अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेत सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील एका दाम्पत्याचा मृत्यू झाला आहे. हतीद येथील महादेव तुकाराम पवार ( वय वर्ष 67 ) आणि आशा महादेव पवार (वय 55 ) असे त्या पती पत्नीचे नाव असून ते आपल्या लंडनस्थित मुलाला भेटण्यासाठी जात होते.
रस्त्यावरील बेकायदेशीर बांधकामांना वीजजोडणी मिळते. मात्र एका माणसाला त्याच्या घरासाठी चार वर्षे वीज जोडणी मिळत नाही हा तुमचा काय कारभार आहे. तो माणूस नाही का? वीज मिळणे हा त्याचा हक्क नाही का? असा खणखणीत सवाल विचारत आम्ही संयम राखला हा आमचा दुबळेपणा समजू नका, नाहीतर आमचा संयम सुटला तर तीव्र आंदोलन करू असा इशारा शिवसेना […]
Air India Plane Crash – बदलापूरचे दिपक पाठक यांचा मृत्यू, एअर इंडियात होते केबिन क्रू
अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेत बदलापूर येथील दिपक पाठक यांचा मृत्यू झाला आहे. दिपक पाठक हे एअर इंडियात गेल्या 11 वर्षांपासून केबिन क्रू म्हणून कार्यरत होते. पाठक कुंटुंब गेल्या अनेक वर्षांपासून बदलापूर येथील रावल कॉम्प्लेक्समध्ये राहत आहेत. विमान दुर्घटनेची बातमी समोर येताच त्यांच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.
बाप्पा पावला, मी वाचले! भूमीनं थरथरत्या आवाजात देवाचे आभार मानले; 10 मिनिटांमुळे चमत्कार घडला
Air India Flight Crash : गुजरातच्या अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या भीषण अपघातात २४२ प्रवाशांचा समावेश होता, ज्यात १२ कर्मचारी होते. या दुर्घटनेतून केवळ एक प्रवासी रमेश विश्वकुमार चमत्कारिकरित्या बचावला.
Ratnagiri News –पुढील दोन दिवस रत्नागिरीत रेड अलर्ट, अतिमुसळधार पाऊस आणि वादळी वारे वाहण्याची शक्यता
रत्नागिरी जिल्ह्यात पुढील दोन दिवस 13 आणि 14 जू रोजी हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या कालावधीत काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार आणि वीजांच्या कडकडाटासह पाऊस व वादळी वारे वाहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर त्यानंतर पुढील दोन दिवस 15 आणि 16 जून रोजी जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आहे. या कालावधीत जिल्ह्यात […]
लेकाच्या भेटीसाठी लंडनची आस, पवार दाम्पत्य अहमदाबादहून विमानाने निघाले, पण हृदयद्रावक...
अहमदाबादहून लंडनला निघालेले एअर इंडियाचे विमान AI 171 टेकऑफच्या काही मिनिटांतच कोसळले, ज्यात 242 प्रवासी होते. पायलटने 'मेडे' कॉल केला होता, परंतु संपर्क तुटला. अपघातानंतर बचावकार्य सुरू झाले असून एक प्रवासी जिवंत आहे.
Ratnagiri News –लिफ्टसाठी खोदलेल्या खड्डयात पडून बालकाचा मृत्यू, दापोलीतील हृदयद्रावक घटना
लिफ्टसाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडून एका सहा वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना दापोलीत घडली. समीर श्रीकांत चव्हण असे मयत बालकाचे नाव आहे. गुरुवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच दापोली पोलीस आणि तहसिलदारांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीकांत चव्हाण हा मूळचा सोलापूर जिल्ह्यातील रहिवासी असून कामानिमित्त दापोली येथे राहत […]
Ahmedabad Plane Crash –विमान दुर्घटनेत गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचं निधन
अहमदाबादमधील भीषण विमान दुर्घटनेत गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचे निधन झाले आहे. केंद्रीय मंत्री आणि गुजरात भाजपचे अध्यक्ष सी. आर. पाटील यांनी रुपाणी यांच्या निधनाबाबत माहिती दिली. विजय रूपाणी हे लंडनला आपल्या मुलीला भेटण्यासाठी जात होते. आमचे नेते आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे याच विमानाने आपल्या कुटुंबियांना भेटण्यासाठी जात होते. या दुर्घटनेत […]
Air India Plane Crash – ‘टाटा ग्रुपकडून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येक 1 कोटीची मदत
एअर इंडियाचे लंडनला जाणारे विमान अहमदाबादमधील मेघानी भागात कोसळले. या दुर्घटनेत विमानातील 241 जणांचा मृत्यू झाल्याचे समजते. अद्याप याचा अधिकृत आकडा समोर आलेला नाही. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना टाटा ग्रृपकडून प्रत्येकी एक कोटी रुपये जाहीर करण्यात आले आहेत. टाटा ग्रृपकडून ट्विट करत ही माहिती देण्यात आली आहे. तसेच जखमींचा खर्च देखील टाटा ग्रुपकडून करण्यात […]
Ahmedabad Plane Crash News : अहमदाबादमध्ये झालेल्या विमान दुर्घटनेत गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्यासह 200 हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती आहे. या दुर्घटनेनंतर, टाटा समूहाने मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 1 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. जखमींच्या उपचाराचा खर्चही टाटा समूह उचलणार असून, बी. जे. मेडिकलच्या वसतिगृहाच्या उभारणीत मदत करणार आहे.
Air India Plane Crash – न्हावा येथील एअर होस्टेस मैथिली पाटील हिचा मृत्यू
अहमदाबादहून लंडनसाठी उड्डाण केलेले एअर इंडियाचे विमान गुरुवारी दुपारी कोसळले. या अपघातग्रस्त विमानात एअर होस्टेस म्हणून काम करीत असलेल्या पनवेल तालुक्यातील न्हावा गावातील मैथिली मोरेश्वर पाटील (२३) हिचा मृत्यू झाला आहे. अपघाताची खबर मिळताच तिचे कुंटुबीय गुरुवारी दुपारी अहमदाबादकडे रवाना झाले. मैथिली मागील दोन वर्षांपासून एअर इंडियामध्ये क्रू मेंबरमध्ये एअर होस्टेस म्हणून काम करीत होती. […]
प्लेन क्रॅशची हेडलाईन! ज्योतिष तरुणीचं भाकित तंतोतंत खरं ठरलं; आठवड्याभरापूर्वी काय म्हटलेलं?
ज्योतिषी शर्मिष्ठा यांचे ५ जूनचे ट्विट व्हायरल झाले आहे, ज्यात त्यांनी विमान अपघाताचा इशारा दिला होता. दुर्दैवाने, १२ जून रोजी अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाला अपघात झाला, ज्यात २४२ प्रवासी होते. या दुर्घटनेत गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्यासह अनेक लोकांचा मृत्यू झाला, ज्यामुळे शर्मिष्ठा यांच्या भविष्यवाणीची चर्चा सुरू झाली.
रोहित-विराटविना खेळण्यासाठी भारतीय संघ करतोय ही खास गोष्ट, नेमकी कोणती जाणून घ्या..
Team India: रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्याविना भारताचा कसोटी संघ प्रथमच मैदानात उतरणार आहे. पण त्यासाठी भारतीय संघ एक खास गोष्ट यावेळी करत आहे, ही गोष्ट नेमकी कोणती, जाणून घ्या...
अहमदाबाद विमान अपघात, गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणींचं निधन
Ahmedabad Plane Crash News : अहमदाबादमधील विमान अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 200 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.
विमान अपघातात 200हून अधिक जण दगावल्याची भीती; कुटुंबियांचा आक्रोश, रुग्णालयांमध्ये गर्दी
Air India Flight Crash :अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाला भीषण अपघात झाला असून २०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची भीती आहे. लंडनला निघालेल्या या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी देखील होते.
अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे AI 171 विमान टेकऑफनंतर लगेचच कोसळले, ज्यात 242 प्रवासी होते. तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. अपघातानंतर परिसरात एकच धावपळ उडाली. या घटनेचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत.
Air India Plane Crash – दैव बलवत्तर! विमानातील एक प्रवासी जिवंत सापडला, रुग्णालयात दाखल
अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या विमानातील 242 प्रवासांपैकी फक्त एक प्रवासी जिवंत अवस्थेत बचाव पथकाला सापडला आहे. रमेश विश्वकुमार असे त्या व्यक्तीचे नाव असून तो 11 A या सीटवर बसला होता. रमेशवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस आयुक्त जीएस मलिक यांनी ही माहिती दिली आहे.
अहमदाबाद विमान दुर्घटनेत एक जण जिवंत, रमेश विश्वकर्मा सुदैवाने बचावले
Ahmedabad Plane Crash News : गुजरातच्या अहमदाबादमध्ये मोठी विमान दुर्घटना झाली. विमानाच्या अवशेषांचा अक्षरशः चुराडा झाला आहे. विमान कोसळल्यानंतर मोठा स्फोट झाला. अनेक जण दगावल्याची भीती आहे. बचावकार्यासाठी एनडीआरएफ, अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. या अपघातात रमेश विश्वकुमार नावाचा एक प्रवासी सुखरूप बचावला आहे.
पंजाब नॅशनल बँकेला मराठीचं वावडं, कोपरखैरणेमधील शाखेत RBI च्या नियमांचं उल्लंघन
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) निर्देशानुसार, हिंदुस्थानातील सर्व बँकांमध्ये त्रिभाषा सूत्र अवलंबिले जाते. म्हणजेच इंग्रजी, हिंदी आणि तिसरी त्या राज्याची राज्य भाषा. म्हणजेच महाराष्ट्रात मराठी भाषा. त्यामुळे बँकेतील सर्व फलक तीन भाषांमध्ये असणं बंधनकारक आहे. असे असताना नवी मुंबईतील कोपरखैरणे येथील पंजाब नॅशनल बँकेमध्ये मराठी भाषेला डावलून हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये फलक लावण्यात आले आहेत. […]
अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान AI-171 कोसळले. या दुर्घटनेत 204 जणांचा मृत्यू झाला तर 41 जण जखमी झाल्याची माहिती अहमदाबादच्या पोलीस आयुक्तांनी दिली. विमान कोसळल्यानंतर मोठा स्फोट झाला आणि विमान आगीच्या भक्ष्यस्थानी गेले. या आगीत विमानातील प्रवासी होरपळल्याने त्यांची ओळख पटवणे अशक्य असल्याने प्रशासनाने डीएनए चाचणीसाठी नमुने देण्याचे आवाहन प्रवाशांच्या नातेवाईकांना करण्यात आले आहे. अहमदाबाद सिव्हील […]
लेक लंचसाठी हॉस्टेलमध्ये, विमान कोसळताच थेट दुसऱ्या मजल्यावरुन...; थरार सांगताना माऊली भावुक
Ahmedabad Plane Crash On Medical Hostel - अहमदाबादमध्ये एका मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये विमान कोसळले तेथे काही विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. हॉस्टेलमधील त्यावेळीचा प्रसंग एका विद्यार्थ्याच्या आईने सांगितला आहे.
सुनील तटकरे यांच्या नातेवाईक क्रू मेबर अपर्णा महाडिक अपघातग्रस्त, महाराष्ट्रातील अनेकांचा समावेश
Ahmedabad Plane Crash News : गुजरातच्या अहमदाबादमध्ये लंडनच्या दिशेने निघालेले विमान तांत्रिक बिघाडामुळे कोसळले. या दुर्घटनेत 242 प्रवासी होते, ज्यात 230 प्रवासी, 10 क्रू मेंबर्स आणि 2 पायलट यांचा समावेश होता. अपघातात महाराष्ट्रातील अनेक जण होते, यामध्ये खासदार सुनील तटकरे यांच्या नातेवाईक अपर्णा महाडिक आणि बदलापूरचे दीपक पाठक यांचा समावेश आहे. या विमान अपघातामुळे मोठी हानी झाली असून बचावकार्य सुरू आहे.
धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हयात आलेल्या अवेळी पावसाने व अतिवृष्टीने शेतीचे नुकसान होते.या नुकसानीचे पंचनामे वेळेत करा. कोणत्याही शेतकऱ्यांची याबाबत तक्रार येणार नाही,याची दक्षता घ्यावी.तसेच या खरीप हंगामात शेतकऱ्यांना खते व बियाण्यांचा तुटवडा जाणवणार नाही यासाठी खते व बियाणे वेळेत उपलब्ध करुन दयावे.असे निर्देश पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज खरीप हंगाम -2025 आणि नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीस श्री.सरनाईक बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, पोलीस अधिक्षक रितू खोकर,माजी आमदार ज्ञानराज चौगुले,निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव, उपजिल्हाधिकारी (रोहयो) प्रवीण धरमकर,जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांची प्रमुख उपस्थिती होती. सरनाईक बोलतांना पुढे म्हणाले, जिल्हयात पुर परिस्थिती निर्माण झाली तर पुर बांधितांच्या मदतीसाठी आवश्यक असणारे साहित्य उपलब्ध करुन घ्यावे.आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन जिल्हयात आवश्यक त्या ठिकाणी वीज अटकाव यंत्र बसवावेत.तसेच ज्या ठिकाणी पर्जन्यमापक यंत्राची गरज आहे.त्या ठिकाणी यंत्रे लावण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल.बाधित शेतकरी व नागरीक यांना व्यवस्थित मदत करण्यासाठी वस्तुनिष्ठ नुकसानीचे पंचनामे करावे.त्यामुळे बाधितांना शासनाकडुन योग्य मदत करता येणार असल्याचे श्री.सरनाईक यांनी सांगितले. खरीप हंगामात शेतकऱ्यांना वेळेत खते व बियाणे मिळाले पाहिजे.असे सांगून श्री.सरनाईक म्हणाले की, खतांची साठवणूक करणाऱ्याविरुध्द कठोर कारवाई करण्यात यावी. बियाण्यांच्या पॅकेटमधून कमी बियाण्यांचा पुरवठा करु नये.त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही. याची दक्षता घ्यावी.पर्यावरणावर प्रेम करणारे भरपूर लोक आहेत.त्यामुळे वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन मोहिमेत सर्वांना सहभागी करुन घ्यावे. जिल्हयात वनक्षेत्र अत्यंत कमी आहे. त्यामुळे जिल्हयात वनक्षेत्र वाढीसाठी नियोजनातून वृक्ष लागवड करण्यात यावी.वनक्षेत्र वाढीसाठी प्रत्येकाने आपला खारीचा वाटा उचलावा.असे आवाहन त्यांनी यावेळी केले. केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनातून जिल्हयात वनीकरण वाढवावे.वृक्ष लागवडीत मोहिमेत बांबू लागवड करण्यात यावी.वृक्ष लागवडीत यापूर्वी जिल्हयात ज्यांनी चांगले काम केले आहे.त्यांना सन्मानीत करण्यात यावे.असेही श्री.सरनाईक यावेळी म्हणाले. जिल्हाधिकारी श्री.पुजार म्हणाले, जिल्हयातील 159 गावे नदीकाठावर आहे.त्यापैकी 15 गावे अंशता पुर प्रवण आहे.जिल्हयातील सर्व तहसिल कार्यालयात पूर बचाव साहित्य उपलब्ध आहे.तालुका पातळीवर पुरपरिस्थितीतून बचावासाठी सराव प्रात्याक्षिके घेण्यात आली.पावसाळा कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालय येथे 24 तास नियंत्रण कक्ष कार्यान्वीत करण्यात आला आहे.आपत्ती व्यवस्थापन विषयक प्रशिक्षण अधिकारी-कर्मचाऱ्यांचे घेण्यात आले आहे.असे त्यांनी सांगितले. श्रीमती जाधव यांनी सांगितले की,माहे मे -2025 मध्ये 298 टक्के झाला असून त्याची सरासरी 25.9 मी.मी.इतकी आहे.जून 2025 मध्ये 10 जूनपर्यंत 54 टक्के पाऊस झाला असुन त्याची सरासरी 46.7 मि.मी. इतकी आहे.जिल्हयात मे-2025 मध्ये 34 मंडळात अतिवृष्टी झाली. एप्रिल-2025 मध्ये अवेळी पाऊस, वादळीवारा व गारपीटीमुळे 33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेले 434 शेतकऱ्यांचे जिरायत,बागायत व फळपिकांचे एकूण-294 .42 हेक्टरवर नुकसान झाले.शासन निकषानुसार 1 कोटी 3 लक्ष रुपये निधी मिळणे अपेक्षित आहे.मे 2025 मध्ये 10 हजार 846 शेतकऱ्यांचे 4694 हेक्टर बांधित झाले. मदतीसाठी 8 कोटी 37 लक्ष रुपये मिळणे अपेक्षीत आहे.असे श्रीमती जाधव यांनी सांगितले. सन 2025 मध्ये आलेल्या अवेळी पावसामुळे 110 गावे बाधित झाल्याचे सांगून श्रीमती जाधव म्हणाल्या की,3 व्यक्तींचा मृत्यू झाला तर 3 जण जखमी झाले.8 लहान तर 53 मोठे दुधाळ जनावरे मुख्यता वीज पडल्याने मृत्यूमुखी पडली.ओढकाम करणारी 11 जनावरे अशी एकूण 72 जनावरे मृत्युमुखी पडली.या पावसामुळे 147 घरांची अंशता पडझड झाली.5 झोपडया तर 22 गुरांचे गोठे बाधित झाल्याची माहिती श्रीमती जाधव यांनी दिली. खरीप हंगाम -2025 साठी 11 जूनपर्यंत 1045.95 मे.टन युरीया आणि 260 मे.टन डी.ए.पी.उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री.माने यांनी दिली. डिएपीला पर्यायी खतांचा वापर करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन केले. भरारी पथकाने कारवाई करुन या हंगामात 10 परवाने निलंबित केले.9परवाने कायमस्वरुपी रद्द केले.3 परवानाधारकांना ताकीद दिली.2 परवानाधारकाविरुध्द एफआयआर नोंदविण्यात आला. वाशी तालुक्यात विना परवाना अनधिकृत खतसाठा केल्यामुळे 4 लक्ष 61 हजार रुपये किमतीचे 20.21 क्विटल खत जप्त करुन एफ आय आर दाखल केल्याचे श्री.माने यांनी सांगितले. धरमकर यावेळी म्हणाले की या पावसाळ्यात जिल्ह्यात 50 लक्ष वृक्ष लागवड करण्यात येणार आहे, त्यापैकी 15 लक्ष वृक्षारोपण येत्या 19 जुलै रोजी करणार आहे.अतिशय नियोजनबद्ध पध्दतीने वृक्ष लागवड करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या आढावा बैठकीला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय चाकुरकर,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरीदास,एसटीचे विभाग नियंत्रक विनोद भालेराव,उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हर्षल डोके, सार्वजनकि बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शेषराव चव्हाण, विभागीय वन अधिकारी बी.ए.पोळ, सामाजिक वनीकरणाचे विभागीय वनअधिकारी व्ही.के.करे यांच्यासह विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
बँकेकडून जाचक अटी करून कर्ज देण्यास टाळाटाळ निषेधार्थ उपोषण इषारा
तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुक्यातील वडगाव लाख येथील महिला शेतकऱ्याला महाराष्ट्र बँक कर्ज देण्यास टाळाटाळ करत आहे. C.M.E.G.P.मधून ट्राक्टरचे यंत्र कर्ज मागणी फाईल बँक ऑफ महाराष्ट्र शाखा तुळजापूर यांनी सिबील मुळे नाकारली बाबत दि.१२ जून रोजी तसीलदार तहसील कार्यालय तुळजापूर यांना महिला शेतकरी सौ शिल्पा गणेश लगदिवे यांनी निवेदन दिले आहे. निवेदनात असे नमूद केले आहे की, बँक ऑफ महाराष्ट्र शाखा तुळजापूर मध्ये वरील कर्जाची फाईल सासऱ्याचे सिबील कोआप्लीकेंट ओटीएस मधून कर्ज भरले असल्यास कर्ज माफिचा लाभ घेतले असल्यास राज्य सरकारच्या व केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ घेता येणार नाही. C.M.E.G.P. महाराष्ट्र मुख्यमंत्री रोजगार कार्यक्रम अतंर्गत आर.बी.आय च्या सिबील. कोआप्लीकेट. ओ.टी.एस. मधून कर्ज भरले असल्यास, कर्ज माफीचा लाभ घेतला असल्यास, राज्यसरकार च्या व केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ घेता येणार नाही, तसेच पिक कर्ज संदर्भात आरबीआयने नवीन नियम आमंलात आणला आहे. मागील नियमाप्रमाणे पिक कर्ज मंजुर केले जाते. एक रक्कम 10 टक्के वाढीव पांच वर्षात मिळणार, पण घेतलेले कर्ज व व्याज संपुर्ण रक्कम भरल्यानंतर च बँक वाढीव देतो असे बँक म्हणते. पण शेतकऱ्यांकडे जर ऐवढी रक्कम असते तर शेतकरी बँकेकडून कर्ज कशाला घेतला असता. म्हणून शेतकऱ्याची अडवणूक करून कर्जापासून सन 2014 पासून वंचीत ठेवले आहे. कर्ज मागणीसाठी दि.16-12-2024 रोजी बँकेसमोर माझे पती गणेश रामलिंग लगदिवे यांनी अमरण उपोषण केले होते. त्या वेळी बँक मॅनेजर च्या आश्वासनाने उषोषण स्थगीत केले. मँनेजर च्या सांगण्यानुसार C.M.E.G.P. मधुन ट्रॅक्टरच्या यंत्राचे कर्ज मागणीचे रजिस्ट्रेशन केले. तरी अद्याप कर्ज मिळाले नाही. त्यामुळे शेतकरी महिला तहसिलदार यांना व संबधीतानां निवेदन देऊन उपोषणाला माझे पती गणेश रामलिंग लगदिवे हे बसत आहे.उपोषण ठिकाण बँक ऑफ महाराष्ट्र शाखा तुळजापूर या निवेदनावर सौ शिल्पा गणेश लगदिवे यांची स्वाक्षरी आहे.
Air India Plane Crash – मी वाढदिवस साजरा करणार नाही…आदित्य ठाकरे यांचे शिवसैनिकांना आवाहन
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांचा 13 जून रोजी वाढदिवस आहे. या दिवशी आदित्य ठाकरे हे शिवसैनिकांना भेटणार होते. मात्र अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी वाढदिवस न साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. I have decided to not […]
Ahmedabad Plane Crash –भीषण…! अहमदाबादमधील दुर्घटनेत विमानातील सर्वच्या सर्व 242 जणांचा मृत्यू!
अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान कोसळून मोठी दुर्घटना घडली. अहमदाबादमधील या दुर्घटनेत विमानतील सर्वच्या सर्व 242 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, अद्याप केंद्र किंवा गुजरात सरकारकडून मृतांची कुठलीही अधिकृत आकडेवारी जाहीर करण्यात आलेली नाही. Air India Plane Crash – मोठा स्फोट झाला अन् परिसरात धुराचे लोट पसरले, प्रत्यक्षदर्शींनी सांगितली भीषण अपघाताची कहाणी […]
नवीन बस स्थानक उद्घाटन प्रकरणी अधिकाऱ्यांची चौकशी करणार- पालकमंत्री सरनाईक
धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव व तुळजापूर येथील नव्याने बांधण्यात आलेल्या बसस्थानकावर एसटी प्रवाशांसाठी कोणत्याही सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या नसताना त्याचे उद्घाटन कार्यक्रम घेण्यात आले. ज्या अधिकाऱ्यांनी हे कार्यक्रम ठरवले. त्या संबंधित अधिकाऱ्याची चौकशी करणार असल्याची माहिती पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. पालकमंत्री सरनाईक गुरूवार दि. 12 जून रोजी धाराशिव मध्ये आले होते. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात खरीप हंगाम व नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना सरनाईक यांनी प्रवाशांना कोणती सुविधा उपलब्ध करून दिली नाही. त्याबद्दल खेद व्यक्त करून बसस्थानकाचे कामे पूर्ण झाले नसतानाही उद्घाटनाचा घोळ घातला. हे अत्यंत दुखदायक घटना आहे. खाजगीकरण होणार नाही एसटी महामंडळाचे खाजगीकरण कधी ही होणार नाही. महामंडळास सध्या 10 हजार अधिकारी व 1 लाख कर्मचारी काम करतात. महामंडळ नफ्यात आणण्यासाठी ठेकेदार बस करार रद्द केला आहे. महामंडळा स्वतः बसेस विकत घेणार आहे. महामंडळाच्या अनेक जागा प्राईम लोकेशनला असून, गुजरात येथे राबवलेल्या योजनेप्रमाणे काही भुखंड डेव्हलपरला देवून बाकी जागेचे डेव्हलमेंट करण्यात येईल व यातून मिळालेल्या उत्पन्नातून बसेसची खरेदी होईल. गेल्या 8 ते 10 वर्ष महामंडळाने बसेस घेतल्या नाहीत असेही पालकमंत्री सरनाईक यांनी सांगितले. 17 जूनला मुंबई बैठक तुळजापूर येथे भवानी मातेचे 108 फुटी छत्रपती शिवाजी महाराज यांना तलवार देणारे जे शिल्प उभारले जाणार आहे त्या संदर्भात 17 जूनला मुंबई येथे बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीत भवानी मातेचे मुर्ती द्विभुजा असणार की, अष्टभूजा असणार यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल. कोणाच्याही भावना दुखावणार नाहीत अशी मुर्ती साकारली जाईल असे पालकमंत्री सरनाईक यांनी सांगितले. माझ्या वडीलांचे नाव मला माहित आहे पत्रकारांनी नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्या संदर्भात विचारले असता पालकमंत्री सरनाईक यांनी माझ्या वडीलांचे नाव मला माहिती आहे. माझ्या नावापुढे मी आईचे व वडीलांचे नाव लावतो असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस यांनी नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्याची गंभीर दखल घेतली आहे. त्यामुळे तो विषय संपला. मी नाराज झालो पालकमंत्री म्हणून मी जिल्हा नियोजन बैठकीत जे काय निर्णय विकास कामाबाबत घेतले होते त्या कामाला स्थगिती दिली गेली. इतर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरू असताना आपल्या जिल्ह्यात कामाला स्थगिती आहे. त्यामुळे मी अत्यंत नाराज झालो. या संदर्भात लवकरच कामावरील स्थगिती उठविली जाईल असे पालकमंत्री सरनाईक यांनी सांगितले. बाळासाहेबांची परपंरा मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मनसे नेते राज ठाकरे यांची भेट झाली. या संदर्भात पत्रकारांनी विचारले असता पालकमंत्री सरनाईक यांनी सांगितले की, बाळासाहेब ठाकरे यांचे दिलदारपणाने पाहुचार करण्याचे धोरण राज ठाकरे राबवत आहेत. त्यामुळे कधी कुणाशी राजकीय सूर जळतील हे सांगता येते नाही असे सरनाईक म्हणाले. वादग्रस्त निविदा रद्द धाराशिव शहरातील रस्त्याबाबत काढण्यात आलेली 140 कोटी रूपयांची निविदा अखेर रद्द करण्यात आली असल्याची माहिती पालकमंत्री सरनाईक यांनी पत्रकारांना सांगितला. शहरातील रस्त्याबाबत फेर निविदा काढण्यात येईल. रस्त्याचे काम उत्तम दर्जाचे होण्यासाठी आयआयटी मुंबई येथील पथक ॲडीट करतील असे सरनाईक यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी किर्ती कुमार पुजार, सीईओ मैनाक घोष, पोलिस अधीक्षक रितू खोकर यासह अधिकारी उपस्थित होते.
फसव्या घोषणा करणाऱ्या सरकारच्या विरोधात आंदोलन
धाराशिव (प्रतिनिधी)- निवडणूक काळात फसव्या घोषणांची खैरात करत सत्तेत आलेल्या महायुती सरकारच्या नेत्यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नाही. अश्या नेत्यांना व त्यांच्या कार्यकर्त्याना आता जनतेने दारात उभा करु नये असे आवाहन आमदार कैलास पाटील यांनी केले. सरकारच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील, सहसंपर्कप्रमुख मकरंद राजेनिंबाळकर यांच्या नेतृत्त्वात धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी (ता.12) धाराशिव शहरातील शिंगोली विश्रामगृहासमोर जोरदार चक्काजाम आंदोलन करण्यात आले. तब्बल दोन तास केलेल्या आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती. सोलापूर आणि धुळे मार्गावर जाणाऱ्या माल वाहतुकीसह प्रवाशी वाहनांची दुतर्फा मोठी रांग लागली होती. शेतकऱ्यांच्या सोयाबीन व इतर शेतीमालाला हमीभाव, बी-बियाणांवर अनुदान तसेच सर्वसामान्य जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली जात नसल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांनी चक्क ट्रॅक्टर, पेरणी यंत्र घेऊन रस्त्यावर ठिय्या मांडला. आंदोलनात भाजप सरकारने दिलेल्या आश्वासनांचा विसर पडल्याच्या निषेधार्थ शिवसैनिकांसह शेतकऱ्यांनी जोरदार घोषणा दिल्या. यावेळी आमदार कैलास पाटील यांनी मार्गदर्शन केले. आंदोलनात सहसंपर्क प्रमुख मकरंद राजे निंबाळकर,भारत इंगळे,महिला आघाडी शामल वडणे, मनीषा वाघमारे,जिल्हा संघटक दीपक जवळगे, दिलीप पाटील,शिवसेना सचिव प्रवीण कोकाटे, माजी नगराध्यक्ष दत्ता बंडगर,उपजिल्हाप्रमुख विजय सस्ते,प्रदीप मेटे,जितेंद्र कानडे तालुकाप्रमुख सतीश सोमाणी, जग्गनाथ गवळी, सचिन काळे,अमोल बिराजदार शहरप्रमुख सोमनाथ गुरव, राहुल खपले,विश्वजीत जाधव, युवासेना जिल्हाप्रमुख रवी वाघमारे,मनोहर धोंगडे, दिनेश बंडगर,संग्राम देशमुख, शाम जाधव, राजेश्वर पाटील संजय खडके, नगरसेवक राजाभाऊ पवार,राणा बनसोडे, तुषार निंबाळकर सिद्धेश्वर कोळी, गणेश खोचरे,पंकज पाटील, शिवसैनिक व शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता.
धाराशिव शहरातील प्रेरणा नगर येथे शिवसेना महिला आघाडी शाखेचे उद्घाटन
धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव शहरातील प्रेरणा नगर येथे शिवसेना महिला आघाडी शाखेचे उद्घाटन गुरुवारी (दि. 12) धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री ना.प्रतापराव सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी धाराशिव जिल्हाप्रमुख सुरज राजाभाऊ साळुंके, जिल्हा सहसंपर्कप्रमुख भगवान देवकते, शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख सौ. भारतीताई गायकवाड, जिल्हा संघटक सौ. किरण निंबाळकर, तालुका अध्यक्ष सौ. माया निंबाळकर, प्रेरणा नगर शाखेच्या प्रमुख मनीषा लोखंडे, शाखा उपप्रमुख पुष्पा भुतेकर, शाखा सचिव हिरा कुंभार, सहसचिव सोनाली रोडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. शिवसेना महिला आघाडीने धाराशिवमध्ये संघटनात्मक ताकद उभी करून महिलांसाठी नवे पर्व सुरू केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून महिला आघाडीच्या शाखा स्थापन करून शिवसेनेच्या महिला आघाडीचे संघटन वाढविण्याचे कार्य या माध्यमातून करण्यात येत आहे. शाखा उदघाटन कार्यक्रमास शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक आणि महिला कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान टेकऑफनंतर काही मिनिटांत कोसळले. या अपघातात विमानातील सर्व 242 जणांचा मृत्यू झाला आहे. एअर इंडियाचे AI-171 बोईंग 787 ड्रीमलाइनर या विमानाने अहमदाबाद येथील विमानतळावरून दुपारी 1 वाजून 38 मिनिटांनी उड्डाण केले. यानंतर अवघ्या 5 मिनिटांत हे विमान मेघानी नगर येथील निवासी परिसरात कोसळले. या भीषण अपघाताची भयावह कहाणी एका […]
Kolhapur Traffic : रंकाळा टॉवर चौक नेहमीच वाहनांच्या वर्दळीत, नित्याचीच वाहतूक कोंडी
रंकाळा स्टॅण्ड ते फुलेवाडी रस्ता वाहतुकीच्या कोंडीत अडकला आहे By : रुपाली चव्हाण कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील रस्ते अतिशय अरुंद आहेत. रस्ते लहान वाहने जादा अशी स्थिती आहे. त्यातच खड्ड्यांची झालेली चाळण, यामुळे शहरातील वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. रस्त्यावर वर्षानूवर्ष डांबरीकरण न केल्याने खड्यांचे साम्राज्य आहे. शहरातील सार्वजनिक समस्या म्हणजे पाणी, कचरा, व वाहतूक [...]
नवीन कसदार साहित्यातूनच समाजनिर्मिती शक्य - दत्ता कुलकर्णी
धाराशिव (प्रतिनिधी)- लेखनातून समाज परिवर्तनासाठी योगदान देण्याचं काम लेखकांनी आजपर्यंत केलं आहे आणि आजही ते करीत आहेत. त्यांच्या चिंतनाची दिशा तुमच्या आमच्यासारखी व्यवहारी कधीच नसते तर समाज हिताची वैचारिक विशालता त्यात असते असे उद्गार भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी काढले. अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारतीच्या जिल्हा कार्यकारिणी बैठक व गुणवंत सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते. साहित्य भारतीच्या व बालकुमार वतीने जे काही साहित्यिक उपक्रम आयोजित केले जातात, अशा उपक्रमातूनच नवनवे लेखक निर्माण होतील आणि आजचे हे लहान लेखक उद्या खूप मोठे होतील. या प्रक्रियेत युवराज नळे यांच्या माध्यमातून कलाविष्कार अकादमी, साहित्य भारती व बालकुमार साहित्य संस्थांच्या वतीने साहित्यिक व साहित्यिक संस्थांना दरवर्षी जे काही साहित्य पुरस्कार देण्यात येणार आहेत ते सिद्धिविनायक परिवाराच्या वतीने प्रायोजित केले जातील असेही दत्ता कुलकर्णी यांनी जाहीर करून सर्व गुणवंत व पुरस्कारार्थींना शुभेच्छा दिल्या.
शिवसेना शहर प्रमुखपदी आकाश कोकाटे यांची निवड
धाराशिव (प्रतिनिधी)- शिवसेना (बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या धाराशिव शहर प्रमुखपदी आकाश मिलींदराव कोकाटे यांची निवड करण्यात आली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही निवड महत्त्वाची मानली जात आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे यांच्या आदेशानुसार व पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांच्या मान्यतेने शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांनी ही निवड केली आहे. पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांच्या हस्ते निवडीचे पत्र आकाश कोकाटे यांना देण्यात आले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार या पदाच्या माध्यमातून करावा, तसेच पक्षाचे संघटन वाढविण्यासाठी कार्य करावे असे नियुक्तीपत्रात म्हटले आहे. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके, शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आकाश कोकाटे यांनी धाराशिव शहर आणि परिसरात शिवसेना पक्ष वाढीसाठी मोठे प्रयत्न केले आहेत. शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांच्यासोबत काम करत असताना त्यांनी कार्यकर्त्यांची मोट बांधून पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला बळकटी देण्याचे काम सतत करत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन ही निवड करण्यात आली आहे. या निवडीचे तमाम शिवसैनिकांमधून स्वागत होत आहे.
चालकाच्या प्रसंगावधानामुळे प्रवाशांचा जीव वाचला
भूम (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्यातील बहुचर्चित भूम आगाराच्या भूम -बोरिवली या बसचे पुण्याकडे जाताना मागील एक टायर गळून पडल्याने व एक टायर अडकून पडल्याने चालकाच्या प्रसंगावधानामुळे बस मध्ये प्रवास करत असलेल्या 85 प्रवाशांचा जीव वाचला आहे. योगायोगाने आज परिवहन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धाराशिव जिल्ह्यामध्ये असताना ही घटना घडली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की, भूम आगारातून सकाळी आठ वाजता सुटणारी भूम -बोरीवली ही बस (क्र एम एच 20 बी एल 2102) नेहमीप्रमाणे भूम ते-बोरीवली जात असताना पुणे सोलापूर हायवे वरील भिगवण जवळील खडकी गावादरम्यान दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास एसटी बसचे मागचे एक टायर निघून व एक टायर प्रेशर आल्याने मध्येच अडकून पडल्याने मोठा अपघात होता होता टळला. यावेळी सदर बस मध्ये 85 प्रवासी प्रवास करत होते. आज सकाळपासूनच भूम आगारांमध्ये नियमित धावणाऱ्या गाड्या अचानकपणे गळती व खिडक्या अ नसल्याच्या कारणाने आगारांमध्ये होत्या. व काही एस. टी बस रद्द करण्यातआल्या असल्याचे सांगण्यात आले. धाराशिव येथील यंत्र अभियंता सूर्यकांत थोरबोले धाराशिव येथील 10 यांत्रिक कामगारांची टीम घेऊन भूम आगारांमध्ये येऊन भूम आगारातल्या ज्या गाड्या आज पेंडिंग ठेवण्यात आलेल्या आहेत. याबाबत त्यांची यांत्रिक टीम एसटी बसेस दुरुस्त करण्याचे काम करत आहे .दररोज भूम आगारातून धावणाऱ्या या बसेस आज अचानकपणे कशा नादुरुस्त झाल्या. त्या दुरुस्त करण्यासाठी भूम आगारातील यांत्रिक कामगाराद्वारे दुरुस्त होणारे एसटी बसेस धाराशिव येथील यांत्रिक कामगाराद्वारे दुरुस्त करण्याचे काम सुरू आहे. याबाबत आमच्या प्रतिनिधीने धाराशिवचे यंत्र अभियंता सूर्यकांत थोरबोले यांच्याशी चर्चा केली असता लवकरच भूम आगाराचा विस्कटलेला कारभार सुरळीत होईल. प्रवाशांची सेवा करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. यावेळी प्रभारी आगारप्रमुख श्रीकांत सुरवसे, ए डब्ल्यू एस कवडे उपस्थित होते. राज्याचे परिवहन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धाराशिव जिल्ह्यात असताना भूम आगाराच्यावतीने गाडी नादुरुस्त होऊन एक आगळी वेगळी भेट दिल्याची चर्चा प्रवासी वर्गातून ऐकण्यास मिळत आहे. आज गुरुवार भूमचा आठवडी बाजार असताना सुट्टीचा हंगाम समाप्तीकडे असताना आगारातून धावणाऱ्या बसेस अचानकपणे आजारी पडल्याने नियमितपणे जाणारी भूम -लातूर, भूम नगर पुणे, भूम बार्शी, स्वारगेट-पुणे यासह दररोज सुटणाऱ्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. आज सकाळी बोरिवली वरून येणारी भूम आगाराची एम एच 20 बी एल 2637 ही बस प्रवासात बंद पडल्याने सदर बस पनवेल आगारात जमा केली. या झालेल्या महामंडळाच्या नुकसानाला कोण जबाबदार आहे. यासाठी भूम आगाराला कायमस्वरूपी एसटी बसेस वर उपचार करणारा आगर प्रमुख देण्याची मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.
'टेकऑफ केल्यानंतर लगेचच असे कसे घडू शकते?' चेतन भगत यांचा सवाल
Chetan Bhagat On Ahmedabad Boieng Plane Crash: अहमबादाबमध्ये झालेल्या विमान दुर्घटनेविषयी लेखक चेतन भगत यांनी सोशल मीडियावर एक सवाल उपस्थित केला आहे.
प्लेनचं टेक ऑफ अन् क्रॅश; 'त्या' 8 मिनिटांत काय काय घडलं? पायलटला मिळाला केवळ 1 मिनिट
Air India Flight Crash : अहमदाबाद विमानतळावर मोठी दुर्घटना घडली आहे. सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन लंडनला निघालेल्या विमानाला उड्डाणानंतर काही वेळातच अपघात झाला.
Air India Plane Crash घटनेनंतर सलमान खानचा मोठा निर्णय, म्हणाला देश दु:खात असताना आम्ही...
salman khan cancels his event : अहमदाबादमधील मेघानीनगरमध्ये एअर इंडियाचं विमान कोसळल्याची घटना आहे. या विमानातून २४२ प्रवासी प्रवास करत होते.
एअर इंडियाचं विमान अचानक कसं कोसळलं? पक्ष्यांची धडक की आणखी काही; तज्ज्ञांनी सांगितली कारणं
Gujarat Plane Crash News: अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाला मोठा अपघात झाला, ज्यात लंडनला जाणारे बोईंग 787 विमान सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर कोसळले. विमानात 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर्स होते. उड्डाणानंतर थोड्याच वेळात विमान खाली कोसळले.
जिल्हयातील ४३ हजार झाडांवर राहणार ‘ट्री अॅप’चा वॉच…
सातारा / विशाल कदम : वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे सातारा जिल्ह्यात महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून तब्बल ४३ हजार २३३ झाडे लावण्यात येणार आहेत. त्या झाडांच्या लागणीचे आणि संवर्धनाचे सर्व सूक्ष्म नियोजन सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केले आहे. त्याचबरोबर लावण्यात येणाऱ्या सर्व झाडांवर ट्री अॅपच्या माध्यमातून बॉच राहणार आहे. प्रत्येक तीन महिन्याचे अपडेट [...]
श्रेयस अय्यर १० दिवसांत दुसऱ्यांदा फायनलमध्ये दाखल, आज होणार विजेतेपदाचा फैसला
Cricket: श्रेयॉसच्या नशिबात विजितेपदाची ट्रॉफी आहे की नाही, याचा निर्णय येत्या काही तासांतच होणार आहे. श्रेयस १० दिवसांत दुसऱ्यांदा फायनल खेळणार असून तो ट्रॉफी जिंकणार की नाही, याची उत्सुकता सर्वांना असणार आहे.
कोकणात वीजांच्या कडकडाटासह पावसाची जोरदार हजेरी; रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला अलर्ट
कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये गुरुवारी सकाळपासून सोसाट्याचा वारा आणि वीजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. हवामान खात्याने पुढील चार दिवस या जिल्ह्यांना अलर्ट जारी केला आहे. पावसामुळे देवगड जामसंडे शहराचा संपर्क तुटला आहे. रस्त्यावर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या आहेत. गुरुवारी सकाळपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे देवगड निपाणी मुख्य रस्त्यावर पेट्रोल पंप […]
महिला डॉक्टर बदनामी; सूत्रधार शिंदे मळ्यातील
कराड : ‘मॅन काईंड जस्टिस’ या व्हॉट्सअप ग्रुपवरून अज्ञात क्रमांकावरून बनावट अश्लील व्हिडीओ प्रसारित करून कराड येथील महिला डॉक्टर आणि साक्षीदारांची बदनामी केल्याप्रकरणी कराडच्या शिंदे मळ्यातील कथित डॉक्टर राजेश शिंदे व पंजाबच्या एकाची कसून चौकशी सुरू आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित अज्ञात क्रमांकावरून फिर्यादी महिला डॉक्टर [...]
Thet Paipline Kolhpaur : सोळांकुरजवळ थेट पाईपलाईनला गळती, लाखो लीटर पाणी वाया
अधिकाऱ्यांच्या कारभाराबाबत स्थानिक भूमिपुत्रांतून संताप व्यक्त होत आहे. कोल्हापूर : कोल्हापूर थेट पाईपलाईन योजनेचा सोळांकूर (ता. राधानगरी) येथील डाव्या कालव्याजवळ व्हॉल्व लिकेज झाल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. मंगळवारी रात्री सुरू झालेली ही गळती बुधवार दुपारपर्यंत होती. योजनेच्या सुरुवाती पासूनच पाईपलाईनला ठिकठिकाणी गळती सुरु आहे. त्यातून आतापर्यंत कोट्यवधी लीटर पाणी वाया गेले. यामुळे कामाबाबात प्रश्न [...]
अपघातग्रस्त विमानातील 230 प्रवाशांची यादी समोर, प्लेनमध्ये कोण कोण होतं?
Ahmedabad Plane Crash News : अहमदाबादमध्ये मोठा विमान अपघात झाला. या अपघातामध्ये 2 पायलट, 10 क्रू मेंबर्ससह 230 प्रवासी प्रवास करत होते. या अपघातानंतर विमानात प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांची यादी समोर आली आहे.
Air India Plane Crash: अमेरिकेच्या दूतावासाची प्रतिक्रिया; ‘या दुःखाच्या क्षणी आम्ही हिंदुस्थानसोबत’
अहमदाबाद येथे झालेल्या भीषण विमान अपघातानंतर अमेरिकेच्या हिंदुस्थानातील दूतावासाने शोक व्यक्त केला आहे. यूएस मिशन इन इंडियाच्या वतीने प्रभारी राजदूत जॉर्गन अँड्र्यूज (Charg d’Affaires Jorgan Andrews) यांनी एक निवेदन जारी करत या दुर्घटनेत प्रभावित झालेल्या कुटुंबांप्रती संवेदना व्यक्त केली आहे. आपल्या शोकसंदेशात अँड्र्यूज म्हणाले, ‘अहमदाबाद येथे झालेल्या भीषण विमान अपघाताची बातमी ऐकून आम्हाला अत्यंत दुःख […]
Air India Plane Crash- अहमदाबादमधील अपघातग्रस्त विमानातल्या 7 मराठी प्रवाशांची नावे आली समोर
अहमदाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनला जाणारे एअर इंडियाच्या विमानाच अपघात होऊन कोसळले. उड्डाणानंतर अवघ्या 1 मिनिटातच विमान कोसळले. ज्याचा व्हिडिओही समोर आला आहे. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की विमानाने उड्डाण केले आणि नंतर ते 625 फूट उंचीवर पोहोचले, परंतु काही क्षणातच विमान खाली येऊ लागले. काही क्षणातच विमान खाली पडले आणि मग एक मोठा स्फोट झाला. […]
विमान दुर्घटनेत कोणत्या सीटवर बसलेले प्रवासी जिवंत राहण्याची शक्यता अधिक? सर्वात घातक जागा कोणती?
Ahmedabad Plane Crash : गुजरातच्या अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान मेघानीनगरजवळ कोसळले. विमानात 242 लोक होते. हे विमान अहमदाबादहून लंडनला जात होते. विमानात भारतीय आणि विदेशी नागरिक होते.
अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेवर काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. घटना स्थळावरचे दृश्य हे हृदय पिळवटून टाकणारे असल्याच्या भावना सोनिया गांधी यांनी व्यक्त केल्या. I am deeply shocked and saddened by the tragic plane crash in Ahmedabad. My thoughts are with the families of the passengers and the crew. The […]
एअर इंडिया विमान दुर्घटनेचा शेअर बाजाराला मोठा फटका बसला आहे. टाटाच्या शेअर्सनंतर आता इंडिगो आणि स्पाइसजेटच्या शेअर्समध्येही मोठी घसरण झाली आहे. दुर्घटनेनंतर काही क्षणातच इंडिगो आणि स्पाइसजेटचे मार्केट कॅप हजारो कोटी रुपयांनी कमी झाले. इंडिगोचे शेअर मार्केट कॅप 7,458.46 कोटी रुपयांनी घसरले. स्पाइसजेटचे मार्केट कॅप 152.55 कोटी रुपयांनी घसरले. एअर इंडियाच्या विमान दुर्घटनेनंतर गुरुवारी टाटा […]
मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर विमान पडताच धावाधाव; इमारतीवर शेपूट अडकलं, भावी डॉक्टर्स दगावल्याची भीती
Air India Plane Crash - अहमदाबादमध्ये भीषण विमान दुर्घटना घडली. हे विमान एका मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर कोसळल्याचे वृत्त आहे. काही विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भिती व्यक्त केली जात आहे.
तब्बल 6000 अपघात, 9000 मृत्यू; MCAS मुळे वारंवार घात, बोईंग विमानात नेमक्या त्रुटी काय?
Boeing Planes Accident Records : गुजरातच्या अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाला मोठा अपघात झाला असून विमानात २४२ प्रवासी होते. उड्डाणानंतर केवळ सहा मिनिटांतच हे बोईंग विमान अपघातग्रस्त झाले. यापूर्वीही बोईंग विमानांना अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
किल्ले अजिंक्यताऱ्याचे होणार संवर्धन
सातारा : सातारा जिह्याच्या पर्यटनवाढीला चालना देण्यासाठी अभ्यासपूर्ण पाठपुरावा करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठपुराव्यातून राजधानी साताऱ्यातील किल्ले अजिंक्यताराचे जतन, संवर्धन आणि परिसर सुशोभीकरण करणे, पर्यटकांसाठी पायाभूत सुविधा करणे तसेच संगम माहुली येथील महाराणी ताराबाई, येसूबाई राणीसाहेब, छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळांचे संवर्धन, जीर्णोद्धार आणि संगम माहुलीचा संपूर्ण परिसर विकसित करणे [...]
सतर्क रहा! कोल्हापुरात वीज कोसळण्याचा धोका; Damini aap चा वापर कसा कराल?
नागरिकांनी अत्यंत सतर्क राहण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे. By : इंद्रजित गडकरी कोल्हापूर : कोल्हापूर आणि परिसरात वीज कोसळण्याचा धोका वाढला असून ‘दामिनी : लाईटनिंग अलर्ट’ अॅपच्या माहितीनुसार कोल्हापुरात पुढील काही मिनिटांत वीज कोसळण्याची शक्यता आहे. नागरिकांनी अत्यंत सतर्क राहण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे. दामिनी अॅपवरील नकाशानुसार, कोल्हापूर शहर आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरात [...]
Air India Plane Crash – धक्कादायक…विमान दुर्घटनेवर आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया
गुजरातमधील अहमदाबादमध्ये एक मोठा अपघात झाला आहे. गुरुवारी अहमदाबादहून लंडनच्या गॅटविकला जाणारे एअर इंडियाचे बी-787 विमान वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहाच्या इमारतीवर कोसळले. या दुर्घटनेवर शिवसेना (आदित्य ठाकरे) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. Shocked, saddened to hear about the plane crash in Ahmedabad. Praying for safety of survivors and for the families of everyone on that plane. […]
पाटील, महाडिक, पाठक...; गुजरातमधील अपघातग्रस्त विमानात प्रवास करत होते 7 मराठी प्रवासी
अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाला मोठा अपघात झाला. एअर इंडियाचे एआय १७१ विमान लंडनला जात असताना डॉक्टरांच्या वसतिगृहाजवळ कोसळले. विमानात २४२ प्रवासी होते. दुर्घटनेत अनेक भारतीय, ब्रिटिश नागरिक होते. विमानातून प्रवास करणारे सात मराठी लोकांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमित शाह आणि राम मोहन नायडू यांना घटनास्थळी भेट देऊन मदत करण्याचे आदेश दिले.
Photo –अहमदाबादमध्ये विमान कोसळून भीषण दुर्घटना
गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळले आहे. गुरुवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. अहमदाबाद विमानतळाजवळच हे विमान कोसळले असून अपघातानंतर आकाशात धुरांचे लोट उठल्याचे दिसले. दरम्यान, बोईंग 787-8 ड्रिमलायनर हे विमान लंडनकडे जाताना कोसळले. हे विमान 11 वर्ष जुने होते. या विमानामध्ये 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर होते. दुर्घटनेनंतर लगेचच मदत आणि […]
अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या भीषण अपघातावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी X या सोशल मीडियावरील हँडलवर पोस्ट करत आपली भावना मांडली. (PM Modi Expresses Grief Over Ahmedabad Air India Crash, Says Tragedy Is Heartbreaking) पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘अहमदाबादमधील दुर्घटनेने मला हादरवून टाकले आहे. हे दु:ख शब्दांत व्यक्त करता […]
अहमदाबाद विमान अपघातानंतर पंतप्रधान मोदी हळहळले; म्हणाले, 'मोठा धक्का बसला, हे दु:ख...'
PM Narendra Modi on Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघाताने मोठी हानी झाली आहे. या अपघाताने संपूर्ण देश सुन्न झाला आहे. अपघातानंतर समोर येणारे व्हिडीओ नि:शब्द करणारी आहेत. अतिशय भयानक घटना आहे. या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.
1 वाजून 17 मिनिटांनी टेकऑफ काही क्षणात एअर इंडियाचे विमान कोसळले, जाणून घ्या नेमकं काय घडलं
आज दुपारी अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या AI171 विमानाला मोठा अपघात झाला. अहमदाबादहून लंडनला निघालेले हे विमान टेकऑफनंतर काही वेळातच मेघानीनगरजवळ कोसळले. विमानात 242 प्रवासी होते, ज्यात भारतीय आणि विदेशी नागरिकांचा समावेश आहे.
गुजरातमधील अहमदाबादमध्ये एक मोठा अपघात झाला आहे. गुरुवारी अहमदाबादहून लंडनच्या गॅटविकला जाणारे एअर इंडियाचे बी-787 विमान एआय-171 उड्डाण करत होते. हे विमान मेघानी नगर येथील निवासी भागात कोसळले. बीजे मेडिकल कॉलेज मेघानी नगर परिसरातच आहे. उड्डाणानंतर 5 मिनिटांनी हे विमान या वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहाच्या इमारतीवर कोसळले. वसतिगृहाच्या वर एक कॅन्टीन आहे, जिथे वैद्यकीय विद्यार्थी दुपारी […]
साताऱ्यातील तरुणांचे बँक अकाऊंट लॉक
सातारा : तुमच्या खात्यात पाकिस्तानातून पैसे आले आहेत, असली कारणं सांगून साताऱ्यातील कित्येक व्यवसायिक तरुणांची बँक अकाऊंट लॉक करण्याची धक्कादायक घटना घडली आहे. दरम्यान, नॅशनलाईज बँकेच्या अधिकाऱ्यांनी हात वर करुन पोलिसांकडे निर्देश केले आहेत. तर सातारा पोलिसांनी या साऱ्या प्रकाराबाबत अनभिज्ञ असल्याचे सांगितले आहे. शहरातील कित्येक तरुणांचे नॅशनल बँकेतील अकाऊंट लॉक झाल्याने एकच खळबळ उडाली [...]
Election 2025: निवडणूक यंत्रणा लागली कामाला, EVM मशिनची पडताळणी शेवटच्या टप्प्यात
राज्य निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे. कोल्हापूर : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या रखडलेल्या निवडणुकीची अखेर प्रक्रिया पुन्हा सुरू झाली आहे. १९ ड वर्ग महापालिकेची प्रभाग रचना चार सदस्यीय होणार असल्याचे आदेश राज्यशासनाने नुकतेच दिले आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनानाचीही निवडणुकीसाठीची यंत्रणा कामाला लागली आहे. ईव्हीएम मशिनची पडताळणी सुरू केली आहे. दोन दिवसांत हे काम पूर्ण होणार [...]
मुलांना यश अपयश पचवायला शिकवा - इंद्रजित देशमुख
कळंब: (प्रतिनिधी)- आपल्या मुलांना उद्याच्या भविष्यासाठी तयार करायचे असेल, तर त्यांना यश आणि अपयश दोन्ही स्वीकारायला शिकवा. जीवनातील स्पर्धा कधीही न संपणाऱ्या असतात, त्यामुळे या स्पर्धेत माणूस म्हणून टिकून राहण्यासाठी प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे, असे विचार माजी सनदी अधिकारी आणि प्रसिद्ध व्याख्याते इंद्रजित देशमुख यांनी व्यक्त केले. ते कळंब तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थी आणि सेवानिवृत्त शिक्षकांच्या सत्कार समारंभात बोलत होते. हा कार्यक्रम कळंब येथे बुधवारी (दि. ११ जून) पार पडला. देशमुख पुढे म्हणाले की, केवळ पैसा, प्रतिष्ठा आणि संपत्तीच्या लोभातून करिअर निवडू नका. तुम्हाला कशात आनंद मिळतो हे शोधा. नीतिमत्ता जपून पैसा कमवण्यात काहीच गैर नाही. ज्या क्षेत्रात तुमची आवड आहे, त्यात तुम्ही उच्च शिखर गाठा. वाईट जगात रमण्याऐवजी चांगल्या जगाच्या निर्मितीसाठी प्रयत्न करा. प्रत्येक पालकाने आपल्या मुलांना चांगले माणूस बनवण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी केले. इंद्रजित देशमुख यांनी आपल्या प्रेरणादायी व्याख्यानात जीवनातील सुख आणि समाधानाचे महत्त्व सांगितले. त्यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांना सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचे आणि ज्ञानार्जनातून जीवनात यशस्वी होण्याचे मार्गदर्शन केले. त्यांच्या विचारांना उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षणाधिकारी अशोक पाटील, उपशिक्षणाधिकारी दत्तात्रय लांडगे, सहाय्यक निबंधक बालाजी सावतर, पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे,राज्य उपाध्यक्ष सोमनाथ टकले, विस्तार अधिकारी भारत देवगुडे जिल्हाध्यक्ष संतोष देशपांडे, वाशी तालुका संघाचे अध्यक्ष संतोष मोळवणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे चेअरमन बाळकृष्ण तांबारे यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले की, पतसंस्थेचे कामकाज अत्यंत पारदर्शकपणे सुरू असून, त्यामुळे संस्थेची राज्यभर चांगली प्रतिमा आहे. सभासदांच्या हितासाठी संस्था नेहमीच कार्यरत असते. वर्षभरात सभासदांच्या मुलींच्या लग्नासाठी अकरा हजार रुपयांची मदत आणि गुणवंत विद्यार्थी व सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार संस्थेतर्फे केला जातो, असे त्यांनी सांगितले. यावेळी संस्थेच्या वतीने इयत्ता ५ वी नवोदय, शिष्यवृत्ती परीक्षा, दहावी, बारावी, मेडिकल व इंजिनिअरिंग परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळवलेल्या सुमारे ८० विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, फेटा, बुके, प्रेरणादायी पुस्तके आणि इंग्रजी शब्दकोश देऊन गौरव करण्यात आला. तसेच, त्यांच्या पुढील शिक्षणासाठी आर्थिक मदत म्हणून धनादेश प्रदान करण्यात आले. यासोबतच, सेवानिवृत्त शिक्षकांच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाचा सन्मान करण्यात आल्याने वातावरण भावुक झाले होते. शिक्षणाधिकारी अशोक पाटील यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक केले आणि गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. त्यांनी शिक्षकांच्या भूमिकेचे महत्त्व विशद केले आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. इतर मान्यवरांनीही आपले विचार मांडले आणि संस्थेच्या या प्रशंसनीय उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे उपाध्यक्ष भागवत जाधवर संचालक दत्तात्रय पवार, भक्तराज दिवाने,अशोक डिकले, सुनील बोरकर, भूषण नानजकर, गणेश कोठावळे,दीपक चालक,दत्तात्रय सुरेवाड, रामचंद्र पवार, रवींद्र शिनगारे, श्रीम वैशाली क्षीरसागर,श्रीम ज्योती ढेपे श्रीम कालिंदा मुंढे, सचिव संतोष ठोंबरे, संघाचे तालुकाध्यक्ष प्रशांत घुटे यांनी परिश्रम घेतले या सत्कार सोहळ्याला संचालक मंडळ, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हणमंत पडवळ आणि श्रीमती ढेपे यांनी केले, तर आभार भक्तराज दिवाने यांनी मानले. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले.
कळंब: (प्रतिनिधी)- येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या जागेचा प्रश्न निकाली निघाला असुन, मा.जिल्हाधिकारी किर्तीकुमार पुजार व जि.प.मुख्यकार्येकारी अधिकारी मा.मौनक घौष,तसेच जिल्हाशल्यचिकित्सक डाॅ.चाकुरकर यांचे जागा पाहणी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सकारात्मक अहवालानंतर,आता कळंब शहर विकास कृती संघर्ष समीती च्या वतीने शहरातील जुना सरकारी दवाखाना व जिल्हा परिषद कन्या तसेच (मुलांची)शाळेच्या भुखंडावर भुमीपुजन करून नियोजित उपजिल्हा रुग्णालयाचे लवकरात लवकर निधीची उपलब्धता तातडीने करत प्रत्यक्ष कामाचा शुभारंभ करण्यात यावा.अशा आशयाचे निवेदन राज्याचे परीवहन तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री मा.प्रतापजी सरनाईक यांना समीतीचे संतोष भांडे,सतपाल बनसोडे व बाळासाहेब कथले यांनी दिले.
काजळा येथील रामानंद महाराज विद्यामंदिरच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात
धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील काजळा येथील रामानंद महाराज विद्यामंदिरात 30 वर्षानंतर माजी विद्यार्थ्यांसाठी शाळेची घंटा पुन्हा वाजली. तब्बल तीस वषार्र्ंनी 1995 च्या बॅचच्या विद्यार्थ्यानी एकमेकांना भेटल्यानंतर सर्वांचे डोळे आनंदाश्रूंनी पाणावले होते. माजी विद्यार्थी, विद्यार्थिनींनी शाळा आणि शिक्षकांविषयी आदरभाव व्यक्त करुन जुन्या आठवणींना उजाळा दिला. काजळा येथील रामानंद महाराज विद्यामंदिरात 1995-96 साली दहावी झालेल्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात उत्साहात पार पडला. या बॅचचे विद्यार्थी आज वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांनी एकत्र येण्यासाठी व्हाटसअप ग्रुप तयार केला. सर्वांच्या सोयीनुसार स्नेहमेळावा घेण्यासाठी तारीख निश्चित करण्यात आली. सर्वांना भेटता येणार याचा आनंद सर्वांनाच होता. एकुण 70 विद्यार्थी, विद्यार्थिनी स्नेहमेळाव्यासाठी एकत्र आले. शाळेत आल्यानंतर माजी विद्यार्थ्यांसाठी 30 वर्षानंतर शाळेची घंटा पुन्हा वाजली. त्यानंतर सर्वांनी प्रार्थना व राष्ट्रगीत गायले. त्यानंतर माजी विद्यार्थ्यांना छडी मारत गुरुजींनी वर्गात प्रवेश दिला. या बॅचला शिकविणारे मुख्याध्यापक शिवाजी वागदकर, जि.प. शाळेचे आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त अली मेहताब शेख, अरुण सातपुते, भीमाशंकर शिवपुरे, भीमाशंकर मळेवाडी व इतर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. स्नेह मेळाव्यानिमित्त माजी विद्यार्थ्यांच्या वतीने शाळेला प्रोजेक्टर भेट देण्यात आला. रामानंद महाराज मंदिराच्या सभागृहात विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करताना आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. जुन्या आठवणींना उजाळा देताना सर्वांचे डोळे पाणावले होते. त्यानंतर रामानंद महाराज यांची प्रतिमा देऊन सर्व विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
अस्सेस टू जास्टीस फॉर चिल्ड्रन प्रकल्प अंतर्गत कळंब येथे जागतिक बाल कामगार विरोधी दिन साजरा
कळंब (प्रतिनिधी)- युवा ग्राम अस्सेस टू जास्टीस फॉर चिल्ड्रन प्रकल्प अंतर्गत कळंब येथे जागतिक बाल कामगार विरोधी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये स्थानिक समाजातील विविध प्रतिनिधी व पालकांच्या उपस्थितीत बाल हक्कांची जाणीव वाढविण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमात कळंब पोलीस स्टेशनच्या उपनिरीक्षक प्रभा कुंडगे यांनी बालकांना व पालकांना बालकामगारांविरोधी कायदे व त्यांचे पालन करण्याची गरज यावर प्रकाश टाकला. त्याचबरोबर, त्यांनी बालकांनी शिक्षणावर लक्ष केंद्रित करावे व पालकांनी मुलांना कामासाठी भागवू नये, असे आवाहन केले. युवा ग्रामचे एच पी देशमुख यांनी बालकामगारांच्या कायद्याविषयी सविस्तर माहिती दिली. त्यांनी आदिवासी पारधी समाजाच्या प्रश्नांवर चर्चा करताना, या समाजातील मुलांच्या कल्याणासाठी केलेल्या कामांचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी अंगणवाडी सेविका, आशा ताई व अंगणवाडी मदतनीस यांच्यासह युवा ग्राम विकास मंडळ अंतर्गत चालत असलेल्या अक्सेस टू जस्टीस प्रकलपाचे प्रमुख संतोष रेपे, राहुल देशमुख, प्रकाश काळे, सुनीता विभुते, संभाजी वळशे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी आपला मोलाचा परिश्रम घेतला. या कार्यक्रमामध्ये बाल हक्कांची जाणीव वाढविण्यासाठी विविध मार्गदर्शन व चर्चा आयोजित करण्यात आली. या उपक्रमातून बालकांचे संरक्षण व त्यांचे हक्क याबाबत जनजागृती करण्यात आली.
दाढी उधार न केल्याने हल्ला; आरोपी फरार
धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील पोस्ट ऑफिसजवळील ‘क्लासिक जेंट्स पार्लर'या सलूनमध्ये दाढी उधार न केल्याच्या कारणावरून एका नाभिक व्यावसायिकावर प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना 9 जून रोजी रात्री 9.30 वाजता घडली असून, हल्ल्यात ऋतुराज बालाजी मोरे (वय 19) हे गंभीर जखमी झाले आहेत. आरोपी बबलू सूर्यवंशी याने धारदार शस्त्र व लाथाबुक्क्यांनी मोरे यांच्यावर हल्ला केला आणि घटनास्थळावरून पसार झाला. महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या धाराशिव जिल्हा शाखेने जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन हल्लेखोरास तात्काळ अटक करण्याची, सलून व्यावसायिकांना पोलिस संरक्षण देण्याची व पोलिसांनी अशा घटनांवर गंभीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. जर या मागण्यांकडे दुर्लक्ष झाले तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा दिला आहे. ही घटना शहर पोलीस ठाण्यापासून काहीच अंतरावर घडूनही आरोपी फरार होण्यात यशस्वी झाल्याने पोलिसांच्या तत्परतेवर तसेच कार्यक्षमतेवर संशय व्यक्त करण्यात येत आहे. आरोपीने स्वतः पलायन केले की त्याला मदत झाली. यावरून शहरात विविध चर्चा सुरू आहेत. यामुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांवरील विश्वास डळमळीत होत आहे. निवेदनावर जिल्हाध्यक्ष लक्ष्मण माने, जिल्हा कार्याध्यक्ष धनंजय राऊत, जिल्हा संघटक किशोर राऊत,जिल्हा सरचिटणीस दाजी पवार, जिल्हा उपाध्यक्ष जगन्नाथ पवार,शहराध्यक्ष गणेश वाघमारे,सामाजिक कार्यकर्ते सचिन चौधरी यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांचा स्वाक्षऱ्या आहेत.
मुंबईकडे जाणारा 1 लाख 65 हजार रूपयांचा गांजा जप्त
धाराशिव (प्रतिनिधी)- अमली पदार्थांची विक्री थांबवण्याच्या उद्देशाने स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या गस्तीदरम्यान मुंबईकडे विक्रीसाठी नेण्यात येणारा 1 लाख 65 हजार 400 रुपये किंमतीचा 8.27 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. ही धडक कारवाई 12 जून 2025 रोजी पहाटे येडशी येथील हॉटेल समाधानसमोर करण्यात आली. पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी दिलेल्या आदेशानंतर सपोनि सुदर्शन कासार व त्यांच्या पथकाने गस्तीदरम्यान एका काळ्या बॅगेसह संशयित इसमाला अडवले. विचारणा केली असता त्याने बॅगेत गांजा असल्याची कबुली दिली. तातडीने ग्रामीण पोलिसांच्या मदतीने पंचनामा करून सदर गांजा जप्त करण्यात आला. वसंत भालचंद्र शिंदे (रा. वाखरवाडी, ता. जि. धाराशिव) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव असून तो ढोकी येथून ट्रॅव्हल्सद्वारे मुंबईला गांजा विक्रीसाठी नेत असल्याची कबुली तपासात समोर आली आहे. त्याच्यावर पोलीस ठाणे धाराशिव ग्रामीण येथे गुन्हा क्रमांक 125/25, कलम 8 (क), 20 (ब)(2)(ब) एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक रितू खोखर, अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानीय गुन्हे शाखेचे निरीक्षक विनोद इज्जपवार, पोलिस निरीक्षक मारुती शेळके, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुदर्शन कासार, पोलिस उपनिरीक्षक उद्धव हाके, हवालदार शौकत पठाण, प्रकाश औताडे, जावेद काझी, फरहान पठाण, तसेच डॉग स्कॉडचे सुजित वडणे व संतोष शाहीर, वाघमारे, भांतलवंडे, चालक रत्नदीप डोंगरे, रामलिंग बनाळे यांच्या संयुक्त प्रयत्नांतून यशस्वीपणे पार पडली.
अष्टविनायक चौक ते बाबर चौक दरम्यानचे रस्त्यातील पोल हटविले
धाराशिव (प्रतिनिधी) - शहरातील प्रभाग क्रमांक चार मधील अष्टविनायक चौक ते बाबर चौक या कच्च्या रस्त्यावर मजबूत व दणकट तसेच टिकाऊ हॉट मिक्स डांबरीकरण करण्याचे काम सुरू आहे. मात्र या रस्त्याच्या अगदी मधोमध विद्युत पोल असल्यामुळे वाहतुकीस अडचण निर्माण होत होती. ते काढण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे वारंवार मागण्या निवेदने व आंदोलने केली. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने ते पोल दि.11 जून रोजी पाठविले आहेत. त्यासाठी शिवसेना (ठाकरे) चे धाराशिव शहर संघटक प्रशांत उर्फ बापू साळुंके यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. साळुंके यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आल्यामुळे या परिसरातील नागरिकांना रस्त्यातील पोलच्या अडथळ्याचा सामना करावा लागत होता. मात्र आता ती समस्या कायमस्वरूपी दूर झाली आहे. धाराशिव शहरातील प्रभाग क्रमांक 4 मधील अष्टविनायक चौक ते बाबर चौक या कच्च्या रस्त्याचे हॉट मिक्स डांबरीकरण रस्ता करण्यासाठी आमदार कैलास पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून 96 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. ते काम करताना रस्त्याच्या मधोमध 18 विद्युत पोल उभे होते. त्यामुळे वाहतुकीला प्रचंड मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत होता. ते काढण्यासाठी शिवसेना (ठाकरे) चे धाराशिव शहर संघटक प्रशांत उर्फ बापू साळुंके यांनी विद्युत वितरण कंपनी तसेच जिल्हा प्रशासनाकडे वारंवार निवेदने व आंदोलन करून ही मागणी सातत्याने लावून धरली. त्यांच्या पाठपुराव्यामुळे दि.11 जून रोजी ते वाहतुकीस अडथळा ठरत असलेले 18 विद्युत पोल जेसीबीच्या साह्याने हटविण्यात आले आहेत. त्या रस्त्याच्या बाजूला नवीन 18 पोल आणि 2 डी.पी. बसविण्यात आले आहेत. विशेष म्हणजे साळुंके हे अपघातात जखमी झाल्यामुळे ते रुग्णालयात बेडवर उपचार घेत आहेत. मात्र, समाजसेवेचा वसा जपत त्यांनी दवाखान्यातून या कामाचा फोनद्वारे पाठपुरावा करून शासकीय यंत्रणेला कामाला लावले आहे. ते काम अर्धवट न ठेवता पूर्ण केलेले आहे. त्यांच्या सामाजिक बांधिलकीच्या कृतीमुळे या भागातील नागरिकांची कायमची अडचण दूर झालेली आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक 4 मधील नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला असून साळुंके यांच्या कामाचे कौतुक करीत आहेत.
अहमदाबादमध्ये कोसळलेल्या विमानाची किंमत किती?
Ahmedabad Plane Crash: गुरुवारी अहमदाबाद विमानतळाजवळ एअर इंडियाचे एक प्रवासी विमान कोसळले. हे विमान लंडनला जात होते. डीजीसीएनुसार, या विमानात 12 क्रू मेंबर्ससह 254 लोक होते. माहितीनुसार, हे एअर इंडियाचे एआय 171 फ्लाइट होते. फ्लाइटराडार24 नुसार, उड्डाणानंतर काही सेकंदातच या विमानाशी संपर्क तुटला. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी देखील या विमानात होते.
देशातील भाव कळण्यासाठी शेतकऱ्यांनी ईनाम ॲप घ्यावा - कटरे
तुळजापूर (प्रतिनिधी)- ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आपल्या मालाची विक्री भारतातील बाजारपेठेत करता यावी म्हणून ईनाम बाजार पेठ सुरु केली असुन मोबाईल मध्ये ईनाम अँप्लीकेशन डाऊनलोड करुन त्या माध्यमातून विकुन आपले उत्पन्न वाढवावे असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समिती तुळजापूरमध्ये ई-नाम अंतर्गत मार्गदर्शक श्री रंगनाथ कटरे यांनी सखोल मार्गदर्शन करताना केले. या कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी सभापती आशिष सोनटक्के, होतेतर यावेळी उपसभापती सुहास गायकवाड उपस्थित होते. केंद्र शासनाचे नवीन धोरणानुसार इ-नाम योजनेबाबत शेतकरी, व्यापारी, हमाल, तोलार बांधव यांचेसाठी बाजार समितीने सदरचे प्रशिक्षण आयोजित केलेले होते. या प्रणालीअंतर्गत कृषि उत्पन्न बाजार समिती, तुळजापूरचा समावेश करण्यात आलेला आहे. यावेळी बोलताना कटारे पुढे म्हणाले कि, एक राष्ट एक बाजार पेठ ही संकल्पना शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी शाषणाने आणली. 2016 घराघरात मोबाईल पोहचले मोबाईल या डिझिटल माध्यमाचा वापर करुन देशात शेतकऱ्यांना आपला शेतमाल कधीही विक्री करता यावा म्हणून ईनाम सुरु केले. यामुळे शेतात बसुन शेतकऱ्यांना देशात माल विकण्याचा अधिकार मिळाला. आज कोट्यावधी शेतकरी तीन लाखव्यापारी तीन लाख आडत व्यापारी 4438 शेतकरी उत्पादक संघटना या राष्ट्रीय कृषी बाजार पेठ माध्यमातून 1,88,208 मेट्रीक टन शेतमालाची उलाढाल करुन शेतकरी व्यापारी आडते शेतकरी उत्पादक संघटना यांनी आपले उत्पन्न दुप्पट करुन घेतले आहे. याप्रसंगी बाजार समितीचे सभापती आशिष सोनटक्के यांनी बाजार समितीचा समावेश ई-नाममध्ये करण्यात आलेला असल्याने तालुक्यातील शेतक-यांनी शेतमाल विक्रीवेळी आधारकार्ड, बॅक पासबुक,मोबाईल क्रमांक इ.बाजार समितीत जमा करुन ई-नाम अंतर्गत ऑनलाईन नोंदणी करुन घ्यावी असे आवाहन तालुक्यातील शेतक-यांना केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बाजार समितीचे सचिव उमेश भोपळे यांनी केले. याप्रसंगी बाजार समितीचे संचालक संतोष कदम बालाजी दादा रोचकरी, दत्ता वाघमारे, जेष्ठ व्यापारी बचाटे, संभाजी मुळे, अंकुश ननवरे, सागर भोसले, महेश डोंगरे, सतिश मुदडा, वसंत पवार,चंद्रकात सोमवसे, हमाल, तोलार, बाजार समितीचे कर्मचारी चव शेतकरी बांधव मोठया प्रमाणात उपस्थित होते.
डिजीलॉकरमध्ये विजेची बिले उपलब्ध; लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहन
धाराशिव (प्रतिनिधी)- आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसेन्स, उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला अशी महत्त्वाची कागदपत्रे इलेक्ट्रॉनिक स्वरुपात सुरक्षित ठेऊन हवे तेव्हा उपलब्ध करून देणाऱ्या केंद्र सरकारच्या डिजिलॉकर या ऑनलाईन सुविधेमध्ये आता महावितरणची वीजबिलेही उपलब्ध झाली असून वीज ग्राहकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक मा. लोकेश चंद्र यांनी बुधवारी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्याधुनिक माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून वीज ग्राहकांना ईज ऑफ लिव्हिंगच्या आधारे अधिकाधिक सेवा देण्याची सूचना केली आहे. त्यानुसार महावितरणने केंद्र सरकारच्या डिजिलॉकरशी वीजबिले जोडली आहेत. यामुळे वीज ग्राहकांना आपल्या मोबाईल फोनमध्ये डिजिलॉकर ॲपमध्ये ठेवलेल्या महत्त्वाच्या दाखल्यांसोबतच वीजेची बिलेही उपलब्ध होणार आहेत. त्यांना वीजबिल भरण्यासाठी तसेच गरजेनुसार हे बिल कोणाला पाठविण्यासाठी किंवा त्याचा प्रिंट काढण्यासाठी याचा उपयोग होईल. डिजिलॉकर हा केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने डिजिटल इंडिया कार्यक्रमाच्या अंतर्गत सुरू केलेला महत्त्वाचा उपक्रम आहे. त्याचा वापर करून नागरिकांना आपले पॅन कार्ड, वाहन नोंदणी कागदपत्रे, रेशन कार्ड, दहावी मार्कशीट, बारावी मार्कशीट, निवासाचा दाखला असे अनेक दस्तऐवज ॲपमध्ये सुरक्षित ठेवता येतात आणि गरजेनुसार त्यांचा वापर करता येतो. सर्व दाखले मोबाईलच्या ॲपमध्ये ठेवलेले असल्याने ते सदैव सोबत उपलब्ध राहतात. देशात आतापर्यंत 52 कोटी 89 लाख नागरिकांनी डिजिलॉकरचा वापर सुरू केला असून त्यांनी त्यात 859 कोटी कागदपत्रे ठेवली आहेत. माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 च्या नियमावलीनुसार डिजिलॉकरमधील दस्तऐवज मूळ कागदी प्रत्यक्ष दाखल्याच्या समान समजले जातात व त्याला कायदेशीर दर्जा आहे. महावितरणने आपल्या संगणकीय व्यवस्थेतील बिलांची माहिती डिजिलॉकर सुविधेला उपलब्ध करून दिली आहे. वीज ग्राहकाने आपल्या डिजिलॉकर ॲपमध्ये गेल्यानंतर महावितरण वीज कंपनीची निवड करून आपला वीज ग्राहक क्रमांक दाखल करण्याची कृती एकदाच करायची आहे. त्यानंतर त्या ग्राहकाला आपल्या डिजिलॉकरमध्ये विजेचे चालू महिन्याचे बिल उपलब्ध होईल.
युवकाचा खून करुन मृतदेह अर्धवट पुरला
फलटण : ठाकुरकी (ता. फलटण) येथे संदीप मनोहर रिटे (वय 35) या युवकाचा खून करून मृतदेह अर्धवट अवस्थेत पुरल्याचे आढळून आले आहे. फलटण शहर पोलिसांकडून व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार डोक्यास व गळ्यावर गंभीर जखमा करून तसेच गुप्तांग अर्धवट कापलेल्या अवस्थेत मृतदेह मिळाल्याने फलटण व परिसरात खळबळ उडाली असून मृत संदीप रिटे यांच्या कथित खुनाचा तपास [...]
तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील काटगाव येथील सरपंच अशोक दगडू माळी यांना अपात्र घोषित करून त्यांचे सरपंच रद्द करण्याच्या आदेश छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी दिले आहेत. काटगावच्या सरपंचाचे पद रद्द झाल्याने काटगाव परीसरातील राजकारणात खळबळ उडाली आहे.या ग्रामपंचायत चा भष्ट्राचार अनागोंदी मनमानी कारभाराचे लक्तरे दैनिक पुण्यनगरीत प्रसिध्द झाले होते. तुळजापूर तालुक्यातील काटगाव येथील सरपंच अशोक दगडू माळी यांच्याविरुद्ध सुनील राजाराम रोकडे मौजे काटगाव तालुका तुळजापूर व इतर यांनी विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांच्या न्यायालयात महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 च्या कलम 39(1) नुसार तक्रार दाखल केली होती त्या अनुषंगाने मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धाराशिव व गटविकास अधिकारी पंचायत समिती तुळजापूर यांचे अहवाल मागून घेण्यात आले होते. ज्यामध्ये असे आरोप ठेवण्यात आले होते की, सरपंच जे गावात मनमानी कारभार करून ग्रामपंचायतमध्ये जमा झालेली रक्कम ग्रामनिधीमध्ये जमा न करता परस्पर हातावर खर्च करून अनियमित्ता केल्याचे स्पष्ट होते, विविध लोकांना अधिकार नसताना वारस प्रमाणपत्र देणे, ग्रामपंचायत 100/- रुपयाचे आदर आधारे मालमत्तेचे हस्तांतरण नोंद मंजूर करून घेणे व नमुना नंबर 8 वर नोंद घेणे, आर्थिक अनिमित्तता, अधिकार नसताना मनीषा खोबरे व रेवन खोबरे यांना रहिवाशी प्रमाणपत्र देणे, शासकीय नियमाप्रमाणे मागासवर्गीय विकासाकरता 15% तसेच दिव्यांग कल्याण करता 3% टक्के रक्कम खर्च न केल्यामुळे, यासह इतरही अनेक आरोप सिद्ध झाल्यामुळे अशोक दगडू माळी सरपंच ग्रामपंचायत काटगाव तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव यांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 च्या कलम 39(1) चे उल्लंघन केल्यामुळे त्यांना ग्रामपंचायतच्या सरपंच पदावरून सांप्रत कालावधीसाठी अपात्र घोषित करण्यात आले आहे, याप्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धाराशिव यांचा अहवालही त्यांचे विरोधात गेलेला होता यातील सर्व आरोप सुनावणीअंती सिद्ध झाले होते. तुळजापूर तालुक्यातील काटगाव गावचे सरपंच अपात्र झाले असुन त्यांचे सरपंच पद रद्द झाल्याने काटगाव परिसरात खळबळ उडाली असून या राजकीय घडामोडीमुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे.
आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यावर गुन्हा दाखल
तुळजापूर (प्रतिनिधी)- शहरातील पोलीस कॉर्टर एस.टी. कॉलनी तुळजापूर येथील पंधरा वर्षीय मुलीला तु प्रेम कर व लग्न कर नाही तर सोशल मिडीयावर तुझी बदनामी करेल व पिस्तुलने मारुन टाकीन अंशी धमकी दिल्याने त्यांचे जाचास व त्रासास कंटाळुन मुलगी सारिका शिकारे हिनी राहत्या जागी दिनांक 31 मे ते 1 जून रोजी आत्महत्या केली. सदर प्रकरणी 10 जून रोजी तुळजापूर पोलिस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. विशेष म्हणजे पोलिस विभागात काम करणाऱ्या व्यक्ती सारिका शिकारे ही मुलगी आहे. याबाबत प्राप्त झालेल्या माहितीनुसार तुळजापूर शहरातील पोलीस कॉर्टर एस.टी. कॉलनी तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव येथे दिनांक 31 मे व 1 जून मध्यरात्री चार वाजण्याच्या सुमारास सारिका बिजली शिकारे, वय 15 वर्षे, 5 महिने रा. राजेश नगर ढोकी ता. जि. धाराशिव हल्ली मुक्काम पोलीस कॉर्टर एस.टी. कॉलनी तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी राहत्या घरी ओढणीच्या साह्याने गळफास घेवून आत्महत्या केली. सारिका हीस आरोपी यांनी प्रेम कर व लग्न कर नाहीतर सोशल मिडीयावर बदनामी करेल. माझ्या कडील पिस्तुलने मारुन टाकीन अंशी धमकी दिल्याने त्यांचे जाचास व त्रासास कंटाळुन सारिका शिकारे यांनी आत्महत्या केली. अशा प्रकारची फिर्याद मयत यांची आई बिजली (निशा) शिकारे यांनी दिनांक 10 जून रोजी तुळजापूर पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी ओंकार कांबळे, नगिना शशिंकात पांडागळे दोघे रा. कांक्रबा ता. तुळजापूर जि. धाराशिव यांच्या विरोधात तुळजापूर पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता.कलम- 107,351(3), 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश नरवडे हे करत आहेत. पोलीस कॉन्स्टेबल निशा शिकारे यांची एकुलती एक कन्या असून तिच्या आकस्मिक मृत्यूमुळे खळबळ व्यक्त केली जात आहे. तर याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून न्यायालयात उभे केले असता दोन्ही आरोपींना 13 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आली आहे.
भूममध्ये शिवसेनेचे घंटानाद व धरणे आंदोलन
भूम (प्रतिनिधी)- शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या लबाड महायुती सरकारचा जाहिर निषेध आणि सरकारच्या खोट्या आश्वासनांचा पर्दाफाश करत दि. 11 जून रोजी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने भूम तहसील कार्यालयासमोर भव्य घंटानाद आणि धरणे आंदोलन छेडण्यात आले. या आंदोलनात विविध प्रलंबित मागण्यांसाठी आवाज उठवण्यात आला. दुपारी 12.30 वाजल्यापासून सुरू झालेल्या आंदोलनात संतप्त कार्यकर्त्यांनी “क्या हुवा तेरा वादा?” असे सवाल करीत शासनाच्या दिशाभूल करणाऱ्या धोरणांचा निषेध नोंदवला. जर शासनाने मागण्या तात्काळ मंजूर करून अंमलात आणल्या नाहीत, तर पुढील काळात अधिक तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा देण्यात आला होता. शेतकऱ्यांची तात्काळ कर्जमाफी, किसान सन्मान योजनेअंतर्गत दरवर्षी 15,000 मिळावेत, महिलांना दरमहा 2100 मानधन, . 45,000 पानंद रस्त्यांचे बांधकाम,अनुदान परत मिळावे, वृध्द नागरिकांना 2100 पेन्शन, शेतीसाठी 24 तास वीज पुरवठा, 'हर घर जल, हर घर छत'योजनेतून घरकुल अनुदान, गोदावरी - कृष्णा खोऱ्यातील पाणी मराठवाड्याला देऊन वॉटर ग्रीड योजना. भूम शहरात प्रीपेड मीटर धोरण तात्काळ रद्द, अमृत योजना -2.0 योजनेअंतर्गत नळ कनेक्शनवरील मीटर बसविण्याला विरोध या आंदोलना दरम्यान शिवसेना नेत्यांनी भूम तहसीलदारांच्या जयवंत पाटील यांच्या मार्फत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना निवेदन दिले. यावेळी शिवसेना उबाटा गटाचे जिल्हाप्रमुख रणजीत पाटील, अनिल शेंडगे, चेतन बोराडे, दिलीप शाळू महाराज, प्रकाश आकरे, महिला संघटक उमाताई रणदिवे, अब्दुल सय्यद, अविनाश गटकळ, अजय कोकाटे, रफीक तांबोळी, श्रीमंत भडके व अनेक शिवसैनिक उपस्थित होते.
तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणे पुजाऱ्यांना भोवले; 8 जणांना कारणे दाखवा नोटीस
तुळजापूर (प्रतिनिधी)- श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करून थुंकणाऱ्या आठ पुजाऱ्यांवर मंदिर संस्थानने कडक कारवाईची भूमिका घेतली आहे. मंदिराच्या शिस्तीला बाधा निर्माण करणाऱ्या अशोभनीय वर्तनामुळे संबंधित पुजाऱ्यांना 'कारणे दाखवा'नोटीस बजावण्यात आली असून, तीन महिन्यांसाठी मंदिरप्रवेश बंदीची कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संबंधित पुजाऱ्यांनी मंदिर परिसरात तंबाखूजन्य पदार्थ खाऊन थुंकल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे आढळून आले आहे. यामुळे मंदिर प्रशासनाने तातडीने दखल घेत, देऊळ कवायत कलम 24 व 25 अन्वये संबंधितांवर नोटीस बजावली आहे. पुजाऱ्यांचे वर्तन अशोभनीय मंदिर प्रशासनाने नोटीसमध्ये स्पष्ट केले आहे की, पुजारी व्यवसायास अशा प्रकारचे वर्तन शोभणारे नसून, मंदिर परिसरातील पावित्र्याला बाधा पोहोचवणारे आहे. यामुळे मंदिराचे कायदा व सुव्यवस्थेचे उल्लंघन होत असून, शिस्तीचा भंग होत आहे. नोटीस मिळाल्यानंतर तीन दिवसांच्या आत स्पष्टीकरण सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अन्यथा, मिळालेला खुलासा असमाधानकारक असल्यास तीन महिन्यांची मंदिरप्रवेश बंदी घालण्यात येईल, असेही नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. कारणे दाखवा नोटीस मिळालेल्या पुजाऱ्यांची नावे वैभव विशाल भोसले, विशाल दादासाहेब मगर, लखन रोहिदास भोसले, विशाल हनमंत चव्हाण, विशाल बाळासाहेब गंगणे, अक्षय किशोर कदम-भैय्ये, राहुल हनुमंत पवार, धीरज राजू चोपदार. मंदिर प्रशासनाची कडक भूमिका श्री तुळजाभवानी मंदिर राज्यातील एक प्रमुख आणि पवित्र तीर्थक्षेत्र असून, दररोज हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. अशा पवित्र जागी तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करून थुंकणे हे अत्यंत अशोभनीय असून, भाविकांच्या भावना दुखावणारे आहे. त्यामुळे भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी मंदिर प्रशासनाने कडक पावले उचलण्याचे ठरवले आहे.
दाळिंब येथे मका पीक उत्पादन व संगोपन परिसंवाद संपन्न
उमरगा (प्रतिनिधी)- उमरगा तालुक्यातील डाळींब येथे एसएचके केमटेक एलएलपी कंपनी उमरगा मार्फत मक्का पीक विषयी मार्गदर्शन परिसंवाद मेळव्याचे आयोजन करण्यात आलेले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भाऊसाहेब बिराजदार बँकेचे चेअरमन सुरेश बिराजदार, तर मुख्य मार्गदर्शक म्हणून सिनियर कृषितज्ज्ञ मा. डॉ बी डी जडे, जैन ईरेगिशन लिमिटेड जळगाव व तसेच प्रमुख पाहुणे म्हणून तालुका कृषी अधिकारी डी. बी. रितापुरे, यशवंत वानखेडे एम जी एम महाराष्ट्र बँक, प्रशांत जैसवाल, सरपंच परशुराम देवकते, बाबा जाफरी, सुनील कोचेटा, नीलम अजमेरा , प्रथमेश कोचेटा, श्रेयांश अजमेरा, सुनील होनराव जनरल मॅनेजर एस एच के कंपनी व सर्व कर्मचारी व गावातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्तिथ होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांचे मनोगत व त्या नंतर प्रामुख मार्गदर्शकाचे मका पिका विषयी सविस्तर मार्गदर्शन , हॅक्क्टरी मिळणारे उत्पादन, व नफा, पूर्वतयारी, संगोपन या विषयी सविस्तर मार्दर्शन झाले अध्यक्षीय सामारोप करत असताना सुरेश बिराजदार यांनी मका पिकातुन उत्पादन व शिल्लक राहिलेल्या धाटा पासून निर्माण होणारे नॅच्युरल गॅस व त्यातून होणार नफा या वर सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी सरपंच परशुराम देवकाते, उपसरपंच ओमप्रकाश टिकांबरे, असिफ शिलार, बालाजी सातपुते, इरफान झागिरदार, ग्रामपंचायत कर्मचारी व एस एच के कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.
दिव्यांग व जेष्ठ नागरिकांसाठी करणार शिबिरांचे आयोजन- खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर
धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव लोकसभा मतदार संघातील दिव्यांग व 60 वर्षे वयोमर्यादा पूर्ण केलेल्या जेष्ठ नागरिकांसाठी मोफत अत्याधुनिक साहित्य वाटपासाठी तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या दिव्यांगजन स्वशक्तीकरण विभागाकडून अधिकृत मंजुरी प्राप्त झाली असून, याचे आयोजन खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या पुढाकाराने करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव येथे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पूर्व नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीकरीता खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील, आमदार प्रवीण स्वामी जिल्हाधिकारी किर्ती कुमार पुजार, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मैनिक घोष जिल्हा परीषदचे समाज कल्याण विभागाचे खामीतकर यांच्यासह सर्व पंचायत समितीचे बी.डी.ओ. जिल्हा शैल्य चिकित्सक उपस्थीत होते. यामध्ये जिल्हा प्रशासन, विविध विभागांचे अधिकारी व लोकप्रतिनिधींनी सहभाग घेतला. बैठकीत ठरविण्यात आले की, 15 जुलैनंतर मतदार संघातील प्रत्येक तालुक्यात तपासणी शिबिरे घेतली जातील. या शिबिरांमध्ये पात्र दिव्यांग व जेष्ठ नागरिकांना खालील अत्याधुनिक साहित्याचे मोफत वाटप केले जाणार आहे. दिव्यांगांसाठी: ट्रायसायकल, मोटराईज ट्रायसायकल, व्हीलचेअर, कुबडी, स्मार्ट केन, सुगम केन, स्मार्ट फोन, डिजीटल श्रवणयंत्र, जेष्ठ नागरिकांसाठी: बेल्ट (मान, पाठ, गुडघा व पायासाठी), काठ्या, कमोड चेअर, व्हीलचेअर, डोळ्यांचे चष्मे, दातांची कवळी, श्रवणयंत्र इत्यादी. या लाभासाठी दिव्यांगांनी खालील कागदपत्रांसह शिबिरात उपस्थित राहणे आवश्यक आहे दिव्यांग प्रमाणपत्र, आधार कार्ड, रेशन कार्ड किंवा उत्पन्नाचा दाखला तपासणीसाठी भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम, मुंबई येथील तज्ञ डॉक्टरांची टीम प्रत्येक तालुक्यातील शिबिरांमध्ये उपस्थित राहणार आहे.खासदार ओमराजे निंबाळकर यांनी धाराशिव लोकसभा मतदार संघातील सर्व दिव्यांग व जेष्ठ नागरिकांना या महत्त्वपूर्ण उपक्रमाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.
विमान अपघातात नुकसान भरपाई कुणाकडून, कंपनी की सरकार? पीडितांच्या कुटुंबीयांसाठी नियम काय पाहा
Plane Crash Insurance Payout : अहमदाबादहून उड्डाण घेतल्यानंतर 242 प्रवाशांसह एअर इंडियाचे विमान कोसळले आहे. यामध्ये अनेक जण जखमी झाले असून अशा प्रकरणात प्रवास विमा आणि विमान अपघात झाल्यास काय होते जाणून घ्या.
Crime Diary: ही जादूटोणा करते... 200 मीटर पळवलं अन् मग भयंकर घडलं, धडकी भरवणारी घटना
एका संशयातून त्याने महिलेची गोळ्या झाडून हत्या केली. ती महिला आपल्यावर जोदूटोणा करते, ती आपली जीव घेईल याची भीती त्याला होती. त्यातून या व्यक्तीने एका निर्दोष महिलेला संपवलं.
अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनच्या गॅटविक विमानतळाकडे निघालेलं एअर इंडियाचं बोईंग 787-8 ड्रीमलाइनर विमान (AI 171) उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या पाच मिनिटांतच कोसळले. या विमानाचे संचालन कॅप्टन सुमीत सभरवाल आणि फर्स्ट ऑफिसर क्लाइव्ह कुंदर यांच्या नियंत्रणाखाली होतं. या दोघांचा एकत्रित उड्डाण अनुभव तब्बल 9,300 तासांचा असल्याची माहिती नागरी उड्डाण महासंचालनालयाने (DGCA) गुरुवारी दिली. […]
2 नवजात बालक, 11 लहान मुलं, 169 भारतीय तर 53 ब्रिटीश नागरीक, विमानात कोण-कोण होतं?
Ahmedabad Plane Crash News : अहमदाबादमध्ये मोठी विमान दुर्घटना घडली आहे. लंडनला जाणारे विमान उड्डाणानंतर 15 किमी अंतरावर मेघानी परिसरात कोसळले. विमानात दोन नवजात बालकांसह 242 प्रवासी होते. यात 169 भारतीय, 53ब्रिटीश आणि इतर नागरिक होते. अपघातापूर्वी वैमानिकाने धोक्याचा संदेश पाठवला होता. अग्निशमन दल आणि बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली असून मदतकार्य सुरू आहे. या दुर्घटनेमुळे देशभरात खळबळ उडाली आहे.
काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं, मी सुन्न झालोय, Air India Plane Crash घटनेचा कलाकारांनाही धक्का
Celebs Reaction on Ahmedabad Air India Plane Crash: गुजरातच्या अहमदाबादमध्ये मोठी विमान दुर्घटना घडली आहे. तब्बल २३० हून अधिक प्रवाशांना घेऊन जाणारं प्रवासी विमान अहमदाबादच्या मेघानीनगपरिसरात कोसळलं आहे.
Mahapalika Election 2025: स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत जिल्हाधिकारी केंद्रस्थानी
पारदर्शी कारभारासाठी एकहाती लक्ष ठेवण्याचा हा प्रयत्न आहे का? By : संतोष पाटील कोल्हापूर : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘ड’ वर्ग महानगरपालिकांच्या प्रभाग रचनेसाठी प्रथमच जिल्हाधिकाऱ्यांना थेट अधिकार देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे प्रभाग रचनेची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवडणूक आयोगाकडे सादर केली जाणार आहे. हा बदल प्रशासकीय असला तरी राजकीयदृष्ट्याही याला कंगोरे असल्याचे तज्ञांचे [...]
Ahmedabad Plane Crash – Air India चे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांच्याकडून दुःख व्यक्त
गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या विमानाला अपघात झाला आहे. अहमदाबादमधील मेघानीमध्ये Air India चं विमान कोसळल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात मोठी जीवितहानी झाल्याची शंका वर्तवली जात आहे. अपघातस्थळावरून आकाशात धुराचे लोळ उठत आहेत. अहमदाबाद विमानतळावरून विमानाने उड्डाण घेतल्यानंतर लगेचच ही दुर्घटना झाल्याचे सांगण्यात येत आहे. या दुर्घटनेबाबत एअर इंडियाचे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांनी दुःख […]
पायलटचा मेसेज... काही सेकंदांची शांतता आणि मोठ्ठा स्फोट, अपघातापूर्वी वैमानिकाचे अखेरचे शब्द कोणते?
Air India Flight Crash : डीजीसीएने दिलेल्या माहितीनुसार, एअर इंडियाचे बोईंग 787 विमान अहमदाबादहून उड्डाण केल्यानंतर अवघ्या काही मिनिटात कोसळले.
Air India Crash Ahmedabad: विमान अपघातानंतर अहमदाबाद विमानतळ प्रशासनाचा मोठा निर्णय
एअर इंडियाच्या AI 171 या विमानाचा गुरुवारी दुपारी उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटांतच अपघात झाला. लंडनच्या गॅटविक विमानतळाकडे निघालेलं हे विमान उड्डाणानंतर केवळ पाच मिनिटांत अहमदाबादमधील मेघाणी नगर या रहिवासी परिसरात कोसळले. या घटनेनंतर सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ (SVPIA) तात्पुरता बंद करण्यात आला असून, पुढील आदेश मिळेपर्यंत सर्व उड्डाणे आणि विमानवाहतूक बंद राहणार असल्याचे विमानतळ […]
Ahmedabad Plane Crash- 625 फूट उंचीवर पोहोचलेले विमान, उड्डाणाच्या 1 मिनिटातच कोसळले
अहमदाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान कोसळले आहे. उड्डाणानंतर अवघ्या 1 मिनिटातच विमान कोसळले. ज्याचा व्हिडिओही समोर आला आहे. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की विमानाने उड्डाण केले आणि नंतर ते 625 फूट उंचीवर पोहोचले, परंतु काही क्षणातच विमान खाली येऊ लागले. काही क्षणातच विमान खाली पडले आणि मग एक मोठा स्फोट झाला. फ्लाइट […]
Air India Plane Crash –अमित शहा तातडीने अहमदाबादकडे रवाना
गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळल्याने खळबळ उडाली. लंडनच्या गॅटविक विमानतळाकडे जाणारे हे विमान उड्डाणानंतर काही क्षणात कोसळले. अपघातग्रस्त विमानामध्ये 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर होते. यात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही समावेश असल्याचे समोर येत आहे. त्यांचे विमान तिकीट आणि बोर्डिंग पासचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. एअर इंडियाचे […]