खामेनी यांच्या समर्थनार्थ निदर्शने करणाऱ्यांची सुटका करा, मेहबूबा मुफ्ती यांची सरकारकडे मागणी
जम्मू-कश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या नेत्या मेहबूबा मुफ्ती यांनी प्रशासनाकडे एका विशेष गटाच्या सुटकेची मागणी केली आहे. इराणचे सर्वोच्च नेते आयतौल्ला अली खामेनी यांच्या निधनानंतर कश्मीरमध्ये काढण्यात आलेल्या शोक मोर्चादरम्यान ताब्यात घेतलेल्या तरुणांना त्वरित सोडून देण्यात यावे, अशी मागणी मुफ्ती यांनी केली आहे. नेमके प्रकरण काय? काही महिन्यांपूर्वी इराणचे नेते आयतौल्ला अली खामेनी […]
तुमच्या कामाशी काम ठेवा, रशियन तेलाच्या मुद्द्यावरून कमल हासन यांचे डोनाल्ड ट्रम्प यांना खुले पत्र
दाक्षिणात्य सुपरस्टार आणि मक्कळ नीधी मय्यम (MNM) पक्षाचे अध्यक्ष कमल हासन यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कडक शब्दांत सुनावले आहे. रशियाकडून तेल खरेदी करण्याच्या मुद्द्यावरून हिंदुस्थानला दिलेल्या धमकीवजा सूचनेनंतर हासन यांनी ट्रम्प यांना “तुमच्या कामाशी काम ठेवा” (Mind your own business) असे खडेबोल सुनावले आहेत. नुकतेच अमेरिकेने हिंदुस्थानी तेल कंपन्यांना रशियाकडून कच्चे तेल खरेदी […]
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या बंगाल दौऱ्यावरून आणि त्यांच्या विधानांवरून आक्रमक पवित्रा घेतला आहे. राष्ट्रपतींचा आपल्याला आदर आहे, पण त्यांनी भाजपच्या अजेंड्यावर काम करू नये, अशा शब्दांत ममतांनी आपली नाराजी व्यक्त केली. राष्ट्रपती जर वर्षातून ५० वेळा राज्यात येणार असतील, तर प्रत्येक वेळी त्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणे आपल्याला शक्य नाही, […]
अमेरिकेसमोर झुकणार नाही, दोन वर्षे लढण्याची तयारी; हिंदुस्थानातील इराणच्या राजदूतांचा इशारा
हिंदुस्थानातील इराणचे राजदूत अब्दुल मजीद हकीम इलाही यांनी अमेरिकेला ठणकावून सांगितले आहे की, इराण कोणत्याही परिस्थितीत अमेरिकेसमोर झुकणार नाही. इराण पुढील दोन वर्षे युद्ध लढण्यासाठी पूर्णपणे तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच येत्या एका आठवड्यात इराण आपल्या नवीन सर्वोच्च नेत्याची निवड करेल, अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली. इलाही यांनी म्हटले की, सर्वोच्च नेत्याची निवड करण्याची […]
उमरी तालुक्यातील काबलगुडा खुर्द गावात एका विधवा महिलेला उचलून नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडितेला उचलून नेत डांबून रात्रभर मारहाण करण्यात आली आणि पाहाटे पाचच्या सुमारास पीडितेला घराबाहेर काढण्यात आलं. या घटनेमुळे उमरी तालुका हादरून गेला असून सर्वत्र संतापाची लाट आहे. धक्कादायक बाब म्हणजे पीडितेच्या मुलाने 20 किलोमीटर पायी चालत जात उमरी पोलीस स्टेशनला […]
एलपीजी दरवाढीवरून आम आदमी पक्षाचा मोदी सरकारवर हल्लाबोल, अमेरिकेच्या दबावाखाली निर्णय घेतल्याचा आरोप
घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ६० रुपयांची मोठी वाढ झाल्यानंतर आम आदमी पक्षाने केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. ‘आप’चे राष्ट्रीय मीडिया प्रभारी अनुराग ढांडा यांनी शनिवारी एका पत्रकार परिषदेत बोलताना मोदी सरकारवर सडकून टीका केली. शनिवारी सकाळीच देशातील सर्वसामान्य जनतेवर महागाईचा हा मोठा बॉम्ब पडला असून, यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबांचे बजेट पूर्णपणे कोलमडणार असल्याचे त्यांनी म्हटले […]
प्रत्येकाचे सत्ता हेच ध्येय असता कामा नये, कार्यकर्ते आणि जनतेसाठी काम करत राहणार –वैभव नाईक
“राजकारणात प्रत्येकाचे सत्ता हेच ध्येय असता कामा नये. जनतेने आपल्याला विरोधकाची भूमिका दिली आहे, ती आपण ठामपणे पार पाडूया. संघर्षाच्या काळात डगमगून न जाता शिवसेना पक्षातूनच कार्यकर्ते आणि जनतेसाठी मी काम करत राहणार आहे,” असा ठाम निर्धार शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) माजी आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केला. कणकवली येथील ‘विजय भवन’ येथे शिवसेना (उद्धव […]
टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये उद्या (8 मार्च) ICC T20 World Cup 2026 ची फायनल खेळली जाणार आहे. हिंदुस्थानला पाठिंबा दर्शवण्यासाठी चाहते मोठ्या संख्येने संपूर्ण देशभरातून नरेंद्र मोदी स्टेडियमवर दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून स्टेडियमच्या आजूबाजूच्या परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. तसेच स्टेडिमयच्या जवळील अनेक मार्ग सुद्धा बदलण्यात आले […]
छत्तीसगडमधील १२५ नक्षलवाद्यांनी टाकली शस्त्रे; हैदराबादमध्ये १३० जणांचे सामूहिक आत्मसमर्पण
नक्षलवादाच्या विरोधात सुरू असलेल्या मोहिमेला मोठे यश मिळाले असून, शनिवारी हैदराबादमध्ये एक ऐतिहासिक घडामोड पाहायला मिळाली. तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांच्या उपस्थितीत एकूण १३० नक्षलवाद्यांनी हिंसाचाराचा मार्ग सोडून सामूहिक आत्मसमर्पण केले. विशेष म्हणजे, शरण आलेल्या या १३० नक्षलवाद्यांपैकी १२५ जण हे एकट्या छत्तीसगडमधील असून, त्यांनी मुख्य प्रवाहात येण्याचा निर्णय घेतला आहे. या आत्मसमर्पणावेळी नक्षलवाद्यांनी […]
महिलांसाठी मोफत बस प्रवास, विद्यार्थिनींना १००० रुपये, केरळममध्ये काँग्रेसच्या सहा मोठ्या ‘गॅरंटी’
केरळम विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने मोठी आघाडी घेतली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी राज्यातील जनतेला आकर्षित करण्यासाठी सहा मोठ्या ‘गॅरंटी’ (Guarantees) जाहीर केल्या आहेत. कर्नाटक आणि तेलंगणामध्ये मिळालेल्या यशानंतर आता केरळममध्येही ‘गॅरंटी कार्ड’च्या जोरावर सत्ता मिळवण्याचा विश्वास काँग्रेसने व्यक्त केला आहे. युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट (UDF) सत्तेत आल्यास या योजनांची तातडीने अंमलबजावणी केली जाईल, असे आश्वासन […]
Petrol Diesel Price News –देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढणार? समोर आली मोठी अपडेट
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार होत असतानाच, हिंदुस्थानात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ होणार नाही, असे वृत्त एएनआय (ANI) या वृत्तसंस्थेने सरकारी सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. एएनआयशी बोलताना सरकारी सूत्रांनी सांगितले आहे की, नजीकच्या काळात देशात इंधन दरवाढीची कोणतीही शक्यता नाही. गेल्या काही […]
पर्थ कसोटीत हिंदुस्थानची घसरगुंडी; दुसरा दिवस संपुष्टात, सामन्यावर ऑस्ट्रेलियाची मजबूत पकड
हिंदुस्थानी महिलांचा ऑस्ट्रेलिया दौरा सुरू असून या दौऱ्यातील कसोटी मालिकेतील एकमेव कसोटी सामना पर्थमध्ये खेळला जात आहे. या सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळ संपुष्टात आला असून टीम इंडिया पराभवाच्या छायेत गेल्याच चित्र आहे. टीम इंडियाने पहिल्या डावात 198 धावा केल्या होत्या. तर ऑस्ट्रेलियाने आपल्या पहिल्या डावात 323 धावा करत सामन्यावर मजबूत पकड निर्माण केली आहे. सामन्याच्या […]
दापोलीत आरोग्य सेविकेला मारहाण; आरोपीला तात्काळ अटक करण्याची कर्मचारी संघटनेची मागणी
तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र पिसई उपकेंद्र खेर्डी येथील आरोग्य सेविका श्रीम. जयश्री टिळे यांना मारहाण झाल्याची धक्कादायक घटना घडली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा आरोग्य विभागातील कर्मचारी व संघटनांकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. परशुराम निवेंडकर यांनी या घटनेचा निषेध व्यक्त […]
Iran Israel War – LPG सिलिंडर बुकिंगच्या नियमात मोठा बदल, गृहिणींच गणित बिघडणार
इराण अमेरिका-इस्रायल यांच्यात सुरू असलेलं युद्ध दिवसेंदिवस अधिक घातक होत चाललं आहे. यामुळे याचे परिणाम आता हळुहळु हिंदुस्थानात दिसण्यास सुरुवात झाली आहे. LPG सिलिंडर देशभरातील प्रत्येक नागरिकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा घटक आहे. सकाळी उठून पाणी तापवण्यासून ते जेवणाचा संपूर्ण स्वयंपाक बनवण्यापर्यंत LPG सिलिंडर हा सर्वसामान्यांच्या आयुष्यातील एक मुलभुत घटक आहे. याच LPG सिलिंडरच्या नियमांत मोठा बदल […]
Ratnagiri News –मुंबई-गोवा महामार्गावरील डायव्हर्जनमुळे अपघातांची मालिका; योग्य उपाययोजनांची मागणी
मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असताना संगमेश्वर ते बावनदी दरम्यान अचानक महामार्ग बंद करून डायव्हर्जन तयार केले जात असल्याने वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता रस्ता बंद केला जात असल्यामुळे सतत अपघात घडत असून वाहनांचे मोठे नुकसान होत असल्याच्या तक्रारी वाहनचालकांकडून केल्या जात आहेत. महामार्गाच्या कामादरम्यान अनेक ठिकाणी अचानक […]
IND Vs NZ Final –हृदय तोडावं लागलं तरी चालेल…न्यूझीलंडच्या कर्णधाराच टीम इंडियाला सुचक इशारा
ICC T20 World Cup 2026 ची फायनल स्पर्धेतील दोन मातब्बर संघ हिंदुस्थान आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये रविवारी (8 मार्च) रंगणार आहे. विजेतेपदाची लढत सुरू होण्यापूर्वी शाब्दीक चकमकीला सुरुवात झाली आहे. न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने मोठं वक्तव्य करत टीम इंडियाला सुचना वजा इशारा दिला आहे. फायनलचा थरार सुरू होण्यापू्र्वी पार पडलेल्या पत्रकार परिषदेत मिचेल सँटनरने आपली रोखठोक […]
लैंगिक शोषण गुन्हेगार जेफ्री एपस्टिनशी संबंधित प्रकरणातील काही नवीन गोपनीय कागदपत्रे (Epstein Files) सार्वजनिक करण्यात आली असून, यामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. अमेरिकेच्या न्याय विभागाने (DOJ) प्रसिद्ध केलेल्या या कागदपत्रांनुसार, एका अज्ञात महिलेने ट्रम्प यांच्यावर ती अल्पवयीन असताना लैंगिक अत्याचार केल्याचा दावा केला आहे. ट्रम्प यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेची […]
गव्हाणकर महाविद्यालयात फूड ब्रॅण्डिंग व बौद्धिक संपदा हक्कांवर सेमिनार
सावंतवाडी – डॉ. हेडगेवार स्मृती सेवा प्रकल्प सिंधुदुर्ग, एम. एस .एम. ई टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट सेंटर पीपीडीसी आग्रा विस्तारित केंद्र कोल्हापूर आणि सावंतवाडी येथील देशभक्त शंकरराव गव्हाणकर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार ७ मार्च रोजी लोकल टू व्होकल फूड एम एस एम ई साठी ब्रॅण्डिंग व बौद्धिक संपदा हक्क ( I P R) या विषयावर मोफत [...]
प्रसिद्ध व्यापारी साईनाथ मुंज यांचे निधन
सावंतवाडी: प्रतिनिधी सावंतवाडी येथील प्रसिद्ध व्यापारी साईनाथ राजाराम मुंज ( ६७ ) यांचे आज शनिवारी गोवा – बांबुळी येथे उपचारादरम्यान निधन झाले. गेले काही दिवस ते आजारी होते. त्यांच्या पश्चात पत्नी ,मुलगा, सूना ,नातवंडे असा परिवार आहे. सावंतवाडीतील चेतन कम्युनिकेशनचे संचालक श्रेयस मुंज यांचे ते वडील होत.
आजपासून कुणकेरी गावचा प्रसिद्ध हुडोत्सव
उद्या हुड्यावर चढणाऱ्या अवसरांच्या थरारासह भक्ती आणि शक्तीचा अनोखा संगम ओटवणे प्रतिनिधी सावंतवाडी तालुक्यातील कुणकेरी गावचा आगळावेगळ्या व वैशिष्टपूर्ण हुडोत्सव रविवारी ८ मार्चला होत आहे. मात्र या हुडोत्सवाला खऱ्या अर्थाने शनिवारी ७ मार्चला दुपारपासुन प्रारंभ होणार आहे. महाराष्ट्रात पंढरपूर नंतर कुणकेरी गावातच हुडोत्सव होत असुन १०० फुटी हुड्यावर चढणाऱ्या संचारीत अवसरांच्या थरारासह भक्ती आणि शक्तीचा [...]
धाराशिव (प्रतिनिधी)- अमराठवाड्यासह राज्यभरातील ग्रामीण भागाचा सामाजिक परिपोष समृद्ध व्हावा यासाठी साहित्य ,संस्कृती, शिक्षण, समाज आणि पर्यावरण यासारख्या विविध क्षेत्रात कसलाही भेदभाव न करता सर्वांना सोबत घेऊन अखंड कार्य करत असलेल्या एकता फाउंडेशनच्या वतीने साहित्य संमेलनाच्या माध्यमातून दरवर्षी उत्कृष्ट साहित्य कृतींना राज्यस्तरीय पुरस्कार दिले जातात. त्या अनुषंगाने सन 2025 चे साहित्य पुरस्कार यंदा शिरूर का. तालुक्यातील पाडळी येथील 8 एकता मराठी साहित्य संमेलनात देण्यात येणार असल्याचे एकता कोर कमिटीतील पदाधिकाऱ्यांनी सांगितले. या राज्यस्तरीय पुरस्कारातील उत्कृष्ट संशोधन संपादन साहित्याचा पुरस्कार धाराशिवच्या डॉ. सौ.रेखा ढगे यांनी संपादित केलेल्या सावित्रीच्या कविता या साहित्यकृतीला जाहीर झाला आहे. हा पुरस्कार कै. परमेश्वर भागुजी कैतके (लाईनमन) यांच्या स्मरणार्थ दिला जातो. सावित्रीच्या कविता या कविता संग्रहाचे संपादन डॉ.रेखा ढगे यांनी केले आहे तर, सहसंपादक म्हणून कविता रमेश पुदाले यांनी काम पाहिले यात धाराशिव सोबतच सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, कर्नाटक ,पुणे, तुळजापूर , नळदुर्ग या ठिकाणच्या कवयित्रींच्या कवितांचा समावेश आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यावरील विविधपूर्ण 50 कवितांचा हा संग्रह अपूर्वाई प्रकाशनच्या डॉ. रवींद्र चिंचोलकर यांनी प्रकाशित केला. पाठराखण साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कवी आणि लेखक श्रीकांत देशमुख नांदेड यांनी केली आहे अशा या जाणिवांना समृद्ध करणाऱ्या सावित्रीच्या कविता या संग्रहाची एकता फाउंडेशनने राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड करून यथोचित सन्मान केला आहे.
धाराशिव (प्रतिनिधी)- तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, धाराशिव येथे तिथीनुसार संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा 396 वा जन्मोत्सव दिनांक 6 मार्च 2026 रोजी पारंपरिक पद्धतीने व मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने दिनांक 2 मार्च ते 6 मार्च 2026 या कालावधीत विविध धार्मिक, शैक्षणिक, क्रीडा, तांत्रिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी इतिहास तज्ञ डॉ. सतीश कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्वप्रथम शिवछत्रपतीच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांची ढोल ताशांच्या गजरात पालखी काढण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने, विभागप्रमुख डॉ.डी डी दाते, डॉ.प्रशांत कोल्हे, प्रा. सुजाता गायकवाड, प्रा.एस एम पवार, प्रा. पी. एम.पवार, डॉ.प्रीती माने, प्रा.सुनीता गुंजाळ, कार्यक्रम समन्वयक डॉ.राजश्री यादव यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. सतीश कदम म्हणाले की, आज आपण बोली भाषेत सहज तुमच्यासाठी काय पण म्हणतो! पण इतिहासाचा आढावा घेतला तर छत्रपती शिवरायांच्या अनेक मावळ्यांनी स्वराज्य स्थापन करण्यासाठी अभूतपूर्व लढाईत आपल्या स्वतःच्या जीवाची परवा न करता बलिदान दिलेले आहे. आणि शिवछत्रपतींसाठी “तुमच्यासाठी काय पण!“ हे सिद्ध करून दाखविले आहे. त्याचा आपण विसर पडू देऊ नये. इतिहासाचे अनेक दाखले देत शिवछत्रपतींचा रंजक इतिहास त्यांनी विद्यार्थ्यांसमोर उलगडून दाखविला. त्यावेळी विद्यार्थी मंत्रमुग्धपणे त्यांचे विचार ऐकत होते. अध्यक्षीय समारोप करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने म्हणाले की, पारंपरिक कार्यक्रम घेण्याची तेरणाची समृद्ध परंपरा असून शिवजन्मोत्सव विद्यार्थी दरवर्षी खूप मोठ्या प्रमाणात साजरा करतात. अशा कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना नक्कीच प्रेरणा मिळते. यावर्षी विद्यार्थ्यांनी किल्ला बांधणी करून आपल्यातील उत्कृष्ट अभियंत्याचे दर्शन घडविले. याचा आनंद वाटतो. पुढे बोलताना डॉ. माने असे म्हणाले की संस्थेचे विश्वस्त आमदार राणाजगजीत सिंह पाटील साहेब विद्यार्थ्यांच्या हितासाठी सतत प्रयत्नशील असतात.यावर्षी कमीन्स स्कॉलरशिप साठी चार विद्यार्थी पात्र झाले असून त्यांना नुकतेच या कार्यक्रमात लॅपटॉपचे वाटप करण्यात आले. तसेच संपूर्ण शैक्षणिक फी सवलत ही या विद्यार्थ्यांना मिळालेली आहे. लॅपटॉप मिळालेल्या क्षितिज गवारे, हर्ष बांगड, सूर्या मुंडे आणि राजवर्धन अवताडे या विद्यार्थ्यांचे प्रमुख पाहुण्यांचे हस्ते विशेष कौतुक आणि स्वागत करण्यात आले. या महोत्सवाची सुरुवात दिनांक 2 मार्च रोजी प्रथम वर्ष अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी आयोजित एआय टूल्स प्रशिक्षण कार्यक्रमाने झाली. या प्रशिक्षणातून विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता संबंधित आधुनिक साधने, त्यांचा वापर आणि तंत्रज्ञानातील नवीन संधी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी महाविद्यालयात क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत मुलांचे आठ, मुलींचे चार तसेच प्राध्यापकांचे दोन संघ सहभागी झाले. खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत स्पर्धेला रंगत आणली. तेरणाच्या इतिहासात यंदाचा शिवजन्मोत्सव विशेष गाजला तो किल्ला बांधणी स्पर्धा (गडोत्सव) आयोजित करून. या स्पर्धेत आठ संघांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी विविध ऐतिहासिक किल्ल्यांच्या आकर्षक प्रतिकृती साकारत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यकालीन इतिहासाची झलक सादर केली. यावेळी ॲप्टिट्यूड टेस्ट, कोडिंग क्विझ स्पर्धा आणि कोडिंग बॅटल स्पर्धा घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी तांत्रिक कौशल्य व बौद्धिक क्षमतेचे उत्कृष्ट प्रदर्शन करत स्पर्धेत आपली गुणवत्ता सिद्ध केली. महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखी मिरवणुकीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. या मिरवणुकीत महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व कीर्तनकार सागर सलगरे यांनी पालखीचे नेतृत्व केले. ढोल-ताशा व लेझीम पथकाच्या तालावर विद्यार्थ्यांनी उत्साहात सहभाग घेतला. यावेळी विविध कंपन्यांमध्ये व शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या अनिकेत कोळगे यांच्यासह सुमारे 50 माजी विद्यार्थ्यांचा प्रमुख अतिथी डॉ. सतीश कदम, प्राचार्य डॉ.विक्रमसिंह माने व सर्व विभाग प्रमुखांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.या महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले. बाल शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत केवीत अजिंक्य काळे यांचा पाळणा सोहळा सादर करण्यात आला. प्रथम वर्ष फार्मसी विभागातील जिजाऊ ग्रुप व तृतीय वर्ष फार्मसी विभागातील शिवकन्या ग्रुप यांनी पारंपरिक लोकनृत्य सादर केले. तसेच अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित प्रभावी पथनाट्य सादर केले. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. तसेच विद्यापीठस्तरीय अविष्कार, स्विमिंग व क्रिकेट स्पर्धांमध्ये विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. याशिवाय कमिन्स स्कॉलरशिप प्राप्त विद्यार्थ्यांना लॅपटॉपचे वितरण करण्यात आले. तसेच महाविद्यालयातील विविध विभागांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्राध्यापकांनाही प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पूजा मुंडे यांनी तर डॉ. राजश्री यादव यांनी आभार प्रदर्शन केले. या महोत्सवासाठी प्रा. आर एम शेख, प्रा.अमृता पिंपळे आणि प्रा. आर. ए.टेकाळे, कार्यक्रम समन्वयक म्हणून डॉ. राजश्री यादव यांनी यशस्वीपणे काम पाहिले. ढोल-ताशा पथकासाठी प्रा. संदीप नलगे, प्रा. आर. ए. दंडनाईक, प्रा. आकाश जगताप; सांस्कृतिक कार्यक्रमासाठी प्रा. वर्षा बोंदर, प्रा. सायली पवार व प्रा. सुकेशनी घणगावे; तसेच स्टेज व्यवस्थापन व अँकरिंगसाठी प्रा. पूजा मुंडे, प्रा. सुरज इंगळे व प्रा. रोहिणी बोंडगे यांनी विशेष परिश्रम घेतले. पारितोषिक वितरणासाठी प्रा. के. जी. डोलारे, प्रा. बी. एस. चव्हाण व प्रा. डी. डी. मुंडे यांनी सहकार्य केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अलीकडील इस्रायल दौऱ्यादरम्यान त्यांना इराणवरील लष्करी हल्ल्यांबाबत कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नव्हती, असं इस्रायलचे परराष्ट्र मंत्री गिदोन सार यांनी म्हटलं आहेत. नवी दिल्लीत आयोजित रायसीना डायलॉगमध्ये (Raisina Dialogue) व्हर्चुअल पद्धतीने सहभागी झाले असताना त्यांनी ही माहिती दिली. इराणवर हल्ला करण्याचा अंतिम निर्णय पंतप्रधान मोदी यांचा दौरा संपल्यानंतर घेण्यात आला होता, असं […]
लग्न झालं आणि पठ्ठ्या 24 तासांत मैदानात उतरला, अर्जुन तेंडुलकरचा व्हिडीओ चर्चेत
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याचा गुरुवारी (5 मार्च) मोठ्या थाटामाटात विवाहसोहळा पार पडला. सानिया चंडोक सोबत त्याचे लग्न झाले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह प्रत्येक क्षेत्रातील प्रतिष्ठीत व्यक्ती या विवाह सोहळ्याला उपस्थित होते. लग्न पार पडलं आणि अर्जुन तेंडुलकर पुढील 24 तासांत मैदानात उतरला. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. डीवाय पाटील […]
जागतिक महिला दिन विशेष: करिअर आणि कुटुंब; ‘सुपरवूमन’ने असा साधावा समतोल!
आजच्या वेगवान जगात महिला केवळ उंबरठ्याआड मर्यादित न राहता आकाशाला गवसणी घालत आहेत. मात्र, ऑफिसच्या जबाबदाऱ्या आणि घरचा पसारा सांभाळताना अनेकदा त्यांची दमछाक होते. या धावपळीत स्वतःचे अस्तित्व आणि मानसिक शांतता टिकवून ठेवण्यासाठी ‘वर्क-लाईफ बॅलन्स’ कसा साधावा? 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्ताने महिलांसाठी खास मंत्र. गोष्टींचे नियोजन करावे वेळेचे योग्य नियोजन हे अर्धे युद्ध जिंकल्यासारखे […]
पत्रकार हत्या प्रकरणी राम रहिमची न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता, इतर ३ जणांची शिक्षा कायम
डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहिम सिंग याला पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने आज एका मोठा दिलासा दिला आहे. २००२ मधील पत्रकार रामचंद्र छत्रपती हत्या प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली जन्मठेपेची शिक्षा उच्च न्यायालयाने रद्द केली असून त्याची निर्दोष मुक्तता केली आहे. मात्र न्यायालयाने कुलदीप सिंग, निर्मल सिंग आणि कृष्ण लाल या तीन आरोपींची शिक्षा […]
Photo –सुहाना खानच्या ग्लॅमरस फोटोंनी चाहत्यांचे वेधले लक्ष
बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानची मुलगी सुहाना खान तिच्या वडिलांइतकीच लोकप्रिय आहे. ती केवळ अभिनयातच नाही, तर जाहिरात क्षेत्रातही मोठी मजल मारत आहे. ती ‘मेबेलिन न्यूयॉर्क’ या प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय कॉस्मेटिक ब्रँडची ब्रँड अॅम्बेसिडर आहे, जे तिच्या वाढत्या लोकप्रियतेचे प्रतीक आहे. सुहाना सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. तिचे फॅशन सेन्स आणि स्टायलिश लूक चाहत्यांना भुरळ घालतात, ज्यामुळे […]
इराणचा दुबई विमानतळावर भीषण हल्ला, सर्व विमान उड्डाणे स्थगित
मध्यपूर्वेतील युद्ध आता अत्यंत भीषण वळणावर येऊन ठेपले आहे. इराणने संयुक्त अरब अमिरातीमधील (UAE) दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठा हल्ला केला आहे. या हल्ल्यानंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली असून, सुरक्षेच्या कारणास्तव दुबई विमानतळावरील सर्व विमान उड्डाणे अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहेत. इराणने या हल्ल्याद्वारे इस्रायल आणि त्याला साथ देणाऱ्या देशांना थेट इशारा दिला आहे. […]
ICC T20 World Cup 2026 चा अंतिम सामना उद्या (8 मार्च 2026) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. हिंदुस्थान आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये तुंबळ लढाई पाहायला मिळणार आहे. त्यामुळे दोन्ही देशांच्या चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मात्र, हिंदुस्थानी चाहत्यांची धाकधूक वाढत चाललीय. सोशल मीडियावर तशा चर्चाही रंगताना दिसत आहे. पण असं का? नरेंद्र मोदी स्टेडिमयवर […]
जींदमध्ये रंगाच्या कारखान्याला भीषण आग; 4 महिला कामगारांचा मृत्यू, 13 जण गंभीर जखमी
हरयाणातील जींद येथे आज सकाळी एका रंग बनवण्याच्या कारखान्यात भीषण आग लागल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या भीषण दुर्घटनेत कारखान्यात काम करणाऱ्या चार महिलांचा होरपळून मृत्यू झाला असून अन्य 13 जण गंभीर जखमी झाले आहेत. ज्यावेळी ही आग लागली, त्यावेळी कारखान्यात एकूण 17 कामगार उपस्थित होते. मिळालेल्या माहितीनुसार, आगीची तीव्रता इतकी मोठी होती की कामगारांना […]
सिंधुदुर्गात ८ मार्चपासून ‘जल महोत्सवा’चे आयोजन
परूळे प्रतिनिधी ग्रामीण पाणी पुरवठा यंत्रणा अधिक शाश्वत, मजबूत करणे आणि त्यामध्ये सामुदायिक सहभाग वाढवण्यासाठी केंद्राच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्यात ८ ते २२ मार्च या कालावधीत ‘जल महोत्सवा’चे आयोजन केले आहे. या महोत्सवाचा प्रारंभ वेंगुर्ले तालुक्यातील परुळे बाजार ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील कर्ली येथे रविवारी दि.८ मार्च रोजी होणार आहे याप्रसंगी भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाचे राज्यमंत्री श्री.व्ही. सोमाण्णा, [...]
सातोसे येथे महिला दिनानिमित्त विविध स्पर्धा
सातार्डा – सातोसे येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जागतिक महिला दिनानिमित्त रविवार दि. 8 मार्च रोजी विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.रविवारी दुपारी 2 वाजता महिला दिन कार्यक्रमाचे मान्यवरांच्याहस्ते उदघाटन होणार आहे.दुपारी 3 वाजता महिलांची वेणी स्पर्धा होणार आहे.त्यानंतर मेहंदी स्पर्धा होणार आहे.महिला दिनाचे औचित्य साधून कष्टकरी महिला पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.तदनंतर महिलांची [...]
मागील शेतकरी कर्जमाफीचा अनुभव पाहता, ती मिळेपर्यंत सरकारवर विश्वास कसा ठेवायचा? आमदार कैलास पाटील
धाराशिव (प्रतिनिधी)- मागच्या वेळी याच सरकारने दिलेली कर्जमाफीचा कसा अनुभव आला हे सर्वांनी पाहिलं आहे. त्यामुळे आताही अटी निकष पूर्ण करण्यात यानी पुढची निवडणूक डोळ्यासमोर ठेवू नये असे म्हणत जोवर कर्जमाफीचा लाभ शेवटच्या शेतकऱ्यांना मिळणार नाही तोवर या सरकारवर विश्वास कसा ठेवायचा असा सवाल आमदार कैलास पाटील यांनी उपस्थित केला आहे. यावेळी आमदार पाटील म्हणाले की, शेतकरी अनुदान योजना पाहता तिथं अनुदान दिले जात नाही. त्यामुळे कालच्या आर्थिक पाहणी अहवालामध्ये शेती उत्पन्न घटल्याच दिसून येत आहे. याच गतिमान सरकारने केलेली ही कामगिरी आहे. कोविड काळात जे क्षेत्र संजीवनी ठरलं त्याची पुढच्या काही सालात सरकारचे शेतकरी विरोधी धोरण कस मारक ठरलं. शिवाय या सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेण्याची तयारी केली असताना मार्च 2025 मध्ये कर्जवसुलीची सक्ती का केली जे शेतकरी चालू बाकीमध्ये गेले त्यांची या सरकारने फसवणूक केली नाही का असा प्रश्न आमदार पाटील यांनी सरकारला विचारला आहे. मोठ्या उद्योगपतीसाठी ज्या प्रकारे गालिचा अंथरलेला असतो तसा विचार शेतकरी, बेरोजगार, महिला यांच्या बाबत का होत नाही. लाडकी बहिण योजना मधून 2100 रुपये देणं, भावांतर योजना, जीएसटीतून राज्य सरकारची करमाफीच आश्वासन दिलं त्यावर सरकार बोलत नाही. पण ज्या शक्तीपीठ महामार्ग यास विरोध असतानाही तो पूर्ण करण्यासाठी सरकार साम,दाम,दंड,भेद याचा वापर करत आहे यावरून सरकारची निती लक्षात येते अस मत आमदार पाटील यांनी व्यक्त केलं आहे.
धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यात आठ पैकी 6 ठिकाणी शिवसेनेचा सभापती बसला, 2 ठिकाणी भाजपचा सभापती झाला याचे अभिनंदन करताना त्यांनी वरील भूमिका घेतली. शिवसेनेची सुरुवातीपासून अध्यक्षपदाची मागणी आहे. ती पूर्ण करण्यासाठी सर्वते प्रयत्न केले जातील.
कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान प्रकल्प
धाराशिव (प्रतिनिधी)- डॉ.बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखाना केशेगाव कार्यक्षेत्र मौजे बेंबळी व टाकळी येथे ऊस पिकातील AI तंत्रज्ञानात भाग घेतलेल्या 25 शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन प्रत्यक्ष भेट देऊन त्यांच्या अडीअडचणी विचारून त्या सोडवण्याचा प्रयत्न केला. उपस्थित डॉ. बाबासाहेब आंबेडकर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष अरविंद गोरे, संचालक अँड निलेश पाटील, भारत गुंड, राहुल सूर्यवंशी, सतिश मुंगळे, फखरुद्दीन शेख, भारत सोनटक्के, सर्व शेतकरी व कर्मचारी उपस्थित होते.
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना 31 हजार कोटीच्या ऐवजी 9 हजार कोटी- हनुमंत पवार
धाराशिव (प्रतिनिधी)- पंतप्रधान पीक विमा योजनेच्या प्रीमियमसाठी राज्य सरकारने मागील वर्षी 2500 कोटी रुपयाहून अधिक रक्कम खाजगी कंपन्याना दिली. काल आर्थिक पाहणी अहवाल आला. एकाही शेतकऱ्याला एक रुपयाही मिळाला नाही, असं पाहणी अहवाल सांगतो. अर्थसंकल्पात यावर चकार शब्द नाही. 31 हजार कोटी रुपयांचे पॅकेज खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषित केले होते. पैकी फक्त 9 हजार कोटी शेतकऱ्यांना पोहोचले. उर्वरित मदतीबद्दल एक आवाक्षर मुख्यमंत्र्यांनी काढले नाही. अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार यांनी व्यक्त केली आहे. भावांतर योजना घोषित करताना मुख्यमंत्री म्हणाले क्रांतिकारी निर्णय, त्या भावांतर योजनेचे पुढे काय झाले हें कळायला मार्ग नाही. कर्जमाफीचे किचकट नियम आणि अटी बघता शेतकऱ्यांना दिलासा देण्याची सरकारची प्रामाणिक ईच्छा आहे कां? असा प्रश्न निर्माण होतो. कृषी क्षेत्रात सर्वाधिक रोजगार देण्याची क्षमता असताना याकडे सरकार दुर्लक्ष करत आहे. कृषी विद्यापीठातील संशोधन आणि मनुष्यबळ हा जिव्हाळ्याचा विषय असताना त्यासाठी अर्थसंकल्पात उल्लेखही नाही. कृषी यांत्रिकीकारण आणि रोजगार हमी योजनेला यां अर्थ संकल्पात ही निधीची तुटपुंजी तरतूद ग्रामीण आणि कृषी व्यवस्थेकडे सरकारचा बघण्याचा नकारात्मक दृष्टीकोन स्पष्ट झाला आहे.
महाराजस्व अभियानास 7 मार्चपासून प्रारंभ; 57 मंडळ मुख्यालयांवर नागरिकांना थेट सेवा
धाराशिव (प्रतिनिधी)- ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनता,शेतकरी,विद्यार्थी व महिला यांच्या महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन प्रश्नांचे निराकरण करणे, जनतेच्या तक्रारी सत्वर निकाली काढणे तसेच महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख आणि गतिमान करण्याच्या उद्देशाने मंडळ स्तरावर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान 7 मार्चपासून जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील 57 मंडळांच्या मुख्यालयांवर ही शिबिरे आयोजित करण्यात आली असून ती दिनांक 7 मार्च,14 मार्च तसेच एप्रिल महिन्यात 10 व 17 एप्रिल रोजी पार पडणार आहेत.या शिबिरांमधून नागरिकांना महसूल विभागाशी संबंधित विविध सेवांचा लाभ एकाच ठिकाणी मिळणार आहे. या शिबिरामध्ये शेतकरी व नागरिकांसाठी हेल्प डेस्कची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून त्याद्वारे भूमि अभिलेख विभागाशी संबंधित सर्व कागदपत्रे तसेच ई-मोजणीच्या सर्व सेवा शिबिराच्या ठिकाणीच उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.त्यामुळे नागरिकांना विविध कामांसाठी कार्यालयीन फेऱ्या मारण्याची गरज भासणार नाही. याशिवाय शासनाच्या स्वामित्व योजनेअंतर्गत तयार करण्यात आलेल्या सनदा,मिळकत पत्रिका व प्रॉपर्टी कार्ड नागरिकांना शिबिरातच उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.तसेच भूसंपादन आणि बिनशेती झालेल्या मिळकतींचे कमी-जास्त पत्र तयार करून सातबारा सुलभ करण्याचेही या विभागाचे धोरण आहे. नागरिकांनी या समाधान शिबिरांमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या हेल्प डेस्कवरील सेवा व सुविधांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा,असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
परंडा पंचायत समितीवर शिवसेनेचे वर्चस्व
परंडा (प्रतिनिधी)- परंडा पंचायत समितीच्या शिवसेना (शिंदे गटाचे) सभापती पदासाठी सौ.अर्चना आण्णासाहेब जाधव व उपसभापती पदासाठी परशू गवारे यांची निवड करण्यात आली आहे. सभापती व उपसभापती निवडीसाठी शुक्रवार दि.6 रोजी पंचायत समिती सभागृहात विशेष सभा घेण्यात आली होती.सभापाती साठी शिवसेनेच्या अर्चना जाधव आणि भाजपाच्या मोनिका पाटील यांनी अर्ज दाखल केला होता. तर उपसभाती शिवसेनेचे परशू गवारे यांनी तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट ) चे पंकज पाटील यांनी अर्जदाखल केला होता. निवडूक प्रक्रिया सदस्यांचे हात उंचावून मतदान पद्धतीने घेण्यात आले. यात अर्चना जाधव यांना सहा मत तर सभापती मोनिका पाटील यांना चार मत मिळाले. तर उपसभापती पंकज पाटील यांना चार मत मिळाले. त्यानुसार बहुमताच्या जोरावर सभापती अर्चना जाधव व परशू गवारे यांची उपसभापती साठी निवड करण्यात आली. निवडणूकीत पिठासीन अधिकारी म्हणून श्रीकांत पाटील यांनी काम पाहिले. त्यांना सहकार्य म्हणून तहसीलदार निलेश काकडे, गटविकास अधिकारी विनोद यादव व मिलींद पराळे यांचे सहकार्य मिळाले. पंचायत समितीच्या सध्याची संख्याबळ शिवसेना शिंदे गटाचे सहा तर भाजपाचे एक तर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन तर शिवसेना ठाकरे गटाचे एक सदस्य पक्षिय बलाबल असून, सभापती अर्चना जाधव व उपसभापती परशू गवारे यांची निवड होताच शिवाजी चौकात कार्यकर्ते व समर्थकांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला.
वास्तवापासून फारकत घेतलेला अर्थसंकल्प- खासदार ओमराजे निंबाळकर
धाराशिव (प्रतिनिधी)- सरकारने जनतेच स्वप्नरंजन करण्याचा प्रयत्न केला असाच हा अर्थसंकल्प आहे. वास्तव परिस्थितीच भान हरवलेला हा अर्थसंकल्प दिसत आहे. कर्जाच्या विळख्यात अडकलेलं सरकार केलेल्या घोषणा पूर्ण कस करणार एवढं जनतेला सांगावे, असे आवाहन खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सरकारला दिले आहे. यावेळी ओमराजे निंबाळकर म्हणाले की, शेतकरी कर्जमाफी योजनेला इतका विलंब केल्यान या योजनेतील लाभार्थी निवडीचे निकष अटी पाहिल्याशिवाय याबाबत अधिक न बोललेल बर. या मागेही या सरकारने अशीच कर्जमाफीची घोषणा केली पण अद्याप लाखो लोक या योजनेपासून वंचित आहेत. शिवाय त्यावेळी अटी,निकष यामुळं शेतकरी मेटाकुटीला आला होता. शिवाय 2019 ला उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना केलेल्या कर्जमाफीमध्ये तेव्हाच दोन लाख रुपयापर्यंतची तरतुद केली होती परंतु आता पाच वर्ष होऊनही लाभाची रक्कम तेवढीच का असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण हे सरकार सत्तेत आल्यावर महात्मा ज्योतिराव फुले या योजनेची एकरकमी परतफेड योजना राबवली नाही त्यामुळं असे लाखो लाभार्थी वंचित राहणार आहेत. याचा विचार सरकारने केलेला नाही. नुसते मेट्रो प्रकल्प, शक्तीपीठ असल्या योजना कोणासाठी आणायच्या हे सर्वश्रुत आहे. पण सामान्य माणूस आपल्या बाजून असूनही त्याचा सरकार सत्तेत आल्यावर विचार करत नाही हे आज दिसून येत आहे.
जिल्ह्यातील पाच पंचायत समित्यांवर महायुतीचे वर्चस्व
धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा मुख्यालय असलेल्या धाराशिवसह तुळजापूर आणि कळंब पंचायत समितीच्या सभापती-उपसभापती निवडीत महायुतीचा झेंडा फडकला आहे. भाजपा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात महायुतीचे राजकीय वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या निवडणुकीत महायुतीने मुसंडी मारत तिन्ही ठिकाणी एकतर्फी विजय मिळवला आहे. या विजयामुळे जिल्ह्यात महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला असून ठिकठिकाणी गुलाल उधळून जल्लोष करण्यात येत आहे. केवळ धाराशिव, कळंब आणि तुळजापूरच नव्हे, तर उमरगा आणि लोहारा पंचायत समितीवरही महायुतीने निर्विवाद बहुमत मिळवत आपला झेंडा फडकवला आहे. तुळजापूरमध्ये कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचा आशीर्वाद घेत महायुतीच्या उमेदवारांनी विजयोत्सव साजरा केला. हा विजय जनतेच्या विश्वासाचा आणि कार्यकर्त्यांच्या कष्टाचा आहे. नवनिर्वाचित सभापती आणि उपसभापतींनी जनसेवेला प्राधान्य देऊन तालुक्याच्या विकासासाठी कटिबद्ध राहावे असे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे. आमदार पाटील यांनी सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. या विजयामुळे महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला असल्याचे चित्र आहे.
पायाभूत विकास कामांना गती देणारा अर्थसंकल्प- नितीन काळे
धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्यातील महायुती सरकारने राज्याच्या उज्वल भविष्यासाठी दूरदृष्टीपूर्ण आज आपला अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प शेतकरी, युवाशक्ती, नारीशक्ती आणि सर्वसामान्यांच्या जीवनाला मजबूत करणारा अर्थसंकल्प असून राज्यातील सर्व घटकांना न्याय देत पायाभूत विकास कामांना गती देत राज्याला पुढे घेऊन जाणारा हा अर्थसंकल्प आहे. अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य नितीन काळे यांनी दिली. पुढे बोलताना ते म्हणाले की या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजना या योजनेअंतर्गत दोन लाख रुपयापर्यंतचे कर्ज माफ करण्याचे धोरण राज्य सरकारने आखले आहे. तसेच जे शेतकरी नियमित कर्ज फेड करतात अशा शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन पर अनुदान स्वरूपात देण्याचे ठरवले आहे. शेतकऱ्यांसाठी 7.5 पर्यंतच्या कृषी पंपांना वीज सवलत देण्याची तरतूद आज राज्य सरकारने केली आहे. या शासनाच्या निर्णयामुळे सर्वसामान्य शेतकरी व शेतमजूर यांच्या जीवनामध्ये एक नवीन सोनेरी पहाट होऊन चांगले दिवस महायुतीच्या काळात आले आहेत. महायुती सरकारच्या काळात सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यापुढेही अखंड सुरू राहणार आहे. या योजनेसंदर्भात विरोधकांनी कितीही समाजामध्ये भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु त्यांचा हा खोटारडेपणा या अर्थसंकल्पातून महायुती सरकारने हाणून पाडला आहे. महिला, युवक,बालके, गरीब व वंचित घटकांवर लक्ष केंद्रित करून त्यांच्यासाठी अन्नसुरक्षा,निवारा, पिण्याचे शुद्ध पाणी, आरोग्य सेवा, शिक्षण सुविधा, आणि रोजगार व स्वयंरोजगार इत्यादी योजनांच्या सक्षमीकरणासाठी बळ देण्याचे काम महायुती सरकारने या अर्थसंकल्पातून केले आहे. महिला सबलीकरणासाठी राज्यातील 25 लाख महिलांना लखपती दीदी बनवण्याचे उद्दिष्ट या अर्थसंकल्पामध्ये समाविष्ट केले आहे. तसेच दिव्यांग नागरिकांसाठी 2500 रुपये मानधन देण्याची तरतूद आजच्या अर्थसंकल्पात केल्यामुळे दिव्यांग नागरिकांच्या सबलीकरणाचे काम या माध्यमातून होणार असल्याचे नितीन काळे यांनी म्हटले आहे. राज्यातील राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात विशेष प्राविण्य मिळणाऱ्या विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी महायुती सरकारने बक्षीस रकमेत मोठी वाढ केली आहे. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची ओढ निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्री विज्ञानवारी उपक्रमा अंतर्गत विद्यार्थ्यांना इस्रो आणि अमेरिकेतील नासा या जगप्रसिद्ध संस्थांना भेट देण्याची संधी उपलब्ध करून देण्याची तरतूद या अर्थसंकल्पामध्ये केली आहे. राज्यातील सर्वात मोठा घटक हा सर्वसामान्य आहे.सर्वसामान्य तरुणांसाठी महाराष्ट्र एजन्सी फॉर हॉलिस्टिक इंटरनॅशनल मोबिलिटी अँड ऍडव्हान्समेंट या संस्थेची स्थापना करून त्याच्या माध्यमातून आपल्या तरुणांना परदेशातील नोकऱ्यांसाठी आवश्यक अशा कौशल्य प्रशिक्षण आणि आर्थिक मार्गदर्शन दिले जाईल राज्यातील समुपदेशन सेवांचा विस्तार व अधिक संघटित व्यवस्था निर्माण करण्यासाठी 36 केंद्रे स्थापन करण्यात येनार आहेत. एकूणच सर्वसामान्य जनतेच्या प्रगतीसाठी पूरक असा अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल मी सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबां यांचा आभारी असून राज्यातील सर्वसामान्यांबद्दल असलेली तळमळ व प्रयत्नांची पराकाष्टा यातून दिसून येते.एकूणच हा आजचा 7.69 लाख कोटींचा अर्थसंकल्प सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा हिताचा अर्थसंकल्प आहे. असे मत श्री नितीन काळे यांनी बोलताना यावेळी व्यक्त केले.
अर्थसंकल्पातील तरतुदीमुळे जिल्ह्याला मिळणार कृष्णा खोऱ्यातील पुराचे पाणी- आमदार राणाजगजितसिंह पाटील
धाराशिव (प्रतिनिधी)- कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील समुद्राला वाहून जाणारे पुराचे पाणी मराठवाड्यात वळवून आणण्याच्या आपण मांडलेल्या महत्वाकांक्षी प्रकल्पाला अर्थसंकल्पातील तरतुदीमुळे आता मोठी गती मिळणार आहे. धाराशिव जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांनाही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेतून 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा दिलासा मिळणार आहे. तसेच नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकरी बांधवांना 50 हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे. धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वेमार्गाच्या माध्यमातून पर्यटनाला उभारी देणे आणि दळणवळणाची सक्षम जाळे निर्माण करण्याचे जे ध्येय आपण ठरवले होते त्याला या अर्थसंकल्पामुळे मोठी ताकद मिळाली आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांच्या विकास कार्यक्रमाला अर्थसंकल्पातील तरतुदींमुळे आणखी मोठी गती मिळणार असल्याचा विश्वास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला. कृष्णा खोऱ्यातील पुराचे पाणी भीमा खोऱ्यातील पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागात वळवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जागतिक बँकेच्या सहाय्याने प्रस्तावित असलेल्या या प्रकल्पासाठी या अर्थसंकल्पात महत्वपूर्ण तरतूद करण्यात आली आहे. धाराशिव-तुळजापूर-सोलापूर या 84 किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गासाठी करण्यात आलेल्या तरतुदीमुळे जिल्ह्यातील दळणवळणाचे जाळे आणखी सक्षम होणार आहे. त्यामुळे आपण पर्यटन व्यवसायाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीच्या दृष्टीने डोळ्यासमोर ठेवलेले ध्येय पूर्ण करण्यासाठी आता आणखी मदत होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सादर केलेला हा अर्थसंकल्प धाराशिव जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रगतीला नवी दिशा देणारा आहे. प्रगतीशील, शाश्वत, सर्वसमावेशक आणि सुशासन या चार स्तंभांवर आधारित हा अर्थसंकल्प जिल्हयातील शेतकरी, कष्टकरी आणि सामान्य नागरिकांचे जीवनमान उंचावणारा ठरेल, असा विश्वास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे. आमदार पाटील यांनी धाराशिव जिल्ह्याच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद फडणवीस व एकनाथराव शिंदे व सुनेत्राताई पवार या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे विशेष आभारही मानले आहेत.
सिंधुरत्न समृद्ध योजना 2.0 ला मुदतवाढ
आमदार दीपक केसरकरांच्या पाठपुराव्याला यश कुडाळ / प्रतिनिधी सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात आलेल्या महत्त्वाकांक्षी “सिंधुरत्न समृद्ध योजना” या योजनेला तीन वर्षांची मुदतवाढ देण्यात आली . वेंगुर्ले ,सावंतवाडी ,दोडामार्गचे आमदार, माजी मंत्री दिपक केसरकर यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश आले आहे.सिंधुरत्न समुद्धी योजना मार्च २०२५ मध्ये संपुष्टात आली होती. या योजनेला पुढील मुदतवाढ देण्यात [...]
कळंब पंचायत समितीत महायुतीची बाजी! चिठ्ठीद्वारे सभापती-उपसभापती निवड
कळंब (प्रतिनिधी)- कलंब पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदाच्या निवडणुकीत अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळाली. दोन्ही बाजूंना समान मते मिळाल्याने अखेर नियमानुसार लहान मुलाच्या हस्ते चिठ्ठी काढून निर्णय घेण्यात आला आणि त्यातून महायुतीला यश मिळाले. सभापती पदासाठी शिवसेनेच्या राजश्री धनंजय वरपे तर उबाठा गटाच्या सीमा टेकाळे यांनी उमेदवारी दाखल केली होती. तसेच उपसभापती पदासाठी भाजपच्या प्रणीता प्रणव चव्हाण आणि उबाठा गटाचे मनोज घोगरे यांच्यात सामना झाला. पंचायत समितीत दोन्ही गटांकडे प्रत्येकी आठ सदस्य असल्याने मतदान घेण्यात आले. मात्र मतदानानंतरही दोन्ही बाजूंना समान मते मिळाल्याने चिठ्ठीद्वारे निर्णय घेण्यात आला. या प्रक्रियेत राजश्री धनंजय वरपे यांची सभापती म्हणून तर प्रणीता प्रणव चव्हाण यांची उपसभापती म्हणून निवड निश्चित झाली. निकाल जाहीर होताच शिवसेना-भाजप महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. यावेळी शिवसेना धाराशिव जिल्हाप्रमुख अजित पिंगळे यांनी कार्यकर्त्यांचे अभिनंदन करत हा विजय महायुतीच्या एकजुटीचा आणि जनतेच्या विश्वासाचा विजय असल्याचे सांगितले. या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी कापसे, शिवसेना तालुकाप्रमुख लक्ष्मीकांत हुलजुते, उपजिल्हाप्रमुख अनंत वाघमारे, भाजप तालुकाध्यक्ष अरुण चौधरी, दत्तात्रय साळुंखे, जिल्हा परिषद सदस्य अनंत लंगडे, प्रणव चव्हाण, मेघराज देशमुख यांच्यासह महायुतीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. नवनिर्वाचित सभापती व उपसभापती यांनी कलंब तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा निर्धार केला.
मळगाव खानोलकर वाचन मंदिरात जागतिक महिला दिन
न्हावेली /वार्ताहर मळगाव येथील कै.प्रा.उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिरात बुधवार ११ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजता जागतिक महिला दिन साजरा करण्यात येणार आहे.या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लेखिका व मानसशास्त्रीय समुपदेशक श्रीमती कावेरी कासरलकर मयेकर उपस्थित राहून महिलांनी सवांद साधून श्रोत्यांना मार्गदर्शन करणार आहेत.सदर कार्यक्रमात श्रीमती उज्ज्वला यशवंतराव खानविलकर पटेकर पुरस्कृत कै.यशवंती धोंडू पटेकर स्मृती [...]
आरोंदा खारबंधाऱ्याचा तिढा सुटला
अधिकाऱ्यांच्या पाहणीनंतर कामाला हिरवा कंदील न्हावेली /वार्ताहर सावंतवाडी तालुक्यातील आरोंदा येथे खारभूमी बंधारा क्रमांक २ व परिसरातील शेतीचे संरक्षण करण्यासाठी खारभूमी विकास प्रकल्पांतर्गत दगड-मातीचा बंधारा उभारण्याचे काम सुरू करण्यात आले होते. मात्र काही कारणांमुळे हे काम काही काळ बंद पडल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. वेंगुर्ले येथील खारभूमी खात्याचे सहाय्यक अभियंता स्नेहल माईणकर [...]
इस्रायल-अमेरिका आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या युद्धात इराणच्या 32 युद्धनौकांना जलसमाधी देण्यात आल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. यात ‘आयआरआयएस देना’ या युद्धनौकेचाही समावेश आहे. हिंद महासागरामध्ये पाणबुडीतून पाणतीर मारून ही युद्धनौका बुडवण्यात आली. विशेष म्हणजे त्याच दिवशी इराणचे ‘आयआरआयएस लावन’ हे जहाज हिंदुस्थानच्या कोची बंदरावर पोहोचले […]
स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात रोजगार कौशल्य कार्यशाळा
मालवण । प्रतिनिधी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय येथे विद्यार्थिनींसाठी रोजगार कौशल्य कार्यशाळा दिनांक ५, ६ ,७ मार्च रोजी महिंद्रा प्राईड क्लासरूम आणि नांदी फाउंडेशन यांच्या सहकार्याने आणि महाविद्यालयाच्या IQAC आणि करिअर गाईडन्स अँड प्लेसमेंट सेल यांच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत एकूण ४८ विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. कार्यशाळेसाठी [...]
सर्वसमावेशक निवडणूक अर्थसंकल्प!
अर्थसंकल्पात योजनांचा वर्षाव, घोषणांचा पूर : वर्षभरात 2500 सरकारी नोकऱ्या देणार,गृहआधार, दयानंद योजना मानधनात वाढ,पंच, सरपंच, झेडपी मानधन रु. 5000 ची वाढ अंगणवाडीसेविकांच्यामानधनातरु. 5000 वाढ अंगणवाडीकर्मचाऱ्यांच्यावेतनात2500चीवाढ काजूआधारभूतकिंमतीतहोणारभरीववाढ काजूबागायतीच्याविकासासाठीकाजूबोर्ड फ्लॅटमध्येराहणाऱ्यासाठी‘म्हजोफ्लॅट’ योजना रेशनदुकानदारांनामुख्यमंत्रीसाहाय्ययोजनालाभ अयोध्येतगोमंतकीयांसाठीरामनिवासचीउभारणी पंढरपूर, नवीमुंबईतगोवायात्रीनिवासउभारणार नव्या बार परवान्यासाठी 20 लाख शुल्क नव्याकॅसिनोपरवानाफीमध्ये200 टक्केवाढ 10 वर्षेकंत्राटीसेवेतअसलेलेहोणारकायम सापेद्र-दिवाडीदोननवीनरो-रोफेरीबोटी पणजी : आगामी विधानसभा निवडणुका नजरेसमोर ठेवून असंख्य नव्या योजनांचा [...]
मिऱ्या गावामध्ये शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास मच्छिमारावर प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जयेंद्र ऊर्फ बावा नार्वेकर असे जखमी व्यक्तीचे नाव असून त्यांच्यावर मच्छिमार बोटीवरच धारदार शस्त्राने तब्बल ९ वार करण्यात आले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण मिऱ्या परिसरात खळबळ माजली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी १०:३० च्या सुमारास जयेंद्र नार्वेकर हे आपल्या मच्छिमार […]
चारही आंदोलकांची बिनशर्त सुटका करा मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांची माफी मागावी
मीराबाग आंदोलक आग्रही, मडगाव पोलिसस्थानकात ठाण मडगाव : मडगाव पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर मीराबाग येथील आंदोलकांनी मडगाव पोलिसस्थानक आवारातच ठाण मांडले व घोषणा दिल्या. विधानसभेत गॅलरीतून घोषणाबाजी केल्याबद्दल अटक करण्यात आलेल्या चार जणांची सुटका करण्यात येत नाही तोपर्यंत स्थानक न सोडण्याचा पवित्रा या आंदोलकांनी घेतला. रात्री उशिरापर्यंत हे आंदोलक तिथे ठाण मांडून होते. आमदार, पंच, सरपंच [...]
लोहिया मैदानावरून मीराबाग आंदोलकांना हटविले
आंदोलकांसहखासदारविरियातोफर्नांडिस, प्रभवनायकयांनाहीघेतलेताब्यात: मीराबागयेथेबंधाराउभारण्यासतीव्रविरोध मडगाव : मीराबाग येथे बंधारा उभारण्यास विरोध करणारे आंदोलक शुक्रवारी दुपारी मडगातील ऐतिहासिक लोहिया मैदानावर जमले असता मडगाव पोलिसांनी त्यांना मडगाव पालिकेकडून परवानगी न घेतल्याने तसेच कायदा आणि सुव्यवस्था स्थिती बिघडण्याची शक्यता गृहीत धरून हटविले. मडगाव पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांमध्ये आंदोलकांबरोबर त्यांना पाठिंबा देण्यासाठी उपस्थित राहिलेले दक्षिण गोव्याचे खासदार विरियातो फर्नांडिस, मडगावचो आवाजचे [...]
नांदेडमध्ये तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी राष्ट्रवादीचा नेता जीवन पाटील घोगरेविरुद्ध गुन्हा दाखल
वसतिगृहाच्या थकीत शुल्कासाठी त्रास दिल्यामुळे हडको येथील पद्मश्री शामरावजी कदम होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमधील बीएचएमएस द्वितीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या आकांक्षा गायकवाड या 25 वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी हॉस्टेलचालक तथा राष्ट्रवादीचा नेता जीवन पाटील घोगरे याच्याविरुद्ध अँट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नांदेडमध्ये हॉस्टेलमधील विद्यार्थ्यांची असुरक्षितता आता पुन्हा एकदा […]
उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आज एका मोठ्या अपघातातून थोडक्यात बचावले आहेत. लखनौहून कौशांबीच्या दिशेने उड्डाण केल्यानंतर काही वेळातच त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाला. परिस्थिती इतकी गंभीर होती की, हेलिकॉप्टरच्या डिस्प्ले पॅनेलने काम करणे बंद केले आणि संपूर्ण केबिनमध्ये धुराचे लोट पसरले. यामुळे वैमानिकाने तातडीने निर्णय घेत हेलिकॉप्टर पुन्हा लखनऊ विमानतळावर सुरक्षितपणे उतरवले. केशव प्रसाद […]
आमदार गणेश गावकर यांनी राजीनामा द्यावा : पाऊसकर
मीराबागप्रकल्प‘दिल्लीलॉबी’च्याफायद्यासाठीअसल्याचाआरोप पणजी : मीराबाग बंधाऱ्याला विरोध करणारे प्रकरण हे विधानसभा सभागृहापर्यंत गेले. याचे कारण म्हणजे हा प्रकल्प स्थानिकांच्या फायद्याचा नसून, केवळ ‘दिल्ली लॉबी’ आणि उद्योजकांच्या हितासाठी राबवला जात आहे. या मुद्यावर मूग गिळून गप्प राहिल्याबद्दल सावर्डेचे आमदार गणेश गावकर यांनी त्वरित राजीनामा द्यावा, अशी मागणी माजी मंत्री दीपक पाऊसकर यांनी पत्रकारांशी बोलताना केली. सरकारने स्थानिकांच्या [...]
बेळगाव जिल्ह्यासाठीही अर्थसंकल्प समाधानकारक
बेळगुंदीतसुसज्जकुस्तीआखाडानिर्माणकरणार बेंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अर्थसंकल्पात बेळगाव जिल्ह्यासाठी समाधानकारक तरतुदी केल्या आहेत. जिल्ह्यात अधिवेशन काळात बंदोबस्तावरील कर्मचाऱ्यांना राहण्याची व्यवस्था, सरकारी पदवी महाविद्यालय, मॅरेथॉनचे आयोजन, बैलहोंगलमध्ये प्रजासौध इमारत, रामदुर्गमध्ये सुसज्ज बसस्थानक अशा अनेक तरतुदी अर्थसंकल्पात करण्यात आल्या आहेत. प्रामुख्याने बेळगावमधील सुवर्णसौध येथे होणाऱ्या अधिवेशनकाळात बंदोबस्तासाठी नेमण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी निवास सुविधा करण्यात येणार आहे. त्यासाठी 20 [...]
एक कोटीची चोरी केलेली 21 वाहने जप्त
आंतरराज्यटोळीच्याआवळल्यामुसक्या: मारिहाळपोलिसांचीकौतुकास्पदकामगिरी, आठजणांचीटोळी, तिघेअद्यापफरार बेळगाव : आंतरराज्य वाहनचोरांच्या टोळीच्या मारिहाळ पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याजवळून 95 लाख 50 हजार रुपये किमतीची 21 वाहने जप्त करण्यात आली आहेत. यामध्ये 8 मिनी गुड्स ट्रक, 5 बुलेट, 5 सुझुकी अॅक्सेस, 2 हिरो स्प्लेंडर, 1 होंडा डिओ या वाहनांचा समावेश आहे. पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी शुक्रवारी एका [...]
‘लोकमान्य’तर्फे महिला सक्षमीकरणासाठी ‘महिला अभिमान’ ठेव योजना जाहीर
बचतीवरअधिकसुरक्षितअन्खात्रीशीरपरतावा: वार्षिक9.50 टक्केइतकाआकर्षकव्याजदर बेळगाव : सहकार क्षेत्रात आपल्या विश्वासार्हतेचा ठसा उमटवणारी संस्था ‘लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी’ आपल्या स्थापनेचे 30 वे वर्ष साजरे करत आहे. या ऐतिहासिक टप्प्याचे औचित्य साधून संस्थेने समाजातील महिला वर्गाला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्यासाठी ‘महिला अभिमान’ ही विशेष मुदत ठेव योजना कार्यान्वित केली आहे. ‘प्रत्येक स्त्राrसाठी आर्थिक स्वातंत्र्याची नवी ओळख’ हे ध्येय समोर [...]
मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते रोजगार मेळावा पोस्टरचे प्रकाशन
शिवबसवनगरमध्येआजजिल्हास्तरीयमेळावा: लाभघेण्याचेआवाहन बेळगाव : जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत व विविध खात्यांच्या संयुक्त सहकार्याने शनिवार दि. 7 रोजी जिल्हास्तरीय रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. हा मेळावा शिवबसवनगरातील एस. जी. बाळेकुंद्री तांत्रिक महाविद्यालयात सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत हेणार असून 100 हून अधिक कंपन्यांचा मेळाव्यात सहभाग राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर मेळावा पोस्टरचे प्रकाशन पालकमंत्री सतीश जारकीहोळी [...]
मध्य पूर्वेमध्ये वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने हिंदुस्थानला रशियन तेल खरेदी करण्याची परवानगी दिली आहे. अमेरिकेने हिंदुस्थानला रशियाकडून कच्चे तेल खरेदी करण्यासाठी 30 दिवसांची सूट दिली आहे. 3 एप्रिलपर्यंत ही सूट देण्यात आली असून त्यानंतर हिंदुस्थान अमेरिकेकडून कच्च्या तेलाची खरेदी वाढवेल, असे अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांनी म्हटले आहे. यावेळी स्कॉट बेसेंट यांनी हिंदुस्थानचा उल्लेख ‘चांगले […]
रयत गल्लीतील विहिरीत ड्रेनेजमिश्रित पाणी
पाण्यालाउग्रवासयेतअसल्यामुळेनागरिकांच्याआरोग्याचाप्रश्नऐरणीवर: महानगरपालिकेचेसाफदुर्लक्ष बेळगाव : उन्हाळ्यापूर्वीच शहर व उपनगरात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्यासह दूषित पाणीपुरवठा सुरू झाला आहे. इतकेच नव्हे तर विहिरींमध्ये ड्रेनेजचे पाणी मिसळत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रयत गल्लीतील विहिरीत ड्रेनेजचे पाणी मिसळत असल्याने पाण्याला उग्र वास येत आहे. त्यामुळे रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले असले तरीही महापालिकेने मात्र याकडे साफ [...]
कचेरी गल्लीसह परिसरातील विहिरींना ड्रेनेजमिश्रित पाणी
बेळगाव : कचेरी गल्ली आणि हट्टीहोळी गल्ली शहापूर येथील विहिरींमध्ये ड्रेनेजचे पाणी पाझरत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. 45 वर्षांपूर्वीच्या ड्रेनेज लाईनला घुशी लागल्या असल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. याबाबत स्थानिक नगरसेवकांकडे तक्रार करून समस्या सोडविण्याची मागणी केली असता निधी नसल्याचे सांगून हात वर केले जात आहेत. त्यामुळे परिसरातील रहिवाशांतून तीव्र संताप व्यक्त [...]
कोयत्याचा धाक दाखवून रक्कम लुटणाऱ्या युवकाला चार तासांत अटक
बेळगाव : कोयत्याचा धाक दाखवून 2 लाख 81 हजार 280 रुपये रोकड असलेली बॅग पळविणाऱ्या एका युवकाला कागवाड पोलिसांनी अटक केली आहे. चार तासांची मोहीम राबवून त्याला अटक करण्यात आली असून त्याने पळविलेली रक्कम जप्त करण्यात आली आहे. सागर अशोक सनदी (वय 35) राहणार बुवाची सौंदत्ती, ता. रायबाग असे त्याचे नाव आहे. उगार बुद्रुक येथील [...]
वाढीवघरपट्टीवरपुन्हाचर्चाकरा: माजीमहापौर, नगरसेवकांचीनिवेदनाद्वारेमागणी बेळगाव : गतवर्षी घरपट्टी वाढविली असतानाच पुन्हा यंदाही घरपट्टीत 3 टक्के वाढ केली आहे. सर्वसाधारण सभेच्या अजेंड्यावर घरपट्टी वाढीचा विषय नसतानाही तो कौन्सिल सेक्रेटरींनी मांडला. हा प्रकार चुकीचा असून सदर विषय महापौरांनी मांडणे आवश्यक होते. हा प्रकार पाहता महापौरांच्या अधिकारावर गदा आणल्यासारखा आहे. त्यामुळे आपले अधिकार नोकरशाहीला देऊ नका. घरपट्टी वाढ विषयावर [...]
बसमध्ये चढताना दागिने चोरलेल्या निपाणीच्या महिलेला अटक
कॅम्पपोलिसांनीलावलाछडा: दागिनेहस्तगत बेळगाव : बसमध्ये चढताना कंग्राळी बुद्रुक येथील एका महिलेच्या बॅगमधील दागिने पळविल्याच्या आरोपावरून कॅम्प पोलिसांनी बुद्धनगर-निपाणी येथील एका महिलेला अटक केली आहे. तिच्याजवळून 3 लाख 64 हजार रुपये किमतीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. सविता संजू लोंढे (वय 46), राहणार बुद्धनगर-निपाणी असे पोलिसांनी अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. खडेबाजारचे एसीपी शेखरप्पा एच. यांच्या [...]
केंगळा येथे हत्तींच्या कळपाकडून पिकांचे नुकसान
शेतकऱ्यांनामोठाआर्थिकफटका: नारळ, केळी, वायंगणभातपिकेउद्ध्वस्त: शेतकरीहवालदिल खानापूर : तालुक्यातील कोंगळा येथे पाच हत्तींच्या कळपाने बुधवारी आणि गुरुवारी धुडगूस घालून वायंगण भात पिकाचे, नारळ, केळी व सुपारी बागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. यामध्ये जयवंत गावकर आणि नारायण दळवी यांच्या शेतातील वायंगण भाताचे तसेच शेतवाडीत शंभरहून अधिक केळींची तर नारळाची व सुपारीची झाडे हत्तीनी जमीनदोस्त केली आहेत. [...]
हलगा-मच्छे रस्त्याचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण
अधिकाऱ्यांचीबैठकीतमाहिती; खासदारशेट्टरयांनीघेतलाविकासकामांचाआढावा: रिंगरोडकामाच्याप्रगतीवरहीचर्चा बेळगाव : रेल्वे खाते, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, विमानतळ प्राधिकरण यांनी हाती घेतलेल्या विकासकामांचा आढावा खासदार जगदीश शेट्टर यांनी शुक्रवारी घेतला. हलगा-मच्छे दरम्यानचा 3 ते 4 कि.मी.चा रस्ता या महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. डिसेंबर अखेरपर्यंत सर्व 13.33 कि.मी. मार्गाचे कामही पूर्ण होईल, असे सांगितले. यावेळी रिंगरोड कामाच्या प्रगतीवरही चर्चा [...]
आकाशाला गवसणी तरीही जमिनीशी नाळ कायम
कर्तृत्वाचाप्रवासगुलमोहोरबागच्यामहिलाचित्रकारांनीकुंचल्यातूनटिपला: ‘तिचीकहाणी’ चित्राकृतींचेप्रदर्शन8 मार्चपर्यंतखुलेराहणार बेळगाव : ‘ती’… तिची किती रुपे… एक काळ असा होता की तिचे शब्दच काय हुंकारसुद्धा उमटणे अशक्य होते अशी परिस्थिती होती. परंतु ती शांतपणे परिस्थितीला सामोरी गेली. त्याचवेळी परिस्थिती बदलण्यासाठी हळूहळू पावले टाकू लागली. शिक्षणाने तिला अवकाश खुले केले आणि ‘मातृत्व ते कर्तृत्व’ असा तिचा प्रवास झळाळणारा ठरला. झाडाखालच्या शाळेत ती [...]
लोककल्पतर्फे मान येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर
बेळगाव : लोककल्प फौंडेशनतर्फे सेंट्राकेअर हॉस्पिटलच्या साहाय्याने मान (ता. खानापूर) येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे 50 हून अधिक नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा देण्याच्या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोफत आरोग्य तपासणी, मधुमेह तपासणी, रक्तदाब आदी तपासण्या करून सल्लामसलत [...]
तिथीनुसार शिवसेनेतर्फे शिवजयंती साजरी
बेळगाव : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सीमाभाग बेळगाव यांच्यावतीने हिंदू तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शुक्रवारी उत्साहात साजरी करण्यात आली. शिवसेनेचे संघटक तानाजी पावशे, एस. के. पोटे व उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी उद्यान येथील शिवमूर्तीचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी उपशहरप्रमुख राजू तुडयेकर, प्रवीण तेजम, सी. पी. घाडी, विठ्ठल हुंदरे, अमर कडगावकर, [...]
कॅन्टोन्मेंट फूल मार्केट नियमानुसारच
कॅन्टोन्मेंटचेअध्यक्षब्रिगेडियरमुखर्जीयांचेस्पष्टीकरण: बोर्डमिटिंगमध्येअनेकविषयांवरचर्चा बेळगाव : कॅन्टोन्मेंट बोर्डने किल्ला परिसरात उभारलेले फूल मार्केट हे कॅन्टोन्मेंटच्या नियमांना धरून आहे. पुरातत्त्व विभाग तसेच कॅन्टोन्मेंट संदर्भातील सर्व परवानग्या घेऊनच फूल मार्केट सुरू करण्यात आले होते. नागरिकांकडून मागणी झाल्यानंतर कॅन्टोन्मेंटने फूल मार्केट उभारण्यासाठी पाच वर्षांसाठी जागा उपलब्ध करून दिली. त्यामुळे हे मार्केट कुठेही बेकायदा नसल्याने याचा यापुढील काळात किरकोळ मार्केट म्हणून [...]
बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री जान्हवी कपूरने आपला 29 वा वाढदिवस कोणताही गाजावाजा न करता अत्यंत साधेपणाने आणि आध्यात्मिक पद्धतीने साजरा केला. वाढदिवसाचे औचित्य साधून तिने शुक्रवारी आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध तिरुमला वेंकटेश्वर मंदिरात जाऊन ईश्वराचे आशीर्वाद घेतले. जान्हवीने तिच्या या खास प्रवासाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले असून, तिच्या या साध्या आणि भक्तीमय लूकने चाहत्यांची मने […]
हिंदू तिथीनुसार शिवजयंती साजरी
शिवप्रतिष्ठानतर्फेशिवाजीउद्यानातसोहळा बेळगाव : शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानच्यावतीने फाल्गुन वद्य तृतिया शके 1947 (शुक्रवार दि. 6 मार्च) या हिंदू तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी उद्यान येथे शिवभक्तांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे विधिवत पूजन शिवप्रतिष्ठानचे प्रांतप्रमुख किरण गावडे यांच्या हस्ते झाले. शिवप्रतिष्ठानचे जिल्हाप्रमुख विश्वनाथ पाटील व त्यांच्या मातोश्री उर्मिलाताई पाटील, शहरप्रमुख अनंत [...]
मिशन ऑलिम्पिकतर्फे उद्या जंगी कुस्ती मैदान
महिलाकुस्तीचेआयोजन: बाळूअपराधआणिहरिषकुमारयांच्यातप्रमुखलढत बेळगाव : मिशन ऑलिम्पिक गेम असोसिएशन कर्नाटक राज्य यांच्यावतीने रविवार दि. 8 मार्च रोजी आनंदवाडी आखाडा बेळगाव येथे निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले आहे. रविवारी होणाऱ्या या कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकांची कुस्ती महाराष्ट्र चॅम्पियन बाळू अपराध वि. हरियाणा केसरी हरिष कुमार हरियाणा यांच्यात होणार आहे. द्वितीय क्रमांक कुस्ती कर्नाटक कंठीरेवा कामेश [...]
राज्यातील अहंकारी सरकारला घोडेबाजाराचा छंद लागला असून प्रत्येक निवडणूक पैशाच्या ताकदीवर लढवायची ही त्यांची मानसिकता झाली आहे, असा हल्लाबोल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. शनिवारी सकाळी ते मुंबईत माध्यमांशी संवाद साधत होते. राज्यसभेप्रमाणे राज्यातील विधानपरिषद निवडणूकही बिनविरोध होईल का? हा प्रश्न संजय राऊय यांना विचारण्यात आला. याला उत्तर देताना ते […]
मुंब्रा कौसा येथील अरमान सोसायटी परिसरात शनिवारी पहाटे अंदाधुंद गोळीबार झाली. या घटनेने मुंब्रा शहर अक्षरशः हादरले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी फिल्मी स्टाईल पाठलाग करून आरोपीला अटक केली आहे. शहाबाद उर्फ शब्बू कुरेशी (वय – 28) असे आरोपीचे नाव असून तो मुंब्रा येथील रहिवासी आहे. आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर दिल्लीतील जाफराबाद परिसरातील चार […]
नांदेडच्या होमिओपॅथिक कॉलेजच्या विद्यार्थिनीने उचलले टोकाचे पाऊल, नातेवाईकांचा हॉस्टेल चालकावर आरोप
नांदेड शहरातील हडको परिसरातील शामराव कदम होमिओपॅथिक कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना 6 मार्च रोजी दुपारी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून मृत विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांनी होस्टेल चालकावर गंभीर आरोप केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आकांक्षा मुंजाजी गायकवाड (वय 25, रा. वाजेगाव) या युवतीने हडको भागातील शामराव कदम होमिओपॅथिक कॉलेजशी संबंधित […]
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2026-27 चा अर्थसंकल्प मांडताना शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीची घोषणा केली. यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शेतकऱ्यांना जर कर्जमाफी खरोखर मिळणार असेल तर त्याचे स्वागतच केले पाहिजे. खरे म्हणजे शेतकऱ्यांना कर्जमाफी सुद्धा नको आहे. शेतकऱ्यांना फक्त हमीभाव आहे. युद्धामुळे दुबईच्या बंदरावर माल सडत […]
बासमती तांदळाच्या किमती घसरल्या; आखाती युद्धाचा परिणाम, निर्यात ठप्प, 4 लाख टन तांदूळ अडकला
अमेरिका – इराण युद्धाचा परिणाम तेल कंपन्यांपर्यंतच मर्यादित राहिलेला नाही. हिंदुस्थानातील तांदूळ मार्केटवर त्याचा परिणाम दिसून येतोय. मागील तीन दिवसांत बासमती तांदळाच्या किंमती 7 ते 10 टक्क्यांनी घसरल्या आहेत. आखाती देशांत हिंदुस्थानातून बासमती तांदूळ मोठ्या प्रमाणात निर्यात होतो. ती निर्यात आता ठप्प झाली आहे. जगाचा मोठा व्यापार हा हिंदुस्थानातून होतो. हिंदुस्थानसह अनेक देशांना क्रूड ऑईल, […]
औषध कंपन्यांना 5 हजार कोटींचा फटका
आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे चटके आता वेगवेगळ्या देशांना आणि क्षेत्रांना बसायला सुरुवात झाली आहे. हिंदुस्थानातील औषध कंपन्यांना अडीच हजार ते पाच हजार कोटींपर्यंत नुकसान होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. फार्मास्युटिकल्स एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल ऑफ इंडियाने (फार्मेक्सिल) दिलेल्या माहितीनुसार, हिंदुस्थानातील औषध कंपन्यांची एकूण निर्यातीत 5.58 टक्के भागीदारी आहे. संयुक्त अरब अमिरात (यूएई), सौदी अरब, ओमान, […]
कर्नाटक सरकारची घोषणा, 16 वर्षांखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी
कर्नाटकामध्ये 16 वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी विधानसभेत बंदी घालण्याची घोषणा केली आहे. 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया वापरावर बंदी घालणारे कर्नाटक हे देशातील पहिले राज्य बनले आहे. सोशल मीडिया हा छोट्या मुलांसाठी एक धोका बनला आहे. 16 वर्षांखालील मुलांना सोशल मीडियाचा धोका टाळण्यासाठी कर्नाटक […]
बासमती तांदळाच्या किमती घसरल्या, आखाती युद्धाचा परिणाम, निर्यात ठप्प, 4 लाख टन तांदूळ अडकला
अमेरिका – इराण युद्धाचा परिणाम तेल पंपन्यांपर्यंतच मर्यादित राहिलेला नाही. हिंदुस्थानातील तांदूळ मार्पेटवर त्याचा परिणाम दिसून येतोय. मागील तीन दिवसांत बासमती तांदळाच्या ंिकमती 7 ते 10 टक्क्यांनी घसरल्या आहेत. आखाती देशांत हिंदुस्थानातून बासमती तांदूळ मोठय़ा प्रमाणात निर्यात होतो. ती निर्यात आता ठप्प झाली आहे. जगाचा मोठा व्यापार हा हिंदुस्थानातून होतो. हिंदुस्थानसह अनेक देशांना क्रूड ऑईल, […]
चारधाम यात्रेसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू; 19 एप्रिलपासून यात्रेला प्रारंभ, घरबसल्या नोंदणी करता येणार
उत्तराखंडमधील प्रसिद्ध चारधाम यात्रा 2026 येत्या 19 एप्रिलपासून सुरू होणार आहे. यासाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. चारधामसाठी जाणाऱ्या भाविकांना आता घरबसल्या मोबाईल, लॅपटॉप किंवा व्हॉट्सअॅपवरून नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. चारधामसाठी जाणाऱ्या सर्व भाविकांना नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. नोंदणी केल्यानंतर नेमके किती भाविक यात्रेला येणार आहेत, याची माहिती […]
इस्रायल-अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धाला एक आठवडा पूर्ण झाला आहे. गेल्या शनिवारी इस्रायलने अमेरिकेच्या मदतीने इराणवर हवाई हल्ले करत केले आणि युद्धाला तोंड फुटले. या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनी यांचा खात्मा झाला होता. खामेनी यांच्या मृत्यूनंतर इराणनेही इस्रायल आणि आखातातील अमेरिकेच्या लष्करी तळांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोनच्या मदतीने तुफान हल्ले चढवले. हे […]
ऑस्कर सोहळ्यात घुमणार हिंदुस्थानच्या ‘देसी गर्ल’चा आवाज
बॉलीवूडची ‘देसी गर्ल’ अशी ओळख असलेली प्रियांका चोप्रा हॉलीवूडच्या प्रसिद्ध ऑस्कर सोहळ्यात दिसणार आहे. 98 व्या अकादमी अवॉर्ड्स ऑस्करच्या सादरकर्त्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यात प्रियांका चोप्राचा समावेश आहे. शुक्रवारी अकादमीने अधिकृतपणे या नावाची घोषणा केली. ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात सादरकर्त्यामध्ये प्रियांका दिसणार आहे. प्रियांकासोबत आयरन मॅन फेम रॉबर्ट डाऊनी ज्युनिअर आणि ऑस्कर विजेता ऐनी […]
आंध्रात दोनपेक्षा जास्त मुले जन्माला घातल्यास 25 हजार रुपये मिळणार
दोन किंवा त्यापेक्षा जास्त मुले जन्माला घालणाऱ्या दांपत्याला आंध्र प्रदेश सरकार 25 हजार रुपये प्रोत्साहन रक्कम देणार आहे. ही घोषणा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केली. राज्यात कमी झालेला जन्मदर पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. चंद्राबाबू नायडू यांनी विधानसभेत राज्याचे नवीन ‘लोकसंख्या व्यवस्थापन धोरण’ मांडले. राज्याचा प्रजनन दर 1.5 पर्यंत खाली घसरल्याने नायडू […]
विद्याविहार अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलाला जामीन
विद्याविहार येथे गेल्या महिन्यात झालेल्या एका भीषण कार अपघातातील आरोपी अल्पवयीन मुलाला ‘बाल न्याय मंडळाने’ (ज्युवेनाईल जस्टीस बोर्ड) आज जामीन मंजूर केला. या अपघातात एका 33 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता, तर त्याच्या पत्नीला जबर दुखापत झाली होती. दरम्यान दोन दिवसांपूर्वीच मुंबई सत्र न्यायालयाने गाडीचे मालक असलेल्या या मुलाच्या वडिलांनाही जामीन मंजूर केला होता. 5 […]
रहमान डकैत पुन्हा परतणार! ‘धुरंधर-2’चा आज ट्रेलर येणार
‘धुरंधर’ चित्रपटामध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांचे मन जिंकणारा अभिनेता अक्षय खन्ना ‘धुरंधर-2’ मध्ये पुन्हा एकदा रहमान डकैतच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ‘धुरंधर-2’ चित्रपटाच्या ट्रेलरच्या लाँचिंगची माहिती रणवीर सिंहने इन्स्टाग्रामवर शेअर केली असून हा ट्रेलर उद्या 7 मार्च रोजी सकाळी 11 वाजून 1 मिनिटाने दिसणार आहे. ‘धुरंधर ः द रिवेंज’ हा चित्रपट हिंदी, तेलुगू, […]
बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर बालाजीच्या चरणी
बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर आपल्या 29 व्या वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा आंध्र प्रदेशातील भगवान बालाजीच्या चरणी नतमस्तक झाली. जान्हवी सर्वसामान्य भाविकांप्रमाणे तिरुमाला मंदिरापर्यंत पायी चालली. जान्हवीने तिरुपतीच्या अलिपिरी फुटपाथ मार्गाहून पायी चालत 3,550 पायऱ्या चढून भगवान बालाजीचे दर्शन घेत मनोभावे पूजाअर्चा केली. जान्हवी याआधीही या ठिकाणी दर्शनासाठी आली होती. त्या वेळी तिच्यासोबत शिखर पहाडिया होता. जान्हवी […]
आखाती देशांत 10 वी, 12 वीच्या परीक्षा रद्द
आखाती देशांत युद्ध सुरू असल्याने सीबीएसईने 10 वी आणि 12 वी बोर्डाच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. सीबीएसईने यासंबंधी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. यात म्हटले की, 10 वीच्या 7 मार्च ते 11 मार्चपर्यंतच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. बहरीन, इराण, कुवेत, ओमान, कतार, सौदी अरब आणि यूएईमध्ये सीबीएसईच्या परीक्षा होणार नाहीत. 2 मार्च, 5 मार्च […]

28 C