्ये 35 एकर राखीव जागेवर अनधिकृत बांधकाम? रहिवाशांचा परांजपे बिल्डर्सवर गंभीर आरोप appeared first on Dainik Prabhat .
प्रभाग १० ब मध्ये संगिता चव्हाण यांची दमदार एंट्री; विकासकामांच्या जोरावर विजय निश्चिततेची चर्चा
आळंदी : प्रभाग क्र. १० ब: ‘धनुष्यबाण’ चिन्हाच्या अधिकृत उमेदवार संगीता राहुल चव्हाण यांनी केवळ आश्वासने नव्हे, तर कृती आणि समर्पण या बळावर आपल्या उमेदवारीची पावती दिली आहे. त्यांचे पती, शिवसेना शहर प्रमुख राहुल चव्हाण यांच्यासह त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून प्रभागाच्या सुख-दुःखात सक्रिय सहभाग घेतला आहे. जनतेच्या सेवेसाठी त्यांनी घेतलेले परिश्रम वाखाणण्याजोगे आहेत. देहूफाटा ते […] The post प्रभाग १० ब मध्ये संगिता चव्हाण यांची दमदार एंट्री; विकासकामांच्या जोरावर विजय निश्चिततेची चर्चा appeared first on Dainik Prabhat .
Election News : आगामी महापालिका निवडणुकीच्या प्रारूप मतदार यादीतील चुका दुरुस्त करण्याचे अधिकार आयुक्तांना असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. याबाबत राज्य निवडणूक आयोगाचे सचिव काकाणी यांनी पत्र जारी केले आहे. यामुळे नागरिकांच्या हरकती, प्रशासनाच्या निदर्शनास आलेल्या चुकांचे निराकरण पालिका आयुक्तांनी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महापालिकेने जाहीर केलेल्या प्रारूप मतदारयादीत मोठ्या प्रमाणावर दुबार […] The post Election News : मतदारयादी दुरुस्तीचे अधिकार आयुक्तांना; राज्य निवडणूक आयोगाचा खुलासा, पुण्यातून सर्वाधिक ७७७ तक्रारी appeared first on Dainik Prabhat .

32 C