प्रभात वृत्तसेवा कराड – ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये ‘ऑपरेशन तारा’ अंतर्गत स्थलांतरित करण्यात आलेल्या दोन वर्षांच्या ‘टी7-एस2’ या दुसर्या वाघिणीला चांदोली राष्ट्रीय उद्यानातील सोनारली अनुकूलन कुंपणातून जंगलात मुक्त करण्यात आली.ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोलारा कोअर रेंज, पांढरपौनी परिसरातून या दोन वर्षांच्या वाघिणीला सोमवारी (दि. 8) सायंकाळी सुरक्षितरित्या पकडण्यात आले होते. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत […] The post Sahyadri Tiger Reserve: ‘ऑपरेशन तारा’ अंतर्गत दुसरी वाघीण सह्याद्रीत दाखल! व्याघ्र प्रकल्पाला मिळणार नवी झळाळी appeared first on Dainik Prabhat .
Satara news: गोरगरीब रुग्णांना मोफत आणि उत्तम आरोग्य सेवा देणार; आमदार मनोज घोरपडे यांची ग्वाही
प्रभात वृत्तसेवा नागठाणे – मतदारसंघातील गोरगरीब,गरजू रुग्णांना चांगल्या आरोग्य सेवा सुविधा मोफत मिळाव्या तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रात चांगल्या प्रकारचे उपचार मिळावेत, यासाठी कायम कटिबद्ध राहणार आहे, अशी ग्वाही आमदार मनोज घोरपडे यांनी दिली.नागठाणे (ता. सातारा) येथे जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत नूतनीकरण करण्यात आलेल्या स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्राच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य […] The post Satara news: गोरगरीब रुग्णांना मोफत आणि उत्तम आरोग्य सेवा देणार; आमदार मनोज घोरपडे यांची ग्वाही appeared first on Dainik Prabhat .
Pimpri accident: रस्त्यावर उभा असलेल्या ट्रकला धडक, हेल्मेट असूनही दुचाकीस्वाराचा चिरडून मृत्यू!
प्रभात वृत्तसेवा पिंपरी – रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला धडकून दुचाकीस्वार रस्त्यावर पडला. त्यावेळी पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाच्या चाकाखाली डोके आल्याने त्यांचा मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी (दि. ९) सकाळी ७.४५ वाजताच्या सुमारास डोंगरवस्ती, निघोजे येथे घडला.गिरीश एकनाथ कोठावदे (वय ४९) असे मृत्यूमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. हाकानी करीम शेख (वय ३६, रा. खालुंब्रे, ता. […] The post Pimpri accident: रस्त्यावर उभा असलेल्या ट्रकला धडक, हेल्मेट असूनही दुचाकीस्वाराचा चिरडून मृत्यू! appeared first on Dainik Prabhat .
दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, ११ डिसेंबर २०२५
पंचांगआज मिती मार्गशीर्ष कृष्ण सप्तमी शके १९४७.चंद्र नक्षत्र पूर्वा फाल्गुनी. योग विष्कंभ.चंद्र राशी सिंह.भारतीय सौर २० मार्गशीर्ष शके १९४७.गुरुवार दिनांक ११ डिसेंबर २०२५ . मुंबईचा सूर्योदय ०७.०१ मुंबईचा सूर्यास्त ०६.०१, मुंबईचा चंद्रोदय ००.३०उद्याची , मुंबईचा चंद्रास्त ०६.०१pm राहू काळ ०१.५४ ते ०३.१६ .कालाष्टमी,शुभ दिवसदैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)मेष : आत्मविश्वास वाढेल मनोबल उत्तम राहीलवृषभ : हाती घेतलेले काम पूर्ण जिद्दीने कराल भाग्य साथ देईल.मिथुन : आरोग्य उत्तम राहील.कर्क : आपल्या शब्दाला मान मिळेल.सिंह : दैनंदिन कामात कार्यमग्न राहाल.कन्या : शांत राहून निर्णय घेणे महत्त्वाचे ठरेल.तूळ : अर्थप्राप्ती मनासारखी होईल.वृश्चिक : वाद-विवाद टाळणे हितकारक राहील.धनू : अतिआत्मविश्वास टाळा.मकर : तुमचे अंदाज अचूक ठरतील.कुंभ : स्थावर मालमत्ता बाबत ची कामे होतील.मीन : महत्त्वाचे निर्णय शांतपणे घ्या.
विश्वासघात! मालकाने सोपवलेली सोन्याची बॅग घेऊन कामगार फरार, भोसरीतील घटना
प्रभात वृत्तसेवा पिंपरी – ज्वेलर्स दुकानातील कामगाराने ८० ग्रॅम सोने घेऊन पलायन केल्याची घटना समोर आली. या दागिन्यांची किंमत ६ लाख ४० हजार रुपये इतकी आहे. ही घटना भोसरीतील गुडविल चौकात शुक्रवारी (दि. ५) रात्री पावणे नऊ वाजताच्या सुमारास घडली.भैरुसिंग जवानसिंग सोलंकी (वय २८, रा. धोरा वरती, बोडसी, जालोर, राजस्थान) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे […] The post विश्वासघात! मालकाने सोपवलेली सोन्याची बॅग घेऊन कामगार फरार, भोसरीतील घटना appeared first on Dainik Prabhat .
प्रारुप मतदार यादीबाबत १०,६६८ तक्रारींचे निवारण
कंट्रोल चार्टद्वारे मतदार यादीची केली जाते पडताळणीमुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रसिध्द झालेल्या प्रारुप मतदार यादीवर प्राप्त झालेल्या ११ हजार ४९७ तक्रारींपैंकी आतापर्यंत १० हजार ६६८ तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे. त्यामुळे याबाबतची मतदार यादी गुरुवारी किंवा शुक्रवारी आयोगाला सादर करण्यात येणार आहे. मतदाराचे नाव राहत्या मतदार केंद्रात नसणे, बाजुच्या मतदार केंद्रात किंवा प्रभागात असणे अशाप्रकारच्या चुका दुरुस्ती करण्यावर भर देण्यात आला आहे. या तक्रारींचे निवारण प्रत्यक्ष स्थळी पाठवून याची खातरजमा केली जात असल्याचे महापालिकेच्या निवडणूक विभागाने स्पष्ट केले आहे.मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ अश्विनी जोशी आणि उपायुक्त विश्वास शंकरवार यांनी पत्रकारांशी बोलतांना ही आकडेवारी दिली आहे. प्रभागात वास्तव्य असताना दुसऱ्या प्रभागात किंवा परिसरात नाव असल्यास किंवा मतदारांची नावे समाविष्ठ नसणे तसेच नावात चुका अशाप्रकारच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. एकूण ११,४९७ हरकती व सूचना प्राप्त झाल्या होत्या. त्यातील १० हजार ६६८ तक्रारींवर निर्णय घेण्यात आला आहे. निवडणूक विभागाने यावर निर्णय घेण्याचे अधिकार प्राधिकृत अधिकारी म्हणून विभागाच्या सहायक अायुक्तांना दिले होते.त्यानुसार २६ विभागाच्या सहायक आयुक्तांनी यावर निर्णय घेतला आहे.यावर निर्णय घेतल्यानंतर अतिरिक्त आयुक्तांना यामध्ये त्रुटी आढळून आल्याने त्यांनी सर्व परिमंडळांच्या उपायुक्तांना याची पुनर्चाेकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार कंट्रोल चार्ट नुसार पाहणी केली जात आहे. आता कंट्रोल चार्टनुसार १५ डिसेंबरपर्यंत तपासणी केली जाईल. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या मतदार केंद्रनिहाय मतदार यादी ही २७ डिसेंबरपर्यंत बनवली जाणार आहे.
घरबसल्या करा सरकारी कामे: लगेच डाऊनलोड करा ‘हे’ 5 सरकारी ॲप्स
नवी दिल्ली: केंद्र सरकारने नागरिकांना ‘डिजिटल’ बनवण्यासाठी अनेक उपयुक्त मोबाइल ॲप्लिकेशन्स (Apps) सुरू केले आहेत. स्मार्टफोन वापरणाऱ्यांसाठी ही ॲप्स मोठी सोय ठरली असून, यामुळे अनेक महत्त्वाची सरकारी कामे घरबसल्या करणे शक्य झाले आहे. वेळ आणि पैसा या दोन्हींची बचत या माध्यमातून होत आहे. सरकारने नागरिक-केंद्रित सेवा, डिजिटल पेमेंट आणि सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी UMANG, BHIM, […] The post घरबसल्या करा सरकारी कामे: लगेच डाऊनलोड करा ‘हे’ 5 सरकारी ॲप्स appeared first on Dainik Prabhat .
मुंबई : उत्तरेकडील शीतलहरींच्या झपाट्याने महाराष्ट्रात तीव्र थंडीची लाट धडकली असून, पुढील दोन दिवस (१० आणि ११ डिसेंबर) धोक्याचे आहेत. हवामान विभागाने राज्यातील १४ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला असून, काही ठिकाणी तापमान बर्फाच्या खाली जाण्याची शक्यता सांगितली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात थंडीचा कडाका कायम राहणार असून, ११ डिसेंबरला किमान तापमान सामान्यापेक्षा ३-४ […] The post Weather Alert : महाराष्ट्रात ‘कोल्ड त्सुनामी’ धडकणार; पुढील 2 दिवस धोक्याचे; ‘या’ १४ जिल्ह्यांना यलो अलर्ट appeared first on Dainik Prabhat .
IPL 2026 च्या ऑक्शनमध्ये दिसणार श्रेयस अय्यर! ‘या’कारणामुळे घेतला मोठा निर्णय
Shreyas Iyer present at IPL 2026 mini auction table : आयपीएल २०२६ (IPL 2026) हंगामासाठी खेळाडूंचा मिनी ऑक्शन सोहळा १६ डिसेंबर रोजी अबु धाबी येथील एतिहाद एरीनामध्ये पार पडणार आहे. या मिनी ऑक्शनला खास बनवणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यर हा यावेळी पहिल्यांदाच ऑक्शन टेबलवर बसलेला दिसू शकतो. क्रिकबझच्या […] The post IPL 2026 च्या ऑक्शनमध्ये दिसणार श्रेयस अय्यर! ‘या’ कारणामुळे घेतला मोठा निर्णय appeared first on Dainik Prabhat .
Volodymyr Zelenskyy : युक्रेन देणार शांततेसाठीचा सुधारीत प्रस्ताव; झेलेन्स्की यांनी दिली माहिती
कीव : युक्रेनने युद्धबंदीसाठी नवीन सुधारीत प्रस्ताव सादर करण्याचा निणर्य घेतला आहे. अमेरिकेच्या मध्यस्थांकडे हा प्रस्ताव गुरुवारी सादर केला जाईल, असे युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी आज सांगितले. युद्धबंदीच्या मुद्द्यावर झेलेन्स्की उद्या युरोपातल्या नेत्यांशी चर्चा करणार आहेत. यावेळी युक्रेनमध्ये युद्धबंदी घडवून आणण्याच्या प्रयत्नांना पाठिंबा देणारे किमान ३० देशांचे नेते उपस्थित असणार आहेत. या चर्चेमध्ये स्वीकारता येण्याजोग्या […] The post Volodymyr Zelenskyy : युक्रेन देणार शांततेसाठीचा सुधारीत प्रस्ताव; झेलेन्स्की यांनी दिली माहिती appeared first on Dainik Prabhat .
अॅमेझॉन भारतात 35 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार; कंपनीचे उपाध्यक्ष अमित अगरवाल यांची घोषणा
नवी दिल्ली – अमेरिकेतला मोठा उद्योगसमूह अॅमेझॉनने भारतात 2030 पर्यंत 35 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीचे उपाध्यक्ष अमित अगरवाल यांनी आयोजित अॅमेझॉन संभव परिषदेत ही घोषणा केली. विकसित भारताच्या उद्दिष्टांशी अॅमेझॉनची प्रगती सुसंगत असल्याचं सांगून ते म्हणाले की, या गुंतवणुकीतून 10 लाख प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होईल. कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात क्षमतावाढ, […] The post अॅमेझॉन भारतात 35 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार; कंपनीचे उपाध्यक्ष अमित अगरवाल यांची घोषणा appeared first on Dainik Prabhat .
शेअर बाजाराचे निर्देशांक आले एक महिन्याच्या निचांकी पातळीवर; कारण काय ते जाणून घ्या..
मुंबई – भारतातील स्थूल अर्थव्यवस्था बळकट असूनही जागतिक पातळीवरील नकारात्मक परिस्थितीमुळे शेअर बाजाराचे निर्देशांक तीन दिवसापासून एकतर्फी कमी होऊन आता एक महिन्याच्या निचांकी पातळीवर आले आहेत. शेवटच्या सत्रात खासगी बँका, ग्राहक वस्तू कंपन्या व आयटी कंपन्यांच्या शेअरची जास्त विक्री झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 275 अंकांनी कमी होऊन 84,391 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा […] The post शेअर बाजाराचे निर्देशांक आले एक महिन्याच्या निचांकी पातळीवर; कारण काय ते जाणून घ्या.. appeared first on Dainik Prabhat .
देशातील स्टार्टअपची एकूण संख्या किती? 21 लाख जणांना मिळाला रोजगार
नवी दिल्ली – सरकारच्या मूल्यांकनाप्रमाणे सध्या देशातील स्टार्टअपची एकूण संख्या दोन लाखावर आहे. केंद्र सरकारने स्टार्टअप इंडिया मोहीम सुरू केली असून या मोहिमेअंतर्गत संबंधित स्टार्ट अपना प्राप्तिकर आणि इतर क्षेत्रात सवलती दिल्या जातात. सरकारने दिलेल्या माहितीनुसार उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाकडे नोंदली गेलेली दोन लाख स्टार्ट अप असून या स्टार्टअप मध्ये तब्बल 21 लाख […] The post देशातील स्टार्टअपची एकूण संख्या किती? 21 लाख जणांना मिळाला रोजगार appeared first on Dainik Prabhat .
चीनच्या निर्यातवाढीचं गुपित विश्लेषकांनी केलं उघड
मुंबई – सरलेल्या केवळ 11 महिन्यांमध्ये चीनची निर्यात आयातीपेक्षा एक लाख कोटी डॉलरने जास्त झाल्याबद्दल जगभरात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मात्र ही निर्यात चीनच्या केवळ नाविन्य आणि स्पर्धात्मकतेमुळे वाढलेली नाहीत तर चीनने ठरवून स्वतःच्या चलनाचे मूल्य कमी पातळीवर ठेवल्यामुळे ही निर्यात वाढण्यास मदत झाल्याचे मत विश्लेषकांनी व्यक्त केले आहे. कोटक म्युच्युअल फंडाचे व्यवस्थापकीय संचालक […] The post चीनच्या निर्यातवाढीचं गुपित विश्लेषकांनी केलं उघड appeared first on Dainik Prabhat .
भारताचा दुसर्या सहामाहीतील विकास दर मंदावणार ? आशियाई बँकेचा अंदाज काय सांगतो ?
नवी दिल्ली – दुसर्या तिमाहीत भारताचा विकास दर वाढून 8.2% झाला आहे. यामुळे इतर पतमानांकन संस्थाप्रमाणे आशियाई विकास बँकेने चालू आर्थिक वर्षाचा भारताचा विकास दर अंदाज पूर्वीच्या 6.5 टक्क्यावरून 7.2% इतका केला आहे. भारताच्या या वाढीव विकासदराचा आधार आशिया खंडाच्या विकासदराला मिळणार असून आशिया खंडाचा विकासदर या बँकेने 4.8% वरून 5.1% इतका होईल असे म्हटले […] The post भारताचा दुसर्या सहामाहीतील विकास दर मंदावणार ? आशियाई बँकेचा अंदाज काय सांगतो ? appeared first on Dainik Prabhat .
चांदीचा दर एकाच दिवसात 11 हजार 500 रुपयांनी वाढला; एका किलोची किंमत जाणून घ्या…
नवी दिल्ली – अमेरिका व्याजदरात कपात करणार असल्यामुळे सोने आणि चांदीची मागणी वाढली आहे. अशा परिस्थितीत बुधवारी दिल्ली सराफात चांदीचा दर एकाच दिवसात 11 हजार 500 रुपयांनी वाढून 1 लाख 92 हजार रुपये प्रति किलो या नव्या उच्चांक पातळीवर गेला आहे. जानेवारीपासून चांदीचा दर 114 टक्क्यांनी वाढला आहे. 31 डिसेंबर 2024 रोजी चांदीचा दर केवळ […] The post चांदीचा दर एकाच दिवसात 11 हजार 500 रुपयांनी वाढला; एका किलोची किंमत जाणून घ्या… appeared first on Dainik Prabhat .
MPSC आणि UGC NET परीक्षा एकाच दिवशी; विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम
मुंबई: राज्यातील नगरपालिका निवडणुकांमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) गट ब आणि गट क परीक्षांच्या तारखांमध्ये केलेल्या बदलामुळे आता मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. आयोगाने २१ डिसेंबर रोजी होणारी परीक्षा ४ जानेवारी रोजी घेण्याचे जाहीर केले आहे, मात्र याच दिवशी विद्यापीठ अनुदान आयोगाची (UGC) NET परीक्षाही नियोजित असल्याने हजारो उमेदवारांसमोर ‘कोणती परीक्षा द्यायची?’ असा पेच उभा […] The post MPSC आणि UGC NET परीक्षा एकाच दिवशी; विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम appeared first on Dainik Prabhat .
Naseem Shah : ‘चहा प्यायला चल…!’पाकिस्तानी क्रिकेटपटूच्या मराठीने वेधलं लक्ष, VIDEO होतोय व्हायरल
Naseem Shah Marathi video viral : भारत-पाक हे क्रिकेटच्या मैदानावरचे कट्टर प्रतिस्पर्धी असले तरी, या दोन देशांतील खेळाडूंच्या वैयक्तिक संबंधात मात्र आजही जिव्हाळा दिसतो. नुकताच आशिया चषक २०२५ दरम्यान दोन्ही संघांमध्ये तणाव आणि हस्तांदोलन टाळल्याचा प्रसंग घडला असला, तरी सध्या पाकिस्तानचा युवा वेगवान गोलंदाज नसीम शाहचा ‘मराठी’ बोलतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत […] The post Naseem Shah : ‘चहा प्यायला चल…!’ पाकिस्तानी क्रिकेटपटूच्या मराठीने वेधलं लक्ष, VIDEO होतोय व्हायरल appeared first on Dainik Prabhat .
एकनाथ खडसेंना मोठा धक्का; भोसरी भूखंड प्रकरणातील दोषमुक्ती अर्ज फेटाळला
पुणे : भोसरी एमआयडीसी भूखंड गैरव्यवहार प्रकरणात माजी महसूलमंत्री आणि शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे, त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे व जावई गिरीश चौधरी यांनी दाखल केलेला दोषमुक्तीचा अर्ज मुंबईतील भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या विशेष न्यायालयाने फेटाळला आहे. न्यायालयाने निरीक्षणात नमूद केले की, खडसे यांनी मंत्रीपदाचा गैरवापर करून कुटुंबीयांना लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केल्याचे प्रथमदर्शनी दिसते. […] The post एकनाथ खडसेंना मोठा धक्का; भोसरी भूखंड प्रकरणातील दोषमुक्ती अर्ज फेटाळला appeared first on Dainik Prabhat .
केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी; CGHS चे नवीन नियम जारी, जाणून घ्या फायदे
नवी दिल्ली: केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम (CGHS) आणि एक्स-सर्व्हिसमन कॉन्ट्रिब्युटरी हेल्थ स्कीम (ECHS) मध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. संरक्षण मंत्रालयाने हे सुधारित नियम १५ डिसेंबर २०२५ पासून लागू करण्याची घोषणा केली आहे. या बदलांमागील मुख्य उद्देश म्हणजे निवृत्तीवेतनधारक आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सेवा वितरण सुधारणे आणि हॉस्पिटल्सनी अद्ययावत मानकांचे पालन सुनिश्चित […] The post केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी; CGHS चे नवीन नियम जारी, जाणून घ्या फायदे appeared first on Dainik Prabhat .
पुणे : नातवाच्या निर्घृण हत्येप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले कुख्यात बंडू आंदेकर, त्यांची भावजय व माजी नगरसेविका लक्ष्मी आंदेकर तसेच माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या पत्नी सोनाली आंदेकर यांना पुणे महापालिकेची आगामी निवडणूक लढविण्यास विशेष मकोका न्यायालयाने परवानगी दिली आहे. ‘निवडणूक लढविणे हा प्रत्येक नागरिकाचा घटनात्मक अधिकार असून त्यासाठी न्यायालयाच्या परवानगीची आवश्यकता नाही,’ असे स्पष्ट करत […] The post Pune Crime : आंदेकर कुटुंबाचा निवडणूक लढविण्याचा मार्ग मोकळा; विशेष मकोका न्यायालयाचा महत्वाचा निर्णय appeared first on Dainik Prabhat .
निवडणुकीपूर्वी मोठी घडामोड..! शरद पवारांच्या दिल्लीतील निवास्थानी अजित पवार दाखल; काय आहे कारण?
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) संस्थापक शरद पवार यांच्या ८४व्या वाढदिवसाच्या निमित्ताने दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी राजकीय नेत्यांचा मोठा मेळावा झाला. या स्नेहभोजनाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थिती लावली. या कार्यक्रमाला उद्योगपती गौतम अदानी यांनीही हजेरी लावली असून, यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. १२ डिसेंबरला मुंबईत वाढदिवस […] The post निवडणुकीपूर्वी मोठी घडामोड..! शरद पवारांच्या दिल्लीतील निवास्थानी अजित पवार दाखल; काय आहे कारण? appeared first on Dainik Prabhat .
PAK vs AUS : इस्लामाबाद बॉम्बस्फोटानंतर ऑस्ट्रेलिया सतर्क! लाहोरमध्ये सुरक्षा तपासणी सुरू
Australia security delegation reaches Lahore : पाकिस्तानमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय संघाच्या ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेपूर्वी सुरक्षा तयारीचा आढावा घेण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे एक शिष्टमंडळ लाहोरला पोहोचले आहे. अलीकडे इस्लामाबादमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटानंतर विदेशी क्रिकेट संघांच्या पाकिस्तान दौऱ्याबद्दल नव्याने चिंता निर्माण झाल्या आहेत. कांगारू संघाचे वेळापत्रक – ऑस्ट्रेलियाचा संघ पुढील वर्षाच्या सुरुवातीला पाकिस्तानचा दौरा करणार आहे. या दौऱ्याची सुरुवात […] The post PAK vs AUS : इस्लामाबाद बॉम्बस्फोटानंतर ऑस्ट्रेलिया सतर्क! लाहोरमध्ये सुरक्षा तपासणी सुरू appeared first on Dainik Prabhat .
महाराष्ट्राला पंप स्टोरेज हब बनवण्याचे लक्ष्य : देवेंद्र फडणवीस
नागपूर : राज्याने पंप स्टोरेजमध्ये ७६,११५ मेगावॅट वीजनिर्मिती क्षमतेपर्यंत मजल मारली आहे.महाराष्ट्राला पंप स्टोरेज हब बनवण्याचे लक्ष्य असून महाराष्ट्रात पंप स्टोरेज प्रकल्पांच्या उभारणीसाठी झालेल्या करारांमुळे ५,८०० मेगावॅट वीजनिर्मिती क्षमतेची वाढ होणार आहे. या प्रकल्पात २३,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक आणि ११,५०० रोजगार निर्मिती होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत […] The post महाराष्ट्राला पंप स्टोरेज हब बनवण्याचे लक्ष्य : देवेंद्र फडणवीस appeared first on Dainik Prabhat .
बँका, विमा कंपन्या आणि फंडात पडून आहेत नागरिकांचे 1 लाख कोटी रुपये; पीएम मोदींनी केले ‘हे’आवाहन
नवी दिल्ली: देशातील बँका, विमा कंपन्या, म्युच्युअल फंड आणि डिव्हिडंड्स (लाभांश) मध्ये तब्बल एक लाख कोटींहून अधिक रक्कम अनक्लेम्ड (दावेदार नसलेली) अवस्थेत पडून आहे, अशी महत्त्वपूर्ण माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. ही प्रचंड रक्कम कोट्यवधी कुटुंबांच्या कष्टाची आणि गुंतवणुकीची कमाई असून, ती त्यांच्या मालकांपर्यंत पोहोचवणे हे सरकारचे मुख्य उद्दिष्ट आहे. बँकांमध्ये सर्वाधिक ७८ […] The post बँका, विमा कंपन्या आणि फंडात पडून आहेत नागरिकांचे 1 लाख कोटी रुपये; पीएम मोदींनी केले ‘हे’ आवाहन appeared first on Dainik Prabhat .
शिंदे माझे मित्र, आम्ही एकत्रित आहोत आणि एकत्रित लढू - देवेंद्र फडणवीस
नागपूर : महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात मतभेद असल्याच्या वावड्या उठवल्या जात आहेत. खुद्द मुख्यमंत्र्यांनी त्यावर भाष्य करीत, सर्व चर्चांना पूर्णविराम दिला. ते म्हणाले, महायुती म्हणून आम्ही एकत्रित आहोत. शक्यतो सगळीकडे एकत्र लढण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत. एकनाथ शिंदे नेहमीच माझे कौतुक करतात, मी त्यांचे कौतुक करतो. आम्ही दिलखुलास मित्र आहोत. त्यामुळे मनात काही न ठेवता आम्ही कौतुक करतो. आमच्यात काही राडा नाही, काही रोडा नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.नागपुरात माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले, “राहुल गांधी संसदेच्या अधिवेशनात असो किंवा नसो त्याने काहीही फरक पडत नाही. कारण त्यांचा अजेंडा ठरलेला आहे. रोज संविधानाचा अपमान करणे, संविधानाने तयार केलेल्या संस्थांचा अपमान करणे हा त्यांचा अजेंडा आहे. ते देशात राहून देशातील संविधानिक संस्थांचा अपमान करतात आणि परदेशात जाऊन देशाचा अपमान करतात. आता जर्मनीमध्येही ते पुन्हा आपल्या देशाचा आणि आपल्या लोकशाहीचा अपमान करतील. त्यामुळे त्यांच्याकडून जास्त काही अपेक्षा नाहीत.”अभिमन्यू पवार यांच्याबद्दल गैरसमज“अभिमन्यू पवार यांना झापले म्हणणे चुकीचे ठरेल. कालच्या प्रकरणात एकप्रकारे त्यांच्यावर अन्यायच झाला. कारण ते बोलले वेगळे आणि मी वेगळे ऐकले. त्याच्यापूर्वी एका प्रकरणात कुणीतरी लाडकी बहीण योजनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यामुळे मी त्यावर बोललो होतो. अभिमन्यू पवार म्हणाले की, लाडक्या बहिणींची मुले अवैध दारूकडे जात आहेत. माझ्या ऐकण्यात काहीतरी वेगळे आले आणि मी त्यांना लाडक्या बहिणींवर आक्षेप घेऊ नका असे म्हटले. त्यानंतर सगळ्या चॅनेलने मी त्यांना झापले असे छापले. पण माझा गैरसमज झाला असून त्यांनी योग्य प्रश्न मांडला होता,” असेही त्यांनी स्पष्ट केले.रेस्क्यु सेंटर तयार झाल्यावर बिबट्यांना पकडण्याचा वेग वाढेल“राज्याच्या विविध भागात बिबट्याचा प्रादुर्भाव पाहायला मिळत असून त्यासंदर्भात वनविभागाने काम सुरु केले आहे. आतापर्यंत जवळपास २२ बिबट्या पकडले आहेत. रेस्क्यु सेंटरचे काम हाती घेतले असून ते तयार झाल्यावर बिबट्यांना पकडण्याचा वेग वाढवता येईल. जंगलातील बिबट्यापेक्षा शेतात किंवा ऊसात जन्माला आलेला बिबट जास्त शहराकडे येतो. त्यामुळे त्यांना पकडून रेस्क्यू सेंटरमध्ये नेण्याच्या दृष्टीने कारवाई सुरु आहे,” असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.निवडणूक आयुक्तांना पदावरून हटवण्याची मागणी करणे अतिशयोक्ती“निवडणूक आयोगाचे काही निर्णय आम्हालाही मान्य नाही. मीसुद्धा त्यावर टीका केली आहे. निवडणूका पुढे नेणे अयोग्य होते, असे मलाही वाटते. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने यावर स्पष्टपणे टीका केली आहे. पण त्यांनी तो निर्णय घेतला. परंतू, तेवढ्या निर्णयांकरिता त्यांना पदावरून हटवण्याची मागणी करणे ही अतिशयोक्ती आहे. त्यामुळे आमची तरी अशी कुठलीही मागणी नाही,” असेही ते म्हणाले.पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणात दोषींवर कारवाई होणारपुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार यांच्यावर एफआयआर का दाखल केला नाही? असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने केला आहे. यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “मुंबई उच्च न्यायालयाने काय म्हटले ते मी ऐकले नाही. पण कोर्टाने जे काही विचारले त्यासंदर्भात योग्य उत्तर सादर केले जाईल. कुणालाही वाचवायचे नाही, ही सरकारची पहिल्या दिवसापासून भूमिका आहे. जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई होणार आहे. त्यामुळे यासंदर्भात आतापर्यंत केलेली कारवाई आणि पुढे काय कारवाई होणार आहे, याची सगळी माहिती आम्ही उच्च न्यायालयाला देऊ.”
'भाषा शिकवा पण भाषेसाठी हिंसा करू नका'
नागपूर : महाराष्ट्रात भाषेच्या आधारावर वाढत्या हिंसाचारावर समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी टीका केली आहे. नागपूर येथील विधीमंडळ परिसरात अर्णव खैरे आत्महत्या प्रकरणाच्या निषेधार्थ अबू आझमी आणि रईस शेख यांनी पायऱ्यांवर बसून आंदोलन केले.‘मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर आहे. देशभरातून लोक येथे रोजगारासाठी येतात. जे येथे जन्मलेले नाहीत किंवा ज्यांचे शिक्षण येथे झाले नाही, त्यांना मराठी शिकवायची असेल तर ती प्रेमाने शिकवा. पण भाषेच्या नावावर मारहाण करणे आणि दुकान तोडणे हे पूर्णपणे चुकीचे आहे,’ असे अबू आझमी म्हणाले. त्यांनी नाव न घेता मराठीवरुन राजकारण ठाकरे बंधूंवर अप्रत्यक्षपणे टीका केली. मराठी भाषा अनिवार्य करायची असेल तर ती शाळांमध्ये सक्तीची करावी, पाठ्यपुस्तके वाटावीत. पण भाषेच्या नावावर व्यक्तिगत हल्ले आणि अपमान होत असेल तर त्यावर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे.‘देशभरात व्यवसाय असलेल्या अनेक कंपन्यांची मुख्यालये मुंबईत आहेत. तिथल्या कर्मचाऱ्यांना मराठी बोलायला कोणी सांगत नाही. पण रिक्षाचालक, भाजीविक्रेते किंवा रस्त्यावर कष्ट करणाऱ्या गरीब मजुरांनाच लक्ष्य केले जाते. त्यांच्या मारहाणीचे व्हिडिओ व्हायरल केले जातात.' या प्रकरणात कारवाई व्हायला हवी, अशी मागणी अबू आझमींनी केली.
मुंबई लोकलमध्ये नियम कडक; मासिक पाससाठी लागू होणार 'हे'कडक नियम
मुंबई : लोकलमध्ये विनातिकिट किंवा बनावट तिकिटांचा वापर करुन प्रवास करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी रेल्वे प्रशासन सज्ज झाले आहे. अनारक्षित तिकीट प्रणाली (यूटीएस) ॲपद्वारे तिकिट बुकिंग वाढले असले, तरी त्याचबरोबर बनावट तिकिटांचा गैरवापरही मोठ्या प्रमाणात समोर येत असल्याने रेल्वेने आता नियम कठोर करण्याचा निर्णय घेतला आहे.अनेक प्रवासी बनावट तिकिटांचा वापर करत असल्याचे उघड झाल्यानंतर टीसींची तपासणी मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. त्याचबरोबर मासिक पास धारकांसाठी नवीन नियम लागू करण्यात आला आहे. आता पास काढताना ओळखपत्र दाखवणे अनिवार्य असेल. ऑनलाइन सीझन तिकीट बुक करतानाही प्रवाशांना वैध ओळखपत्राची माहिती सादर करावी लागेल. ओळखपत्रावरील तपशील आणि सीझन तिकिटावरील माहिती एकसारखी असणे बंधनकारक असेल. ओळखपत्र नसल्यास मासिक पास जारी केला जाणार नाही.एसी लोकलमध्येही आता कडक तपासणी होणार असून टीसी प्रत्येक डब्यात जाऊन तिकिटे तपासतील. त्यामुळे विनातिकिट आणि बनावट तिकिटांचा वापर करुन प्रवास करणाऱ्यांवर कारवाई होऊ शकते. रेल्वे प्रशासनाने जीआरपीला बनावट तिकिट तयार करणाऱ्या आरोपींविरोधात जलदगतीने गुन्हे दाखल करण्याची विनंती केली आहे.या गुन्ह्यांसाठी भारतीय न्याय संहिता (BNS) कायद्यातील कलम ३१८(२), ३३६(३), ३३६(४), ३४०(१), ३४०(२) आणि ३/५ अंतर्गत कारवाई केली जाईल. यामध्ये फसवणूक, बनावटगिरी आणि संबंधित अपराधांचा समावेश असून दोषी ठरल्यास दंडासह सात वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.
नागपूर: सिडको अंतर्गत बांधण्यात आलेल्या घरांच्या किंमतींमध्ये केलेल्या मोठ्या वाढीवरून निर्माण झालेल्या वादंगाच्या पार्श्वभूमीवर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिडकोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीने बैठक बोलावली. या बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांवर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, गरिबांसाठी असलेली घरे सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर जाऊ नयेत, यासाठी स्पष्ट निर्देश दिले आहेत.उपमुख्यमंत्र्यांची नाराजी आणि कठोर भूमिकासिडकोने घरांच्या किमती वाढवल्यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीय नागरिकांना घर घेणे कठीण झाले होते. यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अत्यंत कठोर भूमिका घेतली. हे चालणार नाही. गरिबांसाठी आणि सामान्य जनतेसाठी ती घरं आहेत. त्यांच्या आवाक्याबाहेर किंमत जाता कामा नये, अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी सिडको अधिकाऱ्यांना फटकारले. सिडको प्रकल्पांमधील घरांची मूळ किंमत आणि सध्याची विक्री किंमत यामध्ये मोठी तफावत असल्याबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.आमदार विक्रांत पाटील यांच्या आंदोलनाचा परिणामउपमुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने ही बैठक बोलावण्यामागे, आमदार विक्रांत पाटील यांनी काल अधिवेशनादरम्यान केलेल्या आंदोलनाची पार्श्वभूमी आहे. आमदार विक्रांत पाटील यांनी सिडकोच्या घरांच्या वाढलेल्या किंमती तातडीने कमी कराव्यात, अशी मागणी करत हे आंदोलन केले होते. सामान्य जनतेला परवडेल अशा दरात घरे उपलब्ध व्हावीत, यासाठी त्यांनी आवाज उठवला होता. उपमुख्यमंत्र्यांनी या आंदोलनाची आणि मागणीची तातडीने दखल घेतल्यामुळे अवघ्या एका दिवसात या विषयावर उच्चस्तरीय बैठक संपन्न झाली.बैठक सकारात्मक, किंमत कपातीचे संकेतउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील ही बैठक अत्यंत सकारात्मक ठरली आहे. अधिकाऱ्यांनी घरांच्या किंमत वाढीची कारणे स्पष्ट केली असली तरी, उपमुख्यमंत्र्यांनी सामान्यांचे हित सर्वोच्च मानून किंमत कमी करण्याच्या दिशेने तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. सिडकोच्या घरांच्या दरांचा लवकरच फेरविचार होऊन, सामान्य नागरिकांना दिलासा देणारा निर्णय अपेक्षित आहे. या बैठकीमुळे सामान्य नागरिकांना सिडकोच्या घरांसाठी दिलासा मिळण्याची शक्यता वाढली असून, आमदार विक्रांत पाटील यांच्या आंदोलनाला मोठे यश मिळाल्याचे बोलले जात आहे.
Chirag Paswan : कॉंग्रेसचा जनादेश चोरी झाला आहे; मतचोरीच्या आरोपावर चिराग यांचे उत्तर
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी काँग्रेस पक्षाच्या मतचोरीच्या आरोपांवरून हल्लाबोल केला आहे. काँग्रेस आणि त्यांच्या नेत्यांनी, विशेषतः राहुल गांधी यांनी हे समजून घेतले पाहिजे की ही केवळ मतचोरीची घटना नाही तर त्यांचा जनादेश चोरीला गेला आहे. त्यांच्याकडे आता कोणताही आधार राहिलेला नाही अशी टीका करत राहुल गांधींच्या परदेश प्रवासाबद्दल आणि चर्चेदरम्यान सभागृहात […] The post Chirag Paswan : कॉंग्रेसचा जनादेश चोरी झाला आहे; मतचोरीच्या आरोपावर चिराग यांचे उत्तर appeared first on Dainik Prabhat .
Puducherry U-19 Coach S. Venkatraman Brutally Attacked : क्रिकेट असोसिएशन ऑफ पुदुचेरी (CAP) च्या अंडर-१९ संघाचे मुख्य प्रशिक्षक एस. वेंकटरमन यांच्यावर तीन स्थानिक क्रिकेटपटूंनी ‘जीवे मारण्याच्या उद्देशाने’ हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ८ डिसेंबर रोजी सकाळी सीएपी कॉम्प्लेक्समधील इनडोअर नेटमध्ये ही घटना घडली, ज्यात प्रशिक्षक गंभीर जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला २० हून […] The post S Venkatraman : क्रिकेट विश्वात खळबळ! संघात निवड न झाल्याचा राग; पुदुचेरीच्या ३ खेळाडूंनी बॅटने फोडलं कोचचं डोकं appeared first on Dainik Prabhat .
नवी दिल्ली: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ‘व्होट चोरी’च्या मुद्द्यावरून सत्ताधारी भाजपला घेरल्यानंतर, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बुधवारी लोकसभेत निवडणूक सुधारणा प्रक्रियेवरील चर्चेला उत्तर देताना त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. ‘व्होट चोरी’ म्हणजे काय, याचे प्रकार स्पष्ट करत अमित शाह यांनी नेहरू-गांधी कुटुंबावर तीन वेळा ‘व्होट चोरी’ केल्याचा गंभीर आरोप केला. अमित शाह यांनी […] The post ‘नेहरूंना दोन मतं, तरीही पंतप्रधान’ – नेहरू-गांधी कुटुंबाने तीन वेळा ‘व्होट चोरी’ केली: अमित शाहांचा राहुल गांधींवर पलटवार appeared first on Dainik Prabhat .
राज्यात भीक मागण्यास बंदी घालणारे विधेयक मंजूर, अनेकांची नाराजी
नागपूर : राज्यात भीक मागण्यावर पूर्णपणे प्रतिबंध घालणारे विधेयक विधान परिषदेत अनेक सदस्यांच्या कडाक्याच्या विरोधात आणि सभागृहात गोंधळाच्या वातावरणात मंजूर करण्यात आले. या प्रक्रियेवर तालिका सभापती नीलम गोऱ्हे, आमदार मनिषा कायंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल मिटकरी यांच्यासह अनेक सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विधेयक मंजूर झाल्यानंतर शनिवारी सभापतींच्या दालनात विशेष बैठक बोलावण्यात आली असून, या […] The post राज्यात भीक मागण्यास बंदी घालणारे विधेयक मंजूर, अनेकांची नाराजी appeared first on Dainik Prabhat .
नागपूर : मुंबईतील मालाड-मालवणी भागात गेल्या १४ वर्षांत एका विशिष्ट समाजाची लोकसंख्या २० टक्क्यांवरून ३६ टक्क्यांपर्यंत वाढल्याचा दावा करत कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधिमंडळात काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांना खडसावले. मालवणीतील अतिक्रमण आणि एका शैक्षणिक संस्थेवरून दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली.मुंबई पालिकेच्या मालवणी टाऊनशिप शाळेतील शिक्षक भरतीवरून वादाला सुरुवात झाली. अस्लम शेख यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित करत म्हटले की, “स्वयंसेवी संस्थेमार्फत या शाळेत शिक्षकांची भरती करण्यात आली आहे. मात्र, हे शिक्षक टीईटी किंवा सीटीईटी या कोणत्याही परीक्षा उत्तीर्ण झालेले नाहीत. अपात्र शिक्षकांच्या भरतीमुळे विद्यार्थ्यांच्या भविष्यात खेळखंडोबा सुरू आहे”, असा आरोप त्यांनी केला.मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी या आरोपांना उत्तर देताना मुंबई महानगरपालिकेच्या धोरणाचा उल्लेख केला. ते म्हणाले, “बीएमसीने २००७ पासून शाळा खासगी संस्थांना दत्तक देण्याचे धोरण राबवले आहे. या धोरणांतर्गत आजपर्यंत ३७ शाळा दत्तक देण्यात आल्या आहेत. या संस्थांना फक्त शिक्षकांचे पगार आणि शाळा चालवण्याचा खर्च उचलण्याची जबाबदारी असते, त्यांना शाळेवर कोणताही मालकी हक्क मिळत नाही.” लोढा यांनी पुढे सांगितले की, मालवणी टाऊनशिप शाळा पूर्वी फझलानी ट्रस्टसोबत भागीदारीत चालवली जात होती. तेव्हा स्थानिक आमदारांना (अस्लम शेख) कोणताही आक्षेप नव्हता. आता फझलानी ट्रस्टने जबाबदारी नाकारल्याने प्रयास फाउंडेशन पुढे आले आहे. पालकांचीही तीच मागणी आहे.“मी सहपालकमंत्री या नात्याने पालकांच्या बाजूने उभे राहतो, त्यात काय चुकीचे आहे? विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित होत असेल, तर त्याला स्थानिक आमदारांचा विरोध कशासाठी? महापालिका शाळांसाठी सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) धोरण राबवताना सर्वांना समान न्याय दिला जाईल”, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महायुतीची एकजूट कायम: जिल्हा परिषदा, महानगरपालिकांच्या निवडणुका एकत्र लढवणार –चंद्रशेखर बावनकुळे
नागपूर : आगामी जिल्हा परिषदा आणि महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये महायुतीची एकजूट कायम राहणार असून, या सर्व निवडणुका एकत्रितपणे लढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महसूलमंत्री व भाजप निवडणूक प्रभारी चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी नागपूर येथे ही माहिती दिली. महायुतीने या निवडणुकांमध्ये ५१ टक्के मतांचा आकडा गाठून मोठा विजय मिळवण्याचे ध्येय निश्चित केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री […] The post महायुतीची एकजूट कायम: जिल्हा परिषदा, महानगरपालिकांच्या निवडणुका एकत्र लढवणार – चंद्रशेखर बावनकुळे appeared first on Dainik Prabhat .
PMPML चा पुन्हा कहर; नऊ वर्षांच्या मुलीचा बसखाली चिरडून मृत्यू, गरोदर बहीण गंभीर जखमी
पिंपरी-चिंचवड : शहरात अपघातांची मालिका सुरूच असून,एका अत्यंत हृदयद्रावक घटनेत पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (PMPML) भरधाव ई-बसने धडक दिल्याने नऊ वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत तिची गरोदर बहीण गंभीर जखमी झाली आहे. तळवडे-निगडी रस्त्यावर तळवडे चौकाजवळ मंगळवारी दुपारी सुमारे दीड वाजता हा अपघात झाला.काय आहे घटना?मृत्यू झालेल्या मुलीचे नाव सुधा बिहारीलाल वर्मा (९) असे आहे, तर गंभीर जखमी झालेल्या महिलेचे नाव राधा राममनोज वर्मा असे आहे. या घटनेनंतर पोलिसांनी बसचालक किरण भटू पाटील याला ताब्यात घेतले आहे. राधा आणि तिचा पती तळवडे येथील एका खासगी कंपनीत कामाला आहेत. राधा गरोदर असल्याने मदतीसाठी तिच्या लहान बहीण सुधाला दोन महिन्यांपूर्वी गावावरून बोलावून घेतले होते.त्यांचा भाऊ देखील त्यांच्यासोबत राहतो आणि तोही खासगी कंपनीत नोकरी करतो.राधाचा पती रात्रपाळी करून घरी झोपला होता,तर राधा कामावर गेली होती.दुपारी एकच्या सुमारास ती घरी परतली.तिने जेवण केले आणि कामावर परत जाण्यासाठी ती लहान बहीण सुधाला सोबत घेऊन पायी निघाली होती.दोघी बहिणी रस्ता ओलांडत असतानाच,भरधाव वेगात आलेल्या पीएमपीएमएलच्या बसने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत सुधा गंभीर जखमी झाली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. तर, तिची गरोदर बहीण राधादेखील गंभीर जखमी झाली.तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे जिथे तिच्यावर उपचार सुरू आहेत.
बिग बॉस हरुनही मराठमोळा प्रणित मोरे जिंकलाच,सलमान खानसोबत या सिनेमात झळकणार?
Bigg Boss 19 Pranit More मुंबई : बिग बॉस सीझन १९ चा ग्रँड फिनाले नुकसातच झाला. यंदाचा सीझन छोट्या पडद्यावरील अभिनेता गौरव खन्नाने जिंकलाय.बिग बॉसच्या ग्रँड फिनालेमध्येच सलमान खानने त्याचा बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित 'किक-२' सिनेमाचीही घोषणा केली.यावेळेस सिनेमासाठी प्रणित मोरेच्या नावाची शिफारस करणार असल्याचंही सलमानने म्हटलं. पण खरंच सलमान असं करणार आहे की त्याने मस्करी केली? नेमकं काय घडलंय...सलमान खानकडून 'किक 2' सिनेमाची घोषणाबिग बॉस सीझन १९ ग्रँड फिनालेमधून प्रणित मोरे आऊट झाला,त्यावेळेस त्याला बॅगेजसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला.त्यावर प्रणित म्हणाला की,माझं एक बॅगेज होते की मी बॉलिवूडमधील अनेक कलाकारांवर जोक केले होते.तर ते बॅगेज देखील मी इथेच सोडून जातोय.त्यावर सलमानने लगेच म्हटलं की,थांब,ते बॅगेज आम्ही रिकामं करू,ती आमची जबाबदारी आहे.आता मी 'किक २'सिनेमा करतोय आणि तुझ्या नावाची शंभर टक्के शिफारस करणार आहे. सलमान असं म्हणताच प्रणित मोरेसह उपस्थितांपैकी कोणालाच हसू आवरलं नाही.
महाराष्ट्राला पंप स्टोरेज हब बनवण्याचे लक्ष्य - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
राज्यात उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठी आतापर्यंत ५४ सामंजस्य करार करारांमुळे ५,८०० मेगावॅट वीजनिर्मितीत वाढ होणार या प्रकल्पात २३,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक आणि ११,५०० रोजगार निर्मिती होणारनागपूर : राज्याने पंप स्टोरेजमध्ये ७६,११५ मेगावॅट वीजनिर्मिती क्षमतेपर्यंत मजल मारली आहे.महाराष्ट्राला पंप स्टोरेज हब बनवण्याचे लक्ष्य असून महाराष्ट्रात पंप स्टोरेज प्रकल्पांच्या उभारणीसाठी झालेल्या करारांमुळे ५,८०० मेगावॅट वीजनिर्मिती क्षमतेची वाढ होणार आहे. या प्रकल्पात २३,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक आणि ११,५०० रोजगार निर्मिती होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पश्चिम घाट उदंचन जलविद्युत प्रकल्प, कोयना टप्पा- ६ उदंचन जलविद्युत प्रकल्प आणि सरोवर उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठी जलसंपदा विभाग आणि जेएसडब्लू निओ एनर्जी लि., महाजेनको रिन्यूबल एनर्जी लि.व न्यु एशियन इन्फ्रा. डेव्हलपमेंट प्रा.लि. यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आले.या कार्यक्रमास जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे) मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, जलसंपदा (विदर्भ, तापी, कोकण खोरे) व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, आमदार सुरेश खाडे, आमदार नरेंद्र मेहता, आमदार चित्रा वाघ, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी आदी उपस्थित होते.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र पंप स्टोरेज क्षमतेच्या दृष्टीने देशात आघाडीवर आहे. आपल्याकडे पश्चिम घाट आणि मोठ्या धरणांची प्रणाली असल्याने पंप स्टोरेजसाठी अत्यंत अनुकूल पर्यावरण उपलब्ध आहे. केंद्र शासनाचे यात सहकार्य मिळत असून या प्रकल्पांना गती मिळणार आहे. नवीकरणीय ऊर्जेतील अस्थिरता संतुलित करण्यासाठी पंप स्टोरेज प्रकल्प मोठ्या प्रमाणात उपयुक्त ठरणार आहे. कमीत कमी वेळेत प्रकल्प पूर्ण होण्यासाठी सर्व विभाग समन्वयाने काम करतील.राज्यात उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठी आतापर्यंत एकूण ५४ सामंजस्य करार करण्यात आले आहेत. या प्रकल्पामुळे ७६ हजार ११५ मेगावॅट वीज निर्मिती होणार आहे. त्यामुळे रुपये ४.०६ लाख कोटी इतकी गुंतवणूक व १.२५ लाख मनुष्यबळ रोजगार निर्मिती होणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.सामंजस्य करारातील उदंचन जलविद्युत प्रकल्पांची नावे व थोडक्यात माहिती१. पश्चिम घाट उदंचन जलविद्युत प्रकल्प -या प्रकल्पासाठी जेएसडब्ल्यु निओ एनर्जी लिमिटेड हे गुंतवणूक करणार असून ता. भोर, जि. पुणे व ता. महाड, जि. रायगड येथे उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाची ५,२०० स्थापित क्षमता (मे.वॅ) असून १९,९५० कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून ७, ००० रोजगार निर्मिती होणार आहे. हा देशातील सर्वात मोठा प्रकल्प असणार आहे.२. कोयना टप्पा-६ उदंचन जलविद्युत प्रकल्प -या प्रकल्पासाठी महाजेनको रिन्युएबल एनर्जी लि. (एमआरईएल) हे गुंतवणूक करणार असून कोयना, ता.पाटण जि. सातारा येथे उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाची ४०० स्थापित क्षमता (मे.वॅ) असून २,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून २,५०० रोजगार निर्मिती होणार आहे.३.सरोवर उदंचन जलविद्युत प्रकल्प -या प्रकल्पासाठी न्यु एशियन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट प्रा. लिमिटेड गुंतवणूक करणार असून हा प्रकल्प ता. अकोले, जिल्हा अहिल्यानगर येथे उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाची २०० स्थापित क्षमता (मे.वॅ) असून २०० कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून १,०५० रोजगार निर्मिती होणार आहे.या तिन्ही प्रकल्पांची ५, ८०० (मे.वॅ) स्थापित क्षमता असणार आहे. या प्रकल्पांसाठी २३,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. या तिन्ही प्रकल्पाच्या माध्यमातून ११,५०० रोजगार निर्मिती होणार आहे.राज्यात सार्वजानिक खासगी भागीदारीद्वारे (पीपीपी) उदंचन जलविद्युत प्रकल्प उदंचन जलविद्युत प्रकल्प विकसन करण्याचे धोरण २० डिसेंबर २०२३ रोजी निर्गमित करण्यात आले आहे. या धोरणास अनुसरून जेएसडब्लू निओ एनर्जी लि. महाजेनको रिन्यूबल एनर्जी लि.व न्यु एशियन इन्फ्रा. डेव्हलपमेंट प्रा.लि. या विकासकासोबत सामंजस्य करार करण्यात आले.
Priyanka Gandhi : मोदींचा अर्धा वेळ परदेशात जातो; प्रियंका गांधींचा भाजपवर हल्लाबोल
नवी दिल्ली : कॉंग्रेसचे नेते व लोकसभेतील विरोधीपक्ष नेते राहुल गांधी पुढील आठवड्यात जर्मनीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. भाजपने राहुल गांधी यांच्या परदेश दौऱ्यावर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली होती. यावर वायनाडच्या खासदार प्रियंका गांधी यांनी जोरदार पलटवार केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जवळजवळ कामकाजाचा अर्धा वेळ देशाबाहेर घालवतात, तरीही भाजपच विरोधकांना प्रश्न विचारतो असे म्हणताना […] The post Priyanka Gandhi : मोदींचा अर्धा वेळ परदेशात जातो; प्रियंका गांधींचा भाजपवर हल्लाबोल appeared first on Dainik Prabhat .
Blair Tickner : धक्कादायक! न्यूझीलंडच्या खेळाडूला गंभीर दुखापत, क्षेत्ररक्षण करताना खांदाच निखळला
Blair Tickner dislocated shoulder : न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडच्या संघाला मोठा झटका बसला आहे. सामन्याच्या पहिल्याच दिवशी भेदक गोलंदाजी करणाऱ्या वेगवान गोलंदाज ब्लेअर टिकनरला क्षेत्ररक्षण करताना गंभीर दुखापत झाली, ज्यामुळे त्याला थेट रुग्णालयात दाखल करावे लागले. वेलिंग्टन येथे खेळल्या जाणाऱ्या या कसोटीत टिकनरने शानदार प्रदर्शन केले. त्याने पहिल्या डावात वेस्ट […] The post Blair Tickner : धक्कादायक! न्यूझीलंडच्या खेळाडूला गंभीर दुखापत, क्षेत्ररक्षण करताना खांदाच निखळला appeared first on Dainik Prabhat .
Ahilyanagar Politics : जिल्ह्यात विखे पाटील फॅक्टरच्या वाढत्या प्रभावामुळे विरोधक घायाळ!
नेवासा : (राजेंद्र वाघमारे) – आजच्या कलियुगात राजकारणात पक्षांतर आणि विश्वासघाताची रोज नवी उदाहरणे समोर येत असताना, जिल्ह्यात मात्र एका नेत्याचे कार्यकर्ते आजही खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे आहेत. ते म्हणजे राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील! जिल्ह्यातील उत्तर ते दक्षिण असे अनेक कार्यकर्ते आज वेगवेगळ्या पक्षांत असले तरी त्यांचे मन एकच – […] The post Ahilyanagar Politics : जिल्ह्यात विखे पाटील फॅक्टरच्या वाढत्या प्रभावामुळे विरोधक घायाळ! appeared first on Dainik Prabhat .
मुख्यमंत्र्यांच्या पूरग्रस्ताना मदतीच्या आवाहनानंतर ‘इतका’ निधी झाला जमा; RTIमधून माहिती उघड
मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिवृष्टी बाधितांना मदतीचे केलेले आवाहन यशस्वी झाले असून, ऑक्टोबर महिन्यात मुख्यमंत्री सहायता निधीत उच्चांकी निधी जमा झाला आहे. सहायता निधी खडखडाट असताना इतका मोठा निधी मिळाल्याने गरजू पूरग्रस्तांना मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. माहिती अधिकार (RTI) कार्यकर्ते वैभव कोकाट यांनी केलेल्या अर्जातून ही माहिती समोर आली आहे. ४ नोव्हेंबर […] The post मुख्यमंत्र्यांच्या पूरग्रस्ताना मदतीच्या आवाहनानंतर ‘इतका’ निधी झाला जमा; RTIमधून माहिती उघड appeared first on Dainik Prabhat .
Pune News : आयुक्त नवल किशोर राम यांनी केली वाघोली- चऱ्होली रिंगरोडमध्ये बाधित जागा मालकांशी चर्चा
विश्रांतवाडी : वाघोली ते चऱ्होलीहद्दीपर्यंतचा रिंगरोड विकसित करण्यात येणार आहे. या रिंगरोडमुळे नगर रोड, सोलापूर रोड, नाशिक रोड, मुंबई रोड जोडले जाणार आहेत. यामुळे वाहतूक कोंडीची समस्या दूर होण्यास नक्कीच मदत होइल. वाघोलीपासून चऱ्होली हद्दीदरम्यानच्या सुमारे साडे पाच किलोमीटर अंतराराचा रस्ता विकसित करण्यासाठी जागा ताब्यात घेण्याबाबत प्रशासनाच्यावतीने प्रक्रिया सुरू आहे. यासाठी आयुक्त नवल किशोर राम […] The post Pune News : आयुक्त नवल किशोर राम यांनी केली वाघोली- चऱ्होली रिंगरोडमध्ये बाधित जागा मालकांशी चर्चा appeared first on Dainik Prabhat .
Pune land case : पार्थ पवारांवर गुन्हा दाखल होणार? अजित पवारांचं नाव घेत कोर्टाची जोरदार चपराक
Pune land case : पुण्यातील मुंढवा येथील बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या मालकीच्या सुमारे ४० एकर शासकीय जमिनीचा ३०० कोटींचा घोटाळा प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या प्रकरणी अटक झालेल्या शीतल तेजवानी हिने दाखल केलेल्या दुसऱ्या FIR विरोधातील याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना न्यायमूर्ती माधव जामदार यांनी स्वतःहून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र […] The post Pune land case : पार्थ पवारांवर गुन्हा दाखल होणार? अजित पवारांचं नाव घेत कोर्टाची जोरदार चपराक appeared first on Dainik Prabhat .
बारामती, इंदापूर पुण्यात ईडीची छापेमारी १०८ कोटींच्या डेअरी घोटाळ्याप्रकरणी नियामकांची मोठी कारवाई
पुणे: निष्पाप गुंतवणूकदारांच्या फसवणुकीबाबत व १०८.३० कोटी रुपयांच्या डेअरी घोटाळ्याप्रकरणी बारामती व इंदापूर व पुणे जिल्ह्यातील ५ ठिकाणांवर छापे घालण्यात आले आहेत. विद्यानंद डेअरी प्रायव्हेट लिमिटेड, आनंद सतीश लोखंडे, व विद्यानंद अँग्रोफिड प्रायव्हेट लिमिटेड यांच्यावर ही अंमलबजावणी संचनालयाने (Enforcement Directorate ED) हे छापे टाकले आहेत. यापैकी दोन धाडी पुण्यात, दोन धाडी बारामती व एक इंदापूर तालुक्यात घालण्यात आलेली आहे. ईडीने कलम १७ मनी लॉन्ड्रिंग कायदा २०२२ अंतर्गत ही कारवाई सुरू केलेली असून संबंधित प्रकरणात संशयितांची सखोल चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. संबंधित प्रकरणात विद्यानंद डेअरी, विद्यानंद अँग्रोफिड या दोन कंपनीच्या माध्यमातून लोखंडे व त्यांच्या परिवाराने गुंतवणूकदारांना मोठी स्वप्न दाखवून कंपनीच्या अवास्तविक संभाव्य नफ्याची माहिती देत मोठी रक्कम प्राप्त केली असल्याची माहिती ईडीकडून मिळत आहे.कथित प्रकरणात आरोपींनी वास्तविक ज्या कारणासाठी गुंतवणूक निधी मिळवला होता त्यासाठी नसून भलत्याच कारणांसाठी या दोन कंपन्यांच्या माध्यमातून पैसे दुसरीकडे वळते केले आहेत असा गंभीर आरोप करण्यात आला आहे. उद्योगाला लागणाऱ्या वस्तूंच्या खरेदीसाठी व भांडवलासाठी गुंतवणूकदारांकडून हा निधी मिळविण्यात आला होता मात्र गुंतवणूक ज्या उद्देशाने करण्यात आली होती ती न होता कंपनीने निधी वळवला अशी तक्रार ईडीकडे तक्रारदारांनी दाखल केली होती. त्यावर बुधवारी ईडीने संबंधित आरोपीच्या ठिकाणी छापेमारी करत चौकशीला सुरूवात केली आहे. पोलिसांनी या प्रकरणात कलम १७ मनी लॉन्ड्रिंग कायद्याअंतर्गत लोखंडे व त्यांच्या दोन कंपन्यावर एफआरआर दाखल केला आहे.
बीएमसी शाळा खासगीकरण वादाने अधिवेशन तापले; अस्लम शेख–लोढा आमनेसामने
नागपूर : मालवणीतील बीएमसी टाऊनशिप शाळेच्या मुद्द्यावरून मालाड पश्चिमचे आमदार अस्लम शेख आणि मुंबई उपनगरचे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यात प्रचंड वाद निर्माण झाला आहे. या वादाचे पडसाद थेट विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात उमटले. मुंबईतील बीएमसी शाळांच्या व्यवस्थापन आणि खासगीकरणाच्या शक्यतेवरून सत्ताधारी विरोधक आमनेसामने आल्याचे चित्र पाहायला मिळाले.विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात आमदार अस्लम शेख यांनी त्यांच्या मतदारसंघातील बीएमसी टाऊनशिप शाळा खासगी संस्थेला देण्याच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केला. शासनाने महापालिका शाळांचे खाजगीकरण करण्याचा काही निर्णय घेतला आहे का, असा त्यांच्या प्रश्नाचा मुख्य मुद्दा होता. या निर्णयाच्या विरोधात पालकांनी २३ ऑगस्ट २०२५ रोजी केलेल्या आंदोलनाचीही त्यांनी आठवण करून दिली आणि शासनाने या तक्रारीवर कोणतीही ठोस कारवाई केली का, अशी विचारणा केली.शेख यांनी पुढे सांगितले की, दत्तक शाळा धोरणानुसार त्यांच्या मतदारसंघातील एक व्यवस्थित चालणाऱ्या शाळेत अचानक शिक्षक बदलण्यात आले. सीबीएसई वर्ग असलेल्या या शाळेत १० वी आणि १२ वीचे शिक्षक बदलल्यामुळे पालकांनी आंदोलन केले. यावर उत्तर देताना राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी या शाळेत फी आकारली जाणार असा पालकांचा गैरसमज झाला होता, असे सांगितले. मात्र, हे उत्तर चुकीचे असल्याचा आरोप शेख यांनी केला आणि शाळेची माहितीच चुकीची देण्यात आल्याचे म्हटले. त्यामुळे सभागृहात वातावरण तापले.मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी या मुद्द्यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, महापालिकेचे शाळा दत्तक धोरण २००७ मध्ये लागू झाले होते आणि त्यानुसार अनेक शाळा विविध संस्थांना देण्यात आल्या. मालवणीतील ही शाळा आधी फजलानी ट्रस्टकडे होती, परंतु ट्रस्टने शाळा चालवण्यास नकार दिल्यानंतर ती प्रयास फाऊंडेशनकडे देण्यात आली. प्रयास फाऊंडेशननंतर विद्यार्थ्यांचा निकाल सुधारल्याचेही लोढा यांनी सांगितले.यावर पुढे बोलताना लोढा यांनी अस्लम शेख यांना थेट उद्देशून टीका करत त्यांचा हेतू संशयास्पद असल्याचे म्हटले. आंदोलनाच्या वेळी ते स्वतः पालकमंत्री म्हणून हजर होते, तरी त्यांना धमक्या देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. मात्र, माझा मुद्दा केवळ शिक्षकांच्या भरतीची कायदेशीरता आणि त्यांच्या टीईटी पात्रतेचा होता, असे शेख यांनी प्रत्युत्तर दिले. या संपूर्ण घटनेदरम्यान सत्ताधारी आणि विरोधकांच्या मुंबईतील आमदारांमध्ये तीव्र शब्दयुद्ध झाल्याचे हिवाळी अधिवेशनात स्पष्ट दिसून आले.
नागपूर : राज्यातील ईव्ही व ई-बाइक वापरकर्त्यांना टोलमाफी देण्याबाबत पुढील आठ दिवसांत कार्यवाही करावी, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले आहेत. तसेच या निर्णयाच्या अंमलबजावणी पासून आज पर्यंतच्या काळात टोल घेतला गेला असल्यास पुरावा सादर केल्यावर नागरिकांना टोल परतावा द्यावा, असेदेखील राहुल नार्वेकरांनी स्पष्ट केले आहे. ई वाहनांना टोल माफी देण्याचा निर्णय राज्य […] The post Rahul Narwekar : “8 दिवसांत ई-वाहनांच्या टोलमाफीची अंमलबजावणी करा”; विधानसभा अध्यक्षांनी दिले निर्देश appeared first on Dainik Prabhat .
Hardik Pandya reaction and Girl friend : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या गेलेल्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने विजय मिळवला, पण या सामन्यात सर्वाधिक चर्चा झाली ती अष्टपैलू हार्दिक पंड्याच्या जोरदार पुनरागमनाची. दुखापतीमुळे दोन महिन्यांहून अधिक काळ खेळापासून दूर असलेल्या हार्दिकने या सामन्यातून दमदार कमबॅक केले. ज्याच्यासाठी त्याला सामनावीर पुरस्कारांनी गौरविण्यात आले. […] The post Hardik Pandya Girlfriend : हार्दिकने कमबॅकचं श्रेय गर्लफ्रेंडला देताच तिच्या कमेंटनं वेधलं लक्ष; म्हणाली, ‘माझ्या किंगसारखं कोणीही…’ appeared first on Dainik Prabhat .
31 डिसेंबर ‘या’दोन महत्वाच्या कामांची अंतिम मुदत; न केल्यास मोठी अडचण, दंडही बसेल
नवी दिल्ली: वर्षाचा शेवटचा महिना, डिसेंबर सुरू आहे. ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत काही महत्त्वाची कामे पूर्ण करणे सामान्य नागरिकांसाठी अत्यंत आवश्यक आहे. ही कामे वेळेत पूर्ण न केल्यास तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते, इतकेच नाही तर दंड देखील भरावा लागेल. १. पॅन-आधार लिंक करण्याची अंतिम तारीख – पॅन-आधार लिंक करण्याची अंतिम तारीख ३१ […] The post 31 डिसेंबर ‘या’ दोन महत्वाच्या कामांची अंतिम मुदत; न केल्यास मोठी अडचण, दंडही बसेल appeared first on Dainik Prabhat .
नागपूर : छोटी राज्ये ही अधिक चांगल्या प्रकारे विकसित होऊ शकतात. त्यामुळे याबाबत भाजपचा नेहमीच पुढाकार राहिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात संपूर्ण विदर्भाचा विकास हा अजेंडा घेऊन आम्ही पुढे जात असून सर्व क्षेत्रात विदर्भाला न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत, अशी प्रतिक्रिया महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वेगळ्या विदर्भाच्या प्रश्नावर दिली.विधानभवन परिसरात बुधवारी माध्यमांशी बोलताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, “भाजपचा जाहीरनामा हा छोट्या राज्याचाच आहे. विदर्भाला खऱ्या अर्थाने विकसित करण्याचा आमचा प्रयत्न आहे. २०१४ नंतर विदर्भाच्या संपुर्ण विकासाची योजना तयार झाली. आम्ही विकसित विदर्भाच्या बाजूने काम करतो आहोत. सुरुवातीपासूनच छोटे राज्य हे विकसित राज्य होऊ शकतो यासाठी भाजपचा नेहमीच पुढाकार राहिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात संपूर्ण विदर्भाचा विकास हा अजेंडा घेऊन आम्ही पुढे जात असून सर्व क्षेत्रात विदर्भाला न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत.”काँग्रेसने विदर्भाचा विकास केला नाही“काँग्रेसने कधीही विदर्भाचा विकास केला नाही. त्यामुळे त्यांचे विदर्भात पतन झाले. विदर्भात काँग्रेसला कुठल्याही मुद्यावर लोक मत देत नसल्याने भावनिक मुद्दा घेऊन काँग्रेस राजकरण करत आहे. पण त्यांना याचा फायदा होणार नाही,” असेही ते म्हणाले.जिल्हा परिषद आणि महापालिकांच्या निवडणुका महायुतीतच “परवा रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मी आमच्यात चर्चा झाली. या चर्चेत महाराष्ट्रात महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणूकांमध्ये आम्ही महायुतीमध्ये एकत्रित निवडणूका लढवणार आहोत. तसेच निवडणूकीची रचना कशी असेल, याबाबत आम्ही महापालिका आणि जिल्हास्तरावर अधिकार दिले आहेत,” असेही मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
मंदिरांच्या जमिनी वाचवण्यासाठी विशेष कायदा करा!
नागपूर : भूमाफियांनी राज्यातील देवस्थानांच्या शेकडो एकर शेतजमिनी हडपल्याने त्यांच्या संरक्षणासाठी गुजरात आणि कर्नाटकच्या धर्तीवर ‘अँन्टी लँड ग्रॅबिंग (प्रतिबंध) कायदा’ लागू करावा, अशी मागणी करीत महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या प्रतिनिधींनी बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.नागपूर विधानभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंदिर महासंघाच्या वतीने ‘अँन्टी लँड ग्रॅबिंग (प्रतिबंध) कायदा करावा, सॅनबॅनवर बंदी घालावी, तसेच मंदिरांचे मुद्रांक शुल्क माफ करावे, अशा मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या वेळी मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट, हिंदु जनजागृती समितीचे अभिजीत पोळके उपस्थित होते. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिन्ही निवेदनांचा विषय समजावून घेतला, तसेच पुढील कार्यवाहीसाठी सदरचे निवेदन सचिवांना पाठवून दिले.देवस्थानांच्या जमिनी वाचवण्यासाठी गुजरात आणि कर्नाटकच्या धर्तीवर ‘अँन्टी लँड ग्रॅबिंग (प्रतिबंध) कायदा’ तात्काळ लागू करावा, तसेच विशेष अन्वेषण पथके (एस्.आय.टी.) स्थापन करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
Stock Market: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स 275 अंकांनी खाली
मुंबई: अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या धोरणात्मक घोषणेपूर्वी जागतिक बाजारातून मिळालेल्या संमिश्र संकेतांच्या पार्श्वभूमीवर, भारतीय शेअर बाजारातील घसरणीचा सिलसिला बुधवारीही कायम राहिला. सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी सलग तिसऱ्या दिवशी लाल निशाणीवर क्लोजिंग दिली. बुधवारी सेन्सेक्स २७५ अंकांनी घसरून ८४,३९१ च्या स्तरावर बंद झाला. सेन्सेक्सने ८४,६०७ च्या पातळीवर ओपनिंग दिली होती आणि दिवसअखेर तो ०.३२ […] The post Stock Market: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स 275 अंकांनी खाली appeared first on Dainik Prabhat .
मोदी लोकांचे हृदय हॅक करतात; हे कॉंग्रेसवाल्यांना समजत नाही, खासदार कंगना रनौत नेमक्या काय म्हणाल्या
Kangana Ranaut | संसदेत निवडणूक सुधारणा या विषयावर चालू असलेल्या चर्चेदरम्यान भाजपच्या खासदार कंगना रनौत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेले विधान चांगलेच चर्चेत आले. काँग्रेसकडून ईव्हीएमवर सतत होत असलेल्या टीकेला उत्तर देताना कंगनांनी आपला स्पष्ट सूर मांडत ईव्हीएम हॅकिंगच्या आरोपांवरून काँग्रेसवर जोरदार टीका केली. लोकसभा सत्रात 9 डिसेंबर रोजी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी […] The post मोदी लोकांचे हृदय हॅक करतात; हे कॉंग्रेसवाल्यांना समजत नाही, खासदार कंगना रनौत नेमक्या काय म्हणाल्या appeared first on Dainik Prabhat .
लाडकी बहीण योजनेचा हप्ता 2100 रुपये कधी होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली माहिती – मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील मानधन 2100 रुपये करण्याबाबत योग्य वेळी निर्णय घेण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी विधानसभेत दिले. आतापर्यंत पावणेदोन कोटी महिलांनी eKYC पूर्ण केले असून अंतिम मुदत 31 डिसेंबर आहे. योजनेत पाच हजार 136 कोटी रुपयांचा […] The post Today TOP 10 News: …तर पोलिसांना ई-चलनची कारवाई करता येणार नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा, वाचा आजच्या टाॅप 10 बातम्या appeared first on Dainik Prabhat .
Newasa News : नेवासा नगरपंचायत निवडणूक पुन्हा रंगात; उमेदवारांची दुसरी इनिंग सुरू
नेवासा : (राजेंद्र वाघमारे) – पहिल्यांदा जोरदार प्रचाराला सुरुवात झालेल्या नेवासा नगरपंचायत निवडणुकीला अचानक निवडणूक आयोगाने ब्रेक लावल्याने उमेदवारांसह मतदारांचाही चांगलाच हिरमोड झाला होता. आता ही निवडणूक पुढे ढकलण्यात आल्यानंतर अवघ्या दहा-बारा दिवसांतच उमेदवार पुन्हा रिंगणात उतरले असून, खिशाला कात्री मारूनही प्रचाराचा धुराळा उडवण्यास सुरुवात केली आहे. निवडणूक पुढे गेल्याने काही उमेदवारांनी खर्च थांबवला होता. […] The post Newasa News : नेवासा नगरपंचायत निवडणूक पुन्हा रंगात; उमेदवारांची दुसरी इनिंग सुरू appeared first on Dainik Prabhat .
Newasa News : नेवासे नगरपंचायत निवडणूक पुन्हा रंगात; उमेदवारांची दुसरी इनिंग सुरू
नेवासा : पहिल्यांदा जोरदार प्रचाराला सुरुवात झालेल्या नेवासे नगरपंचायत निवडणुकीला अचानक निवडणूक आयोगाने ब्रेक लावल्याने उमेदवारांसह मतदारांचाही चांगलाच हिरमोड झाला होता. आता ही निवडणूक पुढे ढकलण्यात आल्यानंतर अवघ्या दहा-बारा दिवसांतच उमेदवार पुन्हा रिंगणात उतरले असून, खिशाला कात्री मारूनही प्रचाराचा धुराळा उडवण्यास सुरुवात केली आहे. निवडणूक पुढे गेल्याने काही उमेदवारांनी खर्च थांबवला होता. काहीजण तर नॉट […] The post Newasa News : नेवासे नगरपंचायत निवडणूक पुन्हा रंगात; उमेदवारांची दुसरी इनिंग सुरू appeared first on Dainik Prabhat .
मुंबई: इंडिगो एअरलाईन्स (Interglobe Aviation Limited) कंपनीचे सीईओ पीटर इलिबर्स यांना सरकारने चौकशीसाठी तत्काळ समन्स बजावले आहे. डीजीसीए (Directorate General of Civil Aviation DGCA) विभागाने ११ डिसेंबर दुपारी ३ वाजेपर्यंत चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एअरलाईन्सने एक दिवसाची मुदतवाढ मागितली होती मात्र सरकारने ती नाकारत चौकशीचे आदेश देतानाही संपूर्ण माहिती अहवालासह उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. मोठ्या प्रमाणात विमान प्रवाशांचे हाल झाल्यानंतर सरकार अँक्शन मोडवर आले आहे. २००० पेक्षाही अधिक विमाने रद्द झाल्यावर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गैरसोय झाली. घटलेल्या विमानांमुळे कंपनीने ३००० ते ६० ते ८० हजार रूपयांपर्यंत तिकिटाचे दर सरकारने ताकीद देऊनसुद्धा वाढवले होते या प्रकरणीही कंपनीची कसून चौकशी केली जाऊ शकते. डीजीसीएच्या सूत्रांचे म्हणणे आहे की एअरलाइनने प्रवाशांना पाठवल्या जाणाऱ्या रिअल-टाइम अपडेट्सचे पुरावे दाखवावेत अशी विचारणा केली आहे.काल सीईओ पीटर इलिबर्स यांच्याकडून विमान सेवा पूर्ववत झाल्याचे स्पष्ट करण्यात आले असले तरी डीजीसीए याविषयी खरच सेवा पूर्ववत झाली आहे का यावर पडताळणी करणार आहे. इतकेच नाही तर किती उड्डाणे अजूनही विस्कळीत आहेत, किती प्रवासी अजूनही पुनर्निवासाच्या प्रतीक्षेत आहेत आणि वृद्ध प्रवाशांसाठी, वैद्यकीय प्रकरणांमुळे आणि सोबत नसलेल्या अल्पवयीन मुलांसाठी कोणत्या प्राधान्य यंत्रणा आहेत याचे स्पष्ट चित्र डीजीसीएला हवे आहे. मनुष्यबळाची व रोस्टर गॅपशी संबंधित कारण कंपनीने दिले असले तरी अनुपालनाविषयी किती तरतूद कंंपनीने केली यावरही प्रशासन विचारू शकते.अधिकाऱ्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे की विमान कंपनीला तिच्या अंतर्गत देखरेख प्रणालीचे स्पष्टीकरण विचारले जाईल आणि तिचे नेटवर्क किती वेळात पूर्ववत होईल अशी अपेक्षा आहे याबाबत विचारणा होणार आहे.डीजीसीएने इंडिगोला सक्रिय वैमानिक आणि केबिन क्रूचची नवीन आकडेवारी तसेच येत्या काही महिन्यांसाठी त्यांची अपेक्षित भरती आणि मोठ्या प्रमाणात रद्दीकरण होऊ शकणाऱ्या फ्लाइट ड्युटी टाइम लिमिटेशन (एफडीटीएल) उल्लंघनांना टाळण्यासाठी अंमलात आणल्या जाणाऱ्या उपाययोजना घोषित करण्यास सांगितल्या आहेत अशी खात्रीलायक माहिती दिली जात आहे.किती प्रवाशांना पर्यायी इंडिगो फ्लाइटमध्ये हलवण्यात आले आणि किती प्रवाशांना इतर एअरलाइन्समध्ये जागा देण्यात आल्या याची माहिती एअरलाइनने द्यावी अशीही विचारणा कंपनीला चौकशीदरम्यान केली जाईल अशी माहितीपुढेयेतआहे.
मोठी बातमी..! पुण्यातील कसबा गणपती मंदिर 15 डिसेंबरपासून बंद; काय आहे कारण?
Pune Kasba Ganpati : पुण्याचे ग्रामदैवत असलेल्या श्री कसबा गणपतीवरील सिंदूरलेपन दूर करण्यात येणार असून, भाविकांना मूळ मूर्तीचे दर्शन घडणार आहे. ही प्रक्रिया १५ डिसेंबरपासून सुरू करण्यात येणार असून प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे. याविषयी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त विनायक बाजीराव ठकार यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली. मंदिराच्या आतापर्यंतच्या उपलब्ध असलेल्या इतिहासात […] The post मोठी बातमी..! पुण्यातील कसबा गणपती मंदिर 15 डिसेंबरपासून बंद; काय आहे कारण? appeared first on Dainik Prabhat .
पुणे : मागच्या वर्षी मोठ्या प्रमाणात चर्चेत असलेल्या पुणे पोर्शे कार अपघात (Porsche Car Accident) प्रकरणात राज्य सरकारने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी येरवडा पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे आणि सहायक पोलीस निरीक्षक विश्वनाथ तोडकरी यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. काय होतं नेमकं प्रकरण? पुण्यातील कल्याणीनगरमध्ये १९ मे २०२४ रोजी १७ वर्षीय […] The post Porsche Car Accident : पोर्शे कार अपघातात मोठी कारवाई ! PI राहुल जगदाळे आणि API तोडकरी सेवेतून बडतर्फ appeared first on Dainik Prabhat .
लाडक्या बहीणींना 2100 रुपये कधी मिळणार? एकनाथ शिंदेनी सभागृहात दिली महत्वाची माहिती
नागपुर : हिवाळी अधिवेशनाच्या तिसरा दिवस आहे. ठाकरेसेना आमदार सुनील प्रभू यांनी लाडकी बहीण योजनेत झालेल्या भ्रष्टाचाराची लक्षवेधी सभागृहात मांडली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत 12 हजार 431 पुरुषांनी प्रत्येकी 1500 रुपये घेऊन 164 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप प्रभू यांनी केला. प्रभू यांच्या या लक्षवेधीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील, मंत्री आदिती तटकरे आणि […] The post लाडक्या बहीणींना 2100 रुपये कधी मिळणार? एकनाथ शिंदेनी सभागृहात दिली महत्वाची माहिती appeared first on Dainik Prabhat .
मोठी बातमी - अमेरिका भारत द्विपक्षीय करारावर नवी दिल्लीत चर्चा सुरू युएस शिष्टमंडळ भारतात दाखल
नवी दिल्ली: आज ठरल्याप्रमाणे भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी युएसचे व्यापार विभागाचे उपप्रमुख प्रतिनिधी रिक स्विझटर (Rick Swizter) यांच्याशी आंतरराष्ट्रीय स्तरावरील भारत व युएस यांच्यातील संबंधावर तोडगा काढण्यासाठी महत्वपूर्ण चर्चा केल्याची माहिती व्यापार विभागाचे दिली आहे. त्यानुसार त्यांनी भारत व युएस यांच्यातील परराष्ट्र मुद्यावर महत्वाची चर्चा केली आहे. युएस भारत व्यापार, आर्थिक व तांत्रिक भागीदारी व जागतिक पुरवठा साखळीत (Global Supply Chain) दोन्ही देशातील संरचनात्मक बांधणी यावर चर्चा झाल्याचे समजते. व्यापार विभागाचे प्रवक्ते रणधीर जैसवाल यांनी एक्सवर याविषयी पोस्ट करत माहिती दिली.एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये,'परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी अमेरिकेचे उप-व्यापार प्रतिनिधी रिक स्वित्झर यांची भेट घेतली. भारत-अमेरिका यांच्यातील मजबूत आर्थिक आणि तंत्रज्ञान भागीदारी, चालू व्यापार वाटाघाटी आणि द्विपक्षीय व्यापार आणि लवचिक पुरवठा साखळी वाढवण्याच्या संधी यावर चर्चा झाली' असे जैसवाल यांनी म्हटले आहे.प्रामुख्याने रिक स्वित्झर हे भारत सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी भारतात आले आहेत. त्यामुळे याबाबत पडद्यामागे राजकीय हालचालींना वेग आल्याचे स्पष्ट होत आहे. दोन्ही बाजूंमध्ये आधीच द्विपक्षीय चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या आहेत अद्याप यश आलेले नाही. नुकत्याच केलेल्या वक्तव्यात वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज,'प्रस्तावित द्विपक्षीय व्यापार करारावर अमेरिकेशी चर्चा प्रगतीपथावर आहे' असे म्हटले होते. त्यांनी पुढेसांगितले की, अमेरिकेचे पथक वाटाघाटीसाठी नवी दिल्लीत आले आहे.त्यांच्याशी चर्चा सातत्याने सुरू आहे. आम्ही द्विपक्षीय व्यापार कराराकडे वाटचाल करत आहोत असे गोयल यांनी प्रवासी राजस्थानी दिवस येथील कार्यक्रमात पत्रकारांना सांगितले. त्यांनी संकेत दिले की ते भेट देणाऱ्या अमेरिकन अधिकाऱ्यांना भेटू शकतात.उप-अमेरिका व्यापार प्रतिनिधी (यूएसटीआर) रिक स्वित्झर यांच्या नेतृत्वाखालील एक शिष्टमंडळ त्यांचे भारतातील राजेश अग्रवाल यांच्याशी दोन दिवसांच्या व्यापार चर्चेसाठी दिल्लीत आले आहे.भारत आणि अमेरिका कराराच्या पहिल्या टप्प्याला अंतिम स्वरूप देण्यासाठी काम करत असल्याने ही भेट महत्त्वाची असल्याची सांगितली जाते. रशियन कच्च्या तेलाच्या खरेदीमुळे अमेरिकन बाजारात येणाऱ्या भारतीय वस्तूंवर अतिरिक्त २५ टक्के कर आणि २५ टक्के अतिरिक्त दंड लादल्यानंतर अमेरिकन अधिकाऱ्यांचा हा दुसरा दौरा भारतात आहे.अमेरिकन अधिकाऱ्यांनी शेवटचा दौरा १६ सप्टेंबर रोजी भारतात केला.यापूर्वी २२ सप्टेंबर रोजी गोयल यांनी व्यापार चर्चेसाठी अमेरिकेला अधिकृत शिष्टमंडळाचे नेतृत्व केले होते. त्यांनी मे महिन्यात वॉशिंग्टनलाही भेट दिली होती. नुकतेच वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांनी स्पष्ट केले आहे की,भारत या वर्षीच व्यापार करार तडीस पोहोचवेल अशी आशा बाळगतो. ज्यामुळे भारतीय निर्यातदारांच्या फायद्यासाठी टॅरिफचा प्रश्नसोडवलाजाईल.'
बिबट्यांच्या समस्येवर ९० दिवसांत उपाय करा
नागपूर : बिबट्याची दहशत संपवा, राज्यात दोन बिबट्या रेस्क्यू सेंटर सुरू करा... बिबट्यांच्या समस्येवर ९० दिवसांत उपाय करा अशी मागणी शिवसेना आमदार शरद सोनावणे यांनी केली आहे.बिबट्यांचे राज्यातल्या नागरी वस्तीवरचे हल्ले वाढत आहेत. मागील तीन महिन्यांत बिबट्यांमुळे ५० पेक्षा जास्त मृत्यू झाले आहेत. बिबट्या हा मांजर प्रकारातील (मार्जार वर्गातील) वन्य प्राणी आहे. याआधी २०१४ - १५ मध्ये बिबट्याचा धोका सांगितला होता. पण त्यावेळी या धोक्याकडे दुर्लक्ष केले गेले. आता संकटाची तीव्रता वाढली आहे. बिबटे वेळीअवेळी कुठेही हल्ले करत आहेत. यामुळे मुलांनी शाळेत जाणे थांबवले. शेतावर किंवा अन्यत्र कामासाठी जाणाऱ्यांना भीती वाटू लागली आहे. एरवी सकाळी घराबाहेर पडणारे सकाळी १० किंवा ११ वाजता घराबाहेर पडून अवघ्या काही तासांत कामं उरकून परतत आहेत. बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे नागरिक दहशतीच्या वातावरणात जगत आहेत. या संकटातून मार्ग काढणे आवश्यक आहे.राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच वनमंत्री गणेश नाईक यांनी बिबट्याच्या समस्येकडे गांभिर्याने बघावे. बिबट्यांची समस्या सोडवण्यासाठी दोन रेस्क्यू सेंटर अर्थात बिबट्या बचाव केंद्र सुरू करावी. यातील एक पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात आणि एक अहिल्यानगर जिल्ह्यात सुरू करावे. उभारलेल्या दोन पैकी एका रेस्क्यू सेंटरमध्ये नर बिबटे आणि दुसऱ्या सेंटरमध्ये मादी बिबट्यांची व्यवस्था करावी. वर्ल्ड वाईज नावाची संस्था बिबट्याची देखभाल करण्यास तयार आहे. रेस्क्यू सेंटरसाठी शासनाने निधीची व्यवस्था करावी. प्रत्येक सेटंरमध्ये किमान एक हजार बिबट्यांची कायमस्वरुपी राहण्याची व्यवस्था करावी; अशी मागणी शिवसेना आमदार शरद सोनावणे यांनी केली आहे.बिबट्याच्या हल्ल्यात माणूस मेल्यानंतर २५ लाख रुपये देतात. पण २५ लाखांत आमचा माणूस परत येत नाही ना .. आम्हाला पैसा नको आतापर्यंत साडे १७ कोटी दिलेत . साडे १७ कोटी रुपयांची माती झाली, असे सांगत शरद सोनावणे यांनी बिबट्यांचा प्रश्न सोडवम्यासाठी तातडीने उपाय करण्याची मागणी केली.
नाशिक - पुणे रेल्वे मार्गात बदल, अहिल्यानगरचे नागरिक नाराज
नागपूर : कित्येक वर्षांपासून बहुचर्चित नाशिक - पुणे लोहमार्ग होण्याच्या दिशेने गंभीरपणे हालचाली सुरू झाल्या आहेत. पण अचानक रेल्वे प्रशासनाने प्रस्तावीत मार्गात बदल केला आहे. यामुळे नाशिककर संतापले आहेत.पुणे नाशिक रेल्वेचा मार्ग आता अहिल्यानगर - शिर्डीमार्गे जाणार आहे. या बदलामुळे संगमनेरसह संपूर्ण दक्षिण अहिल्यानगर जिल्हा रेल्वेसेवेपासून दूर जाणार आहे. स्थानिकांच्या विकासाच्या संधी हिरावून घेणारा हा निर्णय असल्याचे संगमनेरमधील संघटनांचे मत आहे. नाशिक - पुणे रेल्वेमार्गाचे तीन वेळा सर्वेक्षण झाले असताना अचानक मार्ग बदलण्यात आल्याने नाराजी पसरली आहे.नाशिक- पुणे रेल्वे मार्ग संगमनेर मार्गे व्हावा हे आपले अनेक वर्षांचे स्वप्न आहे, या मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल २०२० मध्ये मंजूर झाला होता. महारेलने भूसंपादनाची प्रक्रियाही सुरु केली होती, नाशिक, अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यात भूसंपादनही झाले होते. मात्र २०२५ मध्ये अचानक शिर्डी मार्गे नव्या सविस्तर प्रकल्प अहवालास मंजुरी देण्यात आली. अहिल्यानगर , संगमनेर मार्गे होणाऱ्या रेल्वे मार्गामुळे शेतकऱ्यांना आपला माल पुणे शहरात पोहोचवण्यास मदत होईल इतकंच नाही तर पर्यटन क्षेत्रालाही चालना मिळेल. हा मुद्दा अहिल्यानगर जिल्ह्यातील आमदारांनी हिवाळी अधिवेशनात मांडला आहे. तर जिल्ह्यातील राजकारण दूर ठेवून या निर्णयासाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी एकत्र यावे, असे आवाहन सत्यजित तांबे यांनी केले आहे.
पुण्यात पोर्शे कार अपघात प्रकरणी पोलिसांविरोधात मोठी कारवाई
पुणे : पुण्याच्या कल्याणीनगर भागात १९ मे २०२४ रोजी पोर्शे कारचा अपघात झाला होता. पोर्शे कारने अश्विनी कोस्टा आणि अनिश अवधिया यांना उडवले होते. अपघातात अश्विनी कोस्टा आणि अनिश अवधियाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून दोन पोलिसांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले. याआधी दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांना प्रदीर्घ काळासाठी सेवेतून निलंबित केले होते.नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू असताना पोर्शे अपघात प्रकरणात पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वनाथ तोडकरी या दोघांना कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून सेवेतून बडतर्फ करण्यात आले. बडतर्फ केल्यामुळे दोन्ही अधिकाऱ्यांचा पोलीस दलातील कार्यकाळ संपला आहे, त्यांना निवृत्ती अथवा स्वेच्छानिवृत्ती नंतर मिळणारे लाभ मिळणार नाही. निवृत्ती वेतनासाठी पण हे दोघे अपात्र झाले आहेत. पोलीस शिपाई अमित शिंदे आणि आनंदा भोसले या दोघांना पाच वर्षे पदाच्या मूळ वेतनावर ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अपघाताची माहिती वरिष्ठांना न कळवणे. सुरुवातीचा तपास करताना गंभीर स्वरुपाच्या त्रुटी ठेवणे असे गंभीर आरोप बडतर्फ केलेल्या अधिकाऱ्यांवर असल्याचे वृत्त आहे.पुण्यात पोर्शे कार अपघात प्रकरणी पोलिसांनी आधी १७ वर्षे ८ महिने वयाच्या मुलाला अटक केल्याचे जाहीर केले. सध्या हा मुलगा जामिनावर आहे. बाल न्याय मंडळाने आरोपी मुलाला फक्त १४ तासांत १०० शब्दांचा निबंध तसेच 'समाजसेवा' आणि 'अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे' अशा अटी घालून जामीन दिला.
संगमनेर येथील 'पोकळी हिस्से'नोंदीचा प्रश्न मार्गी
नागपूर : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथील इंदिरा नगर भागात सर्वे नंबर १०६ मधील सुमारे ६० ते ६५ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या ७०० नागरिकांच्या 'पोकळी हिस्से' नोंदीचा प्रश्न तातडीने मार्गी लावला आहे. आमदार सत्यजित तांबे यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून उपस्थित केलेल्या या गंभीर प्रश्नाची दखल घेत, अरेरावी करणाऱ्या उपनिबंधक (सब-रजिस्ट्रार) अधिकाऱ्यावर त्वरित कारवाईचे आदेश देण्यात आले.आमदार सत्यजित तांबे यांनी केलेल्या तक्रारीनुसार, संगमनेर येथील उपनिबंधक कार्यालयातील जाधव नावाचे अधिकारी नागरिकांशी अरेरावीने वागत होते आणि कायदेशीर नोंदी करण्यासाठी टाळाटाळ करत होते. महसूल मंत्री बावनकुळे यांनी सभागृहात सांगितले की, त्या अधिकाऱ्याची (जाधव) आजच बदली केली जाईल.नोंदणी महानिरीक्षक (IGR - Inspector General of Registration) स्वतः तीन दिवसांत संगमनेर येथे जातील आणि संपूर्ण प्रकरणाची चौकशी करतील. चौकशी अहवालानंतर जाधव यांच्यावरील निलंबनासह इतर कारवाई करण्याचा निर्णय घेतला जाईल. अधिकाऱ्याने दस्त लावण्यासाठी टाळाटाळ केली असल्यास किंवा चुकीच्या पद्धतीने वागले असल्यास त्याची नोंद घेतली जाईल.जवळपास ७०० नागरिकांचे दस्त नोंदणीसाठी प्रलंबित असल्याने आणि एकाच दिवशी एवढी मोठी कामे कार्यालयाच्या मनुष्यबळासाठी शक्य नसल्यामुळे, महसूल मंत्र्यांनी विशेष उपाययोजना जाहीर केली. ७०० दस्तनोंदणीचे काम पूर्ण करण्यासाठी तीन दिवसांचा विशेष कॅम्प लावण्यात येईल.दुय्यम निबंधक कार्यालयाला अतिरिक्त मनुष्यबळ पुरवले जाईल, जेणेकरून सर्व नागरिकांचे काम जलद गतीने पूर्ण होईल. आयजीआर स्वतः या प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी संगमनेरला उपस्थित राहतील असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.मंत्री महोदयांनी दिलेल्या सकारात्मक आणि तातडीच्या उत्तरावर आमदार सत्यजित तांबे यांनी समाधान व्यक्त केले. त्यांनी महसूल मंत्र्यांचे आभार मानले, कारण हे प्रश्न ५० ते ३०० चौरस फुटांच्या छोट्या घरांशी संबंधित होते, ज्यामुळे अनेक वर्षांपासून नागरिकांना मालमत्तेचा हक्क मिळत नव्हता.मंत्री बावनकुळे यांनी पहिल्या दिवसापासून दाखवलेल्या सकारात्मक भूमिकेमुळे हा प्रश्न मार्गी लागल्याचे तांबे यांनी नमूद केले.
ICC ODI Rankings : किंग कोहलीची मोठी झेप; रोहित-विराटमध्ये ‘नंबर वन’ साठी चुरस!
Virat Kohli jumps to no 2 in ICC ODI batting rankings : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने आयसीसीच्या ताज्या वनडे फलंदाजी रँकिंगमध्ये मोठी झेप घेतली आहे. तो अजूनही पहिल्या क्रमांकावर पोहोचला नसला तरी, त्याने विद्यमान कर्णधार रोहित शर्मा याच्यासमोर मोठे आव्हान उभे केले आहे. नुकत्याच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या दोन वनडे सामन्यांमध्ये कोहलीने केलेल्या […] The post ICC ODI Rankings : किंग कोहलीची मोठी झेप; रोहित-विराटमध्ये ‘नंबर वन’ साठी चुरस! appeared first on Dainik Prabhat .
Income Tax : प्राप्तीकर भरणारे रेशनकार्डधारक अपात्र; धक्कादायक आकडेवारी समोर
लखनौ : उत्तर प्रदेशात निर्धारित मानकांपेक्षा जास्त उत्पन्न असलेले अथवा प्रत्यक्ष प्राप्तीकर (Income Tax) भरत असलेले पाच लाख रेशनकार्डधारक आढळले आहे. प्राप्तिकर (Income Tax) विभागाच्या डेटाच्या आधारे १६.९२ लाख अशा कार्डधारकांची ओळख पटवण्यात आली आहे. आतापर्यंत अन्न विभागाने ९,१०,३७८ कार्डधारकांची पडताळणी पूर्ण केली आहे. अंत्योदय आणि पात्र घरकुल योजनांचे फायदे फक्त अशा लोकांनाच उपलब्ध आहेत, […] The post Income Tax : प्राप्तीकर भरणारे रेशनकार्डधारक अपात्र; धक्कादायक आकडेवारी समोर appeared first on Dainik Prabhat .
बारामतीत चाकूचा धाक दाखवून लुटणारे दोघे जेरबंद; ५ लाखांचा मुद्देमाल जप्त
बारामती : बारामती एमआयडीसी परिसरात चाकूचा धाक दाखवून स्कुटीस्वारास लुटणाऱ्या दोन अज्ञात आरोपींचा बारामती तालुका पोलिसांनी पर्दाफाश करून त्यांना जेरबंद केले आहे. या कारवाईत तब्बल ५ लाख १६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली. फिर्यादी स्कुटीवरून जात असताना वंजारवाडी ब्रिजजवळ लिंबाच्या झाडाशेजारी मोटारसायकलवर आलेल्या दोन इसमांनी त्यांची गाडी […] The post बारामतीत चाकूचा धाक दाखवून लुटणारे दोघे जेरबंद; ५ लाखांचा मुद्देमाल जप्त appeared first on Dainik Prabhat .
Gujarat News : संतापजनक ! गुजरातमध्ये 6 वर्षांच्या मुलीवर अत्याचार
राजकोट : गुजरातमधील राजकोट जिल्ह्यात अटकोट नावाच्या गावामध्ये एका सहा वर्षांच्या मुलीवर निर्भयासारखीच क्रूरता करण्यात आली आहे. आरोपीने प्रथम मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर तिच्या खासगी अवयवांत रॉड घुसवण्यात आला. ही घटना वास्तविक ४ डिसेंबर रोजी घडली आणि तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. घटनेनंतर, मुलीला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात […] The post Gujarat News : संतापजनक ! गुजरातमध्ये 6 वर्षांच्या मुलीवर अत्याचार appeared first on Dainik Prabhat .
‘या’देशात १६ वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया वापरण्यास बंदी लागू
मेलबर्न : ऑस्ट्रेलियामध्ये १६ वर्षांखालील मुलांना सोशल मीडियाचा वापर करण्यासाठी बंदी आजपासून लागू करण्यात आली. या बंदीचे पंतप्रधान ॲन्थनी अल्बानीज यांनी स्वागत केले आहे. आता सोशल मीडिया मुलांना नियंत्रित करणार नसून त्याऐवजी मुलांना नियंत्रण करण्याची जबाबदारी पालकांवर येणार असल्याचेही अल्बानीज यांनी म्हटले आहे. मुलांना सोशल मीडियापासून दूर ठेवण्याचे काम खूप अवघड असल्याचेही त्यांनी मान्य केले. […] The post ‘या’ देशात १६ वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया वापरण्यास बंदी लागू appeared first on Dainik Prabhat .
नागपूर : कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्याच्या पेठ-वडगाव नगरपालिका निवडणुकीदरम्यान ईव्हीएम स्ट्राँग रूमच्या बाहेरील सीसीटीव्ही कॅमेरे हटवल्याच्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आश्वासन बुधवारी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी विधानपरिषदेत ‘पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन’च्या माध्यमातून हा मुद्दा उपस्थित केला होता.सतेज पाटील म्हणाले, “सामान्य नागरिकाला आपल्या घराच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही लावण्याचा मूलभूत अधिकार आहे, मग ईव्हीएम स्ट्राँग रूमच्या सुरक्षेसाठी लावलेले कॅमेरे पोलीस किंवा प्रशासनाला काढण्याचा अधिकार कोणी दिला?” स्ट्राँग रूमचा परिसर पूर्णपणे सीसीटीव्हीच्या कव्हरेजमध्ये असायला हवा असताना उलट कॅमेरे हटवले गेल्याने हा परिसर ‘ब्लाइंड झोन’मध्ये गेल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. या कृत्यामागे हेतूपुरस्सर कट असल्याचा संशय व्यक्त करत पाटील यांनी कॅमेरे हटवणाऱ्या अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई आणि सर्व कॅमेरे पुन्हा बसवण्याचे आदेश देण्याची मागणी केली.या आरोपांवर उत्तर देताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात स्पष्ट केले की, “सरकारने या प्रकरणाची अत्यंत गांभीर्याने दखल घेतली आहे. सीसीटीव्ही कॅमेरे हटवण्यामागील सर्व परिस्थितीची सविस्तर चौकशी केली जाईल. प्रशासनाने कायदेशीर अधिकारांच्या मर्यादेत राहूनच काम करावे. निवडणूक प्रक्रियेतील प्रत्येक टप्पा पूर्णपणे पारदर्शक राहील याची दक्षता घेतली जाईल. सरकार या घटनेवरील शंका दूर करण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलेल, असे ते म्हणाले.
'लाडकी बहिण'योजना बंद होणार नाही! - सभात्याग करणाऱ्या विरोधकांवर एकनाथ शिंदेंचा पलटवार
नागपूर : महाराष्ट्र विधानसभेत आज 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण' योजनेवरून झालेल्या गदारोळात सत्ताधारी महायुती सरकारने या योजनेच्या अंमलबजावणीवर ठाम विश्वास व्यक्त केला. विरोधी पक्षाने eKYC त्रुटी आणि गैरव्यवहाराच्या आरोपांवरून सभागृहात गोंधळ घातला आणि अखेरीस सभात्याग केला. यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर टीका केली आणि ही योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही, अशी ग्वाही राज्यातील कोट्यवधी महिलांना दिली.विरोधकांचा गोंधळ आणि 'राजकीय पोटशूळ'विधानसभेच्या प्रश्नोत्तर सत्रात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी योजनेच्या अंमलबजावणीतील त्रुटींवरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. गैरव्यवहार झाला असून, संबंधितांवर गुन्हे दाखल होणार का, असा प्रश्न त्यांनी विचारल eKYC प्रक्रियेमुळे अपात्र ठरलेल्या महिलांच्या पुनरावलोकनाबाबत विरोधकांना समाधानकारक उत्तर न मिळाल्याचा त्यांनी दावा केला. पाटील यांनी ₹१५०० मदत ₹२१०० कधी करणार, तसेच मुख्यमंत्री पदाबाबत 'एक नंबर, २ नंबर' असे चिमटे काढून सत्ताधारी पक्षांमध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला.महिला व बालकल्याण मंत्र्यांचे ठोस उत्तरमहिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी विरोधकांच्या आरोपांना स्पष्ट उत्तर दिले. अपात्र ठरलेल्या महिलांकडून पैसे परत घेतले जात नाहीत. केवळ स्वतःहून पैसे परत करू इच्छिणाऱ्यांचे पैसे स्वीकारले जातील. त्यांनी स्पष्ट केले की, योजनेबद्दल गैरसमज पसरवले जात आहेत, पण ही योजना महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरूच राहणार आहे. मंत्री तटकरे यांच्या उत्तराने विरोधकांचे समाधान न झाल्याने महाविकास आघाडीच्या आमदारांनी निषेध व्यक्त करत सभात्याग केला.एकनाथ शिंदे यांचा 'लाडक्या बहिणीं'साठी ठाम निर्धारविरोधी पक्षाच्या सभात्यागानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलताना विरोधकांवर थेट हल्ला चढवला. लाडक्या बहिणींनी तुमचा टांगा पलटी केला. लाडकी बहिण योजना बंद होणार नाही. आम्हीच ही योजना सुरू केली असून, ती यशस्वीपणे सुरू राहील. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी या योजनेचे श्रेय घेत, महिलांना भावनिक साद घातली. विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने पूर्ण करण्याचा संकल्प त्यांनी यावेळी बोलून दाखवला.
वर्ध्यात 'डीआरआय'च्या टीमकडून ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त; पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
नागपूर : कारंजा (वर्धा) परिसरातील दुर्गम भागात अवैधरित्या उभारण्यात आलेला ‘मेफेड्रोन’ निर्मितीचा कारखाना मंगळवारी (दि. ९ डिसेंबर) उद्ध्वस्त करण्यात आला. महसूल गुप्तचर संचालनालय (डी.आर्.आय.) यांनी ही कारवाई केली. मात्र पोलीस विभाग अनभिज्ञ होता. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याचा मुद्दा आर्वीचे भाजप आमदार सुमित वानखेडे यांनी बुधवारी विधानसभेत उपस्थित केला.या कारवाईच्या वेळी जवळपास १९२ कोटी रुपये किमतीचे १२८ किलो मेफेड्रोन, २४ किलो प्रीकर्सर रसायने, कच्चा माल आणि यंत्रसामग्री जप्त करण्यात आली होती. या प्रकरणी ३ जणांना अटक करण्यात आली आहे. ‘ऑपरेशन हिन्टरलँड ब्लू’ अंतर्गत अमली पदार्थविरोधी मोहीम राबवण्यात येत आहे. याच सुमारास वर्धा जिल्ह्याच्या कारंजा (घा.) परिसरातील दुर्गम भागात अमली पदार्थ तयार करण्याचा कारखाना उभारण्यात आल्याची गुप्त माहिती ‘डी.आर्.आय.’च्या अधिकार्यांना मिळाली. या आधारावर शोध मोहीम राबवण्यात आली. प्रथमच अशी मोठी कारवाई झाली. असा कारखाना जिल्ह्यात चालू असतांना पोलीस विभागाला याची कल्पना कशी नव्हती? हा मोठा प्रश्न आहे. याची सभागृहाने नोंद घ्यावी, अशी मागणी वानखेडे यांनी केली. युवा पिढीचे भविष्य अधारांत टाकणारा हा प्रकार आहे, असेही ते म्हणाले.
मोहित सोमण: अखेरच्या सत्रात इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात घसरण झाली आहे. सेन्सेक्स आज २७५.०१ अंकाने घसरत ८४३८१.२७ व निफ्टी ८१.६५ अंकांनी घसरत २५७५८.०० पातळीवर स्थिरावला आहे. खऱ्या अर्थाने शेअर बाजारातील 'गेम' बँक निर्देशांकासह मिडकॅप शेअर्सने फिरवला. सेन्सेक्स बँक व बँक निफ्टीत ०.३६% घसरण झाल्याने निर्देशांकाचे पारडे पालटले आहे. सुरूवातीच्या सत्रातील फेडरल रिझर्व्ह व्याजदरातील कपातीच्या आशावादावर उत्साही असलेले वातावरण अखेरीस नकारात्मकतेत बदलले आहे. थोड्याच वेळात युएस फेड रिझर्व्ह व्याजदरावर कपातीवरील निर्णय जाहीर होणार असल्याने गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगल्याने शेअरमधील खरेदी आज मोठ्या प्रमाणात थांबली असून रूपयात पुन्हा एकदा घसरण झाल्याने प्रति डॉलर ९० पेक्षाही कमी पातळीवर रुपया व्यवहार करत होता. अखेर कंसोलिडेशन होत असताना विकली एक्सपायरीसह फेड निर्णयाचा फटका बाजारात दिसत आहे. विशेषतः अस्थिरता निर्देशांक (VIX Volatility Index) जैसे थे राहिला असताना कंज्यूमर ड्युरेबल्स (१.६८%), फायनांशियल सर्विसेस २५/५० (०.५४%), आयटी (०.९६%) शेअर्समध्ये झालेल्या मोठ्या घसरणीचाही फटका बाजारात बसल्याने परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी आज रुपयांच्या आधारे मोठे सेल ऑफ केले आहे. दुसरीकडे मेटल (०.४१%), मिडिया (०.२७%), फार्मा (०.१२%) वाढ कायम राहिली आहे.निफ्टी व्यापक निर्देशांकात मिडकॅप सिलेक्ट (१.५५%), मिडकॅप १०० (०.३२%), मिडकॅप २०० (०.४८%), मिडकॅप ५० (१.१७%) निर्देशांकात घसरण झाली आहे. जागतिक स्तरावर सुरूवातीच्या कलात युएस बाजारातील डाऊ जोन्स (०.०५%), नासडाक (०.०९%) बाजारात वाढ झाली असून एस अँड पी ५०० (०.११%) घसरण कायम राहिली. आशियाई बाजारातील अखेरच्या सत्रात गिफ्ट निफ्टी (०.३१%), निकेयी (०.३६%), स्ट्रेट टाईम्स (०.०३%), कोसपी (०.२१%) यासह बहुतांश बाजारात घसरण झाली असून जकार्ता कंपोझिट (०.५१%),व हेंगसेंग (०.२०%) तैवान वेटेड (०.७१%) बाजारात वाढ झाली आहे.अखेरच्या सत्रात हेवीवेट ब्लू चिप्स कंपनीच्या स्क्रिपपैकी एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, अँक्सिस बँक, स्विगी, डिक्सन टेक्नॉलॉजी, इन्फोसिस यांसारख्या शेअर्समध्ये घसरण झाली असून वाढ रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी एएमसी, वेंदाता, एसबीआय लाईफ इन्शुरन्स, बजाज हाउसिंग सारख्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे.आज अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ बलरामपूर चिनी (७.५४%), वेलस्पून लिविंग (६.८०%), हिन्दुस्तान झिंक (४.२९%), नवीन फ्ल्यूटो (४.२६%), बिकाजी फूडस (४.१८%), आयसीआयसीआय प्रोडूंनशियल लाईफ इन्शुरन्स (३.०९%), ज्योती सीएनसी ऑटो (२.५२%),एचडीएफसी एएमसी (१.९७%) समभागात झाली असून सर्वाधिक घसरण कायनेस टेक (१०.१७%), डिक्सन टेक्नॉलॉजी (८.६३%), लेटंट व्ह्यू (५.४३%), ईरीस लाईफसायन्स (५.४३%), बीएसई (४.९३%), रिलायन्स पॉवर (४.६०%), आयटीसी हॉटेल्स (३.७०%) समभागात झाली आहे.आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले आहेत की,'जपानी बाँड उत्पन्नात वाढ आणि बीओजेच्या आर्थिक कडकपणाच्या संकेतांमुळे जागतिक शेअर बाजारांमध्ये सतत अस्थिरता दिसून आली, ज्यामुळे उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये जोखीम कमी होण्याची भावना निर्माण होत आहे. आता लक्ष आगामी यूएस फेड बैठकीकडे वळले आहे, जिथे २५-बीपीएस दर कपात मोठ्या प्रमाणात अपेक्षित आहे. तथापि, अंतर्गत विभागणी आणि मिश्र आर्थिक निर्देशक २०२६ मध्ये पुढील दर कपातीच्या अपेक्षा कमी करू शकतात. भारतीय बाजारपेठांमध्ये जागतिक सावधगिरीचे प्रतिबिंब दिसून आले, सततच्या एफआयआय बहिर्गमन, भारतीय रुपयातील कमकुवतपणा आणि चालू चर्चा असूनही अमेरिका-भारत व्यापार वाटाघाटींभोवती अनिश्चितता यामुळे ते ओझे झाले. नजीकच्या काळात, बाजाराची दिशा मध्यवर्ती बँकेच्या संकेतांवर आणि व्यापार विकासावरील स्पष्टतेवरपरिणामकरेल.'
मोहित सोमण: कोरोना रेमिडीज (Corona Remedies Limited IPO) आयपीओची आज सांगता झाली आहे. ६५५.३७ कोटींचा आयपीओ ८ ते १० डिसेंबर या कालावधीत गुंतवणूकदारांसाठी खुला झाला होता. संपूर्ण ऑफर फॉर सेल प्रवर्गात मोडत असलेल्या आयपीओला अखेरच्या दिवसापर्यंत एकूण ९४.१७ पटीने सबस्क्रिप्शन मिळाले आहे. एकूण तीन दिवसात आयपीओला उदंड प्रतिसाद मिळाला असल्याने एकूण आयपीओतील सबस्क्रिप्शनपैकी २४.४४ पटीने सबस्क्रिप्शन किरकोळ गुंतवणूकदारांकडून, १४३.८८ पटीने सबस्क्रिप्शन पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून, व १९५.८४ पटीने सबस्क्रिप्शन विना संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून मिळाले आहे. कंपनीने आयपीओसाठी १००८ ते १०६२ रूपये प्राईज बँड निश्चित केला होता. किरकोळ गुंतवणूकदारांना किमान १४८६८ रूपयांची गुंतवणूक अनिवार्य करण्यात आली होती. कंपनीने आयपीओआधीच १९४.८६ कोटी रुपयांची गुंतवणूक अँकर गुंतवणूकदारांकडून प्राप्त केली होती.प्री आयपीओ कंपनीचे बाजार भांडवल (Market Capitalisation) ६४९५.२० कोटी रुपये असून उद्या आयपीओसाठी पात्र गुंतवणूकदारांना समभागाचे वाटप (Allotment) करण्यात येणार आहे. तसेच शेअर १५ डिसेंबरला बाजारात सूचीबद्ध (Listed) होणार आहे. एकूण आयपीओत ६१७११०२ शेअर गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध केले आहेत. कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी प्रति शेअर ५४ रूपये सवलतही देण्यात आल्याचे कंपनीने स्पष्ट केले होते.आर्थिक बाजू पाहता इयर ऑन इयर बेसिसवर कंपनीच्या महसूलात १८% वाढ झाली असून कंपनीच्या करोत्तर नफ्यात ६५% वाढ झाली आहे. तिमाही बेसिसवर कंपनीच्या मार्च तिमाहीतील १२०२.३५ कोटी तुलनेत जून तिमाहीत उत्पन्नात ३४८.५५ कोटींवर घसरण झाली आहे. तर करोत्तर नफ्यातही तिमाही बेसिसवर १४९.४३ कोटीवरून ४६.२० कोटींवर घसरण झाली. कंपनीच्या ईबीटा (करपूर्व कमाई) २४५.९१ कोटींवरून ७१.८० कोटीवर घसरण झाली आहे. कंपनीच्या शेवटच्या जीएमपीनुसार ३०.६०% प्रिमियम दरासह शेअर सूचीबद्ध होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मूळ प्राईज बँड व जीएमपी धरून १३८७ रूपये शेअरसह कंपनी सूचीबद्ध होईल असे तज्ञांचे मत आहे.ऑगस्ट २००४ मध्ये स्थापन झालेली कोरोना रेमेडीज लिमिटेड ही कंपनी महिला आरोग्यसेवा, हृदयरोग, वेदना व्यवस्थापन, मूत्रविज्ञान आणि इतर उपचारात्मक क्षेत्रांमध्ये उत्पादने विकसित करणारी, उत्पादन करणारी आणि विपणन (Marketing) करणारी एक औषध कंपनी आहे.३० जून २०२५ पर्यंत, कंपनीच्या वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओमध्ये महिला आरोग्यसेवा, हृदयरोग-मधुमेह, वेदना व्यवस्थापन, मूत्रविज्ञान आणि मल्टीस्पेशालिटी फार्मास्युटिकल्स (जीवनसत्त्वे/खनिजे/पोषण, गॅस्ट्रोइंटेस्टाइनल आणि श्वसनासह) अशा उपचारात्मक क्षेत्रांमध्ये ७१ ब्रँडसमाविष्टआहेत.
मोहित सोमण: फेडरल रिझर्व्ह आज व्याजदरात कपातीची अपेक्षा व्यक्त केली जात असताना चांदीच्या गुंतवणूक लक्षणीय वाढ झाल्याने चांदी आज नव्या ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचली आहे. एकाच दिवसात चांदीच्या फ्युचर दरात १९१८०० रूपये पातळीवर पोहोचले असून प्रति किलो चांदीत एक दिवसात ९००० रूपयांनी वाढ झाल्याने भारतीय बाजारात सोने १९९००० रूपयांवर म्हणजेच २००००० लाख पातळीजवळ पोहोचले आहे. 'गुड रिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, चांदीच्या प्रति ग्रॅम दरात ९ रूपये वाढ झाली असून प्रति ग्रॅम दर १९९ रूपये,व प्रति किलो दर ९००० रूपयांनी वाढल्याने १९९००० रूपयांवर पोहोचला आहे.काल चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली असताना दुसऱ्या दिवशीही तेजी दिसून आली आहे आणि चांदीत मार्चमध्ये फ्युचर करारात ३७३६ रुपये किंवा १.९८% वाढ झाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे आज सकाळी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (Multi Commodity Exchange MCX) १९१८०० रुपये प्रति किलो या सर्वोच्च पातळीवर पोहोचला होता. पुरवठ्यातील अडचणींमुळे मागील सत्रात या धातूमध्ये ६९२३ रुपये किंवा ३.८८% वाढ कालच्या सत्रात झाली होती व १८८६६५ रुपये प्रति किलोचा विक्रम एमसीएक्समध्ये नोंदवला होता.जागतिक बाजारात दुपारपर्यंत ०.९८% वाढ सिल्वर फ्युचर निर्देशांकात झाली आहे. जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणात ईटीएफ गुंतवणूकीत वाढ झाल्याने तसेच फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपातीची अपेक्षा व्यक्त केली जात असल्याने गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात चांदीत गुंतवणूक वाढवली. त्यामुळे एका दिवसात चांदीच्या दरात ३.५६% वाढ झाल्याचे दिसून आले होते. या विपरित फेब्रुवारी डिलिव्हरीसाठी सोन्याचा वायदा केवळ १७३ रुपये किंवा ०.१३ % वाढून १३०२८० रुपये प्रति १० ग्रॅम जागतिक बाजारपेठेत झाला आहे.मुंबईसह भारतातील प्रमुख शहरातील चांदीच्या प्रति ग्रॅम दर गुड रिटर्न्स संकेतस्थळावरील माहितीनुसार, १० ग्रॅमसाठी १९९० रूपयांवर, प्रति किलो दर १९९००० रूपयांवरपोहोचलेआहेत.
थकीत ₹५००० कोटी दंड वसुलीसाठी फडणवीसांची 'कठोर'घोषणा; लवकरच नवी पॉलिसी
नागपूर : विधान परिषदेत आज टू-व्हीलर पार्किंग आणि वाहनधारकांकडून थकीत चालान वसूल करण्याच्या प्रश्नावर महत्त्वपूर्ण चर्चा झाली. या प्रश्नांना उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, दंड न भरणाऱ्यांसाठी लवकरच एक नवी कठोर पॉलिसी आणण्याची घोषणा केली.पार्किंग संदर्भात नगर विकास खात्याला सूचनाटू-व्हीलर पार्किंगच्या समस्येबाबत मुख्यमंत्र्यांनी सभागृहात माहिती दिली की, नगर विकास खात्याला या संदर्भात आवश्यक सूचना देण्यात आल्या असून, त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर केली जाईल.थकीत ५००० कोटींच्या वसुलीचा प्रश्नया चर्चेदरम्यान सतेज पाटील यांनी थकीत चालान आणि दंड वसुलीचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी सांगितले की, सहा महिन्यांपेक्षा अधिक जुन्या चालानवर कारवाई करण्यासाठी काय उपाययोजना करता येतील? लोक अदालतीच्या माध्यमातून हे चालान काढतात त्यांच्याकडून त्वरित दंड वसूल केला पाहिजे. थकीत दंडाची रक्कम जवळपास ₹५००० कोटी इतकी मोठी आहे.‘नो पेट्रोल' सिस्टीमवर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरणमनीष कायंदे यांनी यावेळी एक अत्यंत वेगळा प्रश्न विचारला. त्यांनी मुख्यमंत्र्यांना विचारले की, 'ज्यांच्यावर पाच हजार रुपये थकीत दंड असेल, त्यांना पेट्रोल देणार नाही, अशी स्कीम आपण आणणार आहात का?' या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले, अशी सिस्टीम चीनमध्ये राबवली जाते, भारतामध्ये नाही. दंड वसुलीसाठी महाराष्ट्राच्या परिस्थितीला साजेसा एक वेगळा उपाय करणे गरजेचे आहे आणि आम्ही त्या दिशेने विचार करू.दंड न भरणाऱ्यांसाठी लवकरच नवी पॉलिसीचर्चेच्या शेवटी मुख्यमंत्र्यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली. ते म्हणाले, चलन आणि पार्किंग संदर्भातला जो कोणी दंड भरणार नाही, अशा संदर्भात एक पॉलिसी लवकरच आणण्यात येईल. यामुळे, वाहतुकीचे नियम तोडून दंड न भरणाऱ्या वाहनधारकांना भविष्यात अधिक कठोर शासकीय नियमांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. या नवीन धोरणाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
ओबीसी समाजासाठी मिनी महामंडळांची स्थापना, मुख्यमंत्र्यांची घोषणा
नागपूर : विधान परिषदेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी समाजाच्या कल्याणासाठी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. ओबीसी समाजासाठी स्थापन करण्यात आलेल्या महामंडळांच्या अंतर्गत आता 'मिनी महामंडळे' स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.मिनी महामंडळांची रचना आणि उद्दिष्ट्येमुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की, ओबीसी समाज हा सुमारे ३५० घटकांचा मिळून एक व्यापक समाज आहे आणि या समाजातील काही घटक आजही वंचित राहिले आहेत. या घटकांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ अधिक प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी मिनी महामंडळे उपयुक्त ठरतील. या मिनी महामंडळांवर शासकीय अधिकारी तसेच ओबीसी समाजातील अनुभवी नेते यांची नियुक्ती केली जाईल. यामुळे प्रशासकीय कार्यक्षमतेसह सामाजिक प्रतिनिधीत्व देखील सुनिश्चित होईल.सध्याच्या योजना सगळ्यांसाठी सारख्या असल्या तरी, प्रत्येक घटकाच्या गरजा लक्षात घेऊन त्यांना योजनेचा लाभ मिळावा यासाठी हे प्रयत्न आहेत. मुख्यमंत्री म्हणाले की, पहिल्या टप्प्यात महामंडळे कार्यान्वित करायची होती आणि आता मिनी महामंडळांद्वारे योजनेची व्याप्ती वाढवली जाईल.अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या धर्तीवर नवीन धोरणयावेळी मुख्यमंत्र्यांनी अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या यशस्वीतेचा उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, या महामंडळाच्या बाबतीत नवीन धोरण राबविण्यात आले, ज्यामुळे त्याची प्रभावीता वाढली. अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत आतापर्यंत २९ हजार लोकांना कर्ज वितरित करण्यात आले आहे. ही संख्या समाजातील लोकांपर्यंत योजना पोहोचल्याचे दर्शवते. मुख्यमंत्र्यांनी योजनेसंदर्भात लोकांमध्ये जनजागृती करणे किती महत्त्वाचे आहे, यावरही भर दिला. शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना माहिती असणे आवश्यक आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.समाजातील वंचित घटकांना थेट मदतओबीसी समाजातील लहान घटकांना त्यांच्या विशिष्ट गरजांनुसार आणि अडचणींनुसार थेट मदत करणे हा मिनी महामंडळे स्थापन करण्यामागचा मुख्य उद्देश आहे. मिनी महामंडळांमुळे ओबीसी समाजाच्या ३५० घटकांपर्यंत पोहोचणे आणि त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे अधिक सुलभ होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
वर्सोवा क्रिस्टल पॉईंट मॉलमधील अनधिकृत बांधकामावर कारवाई- नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ
नागपूर : वर्सोवा क्रिस्टल पॉईंट मॉल मधील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत दिली. सदस्य हारून खान यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राज्यमंत्री मिसाळ बोलत होत्या.राज्यमंत्री मिसाळ म्हणाल्या की, मॉलमध्ये मधल्या भिंती काढून फेरबदल करण्यात आले होते. यासाठीचा बदल आराखडा महापालिकेने २४ फेब्रुवारी २०२० रोजी मंजूर केला होता. तसेच बहुउद्देशीय हॉलसाठी पर्पज बदलाची परवानगी २०२३ मध्ये देण्यात आली होती. या काळात दोन कोटींच्या दंडाची वसुली आणि तीन कोटींचा प्रीमियम महापालिकेने घेतला. मे महिन्यात आलेल्या तक्रारीनंतर तपासात मॉलमध्ये शेडसह नवीन अतिक्रमण असल्याचे महापालिकेने मान्य केले असून त्यावर लवकरच कारवाई केली जाणार आहे. तसेच इमारतीच्या चौथ्या मजल्याच्या स्ट्रक्चरल सुरक्षिततेबाबतही महापालिकेला तातडीने ऑडिट करण्याचे आदेश देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.या मॉलमध्ये वारंवार विनापरवाना बांधकाम होत असल्यास एमआरटीपी कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी सूचना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली.
येत्या आठ दिवसांत ई-वाहनांना टोलमाफीची अंमलबजावणी होणार
नागपूर : राज्यातील ईव्ही व ई-बाइक वापरकर्त्यांना टोलमाफी देण्याबाबत पुढील आठ दिवसांत कार्यवाही करावी, असे स्पष्ट निर्देश देत या निर्णयाच्या अंमलबजावणी पासून आज पर्यंतच्या काळात टोल घेतला गेला असल्यास पुरावा सादर केल्यावर नागरिकांना टोल परतावा द्यावा, असे आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले.ई वाहनांना टोल माफी देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या संदर्भात काढलेल्या शासन निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्याची बाब आमदार अनिल पाटील यांनी विधानसभेत मांडली. त्यावर अध्यक्ष नार्वेकर यांनी हे निर्देश दिले.नार्वेकर यांनी राज्यातील अपुऱ्या चार्जिंग स्टेशन्सचा मुद्दाही उपस्थित करत, ई-वाहनांसाठी किमान १२० के.डब्लू. (kw) क्षमतेची फास्ट चार्जिंग स्टेशन्स उभारण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. सध्या उपलब्ध चार्जिंग स्टेशन्सवर वाहन चार्जिंगसाठी आठ तास लागत असल्याने ही व्यवस्था तातडीने सुधारावी, असेही त्यांनी म्हटले.प्रश्नाला उत्तर देताना मंत्री दादा भुसे यांनी सांगितले की, महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण २०२५ अंतर्गत समृद्धी महामार्ग, मुंबई–पुणे द्रुतगती महामार्ग आणि शिवडी–न्हावाशेवा अटल सेतू या मार्गांवर ई-वाहनांना टोलमाफीचे धोरण २३ मे २०२५ रोजी जाहीर करण्यात आले असून २२ ऑगस्ट २०२५ पासून अंमलबजावणी सुरू आहे. ईव्ही फास्टटॅग रजिस्ट्रेशन, एनआयसी डेटाबेसमधील नोंदणी आणि बँक इंटिग्रेशनची प्रक्रिया सुरू असल्याचे मंत्री भुसे यांनीfree tol सांगितले.
न्यूयॉर्क: युएसमध्ये वार्नर ब्रदर्स (Warner Bros) व नेटफ्लिक्स (Netflix) यांच्यातील होणाऱ्या संभाव्य ७२ अब्ज डॉलर्स डीलमुळे अख्खी सिनेसृष्टी ढवळून निघाली होती. या ओपन ऑफरला जवळपास निश्चित मिळत असतानाचा पॅरामाऊंट कंपनीकडून (Paramount Pictures) नेटफ्लिक्सने वार्नर ब्रदर्सला दिलेल्या ऑफरला चॅलेंज करण्यासाठी ७७.९ अब्ज डॉलर्सची बिडींग बँक ऑफर दिली आहे. त्यामुळे ही डील रद्द होणार का पॅरामाऊंट पिक्चरने दिलेल्या ऑफरकडे वार्नर ब्रदर्स जाणार याकडे युएस बाजाराचे लक्ष केंद्रित झाले आहे. नव्या रिपोर्टनुसार, पॅरामाउंटने सोमवारी वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरीसाठी एक प्रतिकूल टेकओव्हर ऑफर लाँच केली आहे ज्यामुळे एचबीओ, सीएनएन आणि एका प्रसिद्ध चित्रपट स्टुडिओमागील कंपनी खरेदी करण्यासाठी प्रतिस्पर्धी बोलीदार नेटफ्लिक्ससोबत लढाई मोठ्या कॉर्पोरेट स्तरावर सुरु झाली आहे.देशाच्या मनोरंजन क्षेत्राचा बराचसा भाग पुन्हा आकार देण्यासाठी वॉर्नरच्या व्यवस्थापकांनी नेटफ्लिक्सच्या $७२ अब्ज डॉलर्सच्या खरेदीला सहमती दर्शविल्यानंतर काही दिवसांतच उदयास आलेली पॅरामाउंट बोली वॉर्नरच्या भागधारकांना अधिक पैसे ७७.९ अब्ज डॉलर ऑफर केले असल्याने मोठा शह नेटफ्लिक्सला दिल्याचे बोलले जाते. इतकेच नाही तर आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार वॉर्नरचा सर्व व्यवसाय विकत घेण्याची योजना पॅरामाउंट पिक्चरने दिलु आहे. त्यामुळे नेटफ्लिक्सला नको असलेला केबल व्यवसायही विकत घेण्याची तयारी कंपनीने दाखवली आहे.पॅरामाउंटने म्हटले आहे की कंपनीने ऑक्टोबरमध्ये वार्नर कंपनी विक्रीसाठी खुली असल्याची घोषणा केल्यानंतर वॉर्नर व्यवस्थापनाने कधीही अर्थपूर्णपणे सहभागी झाले नाही अशा अनेक ऑफर दिल्यानंतर त्यांनी शत्रुत्व सोडण्याचा निर्णय घेतला.ट्रम्प म्हणाले की नेटफ्लिक्स-वॉर्नर कॉम्बो एकत्रित बाजारपेठेच्या आकारामुळे ही एक समस्या असू शकते असे म्हटले आणि त्यांनी या कराराचा वैयक्तिकरित्या आढावा घेण्याची योजना आखल्यानंतरहीपॅरामाउंटने नमूद केले की त्यांच्या ऑफरमध्ये नेटफ्लिक्सच्या बोलीपेक्षा जास्त रोख रक्कम आहे. १८ अब्ज डॉलर पेक्षा अधिक असल्याचे कंपनीने म्हटले आहे. असा युक्तिवाद केला की ते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाकडून छाननीतून उत्तीर्ण होण्याची शक्यता जास्त आहे. तर डोनाल्ड ट्रम्प हे नेटफ्लिक्सला वार्नर ब्रदर्स विकण्याचा विरोधात असली तरी नेटफ्लिक्सला वार्नर कंपनी आपल्यालाच मिळेल याची खात्री आहे.नेटफ्लिक्स म्हणते की त्यांना खात्री आहे की वॉर्नर पॅरामाउंटची बोली नाकारेल आणि नियामक आणि ट्रम्प त्यांच्या कराराचे समर्थन करतील, स्ट्रीमिंग कंपनीच्या विस्तार आणि नियुक्तीबद्दल सह-सीईओ टेड सारँडोस यांच्याशी झालेल्या अनेक संभाषणांचा हवाला देऊन स्ट्रीमिंग कंपनीच्या विस्तार आणि भरतीबाबत सह-मुख्य कार्यकारी अधिकारी टेड सारंडोस यांच्याशी झालेल्या अनेक संभाषणांचा हवाला देत आम्ही त्यांच्या कराराचे समर्थन करूअसेम्हटलेआहे.
दारू दुकानांच्या स्थलांतरासाठी सोसायटीची एनओसी बंधनकारक -उपमुख्यमंत्री अजित पवार
नागपूर : राज्यात एफ.एल–२ आणि सी.एल–३ परवानाधारक विदेशी व देशी दारू किरकोळ विक्री केंद्रांच्या स्थलांतरासाठी नोंदणीकृत सोसायटीची एनओसी अनिवार्य करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री व उत्पादन शुल्क मंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली.आमदार शंकर जगताप यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. पवार म्हणाले की, संबंधित दुकान सोसायटी परिसरात असेल तर सोसायटीची संमती नसल्यास स्थलांतरास कोणतीही परवानगी दिली जाणार नाही. एफएल–२ आणि सीएल–३ परवान्यांबाबत ही अट आता काटेकोरपणे लागू राहील. पिंपरी-चिंचवड येथील कोळीवाडा आणि रहाटणीतील दोन अनधिकृत दारू दुकाने निलंबित करण्यात आल्याचेही उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले. यापैकी एक प्रकरण न्यायालयात प्रलंबित असून उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई केली जाईल, तर एका दुकानावर यापूर्वी रुपये ५० हजार रुपये दंड आकारण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुंबई उपनगरातील 'पागडी'धारकांचा मुद्दा विधानसभेत
मुंबई शहराचा कायदा उपनगराला लागू करण्याची आमदार मनीषा चौधरी यांनी मागणीनागपूर : भाजपच्या आमदार मनीषा चौधरी यांनी दहिसर येथील 'शुक्ला कंपाउंड' तोडकामावरून विधानसभेत मुंबई उपनगरातील पागडी सिस्टीम (भाडेकरू) धारकांच्या संरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला. आमदार चौधरी यांनी प्रश्न केला की, जर हे गाळे १९७० पासूनचे होते, तर मुंबई महापालिका त्यांच्याकडून टॅक्स आणि गुमास्ता सर्टिफिकेट कसे घेत होती?त्यांनी आरोप केला की, कारवाई करताना बाउन्सर उभे करण्यात आले आणि 'तोडकामाला कोणी सुपारी घेतली' याची चौकशी करण्यासाठी एसआयटी (SIT) नेमण्याची आणि दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली.मुंबई शहरात पागडी सिस्टीमला कायद्याचे संरक्षण आहे. उपनगरात मात्र वेगळा कायदा आहे, असे सांगत, शहराला लागू असलेला १९६२ आणि १९६४ पूर्वीच्या पागडी सिस्टीमच्या संरक्षणाचा कायदा मुंबई उपनगरालाही लागू करणार का? असा थेट सवाल त्यांनी सरकारला केला.
वैष्णोदेवीहून परतणाऱ्या भाविकांवर काळाची झडप ; ३ जणांचा जागीच मृत्यू, १८ जण गंभीर जखमी
Sikar Accident। राजस्थानमधील सीकर जिल्ह्यातील जयपूर-बिकानेर राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी रात्री एक मोठा अपघात झाला. फतेहपूरजवळ स्लीपर बस आणि ट्रक यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत तीन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर १८ प्रवासी गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यापैकी सात जणांची प्रकृती गंभीर आहे. मृतांची अद्याप ओळख पटलेली नाही. गुजरातमधील यात्रेकरू वैष्णोदेवीहून परतत होते Sikar Accident। […] The post वैष्णोदेवीहून परतणाऱ्या भाविकांवर काळाची झडप ; ३ जणांचा जागीच मृत्यू, १८ जण गंभीर जखमी appeared first on Dainik Prabhat .
सौदी अरेबियाचा मोठा निर्णय! मद्यप्राशनास परवानगी
कडक नियमात शिथिलतासौदी अरेबिया : सौदी अरेबियातील कायदे शरिया (इस्लामिक धार्मिक कायदा)वर आधारित आहेत. इस्लाममध्ये मद्यपान (दारू) आणि ड्रग्ज (अमली पदार्थ) सेवन निषिद्ध मानले गेले आहे. म्हणूनच देशात मद्य किंवा अल्कोहोल असलेले कोणतेही पेय उत्पादन करणे, आयात करणे, विकणे किंवा बाळगणे यावर पूर्णपणे प्रतिबंध आहे. काही परदेशी दूतावासांना मर्यादित प्रमाणात मद्य आयात करण्याची परवानगी होती. ते फक्त दूतावासाच्या आवारात आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठीच वापरले जाऊ शकत होते. मात्र आता या कडक नियमात थोडा बदल करण्यात आला आहे. दरम्यान, काही वर्षांपूर्वी सौदी अरेबियात महिलांना गाडी चालवण्यास परवानगी देण्यात आली होती.सौदी अरेबिया सरकारने आपल्या कठोर मद्यपान धोरणात गैर-मुस्लिम परदेशी नागरिकांसाठी एक महत्त्वपूर्ण बदल केला आहे. मात्र यासाठी उत्पन्नाची अट ठेवली आहे. याचा अर्थ दरमहा ५०,००० रियाल किंवा अंदाजे १३,३०० डॉलर (भारतीय चलनात सुमारे ११ लाख रुपये) पेक्षा जास्त कमावतील तरच त्यांना मद्यपानास परवानगी असेल. देशातील एकमेव दारू दुकानात प्रवेश मिळविण्यासाठी रहिवाशांना पगार प्रमाणपत्र दाखवून त्यांचे उत्पन्न सिद्ध करावे लागेल, असे वृत्त 'ब्लूमबर्ग'ने दिले आहे.सौदी अरेबियाच्या सरकारने आता परदेशी, अ-मुस्लिम लोकांसाठी दारू विकण्याची परवानगी देण्यामागे काही स्पष्ट कारणे आहेत. हा देश तेल संपन्न असला तरी आगामी काही वर्षांमध्ये सरकारी तिजोरीत तूट येण्याची चिन्हे आहेत.उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होणार असल्याने आता सरकारला केवळ तेलावर मिळणाऱ्या उत्पन्नावर अवलंबून राहण्याचे प्रमाण कमी करायचे आहे. तसेच दारू विक्री आणि त्यावरील करातून मिळणारा पैसा सरकारी तिजोरीत जमा करायचा आहे. कारण सौदी अरेबियाचा शेजारील देश दुबईने हेच धोरण अवलंबले आहे. तसेच २०३४ मध्ये सौदी अरेबियात पुरुष फुटबॉल विश्वचषक स्पर्धा होणार आहे. जगातील सर्वात मोठ्या स्पर्धा आणि पर्यटन वाढीसाठी आता मद्यपान बंदी अट शिथिल करण्यात आली आहे. त्याचबरोबर सौदीमध्ये नोकरी करणाऱ्या परदेशी नागरिकांना आकर्षित करण्यासाठी सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केल्याचे मानले जात आहे.… कठोर मद्यपान धोरणात गैर-मुस्लिम परदेशी नागरिकांना वगळण्याच्या निर्णयावर स्थानिक नागरिकांचा विरोध होण्याची शक्यता आहे. मात्र हा विरोध टाळण्यासाठी सरकार अतिशय काळजीपूर्वक धोरण आखत आहे. या महत्त्वाच्या बदलावर माध्यमांमधून प्रसिद्धी दिलेली नाही. तसेच देशाचे मुख्य धार्मिक नेत्यांनीही या निर्णयावर अद्याप तरी भाष्य केलेले नाही. आता आर्थिक उत्पन्न वाढीसाठी घेण्यात आलेल्या निर्णयाची अंमलबजावणी अत्यंत सावधगिरीने सुरु आहे.
PSU Bank Mergers: पुन्हा एकदा सरकारी बँकेचे विलीनीकरण चर्चेत,संसदेत पंकज चौधरी यांचे नवे विधान!
मोहित सोमण: पुन्हा एकदा पीएययु बँकेच्या विलिनीकरणाचा मुद्दा चर्चेत आला आहे. अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत बोलताना सध्या तरी कुठलाही असा प्रस्ताव अथवा विचार नाही'असे म्हटले असले तरी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एका कार्यक्रमात, 'भारताला अनेक मोठ्या जागतिक दर्जाच्या नामांकित बँका असण्याची गरज आहे ' असे बोलताना अधोरेखित केले होते. गेल्या महिन्यात स्वतः निर्मला सीतारामन यांनी याविषयी कामाला सुरूवात झाल्याचे सूचित केले होते. मात्र या कार्यक्रमात बोलताना त्यांनी,'आरबीआयसह सगळ्या बँकानी बसून यावर विचारविनिमय करण्याची गरज आहे. सरकारही यावर विचार विमर्श करुन योग्य निर्णय घेईल' असे त्या म्हणाल्या होत्या. एका अहवालानुसार, पीएसयु बँकेच्या बाबतीत सरकार आर्थिक वर्ष २०२६-२७ पर्यंत १२ वरून ४ बँकावर संख्या कमी करण्यासाठी इच्छुक आहे. छोट्या पीएसयु बँकांचे यावेळी मोठ्या आकाराच्या पीएसयु म्हणजेच सरकारी बँकांमध्ये विलीनीकरण केले जाऊ शकते असा कयास मांडला जात आहे. प्रसारमाध्यमांनी सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एसबीआय, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, सिटी युनियन बँक या बँकेमध्ये विभागून युको बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पंजाब व सिंध बँक, इंडियन ओव्हरसिज बँक या बँकांचे विलीनीकरण (Merger) होऊ शकते.मात्र हिवाळी अधिवेशनात संसदेत सरकारने यावर कुठलेही स्पष्टीकरण न देता सध्या कुठलाही प्रस्ताव नसल्याचे मोघम प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे जनतेसह बँकेच्या कर्मचाऱ्यांना देखील ही अस्पष्टता कायम आहे. यापूर्वी निती आयोगाने झालेल्या बैठकीत बँकेच्या पुनर्रचना करण्यासंबंधी सल्ला दिला होता. सरकारची थिंक टँक म्हणून ओळखली जाणारी निती आयोग याविषयी सकारात्मक होती अशी माहिती प्रसारमाध्यमांना सुत्रांनी दिली होती.म्हणूनच निती आयोगाच्या एका अहवालात सरकारने सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि इंडियन ओव्हरसीज बँका सारख्या लहान बँकांचे खाजगीकरण किंवा पुनर्रचना करावी असे सुचवले होते. याशिवाय भारत सरकारने पंजाब नॅशनल बँक (पीएनबी), बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक किंवा स्टेट बँक ऑफ इंडिया यासारख्या काही मोठ्या सरकारी बँका आपल्याकडे ठेवाव्यात असा सल्ला देण्यात आला असून उर्वरित लहान सरकारी बँका एकत्तर खाजगीकरणाचा पर्याय निवडू शकतात किंवा विलीनीकरण करू शकतात अथवा पीएसयु म्हणून असलेला त्यांच्यातील सरकारी हिस्सा कमी करू शकतात असे सुचवले असले तरी बँकेच्या शिष्टमंडळाने यावर अद्याप आपली कुठली प्रतिक्रिया दिलेली नाही.
Top Stocks to Buy: टेक्निकल व फंडामेंटलदृष्ट्या हे शेअर खरेदी गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर जाणून घ्या
मोहित सोमण: आज मोतीलाल ओसवाल फायनांशियल सर्विसेसने व जेएम फायनांशियल सर्व्हिसेस (JMFL) कडून टेक्निकल व फंडामेंटलदृष्ट्या काही शेअर्स खरेदीसाठी सूचवले आहेत. जाणून घेऊयात नक्की कुठले शेअर खरेदी करावे?१)RBL Bank - आरबीएल बँकेचा शेअर खरेदी करावा असा सल्ला मोतीलाल ओसवालने दिला असून कंपनीने लक्ष्य किंमत (Target Price TP) १५% अपसाईड वाढीसह ३५० रूपयांवर निश्चित केली आहे. तर सीएसपी (Common Market Price CMP) अर्थातच खरेदी करण्याची किंमत ३०४ रूपयांच्या आसपास सूचवली आहे. मोतीलाल ओसवालकडून प्रकाशित केलेल्या अहवालानुसार, आरबीएलने कर्जांमध्ये इयर ऑन इयर वार्षिक १४% ची निरोगी वाढ नोंदवली आहे आणि तसेच बँकेच्या व्यवस्थापनाला अपेक्षा आहे की मॅक्रो स्ट्रेस कमी झाल्यामुळे ही गती वाढेल. ईएनबीडी व्यवहार मजबूत वाढीचे भांडवल प्रदान करतो आणि वाढीच्या संधी आणखी विस्तारत आहेत. एमएफआय संकलनातील (MFI Collection) सुधारणांचे प्रारंभिक संकेत दर्शवितात की ताण निर्मिती स्थिर होत आहे आणि येत्या तिमाहीत क्रेडिट कार्डवरील ताण कमी होण्याची बँकेला अपेक्षा आहे. त्यामुळेच मोतीलाल ओसवालने कंपनीच्या शेअरला बाय कॉल दिला आहे.२) Biocon - बायोकॉन कंपनीच्या धेअरला जेएमएफएल म्हणजेच जेएम फायनांशियल इन्स्टिट्युशनल सिक्युरिटीजने लिमिटेडने बाय कॉल दिला असून शेअरसाठी ४२६ रूपये प्रति शेअर लक्ष्य किंमत निश्चित केली होती.ब्रोकरेज मते, बायोकॉनने बायोकॉन बायोलॉजिक्स (BBL) मधील उर्वरित २३.३% अल्पसंख्याक हिस्सा खरेदी करण्याची घोषणा केली आहे ज्यामुळे ती पूर्णपणे मालकीची उपकंपनी बनली. या व्यवहारासाठी ७७३ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स मूल्याच्या १७१.३ दशलक्ष बायोकॉन इक्विटी शेअर्स जारी करून आणि ४०० दशलक्ष अमेरिकन डॉलर्सच्या रोख खर्चाद्वारे वित्तपुरवठा केला जाईल. गर्भित मूल्यांकनानुसार कंपनी (BBL) चे इक्विटी मूल्य ५.५ अब्ज अमेरिकन डॉलर्स (६.६ अब्ज डॉलर EV) आहे, जे मोठ्या प्रमाणात अपेक्षा वाढलेले आहे आणि या विलीनीकरणामुळे कंपनीला ऐतिहासिकदृष्ट्या लागू असलेली होल्डिंग कंपनी सवलत काढून टाकण्याची अपेक्षा आहे.ब्रोकरेज मते, होल्डको सवलत काढून टाकल्यामुळे तसेच बीबीएल मधील वाढलेली हिस्सेदारी यामुळे या व्यवहारात बायोकॉन मूल्यांकनात संभाव्यतः वाढीव १०% वाढ होऊ शकते; गुंतवणूकदारांच्या कॉलनंतर अधिक स्पष्टता अपेक्षित असल्याने अद्याप घटक समाविष्ट करणे बाकी आहे. बायोसिमिलर स्केल-अप (FY25-27 मध्ये पाच लाँच), जटिल जेनेरिक लाँच (GLP-1 सह), मार्जिन विस्तार आणि सुधारित लीव्हरेजमुळे आम्ही बायोकॉनच्या दृष्टिकोनावर रचनात्मक राहतो; आम्ही FY25-28 मध्ये महसूल, ईबीटा EBITDA/ करोत्तर नफा (PAT) CAGR 14%/23%/42% अपेक्षित असा अंदाज वर्तवतो असे म्हटले.
बँड बाजा बारातपासून धुरंधरपर्यंत: रणवीरचा अविस्मरणीय चित्रपट प्रवास
हिंदी सिनेमाला नवी दिशा देणारा अभिनेता: रणवीरच्या यशाची १५ वर्षांची गाथागेल्या १५ वर्षांपासून रणवीर सिंग हे असे नाव राहिले आहे, ज्यांनी भारतीय सिनेमातील अभिनयाची पातळी सतत उंचावली आहे. बँड बाजा बारात मधून त्यांनी पदार्पण केले आणि तेव्हापासून प्रत्येक भूमिकेत इतकी मेहनत आणि जिवंतपणा दाखवला की आज ते आपल्या पिढीतील सर्वोत्कृष्ट आणि सर्वाधिक प्रिय अभिनेत्यांपैकी एक मानले जातात.रणवीरची खरी खासियत म्हणजे ते आपल्या भूमिकेत पूर्णपणे विलीन होतात. प्रत्येक चित्रपटासोबत ते जणू नवा माणूस बनतात. इतके की प्रेक्षक हे विसरून जातात की ते रणवीर सिंगला पाहत आहेत; ते फक्त त्यांच्या साकारलेल्या पात्राशी जोडले जातात. त्यांची मेहनत, उर्जा आणि प्रामाणिक भावना त्यांना असा कलाकार बनवतात, ज्याच्यावर नजर खिळून राहते.त्यांची ऑफ-स्क्रीन पर्सनॅलिटीही तितकीच दमदार आहे. त्यांची जोशपूर्ण उर्जा, प्रामाणिकपणा आणि सिनेमासाठी असलेलं प्रेम त्यांच्या प्रत्येक कृतीत दिसून येतं. त्यांची उपस्थितीच वातावरणात उत्साह निर्माण करते. स्क्रीनवरही आणि लोकांच्या गर्दीतही. म्हणूनच ते इंडस्ट्रीतील सर्वात आवडते आणि रोचक एंटरटेनर्सपैकी एक आहेत.त्यांचा नवा चित्रपट धुरंधर याने हे आणखी ठाम केले आहे. प्रेक्षक असोत किंवा समीक्षक सगळेच त्यांच्या अभिनयाचं भरभरून कौतुक करत आहेत आणि ही भूमिका त्यांच्या सर्वात दमदार, संतुलित कामगिरींपैकी एक असल्याचं म्हणत आहेत. बॉक्स ऑफिसवरील उत्तम कमाई याचा पुरावा आहे की लोक त्यांच्याशी किती जोडलेले आहेत. जेव्हा रणवीर एखादी कथा लीड करतात, तेव्हा संपूर्ण सिनेमॅटिक अनुभव अधिक मोठा, अधिक खोल आणि कायम लक्षात राहणारा होतो.धुरंधर मध्ये रणवीर एक वेगळीच ताकद दाखवतात. ते कमी बोलूनही खूप काही सांगतात… त्यांच्या डोळ्यांतूनच सगळ्या भावना व्यक्त होतात. कोणताही गोंधळ न करता, फक्त आपल्या शांत, सखोल अभिनयाने ते प्रेक्षकांना खिळवून ठेवतात. हीच कामगिरी सिद्ध करते की त्यांना या पिढीचा सर्वोत्कृष्ट अभिनेता का म्हटले जाते. असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही की ते असा कलाकार आहे जो स्वतःला सतत उंचावत राहतो, आश्चर्यचकित करतो आणि प्रेरणा देतो.गंभीर ते विनोदी, धडाकेबाज ते शांत पण प्रभावी, अशा विविध भूमिकांमधून रणवीरच्या अभिनयाची रेंज अतुलनीय दिसते. रणवीर सिंग केवळ स्वतःचं नाव मोठं करत नाहीत, तर आजच्या हिंदी सिनेमाला नवीन दिशाही देत आहेत.१५ वर्षं झाली, असंख्य संस्मरणीय भूमिका मिळाल्या, आणि आता धुरंधर सारख्या आणखी एका मोठ्या चित्रपटासह रणवीर पुन्हा पुन्हा सिद्ध करत आहेत की ते खरोखरच आजच्या पिढीतील सर्वात उत्कृष्ट अभिनेता आहेत.
Shirur News : चांडोह-पिंपरखेड परिसरात 24 तासांत तीन बिबटे जेरबंद; वनविभागाने राबविलेल्या मोहिमेला यश
जांबुत : शिरुर तालुक्याच्या बेट भागात चांडोह गावच्या परिसरात लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात सर्वाधिक ९ वर्षे वयोमान असणाऱ्या नर संवर्गातील बिबट्याला बुधवारी (दि.१०) रोजी पहाटे जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. मागील दोन महिन्यात बिबट घटनांमध्ये हॉट स्पॉट ठरलेल्या पिंपरखेड व चांडोह परिसरात मागील चोवीस तासांत तीन बिबटे जेरबंद करून त्यांना माणिकडोह (ता.जुन्नर ) येथील बिबट […] The post Shirur News : चांडोह-पिंपरखेड परिसरात 24 तासांत तीन बिबटे जेरबंद; वनविभागाने राबविलेल्या मोहिमेला यश appeared first on Dainik Prabhat .
अभिनेत्री कृतिका कामराने दिली प्रेमाची कबुली; शेअर केले खास फोटो
Kritika Kamra | अभिनेत्री कृतिका कामराला ‘इतनी मोहोब्बत है’ या मालिकेमुळे मोठी लोकप्रियता मिळाली. क्रिकेट होस्ट आणि कंटेंट क्रिएटर गौरव कपूरसोबत तिच्या डेटींगच्या चर्चांना उधाण आले होते. तिने रिलेशनशिपमध्ये असल्याची हिंट दिली होती. आता तिने जाहीररित्या प्रेमाची कबुली दिली आहे. कृतिका कामराने इन्स्टाग्रामवर गौरवसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. ‘ब्रेकफास्ट विथ…’ असं कॅप्शन तिने दिलं […] The post अभिनेत्री कृतिका कामराने दिली प्रेमाची कबुली; शेअर केले खास फोटो appeared first on Dainik Prabhat .

26 C