नागपूर : 'फनेल झोन'सह मुंबईतील प्रतिबंधित क्षेत्रांच्या पुनर्विकासाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. त्यासाठी राज्य सरकारने ‘हाऊसिंग फॉर ऑल’ ही नवी योजना जाहीर केली असून, फनेल झोन, जुहू लष्करी ट्रान्समिशन स्टेशन, कांदिवली-मालाड सीओडी परिसरातील उंची आणि इतर निर्बंधांमुळे अडकलेल्या भागांत आता पूर्ण क्षमतेने पुनर्विकास शक्य होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी विधानसभेत याबाबत निवेदन केले.या योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (ईडब्ल्यूएस) ३०० चौ. फूट आणि कमी उत्पन्न गटासाठी (एलआयजी) ६०० चौ. फूटांपर्यंतच्या सदनिकांचा पुनर्विकास विनाशुल्क करता येणार आहे. यासाठी प्रोत्साहनात्मक एफएसआय (इन्सेंटिव्ह एफएसआय) उपलब्ध करून देण्यात येणार असून, मूळ जमीनमालकांचा मूलभूत एफएसआयचा हक्क अबाधित राहील. न वापरता राहिलेल्या एफएसआयला (अनकंझ्युम्ड एफएसआय) टीडीआर स्वरूपात उपलब्ध करून देण्याची तरतूद आहे, ज्यामुळे प्रकल्पांसाठी निधी उभारणी सोपी होईल. तसेच, डीसीआर ३३(७) आणि ३३(९) अंतर्गतचे विद्यमान प्रोत्साहन, प्रीमियम आणि इतर फायदे कायम राहतील.मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘या योजनेमुळे मुंबईतील सर्व पुनर्विकास प्रकल्प व्यवहार्य होतील आणि त्यांना गती मिळेल. यापूर्वी अव्यवहार्य ठरलेले प्रकल्प, जसे जुहू लष्करी परिसर आणि कांदिवली-मलाड सीओडी भागातील, आता शक्य होतील. तेथील रहिवाशांना याचा थेट फायदा होईल.’’ पुनर्विकासातील इतर अडथळे दूर करण्यासाठीही सरकार प्रयत्नशील राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.दहिसर आणि जुहूमधील रडारचे स्थलांतरपुनर्विकासातील आणखी एक मोठा अडथळा दूर करण्यासाठी दहिसर आणि जुहू (डी. एन. नगर) येथील उच्च वारंवारता रडार केंद्रे तांत्रिकदृष्ट्या योग्य ठिकाणी स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या रडारमुळे परिसरातील इमारतींच्या उंचीवर कडक निर्बंध आहेत, ज्यामुळे पुनर्विकास अशक्य झाला होता. केंद्राच्या नागरी विमान वाहतूक मंत्रालय आणि एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया (एएआय) ने दहिसरचे रडार गोराईला हलवण्यास सहमती दिली आहे. महाराष्ट्र सरकार स्थलांतराचा खर्च उचलेल आणि पर्यायी जमीन मोफत उपलब्ध करून देईल. बदल्यात, एएआय दहिसर येथील आपल्या ५० टक्के जमिनीचा वापर सार्वजनिक उद्यानासाठी करेल. जुहूच्या रडारसाठीही सरकारने एएआयच्या तांत्रिक पथकाला पर्यायी जागा सुचवली असून, पथकाची पाहणी सुरू आहे. तांत्रिक अभ्यास पूर्ण झाल्यानंतर स्थलांतराला मंजुरी मिळेल. या स्थलांतरानंतर दहिसर आणि जुहू परिसरातील पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
नागपूर : प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत नागपूर शहरात आधुनिक मासळी बाजार केंद्र उभारले जाणार आहे. आमचे नेते नितीन गडकरी नेहमी म्हणतात, की आमच्या शहरात मच्छीमार्केट, मटन मार्केट हे आधुनिक असायला हवेत. कारण, या व्यवस्था चांगल्या नसल्या, तर लोकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होतो. मी मंत्री नितेश राणे यांचे आभार मानेन, की त्यांच्या विभागाने नागपूर शहरासाठी आधुनिक मासळी बाजार तयार करण्याचा निर्णय घेतला आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.परमवीरचक्र विजेत्या सैनिकांना समर्पित 'वंदे मातरम् उद्याना'चे लोकार्पण शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत नागपूर शहरात उभारल्या जाणाऱ्या आधुनिक (घाऊक आणि किरकोळ) मासळी बाजार केंद्राचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाइन माध्यमातून करण्यात आले. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे, आमदार प्रवीण दटके यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते. या आधुनिक मासळी बाजाराचे काम जेव्हा पूर्ण होईल, तेव्हा तेव्हा विक्रेते आणि ग्राहकांना त्याचा मोठा फायदा होईल. या मार्केटला नाथूबाबा यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी आहे. त्याबाबत लवकरच निर्णय करू, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.प्रकल्पाची वैशिष्ट्ये काय?- हा आधुनिक मासळी बाजार ५ एकर क्षेत्रावर विकसित होईल. यात ३.६ ४ मीटर आकाराचे एकूण ६० घाऊक व किरकोळ विक्री गाळे, दुचाकी-चारचाकी वाहनांसाठी पुरेसे पार्किंग, प्रशासकीय ब्लॉक आणि उपहारगृह, ७ टन क्षमतेचे कोल्ड स्टोरेज, १२ ते १५ मीटर रुंद कॉंक्रिट रस्ते, वीज-पाणी पुरवठा, तसेच स्वतंत्र पुरुष-महिला प्रसाधनगृहे अशा मूलभूत सुविधा असतील. हा प्रकल्प शहरातील मासळी विक्रेत्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार असून, रस्त्यांवरील अस्वच्छता आणि अनियोजित मत्स्यविक्रीच्या समस्येवर कायमस्वरुपी तोडगा मिळणार आहे.- केंद्र व राज्य सरकारच्या संयुक्त पुरस्कृत योजनेतून हा प्रकल्प राबविला जात आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, एकूण २१.०५५८ कोटी इतका खर्च अपेक्षित आहे. यात केंद्राचा वाटा ८.९६५४ कोटी, राज्याचा ५.९७६९ कोटी आणि नागपूर महानगरपालिकेचा ६.११३५ कोटी रुपये आहे. पर्यावरणपूरक बाबींनाही यात प्राधान्य देण्यात आले आहे.- यात २० केएलडी क्षमतेचा सिव्हेज ट्रीटमेंट प्लँट, ३० केएलडीचा एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लँट, कचरा व्यवस्थापनासाठी रेंडरिंग प्लँट, पर्जन्यजल संचयन, अग्निशामक यंत्रणा, सौर ऊर्जा, सीसीटीव्ही आणि कंपाउंड वॉल यांचा समावेश आहे. या सुविधांमुळे बाजार स्वच्छ, सुरक्षित व टिकाऊ बनेल.फायदा काय होणार?सध्या नागपूरमध्ये मासळी विक्री मुख्यतः रस्त्यावर किंवा असंघटित पद्धतीने होते. त्यामुळे स्वच्छता आणि वाहतूक समस्या उद्भवतात. भाडेवाडी येथील हा आधुनिक बाजार विशेषतः पूर्व आणि दक्षिण नागपूरातील विक्रेत्यांसाठी उपयुक्त ठरेल. १० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर शहराला पहिला पूर्ण सुसज्ज मासळी बाजार मिळणार असल्याने विक्रेते व ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
नागपूर : परराज्यातून महाराष्ट्राच्या सागरी क्षेत्रात येणाऱ्या मच्छिमार नौकांमुळे राज्यातील मच्छिमारांचे आर्थिक नुकसान होते. याचा विचार करून या परराज्यातील मच्छिमारी नौकांवर कारवाई करण्यासाठी आणि किनारपट्टीची सुरक्षा भक्कम करण्याच्या दृष्टीने लवकरच १५ हाय स्पीड गस्ती नौका राज्यात दाखल होणार असल्याची माहिती मस्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी शनिवारी विधानसभेत दिली.मंत्री राणे म्हणाले की, सध्या गस्तीसाठी मत्स्यव्यवसाय विभागाकडे लाकडी बोटी आहेत. या बोटींमधून परराज्यातून आलेल्या मच्छिमार नौकांचा पाठलाग करून त्यांना पकडणे शक्य होत नाही. त्यामुळे हाय स्पीड नौका घेण्यात येत आहेत. त्याशिवाय ड्रोनच्या मदतीने गस्त घातली जात आहे. त्यामाध्यमातून परराज्यातील नौका, अवैध मासेमारी आणि इतर बेकायदेशीर गोष्टींवर नियंत्रण आणले असल्याची माहिती मस्यव्यवसाय मंत्री राणे यांनी दिली
‘या’ 10 कंपन्यांच्या बाजार मूल्यात पाच वर्षात तब्बल 46 लाख कोटी रुपयांची वाढ
मुंबई – शेअर बाजारात गेल्या पाच वर्षात एकतर्फी तेजी नसली तरी दहा कंपन्यांच्या बाजार मूल्यात या पाच वर्षात तब्बल 46 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे या कंपन्यांचे शेअर बाळगणार्यांना चांगला परतावा मिळाला आहे. 2020 ते 25 या कालावधीत उत्तम कामगिरी करणार्या या कंपन्यांमध्ये बँका, तंत्रज्ञान, इंडस्ट्रियल्स, एफएमसीजी क्षेत्रातील कंपन्या आहेत. म्हणजे विविध क्षेत्रातील […] The post ‘या’ 10 कंपन्यांच्या बाजार मूल्यात पाच वर्षात तब्बल 46 लाख कोटी रुपयांची वाढ appeared first on Dainik Prabhat .
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांसाठी सरकार जबाबदार; वडेट्टीवार यांचे विधान
नागपूर : काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांसाठी भाजपच्या नेतृत्वातील महायुती सरकारला जबाबदार धरले. त्यांनी धोरणात्मक अपयश, अपुरी मदत आणि कृषी क्षेत्राकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत सोयाबीन आणि धानाला बोनस देण्याची मागणी केली. वडेट्टीवार हे विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान विधानसभेतबोलत होते. वडेट्टीवार म्हणाले, राज्यात दररोज सरासरी आठ शेतकरी आत्महत्या करत आहेत. सरकारी […] The post शेतकऱ्यांच्या आत्महत्यांसाठी सरकार जबाबदार; वडेट्टीवार यांचे विधान appeared first on Dainik Prabhat .
WBBL 2025 : १० वर्षांनंतर होबार्ट हरिकेन्सने पटकावले पहिले जेतेपद! RCB प्रमाणे केला ‘डबल’धमाका
Hobart Hurricanes won maiden WBBL title 2025 : २०२५ हे वर्ष क्रिकेट विश्वासाठी अनेक वर्षांची प्रतीक्षा संपवणारे ठरले आहे. याच वर्षी जूनमध्ये आरसीबी संघाने १७ वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर प्रथमच आयपीएलचे जेतेपद पटकावले होते. त्याचप्रमाणे, आता १० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर विमेन्स बिग बॅश लीग २०२५ मध्ये होबार्ट हरिकेन्सला यश मिळाले आहे. शनिवारी १३ डिसेंबर रोजी झालेल्या ११ […] The post WBBL 2025 : १० वर्षांनंतर होबार्ट हरिकेन्सने पटकावले पहिले जेतेपद! RCB प्रमाणे केला ‘डबल’ धमाका appeared first on Dainik Prabhat .
इस्त्रायलच्या विरोधात 8 मुस्लिम देश एकवटले; यूएनआरडब्लूए कार्यालयावरील हल्ल्याचा केला निषेध
इस्लामाबाद : पाकिस्तान आणि तुर्कीसह आठ प्रमुख मुस्लिम देश एका मुद्द्यावर इस्रायलविरुद्ध एकत्र आले आहेत. त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या पॅलेस्टिनी निर्वासितांसाठीच्या मदत आणि कार्य एजन्सीला (यूएनआरडब्लूए) जोरदार पाठिंबा दर्शविला आहे आणि या संस्थेच्या कार्यालयावर इस्रायली सैन्याने केलेल्या हल्ल्याचा निषेध केला आहे. अभूतपूर्व मानवीय संकटाच्या काळात गाझामध्ये यूएनआरडब्लूएची भूमिका अतुलनीय असल्याचे या देशांनी म्हटले आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र […] The post इस्त्रायलच्या विरोधात 8 मुस्लिम देश एकवटले; यूएनआरडब्लूए कार्यालयावरील हल्ल्याचा केला निषेध appeared first on Dainik Prabhat .
मेक्सिकोने भारतीय वस्तूंवर आयात शुल्क लावले; 5% ते 50% शुल्क आकारणी होणार, भारताची विचारणा
नवी दिल्ली – लॅटिन अमेरिकेतील मेक्सिकोने शुक्रवारी एकतर्फी भारतीय वस्तूवर आयात शुल्क लावले आहे. अशा परिस्थितीत दोन्ही देशांना फायदेशीर ठरेल असे व्यापार धोरण ठरविण्याबाबत भारत सरकार मेक्सिकोशी चर्चा करीत असल्याचे सूत्रांनी सांगितले. मेक्सिकोने भारतावरील वस्तूवर आयात शुल्क लावल्यानंतर भारत आपल्या निर्यातदारांचे हितरक्षण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची शक्यता आहे. तसा अधिकार भारताने राखून ठेवला असल्याचे स्पष्ट […] The post मेक्सिकोने भारतीय वस्तूंवर आयात शुल्क लावले; 5% ते 50% शुल्क आकारणी होणार, भारताची विचारणा appeared first on Dainik Prabhat .
राजकुमार गोयल नवे मुख्य माहिती आयुक्त
नवी दिल्ली : माजी आयएएस अधिकारी राजकुमार गोयल नवे मुख्य माहिती आयुक्त म्हणून सुत्रे हाती घेतील. त्यांना सोमवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील तीन सदस्यीय समितीने गोयल यांच्या नावाची शिफारस केली. तसेच, इतर ८ माहिती आयुक्तही निश्चित केले. गोयल हे भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) १९९० च्या तुकडीचे […] The post राजकुमार गोयल नवे मुख्य माहिती आयुक्त appeared first on Dainik Prabhat .
Money-back policy: मुलांच्या भविष्यासाठी ‘मनीबॅक पॉलिसी’घ्यावी का? जाणून घ्या…
Money-back policy: गेल्या काही वर्षांत मुलांच्या शिक्षणखर्चात प्रचंड वाढ होताना दिसत आहे. शाळेतील फीपासून उच्च शिक्षणापर्यंत प्रत्येक टप्प्यावर खर्चाचा आलेख सातत्याने वर जात आहे. अशा परिस्थितीत पालकांनी मुलांच्या भविष्यासाठी योग्य आर्थिक नियोजन करणे अत्यावश्यक ठरते. या नियोजनात मनीबॅक पॉलिसी आणि म्युच्युअल फंड एसआयपी हे दोन पर्याय बहुतेक पालकांच्या चर्चेत नेहमी दिसून येतात. या दोन्ही पर्यायांचा […] The post Money-back policy: मुलांच्या भविष्यासाठी ‘मनीबॅक पॉलिसी’ घ्यावी का? जाणून घ्या… appeared first on Dainik Prabhat .
Donald Trump : अमेरिका व्हेनेझुएलावर हल्ला करणार; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली घोषणा
वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळात विविध देशांमधील किमान आठ युद्धे आपण थांबवल्याचे मोठे दावे केले असले तरी, यावेळी त्यांनी स्वतःच या युद्धात उडी घेतली आहे. ट्रम्प यांनी लवकरच व्हेनेझुएलावर जमिनीवरून हल्ला करणार असल्याची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केले. तथापि, त्यांनी तारीख स्पष्ट केली नाही. गेल्या दोन महिन्यांपासून अमेरिका आणि व्हेनेझुएलातील […] The post Donald Trump : अमेरिका व्हेनेझुएलावर हल्ला करणार; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली घोषणा appeared first on Dainik Prabhat .
Chhagan Bhujbal: शस्त्रक्रियेनंतर छगन भुजबळांचा पहिला फोटो समोर; प्रकृती स्थिर
मुंबई – राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची नुकतीच एक शस्त्रक्रिया पार पडली आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून, ते रुग्णालयात उपचार घेत आहेत. या शस्त्रक्रियेनंतर भुजबळ यांचा पहिला फोटो आज समोर आला आहे, जो राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. आज मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी […] The post Chhagan Bhujbal: शस्त्रक्रियेनंतर छगन भुजबळांचा पहिला फोटो समोर; प्रकृती स्थिर appeared first on Dainik Prabhat .
Lionel Messi play with football CM Revanth Reddy : महान फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी तीन दिवसीय ‘गोट इंडिया टूर’साठी भारतात दाखल झाला आहे. १३ डिसेंबर रोजी कोलकात्यातील सॉल्ट लेक स्टेडियमवर त्याच्या आगमनाने या दौऱ्याची सुरुवात झाली. सकाळी कोलकाता येथे मेस्सीने चाहत्यांशी संवाद साधला, मात्र तेथून लवकर निघाल्याने काही चाहते निराश झाले असले तरी, त्याच्या भारत आगमनाचा […] The post Lionel Messi : लिओनेल मेस्सीचे हैदराबादमध्ये धमाकेदार आगमन! सीएम रेवंत रेड्डीसोबत गाजवले मैदान, पाहा VIDEO appeared first on Dainik Prabhat .
इस्लामाबाद : पाकिस्तानचे संरक्षण दल प्रमुख (सीडीएफ) झाल्यानंतर फील्ड मार्शल असीम मुनीर दररोज दर्पोक्ती करत भारताच्या विरोधात फुत्कार सोडताना दिसत आहेत. त्यांनी पुन्हा एकदा भारताविरुद्ध प्रक्षोभक विधान केले आहे. यावेळी त्यांनी भारताचे नाव घेतले नसले तरी त्यांनी अप्रत्यक्षपणे भारताच्या विरोधातच आपला मुद्दा मांडला. पाकिस्तानचे सुरक्षा दल बाह्य आणि अंतर्गत धोक्यांना तोंड देण्यासाठी पूर्णपणे तयार आहेत […] The post Asim Munir : पाकिस्तानचे सुरक्षा दल धोक्यांना तोंड देण्यासाठी सज्ज; असीम मुनीर यांनी छावणी क्षेत्रांना दिली भेट appeared first on Dainik Prabhat .
Pune News : भूमिगत केबल कामामुळे मेलोडीना रोडवर वाहतूक बदल
पुणे : लष्कर वाहतूक विभागाच्या हद्दीत मेलोडीना रोडवरील नेहरू मेमोरियल चौक (एचपी पेट्रोल पंप) ते नवीन जिल्हा परिषद (ZP) इमारत या दरम्यान महावितरण विभागाकडून भूमिगत उच्चदाब विद्युत वाहिनी केबल टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम आज (दि. १३ डिसेंबर) रात्री ९ वाजल्यापासून सुरू होणार असून साधारणपणे १५ डिसेंबर २०२५ पर्यंत, म्हणजेच तीन दिवस […] The post Pune News : भूमिगत केबल कामामुळे मेलोडीना रोडवर वाहतूक बदल appeared first on Dainik Prabhat .
लखनऊ: लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर उत्तर प्रदेशात (यूपी) आपले ओबीसी (इतर मागासवर्गीय) आणि विशेषतः कुर्मी व्होट बँक मजबूत करण्यासाठी भाजपने मोठी खेळी केली आहे. केंद्रीय मंत्री पंकज चौधरी यांची भाजपच्या उत्तर प्रदेश प्रदेशाध्यक्षपदी निवड निश्चित झाली आहे. रविवारी अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्या नामांकनाला पाठिंबा दिल्याने ही निवड जवळपास निर्विरोध […] The post Pankaj Chaudhary: ‘या’ कारणासाठी भाजपच्या उत्तर प्रदेश प्रदेशाध्यक्षपदी केंद्रीय मंत्री पंकज चौधरी यांची निवड; लोकसभा निवडणुकीशी संबंध appeared first on Dainik Prabhat .
कृत्रिम बुद्धिमत्ता युगातील मनुष्यबळ: विश्वकर्मा विद्यापीठात पूर्व-शिखर परिषदेचे आयोजन
पुणे: कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) वेगाने बदलणाऱ्या युगात मनुष्यबळ विकासाची दिशा निश्चित करण्यासाठी शहरातील अग्रगण्य विश्वकर्मा विद्यापीठ (VU) आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या (AICTE) वतीने महत्त्वपूर्ण पूर्व-शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘कृत्रिम बुद्धिमत्ता युगातील मनुष्यबळ’ या विषयावर होणारी ही परिषद सोमवार, १५ डिसेंबर रोजी हयात इस्ता, पुणे येथे सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत […] The post कृत्रिम बुद्धिमत्ता युगातील मनुष्यबळ: विश्वकर्मा विद्यापीठात पूर्व-शिखर परिषदेचे आयोजन appeared first on Dainik Prabhat .
England Team security guard clash cameraman : ॲशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाकडून ०-२ अशी मोठी पिछाडी मिळाल्यानंतर इंग्लंडचा संघ आता ॲडलेड येथे तिसऱ्या कसोटीसाठी सज्ज होत आहे. मात्र, या महत्त्वपूर्ण सामन्यापूर्वी पाहुणा संघ एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. ब्रिस्बेन विमानतळावर इंग्लंड संघाच्या सुरक्षा कर्मचाऱ्याची आणि एका मीडिया कॅमेरा ऑपरेटरची जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली, ज्याचा व्हिडिओ सध्या […] The post AUS vs ENG : तिसऱ्या कसोटीपूर्वी हाय-व्होल्टेज ड्रामा! इंग्लंड संघाच्या सुरक्षा रक्षकाची कॅमेरामॅनशी झटापट, पाहा VIDEO appeared first on Dainik Prabhat .
MGNREGA scheme: ‘मनरेगा’योजनेत ‘हे’मोठे बदल होणार; कामगारांना काय फायदा जाणून घ्या…
नवी दिल्ली: केंद्र सरकार लवकरच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियमामध्ये (मनरेगा) मोठे बदल करण्याच्या तयारीत आहे. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्रिमंडळाने या योजनेअंतर्गत रोजगाराचे दिवस १०० वरून १२५ करण्याच्या आणि योजनेचे नाव बदलून ‘पूज्य बापू ग्रामीण रोजगार हमी अधिनियम’ (Poojya Bapu Rural Employment Guarantee Act) करण्याच्या प्रस्तावावर चर्चा केली आहे. रोजगार दिवसांमध्ये […] The post MGNREGA scheme: ‘मनरेगा’ योजनेत ‘हे’ मोठे बदल होणार; कामगारांना काय फायदा जाणून घ्या… appeared first on Dainik Prabhat .
Eknath Shinde : एकनाथ शिंदे २ महिन्यात पुन्हा मुख्यमंत्री होणार? ‘या’नेत्याची भविष्यवाणी खरी ठरणार?
Eknath Shinde : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भविष्याबाबत मोठे भाकीत वर्तवले आहे. शिंदे हे येत्या एक ते दोन महिन्यांत पुन्हा मुख्यमंत्री होतील, असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश झाले आहेत. याचा सर्वाधिक फटका […] The post Eknath Shinde : एकनाथ शिंदे २ महिन्यात पुन्हा मुख्यमंत्री होणार? ‘या’ नेत्याची भविष्यवाणी खरी ठरणार? appeared first on Dainik Prabhat .
तिरुवनंतपुरम : केरळमध्ये नुकत्याच झालेल्या दोन टप्प्यांतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निकालांनी राज्याच्या राजकारणाला नवी दिशा दिली आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त लोकशाही आघाडी (UDF) ने एकंदरीत विजय मिळवला असला तरी, भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (NDA) राजधानी तिरुवनंतपुरम महानगरपालिकेत ४५ वर्षांची डाव्या लोकशाही आघाडीची (LDF) सत्ता उलथवून टाकत ऐतिहासिक विजय नोंदवला आहे. […] The post Kerala local body elections result: केरळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपचा तिरुवनंतपुरममध्ये ऐतिहासिक विजय appeared first on Dainik Prabhat .
मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी म्हणजेच शनिवारी माजी मंत्री तथा काँग्रेसचे आमदार डॉ. नितिन राऊत यांनी राज्य शासनाच्या बार्टी, सारथी आणि महाज्योती संस्थांमधील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती विहीत वेळेमध्ये मिळण्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला. यावेळी विधानसभेत उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिले. यावेळी त्यांनी सारथी आणि बार्टीच्या पी.एचडी. करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर आता मर्यादा घालणार असल्याची […] The post Ajit Pawar : सारथी-बार्टीच्या पी.एचडी. प्रवेशावर मर्यादा!; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत माहिती appeared first on Dainik Prabhat .
रडार स्थलांतराला केंद्राची संमती; दहिसर-जुहू परिसरातील पुनर्विकासाला मिळणार गती
मुंबई : दहिसर आणि जुहू (डी.एन.नगर) येथील उच्च वारंवारता रडार केंद्रांमुळे रखडलेला पुनर्विकास मार्गी लावण्यासाठी तसेच ‘Housing for All’ या महत्त्वाकांक्षी उद्दिष्टासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे महत्त्वाचे निवेदन सादर केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर करण्यात आलेल्या या निवेदनात रडार स्थलांतर आणि नव्या गृहनिर्माण धोरणाची सविस्तर मांडणी करण्यात आली आहे.दहिसर आणि जुहू परिसरात असलेल्या उच्च वारंवारता रडार केंद्रांच्या आजूबाजूला इमारतींच्या उंचीवर मर्यादा येत असल्याने या भागांचा पुनर्विकास अडचणीत आला आहे. त्यामुळे ही रडार केंद्रे तांत्रिकदृष्ट्या योग्य असलेल्या इतर ठिकाणी स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालय, भारत सरकारआणि एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया यांनी दहिसर येथील रडार गोरेगाव येथे स्थलांतरित करण्यास संमती दर्शवली आहे.या प्रक्रियेसाठी महाराष्ट्र सरकारने स्थलांतराचा खर्च उचलण्याची तसेच पर्यायी जमीन उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली आहे. गोरेगाव येथील जमीन भारत सरकारकडे विनामूल्य हस्तांतरित केली जाणार असून, एएआय दहिसर येथील ५० टक्के जमीन सार्वजनिक बागेसाठी वापरणार आहे. एएआयच्या तांत्रिक पथकाला जुहू येथील रडारसाठीही पर्यायी जागेची पाहणी करण्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. तांत्रिक अभ्यास पूर्ण झाल्यानंतर जुहू रडार स्थलांतराच्या मंजुरीची प्रक्रिया सुरू होणार आहे.
नागपूर : राज्यातील भूजलाशयीन मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांच्या नोंदणीसाठी दि. १२ मे २०२३ च्या शासन निर्णयाला तात्काळ स्थगिती देण्यात येत असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी शनिवारी नागपुरात केली. या निर्णयामुळे राज्यभरातील भोई, ढिवर, कहार आणि मच्छीमार समाजाला मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र राज्य मच्छिमार संघर्ष कृती समिती आणि विदर्भ विभागीय मच्छिमार सहकारी संघाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'भोई, ढिवर, कहार, मच्छिमार समाजाचा आभार मेळावा' आणि 'भूजलाशयीन मच्छिमार सहकारी संस्था परिषदे'त ते बोलत होते.मत्स्यव्यवसायाला कृषीचा दर्जा मिळवून दिल्याबद्दल आणि महाराष्ट्र भूजलाशयीन मच्छिमार कल्याणकारी महामंडळ स्थापन करून ५० कोटींची तरतूद केल्याबद्दल मच्छीमार बांधवांच्या वतीने मंत्री राणेंचा भव्य सत्कार करून आभार व्यक्त करण्यात आले. यावेळी बोलताना मंत्री राणे म्हणाले, १२ मे २०२३ च्या शासन निर्णयामुळे खऱ्या मच्छिमार संस्थांना अडचणी निर्माण येत होत्या. तलावांच्या ठेक्यांवरून उद्भवलेले वाद आणि प्राथमिक संस्थांच्या कामकाजातील अडथळे लक्षात घेऊन, ही स्थगिती देण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.बोगस संस्थांवर कठोर कारवाईबोगस संस्थांबाबत कठोर भूमिका घेत मंत्री राणे म्हणाले, ज्यांच्या नावाने संस्था आहे, तेच लोक तलाव चालवताना (मासेमारी करताना) दिसले पाहिजेत. कोणाचे नाव वापरून तिसऱ्या व्यक्तीने फायदा घेतला किंवा संस्था निष्क्रिय असेल, तर मी जागेवरच त्या संस्थेची नोंदणी रद्द करेन, असा इशारा त्यांनी दिला. स्थानिक भोई आणि मच्छीमार समाजालाच तलावांचे हक्क मिळाले पाहिजेत, हीच सरकारची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आभारमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महायुती सरकार सर्वसामान्यांचे असून मच्छिमारांच्या हितासाठी कटिबद्ध आहे, असा विश्वास मंत्री राणे यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, मी फक्त कोकणातील समुद्री मच्छीमारांचाच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रातील गोड्या पाण्यातील मच्छिमारांचाही मंत्री आहे. बजेट वाढवून घेण्यापासून ते सर्व मागण्या पूर्ण होईपर्यंत मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन.\गेल्या १२ महिन्यांत फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाने मच्छीमारांसाठी अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत. गोड्या पाण्यातील मासेमारीवर विशेष लक्ष केंद्रित करून या समाजाचे उत्पन्न वाढवण्याची जबाबदारी त्यांनी माझ्यावर सोपवली असून ती मी यशस्वीपणे पूर्ण करेन, असा शब्दही त्यांनी दिला.विधानसभेत निवेदनमत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांच्या मागणीनुसार १२ मे २०२३ च्या सुधारित शासन निर्णयाला स्थगिती देण्यात आल्याची माहिती मंत्री नितेश राणे यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली. भूजलाशयीन मत्स्यव्यवसाय संस्थांनी आक्षेप घेतल्यानंतर शासनाने दखल घेऊन १२ डिसेंबर २०२५ च्या निर्णयान्वये प्राथमिक संस्था, विविध कार्यकारी संस्था, जलाशय संघ आणि जिल्हा संघांच्या नोंदणीसाठीच्या सुधारित निकषांना स्थगिती दिली आहे. यामुळे दुर्बल घटकांना संधी मिळेल आणि उत्पादन क्षमता वाढेल, असा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
बेंगळूरु: कर्नाटकमधील काँग्रेस पक्षात गेले काही महिने सुरू असलेल्या मुख्यमंत्रीपदाच्या ‘खुर्ची युद्धा’ला रामनगरचे काँग्रेस आमदार एच.ए. इक्बाल हुसैन यांच्या ताज्या विधानामुळे पुन्हा एकदा धार आली आहे. उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार (DK Shivakumar) हे ६ जानेवारी रोजी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारतील, असा खळबळजनक दावा हुसैन यांनी केला आहे, ज्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. काँग्रेसमध्ये सध्या मुख्यमंत्री […] The post कर्नाटकमध्ये राजकीय भूकंप? ‘6 जानेवारीला डीके शिवकुमार मुख्यमंत्री होतील,’ काँग्रेस आमदाराच्या दाव्याने खळबळ appeared first on Dainik Prabhat .
मुंबईत मुली बेपत्ता होण्यावर राज ठाकरेंचा सवाल; मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र
मुंबई : राज्यात विशेषतः मुंबईत मुली आणि लहान मुली बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होत असल्याचा मुद्दा उपस्थित करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. गेल्या दहा महिन्यांत राज्यात मुलींच्या अपहरणाचे तब्बल १,१८७ गुन्हे दाखल झाले असून दररोज सरासरी चार ते पाच मुली बेपत्ता होत असल्याची गंभीर बाब त्यांनी अधोरेखित केली आहे.राज ठाकरे यांनी पत्रात नमूद केले आहे की, एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार २०२१ ते २०२४ या कालावधीत लहान मुलांच्या अपहरणाच्या घटनांमध्ये जवळपास ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. लहान मुलांना पळवून त्यांना कामाला जुंपणे, भीक मागायला लावणे यासाठी आंतरराज्य टोळ्या कार्यरत असल्याचा आरोप करत, या टोळ्या इतक्या बिनधास्तपणे कशा काम करतात, असा सवाल त्यांनी सरकारला केला आहे.प्रति,श्री. देवेंद्र फडणवीस,मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य,सस्नेह जय महाराष्ट्र,एका अत्यंत महत्वाच्या आणि गंभीर विषयाकडे तुमचं लक्ष वेधून घेण्यासाठी हे लिहीत आहे. महाराष्ट्रात लहान मुलं पळवण्याचं, ती बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढतं आहे. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार जरी गेलं…— Raj Thackeray (@RajThackeray) December 13, 2025
दहिसर–जुहू रडार स्थलांतर आणि Housing for All; मुख्यमंत्री फडणवीसांकडे महत्त्वाचं निवेदन
मुंबई : मुंबईतील तील रखडलेल्या पुनर्विकासाला चालना देण्यासाठी ‘Housing for All’ अंतर्गत नवीन धोरण मांडण्यात आले आहे. फनेल झोन, जुहू मिलिटरी ट्रान्समिशन स्टेशन, कांदिवली-मालाड COD परिसर आणि संरक्षित क्षेत्रांमुळे ज्या भागांमध्ये पूर्ण क्षमतेने पुनर्विकास शक्य नव्हता, ते प्रकल्प या नव्या योजनेमुळे व्यवहार्य ठरणार आहेत.या योजनेअंतर्गत EWS घटकासाठी ३०० चौरस फूटपर्यंत मोफत FSI देण्यात येणार असून, LIG घटकासाठी ६०० चौरस फूटपर्यंत सदनिकांचे पुनर्वसन विनाशुल्क केले जाणार आहे. पुनर्विकासासाठी आवश्यक असलेला प्रोत्साहन FSI देण्यात येणार असून, मूळ जमीन मालकांचा बेसिक FSI चा हक्क अबाधित राहणार आहे. न वापरलेला FSI TDR स्वरूपात उपलब्ध करून देण्याची तरतूद करण्यात आली आहे.या धोरणामुळे बृहन्मुंबईतील सर्व पुनर्विकास प्रकल्प शक्य होण्याचा मार्ग मोकळा होणार असून, दीर्घकाळ रखडलेले जुहू मिलिटरी परिसर आणि कांदिवली-मालाड COD परिसरातील प्रकल्पही मार्गी लागण्याची शक्यता आहे. यामुळे लाखो रहिवाशांना दिलासा मिळणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
Gopichand Padalkar : ‘शरद पवारांना भारतरत्न द्या’, ‘या’खासदाराच्या मागणीची पडळकरांनी उडवली खिल्ली
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) चे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांचा नुकताच ८५ वा वाढदिवस (१२ डिसेंबर २०२५) साजरा झाला. वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला दिल्लीत आयोजित स्नेहभोजन कार्यक्रमात काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी, उद्योगपती गौतम अदाणी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक राजकीय आणि उद्योग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाने […] The post Gopichand Padalkar : ‘शरद पवारांना भारतरत्न द्या’, ‘या’ खासदाराच्या मागणीची पडळकरांनी उडवली खिल्ली appeared first on Dainik Prabhat .
पुरंदर: वेताळवाडीत रोटरी क्लब ऑफ पुणे नांदेड सिटीचा ‘पाणी सुरक्षा’उपक्रम
पुरंदर : पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील वेताळवाडी गावात पाणीटंचाई आणि पाण्याच्या गुणवत्तेच्या दीर्घकालीन समस्यांवर मात करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ पुणे नांदेड सिटीच्या वतीने महत्त्वपूर्ण सामुदायिक सेवा प्रकल्प राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत गावातील सार्वजनिक पाण्याच्या विहिरीचे खोलीकरण तसेच संपूर्ण स्वच्छता करण्यात आली असून, त्यामुळे ग्रामस्थांना स्वच्छ व विश्वसनीय पाणीपुरवठा उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पासाठी रोटरी क्लबचे […] The post पुरंदर: वेताळवाडीत रोटरी क्लब ऑफ पुणे नांदेड सिटीचा ‘पाणी सुरक्षा’ उपक्रम appeared first on Dainik Prabhat .
ICC Ignored PAK T20 Captain : आगामी टी-२० विश्वचषक २०२६ या स्पर्धेची तयारी सुरू झाली आहे. भारत आणि श्रीलंका येथे आयोजित केल्या जाणाऱ्या या स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) नुकतेच प्रमोशन पोस्टर जारी केले. मात्र, या पोस्टरमध्ये पाकिस्तानच्या टी-२० संघाचा कर्णधार सलमान अली आगाला स्थान न मिळाल्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) तीव्र नाराजी व्यक्त केली […] The post PAK T20 Captain : टी-२० विश्वचषकापूर्वी ICCने पाकिस्तानकडे केले दुर्लक्ष, अपमान झाल्याने संतप्त PCB ने केली तक्रार appeared first on Dainik Prabhat .
E-Pik Pahani : ई-पीक पाहणी नोंदणी चुकलेल्या शेतकऱ्यांना आता ‘या’तारखेपर्यंत नोंदणी करता येणार
नागपूर : महाराष्ट्राची ई-पीक पाहणी म्हणून ओळखली जाणारी प्रणाली शेतकऱ्यांना मोबाइल ॲप्लिकेशनद्वारे त्यांच्या पिकांची माहिती स्वतः नोंदवण्याची परवानगी देते. ई-पीक पाहणी नोंदणी चुकलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना सरकारी खरेदी केंद्रांवर आपला शेतमाल विकता यावा यासाठी त्यांना १५ जानेवारीपर्यंत ऑफलाइन प्रक्रियेद्वारे नोंदणी करण्याची परवानगी दिली जाईल, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. एखाद्या सदस्याने तातडीची सार्वजनिक बाब […] The post E-Pik Pahani : ई-पीक पाहणी नोंदणी चुकलेल्या शेतकऱ्यांना आता ‘या’ तारखेपर्यंत नोंदणी करता येणार appeared first on Dainik Prabhat .
मोहित सोमण: स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी आहे. बँकेने नुकतीच ग्राहकांना खुशखबर दिली आहे. आता तुम्ही एसबीआय (State Bank of India) ग्राहक असेल तर तुमच्या कर्जाच्या व्याजदरातील हप्त्यात कपात होणार आहे. याविषयी एसबीआयने आपल्या अधिकृत निवेदनात पुढील माहिती स्पष्ट केली. आरबीआयने पतधोरण जाहीर केल्यानंतर रेपो दरात २५ बेसिस पूर्णांकाने कपात करण्याचे स्पष्ट केले. ज्याचा फायदा आता ग्राहकांपर्यंत लवकरात लवकर ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी आरबीआयने बँकाना आदेश दिले होते. या सुचनेनुसार एसबीआयने आपल्या बेस इफेक्टसह व्याजदरात बदल केल्याचे आज स्पष्ट केले. दिनांक १५/१२/२०२५ म्हणजेच परवापासून या अधिसूचनेची अंमलबजावणी केली जाईल हे बँकेने स्पष्ट केले.नव्या माहितीनुसार, एसबीआयनेही आपल्या दरात २५ बेसिस पूर्णांकाने कपात केल्याने ईबीएलआर (External Benchmark Linked Rate EBLR) हा ७.९०% वर आला आहे. यापूर्वी हा दर ८.६५% होता. तर ओव्हरनाईट मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड (MCLR) दरात बँकेने फेरबदल केल्याने हा नवा दर ७.९०% वरून ७.८% वर आला आहे. एक दिवसासाठी ७.९०% वरून ७.८५% व एक वर्षासाठी हा दर ८.७५% वरून ८.७०% पातळीवर आला .तथापि, बँकेने इतर मुदत ठेवींवरील व्याजदर कायम ठेवले आहेत, जे ठेवी जमा करण्यावरील दबावाचे संकेत देतात.बँकेच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार, आता व्याजदर किती? त्याचा फायदा कुणाला?४४४ दिवसांच्या अमृत वृष्टी या विशिष्ट मुदत योजनेचा व्याजदर १५ डिसेंबरपासून ६.६०% वरून ६.४५% पातळीवर आला असल्याचे बँकेने स्पष्ट केले.इंडियन ओव्हरसीज बँकेने (IOB) देखील १५ डिसेंबर २०२५ पासून लागू होणाऱ्या आपल्या कर्ज दरांमध्ये कपात जाहीर केली आहे. बँकेने आपला एक्सटर्नल बेंचमार्क लोन रेट (EBLR) - विशेषतः रेपो लिंक्ड लेंडिंग रेट (RLLR) २५ बेसिस पॉइंट्सने ८.३५% वरून ८.१०% कमी केला आहे. याव्यतिरिक्त बँकेच्या मालमत्ता देय व्यवस्थापन समितीने (ALCO) तीन महिने ते तीन वर्षांपर्यंतच्या सर्व मुदतींसाठी मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स-बेस्ड लेंडिंग रेट (MCLR) मध्ये ५ बेसिस पॉइंट्सची कपात मंजूर केली आहे. या सुधारणांमुळे ज्यांचे कर्ज या बेंचमार्कशी जोडलेले आहे अशा विद्यमान आणि नवीन कर्जदारांचे समान मासिक हप्ते (EMIs) कमी इंडियन ओव्हरसिज बँकेने कमी केले असे म्हटले आहे.'गृह, वाहन आणि वैयक्तिक कर्ज घेऊ इच्छिणाऱ्या किरकोळ ग्राहकांना फायदा होईल. मध्यम लघू सूक्ष्म उद्योग (MSME) आणि कॉर्पोरेट कर्जदारांनाही त्यांच्या निधीच्या खर्चात कपात अनुभवायला मिळेल ज्यामुळे ग्राहकांच्या खेळत्या भांडवलाच्या गरजा (Working Capital Requirments) पूर्ण होतील आणि व्यवसायाच्या वाढीस मदत होईल असेही ओव्हरसीज बँकेने यावेळी नमूद केले आहे. याआधी बँक ऑफ बडोदानेही या आठवड्यात दरकपातीच्या निर्णयानंतर आपल्या मार्केट लिंक आधारित व्याजदरात ७.९०% पातळीवर कपात केली होती. यापूर्वी बँक ऑफ बडोदाने केलेल्या दरकपातीत दर ८.१५% वरून ७.९०% पातळीवर खाली आला.
बकऱ्या जंगलात सोडा, वनमंत्र्यांच्या सूचनेची अजित पवारांनी उडवली खिल्ली
नागपूर : जर बिबट्याच्या हल्ल्यात चार लोक मारले गेले, तर राज्याला १ कोटी रुपये भरपाई म्हणून द्यावे लागतात. म्हणून मी अधिकाऱ्यांना सांगितले की, मृत्यू झाल्यानंतर भरपाई देण्याऐवजी, १ कोटी रुपयांच्या बकऱ्या जंगलात सोडा, जेणेकरून बिबटे मानवी वस्तीत येणार नाहीत, असे वनमंत्री गणेश नाईक यांनी बिबट्यांना भक्ष्याच्या शोधात मानवी वस्त्यांमध्ये येण्यापासून रोखण्यासाठी वन अधिकाऱ्यांना सूचना केल्या […] The post बकऱ्या जंगलात सोडा, वनमंत्र्यांच्या सूचनेची अजित पवारांनी उडवली खिल्ली appeared first on Dainik Prabhat .
तिकीट काढूनही मेस्सीची झलक पाहायला मिळाली नाही; संतप्त चाहत्यांचा स्टेडियममध्ये तोडफोड
कोलकाता : GOAT India Tour अंतर्गत अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी १४ वर्षांनंतर भारतात आला. मेस्सीच्या आगमनामुळे फुटबॉल वेड्या कोलकात्यात उत्साहाचं वातावरण होतं आणि त्याला पाहण्यासाठी हजारो चाहते सॉल्ट लेक स्टेडियममध्ये उपस्थित होते. मात्र, मेस्सीच्या प्रत्यक्ष उपस्थितीदरम्यान अवघ्या काही मिनिटांतच परिस्थिती हाताबाहेर गेली आणि कार्यक्रम अर्धवट थांबवावा लागला.सकाळी ११.३० वाजता मेस्सी स्टेडियममध्ये पोहोचला. कडेकोट सुरक्षा व्यवस्था असतानाही मेस्सी मैदानात येताच चाहत्यांनी त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला. काही जणांनी स्टँडचे गेट तोडण्याचा प्रयत्न केला, तर मेस्सी बाहेर पडताच प्रेक्षकांमध्ये संताप उसळला. केवळ १० मिनिटे स्टेडियममध्ये थांबल्याने नाराज झालेल्या चाहत्यांनी बाटल्या फेकण्यास सुरुवात केली आणि फायबरग्लासच्या खुर्च्यांची तोडफोड केली.परिस्थिती गंभीर होताच ‘GOAT Tour’चे आयोजक व प्रवर्तक शतद्रु दत्ता यांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या मदतीने मेस्सीला तात्काळ स्टेडियममधून बाहेर काढले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांची मोठी धावपळ उडाली. यावेळी ४५०० ते १०००० रुपयांपर्यंतची तिकीटे काढलेल्या अनेक चाहत्यांचा संताप उफाळून आला.
Shashikant Shinde : बिल्डर घरे घेऊन बाहेर विकतात; शशिकांत शिंदे यांचा आरोप
मुंबई : म्हाडामध्ये एक मोठे रॅकेट कार्यरत असून, या ठिकाणी मोठा भ्रष्टाचार सुरू आहे. त्यामुळेच सर्वसामान्य नागरिकांचे नुकसान होत आहे. बिल्डर परस्पर घरे घेतात आणि ते जास्त किमतीने बाहेर विकतात, असा आरोप राष्ट्रवादी(शप) आमदार शशिकांत शिंदे यांनी केला आहे. या रॅकेटची चौकशी करावी अशी मागणी त्यांनी विधान परिषदेत केली आहे. शिंदे म्हणाले, कर्ज माफी संदर्भात […] The post Shashikant Shinde : बिल्डर घरे घेऊन बाहेर विकतात; शशिकांत शिंदे यांचा आरोप appeared first on Dainik Prabhat .
४ तहसीलदार, ४ मंडळ अधिकारी, २ तलाठी निलंबित – ९० हजार ब्रास गौण खनिज गैरव्यवहार प्रकरण – मावळ तालुक्यातील वनीकरणासाठी राखीव क्षेत्रात ९० हजार ब्रास अनधिकृत गौण खनिज उत्खनन केल्याप्रकरणी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कठोर कारवाई केली आहे. या गैरव्यवहारात दोषी आढळलेल्या चार तहसीलदार, चार मंडळ अधिकारी आणि दोन तलाठी यांना निलंबित करण्यात आले आहे. […] The post Today TOP 10 News: राज्यातील बेपत्ता मुलांच्या शोधासाठी विशेष मोहीम, तहसीलदार निलंबन, महाविस्तार अॅप, SBI व्याजदर… वाचा आजच्या टाॅप 10 बातम्या appeared first on Dainik Prabhat .
Mohammed Siraj shares POTM award : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज सध्या फक्त कसोटी संघातच स्थान मिळवत आहे, मात्र मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये त्याला अपेक्षित संधी मिळत नाहीये. टी-२० आंतरराष्ट्रीय संघात पुनरागमन करण्याच्या दृष्टीने सिराज सध्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये हैदराबाद संघाकडून खेळत आहे. मात्र, एका सामन्यातील त्याच्या कृतीने सर्वांची मनं जिंकली. सिराजची प्रभावी गोलंदाजी, हैदराबादचा […] The post Mohammed Siraj : मुंबईला हरवलं, मनही जिंकलं; सिराजच्या हृदयस्पर्शी कृतीने चाहते भारावले! नेमकं काय केलं? जाणून घ्या appeared first on Dainik Prabhat .
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यांत बिबट्यांनी ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागातही धुमाकूळ घातला आहे. बिबट्याच्या हल्ल्यात अनेक सर्वसामान्यांना प्राणाला मुकावे लागले असून काही जण जखमी झाले आहेत. भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ च्या कायद्यामुळे बिबट्यांविरोधात वन विभागाला ठोस पावले उचलता येत नसून या कायद्यात सुधारणा करून सूची १ मधून बिबट्याला वगळण्यात यावे, अशी आग्रही मागणी […] The post Naresh Mhaske : बिबट्यांचे हल्ले रोखण्यासाठी वन्यजीव संरक्षणमध्ये सुधारणा आवश्यक; खा. नरेश म्हस्के यांची संसदेत मागणी appeared first on Dainik Prabhat .
CIDCO House Price : एकनाथ शिंदेची मोठी घोषणा ! सिडकोच्या घरासंदर्भात घेतला ‘हा’मोठा निर्णय
मुंबईसह नवी मुंबई आणि आसपासच्या भागात घरांच्या वाढत्या किमतींमुळे स्वतःचे हक्काचे घर घेणे हे अनेकांसाठी दूरच्या गोष्टी झाले आहे. आयुष्यभर मेहनत करूनही सामान्य माणूस घर खरेदी करू शकत नाही. या पार्श्वभूमीवर म्हाडा आणि सिडको सारख्या संस्था बाजारभावापेक्षा कमी दरात घरे उपलब्ध करून देतात. मात्र, म्हाडाच्या तुलनेत सिडकोची घरे नेहमीच किंचित महाग असल्याने अनेकांच्या आवाक्याबाहेर राहतात. […] The post CIDCO House Price : एकनाथ शिंदेची मोठी घोषणा ! सिडकोच्या घरासंदर्भात घेतला ‘हा’ मोठा निर्णय appeared first on Dainik Prabhat .
लाडक्या बहिणींना 'ई-केवायसी'दुरुस्तीसाठी मिळणार एकच संधी
मंत्री अदिती तटकरे; ३१ डिसेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारकनागपूर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना ई-केवायसी प्रक्रियेदरम्यान झालेल्या चुका दुरुस्त करण्यासाठी अंतिम आणि एकमेव संधी देण्यात येणार आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी शनिवारी याबाबत महत्त्वपूर्ण घोषणा केली असून, ही सुधारणा प्रक्रिया ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करणे बंधनकारक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.योजनेच्या बहुतांश लाभार्थी दुर्गम आणि ग्रामीण भागातील असल्याने ई-केवायसी करताना चुका होणे स्वाभाविक आहे. अशा चुका दुरुस्त करण्याबाबत विभागाकडे अनेक निवेदने प्राप्त झाली होती. महिला सक्षमीकरणाच्या उद्देशाने राबविल्या जाणाऱ्या या योजनेत लाभार्थींना संधी देणे गरजेचे असल्याने, ई-केवायसीमध्ये केवळ एकदाच सुधारणा करण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे.तसेच, पती किंवा वडील हयात नसलेल्या किंवा घटस्फोटित महिलांना ई-केवायसी प्रक्रिया स्वतः पूर्ण करण्यासाठी पोर्टलवर विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आवश्यक कागदपत्रे सादर करून या महिलांना योजनेचा लाभ सुरळीत मिळावा, यासाठी विभाग प्रयत्नशील आहे. ई-केवायसी प्रक्रिया अधिक सुलभ व सोपी करण्याबरोबरच जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ मिळावा, यासाठी महिला व बालविकास विभाग कटिबद्ध असल्याचे मंत्री तटकरे यांनी सांगितले. लाभार्थी महिलांनी लवकरात लवकर ladakibahin.maharashtra.gov.in या पोर्टलवर ई-केवायसी पूर्ण करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.e-KYC दुरुस्तीसाठी मिळणार एकच संधी !मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील बहुतांश लाभार्थी या दुर्गम, ग्रामीण भागातील आहेत. e-KYC प्रक्रिया करत असताना त्यांच्याकडून काही चूक होणे स्वाभाविक आहे. या चुका दुरुस्त करण्याची संधी मिळावी अशा आशयाची अनेक निवेदने विभागास प्राप्त झाली… pic.twitter.com/nT4Pw6E2QP— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) December 13, 2025
नागपूर : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनाही महाराष्ट्र शासनाची एक योजना आहे. ज्याचा उद्देश बेरोजगार तरुणांना रोजगार-भिमुख प्रशिक्षण देणे आणि त्यांना आर्थिक सहाय्य करणे आहे. यात बारावी उत्तीर्ण तरुणांना प्रशिक्षण कालावधीत दरमहा 6,000 ते 10,000 रुपयापर्यंत भत्ता मिळतो. मात्र 11 महिने प्रशिक्षण घेतल्यानंतरही कायमस्वरुपी नोकरी न मिळाल्याने तरुण-तरुणी आक्रमक झाले आहेत. चार दिवस आंदोलन केल्यानंतर […] The post मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील तरुणांचे ‘लोटांगण’; अधिवेशनात घुसण्याचा प्रयत्न, काय आहेत मागण्या? appeared first on Dainik Prabhat .
ई-पीक पाहणीतून सुटलेल्यांसाठी 'ऑफलाईन'चा पर्याय ; महसूलमंत्री बावनकुळेंचा 'मास्टरस्ट्रोक'!
१५ जानेवारीपर्यंत 'ऑफलाईन' नोंदणीची संधीउपविभागीय अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली समितीनागपूर : 'ई-पीक पाहणी'ची ऑनलाईन मुदत संपल्याने हजारो शेतकरी शासकीय खरेदी केंद्रावर आपला माल विकण्यापासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाल्याने या शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत राज्य सरकारने आता 'ऑफलाईन' पीक पाहणीची संधी उपलब्ध करून दिली आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत यासंदर्भात घोषणा केली. ज्या शेतकऱ्यांची ई-पीक पाहणी राहून गेली आहे, त्यांना आता १५ जानेवारीपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांकडे ऑफलाईन अर्ज करता येणार आहेत.आमदार विक्रम पाचपुते यांनी विधानसभेत यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. ई-पीक पाहणीसाठी तीन वेळा मुदतवाढ देऊनही अनेक शेतकरी तांत्रिक अडचणी किंवा इतर कारणांमुळे नोंदणी करू शकले नाहीत, याकडे त्यांनी लक्ष वेधले होते. ई-पीक पाहणीची नोंद सातबाऱ्यावर असल्याशिवाय 'नाफेड' किंवा शासकीय केंद्रांवर शेतमाल खरेदी केला जात नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला.यावर उत्तर देताना महसूलमंत्री बावनकुळे यांनी सांगितले की, ई-पीक पाहणीचे पोर्टल आता बंद झाले असल्याने ते पुन्हा सुरु करणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नाही. मात्र, शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून आम्ही 'ऑफलाईन' खिडकी उघडण्याचा निर्णय घेतला आहे.अशी असेल प्रक्रियाउपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली जाईल. तहसीलदार, गट विकास अधिकारी (BDO) आणि तालुका कृषी अधिकारी यांचा तीत समावेश असेल. ज्या शेतकऱ्यांची नोंदणी राहिली आहे, त्यांनी १५ जानेवारीपर्यंत या समितीकडे अर्ज करायचे आहेत. खरीप हंगाम संपला असला तरी, ही समिती तक्रारींचे निवारण करेल, प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून पंचनामा करेल आणि आपला अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करेल. जिल्हाधिकारी हा अहवाल पणन विभागामार्फत केंद्र सरकारला पाठवतील, जेणेकरून शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी करणे शक्य होईल.बोगसगिरी रोखण्यासाठी खबरदारीही सवलत केवळ खऱ्या शेतकऱ्यांसाठी असून, व्यापाऱ्यांनी याचा गैरफायदा घेऊ नये यासाठी विशेष खबरदारी घेण्याच्या सूचनाही मंत्र्यांनी दिल्या आहेत. ऑफलाईन प्रक्रियेत व्यापारी घुसखोरी करून फायदा लाटण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे समितीने काटेकोर पडताळणी करावी, असे निर्देश बावनकुळे यांनी दिले.
मुबलक घरे उपलब्ध होण्यासाठी हौसिंग स्टॉक ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधिमंडळात घोषणा
नागपूर : जुन्या लोकांना तातडीने घरे देणे तसेच नवीन प्रकल्पांकरिता मुबलक घरे उपलब्ध होण्यासाठी हौसिंग स्टॉक निर्माण करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधान परिषदेत केली. महाराष्ट्रात तसेच मुंबईमध्ये वन, कांदळवन, सीआरझेड, इत्यादी ठिकाणी मूळ स्थितीत पुनर्विकास होऊ शकत नाही. तसेच बऱ्याचशा पायाभूत प्रकल्प जसे की रस्ता रुंदीकरण, मेट्रो, पाणी व मलनिस्सारण प्रकल्प इत्यादींना जलदगतीने पुढे नेण्यासाठी पीएपीची गरज भासते.त्याचप्रमाणे समाजातील गरीब गरजू घटकांना जसे गिरणी कामगार, डब्बेवाले, माथाडी इत्यादींना घरे देण्याचे शासनाने धोरण स्विकारलेले आहे. या सर्वांना वेळेवर घरे देता याकरीता मोठ्या प्रमाणात राज्यस्तरावर हौसिंग स्टॉकची आवश्यकता लागणार आहे, आणि म्हणूनच याबाबतीत निर्णय घेण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.या सर्व घटकांना घरे देण्यासाठी शासनाच्या विविध योजनेतून उपलब्ध होणारे हौसिंग स्टॉकला एकत्रित करून त्याचा सुनियोजित प्राधान्यक्रमाने वितरण करण्याचे शासनाने धोरण ठरविले आहे. या हौसिंग स्टॉक करीता मुंबईतील ३३ (७), ३३ (९), ३३ (१२ बी) यासह विविध योजना तसेच राज्यस्तरावरील इन्क्ल्युसिव्ह हौसिंग, पीएमएवाय इत्यादी योजनांचा समावेश करण्याचा आमचा मानस आहे असेही उपमुख्यमंत्री म्हणालेखारफुटीच्या जमिनींवर अतिक्रमणे करण्याचे प्रकार घडले आहेत. कांदळवन संरक्षित राहिले पाहिजे , त्याचे जतन केले पाहिजे हे लक्षात घेऊन ग्रीन टीडीआर देण्याबाबत विचार केला जाईल असेही ते म्हणाले.
'एसआरए'इमारतींच्या देखभाल निधीत वाढ, लिफ्टसाठी सौर ऊर्जेचा वापर - राज्य सरकारचा निर्णय;
ओसी देण्यापूर्वी इमारतीवर सोलार पॅनल लावणे बंधनकारकनागपूर : महायुती सरकारने एसआरए (झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण) आणि म्हाडा पुनर्विकास प्रकल्पांतील रहिवाशांना दिलासा देणारे दोन महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. इमारतीच्या देखभाल निधीत (कॉर्पस फंड)इमारतीच्या उंचीनुसार मोठी वाढ करण्यात येणार असून, लिफ्ट आणि सामाईक भागांचा वीज खर्च कमी करण्यासाठी ओसी (ऑक्युपेशन सर्टिफिकेट) देण्यापूर्वी सोलार पॅनल बसविणे बंधनकारक करण्यात येणार असल्याची घोषणा गृहनिर्माण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी शनिवारी विधानसभेत केली.झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत उंच टॉवरमध्ये स्थलांतरित झालेल्या रहिवाशांना वाढलेला देखभाल खर्च आणि वीज बिलाचा भार सहन करावा लागत असल्याच्या समस्येवर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी विधानसभेत लक्षवेधी मांडली होती. त्यांनी निदर्शनास आणून दिले की, पूर्वीच्या ४० हजार रुपये कॉर्पस फंडच्या व्याजातून हा खर्च भागवणे कठीण झाले आहे. या लक्षवेधीला उत्तर देताना राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी जाहीर केले की, कॉर्पस फंडाची रक्कम आता इमारतीच्या उंचीनुसार वाढवली जाईल. हा बदल महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ नुसार अधिसूचना जारी करून लागू करण्यात येईल. हरकती-सूचनांवरील सुनावणी अंतिम टप्प्यात असून, लवकरच अंमलबजावणी होईल.कॉर्पस फंडाची रक्कम किती असेल?७० मीटरपर्यंत उंचीच्या इमारतीसाठी : १ लाख रुपये७० ते १२० मीटर उंचीच्या इमारतीसाठी : २ लाख रुपये१२० मीटरपेक्षा जास्त उंचीच्या इमारतीसाठी : ३ लाख रुपयेसौर ऊर्जेचा वापर अनिवार्यमंत्री भोयर यांनी सांगितले की, ग्रीन एनर्जीला प्रोत्साहन देण्यासाठी पुनर्विकास प्रकल्पांत ओसी देण्यापूर्वी इमारतीवर सोलार पॅनल बसविणे बंधनकारक करण्यात येईल. विशेषतः लिफ्ट आणि सामाईक भागांसाठी सौर ऊर्जेचा वापर अनिवार्य असेल. ओसीशिवाय ताबा देणाऱ्या विकासकांवर कठोर कारवाई होईल आणि अपूर्ण इमारतींमध्ये पजेशन दिल्यास सखोल चौकशी केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सिडकोच्या घरांच्या किमतीत १० टक्के कपात
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधान परिषदेत घोषणा, १७ हजार घरांची लॉटरी लवकरचनागपूर : नवी मुंबईतील सिडकोच्या वेगवेगळ्या प्रवर्गातील घरांसाठी सिडकोने जे दर निश्चित केले होते त्यामध्ये थेट १० टक्के कपात करण्यात येत असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत निवेदनाद्वारे केली. या निर्णयामुळे आता ही घरे पूर्वीपेक्षा स्वस्त दरात उपलब्ध होणार असून नवी मुंबई परिसरात घर घेण्याचे सर्वसामान्यांचे स्वप्न आता अधिक सुकर होणार आहे.यासंदर्भात निवेदन करताना उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, सिडकोतर्फे नवी मुंबईतील खारघर, वाशी, खारकोपर, तळोजा, उलवे, कळंबोली, कामोठे आणि पनवेल या परिसरात तब्बल १७ हजार घरे बांधण्यात आली आहेत. या घरांसाठीची लॉटरी प्रक्रिया येत्या दोन महिन्यांत पूर्ण केली जाणार आहे. त्यापूर्वी सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी घरांच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. इडब्ल्यूएस आणि एलआयजी या प्रवर्गातील घरांच्या किमती १० टक्के कमी होतील.या संदर्भात माहिती देताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वांसाठी घरे या संकल्पनेला बळ देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरात अधिकृत आणि चांगल्या दर्जाची घरे मिळणे शक्य होणार आहेत.
नागपूर : मुंबईतील फनेल झोनमुळे रखडलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाला गती देण्यासाठी राज्य शासनाने तयार केलेल्या नवीन योजनेची महत्त्वपूर्ण घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानपरिषदेत केली. या योजनेमुळे मुंबईतील हजारो पुनर्विकास प्रकल्प मार्गी लागणार आहेत.मुंबई विमानतळाच्या बाजूला असलेल्या इमारतींचा फनेल झोन व इतर तांत्रिक अडथळ्यांमुळे अनेक इमारतींचा पुनर्विकास शक्य होत नव्हता. परिणामी उपलब्ध असलेला संपूर्ण चटई क्षेत्र वापरात येत नव्हते, ही अडचण दूर करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘सर्वांसाठी घरे’ धोरणांतर्गत राज्य शासनाने ही नवी योजना तयार केली आहे, असे उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.या योजनेअंतर्गत मुंबईतील सर्व पुनर्विकासयोग्य इमारतींच्या पुनर्विकासाला चालना देण्यात येणार असून, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (EWS) ३०० चौ. फुटापर्यंतचे चटई क्षेत्र विनामूल्य देण्यात येणार आहे. तसेच अल्प उत्पन्न गटासाठी (LIG) ६०० चौ. फुटापर्यंतच्या सदनिकांची पुनर्बांधणी विनाशुल्क व्हावी, यासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे.या योजनेत जमीनमालकांना त्यांच्या मूळ मालकी हक्काच्या प्रमाणात बेसिक चटई क्षेत्र देण्यात येणार आहे. संरक्षित भाडेकरूंना त्यांच्या संरक्षित क्षेत्राएवढा किंवा किमान ३० चौ. मीटर (जे अधिक असेल ते) इतके चटई क्षेत्र देण्यात येईल. तसेच अधिकृत रहिवाशांनाही त्यांच्या कायदेशीर ताब्यातील क्षेत्राएवढा किंवा किमान ३० चौ. मीटर क्षेत्रफळाइतका यापैकी जो अधिक असेल तो एफएसआय अनुज्ञेय राहणार आहे.योजनेअंतर्गत न वापरलेले चटई क्षेत्र हे टीडीआर स्वरूपात उपलब्ध करून दिले जाणार असून, त्यामुळे प्रकल्प आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य होतील. तसेच विद्यमान विकास नियंत्रण नियम ३३(७) व ३३(९) अंतर्गत मिळणारे सर्व इनसेंटिव्ह, प्रीमियम व इतर फायदे कायम राहणार असल्याचे सांगून या नव्या योजनेमुळे बृहन्मुंबई क्षेत्रातील फनेल झोन बाधित पुनर्विकास प्रकल्पांना मोठा दिलासा मिळणार असून, अनेक वर्षांपासून रखडलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होणार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.
नागपूर : मुंबईबाहेर गेलेला चाकरमानी पुन्हा मुंबईत परतला पाहिजे, हीच स्व. बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती आणि ती पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. विधान परिषदेत गृहनिर्माण क्षेत्रासंदर्भात निवेदन देताना त्यांनी मुंबईकरांसाठी, विशेषतः मध्यमवर्गीय आणि गिरणी कामगारांसाठी अनेक क्रांतिकारी निर्णय जाहीर केले आहेत. यामध्ये प्रामुख्याने ओसी (OC) नसलेल्या इमारती, पागडी सिस्टिम, विमानतळ परिसर (फनेल झोन) आणि गिरणी कामगारांच्या घरांबाबत महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या आहेत.ओसी नसलेल्या इमारतींना 'अभय', दंडात मोठी सवलतमुंबईत अनेक इमारतींचे बांधकाम करताना काही नियमांचे उल्लंघन झाल्याने त्यांना ओसी (Occupancy Certificate) मिळालेली नाही. अशा सुमारे २० हजार इमारती असून त्यात लाखो कुटुंबे राहतात. या रहिवाशांना मोठा दिलासा देत शिंदे यांनी 'सुधारित अभय भोगवटा' योजनेला मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे रहिवाशांना आता दुप्पट मालमत्ता कर भरावा लागणार नाही. तसेच, ओसी मिळाल्यामुळे घरांवर कर्ज मिळणे सोपे होईल आणि घराला बाजारभावाप्रमाणे योग्य किंमत मिळेल. रेडीरेकनरच्या दरात ५० टक्के सवलत देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पहिल्या ६ महिन्यांत येणाऱ्या अर्जांना कोणताही दंड आकारला जाणार नाही. आता संपूर्ण सोसायटीची वाट न पाहता, एखादी वैयक्तिक व्यक्तीही ओसीसाठी अर्ज करू शकते आणि तिला ती मिळेल.'पुढील काही वर्षांत मुंबई पागडीमुक्त होणार'जुन्या मुंबईची ओळख असलेल्या पागडी पद्धतीबाबतही सरकारने ठोस पावले उचलली आहेत. पागडी संदर्भात नवीन नियमावली तयार करण्यात येत असून, यात भाडेकरू आणि घरमालक या दोघांनाही एफएसआय (FSI) देण्यात येणार आहे. उंची किंवा इतर तांत्रिक कारणांमुळे एफएसआय वापरता आला नाही, तर त्याबदल्यात टीडीआर (TDR) देण्याची तरतूद करण्यात आली आहे. सध्या २८ हजार प्रकरणे प्रलंबित असून ती निकाली काढण्यासाठी 'फास्ट ट्रॅक कोर्ट' स्थापन केले जाईल. यामुळे पुढील काही वर्षांत मुंबई पूर्णपणे पागडीमुक्त होईल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.विमानतळ परिसर (फनेल झोन) आणि संरक्षण क्षेत्राला दिलासाविमानतळ परिसरातील 'फनेल झोन'मुळे अनेक इमारतींना उंची वाढवता येत नाही. येथे पंतप्रधानांची 'सबको घर' ही योजना प्रभावीपणे राबवली जाणार आहे. EWS (आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक) आणि LIG (अल्प उत्पन्न गट) विभागातील सदनिका धारकांना एफएसआय दिला जाईल. ही योजना इतर योजनांशी क्लब करून राबवली जाईल, ज्यामुळे प्रकल्प व्यवहार्य होतील आणि लोकांचा फायदा होईल. तसेच, संरक्षण क्षेत्राला लागून असलेल्या जमिनींवरील रखडलेल्या प्रकल्पांवरही याच पद्धतीने काम केले जाईल.गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न मार्गीगिरणी कामगारांच्या घरांबाबत माहिती देताना शिंदे म्हणाले की, १ लाख गिरणी कामगार घरांसाठी पात्र ठरले आहेत. या घरांची किंमत १५ लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. क्लस्टर योजना वेगाने पूर्ण करण्यासाठी जेव्ही (Joint Venture) पद्धतीचा अवलंब केला आहे. ज्या कामगारांनी यास मान्यता दिली नाही, त्यांच्यासाठी वेगळा पर्यायही खुला ठेवला आहे. गेल्या ३ वर्षांपासून रखडलेल्या अनेक विकासकामांना चालना दिली असून, प्रस्थापित चौकटीबाहेर जाऊन निर्णय घेतल्यामुळेच हे शक्य झाल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.
IND vs SA : गंभीर-पंड्या यांच्यात ड्रेसिंग रूममध्ये जोरदार खडाजंगी? व्हायरल व्हिडिओने खळबळ!
Gautam Gambhir Hardik Pandya Video Viral : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताला ५१ धावांनी मानहानिकारक पराभव पत्करावा लागला, ज्यामुळे ही मालिका १-१ अशी बरोबरीत आली आहे. पंजाबमधील मुल्लानपूर येथे झालेल्या या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी मोठ्या प्रमाणात धावा दिल्या आणि त्यानंतर फलंदाजांची कामगिरीही सुमार राहिली. गंभीर-पंड्या यांच्यात […] The post IND vs SA : गंभीर-पंड्या यांच्यात ड्रेसिंग रूममध्ये जोरदार खडाजंगी? व्हायरल व्हिडिओने खळबळ! appeared first on Dainik Prabhat .
कोलकाता: जगप्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीच्या कोलकाता येथील साल्टलेक स्टेडियममधील कार्यक्रमादरम्यान झालेल्या मोठ्या गोंधळानंतर पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे. या कार्यक्रमाचा मुख्य आयोजक सताद्रु दत्ता याला पोलिसांनी विमानतळावरून (airport) अटक केली आहे. पश्चिम बंगालचे पोलीस महासंचालक (DGP) राजीव कुमार यांनी या घटनेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच, ज्या प्रेक्षकांनी […] The post Lionel Messi: मेस्सीच्या कार्यक्रम गोंधळाप्रकरणी मोठी कारवाई: मुख्य आयोजकांना अटक, तिकिटांचे पैसे परत करणार, नेमके काय घडले? appeared first on Dainik Prabhat .
नागपूर : महाराष्ट्रासाठी २०२६ पर्यंत १.५० लाख कोटी रुपयांच्या रस्ते कामांना मंजुरी देण्यात आली असल्याची माहीती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. ही कामे पुढील तीन महिन्यांत सुरू होतील, असे त्यांनी विधान भवनाच्या परिसरात पत्रकारांशी बोलताना सांगितले. मंत्री गडकरी हे विधान परिषदेच्या शताब्दी सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी विधिमंडळात आले होते. गडकरी म्हणाले, महाराष्ट्र […] The post Nitin Gadkari : महाराष्ट्रासाठी 1.50 लाख कोटींच्या रस्ते कामांस मंजुरी; मंत्री नितीन गडकरींनी दिली माहिती appeared first on Dainik Prabhat .
Devendra Fadnavis : मनरेगावरून फडणवीसांची काँग्रेसवर टीका; म्हणाले…
नागपूर : मनरेगाचे नामांतर करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर टीका केली. केंद्रीय मंत्रिमंडळाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्याचे (मनरेगा) नाव बदलून पूज्य बापू ग्रामीण रोजगार योजना असे करण्याच्या विधेयकाला मंजुरी दिली आहे. या अंतर्गत कामाच्या दिवसांची संख्या सध्याच्या १०० दिवसांवरून १२५ दिवसांपर्यंत वाढवली जाणार आहे. मनरेगाचे […] The post Devendra Fadnavis : मनरेगावरून फडणवीसांची काँग्रेसवर टीका; म्हणाले… appeared first on Dainik Prabhat .
…तर उद्या मुख्य सचिवांवर हक्कभंग आणणार; राहुल नार्वेकरांचा इशारा
मुंबई : राज्याच्या विधीमंडळाचे अधिवेशनात सदस्यांनी मांडलेल्या अनेक लक्ष्यवेधी सूचनांची उत्तर अद्याप प्रलंबित असल्याने भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी चिंता व्यक्त केली. त्यावरती विधानसभा अध्यक्षांनी प्रतिसाद देत कारवाईचा इशारा दिला. उद्या सभागृहाची बैठक संपेपर्यंत जर लक्ष्यवेधींची प्रलंबित उत्तरे दिली नाहीत, तर मुख्य सचिवांवर हक्कभंगाचा प्रस्ताव आणला जाईल, असा इशारा नार्वेकरांनी दिला आहे. मुनगंटीवार यांनी लक्ष्यवेधींच्या […] The post … तर उद्या मुख्य सचिवांवर हक्कभंग आणणार; राहुल नार्वेकरांचा इशारा appeared first on Dainik Prabhat .
केंद्रीय मंत्री शिवराज सिंह यांना पाकिस्तानकडून धोका: गृह मंत्रालयाकडून सुरक्षा वाढवली
नवी दिल्ली : केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांना पाकिस्तानच्या गुप्तचर संस्था आयएसआय (ISI) कडून मोठा धोका असल्याची माहिती समोर आली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाला शिवराज सिंह चौहान यांच्यावर हल्ल्याबाबत गुप्तचर इनपुट मिळाल्यानंतर, शुक्रवारी उशिरा रात्री तातडीने भोपाळ आणि दिल्ली येथील त्यांच्या निवासस्थानांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भोपाळमधील 74 बंगला परिसरातील बी-8 निवासस्थानाच्या […] The post केंद्रीय मंत्री शिवराज सिंह यांना पाकिस्तानकडून धोका: गृह मंत्रालयाकडून सुरक्षा वाढवली appeared first on Dainik Prabhat .
मुंबई झोपडपट्टीमुक्तीसाठी सरकारचे मोठे पाऊल!
मुंबईत ५० एकरपेक्षा मोठ्या भूखंडांवर राबवणार 'क्लस्टर रिडेव्हलपमेंट'; पहिल्या टप्प्यात १७ प्रकल्पांची निवड उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधान परिषदेत घोषणा एसआरए अभय योजनेला ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ एसआरए प्रकल्प तक्रार जलद निपटाऱ्यासाठी एजीआरसीची संख्या वाढविणार म्हाडाच्या ओसीसाठीच्या अभय योजनेला देखील १ वर्षाची मुदतवाढनागपूर : योजनेच्या पहिल्या टप्प्यात मुंबईतील अँटॉप हिल, कृष्ण नगर आणि केतकीपाडा (बोरिवली), गोपीकृष्ण नगर (दहिसर),ओशिवरा, गोवंडी, चित्ता कॅम्प (ट्रॉम्बे), चेंबूर, टागोर नगर (विक्रोळी), विक्रोळी पार्कसाईट, भांडुप या १७ प्रमुख ठिकाणांची निवड करण्यात आली आहे. यामुळे मुंबईतील लाखो झोपडपट्टीवासीयांना मोठा दिलासा मिळणार आहे. यासंदर्भात निवेदन करताना उपमुख्यमंत्री. शिंदे म्हणाले, मुंबईतील ५० एकर किंवा त्यापेक्षा मोठ्या खाजगी, शासकीय किंवा निमशासकीय जमिनींवर आता एकत्रितपणे पुनर्विकास केला जाणार आहे. छोट्या-छोट्या एसआरए प्रकल्पांऐवजी आता संपूर्ण परिसराचा कायापालट करण्यासाठी ही योजना राबवली जाईल.या महत्त्वाकांक्षी योजनेला राज्य मंत्रिमंडळाने ७ ऑक्टोबर २०२५ रोजी मान्यता दिली असून, १३ नोव्हेंबर २०२५ रोजी याबाबतचा शासन निर्णयही जारी करण्यात आला असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. हे प्रकल्प रखडू नयेत आणि जलदगतीने पूर्ण व्हावेत, यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला असून एमएमआरडीए, सिडको, एमआयडीसी, एमएसआरडीसी, म्हाडा आणि मुंबई महानगरपालिका या शासकीय संस्थांच्या मदतीने 'जॉइंट व्हेंचर' तत्त्वावर हे प्रकल्प उभारले जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले. प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात आणखी काही प्रकल्प हाती घेतले जाणार असून त्यामुळे मुंबईचा चेहरामोहरा बदलण्यास आणि सुनियोजित शहरे वसण्यास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले.एसआरए अभय योजने'ला ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढमुंबईतील हजारो झोपडीधारकांसाठी दिलासा देताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी झोपडी खरेदी-विक्रीच्या तांत्रिक अडचणीत अडकलेल्या नागरिकांसाठी 'एसआरए अभय योजने'ची मुदत आता डिसेंबर २०२६ पर्यंत वाढविण्याची घोषणा केली. अनेक झोपडीधारकांनी आपल्या झोपड्यांची खरेदी-विक्री किंवा हस्तांतरण केले होते. मात्र, नियमानुसार या नवीन झोपडीधारकांचे नाव 'अंतिम परिशिष्ट-२' मध्ये (पात्र झोपडीधारकांच्या यादीत) समाविष्ट करण्याची कोणतीही तरतूद नव्हती. यामुळे हजारो गरीब कुटुंब हक्काच्या घरापासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली होती. त्यामुळे राज्य शासनाने १ ऑक्टोबर २०२४ रोजी 'अभय योजना' लागू केली होती. सुरुवातीला ही योजना ३ महिन्यांसाठी होती नंतर तिला मार्च २०२५ पर्यंत मुदतवाढ दिली होती. यासोबतच म्हाडाच्या ओसी साठीच्या अभय योजनेला देखील सध्या सुरू आहे. १ वर्षाची मुदतवाढ देण्याची घोषणा उपमुख्यमंत्र्यांनी केली.एसआरए प्रकल्पाच्या तक्रार निपटाऱ्यासाठी एजीआरसीची संख्या वाढविणारझोपडपट्टी पुनर्विकासाशी संबंधित तक्रारींचे निवारण करण्यासाठी असलेल्या 'एपेक्स ग्रीव्हन्स रिड्रेसल कमिटी'ची (AGRC) संख्या वाढविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयाची घोषणा उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केली.सद्यस्थितीत २१०३ प्रकरणे प्रलंबित असून त्यांचा जलद गतीने निपटारा करण्यासाठी एजीआरसीची संख्या वाढविण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुंबई महापालिकेच्या लिज प्लॉटवर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची जी घरं बांधलेली आहेत त्याकरिता नवीन योजना आणण्याचे निर्देश महापालिकेला दिले असल्याची घोषणा देखील उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केली.
ना घरका ना घाटका ! ट्रम्पविरोधात युएसमध्येच असंतोष, एच१बी व्हिसा निर्णयावर फेडरल न्यायालयात धाव
मुंबई: ना घरका ना घाट का अशी परिस्थिती डोनाल्ड ट्रम्प यांची झालेली दिसते. भारतासह इतर देशावर देशहिताच्या नावाखाली टॅरिफ वाढवत मनमानी केली. यानंतर ट्रम्प प्रशासनाकडून एच १ बी व्हिसावरही भरमसाठ वाढ करत १००००० डॉलर आकारल्याने परदेशातून येत असलेल्या कर्मचाऱ्यांवर व कंपन्यावर याचा मोठा परिणाम झाला आहे.२००० ते ५००० डॉलर शुल्कवाढीविरोधात न्यायालयात अपील केले. यावर न्यायालय आपले मत लवकरच मांडू शकते.याचा मागील अध्याय म्हणून मोठ्या प्रमाणात देशांतर्गतच नागरिकांनी व संस्थांनी याला विरोध करत टॅरिफ शुल्कवाढ कमी करण्याची मागणी केली होती व न्यायालयात याचिकाकर्ते गेले होते. यावर अद्याप अंतरिम निर्णय बाकी असला तरी पुन्हा एकदा ट्रम्प प्रशासनाला घरचा आहेर मिळवावा आहे. आज युएसमधील कायदे बनवणाऱ्या धोरणकर्त्यांनीच कायद्याला विरोधात न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. अमेरिकेतील एकूण २० राज्यांनी या शुल्कवाढीला विरोध करत फेडरल न्यायालयात धाव घेतली आहे. हा केवळ भारत व इतर देशांचा प्रश्न नसून अमेरिकेतील अर्थव्यवस्थेशीही निगडित आहे असे मत मांडले आहे. त्यामुळे ट्रम्प प्रशासनाने वाढविलेल्या थेट करवाढीचा विरोध स्थानिक प्रशासनाने मोठ्या प्रमाणात सुरु केला. तंत्रज्ञान, शिक्षण, हेल्थकेअर, आयटी अशा अनेक क्षेत्रांत या फी वाढीचा मोठा फटका बसल्याने वाढत्या आर्थिक खर्चाचा भार कंपन्यांवर आला. परिणामी कंपन्यांच्या कामकाजावर परिणाम होणार असल्याने नाईलाजास्तव कंपन्यांनी न्यायालयात ट्रम्प यांच्याविरोधात दरवाजे ठोठावले.उपलब्ध माहितीनुसार, कॅलिफोर्नियाचे ॲटर्नी जनरल रॉब बोंटा यांच्या कार्यालयाने म्हटले आहे की, ट्रम्प प्रशासनाला ही फी लादण्याचा अधिकार नाही. त्यांनी सांगितले की, हे फेडरल कायद्याचे उल्लंघन आहे कारण तो कायदा केवळ व्हिसा कार्यक्रमांच्या प्रशासनाचा खर्च भागवण्यासाठीच शुल्क आकारण्याची परवानगी देतो. बोंटा यांनी पुढे सांगितले की, १००००० डॉलर्सच्या शुल्कामुळे शिक्षण आणि आरोग्यसेवांसारख्या अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांवर अनावश्यक आर्थिक भार पडेल ज्यामुळे कामगारांची कमतरता अधिकच वाढेल आणि सेवांमध्ये कपात होण्याची शक्यता निर्माण होईल. ट्रम्प प्रशासनाच्या आदेशानुसार, जोपर्यंत प्रायोजक कंपन्या १००००० डॉलर्सचे शुल्क भरत नाही, तोपर्यंत नवीन एच-१बी व्हिसा धारकांना अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही.अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, या धोरणाचा सध्याच्या एच-१बी व्हिसा धारकांवर किंवा ज्यांनी २१ सप्टेंबरपूर्वी अर्ज केला आहे, त्यांच्यावर परिणाम होणार नाही. ट्रम्प प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार हे शुल्क राष्ट्रपतींच्या अधिकारांचा कायदेशीर वापर आहे आणि त्याचा उद्देश एच-१बी कार्यक्रमाचा गैरवापर रोखणे हा आहे. मात्र एच-१बी प्रणालीमुळे अमेरिकन कामगारांची जागा कमी पगाराच्या परदेशी कामगारांनी घेतली जाते.मात्र कंपन्यांचे याविषयी मत वेगळे आहे. त्यांच्या मते देशातील कुशल कामगारांची कमतरता भरून काढण्यासाठी या कार्यक्रमाची आवश्यकता आहे. त्याला केवळ परकीय कामगारावर जबाबदारी ढकलून चालणार नाही. आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्योग लॉबीस्ट आणि यूएस चेंबर ऑफ कॉमर्स, कामगार संघटना आणि नियोक्ते यांच्यासह एका गटानेही या शुल्काविरुद्ध खटले दाखल केले आहेत. पुढील आठवड्यात वॉशिंग्टन, डी.सी. येथे न्यायालयातील सुनावणी अपेक्षित आहे असे म्हटले जाते.तत्पूर्वी ट्रम्प यांनी फेडरल स्थलांतर कायद्यांतर्गत हा आदेश जारी केला गेला असल्याने अमेरिकेच्या हिताचे रक्षण करण्यासाठी परदेशी नागरिकांच्या प्रवेशावर निर्बंध घालण्याचा अधिकार असल्याचे ट्रम्प प्रशासनाला असल्याचे सरकारी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले होते राज्यांच्या या कायदेशीर आव्हानाचा परिणाम कुशल परदेशी कामगारांवर अवलंबून असलेल्या अमेरिकन कंपन्यांसाठी आणि संपूर्ण एच-१बी व्हिसा प्रणालीसाठी गंभीर ठरू शकतो.
राज्यात २६ जानेवारीपासून 'मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना'; मंत्री नितेश राणेंची मोठी घोषणा
मत्स्यपालनात आता 'एआय'चा वॉच! उत्पादनावर नजर ठेवण्यासाठी 'मार्वल'शी करारनागपूर: राज्यातील मच्छिमार समाजाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महायुती सरकारने कंबर कसली असून, केंद्राच्या धर्तीवर राज्यात येत्या २६ जानेवारी २०२६ पासून स्वतंत्र 'मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना' सुरू करण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी आज केली. तसेच, मत्स्य उत्पादनातील चोरी रोखण्यासाठी आणि नेमके उत्पादन समजण्यासाठी यापुढे अत्याधुनिक 'एआय' (AI) तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.आज झालेल्या मच्छिमार मेळाव्यात बोलताना मंत्री राणे यांनी या नवीन योजनांची माहिती दिली. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजने'च्या धर्तीवर राज्यात ही नवीन योजना राबवली जाईल. या अंतर्गत राज्यासाठी खास २६ नवीन योजना आणल्या जाणार आहेत. मच्छिमार बांधवांचे उत्पन्न वाढवणे आणि राज्याचे मत्स्य उत्पादन वाढवणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.मत्स्यपालनात 'एआय' क्रांतीतलावांमधील मासळीचे नेमके उत्पादन किती होते, याची माहिती अनेकदा सरकारपासून लपवली जाते. यावर उपाय म्हणून राज्य सरकारने तंत्रज्ञानाची मदत घेण्याचे ठरवले आहे. मंत्री राणे म्हणाले, आता तलावांवर नजर ठेवण्यासाठी 'एआय' (Artificial Intelligence) तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यासाठी शासनाने 'मार्वल' (Marvel) या एजन्सीसोबत १ कोटी ८० लाख रुपयांचा करार केला आहे. या तंत्रज्ञानामुळे तलावातील चोरीला आळा बसेल आणि शासनाला उत्पादनाची अचूक आकडेवारी मिळेल.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आभारयावेळी बोलताना मंत्री राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष आभार मानले. गेल्या १२ महिन्यांत देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मच्छीमारांसाठी अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत. गोड्या पाण्यातील मासेमारीवर लक्ष केंद्रित करून या समाजाचे उत्पन्न वाढवण्याची महत्त्वाची जबाबदारी फडणवीस साहेबांनी माझ्यावर सोपवली आहे आणि ती मी पूर्ण करेन, असा विश्वास राणे यांनी व्यक्त केला.
प्रतिनिधी: डोनाल्ड ट्रम्प यांना आणखी एक झटका स्वगृही मिळाला आहे. भारतासह इतर देशावर लावलेल्या भरमसाठ शुल्कवाढीला देशाअंतर्गत विरोध होत असल्याचे नव्या माहितीतून दिसून आले आहे कारण युएसमधीलच कायदेकार तज्ञ मंडळीनी सिनेटमध्ये टॅरिफ रद्द करण्यासाठी नवे विधेयक मांडले आहे. या विधेयकात स्पष्टपणे वाढविलेल्या दलांना विरोध करून ' अजबाबदार व्यापारी धोरण' असा उल्लेख करत फटकारले आहे. भारतावर ५०% इतका उच्च कर लावणे हे चुकीचे असून यामुळे द्विपक्षीय संबंधात बाधा येत असल्याचे त्यांनी म्हटले. देबोरा रोस, मार्क विऐसी, राजा कृष्णमूर्ती यांनी या कायद्याला विरोध करत यावेळी आपल्या भावनाही व्यक्त केल्या.भारतावर यापूर्वी रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने युएसने अतिरिक्त २५% कर लावल्यावर युएसकडून आता भारतावर ५०% शुल्क टॅरिफ आकारले जाते. डोनाल्ड ट्रम्प यांनी आणीबाणी अंतर्गत असलेल्या कायद्याचा वापर करत आयईईपीए (International Emergency Economic Powers IEEPA) कायद्याला वापर केला होता. त्यामुळे ट्रम्प यांनी या कायद्याअंतर्गत २७ सप्टेंबरपासून भारतावर हा कर लागू केला. युएसचे हितसरंक्षण करण्याच्या नादात युएसमधील पुरवठा साखळीचे (Supply Chains), व व्यापारी वर्गाचे मोठ्या प्रमाणात अधःपतन होत आहे ज्याचा फटका युएस मधील कंपन्यावर बसल्याने हा कायदा मागे घेतला जावा अशी मागणी या सदस्यांनी केली.ट्रम्प यांनी लावलेले भारतावरील शुल्क रद्द करणे हा काँग्रेसच्या डेमोक्रॅट्सच्या एका व्यापक प्रयत्नाचा भाग आहे असे तज्ञांचे मत आहे. याचा उद्देश व्यापारावरील फेड काँग्रेसचा घटनात्मक अधिकार परत मिळवणे आणि अध्यक्षांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करून एकतर्फीपणे आपली चुकीची व्यापार धोरणे लादण्यापासून रोखणे हा आहे असे त्या ट्रम्प विरोधी निर्णयाविरोधातील निवेदनात पुढे म्हटले आहे.
भंडारा अवैध वाळू उपसा प्रकरणी एसडीओ निलंबित
निवृत्त तहसीलदारांवरही होणार गुन्हा दाखलघोटी-त्र्यंबक रस्ता बाधितांसाठी ३ दिवसांत बैठक;विधानसभेत महसूल मंत्र्यांची घोषणानागपूर : भंडारा जिल्ह्यातील बेटाळा येथील वाळू डेपो अवैध उत्खननामुळे शासनाचा बुडालेला महसूल आणि शेतकऱ्यांच्या जमिनीचा मोबदला यावर सरकारने आक्रमक भूमिका घेतली. याप्रकरणी उपविभागीय अधिकारी गजेंद्र बालपांडे यांना निलंबित तर तत्कालीन तहसीलदार सध्या निवृत्त असले तरी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत केली.भंडारा जिल्ह्यातील मौजा बेटाळा येथील वाळू डेपोच्या नावाखाली 'केशवप्रिया इन्फ्रास्ट्रक्चर'ने तब्बल ३४,६०० ब्रास अवैध वाळू उपसा केल्याचे प्रकरण आज सभागृहात चर्चेला आले. तलाठी व तहसीलदारांच्या अहवालात तफावत असूनही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कारवाईकडे दुर्लक्ष केल्याचे समोर आल्याने याबाबतच्या लक्षवेधीवर उत्तर देताना संबंधित मंत्र्यांनी कठोर पाऊल उचलले आहे.या प्रकरणात कंत्राटदाराला अभय देणारे उपविभागीय अधिकारी (SDO) गजेंद्र बालपांडे यांना निलंबित करण्याची घोषणा मंत्र्यांनी सभागृहात केली. तसेच, तत्कलीन तहसीलदार महेंद्र सोनवणे हे निवृत्त झाले असले तरी, त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या अवैध उत्खननामुळे शासनाचे सुमारे ६५ कोटी रुपयांचे नुकसान झाले असून, ही रक्कम दंडासहित संबंधित कंपनीकडून वसूल केली जाईल, असेही शासनाने स्पष्ट केले.घोटी-त्र्यंबक रस्ता: शेतकऱ्यांसाठी १५ ते १८ तारखेदरम्यान विशेष बैठकआमदार हिरामण खोसकर यांनी समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या घोटी-त्र्यंबक रस्त्याचा प्रश्न उपस्थित केला. ३५ किलोमीटरच्या या रस्त्यासाठी जमिनीचे संपादन करताना २२ गावांतील शेतकऱ्यांना विश्वासात न घेतल्याचा आरोप त्यांनी केला. रस्त्याची रुंदी ४५ मीटरऐवजी १० ते २० मीटर ठेवावी आणि बाधित शेतकऱ्यांना जमिनी, घरे, झाडे व विहिरींचा चालू बाजारभावाप्रमाणे मोबदला मिळावा, अशी मागणी खोसकर यांनी लावून धरली. यावर उत्तर देताना मंत्र्यांनी सांगितले की, रस्त्याची रुंदी आणि भरपाईचे निकष यावर सभागृहात तातडीने निर्णय घेणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नाही. मात्र, शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी १५ ते १८ डिसेंबर दरम्यान नॅशनल हायवेचे अधिकारी, भूसंपादन अधिकारी आणि लोकप्रतिनिधींची संयुक्त बैठक आयोजित करण्यात येईल. या बैठकीत शेतकऱ्यांचे नुकसान टाळून योग्य भरपाई देण्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन मंत्र्यांनी दिले.
क्रिकेट जगतात खळबळ! मॅच फिक्सिंग प्रकरणात भारताचे 4 खेळाडू निलंबित, ACA ने उचलले मोठे पाऊल
ACA 4 players suspended : आसाम क्रिकेट असोसिएशन (ACA) ने मोठी कारवाई करत चार क्रिकेटपटूंना भ्रष्ट आचरणाच्या आरोपाखाली तात्काळ निलंबित केले आहे. या खेळाडूंनी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२५ दरम्यान गैरव्यवहार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. निलंबित करण्यात आलेल्या खेळाडूंमध्ये अमित सिन्हा, इशान अहमद, अमन त्रिपाठी आणि अभिषेक ठाकुरी यांचा समावेश आहे. या खेळाडूंनी आसामचे […] The post क्रिकेट जगतात खळबळ! मॅच फिक्सिंग प्रकरणात भारताचे 4 खेळाडू निलंबित, ACA ने उचलले मोठे पाऊल appeared first on Dainik Prabhat .
डॉ. पतंगराव कदम यांचे योगदान अनमोल : डॉ.सदानंद मोरे
पुणे – महाराष्ट्राचे शिल्प अनेक नेत्यांनी घडवले असून, त्यात डॉ. पतंगराव कदम यांचे नाव महत्त्वाचे आहे. त्यांचे शैक्षणिक, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान अनमोल आहे, असे मत महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात डॉ. मोरे यांच्या हस्ते ‘ महाराष्ट्राचे शिल्पकार : […] The post डॉ. पतंगराव कदम यांचे योगदान अनमोल : डॉ.सदानंद मोरे appeared first on Dainik Prabhat .
Goldy Brar : गँगस्टर गोल्डी ब्रारच्या नावाने खंडणी उकळणाऱ्या दोघांना अटक
लुधियाना : कुख्यात गँगस्टर गोल्डी ब्रारच्या नावाने व्यावसायिकांकडून खंडणी उकळणाऱ्या दोन आरोपींना डिव्हिजन ४ पोलिस स्टेशनमधील पोलिसांनी अटक केली आहे. दोन्ही आरोपी गँगस्टर गोल्डी ब्रारचे साथीदार आहेत आणि त्यांच्या सतत संपर्कात होते. गुप्त माहितीवरून कारवाई करत पोलिसांनी दोन्ही आरोपींचा माग काढला आणि त्यांना अटक केली. आरोपींची ओळख जतिन उर्फ सॅम आणि जसप्रीत सिंग उर्फ जस्सू […] The post Goldy Brar : गँगस्टर गोल्डी ब्रारच्या नावाने खंडणी उकळणाऱ्या दोघांना अटक appeared first on Dainik Prabhat .
नवीन आधार ॲपपासून ते शुल्क रचनेचे मोठे बदल; जाणून घ्या
नवी दिल्ली : २०२५ हे वर्ष आधार प्रणालीमध्ये महत्त्वपूर्ण बदलांनी भरलेले होते. या वर्षी आधार कार्डशी संबंधित अनेक मोठे बदल लागू करण्यात आले. आधारशी संबंधित सेवांमधील या बदलांचा देशभरातील लाखो नागरिकांवर परिणाम झाला आहे. या वर्षी, सरकारने आधारशी संबंधित नियम, प्रक्रिया आणि तंत्रज्ञानात अनेक सुधारणा केल्या, ज्याचा उद्देश आधारशी जोडलेली डिजिटल ओळख सुरक्षित करणे आणि […] The post नवीन आधार ॲपपासून ते शुल्क रचनेचे मोठे बदल; जाणून घ्या appeared first on Dainik Prabhat .
दिवसा घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना जेरबंद; सुमारे साडेआठ लाखांचा मुद्देमाल जप्त
पुणे : मंगळवार पेठ परिसरात दिवसा घरफोडी करून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना समर्थ पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून सुमारे ८ लाख ११ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दि. १८ नोव्हेंबर २०२५ रोजी मंगळवार पेठ येथील फिर्यादी यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात इसमाने घरात प्रवेश केला. घरातून […] The post दिवसा घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना जेरबंद; सुमारे साडेआठ लाखांचा मुद्देमाल जप्त appeared first on Dainik Prabhat .
दिग्दर्शक महेश मांजरेकरांशी भेट...
टर्निंग पॉइंट : युवराज अवसरमलअतुल काळेलेखन, अभिनय, दिग्दर्शन व गायन या सर्व क्षेत्रांमध्ये मुशाफिरी करणारा एक कलावंत म्हणजे अतुल काळे.अतुलचे शालेय शिक्षण गिरगावमधील चिराबाजार येथील सेंट सॅबेस्टियन हायस्कूलमध्ये झाले. सातवीत असताना त्यांनी शाळेतील नाटकामध्ये स्त्री व्यक्तिरेखा साकारली होती. त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षणासाठी चौपाटीच्या भवन्स कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. तेथे त्यांच्या गायनाच्या करिअरला सुरुवात झाली. तेथे त्यांची ओळख दिग्दर्शक देवेंद्र पेमसोबत झाली. त्यांच्यासोबत त्यांनी अनेक एकांकिका केल्या. फार्ष बाबूच्या प्रेमाचा, कथा एका मस्त रामाची, प्लँचेट या एकांकिकेचा त्यात समावेश होता.१९९१ मध्ये त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर त्यांना ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीमध्ये नोकरी लागली. तेथे संजय नाडकर्णी (ऑर्गनायझर) यांनी त्यांच्या गायनाला प्रोत्साहन दिले. त्यांनी महेंद्र कपूर, जॉनी लिव्हर, अनवर यांच्या ऑर्केस्ट्रामध्ये गाणे गायली. १९९५ मध्ये त्यांच्या जीवनात टर्निंग पॉइंट आला. त्यांचा अपघात झाला होता. हाताला मार लागला होता. तीन महिने ते घरीच होते. देवेंद्र पेमने त्यांना ‘ऑल दी बेस्ट’ हे नाटक इंग्रजीमध्ये करण्यास सांगितले. त्यावेळी त्यांची ओळख दिग्दर्शक महेश मांजरेकरांशी झाली. त्या नाटकाचे ५६ प्रयोग त्यांनी केले.२००० साली त्यांनी नोकरी सोडली व अभिनयाच्या क्षेत्रात त्यांचे करिअर सुरू झाले. निदान, वास्तव, जिस देश मे गंगा रहता है, हत्यार, मी शिवाजी राजे भोसले बोलतोय, डियर जिंदगी, गोल्ड, अंतिम, साम बहादुर या चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय केला. वास्तव चित्रपट करीत असतानाच महेश मांजरेकरांचा पराग कुलकर्णी नावाचा मित्र भेटला. त्याने रूपा बनियानची जाहिरात त्यांना दिली. एम टीव्हीसाठी रूपा की बनियान पहेनोगे हा प्रोमो केला. अशा प्रकारे जाहिरात क्षेत्र त्यांच्यासाठी खुले झाले. हा त्याचा जाहिरात क्षेत्रात प्रवेश मिळवून देणारा टर्निंग पॉइंट ठरला. जाहिरात क्षेत्रातील अनेक मोठ्या दिग्दर्शकांकडे त्यांनी कामे केली. सबल सरकार, प्रसून पांडे, दादू आणी बोढायन, रेन्सिल डिसिल्वा, प्रल्हाद कक्कड इत्यादी. दहा वर्षांनंतर अतुलने स्वतः स्वतंत्र दिग्दर्शक म्हणून कामाला सुरुवात केली. तिचा बाप त्याचा बाप हा त्यांचा पहिला स्वतंत्र दिग्दर्शन केलेला चित्रपट होता. असा मी अशी ती, बाळकडू, संदूक इत्यादी. गोल गोल गरा गरा ही झी वाहिनीसाठी त्यांनी टेलिफिल्म केली. झी ५ वरील जनावर ही वेब सिरीज त्यांनी केली.मी शिवाजीराजे भोसले बोलतोय साठी बॅक ग्राउंड म्यूजिकसाठी त्यांना झी अवॉर्ड मिळाला. दे धक्का चित्रपटासाठी बेस्ट म्यूजिकसाठी दत्ता डावजेकर अवॉर्ड आहे. माझा होशील ना व जीवाची होती या काहीली या मालिका त्यांनी केल्या. सगळ्याच क्षेत्रामध्ये त्यांनी काम केले. मराठी, हिंदी, हिंग्लिश, हॉलिवूड साऱ्याच ठिकाणी त्यांनी काम केले. हिंदीतील अनेक मालिकांमध्ये त्यांनी कामे केलेली आहेत.अनंत महादेवन, सतीश शाह, शेखर सुमन सोबत त्यांनी कामे केलेली आहेत. भारत दाभोळकर सोबत हिंग्लिश नाटकात त्यांनी काम केले.दर्जेदार कामे करण्याकडे त्यांचा कल आहे, हल्ली इंस्टाग्रामचे फॉलोअर्स पाहून कामे दिली जातात, ही बाब त्यांना पटत नाही. अजून चांगले टर्निंग पॉइंट्सजीवनात येतील असा त्यांना आशावाद आहे.
गेल्या आठवड्यात परकीय चलनसाठ्यात १.०३ अब्ज डॉलरने वाढ
प्रतिनिधी: परकीय चलन संकलनात (Forex Reserves) किरकोळ वाढ नोव्हेंबर महिन्यात झाली आहे. आरबीआयच्या नव्या 'विकली सॅस्टिटिक्स सफ्लिमेंट' या अहवालात वाढीचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. अस्थिरतेच्या काळात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) दिलेल्या माहितीत परकीय चलनात एका आठवड्यात १.०३३ अब्ज डॉलरने वाढ झाली आहे. त्यामुळे ही किटी ६८७.२६० अब्ज डॉलरवर पोहोचली असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.५ डिसेंबरपासून झालेल्या या नोंदणीत आरबीआयकडून सोन्याच्या साठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. रूपयांच्या स्थिरीकरणासाठी आरबीआय हे कार्य वेळोवेळी करते. या आठवड्यातही आरबीआयने सोने साठ्यात वाढ केली जी येणाऱ्या काळात ७०४.८९ अब्ज डॉलर या विक्रमी पातळीवर आगामी काळात पोहोचू शकते. सप्टेंबर २०२४ मध्ये ही पातळी गाठण्यास भारताला यश आले होते. आरबीआयच्या पतधोरण समितीच्या बैठकीतील निर्णयानंतर आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी भारताकडे पुरेसा निधी असून पुढील ११ महिन्यात आयात देयी सहज चुकवता येतील इतका पुरेसा निधी असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले होते.तसेच अहवालातील आणख्या माहितीनुसार, सोन्याच्या ठेवीत (Gold Reserves) गेल्या आठवड्यात १०६.९८४ अब्ज डॉलर पर्यंत वाढ झाली आहे. एकाच आठवड्यात या साठ्यात १.०३३ अब्ज डॉलरने वाढ झाल्याचे अहवाल सांगतो. गेल्या महिन्याभरात सोन्याच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात अस्थिरता निर्माण झाल्याने या किंमतीत मोठ्या प्रमाणात चढउतार पहायला मिळाले होते. त्यामुळे या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या. आरबीआयच्या मते एकूणच परिस्थिती सकारात्मक असून परकीय चलनाबाबत भारत मजबूत स्थितीत असल्याचे स्पष्ट केले.एकूणच यावर्षी ४७ ते ४८ अब्ज डॉलरची वाढ परकीय चलन साठ्यात झाली आहे. मात्र आर्थिक वर्ष २०२२ मधील ७१ अब्ज डॉलर तुलनेत आर्थिक वर्ष २०२३ मध्ये ५८ अब्ज डॉलरवर चलनसाठा वाढीत घसरण झाली होती. वेळोवेळी सोन्याच्या साठ्यात वाढ करताना रूपयांचे अवमूल्यन (Devaluation) अस्थिरतेच्या काळात रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात डॉलरची विक्री केली जाते. तर स्थिर कालावधीत वेळप्रसंगी आरबीआय डॉलरही खरेदी करत असते.
‘ह्युमन कोकेन’चा धडकी भरवणारा ट्रेलर
‘ह्युमन कोकेन’चा ट्रेलर अखेर विविध माध्यमांवर प्रदर्शित झाला असून काही क्षणांतच प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. धक्कादायक दृश्यांची मालिकाच जणू या ट्रेलरमध्ये उलगडत जाते. गुन्हेगारी, अमली पदार्थांचा व्यापार आणि अस्तित्वासाठी सुरू असलेल्या निष्ठूर संघर्षाच्या लपलेल्या जगाचे उघड, क्रूर आणि निःसंकोच चित्रण यातून दिसते.या ट्रेलरमध्ये पुष्कर जोग अगदी नव्याच रूपात झळकतो. तो पहिल्यांदाच हिंदी चित्रपटात झळकणार असून त्याची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. एका भयावह जाळ्यात अडकलेल्या कैद्याची तो भूमिका साकारत आहे. जिथे सुटकेची किंचितही शक्यता उरलेली नाही. रोमँटिक आणि हलक्या भूमिकांसाठी ओळखली जाणारी इशिता राज प्रथमच एका काळोख्या आणि धगधगत्या व्यक्तिरेखेत दिसते. पुष्करसोबत कैद झालेली तिची भूमिका ट्रेलरला भावनिकता देते आणि प्रत्येक पडद्यावरील क्षणातील तणाव आणखी गहिरा करते. सिद्धांत कपूर आपल्या हटके आणि धाडसी रूपात लक्ष वेधून घेतो. त्याचे रूप, त्याची उपस्थिती सर्व काही रहस्य आणि अस्वस्थता वाढवणारे आहे. तर ज्येष्ठ अभिनेते जाकीर हुसेन अंगावर काटा आणणाऱ्या भूमिकेत दिसत आहेत. पडद्यावर त्यांची उपस्थितीच भीती निर्माण करण्यास पुरेशी ठरते. ‘ह्युमन कोकेन’ ही कथा अत्यंत महागड्या, नव्या आणि मानवी मन सुन्न करणाऱ्या अमानुष प्रक्रियेतून तयार होणाऱ्या कोकेनच्या प्रकाराभोवती फिरते. या निःसंवेदनशील सत्याच्या गर्तेत पुष्कर जोग आणि इशिता राज सापडतात आणि त्यांचा या भीषण अंधाऱ्या जगात कसा ऱ्हास होतो, याची झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. निखळ वास्तवावर आधारित ही कथा अंडरवर्ल्डच्या अंधाऱ्या आणि दडवलेल्या जगाचा पर्दाफाश करणारी आहे.दिग्दर्शक व लेखक सारिम मोमिन म्हणतात, ‘ह्युमन कोकेन हे आपल्या आसपास दबा धरून बसलेल्या भयावह वास्तवाचे प्रतिबिंब आहे. हा चित्रपट सोपा नाही, तो जाणूनबुजून अस्वस्थ करण्यासाठी, विचारांना कुरवाळण्यासाठी आणि संवादाला चालना देण्यासाठीच बनवला आहे. प्रत्येक व्यक्तिरेखेच्या माध्यमातून समाजातील लपलेली बाजू उजेडात आणली आहे.’इशिता राज, सिद्धांत कपूर, जाकीर हुसेन आणि काही प्रभावी ब्रिटिश कलाकारांच्या दमदार भूमिकांनी सजलेला हा चित्रपट आंतरराष्ट्रीय धाटणीचा अनुभव देतो. सारिम मोमिन लिखित–दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती स्कार्लेट स्लेट स्टुडिओज, वाइनलाइट लिमिटेड, टेक्स्टस्टेप सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड आणि गूजबम्प्स एंटरटेनमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली आहे. निर्मातेची तेंग जू आणि हरीत देसाई. छायाचित्रण सोपन पुरंदरे, संपादन संदीप फ्रान्सिस, दमदार पार्श्वसंगीत क्षितिज तारे यांचे असून नृत्यदिग्दर्शन पवन शेट्टी व खालिद शेख यांनी सांभाळले आहे.युनायटेड किंगडममध्ये बऱ्याच प्रमाणात चित्रीत झालेला ‘ह्युमन कोकेन’ हा केवळ चित्रपट नसून आपण जाणीवपूर्वक टाळत असलेल्या, भयावह आणि काळोख्या जगाचे खरे, कठोर आणि निःसंकोच प्रतिबिंब आहे. हा चित्रपट १६ जानेवारी २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे.
मत्स्यव्यवसाय संस्थांच्या नोंदणीवरील स्थगिती उठवली; मंत्री नितेश राणेंची नागपुरात मोठी घोषणा
नागपूर: मत्स्यव्यवसाय संस्थांच्या नोंदणीवरील स्थगिती उठवली, अशी मोठी घोषणा राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी आज नागपुरात केली. महाराष्ट्र राज्य मच्छिमार संघर्ष कृती समिती आणि विदर्भ विभागीय मच्छिमार सहकारी संघ (मर्या. नागपूर) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'भोई, धीवर, कहार, मच्छिमार समाजाचा आभार मेळावा' आणि 'भूजलाशयीन मच्छिमार सहकारी संस्था परिषदेत' ते बोलत होते. त्यांच्या या निर्णयामुळे राज्यातील भोई, धीवर, कहार आणि इतर मच्छिमार समाजाला मोठा दिलासा मिळाला आहे. मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने या कार्यक्रमाची दिमाखात सुरुवात झाली.नेमका निर्णय काय?मंत्री नितेश राणे यांनी सांगितले की, भूजलाशयीन मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था (प्राथमिक), मच्छिमार विविध कार्यकारी सहकारी संस्था आणि तलावांचे ठेक्यांवरून निर्माण झालेले वाद पाहता, १२ मे २०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये (GR) संस्थांच्या नोंदणीवर स्थगिती देण्यात आली होती. मात्र, यामुळे अनेक ठिकाणी काम करणाऱ्या खऱ्या संस्थांची अडचण होत होती. ही बाब लक्षात घेऊन, १२ डिसेंबर २०२५ रोजीच्या नवीन शासन निर्णयान्वये ही स्थगिती तात्काळ उठवण्यात येत असल्याचे राणे यांनी जाहीर केले. या निर्णयाचा शासन आदेश (GR) लवकरच निर्गमित होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.बोगस संस्थांवर कारवाईचा बडगाआपल्या आक्रमक शैलीत बोलताना मंत्री राणे यांनी बोगस संस्था चालवणाऱ्यांना सज्जड दम भरला. ते म्हणाले, ज्यांच्या नावाने संस्था आहे, तेच लोक तिथे तलाव चालवताना दिसले पाहिजेत. जर कोणाचे नाव वापरून तिसराच कोणीतरी फायदा घेत असेल किंवा संस्था चालवत नसेल, तर त्या संस्थेची नोंदणी मी जागेवर रद्द करेन. तलावांमध्ये खऱ्या अर्थाने काम करणाऱ्या आणि कष्ट करणाऱ्या स्थानिक भोई व मच्छिमार समाजालाच हक्क मिळाला पाहिजे, ही सरकारची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.मच्छीमारांच्या पाठीशी महायुती सरकारदेवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महायुतीचे सरकार हे सर्वसामान्यांचे सरकार असून, ते मच्छीमारांच्या हितासाठी कटिबद्ध आहे, असा विश्वास त्यांनी उपस्थितांना दिला. मी फक्त कोकणातील समुद्राचा मंत्री नसून संपूर्ण महाराष्ट्रातील गोड्या पाण्यातील मच्छीमारांचाही मंत्री आहे आणि तुमच्या प्रगतीसाठी बजेट वाढवून घेण्यापासून ते सर्व मागण्या पूर्ण करेपर्यंत मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन, असे आश्वासन नितेश राणे यांनी यावेळी दिले.
विस्तृत अवकाशाची बहुस्तरीय निर्मितीवस्था...!
राजरंग : राज चिंचणकरएखादा सिनेमा निर्माण होताना त्या कलाकृतीची निर्मितीवस्था विविध वळणे आणि आडवळणे घेऊन पूर्णत्वास जात असते. या निर्मितीवस्थेच्या दरम्यान अनेक गोष्टी घडत असतात. त्यातल्या अगदी काहीच गोष्टी जगासमोर येतात आणि बहुसंख्य घटना मात्र त्या निर्मितीवस्थेत गुंतून गेलेल्या अनेकजणांच्या मनात कायमस्वरूपी ठाण मांडून बसतात. एखादा सिनेमा निर्माण करायला प्रारंभ केल्यावर तो कधी पूर्ण होईल आणि मोठ्या पडद्यावर कधी येईल, हे नक्की कुणी सांगू शकत नाही. यात अनेक महिने, वर्षेही जातात आणि या काळात अनेक घटना त्या कलाकृतीच्या बाबतीत, पर्यायाने तिच्याशी संबंधित लोकांच्या आयुष्यात घडत राहतात. आता हे सर्व मांडण्यासाठी निमित्तमात्र ठरला आहे; तो एक मराठी सिनेमा...! या सिनेमाचे शीर्षक आहे, 'व्हिसल ब्लोविंग सूट' आणि ही थक्क करणारी कहाणी आहे; ती या सिनेमाच्या विस्तृत अवकाशाच्या बहुस्तरीय निर्मितीवस्थेची...!भूत, वर्तमान आणि भविष्याला साक्षी ठेवत केलेला प्रवास, वैज्ञानिक कसोटीवर खरी उतरणारी आणि अनेक वर्षे संशोधन करून लिहिलेली संहिता, सर्व ऋतूंचे रागरंग, दिवसांचे सगळे प्रहर, अगणित पशुपक्षी, त्यांचे विविध मूड्स, लक्षावधी आवाज, समुद्राची दर क्षणाला बदलणारी गाज, आकाशाचे सतत बदलणारे अनेकविध रंग, सूर्याच्या असंख्य तऱ्हा, पंचतत्त्वे आणि हे सर्वकाही टिपण्यासाठी तीन वर्षे केलेले चित्रीकरण; ही अशी सगळी पार्श्वभूमी ज्या सिनेमाला आहे, तो सिनेमा विशेष असणार याबाबत शंका घ्यायला वावच उरत नाही. सिनेमाची हटके शैली, प्रत्येक फ्रेम भारून टाकणारे संगीत, अनेक लेअर्समध्ये भाष्य करणारे दिग्दर्शन, कॅमेऱ्यासमोर आणि कॅमेऱ्याच्या मागे जवळपास पाचशे माणसांचा गोतावळा आणि इतके सगळे असूनही गेली अनेक वर्षे बाहेर कुणालाही, मराठी सिनेमाच्या विश्वात असे काही 'क्रिएशन' घडत आहे, याबाबत खबरही लागू नये अशी अवलंबलेली पद्धत; हे सर्वकाही थक्क करणारे आहे.एकूणच या निर्मितीसाठी गेली तब्बल नऊ वर्षे घेतलेले प्रामाणिक कष्ट, संयमाची पराकाष्ठा, प्रसंगी आरोग्याचीही पर्वा न करता ऊन, वारा आणि पावसाला भिडलेले सिनेमातले कलावंत, सिनेमाशी संबंधित सर्वच विभागांनी घेतलेली अथक मेहनत आणि सिनेमा व वास्तव हा भेद संपून सिनेमाच्या माध्यमातून वास्तवदर्शी अनुभव यावा, तसेच पडद्यावर घडत असलेल्या सर्व घटनांना प्रेक्षकवर्ग प्रत्यक्ष साक्षीदार व्हावा; अशा केल्या गेलेल्या प्रयत्नांचा दृश्य परिणाम म्हणजे 'व्हिसल ब्लोविंग सूट' हा सिनेमा असल्याचे स्पष्ट होत आहे. या सिनेमाच्या बाबतीतली अजून एक लक्षणीय गोष्ट म्हणजे या सिनेमाच्या इतक्या वर्षांच्या निर्मिती प्रक्रियेच्या काळात या सिनेमाशी संबंधित काही सहकारी दिवंगत झाले आहेत. पण तरीही या सिनेमाच्या निर्मितीसोबत त्यांची पारलौकिक साथसोबत घट्ट आहे आणि ते सारेच एकरूप होऊन या सिनेमाला घडवत असल्याची भूमिका या सिनेमाच्या टीमकडून व्यक्त केली जात आहे.या सिनेमासाठी संशोधन, कथा, पटकथा, संवाद, निर्माता आणि दिग्दर्शक अशी मोठी जबाबदारी रंगकर्मी ज्ञानेश्वर मर्गज सांभाळत आहेत. त्यांच्या या अनोख्या प्रवासाविषयी, खास 'राजरंग' कॉलमसाठी त्यांची भूमिका मांडताना ते म्हणतात, आशा, मेहनत, संयम अशी सगळ्याचीच पराकाष्ठा लागलेला हा सिनेमा आहे; पण तरीही कायम आहे ती दुर्दम्य इच्छाशक्ती...! तिच्याच जोरावर सारे आरोप, अपमान, प्रसंगी शापही गिळून अत्यंत सावकाश, पण दृढतेने एक एक पाऊल पूर्णत्वाकडे टाकत हा सिनेमा तयार झाला आहे. आमचे हे प्रथम पुष्प सावित्रीबाई आणि जोतिबा फुले यांच्या चरणी अर्पण करण्यात आले असून, त्यामागचे विशेष कारण हा सिनेमा पाहताना कळून येईल. नेहमीच्या धाटणीसारखा हा सिनेमा नाही. दृक-श्राव्य माध्यमाच्या सर्व शक्यतांना ३६० डिग्री आव्हान देत, मनोरंजन करणारा बहुस्तरीय आविष्काराचा आगळावेगळा प्रयोग यात केलेला आहे. हिंदी व मराठी मालिकांतून भूमिका केलेली, 'राधा' या नाटकात पाच वेगवेगळी पात्रे रंगवलेली अभिनेत्री विशाखा कशाळकर या सिनेमातून प्रमुख भूमिकेत पदार्पण करत आहे. या सिनेमाचे शीर्षक इंग्रजी का, हेही लवकरच उघडकीस येईल. हा सिनेमा म्हणजे लघुपट, माहितीपट किंवा एकपात्री प्रकार नाही; तर हा पूर्ण लांबीचा मराठी सिनेमा आहे.एकूणच या निर्मिती प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर, धर्मवीर भारती यांच्या 'अंधायुग' या नाटकाच्या उद्घोषाला या कलाकृतीचा उद्देश मानत असल्याचे ज्ञानेश्वर मर्गज सांगतात. 'एक नशा आहे, अंधाराच्या गर्जणाऱ्या महासागराला सामोरे जाण्याची, पर्वताएवढ्या उठलेल्या लाटांशी रिक्त हातांनी झुंज देण्याची, अथांग तळ गाठत रसातळाला जाण्याची आणि मग स्वतःला सर्व संकटांत ढकलत मिळालेले आस्थेचे, प्रकाशाचे, सत्याचे, मर्यादेचे काही कण गोळा करून, प्राणापलीकडे जपत, वाचवित त्यांना धरतीवर, सर्वांसमोर आणण्याचे साहस करण्याची नशा...! या नशेत खोल वेदना आणि तितकाच तीव्र, चटका देणारा आनंद मिसळलेला असतो; ज्याच्या आस्वादासाठी मन अक्षरशः अगतिक होऊन जाते, अशा या नाटकाच्या उद्घोषाला प्रमाण मानत ज्ञानेश्वर मर्गज पुढे म्हणतात, जगासमोर नसलेले रहस्य गोताखोर वृतीने शोधून ते प्रेक्षकांसाठी आमच्या पहिल्यावाहिल्या सिनेमाच्या रूपात साकार करण्याची महत्त्वाकांक्षा आमची निर्मितीसंस्था व्यक्त करते. ध्वनी आणि दृश्य यात घडवलेल्या बहुस्तरीय अनोख्या आविष्काराच्या व्यतिरिक्त या सिनेमाच्या कथेचा आवाका खूप विस्तृत आहे. निर्मिती प्रक्रियेतले अडथळे दूर करत आता शेवटच्या टप्प्यात हा सिनेमा पोहोचला आहे. हा सिनेमा पाहताना कान आणि डोळ्यांसोबतच मेंदूलाही खऱ्या अर्थाने प्रेक्षक व्हावे लागेल.
पनवेलमधील माणघरच्या जमिनीचा प्रश्न सुटणार !
स्थानिकांना न्याय देण्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देशनागपूर : पनवेल तालुक्यातील मौजे माणघर येथील जमिनीचा मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न आता मार्गी लागणार आहे. या संदर्भात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना तातडीने बैठक घेऊन येथील स्थानिकांना जमिनी देण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.विधानभवनात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनात पार पडलेल्या बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. बैठकील आमदार प्रसाद लाड आणि माणघरमधील ग्रामस्थ उपस्थित होते.मौजे माणघर येथील सर्व्हे नंबर ६७/० (जुना सर्व्हे क्र. ३५) मधील एकूण १४४.३३ हेक्टर जमिनीचा हा वाद आहे. यातील ५७.१७१९ हेक्टर जमीन निर्वनीकरण झालेली असून, उर्वरित ८७.१५९० हेक्टर जमीन राखीव वन म्हणून कायम आहे.या जमिनीच्या हक्काबाबत महसूल अभिलेख आणि वन हक्क दावे यामध्ये तफावत आढळून आली होती.दळी जमिनीचा दावा : २०२० मध्ये तहसीलदार आणि वन विभागाच्या काही जुन्या पत्रांच्या आधारे ५७.१७ हेक्टर जमिनीवर 'सोनी पांड्या कातकरी' यांचे नाव दळी धारक म्हणून लावून फेरफार (क्र. ५८८, ५८९) करण्यात आले होते.सामुहिक वनहक्क : मात्र, २०१७ मध्येच जिल्हाधिकाऱ्यांनी याच जमिनीवर 'बामा जानू कातकरी व इतर ग्रामस्थ' यांना सामुहिक वनहक्काची सनद दिली होती.एकाच जमिनीवर वैयक्तिक आणि सामुहिक हक्कांच्या नोंदीमुळे संभ्रम निर्माण झाला होता. यावर सुनावणी करताना उपविभागीय अधिकारी , पनवेल यांनी ५८८, ५८९ आणि ५९० हे फेरफार रद्द केले आहेत. सध्या ५७.१७ हेक्टर जमिनीवर पुन्हा 'महाराष्ट्र शासन' अशी नोंद घेण्यात आली आहे.जमिनीच्या नोंदी रद्द झाल्यामुळे स्थानिकांमध्ये संभ्रम होता. या पार्श्वभूमीवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणाची दखल घेतली. या भागातील लोकांना जमिनी देण्याबाबत अधिकाऱ्यांनी बैठक घ्यावी, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले आहेत. मंत्र्यांच्या या भूमिकेमुळे माणघरमधील ग्रामस्थांना आणि विशेषतः कातकरी समाजाला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.सध्या वनहक्क कायद्यानुसार ८७.१६ हेक्टर क्षेत्रावर (स.नं. ६७/२) ग्रामस्थांचे सामुहिक वनहक्क अबाधित ठेवण्यात आले आहेत. आता उर्वरित जमिनीबाबत शासनाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
'मुद्रांक सुधारणा विधेयक'पार्थ पवारांना वाचवण्यासाठी नाही!
अजित पवारांनी नाकारले आरोप; पुण्यातील जमीन व्यवहार प्रकरणात अधिकाऱ्यांच्या भूमिकेकडे दाखवले बोटनागपूर :'अमेडिया' कंपनीशी संबंधित पुण्यातील वादग्रस्त जमीन व्यवहार प्रकरणात पार्थ पवार यांना वाचवण्यासाठी सरकारने मुद्रांक सुधारणा विधेयक आणले असल्याचा आरोप विरोधकांकडून सुरू आहे. अजित पवार यांनी हे आरोप फेटाळून लावले असून, हे विधेयक पार्थ पवारांना वाचवण्यासाठी नसून, मुद्रांक आणि नोंदणी विभागातील तक्रारी थेट मंत्र्यांकडे सुनावणीसाठी याव्यात, यासाठी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.मुंढवा येथील जमीन व्यवहाराशी संबंधित प्रश्नावर शनिवारी पत्रकारांशी झालेल्या अनौपचारिक चर्चेत अजित पवार म्हणाले, व्यवहार होताना अधिकाऱ्यांनी कागदपत्रांची तपासणी करणे आणि चुकीच्या बाबी आढळल्यास कारवाई करणे अपेक्षित होते. अधिकाऱ्यांनी वेळीच भूमिका घेतली असती तर पुढचे प्रकार घडले नसते.दरम्यान, या प्रकरणात कुलमुखत्यारधारक शीतल तेजवानी यांना पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. तहसीलदार सूर्यकांत येवले आणि कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, पार्थ पवार यांच्यावर अद्याप कारवाई न झाल्याने विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. शुक्रवारी विधानसभेत मंजूर झालेल्या मुद्रांक सुधारणा विधेयकात मुद्रांक विभागातील तक्रारी कोर्टात न जाता थेट मंत्र्यांकडे सुनावणीसाठी येण्याची तरतूद आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधकांनी हे विधेयक पार्थ पवारांना फायदा पोहोचवण्यासाठी असल्याचा आरोप केला होता.रायगडमधील संघर्ष थांबवण्यासाठी अजित पवारांची मध्यस्थीदरम्यान, रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यातील राजकीय तणाव कमी करण्यासाठी अजित पवार यांनी पुढाकार घेतला आहे. शुक्रवारी त्यांनी मंत्री उदय सामंत आणि भरत गोगावले यांच्याशी बैठक घेतली. त्यानंतर मंत्री आदिती तटकरे यांच्याशीही चर्चा केली. दोन्ही पक्षांना वाद वाढवू नये, अशी विनंती केल्याचे पवार यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये सांगितले.
उतावळे परीक्षक आणि अकलेला बाशिंग
भालचंद्र कुबल : पाचवा वेदभाग एक६४व्या हौशी राज्यनाट्य स्पर्धेचे साधारण २५ केंद्रावरचे निकाल यायला सुरुवात झालेली आहे आणि दरवर्षीप्रमाणे यंदाही परीक्षकांनी दिलेल्या निकालांवर बोंबाबोंब सुरू होईल. त्यानंतर प्रत्येक केंद्रावर परीक्षकांच्या दिमतीला उभ्या असणाऱ्या समन्वयक नामक हरकाम्याबाबत परीक्षकांकडून लेखी पत्रापत्री सुरू होईल. मग निकालांसदर्भात ज्यांना परीक्षकांकडून अन्याय झालाय असं वाटणारे स्पर्धक आर. टी. आय. टाकतील. त्याला अजून काही दिवस जातील, तोवर बालनाट्य स्पर्धा, नंतर हिंदी नाट्य स्पर्धा, मग संस्कृतमधेच कधीतरी दिव्यांग अशा हजारोंची मॅनपॉवर किंबहूना स्टेजपॉवर प्राप्त झालेली ही स्पर्धा साधारणपणे एप्रिल, मेच्या सुमारास संपेल आणि मग अन्याय म्हणून स्पर्धेबाबत ओरडणारा प्रत्येक घटक शांत होऊन जाईल. यंदाची हौशी राज्यनाट्य स्पर्धा २५ केंद्रांवर आयोजित केली गेली आहे. त्यासाठी साधारणपणे ७५ परीक्षकांची फौज सांस्कृतिक संचालनालयाने उभी केली आहे. निकाल म्हटले की, नेहमीच टार्गेट केलं जातं ते परीक्षकांना, दरवेळी आरोपांच्या पिंजऱ्यात उभं केलं जातं ते परीक्षकांनाच आणि त्या परीक्षणाबाबतत चुकीचा ठपका ठेऊन प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे शासन केले जाते ते परीक्षकांनाच. ७५ परीक्षकांविरुद्ध अन्याय अन्याय म्हणून मुठी आवळणाऱ्यांची संख्या आजमितीला हजारोंची असल्याने साहजिकच जनमानसात परीक्षकांबाबतची उदासिनता अधिक असल्याची लक्षात येईल. मग हाती समाज माध्यमासारखं हत्यार सहज उपलब्ध असल्याने हा परीक्षक नामक एलिमेंट आणि त्याचाच फायदा घेऊन स्पर्धा नियोजन करणारे सांस्कृतिक कार्य संचलनालय येता जाता बडवले जाते. या स्पर्धक मंडळींची संख्या त्यांचे लक्ष्य आणि जनप्रतिनिधींवर असलेला दबाव लक्षात घेता परीक्षकांच्या गळ्याला बसणारा फास अपरिहार्य असतोच असतो म्हणून आजचा उहापोह या परीक्षक नामक न्याय देणाऱ्या अदृष्य न्यायदानाबाबत...!वर उल्लेखिल्याप्रमाणे परीक्षक या स्पर्धांसाठी दिलेल्या वेळेत, दिलेल्या ट्रान्सपोर्टद्वारा, दिलेल्या निवासावर हजर होतो. स्पर्धेस आपल्याबरोबर कोण सहकारी परीक्षक असेल, त्यांचा स्वभाव, त्यांचे राहणीमान, त्यांचे वर्तन याबाबत सुतराम माहिती नसलेले तीन नाट्य अभ्यासक एकत्र येऊन आपल्याला दिलेले काम पार पाडण्याचा १००% प्रयत्न करत असतात. शासनाने आखून दिलेली नियमावली व शासन शिष्टाचार अधिकाधिक कसा पाळला जाईल याचाही प्रयत्न करत असतात. यांच्या मदतीला शासनाने नेमलेला समन्वयक आणि सहसमन्वयक यांचे सहकार्य ते घेत असतात. साधारणपणे स्पर्धेचा कालावधी सरासरी १८ दिवसांचा असतो. आता अठरा दिवस एकाच जागी राहणे हे एखाद्या होम सेटलमेंटप्रमाणे असते. या दिवसांचे जेवण, दिनचर्या आणि परीक्षणाचे वेळापत्रक आखावे लागते. हे वेळापत्रक आखण्यात दोन-तीन दिवस निघून जातात आणि शेवटी माणूस म्हटला की आवडी-निवडी, स्वभाव आणि गुणवत्ता यांचे प्रमाण तीन व्यक्तींमधे भिन्न असणारच. याची जुळवाजुळव ही देखील अॅडजेस्टमेंट होईस्तोवर स्पर्धा रंगात यायला सुरुवात होते. एखादे नाटक संपले की त्याबाबतची गोपनीय चर्चा हा तीन परीक्षकांच्या गुणांकनाबाबत अती महत्त्वाचा विषय असतो. ती करण्यासाठी निवासाच्या ठिकाणी व्यवस्था असेल, तर ठीक अन्यथा ती चर्चा उभ्या उभ्यानेही करावी लागते. गुणपत्रिका नाटक संपताच भरावी असा अलिखित नियम परीक्षकाने आपल्या अंगी बाळगावा, हे अपेक्षित आहे; परंतु एकंदरीत व्यस्त दिनचर्येमुळे तीन पानी गुणपत्रिकेचा भरणा त्याच दिवशी होईल हे सांगता येत नाही. सादर झालेल्या नाटकाबाबतचा आढावा, तपशील आणि परीक्षकाचे मत हे साधारणपणे एक फुलस्केप एवढे विचार करून नोंदवावे लागते. नाटक पाहताना नमूद केलेल्या नोंदी या लिखाणात विस्त्रूत स्वरूपात लिहाव्या लागतात. हल्ली तर या लिखाणाला अनन्य साधारण महत्त्व अशासाठी प्राप्त झाले आहे, कारण की स्पर्धक संघ, बक्षीस न मिळाल्याकारणाने जरा काही स्वतःवर अन्याय झालाय असं वाटलं की लागलीच आर. टी. आय. टाकतात. गुणांकन हे व्यक्तीसापेक्ष असल्याने कमी अधिक असू शकते मात्र नाटकाबद्दलचे निरीक्षण हा गुणपत्रिकेतील महत्त्वाचा मजकूर असतो. थोडक्यात परीक्षक हा समीक्षकही असणे आता गरजेचे झालेय आणि यालाच स्पर्धक मंडळींचा आक्षेप असतो. परीक्षकांचे बायोडेटा जे संचालनालयाकडे पाठवले जातात त्यांनी आयुष्यभरात केलेल्या कामाची नोंद असते. या स्पर्धेसाठी सहज उपलब्ध असलेल्या नाट्यकर्मींचे आजचे वय सरासरी वय ५८ ते ६० असल्याचे मला आढळून आले. या परीक्षकांनी त्यांच्या उमेदीच्या काळात नाट्यक्षेत्र गाजवले असेलही परंतु आजच्या नव्या पिढीला त्याचा मागमूसही नसतो. त्यामुळे परीक्षकांच्या निवडीबाबतचे पहिले प्रश्नचिन्ह याच मुद्यावर उभे राहते. शिवाय नाट्यक्षेत्रातील नवप्रवाह, नवेइझम्स, नव्यारचनात्मक बदलांविषयी मुंबई-पुणे शहरांव्यतिरीक्तचा परीक्षक पार अनभिज्ञ असतो. संचालनालयाच्या निर्णयानुसार मुंबईतील परीक्षक महाराष्ट्रात कुठेही तर मुंबई बाहेरचा परीक्षक मुंबईत पाठवला जातो. राज्यनाट्य स्पर्धा ही प्रयोग तपासण्याचे माध्यम आहे. नव्याप्रवाहांचे नवे प्रयोग मुंबई बाहेरून येणाऱ्या परीक्षकांच्या आकलनाच्या पुढचा असू शकतो आणि तिथेच स्पर्धक व परीक्षकांच्या समज-उमज बाबतची पहिली ठिणगी पडते. एक तर कधी काळी दिवाणखानी मेलो ड्रामा केलेले परीक्षक नव्या विषयांना आणि सादरीकरणांना आत्मसात करायला कमी पडतात जेणेकरून स्पर्धकांचा रोष परीक्षकांच्या दिशेने सुरू होतो. संचालनालयाकडे परीक्षक नियुक्ती या विषयावर उपाय आहे का ? तर केवळ बायोडेटांच्या आधारेच या नियुक्त्या केल्या जातात. या बायोडेटामध्ये गेल्या दहा वर्षांत नाट्यक्षेत्राला दिलेल्या योगदानाबाबत एकही अक्षर नसते किंवा नमूद करणे परीक्षकही टाळतात. एखाद्या परीक्षकाचा बायोडेटा बॅकचेक करायचा म्हटला तरी त्यास लागणारा कालावधी आणि निर्णयाप्रत येण्याची प्रक्रिया यासाठी जशी समन्वयक नामक अशासकीय यंत्रणा उभारून स्पर्धा पार पाडल्या जातात तशीच यंत्रणा परीक्षक स्क्रुटीनी आणि नियुक्तीबाबत उभारण्यात यावी. यातून शासनाचा वेळ आणि अवमान दोन्ही वाचेल असा माझा वैयक्तिक अंदाज आहे.परीक्षक हा शासनाचा प्रतिनिधी असतो त्यामुळे स्पर्धकांना होणाऱ्या त्रासाबद्दल, मनःस्तापाबद्दल, तक्रारीचे निवारण करणारा आका वाटत असतो. स्पर्धात्मक पातळीवर स्पर्धकांच्या परस्परांबाबत अनंत तक्रारी स्पर्धावृत्तीतून जन्म घेत असतात. समन्वयक हा स्थानिक असतो आणि शासन कार्यालय फार दूरवर असल्याने तिथल्या तिथे प्रॉब्लेम सलटवायला परीक्षक हाच एक उपाय आहे या समजूतीने स्पर्धक परीक्षकांकडे धाव घेतात. यात नवखे परीक्षक नेमके बळी जातात. परीक्षकांनी नाटक बघून शून्य ते शंभर एवढे गुणांकनाने गुणपत्रिका भरावी एवढीच त्यांच्याकडून शासनाची अपेक्षा असते, हे ते विसरतात आणि वादास नवे स्वरूप प्राप्त होते. काही वर्षांपूर्वी स्पर्धकांच्या सोयीसाठी स्पर्धक व परीक्षक अशी नाटक संपल्या संपल्या लगेचच चर्चा होत असे. ही चर्चा आता बंद करण्यात आली असून त्या ऐवजी परीक्षक नियमावलीत एक नियम अंतर्भूत करण्यात आला आहे, तो म्हणजे कुठल्याही स्पर्धक संस्थेस नाटक संपताच परीक्षकांशी चर्चा करण्याची इच्छा असल्यास ती करू द्यावी. हा नियम खरं तर समन्वयकाने स्पर्धकांना सांगावा अशी अपेक्षा आहे. स्पर्धकांनी परीक्षकांचा बायोडेटा मागितल्यास संचालनालयाकडे सबमिट केलेला बायोडेटा त्याना देण्यात यावा अशीही तरतूद आहे. परंतु ही प्रक्रिया स्पर्धकांच्या गावीही नसते. परीक्षकांच्या योग्यतेबाबतची पारदर्शकता स्पर्धकांना असलेल्या अज्ञानातून लोप पावते आणि मग गोंधळ माजतो तो याच कारणातून. परीक्षक-स्पर्धक चर्चा का बंद झाली ? याची कारणे सुरस चमत्कारीक जणू चांदोबातल्या कथानाही मागे टाकतील अशी आहेत. परंतु सकारात्मक बदल अथवा सोल्युशन काढायचे असल्यास परीक्षकांचे परीक्षणाबाबतचे शिबीर, जमल्यास लेखी अथवा तोंडी परीक्षा, जमल्यास ग्रुप डिस्कशन किंवा एखाद्या नाट्यविषयाचे प्रेझेंटेशन नाट्यशास्त्र शिकविणाऱ्या विद्यापीठातल्या प्राध्यापकांकडून करवून घ्यावे. ही प्रक्रिया पार करणारे परीक्षक केवळ तीन वर्षांसाठी नियुक्त केले जातील अशी तरतूद असावी. गेल्या काही वर्षात राजकीय ढवळाढवळीतील परीक्षक ही अजून एक मोठी विनोदाने निर्माण केलेली संस्कारी समस्या स्पर्धकांच्या माथी मारली गेलीय. त्या विषयी लिहायचे तर एखादी कादंबरीच लिहावी लागेल आणि त्यातून स्पर्धकांचे प्रश्न काही सुटणार नाहीत. त्यामुळे परीक्षणाच्या पाॅइंट ऑफ व्ह्यूवने मांडलेला लेखाजोखा पुढील लेखात पूर्ण करू म्हणतो..!
Shatrughan Sinha : सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इकबाल यांच्या लग्नानंतर या नात्याबाबत अनेक चर्चा झाल्या. २३ जून २०२४ रोजी दोघांनी कुटुंबीय आणि इंडस्ट्रीतील जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत लग्न केलं. इंटरफेथ मॅरेजमुळे त्यांना सोशल मीडियावर टीकेलाही सामोरं जावं लागलं. अशा वेळी सोनाक्षीचे वडील शत्रुघ्न सिन्हा सुरुवातीपासूनच मुलीच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहेत. शत्रुघ्न सिन्हा हे नेहमीच मुलांच्या […] The post Shatrughan Sinha: मुलगी सोनाक्षीसाठी जहीर इकबाल कसे आहेत? शत्रुघ्न सिन्हा म्हणाले… दोघंही एकमेकांसाठीच बनले आहेत! appeared first on Dainik Prabhat .
महाराष्ट्रातील ‘या’सहकारी बँकेवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची कारवाई; ग्राहकांवर होणार परिणाम?
Nashik News | रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नाशिक जिल्हा महिला विकास सहकारी बँकेविरुध्द कारवाई केली आहे. तरलतेच्या गंभीर समस्येमुळे आरबीआयने हा निर्णय घेतला असून, बँक कर्मचाऱ्यांसह ठेवीदारांना हा आदेश लागू झाला आहे. त्यानुसार आता बँकेच्या आर्थिक आणि बँकिंग कामकाजावर अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत. मात्र बॅंक प्रशासनाने सभासदांनी घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे. जिल्हा […] The post महाराष्ट्रातील ‘या’ सहकारी बँकेवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची कारवाई; ग्राहकांवर होणार परिणाम? appeared first on Dainik Prabhat .
भूगाव भूकुम येथे वाहतूक कोंडी, वाहनाच्या लांबच रांगा
पौड – मुळशी तालुक्यातील मुख्य असलेला रस्ता पुणे चांदणी चौक ते पौड याठिकाणाहून शनिवार व रविवार नित्याचीच कोंडी होत असताना सुधा अपुरा पोलिस बंदोबस्त मुळे स्थानिक नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.आज शनिवार मुळे कोकणात या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनाची संख्या अधिक वाढत असल्याने वाहतूक कोंडी होत आहे भूकुम माताळवाडी ते भूगाव या दरम्यान असलेल्या […] The post भूगाव भूकुम येथे वाहतूक कोंडी, वाहनाच्या लांबच रांगा appeared first on Dainik Prabhat .
पुणे-संभाजीनगर प्रवास फक्त २ तासात ; नितीन गडकरींकडून ग्रीन फील्ड सुपर हायवेची घोषणा
नागपूर : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यांनी पुणे ते संभाजीनगर या दोन शहरांना जोडणारा नवीन महामार्ग बांधला जाणार असल्याची माहिती दिली आहे. पुणे-संभाजीनगरला जोडणाऱ्या रस्त्याचा प्रकल्प १६ हजार ३१८ कोटींचा आहे . यामुळे पुणे संभाजीनगर हे अंतर केवळ दोन तासांत पार होणार .कसा असेल महामार्ग ?या प्रकल्पाविषयी माहिती देताना गडकरी यांनी सांगितलं की, आम्ही पुणे ते संभाजीनगर हा नवीन एक्स्प्रेस हायवे बांधत आहोत. याचा एमएयू झाला असून पहिला रस्ता पुणे, अहिल्यानगर आणि संभाजीनगर असा असणार आहे. तो रस्ता आधी पूर्णपणे चांगला करणार आहे. यावर काही ठिकाणी पूल बांधले जाणार आहेत. यासाठी दोन हजार कोटी खर्च केले जाणार आहेत.दुसरा रस्ता शिक्रापूर येथून जाणार आहे. हा रस्ता अहिल्यानगरच्या बाहेरून थेट बीड जिल्ह्यात जाईल आणि तिथून तो संभाजीनगरपर्यंत जोडला जाईल. हा ग्रीन फिल्ड हायवे असणार आहे. या पूर्ण प्रकलापासाठी १६ हजार ३१८ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यात सगळ्या गोष्टी जवळपास पूर्ण झाल्या आहेत.हा रस्ता तयार झाला तर संभाजीनगर ते पुणे अंतर केवळ दोन तासात पार करता येणार आहे. तर संभाजीनगर नागपूर हे अंतर अडीच तासांत पार करता येणार आहे. एकूण काय तर हा एक्स्प्रेस वे पुणे ते नागपूर असा होणार आहे, अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली.
विधानपरिषदेत शिक्षकांच्या प्रश्नांवर खडाजंगी; 'टीईटी'आणि निवडणूक कामांबाबत सरकारची महत्त्वाची भूमिका
मुंबई: विधानपरिषदेच्या आजच्या कामकाजात शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर जोरदार चर्चा झाली. यामध्ये प्रामुख्याने 'टीईटी' (TET) बाबतचा न्यायालयीन निर्णय आणि शिक्षकांना लावली जाणारी निवडणूक कामे हे मुद्दे केंद्रस्थानी राहिले. तसेच, विरोधकांच्या वतीने अंतिम आठवडा प्रस्ताव मांडण्यात आला, ज्यावर उद्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उत्तर देणार आहेत.टीईटी (TET) संदर्भात सरकारची भूमिकाशिक्षक पात्रता परीक्षेच्या (TET) निकालासंदर्भात सभागृहात चर्चा झाली. यावेळी उत्तर देताना संबंधित मंत्र्यांनी स्पष्ट केले की, हा निर्णय राज्य सरकारने घेतलेला नसून तो सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे. याबाबत पुन्हा न्यायालयात जाण्याविषयी विधी व न्याय विभागाकडून सल्ला घेतला असता, त्यांनी पुन्हा न्यायालयात जाणे योग्य ठरणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.तथापि, इतर राज्यांनी या संदर्भात काय निर्णय घेतले आहेत, याचा अभ्यास करून आणि विधी मंडळाचा सल्ला घेऊन पुढील दिशा ठरवली जाईल, असे आश्वासन सरकारने दिले. यावेळी आमदार सत्यजित तांबे यांनी न्यायालयाचा जो काही निर्णय आहे, तो सभागृहाच्या पटलावर ठेवण्याची मागणी केली. यावर मंत्र्यांनी हा निर्णय पटलावर ठेवण्याचे मान्य केले.निवडणुका आल्या की शिक्षकांकडेच का पाहिले जाते? - विक्रम काळेआमदार विक्रम काळे यांनी शिक्षकांना देण्यात येणाऱ्या अशैक्षणिक कामांचा मुद्दा पोटतिडकीने मांडला. ते म्हणाले, राज्यात कोणतेही सरकारी काम आले की प्रशासनाला आधी शिक्षकच दिसतात. निवडणुका आल्या की शिक्षकांना जुंपले जाते. जे शिक्षक 'बीएलओ' (BLO) म्हणून काम करतात, त्यांना तर वर्षभर कामात राहावे लागते, त्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांची भेटच होत नाही. काळे यांनी एका गंभीर बाबीकडे लक्ष वेधताना सांगितले की, एखाद्या शाळेत १० शिक्षक असतील तर त्यातील ८ जणांना निवडणूक कामाला घेतले जाते. जर शिक्षक कामावर गेले नाहीत, तर त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वी शिक्षकांना अशैक्षणिक कामे देणार नाही असे सांगितले होते, मात्र प्रत्यक्षात परिस्थिती बदललेली नाही. यावर मंत्री पंकज भोयर यांनी संबंधित सूचना सचिवांना दिल्या जातील, असे सांगितले.तरुणांना रोजगार आणि शिक्षकांना मुक्ती: निरंजन डावखरे यांची सूचनाया चर्चेत आमदार निरंजन डावखरे यांनी एक महत्त्वाची सूचना मांडली. शिक्षकांना निवडणूक कामात अडकवण्यापेक्षा, कौशल्य विकास विभागाअंतर्गत राज्यातील बेरोजगार तरुणांना हे काम देता येईल का?, असा सवाल त्यांनी केला. यामुळे तरुणांना रोजगार मिळेल आणि शिक्षक केवळ अध्यापनाचे काम करतील, असे मत त्यांनी व्यक्त केले. ही सूचना अत्यंत चांगली असून सरकार यावर गांभीर्याने विचार करेल, असे आश्वासन मंत्री पंकज भोयर यांनी दिले.अंतिम आठवडा प्रस्ताव: उद्या उपमुख्यमंत्री शिंदे देणार उत्तरआज विधानपरिषदेत विरोधकांच्या वतीने अंतिम आठवडा प्रस्ताव मांडण्यात आला. काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी हा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाद्वारे महिला सुरक्षा, सार्वजनिक आरोग्य, प्रदूषण, इन्फ्रास्ट्रक्चर आणि सरकारच्या विविध खात्यांमधील कथित आर्थिक अनियमितता यांसारख्या गंभीर विषयांवर विरोधकांनी सरकारला घेरले आहे. या प्रस्तावावर आज चर्चा होऊन उद्या (शनिवारी) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे याला सविस्तर उत्तर देणार आहेत.
मुंबई : राज्यातील शिक्षण क्षेत्रात कंत्राटी भरतीचे प्रमाण वाढत असल्याच्या चर्चांवर राज्य सरकारने अखेर शिक्कामोर्तब केले आहे. राज्यात कंत्राटी शिक्षकांची संख्या वाढत असल्याचे शासनाने मान्य केले असून, सद्यस्थितीत ही संख्या तब्बल ७५ हजार ७४० इतकी झाली आहे. मात्र, इतक्या मोठ्या संख्येने असलेल्या या शिक्षकांना सेवेत कायम (Permanent) करण्याबाबत सरकारचा सध्या कोणताही विचार नसल्याची माहिती लेखी उत्तराद्वारे समोर आली आहे.खासगी आणि विनाअनुदानित शाळांमध्ये भरणा जास्तसरकारने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात सध्या कार्यरत असलेल्या ७५,७४० कंत्राटी शिक्षकांपैकी बहुतांश शिक्षक हे खासगी संस्थांवर अवलंबून आहेत. या एकूण संख्येपैकी जवळजवळ ८० टक्के शिक्षक हे खासगी आणि विनाअनुदानित शाळांमध्ये कार्यरत आहेत. उर्वरित शिक्षक सरकारी किंवा अनुदानित संस्थांमध्ये कंत्राटी तत्त्वावर ज्ञानदानाचे काम करत आहेत.शिक्षकांच्या पदरी निराशाचकंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या शिक्षकांना कधी ना कधी सेवेत कायम केले जाईल, अशी अपेक्षा असते. मात्र, राज्य सरकारने दिलेल्या लेखी उत्तरामुळे या शिक्षकांच्या पदरी निराशा पडली आहे. सदर कंत्राटी शिक्षकांना सेवेत कायम करण्याबाबतचा कोणताही प्रस्ताव सध्या शासनाच्या विचाराधीन नाही, असे सरकारने स्पष्ट शब्दांत सांगितले आहे.नोकरीची शाश्वती आणि वेतनाचा प्रश्नराज्यात बेरोजगारीचा दर आणि शिक्षकांच्या रिक्त जागा पाहता, अनेक तरुण कंत्राटी पद्धतीवर शिकवण्यास तयार होतात. मात्र, आता सरकारनेच कायम करण्याचा प्रस्ताव नसल्याचे स्पष्ट केल्याने, या हजारो शिक्षकांच्या नोकरीच्या शाश्वतीचा आणि भविष्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. एकीकडे 'टीईटी' आणि पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरतीची प्रक्रिया संथ गतीने सुरू असताना, दुसरीकडे कंत्राटी शिक्षकांची वाढती फौज शिक्षण व्यवस्थेतील विदारक चित्र स्पष्ट करत आहे.
‘लक्ष्मीच्या पावलांनी’मालिका होणार बंद; ईशा केसकरने मागितली चाहत्यांची माफी
Isha Keskar | ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ मालिकेतील अभिनेत्री ईशा केसकरने प्रकृतीच्या कारणास्तव मालिका सोडली. याचा परिणाम मालिकेच्या टीआरपीवर झाला. त्यामुळे ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. मालिकेतून एक्झिट घेतलेल्या ईशा केसकरने यासाठी प्रेक्षकांची माफी मागितली आहे. ईशा केसकरने लिहिली भावुक पोस्ट ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ मालिका बंद होणार असल्याने ईशाने सोशल मीडियावर मालिकेच्या सेटवरील खास आठवणी शेअर […] The post ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ मालिका होणार बंद; ईशा केसकरने मागितली चाहत्यांची माफी appeared first on Dainik Prabhat .
‘सर्वात सुंदर गोष्टी तेव्हाच घडतात, जेव्हा…’; लोकप्रिय अभिनेत्रीचे ७ वर्षांनी छोट्या पडद्यावर कमबॅक
Shweta Pendse | ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘वचन दिले तू मला’ असे या मालिकेचे नाव असून यात अभिनेत्री श्वेता पेंडसे ७ वर्षांनी छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहे. याबद्दलची एक खास पोस्ट तिनं सोशल मीडियावर शेअर केली आहे. या मालिकेत श्वेता पूर्वा शिंदे ही भूमिका साकारणार आहे. याच भूमिकेतील एक […] The post ‘सर्वात सुंदर गोष्टी तेव्हाच घडतात, जेव्हा…’; लोकप्रिय अभिनेत्रीचे ७ वर्षांनी छोट्या पडद्यावर कमबॅक appeared first on Dainik Prabhat .
मुंबईतून दररोज ४ ते ५ मुली बेपत्ता ; मुलींच्या अपहरणाचे ११८७ गुन्हे दाखल
मुंबई : मुंबईत मुलींच्या अपहरणांचं प्रमाण दिवसागणिक वाढत असल्याचं दिसून येत आहे. गेल्या दहा महिन्यात अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचे ११८७ गुन्हे मुंबईत दाखल झाले आहेत. यापैकी १११८ गुन्ह्यांची उकल झाली आहे. या घटनांमुळे मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न उभा आहे.ऑक्टोबर महिन्यात सर्वाधिक मुली बेपत्ता झाल्या आहेत. मुंबई पोलिसांच्या आकडेवारीनुसार, जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीत मुंबईत महिलांसंबंधित ५८८६ गुन्हे दाखल झाले आगेत. त्यापैकी ५५६१ गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे. याशिवाय अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचे ११८७ गुन्हे दाखल झाले असून यासंदर्भात तपास केला जात आहे.मुली बेपत्ता होण्यामागील कारणं काय?मिळालेल्या माहितीनुसार, प्रेम प्रकरणातून पळून जाणाऱ्य़ा मुलींची संख्या सर्वाधिक आहे. अनेक ठिकाणी घरातील किरकोळ वाद, पालकांविषयीचा रागही कारणीभूत ठरत असल्याचं दिसून येत आहे. तर सेक्स रॅकेटच्या घटनांचाही खुलासा झाला. राजस्थान आणि गुजरातसाख्या ठिकाणी अल्पवयीन मुलींची लग्नासाठी तस्करी केली जाते. पोलिसांच्या कारवाईदरम्यान अनेकदा अशा घटना समोर आल्या आहेत.कुठल्या महिन्यात किती मुली बेपत्ताजानेवारी - १२६फेब्रुवारी - १००मार्च - १३१एप्रिल - १००मे - १२१जून - १२२जुलै - १०७ऑगस्ट - १३२सप्टेंबर १२७ऑक्टोबर - १३६
Tara Sharma : अभिनेता अक्षय खन्ना. या दोन शब्दांच्या नावाने धुमाकूळ घातला आहे. सगळीकडे अक्षय खन्नाची जोरदार चर्चा आहे, त्याला कारण आहे ‘धुरंधर’ हा चित्रपट. ५ डिसेंबर या दिवशी प्रदर्शित झालेल्या चित्रपटाने बॅाक्स अॅाफिसर धुव्वा केला आहे. चित्रपटातून रणवीर सिंहच्या कमबॅकची चर्चा असतानाच अचानक अक्षय खन्नाने साकारलेल्या रहेमान डकैतची भूमिका भाऊ खाऊन गेली आहे. सोशल […] The post “तेव्हापासून माहित होतं की….”; अक्षय खन्नाच्या एक्स गर्लफ्रेंडची पोस्ट व्हायरल; ‘तो’ जुना फोटो केला शेअर appeared first on Dainik Prabhat .
नागपूर: महाराष्ट्रात मराठी भाषेचा सन्मान राखण्यासाठी आणि ती प्रत्येकापर्यंत पोहोचवण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. राज्यातील शाळांमध्ये मराठी सक्तीचा ऐतिहासिक निर्णय घेतल्यानंतर, आता या निर्णयाला बगल देणाऱ्या शाळांच्या मनमानी कारभाराला चाप लावण्यासाठी सरकारने आक्रमक पवित्रा घेतला आहे. केंद्रीय मंडळाच्या शाळांनी मराठी विषय 'ऐच्छिक' ठेवल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याची गंभीर दखल घेत, अशा शाळांवर कडक कारवाई करण्याचे स्पष्ट संकेत सरकारने आज विधान परिषदेत दिले.मराठीची सक्ती, नाहीतर कारवाई!फेब्रुवारी २०२४ मध्ये सरकारने राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि मंडळांच्या शाळांना मराठी भाषा शिकवणे अनिवार्य केले होते. हा निर्णय म्हणजे मराठी अस्मितेच्या जपणुकीसाठी टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल होते. मात्र, काही केंद्रीय शाळांनी या आदेशांचे पालन न करता मराठी विषय 'ऐच्छिक' ठेवल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे ८५,४९७ विद्यार्थ्यांना मराठीचे शिक्षण मिळाले नसल्याची बाब समोर येताच, सरकारने यावर तातडीने कठोर भूमिका घेतली आहे.शाळांच्या मनमानीला बसणार चापआज विधान परिषदेत एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना सरकारने स्पष्ट केले की, राज्यात शाळा कोणत्याही मंडळाची असो, मराठी शिकावीच लागेल. सरकारी आदेश धाब्यावर बसवणाऱ्या शाळांची आता गय केली जाणार नाही. ज्या शाळांनी मराठी विषय सक्तीचा केलेला नाही आणि सरकारी निर्णयाची अंमलबजावणी केलेली नाही, अशा शाळांवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
‘एकाकी’मधील जॉनर बदलासाठी आशिष चंचलानीचे एस.एस. राजामौलींने केले कौतुक
आशिष चंचलानी, जे भारतातील सर्वात मोठ्या डिजिटल स्टार्सपैकी एक आहेत आणि ज्यांची देशभरात जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे, त्यांनी आपल्या करिअरमध्ये एक मोठे पाऊल उचलले आहे. अनेक वर्षे पॅरोडी आणि कॉमिक व्हिडिओद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन केल्यानंतर, आता त्यांनी दिग्दर्शनाच्या दुनियेत आपल्या पहिल्या वेबसीरिज ‘एकाकी’सह पदार्पण केले आहे. हॉरर-कॉमेडी थ्रिलरवर आधारित या सीरिजचे पहिले दोन भाग प्रदर्शित झाले असून, प्रेक्षक आणि समीक्षक दोघांकडूनही तिला चांगला प्रतिसाद मिळत आहे.हा क्षण आणखी खास ठरतो कारण देशातील दिग्गज दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांनीही आशिष यांच्या कामाचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी X (पूर्वीचे ट्विटर)वर आशिष यांच्या कामाची प्रशंसा केली. आशिषसाठी ही दाद त्यांच्या सर्जनशील प्रवासातील एक मोठा अभिमानाचा क्षण आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
प्रहार शनिवार अर्थविशेष: घरातील पेटत्या भयानक विषमतेच्या भस्मासूराला वेळीच आवरा!
मोहित सोमणआपण वास्तविक जगात राहतो वास्तविक जीवनात खातो जगतो पण कधीकधी भीषण वास्तविकता आपल्या नजरेसमोर येत नाही आली तरी आपण स्विकारत नाही याच दृष्टीने काहीतरी महत्वाचे प्रकाशास आणणे काळाच्या ओघात गरजेचे आहे. जगभरात असामाजिक तत्वापेक्षाही असमानता हा मूलभूत मुद्दा वणवा बनू पाहतो आहे. जगभरात मोठ्या प्रमाणात संपत्तीतील विषमता वाढत आहे. धनाढ्य आणखी धनाढ्य होत आहे गरीब आणखी गरीब आहे ही वास्तविकता आहे हे पहिले आपण स्विकारले पाहिजे अनेकदा याला राजकीय चष्म्यातून पाहिले जाते. अनेकदा यावर खिल्ली उडविली जाते. अनेकदा यावर टिंगलटवाळी करत 'डावे' विचार म्हणत दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे हा वणवा मशालीसारखा तेवत आहे आणि भविष्यात वाढण्याची शक्यता आहे. वेळेतेच यावर उपाययोजना करणे हे समाजासाठी हितकारक ठरेल. अनेक अहवालानुसार सातत्याने गरीब श्रीमंतातील दरी वाढत आहे.असं म्हणतात पैसा पैशाला खेचतो. तर गरिबी गरिबीला आणखी वाढवते. सरकार कोणाचेही असो सरकारी दरबारी योजना आणल्या तरी त्या प्रत्येक योजना प्रत्येक गरजू व्यक्तीकडे पोहोचते का? पोहोचल्यास किती पोहोचतात आणि पोहोचल्याच तरी त्या तुटपुंज्या पैशात आणखी काय करता करता येईल. अनेकदा निवडणूक जिंकायच्या नादात पैशाची खिरापत योजनेतून वाटली जाते. व्यक्तीला स्वावलंबी बनवण्याऐवजी अनेकदा परावलंबी बनवत आहे. स्वतः पायावर उभे राहून आपण दुसऱ्याला नोकरी देऊ हे विचार तरूणांच्या मनात बिंबवण्यासाठी कधीही इच्छाशक्ती दिसली नाही. निश्चितच एकांगी नजरेतून त्यात पाहता येणार नाही. इच्छाशक्ती व पाठबळ या दोन स्वतंत्र गोष्टी समजल्या जात असल्या तरी दोन्ही गोष्टींचा मेळ आपण घालू शकलो नाही ही वस्तुस्थिती आहे. आजही अनेकदा शिक्षणाचा प्रसार झालेला नाही. आदिवासी क्षेत्रात एक गाव असे नुकतेच सापडले ज्या गावाचा १९४७ सालापासून भारताच्या नकाशावर उल्लेखच नाही. अशा वेळी मागासलेल्या वर्गातील मुलांना शिकायची इच्छा असेल तर पाठबळ द्यायला यंत्रणा राबली पाहिजे दुसरीकडे सरकारी योजनांचा गैरफायदा घेऊन 'आईतखाऊ' बनवण्याचे कामही पद्धतशीरपणे समाजात सुरु असते ज्यांना पाठबळाची आवश्यकता नाही शिकण्याची उमेद नाही त्यांना लाभाचा पाऊस पडतो.शेतीची मशागत केल्यानेच शेत समृद्ध होत असते. गरीब व श्रीमंत यांच्यातील मुद्देसूद विश्लेषण करण्यापूर्वी प्रथम या मुद्यावर प्रकाश टाकणे महत्वाचे आहे. म्हणूनच हा प्रपंच. जीवनात अशा विविध कारणांमुळे समाज घडत असतो. बिघडत असतो. या मानसिकतेतून समाज आर्थिक विषमता वाढत असतो कारण जो लाभार्थी असतो त्याची सामाजिक पोहोच चांगली असते. कुठल्या ठिकाणी कुठले कार्ड वापरता येईल कुठे कुणाशी जवळीक केल्याने लाभ पदरात पडेल कुठे सलगी केल्याने साम्राज्य उभे करता येईल या सगळ्याची समज असल्याने त्याला आपल्या ज्ञानाने 'हाताळणी' करता येते. दुसरीकडे अडाणी समाजाला चाकोरीबाहेर काय चाललंय याच भानही नसल्याने ते प्रवाहाच्या बाहेर येऊच शकत नाही. उदाहरणार्थ आजही अनेक खेडीपाडी भारतात आहेत की ज्यांनी जीवनात रेल्वेही पाहिली नाही. १४० कोटींच्या भारत देशात अशी किमान १५ कोटी जनसंख्या आजही आहे. जिथे शिक्षण नाही रोजगार नाही वीज नाही समृध्दी करण्यासाठी आवश्यक असलेले साधन नाही, चांगले वेतन नाही अशा पीडीतांना केवळ दीड हजारांची मदत करून भागणार नाही. तर त्यासाठी सगळ्यांचे एकत्रित समानतेचे मनोबल हवे. हे झालं दारिद्र्य रेषेखालील व प्रमाणाबाहेर श्रीमंत व्यक्तींची परिस्थिती.पण आज एक नवा मध्यमवर्ग निर्माण झाला आहे ज्याच्या गरजा, आकांशा, समज वाढली आहे. पण उच्चपदस्थ अधिकारी बनण्यासाठी अपार कष्ट घेतले असूनही नोकरीसाठी वणवण ते करत असतात. उन्हाळ्यात पावसाळ्यात पर्वा न करता मुलाखती देत फिरत असतात. नाईलाजाने कुठेच नाही तर बीपीओत, कॉल सेंटरमध्ये काम करून आपले पोट भरतात. अनेकदा शिक्षण असूनही योग्य मोबदला दिला जात नाही. पिळवणूक तर सगळ्याच क्षेत्रात आहे. फक्त यावर बोलण्याची कोणी हिंमत करत नाही. दुसरीकडे नवश्रीमंत नियमांची पायमल्ली करून सुद्धा यंत्रणेतील जोरावर कंपन्यावर कंपन्या उघडत आपले नवे साम्राज्य तयार करत आहे. यावर एकच बाजू कायम समाजातून सांगितली जाते ती म्हणजे त्यामागील मेहनत! मेहनत तर गरीब माणूसही करतो म्हणून तो उद्योगपती होऊ शकतो का? तर याचे उत्तर नाही असे आहे. म्हणूनच म्हणतात पैसा पैशाला खेचतो. निश्चितच उद्योगपती बनण्यासाठी अपार मेहनत आहे. राखेतून फिनिक्स उडी घेणारे कृत्य वाईट नाही. परंतु त्यामध्ये नैतिकतेचा भाग किती हा खरा कळीचा मुद्दा आहे. असं म्हणतात पहिले १० कोटी कमवायला मेहनत लागते. त्यानंतर पुढील कमाई आपोआप होत राहते. पण खरच सगळेच करोडपती होतात का?महिन्याला ५००० देखील कमवू न शकणारे व्यक्ती देशात आजही आहेत. हा देष कृषीप्रधान देश आहे असं म्हणतात पण आकडेवारी पाहिल्यास दिवसेंदिवस अर्थकारणात शेतीचा जीडीपीतील वाटा घसरतच आहे. औद्योगिक व सेवा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नोकऱ्या निर्माण जरी झाल्या तरी त्यामागे असणारी भयानक लोकसंख्या गरजूंच्या शोषणासाठी आणखी कारण ठरत आहे. सरकारी आकडेवारी पाहता १ सरकारी नोकरीसाठी किमान ४००० अर्ज सध्या दाखल होत आहेत. ही झाली सरकारी नोकरीची बाब खाजगी क्षेत्रात परिस्थिती तर बिकट आहे. खाजगी क्षेत्रात कर्मचाऱ्यांची उपलब्धता वाढल्याने मालक सांगेल त्या पगारात काम करावे लागते. गरजू ते काम कमी मोबदल्यात करतो देखील पण हे नैतिकतेने योग्य आहे का? प्रत्येक श्रमिकाला ज्याचा योग्य मोबदला मिळणे हा त्यांचा हक्क नाही का?आपल्या देशात समानतेच्या मोठं मोठ्या गप्पा मारल्या जातात. पण तुम्हाला हे माहित आहे? की देशातील बहुतांश एनजीओ परदेशी पैशावर चालतात? देशातील ७०% एनजीओ सेवाभावी संस्था या परदेशी देणग्यावर चालत असतील तर ते भारतात बसून समानतेची अंमलबजावणी करणार आहेत का? उद्योगपती, राजकारणी, सरकारी अधिकारी, पोलिस यंत्रणा, समाजातील प्रभावी व्यक्ती यांना समाजातील वास्तविकतेची चांगली ज्याण आहे त्याचा फायदा आंतरसंबंधातून होत असतात. वास्तविक पाहता, यांची जाण असूनही नकळतपणे अजाणतेने नवं मध्यम वर्गीय या असमानतेला बळी पडतात त्यावर समाज म्हणून आपण काय करणार आहोत.ताज्या एका नव्या वर्ल्ड इनइक्विलिटी रिपोर्ट २०२६ मधील माहितीनुसार भारतातच नाही संपूर्ण जगात असमानता वाढत आहे.ती इतकी भीषण परिस्थिती दर्शवते ज्याचा विचार आपण एसीत बसून करु शकत नाही. या अहवालात म्हटलंय की, जगात मोठ्या प्रमाणात सामजिक विषमता, आर्थिक विषमता लैंगिक विषमता मोठ्या प्रमाणात वाढत आहे. भारताचाच विचार केल्यास अहवालात म्हटलंय की, देशातील ५८% संपत्ती केवळ १०% व्यक्तीकडे आहे तर उर्वरित ५०% व्यक्तीकडे केवळ १५% संपत्ती आहे. २०२२ सालच्या आधीच्या रिपोर्टमध्ये १०% लोकांकडे ५७% संपत्ती होती. तर उर्वरित ५०% लोकांकडे १३% संपत्ती होती. भारतातील ६५% संपत्ती ही केवळ १०% लोकांकडे आहे तर सर्वात श्रीमंत असलेल्या १% व्यक्तीकडे ४०% संपत्ती देशात आहे. जगभरातही १०% व्यक्तींकडे एकूण जगातील ७५% संपत्ती अस्तिवात आहे. तर उर्वरित २% व्यक्तीकडे केवळ २% संपती अस्तित्वात आहे. हे दिवसेंदिवस वाढतच आहे.आगीतून फुफाट्यात जाण्यापूर्वी सरकारने यावर ठोस पावले उचलली पाहिजेत तसेच समाजाच्या विचारातही बदल झाला पाहिजे. निश्चितच व्यक्तीचे स्वभाव सारखे नसले तरी समाज म्हणून आपल्या काही जबाबदाऱ्या आहेत. व्यापक धोरण आखण्याची गरज मोठ्या प्रमाणात वाढत आहे. समान संधी, समान महत्व, समान स्पर्धा याकडेही व्यापक नजरेतून पाहणे महत्त्वाचे आहे. अखेर ही अंतिम पायरी नाही. आणखी एक मुद्दा म्हणजे वाढलेली भपकेबाजी. संपत्तीचे, श्रीमंती पार्ट्याचे, काढलेल्या लक्झरी सहलीचे इंस्टाग्रामवर ओगंळवाणे प्रदर्शन यामुळे मोठ्या प्रमाणात 'असुया' हे भस्मासूराचे रूप घेत आहे. नवश्रीमंत, गर्भश्रीमंत असणाऱ्या व्यक्तींचा नंगानाच पाहून आपणही आयफोन घेऊन फिरावे, गरज नसतानाही तशी लाईफस्टाईल मिळवावी, मर्सिडीज घेऊन फिरावे यासाठी वाटले ते इथपर्यंत या तरुणांची तयारी पोहोचते तेव्हा हे ओंगळवाणे प्रदर्शन भस्मासूर बनते. व असमानतेचा मुद्दा भलत्याच कारणांसाठी वेगळेच रूप धारण करते. यामुळे या गुंतागुंतीच्या मुद्यात कुणीही हात घालणारा नाही. सायबर गुन्हेगार हे त्यांचे नव स्वरुप आहे, वाढणारी वेश्याव्यवसाय हे या विषमतेतून श्रीमंतीचे व लाईफस्टाईल आकर्षण हे त्याचेच फळ आहे, ओटीटी चित्रपट पाहून ड्रग्स मध्ये पकडले जाणारे तरूणतरुणी त्यांचे स्वरूप आहे. या वास्तविकतेचा सर्वाधिक झटका नव तरुणाईला होत आहे याकडेही कोणी गांभीर्याने बघायला तयार नाही. आज तरीही आपण ठीक स्थितीत आहोत असे म्हणावे लागेल. मध्य व पूर्व आफ्रिकेतील देशाचे उदाहरण हे या विषमतेचे सर्वात मोठे उदाहरण आहे. रस्त्यावर चालणेही मुश्किल झालेल्या बुर्किना फासो, बरूंडी, सुदान,नायजर, मलावी,सोमालिया देशाचे देता येईल. वास्तविक येथे भयाण शांतता निर्माण झालेली आहे. कधीही काहीही होऊ शकते अशी परिस्थिती तिथे विषमतेने निर्माण झाली. केवळ १ ते २ कुटुंबाकडे संपूर्ण देशाची संपत्ती असलेले हेच ते देश आहेत. कृपया या भस्मासूरातून देश वाचला पाहिजे असे देशाच्या प्रत्येक नागरिकाला वाटले पाहिजे हीच ईश्वर चरणी प्रार्थना....(टीप- वरील विचार लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत त्याचा प्रकाशकाशी काही संबंध नाही).
वर्ध्याचे धरण फुटता-फुटता वाचले, तीच परिस्थिती आम्रडची होणार का? निलेश राणेंचा विधानसभेत सवाल
नागपूर : कुडाळ-मालवण मतदारसंघातील रखडलेले सिंचन प्रकल्प, अधिकाऱ्यांकडून दिली जाणारी खोटी माहिती आणि कामाच्या निकृष्ट दर्जावरून आमदार निलेश राणे यांनी आज विधान सभेत प्रशासनावर जोरदार हल्लाबोल केला. १९९६ साली सुरू झालेला आम्रड धरण प्रकल्प आज २०२५ उजाडले तरी अपूर्णच आहे. या विलंबासाठी जबाबदार कोण? असा संतप्त सवाल करत राणे यांनी पाटबंधारे विभागाच्या कारभाराचे वाभाडे काढले.४ कोटींचा प्रकल्प ३४ कोटींवरआमदार निलेश राणे यांनी विधान सभेत माहिती देताना सांगितले की, १९९६ साली आम्रड धरण प्रकल्पाची मूळ किंमत ४ कोटी ५ लाख रुपये होती. आज २०२५ मध्ये या प्रकल्पाची किंमत तब्बल ३४ कोटींच्या घरात गेली आहे. ३० वर्षे उलटूनही प्रकल्पाचे काम केवळ ८० टक्के पूर्ण झाल्याचा दावा प्रशासन करत आहे, जो पूर्णपणे दिशाभूल करणारा असल्याचे राणे यांनी स्पष्ट केले.अधिकारी दिशाभूल करत आहेतप्रशासनाकडून मिळालेल्या उत्तरावर आक्षेप घेताना निलेश राणे म्हणाले, उत्तरामध्ये भूसंपादन आणि जीएसटीची कारणे दिली आहेत. मुळात भूसंपादन २००५ मध्ये झाले आणि त्याचे ७१ लाख रुपये दिले गेले. मग आता विलंबाचे कारण भूसंपादन कसे असू शकते? तसेच, ३० वर्षांपूर्वी सुरू झालेल्या प्रकल्पाच्या विलंबाला जीएसटीचे कारण देणे हास्यास्पद आहे. मंत्र्यांना अधिकारी खोटी माहिती पुरवत असून, 'चौकशीचा प्रश्नच उद्भवत नाही' हे अधिकाऱ्यांचे उत्तर संतापजनक असल्याचे त्यांनी नमूद केले.वर्ध्याचे धरण फुटता-फुटता वाचले!कुडाळ तालुक्यातील वर्धा धरणाचे उदाहरण देताना राणे यांनी गंभीर इशारा दिला. कुडाळमध्ये ४ पैकी १ काम झाल्याचे सांगितले जाते, पण जे एक काम पूर्ण झाले आहे, ते वर्धा धरण मागच्या वर्षी फुटता-फुटता वाचले आहे. अधिकाऱ्यांनी किंवा ठेकेदाराने वेळीच सावरल्याने चिपळूणसारखी दुर्घटना टळली. मात्र, निकृष्ट कामामुळे लोकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले.मालवणमध्येही तीच स्थितीमालवणमध्ये दोन धरणे पूर्ण झाल्याची माहिती प्रशासनाने दिली होती, ती खोडून काढताना राणे म्हणाले की, माझ्या मतदारसंघात ३ पैकी एकही धरण पूर्ण झालेले नाही. अधिकारी मंत्र्यांना आणि सभागृहाला अशी खोटी उत्तरे देत असतील, तर आम्ही प्रश्न विचारायचे कोणाला? सॉईल टेस्टिंगच्या नावाखाली केवळ वेळकाढूपणा सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.चौकशीची मागणीरखडलेले प्रकल्प आणि वाढलेला खर्च याला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. तसेच, मंत्र्यांना खोटी माहिती देऊन सभागृहाची दिशाभूल करणाऱ्या अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करावी, अशी आग्रही मागणी आमदार निलेश राणे यांनी केली.
Christmas Day Special Cake: ख्रिसमसच्या खास दिवशी ट्राय करा हे पाच स्वादिष्ट केक
Christmas Day Special Cake: ख्रिसमस हा आनंद, प्रेम आणि गोडव्याचा सण मानला जातो. या दिवशी घरात सजावट केली जाते, एकमेकांना भेटवस्तू दिल्या जातात आणि खास पदार्थ तयार केले जातात. ख्रिसमस म्हटलं की केक हा महत्त्वाचा भाग असतो. घरच्या घरी बनवलेला केक केवळ चविष्टच नसतो, तर त्यात प्रेम आणि आपुलकीही मिसळलेली असते. काही जण पारंपरिक फ्रूट […] The post Christmas Day Special Cake: ख्रिसमसच्या खास दिवशी ट्राय करा हे पाच स्वादिष्ट केक appeared first on Dainik Prabhat .
मेस्सी मैदानात आला अन् ‘या’कारणामुळे चाहते संतापले; थेट बाटल्या अन् खुर्च्या फेकत घातला गोंधळ
Lionel Messi Arrives In Kolkata | दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी ‘गोट इंडिया टूर’ अंतर्गत भारतात दाखल झाला आहे. यावेळी तो कोलकाता, मुंबई, हैदराबाद आणि दिल्ली या चार वेगवेगळ्यांना शहरांना भेट देणार आहे. 2022 च्या फिफा वर्ल्ड कप विजेत्या संघाचे कर्णधार मेस्सीचे भारतातील तीन दिवसीय दौरेची सुरुवात कोलकात्यात झाली आहे. यावेळी त्याने आपल्या ७० फूट उंच […] The post मेस्सी मैदानात आला अन् ‘या’ कारणामुळे चाहते संतापले; थेट बाटल्या अन् खुर्च्या फेकत घातला गोंधळ appeared first on Dainik Prabhat .
भारतावरील ५०% टॅरिफचा होणार End? ट्रम्प यांच्या निर्णयाविरोधात तीन खासदारांनी संसदेत मांडला प्रस्ताव
Donald Trump Tariffs | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी १ ऑगस्टपासून भारतीय वस्तूंवर २५% टॅरिफ लावला होता आणि काही दिवसांनी त्यात २५% ची आणखी वाढ केली. भारताने रशियाकडून तेल खरेदी करणे सुरू ठेवल्यामुळे हे टॅरिफ लावण्यात आले. भारताच्या या कृतीमुळे रशियाच्या युक्रेन युद्धाच्या उद्दिष्टांना प्रोत्साहन मिळत असल्याचा ट्रम्प यांनी दावा केला आहे. मात्र ट्रम्प यांनी […] The post भारतावरील ५०% टॅरिफचा होणार End? ट्रम्प यांच्या निर्णयाविरोधात तीन खासदारांनी संसदेत मांडला प्रस्ताव appeared first on Dainik Prabhat .
पुणे ते संभाजीनगर प्रवास अवघ्या २ तासात; नितीन गडकरींची मोठी घोषणा! ‘असा’असणार नवा महामार्ग
नागपूर : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरमध्ये सुरू असून, आजचा अधिवेशनाचा सहावा दिवस आहे. अशातच भाजप नेते केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी पुणे ते संभाजीनगर या दोन शहरांना जोडणारा नवीन महामार्ग बांधला जाणार असल्याची मोठी घोषणा केली आहे. यामुळे या दोन शहरांमध्ये प्रवासाचे अंतर कमी होणार असून, अवघ्या दोन तासांत पुणे […] The post पुणे ते संभाजीनगर प्रवास अवघ्या २ तासात; नितीन गडकरींची मोठी घोषणा! ‘असा’ असणार नवा महामार्ग appeared first on Dainik Prabhat .
दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, १३ डिसेंबर २०२५
पंचांगआज मिती मार्गशीर्ष कृष्ण नवमी शके १९४७. चंद्र नक्षत्र . योग आयुष्यमान चंद्र राशी कन्या.भारतीय सौर २२ मार्गशीर्ष शके १९४७. शुक्रवार दिनांक १३ डिसेंबर २०२४ .मुंबईचा सूर्योदय ०७.०२ , मुंबईचा सूर्यास्त ०६.०२, मुंबईचा चंद्रोदय ०२.०७, उद्याची मुंबईचा चंद्रास्त ०१.२८ राहू काळ ०९.४७ ते ११.०९,पारशी आमर्दादंदैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)मेष : नोकरी व्यवसाय धंदा यामध्ये उत्तम यश मिळेल.वृषभ : आपली कामे इतरांवर सोपवू नका.मिथुन : महत्त्वाचे निर्णय घेणे आपल्या हातात आहे.कर्क : आत्मविश्वास वाढून महत्त्वाकांक्षाही वाढतील.सिंह : नशिबाची साथ लाभणार आहे.कन्या : आपल्या मतांवर ठाम राहा.तूळ : व्यसन व कुसंगतीपासून दूर राहा.वृश्चिक : सरकारी कामात यश मिळेल.धनू : एका वेळेस अनेक विचार करणे टाळा.मकर : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.कुंभ : मनोबल व आत्मविश्वास वृद्धिंगत होईल. मीन : कामांच्या निमित्त्याने प्रवास करावा लागेल.

26 C