‘इंग्लिश क्रिकेटचा मृत्यू झाला!’ क्रीडा पत्रकार रेगिनाल्ड शर्ली ब्रूक्स यांनी ‘द स्पोर्टिंग टाइम्स’ साप्ताहिकात १४३ वर्षांपूर्वी हे उपहासाने लिहिले. त्यांच्या या विनोदी ढंगातील मृत्युलेखातून ‘अॅशेस’चा जन्म झाला. भारतीय क्रिकेटसाठीही तीच वेळ आलेली दिसते. गुवाहाटीमध्ये दुसऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विक्रमी धावांनी पराभूत झालेल्या या संघाच्या ‘कामगिरी’ची येते काही दिवस चिरफाड होत राहणार. वर्षभरातच घरच्या मैदानावर दोन संघांकडून न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका - भारताला ‘व्हाईट वॉश’ मिळाला. त्यामुळे आता रंगसफेदी नव्हे तर रंगरंगोटी आवश्यक आहे. मालिकेतील दुसऱ्या पराभवाची चाहूल सामन्याच्या चौथ्या दिवशीच लागली. परिणामी सामाजिक माध्यमांवर मिम्सचा महापूर सुरू झाला. ते पाणी आज डोक्यावरून गेले. इतिहासातील सर्वांत मोठा, म्हणजे ४०८ धावांनी पराभव. दक्षिण आफ्रिकेने दुसरा डाव थोडा लवकर घोषित केला असता, तर या पराभवाची नोंद कदाचित चौथ्या दिवशीच झाली असती. पराभवाचे अंतर थोडे कमी असले असते. पाहुण्यांनी डाव लवकर का घोषित केला नसावा? पत्रकारांनी विचारलेच. प्रशिक्षक शुकरी कॉनरॅड त्यावर म्हणाले, ‘आम्हाला त्यांना पुरते लोळवायचे होते!’ यजमानांनी पाहुण्यांच्या इच्छेचा मान राखलेला दिसतो. ‘अतिथी देवो भवः’ संस्कृतीला साजेसाच खेळ भारतीय क्रिकेटपटूंनी दोन्ही सामन्यांमध्ये केला. आपल्या फिरकी गोलंदाजांच्या तालावर परदेशी खेळाडू नाचत, हा इतिहास. आता स्वदेशातील खेळपट्ट्यांवर परदेशी फिरकी गोलंदाज भारतीय फलंदाजांना ‘ता-ता थैया, ता-ता थैया’ करायला लावतात. आधीच्या १२ कसोटी सामन्यांमध्ये एकदाच पाच बळी घेता आलेल्या सायमन हार्मर याला आपण १७ बळींची भेट दिली. हे ताजे वर्तमान पचायला आणि रुचायला कठीणच.आपण नेहमी जिंकत(च) राहावे, अशी भारतीय चाहत्यांची अपेक्षा बनली आहे. एखादाही पराभव त्यांना सहन करता येत नाही, हे वेळोवेळी दिसतेच. खेळात हार-जीत चालायचीच, हे तत्त्वज्ञान केवळ कागदावरती आणि सांगण्यापुरते राहिले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पराभव तेवढ्यामुळेच टोचतो, असे मुळीच नाही. अतिशय बेजाबदारपणे खेळून भारताने दोन्ही सामने गमावलेले आहेत. हंगामी कर्णधारपदाची जबाबदारी लाभलेला ऋषभ पंत या कसोटीतील दोन्ही डावांत कसा खेळला आणि कसा बाद झाला हे पाहिल्यावर ते लक्षात येते. संघातील अनुभवी फलंदाज के. एल. राहुल, ध्रुव जुरेल यांनी मैदानावर टिकून राहण्याची क्षमता दाखविली नाही. प्रत्येक सामन्यात ‘मन की खुशी, दिल का राजा’ पद्धतीने खेळलास तर तुझी जागा धोक्यात येईल, असे यशस्वी जयस्वाल याला कोणी सांगितले की नाही? सामना वाचविण्यासाठी खेळपट्टीवर उभे राहण्याची गरज असताना नितीशकुमार रेड्डी रीव्हर्स स्वीपचा गंमतीदार प्रयोग करत होता. प्रतिस्पर्धी संघाचे सामर्थ्य, आपल्या मर्यादा, संधी साधणे आणि धोके ओळखणे यात संघ पूर्णपणे अपयशी ठरला. धावफलक नेहमीच गाढव असतो का? तर मुळीच नाही. पूर्ण मालिकेत शंभराहून अधिक धावा करणारे दोनच भारतीय फलंदाज वॉशिंग्टन सुंदर (१२४) व रवींद्र जाडेजा (१०५). हे दोघेही पूर्ण वेळ फलंदाज नाहीत, हे लक्षात घेतले की, सलामीवीरांचे आणि मधल्या फळीचे अपयश ठसठशीत दिसते. मालिकेत सर्वाधिक चेंडू खेळला तो सुंदरच. चार वेळा सर्व गडी गमावणाऱ्या यजमान संघाकडून दोनच अर्धशतके - यशस्वी जयस्वाल व जाडेजा. आपल्या दोनच फलंदाजांची सरासरी पंचवीसहून अधिक. दक्षिण आफ्रिकेकडून एक शतक, तीन अर्धशतके झाली. या सर्व खेळात सामना जिंकून देणाऱ्या त्यांच्या सात फलंदाजांनी मालिकेत शंभराहून अधिक धावा केल्या आणि चौघांची सरासरी तीसहून अधिक. घरच्या मैदानावर, आपल्याला हव्या तशा खेळपट्ट्या बनविण्याचा आदेश दिल्यानंतरही मालिकेत पाहुण्यांच्या गोलंदाजांचा वरचष्मा दिसतो. दोन सामन्यांतील चार डावांमध्ये फक्त एकदाच यजमानांना दोनशेचा उंबरठा ओलांडता आला. एकदा तर शंभराच्या आत डाव आटोपला. खेळपट्टीत काही विशेष नाही, असे कुलदीप यादव सांगतो. आपले फलंदाज मात्र मार्को यान्सेन आणि हार्मर यांच्यापुढे शरणागती पत्करतात. हा फरक वृत्तीतला आहे. मालिकेत भारताने सात झेल सोडले. पाहुण्यांकडून दोन सुटले. त्याबद्दल पश्चात्ताप करण्याची वेळ त्यांच्यावर आली नाही. संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर, निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांच्या मनमानी कारभारामुळेच भारतीय संघाची ही अवस्था झाली. कसोटी विश्वविजेत्यापदाच्या तालिकेत भारतीय संघाची आता पाचव्या स्थानावर घसरण झाली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी प्रथम श्रेणी सामन्यात खेळले पाहिजे, असा मानभावी सल्ला देण्यात आला. पण याची निवड करताना देशातील स्पर्धांमध्ये केलेल्या कामगिरीचा विचार होतो का? रणजी आणि इराणी करंडक जिंकणाऱ्या विदर्भाच्या संघातील खेळाडूंना हे विचारले पाहिजे. हर्षित राणाचा संघात समावेश कसा काय होतो बुवा, असा प्रश्न माजी कर्णधार के. श्रीकांत यांनी जाहीरपणे विचारला. त्याचे उत्तर देताना त्यांचे बोट कोणाकडे रोखले होते, हे मंडळातील धुरिणांनी पाहायला हवे. एका सामन्यात तीन यष्टिरक्षक, तीन डावखुरे फिरकी गोलंदाज, कथित अष्टपैलू खेळाडूंचा भरणा, राणाला १० षटकेही गोलंदाजी न देणे हे आणि असे बरेच विनोद मालिकेत झाले आहेत. गंभीर कालपर्यंत विचारत होते, ‘पराभवाबद्दल मला का ट्रोल करता? मी मैदानात जाऊन जिंकून देऊ की काय?’ आजच्या पराभवानंतर फरक एवढाच पडलेला दिसतो की, त्यांनी पराभवाची नैतिक वगैरे म्हणतात ती जबाबदारी स्वीकारलेली आहे. प्रशिक्षकपदाच्या छोट्या कारकिर्दीत त्यांनी गांभीर्याने केलेल्या काही मोजक्या विधानांपैकी हे एक! त्याची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने अर्थातच गंभीरपणे दखल घ्यायला हवी. अश्विन, रोहित आणि विराट यांना सन्मानाने निवृत्त होण्याची संधी न देणाऱ्यांची हकालपट्टी करणे, हेच तातडीचे औषध आहे.
Manchar Election: मंचरमध्ये निवडणुकीचा ज्वर शिगेला! “एकदा संधी द्या”म्हणत उमेदवारांची घरोघरी धावपळ
प्रभात वृत्तसेवा मंचर – मंचर नगरपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली असून एकूण १७ प्रभागांसह नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांची प्रचारयात्रा वेग घेत आहे. सर्वच राजकीय पक्षांचे उमेदवार आणि त्यांचे समर्थक सकाळपासून रात्रीपर्यंत पदयात्रा, घराघर भेटी आणि वैयक्तिक संवादातून मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. प्रत्येक प्रभागात उमेदवारांनी आपला प्रचाराचा जोर वाढवला असून अनेक ठिकाणी गाठीभेटी, कोपरा सभा आणि परिसर […] The post Manchar Election: मंचरमध्ये निवडणुकीचा ज्वर शिगेला! “एकदा संधी द्या” म्हणत उमेदवारांची घरोघरी धावपळ appeared first on Dainik Prabhat .
Manchar Election: मंचरमध्ये प्राची थोरात यांचे जंगी स्वागत; उच्चशिक्षित उमेदवाराची सर्वत्र चर्चा
प्रभात वृत्तसेवा मंचर – मंचर नगरपंचायत निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी उभे राहिलेल्या अपक्ष उमेदवार प्राची थोरात यांनी प्रचारात चांगलीच आघाडी घेतली असून घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेण्यावर आणि मिळालेले चिन्ह रिक्षा घरोघरी पोहचवण्यासाठी भर दिला जात आहे. प्राची थोरात यांचे सासरे ज्येष्ठ नेते संजय थोरात यांनी केलेल्या विकास कामाच्या जोरावर मी नक्कीच निवडून येईल.असा विश्वास त्यांनी […] The post Manchar Election: मंचरमध्ये प्राची थोरात यांचे जंगी स्वागत; उच्चशिक्षित उमेदवाराची सर्वत्र चर्चा appeared first on Dainik Prabhat .
गुन्हेगार वापरत असलेल्या कायद्याच्या पळवाटा आणि त्यामागील मानसिकता
'गुन्हा आणि शिक्षा' हे मानवी समाजाचे एक अविभाज्य चक्र आहे. जिथे गुन्हा घडतो, तिथे त्या गुन्ह्याला आळा घालणारी यंत्रणा आणि न्याय देणारी व्यवस्था अस्तित्वात असते; परंतु, गुन्हा केल्यानंतर प्रत्येक गुन्हेगार शिक्षेला सामोरे जाण्यास तयार असतोच असे नाही. खरं तर, बहुतांश गुन्हेगारांचा पहिला प्रयत्न पकडले न जाणे, कायद्याच्या कचाट्यातून सुटणे हाच असतो. पोलीस प्रशासनापासून स्वतःला लपवण्यासाठी गुन्हेगार अनेक डावपेच अवलंबतात. यामागे एक विशिष्ट प्रकारची मानसिकता आणि काही वेळा नियोजबद्ध रणनीती असते. हा लेख गुन्हेगारांच्या याच पद्धती मागील मानसिकतेचा सविस्तर आढावा घेतो.गुन्हेगारांनी अवलंबलेल्या प्रमुख पद्धती आणि क्लृप्त्या याचा अभ्यास सगळ्यांना असणे गरजेचे आहे. गुन्हेगार स्वतःला लपवण्यासाठी गुन्ह्याच्या स्वरूपानुसार, त्यांच्या बुद्धिमत्तेनुसार आणि उपलब्ध संसाधनांनुसार विविध मार्गांचा अवलंब करतात. यांचे ढोबळमानाने पुढीलप्रमाणे वर्गीकरण करता येईल. गुन्हा घडल्यानंतर गुन्हेगार तत्काळ ते शहर, राज्य सोडून पळून जातात, ते अशा ठिकाणी आश्रय घेतात जिथे त्यांची ओळख पटणे कठीण असते. ही ठिकाणे अनेकदा सामान्य वस्तीत, अपरिचित ठिकाणी किंवा दुर्गम भागात असतात, जिथे पोलीस सहजासहजी पोहोचू शकत नाहीत. काही गुन्हेगार, विशेषतः जे फारसे ओळखले गेलेले नाहीत, रेकॉर्डवर नाहीत ते पळून न जाता गर्दीच्या ठिकाणी, जसे की मोठी शहरे किंवा झोपडपट्ट्यांमध्ये सामान्य जीवन जगण्याचा प्रयत्न करतात, जेणेकरून त्यांच्यावर कोणाचा संशय येऊ नये. सतत जागा बदलणे म्हणजेच एकाच ठिकाणी न राहता दर काही दिवसांनी किंवा आठवड्यांनी आपला मुक्काम बदलत राहणे यामुळे पोलिसांना त्यांचा मागोवा घेणे कठीण जाते. ओळख बदलण्यासाठी त्यांचा शारीरिक बदल हा एक अत्यंत जुना, पण प्रभावी मार्ग आहे. यामध्ये केसांची रचना बदलणे, केस कापणे किंवा वाढवणे, दाढी-मिशी ठेवणे किंवा काढणे यांचा समावेश होतो. बनावट नावे जसे की स्वतःची खरी ओळख लपवून नवीन नावाने वावरणे. बनावट कागदपत्रे तयार करणे, खोटे आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन्स तयार करून नवीन ओळख प्रस्थापित करणे याचा आधार गुन्हेगार घेतात.प्लॅस्टिक सर्जरीचा आधार घेतला जातो. अत्यंत गंभीर आणि हाय-प्रोफाइल प्रकरणांमध्ये, जिथे गुन्हेगाराकडे भरपूर पैसा असतो, तिथे चेहऱ्याची ओळख बदलण्यासाठी प्लॅस्टिक सर्जरीचा आधार घेतला जातो. तांत्रिक आणि आर्थिक क्लृप्त्यामार्फत पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी मोबाइलचा वापर टाळला जातो. पोलिसांसाठी मोबाइल ट्रॅकिंग हा गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्याचा सर्वात सोपा मार्ग असतो. हुशार गुन्हेगार एकतर फोन वापरणे पूर्णपणे बंद करतात किंवा डिस्पोजेबल सीम कार्ड असलेले साधे फोन वापरतात, जे वापरानंतर फेकून दिले जातात. याशिवाय अनेक नंबर वापरणे, विविध सेटिंग बदलत राहणे हा पर्याय गुन्हेगार अमलात आणतात. डिजिटल फूटप्रिंट टाळणे म्हणजेच सोशल मीडिया पूर्णपणे बंद करणे. डिजिटल पेमेंट टाळून केवळ रोख व्यवहार करणे. व्हीपीएन आणि एन्क्रिप्टेड चॅट्सचा वापर करणे. गुन्ह्यातून मिळालेला पैसा किंवा पळून जाण्यासाठी लागणारा पैसा इतरांच्या बँक खात्यांद्वारे किंवा हवालामार्गे फिरवला जातो, अनेक बँकांमध्ये बनावट नावानी अकाउंट बनवून त्याद्वारे पैशाची देवाण-घेवाण केली जाते. कायदेशीर आणि प्रक्रियात्मक डावपेच खेळणे जसे की पुरावे नष्ट करणे हा खूप प्रचलित प्रकार आहे. गुन्हा केल्यानंतर सर्वात आधी गुन्ह्याशी संबंधित पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला जातो. आपण गुन्ह्याच्या वेळी घटनास्थळी नव्हतोच, तर दुसरीकडेच होतो, हे सिद्ध करण्यासाठी खोटे साक्षीदार उभे करणे किंवा तसे पुरावे तयार करणे.सर्वांना परिचय असणारा भाग म्हणजेच अटकपूर्व जामीन. अटक होण्याची शक्यता दिसताच वकिलांमार्फत न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करणे. जेव्हा पळून जाण्याचे सर्व मार्ग बंद होतात, तेव्हा काही गुन्हेगार स्वतःच्या अटींवर, वकिलामार्फत आत्मसमर्पण करतात. यामुळे कारवाई किंवा 'एन्काउंटर' टाळता येईल अशी गुन्हेगाराची मानसिकता असते. गुन्हेगारांचे नेटवर्क अर्थात गुन्हेगारांना त्यांच्या नेटवर्कचा आधार असतो. हे साथीदार त्यांना लपण्यासाठी जागा, पैसा आणि माहिती पुरवतात. बहुतांशवेळा राजकीय आश्रय घेणे यासारखे प्रकार पाहायला मिळतात. काही गुन्हेगारांना राजकारण्यांचा छुपा पाठिंबा असतो, ज्याच्या आधारे ते पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करतात. जे लोक आपल्याविरुद्ध साक्ष देऊ शकतात, त्यांना धमकावून गप्प करणे, जेणेकरून खटला उभाच राहू नये यासाठी गुन्हेगार प्रयत्न करताना दिसतात. गुन्हेगारांच्या या कृतीमागील मानसिकता लक्षात घेणे गरजेचे आहे. गुन्हेगार का लपतात? याचे उत्तर वरवर सोपे असले तरी, त्यामागे अनेक मानसिक पैलू आहेत. शिक्षेची भीती ही सर्वात मूलभूत आणि प्रबळ भावना आहे. अटक होणे, तुरुंगात जाणे, स्वातंत्र्य गमावणे, समाजातील प्रतिष्ठा आणि सन्मान गमावणे आणि कायद्यानुसार होणाऱ्या शिक्षेची भीती, गुन्हेगाराला पळून जाण्यास प्रवृत्त करते. जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःला धोक्यात पाहते, तेव्हा तिची पहिली प्रतिक्रिया 'लढा किंवा पळा' अशी असते. या प्रकरणात, पोलीस प्रशासन हे 'धोका' असते आणि 'पळून जाणे' हा त्या धोक्यापासून वाचण्याचा मार्ग असतो. आपण व्यवस्थेपेक्षा हुशार आहोत ही भावना काही सराईत गुन्हेगारांमध्ये असते. त्यांना असे वाटते की, ते पोलीस आणि कायदेशीर व्यवस्थेपेक्षा जास्त हुशार आहेत. अनेकदा, एखादा गुन्हा घडल्यानंतर, व्यक्ती घाबरते, गोंधळते आणि पुढे काय करावे हे न सुचल्याने फक्त पळ काढते. पोलीस आणि समाज त्याचा शोध घेत राहतात. पोलिसांची फाईल बंद होते. समाजाच्या आणि कुटुंबाच्या मनातून ती व्यक्ती 'संपलेली' असते किंवा कधी कधी कुटुंबातील लोकांना सत्य माहिती असते पण समाजासाठी, पोलिसांना दाखवण्यासाठी ही व्यक्ती स्वतःला मृत घोषित करते. गुन्हेगार जेव्हा हा अत्यंत टोकाचा मार्ग निवडतो, तेव्हा त्यामागील मानसिकता भयानक असते. 'मृत्यू'चा बनाव रचणे त्यामागील प्रमुख मानसिक पैलू लक्षात घेणे गरजेचे आहे. अंतिम 'रीसेट बटण' ही या कृतीमागील सर्वात प्रबळ मानसिकता आहे. गुन्हेगाराला हे कळून चुकलेले असते, की त्याने केलेला गुन्हा गंभीर आहे. तो पकडला गेल्यास त्याला उर्वरित आयुष्य तुरुंगात काढावे लागेल. पण 'मृत' झाल्यावर तो ती ओळख पुसून टाकू शकतो. तो एका नवीन ठिकाणी, नवीन नावाने, एक सामान्य माणूस म्हणून जगण्याची अपेक्षा ठेवतो. त्याला त्याची जुनी ओळख पूर्णपणे नष्ट करायची असते. या परिस्थितीमध्ये व्यवस्थेपेक्षा आपण श्रेष्ठ असण्याचा अहंकार असतो. काही गुन्हेगार विशेषतः जे हुशार असतात, जसे की 'व्हाईट कॉलर क्रिमिनल्स' स्वतःला व्यवस्थेपेक्षा जास्त हुशार समजतात. स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचून सर्वांना फसवणे, हा त्यांच्या बुद्धिमत्तेचा 'अंतिम विजय' असतो. 'मी इतका हुशार आहे की मी माझ्या मृत्यूवरही नियंत्रण ठेवू शकतो आणि पोलिसांना मूर्ख बनवू शकतो,' हा अहंकार त्याला हे पाऊल उचलण्यास प्रवृत्त करतो. जेव्हा गुन्हेगाराला शिक्षेची किंवा गुन्हेगारी टोळीकडून होणाऱ्या प्रतिशोधाची प्रचंड भीती वाटते, तेव्हा तो हा मार्ग निवडतो.भावनिक अलिप्तता आणि समाजविघातक प्रवृत्ती अशा लोकांमध्ये पाहायला मिळते. स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचणे हे वाटते तितके सोपे नसते. स्वतःला मृत घोषित करणे, दाखवणे असे दर्शवते की त्या व्यक्तीची स्वतःच्या कुटुंबाशी असलेली भावनिक नाळ पूर्णपणे तुटलेली आहे. स्वतःची सुटका करणे, हे त्याच्यासाठी इतरांच्या भावनांपेक्षा जास्त महत्त्वाचे असते. ही एक प्रकारची आत्मकेंद्री वृत्ती आहे. एकदा तो 'मृत' घोषित झाला की, शोध थांबतो, फाईल बंद होते आणि मानसिक शांतता मिळवण्यासाठी हे कृत्य गुन्हेगाराला फायदेशीर वाटते. स्वतःला मृत भासवणे हे केवळ पळून जाणे नाही, तर ते 'ओळखीची आत्महत्या' असते. सीसीटीव्ही कॅमेरे, मोबाइल लोकेशन ट्रॅकिंग, डिजिटल पेमेंट रेकॉर्ड, डीएनए फॉरेन्सिक्स आणि खबऱ्यांचे जाळे या जोरावर पोलीस गुन्हेगारांचा मागोवा घेतात. गुन्हेगाराचे लपणे हे तात्पुरते असू शकते, पण कायद्याच्या कचाट्यातून कायमचे सुटणे अशक्य असते.- मीनाक्षी जगदाळे
प्रभात वृत्तसेवा पिंपरी – कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघातर्फे संविधान सन्मान मेळावा आयोजित करण्यात आला. कंत्राटी कामगार, बांधकाम कामगार, फेरीवाला, रिक्षा चालक, घरेलू कामगार आदी असंघटित कामगारांच्या लक्षणीय उपस्थितीमध्ये थरमॅक्स चौक चिंचवड येथे संविधान दिनाचा उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी कामगार नेते काशिनाथ नखाते, प्रदेश उपाध्यक्ष राजेश माने, प्रदेश संघटक भास्कर राठोड, अनिल […] The post Pimpri News: “आजही हक्कांसाठी झगडावं लागतंय”; संविधान दिनी कामगारांची खंत, पिंपरीत भव्य मेळाव्याचे आयोजन appeared first on Dainik Prabhat .
प्रभात वृत्तसेवा पिंपरी – भरधाव वेगात आलेल्या वाहनाने धडक दिल्यामुळे लाकूड घेऊन जाणाऱ्या तरुणाचा मृत्यू झाला. ही घअना उत्कर्ष चौकाजवळ १९ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.व्यंकटेश मानसिंग पवार (वय ३५) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत त्यांच्या पत्नीने मंगळवारी (दि. २५) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात वाहन […] The post Wakad Accident: सकाळी कामावर निघाला अन् काळाने घाला घातला! भरधाव वाहनाच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू appeared first on Dainik Prabhat .
प्रभात वृत्तसेवा हिंजवडी – भाजपा शहर उपाध्यक्ष राम वाकडकर यांनी भाविकांसाठी आयोजित केलेल्या तीन दिवसीय श्रीकृष्णलीला मायरा कथेने भाविकांना मंत्रमुग्ध केले आहे. शहरात एवढ्या मोठ्या भव्य दिव्य नियोजनात सुरू झालेल्या कथा सोहळ्याला भाविकांचा जनसागर लोटला होता.नागरिकांचा प्रतिसाद व विश्व विख्यात आध्यात्मिक प्रवक्त्या तथा कथाकार जया किशोरी यांच्या सुमधुर अमृतवाणीतून कथेला सुरवात होताच अवघा वाकड परिसर […] The post Pimpri News: वाकड परिसर झाला ‘कृष्णमय’! जया किशोरींच्या अमृतवाणीने भाविक मंत्रमुग्ध; पाहा भक्तीचा महापूर appeared first on Dainik Prabhat .
तपोवनाबाहेर झाडे लावता येतील, साधुग्राम उभारता येईल?
वृक्षतोडी प्रकरणी भाजपचे नाशिकमधील तीनही आमदार किंवा इतर पदाधिकारी भूमिका स्पष्ट करताना दिसत नाहीत. मात्र मतदार नागरिकही तितकेच महत्त्वाचे असल्याची भावना जनतेतून व्यक्त होते. त्यामुळे कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांचा अंतिम निर्णयच निर्णायक ठरेल, असे बोलले जाते.भारतात चार ठिकाणी, तर महाराष्ट्रात केवळ नाशिक, त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळा भरतो. कुंभमेळ्याच्या निमित्ताने मिळणाऱ्या निधीतून नाशिकच्या विकासाला मोठा हातभार लागतो, हे निर्विवाद आहे. दर १२ वर्षांनी होणाऱ्या कुंभमेळ्यात साधुग्रामसह अनेक प्रश्न उपस्थित होतात, यंदाही त्याला अपवाद नाही. साधुग्रामच्या जागेवर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्याचा घेतलेला निर्णय अनाकलनीय ठरत असून, गेल्या काही दिवसांपासून वृक्षतोडीच्या मुद्द्यावर मोठा वादंग निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि पर्यावरणप्रेमींनी एकत्रित बसून योग्य तो तोडगा काढण्याची गरज निर्माण झाली आहे. सिंहस्थ कुंभमेळा अवघ्या दीड वर्षांवर आला असून तयारीची कामे जोरात सुरू झाली आहेत. प्रत्यक्षात ही कामे दोन वर्षांपूर्वीच सुरू व्हायला हवी होती. नाशिकनंतर होणाऱ्या उज्जैन कुंभमेळ्याची तयारीही मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याची चर्चा आहे.सिंहस्थ कुंभमेळ्यात साधू–महंतांसाठी साधुग्राममध्ये सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेने ५४ एकरांवरील १८२५ वृक्ष तोडण्याची तयारी दर्शविली आहे. या निर्णयाला पर्यावरणप्रेमींकडून सुरुवातीपासूनच तीव्र विरोध होत आहे. या ठिकाणी पर्यावरणप्रेमींसह काही राजकीय पक्षांनी आंदोलन करत निषेध व्यक्त केला आहे. वाढत्या विरोधानंतर कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी मनपा आयुक्त व अधिकाऱ्यांसह तपोवनाचा दौरा करत पर्यावरणप्रेमींच्या भावना जाणून घेतल्या. यावेळी 'एक वृक्ष तोडल्यास दहा वृक्ष लावले जातील' असे त्यांनी स्पष्ट केलं. मात्र त्यावरही पर्यावरणप्रेमी समाधानी नव्हते. अलीकडेच मनपाकडे दाखल हरकतींवर सुनावणी घेण्यात आली. सुनावणीदरम्यान पर्यावरणप्रेमी आक्रमक झाले आणि 'साधुग्राममधील एकही झाड तोडू देणार नाही' असा ठाम पवित्रा घेतला.तसेच या निर्णयाविरुद्ध थेट उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची भूमिकाही त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे ही सुनावणी चांगलीच वादळी ठरली. महत्त्वाची सुनावणी असताना आयुक्त मनीषा खत्री बक्षीस समारंभाला गेल्याने त्यांच्यावर टीकेची झोड उठली. कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलीस आणि सुरक्षा रक्षकांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.वृक्षतोड भूमाफिया आणि बांधकाम व्यावसायिकांच्या फायद्यासाठी होत असल्याचे गंभीर आरोप करण्यात आले. साधू–महंतांसाठी झाडे तोडली जात आहेत, तर त्यांच्या तरी याबाबतची संमती आहे का, असा प्रश्नही उपस्थित झाला. आजवर झालेल्या कोणत्याही सिंहस्थ कुंभमेळ्यात झाडे तोडण्याची वेळ आली नव्हती, मग यावेळी अठराशे झाडे तोडण्याची गरज कशासाठी-असा सवाल करण्यात आला. 'सामान्य नागरिकाने झाड तोडले, तर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होतो, मग येथे अठराशे झाडे तोडणे म्हणजे अठराशे खूनच,' अशी तीव्र टीका पर्यावरणप्रेमींनी केली. मागील कुंभमेळ्यात साधुग्राममधील अखाडा जागांवर लॉन्स तयार झाल्याचा अनुभव, ३०० एकर जागा हडप झाल्याची चर्चा, तसेच त्याचा तपास करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. पर्यावरणप्रेमींकडून पर्यावरण संतुलनाबरोबरच विकासाच्या गरजांकडेही लक्ष दिले जाणे आवश्यक आहे. त्यांचे आंदोलन योग्य असले तरी त्यातून मार्ग काढण्याची वेळ आली आहे. केवळ विरोधासाठी विरोध योग्य नाही. यापूर्वी नाशिकमध्ये रस्ते-इमारतींसाठी झालेले वृक्षारोपण, औद्योगिक वसाहतींतील पर्यावरणपूरक बाबींवरही त्यांनी पुढे येणे आवश्यक असल्याचे नागरिकांकडून मत व्यक्त होत आहे.प्रशासन आणि नागरिकांच्या या वादात साधू-महंतांनीही उडी घेतली आहे. २०१५–१६ च्या कुंभमेळ्यात काही झाडांमुळे तंबू उभारण्यास अडचणी आल्या होत्या. तो अनुभव असताना पुन्हा दाट वृक्षारोपण का करण्यात आले, असा सवाल महंत रामकिशोर शास्त्री महाराज यांनी केला आहे. साधू–महंतांच्या तंबूंसाठी विस्तीर्ण मोकळी जागा आवश्यक असते. पूर्वी कधीही अशी अडचण निर्माण झाली नव्हती. जुन्या, मोठ्या झाडांची उपस्थिती असताना नव्याने वृक्षारोपण करण्याची गरज नेमकी काय होती, हे त्यांनी स्पष्ट विचारले आहे. साधुग्रामासाठी राखीव असलेल्या जागेत निर्वाणी, निर्मोही आणि दिगंबर या तीनही अखाड्यांचे तंबू लागतात. या तंबूंसाठी आवश्यक असलेल्या मोकळ्या जागेचा विचार न केल्यानेच आजची समस्या निर्माण झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. आपल्या शहराच्या विकासासाठी पर्यावरणप्रेमी, नागरिक आणि प्रशासन यांनी एकत्र येऊन प्रयत्न केले तरच सिंहस्थ कुंभमेळा वादातीत होऊ शकेल, अशी अपेक्षा व्यक्त करूया. तोडगा काढताना आंदोलकांनी हे लक्षात घेण्याची गरज आहे की, तोडलेल्या नवीन झाडांच्या बदल्यात इतर ठिकाणी अधिक वृक्षारोपण करणे शक्य आहे, पण साधुग्राम इतर ठिकाणी तयार करता येणे शक्य आहे का?- धनंजय बोडके
प्रभात वृत्तसेवा पिंपरी – सिगारेटचे पैसे मागितल्याच्या रागातून एका तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. ही घटना भोसरीतील लांडेवाडी परिसरात सोमवारी (दि. २४) दुपारी तीन वाजताच्या सुमारास घडला.आकाश अनसरवाडे (वय २३) असे जखमी तरुणाचे नाव असून सध्या त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. राहुल क्षिरसागर उर्फ संभ्या (वय ३२), सचिन सहादू गाडेकर (वय ३८, रा. लांडेवाडी, […] The post Bhosari Crime: भोसरीत गुंडगिरीचा कळस! सिगारेटचे पैसे मागितले म्हणून तरुणाच्या तोंडावर मारला सिमेंटचा गट्टू appeared first on Dainik Prabhat .
गांजा पिऊन मतदार याद्या बनवल्यात का? आयुक्त हर्डीकरांचा पारा चढला; अधिकार्यांची झोप उडवणारा सवाल
प्रभात वृत्तसेवा पिंपरी – महापालिका निवडणुकीसाठी प्रसिद्ध केलेल्या प्रारुप मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर घोळ आहे. याद्यांमधील गोंधळामुळे महापालिका निवडणूक यंत्रणेवर मोठ्या प्रमाणावर आरोप होत आहेत. राजकीय पक्षांनी वरिष्ठ अधिकार्यांना धारेवर धरले असून सत्ताधारी भाजपाच्या मदतीने हा घोळ केला असल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर या मतदार याद्यांच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी घेतलेल्या बैठकीत आयुक्त तथा प्रशासक श्रावण […] The post गांजा पिऊन मतदार याद्या बनवल्यात का? आयुक्त हर्डीकरांचा पारा चढला; अधिकार्यांची झोप उडवणारा सवाल appeared first on Dainik Prabhat .
PCMC Election: आरपीआयचे उमेदवार लढणार भाजपच्या चिन्हावर! पिंपरीत १५ जागांसाठी ‘फिल्डिंग’
प्रभात वृत्तसेवा पिंपरी – केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या सूचनेनुसार पिंपरी चिंचवड शहरामध्ये भाजप आणि रिबप्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) सोबत लढणार आहेत. मात्र, प्रभागामध्ये मतदारसंख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे आरपीआयचे कार्यकर्ते तसेच चिन्ह पोहचवताना अडचणी येऊ शकतात. त्यामुळे भाजपच्या पक्षचिन्हावर आरपीआय महापालिकेच्या जागा लढणार आहे. तसेच या निवडणुकीसाठी भाजपाकडे १५ जागांची मागणी केली असल्याचे […] The post PCMC Election: आरपीआयचे उमेदवार लढणार भाजपच्या चिन्हावर! पिंपरीत १५ जागांसाठी ‘फिल्डिंग’ appeared first on Dainik Prabhat .
Pimpri Crime: दामदुप्पटचं आमिष पडलं महागात! भोसरीत रिक्षा चालकाची २० लाखांची फसवणूक, तिघांवर गुन्हा
प्रभात वृत्तसेवा पिंपरी – अवघ्या २० महिन्यांत रक्कम दामदुपट करून देतो, असे आमिष दाखवून एका रिक्षा चालकाची २० लाख ४० हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना भोसरी परिसरातील हॉटेल समाधान, फुगे प्रायमा येथे ०९ डिसेंबर २०२२ ते १२ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत घडली.संतोष बाळकृष्ण तरटे (वय ४३, रा. नखाते चौक, रहाटणी. मुळ रा. गायकवाड चाळ, […] The post Pimpri Crime: दामदुप्पटचं आमिष पडलं महागात! भोसरीत रिक्षा चालकाची २० लाखांची फसवणूक, तिघांवर गुन्हा appeared first on Dainik Prabhat .
दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, २७ नोव्हेंबर २०२५
पंचांगआज मिती मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी शके १९४७, चंद्र नक्षत्र धनिष्ठा, योग ध्रुव चंद्र राशी मकर, भारतीय सौर ६ पौष शके १९४७, गुरुवार, दि. २७ नोव्हेंबर २०२५. मुंबईचा सूर्योदय ६.५२, मुंबईचा सूर्यास्त ५.५९ मुंबईचा चंद्रोदय १२.१८ मुंबईचा चंद्रास्त ००.००, उद्याची राहू काळ १.४९ ते ३.१२. संत रोहिदास पुण्यतिथी, शुभ दिवस.दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)मेष : नवीन संधी मिळतील.वृषभ : नियोजन यशस्वी होईल.मिथुन : स्थावर बाबतचे प्रश्न सोडविता येतील.कर्क : प्रयत्नात सातत्य राहील.सिंह : अति आत्मविश्वास टाळा.कन्या : अनावश्यक खर्च टाळा.तूळ : सरकारी कामांना चालना मिळेल.वृश्चिक : मित्रमंडळीत वेळ जाईल.धनू : आव्हानांना सामोरे जावे लागेल.मकर : जोडीदाराची साथ चांगली मिळेल.कुंभ : कौटुंबिक सुख-समाधान व आनंद मिळेल.मीन : आशावादी स्वरूपाचा दिवस असणार आहे.
SMAT 2025 : मोठा उलटफेर! दुबळ्या जम्मू-काश्मीरने महाराष्ट्राला पहिल्याच सामन्यात लोळवले
Jammu Kashmir stun Maharashtra in SMAT 2025 : सय्यद मुस्ताक अली ट्रॉफी स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात महाराष्ट्राला दुबळ्या जम्मू काश्मीर संघाने पराभवाचा धक्का दिला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या महाराष्ट्राच्या संघाला १३० रोखल्यानंतर १३१ धावांचे लक्ष्य कश्मीरच्या संघाने १८.४ षटकांत ५ गडी राखून गाठले. अशा प्रकारे ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्त्वाखाली तगड्या संघाला सलामीच्या सामन्यातच पराभव पत्करावा लागला आहे, ईडन […] The post SMAT 2025 : मोठा उलटफेर! दुबळ्या जम्मू-काश्मीरने महाराष्ट्राला पहिल्याच सामन्यात लोळवले appeared first on Dainik Prabhat .
महायुतीतील संघर्ष उघड..! भाजपच्या मंत्र्याची मित्रपक्ष शिवसेनेवर गंभीर आरोप
मुंबई : जळगावच्या मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे कार्यकर्ते लोकांना धमकावत असल्याचा आरोप भाजपच्या मंत्री रक्षा खडसे यांनी केला आहे. या दाव्यामुळे महायुतीतील मित्रपक्षांमधील तणाव उघड झाला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे कार्यकर्ते लोकांवर दबाव वाढवत आहेत. त्याविरुद्ध आवाज उठवणे ही माझी जबाबदारी असल्याची खडसे यांनी पत्रकारांना सांगितले. खडसेंनी आरोप केला की, शिवसेना अस्पष्ट […] The post महायुतीतील संघर्ष उघड..! भाजपच्या मंत्र्याची मित्रपक्ष शिवसेनेवर गंभीर आरोप appeared first on Dainik Prabhat .
India host Commonwealth Games 2030 at Ahmedabad : भारताला 2030 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे यजमानपद मिळाले आहे. बुधवारी स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे राष्ट्रकुल क्रीडा कार्यकारी मंडळाच्या बैठकीनंतर अहमदाबादला यजमान शहर म्हणून घोषित करण्यात आले. भारत 15 वर्षांनंतर या स्पर्धेचे यजमानपद भूषवत आहे. यापूर्वी 2010 मध्ये नवी दिल्लीत या खेळांचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी भारतीय खेळाडूंनी […] The post Commonwealth Games 2030 : भारताला 15 वर्षांनंतर ‘राष्ट्रकुल’चे यजमानपद! ‘या’ शहरात पार पडणार संपूर्ण स्पर्धा appeared first on Dainik Prabhat .
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत भारत पाचव्या स्थानावर
गुवाहाटी : भारताच्या कसोटी संघाला दक्षिण आफ्रिकेने गुवाहाटीतील दुसऱ्या कसोटीत ४०८ धावांनी पराभूत करत मालिका २-० ने खिशात घातली. तब्बल २५ वर्षांनी भारतात मालिका जिंकण्याची ऐतिहासिक नोंद केली. या सामन्यात भारताला ५४९ धावांचे लक्ष्य दिल्यानंतर संपूर्ण संघ केवळ १४० धावांवर कोसळला. या निकालामुळे भारताच्या कसोटी इतिहासातील धावांच्या फरकाने हा सर्वात मोठा पराभव ठरला आणि फलंदाजी, गोलंदाजी तसेच क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागांत पाहुण्यांनी भारताला चारीमुंड्या चित केले.या मालिकेतील नीरस कामगिरीचा थेट फटका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत बसला असून भारताचा गुणात्मक टक्का घसरून ४८.१५ टक्क्यांवर आला आहे आणि संघ पाचव्या स्थानावर सरकला आहे. पाकिस्तानने आता ५० टक्क्यांसह भारताला मागे टाकत वरचे स्थान मिळवले आहे. या शर्यतीत ऑस्ट्रेलिया शंभर टक्के गुणांसह अव्वल स्थान कायम राखून आहे, तर दक्षिण आफ्रिका या मालिकेतील विजयामुळे दुसऱ्या स्थानी अधिक भक्कम झाली आहे.पराभवानंतर भारतीय संघाचा नेतृत्वभार सांभाळणाऱ्या ऋषभ पंतने ही स्थिती निराशाजनक असल्याचे मान्य केले. मात्र चुका सुधारून अधिक चांगली कामगिरी करण्याची गरज असल्याचे तो म्हणाला आणि दक्षिण आफ्रिकेने अधिक सक्षम खेळ केला याचे श्रेय त्यांनाच जात असल्याचेही त्याने नमूद केले.भारताने पहिल्या दोन डब्ल्यूटीसीमध्ये अंतिम फेरी गाठली होती, पण गेल्या काही महिन्यांतील सततच्या अपयशामुळे अंतिम फेरी गाठणे कठीण बनत चालले आहे. घरच्या मैदानावरही अस्थिरता वाढत असून फलंदाजीतील सातत्याचा पूर्ण अभाव, फिरकीचा प्रभाव कमी होणे आणि वारंवार डाव कोसळणे या चिंताजनक बाबींवर आता तातडीने उपाययोजना आवश्यक ठरल्या आहेत. पुढील मालिकांमध्ये नाट्यमय पुनरागमन केल्याशिवाय भारतासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा प्रवास आव्हानांनी भरलेला राहणार आहे.
मुंबईतील भायखळा परिसरात मोठा अपघात
मुंबई : मुंबईतील भायखळा परिसरात मोठा अपघात झाला आहे. जे जे हॉस्पिटलच्या जवळ असलेल्या एस ब्यु टी क्लस्टर १ इमारतीच्या बांधकाम साइटवर कन्स्ट्रक्शन क्रेनची केबल तुटल्यामुळे गंभीर दुर्घटना झाली आहे. या घटनेत इमारतीचे सेफ्टी इंजिनियर दानिश शेख गंभीर जखमी झाले.एस ब्यु टी क्लस्टर १ इमारतीच्या बांधकामासाठी क्रेनचा वापर सुरू होता. क्रेनच्या सहाय्याने सिमेंटचा डबा वर उचलला जात होता, पण केबल तुटल्याने डबा खाली कोसळला. यामुळे अपघात झाला आणि इमारतीचा सेफ्टी इंजिनियर दानिश शेख गंभीर जखमी झाले. अपघातानंतर, दानिश शेख यांना तात्काळ उपचारासाठी जे जे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि त्यांची स्थिती गंभीर आहे.अपघाताची माहिती मिळताच, पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरू असून, पोलिस प्रशासन पंचनामा करत आहे. या घटनेबाबत सविस्तर चौकशी सुरू असून, जबाबदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
रोहित शर्मा पुन्हा अव्वल स्थानावर
दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने बुधवारी (२६ नोव्हेंबर) पुरुषांची फलंदाजी क्रमवारी जाहीर केली आहे. या यादीत रोहित शर्माने पुन्हा एकदा अव्वल स्थानी झेप घेतली आहे. तर डॅरिल मिशेलची या यादीत दुसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. ऑस्ट्रेलियाविरूद्ध झालेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात रोहित शर्माने दमदार शतकी खेळी केली होती. या खेळीच्या बळावर त्याने अव्वल स्थानी झेप घेतली होती. पण त्यानंतर डॅरिल मिशेलने पुन्हा एकदा अव्वल स्थानी कब्जा केला होता. ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या वनडे मालिकेनंतर भारतीय संघ एकही वनडे सामने खेळण्यासाठी मैदानात उतरलेला नाही. तरीदेखील रोहित पुन्हा एकदा नंबर १ फलंदाज बनला आहे.डॅरिल मिशेलने वेस्ट इंडिजविरूद्ध झालेल्या वनडे मालिकेत दमदार शतकी खेळी केली होती. या खेळीनंतर त्याने वनडे फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थान मिळवलं होतं. त्याने ७६६ रेटिंग पॉईंट्सची कमाई केली आहे. तर अव्वल स्थानी असलेल्या रोहित शर्माने ७८१ रेटिंग पॉईंट्सची कमाई केली आहे.टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत झिम्बाब्वेचा अनुभवी खेळाडू सिकंदर रझा अव्वल स्थानी पोहोचला आहे. सिकंदर रझाने आतापर्यंत २८९ रेटिंग पॉईंट्सची कमाई केली आहे. झिम्बाब्वेचा संघ नुकताच पाकिस्तान आणि श्रीलंकेविरूद्ध तिरंगी मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. या मालिकेत सिकंदर रझाचा बोलबाला पाहायला मिळाला. त्याने पाकिस्तानविरूद्ध झालेल्या सामन्यात फलंदाजी करताना २३ धावा आणि गोलंदाजी करताना २ गडी बाद केले होते. तर श्रीलंकेविरूद्ध झालेल्या सामन्यात त्याने ३७ धावा करून ४ गडी बाद केले होते. तर पाकिस्तानचा सईय अयुब या यादीत दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. सईम अयुबने २६९ रेटिंग पॉईंट्ससह दुसरे स्थान गाठले आहे.कसोटी फलंदाजांच्या यादीत ट्रॅव्हिस हेड सहाव्या स्थानी पोहोचला आहे. हेडने इंग्लंडविरूद्ध झालेल्या अॅशेस मालिकेतील पहिल्याच कसोटीत दमदार शतकी खेळी केली होती. तर इंग्लंडचा स्टार फलंदाज २४ व्या स्थानी जाऊन पोहोचला आहे. इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रूट या यादीत अव्वल स्थानी आहे. जो रूटची रेटिंग ८८४ इतकी आहे. तर हॅरी ब्रूक ८५३ रेटिंग पॉईंट्ससह दुसऱ्या स्थानी आहे. तर केन विलियम्सन या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. कसोटी क्रिकेटमधील टॉप १० फलंदाजांच्या यादीत यशस्वी जयस्वाल हा एकमेव भारतीय फलंदाज आहे. यशस्वी जयस्वाल ८ व्या क्रमांकावर घसरला आहे.
महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ च्या तारखेत बदल !
मुंबई : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्याकडून आयोजित करण्यात येणाऱ्या ५ वी (पूर्व उच्च प्राथमिक) आणि ८ वी (पूर्व माध्यमिक) शिष्यवृत्ती परीक्षेच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. याआधी ८ फेब्रुवारी २०२६ रोजी होणारी परीक्षा आता २२ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित केली जाणार आहे. ही परीक्षा राज्यभर एकाच दिवशी होईल.हे बदल केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) च्या तारखेशी सुसंगत करण्यात आले आहेत. सीटीईटी परीक्षा ८ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार असून, राज्यातील अनेक शिक्षक या परीक्षेत सहभागी होणार आहेत. त्यांच्या सुविधेसाठी शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख बदलण्यात आली आहे. त्यामुळे, शिष्यवृत्ती परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी आणि शाळांनी नवीन तारखेसाठी आवश्यक तयारी करणे आवश्यक आहे.महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त, अनुराधा ओक यांनी याबद्दल अधिकृत माहिती दिली आणि सर्व संबंधितांना याची नोंद घेण्याचे आवाहन केले आहे.महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परीक्षा विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शिक्षणासाठी आर्थिक मदतीचा एक महत्त्वपूर्ण मार्ग आहे. या परीक्षांद्वारे विद्यार्थ्यांना त्यांच्या शालेय शिक्षणासाठी आणि इतर आवश्यक खर्चासाठी शिष्यवृत्ती मिळवता येते. महाराष्ट्रात, इयत्ता 4 आणि 8 च्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेतल्या जातात. याशिवाय, राष्ट्रीय स्तरावर देखील शिष्यवृत्ती देणाऱ्या परीक्षा घेतल्या जातात, जसे की राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षा (NICE) आणि अन्य विविध सरकारी योजनांद्वारे आर्थिक सहाय्य मिळवता येते.नवीन तारखा आणि तयारीची सूचनाशिष्यवृत्ती परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांनी, पालकांनी आणि शाळांनी नवीन तारखेनुसार तयारी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. २२ फेब्रुवारी २०२६ रोजी परीक्षा होईल, त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासाचे पुनरावलोकन करणे आणि वेळेवर तयारी पूर्ण करणे आवश्यक आहे.
“आयआयटी बॉम्बेचे नाव मुंबई करण्यासाठी पंतप्रधानांना पत्र लिहिणार”–मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई – आयआयटी बॉम्बेचे नाव आयआयटी मुंबई असे कराण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. केंद्रीय राज्यमंत्री जिंतेद्र सिंह यांच्या वक्तव्यानंतर निर्माण झालेल्या वादानंतर फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. आमच्यासाठी हे मुंबईच आहे, बॉम्बेचे नाव मुंबई करण्यामागे भाजपचा मोठा वाटा असल्याचे ते म्हणाले. राज ठाकरे यांच्या टीकेवर उत्तर देताना फडणवीस […] The post “आयआयटी बॉम्बेचे नाव मुंबई करण्यासाठी पंतप्रधानांना पत्र लिहिणार” – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस appeared first on Dainik Prabhat .
Pune News : पुण्यातील महिलेचा तरुणावर अत्याचार; कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पुणे : येथील एका तरुणीने चंदगड येथील तरुणाला आपल्या जाळ्यात ओढून काशी येथे नेले. तेथे त्याच्यावर शारीरिक अत्याचाराचा प्रयत्न केला. याशिवाय २ लाख रुपयांची खंडणी मागितली. पैसे दिले नाही, तर फोटो व्हायरल करेन, अशी धमकी दिल्याबाबत चंदगड येथील एका ४७ वर्षांच्या व्यक्तीने कोथरूड पोलिसांत फिर्याद दिली आहे. यावरून पोलिसांनी कोथरूड येथील ४२ वर्षांच्या महिलेवर गुन्हा […] The post Pune News : पुण्यातील महिलेचा तरुणावर अत्याचार; कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल appeared first on Dainik Prabhat .
Hong Kong : हॉंगकॉंगमधील आगीत १३ जणांचा मृत्यू !
Hong Kong – हाँगकाँगमधील एका गृहनिर्माण संकुलातील अनेक उंच इमारतींना लागलेल्या आगीत १३ जणांचा मृत्यू झाला, असे शहरातील अग्निशमन दलाने बुधवारी सांगितले. घटनास्थळी नऊ जणांना मृत घोषित करण्यात आले आणि रुग्णालयात पाठवण्यात आलेल्या इतर चार जणांना नंतर मृत घोषित करण्यात आले, असे अधिकाऱ्यांनी पत्रकारांना सांगितले. सुमारे ७०० लोकांना तात्पुरत्या आश्रयस्थानांमध्ये हलवण्यात आले आहे. न्यू टेरिटरीजमधील […] The post Hong Kong : हॉंगकॉंगमधील आगीत १३ जणांचा मृत्यू ! appeared first on Dainik Prabhat .
मुंबईतील दहिसरमध्ये मोठी आग, अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे धोका टळला !
मुंबई : राजधानी मुंबईतील दहिसर पूर्वेकडील आनंदनगर परिसरात आज मोठी आग लागली. दहिसर येथील एका उंच इमारतीत ही आग लागली, मात्र सुदैवाने या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.आग लागलेली इमारत आनंदनगर परिसरातील सब्जी मार्केटच्या अगदी समोर स्थित आहे. घटनेची माहिती मिळताच महापालिका प्रशासनाने तात्काळ चार अग्निशमन गाड्या घटनास्थळी पाठवल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवले.आगीमुळे इमारतीतील एक घर जळून खाक झाले, परंतु सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे सर्व रहिवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. आग लागण्याचे कारण अद्याप स्पष्ट नाही झाले. यावर अधिक तपास सुरू असून, दहिसर पोलीस आणि अग्निशमन दल याचा शोध घेत आहेत.आग लागल्यानंतर, इमारतीच्या परिसरातील रस्त्यांवर वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला. अग्निशमन दलाच्या गाड्या आणि पोलिसांच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यामुळे रस्त्यावर गाड्यांची लांबच लांब रांग लागली. आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत वाहतूक सुरळीत केली.
आतापर्यंत दोन कोटींपेक्षा जास्त मृतांचे आधार क्रमांक केले निष्क्रीय
मुंबई : जेव्हापासून आधार आयडी सुरु झाले तेव्हापासून करोडो लोकांचे युआयडीएआयकडे रजिस्ट्रेशन झाले आहे. अद्यापही अनेकजण आधार प्रणालीपासून दूर आहेत. नवीन जन्मलेली मुले, त्यांचेही आधार क्रमांक तयार करावे लागत आहेत. पुढे शिक्षणासाठी ते गरजेचे करण्यात आले आहे. अशावेळी युआयडीएआयकडे आकडा वाढतच चालला आहे. यामुळे युआयडीएआयने आधार क्रमांक निष्क्रीय करण्याची मोहीम सुरु केली आहे.आधार डेटाबेसची अचूकता आणि सुरक्षितता राखण्यासाठी देशव्यापी महत्त्वाकांक्षी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत, २ कोटींहून अधिक मृत व्यक्तींचे आधार क्रमांक निष्क्रिय करण्यात आले आहेत. वास्तविक या १५ वर्षांच्या काळात करोडोंच्या संख्येने आधारधारक मृत झालेले आहेत; परंतू, त्याची माहिती युआयडीएआयला मिळालेली नसल्याने आजही त्यांचे आधार नंबर सक्रीय आहेत. यामुळे या आयडींचा वापर करून अनेक ठिकाणी फसवणूक केली जात आहे. बँक अकाऊंट उघडली जात आहेत, फ्रॉड केले जात आहेत. सरकारी योजनांचा लाभ घेतला जात आहे.यामुळे युआयडीएआयने ही मोहिम सुरु केली आहे. मृत व्यक्तींची माहिती घेऊन त्यांचे आधार क्रमांक बंद केले जात आहेत. लोकांना आपल्या घरातील मृत व्यक्तींचे आधार क्रमांक कसे बंद करायचे याची माहिती नाही. यामुळे आधारलाही याची माहिती मिळत नाही. यामुळे आता युआयडीएआय अशा मृत व्यक्तींची माहिती भारताचे रजिस्ट्रार जनरल, विविध राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या नागरी नोंदणी प्रणाली, सार्वजनिक वितरण प्रणाली आणि राष्ट्रीय सामाजिक सहाय्यता कार्यक्रम अशा ठिकाणांकडून घेण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये पुढे बँका आणि इतर संस्थांचीही मदत घेतली जाणार आहे.या संस्थांकडे तो व्यक्ती मृत असल्याची माहिती असली तरीही युआयडीएआयकडून वेगळी यंत्रणा राबवून त्याची पडताळणी केली जात आहे. यामुळे जिवंत असलेल्या व्यक्तीचे आधार रद्द होण्याची शक्यता टाळली जात आहे. याचबरोबर आधारच्या पोर्टलवरही एक सेवा सुरु करण्यात आली आहे. यामध्ये 'कुटुंबातील सदस्याच्या मृत्यूची नोंदणी' पर्याय देण्यात आला आहे. कुटुंबातील सदस्य स्वतः प्रमाणित करून मृत व्यक्तीचा आधार क्रमांक, मृत्यू नोंदणी क्रमांक आणि इतर आवश्यक तपशील पोर्टलवर देऊ शकतात. मृत्यूचे अधिकृत प्रमाणपत्र मिळाल्यानंतर या सुविधेचा वापर करून मृत व्यक्तीच्या आधार क्रमांकाची नोंदणी करावी, असे युआयडीएआयने आवाहन केले आहे.
Rahul Gandhi : ‘युनिटी मार्च’साठी भाजपकडून राहुल गांधींना खास निमंत्रण
वडोदरा – भाजपच्या वतीने 29 व 30 नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या युनिटी मार्चसाठी लोकसभेतील विरोधी पक्षनेते व कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना पत्राद्वारे निमंत्रण देण्यात आले असून त्यांनी पदयात्रेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे, असे भाजप खासदार हेमांग जोशी यांनी सांगितले. स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांच्या सन्मानार्थ सरकारकडून या मार्चचे […] The post Rahul Gandhi : ‘युनिटी मार्च’साठी भाजपकडून राहुल गांधींना खास निमंत्रण appeared first on Dainik Prabhat .
कणकवली नगरपंचायतीच्या निवडणूक प्रचारात पालकमंत्री नितेश राणेंची एन्ट्री
कणकवली : कणकवली नगरपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पार्टी विरुध्द शहर विकास आघाडी अशी लढत आहे. निवडणुकीचे वातावरण तापले असतानाच मत्स्य व बंदरे विकास मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवलीच्या प्रचारात एन्ट्री घेतली आहे. खुद्द पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवली शहरातील व्यापारी , डॉक्टर , वकील, पत्रकार , प्रतिष्ठित नागरिक यांच्या गाठीभेटी घ्यायला सुरुवात केली आहे.कणकवली येथील व्यापारी संघाचे अध्यक्ष दीपक बेलवलकर , डॉ. निलेश पाकळे , बापू पारकर , सुशील पारकर , डॉ. अनंत नागवेकर , मालपेकर यांच्यासह शहरातील प्रतिष्ठित नागरिकांशी पालकमंत्री नितेश राणे यांनी संवाद साधला.यावेळी ही निवडणूक कणकवलीला विकासाकडे नेणारी आहे. केंद्र आणि राज्य सरकार हे भाजपचे आहेत. त्यामुळे कणकवलीतील सुज्ञ नागरिक म्हणून भारतीय जनता पार्टी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे आणि नगरसेवकांना मतदान करा. दुस-या टप्प्यातील विकास करण्याची जबाबदारी माझी आहे, असा शब्द देत विश्वास देण्याची भूमिका पालकमंत्री नितेश राणे वैयक्तिक गाठीभेटीमध्ये मांडत आहेत.
पुण्यातील दोन नवीन मेट्रो मार्गिकांना मंजुरी
पुणे (प्रतिनिधी) : गेल्या काही महिन्यांपासून पुणे मेट्रोचा विस्तार झपाट्याने होत आहे. संपूर्ण पुणे शहरात मेट्रोचे जाळे होणार असल्याचे केंद्र सरकारने यापूर्वीच सांगितले आहे. केंद्र सरकारने पुण्यातील दोन नवीन मेट्रो मार्गिकांना मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हे निर्णय घेण्यात आल्याची माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांनी दिली आहे.केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्ली येथे सांगितले की, सरकारने बुधवारी पुणे मेट्रो रेल्वे नेटवर्कच्या विस्ताराला ९,८५८ कोटी रुपये खर्चाच्या मंजुरी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत लाइन ४ (खराडी-हडपसर-स्वारगेट-खडकवासला) आणि लाइन ४अ (नल स्टॉप-वारजे-माणिक बाग) ला मान्यता दिली.केंद्रीय राज्यमंत्री आणि खासदार मुरलीधर मुरलीधर मोहोळ यांनी एक्स पोस्टवरून पुणेकरांसाठी ही आनंदाची बातमी दिली आहे. पुण्यासाठी खराडी-खडकवासला (मार्गिका ४) आणि नळ स्टॉप-वारजे-माणिकबाग (मार्गिका ४अ) मार्गांनी मोदी सरकारने मंजुरी दिल्याचे त्यांनी सांगितले आहे. पुणे मेट्रो रेल नेटवर्कच्या फेज-२ अंतर्गत लाइन ४ (खराडी–खडकवासला) आणि लाइन ४अ (नळ स्टॉप–वारजे–माणिक बाग) या दोन्ही मार्गांना मंजुरी मिळाली आहे. या प्रकल्पामध्ये ९,८५७.८५ कोटींची तरतूद असून, पुढील ५ वर्षांत हे काम पूर्ण होणार आहे. या मार्गांना मंजुरी मिळावी यासाठी नुकतीच केंद्रीय नगरविकास मंत्री मनोहरलाल खट्टर यांची भेट घेऊन पाठपुरावा केला होता. या विस्तारामुळे ३१.६ किमीचे नवे नेटवर्क, २८ एलिव्हेटेड स्टेशन तयार होतील ज्यामुळे आयटी हब, व्यावसायिक परिसर, कॉलेजेस आणि प्रमुख निवासी भागांना अधिक वेगवान कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. नवीन लाईन्समुळे नळस्टॉप, वारजे, माणिक बाग आणि डेक्कन–स्वारगेट परिसराला प्रचंड फायदा होणार आहे.नागरिकांचा प्रवास अधिक जलद आणि सोपा होईलया महत्त्वपूर्ण निर्णयामुळे पुणेकरांची वाहतुकीची समस्या कमी होण्यास मदत होणार असून, शहराच्या विकासाला नवी गती मिळणार आहे. मार्गिका ४ (खराडी ते खडकवासला) ची लांबी २५.५२ किमी असून, यात २२ उन्नत (Elevated) स्थानके असतील. हा मार्ग खराडी, हडपसर, स्वारगेट मार्गे खडकवासल्यापर्यंत असणार आहे. याव्यतिरिक्त, मार्गिका ४अ (नळ स्टॉप-वारजे-माणिक बाग) ही ६.१२ किमी लांबीची असून, यात ६ उन्नत स्थानके असतील. या दोन्ही मार्गिकांची एकूण लांबी ३१.६४ किमी आणि स्थानकांची एकूण संख्या २८ आहे. या संपूर्ण प्रकल्पासाठी ९८५७.८५ कोटी खर्च अपेक्षित असून, पाच वर्षांमध्ये हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. या नव्या मेट्रो मार्गामुळे पुणे शहरातील पूर्वेकडील, मध्यवर्ती आणि पश्चिमेकडील महत्त्वाचे भाग थेट जोडले जातील, ज्यामुळे नागरिकांचा प्रवास अधिक जलद आणि सोपा होईल.
मुंबईतल्या बांधकामांसोबतच बेकऱ्यांमुळे प्रदूषणात वाढ
मुंबई (वार्ताहर) : मुंबईतल्या बांधकामांसोबतच बेकऱ्यांमुळे प्रदूषण वाढत असून, धुके आणि धूलिकणांमुळे यात आणखी भर पडली आहे. थंडीच्या दिवसांत नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये दरवर्षी प्रदूषण वाढत असून, यावर्षीही प्रदूषणाचा विळखा कायम राहणार आहे. त्यातच एखाद्या परिसरात सलग तीन दिवस हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक ३०० वर नोंदविला गेला, तर संबंधित परिसर रेड झोन घोषित केला जाणार असून, तेथील बांधकामे बंद केली जाणार आहेत.मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक खालावलेला असून दक्षिण मुंबईपासून पूर्व व पश्चिम उपनगरांत ठिकठिकाणी नोंदविण्यात आलेल्या प्रदूषणामुळे मुंबईमधील दृश्यमानता कमी झाली होती. ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर म्हणाले, इथिओपियाच्या ज्वालामुखीच्या राखेचे कण हवेद्वारे वाहून आले असले तरी ते मुंबईवर वाहून आलेले नाहीत. गुजरात, राजस्थानवरील पट्ट्यात त्याचा प्रभाव दिसला. हे राखेचे कण वातावरणात अत्यंत वरच्या उंचीवर होते. हवामान अभ्यासक अथ्रेय शेट्टी यांच्या म्हणण्यानुसार, मुंबईत नोंदविण्यात आलेले प्रदूषण ज्वालामुखीच्या राखेच्या कणांचे नाही. मुंबईमधील हवा खराब म्हणजे रोजचे प्रदूषण आहे. नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये प्रदूषणाचे प्रमाण वाढते. कारण हवा स्थिर राहते. हवामानातील बदलामुळे प्रदूषण वाढू नये म्हणून बांधकामांना नोटीस देण्यापासून प्रदूषण करणाऱ्या बेकऱ्या बंद करण्याची कारवाई सुरू असते. प्रदूषण होऊ नये म्हणून उपाययोजना सुरू असून, गेल्या वर्षी नोंदविण्यात आलेल्या प्रदूषणामुळे कुलाबा, भायखळा आणि बोरिवलीतील बांधकामे बंद केली होती. यावर्षीही कारवाई सुरूच राहील, असे मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी सांगितले.
प्रारुप मतदार यादीवर हरकती, सूचना नोंदवण्यास मुदतवाढ
मुंबई : मुंबई महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीकरता प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली असून या प्रारुप मतदार यादीतील त्रुटीबाबत हरकती तथा सूचना मांडण्याच्या तारखेला मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी हरकती व सूचना मांडण्याची तारीख २७ नोव्हेंबर होती. परंतु आता याला मुदतवाढ देवून ही तारीख ३ डिसेंबर २०२५ अशी करण्यात आली. दरम्यान, यापूर्वी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार मंगळवारी २५ नोव्हेंबर २०२५ पर्यंत महापालिकेच्या २६ प्रशासकीय विभागांमध्ये तब्बल ७६९ हरकती व सूचना प्राप्त झाल्या आहेत. गुरुवारी २७ नोव्हेंबर रेाजी शेवटची तारीख असल्याने मंगळवारी एकाच दिवशी ५२९ हरकती व सूचना प्राप्त झाल्या.परंतु बुधवारी मोठ्याप्रमाणात सुधारीत परिपत्रकानुसार हरकती सूचना प्राप्त झाल्या असल्या तरी याची संख्या प्राप्त झालेली नाही. मात्र, बुधवारी अशाप्रकारे हरकती व सूचना नोंदवण्यासाठी अनेकांनी विभाग कार्यालयांमध्ये गर्दी केल्याची माहिती मिळत होती.राज्य निवडणूक आयोगाने २९ महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकींकरता मतदार यादीचा कार्यक्रम दिला असून त्यानुसार प्रत्येक महापालिकेत सुधारणा करण्यात येत आहे. त्यानुसार मुंबई महापालिकेने प्रारुप मतदार यादी प्रसिध्द केलेली आहे. यासाठी २७ नोव्हेंबर २०२५ ही हरकती व सूचना नोंदण्यासाठी अंतिम तारीख होती. परंतु ही तारीख वाढवून आता ३ डिसेंबर २०१२ करण्यात आली आहे.तर प्रारुप मतदार यादीवरील दाखल हरकतीवर निर्णय घेवून प्रभाग निहाय अंतिम मतदार याद्या बनवून प्रसिध्दी करण्याची तारीख जी ५ डिसेंबर होती, ती वाढवून १० डिसेंबर २०२५ करण्यात आली आहे. तर मतदान केंद्रांच्या ठिकाणांची यादी प्रसिध्द करण्याची तारीख ८ डिसेंबर ऐवजी १५ डिसेंबर करण्यात आली आहे आणि मतदान केंद्र निहाय मतदार यादी प्रसिध्द करण्याची तारीख १२ डिसेंबर ऐवजी आता २२ डिसेंबर करण्यात आली आहे.प्रारुप मतदार यादीवर हरकती सूचना नोंदवण्याचा कालावधी वाढवून दिला असला तरी २७ नोव्हेंबर ही अंतिम तारीख असल्याने सर्व पक्षांकडून ही कामे तातडीने पूर्ण करण्याची प्रक्रिया पार पाडण्यात आली आहे. त्यामुळे त्यामुळे आता राजकीय पक्षांसह इतरांनाही घाईघाईत हरकत घेण्याऐवजी यादीवर शेवटची नजर मारण्याची संधी प्राप्त झाली आहे. मंगळवारपर्यंत सहा दिवसांमध्ये ५२९ हरकती सूचना प्राप्त झाल्याने पुढील दिवसांमध्ये ही संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
देवेंद्र फडणवीस जल्लाद, त्यांनी लोकशाहीला फासावर लटवकण्याचं काम केलं; हर्षवर्धन सपकाळांची जहरी टीका
अहिल्यानगर : संविधान दिवशी (२६ नोव्हेंबर) राज्यात लोकशाहीवर थेट हल्ला झाल्याचा आरोप काँग्रेसने केला असून, पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर कठोर टीका केली आहे. श्रीरामपूर येथे पक्षाच्या जिल्हाध्यक्ष सचिन गुजर (Sachin Gujar) यांचे अपहरण करून मारहाण करण्यात आली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर बोलताना सपकाळ यांनी फडणवीस यांना ‘जल्लाद’ […] The post देवेंद्र फडणवीस जल्लाद, त्यांनी लोकशाहीला फासावर लटवकण्याचं काम केलं; हर्षवर्धन सपकाळांची जहरी टीका appeared first on Dainik Prabhat .
वाळू माफियांवर महसूलमंत्र्यांचा 'सर्जिकल स्ट्राईक'
मुंबई :गौण खनिजांची वाहतूक करताना सापडलेल्या वाहनांचा परवाना (परमिट) थेट निलंबित किंवा रद्द करण्याची धडक कारवाई आता करण्यात येणार आहे.राज्यातील वाळू व इतर गौण खनिजांचे अवैध उत्खनन आणि वाहतूक रोखण्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्य परिवहन प्राधिकरणाच्या निर्देशानुसार अत्यंत कठोर निर्णय घेतला. महसूल विभागाने यासंदर्भातील परिपत्रक जारी केले.राज्यात मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या वाळू आणि इतर गौण खनिजांच्या चोरीमुळे शासनाच्या महसुलाची आणि पर्यावरणाची मोठी हानी तर होतेच, सोबतच या अवैध व्यवसायातून गुन्हेगारी वाढत असून, कारवाईसाठी जाणाऱ्या शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या जिवाला धोका निर्माण झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर महसूल मंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार, अवैध वाहतुकीला आळा घालण्यासाठी परिवहन विभागाच्या मदतीने आता कडक धोरण अवलंबण्यात आले आहे.* अशी होणार कारवाई (तीन टप्प्यांत शिक्षा)* राज्य परिवहन प्राधिकरणाने निश्चित केलेल्या नवीन निर्देशानुसार, अवैध उत्खनन व वाहतूक करणाऱ्या वाहनांवर मोटार वाहन अधिनियम, १९८८ च्या कलम ८६ अंतर्गत खालीलप्रमाणे कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत:• पहिला गुन्हा : ३० दिवसांसाठी परवाना (परमिट) निलंबित करणे आणि वाहन अटकावून ठेवणे.• दुसरा गुन्हा : ६० दिवसांसाठी परवाना निलंबित करणे आणि वाहन अटकावून ठेवणे.• तिसरा गुन्हा : संबंधित वाहनाचा परवाना कायमस्वरूपी रद्द करणे आणि प्रादेशिक परिवहन प्राधिकरणामार्फत पुढील कारवाईसाठी वाहन जप्त करणे.• या वाहनांवर करडी नजरअवैध उत्खनन आणि वाहतुकीसाठी वापरले जाणारे ड्रील मशीन, जेसीबी व पोकलैंड, ट्रॅक्टर, ट्रॅक्टर ट्रॉली, हाफ बॉडी ट्रक, फुल बॉडी ट्रक, डंपर, ट्रॉलर, कॉम्प्रेसर, ट्रॉलर, बार्ज, मोटोराईज्ड बोट, एक्सकॅवेटर, मॅकेनाईज्ड लोडर यासारख्या सर्व प्रकारच्या वाहनांवर व साहित्यावरही कारवाई लागू असणार आहे.___शासनाचा महसूल चूकविणे हा गंभीर गुन्हा असून, काही लोक जाणीवपूर्वक असा प्रयत्न करतात. त्यांना बचक बसावा यासाठी हा निर्णय घेतला आहे. यामुळे महसूल विभागाच्या क्षेत्रीय यंत्रणेने अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांची माहिती तात्काळ परिवहन विभागाला कळवावी, जेणेकरून संबंधित वाहनांवर जागेवरच कारवाई करणे शक्य होईल. तसेच अवैध वाहतुकीला आळा बसेल. -चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
IIT बॉम्बे वादावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया, केली मोठी घोषणा
मुंबई : आयआयटी बॉम्बेचे नाव बदलून आयआयटी मुंबई करावे का, या मुद्द्यावर निर्माण झालेल्या राजकीय वादाला आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या वक्तव्यावरून सुरू झालेल्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस म्हणाले, “आमच्यासाठी हे शहर कायम मुंबईच राहिलं आहे. बॉम्बेचं मुंबई करण्यात भाजपचा मोठा इतिहास आहे. त्यामुळे आयआयटी बॉम्बेचं नाव अधिकृतपणे ‘आयआयटी मुंबई’ करण्याची विनंती मी स्वतः पंतप्रधान आणि संबंधित केंद्रीय मंत्र्यांना करणार आहे.”जितेंद्र सिंह यांच्या वक्तव्यावरून वाद पेटलाअलीकडेच आयआयटी मुंबईतील एका कार्यक्रमात केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी, “आयआयटी बॉम्बेचं नाव मुंबई करण्यात आलं नाही, हे योग्यच आहे,” असं विधान केलं. त्यांच्या या शब्दांनंतर महाराष्ट्रात संताप उसळला. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे.राज ठाकरे यांच्या प्रतिक्रियेवर बोलताना फडणवीस म्हणाले, “बॉम्बेचे नाव मुंबई करण्यामागे सर्वात पुढाकार भाजपचे दिवंगत नेते राम नाईक यांचा होता. मुंबईच नाव सर्वत्र रूढ व्हावं, ही आमची भूमिका कायम आहे.” त्यांनी पुढे उद्धव आणि राज ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करत म्हटलं, “काही जण स्वतःची मुलं ज्या शाळेत शिकतात, त्या शाळेचं नाव बदलण्याची मागणी मात्र करत नाहीत.”ते पुढे म्हणाले, “जितेंद्र सिंह यांचा मुंबई, महाराष्ट्र किंवा गुजरातशी काहीही संबंध नाही. तरीही अशा प्रकारची वक्तव्यं करण्यामागे कोणती प्रवृत्ती आहे, हे लोकांनी समजून घेतलं पाहिजे. तमाम मराठी जनतेने आता तरी डोळे उघडावे.”या वादामुळे ‘IIT Bombay vs IIT Mumbai’ हा मुद्दा पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आला असून, नावांवरील राजकारणाला नव्याने पेटायला सुरूवात झाली आहे.
Cheteshwar Pujara’s brother-in-law commits suicide : माजी भारतीय कसोटी क्रिकेटपटू चेतेश्वर पुजाराच्या कुटुंबातून एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. पुजाराचा मेहुणा जीत पाबारी याने राजकोट येथील त्यांच्या निवासस्थानी कथितरित्या आत्महत्या केली आहे. ही घटना घडली, तेव्हा पुजारा भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी सामन्यासाठी टीव्हीवर कॉमेंट्री करत होता. घटनेची माहिती मिळताच त्याने कॉमेंट्रीचे काम […] The post Cheteshwar Pujara : चेतेश्वर पुजाराच्या मेहुण्याने राजकोटमध्ये केली आत्महत्या, नेमकं काय होतं कारण? जाणून घ्या appeared first on Dainik Prabhat .
नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील लाइन ४ (खराडी-हडपसर-स्वारगेट-खडकवासला) आणि लाइन ४-अ (नळ स्टॉप-वारजे-माणिक बाग) यांना मंजुरी देण्यात आली. लाइन २अ (वनाज-चांदणी चौक) आणि लाइन २ब (रामवाडी-वाघोली/विठ्ठलवाडी) यांच्या मंजुरीनंतर फेज २ अंतर्गत मंजूर झालेला हा दुसरा मोठा प्रकल्प आहे. या प्रकल्पासाठी केंद्रीय […] The post Pune metro : पुणेकरांना मोदी सरकारंच मोठं गिफ्ट ! मेट्रोसाठी तब्बल ‘इतक्या’ हजार कोटींच्या निधीला मंजूरी appeared first on Dainik Prabhat .
कोल्हापुरात टीईटी पेपर फुटीचे रॅकेट उघडकीस; १८ जणांना अटक
कोल्हापूर – कोल्हापूर जिल्ह्यात शिक्षक पात्रता चाचणी (टीईटी) प्रश्नपत्रिका फोडुन उमेदवारांना बनावट मार्गाने परीक्षा उत्तीर्ण होण्यास मदत करणाऱ्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. टीईटी २३ नोव्हेंबर रोजी घेण्यात आली. परीक्षेच्या आदल्या दिवशी काही व्यक्ती पैशासाठी प्रश्नपत्रिका फिरवत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आणि अनेक संशयितांना ताब्यात घेतले. आतापर्यंत, मुख्य आरोपी महेश गायकवाडसह १८ जणांना […] The post कोल्हापुरात टीईटी पेपर फुटीचे रॅकेट उघडकीस; १८ जणांना अटक appeared first on Dainik Prabhat .
बी. आय. एस. (ब्युरो ऑफ इंडियन स्टॅंडर्ड) अंतर्गत कार्यशाळा संपन्न
ओझर : पुणे जिल्हा शिक्षण मंडळ्याच्या न्यू इंग्लिश स्कुल, शिरोली बुद्रुक येथे मंगळवार दि २५ रोजी बी. आय. एस. च्या (कि रिसोर्स पर्सन) रविंद्र ननवरे यांच्या मार्गदर्शनाखाली (एल एस व्ही एस)ची कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यक्रमासाठी विद्यालयातील विज्ञान शिक्षक, मेंटर आणि स्टॅंडर्ड क्लबचे ६० विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात बी. आय. एस. मेंटर प्रियांका पादीर […] The post बी. आय. एस. (ब्युरो ऑफ इंडियन स्टॅंडर्ड) अंतर्गत कार्यशाळा संपन्न appeared first on Dainik Prabhat .
Temba Bavuma World Record in Test Cricket : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळला गेलेला गुवाहाटी कसोटी सामना यजमान भारतीय संघासाठी निराशाजनक ठरला, तर कर्णधार टेम्बा बावुमाच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिकेसाठी ऐतिहासिक ठरला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ४०८ धावांनी पराभव करत मालिकेत २-० ने क्लीन स्वीप केले. प्रत्येक विजय महत्त्वाचा असला तरी, बावुमासाठी हा विजय खूप […] The post IND vs SA : टेम्बा बावुमा ‘वर्ल्ड रेकॉर्ड’! कसोटी क्रिकेटच्या इतिहासात ‘हा’ पराक्रम करणारा जगातील पहिलाच कर्णधार appeared first on Dainik Prabhat .
जन्मदिनी तरुणाला जीवंत जाळण्याचा प्रयत्न, पाच जणांना अटक
मुंबई : वाढदिवस साजरा करताना नवनवे उद्योग करायचे आणि त्याचे व्हिडीओ करुन व्हायरल करायचे हा प्रकार अलिकडे वाढला आहे. ताजी घटना मुंबईतील कुर्ला परिसरातील आहे. कुर्ला येथे जन्मदिनी तरुणाला जीवंत जाळण्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणात पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेज तपासले आणि पाच जणांना अटक केली आहे. ज्या तरुणाला जीवंत जाळण्याचा प्रयत्न झाला तो जखमी आहे, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.अबुल रेहमान मकसूद आलम खान याचा २४ नोव्हेंबर रोजी वाढदिवस होता. हा वाढदिवस साजरा करण्यासाठी पाच मित्रांनी त्याला एकत्रितपणे आमंत्रित केले. केक कापण्याचा कार्यक्रम ठरला. रात्री जिथे वाहनं पार्क असतात अशा निवांत ठिकाणी भेटायचे ठरले. सर्व जण ठरलेल्या जागेवर पोहोचले. यानंतर केक कापण्यात आला. यानंतर शुभेच्छा देण्याऐवजी मित्रांनी वाढदिवस असलेल्या तरुणावर अंडी आणि दगडांचा मारा केला. थोड्या वेळानंतर ज्याचा वाढदिवस होता त्या तरुणावर मित्रांनी पेट्रोल ओतले.पेट्रोलचा वास येताच अबुल रेहमान मकसूद आलम खान ओरडू लागला. त्याने मित्रांना ओरडतच जाब विचारला. पण मित्रांनी उत्तर दिले नाही. जे पाच जण जमले होते त्यापैकी तीन जणांनी लायटरच्या मदतीने अबुल रेहमान मकसूद आलम खान याला जीवंत जाळण्याचा प्रयत्न केला. कपड्यांनी पेट घेताच संकटाची जाणीव झाल्यामुळे अबुल रेहमान मकसूद आलम खानने जमिनीवर लोळून आग विझवण्याचा प्रयत्न केला. जवळच असलेल्या इमारतीत राहणाऱ्या एका व्यक्तीने हा प्रकार बघितला. नेमका तो तरुण अबुल रेहमान मकसूद आलम खान याला ओळखत होता. तो धावत घटनास्थळी आला. यानंतर अबुल रेहमान मकसूद आलम खान याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.अबुल रेहमान मकसूद आलम खान याला जीवंत जाळल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला. सीसीटीव्ही फूटेज तपासून अबुल रेहमान मकसूद आलम खान याला जीवंत जाळणाऱ्या पाच जणांना अटक करण्यात आली.डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार अबुल रेहमान मकसूद आलम खान याला जीवंत जाळण्याचा प्रयत्न झाला. या प्रकारात गंभीर जखमी झालेला अबुल रेहमान मकसूद आलम खान याला बरा होण्यासाठी वेळ लागणार आहे.पोलिसांनी अयाज मलिक, अश्राफ मलिक, कासिम चौधरी, हुझैफा खान आणि शरीफ शेख यांना अटक केली आहे. न्यायालयाने आरोपींना २९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. पोलीस अबुल रेहमान मकसूद आलम खान वर झालेला हल्ला हा पूर्वनियोजीत होता की अचानक झाला होता याचा तपास करत आहेत.
प्रभात वृत्तसेवा पुणे – मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पुणे जिल्हा समितीचे सदस्य, जातिअंत संघर्ष समितीचे पुणे जिल्हा अध्यक्ष आणि जन आरोग्य मंचचे पुणे जिल्हा अध्यक्ष कॉ. डॉ. किशोर खिलारे यांचे मध्यरात्री निधन झाले. ते ६२ वर्षांचे होते. त्यांच्या कन्या परदेशात असल्याने त्या आल्यानंतर बुधवारी (दि. २६) सकाळी ११.३० वाजता त्यांच्या डॉ. खिलारे यांचा अंत्यविधी वैकुंठ स्मशानभूमीत […] The post Pune News: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉ. किशोर खिलारे कालवश; वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार appeared first on Dainik Prabhat .
Pune : रिलायंसच्या पुणे व मुंबई कार्यालयातील जंगम मालमत्ता जप्त करा; न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल
पुणे – मोटार अपघात न्यायप्राधिकरणाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी न करता नुकसान भरपाई न देणे रिलायन्स जनरल इन्शुअरन्स कंपनीला महागात पडले आहे. पुणे व मुंबई येथील कार्यालयातील जंगम मालमत्ता जप्तीचे आदेश मोटार अपघात न्यायप्राधिकरणाचे सदस्य सत्र न्यायाधीश बी.डी.कुलकर्णी यांनी दिले आहेत. या प्रकरणात अर्जदारांच्या वतीने ॲड. मजहर मुजावर आणि ॲड. प्रमोद धुळे यांनी काम पाहिले. अर्जदार […] The post Pune : रिलायंसच्या पुणे व मुंबई कार्यालयातील जंगम मालमत्ता जप्त करा; न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल appeared first on Dainik Prabhat .
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात शिक्षक पात्रता चाचणी (टीईटी) प्रश्नपत्रिका फोडुन उमेदवारांना बनावट मार्गाने परीक्षा उत्तीर्ण होण्यास मदत करणाऱ्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. टीईटी २३ नोव्हेंबर रोजी घेण्यात आली. परीक्षेच्या आदल्या दिवशी काही व्यक्ती पैशासाठी प्रश्नपत्रिका फिरवत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आणि अनेक संशयितांना ताब्यात घेतले. आतापर्यंत, मुख्य आरोपी महेश गायकवाडसह १८ जणांना […] The post TET Paper Leak : मोठी कारवाई..! टीईटी पेपरफुटी प्रकरणातील मुख्य सूत्रधारासह १८ जणांना बेड्या, राज्यभरात रॅकेट? appeared first on Dainik Prabhat .
Raj Thackeray : “मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा कट”–राज ठाकरे
Raj Thackeray – आयआयटी बॉम्बेचे नाव बदलून आयआयटी मुंबई न करण्याबाबत केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी केलेली टिप्पणी सरकारची मानसिकता दर्शवत असल्याचे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी म्हटले आहे. सिंह यांचे विधान स्पष्टपणे सरकारच्या मानसिकतेचे प्रतीक असल्याचे दिसून येते. नेहमीच मराठी लोकांची असलेली मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा कट मराठी नेत्यांनी आणि जनतेने […] The post Raj Thackeray : “मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा कट” – राज ठाकरे appeared first on Dainik Prabhat .
न्यू इंग्लिश स्कूल शिरोली बु॥ चे क्रीडा स्पर्धत घवघवीत यश
ओझर : न्यू इंग्लिश स्कूल शिरोली बु॥ चे क्रीडा स्पर्धत घवघवीत यशपुणे जिल्हा शिक्षण मंडळ, पुणे आयोजित गट पातळी क्रीडा स्पर्धत न्यू इंग्लिश स्कूल शिरोली बु॥ विद्यालयाने घवघवीत यश संपादन केल्याची माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रसाद हांडे यांनी दिली. शालेय गुणवत्तेबरोबरच विद्यार्थांमध्ये क्रीडा विषयक आवड निर्माण होऊन राज्य -राष्ट्रिय -आंतर राष्ट्रीय खेळाडू निर्माण व्हावेत यासाठी दरवर्षी […] The post न्यू इंग्लिश स्कूल शिरोली बु॥ चे क्रीडा स्पर्धत घवघवीत यश appeared first on Dainik Prabhat .
Fans Chanting Gautam Gambhir Hay Hay Video Viral : दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मायदेशातील कसोटी मालिका भारतीय क्रिकेट संघासाठी एका वाईट स्वप्नासारखी ठरली. गुवाहाटी कसोटीत तब्बल ४०८ धावांच्या मोठ्या फरकाने मिळालेल्या लाजिरवाण्या पराभवानंतर, भारताला २-० अशा फरकाने क्लीन स्वीप स्वीकारावा लागला. या निराशाजनक कामगिरीमुळे भारतीय क्रिकेट विश्वावर एक मोठा डाग लागला असून, चाहत्यांचा संताप आता थेट संघाचे […] The post Gautam Gambhir : भारताच्या लाजिरवाण्या पराभवानंतर चांहत्यांचा संताप; गौतम गंभीरला स्टेडियममध्येच घेरलं, पाहा VIDEO appeared first on Dainik Prabhat .
गँगस्टरची फॅशन…आणि पोलिसांची ॲक्शन.! लॉरेन्स बिश्नोईचे जॅकेट विकणाऱ्या तिघांना अटक
Lawrence Bishnoi – राजस्थान पोलिसांनी आंतरराष्ट्रीय माफिया लॉरेन्स बिश्नोईचे गौरव करणाऱ्यांवर मोठी कारवाई केली आहे. एका मोठ्या कारवाईत लॉरेन्स बिश्नोईच्या नावाचे गौरव करणारे जॅकेट विकणाऱ्या तीन जणांना कोटपुतली पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून लॉरेन्स बिश्नोईचे चिन्ह असलेले ३५ जॅकेट जप्त केले. पोलिस आता हे जॅकेट कुठून आले आणि कोणी बनवले हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. […] The post गँगस्टरची फॅशन… आणि पोलिसांची ॲक्शन.! लॉरेन्स बिश्नोईचे जॅकेट विकणाऱ्या तिघांना अटक appeared first on Dainik Prabhat .
इम्रान खान यांचा मृत्यू ? भेटींवर बंदी; अफवांनी पाकिस्तानमध्ये खळबळ!
इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (PTI) चे संस्थापक इम्रान खान यांचा तुरुंगात संशयास्पद मृत्यू झाल्याच्या अफवा मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर पसरत आहेत. काही पोस्ट्समध्ये पाकिस्तानी लष्कराने त्यांना विष दिल्याचा दावा देखील करण्यात येत आहे, ज्यामुळे पाकिस्तानात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.इम्रान खान यांना २०२३ मध्ये विविध प्रकरणांत दोषी ठरवून रावळपिंडीच्या आदियाला तुरुंगात ठेवण्यात आले आहे. मागील काही आठवड्यांपासून कोणालाही इम्रान खान यांना भेटण्यासाठी परवानगी दिलेली नाही. कुटुंबीय, पक्षनेते तसेच अधिकृत प्रतिनिधींनाही भेटण्याची परवानगी दिली जात नसल्याने या अफवांना अधिक खतपाणी मिळत आहे.तुरुंगाबाहेर शांततापूर्ण धरणे देत असलेल्या इम्रान खान यांच्या बहिणींवर पोलिसांनी अचानक लाठीहल्ला केल्याचा PTI पक्षाचा आरोप आहे. नुरीन नियाझी यांनी पोलिस महासंचालकांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, “आम्ही कोणताही कायदा मोडला नव्हता. रस्ते अडवले नाहीत. तरीही पथदिवे बंद करुन अंधार करत पोलिसांनी आमच्यावर ठरवून हल्ला केला.”या घटनेनंतर इम्रान खान यांच्या बहिणीने पंजाब पोलिसांना पत्र पाठवून संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. त्यांनी मागील तीन वर्षांत शांततेने आंदोलन करणाऱ्यांवर पोलिस अत्याचार वाढल्याचेही नमूद केले.सूत्रांच्या म्हणण्यानुसार, गेल्या महिनाभरात इम्रान खान यांना भेटण्यासाठी कोणालाही परवानगी मिळालेली नाही. त्यांच्या मृत्यूच्या अफवा इंटरनेटवर फिरत असताना तुरुंग प्रशासनाकडून भेटींवर सुरू असलेली बंदी परिस्थिती अधिकच संशयास्पद बनवत असल्याचे पक्षाचे मत आहे.खैबर पख्तूनख्वाचे मुख्यमंत्री सोहैल आफ्रिदी यांनीही सलग सात वेळा भेटीचा प्रयत्न केला, मात्र प्रत्येक वेळी प्रशासनाने त्यांना प्रवेश नाकारल्याचे सांगितले जाते.या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानातील वातावरण तापले असून इम्रान खान यांच्या स्थितीबाबत अधिकृत माहिती जाहीर करण्याची मागणी वाढत आहे.
मुख्यमंत्री असो वा पंतप्रधान, माझे वडीलच दावेदार; प्रियांक खर्गे यांचे विधान चर्चेत
बेंगळुरू : जेव्हा जेव्हा कर्नाटक राज्यात निवडणुका असतात तेव्हा माझे वडील आणि काॅंग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार असतात. जेव्हा संसदीय निवडणुका होतात तेव्हा तेच पंतप्रधानपदाचे दावेदार असतात. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत नेता बदलण्याचा प्रश्न निर्माण झाला, तर माझे वडीलच त्या पदावर हक्क सांगतात, असे विधान कर्नाटक सरकारचे मंत्री प्रियांक खर्गे यांनी केले आहे. […] The post मुख्यमंत्री असो वा पंतप्रधान, माझे वडीलच दावेदार; प्रियांक खर्गे यांचे विधान चर्चेत appeared first on Dainik Prabhat .
पाकिस्तान हादरला.! माजी पंतप्रधान इम्रान खान यांची तुरुंगातच हत्या? ‘तो’फोटो आला समोर…
Pakistan | Imran Khan : पाकिस्तानमध्ये राजकीय अस्थिरता, लष्कराचा हस्तक्षेप आणि दहशतवादी कारवाया हे नवे नाही. मात्र आता समोर आलेल्या एका दाव्यामुळे संपूर्ण पाकिस्तान आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर खळबळ उडाली आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची तुरुंगात हत्या झाल्याची अफवा वेगाने पसरत आहे. सरकार, लष्कर आणि तुरुंग प्रशासन संगनमताने इम्रान खान यांचा छळ करत असल्याचा […] The post पाकिस्तान हादरला.! माजी पंतप्रधान इम्रान खान यांची तुरुंगातच हत्या? ‘तो’ फोटो आला समोर… appeared first on Dainik Prabhat .
Gautam Gambhir takes full responsibility of defeat : गुवाहाटी येथील बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर झालेला दुसरा कसोटी सामना भारतीय संघासाठी अत्यंत निराशाजनक ठरला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडियाला तब्बल ४०८ धावांनी मानहानिकारक पराभव स्वीकारावा लागला. धावांच्या बाबतीत कसोटी क्रिकेटमधील भारताचा हा आजवरचा सर्वात मोठा पराभव ठरला आहे. या लाजिरवाण्या कामगिरीमुळे दक्षिण आफ्रिकेच्या संघाने दोन सामन्यांची कसोटी मालिका […] The post IND vs SA : ‘माझ्या भविष्याचा निर्णय BCCI घेईल…’, द. आफ्रिकेविरुद्धच्या लाजिरवाण्या पराभवानंतर गौतम गंभीरची प्रतिक्रिया appeared first on Dainik Prabhat .
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून भारतीय क्रिकेट संघाची स्टार खेळाडू स्मृती मानधना (Smriti Mandhana) आणि लोकप्रिय म्युझिक कंपोजर पलाश मुच्छल (Palash Muchhal) यांचे लग्न जोरदार चर्चेत होते. त्यांच्या लग्नापूर्वीच्या काही सोहळ्यांचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, ज्यामुळे चाहते या ग्रँड वेडिंगची आतुरतेने वाट पाहत होते. परंतु, चाहत्यांना मोठा धक्का देत, लग्नाच्या अगदी एक दिवस आधी स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचे लग्न अचानक पुढे ढकलल्याचे समोर आले. यामुळे दोघांच्या नात्यात काहीतरी बिनसल्याची चर्चा सुरू झाली. सुरुवातीला यामागचे कारण म्हणून स्मृती मंधानाच्या वडिलांची तब्येत बिघडल्याचे सांगितले गेले. मात्र, लवकरच यामागील खरे आणि धक्कादायक कारण समोर आले. हे कारण म्हणजे पलाश मुच्छलचे काही खासगी फ्लर्टी चॅट्सचे स्क्रीनशॉर्ट्स जे इंटरनेटवर व्हायरल झाले. व्हायरल झालेल्या या चॅट्समध्ये पलाश मुच्छल हा मेरी डिकॉस्टा (Mary D'Costa) नावाच्या तरुणीसोबत संभाषण करत असल्याचे दिसून आले. या चॅट्समध्ये पलाशने स्मृतीसोबतच्या नात्याबद्दल केलेले काही उल्लेख, या लग्नाचे ब्रेकअप होण्याचे मुख्य कारण ठरले असल्याची जोरदार चर्चा आहे. या गंभीर घडामोडीनंतर दोन्ही कुटुंबाकडून अजूनही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.https://prahaar.in/2025/11/26/atara-accident-high-speed-mini-bus-mows-down-two-on-highway-in-phaltan-one-dead-and-four-injured-accident-caught-on-cctv-watch-video/क्रिकेटर स्मृती मंधाना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचे लग्न पुढे ढकलल्याच्या घटनेनंतर सुरू झालेल्या चर्चांना आता नवा आणि मोठा ट्विस्ट मिळाला आहे. पलाशवर स्मृतीला धोका दिल्याचा आरोप होत असताना, व्हायरल चॅट्समधील तरुणीने एक महत्त्वाची पोस्ट सार्वजनिक केली आहे. लग्न पुढे ढकलण्याचे कारण सुरुवातीला स्मृतीच्या वडिलांची तब्येत असल्याचे सांगितले जात होते. पण, त्यानंतर मेरी डिकॉस्टा नावाच्या तरुणीसोबतचे पलाश मुच्छलचे काही फ्लर्टी चॅट्स सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि पलाशने स्मृतीला धोका दिला असल्याचं बोललं जाऊ लागलं. मात्र, आता मेरी डिकॉस्टाच्या नावाचे एक नवीन पोस्ट व्हायरल होत आहे, ज्यामध्ये मेरीने स्पष्टपणे म्हटले आहे की, ती पलाशला कधीही प्रत्यक्ष भेटलेली नाही. मेरी डिकॉस्टाच्या या नवीन पोस्टमुळे नेटकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पोस्टमुळे पलाशच्या भूमिकेवर अनेक मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत. पहिला प्रश्न असा की, जर भेट झाली नसतानाही पलाशने मेरीला DM (Direct Message) का केला? प्रश्न दुसरा असा की, स्मृती मंधानासोबत रिलेशनशिपमध्ये असतानाही पलाश तिच्याशी फ्लर्ट (Flirt) का करत होता? हे व्हायरल चॅट्स आणि मेरीच्या स्पष्टीकरणामुळे या दोघांच्या लग्न रद्द होण्यामागील सत्य काय आहे, याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पलाश किंवा स्मृतीकडून अजूनही अधिकृत स्पष्टीकरण आलेले नाही.मेरी डिकॉस्टाच्या व्हायरल पोस्टमध्ये मोठा खुलासा; 'तो' खरा चेहरा...
'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या सिझनचा विजेता (Bigg Boss Marathi Season 5 Winner) सूरज चव्हाण लवकरच आपल्या आयुष्यातील एका नव्या अध्यायाला सुरुवात करणार आहे. सूरज चव्हाण हा लवकरच विवाहबंधनात अडकणार असून, त्याच्या लग्नापूर्वीच्या विविध कार्यक्रमांना जोरदार सुरुवात झाली आहे. सूरज चव्हाणची होणारी पत्नी कोण आहे, हे जाणून घेण्यासाठी चाहत्यांमध्ये बरीच उत्सुकता होती. अखेर, त्याच्या होणाऱ्या पत्नीचे नाव संजना (Sanjana) असे आहे. येत्या २९ नोव्हेंबरला हे दोघे विवाहबद्ध होणार आहेत. सूरज चव्हाण आणि संजना यांच्या लग्नाच्या आधीचे विधी मोठ्या उत्साहात पार पडत आहेत. सोशल मीडियावर सूरजच्या केळवणाचे (Kelvan) फोटो आणि व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. यासोबतच, नुकताच संजनाचा घाण्याचा कार्यक्रम देखील पार पडला. घाण्याच्या या कार्यक्रमात वधू संजनाने धमाल डान्स केला आहे. तिच्या या हटके डान्सचा व्हिडीओ सध्या नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे आणि तो वेगाने व्हायरल होत आहे. चाहत्यांकडून या दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.https://prahaar.in/2025/11/26/palash-muchhal-exposing-flirty-chats-with-mary-decosta-viral-on-social-media-t/नुकत्याच पार पडलेल्या घाण्याच्या कार्यक्रमात वधू संजनाचा पारंपरिक लुक चाहत्यांना खूप आवडला आहे. संजनाने या कार्यक्रमासाठी हिरव्या रंगाची साडी नेसली होती. त्यावर तिने पारंपरिक दागिने परिधान केले होते आणि केसात सुगंधित गजरा माळला होता. या पारंपरिक वेशात तिने केलेला डान्स सध्या नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. सूरज आणि संजना यांचे खास केळवण (Kelvan) सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर 'कोकण हार्टेड गर्ल' म्हणून ओळखली जाणारी अंकिता वालावलकर हिने धूमधडाक्यात केले होते. अंकिताने खास संजनासाठी पुरी-भाजीचा बेत केला होता. या केळवणादरम्यान सूरजने घेतलेला उखाणाही चाहत्यांमध्ये खूप व्हायरल झाला आहे. त्याने, बिग बॉस जिंकून झालं माझं पूर्ण स्वप्न.. संजनाचं नाव घेतो आता करेन लग्न असा हटके उखाणा घेतला, ज्यामुळे उपस्थित पाहुण्यांमध्ये हास्याचे वातावरण निर्माण झाले. आता २९ नोव्हेंबरला होणाऱ्या या दोघांच्या लग्नाची चाहत्यांना उत्सुकता आहे.
मोहित सोमण: युएस काय चीनलाही भारताने टक्कर देण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. पृथ्वीवरील दुर्मिळ वस्तू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आरईपीएम (Rare Earth Permanent Magnets REPM) उत्पादन सुरू करण्यासाठी प्रोत्साहनपर ७३०० कोटींची इन्सेटिंव योजना सरकार सुरु करणार आहे. प्रसारमाध्यमांना दिलेल्या सुत्रांच्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेट बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. जगभरातील युएससह अनेक देशांना चीनवर दुर्मिळ वस्तूंसाठी अवलंबून रहावे लागत असे ज्याचा फटका मोठ्या प्रमाणात व्यापारी, गुंतवणूकदारांसह निर्यातदारांना बसत होता. त्याला पर्याय म्हणून स्वदेशीच हे उत्पादन सुरु करण्यासाठी मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतला असल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे.उत्पादन कंपन्यांना या योजनेचा लाभ मिळणार असून सात वर्षांसाठी आर्थिक सहाय्यासह प्रोत्साहनासाठी इन्सेंटिव मिळू शकतात. दरवर्षी किमान ६००० टनांचे उत्पादन लक्ष करण्यासाठी सरकारने ही योजना आखली आहे. अँडव्हान्स मॅग्नेट (चुंबक) तंत्रज्ञानासह हे उत्पादन भारतात सुरू करण्यासाठी आवश्यक असलेला पाठिंबा या योजनेअंतर्गत भारत सरकार देऊ शकते. यामुळे जीएमडीसी (Gujarat Mineral Development Corporation Limited) कंपनीचा शेअर आज मोठ्या प्रमाणात उसळला होता.हा शेअर आज ६.९६% इंट्राडे उच्चांकावर उसळला होता. माहितीनुसार, १२०० एमटीवीए (Magnetic Vibration Absorber) क्षमतेचे पाच प्रकल्पांना सरकार मंजुरी देण्याची शक्यता आहे.यापूर्वी चीनने मोठ्या प्रमाणात लोहचुंबक अथवा दुर्मिळ वस्तूंच्या उत्पादनातील निर्यातीत युएससाठी मोठ्या प्रमाणात निर्बंध घातले होते. त्यानंतर युएसने चीनवर ४७% पर्यंत अतिरिक्त शुल्क वाढवले आहे. या दुर्मिळ घटकांचा मोठ्या प्रमाणात वापर अत्याधुनिक तंत्रज्ञानासाठी, ग्राहक केंद्रित इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंमध्ये, अक्षय उर्जेसहित औषधे, संरक्षण, अशा विविध क्षेत्रात केला जातो. सध्या सर्वाधिक या क्षेत्रात चीनची मक्तेदारी आहे यासाठी अमेरिकेने चीनवर दबाव निर्माण केला आहे. अशातच घटत्या दुर्मिळ पृथ्वी वस्तू उत्पादनांसाठी भारतालाही चीन व इतर देशांवर अवलंबून रहावे लागत असे यासाठी सरकारने ही योजना राबवण्याचे ठरवले आहे.खरं तर भारतात दुर्मिळ पृथ्वीचा जगातील तिसरा सर्वात मोठा साठा आहे असून तो ६.९ मेट्रिक टन आहे, ज्यामध्ये जगातील वाळू खनिज साठ्यांचा जवळजवळ ३५% समावेश आहे आणि चीनच्या निर्बंधांना तोंड देत ते उद्योगाला चालना देत आहेत. जुलै २०२५ मध्ये संसदेत असे नोंदवण्यात आले की देशात १३.१५ मेट्रिक टन मोनाझाइटमध्ये असलेले सुमारे ७.२३ दशलक्ष टन (MT) REO आहेत, जे आंध्र प्रदेश, ओडिशा, तामिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल, झारखंड, गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांमधील किनारी, देशांतर्गत प्रदेशात आणि नदीकाठच्या वाळूमध्ये आढळतात. तर गुजरात आणि राजस्थानच्या काही भागात कठीण खडकांमध्ये आणखी १.२९ मेट्रिक टन दुर्मिळ पृथ्वी खजिना साठवला जातो. त्यामुळे भारताचे हे पाऊल मोठे मानले जात आहे.याविषयी अधिक माहिती देताना,'दुर्मिळ पृथ्वी ही एक धोरणात्मक सामग्री आहे.चुंबकाच्या कमतरतेमुळे कार आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन थांबवण्यात आले. कायमस्वरूपी चुंबकांचा वापर ईव्ही, एरोस्पेस, संरक्षण, वैद्यकीय उपकरणांमध्ये आहे.' असे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले आहेत.ही योजना एकात्मिक आरईपीएम उत्पादन सुविधांच्या निर्मितीला पाठिंबा देईल, ज्यामध्ये दुर्मिळ पृथ्वी ऑक्साईडचे धातूंमध्ये, धातूंचे मिश्रधातूंमध्ये आणि मिश्रधातूंचे तयार आरईपीएममध्ये रूपांतर करणे समाविष्ट आहे, असे कॅबिनेट नोटमध्ये म्हटले आहे. एकूण आर्थिक खर्चात पाच वर्षांसाठी आरईपीएम विक्रीवर ६४५० कोटी रुपयांचे विक्री-संबंधित प्रोत्साहन आणि उत्पादन सुविधा स्थापन करण्यासाठी ७५० कोटी रुपयांचे भांडवली अनुदान समाविष्ट असणार आहे.चीन जागतिक दुर्मिळ पृथ्वी चुंबक पुरवठा साखळीवर वर्चस्व गाजवतो आणि कठीण परवाना व्यवस्थेद्वारे भू-राजकीय धोरणाचे साधन म्हणून त्याचे नियंत्रण वापरत आहे. वैष्णव म्हणाले की ओडिशा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, गोवा आणि गुजरातच्या किनारपट्टीवर दुर्मिळ पृथ्वीचे साठे आहेत, तसेच गुजरात आणि महाराष्ट्राच्या डोंगराळ भागातही आहेत. कायमस्वरूपी चुंबक हलक्या आणि जड दुर्मिळ पृथ्वीच्या मिश्रणाद्वारे बनवले जातील.
शिवडीत उबाठाची होणार मोठी पंचाईत, मनसेच ठरणार डोकेदुखी
मनसेसाठी आपल्याच नगरसेवकांना घरी बसवण्याची वेळ येणार उबाठावरमुंबई (सचिन धानजी) : दक्षिण मुंबईतील शिवडी विधानसभेत भाजपा शिवसेनेने मनसेला पाठिंबा दिल्यानंतरही मनसे नेते आणि उमेदवार बाळा नांदगावकर यांचा ७ हजार मतांनी पराभव झाला. परंतु आता हीच मनसे उबाठा शिवसेनेसोबत जावून महापालिका निवडणूक लढवणार आहे. पण शिवडी विधानसभेत उबाठाचे पाचही नगरसेवक असून मनसेसोबत युती केल्यास या विधानसभेत कुठे सामावून घ्यायचे हाच प्रश्न भविष्यात निर्माण होणार आहे. शिवडीत उबाठाची मनसेला जागा सोडण्यासाठी मोठी पंचाईत होणार असून मनसेला एक किंवा दोन जागा सोडायच्या झाल्यास उबाठाच्या नगरसेवकांना घरी बसवण्याची वेळ येणार आहे. त्यामुळे शिवडीत मनसेला ऍडजस्ट करण्यासाठी उबाठाला आपल्या नगरसेवकांचा बळी चढवावा लागणार असल्याचे स्पष्ट होत आहे.शिवडी विधानसभेत पाच महापालिका प्रभाग असून त्यासर्व प्रभागांमधून उबाठाचे नगरसेवक निवडून आले आहेत. यासर्व प्रभागांमध्ये प्रभाग क्रमांक २०२, प्रभाग क्रमांक२०४ आणि प्रभाग क्रमांक २०६ हे तीन प्रभाग सर्वसाधारण खुले झाले आहेत. तर प्रभाग क्रमांक २०३ आणि प्रभाग क्रमांक २०५ हे प्रभाग महिला आरक्षित झाले आहेत. या विधानसभेतील प्रभाग क्रमांक २०३ आणि प्रभाग क्रमांक २०६वर मनसेचा प्रमुख दावा राहणार असल्याचे स्पष्ट होत आहे.प्रभाग क्रमांक २०३ हा महिला आरक्षित कायम राहिल्याने या मतदार संघातून उबाठामधून सिंधु मसुरकर यांच्यासमवेत इच्छुकांची यादी मोठी आहे. पण याच मतदार संघाची बांधणी मनसेकडून केली जात आहे. याच मतदार संघात मनसेने कोकण महोत्सव भरवला आहे. त्यामुळे मनसेकडून या प्रभागात शाखाध्यक्ष निलेश इंदप हे आपल्या पत्नीच्या उमेदवारीसाठी इच्छुक आहे. इंदप यांनी कोकण महोत्सव भरवला आहे आणि यासाठी खुद्द मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहिले होते. त्यामुळे या प्रभागावर मनसेचा दावा पक्का मानला जाणार असून तसे झाल्यास सिंधु मसुररकर यांच्यासह दगडू सकपाळ यांच्या मुलगी रेश्मा सकपाळ आणि इतरांचा पत्ता कापला जाण्याची शक्यता आहे. तसेच मनसेचा दुसरा दावा हा प्रभाग क्रमांक २०६मध्ये असेल. हा प्रभाग मनसेसाठी अनुकूल असून मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्यासह राज ठाकरे यांच्या जवळ असलेल्या चेतन पेडणेकर या प्रभागातून इच्छुक आहेत. या प्रभागातून उबाठाचे सचिन पडवळ हे निवडून आलेले आहेत. पडवळ हे अभ्यासू नगरसेवक असले तरी या प्रभागातून किशोर वाळुंज हे इच्छुक आहेत. या दोघांचा वादात हा प्रभाग मनसेला सोडला जाणार का असा प्रश्न आहे. पाच जागा उबाठाकडे असल्याने मनसेला केवळ एक जागा सोडली जाते की दोन जागा दिल्या जातात याबाबत साशंकता आहे. त्यामुळे मनसेसोबत युती केल्यास याचा पहिला फटका जागा वाटपात उबाठाला शिवडी मतदार संघात बसला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मनसेला सामावून घेण्यासाठी आपल्या नगरसेवकाचा पत्ता कापण्याची वेळ येणार आहे, यामुळे भविष्यात शिवडी विधानसभेत नाराजी नाट्य पहायला मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.लोकसभा निवडणूक २०२४मधील शिवडी विधानसभेतील मतदान अरविंद सावंत उबाठा: ७६, ०५३ यामिनी जाधव शिवसेना: ५९,१५०शिवडी विधानसभा २०२४चा निकाल अजय चौधरी उबाठा : ७४,८९० बाळा नांदगावकर,मनसे : ६७,७५०प्रभाग क्रमांक २०२ (सर्वसाधारण खुला)हा प्रभाग आधी महिला असला तरी आगामी निवडणुकीत तो सर्वसाधारण अर्थात खुला झाला आहे. या भागातून आजवर सहावेळा निवडून आलेल्या माजी महापौर श्रद्धा जाधव या उबाठाच्या नगरसेविका आहे. हा प्रभाग खुला झाल्याने श्रद्धा जाधव यांचे ज्येष्ठ पुत्र आणि उबाठा युवा सेनेचे पदाधिकारी पवन जाधव यांचे नाव चर्चेत आहे. पवन जाधव बरोबरच त्यांच्या पक्षाचे शाखाप्रमुख इंदुलकर याचे नाव चर्चेत आहे. हा प्रभाग भाजपा सुटण्याचीची शक्यता असून भाजपकडून पार्थ बावकर यांच्या नावाची तर मनसेकडून प्रसाद सरफरे यांच्या नावाची चर्चा आहे. श्रद्धा जाधव या वडाळा विधानसभेतील आपल्या जुन्या प्रभागात जिथे तो प्रभाग महिला आरक्षित झाला आहे, तिथे जाणार असल्याची शक्यता आहे.प्रभाग क्रमांक २०३ (महिला)हा प्रभाग पुन्हा एकदा महिला आरक्षित झाला असून मागील निवडणुकीत नाना आंबोले यांच्या पत्नीचा पराभव करून विजयी झालेल्या सिंधू मसुरकर या पुन्हा इच्छुक आहेत. तर याभागात त्यांच्यासमोर उमेदवारी मिळवताना मोठी अडचण आहे. या प्रभागात माजी आमदार दगडू सकपाळ यांची कन्या आणि युवा सेना पदाधिकारी रेश्मा सकपाळ.दिव्या बडवे, भरती पेडणेकर, दर्शना पाटकर याही इच्छुक आहेत. तर आमदार अजय चौधरी यांची गौरी चौधरी यांचेही नाव इच्छुकांच्या यादीत आहे. तर भाजपकडून राजेश्री हाटले,राखी शेटे, साक्षी दरेकर, शिवसेनेकडून तेजस्विनी आंबोले, मनीषा राणावडे आणि मनसेकडू आसावरी जाधव आणि शाखाध्यक्ष इंदप यांची पत्नी आदींच्या नावाची चर्चा आहे. शिवडी विधानसभेतील या प्रभागातील लढत ही लक्षणीय ठरणार आहे.प्रभाग क्रमांक २०४ (सर्वसाधारण खुला)हा प्रभाग पुन्हा एकदा सर्वसाधारण झाला आहे. प्रभाग पुन्हा खुला राहिल्याने उबाठाचे नगरसेवक माजी बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकिळ यांची दावेदारी कायम राहिली आहे. पण यंदा कोकिळ यांना त्यांच्याच पक्षाचे किरण तावडे यांचे आव्हान आहे. उबाठाकडून तावडेही इच्छुक आहेत. भाजपकडून अरुण दळवी, मनसेकडून विक्रांत विचारे आणि संतोष नलावडे आणि शिवसेकडून अतुल मावळे यांच्या नावाची इच्छुक म्हणून चर्चा आहे.प्रभाग २०५ (महिला)हा प्रभाग आधी सर्वसाधारण असल्यामुळे उबाठाचे दत्ता पोंगडे हे नगरसेवक निवडून आले होते. पण आता हा प्रभाग महिला आरक्षित झाल्याने या प्रभागातून उबाठाकडून वैभवी चव्हाण, गौरी चौधरी, रुपाली चांदे या इच्छुकांच्या रांगेत आहेत. शिवसेनेकडून अनुराधा इनामदार यांच्या नावाची चर्चा आहे. वैभवी चव्हाण ही माजी नगरसेविका असून प्रभाग २०३ मध्ये वर्णी न लागल्यास गौरी चौधरी यांच्यासाठी आमदार अजय चौधरी शब्द टाकून यात आपल्या सुनेला उमेदवारी मिळवून देण्याचा प्रयत्न करतील.प्रभाग २०६ (सर्वसाधारण)या प्रभागातून उबाठाचा नगरसेवक सचिन पडवळ यांच्या रूपात निवडून आला. हा प्रभाग पुन्हा सर्वसाधारण झाल्याने सचिन पडवळ यांची उबाठा कडून प्रमुख दावेदारी असली तरी त्यांच्यासमोर त्यांच्या पक्षातून किशोर वाळुंज यांचे आव्हान असणार आहे. वाळुंज हे या प्रभागातून इच्छुक आहे. शिवसेनेकडून राम मोचन मुरारी हे इच्छुक आहे. तर मनसेकडून चेतन पेडणेकर हे निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे हा प्रभाग शिवसेनेला मनसेसाठी सोडावे लागल्यास सचिन पडवळ याला मागे हटावे लागणार आहे. हा प्रभाग मनसेसाठी पूरक असल्याने मनसेची इथे जोरदार मागणी राहणार असल्याचे बोलले जात आहे.
Sachin Pilgaonkar | Dharmendra : हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘ही-मॅन’ आणि दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचे सोमवारी (दि. 24 ) निधन झाले आहे. 89 वर्षांच्या या व्यक्तीने मुंबईतील त्यांच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते आणि रुग्णालयातही दाखल होते त्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले होते. तेव्हापासून ते त्यांच्या कुटुंबासोबत त्यांच्या घरी वेळ घालवत […] The post त्यांनी स्वतः मला ‘यमला पगला दीवाना’साठी विचारलं, पण मी धरमजींना नकार दिला…; सचिन पिळगावकरांचा मोठा खुलासा appeared first on Dainik Prabhat .
बारामतीत लगीन घाई..! युगेंद्र अन् जय पवार अडकणार विवाहबंधनात; तारीख अन् ठिकाण जाहीर?
पुणे : राज्यात सध्या नगरपालिका-नगरपंचायत निवडणुकांचा (Municipal Election) धुरळा उडाला असताना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) मात्र कौटुंबिक आणि राजकीय दोन्ही आघाड्यांवर एकाच वेळी तारेवरची कसरत करताना दिसत आहेत. कारण पवार कुटुंबात सध्या लग्नाची लगबग सुरू आहे. अजित पवारांचे पुतणे तसेच गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्याविरुद्ध बारामतीतून उतरलेले युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांचा विवाह सोहळा येत्या […] The post बारामतीत लगीन घाई..! युगेंद्र अन् जय पवार अडकणार विवाहबंधनात; तारीख अन् ठिकाण जाहीर? appeared first on Dainik Prabhat .
IND vs SA South africa beat India in Test Series : गुवाहाटीच्या बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. दक्षिण आफ्रिकेने भारताचा ४०८ धावांनी धुव्वा उडवत कसोटी मालिकेत २-० ने क्लीन स्वीप केला. या विजयासह, दक्षिण आफ्रिकेच्या संघाने २५ वर्षे जुन्या इतिहासाची पुनरावृत्ती केली आहे. यापूर्वी, […] The post IND vs SA : दक्षिण आफ्रिकेने भारताचा धुरळा उडवत रचला इतिहास! 25 वर्षांनी घरात घुसून चारीमुंड्या केले चीत appeared first on Dainik Prabhat .
President Draupadi Murmu : “संविधान गुलामगिरीची मानसिकता नष्ट करते…”–राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
President Draupadi Murmu – संविधान हा देशाच्या अस्मितेचा पाया आहे आणि गुलामगिरी सोडून राष्ट्रवादी मानसिकता स्वीकारण्यासाठी मार्गदर्शक दस्तऐवज आहे. स्वातंत्र्यानंतर, संविधान सभेने भारताची अंतरिम संसद म्हणूनही काम केले. डॉ. भीमराव अर्थात बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या संविधानाचे मुख्य शिल्पकार होते. २०१५ मध्ये, बाबासाहेबांच्या १२५ व्या जयंतीचे वर्ष, दरवर्षी २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा […] The post President Draupadi Murmu : “संविधान गुलामगिरीची मानसिकता नष्ट करते…” – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू appeared first on Dainik Prabhat .
मोहित सोमण: आज शेअर बाजारात 'छप्पर फाड के' वाढ झाली आहे. तेजीचा सुतळी बॉम्ब फुटल्याने शेअर बाजारात भरघोस वाढ झाली. सेन्सेक्स १०२२.५० अंकाने उसळत ८५६०९.५१ व निफ्टी ३२०.५० अंकांने उसळत २६२०५.३० पातळीवर स्थिरावला आहे. त्यामुळे सेन्सेक्स १.२१% व निफ्टी १.२४% दिवसभरात उसळला होता. सेन्सेक्स बँक निर्देशांकाने तर मोठी कामगिरी करत ७७२.७५ अंकांची वाढ नोंदवली असून बँक निफ्टीतही ७०७.२५ अंकांची मोठी वाढ झाली आहे. निफ्टी व्यापक निर्देशांकात अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ निफ्टी नेक्स्ट ५० (१.४९%), मिडकॅप सिलेक्ट (१.४७%), नेक्स्ट ५० (१.४९%) निर्देशांकात झाली असून निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात सर्वाधिक वाढ मेटल (२.०६%), मिडिया (१.६२%), कंज्यूमर ड्युरेबल्स (१.७५%) तेल व गॅस (१.७२%), एफएमसीजी (१.७२%) निर्देशांकात निर्विवाद वाढ झाली आहे. तसेच डिसेंबर एफ अँड ओमधील सुरूवातीच्या काळात गुंतवणूकदारांनी खरेदी सुरू केल्याने बाजारात आज मोठी रक्कम गुंतवली गेली आहे.मोठ्या प्रमाणात आज शेअर बाजारात घरगुती व परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी उदंड प्रतिसाद दिला. भारतीय कंपन्यासह अर्थव्यवस्थेतील मजबूत फंडांमेंटल व त्याला टेक्निकल मजबूतीची साथ मिळाल्याने सेन्सेक्स व निफ्टीसह मेटल,बँक, फायनांशियल सर्विसेस, हेल्थकेअर या शेअर्समध्ये झालेल्या भरघोस वाढीमुळे बाजारात मोठी रॅली झाली आहे. अखेरच्या सत्रात ब्लू चिप्स कंपनीच्या स्क्रिपमध्येही वाढ झाल्याने बाजारात आज घसरणीला वाव मिळाला नाही. मिड स्मॉल कॅप शेअर्समध्येही वाढ झाल्याने मजबूत आधारपातळी बाजारात राखली गेली आहे.युएस बाजारातील फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपातीची अपेक्षा गेले २ दिवसात व्यक्त केली जात होती. कालच्या अस्थिरतेचा अपवाद वगळता शेअर बाजारात या आशावादामुळे ४ सत्रात वाढ नोंदवली आहे. आज विशेषतः सकारात्मक फेडच्या वक्तव्यांचा विशेष फायदा जागतिक शेअर बाजारात होत आहे. कालच्या युएस बाजारातील रॅलीसह आशियाई बाजारातही आज तुफान रॅली झाली आहे. युएस बाजारातील आजच्या सुरुवातीच्या कलातही तुफानी वाढ होत आहे. याखेरीज अमेरिकेतील आगामी महागाई, ग्राहक सीपीआय निर्देशांक, रोजगार आकडेवारी, किरकोळ विक्रीसह इतर महत्वाची आकडेवारी येणार असल्याने विशेष उत्साह बाजारात दिसत आहे. युक्रेन रशिया यांच्यातील तडजोडीसाठी युएसने प्रयत्न सुरू केल्याने भूराजकीय अस्थिरतेत मोठ्या प्रमाणात शांतता निर्माण झाली. जपानी बाजारातील मजबूत जीडीपीसह इतर आकडेवारीमुळे आशियाई बाजारात रॅलीला आणखी जोड मिळाली होती.आज दुपारी तीन दिवसांच्या घसरणीनंतर आज जोरदार पुनरागमन केल्याने बाजारात सेन्सेक्स ९८८.९९ (१.१७%), निफ्टी ३११.५० (१.२०%) उसळत मोठी वाढ नोंदवली आहे. कालच्या नफा बुकिंगनंतरही आज मोठ्या प्रमाणात बाजारात डिसेंबरसाठी आणखी गुंतवणूक वाढवली गेल्याने त्याचा फायदा बाजारात झाला. कच्च्या तेलाच्या निर्देशांकातही घसरण झाल्याने आज मोठ्या प्रमाणात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात भारतीय बाजारात गुंतवणूक वाढवली असल्याची शक्यता आहे. डॉलरच्या तुलनेत रूपयातही किरकोळ वाढ झाल्याचाही फायदा बाजारात दिसला आहे.मोठ्या प्रमाणावर आज परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी व घरगुती गुंतवणूकदारांकडून खरेदी वाढवताना आज मोठ्या प्रमाणात रोख विक्री मोठ्या प्रमाणात थांबली होती. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी ७८५.३० कोटींच्या गुंतवणुकीसह निव्वळ खरेदीदार बनले होते तर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी अंदाजे ३९१२ कोटींची गुंतवणूक केली आहे. सकाळी १ ते १.५०% घसरणाऱ्या अस्थिरता निर्देशांक (VIX Volatility Index)हा १.८५% घसरणीवर पोहोचला असल्याने आज दिवसभरातील स्थैर्य अखेरच्या सत्रात आणखी वाढले आहे.आज युएस बाजारातील सुरूवातीच्या कलात डाऊ जोन्स (०.२९%), एस अँड पी ५०० (०.९३%), नासडाक (०.७१%) निर्देशांकात वाढ झाली आहे तर आशियाई बाजारातील अखेरच्या सत्रात गिफ्ट निफ्टी (१.३१%) सह निकेयी २२५ (१.९३%), तैवान वेटेड (१.८१%), जकार्ता कंपोझिट (०.९३%),कोसपी (२.६०%) निर्देशांकात वाढ झाली आहे.शेअर बाजारातील अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ नाटको फार्मा (११.२%), जीएमडीसी (८.२१%), रिलायन्स पॉवर (६.१३%), जेके सिमेंट (६.०९%), पीजी इलेक्ट्रोप्लास्ट (५.९१%), डीसीएम श्रीराम (५.८३%), टाटा इन्व्हेसमेंट कॉर्पोरेशन (५.५१%), नुवामा वेल्थ (४.८८%), जीई व्हर्नोवा (४.५०%), एनएमडीसी स्टील (४.४४%) निर्देशांकात झाली आहे.शेअर बाजारातील अखेरच्या सत्रात सर्वाधिक घसरण सीपीसीएल (११.९९%), एमआरपीएल (३.१२%), एम अँड एम फायनांशियल सर्विसेस (२.९१%), टीआरआयएल (२.६३%), एफएसएन ईकॉमर्स (२.२२%), जेपी पॉवर वेंचर (२.१९%), सफायर फूडस (१.९५%), मदर्सन वायरिंग (१.७३%), भारती एअरटेल (१.६१%) निर्देशांकात झाली आहे.आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले आहेत की,' जागतिक बाजारपेठेत उत्सवी सांता क्लॉज रॅली मुळे देशांतर्गत शेअर बाजारांमध्ये लक्षणीय वाढ झाली. किरकोळ आणि देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदार (DII) च्या मजबूत आवकांमुळे ही वाढ झाली, तर परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांचा (FII) प्रवाह सामान्य राहिला. जागतिक स्तरावर, डिसेंबरमध्ये यूएस फेडरल रिझर्व्हच्या दर कपातीच्या वाढत्या अपेक्षांसह, यूएस उत्पन्न कमी होणे आणि कमकुवत डॉलरसह बाजारातील भावना सुधारल्या. याव्यतिरिक्त, कच्च्या तेलाच्या किमतीत १% घट झाल्याने महागाईच्या चिंता कमी होण्यास मदत झाली. देशांतर्गत धोरणात्मक आघाडीवर, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) डिसेंबरमध्ये २५-बेसिस पॉइंट रेट कपात लागू करेल अशी अपेक्षा आहे, ज्याला चलनवाढ कमी करणे आणि उदासीन भूमिका घेणे आवश्यक आहे. शिवाय, रशिया आणि युक्रेनमधील संभाव्य युद्धबंदीभोवती वाढणारा आशावाद जोखीम घेण्याची क्षमता वाढवत आहे, ज्यामुळे आगामी वर्षासाठी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होत आहे.'आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना अशिका इन्स्टिट्युशनल इक्विटीजने म्हटले आहे की,'डिसेंबर डेरिव्हेटिव्ह्ज मालिकेच्या पहिल्या दिवशी, भारतीय बाजारांनी जोरदार सुरुवात केली कारण निफ्टीने सकाळच्या अंतराच्या घसरणीपासून तीक्ष्ण पुनरागमन पाहिले आणि निर्णायकपणे २६००० पातळीचा टप्पा पुन्हा मिळवला, जो या प्रमुख तांत्रिक आणि मानसिक पातळीच्या वर आरामात बंद झाला. इंट्राडे रिकव्हरीमध्ये सर्वत्र खरेदीची तीव्र उत्सुकता दिसून आली, जी सुधारित भावना दर्शवते. क्षेत्रीयदृष्ट्या, व्यापक बाजार दृढपणे हिरव्या रंगात होता, धातू, ऊर्जा, ग्राहक टिकाऊ वस्तू आणि तेल आणि वायूमध्ये लक्षणीय ताकद होती, जी व्यापक-आधारित तेजी दर्शवते. बहुतेक क्षेत्रीय निर्देशांक उच्चांकावर संपले, जे नवीन तेजीच्या गतीला अधोरेखित करते. डेरिव्हेटिव्ह्ज क्षेत्रात, NUVAMA, 360ONE, SAIL, MCX आणि SIEMENS मध्ये लक्षणीय ओपन इंटरेस्ट स्पर्ट दिसून आले, जे सूचित करते की या काउंटरमध्ये नवीन लॉन्ग पोझिशन्स तयार होत आहेत. निफ्टी पर्यायांसाठी, कॉल साईड OI बिल्डअप २६२०० आणि २६५०० वर केंद्रित आहे, जे संभाव्य प्रतिकार क्षेत्र दर्शवते, तर पुट साईडवर, २६१०० आणि २६००० पातळीवर हेवी राइटिंग मजबूत समर्थन पातळी दर्शवते.'आजच्या बाजारातील बँक निफ्टीवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे तांत्रिक विश्लेषक वत्सल भुवा म्हणाले आहेत की,'बँक निफ्टी एका मजबूत दीर्घ तेजीच्या कॅन्डलस्टिकसह बंद झाला, जो सूचित करतो की बुल्सचा विश्रांतीचा कालावधी संपला आहे आणि गती पुन्हा वरच्या दिशेने येत आहे. आरएसआयने तेजीच्या क्रॉसओवरमध्ये प्रवेश केल्याने निर्देशांकातील ताकद आणखी पुष्टी होते. पुढे जाऊन, जोपर्यंत निर्देशांक समर्थन पातळीपेक्षा वर टिकतो तोपर्यंत बाय-ऑन-डिप धोरण राखले पाहिजे. तात्काळ समर्थन (Immdiate Support) ५९२०० वर ठेवले आहे, तर ५८८०० हा स्थितीत्मक आधार (Positional Support) म्हणून काम करतो. वरच्या बाजूस, मानसिकदृष्ट्या महत्त्वाच्या ६०००० पातळीजवळ संभाव्य प्रतिकार (Potential Resistance) अपेक्षित आहे.'
हवाई क्षेत्रात परिवर्तन होणार SESI उद्घाटनात पीएम मोदीचे मोठे उद्गार! २०३१ पर्यंत.....
हैद्राबाद: एमएसएमई क्षेत्रातही मोठी क्रांती होत आहे. याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी,' हवाई क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत या आधुनिकीकरणासाठी सरकारही अनेक परिवर्तनकारी बदल या क्षेत्रासाठी करत आहे. तसेच या क्षेत्रात मोठ्या संख्येने एमएसएमई (मध्यम,लघू, सूक्ष्म उद्योग) यांनी भाग घ्यावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत 'असे विधान केले. एसएईएसआय (Safran Aircraft Engine Services India) या उच्च क्षमतेच्या रिपेअर, मेंटेनन्स इंजिनिअरिंग सिस्टिम असलेल्या लिप (Leap) इंजिनच्या उद्घाटनप्रसंगी म्हटले आहे. यावेळी पंतप्रधानांसह केंद्रीय उड्डाणमंत्री के राममोहन नायडूही उपस्थित होते.हवाई उड्डाण मंत्र्यांनीही बोलताना भारताचे एम आर ओ (Maintenance, Repair and Overhaul) क्षेत्रात आर्थिक वर्ष २०३१ पर्यंत ४ अब्ज डॉलरची उलाढाल होईल असे मोठे वक्तव्य यावेळी केले आहे. या क्षेत्रात वार्षिक आधारे ८.९% वाढ होईल असेही ते म्हणाले आहेत. स्वदेशात या तंत्रज्ञानात काम केल्यास परकीय चलनातील १५ अब्ज डॉलरची बचत होणार आहे. त्याचा निश्चितच फायदा आम्ही ग्राहकांपर्यंत पोहोचवू असे ते पुढे म्हणाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही याविषयी आणखी महत्वाचे भाष्य केले. 'विमान वाहतूक उद्योगाला चालना देण्यासाठी केंद्राने काही क्षेत्रात १०० टक्के थेट परकीय गुंतवणुकीला परवानगी दिली आहे, असे सांगून पंतप्रधान म्हणाले की, भारताने १५०० विमानांची ऑर्डर आधीच दिली आहे ज्यामुळे विमान वाहतूक अधिक मजबूत होईल. भारतातील सफ्रानच्या कामकाजात केंद्र सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल, असे मोदी म्हणाले आहेत.जीएमआर एरोस्पेस अँड इंडस्ट्रियल पार्क येथे येणाऱ्या सफ्रानच्या सर्वात मोठ्या भारतीय इंजिन देखभाल, दुरुस्ती आणि दुरुस्ती (MRO) सुविधेमुळे व्यावसायिक विमान कंपन्या आणि भारतीय संरक्षण क्षेत्रासाठी इंजिन सपोर्ट मिळणार आहे.कंपनीने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की,'सफ्रान हैदराबादमध्ये दसॉल्ट एव्हिएशन राफेल लढाऊ विमानांना शक्ती देणाऱ्या एम८८ इंजिनसाठी एक समर्पित एमआरओ (देखभाल, दुरुस्ती आणि दुरुस्ती) सुविधा देखील स्थापित करणार आहे. या सुविधांसह, फ्रेंच सफ्रानने म्हटले आहे की, २०३० पर्यंत देशातील त्यांचे वार्षिक उत्पन्न तिप्पट होऊन ३ अब्ज युरोपेक्षा जास्त होईल.''नवीन LEAP इंजिन MRO केंद्र एकूण २०० दशलक्ष युरोची गुंतवणूक दर्शवते आणि २०२६ मध्ये कार्यान्वित होईल. ४५००० चौरस मीटरची ही सुविधा दरवर्षी ३०० LEAP दुकानांच्या भेटींच्या क्षमतेपर्यंत वाढवेल आणि पुढील पिढीच्या चाचणी बेंचचा अभिमान बाळगेल असेही कंपनीने प्रसिद्धीपत्रकात म्हटले.
२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज बरोबर सतरा वर्षे पूर्ण झाली. कटू आठवणी खरेतर उगाळत बसू नयेत. ही आठवणही तो हल्ला, कसाब, त्याचे दुःसाहस, त्यात शहीद झालेले करकरे-साळस्कर-कामटे हे अधिकारी किंवा तुकाराम ओंबळेंसारख्या शूर शिपायाने स्वतःच्या बलिदानाने पकडून दिलेला ढळढळीत पुरावा या अंगाने काढायची नाहीच आहे. मुंबई वाचवण्यासाठी या थोर सुपुत्रांनी दिलेले बलिदान कृतज्ञतापूर्वक सतत आपल्या स्मरणात राहणारच आहे. आठवण करायची यासाठी, की मुंबईवरील या हल्ल्यानंतर दहशतवादी कारवायांचा बंदोबस्त किती झाला आणि काहीच दिवसांपूर्वी त्याचे दिल्लीत दिसलेले रूप नक्की कसे समजायचे? याचे भविष्याच्या दृष्टीने आकलन होण्यासाठी. २००८ मध्ये मुंबईवर झालेल्या हल्ल्यानंतर २०१० मध्ये पुण्यात जर्मन बेकरीजवळ बॉम्बस्फोट झाला. त्यानंतर सप्टेंबर २०११ मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाजवळ साखळी बॉम्बस्फोट झाले. दिल्लीतल्या त्या बॉम्बस्फोटात ३० जणांचे बळी गेले. २०११ ते २०२५ अशी सुमारे १४ वर्षे दिल्ली शांत राहिली. त्यानंतर या महिन्यात, १० नोव्हेंबर रोजी लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या पार्किंग आवारात स्फोटक रसायनांच्या गाडीच्या स्फोटाने देशाला हादरा दिला. त्यात १३ जण ठार, तर ३० जण जखमी झाले. १४ वर्षांपूर्वी दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोटात ३० जण ठार झाले होते! मुंबईवरील हल्ल्यानंतर १७ वर्षांनी आणि दिल्लीतील हल्ल्यानंतर १४ वर्षांनी झालेल्या या बॉम्बस्फोटांमध्येे दहशतवादी कारवाया झाल्याच नाहीत, असे नाही. ज्या झाल्या, त्या मुख्यतः जम्मू-काश्मीरच्या खोऱ्यात झाल्या. ७-८ जणांपेक्षा अधिक बळी गेल्याच्या दुर्घटना देशाच्या अन्य भागांत कुठे झाल्या नाहीत. १९८९ पासून धुमसत असलेल्या जम्मू - काश्मीरमध्येच त्या होत होत्या. पठाणकोट, पुलवामा आणि पहलगाम ही त्याची ठळक उदाहरणे होती. मुस्लीम दहशतवादाशी सुरू असलेले भारताचे युद्ध अद्याप संपलेले नाही, भारतात अन्यत्र कुठे काही खूप गंभीर, मोठे स्फोट होऊ शकले नसले, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी त्यांना रोखले असले, तरी हा वडवानल शमलेला नाही याची साक्ष म्हणजे जम्मू-काश्मीरमधील या सगळ्या घटना होत्या.दहशतवादी कारवाया दरवेळी देशाबाहेरून येऊनच केल्या जातील, असे नाही. त्यासाठी इथल्याच माणसांचा पद्धतशीर उपयोग केला जातो, हे यापूर्वी सिद्ध झाले आहे. देशात त्या दृष्टीने सतत धरपकड सुरू असते. वेगवेगळे छोटेमोठे कट, कटाची तयारी, निरोपांची देवाणघेवाण, घातपाती कारवायांच्या योजना सुरक्षा यंत्रणांकडून उघड होत असतात. शहरी-ग्रामीण भागातून तरुणांना ताब्यात घेतले जात असते. त्यामुळे, हा कर्करोग देशात सर्वत्र पसरला असल्याची जाणीव सुरक्षा यंत्रणांना आहे. त्यानुसार ते दक्षही आहेत. तरीही दिल्लीसारख्या घटना घडतात. अशा घटना घडल्या, की सुरक्षा यंत्रणांना; पर्यायाने सरकारला दोष दिला जातो. पण, दक्षतेला मर्यादा असतात. कोणतीही प्रतिबंधात्मक यंत्रणा जगात कुठेही, कधीही पूर्णपणे सुरक्षित, खात्रीशीर हमीची असू शकत नाही, यावर तज्ञांचे एकमत आहे. दुसरे, दहशतवादाविरुद्धचा लढा केवळ सैन्याने, सुरक्षा यंत्रणांनी लढायचा नसतो. अशा यंत्रणा त्याला कधीच पुऱ्या पडू शकत नाहीत. हा लढा सतर्कतेने, सावधानतेने, सामाजिक ऐक्याने लढायचा असतो. त्याची जबाबदारी बरीचशी नागरिकांवरच असते. दहशतवादाचे संकट नागरिकांनी किती समजावून घेतले आहे, त्याच्या कारणांना पुष्टी मिळणार नाही, असे सामाजिक सौहार्द्र किती आहे, ‘नागरिक’ म्हणून असलेल्या आपल्या कर्तव्यांना शालेय शिक्षणातून किती बिंबवले जात आहे, यावर या लढ्याचे यश बहुतांश अवलंबून असते. दिल्ली बॉम्बस्फोटामागे डॉक्टरांची मोठी साखळी असल्याचे उघड झाले आहे. डॉक्टर हा समाजातला सर्वात सुशिक्षित, सर्वाधिक जबाबदार घटक मानला जातो. इतके उच्च शिक्षण घेतलेले तरुण दहशतवादी कारवायांत कसे सामील होतात? असा प्रश्न आज अनेक ठिकाणी आश्चर्याने ऐकायला मिळतो. समाजाची स्मरणशक्ती दुबळी असते, म्हणून असे प्रश्न विचारले जात असावेत. अन्यथा, सन २००० मध्ये उघड झालेल्या इंडियन मुजाहिदीनच्या कटातले रियाज भटकळ किंवा अब्दुल सुभान कुरेशी हे अभियंते होते, याचे विस्मरण झाले नसते आणि दिल्ली बॉम्बस्फोटातल्या संशयित डॉक्टरांचं आश्चर्यही वाटलं नसते!प्रश्न व्यावसायिक शिक्षणाचा नाही. शिक्षणातून पेरल्या जाणाऱ्या मूल्यांचा आहे. भारताला सर्वसमावेशक दृष्टिकोन देणाऱ्या शिक्षणाशिवाय पर्याय नाही. आपला समाज बहुजातीय, बहुधार्मिक, बहुसांस्कृतिक आहे आणि तेच या देशाचे वास्तव आहे, हे सर्व प्रकारच्या शिक्षणातून ठसवले गेले पाहिजे. समरसता हाच इथल्या जगण्याचा मूलमंत्र असू शकतो, हे या शिकवणुकीचे सूत्र असले पाहिजे. विशिष्ट धार्मिक, भाषिक अल्पसंख्याकांच्या शिक्षण संस्थांना अजिबात मान्यता देता कामा नये. अशा संस्थांतून वेगवेगळ्या अस्मितांचे पोषण होते आणि त्यातून अतिरेकी ध्रुवीकरण होते. या देशाच्या ऐक्याला ते सर्वाधिक घातक ठरते. नव्या आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताला पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही बाजूने इस्लामी दहशतवादाचा धोका आहे. अमेरिका-पाकिस्तान-चीन या त्रैराशिकात पाकिस्तान केवळ भारताविरोधातले शस्त्र म्हणून या दोन्ही प्रबळ सत्तांकडून फायदे उकळतो आहे. पाकिस्तान आणि बांगलादेश हे दोन्ही देश अशा स्थितीत आले आहेत, की ते कोणाच्याही हातचं बाहुले बनायला उत्सुक आहेत. ज्यांना भारताची प्रगती रोखायची आहे, आंतरराष्ट्रीय पातळीवर महासत्ता म्हणून भारताला वाढू द्यायचे नाही असे देश या दोन्ही देशांना भरपेट मदत देऊन भारताविरोधात जिवंत ठेवताहेत. ‘हिंदू-मुस्लिम’ हत्यार सोडले, तर या दोन्ही देशांकडे भारताला त्रास देण्यासाठी अन्य कुठलेही हत्यार नाही! भारतविरोधी दहशतवादाला इस्लामचा रंग सहज मिळतो, याचे कारण हेच आहे. भारताला देशांतर्गत दहशतवादी कारवायांना आळा घालायचा असेल, तर सुरक्षा यंत्रणांना कितीही सुसज्ज केले, त्यांना अत्याधुनिक यंत्रणा अन् शस्त्र दिली, तरी त्याला मर्यादाच असणार. या यंत्रणांना खरे बळ देशातल्या धार्मिक सलोख्याने मिळेल. त्या दिशेने धोरणे आखली, तर भारताची देशांतर्गत आणि सीमेवरील अशी दोन्ही आघाड्यांवरची डोकेदुखी मिटेल. आर्थिक, सामाजिक प्रगतीकडे लक्ष केंद्रित करता येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातल्या १४० कोटी जनतेसमोर जे स्वप्न ठेवत आहेत, जे संकल्प सोडत आहेत, त्या दिशेने आपण आश्चर्यकारक वेगाने जाऊ शकू. महाराष्ट्राला २६/११ ची आठवण करायचीच असेल, तर ती या पद्धतीने करायला हवी.
भारताचा दारुण पराभव; गौतम गंभीरवर टीकेची झोड, राजीनाम्याच्या मागणीवर काय म्हणाला गंभीर?
गुवाहाटी : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताला २-० ने पराभव स्वीकारावा लागल्यानंतर भारतीय संघावर आणि विशेषत: मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरवर टीकेची झोड उठली आहे. गुवाहाटीतील दुसऱ्या कसोटीत भारताला तब्बल ४०८ धावांनी हार पत्करावी लागली. गुवाहाटीत ५४९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघ केवळ १४० धावांत गारद झाला आणि हा भारताचा घरच्या मैदानावर धावांच्या फरकाने झालेल्या पराभवांपैकी सर्वात मोठा पराभव ठरला. या दारुण कामगिरीनंतर सोशल मीडियाद्वारे गंभीरवर तीव्र टीका सुरू झाली असून त्याने मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. काही ठिकाणी तर गंभीर लवकरच पद सोडणार असल्याचा अंदाजही व्यक्त करत आहेत.सामना संपल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना गौतम गंभीरने पराभवाची जबाबदारी स्वीकारली. “दोष सर्वांचा आहे, पण सुरुवात माझ्यापासून करा,” असे तो म्हणाला. तसेच आपल्या भवितव्याचा निर्णय बीसीसीआय घेईल, असं सांगत गंभीरने इंग्लंड दौर्यातील चांगल्या कामगिरीची आणि आपल्या मार्गदर्शनाखाली जिंकलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी व आशिया कपची आठवणही करून दिली. त्याच्या कार्यकाळात टीम इंडियाला अनेक अनपेक्षित धक्के बसले. ३६ वर्षांनंतर घरच्या मैदानावर न्यूझीलंडकडून कसोटी पराभव, १९ वर्षांनी बंगलुरूच्या चिन्नास्वामीवर हार, पहिल्यांदाच घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिका गमावली, १२ वर्षांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेत पराभव, वानखेडेवरील पराभव, तसेच पहिल्यांदाच घरच्या मैदानावर ३-० ने क्लीन स्वीप, अशा अनेक निराशाजनक निकालांची नोंद गंभीरच्या कार्यकाळात झाली. याशिवाय, टीम इंडिया पहिल्यांदाच WTC फायनलसाठी पात्र ठरू शकली नाही, तर दक्षिण आफ्रिकेविरुद्धही २५ वर्षांनी घरच्या मैदानावर मालिका गमवावी लागली.या सलग पराभवांमुळे आणि संघाच्या सतत ढासळलेल्या कामगिरीमुळे भारतीय संघाच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत. गौतम गंभीरचे प्रशिक्षकपदही आता संकटात आल्याचे संकेत मिळत आहेत. बीसीसीआय लवकरच या प्रकरणी निर्णय घेऊ शकते, अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात सुरू आहे. चाहत्यांमध्ये निर्माण झालेली नाराजी, संघाची घसरलेली कामगिरी आणि गंभीरवर वाढत चाललेला दबाव पाहता आगामी काळात भारतीय संघात मोठे बदल होण्याची शक्यता आहे.
Anarock अहवालातील माहितीत स्पष्ट -आर्थिक वर्ष २०२२ पासून टॉप ७ शहरांमध्ये लक्झरी घरांची किंमत ४०% वाढली आहे, तर परवडणाऱ्या घरांची किंमत फक्त २६% आहे.एमएमआर (Mumbai Metropolitical Region MMR) आणि बेंगळुरूमध्ये या कालावधीत १.५ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या घरांच्या किमतीत अनुक्रमे ४३% आणि ४२% सरासरी वाढ झाली आहे. तर या प्रदेशात परवडणाऱ्या घरांच्या किंमतीत फक्त २६% सरासरी वाढमोहित सोमण: भारतातील महत्वाच्या टॉप ७ शहरांमध्ये लक्झरी निवासी बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मागणी वाढल्याचे दिसून येत आहे. एका अहवालानुसार केवळ नवीन पुरवठ्यात नाही तर किमतीतही मागणीमुळे सातत्याने वाढ होत आहे. वेगवेगळ्या बजेट सेगमेंटमधील या शहरांमधील सरासरी किमतीच्या ट्रेंडची आकडेवारी नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ॲनारॉक संशोधन विश्लेषणातून दिसून आली आहे. अहवालातील निष्कर्षानुसार गेल्या तीन वर्षांत ४०% दराने, लक्झरी घरांमध्ये सर्वाधिक सरासरी किमतीत वाढ झाली आहे.याविषयी आपली भूमिका स्पष्ट करताना ॲनारॉक ग्रुपचे अध्यक्ष अनुज पुरी म्हणाले की,'२०२२ मध्ये टॉप ७ शहरांमधील या घरांच्या किमती सरासरी १४५३० रुपये प्रति चौरस फूट होत्या. २०२५ मध्ये या टप्प्यावर दर सुमारे २०३०० रुपये प्रति चौरस फूट इतके वाढले आहेत. या शहरांमध्ये, दिल्ली-एनसीआरच्या लक्झरी सेगमेंटमध्ये तीन वर्षांत ७२% ची सर्वाधिक वाढ झाली आहे. आर्थिक २०२२ मध्ये अंदाजे १३४५० रुपये/चौरस फूट वरून २०२५ मध्ये आजच्या तारखेनुसार अंदाजे २३१०० रुपये/चौरस फूट दरासह (४३% वर) एमएमआर या बजेट सेगमेंटमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आला, त्यानंतर ४२% वाढीसह बेंगळुरूचा क्रमांक लागतो.'निष्कर्षानुसार, एमएमआरमध्ये, आर्थिक वर्ष २०२२ मध्ये १.५ कोटी रुपये श्रेणीतील सरासरी किंमत २८०४४ रुपये/चौरस फूट होती सध्या ती ४०२०० रुपये/चौरस फूट आहे. बेंगळुरूमध्ये, २०२२ मध्ये लक्झरी सेगमेंटची सरासरी किंमत ११७६० रुपये/चौरस फूट होती. आजपर्यंत ते वाढून आता १६७०० रूपये चौरस फूट झाले आहे असे नमूद केले आहे.तसेच या माहितीनुसार, या कालावधीत परवडणाऱ्या घरांच्या सुमारे ४० लाखांपेक्षा कमी किमतीच्या सरासरी युनिट्स किमतीत २६% ची वाढ झाली मध्ये या श्रेणीतील शीर्ष (Top) शहरांमध्ये सरासरी किंमत ४२२०/चौरस फूट होती. सध्या, ती सरासरी ५२९९ रुपये/चौरस फूट आहे.अहवालातील निष्कर्षानुसार एनसीआर (National Capital Region NCR) मध्ये लक्झरी विभागात सर्वाधिक ४८% सरासरी किमतीत वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष २०२२ मध्ये ३५२० रूपये चौरस फूट वरून आर्थिक वर्ष २०२५ मध्ये ५२०० रूपये प्रति चौरस फूटांवर किंमती पोहोचल्या आहेत. हैदराबादमधील बजेट घरांच्या किमतीत या कालावधीत ३५% ची दुसरी सर्वोत्तम वाढ झाली. आर्थिक वर्ष २०२२ मध्ये३८८० प्रति चौरस फूट वरून सध्या ५२३४/चौरस फूटांवर या किंमती पोहोचल्या आहेत. अहवालाने म्हटले आहे की,'विशेष म्हणजे, दिल्ली-एनसीआरमध्ये सध्याच्या सरासरी परवडणाऱ्या किमती हैदराबादपेक्षा थोड्या कमी आहेत.'उत्कृष्ट ठिकाणी ब्रँडेड डेव्हलपर्सकडून मोठ्या घरांसाठी सातत्याने मागणी असल्याने, इतर विभागांपेक्षा आलिशान घरांची मागणी वाढतच आहे असे अनुज पुरी म्हणतात. ते पुढे म्हणाले आहेत की,' आमच्या डेटानुसार, ९ मे २०२५ मध्ये टॉप ७ शहरांमध्ये झालेल्या सुमारे २.८७ लाख युनिट्सच्या एकूण विक्रीपैकी जवळजवळ ३०% विक्री लक्झरी विभागात होती. हे विशेषतः उल्लेखनीय आहे कारण गेल्या काही वर्षांत वाढत्या इनपुट खर्चामुळे आणि मजबूत मागणीमुळे देशभरात घरांच्या किमती वाढल्या आहेत.'सध्याच्या ट्रेंडवरून असे दिसून येते की लक्झरी रिअल इस्टेट विकास मार्ग अत्यंत शाश्वत (Susitanable) आहे, कारण तो भारतातील एचएनआय (High Net Worth Individual HNIs) आणि अल्ट्रा-एचएनआयएसच्या वाढत्या संख्येमुळे व गुंतवणूकीमुळे आणखी वाढत आहे. भारतातील वाढती संपत्ती निर्मिती (Wealth Creation) आणि आर्थिक स्थिरतेसह लक्झरी मालमत्तेच्या मूल्यांमध्ये स्थिर वाढ देखील या विभागातील दीर्घकालीन वाढीचा एक मजबूत पाया तयार करते असेही अहवालात स्पष्ट करण्यात आले.निष्कर्षानुसार, मागणी आणि विक्रीत परवडणाऱ्या घरांचा विभागांपेक्षा लक्झरी निवासी मागणी अधिक वेगाने वाढत आहे. एकूणच या लक्झरी निवासी विभागात अखेरीस त्याच्या सरासरी २६% वाढीमध्ये देखील दिसून येतो. या कालावधीत, मध्यम श्रेणी आणि प्रीमियम श्रेणीतील घरांची सरासरी किंमत, ज्यांची किंमत ४० लाख ते .१५ कोटी दरम्यान आहे, त्यांच्या किमतीत सरासरी ३९% वाढ झाली. आर्थिक वर्ष २०२ मध्ये ६८८० रूपये प्रति चौरस फूट वरून आर्थिक वर्ष २२०५ मध्ये मध्ये ९५३७ रूपये प्रति चौरस फूटवर किंमती पोहोचल्या.'किंमत वाढीच्या बाबतीत NCR (दिल्ली महानगर प्रदेश) जवळजवळ सर्व रिअल इस्टेट विभागांमध्ये एक उत्कृष्ट कामगिरी करणारा ठरला आहे आणि येथे लक्झरी घरांची मागणी उल्लेखनीय आहे असे ते म्हणाले आहेत. पुरी पुढे म्हणतात. 'लक्झरी श्रेणीमध्ये ७२%,मध्यम श्रेणी आणि प्रीमियममध्ये ५४% आणि परवडणाऱ्या श्रेणीमध्ये ४८% अशी सर्वोच्च किंमत वाढ झाली आहे ही वस्तुस्थिती या प्रदेशातील सर्वांगीण कामगिरी करणाऱ्या बाजार गतिमानतेशी जुळते.' असेही ते पुढे म्हणाले आहेत.अतिरिक्त आकडेवारी -बजेट विभागांमधील सध्याचे किमतींचे ट्रेंडमुंबई महानगर प्रदेश (एमएमआरमध्ये) सध्या टॉप ७ शहरांमधील सर्व घरांच्या श्रेणींमध्ये सर्वाधिक सरासरी किंमत आहे.१.५ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या घरांची सरासरी किंमत सध्या ४०२०० रुपये/चौरस फूट आहेत.परवडणाऱ्या विभागात, ती ६४५० रुपये/चौरस फूट आहे आणि मध्यम आणि प्रीमियम विभागात, १६४०० रुपये/चौरस फूट आहे.एनसीआरमध्ये दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक लक्झरी घरांची सरासरी किंमत आहे, जी सध्या २३,१०० रुपये/चौरस फूट आहे. मध्यम आणि परवडणाऱ्या घरांची किंमत अनुक्रमे ९७५० रुपये/चौरस फूट आणि ५२०० रुपये/चौरस फूट आहे.चेन्नईमध्ये, लक्झरी श्रेणीतील सरासरी किंमत सध्या १८५०० रुपये/चौरस फूट आहे. फूट आहे, तर मध्यम आणि परवडणाऱ्या श्रेणीमध्ये ते अनुक्रमे ७४५० रुपये/चौरस फूट आणि ४८६५ रुपये/चौरस फूट आहे.बेंगळुरूमध्ये, २०२५ मध्ये आजपर्यंत आलिशान घरांची सरासरी किंमत १६,७०० रुपये/चौरस फूट आहे; मध्यम श्रेणीमध्ये ती ९,१४० रुपये/चौरस फूट आहे आणि परवडणाऱ्या श्रेणीमध्ये ती ५,४५० रुपये/चौरस फूट आहे.पुण्यात, आलिशान घरांची सरासरी किंमत सध्या १५२०० रुपये/चौरस फूट आहे, तर मध्यम आणि परवडणाऱ्या श्रेणीमध्ये ती अनुक्रमे ८८५० रुपये/चौरस फूट आणि ५८५० रुपये/चौरस फूट आहे.कोलकातामध्ये, २०२५ मध्ये आलिशान घरांची सरासरी किंमत १४२०० रुपये/चौरस फूट आहे. तसेच मध्यम आणि परवडणाऱ्या श्रेणींमध्ये, ते शीर्ष (Top) ७ शहरांमध्ये अनुक्रमे सर्वात कमी आहे, म्हणजेच ६७५० रुपये/चौरस फूट आणि ४०४० रुपये/चौरस फूट रूपये आहे.माहितीनुसार, हैदराबादमध्ये, लक्झरी मालमत्तांच्या सरासरी किमतीत ४१% वाढ झाली असली तरी, या श्रेणीतील शहराची सध्याची सरासरी किंमत २०२५ मध्ये कोलकाता शहराच्या तुलनेत सर्वात कमी आहे, जिथे ते १४२०० रुपये/चौरस फूट आहे; मध्यम श्रेणीमध्ये ते ८४२० रुपये/चौरस फूट आणि ५२३५ रुपये/चौरस फूट आहे.
अभिमान संविधानाचा: समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुत्वाचा!
जगातील कोणत्याही देशापेक्षा सर्वात मोठे लिखित असे संविधान तयार करून, केवळ भारतच नव्हे तर संपूर्ण जगाला महत्त्वपूर्ण संविधानरूपी अनमोल असा ठेवा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला. निश्चितच हे संविधान म्हणजे आपल्याला मिळालेले अलौकिक असे अनमोल, दिव्य रत्न आहे. २६ नोव्हेंबर १०४९ रोजी आपले भारतीय संविधान संमत झाले मात्र त्याची अंमलबजावणी २६ जानेवारी १९५० रोजी सुरू झाली. यास ७६ वर्षे पूर्ण झाली. भारतीय संविधान हे इंग्रजी भाषेत असून हिंदी भाषेतील प्रतही कायदेशिरदृष्ट्या ग्राह्य आहे. जागतिक पातळीवर श्रेष्ठत्व असलेले आपले संविधान म्हणजे तमाम भारतीयांचा अभिमान आहे आणि म्हणूनच आपण 'अभिमान आम्हाला संविधानाचा... समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुत्वाचा’ असे अभिमानाने म्हणू शकतो.भारताचे संविधान म्हणजेच भारतीय राज्यघटना. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना या राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून संबोधले जाते. आज जवळपास ६८ वर्षांपासून डॉ. आंबेडकरांनी तयार केलेल्या या संविधानाच्या आधारे आपले भारतीय संघराज्य व व्यवस्था सुरळीतपणे चालू आहे. १५ ऑगस्ट १९४७ ला आपल्याला स्वांतत्र्य मिळाले आणि तद्नंतर म्हणजे २९ ऑगस्ट १९४७ रोजी संविधान समिती स्थापन झाली. या समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद, उपाध्यक्ष डॉ. एस. सी. मुखर्जी व सल्लागार म्हणून डॉ. बी. एन. राव यांची निवड करण्यात आली. या समितीत प्रामुख्याने पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. राधाकृष्णनन, के. एम. मुन्शी व डॉ. जयकर यांचा समावेश होता. या समितीने संविधानाचा मसुदा तयार करण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समितीची स्थापना केली. या समितीने अखंड मेहनत घेऊन भारतीय संविधानाची निर्मिती केली. या समितीने घटनेमध्ये आपल्या जन-गण-मन या गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर यांच्या गीताला राष्ट्रगीताचा सन्मान दिला तसेच राष्ट्रध्वजाचीही निर्मिती करण्यात आली. घटनेच्या पहिल्या मसुद्यामध्ये ३१५ कलमे व ७ परिशिष्ट होती, पुढे त्यात वाढ झाली. या संविधानाची उद्देशिका पुढीलप्रमाणे आहे. 'आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वामध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून, आमच्या संविधान सभेस आज २६ नोव्हेंबर १९४९ रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वत: प्रत अर्पण करीत आहोत.' यात नमूद केले आहे की आपला देश हा सार्वभौम (Sovereign), समाजवादी (Socialist), धर्मनिरपेक्ष (Secular) आणि प्रजासत्ताक (Republic) आहे. या उद्देशिकेच्या प्रत्येक शब्दातून आपणास संविधानाची महती लक्षात येते.संविधानाची दिव्यताभारताचे संविधान म्हणजे राज्यघटना संदर्भात विविध वैशिष्ट्ये आहेत. यात प्रामुख्याने संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र, नागरिकत्व, मूलभूत हक्क, समानतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, शोषणाविरुद्ध हक्क, धर्मस्वातंत्र्यांचा हक्क, सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क, संविधानिक उपाययोजनेचा हक्क, विवक्षित कायद्यांचे व्यावृत्ती, त्याचप्रमाणे राज्य धोरणांची निदेशक तत्त्वे, मूलभूत कर्तव्ये, संघराज्य, राज्य, त्याची कार्यपद्धती, न्यायालये, न्यायाधिकरणे, निवडणुका, आणीबाणी, राज्यभाषा या खेरीज संकीर्ण यात उर्वरित सर्व विषय समाविष्ट होतात. अशा सर्व स्तरावरील बाबींचा समावेश आहे. भारतीयांना त्याच्या प्रत्येक स्वातंत्र्याचा अथवा जगण्याचा अधिकार, हक्क याचे स्पष्ट व सखोल मार्गदर्शन या घटनेत आहे. त्यामुळे ही घटना प्रत्येक भारतीयाला आपलीच वाटेल अशी आहे. राज्य कारभाराविषयीचे नियम, अधिकार, कर्तव्ये, लोकांचे सार्वभौमत्व आदी यात आहे. २६ जानेवारी १९५० पासून या घटनेनुसारच आपल्या भारत देशाचा राज्यकारभार सुरू झाला. म्हणूनच २६ जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन एक राष्ट्रीय सण म्हणून साजरा करतो.१७ डिसेंबर १९४६ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेत केलेले या संदर्भातील त्यांचे पहिले भाषण अत्यंत महत्त्वपूर्ण असे आहे. संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी अकस्मातपणे डॉ. बाबासाहेबांचे नाव भाषणासाठी पुकारले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेबांनी अमोघ असे भाषण केले. या भाषणाचे वर्णन करताना न. वि. गाडगीळ म्हणाले की, 'त्यांचे भाषण इतके मुद्याला शोभणारे होते, इतके कटुतेशिवाय, इतके प्रामाणिक आवाहन करणारे होते की, संपूर्ण सभागृह मतिगुंग झाल्याप्रमाणे ऐकत होते'. संविधान सभेमध्ये अशा प्रकारे पहिलेच भाषण प्रभावीपणे करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची महती स्पष्ट केली. एकसंध भारताच्या उन्नतीची धारणा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान निर्मितीमागे होती. १० जून १९५० रोजी सिलोन दौऱ्यावरून परत येताना त्रिवेंद्रम येथे लेजिसलेटिव्ह चेंबरमध्ये त्यांनी एक भाषण केले. त्या भाषणात अत्यंत महत्वपूर्ण अशी गोष्ट स्पष्ट केली ती म्हणजे 'घटनात्मक नितीचे काटेकोरपणे पालन करा', यावेळी बोलताना ते म्हणाले, 'प्रत्यक्ष घटनेपेक्षा घटनेप्रमाणे वागण्याची नीती जनतेत असणे या गोष्टीला फार महत्त्व आहे. देशाला पार्लमेंटरी लोकशाहीची पद्धत यशस्वी व्हावयाची असेल तर सरकार व जनता या उभयतांनी घटनेतील काही संकेत आणि नीती यांचे पालन करणे आवश्यक आहे. हे संकेत व नीती पुढीलप्रमाणे- सरकार बनविण्याच्या पद्धतीविषयी आदर, कायद्याचे पालन, स्वतंत्र विचार करण्याची सवय व बहुसंख्याकांच्या नियमाचे पालन' घटना समितीचे अध्यक्ष या नात्याने, भारतीय राज्यघटना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला देऊन जागतिक पातळीवर भारतीय सार्वभौमत्वाचे गौरवचिन्ह निर्माण केलेले आहे. केवळ संविधानच नव्हे तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रत्येक क्षेत्रातील विचारही तेजस्वी, प्रखर व मौलिक असे आहेत.- डॉ.राजू पाटोदकर
लेखक- कॅप्टन (डॉ.) ए.वाय. राजेंद्र, सीईओ - अॅनिमल अँड अॅक्वा फीड बिझनेस, गोदरेज अॅग्रोव्हेट लिमिटेडडॉ. वर्गीस कुरियन यांच्या जयंतीनिमित्त भारतात राष्ट्रीय दूध दिवस साजरा केला जातो. श्वेत क्रांतीचे जनक असलेल्या कुरियन यांनी दिलेल्या या वारशाचे स्मरण करत असतानाच, त्यांची हीच दूरदृष्टी लक्षात घेऊन दुसऱ्या श्वेत क्रांतीसाठी उत्पादकतेवर आधारित परिवर्तन कसे घडवता येईल, याचा देशाच्या दुग्ध क्षेत्राच्या दृष्टीने विचार करण्याचा हाच क्षण आहे. सातत्यपूर्ण संस्थात्मक प्रयत्नांमुळे, दुधाच्या दीर्घकालीन टंचाईतून बाहेर पडून भारत जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक बनला. आजघडीला जागतिक पुरवठ्यात जवळजवळ २५% वाटा भारताचा आहे. स्वातंत्र्याच्या वेळी देशात दरवर्षी २.१ कोटी टन दूध उत्पादन होत होते. ज्याची दररोज दरडोई उपलब्धता केवळ १२४ ग्रॅम होती.आज, उत्पादन २०० दशलक्ष टनांपेक्षा जास्त आहे आणि दरडोई उपलब्धता ४७१ ग्रॅमपर्यंत वाढली आहे जी ३२२ ग्रॅमच्या जागतिक सरासरीपेक्षा जास्त आहे. या संरचनात्मक प्रगतीमुळे भारताचा दूध पुरवठा सुरक्षित झाला आहे. आता पुढची पायरी म्हणजे उत्पादकता वाढवणे.भारतातील ही आकडेवारी एक गंभीर आव्हान लपवते ते म्हणजे प्रति जनावर उत्पादनाचे प्रमाण. ते अजूनही कमी आहे. जगातील दूधदुभत्या गायींची सर्वाधिक संख्या भारतात असूनही जागतिक सरासरीच्या तुलनेत दररोज फक्त ४.८७ किलो दूध देते. जागतिक सरासरी ७.१८ किलो आहे. ही तफावत भरून काढण्यासाठी पोषण, जनुके आणि प्राण्यांच्या वैज्ञानिकदृष्ट्या काळजीमध्ये उत्पादकता-केंद्रित 'श्वेत क्रांती २.० 'ची गरज आहे. यासाठी पोषण ही तातडीची गरज आहे. गुरांची संख्या वाढली असली तरी, उत्पादन तेवढ्या वेगाने होत नाही. 'कमीतून जास्त मिळवण्यासाठी' भारताने उत्तम जनुके, व्यवस्थापन आणि पोषण याद्वारे प्रति प्राणी उत्पादकता सुधारली पाहिजे. जवळजवळ ७० दशलक्ष टन पशुखाद्याची देशाची गरज आहे. पण त्या तुलनेत सध्या केवळ ७.५ दशलक्ष टनाचीच निर्मिती होते आहे. यासोबतच हिरव्या तसेच कोरड्या चाऱ्याची कमतरता कायम आहे. चांगल्या प्रतीचे सायलेज हा एक विश्वासार्ह पर्याय ठरू शकतो. कारण या माध्यमातून गायीच्या ऊर्जेच्या गरजांपैकी निम्म्या गरजा पूर्ण होऊ शकतात. विशेषतः प्रजनन, स्तनपानाच्या टप्प्यानुसार आणि हवामानानुसार पशुखाद्याची ही गरज भरून काढण्यासाठी चारा धोरणे अधिक शास्त्रीय व्हायला हवीत.जेनेटिक्स हा दुसरा पर्याय आहे. पंजाबसारखी संकरित गुरांवर जास्त भर देणारी राज्ये सातत्याने चांगले उत्पादन मिळवतात. आधुनिक प्रजनन साधनांद्वारे अनुवांशिक सुधारणा जलद केल्याने, यात भ्रूण हस्तांतरण, सेक्स सॉर्टेड सीमेन आणि कृत्रिम गर्भाधान यांचा समावेश आहे. अशा उपायांमुळे कळपाची गुणवत्ता वेगाने सुधारू शकते आणि उत्पादक कालव किंवा मादी वासरांची संख्या वाढवू शकते. यासाठीचा तिसरा आधारस्तंभ म्हणजे गुरांचे उत्तम व्यवस्थापन आणि आरोग्यसेवा. नियमित पशुवैद्यकीय काळजी, वेळेवर लसीकरण आणि लम्पीसारख्या त्वचा रोगांच्या बाबतीत आजारांचे वेळेवर निदान हे अत्यंत गरजेचे आहे.जनावरांसाठी योग्य आणि आरामदायी निवासस्थान- उन्हाच्या तडाख्यापासून संरक्षण, हिवाळ्यातील काळजी आणि स्वच्छ, हवेशीर शेड - या सर्व गोष्टींचा एकत्रित परिणाम थेट उत्पादकतेवर होतो. डिजिटल साधनांमुळे आरोग्य, पोषण आणि त्यांच्या रोजच्या वर्तनाचे रिअल-टाइम निरीक्षण करणे शक्य होते. यामुळे गुरांची काळजी अधिक परिणामकारकरित्या घेतली जाऊ शकते. ज्यामुळे शेतकऱ्यांना एकूणच जोखमीचा अंदाज घेऊन नुकसान टाळता येते.राष्ट्रीय दूध दिवस म्हणजे या क्षेत्रात भारताने किती प्रगती केली आहे, याचा निदर्शक आहे. तसेच पुढे काय करायचे आहे, याचा वास्तवदर्शी आरसा आहे. त्यासाठी कृती करण्याचे आवाहन आहे. श्वेत क्रांतीने देशाची दुग्ध व्यवसायाची क्षमता सिद्ध केली. आता उत्पादकतेच्या आव्हानांवर मार्ग शोधल्याने उत्पन्न तर वाढेलच पण दूध आणि मूल्यवर्धित दुग्धजन्य पदार्थांच्या मागणीत देखील वाढ होऊ शकते. भारताने आज कष्टाने दुग्ध सुरक्षा मिळवली आहे. डॉ. कुरियन यांच्या वारशाचा सन्मान करणे म्हणजे केवळ त्यांच्या कामगिरीचे स्मरण करणे नव्हे तर अधिक कार्यक्षम, लवचिक आणि भविष्यासाठी तयार असे दुग्ध क्षेत्र निर्माण करण्याचे त्यांचे स्वप्न पुढे नेणे होय.
पुणे जिल्ह्यात युतीत ‘फूट’, आघाडीत ‘बिघाडी’
पुणे जिह्यातील १४ नगर परिषदा आणि तीन नगरपंचायतींच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिह्यातील राजकीय तापमान वाढण्यास सुरुवात झाली आहे. महायुतीत फूट, तर आघाडीत बिघाडी झाल्याचे चित्र आहे. उमेदवारी मागे घेतल्यानंतरही फारसे राजकीय चित्र बदलले नसून, जिह्यात महायुती आणि महाआघाडी यातील पक्षांनी एकमेकांना रामराम करत विरोधात उमेदवार उभे केले आहेत. नगराध्यक्षपदासाठी सर्वत्र चुरस दिसून येत असून, अपक्षांनी मोठे आव्हान नगरसेवकपदाच्या दावेदारांच्या समोर उभे केले आहे.पुणे जिल्हात गेल्या काही दशकांपासून महाराष्ट्राच्या राजकीय पटातील महत्त्वाचा केंद्रबिंदू राहिला आहे. राज्याच्या राजकारणात निर्णायक भूमिका बजावणारे नेते, व्यापक सामाजिक चळवळी, तसेच वाढत्या शहरीकरणामुळे तयार होणाऱ्या नव्या राजकीय गरजा यामुळे पुणे जिह्यातील नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये प्रत्येक वेळी वेगवेगळ्या आणि रंजक समीकरणांची निर्मिती होताना दिसते. राजकीय पक्षांची हालचाल, स्थानिक पातळीवरील व्यक्ती-आधारित गट, समाजघटकांचे मतदानाचे कल आणि विकासाच्या मुद्द्यांवर आगामी निवडणुका अधिकच रंगतदार होणार आहेत. बारामती नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) हे दोन्ही राष्ट्रवादी आमने-सामने उतरले आहेत. भाजपला रासप पक्षाची साथ दिल्याने मजबूत झाली आहे. शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षानेही उमेदवार उभा केल्याने महायुतीतील मित्र पक्षासोबतच लढत द्यावी लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने बारामती सहकारी बँकेचे अध्यक्ष सचिन सातव यांना उमेदवारी दिली आहे. भाजपकडून ३२ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात रासपचे चार उमेदवार आहेत. भाजपने अॅड. गोविंद देवकाते यांना उमेदवारी दिली आहे. बसपाच्या वतीने काळूराम चौधरी तर, शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या वतीने जिल्हा प्रमुख सुरेंद्र जेवरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.इंदापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे प्रदीप गारटकर यांनी पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन अजित पवार यांनाच आव्हान दिले आहे. हर्षवर्धन पाटील, भाजपचे युवा नेते प्रवीण माने यांच्याशी गारटकर यांनी हातमिळवणी केली असून, ‘कृष्णा-भीमा’ विकास आघाडीच्या वतीने ते रिंगणात उतरले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने माजी उपनराध्यक्ष भरत शहा यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे गारटकर, शहा यांच्यात सरळ लढत होणार आहे. हर्षवर्धन पाटील, प्रवीण माने, गारटकर एकत्र आल्याने राजकीय समीकरणे बदलली आहेत. शहा यांच्या उमेदवारीला विरोध करून गारटकर यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे शहा यांच्याविरोधात निवडणूक लढवण्याचा निर्णय गारटकर यांनी घेतला. नगराध्यक्षपदासाठी १० जणांनी अर्ज भरले आहेत. तर, नगरसेवकपदासाठी ९० अर्ज आले आहेत. प्रभाग रचनेतील बदलामुळे निवडणुकीतील स्पर्धा अधिक चुरशीची होणार आहे. दौंड नगर परिषदेमध्ये नागरिक संरक्षण मंडळ आणि भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्ष आणि त्यांचे आघाडीतील मित्रपक्ष यांच्यातच तिरंगी लढत होत आहे. नागरिक संरक्षण मंडळ आणि भाजपचे आमदार राहुल कुल एकत्र आहेत. तर, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे माजी आमदार रमेश थोरात आणि माजी नगराध्यक्ष वीरधवल जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली पॅनेल उभे केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि मित्रपक्षांचे नेतृत्व अप्पासाहेब पवार यांच्याकडे आहे. दौंडचे आजी माजी आमदार राजकीय समीकरणाची जुळवाजुळवीसाठी प्रयत्न करत असल्याने निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. शिवसेनेत फूट पडली असली तरी चाकण नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी दोन्ही शिवसेना एकत्र आल्याचे पाहायला मिळत आहे. माजी आमदार दिवंगत सुरेश गोरे यांच्या पत्नी मनीषा गोरे या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. त्यांना शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे आमदार बाबाजी काळे यांनी पाठिंबा दिला आहे. शिरुरमध्ये महायुतीतील सर्व पक्ष स्वबळावर लढणार आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), शिवसेना (उबाठा) आणि काँग्रेस महाआघाडीच्या माध्यमातून एकत्रित निवडणूक लढवत आहेत. तर उद्योगपती प्रकाश धारिवाल यांच्या शिरुर विकास आघाडीने निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या आघाडीतील इच्छुक उमेदवारांना अन्य पक्षातून उमेदवारी मिळवावी लागली. त्याचबरोबर माजी नगरसेवक लोकशाही क्रांती आघाडीचे अध्यक्ष रवींद्र धनक यांनीही निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले आहे. भाजपकडून सुवर्णा लोळगे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिंदेंच्या शिवसेनेकडून माजी नगरसेविका रोहिणी बनकर यांनी फॉर्म भरला आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाकडून माजी नगरसेविका पूजा जाधव या निवडणूक लढविणार आहेत. मंचर नगपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी होऊ शकली नसल्याने सर्व पक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून मोनिका बाणखेले, शिवसेना शिंदे पक्षाच्या वतीने राजश्री गांजाळे, शिवसेना ठाकरे पक्षाकडून रजनीगंधा बाणखेले, काँग्रेस पक्षाकडून फरजीन मुलाणी यांना उमेदवारी दिली आहे. तर, भाजपने प्राची थोरात यांना उमेदवारी दिली. शिवसेना शिंदे पक्षाकडून जागृती महाजन यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे.सासवड नगर परिषदेमध्ये महायुती आणि महाआघाडी होऊ न शकल्याने सर्व पक्ष एकमेकांविरुद्ध निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. विद्यमान आमदार विजय शिवतारे आणि माजी आमदार संजय जगताप यांनी आपापले उमेदवार उभे केले आहेत. तसेच राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आणि शिवसेना ठाकरे पक्षाचे उमेदवार असल्याने चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे माजी आमदार संजय जगताप यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर या नगर परिषदेतील राजकीय समीकरणे बदलली आहेत. भाजपकडून त्यांच्या मात़ोश्री आनंदी जगताप यांना उमेदवारी मिळाली आहे. शिवसेना ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख अभिजीत जगताप यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला असून, त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने पाठिंबा दिला आहे. जुन्नर नगर परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने स्वतंत्र २० उमेदवारांसह नगराध्यक्षपदाचा उमेदवार केला. तर शिवसेना शिंदेंच्या पक्ष आणि भाजपने एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, काही प्रभागांमध्ये उमेदवार निश्चित करताना एकमत न झाल्याने मैत्रीपूर्ण लढत जाहीर केली आहे. शिवसेना शिंदे पक्ष आणि भाजपने नगराध्यक्षपदासाठी सुजाता काजळे यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र, शेवटच्या क्षणी भाजपने तृप्ती परदेशी यांनी उमेदवारी अर्ज दाखल करत युतीला धक्का दिला. शिवसेना ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आघाडी जाहीर केली. मात्र, त्यांना सर्व ठिकाणी उमेदवार देता आले नाही. तर काँग्रेसने राहीन कागदी यांना उमेदवारी दिली आहे. मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढत असून, त्यांच्यासमोर भाजप-शिवसेना युती, वंचित बहुजन आघाडीचे आव्हान असणार आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा आमदार सुनील शेळके यांच्याकडे असून, सत्ता कायम राखण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे. मावळात महायुतीतील आणि महाआघाडीतील बंडखोरांना शांत करण्यास अपयश आले असून, तळेगाव दाभाडे नगर परिषद आणि वडगाव नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली आहे. पुणे जिह्यातील राजगुरुनगर नगरसेवक पदासाठी १ कोटी ३ लाखांची बोली लागली तर, महिला नगरसेवकपदासाठी २२ लाखांची बोली लागली. हे निश्चितपणे लोकशाहीसाठी धोकादायक आहे.
lalu yadav bungalow। बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार पूर्वीपेक्षाही अधिक मजबूत होऊन सत्तेत आले आहे. नवनिर्वाचित मंत्री आणि आमदारांना सरकारी निवासस्थाने उपलब्ध करून दिली जात आहेत, तर माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांना १० सर्कुलर रोड येथील त्यांचा बंगला रिकामा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. २० वर्षांपासून सरकारी निवासस्थानात राहणाऱ्या लालू कुटुंबाला आता घर […] The post तेजस्वीच्या एका चुकीमुळे यादव कुटुंबियांना गमवावे लागले राहते घर ?; नितीशकुमारांनी केली होती दुसरी व्यवस्था appeared first on Dainik Prabhat .
प्रतिनिधी: नव्या माहितीनुसार,जागतिक बँकेने (World Bank) आज भारतातील दोन प्रकल्पांसाठी निधी मंजूर केला आहे. महाराष्ट्रातील २.९ लाख महिलांसह २० लाखांहून अधिक लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना सुधारित मातीचे आरोग्य राखण्यासाठी आता मोठी मदत होणार आहे. विशेषतः महाराष्ट्र, पंजाब या दोन राज्यांतील प्रकल्पाला यातून मंजूरी दिल्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातील लहान आणि सीमांत शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी नावीन्यपूर्ण हायटेक डिजिटल इकोसिस्टीमचा वापर केल्याने आगामी काळात ६० लाखांहून अधिक लोकांना या प्रकल्पाचा फायदा होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. पंजाबमध्येही शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी या योजनेचा मोठा लाभ होऊ शकतो. 'आज जागतिक बँकेच्या कार्यकारी संचालक मंडळाने २५ नोव्हेंबर रोजी भारतातील दोन प्रकल्पांना मंजुरी दिली आहे ज्यामुळे पंजाब राज्यातील शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि महाराष्ट्र राज्यातील लहान आणि सीमांत शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी नाविन्यपूर्ण डिजिटल उपायांचा वापर करून ६ दशलक्षांहून अधिक लोकांना फायदा होईल' असे जागतिक बँकेने एका निवेदनात म्हटले आहे.महाराष्ट्र प्रोजेक्ट ऑन रिझिलियंट अँग्रीकल्चर (POCRA) फेज II हा ४९० दशलक्ष डॉलर्सचा प्रकल्प असून अचूक पद्धतीने. या नव्या शेती पद्धतींमध्ये डिजिटल तंत्रज्ञानाचा अवलंब करून पीक उत्पादकता वाढवेल आणि लवचिकता मजबूत करेल असे बँकेने यावेळी म्हटले आहे. ही पद्धत तंत्रज्ञानाचा वापर करून पिके आणि मातीला आरोग्य आणि उत्पादकतेसाठी आवश्यक असलेले घटकांचे अचूक निदान करते व याची खात्री करून शेतीची उत्पादकता वाढवते तसेच उत्पादनात जास्तीत जास्त वाढ करत कचराही रोखला जातो.महाराष्ट्रातील २.९ लाख महिलांसह २० लाखांहून अधिक लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना सुधारित मातीचे आरोग्य राखण्यासाठी, पीक पोषक व्यवस्थापन करणे सुकर होणार आहे तसचे पाण्याचा वापर योग्य पद्धतीने करून वाढत्या कार्यक्षमतेचा फायदा शेतकऱ्यांना होऊ शकतो आणि बँकेच्या दाव्यानुसार महाराष्ट्रातील २१ जिल्ह्यांमधील लहान शेतकऱ्यांसाठी उत्पन्न पातळी ३०% वाढू शकते असे वर्ल्ड बँकेच्या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.पंजाब आउटकम्स-एक्सेलरेशन इन स्कूल एज्युकेशन ऑपरेशन (POISE) कार्यक्रम (USD २८६ दशलक्ष) शिक्षणाच्या निकालांचा मागोवा घेण्यासाठी तंत्रज्ञानाच्या मदतीने पंजाबमध्ये दर्जेदार शिक्षण सुधारण्यास मदत करेल. यामुळे १३ लाख विद्यार्थ्यांनी प्राथमिक शाळांमध्ये प्रवेश घेतला आहे आणि २.२ दशलक्षांहून अधिक विद्यार्थ्यांनी माध्यमिक शाळांमध्ये प्रवेश घेतला आहे याची खात्री होईल. याव्यतिरिक्त, बालपणीच्या शिक्षणात ५९ लाख विद्यार्थ्यांना मदत केली जाईल.याविषयी बोलताना जागतिक बँक इंडियाचे कार्यवाहक देश संचालक पॉल प्रॉसी म्हणाले आहेत की,'डिजिटल पायाभूत सुविधांमध्ये कार्यक्षमता वाढवून, नवोपक्रमांना चालना देऊन आणि आरोग्य, शिक्षण, शेती आणि इतर आवश्यक क्षेत्रांमध्ये परिणाम सुधारून आर्थिक विकास आणि गरिबी कमी करण्यास लक्षणीयरीत्या चालना देण्याची क्षमता आहे.हे दोन्ही नवीन प्रकल्प चांगल्या नोकऱ्यांसाठी दर्जेदार शिक्षण आणि पीक उत्पादकता वाढविण्यासाठी आणि सुधारित उपजीविकेसाठी तंत्रज्ञानाचा वापर करून विकसित भारताच्या भारताच्या दृष्टिकोनाला पाठिंबा देतील' असे प्रॉसी म्हणाले आहेत.
‘सहकुटुंब सहपरिवार’ फेम अभिनेत्री अडकली विवाहबंधनात; नवीन आयुष्याला सुरुवात
Marathi Actress Wedding | मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकार मंडळी सध्या विवाहबंधनात अडकत आहेत. याचदरम्यान आता ‘सहकुटुंब सहपरिवार’ या मालिकेत ‘अंजी’ नावाची भूमिका साकारलेली अभिनेत्री कोमल कुंभार हिचा देखील विवाहसोहळा पार पडला. अभिनेत्री कोमल कुंभारने गोकुळ दशवंतशी लग्न केलं आहे. कोमल आणि गोकुळने लग्नात पारंपरिक लूक केला होता. कोमलने पोपटी रंगाची सुंदर साडी नेसली होती. हातात हिरवा […] The post ‘सहकुटुंब सहपरिवार’ फेम अभिनेत्री अडकली विवाहबंधनात; नवीन आयुष्याला सुरुवात appeared first on Dainik Prabhat .
कर्नाटक काँग्रेसमध्ये कधीही उडू शकतो भडका? ; मुख्यमंत्रीपदाच्या वादात राहुल गांधी गप्प का? वाचा
Karnataka politics। कर्नाटकातील काँग्रेसमध्ये कधीही भडका उडण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांच्यातील संघर्ष आता शेवटच्या टप्पयात येऊन पोहचला असल्याचे दिसत आहे. राज्यातील काँग्रेस सदस्य पक्षाच्या हायकमांडने वेळीच यावर तोडगा काढण्याची मागणी करत आहेत, परंतु सर्वात मोठे संकटमोचक असणारे राहुल गांधी हे या मुद्दयावर काहीही बोलत नसल्याचे दिसत आहे. ही केवळ हायकमांडची भूमिका […] The post कर्नाटक काँग्रेसमध्ये कधीही उडू शकतो भडका? ; मुख्यमंत्रीपदाच्या वादात राहुल गांधी गप्प का? वाचा appeared first on Dainik Prabhat .
सातारा : साताऱ्यातून (Satara) एक अत्यंत धक्कादायक आणि भयंकर अपघाताची घटना समोर आली आहे. फलटण तालुक्यातील बरड येथे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावर (Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Mahamarg) भरधाव मिनी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला, ज्यात एका व्यक्तीला आपले प्राण गमवावे लागले, तर चौघे जण गंभीर जखमी झाले आहेत.https://prahaar.in/2025/11/26/chhatrapati-sambhajinagar-sambhajinagar-hostel-food-issue-lizard-found-in-meal-students-hospitalised/मिळालेल्या माहितीनुसार, बरड येथे मिनी ट्रॅव्हल बसवरील चालकाचे नियंत्रण सुटले. अनियंत्रित झालेल्या या बसने महामार्गावर रस्ता ओलांडणाऱ्यांना चिरडले. या अपघातामध्ये एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून, मिनी ट्रॅव्हल्समधील चार जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात इतका भीषण होता की, महामार्गाच्या कडेला असलेल्या एका हॉटेलच्या सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यामध्ये हा संपूर्ण थरार कैद झाला आहे. हा हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अपघातानंतर तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले. जखमींना उपचारासाठी फलटण येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे संत ज्ञानेश्वर महामार्गावरील वाहतुकीच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
मोहित सोमण: जगभरात प्रभावशाली ठरणाऱ्या युएस अर्थव्यवस्थेतील फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात होईल या आशावादाचा जागतिक विश्वात मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे. याच धर्तीवर युरोप व जपानमधील वाढत्या आकडेवारीसह आशियाई बाजारात सकाळच्या सत्रात वाढ झाली हीच परिस्थिती भारतीय शेअर बाजारात दिसत आहे. दुपारी १२.२९ वाजेपर्यंत बीएसई व एनएसईवर सेन्सेक्स व निफ्टीत तुफान वाढ झाली आहे. सेन्सेक्स ८६३ व निफ्टी २७३ अंकाने उसळला असल्याने दोन्ही निर्देशांकात १% हून अधिक वाढ झाली असल्याचे या निमित्ताने स्पष्ट झाले आहे. सकाळी मिड व स्मॉल कॅप शेअर्समध्ये ब्लू चिप्स कंपनीच्या शेअर पेक्षा अधिक वाढ झाली होती. तसेच बँक, मेटल, फायनांशियल सर्विसेस शेअर्समध्ये झालेल्या वाढीमुळे बाजारात रॅली झाली.एचडीएफसी (१.२५%), रिलायन्स इंडस्ट्रीज (१.२८%), आयसीआयसीआय सिक्युरिटीज (०.८९%),बजाज फायनान्स (२.५०%), श्रीराम फायनान्स (१.७२%), अदानी एंटरप्राईजेस (०.१८%), अदानी पोर्ट (२.०२%), टाटा स्टील (१.७७%), पीएमपीवी (१.३८%) यांसारख्या बड्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाल्याने बाजारात मोठी वाढ झाली आहे. तज्ञांच्या मते कच्च्या तेलाच्या किंमती जागतिक बाजारपेठेत घसरल्याने परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी आज मोठ्या प्रमाणात बाजारात गुंतवणूक केली. तज्ञांच्या मते ७८५.३० कोटींची गुंतवणूक वाढल्याने त्याचा फायदा बाजारात होत आहे. अर्थात भारती एअरटेल (१.४२%), महिंद्रा अँड महिंद्रा फिनसर्व्ह (१.६२%),बजाज होल्डिंग्स (०.०५%), बर्जर पेंटस (०.६०%) यांसारख्या शेअर्समध्ये घसरण झाल्याने अतिरिक्त रॅली रोखली गेली.जिओजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडचे मुख्य गुंतवणूक रणनितीकार डॉ. व्ही.के. विजयकुमार यांनी अलीकडील अस्थिरतेचे कारण फ्युचर्स एक्सपायरी अॅक्टिव्हिटीला दिले त्यांच्या मते, 'काल निफ्टीमध्ये ७४ अंकांची घसरण झाली असूनही ४६९७ कोटी रुपयांचा सकारात्मक संस्थात्मक खरेदीचा आकडा असूनही काल ही एक्सपायरीशी संबंधित अशा अस्थिरतेचे उदाहरण आहे.'किरकोळ गुंतवणूकदारांसाठी सर्वोत्तम रणनीती म्हणजे व्यापार करण्यापासून दूर राहणे आणि हळूहळू बऱ्यापैकी मूल्यवान उच्च दर्जाचे ग्रोथ स्टॉक जमा करणे.' असे ते पुढे म्हणाले आहेत.काल परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी ७८५.३० कोटींच्या गुंतवणुकी केली होती तर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी अंदाजे ३९१२ कोटींची गुंतवणूक केली होती ज्यामुळे देशांतर्गत सहभाग मजबूत असल्याचे दिसून आले. युक्रेन-रशिया यांच्यातील तीढा सुटत आल्याने तेलाच्या किमती प्रति बॅरल $५७.२ पर्यंत घसरल्या होत्या ज्यामुळे बाजारांना अतिरिक्त आधार मिळाला. असे असताना युएस बाजारातील फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपातीशिवाय आगामी किरकोळ विक्री (Retail Sales) डेटा, पीएमआय डेटा, रोजगार आकडेवारी, उत्पादन निर्मिती निर्देशांक अशा विविध आगामी आकडेवारींची प्रतिक्षा गुंतवणूकदार करत असल्याने सोन्यासह बाजारालाही आधार मिळत आहे.आज दिवसभरात अस्थिरता निर्देशांक (VIX Volatility Index) हा १.४७% घसरला आहे. सुरूवातीच्या कलात तो २% पेक्षा अधिक पातळीवर घसरला होता. त्यामुळे एकूणच बाजारात आज स्थैर्यता असल्याचे स्पष्ट होत आहे. दुपारी नेक्स्ट ५० (१.२७%), बँक निफ्टी (१.२७%), फायनांशियल सर्विसेस (१.२५%), मिडकॅप सिलेक्ट (१.१६%) निर्देशांकात मोठी वाढ झाल्याने बाजार मोठ्या प्रमाणात आणखी उसळत आहे.काल युएस बाजारात अखेरच्या सत्रात डाऊ जोन्स (०.२९%), एस अँड पी ५०० (०.९३%), नासडाक (०.७१%) निर्देशांकात वाढ झाली. आशियाई बाजारात आज दुपारपर्यंत सेट कंपोझिट (०.३१%), शांघाई कंपोझिट (०.१५%) वगळता इतर निर्देशांकात मोठी वाढ झाली आहे. सर्वाधिक वाढ तैवान वेटेड (१.८१%), निकेयी २२५ (१.९३%), गिफ्ट निफ्टी (१.१९%) निर्देशांकात झाली आहे.
Hibiscus Tea: जास्वंदीचे फूल दिसायला जितके सुंदर, तितकेच ते आरोग्यासाठीही अतिशय उपयुक्त मानले जाते. देवी-देवतांना अर्पण केल्या जाणाऱ्या या फुलाला धार्मिक महत्त्वाबरोबरच औषधी मूल्यही आहे. आयुर्वेदात याला जपा पुष्प म्हटले जाते. हे फूल शीतल, रक्तवर्धक, बलवर्धक आणि सूजन कमी करणारे म्हणून ओळखले जाते. जास्वंदीची पाने, फुले आणि मुळे सगळ्यांची औषधी गुणधर्म आहेत, तर फुलांमध्ये एंटीऑक्सिडेंट, […] The post Hibiscus Tea: जास्वंदीच्या फुलांच्या चहाचे आश्चर्यकारक फायदे; डायबिटीज, कोलेस्ट्रॉलसह अनेक आजारांवर नियंत्रण appeared first on Dainik Prabhat .
Isha Keskar | ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ मालिकेला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेतील अद्वैत-कलाची जोडीला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. मालिकेत सुकन्या नावाच्या नव्या पात्राची एन्ट्री झाली आहे. या मालिकेत कलाचा अपघात झाल्याचे दाखवण्यात आला होता. ज्यानंतर कला ही व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री ईशा केसकर हिनं मालिका सोडल्याचं बोललं जात होतं. अखेर या चर्चा खऱ्या ठरल्या आहेत. […] The post “…म्हणून मालिकेतून बाहेर पडायचं ठरवलं,” ईशा केसकरने ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ मालिकेतून बाहेर पडण्यामागचे सांगितले कारण appeared first on Dainik Prabhat .
Gulabrao Patil : राज्यात गेल्या काही दिवसांपासून तिजोरच्या चाव्यावरून राजकारण रंगले आहे. यासंदर्भात सुरुवातीला एका जाहीर सभेत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना आवाहन करताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधान केले होते. त्यांच्या विधानाला भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले होते. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात दोन दादांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा होती. अशातच आता शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील […] The post गुलाबराव पाटलांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा! अजित पवारांना लगावला खोचक टोला म्हणाले “दुसऱ्याची पोरं….” appeared first on Dainik Prabhat .
“पहिल्यांदा मतदान करणाऱ्या मतदारांचा आदर करा” ; संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे पत्र
Constitution Day of India। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नागरिकांना त्यांची संवैधानिक कर्तव्ये पार पाडण्याचे आवाहन केले, ते एका मजबूत लोकशाहीचा पाया असल्याचे सांगत त्यांनी देशवासियांसाठी एक पत्र लिहिले. या आजच्या संविधान दिनानिमित्त जनतेला लिहिलेल्या पत्रात, पंतप्रधान मोदींनी मतदानाचा अधिकार वापरून लोकशाही मजबूत करण्याच्या जबाबदारीवरही भर दिला. १८ वर्षांचे झालेल्या आणि पहिल्यांदाच मतदान करणाऱ्यांचा सन्मान […] The post “पहिल्यांदा मतदान करणाऱ्या मतदारांचा आदर करा” ; संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे पत्र appeared first on Dainik Prabhat .
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर बातमी समोर येत आहे. किल्लेआर्क (Killeark) येथील समाज कल्याण विभागातर्फे चालवल्या जाणाऱ्या एका शासकीय वसतिगृहातील (Government Hostel) विद्यार्थ्यांच्या जेवणात पाल (Lizard) शिजलेली आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. रात्रीच्या जेवणात एका विद्यार्थ्याच्या ताटात गवारीच्या भाजीत शिजलेली पाल सापडली. हे जेवण खाल्लेल्या अनेक विद्यार्थ्यांना याचा त्रास सुरू झाला. सुमारे १० ते १५ विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याने त्यांना तातडीने उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दूषित जेवणामुळे विद्यार्थ्यांना मळमळ आणि उलट्या (Nausea and Vomiting) झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. वसतिगृहाच्या या भोंगळ कारभारावर विद्यार्थ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. संतप्त विद्यार्थ्यांनी रात्री उशिरा, म्हणजेच ११.३० वाजेपर्यंत वसतिगृहासमोर धरणे आंदोलन (Protest) केले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त आर.एम. शिंदे यांनी तात्काळ वसतिगृहाला भेट देऊन विद्यार्थ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे शासकीय वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या गुणवत्तेवर आणि स्वच्छतेच्या प्रश्नावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी जोर धरू लागली आहे.https://prahaar.in/2025/11/26/2611-mumbai-terror-attack-know-what-happend-17-years-ago/दूषित जेवणामुळे विद्यार्थ्यांना मळमळ, उलट्यांचा त्रासछत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) शहरातील समाज कल्याण विभागाच्या किल्लेआर्क युनिट क्रमांक १ मधील १००० मुलांच्या वसतिगृहात काल सायंकाळी एक अत्यंत गंभीर आणि धक्कादायक घटना घडली. या वसतिगृहातील भोजनात थेट पाल (Lizard) आढळल्याने मोठी खळबळ उडाली.सोमवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास विद्यार्थी जेवण करत असताना, त्यांना गवारीच्या शेंगांच्या भाजीमध्ये शिजलेली पाल आढळली. या घटनेनंतर विद्यार्थ्यांमध्ये एकच आरडाओरडा झाला. दूषित जेवण केल्यामुळे काही विद्यार्थ्यांना लगेचच मळमळ आणि उलट्या (Nausea and Vomiting) होण्याचा त्रास सुरू झाला. त्रास होत असलेल्या सुमारे १० विद्यार्थ्यांना तातडीने घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेच्या निषेधार्थ, सायंकाळी ७:३० वाजल्यापासूनच विद्यार्थ्यांनी वसतिगृहासमोर आंदोलन सुरू केले. वसतिगृहातील असुविधांचा पाढा वाचत त्यांनी संताप व्यक्त केला. समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त आर.एम. शिंदे यांनी आंदोलकांची भेट घेतली. यावेळी मेस चालक योगिराज गोरशेटे यांनी आपली चूक मान्य करत माफी मागितली आणि भविष्यात असा प्रकार होणार नाही, अशी ग्वाही दिली. मात्र, मेस चालकाच्या ग्वाहीनंतरही विद्यार्थी आंदोलनावर ठाम राहिले. या घटनेमुळे शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेआधी अळ्या, आता पाल... वारंवार तक्रारी करूनही कारवाई नाहीछत्रपती संभाजीनगरमधील शासकीय वसतिगृहात जेवणात पाल आढळल्याच्या घटनेनंतर विद्यार्थ्यांनी वसतिगृहातील निकृष्ट आणि आरोग्यास अपायकारक जेवणाचा पाढाच वाचला आहे. विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, ही केवळ एकच घटना नाही, तर वसतिगृहात सातत्याने खराब दर्जाचे जेवण दिले जाते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळपास ४० ते ५० मुलांनी दूषित जेवण केले होते. त्यापैकी बहुतेकांना पोटदुखी (Stomach Ache) आणि डोळे लाल होण्यासारखा (Red Eyes) त्रास जाणवत आहे. विद्यार्थ्यांनी जेवणाच्या गुणवत्तेवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांना सातत्याने कच्च्या पोळ्या, पाण्यात केवळ दूध पावडर मिसळून दिलेले दूध आणि खराब अंडी व फळे दिली जातात. वसतिगृहाच्या भोंगळ कारभाराला कंटाळून विद्यार्थ्यांनी प्रशासनाकडे आता थेट आणि कठोर मागणी केली आहे. सर्व मेस (Mess) त्वरित बंद करून जेवणाचे पैसे विद्यार्थ्यांच्या अकाउंटला जमा करण्यात यावे, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. यापूर्वीही जेवणात अळ्या निघाल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या होत्या. मात्र, त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी प्रशासनाला थेट इशारा दिला आहे की, जर त्यांच्या मागण्यांकडे लक्ष दिले नाही, तर समाजकल्याण कार्यालयावर मोठे आंदोलन करण्यात येईल.
मॉर्निंग वॉकला गेलेल्या काँग्रेस जिल्हाध्यक्षाचे अपहरण; गाडीत जबरदस्तीने बसवले… CCTV फुटेज समोर
Ahilyanagar News | एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून प्रचारसभांनी देखील वेग धरला आहे. याचदरम्यान अहिल्यानगरमध्ये काँग्रेस जिल्हा अध्यक्षाचे अपहरण करुन बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या अपहरणाचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावरून आता काँग्रेस नेत्यांकडून कायदा-सुव्यस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत. या घटनेनंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी […] The post मॉर्निंग वॉकला गेलेल्या काँग्रेस जिल्हाध्यक्षाचे अपहरण; गाडीत जबरदस्तीने बसवले… CCTV फुटेज समोर appeared first on Dainik Prabhat .
Rahi Anil Barve : गेल्या काही दिवसांपूर्वीच तुबांड चित्रपटाचा दिग्दर्शक राही अनिल बर्वे याने त्याच्या आगामी मयसभा चित्रपटाची घोषणा केली होती. सोशल मीडियावर या चित्रपटाचे पहिले पोस्टरही राहीने शेअर केले होते. पोस्टर पाहिल्यानंतर मयसभा चित्रपटाची मोठी उत्सुकता चाहत्यांमध्ये होती. अशातच आता या चित्रपटाचा पहिला व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओने देखील चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढवली […] The post ‘तुबांड’च्या दिग्दर्शकाचा नवीन चित्रपट; पोस्टरनंतर व्हिडीओ समोर, ‘मयसभा’त मराठी अभिनेत्रीला मिळाली मोठी संधी appeared first on Dainik Prabhat .
भारतीय क्रिकेट संघाची स्टार खेळाडू स्मृती मंधाना (Smriti Mandhana) आणि लोकप्रिय म्युझिक कंपोजर पलाश मुच्छल (Palaash Muchhal) दोघेही सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जोरदार चर्चेत आहेत. त्यांच्या नात्यात आलेल्या एका वादळामुळे अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. सर्वात मोठी बातमी म्हणजे, २३ नोव्हेंबर २०२५ रोजी नियोजित असलेला या दोघांचा ग्रँड वेडिंग सोहळा (Grand Wedding) अचानकपणे पुढे ढकलण्यात आला. यानंतर दोघांच्या नात्यात काहीतरी बिनसले असल्याच्या चर्चांना उधाण आले. या वादळाचे कारण म्हणजे पलाश मुच्छलच्या खासगी चॅट्सचे काही स्क्रीन शॉर्ट्स व्हायरल झाले, ज्यामुळे दोघांच्या नात्यात मोठी दरी निर्माण झाली. या प्रकरणात आता एका व्यक्तीचे नाव समोर आले आहे, ती म्हणजे कोरिओग्राफर मेरी डि'कोस्टा (Mary D'Costa). 'ग्रहण' लागण्याचे कारण मेरी डि'कोस्टा? सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पलाश मुच्छलच्या व्हायरल झालेल्या चॅट्समधील मुलगी ही कोरिओग्राफर मेरी डि'कोस्टा आहे. यामुळे स्मृती मंधाना आणि पलाश मुच्छल यांच्या लग्नाला 'ग्रहण' लागण्याचे कारण मेरी डि'कोस्टा आहे का? या एका प्रश्नाभोवती सध्या सोशल मीडियावर आणि बी-टाऊनमध्ये जोरदार चर्चा रंगल्या आहेत. या संवेदनशील मुद्द्यावर अजूनही स्मृती मानधना किंवा पलाश मुच्छल यांनी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.https://prahaar.in/2025/11/26/net-household-financial-assets-increased-by-rs-9-9-lakh-crore-nirmala-sitharaman/लग्न रद्द होण्यामागचं पलक मुच्छलने सांगितले वेगळेच कारणक्रिकेटर स्मृती मंधाना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचे अचानक रद्द झालेले लग्न सध्या बॉलिवूड आणि क्रीडा जगतात चर्चेचा विषय बनले आहे. सुरुवातीला या दोघांचे लग्न रद्द होण्यामागे वेगळे कारण सांगितले जात होते, मात्र आता समोर आलेले सत्य खरोखरच धक्कादायक आहे. या दोघांचे लग्न रद्द झाल्यावर, सुरुवातीला स्मृती मंधानाच्या वडिलांची तब्येत बिघडल्यामुळे लग्न पुढे ढकलण्यात आले, असे सांगण्यात आले होते. इतकंच नाही, तर पलाशची बहिण आणि सुप्रसिद्ध गायिका पलक मुच्छलनेही याच कारणांवर शिक्कामोर्तब केले होते. पण, काही काळानंतर या प्रकरणात एकापाठोपाठ एक असे धक्कादायक खुलासे समोर येऊ लागले. यानुसार, लग्न रद्द होण्यामागे स्मृतीच्या वडिलांची तब्येत नसून, पलाश मुच्छलचे इंटरनेटवर व्हायरल झालेले काही खासगी चॅट्स असल्याचे बोलले जात आहे. या व्हायरल चॅट्समुळे दोघांच्या नात्यात मोठे वादळ आले आणि त्यामुळेच २३ नोव्हेंबरला नियोजित असलेले ग्रँड वेडिंग रद्द झाले. या तणावामुळे पलाश मुच्छलची तब्येतही बिघडली आणि त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले. व्हायरल चॅट्समुळे लग्न रद्द झाले असावे, असा कयास आता सर्वत्र लावला जात आहे. या गंभीर विषयावर मंधाना किंवा मुच्छल कुटुंबाकडून कोणतीही स्पष्ट प्रतिक्रिया अजून आलेली नाही.पलाश मुच्छलवर स्मृती मंधानाला फसवल्याचा गंभीर आरोपपलाश मुच्छलवर थेट स्मृती मंधानाला 'धोका' दिल्याचा गंभीर आरोप लावण्यात आल्यामुळे हे संपूर्ण प्रकरण वादग्रस्त बनले आहे. या प्रकरणाला वाचा फोडणारी व्यक्ती म्हणजे कोरिओग्राफर मेरी डि'कोस्टा (Mary D'Costa). मेरीने पलाश मुच्छलसोबतच्या तिच्या कथित 'फ्लर्टी चॅट्स'चे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर केले आहेत, जे सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या व्हायरल झालेल्या चॅट्सनुसार, पलाश वारंवार मेरीला भेटण्याचा आग्रह धरत असल्याचे दिसून येते. सर्वात गंभीर बाब म्हणजे, जेव्हा मेरीने त्याला स्मृती मंधानासोबतच्या त्याच्या नात्याबद्दल विचारले, तेव्हा पलाशने त्यांच्या नात्याला 'मृत' (Dead) आणि केवळ एक 'लाँग डिस्टन्स' रिलेशनशिप म्हणून वर्णन केल्याचे समोर आले आहे. या चॅट्समुळे पलाश मुच्छल फसवणुकीच्या आरोपांमुळे अडचणीत आला आहे. या स्क्रीनशॉट्सची अद्याप अधिकृत पुष्टी केलेली नसली तरी, सोशल मीडियावर हे चॅट्स वेगाने व्हायरल होत आहेत आणि याच कारणामुळे मंधाना-मुच्छल यांचे लग्न मोडले असावे, अशी चर्चा आता रंगू लागली आहे.मेरी डि'कोस्टा कोण?क्रिकेटर स्मृती मंधाना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांच्या लग्न रद्द होण्यामागील वादग्रस्त प्रकरणामुळे आता कोरिओग्राफर मेरी डि'कोस्टा (Mary D'Costa) हे नाव चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. पलाशचे 'फ्लर्टी चॅट्स' लीक करणारी ही व्यक्ती कोण आहे, याबद्दल आता माहिती समोर आली आहे.मीडिया रिपोर्टनुसार, पलाश मुच्छल आणि स्मृती मंधानाच्या वैयक्तिक आयुष्यात वादळ आणणारी, स्क्रीनशॉट व्हायरल करणारी ही महिला एक व्यावसायिक कोरिओग्राफर आहे. धक्कादायक बाब म्हणजे, मेरी डि'कोस्टा ही केवळ बाहेरची व्यक्ती नव्हती, तर ती या दोघांच्या लग्नाच्या तयारीमध्ये सक्रियपणे सहभागी होती! सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्मृती मंधाना आणि पलाश मुच्छल यांच्या संगीत सोहळ्यातील डान्सची कोरिओग्राफी करण्याची जबाबदारी मेरी डि'कोस्टा हिच्याकडेच होती. जी व्यक्ती अत्यंत खासगी आणि आनंदाच्या सोहळ्याची तयारी करत होती, त्याच व्यक्तीने पलाश मुच्छलचे फ्लर्टी चॅट्स सार्वजनिक केल्याने मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. यामुळे स्मृती मंधाना आणि पलाश मुच्छल यांच्या लग्नाला ग्रहण लागले असावे, अशी चर्चा रंगली आहे. मेरी डि'कोस्टाच्या भूमिकेमुळे पलाश मुच्छलवर फसवणुकीचे गंभीर आरोप होत आहेत.रेडिटवर धक्कादायक दावेसुरुवातीला स्मृतीच्या वडिलांची तब्येत बिघडल्यामुळे लग्न पुढे ढकलण्यात आले, असे सांगण्यात आले होते. मात्र, आता रेडिटवरील काही युजर्सनी या तब्येतीच्या बिघाडामागील वेगळे कारण समोर आणले आहे. रेडिटवरील युजर्सनी आरोप केला आहे की, स्मृती मंधानाच्या वडिलांनी लग्नापूर्वीच्या काही सोहळ्यांमध्ये पलाश मुच्छलला कोरिओग्राफर मेरी डि'कोस्टासोबत पाहिले होते. हे दृश्य पाहिल्यानंतर त्यांना मोठा धक्का बसला आणि याच कारणामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगितले जात आहे. जरी हे दावे रेडिटवर काही काळानंतर काढण्यात आले असले, तरी यामुळे या संपूर्ण प्रकरणाची गंभीरता वाढली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, पलाशचे व्हायरल चॅट्स आणि वडिलांची तब्येत बिघडणे या दोन्ही दाव्यांवर मंधाना किंवा मुच्छल कुटुंबातील कुणीही अद्याप अधिकृत वक्तव्य केलेले नाही. या मौनामुळे या आरोपांवर अधिक चर्चा रंगत आहेत.
रशिया-युक्रेन युद्ध लवकरच संपणार? अमेरिकेच्या करार आराखड्यावर दोन्ही देशांची सहमती
अमेरिका: रशियासोबत युद्ध संपवण्यासाठी प्रस्तावित अमेरिकेच्या करार आराखड्यावर युक्रेनने सहमती दर्शविली आहे. यामुळे मागील दोन वर्षांपेक्षा जास्त काळ सुरु असलेले रशिया-युक्रेन युद्ध आता लवकरच संपेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी सांगितले की अनेक मुद्दे अद्याप अनुत्तरित आहेत. अबू धाबीमध्ये अमेरिकेचे लष्कर सचिव डॅन ड्रिस्कॉल आणि रशियन प्रतिनिधी यांच्यातील चर्चेदरम्यान हे विधान आले आहे. दरम्यान, रशिया-युक्रेन युद्ध संपवण्याची बहुचर्चित योजना आता सुव्यवस्थित आणि अंतिम झाली आहे, असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे.अमेरिकेचे लष्कर सचिव डॅन ड्रिस्कॉल यांनी अबुधाबीमध्ये रशियन अधिकाऱ्यांशी दोन दिवसीय चर्चा केली. या चर्चेत काही किरकोळ मुद्दे अजूनही सोडवायचे असले तरी युक्रेनने शांतता करारावर सहमती दर्शविली असल्याचे सांगितले जात आहे. याव्यतिरिक्त युक्रेनचे राष्ट्रीय सुरक्षा सचिव रुस्तम उमरोव यांनी सोशल मीडीयावर पोस्ट करत सांगितले आहे की, जिनेव्हा येथे झालेल्या युक्रेनियन आणि अमेरिकन शिष्टमंडळांमधील उत्पादक आणि रचनात्मक बैठका आणि युद्ध संपवण्यासाठी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या अथक प्रयत्नांचे आम्ही कौतुक करतो. जिनेव्हा येथे चर्चा झालेल्या कराराच्या मुख्य अटींवर दोन्ही बाजूंनी एकमत झाले आहे.https://prahaar.in/2025/11/26/a-girl-who-was-begging-at-the-railway-station-was-used-for-physical-pleasure-and-her-body-was-found-in-the-creek-shocking-incident-in-dombivli-revealed/अमेरिकेने तयार केलेल्या शांतता योजनेत अनेक गोष्टींचा समावेश होता. ज्या युक्रेनने मागील वाटाघाटींमध्ये नाकारल्या होत्या. युक्रेनला त्याच्या सशस्त्र दलांच्या आकारावरील मर्यादा स्वीकारणे, नाटोमध्ये सामील होण्याचे प्रयत्न सोडून देणे आणि काही प्रदेश रशियाला देण्यास सांगितले होते. या सर्व रशियाच्या दीर्घकालीन मागण्या आहेत, कारण राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन जास्तीत जास्त सवलती मागत आहेत. मात्र युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कीने रशियाच्या मागण्या नाकारल्या. या ठरावात डोनबास प्रदेशातील मुख्य भाग कीवला सोपवण्याची मागणी देखील करण्यात आली आहे. ज्यावर रशियाने कब्जा केला असला तरी हा भाग ते पूर्णपणे नियंत्रित करत नाही. या भागात अशी शहरे आहेत जी युक्रेनच्या संरक्षण धोरणाचा केंद्रबिंदू आहे.
मुंबई : आजचा दिवस २६ नोव्हेंबर भारतीय आणि विशेषतः मुंबईच्या इतिहासातील सर्वात भयानक आणि वेदनादायी दिवसांपैकी एक आहे. आजच्या दिवशी, म्हणजेच २६ नोव्हेंबर २००८ रोजी, देशाने आणि मुंबईने सर्वात मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा (26/11 Terror Attack) थरार अनुभवला होता. या हल्ल्याच्या जखमा आजही ताज्या आहेत. २६/११ च्या रात्री मुंबईतील प्रतिष्ठित ताज महाल हॉटेलला दहशतवाद्यांनी लक्ष्य केले. या ठिकाणी मोठा बॉम्बस्फोट घडवण्यात आला. या स्फोटामुळे ताज महालाचा भव्य घुमट चहूबाजूंनी आगीच्या ज्वालात लपेटलेला होता. मुंबईच्या या ऐतिहासिक वास्तूमधून सर्वत्र धुराचे तांडव सुरू होते, ज्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. हा भारतावरील सर्वात मोठा आणि सुनियोजित दहशतवादी हल्ला होता. या हल्ल्यात अनेक निष्पाप नागरिकांनी आपला जीव गमावला, तर अनेक शूर जवान शहीद झाले. आज २६ नोव्हेंबरच्या निमित्ताने संपूर्ण देश त्या शहिदांना आणि पीडितांना श्रद्धांजली वाहत आहे.तीन दिवस चाललेल्या २६/११ हल्ल्यात १६६ जणांनी गमावले प्राणतीन दिवस चाललेल्या या हल्ल्यात दहशतवाद्यांनी मुंबईला वेठीस धरले होते, ज्यात १६६ जणांनी आपले प्राण गमावले, तर ३०० हून अधिक लोक जखमी झाले होते. दहशतवाद्यांनी मुंबईतील गर्दीच्या आणि महत्त्वाच्या अनेक ठिकाणांना लक्ष्य केले. यामध्ये ताज महाल हॉटेल, ओबेरॉय-ट्रायडेंट हॉटेल, छत्रपती शिवाजी टर्मिनस (CST), कामा हॉस्पिटल आणि प्रसिद्ध लिओपोल्ड कॅफे यांचा समावेश होता. दहशतवाद्यांनी सीएसटी स्थानकावर अंदाधुंद गोळीबार करत मोठा नरसंहार घडवला, ज्यात ५८ लोक मृत्यूमुखी पडले. याचबरोबर, त्यांनी गर्दीत घुसून मुंबईच्या अनेक भागांमध्ये धुमाकूळ माजवला. ताज हॉटेलच्या लॉबी, बार, ट्रायडेंट परिसर आणि अनेक रेस्टॉरंटमध्ये गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात अनेक विदेशी नागरिक आणि भारतीय नागरिक ताजच्या आत अडकले होते. मुंबईची लोकप्रिय टिफिन रेस्टॉरंट देखील दहशतवाद्यांच्या क्रूरतेची शिकार झाली. याशिवाय, वाडी आणि विलेपार्ले येथील टॅक्सींमध्येही बॉम्बस्फोट घडवण्यात आले. लोकांवर ग्रेनेड बॉम्ब फेकून मारण्यात आले, ज्यामुळे अनेक निरपराध नागरिकांचा बळी गेला. या हल्ल्याने मुंबईच्या इतिहासावर आणि लोकांच्या मनावर न मिटणारी जखम केली आहे.https://prahaar.in/2025/11/26/will-the-russia-ukraine-war-end-soon-both-countries-agree-on-the-us-agreement-draft/२६/११ हल्ल्यात मुंबई पोलिस, कमांडो आणि ताज कर्मचाऱ्यांचे धैर्यमुंबईवरील २६/११ च्या भयंकर दहशतवादी हल्ल्यादरम्यान, अनेक ठिकाणी क्रूरता पाहायला मिळाली, पण त्याचवेळी मानवी शौर्य आणि धैर्याची अविस्मरणीय उदाहरणेही पाहायला मिळाली. दहशतवाद्यांनी ताज महाल हॉटेलमध्ये अडकलेल्या अनेक लोकांना ओलीस (Hostage) बनवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, ताजच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या प्राणांची पर्वा न करता, मोठ्या धैर्याने सुमारे २०० हून अधिक लोकांचे प्राण वाचवले. त्यावेळेचे हेड शेफ हेमंत ओबेरॉय आणि अन्य कर्मचाऱ्यांनी लोकांना सुरक्षित मार्गाने बाहेर काढले. या हल्ल्यात मुंबई पोलिसांच्या अनेक शूर अधिकाऱ्यांनी आपल्या जीवाची बाजी लावली. कामा हॉस्पिटलच्या परिसरात अतिमहत्वाचे अधिकारी हेमंत करकरे, अशोक कामटे आणि विजय साळसकर यांनी दहशतवाद्यांना थेट सामोरे जात त्यांचा मुकाबला केला आणि या लढ्यात ते शहीद झाले. सुरक्षा दलांनी आणि कमांडोजनी तातडीने हॉटेलमध्ये प्रवेश करत लोकांना वेगाने बाहेर काढले. त्यांच्या या शौर्यामुळे अनेक लोक ओलिस होण्यापासून वाचले. या ऑपरेशनमध्ये अनेक मुंबई पोलीस अधिकारीही जखमी झाले होते. याच रात्री दहशतवाद्यांनी ज्यू आउटरीच सेंटरवरही हल्ला केला होता. तिथे उपस्थित असलेल्या एका भारतीय आयाने (Nanny) आपला जीव धोक्यात घालून दोन वर्षांच्या चिमुकल्याचा जीव वाचवला होता. या सर्वांचे शौर्य आणि बलिदान आजही मुंबईकरांच्या आणि संपूर्ण देशाच्या कायम स्मरणात राहील.१७ वर्षांनंतरही २६/११ चा तपास सुरुचमुंबईवरील २६/११ च्या क्रूर दहशतवादी हल्ल्याला आज १७ वर्षे पूर्ण झाली आहेत. तरीही, या हल्ल्याचा तपास आजही पूर्ण झालेला नाही आणि अनेक रहस्ये अजूनही गुलदस्त्यात आहेत. या तपासात उघड झालेल्या एका मोठ्या रहस्याने पाकिस्तानच्या भूमिकेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे केले आहे. या हल्ल्याच्या तपासात साजिद मीर नावाच्या एका महत्त्वाच्या दहशतवाद्याची ओळख पटली होती. हा दहशतवादी २६/११ हल्ल्याच्या कटातील एक प्रमुख सूत्रधार असल्याचे मानले जाते. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, आंतरराष्ट्रीय गुप्तचर संस्थांच्या दाव्यानुसार, पाकिस्तान आपल्या भूमीवर साजिद मीरला गेल्या १७ वर्षांपासून संरक्षण देत आहे. यावरून पाकिस्तान दहशतवाद्यांना आश्रय देत असल्याचे स्पष्ट होत असले, तरी पाकिस्तानने मात्र हा दावा सातत्याने नाकारला आहे. आज या भयानक हल्ल्याला १७ वर्षे पूर्ण झाली असली तरी, या हल्ल्याबद्दल बोलताना किंवा लिहिताना आजही प्रत्येक भारतीयाच्या अंगावर काटा येतो आणि या हल्ल्यातील न्याय अपूर्ण राहिल्याची भावना कायम राहते.
रुग्णांची चिंता कमी करण्यासाठी संगीत महत्वाचे; संशोधनातून माहिती समोर
नवी दिल्ली : शस्त्रक्रियेपूर्वी, शस्त्रक्रियेदरम्यान किंवा नंतर संगीत ऐकल्याने रुग्णांची चिंता, वेदनांचे प्रमाण कमी होते, असे एका नवीन भारतीय अभ्यासातून दिसून आले आहे. संशोधकांना सुधारित महत्वाच्या लक्षणांमध्ये, वेदना औषधांची गरज कमी होते आणि रुग्णांचे समाधान जास्त होते असे आढळून आले आहे. भारतीय अभ्यासातून असे दिसून आले आहे की, शस्त्रक्रियेदरम्यान वाद्य संगीत वाजवल्याने रुग्णाची रिकव्हरी लक्षणीयरीत्या […] The post रुग्णांची चिंता कमी करण्यासाठी संगीत महत्वाचे; संशोधनातून माहिती समोर appeared first on Dainik Prabhat .
Bobby Deol : दाक्षिणात्य अभिनेता प्रभासने पुढच्या वर्षासाठी आधीच जोरदार तयारी केली आहे. तो दोन मोठ्या चित्रपटांमुळे चर्चेत आहे. एक म्हणजे ‘राजा साब’ आणि दुसरा म्हणजे ‘स्पिरीट’. राजा साब चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून, त्यानंतर स्पिरीट येणार आहे. बहुचर्चित स्पिरीट चित्रपटात अभिनेता बॅाबी देओल खलनायकाच्या भूमिकेत दिसणार होता. पण आता त्याचा पत्ता कट करण्यात आला […] The post स्पिरीटमधून बॅाबीचा पत्ता कट? ‘या’ अभिनेत्याच्या एंन्ट्रीची जोरदार चर्चा; संदीप रेड्डी वांगाच्या मनात काय? appeared first on Dainik Prabhat .
urmilla kothare: सोशल मीडियामुळे सेलिब्रिटींना नेहमीच ट्रोलिंग आणि चर्चा यांचा सामना करावा लागतो. मराठी अभिनेत्री उर्मिला कानेटकर कोठारेही याला अपवाद नाही. तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक अंदाज, चर्चा, अफवा ऑनलाइन दिसतात. पण या सगळ्याविषयी उर्मिलाने अतिशय स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे. अपघातानंतर उर्मिला पुन्हा कामावर काही महिन्यांपूर्वी झालेल्या अपघातात उर्मिलाला दुखापत झाली होती. आता ती पूर्णपणे सावरली […] The post urmilla kothare: उर्मिला कोठारे म्हणते, “काही गोष्टी खऱ्या, तर काही नाहीत…” वैयक्तिक आयुष्यावरील चर्चांना दिलं स्पष्ट उत्तर appeared first on Dainik Prabhat .
मोहित सोमण: आज टाटा इन्व्हेसमेंट कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअर्समध्ये तुफान वाढ झाली आहे. सातत्याने रेकॉर्ड ब्रेक पातळीवर शेअर घसरत असताना बदलत्या आर्थिक संकेतामुळे व बाजारातील तेजीमुळे कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी खरेदी झाली व शेअर आज ८.३१% इंट्राडे उच्चांकावर (Intradday All time High) व्यवहार करत होता. हा शेअर ८.३१% उसळल्याने ७८६.९१ रूपये प्रति शेअरवर व्यवहार करत होता. सकाळी १०.५५ वाजेपर्यंत कंपनीचा शेअर ७.०३% उसळत ७७७.६० रूपये प्रति शेअरवर व्यवहार करत आहे. प्रामुख्याने शेअर्समध्ये मोठी प्राईज करेक्शन झाली आहे.यापूर्वी कंपनीचा शेअर सातत्याने ७ सत्रात घसरला होता. परवा शेअर २५% कोसळला होता तर कालही शेअर ५ ते ६% कोसळला होता. एकूण सात सत्रात शेअर ३ ऑक्टोबर रोजी असलेल्या इंट्राडे उच्चांकावर (११८४ प्रति शेअर) वरून ३३.७५% कोसळला होता.तांत्रिक दृष्ट्या टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनची किंमत सध्या त्यांच्या ५-दिवस (5Days) १००-दिवस (100 Days) आणि २००-दिवसांच्या (200 Days) एमवीए (Moving Average) मूव्हिंग अँव्हरेजपेक्षा जास्त आहे. कंपनीच्या शेअरने अल्पकालीन आणि दीर्घकालीन तांत्रिक दृष्ट्या समर्थन पातळी (Support Level) राखण्यास यश प्राप्त केले आहे तथापि, शेअर याच्या २० दिवस आणि ५० दिवसांच्या मूव्हिंग अँव्हरेजपेक्षा कमी आहे, जे मध्यम कालावधीत काही प्रतिकार (Resistance) दर्शवत आहे हे तांत्रिकदृष्ट्या मिश्र तांत्रिक चित्र काही काळाच्या घसरणीनंतर शेअरच्या अलीकडच्या रिकवरीशी जुळत आहे.एकूणच गेल्या पाच दिवसांत कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण झाली असूनही शेअरने १.६६% वाढ नोंदवली असून संपूर्ण महिनाभरात ७.२६% घसरण नोंदवली आहे. संपूर्ण ६ महिन्याचा कालावधी पाहता २३.७१% व संपूर्ण वर्षात १६.३६% वाढ नोंदवली आहे. गेल्या वर्षीच्या तिमाहीतील तुलनेत या एनबीएफसी (Non Banking Financial Services NBFC) कंपनीला १९.७८% अधिक निव्वळ नफा (Net Profit) मिळाला होता. तर कंपनीच्या कामकाजातून मिळणाऱ्या महसूलात (Revenue from Operations) ८.०७% वाढ कंपनीने नोंदवली.
दिल्ली बॉम्बस्फोट : दहशतवादी उमर नबीला आश्रय देणाऱ्या शोएबला NIA कडून अटक
Delhi Red Fort blast। दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार बॉम्बस्फोट प्रकरणात NIA ने मोठी कारवाई केली आहे. या प्रकारांत NIA ने आणखी एका आरोपीला अटक केली आहे. तपास यंत्रणेनुसार, या आरोपीने स्फोटापूर्वी मुख्य दहशतवादी उमर उन नबीला पाठिंबा दिला होता आणि त्याला लपण्याची जागा आणि आवश्यक मदत पुरवली होती. दहशतवाद्याला आश्रय दिल्याचा आरोप Delhi Red […] The post दिल्ली बॉम्बस्फोट : दहशतवादी उमर नबीला आश्रय देणाऱ्या शोएबला NIA कडून अटक appeared first on Dainik Prabhat .
Celina Jaitley : अभिनेत्री आणि माजी मिस इंडिया सेलिना जेटली तिच्या खाजगी आयुष्यातील एका गोष्टीमुळे चर्चेत आली आहे. तिच्या वैवाहिक जीवनातील होणारी उलथापालथ आता सगळ्यांसमोर आली आहे. मंगळवारी सेलिना जेटलीने तिचा पती पीटर हागविरुद्ध घरगुती हिंसाचाराचा खटका दाखल केल्याचे वृत्त आहे. यासंबंधी आता सेलिनाने सोशल मीडियाच्या माध्यमातून घटस्फोटाबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. मी कधीच […] The post “मी कधीच कल्पना केली…”; कौटुंबिक हिंसाचार प्रकरणानंतर सेलिना जेटलीची पहिली पोस्ट चर्चेत; कोण आहे पीटर हाग? appeared first on Dainik Prabhat .
Salil Kulkarni | भारतीय महिला संघाची उपकर्णधार स्मती मानधना आणि म्युझिक कंपोझर पलाश मुच्छल यांचा लग्नसोहळा २३ नोव्हेंबरला पार पडणार होता. मात्र, स्मृतीच्या वडिलांची प्रकृती बिघडल्यामुळे लग्न तात्पुरता रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. पण, याचदरम्यान स्मृतीने लग्नासंदर्भातील पलाशबरोबरचे फोटो इन्स्टाग्रामवरून डिलीट केल्याने सोशल मीडियावर सध्या विविध चर्चांना उधाण आलं आहे. याबाबत आता अनेक तर्क-वितर्क […] The post “चर्चा करणं थांबवा आणि तिला तिचं आयुष्य जगू द्या!”; स्मृती मानधनासाठी सलील कुलकर्णींचे नेटकऱ्यांना आवाहन appeared first on Dainik Prabhat .
निव्वळ घरगुती वित्तीय मालमत्ता ९.९ लाख कोटींनी वाढली - निर्मला सीतारामन
मोहित सोमण: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी निव्वळ घरगुती वित्तीय मालमत्ता (Net Financial Household Assets) आधारित मोठे वक्तव्य केले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटल्याप्रमाणे, या आर्थिक वर्षात गेल्या वर्षीच्या तुलनेत मोठी वाढ झाल्याने निव्वळ घरगुती वित्तीय मालमत्ता ९.९ लाख कोटींनी वाढली आहे. त्यामुळे यावर्षी एकूण जीडीपीतील (सकल देशांतर्गत उत्पादन GDP) ६% हिस्सा या मालमत्तेचा आहे ' असे विधान त्यांनी केले. गेल्या वर्षी ते १५.५ लाख कोटी किंवा एकूण जीडीपीतील ५.३% होते ते यंदा मोठ्या प्रमाणात वाढल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.तत्पूर्वी आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये घरगुती मालमत्ता पाच वर्षांतील सर्वाधिक खालच्या पातळीवर (All time Low घसरली होती. त्यावर्षी ती १३.३ लाख कोटीवर पोहोचली होती जी तत्कालीन एकूण जीडीपीतील ४.९% होती. मोठ्या प्रमाणातील संतुलित आर्थिक धोरणे व घरगुती उत्पन्नातील वाढती बचत पाहता ही वाढ झाल्याचे जाणवते. विशेषतः कोविड काळ सावरल्यानंतर वाढलेल्या बचतीमुळे दिसून येते. या तिमाहीत आर्थिक देय (Financial Debt) गेल्या तिमाहीतील १८.८ लाख कोटीवरूश १५.७ लाख कोटींवर घसरली आहे. या वर्षी क्रेडिट वाढ (Credit Growth) मोठ्या प्रमाणात वाढल्याचे यापूर्वी आपण आकडेवारीतून पाहिले होते. आकडेवारीनुसार, गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी १२% वाढ झाली होती त्यामुळे मोठ्या प्रमाणात चलनी तरलता बाजारात निर्माण झाली असताना उपभोग (Consumption), व एकूणच घरगुती मालमत्तेत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे स्पष्ट होते.मात्र महत्वाची बाब म्हणजे बँकांच्या ठेवीत (Bank Deposits) गुंतवणूकीत घसरण सुरू झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या तिमाहीत ३५.२% घसरण झाली. त्याऐवजी गुंतवणूकदारांचा कल हा इक्विटी मार्केट लिंक गुंतवणूकीत अधिक जाणवत आहे.सोन्याच्या आधारावर कर्जांमध्ये सतत वाढ होत असतानाही, जलद, सुरक्षित कर्ज घेण्याला प्राधान्य गुंतवणूकदार देत आहे.

26 C