व्हाइट हाउसमधून नेतन्याहू यांचा कतारच्या पंतप्रधानांना फोन; दोहा हल्ल्यासाठी माफी मागितली
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. जानेवारी महिन्यापासून त्यांचा हा चौथा अमेरिकन दौरा आहे. लिमोझिनमध्ये व्हाइट हाऊसमध्ये आलेल्या बेंजामिन नेतान्याहू यांचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वैयक्तिकरित्या स्वागत केले. दोन्ही नेत्यांनी हस्तांदोलन केले. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, या भेटीदरम्यान नेतन्याहू यांनी व्हाइट हाउसमधूनच कतारचे पंतप्रधान शेख मोहम्मद बिन अब्दुलरहमान अल-थानी यांना फोन करून दोहा येथील अलीकडील […]
लातूर तालुक्यात परतीच्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. वर्षभराची मेहनत या पावसाने हिरावून घेतली आहे. त्यामुळे भविष्याच्या चिंतेत या भागातील शेतकरी अडकला आहे, शासनाकडून त्यांना मदतीची अपेक्षा आहे. मात्र, ज्यांना निवडून दिलं तेच पर्यटनासाठी यावं, अशा पद्धतीने नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत आहेत. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी लातूर तालुक्याचे आमदार रमेश आप्पा कराड यांना जाहीर […]
सध्या सोशल मिडिया बहरत चालला आहे. अनेक प्रकारची अनोखी माहिती त्यावरुन प्रसारित करण्यात येत आहे. ती खरी की खोटी हा प्रश्न असला, तरी कित्येकदा ती सनसनाटी असते, हे निश्चित आहे. सध्या, असाच एक व्हिडीओ प्रसारित केला जात आहे. एका झुरळाच्या साहाय्याने एका कलाकाराने एक पेंटिंग काढले असून ते त्याने 9 कोटी रुपयांना विकायला काढले असल्याचा [...]
रत्नागिरीचे पालकमंत्री विकास कामात व्यस्त आहेत. रत्नागिरीतील समस्यांबाबत जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आणि नगर परिषद मुख्याधिकारी यांच्याकडे समस्या मांडली असता उडवा उडवीची उत्तरे मिळतात, असे काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रमेश कीर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी ते म्हणाले की, रत्नागिरीतील सर्व रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे.काही महत्वाच्या प्रश्नांवर आंदोलनही केले होते अशी माहिती रमेश […]
Ratnagiri News –दापोली अंमली पदार्थांच्या विळख्यात, 22 लाख 22 हजार रूपयांचे चरस पकडले
दापोली तालुक्यात अंमली पदार्थ विरोधात पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. केळशी किनारा मोहल्ला येथे पोलिसांनी टाकलेल्या धाडीत 22 लाख 92 हजार रूपये किंमतीचे चरस सापडले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. दापोली तालुक्यात अंमली पदार्थ विरोधात ही तिसरी मोठी कारवाई आहे. पोलीस निरीक्षक महेश तोरस्कर यांच्या पथकाने टाकलेल्या धाडीत केळशी किनारा मोहल्ला येथील […]
ट्रम्प यांचा आणखी एक टॅरिफ बॉम्ब; अमेरिकेबाहेर बनवल्या जाणाऱ्या चित्रपटांवर लादला 100 टक्के कर
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी आणखी एक टॅरिफ बॉम्ब टाकला आहे. ट्रम्प यांनी जाहीर केले की, अमेरिकेबाहेर तयार होणाऱ्या प्रत्येक चित्रपटावर आता 100 टक्के कर आकारला जाईल. हा निर्णय चित्रपट उद्योगासाठी धक्कादायक आहे. याचा फक्त फक्त हॉलिवूडच नाही तर, बॉलिवूडलाही बसणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘ट्रुथ सोशल’ वर एक पोस्ट […]
कॅनडाने लॉरेन्स बिश्नोई गँगला दहशतवादी संघटना घोषित केले, खून आणि खंडणीचा आरोप
कॅनडा सरकारने सोमवारी लॉरेन्स बिश्नोई गँगला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. हा निर्णय कॅनडातील हिंदुस्थानी वंशाच्या लोकांना दिल्या जाणाऱ्या धमक्या आणि हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला आहे. कॅनडाच्या सार्वजनिक सुरक्षामंत्र्यांच्या विभागाने (Public Safety Canada) जारी केलेल्या निवेदनात सांगितले आहे की, या गँगने खून, गोळीबार आणि खंडणी मागणी सारखे गंभीर गुन्हे केले आहेत, ज्यामुळे हिंदुस्थानी वंशाच्या […]
Ahilyanagar News – पाथर्डीत पावसाची विश्रांती, मोहटादेवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
पावसाने उघडीप देताच मोहटा देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी दोन दिवसात मोठ्या संख्येने देवीच्या दर्शनाचा लाभ घेतला. घटस्थापनेच्या दिवशी देवीगडाकडे जाणाऱ्या मार्गावर ठिकठिकाणी पाणी साचल्याने व कारेगाव येथील नदीवरील पूल वाहून गेला. यामुळे भाविकांनी नवरात्र उत्सव काळात देवीच्या दर्शनाला येण्याचे टाळल्याने अपेक्षित गर्दी सुरवातीच्या काळात गडावर जमली नाही. परिणामी अनेक व्यावसायिकांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला. […]
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बाजार समितीच्या कारभारावर बोट ठेवणाऱ्या शेतकरी व शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा आवाज दाबण्यात आला. शेतकरी प्रश्न मांडणाऱ्या बोलू न देता केवळ अभिनंदन आणि कौतुकाचे गोडवे जाणाऱ्यांना वेळच वेळ दिला. बाजारात वाढलेल्या शेतमाल, मोबाईल चोऱ्या, मारामारी, सुरक्षा आदी वर्षानुवर्षे प्रश्नांवर संचालक मंडळाकडे उत्तरे नव्हती. तर संपूर्ण सभा माजी सभापती […]
नेपाळनंतर पेरूमध्ये Gen-Z निदर्शने, भ्रष्टाचारविरोधात रस्त्यावर उतरली तरुणाई
नेपाळमधील आंदोलनांनंतर आता दक्षिण अमेरिकेतील पेरूमध्येही Gen-Z तरुणांनी रस्त्यांवर उतरून भ्रष्टाचार आणि पेन्शन सुधारणांविरोधात तीव्र निदर्शने केली आहेत. या आंदोलनदरम्यान पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये संघर्ष झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि लाठीमार केला. यानंतर तरुणांनी दगडफेक केली. २० सप्टेंबरपासून हे आंदोलन सुरु झाले आहे. या आंदोलनात मोठ्या प्रमाणात तरुण सहभागी झाले असून हे […]
Ratnagiri News –मानव आणि बिबट्याचा संघर्ष! लावणी, भारूड आणि कव्वालीतून बिबट्या मानवाला सांगणार व्यथा
जंगलातील देखणा, चपळ बिबट्या आता मानवी वस्तीत शिरकाव करू लागला आहे. बिबट्याचा जंगलातील आधिवास धोक्यात आला आहे. कधी गोठ्यात, कधी दारात, तर तोल जाऊन विहिरीत पडणाऱ्या बिबट्याचा आणि मानवाचा संघर्ष आता सुरू झाला आहे. हा बिबट्या मानवासमोर मानवाच्या भाषेतच आपली बाजू मांडणार आहे. बिबट्याची लावणी, बिबट्याचे भारूड बिबट्याच्या कव्वालीतून बिबट्या दसऱ्याच्या दिवशी संगीत बिबट आख्यानमधून […]
फसवणुकीच्या एका प्रकरणात आरोपींना दिलेल्या जामीन आदेशांवर सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त करत ते रद्द केले आहेत. अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी आणि सत्र न्यायाधीश यांनी जामीन अर्जांना ज्या पद्धतीने हाताळले, त्याबद्दल न्यायालयाने जोरदार टीका केली आहे. एवढंच नव्हे, तर या दोघांनाही किमान सात दिवसांचं विशेष न्यायिक प्रशिक्षण घेण्याचे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. इंडिया टुडेनं […]
Ahilyanagar News –ओला दुष्काळ जाहीर करून शेतकर्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी; संभाजी ब्रिगेडची मागणी
महाराष्ट्रात विशेष करून मराठवाड्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला. अतिवृष्टीमुळे महाभयंकर पुरस्थिती निर्माण झाली असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. गावच्या गाव उद्ध्वस्त झाली आहेत, शेतजमीनी खरडून गेल्या आहेत, जनावरे व गुरेढोरे मृत्यूमुखी पडले आहेत, संसार डोळ्यादेखत पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता पुन्हा एकदा शुन्यातून आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात करावी लागणार आहे. त्यामुळे […]
राहुल गांधींना जीवे मारण्याची धमकी, भाजप नेत्यावर गुन्हा दाखल
एका वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान भाजपच्या विद्यार्थी संघटनेचे (ABVP) माजी नेते प्रिंटू महादेव यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. ‘राहुल गांधींच्या छातीत गोळ्या घालू’, असं ते म्हणाले होते. याच प्रकरणी आता त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २६ सप्टेंबर रोजी न्यूज१८ केरळ वाहिनीवर लडाख हिंसाचारावरील चर्चेदरम्यान हे वादग्रस्त विधान […]
Chandrapur News –एकच मिशन ST आरक्षण…, राजुरा शहरात बंजारा समाजाच्या वतीने काढण्यात आला मोर्चा
बंजारा समाजाला अनुसूचित जमातीत (ST) आरक्षण मिळावे या मागणीसाठी चंद्रपुरात बंजारा समाज एकवटला. राजुरा शहरात बंजारा समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. जिल्हाभरातून मोठ्या संख्येने बंजारा समाज बांधव मोर्चामध्ये सहभागी झाले होते. हैदराबाद गॅझेटचा आधार घेऊन बंजारा समाजाला अनुसूचित जमातीत आरक्षण देण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. या मागणीसाठी विविध जिल्ह्यांमध्ये बंजारा समाजाच्या वतीने मोर्चा […]
अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी घेतले तुळजाभवानी मातेचे दर्शन
धाराशिव (प्रतिनिधी)- आज श्री तुळजाभवानी मंदिर तुळजापूर येथे सुप्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी देवीचं दर्शन घेतलं. आईच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांनी भाविकांसाठी सुख, समृद्धी आणि आरोग्याची प्रार्थना केली.
एस.बी.एन.एम.कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये जागतिक फार्मासिस्ट दिन उत्साहात साजरा
धाराशिव (प्रतिनिधी)- व्ही पी शैक्षणिक संकुल, छत्रपती संभाजी नगर रोड, धाराशिव येथे डॉ. प्रतापसिंह पाटील व करण प्रतापसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एस.बी.एन.एम. कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये जागतिक फार्मासिस्ट दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावर्षीच्या दिनाची थीम “थिंक हेल्थ, थिंक फार्मासिस्ट” ही होती. या थीमनुसार फार्मसी व्यवसायाचे महत्त्व, समाजाप्रती फार्मासिस्टची भूमिका आणि जबाबदाऱ्या याविषयी जागृती घडविण्यासाठी महाविद्यालयाने विविध उपक्रमांचे आयोजन केले. या दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांसाठी विशेष व्याख्याने, चर्चासत्रे व जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना फार्मसी व्यवसायाचा आरोग्य व्यवस्थेतला महत्त्वाचा सहभाग, औषधनिर्मिती ते रुग्णापर्यंत पोहोचविण्याच्या प्रक्रियेत फार्मासिस्टची भूमिका, तसेच सुरक्षित औषधोपचार यांचे महत्त्व समजावून सांगितले.याशिवाय, विद्यार्थ्यांनी गटचर्चा यामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या उपक्रमांतून विद्यार्थ्यांना “फार्मासिस्ट केवळ औषध विक्रेता नसून एक आरोग्य मार्गदर्शक आहे” हा संदेश प्रभावीपणे अधोरेखित करण्यात आला. या शिवाय विद्यार्थ्यांनी सुद्धा त्यांचे मनोगत व्यक्त करत त्यांचे औषधनिर्माण शास्त्र मधील त्यांच्या अपेक्षा सुद्धा व्यक्त केल्या. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. बी. ननवरे यांनी मार्गदर्शन करताना आजच्या आरोग्य व्यवस्थेत फार्मासिस्ट हा केवळ औषध पुरवठा करणारा व्यक्ती राहिलेला नसून, तो रुग्णांना योग्य औषधोपचार, योग्य सल्ला आणि जीवनशैलीविषयी जागृती करून देणारा एक महत्त्वपूर्ण दुवा ठरला आहे. ‘थिंक हेल्थ, थिंक फार्मासिस्ट’ ही संकल्पना समाजाला आरोग्य जपण्यासाठी फार्मासिस्टची गरज पटवून दिली.प्रा. केदार व प्रा.धस यांनी आपल्या व्याख्यानातुन विद्यार्थ्यांमध्ये जागृती घडवण्यासाठी विविध पैलूंवर संवादसाधला. या कार्यक्रमास महाविद्यालयातील सहा.प्रा. नागरगोजे,प्रा .हाके, प्रा. शेरखाने ,प्रा. किरदत्त , प्रा.जोशी, प्रा.माने,प्रा.हजारे, प्रा.पवार, प्रा. कुऱ्हाडे , प्रा.पठाण,प्रा.मुंढे,प्रा. सांगडे,प्रा.जाधव व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
धाराशिव जिल्ह्यातील पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने भाजपचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यात झालेल्या सततच्या अतिवृष्टीमुळे शेतकरी आणि नागरिकांवर मोठे संकट आले आहे. शेतीसह व्यापार व्यवहार आणि समाजजीवनावर नकारात्मक परिणाम झाला असून शेतकरी हवालदिल झाले आहेत. याअनुषंगाने भाजपकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. भाजपच्या वतीने सोमवारी दि.29 रोजी देण्यात आलेल्या निवेदनात मातोश्री शेत रस्ते व पाणंद रस्ते योजना तसेच मनरेगा अंतर्गत मंजूर झालेल्या कामांतर्गत स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मितीची संधी उपलब्ध होऊ शकते, असे नमूद करण्यात आले आहे. या योजनांतील शेत रस्ते व पाणंद रस्ते खडीकरणाची कामे थेट स्थानिक सुशिक्षित बेरोजगार अभियंते, महिला संस्था, महिला बचत गट व शेतकरी बचत गटांना देण्यात यावीत, अशी मागणी करण्यात आली. यामुळे पूरपरिस्थितीमुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळेल तसेच बेरोजगार युवक आणि महिलांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असेही निवेदनात नमूद आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रस्तावास सकारात्मक दृष्टीकोनातून विचार करून तात्काळ निर्णय घ्यावा, अशी विनंती भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केली. या निवेदनावर भाजप जिल्हा सरचिटणीस ॲड. नितीन भोसले आणि कळंब तालुकाध्यक्ष मकरंद पाटील यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
Nanded News –एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे, बंजारा समाजाचा महाएल्गार मोर्चा
हैद्राबाद गॅझेटीयर नुसार बंजारा समाजाला अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी आज बंजारा समाजाचा महाएल्गार मोर्चा आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. सबंध जिल्ह्यातून हजारो बंजारा बांधव या मोर्चात पारंपारिक वेषात सहभागी होते. मोर्चाचे नेतृत्व संयोजक डॉ.बी.डी.चव्हाण यांनी केले. बंजारा समाजाला हैद्राबाद गॅझेटीयरनुसार अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी जिल्ह्यात विविध तालुक्याच्या ठिकाणी […]
इटलकर खून प्रकरणी मुख्य आरोपीस अटक करा
धाराशिव (प्रतिनिधी)- बहिणीची छेड काढणाऱ्याला जाब विचारण्यास इयत्ता दहावीतील मारुती शिवाजी इटलकर हा भाऊ गेला होता. मात्र त्याचा अत्यंत निर्दयपणे संबंधित आरोपींनी खून केला. खून करणाऱ्या मुख्य आरोपीस पोलिसांनी अद्यापपर्यंत अटक केलेली नाही. त्यामुळे त्या आरोपीस अटक करावी, या मागणीसाठी निवेदने, धरणे, आंदोलन व मोर्चा देखील काढला. मात्र आश्वासनाशिवाय पोलिसांनी कुठलीच भूमिका निभावली नाही. विशेष म्हणजे मुख्य आरोपी गावात मोकाट फिरत असताना देखील त्याला पोलीस पकडण्याऐवजी संबंधित पोलीस नातेवाईकांनाच त्या आरोपींना पकडून द्या, असे फर्मान सोडत आहेत. त्यामुळे वडिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. आजचा आठवा दिवस असल्याने उपोषणकर्त्याची प्रकृती खालावली आहे. दरम्यान, आमरण उपोषण तात्काळ थांबवा असा दबाव पोलीस आणत आहेत. त्यामुळे जर आरोपीस अटक करण्यास टाळाटाळ केली तर संबंधित पीडित कुटूंब सामूहिक आत्मदहन करणार असल्याचा इशारा इटलकर नातेवाईकांनी दिला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, धाराशिव शहरातील बालाजी नगर येथील शिवाजी सीमाप्पा इटलकर यांच्या मुलीची त्या गल्लीतील सागर प्रवीण चौधरी हा सतत छेड काढत होता. त्याचा जाब तिचा एकुलता एक भाऊ असलेल्या मारुती इटलकर या भावाने विचारला. त्यामुळे मारुतीस गणेश किराणा स्टोअर समोर प्रवीण सुभाष चौधरी, किशोर सुभाष चौधरी, सिद्धनाथ सावंत, अंकुश सुभाष चौधरी, सागर सुभाष चौधरी, रणजीत सुभाष चौधरी व अज्ञात दोन व्यक्तींनी संगणमताने कट रचून मारुतीस दि.8 मे 2025 रोजी जबर मारहाण केली. त्यामुळे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या उपोषणामध्ये शिवाजी इटलकर यांच्यासह आशा इटलकर, महादेव इटलकर, अनुराधा इटलकर, सानिया इटलकर, पूजा इटलकर, आरती इटलकर, कविता इटलकर,मनीषा इटलकर, छकुली इटलकर, तनुजा इटलकर व बजरंग इटलकर आदी सहभागी झाले आहेत.
पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे नाव सांगून सहा लाखांची फसवणूक
वाशी (प्रतिनिधी)- धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची चांगली ओळख असून या ओळखीने सरकारी काम मिळवून देतो म्हणत भूम तालुक्यातील पाथरूड येथील एका व्यक्तीने भूम येथील व्यक्तीची तब्बल सहा लाखांची आर्थिक फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंबंधी सविस्तर वृत्त असे की, आरोपी गणेश सतिश चव्हाण (रा.पाथरुड ता. भूम) यांनी दिनांक 13 जानेवारी 2025 ते 4 फेब्रुवारी 2025 या काळात मोबाईलवरुन फिर्यादी प्रशांत सतिश नाईकवाडी (वय 35 वर्षे, रा. भूम) यांना पालकमंत्री प्रताप सरनाईक हे माझ्या चांगले ओळखीचे आहेत असे सांगितले. गावातील केलेली कामे दाखवून जिल्हा नियोजन समिती मधून कामे मंजूर करुन देतो असे म्हणून आरोपीने फिर्यादीचा विश्वास संपादन केला. पुढे आरोपीने फिर्यादीला कोणतेही शासकीय काम मिळवून न देता फिर्यादीकडून वेळोवेळी एकुण 5,95,000 रुपये ऑनलाईन घेवून फिर्यादीची फसवणुक केली. तसेच पैसे परत मागीतले असता जिवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी फिर्यादी प्रशांत नाईकवाडी यांनी दिनांक 28 सप्टेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पोलीस ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 318(4), 351 (2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.
जनता सहकारी बँकेकडून पूरग्रस्तांना 30 लाखांची आर्थिक मदत
धाराशिव (प्रतिनिधी)- राज्यासह मराठवाड्यातील अनेक भागांवर कोसळलेल्या अतिवृष्टी व पुरामुळे शेती, पशुधन आणि घरांचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे. या आपत्तीग्रस्तांना दिलासा देण्यासाठी जनता सहकारी बँक लि., धाराशिव यांनी पुढाकार घेत एकूण 30 लाख रुपयांची आर्थिक मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेचे कार्यक्षेत्र महाराष्ट्रातील धाराशिव, लातूर, सोलापूर, बीड तसेच कर्नाटकातील बीदर जिल्ह्यांपर्यंत पसरलेले आहे. धाराशिव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर झालेल्या अतिवृष्टीमुळे पीकहानी, जनावरांचे मृत्यू व घरांची पडझड झाली आहे. सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन बँकेच्या संचालक मंडळाने त्वरीत बैठक घेऊन मदतीचा निर्णय घेतला. निर्णयानुसार, धाराशिव जिल्ह्यासाठी 10 लाख तर लातूर, सोलापूर, बीड आणि बीदर या प्रत्येक जिल्ह्यासाठी 5 लाख रुपये असे एकूण 30 लाख रुपयांचे धनादेश संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्द करण्याचे ठरले. धाराशिव जिल्ह्यासाठीचा 10 लाखांचा धनादेश बँकेचे अध्यक्ष वसंतराव नागदे, संचालक विश्वास शिंदे, संचालक आशिष मोदाणी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय घोडके व मुख्याधिकारी शिवाजी बुडुपे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी धाराशिव यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. “संकटसमयी समाजाने एकदिलाने उभे राहणे ही आपली जबाबदारी आहे. पूरग्रस्तांना मदत करून त्यांच्या पुनर्वसनाला हातभार लावणे हे आमचे कर्तव्य आहे,” असे बँकेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. जनता सहकारी बँकेच्या या दानशूर उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, समाजातील इतर संस्था व नागरिकांनाही मदतीसाठी प्रेरणा मिळत आहे.
सक्षणा सलगर यांनी केली पूरग्रस्त भागाची पाहणी
तेर (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यातील विविध गावांमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार राष्ट्रीय युवती अध्यक्षा सक्षणा सलगर यांनी पहाणी करून नागरिकांची मते जाणून घेतली. परंडा तालुक्यातील नालगाव, वडनेर, देवगाव या गावात सक्षणा सलगर यांनी भेट देऊन अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या परस्थितीची माहिती जाणून घेतली.
जिल्हा परिषद कन्या प्रशालेत पाढे पाठांतर उपक्रम
तेर (प्रतिनिधी)- ज्ञानात भर पडावी म्हणून धाराशिव तालुक्यातील तेर येथील जिल्हा परिषद कन्या प्रशालेत पाढे पाठांतर अभिनव उपक्रम चार वर्षांपासून सहशिक्षक सुशिलकुमार क्षिरसागर राबवित आहेत. धाराशिव तालुक्यातील तेर येथील जिल्हा परिषद कन्या प्रशालेत विद्यार्थीनी यांना अभ्यासाची गोडी लागावी.अंकगणिताची ओळख व्हावी म्हणून पाढे पाठांतर उपक्रम सहशिक्षक सुशिलकुमार क्षिरसागर राबवितात. हा उपक्रम 4थी च्या विद्यार्थीनीसाठी राबविण्यात येत आहे.चार वर्षांपासून पाढे पाठांतर करणे (किमान30पर्यंत कमाल विद्यार्थी कुवतीनुसार) उपक्रम राबविण्यात येत आहे.विजेत्यां विद्यार्थीनींना बक्षीस म्हणून विद्यार्थीनी मागेल तेवढे शैक्षणिक साहित्य वर्गशिक्षक सुशिलकुमार क्षिरसागर बक्षीस म्हणून देतात.या उपक्रमाचा मुख्य हेतु हा आहे की,विद्यार्थीनीना गणितातील गुणाकार क्रिया सोप्या पद्धतीने करता याव्यात.गणित विषयाची आवड निर्माण व्हावी हा आहे अशी माहिती हा उपक्रम राबविणारे सहशिक्षक सुशिलकुमार क्षिरसागर यांनी सांगितले.
भाई उद्धवराव पाटील शिक्षक पतसंस्थेकडून पूरग्रस्तांसाठी २. ५१ लाख रुपयाचा धनादेश
धाराशिव (प्रतिनिधी)- भाई उद्धवराव पाटील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सहकारी पतसंस्था म. धाराशिवच्या वतीने राज्यातील पूरग्रस्तांसाठी 2.51 लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष विशाल घोगरे, सचिव अमरसिंह देशमुख व संतोष मोरे यांनी मुख्यमंत्री सहायता निधी कक्षास जिल्हाधिकारी कीर्तीकुमार पुजार यांच्याकडे दिनांक २९ सप्टेंबर २०२५ रोजी सुपूर्द करण्यात आला. भाई उद्धवराव पाटील शिक्षक पतसंस्थेने यापूर्वी शासकीय जिल्हा रुग्णालय धाराशिव यांच्यासाठी कोरोना काळात दोन लाख रुपयांची वैद्यकीय उपकरणे खरेदी केली होती व मुख्यमंत्री सहाय्यता कक्षास पन्नास हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला होता. धाराशिव जिल्ह्यात दुष्काळ दरम्यान पिण्याच्या पाण्याच्या टाक्या वाटप,पाणी आडवा पाणी जिरवा योजनेस आर्थिक सहाय्य करण्यात आले होते. आत्महत्याग्रस्त विधवा पत्नीसही रोख स्वरूपात मदत करण्यात आली होती. संस्थेस यापूर्वी महाराष्ट्र शासनाचा २०१४ मध्ये सहकार निष्ठ तर २०१६ मध्ये सहकार भूषण हे दोन पुरस्कार मिळाले होते. संस्थेचे अध्यक्ष विशाल घोगरे,उपाध्यक्ष शशिकांत पडवळ,सचिव अमरसिंह देशमुख, संचालक बालाजी तांबे, विजयकुमार कुलकर्णी, रवींद्र शिंदे, विलास खरात, अमोल सरवळे, उत्तरेश्वर चव्हाण, बाळासाहेब नरवडे,ललिता लोमटे, सिंधू कांबळे, कर्मचारी करण पेठे, सभासद व हितचिंतकाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
जगात दुसऱ्या क्रमांकाची ठेंगणी मुलगी चंद्रपूर जिल्ह्यात; विक्रमाची नोंद, प्रमाणपत्र बहाल
जगात दुसऱ्या क्रमांकाची ठेंगणी मुलगी चंद्रपूर जिल्ह्यात आढळली. दोन फूट तीन इंच एवढी तिची उंची आहे. त्यामुळे तिची नोंद आता International Book of records मध्ये झाली आहे. राजेश्वरी गुणेदार असे या मुलीचे नाव असून, ती चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यात परसोडी येथील रहिवासी आहे. काही युवकांना ती रस्त्याच्या कडेला चालताना दिसली. तिची उंची बघून त्यांना आश्चर्य […]
जगात दुसऱ्या क्रमांकाची कमी उंचीची मुलगी चंद्रपूर जिल्ह्यात; विक्रमाची नोंद, प्रमाणपत्र बहाल
जगात दुसऱ्या क्रमांकाची ठेंगणी मुलगी चंद्रपूर जिल्ह्यात आढळली. दोन फूट तीन इंच एवढी तिची उंची आहे. त्यामुळे तिची नोंद आता International Book of records मध्ये झाली आहे. राजेश्वरी गुणेदार असे या मुलीचे नाव असून, ती चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यात परसोडी येथील रहिवासी आहे. काही युवकांना ती रस्त्याच्या कडेला चालताना दिसली. तिची उंची बघून त्यांना आश्चर्य […]
सरकारकडून घोषणांचा फक्त पूर, प्रत्यक्षात मदत पोहोचलीच नाही; आदित्य ठाकरे यांचा घणाघात
राज्यात गंभीर संकट असतानाही सरकार आपल्याच मस्तीत आहे. निवडणुका असलेल्या राज्यात भाजपकडून जनतेच्या पैशांची उधळपट्टी करण्यात येत आहे. मात्र, राज्यातील आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचत नाही. सरकारकडून फक्त घोषणांचा पूर आला आहे, प्रत्यक्षात शेतकऱ्यांपर्यंत काहीही मदत पोहचलेली नाही, अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी सरकारवर हल्ला चढवला आहे. कोणतेही काम […]
बेपत्ता पत्रकार राजीव प्रताप यांचा अखेर मृतदेह जोशीयारा तलावात आढळला; कुटुंबीयांची चौकशीची मागणी
उत्तरकाशीमध्ये गेल्या दहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या डिजीटल मिडीयाचे पत्रकार राजीव प्रताप यांचा मृतदेह अखेर जोशियारा तलावात सापडला आहे. रविवारी सकाळी 10.40 वाजता आपत्ती व्यवस्थापन विभागाला जोशीदा बॅरेज नदीत हा मृतदेह आढळल्याची माहिती मिळाली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मात्र त्यांच्या कुटुंबाने त्यांच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला असून चौकशीची मागणी केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजीव […]
मॉडेल कॉम्पिटिशन व पोस्टर प्रेझेंटेशन करून तेरणा फार्मसीचा जागतिक फार्मासिस्ट दिवस साजरा
धाराशिव (प्रतिनिधी)- तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग उस्मानाबाद येथील औषधनिर्माणशास्त्र () विभागाने दिनांक 25 सप्टेंबर 2025 रोजी जागतिक औषधनिर्माणशास्त्र दिन विविध उपक्रम घेऊन साजरा केला. या दिवसाची सुरवात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने सर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. धन्वंतरी प्रतिमा पूजन करून झाली. यावेळी विशेष अतिथी म्हणून तेरणा ट्रस्टचे विश्वस्त श्री. बाळासाहेब वाघ, तेरणा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.बी. मोरे, प्रमुख दासलॅब, पुणे आणि अभय आयुर्वेदिक औषधालयचे प्रॉडक्शन हेड श्री. राम लगदिवे, हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.या कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना डॉ. विक्रमसिंह माने सरांनी यंदाच महाविद्यालयाच्या सिम्बॉयसिस कॉलेज सोबत झालेल्या कराराबद्दल सविस्तर माहिती दिली. या करारानुसार फार्मसी च्या विद्यार्थ्यांमध्ये पायथोन व आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारखे सॉफ्टवेअर स्किल डेव्हलपमेंट करून फार्मसी चे विद्यार्थ्यांना विविध इंटरशिप व प्लेसमेंट मिळण्यासाठी प्रयत्नशील आहोत असा विश्वासही व्यक्त केला. प्रमुख अतिथीनिदेखील फार्मसी विभागात असलेल्या अनेक अपॉर्च्युनिटीची माहिती दिली. तेरणा ट्रस्टचे विश्वस्त श्री बाळासाहेब वाघ सरांनी देखील विद्यार्थ्यांना नियमितता व शिस्तीचे महत्व समजावून सांगितले. त्यानंतर महाविद्यालयातर्फे फार्मसी विभागात पोस्टर प्रेसेंटेशन चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यांनी फार्मसी क्षेत्राच्या विविध विषयातील नवीन उपक्रम सादर केले. त्याचप्रमाणे महाविद्यालयात मॉडेल मेकिंग कॉम्पिटिशन हे देखील आयोजित करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांनी शरीरातील अनेक अवयव आणि त्यावर काम करणाऱ्या विविध औषधी यांची थ्रीडी मधील मॉडेल्स प्रदर्शित केले. त्याचप्रमाणे फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमधील वापरण्यात येणाऱ्या मशीनचे देखील नाविन्यपूर्व मॉडेल्स बनवले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी विज्ञान आणि कला यांचा अतिशय सुंदर संयोग केला होता. महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा केली आणि नेमणूक केलेल्या जजेसनी देखील विद्यार्थ्यांचे कौतुक केले. निवडण्यात आलेल्या प्रथम, द्वितीय, आणि तृतीय क्रमांकाचे विद्यार्थ्यांना पारितोषिके देखील देण्यात आली. फार्मासिस्ट दिन 2025 निमित्त टी.पी.सी.टी. कॉलेज ऑफ फार्मसीतर्फे ऑनलाईन स्पर्धांचे यशस्वी आयोजन फार्मासिस्ट दिन 2025 च्या निमित्ताने टी.पी.सी.टी.च्या कॉलेज ऑफ फार्मसीतर्फे ऑनलाईन रील मेकिंग स्पर्धा व ऑनलाईन पोस्टर सादरीकरण स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धांना राज्यभरातील आणि बाहेरील विविध महाविद्यालयांमधून विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. ऑनलाईन पोस्टर सादरीकरण स्पर्धा: बी. फार्मसी विभागातील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत प्रभावी सादरीकरण करत आपली गुणवत्ता सिद्ध केली. या स्पर्धेत प्रथम क्रमांक पूजा लोमटे (आर. पी. कॉलेज ऑफ फार्मसी, धाराशिव), द्वितीय क्रमांक विकास डेडे (के. टी. पाटील कॉलेज ऑफ फार्मसी, धाराशिव),तृतीय क्रमांक बादल गुप्ता (डीआयटी युनिव्हर्सिटी, देहराडून - इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी) या विजेत्यांनी अनुक्रमे क्रमांक पटकावले. सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा! ऑनलाईन पोस्टर सादरीकरण स्पर्धा: डी. फार्मसी विभागातील विद्यार्थ्यांनीही या स्पर्धेत उत्साहाने भाग घेतला. प्रथम क्रमांक पद्मास अश्विनी रमेश्वर (शिवलिंगेश्वर कॉलेज ऑफ फार्मसी, आलमळा), द्वितीय क्रमांक हेमा वाघारे (रवींद्र विद्या प्रसारक मंडळ, नाशिक), या विद्यार्थिनींनी आपले कौशल्य प्रभावीपणे सादर करत विजेतेपद मिळवले. त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. ऑनलाईन रील मेकिंग स्पर्धा-डी. फार्मसी विभागातील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उत्साही सहभाग नोंदवत आपली सर्जनशीलता दर्शवली. प्रथम क्रमांक सचिन (दिल्ली स्किल एंटरप्राइज युनिव्हर्सिटी) द्वितीय क्रमांक कोर्बु साफिया रौफ (आर. पी. कॉलेज ऑफ फार्मसी, धाराशिव) जागतिक फार्मासिस्ट दिवस 2025 निमित्त डिपार्टमेंट ऑफ फार्मसी, टीपीसीटीएस कॉलेज ऑफ इंजीनियरिंग येथे आयोजित केलेल्या विविध स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. या स्पर्धेमध्ये सायंटिफिक मॉडेल मेकिंग स्पर्धेमध्ये कुमारी आकांक्षा जनक कुलकर्णी व शैला सुरेश चव्हाण यांनी प्रथम क्रमांक, कुमारी फिजा बाबा मिर्झा बैग व अमृता बालू माने यांनी द्वितीय क्रमांक आणि कुमारी श्रद्धा बालाजी कोळी, सोनाली संभाजी डोळे व स्वप्नाली महादेव गडकरी यांनी तृतीय क्रमांक पटकावला. या विजेत्यांचेही अभिनंदन करण्यात आले. या सर्व स्पर्धांद्वारे विद्यार्थ्यांनी आपली कलात्मकता, सादरीकरण कौशल्य आणि औषधशास्त्रावरील आकलन प्रभावीपणे मांडले. तेरणा फार्मसीकडून सर्व विजेते आणि सहभागी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले असून, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली फार्मसी विभागाच्या प्रमुख डॉ. प्रीती माने यांनी केले होते. त्याचबरोबर डॉ. गुरुप्रसाद चिवटे, डॉ. राजेश ननवरे, प्रा. सायली पवार, प्रा. ज्ञानेश्वरी भोजने यांनी विशेष परिश्रम घेतले. महाविद्यालयातील इतर प्राध्यापक यांनीही विद्यार्थ्यांना विविध उपक्रमासाठी मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे समन्वयक प्रा. गणेश भातलवंडे सर यांनी देखील विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
मराठी अभिनेत्री रुपाली भोसलेच्या गाडीचा भीषण अपघात
‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रुपाली भोसले हिच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी आहे. तिच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. अपघातात ती सुखरुप असून तिच्या लग्झरी गाडीचे प्रचंड नुकसान झाले आहे. रुपाली भोसले हिने काही दिवसांपूर्वी मर्सिडीज बेंझ ही लग्झरी कार खरेदी केली होती आणि त्याबाबत तिने सोशल मीडियावर आनंद व्यक्त केला होता. […]
तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूरच्या सुपुत्राने राजधानी दिल्लीमध्ये मानाचा मोठा टप्पा गाठला आहे. मिनिस्ट्री ऑफ लॉ अँड जस्टीस, दिल्ली यांनी दि. 15 सप्टेंबर 2025 रोजी जारी केलेल्या आदेशानुसार तुळजापूरचे सुपुत्र ॲड. नितीन सुरेश साळुंके यांची स्टँडिंग कौन्सिल फॉर युनियन ऑफ इंडिया (सरकारी वकील, भारत सरकार) या प्रतिष्ठित पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. या उल्लेखनीय नियुक्तीबद्दल तुळजापूर तालुका पत्रकार संघ, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दि. 28 सप्टेंबर रोजी तुळजापूरमध्ये ॲड. साळुंके यांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष श्रीकांत कदम, तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर गवळी स्वाभीमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष रविंद्र इंगळे राष्ट्रवादीकाँग्रेस अपगट ,श्रीकृष्ण सुर्यवंशी पावणारा गणपती मंडळ अध्यक्ष गणेश साळुंके, भाऊसाहेब देशमुख आदी मान्यवरांनी उपस्थित राहून ॲड. साळुंके यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. मूळचे तुळजापूरचे रहिवासी असलेले ॲड. नितीन साळुंके हे सध्या छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयात वकिली करतात. विशेष म्हणजे, ते या पदावर नियुक्त होणारे सर्वात कमी वयाचे वकील आहेत. “त्यांच्या या कामगिरीमुळे तुळजापूरचे नाव दिल्लीसारख्या राजधानीत झळकले असून, तरुण पिढीला त्यांच्या वाटचालीतून नक्कीच प्रेरणा मिळेल,“ असे मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ॲड. साळुंके यांच्या निवडीने तुळजापूर तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात अभिमानाची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या या यशाबद्दल विविध सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, हे यश तरुण वकिलांसाठी प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे.
धाराशिव जिल्ह्यातील पूरग्रस्तांना बालाजी अमाईन्सकडून मदत
तुळजापूर (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात भूम आणि परांडा तालुक्यातील अनेक गावांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. या आपत्तीत अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले असून जिल्हा प्रशासनाने त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवून शाळांमध्ये तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था केली आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी बालाजी अमाईन्स लिमिटेड पुढे सरसावली आहे. कंपनीने धाराशिव जिल्हा प्रशासन अधिकाऱ्यांशी तात्काळ समन्वय साधून राशन किट्स तयार केली. प्रत्येक किटमध्ये 26 किलो तांदूळ, 30 किलो गहू पीठ, 10 किलो डाळ, 5 किलो पोहे, 5 किलो रवा, 5 किलो रिफाईन्ड तेल, 2 किलो शेंगा, 1 किलो तिखट व 1 किलो मीठ अशा एकूण 85 किलो अन्नधान्याचा समावेश आहे. 25 सप्टेंबर रोजी 1 टेम्पो मदत साहित्य कंपनीच्या संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली कंपनीचे अधिकारी दत्तप्रसाद सांजेकर व सचिन मोरे यांनी परांडा तहसील कार्यालय या ठिकाणी तहसीलदार निलेश काकडे, नायब तहसीलदार विजयकुमार बाडकर, पुरवठा निरिक्षण अधिकारी नितिन भांडवलकर, महसूल सहाय्यक ए. बी. करपे व सौरभ गिरी यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी बोलताना बालाजी अमाईन्सचे व्यवस्थापकीय संचालक डी. राम रेड्डी म्हणाले, “सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यात आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमध्ये मागे राहण्याचा प्रश्नच येत नाही. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी हात पुढे करणे हे आमचे नैतिक कर्तव्य आहे. अश्या प्रसंगी आमचे सर्व संचालक मंडळ पुढे येवून तातडीने अन्नधान्य वितरणाचे नियोजन केले, अन्नधान्य वितरण सुरू असून पुढेही गरजेनुसार मदत साहित्य पोहोचवले जाईल,” असे ते म्हणाले. तसेच कंपनीचे कर्मचारीही आपले योगदान देत बाधितांकडे लवकरात लवकर मदत पोहोचविले त्यामुळे त्यांचेही त्यांनी यावेळी आभार मानले.
तामलवाडी टोलनाक्यावर पुन्हा अवतरल्या आरटीओच्या गाड्या
तुळजापूर (प्रतिनिधी) - तालुक्यातील तामलवाडी टोलनाक्यावर पुन्हा आरटीओच्या गाड्या अवतरल्या असून, कागदपत्र तपासणीच्या नावाखाली वाहनचालक व देविभक्तांची आर्थिक लूट होत असल्याची चर्चा समोर आली आहे. हा प्रकार 29 सप्टेंबर रोजी सकाळी घडला. श्री तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्रोत्सव सुरू असल्याने रोज शेकडो भाविक तुळजापूर येथे दर्शनासाठी येत आहेत. मात्र, तामलवाडी टोलनाक्यावर अचानक उभ्या राहणाऱ्या आरटीओ, महामार्ग पोलिसामुळे भाविक त्रस्त झाले आहेत. “आम्ही दर्शनाला जावे की नाही?” असा सवाल अनेक भक्तांनी उपस्थित केला. दरम्यान, मराठवाड्यात पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून अनेक स्वयंसेवी संस्था मदतीसाठी पुढे सरसावत आहेत. अशा परिस्थितीत, मराठवाड्याच्या प्रवेशद्वारावरच भाविकांना लुटावे लागणे ही दुर्दैवी बाब असल्याचे नागरिकांनी म्हटले आहे. पूर्वीही याच टोलनाक्यावर दोन आरटीओ गाड्यांमार्फत आर्थिक वसुली सुरू असल्याच्या तक्रारी प्रसारमाध्यमांनी मांडल्या होत्या. त्यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या गाड्या आमच्या नसल्याचे सांगून जबाबदारी झटकली होती. त्यानंतर काही काळ हा प्रकार थांबला होता. मात्र, 29 सप्टेंबर रोजी पुन्हा दोन गाड्या अवतरल्याने भाविकांची लूट सुरू झाल्याचे वाहनचालकांचे म्हणणे आहे. नवरात्रोत्सवात होणारा हा प्रकार तातडीने थांबवून देविभक्तांना होणारा त्रास टाळावा, अशी मागणी नागरिक, वाहनचालक व भाविकांनी केली आहे.
अशोक हाँटेल समोर वाहनातुन 5 लाख 24 हजाराचा मुद्देमाल चोरीस
तुळजापूर (प्रतिनिधी)- शहरातील धाराशिव रस्त्यावर असणाऱ्या अशोक हाँटेल समोर लावलेल्या वाहनाची काच अज्ञाताने फोडुन आतील रोख रकमेसह 5,24,000 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरुन नेल्याची रविवार दि. 28 सप्टेंबर रोजी राञी सात वाजता घडली. या बाबतीत अधिक माहीती अशी कि, कविता देवी पर्णचंद्राराव गंटा, वय 48 वर्षे, व्यवसाय सिनियर सिव्हील जज, जहीराबाद ता. जहीराबाद जि.संघारेड्डी तेलंगाना या रविवार दि.27 सप्टेंबर रोजी हॉटेल अशोक येथे जेवन करत होत्या. त्यावेळी हॉटेल बाहेर लावलेली महिंद्र एक्स यु व्ही 700 गाडी क्र. टी. एस. 28 एल 6666 हिचा काच अज्ञात व्यक्तीने फोडून गाडीतील ईटकरी बॅग व एक काळ्या रंगाची हँड बॅग मधील 120 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, मोबाईल फोन, रोख रक्कम 35 हजार रूपये व नविन कपडे असा एकुण 5 लाख 24 हजार रूपये किंमतीचा माल चोरुन नेला. अशी फिर्यादी कविता देवी गंटा यांनी दि.28 सप्टेंबर रोजी दिल्यावरून तुळजापूर पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शारदीय नवरात्र महोत्सवातील ड्रोन शो पुढे ढकलला
तुळजापूर (प्रतिनिधी)- श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव 2025 अंतर्गत तुळजाभवानी सैनिक विद्यालय, तुळजापूर येथे दिनांक 29 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेला ड्रोन शो प्रतिकूल हवामानामुळे पुढे ढकलण्यात आला आहे. मंदिर संस्थानच्या वतीने कळविण्यात आले की, भक्तांची सुरक्षितता हीच आमची प्राथमिकता आहे. त्यामुळे हा शो आता योग्य व शुभ प्रसंगी आयोजित करण्यात येईल. नविन दिनांक लवकरच जाहीर केला जाईल.अशी माहीती मंदीर प्रशाषणाने दिली.
बारूळ येथील प्रकाश डेव्हलपरच्या अनधिकृत प्लांटवर कार्यवाही करण्याबाबत
तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापुर तालुक्यातील मौजे बारुळ येथील बारुळ जवळगा मेसाई रस्तावरील असलेला प्रकाश डेव्हलपर चा सिमेंट काँक्रिटच मिक्सर प्लांट अनधिकृत चालू आहे. या पूर्वीच ग्रामपंचायतने सदरील प्लांट नोटीस देऊन बंद करण्याची सूचना देऊन हि मग्रूर कंपनी त्याला केराची टोपली दाखवून तसाच चालू ठेवण्यात आला आहे. सदरीलप्लांट हा ग्रामपंचायत हद्दीत असून त्यांची नाहरकत प्रमाणपत्र न घेताच कामाला सुरुवात केली. आज प्लांट चालू होऊन वर्षे उलटून गेला आहे. प्लांट मधून निघणारा धूळ यामुळे सभोवतीलची शेकडो एकर जमीन नापीक होण्याची भिती असल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे. यामधून उत्खनन केलेल्या मुरुमाची रॉयल टी चा भरणा केला नाही, सदरील प्लांट हा व्यवसायिक दृष्ट्या उभा केला असल्याने त्यां जागेचा कसलाही व्यवसायिक अकृषिक परवानगी घेतली नाही. या सर्व गोष्टीचा विचार करता प्रशासन ही मूग गिळून का गप्प आहे ? असा प्रश्न सर्व सामान्य नागरिकास पडला आहे. सदरील बेकायदेशीर प्लांट तात्काळ बंद करून ,त्यांचावर योग्य ती कार्यवाही करावी तरी अशी मागणी लोकांमधून होत आहे.
टिळक चौक नवरात्र महोत्सव मंडळाकडून आरोग्य शिबिराचे आयोजन
मुरुम (प्रतिनिधी)- येथील टिळक चौक नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीने परिसरातील नागरिकांसाठी आरोग्यविषयक शिबिराचे आयोजन रविवारी (ता. 28) रोजी करण्यात आले. यामध्ये नेत्र तपासणी, मोफत मोतीबिंदू व सर्वरोग निदान तपासणी शिबिरसह रक्तदान शिबिराचे उद्घाटन भाजप युवानेते शरण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पुणे येथील एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालय चे डॉ. संभाजी जगदाळे यांनी नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे मार्गदर्शन केले. उमरगा येथील शेंडगे हॉस्पीटल अँड रिसर्च सेंटर सर्वरोग निदान तपासणी डॉ. हारून मुजावर, डॉ. विशाल पवार, सुरज बोडके, प्रांजली भैसारे, निकिता दरो, प्रिया कांबळे, पंकज चव्हाण, आनंद चव्हाण, पुनम मते, व्यंकट चिंचोळे आदींनी काम केले. उमरगा येथील श्रीकृष्ण रक्तपेढीचे विजय केवडकर, ऋतिक म्हेत्रे, स्वप्नील देशमुख, पुजा पुजारी आदींनी परिश्रम घेतले. याप्रसंगी पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच उत्सव समितीचे सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते. या शिबिराचा शेकडो अबाल वृद्धांनी लाभ घेतला. नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने घेतलेल्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.
जिल्ह्यात हरित क्रांतीचा येणार बहर
गोडोली / विजय जाधव : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत सातारा जिह्यातील 11 तालुक्यांची एकूण लोकसंख्या 33 लाखांहून अधिक आहे. या लोकसंख्येच्या पटीत प्रत्येक गावात वृक्षलागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ‘एक व्यक्ती-एक झाड’ उपक्रमासाठी अभियानात 100 पैकी 2 गुण निश्चित केले असून, गुणांच्या स्पर्धेत आघाडी मिळवण्यासोबतच पर्यावरण संवर्धनासाठी ही ऐतिहासिक संधी ग्रामपंचायतींना मिळाली आहे. गावच्या [...]
बेलगाव येथील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्याला दोन जर्शी गाय भेट
भूम (प्रतिनिधी)- अतिवृष्टीने हवालदील झालेल्या शेतकऱ्यांना माजी कृषी मंत्री तथा आमदार सदाभाऊ खोत यांनी भूम तालुक्यातील बेलगाव येथील विश्वनाथ दातखिळे यांना दोन जर्शी गाया आज त्यांना बेलगाव येथे पोहच केल्या आहेत. तालुक्यातील बेलगाव येथील शेतकरी विश्वनाथ दातखिळे यांच्या 10 गायी पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेल्या होत्या तर अठरा गायी जागेवर कोठ्यामध्ये पुराच्या पाण्यामुळे मृत्युमुखी पडल्या होत्या त्यामुळे त्यांचे कुटुंब उघड्यावर पडले होते .धाराशिव जिल्ह्यातील नेते किराणा किट वाटप करण्यामध्ये मग नसताना सांगली जिल्ह्यातून माजी कृषी मंत्री तथा आमदार सदाभाऊ खोत यांचे चिरंजीव सागर खोत स्वतः तालुक्यामधील बेलगाव येथे दोन जर्शी गाई घेऊन येऊन दातखिळे कुटुंबीयांना सपुर्द केल्या आहेत .यावेळी बोलताना विश्वनाथ दातखिळे यांनी सांगितले की माझ्या गोट्यामध्ये गायी राहिल्या नाहीत. पुराने वाहून नेल्या परंतु सदाभाऊ खोत यांनी माझ्यासाठी माझ्या गोट्याला गोठेपण आणले आहे .मी त्यांचा आभारी आहे .असे हवालदिल होत दातखिळे म्हणाले . सागर खोत यावेळी बोलताना इतर मदत करण्यापेक्षा शेतकऱ्याचा उदरनिर्वाह दूध व्यवसायावर असल्यामुळे गायी ची मदत देणे योग्य आहे . त्याप्रमाणे सदाभाऊ खोत यांच्या सांगण्यानुसार दोन जर्शी गायी आम्ही देत आहोत . यावेळी सरपंच जिनत सय्यद ,विश्वनाथ दातखिळे ,कोहिनूर सय्यद ,अलीम शेख, ॲड.संदीप ढगे पाटील ,ग्रामपंचायत अधिकारी दत्तात्रय हराळ ,सचिन गायकवाड ,रोहित शिंदे,कृष्णा काशीद,जितेंद्र सूर्यवंशी,रोहन बाबर,समाधान मराळे,विश्वनाथ जाधव,मारुती चौबे,अर्जुन ईळे, श्रीराम दातखिळे, नारायण दातखिळे,विठ्ठल जाधव, रोहन जाधव, अतुल गोरे,गोवर्धन दातखिळे,धनंजय जाधव ,समाधान मराळे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
कळंब तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थेचा 15 टक्के लाभांश जाहीर
कळंब (प्रतिनिधी)- कळंब तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थेची 52 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे अध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांचे अध्यक्ष खाली दिनांक 28 सप्टेंबर रोजी राधेश्याम मंगल कार्यालय कळंब या ठिकाणी संपन्न झाली. यावेळी त्यांनी संस्थेच्या सभासदांना 15 टक्के लाभांश देण्याची घोषणा करण्यात आली. यावेळी या वार्षिक सर्वसाधारण सभेस प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष सोमनाथ टकले, जिल्हाध्यक्ष संतोष देशपांडे, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल माने, साने गुरुजी पतसंस्था परंडाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर देवराम, कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षक पतसंस्था वाशीचे अध्यक्ष राजेश ढेंगळे, शिक्षण विस्तार अधिकारी सुशील फुलारी,मधुकर तोडकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या सर्वसाधारण सभेत पुढे बोलताना श्री तांबारे म्हणाले की आपली पतसंस्था ही राज्यामध्ये एक लौकिक मिळवलेली पतसंस्था असून या पतसंस्थेच्या प्रगतीचा आलेख सतत उंचावत ठेवण्यात संचालक मंडळाला यश आले आहे 100 कोटी पेक्षा अधिक वार्षिक उलाढाल असलेली आपली ही जिल्ह्यातील एकमेव पतसंस्था असून या पतसंस्थेचा कारभार जाणून घेण्यासाठी राज्यातील अनेक पतसंस्थेचे पदाधिकारी येतात. आपली पतसंस्था सभासदांना अत्यंत कमी म्हणजे 8.5 टक्के व्याज दराने 25 लाख कर्ज देत आहे. तसेच सभासदाच्या मुदत ठेवीवर पण 8.5 टक्के तर कायम ठेवीवर 8 टक्के व्याज देणारी ही राज्यातील एकमेव पतसंस्था असून उच्चतम 15 टक्के लाभांश देणारी राज्यातील एकमेव संस्था आहे. कळंब तालुका शिक्षक सहकारी पतसंस्था ही सभासदांसाठी विविध योजना राबवत असून त्यामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, सभासदाच्या मुलीच्या लग्नासाठी 11 हजार रुपये कन्यादान, कोणत्याही कारणाने सभासदाचा मृत्यू झाल्यास संपूर्ण कर्जमाफी, शिल्लक नफ्यातून सभासदांना भेटवस्तू, गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रम घेतले जातात. या प्रसंगी जिल्हा सोसायटीचे उपाध्यक्ष कांतीलाल ढोले संचालक हनुमंत पडवळ, प्रदीप म्हेत्रे, संजीवन तांबे, प्रशांत घुटे, नितीन गायकवाड आप्पासाहेब भोंग,महादेव खराटे, महादेव मेनकुदळे हे उपस्थित होते. याप्रसंगी अशोक खडके यांना राज्य शासनाचा सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल व मधुकर तोडकर यांचा उपशिक्षणाधिकारी पदावर निवड झाल्याबद्दल सपत्नी सत्कार करण्यात आला या शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांचा गौरव इयत्ता 5 वी मधील युवराज पांचाळ, सिद्धी जगताप, ईश्वरी गायकवाड, समर्थ जावळे, अक्षय गिरी, वेदांत भिसे, शौर्य रणदिवे, अभिनव गिरी,विराज गादेकर, रणवीर मचाले तर इयत्ता 8 वी मधील सायली गायकवाड, ऋषिकेश क्षीरसागर, श्रेयस गिलबिले, साईराज भिसे, राज अनपट, तनिष्का माने, मृणाल पवळ, प्रांजल देशमुख, आदित्य कासले,भक्ति गरड, गार्गी जाधव, नक्षत्रा जावळे, श्रद्धा अनपट, वेदांत शिंदे या सर्वांचा सन्मानचिन्ह रोख बक्षीस व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पतसंस्थेचे उपाध्यक्ष बी एन जाधवर संचालक भक्तराज दिवाने, दत्तात्रय पवार,दत्तात्रय सुरेवाड, भूषण नानजकर, गणेश कोठावळे, अशोक डिकले, दीपक चाळक, सुनील बोरकर, रामचंद्र पवार, रवींद्र शिनगारे वैशाली शिरसागर ज्योती ढेपे व कालींदा मुंडे यांनी परिश्रम घेतले. संस्थेचे अहवाल वाचन सचिव संतोष ठोंबरे तर आभार भक्तराज दिवाने यांनी मानले.
ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक प्रा. भास्कर चंदनशिव काळाच्या पडद्याआड
कळंब (प्रतिनिधी)- हसेगावचे (केज) चे सुपुत्र जेष्ठ ग्रामीण साहित्यिक भास्कर चंदनशिव यांच्यावर स्वामी विवेकानंद हॉस्पिटल लातूर येथे उपचार चालू असताना दिनांक 28 सप्टेंबर 2025 वार रविवार रोजी ठीक 1:30 वाजता वयाच्या 80 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला . त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी कळंब येथे देवमित्रा या निवस्थानी पुनवर्सन सावरगाव येथे ठेवण्यात आले व त्यानंतर त्यांचा अंत्यविधी कळंब येथील परळी रोड येथील स्मशानभूमीत करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा प्रा. कपिल चंदनशिव, एक मुलगी, दोन सुना व तीन नातवंडे असा परिवार आहे. इ.10 वी व 12 वी च्या पुस्तकात दीर्घकाळ राहिलेल्या “लाल चिखल“ या शेतकऱ्याच्या आयुष्याचं वास्तव मांडणाऱ्या कथेचे लेखक, ग्रामीण मराठी साहित्यातील प्रसिद्ध कथाकार कळंब तालुक्यातील हासेगाव (केज) येथील मूळ भास्कर देवराव यादव व दत्तक नंतर भास्कर तात्याबा चंदनशिव असे झाले. त्यांनी जांभळडव्ह (1980), मरणकळा (1983), अंगारमाती (1991), नवी वारूळ (1992), बिरडं (1999) हे त्यांचे प्रचंड गाजलेले मराठी साहित्यातील कथासंग्रह. 28 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे आणि 30 व्या अस्मितादर्श मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. त्यांनी महाराष्ट्र राज्याच्या साहित्य व संस्कृती महामंडळावर देखील काम केलेले होते. महाराष्ट्र शासनाच्या पुरस्कारासह असंख्य पुरस्कारांनी त्यांना गौरविले गेले होते.अश्या या शेती जीवनाचं आणि शेतकऱ्याच वास्तव आपल्या लेखणीतून मांडणारे महान साहित्यिक असे भास्कर चंदनशिव हे काळाच्या पडद्याआड गेले आहेत.त्यांच्या जाण्याने कळंब तालुका व धाराशिव जिल्ह्यावर साहित्यिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
अतिवृष्टीमुळे केळीच्या बागा उध्दवस्त
भूम (प्रतिनिधी)- केळीचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भूम तालुक्यातील वारे वडगाव येथील केळीच्या उध्वस्त झाल्याने शेतकऱ्याचे लाखो रुपयाचे नुकसान झाल्याने शेतकरी वर्ग शासनाच्या मदतीची वाट पाहत आहे. याबाबत सविस्तर असे की भूम शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या तालुक्यातील वारे वडगाव येथे गेल्या तीन-चार दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे गावातून वाहणाऱ्या रामगंगा नदीचे पात्र बदलल्याने गावातील हनुमान सुपेकर आश्रुबा करवंदे अनिल करवंदे व विनोद लाडाने यांच्यासह असंख्य शेतकऱ्यांच्या जवळपास 200 कर केळीच्या बागा उध्वस्त झाले आहेत. यामुळे या भागातील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सदर शेतकरी शासन केव्हा मदत देते याकडे वाट बघत आहेत. तसेच परंडा तालुक्यातील वाघे गव्हाणे येथील शेतकरी शरद कुलकर्णी यांचीही दोन एकर केळीची बाग या पावसामुळे मोडून पडलेली आहे. तेव्हा शासन यांना केव्हा मदत करणार याबाबत शेतकरी वाट बघत आहेत.
…तर थेट मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर शेतकरी आंदोलन करू! निहाल पांडे यांचा इशारा
घरांगणा येथील शेतकरी या बांधावर अद्यापही अधिकारी येऊन साधा पंचनामा करत नाही याचा निषेध करण्यासाठी शेतात ठिय्या आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली असता प्रशासनकडून अनेक गावात अद्यापही पंचनामे सुद्धा झाले नाहीये, अशी माहिती शेतकऱ्यांकडून मिळत आहे. शेतात अजूनही पाणी आहे, शेतकऱ्यांचा सोयाबीन शंभर टक्के खराब झाला आहे. 50,000 रुपये हेक्टरी नुकसान भरपाई […]
हिंदुस्थानने काय करावे हे इतर कोणीही ठरवू शकत नाही. हिंदुस्थान स्वतःचे हितसंबंध जोपासत आहे. तसेच देशासाठी योग्य ते करार आणि खरेदी विक्रीचे निर्णय घेत आहे. आम्ही कोणाकडून तेल खरेदी करावे, हे आम्हीच ठरवणार, आम्ही तुमच्या इच्छेनुसार तेलखरेदी का करावी? हिंदुस्थानला कोणीही आदेश देऊ शकत नाही, अशा शब्दांत माजी लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी रशियाकडून […]
Photo –श्री तुळजाभवानी देवीची भवानी तलवार अलंकार महापूजा
शारदीय नवरात्र महोत्सवात सोमवारी आठव्या माळेच्या दिवशी श्री तुळजाभवानी देवीची भवानी तलवार अलंकार महापूजा मोठ्या भक्तिभावाने मांडण्यात आली. सकाळपासूनच मंदिर परिसरात भाविकांची गर्दी होती. छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य रक्षणासाठी श्री तुळजाभवानी देवींने प्रसन्न होऊन स्वतःच्या हाताने भवानी तलवार दिली. त्या तलवारीच्या आर्शीर्वादाने स्वराज्याची स्थापना शक्य झाली, अशी लोकधारणा आहे. हाच परंपरेचा वारसा जपण्यासाठी दरवर्षी नवरात्रोत्सवात […]
Kokan News –समुद्रात वादळ सदृश्य वातावरण; नौका किनाऱ्याकडे परतल्या
समुद्रात वादळ सदृश्य वातावरण निर्माण झाल्यानंतर स्थानिक नौकांबरोबर इतर नवकाही सुरक्षेच्या कारणास्तव सुरक्षित असलेल्या देवगड बंदराचा आश्रय घेतला यावेळी वादळी वारे व पाऊस यामुळे समुद्रातील वातावरण मच्छीमारांसाठी प्रतिकूल नसल्याने आश्रयासाठी देवगड बंदरात गुजरात राज्यातील तब्बल शंभरहून अधिक नौका देवगड बंदरात दाखल झाल्या आहेत. हवामान विभागाने 28 ते 29 सप्टेंबर या कालावधीत काही ठिकाणी हलका तर […]
राज्यात पूरपरिस्थिती असताना मिंध्यांच्या नेते, प्रवक्ते चमकोगिरी करत आहेत. काही ठिकाणी ग्रामस्थांनीच मिंधेंचे फोटो असणारी मदत नाकारली, तर काही ठिकाणी नेत्यांना घेराव घातले असे पाहायला मिळाले. त्यातच सोलापूरमधील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. राजकीय वर्तुळात ‘वाचाळवीर’ म्हणून ख्याती असलेल्या मिंधे गटातील सोलापूरच्या महिला प्रवक्त्याची गावकऱ्यांसमोर चांगलीच फजिती झाली. सीना नदीला आलेल्या पूरग्रस्त गावांची पाहणी आणि […]
राज्यात पूरपरिस्थिती असताना मिंध्यांच्या नेते, प्रवक्ते चमकोगिरी करत आहेत. काही ठिकाणी ग्रामस्थांनीच मिंधेंचे फोटो असणारी मदत नाकारली, तर काही ठिकाणी नेत्यांना घेराव घातले असे पाहायला मिळाले. त्यातच सोलापूरमधील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. राजकीय वर्तुळात ‘वाचाळवीर’ म्हणून ख्याती असलेल्या मिंधे गटातील सोलापूरच्या महिला प्रवक्त्याची गावकऱ्यांसमोर चांगलीच फजिती झाली. सीना नदीला आलेल्या पूरग्रस्त गावांची पाहणी आणि […]
मंत्री सुभाष शिरोडकर यांची माहिती : सरकारची माघार, जनतेचा विजय पणजी : आयआयटी प्रकल्प पूर्णत्वास आला असता तर कोडार गाव जगाच्या नकाशावर पोहोचला असता. परंतु तेथील स्थानिकांच्या प्रखर विरोधामुळे आता नियोजित आयआयटी प्रकल्प रद्द करण्यात आला आहे, अशी माहिती स्थानिक आमदार तथा जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिली. रविवारी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. [...]
कोडारग्रामस्थांचाआग्रह: नागरिकांनीदाखवलेल्याएकजुटीचाविजयअसल्याचीप्रतिक्रिया फोंडा : कोडार व कसमशेळ ग्रामस्थांचा प्रखर विरोध तसेच सर्व विरोधी पक्षांनी आंदोलनाला दिलेल्या पाठिंब्यामुळे बेतोडा पंचायतक्षेत्रातील कोडार गावात होऊ घातलेला आयआयटी प्रकल्प सरकारने रद्द केल्याचे जाहीर केले आहे. स्थानिक आमदार तथा जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी रविवारी पणजी येथे पत्रकार परिषदेत तसे जाहीर केले. त्यानंतर सायंकाळी कोडार गावात येऊन ग्रामस्थांची भेट घेत हा [...]
पाकव्याप्त काश्मीरमध्ये स्थानिक प्रशासनाविरोधात नागिकांचे आंदोलन पेटले आहे. अवामी कृती समिती(एएसी) च्या नेतृत्वाखाली निदर्शक गव्हाच्या पिठाच्या गगनाला भिडणाऱ्या किमती आणि वीज बिलांच्या वाढीविरोधात निदर्शने करत आहेत. पीओके सरकार आणि तेथील स्थानिकांमधील वाद आता शिगेला पोहोचला आहे. याच पार्श्वभूमीवर पीओकेमधील स्थानिक पब्लिक एक्शन कमिटीने 29 सप्टेंबरपासून अनिश्चित काळासाठी संपाची घोषणा केली आहे. त्यामुळे सोमवार सकाळपासून लोक […]
वाहनाच्या धडकेने अळणावरचा तरुण ठार
ग्लोबसर्कलजवळशनिवारीरात्रीघडलाअपघात: अपघातीमृत्यूमुळेकुटुंबीयांनामोठाधक्का बेळगाव : अज्ञात वाहनाच्या धडकेने अळणावर येथील एक तरुण जागीच ठार झाला. शनिवारी रात्री उशिरा ग्लोब सर्कलजवळ ही घटना घडली असून वाहतूक दक्षिण विभाग पोलीस स्थानकात या अपघाताची नोंद झाली आहे. विजयकुमार लॉरेन्स डिसोझा (वय 30) राहणार अळणावर (जि. धारवाड) असे त्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. शनिवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास अज्ञात वाहनाने [...]
कत्ती-ए.बी.पाटील पॅनेल आघाडीवर
15 पैकी6 जागाकाबीज, 9 जागांवरचुरस वार्ताहर/प्रतिनिधी/हुक्केरी/संकेश्वर हुक्केरी ग्रामीण विद्युत सहकारी संघाच्या निवडणुकीत कत्ती- ए. बी. पाटील स्वाभिमानी पॅनेलचे सहा उमेदवार विजयी झाले तर नऊ उमेदवार आघाडीवर आहेत. विजयी उमेदवारांमध्ये एस.सी. गटामध्ये श्रीमंत सन्ननाईक, एस. टी गटामध्ये बसवाणी लंकेपगोळ, ओबीसी गटामध्ये गजानन कोळ्ळी, ओबीसी अ गटामध्ये सत्याप्पा नाईक, महिला वर्ग महाबुबाबी नाईकवाडी, मंगल मुडलगी हे सहा [...]
आजपासून भटक्या कुत्र्यांना देणार लस
महानगरपालिका, पशूसंगोपनखात्याचीसंयुक्तमोहीम: रेबिजदिनानिमित्तरविवारपासूनप्रारंभ बेळगाव : महानगरपालिका आणि पशूसंगोपन खात्याच्या संयुक्त विद्यमाने जागतिक रेबिज दिन पशूसंगोपन खात्याच्या आवारात असलेल्या रयत भवन येथे साजरा करण्यात आला. यावेळी 50 हून अधिक भटक्या कुत्र्यांना अँटी रेबिज लस टोचण्यात आली. जवळपास महिनाभर विविध ठिकाणी भटक्या कुत्र्यांना लस टोचली जाणार असून सोमवार दि. 28 पासून लसीकरणाला गती देण्यात येणार आहे. यंदा [...]
गरीबाची मजबुरी…देवीच्या मंडपात चोरी?
साडी, खण, नारळअन्फळेलांबविली: उलटसुलटमतप्रवाहांनाउधाण बेळगाव : केळकरबाग येथील ‘बेळगावची आदिशक्ती’ देवीच्या मंडपात साड्यांची चोरी झाली आहे. शनिवारी दुपारी देवीच्या दर्शनासाठी आलेल्या एका महिलेने देवीच्या साड्या, खण, नारळ व फळे नेली आहेत. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. शनिवार दि. 27 सप्टेंबर रोजी दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास मंडळाचे कार्यकर्ते जेवणाला गेले होते. मंडपात कोणीच नव्हते. [...]
TVK Vijay Rally Stampede – राहुल गांधी यांचा विजय थलपती यांना फोन; दुर्घटनेबाबत शोक व्यक्त
तमिळचा सुपरस्टार थलपती विजय यांच्या करुर पक्षाच्या जाहीर सभेत झालेल्या चेंगराचेंगरीत मृतांची संख्या 40 वर पोहोचली असून 100हून अधिक जण जखमी झाले आहेत. या रॅलीत झालेल्या चेंगराचेंगरीमुळे देशभरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून हा चर्चेचा विषय बनला आहे. अशातच लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी थलपती विजय यांना फोन करुन या घटनेबाबत शोक व्यक्त केला […]
आष्टीत एनडीआरएफचे रेस्क्यू ऑपरेशन, अडकलेल्या 12 जणांना सुखरूप बाहेर काढले
मुसळधार पावसाने आष्टी्च्या सांगवीमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली. या पुराच्या पाण्यात 12 ग्रामस्थ अडकले. तातडीने एनडीआरएफचे टिम घटनास्थळी दाखल झाली. टिमच्या मदतीने 12 नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळाले. रविवारी पहाटे मुसळधार पावसाने आष्टी तालुक्यामध्ये हाहाकार उडवून दिला. आष्टी तालुक्यातील सांगवीमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली. पुराच्या पाण्यामध्ये 12 नागरिक अडकले. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार वैशाली पाटील, […]
जिल्ह्यात 3.3 लाख हेक्टर पेरणीचे उद्दिष्ट
यंदा कृषी खात्याकडून रब्बी हंगामासाठी उपाययोजना : उत्कृष्ट दर्जाची बियाणे वितरणासाठी पथके बेळगाव : शेतकऱ्यांनी मान्सूनपूर्व पेरणी करून पिके घेतली होती. मात्र मुसळधार पाऊस व महापुरामुळे हातातोंडाची आलेली पिके वाया गेली. यानंतरही न डगमगता शेतकऱ्यांनी दुबार पेरण्या घेतल्या होत्या. पण पुन्हा मुसळधार पाऊस व नदी-नाल्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने दुबार पेरण्याही वाया जाऊन शेतकऱ्यांवर आर्थिक संकट [...]
जात मागासवर्गीय असा उल्लेख बौद्ध धर्मीयांनी करावा
बौद्धमहासभाबेळगावशाखेतर्फेआवाहन बेळगाव : मागासवर्गीय आयोगाने राज्यात 22 सप्टेंबरपासून जातनिहाय सर्वेक्षण चालविले आहे. त्यामुळे बौद्ध धर्मीयांनी धर्म बौद्ध, जात कॉलममध्ये अनुसूचित जाती असे लिहावे, असे आवाहन भारतीय बैद्ध महासभेचे अध्यक्ष एस. एस. कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत केले. राज्य सरकारकडून जातनिहाय जनगणनेला सुऊवात केली आहे. त्यानुसार बौद्ध धर्मीयांचीदेखील गणना केली जाणार आहे. सरकारकडे बौद्ध निगम स्थापन करण्याची [...]
जातनिहाय सर्वेक्षणातील तांत्रिक दोष केव्हा दूर होणार?
सर्व्हरडाऊनचा मनस्ताप शिक्षकांसोबत सर्वेक्षण करणाऱ्या कुटुंबालाही बेळगाव : जातनिहाय सर्वेक्षणाला सुरुवात झाली खरी. परंतु तांत्रिक अडथळे मात्र अद्याप दूर झालेले नाहीत. एका कुटुंबाचे सर्वेक्षण करण्यासाठी तब्बल तास ते दीड तास कालावधी लागत आहे. तर ‘डेटा नॉट फाऊंड’, तसेच सर्व्हरडाऊनचा मनस्ताप शिक्षकांसोबत सर्वेक्षण करणाऱ्या कुटुंबालाही होत आहे. त्यामुळे हे तांत्रिक दोष नेमके केव्हा दूर होणार? हा [...]
फोर्टरोडवर खड्ड्यांचे साम्राज्य : प्रवाशात संताप
वाहनधारकांनाकरावीलागतेकसरत, दुरुस्तीकरण्याचीमागणी बेळगाव : फोर्ट रोडच्या एका बाजुच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण केले आहे. मात्र दुसऱ्या बाजूच्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. पावलोपावली खड्डे पडले असल्याने ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. वारंवार वाहने नादुरुस्त होण्याचे प्रकारही घडत आहेत. त्यामुळे याकडे लोकप्रतिनिधी आणि महानगरपालिकेने लक्ष घालून रस्त्याचे काम करावे, अशी मागणी केली जात आहे. [...]
मांजरा प्रकल्पातून 31651.89 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरुच; सतर्कतेचे आवाहन
मांजरा प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरूच ठेवण्यात आला आहे. आजही तब्बल 31651.89 क्युसेक्स पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. मांजरा धरण पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या पावसामुळे व धरण पाणी पातळी नियंत्रित करण्याचे दृष्टीने आज दि. 29/09/2025 रोजी 7.00 वाजता गेट क्रमांक 1,2,3,4,5 व 6 (हे 4 गेट) 0.25 मीटरने कमी करण्यात आले आहेत. सद्यस्थितीत मांजरा धरणाच्या सांडव्याची […]
दौडमध्ये धार्मिक-सामाजिक देखाव्यांचे आकर्षण
शहापूरमध्येहजारोधारकऱ्यांचीउपस्थिती: शिवाजीमहाराजांच्याजीवनावरीलदेखावेलक्षवेधी बेळगाव : हिंदवी स्वराज्याचा सुवर्णाक्षरांनी लिहिलेला इतिहास तरुणाईला समजावा, तसेच देव, देश आणि धर्म यांची माहिती व्हावी, यासाठी नवरात्रोत्सवात दुर्गामाता दौड काढली जाते. केवळ ध्वज घेऊन धावणे इतकेच याचे महत्त्व नसून या दौडमधून अनेक सामाजिक व धार्मिक संदेश देणारे देखावे सादर करून समाजामध्ये परिवर्तन घडविले जाते. रविवारी शहापूर परिसरात बलात्काऱ्यांना फाशी, गोहत्या बंदी, [...]
तालुक्यात रविवारची दुर्गामाता दौड ठरली अभूतपूर्व
दौडमध्ये तरुण-तरुणींचा सहभाग अधिक : जयघोषांनी परिसर दुमदुमला : गावागावांमध्ये सांस्कृतिक पारंपरिक देखाव्यांनी लक्ष वेधले वार्ताहर/किणये तालुक्याच्या विविध गावांमध्ये दुर्गामाता दौड मोठ्या उत्साहात सुरू आहे. सध्या शाळांना सुटी आहे. तसेच रविवार हा कामगार वर्गासाठी सुटीचा दिवस असल्याने दुर्गामाता दौडमध्ये तरुण व तरुणींचा सहभाग अधिक दिसून आला. गावागावांमध्ये विविध सांस्कृतिक व ग्रामीण पारंपरिक देखावे सादर करण्यात [...]
भरपावसातही दुर्गामाता दौडमध्ये तरुणांचा उत्साह
देसूर-यळेबैलगावांतयुवावर्गालाशिवचैतन्याचाध्यास वार्ताहर /किणये तालुक्यात शनिवारी दुर्गामाता दौडच्या सहाव्या दिवशी जल्लोषात दुर्गामाता दौड काढण्यात आली. भर पावसातही तरुणांचा उत्साह कायम दिसून आला. पावसात भिजतच धारकऱ्यांनी शनिवारची दुर्गामाता दौड सुरू ठेवली होती. या दौडच्या माध्यमातून गावागावातील तरुण वर्ग एकवटले असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. दुर्गामाता दौडनिमित्त गावातील सर्व मंदिरांमध्ये ही दौड जाऊन मंदिरात पूजा करण्यात येऊ लागली [...]
वार्ताहर/कंग्राळीबुद्रुक दुर्गा माता की जय, जय भवानी जय शिवाजी..असा जयघोष करत सोमवारी घटस्थापनेपासून अलतगे येथील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान धारकरी व ग्रामस्थ यांच्यावतीने नवरात्रोत्सवानिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे दुर्गामाता दौडला मोठ्या जल्लोषी वातावरणात प्रारंभ करण्यात आला. दौडमध्ये धारकऱ्यांबरोबर बालचमू व शिवभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाल्याचे चित्र दिसून आले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज मूर्ती पूजन, दुर्गामाता मूर्ती पूजन, शस्त्र [...]
बससेवा कोलमडल्याने प्रवासी-विद्यार्थ्यांचे हाल
तालुक्यातील धोका पत्करुन विद्यार्थ्यांचा प्रवास : बससेवा वेळेत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष खानापूर : खानापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील तसेच बेळगावसह इतर ठिकाणची बससेवा पूर्णपणे कोलमडल्याने नागरिकांना व विद्यार्थ्यांना अपुऱ्या बससेवेमुळे धोका पत्करुन शिक्षणासाठी प्रवास करावा लागत आहे. मात्र तालुक्यातील लोकप्रतिनिधीनी याकडे साफ दुर्लक्ष केल्याने विद्यार्थी आणि पालकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. खानापूर [...]
गुंजी ग्रामपंचायतची कचरागाडी आठवड्यापासून बंदच
नागरिकांचीगैरसोय: कचरानियोजनकोलमडल्यानेनागरिकांतसंताप वार्ताहर/गुंजी गुंजी ग्रा,,पं.ची कचरागाडी आठवड्यापासून बंद असल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय होत असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे. ऐन दसरोत्सवाच्या तोंडावरच कचरागाडी बंद झाल्याने घरच्या साफसफाईचा कचरा टाकायचा कुठे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे गावातील कोपऱ्या कोपऱ्यांवर आता कचऱ्याचे ढीग दिसू लागल्याने यात्रेच्या काळात कचरा नियोजन कोलमडल्याने संताप व्यक्त करण्यात आहे. याआधी गावांमध्ये आठवड्यातून [...]
15 दिवसांपूर्वी मोहसीन नक्वीसोबत हस्तांदोलन केले, आता नौटंकी का करता? संजय राऊत यांचा सवाल
हिंदुस्थानी क्रिकेट संघाने पाकिस्तानचे मंत्री आणि एसीसीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्याकडून विजयाचा चषक घेण्यास नकार दिला, ही नौटंकी आहे. मुळात ते सामना का खेळले, हा देशाचा सवाल आहे. पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळून त्यांनी पहलगाम हल्ल्यात बळी पडलेल्यांच्या रक्तांचा अपमान केला आहे, त्यामुळे हे सर्व नौटंकी असल्याचे स्पष्ट मत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत […]
राज्यात पूरपरिस्तिथीमुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. आता शेतकऱ्यांचा जगण्यासाठी तातडीने मदत देण्याची गरज आहे. तसेच कर्जमाफी आणि नुकसानभरपाई याबाबत लवकर निर्णय घेणे गरजेचे आहे. राज्यात अजूनही शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही, शेतकरी अजूनही मदतीच्या प्रतिक्षेत आहे, असे स्पष्ट करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी सरकारने तातडीने मदत करावी, अशी मागणी केली आहे. […]
राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर तातडीने विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांनी केली आहे. यासंदर्भात विजय वडेट्टीवर यांनी राज्याचे राज्यपाल यांना पत्र लिहिले आहे. वडेट्टीवार यांनी पत्राद्वारे मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र यांसह राज्याच्या अनेक भागांमध्ये अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या गंभीर आपत्कालीन परिस्थितीकडे राज्यपालांचे लक्ष वेधले आहे. राज्यातील नैसर्गिक आपत्तीमुळे […]
अतिवाड अप्रोच रस्त्याची दुर्दशा; तातडीने डांबरीकरण करण्याची मागणी
उचगाव : अतिवाड अप्रोच रोड या तीन किलोमीटर अंतराच्या रस्त्याची अक्षरश: दुर्दशा झाली आहे. सदर रस्त्याचे तातडीने डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी अतिवाड ग्रामस्थांनी केली आहे. बेकिनकेरे ते कर्नाटक, महाराष्ट्र हद्दीपर्यंतच्या या अतिवाड अप्रोच रस्त्याची दुर्दशा झाली आहे. गावांमध्ये ये-जा करण्यासाठी सदर रस्ता महत्त्वाचा आहे. रस्त्यामध्ये मोठ मोठे खड्डे पडले असून रात्रीच्या वेळी प्रवास करणे [...]
राजहंसगड येथे बालकलाकारांनी साकारली प्रतापगडाची प्रतिकृती
वार्ताहर/धामणे राजहंसगड गावामध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही नवरात्रोत्सवात बाल युवकांच्यावतीने गल्लोगल्ली किल्ल्यांची प्रतिकृती तयार केल्या जातात. त्याच पद्धतीने यंदाही येथील बाल युवकांनी प्रत्येक गल्लीत वेगवेगळ्या किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार केल्या आहेत. येथील मारुती गल्ली येथे साकारलेल्या प्रतापगडाची प्रतिकृती केलेली आहे. त्याचे दि. 24 रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साही वातावरणात उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरूवातीला येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात मान्यवरांच्या हस्ते [...]
देमिनकोप्प गावातच रेशन वितरणाची मागणी
ग्रामस्थांचेतहसीलदारांनानिवेदन खानापूर : कोडचवाड ग्रा. पं. कार्यक्षेत्रात येणाऱ्या देमिनकोप्प गावात रेशन वितरण व्यवस्था गावातच करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन देमिनकोप्प ग्रामस्थांनी शुक्रवारी तहसीलदारांना दिले. यावेळी उपतहसीलदार संगोळ्ळी यांनी निवेदनाचा स्वीकार करून आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून योग्य निर्णय घेऊ, असे आश्वासन ग्रामस्थांना दिले. देमिनकोप्प गावात जवळपास शंभरच्या आसपास बीपीएल रेशनकार्डधारक आहेत. या रेशन कार्डधारकांना कोडचवाड [...]
साफयीस्ट कंपनीकडे मागितली खंडणी, आठजणांविरुद्ध गुन्हा
चिपळूण : खडपोली येथील साफयीस्ट कंपनीत घुसून दमदाटी करीत खंडणी मागणाऱ्या गाणेतील आठ जणांवर शनिवारी अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी पावसाचे पाणी जाणारे गटारही बंद केल्याची तक्रार देण्यात आली आहे. निवृत्ती केशव गजमल, समीर गजमल, अमिल गजमल, शशिकांत गजमल व अन्य चार अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबतची तक्रार कंपनीचे [...]
प्रदेश काँग्रेसकडून विभागनिहाय समिती स्थापन
सामाजिक, शैक्षणिक सर्वेक्षणाला आणखी गती येणार : 25 सप्टेंबर रोजी समिती स्थापण्याचा घेतला होता निर्णय, केपीसीसीचा सर्वेक्षणाला पाठिंबा बेंगळूर : मागासवर्ग आयोगाने राज्यात सुरू केलेल्या सामाजिक आणि शैक्षणिक परिस्थितीच्या सर्वेक्षणाला कर्नाटक प्रदेश काँग्रेसने (केपीसीसी) पाठिंबा दिला आहे. त्यानुसार मंत्री, खासदार, आमदार आणि कर्नाटक प्रदेश काँग्रेस पक्षाच्या मागासवर्गीयांच्या वरिष्ठ नेत्यांनी 25 सप्टेंबर रोजी घेतलेल्या निर्णयानुसार विभागनिहाय [...]
केएसआरटीसीला 9 श्रेणींमध्ये राष्ट्रीय पुरस्कार
बेंगळूर : भारतीय जनसंपर्क परिषदेने आयोजित केलेल्या 15 व्या जागतिक संप्रेषण परिषद आणि उत्कृष्टता पुरस्कार 2025 मध्ये कर्नाटक रस्ते वाहतूक महामंडळाने (केएसआरटीसी) 9 श्रेणींमध्ये राष्ट्रीय पुरस्कार जिंकले आहेत. केएसआरटीसीने डिजिटल मीडिया इनोव्हेशन अँड हाऊस जर्नल प्रिंट (प्रादेशिक) श्रेणीमध्ये सुवर्णपदक, हेल्थकेअर कम्युनिकेशन फिल्स श्रेणीमध्ये रौप्य पदक आणि उत्कृष्ट मानव संसाधन कार्यक्रमासाठी कांस्यपदक जिंकले. ग्राहक सेवा उत्कृष्टता, [...]
केंद्र सरकारकडून आवश्यक मदत देण्यास कटिबद्ध : एच. डी. कुमारस्वामी
बेंगळूर : कल्याण कर्नाटक भागातील पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकार आवश्यक मदत करण्यास कटिबद्ध आहे. या संदर्भात केंद्र सरकार कर्नाटकच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, असे केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी स्पष्ट केले. सोशल नेटवर्किंग साईट ‘एक्स’वर ट्विट करत ते म्हणाले, केंद्र सरकार आपल्या लोकांच्या कल्याणाची आणि त्यांच्या सुरक्षित उपजीविकेची काळजी घेऊन सर्वतोपरी सहकार्य [...]
पूरस्थिती योग्यरित्या हाताळा : मुख्यमंत्री सिद्धरामय्या
कलबुर्गी, विजापूर, यादगीर जिल्ह्यांतील अनेक गावांत पूरस्थिती : उद्या मुख्यमंत्री पूरग्रस्त भागाला देणार भेट बेंगळूर : कृष्णा आणि भीमा नदीकाठी निर्माण झालेली पूरपरिस्थिती योग्यरित्या हाताळण्यासह आवश्यक बचाव आणि मदत कार्य करण्याचे निर्देश मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी अधिकाऱ्यांना दिले. कलबुर्गी जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसासह महाराष्ट्रातील उजनी आणि नीरा जलाशयातून कृष्णा नदीत मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्यामुळे कलबुर्गी, विजापूर आणि [...]
Ahilyanagar Rain – सीनेचे पाणी अहिल्यानगरात शिरले; पूरस्थिती कायम
अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये शनिवारी रात्री पडलेल्या अतिमुसळधार पावसामुळे सर्वत्र दाणादाण उडाली आहे. सीना नदीला पूर आला असून, सीनेचे पाणी अहिल्यानगरात घुसले आहे. शहरातील नेप्ती नाका परिसरात पुराचे पाणी पसरल्याने पर्यायी मार्गाचा वापर सुरू आहे. नगर-कल्याण व नगर-मनमाड महामार्ग हा बंद करून दुसऱया मार्गाने वाहतूक वळवण्यात आली आहे. जिल्ह्यातही पावसाचे थैमान सुरू असून, अनेक ठिकाणी रस्ते बंद […]
‘हीच मोदींची गॅरंटी आहे का?’; आपचा केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा
आम आदमी पार्टीने (आप) रविवारी भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक समस्या हाताळण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहेत, असा आरोप ‘आप’ने केला आहे. ‘आप’ने आपल्या ‘X’ हँडलवर एक पोस्टर शेअर केले आहे. यामध्ये अमेरिका, चीन, मणिपूर, लडाख, उत्तराखंड आणि आसाममधील समस्यांचा उल्लेख आहे. […]
डॉक्टरांची कार उलटून पेटली, लेक जखमी
रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा येथे कार उलटून पेटल्याची घटना रविवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास घडल़ी याठिकाणी अग्निशमन दलाला तातडीने पाचारण कऊन कारला लागलेली आग आटोक्यात आणण्यात आल़ी या अपघातात कारमधील दोघांपैकी दहा वर्षीय बालिका किरकोळ जखमी झाली असून कारचे मोठे नुकसान झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 28 सप्टेंबर रोजी डॉ. मिहीर मुरलीधर प्रभुदेसाई (40, [...]
हाके हल्लाप्रकरणातील आरोपींना पोलीस कोठडी
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. काल (दि. 27) अहिल्यानगर तालुक्यातील अरणगाव परिसरात हाके यांच्या गाडीवर दगडफेक करून वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. या घटनेनंतर नगर तालुका पोलिसांनी तातडीने कारवाई करत हल्ल्यातील तिघांना ताब्यात घेतले. या तिघांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात दाखल […]
Sangola News –सांगोला तालुक्यात मुसळधार; 27 घरांची पडझड
सांगोला तालुक्यात शुक्रवार (दि. 27) रात्रीपासून शनिवारी (दि. 28) दिवसभर पुन्हा मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे तालुक्यातील तब्बल 27 घरांची पडझड झाली असून, 3 जनावरे दगावली. या पावसामुळे अंदाजे 30 हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. जनावरांच्या चाऱयाची टंचाई निर्माण झाली असून, मुरघास खड्डय़ांमध्ये पाणी गेल्याने चारा वाया गेला आहे. पावसामुळे झालेल्या नुकसानीची […]
अकार्यक्षम, हतबल आमदार क्षीरसागर यांनी राजीनामा द्यावा, शिवसेना उपनेते संजय पवार यांची मागणी
शिंदे गटाचे आमदार व राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी शहराच्या दुर्दशेचे सर्व खापर प्रशासनावर न फोडता एक लोकप्रतिनिधी म्हणून आपणही तेवढेच जबाबदार आहात, हे विसरू नये. या सर्व गंभीर बाबींचे आत्मपरीक्षण करावे व जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते संजय पवार यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे केली आहे. कोल्हापूर […]
पाकिस्तानच्या दुर्मिळ खनीज संपदेवर अमेरिकेचा डोळा; ट्रम्प- शरीफ भेटीत महत्त्वाची खलबतं
अमेरिका आणि पाकिस्तानची जवळीक सध्या वाढत आहे. यामागे पाकिस्तानातील दुर्मिळ खनीज संपदा हे कारण असल्याचे स्पष्ट झाले आहे. अमेरिकेचा डोळा या दुर्मिळ खनीज संपदेवर असल्याचे दिसून येत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्यासोबत एक बैठक घेतली. त्याचा एक फोटो व्हायरल होत आहे. त्यात मुनीर […]
Marathwada Rain Update: गोदाकाठ रात्रभर जागा! सायरनचे आवाज, अन् धावपळ…गावात केवळ कर्ते पुरुष शिल्लक
>> उदय जोशी, बीड जायकवाडी जल साठ्यातून तीन लाख क्युसेस पाणी गोदावरीत सोडल्यानंतर गोदावरीला भीषण पूर परिस्थिती निर्माण झाली आहे, ताशी चार ते पाच की मी वेगाने येणारे पाणी रात्री बारा वाजता बीड जिल्ह्याच्या गोदाकाठावर धडकले आहे, महापुराच्या भीतीने रात्रभर गोदाकाठ जागा आहे, भयभीत झालेल्या नागरिकांचे रात्रभर स्थलांतर सुरू होते, पांचाळेश्वर मध्ये पाणी घुसले तर […]
‘राहुल गांधींच्या छातीत गोळ्या घालू’, भाजपच्या नेत्याची राहुल गांधींना जीवे मारण्याची धमकी
काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना एक पत्र लिहिले आहे. भाजपच्या विद्यार्थी संघटनेचे (ABVP) माजी नेते प्रिंटू महादेव यांनी एका वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते राहुल गांधींविरोधात वादग्रस्त विधान केले आहे. याप्रकरणी वेणुगोपाल यांनी महादेव यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. जर कारवाई झाली नाही, तर विरोधी पक्षनेत्यांविरोधात होणाऱ्या हिंसाचाराला […]
तमिळनाडूतील करूर येथे अभिनेता-राजकारणी थलपती विजय याच्या नव्या पक्षाच्या जाहीर सभेत शनिवारी चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीतील 39 जणांचा मृत्यू झाला असून 100 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. 51 जणांवर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे सर्वत्र संतापाचे वातावरण निर्माण झाले असून घटनेच्या दुसऱ्याच दिवशी विजय यांच्या चेन्नई येथील निवासस्थानी बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली. यामुळे […]