SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

24    C
... ...View News by News Source

अलिबाग प्रभाग दोनमधून ॲड. प्रशांत नाईक बिनविरोध

अलिबाग : अलिबाग नगर परिषद निवडणुकीत शेकाप, काँग्रेस आघाडीने विजयाचा गुलाल उधळला असून, भाजप, शिवसेना (शिंदे गट) युतीला पहिला धक्का दिला आहे. प्रभाग क्रमांक दोनमधून शेकापचे उमेदवार प्रशांत नाईक हे बिनविरोध निवडून आले आहेत.प्रशांत नाईक यांच्यासमोर निवडणुकीत नामनिर्देशन पत्र दाखल केलेले भाजपचे संतोष साळुंखे यांनी गुरुवारी (दि.२०) आपले नामनिर्देशन पत्र मागे घेतले. यानंतर शेकाप कार्यकर्त्यांनी शेतकरी भवन येथे जल्लोष करीत ॲड. प्रशांत नाईक यांचे अभिनंदन केले. अलिबाग नगर परिषदेची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. २ डिसेंबर रोजी मतदानप्रक्रिया राबविण्यात येणार आहे. नगरपरिषद निवडणुकीत शेकाप, काँग्रेस आघाडी व भाजप, शिवसेना (शिंदे गट) युती यामध्ये लढत होणार आहे. या पार्श्वभूमीवर आघाडीने युतीला पहिला धक्का देत विजयाचा गुलाल उधळला. नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवरी अर्ज मागे घेण्याची मुदत २१ नोव्हेंबरपर्यंत आहे. गुरुवारी प्रभाग क्र. २ मधील भाजपचे उमेदवार संतोष साळुंखे यांनी आपले नामनिर्देशनपत्र मागे घेतले. यामुळे आघाडीकडून नगरसेवक पदासाठी निवडणूक लढविणारे ॲड. प्रशांत नाईक हे बिनविरोध निवडून आले. बिनविरोध निवडून आल्यानंतर ॲड. प्रशांत नाईक यांचे आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अक्षया नाईक, नगरसेवक पदाच्या उमेदवार ॲड. मानसी म्हात्रे यांच्यासह इतर उमेदवार तसेच शेकाप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले.

फीड फीडबर्नर 21 Nov 2025 8:30 am

रायगडमध्ये दोन मंत्री, पाच आमदार, तीन खासदारांची प्रतिष्ठा पणाला !

नगरपालिकांच्या निवडणुकांमुळे ऐन थंडीत वातावरण तापलेसुभाष म्हात्रे अलिबाग (प्रतिनिधी) : नगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी रायगड जिल्ह्यात सुरु असून, जिल्ह्यातील दोन मंत्री, पाच आमदार आणि तीन खासदारांची या निवडणुकीसाठी प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या नगरपालिकांवर आपल्याच पक्षाचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी या नेतेमंडळींना खूपच प्रयत्न करावे लागणार आहेत. या प्रयत्नात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. सध्यातरी रायगड जिल्ह्यात ऐन थंडीत राजकीय वातावरण तापलेले असून, जस-जसा प्रचार शिगेला पोहोचणार आहे. तसे एकमेकांवर आरोपांच्या फैरी झडण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेषतः खासदार सुनील तटकरे आणि रोहयो मंत्री भरतशेठ गोगावले यांना राजकीयदृष्ट्या आपले प्राबल्य वाढविण्यासाठी या नगरपालिका निवडणुकांकडे गांभीर्याने पहावे लागत असल्याचे प्रकर्षाने दिसून येत आहे. या निवडणुकांनंतर आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका होणार असल्याने या निवडणुकीचा कठीण पेपर कोण सोडविणार याकडे रायगडकरांचे लक्ष आहे.रायगड जिल्ह्यात अलिबाग, पेण, उरण, कर्जत, माथेरान, रोहा, महाड, श्रीवर्धन, मुरुड, खोपोली या नगरपालिकांच्या निवडणुका चार वर्षांनी होत असल्याने सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांचा अंगात उत्साह संचारलेला आहे. त्यामुळे या सर्व नगरपालिकांवर कुणाची सत्ता येणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. महाडमध्ये गोगावले यांच्या विरोधात राष्ट्रवादीने भाजपसमवेत युती केली आहे. त्यामुळे महाड जिंकणे हे तटकरे आणि गोगावले यांच्यासाठी प्रतिष्ठेचे ठरणार आहे. असाच प्रकार रोहा, कर्जत, श्रीवर्धन, खोपोलीमध्येही निर्माण झालेला आहे. तेथेही राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असाच राजकीय सामना होणार असल्याने खासदार सुनिल तटकरे विरुद्ध आमदार महेंद्र थोरवे यांचा कस लागणार आहे. कर्जतला भाजपाने शिवसेनेला साथ दिली आहे, तर खोपोलीत शिवसेना, भाजप, रिपाइं एकत्र आलेले आहेत. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीने ठाकरे शिवसेना आणि शेकाप यांची मोट बांधून विकास परिवर्तन आघाडी गठीत केलेली आहे. त्यामुळे येथेही थोरवे आणि तटकरे यांना कडवी झुंज द्यावी लागणार आहे. माथेरानमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध महायुती असाच सामना होणार आहे. अलिबागमध्ये शेकाप, काँग्रेस यांची महाआघाडी आहे. त्या विरोधात शिवसेना, भाजप एकत्र आलेले आहेत. मात्र यामध्ये राष्ट्रवादीचा समावेश नाही. त्यांनी नगराध्यक्ष पदासाठी स्वतंत्र अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे येथे राष्ट्रवादी महायुतीत सहभागी झालेली नाही. उरणला भाजपने स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्या विरोधात शिवसेना आणि महाविकास आघाडीही मैदानात उतरलेली आहे. यामुळे येथे भाजपचे आमदार महेश बालदी यांना आपल्या अस्तित्वासाठी झगडावे लागणार एवढे निश्चित. रोह्यात खासदार सुनिल तटकरे यांच्या विरोधात शिवसेना उभी ठाकली आहे. अशी स्थिती श्रीवर्धन, मुरुडला देखील आहे. एकूणच महायुतीच्या सर्व आमदारांना आपापल्या मतदार संघातील नगरपालिकांवर सत्ता टिकविण्यासाठी झगडावे लागणार हे नक्की !

फीड फीडबर्नर 21 Nov 2025 8:30 am

सोसायटीच्या परवानगीविना विकासकाला मजला वाढविण्याची परवानगी

बांधकाम परवानगी रद्द करण्याची रहिवाशांची मागणीकल्याण (प्रतिनिधी) : कल्याण-डोंबिवली पालिकेचा अजब कारभार समोर आला आहे. कल्याण, प.येथील नीरज रीवेरीया शंतनू कॉ. ऑप. हौसिंग सोसायटीच्या परवानगीशिवायच पालिकेने विकासकाला या इमारतीवर आणखी एक मजला वाढविण्याची परवानगी दिली आहे. २०१७ साली सहा मजले बांधून पूर्ण झालेली इमारत अवघ्या ८ वर्षांत कमकुवत झाली. असे असताना आणखी एक मजला वाढविण्यासाठी दिलेली परवानगी रहिवाशांसाठी धोकायदायक असून बांधकाम करताना एखादी दुर्घटना घडल्यास जवाबदारी केडीएमसी घेणार का असा प्रश्न करत केडीएमसीने दिलेली बांधकाम परवानगी रद्द करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. विकासक पोलिसांचे दबाबतंत्र वापरत आहे.कल्याण, प. येथील गोदरेज हिल परिसरात ही सोसायटी आहे. २०१७ साली या इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊन तेथे लोक राहण्यास आले. आता या इमारतीला जवळपास ८ वर्षे पूर्ण झाली. इमारत कमकुवत होऊन दरवाजाच्या चौकटी निघत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. अशी परिस्थिती असताना विकासकाने आणखी एक मजला बांधण्यासाठी केडीएमसीकडे परवानगी मागितली. मात्र सोसायटीची परवानगी नसताना, सोसायटीची 'ना हरकत प्रमाणपत्र' नसतानादेखील केडीएमसीने पाचवा मजला अधिक सातवा मजला असा एक मजला वाढविण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे या रहिवाशांनी केडीएमसीच्या या अजब कारभाराबाबत आश्चर्य व्यक्त केले आहे.विशेष म्हणजे विकासकाने पाचव्या मजल्याचे यापूर्वी संपूर्ण बांधकाम केले असतानादेखील पाचव्या मजल्याची परवानगी देण्यात आली. तत्कालीन आयुक्त विजय सूर्यवंशी, नगररचनाकार सावंत यांनी जोपर्यंत सोसायटीचे ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त होत नाही तोपर्यंत बांधकाम परवानगी देणार नाही अशी मौखीक व लेखी आदेश संबंधी नस्तीमध्ये नमूद असताना केडीएमसीकडून परवानगी कशी देण्यात आली असा प्रश्न रहिवाशांनी उपस्थित केला आहे. ही सोसायटी नोंदणीकृत असतानाही विकासकाने कागदपत्रे, खोटा ना हरकत दाखला देऊन केडीएमसीची दिशाभूल केल्याचा आरोप सोसायटीच्या सचिव रेश्मा बांगर यांनी केला आहे. याबाबत केडीएमसी आयुक्तांचीदेखील या रहिवाशांनी भेट घेतली मात्र आयुक्तांनी याबाबत माहिती घेऊन सांगू असे उत्तर देत नगररचना विभागाकडे जाण्यास सांगितले. मात्र नगररचना विभाग आपल्या परवानगीवर ठाम आहे.

फीड फीडबर्नर 21 Nov 2025 8:30 am

पश्चिम आणि पूर्व द्रुतगती मार्ग ठरतो मुंबई महापालिकेसाठी पांढरा हत्ती

पुन्हा सुमारे दीडशे कोटींची निविदा मागवलीमुंबई : मुंबई महापालिकेच्या ताब्यात पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग आल्यानंतर या रस्त्यांच्या डागडुजीसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च मागील दोन ते तीन वर्षांत करण्यात आला आहे. हा खर्च करण्यात आल्यानंतर आता या दोन्ही मार्गावरील एमएसआरडीसीच्या ताब्यातील सर्व पुलांची डागडुजी करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जाणार आहे. या दोन्ही मार्गावरील एमएसआरडीसीच्या ताब्यातील पूल तसेच महत्वाच्या भागांच्या पृष्ठभागाची सुधारणा करण्यासाठी निविदा मागवण्यात आली आहे.मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात एम.एम.आर.डी.ए यांच्या ताब्यातून पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि पूर्व द्रुतगती महामार्ग हा मुंबई महापालिकेला या रस्त्याची सुधारणा करण्याच्या दृष्टिकोनातून ३ ऑक्टोबर २०२२ ला हस्तांतरित करण्यात आला. तब्बल २७.८५ किलोमीटर लांबीच्या व ४२ मीटर रुंदीचा पश्चिम द्रुतगती महामार्ग, तर १८.६ किलोमीटर असून ६० मीटर रुंद असा शीव ते मुलुंड हा पूर्व द्रुतगती महामार्ग आहे. या दोन्ही मार्गांवरील पावसाळ्यापूर्व व पावसाळ्यातील खड्डे भरण्यासाठी, खराब भागाचा विकास करण्यासाठी तसेच विविध कामांसाठी दोन्ही मार्गांसाठी एकाच ठेकेदाराची अडीच वर्षांपूर्वी निवड करण्यात आली होती.तब्बल २७. ८५ किलोमीटर लांबीच्या व ४२ मीटर रुंदीच्या पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या पावसाळ्यापूर्वीची प्रतिबंधात्मक देखभाल पावसाळ्या दरम्यान या रस्त्याची कामे पूर्ण करून वाहतूक सुरळीत राखण्याच्या दृष्टिकोनातून दोन वर्षांचा कालावधी के. आर कंट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड - कोणार्क आणि आर अँड बी या संयुक्त भागीदारीतील कंपनीची निवड केली आहे. यासाठी करांसह १३१कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी दिली होती, तर मुंबईतील मुलुंड ते शीव हा पूर्व द्रुतगती महामार्ग १८.६ किलोमीटर असून ६० मीटर रुंद आहे. पावसाळ्यात या महामार्गावर खड्डे पडू नये यासाठी मागील वर्षी दोन वर्षांकरिता के. आर. कंस्ट्रक्शन कंपनीची निवड केली. यासाठी विविध करांसह ९३ कोटी रुपये खर्च करण्यास मंजुरी दिली होती. याशिवाय दोन्ही मार्गांवर सेवा रस्त्यांवर एकूण २०० कोटींच्या खर्चाला मंजुरी देण्यास आली आहे. त्यातच आता पूर्व द्रुतगती महामार्गावरील एमएसआरडीसीच्या ताब्यातील पुलावरील सुधारणा तसेच पश्चिम द्रुतगती महामार्गावर साईट कॅरेजेसची आणि खराब झालेल्या भागाची सुधारणा करण्यासाठी निविदा मागवण्यात आली आहे. यासाठी विविध करांसह १५० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.अशाप्रकारे करण्यात आलेला आणि मंजूर झालेले कंत्राट काम :पूर्व व पश्चिम द्रुतगती मार्गावर प्रवेश नियंत्रण प्रकल्पप्रकल्प खर्च : ११२५.८८ कोटी रुपयेकंत्राटदार : आर पी एस इन्फ्राप्रोजेक्टपूर्व द्रुतगती महामार्गाची पावसाळ्यापूर्वीची डागडुजीएकूण खर्च : ९३ कोटी रुपयेकंपनी : के आर कंस्ट्रक्शनपूर्व द्रुतगती महामार्गाच्या सेवा रस्त्यांचे मास्टिकमध्ये खड्डे बुजवणे व दुरुस्तीएकूण खर्च : सुमारे ८५ कोटी रुपयेकंत्राट कंपनी : प्रीती कंस्ट्रक्शन कंपनीपूर्व द्रुतगती मार्गाची मायक्रो सरफेसिंगने सुधारणाएकूण खर्च : ४६.३१ कोटी रुपयेकंत्राट कंपनी : मारकोलाईन्स पेवमेंट टेक्नॉलॉजिसपश्चिम द्रुतगती महामार्गाची पावसाळ्यापूर्वीची डागडुजीएकूण खर्च : सुमारे १३१ कोटी रुपयेकंत्राट कंपनी : के.आर कंट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड - कोणार्क आणि आर अँड बी या संयुक्त भागीदारपावसाळ्यापूर्वी पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या सेवा रस्त्यांचे मास्टिकमध्ये खड्डे बुजवणेएकूण खर्च : सुमारे ९० कोटी रुपयेकंत्राट कंपनी : कोणार्क स्ट्रक्चरल इंजिनिअरींग प्रायव्हेट लिमिटेड

फीड फीडबर्नर 21 Nov 2025 8:10 am

राज्यातील फार्मसी अभ्यासक्रमांच्या यंदाही २५ ते ३० टक्के जागा रिक्त

मुंबई : कोरोना महामारीत फार्मसी उद्योगाला मिळालेल्या महत्त्वामुळे या क्षेत्रातील अभ्यासक्रमांची लोकप्रियता वाढली होती. हीच वेळ साधून राज्यातील संस्थांनी फार्मसी अभ्यासक्रमांसाठी मोठ्या प्रमाणात नवीन महाविद्यालये सुरू करण्यास अनुमती घेतली. फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियानेही या संस्थांच्या अर्जांना तातडीने मान्यता दिली. मात्र गेल्या चार वर्षांत राज्यात बी. फार्म आणि डी. फार्म अभ्यासक्रमांसाठी कार्यरत असलेल्या महाविद्यालयांची संख्या अल्पावधीत झपाट्याने वाढली.आता मात्र गेल्या दोन वर्षांत परिस्थिती बदलली. गेल्या दोन वर्षांत या अभ्यासक्रमांना उतरती कळा लागली असून एकूण जागांपैकी सुमारे २५ ते ३० टक्के जागा यंदाही रिक्त राहिल्या आहेत, यावरून असे स्पष्ट होते की, महाविद्यालयांची वाढलेली संख्या ही गरज नसताना निर्माण झालेला भार असल्याचेही दिसून येत आहे. चार फेऱ्यानंतर बी. फार्मसीच्या १४ हजार ६५४ जागा रिक्त राहिल्या आहेत.राज्यातील बी. फार्मसी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत चारही फेऱ्या पूर्ण झाल्यानंतरही मोठ्या प्रमाणावर जागा रिक्त राहिल्या आहेत. चौथ्या फेरीनंतर १४ हजार ४५५ जागा रिक्त आहेत. फार्मसीचे प्रवेश चालू झाल्यानंतर पहिल्या फेरीत १६ हजार ६०४, दुसऱ्या फेरीत ८ हजार ८०, तिसऱ्या फेरीत ३ हजार ५७८ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला. राज्यभरात ५३१ फार्मसी महाविद्यालयात ३१ हजार ६९६ प्रवेश झाले.राज्यात आवश्यकतेपेक्षा मोठ्या प्रमाणात फार्मसी महाविद्यालये स्थापन झाल्याने प्रवेश प्रक्रियेवर गंभीर परिणाम दिसून येत आहेत. नवीन महाविद्यालयांबद्दल विद्यार्थ्यांना पुरेशी माहिती नसल्याने अनेक संस्थांमध्ये प्रवेश घटले आहेत; तर उत्तम व गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये मात्र प्रवेशवाढ झाली आहे. यावर्षी फार्मसी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया अभियांत्रिकीच्या तुलनेत खूप उशिरा सुरू झाल्याने अनेक विद्यार्थ्यांनी इतर अभ्यासक्रमांचा पर्याय निवडला. महाविद्यालयांची अनियंत्रित वाढ आणि केंद्रीकृत प्रवेश प्रक्रियेतील विलंब यामुळे विद्यार्थी फार्मसी शिक्षणापासून दूर जात आहेत, असे एसोसिएशन ऑफ फार्मास्यूटिकल टिचर्स ऑफ इंडियाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद उमेकर यांनी सांगितले.नवीन महाविद्यालयांना दिली जाणारी परवानगी ही चिंतेची बाब असून, भविष्यात फार्मसी क्षेत्रात बेरोजगारीची समस्या गंभीर रूप धारण करू शकते. शासन, विद्यापीठ आणि तंत्रशिक्षण विभाग यांनी तातडीने हस्तक्षेप करून मागणी-पुरवठा संतुलित ठेवण्यासाठी ठोस धोरण आखणे अत्यावश्यक आहे. - प्रा. मिलिंद उमेकर, राष्ट्रीय अध्यक्ष, एसोसिएशन ऑफ फार्मास्यूटिकल टिचर्स ऑफ इंडिया

फीड फीडबर्नर 21 Nov 2025 8:10 am

४५ आयटीआयमध्ये सुसज्ज प्रयोगशाळांची उभारणी

८ हजार विद्यार्थ्यांना रोजगाराची संधीमुंबई : राज्यातल्या तरुणांना दर्जेदार रोजगाराभिमुख औद्योगिक प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगाराच्या जागतिक संधी निर्माण करण्याच्या कौशल्य विकास विभागाच्या उद्दिष्टानुसार मंत्रालयात कौशल्य, रोजगार व उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत टोयोटा किर्लोस्कर मोटार कंपनी आणि व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयामध्ये सामंजस्य करार करण्यात आला.या करारान्वये टोयोटा किर्लोस्कर मोटार कंपनी राज्यातील ४५ आयटीआय संस्थांमध्ये ( एलएमव्ही) हलकी वाहन तंत्रज्ञ अभ्यासक्रमांसाठी सुसज्ज प्रयोगशाळांची उभारणी करणार असून तेथे शिक्षकांना प्रशिक्षित करण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे ८ हजार आयटीआय विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.कौशल्य मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या मार्गदर्शनात टोयोटा-किर्लोस्कर कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष विक्रम गुलाटी आणि व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाच्या संचालिका माधवी सरदेशमुख यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्या. येत्या दोन महिन्यात कंपनीकडून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असून मार्च २६ पर्यंत पहिल्या टप्प्यात १३ प्रयोगशाळा सुरु करण्यात येणार असल्याची माहिती कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष विक्रम गुलाटी यांनी दिली, तर तीन टप्प्यात उर्वरित प्रयोगशाळा सुरु करण्यात येणार आहेत.राज्यातल्या आयटीआयच्या विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विभाग नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असून विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या दर्जेदार प्रशिक्षणामुळे रोजगाराच्या जागतिक संधी उपलब्ध होतील असा विश्वास यावेळी कौशल्य मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केला. तसेच राज्य शासनाकडे आयटीआयच्या माध्यमातून उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधा, उद्योग क्षेत्रातील ज्ञान, अनुभव या सहभागातून कुशल व रोजगारक्षम मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी उद्योग समूहांचे सहकार्य आवश्यक असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले. पुढच्या या अनुषंगाने अनेक रोजगाराभिमुख सामंजस्य करार होतील असेही त्यांनी यावेळी नमूद केले.यावेळी कौशल्य विकास विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा, व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाचे सह संचालक सतीश सूर्यवंशी, टोयोटा किर्लोस्कर कंपनीचे उपाध्यक्ष रमेश राव, कंपनीचे मानव संसाधन व्यवस्थापक भास्कर पै आणि मुख्य व्यवस्थापक रवी सोनटक्के उपस्थित होते.

फीड फीडबर्नर 21 Nov 2025 8:10 am

शौचालयांच्या देखभालीसाठी आता संस्थांची नेमणूक

मुंबईतील स्वच्छतागृह होणार चकाचक आणि दुर्गंधीमुक्तसचिन धानजी मुंबई : मुंबईतील म्हाडासह इतर ४३०९ शौचालयांची डागडुजी तसेच सुधारणा केल्यानंतर आता याची देखभाल करण्यासाठी महापालिकेच्यावतीने वस्ती पातळीवर अशासकीय संस्थांची नेमणूक केली जात आहे. यासाठी सुमार १७०० संस्थांची नेमणूक केली जाणार असून यामुळे आता स्थानिक पातळीवरील म्हाडासह इतरांच्या ताब्यातील शौचालये स्वच्छ आणि दुर्गंधीमुक्त दिसणार आहेत.मुंबईतील झोपडपट्टयांमध्ये आरसीसी पध्दतीचे तळमजला, तळ अधिक एक आणि तळ अधिक दोन मजल्यांची सामुदायिक शौचालयांची उभारणी केली जात आहे.येथे विविध ठिकाणी कंत्राटदारांमार्फत टप्पा एक ते टप्पा ११मध्ये १७४५ सामुदायिक शौचालयांची निर्मिती करण्यात आली असून यांच्या देखभालीसाठी अशासकीय संस्थांची नेमणूक करण्यात येते. मात्र स्वच्छ भारत मिशनच्या मार्गदर्शक तत्वानुसार म्हाडा व इतर सामुदायिक शौचालयांंकरता वस्ती पातळीवर अशासकीय संस्थांची नेमणूक करण्याचा करार करण्यात आला आहे. त्यानुसार म्हाडा आणि इतर सामुदायिक शौचालयांच्या दैनंदिन कामकाजासाठी व दैनंदिन देखभालीसाठी संस्थेची निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच तत्कालिन पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनीही अशाप्रकारचे निर्देश दिल्यामुळे मुंबईतील म्हाडा व इतर सामुदायिक शौचालये जी महापालिकेला हस्तांतरीत झाली आहेत, त्याच्या देखभालीसाठी अशासकीय संस्थेची नेमणूक करण्यात येत आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार म्हाडाकडून हस्तांतरीत झालेल्या ३८३० शौचालयांच्या देखभालीसाठी वस्ती पातळीवर १४७० संस्था नियुक्त केल्या केल्या जाणार आहेत. तर इतर ४७९ शौचालयांच्या देखभालीसाठी १९६ संस्थांची नेमणूक करण्यात येणार आहे. यासाठी सुमारे २३ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे त्यातील ७ कोटी २८ लाख रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात येत आहे.

फीड फीडबर्नर 21 Nov 2025 8:10 am

Pimpri : अरे बापरे! शहरातील ३२ प्रभागात ४६ हजार दुबार मतदार

नावासमोर दोन स्टार : ९२ हजारांहून अधिक नावे पिंपरी – दुबार मतदारांच्या मुद्द्यावरून विरोधकांनी राज्यात रणकंदन माजवले आहे. त्यातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहे. असे असताना पिंपरी चिंचवड शहरामध्ये तब्बल ४६ हजार ३३२ दुबार मतदार असून यादीमध्ये तब्बल ९२ हजार ६६४ नावे मतदारयादीमध्ये आली असल्याचे महापालिकेच्या निवडणूक विभागाने प्रसिद्ध केलेल्या मतदार यादीतून समोर आले […] The post Pimpri : अरे बापरे! शहरातील ३२ प्रभागात ४६ हजार दुबार मतदार appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 21 Nov 2025 8:09 am

Pimpri : या निवडणुकीत स्‍थानिकालाच प्राधान्‍य द्यायचे

गांधीनगर-खराळवाडीमधील सर्वपक्षीय इच्‍छुकांच्‍या बैठकीत निर्णय १८ वर्षांत एकही स्‍थानिक नगरसेवक नाही पिंपरी – महापालिकेच्‍या निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक ९ गांधीनगर–खराळवाडी परिसरातील (अनुसूचित जाती राखीव)सर्वपक्षीय इच्‍छुकांची तातडीची बैठक डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, भीमसृष्टी, पिंपरी चौक येथे पार पडली. बैठकीची सुरुवात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. तसेच प्रभागातील सध्याच्या राजकीय स्थितीवर तसेच […] The post Pimpri : या निवडणुकीत स्‍थानिकालाच प्राधान्‍य द्यायचे appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 21 Nov 2025 8:06 am

Pimpri : महापालिकेचे प्रभाग मिनी विधानसभा

चिखलीत सर्वाधिक ७४ हजार, थेरगावात सर्वात कमी ३४ हजार मतदार पिंपरी – शहरातील प्रभाग क्रमांक १ चिखली हा सर्वात मोठा प्रभाग असून या प्रभागामध्ये सर्वाधिक ७४ हजार ३४० मतदार आहेत. एवढ्या मतदारांपर्यंत पोहचताना उमेदवारांची पळता भुई थोडी होणार आहे. तर सर्वात कमी मतदारसंख्या ही थेरगाव गावठाण येथील प्रभाग क्रमांक २३ मध्ये आहे. या प्रभागातील उमेदवारांना […] The post Pimpri : महापालिकेचे प्रभाग मिनी विधानसभा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 21 Nov 2025 8:03 am

Pimpri : योजना महिलांपर्यंत पोहचत नाहीत

महापालिका अधिकाऱ्यांसोबतच्‍या बैठकीत दुर्गा बि्रेगडचा आक्षेप पिंपरी – महिलांच्या रोजगाराबाबत शासन पूर्णपणे अपयशी ठरले आहे. विविध योजना, सूचना संस्था पातळीपर्यंत जातात; मात्र त्या महिलांपर्यंत पोहचत नाहीत, असा आक्षेप दुर्गा ब्रिगेड संघटनेच्‍या अध्यक्षा दुर्गा भोर यांनी महापालिका अधिकाऱ्यांसोबतच्‍या आढावा बैठकीत केला. नेहरूनगर महानगरपालिका क-प्रभाग कार्यालय येथे झालेल्या आढावा बैठकीत महिलांच्या रोजगार, लघुउद्योग, स्वच्छता व मूलभूत सुविधांवर […] The post Pimpri : योजना महिलांपर्यंत पोहचत नाहीत appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 21 Nov 2025 8:01 am

Weather Update : थंडीचा जोर ओसरणार! महाराष्ट्रात ‘या’तारखांना पावसाची शक्यता; हवामान खात्याचा नवा अंदाज

प्रभात वृत्तसेवा पुणे – राज्यात पुढील २४ तासांत थंडीचा जोर कमी होऊन कोकण-गोव्यासह मध्य महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडतील. त्यानंतर कमाल व किमान तापमानात एक ते दोन अंशाने वाढ होऊन हवामान कोरडे राहील, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. दरम्यान, आज अहिल्यानगर येथे सर्वात कमी ९.४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. […] The post Weather Update : थंडीचा जोर ओसरणार! महाराष्ट्रात ‘या’ तारखांना पावसाची शक्यता; हवामान खात्याचा नवा अंदाज appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 21 Nov 2025 7:45 am

Pune News : गोव्यात जागतिक मराठी संमेलन; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते होणार उद्घाटन

प्रभात वृत्तसेवा पुणे – पणजी (गोवा) येथे ९ ते ११ जानेवारी २०२६ दरम्यान जागतिक मराठी अकादमी आयोजित ‘शोध मराठी मनाचा’ या जागतिक संमेलनाचे उद्घाटन नऊ जानेवारी २०२६ रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष असून, ‘पद्मविभूषण’ डॉ. अनिल काकोडकर हे संमेलनाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. या […] The post Pune News : गोव्यात जागतिक मराठी संमेलन; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते होणार उद्घाटन appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 21 Nov 2025 7:30 am

MHADA : स्वप्नातील घर मिळवण्याची ‘शेवटची संधी’; म्हाडा लॉटरीसाठी अर्ज करण्यास मिळाली मुदतवाढ

प्रभात वृत्तसेवा पुणे – म्हाडाने पुणे, पिंपरी- चिंचवड शहर आणि पीएमआरडीएमधील 6 हजार 168 घरांसाठी सोडत जाहीर केली होती. त्यासाठी अर्ज करण्यासाठी दि. 21 नोव्हेंबर, 2025 पर्यंत मुदत दिली होती. मात्र, तांत्रिक कारणामुळे बऱ्याच अर्जदारांनी कागदपत्रांची पडताळणीसाठी अडचणी आल्याने मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. त्यानुसार म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम मुदतवाढ दिली असून, 30 नोव्हेंबर […] The post MHADA : स्वप्नातील घर मिळवण्याची ‘शेवटची संधी’; म्हाडा लॉटरीसाठी अर्ज करण्यास मिळाली मुदतवाढ appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 21 Nov 2025 7:30 am

Naval Kishore Ram : निकृष्ट, चुकीच्या कामाला थारा नाही; महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांचा थेट इशारा

प्रभात वृत्तसेवा पुणे – महापालिका ही नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ‘मिशन मोड’वर काम केलेच पाहिजे. काम न करणाऱ्या किंवा चुकीचे काम करणाऱ्यांवर कारवाई निश्चित आहे. कितीही मोठा अधिकारी असला, तरी त्याला सूट मिळणार नाही, असा थेट इशारा महापालिका आयुक्त व प्रशासक नवलकिशोर राम यांनी गुरुवारी दिला आहे. कामात कोणी दबाव आणला किंवा […] The post Naval Kishore Ram : निकृष्ट, चुकीच्या कामाला थारा नाही; महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांचा थेट इशारा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 21 Nov 2025 7:15 am

नितीन गडकरींचे कडक आदेश! नवले पुलावरील ‘ब्लॅक स्पॉट्स’तातडीने हटवा, अपघात थांबलेच पाहिजेत

प्रभात वृत्तसेवा पुणे – पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील नवले पूल परिसरातील वाढत्या अपघातांचे प्रमाण थांबवण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने सुरू कराव्यात, असे आदेश केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दिले आहेत. ही माहिती पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली. नवले पूल परिसरातील अलीकडील भीषण अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला होता. […] The post नितीन गडकरींचे कडक आदेश! नवले पुलावरील ‘ब्लॅक स्पॉट्स’ तातडीने हटवा, अपघात थांबलेच पाहिजेत appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 21 Nov 2025 7:00 am

अग्रलेख : कुबड्या नको

जेव्हा तुम्ही स्वत:हून एखादी गोष्ट करू शकत नसाल तेव्हा कोणाची किंवा कशाची मदत घेतली जाते त्याला ‘कुबड्या’ म्हणतात. हा शब्द सर्रास सर्वत्र वापरला जातो आणि राजकीय क्षेत्रही त्याला अपवाद नाही. अलीकडच्या काळात साधारण महिनाभरापूर्वी भाजपाचे चाणक्य अमित शहा यांनी तो वापरला. आता शहांनी ‘कुबड्या’ म्हणून कोणाचा उल्लेख केला तर अर्थातच अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस […] The post अग्रलेख : कुबड्या नको appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 21 Nov 2025 6:55 am

PMC Election : पुण्यात तीन लाख दुबार मतदार! महापालिका एकाच ठिकाणी मतदानाची देणार संधी

प्रभात वृत्तसेवा पुणे – देशभरात मतदार याद्यांमधील घोळ आणि दुबार मतदारांवरून आरोप- प्रत्यारोप सुरू असतानाच पुण्यात प्रारूप मतदार यादीत सुमारे ३५ लाख ५१ हजार मतदारांपैकी तब्बल ३ लाख ४६८ दुबार मतदार शोधण्यात आले आहेत. निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार अशा दुबार मतदारांच्या नावापुढे दोन स्टार करण्यात आलेले आहेत.या मतदारांना महापालिकेचे कर्मचारी भेटून त्यांना कोणत्या तरी एकाच ठिकाणी […] The post PMC Election : पुण्यात तीन लाख दुबार मतदार! महापालिका एकाच ठिकाणी मतदानाची देणार संधी appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 21 Nov 2025 6:45 am

बाप रे! पुण्यातल्या ‘या’प्रभागात तब्बल १ लाख ६० हजार मतदार; उमेदवारांचे धाबे दणाणले

प्रभात वृत्तसेवा पुणे – जानेवारी २०२५ मध्ये होणाऱ्या पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून प्रभाग निहाय प्रारूप मतदार याद्या शुक्रवारी जाहीर करण्यात आल्या आहेत. प्रभाग रचनेत मोठ्या प्रमाणात मोडतोड झाल्यानंतर आता मतदार यादीतही मतदारांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात तफावत असून, प्रभाग क्रमांक ९ सूस- बाणेर- पाषाण १ लाख ६० हजार २४२ मतदारांसह संपूर्ण शहरातील सर्वात मोठा प्रभाग […] The post बाप रे! पुण्यातल्या ‘या’ प्रभागात तब्बल १ लाख ६० हजार मतदार; उमेदवारांचे धाबे दणाणले appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 21 Nov 2025 6:30 am

पुणेकरांना दिलासा! कडाक्याच्या थंडीचा जोर ओसरला; पाहा तुमच्या भागातील तापमान

प्रभात वृत्तसेवा पुणे – गेल्या २४ तासांत किमान तापमानात दोन ते तीन अंशांनी वाढ झाल्यामुळे शहरासह जिल्ह्यातील कडाक्याचा थंडीचा जोर कमी झाला आहे. ७ अंशांवरील थंडीचा पारा आज ९ अंशांपर्यंत आला. हवेली आणि माळीण परिसरात पारा ९, तर अन्य परिसरातील किमान तापमान १० ते ११ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले.नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवड्यात शहरासह जिल्ह्यातील किमान […] The post पुणेकरांना दिलासा! कडाक्याच्या थंडीचा जोर ओसरला; पाहा तुमच्या भागातील तापमान appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 21 Nov 2025 6:15 am

UPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘बार्टी’चा मोठा निर्णय! आता थेट मिळणार २५ हजार रुपये, असा करा अर्ज

प्रभात वृत्तसेवा पुणे – डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) तर्फे महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील यूपीएससी नागरी सेवा व्यक्तिमत्त्व चाचणी 2025 साठी पात्र ठरलेल्या उमेदवारांसाठी एकरकमी आर्थिक साहाय्य योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र उमेदवारांना बार्टीमार्फत 25 हजार रुपये एकरकमी अर्थसाहाय्य दिले जाणार असल्याची माहिती बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांनी […] The post UPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘बार्टी’चा मोठा निर्णय! आता थेट मिळणार २५ हजार रुपये, असा करा अर्ज appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 21 Nov 2025 6:00 am

पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! परीक्षांच्या वेळापत्रकात अचानक बदल, जाणून घ्या नव्या तारखा

प्रभात वृत्तसेवा पुणे – राज्‍यात नगरपालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका २ डिसेंबर रोजी होत आहे. त्‍या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाने (एमएसबीटीई) तंत्रशिक्षण अभ्यासक्रम अर्थात पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाच्या लेखी परीक्षांच्या वेळापत्रकात बदल केला आहे. त्यामुळे १ व २ डिसेंबर रोजी होणाऱ्या परीक्षा आता ४ आणि ५ डिसेंबरला होणार आहेत. निवडणुकांसाठी शैक्षणिक संस्थांच्या इमारती व वर्ग […] The post पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! परीक्षांच्या वेळापत्रकात अचानक बदल, जाणून घ्या नव्या तारखा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 21 Nov 2025 5:45 am

एकाच दिवसात दोन अपघात! सुस आणि बालेवाडीत दोन भीषण अपघात; चिमुकल्यासह महिलेने गमावला जीव

प्रभात वृत्तसेवा पिंपरी – पुनावळे येथे भरधाव डंपरने तरुणीला चिरडल्याची घटना ताजी असतानाच बावधन पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन वेगवेगळ्या अपघातात चिमुकल्यासह महिलेने जीव गमावला. बालेवाडी येथे भरधाव टेम्पोने दुचाकीला धडक दिल्याने आजोबा आणि लहान नातू गंभीर जखमी झाले तर सात वर्षीय नातवाचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर सुस येथे ट्रकने धडक दिल्याने ४४ वर्षीय महिलेचा मृत्यू […] The post एकाच दिवसात दोन अपघात! सुस आणि बालेवाडीत दोन भीषण अपघात; चिमुकल्यासह महिलेने गमावला जीव appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 21 Nov 2025 5:15 am

बारामतीत दारू पार्टीत राडा! जंगलात दोन गट भिडले; एकावर धारदार शस्त्राने वार, तिघे गजाआड

प्रभात वृत्तसेवा काटेवाडी – बारामतीजवळील वंजारवाडी परिसरातील जंगलात दारू पिताना दोन अनोळखी गटांमध्ये किरकोळ वादातून सुरुवात झालेली बाचाबाची अखेर गंभीर हाणामारीत परिवर्तित झाली. या घटनेत एकाला धारदार शस्त्राने जखम झाल्याचे समोर आले असून, बारामती तालुका पोलिसांनी अल्पावधीत गुन्ह्याचा उलगडा करून तीन आरोपींना अटक केली आहे.वनक्षेत्रात दोन्ही गट काही अंतरावर दारू पित बसलेले असताना बोलाचाली झाली. […] The post बारामतीत दारू पार्टीत राडा! जंगलात दोन गट भिडले; एकावर धारदार शस्त्राने वार, तिघे गजाआड appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 21 Nov 2025 5:00 am

बारामती नगरपालिकेत हाय व्होल्टेज ड्रामा! काही जागा बिनविरोध होणार? बंडखोरांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष

प्रभात वृत्तसेवा बारामती – बारामती नगरपरिषद निवडणुकीचा आखाडा चांगलाच रंगतदार झाला आहे. माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत कोण कोण अर्ज माघारी घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अर्ज माघारीसाठी मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत. बंडखोर उमेदवारांमुळे मतांची विभागणी होऊ नये, याकडे लक्ष देत बंडखोर उमेदवारांच्या विनवण्या सुरू आहेत. अपक्ष व बंडखोरांचा फटका कोणाला बसणार याकडे देखील लक्ष […] The post बारामती नगरपालिकेत हाय व्होल्टेज ड्रामा! काही जागा बिनविरोध होणार? बंडखोरांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 21 Nov 2025 4:45 am

Shirur News : जांबूत परिसरात दोन दिवसांत दोन बिबटे जेरबंद! वनविभागाचा ‘ट्रॅप’यशस्वी

प्रभात वृत्तसेवा जांबूत – मागील एक महिन्यापूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या शिवन्या बोंबे, भागुबाई जाधव आणि रोहन बोंबे यांच्या दुःखद घटनांनंतर वनविभागाकडून बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. रोहन बोंबे यांच्या मृत्यूनंतर अलर्ट झालेल्या वनविभागाने ४८ तासांत दोन बिबटे जेरबंद केले, तर नरभक्षक बिबट्याला ठार करण्यात यश मिळवले. बुधवारी (दि. २०) रोजी रात्री […] The post Shirur News : जांबूत परिसरात दोन दिवसांत दोन बिबटे जेरबंद! वनविभागाचा ‘ट्रॅप’ यशस्वी appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 21 Nov 2025 4:45 am

Jejuri Election : जेजुरी नगरपरिषद भ्रष्टाचार, भयमुक्त करणार; जयदीप बारभाई यांची ग्वाही

प्रभात वृत्तसेवा पुणे – जेजुरी नगरपरिषदेत 8 वर्षांपासून सत्ताधाऱ्यांनी विविध विकासकामांमध्ये केलेला भ्रष्टाचार पुराव्यानिशी दाखवून देणार आहे. सत्ताधाऱ्यांनी नगरपरिषद हे भ्रष्टाचाराचे केंद्र बनविले होते. आज सत्ताधाऱ्यांना जनता नाकारत असून जेजुरीच्या जनतेने माझी उमेदवारी जाहीर केली असून जेजुरी नगरपरिषदेच्या पारदर्शक कारभारासाठी मी कटिबद्ध आहे, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जयदीप दिलीपभाई बारभाई यांनी […] The post Jejuri Election : जेजुरी नगरपरिषद भ्रष्टाचार, भयमुक्त करणार; जयदीप बारभाई यांची ग्वाही appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 21 Nov 2025 4:30 am

Rajgurunagar : कचरा संकलन केंद्राचे काम थांबवा! मुंबई उच्च न्यायालयाचे कडक आदेश; टाकळकरवाडी ग्रामस्थांचा मोठा विजय

प्रभात वृत्तसेवा राजगुरुनगर – राजगुरुनगर नगरपरिषद प्रस्तावित कचरा संकलन केंद्रासाठी आवश्यक प्रतिज्ञापत्र सादर करण्यात विलंब झाल्याने मुंबई उच्च न्यायालयाने त्या ठिकाणी कोणतेही कायमस्वरूपी बांधकाम करण्यास मनाई केली असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते अशोक टाव्हरे यांनी दिली.टाकळकरवाडीच्या सरपंच शीतल टाकळकर, जऊळके खुर्दचे माजी सरपंच सुभाष बोर्‍हाडे, बाजार समितीचे माजी संचालक कैलास टाकळकर, प्रा. गीताराम टाकळकर आणि इतर […] The post Rajgurunagar : कचरा संकलन केंद्राचे काम थांबवा! मुंबई उच्च न्यायालयाचे कडक आदेश; टाकळकरवाडी ग्रामस्थांचा मोठा विजय appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 21 Nov 2025 4:15 am

कोकण ट्रिप ठरली शेवटची! उत्तमनगरच्या सहा मित्रांचा ताम्हिणीत करुण अंत; लोकेशन ट्रेस करत पोलीस पोहोचले तेव्हा..

प्रभात वृत्तसेवा पौड – ताम्हिणी घाट (जि. रायगड) हद्दीत पुण्यातील सहा तरुणांची थार मोटार ताम्हिणी घाटातील सुमारे 500 ते 1000 फूट खोल दरीत कोसळून भीषण दुर्घटना घडली. मध्यरात्री झालेल्या या अपघातात सर्व तरुणांचा मृत्यू झाला असून, जखमी अवस्थेत एकही जण सापडलेला नाही. दरी अतिशय खोल आणि परिसर निर्जन असल्याने अपघात रात्रीच्यावेळी कुणाच्याही लक्षात आला नाही. […] The post कोकण ट्रिप ठरली शेवटची! उत्तमनगरच्या सहा मित्रांचा ताम्हिणीत करुण अंत; लोकेशन ट्रेस करत पोलीस पोहोचले तेव्हा.. appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 21 Nov 2025 4:00 am

Manchar Election : मंचरमध्ये ८३ उमेदवार, पण लक्ष फक्त दोघींवर! कोण माघार घेणार, कोण रिंगणात राहणार?

प्रभात वृत्तसेवा मंचर – मंचर नगरपंचायत निवडणुकीत माघारीच्या प्रक्रियेला वेग आला असून दोन दिवसांत एकाच उमेदवाराने माघार घेतली आहे. प्रभाग क्र. १५ मधील अपक्ष उमेदवार रूपाली इंद्रजीत दैने यांनी आज माघार घेतली. शुक्रवार दि.२१ रोजी माघारीचा शेवटचा दिवस असल्याने अनेक जणांच्या भूमिकेकडे उत्सुकतेने पाहिले जात आहे.नगराध्यक्षपदासाठी एकूण सहा उमेदवारी अर्ज वैध ठरले असून त्यात दोन […] The post Manchar Election : मंचरमध्ये ८३ उमेदवार, पण लक्ष फक्त दोघींवर! कोण माघार घेणार, कोण रिंगणात राहणार? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 21 Nov 2025 3:30 am

पक्षश्रेष्ठींना मोठा धक्का! तिकीट नाकारताच निष्ठावंत बनले ‘बंडखोर’; मंचर नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट

प्रभात वृत्तसेवा मंचर – मंचर नगरपंचायतीच्या निवडणुकीत राजकीय रंगत चांगलीच वाढली आहे. अनेक इच्छुकांनी अपक्ष म्हणून किंवा प्रतिस्पर्धी पक्षात जाऊन उमेदवारी अर्ज भरत पक्षश्रेष्ठींनाच मोठा धक्का दिला आहे.अनपेक्षितरीत्या वाढलेल्या बंडखोरीमुळे पक्षांच्या रणनीतीत गोंधळ निर्माण झाला असून, या नाराज कार्यकर्त्यांना पुन्हा गाठीशी बांधण्यासाठी नेत्यांची चांगलीच धावपळ सुरू झाली आहे.बंडखोर उमेदवारांना पटवण्याचे प्रयत्न वाढल्याने त्यांचाही भाव चढू […] The post पक्षश्रेष्ठींना मोठा धक्का! तिकीट नाकारताच निष्ठावंत बनले ‘बंडखोर’; मंचर नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 21 Nov 2025 3:00 am

PCMC Election : महापालिकेचे प्रभाग मिनी विधानसभा; चिखलीत सर्वाधिक ७४ हजार, थेरगावात सर्वात कमी ३४ हजार मतदार

प्रभात वृत्तसेवा पिंपरी – शहरातील प्रभाग क्रमांक १ चिखली हा सर्वात मोठा प्रभाग असून या प्रभागामध्ये सर्वाधिक ७४ हजार ३४० मतदार आहेत. एवढ्या मतदारांपर्यंत पोहचताना उमेदवारांची पळता भुई थोडी होणार आहे. तर सर्वात कमी मतदारसंख्या ही थेरगाव गावठाण येथील प्रभाग क्रमांक २३ मध्ये आहे. या प्रभागातील उमेदवारांना मतदारांपर्यंत पोहचणे सहज शक्य आहे.शहरातील पिंपरी, भोसरी, चिंचवड […] The post PCMC Election : महापालिकेचे प्रभाग मिनी विधानसभा; चिखलीत सर्वाधिक ७४ हजार, थेरगावात सर्वात कमी ३४ हजार मतदार appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 21 Nov 2025 2:45 am

बिकट वाट वहिवाट...

बिहारचे ३५वे मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार यांनी काल पदाची शपथ घेतली, तेव्हा त्यांनी भारतात सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदी राहिलेल्या आतापर्यंतच्या पहिल्या दहा मुख्यमंत्र्यांत आपलं स्थान नक्की केलं. या यादीत सिक्कीमच्या पवनकुमार चामलिंग, ओडिशाच्या नवीन पटनाईक, पश्चिम बंगालच्या दिवंगत ज्योती बसू, अरुणाचल प्रदेशच्या गेगॉंग अपांग, मिझोरामच्या लाल ठाणवाला, हिमाचल प्रदेशच्या वीरभद्र सिंग आणि त्रिपुराच्या माणिक सरकारनंतर त्यांचा नंबर लागला असला, तरी त्यांची ही कारकीर्द किती मोठी ठरते, यावर ते या यादीत किती पायऱ्या वर चढणार, ते ठरेल. गंमत म्हणजे, ज्या लालूप्रसाद यादव यांच्याबरोबर त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली, काही काळ त्यांच्याबरोबर सत्तेतही राहिले, वैचारिक सहप्रवासी म्हणून सरकार बनवताना एकत्र निर्णय घेतले, त्या लालूप्रसादांच्या राष्ट्रीय जनता दलाला पराभूत करूनच नितीश कुमार यांनी दहाव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. १९८९ ची लोकसभा आणि १९९० ची विधानसभा निवडणूक लालूप्रसाद आणि नितीश कुमार यांच्या एकत्रित नेतृत्वाखाली लढवली गेली होती. पण, मुख्यमंत्री झाल्यानंतर लालूंचे रंग बदलू लागले. त्या वादातून १९९४ मध्ये जॉर्ज फर्नांडिस यांच्या नेतृत्वाखाली 'समता पार्टी'ची स्थापना झाली. लालूंचा सामाजिक न्यायाचा अजेंडा तेव्हा एवढा जोरात होता, की समता पार्टीला यश मिळणं शक्यच नव्हतं. अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, जॉर्ज आणि नितीश यांनी त्यामुळे १९९८ मध्ये एकत्र येऊन (मुख्यतः बिहारला डोळ्यासमोर ठेवून) राष्ट्रीय स्तरावर' राष्ट्रीय जनतांत्रिक गठबंधन'ची स्थापना केली. या आघाडीने नितीशना खरी चाल दिली. चारा घोटाळ्यात लालूंची प्रतिमा धुळीला मिळाली असताना तुरुंगात जाण्यापूर्वी त्यांनी राजकारणात पूर्ण अननुभवी असलेल्या पत्नी राबडीदेवी यांना मुख्यमंत्रीपदी बसवल्याने त्यांची होती नव्हती तीही मान्यता संपली. परिणामी सन २००० पर्यंत लालूंचा जनाधार घटत गेला आणि नितीश कुमार यांचा वाढत गेला!सन २००० मध्येच नितीश कुमार यांनी पहिल्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. पण, ते सरकार प्रत्यक्षात आलंच नाही. त्याची नुकसानभरपाई म्हणून नितीश कुमार यांची वर्णी थेट अटलजींच्या मंत्रिमंडळात, केंद्रात लागली. तिथे त्यांनी आपल्या प्रशासन कुशलतेचा चांगला ठसा उमटवला. देशभर त्यांची प्रतिमा तयार झाली. लालूंवर भ्रष्टाचाराची एकामागोमाग एक प्रकरणं शेकत असताना, त्यातून सावरण्यासाठी त्यांनी घेतलेल्या 'अतिरेकी सामाजिक न्याया'च्या धोरणाने गांवागांवात वेगळ्या चर्चा सुरू झाल्या. लालू आणि नितीश यांच्यातील त्यावेळच्या तुलनेतच नितीश पुढे निघून गेले. लालू वेगवेगळ्या आरोपात अडकत गेले. लालू आणि नितीश यांचे राजकीय-सामाजिक विचार एक असले, तरी राजकीय मूल्यकल्पना कशा वेगळ्या होत्या, याचा एक किस्सा बिहारमध्ये चांगलाच प्रसिद्ध आहे. २००५ मध्ये विधानसभा निवडणुकीत 'राष्ट्रीय जनतांत्रिक गठबंधन'ला बहुमत मिळालं. पण, ते स्पष्ट बहुमत नव्हतं. काही आमदार कमी पडत होते. त्यावर तोडगा काढण्यासाठी समता पार्टीचे अध्यक्ष म्हणून जॉर्ज यांच्या निवासस्थानी एक बैठक बसली. बैठकीला नितीश कुमार, शरद यादव, दिग्विजयसिंह असे चार-पाच महत्त्वाचे नेते होते. बरीच आकडेमोड करूनही गणित जुळत नव्हतं. शेवटी आपल्यातल्याच काही आमदारांशी बोलून निधीची व्यवस्था करावी आणि त्यातून सरकार स्थापनेच्या प्रक्रियेला गती द्यावी, अशी सूचना पुढे आली. ती सूचना ऐकून नितीश कुमार यांनी जागच्या जागी त्या सूचनेला तीव्र विरोध केला. 'अशा प्रकारे मुख्यमंत्रीपद मिळणार असेल, तर ते मला नको' असं त्यांनी त्या बैठकीत बजावलं आणि बैठक मोडली. राजकीय पेच कायम राहिला. त्यामुळे, पुन्हा निवडणूक घ्यावी लागली. ऑक्टोबर २००५ मध्ये झालेल्या त्या निवडणुकीत जनता दलाला (संयुक्त) ८८ जागा मिळाल्या! विधानसभेतील सर्वात मोठा पक्ष म्हणून बिहारी जनतेने नितीश कुमार यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केलं. नितीश कुमार त्यावेळी पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले. पुढे त्यांनी आपला सिलसिला चालूच ठेवला. त्याचाच पुढचा अध्याय कालपासून सुरू झाला. गेल्या १९ वर्षांच्या प्रवासात नितीश कुमार यांनी कधी लालूप्रसादांच्या राष्ट्रीय जनता दलाची साथ घेतली, तर कधी भारतीय जनता पक्षाची. त्यावरून त्यांचा 'पलटूराम' असा उपहासही झाला. पण, आपल्या राजकीय अस्तित्वासाठी आणि राजकीय अजेंड्यासाठी केलेल्या अशा तडजोडींतही त्यांची 'सुशासनबाबू' ही प्रतिमा कायम राहिली. ज्या राज्याचा उल्लेख देशात केवळ 'अतिमागास', 'जंगली', 'मध्ययुगीन मानसिकतेचे राज्य' असा केला जात होता, त्याच राज्याला त्यांनी प्रतिष्ठा मिळवून दिली. बिहारच्या आमूलाग्र परिवर्तनाला हात घातला. २०२४-२५ची ताजी आकडेवारी पाहिली, तर बिहारची अर्थव्यवस्था ८.६४ टक्के दराने वाढते; खरं तर धावते आहे!सलग १९ वर्षे मुख्यमंत्रीपदी असलेल्याच्या विरोधात आपोआपच जनमत तयार होतं. सत्तेच्या विरोधातला रोष एकवटतो, असं म्हटलं जातं. नितीश कुमार यांच्याविषयी ते घडलं नाही. उलट, त्यांचा पाठिंबा वाढतच राहिला. याचं कारण, सामाजिक बदलासाठी निर्णय करण्याचा आग्रह आणि स्वतःची मतपेढी तयार करण्याची दूरदृष्टी. समाजातील सर्वात मोठ्या घटकाला, महिलांना केंद्रस्थानी ठेवून त्यांनी सातत्याने योजना आखल्या आणि त्याची गावपातळीपर्यंत नीट अंमलबजावणी होईल, याची दक्षताही घेतली. लालूप्रसाद यांच्याप्रमाणे न वागता त्यांनी आपल्या कुटुंबाला, नातेवाइकांना राजकीय पटलापासून कटाक्षाने दूर ठेवलं. नाही. २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर लगेच मुख्यमंत्रीपद न घेता त्यांनी सामाजिक समीकरण आणि आपली प्रतिमा या दोन्हींचा विचार करून खुबीने जितनराम मांझी यांना मुख्यमंत्री केलं. राजकारणात वेगापेक्षा असा हिशोबी संयमच बहुतेकदा हुकमी यश देत असतो. निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी जाहीर केलेल्या 'मुख्यमंत्री महिला रोजगार योजने' वर चहूबाजूंनी टीका झाली. 'पोल्समॅप' या संस्थेने घेतलेल्या मतदानोत्तर चाचणीत ज्यांना या योजनेचा लाभ झाला, त्यापैकी ६९ टक्के महिलांनी 'अशाप्रकारे निवडणुकीआधी थेट लाभाच्या योजना अयोग्य असल्या'चं मत नोंदवलं. पण, हे पैसे आपल्या खात्यात कशासाठी आले, तेही त्यांना नीट माहीत होतं. त्यांनी त्यानुसार मतदानही केलं! महिलांना दिलेल्या अशा थेट लाभाच्या योजनांनी महाराष्ट्रासह इतर राज्यातही 'जादू' केली, हे जगजाहीर आहे. त्याचा लाभ नितीश कुमार यांना झालाच. पण, त्याआधी गेली काही वर्षं ते 'महिला' हाच आपला जनाधार, असं ठरवून काम करत होते. शाळेत जाणाऱ्या मुलींना मोफत सायकलपासून बचत गटांना दिलेल्या विविध प्रोत्साहन योजना, ग्रामीण जीवनोन्नती कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी त्यांना हात देऊन गेली. जात आणि जातीभेदाने ग्रासलेल्या बिहारला, बिहारच्या राजकारणाला नितीश कुमार यांनी यानिमित्ताने अलगद भौतिक कार्यक्रमांवर आणलं, हे त्यांचं यश इतिहासात कायमचं नोंदवलं जाईल. भविष्यात त्यांच्याकडून म्हणूनच अधिक अपेक्षा आहेत.

फीड फीडबर्नर 21 Nov 2025 2:30 am

पिंपरी-चिंचवडची प्रारूप मतदार यादी जाहीर; तुमचं नाव बरोबर आहे का? २७ नोव्हेंबरपर्यंतच दुरुस्तीची संधी!

प्रभात वृत्तसेवा पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नियोजित सार्वत्रिक निवडणुकीसाठी विधानसभा मतदारसंघांची मतदार यादी प्रभागनिहाय विभाजित करून प्रारूप मतदार यादी गुरूवारी (दि. २०) प्रसिद्ध करण्यात आली. या यादीवर नागरिकांना हरकती व सूचना दाखल करण्यासाठी २० ते २७ नोव्हेंबर हा कालावधी देण्यात आला आहे. नागरिकांकडून येणाऱ्या हरकती व सूचना स्वीकारण्यासाठी अ, ब, क, ड, ई, फ, […] The post पिंपरी-चिंचवडची प्रारूप मतदार यादी जाहीर; तुमचं नाव बरोबर आहे का? २७ नोव्हेंबरपर्यंतच दुरुस्तीची संधी! appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 21 Nov 2025 2:30 am

आधुनिक युगातही मध्ययुगीन जीवन! खोपोली बाजारपेठेत डोंबारी समाजाचे करुण चित्र; प्रशासन अपयशी?

प्रभात वृत्तसेवा खालापूर – आधुनिकतेच्या आणि शिक्षणाच्या युगात आजही काही समाजघटक विकासाच्या परिघाबाहेर आहेत, याची जिवंत साक्ष खोपोली बाजारपेठेत पाहायला मिळाली. डोंबारी समाजातील लहानग्यांनी पोटासाठी, कुटुंबासाठी तारेवरची कसरत करत केलेली जीवघेणी प्रात्यक्षिके पाहून अनेकांनी विचार करण्यास भाग पाडले.जन्माचे ठिकाण नाही, घराचा पत्ता नाही, ओळख नाही आणि आधारही नाही. अशा परिस्थितीत जगणारा हा समाज केवळ कसरती […] The post आधुनिक युगातही मध्ययुगीन जीवन! खोपोली बाजारपेठेत डोंबारी समाजाचे करुण चित्र; प्रशासन अपयशी? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 21 Nov 2025 2:15 am

मराठवाड्यात उमेदवारी अर्जांचा पाऊस

छत्रपती संभाजीनगर, नांदेड आणि लातूर जिल्ह्यांमध्ये नगरपालिका व नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. २१ नोव्हेंबरला अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. आता राजकीय पक्षांची धाकधूक वाढली आहे. नांदेड आणि लातूर जिल्ह्यांमध्ये मोठ्या संख्येने अर्ज दाखल झाल्याने, स्थानिक पातळीवर चुरस वाढण्याची चिन्हे आहेत. विशेषतः अध्यक्षपदासाठी अनेक ठिकाणी इच्छुकांची गर्दी दिसून येत आहे. २६ नोव्हेंबरला चिन्हे वाटप होतील. २ डिसेंबरला मतदान आणि ३ डिसेंबरला निकाल जाहीर होतील. या निवडणुकीत अनेक ठिकाणी राजकीय सोयीनुसार युतीधर्म पाळला जाणार नाही, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. याचा अर्थ असा की, जे पक्ष किंवा गट एकत्र आहेत, ते स्थानिक पातळीवर एकमेकांच्या विरोधातही उभे राहू शकतात. यामुळे निवडणुकीचे निकाल अनपेक्षित लागू शकतात.मराठवाड्यात असलेल्या आठ जिल्ह्यांतील ४८ नगर परिषदा आणि ११ नगरपंचायतींच्या नगरसेवक व अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्जांचा अक्षरशः पाऊस पडला. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, बीड, लातूर व धाराशिव जिल्ह्यातील नगर परिषद आणि नगरपंचायतींसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी इच्छुकांची प्रचंड गर्दी झाली. नांदेड जिल्ह्यात नगराध्यक्ष पदासाठी २१२, तर नगरसेवक पदासाठी २१५३ जणांनी अर्ज दाखल केले. त्या पाठोपाठ बीड जिल्ह्यात १६९ व नगरसेवक पदासाठी २१२७, परभणी जिल्ह्यात नगराध्यक्ष पदासाठी ११७, तर नगरसेवक पदासाठी १२१० जणांनी, लातूर जिल्ह्यात नगराध्यक्ष पदासाठी १०३ व नगरसेवक पदासाठी १२५७ जणांनी, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात नगराध्यक्ष पदासाठी ९४ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले, तर नगरसेवक पदासाठी १४३६ अर्ज दाखल झाले. हिंगोली जिल्ह्यात नगराध्यक्ष पदासाठी ७१ व नगरसेवक पदासाठी ९१० जणांचे अर्ज, धाराशिव जिल्ह्यात नगराध्यक्ष पदासाठी ५३, तर नगरसेवक पदासाठी ६१० अर्ज तसेच सर्वात कमी जालना जिल्ह्यात नगराध्यक्ष पदासाठी ४२ व नगरसेवक पदासाठी ४१८ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत अध्यक्षपदासाठी ७५० पेक्षा अधिक तर नगरसेवक पदासाठी तब्बल दहा हजारांपेक्षा जास्त इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले.या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे मराठवाड्यात विद्यमान व माजी आमदारांनी स्वतःच्या नातलगांना उमेदवारी अर्ज भरायला लावले. सत्ताधारी व विरोधी पक्षांतील नेत्यांच्या परिवारातील सदस्यांनी या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. आपलेच सगे-सोयरे सत्तेवर राहावेत या उद्देशाने काँग्रेस, भाजप, अजित पवार गट, शरद पवार गट, उद्धव ठाकरे गट तसेच एकनाथ शिंदे गटाच्या नेत्यांनी स्वतःच्या पाहुण्यांचा उमेदवारी अर्जात भरणा केलेला आहे. त्यामुळे भविष्यात याच परिवारांकडे सत्तेची सूत्र राहणार असल्याचे उमेदवारी अर्जांवरून दिसून येते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड येथे स्वतःचे चिरंजीव समीर सत्तार यांची उमेदवारी दाखल केली. याचबरोबर हिंगोली जिल्ह्यातील आमदगर संतोष बांगर, परभणी जिल्ह्यातील राजेश विटेकर, नारायण कुचे यांनी स्वतःच्या नातलगांना व विशेषतः घरातील सदस्याला उमेदवारी दिली आहे. बीड जिल्ह्यातील गेवराईत भाजपचे माजी आमदार लक्ष्मण पवार यांच्या भावजई गीता पवार यांनी भाजपकडून उमेदवारी दाखल केली, तर अंबाजोगाईमध्ये भाजपच्या आमदार नमिता मुंदडा यांचे सासरे नंदकिशोर मुंदडा यांनी शहर परिवर्तन जनविकास आघाडीकडून नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याचबरोबर बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला सोडचिठ्ठी देऊन भाजपात गेलेले डॉ. योगेश क्षीरसागर यांची पत्नी डॉ. सारिका यांनी भाजपकडून नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. बीड जिल्ह्यातील आमदार धनंजय मुंडे यांच्या भगिनी तथा गंगाखेडचे माजी आमदार मधुसूधन केंद्रे यांची पत्नी उर्मिला यांनी गंगाखेडमध्ये नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला आहे. आता मराठवाड्यात उमेदवारी मागे घेण्यासाठी एकमेकांची मनधरणी करण्याचे आव्हान उभे राहिले आहे. या निवडणुकीच्या लढतीचे सर्व चित्र २५ नोव्हेंबर रोजी स्पष्ट होणार आहे. तोपर्यंत कोण-कोण उमेदवारी मागे घेतो हे स्पष्ट झाल्यानंतर निवडणुकीचे चित्र समोर येणार आहे.राज्यमंत्री तथा परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी तीन ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत. जिंतूर, सेलू व गंगाखेड या ठिकाणी नगराध्यक्षपदासाठी राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांची कसोटी पणाला लागली आहे. याव्यतिरिक्त पाथरी व पूर्णा या ठिकाणी बोर्डीकर यांना उमेदवार मिळालेला नाही. त्या ठिकाणी शिंदेसेना तसेच काँग्रेसचे उमेदवार एकमेकांविरुद्ध निवडणूक लढविणार आहेत. धाराशिव जिल्ह्यात माजी मंत्री तानाजी सावंत समर्थक विरुद्ध इतर सर्वजण परंडा व भूम येथे एकमेकांच्या विरुद्ध लढणार आहेत. या ठिकाणी नळदुर्ग, उमरगा येथे शरद पवार गटाचे स्वतंत्र उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात थांबणार आहेत. धाराशिव जिल्ह्यात दोन्ही राष्ट्रवादीची कसोटी पणाला लागलेली आहे. लातूर जिल्ह्यात पाच नगराध्यक्ष पदासाठी १०३ उमेदवार इच्छुक होते, तर नगरसेवकाच्या १२८ जागांसाठी १२५७ उमेदवारांनी अर्ज भरले. या जिल्ह्यात काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे आमदार सुपुत्र काँग्रेसला किती ठिकाणी विजय मिळवून देणार याकडे मराठवाड्याचे लक्ष लागले आहे. हिंगोली जिल्ह्यात युती स्वतंत्र निवडणूक लढविणार आहे, तर आघाडी मात्र एकत्र राहून सोयीच्या ठिकाणी उमेदवार उभे करून सत्ता हातात घेण्याच्या तयारीत आहेत. हिंगोली जिल्ह्यातील तीन नगरपालिका कोणाच्या ताब्यात जातील हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. वसमत, कळमनुरी व हिंगोली या तीन नगरपालिकेसाठी निर्णायक निवडणूक होणार आहे. जालना जिल्ह्यातील परतुर, अंबड व भोकरदन येथील निवडणूक रंगतदार ठरणार आहे. नांदेड जिल्ह्यात राज्यसभेचे भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांच्या आमदार कन्या श्रीजया यांचा बालेकिल्ला भोकर येथे नगराध्यक्ष पदासाठी सर्वाधिक उमेदवार उभे आहेत. नांदेड जिल्ह्यात भोकर येथील निवडणुकीकडे मराठवाड्याचे लक्ष लागले आहे. मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजेच १३ नगराध्यक्ष निवडले जाणार आहेत. हा जिल्हा मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत भौगोलिकदृष्ट्या मोठा जिल्हा आहे. लोकसभा निवडणुकीत नांदेड येथे भाजपच्या उमेदवाराचा पराभव करून काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले होते. त्यानंतर भाजपने दोन जणांना राज्यसभेवर घेऊन त्यांना खासदार बनविले. त्यामध्ये अशोक चव्हाण व डॉ. अजित गोपछडे यांचा समावेश आहे. त्यामुळे हे भाजपचे दोन खासदार किती नगराध्यक्ष निवडून आणणार आहेत हे भाजपच्या वरिष्ठांनी त्यांच्याकडून एक परीक्षा म्हणून तपासून घ्यावे, असे नांदेड जिल्ह्यातील राजकीय विश्लेषकांचे मत आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड, कन्नड, पैठण, वैजापूर तसेच खुलताबाद व गंगापूर, फुलंब्री नगरपंचायत या ठिकाणी भाजपला किती नगराध्यक्ष निवडून आणता येतील याकडे मराठवाड्याचे लक्ष लागले आहे. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात माजी मंत्री अब्दुल सत्तार यांचे सुपुत्र समीर सत्तार हे सिल्लोड नगरपालिकेतून नगराध्यक्ष म्हणून निवडून येण्यासाठी मैदानात आहेत. त्यांच्या निवडणुकीकडे सर्वच पक्षाचे लक्ष लागले आहे. उमेदवारी अर्ज परत घेण्याची शेवटची तारीख २१ नोव्हेंबर आहे, तर २६ नोव्हेंबर रोजी निवडणूक चिन्ह वाटप केले जातील तसेच २ डिसेंबर रोजी मतदान व लगेच दुसऱ्या दिवशी ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.- डॉ. अभयकुमार दांडगे

फीड फीडबर्नर 21 Nov 2025 2:10 am

पिंपरीत ४६ हजार ‘दुबार’मतदार! दुबार मतदारांना शोधण्यासाठी निवडणूक विभागाची ‘ही’आहे युक्ती

प्रभात वृत्तसेवा पिंपरी – दुबार मतदारांच्या मुद्द्यावरून विरोधकांनी राज्यात रणकंदन माजवले आहे. त्यातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहे. असे असताना पिंपरी चिंचवड शहरामध्ये तब्बल ४६ हजार ३३२ दुबार मतदार असून यादीमध्ये तब्बल ९२ हजार ६६४ नावे मतदारयादीमध्ये आली असल्याचे महापालिकेच्या निवडणूक विभागाने प्रसिद्ध केलेल्या मतदार यादीतून समोर आले आहे. निवडणूक विभागाने गुरूवारी (दि. २०) […] The post पिंपरीत ४६ हजार ‘दुबार’ मतदार! दुबार मतदारांना शोधण्यासाठी निवडणूक विभागाची ‘ही’ आहे युक्ती appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 21 Nov 2025 2:00 am

PCMC Election : तिकीट कुणालाही द्या, पण स्थानिकच हवा! अन्यथा…; पिंपरीत मतदारांचा राजकीय पक्षांना ‘असा’आहे इशारा

प्रभात वृत्तसेवा पिंपरी – महापालिकेच्‍या निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक ९ गांधीनगर–खराळवाडी परिसरातील (अनुसूचित जाती राखीव)सर्वपक्षीय इच्‍छुकांची तातडीची बैठक डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, भीमसृष्टी, पिंपरी चौक येथे पार पडली. बैठकीची सुरुवात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. तसेच प्रभागातील सध्याच्या राजकीय स्थितीवर तसेच आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सखोल चर्चा करण्यात आली. गेल्या 18 […] The post PCMC Election : तिकीट कुणालाही द्या, पण स्थानिकच हवा! अन्यथा…; पिंपरीत मतदारांचा राजकीय पक्षांना ‘असा’ आहे इशारा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 21 Nov 2025 1:45 am

Pathardi Crime : वर तुरीची शेती, आत ‘गांजा’चा मळा! पाथर्डीत शेतकऱ्याचा ‘जुगाड’पोलिसांना असा लावला छडा

प्रभात वृत्तसेवा पाथर्डी : पाथर्डी तालुक्यातील मालेवाडी परिसरात तुरीच्या पिकामध्ये लपवून गांजाची लागवड केल्याचा प्रकार उघडकीस आला असून, पाथर्डी पोलिसांनी बुधवारी धडक कारवाई करत २ लाख १० हजार २२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी विक्रम मुरलीधर खेडकर (वय ४३, रा. मालेवाडी) या शेतकऱ्याला अटक करण्यात आली आहे.पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पोलीस पथकाने […] The post Pathardi Crime : वर तुरीची शेती, आत ‘गांजा’चा मळा! पाथर्डीत शेतकऱ्याचा ‘जुगाड’ पोलिसांना असा लावला छडा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 21 Nov 2025 1:30 am

Shirdi News : बिबट्या आला कुठून? शिर्डीच्या गजबजलेल्या भागात बिबट्याचा वावर; भाविकांमध्ये भीतीचे सावट

प्रभात वृत्तसेवा शिर्डी – शहरात स्थानिक नागरिक आणी भाविकांची मोठी वर्दळ असलेल्या पिंपळवाडी रोडलगतच्या माऊलीनगर परिसरात नागरी वस्तीत बुधवारी रात्री बिबट्या मुक्तपणे फिरताना दिसल्याची घटना समोर आली आहे. बिबट्या नागरी भागातील रस्त्यांवर मुक्त संचार करीत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाल्याने परिसरातील नागरिकांसह शिर्डीला दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांमध्ये मोठी भीती निर्माण झाली आहे. बुधवारी रात्री उशिरा […] The post Shirdi News : बिबट्या आला कुठून? शिर्डीच्या गजबजलेल्या भागात बिबट्याचा वावर; भाविकांमध्ये भीतीचे सावट appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 21 Nov 2025 1:15 am

Satara TET Exam : टीईटीसाठी साताऱ्यात ११ हजार उमेदवार; प्रशासनाचा ‘हा’आहे मास्टर प्लॅन

प्रभात वृत्तसेवा सातारा – यावर्षीची शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) रविवारी (दि.२३) सातारा शहरातील ३१ केंद्रांवर पार पडणार आहे. नवीन शिक्षक व कार्यरत शिक्षकांसाठी ही परीक्षा असणार आहे. या परीक्षेत केंद्रातील प्रत्येक वर्गात बसवलेल्या एआय कॅमेऱ्यांद्वारे नियंत्रण कक्षापर्यंत तत्काळ अलर्ट पाठवला जाणार आहे. विद्यार्थी संशयास्पद हालचाल करत असल्यास, मागे वळत असल्यास किंवा संकेत देत असल्यासही हॉटलाइन […] The post Satara TET Exam : टीईटीसाठी साताऱ्यात ११ हजार उमेदवार; प्रशासनाचा ‘हा’ आहे मास्टर प्लॅन appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 21 Nov 2025 1:00 am

भाजपची प्रतिष्ठा पणाला! अमोल मोहितेंसाठी दोन्ही ‘राजे’एकवटले, पण सुवर्णाताईंची ‘ही’रणनीती ठरणार गेमचेंजर?

प्रभात वृत्तसेवा सातारा – सातारा शहराचा प्रथम नागरिक कोण, या प्रतिष्ठेच्या प्रश्नासाठी भाजपला महाविकास आघाडीने जोरदार टक्कर देण्याची रणनीती स्पष्ट केली आहे. भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अमोल मोहिते यांच्या नेतृत्वाला महाविकास आघाडीच्या माध्यमातून सुवर्णाताई पाटील यांचे जोरदार आव्हान मिळाले आहे. सातारा जिल्ह्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या असणार्‍या सातारा पालिकेच्या रणसंग्रामात कोण बाजी मारणार, हा राजकीय वर्तुळातील चर्चेचा […] The post भाजपची प्रतिष्ठा पणाला! अमोल मोहितेंसाठी दोन्ही ‘राजे’ एकवटले, पण सुवर्णाताईंची ‘ही’ रणनीती ठरणार गेमचेंजर? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 21 Nov 2025 12:45 am

Rahimatpur Election : रहिमतपूरमध्ये भाजपचा ‘गेम’होणार? निलेश मानेंना स्वकीयांनीच घेरले! वाचा नेमकं काय घडलंय?

प्रभात वृत्तसेवा रहिमतपूर – नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अर्ज माघारी घेण्याची मुदत अजूनही संपली नसली तरी जवळपास सर्वच प्रभागात उमेदवारी निश्चित करून सुनील माने व वासुदेव माने यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. याउलट भाजपच्या माध्यमातून निवडणूक लढणारे नीलेश माने यांना स्वकीयांनीच घेरले असल्याचे चिन्ह रहिमतपूरमध्ये दिसत आहे .रहिमतपूर नगरपालिकेचे निवडणूक लागल्यानंतर रहिमतपूरमधील भाजप-शिवसेना शिंदे गट यांनी एकत्रित […] The post Rahimatpur Election : रहिमतपूरमध्ये भाजपचा ‘गेम’ होणार? निलेश मानेंना स्वकीयांनीच घेरले! वाचा नेमकं काय घडलंय? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 21 Nov 2025 12:30 am

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, २१ नोव्हेंबर २०२५

पंचांगआज मिती मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा शके १९४७, चंद्र नक्षत्र अनुराधा योग अतिगंड चंद्र राशी मीन, भारतीय सौर ३० मार्गशीर्ष शके १९४७, शुक्रवार, दि. २१ नोव्हेंबर २०२५. मुंबईचा सूर्योदय ६.४९, मुंबईचा सूर्यास्त ५.५९, मुंबईचा चंद्रोदय ७.३७, मुंबईचा चंद्रास्त ६.३७, राहू काळ ११.०० ते १२.२४. मार्गशीर्ष मासारंभ, मार्तंड्भैरव षडरात्रोस्सव आरंभ, शुभ दिवस दुपारी १.५५ पर्यंत.दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)मेष : जवळचे प्रवास करावे लागतील.वृषभ : निरनिराळ्या मार्गांनी धनलाभ होऊ शकतो.मिथुन : कौटुंबिक सुख चांगले राहील.कर्क : महत्त्वाच्या कामात अडचणी येण्याची शक्यता आहे.सिंह : आर्थिक आवक चांगली राहून कौटुंबिक सुख मिळेल.कन्या : चालू नोकरीमध्ये वातावरण बदल.तूळ : महत्त्वाच्या कामात यश मिळेल.वृश्चिक : नशिबावर फार विसंबून राहू नका.धनू : आज आपला प्रवास फलदायी होऊ शकतो.मकर : आरोग्याची काळजी घ्या.कुंभ : जीवनसाथीबरोबर सूर जुळतील.मीन : प्रेमात यश मिळणार आहे.

फीड फीडबर्नर 21 Nov 2025 12:30 am

Nitin Patil : रामराजेंचा पक्षप्रवेश का रखडला? मुंबईतील बैठकीत नेमकं काय ठरलं? नितीन पाटलांनी उलगडले ‘ते’गुपित

प्रभात वृत्तसेवा वाठार स्टेशन – प्रभात वृत्तसेवास्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांसाठी असतात. त्यासाठी स्थानिक पातळीवरील परिस्थिती आणि कार्यकर्त्यांचा कल पाहून निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सन्मानपूर्वक जागा मिळाल्यास युती करू, असे मत खासदार नितीन पाटील यांनी व्यक्त केले.वाठार स्टेशन (ता. कोरेगाव) येथे उद्योजक राजेंद्र […] The post Nitin Patil : रामराजेंचा पक्षप्रवेश का रखडला? मुंबईतील बैठकीत नेमकं काय ठरलं? नितीन पाटलांनी उलगडले ‘ते’ गुपित appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 21 Nov 2025 12:15 am

अवयव प्रत्यारोपणासाठी देशव्यापी एकसमान धोरणाचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

दानकर्त्यांची प्रत्यारोपणानंतर वैद्यकीय काळजी बंधनकारक…मुंबई : देशभर अवयव प्रत्यारोपणासाठी एकसमान व पारदर्शक यंत्रणा उभारण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय धोरण तयार करावे, असे निर्देश काल सर्वोच्च न्यायालयाने दिले. प्रत्यारोपणानंतर अनेक दाते उपचाराअभावी उपेक्षित राहतात, याबाबत चिंता व्यक्त करत न्यायालयाने दानकर्त्यांच्या फॉलो-अप वैद्यकीय सेवेला बंधनकारक करण्याची आवश्यकता अधोरेखित केली.मुख्य न्यायाधीश बी. आर. गवई आणि न्यायमूर्ती के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठासमोर भारतीय ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन सोसायटीने दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी झाली. जीवंत दाता मौल्यवान अवयव देतो. प्रत्यारोपणानंतर त्याच्याकडे दुर्लक्ष होता कामा नये, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.न्यायालयाने केंद्राला अवयव वाटपासाठी ‘आदर्श वाटप निकष’ निश्चित करून देशभर तीच निकष लागू करण्यास सांगितले. अवयव प्रत्यारोपणासाठी लिंग, प्रदेश किंवा आर्थिक स्तर यांसारख्या मर्यादा नसाव्यात. सर्वांसाठी समान नियम असणे आवश्यक आहे, असे न्यायालयाने नमूद केले.दरम्यान, अवयव प्रत्यारोपणाच्या कायदेशीर तरतुदींमध्ये प्रलंबित असलेल्या दुरुस्त्यांबाबत काही राज्यांनी अद्याप कारवाई न केल्याचे न्यायालयाने निदर्शनास आणले. न्यायालयाने केंद्र सरकारला आंध्र प्रदेश सरकारला १९९४ च्या मानवी अवयव प्रत्यारोपण कायद्यात २०११1 मध्ये करण्यात आलेल्या दुरुस्त्या स्वीकारण्यासाठी प्रवृत्त करण्यास सांगितले. तसेच कर्नाटक, तमिळनाडू आणि मणिपूरने २०१४ च्या अवयव व ऊतक प्रत्यारोपण नियमावलीची अंमलबजावणी त्वरित करावी, असे निर्देश दिले.न्यायालयाने पुढे सांगितले की मणिपूर, नागालँड, अंदमान-निकोबार आणि लक्षद्वीपमध्ये अद्याप राज्य अवयव व ऊतक प्रत्यारोपण संस्था (सोटो) अस्तित्वात नाहीत. त्यामुळे या संस्थांची स्थापना राष्ट्रीय अवयव प्रत्यारोपण कार्यक्रमांतर्गत केंद्राने करावी, असा आदेश देण्यात आला. तसेच मृत्यू नोंदणीच्या फॉर्ममध्ये सुधारणा करून,मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना अवयव दानाचा पर्याय विचारला गेला का याची नोंद अनिवार्य करण्याबाबत केंद्राने राष्ट्रीय अवयव आणि ऊतक प्रत्यारोपण संस्था (नोटो) यांच्यासोबत चर्चा करावी, असेही खंडपीठाने निर्देशित केले.खंडपीठाने पुढे सरकारला राष्ट्रीय अवयव व ऊतक प्रत्यारोपण संस्थेच्या सल्ल्याने मृत्यू नोंदणी फॉर्ममध्ये बदल करण्याचे निर्देश दिले, ज्यामध्ये मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना अवयव दानाबाबत पर्याय विचारला गेला का, हे स्पष्टपणे नमूद करण्याची तरतूद असावी असे म्हटले आहे.एकसमान राष्ट्रीय धोरण तयार करताना दानकर्त्यांच्या उपचार व फॉलो-अपची गरज अधोरेखित आहे. मुख्य न्यायाधीश बी.आर. गवई व न्यायमूर्ती के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठाने लक्ष वेधले की अनेक वेळा अवयव दान करणारे दाते प्रत्यारोपणानंतर कोणत्याही उपचार किंवा वैद्यकीय फॉलो-अपशिवाय असहाय्य स्थितीत राहतात. ‘जीवंत दाता मौल्यवान अवयव देतो; त्याकडे दुर्लक्ष होता कामा नये आणि त्याची प्रत्यारोपणानंतर योग्य काळजी घेतली पाहिजे,’ असे न्यायालयाने भारतीय ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन सोसायटी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावताना नमूद केले.न्यायालयाने म्हटले की ही यंत्रणा लिंग, प्रदेश आणि सामाजिक स्तराच्या मर्यादा ओलांडणारी असावी आणि देशातील सर्व राज्यांमध्ये समानपणे लागू व्हावी. अवयव प्रत्यारोपणासाठी सर्वांसाठी समान निकष असावेत, असे न्यायालयाने निरीक्षण नोंदवले.

फीड फीडबर्नर 20 Nov 2025 11:10 pm

डॉलर जोरात! सोनं-चांदी कोसळलं; बाजारात घबराटीचे वातावरण

नवी दिल्ली – अमेरिकेत व्याजदर कपात होण्याची शक्यता मावळल्यामुळे डॉलर बळकट होत आहे. त्याचबरोबर रशिया- युक्रेन युद्ध संपविण्यासाठी अमेरिका प्रयत्न वाढविणार आहे. यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने आणि चांदीचे आकर्षण कमी झाले आहे. अशा परिस्थितीत या दोन धातूच्या दरात वेगाने घट होत आहे. दिल्ली सराफात गुरुवारी सोन्याचा दर 600 रुपयांनी घसरून 1 लाख 26 हजार […] The post डॉलर जोरात! सोनं-चांदी कोसळलं; बाजारात घबराटीचे वातावरण appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 20 Nov 2025 10:35 pm

अमूलचा मोठा डाव! आता इस्रायलच्या बाजारात भारतीय दूध-तूपाची धमाकेदार एन्ट्री?

तेल अविव – अमूल कंपनी इस्त्रायलला अगोदरच तुपाची निर्यात करीत आहे. लवकरच इतर दुग्धोत्पादने इस्रायलला निर्यात करण्याची शक्यता पडताळण्यात येत आहे, असे या कंपनीची पालक कंपनी असलेल्या गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनचे व्यवस्थापकीय संचालक जयेन मेहता यांनी सांगितले. सध्या पाठविले जात असलेले तूप इस्त्रायलमध्ये राहत असलेल्या भारतीय नागरिकांना पाठविले जात आहे. आता दूध आणि इतर […] The post अमूलचा मोठा डाव! आता इस्रायलच्या बाजारात भारतीय दूध-तूपाची धमाकेदार एन्ट्री? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 20 Nov 2025 10:33 pm

शिक्षकांसह मुख्याध्यापकाकडून होणाऱ्या मानसिक छळामुळे शौर्यची आत्महत्या

शिक्षण व्यवस्थेतील मानसिक छळाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेतनवी दिल्ली (वृत्तसंस्था): प्राचार्या आणि शिक्षिकांच्या जाचाला कंटाळून दहावीमध्ये शिकणाऱ्या सांगलीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. दिल्लीतील सेंट कोलंबस शाळेमध्ये हा विद्यार्थी शिक्षण घेत होता. मंगळवारी दिल्लीतील मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरून खाली रस्त्यावर उडी मारून त्याने आत्महत्या केली. शौर्य प्रदीप पाटील असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांचे नाव होते. तो नवी दिल्लीतील राजीवनगर भागात राहत होता. शौर्य हा मूळचा सांगली जिह्यातील खानापूर तालुक्यातील ढवळेश्वरचा रहिवासी होता.सांगलीच्या खानापूर तालुक्यातील प्रदीप पाटील हे सोने-चांदी गलाई व्यवसायानिमित्त गेल्या अनेक वर्षापासून दिल्ली येथे स्थायिक आहेत. त्यामुळे शौर्य हा त्यांच्या कुटुंबीयांसह दिल्लीतील राजीवनगर भागात भागात कुटुंबीयांसोबत राहत होता. दिल्लीच्या या धक्कादायक घटनेने शिक्षण व्यवस्थेतील मानसिक छळाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.१८ नोव्हेंबरला दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडली. सकाळी नेहमीप्रमाणे शौर्य शाळेसाठी घरातून बाहेर पडला होता. त्याच दिवशी वडील आईच्या उपचारासाठी कोल्हापूरला जायच्या तयारीत होते. तेवढ्यात त्यांना शौर्य मेट्रो स्टेशनवरून खाली पडल्याची माहिती देणारा फोन आला. धावपळ करत रुग्णालयात पोहोचेपर्यंत डॉक्टरांनी शौर्यला मृत घोषित केले होते. या घटनेनंतर शौर्यची शाळेची बॅग तपासण्यात आली आणि त्यात एक चिठ्ठी मिळाली. त्या नोटमध्ये त्याने आई-वडिलांची माफी मागितली आणि आपल्या अवयवांचे दान करण्याची विनंती केली होती. पण सर्वात वेदनादायक गोष्ट म्हणजे त्याने शाळेतील काही शिक्षक आणि मुख्याध्यापकांनी केलेल्या मानसिक छळाचाच उल्लेख आत्महत्येचे कारण म्हणून केला होता.संबंधित शिक्षकांची पोलिसांकडून चौकशीवडील प्रदीप पाटील यांनी तक्रार दिल्यानंतर राजेंद्र नगर पोलीस ठाण्यात मुख्याध्यापक, को-ऑर्डिनेटर आणि दोन शिक्षकांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून एका शिक्षिकेने ‘तुझ्या पालकांना बोलावून तुझे अॅडमिशन रद्द करेन’ अशा धमक्या दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. १८ नोव्हेंबरला वर्गात शौर्यचा तोल जाऊन तो पडल्यावर, त्यावर थट्टा करत ‘हे सगळे नाटक आहे’, असे वर्गासमोर त्याला हिणवण्यात आले. शौर्य रडू लागल्यावरही ‘रडलास तरी मला काही फरक पडत नाही’ अशा शब्दांत त्याला अधिक त्रास दिला गेला, अशी माहिती मित्रांकडून मिळाली आहे. त्यावेळी मुख्याध्यापकही उपस्थित होते, पण त्यांनी हस्तक्षेप केला नाही, असा आरोप आहे. त्याच्या मृत्यूची चौकशी सुरु असून संबंधित शिक्षकांची पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. शिक्षण देणाऱ्यांकडूनच जर मानसिक छळ होत असेल, तर विद्यार्थी कोणाकडे पाहणार?

फीड फीडबर्नर 20 Nov 2025 10:30 pm

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपची दमदार सुरुवात

मुंबई : महाराष्ट्रात २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया झाली. नियमानुसार अर्ज मागे घेण्यासाठी मुदत देण्यात आली. या कालावधीत अर्ज मागे घेण्यात आल्यामुळे निवडक जागांवर भाजपने बिनविरोध विजय मिळवला. या विजयांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपने दमदार सुरुवात केली.जळगाव जिल्ह्यातील भुसावळ, जामनेर आणि सावदा या नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपचा नगरसेवक पदाचा प्रत्येकी एक उमेदवार विजयी झाला. भुसावळ येथे वार्ड क्र. ७ (अ) मधून भाजपच्या प्रीती मुकेश पाटील, जामनेरमध्ये वार्ड क्र. ११ (ब) मधून भाजपच्या उज्वला दीपक तायडे, सावदा मध्ये वार्ड क्र. ७ (अ) मधून भाजपच्या रंजना जितेंद्र भारंबे बिनविरोध विजयी झाल्या. एकाच दिवशी तीन नगरसेवकांचा बिनविरोध विजय झाला. जामनेर नगराध्यक्षपदी भाजपच्या साधना महाजन यांची बिनविरोध निवड झाली. मंत्री गिरीश महाजन यांची पत्नी साधना महाजन सलग तिसऱ्यांदा बिनविरोध जामनेरच्या नगराध्यक्ष झाल्या आहेत. साधना महाजन यांनी जामनेरच्या नगराध्यक्षपदावर बिनविरोध विजयाची हॅटट्रिक केली.https://prahaar.in/2025/11/20/sadhana-mahajans-hat-trick-of-victories-as-jamner-mayor-unopposed/अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा नगरपालिकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ आल्हाद कलोती हे नगरसेवकपदाचे उमेदवार होते. आल्हाद कलोती यांच्या प्रभागातून रिंगणात असलेल्या काँग्रेसच्या उमेदवारासह नऊ उमेदवारांनी ऐनवेळी माघार घेतली आहे. या घडामोडीनंतर आल्हाद कलोती यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सर्व उमेदवारांनी माघार घेणे पसंत केले. हा दूरदृष्टीचा विजय आहे, असे युवा स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आमदार रवी राणा यांनी सांगितले आहे. सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंचायत निवडणुकीत भाजपचे १७ उमेदवार आणि नगराध्यक्ष बिनविरोध निवडून आले. भाजपने निवडणुकीआधीच विजय मिळवला.

फीड फीडबर्नर 20 Nov 2025 10:30 pm

नेमक्या कोणत्या कारणामुळे पार्थ पवारांच्या अडचणी वाढल्या ?

पुणे : कोरेगाव पार्क परिसरातील महार वतनाच्या तब्बल ४० एकर जमिनीच्या नोंदणी प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा धक्कादायक निष्कर्ष चौकशी समितीच्या अहवालातून समोर आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र संचालक म्हणून कार्यरत असलेल्या ‘अमेडिया’ कंपनीशी संबंधित या व्यवहारात नोंदणी करताना नियमबाह्य पद्धतींचा अवलंब करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेषतः, दस्त नोंदविताना जुन्या आणि वापरात नसलेल्या सातबारा उताऱ्याचा उपयोग करण्यात आला, तसेच ई-फेरफार (ई-म्युटेशन) प्रक्रिया टाळल्याचे अहवालात नोंदविण्यात आले आहे. याशिवाय, जमिनीचे स्वरूप स्थावर असताना ती जंगम मालमत्ता म्हणून नोंदविली गेल्यामुळेही संशय निर्माण झाला आहे.या जमिनीबाबत ‘अमेडिया’चे भागीदार दिग्विजयसिंह पाटील आणि जागेचे कुलमुखत्यारधारक शीतल तेजवानी यांच्यात खरेदी-विक्री करार झाला होता. मात्र संबंधित जमीन शासकीय स्वरूपाची आणि महार वतनात समाविष्ट असल्यामुळे तिची विक्री किंवा हस्तांतरण करणे नियमांनुसार मान्य नाही. या व्यवहाराची माहिती पुढे आल्यानंतर संपूर्ण प्रकरणावर चौकशीची आवश्यकता भासली आणि त्यासाठी नोंदणी उपमहानिरीक्षक राजेंद्र मुठे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती गठीत करण्यात आली. या समितीने तयार केलेला अहवाल नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक नियंत्रक रवींद्र बिनवडे यांच्याकडे सादर करण्यात आला असून, निलंबित सहदुय्यम निबंधक रवींद्र तारू यांच्या वर्तनाबाबत गंभीर निरीक्षणे नोंदवली आहेत.अहवालात म्हटले आहे की, दस्त नोंद करताना संबंधित भूखंडाचा अधिकृत ऑनलाइन सातबारा उतारा तपासणे अत्यावश्यक असतानाही, ते न करता अप्रचलित सातबारा दस्ताशी जोडण्यात आला. तसेच, उद्योग संचालनालयाकडून आवश्यक पात्रता प्रमाणपत्र नसतानाही मुद्रांक शुल्क सवलत मिळवून नोंदणी करण्यात आली. दस्ताची ई-म्युटेशन प्रक्रियेसाठी पाठवणी करताना स्थावरच्या जागी जंगम मालमत्ता हा पर्याय निवडण्यात आला, आणि संपूर्ण नोंदणी प्रक्रिया ‘ऑफलाइन’ स्वरूपात हाताळण्यात आली.‘सर्व्हेअर’ यंत्रणेत अडचणी आल्यास नागरिकांना पर्याय म्हणून ऑफलाइन दस्त नोंदणीची सुविधा उपलब्ध असते. मात्र, या प्रकरणात त्या सुविधेचा वापर प्रत्यक्षात नियमांचं उल्लंघन करण्यासाठी झाल्याचे समितीने स्पष्टपणे अधोरेखित केले आहे. या सर्व गोष्टींच्या पार्श्वभूमीवर, या व्यवहारात लक्षणीय अनियमितता झाल्याचे अहवालावरून स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी सखोल चौकशी सुरु आहे.

फीड फीडबर्नर 20 Nov 2025 10:30 pm

AI शेअर मार्केटमध्ये उधाण! गुगलचे CEOच म्हणाले –‘फुगा फुटला तर सर्व काही संपेल

लॉस एंजल्स – कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील कंपन्या आणि या क्षेत्रासाठी सेमीकंडक्टर तयार करणार्‍या कंपन्यांच्या शेअरच्या भावात गेल्या एक वर्षात अभूतपूर्व वाढ झाली आहे. एन व्हिडिवा या कंपनीच्या शेअरचा भाव तर इतका वाढला आहे की या कंपनीचे बाजार मूल्य भारताच्या एकूण अर्थव्यवस्थेपेक्षा जास्त म्हणजे पाच लाख कोटी डॉलर इतके झाले आहेत. या क्षेत्रावर गुंतवरूकदार आवश्यकतेपेक्षा जास्त […] The post AI शेअर मार्केटमध्ये उधाण! गुगलचे CEOच म्हणाले – ‘फुगा फुटला तर सर्व काही संपेल appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 20 Nov 2025 10:28 pm

Prakash Abitkar : गिरणी कामगारांच्या हक्काच्या घरांसाठी कालबद्ध कार्यक्रम राबवा; मंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश

मुंबई : गिरणी कामगारांना घरे देण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम तयार करण्याचे तसेच, एकही पात्र गिरणी कामगार हक्काच्या घरापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील गिरणी कामगारांच्या घरांबाबत मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव असिमकुमार गुप्ता यांच्यासह म्हाडा, नगर विकास […] The post Prakash Abitkar : गिरणी कामगारांच्या हक्काच्या घरांसाठी कालबद्ध कार्यक्रम राबवा; मंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 20 Nov 2025 10:27 pm

रुपया कोसळला 88.71 वर! RBI गव्हर्नरचा मोठा खुलासा – डॉलरची मागणी वाढली, पण भारत सुरक्षित?

मुंबई – जागतिक आर्थिक आणि भूराजकीय परिस्थितीमुळे गेल्या काही महिन्यात रुपयाचे बरेच अवमूल्यन झाले आहे. गुरुवारी रुपयाचा भाव डॉलरच्या तुलनेत 23 पैशांनी कोसळून 88 रुपये 71 पैसे प्रति डॉलर या पातळीवर गेला. चलन बाजारात रिझर्व बँक शक्यतो हस्तक्षेप करत नाही. सध्याचे रुपयाचे अवमूल्यन डॉलरची मागणी वाढल्यामुळे होत आहे, असे रिझर्व बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी […] The post रुपया कोसळला 88.71 वर! RBI गव्हर्नरचा मोठा खुलासा – डॉलरची मागणी वाढली, पण भारत सुरक्षित? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 20 Nov 2025 10:22 pm

कृषी विकासदर 4% वर पोहोचणार? नीती आयोगाचे भाकीत खळबळ उडवणार

नवी दिल्ली – कृषी क्षेत्राचे एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील योगदान वाढत आहे. एकूण परिस्थिती पाहता पुढील दहा वर्षे कृषी क्षेत्राचा विकासदर किमान चार टक्के राहण्याची शक्यता आहे. देशातील कृषी क्षेत्राचे उत्पादन देशांतर्गत गरजेपेक्षा जास्त आहे. अशा परिस्थितीत या उत्पादनांची निर्यात वाढवावी लागणार आहे असे मत नीती आयोगाचे सदस्य रमेश चंद यांनी व्यक्त केले. पीएचडी चेंबर ऑफ […] The post कृषी विकासदर 4% वर पोहोचणार? नीती आयोगाचे भाकीत खळबळ उडवणार appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 20 Nov 2025 10:17 pm

ऑनलाइन शॉपिंगमध्ये मोठा बदल; 26 कंपन्यांनी मान्य केले नवे नियम

नवी दिल्ली – डिजिटल बाजारपेठेत ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलत, 26 आघाडीच्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सनी डार्क पॅटर्न प्रतिबंध आणि नियमन मार्गदर्शक तत्त्वे, 2023 चे पालन करण्यासंदर्भात स्वयंस्फूर्तीने स्व-घोषणा पत्रे सादर केली आहेत. ग्राहकांची दिशाभूल करणार्‍या किंवा त्यांना प्रभावित करणार्‍या फसव्या ऑनलाइन डिझाइन पद्धतींना आळा घालण्याच्या भारताच्या प्रयत्नांमध्ये हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. […] The post ऑनलाइन शॉपिंगमध्ये मोठा बदल; 26 कंपन्यांनी मान्य केले नवे नियम appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 20 Nov 2025 10:13 pm

कोळसा–वीज घसरली, गुंतवणूक कमी… उद्योगक्षेत्र अडचणीत?

नवी दिल्ली – ऑक्टोबर महिन्यात पायाभूत सुविधा क्षेत्राची उत्पादकता 3.3% या पातळीवर स्थिर आहे. सप्टेंबर महिन्यात ही उत्पादकता 3.3% होती. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात ही उत्पादकता 3.8 टक्क्यांनी वाढली होती. म्हणजे वार्षिक आणि मासिक पातळीवर या उत्पादकतेत फारसा बदल झालेला नाही. ऑक्टोबर महिन्यामध्ये खते, पोलाद व तेल शुद्धीकरण क्षेत्राची उत्पादकता स्थिर राहिली. तर कोळसा आणि […] The post कोळसा–वीज घसरली, गुंतवणूक कमी… उद्योगक्षेत्र अडचणीत? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 20 Nov 2025 10:10 pm

पुणेकरांनो नव्या घराचं स्वप्न होणार पूर्ण; म्हाडाच्या ४,१८६ घरांसाठी अर्ज करण्याची मुदत आता ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत वाढवली

पुणे : पुणे महानगर प्रदेशात घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी म्हाडाने (MHADA) मोठा दिलासा दिला आहे. विविध गृहनिर्माण योजनेंतर्गत उपलब्ध असलेल्या ४,१८६ सदनिकांसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत वाढवून आता ३० नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत करण्यात आली आहे. त्यामुळे अर्ज प्रक्रिया पूर्ण न झालेल्या इच्छुकांना अतिरिक्त वेळ मिळणार आहे. या योजनांसाठी आतापर्यंत १,८२,७८१ ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी १,३३,८८५ अर्ज अनामत रकमेच्या भरण्यासह नोंदवले गेले आहेत. सदनिकांच्या संगणकीय सोडतीचा कार्यक्रम ११ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजता आयोजित करण्यात आलेला आहे. अर्जदारांना ३० नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन पद्धतीने किंवा १ डिसेंबर २०२५ पर्यंत संबंधित बँकेच्या वेळेत RTGS/NEFT द्वारे अनामत रक्कम जमा करण्याची सुविधा उपलब्ध आहे.दरम्यान, अनेक अर्जदारांना कागदपत्र पडताळणीतील तांत्रिक अडचणींमुळे अडथळे येत असल्याने तसेच आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी अधिक वेळ देण्याची मागणी वाढली होती. नागरिकांच्या या मागणीचा आणि मिळालेल्या मोठ्या प्रतिसादाचा विचार करून ही मुदतवाढ “शेवटची संधी” म्हणून देण्यात आल्याचे पुणे मंडळातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. या सोडतीबाबतचे सुधारित वेळापत्रक म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येणार आहे.म्हाडाच्या पुणे मंडळाने जाहीर केलेली ही सोडत चार प्रमुख गटांत विभागण्यात आली आहे. यामध्ये म्हाडा गृहनिर्माण योजना (प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य) अंतर्गत १,६८३ सदनिका, प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) FCFS अंतर्गत २९९ सदनिका, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हद्दीतील १५ टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेतील ८६४ सदनिका आणि PMC, PCMC व PMRDA हद्दीतील २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेतील ३,२२२ सदनिकांचा समावेश आहे. या मुदतवाढीमुळे पुण्यात तसेच परिसरात घर घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्याची आणखी एक महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे.

फीड फीडबर्नर 20 Nov 2025 10:10 pm

नेपाळमध्ये पुन्हा पेटलं जेन झी चं आंदोलन

काठमांडू : नेपाळमध्ये पुन्हा जेन झी आंदोलन पेटलं आहे. देशातील तरुणाई पुन्हा रस्त्यावर उतरली आहे. परिस्थिती हाताबाहेर गेल्यानं काही भागांमध्ये संचारबंदी लागू केली आहे. विमानांची उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. नेपाळमध्ये ८-९ सप्टेंबरला पोलिसांकडून झालेल्या गोळीबारात २१ जणांचा मृत्यू झाला होता. आता ७० दिवसांनी नेपाळमध्ये पुन्हा एकदा गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. भारतीय सीमेला लागून असलेल्या नेपाळच्या सर्व जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे.जेन झी आणि सीपीएन-यूएमएल (कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ युनायटेड मार्क्सिस्ट-लेनिनिस्ट) यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हिंसक झटापट झाल्यामुळे परिस्थिती बिघडली आहे. यूएमएलचे महासचिव शंकर पोखरेल आणि युवा नेते महेश बस्नेत सरकार विरोधात भाषण देण्यासाठी एका कार्यक्रमाला जात होते. ते कार्यक्रमासाठी सेमरा शहरात आल्याची माहिती मिळताच तरुणाई रस्त्यावर आली. जेन झी आणि सीपीएन-यूएमएल यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हिंसक झटापट झाली. दोन्ही गटांनी एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. तणाव वाढला आणि दोन्ही बाजूने एकमेकांवर दगडफेक सुरू झाली. तोडफोड आणि जाळपोळ झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी दुपारी १ ते रात्री ८ पर्यंत प्रशासनानं संचारबंदी लागू केली. पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला. बुद्ध एअरलाईन्सनं त्यांची देशांतर्गत सर्व उड्डाणं रद्द केली.सेमरामधील परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. स्थानिक प्रशासनानं परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक पावलं उचलली आहेत. कायदा-सुव्यवस्थेची स्थिती ठीक असल्याचं मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.

फीड फीडबर्नर 20 Nov 2025 10:10 pm

मालाड, कांदिवली, माटुंगा, परळमधील उद्याने, क्रीडांगणाचा होणार विकास

महापालिकेने मागवली २६ कोटींची निविदामुंबई (खास प्रतिनिधी) : मालाड (पूर्व), येथील माँसाहेब मीनाताई ठाकरे क्रीडांगण, कांदिवली (पूर्व) लोखंडवाला येथील आकुर्ली व्हिलेज येथील साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे उद्यान, माटुंगा येथील महेश्वरी उद्यान, परळ येथील दादासाहेब फाळके उद्यान आणि नरे पार्क मैदानाचा नूतनीकरण करत विकास करण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेने २६ कोटींची निविदा मागवली आहे.मुंबई महापालिकेचे शहर आणि उपनगरे येथे अनेक उद्याने, क्रीडांगणे, मनोरंजन मैदाने आहेत. त्यांचा ठराविक वर्षांनी दुरुस्ती, नूतनीकरण यांच्या माध्यमातून विकास करण्यात येतो. मात्र, विकास केल्यानंतर पुढील तीन ते पाच वर्षे त्याची देखभाल दुरुस्ती करणे हे संबंधित काम करणाऱ्या कंपनीची जबाबदारी असते. मात्र प्रत्यक्षात उद्यानातील पायवाटा, झोपाळे, घसरगुंडी, व्यायाम साहित्य, आदीकडे कंत्राटदाराकडून दुर्लक्ष केला जातो. परिणामी त्या विकसित मैदान आणि उद्यानांची दुरवस्था होते.आता महापालिकेची निवडणूक तोंडावर असतानाच पालिका प्रशासनाने, मालाड (पूर्व), येथील माँसाहेब मीनाताई ठाकरे क्रीडांगणाची ११ महिन्यात दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यासाठी ४ कोटी २२ लाख रुपये खर्चात येणार आहेत. तसेच, कांदिवली (पूर्व) लोखंडवाला येथील आकुर्ली व्हिलेज येथील साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे उद्यानाच्या विकासाचे आणि श्रेणीवाढ करण्याचे काम ११ महिन्यात करण्यात येणार असून त्यासाठी महापालिका १४ कोटी ७८ लाख रुपये खर्च करणार आहे. त्याचप्रमाणे, माटुंगा येथील महेश्वरी उद्यानाच्या नूतनीकरणाचे काम आगामी ११ महिन्यात करण्यात येणार असून त्यासाठी महापालिका ३ कोटी ९९ लाख रुपये खर्च करणार आहे. तसेच, परळ येथील दादासाहेब फाळके उद्यान, नरे पार्क मैदानाची दर्जेदार कामे करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे, माटुंगा परिसरातील एम. चंदगडकर वाड्यांचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. या दोन्ही कामांसाठी ३ कोटी १५ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. या सर्व उद्याने, क्रीडांगणे, मनोरंजन मैदाने यांच्या विकासकामांसाठी महापालिकेने तब्बल १६ कोटी १५ लाख ३८ हजार रुपयांच्या अंदाजित खर्चाकरता निविदा मागवली आहे.

फीड फीडबर्नर 20 Nov 2025 10:10 pm

Anil Ambani : अनिल अंबानींची आणखी कोट्यवधींची मालमत्ता जप्त

Anil Ambani – अनिल अंबानी यांच्यासमोरील अडचणी आणखी वाढत असून रिलायन्स ग्रुपवर ईडीकडून कारवाई करण्यात येत आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीने रिलायन्स ग्रुपशी संबंधित आणखी १४५२ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. यामध्‍ये पुणे, नवी मुंबई, चेन्नई आणि भुवनेश्वर येथील भूखंड आणि अन्‍य मालमत्‍तेचा समावेश आहेत. आतापर्यंत ईडीने अनिल अंबानी यांची एकूण ९००० कोटींच्‍या मालमत्‍तेवर […] The post Anil Ambani : अनिल अंबानींची आणखी कोट्यवधींची मालमत्ता जप्त appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 20 Nov 2025 9:58 pm

पालघरमध्ये विद्यार्थिनीला ‘100 उठाबशां’ची शिक्षा देणारी शिक्षिका अटकेत; मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू

पालघर: शाळेत उशिरा आल्याबद्दल एका बारा वर्षीय विद्यार्थिनीला १०० उठाबशांची अमानुष शिक्षा देणाऱ्या शिक्षिकेला अखेर गुरुवारी पोलिसांनी अटक केली. वसई येथील सातिवली परिसरात ही धक्कादायक घटना घडली असून, शिक्षिकेच्या शिक्षेनंतर त्रास होऊन उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू झाला होता. आरोपी शिक्षिकेविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा (Culpable Homicide) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वालिव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही हृदयद्रावक घटना […] The post पालघरमध्ये विद्यार्थिनीला ‘100 उठाबशां’ची शिक्षा देणारी शिक्षिका अटकेत; मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 20 Nov 2025 9:57 pm

Shai Hope Record : शाई होपचा विश्वविक्रमी धमाका! गिलख्रिस्ट-बटलरचा १९ वर्ष जुना विक्रम चक्काचूर

Shai Hope Record most sixes in one calender year : क्रिकेटच्या विश्वात दररोज नवनवीन विक्रम रचले जात असताना, वेस्ट इंडिजचा यष्टिरक्षक फलंदाज शाई होपने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक मोठा आणि ऐतिहासिक विक्रम आपल्या नावावर केला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने केलेल्या शानदार शतकी खेळीदरम्यान हा पराक्रम साधला. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात होपने ६९ चेंडूत १३ चौकार आणि […] The post Shai Hope Record : शाई होपचा विश्वविक्रमी धमाका! गिलख्रिस्ट-बटलरचा १९ वर्ष जुना विक्रम चक्काचूर appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 20 Nov 2025 9:51 pm

शाहिन, मुझम्मिलने बॉम्बसाठी ‘अल-फलाह’तून चोरले केमिकल

नवी दिल्ली : बॉम्ब बनवण्यासाठी विद्यापीठाच्या प्रयोगशाळेतून रसायने चोरली होती, असा कबुली जबाब फरिदाबादच्या अल-फलाह विद्यापीठातील डॉ. शाहिन सईद आणि डॉ. मुझम्मिल यांनी ‘एनआयए’समोर चौकशीदरम्यान दिला. राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए), जम्मू-काश्मीर पोलीस, दिल्ली गुन्हे शाखा, हरियाणा एटीएस अशा अनेक पथकांकडून फरिदाबादच्या अल-फलाह विद्यापीठातून चालवल्या जाणाऱ्या ‘व्हाईट कॉलर टेरर मॉड्यूल’ची चौकशी करण्यात येत आहे. या विद्यापीठाच्या लॅबोरेटरीतून बॉम्ब बनवण्यासाठी केमिकल चोरली होती. त्यांचा वापर बॉम्ब बनवण्यासाठी कसा करायचा, याचे मार्गदर्शन मिळवले होते, असेही परवेज मुझम्मिलने कबूल केले, तर डॉ. शाहिनने ती महिलांच्या आत्मघातकी पथकाची उभारणी करत असल्याची माहिती दिली. दरम्यान, तपास यंत्रणांतील अन्य सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उमर आत्मघातकी बॉम्बर्सची एक टीम तयार करत होता. डॉ. उमर नबी स्वतःसारख्या अधिक आत्मघाती हल्लेखोरांना प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न करत होता. तो तरुणांचे ब्रेन वॉश करण्यासाठी त्यांना प्रेरणादायी व्हिडीओ तयार करून पाठवत होता. हे व्हिडीओ ११ व्यक्तींना पाठवण्यात आले होते, त्यापैकी सात काश्मिरी होते आणि ते सर्व कोणत्या ना कोणत्या प्रकारे विद्यापीठाशी जोडलेले होते. उर्वरित चारजण उत्तर प्रदेश, केरळ आणि कर्नाटकमधील असल्याचे सांगितले जाते.दिल्ली स्फोट प्रकरणी चार आरोपींना अटकदिल्लीत १० नोव्हेंबर रोजी लाल किल्ल्याबाहेर झालेल्या स्फोट प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) आणखी चार प्रमुख आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणात अटक झालेल्यांची एकूण संख्या सहा झाली आहे. पटियाला हाऊस कोर्टाच्या जिल्हा सत्र न्यायाधीशांच्या प्रोडक्शन ऑर्डरवर एनआयएने जम्मू आणि काश्मीरमधून चारही आरोपींना ताब्यात घेतले. चौघांनाही १० दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. जम्मू- काश्मीरच्या पुलवामा येथील रहिवासी डॉ. मुजम्मिल शकील गनई, अनंतनाग येथील रहिवासी डॉ. आदिल अहमद राथेर, लखनऊ येथील रहिवासी डॉ. शाहीन सईद आणि शोपियां येथील रहिवासी मुफ्ती इरफान अहमद वागे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या सर्वांनी दहशतवादी हल्ल्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती, असे एनआयएच्या तपासात स्पष्ट झाले आली आहे. एनआयएने आधीच दोन इतर आरोपींना अटक केली आहे.

फीड फीडबर्नर 20 Nov 2025 9:30 pm

Karnataka Government : कर्नाटक कॉंग्रेसमध्ये सत्तासंघर्षाचे संकेत; शिवकुमार यांचे समर्थक दिल्लीला रवाना

बंगळुरू : कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के.शिवकुमार यांचे समर्थक गुरूवारी कॉंग्रेस श्रेष्ठींच्या भेटीसाठी दिल्लीला रवाना झाले. त्यामुळे कर्नाटक कॉंग्रेसमध्ये सत्तासंघर्ष उफाळण्याचे संकेत मिळत आहेत. कर्नाटकात मे २०२३ मध्ये विधानसभा निवडणूक झाली. त्यामध्ये बाजी मारून कॉंग्रेसने त्या राज्याची सत्ता हस्तगत केली. मात्र, मुख्यमंत्रिपदावरून कोंडी निर्माण झाली. सिद्धरामय्या आणि शिवकुमार या तगड्या दावेदारांमुळे ती स्थिती उद्भवली. अखेर तोडगा काढत […] The post Karnataka Government : कर्नाटक कॉंग्रेसमध्ये सत्तासंघर्षाचे संकेत; शिवकुमार यांचे समर्थक दिल्लीला रवाना appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 20 Nov 2025 9:28 pm

मालेगावच्या बालिकेवर अत्याचार, सर्वत्र संताप; अभिनेत्री सुरभी भावेकडून कठोर शिक्षेची मागणी

मालेगाव : मालेगावजवळील डोंगराळे गावात घडलेल्या निर्घृण घटनेनंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. साडेतीन वर्षांच्या निरागस बालिकेवर २४ वर्षीय व्यक्तीने अत्याचार करून दगडाने ठेचून तिची हत्या केल्याची घटना समोर आल्यानंतर नागरिकांसह अनेक कलाकारांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे. मराठी अभिनेत्री सुरभी भावे हिने देखील सोशल मीडियावर भावनिक व्हिडिओ शेअर करत आपला संताप व्यक्त केला.“अशी घटना मन हेलावून टाकणारी” सुरभी भावे

फीड फीडबर्नर 20 Nov 2025 9:10 pm

स्मार्ट सिटीच्या धर्तीवर अयोध्येचा विकास

लखनऊ / अयोध्या : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या दूरदर्शी नेतृत्वाचा परिणाम म्हणून अयोध्येचा स्मार्ट सिटी म्हणून जलदगतीने विकास होत आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अयोध्या नगरीचा कायापालट ध्वजारोहणापूर्वीच आधुनिक रूपात होत आहे. सौर ऊर्जा आणि इतर नवीकरणीय ऊर्जेच्या वापराद्वारे शहराला पर्यावरणपूरक बनवण्यावर विशेष भर दिला जात आहे. शहरातील सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम केली जात असून १२०० सीसीटीवी कॅमेरे बसवले जात आहेत, ज्याद्वारे संशयास्पद हालचाली आणि व्यक्तींवर सतत लक्ष ठेवले जाईल. येत्या काही वर्षांत अयोध्येचा विकास नवा मानदंड निर्माण करीत जगभरात आपली छाप उमटवेल. आध्यात्मिक नगरी अयोध्या विकासाचे नवे मापदंड निर्धारित करत आहे.स्मार्ट सिटी अयोध्या — नवीकरणीय ऊर्जेकडे लक्ष केंद्रित:सूर्यनगरी म्हणून ओळख पुन्हा प्राप्त करण्याच्या उद्देशाने धार्मिक वारसा, आधुनिक तंत्रज्ञान, हरित ऊर्जा आणि शाश्वत शहरी विकासाच्या संयोगातून अयोध्येला नव्या रूपात घडवण्यात येत आहे. ‘म्युझियम ऑफ टेंपल’, ग्रीनफील्ड टाउनशिप, सौर ऊर्जा शहर, डिजिटल वर्चुअल दर्शन, वैदिक वन आणि हवामान-आधारित सुरक्षा प्रकल्पांसारख्या उपक्रमांनी अयोध्येला जागतिक धार्मिक पर्यटन, आरोग्य सुरक्षा आणि हरित विकासाच्या प्रमुख केंद्र म्हणून स्थापित करण्याचा पाया मजबूत केला आहे. उत्तर प्रदेशातील १७ स्मार्ट शहरांच्या यादीत अयोध्या पहिल्या क्रमांकावर आहे. अयोध्या महायोजना २०३१ अंतर्गत अयोध्येला पूर्णपणे सौर ऊर्जेवर आधारित नगरी म्हणून विकसित केले जात आहे.ग्रीनफील्ड टाउनशिप प्रकल्पाद्वारे सर्वांगीण विकास:अयोध्येचा विकास ग्रीनफील्ड टाउनशिप प्रकल्पाच्याअंतर्गत करण्यात येत असून, यात आधुनिकता आणि पर्यावरण संरक्षण या दोन्ही गोष्टींना समान प्राधान्य दिले जात आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मार्गदर्शनानुसार ‘नव्य अयोध्या’ योजनेअंतर्गत ५५० एकर क्षेत्रात उभ्या राहणारी ही हायटेक टाउनशिप राज्यातील सर्वात प्रगत प्रकल्पांपैकी एक ठरत आहे. येथे अंडरग्राउंड ड्रेनेज, इलेक्ट्रिकल डक्ट यांसारख्या अत्याधुनिक संरचनांवर २१८ कोटी रुपये खर्च केले जात आहेत. २०० एकर हरित क्षेत्रासोबत सुपर-स्पेशॅलिटी मेडिकल सेंटर, हायटेक पार्क आणि वेलनेस हब विकसित होत आहेत, ज्यामुळे ही टाउनशिप एक आधुनिक, पर्यावरणपूरक आणि भविष्याभिमुख स्मार्ट सिटीचा नमुना निर्माण करेल.सोलर सिटी अयोध्या — पुरातन वैभवाचे नव्याने दर्शन:आध्यात्मिक नगरी अयोध्येला हायटेक शहरात रूपांतरित करण्याचा उद्देश व्यापक आहे. यामुळे परदेशातून येणाऱ्या पर्यटकांना जागतिक दर्जाच्या सुविधांचा लाभ मिळेल तसेच स्थानिक नागरिकांनाही सुधारित सुविधा उपलब्ध होतील. उत्तर प्रदेश सौर ऊर्जा धोरण २०२२ अंतर्गत अयोध्येला मॉडेल सोलर सिटी घोषित करण्यात आले आहे. एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेडद्वारे सरयू काठावरील दोन गावांमध्ये ४० मेगावॅट क्षमतेचा सौर प्रकल्प उभारला आहे. 165 हेक्टर सरकारी जमिनीवर ३० वर्षांच्या लीजवर कार्यान्वित असलेला हा प्रकल्प शहराच्या १९८ मेगावॅट वीज मागणीपैकी २५–३०% पुरवठा करत आहे. हा उपक्रम अयोध्येला ऊर्जा स्वावलंबन आणि स्वच्छ ऊर्जेच्या व्यापक वापराच्या दिशेने अग्रगण्य मॉडेल सिटी बनवत आहे.अक्षय ऊर्जेच्या प्रकल्पांमुळे शहराला नवे रूप:अयोध्या विकास प्राधिकरणाच्या ग्रीन फंडद्वारे ७५ स्थळांवर १५,००० वृक्षारोपणाची प्रक्रिया राबवली जात आहे, ज्यामध्ये मियावाकी पद्धतीचा समावेश असेल. तसेच एडीएद्वारे टाटा पॉवर, रिलायन्स आणि अदानी समूहाच्या सहकार्याने १३ सार्वजनिक स्थळांवर ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारले जात आहेत. त्यापैकी १० स्टेशन सुरू झाले असून उर्वरित ३ स्टेशन लवकरच कार्यान्वित केले जातील. या सर्व उपक्रमांमुळे अयोध्या नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातही नवे विक्रम प्रस्थापित करत आहे

फीड फीडबर्नर 20 Nov 2025 9:10 pm

मुंबईत २०० पेक्षा वायू गुणवत्ता निर्देशांक असल्यास उद्योग आणि बांधकामे बंद करा

महापालिका आयुक्त अश्विनी जोशी यांचे अधिकाऱ्यांना निर्देशमार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणाऱ्यांचा गय नाहीमुंबई (खास प्रतिनिधी) : वायू प्रदूषण नियंत्रण उपायांच्या अंमलबजावणीसाठी मुंबईत महानगरपालिकेडून प्रत्येक प्रशासकीय विभाग (वॉर्ड) स्तरावर भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या मार्गदर्शक तत्त्वांचा उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर करावी, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी दिले आहेत. तसेच विविध उपाययोजना राबवूनदेखील वायू गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) सातत्याने २०० पेक्षा अधिक राहिल्यास त्या परिसरातील कारणीभूत उद्योग आणि बांधकामे ‘ग्रेडेड रिस्पॉन्स अॅक्शन प्लॅन-४’ (ग्रॅप-४) अंतर्गत बंद करण्यात येतील, असेही डॉ. अश्विनी जोशी यांनी स्पष्ट केले. महानगरपालिकेचे सर्व उपायुक्त, सहायक आयुक्त यांनी या बाबींवर विशेष लक्ष देण्याच्या आणि यथोचित कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.मुंबईतील वायू प्रदूषण नियंत्रणाच्या अनुषंगाने, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशांनुसार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनात, उपायुक्त (पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग) अविनाश काटे यांच्या देखीरेखीत विविध उपाययोजना केल्या जात आहेत. यामध्ये स्वच्छ इंधनावर बेकरी तसेच स्मशानभूमीचे क्रियान्वयन, सार्वजनिक वाहतूक सेवा अधिक पर्यावरणस्नेही बनविण्यासाठी इलेक्ट्रिक बसेसचा वापर, बांधकामाच्या राडारोड्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करण्यासाठी प्रकल्प, धूळ आटोक्यात आणण्यासाठी मिस्टींग मशीनच्या सहाय्याने रस्त्यांवर पाणी फवारणी आदी बाबींचा समावेश आहे.याच अनुषंगाने, वायू प्रदूषण नियंत्रणासाठी महानगरपालिकेने १५ ऑक्टोबर २०२४ रोजी सर्वंकष मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. यामध्ये बांधकाम प्रकल्पाच्या सभोवताली धूळ प्रदूषण रोखण्यासाठी पत्र्यांचे कुंपण उभारणे, हिरव्या कपड्याचे आच्छादन करणे, पाणी फवारणी करणे, राडारोड्याची शास्त्रशुद्ध साठवण व ने-आण करणे, बांधकामाच्या ठिकाणी वायू प्रदूषण मोजमाप करणारी यंत्रणा बसवणे, धूरशोषक यंत्र बसवणे आदी उपाययोजनांचा समावेश आहे. ही सर्व मार्गदर्शक तत्त्वे मुंबई महानगरपालिकेच्या https://www.mcgm.gov.inसंकेतस्थळावर उपलब्ध आहेत.याच पार्श्वभूमीवर, वायू प्रदूषण नियंत्रण उपायांची काटेकोरपणे अंमलबजावणी सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने, महानगरपालिकेडून प्रत्येक प्रशासकीय विभाग (वॉर्ड) स्तरावर भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकामध्ये विभाग स्तरावरील दोन अभियंता आणि एका पोलिस कर्मचाऱ्याचा समावेश राहील. त्यांच्यासमवेत व्हेईकल ट्रॅकिंग अँड मॉनिटरिंग सिस्टीमसह (व्हीटीएमएस) वाहन कार्यरत राहील. महानगरपालिकेने जारी केलेल्या २८ मुद्दे समाविष्ट असलेली मार्गदर्शक तत्त्वांची काटेकोरपणे अंमलबजावणी, संवेदन (सेन्सॉर) आधारित वायू गुणवत्ता देखरेख संयंत्र आणि एलईडीचे क्रियान्वयन योग्यप्रकारे होत असल्याचे सुनिश्चित करणे. तसेच, कचरा जाळणे, इंधनाच्या स्वरुपात लाकूड जाळण्यावर प्रतिबंध घालणे आदी कार्यवाही या पथकाकडून करण्यात येईल. तसेच, मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाईही त्यांच्याकडून केली जाईल. नागरिकांनी वायू प्रदुषणास कारक ठरतील असे कृत्य करणे टाळावे आणि महानगरपालिकेच्या प्रयत्नांना सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

फीड फीडबर्नर 20 Nov 2025 8:30 pm

Suryakumar Yadav : ‘मला कर्णधारपदाबाबत गिलकडून धोका…’, टी-२० कॅप्टन्सीवर प्रश्नचिन्ह? सूर्यकुमार यादवचं मोठं विधान

Suryakumar Yadav on Shubman Gill : टी-२० फॉर्मेटमध्ये टीम इंडियाचा सातत्याने चांगला खेळ सुरू आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वानेही सर्वांचे लक्ष वेधले आहे, मात्र सध्या त्याचा फॉर्म संघासाठी चिंतेचा विषय बनला आहे. २०२६ च्या टी-२० विश्वचषकाची तयारी सुरू असताना, युवा फलंदाज शुबमन गिलला टी-२० संघाचा कर्णधार बनवण्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे. या चर्चांवर आणि […] The post Suryakumar Yadav : ‘मला कर्णधारपदाबाबत गिलकडून धोका…’, टी-२० कॅप्टन्सीवर प्रश्नचिन्ह? सूर्यकुमार यादवचं मोठं विधान appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 20 Nov 2025 8:22 pm

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरच जिल्हा परिषदांचा कार्यक्रम

आरक्षणासाठी निवडणूक आयोग पुन्हा लॉटरी काढण्याची शक्यतानवी दिल्ली : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत इतर मागासवर्गीयांसाठी असलेल्या आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडण्यात आल्याने हा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. या सुनावणीत न्यायालयाने अतिरिक्त आरक्षण कमी करण्याचे आदेश दिले, तर जिथे आरक्षण मर्यादा ओलांडली गेली आहे तेथे आरक्षित प्रभागांची संख्या कमी केली जाईल. त्यासाठी लॉटरी हा एक पर्याय असू शकतो. मात्र, न्यायालय काय निर्णय देते, यावर पुढील प्रक्रिया अवलंबून राहील, अशी माहिती निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी दिली. मंगळवारी न्यायालय काय निर्णय देते, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. हा निकाल लागल्यावर पुन्हा आरक्षणाच्या प्रभागासाठी लॉटरी काढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत ओबीसींसाठी सरसकट २७ टक्के आरक्षण लागू केल्याने आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा जिल्हा परिषद, पंचायत समित्या, महापालिका आणि नगरपालिका व नगरपंचायती यामध्ये ओलांडण्यात आल्याप्रकरणी धुळ्यातील राहुल रमेश वाघ आणि किसनराव गवळी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेवर बुधवारी (दि. १९) सुनावणी होणार होती. मात्र, आता ही सुनावणी पुढील आठवड्यात मंगळवारी (दि. २५) होणार आहे. या सुनावणीवेळी न्यायालय काय निर्णय देते, याकडे राज्य निवडणूक आयोगाचे लक्ष लागले आहे. न्यायालयीन निर्णयाच्या अधीन राहून आरक्षणात सुधारणा करण्याची तयारी आयोगाने ठेवली आहे.महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांच्या निवडणुकांत आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांच्या वर जाणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. मात्र, या निर्देशांनंतरही विदर्भातील नागपूर, चंद्रपूर जिल्ह्यांतील जिल्हा परिषदांमध्ये सर्वाधिक मर्यादा ओलांडली गेली आहे. तर, काही जिल्ह्यांमधील नगरपंचायतींमध्ये ५० टक्क्यांवर आरक्षण गेल्याचे आढळून येत आहे. मात्र, हे प्रमाण फारसे नाही, असे नगरविकास विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. तर, सुनावणीत न्यायालयाने जास्तीचे आरक्षण कमी करण्याचे आदेश दिले.इच्छुकांचे देव पुन्हा पाण्यातन्यायालयाची पुढील सुनावणी पार पडेपर्यंत निवडणूक आयोगाकडून जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला जाणार नाही. तसेच, या निवडणुकांसाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची अजून नेमणूक झालेली नाही. याबाबत महसूल विभागाकडून अहवाल मिळालेला नाही. नियुक्त झालेले निवडणूक निर्णय अधिकारी हजर झाल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर आयोगाकडून जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असेही सूत्रांनी स्पष्ट केले. आरक्षणाची मर्यांदा ओंलाडल्या गेलेल्या ठिकाणी इच्छूकांचे पुन्हा धाबे दणाणले आहे. आरक्षण निश्चित होताच निवडणुक लढवू पाहणाऱ्या इच्छुकांनी मोर्चेबांधणी आखताना कार्यकर्त्याना खुश ठेवण्यासाठी पार्ट्यांना सुरुवात केली होती. आपल्या मतदारसंघामध्ये मोर्चेबांधणी करताना नाराजांची मनधरणी करताना काही निधीही खर्च केला होता. पुन्हा नव्याने आरक्षणाची लॉटरी निघून मतदारसंघाचे आरक्षण बदली झाल्यास संबंधितांची राजकीय वाट बिकट होण्याची भीती असून त्यांनी आतापासूनच देवांना साकडे घातले असल्याची ग्रामीण भागात जोरदार चर्चा आहे.

फीड फीडबर्नर 20 Nov 2025 8:10 pm

नितीश कुमारांनी दहाव्यांदा घेतली बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

सम्राट चौधरी, विजय सिन्हा सलग दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्रीपदीपाटणा (वृत्तसंस्था) : नितीश कुमार यांनी गुरुवारी दहाव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पाटणा येथील ऐतिहासिक गांधी मैदानात राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी त्यांना पदाची शपथ दिली. यानंतर सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. ते दुसऱ्यांदा बिहारचे उपमुख्यमंत्री झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री जीतन राम मांझी आणि उपेंद्र कुशवाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू तसेच भाजप आणि एनडीएच्या अनेक वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी २४ अन्य मंत्र्यांना शपथ दिली.नितीश यांची प्रदीर्घ राजकीय वाटचाल७४ वर्षीय नितीश कुमार यांनी नोव्हेंबर २००५ पासून राज्याचे मुख्यमंत्री आहेत. याला अपवाद २०१४-१५ मधील केवळ नऊ महिन्यांचा कालंखड आहे. यंदाची विधानसभा निवडणूक ही नितीश कुमार यांच्यासाठी एक महत्त्वाची परीक्षा म्हणून पाहिली जात होती. त्यांनी रालोआला अभूतपूर्व यश मिळवून देत पुन्हा एकदा सत्ता अबाधित ठेवण्यात यश मिळवले. जद(यू)चे प्रमुख नितीश कुमार यांची बुधवारी पाटणा येथे झालेल्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत पक्षाच्या विधिमंडळ गटाचे नेते म्हणून निवड झाली होती.चिराग यांच्या पक्षातील दोन आमदार मंत्रीचिराग यांच्या पक्षाचे संजय कुमार पासवान आणि संजय सिंह यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. संजय कुमार पासवान हे बखरी येथून आमदार आहेत, तर संजय सिंह हे महुआ येथून आमदार आहेत. त्यांनी लालू यादव यांचे पुत्र तेज प्रताप यांचा पराभव केला.प्रेम कुमार हे बिहार विधानसभेचे अध्यक्षप्रेम कुमार हे बिहार विधानसभेचे अध्यक्ष होतील. या मुद्द्यावर जेडीयू आणि भाजपमध्ये एक करार झाला आहे. डॉ. प्रेम कुमार हे गया टाउन विधानसभा मतदारसंघातून नवव्यांदा आमदार झाले आहेत. १९९० पासून ते गया टाउनची जागा सतत जिंकत आहेत. प्रेम कुमार यांनी बिहार सरकारमध्ये आरोग्य अभियांत्रिकी, रस्ते बांधकाम आणि शहरी विकास मंत्री म्हणून काम पाहिले आहे.२६ मंत्र्यांपैकी ३ महिला, ११% वाटानितीश यांच्या मंत्रिमंडळातील २६ मंत्र्यांपैकी तीन महिला आहेत. टक्केवारीच्या बाबतीत, महिला मंत्रिमंडळात ११ टक्के आहेत. लेशी सिंह, रमा निषाद आणि श्रेयसी सिंह यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे.

फीड फीडबर्नर 20 Nov 2025 8:10 pm

विधेयक मंजुरीसाठी राष्ट्रपती, राज्यपालांवर वेळेचं बंधन नाही; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना राज्य किंवा केंद्र सरकारने मंजुरीसाठी पाठवलेल्या विधेयकावर स्वाक्षरी करण्यासाठी कोणतेही वेळेचे बंधन घालता येणार नाही असा ऐतिहासिक निर्णय दिली आहे. हा निर्णय मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायमूर्तींच्या बेंचने दिला आहे. पाच न्यायमूर्तींच्या बेंचने ज्यावेळी राष्ट्रपती आणि राज्यपाल यांची कृती जस्टिसेबल नसेल आणि हे विधेयकाचे कायद्यात रूपांतर होईल, त्याचवेळी न्यायव्यवस्थेकडे त्याचे परीक्षण होईल, असे म्हटले आहे.राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्वोच्च न्यायालयाला राष्ट्रपती आणि राज्यपाल यांच्या अधिकारांबाबतचे १४ प्रश्न विचारले होते. त्यावरील सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. तत्पूर्वी, दोन जजेसच्या बेंचने तमिळनाडू सरकारच्या विधेयक मंजुरीसाठी राज्यपाल आणि राष्ट्रपतींवर वेळेचे बंधन घालण्याच्या याचिकेवर तमिळनाडू सरकारच्या बाजूने निर्णय दिला होता. त्यानंतर राष्ट्रपतींनी न्यायालयाकडे १४ प्रश्न पाठवून राष्ट्रपती, राज्यपालांच्या अधिकारांबाबत न्यायालयाचे मत मागवले होते.राष्ट्रपतींनी घटनेच्या कलम १४३ अंतर्गत न्यायालयाचे हे मत मागवले होते. राष्ट्रपतींनी ज्यावेळी भारतीय राज्यघटनेच्या कलम २०० अन्वये एखादे विधेयक हे राज्यपालांकडे संमतीसाठी सादर केले जाते, त्यावेळी मंत्रीगटाचा सल्ला मान्य करणे बंधनकारक आहे का? असा प्रश्न विचारला होता. त्यावेळी त्यांनी घटनेतील कलम ३६१ चा हवाला देत राष्ट्रपती किंवा राज्यपाल हे त्यांची कार्यालयीन कर्तव्ये पार पाडत असताना कोणत्याही न्यायालयाला बांधील नसतात, असे सुचीत केले होते.न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश बीआर गवई यांच्या अध्यक्षतेखालच्या पाच जजेसच्या बेंचने राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना विधेयकावर स्वाक्षरी करण्यासाठी वेळेचे बंधन घालणे हे घटनेच्या अगदी उलट असल्याचे म्हटले. या बेंचमध्ये न्यायाधीश सूर्यकांत, विक्रम नाथ, पीएस नरसिंहा आणि एएस चांदुरकर यांचा समावेश होता.

फीड फीडबर्नर 20 Nov 2025 8:10 pm

पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचे १० नगरसेवक फुटणार ?

भाजपमध्ये पक्ष प्रवेश करण्याची शक्यतापिंपरी : पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांची डोकेदुखी वाढण्याची चिन्हे आहेत. महायुतीतील संघर्ष काही दिवसांपासून तीव्र झाला आहे. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना फोडाफोडीचे राजकारण करत आहेत. त्यामुळे महायुतीत मिठाचा खडा पडल्याचे दिसते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आऊटगोईंगबाबत थेट केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांच्यासमोर नाराजी व्यक्त केली होती. भाजपाने आपले लक्ष अजित पवार यांच्या हक्काच्या पिंपरी-चिंचवडकडे वळवले आहे. पार्थ पवार यांचे कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची पीछेहाट झाली. भाजप शहरभर शत-प्रतिशत विजयश्री खेचून आणण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. शहरातील राष्ट्रवादीच्या जवळपास १० माजी नगरसेवकांशी भाजपच्या नेत्यांनी संपर्क साधला असल्याची माहिती समोर येत आहे.जसजशा पालिका निवडणुका जवळ येत आहेत तसे राजकीय वातावरण तप्त होत आहे. भाजप आणि राष्ट्रवादी स्वतंत्र लढत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर फोडाफोडीचे राजकारण प्रकर्षाने बघायला मिळत आहे. २०१७ मध्ये भाजपाने ७७ जागांवर विजय मिळवला होता तर राष्ट्रवादीला ३२ जागा मिळाल्या होत्या. दोन्ही पक्षांतील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. भाजपाचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी स्पष्ट केले की, पालिकेत शत-प्रतिशत विजय मिळवण्यासाठी भाजप तयार आहे. अधिकाधिक सक्षम उमेदवार उभे करण्यासाठी राष्ट्रवादीतील माजी नगरसेवकांना पक्षात खेचण्याची रणनिती खेळली जात आहे. महायुती तुटल्यामुळे भाजपाकडून १२८ पैकी सर्व जागांवर उमेदवार देण्याचा पर्याय खुला मोकळा झाला आहे.चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार असल्यामुळे या भागातील राष्ट्रवादीतील अनेक माजी नगरसेवक भाजपाच्या संपर्कात आहेत अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. ३२ प्रभागांमध्ये तिकीटासाठी चढाओढ सुरू आहे. ज्या प्रभागांमध्ये भाजप तुलनेने कमी पडते तिथे ‘ऑपरेशन कमळ’ खुलवण्याचा विचार सुरू आहे. कार्यकर्ते स्थानिक निष्ठावंतांना संधी द्यावी अशी मागणी करत आहेत. जर राष्ट्रवादीचे आयात केलेले नेते घेतल्यास पक्षातून नाराजी ओढवली जाण्याची शक्यता आहे.

फीड फीडबर्नर 20 Nov 2025 8:10 pm

जामनेरच्या नगराध्यक्षपदी साधना महाजन यांची बिनविरोध हॅट्ट्ट्रिक

मंत्री गिरीश महाजन यांचे वर्चस्व कायम!जामनेर : जिल्ह्यात सध्या नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची धामधूम सुरू आहे. मंगळवारी ता. १८ रोजी उमेदवारी अर्जाची छाननी करण्यात आली. या छाननीत अनेकांचे अर्ज तांत्रिक कारणास्तव बाद ठरविण्यात आले. या प्रक्रिये दरम्यान भाजपाचे तीन ठिकाणी नगरसेवक पदाचे उमेदवार बिनविरोध झाले आहे. यात भुसावळ येथे वार्ड क्र. ७ (अ) मधून भाजपच्या प्रीती मुकेश पाटील, जामनेरमध्ये वार्ड क्र. ११ (ब) मधून भाजपच्या उज्वला दीपक तायडे, सावदा मध्ये वार्ड क्र. ७ (अ) मधून भाजपच्या रंजना जितेंद्र भारंबे बिनविरोध झाल्या आहेत.जिल्ह्यात होऊ घातलेल्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी मंगळवारी अनेक मातब्बरांचे उमेदवारी अर्ज बाद झाले. दरम्यान, मतदान होण्या आधीच भाजपाने जिल्ह्यात तीन ठिकाणी खाते उघडून आघाडी घेतली आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी जिल्ह्यात नगराध्यक्ष पदाचे खाते उघडून विरोधकांची झोप उडवून लावली आहे. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या मैदानातून राष्ट्रवादी शरद पवार गट, काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षाच्या उमेदवारांनी माघार घेतली. साधना महाजन यांच्या विजयासह जामनेर नगरपालिका जळगाव जिल्ह्यातील बिनविरोध नगराध्यक्ष निवडणारी पहिली नगरपालिका ठरली आहे.जामनेर नगराध्यक्षपदी भाजपच्या साधना महाजन यांची बिनविरोध निवड झाली असून त्यांनी बिनविरोध हॅट्रिक साधली आहे. यामुळे जळगाव जिल्ह्याच्या राजकिय इतिहासात नवा अध्याय निर्माण झाला आहे. जामनेर नगरपरिषदेच्या मतदानापूर्वीच नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार साधना गिरीश महाजन या बिनविरोध निवडून आल्याने आता जामनेर नगरपरिषदेवर पुन्हा मंत्री गिरीश महाजन यांचे निर्विवाद वर्चस्व कायम राहिले आहे. त्यामुळे सध्या जामनेरमध्ये महाजन कुटुंबासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून आनंद साजरा केला जात आहे.जळगाव जिल्ह्यातील भुसावळ जामनेर व सावदा या नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे नगरसेवक पदाचे प्रत्येकी एक उमेदवार विजयी झाल्याने भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला. विशेष म्हणजे बिनविरोध झालेल्या तीनही नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याने या तीन जागांवर भाजपला बिनविरोध जागा मिळविण्यात यश मिळाले आहे.

फीड फीडबर्नर 20 Nov 2025 8:10 pm

Pratap Sarnaik : डिसेंबर अखेरपर्यंत मेट्रो मिरा भाईंदरकरांच्या सेवेत होणार रुजू; परिवहन मंत्र्यांनी दिली माहिती

मुंबई : या वर्षीच्या डिसेंबर अखेर दहिसर ते काशीमिरा मार्गावर मेट्रो सुरू करण्याचे नियोजन असून, मिरा भाईंदरवासियांसाच्या तब्बल 14 वर्षांच्या पाठपुराव्याला यश येत आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. सरनाईक यांनी दहिसर ते काशीमिरा या मेट्रो मार्गाचा पाहणी दौरा केला, त्यावेळी ते बोलत होते. मंत्री सरनाईक म्हणाले की, सन 2009 मध्ये जेव्हा […] The post Pratap Sarnaik : डिसेंबर अखेरपर्यंत मेट्रो मिरा भाईंदरकरांच्या सेवेत होणार रुजू; परिवहन मंत्र्यांनी दिली माहिती appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 20 Nov 2025 8:05 pm

Donald Trump : “त्यानंतर मोदींनी मला फोन करून सांगितले आम्ही युद्ध करणार नाही…”; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा खुलासा

Donald Trump – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारत व पाकिस्तानमधील युद्ध थांबवल्याचा दावा केला आहे. आपल्या दाव्यामध्ये त्यांनी ३५० टक्के कर लादण्याची धमकी दिल्याने भारत आणि पाकिस्तान यांच्यातील एकमेकांवरील हल्ले थांबवण्यात आले होते. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन करून सांगितले की आम्ही युद्ध करणार नाही, असे ट्रम्प यांचे म्हणणे आहे. मे […] The post Donald Trump : “त्यानंतर मोदींनी मला फोन करून सांगितले आम्ही युद्ध करणार नाही…”; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा खुलासा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 20 Nov 2025 8:04 pm

PM Kisan 21st Installment: तुमचा पीएम किसानचा हप्ता मिळाला नाही का? ‘या’नंबरवर कॉल करून नोंदवा तक्रार

PM Kisan 21st Installment: केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘पीएम किसान सन्मान निधी’ योजनेचा २१ वा हप्ता देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला आहे. मात्र, अनेक शेतकरी असे आहेत ज्यांना अद्याप त्यांच्या वाट्याचे २००० रुपये मिळालेले नाहीत. अशा परिस्थितीत त्वरित स्थिती तपासणे (स्टेटस चेक करणे) आणि गरज पडल्यास तक्रार नोंदवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. किती शेतकऱ्यांना […] The post PM Kisan 21st Installment: तुमचा पीएम किसानचा हप्ता मिळाला नाही का? ‘या’ नंबरवर कॉल करून नोंदवा तक्रार appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 20 Nov 2025 8:03 pm

Double Voter ID: जर एखाद्या व्यक्तीकडे दोन वेगवेगळ्या ठिकाणांचे मतदान कार्ड असेल तर होते ‘ही’शिक्षा

मुंबई: भारतीय नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे दस्तावेज असलेला ‘व्होटर आयडी’ (Voter ID) निवडणुकीत मतदानाचा हक्क देते. मात्र, एका व्यक्तीकडे एकापेक्षा अधिक व्होटर आयडी असणे, हा कायद्याने गंभीर गुन्हा आहे. निवडणूक आयोगाने (Election Commission) नागरिकांना आवाहन केले आहे की, चुकून तयार झालेले किंवा डुप्लिकेट कार्ड तात्काळ दुरुस्त करावेत, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल. व्होटर आयडी: फक्त […] The post Double Voter ID: जर एखाद्या व्यक्तीकडे दोन वेगवेगळ्या ठिकाणांचे मतदान कार्ड असेल तर होते ‘ही’ शिक्षा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 20 Nov 2025 7:50 pm

Newasa News : नेवासे नगरपंचायत निवडणुकीत ‘बंडोबा थंडोबा’ची धाकधुक; अर्ज मागे घेण्याच्या दिवशी होणार रस्सीखेच

नेवासे : राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्यातील नेवासे नगरपंचायतीच्या राजकीय रिंगणात शुक्रवारी (२१ नोव्हेंबर २०२५) अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अपक्ष आणि बंडखोर उमेदवारांमुळे अधिकृत उमेदवारांना मतविभागणीचा धोका निर्माण झाल्याने क्रांतीकारी शेतकरी पक्ष (वायएस) आणि महायुतीच्या पक्षश्रेष्ठींकडून वरिष्ठ पातळीवरून जोरदार मनधरणी सुरू आहे. “बंडोबा थंडोबा” होणार […] The post Newasa News : नेवासे नगरपंचायत निवडणुकीत ‘बंडोबा थंडोबा’ची धाकधुक; अर्ज मागे घेण्याच्या दिवशी होणार रस्सीखेच appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 20 Nov 2025 7:40 pm

Ricky Ponting : ‘तुम्हीच प्रतिस्पर्धकांचा फायदा करून देताय!’भारताच्या पराभवानंतर रिकी पाँटिंगचा मोठा खुलासा

Ricky Ponting slams India’s over-prepared turning pitches : कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत भारताला दारूण पराभव पत्करावा लागला. या सामन्यात भारतीय फलंदाज दक्षिण आफ्रिकेच्या फिरकी गोलंदाजीसमोर पूर्णपणे निष्प्रभ ठरले. भारताने अत्यंत टर्निंग खेळपट्टी बनवण्याची जी रणनीती आखली होती, तीच आता त्यांच्यावर उलटल्याचे दिसून येत आहे. या लाजिरवाण्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाचे माजी […] The post Ricky Ponting : ‘तुम्हीच प्रतिस्पर्धकांचा फायदा करून देताय!’ भारताच्या पराभवानंतर रिकी पाँटिंगचा मोठा खुलासा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 20 Nov 2025 7:38 pm

ताम्हिणी घाटात थार अपघातामध्ये सहा जणांचा मृत्यू

पनवेल :ताम्हिणी घाटात थार कारला भीषण अपघात झाला असून या अपघातात सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पुणे-माणगाव मार्गावर सोमवारी सांयकाळी हा अपघात झाल्याची माहिती असून थार गाडी एका तीव्र वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट ५०० फूट खोल दरीत कोसळली. या घटनेने जिल्हा हादरला असून, मृतदेह शोधण्यासाठी पोलिसांना ड्रोनची मदत घ्यावी लागत आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट नसले तरी, चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे.दरम्यान, २० दिवसांपूर्वीच घेतलेली नवीन थार कार घेऊन पुण्यातील हे सहा तरुण कोकणात फिरायला निघाले होते. मात्र, या तरुणांवर काळाने घाला घातल्याची ह्रदयद्रावक घटना घडली. रायगड जिल्ह्याच्या हद्दीत ताम्हिणी घाटात गाडी दुर्घटनाग्रस्त झाली. सोमवारी घडलेली घटना तब्बल चार दिवसांनी समोर आली आहे. अपघातात मृत्यू झालेल्यांचे वय १८ वर्षे ते २४ वर्षे असे असून सर्वजण पुण्यात राहणारे आहेत. कोकणात गेलेल्या या तरुणांशी संपर्क होत नसल्याने बुधवारी त्यांच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. तेव्हापासून पोलिसांकडून या थार कारचा शोध सुरू होता. मात्र घाटात शोधकार्य करताना अनेक अडचणी येत होत्या. त्यामुळे पोलिसांनी ड्रोनची मदत घेतली. अखेर गुरुवारी सकाळी ताम्हिणी घाटातील दरीत चक्काचूर झालेली थार आणि चार जणांचा मृतदेह आढळून आला आहे. बेपत्ता असलेल्या आणखी दोन जणांचा शोध सुरु आहे.ताम्हिणी घाटातील वळणावर चालकाचे नियंत्रण सुटताच थार गाडी थेट खोल दरीत कोसळली. धोकादायक उतार, खोल दरी आणि चेंदामेंदा झालेल्या वाहनाचे अवशेष पाहून घटनास्थळी उपस्थित नागरिकही हादरले. मृतदेह शोधण्यासाठी पोलिसांना ड्रोनची मदत घ्यावी लागत आहे. हा अपघात अत्यंत गंभीर असून, दरी खोल आणि दगडांनी भरलेली असल्याने मृतदेह बाहेर काढण्याचे आव्हान बचाव पथकासमोर आहे. या घटनेनंतर पुन्हा एकदा ताम्हिणी घाटातील सुरक्षा व्यवस्था आणि वाहतुकीच्या नियमांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.अपघातात शहाजी चव्हाण (२२), पुनित सुधारक शेट्टी (२०), साहील साधू बोटे (२४), श्री महादेव कोळी (१८), ओंकार सुनील कोळी (१८) आणि शिवा अरुण माने (१९) या सहा मित्रांचा मृत्यू झाला. हे सर्व तरुण पुण्यातील उत्तमनगर परिसरातील रहिवासी होते.

फीड फीडबर्नर 20 Nov 2025 7:30 pm

‘Google Pixel 10’वर तब्बल ‘इतक्या’रुपयांपर्यंत मोठी सूट; जाणून घ्या फीचर्स आणि ऑफर्स

Google Pixel 10 : गूगलचा अत्याधुनिक फ्लॅगशिप स्मार्टफोन ‘Google Pixel 10’ ऑगस्ट महिन्यात लॉन्च झाला होता. लॉन्चिंगच्या वेळी किंमत जास्त असल्याने अनेकांनी हा फोन घेण्याचा विचार पुढे ढकलला होता. मात्र आता अॅमेझॉनवर हा फोन मोठ्या डिस्काउंटसह उपलब्ध झाल्याने खरेदीदारांसाठी ही उत्तम संधी आहे. चला तर जाणून घेऊया Pixel 10 चे प्रमुख फीचर्स आणि सध्या मिळणाऱ्या […] The post ‘Google Pixel 10’वर तब्बल ‘इतक्या’ रुपयांपर्यंत मोठी सूट; जाणून घ्या फीचर्स आणि ऑफर्स appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 20 Nov 2025 7:27 pm

अचानक राजीनामा देऊन सलील देशमुखांनी शरद पवार गटाला का दिला धक्का? कारण उघडकीस तरीही चर्चांना उधाण

नागपूर: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे युवा नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी यामागे ‘प्रकृती’चे कारण दिले आहे. सलील देशमुख यांनी आपला राजीनामा पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, खासदार सुप्रिया […] The post अचानक राजीनामा देऊन सलील देशमुखांनी शरद पवार गटाला का दिला धक्का? कारण उघडकीस तरीही चर्चांना उधाण appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 20 Nov 2025 7:17 pm

माजी गृहमंत्र्यांचा मुलगा भाजपच्या वाटेवर ?

नागपूर : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. सलील देशमुख यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. अद्याप त्यांनी कोणत्याही पक्षात प्रवेश केलेला नाही. पण ते भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे.शरद पवार आणि पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना सलील देशमुख यांनी राजीनामा पाठवून दिला आहे. तब्येतीचे कारण देत सलील देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आराम करण्यासाठी पक्षाच्या सक्रीय सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे सलील देशमुख यांनी पत्रातून शरद पवार आणि पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना कळवले आहे.शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा राजीनामा देऊन उद्या दुसऱ्या पक्षात जाणार का असा प्रश्न काही पत्रकारांनी विचारताच उद्याची परिस्थिती काय असेल ते माहिती नाही. सध्या प्रकृतीच्या कारणांनी मी राजीनामा देत आहे, असे सलील देशमुख म्हणाले.सलील देशमुख यांनी काटोल मतदार संघातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून विधानसभेची निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर सलील देशमुख यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा राजीनामा दिला आहे.

फीड फीडबर्नर 20 Nov 2025 7:10 pm

महाआघाडीत खळबळ; भाजपकडून ‘स्वबळा’ची भूमिका ?

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय पटावर भाजपने स्वबळावर पुढे जाण्याचे संकेत पुन्हा स्पष्ट केल्यानंतर मित्रपक्षांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते अमित शहा यांनी ‘‘भाजपला आता कोणाच्या आधाराची गरज नाही’’ अशी भूमिका मांडताच महायुतीतील प्रमुख नेत्यांवर अडचणींचे सावट दाटले आहे.ऑक्टोबरच्या अखेरीस अमित शाह यांनी केलेल्या विधानानंतर काही दिवसांतच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या गटात धांदल उडाली. पुण्यातील जमिनीच्या खरेदी प्रकरणामुळे अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पुन्हा चर्चेत आले, तर कल्याण–डोंबिवली परिसरातील भाजपच्या आक्रमक राजकारणामुळे एकनाथ शिंदे यांच्यासाठीही परिस्थिती कठीण झाली. त्यानंतर शिंदे यांनी दिल्लीला धाव घेत अमित शाह यांच्यासमोर स्वतःच्या अडचणी मांडल्या.महाराष्ट्रात २०१९ पासूनच भाजप २०२९ ची निवडणूक स्वबळावर लढवण्याची तयारी करू लागले आहे. ही तयारी सुरू असल्याचे स्पष्ट संकेतही अमित शाह यांनी वेळोवेळी दिले आहेत. आता ‘कुबड्यांची गरज नाही’ या विधानाने एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेना आणि अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस यांची चिंता वाढली आहे.भाजपचे धोरण ठरवणारी टीम गेल्या वर्षीच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील आकडेवारीचे काटेकोर विश्लेषण करत आहे. मित्रपक्षांचा फायदा कोणाला अधिक, भाजपला की मित्रांनाच याचा शोध घेतला जातोय. या विश्लेषणाच्याआधारे २०२९ च्या स्वबळाचा रोडमॅप भाजप आखत आहे. मुंबई वगळता राज्यातील अनेक ठिकाणी भाजपने स्वतंत्रपणे लढण्याचे संकेत दिले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या येऊ घातलेल्या निवडणुका हीच २०२९ साठीची भाजपची ‘लिटमस टेस्ट’ ठरणार आहेत. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना स्थानिक पातळीवरील दबावामुळे भाजपसमोर माघार घ्यावी लागली आहे.राज्यात भाजपसमोर सर्वात मोठे आव्हान म्हणजे मतांची टक्केवारी. महाराष्ट्रात २०१४ पासून २०२४ पर्यंतच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील तीन–तीन फेऱ्यांमध्ये भाजपा फक्त २५ ते २८ टक्क्यांच्या दरम्यानच मतहिस्सा टिकवू शकली आहे. भाजपने २८ टक्क्यांच्या वर एकदाही मजल न मारणे ही पक्षासाठी चिंतेची बाब आहे.उत्तर प्रदेश, गुजरात आणि मध्य प्रदेशात भाजप स्वतःच्या बळावर स्थिर आहे, कारण त्या राज्यांमध्ये पक्षाचा मतहिस्सा अर्थात व्होटशेअर ४० टक्क्यांच्या पुढे असतो. महाराष्ट्रात मात्र हा आकडा गाठणे कठीण ठरत आहे.आगामी दोन महिन्यांत होणाऱ्या स्थानिक निवडणुकांमधून ४० टक्के मतहिस्सा (व्होटशेअर) मिळवण्याची शक्यता तपासली जाईल. त्यानंतरच भाजप मित्रपक्षांना दूर सारायचे की सहकार्य टिकवायचे, यावर अंतिम निर्णय घेईल.

फीड फीडबर्नर 20 Nov 2025 7:10 pm

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाअंतर्गत HRA बंद होईल का? सरकारने दिले ‘हे’उत्तर

8th Pay Commission: केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. ८वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता (HRA) आणि महागाई भत्ता (DA) बंद होणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. मात्र, केंद्र सरकारने यावर स्पष्टीकरण देत या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. एचआरए (HRA) आणि इतर भत्ते नियमितपणे सुरूच राहतील, असे सरकारने […] The post 8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाअंतर्गत HRA बंद होईल का? सरकारने दिले ‘हे’ उत्तर appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 20 Nov 2025 7:05 pm

Pravin Darekar : 600 चौ. फूटांपर्यंतच्या घरांसाठी मुद्रांक शुल्क माफ करा; प्रवीण दरेकर यांची मागणी

मुंबई : मुंबई आणि उपनगरातील सर्व पुनर्विकास प्रकल्पांमध्ये 600 चौरस फूट पर्यंतच्या सदनिकांसाठी मुद्रांक शुल्क माफ करण्याची मागणी भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी गुरुवारी केली आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण समूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष दरेकर यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र लिहीत ही मागणी केली आहे. याची दखल घेत, बावनकुळे यांनी ६०० चौरस फूट पर्यंतच्या घरांसाठी मुद्रांक […] The post Pravin Darekar : 600 चौ. फूटांपर्यंतच्या घरांसाठी मुद्रांक शुल्क माफ करा; प्रवीण दरेकर यांची मागणी appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 20 Nov 2025 6:59 pm

सिनेरसिकांसाठी या आठवड्यात असणार खास मेजवानी…; ‘मस्ती 4’पासून ‘120 बहादूर’पर्यंत अनेक दमदार चित्रपट होणार प्रदर्शित

Movies Releasing This Week : या आठवड्यातही सिनेमागृहांमध्ये अनेक नवे चित्रपट प्रदर्शित होत आहेत. बॉलिवूडपासून साऊथ इंडस्ट्रीपर्यंत अनेक बहुप्रतिक्षित चित्रपट रिलीज होणार आहेत. एडल्ट कॉमेडी ‘मस्ती 4’, फरहान अख्तरची युद्धावर आधारित ‘120 बहादूर’, तसेच मलयाळम, तमिळ आणि तेलुगू चित्रपटांचाही या यादीत समावेश आहे. तर पाहूया कोणते चित्रपट या शुक्रवारी प्रेक्षकांना भेटणार आहेत. 1. मस्ती 4 […] The post सिनेरसिकांसाठी या आठवड्यात असणार खास मेजवानी…; ‘मस्ती 4’ पासून ‘120 बहादूर’पर्यंत अनेक दमदार चित्रपट होणार प्रदर्शित appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 20 Nov 2025 6:57 pm

Ration Card: रेशन कार्डमधून कोट्यवधी नावे वगळली; तुमचे नाव लिस्टमध्ये आहे का? कसे तपासाल, इथे जाणून घ्या

Ration Card: देशात आर्थिकदृष्ट्या दुर्बळ असलेल्या आणि ज्यांना दोन वेळचे जेवणही मिळत नाही, अशा गरजू लोकांसाठी भारत सरकार राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत (NFSA) मोफत रेशनची सुविधा पुरवते. मोफत आणि कमी किमतीत रेशन मिळवण्यासाठी रेशन कार्ड असणे आवश्यक आहे. परंतु, रेशन कार्डमधून मोठ्या प्रमाणावर नावे हटवली जात आहेत. अपात्र असूनही या योजनेचा लाभ घेणाऱ्या लोकांना यंत्रणेतून […] The post Ration Card: रेशन कार्डमधून कोट्यवधी नावे वगळली; तुमचे नाव लिस्टमध्ये आहे का? कसे तपासाल, इथे जाणून घ्या appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 20 Nov 2025 6:56 pm

Sunil Gavaskar Slams : ‘हा चुकीचा पायंडा पाडू नका!’लाजिरवाण्या पराभवानंतर गावस्करांनी टीम मॅनेजमेंटला धरलं धारेवर

Sunil Gavaskar slams Team India : कोलकाता येथील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत झालेल्या लाजिरवाण्या पराभवानंतर भारतीय संघावर चौफेर टीका होत आहे. याच पार्श्वभूमीवर, भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी कठोर शब्दांत भारतीय फलंदाज, संघ व्यवस्थापन आणि बीसीसीआयच्या निवडकर्त्यांचे कान टोचले आहेत. २२ नोव्हेंबरला गुवाहाटी येथील दुसऱ्या कसोटीत बरोबरी साधण्यापूर्वी गावस्करांनी संघाला आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला […] The post Sunil Gavaskar Slams : ‘हा चुकीचा पायंडा पाडू नका!’ लाजिरवाण्या पराभवानंतर गावस्करांनी टीम मॅनेजमेंटला धरलं धारेवर appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 20 Nov 2025 6:47 pm