भीमा नदीकाठी चोरट्यांचा धुमाकूळ! ७० शेतकऱ्यांवर एकाच वेळी ओढवलं संकट..वाचा काय घडलं?
प्रभात वृत्तसेवा पारगाव – दौंड तालुक्यातील पारगाव भिमा नदी किनारी काल रात्री शेतकऱ्यांच्या तब्बल ७० विद्युत मोटारींच्या केबल चोरट्यांनी चोरून नेल्या. यामुळे शेतकऱ्यांचे लाखों रुपयांचे नुकसान झाले आहे.पारगाव भिमा नदीवरील पुलाच्या पूर्व बाजूच्या एकूण ८४ विद्युत मोटारी असून काल मध्यरात्री ३ च्या सुमारास तब्बल ७० विद्युत मोटारींच्या केबल चोरट्यांनी चोरून नेल्या. या वेळी चोरट्यांनी चार […] The post भीमा नदीकाठी चोरट्यांचा धुमाकूळ! ७० शेतकऱ्यांवर एकाच वेळी ओढवलं संकट..वाचा काय घडलं? appeared first on Dainik Prabhat .
Walhe News: पुणे-पंढरपूर हायवेवर का वाढलेत वन्यप्राण्यांचे अपघात? त्यामागे आहे ‘हे’गंभीर कारण
प्रभात वृत्तसेवा वाल्हे – यावर्षी मान्सूनपूर्व व मान्सून पाऊस समाधानकारक पडला होता. यानंतर, मागील महिन्यांपासून डोंगर परिसरातील नैसर्गिक जलस्त्रोत आटले आहेत. वाल्हे (ता.पुरंदर) परिसरातील कृत्रिम पाणवठे, बोअरवेल व टॅंकरने भरण्यात येत असून,या माध्यमातून वन्यजीवांची तहान भागवली जात आहे. दिवसेंदिवस वाढत्या उष्णतेमुळे अनेक ठिकाणचे नैसर्गिक पाठवठे आटून गेल्यामुळे, वन्यप्राणी पिण्याच्या पाण्याची शोधात मानवी वस्तीमध्ये,मागील काही दिवसांपासून […] The post Walhe News: पुणे-पंढरपूर हायवेवर का वाढलेत वन्यप्राण्यांचे अपघात? त्यामागे आहे ‘हे’ गंभीर कारण appeared first on Dainik Prabhat .
Shaurya Din: गर्दीच्या सोहळ्यात बिबट्याची दहशत? अनुयायांच्या सुरक्षेसाठी वनविभाग हाय अलर्टवर
प्रभात वृत्तसेवा शिक्रापूर – पेरणे फाटा येथे १ जानेवारी रोजी साजरा होणाऱ्या २०८ व्या शौर्यदिनानिमित्त येणाऱ्या अनुयायांना बिबट्यांपासून संरक्षण देण्यासाठी वनविभाग सज्ज झाला आहे. शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा, वढू बुद्रुक आणि सणसवाडी परिसरात बिबट्यांचा वावर असल्याने प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून विशेष पथकांची नियुक्ती केली असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे यांनी सांगितले. उपवनसंरक्षक प्रशांत खाडे, सहाय्यक […] The post Shaurya Din: गर्दीच्या सोहळ्यात बिबट्याची दहशत? अनुयायांच्या सुरक्षेसाठी वनविभाग हाय अलर्टवर appeared first on Dainik Prabhat .
जेजुरीत धक्कादायक प्रकार! कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सापडली चक्क नगराध्यक्षांची खुर्ची
प्रभात वृत्तसेवा जेजुरी – जेजुरी नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष जयदीप बारभाई यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारण्यापूर्वी (खुर्चीत बसण्यापूर्वी) शहराच्या कचरा डेपोला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांचे समवेत नगरसेवक योगेश जगताप होते. येथील कचरा डेपोची अवस्था आणि धोकादायक पद्धतीने अतिउच्चदाबाच्या वाहिनीखालीओल्या व सुक्या कचऱ्याचा झालेला डोंगर त्यातून सुटलेली दुर्गंधी अशी अवस्था पाहून बारभाई यांनी नगरपरिषदेचे स्वच्छता […] The post जेजुरीत धक्कादायक प्रकार! कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सापडली चक्क नगराध्यक्षांची खुर्ची appeared first on Dainik Prabhat .
Shaurya Din: २०८ व्या वर्षासाठी प्रशासनाची ऐतिहासिक तयारी; वाचा काय आहेत खास सोयी-सुविधा
प्रभात वृत्तसेवा लोणीकंद – पेरणे फाटा येथे 1 जानेवारी 2026 रोजी आयोजित करण्यात आलेला 208 वा विजयस्तंभ अभिवादन सोहळा शांतता, सुव्यवस्था आणि उत्साहात पार पडावा यासाठी प्रशासनाने सर्वांगीण तयारी केली असून आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.सोहळ्याच्या नियोजनासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले. जिल्हाधिकारी डुडी म्हणाले की, […] The post Shaurya Din: २०८ व्या वर्षासाठी प्रशासनाची ऐतिहासिक तयारी; वाचा काय आहेत खास सोयी-सुविधा appeared first on Dainik Prabhat .
प्रभात वृत्तसेवा शिक्रापूर – पेरणे फाटा येथे १ जानेवारी रोजी होणाऱ्या शौर्यदिन मानवंदना कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली असून सुरक्षेसाठी अत्याधुनिक वरुण वज्र वाहन परिसरात दाखल झाले आहे. सन २०१८ च्या घटनेनंतर दरवर्षी पोलीस प्रशासनाकडून चोख नियोजन केले जात असून, यंदाही शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे ग्रामीण आणि शहर पोलिसांच्या वतीने मोठा फौजफाटा तैनात […] The post Shourya Din 2026: शौर्यदिनासाठी ‘वरुण वज्र’ सज्ज; कोरेगाव भीमा परिसरात १० हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त appeared first on Dainik Prabhat .
PCMC Election: लाखो खर्चले, पण हाती भोपळा; ‘तयारी करा’सांगणाऱ्या नेत्यांनी ऐनवेळी फोन केले बंद
प्रभात वृत्तसेवा पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सार्व.ित्रक निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस शहराच्या आजवरच्या राजकीय इतिहासातील सर्वाधिक गोंधळाचा ठरला. गेल्या सात -आठ वर्षांपासून प्रभागात काम करत असलेल्या आणि आजवर निवडणूक लढवायची म्हणून प्रचंड खर्च करणाऱ्या प्रस्थापितांना देखील पक्षांनी जोर का झटका दिला. अखेरच्या दिवसापर्यंत झुलवत ठेवले आणि अखेर एबी फाॅर्म दुसऱ्याच कुणाला तरी दिल्याने आपल्याला […] The post PCMC Election: लाखो खर्चले, पण हाती भोपळा; ‘तयारी करा’ सांगणाऱ्या नेत्यांनी ऐनवेळी फोन केले बंद appeared first on Dainik Prabhat .
Share Market Scam: गुंतवणुकीच्या नावाखाली ६१ लाखांची फसवणूक
प्रभात वृत्तसेवा पिंपरी – शेअरमार्केटमध्ये जास्त नफा मिळवून देतो म्हणून प्रलोभन दाखवून एका नागरिकाची तब्बल ६१ लाख ९ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. ही घटना ३ जून ते २ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने एम्पायर स्क्वेअर येथे घडली.याप्रकरणी प्युअर प्राॅफिट शेअर मार्केट कंपनीचे संचालक, ज्योती (मोबाइल ७०३९५१२२६१), पूजा (मोबाइल ८१०८४०५१२६), निकेत (मोबाइल ८१०८४०७९१८), […] The post Share Market Scam: गुंतवणुकीच्या नावाखाली ६१ लाखांची फसवणूक appeared first on Dainik Prabhat .
107 वर्षांनंतर घडणार! 2026 मध्ये तिहेरी गुरुवारी योग; जाणून घ्या काय आहे खास
प्रभात वृत्तसेवा पिंपरी – २०२६ हे वर्ष पिंपरी-चिंचवडसह संपूर्ण देशासाठी आगळेवेगळे ठरणार असल्याचा अंदाज ज्योतिष क्षेत्रात व्यक्त केला जात आहे. आगामी वर्षाची सुरुवात, वर्षाचा समारोप आणि हिंदू नवीन वर्षाची सुरूवात म्हणजेच गुढीपाडवा, हे तीनही महत्त्वाचे टप्पे गुरुवारीच येत असल्याने हा तिहेरी योग अत्यंत दुर्मिळ व विशेष मानला जात आहे. एक जानेवारी २०२६ रोजी वर्षारंभ गुरुवारी […] The post 107 वर्षांनंतर घडणार! 2026 मध्ये तिहेरी गुरुवारी योग; जाणून घ्या काय आहे खास appeared first on Dainik Prabhat .
पुणे-लोणावळा लोकलला ४७ वर्षे! तरीही तिसरी-चौथी मार्गिका कागदावरच; प्रवाशांचे हाल
प्रभात वृत्तसेवा वडगाव मावळ – पुणे आणि लोणावळा या दोन शहरांना जोडणाऱ्या उपनगरीय रेल्वे सेवेला तब्बल ४७ वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, या मार्गावरील वाढता ताण कमी करण्यासाठी अत्यंत आवश्यक असलेल्या तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचा विस्तार अद्यापही कागदी घोडे नाचवण्यातच अडकला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या नव्या मार्गिकांची मागणी प्रवासी संघटनांकडून केली जात आहे, परंतु […] The post पुणे-लोणावळा लोकलला ४७ वर्षे! तरीही तिसरी-चौथी मार्गिका कागदावरच; प्रवाशांचे हाल appeared first on Dainik Prabhat .
Mandhardevi Yatra: मांढरदेव येथे भेसळयुक्त मिठाईचा सुळसुळाट; भाविकांकडून कठोर कारवाईची मागणी
प्रभात वृत्तसेवा मांढरदेव – महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या मांढरदेव, ता. वाई येथे पौष महिन्यात सुरू असलेल्या यात्रेमध्ये काही व्यावसायिक भेसळयुक्त मलई, कलाकंद, बर्फी आदी खाद्यपदार्थांची चोरटी विक्री करत आहेत. संबंधित व्यापार्यांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थ आणि भाविकांनी केली आहे. पौष महिन्यात काळूबाईदेवीची यात्रा सुरू असून, मांढरदेव येथे दर्शनासाठी रोज हजारो भाविक येत आहेत. हे भाविक […] The post Mandhardevi Yatra: मांढरदेव येथे भेसळयुक्त मिठाईचा सुळसुळाट; भाविकांकडून कठोर कारवाईची मागणी appeared first on Dainik Prabhat .
धनंजय बोडकेगल्ली ते दिल्लीपर्यंत सर्वाधिक प्रस्थ असलेला पक्ष म्हणून भारतीय जनता पक्ष आहे. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीमध्येदेखील इथे भाजपने राज्यात चांगलीच मुसंडी मारली. त्याला अपवाद नाशिक जिल्हा ठरला असून शिंदेसेनेने आघाडी घेतली आहे. महानगरपालिकेमध्येदेखील एकहाती सत्ता अर्थात १०० प्लसचा नारा भाजपने दिला.उमेदवारी एबी फॉर्म मिळवण्यासाठी शेवटच्या दिवशी भाजप, सेना, काँग्रेसमधील घमासान राज्यभर गाजले. त्यामुळे भाजपासह शिंदे सेना, अजितपवार यांची राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीत पुढील १५ दिवस आरोप प्रत्यारोपाचा धुराळा उडणार आहे. राज्यात कोणाशीही युती न करता भाजपने १४ महानगरपालिकेच्या निवडणुकी स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला. त्यात नाशिक महानगरपालिकेचाही समावेश आहे. भाजपची उमेदवारी मिळेल म्हणून सुमारे १०७७ इच्छुकांनी मुलाखती दिल्या होत्या. त्यामुळे कोणाला उमेदवारी मिळेल याची उत्सुकता असताना १२२ जागांमध्ये चांगल्या व अनुभवी लोकांना उमेदवारी मिळेल असे बोलले जात होते; परंतु कार्यकर्त्यांना डावलून नव्यानेच भाजपमध्ये दाखल झालेल्या ३३ आयारामांना तिकीट दिले आहे. तर दुसरीकडे सुमारे २२ माजी नगरसेवकांना तिकीट नाकारले आहे. त्यामुळे नाशिक शहरात तिकीट वाटपावरून हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला, तर दुसरीकडे शिवसेना शिंदे आणि अजित पवार राष्ट्रवादी यांनी एकत्र येऊन युती करत १३५ ठिकाणी उमेदवार उभे केले. तर तिसरीकडे महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उबाठा ८२, मनसे ३४, काँग्रेस २२ आणि राष्ट्रवादी शरद पवार गट ३१ जागांवर निवडणूक लढविणार आहे.खरे म्हणजे आमदार-खासदारांच्या आप्तस्वकीयांना तिकिटे आणि घराणेशाहीला थारा नको म्हणणाऱ्या भाजपचे नाशिकमध्ये भलतेच धोरण समोर आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. महापालिका निवडणुकीसाठी १२२ जागा असताना इच्छुकांची संख्या हजारावर पोहोचल्याचा दावा करणाऱ्या या पक्षाने अनेक निष्ठावंतांना ‘कात्रजचा घाट’ दाखवताना दुसरीकडे मात्र तीन परिवारांसाठी नियमोल्लंघन करीत प्रत्येकी दोन उमेदवार देण्याचे दातृत्व दाखवले. विशेष म्हणजे, स्थानिक आमदारांना थेट विरोध केलेल्यांना टाकलेले हे ‘रेड कार्पेट’ निष्ठावंतांना बुचकळ्यात टाकणारे आहे. नाशिक महापालिकेची सत्ता कोणत्याही परिस्थितीत राखण्याच्या इराद्याने मैदानात उतरलेल्या भाजपने विविध प्रकारची रणनीती अवलंबली. पक्षात आता हाउसफुल’चा बोर्ड लावण्याची वेळ आलीय म्हणणारे मंत्री गिरीश महाजन यांना मात्र उमेदवारी बहाल करताना निर्माण झालेला असमतोल ध्यानी आला नाही. सतीश सोनवणे, शशी जाधव, वर्षा भालेराव, प्रशांत जाधव या निष्ठावंत मंडळीसह इतर पक्षातून येताना ‘शब्द’ दिलेल्या अनेकांना उमेदवारी यादीतून डावलण्यात आले. मात्र, शहरातील तीन परिवारांतील प्रत्येकी दोघांना उमेदवारी देवून पक्षाने अनेकांची ‘उमेद’ घालवली. काही प्रभागातील प्राबल्य पाहून भाजपने काहींना काही महिने आधी तर काहीना ऐनवेळी समाविष्ट करून घेत उमेदवारी देण्याचे सोपस्कार पार पडले. महापालिका निवडणुका तब्बल आठ वर्षांनी होत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. निवडणुका जाहीर होण्याच्या आधीपासून भाजप प्रवेशाची भरती आली. ती निवडणुका जाहीर झाल्यांनतरही कायम राहिल्याने पक्षातील निष्ठावानांवर अन्याय झाल्याचे चित्र आहे. गेल्या आठवड्यात विनायक पांडे आणि शाहू खैरे यांचा प्रवेश निष्ठावानांच्या विरोधामुळे पोलीस बंदोबस्तात झाल्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशीही एबी फॉर्म मिळावा यासाठी प्रचंड राडा झाला. शेवटच्या दिवशी इच्छुकांनी एबी फॉर्म मिळावा यासाठी चांगलीच धावपळ केल्याचे चित्र आहे. मात्र, आयारामांना संधी आणि निष्ठावानांची कोंडी झाल्याचे चित्र असल्याने भाजपचे पदाधिकारी चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. उमेदवारी न मिळाल्याने असंतोष निर्माण झाल्याने बंडखोरी अधिक होण्याची शक्यता आहे.अंतर्गत शह-काटशहाचे राजकारण रंगणार असून, त्याचा फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आमदार राहुल ढिकले आणि आमदार सीमा हिरे यासुद्धा या ताफ्यामध्ये होत्या. यानंतर भाजपकडून पोलिसांच्या कडेकोट पोलीस बंदोबस्तात एबी फॉर्मचे वाटप करण्यात आले. माजी नगरसेविका अलका अहिरे यांचे पती कैलास अहिरे यांनी एबी फॉर्म न मिळाल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी आमदार सीमा हिरे यांच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध नोंदवला. तसेच उमेदवारी न मिळालेल्या इतर इच्छुकांनीही नाराजी व्यक्त केली. अनेक वर्षे पक्षासाठी काम करूनही आपल्याला डावलण्यात आल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघा एक तास शिल्लक असताना काही मोजक्याच इच्छुकांना ऐनवेळी एबी फॉर्म देण्यात आल्याने भाजपच्या अंतर्गत नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी देखील तिकीट वाटप सुरू असलेल्या ठिकाणी भेट दिली. भाजपने निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलल्याने कार्यकर्त्यांची नाराजी उफाळून आली होती. तसेच, कारागृहात असलेल्या भाजपाचे माजी नगरसेवक उद्धव निमसे यांचे पुत्र रिद्धीश निमसे यांना भाजपकडून महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भाजप नेते सुधाकर बडगुजर यांनीदेखील अगदी शेवटच्या क्षणी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. नाशिकमध्ये भाजपविरोधात शिवसेना आणि राष्ट्रवादीने शड्डू ठोकलाय. आता नाशिक महापालिका निवडणुकीत सर्व पक्ष किती जागांवर निवडणूक लढवणार याचे चित्र स्पष्ट झाले आहे. भाजपला आता १०० प्लस साठी पक्षांतर्गत नाराजी प्रथम दूर करावी लागणार आहे, तर विकासाची मुद्दे घराघरात पोहोचवावी लागणार आहे. शिंदे सेनेलाही चांगली झुंज द्यावी लागेल, तर महाविकास आघाडीचीही मोठी परीक्षा आहे.
प्राची परचुरे - वैद्य, आत्मज्ञानमाणसाने माणसाशी माणसासम वागणे ही प्रार्थना आपण ऐकली असेलच. ते गाणं पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते. कितीही वेळा ऐकले तरी मन आणि कान तृप्त होतच नाहीत. ते गाणं सध्याच्या वास्तव परिस्थितीवर असावं असं वाटतं. “खरंच किती गहन अर्थ आहे त्यात ! पण खरंच आपल्या आजूबाजूची परिस्थिती तशी आहे? मी, माझे, माझी नोकरी, माझे कुटुंब, सगळे काही मी आणि माझे या भोवतीच माणूस सतत गुरफटलेला दिसतो. कधीतरी आपण कोणाला काही कारणास्तव मदतीचा हात पुढे करावा असे वाटणारी लोकं समाजात फारच कमी आणि इतरांच्या टाळूवरचे लोणी खाणारे जास्त असा प्रकार आपल्याला दिसून येतो. कधीतरी स्वतः पलीकडेही जग असते त्याचाही विचार करा. तुमचे कर्म व तुमचा दृष्टिकोन एवढंच महत्त्वाचं आहे. जग तुम्हाला कोणत्या नजरेने बघतं काही फरक पडत नाही.कधी ही कोणाची मदत करताना स्वार्थ न ठेवता कोणाच्या नकळत मदत करा. निःस्वार्थ मदत माणुसकीच्या भावनेतून केली जाते. जगात अशी खूप कमी माणसे आहेत जे दुसऱ्याला मदत करतात; परंतु गरजवंताला मदत केल्याने जे आत्मिक समाधान मिळते त्या अनुभवाचे वर्णन शब्दांत नाही करता येत आणि तो अनुभव प्रत्येकाने स्वतः घ्यावा. दुसऱ्याची मजा पाहणे किंवा त्याला दुःखात पाहणे हे खूपच सोपे आहे पण एखाद्याला कधीतरी मदत करून तर पाहा. रोजच्यापेक्षा शांत आणि तृप्त मन होऊन जाईल. इतरांचे दुःख आपले माना, संवेदनशील राहा, त्यानंतर मदत करा आणि स्वतःचीच मदत केली असं समजा आणि तेही खरेच आहे दुसऱ्याची मदत करून तुम्हाला पुण्याचं मिळणार आहे, ज्याला तुम्ही मदत करताय त्याचा आशीर्वाद घेऊनच तुम्ही पुढे जाणार आहात. फक्त इतरांनी आपल्यावर केलेल्या उपकारांची जाण ठेवा व शक्य झाल्यास परतफेड करण्याचा प्रयत्न करा; परंतु आपण केलेली मदत लक्षात न ठेवता विसरून जा.समाजात काही चांगली माणसंही आहेत त्यामुळेच तर समाज टिकून आहे. जर कोणी तुमच्याशी चांगलं वागत असेल तर तो त्याचा स्वभाव आहे, स्वार्थ नाही. बहुधा, कोणत्याच अपेक्षेशिवाय ही फक्त आपली मदत करण्याचाच हेतू असू शकतो इतर काही नाही हे विसरू नका. उदा. अशा अनेक समाजसेवी संस्था आहेत आणि त्यात काम करणारे स्वयंसेवी कार्यकर्ते स्वतःचे व्यवसाय, कामधंदे सांभाळून जसा वेळ मिळेल तसा या समाजसेवी संस्थेत नि:स्वार्थ मदत करत असतात.उगाचच कोणाबद्दल गैरसमज मनात बाळगू नये आणि एखाद्याविषयी मनात गैरसमज निर्माण झाला असेल, तर तो त्या व्यक्तीशी बोलून मोकळे व्हावे. एखाद्या व्यक्तीचे विचार पटत नसतील तर त्याच्याशी बोलू नका कारण शब्दाने शब्द वाढतो आणि हाती काहीच लागत नाही. तुमच्या काही बोलण्यापेक्षा तुमचं न बोलणं समोरच्याला जास्त त्रास देऊन जातं. शब्दांपेक्षा आपली वर्तणूक समोरच्याला खूप काही सांगते. त्यामुळे, आपल्या विचारांना गती द्या व एकाच चुकीच्या दृष्टीने विचार न करता इतर चांगल्या गोष्टींकडे लक्ष द्या जेणेकरून आपला सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल.
सद्गुरू वामनराव पै, जीवन संगीतसध्या समाजामध्ये अनेक गैरसमज मोठ्या प्रमाणात पसरलेले आहेत. आपल्या हातात काही नाही, सगळे नियतीच्या हातात आहे, हा त्यातलाच एक. असे बोलणाऱ्यांची, किंबहुना हेच सत्य आहे अशी खात्री बाळगून जीवन जगणाऱ्यांची संख्या आज आपल्या समाजात खूप मोठी आहे. असे बोलले जाते तेव्हा याचा अर्थ हाच की त्या सर्व लोकांचा असा समज झालेला आहे की भाग्यविधाता कोणीतरी आहे, नियती कोणीतरी आहे. ती कुठेतरी दूर आहे. आपल्या कक्षेच्या बाहेर आहे. ती अदृश्य शक्ती आपल्या जीवनाची सूत्रे खेळते, हलवते, नांदवते आणि यामुळेच असा गैरसमज होतो आहे की प्रत्यक्षात मनुष्याच्या हाती काहीच नाही. मात्र सर्व जे काही आहे ते उपरवाल्याच्या हातात. सर्व काही आहे ते नशिबाच्या हातात आणि मुळात नशीब फुटके. किती प्रयत्न केले तरी फुकट ! आणि यावर अशा लोकांना तुम्ही प्रयत्न केले ते काय केले? असे विचारले तर त्याने केलेले सर्व प्रयत्न चुकीचे असतात. देवाचे एवढे केले, प्रयत्न एवढे केले, शेवटी आमच्या वाटेला नैराश्य आले, आपत्ती आली., असे म्हणतात. मात्र सत्य हे आहे की तुम्ही नशीब फुटके, नशीब फुटके म्हणता म्हणूनच तुमचे नशीब तसे. कारण तुमचे बोलणे Negative, नकारार्थी. कारण शंकर म्हणतो तथास्तु ! हे तथास्तु कोण म्हणतो ? उपरवाला नाही तर अंदरवाला म्हणतो.ईश्वरस्य सर्वभूतनां हृदयशेर्जुन तिष्ठति हा भगवद्गीतेने लावलेला सर्वात मोठा शोध आहे. एवढा मोठा शोध जगांत आतापर्यंत कुणी लावलेला नाही. आज केवळ हिंदू म्हणतात, भगवद्गीता आमची आहे. मात्र ही सर्वांची आहे. म्हणजेच भगवद्गीता ही सर्व धर्मियांसाठी तितकीच उपयुक्त व आवश्यक आहे. संत हे सर्व धर्माचे असतात. त्यांनी कुठेही हा माझ्या धर्माचा, तो त्या धर्माचा असे केलेले नाही. त्यांच्याकडे भेदाभेद नव्हता. भेदाभेद केला तो त्यांच्या अनुयायांनी केला. भगवंत किंवा संत हे अमक्या जातीचे किंवा अमक्या धर्माचे नसतात. अमूक जातीत जन्माला आला म्हणून तो त्या जातीचा, अमूक धर्मात जन्माला आला म्हणून तो त्या धर्माचा ह्या सर्व गोष्टी चुकीच्या आहेत. माणूस जन्माला येतो तेव्हा तो कुठल्याही जातीचा, धर्माचा नसतो. जन्माला येतो तेव्हा काहीच नसते. मग त्यावर स्टॅम्प मारले जातात. पोस्टात स्टॅम्प मारला जातो तो स्टॅम्प दुसऱ्याने वापरू नये म्हणून दुसरा स्टॅम्प मारतात. जन्माला आलेल्या मुलावर एक छापा मारतो तो अमूक धर्माचा. दुसरा छापा मारतो तो अमूक जातीचा. तिसरा छापा पंथाचा, चौथा छापा कुळाचा, गोत्राचा. असे वारंवार भरपूर स्टॅम्प्स मारल्यावर काय होईल? मुळात जो आहे तो पत्ताच दिसणार नाही व ते पाकीट कचऱ्याच्या पेटीत टाकले जाईल. हे असेच होऊन तसे स्टॅम्प्स माणसावर सतत मारले गेल्यामुळे मानवजात कचऱ्याच्या पेटीकडे सरकत आहे. कचऱ्याच्या पेटीत सगळी घाण असते तशी जगांत सर्व घाण झाली आहे. त्यातून दुजाभाव निर्माण झाला, द्वेषमत्सर निर्माण झाले, त्यातून दंगेधोपे, युद्धलढाया हे स्टॅम्प मारल्यामुळे झाले. हे स्टॅम्प जर मारले नाही तर सर्व जग सुखी होईल. सर्वांवर एकच स्टॅम्प मारायचा, तो म्हणजे माणूस. बाकी काही नाही. हे करायला सर्वांनी सुरुवात केली की सर्व मानवजात सुखी होते कीनाही ते पाहा.
२०२५ गोंदणखुणांतून २०२६च्या नव्या पहाटेकडे
ऋतुजा केळकर, ऋतुराज‘ऋतुभारणीच्या गोंदणावर...नव्या वर्षाचा झुलता गुलमोहर...नव्या मोगरी गंधाचा पाझर...देह पुष्करणीत फुलवत गेला ...’नव्या वर्षाच्या गार हवेचा झोंबता गारवा श्वासात भरून घेताना, कुठेतरी मागे वळून पाहताना माझी लेखणी थबकली. भूतकाळाच्या धुळवाटांवरून चालत आलेल्या आठवणींनी पुन्हा एकदा मनात ठसा उमटवला. २०२५ हे वर्ष संपत असताना, त्याच्या सुख-दु:खाच्या, आशा-निराशेच्या, विजय-पराजयाच्या गोंदणखुणा मनावर कोरल्या गेल्या आहेत. आता २०२६ च्या नव्या पहाटेचे स्वागत करताना, मागे वळून पाहणे अपरिहार्य ठरते.आठवली ती त्रिवेणी संगमाच्या गाभाऱ्यात उगवलेली ती पहाट, गंगेच्या लाटांवरून वाहणारा मंत्रोच्चारांचा निनाद आणि साधू-संतांच्या कंठातून उमटणारा ओंकार जणू काळाच्या मण्याना थांबवून ठेवणारा एक क्षण. महाकुंभाच्या स्नानात लाखो जीव आत्मशुद्धीचा अनुभव घेत होते. या अशा अक्षयवटाच्या सावलीत उभं राहिलं की जाणवतं की जन्म-मृत्यूच्या पलीकडेही एक अखंड प्रवाह आहे, जो आपल्याला निसर्गाच्या कुशीत पुन्हा पुन्हा सामावून घेतो. मग आठवलं रामलल्लाच्या पुनर्स्थापनेनंतर अयोध्येच्या गाभाऱ्यात जणू भक्तिभावाचा एक नवा सूर्य उगवला आणि त्या तेजात त्या तेजात भूतकाळाच्या धुळवाटा विरघळून गेल्या आणि भविष्याच्या कलामंडपी एक नवा दीप प्रज्ज्वलित झाला. “कुंभाच्या गर्दीत, साधूंच्या अखाड्यांत उमटलेले आंतरराष्ट्रीय भाविकांच्या ओठांवर मंत्र” आपल्या भरतभुची विश्वगुरू ओळख पुन्हा अधोरेखित करत होते. जणू प्रत्येक श्वासात अध्यात्माचा गंध होता. प्रत्येक पावलात मोक्षाची चाहूल आणि प्रत्येक डोळ्यात एकअदृश्य प्रकाश.काळाच्या गाभाऱ्यातून उमटणाऱ्या अध्यात्मिक निनादानंतर भारताने विज्ञानाच्या आकाशातही नवे दीप प्रज्वलित केले. इस्रोच्या स्पेस डॉकिंग प्रयोगाने जणू दोन युगांचे संगम घडवले जसे त्रिवेणी संगमात नद्या एकत्र येतात, तसेच अंतराळात दोन यानांच्या मीलनाने भविष्याची चाहूल दिली. कुंभाच्या गर्दीत जशी श्रद्धेची लाट उसळते, तशीच क्रिकेटच्या मैदानावर देखील क्रिकेट प्रेमिंकरिता विजयाची लाट उसळली. आपल्या पुरुष आणि महिला संघांनी जागतिक विजेतेपद मिळवून भारताच्या ओठांवर आनंदाचे गीत चढवले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे दिव्यांग महिला खेळाडूंनी Blind T20 World Cup जिंकून जगाला दाखवले की “मर्यादा ही केवळ देहाची असते, मनाच्या अथांगतेला कुठलीही सीमा नसते. नंतर मात्र सैन्याच्या शौर्यकथेत ऑपरेशन सिंदूर जणू रक्तवर्णी सूर्यकिरणासारखे झळकले. भारताच्या सुरक्षेची भिंत अधिक भक्कम झाली आणि जगभरात भारताचा प्रभाव अधिक स्पष्ट झाला. या सर्व घटनांनी २०२५ हे वर्ष फक्त आठवणींच्या गोंदणावर कोरले गेले नाही, तर अभिमानाच्या सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले.या सर्व तेजोमय घटनांच्या दरम्यान, जणू एका शुभ्र रांगोळीवर काळा ठिपका उमटावा, तसा पेहलगावचा संहार २०२५ च्या आठवणीत कोरला गेला. काश्मीरच्या निसर्गरम्य दऱ्यांत, जिथे देवदारांच्या सावलीत शांतता नांदते, तिथेच दहशतवाद्यांच्या गोळ्यांनी निरपराध जीवांचा श्वास थांबवला. २६ नागरिकांचा बळी, असंख्य जखमी आणि त्या रक्तरंजित क्षणांनी मानवतेच्या चेहऱ्यावर गालबोट उमटवले. जगाला दाखवून दिले की, अध्यात्मिक तेज आणि वैज्ञानिक प्रगतीच्या सोबतच दहशतवादाचा अंधार अजूनही आपल्या सभोवती घुटमळतो आहे. पण या अंधारातही एक सत्य स्पष्ट झाले भारताची जिद्द, भारताची एकता आणि मानवतेच्या रक्षणासाठीची त्याची अखंड लढाई जगाच्या छातीत धडकी भरवून गेली.संगीत-साहित्य-चित्रपट या क्षेत्रांना २०२५ ने दिलेला धक्का अजूनही मनाला चटका लावतो. याच काळात जणू अचानक भैरवीचा स्वर लागावा तसं काहीस झालं, जीवनाच्या संगीताचा स्वरच जणू थांबला “आसामचा हृदयस्पर्शी आवाज जुबीन गर्ग” स्कूबा डायव्हिंगच्या अपघातात काळाच्या पडद्याआड गेला. त्याच्या या अलीसारख्या गाण्यांनी लाखो हृदयांना स्पर्श केला होता. त्यातच पंजाबी सुरांचा उत्साह हरपला, राजवीर जवांदा यांच्या जाण्याने तरुणाईच्या ओठांवरचा आनंदाचा झरा थांबला. त्यांच्या कली जवांदे दीसारख्या गाण्यांनी पंजाबी संगीताला नवा उत्साह दिला होता. त्यातच धर्मेंद्र, मनोज कुमार, असरानी, सतीश शाह यांसारख्या कलाकारांनी काळाच्या पडद्याआड जाऊन आपली रंगमंचावर घेतलेली एझिट ही आपल्याला आठवणींच्या गोंदणावर खोल खोल गोंदणेच कोरून गेली. धर्मेंद्र He-Man of Bollywood, ज्यांच्या देखण्या व्यक्तिमत्त्वाने तरुणींच्या हृदद्याची धडकन होते ज्यांना आंतरराष्ट्रीय मासिकांनी त्यांना World’s Most Handsome Man म्हटले, आणि भारतीय सिनेमाला एक वेगळा दर्जा तर दिलाच पण सर्वाच्या समोर आपल्या ड्रीम गर्ल हेमामालिनी यांचे ही हृद्य चोरले.त्यांच्या अभिनयात ताकद होती, पण त्याचबरोबर एक कोमल भावही होता जो शोलेच्या वीरूपासून चुपके चुपकेच्या विनोदी भूमिकेत दिसून आला, तोच वीरू आपल्या खास अंदाजात म्हणायचा, बसंती भी राजी और मौसी भी राजी, इसी लिये मरना कॅन्सल... असं जणू हसत-हसवत मृत्यूला सामोरे गेले. त्या आधी मनोज कुमार नव्हे नव्हे भारत कुमार, ज्यांनी देशभक्तीला सिनेमाच्या पडद्यावर अमरत्व दिले. उपकार, पूरब और पश्चिम, रोटी कपडा और मकान या चित्रपटांतून त्यांनी भारताच्या भावनांना पडद्यावर मूर्त रूप दिलं. भारताच्या संस्कृतीला मोठ्या पडद्यावर राष्ट्रभक्तीचा गंध दिला आणि भारताच्या जनमानसाला देशभक्तीची ज्योत प्रज्वलित केली असरानी आणि सतीश शाह या विनोद्विरांबद्दल तर काय सांगावे? ज्यांनी आपल्या अभिनयातून हसवले, रडवले आणि विचार करायला लावले.ये जो है जिंदगीसारख्या मालिकेतून सतीश शाह यांनी घराघरात आनंदाचा झरा वाहवला. असरानींच्या जेलर भूमिकेने शोलेला एक वेगळा रंग दिला. घर सोडून जाता जाता लाडक्या लेकीने जणू जाता जाता तिच्या आवडीच्या गोष्टी न्याव्यात अगदी तशाच सरत्या वर्षाने संगीत आणि चित्रपट या क्षेत्रांना दिलेला हा मोठा झटका होता. काय बर वाटलं असेल या जात्या आत्म्यांना मग सहज शब्द सुचले...‘वक्त की धूप में ...तपता हुआ सहेरा....जिंदगी केहेलाता है ...और ....फिसलती पलों की रेत में ....मेरा आनाजाना .... होता है....’कारण त्यांनी आपल्या कलाकृतींनी जीवनाला रंग दिला आणि त्यांच्या जाण्याने त्या रंगांची एक छटा हरपली. काळच तो, घट्ट मुठीतील वाळूसारखा हळूहळू मूठ रिकामी करणारच,आणि पाठी ठेऊन जाणार त्या फक्त आठवणीच्या गोंदण खुणा... “२०२५ च्या आठवणींनी मनाला गोंदण दिलं, आता २०२६ च्या नव्या पहाटेचे स्वागत करताना मनात एकच भावना आशेचा गुलमोहर, श्रद्धेचा दीप, आणि जीवनाच्या प्रत्येक श्वासात उमलणारा नवा गंध.
२०२६ मध्ये भारत जगातील चौथी अर्थव्यवस्था झाला आहे आणि त्याने जपानलाही मागे टाकले आहे. विशेष म्हणजे, भारताने हे यश टॅरिफच्या सावटात मिळवले. २०२६ च्या पहिल्या सहामाहीत आंतरराष्ट्रीय मुद्रा कोषाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, भारताचे सकल राष्ट्रीय उत्पादन ४.१८ ट्रिलियन डॉलर इतके झाले आहे.भारताने महागाई नियंत्रणात ठेवली आहे आणि बेरोजगारी कमी होत आहे. मोदी यांनी केलेल्या उपाययोजनांमुळे निर्यातीत सुधारणा झाली आणि भारताचा आयात-निर्यात समतोल सुधारला. भारत आता जगातील सर्वात जास्त वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांमध्ये सामील झाला. अगदी काही वर्षांपूर्वी भारत हा जगातील सर्वात मागास देशांपैकी एक होता आणि येथील जीडीपी साडेतीन टक्क्यांच्या वर कधी जात नव्हता. हा काळ तो होता जो देश डावे आणि मध्यममार्ग यांच्या कचाट्यात सापडला होता आणि इंदिरा गांधी यांच्या काळात तर सरकार डाव्यांच्या मगरमुठीत होते. पण ज्यावेळी मोदी सत्तेवर आले आणि तेव्हापासून भारताच्या अर्थव्यवस्थेने कात टाकण्यास सुरुवात केली आणि आज भारत जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला आहे. मुडीजच्या अनुसार भारत २०२६ मध्ये ६.४ आणि २०२७ मध्ये ६.५ च्या गतीने वाढू शकेल, तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारताची गती २०२६ मध्ये ६.२ टक्के इतकी असेल असा अंदाज लावला आहे. अर्थात भारताची प्रगती सर्वत्र दिसते आणि रस्ते, सुविधा, लोकांचे जीवनमान कसे सुसह्य होईल हे मोदी सरकारने पाहिले. एकेकाळी जो देश हत्ती आणि सापांचा देश म्हणून ओळखला जात होता, त्या देशाने इतकी मोठी झेप घेणे ही निश्चितच कौतुकाची बाब आहे. याचे श्रेय निःसंशय मोदी यांना आहेच. पण भारताची जनता आणि येथील नागरिकांनाही आहे. काँग्रेसला हे मान्य नाही आणि त्यामुळे रशिद अल्वी यांनी ही बातमीच संपूर्ण चुकीची आणि निराधार आहे असे म्हटले आहे. काँग्रेसच्या काळात भारताने कधीही जीडीपी टक्क्यांच्या वर गेला नव्हता. आज तो ८ टक्क्यांच्या वर आहे आणि हे काँग्रेसला कसे पाहावणार. एवढ्यावरच भारताची प्रगती थांबणार नाही.२०३० पर्यंत भारत आता जर्मनीला मागे टाकण्याचा अंदाज आहे. ही भारतासाठी सर्वात मोठी उपलब्धी आहे. अर्थात या आकडेवारीवरून भारतातील लोक सुखी आहेत की नाहीत याचा अंदाज येऊ शकत नाही, पण आकडेवारी ही एक प्रकारे मानदंड असते आणि त्यावरून असा निष्कर्ष काढता येतो, की लोक सुखी असू शकतात. २०३० पर्यंत भारताचा जीडीपी म्हणजे सकल देशांतर्गत उत्पादनाचा आकडा ७.३ ट्रिलियन डॉलरपर्यंत जाईल. आकडेवारी नीरस वाटू शकेल. पण भारताची प्रगती तर डोळ्यांना दिसते आहे आणि आज लोक सुखी जीवनमान जगत आहेत आणि त्यांच्याबरोबर महागाई नियंत्रणात आहे आणि बेरोजगारी कमी झाली आहे. अगदी पूर्वी म्हणजे १९५० ते १९८० च्या काळात भारताचा प्रगतीचा वेग मंद होता आणि तो एक टक्क्यांपेक्षा कमी होता. नंतरच्या दशकात गरिबी घटली आणि विकासदराने लक्षणीय झेप घेतली. काँग्रेस सरकारप्रमाणे गरिबी हटाव अशा घोषणा न देताही मोदी सरकारने गरिबी घटवली आणि रोजगारी वाढवली. तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिले आणि तरीही चीनच्या तुलनेत भारताची कामगिरी कमीच राहिली, पण आता भारत जपानला मागे टाकून चौथ्या क्रमाकांची अर्थव्यवस्था बनला आहे आणि यापुढचे लक्ष्य आहे ते जर्मनीला मागे टाकण्याचे.गेल्या काही वर्षांत अनेक शहरे जी कधीही प्रतिनिधींचे गंतव्यस्थान नसते ती आता गंतव्यस्थान बनले आहे आणि याचे उदाहरण आहे उत्तर प्रदेश भारताची वृद्धी. साडेसहा टक्क्यांनी राहिली तर जगाची वृद्धी ही तीन टक्क्यांच्या आसपास राहिली. याचा अर्थ जागतिक वृद्धी दरातील भारताचा वाटा १५ टक्के इतका मोठा राहील. २०१३ मध्ये भारत, इंडोनेशिया, ब्राझिल, दक्षिण आफ्रिका आणि तुर्की या पाच देशांना तकलादू अर्थव्यस्था म्हणून समजले जात होते. पण आज त्यातून भारत कधीच बाहेर निघाला आहे. भारताला सतावत होता तो प्रश्न बॅलन्स ऑफ पेमेंट्सचा. पण आज त्यावर भारताने मात केली आहे आणि मोदी यांच्या कुशल मार्गदर्शनामुळे भारत आज जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला आहे. आज भारतातील सामान्य लोकही उद्योजक होत आहेत आणि भारताचे सर्वसामान्य लोक आपले उद्योग चालवतात आणि त्यांच्यावर कित्येक लोक अवलंबून राहतात. भारताचे परकीय भांडवलावरील अवलंबित्व कमी झाले आहे आणि मोदी सरकारने सामान्यांच्या बँक खात्यांची संख्या वाढवल्यामुळे लोकांनां बँकिंगच्या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. याचाच अर्थ असा की, लोकांना आता सुख-सुविधा उपलब्ध होत आहेत आणि त्यांमुळे त्यांचा सुखी होण्याचा इंडेक्स वाढतो आहे. अजूनही काही उणिवा आहेत. त्या म्हणजे देशांतर्गत मागणी कमी असणे, मोठ्या प्रमाणात देशात असलेली गरिबी आणि उत्पादनांसाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध न होणे. हे तीन निसरडे घटक आहेत पण यावर मात करून भारत लवकरच जर्मनीला मागे टाकून आपले उद्दिष्ट साध्य करेल यात काही शंका नाही. भारताची आर्थिक झेप हे स्वप्न होते आणि ते आता साध्य झाले आहे. पण याहून अधिक स्वप्ने पाहण्याचे बळ मोदी यांनी भारताला दिले आहे. २०४७ मध्ये विकसित भारत बनवण्याची योजना मोदी यांनी आखली आहे. त्या दृष्टीने मोदी यांना यश येणार यात काही शंका नाही. भारताची आर्थिक झेप हे त्यांच्या योजनेचे पहिले पाऊल आहे. आगामी अडीच ते तीन वर्षांत भारत जर्मनीला मागे टाकून तिसरी अर्थात सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल असे आकडे सांगतात. गेल्या दहा वर्षांत भारताचा अर्थव्यवस्थेचा आकार दुप्पट झाला आहे. याच्या मागे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सर्वसमावेशक शोधक दृष्टी आहे.
भविष्यवेत्त्यांच्या नजरेतून २०२६
पंकजा देवभविष्यामध्ये काय घडेल याचे कुतूहल, भीती, चिंता आणि भय प्रत्येकाला असते. त्यामुळेच भविष्याची काळजी करतो. ही जगभरातील मानवजातीची कथा आहे. त्यामुळेच भविष्यवेत्त्यांचे २०२६ बाबत काय संकेत मिळतात, पाहू या.२०२५ची अखेर आणि २०२६ ची सुरुवात कालचक्र नव्या वळणावर नेणारी आहे. भविष्याच्या कुशीत काय दडले आहे, याबद्दल जाणून घेण्याची, आडाखे बांधण्याची तसेच अंदाज व्यक्त करण्याची मानवी भावना काही नवी नाही. भविष्याविषयी जाणून घेण्यासंदर्भात प्रसिद्ध असणाऱ्या काही अभ्यासशाखाही आपण जाणतो. यातील तज्ज्ञ, अभ्यासू वा भाकीत वर्तवण्याची ‘शक्ती’ असलेले काही लोक हे काम दरवर्षी करतच असतात. असे असताना नववर्षात पाऊल ठेवताना आपणही भविष्याची चाचपणी करायला काय हरकत आहे? चला तर, २०२६ या वर्षाबद्दल भविष्यसूचक स्फटिकाचा गोळा काय म्हणतो, हे जाणून घेऊ या. जगातील महत्त्वाच्या भविष्यवाण्यांमध्ये प्रसिद्ध फ्रेंच भविष्यवेत्ता नॉस्ट्राडेमस यांच्या भाकितांचा अग्रक्रमाने समावेश होतो. म्हणूनच त्यांच्या भविष्यवाण्यांचे विविध प्रकारे अर्थ लावले गेले आहेत. त्याने सूचित केलेल्या घटनांमध्ये दोन महायुद्धे, हिरोशिमा आणि नागासाकीवर केले गेलेले अणुबॉम्बस्फोट तसेच अमेरिकेतील ९/११ चा दहशतवादी हल्ला यांचा समावेश होता. या सर्व भविष्यवाण्या १५५५ मध्ये लिहिल्या गेल्या होत्या. लेखनाच्या संकेतात्मक भाषेतून त्याचे विविध अर्थ निघू शकतात आणि त्यामुळेच इतिहासकार अनेकदा त्यांच्या भविष्यवाण्यांच्या विश्वासार्हतेवर वादही घालतात. या पार्श्वभूमीवर बघायचे तर २०२६ साठीच्या नॉस्ट्राडेमसच्या भविष्यवाण्याही जागतिक पातळीवर लक्षणीय अशांतता दर्शवतात.काही अभ्यासकांतर्फे असेही सूचित होते की, पुढील काळात हवामान आपत्ती आणि तांत्रिक बदल मोठ्या प्रमाणात बघायला मिळतील. दुसरीकडे, बाबा वांगा या एका आदरणीय बल्गेरियन भविष्यवेत्त्याने भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक आणि तीव्र हवामान बदल यासारख्या महत्त्वाच्या आपत्तींबद्दलच्या भाकितांनिशी हे वर्ष कसे असेल, याचा प्राथमिक अंदाज दिला आहे. यंदा अशा पर्यावरणीय बदलांमुळे जगातील अनेक भागांमध्ये पूर, त्सुनामी आणि इतर अत्यंत गंभीर घटना घडू शकतात आणि त्यामुळे जगभरातील काही प्रदेश आणि क्षेत्रांवर विपरित परिणाम होऊ शकतो, असे सूचित करण्यात आले आहे. २०२६ मध्ये इथिओपिया, अमेरिका, म्यानमार, दक्षिण सुदान, गांबिया, सुदान, रशिया, झांबिया, दक्षिण आफ्रिका आणि थायलंड या देशांमध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. असे असताना जगभरातील प्रत्येक शंभर लोकांपैकी अंदाजे सात ते आठ लोक निवडणुकीशी संबंधीत विपरित घटनांमुळे प्रभावित होऊ शकतात, असे दर्शवण्यात आले आहे. यंदा देशात पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, आसाम आणि पुद्दुचेरीमध्ये विधानसभा निवडणुकांची तयारी असणार आहे. पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्ष तृणमूल काँग्रेसच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना आव्हान देत आहे. तामिळनाडूमध्ये अण्णा द्रमुक-भाजप युती द्रमुकला सत्तेवरून हाकलून लावण्याचा प्रयत्न करत आहे. केरळमध्ये भाजप सातत्याने ताकद वाढवत असला तरी डावी लोकशाही आघाडी (एलडीएफ) आणि संयुक्त लोकशाही आघाडीमध्येच खरी लढत होईल. आसाममध्ये सध्या भाजप सत्तेत असले तरी आगामी निवडणुकांमध्ये राज्यात प्रभाव टिकवून ठेवण्यासाठी त्यांना प्रयत्न करावे लागतील.जगाचा विचार करता सध्या जागतिक अर्थव्यवस्था मंदावली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास जिंकण्यासाठी अर्थजगताला जोरदार प्रयत्न करावा लागेल. कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये गुंतवणूक केल्याने परिस्थिती सुधारण्यास मदत होईल. मात्र भाकीतांचा अंदाज घेता वेगवेगळी आर्थिक धोरणे आणि उच्च सार्वजनिक कर्जाचे निरीक्षण करणे महत्त्वाचे ठरणार आहे. आताच रशिया आणि चीन संसाधनांसाठी स्पर्धा करत आहेत. येत्या काळात त्यांच्यामधील संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता भविष्यवेत्ते दर्शवतात. सध्याची स्थिती तरी या इशाऱ्यांशी सुसंगत आहे. बल्गेरियन भविष्यवेत्ता बाबा वांगा यांनी देखील आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. २०२६ मध्ये येणारी अपेक्षित मंदी व्यापार तणाव आणि लोकसंख्याशास्त्रीय बदलांमुळे, विशेषतः विकसित देशांमध्ये वाढत असलेल्या वृद्धांच्या लोकसंख्येमुळे गडद होण्याची शक्यता आहे. ‘गोल्डमन सॅक्स रिसर्च’चा अंदाज आहे की, २०२६ मध्ये बहुतेक प्रमुख अर्थव्यवस्था पूर्वीच्या अपेक्षेपेक्षा वेगाने वाढतील. जागतिक व्यापार शुल्कांमधील धक्क्यांमुळे आणि देशांतर्गत धोरणांमुळे २०२६ आणि त्यानंतरच्या आर्थिक वर्षासाठी भारताचा आर्थिक दृष्टिकोन प्रभावित राहण्याचा अंदाज आहे. २०४७ पर्यंत विकसित देशाचा दर्जा मिळवण्यासाठी सरकारला देशांतर्गत उत्पादनवाढीला चालना देणे, परकीय गुंतवणूक वाढवणे आणि जागतिक बाजारपेठांमध्ये व्यापार वाढवणे गरजेचे ठरेल. भारताची अर्थव्यवस्था जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. २०२६ मध्ये भारताचे परराष्ट्र धोरण शेजारी राष्ट्रांशी जुळवून घेण्याच्या उपक्रमांवर भर देणारे राहील. त्याचबरोबर देश संरक्षण आणि आर्थिक सहकार्य वाढवून ‘क्वाड’द्वारे अमेरिका आणि युरोप, विशेषतः जर्मनीसोबत आपली धोरणात्मक भागीदारी मजबूत करेल. थोडक्यात, भारताचे २०२६ चे परराष्ट्र धोरण दृढनिश्चयी असणार असून विविध देशांशी मजबूत भागीदारी निर्माण करणे, जागतिक नेतृत्वक्षमता वाढवणे आणि जटिल भू-राजकीय परिस्थितीत राष्ट्रीय विकास सुनिश्चित करणे हे असेल.
दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार ०१ जानेवारी २०२६
पंचांगआज मिती पौष शुद्ध त्रयोदशी शके १९४७. चंद्र नक्षत्र रोहिणी. योग शुभ.चंद्र राशी वृषभ भारतीय सौर ११ पौष शके १९४७.गुरुवार दिनांक १ जानेवारी २०२६ मुंबईचा सूर्योदय ०७.०८ मुंबईचा सूर्यास्त०६.०७ मुंबईचा चंद्रोदय १०.५६ मुंबईचा चंद्रास्त १०.१११०.४८पीएम राहू काळ ०२.०० ते ०३.२३ .ई.स.२०२६ प्रारंभ,प्रदोष शुभ दिवसदैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)मेष : कामामध्ये सातत्य राहणार आहे.वृषभ : महत्त्वाचे निर्णय घेऊ नका.मिथुन : आजचा दिवस संमिश्र जाणार आहे.कर्क : मन:स्वास्थ्य थोडेसे बिघडणार आहे.सिंह : आर्थिक फायदे मिळतील.कन्या : स्वतःच्या कामांना प्राधान्य द्या.तूळ : आपल्या कार्यक्षेत्रामध्ये काम वाढणार आहे.वृश्चिक : प्रगती होईल.धनू : मनात काळजीचे विचार राहणार आहेत.मकर : नोकरीमध्ये संघर्ष टाळलेलेच चांगले .कुंभ : लेखक आणि कलावंतांना चांगला दिवस आहे.मीन : आपले अंदाज बरोबर ठरणार आहेत.
Satara News: आंदोलनानंतर मेघा कंपनी जागी; सातारा-लातूर महामार्गावर आता क्राँक्रीटीकरण सुरू
प्रभात वृत्तसेवा कृष्णानगर – अनेक छोटे-मोठे अपघात, वाहनांचे नुकसान व जीवितहानी झाल्यानंतर दैनिक प्रभात ने वारंवार धारेवर धरल्याने सुस्त मेघा इंजिनियरींग कंपनीला जाग येवून सातारा-लातूर महामार्गावरील पाणी गळती नंतरच्या खडडे क्राँक्रीटीकरणाला मुहूर्त मिळाला आहे.अर्धवट सोडलेली, निकृष्ट दर्जाची कामे, अधिकार्यांची अनुपस्थिती तसेच कंपनीच्या स्थायी कार्यालयाचा अभाव, सरकारी आदेशाचे उल्लंघन अशा विविध कारणांनी चर्चेत असलेल्या मेघा इंजिनियरींग […] The post Satara News: आंदोलनानंतर मेघा कंपनी जागी; सातारा-लातूर महामार्गावर आता क्राँक्रीटीकरण सुरू appeared first on Dainik Prabhat .
Breaking News : आज होगा हंगामा १२ बजे बॉम्ब ब्लास्ट.! संजय राऊतांच्या घराबाहेर बॉम्बस्फोटाची धमकी
Breaking News | Bomb blast | Sanjay Raut – ठाकरेसेना पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर बुधवारी दुपारी एका गाडीच्या काचेवर बॉम्बस्फोटाच्या धमकीचा संदेश लिहिलेला आढळला आहे. त्यानंतर बॉम्बशोधक पथकाने त्यांच्या परिसराची कसुन तपासणी केली, मात्र त्या ठिकाणी काहीही संशयास्पद आढळले नाही. पोलिसांच्या माहितीनुसार, भांडुप परिसरातील राऊत यांच्या निवासस्थानाच्या बाहेर वॅगनर गाडीच्या खिडकीवर आज […] The post Breaking News : आज होगा हंगामा १२ बजे बॉम्ब ब्लास्ट.! संजय राऊतांच्या घराबाहेर बॉम्बस्फोटाची धमकी appeared first on Dainik Prabhat .
SIP : एफआयआयकडून गेले एसआयपीतून आले; सरलेल्या वर्षात एसआयपीतून 14 लाख कोटींचा ओघ
मुंबई : 2025 मध्ये म्युच्युअल फंड उद्योगात तेजी कायम राहिली. एसआयपीच्या माध्यमातून 14 लाख कोटी रुपयांचा निधी आल्यामुळे नोव्हेंबर अखेर म्युच्युअल फंडाच्या व्यवस्थापनाखाली मालमत्ता 81 लाख कोटी रुपयांवर गेले आहे. म्युच्युअल फंड नियंत्रक अॅक्फीचे मुख्य कार्यकारी अधिकारी वेंकट छलसानी यांनी सांगितले की आगामी, वर्षाबाबतही आम्ही आशावादी आहेत. सरलेल्या वर्षात परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी(एफआयआय) रूपया कमकुवत झाल्यामुळे […] The post SIP : एफआयआयकडून गेले एसआयपीतून आले; सरलेल्या वर्षात एसआयपीतून 14 लाख कोटींचा ओघ appeared first on Dainik Prabhat .
भारत-पाकिस्तान संघर्षामधील मध्यस्थीचा आणखी एक दावेदार, चीनचा दावा भारताने फेटाळला
नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील तहशतवादी तळ उध्वस्त केले होते. यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात संघर्ष पेटला होता. हा संघर्ष संपवण्यात मध्यस्थी केल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. मात्र भारताने हा दावा पूर्णपणे फेटाळून लावला. दरम्यान यानंतर आता चीनने देखील आपण भारत आणि पाकिस्तान यांच्यात या संघर्षाच्या काळात मध्यस्थी केल्याचा दावा केला आहे. भारताने चीनचा दावा देखील पूर्णपणे फेटाळून लावला असून शस्त्रविरामाच्या निर्णयामध्ये कोणत्याही तिसऱ्या पक्षाचा हस्तक्षेप नव्हता, असे स्पष्ट करण्यात आले आहे.ऑपरेशन सिंदूर नंतर १० मे रोजी दोन्ही देशांच्या डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेश्न्समध्ये (डीजीएमओ) थेट चर्चा झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रविराम जाहीर करण्यात आला, असे भारताकडून वारंवार सांगण्यात आले आहे. आम्ही यापूर्वीच असे दावे फेटाळले आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय मुद्द्यावर तिसऱ्या पक्षाची कसलीही भूमिका नाही. दोन देशांच्या डीजीएमओमध्ये झालेल्या थेट चर्चेनंतर शस्त्रविरामावर एकमत झाले, ही आपली भूमिका यापूर्वीही अनेकदा स्पष्ट करण्यात आलेली आहे.चीनचे पराराष्ट्रमंत्री वांग यी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याप्रमाने चीनने मे महिन्यात झालेल्या भारत-पाकिस्तान संघर्षास अनेक जागतिक संघर्षामध्ये मध्यस्थी केल्याचा दावा केल्यानंतर यावर भारताकडून ही प्रतिक्रिया देण्यात आली आहे. भारत-पाकिस्तान युद्धबंदीसाठी आम्ही मध्यस्थी केल्याचा दावा चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी चीनच्या परराष्ट्र संबंधांवरील परिसंवादात बोलताना केला आहे. शाश्वत शांतता प्रस्थापित करण्यासाठी आम्ही एक वस्तुनिष्ठ आणि तर्कसंगत दृष्टिकोन स्वीकारला आहे. संघर्षाचे प्रश्न सोडवण्यासाठी चीनच्या या दृष्टिकोनाचा अवलंब करून आम्ही उत्तर म्यानमार, इराणचा आण्विक प्रश्न, पाकिस्तान आणि भारत यांच्यातील तणाव, यासारखे प्रश्न सोडवले. पाकिस्तान आणि भारत यांच्यातील तणाव, पॅलेस्टाईन आणि इस्रायलमधील समस्या आणि कंबोडिया आणि थायलंडमधील संघर्षात मध्यस्थी केली, असा दावा चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी केला आहे. दरम्यान, भारत-पाकिस्तान युद्धबंदीसाठी तिसऱ्या पक्षाच्या हस्तक्षेपाला भारताने वारंवार नकार देत या संदर्भातील सर्वच दावे फेटाळून लावलेले आहेत.
’लोकमान्य सोसायटी’ तर्फे ’आरंभ’ मुदत ठेव योजना सादर
पूणे : नवीन वर्षाच्या प्रारंभीच गुंतवणुकीला चालना देणाच्या उद्देशाने ’लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटी लि’ तर्फे ’आरंभ’ ही मुदत ठेव योजना सादर करण्यात आली आहे. 15 महिन्यांच्या कालावधीसाठी असलेल्या या गुंतवणूक योजनेसाठी 10.25 टक्के इतका व्याजदर असणार आहे. तर जेष्ठ नागरिकांसाठी 0.50 टक्के इतका अधिकचा व्याजदर असणार आहे. ग्राहक-सभासद या योजनेत किमान दहा हजार रूपयांपासून गुंतवणुक […] The post ’लोकमान्य सोसायटी’ तर्फे ’आरंभ’ मुदत ठेव योजना सादर appeared first on Dainik Prabhat .
Nimesulide Drug Banned : निमसुलाइड औषधावर बंदी; आरोग्याच्या दृष्टीने केंद्र सरकारचा निर्णय
नवी दिल्ली : गेल्या काही काळात केंद्र सरकारने स्वास्थ आणि आरोग्याच्या दृष्टीने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. नुकतेच केंद्र सरकारने वेदना आणि तापावर वापरल्या जाणाऱ्या निमेसुलाइड या औषधावर बंदी आणली आहे. 100 मिलीग्रामपेक्षा जास्त डोस असलेल्या निमेसुलाइडच्या सर्व ओरलऔषधांच्या उत्पादन आणि विक्रीवर तात्काळ बंदी घालण्यात आली आहे. मेसुलाइड हे नॉन-स्टेरॉइडल अँटी-इंफ्लेमेटरी औषध आहे. जे वेदना […] The post Nimesulide Drug Banned : निमसुलाइड औषधावर बंदी; आरोग्याच्या दृष्टीने केंद्र सरकारचा निर्णय appeared first on Dainik Prabhat .
Kidney racket : किडनी विक्री प्रकरणी देशांतर्गत रॅकेट उघड; चंद्रपूर पोलिसांना मोठे यश
Kidney racket – चंद्रपूरमधील शेतकऱ्याच्या कर्जफेडीसाठी त्याची किडनी काढण्याची घटना नुकतीच समोर आली होती. या प्रकरणात चंद्रपूर पोलिसांनी एका मोठ्या देशांतर्गत किडनी प्रत्यारोपणाच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या रॅकेटचे संबंध दिल्ली, तामिळनाडू आणि कंबोडियाशी असल्याचे आढळून आले. तपासामध्ये दिल्लीचे डॉ. रविंदर पाल सिंग आणि त्रिची येथील स्टार किम्स रुग्णालयाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजरत्नम गोविंदास्वामी यांची […] The post Kidney racket : किडनी विक्री प्रकरणी देशांतर्गत रॅकेट उघड; चंद्रपूर पोलिसांना मोठे यश appeared first on Dainik Prabhat .
‘जर्मन बेकरी’प्रकरणातील आरोपी बंटी जहागिरदार याचा गोळीबारात मृत्यू
श्रीरामपूर : पुण्यातील गाजलेल्या जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी अस्लम शेख उर्फ बंटी जहागिरदार याच्यावर बुधवारी भरदिवसा झालेल्या गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण श्रीरामपूर शहरात एकच खळबळ उडाली आहे. दुपारी सुमारे पावणे तीन वाजण्याच्या सुमारास ही थरारक घटना घडली असून, शहरातील कॉलेज रोड परिसरात दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी बंटी जहागिरदारवर गोळीबार केला. या हल्ल्यात बंटी जहागिरदार गंभीर जखमी झाल्याने त्याला तातडीने श्रीरामपूर येथील साखर कामगार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती अधिक गंभीर झाल्याने त्यास पुढील उपचारासाठी अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला आहे.बंटी जहागिरदार कॉलेज रोडने दुचाकीवरून जात असताना अचानक दोन अज्ञात इसमांनी जवळ येत त्याच्यावर गोळीबार केला. काही सेकंदातच हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले. गोळीबाराचा आवाज ऐकताच परिसरात प्रचंड खळबळ उडाली. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, अनेक दुकाने तातडीने बंद करण्यात आली. अस्लम शेख उर्फ बंटी जहागिरदार हे नाव २०१० साली पुण्यात झालेल्या जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणात चर्चेत आले होते. या प्रकरणातील तो प्रमुख आरोपींपैकी एक होता. दीर्घ काळ तुरुंगवासानंतर त्याला २०२३ मध्ये जामीन मंजूर झाला होता. जामिनावर बाहेर आल्यानंतर तो श्रीरामपूर परिसरात राहत असल्याची माहिती आहे.या पार्श्वभूमीवर झालेला हा हल्ला केवळ वैयक्तिक वादातून झाला की यामागे काही मोठा कट आहे, याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी जमली. तसेच, आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी या मागणीसाठी काही समर्थक व नागरिकांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन केले. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जमावाला शांत राहण्याचे आवाहन करत, शहरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.संवेदनशील ठिकाणी पोलीस गस्त वाढविण्यात आली असून, सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे. या घटनेनंतर पोलिसांनी विशेष पथके तयार करून हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे. हल्लेखोर कोण होते, त्यांनी कोणत्या दिशेने पलायन केले, तसेच हल्ल्यामागील नेमके कारण काय याचा सखोल तपास सुरू आहे. वैयक्तिक वैर, जुना वाद की गुन्हेगारी पार्श्वभूमी यापैकी कोणता धागा पुढे येतो, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. सध्या श्रीरामपूर शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, संशयित हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे.
Pune : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत उमेदवारी अर्जावरून सुरू असलेली रस्सीखेच आता थेट ‘पळवा-पळवी’पर्यंत पोहोचली आहे. धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयात उमेदवारी अर्जांच्या छाननी दरम्यान, शिवसेना शिंदे गटाच्या एका उमेदवाराने दुसऱ्या उमेदवाराचा मूळ ‘एबी फॉर्म’ निवडणूक कर्मचाऱ्याच्या हातातून हिसकावून पळवल्याची धक्कादायक घटना आज घडली. या नाट्यमय प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, संबंधित उमेदवारावर पोलिसांत गुन्हा दाखल […] The post Pune : शिवसेना शिंदे गटात ‘एबी फॉर्म’ची पळवा-पळवी; पुण्यात छाननी प्रक्रियेत हायव्होल्टेज ड्रामा, उमेदवारावर गुन्हा दाखल appeared first on Dainik Prabhat .
नूतन वर्ष महाराष्ट्राचे, महाराष्ट्राच्या समृद्धीचे, विकासाचे नवपर्व आणणारे
नवर्षप्रारंभाच्या पूर्वसंध्येला दिल्या शुभेच्छामुंबई : - नूतन वर्ष महाराष्ट्राचे, महाराष्ट्राच्या समृद्धीचे, विकासाचे नवपर्व आणणारे ठरेल, असा विश्वास व्यक्त करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातील नागरिकांना नववर्ष प्रारंभाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.सरत्या वर्षाला निरोप देताना आणि नवीन वर्ष प्रारंभाच्या पुर्वसंध्येला दिलेल्या या शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, ‘सरत्या वर्षातील कटू प्रसंगांना विसरूया आणि सुमधूर आठवणींकडून प्रेरणा घेत, पुढे जाऊया. महाराष्ट्र सर्वच क्षेत्रात अग्रेसर, नेतृत्व करणारे राज्य आहे. महाराष्ट्राची प्रगतीची पताका अशीच फडकत राहो, यासाठी आपण एकजूट करूया. महाराष्ट्राच्या मातीत आव्हाने स्वीकारण्याची धमक आहे. आव्हाने आलीच, तर त्यावर मात करण्याचा निर्धार करुया. नवे वर्ष नवचैतन्य घेऊन येणारे, आशा, आकांक्षांना बळ देणारे ठरेल अशी आशा व्यक्त करून मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी नववर्ष सर्वांसाठी आरोग्यदायी, सर्वच क्षेत्रात भरभराट, समृद्धी घेऊन येणारे ठरावे, अशा शुभेच्छा दिल्या आहेत.
कात्रज : शहरात मोठ्या संख्येने वास्तव्यास असलेल्या राजस्थानी समाजासाठी स्वतंत्र ‘राजस्थान भवन’ उभारण्यासाठी ४ ते ५ एकर जागा उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी समस्त राजस्थानी समाज संघाकडून करण्यात आली आहे. यासंदर्भात संघाचे संस्थापक मगराज राठी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले आहे. यासोबतच केंद्रिय रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांच्याकडे पुणे ते जोधपूर रेल्वेच्या फेऱ्या […] The post Pune News : पुण्यात ‘राजस्थान भवना’च्या उभारणीसाठी जागा द्यावी; राजस्थानी समाज संघाकडून मुख्यमंत्र्यांना पत्र appeared first on Dainik Prabhat .
Suryakumar Yadav Tirumala Video Viral : भारतीय टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव सध्या कठीण काळातून जात आहे. आगामी टी-२० विश्वचषक २०२६ आणि त्यापूर्वी होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेआधी सूर्याने आपली पत्नी देविशा शेट्टीसह तिरुमला येथील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. वैकुंठ एकादशीच्या शुभ मुहूर्तावर या जोडप्याने देवाचे आशीर्वाद घेतले, ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान […] The post Suryakumar Yadav : टी-२० विश्वचषकापूर्वी सूर्या पत्नीसह तिरुपती चरणी; खराब फॉर्ममधून सावरण्यासाठी साकडं, पाहा VIDEO appeared first on Dainik Prabhat .
Harshwardhan Sapkal : भाजप मूळ कार्यकर्त्यांना बाजूला सारत आहे; हर्षवर्धन सपकाळ यांचा दावा
मुंबई : देशातून काँग्रेसमुक्त करण्याची भाषा करणाऱ्या सत्ताधारी पक्षाने आपल्याच तळागाळातील कार्यकर्त्यांना बाजूला सारून स्वतःला कार्यकर्तेमुक्त पक्ष बनवले आहे. भाजप आता बाहेरील लोकांच्या हातात गेला असून, तो आपल्या मूळ कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा दावा महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. बुलढाणा येथे सपकाळ पत्रकारांशी बोलत होते. सपकाळ म्हणाले, राज्यात सुरू असलेल्या निवडणुकांत भाजपमध्ये […] The post Harshwardhan Sapkal : भाजप मूळ कार्यकर्त्यांना बाजूला सारत आहे; हर्षवर्धन सपकाळ यांचा दावा appeared first on Dainik Prabhat .
Thailand : थायलंडने केली कंबोडियाच्या १८ सैनिकांची सुटका
बँकॉक – थायलंडने आज कंबोडियाच्या १८ सैनिकांची सुटका केली. गेल्या पाच महिन्यांपासून हे सैनिक थायलंडच्या ताब्यात होते. थायलंड आणि कंबोडियामध्ये झालेल्या युद्धबंदी करारातल्या तरतूदीनुसार हा करार ७२ तास पाळला गेल्यानंतर थायलंडने या सैनिकांची सुटका करणे अपेक्षित होते. त्यानुसार आज या सैनिकांची सुटका करण्यात आली. थायलंड आणि कंबोडियाच्या संरक्षण मंत्र्यांनी शनिवारी युद्धबंदी करारावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. […] The post Thailand : थायलंडने केली कंबोडियाच्या १८ सैनिकांची सुटका appeared first on Dainik Prabhat .
Chandrapur Police : चंद्रपूर पोलिसांना मोठं यश! किडनी विक्री प्रकरणी देशांतर्गत रॅकेट उघड
चंद्रपूर : चंद्रपूरमधील शेतकऱ्याच्या कर्जफेडीसाठी त्याची किडनी काढण्याची घटना नुकतीच समोर आली होती. या प्रकरणात चंद्रपूर पोलिसांनी एका मोठ्या देशांतर्गत किडनी प्रत्यारोपणाच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या रॅकेटचे संबंध दिल्ली, तामिळनाडू आणि कंबोडियाशी असल्याचे आढळून आले. तपासामध्ये दिल्लीचे डॉ. रविंदर पाल सिंग आणि त्रिची येथील स्टार किम्स रुग्णालयाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजरत्नम गोविंदास्वामी यांची नावे […] The post Chandrapur Police : चंद्रपूर पोलिसांना मोठं यश! किडनी विक्री प्रकरणी देशांतर्गत रॅकेट उघड appeared first on Dainik Prabhat .
Maratha Kunbi certificates – मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा जातीचे दाखले जारी करण्यासाठी नियुक्त केलेल्या न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) समितीला राज्य सरकारने ३० जून २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. बुधवारी जारी केलेल्या सरकारी निर्णयानुसार, सप्टेंबर २०२३ मध्ये सामान्य प्रशासन विभागांतर्गत स्थापन केलेल्या या समितीला प्रमाणपत्रांसाठी पात्रता निश्चित करण्याकरिता कागदोपत्री पुराव्यांची पडताळणी आणि ऐतिहासिक नोंदींची छाननी करण्यासाठी एक […] The post Maratha Kunbi certificates : मराठा-कुणबी प्रमाणपत्रांवरील शिंदे समितीला पुढील वर्षी ३० जूनपर्यंत मुदतवाढ appeared first on Dainik Prabhat .
Damien Martyn Coma : ऑस्ट्रेलियन क्रिकेट जगतातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. २००३ च्या विश्वचषक विजेत्या संघातील महत्त्वाचा फलंदाज डेमियन मार्टिन याची प्रकृती अत्यंत खालावली असून तो सध्या रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. ५४ वर्षीय मार्टिनला मेनिंजायटीस (मेंदूज्वर) झाल्याचे निदान झाले असून त्याच्यावर ब्रिस्बेनमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रकृती चिंताजनक, व्हेंटिलेटरवर उपचार – मिळालेल्या […] The post Damien Martyn : धक्कादायक! २००३ च्या विश्वचषकाचा हिरो व्हेंटिलेटरवर; मेंदूज्वराने गंभीर असल्याने मृत्यूशी देतोय झुंज appeared first on Dainik Prabhat .
मुंबई : राज्यात १५ जानेवारी रोजी होणाऱ्या निवडणुकांसाठी डिजिटल संगणकीकृत स्वाक्षरीद्वारे जारी केलेले किंवा सत्यापित केलेले फॉर्म ए आणि फॉर्म बी सादर केलेल्या सर्व उमेदवारांना अपात्र ठरवण्यात यावे, अशी मागणी शिवसेना खासदार मिलिंद देवरा यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. राज्य निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात देवरा म्हणाले, निवडणूक आयोगाने विहित केलेल्या कार्यपद्धतीत फॉर्म ए आणि […] The post अनधिकृत डिजिटल स्वाक्षरी वापरणाऱ्या उमेदवारांना अपात्र ठरवावे; खा. मिलिंद देवरा यांची राज्य निवडणूक आयोगाकडे मागणी appeared first on Dainik Prabhat .
केंद्रीय मंत्रिमंडळाची नाशिक-सोलापूर-अक्कलकोट या सहा पदरी ग्रीनफील्ड कॉरिडॉरला मंजुरी
नवी दिल्ली : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने आज महाराष्ट्रात ३७४ कि.मी. लांबीच्या सहा पदरी ग्रीनफिल्ड ॲक्सेस-कंट्रोल्ड नाशिक-सोलापूर- अक्कलकोट मार्गिकेच्या बांधकामाला मंजुरी दिली आहे. बांधा वापरा हस्तांतरित करा या तत्त्वावर राबवल्या जाणाऱ्या या प्रकल्पाचा एकूण भांडवली खर्च १९ ,१४२ कोटी रुपये आहे.नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर या महत्त्वाच्या शहरांसह पुढे कुर्नुलला जोडणारा हा प्रकल्प पायाभूत सुविधा पीएम गतिशक्ती राष्ट्रीय बृहद् आराखड्याच्या तत्त्वांतर्गत एकात्मिक वाहतूक पायाभूत सुविधा विकासाला गती देण्यासाठीचा एक महत्त्वपूर्ण निर्णय आहे.नाशिक ते अक्कलकोट दरम्यानचा हा ग्रीनफिल्ड मार्ग वाढवण बंदर इंटरचेंजजवळ दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेला, नाशिकमध्ये राष्ट्रीय महामार्ग -६० (आडेगाव) च्या जंक्शनवर आग्रा-मुंबई कॉरिडॉरला आणि पांगरी (नाशिक जवळ) येथे समृद्धी महामार्गाला जोडण्याचे प्रस्तावित आहे. हा प्रस्तावित मार्ग पश्चिम किनारपट्टीपासून पूर्व किनारपट्टीपर्यंत थेट दळण वळण उपलब्ध करेल. चेन्नई बंदराच्या बाजूने, तिरुवल्लूर, रेणिगुंटा, कडप्पा आणि कुर्नूलमार्गे चेन्नई ते हसापूर (महाराष्ट्र सीमा) पर्यंत (७०० कि.मी. लांब) चार पदरी मार्गिकेचे काम प्रगतीपथावर आहे.महामार्ग क्षमता सुधारणे हा या प्रस्तावित ॲक्सेस-कंट्रोल्ड सहा-पदरी ग्रीनफिल्ड प्रकल्पाचा मुख्य उद्देश असून, यामुळे प्रवासाचा वेळ १७ तास आणि प्रवासाचे अंतर २०१ कि.मी. ने कमी होण्याची अपेक्षा आहे. नाशिक-अक्कलकोट (सोलापूर) मार्गामुळे कोप्पर्थी आणि ओरवाकल या प्रमुख नॅशनल इंडस्ट्रियल कॉरिडॉर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एनआयसीडीसी) नोड्सवर येणाऱ्या आणि जाणाऱ्या मालाची लॉजिस्टिक क्षमता सुधारणार आहे. नाशिक-तळेगाव दिघे हा भाग पुणे-नाशिक एक्सप्रेसवेच्या विकासाच्या दृष्टीने देखील महत्वाचा आहे. एनआयसीडीसीने महाराष्ट्र राज्य शासनाद्वारे हाती घेतल्या जाणाऱ्या प्रस्तावित नवीन एक्सप्रेसवेचा भाग म्हणून हा प्रकल्प असेल. या प्रकल्पामुळे सुधारित सुरक्षा आणि विनाव्यत्यय वाहतुकीसाठी द्रुत-गती मार्ग उपलब्ध होणार आहे. यामुळे प्रवासाचा वेळ, वाहतूक कोंडी आणि परिचालन खर्च कमी व्हायला मदत होईल. महत्त्वाचे म्हणजे, हा प्रकल्प या क्षेत्रातील पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्याबरोबरच नाशिक, अहिल्यानगर, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यांच्या सर्वांगीण आर्थिक विकासात मोलाचे योगदान देईल.हा सहा पदरी ॲक्सेस-कंट्रोल्ड ग्रीनफिल्ड कॉरिडॉर 'क्लोज टोलिंग' सुविधेसह असणार आहे. सरासरी ताशी ६० कि.मी. आणि ताशी १०० कि.मी. डिझाइन स्पीडची अनुमती असेल. यामुळे प्रवासाचा एकूण वेळ अंदाजे १७' तासांपर्यंत कमी होईल (३१ तासांवरून ४५ टक्केची घट), तसेच प्रवासी आणि मालवाहू वाहनांसाठी अधिक सुरक्षित, वेगवान आणि विनाव्यत्यय दळण वळणाची सुविधा उपलब्ध होईल.या प्रकल्पामुळे सुमारे २५१.०६ लाख मनुष्य-दिवस प्रत्यक्ष रोजगार आणि ३१३.८३ लाख मनुष्य-दिवसांचा अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होईल. या प्रस्तावित मार्गिकेच्या आसपासच्या परिसरात आर्थिक घडामोडी वाढल्यामुळे अतिरिक्त रोजगाराच्या संधी देखील निर्माण होतील.
ओडिशाच्या किनाऱ्यावरून एकाच लाँचरमधून लागोपाठ दोन प्रलय क्षेपणास्त्रांचे यशस्वी प्रक्षेपण
हैद्राबाद : संरक्षण क्षेत्रात भारताने आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) ओडिशाच्या किनाऱ्यावरून एकाच लाँचरवरून दोन स्वदेशी विकसित प्रलय क्षेपणास्त्रांचेलागोपाठ यशस्वी प्रक्षेपण केले आहे. या चाचण्यांमुळे भारताच्या लढण्याच्या क्षमतेत मोठी भर पडली असून, देशाच्या संरक्षण सज्जतेला नवे बळ मिळाले आहे.वापरकर्ता मूल्यांकन चाचण्यांच्या अंतर्गत ३१ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता ही चाचणी झाली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही क्षेपणास्त्रांनी ठरवून दिलेल्या मार्गाचे अचूक पालन केले आणि सर्व उद्दिष्टे यशस्वीरीत्या पूर्ण केली. चांदीपूर येथील एकात्मिक चाचणी श्रेणीतील प्रगत ट्रॅकिंग सेन्सर्सद्वारे क्षेपणास्त्रांच्या कामगिरीची पुष्टी करण्यात आली, तर लक्ष्य क्षेत्राजवळ तैनात जहाजांवरील टेलिमेट्री प्रणालीद्वारे अंतिम टप्प्यातील घटनांची पडताळणी करण्यात आली.प्रलय हे घन इंधनावर आधारित, लहान पल्ल्याचे अर्ध-बॅलिस्टिक क्षेपणास्त्र असून ते अत्याधुनिक मार्गदर्शन आणि नेव्हिगेशन प्रणालींनी सुसज्ज आहे. या क्षेपणास्त्राची अचूकता अधिक असून ते विविध प्रकारचे पारंपरिक वॉरहेड्स वाहून नेण्यास सक्षम आहे. वेगवेगळ्या लक्ष्यांवर मारा करण्याची क्षमता असल्याने हे क्षेपणास्त्र लष्करासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. प्रलय क्षेपणास्त्र प्रामुख्याने शत्रूच्या तळांवर, कमांड सेंटर्स, रडार प्रणाली आणि इतर सामरिक ठिकाणांवर अचूक हल्ला करण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे.हे क्षेपणास्त्र हैदराबाद येथील रिसर्च सेंटर इमरतच्या नेतृत्वाखाली डीआरडीओच्या विविध प्रयोगशाळा आणि भारतीय उद्योग भागीदारांच्या सहकार्याने विकसित करण्यात आले आहे. भारत डायनॅमिक्स लिमिटेड आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड यांनी प्रणाली विकास आणि उत्पादन भागीदार म्हणू न महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या चाचण्यांना वरिष्ठ डीआरडीओ शास्त्रज्ञ, भारतीय लष्कर आणि भारतीय हवाई दलाचे अधिकारी तसेच उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी उपस्थित होते.संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल डीआरडीओ, सशस्त्र दल, संरक्षण सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि उद्योग भागीदारांचे अभिनंदन केले. प्रलय क्षेपणास्त्र प्रणालीची विश्वासार्हता आणि कार्यक्षमता या चाचण्यांमधून सिद्ध झाली असून, आत्मनिर्भर भारत मोहिमेच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे त्यांनी नमूद केले. या यशस्वी चाचणीमुळे भारताची स्वदेशी क्षेपणास्त्र क्षमता अधिक मजबूत झाली असून, भविष्यातील सामरिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी देश अधिक सक्षम होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Jamkhed News : नवनिर्वाचित नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी यांचा उद्या पार पडणार पदग्रहण समारंभ
जामखेड : अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड नगरपरिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (भाजप) ऐतिहासिक यश मिळवले आहे. विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपने नगराध्यक्षपदासह एकूण १५ जागांवर विजय मिळवला. नवनिर्वाचित नगराध्यक्षा प्रांजल अमित चिंतामणी यांनी प्रतिस्पर्ध्याला तब्बल ३६८२ मतांच्या मोठ्या फरकाने पराभूत करून आपली ताकद दाखवली. ही निवडणूक केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेपुरती मर्यादित राहिली नाही, […] The post Jamkhed News : नवनिर्वाचित नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी यांचा उद्या पार पडणार पदग्रहण समारंभ appeared first on Dainik Prabhat .
KBC 17: रांचीचे बिप्लब बिस्वास बनले करोडपती; ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’च्या प्रश्नावर क्षणात मारली बाजी
KBC 17: लोकप्रिय टीव्ही शो ‘कोण बनेगा करोडपती’च्या १७ व्या पर्वात पुन्हा एकदा ज्ञानाचा आणि धैर्याचा सुवर्णक्षण पाहायला मिळाला. झारखंडमधील रांचीचे सुपुत्र बिप्लब बिस्वास यांनी आपल्या अफाट बुद्धिमत्तेच्या जोरावर १ कोटी रुपये जिंकून इतिहास रचला आहे. बिप्लब यांच्या आत्मविश्वासाने आणि वेगवान विचार करण्याच्या शैलीने प्रेक्षकांसह महानायक अमिताभ बच्चन यांनाही थक्क केले. बिप्लब बिस्वास सध्या छत्तीसगडमधील […] The post KBC 17: रांचीचे बिप्लब बिस्वास बनले करोडपती; ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’च्या प्रश्नावर क्षणात मारली बाजी appeared first on Dainik Prabhat .
निवणुकीपूर्वीच महायुतीला झटका: वॉर्डातून २ उमेदवार बाद
मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीला मतदानाआधीच मोठा धक्का बसला आहे. मुंबईतील वॉर्ड क्रमांक २११ आणि २१२ या दोन महत्त्वाच्या प्रभागांत महायुतीचा एकही उमेदवार रिंगणात नसल्याने या दोन्ही जागा अक्षरशः हातातून निसटल्या आहेत. भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार बाद झाल्यामुळे या वॉर्डमध्ये महायुतीला माघार घ्यावी लागली असून, याचा थेट फायदा विरोधी पक्षांना होणार आहे.वॉर्ड क्रमांक २११ मध्ये भाजपने शकील अन्सारी यांना उमेदवारी दिली होती. हा वॉर्ड खुल्या प्रवर्गातील असल्याने भाजपने येथे विशेष तयारी केली होती. मात्र उमेदवारी अर्जासोबत आवश्यक असलेली कागदपत्रे पूर्ण न झाल्याने निवडणूक आयोगाच्या छाननीत त्यांचा अर्ज बाद करण्यात आला. परिणामी या प्रभागात कमळ किंवा धनुष्यबाण हे चिन्ह मतदारांना दिसणार नाही.दरम्यान, वॉर्ड क्रमांक २१२ मध्ये घडलेल्या घटनेने महायुतीची अडचण अधिकच वाढवली. या वॉर्डमधून भाजपच्या मंदाकिनी खामकर यांना उमेदवारी देण्यात आली होती आणि त्यांना पक्षाचा एबी फॉर्मही मिळाला होता. मात्र अर्ज दाखल करण्यासाठी त्या निवडणूक कार्यालयात १५ मिनिटे उशिरा पोहोचल्या. निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार वेळ संपल्यानंतर अर्ज स्वीकारला जात नसल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज थेट बाद ठरवण्यात आला.मुंबई महानगरपालिका निवडणुकीत प्रत्येक वॉर्ड निर्णायक ठरणार असताना, दोन प्रभागांमध्ये उमेदवारच नसणे ही महायुतीसाठी नामुष्की मानली जात आहे.आता या दोन वॉर्डमधील महायुतीचे मतदार कोणत्या दिशेने मतदान करतात आणि त्याचा फायदा कोणाला होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुंबई : मुंबई पालिका निवडणुकीच्या जागावाटपात सन्मानजनक वागणूक न मिळाल्याने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेत महायुतीला धक्का देणाऱ्या केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे बंड अवघ्या २४ तासांत थंड झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर आठवले यांनी माघार घेतली असून, भाजप आणि शिवसेनेच्या कोट्यातून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला (आरपीआय) किमान १२ जागा सोडण्याचे ठरल्याचा दावा त्यांनी केला.मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर बुधवारी वर्षा निवासस्थानाबाहेर माध्यमांशी संवाद साधताना आठवले म्हणाले, आरपीआयने महायुतीकडे १७ जागांची अंतिम यादी सादर केली. त्यापैकी भाजपच्या कोट्यातील ६-७ आणि शिवसेनेच्या कोट्यातील ६-७ अशा एकूण १२ जागा सोडण्यास मुख्यमंत्री फडणवीस यांनी संमती दिली आहे. याबाबत फडणवीस यांनी भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम आणि प्रवीण दरेकर यांना निर्देश दिले आहेत. शिवसेना कोट्यातील उर्वरित जागांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा होणार आहे.या १२ जागांवर आरपीआयचे उमेदवार महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून लढतील आणि तेथील भाजप-शिवसेना उमेदवार माघार घेतील. उर्वरित १८ जागांवर (आरपीआयच्या ३० पैकी) स्वबळावर मैत्रीपूर्ण लढत होईल. मुंबईच्या एकूण २२७ जागांपैकी उर्वरित १९७ जागांवर आरपीआय महायुतीचा घटकपक्ष म्हणून प्रचार करेल आणि महायुती उमेदवारांना पाठिंबा देईल, अशी माहिती रामदास आठवले यांनी दिली.
मराठा समाजासाठी महत्त्वाची बातमी, शिंदे समितीला सहा महिन्यांची मुदतवाढ
मुंबई : मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी पुराव्यांची प्रशासकीय छाननी करणाऱ्या शिंदे समितीला सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्य शासनाने ही मुदतवाढ दिली आहे. मराठा - कुणबी आणि कुणबी - मराठा नोंदी शोधण्यासाठी स्थापन केलेल्या माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या समितीला सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय मंगळवार ३१ डिसेंबर २०२५ रोजी मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला. मुंबईत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना विखे-पाटील म्हणाले, हैदराबाद गॅझेट, सातारा गॅझेटमधील नोंदीनुसार विनंती करणाऱ्या पात्र मराठा नागरिकांना कुणबी असल्याचे प्रमाणपत्र दिले जात आहे. यासाठी आवश्यक ती छाननी न्यायमूर्ती शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समिती करत आहे. या समितीला मुदतवाढ देण्यात आली आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळवण्यासाठी आवश्यक पुरावे आणि माहिती गोळा करणे, तसेच सातारा गॅझेट आणि सोयऱ्यांच्या मागण्यांचा अभ्यास करणे यासाठी शिंदे समितीची स्थापना करण्यात आली आहे. हीच समिती कागदपत्रांचीच छाननी करत आहे. राज्य शासनाने या महत्त्वाच्या समितीला ३० जून २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे.
‘हॅप्पी पटेल: खतरनाक जासूस’ची स्टार कास्ट ‘कौन बनेगा करोड़पति’च्या सेटवर
मुंबई : आमिर खान प्रोडक्शन्सची आगामी मनोरंजक चित्रपट हॅप्पी पटेल: खतरनाक जासूस आपल्या खास ऊर्जा आणि खुमासदार अंदाजासह आयकॉनिक गेम शो कौन बनेगा करोड़पतिच्या सेटवर पोहोचली. या शोचे सूत्रसंचालन मेगास्टार अमिताभ बच्चन करत आहेत. हॉट सीटवर मोना सिंह आणि वीर दास दिसले, तर या भागात मिथिला पालकर आणि शरीब हाशमी यांचाही सहभाग आहे. हा एपिसोड ज्ञान, विनोद आणि बेधडक गप्पांचा सुरेख संगम सादर करणार असून सिनेमा आणि टेलिव्हिजनप्रेमींसाठी तो नक्कीच पाहण्यासारखा अनुभव ठरणार आहे.अलीकडेच प्रदर्शित झालेल्या हॅप्पी पटेल: खतरनाक जासूसच्या ट्रेलरने मजा एका नव्या पातळीवर नेली आहे. उच्च दर्जाच्या विनोदाने भरलेल्या या ट्रेलरमध्ये अनेक मनोरंजक आणि अनोखे क्षण पाहायला मिळतात, जे पूर्णपणे एंटरटेनिंग चित्रपटाचे आश्वासन देतात. दिग्दर्शक आणि अभिनेता या दुहेरी भूमिकेत वीर दास आपल्या ताज्या, क्वर्की कॉमेडी स्टाइलसह भरपूर हसवण्यासाठी सज्ज आहेत. ऊर्जा, आकर्षण आणि युथफुल वाइबने भरलेला हा ट्रेलर चित्रपटाच्या रिलीजबद्दलची उत्सुकता आणखी वाढवतो. आमिर खान प्रोडक्शन्सच्या बॅनरखाली तयार झालेल्या हॅप्पी पटेल: खतरनाक जासूस चे दिग्दर्शन वीर दास यांनी केले असून हा चित्रपट १६ जानेवारी २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
मोहित सोमणसोन्यावर कर्ज मिळते हे तुम्ही ऐकले असेल, सोने तारण हे समाजात लोकप्रिय असेल पण आतापर्यंत चांदीवर कर्ज ही संकल्पना ऐकली होती का? नसेल तर आता पहा, कारण आरबीआयने चांदीच्या बदल्यात कर्ज देण्यासह मान्यता दिली आहे. नोव्हेंबर महिन्यात आलेल्या परिपत्रकानुसार १ एप्रिल २०२६ पासून संबंधित योजनेला मान्यता दिली गेली असून नव्या बदललेल्या धोरणात्मक निर्णयानुसार, आरबीआयने आरबीआय (Lending Against Gold and Silver Collateral 2025) ही नवी नियमावली जाहीर केली. त्यानुसार आता सर्वसामान्यांना चांदी तारण बदल्यात कर्ज मिळणार आहे. सोन्याला प्रतिस्पर्धा, आंतरराष्ट्रीय बाजारात वाढलेले चांदीचे मूल्यांकन,चांदीला मिळालेली आंतरराष्ट्रीय मान्यता यामुळे वाढते महत्व लक्षात घेताना रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) चांदीच्या तारण कर्जाला मान्यता दिली आहे.अर्थात यामध्ये सीबील स्कोअरला महत्व असणार आहे.चांगला ट्रॅक रेकॉर्ड असलेल्या पात्र व्यक्तीला हे कर्ज घेण्यास सुलभ होणार आहे. गृहकर्जासाठी अर्ज केलेल्या व्यक्तींना ७०० ते ७५० पातळीवर क्रेडिट स्कोअर असल्यास ते मिळणे अधिक सोयिस्कर होतेच तर उर्वरित कर्जासाठीही चांगला स्कोअर आवश्यक आहे. मात्र कर्ज घेताना काही बाबी तपासणे महत्त्वाचे आहे बघुयात काय आहेत त्या तरतूदी -१) चांदीचे कर्ज घेताना जर रक्कम २.५ लाखांपेक्षा कमी असेल तर चांदीच्या मूल्यांकनातील तुलनेत ८५% रक्कम कर्ज म्हणून मिळणार आहे.२) जर रक्कम २.५० लाख ते ५ लाखांपर्यंत असेल तर चांदीच्या तारणावर ८०% कर्ज ग्राहकांना मिळू शकते.३) जर ५ लाखांपेक्षा अधिक रक्कम असेल तर ७५% रक्कम कर्ज म्हणून मिळू शकते.४) महत्वाची बाब म्हणजे हे कर्ज बुलियन प्रकारच्या सोने चांदीवर मिळणार नाही अथवा प्राथमिक प्रकारच्या फ्युचर अथवा बिस्किटे, इनगोट, उच्चतम शुद्धता असलेले फ्युचर कमोडिटी असलेले सोने चांदी यावर हे कर्ज मिळणार नाही किंबहुना हे केवळ ज्वेलरी अथवा नाण्यांवर मिळू शकते.५) ईटीएफ किंवा डिजिटल चांदी गुंतवणूकीवरही हे कर्ज मिळणार नाही.६) आधीच गहाण ठेवलेल्या सोन्याचांदीवर पुन्हा कर्ज मिळणार नाही.७) बँकेच्या नियमानुसार, कर्जाची मुदत कमाल १२ महिना असेल.८) सोने पाहता १ किलो चांदी पाहता १० किलो मूल्यांकन असलेल्या तारणावर कर्ज मिळू शकते.९) नाणी प्रकार असल्यास जास्तीत जास्त ५० ग्रॅम तर चांदी असल्यास जास्तीत जास्त ५०० ग्रॅम१०) संबंधित सोने किंव चांदीची किंमत ठरवताना ३० दिवसांची सरासरी क्लोजिंग किंमत, अथवा बुलियन असोसिएशन (IBJA) अथवा सेबी आरबीआय अशा नियामकांनी ठरवल्या अशा किंमतीपैकी आदल्या दिवशी जाहीर झालेल्या क्लोजिंग किंमतीपैकी जी किमान किंमत असेल अश्या किंमतीवर हे मूल्यांकन केले जाणार आहे.११) जर वेळेवर कर्ज न फेडल्यास त्या दागिन्यांचा लिलाव होणार अर्थात प्रथम नोटीस मिळेल तरीही दिलेल्या मुदतीत अथवा नोटीस दिल्यानंतरही समाधानकारक वेळात न कर्ज भरल्यास दागिने जप्त करून लिलाव केला जाऊ शकतो.१२) बँकेला कर्ज फेडल्यानंतर वेळेवर दागिने बँकेला बंधनकारक असेल. त्यामध्ये जर उशीर झाला तर कर्जदार किंवा कर्जदाराच्या वारशाला प्रतिदिनी ५००० रूपये नुकसानभरपाई देणे बंधनकारक असेल. ७ दिवसांच्या आत दागिने अथवा तारण परत करणे बंधनकारक असेल.१३) नवीन नियमावलीनुसार सर्व व्यावसायिक बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँका चांदीवर कर्ज देऊ शकतील.१४) शहरी आणि ग्रामीण सहकारी बँकाही चांदीवर कर्ज देऊ शकतील. अगदी ही सुविधा विना बँकिंग वित्तीय संस्था (NBFCs) आणि हाउसिंग फायनान्स कंपन्यांनाही देण्यात ही मुभा देण्यात आली आहे.याविषयी तज्ञांनी काय म्हटले?तज्ञांच्या मते ही या निर्णयाची वेळही महत्वाची आहे. चांदीच्या किमतींमध्ये अलीकडे मोठी वाढ झाली असताना केवळ दागिन्यांच्या मागणीमुळेच नाही, तर उद्योगांनाही चांदीची गरज असल्यामुळे आणि गेल्या वर्षी रशियाने प्रथमच आपल्या सरकारी राखीव निधीमध्ये चांदीचा समावेश करण्याची योजना असल्याचे सांगितल्यामुळेही ही वाढ आणखी होत आहे. याशिवाय रशिया युक्रेन संघर्ष व अमेरिकेतील अस्थिरता यांचाही परिणाम चांदीच्या किंमतीत झाला. परिणामी,गेल्या सहा महिन्यांत चांदीच्या किमतीत जवळपास ३९% वाढ झाली आहे. सोन्याच्या तुलनेत १८% वाढीच्या दुप्पटपेक्षाही चांदीची वाढ जास्त असून या भाववाढीनंतरही तज्ञांच्या मते ही चांदी अजूनही 'गरिबांचे सोने' म्हणून मानली जाते. भारताचा विचार केल्यास नेमके याच कारणामुळे आरबीआयला बँकांना ताळेबंदी सुधारण्यासाठी चांदीच्या आधारावर आपल्या कर्जपुस्तकात सुधारणा करावयाची आहे. मात्र तज्ञांनी म्हटल्याप्रमाणे जर चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाल्यास परिस्थिती खूप लवकर बिघडू शकते. त्यामुळे ही ग्राहकांच्या बाजूने पाहिल्यास निश्चित जोखीम असली तरी हे प्रमाण म्हणजे एक प्रकारचे जोखीम संरक्षणही आहे.आज भारतात असाही एक मोठी वर्ग आहे ज्यांच्याकडे सोने नाही. त्या लाखो लोकांकडे सोने नसून फक्त चांदी आहे त्यामुळे त्यांना आता कर्जाची सोय उपलब्ध होणार आहे. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या २०१९ च्या सर्वेक्षणानुसार, ६०% भारतीय महिलांकडे सोन्याचे दागिने होते, तर जवळपास ५७% महिलांकडे चांदीचे दागिने होते. ही तफावत अगदी कमी आहे आणि याचा अर्थ असाही होतो की,देशभरातील घरांमध्ये चांदी पडून आहे अथवा ती निष्क्रिय आहे आणि अथवा उत्पादकता असलेली नाही. त्यातून काहीही उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे बँक व ग्राहक दोघांनाही सम्यक दृष्टीने फायदा होण्यासाठी आरबीआयने हा निर्णय घेतला होता.निश्चितच तुमच्या मनात प्रश्न असेल चांदीच्या दरात काय भविष्यात काय होईल ?त्यावेळी प्रहारला प्रतिक्रिया देताना ज्येष्ठ बाजार व फायनान्स विश्लेषक अजित भिडे म्हणाले आहेत की,'अमेरिकेची अर्थव्यवस्था ही जगात होणारी नियमित युद्ध आणि डाॅलरवर अवलंबून आहे. परंतु ब्रिक्स चे सदस्य देश अमेरीकन डाॅलरला पर्यायी चलन बाजारात आणण्याची तयारीत आहे. त्यामुळेच अमेरिका भरवसा असलेला सोन्याचांदीवर भर देत आहेत परत एकदा सोनं जमा करण्याची जोरदार स्पर्धा अमेरीके सह जगात सुरूआहे. आज अमेरिकेला डाॅलर पुढील काळात कमजोर होण्याची भिती वाटत आहे .म्हणून मागील काही वर्ष अमेरिका जोरदार सोनं खरेदी करत आहे.चीनही यात मागे नाही. पुढील काही काळात सोनं चांदी ही मोठी देशांची तिजोरी व मोठे चलनापेक्षाही मोठे हत्यारांपेक्षा जास्त महत्व मिळणार आहे.या सर्वाचा परिणाम म्हणुन मागील दोन वर्षांत सोने व चांदी याला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त होईल. आज अमेरिकेत ८२०० टन सोन जर्मनीत ४००० टन इटली २४०० टनभारत ९००/१००० टन सोने इतकं सोनं व त्याच प्रमाणात चांदी ही जमवली आहे. त्याच मुले आरबीआय चांदीवर ही कर्ज मिळवून देणार आहे. या दोन्ही धातूच्या किमती चढ्या रहाणार हे निश्चित आहे.'त्यामुळे निश्चितच चांदी तारण कर्जाला भविष्यात दिसते दरम्यान जोखीम कायम असताना व कर्ज घेताना सगळ्या तरतूदी व नियमावली यांचा अभ्यास करूनच योग्य निर्णय गुंतवणूकदारांनी घ्यावा हे फार महत्वाचे आहे.
२९ महापालिकांच्या निवडणुकीत तब्बल ३३ हजार ६०६ अर्ज
एका जागेसाठी सरासरी १२ उमेदवार रिंगणात; पुण्यात सर्वाधिक चुरस, मुंबईत अडीच हजार उमेदवारमुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन प्रक्रिया पूर्ण झाली असून, ८९३ प्रभागांमधील २ हजार ८६९ जागांसाठी तब्बल ३३ हजार ६०६ अर्ज दाखल झाले आहेत. राज्य निवडणूक आयोगाकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रत्येक जागेवर सरासरी ११.७१ उमेदवार रिंगणात आहेत.या निवडणुकीत सर्वाधिक चुरस पुणे महानगरपालिकेत दिसून येत आहे. पुण्यात ४१ प्रभागांमधील १६५ जागांसाठी ३ हजार १७९ अर्ज दाखल झाले असून, प्रति जागा सरासरी १९.२७ उमेदवार रिंगणात आहेत. पुण्याच्या जवळपास नाशिक महानगरपालिकेतही तीव्र स्पर्धा आहे. नाशिकमध्ये २ हजार ३५६ अर्ज प्राप्त झाले असून, प्रति जागा सरासरी १९.३१ उमेदवार मैदानात आहेत. त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगरमध्ये १ हजार ८७० अर्ज दाखल झाले असून, एका जागेवर सरासरी १६.२६ उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. जालना महानगरपालिकेत एका सर्वाधिक स्पर्धा दिसून येते आहे. येथे ६५ जागांसाठी १ हजार २६० अर्ज आले असून, प्रति प्रभाग अर्जाचे प्रमाण सरासरी १९.३८ उमेदवार इतके आहे.दुसरीकडे, काही महानगरपालिकांमध्ये स्पर्धा तुलनेने कमी आहे. पनवेल महानगरपालिकेत ७८ जागांसाठी केवळ ३९१ अर्ज प्राप्त झाले असून, प्रति जागा सरासरी केवळ ५.०१ उमेदवार रिंगणात आहेत. इचलकरंजी (४५६ अर्ज) आणि मिरा-भाईंदर (६३२ अर्ज) येथेही कमी उमेदवार मैदानात आहेत.मुंबईत काय स्थिती?मुंबईतील २२७ जागांसाठी २ हजार ५१६ अर्ज दाखल झाले आहेत. यातील तब्बल २ हजार १२२ अर्ज शेवटच्या दिवशी (३० डिसेंबर २०२५) दाखल झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. पक्षांतर्गत जागावाटपाच्या चर्चा शेवटपर्यंत सुरू होत्या, त्यामुळे अखेरच्या दिवशी उमेदवारांची मोठी गर्दी झाली होती. येथे प्रत्येक प्रभागात सरासरी ११ उमेदवार रिंगणात आहेत.कुठे किती अर्ज?- पुणे : ३,१७९ (सर्वाधिक)- मुंबई : २,५१६- नाशिक : २,३५६- पिंपरी-चिंचवड : १,९९३- छत्रपती संभाजीनगर : १,८७०- पनवेल : ३९१ (सर्वात कमी)२ जानेवारीला चित्र स्पष्ट होणारनिवडणूक कार्यक्रमानुसार, अर्ज माघारीची अंतिम मुदत २ जानेवारी २०२६ पर्यंत आहे. त्यामुळे बंडखोरी केलेले किती जण अर्ज माघारी घेतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. बंडोबांना थंड करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कोअर टीम कामाला लागली असून, प्रमुख महानगरपालिकांमध्ये समविचारी उमेदवारांमध्ये कमीत कमी लढत व्हावी, यादृष्टीने प्रयत्न केले जात आहेत.
Silver Price Crash: वर्ष २०२५ मध्ये सोन्या-चांदीच्या दराने गाठलेल्या विक्रमी उच्चांकाला आज वर्षाच्या अखेरच्या दिवशी मोठा ब्रेक लागला आहे. वर्षभर बाजारपेठेत राहिलेल्या जबरदस्त तेजीनंतर, आज ३१ डिसेंबर रोजी सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी नफावसुली (Profit Booking) पाहायला मिळाली. यामध्ये चांदीच्या किमतीत सर्वाधिक मोठी घसरण झाली असून सोन्याच्या दरातही काहीशी नरमी दिसून आली आहे. वायदा बाजारात मार्च २०२६ […] The post Silver Price Crash: वर्षाच्या शेवटच्या दिवशी चांदीच्या किमतीत 19000 रुपयांची मोठी घसरण, गुंतवणूकदारांना धक्का appeared first on Dainik Prabhat .
मुंबई : मुंबई महापालिकेसाठी ठाकरे बंधू यांची युती झाली आहे. महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी हे दोन्ही बंधू एकत्र सभा घेणार आहेत. महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाले असून कोण कोणाविरुद्ध लढणार आहे, हे चित्र स्पष्ट होऊ लागले आहे. आता ठाकरे बंधूंनीही जय्यत तयारी केली आहे. ठाकरे बंधूंची संयुक्त सभा ते वचननामा याचा संपूर्ण कार्यक्रम तयार झाला […] The post Thackeray Brothers : ठाकरे बंधू उडवणार प्रचाराचा धुरळा! मुंबई, पुण्यासह ‘या’ 6 ठिकाणी होणार संयुक्त सभा appeared first on Dainik Prabhat .
Ruturaj Gaikwad : कॅप्टन्सी इनिंग! ऋतुराजच्या शतकाने उत्तराखंडला नमवलं; महाराष्ट्राचा दिमाखदार विजय
Ruturaj Gaikwad Century in Vijay Hazare Trophy : विजय हजारे ट्रॉफी २०२५-२६ च्या रोमांचक सामन्यात महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने झंझावाती शतक झळकावत संघाला शानदार विजय मिळवून दिला. जयपूरमध्ये झालेल्या या सामन्यात उत्तराखंडविरुद्ध फलंदाजी करताना महाराष्ट्राची अवस्था एकवेळ ३ बाद ५० अशी बिकट झाली होती. मात्र, चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या ऋतुराजने खिंड लढवत संघाचा डाव सावरला. […] The post Ruturaj Gaikwad : कॅप्टन्सी इनिंग! ऋतुराजच्या शतकाने उत्तराखंडला नमवलं; महाराष्ट्राचा दिमाखदार विजय appeared first on Dainik Prabhat .
बिनविरोध विजय हा विश्वासाचा संदेश.! निवडणुकीपूर्वीच भाजपच्या तीन महिला बिनविरोध, CM फडणवीस म्हणाले….
Devendra fadnavis – ठाणे जिल्ह्यातील कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मतदानहोण्यापूर्वीच भाजपच्या दोन महिला उमेदवारांनी बिनविरोध विजय मिळवला आहे. दोन दशकांहून अधिक काळ नगरसेविका असलेल्या रेखा चौधरी आणि आसावरी केदार नवरे यांना अनुक्रमे प्रभाग क्रमांक १८ (कचोरे) आणि सावरकर रोड परिसर समाविष्ट असलेल्या प्रभाग क्रमांक २६(अ) मधून बिनविरोध विजयी घोषित करण्यात आले. आता, या महापालिकेत तिसरा […] The post बिनविरोध विजय हा विश्वासाचा संदेश.! निवडणुकीपूर्वीच भाजपच्या तीन महिला बिनविरोध, CM फडणवीस म्हणाले…. appeared first on Dainik Prabhat .
Happy New Year 2026: जगभरात वर्ष २०२६ चे उत्साहात स्वागत करण्यात आले असून, न्यूझीलंड हा नवीन वर्षाचे स्वागत करणारा जगातील दुसरा देश ठरला आहे. ऑकलंडमधील प्रसिद्ध ‘स्काई टॉवर’वर ३,५०० पेक्षा अधिक शोभेच्या दारूची नयनरम्य आतिशबाजी करण्यात आली. हे विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी स्थानिक नागरिकांसह हजारो विदेशी पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. किरिबातीमध्ये सर्वप्रथम जल्लोष प्रशांत महासागरातील […] The post Happy New Year 2026: नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत; न्यूझीलंडमध्ये नयनरम्य आतिशबाजी, ‘हा’ देश ठरला पहिला appeared first on Dainik Prabhat .
Modi Government : मोदी सरकारचा महाराष्ट्रासाठी मोठा निर्णय; ‘या’महामार्गाला मिळाली मंजुरी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय आर्थिक व्यवहार मंत्रिमंडळ समितीने (CCEA) महाराष्ट्रातील नाशिक ते सोलापूर-अक्कलकोट या ६ पदरी अॅक्सेस-कंट्रोल्ड ग्रीनफिल्ड महामार्ग प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. हा ३७४ किलोमीटर लांबीचा महामार्ग सुमारे १९,१४२ कोटी रुपयांच्या खर्चाने बांधला जाणार असून, तो BOT (बिल्ड-ऑपरेट-ट्रान्सफर, टोल) पद्धतीने विकसित केला जाईल. हा प्रकल्प पीएम गतिशक्ती राष्ट्रीय मास्टर […] The post Modi Government : मोदी सरकारचा महाराष्ट्रासाठी मोठा निर्णय; ‘या’ महामार्गाला मिळाली मंजुरी appeared first on Dainik Prabhat .
मोठी बातमी! महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी सदानंद दाते यांची नियुक्ती; कोण आहेत ते जाणून घ्या…
DGP Sadanand Date: महाराष्ट्र सरकारने राज्य पोलीस दलाच्या सर्वोच्च पदी ज्येष्ठ आयपीएस अधिकारी आणि एनआयएचे माजी प्रमुख सदानंद दाते यांची नियुक्ती केली आहे. या संदर्भातील अधिकृत आदेश राज्य सरकारकडून जारी करण्यात आला असून विद्यमान पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांचा कार्यकाळ ३१ डिसेंबर रोजी संपत असल्याने त्यांच्या जागी आता दाते राज्याच्या पोलीस दलाची धुरा सांभाळतील. १९९० […] The post मोठी बातमी! महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी सदानंद दाते यांची नियुक्ती; कोण आहेत ते जाणून घ्या… appeared first on Dainik Prabhat .
मुंबईसह महानगरात महायुतीच्या सभांचा धडाका
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह देशभरातून स्टार प्रचारक येणारमुंबई : मिनी विधानसभा समजल्या जाणाऱ्या महापालिकांची निवडणूक ही भाजप-महायुतीसाठी प्रतिष्ठेची, तर ठाकरे बंधूंसाठी अस्तित्त्वाची लढाई आहे. त्यामुळे मुंबईसह राज्यातील प्रमुख महानगरपालिकांमध्ये महायुतीने विजय मिळवण्यासाठी आपली पूर्ण ताकद पणाला लावली आहे. याचाच भाग म्हणून ११, १२ आणि १३ जानेवारी या तीन दिवसांत मुंबई, नवी मुंबई, ठाणे, मिरा-भाईंदर या प्रमुख शहरांमध्ये महायुतीच्या जाहीर सभांचा धडाका पाहायला मिळणार आहे.या सभांना पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपच्या इतर राज्यांतील मुख्यमंत्री आणि स्टार प्रचारकांची उपस्थिती असणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी ११ जानेवारीला मुंबईत दाखल होणार असून, त्यांच्या हस्ते पद्म भूषण पुरस्कार प्राप्त आचार्य श्री रत्नसुंदरसुरीश्वरजी महाराज यांनी लिहिलेल्या ५००व्या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. या धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्ताने जैन मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न महायुतीकडून केला जाणार आहे.महानगरात प्रचाराचा मास्टरप्लानमहायुतीने मुंबई महानगरातील प्रचाराचा मास्टरप्लान तयार केला असून, उत्तर भारतीय मतदारांची संख्या लक्षात घेऊन विशेष रणनीती आखली आहे. यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह भोजपुरी अभिनेते मनोज तिवारी, रवी किशन, मैथिली ठाकूर, गायक निरहुआ यांसारख्या स्टार प्रचारकांची फौज मैदानात उतरवली जाणार आहे. या स्टार प्रचारकांना मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात पाचारण करण्यात येणार असून, उत्तर भारतीय मतदारसंघांमध्ये त्यांचा प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न आहे.मुख्यमंत्री फडणवीस १० दिवसांत ४० सभा घेणारमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आगामी १० दिवसांत तब्बल ४० ते ४५ प्रचार सभा घेणार आहेत. प्रत्येक महापालिकेसाठी वेगळे नियोजन करण्यात आले असून, मोठ्या महापालिकांमध्ये (मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, ठाणे, नवी मुंबई, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर) तीन ते चार सभांचे आयोजन केले जाणार आहे. छोट्या महापालिकांमध्ये प्रत्येकी एक सभा होईल. दिवसाला सरासरी ४ सभांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, यामुळे प्रचाराला प्रचंड वेग येणार आहे. यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही मुख्यमंत्र्यांनी मोठ्या प्रमाणात सभा घेतल्या होत्या आणि आता महापालिका निवडणुकांमध्येही तेच चित्र दिसणार आहे.
महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक बदलले; सदानंद दाते बनले नवे डीजीपी राज्य सरकारने वरिष्ठ आयपीएस अधिकारी आणि एनआयएचे (NIA) माजी प्रमुख सदानंद दाते यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी (DGP) नियुक्ती केली आहे. विद्यमान डीजीपी रश्मी शुक्ला यांचा कार्यकाळ ३१ डिसेंबर रोजी संपत असल्याने, सरकारने बुधवारी याबाबतचे अधिकृत आदेश जारी केले. १९९० च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले दाते यांनी […] The post महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक बदलले, तिसरे महायुद्ध ते चांदी 19000 रुपयांनी घसरली… वाचा आजच्या टाॅप 10 बातम्या appeared first on Dainik Prabhat .
Sarfaraz Khan : सर्फराझ खानचा विजय हजारे ट्रॉफीत शतकी धमाका! रोहित शर्माचा मोडला खास विक्रम
Sarfaraz Khan broke Rohit Sharma record : भारतीय क्रिकेटमधील देशांतर्गत स्पर्धेत (विजय हजारे ट्रॉफी) मुंबईच्या फलंदाजांनी गोव्याच्या गोलंदाजांची अक्षरशः पिसं काढली. सर्फराझ खान आणि त्याचा धाकटा भाऊ मुशीर खान या जोडीने मैदानावर चौफेर फटकेबाजी करत मुंबईला ४४४ धावांचा डोंगर उभा करून दिला. या खेळीदरम्यान सर्फराझने भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माचा एक खास विक्रमही आपल्या नावे […] The post Sarfaraz Khan : सर्फराझ खानचा विजय हजारे ट्रॉफीत शतकी धमाका! रोहित शर्माचा मोडला खास विक्रम appeared first on Dainik Prabhat .
ठाकरे गटाच्या ३५ उमेदवारांचे अर्ज धोक्यात, भाजपचा स्कॅन सह्यांवर आक्षेप
जळगाव : जळगाव महापालिका निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात ठाकरे गट आणि भाजप-शिंदे गट यांच्यात कायदेशीर संघर्ष तीव्र झाला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या तब्बल ३५ उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता निर्माण झाली असून, भाजपने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे जोरदार आक्षेप नोंदवला आहे.भाजपचा दावा आहे की ठाकरे गटाच्या ३५ उमेदवारांनी उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या एबी फॉर्मवर मूळ सही नसून स्कॅन केलेली सही वापरण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार एबी फॉर्मवर पक्षाच्या अधिकृत स्वाक्षरी कर्त्याची मूळ सही आवश्यक असून, स्कॅन किंवा फोटोकॉपी केलेली सही वैध धरली जात नाही.भाजपचे उमेदवार अरविंद देशमुख यांच्यासह इतर उमेदवारांनी हा आक्षेप घेतला असून, हे सर्व अर्ज तांत्रिक कारणावरून बाद करण्यात यावेत, अशी मागणी केली आहे. या वादात शिवसेना शिंदे गटानेही उडी घेत भाजपच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला आहे. नियम सर्व पक्षांसाठी समान असले पाहिजेत, असे म्हणत स्कॅन सही असलेले अर्ज फेटाळले जावेत, अशी भूमिका शिंदे गटाने मांडली आहे.दरम्यान , या आक्षेपांवर निवडणूक निर्णय अधिकारी काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ३१ डिसेंबर रोजी होणाऱ्या छाननीत या प्रकरणावर अंतिम शिक्का बसणार आहे. जर ठाकरे गटाचे अर्ज बाद झाले, तर जळगाव महापालिका निवडणुकीत त्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता असून भाजप-शिंदे गटासाठी मार्ग सुकर होऊ शकतो.
मोहित सोमण: आज सोन्याच्या दरात घसरण व चांदीच्या दरात बदल झालेला नाही. सोन्यातील अस्थिरता कायम असताना चांदीतही पराकोटीची अस्थिरता दिसून आली आहे. याचाच परिणाम म्हणून २९ डिसेंबरला सोने चांदी सर्वोच्च स्तरावर पोहोचले असताना परवा एका दिवसात सोन्याचांदीत मोठी घसरण झाली ज्यामध्ये प्रति किलो चांदी २१००० पेक्षा अधिक स्तरावर घसरली होती काल पुन्हा एकदा सोन्याचांदीत काल वाढ झाली असताना आज मात्र सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली असून चांदीचे दर भारतीय बाजारात 'जैसे थे' असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. 'गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात आज ९८ रूपये, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ९० रूपये, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ७३ रूपये घसरण झाली आहे. त्यामुळे प्रति ग्रॅम दर २४ कॅरेटसाठी १३५२२, २२ कॅरेटसाठी १२३९५, १८ कॅरेटसाठी १०१४२ रुपयांवर पोहोचले आहेत. प्रति तोळा दर पाहिल्यास २४ कॅरेटमागे ९८० रुपये, २२ कॅरेटसाठी ९०० रूपये, १८ कॅरेटसाठी ७३० रुपये घसरण झाली आहे. त्यामुळे प्रति तोळा दर २४ कॅरेटसाठी १३५२२० रूपये, २२ कॅरेटसाठी १२३९५० रूपये, १८ कॅरेटसाठी १०१४२० रूपयांवर पोहोचले आहेत.भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये (Mutli Commodity Exchange MCX) बाजारात सोन्याच्या दरात ०.९७% घसरण झाल्याने दरपातळी १३५३३६ रुपयांवर पोहोचली आहे. जागतिक स्तरावर सोन्याच्या गोल्ड फ्युचर निर्देशांकात संध्याकाळपर्यंत १.४७% घसरण झाली असून जागतिक मानक (World Standard) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या युएस गोल्ड स्पॉट दरात संध्याकाळपर्यंत ०.७१% घसरण झाल्याने प्रति डॉलर दरपातळी ४३११.७५ औंसवर गेली आहे. जागतिक स्तरावर सोन्याच्या निर्देशांकात ३.५३% घसरण झाल्याने सोने कालपासून १३४९४२ पातळीच्या आसपास व्यवहार करत आहे.एमसीएक्समध्ये एमसीएक्स सोन्याचा फेब्रुवारीचा वायदा (Futures) दर आज सत्राच्या सुरुवातीलाच ०.७७% घसरून १३५६१८ रुपये प्रति १० ग्रॅम झाला होता. त्यामुळे युएस व्याजदरातील कपातीच्या पुन्हा वाढलेल्या आशावादावर गोल्ड स्पॉट मागणीत कालपर्यंत झालेली घसरण आजही कायम राहिली आहे.विशेषतः युएस रशिया युक्रेन यांच्यातील मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत असल्याने काही काळ सोन्याचा पुरवठा अखंडित राहिला. आज पुरवठा मोठ्या प्रमाणात मागणीपेक्षा पुरेसा राहिल्याने किरकोळ किंमतीवर सोने घसरले आहे. आज युएस बाजारात १० वर्षाच्या यिल्डमध्ये वाढ झाल्याने बाजारातील व्याजदर कपातीवरील आशावाद वाढला. परिणामी आज डॉलरच्या पातळीत वाढ झाली.चांदीच्या दरातही आज स्थिरता!चांदीच्या दरातही तुफान पराकोटीची अस्थिरता असताना मात्र काहीशी स्थिरता आज चांदीला प्राप्त झाली आहे. 'गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, चांदीच्या प्रति ग्रॅम दरात व प्रति किलो दरात कुठलाही बदल झाला नसल्याने प्रति ग्रॅम दर २४० रुपयांवर कायम राहत प्रति किलो दर २४०००० रूपयांवर कायम आहे. कमोडिटी बाजारात तर सकाळच्या सत्रातील सुरूवातीच्या कलातच चांदी तब्बल ६ ते ७% कोसळली. उपलब्ध माहितीनुसार, चांदीच्या निर्देशांकात सकाळी ६% घसरण झाल्याने दरु२३५९५२ रूपयांवर पोहोचली होती. आज दिवसभरात चांदी ७२ डॉलर प्रति औंसवर पोहोचल्याने मोठ्या प्रमाणात चांदी घसरल्याचे पहायला मिळाले आहे.इयर टू डेट बेसिसवर चांदीने आतापर्यंत १५७% परतावा दिला आहे. २८ डिसेंबरला चांदी तब्बल ८३.९२ डॉलर प्रति औंसवर पोहोचली होती. संध्याकाळपर्यंत जागतिक पातळीवरील सिल्वर फ्युचर निर्देशांकात ७.९६% घसरण झाल्याने दरपातळी ७१.७० डॉलर प्रति औंसवर गेली आहे. युक्रेन रशिया यांच्यातील संबंध अनिश्चित असताना काही सकारात्मक घडामोडींमुळे घसरलेली चांदी आज वाढलेल्या यिल्ड व व्याजदरात कपात होण्याची शक्यता यामुळे पुन्हा घसरली. आज दिवसभरात चांदीच्या स्पॉट गुंतवणूकीसह ईपीएफ गुंतवणूकीत स्थिरता मिळाल्याने चांदीच्या किंमती नियंत्रित राहिल्या आहेत.अल्पावधीतील अस्थिरतेनंतरही चांदी सुमारे १८०% च्या अपवादात्मक वार्षिक रॅलीच्या मार्गावर आहे. १९७९ नंतरची ही चांदीची सर्वोच्च कामगिरी नोंदवली गेली आहे. वाढत्या मजबूत औद्योगिक मागणी, जागतिक पुरवठ्यातील सततची कमतरता, ईटीएफमधील सततचा निधी प्रवाह, मध्यवर्ती बँकांची खरेदी आणि अमेरिकेने केलेल्या तीन व्याजदर कपातीची पार्श्वभूमी यामुळे किमतींना आधार मिळत आहे आणि बाजारपेठा आर्थिक वर्ष २०२६ मध्ये पुढील आर्थिक शिथिलतेची शक्यता गृहीत धरत आहेत.
माजी एनआयए प्रमुख सदानंद दातेंची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती
मुंबई : माजी एनआयए प्रमुख सदानंद दाते यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाली आहे. ही नियुक्ती दोन वर्षांच्या कालावधीसाठी आहे. आवश्यकता भासल्यास या कालावधीत वाढ अथवा कपात करण्याचे सर्व अधिकार राज्य शासनाकडे आहेत. भारतीय पोलिस सेवेतील (आयपीएस) १९९० च्या बॅचचे अधिकारी असलेले सदानंद दाते शनिवार ३ जानेवारी २०२६ रोजी पदभार स्वीकारणार आहेत. विद्यमान पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याकडून ते सूत्रं स्वीकारतील. गृह मंत्रालयाने बुधवार ३१ डिसेंबर २०२५ रोजी जारी केलेल्या आदेशानुसार सदानंद दाते यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाली आहे. ही नियुक्ती दोन वर्षांच्या कालावधीसाठी आहे.मार्च २०२४ पर्यंत सदानंद दाते महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे (एटीएस) प्रमुख होते, त्यानंतर ते भारताच्या राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) नेतृत्व करण्यासाठी नवी दिल्लीला गेले. राज्य सरकारच्या विनंतीवरून त्यांना दोन आठवड्यांपूर्वी महाराष्ट्रात परत पाठवण्यात आले.कोण आहेत सदानंद वसंत दाते ?कसाबसह दहा पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईत हल्ला केला होता. यापैकी दोन दहशतवाद्यांशी दक्षिण मुंबईतील कामा रुग्णालयात थेट संघर्ष करणाऱ्या सदानंद दाते यांना राष्ट्रपतींनी शौर्य पुरस्कार देऊन गौरविले आहे. दातेंनीच पुढे जिवंत पकडलेल्या कसाब या दहशतवाद्याशी संबंधित प्रकरणाचा तपास केला होता. सदानंद दाते यांनी महाराष्ट्र एटीएस प्रमुख, मुंबई सहपोलीस आयुक्त (गुन्हे), केंद्रीय राखीव पोलिस दल (सीआरपीएफ), कायदा व न्या विभागाचे संयुक्त सचिव अशा वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सक्षमपणे हाताळल्या आहेत. त्यांनी महाराष्ट्राच्या फोर्स वन या कमांडो पथकाचेही नेतृत्व केले आहे.काही वर्षांपूर्वी बिहारच्या राहुल राजने मुंबईत प्रवाशांसह बेस्ट बसचे अपहरण केले होते. राज ठाकरेंना ठार मारायचे आहे त्यांच्या घरी बस घेऊन चला असे म्हणत या तरुणाने दहशत निर्माण केली होती. अखेर सर्व प्रवाशांच्या सुरक्षेसाठी चतुराईने परिस्थिती हाताळत सदानंद दाते यांनी राहुल राजला चकमकीत ठार केले होते. दातेंनी २६/११ च्या वेळी परिस्थिती योग्य प्रकारे हाताळली होती. त्यावेळी चकमकीत जखमी झालेल्या दातेंना नंतर राष्ट्रपतींनी शौर्य पदकाने गौरविले होते.दातेंनी हम्फ्रे फेलोशिप प्रोग्रॅम अंतर्गत मिनेसोटा विद्यापीठातून व्हाईट-कॉलर आणि संघटित गुन्हेगारी नियंत्रित करण्यासाठी उच्च शिक्षण घेतले होते. जर्मन फेडरल पोलिसांच्या विशेष युनिट GSG-9 (Grenzschutzgruppe-9) सोबतही त्यांचे विशेष प्रशिक्षण झाले आहे.
Rajasthan News : टोंकमध्ये 150 किलो अमोनियम नायट्रेट जप्त; राजस्थान पोलिसांची मोठी कारवाई
टोंक (राजस्थान) : अरवली प्रदेश आणि इतर भागात बेकायदेशीर खाणकामावर प्रभावीपणे कारवाई करण्यासाठी राजस्थान सरकारच्या मोठ्या मोहिमेच्या फक्त एक दिवस आधी, टोंक जिल्ह्यातील पोलिसांच्या जिल्हा विशेष पथकाने (डीएसटी) एक मोठी कारवाई केली आहे. बुंदीहून टोंकला वाहतूक करणाऱ्या कारमधून डीएसटीने मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त केली आहेत. टोंक-जयपूर राष्ट्रीय महामार्ग ५२ वर बरौनी पोलिस स्टेशन परिसरात नाकाबंदी […] The post Rajasthan News : टोंकमध्ये 150 किलो अमोनियम नायट्रेट जप्त; राजस्थान पोलिसांची मोठी कारवाई appeared first on Dainik Prabhat .
Election News : भाजपच्या बालेकिल्ल्यात नाराजी सत्र सुरूच; 40 पदाधिकाऱ्यांकडून राजीनामे
Election News – भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपुरमध्ये नाराजी सत्र सुरू असल्याचे चित्र आहे. पक्षातील 40 पेक्षा अधिक पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्याचे दिसत आहे. तर अनेकांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात अपक्ष उभे राहून बंडखोरीही केल्याचे दिसत आहे. नागपूर महानगरपालिकेसाठी सुनील अग्रवाल यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे प्रभाग 14 मधील सुमारे भाजपच्या 40 पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. तसेच, प्रभाग क्रमांक14 […] The post Election News : भाजपच्या बालेकिल्ल्यात नाराजी सत्र सुरूच; 40 पदाधिकाऱ्यांकडून राजीनामे appeared first on Dainik Prabhat .
जालना : जागावाटपावरून आठवडाभर चाललेल्या तीव्र वाटाघाटींनंतर जालना महानगरपालिका निवडणुकीपूर्वी महायुतीची आघाडी तुटल्याचे दिसत आहे. सत्ताधारी घटक पक्षांनी या ठिकाणी स्वतंत्रपणे लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भाजप, शिंदेसेना आणि राष्ट्रवादीने स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याने ही आघाडी संपुष्टात आल्याचे स्पष्ट झाले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने सोमवारी रात्री […] The post Election News : ‘या’ महापालिका निवडणुकीत महायुती तुटली; तिन्ही पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा घेतला निर्णय appeared first on Dainik Prabhat .
अयोध्येत रामलल्लाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त मोदींनी दिल्या शुभेच्छा
नवी दिल्ली : अयोध्येत रामलल्लाच्या अर्थात प्रभू रामाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनाच्या पावन प्रसंगी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना आणि जगभरातील भक्तांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान मोदी यांनी या वर्धापनदिनाचे वर्णन भारताच्या श्रद्धा आणि सांस्कृतिक वारशाचा एक दिव्य उत्सव असे केले. त्यांनी भारतातील आणि परदेशातील असंख्य भक्तांच्या वतीने भगवान श्री रामाच्या चरणी आदरपूर्वक वंदन केले आणि सर्व देशवासीयांना अनंत शुभेच्छा दिल्या.अयोध्या जी की पावन धरा पर आज रामलला की प्राण-प्रतिष्ठा की द्वितीय वर्षगांठ मनाई जा रही है। ये वर्षगांठ हमारी आस्था और संस्कारों का एक दिव्य उत्सव है। इस पावन-पुनीत अवसर पर देश-विदेश के सभी रामभक्तों की ओर से प्रभु श्री राम के चरणों में मेरा कोटि-कोटि नमन और वंदन! समस्त देशवासियों… pic.twitter.com/c1eY75MxDa— Narendra Modi (@narendramodi) December 31, 2025शतकानुशतके जुन्या संकल्पाच्या ऐतिहासिक पूर्ततेची आठवण करून देताना, पंतप्रधानांनी नमूद केले की, भगवान श्री रामाच्या कृपेने आणि आशीर्वादाने, पाच शतकांतील लाखो भक्तांची पवित्र आकांक्षा पूर्ण झाली आहे. रामलल्ला आता पुन्हा एकदा आपल्या भव्य निवासस्थानी विराजमान झाले आहेत. यावर्षी अयोध्या नगरी धर्मध्वज आणि रामलल्लाच्या प्रतिष्ठा द्वादशीच्या प्रतिष्ठेची साक्षीदार झाली आहे. गेल्या महिन्यात या धर्मध्वजाची प्रतिष्ठापना करण्याची संधी लाभणे आपले भाग्य असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. मेरी कामना है कि मर्यादा पुरुषोत्तम की प्रेरणा हर देशवासी के हृदय में सेवा, समर्पण और करुणा की भावना को और प्रगाढ़ करे, जो समृद्ध और आत्मनिर्भर भारत के निर्माण का सशक्त आधार भी बने।जय सियाराम!— Narendra Modi (@narendramodi) December 31, 2025मोदी यांनी पुढे अशी इच्छा व्यक्त केली की, मर्यादा पुरुषोत्तम श्री रामाची प्रेरणा प्रत्येक नागरिकाच्या हृदयात सेवा, समर्पण आणि करुणेची भावना अधिक दृढ करो. ही मूल्ये समृद्ध आणि आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी एक मजबूत पाया असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
BMC Election : बृहन्मुंबई महापालिकेसाठी 2500 हून अधिक दाखल; शेवटच्या दिवशी आले ‘एवढे’अर्ज
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी एकूण २,५१६ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. ज्यामध्ये अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल २,१२२ अर्ज दाखल करण्यात आले आहेत. या ठिकाणी २२७ प्रभागांसाठी निवडणुका होणार आहेत. शहरातील २३ निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाखल झालेल्या २,५१६ अर्जांपैकी गोवंडी, देवनार, चेंबूर, ट्रॉम्बे, मानखुर्द आणि अनिक यांसारख्या भागांचा समावेश असलेल्या प्रभागात सर्वाधिक १८३ […] The post BMC Election : बृहन्मुंबई महापालिकेसाठी 2500 हून अधिक दाखल; शेवटच्या दिवशी आले ‘एवढे’ अर्ज appeared first on Dainik Prabhat .
फूड डिलिव्हरी बॉय संपावर, थर्टी फर्स्टच्या घरगुती पार्ट्या संकटात ?
मुंबई : नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला झोमॅटो, स्विगी, ब्लिंकिट, झेप्टो आदी अॅपबेस्ड फूड ऑर्डर पूर्ण करणाऱ्या डिलिव्हरी पार्टनर्सनी देशव्यापी संपाची घोषणा केली आहे. या संपामुळे थर्टी फर्स्टच्या घरगुती पार्ट्या संकटात सापडल्या आहेत. फूड आणि क्विक कॉमर्स सेवांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. वर्षातील सर्वात व्यस्त दिवशी डिलिव्हरी सेवा विस्कळीत होऊ शकतात, असा इशारा कामगार संघटनांनी दिला आहे.फक्त १० मिनिटांच्या डिलिव्हरी मॉडेलमुळे सुरक्षिततेचा धोका वाढत असल्याचा आरोप करत गिग वर्कर्सनी संप पुकारला आहे. इंडियन फेडरेशन ऑफ अॅप-बेस्ड ट्रान्सपोर्ट वर्कर्सने सरकारकडे किमान मासिक उत्पन्न, विमा संरक्षण, कामाचे तास मर्यादित करणे आणि कामगार म्हणून कायदेशीर मान्यता अशा मागण्या केल्या आहेत. आपल्या मागण्यांसाठी डिलिव्हरी पार्टनर्सनी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाचे २५ डिसेंबर रोजी दिल्ली-एनसीआरमध्ये परिणाम दिसून आले. आता ३१ डिसेंबरलाही मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.दरम्यान, संपाचा परिणाम कमी करण्यासाठी झोमॅटो आणि स्विगीने डिलिव्हरी पार्टनर्ससाठी मोठ्या प्रमाणात इंसेंटिव जाहीर केली आहेत. झोमॅटोने पीक अवर्समध्ये प्रति ऑर्डर जादा मानधन आणि पेनल्टी माफीची घोषणा केली आहे. स्विगीने ३१ डिसेंबर आणि १ जानेवारीदरम्यान मेगा कमाई ऑफर देत पीक अवर्समध्ये अतिरिक्त बोनस देण्याचे आश्वासन दिले आहे. झेप्टोनेही पेमेंट स्ट्रक्चरमध्ये बदल करत डिलिव्हरी सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
मोहित सोमण: वाढत्या पुरवठ्याच्या चिंता,कमी होत असलेला भूराजकीय जोखीम प्रीमियम, मागणीचा कमकुवत दृष्टिकोन आणि सततची आर्थिक अनिश्चितता यामुळे २०२५ मध्ये कच्च्या तेलाच्या किमतींवर दबाव राहिला असल्याने परिणामी -१७% नकारात्मक परतावा मिळाला असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे. मोतीलाल ओसवालचे हेड ऑफ रिसर्च कमोडिटी नवनीत दमानी यांनी हे स्पष्ट केले आहे. परंतु तत्पूर्वी कमोडिटी बाजारातील क्रूड ऑइल क्षेत्रातील गुंतवणूकदारांसाठी संपूर्ण आर्थिक वर्ष अस्थिरतचे राहिले. संपूर्ण वर्ष कच्च्या तेलाच्या पुरवठ्यासाठी अस्थिर होते कारण प्रथमदर्शनी डॉलरच्या तुलनेत रुपयाची चलनवाढ झाली. त्यानंतर इस्त्राईल इराण युद्ध झाले ते संपतेच तो पर्यंत पुन्हा एकदा रेड सी प्रकरणामुळे कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला. कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर अस्वस्थताच नाही तर जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम झाला परिणाम सरासरी काढल्यास कच्च्या तेलाची किंमत जागतिक स्तरावर जवळपास ०.२४% वाढली आहे.असे असले तरी संपूर्ण वर्षात कच्च्या तेलाच्या किंमती जानेवारी महिन्यातील तुलनेत डिसेंबर महिन्यापर्यंत आकडेवारीनुसार २०.५५% घसरल्या आहेत. दुसरीकडे युएस डब्लूटीआय फ्युचर (Crude WTI Futures) निर्देशांकात वर्षभरात ८०.५९ म्हणजेच जवळपास ९० डॉलर प्रति बॅरेल ही सर्वोच्च पातळी नोंदवली होती तर सर्वात कमी पातळी ५४.९८ डॉलर प्रति औंसवर नोंदवली गेली. WTI Futures निर्देशांक पाहिल्यास संपूर्ण वर्षात तेलाच्या किमती १७.५१% घसरल्या आहेत. तर केवळ एक दिवसात कच्च्या तेलात २०% आज झाल्याने २०२० नंतर सर्वाधिक घसरण कच्च्या तेलाने आज नोंदवली आहे. आज WTI Futures ५७.८९ डॉलर प्रति बॅरेलवर नोंदवले गेले आहे. कोविड काळानंतर सर्वाधिक ही घसरण मानली जाते. दरम्यान ५ वर्षाच्या कालावधीचा विचार केल्यास जगभरातील कच्च्या तेलाच्या किमती १९.४७% उसळल्या आहेत. प्रामुख्याने कच्च्या तेलाच्या किंमती या मागणी पुरवठा व जागतिक घडामोडीवर अवलंबून असतात.असे असताना ब्रेंट फ्युचर निर्देशांकात बघितल्यास या निर्देशांकात आज ०.१८% वाढ झाली असून प्रति डॉलर दरपातळी ६१.४३ प्रति बॅरेलवर नोंदवली गेली आहे. एक दिवसात ही पातळी ०.१६% वाढली असली तरी गेल्या एक आठवड्यात ०.५८% हा निर्देशांक घसरला असून संपूर्ण वर्षभरात १७.६८% इयर टू डेट (YTD) घसरला आहे. गेल्या ५ वर्षात कच्चे तेल १८.६१% उसळले आहे. त्यामुळेच मोठ्या प्रमाणावर कच्च्या तेलाच्या निर्देशांकात चढउतार झाले हे स्पष्ट होते.याच पार्श्वभूमीवर संपूर्ण वर्षात कच्च्या तेलाच्या हालचालीत काय बदल झाले हे जाणून घेण्यासाठी मोतीलाल ओसवाल फायनांशियल सर्विसेसचे हेड ऑफ रिसर्च कमोडिटी नवनीत दमानी यांना प्रतिक्रिया दिली आहे. नेमके २०२५ हे वर्ष तेलासाठी कसे राहिले? यावर दमांनी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.त्यांनी मांडलेले वास्तविक महत्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत -१) वाढत्या पुरवठ्याच्या चिंता, कमी होत असलेला भूराजकीय जोखीम प्रीमियम, मागणीचा कमकुवत दृष्टिकोन आणि सततची आर्थिक अनिश्चितता यामुळे २०२५ मध्ये कच्च्या तेलाच्या किमतींवर दबाव राहिला असल्याने परिणामी -१७% नकारात्मक परतावा मिळाला आहे.२) ओपेक+ (OPEC) च्या शिस्तीवर, हिवाळ्यातील मागणीवर आणि रशिया व इराणवरील अमेरिकेच्या निर्बंधांवर आधारित तेजीच्या स्थितीसह कच्च्या तेलाने वर्षाची सुरुवात केली. त्यानंतर निर्बंध असूनही, रशियन निर्यात मोठ्या प्रमाणावर गैर-पारंपारिक टँकरद्वारे सुरू राहिली ज्यामुळे वाढत्या आर्थिक अनिश्चिततेच्या काळात तात्काळ पुरवठ्यातील व्यत्यय मर्यादित राहिले.३) ओपेक बाहेरील देशांकडून पुरवठ्यात वाढ होत असताना, अमेरिकेच्या निर्बंधांमुळे वाढणारे व्यापारी घर्षण आणि आर्थिक मंदीच्या चिंतेमुळे किमतींवर दबाव आला.३) ओपेकने आर्थिक वर्ष २०२५ च्या पूर्वार्धात आपली रणनीती बदलली, पूर्वीच्या कपातीची परतफेड वेगाने सुरू केली आणि किमतींच्या संरक्षणाऐवजी बाजारातील हिस्सा वाचवण्याकडे वाटचाल करण्याचे संकेत दिले.४) एप्रिल ते डिसेंबर या काळात ओपेकने पुरवठा वेगाने वाढवला, एप्रिलमध्ये +१३८ kb/d ने सुरुवात करून, वर्षाच्या मध्यापर्यंत दरमहा ४०० kb/d पेक्षा जास्त वाढ केली, ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये सुमारे ५५० kb/d च्या शिखरावर पोहोचली आणि वर्षाच्या अखेरीस +१३७ kb/d च्या स्थिर वाढीवर आली, ज्यामुळे एकूण वाढ जवळपास २.९ mb/d झाली.५) रशिया, इराण आणि व्हेनेझुएलामधील निर्बंधांखालील बॅरल्सचा पुरवठा सुरूच राहिला, ज्यामुळे समुद्रातील साठवलेल्या तेलाचे प्रमाण वाढले आणि व्यत्ययाच्या भीती कमी झाल्या.६) दुय्यम शुल्काच्या वाढत्या चिंतांमुळे रशियन कच्च्या तेलाचे खरेदीदार पर्यायी स्रोतांकडे वळल्याने तरंगता साठाही वाढला. यामुळे निर्बंधांखालील बॅरल्सच्या समुद्रातील साठ्यात वाढ झाली.७) वर्षभर साठ्यात सातत्याने वाढ झाली, ज्यात अलीकडच्या काळात कच्च्या तेलाच्या साठ्यापेक्षा उत्पादित वस्तूंच्या साठ्यात वेगाने वाढ झाली.८) मागणी अपेक्षेपेक्षा कमी राहिली, ती पूर्णपणे कोसळली नाही, परंतु नवीन पुरवठा शोषून घेण्यात अयशस्वी ठरली.चीनच्या मजबूत आयातीने कमकुवत वापराला झाकले, कारण कच्च्या तेलाचा वापर सामरिक आणि व्यावसायिक साठ्यासाठी वळवण्यात आला.९) इलेक्ट्रिक वाहनांचा वाढता वापर आणि जागतिक स्तरावर उत्पादन पीएमआय नाजूक राहिल्याने मागणीच्या दृष्टिकोनावर वारंवार दबाव आला.१०) पुरवठ्यातील व्यत्ययांमुळे (लिबिया, नायजेरिया, वणवे, देखभाल) केवळ काही काळासाठी किमतीत वाढ झाली, जी लवकरच नाहीशी झाली.११) मागणी कमी असल्याने भूराजकीय घटनांमुळे अस्थिरता निर्माण झाली, दिशा नाही; तथापि, अतिरिक्त पुरवठ्याची चिंता पार्श्वभूमीवर कायम राहिली.१२) युक्रेन-रशिया शांतता चर्चेच्या बातम्यांनी वेळोवेळी जोखीम प्रीमियम कमी केला, ज्यामुळे विक्रीला गती मिळाली; तथापि, ठोस कराराची प्रतीक्षा कधीही न संपणारी वाटत आहे.१३) अखेरीस, सवलतीच्या दरातील निर्बंधांखालील बॅरल्समुळे पुरवठा सुरूच राहिला, त्याच वेळी आर्थिक अनिश्चिततेने मागणीवरील विश्वास कमी केला. पुरवठा वाढत असताना आणि मागणी प्रतिसाद देऊ शकत नसल्यामुळे, कच्च्या तेलाच्या किमतींवर सतत दबाव राहिला.आर्थिक वर्ष २०२६ मध्ये काय? नवनीत दमानी यांचा Outlookआर्थिक वर्ष २०२६ मध्ये मागणी नव्हे, तर पुरवठा हाच प्रमुख चालक घटक असेल. मागणी वाढत आहे, परंतु प्रणालीमध्ये आधीच असलेल्या अतिरिक्त बॅरल्सना सामावून घेण्यासाठी ती पुरेशी वेगाने वाढत नाही.२०२५ च्या तुलनेत २०२६ मध्ये सरासरी किमती कमी राहण्याची शक्यता आहे. हे मागणीतील घसरणीमुळे नव्हे, तर सततचा अतिरिक्त पुरवठा आणि वाढलेल्या साठ्यांमुळे आहे.ओपेकने किंमत संरक्षणावरून बाजारातील वाटा जपण्याकडे लक्ष वळवले आहे.२०२५ मध्ये पुरवठ्याच्या आक्रमक पुनरागमनामुळे, मर्यादित अतिरिक्त क्षमतेमुळे, त्याची किंमत निश्चित करण्याची शक्ती कमकुवत झाली आहे.ओपेकबाहेरील देशांचा पुरवठा संरचनात्मकदृष्ट्या उच्च राहिला आहे, कारण विशेषतः अमेरिकेत, विक्रमी पातळीच्या जवळ स्थिर उत्पादन देखील पुरवठा संतुलित ठेवण्यासाठी पुरेसे आहे.चीन आता स्विंग ग्राहक म्हणून काम करत नाही कारण आयात वाढत्या प्रमाणात अंतिम वापराऐवजी साठवणुकीसाठी जात आहे, ज्यामुळे मागणीची लवचिकता कमी होत आहे.भूराजकीय धोके आता दिशा नव्हे, तर अस्थिरता निर्माण करत आहेत. जोपर्यंत व्यत्यय गंभीर आणि दीर्घकाळ टिकणारे नसतात, तोपर्यंत चांगला पुरवठा असलेल्या बाजारात किमतीतील वाढ लवकरच नाहीशी होते.२०२६ साठी मुख्य प्रश्न हा आहे की पुरवठ्याला प्रतिसाद देण्यासाठी किमती किती खाली याव्या लागतील. जोपर्यंत उत्पादन कमी केले जात नाही, तोपर्यंत घसरणीचा दबाव कायम राहील.जर पुरवठा शिस्त कमकुवत झाली किंवा मागणी अपेक्षेपेक्षा कमी राहिली, तर किमतींसाठी घसरणीचा धोका कायम आहे. स्थिरीकरण किंवा वाढीसाठी पुरवठ्यात स्पष्ट कपात, मजबूत मागणी किंवा ओपेकद्वारे निर्णायक कपातीची आवश्यकता असेल.जोपर्यंत एकूण जोखीम प्रीमियममध्ये लक्षणीय वाढ होत नाही, तोपर्यंत किमती एका विस्तृत मर्यादेत व्यवहार करत राहू शकतात, ज्यामुळे किमतींना चालना मिळेल.
कल्याण - डोंबिवलीत मतदानापूर्वीच कमळ फुललं: भाजपाची विजयाची हॅट्रिक
ठाणे : कल्याण-डोंबिवली महापालिकेची निवडणूक १५ जानेवारी रोजी होणार असली, तरी मतदानापूर्वीच भाजपाला मोठे यश मिळाले आहे. पॅनल क्रमांक २६ बी मधून भाजपच्या उमेदवार रंजना मितेश पेणकर या बिनविरोध निवडून आल्या असून, त्यामुळे शहरात भाजपाने विजयाची हॅट्रिक साधली आहे.रंजना पेणकर यांच्या विरोधातील अपक्ष उमेदवाराचा अर्ज छाननीदरम्यान बाद झाला. उद्धव ठाकरे गट आणि मनसे आघाडीनेही या पॅनलमध्ये उमेदवार न दिल्याने पेणकर यांचा विजय निश्चित झाला.कल्याण-डोंबिवलीत बिनविरोध निवडून येणाऱ्या पेणकर या तिसऱ्या भाजप उमेदवार ठरल्या आहेत. याआधी आसावरी केदार नवरे आणि रेखा चौधरी या देखील भाजपच्या उमेदवार बिनविरोध विजयी झाल्या आहेत. आसावरी नवरे यांनी पॅनल क्रमांक २६ (क) मधून खुल्या प्रवर्गातून विजय मिळवला, तर रेखा चौधरी या पॅनल क्रमांक १८ (अ) मधून निवडून आल्या. नवरे यांच्या विरोधात एकही अर्ज दाखल न झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली.कल्याण-डोंबिवली महापालिकेत एकूण १२२ जागा असून, यंदा सत्तारुढ भाजप-शिवसेना युती निवडणूक लढवत आहे. यामध्ये शिवसेना ६६ तर भाजप ५६ जागांवर निवडणुकीत उतरली आहे. महायुतीतून बाहेर पडलेला अजित पवार गट ४२ जागांवर स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहे.सत्तारुढ युतीसमोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आघाडीचे आव्हान आहे. या आघाडीत उबाठा गट ६८ तर मनसे ५४ जागांवर निवडणूक लढवत आहे. दरम्यान, सत्तारुढ आणि विरोधी आघाडीत बंडखोरीचे सावट दिसत असून, नाराज उमेदवारांची मनधरणी सुरू आहे. अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत संपल्यानंतरच सर्व प्रभागांतील चित्र स्पष्ट होणार असून, त्यानंतर प्रचाराला खऱ्या अर्थाने गती मिळणार आहे.
स्वच्छ शहर इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मृत्यू, प्रशासनावर गंभीर आरोप
इंदूर : देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. सांडपाणी मिसळलेले पाणी प्यायल्याने नागरिकांचा मृत्यू झाला आहे. भागीरथपुरा परिसरात पाणीपुरवठ्याच्या जलवाहिनीत सांडपाणी मिसळल्यामुळे चार नागरिकांचा मृत्यू झाला असून १४९ जणांना रुग्णालयात दाखल केले आहे.जलवाहिनीत गळती झाली. गळतीमुळे शौचालयाचे सांडपाणी आणि पिण्याचे पाणी एकत्र झाल्यामुळे मोठे संकट निर्माण झाले. या प्रकरणी इंदूरचे आयुक्त आणि महापौर यांनी चौकशीचे आदेश दिलेनव्या जलवाहिनीला मंजुरी दिली असूनही कामाने अपेक्षेप्रमाणे गती घेतलेली नाही. आता सांडपाणी आणि पिण्याचे पाणी एकमेकांत मिसळण्याचा प्रकार घडला आहे. या घटनेचे राजकीय पडसाद उमटले आहेत. काँग्रेसने याला प्रशासनाचा गंभीर निष्काळजीपणा ठरवत महापौर आणि आयुक्तांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे.
मोहित सोमण: वर्षाच्या अखेरच्या दिवशी अखेरच्या सत्रात शेअर बाजाराने वाढ नोंदवली आहे. सेन्सेक्स ५४५.५२ अंकांने उसळत ८५२२०.६० पातळीवर स्थिरावला असून निफ्टी १९०.७५ अंकांने उसळत २६१२९ पातळीवर स्थिरावला आहे. तज्ञांच्या अंदाजानुसार ही पातळी राखण्यास बाजाराला यश आले असताना विशेष उल्लेख म्हणजे सुरूवातीच्या संथ तेजीनंतर बँक निर्देशांकाने अखेरीस अधिक उसळी घेतल्याने बाजारात अधिक रॅली झाली. सपोर्ट लेवल कायम राखताना आयटी वगळता इतर निर्देशांकात वाढ झाली आहे. सर्वाधिक वाढ दिवसभरात मेटल, मिडिया, पीएसयु बँक ळ कंज्यूमर ड्युरेबल्स, ऑटो शेअर्समध्ये झाल्याने बाजारातील सकारात्मकता अधोरेखित झाली आहे. २५ डिसेंबरनंतर व तत्पूर्वी बाजारात किरकोळ घसरण झाल्याने घरगुती रिटेल गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास कमी झाला होता. त्यामुळे गंभीर जागतिक अस्थिरतेत परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी आपला निधी काढून घेतल्याने भारतीय गुंतवणूकदारांनी कमोडिटी बाजारासह शेअर बाजारात मोठे नफा बुकिंग केले होते. आजही कच्च्या तेलाच्या निर्देशांकासह सोने चांदी मर्यादेत राहिल्याने परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक टिकवून घेतल्याची शक्यता असताना घरगुती गुंतवणूकदारांनी आपल्या पोर्टफोलिओतील खरेदीत वाढ केली आहे. इयर ऐंड व्हॉल्यूम मध्ये वाढ झाल्याने बाजारात निर्देशांक उसळला गेला.व्यापक निर्देशांकातील स्मॉलकॅप १००, मिडकॅप १००, निफ्टी ५००, स्मॉलकॅप ५० या निर्देशांकात मोठी वाढ झाली असून विशेषतः १% पेक्षा कमी पातळीवर सुरू असलेला अस्थिरता निर्देशांक अखेरच्या सत्रात २.०९% कोसळल्याने निश्चितच तांत्रिकदृष्ट्या बाजारात फायदा झाला आहे. त्यामुळे सलग चार सत्रातील घसरणीनंतर आज बाजारात तेजी नोंदवली गेल्याने बाजारात पुन्हा एकदा उत्सुकता निर्माण झाली आहे.आशियाई बाजाराचा विचार केल्यास चीनच्या उत्पादन निर्देशांकात मोठी वाढ झाल्याचा अधिकचा फायदा बाजारात झाला. युएस बाजारातील वाढलेल्या १० वर्षाच्या यिल्डमध्ये किंचित वाढ झालेली असताना युएस बाजारातील व्यापक निर्देशांकातही वाढ झाल्याने व युएसकडून रशिया आणि युक्रेन यांच्यातील तोडगा निघू शकतो अशी वातावरणनिर्मिती झाल्याने शेअर बाजारातील उत्सुकता कायम राहिली आहे. वर्षाच्या अखेरीस युएससह आशियाई शेअर बाजारात गुंतवणूकदारांनी मोठा उत्साह नोंदवल्याचे बाजारात दिसून आले. अखेरच्या सत्रात आशियाई बाजारातील संमिश्रित कल कायम असताना युएस बाजारातील सुरूवातीच्या कलात मात्र तिन्ही बाजारात पुन्हा एकदा घसरण दिसत आहे.अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ ग्राफाईट इंडिया (९.१९%), क्राफ्ट्समन ऑटो (७.४६%), एमआरपीएल (७.२४%), एचएफसीएल (६.७६%), एचपीसीएल (६.४६%), गुजरात गॅस (५.३०%) समभागात सर्वाधिक वाढ झाली असून सर्वाधिक घसरण वोडाफोन आयडिया (१०.७८%), नवीन फ्ल्युरोटेक (३.५३%), आदित्य एएमसी (२.८४%), हिन्दुस्तान कॉपर (२.८२%), रेडिको खैतान (२.३०%), हिन्दुस्तान झिंक (२.०६%), स्विगी (१.९८%) समभागात झाली आहे.आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले आहेत की,' बाजारांनी २०२५ वर्षाचा शेवट दमदारपणे केला, ज्यात सर्वच क्षेत्रांमध्ये व्यापक सुधारणा दिसून आली. पुढे पाहता, मागणीच्या परिस्थितीत सुधारणा झाल्यामुळे, २०२६ मध्ये सकारात्मक तेजी येण्याची अपेक्षा वाढत आहे. गुंतवणूकदारांची भावना कॉर्पोरेट नफा आणि नाममात्र सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) वाढीतील संभाव्य वाढीवर अवलंबून राहण्याची शक्यता आहे. सरकारने पोलाद उत्पादनांवर आयात शुल्क जाहीर केल्यानंतर आज धातूंच्या शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ झाली. दरम्यान, स्थिर मागणीच्या अपेक्षेने आणि मजबूत रिफायनिंग मार्जिनमुळे तेल आणि वायू क्षेत्राने उत्कृष्ट कामगिरी केली.'
मुंबईत मुस्लिमांचा जन्मदर २.६ टक्के; लवकरच त्यांची लोकसंख्या ३० टक्क्यांपर्यंत वाढणार
किरीट सोमय्यांचा दावा; मुंबईला मुस्लिम करण्याचा डाव सुरू असल्याचा आरोपमुंबई: मुंबईत हिंदूंचा जन्मदर १.३ टक्के तर मुस्लिमांचा जन्मदर २.६ टक्के म्हणजे दुप्पट आहे. त्यामुळे २०५० मध्ये हिंदू ५४ टक्क्यांखाली आणि मुस्लीम लोकसंख्या ३० टक्क्यांवर जाईल, असा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी बुधवारी केला. मुंबईला मुस्लिम करण्याचा डाव सुरू असून, मुंबईकर मतदार ते कदापी होऊ देणार नाही, असे सोमय्या म्हणाले.मुंबईतील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सोमय्या म्हणाले, मराठी मुंबई आता मुस्लीम मुंबई झाली आहे. हे किरीट सोमय्या किंवा अमित शाह नव्हे, तर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सचा रिपोर्ट सांगत आहे. २०५० मध्ये हिंदू ५४ टक्क्यांखाली आणि मुस्लीम ३० टक्क्यांच्या वर जाईल. मुंबईत हिंदूंचा जन्मदर १.३ टक्के तर मुस्लिमांचा जन्मदर २.६ टक्के म्हणजे दुप्पट आहे. उबाठाचा सहकारी एमआयएम पक्ष सांगतो, मुंबईचा महापौर खान, पठाण किंवा बुरखावाली असावी हे आमचे लक्ष्य आहे. ठाकरे बंधू यावर एक शब्द बोलत नाहीत. मुंबईत बांगलादेशींचे अतिक्रमण इतक्या मोठ्या संख्येने होत आहे, त्यावर चाकर शब्द काढत नाहीत. माफिया कंत्राटदारांकडून तुम्हाला पैसे मिळतात म्हणून 'मुस्लीम मुंबई' बनवण्याचं कटकारस्थान एमआयएम आणि ठाकरे बंधूकडून होत असेल. परंतु हे महायुती यशस्वी होऊ देणार नाही, असे त्यांनी सांगितले.आता मोठ्या ठाकरेंसोबत छोटे ठाकरे एकत्र आले आहेत. मराठी मुंबई म्हणायचे आणि मुस्लीम मुंबई करण्याच्या कारस्थानात सहभागी व्हायचे! माझ्याकडे जनगणनेचे आकडे आहेत. १९४७ मध्ये जेव्हा देशाचे विभाजन झाले तेव्हा मुंबईत मुस्लिमांची संख्या ८.८ टक्के होती आणि आता हाच आकडा २०११ साली २०.६८ टक्के इतका वाढला आहे. २०२५ मध्ये मुंबईत मुस्लीम लोकसंख्या २४.९८ टक्के आहे. त्या जीवावर उबाठाने लोकसभेला व्होट जिहाद केले. धारावीत त्यांनी २५ हजार मुस्लिमांचे नेतृत्व करत अनधिकृत मशिदीसाठी पुढाकार घेतला, असा आरोप सोमय्या यांनी केला.https://prahaar.in/2025/12/31/the-bjp-celebrated-with-colored-powder-in-kadompa-panvel-and-dhule/उबाठाने मुस्लिमांची शरणागती स्वीकारली
वर्षअखेरच्या कॅबिनेट बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दांडी
मुंबई : वर्ष २०२५ च्या अखेरच्या कॅबिनेट बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दांडी मारल्याने ते पुन्हा नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत. मात्र, ते आजारी असल्याने मंत्रिमंडळ बैठकीला येऊ शकते नाहीत, असे स्पष्टीकरण शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी दिले.राज्य मंत्रिमंडळाची बैठक बुधवारी सह्याद्री अतिथीगृहात पार पडली. या बैठकीत चिखलदरा येथील श्री. अंबादेवी संस्थानाला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची ३ एकर ८ आर जमीन देण्यास मंजुरी देण्यात आली. मात्र, या कॅबिनेटला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दांडी मारल्याची चर्चा सर्वाधिक रंगली. याविषयी मंत्रिमंडळ बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले, मी आधी खुलासा करतो, की कॅबिनेटला एकनाथ शिंदे हे तब्येत आणि वैयक्तिक कारणास्तव उपस्थित नव्हते.पुण्यातील महायुतीच्या जागावाटपाबाबतही त्यांनी भाष्य केले. सामंत म्हणाले, रवींद्र धंगेकर हे पक्षाची भूमिका मांडणारी व्यक्ती नाहीत, हे मी स्पष्टपणे सांगतो. ते आमचे महानगरप्रमुख आहेत. धंगेकर आणि नीलम गोऱ्हे यांच्याशी मी चर्चा केली आहे. पुण्यासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्याचे अधिकार मला देखील नाहीत. शिवसेनेच्या वतीने एकनाथ शिंदे भूमिका स्पष्ट करतील. मुंबईत १३७ आणि ९० जागा आम्ही लढत आहोत. आरपीआयला देखील जागा सोडलेल्या आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.कृपाशंकर सिंग यांच्या विधानावर दिली प्रतिक्रियाभाजप नेते कृपाशंकर सिंग यांनी मीरा-भाईंदरमध्ये उत्तर भारतीय समाजाचा महापौर होईल, असे विधान केल्याने चौफेर टीका होऊ लागली आहे. याविषयी विचारले असता उदय सामंत म्हणाले, कृपाशंकर महायुतीचं धोरण ठरवत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे धोरण ठरवतील, असे त्यांनी स्पष्ट केले.मंत्रिमंडळ बैठकीत काय निर्णय झाला? अमरावती जिल्ह्यातील मौजे चिखलदरा येथील श्री. अंबादेवी संस्थानाला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची ३ एकर ८ आर जमीन देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. चिखलदरा येथील सुमारे साडे सात एकर जमीन १९७५ मध्ये महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला पर्यटकांसाठी मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी देण्यात आली होती. पण ही जमीन वापराविना पडून होती. ही जमीन अंबादेवी संस्थानाला विनामुल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही जमीन मंदिर संस्थानाला भोगवटादार वर्ग – २ म्हणून मिळणार असून, जमीन केवळ धार्मिक प्रयोजनासाठी वापरता येणार आहे.
मुंबई महापालिकेची भारतीय जनता पार्टीची १३७ उमेदवारांची यादी
मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार मुंबई महापालिकेसाठी १५ जानेवारीला मतदान आणि १६ जानेवारीला मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठीच्या भाजपच्या उमेदवारांची यादी पुढीलप्रमाणे...
प्रतिनिधी: वर्षाच्या शेवटाला शेअर बाजार आला असताना अखेरच्या दिवशी मोतीलाल ओसवाल फायनांशियल सर्विसेस व मेहता इक्विटीचे रियांक अरोरा यांनी काही शेअर उत्तम परताव्यासाठी सुचवले आहेत. जाणून घेऊयात कुठले शेअर ठरणार परताव्यासाठी फायदेशीर -१) V Mart Retail- वी मार्ट रिटेल कंपनीच्या शेअरला मोतीलाल ओसवाल फायनांशियल सर्विसेसने बाय कॉल दिला असून ७१५ रूपये प्रति शेअर सर्वसामान्य खरेदी किंमत (Common Market Price CMP) सह सुचवली असून मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज मते, हा शेअर ४५% अपसाईड म्हणजेच संभाव्य वाढीसह अपेक्षित आहे. ब्रोकरेजने लक्ष्य किंमत (Target Price TP) ७१५ रूपये प्रति शेअर निश्चित केली आहे.२) Shriram Finance Limited- श्रीराम फायनान्स कंपनीच्या शेअरला ब्रोकरेजने बाय कॉल दिला असून ९७९ रूपये प्रति शेअरची सीएमपी दिली असून २०% अपसाईडसह ब्रोकरेजने ११८० रूपये प्रति शेअर लक्ष्य किंमत निश्चित केली आहे.३)KFin Technologies- केफिन टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअरला ब्रोकरेजने बाय कॉल दिला असून सीएमपी १०९२ रूपयाला निश्चित केली आहे. तसेच ब्रोकरेजला १०% अपसाईडला शेअर अपेक्षित असून ब्रोकरेजने लक्ष्य किंमत १२०० रूपये प्रति शेअर निश्चित केली आहे.४) VA Tech Wabag- वीए टेक वाबॅग कंपनीच्या शेअरला बाय कॉल दिला असून १२७१ रूपये प्रति शेअर सीएमपी निश्चित केली आहे. तसेच ब्रोकरेजने शेअर ४९% अपसाईड वाढ अपेक्षित केली असून लक्ष्य किंमत १९०० रूपये प्रति शेअर निश्चित केली आहे.मेहता इक्विटीचे आजचे स्टॉक्स पिक्स -५) NMDC- कंपनीच्या शेअरला मेहता इक्विटीजने बाय कॉल दिला असून कंपनीने सीएमपी ८३.४१ रूपये निश्चित केली आहे. तसेच ब्रोकरेजकडून ८८ ते ९२ रूपये प्रति शेअर लक्ष्य किंमत निश्चित करण्यात आली आहे. तसेच स्टॉप लॉस ८० रुपयांवर ठेवण्याचे सूचवले गेले आहे.६) Hero Motocorp- हिरो मोटोकॉर्प कंपनीच्या शेअरला ब्रोकरेजने बाय कॉल दिला असून सीएमपी ५७११ रूपये निश्चित करण्यात आली असून ५९०० ते ६०५० रूपये प्रति शेअर लक्ष्य किंमत निश्चित करण्यात आली आहे.
कडोमपा, पनवेल आणि धुळ्यात भाजपने उधळला गुलाल!
डोंबिवली: महाराष्ट्रातल्या २९ महानगरपालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान आणि १६ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. या महानगरपालिकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत मंगळवार ३० डिसेंबर रोजी संध्याकाळी संपली आहे. आता अर्जांची छाननी सुरू आहे. ही प्रक्रिया सुरू होण्याआधीच कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपने खातं उघडून दमदार सुरुवात केल्याची बातमी सकाळी मिळाली. पाठोपाठ भाजपने धुळ्यात आणि पनवेलमध्येसुद्धा खाते उघडले. धुळ्यात आणि पनवेलमध्ये भाजपचा प्रत्येकी एक उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे. त्यामुळे आतापर्यंत भारतीय जनता पार्टीचे अर्थात भाजपचे चार उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.आसावरी केदार नवरे यांनी पॅनल क्रमांक २६ (क) मधून खुल्या प्रवर्गातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या विरोधात एकही अर्ज न आल्याने त्यांची निवड बिनविरोध झाली आहे. तर रेखा चौधरी यांनी पॅनल क्रमांक १८ (अ) मधून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या विरोधात एकही अर्ज न आल्याने त्यांचीही निवड बिनविरोध झाली आहे. दरम्यान दुसरीकडे पनवेल महापालिकाच्या प्रभाग क्रमांक १८ (ब) मधून नितीन पाटील आणि धुळे महापालिकेतून उज्वला भोसले हे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.https://prahaar.in/2025/12/31/ban-on-visiting-these-forts-for-new-year-celebrations-forest-department-orders-issued/महत्त्वाचे म्हणजे, धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या अर्ज छाननी दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष असलेले रणजीत राजे भोसले यांनी काल तडकाफडकी पक्षाचा राजीनामा देत शेवटच्या क्षणी भाजपात प्रवेश केला. तसेच पत्नी उज्वला भोसले यांना भाजपाचे तिकीट मिळवून दिले. अर्ज छाननी दरम्यान त्यांच्या विरोधात असलेल्या चारही उमेदवारांचे नामांकन अर्ज बाद झाल्याने त्या बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे, धुळे मनपातील 'त्या' पहिल्याच नगरसेविका म्हणून बिनविरोध निवडून आल्या आहे. विशेष म्हणजे आदल्या दिवशी भाजप प्रवेश केला अन् दुसऱ्याच दिवशी नगरसेवक बनल्याचा वेगळाच रेकॉर्ड त्यांच्या नावावर तयार झाला आहे.महायुती म्हणून शिवसेना ६६ आणि भाजप ५६ जागांवर लढत आहे. अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस ४२ जागांवर स्वबळावर लढत आहे. मनसे आणि उबाठाने एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. मनसे ५४ तर उबाठा ६८ जागांवर निवडणूक लढवत आहे. जागावाटपाचा तिढा सुटला असला तरी सर्वच पक्षांसमोर कमी जास्त प्रमाणात बंडखोरांना शांत करण्याचे आव्हान आहे.
मुंबई महापालिकेची भारतीय जनता पार्टीची १३६ उमेदवारांची यादी
मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार मुंबई महापालिकेसाठी १५ जानेवारीला मतदान आणि १६ जानेवारीला मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठीच्या भाजपच्या उमेदवारांची यादी पुढीलप्रमाणे...1. वॉर्ड क्रमांक २ - तेजस्वी घोसाळकर2. वॉर्ड क्रमांक ३ - प्रकाश दरेकर3. वॉर्ड क्रमांक ७ - गणेश खणकर4. वॉर्ड क्रमांक ८ - योगिता पाटील5. वॉर्ड क्रमांक ९ - शिवानंद शेट्टी6. वॉर्ड क्रमांक १० - जितेंद्र पटेल7. वॉर्ड क्रमांक १३ - राणी त्रिवेदी8. वॉर्ड क्रमांक १४ - सीमा शिंदे9. वॉर्ड क्रमांक १५ - जिग्ना शाह10. वॉर्ड क्रमांक १६ - श्वेता कोरगावकर11. वॉर्ड क्रमांक १७ - शिल्पा सांगोरे12. वॉर्ड क्रमांक १९ - दक्षता कवठणकर13. वॉर्ड क्रमांक २० - बाळा तावडे14. वॉर्ड क्रमांक २१ - लीना देहरेकर15. वॉर्ड क्रमांक २२ - हेमांशू पारेख16. वॉर्ड क्रमांक २३ - शिवकुमार झा17. वॉर्ड क्रमांक २४ - स्वाती जैस्वाल18. वॉर्ड क्रमांक २५ - निशा परुळेकर19. वॉर्ड क्रमांक २६ - प्रीतम खंडागळे20. वॉर्ड क्रमांक २७ - नीलम गुरव21. वॉर्ड क्रमांक २९ - नितीन चौहान22. वॉर्ड क्रमांक ३० - धवल वोरा23. वॉर्ड क्रमांक ३१ - मनिषा यादव24. वॉर्ड क्रमांक ३३ - उज्वला वैती25. वॉर्ड क्रमांक ३४ - सॅम्युअल डेनीस (शिंदेंनी भरला नाही)26. वॉर्ड क्रमांक ३५ - योगेश वर्मा27. वॉर्ड क्रमांक ३६ - सिद्धार्थ शर्मा28. वॉर्ड क्रमांक ३७ - प्रतिभा शिंदे29. वॉर्ड क्रमांक ४० - संजय आव्हाड30. वॉर्ड क्रमांक ४३ - विनोद मिश्रा31. वॉर्ड क्रमांक ४४ - संगीता ज्ञानमुर्ती शर्मा32. वॉर्ड क्रमांक ४५ - संजय कांबळे33. वॉर्ड क्रमांक ४६ - योगिता कोळी34. वॉर्ड क्रमांक ४७ - तेजिंदर सिंह तिवाना35. वॉर्ड क्रमांक ४९ - सुमित्रा म्हात्रे36. वॉर्ड क्रमांक ५० - विक्रम राजपूत37. वॉर्ड क्रमांक ५२ - प्रीती सातम38. वॉर्ड क्रमांक ५४ - विप्लव अवसरे39. वॉर्ड क्रमांक ५५ - हर्ष पटेल40. वॉर्ड क्रमांक ५६ - राजूल समीर देसाई41. वॉर्ड क्रमांक ५७ - श्रीकला पिल्ले42. वॉर्ड क्रमांक ५८ - संदीप पटेल43. वॉर्ड क्रमांक ५९ - योगीराज दाभाडकर44. वॉर्ड क्रमांक ६० - सायली कुलकर्णी45. वॉर्ड क्रमांक ६३ - रुपेश सावरकर46. वॉर्ड क्रमांक ६४ - सरिता राजापुरे47. वॉर्ड क्रमांक ६५ - विठ्ठल बंदेरी48. वॉर्ड क्रमांक ६६ - आरती पांड्या49. वॉर्ड क्रमांक ६७ - दिपक कोतेकर50. वॉर्ड क्रमांक ६८ - रोहन राठोड51. वॉर्ड क्रमांक ६९ - सुधा सिंह52. वॉर्ड क्रमांक ७० - अनिष मकवानी53. वॉर्ड क्रमांक ७१ - सुनीता मेहता54. वॉर्ड क्रमांक ७२ - ममता यादव55. वॉर्ड क्रमांक ७४ - उज्ज्वला मोडक56. वॉर्ड क्रमांक ७५ - उमेश राणे57. वॉर्ड क्रमांक ७६ - प्रकाश मुसळे58. वॉर्ड क्रमांक ८० - दिशा यादव59. वॉर्ड क्रमांक ८१ - केसरबेन पटेल60. वॉर्ड क्रमांक ८२ - जगदिश्वरी अमिन61. वॉर्ड क्रमांक ८४ - अंजली सामंत62. वॉर्ड क्रमांक ८५ - मिलिंद शिंदे63. वॉर्ड क्रमांक ८७ - महेश पारकर64. वॉर्ड क्रमांक ८८ - प्रज्ञा सामंत65. वॉर्ड क्रमांक ९० - ज्योति उपाध्याय66. वॉर्ड क्रमांक ९५ - सुहास आडिवरेकर67. वॉर्ड क्रमांक ९७ - हेतल गाला68. वॉर्ड क्रमांक ९८ - अलका केरकर69. वॉर्ड क्रमांक ९९ - जितेंद्र राऊत70. वॉर्ड क्रमांक १०० - स्वप्ना म्हात्रे71. वॉर्ड क्रमांक १०१ - अनुश्री घोडके72. वॉर्ड क्रमांक १०२ - निलेश हंडगर73. वॉर्ड क्रमांक १०३ - हेतल गाला मोर्वेकर74. वॉर्ड क्रमांक १०४ - प्रकाश गंगाधरे75. वॉर्ड क्रमांक १०५ - अनिता वैती76. वॉर्ड क्रमांक १०६ - प्रभाकर शिंदे77. वॉर्ड क्रमांक १०७ - नील सोमय्या78. वॉर्ड क्रमांक १०८ - दिपिका घाग79. वॉर्ड क्रमांक ११० - जेनी शर्मा80. वॉर्ड क्रमांक १११ - सारिका पवार81. वॉर्ड क्रमांक ११२ - साक्षी पवार82. वॉर्ड क्रमांक ११५ - स्मिता परब83. वॉर्ड क्रमांक ११६ - जागृती पाटील84. वॉर्ड क्रमांक १२२ - चंदन शर्मा85. वॉर्ड क्रमांक १२३ - अनिल निर्मळे86. वॉर्ड क्रमांक १२६ - अर्चना भालेराव87. वॉर्ड क्रमांक १२७ - अलका भगत88. वॉर्ड क्रमांक १२९ - अश्विनी मते89. वॉर्ड क्रमांक १३० - धर्मेश गिरी90. वॉर्ड क्रमांक १३१ - राखी जाधव91. वॉर्ड क्रमांक १३२ - रितू तावडे92. वॉर्ड क्रमांक १३५ - नवनाथ बन93. वॉर्ड क्रमांक १४१ - श्रुतिका किशोर मोरे94. वॉर्ड क्रमांक १४४ - दिनेश उर्फ बबलू पांचाळ95. वॉर्ड क्रमांक १४९ - सुषम सावंत96. वॉर्ड क्रमांक १५० - वनिता कोकरे97. वॉर्ड क्रमांक १५१ - कशिश फुलवारिया98. वॉर्ड क्रमांक १५२ - आशा मराठे99. वॉर्ड क्रमांक १५४ - महादेव शिगवण100. वॉर्ड क्रमांक १५५ - वर्षा शेट्ये101. वॉर्ड क्रमांक १५७ - आशाताई तायडे102. वॉर्ड क्रमांक १५८ - आकांक्षा शेट्ये103. वॉर्ड क्रमांक १५९ - प्रकाश मोरे104. वॉर्ड क्रमांक १६४ - हरिष भांदिर्गे105. वॉर्ड क्रमांक १६५ - रुपेश पवार106. वॉर्ड क्रमांक १६८ - अनुराधा पेडणेकर107. वॉर्ड क्रमांक १७० - रणजिता दिवेकर108. वॉर्ड क्रमांक १७२ - राजश्री शिरवडकर109. वॉर्ड क्रमांक १७४ - साक्षी कनोजिया110. वॉर्ड क्रमांक १७६ - रेखा यादव111. वॉर्ड क्रमांक १७७ - कल्पेशा जेसल कोठारी112. वॉर्ड क्रमांक १८२ - राजन पारकर113. वॉर्ड क्रमांक १८५ - रवी राजा114. वॉर्ड क्रमांक १८६ - निला सोनावणे115. वॉर्ड क्रमांक १८९ - मंगला गायकवाड116. वॉर्ड क्रमांक १९० - शितल गंभीर देसाई117. वॉर्ड क्रमांक १९५ - राजेश कांगणे118. वॉर्ड क्रमांक १९६ - सोनाली सावंत119. वॉर्ड क्रमांक २०० - संदीप पानसांडे120. वॉर्ड क्रमांक २०२ - पार्थ बावकर121. वॉर्ड क्रमांक २०५ - वर्षा गणेश शिंदे122. वॉर्ड क्रमांक २०७ - रोहिदास लोखंडे123. वॉर्ड क्रमांक २१० - संतोष राणे124. वॉर्ड क्रमांक २१२ - मंदिकिनी खामकर (अर्ज वेळेत दाखल करता आला नाही)125. वॉर्ड क्रमांक २१४ - अजय पाटील126. वॉर्ड क्रमांक २१५ - संतोष ढोले127. वॉर्ड क्रमांक २१६ - गौरी नरवणकर128. वॉर्ड क्रमांक २१७ - गौरंग झवेरी129. वॉर्ड क्रमांक २१८ - स्नेहल तेंडुलकर130. वॉर्ड क्रमांक २१९ - सन्नी सानप131. वॉर्ड क्रमांक २२० - दिपाली कुलथे132. वॉर्ड क्रमांक २२१ - आकाश पुरोहित133. वॉर्ड क्रमांक २२२ - रिटा मकवाना134. वॉर्ड क्रमांक २२५ - हर्षिदा नार्वेकर135. वॉर्ड क्रमांक २२६ - मकरंद नार्वेकर
कडोंमपा, पनवेल आणि धुळ्यात भाजपने उधळला गुलाल!
डोंबिवली: महाराष्ट्रातल्या २९ महानगरपालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान आणि १६ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. या महानगरपालिकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत मंगळवार ३० डिसेंबर रोजी संध्याकाळी संपली आहे. आता अर्जांची छाननी सुरू आहे. ही प्रक्रिया सुरू असतानाच कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपने खातं उघडून दमदार सुरुवात केल्याची बातमी सकाळी मिळाली. पाठोपाठ भाजपने धुळ्यात आणि पनवेलमध्येसुद्धा खाते उघडले. धुळ्यात आणि पनवेलमध्ये भाजपचा प्रत्येकी एक उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे. त्यामुळे आतापर्यंत भारतीय जनता पार्टीचे अर्थात भाजपचे चार उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.आसावरी केदार नवरे यांनी पॅनल क्रमांक २६ (क) मधून खुल्या प्रवर्गातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या विरोधात एकही अर्ज न आल्याने त्यांची निवड बिनविरोध झाली आहे. तर रेखा चौधरी यांनी पॅनल क्रमांक १८ (अ) मधून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या विरोधात एकही अर्ज न आल्याने त्यांचीही निवड बिनविरोध झाली आहे. दरम्यान दुसरीकडे पनवेल महापालिकाच्या प्रभाग क्रमांक १८ (ब) मधून नितीन पाटील आणि धुळे महापालिकेतून उज्वला भोसले हे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.https://prahaar.in/2025/12/31/ban-on-visiting-these-forts-for-new-year-celebrations-forest-department-orders-issued/महत्त्वाचे म्हणजे, धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या अर्ज छाननी दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष असलेले रणजीत राजे भोसले यांनी काल तडकाफडकी पक्षाचा राजीनामा देत शेवटच्या क्षणी भाजपात प्रवेश केला. तसेच पत्नी उज्वला भोसले यांना भाजपाचे तिकीट मिळवून दिले. अर्ज छाननी दरम्यान त्यांच्या विरोधात असलेल्या चारही उमेदवारांचे नामांकन अर्ज बाद झाल्याने त्या बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे, धुळे मनपातील 'त्या' पहिल्याच नगरसेविका म्हणून बिनविरोध निवडून आल्या आहे. विशेष म्हणजे आदल्या दिवशी भाजप प्रवेश केला अन् दुसऱ्याच दिवशी नगरसेवक बनल्याचा वेगळाच रेकॉर्ड त्यांच्या नावावर तयार झाला आहे.महायुती म्हणून शिवसेना ६६ आणि भाजप ५६ जागांवर लढत आहे. अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस ४२ जागांवर स्वबळावर लढत आहे. मनसे आणि उबाठाने एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. मनसे ५४ तर उबाठा ६८ जागांवर निवडणूक लढवत आहे. जागावाटपाचा तिढा सुटला असला तरी सर्वच पक्षांसमोर कमी जास्त प्रमाणात बंडखोरांना शांत करण्याचे आव्हान आहे.
सरत्या वर्षाला द्या निरोप , प्रियजनांना द्या २०२६ नववर्षाच्या हटके शुभेच्छा!
आज संपूर्ण जगभरात मध्यरात्री सर्वजण सरत्या वर्षाला निरोप दिला जातो. २०२६ नवीन वर्षाचे स्वागत केले जाईल. सरत्या वर्षाला निरोप देत सर्वचजण धम्माल, मज्जा, मस्ती, खाणंपिणं, नाचत नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत करतात.तुमच्या सोबतच तुमच्या नातेवाईकांना , मित्र-मैत्रिणिंना या सर्वांमध्ये नवीन वर्षाच्या मराठमोळ्या, हटक्या शुभेच्छा, संदेत पाठवून नातं अधिकच घट्ट करू शकता.आपल्या सुखात आणि दुःखात सोबत असलेल्या मित्र-मैत्रिणींना, कुटुंबाला आणि नातेवाईकांना जेव्हा आपण मनापासून शुभेच्छा देतो, तेव्हा त्या नात्यांमधील ओलावा अधिक वाढतो.एक छोटासा शुभेच्छा संदेश सुद्धा कोणाच्या तरी चेहऱ्यावर हासू फुलवू शकतो आणि त्यांना आयुष्यातील नवीन आव्हाने पेलण्यासाठी बळ देऊ शकतो.नवीन वर्षाचे स्वागत करणे म्हणजे केवळ सेलिब्रेशन करणे नव्हे, तर आपल्या आयुष्यातील प्रिय व्यक्तींप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची ही एक सुवर्णसंधी असते. म्हणूनच, या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत काही खास आणि निवडक 'New Year Wishes'. हे संदेश तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करून त्यांचे नवीन वर्ष अधिक आनंदमयी आणि उत्साही बनवू शकता. चला तर मग, जुन्या कटू आठवणींना निरोप देऊया आणि एका नवीन ऊर्जेने, सकारात्मकतेने या नूतन वर्षाचे स्वागत करूया!२०२६ नववर्षाच्या हटके शुभेच्छा प्रियजनांना द्या!१ सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्नं,नव्या आशा, नवी उमेद व नावीन्याची कास धरतनवीन वर्षाचं स्वागत करू.आपली सर्व स्वप्नं, आशा, आकांक्षा पूर्ण होवोत या प्रार्थनेसह नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!२ गेलं ते वर्ष, गेला तो काल,नवीन आशा-अपेक्षा घेऊन आले २०२६ साल.नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!३ येवो समृद्धी अंगणी, वाढो आनंद जीवनीतुम्हासाठी या शुभेच्छा, नववर्षाच्या या दिनी४ प्रत्येक सकाळ आनंदाने सुरू होवोनव्या दिवसाचा नवीन ऊर्जेने स्वागत करासंपूर्ण वर्ष यशस्वी जावोआयुष्याचा प्रत्येक क्षण खास ठरो५ दुःखं सारी विसरून जाऊ ..सुखं देवाच्या चरणी वाहू …स्वप्नं उरलेली.. नव्या या वर्षीनव्या नजरेनं नव्यानं पाहू…नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!६ नवीन वर्ष आपणास सुख-समाधानाचे,आनंदाचे, ऐश्वर्याचे, आरोग्याचे जावो!नवीन वर्षात आपले जीवन आनंदमय,सुखमय होवो, अशी श्रीचरणी प्रार्थना!७ ३१ तारखेला फक्त मजा करा अन् नवीन वर्षात भरपूर काम करानवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!!८ पुन्हा एक नवीन वर्ष,पुन्हा एक नवी आशा,तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हाएक नवी दिशा,नवी स्वप्ने, नवी क्षितिजे,सोबत माझ्या नव्या शुभेच्छा!नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!!९ तुमच्या नात्यांना नवा बहर लाभोमित्रांची साथ आणि कुटुंबाचं प्रेम सतत लाभोप्रत्येक स्वप्नाला यशाचा कोंदण लाभोतुमचं आयुष्य आनंदाने फुलून राहो१० नवीन वर्ष तुम्हाला नवीन प्रेरणा देईलतुमच्या प्रत्येक इच्छेला सत्याचा मार्ग दाखवेलसंपूर्ण जीवन आनंदाने भरून टाकेलतुमचं यश सतत वाढत जावो११ माझी इच्छा आहे की येणारे १२ महिने सुख मिळो५२ आठवडे यश आणि ३६५ दिवस मजेदार जावोतमाझ्या मित्र-मैत्रिणींना, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा१२ नवं पान, नवा दिवस, नवी स्वप्नं, नवी ध्येयंनव्या आशा, नव्या दिशा, नवी माणसंनवी नाती, नवं यश, नवा आनंदकधी अपूर्ण, कधी संपूर्ण, नवा हर्ष, नवं वर्ष…!हॅपी न्यू ईअर१३ येवो समृद्धी अंगणी, वाढो आनंद जीवनीतुम्हासाठी या शुभेच्छा, नववर्षाच्या या शुभदिनी..!नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा!१४ इडा, पिडा टळू दे नवीन वर्षात माझ्या मित्रांना काय हवं ते मिळू दे नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!१५ दाखवून गत वर्षाला पाठ चाले भविष्याची वाटकरुन नव्या नवरीसारखा थाट आली ही सोनेरी पहाट!!नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!१६ सरत्या वर्षाला निरोप देतनवी स्वप्न, नव्या आशा,नवी उमेद,नाविन्याची कास धरत,नवीन वर्षाचं स्वागत करू.आपली सर्व स्वप्न, आशा, आकांशा पूर्ण होवोत,नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!१७ नव्या वर्षाचे आगमनसंस्कृती आपली जपूयादेव- थोरा-मोठ्यांच्या चरणी,मस्तक आपले झुकवू या,नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!१८ सरतं वर्ष जातंय आपल्यापासून दूरशंका- कुशंका, राग-रुसवेनव्या वर्षात संपून जाऊ दे,तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!१९ भोवर्यातून बाहेर पडून किनारा मिळाला,जगण्याला आज एक नवा अर्थ मिळाला,चढ-उतारांनी भरलेले होते हे वर्ष,या नव्या वर्षी तुमची साथ मिळावी,हीच आशा...नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!२० मनामनातून आज उजळलेआनंदाचे लक्ष्य दिवे…समृध्दीच्या या नजरांनीघेऊन आले वर्ष नवे….आपणांस व आपल्या परिवारासनवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…२१ हे आपल नातं असंच राहु दे,मनात आठवणींची ज्योत अखंड तेवत राहु देखूप सुंदर असा प्रवास होता २०२५ वर्षाचा२०२६ मध्येही अशीच सोबत कायम राहू देनवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!२२ नवीन वर्ष आपणांस सुखाचे,समाधानाचे, ऐश्वर्याचे, आनंदाचे, आरोग्याचे जावो…!येत्या नवीन वर्षात आपले जीवन आनंदमय आणि सुखमय होवो,हीच ईश्वरचरणी प्रार्थना.नववर्षाभिनंदननवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!२३ सर्वांच्या हृदयात असुदे प्रेमाची भावना,नव्या वर्षात पूर्ण होऊ दे अधुरी ही कहाणी,हीच प्रार्थना होऊन नतमस्तक,गरिबांना मिळू दे अन्न- वस्त्र आणि निवारा२४ हे नातं सदैव असंच राहो,मनात आठवणींचे दिवे कायम राहो,खूप प्रेमळ होता २०२५ चा प्रवास,अशीच राहो २०२६मध्येही आपली साथ२५ नवीन वर्ष प्रकाश बनून आलंय आपल्या जीवनात,या वर्षात उजळून जाऊदे भाग्याची ही रेषा,परमेश्वराची कृपा राहो सर्वांवरती खास,तुमच्या उपस्थितीने लखलखुदे हे जीवन आज,नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!२६ पाकळी-पाकळी भिजावी,अलवार त्या दवाने,फुलांचेही व्हावे गाणे,असे जावो वर्ष नवे,नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!२७ हे नववर्ष तुमच्यासाठी ठरो आनंदाची पर्वणी,आयुष्यातील प्रत्येक क्षण उजळू दे क्षणोक्षणी,नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ साठी दोन हजार ५१६ अर्ज दाखल
काल अंतिम दिनी म्हणजे मंगळवार, दिनांक ३० डिसेंबर २०२५ रोजी २ हजार १२२ नामनिर्देशन अर्ज दाखलनामनिर्देशपपत्र सादर करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत एकूण मिळून २ हजार ५१६ अर्ज दाखलआज बुधवार, दिनांक ३१ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजेपासून नामनिर्देशनपत्रांची छाननीछाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी लगेच प्रसिद्ध होणारमुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ च्या अनुषंगाने नामनिर्देशनपत्र स्वीकारण्याच्या अखेरच्या दिवशी म्हणजेच काल मंगळवार, दिनांक ३० डिसेंबर २०२५ रोजी २३ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांतून मिळून एकूण २ हजार १२२ नामनिर्देशन अर्ज दाखल दाखल झाले आहेत. तर, नामनिर्देशपपत्र सादर करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत म्हणजे मंगळवार, दिनांक ३० डिसेंबर २०२५ पर्यंत एकूण मिळून २ हजार ५१६ नामनिर्देशन पत्रे दाखल झाली आहेत. आज बुधवार, दिनांक ३१ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजेपासून नामनिर्देशनपत्रांची छाननी केली जाणार आहे. छाननी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी लगेच प्रसिद्ध करण्यात येणार आहे.माननीय राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांनी जाहीर केलेल्या महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ च्या कार्यक्रमानुसार, उमेदवारांना नामनिर्देशन पत्रे देण्यास मंगळवार, दिनांक २३ डिसेंबर २०२५ पासून सुरुवात झाली. त्यानुसार, मंगळवार, दिनांक ३० डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११ ते ४ यावेळेत नामनिर्देशनपत्रांचे वितरण तर, सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात आली.नामनिर्देशनपत्र स्वीकारण्याच्या अखेरच्या दिवशी म्हणजेच काल मंगळवार, दिनांक ३० डिसेंबर २०२५ रोजी २३ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांतून मिळून एकूण २ हजार १२२ नामनिर्देशन अर्ज दाखल झाले आहेत. तर, सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत ५९४ नामनिर्देशन पत्रांचे वितरण करण्यात आले आहे.मंगळवार, दिनांक २३ डिसेंबर २०२५ ते मंगळवार, दिनांक ३० डिसेंबर २०२५ या कालावधीत एकूण मिळून ११ हजार ३९१ नामनिर्देशन पत्रांचे वितरण झाले. तर, काल अखेर एकूण मिळून २ हजार ५१६ नामनिर्देशनपत्रे दाखल झाली आहेत.प्रशासकीय विभाग / वितरण केलेले नामनिर्देशन पत्र संख्या/ आज प्राप्त नामनिर्देशन पत्रे/ आजअखेर एकूण प्राप्त नामनिर्देशन पत्रे याची माहिती पुढीलप्रमाणे -१) ए + बी + ई विभाग (RO २३) - ४५ / ११८ / १५० प्राप्त२) सी + डी विभाग (RO २२) - २० / ५० / ५८ प्राप्त3) एफ दक्षिण विभाग (RO २१ ) - ०८ / ६४/ ७५ प्राप्त४) जी दक्षिण विभाग (RO २०) - ३५ / ७७ / ८६ प्राप्त५) जी उत्तर विभाग (RO १९) - ३३ / ११३ / १३७ प्राप्त६) एफ उत्तर विभाग (RO १८) - ४० / १०५ / ११८ प्राप्त७) एल विभाग (RO १७) - २१ / १०१ / ११६ प्राप्त८) एल विभाग (RO १६) - ३४ / ९१ / १११ प्राप्त९) एम पूर्व विभाग (RO १५) - ३७ / १५८ / १८२ प्राप्त१०) एम पूर्व + एम पश्चिम (RO १४) - ६१ / १५२/ १६४ प्राप्त११) एन विभाग (RO १३) - २० / ९७ / १२३ प्राप्त१२) एस विभाग (RO १२) - ३९ / ११५ / १२५ प्राप्त१३) टी विभाग (RO ११) - ३० / ८८ / १०९ प्राप्त१४) एच पूर्व विभाग (RO १०) - २६ / १०६ / १२५ प्राप्त१५) के पूर्व + एच पश्चिम विभाग (RO ९) - १६ / ८५ / ९३ प्राप्त१६) के पश्चिम विभाग + के पूर्व (RO ८) - ० / ८३ / १०४ प्राप्त१७) के पश्चिम विभाग (RO ७) - २७ / १०४ / १३३ प्राप्त१८) पी दक्षिण विभाग (RO ६) - १६ / ६९ / ८१ प्राप्त१९) पी पूर्व विभाग (RO ५) - २८ / ९८ / ११७ प्राप्त२०) पी उत्तर विभाग (RO ४) - ०७ / ५९ / ८९ प्राप्त२१) आर दक्षिण विभाग (RO ३) - १८ / ९५ / १०९ प्राप्त२२) आर मध्य विभाग (RO २) - ११ / ४७ / ५१ प्राप्त२३) आर उत्तर विभाग (RO १) - २२ / ४७ / ६० प्राप्तएकूण – वितरित ५९४ / २१२२ / २५१६ प्राप्त
अमरावतीच्या अंबादेवी संस्थानास चिखलदरा येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची तीन एकर जमीन
अमरावती : अमरावती जिल्ह्यातील मौजे चिखलदरा येथील श्री. अंबादेवी संस्थान, अमरावती यांना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची ३ एकर ८ आर जमीन देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.चिखलदरा येथील सुमारे साडे सात एकर जमीन १९७५ मध्ये महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला पर्यटकांसाठी मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी देण्यात आली होती. पण ही जमीन वापराविना पडून होती. दरम्यान, अमरावतीच्या श्री अंबादेवी संस्थान यांनी चिखलदरा येथील देवी पॉईंट आणि विराट देवी देवस्थान यांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी आहे. या संस्थानाने या दोन्ही देवस्थानच्या विकासासाठी शासनाकडे जमिनीची मागणी केली आहे. त्यानुसार पर्यटन विकास महामंडळाकडील सुमारे तीन एकर ८ आर जमीन शासन जमा करून घेऊन, ती श्री. अंबादेवी संस्थानास विनामुल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही जमीन मंदिर संस्थानाला भोगवटादार वर्ग – २ म्हणून मिळणार असून, जमीन केवळ धार्मिक प्रयोजनासाठी वापरता येणार आहे.
नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी या गड किल्ल्यांवर जाण्यास बंदी; वन विभागाचा आदेश जारी
पुणे : अनेकजण नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी ३१ डिसेंबरच्या रात्री गडकिल्ल्यावर जाणे पसंत करतात. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील किल्ले, टेकड्या आणि संरक्षित वनक्षेत्रात वन विभागाकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जंगल आणि डोंगर भागात मद्यपान, गोंगाट आणि गैरप्रकार होऊ नयेत, यासाठी बुधवारी सकाळपासूनच गस्त वाढवण्यात आलीअसल्याची माहिती वन विभागाने दिली आहे. रात्रीच्या वेळेतही अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला जाणार आहे.सिंहगड, राजगड-तोरणा, लोहगड, विसापूर, राजमाची अशा लोकप्रिय किल्ल्यांवर ३१ डिसेंबर रोजी मुक्काम करण्यास बंदी घालण्यात आली आहे. शहरातील हॉटेल्स आणि रिसॉर्टमधील गर्दी टाळून अनेक जण नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला निर्जन भागात, जंगलाच्या पायथ्याशी किंवा डोंगरदऱ्यांमध्ये तंबू टाकून रात्रभर पार्टी करण्याचा प्रयत्न करतात. काही पर्यटन कंपन्यांनी ‘निसर्गाच्या कुशीत नवीन वर्ष’ ही संकल्पना पुढे रेटल्याने मुळशी, ताम्हिणी, लोणावळा, खंडाळा, भोर-राजगड परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी होत असल्याचे चित्र आहे.या भागांतील संरक्षित वनक्षेत्रालगत असलेल्या फार्महाऊस आणि मोकळ्या जागांवर काही ठिकाणी गेट-टुगेदर, बार्बेक्यू पार्टींचे आयोजन केले जाते. मात्र या गोंगाटाचा जंगलातील वन्यप्राण्यांच्या हालचालींवर विपरीत परिणाम होत असून, मद्याच्या बाटल्या, प्लास्टिक कचरा जंगलात टाकणे यामुळे प्रदूषण वाढते तसेच माळरानावर वणवा लागण्याचे प्रकार घडतात. यामुळेच वन विभागाने मागील दोन वर्षांपासून ३१ डिसेंबरला विशेष दक्षता घेण्यास सुरुवात केली आहे. या मोहिमेत संयुक्त वन व्यवस्थापन समित्या आणि स्थानिक स्वयंसेवी संस्थांचाही सहभाग असणार आहे.नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला सिंहगडावर जाणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी असते. गडावर मांसाहार आणि मद्यपानास सक्त मनाई असतानाही काही जण दारू चोरून नेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे गडाच्या पायथ्याशी असलेल्या टोलनाक्यावर प्रत्येक वाहनाची तपासणी करण्यात येणार आहे. संध्याकाळी पाच वाजल्यानंतर गडावर जाणारी वाहने रोखली जातील, तर फिरायला गेलेल्या पर्यटकांनाही खाली पाठवण्यात येईल. सायंकाळी सहानंतर सिंहगड पर्यटकांसाठी पूर्णपणे बंद राहणार असल्याचे वन विभागाने स्पष्ट केले आहे.
काजोलने शेअर केला २०२५ मधील सर्वाेत्तम क्षण! व्हिडीओने वेधले लक्ष; आई मुलगी दिसली एकत्र
Kajol : सगळीकडे नवीन वर्षाचे स्वागत उत्साहात केले जात आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट शेअर करत २०२५ मधील आठवणींना उजाळा दिला जात जात आहे. मनोरंजन विश्वातील कलाकार देखील नववर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहात करताना दिसत आहेत. या निमित्ताने अभिनेत्री काजोल हिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक खास व्हिडीओ शेअर करत तिचा २०२५ मधील हा खास क्षण […] The post काजोलने शेअर केला २०२५ मधील सर्वाेत्तम क्षण! व्हिडीओने वेधले लक्ष; आई मुलगी दिसली एकत्र appeared first on Dainik Prabhat .
ब्लॅक ड्रेस अन् हातात बंदूक; ‘टॉक्सिक’चित्रपटातील नयनताराचा फर्स्ट लुक
Nayanthara First Look | दाक्षिणात्य सुपरस्टार यशच्या ‘टॉक्सिक’ चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. यात कियारा आडवाणी आणि हुमा कुरैशी देखील झळकणार आहे. नुकताच या चित्रपटातील ‘लेडी सुपरस्टार’ नयनताराचा फर्स्ट लूक समोर आला आहे. नयनतारा ‘टॉक्सिक’ मध्ये ‘गंगा’ची भूमिका साकारणार आहे. पोस्टरमध्ये नयनतारा एका काळ्या रंगाच्या स्टायलिश हाय-स्लिट गाऊनमध्ये चालत येताना दिसते. तिच्या हातात बंदूक […] The post ब्लॅक ड्रेस अन् हातात बंदूक; ‘टॉक्सिक’ चित्रपटातील नयनताराचा फर्स्ट लुक appeared first on Dainik Prabhat .
“कोणताही तिसरा पक्ष…” ; पोकळ धमक्या देणाऱ्या चीनची भारताने केली ‘बोलती बंद’
Operation Sindur। भारत-पाकिस्तान युद्धबंदीत मध्यस्थीचा चीनचा दावा भारताने फेटाळून लावला आहे. चीनने या वर्षी मे महिन्यात झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धात मध्यस्थी केल्याचे म्हटले होते. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी,”या वर्षी चीनने मध्यस्थी केलेल्या मुद्द्यांमध्ये भारत-पाकिस्तान युद्धाचा समावेश होता” असे म्हटले होते. मात्र भारतीय सरकारी सूत्रांनी चीनचा दावा स्पष्टपणे फेटाळून लावला आहे. सूत्रांनी सांगितले की भारताने […] The post “कोणताही तिसरा पक्ष…” ; पोकळ धमक्या देणाऱ्या चीनची भारताने केली ‘बोलती बंद’ appeared first on Dainik Prabhat .
भाजपच्या महिला उमेदवाराला मोठा धक्का! निवडणुकीची संधीच हुकली; मुंबईतील ‘या’वॅार्डमध्ये काय घडलं?
Mandakini Khamkar : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी वॉर्ड क्रमांक २१२ मध्ये खळबळ उडवून देणारी घटना घडली आहे. भाजपच्या अधिकृत उमेदवार मंदाकिनी खामकर यांना पक्षाकडून एबी फॅार्म देण्यात आला होता. मात्र, उमेदवारांसाठी घालून दिलेली वेळ न पाळण्याने त्यांना मोठा फटका बसला आहे. दिलेल्या वेळेपेक्षा १५ मिनिटे फॅार्म भरण्यास उशिर झाल्याने त्यांचा अर्जच […] The post भाजपच्या महिला उमेदवाराला मोठा धक्का! निवडणुकीची संधीच हुकली; मुंबईतील ‘या’ वॅार्डमध्ये काय घडलं? appeared first on Dainik Prabhat .
मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून सरकारचे खास पाऊल
मुंबई: आपल्या देशाने लोकशाही पध्दती स्विकारली असून १८ वर्षावरील नोंदणी झालेल्या सर्व नागरिकांनी प्रत्येक निवडणुकीमध्ये मतदान करणे अपेक्षित आहे. ही बाब लक्षात घेता लोकप्रतिनिधीत्व कायदा, १९५१ च्या परिच्छेद १३५ (बी) नुसार मतदानाच्या दिवशी सर्वसाधारणपणे मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात येते किंवा काही ठिकाणी कामाच्या तासात योग्य ती सवलत देण्यात येते. मात्र गेल्या काही निवडणुकांमध्ये असे दिसून आले आहे की, काही संस्था/आस्थापना इ. त्यांच्या कामगारांना भरपगारी सुट्टी किंवा सवलत देत नाहीत. त्यामुळे अनेक मतदारांना त्यांच्या मतदानाचा हक्क बजावण्यापासून वंचित रहावे लागते, जे लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे.राज्य निवडणूक आयोगाने निर्गमित केलेल्या आदेशाप्रमाणे दि.१५/०१/२०२६ रोजी राज्यातील २९ महानगरपालिकांमध्ये सार्वत्रिक निवडणूक घेतली जाणार आहे. सदर निवडणुकीमध्ये सर्व मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क योग्यरितीने बजावता यावा, तसेच महाराष्ट्र राज्याच्या सीमेलगतच्या जिल्ह्यामधील सर्व मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क योग्य रीतीने बजावता यावा यासाठी खालील प्रमाणे आदेश देण्यात येत आहेत :-१. निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार/अधिकारी/कर्मचारी यांना, मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी.२. सदर सुट्टी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादींना लागू राहिल (उदा. खाजगी कंपन्या या मधील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी, हॉटेल, खाद्यगृहे. अन्य गृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स इ.)३. अपवादात्मक परिस्थितीत अनुपस्थित्तीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होईल अशा धोकादायक अथवा लोकोपयोगी सेवेत अथवा आस्थपनांच्या संदर्भात संबंधित अधिकारी, कर्मचारी व कामगार इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी दोन ते तीन तासांची विशेष सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापना मालकांनी घेणे आवश्यक राहिल.४. वर नमूद केल्यानुसार उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादर्दीच्या मालकांनी / व्यवस्थापनाने वरील सूचनांचे योग्य ते अनुपालन होईल याची काटेकोरपणे खबरदारी घ्यावी, मतदारांकडून मतदानाकरिता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधित आस्थापनांविरुध्द कारवाई करण्यात येईल.
रणवीर सिंहच्या जागी ‘डॉन ३’मध्ये दिसणार ‘हा’लोकप्रिय अभिनेता?
Don 3 Film | अभिनेता रणवीर सिंह ‘डॉन ३’ मधून बाहेर पडला आहे. धुरंधरच्या प्रचंड यशामुळे त्याने ‘डॉन ३’ सोडल्याचे मानले जात आहे. यानंतर आता फरहान अख्तर नव्या चेहऱ्याच्या शोधात आहे. डॉन ३ चे निर्माते तातडीने रणवीर सिंगची रिप्लेस्मेंट शोधण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यांनी अभिनेता हृतिक रोशनचाही विचार केल्याचे म्हंटले जात आहे. फरहानने हृतिकसोबत […] The post रणवीर सिंहच्या जागी ‘डॉन ३’मध्ये दिसणार ‘हा’ लोकप्रिय अभिनेता? appeared first on Dainik Prabhat .
गुंतवणुकीचे जादूगार वॉरेन बफेट आज 95 व्या वर्षी निवृत्त होत आहेत. 60 वर्षांपूर्वी जेव्हा त्यांनी बर्कशायर हॅथवेची सूत्रे हाती घेतली, तेव्हा कंपनीच्या एका शेअरची किंमत 18 डॉलर होती. आज एका शेअरची किंमत 8 लाख डॉलरपेक्षाही जास्त आहे. म्हणजे 60 वर्षांत 45,000 पट वाढ. या काळात अमेरिकेने 11 राष्ट्राध्यक्ष पाहिले, जगातील सर्वात मोठ्या कंपन्या बुडाल्या-उभरल्या, बाजारांनी अनेकदा श्वास रोखला, पण बफेट बदलले नाहीत. ना त्यांची पद्धत, ना त्यांचे तत्त्वज्ञान. त्यांची बर्कशायर हॅथवे 34 लाख कोटी रोख रकमेसह आज जगातील सर्वात मोठी गुंतवणूक कंपनी आहे आणि बफेट जगातील 10 वे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. वॉरेन बफेट यांना केवळ आकडेवारीत मोजता येत नाही. आम्ही त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे पैलू 5 प्रकरणांमध्ये गुंफले आहेत... साल 1929 आणि अमेरिकेतील ओमाहा शहर. स्टॉक ब्रोकर हॉवर्ड बफेट त्यांची पत्नी लैला आणि मुलगी डोरिस यांच्यासोबत चांगले जीवन जगत होते. तेव्हा अमेरिकेत महामंदीचा काळ सुरू झाला आणि शेअर बाजार कोसळला. हॉवर्डचे खूप नुकसान झाले आणि कुटुंबाचा खर्च चालवणे कठीण झाले. याच दरम्यान 30 ऑगस्ट 1930 रोजी त्यांच्या घरी वॉरेन बफेट यांचा जन्म झाला. वडिलांमुळे बफेट लहानपणापासूनच व्यवसाय आणि गुंतवणुकीत रस घेऊ लागले. ग्रंथालयात त्यांना अमेरिकन व्यावसायिक लेखिका फ्रान्सिस मिनकर यांचे 'वन थाउसंड वेज टू मेक 1000 डॉलर' हे पुस्तक मिळाले, ज्यातून त्यांनी पैसे कमावण्याचे मार्ग शिकले आणि अवलंबले. 6 वर्षांच्या वयात च्युइंगम विकली, 13 व्या वर्षी कर भरला फक्त 6 वर्षांच्या वयात वॉरेनने आजोबांच्या किराणा दुकानातून खरेदी केलेले च्युइंगम शेजाऱ्यांना विकून नफा कमावला. नंतर ते कोका-कोलाच्या बाटल्या विकू लागले. 6 बाटल्यांच्या एका सेटमधून ते 5 सेंट कमवत असत. नंतर त्यांनी वर्तमानपत्रे, गोल्फ बॉल, पॉपकॉर्न आणि शेंगदाणे विकले. जेव्हा ते 11 वर्षांचे झाले, तेव्हा वॉरेन न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजला भेट देण्यासाठी गेले. 1942 मध्ये त्यांचे वडील हॉवर्ड अमेरिकन काँग्रेसचे सदस्य म्हणून निवडले गेले. तरीही वॉरेन ‘द वॉशिंग्टन पोस्ट’ वर्तमानपत्र विकत राहिले, ज्यातून त्यांना दरमहा 175 डॉलरची कमाई होत असे. त्याच वर्षी त्यांनी त्यांची मोठी बहीण डोरिससोबत 120 डॉलरचे 3 शेअर्स खरेदी केले. हे शेअर्स अमेरिकन पेट्रोलियम कंपनी सिटीज सर्व्हिसचे होते. 3 महिन्यांनंतर शेअरचा भाव घसरू लागला, तेव्हा बहिणीने ते विकायला सांगितले, पण वॉरेनने प्रतीक्षा करण्याचा निर्णय घेतला. 4 महिन्यांनंतर या शेअर्समधून 5 डॉलरचा नफा झाला. 13 वर्षांच्या वयात त्यांनी पहिला आयकर रिटर्न भरला. हायस्कूलमध्ये असताना, 14 वर्षांच्या वॉरेनने सुमारे 40 एकर शेतीची जमीन खरेदी केली, जी त्यांनी भाड्याने दिली. 17 वर्षांच्या वॉरेनने आपल्या बचतीतून काही पिनबॉल मशीन्स खरेदी केल्या आणि त्या न्हाव्याच्या दुकानांमध्ये लावल्या. धाकट्या बहिणीच्या रूममेटसोबत पहिल्या नजरेत प्रेम, मग लग्न ही गोष्ट 1950 च्या उन्हाळ्यातील आहे. वॉरेन त्यांची धाकटी बहीण बर्टीला भेटायला कोलंबियाला गेले होते. तिथेच बर्टीने त्यांची ओळख तिची रूममेट सुसैन थॉम्पसनशी करून दिली. त्यांना पहिल्याच भेटीत प्रेम झाले, पण सुसैनला त्यात काही रस नव्हता. तरीही वॉरेन सुसैनशी मैत्री वाढवण्याचा प्रयत्न करत राहिले. लवकरच वॉरेन सुसैनचे वडील आणि मानसशास्त्रज्ञ प्राध्यापक विल्यम 'डॉक्टर' थॉम्पसन यांच्या जवळचे बनले. हळूहळू सुसैनलाही वॉरेनची सोबत आवडू लागली. दोन वर्षांच्या प्रयत्नांनंतर सुसैनने वॉरेनशी लग्न करण्यास होकार दिला. 19 एप्रिल 1952 रोजी वॉरेन बफेट आणि सुसैन यांनी लग्न केले. 1956 मध्ये वॉरेनने एक गुंतवणूक भागीदारी सुरू केली. नाव ठेवले- बफेट असोसिएट्स लिमिटेड. यात त्यांनी मित्र आणि कुटुंबियांना जोडले. वॉरेनला लहानपणापासूनच विश्वास होता की व्हॅल्यू-इन्व्हेस्टमेंटचा (मूल्य-गुंतवणुकीचा) मार्ग खूप जास्त परतावा देईल. वॉरेन सांगतात, 'प्रो. ग्राहम यांनी मला 'गुंतवणुकीचे दोन नियम' शिकवले, जे मी नेहमीच पाळत आलो आहे. पहिला नियम - कधीही पैसे गमावू नका आणि दुसरा नियम - पहिल्या नियमाला कधीही विसरू नका.' प्रो. ग्राहम हे व्हॅल्यू इन्व्हेस्टिंगचे जनक आहेत. त्यांच्या याच सिद्धांत आणि शिकवणीमुळे वॉरेन आज जगातील सर्वात मोठे गुंतवणूकदार आहेत. विश्वास तुटल्यावर बुडणारी टेक्सटाईल कंपनी विकत घेतली गोष्ट डिसेंबर 1962 ची आहे. अमेरिकन टेक्सटाईल कंपनी बर्कशायर हॅथवे तोट्यात चालली होती. दिवसेंदिवस कापड गिरण्या बंद पडत होत्या. तेव्हा तरुण गुंतवणूकदार वॉरेन बफेट यांनी बुडणाऱ्या कंपनीच्या शेअरच्या किमतीत एक नमुना (पॅटर्न) पाहिला आणि ते खरेदी करू लागले. हळूहळू त्यांच्याकडे बर्कशायर हॅथवेचे 7% शेअर्स झाले, पण कंपनी तोट्यात जात असल्याचे पाहून वॉरेन यांना वाटले की पैसे बुडतील. 1964 मध्ये बर्कशायर हॅथवेचे सीईओ स्टॅंटन यांनी वॉरेन यांना कंपनीचे शेअर्स 11.5 डॉलरला खरेदी करण्याची ऑफर दिली. हा फायद्याचा व्यवहार होता. वॉरेन सहमत झाले, पण काही दिवसांनी जेव्हा कागदपत्रे मिळाली, तेव्हा त्यावर शेअरची किंमत 11.375 डॉलर लिहिलेली होती. पैशांचा फरक लहान होता, पण विश्वास तुटल्याने वॉरेन यांना राग आला. त्यांनी शेअर्स विकण्याऐवजी आणखी खरेदी करण्यास सुरुवात केली आणि कंपनीचे नवीन मालक बनले. त्याचवेळी स्टॅंटन आणि त्यांच्या मुलाने कंपनीच्या बोर्डातून राजीनामा दिला. बुडणाऱ्या कंपनीला वाचवण्यासाठी वॉरेनने अनेक प्रयत्न केले, पण त्यांना अपयश आले. मग त्यांनी बर्कशायर हॅथवेला टेक्सटाईल कंपनीऐवजी होल्डिंग कंपनी बनवले. त्यानंतर कंपनी विमा, ऊर्जा, रेल्वे, डेअरी यांसारख्या अनेक क्षेत्रांमध्ये काम करू लागली. आज कंपनीचे 189 व्यवसाय आहेत. वॉरेन सीईओ असताना बर्कशायर हॅथवेने ॲपल, कोका-कोला आणि बँक ऑफ अमेरिका यांसह 41 कंपन्यांमध्ये 25 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक केली. ऑगस्ट 2024 मध्ये बर्कशायर हॅथवे एक ट्रिलियन डॉलर म्हणजेच 90 लाख कोटी रुपयांच्या बाजार भांडवलासह अमेरिकेतील पहिली नॉन-टेक कंपनी बनली. बर्कशायर हॅथवेकडे सुमारे 34 लाख कोटी रुपये रोख आहेत, जे जगात सर्वाधिक आहेत. बर्कशायर हॅथवेकडे 381 अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे 34 लाख कोटी रुपये रोख रक्कम आहे. त्यांनी ही रक्कम कुठेही गुंतवली नाही, त्यातून सोने खरेदी केले नाही, फिक्स्ड डिपॉझिट केले नाही आणि बँकेतही जमा केली नाही. या रकमेचा एक मोठा भाग अमेरिकन ट्रेझरी बिलांच्या स्वरूपात आहे. अमेरिकन ट्रेझरी बिल, चलन नोटांप्रमाणेच रोख रक्कम मानले जाते. महागाईमुळे दरवर्षी या मोठ्या रकमेचे मूल्य 2% ते 4% कमी होते, तरीही वॉरेन असे का करतात? खरं तर, वॉरेन दशकातून एकदा मिळणाऱ्या संधीची वाट पाहतात. उदा. 2020 ची कोरोना महामारी, 2008 चे लेहमन ब्रदर्स संकट आणि 2000 चे डॉट-कॉम बबल संकट. अशा संधींवर जेव्हा बहुतेक कंपन्या दिवाळखोर होऊ लागतात, तेव्हा वॉरेन 40% ते 50% सवलतीत स्टॉक खरेदी करतात. यासाठी ते रोख रकमेचा वापर करतात. 2020 मध्ये भागधारकांच्या एका बैठकीत ते म्हणाले होते, ‘पुढील 20-30 वर्षांत असे दोन किंवा तीन वेळा घडेल, जेव्हा सोन्याचा पाऊस पडत असेल. तेव्हा आपल्याला फक्त ते गोळा करण्यासाठी बाहेर जावे लागेल, पण हे कधी घडेल हे कोणालाच माहीत नाही.’ वॉरेन शेअर बाजाराला Overvalued मानतात. म्हणजेच शेअर बाजारात होणारी वाढ खरी नाही. त्यांना वाटते की कधीतरी शेअर बाजार कोसळू शकतो. म्हणूनच बफेटच्या कंपनीने एवढी मोठी रक्कम शेअर बाजारात गुंतवण्याऐवजी रोख स्वरूपात ठेवली आहे. हा ट्रेंड अमेरिकेतील इतर अनेक मोठ्या कंपन्यांमध्येही दिसतो, ज्यांनी इतर कंपन्यांच्या शेअर्सऐवजी सरकारी बॉन्ड्समध्ये गुंतवणूक केली आहे. 50 वर्षांच्या वयानंतर कंपाउंडिंगमधून कमावली 99% संपत्ती 11 वर्षांच्या वयापासून गुंतवणूक करणारे वॉरेन बफेट यांनी आपली 99% संपत्ती 50 वर्षांच्या वयानंतर कमावली आहे, विशेषतः 60-70 वर्षांच्या वयानंतर. खरं तर, वॉरेन यांनी पैसे कमावण्यासाठी दोन युक्त्या वापरल्या… 1. व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग (मूल्य गुंतवणूक): वॉरेन यांनी त्यांचे गुरु प्रो. बेंजामिन ग्राहम यांची व्हॅल्यू इन्व्हेस्टिंगची (मूल्य गुंतवणुकीची) थिअरी (सिद्धांत) स्वीकारली. यानुसार, केवळ तोच स्टॉक किंवा कंपनी खरेदी करावी, जी तिच्या वास्तविक मूल्यापेक्षा म्हणजेच खऱ्या किमतीपेक्षा स्वस्त असेल. वॉरेन यांचे लक्ष नेहमी कंपनीच्या अंतर्गत मूल्यावर, कॅश फ्लोवर आणि दीर्घकालीन व्यवसायाच्या गुणवत्तेवर राहिले, अल्पकालीन बाजारातील किमतीवर नाही. 2. कंपाउंडिंग (चक्रवाढ): वॉरेन यांनी केवळ पैशातून पैसा कमावला नाही, तर कमावलेल्या पैशातूनही पैसा तयार केला. यालाच कंपाउंडिंग (चक्रवाढ) म्हणतात. समजा, वॉरेन यांनी एखाद्या कंपनीत 10 वर्षांसाठी 10 हजार रुपये गुंतवले. दरवर्षी त्यांना 10% परतावा मिळाला, जो त्याच कंपनीत पुन्हा गुंतवला जात राहिला, तर 10 वर्षांनंतर त्यांना एकूण 25,937 रुपये मिळाले. म्हणजेच, दरवर्षी मिळणाऱ्या 10% परताव्यानेही पैसा कमावला. या सिद्धांतांमुळे जास्त पैसे कमवायला जास्त वेळ लागत असला तरी, कमी पैशातूनही जास्त नफा मिळवता येतो हे निश्चित आहे. सुरुवातीच्या 20-30 वर्षांत कमाई हळूहळू वाढते, पण त्यानंतरच्या 10-20 वर्षांत कमाईचा आलेख वेगाने वर गेला. वॉरेनसोबत हाच परिणाम 50 वर्षांच्या वयानंतर झाला. वॉरेन बफेट पैसे कमावण्यासाठी हे 4 वेल्थ मंत्र सांगतात… 1. जेव्हा लोक सावध असतात, तेव्हा लोभी बना 2. वाईट बातमीच गुंतवणूकदाराची चांगली मैत्रीण 3. तीच गोष्ट खरेदी करा, ज्याची तुम्हाला समज आहे 4. दीर्घकाळासाठी गुंतवणूक करा आणि सोडून द्या बर्कशायर हॅथवे कंपनीच्या वार्षिक बैठकीत 3 मे 2025 रोजी वॉरेन बफेट म्हणाले, '2025 च्या अखेरीस मी CEO पदावरून निवृत्त होईन आणि माझ्या नंतर कंपनीची जबाबदारी ग्रेग एबेल सांभाळतील.' वॉरेन यांना निवृत्तीनंतर शांत आणि समाधानी जीवन जगण्यासाठी वेळ मिळावा अशी इच्छा आहे. ते सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये कमी दिसतील. ते ओमाहा येथील त्याच घरात राहतील, जिथे ते 67 वर्षांपासून राहत आहेत. मात्र, त्यांनी नवीन ठिकाणी राहण्याबद्दल किंवा जाण्याबद्दल काहीही सांगितले नाही. खरं तर, 1958 मध्ये वॉरेन यांनी ओमाहा शहरात एक घर विकत घेतले. त्यावेळी त्याची किंमत 31,500 डॉलर होती, आजच्या हिशोबाने 3.2 कोटी रुपये. 6280 चौरस फुटांवर बांधलेल्या या घरात 5 बेडरूम आणि 2 बाथरूम आहेत. वॉरेन बर्कशायर हॅथवेच्या शेअरधारकांसाठी वार्षिक पत्र लिहीत असत, पण निवृत्तीनंतर ते अशी पत्रे लिहिणार नाहीत. मात्र, ते थँक्सगिव्हिंग संदेश देणे सुरू ठेवतील. ख्रिसमसला मित्र, जवळचे लोक आणि कुटुंबियांना भेटवस्तू आणि पत्रे देत राहतील. 99% संपत्ती आणि बर्कशायर हॅथवेचे सर्व शेअर्स दान करतील वॉरेन बफेट यांच्याकडे सुमारे 15 हजार कोटी डॉलर म्हणजेच सुमारे 13 लाख कोटी रुपयांची एकूण संपत्ती आहे. 2006 मध्ये त्यांनी एक ‘गिव्हिंग प्लेज’ म्हणजेच परोपकारी शपथ घेतली होती, ज्यात त्यांनी सांगितले होते की ते आपली 99% संपत्ती दान करतील. ते म्हणाले, 'बर्कशायर हॅथवेचे माझे सर्व शेअर्स हळूहळू परोपकारी संस्थांना दान करेन. माझ्या संपत्तीचा 99% पेक्षा जास्त भाग मी हयात असताना किंवा नसतानाही दान केला जाईल. पैशांच्या हिशोबाने हा आकडा खूप मोठा दिसत असेल, पण लोक दररोज यापेक्षा कितीतरी जास्त दान करतात. वॉरेन यांनी हे देखील सांगितले की, याचा त्यांच्या 3 मुलांच्या आयुष्यावर कोणताही परिणाम होणार नाही. त्यांना आधीच वैयक्तिक वापरासाठी चांगली रक्कम मिळाली आहे आणि भविष्यातही मिळत राहील. वॉरेन यांनी मृत्यूनंतर 10 वर्षांनी संपूर्ण संपत्ती दान करण्यासाठी ट्रस्ट बनवला गेल्या दोन दशकांत वॉरेन यांनी 60 अब्ज डॉलर दान केले आहेत. वॉरेन यांची इच्छा होती की त्यांनी केलेले बहुतेक दान बिल गेट्सच्या 'गेट्स फाउंडेशन'मध्ये जावे. यासाठी त्यांनी 40 अब्ज डॉलर दिलेही आहेत, पण अलीकडे त्यांना वाटले की काहीतरी नवीन केले पाहिजे. ते बिल गेट्सच्या खर्चिक वृत्तीमुळेही खूप अस्वस्थ होते. अशा परिस्थितीत, वॉरेन यांनी आपली संपत्ती दान करण्यासाठी एक धर्मादाय ट्रस्ट स्थापन केला आहे, ज्याचे व्यवस्थापन त्यांची तीन मुले सुसैन, हॉवर्ड आणि पीटर करतील. हा ट्रस्ट वॉरेन यांच्या मृत्यूनंतर पुढील 10 वर्षांत त्यांच्या संपत्तीचा मोठा भाग वेगवेगळ्या संस्थांना दान करेल. यामध्ये एक अट आहे की तिन्ही भावंडांना सहमतीने ठरवावे लागेल की पैसे कोणाला द्यावे. ते दरवर्षी सुमारे 50 कोटी डॉलर दान करतील. याचा बहुतेक भाग मुलांशी संबंधित संस्थांना जाईल. वॉरेन यांची तिन्ही मुले लोकांची मदत करतात. सुसैन सामाजिक न्याय, शिक्षण आणि आरोग्यावर, हॉवर्ड अन्न, गुन्हेगारी आणि आंतरराष्ट्रीय मदतीवर आणि पीटर आदिवासींच्या कल्याणासाठी आणि उपासमार रोखण्यासाठी काम करतात. वॉरेन म्हणाले, 'मला विश्वास आहे की माझी मुले माझ्या पश्चात व्यवस्थित काम करतील. तिघे मिळून काम करतील आणि योग्य निर्णय घेतील.' ग्राफिक्स- दृगचंद्र भुर्जी **** संदर्भ- 1. द स्नोबॉल: वॉरेन बफेटट एंड द बिजनेस ऑफ लाइफ - एलिस श्रोएडर 2. बफेटट: द मेकिंग ऑफ एन अमेरिकन कैपटलिस्ट - रोजर लोवेनस्टीन 3. बफेटटोलॉजी - मैरी बफेटट एंड डेविड क्लार्क 4. फोर्ब्स, न्यूयॉर्क टाइम्स, ब्लूमबर्ग, बिजनेस इंसाइडर सारख्या वृत्तसंस्थांचे अहवाल
शिरुर तालुक्यात जागा विक्रीला नकार दिल्याने शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला
न्हावरे –आंबळे (ता. शिरुर) येथे जागा विक्रीस नकार दिल्याचा राग मनात धरुन एका ६० वर्षीय शेतकऱ्याला लोखंडी रॉडने अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना शिरुर तालुक्यातील आंबळे गावात घडली आहे. या प्रकरणी संजय बाळासाहेब बेंद्रे याच्याविरुद्ध शिरुर पोलिस ठाण्यात गंभीर स्वरुपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विलास नारायण बेंद्रे (वय ६०, व्यवसाय शेती, रा. आंबळे) यांनी […] The post शिरुर तालुक्यात जागा विक्रीला नकार दिल्याने शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला appeared first on Dainik Prabhat .
Riteish Deshmukh : अभिनेता रितेश देशमुख त्याच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे नेहमी चर्चेत असतो. कोणताही नवीन चित्रपट प्रदर्शित झाला आणि रितेशने तो पाहिला तर त्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून तो व्यक्त होत असतो. नुकताच इक्कीस हा बहुचर्चित चित्रपटाचा ग्रँड प्रमिअर मुंबईत पार पडला. या प्रीमिअरला रितेशने हजेरी लावली होती. हा चित्रपट पाहिल्यानंतर त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रतिक्रिया […] The post ‘इक्कीस’ पाहिला आणि…; रितेश देशमुखची भावूक पोस्ट, धर्मेंद्र यांच्याविषयी म्हणाला “जेव्हा जेव्हा स्क्रिनवर …” appeared first on Dainik Prabhat .
सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी गूगल तयार; बनवले खास डूडल
सर्वत्र नववर्षाची चाहूल लागली आहे. सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेकजण पार्टीचे आयोजन करत आहेत. या आनंदाच्या लहरींमध्ये आता गूगलने सुद्धा पुढाकार घेतला आहे. गुगलने आपल्या नावात नववर्ष चिन्हांकित केले आहे. ज्या आकर्षक दिसत असून आज सकाळपासून वापरकर्त्यांना नव वर्षाची ओळख करून देत आहे. ज्यात सोनेरी आणि रंगाचा वापर केला असून डूडल फुगे दिसत आहे.गेल्या काही वर्षांत, गूगलचे नवीन वर्ष थीम असलेले डूडल एक डिजिटल आकर्षण बनले आहे. या साध्या डिझाईनमुळे देखील सर्व जगाला सामायिक करून घेण्याचा उत्साह दिसत आहे. २०२६ ची सुरुवात होत असताना, नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला २०२५ चे गुगल डूडल वापरकर्त्यांना आवडले आहे. विशेष म्हणजे हे डूडल २०२५ मधील ५ हा आकडा वर सरकून खाली ६ आकडा येताना मज्जेशीर दिसत आहे. नागरिक २०२६ चे स्वागत आतषबाजीने, कौटुंबिक मेळाव्यांसह किंवा शांत चिंतनाने करत असले तरी, गूगल डूडलही त्यात सामाईक होणार आहे.https://prahaar.in/2025/12/31/according-to-the-lunar-calendar-today-is-the-second-anniversary-of-the-ram-temple-there-is-an-atmosphere-of-joy-in-ayodhya/गूगलने तयार केलेले डूडल हे गडद सोनेरी रंगाचे आहे. ज्यात गूगलच्या इंग्रजी स्पेलिंगनुसार 'डबल ओ'ऐवजी २०२५ आणि २०२६ हे आकडे टाकले आहेत. तसेच एक चॉकलेटदेखील उघडतानाचे अॅनिमेशन दिसत आहे. हे अॅनिमेट केलेले डूडल पाहताना सकारात्मकता वाटत आहे. तसेच येणारे वर्ष आपल्या आयुष्यात सोनेरी क्षण घेऊन येवोत, असा संदेशही त्यातून दिसत आहे.

23 C