ENG vs IND: शुभमन गिलने द्विशतक ठोकत रचला इतिहास, कोहलीचा रेकॉर्ड मोडला
एजबेस्टन: इंग्लंडविरुद्ध एजबेस्टन कसोटीत कर्णधार शुभमन गिलचा जलवा पाहायला मिळत आहे. शुभमन गिलने भारताच्या पहिल्या डावात द्विशतक ठोकले आहे. शुभमन इंग्लंडमध्ये कसोटीत द्विशतक ठोकणारा पहिला भारतीय कर्णधार ठरला आहे. शुभमनचे कसोटी करिअरमधील हे पहिले द्विशतक आहे.आता शुभमन परदेशी धरतीवर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात मोठी खेळणारा भारताचा कर्णधार ठरला आहे. शुभमनने विराट कोहलीला मागे टाकले. कोहलीने जुलै २०१६मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध नॉर्थसाऊंड कसोटीत २०० धावा केल्या होत्या. शुभमन गिल आता इंग्लंडमध्ये कसोटीत सर्वात मोठी खेळणारा भारताचा कर्णधार ठरला आहे. गिलने मोहम्मद अझरुद्दीनला मागे टाकले. अझरुद्दीनने ऑगस्ट १९९० मध्ये मँचेस्टर कसोटी सामन्यात १७९ धावांची खेळी केली होती.शुभमन गिल आता इंग्लंडमध्ये सर्वात मोठी खेळी करणारा भारताचा फलंदाज ठरला आहे. शुभमनने २२२ धावा करताच सुनील गावस्करना मागे टाकले आहे.भारतीय कसोटी कर्णधाराच्या रूपात द्विशतक७- विराट कोहली१- मन्सूर अली खान पटौदी, सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, एमएस धोनी, शुभमन गिल
मुंबई: बार्टी, सारथी, महाज्योती, आर्टी या संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या आधारावर विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश देण्यात येणार असून या संस्थांमधील विद्यार्थ्यांची संख्या, सर्वसाधारण शिष्यवृत्ती, परदेशी शिष्यवृत्ती, प्रवेश प्रक्रियेबाबत समान धोरण राबविण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी विधान परिषदेत दिली.विधान परिषद सदस्य संजय खोडके, अभिजीत वंजारी यांनी ‘छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्थे’कडून (सारथी) घरभाडे भत्ता आणि आकस्मितता निधी वितरणाबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार बोलत होते. ते पुढे म्हणाले की, सारथी संस्थेमध्ये २०१८ ते २५ या कालावधीत ८३ अभ्यासक्रमांमध्ये ३ लाख विद्यार्थ्यांना शासनामार्फत विद्यावेतन, शिष्यवृत्ती आदी लाभ देण्यात आले. त्यापैकी ३ हजार म्हणजे केवळ एक टक्का विद्यार्थ्यांनी पीएचडी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतला होता. त्या एक टक्का विद्यार्थ्यांसाठी २८० कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला. पाच वर्षात एका विद्यार्थ्यामागे ३० लाख रुपये खर्च झाला, ही बाब गांभीर्याने घेण्यासारखी आहे. यापुढच्या काळात ज्या अभ्यासक्रमांच्या आधारे रोजगार मिळेल, अशाच अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.बार्टी, सारथी, महाज्योती, आर्टी या संस्थांमध्ये विद्यार्थी संख्या, प्रवेश प्रक्रिया, शिष्यवृत्ती यांची संख्या ठरविणे आणि गुणवत्ता वाढ यासंदर्भात मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. या समितीचा अहवाल आता प्राप्त झालेला आहे. त्या संदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.
Wimbledon 2025 : १८ वर्षीय जोआओ फोंसेकाने रचला इतिहास, तिसऱ्या फेरीत मारली धडक
Wimbledon 2025 Updates Joao Fonseca Makes History : जोआओ फोंसेकाने बुधवारी विम्बल्डनच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश करत इतिहास रचला. 18 वर्षीय ब्राझिलियन खेळाडूने तीन तासांहून अधिक काळ चाललेल्या कठीण सामन्यात अमेरिकन जेन्सन ब्रूक्सबीचा 6-4, 5-7, 6-2, 6-4 असा पराभव केला. आपल्या कारकिर्दीतील केवळ चौथ्या टूर-स्तरीय स्पर्धेत फोंसेकाने आपल्या वयापेक्षा जास्त परिपक्वता दाखवली. कोर्ट 12 वर आव्हानात्मक […] The post Wimbledon 2025 : १८ वर्षीय जोआओ फोंसेकाने रचला इतिहास, तिसऱ्या फेरीत मारली धडक appeared first on Dainik Prabhat .
Crime News : एसटी बस व पिकअपचा अपघात; एकाचा मृत्यू
आळेफाटा : बुधवार, दि. २ जुलै २०२५ रोजी रात्री १०:१५ वाजता राजुरी गावच्या हद्दीत सह्याद्री व्हॅली इंजीनियरिंग कॉलेजसमोर एसटी बस आणि महिंद्रा बोलेरो पिकअप यांच्यात झालेल्या भीषण अपघातात पिकअप चालकाचा मृत्यू झाला. मृत चालकाचे नाव विनायक बाजीनाथ पंडित (वय ३५, रा. सातपूर कॉलनी, नाशिक) असे आहे. कल्याणहून साकोरीकडे निघालेली एसटी बस (क्रमांक एमएच २० बीएल […] The post Crime News : एसटी बस व पिकअपचा अपघात; एकाचा मृत्यू appeared first on Dainik Prabhat .
हडपसर-मांजरी-वाघोलीसह पूर्व भागासाठी स्वतंत्र महानगरपालिकेची निर्मिती करावी
हडपसर : नव्याने समाविष्ट आणि हडपसर- वाघोली अशी पुण्याच्या पूर्व भागातील गावांची एकत्रित महानगरपालिका निर्माण करण्याची मागणी विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांनी लक्षवेधीद्वारे आज विधान परिषदेत केली आहे. वाढत्या नागरिकरणामुळे या समाविष्ट गावांना सुविधा पुरवण्यात महानगर पालिकेची कसरत होत असून आर्थिक अडचणीही निर्माण होत आहेत. त्यामुळे शहराच्या पूर्व भागातील हडपसर-मांजरी-वाघोली आणि त्या लगतच्या गावांची […] The post हडपसर-मांजरी-वाघोलीसह पूर्व भागासाठी स्वतंत्र महानगरपालिकेची निर्मिती करावी appeared first on Dainik Prabhat .
इंदापूर : आषाढी वारीच्या पवित्र उत्साहात लाखेवाडी येथे जय भवानीगड विकास प्रतिष्ठानच्या विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज आणि प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूलच्या संयुक्त विद्यमाने भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. गुरुवारी (3 जुलै) झालेल्या या सोहळ्यात छोट्या बाल वारकऱ्यांनी टाळ, मृदंग, लेझीम आणि भगव्या पताकांच्या गजरात हरिनामाचा जयघोष करत वातावरण भक्तिमय केले. पायी पालखी, रिंगण आणि […] The post Pune Gramin : लाखेवाडीत बाल वारकऱ्यांचा ‘ज्ञानोबा-तुकाराम’ जयघोष ! पालखी-रिंगण सोहळ्याने विद्यार्थ्यांनी रंगवला भक्तिमय उत्सव appeared first on Dainik Prabhat .
शिरूर : शिरूर तालुक्यातील भूमिअभिलेख कार्यालयात कार्यरत असलेले उपअधीक्षक अमोल भोसले हे खासगी वाहनावर “महाराष्ट्र शासन” अशी शासकीय पाटी लावून फिरत असल्याचे उघड झाल्याने एका सामाजिक कार्यकर्त्यांनी तक्रार केल्यानंतर शिरूर पोलिस स्टेशनचे ट्राफिक हवालदार राजेंद्र वाघमोडे व शेखर झाडबुके यांनी तातडीने फोटो काढत चलन काढले आहे आहे. या प्रकारामुळे स्थानिक प्रशासनात आणि नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण […] The post Shirur News : शिरूरमधील उपअधीक्षकाच्या खासगी वाहनावर ‘महाराष्ट्र शासन’ पाटी; नागरिकांकडून कारवाईची मागणी appeared first on Dainik Prabhat .
IND vs ENG : शुबमन गिलचे ऐतिहासिक द्विशतक! ‘ही’कामगिरी करणारा ठरला पहिलाच आशियाई कर्णधार
Shubman Gill 1st Double Century in Test : भारतीय संघाचा कर्णधार शुबमन गिल याने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात द्विशतक झळकावले आहे. या द्विशतकी खेळीच्या जोरावर गिलने एक खास इतिहास रचला आहे. बर्मिंगहॅमच्या मैदानावर गिलने ३११ चेंडूंमध्ये आपले द्विशतक पूर्ण केले. हे गिलचे कसोटी कारकीर्दीतील पहिले द्विशतक आहे. त्याने २१ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने […] The post IND vs ENG : शुबमन गिलचे ऐतिहासिक द्विशतक! ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिलाच आशियाई कर्णधार appeared first on Dainik Prabhat .
Pune News : दारू पिऊन उपनिरीक्षकाचे वाहतूक नियमन; तडकाफडकी केले निलंबन
पुणे : मद्यप्राशन करून कर्तव्यावर आलेल्या श्रेणी पोलिस उपनिरीक्षकावर लष्कर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर, त्यांचे पोलिस खात्यातून निलंबन करण्यात आले आहे. संजय सुधाकर माटेकर असे निलंबीत करण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षकांचे नाव आहे. याबाबतचे आदेश वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त हिंमत जाधव यांनी दिले आहेत. श्रेणी पोलिस उपनिरीक्षक माटेकर हे लष्कर वाहतूक विभागात नेमणूकीस आहेत. ते […] The post Pune News : दारू पिऊन उपनिरीक्षकाचे वाहतूक नियमन; तडकाफडकी केले निलंबन appeared first on Dainik Prabhat .
Pandharpur Wari 2025 : आषाढी वारीची पायी दिंडी पंढरपूरकडे मार्गस्थ
खटाव : पांडुरंगाच्या दर्शनासाठी आणि शतकानुशतकांच्या परंपरेचे पालन करत खटाव परिसरातील पायी दिंड्या पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाल्या आहेत. आमलेवाडी येथील ईश्वर प्रसाद पंचक्रोशी आषाढी पायी दिंडीचा पहिला मुक्काम खटाव येथील हनुमान नगरातील विठ्ठल रखुमाई मंदिरात, तर इंचगिरी संप्रदाय ज्ञानेश्वर माऊली पायी दिंडीचा मुक्काम यशवंत बाबा मंदिरात झाला. तसेच, रामेश्वर पंचक्रोशी पायी दिंडीचे जाखणगाव येथून खटाव […] The post Pandharpur Wari 2025 : आषाढी वारीची पायी दिंडी पंढरपूरकडे मार्गस्थ appeared first on Dainik Prabhat .
RBI News: आरबीआयचा सर्वसामान्य व्यवसायिकांना दिलासा ! आता SME कर्जावर Prepayment Fine रद्द!
प्रतिनिधी: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) बँकेने कर्ज ग्राहकांना मोठा निर्णय घेत दिलासा दिला आहे. जानेवारी २०२६ पासून मंजूर किंवा नूतनीकरण केलेल्या सूक्ष्म आणि लघु उद्योगांना (MSE) फ्लोटिंग रेट कर्जांवर कोणताही आगाऊ (Prepayment ) दंड आकारू नये असे निर्देश आरबीआयने बँका आणि विनाबँकिंग वित्तीय कंपन्यांना (NBFC) दिले आहेत. 'सूक्ष्म आणि लघु उद्योगांना सुलभ आणि परवडणारे वित्तपुरवठा उपलब्ध असणे अत्यंत महत्त्वाचे आहे' असे प्रामु ख्याने निरीक्षण नोंदवत बँकिंग नियामकाने (Regulator) ने म्हटले आहे की त्यांच्या पर्यवेक्षी पुनरावलोकनांमध्ये (Review) सूक्ष्म आणि लघु उद्योगांना मंजूर केलेल्या कर्जांवर प्रीपेमेंट शुल्क आकारण्याच्या बाबतीत कर्जदारांनी (Lenders) वेगवेगळ्या पद्धती वापरल्या आहेत, ज्यामुळे ग्राहकांच्या तक्रारी आणि वाद निर्माण झाले आहेत. या कारणांमुळे या अनैतिक व्यवसाय पद्धतीला आरबीआयने चाप लावण्याचा निर्णय उच्चस्तरीय पातळीवर घेतला आहे. शिवाय, काही नियमन केलेल्या संस्था कर्जदारांना कमी व्याजदर किंवा चांगल्या सेवा अटी मिळविण्यासाठी दुसऱ्या कर्जदात्याकडे जाण्यापासून रोखण्यासाठी कर्ज करार किंवा करारांमध्ये प्रतिबंधात्मक कलमे समाविष्ट करत असल्याचे आढळून आले आहे,' असे नेमके आरबीआयने बुधवारी जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे.या निर्णयामुळे कर्ज लवचिकता वाढेल आणि कर्जदारांमध्ये स्पर्धा वाढेल अशी अपेक्षा आहे. कर्जदारांना मंजुरी पत्रे आणि कर्ज करारांमध्ये आणि लागू असल्यास, मुख्य तथ्ये विधानात पूर्व-पेमेंट कलमांबद्दल स्पष्टपणे माहिती देण्याचे निर्देश आरबीआयने दिले आहेत.मात्र लघु वित्त बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, टियर-३ प्राथमिक (शहरी) सहकारी बँका, राज्य सहकारी बँका, केंद्रीय सहकारी बँका आणि मध्यम स्तरावरील एनबीएफसींना अपवाद करण्यात आले आहे. या संस्थांना मंजूर रकमेच्या किंवा ५० लाखांपर्यंतच्या मर्यादेच्या कर्जावर कोणतेही प्रीपेमेंट शुल्क आकारण्याची परवानगी नाही याआधीच नाही. हे निर्देश १ जानेवारी २०२६ रोजी किंवा त्यानंतर मंजूर झालेल्या किंवा नूतनीकरण केलेल्या सर्व कर्जांना आणि आगाऊ कर्जांना लागू असतील,” असेही आरबीआयने म्हटले आहे.कॅश क्रेडिट किंवा ओव्हरड्राफ्ट सुविधांच्या बाबतीत, कर्जदाराने कर्ज करारात नमूद केलेल्या कालावधीपूर्वी सुविधा नूतनीकरण न करण्याचा त्यांचा हेतू नियमन केलेल्या संस्थेला कळवला तर कोणतेही प्रीपेमेंट शुल्क लागू होणार नाही, परंतु जर सुविधा देय तारखेला बंद झाली तर,' असे अधिसूचनेत म्हटले आहे. नियामकाने आधीच कर्जदारांना किरकोळ कर्ज ग्राहकांकडून प्रीपेमेंट दंड आकारण्यास मनाई केली होती.
जमियत उलेमा-ए-इस्लाम पाकिस्तानच्या मुफ्ती हबीबुल्ला हक्कानीची हत्या
बरवाल : पाकिस्तानमधील अप्पर दिरच्या बरवाल बेंद्रा भागात 'जमियत उलेमा-ए-इस्लाम पाकिस्तान'च्या मुफ्ती हबीबुल्ला हक्कानीची घरात घुसून हत्या करण्यात आली. हबीबुल्ला हक्कानी मूलतत्ववादी विचारांचा नेता होता. हल्लेखोरांनी त्याच्या घरात घुसून गोळीबार केला. या गोळीबारात हबीबुल्ला हक्कानी ठार झाला आणि त्याची पत्नी जखमी झाली. हबीबुल्ला हक्कानीच्या जखमी पत्नीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्ल्याची जबाबदारी कोणीही स्वीकारलेली नाही. तपास पथकाने अज्ञातांनी हल्ला केल्याची माहिती दिली. तर जमियत उलेमा-ए-इस्लाम पंजाबचे अमीर, जामिया मदनिया जदीदचे प्रमुख मौलाना सय्यद मेहमूद मियांचे दीर्घ आजाराने निधन झाले.भारताच्या ऑपरेशन सिंदूर नंतर काही आठवड्यातच हबीबुल्ला हक्कानीची अज्ञातांनी हत्या केली आहे. हा पाकिस्तानच्या भारतविरोधी अतिरेकी कारवायांना मोठा धक्का असल्याची चर्चा आहे.'जमियत उलेमा-ए-इस्लाम पाकिस्तान' ही एक जहाल मूलत्ववादी विचारांची संघटना आहे. इस्लामचा प्रचार प्रसार करणे आणि धर्मयुद्ध लढण्याच्या नावाखाली अतिरेकी तयार करुन भारताविरोधात वापरणे हे जमियतचे प्रमुख काम आहे. यामुळे जमियतशी संबंधित महत्त्वाच्या नेत्याच्या हत्येने अतिरेक्यांच्या कारवायांना धक्का बसल्याची चर्चा आहे.
मुंबई : दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणात उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांना दिलासा मिळाला आहे. मुंबई पोलिसांनी त्यांना क्लीन चिट दिली आहे. याविषयी भाजप नेते आणि विद्यमान मंत्री नितेश राणे यांनी आज माध्यमांशी बोलताना ‘पिक्चर अभी बाकी हैं, अस म्हणत टोला लगावलाय.'पिक्चर अजून बाकी आहे'“कोर्टात चालू असलेला मॅटर आहे. त्याबद्दल किती भाष्य करु शकतो, यावर प्रश्नचिन्ह आहे. हा नितेश राणेंचा विषय नाही. राजकीय आरोपांचा विषय नाही. दिशा सालियानचे वडील ज्यांनी स्वतची मुलगी गमावली ते राजकीय आरोप करणार आहेत का? ते मुद्दामून कोणाचं नाव घेणार का? त्यांनी जे प्रतिज्ञापत्र कोर्टात सादर केलं, दिशा सालियानच्या वडिलांनी डिनो मारियो, आदित्य ठाकरे यांची नाव घेतली आहेत. म्हणून मी एवढच सांगेन पिक्चर अजून बाकी आहे. पूर्ण पिक्चर अजून संपलेला नाही. १६ तारीख दिली आहे. त्या तारखेला काय होत ते आपण बघू” असं नितेश राणे म्हणाले.https://youtu.be/I4vbrrjvFYY?si=aB6_PbTXPfXPIQpl“राज्य सरकार, आत्ताचे पोलीस त्यांना जे नजरेसमोर दिसलं त्यांनी योग्य पद्धतीने अहवाल दिला. तुम्हाला आठवत असेल एसआयटी गठीत झाली. त्यात एक अधिकारी होता, तो दिशा सालियान केसमध्ये साथीदार होता. त्याला बदलण्यात यावं, असं पत्र मी दिलेलं. दिशा सालियानच्या वडिलांनी कोर्टात काऊंटर प्रतिज्ञापत्र दिलेलं आहे. १६ तारखेला काय होतं ते पाहू. पिक्चर अजून बाकी आहे” असं नितेश राणे यांनी म्हंटलंय.https://prahaar.in/2025/07/03/rbi-news-rbis-relief-to-common-businessmen-now-prepayment-fine-on-sme-loans-canceled/‘आगे, आगे देखो होता हैं क्या’आदित्य ठाकरे म्हणतात माझा या प्रकरणाशी संबंध नाही. नाहक बदनामी सुरु आहे. त्यावर नितेश राणे म्हणाले की, “यावर आता उत्तर देण्यापेक्षा आगे, आगे देखो होता हैं क्या, तुम्हाला सांगून ठेवलेली उत्तर रेकॉर्ड करुन ठेवा. नंतर एकत्र वाजवायला मिळतील”आदित्य ठाकरेंची माहिती खोटीदरम्यान, कोर्टात आदित्य ठाकरेंनी खोटी माहिती दिली, मी आमदार आहे हे लपवून त्यांनी आपण व्यवसाय करत असल्याचं दाखवलं. दिशा सालियानला नक्की न्याय दिला जाणार हे सर्व आरोपी तुरुंगात जाणार, असेही नितेश राणेंनी म्हटलंय.
दलाई लामांचा उत्तराधिकारी ठरवण्याचा अधिकार केवळ तिबेटी परंपरेलाच: किरेन रिजिजू
तिबेटीयन धर्मगुरू दलाई लामा यांच्या उत्तराधिकारी निवडीबाबत चीनच्या हस्तक्षेपाच्या प्रयत्नांना भारताचे जोरदार प्रत्युत्तरनवी दिल्ली: दलाई लामा यांच्या उत्तराधिकारी निवडीत चीनने अडथळे निर्माण करण्याचा पवित्रा घेतला आहे. तिबेटी बौद्ध धार्मिक नेते, १४ वे दलाई लामा यांनी जेव्हापासून पुढील दलाई लामाची घोषणा त्यांच्या हयातीतही होऊ शकते अशी घोषणा केली तेव्हापासून चीन अस्वस्थ झाला आहे. दलाई लामा यांच्या उत्तराधिकारीसाठी चीनची मान्यता घ्यावी लागेल, असा चीन आग्रह धरत आहे. ज्यावर आता भारत सरकारनेही आपली प्रतिक्रिया दिली आहे. (Dispute over Dalai Lama's succession)भारताने ठामपणे स्पष्ट केले आहे की, उत्तराधिकारी निवडीचा निर्णय केवळ दलाई लामा आणि त्यांच्या धार्मिक परंपरेनुसारच घेतला जाईल. कोणत्याही तृतीय पक्षाला, मग तो देश असो वा संस्था, या निर्णयात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही.दलाई लामाच्या उत्तराधिकारावरून वाद६ जुलै रोजी तिबेटी बौद्ध धार्मिक नेते दलाई लामा ९० वर्षांचे होतील, त्यामुळे त्यांच्या उत्तराधिकारावरून सुरू असलेला वाद हा पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला आहे. ज्यामध्ये चीन हस्तक्षेप करू लागला आहे. दलाई लामा यांच्या भावी उत्तराधिकारी घोषणेसाठी चीनची मान्यता असायला हवी, असे म्हणत चीन नाक खुपसू पाहत आहे. या पार्श्वभूमीवर, भारताचे केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी चीनच्या हस्तक्षेपाच्या प्रयत्नावर टीका केली आहे.दलाई लामांचा उत्तराधिकारी ठरवण्याचा अधिकार कोणत्याही देशाला नाहीकिरेन रिजिजू यांनी म्हटले आहे की दलाई लामा यांचे पद सर्वात महत्वाचे आहे. हे पद केवळ तिबेटी लोकांसाठीच नाही तर सर्व बौद्ध उपासकांसाठी महत्त्वाचे आहे. दलाई लामांव्यतिरिक्त इतर कोणालाही दलाई लामांचा उत्तराधिकारी ठरवण्याचा अधिकार नाही. दलाई लामांनी बुधवारी केलेल्या वक्तव्यातही या मुद्द्यावर स्पष्ट भूमिका घेतली. त्यांनी सांगितले की, त्यांच्या उत्तराधिकाऱ्याचा निर्णय घेण्याचा एकमेव अधिकृत हक्क त्यांच्या 'गाडेन फोडरंग ट्रस्ट'कडेच आहे. चीनने मांडलेल्या उत्तराधिकारी मान्यतेच्या दाव्याला पूर्णपणे फेटाळत त्यांनी ही भूमिका मांडली. चीनकडून करण्यात आलेल्या दाव्याचे खंडन करताना भारताने पुन्हा एकदा तिबेटी बौद्ध परंपरेचा आदर करण्याची आपली वचनबद्धता अधोरेखित केली आहे. कोणताही देश अगदी चीनसुद्धा दलाई लामांचा उत्तराधिकारी कोण असेल हे ठरवू शकत नाही, असे ठाम मत रिजिजू यांनी व्यक्त केले. देशभरातील बौद्ध अनुयायी दलाई लामांच्या शिकवणी आणि धार्मिक परंपरांचे आजही निष्ठेने पालन करतात, असेही रिजिजू यांनी सांगितले.हिमाचल प्रदेशातील धर्मशाळा येथे साजरा केला जाणार दलाई लामांचा वाढदिवसदलाई लामा यांचा ९० वा वाढदिवस येत्या ६ जुलै रोजी हिमाचल प्रदेशातील धर्मशाळा येथे साजरा होणार असून, भारत सरकारकडून केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू आणि राजीव रंजन सिंह उर्फ लल्लन सिंग या विशेष कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. ही भूमिका भारताने तिबेटी बौद्ध धर्मगुरूंच्या स्वायत्ततेच्या मुद्द्यावर घेतलेली स्पष्ट केली आहे.
Ravindra Jadeja World Record : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना एजबॅस्टन येथे खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाने पहिल्या डावात दुसऱ्या दिवसाच्या लंच ब्रेकपर्यंत ६ बाद ४१९ धावांचा डोंगर उभारला आहे. दरम्यान या डावात रवींद्र जडेजाने ८९ धावांची खेळी साकारत भारतीय संघाला मजबूत स्थितीत पोहोचवण्यात कर्णधार गिलसह […] The post IND vs ENG : रवींद्र जडेजाने केला ‘वर्ल्डरेकॉर्ड’! WTC मध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरला जगातील पहिलाच खेळाडू appeared first on Dainik Prabhat .
RBI : प्रत्येक भारतीयावर 4 लाख 80 हजारांचे कर्ज; आरबीआयच्या रिपोर्टने उडाली खळबळ
नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नव्या रिपोर्टने खळबळ उडाली आहे. मागील दोन वर्षात प्रत्येक भारतीयावरील भांडवली कर्जात प्रचंड वाढ झाली असून, ते ९० हजाराने वाढून ४ लाख ८० हजाराच्या घरात गेले आहे. यावरूनच काँग्रेसने मोदी सरकारवर हल्ला चढवला. सगळे सरकारी प्रकल्प पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप किंवा खासगी भागीदारीतून होत आहेत, तर मग देशावर हे […] The post RBI : प्रत्येक भारतीयावर 4 लाख 80 हजारांचे कर्ज; आरबीआयच्या रिपोर्टने उडाली खळबळ appeared first on Dainik Prabhat .
मोहित सोमण: जेएम फायनांशियल म्युचल फंड (JM Financial Mutual Fund) कंपनीने आज जेएम लार्ज कॅप ॲड मिड कॅप फंड' या नव्या लार्ज कॅप, मिड कॅप गुंतवणूकीसाठी असलेल्या ओपन एंडेड इक्विटी स्कीम (NFO) फंड भारतीय बाजारात लाँच केला आहे. 'भारतीय गुंतवणूकदार आणि भारतीय बाजार प्रगल्भ असून गेल्या पाच ते सहा वर्षांतील कामगिरी पाहिल्यास भारतीय गुंतवणूकदारांनी चढउतार (Volatility) कायम असतानाही आपली गुंतवणूक स्थिर ठेवली' असे प्रतिपादन 'प्रहार' न्यूजशी बोलताना केले आहे.हे प्रतिपादन लाँच दरम्यान जेएम फायनांशियल असेट मॅनेजमेंट कंपनीचे संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ मोहंती यांनी केले.'भारतीय बाजारात निश्चितपणे सध्याच्या काळात भूराजकीय व इतर कारणांमुळे चढउतार असलातरी बाजारातील फंडामेटल मजबूत आहे. या कारणांमुळे जागतिक पातळीवर काही घडले तरी भारतीय गुंतवणूकदारांचा बाजारावर मूलभूत विश्वास कायम आहे ' असेही म्हंटले आहे. लाँचदरम्यान कंपनीने पत्रकार परिषदेत नव्या फंडाची अधिकृत घोषणा यावेळी केली.'सध्या बाजारात भरपूर स्कोप असून नवीन आशा आकांक्षा गुंतवणूकदारांना तसेच आमच्या कंपनीलाही आहेत. सध्या मिडकॅप व स्मॉलकॅप विशेषतः मिडकॅपने ज्या पद्धतीने परतावा (Return) दिला त्यानुसार यातील भविष्यही उज्ज्वल आहे असे आम्हाला वाटते. आमचा नवा फंडही संपूर्ण सखोल रिसर्च मधून आला असून चांगले कंपाऊंड (Compound) मिळावा यासाठीच आम्ही प्रयत्नशील आहोत. किंबहुना त्यांना चांगला परतावा मिळावा यासाठी आम्ही प्रयत्नशील व कटीबद्ध आहोत.''प्रहार' ने छोट्या शहरातील गुंतवणूकदारांबद्दल विचारले असता ' छोट्या शहरांतील गुंतवणूकदारही सूज्ञ आहेत. आजच्या काळातील गुंतवणूकदार बाजार चांगल्या प्रकारे जाणतात. त्यामुळे आमचे उत्पादन नक्की माहित असणारे गुंतवणूक दार निश्चितच आमच्यावर विश्वास ठेवतील. जरी म्युचल फंडमधील एप्रिल महिन्यातील एकूण आवक (Inflow) कमी झाली असली तरी म्युचल फंड मधील स्थूल गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे.अजूनही या गुंतवणूकीत मोठ्या प्रमाणा त वाढ होणार आहे. नजीकच्या काळात आम्ही याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहतो. देशाच्या घरगुती बचतीत वाढ होत असली तरी जागतिक पातळीवरील बचतीपेक्षा तुलनेने कमी आहे. यामुळे योग्य उत्पादनात गुंतवणूक करताना आप ल्या निश्चित कारणासाठी गुंतवणूक केल्यास त्याचा सकारात्मक परिणाम होऊ शकतो. एसआयपीतही गुंतवणूकीत मोठी वाढ होत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळाची परिस्थिती अथवा ट्रेंड निश्चित पाहणे कुतुहलाचे ठरणार आहे.बाजारातील परिस्थितीवर भाष्य करताना मोहंती पुढे म्हणाले ,'मागील सहा सात महिन्यातील अस्थिरता वाढली असली तरी एसआयपी (SIP) गुंतवणूक कोसळली (Crash) झाली नाही. त्यामुळे मला वाटत ही वाढ पुढेही राहिल. एकदा गुंतव णूकदारांकडे निश्चित ध्येय असेल तर विचलित न होता तो बाजारात आशेचा किरण पाहू शकतो ते केवळ उत्पादनावर असलेला विश्वासच सार्थ ठरतो जो अस्थिरतेला जाणतो. नवीन गुंतवणूकदारांबाबत बोलताना ते पुढे म्हणाले,' नवीन गुंतवणू कदारांना मिडकॅप मध्येच गुंतवणूक केली पाहिजे असे नाही प्रवेश करणे महत्वाच आहे. कंपाऊंड इफेक्ट (Compound Effect) वाढवणे हे आपल्या सगळ्यांसाठी महत्वाचे आहे.'जेएम नवीन फंड प्रस्ताव (NFO Fund) ४ जुलै २०२५ ते १८ जुलै २०२५ पर्यंत गुंतवणुकीसाठी खुला असेल. या योजनेचे गुंतवणूक उद्दिष्ट हे उत्कृष्ट व्यवस्थापन गुणवत्ता आणि उद्यम प्रशासन मानके स्थापित केलेल्या कंपन्यांच्या उच्च दर्जाच्या वाढक्षम समभागांमध्ये गुंतवणूक करून परतावा निर्माण करणे आहे असे कंपनीने म्हटले. गुंतवणूक करण्यायोग्य समभाग संचांची निर्मिती ही अंतर्गत जीक्यू - GeeQ (ग्रोथ ऑफ अर्निंग्ज अँड अर्निंग्ज क्वालिटी) या मॉडेलचा वापर करून कर ण्यात आली आहे.तरलता आणि लवचिकता हे घटक योजनेच्या पोर्टफोलिओ धोरणाच्या कोनशिला आहेत. लार्जकॅप आणि मिडकॅप संधींमध्ये अखंडपणे वहिवाट सुरू राखताना, बदलत्या बाजार परिस्थितीत सातत्यपूर्ण कामगिरी आणि वाढ साध्य करण्या साठी जोखीम व्यवस्थापनाशी तडजोड न करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.फंड युएसपी बाबत बोलल्यास पोर्टफोलिओ गुंतवणूक करताना तरलता (Liquidity),लवचिकता (Flexibility) आणि विवेकपूर्ण जोखीम (Cautious Risk Mana gement) व्यवस्थापन यावर लक्ष केंद्रित केले आहे. हा फंड मोठ्या कॅप्सच्या स्थिरतेला मिड कॅप्सच्या वाढीच्या क्षमतेशी संतुलित करण्याचा प्रयत्न करतो, बदलत्या परिस्थितीनुसार एक संरचित दृष्टिकोन (Structural Approach) देतो.अ स्थिरतेतून सावरून स्थिर परतावा देण्यासाठी हा फंड जेएस फायनाशियलने डिझाईन केलेला आहे.नव्या फंड लाँचवर प्रतिक्रिया देताना जेएम फायनान्शियल अॅसेट मॅनेजमेंट लिमिटेडचे मुख्य गुंतवणूक अधिकारी - समभाग (Share) सतीश रामनाथन म्हणाले,' आम्हाला आमचा ‘लार्ज अँड मिड कॅप फंड’ सुरू करताना खूप आनंद होत आहे. हा फंड भारतातील सर्वात मोठ्या कंपन्यांकडून आकार व स्थिरता आणि उदयोन्मुख मिडकॅप कंपन्यांकडून चैतन्यशीलता असे दोन्ही पैलू प्रदान करतो. आम्हाला विश्वास आहे की हे मिश्रण भारतीय अर्थव्यवस्थेच्या सर्व पैलूंना व्यापण्या साठी एक अद्वितीय संधी ठरेल, जी वाढ मिळवून देतानाच कमी अस्थिरता राखेल. आम्हाला भारताच्या वाढीच्या संधीबद्दल विश्वास आहे आणि खात्री आहे की येणारा काळ हा सर्वोत्तमच असेल. लार्ज कॅप निर्देशांक हा अशा कंपन्यांना प्रस्तुत करतो, ज्यांचा भांडवलावरील खर्च कमी आहे, तर तंत्रज्ञान व बाजारपेठेतील व्याप्ती मोठी आणि त्या त्यांच्या क्षेत्रातील विजेत्या कंपन्या आहेत. पण अशा कंपन्यांची दुसरी बाजू अशीही की त्यांच्या नफ्यातील वाढ ही देशाच्या जीडीपी वाढीशी जुळणारी असते. दुसरीकडे ऑटो अॅन्सिलरी, मॅन्युफॅक्चरिंग, डिफेन्स, क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट्स या उदयोन्मुख क्षेत्रांना मिडकॅप कंपन्या वाढीचा मार्ग देतात. आमचा ‘लार्ज अँड मिड कॅप फंड’ या मालमत्ता वर्गाद्वारे प्रस्तुत होणारी वाढ आणि स्थिरता हस्तगत करण्याचे उद्दिष्ट ठेवेल.'या प्रस्तुतीबद्दल बोलताना, जेएम फायनान्शियल अॅसेट मॅनेजमेंट लिमिटेडचे वरिष्ठ निधी व्यवस्थापक - समभाग, असित भांडारकर म्हणाले, 'आमच्या नवीन ‘लार्ज अँड मिड कॅप फंडा’द्वारे आम्ही ब्लू-चिप दिग्गजांची स्थिरता आणि लवचिकता त्याचबरोबर उदयोन्मुख नेत्यांची वाढीची क्षमता एकत्र आणली आहे. ही आणखी एक दाखल झालेली केवळ योजना नाही, तर ती आकारमान आणि जलद वाढीचे एक शक्तिशाली मिश्रण आहे, जे उद्याच्या संधींचा फायदा घेण्यासाठी विकसित केले गेले आहे. भारतीय भांडवली बाजार हा मोठ्या अस्थिरतेच्या काळातून जात आहे, जेथे परतावा क्षमता असलेले मिडकॅप्स आणि जोखीम कार्यक्षम लार्जकॅप्स असलेली ही योजना चांगला गुंतवणूक अनुभव देऊ शकते. आम्हाला विश्वास आहे की आमचे वाढ आणि गुणवत्ता केंद्रित गुंतवणूक तत्वज्ञान, एक शिस्तबद्ध आणि प्रक्रिया-चालित गुंतवणूक दृष्टिकोन आणि एक अनुभवी समभागसंलग्न निधी व्यवस्थापन संघ आम्हाला या अशांत काळातून मार्ग काढण्यास आणि एक मजबूत पोर्टफोलिओ तयार करण्यास मदत करू शकेल. ज्यामुळे गुंतवणूकदारांना इच्छित संपत्ती निर्मिती शक्य होईल.'असित भांडारकर आणि दीपक गुप्ता हे या योजनेचे अनुक्रमे निधी व्यवस्थापक आणि सह-निधी व्यवस्थापक आहेत. भांडारकर संयुक्तपणे जेएम फायनान्शियल म्युच्युअल फंडच्या इतर इक्विटी योजनांचे देखील व्यवस्थापन पाहतात. अशा प्रमुख योजनांमध्ये जेएम फ्लेक्सीकॅप फंडाचा समावेश आहे.गुप्ता हे जेएम टॅक्स सेव्हर फंड आणि जेएम लार्ज कॅप फंडाचे व्यवस्थापन पाहतात, तसेच इतर विविध इक्विटी योजनांमध्ये ते सह-व्यवस्थापक आहेत. सुश्री रुची फोजदार या ‘जे एम लार्ज अँड मिड कॅप फंडा’च्या रोखेसंलग्न (डेट) गुंतवणूक विभागाची देखरेख करतील. इतर इक्विटी योजनांच्या डेट घटकांचे आणि जेएम फायनान्शियल म्युच्युअल फंडाच्या डेट-ओरिएंटेड योजनांचे संयुक्तपणे व्यवस्थापन देखील त्या पाहात आहेत असे कंपनीने नव्या फंडाबाबत माहिती देताना म्हटले आहे.जून महिन्यापर्यंत मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये मोठी वाढ झाली होती. ज्यामध्ये गुंतवणूकदारांना चांगला नफा अथवा परतावा मिळाला होता. रिपोर्टमध्ये नमूद केल्याप्रमाणे, एप्रिलपर्यंत या प्रकारच्या समभागातील गुंतवणूक जवळपास १०% हून अधिक प्रमाणात वाढली होती. मात्र काही विश्लेषकांनी मात्र मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये होणारी वाढ अनैसर्गिक व फुगवलेली आहे असे म्हटले होते. परंतु वस्तुस्थिती विविध अहवालानुसार, पाहता लार्ज कॅपपेक्षा अधिक परतावा मिडकॅपने गे ल्या वर्षभरात दिला आहे.जेएम फायनान्शियल ग्रुपचा भाग असलेली, जेएम फायनान्शियल असेट मॅनेजमेंट लिमिटेड ही भारतातील आघाडीची मालमत्ता व्यवस्थापन कंपनी आहे जी व्यक्ती आणि संस्थात्मक गुंतवणूकदारांना गुंतवणूक उपायांची विस्तृत श्रेणी (Divers ified Options) देते. अनुभवी गुंतवणूक व्यावसायिकांच्या टीम आणि कामगिरीचा मजबूत दीर्घकालीन ट्रॅक रेकॉर्डसह, जेएम फायनान्शियल असेट मॅनेजमेंट लिमिटेड त्यांच्या ग्राहकांना त्यांच्या अद्वितीय गरजा आणि उद्दिष्टे पूर्ण करणारे ना विन्यपूर्ण आणि सानुकूलित गुंतवणूक उपाय प्रदान करण्यास वचनबद्ध आहे असे कंपनीने यावेळी म्हटले आहे.३१ मे २०२५ पर्यंत कंपनीकडे जवळजवळ २८,५००+ भागीदार (Partners) आहेत, जे सध्या अंदाजे ९.१५ लाख गुंतवणूकदार फोलिओंना सेवा देतात. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीची व्यवस्थापनाखालील अंतर्गत मालमत्ता (Asset Under Management AUM) १३,८६९.०३ कोटी रुपये आहे ज्यापैकी ११,१२९.९५ कोटींमध्ये हायब्रिड योजनांसह इक्विटी योजनांचा समावेश आहे. कंपनीने पोर्टफोलिओ मुल्यांकन - ३१ मार्च २०२५ रोजी व्यवस्थापनाखालील मालमत्ता (A UM) (कोट्यवधींमध्ये)- १३,४१९.२९ मध्ये इक्विटी समाविष्ट आहे: ९,०२७.१५, कर्ज: ६४५.३६ हायब्रिड: ९४०.७८, तरलता: २,८०५.९९, तिमाही भौगोलिक प्रसार (%): शीर्ष ५ शहरे: ६४.५७%, पुढील १० शहरे: १३.४९%, पुढील २० शहरे ४.१७%, इतर: १७.७७% (३१ मार्च २०२५ रोजीचा डेटानुसार) सांगण्यात आले आहे.
नाशिक : उद्धवसेनेला नाशिकमध्ये पुन्हा एकदा धक्का बसला आहे. सुधाकर बडगुजर, विलास शिंदे यांच्यानंतर आणखी एका बड्या नेत्याने शिवबंधन सोडले आहे. विशेष म्हणजे चारच दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंनी ज्यांच्यावर महानगर प्रमुख पदाची जबाबदारी सोपवली, त्या मामा राजवाडे यांनीच उद्धवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे. मामा राजवाडे भाजपचा झेंडा खांद्यावर घेणार आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते सुनील बागुल […] The post Uddhav thackeray : नाशिकमध्ये ठाकरे गटाला धक्क्यावर धक्का ! ज्यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी त्यांनीच केला जय महाराष्ट्र appeared first on Dainik Prabhat .
चाकण वाहतूक कोंडी, अपघातांविरोधात राजगुरुनगर वकील बार असोसिएशनची उच्च न्यायालयात जनहित याचिका
राजगुरुनगर : खेड तालुक्यातील चाकण परिसरातील पुणे-नाशिक आणि शिक्रापूर-तळेगाव राष्ट्रीय महामार्गावरील सततची वाहतूक कोंडी आणि जीवघेण्या अपघातांविरोधात राजगुरुनगर वकील बार असोसिएशनने मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. वैभव कर्वे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. वाहतूक कोंडी आणि अपघातांमुळे नागरिक हैराण पुणे-नाशिक आणि शिक्रापूर-तळेगाव राष्ट्रीय महामार्गांवर चाकण परिसरात […] The post चाकण वाहतूक कोंडी, अपघातांविरोधात राजगुरुनगर वकील बार असोसिएशनची उच्च न्यायालयात जनहित याचिका appeared first on Dainik Prabhat .
आरोग्यास अपायकारक तरीही मुंबई महापालिकेच्या हद्दीत ५१ कबुतरखाने पुन्हा सुरू
मनपाने मुंबईतील कबूतरखान्यांबाबत विशेष अभियान राबवावे – मंत्री उदय सामंतमुंबई : सध्या मुंबई महापालिकेच्या हद्दीत ५१ कबुतरखाने आहेत. या ठिकाणी कबुतरांमुळे श्वसनविकार, दुर्गंधी व प्रदूषण वाढत असून, यावर नियंत्रण आवश्यक आहे. त्यादृष्टीने कबूतर खाण्यांबाबत तातडीने विशेष ड्राईव्ह घेण्याबाबत मुंबई महापालिकेला आदेश देण्यात येतील असे मंत्री उदय सामंत यांनी आज विधानपरिषदेत सांगितले.सदस्य मनिषा कायंदे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री सामंत बोलत होते. यावेळी सदस्य चित्रा वाघ यांनी चर्चेमध्ये सहभाग घेतला. मुंबईतील कबूतरखाने आणि त्यामुळे होणाऱ्या आरोग्यविषयक त्रासाबाबत मंत्री सामंत यांनी विधानपरिषदेत माहिती दिली.काही कबुतरखाने न्यायालयाच्या आदेशानुसार बंद करण्यात आले होते असे सांगून मंत्री सामंत म्हणाले की, हे कबुतरखाने पुन्हा सुरू झाल्याचे निदर्शनास आले आहे. नागरिकांनी कबुतरांना धान्य टाकणे थांबवावे यासाठी जनजागृती आवश्यक आहे. महापालिकेला एक महिन्यात कबुतरखाने बंद करण्यासाठी विशेष ड्राइव्ह राबवण्याचे आणि जनजागृती मोहीम सुरू करण्याचे निर्देश लवकरच दिले जातील, असेही त्यांनी सांगितले.
कन्नड तहसील कार्यालयासमोरची नगरपालिकेची जुनी इमारत कोसळली
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्रात ठिकठिकाणी सतत पाऊस पडत आहे. पावसामुळे अनेक जुनं बांधकाम असलेल्या इमारतींची पडझड होण्याच्या घटना घडत आहेत. याच कारणामुळे प्रशासन दरवर्षी पावसाळ्याआधी अती धोकादायक इमारती पाडते आणि धोकादायक इमारतींची डागडुजी करण्याचे निर्देश देते. पण महाराष्ट्रातल्या छत्रपती संभाजीनगरमधील कन्नड शहरात धक्कादायक घटना घडली. कन्नड तहसील कार्यालयासमोरची नगरपालिकेची जुनी इमारत पत्त्याच्या बंगल्यासारखी धाडकन कोसळली.कन्नड तहसील कार्यालयात नेहमीप्रमाणे काम सुरू होते. अचानक दुपारी मोठा आवाज ऐकू आला. घाबरलेल्या नागरिकांनी आवाजाच्या दिशेने बघितले. त्यावेळी कन्नड तहसील कार्यालयासमोरची नगरपालिकेची जुनी इमारत कोसळत असल्याचे नागरिकांना दिसले. अनेकांच्या डोळ्यांसमोर इमारत पत्त्याच्या बंगल्यासारखी धाडकन कोसळली. इमारतीचा जो भाग कोसळला त्या भागातील सर्व रहिवासी आणि दुकानदार स्थलांतरित झाले होते. काही दुकानं बंद होती. यामुळे जीवितहानी झालेली नाही.इमारत पडत असतानाचे काही व्हिडीओ व्हायरल होत आहेत. यात इमारत कोसळताच मोठ्या प्रमाणात धूळ उडाल्याचे दिसते. इमारत कोसळत असल्याचे बघून घाबरलेले नागरिक आणि त्यांची धावपळ पण व्हिडीओत दिसत आहे.
जागतिक ड्रग व्यापार : भारताची कारवाई, सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय ड्रग तस्करीचा पर्दाफाश
नवी दिल्ली : एक मोठी आणि तितकीच धक्कादायक बातमी आहे. चार खंड आणि दहाहून अधिक देशांमध्ये कार्यरत असलेल्या ड्रग्ज गँगचा पर्दाफाश करण्यात आलाय. एनसीबी अर्थात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने ही धडक करवाई केलीय. या कारवाईची दखल केंद्र सरकारनेही घेतलीय.एनसीबीने अवैध ड्रग्ज व्यापाराविरोधात जागतिक पातळीवर आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केलीय. नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोच्या मुख्यालयातील ऑपरेशन्स युनिटने एका आंतरराष्ट्रीय ड्रग तस्करी सिंडिकेटचा पर्दाफाश केलाय. ही ड्रग्ज तस्कर एन्क्रिप्टेड डिजिटल प्लॅटफॉर्म्स, ड्रॉपशिपिंग मॉडेल आणि क्रिप्टो करन्सीचा वापर करत होते आणि हा अवैध ड्रग्ज तस्करीचा व्यापार चार खंडांमध्ये सुरू होता. या कारवाईत ८ जणांना अटक झालीय. पाच कन्साईमेन्ट जप्त करण्यात आल्या. इतकंच नव्हे तर अमेरिका आणि ऑस्ट्रेलियामध्येही या अवैध नेटवर्कविरुद्ध मोठी कारवाई झालीय.https://youtu.be/ULXGZwdsleYही कारवाईची सुरुवात नवी दिल्लीतील बंगाली मार्केटपासून झाली. या मार्केटजवळ वाहन तपासत असताना त्यातील दोन व्यक्तींकडून ३ किलो ७०० ग्रॅम ट्रामाडोल गोळ्या जप्त करण्यात आल्या. विशेष म्हणजे या दोन्ही व्यक्तींनी नोएडामधील एका प्रतिष्ठित खासगी विद्यापीठातून बी.फार्मा पदवी मिळवली होती. या दोघांची कसून चौकशी झाली आणि अवैध आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफियांचे कारनामे उघड झाले.हे दोघेही एका प्रमुख भारतीय बीटूबी प्लॅटफॉर्मवर विक्रेता प्रोफाईल चालवत होते. जिथून ते अमेरिका, युरोप आणि ऑस्ट्रेलियामधील ग्राहकांना औषधांच्या गोळ्या विकत होते. त्यानंतर दिल्लीतील मयूर विहार येथे एका प्रमुख सहकाऱ्याला अटक झाली. या सहकाऱ्याने कर्नाटकातील उडुपी येथील एका ड्रग्ज व्यापाऱ्याची माहिती दिली. उड्डपी येथील ही व्यक्ती अमेरिकेसाठी ऑर्डर आणि शिपमेंटचं नियोजन करत होता. उडुपी येथे या सिंडिकेटचं कॉल सेंटर होतं. या ठिकाणी जवळपास १० कर्मचारी काम करत होते. यापैकी बऱ्याच जणांना या अवैध गतिविधींची माहिती नव्हती. एनसीबीने येथून ५० आंतरराष्ट्रीय कन्साईन्मेंटचा डेटा शोधून काढला. यामध्ये अमेरिकेत २९, ऑस्ट्रेलियात १८ आणि एस्टोनिया, स्पेन, स्वित्झर्लंडमधील प्रत्येकी एक कन्साईन्मेंटचा समावेश होता. ही माहिती इंटरपोलला देण्यात आली. त्यामुळे अमेरिकेतील अलबामामध्ये यूएस ड्रग एन्फोर्समेंट अॅडमिनिस्ट्रेशनने जोएल हॉलला अटक केली. तसंच त्याच्याकडून १७ हजारांहून अधिक नियंत्रित औषधांच्या साठा आणि ७०० ग्रॅम झोलपिडेम गोळ्या जप्त करण्यात आल्या. ऑस्ट्रेलियातही कार्यरत असलेलं ड्रग्जचं युनिट उद्ध्वस्त करण्यात आलं. ही ड्रग्ज टोळी टेलीग्राम प्लॅटफॉर्म्सवर काम करत होती.क्रिप्टो करन्सी, पे पल आणि वेस्टर्न युनियनद्वारे आर्थिक व्यवहार केले जात होते. याशिवाय कुणालाही माहिती मिळू नये यासाठी आंतरराष्ट्रीय ड्रॉप शिपर्सचा वापर केला जात होता. त्यानंतर डिजिटल फॉरेन्सिक तपासातून नवी दिल्ली आणि जयपूर येथून आणखी दोन भारतीयांना अटक झाली, जे लॉजिस्टिक्स आणि पुरवठ्याची कामं हाताळत होते. या नेटवर्कचा मास्टरमाईड यूएईमधून काम करत असल्याचं उघड झालंय. एनसीबी आता यूएई अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या कारवाईचं कौतुक केलंय. एनसीबी आणि इतर तपास यंत्रणांनी अन्य देशांतल्या यंत्रणांशी कसा समन्वय साधायचा याचं उत्कृष्ट उदाहरण घालून दिलंय. आमच्या यंत्रणा क्रिप्टो पेमेंट्स आणि गुप्त ड्रॉप शिपर्ससारख्या पद्धतींवर सतत लक्ष ठेवून आहेत, असंही त्यांनी म्हटलंय.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने ड्रग कार्टेल्सविरुद्ध कठोर कारवाईचं धोरण स्वीकारलंय. या कारवाईद्वारे तरुण पिढीला ड्रग्जच्या विळख्यातून वाचवण्याचा निर्धार व्यक्त केलाय. एनसीबी आता अवैध ऑनलाईन फार्मन्सीच्या प्रचाराला आळा घालण्यासाठी प्रयत्न करत आहे. ही कारवाई केवळ एक यशस्वी ऑपरेशनच नाही, तर आंतरराष्ट्रीय समन्वय आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर याचं उदाहरण आहे. ड्रग तस्करीसारख्या जागतिक समस्येला तोंड देण्यासाठी भारताची ही आघाडी निश्चितच कौतुकास्पद आहे.
बीड : परळीतील व्यापारी महादेव मुंडे हत्याकांड आणि मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनाच्या प्रकरणाने बीड जिल्ह्यात खळबळ उडवली आहे. या प्रकरणात मुख्य आरोपी वाल्मिक कराड याच्यावर गंभीर आरोप करत त्याचा माजी सहकारी विजयसिंह (बाळा) बांगर यांनी पत्रकार परिषदेत धक्कादायक खुलासे केले आहेत. बांगर यांनी सांगितले की, “वाल्मिक कराडने माझ्यासमोर तिघांना मारले. महादेव मुंडेंना मारल्यानंतर […] The post Mahadev Munde : वाल्मिक कराडच्या टेबलवर हाडं-कातडं ठेवली; बांगरांच्या धक्कादायक खुलाशानंतर ज्ञानेश्वरी मुंडेंची संतप्त प्रतिक्रिया appeared first on Dainik Prabhat .
Chandrashekhar Bawankule : आता वाळू वाहतूक होणार 24 तास; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा
मुंबई : राज्यात वाळू वाहतुकीसंदर्भातील दीर्घकाळ प्रलंबित असलेला निर्णय अखेर घेण्यात आला असून, सकाळी ६ ते सायंकाळी ६ या कालावधीत उत्खनन केलेल्या वाळूची वाहतूक आता २४ तास करता येणार आहे, अशी घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत केली. बावनकुळे म्हणाले, सद्यस्थितीत सकाळी ६ ते सायंकाळी ६ या वेळेतच वाळूचे उत्खनन परवानगीने होते. पण दिवसभरात साठवलेली […] The post Chandrashekhar Bawankule : आता वाळू वाहतूक होणार 24 तास; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा appeared first on Dainik Prabhat .
IND vs ENG : शुबमन गिलने मोडला विराटचा सर्वात मोठा विक्रम; बर्मिंगहॅममध्ये लिहिला नवा इतिहास!
Shubman Gill surpasses Virat Kohli’s record : इंग्लंड दौऱ्यावर भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुबमन गिल एका वेगळ्याच लयीत दिसत असून धावांचा पाऊस पाडतोय. त्याने सलग दुसऱ्या कसोटी सामन्यात शतक ठोकताना इंग्लंडच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. त्याच्यामुळेच पहिल्या दिवशी भारतीय संघाला ३०० धावांचा टप्पा ओलांडता आला. यानंतर दुसऱ्या दिवशीही गिलने उत्कृष्ट फलंदाजी केली आणि १५० धावांचा […] The post IND vs ENG : शुबमन गिलने मोडला विराटचा सर्वात मोठा विक्रम; बर्मिंगहॅममध्ये लिहिला नवा इतिहास! appeared first on Dainik Prabhat .
गढवा : केंद्र सरकार झारखंडच्या पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी वचनबद्ध आहे आणि राज्यात २ लाख कोटी रुपयांचे राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प राबविले जातील. मी झारखंडच्या पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे. मी राज्यात २ लाख कोटी रुपयांचे राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प राबविण्याचे आश्वासन देतो, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी झारखंडमधील […] The post Nitin Gadkari : राज्यात 2 लाख कोटी रुपयांचे राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प राबवणार; नितीन गडकरींची झारखंडमध्ये मोठी घोषणा appeared first on Dainik Prabhat .
शक्तीपीठ महामार्ग लोकांच्या विकासासाठी : मंत्री नितेश राणे
मुंबई : शक्तीपीठ महामार्ग हा लोकांच्या विकासासाठी आहे. या प्रकल्पासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी मी पालकमंत्री म्हणून चर्चा करणार आहे. परंतु काही लोक सिंधुदुर्ग जिल्ह्यात शेतकऱ्यांमध्ये गैरसमज पसरवत आहेत. म्हणूनच प्रत्येकाला विश्वासात घेऊनच महामार्ग तयार करण्याचा निर्णय घेतला असल्याचे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.दोन आठवड्यांपूर्वी या विषयावर बैठक झाली असून, लोकांना विश्वासात घेऊन काम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्री राणे यांनी अधिकाऱ्यांना दोन ते तीन पर्यायी मार्ग दाखवण्यास सांगितले आहे. सध्याच्या शक्तीपीठ महामार्गाच्या प्लॅनमध्ये बांदा शहर आणि काही भाग बाधित होत आहे, हे लक्षात घेतले आहे.https://youtu.be/I4vbrrjvFYY?si=llcbPQNYUB9Qc0_xमंत्री नितेश राणे यांनी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे. सध्याचा हायवे थेट गोव्यामध्ये जात आहे आणि ज्या हायवेचे टोक गोवा राज्यामध्ये निघत असेल तर महाराष्ट्राला आणि सिंधुदुर्गला काय फायदा होईल, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. या समस्येचे निराकरण करण्यासाठी त्यांनी सध्याच्या प्लॅनमध्ये बदल करण्याचे जाहीर केले आहे.https://prahaar.in/2025/07/03/bjp-leader-narayan-rane-slams-mns-chief-raj-thackeray-and-uddhav-thackeray/वरिष्ठ अधिकारी आणि कॅबिनेटमध्ये चर्चा झाल्यानंतर दोन पर्याय सुचवले आहेत. झिरो पॉईंट किंवा मळगाव या ठिकाणांहून शक्तीपीठ महामार्ग निघू शकतो, असे त्यांनी सांगितले. कोस्टल रोड मार्गे रेडी बंदरकडे गेला तर अजून लोकांचा फायदा होईल आणि विकासाची दालने उघडतील, असे त्यांचे मत आहे.महामार्गामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांची काळजी घेत राणे यांनी स्पष्ट केले आहे की काही शेतकऱ्यांच्या शेतीतून महामार्ग जात असेल तर त्यांना योग्य मोबदला दिला जाईल. या प्रकल्पात शेतकऱ्यांच्या हितसंबंधांचे रक्षण करण्याचे त्यांनी आश्वासन दिले आहे.पण सिंधुदुर्ग जिल्ह्यात विरोध करण्याची जी काही नौटंकी सुरू आहे, यावर राणे यांनी कडक भूमिका घेतली आहे. त्यांनी सांगितले की आम्ही लोकांमध्ये निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहोत आणि लोकांनी आठ-नऊ महिने आधीच मतदान केलेले आहे. लोकांची चिंता आम्हाला जास्त आहे, असे ते म्हणाले.ज्यांना लोकांनी नाकारले आहे, त्यांना घरी बसवले आहे आणि त्यांनी लोकांची माथी भडकवण्याचे प्रयत्न करू नये, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र त्यांचे काही प्रश्न असतील तर त्यांच्याशी संवाद करायला तयार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.मंत्री नितेश राणे यांनी स्पष्ट केले की वातावरण खराब करायचे नाही आणि पोलीस बळाचा वापर करायचा नाही. समिती बनवली असेल तर त्यांनी पालकमंत्री म्हणून त्यांच्याशी बोलावे, असे त्यांनी सुचवले आहे. हे दर्शवते की ते संवाद आणि सामंजस्याच्या मार्गाला प्राधान्य देत आहेत.मंत्री नितेश राणे यांनी स्पष्ट केले आहे की शक्तीपीठ महामार्ग हा लोकांच्या विकासासाठी आहे. त्यांनी सुचवले आहे की हा मार्ग गोव्याकडे न जाता झिरो पॉईंट किंवा मळगाव जाईल या पद्धतीने तयार करावा. या निर्णयामागे महाराष्ट्राच्या आणि सिंधुदुर्गच्या फायद्याचा विचार आहे.या संपूर्ण वक्तव्यातून असे दिसते की शक्तीपीठ महामार्ग हा केवळ एक बांधकाम प्रकल्प नाही तर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी एक महत्त्वाचा पाया आहे. मंत्री राणे यांनी लोकांच्या चिंता लक्षात घेत पर्यायी मार्गांचा विचार करण्याची तयारी दर्शवली आहे आणि सर्वांना विश्वासात घेऊन हा प्रकल्प पुढे नेण्याची भूमिका स्वीकारली आहे.
Pandharpur Wari 2025 : महाराष्ट्रात पंढरपूर वारीचा उत्साह शिगेला पोहोचला असून, लाखो वारकरी विठ्ठल भक्तीच्या ओढीने पंढरीच्या दिशेने पायी चालत आहेत. संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत मुक्ताई आणि संत गजानन महाराज यांच्या पालख्यांचा सोहळा भक्तीमय वातावरणात मार्गक्रमण करत आहे. ऊन, पाऊस, वारा याची तमा न बाळगता वारकरी दिंडी, रिंगण आणि अवघड घाट पार […] The post Pandharpur Wari 2025 : अत्यंत निंदनीय प्रकार..! माऊलींच्या पालखीत महिला वारकऱ्याला ढकलले; व्हायरल व्हिडिओवर नेटीझन्स संतप्त appeared first on Dainik Prabhat .
SL vs BAN : लाइव्ह सामन्यात ७ फूट लांब सापाचा थरार, VIDEO होतोय व्हायरल
SL vs BAN 1st ODI Match Snake Interrupts : श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेनंतर २ जुलैपासून एकदिवसीय मालिकेला सुरुवात झाली आहे. ही मालिका तीन सामन्यांची आहे. या मालिकेतील पहिला सामना बुधवारी कोलंबो येथील आर. प्रेमदासा क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यादरम्यान अशी एक घटना घडली, ज्यामुळे दोन्ही संघांचे खेळाडू घाबरले. खरेतर, बांगलादेश आणि श्रीलंका […] The post SL vs BAN : लाइव्ह सामन्यात ७ फूट लांब सापाचा थरार, VIDEO होतोय व्हायरल appeared first on Dainik Prabhat .
मुंबईत गिरगाव चौपाटीवर लक्ष्मण हाकेंचं आंदोलन, पाण्यात उभं राहून घोषणाबाजी
मुंबई : मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींचे आरक्षण कमी करू नये, ही मागणी घेऊन लक्ष्मण हाके आंदोलन करत आहेत. लक्ष्मण हाके आणि त्यांच्या समर्थकांनी आज म्हणजेच गुरुवारी ३ जुलै रोजी गिरगाव चौपाटी येथे पाण्यात उतरुन आंदोलन केले. विधान भवनात पावसाळी अधिवेशन सुरू असल्याचे लक्षात ठेवून हाके आणि त्यांच्या समर्थकांनी मुंबईत गिरगाव चौपाटी येथे पाण्यात उतरुन आंदोलन केले.ओबीसी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी लक्ष्मण हाके आणि त्यांचे समर्थक थेट समुद्राच्या पाण्यात उतरले. आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. सोबत आणलेले बॅनर झळकवले. 'उठ ओबीसी जागा हो, संघर्षाचा धागा हो' अशी घोषणा देत सरकारचा निषेध करण्यात आला. आंदोलकांनी सरकारमधील ओबीसी नेत्यांचा आणि मंत्र्यांचाही निषेध केला.राज्य सरकारकडून सारथी आणि बार्टी सारख्या योजनांना जेवढे अनुदान मिळते त्या तुलनेत ओबीसी विद्यार्थ्यांसाठी असलेल्या महाज्योती योजनेला पुरेसे अनुदान मिळत नाही, असा आरोप आंदोलक विद्यार्थ्यांनी केला. मागील तीन वर्षांपासून महाज्योती योजनेला सारथी आणि बार्टीच्या तुलनेत कमी महत्त्व दिले जात आहे, असाही आरोप विद्यार्थ्यांनी केला. सरकार दखल घेत नसल्यामुळे समुद्रात उतरुन आंदोलन करण्याची वेळ आली, असेही आंदोलक विद्यार्थी म्हणाले.
बस आणि रिक्षा-टॅक्सीनंतर आता कॅब प्रवास ही महागला..! ओला, उबेर, रॅपिडोच्या भाडेदरात दुप्पट वाढ
मुंबई: सध्या महागाई इतकी वाढत चालली आहे की, त्याचा फटका मध्यमवर्गीयांना पडत आहे. बस आणि रिक्षा-टॅक्सीनंतर आता कॅब प्रवास देखील महागला आहे. आजकाल अनेक लोकं सुरक्षित आणि सोईस्कर प्रवासाठी ओला, उबेर आणि रॅपिडो सारख्या ॲप आधारित प्रवासी वाहन सेवांचा वापर करतात. मात्र 1 जुलैपासून लागू झालेल्या नव्या मार्गदर्शक तत्वांनुसार या सेवा प्रदात्यांना आता गर्दीच्या वेळेत मूळ भाड्याच्या दुप्पट दराने भाडं आकारता येणार आहे.ओला, उबर, रॅपिडो सेवा प्रदात्यांना पीक अवर्समध्ये भाडे दुप्पट आकारण्यास केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाकडून परवानगी देण्यात आली आहे. याआधी ही मर्यादा दीडपट होती. याशिवाय, गर्दी नसलेल्या वेळेतही किमान भाड्याच्या ५०% आकारणी अनिवार्य करण्यात आली आहे. यामुळे सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशाला चांगलाच फटका बसणार आहे.तीन महिन्यांत नियम लागूदेशातील सर्व राज्यांनी पुढील तीन महिन्यांत हे मार्गदर्शक नियम लागू करावेत, असा सल्ला केंद्र सरकारकडून देण्यात आला आहे. त्यामुळे पुढील काही महिन्यांत ओला-उबरच्या दरात वाढ निश्चित मानली जात आहे. यामध्ये ‘डेड मायलेज’ अर्थात प्रवाशाला पिकअप करण्यासाठी चालकाने जे अंतर पार केलं, त्याच्या इंधनाचा विचार करून कमीत कमी तीन किलोमीटरचं मूळ भाडं अनिवार्य ठरवण्यात आलं आहे.यामुळे प्रवाशांना गर्दीच्या वेळेत किंवा अल्प मागणीच्या वेळेतही आता जास्त दराने प्रवास करावा लागणार आहे. काही ग्राहकांसाठी ही सेवा आधीच महाग वाटत होती, त्यात आता अधिक आर्थिक तडजोड करावी लागणार आहे.स्थानिक रिक्षा-टॅक्सी चालकांमध्ये संतापॲप आधारित सेवांमुळे स्थानिक रिक्षा व पारंपरिक टॅक्सी चालकांमध्ये मोठा असंतोष आहे. अनेक ठिकाणी स्थानिक चालक आणि ॲप सेवा चालक यांच्यात वाद, तक्रारी आणि संघर्षाचे प्रसंग समोर आले आहेत. ग्राहकांकडूनही भाड्याच्या लूट आणि सेवा गुणवत्तेवर टीका करण्यात येत आहे.सरकारच्या या नव्या नियमामुळे स्थानिक वाहनचालकांची अस्वस्थता अधिकच वाढली असून, सरकारी परवानगी नसलेल्या कंपन्यांवर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.
मोहित सोमण: आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात अखेरच्या सत्रात घसरण झाली आहे. सकाळी 'प्रहार' ने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, पुन्हा बाजारात जागतिक स्तरावरील फटका बसला. त्यामुळे बाजार आज 'लाल' रंगात बंद झाला आहे. आज आंतरराष्ट्रीय बाजारातील टेरिफ वाढीच्या मुद्यांवर बाजारात अस्वस्थता कायम असल्याने बाजारात पडझड झाली. सेन्सेक्स २७२.५५ अंकाने घसरत ६३४१८.२२ अंकावर स्थिरावला आहे. निफ्टी ५० निर्देशांकात ४८.१० अंकांने घसरण होत निर्देशांक २५४०५.३० अंकांवर स्थिरावला आहे. प्रामुख्याने आज सकाळप्रमाणेच किंबहुना अखेरच्या सत्रात अधिक प्रमाणात घसरण झाली. सेन्सेक्स बँक निर्देशांकात २७२.५५ अंकांने घसरण होत बँक सेन्सेक्स ६३४१८.२२ पातळीवर पोहोचला आहे. बँक निफ्टी २०५.२५ अंकाने घसरत ५६७९१.९५ पातळीवर पोहोचला आहे. सकाळप्रमाणेच बँक सेन्सेक्स तुलनेत बँक निफ्टीची घसरण अधिक प्रमाणात झाली व अस्थिरही राहिली.सेन्सेक्स मिडकॅपमध्ये ०.०६% अंकाने घसरण झाली आहे तर स्मॉलकॅपमध्ये ०.४७% वाढ झाली आहे. निफ्टी मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.१२%,०.०३% वाढ झाली आहे. विशेषतः आज सकाळी १% हून अधिक असणारा अस्थिरता निर्देशांक (VIX Volatility Index) अखेरीस ०.४८% वर बंद झाला आहे. बाजारातील अस्थिरता कायम असली तरी प्रामुख्याने दुपारी १ ते ३ दरम्यान ती सर्वाधिक होती. आज निफ्टी उच्चांक २५५८७.५० तर निचांकी पातळी २५३८४.३५ होती. आज सेन्सेक्स व निफ्टीत मार्जिनल घट झाली असली किंवा वीआयएक्सची घसरण थोडक्यात अटोपली असली तरी भविष्यातील घसरणीचा धोका अजून टळलेला नाही.निफ्टी क्षेत्रीय निर्देशांक (Nifty Sectoral Indices) मध्ये आजही क्षेत्रीय विशेष प्रतिसाद कायम राहिला आहे. सर्वाधिक वाढ मिडस्मॉल हेल्थकेअर (०.७८%), हेल्थकेअर (०.५२%), मिडस्मॉल फायनाशियल सर्विसेस (०.२३%), मिडिया (१.४५%), ऑटो (०.४४%) समभागात झाली तर सर्वाधिक घसरण पीएसयु बँक (०.८९%), खाजगी बँक (०.४६%), मेटल (०.७८%), फायनांशियल सर्विसेस (०.६१%) समभागात झाली आहे.भारतातील तिमाहीतील निकालावर येणारे परिणाम, आंतरराष्ट्रीय बाजारातील दबाव पातळी, अमेरिकन बाजारातील ट्रेड संदर्भात अस्थिरता, भारत व युएस यांच्यातील ट्रेडबदल अस्पष्टता, आज डॉलरचा तुलनेत घटणारा रुपया, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी रोख रक्कम मोठ्या प्रमाणात काढून घेतल्याची शक्यता, घरगुती गुंतवणूकदारांमध्ये अस्थिरता, सोन्याचे चढते दर, युएस बाजारातील आगामी पेरोल आकडेवारी अशा अनेक एकत्रित कारणांमुळे बाजारात आज घसरण झाली. आज कदाचित नफा बुकिंग होण्याची शक्यता होती. विशेषतः क्षेत्रीय विशेष समभागातील कामगिरीवर आधारित हालचाली बाजारात घडल्या असाव्यात.याशिवाय अमेरिका-व्हिएतनाम व्यापार करारानंतर, प्रादेशिक आशियाई बाजारपेठांमध्ये उत्साहाचे वातावरण होते, ज्यामुळे भारतीय बेंचमार्क सावधपणे उघडण्यास मदत झाली मात्र दुपारनंतर बाजाराने उलटा प्रवास सुरू केल्याने सपोर्ट लेवला मिडकॅप व स्मॉलकॅप, बँक निर्देशांक,फायनांशियल समभाग वाचवू शकले नाहीत. ही प्रामुख्याने बाजारातील अस्थिरता, चढउतार अधोरेखित करते. ऐतिहासिक अमेरिका-व्हिएतनाम कराराच्या पार्श्वभूमीवर,अमेरिका-भारत व्यापार वाटाघाटींमध्ये चांगल्या अपेक्षांमुळे गुंतवणूकदारांचा आशावाद स्थानिक पातळीवर बळकट झाला आहे. तथापि, आशियाई बाजारातील चिनी डेटामधील कमकुवतपणा आणि अमेरिकेच्या आर्थिक धोरणावरील सावधगिरीमुळे नफा मर्यादित आहे. कदाचित आधी म्हटल्याप्रमाणे नफा बुकिंगची शक्यता अधिक आहे. जागतिक स्तरावर, आजच्या सुरुवातीच्या सत्रात आशियाई बाजारपेठांमध्ये संमिश्र वातावरण होते परंतु जागतिक व्यापाराबद्दल आशावाद आणि फेडच्या कारवाईच्या अपेक्षांमुळे गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगली आहे.जागतिक स्तरावरील संकेतांमुळे कथा प्रवाहावर परिणाम झाला आहे, ज्यामध्ये नायका (Nykaa) ची कॉर्पोरेट शेअर विक्री आणि मजबूत Q1 तिमाही प्रोव्हिजनल कमाई अपडेट यांचाही प्रभाव बाजारात पडला होता. बीएसईतील ४१६८ सम भागात २००९ समभागात वाढ झाली आहे तर २००१ समभागात घसरण झाली. एनएसईत ३०२५ समभागात १४५० समभागात वाढ झाली आहे तर १४७२ समभागात घसरण झाली आहे. बीएसईचे आजचे बाजार भांडवल (Market Capitali sation) ४६०.३१ कोटी तर एनएसईचे बाजार भांडवल ४५८.३४ कोटी होते. आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्याच्या निर्देशांकातही संध्याकाळपर्यंत ०.०५% वाढ झाली होती. तर चांदीच्या निर्देशांकात तर १.०२% वाढ झाली होती. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या WTI Futures निर्देशांकात ०.२१% घसरण झाली असून Brent Future निर्देशांकात ०.३२% घसरण झाली आहे.अमेरिकन बाजारातील फेडरल व्याजदराच्या कपातीवरील नव्या वक्तव्यांची वाट पाहत असलेल्या गुंतवणूकदारांनी सुरूवातीच्या कलात लाभांश जाहीर केल्यानंतर उत्साह दर्शविला आहे. डाऊ जोन्स (०.१३%), एस अँड पी ५०० (०.४७%), नासडाक (०.९४%) तिन्ही बाजारात वाढ झाली आहे. तसेच युरोपियन बाजारातही एफटीएसई (०.३२%), डीएक्स (DAX ०.११%) वाढ झाली आहे तर सीएससी (०.१९%) समभागात घसरण झाली. आशियाई बाजारातील बहुतांश बाजारात वाढ दर्शविली गेली. व्हिएतनाम बरोबर झालेल्या मंजूरी धोरणामुळे बाजारात उत्साहाचे वातावरण आहे. आशियाई बाजारातील निकेयी २२५ (०.०६%), स्ट्रेट टाईम्स (०.२२%), तैवान वेटेड (०.६०%), कोसपी (१.३२%), शांघाई कंपोझिट (०.१८%) बाजारात वाढ झाली आहे. तर जकार्ता कंपोझिट (०.०५%), हेंगसेंग (०.६३%) बाजारात घसरण झाली आहे.अखेरच्या सत्रात आज सर्वाधिक वाढ डीसीएम श्रीराम (१५.१५%), मोतीलाल ओसवाल फायनान्स (८.५७%), ब्लू स्टार (४.९१%),ऑईल इंडिया (३.९१%), सीसीएल प्रोडक्ट (३.४२%), अजंता फार्मा (३.२४%), बोसच (Bosch ६.०४%), अपोलो हॉस्पिटल एंटरप्राईज (१.६७%), डॉ रेड्डीज (१.६१%), ओएनजीसी (१.२४%), पिडिलाईट इंडस्ट्रीज (१.२३%), जेल इंडिया (१.०४%), मारूती सुझुकी इंडिया (१.०३%),डाबर इंडिया (०.८३%), सिमेन्स (०.७१%), इटर्नल (०.४२%), टाटा मोटर्स (०.२७%),आयटीसी (०.१०%), ब्रिटानिया (०.०८%) या समभागात झाली आहे.अखेरच्या सत्रात सर्वाधिक घसरण एफएसएन इ कॉमर्स (४.५१%), पंजाब नॅशनल बँक (३.२१%), आयसीआयसीआय प्रोडुंशियल (२.७९%), एसबीआय लाईफ इन्शुरन्स (२.७२%), चोलामंडलम फायनान्स (२.६५%), वेदांता (२.०४%), बंध न बँक (२.०१%), कोरोमंडलम इंटरनॅशनल (१.६२%), अनंत राज (१.४२%), आयडीबीआय बँक (१.३६%), जेएसबब्लू एनर्जी (१.४२%), जिंदाल स्टील (१.३४%), ओला इलेक्ट्रिक (१.०७%), इंटरग्लोब एव्हिएशन (३.१९%), लोढा डेव्हलपर (२.१४%), टाटा पॉवर (१.६६%), एलआयसी (१.२५%), अदानी ग्रीन (१.०३%), इंडियन हॉटेल्स कंपनी (१.०३%) समभागात झाली आहे.आजच्या बाजारातील परिस्थितीवर भाष्य करताना अशिका इन्स्टिट्युशनल इक्विटीचे तांत्रिक व डेरिएटिव विश्लेषक सुंदर केवात म्हणाले की,' गुरुवारी निफ्टी निर्देशांक २५,५०५ वर स्थिर होता, जो दिवसाच्या आत २५,३८४ च्या नीचांकी पातळीवर घसरला आणि नंतर तो २५,५८७ च्या उच्चांकावर पोहोचला. तथापि, सत्राच्या दुसऱ्या सहामाहीत निर्देशांकात दिवसाच्या उच्चांकावरून पुन्हा विक्रीचा दबाव दिसून आला, जो शेवटी मंदावला. क्षेत्रीयदृष्ट्या, मीडिया, कंझ्युमर ड्युरेबल्स, हेल्थकेअर आणि ऑटोमोबाईल्समध्ये चांगली कामगिरी दिसून आली, तर सार्वजनिक क्षेत्रातील बँका,धातू आणि रिअल्टी समभागांमध्ये लक्षणीय कमकुवतपणा कायम राहिला. अपेक्षित अमेरिका-भारत व्यापार कराराच्या आधी गुंतवणूकदार बाजूला राहिल्याने, एकूण भावना मंदावल्या गेल्याने बाजारातील व्यापक मूड सावध राहिला. डेरिव्हेटिव्ह्जच्या आघाडीवर, बाजाराची व्याप्ती नकारात्मक राहिली, ९६ समभागांनी प्रगती केली आणि १३३ समभाग घसरले. बॉश लिमिटेड, ब्लू स्टार, ३६० वन डब्ल्यूएएम, नायका आणि डी-मार्टमध्ये ओपन इंटरेस्टमध्ये लक्षणीय वाढ दिसून आली, जी या काउंटरमध्ये सक्रिय सहभाग आणि स्थिती दर्शवते.'आजच्या बाजारातील जिओजित इनव्हेसमेंट लिमिटेडचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले की,' गेल्या आठवड्यातील तीव्र तेजीनंतर नफा बुकिंग सुरूच राहिल्याने देशांतर्गत शेअर बाजार मजबूत होत राहिला. ९० दिवसांच्या विरामाच्या समाप्तीसह, गुंतवणूकदार संभाव्य अमेरिका-भारत व्यापार कराराच्या आसपासच्या घडामोडींकडे लक्ष ठेवून आहेत. प्रीमियम मूल्यांकनामुळे अलिकडच्या काळात एफआयआय सावध झाले आहेत. या अडचणी असूनही, आगामी कमाई हंगामाभोवती आशावाद आणि कमकुवत होत चाललेल्या अमेरिकन डॉलर निर्देशांकामुळे भावनांना पाठिंबा आहे.'बाजारातील सोन्याच्या हालचालीवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले की,'सोन्याच्या किमती ९७,००० ते ₹९७,७५० रूपयांच्या आत चढ-उतार झाल्यामुळे सोन्याचा भाव कमकुवत आणि अस्थिर झाला, याचे मुख्य कारण ८५.५० ते ८५.३० च्या पातळीवरील रुपयाचे मूल्य वाढणे होते, ज्यामुळे जागतिक संकेत असूनही देशांतर्गत किमतींवर परिणाम झाला. बाजार आता आज संध्याकाळी अमेरिकेतील महत्त्वाच्या डेटा रिलीजची वाट पाहत आहे, ज्यामध्ये नॉन-फार्म पेरोल्स (NFP) आणि बेरोजगारीचे आकडे समाविष्ट आहेत, जे नवीन दिशा देऊ शकतात. पुढे जाऊन, सोन्याचा व्यापार ९५,५०० ते ९८,५०० रूपयांच्या विस्तृत श्रेणीत होण्याची अपेक्षा आहे.'एकूणच बाजारातील स्थिती पाहता बाजारात जशी तेजीची शक्यता आहे तशी अस्थिरताही कायम आहे. आगामी अमेरिकन ट्रेडवर आधारित निर्णयावर व स्मॉलकॅपमध्ये, बँक निर्देशांकात होणारी हालचाल पाहता पुढील बाजाराची दिशा स्पष्ट होणार आहे. तज्ज्ञांकडून अशावेळी क्षेत्रीय कामगिरीसह आंतरराष्ट्रीय बाजारातील परिस्थितीवर लक्ष ठेवूनच गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जात आहे.
Disha Salian Case : दिशा सालियन मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरेंना क्लीन चिट
मुंबई : सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियन मृत्यूप्रकरणी नवा ट्विस्ट समोर आला आहे. या प्रकरणात आदित्य ठाकरेंना क्लीन चिट मिळाली आहे. दिशाची हत्या झाल्याचे किंवा तिच्यावर कोणत्याही प्रकारचा लैंगिक अत्याचार झाल्याचे पुराव्यांतून सिद्ध झालेले नाही, असे पोलिसांनी म्हटले आहे. सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियनची हत्या झाल्याचे किंवा तिच्यावर कोणत्याही प्रकारचा लैंगिक अत्याचार झाल्याचे वैद्यकीय आणि वैज्ञानिक पुराव्यांतून […] The post Disha Salian Case : दिशा सालियन मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरेंना क्लीन चिट appeared first on Dainik Prabhat .
Maharashtra Dam Water Update : राज्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली असून, धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे राज्यातील अनेक धरणांमध्ये पाण्याची आवक वाढली आहे, तर काही धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. रायगड जिल्ह्यातील 17 धरणं 100 टक्के भरली असून, गोसेखुर्द धरणाचे 9 दरवाजे उघडण्यात आले आहेत. पुणे, नाशिक, मराठवाडा […] The post पावसाचा धडाका ! रायगडातील 17 धरणं तुडुंब, गोसेखुर्दचे 9 दरवाजे उघडले; वाचा राज्यातील धरणसाठ्याची ताजी अपडेट appeared first on Dainik Prabhat .
Mohammed Shami : ‘शमीला अहंकार; मुलीशी संपर्क नाही!’, हसीन जहांची मोहम्मद शमीवर पुन्हा टीका
Mohammed Shami and Hasin Jahan Case : भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी चर्चेत आहे. मोहम्मद शमी आणि त्याची एक्स वाईफ हसीन जहां यांच्यात गेल्या सुमारे सहा वर्षांपासून कायदेशीर लढाई सुरू आहे. या संपूर्ण प्रकरणात कोलकाता उच्च न्यायालयाने असा आदेश दिला आहे की, शमीने दरमहा चार लाख रुपये हसीन जहां आणि त्यांच्या मुलीला भरणपोषण […] The post Mohammed Shami : ‘शमीला अहंकार; मुलीशी संपर्क नाही!’, हसीन जहांची मोहम्मद शमीवर पुन्हा टीका appeared first on Dainik Prabhat .
Narayan Rane : दोन्ही भावांची अस्तित्व टिकवण्याची धडपड; नारायण राणेंची ठाकरे बंधूंवर टीका
रत्नागिरी : ही दोन भावांची अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड असून ते दोघेही स्वार्थासाठी एकत्र येत आहेत. दोन भाऊ एकत्र येणार असतील तर एवढा गवगवा का? एकमेकांना घरी बोलवा, जेवा, मिठ्या मारा. पण मराठीसाठी एकत्र येतायत असे भासवण्याचे कारण काय? काय केले दोघांनी मराठीसाठी? मराठी तरुणांच्या नोकरी – रोजगाराच्या प्रश्नावर काय केले यांनी? हिंदी भाषा लादण्याच्या निर्णयाला […] The post Narayan Rane : दोन्ही भावांची अस्तित्व टिकवण्याची धडपड; नारायण राणेंची ठाकरे बंधूंवर टीका appeared first on Dainik Prabhat .
लिव्हरपूरलचा फुटबॉलपटू डिओगो जोटाचं कार अपघातात निधन
माद्रिद: पोर्तुगाल आणि लिव्हरपूलचा फुटबॉलपटू डिओगो जोटाचे वयाच्या २८ व्या वर्षी कार अपघातात निधन झाले आहे. जोटा आणि त्याच्या भावाचा स्पेनमधील झमोरा शहरात कार अपघात मृत्यू झाल्याची माहिती आहे. डिओगो जोटाच्या पश्चात पत्नी आणि तीन मुले आहेत. डिओगो जोटाची लॅम्बोर्गिनी कार दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करताना टायर फुटल्यामुळे रस्ता सोडून गेली आणि नंतर ती आगीत जळून खाक झाली.स्पेनच्या वायव्येकडील झमोराजवळ हा अपघात झाला. जोटाचा भाऊ आंद्रे सिल्वाही या अपघातामध्ये ठार झाला आहे. २६ वर्षीय सिल्वा पोर्तुगीज फुटबॉलच्या दुसऱ्या श्रेणीत पेनाफिलकडून खेळत होता. दरम्यान, गेल्या हंगामात लिव्हरपूलसोबत प्रीमियर लीगचे विजेतेपद जिंकणारा आणि पोर्तुगालच्या राष्ट्रीय संघासाठी डिओगो जोटा खेळला होता. त्याचप्रमाणे २०१९ आणि २०२५ मध्ये यूईएफए नेशन्स लीग जिंकणाऱ्या पोर्तुगाल संघाचाही तो भाग होता. २८ वर्षीय जोटाने दोन आठवड्यांपूर्वीच रुट कार्डोसोशी लग्न केले होते. त्याला तीन मुले देखिल आहेत.
बेदरकार गाडी चालवणाऱ्यांना विमा भरपाई नाही - सर्वोच्च न्यायालय
स्वतःच्या चुकीमुळे झालेल्या अपघातात मृत्यू झाल्यास कुटुंबीयांना भरपाई मिळणार नाहीनवी दिल्ली : भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने वाहन चालवणाऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे जो भविष्यकाळात रस्त्यावरील वाहतूक नियमांचे पालन करण्यासाठी प्रेरणा देणारा ठरू शकतो. न्यायालयाने स्पष्ट केले आहे की बेफिकीरपणे आणि वेगाने वाहन चालवणाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाल्यास विमा कंपनी त्यांच्या कुटुंबीयांना भरपाई देण्यास बाध्य नाही.हा निर्णय एन.एस. रवीश यांच्याशी संबंधित प्रकरणावर आधारित आहे. १८ जून २०१४ रोजी घडलेल्या या दुर्घटनेची सुरुवात तेव्हा झाली जेव्हा रवीश हे त्यांच्या वडील, बहीण आणि मुलांसह कारने प्रवास करत होते. मालनहल्लीजवळ त्यांच्या गाडीवरील नियंत्रण सुटले आणि भीषण अपघात झाला.या अपघातामागील कारणे तपासताना असे स्पष्ट झाले की रवीश हे अत्याधिक वेगाने आणि बेपर्वाईने गाडी चालवत होते. त्यांच्या या निष्काळजीपणामुळेच हा अपघात घडला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांच्या तपासणीतही ही बाब स्पष्ट झाली होती.https://prahaar.in/2025/07/03/will-you-become-a-doctor-or-a-compounder-nilesh-ranes-attack-in-the-legislative-assembly/रवीश यांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी, मुलगा आणि पालकांनी विमा कंपनीकडे ८० लाख रुपयांची भरपाई मागितली होती. परंतु पोलिसांच्या आरोप पत्रात रवीश यांनाच या अपघातासाठी थेट जबाबदार ठरवण्यात आले होते. या आधारावर मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाने (एमएसीटी) त्यांचा दावा फेटाळून लावला.या निर्णयावर असमाधानी असलेल्या कुटुंबीयांनी कर्नाटक उच्च न्यायालयात अपील दाखल केले. त्यांनी आपला युक्तिवाद बदलत असा दावा केला की अपघात टायर फुटल्यामुळे झाला होता, रवीश यांच्या चुकीमुळे नाही. परंतु उच्च न्यायालयाने या दाव्याला फारसे महत्त्व दिले नाही.उच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, सर्व पुराव्यांचे परीक्षण करता मृत व्यक्ती त्यांच्या निष्काळजीपणामुळेच अपघाताला कारणीभूत ठरली होती. त्यामुळे विमा कंपनी भरपाई देण्यास बाध्य नाही, असा निर्णय त्यांनी दिला.अंतिम उपाय म्हणून कुटुंबीयांनी सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. न्यायमूर्ती पी.एस. नरसिंह आणि आर. महादेवन यांच्या खंडपीठाने या संपूर्ण प्रकरणाचा सखोल अभ्यास केला. सर्व पुराव्यांचे आणि कायदेशीर मुद्द्यांचे परीक्षण करून त्यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयाला मान्यता दिली.सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने आपल्या निर्णयात स्पष्टपणे नमूद केले, जेव्हा अपघात मृत व्यक्तीच्या स्वतःच्या निष्काळजीपणामुळे होतो, तेव्हा विमा कंपनीवर कोणतीही भरपाईची जबाबदारी राहात नाही. हा निर्णय कायदेशीर तत्त्वावर आधारित आहे की कोणीही व्यक्ती स्वतःच्या चुकीचा फायदा घेऊ शकत नाही.या निर्णयाचे व्यापक परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे. यामुळे वाहनचालकांना अधिक जबाबदारीने आणि सुरक्षितपणे वाहन चालवण्यासाठी प्रेरणा मिळेल. रस्त्यावरील वेगवान आणि बेपर्वाह गाडी चालवणे हे केवळ स्वतःच्या जीवाला धोका नसून कुटुंबीयांच्या आर्थिक सुरक्षेलाही धोका आहे हे या निर्णयामुळे स्पष्ट झाले आहे.विमा कंपन्यांसाठी देखील हा निर्णय महत्त्वाचा आहे. यामुळे त्यांना अनावश्यक भरपाई देण्यापासून संरक्षण मिळेल आणि विमा दाव्यांबाबत स्पष्टता निर्माण होईल. तथापि, याचा अर्थ असा नाही की सर्व विमा दावे नाकारले जातील, फक्त निष्काळजीपणामुळे झालेल्या अपघातांमध्ये हा नियम लागू होईल.या निर्णयामुळे भविष्यकाळात वाहतूक नियमांचे पालन करण्यासाठी लोकांना अधिक प्रेरणा मिळेल आणि रस्त्यावरील सुरक्षिततेत सुधारणा होण्याची शक्यता आहे.
विधानसभा अध्यक्षांकडे इंग्रजी कामकाजपत्रिकेची मागणीमुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभेत कामकाजाची पत्रिका इंग्रजी भाषेत मिळावी, यासाठी ९ आमदारांनी विनंती केली असल्याची माहिती अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात दिली. आज (गुरुवार, दि. ३ जुलै) विधानसभेत इंग्रजी भाषेत असलेली कामकाजपत्रिका पाहून भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी ‘कामकाजपत्रिका इंग्रजीतून का?’, असा प्रश्न औचित्याच्या सूत्राच्या अंतर्गत उपस्थित केला. इंग्रजीशिवाय इतकीच अडचण येत असेल, तर त्या आमदारांना ब्रिटनच्या संसदेत पाठवा, असे उपरोधिक वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी या वेळी केले.https://prahaar.in/2025/07/03/bjp-leader-narayan-rane-slams-mns-chief-raj-thackeray-and-uddhav-thackeray/इंग्रजीतून कामकाजपत्रिका कशासाठी?सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ‘‘विधानसभ नियमातील प्रावधानानुसार सभागृहातील कामकाज मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत चालवता येत असले, तरी अद्यापपर्यंत सभागृहात इंग्रजीतील कामकाजपत्रिका मी पाहिलेली नाही. एकिकडे मराठीला अभिजात भाषा करायची आणि ज्यांना मराठी बोलता येत नाही त्यांना हिंदीची संधी असतांना इंग्रजीतून कामकाजपत्रिका कशासाठी? मराठी समजायला अडचण असेल, तर कामकाजपत्रिका हिंदीतून काढावी. हिंदीला विरोध आणि इंग्रजीला आलिंगन, हे धोरण चुकीचे आहे.इंग्रजीशिवाय अडचण असेल तर ब्रिटनच्या संसदेत पाठवावेमहाराष्ट्राच्या विधानसभेचे नियमावली करतांना त्या वेळी इंग्रजीचा प्रभाव असेल; परंतु याविषयी नियम समितीची बैठक घेऊन कामकाजातील इंग्रजी शब्द काढून टाकावेत. मराठी भाषा शिकलीच पाहिजे. एखाद्याला मराठी शिकायला खूपच अडचण असेल, त्यांनी हिंदी शिकावी; परंतु इंग्रजीशिवाय खूपच अडचण असेल, तर त्यांना ब्रिटनच्या संसदेत पाठवावे. एकीकडे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकार्यांना राज्यात मराठी शिकायला लावले जाते; परंतु ज्यांना मराठी येत नाही त्यांच्याकरता हिंदीची संधी असतांना इंग्रजीतून कामकाजपत्रिका कशाकरिता?’’, असा सवाल मुनगंटीवार यांनी केला. सुधीर मुनगंटीवार यांच्या औचित्याच्या सूत्रावर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मराठी आणि इंग्रजी या भाषांमध्ये कामकाजपत्रिका काढतो, अशी माहिती सांगून इंग्रजीतून कामकाजपत्रिकेसाठी आमदारांनी विनंती केल्याचे म्हटलं
Vaibhav Suryavanshi Create History : सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे, जिथे दोन्ही संघांमध्ये एजबॅस्टन येथे दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. दुसरीकडे, भारताचा १९ वर्षांखालील संघ देखील इंग्लंडमध्ये खेळत आहे. भारताच्या १९ वर्षांखालील आणि इंग्लंडच्या १९ वर्षांखालील संघांमध्ये एकदिवसीय मालिका खेळली जात आहे, ज्यामध्ये १४ वर्षीय वैभव सूर्यवंशी अप्रतिम कामगिरी केली आहे. मालिकेतील […] The post Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशीने इंग्लंडमध्ये रचला इतिहास, ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच भारतीय appeared first on Dainik Prabhat .
पुणे : सांस्कृतिक आणि शैक्षणिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यात एका भोंदूबाबाच्या काळ्या कारनाम्यांनी खळबळ उडवली आहे. प्रसाद तामदार (वय 29, रा. सूस गाव, मुळशी) या तथाकथित बाबाला बावधन पोलिसांनी अटक केली असून, त्याच्यावर गंभीर आरोपांचा डोंगर उभा राहिला आहे. अंधश्रद्धेचा गैरफायदा घेत भक्तांची फसवणूक करणाऱ्या या भोंदूबाबाच्या आश्रमातून पोलिसांना धक्कादायक पुरावे हाती लागले […] The post Prasad Tamdar : आश्रमात गोळ्यांची पाकिटे, आयपॅड, सिमकार्डचा खच; पुण्यातील भोंदूबाबाचा हायटेक कारनामा समोर appeared first on Dainik Prabhat .
श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याला राष्ट्रीय पुरस्कार प्रदान
नवी दिल्ली : नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑप. शुगर फॅक्टरीज लि., नवी दिल्ली यांच्यातर्फे हंगाम २०२३-२४ साठी देशातील उच्च साखर उतारा आणि उत्कृष्ट ऊस विकासासाठी प्रथम क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याला प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार नवी दिल्ली येथे केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि नवीकरणीय ऊर्जामंत्री प्रल्हाद जोशी, केंद्रीय राज्यमंत्री […] The post श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याला राष्ट्रीय पुरस्कार प्रदान appeared first on Dainik Prabhat .
Pune News : अतिक्रमणे न काढल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई; आमदार सुनिल कांबळेच्या लक्षवेधीवर शासनाचे आदेश
पुणे : शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महापालिकेकडून रस्ता रूंदीकरण करण्यात आले आहे. मात्र, या रस्त्यांवर आता मोठ्या प्रमाणात अनधिकृत व्यावसायिक आणि अनधिकृत जाहीरात फलक उभारण्यात आले आहेत. त्यावर तातडीनं कारवाई न झाल्यास संबधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेश महापालिका प्रशासनास दिले असल्याची माहिती नगरविकास विभागाच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत दिली. कॅन्टोन्मेट विधानसभा […] The post Pune News : अतिक्रमणे न काढल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई; आमदार सुनिल कांबळेच्या लक्षवेधीवर शासनाचे आदेश appeared first on Dainik Prabhat .
Gold Silver Rate: सोन्यात तिसऱ्यांदा उसळी चांदीच्या दरात दुसऱ्यांदा 'ही'आहे प्रति तोळा किंमत
प्रतिनिधी: आज सलग तिसऱ्यांदा सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. प्रामुख्याने जागतिक अस्थिरतेचा परिणाम म्हणून सोन्यावर दबाव निर्माण झाला. परिणामी सोने आज पुन्हा एकदा महागले आहे. 'गुडरिटर्न्स' या संकेतस्थळावरील माहितीनुसार, २४ कॅरेट प्रति ग्रॅम दरात ४४ रूपयांने वाढ झाल्याने दरपातळी ९९२३ रुपयांवर पोहोचली आहे. २२ कॅरेट प्रति ग्रॅम किंमत ४० रुपयांनी वाढत ९१०५ रूपये पातळीवर सोने पोहोचले आहे. १८ कॅरेट प्रति ग्रॅम किंमत ३३ रुपयांनी वाढत ७४५० रूपये पातळीवर पोहोचले आहे. २४ कॅरेट प्रति तोळा किंमत आज ४४० रूपयांनी वाढत ९९३३० रूपयांवर पोहोचली आहे. २२ कॅरेट प्रति तोळा किंमत ४०० रुपयांनी वाढत ९१०५० रूपये पातळीवर पोहोचली. १८ कॅरेट सोने प्रति तोळा किंमत ३३० रूपयांनी वाढत ७४५०० रूपये पातळीवर पोहोचले आहे.देशातील मुंबई पुण्यासह,प्रमुख शहरातील सराफा बाजारातील २४ कॅरेट प्रति ग्रॅम किंमत ९९३३ रुपये तर २२ कॅरेट प्रति ग्रॅम दर पातळी ९१०५ रूपये आहे.आज आंतरराष्ट्रीय स्तरावर युएस फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपातीबाबत नव्या वक्तव्यांची बाजारातील गुंतवणूकदार आतुरतेने वाट पाहत आहेत. तसेच रेसिप्रोकल ट्रेडमध्ये अजून अंतिम बोलणी न झाल्याने भारतीय व परदेशी गुंतवणूक दारांनी मोठ्या प्रमाणात सोन्याची वाट धरली आहे. सोन्याच्या मागणीत झालेल्या मोठ्या वाढीनंतर मागील आठवड्यात घसरणीनंतर सोन्याने पुन्हा तीन वेळा उसळी घेतली होती.यापूर्वी गुंतवणूकदारांना नव्या नफा बुकिंगची संधी पिवळ्या धातू (Yellow Metal ) ने दिली होती.आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजी ही मर्यादित असल्यामागे युएस पेरोल डेटाही लवकरच अपेक्षित असल्याने युएस बाजारातील उसळीचा परिणाम म्हणून आज सकाळी १२ वाजेपर्यंत सोन्याच्या निर्देशांकात मर्यादित वाढ होत आहे. नुकतेच युएस राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हिएतनामसोबत ट्रेड डील झाल्याचे घोषित केले होते. ज्याचा फायदा शेअर बाजारात काल अखेरच्या सत्रात दिसला होता. आता व्हिएतनामी आयातीवर युएस केवळ २०% शुल्क आकारणार आहे. अशातच मात्र भारत व युएस यांच्यातील व्यापार मतभेदाचा फटका भारतीय बाजारात बसत आहे. परिणामी बाजारातील सोन्याच्या गुंतवणूकीत अस्थिरता निर्माण झाली. गुंतवणूकदार अजूनही पेरोल डेटा व इंडिया युएस व्यापारी अंतिम बोलणी यांची वाट पाहत असल्याने गुंतवणूकदारांचा बाजारात सावध पवित्रा दिसून येत आहे.आजच्या सोन्याच्या गोल्ड फ्युचर निर्देशांक (Gold Future Index) यामध्ये ०.२८% वाढ सकाळपर्यंत झाली आहे. युएस गोल्ड ०.०७% घसरला आहे. एमसीएक्सवरील सोने निर्देशांकात दुपारपर्यंत किरकोळ घसरण होत निर्देशांक ०.०८% टक्के घसरला.आज चांदीच्या दरातही किरकोळ वाढसलग दुसऱ्यांदा चांदीच्या दरातही वाढ कायम आहे. सोन्याच्या मागणीप्रमाणे चांदीच्या मागणीतही वाढ झाल्याने बाजारात चांदीचे दर वाढले आहेत. स्थावर गुंतवणूक सध्या रोलरकोस्टर स्थित्यंतरातून जात असल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष आंतरराष्ट्रीय निर्देशांकावर आधारलेले आहे. प्रति ग्रॅम किंमत १ रूपयाने वाढत चांदीचा प्रति ग्रॅम पातळी १११ रूपयांवर पोहोचली आहे. तर प्रति किलो किंमत १००० रूपयांनी वाढत दरपातळी ११०००० रूपयांवर पोहोचली आहे. चांदीच्या आंतरराष्ट्रीय सिल्वर फ्युचर निर्देशांकात दुपारपर्यंत मोठी वाढ झाली आहे. निर्देशांकात तब्बल १.४२% वाढ झाली आहे. भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समधील (MCX) मधील चांदीच्या निर्देशांकात दुपारपर्यंत १.०५% वाढ झाली आहे.
IND vs ENG : शुबमन गिलचा इंग्लंडमध्ये जलवा! सलग दोन कसोटीत शतकं ठोकत रचला इतिहास
IND vs ENG Shubman Gill Creates History : शुबमन गिलने बुधवारी (२ जुलै) एजबॅस्टन कसोटीत अनेक विक्रमांची रांग लावत इतिहास रचला. तो इंग्लंडमध्ये कसोटी मालिकेतील पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यात शतक ठोकणाऱ्या परदेशी कर्णधारांच्या यादीत सामील झाला आहे. विशेष म्हणजे, असे करणारा तो केवळ दुसरा भारतीय कर्णधार आहे. या खास क्लबमध्ये डॉन ब्रॅडमन, गारफील्ड सोबर्स आणि […] The post IND vs ENG : शुबमन गिलचा इंग्लंडमध्ये जलवा! सलग दोन कसोटीत शतकं ठोकत रचला इतिहास appeared first on Dainik Prabhat .
कृषी महाविद्यालय सरळगांवच्या विद्यार्थ्यांकडून मानिवली गावात कृषी दिन साजरा
मानिवली (ता. मुरबाड) : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत, यशोदिप सामाजिक संस्था संचालित कृषी महाविद्यालय, सरळगांव येथील चतुर्थ वर्षातील “कृषी क्रांती” गटाच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र कृषी दिन आणि हरित क्रांतीचे जनक पद्मविभूषण डॉ. वसंतराव नाईक यांची जयंती मानिवली गावात उत्साहात साजरी केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नरेश व्यापारी होते. प्रमुख पाहुणे म्हणून गावचे सरपंच लक्ष्मण […] The post कृषी महाविद्यालय सरळगांवच्या विद्यार्थ्यांकडून मानिवली गावात कृषी दिन साजरा appeared first on Dainik Prabhat .
रत्नागिरी : एकमेकांना घरी बोलवा, जेवा, मिठ्या मारा. पण मराठीसाठी एकत्र येतायत असं भासवण्याचं कारण काय? काय केलं आतापर्यंत मराठीसाठी? अशी खरमरीत टीका माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे (Narayan Rane) यांनी केली. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधू स्वार्थासाठी एकत्र येत आहेत. या दोन भावांची अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड सुरु आहे. लोकसभा निवडणुकीवेळी नारायण राणे यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे हे त्यांच्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात गेले होते. याठिकाणी राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी प्रचारसभा घेतली होती. मात्र, आता मराठीच्या मुद्द्यावरुन ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर नारायण राणे यांनी आपल्या पक्षाच्या बाजूने उभे राहत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर नेहमीच्या शैलीत टीकेची तोफ डागली आहे. ते गुरुवारी मुंबईत रत्नागिरीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.काय केलं आतापर्यंत मराठीसाठी?नारायण राणे यांनी ठाकरे बंधुंवर टीकास्त्र डागताना म्हटले की, ही दोन भावांची अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड असून ते दोघेही स्वार्थासाठी एकत्र येत आहेत. दोन भाऊ एकत्र येणार असतील तर एवढा गवगवा का? एकमेकांना घरी बोलवा, जेवा, मिठ्या मारा. पण मराठीसाठी एकत्र येतायत असं भासवण्याचं कारण काय? काय केलं आतापर्यंत मराठीसाठी? मराठी तरुणांच्या नोकरी - रोजगाराच्या प्रश्नावर काय केलं यांनी? हिंदी भाषा लादण्याच्या निर्णयाला कोणाची सही आहे? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना का नाही निर्णय रद्द केला, असा सवाल नारायण राणे यांनी उपस्थित केला.उद्धव रकरेंच शिवसेनेत राहणं असहाय्य्यघरगुती भांडणं चव्हाट्यावर आणणं योग्य नाही. राज ठाकरे यांनीच त्यावर बोलावं. उद्धव ठाकरेंनी त्यांना शिवसेनेत राहणं असहाय्य्य केलं. राज यांचा एकही निर्णय मान्य केला जात नव्हता. उद्धव ठाकरेंसोबत आज कोणीही नाही. दोन भाऊ एकत्र आले तर मला शब्दात सांगता येत नाही इतका आनंद होतोय. किती टक्के मराठी माणूस मुंबईत राहिलाय? यासाठी जबादार कोण? हे सोयीचं, फायद्याचं आणि परिवाराच्या स्वार्थाचं राजकारण आहे, अशी घणाघाती टीका नारायण राणे यांनी केली.https://prahaar.in/2025/07/03/stop-crying-before-entering-the-field-if-you-have-the-courage-come-to-the-election-arena-like-a-real-man/उद्धव ठाकरेंकडे एकही गुण चांगला नाहीभाजपला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्याने कोणताही फरक पडणार नाही, असा दावा नारायण राणे यांनी केला. दोघे एकत्र येण्याने आम्हाला काई धक्का बसणार नाही. आम्ही मराठी नाही का ? आम्ही त्यांच्यापेक्षा जास्त मराठी माणसासाठी काम केलंय. मला उद्धव ठाकरेंचा एकही चांगला गुण मला माहिती नाही. पण राज ठाकरेंचा स्वभाव रोखठोक आहे. शिवसेनेने अडीच वर्षात सत्ता आणि हिंदुत्व दोन्ही गमावले. राज ठाकरे चुकतायत की नाही, हा माझा प्रश्न नाही. काही हाताशी लागणार नाही, असे नारायण राणे यांनी म्हटलंय.अंतिम निर्णय कोर्ट सुनावत नाही तोपर्यंत मी मानणार नाहीनारायण राणे यांनी दिशा सालियन प्रकरणावरही भाष्य केले. मी दिशा सालियन प्रकरण यावर बारीक नजर ठेवून आहे. एसआयटीने दिलेला रिपोर्ट खराच असेल असं नाही. अनेक पोलीस रिपोर्ट खोटे असतात. रिपोर्ट काही असला तरी माझा विश्वास नाही. अंतिम निर्णय कोर्ट सुनावत नाही तोपर्यंत मी मानणार नाही, असे नारायण राणे यांनी म्हटले.
मुंबईतील प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये कार्तिक श्रीलीलाची डिनर डेट; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Karthik Aryan | Srileela | गेल्या काही महिन्यांपासून बॅालिवूड अभिनेता कार्तिक आर्यन आणि दाक्षिणात्य अभिनेत्री श्रीलीला यांच्या अफेअरच्या चर्चा बीटाऊनमध्ये होत असतात. नुकतीच श्रीलीलाच्या वाढदिवसानिमित्ताने कार्तिकने तिला शुभेच्छा देणारी एक सुंदर पोस्ट लिहिली होती. या पोस्टमध्ये त्याने श्रीलीलाचा फोटोही शेअर केला होता. अशातच आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. नुकतेच दोघांनाही रात्री उशिरा […] The post मुंबईतील प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये कार्तिक श्रीलीलाची डिनर डेट; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल appeared first on Dainik Prabhat .
लातूरच्या शेतकरी दाम्पत्याला सोनू सुदचा मदतीचा हात; म्हणाला, “तुम्ही नंबर पाठवा…”
Sonu Sood | लातूर जिल्ह्यातील हाडोलती गावातील एका शेतकरी दाम्पत्याचा हृदयस्पर्शी व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. महाराष्ट्रातील कृषी क्षेत्राचे हे दयनीय चित्र पाहिल्यानंतर मनं सुन्न होते. ७५ वर्षीय अंबादास आणि मुक्ताबाई पवार या वृद्ध शेतकरी दाम्पत्याकडे ना बैल आहेत, ना मजूर आणि ट्रॅक्टर भाड्यानं घेण्याचा विचारही ते करू शकत नाहीत. आर्थिक संकटात सापडलेल्या दाम्पत्याने […] The post लातूरच्या शेतकरी दाम्पत्याला सोनू सुदचा मदतीचा हात; म्हणाला, “तुम्ही नंबर पाठवा…” appeared first on Dainik Prabhat .
“फक्त दलाई लामाच त्यांचा उत्तराधिकारी ठरवू शकतात” ; भारताने चीनला दिली योग्य पद्धतीने समज
Dalai Lama Successor । भारताने चीनला,”फक्त तिबेटी आध्यात्मिक नेते दलाई लामाच त्यांच्या उत्तराधिकाऱ्याबाबत निर्णय घेऊ शकतात ” असे स्पष्ट शब्दात सांगितले आहे. भारताने आज शेजारील देशाला सांगताना,”त्यांनी दलाई लामा यांच्या पुनर्जन्माला मान्यता द्यावी.’ असे म्हटले आहे. दलाई लामा यांनी नुकतेच त्यांनी स्थापन केलेल्या गादेन फोडरंग ट्रस्टला त्यांचा पुनर्जन्म ओळखण्याचा अधिकार आहे, परंतु दुसरीकडे चीन दलाई […] The post “फक्त दलाई लामाच त्यांचा उत्तराधिकारी ठरवू शकतात” ; भारताने चीनला दिली योग्य पद्धतीने समज appeared first on Dainik Prabhat .
Mark Zuckerberg । मार्क झुकरबर्गला व्हाईट हाऊसच्या ओव्हल ऑफिसमधून बाहेर पडण्यास सांगण्यात आले. अमेरिकन माध्यमांमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. ट्रम्प सरकारकडून हे आदेश देण्यात आले त्यावेळी झुकरबर्ग रिपब्लिकन नेते आणि अमेरिकन सैन्याच्या उच्च अधिकाऱ्यांमधील एका संवेदनशील लष्करी बैठकीला उपस्थित राहण्यासाठी गेले होते. एका इंग्रजी वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, “ही बैठक हवाई दलाच्या पुढील पिढीतील लढाऊ विमान […] The post मार्क झुकरबर्गला ट्रम्पने दाखवला बाहेरचा रस्ता ; ओव्हल ऑफिसमधून जाण्याचे दिले आदेश, का दिला असा आदेश? वाचा appeared first on Dainik Prabhat .
Ramayana Movie First Look : दिग्दर्शक नितेश तिवारी यांचा बहुचर्चित रामायण या चित्रपटाचा फर्स्ट लूक व्हिडीओ समोर आला आहे. ३ मिनिटांच्या या फर्स्ट लूकमध्ये चित्रपटातील कास्टची ओळख करून देण्यात आली आहे. सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा होत आहे. चाहत्यांकडून चित्रपटाच्या पहिल्या झलकचे कौतुक केले जात आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेता रणबीर कपूर भगवान राम, तर साई […] The post जय श्रीराम…! बहुचर्चित ‘रामायण’ चित्रपटाची पहिली झलक भेटीला; रणबीर राम, साई पल्लवी सीता, रावणाच्या भूमिकेत ‘हा’ अभिनेता appeared first on Dainik Prabhat .
पुण्यात मनसेच्या कार्यकर्त्यांनी केला राडा
पुणे : मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केली म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी कोथरूड येथील केदार सोमण यांच्या घराबाहेर गोंधळ घातला. पोलिसांनी हस्तक्षेप करुन परिस्थिती नियंत्रणात आणली. केदार सोमण यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.कोथरूड येथे राहणाऱ्या केदार सोमण यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केली होती. ही पोस्ट व्हायरल होऊ लागताच मनसे प्रवक्ते हेमंत संभूस यांच्या अध्यक्षतेखाली केदार सोमण यांच्या घराबाहेर आंदोलन करण्यात आले. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांनी कारवाई केली.मनसेच्या कार्यकर्त्यांनी आधी सोमण यांच्या घराचा दरवाजा ठोठावला आणि दार उघडण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. पण सोमण यांनी घराचे दार उघडले नाही. तोपर्यंत कोथरूडच्या इंद्रधनु सोसायटीत गडबड सुरू असल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले.पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना सोसायटीच्या मुख्य प्रवेशद्वारापासून दूर केले. रस्त्यावर थांबवले. यानंतर पोलिसांनी केदार सोमण यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. पोलीस केदार सोमण यांना व्हॅनमध्ये घेऊन जात होते त्यावेळी रस्त्यावर उभ्या असलेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. पण पोलिसांनी तातडीने केदार सोमण यांना घटनास्थळापासून दूर नेले आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.काय आहे केदार सोमण यांची पोस्ट ?
हातात टाळ आणि डोक्यावर तुळस…रिंकू राजगुरु पंढरीच्या वारीत झाली सहभागी
Rinku Rajguru | दरवर्षी मोठ्या भक्तीमय वातावरणात लाखो वारकरी पंढरीच्या वारीत सहभागी होतात. वारीचा हा नयनरम्य सोहळा अनुभवण्यासाठी तसेच वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी अनेक कलाकार वारीत सहभागी होतात. यंदाही मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार वारीत सहभागी झाले आहेत. यानंतर आता आर्ची म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरु देखील पंढरीच्या वारीत आपल्या वडिलांसह सहभागी झाली. याचा व्हिडिओ तिने सोशल […] The post हातात टाळ आणि डोक्यावर तुळस… रिंकू राजगुरु पंढरीच्या वारीत झाली सहभागी appeared first on Dainik Prabhat .
डॉक्टर तयार करणार की कंपाऊंडर? विधानसभेत निलेश राणेंचा हल्लाबोल!
सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेजची दयनीय स्थिती, आमदार निलेश राणेंचे तीव्र सवालमंत्री मुश्रीफ यांनी दिले स्वत: पाहणी करण्याचे आश्वासनमुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सरकारी मेडिकल कॉलेजची दयनीय स्थिती विधानसभेत चर्चेचा मुद्दा बनली आहे. आमदार निलेश राणे यांनी या प्रकरणी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना कडक सवाल विचारले आहेत. राणे यांनी मेडिकल कॉलेजमधील सुविधांचा अभाव आणि रुग्णसेवेतील गंभीर कमतरता यांचा मुद्दा जोरदारपणे उठवला.आमदार निलेश राणे यांनी विधानसभेत बोलताना सांगितले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात सरकारी मेडिकल कॉलेज असूनही तेथे मूलभूत सुविधांचा अभाव आहे. या स्थितीची गंभीरता दाखवत त्यांनी म्हटले, या मेडिकल कॉलेजची श्वेत पत्रिका काढली पाहिजे कारण तेथे रुग्णांना योग्य सुविधा मिळत नाहीत.राणे यांनी आणखी धक्कादायक माहिती देत सांगितले की, सिंधुदुर्ग येथील सरकारी रुग्णालयातून रुग्णांना थेट गोव्यात जाऊन उपचार करा असे सांगितले जाते. हे सांगणे म्हणजे स्वत:च्या राज्यातील सरकारी रुग्णालयाच्या अक्षमतेची कबुली देणे असल्याचे त्यांनी नमूद केले.https://prahaar.in/2025/07/03/stop-crying-before-entering-the-field-if-you-have-the-courage-come-to-the-election-arena-like-a-real-man/सर्वात गंभीर मुद्दा मांडताना राणे यांनी सांगितले की, सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी पुरेसे डॉक्टर नाहीत. या परिस्थितीची गंभीरता दाखवत त्यांनी थेट प्रश्न केला, या परिस्थितीत आपण डॉक्टर तयार करणार आहोत की कंपाऊंडर बाहेर काढणार आहोत?राणे यांच्या या टीकेचा मुद्दा असा आहे की मेडिकल कॉलेजमध्ये योग्य शिक्षण मिळत नसल्यामुळे तेथील विद्यार्थी दर्जेदार डॉक्टर बनू शकणार नाहीत. याचा परिणाम राज्यातील संपूर्ण आरोग्य सेवेवर होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.त्यांनी मांडलेल्या मुद्द्यांमध्ये सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेजमधील प्राध्यापक टंचाई, अत्याधुनिक उपकरणांचा अभाव, प्रयोगशाळांची कमतरता आणि रुग्णालयातील दर्जेहीन सेवा यांचा समावेश आहे. या सर्व समस्यांमुळे मेडिकल शिक्षणाचा दर्जा घसरत असल्याचे त्यांनी सांगितले.या गंभीर आरोपांना उत्तर देताना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले की, राज्य सरकार गरीब आणि सामान्य घरातील मुलांना शिक्षण दर्जेदार करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. त्यांनी या समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले.मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले, सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेजमधील समस्यांची गंभीरता लक्षात घेऊन मी स्वत: तेथे जाऊन सरकारी रुग्णालयाची पाहणी करणार आहे. सर्व कमतरता दूर करण्यासाठी तातडीने कारवाई केली जाईल.त्यांनी पुढे सांगितले की, रुग्णसेवेच्या दर्जात सुधारणा करण्यासाठी सर्वसमावेशक योजना आखली जाईल.मंत्री यांनी आश्वासन दिले की सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेजला राज्यातील इतर मेडिकल कॉलेजांच्या बरोबरीने आणण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना केल्या जातील. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे आणि स्थानिक रुग्णांना उत्तम सेवा मिळावी यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले.
बिहारमध्ये ‘आप’स्वबळावरच! ; “आता कोणाशीही युती नाही”म्हणत केजरीवालांची घोषणा
Aam Aadmi Party in Bihar Election। आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी बिहार विधानसभा निवडणुकीविषयी आज मोठी घोषणा केली आहे, अरविंद केजरीवाल यांनी त्यांचा पक्ष बिहार विधानसभा निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी काँग्रेससोबत किंवा अन्य कोणासोबतही कोणत्याही प्रकारची युती केली जाणार नाही.” असेही स्पष्ट केले आहे. येत्या काही महिन्यांत बिहारमध्ये […] The post बिहारमध्ये ‘आप’ स्वबळावरच! ; “आता कोणाशीही युती नाही” म्हणत केजरीवालांची घोषणा appeared first on Dainik Prabhat .
सरकारी महिला कर्मचारी लाडकी बहीण योजनेस अपात्र
मुंबई : सरकारी महिला कर्मचारी लाडकी बहीण योजनेस अपात्र ठरणार आहेत. ज्या सरकारी महिला कर्मचारी आधी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत होत्या, त्यांना यापुढे सरकारी योजनेचा लाभ मिळणार नाही. राज्यातील दोन हजार २८९ सरकारी महिला कर्मचारी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याचे आढळले आहे. या सरकारी महिला कर्मचाऱ्यांना यापुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. ही माहिती महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे.विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला आलेल्या एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी सरकारी महिला कर्मचारी लाडकी बहीण योजनेस अपात्र असल्याचे सांगितले.
तेजस्वीसाठी अनुष्काला सोडलं? ट्रोल करणाऱ्यांना करण कुंद्राचे सडेतोड उत्तर
Karan Kundra | अभिनेता करण कुंद्रा वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत आला आहे. अनुषा दांडेकरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर तो गेल्या काही वर्षांपासून तेजस्वी प्रकाशला डेट करत आहे. करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश ‘बिग बॉस’मध्ये एकत्र झळकले होते. तिथेच त्यांचे सूर जुळले आणि तेव्हापासून ते रिलेशनशिपमध्ये आहेत. मात्र त्यांच्याही ब्रेकअपच्या चर्चा मध्यंतरी रंगल्या होत्या. इतकेच काय तर तेजस्वीसाठी […] The post तेजस्वीसाठी अनुष्काला सोडलं? ट्रोल करणाऱ्यांना करण कुंद्राचे सडेतोड उत्तर appeared first on Dainik Prabhat .
पुणे : कोंढव्यातील एका उच्चभ्रु सोसायटीतील सदनिकेत शिरलेल्या एकाने संगणक अभियंता तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना बुधवारी सायंकाळी घडली आहे. कुरिअर कंपनीतील कामगार असल्याची बतावणी करुन आरोपी सदनिकेत शिरल्याचे उघडकीस आले असून, पसार झालेल्या आरोपीचा मागा काढण्यात येत आहे. याबाबत एका २५ वर्षीय तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार एका तरुणाविरुद्ध […] The post Pune Crime News : पुण्यात चाललयं तरी काय? तोंडावर स्पे मारून तरुणीवर बलात्कार; कोंढव्यातील धक्कादायक घटना appeared first on Dainik Prabhat .
उरुळी कांचन येथे रस्त्यावर उभ्या असलेल्या सहा जणांना पिकअपची जोरदार धडक; दोघांचा मृत्यू, चोघे गंभीर
उरुळी कांचन: पुणे- सोलापूर महामार्गावर वाहनाची वाट पाहत बसलेल्या सहा जणांना एका भरधाव पिकअप चालकाने जोरदार धडक दिली. या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर चौघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. बुधवारी (ता. 02) रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील तळवडी चौकात हा अपघात झाला. या अपघातात अशोक भीमराव […] The post उरुळी कांचन येथे रस्त्यावर उभ्या असलेल्या सहा जणांना पिकअपची जोरदार धडक; दोघांचा मृत्यू, चोघे गंभीर appeared first on Dainik Prabhat .
पाकिस्तानी सेलिब्रेटींच्या इन्स्टा अकाउंटवर भारतात बंदी
नवी दिल्ली : पाकिस्तानी सेलिब्रेटींच्या इन्स्टा अकाउंटवर भारतात बंदी लागू करण्यात आली आहे. भारत सरकारने निर्देश दिल्यानंतर इन्स्टाग्रामने पाकिस्तानी सेलिब्रेटींच्या इन्स्टा अकाउंट भारतात दिसणार नाही, अशी व्यवस्था केली आहे. फवाद खान, माहिरा खान, मावरा होकेन, हानिया आमिर अशा एकूण २४ पाकिस्तानी सेलिब्रेटींची इन्स्टा अकाउंट भारतात ब्लॉक करण्यात आली आहेत.पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी २२ एप्रिल २०२५ रोजी भारतात पहलगाम येथे अतिरेकी हल्ला केला होता. या घटनेनंतर भारत - पाकिस्तान दरम्यान तणाव निर्माण झाला. भारत सरकारने पाकिस्तानमधून हाताळली जाणारी तसेच पाकिस्तानच्या नागरिकांची अशी अनेक सोशल मीडिया अकाउंट, यू ट्युब चॅनल ब्लॉक करण्याचा निर्णय घेतला. ऑपरेशन सिंदूरनंतर भारत सरकारने बंदी घातलेल्या पाकिस्तानी कलाकारांच्या सोशल मीडिया अकाउंट्सच्या संख्येत वाढ झाली. पण मागील काही तासांपासून निवडक पाकिस्तानी सेलिब्रेटींची इन्स्टा अकाउंट भारतात दिसण्यास सुरुवात झाली होती. हा प्रकार लक्षात येताच तातडीने कारवाई करुन भारत सरकारने २४ पाकिस्तानी सेलिब्रेटींची इन्स्टा अकाउंट भारतात पुन्हा ब्लॉक केली.देशाच्या सुरक्षिततेसाठी तसेच अपप्रचाराला खीळ घालण्यासाठी भारताने पाकिस्तानी सेलिब्रेटींच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर देशात बंदी घातली आहे. सरदारजी ३ या सिनेमात एका पाकिस्तानी अभिनेत्रीने काम केले आहे. त्यामुळे हा सिनेमा प्रदर्शित करण्यास भारत सरकारने परवानगी नाकारली आहे.
“काळजाचा तुकडा हिरावला….”शेफालीच्या शोक सभेत पित्याला अश्रू अनावर; परागने दिला धीर, व्हिडीओ पाहा
Shefali Jariwala : ‘कांटा लगा गर्ल’ शेफाली जारीवालाच्या निधनाला आज आठवडा पूर्ण झाला आहे. २७ जूनच्या रात्री उशिरा तिचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची बातमी समोर आली होती. तिच्या निधनाच्या वृत्ताने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. शेफालीच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दुःखातून त्यांना बाहेर पडण्यासाठी शेफालीच्या मित्रपरिवाराकडून प्रार्थना केली जात आहे. बुधवारी शेफालीच्या जारीवालीसाठी […] The post “काळजाचा तुकडा हिरावला….” शेफालीच्या शोक सभेत पित्याला अश्रू अनावर; परागने दिला धीर, व्हिडीओ पाहा appeared first on Dainik Prabhat .
Rahul Gandhi | राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न गंभीर होताना दिसत आहे. नुकतेच राज्यात जानेवारी ते मार्च महिन्याच्या कालावधीत तब्बल ७६७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी विधान परिषदेत लेखी उत्तरात दिली आहे. यावर आता राहुल गांधी यांनी ट्वीट करत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. राहुल गांधींचे ट्वीट “विचार करा… अवघ्या […] The post “कोट्यावधीशांचे कर्ज माफ, पण शेतकरी दुर्लक्षितच”; महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्याबाबत राहुल गांधींचे ट्वीट appeared first on Dainik Prabhat .
Swami Avimukteswarananda Saraswati। शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराज यांनी देखील ‘धर्मनिरपेक्ष’ या शब्दाबद्दल एक मोठे विधान केले आहे. त्यांनी धर्मनिरपेक्ष हा शब्द मूळतः भारतीय संविधानात समाविष्ट नव्हता, परंतु नंतर जोडला गेला.” असे म्हटले आहे. त्यांचे हे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सरकार्यवाह दत्तात्रेय होसाबळे यांनी केलेल्या विधानाला समर्थन देणारे असल्याचे दिसत आहे. शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती […] The post ‘मूळ संविधानात धर्मनिरपेक्ष शब्द नव्हता’ ; दत्तात्रेय होसाबळे यांच्या विधानाचे अविमुक्तेश्वरानंदांकडून समर्थन appeared first on Dainik Prabhat .
देसी गर्ल प्रियांका चोप्रा बॅालिवूडमध्ये कमबॅक करणार? स्वतः केला खुलासा; म्हणाली “मी लवकरच…”
Priyanka Chopra :देसी गर्ल प्रियांका चोप्रा तिच्या ‘हेड ऑफ स्टेट’ या हॅालीवूड चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन प्रियांका करत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचे विशेष स्क्रिनिंग पार पडले. प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद चित्रपटाला मिळाला आहे. अशातच एका मुलाखती दरम्यान प्रियांकाने बॅालिवूड चित्रपटांची खूप आठवण येत असल्याचे विधान केले आहे. यामुळे आता ती लवकरच […] The post देसी गर्ल प्रियांका चोप्रा बॅालिवूडमध्ये कमबॅक करणार? स्वतः केला खुलासा; म्हणाली “मी लवकरच…” appeared first on Dainik Prabhat .
अरे बापरे! पुण्यात हे चाललंय तरी काय? घरात घुसून डिलिव्हरी बॉयकडून तरुणीवर बलात्कार!
पुणे: पुणे शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. कोंढवा भागातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहणाऱ्या २५ वर्षीय तरुणीवर तिच्याच घरात घुसून एका डिलिव्हरी बॉयकडून बलात्कार करण्यात आल्याचं उघड झालं आहे. या घटनेने पुणे शहर हादरलं असून, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. विशेष म्हणजे, या नराधमाने पीडित तरुणीवर अत्याचार केल्यानंतर तिच्याच मोबाईलमधून 'सेल्फी' काढल्याची आणि 'परत येईल' असा संदेश टाईप करून ठेवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना बुधवारी रात्री साडेसातच्या सुमारास घडली. आरोपीने कोंढवा भागातील उच्चभ्रू सोसायटीमध्ये 'डिलिव्हरी बॉय' असल्याचं सांगून प्रवेश मिळवला. त्यानंतर तो एका फ्लॅटमध्ये गेला आणि पीडित तरुणीला तुमचं कुरिअर आल्याचं सांगितलं. पीडितेने ते कुरिअर आपलं नसल्याचं स्पष्ट केलं तरी, आरोपीने तिला 'सही करावी लागेल' असं सांगून सेफ्टी डोअर उघडायला लावलं.https://prahaar.in/2025/07/03/stop-crying-before-entering-the-field-if-you-have-the-courage-come-to-the-election-arena-like-a-real-man/जसजसं पीडितेने सेफ्टी डोअर उघडलं, त्याच क्षणी आरोपीने तिच्या तोंडावर स्प्रे मारला आणि त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. या अमानुष कृत्यानंतर आरोपीने पीडितेच्याच मोबाईलने स्वतःसोबत सेल्फी काढले आणि 'परत येईल' असा मेसेज टाईप करून ठेवला.घटनेची माहिती मिळताच पुणे पोलिसांमध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांनी पाच पथके तात्काळ रवाना केली आहेत. या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
“तर राज ठाकरे शिवसेनेचे प्रमुख होतील आणि उद्धव…”; नारायण राणे नेमकं काय म्हणाले?
Narayan Rane | विधिमंडळाचे अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदी सक्ती निर्णयाचा जीआर रद्द करत असल्याचे जाहीर केले. यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे हे दोन्ही नेते विजय मेळाव्यात एकत्र पाहायला मिळणार आहे. ५ जुलै रोजी होणाऱ्या कार्यक्रमासाठी ठाकरे गटासह मनसेकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे बंधूंच्या एकत्रित येण्याच्या […] The post “तर राज ठाकरे शिवसेनेचे प्रमुख होतील आणि उद्धव…”; नारायण राणे नेमकं काय म्हणाले? appeared first on Dainik Prabhat .
नाशिकमध्ये ठाकरे गटाला पुन्हा धक्का! चार दिवसांपूर्वीचा 'महानगरप्रमुख'ही भाजपाने फोडला
नाशिक: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतशी महाविकास आघाडीला गळती लागण्याचे सत्र सुरूच आहे. नाशिकमध्ये तर भाजपाने ठाकरे गटाला अक्षरशः सुरुंग लावला आहे. काही दिवसांपूर्वीच सुधाकर बडगुजर आणि माजी मंत्री बबनराव घोलप यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर, आता ठाकरे गटाचे आणखी एक मोठे नाव भाजपच्या गोटात दाखल होणार आहे.मोठी बातमी अशी की, अवघ्या चार दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरेंनी महानगरप्रमुखपदाची जबाबदारी दिलेले मामा राजवाडे हे आता भाजपाचा झेंडा हाती घेणार आहेत. ठाकरे गटाला हा प्रचंड मोठा धक्का मानला जातोय.https://prahaar.in/2025/07/03/stop-crying-before-entering-the-field-if-you-have-the-courage-come-to-the-election-arena-like-a-real-man/विलास शिंदे यांनी पक्ष सोडल्यानंतर, उद्धव ठाकरेंनी मामा राजवाडे यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना महानगरप्रमुखपद दिलं होतं. मात्र, पदभार स्वीकारल्याच्या दुसऱ्याच दिवशी एका मारहाण प्रकरणात राजवाडे आणि सुनील बागूल यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांच्या कारवाईपासून वाचण्यासाठी ते दोघेही फरार झाले होते.आता हेच राजवाडे भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्यासोबत ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका सीमा ताजणे, कमलेश बोडके, प्रशांत दिवे हे देखील आजच भाजपामध्ये दाखल होणार असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, शरद पवार गटाचे गणेश गीते हे देखील आज भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत.मुंबईत आज पक्षप्रवेश सोहळाया पक्षप्रवेशाबाबत भाजपाने कमालीची गुप्तता पाळली होती. वरिष्ठ नेत्यांच्या अनेक बैठका झाल्यानंतर आज (गुरुवार) दुपारी मुंबईतील भाजपा मुख्यालयात पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यामुळे नाशिकमधील ठाकरे गटाला मोठा हादरा बसला असून, आगामी निवडणुकांमध्ये याचा परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे.
घाना : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ देशांच्या दौऱ्याला सुरुवात केली आहे, या दरम्यान ते ब्राझीलमध्ये होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होतील. आज मोदींनी घानाचे राष्ट्राध्यक्ष जॉन द्रमानी महामा यांची भेट घेतली. यावेळी महामा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा घानाच्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान केला. ‘द ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना’ (The Officer of The Order of the Star of Ghana ) असं या पुरस्काराचं नाव आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं प्रशासकीय नेतृत्व आणि जागतिक स्तरावर नावाजलेलं नेतृत्व याप्रीत्यर्थ हा सन्मान करण्यात आल्याचं घाना सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यांच्या भेटीदरम्यान, भारत आणि घाना यांनी द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासाठी अनेक करारांवर स्वाक्षरी केली.नरेंद्र मोदींनी काय म्हटलंय या सन्मानाबाबत?The Officer of The Order of the Star of Ghana या पुरस्काराने सन्मानित झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर यासंदर्भात सविस्तर पोस्ट केली आहे. या पोस्टबरोबर त्यांनी हा सन्मान त्यांना बहाल केला जात असतानाचे फोटोही शेअर केले आहेत. आपल्या पोस्टमध्ये मोदींनी घाना सरकार व जनतेचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.I thank the people and Government of Ghana for conferring ‘The Officer of the Order of the Star of Ghana’ upon me. This honour is dedicated to the bright future of our youth, their aspirations, our rich cultural diversity and the historical ties between India and Ghana.This… pic.twitter.com/coqwU04RZi— Narendra Modi (@narendramodi) July 2, 2025“हा पुरस्कार मला बहाल केल्याबद्दल मी घानाच्या जनतेचे व सरकारचे खूप खूप आभार मानतो. हा पुरस्कार मी दोन्ही देशांच्या तरुणाईच्या भवितव्याला, त्यांच्या महत्त्वाकांक्षांना, आपल्या समृद्ध सांस्कृतिक वैविध्याला आणि दोन्ही देशांमधील ऐतिहासिक संबंधांना अर्पण करतो. हा पुरस्करा ही एक जबाबदारीदेखील आहे. दोन्ही देशांमधील घट्ट मैत्री अधिकाधिक वृद्धिंगत करण्याची ही जबाबदारी आहे. भारत नेहमीच घानासोबत उभा राहील आणि एक मित्र आणि विकासातील भागीदार म्हणून नेहमीच घानाला मदत करत राहील”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घानाच्या सरकारला आश्वासन दिलं आहे.Global Honours Celebrate India’s Pride!PM @narendramodi conferred with Ghana’s highest state honour — The Officer of the Order of the Star of Ghana. With 24 global honours and counting, 140 crore Indians celebrate a leader who is taking India to the world.#PMModiGhanaVisit… pic.twitter.com/pJYrHqzg15— MyGovIndia (@mygovindia) July 2, 2025घाना पुरस्कार काय आहे?हा पुरस्कार घाना सरकारकडून दिला जाणारा दुसरा महत्त्वाचा राष्ट्रीय पुरस्कार आहे. ज्या व्यक्तींनी देशासाठी कोणत्याही स्वरूपात एखादी अत्यंत महत्त्वाची कामगिरी बजावली असेल, अशा नागरिकाला हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. घानाच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यामध्ये अशा पुरस्कारार्थींचा आदर-सत्कार केला जातो. वास्तविक २३ जून २००८ पर्यंत हा घानाचा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार होता. मात्र, या दिवशी ‘ग्रँड ऑर्डर ऑफ द स्टार अँड इगल्स ऑफ घाना’ हा सर्वोच्च पुरस्कार देण्यास घाना सरकारने सुरुवात केली.Fitting that PM @narendramodi has been conferred with Ghana’s national honour - the ‘Officer of the Order of the Star of Ghana’.It is a recognition of his steadfast efforts in strengthening the voice of the Global South. Also a testament to our cooperation and friendship with… pic.twitter.com/wBWgFcvO1I— Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) July 2, 2025https://prahaar.in/2025/07/03/excise-department-takes-drastic-action-on-the-backdrop-of-ashadhi-wari-more-than-14-lakh-50-thousand-worth-of-goods-seized/नरेंद्र मोदींचा ५ देशांचा दौरापंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी ५ देशांच्या दौऱ्यावर रवाना झाले. गेल्या १० वर्षांतला त्यांचा हा सर्वात मोठा दौरा असून तो तब्बल ५ आठवडे असणार आहे. घानापासून मोदींनी आपल्या या दौऱ्याला सुरुवात केली असून त्यानंतर त्रिनिदाद अँड टोबॅगो, अर्जेंटिना, ब्राझील आणि नामिबियाचा दौरा ते करणार आहेत. येत्या ६ व ७ जुलै रोजी ब्राझीलच्या रिओ दी जानेरिओ येथे होणाऱ्या ‘ब्रिक्स शिखर परिषदे’लाही पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान यावर्षीच्या प्रवासी भारतीय दिवसाच्या प्रमुख पाहुण्या असलेल्या राष्ट्रपती क्रिस्टीन कार्ला कांगालू आणि अलीकडेच दुसऱ्या कार्यकाळासाठी पदभार स्वीकारलेल्या पंतप्रधान कमला प्रसाद-बिसेसर यांची भेट घेतील. नंतर, ते ब्यूनस आयर्सला जातील, ही ५७ वर्षांत भारतीय पंतप्रधानांची अर्जेंटिनाची पहिली द्विपक्षीय भेट असेल.
'मैदानात उतरण्याआधीच रडणे सोडा, हिंम्मत असेल तर खऱ्या मर्दांसारखे निवडणुकीच्या रिंगणात या'
मंत्री आशिष शेलार यांचे उद्धव ठाकरेंना थेट आव्हानमुंबई: खऱ्या मर्दांसारखे निवडणुकीच्या रिंगणात या, मैदानात उतरण्याआधीच रडणं सोडा! अशा बोचऱ्या शब्दांत भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाला खुलं आव्हान दिलं आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका घेण्यावरून सुरू असलेल्या राजकारणात आता शेलार यांनी थेट उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलंय.◆मुंबई महापालिकेची वेळेवर निवडणूक न घेता तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच महापालिकेवर प्रशासकाची नियुक्ती केली.◆नवीन जनगणना झाली नसताना मुंबई महापालिकेची 227 ची वॉर्ड रचना बदलून मनमानी करीत 236 ची वार्ड रचना केली आणि घोळ घालून निवडणूक लांबवली.◆236 वॉर्ड रचनेचा हट्ट…— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) July 3, 2025उद्धव ठाकरेंनीच निवडणुका थांबवल्या, आता घाबरत आहेत!आशिष शेलार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, मुंबई महापालिकेची निवडणूक वेळेवर न घेता तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच महापालिकेवर प्रशासक नेमला. नवीन जनगणना नसतानाही त्यांनी २२७ ची वॉर्ड रचना बदलून मनमानी करत २३६ वॉर्डांची रचना केली. यात घोळ घालून निवडणुका लांबवल्या. २३६ वॉर्ड रचनेचा हट्ट धरून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानेच उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आणि निवडणुका रोखून धरल्या.शेलार पुढे म्हणाले, आता सर्वोच्च न्यायालयाने निवडणुका घेण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. निवडणूक आयोगानेही तयारी सुरू केली आहे. तरीही दोन निवडणुका लढल्यानंतर पुन्हा चिन्ह आणि पक्षाच्या नावाबाबत न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. यातून पुन्हा निवडणुका लांबवण्याचाच डाव दिसतोय. निवडणुकीला घाबरणारा हा पक्ष आहे, तथाकथित मर्दांच्या पक्षांचा हा कारभार आहे, असं म्हणत शेलारांनी उबाठाला टोला लगावला.https://prahaar.in/2025/07/03/excise-department-takes-drastic-action-on-the-backdrop-of-ashadhi-wari-more-than-14-lakh-50-thousand-worth-of-goods-seized/मुंबईकरांसाठी भाजपाच लढणारा पक्ष!मुंबईकरांसाठी भाजपाच लढणारा पक्ष असल्याचंही शेलार यांनी अधोरेखित केलं. त्यांनी उद्धव ठाकरे गटाला थेट आव्हान देत म्हटलं, हिंमत असेल तर खऱ्या मर्दांसारखे निवडणुकीच्या रिंगणात या!सध्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू असली तरी, वॉर्ड रचनेपासून ते चिन्ह आणि पक्ष प्रकरण याचिका न्यायालयात प्रलंबित आहेत. निवडणूक आयोगाने नोव्हेंबरमध्ये मतदानासाठी तयारी केली असली तरी, न्यायालयीन प्रक्रियेमुळे पुन्हा अडथळे येण्याची शक्यता कायम आहे.
‘भारत-पाकिस्तान डीजीएमओ यांच्यातील चर्चेनंतर युद्धबंदी…’ ; जयशंकर यांचे ट्रम्प यांना थेट प्रत्युत्तर
India Pakistan Ceasefire। भारत आणि पाकिस्तानमधील संघर्षादरम्यान आपण युद्धबंदी पूर्ण केल्याचा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वारंवार केलेला दाव्यावर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी भारताची भूमिका पुन्हा स्पष्ट केली आहे. जयशंकर यांनी, “भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदी दोन्ही देशांच्या डीजीएमओंमधील चर्चेनंतर झाली आणि कोणत्याही व्यापार कराराची त्यात कोणतीही भूमिका नव्हती.” असे म्हणत ट्रम्प यांना थेट उत्तर […] The post ‘भारत-पाकिस्तान डीजीएमओ यांच्यातील चर्चेनंतर युद्धबंदी…’ ; जयशंकर यांचे ट्रम्प यांना थेट प्रत्युत्तर appeared first on Dainik Prabhat .
रक्तदानाच्या माध्यमातून स्टेट बँकेचा वर्धापन दिन साजरा; शिरोलीतर्फे आळे शाखेचा स्तुत्य उपक्रम
ओझर : भारतीय स्टेट बँकेचा ७० वा वर्धापन दिन शिरोली तर्फे आळे शाखेकडून सामाजिक बांधिलकी जोपासत अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. बँकेच्या शिरोली तर्फे आळे शाखे कडून आयोजित या उपक्रमात ७० रक्तदात्यांनी रक्तदान करून बँकेच्या सामाजिक जबाबदारीला साथ दिली. २१९ वर्षांचा प्रदीर्घ इतिहास लाभलेल्या आणि देशाची आर्थिक रक्तवाहिनी समजल्या जाणाऱ्या भारतीय स्टेट बँकेने समाजाप्रती आपली […] The post रक्तदानाच्या माध्यमातून स्टेट बँकेचा वर्धापन दिन साजरा; शिरोलीतर्फे आळे शाखेचा स्तुत्य उपक्रम appeared first on Dainik Prabhat .
Sanjay Raut :पीआर मॅनेजर दिशा सालियन मृत्यू प्रकरणाने राज्यासह देशात मोठी खळबळ उडवून दिली होती. दिशाच्या मृत्यूप्रकरणात अनेक आरोप करण्यात आले होते. तिची हत्या झाल्याचा व तिच्यावर अत्याचार झाल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र, तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला किंवा तिची हत्या झाली हे कोणत्याही वैद्यकीय आणि वैज्ञानिक पुराव्यांतून सिद्ध झालेले नाही. तसेच दिशाच्या मृत्यूप्रकरणात केलेले […] The post दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंना दिलासा! संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले ” थोडीशी तरी नैतिकता असेल तर…” appeared first on Dainik Prabhat .
रविंद्र नाट्य मंदिर मध्ये 'एक तिची गोष्ट'नाटकाचा पहिल्या प्रयोगच शानदार सादरीकरण ...
'एक तिची गोष्ट' नृत्यनाट्याचा शानदार प्रिमियर सोहळा रविंद्र नाट्य मंदिर येथे नुकताच संपन्न झाला. सिनेनाट्य, राजकारण, साहित्य, उद्योग व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर यावेळी आवर्जून उपस्थित होते.'मधुसूदन कालेलकर प्रोडक्शन्स' या निर्मिती संस्थेने, 'थिएटरऑन एंटरटेनमेंट' आणि 'पी एस डी जी स्टुडिओज प्रोडक्शन' यांच्या साथीने ‘एक तिची गोष्ट’ हे नाटक रंगमंचावर आणल आहे. ज्येष्ठ लेखक कै.मधुसूदन कालेलकर यांचा वारसा समर्थपणे पुढे नेत गौरी कालेलकर-चौधरी आणि सिद्धेश चौधरी यांनी 'मधुसूदन कालेलकर प्रोडक्शन्स' या निर्मिती संस्थेची स्थापना केली.संस्थेचे सदस्य परी तेलंग आणि शंतनू तेंडुलकर ह्यांच सहकार्य यासाठी लाभलं.या सृजनशील कलाकृतीचे खास आकर्षण म्हणजे सुप्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका फुलवा खामकर आणि त्यांची मुलगी आस्मा खामकर यांच्या संगीत, अभिनय, नृत्याची बहारदार अदाकारी रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. या दोघींसोबत अभिनेता ओंकार गोखले या नाटकात आहे.या नाटकाच लेखन अभिनेता विराजस कुलकर्णीने केलं आहे. सूरज पारसनीस, विराजस कुलकर्णी यांनी दिग्दर्शन केले आहे.'एक तिची गोष्ट' या नावावरूनच हे नाटक काहीतरी निराळं असणार याची कल्पना येत असली तरी त्याचे सादरीकरण नक्कीच वैशिष्ट्यपूर्ण ठरलं आहे. 'एक तिची गोष्ट' च्या संपूर्ण टीमचं सध्या नाट्यरसिकांकडून कौतुक होत आहे. अचाट, अफाट उर्जा असलेल्या या नाटकाचा हा रंग उत्तरोत्तर असाच चढेल असं वाटत आहे.आर्या आंबेकर, वैशाली सामंत, ऋषिकेश रानडे यांनी यातील गाणी स्वरबद्ध केली आहेत. संगीत निषाद गोलांब्रे याच आहे. चाळीशीतली अनया आणि तिच्या आयुष्यात आलेली एक किशोरवयीन मुलगी या दोघींच्या भावविश्वातून या नृत्यनाटिकेची कथा उलगडते.
सोलापूर: पंढरपूरची आषाढी वारी काही दिवसांवर आली असताना, राज्य उत्पादन शुल्क विभागाने सोलापूर जिल्ह्यात अवैध दारूविक्री आणि निर्मितीवर जोरदार कारवाईचा बडगा उगारला आहे. या धडक मोहिमेत तब्बल १४ लाख ४५ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वारकरी सांप्रदायाची शिस्त आणि पावित्र्य राखण्यासाठी ही कारवाई अत्यंत महत्त्वाची ठरत आहे.राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील पथकांनी अवैध हातभट्टी निर्मिती केंद्रे, अवैध देशी-विदेशी मद्य विक्री, वाहतूक आणि बेकायदेशीर धाब्यांवर लक्ष केंद्रित केले होते. विभागीय उपायुक्त सागर धोमकर आणि अधीक्षक भाग्यश्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली.नेमके काय जप्त झाले?या कारवाईत एकूण १५ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. यात ९५५० लिटर रसायन, २३५ लिटर हातभट्टी दारू, १९४.२२ लिटर देशी मद्य, ३०.२४ लिटर विदेशी मद्य, ७८ लिटर बिअर आणि एक चारचाकी वाहनाचा समावेश आहे. या सर्व जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत १४ लाख ४५ हजार ४०० रुपये इतकी आहे.गेल्या एका महिन्यात २२९ गुन्हे दाखल!केवळ आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवरच नाही, तर १ जून ते ३० जून २०२५ या कालावधीतही सोलापूर शहर आणि जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने सातत्याने कारवाई केली आहे. या एका महिन्यात एकूण २२९ गुन्हे नोंदवून २१४ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.या मोठ्या मोहिमेत ६५,५५० लिटर रसायन, ५७९३ लिटर हातभट्टी दारू, ४९९ लिटर देशी मद्य, १२८ लिटर विदेशी मद्य, १०२.३२ लिटर बिअर, २४६७ लिटर ताडी, १२६० लिटर गोव्यातील बनावट विदेशी मद्य आणि २७ वाहने जप्त करण्यात आली आहेत. या सर्व जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत १ कोटी ३ लाख ३७ हजार २३८ रुपये इतकी आहे.याशिवाय, अवैध मद्यविक्री आणि मद्य पिण्यास परवानगी देणाऱ्या २७ धाब्यांवरही गुन्हे नोंदवून कारवाई करण्यात आली आहे.अवैध मद्यविक्री, निर्मिती आणि वाहतुकीविरोधातील ही कारवाई यापुढेही सुरूच राहणार असल्याची माहिती अधीक्षक भाग्यश्री जाधव यांनी दिली आहे. तुम्हाला कुठेही अवैध मद्याची माहिती मिळाल्यास, टोल फ्री क्रमांक १८००२३३९९९९ किंवा व्हॉट्सॲप क्रमांक ८४२२००११३३ वर संपर्क साधून माहिती देऊ शकता. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल, असेही विभागाने स्पष्ट केले आहे.
सोन्याच्या किमतीत मोठी वाढ ; पहा दिल्लीपासून मुंबई पर्यंतच्या नवीन किमती किती ?
Gold Price। सोने आणि चांदीच्या किमतीत सतत चढ-उतार होत आहेत. आज पुन्हा एकदा सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. आज दिवसाच्या सुरुवातीला २४ कॅरेट सोने ९८,९०० रुपये प्रति १० ग्रॅमवर व्यवहार करत आहे. एक दिवस आधी त्याचा दर ९८४१० रुपये होता. तर आज २२ कॅरेट सोने ९०६६० रुपये आणि १८ कॅरेट सोने ७४१८० रुपये प्रति १० […] The post सोन्याच्या किमतीत मोठी वाढ ; पहा दिल्लीपासून मुंबई पर्यंतच्या नवीन किमती किती ? appeared first on Dainik Prabhat .
“…डोक्यात हवा गेली होती”; निलेश साबळेला राशीचक्रकार शरद उपाध्येंनी सुनावले खडेबोल
Sharad Upadhye On Nilesh Sable | ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमात निलेश साबळे याने सूत्रसंचालनाची धुरा सांभाळली होती. मात्र 10 वर्षे या कार्यक्रमात सूत्रसंचालन करणाऱ्या निलेशचा ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाच्या नवा सीझनमध्ये पत्ता कट करण्यात आला आहे. निलेशच्या जागी अभिनेता अभिजीत खांडकेकर ‘चला हवा येऊ द्या’चा नवा होस्ट असेल असं म्हटलं जात आहे. याच […] The post “…डोक्यात हवा गेली होती”; निलेश साबळेला राशीचक्रकार शरद उपाध्येंनी सुनावले खडेबोल appeared first on Dainik Prabhat .
मोहित सोमण, BSE : आज सकाळच्या सत्रात सुरूवातीलाच इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात तेजीचे व अस्थिरतेचे लोण कायम दिसत आहे. सकाळीच गिफ्ट निफ्टी ०.०९ अंकाने वाढत 'सपाट' (Flat) ठरल्याने बाजारातील दबाव पातळी कायम असू शकते. आज सत्र सुरू झाल्यावरच सेन्सेक्समध्ये १३५.६६ अंकांने व निफ्टीत ६.३५ अंकांने वाढ झाली आहे. मात्र वीयएक्स अस्थिरता निर्देशांक (VIX) पातळी १.८०% घसरल्याने बाजारात धोक्याची घंटा वर्तवली जात आहे.अमेरिकन बाजारातील रेसिप्रोकल (Reciprocal) टेरिफ वाढीची अंतिम मुदत ९ जुलैला संपत आहे. भारत व व्हिएतनाम यांच्यातील व्यापारी बोलणी यशस्वी झाली असली तरी अद्याप भारतीय व अमेरिकन ट्रेडिंग डीलचे घोडे अडले आहे. आतापर्यंत अमेरिकेने चीन, इंग्लंड, व्हिएतनाम यांच्याशी यशस्वीपणे बोलणी पार पाडली आहे. यामुळेच गुंतवणूकदारांना चिंता कायम आहे. किंबहुना अमेरिकन बाजारातील रोजगार डेटा (बेरोजगारी प्रमाण डेटा) जाहीर होणार आहे. याच अनुषंगाने फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात इतक्यात कपात होईल का याची नांदी निश्चित होणार असल्याने त्याचा संमिश्र परिणाम सुद्धा काल आशियाई बाजारात झाला होता.सेन्सेक्स बँक निर्देशांकात घसरण कायम राहत १७.१३ अंकाने निर्देशांकात घसरण झाली आहे तर निफ्टी बँक निर्देशांकात २.२० अंकाने वाढ झाली होती. सेन्सेक्स मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ' युटर्न ' मारत आज वाढ झाली आहे. सेन्सेक्स मिडकॅप ०.१०%, स्मॉलकॅप निर्देशांक (०.११%) वाढला आहे. निफ्टी मिडकॅप (०.२५%) व स्मॉलकॅप (०.२१%) वाढला आहे. आज बाजारातील ब्लू चिप्स कंपन्यांच्या समभागात (शेअर्स) संमिश्र प्रतिसाद अथवा दबाव राहण्याची शक्यता असली तरी मिडकॅप व स्मॉलकॅपमधील तेजी बाजारातील फंडामेंटल अजूनही अनुकूल असल्याची प्रचिती देत आहे. विशेषतः आज ऑटो, फायनांशियल सर्विसेस, बँक निर्देशांक, आयटी, टेलिकॉम, हेल्थकेअर समभागात बाजाराचा फोकस असू शकतो.निफ्टी क्षेत्रीय निर्देशांक (Nifty Sectoral Indices) यामध्ये संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. सर्वाधिक वाढ विशेषतः मिडकॅप १५० (०.३२%), स्मॉलकॅप ५० (०.३२%),ऑटो (०.८०%), मेटल (०.८१%), आयटी (०.४९%), हेल्थकेअर (०.३०%) निर्देशांकात झाली आहे. सर्वाधिक घसरण पीएसयु बँक (०.१७%), खाजगी बँक (०.०९%), मिडिया (०.१०%), कंज्युमर ड्युरेबल्स (०.१२%) समभागात झाली.भारतीय बाजारपेठा दिवसाची सुरुवात सावधपणे हे जागतिक Nykaa ची कॉर्पोरेट शेअर विक्री आणि मजबूत Q1 तिमाही निकाल प्रोव्हिजनल कमाई अपडेट यांचाही बाजारात प्रभाव पडू शकतो. त्याचा निर्देशांकात किती परिणाम होईल हे बाजाराच्या अखेरच्या सत्रातच कळू शकते.काल अमेरिकन बाजारातील डाऊ जोन्स (०.१३%), एस अँड पी ५०० (०.४७%), नासडाक (०.९४%) या तिन्ही बाजारात व्हिएतनाम डीलनंतर वाढीचे संकेत मिळत होते. युरोप बाजारात मात्र एफटीएसई (०.१२%) बाजारात घसरण झाली तर सीएससी (०.९८%), डीएक्स (DAX ०.४९%) बाजारात वाढ झाली होती. आशियाई बाजारातील गिफ्ट निफ्टी वगळता निकेयी (०.०७%), तैवान वेटेड (०.९३%), कोसपी (०.९०%),सेट कंपोझिट (०.१०%), जकार्ता कंपोझिट (०.२५%), शांघाई कंपोझिट (०.०७%) बाजारात वाढ झाली आहे.सकाळच्या सत्रात सर्वाधिक वाढ अँस्टर डीएम हेल्थ (५.१९%), कोरोमंडल इंटरनॅशनल (४.२%), विजया डायग्नोस्टिक्स (२.२९%), नाटको फार्मा (२.२३%), सीपीसीएल (२.१३%), सीबीएफसी फायनान्स (१.८५%), जिंदाल स्टील (१.६३%), गुजरात गॅस (१.३७%), मोतीलाल ओसवाल फायनान्स (१.३७%), जेल इंडिया (१.२६%),एशियन पेंटस (१.१९%), सुंदरम फायनान्स (१.०२%), हिंदुस्थान एरोनॉटिक्स (०.१९%), ओएनजीसी (१.२०%), टीव्हीएस मोटर्स (१.०८%), हिंदाल्को (०.९३%), हिरो मोटोकॉर्प (०.८३%), पीडिलाईट (०.७८%) समभागात झाली आहे.सर्वाधिक घसरण एफएसएन इ कॉमर्स (३.८७%), अव्हेन्यू सुपरमार्ट (३.५५%), रेमंड (३.३६%), भारत डायनॅमिक्स (२.९३%), टाटा पॉवर (२.२१%), कल्याण ज्वेलर्स (१.८६%), जेपी पॉवर (१.८१%), जे एम फायनांशियल (१.८१%), कोटक महिंद्रा बँक (१.७४%), इंटरग्लोब एव्हिएशन (१.०७%), चोलामंडलम फायनान्स (१.५७%), हिताची एनर्जी (१.४५%), बजाज फायनान्स (१.४१%), पंजाब नॅशनल बँक (१.४१%), क्रिसील (१.०८%), बजाज फिनसर्व्ह (०.८६%), एचडीएफसी लाईफ इन्शुरन्स (०.६७%), अदानी पॉवर (०.६३%), अदानी एंटरप्राईजेस (०.५९%), जेएसबब्लू एनर्जी (१.५७%), होंडाई मोटर्स (१.४७%), टोरंट फार्मास्युटिकल (०.९३%), वेदांता (०.३५%) समभागात झाली आहे.बाजारातील कलावर भाष्य करताना जिओजित इनव्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य गुंतवणूक रणनीतीकार डॉ वी के विजयाकुमार म्हणाले की,' निफ्टी आणखी काही काळ २५२००-२५८०० च्या श्रेणीत व्यापार करण्याची शक्यता आहे, जोपर्यंत एखादा ट्रिगर ही श्रेणी तोडत नाही. काही दिवसांत जाहीर होणाऱ्या भारत-अमेरिका व्यापार करारामुळे सकारात्मक ट्रिगर येऊ शकतो. अमेरिका-व्हिएतनाम व्यापार करार हे दर्शवितो की अमेरिकन प्रशासन शक्य तितके व्यापार करार करण्याची उत्सुकता बाळगत आहे कारण EU आणि जपानसोबत लवकरच करार होण्याची शक्यता कमी आहे.अमेरिकेतील काही अलीकडील आकडेवारीवरून रोजगारांच्या बाबतीत नकारात्मक बातम्या दिसून येतात. यामुळे अमेरिकेतून अधिक भांडवल बाहेर पडू शकते आणि डॉलर आणखी कमकुवत होऊ शकतो, जो या वर्षी आधीच १०% पेक्षा जास्त घसरला आहे. भारतासारख्या EM साठी ही चांगली बातमी आहे. परंतु आव्हान म्हणजे भारतातील कमाईची मंद वाढ आणि FY26 मध्ये केवळ माफक कमाई वाढीचे संकेत. कमकुवत सूक्ष्म आणि उच्च मूल्यांकने पाहता, बाजाराला श्रेणीच्या वरच्या टोकापासून वर येण्याच्या प्रयत्नात अडथळ्यांना तोंड द्यावे लागेल.'
न्यू जर्सीमधील विमानतळावर टेकऑफ दरम्यान मोठा अपघात; स्कायडायव्हिंग विमान कोसळले
वॉशिंग्टन डीसी : अमेरिकेतील न्यू जर्सी येथे विमान अपघात झाला आहे. दक्षिण न्यू जर्सी येथील विमानतळावर एक छोटे स्कायडायव्हिंग विमान धावपट्टीवरून घसरले. विमान जंगली भागात कोसळले.अपघातानंतर किमान १५ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अधिकाऱ्यांच्या मते सेस्ना २०८बी मॉडेलच्या विमानात १५ जण होते.अमेरिकेतील न्यू जर्सी येथे झालेल्या विमान अपघाताबाबतफेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनच्या प्रवक्त्याने सांगितले की, टेकऑफ दरम्यान. एक छोटे स्कायडायव्हिंग विमान धावपट्टीच्या शेवटी घसरले. क्रॉस कीज विमानतळावरील या अपघाताबाबतअधिकाऱ्यांनी सांगितले की, विमान जंगली भागात कोसळले. हा अपघात फिलाडेल्फियाच्या आग्नेयेस सुमारे ३३.८ किलोमीटर अंतरावर घडला.अपघातग्रस्त विमानाची हवाई दृश्यही समोर आले आहे. विमानाजवळ अनेक ढिगाऱ्यांचे तुकडे दिसत आहेत.मदत आणि बचाव कार्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या आणि इतर आपत्कालीन वाहने देखील घटनास्थळी पाठवण्यात आली आहेत. जखमींना न्यू जर्सी येथील कूपर युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, आठ जणांना कमी गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर आपत्कालीन विभागात उपचार सुरू आहेत.
दिशा सालियन मृत्यूप्रकरण: आदित्य ठाकरेंना दिलासा, मुंबई पोलिसांनी कोर्टात दिली महत्वाची माहिती
Disha Salian death case : पीआर मॅनेजर दिशा सालियन मृत्यू प्रकरणाने राज्यासह देशात मोठी खळबळ उडवून दिली होती. तिच्या मृत्यूप्रकरणात अनेक आरोप करण्यात आले होते. दिशा सालियन हिच्या वडिलांनी न्यायालयात धाव घेत तिचा मृत्यू राजकीय षडयंत्र रचून दाबून टाकण्यात आल्याचा गंभीर आरोप केला होता. दिशाचे वडील सतीश यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यांच्या याचिकेला […] The post दिशा सालियन मृत्यूप्रकरण: आदित्य ठाकरेंना दिलासा, मुंबई पोलिसांनी कोर्टात दिली महत्वाची माहिती appeared first on Dainik Prabhat .
National Herald case। नॅशनल हेराल्ड प्रकरण पुन्हा एकदा काँग्रेसच्या माजी राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या राहुल गांधी यांच्यासाठी मोठी समस्या बनू शकते. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बुधवारी दिल्लीच्या न्यायालयात सांगितले की सोनिया आणि राहुल गांधी असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड (एजेएल) कडून २००० कोटी रुपये हडप करू इच्छित होते. हे लक्षात घेण्यासारखे आहे की एजेएल […] The post “सोनिया-राहुल गांधींना AJL कडून २००० कोटी रुपये हडपायचे होते” ; नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीचे न्यायालयात निवेदन appeared first on Dainik Prabhat .
Stock Market Today। अमेरिका आणि व्हिएतनाममधील व्यापार करार आणि लवकरच भारत-अमेरिका करारामुळे आशियाई बाजारात तेजी दिसून आली, तर भारतीय बाजार आज आठवड्याच्या चौथ्या व्यापार दिवशीही तेजीत आहे. सुरुवातीच्या व्यापारादरम्यान, बीएसईवर ३० अंकांचा सेन्सेक्स २३० अंकांनी वाढला, तर एनएसईवरील निफ्टी ५० देखील २५५०० च्या वर उघडला. मात्र, आज न्याकाचा शेअर ३ टक्क्यांनी घसरत आहे. ऑटो-मेटल क्षेत्रातील […] The post अमेरिका-व्हिएतनाम व्यापार करारामुळे बाजार तेजीत ; सेन्सेक्स २३० अंकांचा तर निफ्टीनेही २५५०० चा टप्पा ओलांडला appeared first on Dainik Prabhat .
१५ जून २०२५ ची सकाळ उत्तर प्रदेशातील रामप्रकाश श्रीवास्तव यांच्यासाठी इतर दिवसांसारखी नव्हती. ते श्रद्धेने आणि उत्साहाने केदारनाथ धामला जाणार होते. यात्रेकरूंना खोऱ्यात घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरच्या यादीत त्यांचे नाव होते. ते त्यांच्या पाळीची आतुरतेने वाट पाहत होते. मग त्यांना कळले की गुप्तकाशीतील हवामान खराब झाले आहे. ज्या हेलिकॉप्टरमधून ते प्रवास करणार होते ते केदार खोऱ्यात कोसळले. चार धाम यात्रेवर गेलेले रामप्रकाश त्या दिवशी वाचले, पण त्या हेलिकॉप्टरमध्ये प्रवास करणाऱ्या ७ जणांचे नशीब इतके दयाळू नव्हते. या अपघातात पायलट आणि एका मुलासह ७ जणांचा मृत्यू झाला. या वर्षी चार धाम यात्रेच्या पहिल्या ४० दिवसांत ५ हेलिकॉप्टर अपघात झाले आहेत, ज्यामध्ये १३ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी ३ अपघात फक्त केदार खोऱ्यात झाले आहेत. हेलिकॉप्टर अपघातांच्या वाढत्या संख्येमुळे उत्तराखंडला भेट देणाऱ्या यात्रेकरूंची चिंता वाढली आहे. हेलिकॉप्टर सेवांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. अपघातांमागील खरे कारण काय आहे? हेली उड्डाणे डीजीसीएच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आणि सर्व मानकांनुसार व्यवस्थापित केली जात आहेत का? हेलिकॉप्टरने तीर्थयात्रा किती सुरक्षित आहेत? आम्ही हे प्रश्न विमान वाहतूक तज्ञ, उत्तराखंड सरकारी अधिकारी आणि पर्यावरण शास्त्रज्ञांना विचारले. वैमानिकांवर अधिक उड्डाणांचा दबाव, डीजीसीएच्या मार्गदर्शक तत्त्वांशी खेळ आणि ऑटो-रिक्षांप्रमाणे अमर्यादित प्रवाशांची वाहतूक करणे अशी अनेक कारणे समोर आली आहेत. संपूर्ण बातमी वाचा... ५ मिनिटांत हवामान बदलते, केदार खोऱ्यात विमान प्रवास करणे सर्वात धोकादायक केदारनाथला जाणारे हेलिकॉप्टर उड्डाण हे देशातील सर्वात धोकादायक विमान सेवांपैकी एक मानले जाते. यामागे अनेक कारणे आहेत. सर्वात मोठे कारण म्हणजे येथील वेगाने बदलणारे हवामान. समुद्रसपाटीपासून ३,५०० मीटर उंचीवर असलेल्या या भागात दर काही मिनिटांनी हवामान बदलत राहते. कधीकधी तेजस्वी सूर्यप्रकाश असतो, नंतर काही क्षणांत दाट धुके येते आणि अचानक मुसळधार पाऊस पडू लागतो. या परिस्थितीत उड्डाण करणे धोकादायक ठरते. १५ जून रोजी अपघातग्रस्त झालेले आर्यन एव्हिएशन हेलिकॉप्टर केदारनाथहून गुप्तकाशी सेक्टरमधील आर्यन हेलिपॅडकडे उड्डाण करत होते. या अपघातात पायलटसह ७ जणांना आपला जीव गमवावा लागला. विमान अपघात तपास ब्युरो (एएआयबी) या अपघाताची चौकशी करत आहे. प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की अपघाताच्या वेळी पायलट नियंत्रणात असतानाही हेलिकॉप्टर कशाशी तरी आदळले. विमान वाहतुकीच्या भाषेत याला CFIT म्हणजेच नियंत्रित उड्डाण भूप्रदेशात असे म्हणतात. एएआयबीशी संबंधित एका सूत्रानुसार, अपघाताच्या वेळी खोऱ्यात खूप ढग होते आणि दृश्यमानता कमी होती. अशा वेळी कोणत्याही हवाई उड्डाणाला मनाई असते, परंतु खराब हवामान असूनही त्या दिवशी हेलिकॉप्टरने उड्डाण केले. हे अपघाताचे सर्वात मोठे कारण बनले. अपघाताच्या इतर कारणांचा तपास अजूनही सुरू आहे. हेलिकॉप्टर अपघातानंतर, केंद्रीय विमान वाहतूक मंत्रालयाने चार धाम यात्रेशी संबंधित आर्यन एव्हिएशनच्या सर्व सेवा निलंबित केल्या आहेत. तसेच, ट्रान्स भारत एव्हिएशन कंपनीचे दोन वैमानिक कॅप्टन योगेश ग्रेवाल आणि कॅप्टन जितेंद्र हरजाई यांचे परवाने खराब हवामानात उड्डाण केल्यामुळे सहा महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले आहेत. मंत्रालयाने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की प्रवास करताना लोकांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड केली जाऊ शकत नाही. कोणत्याही ऑपरेटरने हवामानाशी संबंधित आणि इतर प्रोटोकॉलचे उल्लंघन करून उड्डाणे चालवू नयेत. डीजीसीएच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केले जात आहे, हेलिकॉप्टर अंदाधुंदपणे उडवले जात आहेतचार धाम यात्रेत, केदारनाथ धाम यात्रेत सर्वाधिक हवाई वाहतूक भार असतो. येथे 9 विमान कंपन्या गुप्तकाशी, फाटा, सिरसी आणि सहस्त्रधारा सारख्या ठिकाणांहून हेलिकॉप्टर सेवा देतात. या सर्व कंपन्यांकडे हेलिकॉप्टर उड्डाणांसाठी निश्चित मार्ग आहेत, परंतु बहुतेक हेलिकॉप्टर इंधन आणि वेळ वाचवण्यासाठी निर्धारित उंचीपेक्षा कमी उड्डाण करतात. रुद्रप्रयाग प्रदेशाचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नंदन सिंह राजवार यांचे मत आहे की हवाई अपघातांचे कारण हेलिकॉप्टर ऑपरेटर्सची मनमानी आहे. ते म्हणतात, 'केदारनाथ-बद्रीनाथ सारख्या उंच हिमालयीन प्रदेशात हवामान काही मिनिटांत बदलू शकते. या दऱ्या उंच पर्वतांनी वेढलेल्या आहेत. येथे उड्डाण आणि उतरण्यासाठी जागा खूपच मर्यादित आहे.' थोडीशी चूकही मोठी दुर्घटना घडवू शकते. अशा परिस्थितीत उड्डाण करणे अत्यंत आव्हानात्मक बनते, विशेषतः जेव्हा हेलिकॉप्टर सिंगल इंजिन असतात. 'बहुतेक हेलिकॉप्टर कंपन्या चार धाम यात्रेसाठी सिंगल इंजिन हेलिकॉप्टर वापरत आहेत. हे हलके आहेत आणि उच्च वेगाने उड्डाण करण्यास सक्षम आहेत. साधारणपणे, गुप्तकाशी किंवा फाटा येथून केदारनाथ हेलिपॅडवर पोहोचण्यासाठी १५ ते २० मिनिटे लागतात. सिंगल इंजिन हेलिकॉप्टर हे अंतर फक्त ७ मिनिटांत पूर्ण करतात. असे करणे डीजीसीएच्या मानकांचे उल्लंघन आहे.' डीजीसीएच्या मार्गदर्शक तत्वांनुसार, केदार खोऱ्यातील मंदाकिनी नदीच्या काठापासून फक्त ६०० मीटर उंचीवर हेलिकॉप्टर उडवण्याची परवानगी आहे. मंदिराकडे जाणारा हवाई मार्ग खूपच अरुंद आहे. येथे एका वेळी फक्त २ हेलिकॉप्टर येऊ शकतात आणि जाऊ शकतात. संध्याकाळी हेलिकॉप्टर उडणार नाहीत असाही निर्णय घेण्यात आला होता, परंतु ही मार्गदर्शक तत्वे केवळ कागदपत्रांपुरती मर्यादित आहेत. २०२२ मध्ये, या मानकांचे उल्लंघन केल्याबद्दल ३ हेली कंपन्यांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. हवाई वाहतूक नियंत्रण व्यवस्था नाही, पायलटवर उड्डाणांचा दबावऑक्टोबर २०२२ मध्ये केदारनाथ येथे झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला. याची चौकशी केल्यानंतर, AAIB ने UCADA म्हणजेच उत्तराखंड नागरी विमान वाहतूक विकास प्राधिकरणाला ATC हवाई वाहतूक नियंत्रण प्रणाली आणि विमान वाहतूक हवामान केंद्र स्थापन करण्याची शिफारस केली होती. यामुळे वैमानिकांना उड्डाणापूर्वी हवामानाशी संबंधित माहिती मिळाली असती, परंतु ३ वर्षांनंतरही AAIB ची शिफारस लागू करण्यात आली नाही. विमान वाहतूक तज्ज्ञ कॅप्टन मोहन रंगनाथ म्हणतात, 'उत्तराखंडच्या बहुतेक खोऱ्यांमध्ये ढग खूप खाली येतात, जे केवळ हेलिकॉप्टरसाठीच नाही तर कोणत्याही प्रकारच्या उड्डाणासाठी धोकादायक आहे. अशा परिस्थिती टाळण्यासाठी, एटीसी आणि उच्च-तंत्रज्ञान नेव्हिगेशन सिस्टम असणे खूप महत्वाचे आहे, परंतु उत्तराखंडमध्ये त्याचा अभाव आहे.' 'व्हीएफआर म्हणजेच व्हिज्युअल फ्लाइंग नियमानुसार, जर त्या भागात दाट ढग असतील आणि पायलटला ५ किमी पर्यंत स्पष्ट दिसत नसेल, तर त्या स्थितीत उड्डाण करण्याची परवानगी देऊ नये.' ७ जून रोजी सिरसीहून केदारनाथला जात असताना एक हेलिकॉप्टर कोसळले. सर्व प्रवासी बचावले, परंतु वैमानिक जखमी झाला. अपघातानंतर डीजीसीएने उत्तराखंडमध्ये नवीन नियम लागू केले आणि काही वैमानिकांचे परवाने निलंबित केले. तसेच, वैमानिकांवरील उड्डाणाचा ताण कमी करण्यासाठी, चार धाम मार्गावर प्रति तास फक्त 9 उड्डाणांची मर्यादा निश्चित करण्यात आली. यामध्ये सिरसी हेलिपॅडवरून 4, फाटा येथून 3 आणि गुप्तकाशी येथून 2 उड्डाणे ठेवण्यात आली. यामुळे, एकूण दैनंदिन उड्डाणांची संख्या 250 वरून 150 वर आली आहे. नियम बनवले गेले, पण ते फक्त कागदावरचदेशभरात शटल सेवा देणाऱ्या सर्व खाजगी हेलिकॉप्टर ऑपरेटर्सना डीजीसीए उड्डाण परवाने जारी करते. यामध्ये माता वैष्णोदेवी तीर्थ मंडळाकडून बद्री-केदार मंदिर समितीपर्यंतच्या शटल सेवांचा समावेश आहे. एव्हिएशन नियम १९३६-३७ नुसार, कोणत्याही वैमानिकाला उड्डाण परवाना देण्यापूर्वी, डीजीसीए त्यांच्या वेबसाइटवर त्याबद्दल माहिती देते. नियमानुसार, वैमानिकाचे वय किमान १७ वर्षे असणे आवश्यक आहे आणि तो दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ४० तासांचा उड्डाणाचा अनुभव देखील असावा, ज्यामध्ये १६ तासांचा एकट्याने उड्डाणाचा समावेश आहे. तसेच, निवडीसाठी, लेखी परीक्षेत ६०% पेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे. कॅप्टन मोहन रंगनाथ म्हणतात, 'हेलिकॉप्टर अपघात रोखण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वैमानिकांचे चांगले प्रशिक्षण. डीजीसीएने नियम बनवले आहेत, पण ते फक्त कागदावरच मर्यादित आहेत. त्यांची अंमलबजावणी होत आहे की नाही? याची कोणालाही चिंता नाही. डीजीसीए अपघातानंतर कारवाई देखील करते. फक्त परवाना रद्द केल्याने परिस्थिती बदलणार नाही. हेलिकॉप्टर ऑपरेटर आणि अपघातांना जबाबदार असलेल्या लोकांना तुरुंगात पाठवले पाहिजे.' ऑटो-रिक्षांसारखे असंख्य प्रवाशांना घेऊन जाताहेत हेलिकॉप्टरउत्तराखंडमधील सामाजिक कार्यकर्ते आणि सोशल डेव्हलपमेंट फॉर कम्युनिटीज फाउंडेशनचे संस्थापक अनुप नौटियाल म्हणतात, '२०१३ पासून, यावेळी चारधाम यात्रेदरम्यान आकाशात इतके मृत्यू झाले आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे हवाई वाहतुकीचा भार. उत्तराखंडमध्ये आता हेलिकॉप्टर ऑटो आणि रिक्षांप्रमाणे चालवले जात आहेत. नफा मिळविण्यासाठी, अधिक प्रवाशांना बसवले जात आहे आणि सुरक्षा तपासणीशिवाय उड्डाणे वाढवण्यात आली आहेत.' डीजीसीएचे म्हणणे आहे की हेलिकॉप्टर प्रवासादरम्यान, पायलटसह एका वेळी ३-४ पेक्षा जास्त प्रवासी प्रवास करू शकत नाहीत. मग १५ जूनच्या घटनेत ७ जणांसह का उडवण्यात आले? हे विमान वाहतूक नियमांचे उल्लंघन नाही का? 'सरकारचे लक्ष प्रवाशांच्या संख्येचा विक्रम प्रस्थापित करण्यावर आहे. जर आपण फक्त केदारनाथकडे पाहिले तर सिरसी, फाटा आणि गुप्तकाशी हेलिपॅडवरून दिवसातून ३०० ते ४०० वेळा हेलिकॉप्टर मंदिरात जातात. यामुळे वैमानिकांवरचा भार वाढतोच, शिवाय तेथील जैवमंडळावरही परिणाम होतो. म्हणूनच, सरकारचे लक्ष लोकांच्या संख्येचा विक्रम प्रस्थापित करण्यावर नसून ते मर्यादित संख्येत सुरक्षितपणे प्रवास करतील याची खात्री करण्यावर असले पाहिजे.' उत्तराखंड सरकार आणि विरोधी पक्ष काय म्हणत आहेत...मुख्यमंत्री म्हणाले- वैमानिकांची पात्रता तपासली जाईल, नवीन नियंत्रण-कमांड केंद्र बांधले जाईल१५ जून रोजी केदारनाथ येथे झालेल्या हेलिकॉप्टर अपघातानंतर, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी एक उच्चस्तरीय बैठक बोलावली. त्यात राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी, युकाडा नागरी विमान वाहतूक सचिव, डीजीसीए आणि हेलिकॉप्टर सेवांशी संबंधित एजन्सींचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत, मुख्यमंत्री धामी यांनी हेलिकॉप्टर सेवा पुन्हा सुरू करण्यापूर्वी सर्व ऑपरेटर आणि वैमानिकांवर लक्ष ठेवण्याच्या कडक सूचना दिल्या आहेत. मुख्यमंत्री धामी म्हणाले, 'चारधाम यात्रेला येणाऱ्या प्रत्येक भाविकाची सुरक्षा ही आपली जबाबदारी आहे. हे लक्षात घेऊन, सर्व हेलिकॉप्टर ऑपरेटर्सना डीजीसीएच्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, उच्च हिमालयीन प्रदेशात लोकांना दर्शनासाठी घेऊन जाणाऱ्या वैमानिकांचा अनुभव आणि पात्रता पुन्हा तपासली जाईल. अपघातांना जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई केली जाईल.' काँग्रेस: राज्य सरकारने स्वतःच्या नफ्यासाठी हेलिकॉप्टर एजन्सींना निविदा वाटल्याकाँग्रेस कार्यकारिणीचे सदस्य आणि उत्तराखंड काँग्रेसचे माजी अध्यक्ष गणेश गोडियाल म्हणतात, 'चारधाम यात्रेदरम्यान होणारे हेलिकॉप्टर अपघात हे उत्तराखंड सरकारच्या भ्रष्टाचाराचे परिणाम आहेत. हेलिकॉप्टर एजन्सींना त्यांच्या फायद्यासाठी निविदा वाटणे, त्यांना उड्डाण नियमांचे उल्लंघन करण्याची मोकळीक देणे आणि एकामागून एक होणाऱ्या अपघातांपासून धडा न घेणे. या सर्व कारणांमुळे गेल्या ४० दिवसांत ५ घटना घडल्या आहेत.' 'एकीकडे, हेलिकॉप्टर प्रवासामुळे यात्रेकरूंना धोका निर्माण होत आहे, तर दुसरीकडे, ऑल वेदर रोडवरून प्रवास करताना सुरक्षिततेची कोणतीही हमी नाही. ऑल वेदर रोडच्या नावाखाली ज्या प्रकारे कच्चे पर्वत उद्ध्वस्त केले गेले, त्यातून पैशांची फसवणूक झाली. आज त्याचेच परिणाम म्हणजे उत्तराखंडमधील लोक आणि निष्पाप यात्रेकरू आपले प्राण गमावत आहेत.' पर्यावरण शास्त्रज्ञांनी सांगितले- हेलिकॉप्टरच्या आवाजामुळे पर्वतांवर दबाव वाढलाचार धाम यात्रेत हेलिकॉप्टर सेवा किती सुरक्षित आहे? याबद्दल आम्ही उत्तराखंडचे पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ. रवी चोप्रा यांच्याशी बोललो. २०१३ च्या केदारनाथ आपत्तीनंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थापन करण्यात आलेल्या उच्चाधिकार समितीचे रवी अध्यक्ष होते. ते म्हणतात, 'चारधाम यात्रेदरम्यान, घनदाट जंगलांवरून हेलिकॉप्टरच्या हालचालींमुळे पर्वतांवर दबाव वाढत आहे. विशेषतः केदारनाथमध्ये, आवाजामुळे दरीचा समतोल बिघडत आहे. यामुळे हिमनद्या वितळत आहेत.' 'केदारनाथच्या जंगलांवरून उडणाऱ्या हेलिकॉप्टरचा मोठा आवाज येथे आढळणाऱ्या कस्तुरी मृगांसाठी हानिकारक ठरत आहे, असा इशारा वन्यजीव संस्थेने उत्तराखंड सरकारला दिला आहे. हे त्वरित थांबवावे.'
हर हर महादेव ! अमरनाथ यात्रेला सुरूवात; कडक सुरक्षा व्यवस्था तैनात
Amarnath Yatra | अमरनाथ यात्रा ३ जुलै अर्थात आजपासून सुरू झाली आहे. यात्रेनिमित्त कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात येत आहे. पहलगाम आणि बालटाल या दोन मार्गांद्वारे यात्रा होते. जम्मू-काश्मीरमधील ३८८० मीटर उंचीवर असलेल्या अमरनाथ गुहेत भगवान शंकराचे (बाबा बर्फानी) दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक सहभागी झाले आहेत. जम्मू आणि काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी बुधवारी पहाटे जम्मूहून […] The post हर हर महादेव ! अमरनाथ यात्रेला सुरूवात; कडक सुरक्षा व्यवस्था तैनात appeared first on Dainik Prabhat .
ओवैसींची योगी सरकारवर जोरदार टीका ; म्हणाले,’या लोकांनी तमाशा मांडलाय…”
Owaisi On Yogi Government। एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी कावड यात्रेवरून उत्तर प्रदेशच्या योगी सरकारवर जोरदार निशाणा साधला. त्यांनी, मुझफ्फरनगरमधील कावड यात्रा मार्गावर भोजनालये चालवणाऱ्या दुकानदारांना त्रास दिला जात असल्याचे सांगत दुकानदारांना त्यांच्या पँट काढण्यास सांगण्यात येत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. असदुद्दीन ओवैसी यांनी, “योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकार गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम […] The post ओवैसींची योगी सरकारवर जोरदार टीका ; म्हणाले,’या लोकांनी तमाशा मांडलाय…” appeared first on Dainik Prabhat .
Mama Rajwade Nashik : नाशिकमध्ये भाजपने अक्षरश: सुरुंग लावला आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजप राजकीय खेळी करत उबाठा गटाला धक्कावर धक्के देत असल्याचे पाहायला मिळत आहे. आगामी स्थानिक स्वाराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुंषगाने भाजपने चाणक्यनितीचा अवलंब केला जात आहे. अलिकडेच सुधावर बडगुजर हे भाजपवासी झाले. त्यानंतर विलास शिंदे यांनी आपल्या हाती धनुष्यबाण घेतले अशातच आता शिंदे […] The post नाशकात उबाठाला मोठा धक्का? मामा राजवाडे भाजपच्या वाटेवर? “जमवा जमव पार्टीने महाराष्ट्राची वाट लावली”: संजय राऊतांचा हल्लाबोल appeared first on Dainik Prabhat .
Donald Trump on Zohran Mamdani। अमेरिकेची राजधानी न्यूयॉर्कच्या महापौर निवडणुकीवरून सध्या अमेरिकेत राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी डेमोक्रॅटिक महापौरपदाचे उमेदवार जोहरान ममदानी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. एवढेच नाही तर त्यांनी ममदानी यांना कम्युनिस्ट वेडे आणि धोकादायक व्यक्ती म्हटले आहे. ट्रम्प यांनी,”जर ममदानी महापौर झाले तर ते न्यू यॉर्क उद्ध्वस्त करतील.”असा मोठा […] The post ‘मी या कम्युनिस्ट वेड्याला न्यूयॉर्क उद्ध्वस्त करू देणार नाही’ ; डोनाल्ड ट्रम्प यांची जोहरान ममदानींवर टीका appeared first on Dainik Prabhat .
फवाद खान, माहिरा आणि शाहीद आफ्रिदी...पाकिस्तानी सेलिब्रेटींच्या अकाऊंट्सवर २४ तासांत पुन्हा बंदी
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबध ताणले गेले. दोन्हीही देशांदरम्यान अद्यापही तणाव आहे. यातच पाकिस्तानच्या काही सेलिब्रेटीच्या सोशल मिडिया अकाऊंटवर घातलेली बंदी हटवण्यात आली होती. मात्र २४ तासांतच ही बंदी पुन्हा घालण्यात आली आहे.पाकिस्तानी सेलिब्रेटीज माहिरा खान, मावरा होकैन, युमना जैदी, हानिया आमिर आणि फवाद खानसारख्या कलाकारांच्या इन्स्टाग्राम आणि ट्विटर अकाऊंटवर गुरूवारी सकाळी बंदी घालण्यात आली. दरम्यान, अद्याप सरकारकडून यावर अधिकृत विधान आलेले नाही.दोन जुलैला सबा कमर, मावरा होकैन, शाहीद आफ्रिदी, अहद रजा मीर सारख्या पाकिस्तानी सेलिब्रेटीचजे अकाऊंट्स दिसत होते. याशिवाय हम टीव्ही, ARY डिजीटल, आणि हर पल जियो सारखे पाकिस्तानी यूट्यूब चॅनेल्सही दिसत होते. मात्र गुरूवारी सकाळी या सेलिब्रेटीजचे इन्स्टाग्राम अकाऊंट्स भारतात उपलब्ध नाहीत.पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानविरुद्ध भारताच्या ऑपरेशन सिंदूरदरम्यान पाकिस्तानच्या अनेक सेलिब्रेटीजचे सोशल मीडियावर अकाऊंट्स बंद करण्यात आले होते. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेल्सवर बंदी घातली होती.
इंडोनेशियात ६५ जणांना घेऊन निघालेली फेरीबोट उलटली
बाली : पर्यटकांच्या पसंतीचे ठिकाण असलेल्या इंडोनेशियात बालीजवळ ६५ जणांना घेऊन निघालेली फेरीबोट उलटली. या अपघातात आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला असून ४१ जण बेपत्ता आहेत. इतरांना वाचवण्यात आले आहे. बेपत्ता असलेल्यांचा शोध सुरू आहे. स्थानिक वेळेनुसार रात्री ११.२० वाजता बाली सामुद्रधुनी परिसरात दुर्दैवी घटना घडली. जावा येथून एका पर्यटनस्थळाच्या दिशेने निघालेली फेरीबोट उलटली.फेरीबोटीत ५३ प्रवासी आणि १२ क्रू सदस्य होते. जावाच्या केतापांग बंदरावरून निघाल्यानंतर बालीच्या गिलिमानुक बंदराजवळ म्हणजे सुमारे ५० किमी. अंतर पार केल्यावर फेरीबोट उलटली. प्रवासाला सुरुवात केल्यानंतर जेमतेम अर्ध्या तासात दुर्दैवी घटना घडली. एकूण नऊ छोट्या बोटींमधून बेपत्ता असलेल्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.आशिया खंडाच्या आग्नेय भागात इंडोनेशिया हा देश आहे. इंडोनेशिया हा १७ हजार लहान - मोठ्या बेटांचा समूह आहे. एका बेटावरुन दुसऱ्या बेटावर जाण्यासाठी इंडोनेशियात फेरीबोटींचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. सुरक्षा मानकांचे पालन न केल्यामुळे इंडोनेशियात अनेक बोटींचे अपघात झाले आहेत. मार्च २०२५ मध्ये बालीच्या किनाऱ्याजवळ उसळलेल्या लाटांमुळे एक बोट उलटली होती. या दुर्दैवी घटनेत एका ऑस्ट्रेलियन महिलेचा मृत्यू झाला होता.
Pune : कक्ष आहे…पण कर्मचारी आहेत कुठे?
संदीप घोडके पुणे – आईचे ऑपरेशन झाले, चार दिवस झाले; पण बिल भरता येत नाही म्हणून रुग्णालयाने डिस्चार्ज दिला नाही. दोन दिवस झाले कक्षात चकरा मारतोय… पण इथे कुणीच नाही.., अशा हतबल शब्दांत एका रुग्णाच्या नातेवाईकाने आपल्या वेदना व्यक्त केल्या. असा अनुभव मागील पंधरा दिवसांपासून अनके नागरिक पुण्यातील जुन्या जिल्हा परिषदेच्या मुख्यमंत्री सहायता निधी व […] The post Pune : कक्ष आहे… पण कर्मचारी आहेत कुठे? appeared first on Dainik Prabhat .