केसांना अतिप्रमाणात कंडिशनर लावल्याने काय नुकसान होते
प्रत्येक ऋतूत केसांची काळजी घेणे आवश्यक असते. उन्हाळा आला आहे आणि अशा परिस्थितीत त्वचेसोबतच केसांचीही अतिरिक्त काळजी घेणे आवश्यक आहे. केस शाम्पूने धुतल्यानंतर, कंडिशनर काही वेळ केसांवर लावावे लागते आणि नंतर केस धुवावे लागतात. तज्ञांचे म्हणणे आहे की कंडिशनरमध्ये अनेक प्रकारची रसायने असतात. कोणत्याही प्रकारचे केमिकल अति प्रमाणात केसांना लावल्यानंतर, केसांची हानी होण्याची शक्यता अधिक […]
…तर सरकार या अधिवेशनात विरोधी पक्षनेत्याची घोषणा करेल, अनिल परब यांचे विधान
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि आमदार अनिल परब यांनी महाराष्ट्राच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाबाबत माहिती देत सरकारवर टीका केली आहे. त्यांनी सांगितले की, कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत 23 फेब्रुवारी ते 25 मार्चदरम्यान अधिवेशन घेण्याचा निर्णय जाहीर झाला आहे. 6 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाणार असून त्यानंतर त्यावर चर्चा होईल. परब म्हणाले की, अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या […]
फळांचा रस की अख्खं फळ खायला हवं, आपल्या आरोग्यासाठी सर्वात उत्तम काय
प्रत्येक ऋतूमध्ये वेगवेगळ्या स्वादिष्ट फळांचा आस्वाद घेणे आवश्यक आहे. यामुळे तुम्हाला फक्त चांगले वाटेलच असे नाही तर आश्चर्यकारक आरोग्य फायदे देखील मिळतील. फळे शरीरासाठी अमृत मानली जातात. हंगामी फळे खाल्ल्याने आजार टाळता येतात आणि आरोग्य सुधारते. अलीकडे अनेकजण फळांचा रस पिण्यास प्राधान्य देतात. बहुतेकांना अख्खे फळ खाण्यापेक्षा फळांचा रस पिणे हे अतिशय योग्य वाटते. परंतु […]
विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. अधिवेशनात ६ मार्चला राज्याचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प मांडणार आहेत. विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारी ते २५ मार्च दरम्यान होणार आहे. विधिंमडळाच्या दोन्ही सभागृहांच्या कामकाज सल्लागार समितीच्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. […]
T20 World Cup 2026 मध्ये मंगळवारी (10 फेब्रुवारी 2026) चौकार आणि षटकारांची तुफान बरसात पाहायला मिळाली. न्यूझीलंडच्या सलामीविरांनी UAE च्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत त्यांची चांगलीच धुलाई केली. UAE ने उभा केलेला 173 धावांचा डोंगर न्यूझीलंडने 92 चेंडूंमध्येच भेदून काढला विक्रमी भागीदारी करत 10 विकेटने दणदणीत विजयी जल्लोष केला. न्यूझीलंडने स्पर्धेतील दुसरा विजय साजरा करत […]
बांगलादेशात निवडणुकीपूर्वी हिंदू व्यावसायिकाची हत्या, त्रिशालमध्ये लुटीचाही आरोप
बांगलादेशात 12 फेब्रुवारी 2026 रोजी सार्वत्रिक निवडणुका होणार असतानाच हिंदूंवरील हिंसाचाराच्या घटना सुरूच असल्याचे समोर आले आहे. निवडणुकीच्या 48 तास आधी मैमनसिंह जिल्ह्यातील त्रिशाल उपजिल्यात एका हिंदू व्यावसायिकाची हत्या करण्यात आली. मृत व्यक्तीची ओळख 62 वर्षीय सुशेन चंद्र सरकार अशी झाली आहे. ते त्रिशालमध्ये “एमएस भाई-भाई एंटरप्राइजेज” नावाचा व्यवसाय चालवत होते. त्यांच्या कुटुंबीयांनी आरोप केला […]
अभिनेता रणवीर सिंगला खंडणीसाठी धमकीचा मेसेज, मुंबई पोलिसांकडून कसून चौकशी
चित्रपट निर्माता रोहित शेट्टी यांच्या घरी झालेल्या, हल्ल्यानंतर आता बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगला व्हॉट्सअॅप व्हॉइस नोटद्वारे धमकीचा संदेश मिळाला आहे. या मेसेजच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. या धमकीच्या मेसेजनंतर मुंबई पोलिसांना माहिती देण्यात आलेली आहे. त्यानंतर आता रणवीर सिंगच्या घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली. पोलिस आता धमकी देणारी व्हॉइस नोट पाठवणाऱ्याचा शोध घेत […]
उसाचा रस पिणे कुणी टाळायला हवे, जाणून घ्या
उन्हाळा सुरू होताच आपल्याला गारेगार उसाचा रस हा रस्त्यावर पाहायला मिळतो. उन्हाळ्यामध्ये उसाच्या रसाचे सेवन हे खूप मोठ्या प्रमाणात होते. कडकडीत उन्हात एक ग्लास थंड उसाचा रस शरीराला ताजेतवाने करतो. हा रस नैसर्गिक साखरेने समृद्ध असतो आणि त्वरित ऊर्जा प्रदान करतो. उसाच्या रसात जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात. ते शरीराला ऊर्जा देते आणि हायड्रेशन […]
विरोधी पक्षांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर चर्चा पूर्ण होईपर्यंत सभागृहाच्या कार्यवाहीपासून दूर राहण्याचा निर्णय लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी घेतला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात अविश्वास प्रस्तावावरील चर्चा पूर्ण होत नाही आणि निर्णय होत नाही तोपर्यंत ओम बिर्ला हे लोकसभेत उपस्थित राहणार नाहीत. संसदीय नियमांनुसार अविश्वास प्रस्तावादरम्यान लोकसभा अध्यक्ष उपस्थित राहिले तरी त्याने कुठलीही आडकाठी येणार […]
बीड जिल्ह्यातील धारूर येथील शालेय विद्यार्थ्यांची सहल घेऊन जाणाऱ्या बसला फुणगूस येथील मुख्य रस्त्यावर भोसलेवाडी परिसरात आज (10/02/2026) सकाळी सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. बस रस्त्याच्या कडेला पलटी झाल्याने क्षणभर भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र सुदैवाने या अपघातात मोठी जीवितहानी टळली असून केवळ एक-दोन विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. चाटे पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर […]
त्या दिवशी पायलट दारू प्यायला होता का? रोहित पवार यांची पत्रकार परिषदेत सखोल चौकशीची मागणी
आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत अजित पवाार यांच्या विमानप्रवासाशी संबंधित अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले. त्यांनी ब्रेथ अनालायझर चाचणीपासून ते पायलटच्या ट्रॅक रेकॉर्डपर्यंत विविध मुद्द्यांवर सखोल चौकशीची मागणी केली. ब्रेथ अनालायझर चाचणी आणि सीसीटीव्हीबाबत प्रश्न रोहित पवार म्हणाले की, विमानतळावर पायलटची ब्रेथ अनालायझर चाचणी झाली होती का, याची चौकशी झाली पाहिजे. पोलिस जशी […]
अजित पवार यांचा घातपात झाला असावा असा संशय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला. तसेच या विमान दुर्घटनेत अनेक संशयास्पद गोष्टी आहेत असेही रोहित पवार म्हणाले. आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत रोहित पवार म्हणाले की, या घटनेबाबत त्यांनाही शंका आहे आणि ती पुढे काही मुद्द्यांद्वारे स्पष्ट होऊ शकते. त्यांनी […]
आपल्या आरोग्यासाठी सर्वात उत्तम अंडी की पनीर, जाणून घ्या
प्रथिने ही आपल्या शरीरासाठी खूप गरजेची असतात. खासकरून शाकाहरी व्यक्तींना प्रचंड प्रमाणात प्रथिनांची कमतरता भासते. मजबूत स्नायू होण्यासाठी प्रथिनांची आवश्यकता असते. शरीरसौष्ठव करणाऱ्यांसाठी प्रथिने फार महत्त्वाची भूमिका बजावतात. प्रथिने स्नायू दुरुस्त करण्यास मोठ्या प्रमाणात मदत करतात. अंडी आणि पनीर हे दोन्ही प्रथिनांचे उत्कृष्ट स्रोत मानले जातात. अनेकदा प्रश्न पडतो, आपल्या शरीरासाठी अंडी की पनीर सर्वात […]
शंकरराव पाटील कनिष्ठ महाविद्यालयात बारावीची परीक्षा सुरळीत सुरू
भूम (प्रतिनिधी)- शंकरराव पाटील कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता बारावीच्या परीक्षेला आज सोमवार दि. 10 फेब्रुवारी 2026 पासून सुरळीत सुरुवात झाली. कला, वाणिज्य व विज्ञान या तिन्ही शाखांसाठी आज इंग्रजी विषयाचा अनिवार्य पेपर घेण्यात आला. या परीक्षेसाठी एकूण 372 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून त्यापैकी 356 विद्यार्थी परीक्षेला उपस्थित होते. परीक्षेच्या कामकाजावर केंद्रप्रमुख म्हणून प्रा. रवी सातपुते हे लक्ष ठेवून आहेत. परीक्षा अत्यंत शांत व शिस्तबद्ध वातावरणात पार पडत असून गैरप्रकार रोखण्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. परीक्षाकेंद्रावर आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी विशेष दक्षता घेण्यात आली आहे. पहिल्याच दिवशीची परीक्षा यशस्वीरीत्या पार पडल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. पुढील परीक्षाही अशाच शांततेत व शिस्तीत पार पडतील, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे इयत्ता बारावीच्या परीक्षेस आजपासून सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशीची परीक्षा शांत व शिस्तबद्ध वातावरणात पार पडली. विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी महाविद्यालय प्रशासनाने सर्व आवश्यक व्यवस्था केली आहे. परीक्षा पारदर्शक व गैरप्रकारमुक्त व्हावी यासाठी केंद्रप्रमुख प्रा. रवी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली कडक सुरक्षा व्यवस्था राबविण्यात येत आहे. सर्व विद्यार्थ्यांनी तणावमुक्त मनाने परीक्षा द्यावी, असे आवाहन शंकरराव पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संतोष शिंदे यांनी केले.
Solapur News : धाराशिव जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता!
धाराशिव जिल्हा परिषदेच्या मतमोजणीत शिवसेना शिंदे गटाचा दबदबा सोलापूर: धाराशिव जिल्हा परिषदेच्या ५५ गांसाठी आणि ११० पंचायत समिती गणांसाठी आज झालेल्या मतमोजणीत धाराशिव जिल्हा परिषदेवर महायुतीचे वर्चरव असल्याचे सिद्ध झाले आहे.भारतीय जनता पक्षाच्या एकहाती सत्ता मिळवण्याच्या प्रयत्नाला मतदारांनी नाकारले असून शिवसेना शिदे [...]
उन्हाळा सुरू होताच आहारामध्ये भेंडीसह इतर कोणत्या भाज्या समाविष्ट करायला हव्यात
उन्हाळा सुरु होताच बाजारामध्ये फारश्या भाज्या दिसत नाहीत. त्यामुळेच उन्हाळा हा गृहिणींसाठी डोकेदुखी ठरतो. उन्हाळ्यात आहार आणि खाण्याच्या सवयींकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. थोडीशीही निष्काळजीपणा आरोग्याच्या समस्या निर्माण करू शकतो. निरोगी शरीर राखण्यासाठी उन्हाळ्यात लोकांनी शक्य तितकी फळे आणि भाज्यांचे सेवन करावे. भाज्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात कारण त्यामध्ये भरपूर प्रमाणात नैसर्गिक पोषक तत्वे […]
ICC T20 World Cup 2026 मध्ये आज नेदरलॅंड्स आणि नामिबिया यांच्यामध्ये सामना खेळला गेला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना नामिबियाने 156 धावा करत नेदरलॅंड्सला 157 धावांचे माफक आव्हान दिले होते. आव्हानाचा पाठलाग नेदरलॅंड्सने 12 चेंडू शिल्लक ठेवत पूर्ण केलं आणि 7 विकेटने दणदणीत विजय साजरा केला. या विजयासह गुणतालिकेत नेदरलॅंड्सने पाकिस्ताना पिछाडीवर टाकलं आहे. दिल्लीच्या […]
Solapur Crime : सोलापूरात वेष्टा मस्करीत मोबाईल देण्या घेण्याच्या कारणावरून तरुणाचा खून
अक्कलकोट रोडवरील मारहाणीत तरुण ठार सोलापूर: सोलापूर वेष्टा मस्करीत मोबाईल देण्या घेण्याच्या कारणावरून दोघांनी केलेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाला, ही घटना अक्कलकोट रोडवरील समाधान नगरातील राज बिअर शॉपीजवळ सोमवार, ९ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री घडली. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात [...]
आंगणेवाडी यात्रोत्सवास लोटला भाविकांचा जनसागर
दत्तप्रसाद पेडणेकर (आंगणेवाडी) ध्वनीक्षेपकावर चालु असलेला देवीचा गजर, आणि महाप्रसादाचा सोहळा पाहण्यासाठी देवालयाच्या प्रांगणा बाहेर उसळलेली भक्तांची गर्दी असाच नजारा सोमवारी रात्री आंगणेवाडीत पहावयास मिळाला. महाप्रसाद ताटे लावण्याच्या कार्यक्रमासाठी राठी 9.50 वाजता बंद झालेली दर्शन रांग पुन्हा रात्री 1.00 नंतर चालू झाली.सकाळच्या सत्रा बरोबरच सायंकाळी भाविकानी उच्चांकी गर्दी अनुभवली. मंगळवारी सुद्धा भाविकांच्या गर्दीने आंगणेवाडी यात्रा [...]
मधुमेही रुग्णांनी साखरेची पातळी नियंत्रित राहण्यासाठी आहारात कोणत्या फळांचा समावेश करायला हवा
मधुमेह म्हटल्यावर खाण्यापिण्यावर खूप निर्बंध येतात. अशावेळी आहाराकडे बारकाईने लक्ष देणेही तितकेच गरजेचे असते. मधुमेही रुग्णांना त्यांच्या आहाराबद्दल विशेषतः काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. खाण्याच्या सवयींमध्ये थोडीशीही निष्काळजीपणा रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढवू शकतो. मधुमेही रुग्णांना अनेकदा गोड आणि साखरयुक्त पदार्थांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो. अनेक मधुमेही रुग्ण फळे खाणे टाळतात कारण त्यांचा असा […]
Solapur News : जेऊर स्टेशनवर मालगाड्या मेन लाईनवर तासन्तास उभ्या
जेऊर स्टेशनवर एक्स्प्रेस गाड्यांना मिनिटभर थांबा द्यावा ; प्रवासी संघाची मागणी सोलापूर : जेऊर रेल्वे स्थानकावर मेन लाईनवर दररोज मालगाड्या तासन्तास उभ्या राहत असल्याने पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या महत्वाच्या एक्स्प्रेस गाड्यांना लुप लाईनवरून मार्ग काढावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित एक्स्प्रेस गाड्यांना जेऊर येथे किमान एकमिनिटाचा थांबा द्यावा, [...]
Solapur News : महापौर-उपमहापौरांच्या नवीन गाड्यांसाठी नगरसचिव कार्यालयाकडून आयुक्तांना पत्र
महापौर व उपमहापौरांसाठी नवीन वाहनांची मागणी, नागरिक नाराज सोलापूर : शहराचे महापौर व उपमहापौर यांच्यासाठी शासनाकडून अधिकृत वाहन देण्याची परंपरा आहे मात्र सध्या वापरात असलेल्या गाड्या अत्यंत जुन्या आणि कालयाला झाल्या आहेत. यापूर्वीच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच प्रशासकीय कालावधीत अधिकायांनी या गाक्यांचा तब्बल १४ वर्षांहून अधिक काळ [...]
Solapur News : सोलापूरमध्ये बारावी परीक्षा सुरू ; कॉपीमुक्ततेसाठी ४० भरारी पथके तैनात!
सोलापूरमध्ये बारावी परीक्षा – भरारी पथक आणि ड्रोनसह कडक नियंत्रण सोलापूर : यंदाच्या बारावीच्या परीक्षेला मंगळवारी सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी इंग्रजी या विषयाची परीक्षा यावेळी घेण्यात आली. यावेळी परीक्षेपूर्वी विध्यार्थी मोठ्या आत्मविश्वासाने परीक्षा केंद्रात जाताना दिसून येत होते. जिल्ह्यातील ११९ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होत [...]
नगरसेवक अजय गोंदावळेंचा वाढदिवस उत्साहात
सावंतवाडी । प्रतिनिधी सावंतवाडी नगरपालिकेचे नगरसेवक अजय गोंदावळे यांचा वाढदिवस आज शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत संजू परब यांच्या कार्यालयात केक कापून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संजू परब यांनी गोंदावळे यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.तसेच विविध स्तरातूनही त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून अनेकांनी प्रत्यक्ष भेटून तसेच दूरध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत.
एनएसयुआय महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी कफील सय्यद यांची नियुक्ती
धाराशिव (प्रतिनिधी)- भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या एनएसयुआय विद्यार्थी काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी कफील सय्यद यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीचे पत्र प्रदेशाध्यक्ष सागर साळुंखे यांनी समाजमाध्यमावर जाहीर करत दूरध्वनीद्वारे त्यांचे अभिनंदन केले. कफील सय्यद यांनी यापूर्वी असंघटित कामगार विभागाचे समाजमाध्यम जिल्हाध्यक्ष, कळंब विधानसभा युवक काँग्रेस उपाध्यक्ष तसेच एनएसयुआय जिल्हाध्यक्ष म्हणून प्रभावी काम केले आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी त्यांनी सातत्याने संघर्ष केला असून कोरोना महामारीच्या काळात मोहल्ला क्लिनिकमध्ये रुग्णसेवा देत मोलाची मदत केली. या नियुक्तीबद्दल प्रदेशाध्यक्ष सागर साळुंखे, प्रदेश प्रभारी अक्षय यादव, दुसरे प्रभारी कांता ग्वाला, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. शादाब रहेमान शेख यांच्यासह काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.
राजकीय सुरक्षितेसाठी जिल्हा परिषद सदस्य सहलीवर
धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक कार्यक्रम येत्या दहा दिवसात जाहीर होणार असून, अध्यक्षपदी आपल्याच पक्षाचा सदस्य बसवा यासाठी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिवसेना-काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गट यांनी आपापले निवडून आलेले जिल्हा परिषद सदस्य राजकीय सुरक्षितेसाठी सहलीवर नेले आहेत. याबाबत सुत्राने दिलेल्या माहिती नुसार भाजप नेते आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या बंगल्यावर भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट दोन्ही पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य एकत्र बैठकीसाठी बोलवण्यात आले. त्यानंतर रात्री उशिरा अध्यक्षपदाच्या निवडीसाठी चर्चा होवून सर्व सदस्य राजकीय सुरक्षितेसाठी सहलीवर पाठविण्यात आले आहेत. भाजप व राष्ट्रवादीने सावध पावित्रा घेतलेला दिसताच शिंदे शिवसेना यांनी आपले निवडून आलेले जि. प. सदस्य एकत्र केले. परंतु 15 सदस्यापैकी काही सदस्य दुसऱ्या गटात गेल्याचे समजताच पालकमंत्री यांनी सदर नेत्यास फोन करून सदस्य परत पाठविण्याचे सांगितल्याचे समजते. शिवसेना ठाकरे गटाचे 7 व काँग्रेसचे 3 या प्रमाणे दहा जि. प. सदस्य राजकीय सुरक्षितेसाठी सहलीवर पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले. भाजप व शिंदे सेनेमध्ये मतभेद धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये महायुतीला 40 जागा मिळून स्पष्ट बहुमत मिळाले आहे. असे असले तरी धाराशिव जिल्हा परिषदच्या अध्यक्षपदासाठी आपल्या पक्षाचा उमेदवार असावा यासाठी भाजप व शिंदे शिवसेनेमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. भाजपच्यावतीने भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी तथा माजी जि. प. उपाध्यक्ष अर्चना पाटील या जि. प. अध्यक्षपदाच्या दावेदार आहेत. तर शिंदे शिवसेनेच्यावतीने माजी खासदार रविंद्र गायकवाड यांच्या पत्नी उषा गायकवाड या जि. प. अध्यक्षपदाच्या दावेदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस सुरेश बिराजदार यांच्या पत्नी सविता बिराजदार यापण जि. प. अध्यक्षपदाच्या दावेदार आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्षपदाची लॉटरी कोणाला लागणार याकडे लक्ष लागले आहे.
तेर गटात भाजपच्या अर्चनाताई पाटील विजयी
तेर (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्हयाचे लक्ष लागलेल्या तेर गटात भाजपच्या अर्चनाताई पाटील 2360 मतांनी विजयी झाल्या.तेर गटात भारतीय जनता पार्टीच्या अर्चनाताई पाटील यांना 7597 मतदान मिळाले. तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी( शरदचंद्र पवार) गटाच्या सक्षणा सलगर यांना 1253 मतदान मिळाले. तर शिवसेना उबाठाच्या किर्तीमाला खटावकर यांना 5237 मतद़ान मिळाले. तर आम आदमी पार्टी तर्फे रत्नमाला पिंपळे यांना 181 तर नोटाला 82 मतदान झाले. तेर गणात युती पुरस्कृत जया नाईकवाडी 1626 मतानी विजयी झाल्या विजयी झाल्या. तेर गणात युती पुरस्कृत जया नाईकवाडी यांना 3345 मतदान मिळाले. तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) च्या प्रिती आंधळे यांना 882 मतदान मिळाले. तर शिवसेना उबाठाच्या सोनाली पांगरकर यांना 1719 मतदान मिळाले. तर राष्ट्रीय समाज पक्षाच्या सुप्रिया देवकते यांना 1032 मतदान मिळाले. तर नोटाला 142 मतदान झाले. तर आळणी गणात भाजपच्या सुरेखा गवाड 217 मतांनी विजयी झाल्या. आळणी गणात भारतीय जनता पार्टीच्या सुरेखा गवाड यांना 3628 मतदान मिळाले. तर शिवसेना उबाठाच्या सोनाली वीर यांना 3411 मतदान मिळाले. तर नोटाला 181 मतदान झाले.
अध्यक्षपदासाठी सर्वच राजकीय पक्षाकडून जोरदार फिल्डींग
धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्हा परिषद निवडणूक मतमोजणी सोमवारी दि.9 फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील आठही तालुक्याच्या ठिकाणी पार पडली. या निवडणुकीत महायुतीमधील भाजप शिवसेना व राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला 55 पैकी 40 जागेवर दणदणीत विजय मिळवला आहे. असे असले तरी महायुतीमधील शिवसेना पक्षाचे आमदार तानाजी सावंत यांना त्यांच्या मतदार संघात मित्र पक्ष असलेल्या भाजपाने नगरपालिका निवडणूक असो की जिल्हा परिषद, पंचायत समिती एकाकी पाडले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत ते भाजपाला धडा शिकविण्यासाठी वेगळी चाल खेळण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. विशेषत: त्यांचे भूम, परंडा, वाशी तालुक्यातील शिवसेनेच्या सदस्यांची भूमिका वेगळी असण्याची शक्यता आहे. त्यास पुष्टी म्हणून की काय, कमी सदस्यसंख्या असलेल्या ठाकरे सेनेनेही आपले सदस्य सुरक्षीत ठिकाणी हलवले आहे. त्यामुळे कुछ तो गडबड हे, अशी चर्चा जिल्ह्यात सुरु असून, जिल्हा परिषदेत महायुतीला स्पष्ट बहुमत असतानाही काही दगा, फटका होवून नये, या भितीने भाजपा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनीही आपले सदस्य सुरक्षीत ठिकाणी हलविले आहेत. तसेच मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीचे सदस्यही त्यांनी सोबत घेतल्याची माहिती कळत आहे. याशिवाय सत्तासमीकरण जुळविण्यासाठी अपक्षही गळाला लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. जिल्हा परिषद निवडणूकीत भारतीय जनता पक्षास 19 जागा, शिवसेना पक्षास 15 जागा, राष्ट्रवादी अजित पवार पक्ष 06, शिवसेना ठाकरे पक्ष 07, राष्ट्रीय काँग्रेस 03, समाजवादी पक्ष 01 तर अपक्ष 4 अशी एकूण 55 सदस्यसंख्या आहेत. अध्यक्ष होण्यासाठी किमान 28 सदस्यांचे बहुमत होण्याची आवश्यकता आहे. तेवढा आकडा कोणत्याच एकट्या पक्षाकडे नाही. त्यामुळे महायुतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेकडे 15 सदस्य संख्येच्या जोरावर ते विरोधातील सदस्यांना सोबत घेवून आपला अध्यक्ष जिल्हा परिषदेत बसवू शकतात. विशेष म्हणजे आमदार तानाजी सावंत यांनी भाजपा आमदार पाटील यांना पालिका निवडणूकीतील धडा शिकवण्यासाठी ही खेळी करु शकतील अशी चर्चा जिल्ह्यात जोरात सुरु आहे. त्याचे कारण म्हणजे आमदार सावंत यांनी या निवडणूकीत प्रचारादरम्यान अनेकवेळा ही बाब बोलूनही दाखवलेली आहे. त्यामुळे शिवसेनेचे 15 सदस्य अधिक त्यांनी ठाकरे सेना, कॉग्रेस व अपक्षांना सोबत घेतले तरी ते अध्यक्षपदासाठीचा बहुमताचा आकडा गाठू शकतील. तशी रणनिती आखली जात असल्याचेही जोरदार चर्चा सुरु आहेत. आमदार सावंत यांनी धाराशिव जिल्ह्यात शिवसेनेचे एबी फॉर्म वाटपावरुन भाजपा आमदार पाटील यांच्यावर त्यांनी नाव न घेता अनेकवेळा टिकाही केली आहे. त्यामुळे भाजपाला जिल्हा परिषदेत सत्तेतून बाहेर ठेवण्यासाठी त्यांची ही रणनिती असू शकते, अशी चर्चाही आता जोरात सुरु झाली असून सर्वच राजकीय पक्षाकडून आपआपले उमेदवार सुरक्षीत ठिकाणी हलविण्याची प्रक्रीया सुरु केली आहे हेच यावरुन स्पष्ट होत आहे.
श्रीकांतराव कुलकर्णी यांचे निधन
धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव शहरातील जुन्या पिढीतील ज्येष्ठ माजी नगरसेवक श्रीकांत अनंतराव कुलकर्णी अंबेजवळगेकर यांचे वयाच्या 93 व्या वर्षी राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. धाराशिव नगरपालिकेला ते 1967 आणि 1974 असे दोन वेळा काँग्रेसच्या तिकिटावर नगरसेवक म्हणून विजयी झाले होते.उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे संचालक म्हणूनही ते काही काळ कार्यरत होते. ते आंबेजवळगा येथील मोसंबी फळबाग शेतकरी म्हणून प्रसिद्ध होते.आंबेजवळग्याच्या विकासासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, सुन,जावई, नातू, पणतू, पणती असा परिवार आहे. जिल्हा सहाय्यक सरकारी वकील ॲड. आशिष कुलकर्णी यांचे ते वडील होत. त्यांच्या पार्थिव देहावर रात्री नऊ वाजता आंबेजवळगा त्यांच्या राहत्या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.
उमरगा तालुक्यात समीश्र कौल, भाजपाला सर्वाधिक जागा, ठाकरे सेनेचे पानिपत
उमरगा (प्रतिनिधी)- तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष 3, काँग्रेस 2, शिवसेना (शिंदे) 1, राष्ट्रवादी काँग्रेस 1 तर 2 जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाल्याने जनतेचा कौल संमिश्र दिसून येत आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत ठाकरे सेनेचा सुपडा साफ झाला आहे. पंचायत समितीमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले असले तरी सभापती पदावरुन वेगळी समीकरणे जुळून येण्याची शक्यता आहे. तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने माजी मंत्री बसवराज पाटील, जिल्हा बँकेचे चेअरमन बापुराव पाटील, माजी जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य, उमरगा जनता बँकेचे चेअरमन शरण पाटील, माजी सभापती ॲड. अभयराजे चालुक्य यांनी तर शिवसेना (शिंदे) कडून माजी खासदार प्रा. रविंद्र गायकवाड, माजी आमदार ज्ञानराज चौगुले, उमरगा नगराध्यक्ष किरण गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस (अप) कडून प्रदेश उपाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार, काँग्रेसकडून युवक काँग्रेसचे सचिव महेश देशमुख, जिल्हाध्यक्ष आश्लेष मोरे व शिवसेना (ठाकरे) कडून खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार प्रविण स्वामी यांनी प्रचारात जीवाचे रान केले. सोमवारी (दि.9) झालेल्या मतमोजणीत नगरपालिकेच्या निकालाची पुनरावृत्ती होत ठाकरे गटाचे पानीपत झाल्याचे दिसून आले. जिल्हा परिषद मतदारसंघातील विजयी उमेदवार दाळिंब - रफिक तांबोळी (भाजपा), येणेगुर - रचना राठोड (भाजपा), गुंजोटी - शहाजी पाटील (भाजपा), कवठा महेश देशमुख (काँग्रेस), कुन्हाळी लताताई मोरे (काँग्रेस), कदेर - उषाताई गायकवाड (शिवसेना), बलसुर - सविता बिराजदार (राष्ट्रवादी काँग्रेस), तुरोरी - अर्चना जाधव (अपक्ष), आलुर - आप्पासाहेब पाटील (अपक्ष) हे उमेदवार निवडून आले आहेत. तर पंचायत समितीच्या 18 जागापैकी भाजपाला 7 यामध्ये डिग्गी - अनिल माने, दाळिंब - अमर वाले, भुसणी - कैलास शिंदे, येणेगुर - विजयालक्ष्मी पाटील, तुगाव - रेखा मुळे, आलुर - राजकुमार माने, तलमोड - दगडू मोरे तर शिवसेना शिंदे 5 यामध्ये केसरजवळगा - आकांक्षा चौगुले, कदेर - महानंदा कलबुर्गे, माडज - मन्मथ स्वामी, गुंजोटी - स्नेहा जाधव, तुरोरी - तुकाराम जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस बलसुर - अर्चना पाटील, काँग्रेस 3 यामध्ये कुन्हाळी - रविंद्र हंगरगे, कवठा - रुक्मिणी कांबळे व नाईचाकुर - सुगलाबाई मदने, शिवसेनेच्या चिन्हावर मनसेचे तालुकाध्यक्ष हरी जाधव जकेकुर गणातून तर मुळज गणातून रेखा इंगळे या अपक्ष म्हणून निवडून आलेल्या आहेत. निकालानंतर सर्वच विजयी उमेदवारांनी गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला. पंचायत समितीचे सभापती पद अनुसुचित जाती साठी राखीव असुन भाजपाचे कैलास शिंदे व शिवसेना (शिंदे) च्या आकांक्षा ज्ञानराज चौगुले दोघेही या पदाचे प्रबळ दावेदार आहेत. महायुतीला 18 पैकी 13 जागेवर घवघवीत यश मिळाले. तरी सभापती पदावरुन रस्सीखेच होईल आणि वेगळी राजकीय समीकरणे जुळतील असा अंदाज आहे.
जि.प. आणि पं.स.निडणुकीत शिवसेनेचे निर्विवाद वर्चस्व
वाशी (प्रतिनिधी)- नुकत्याच पार पडलेल्या जि.प. आणि पंचायत समिती निवडणूक 2026 ची मतमोजणी सोमवारी दि.9 फेब्रुवारी रोजी वाशी तहसील कार्यालयात झाली.या निकालातून तालुक्यातील राजकारणावर शिवसेनेचे विद्यमान आमदार आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांचे वर्चस्व असल्याचे दिसून आले. वाशी पंचायत समितीवर सहापैकी पाच जागा जिंकत शिवसेनेची एकहाती सत्ता आली आहे. तसेच वाशी तालुक्यातील तीनपैकी तीन जागाही शिवसेनेने जिंकल्या आहेत. या निवडणुकीत अनेक बुजुर्ग राजकारण्यांना धक्का देत तरुण उमेदवारांनी आपला विजय मिळवला आहे. पारगाव जि.प.गट- तळेकर सविता विकास (शिवसेना), पारा जि.प. गट - उंदरे अश्विनी सुनिल (शिवसेना) तेरखेडा जि.प.गट- चव्हाण संदेश उर्फ विकी सोमनाथ (शिवसेना) हे विजयी झाले आहेत. पंचायत समिती विजयी उमेदवार पारगाव गण- मोटे कमल प्रदीप (राष्ट्रवादी) सरमकुंडी गण- गायकवाड प्रणिता प्रविण (शिवसेना) पारा गण- भराटे अशोक रामदास (शिवसेना), बावी गण- रणदिवे नितीन शिवाजी (शिवसेना), इंदापूर गण- शिंदे अरुणा रावसाहेब (शिवसेना), तेरखेडा गण- घोलप पूनम बालाजी (शिवसेना)
तेर (प्रतिनिधी )- धाराशिव तालुक्यातील तेर येथील श्री कालेश्वर मंदिरात महाशिवरात्री निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहात प्रारंभ झाला. अखंड हरिनाम सप्ताहाचा प्रारंभ श्री संत गोरोबा काका व शिवमंदिर ट्रस्टच्या प्रशासक रूपाली कोरे यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी साहेबराव सौदागर, कल्याण कानडे, दत्तात्रय स्वामी,हभप महेश महाराज भोरे व भक्तगण उपस्थित होते.
Satara News : वाघेरी गणात अनिता पर्व सुरू; विरोधकांना धोबीपछाड
पंचायत समिती गणात महिला उमेदवार अनिता वेताळ यांचा विजय बाघेरी : बाघेरी पंचायत समिती गणातून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार अनिता वेताळ यांनी १५८ मतांनी विजय मिळवत भाजपचा भगवा झेंडा फडकवला. त्यांच्या या विजयामागे कुटुंबातील कुस्तीचा शिस्तबद्ध वारसा, मजबूत संघटन आणि कराह [...]
चोरीच्या गुन्ह्याची उकल करण्यात कुडाळ पोलिसांना यश
मुंबई येथील सराईत चोरट्याला ठोकल्या बेड्या ; 13 लाखाचे सोन्याचे दागिने केले हस्तगत. कुडाळ – बस प्रवासात चोरी केलेल्या गुन्हयाची उकल करण्यात कुडाळ पोलिसांना यश आले. या गुन्हयातील संशयित मंगेश नाथुभाई नटु (55,रा.सायन कोळीवाडा, मुंबई ) याला अटक करण्यात आली.तसेच त्याच्याकडून चोरीतील 13 लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख सहा हजार रुपये हस्तगत केले.20 [...]
उन्हाळ्यात रोज एक काकडी का खायला हवी, जाणून घ्या
उन्हाळा आल्यावर घामाद्वारे शरीरातील पाणी कमी होते. अशावेळी चक्कर येणे किंवा थकवा लागणे या समस्या भेडसावतात. म्हणूनच उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीरातील पाण्याची पातळी उत्तम राहावी याकरता काही फळे आणि भाज्या आहारात समाविष्ट करायला हवीत. उन्हाळ्यात शरीराला ताजेतवाने ठेवण्यासाठी, पाणीयुक्त पदार्थ खाण्याची शिफारस केली जाते. लोक बहुतेकदा हायड्रेशनसाठी काकडी पसंत करतात. केसांच्या उत्तम वाढीसाठी कढीपत्त्याचा असा वापर […]
Satara News : पंचायत समिती निवडणुकीत भाजपला शिखरशिंगणापूरमध्ये मोठा विजय
राजाराम बोराटे यांचा शिंगणापुरात विजयोत्सव शिखरशिंगणापूर : जिल्हापरिषद पंचायत समिती निवडणुकीत शिंगणापूरचे माजी सरपंच राजाराम महादेव बोराटे हे वावरहिरे गणातून बहुमताने विजय झाले. त्यांच्या या पंचायत समिती विजयामुळे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी शिंगणापूरमध्ये जोरदार आंनद उत्सव [...]
Satara News : मारूल हवेली परिसरातील शेतकऱ्यांना पाण्याअभावी संकट
गांधीटेकडी योजना थकल्यामुळे पिकांचे नुकसान सुरू पाटण : उन्हाळा वाडू लागल्याने मारूल हवेलीसह भागातील बाधा-वस्तीच्या घशाला कोरड पडू लागती आहे. शेतीला पाणीपुरवठा करणारी गांधीटेकडी (ता.पाटण) येथील इरिगेशन योजना पाणीपट्टी थकल्याने बंद ठेवण्यात आली आहे. परिणामी गांधीटेकडी परिसरातील गावांत पाणीटंचाईचे चटके बसू लागले आहेत. ओढे-नाले, [...]
हिंगोली तालुक्यातील सिरसम बुद्रुक येथे जलजीवन मिशन अंतर्गत कोट्यावधी रूपयांचा खर्च करण्यात आला. मात्र, अद्यापपर्यंत गावात पाण्याचा एक थेंबही आला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी डोक्यावर हंडे घेत जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी महिला व ग्रामस्थांनी ‘कलेक्टर साहेब, आमदार साहेब जागे व्हा..जागे व्हा… सिरसम गावाला पाणी उपलब्ध करून द्या.., अशा घोषणा […]
Satara Crime : शिरवळ चौकात पोलिसांना शिवीगाळ; लोणंद पोलिसांची ऐतिहासिक धिंड
लोणंद पोलिसांनी मद्यधुंद वाहनचालकाची धिंड काढून दिला संदेश लोणंद : लोणंद शहरात पोलिसांशी बेट शिवीगाळ व उर्मट वर्तन करण्याची ही पहिलीच घटना ठरली असून, या प्रकाराने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. मद्यधुंद अवस्थेत दुचाकी चालवत पोलिसांच्या शासकीय कर्तव्यात [...]
Sharad Pawar Health Updates : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट
शरद पवार यांची प्रकृती स्थिर; पुणे : ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांना खोकल्याच्या व श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने सोमवारी पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात दाखल केले. पवारांची प्रकृती नॉर्मल असून, काळजीचे कारण नसल्याचे डॉ क्टरांकडून [...]
Sangli News |सांगली महापालिकेत नवे नेतृत्व; महापौर व उपमहापौरांनी पदभार स्वीकारला
नव्या नेतृत्वामुळे सांगलीच्या विकासाला नवी दिशा सांगली : सांगली, मिरज व कुपवाड शहर महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपचे धीरज सूर्यवंशी व उपमहापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे गजानन मगदूम यांनी आज अधिकृतपणे पदभार स्वीकारला. महापालिकेच्या मुख्य कार्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमात [...]
तर लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांनाच धक्का, खासदार अरविंद सावंत यांची टीका
दिल्लीमध्ये लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्तावावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विरोधी पक्षनेत्याला संसदेत बोलू दिले जात नसल्याचा आरोप त्यांनी केला. सावंत म्हणाले की, “विरोधी पक्षनेत्याला संसदेत बोलू दिले जात नसेल, तर लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांनाच धक्का बसतो. त्यांना बोलण्याची संधीच दिली जात नसेल, तर काय करायचे?” ते […]
Sangli Zilla Parishad |सांगली जि.प. निवडणुकीत भाजपला मोठा दणका; महाविकास आघाडीला बळ
सांगली जिल्हा परिषदेत सत्तास्थापनेचा पेच सांगली : दरम्यान, पंचायत समित्यांच्या दहा पैकी सर्वच पक्षांना संमिश्र यश मिळाले आहे. जिल्हा परिषदेच्या ६१ आणि पंचायत समितीच्या १२२ जागांसाठी शनिवारी मतदान झाले होते. सोमवारी प्रत्येक [...]
Photo –दोनदा टी-20 वर्ल्डकप जिंकणारे जगातील नऊ दिग्गज खेळाडू
आयसीसी टी-20 वर्ल्डकपला 7 फेब्रुवारीपासून सुरुवात झाली. पहिल्या तीन-चार दिवसातच तुल्यबळ लढती पाहायला मिळाल्या. वर्ल्डकप जसा पुढे सरकेल तशी आणखी रंगत वाढत जाईल. यंदा कोण सेमीफायनल गाठणार, कोण वर्ल्डकप उंचावणार याबाबत विविध खेळाडू भाकीतही वर्तवत आहेत. विशेष म्हणजे हिंदुस्थान, वेस्ट इंडिज, इंग्लंड हे तीनच संघ असे आहेत ज्यांनी दोन वेळा वर्ल्डकप जिंकला आहे. तर 9 […]
Budhgaon Zilla Parishad |बुधगाव जि.प. मध्ये काँग्रेसचा भाजपाला हादरा, तब्बल १५ वर्षानंतर सत्तांतर
बुधगाव-माधवनगर जि.प. मध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय मिरज : मिरज तालुक्यातील अतिशय चुरशीने झालेल्या बुधगोष माधवनगर जिल्हा परिषद मतदार संघामध्ये काँग्रेसने भाजपाला धक्का देत मोठा विजय मिळवला. मागील पंधरा बर्षे या मतदारसंघावर शिबाजी डोंगरे आणि भाजपाचे वर्चस्व होते. यंदा खासदार विशालपाटील आणि [...]
महात्मा गांधीवर लिहिले निबंध, पोक्सो प्रकरणात दोषी गुन्हेगाराची शिक्षा जन्मठेपेवरून थेट 12 वर्षांची
मुंबई उच्च न्यायालयाने पोक्सो (POCSO) कायद्यान्वये दोषी ठरलेल्या एका आरोपीची दोषसिद्धी कायम ठेवत, त्याची शिक्षा जन्मठेपेवरून 12 वर्षांच्या कारावासात रूपांतरित केली आहे. कारागृहात असताना महात्मा गांधींचे विचार वाचन, निबंध लेखन आणि पुस्तक विश्लेषण कार्यक्रमांत सहभागी होऊन मिळवलेल्या प्रमाणपत्रांचा विचार करून ही सवलत देण्यात आल्याचे न्यायालयाने नमूद केले. घाटकोपरमधील चाळीत राहणाऱ्या या आरोपीने डिसेंबर 2016 मध्ये […]
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी ट्विट करत केंद्र सरकारवर इंडो-यूएस व्यापार करारावरून जोरदार टीका केली आहे. “ट्रॅप कराराचे सत्य आता हळूहळू समोर येत आहे,” असे म्हणत त्यांनी चार प्रमुख मुद्द्यांवर सरकारवर आरोप केले. रशियन तेल आणि धोरणात्मक स्वायत्ततेवर प्रश्न खर्गे म्हणाले की, इंडो-यूएस संयुक्त निवेदनात रशियन तेलाचा उल्लेख नसल्याचे सांगितले गेले होते, मात्र अमेरिकेच्या व्हाईट […]
‘उदं… ग… आई उदं…’ च्या गजरात रेणुका देवीची आंबील यात्रा उत्साहात
रेणुका देवी मंदिरात आंबील-घुगऱ्यांचा नैवेद्य कसबा बावडा : कसबा बावड्यात रेणुका देवीची आंबील यात्रा सोमवारी उदं.. ग.. आई उदं… च्या गजरात पार पडली. यात्रेनिमित्त दिवसभर भाविकांनी देवीस आंबील-घुगऱ्या, पोळ्याचा नैवेद्य अर्पण करण्यासाठी मंदिरात [...]
Kalammavadi Water Scheme |वीजपुरवठा खंडित; कोल्हापुरात दोन दिवस अपुरा पाणीपुरवठा
काळम्मावाडी योजनेचा पाणी उपसा बंद कोल्हापूर : काळम्मावाडी येथील ३३ केव्ही विद्युत वाहिनीच्या सबस्टेशनमध्ये आयसोलेटर बसवण्याचे काम सोमवारी सुरू झाले. मंगळवारी ते काम सुरू राहणार आहे. त्यामुळे या भागातील वीजपुरवठा सोमवारी खंडित केला होता. [...]
Kolhapur Zilla Parishad |जिल्हा परिषदेत राजकीय वारसदारांचा उदय; नव्या चेहऱ्यांचा दबदबा
कोल्हापूर जि.प. निवडणुकीत राजकीय घराण्यांचे वर्चस्व कोल्हापूर : जिल्हा परिषद निवडणुकीत राजकीय वारसदारांनी चांगलेच यश मिळवले आहे. आमदार, माजी आमदार, कारखान्याचे उपाध्यक्ष, गोकुळचे माजी अध्यक्ष यांच्या वारसदारांनी या निवडणूकीत यश मिळवले आहे. मंत्रालयापूर्वी मिनी मंत्रालयात त्यांचा प्रवेश झाला आहे. त्यामुळे [...]
ICC T20 WC 2026 –‘या’ 4 टीम खेळणार सेमीफायनल; ऑस्ट्रेलियाच्या विश्वविजेत्या कर्णधाराचं भाकीत
हिंदुस्थान आणि श्रीलंकेत सुरू असलेला आयसीसी टी-20 वर्ल्डकप चांगलाच रंगात आला आहे. टी-20 मधील टॉपच्या समजल्या जाणाऱ्या संघांनाही नवख्या संघांनी विजयासाठी चांगलेच झुंझवले. अखेरच्या षटकांपर्यंत जाणाऱ्या सामन्यांमुळे क्रीडाप्रेमींचाही उत्साह वाढत आहे. अशातच ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्क याने टी-20 वर्ल्डकप 2026 मध्ये कोणते चार संघ सेमीफायनल गाठतील याचे भाकीत वर्तवले आहे. बातमी अपडेट होत आहे…
सुप्रसिद्ध गणेश मूर्तिकार शंकर गोसावी यांचे निधन
चौके ( प्रतिनिधी ) मालवण तालुक्यातील काळसे गोसावीवाडीतील रहिवासी सुप्रसिद्ध गणेशमूर्तिकार शंकर धर्माजी गोसावी ( वय ८० वर्षे ) यांचे आज मंगळवार दिनांक १० फेब्रुवारी रोजी पहाटे ६.०० वाजता राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन विवाहित मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. काळसे गावासह पंचक्रोशीमध्ये पर्यावरण पूरक माती [...]
बारावीच्या परीक्षेला १० तारखेपासून सुरुवात कोल्हापुर- बारावीच्या परिक्षेला मंगळवारी १० रोजीपासुन सुरुवात होत आहे. राज्य माध्यामिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने ही परिक्षा घेतली जात आहे. परीक्षेच्या पहिल्याच दिवशी इंग्रजी या विषयाचा पेपर होणार आहे. सकाळी [...]
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव सादर, 118 खासदारांच्या सह्या
विरोधी पक्षाने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याची नोटीस जारी केली आहे. या नोटीसीवर विरोधी पक्षातील 118 खासदारांच्या सह्या आहेत. मंगळवारी लोकसभा सचिवालयाला तशी नोटीस दिली आहे. The opposition on Tuesday submitted a notice for moving a resolution to remove Lok Sabha Speaker Om Birla from office for disallowing Rahul Gandhi and […]
Photo – ट्रेडिशनल लूकमध्ये पलक तिवारीचा ग्लॅमरस अंदाज, पाहा फोटो
टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी हिची मुलगी पलक तिवारीसोशल मीडियावर कायम चर्चेत असते. तिच्या फॅशन सेन्स चाहत्यांना प्रचंड आवडतो. नुकतेच तिने इंस्टाग्रावर ट्रेडिशनल आउटफिटमध्ये फोटो शेअर केले आहेत. नुकतेच पलकने तिच्या मैत्रिणीच्या हळदी समारंभाला हजेरी लावली. या कार्यक्रमातील काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मैत्रिणीच्या हळदी समारंभासाठी पलकने सी ग्रीन कलरच्या डिझायनर लेहेंगा परिधान […]
पुजेसाठी लावलेल्या दिव्याने केला घात, मुलाच्या लग्नाच्या एक दिवस आधी आईचा होरपळून मृत्यू
विलेपार्ले पूर्व येथे सोमवारी उत्तुंग इमारतीच्या तेराव्या मजल्यावर भीषण आग लागून एका 63 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. भावना सत्रा असे त्या महिलेचे नाव असून त्यांच्या मुलाच्या लग्नाच्या एक दिवस आधीच त्यांच्या घराला आग लागली व त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. घरात लग्नाच्या विधी सुरू असताना लावलेल्या दिव्यामुळे ही आग लागल्याचे समजते. विलेपार्लेच्या फिरोजशहा मेहता […]
अखेर चिंबलवासियांच्या ‘युनिटी’चा विजय
नियोजित ‘युनिटी मॉल’, ‘प्रशासन स्तंभ’चे स्थलांतरण : सर्वसाधारण प्रशासन, पर्यटन खात्याकडून आदेश जारी : लेखी आदेश मिळाल्यानंतर 44 दिवसांचे आंदोलन मागे : पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे आंदोलकांनी मानले आभार पणजी : चिंबल येथे होणारा ‘युनिटी मॉल’ आणि ‘प्रशासन स्तंभ’ या दोन्ही प्रकल्पांना तीव्र विरोध करीत चिंबलवासियांनी गेले 44 दिवस प्रखर आंदोलन केल्यानंतर अखेर काल सोमवारी सरकारला [...]
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार उफाळला; 5 दिवसांसाठी इंटरनेट बंद, कर्फ्यू लागू
मणिपूरच्या उखरुलमध्ये हिंसाचाराचे वृत्त समोर आले आहे. लिटन सारेखोंग गावात काही सशस्त्र गटाने अनेक घरांना आग लावल्याचे वृत्त आहे. परिस्थिती आणखी बिकट होण्याची भीती असल्याने प्रशासनाने संपूर्ण जिल्ह्यात कर्फ्यू लागू केला आहे. तसेच कोणत्याही अफवा पसरवण्यात येऊ नये, यासाठी पाच दिवस इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात येणार आहेत. लिटन सारेखोंग गावात सशस्त्र दरोडेखोरांनी अनेक घरांना आग […]
मीराबाग बंधारा बांधकामामुळे तणाव
लोकांच्याविरोधानंतरहीखोदकामसुरु: कंत्राटदाराचीदादागिरी, स्थानिकांचाआक्रमकविरोध कुडचडे : कुडचडे येथील मीराबाग भागात प्रस्तावित असलेल्या बंधाऱ्याचा वाद आता विकोपाला गेला आहे. रविवारी झालेल्या महासभेत हा बंधारा नको, असा ठराव ग्रामस्थांनी एकमताने संमत केला असतानाही, काल सोमवारी सकाळी कंत्राटदाराने या निर्णयाला कचऱ्याची टोपली दाखवत खोदकाम सुरू केल्याने परिसरात तणाव निर्माण झाला. काल सोमवारी सकाळी कंत्राटदाराने पोलिस संरक्षण किंवा ग्रामस्थांची संमती [...]
मांडवीतील ‘कॅसिनो’ त्वरित हटवावे
‘पणजीकारअगेन्स्टकॅसिनो’चेमहापौर, आयुक्तांनानिवेदन पणजी : पणजीशहराचेऊपबिघडतचाललेआहे. यालासर्वस्वीमांडवीनदीतीलकॅसिनो जबाबदार आहेत. तरीही सरकारला पणजी शहर, मांडवी नदीचे काहीच सोयर-सुतक पडलेले नाही. या कॅसिनोंचा त्रास खुद्द पणजीवासियांनाच होतोय असे नाही, संपूर्ण राज्यासाठी तो मोठा धोका बनला आहे. मांडवी नदीतील पाणी दिवसेंदिवस प्रदूषित होत आहे. मांडवी नदीतील प्रदूषण आणि पणजीतील स्थानिकांना होणारा त्रास सरकारने लक्षात घ्यावा आणि कॅसिनो मांडवीतून हटवावेत, [...]
डिजिटल तंत्रज्ञान आत्मसात करण्याची वेळ
मुख्यमंत्रीडॉ. प्रमोदसावंतयांचेप्रतिपादन: गोवाशालांतमंडळाचेसुवर्णमहोत्सवीवर्ष पणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘विकसित भारत 2047’चे जे स्वप्न बाळगले आहे. त्यामध्ये शिक्षण क्षेत्राचा अधिक समावेश आहे. हे स्वप्न पूर्ण करताना राज्यातील शाळांच्या इमारती सुसज्ज करण्याबरोबरच विद्यार्थ्यांनाही भविष्यासाठी सक्षम केले जाईल. झेन-जी, झेन-एक्स हे डिजिटल तंत्रज्ञान आता आत्मसात करण्याची वेळ आली आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. डिजिटल [...]
मेहकर येथील सेवानिवृत्त प्राध्यापक वसंत गिरी यांचा एकुलता एक मुलगा प्रज्वल वसंत गिरी (वय – 26) याचा लोणावळा येथील खंडाळा टेकडीवर झालेल्या दुर्दैवी अपघातात मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. सनसेट पाहताना पाय घसरून तो सुमारे 70 ते 80 फूट खोल दरीत कोसळल्याने त्याच्या डोक्याला व हाताला गंभीर दुखापत झाली. त्यातच त्याचा मृत्यू झाला. खोपोली […]
खोट्या कागदपत्रांद्वारे जमीन बळकावली
उपनोंदणीअधिकारी, बाँडरायटरलाअटक बेळगाव : दोन एकर,एक गुंठा जमीन बळकाविण्यासाठी खोटी कागदपत्रे तयार करून हुक्केरी येथील उपनोंदणी कार्यालयात त्याची नोंदणी करण्यात आली होती. या फसवणूक प्रकरणी उपनोंदणी अधिकारी व बाँड रायटरला हुक्केरी पोलिसांनी अटक केली आहे. जिल्हा पोलीसप्रमुख के. रामराजन यांनी ही माहिती दिली आहे. यासंबंधी एक पत्रक प्रसिद्धीस दिले असून 22 मे 2024 रोजी कुरणीवाडी, [...]
सोने चांदीच्या तेजीला पुन्हा एकदा ब्रेक; सोने 2000 तर चांदी 5500 रुपयांनी घसरली
सोने चांदीच्या दरात गेल्या दोन दिसांपासून आलेल्या तेजीला पुन्हा एकदा ब्रेक लागला आहे. वायदे बाजाराला मंगळवारी सुरुवात होताच सोने चांदीच्या दरात पुन्हा एकदा मोठी घसरण झाली आहे. मंगळवारी दोन्ही घसरणीसह उघडले आणि स्वस्त झाले. चांदीच्या दर आता त्यांच्या उच्चांकापासून १.६३ लाखांपेक्षा कमी झाले आहेत. सलग मोठ्या घसरणीनंतर गेल्या दोन दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये तेजी […]
महिलांच्या आर्थिक सबलीकरणातून सर्वांगीण विकास
सरकारीयोजनाप्रत्येककुटुंबापर्यंतपोहोचविण्याचाउद्देश: गृहकार्यालयातआढावाबैठक बेळगाव : ग्रामीण भागातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणातूनच सर्वांगीण सामुदायिक विकास साध्य होऊ शकतो, या ठाम विश्वासातून महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. राज्यातील प्रत्येक कुटुंबापर्यंत सरकारी योजना प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी ग्रा. पं. स्तरावरील लेखक, एमबीके, स्थानिक समुदाय संसाधन व्यक्ती, कृषीसखी आणि पशुसखी यांच्या समन्वयाने काम करण्याचे उद्दिष्ट त्यांनी मांडले [...]
कणकवली नगरपंचायतीत विषय समित्यांच्या निवडीवरून सत्ताधारी-विरोधकात जुंपली !
समान मतांमुळे चिठ्ठीचा कौल ‘समिती न नेमण्या’कडे; स्थायी समितीच्या निवडीवरूनही खडाजंगी कणकवली / वार्ताहर कणकवली नगरपंचायतीच्या सभागृहात विषय समित्यांचे सभापती आणि समित्या निवडीसाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेत सत्ताधारी आणि विरोधी गटात जोरदार वादंग पाहायला मिळाले. समित्या नेमण्यावरून दोन्ही बाजूंनी आक्रमक पवित्रा घेतल्याने अखेर चिठ्ठी टाकून निर्णय घेण्यात आला. दरम्यान, स्थायी समितीच्या वैधतेवरूनही दोन्ही पक्षांमध्ये खडाजंगी [...]
मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी घेतली अंगणवाडी सेविकांची बैठक
बेळगाव : महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सोमवारी बेळगाव ग्रामीण भागातील अंगणवाडी सेविकांची बैठक घेतली. बेळगाव येथील गृह कार्यालयात आयोजित या बैठकीत अंगणवाडी सेविकांनी कामकाजातील अडथळे, सुविधा, मानधन तसेच प्रशासकीय पातळीवरील समस्यांबाबत आपली मते मांडली. यानंतर मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी समस्या सोडविण्यासाठी महिला व बालविकास विभागाचे उपसंचालक आणि संबंधित बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांना योग्य [...]
यंदा जून अखेरपर्यंत पाण्याची कमतरता भासणार नाही
राकसकोपजलाशयात2468.20 फूटपाणीसाठाशिल्लक बेळगाव : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशयात आतापर्यंत 2468.20 फूट इतका पाणीसाठा आहे. गतवर्षी फेब्रुवारी महिन्यात हा पाणीसाठा 2469 फूट इतका होता. गतवर्षीच्या तुलनेत यंदा जलाशयात 8 फूट पाणीसाठा कमी असून यंदा जून महिन्याच्या अखेरपर्यंत शहराला पाण्याची कमतरता भासणार नाही. शहराला राकसकोप आणि हिडकल जलाशयातून पाणीपुरवठा केला जातो. राकसकोप जलाशयातून लक्ष्मीटेक येथील जलशुद्धीकरण [...]
माजी नगरसेवकाची सोनसाखळी चोरीचा प्रयत्न
चोरटय़ाने माजी नगरसेवकाची सोनसाखळी चोरण्याचा प्रयत्न केल्याची घटना बोरिवली पूर्व येथे घडली. या प्रकरणी कस्तुरबा मार्ग पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. तक्रारदार हे माजी नगरसेवक आहेत. रविवारी रात्री ते कारने बोरिवली पूर्व परिसरात जात होते. रहदारी जास्त असल्याने त्याची कार थांबली होती. तेव्हा एक जण त्यांच्या कारजवळ आला. हॉर्न वाजल्यानंतर तो बाजूला हटत नव्हता. त्याला […]
रेशन तांदळाचा काळाबाजार रोखण्यासाठी अन्न-नागरी पुरवठा खाते सरसावले
बेळगाव : जिल्ह्यात अन्नभाग्य योजनेंतर्गत मिळणाऱ्या तांदळाची काळ्याबाजारात विक्री केली जात असल्याने ही बाब आहार व नागरी पुरवठा खात्याने गांभीर्याने घेतली आहे. गेल्या तीन वर्षांत जिल्ह्याभरात 37 प्रकरणांची नोंद झाली असून बेकायदा साठा आणि वाहतूक प्रकरणी कारवाई करून 2023-24 मध्ये 11, 2024-25 मध्ये 6 आणि 2025-26 मध्ये 3 फेब्रुवारीपर्यंत 20 प्रकरणांमध्ये एकूण 1.50 कोटी रुपयांचा [...]
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी माजी लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांच्या पुस्तकावरून पुन्हा एकदा केंद्र सरकारवर हल्ला चढवला आहे. माझा पेंग्विन प्रकाशकापेक्षा जनरल नरवणे यांच्यावर अधिक विश्वास असल्याचे राहुल गांधी म्हणाले. नरवणे यांच्या पुस्तकाबाबत दिल्ली पोलिसांनी नोंदवलेला एफआयआर आणि प्रकाशक ‘पेंग्विन रँडम हाऊस इंडिया’ने दिलेल्या स्पष्टीकरणावर राहुल गांधी यांनी माध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली. […]
राजपाल यादवच्या मदतीसाठी सोनू सूदचा पुढाकार, सहकलाकारांना देखील केले आवाहन
चेक बाउंस प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव याने दिल्लीत तिहार तुरुंग प्रशासनासमोर आत्मसमर्पण केले. राजपाल यादव सध्या तुरुंगात शिक्षा भोगत आहे. दरम्यान राजपालच्या मदतीसाठी त्याचा बॉलिवूडमधील सहकलाकार सोनू सूद धावून आला आहे. सोनू सूदने त्याला चित्रपटात काम देणार असल्याचे सांगत इतर दिग्दर्शक, निर्मात्यांनी देखील पुढे येऊन त्याला मदत करावी असे आवाहन केले […]
‘डीसीसी’च्या माध्यमातून तीन नव्या योजना आणणार
बँकेचेअध्यक्षआण्णासाहेबजोल्लेयांचीमाहिती: संचालकमंडळाचीपत्रकारपरिषद बेळगाव : राज्यात बेळगाव डीसीसी बँक शेतीकर्ज देण्यात अव्वल आहे. डीसीसी बँक ही शेतकऱ्यांची असून काहींच्या अपप्रचारामुळे बँकेचे नाव खराब होत आहे. आपले प्रशासन बँकेवर आल्यानंतरच्या केवळ तीन महिन्यात 500 कोटी ठेवी वाढल्या आहेत. बँकेच्या माध्यमातून तीन नव्या योजला लागू करण्यात येणार आहेत. 12 फेब्रुवारीला होणाऱ्या बँकेच्या बैठकीत योजना संमत करण्यात येणार असून [...]
लोककल्पतर्फे महिलांना मोफत शिलाई मशीन वाटप
बेळगाव : लोककल्प फौंडेशनतर्फे खानापूर येथील दत्तक घेतलेल्या गावांतील महिलांना स्वावलंबन आणि उपजीविकेची निर्मिती करून देण्याच्या उद्देशाने शिलाई मशिनींचे जांबोटी येथे मोफत वितरण करण्यात आले. या उपक्रमामुळे लाभार्थी महिलांना शिलाईच्या माध्यमातून स्वरोजगाराची संधी मिळणार असून, त्यांचे कौशल्यविकास व आर्थिक स्वातंत्र्य अधिक बळकट होणार आहे. शिलाई मशीन मिळाल्याबद्दल महिलांनी लोककल्पचे आभार व्यक्त केले. लोककल्प फौंडेशन महिला [...]
क्रिडाई-बेलकॉन प्रदर्शनाला नागरिकांचा उदंड प्रतिसाद
स्टॉलधारकांमधून समाधान : सर्व काही एकाच छताखाली मिळत असल्याने ग्राहकांची उत्तम सोय : यावर्षी बेलकॉन प्रदर्शनाची मांडणी सुरेख बेळगाव : बांधकामांची सर्व साहित्याची माहिती एकाच छताखाली मिळावी. बांधकामातील नवनवे ट्रेंड्स, बांधकामात आलेली आधुनिकता आणि नवता यांची माहिती मिळावी या हेतूने क्रिडाईने भरवलेल्या बेलकॉन प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यश इव्हेंटस्च्या सहकाऱ्याने भरविण्यात आलेल्या या प्रदर्शनातील नेटक्या [...]
दुर्लक्ष परिवहनचे, हाल प्रवाशांचे
रायचूरनजीकचाप्रकार: केएसआरटीसीच्यास्लीपरबसमध्येतांत्रिकबिघाडानेसमस्या: गतिरोधकघालण्याचीमागणी बेळगाव : तिकिटाचे पूर्ण पैसे भरूनही बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने प्रवाशांना मध्यरात्री उतरविण्यात आले. परंतु त्यांच्या प्रवासाची कोणतीच सोय परिवहन मंडळाने न केल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. हा प्रकार बेळगाव-हैदराबाद एसी स्लीपर बसचा असून रायचूरनजीक घडला. याबाबतचे सविस्तर असे की, सुरक्षित प्रवास म्हणून नागरिकांकडून परिवहन मंडळाला पसंती दिली जाते. मात्र ज्यावेळी प्रवासादरम्यान बसमध्ये [...]
वाहनांमधील कर्णकर्कश गाण्यांवर बंदी घालण्याची मागणी
बेळगाव : आजकाल डीजेचा वापर मोठ्या प्रमाणत वाढला आहे.ट्रॅक्टर व इतर वाहनांमध्ये मोठ्या आवाजात कर्णकर्कश गाणी लावण्यात येत आहेत. याचा समाजातील सर्वच घटकांवर परिणाम होत असून हे त्वरित थांबले पाहिजे. डीजेच्या आवाजामुळे शाळकरी मुले, महिला, हृदयरुग्ण, वयोवृद्धांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यामुळे डीजे बंदी आणण्याची मागण्यासाठी शेतकरी संघटनेसह विविध संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत [...]
ड्रेनेज गळतीमुळे वडगावमध्ये विहिरींच्या पाण्याला दुर्गंधी
दोनमहिन्यांनंतरहीअद्यापगळतीनमिळाल्यानेरहिवासीसंतप्त बेळगाव : पाटील गल्ली, वडगाव परिसरात ड्रेनेज वाहिनीला गळती लागल्याने आसपासच्या विहिरींचे पाणी खराब झाले आहे. दोन महिन्यांपासून ही गळती शोधण्यासाठी मनपाकडून दुरुस्ती केली जात असली तरी अद्याप गळती नेमकी कोठे आहे? हे समजू शकलेले नाही. अनेक ठिकाणी खोदाई करून ठेवल्याने नागरिकांना येणेजाणेही अवघड होत आहे. वडगाव पाटील गल्ली, मठ, मंगाई मंदिर परिसर व [...]
हुबळी-लोंढा-मिरज-पंढरपूर रेल्वेसेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी
कारवार : कोविड महामारीमुळे स्थगित करण्यात आलेली हुबळी-लोंढा-मिरज-पंढरपूर रेल्वेसेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी हल्ल्याळ-जोयडाचे आमदार आणि माजी मंत्री आर. व्ही. देशपांडे यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमण्णा यांच्याकडे केली आहे. मंत्री सोमण्णा दांडेलीच्या दौऱ्यावर आले असताना देशपांडे यांनी सोमण्णा यांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, कोविडमुळे हुबळी-पंढरपूर रेल्वे सेवा ठप्प झाल्याने उत्तर कर्नाटकवासियांची आणि [...]
मोदींच्या कार्यकाळात पायरसीचे अनेक प्रकार आहेत. त्यांच्या काळात प्रत्येक गोष्टीची पायरसी होत आहे. राजकीय पक्षांची पायरसी होते, तर एका पुस्तकाची काय बाब आहे? असा सावल करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत, खासदार संजय राऊत यांनी भाजपला चांगलेच फटकारले आहे. माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांचे पुस्तक प्रकाशित झाले नाही, तरी त्यातील माहिती उघड कशी झाली, […]
संसदेतील गदारोळ, गोंधळ (डेडलॉक) थांबवण्याची जबाबदारी सरकार पक्षाची असते. संसदेचे अधिवेशन सुरू असताना पंतप्रधान परदेशात आहेत. आपल्या देशात लोकसभेत विरोधी पक्षनेत्याला बोलू दिले जात नाही आणि ते परदेशात जाऊन लोकशाहीवर व्याख्यान देत आहेत. त्यामुळे आपल्या देशाचे भविष्य काय आहे? असा प्रश्न उभा राहत आहे, अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत, खासदार संजय राऊत यांनी […]
‘चिन्नास्वामी’वरील आयपीएल सामन्यांबाबत उद्या निर्णय
गृहमंत्रीडॉ. जी. परमेश्वरयांचीमाहिती: केएससीए, आरसीबीशिष्टमंडळाकडूनक्रिकेटस्पर्धाआयोजितकरण्याचीविनंती बेंगळूर : बेंगळूरमधील चिन्नास्वामी स्टेडियममध्ये आयपीएल क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्याच्या परवानगीबाबत बुधवार दि. 11 फेब्रुवारी रोजी योग्य निर्णय घेतला जाईल, अशी माहिती गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी दिली. बेंगळूरच्या सदाशिवनगर येथील निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना, कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष व्यंकटेश प्रसाद, प्रवक्ते विनय मृत्यूंजय आणि आरसीबीचे प्रतिनिधी राजेश मेनन यांच्या [...]
Sunetra Pawar –सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला
महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मंगळवारी आपल्या पदाचा अधिकृत पदभार स्वीकारला. 28 जानेवारी रोजी अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्यानंतर 31 जानेवारी रोजी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती आणि आज त्यांनी पदभार स्वीकारत विधीवत कामकाजाला सुरुवात केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, ज्येष्ठ […]
यळेबैल-बेळगुंदी पाईपलाईन रस्त्याच्या डांबरीकरणाची मागणी
रस्त्यावरअतिक्रमणवाढले: शिवारातीलमहत्त्वाचारस्ता: डांबरीकरणझाल्यासशेतकऱ्यांनाफायदेशीर वार्ताहर/किणये यळेबैल-बेळगुंदी भागातील पाईप लाईन रस्त्यावर अतिक्रमण वाढले आहे. शिवारातून जाणारा हा महत्त्वाचा रस्ता आहे. सध्या हा रस्ता पूर्णपणे दुर्लक्षित झाला आहे. या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी शेतकरी व या भागातील वाहनधारकांतून होत आहे. राकसकोप धरणातून पाईप लाईनद्वारे शहराला पाणी पुरवठा करण्यात आला आहे. राकसकोप धरणापासून राकसकोप, यळेबैल गावच्या रस्त्याच्या [...]
भाजपला मदत होईल, असा कोणताही निर्णय घेणार नाही, हीच आमची भूमिका; संजय राऊत यांनी केले स्पष्ट
मिंधे आणि अजित पवार यांच्या गटाने अमित शहा यांची भेट घेणे, यात काही नवीन नाही. या दोन्ही गटाच्या नेत्यांना दिल्लीत जाऊन त्यांच्या प्रमुखांशी चर्चा करूनच निर्णय घ्यावे लागतात, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत, खासदार संजय राऊत यांनी सांगत मिंधे, अजित पवार गट आणि भाजपला जबरदस्त टोला लगावला आहे. तसेच भाजपला मदत होईल, असा कोणताही […]
नंदगड सरकारी पशू दवाखान्यात पशु पालकांची गैरसोय
वार्ताहर/हलशी नंदगड येथे सरकारी पशु दवाखाना आहे. परंतु पशुवैद्यकीय दवाखान्यात योग्य वेळेत सेवेत पशुधन पर्यवेक्षक अधिकारी उपलब्ध नसल्यामुळे पशू पालकांची मोठी गैरसोय होत आहे. पशुवैद्यकीय अधिकारी नसल्यामुळे त्यामुळे पशुधन मृत्युमुखी पडण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. कायमस्वरूपी दिवसभर पशु वैद्यकीय अधिकारी उपस्थित रहावा, अशी मागणी पशुपालक शेतकरी वर्गाकडून होत आहे. नंदगड येथे मागील अनेक दिवसांपासून पशुवैद्यकीय [...]
बेळगाव-वेंगुर्ला राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित करा
नीलिमापावशेयांनीकेंद्रीयरस्तेवाहतूकमंत्रीनितीनगडकरीयांचीघेतलीभेट: रस्त्याचासर्वांगीणविकासकरण्याचीमागणी वार्ताहर/उचगाव बेळगाव-वेंगुर्ला रस्ता राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित करून त्याचा सर्वांगीण विकास करण्यात यावा, सीमाप्रश्नावर केंद्राशी तातडीने चर्चा व्हावी, अशी ठाम मागणी बेळगाव महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका तसेच उचगाव मतदार संघाचे माजी आमदार कै. प्रभाकर पावशे यांच्या स्नुषा आणि तालुका म. ए. समितीचे सरचिटणीस मनोज पावशे यांच्या पत्नी नीलिमा पावशे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व [...]
आर्थिक साक्षरता सप्ताहाचा लाभ घ्या
जिल्हापंचायतसीईओराहुलशिंदेयांचेआवाहन: प्रचारपत्रकांचेप्रकाशन बेळगाव : सर्वसामान्य नागरिकांमध्ये बँकिंग व्यवहार व आर्थिक शिस्तीबाबत जागरुकता निर्माण करण्याच्या उद्देशाने फेब्रुवारी दि. 9 ते 13 या कालावधीत जिल्ह्याभरात पाच दिवसांचा आर्थिक साक्षरता सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. वित्तीय सेवा विभाग, भारतीय रिझर्व्ह बँक व जिल्हा पंचायत यांच्या सहकार्याने बेळगाव जिल्हा मार्गदर्शक बँकेमार्फत हा उपक्रम होणार आहे, अशी माहिती जि. पं. [...]
वीजवाहिन्यांचे टॉवर उभारणीसाठी शेतीचे नुकसान
अनगोळ, येळ्ळूर, वडगावशिवारातीलप्रकार: शेतकऱ्यांमध्येसंतापाचीलाट बेळगाव : केपीटीसीएलकडून जुने बेळगाव, वडगाव, येळ्ळूर व अनगोळ शिवारामध्ये उच्चदाबाच्या वीजवाहिन्या ओढण्यासाठी टॉवर उभारले जात आहेत. परंतु, हे काम करताना आसपासच्या शेतीचे मोठे नुकसान होत आहे. रब्बी हंगामातील मोहरी, मसूर, वाटाणा, हरभरा यासह इतर पिकांचे नुकसान केले जात असल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. बेळगावच्या औद्योगिक क्षेत्राला वीजपुरवठा करण्यासाठी ऑटोनगर येथून [...]
सुनील भातकांडे ‘गणेश श्री कलखांब’चा मानकरी
विशालनिलजकरपहिलाउपविजेता बेळगाव : बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव संघटना व कलखांब ग्रामस्थ शरीरसौष्ठव संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने गणेश श्री कलखांब या जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत पॉलिहैड्रॉनच्या सुनील भातकांडेने आपल्या पिळदार शरीराच्या जोरावर गणेश श्री कलखांब हा मानाचा किताब पटकाविला तर फिट प्रोच्या विशाल निलजकरने पहिले उपविजेतेपद पटकाविले. कलखाबं येथे घेण्यात आलेल्या या शरीरसौष्ठव स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते हनुमान [...]

26 C