SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

29    C
...

आरएसएसच्या कार्यक्रमाला जाणाऱ्या जज मला न्याय कसा देणार? केजरीवाल यांचा न्या. स्वर्णकांता शर्मा यांच्यापुढे युक्तिवाद

दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्याच्या सुनावणीपासून न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा यांनी दूर व्हावे, अशी मागणी या प्रकरणातील आरोपी माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज उच्च न्यायालयात न्या. शर्मा यांच्याच खंडपीठापुढे केली. ’न्यायमूर्ती शर्मा या चार वेळा आरएसएसशी संबंधित संघटनेच्या कार्यक्रमाला हजर होत्या. त्या विशिष्ट विचारधारेशी संबंधित आहेत. त्यांच्याकडून मला न्यायाची अपेक्षा नाही,’ असा युक्तिवाद केजरीवाल यांनी […]

सामना 14 Apr 2026 5:09 am

सामना अग्रलेख –युद्ध कोणाला हवे?

इस्लामाबादमधील अमेरिका–इराण शांती चर्चेचे वार्तांकन करण्यासाठी जगभराचा मीडिया आला. त्यांनी इस्लामाबादला नव्याने जागतिक नकाशावर नेले. पाक पंतप्रधान शाहबाज शरीफ व जनरल मुनीर यांनी जागतिक नेत्यांबरोबर झोपाळ्यावर हिंदोळे घेतानाची छायाचित्रे प्रसिद्ध केली नाहीत. पाकिस्तानने या घडामोडींचा वापर आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा वाढवण्यासाठी करून घेतला. 21 तास चर्चेनंतरही यशस्वी फॉर्म्युला निघाला नाही, पण चर्चा झाली हे महत्त्वाचे. अमेरिकेला युद्धातून […]

सामना 14 Apr 2026 5:05 am

Photo –भाव दाटले…शब्द गोठले सूरही गहिवरले…

पृथ्वीवर सुरांच्या चांदण्याचं अलौकिक देणं बरसून स्वरचंद्रिका स्वर्गाच्या दिशेने निघाली. तिला अलविदा करताना भावना अनावर झाल्या, शब्द गोठले आणि सूरही गहिवरले. अथांग समुद्र आणि मावळत्या सूर्याच्या साक्षीने आशा भोसले यांना अखेरचा निरोप देण्यात आला. ‘आशा भोसले अमर रहे’चा जयघोष मुखातून निघाला. आशाताईंच्या शब्दांत सांगायचे तर ‘आशा कधी संपत नाही’! आशाताईंना अखेरचा निरोप देताना भावुक झालेल्या […]

सामना 14 Apr 2026 4:58 am

असाधारण! बेहतरीन!! आशाताईंच्या आठवणींनी गझलसम्राट गुलाम अली भावुक

‘आशाताई केवळ असाधारण कलाकार होत्या असं नव्हे, तर माणूस म्हणून त्या ‘बेहतरीन’ होत्या. त्या किती महान होत्या हे सर्वांनाच माहीत आहे. मी वेगळं काय सांगणार? त्यांना जन्नत मिळो एवढीच दुवा मी अल्लाहकडे करतो…’ हे उद्गार आहेत पाकिस्तानचे दिग्गज गझल गायक गुलाम अली यांचे. आशा भोसले यांच्या निधनाचे वृत्त कळताच फेसबुकवर व्हिडीओ शेअर करून गुलाम अली […]

सामना 14 Apr 2026 4:10 am

एका युगाचा अंत…अमिताभ बच्चन यांनी वाहिली श्रद्धांजली

बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी दिग्गज गायिका आशा भोसले यांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या निधनामुळे एका संपूर्ण युगाचा अंत झाल्याचे म्हटले आहे. अमिताभ यांनी रविवारी आपल्या ब्लॉगवर नोट शेअर करत ‘ये मेरा दिल’, ‘तनहा तनहा’ आणि ‘दम मारो दम’ यांसारख्या अनेक गाण्यांना आवाज देणाऱ्या या महान गायिकेला श्रद्धांजली वाहिली. “दुःख आणि शोक… एक संपूर्ण युग… […]

सामना 14 Apr 2026 4:02 am

आयपीएलमधील दोन सामन्यांच्या वेळापत्रकात बदल

वृत्तसंस्था/ मुंबई भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आयपीएलच्या 19व्या हंगामाच्या वेळापत्रकात बदल केला आहे. गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात 26 एप्रिल रोजी अहमदाबाद येथे दुपारी सामना खेळवला जाणार होता, तो आता चेन्नईच्या एम. ए चिंदबरम स्टेडियमवर दुपारी 3.30 वाजता खेळवला जाईल. याच बदलानुसार चेन्नई आणि गुजरात यांच्यात चेन्नई येथे 21 मे रोजी संध्याकाळी खेळवला [...]

तरुण भारत 14 Apr 2026 3:16 am

IPL 2026 –विदर्भ एक्स्प्रेस ‘प्रफुल’ची ऐतिहासिक एन्ट्री! पहिल्याच ओव्हरमध्ये प्रस्थापित केला जागतिक विक्रम

आयपीएलच्या मैदानात दरवर्षी नवे तारे चमकतात, पण विदर्भाच्या प्रफुल हिंगेने आपल्या पहिल्याच सामन्यात जे, करून दाखवले, ते आजवर कोणत्याही गोलंदाजाला जमले नव्हते. सनरायझर्स हैदराबादकडून पदार्पण करणाऱ्या या 24 वर्षीय वेगवान गोलंदाजाने राजस्थान रॉयल्सची फलंदाजी अक्षरशः मोडून काढली. 217 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानला प्रफुलच्या पहिल्याच षटकाने असे धक्के दिले की, त्यातून सावरणे त्यांना अशक्य झाले. […]

सामना 13 Apr 2026 10:57 pm

IPL 2026 –खेळाडूंनी नाही तर ग्राउंड स्टाफने मैदान मारलं; ACA कडून 25 लाखांचे बक्षीस जाहीर, कारण काय?

IPL 2026 मधील राजस्थान रॉयल्सचे तीन सामने गुवाहाटीच्या बारसापारा स्टेडियमवर यशस्वीपणे पार पडले. या काळात पावसाचे मोठे संकट असतानाही पिच आणि आउटफील्ड खेळण्यायोग्य ठेवल्याबद्दल ‘आसाम क्रिकेट असोसिएशन’ने (ACA) ग्राउंड स्टाफ आणि क्युरेटरसाठी 25 लाख रुपयांच्या रोख बक्षीसाची घोषणा केली आहे. मुंबई इंडियन्स, आरसीबी आणि सीएसके विरुद्धच्या सामन्यांमध्ये पावसाने वारंवार व्यत्यय आणला होता. विशेषतः मुंबईविरुद्धचा सामना […]

सामना 13 Apr 2026 8:46 pm

Ratnagiri News –दापोलीच्या कृषि विद्यापीठाला भारतीय कृषि अनुसंधान परिषद नवी दिल्लीकडून मानांकन प्रक्रियेत ‘अ’दर्जा प्राप्त

दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ या कोकणातील अग्रगण्य कृषि शिक्षण संस्थेला भारतीय कृषि अनुसंधान परिषद ICAR कडून मानांकन प्रक्रियेत ‘A’ ग्रेड प्राप्त झाली आहे. सदरचे मानांकन २०२५ ते २०२९ या पाच वर्ष कालावधीसाठी देण्यात आले आहे. या यशामुळे विद्यापीठाच्या शैक्षणीक, संशोधन व विस्तार कार्याची गुणवता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. ICAR च्या […]

सामना 13 Apr 2026 8:41 pm

नोव्हेंबरमध्येच रंगणार चौकार-षटकारांचा थरार; प्रसिद्ध T-20 लीगची घोषणा, MI चा संघ धमाका करणार?

संयुक्त अरब अमिरातीमधील आगामी टी-20 लीगच्या पाचव्या हंगामाची अधिकृत घोषणा करण्यात आली असून यंदा ही स्पर्धा नेहमीपेक्षा लवकर सुरू होणार आहे. दक्षिण आफ्रिकेच्या टी-20 लीगशी होणारा संभाव्य संघर्ष टाळण्यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. या संपूर्ण स्पर्धेत 34 सामने खेळवले जाणार असून दुबई, अबू धाबी आणि शारजाह या तीन शहरांमध्ये हे सामने पार पडतील. स्पर्धेचा […]

सामना 13 Apr 2026 8:28 pm

मॉन्सून यंदा बळीराजाची चिंता वाढवणार; 2026 मध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस, हवामान खात्याचा पहिला अंदाज जाहीर

भारतीय हवामान खात्याने (IMD) सोमवारी मान्सून 2026 बाबतचा पहिला अंदाज जाहीर केला आहे. गेल्या वर्षी नियोजित वेळेपेक्षा लवकर आलेला मॉन्सून यावर्षी मात्र शेतकऱ्यांची चिंता वाढवण्याची शक्यता आहे. यावर्षी देशात सरासरीपेक्षा कमी म्हणजे 92 टक्के पर्जन्यमानाच अंदाज जाहीर करण्यात आला आहे. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. रविचंद्रन आणि हवामान विभागाच्या महासंचालक डॉ. एम. मोहापात्रा यांच्या […]

सामना 13 Apr 2026 8:01 pm

Kokan News –कणकवली रेल्वे स्टेशन मधील डासांचा प्रादुर्भाव थांबवा; कोकण रेल्वे समन्वय व संघर्ष समितीचे स्टेशन मास्तरांना निवेदन

कणकवली रेल्वे स्टेशन परिसरात घाणीचे सामाज्य झाले आहे. त्यामुळे डासांची पैदास वाढलेली आहे. कणकवली रेल्वे स्थानकात आलेल्या प्रवाशांना त्याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. बऱ्याचदा नियमित वेळेपेक्षा उशीरा विविध रेल्वे गाड्या येत असतात. त्यावेळी प्रवासी शेडमध्ये बसलेल्या प्रवाशांना , लहान मुलांना, अपंग व्यक्तींना , जेष्ठ नागरिकांना , महिलांना डासांच्या प्रार्दुभावामूळे त्रास होत आहे. त्यामुळे रेल्वे […]

सामना 13 Apr 2026 7:57 pm

Ratnagiri News –करबुडे गावच्या तेजस जाधवची कमाल; हिमालयातील अन्नपूर्णा बेस कॅम्प अवघ्या साडेतीन दिवसांत सर

रत्नागिरी तालुक्यातील करबुडे गावचा सुपुत्र तेजस अनिल जाधव याने हिमालयातील नेपाळस्थित ‘अन्नपूर्णा बेस कॅम्प’ यशस्वीरित्या सर करून जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. समुद्रसपाटीपासून 4130 मीटर उंचीवर असलेला हा बेस कॅम्प अत्यंत आव्हानात्मक मानला जातो, मात्र तेजसने आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर ही मोहीम फत्ते केली. विशेष म्हणजे, जो ट्रेक पूर्ण करण्यासाठी सर्वसाधारणपणे पाच ते […]

सामना 13 Apr 2026 7:57 pm

IPL 2026 –हार्दिक पंड्या आणि टिम डेव्हिडवर कारवाई, दोघांनाही ठोठावला दंड; कारण काय?

IPL 2026 मध्ये रविवारी वानखेडे स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि मुंबई इंडियन्स यांच्यात झालेल्या सामन्यानंतर टिम डेव्हिड आणि हार्दिक पांड्या यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. आरसीबीचा फलंदाज टिम डेव्हिडने अंपायरच्या निर्णयावर असहमती दर्शवल्याबद्दल आणि वारंवार सांगूनही चेंडू अंपायरकडे न दिल्याबद्दल त्याच्यावर मॅच फीच्या 25 टक्के दंड आकारण्यात आला असून त्याच्या खात्यात एक डिमेरिट पॉइंटही […]

सामना 13 Apr 2026 7:48 pm

Ratnagiri News –संगमेश्वरच्या नम्रताची पोलीस दलात एन्ट्री; कष्ट आणि जिद्दीची जोरावर सिद्ध केली कर्तबगारी

​”पोरी काय करणार? मुलगा असता तर आधार झाला असता.” समाजाच्या या कुत्सित टोमण्यांना आणि बुरसटलेल्या विचारांना संगमेश्वरच्या एका रणरागिणीने आपल्या कर्तृत्वाने आणि जिद्दीने उत्तर दिले आहे. मांजरे-कळकदे सारख्या दुर्गम भागातील नम्रता मनिष देसाई हिने वयाच्या अवघ्या २० व्या वर्षी खाकी वर्दी परिधान करून सिद्ध केले की, कष्टाला जिद्दीची जोड मिळाली की, नशिबालाही दरवाजेही उघडावे लागतात. […]

सामना 13 Apr 2026 6:45 pm

IPL 2026: गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्सच्या सामन्यांच्या वेळापत्रकात बदल, वाचा सविस्तर…

BCCI ने IPL 2026 च्या वेळापत्रकात महत्त्वाचा बदल जाहीर केला आहे. गुजरात टायटन्स (GT) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) यांच्यातील दोन सामन्यांच्या ठिकाणांची आपापसात अदलाबदल करण्यात आली आहे. अहमदाबादमध्ये होणाऱ्या निवडणुकांमुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला असून, चाहत्यांनी या नवीन बदलाची नोंद घेण्याचे आवाहन बोर्डाकडून करण्यात आले आहे. मूळ वेळापत्रकानुसार, 26 एप्रिल 2026 रोजी […]

सामना 13 Apr 2026 6:44 pm

आशाताईंनी केली होती कोकणात जलसफर; सचिन देसाई यांच्याकडून आठवणींना उजाळा

दिग्गज गायिका आशा भोसले यांच्या निधनानंतर त्यांच्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील जलसफरीच्या आणि गाठीभेटीच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई यांनी या आठवणींना उजाळा दिला आहे. सचिन देसाई यांनी सांगितले की, २००८ साली ज्येष्ठ गायिका आशा भोसले रत्नागिरी तालुक्यातील निवळी येथील ज्येष्ठ संगीतकार नितीन शंकर यांच्या बंगल्यात उतरल्या होत्या. तिथे मी त्यांना […]

सामना 13 Apr 2026 6:44 pm

होमुर्झ नाकेबंदीला चीनचा विरोध; इराणची बाजू घेत थेट अमेरिकेला आव्हान दिल्याने तणाव वाढणार?

अमेरिका आणि इराणमधील शांतता चर्चा अयशस्वी ठरल्याने आता पुन्हा दोन्ही देशात तणाव पुन्हा वाढला आहे. आता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीवर नाकेबंदी जाहीर केली असताना, इराणने अमेरिकेला इशारा देत प्रत्युत्तर दिले आहे. चीननेही ट्रम्प यांच्या चीनवरील शुल्कवाढीच्या धमकीला प्रत्युत्तर देत उघडपणे इराणची बाजू घेतली आहे. आमच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका, असा थेट […]

सामना 13 Apr 2026 6:32 pm

Raigad News –इर्शाळगडावर ट्रेकिंगला गेलेल्या तरुणाचा दरीत पडून मृत्यू

खालापूर येथील इर्शाळगडावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या तरुणाचा दरीत पडून मृत्यू झाला आहे. आकाश राजेंद्र वाघमोडे (26) असे मयत तरुणाचे नाव असून तो भिवंडी येथील रहिवासी आहे. याप्रकरणी खालापूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. आकाश खालापूरातील इर्शाळवाडी येथे रविवारी ट्रेकिंगसाठी गेला होता. आकाशने दुचाकी डोंगराच्या पायथ्याशी लावली आणि गडावर ट्रेकिंगला गेला. संध्याकाळ झाली तरी आकाशशी संपर्क […]

सामना 13 Apr 2026 6:26 pm

‘यू आर द वन फॉर मी…; ब्रेट लीची दिग्गज गायिका आशा भोसले यांना श्रद्धांजली

जगातील सर्वात वेगवान गोलंदाजांपैकी एक असलेला ऑस्ट्रेलियाचा दिग्गज माजी क्रिकेटपटू ब्रेट ली याने हिंदुस्थानच्या दिग्गज गायिका आशा भोसले यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. ‘फेसबुक’वर एक भावूक पोस्ट शेअर करत लीने आशाताईंसोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. 2006 मध्ये ‘यू आर द वन फॉर मी’ या गाण्याच्या निमित्ताने या दोन दिग्गज व्यक्तींनी एकत्र काम केले होते, […]

सामना 13 Apr 2026 6:17 pm

सचिन तेंडुलकरनंतर असं टॅलेंट पहिल्यांदाच पाहतोय, जतीन परांजपे यांनी केलं वैभव सूर्यवंशीचं भरभरून कौतुक

क्रिकेट वर्तुळामध्ये सध्या 15 वर्षीय वैभव सूर्यवंशी याच्या नावाची जोरदार चर्चा आहे. इंडियन प्रीमियर लीगचा पहिला हंगाम गाजवल्यानंतर दुसऱ्या हंगामातही वैभवने आपला फॉर्म कायम राखला आहे. राजस्थानला ‘पॉवर’ सुरूवात करून देणाऱ्या वैभवचे हिंदुस्थानचे माजी खेळाडू आणि बीसीसीआयचे क्रिकेट सल्लागार समितीचे सदस्य जतीन परांजपे यांनी भरभरून कौतुक केले आहे. जतीन परांजपे यांनी वैभवची तुलना थेट मास्टर […]

सामना 13 Apr 2026 5:57 pm

Asha Bhosale: संगीतसम्राज्ञी आशा भोसले यांचे चोरे गावाशी होते जिव्हाळ्याचे नाते

मंगेशकर घराण्याचा तेजस्वी वारसा लग्नानंतर भोसले आडनाव… सातारा: भारतीय संगीतविश्वावर ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांचे रविवारी मुंबई येथे निधन झाले. त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्रावर शोककळा पसरली असून देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. त्या वयाच्या उत्तरार्धात होत्या. आशा भोसले यांचे कराड तालुक्यातील चोरे गावाशी विशेष जिव्हाळ्याचे नाते होते. हेच त्यांचे सासर असून भोसले [...]

तरुण भारत 13 Apr 2026 5:54 pm

IPL 2026 –रोहित शर्माची दुखापत अन् सूर हरवलेल्या मुंबई इंडियन्सची चिंता वाढली; पंजाबविरुद्धच्या सामन्यात खेळणार नाही?

IPL मधला ‘दादा’ संघ म्हणून ओळखला जाणाऱ्या आणि पाच वेळा विजेतेपद भूषवणाऱ्या मुंबई इंडियन्सची अवस्था सध्या बिकट आहे. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबईने या हंगामात आतापर्यंत चार सामने खेळले असून, त्यापैकी पहिल्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर त्यांना सलग तीन पराभवांचा सामना करावा लागला आहे. सध्या संघ गुणतालिकेत अवघ्या दोन गुणांसह आठव्या स्थानावर असून, अशा कठीण परिस्थितीत […]

सामना 13 Apr 2026 5:46 pm

Ratnagiri News –आंबा बागायतदाराची स्वतःवर गोळी झाडत आत्महत्या, तोणदे गावातील घटना

रत्नागिरीतील आंबा व्यावसायिक रुपेश नागवेकर यांनी राहत्या घरी स्वत:वर बंदुकीतून गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात मोठी खळबळ माजली आहे. ही घटना रत्नागिरी तालुक्यातील ताणदे गावात घडली. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रुपेश नागवेकर यांनी त्यांच्या ताणदे येथील राहत्या घरी स्वतःच्या बंदुकीतून गोळ्या झाडून घेतल्या. गोळीबाराचा आवाज ऐकून […]

सामना 13 Apr 2026 5:44 pm

होर्मुझची नाकेबंदीची घोषणा करणाऱ्या ट्रम्प यांना धक्का; आम्ही युद्धात ओढले जाणार नाही,ब्रिटनची भूमिका

अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, होर्मुझ हा सर्वात संवेदनशील मुद्दा ठरत आहे. आता या सामुद्रधुनीबाबत एक नवीन वळण आले आहे. एकीकडे अमेरिका हा महत्त्वाचा सागरी मार्ग रोखण्याची तयारी करत असताना, दुसरीकडे त्यांचा सर्वात जवळचा मित्र देश असलेल्या ब्रिटनने अमेरिकेच्या या भूमिकेपासून वेगळे होण्याचे मत व्यक्त केले आहे. ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांनी स्पष्टपणे […]

सामना 13 Apr 2026 5:43 pm

Asha Bhosle Funeral –स्वरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, साश्रू नयनांनी अखेरचा निरोप

हिंदुस्थानच्या दिग्गज गायिका आशा भोसले यांना सोमवारी साश्रू नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. आशाताईंच्या पार्थिवावर सोमवारी छत्रपती शिवाजी महाराज पार्क दादर येथील स्मशानभूमीमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी क्रीडा, साहित्य, राजकीय आणि चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज उपस्थित होते. रविवारी सकाळी मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात आशा भोसले यांचे निधन झाले. त्या 92 वर्षांच्या होत्या. सोमवारी सकाळी […]

सामना 13 Apr 2026 5:36 pm

माणिकगड सिमेंट जमिन प्रकरण चिघळले; मोबदला आणि जमिनीच्या मागणीसाठी पाच आदिवासींनी केले विषप्राशन

चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा उपविभागांतर्गत येणाऱ्या कोरपना तालुक्यातील माणिकगड सिमेंट कंपनीच्या (अल्ट्राटेक) चुनखडी क्षेत्रात कुसुंबी येथील कोलाम बांधवांच्या जमिनी अधिग्रहित झाल्या. मात्र याचा योग्य मोबदला अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे जमिनी परत कराव्या, या मागणीसाठी गेल्या 15 वर्षांपासून या आदिवासींचा लढा प्रशासकीय पातळीवर आणि मानिकगड सिमेंट कंपनीसोबत सुरू आहे. सतत पाठपुरावा करूनही हा वाद निकाली न निघाल्याने […]

सामना 13 Apr 2026 5:19 pm

पैशांचा महापूर! T-20 World Cup 2026 साठी विक्रमी बक्षीस रक्कम जाहीर, ICC ची मोठी घोषणा

इंग्लंड आणि वेल्समध्ये होणाऱ्या 2026 च्या महिला टी-20 विश्वचषकासाठी आयसीसीने बक्षिसांच्या रकमेत मोठी वाढ केली आहे. आगामी स्पर्धेसाठी एकूण 81.83 कोटी रुपयांचे बक्षीस पूल जाहीर करण्यात आले असून, हे 2024 च्या तुलनेत 10 टक्क्यांनी जास्त आहे. यावेळच्या स्पर्धेत प्रथमच 12 संघ सहभागी होणार आहेत. ICC ने जाहीर केलेल्या बक्षीस पूल नुसार, स्पर्धेतील विजेता संघ 21.84 […]

सामना 13 Apr 2026 5:16 pm

…तर आखातातील एकही बंदर सुरक्षित राहणार नाही, अमेरिकेने नाकेबंदीची घोषणा केल्यानंतर इराणचा मोठा इशारा

इराण आणि अमेरिका यांच्यात पाकिस्तानच्या इस्लामाबाद येथे आयोजित करण्यात आलेली शांतता चर्चा निष्फळ ठरल्याने आखातातील तणाव पुन्हा वाढला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणची नाकेबंदी करण्याची धमकी दिली. इराणची बंदरे आणि किनारपट्टीच्या भागांची नाकेबंदी करण्याची तयारी अमेरिकेने सुरू केली आहे. यामुळे इराणही आक्रमक झाला आहे. आमच्या बंदरांना धोका निर्माण झाला तर पर्शियन आखात किंवा […]

सामना 13 Apr 2026 5:13 pm

केरळमध्ये मासेमारी बोटीला आग; सुदैवाने कामगार सुखरूप बचावले

केरळमध्ये मासेमारी करणाऱ्या बोटीला आग लागल्याची घटना सोमवारी दुपारच्या सुमारास घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी किंवा कुणीही जखमी झाले नाही. यार्डात नांगरलेल्या बोटीला आग लागल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. आगीची माहिती मिळताच अग्नीशमन दल आणि बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. पाच कामगार बोट तोडण्याच्या कामात गुंतलेले असताना बोटीला अचानक आग लागली. आग लागल्याचे लक्षात […]

सामना 13 Apr 2026 5:07 pm

Mumbai News –बंद दरवाजांची नॉन-एसी लोकल अखेर कुर्ला कारशेडमध्ये दाखल

पहिली बंद दरवाजाची नॉन-एसी लोकल अखेर मध्य रेल्वेवरील कुर्ला कारशेडमध्ये दाखल झाली आहे. गर्दीमुळे प्रवाशांचे होणारे मृत्यू रोखण्यासाठी बंद दरवाजाची नॉन-एसी लोकल प्रवाशांच्या सेवेत रुजू होण्यासाठी सज्ज झाली आहे. बंद दरवाजांची ही देशातील पहिली नॉन-एसी लोकल असून मुंबईत दाखल झाली आहे. जून 2025 मध्ये गर्दीमुळे लोकलमधून पडून मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ पाच प्रवाशांचा मृत्यू झाला होता. […]

सामना 13 Apr 2026 4:49 pm

IPL 2026 –राजस्थान रॉयल्सच्या मॅनेजरला BCCI ची नोटीस; वैभव सूर्यवंशीच्या शेजारी बसून केलं असं काही की…

इंडियन प्रीमियर लीगमध्ये गेल्या आठवड्यात गुवाहाटी येथे राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात सामना रंगला होता. या लढतीत बंगळुरूने राजस्थानला विजयासाठी 202 धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान राजस्थानने 12 चेंडू आणि 6 विकेट्स राखून पार केले. या लढतीदरम्यान राजस्थानचे मॅनेजर रोमी भिंदर यांनी डगआऊडमध्ये बसून केलेल्या एका कृतीमुळे बीसीसीआयने त्यांना नोटीस धाडली आहे. […]

सामना 13 Apr 2026 4:48 pm

कसाल शिक्षण संस्थेच्या संचालकपदी प्रभाकर सावंत यांची बिनविरोध फेरनिवड

सिंधुदुर्गनगरी / प्रतिनिधी शैक्षणिक क्षेत्रात अग्रस्थानी असलेल्या धी कसाल पंचक्रोशी शिक्षण संस्थेच्या संचालकपदी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांची बिनविरोध फेरनिवड झाली आहे. कसाल पंचक्रोशी शिक्षण संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी कसाल हायस्कुलच्या गुरुदक्षिणा सभागृहामध्ये मावळते अध्यक्ष भाई सावंत याच्या अध्यक्षतेखाली पार पडली.यावेळी 2026 ते 2031 या कालावधीसाठी संचालक मंडळाची निवडणूक पार पडली.यामध्ये प्रमुख्याने कसाल शिक्षण [...]

तरुण भारत 13 Apr 2026 4:46 pm

कामगिरी उंचावण्यासाठी स्पर्धा आवश्यक- कांचनमाला संगवे

धाराशिव (प्रतिनिधी)- खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी गाठण्यासाठी केवळ सराव पुरेसा नसून नियमित स्पर्धांमध्ये सहभागी होणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत कांचनमाला संगवे यांनी व्यक्त केले. भारतीय जैन संघटनेच्या वतीने धाराशिव येथील तुळजाभवानी क्रीडा संकुलात आयोजित जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यात भारतीय जैन संघटनेचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य कांचन माला सांगवी बोलत होत्या. यावेळी क्रीडा भारतीचे ज्येष्ठ मार्गदर्शक राजाभाऊ वैद्य, भारतीय जैन संघटनेचे जिल्हाध्यक्ष जयकुमार जैन, धाराशिव तालुका अध्यक्ष प्रवीण गडदे, रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे प्राचार्य संदीप देशमुख, स्केटिंग प्रशिक्षक यशस्वी कदम, तसेच राष्ट्रीय खेळाडू अभिजीत कंदले आणि अजिंक्य जाधव यांच्यासह खेळाडू व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विविध गटांमध्ये रंगलेल्या या स्पर्धांमध्ये खेळाडूंनी आपली गती, कौशल्य आणि आत्मविश्वासाचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. विजेत्या खेळाडूंना पदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले, तर सर्व सहभागी खेळाडूंनाही प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनामुळे तुळजाभवानी क्रीडा संकुलात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. खेळाडू, पालक आणि क्रीडाप्रेमींच्या उपस्थितीमुळे कार्यक्रम अधिक रंगतदार झाला.

लोकराज्य जिवंत 13 Apr 2026 4:44 pm

हिंगणगाव येथे “काजवा“ हस्तलिखिताचे प्रकाशन

भुम (प्रतिनिधी)- महात्मा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने, विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांच्यातील कल्पकता पुरवण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिंगणगाव बुद्रुक येथील विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन काजवा या हस्तलिखितेची निर्मिती केली आहे. या अनोख्या हस्तलिखिताचे प्रकाशन बाल विकास प्रकल्प अधिकारी गणेश कुकडे यांच्या हस्ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिंगणगाव (बुद्रुक) येथे दि.13 एप्रिल रोजी करण्यात आले. शालेय वयापासून मुलांमध्ये वाचन आणि लेखन संस्कृती रुजवावी यासाठी काजवा हस्तलिखित मध्ये विद्यार्थ्यांनी स्वतः लिहिलेल्या कविता, सामान्य ज्ञान, कथा ,चारोळ्या ,निसर्ग चित्रे, रांगोळी, मेहंदी ,सुविचार ,माझं चित्र, वृत्तपत्रातील आलेल्या बातम्या ,छायाचित्रे, पुस्तक परिचय लेखन इत्यादीचा यामध्ये समावेश केला आहे. प्रकाशन प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. “आजच्या डिजिटल युगात हाताने दिलेल्या हस्तलिखिताचे महत्त्व अनन्यसाधारण आहे अशा उपक्रमामुळे मुलांचा आत्मविश्वास वाढतो आणि त्यांच्या भाषिक कौशल्याचा विकास होतो असे मत बाल विकास प्रकल्पाधिकारी गणेश कुकडे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका शाहेदा हुसेनी या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रप्रमुख प्रदीप खराडे , विस्ताराधिकारी संतोष जाधव,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दादासाहेब मारकड, महेश ठोंगे हे होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक ऐश्वर्या नवले यांनी केले तर आभार प्रदर्शन आर्या मारकड यांनी केले. “ ग्रामीण भागातील आम्हा मुलांच्या मनातील दडलेले विचार आणि निसर्गाकडे पाहण्याचा दृष्टिकोन काजवा या हस्तलिखितेच्या माध्यमातून आम्ही शब्दबद्ध केला आहे“ ऐश्वर्या नवले (संपादक)

लोकराज्य जिवंत 13 Apr 2026 4:44 pm

भोसले हायस्कूल मध्ये महात्मा ज्योतिराव फुले जयंती साजरी

धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील श्रीपतराव भोसले हायस्कूल मध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेचे पुजन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था प्राचार्य डॉ. दयानंद जटनुरे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी प्रशालेचे प्राचार्य तथा मुख्याध्यापक नंदकुमार नन्नवरे , उपप्राचार्य संतोष घार्गे, कला विभाग प्रमुख कैलास कोरके ,इ.10 वी पर्यवेक्षक प्रविण बागल 8 वी पर्यवेक्षक कुमार निकम, वरिष्ठ लिपीक विश्वनाथ दहिफळे, नवनाथ तांबारे, आदि कर्मचारी वृंद उपस्थित होते.

लोकराज्य जिवंत 13 Apr 2026 4:43 pm

श्री तुळजाभवानी मंदिर विकास आराखडा वेगाने राबवणार - आमदार पाटील

तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचे पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या तुळजाभवानी मंदिर परिसराचा कायापालट करण्यासाठी 1800 कोटी रुपयांचा भव्य विकास आराखडा आता वेगाने राबवला जाणार आहे. या कामांचा दर आठवड्याला आढावा घेतला जाणार असून, पुढील 15 दिवसांत सर्व विभागांकडून कालबद्ध (टाईम-बाउंड) आराखडा सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अशी माहिती आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन दिले. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना पाटील म्हणाले की, भाविकांच्या सोयीसाठी उभारण्यात येणाऱ्या भक्त सुविधा केंद्रांच्या निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. नियोजनानुसार भाविकांना महाद्वारातून प्रवेश करून थेट दर्शन मंडपात पोहोचता येणार आहे. दर्शन मंडपाचे काम भौगोलिकदृष्ट्या आव्हानात्मक असले तरी त्याचे डिझाइन व तांत्रिक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. वृद्ध व दिव्यांग भाविकांसाठी महत्त्वाचा निर्णय घेत महाद्वाराजवळ मोठी लिफ्ट उभारली जाणार आहे. या लिफ्टमधून खाली उतरल्यावर भुयारी मार्ग (टनेल) द्वारे थेट मंदिराजवळ पोहोचण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. हे महत्त्वाचे काम 6 ते 9 महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. तुळजापूरच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी रामदरा तलाव परिसरात 108 फूट उंचीचा भव्य पुतळा, अद्ययावत वस्तुसंग्रहालय (म्युझियम), बोटिंग सुविधा, आकर्षक बगीचा विकास, या सर्व कामांचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे पर्यटनाला चालना मिळून स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. तुळजापूर शहराचा विकास केवळ आजचा न राहता पुढील 50 वर्षांचा विचार करून ‌‘अर्बन प्लॅनिंग‌’द्वारे मास्टर प्लॅन तयार केला जात आहे. असे सांगितले. यावेळी नगराध्यक्ष विनोद गंगणे,आनंद कंदले, औदुंबर कदम उपस्थित होते.

लोकराज्य जिवंत 13 Apr 2026 4:42 pm

धाराशिवमध्ये तणाव: तरुणाच्या मृत्यूवरून नातेवाईक रस्त्यावर

धाराशिव (प्रतिनिधी)- तालुक्यातील उपळा (मा) येथील प्रमोद मनोज अवधूते (वय 23) याच्या अत्यंत संशयास्पद मृत्यू प्रकरणी नातेवाईकांनी प्रेतासह जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर दोन तास रास्ता रोको आंदोलन केले. या प्रकरणी ॲट्रॉसिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून आरोपीला तात्काळ अटक करावी, अशी न्याय मागणी आंदोलकांनी केली. रिपाइं (आ) चे प्रदेश जॉइंट सेक्रेटरी राजाभाऊ ओहाळ यांनी यंत्रणेला जाब विचारला. त्यानंतर अतिरिक्त पोलिस अधीक्षक शफकत आमना यांनी वरिष्ठांना याबाबत अवगत केले. त्यानंतर पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांनी आंदोलकांना कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हा रास्ता रोको स्थगित करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. 11 एप्रिल) रात्री सुमारे नऊच्या सुमारास प्रमोद अवधूते यास शेतात कामासाठी मनोज पडवळ घेऊन गेले होते. त्यानंतर रविवारी सकाळी प्रमोदने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती पडवळ यांनी कुटुंबीयांना दूरध्वनीद्वारे दिली. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाठविला. तेथे शव विच्छेदन करण्यात आले. दरम्यान, हा आत्महत्येचा प्रकार नसून प्रमोदला अमानुष मारहाण करून त्याचा खून करण्यात आला आणि पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह झाडाला टांगण्यात आल्याचा गंभीर आरोप मयताच्या नातेवाईकांनी केला आहे. प्रमोद हा मागासवर्गीय कुटुंबातील असल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी करून न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. या घटनेच्या निषेधार्थ नातेवाईकांनी मृतदेह थेट जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आणत ठिय्या आंदोलन केले. प्रशासनाकडून तत्काळ कारवाई न झाल्याने संतप्त नातेवाईकांनी दोन तास रास्ता रोको आंदोलन करत निषेध व्यक्त केला. यावेळी स्थानिक राजकीय पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकराज्य जिवंत 13 Apr 2026 4:42 pm

दिनेश अग्रवाल ‌‘व्हिजनरी ऑफ द इयर‌’ने सन्मानित

तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर येथील युवा उद्योजक आणि शिव रियालिटी चे संचालक दिनेश अग्रवाल यांनी सोलापूरच्या रिअल इस्टेट क्षेत्रात प्रीमियम प्लॉटिंगची वेगळी ओळख निर्माण करत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना ‌‘व्हिजनरी ऑफ द इयर‌’ पुरस्काराने गौरविण्यात आले. सोलापूर येथे पार पडलेल्या पावर कॉन्फरन्स 2026 कार्यक्रमात हा प्रतिष्ठेचा पुरस्कार सिने अभिनेत्री उर्मिला कानेटकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या सोहळ्यास जिल्हाधिकारी कार्तिकीयन, जिल्हा पोलीस प्रमुख अतुल कुलकर्णी, आयुक्त सचिन ओंबासे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. दिनेश अग्रवाल यांनी तीर्थक्षेत्र तुळजापूर नंतर यांनी नियोजनबद्ध प्रोजेक्ट्स, उत्कृष्ट लोकेशन्स आणि पारदर्शक व्यवहार यामुळे ग्राहकांचा ठाम विश्वास जिंकला आहे. अल्पावधीत त्यांनी उभारलेले प्रकल्प सोलापूरच्या रिअल इस्टेट क्षेत्रात वेगळी छाप पाडत आहेत. याची दखल घेऊन हा पुरस्कार दिनेश आगरवाड्यांना देण्यात आला आहे. या पुरस्कारानंतर तुळजापूरसह सोलापूर परिसरातील उद्योग क्षेत्रातून दिनेश अग्रवाल यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांनी ग्राहकांचा विश्वास जिंकून मिळवलेले यश हेच या सन्मानामागील खरे कारण असल्याची भावना मान्यवरांनी व्यक्त केली. दिनेश अग्रवाल यांच्या या यशामुळे तुळजापूरच्या उद्योजकतेला नवी ओळख मिळाली असून, युवा पिढीसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण झाले आहे. भविष्यातही ते अशाच यशाची शिखरे सर करतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

लोकराज्य जिवंत 13 Apr 2026 4:41 pm

इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर चुलींना पुन्हा मागणी; कुंभार व्यस्त

तुळजापूर (प्रतिनिधी)- इराण-अमेरिका तणावाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या इंधन टंचाईचा परिणाम आता ग्रामीण भागात दिसू लागला असून, पारंपरिक मातीच्या चुलींना पुन्हा चांगले दिवस आले आहेत. तुळजापूर परिसरात चुलींची मागणी झपाट्याने वाढत असून कुंभार सध्या चुली तयार करण्यात व्यस्त आहेत. पूर्वी रॉकेल स्टोव्ह, त्यानंतर गॅस शेगड्यांचा वापर वाढला होता. मात्र सध्या इंधनाचा प्रश्न निर्माण झाल्याने ग्रामीण भागातील नागरिक पुन्हा पारंपरिक चुलीकडे वळताना दिसत आहेत. स्थानिक बाजारात दर आठवड्याला 100 ते 150 चुलींची विक्री होत असल्याची माहिती कुंभारांनी दिली. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात मागणी असून शहरी भागातही काही प्रमाणात चुली खरेदी केल्या जात आहेत. सध्या एका मातीच्या चुलीची किंमत सुमारे 200 रुपये असून नागरिक मोठ्या उत्साहाने खरेदी करत आहेत. चुलीवर बनवलेल्या जेवणाच्या चवीमुळेही लोकांचा कल वाढला आहे. चुली तयार करण्यासाठी पंढरपूर परिसरातून विशेष माती आणली जाते. त्यानंतर कच्च्या चुली तयार केल्या जातात. त्या वाळवून भट्टीत भाजल्या जातात ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी साधारण 7 ते 8 दिवसांचा कालावधी लागतो. सध्या कुंभारांच्या घराकडे नागरिकांची मोठी वर्दळ वाढली असून चुली खरेदीसाठी लोकांची पावले वळत आहेत. इंधनाच्या समस्येमुळे पुन्हा एकदा पारंपरिक चुलींचा वापर वाढताना दिसत असून ग्रामीण भागात चुलीवरील स्वयंपाकाचा आस्वाद घेण्याकडे नागरिकांचा कल वाढत आहे.

लोकराज्य जिवंत 13 Apr 2026 4:41 pm

एका महिन्यात 10 गदा जिंकून पैलवान महादेव घोडके यांचा दबदबा; तुळजापूर तालुक्यात भव्य सत्कार

तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुक्यातील अंणदुर गावचे सुपुत्र आणि तुळजाभवानी मंदिर ट्रस्टमध्ये येथे सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत असलेले पैलवान महादेव सुभाषराव घोडके यांनी कुस्ती क्षेत्रात अभूतपूर्व कामगिरी करत तालुका आणि जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे. पैलवान महादेव सुभाषराव घोडके यांनी अवघ्या एका महिन्यात तब्बल 10 गदा जिंकत दमदार कामगिरी केली. अंणदुर, शहापूर, आरळी, खुदावाडी, शिंदफळ यांसह धाराशिव जिल्ह्यातील विविध ठिकाणी आणि कर्नाटक राज्यातील स्पर्धांमध्ये त्यांनी विजय मिळवत आपली ताकद सिद्ध केली. रोख 11 हजारांचा सन्मान; खुराकाचीही घोषणा या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांचा स्थानिक नगराध्यक्ष विनोद गंगणे यांच्या हस्ते रोख 11,000 रुपयांचे बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला. तसेच त्यांच्या पुढील तयारीसाठी दरमहा खुराक देण्याची घोषणाही करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी महादेव घोडके यांच्या जिद्द, मेहनत आणि चिकाटीचे विशेष कौतुक केले. त्यांच्या यशामुळे तुळजापूर तालुक्यातील क्रीडा क्षेत्रात नवचैतन्य निर्माण झाले असून, युवकांसाठी ते प्रेरणास्थान ठरत आहेत. या सन्मान सोहळ्याला कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विजय सर गंगणे, सामाजिक कार्यकर्ते पांढरे, संग्राम पाटील, गणेश भिंगारे, मनोज गवळी, गटनेते औदुंबर कदम, नगरसेविका प्रियंका गंगणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. पैलवान महादेव घोडके यांच्या या यशाने तुळजापूर तालुक्याचा क्रीडा मान उंचावला असून, त्यांच्या पुढील वाटचालीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशीच दमदार कामगिरी कायम ठेवत राज्यस्तरावर नाव उज्ज्वल करावे, अशा शुभेच्छा सर्व स्तरातून दिल्या जात आहेत.

लोकराज्य जिवंत 13 Apr 2026 4:40 pm

ईट येथील साहेब महोत्सवात कलाकारांनी प्रेक्षकांची मने जिंकली

भुम (प्रतिनिधी)- ईट येथे साहेब महोत्सव निमित्त राज्यस्तरीय समय गट व वैयक्तिक गट बाल व प्रौढ नृत्य स्पर्धेचे आयोजन राज्याचे आरोग्य मंत्री माजी मंत्री आमदार डॉ. तानाजीराव सावंत यांच्या वाढदिवसाच्या निमित्त कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रवीण देशमुख यांच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमांमध्ये पहिल्या दिवशी दिनांक 11 एप्रिल रोजी बाल गटातील स्पर्धा सामूहिक गट व वैयक्तीक गट असं उत्साहाच्या वातावरणामध्ये पार पडल्या. राज्यातील अनेक भागातून समूह गट व वैयक्तिक नृत्य स्पर्धेसाठी सहभाग नोंदवला होता. या प्रसंगी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक केशव सावंत, अण्णासाहेब देशमुख, सुनील भोईटे, नागनाथ नाईकवाडी, महिला आघाडी जिल्हाप्रमुख अर्चना दराडे, बाळासाहेब मांगले, सत्यवान गपाट, बालाजी गुंजाळ , विशाल ढगे, प्रवीण गायकवाड, भाऊसाहेब मारकड, राहुल डोके, बालाजी काळे,जेष्ठ नेते केशव चव्हाण, आदी उपस्थित होते. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक नृत्य निकेतन अकॅडमी ग्रुप, द्वितीय क्रमांक साया अकॅडमी ग्रुप, तृतीय क्रमांक ऑसम ग्रुप, चतुर्थ क्रमांक नवाकुर ग्रुप यांनी क्रमांक पटकावले. तर वैयक्तिक गटामध्ये प्रथम क्रमांक विराट काळे, द्वितीय क्रमांक अदिती जाधव, तृतीय क्रमांक शौर्य गोडबोले, चतुर्थ क्रमांक अदिव्यता कांबळे, यांनी क्रमांक पटकावले सुत्रसंचालन डॉ. हनुमंत गवळी यांनी केले.या नृत्याचे परीक्षण रोहित राठोड व सिद्धी गाडेकर यांनी केले. उपस्थित कलाकारांना सन्मानचिन्ह व बक्षीस वितरण करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ईश्वर देशमुख बंटी देशमुख अक्षय शिंदे आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रम यशस्वी करण्यात आला.

लोकराज्य जिवंत 13 Apr 2026 4:40 pm

माळुंब्रा-मसला रस्त्याची दुरवस्था; 5 किमी मार्ग खड्डेमय, ग्रामस्थांची तातडीच्या दुरुस्तीची मागणी

तुळजापूर (प्रतिनिधी)- माळुंब्रा ते मसला असा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 ला जोडणारा महत्त्वाचा संपर्क रस्ता सध्या पूर्णपणे खड्डेमय झाला असून प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहे. सुमारे 5 किलोमीटरचा हा मार्ग अक्षरशः चाळण झाल्याने वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, माळुंब्रा हायवेपासून पुढे मसला, काठी, दहिवडी, ढेकरी, अपशिंगा, सारोळा, कासारी (ता. बार्शी) या गावांना जोडणारा हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा आहे. दररोज शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी आणि ग्रामस्थ या मार्गाचा वापर करत असतात. गेल्या काही महिन्यांपासून या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून, काही ठिकाणी डांबर पूर्णपणे निघून गेला आहे. त्यामुळे वाहन चालवताना अपघाताचा धोका वाढला आहे. वाहतूक आणि शेतीवर परिणाम हा रस्ता शेतमाल वाहतुकीसाठी महत्त्वाचा असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. खराब रस्त्यामुळे वेळ आणि खर्च दोन्ही वाढत आहेत माळुंब्रा-मसला रस्त्याचे तातडीने डांबरीकरण करावे, खड्डे बुजवून सुरक्षित वाहतुकीची व्यवस्था करावी. संबंधित विभागाने स्थळ पाहणी करून कामाला गती द्यावी. अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. महत्त्वाचा संपर्क रस्ता असूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.अपघात टाळण्यासाठी आणि ग्रामीण भागातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करणे गरजेचे असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत.

लोकराज्य जिवंत 13 Apr 2026 4:39 pm

एकूण उत्पादन खर्चावर आधारित हमीभावाच्या मागणी याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाची केंद्राला नोटीस

शेतमालाला हमीभाव निश्चित करताना आलेला एकूण उत्पादन खर्च लक्षात घेण्यात यावा यासाठीचे निर्देश केंद्र सरकारला द्यावेत, अशी मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने आज नोटीस बजावली आहे. महाराष्ट्रातील तीन शेतकऱ्यांनी दाखल केलेल्या या जनहित याचिकेवर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी संबंधित राज्यांनी प्रस्तावित केलेल्या सी-2 वर आधारीत किमान आधारभूत किंमत (MSP) निश्चित करावी, अशी […]

सामना 13 Apr 2026 4:38 pm

महात्मा ज्योतिबा फुले यांनी अंधश्रद्धेवर विश्वास न ठेवता विज्ञाननिष्ठ बनण्याची शिकवण दिली- डॉ. दत्तात्रय साखरे

धाराशिव (प्रतिनिधी)- येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संदीप देशमुख यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. उपस्थितांना मार्गदर्शन करताना डॉ साखरे म्हणाले की, समाजातील अन्याय, अज्ञान आणि असमानता याविरुद्ध लढा देणाऱ्या या महान व्यक्तिमत्त्वाच्या कार्याची समाजास जाणीव असावी. महात्मा फुले हे केवळ एक समाजसुधारक नव्हते, तर ते शिक्षणाच्या माध्यमातून समाज परिवर्तन घडवून आणणारे महान विचारवंत होते. त्यांनी स्त्रीशिक्षणाचा पाया रचत 1848 साली मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. त्या काळात स्त्रियांना शिक्षण घेणे निषिद्ध मानले जात असताना त्यांनी धाडसाने हा उपक्रम राबविला. त्यांच्या या कार्यात त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले यांनीही मोठा सहभाग घेतला. सावित्रीबाई या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका ठरल्या आणि त्यांनी समाजातील अंधश्रद्धा व अन्यायाविरुद्ध लढा दिला. महात्मा फुले यांनी शूद्र-अतिशूद्र, दलित आणि दुर्बल घटकांच्या उन्नतीसाठी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांनी “सत्यशोधक समाज” या संस्थेची स्थापना करून जातिभेद, अस्पृश्यता आणि सामाजिक विषमता यांना विरोध केला. सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून त्यांनी समानतेचा संदेश दिला आणि समाजात न्याय व बंधुतेची भावना रुजवली. त्यांच्या विचारांमध्ये ‌‘मानवतेचा धर्म‌’ हा सर्वात महत्त्वाचा होता. त्यांनी धर्म, जात आणि पंथ यांवर आधारित भेदभावाला विरोध केला आणि सर्वांना समान हक्क मिळावेत, अशी भूमिका घेतली. “शिक्षण हेच खरे मुक्तीचे साधन आहे” हा त्यांचा संदेश आजही तितकाच प्रेरणादायी आहे. महात्मा फुले यांनी केवळ शिक्षण क्षेत्रातच नव्हे, तर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरही काम केले. त्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत “शेतकऱ्यांचा असूड” हे पुस्तक लिहिले, ज्यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांच्या दुःखाची जाणीव करून दिली. त्यांच्या या कार्यामुळे ते शेतकरी आणि कामगार वर्गाचे खरे नेते ठरले.आजही समाजात असमानता, अज्ञान आणि अंधश्रद्धा आढळून येते. अशा वेळी महात्मा फुले यांच्या विचारांचा अवलंब करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यांच्या शिकवणुकीनुसार समाजात समता, बंधुता आणि न्याय प्रस्थापित करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. महात्मा फुले यांचे कार्य केवळ इतिहासापुरते मर्यादित नाही, तर ते आजही आपल्याला मार्गदर्शन करते. त्यांच्या विचारांमुळे समाजात जागृती निर्माण झाली आणि अनेकांनी शिक्षणाच्या माध्यमातून आपले जीवन बदलले. आजच्या पिढीने त्यांच्या विचारांचा आदर्श ठेवून समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा घ्यावी, हा संदेश या जयंतीनिमित्त त्यांनी यावेळी दिला यावेळी कार्यालयातील सुमेर कांबळे, सुभाष पिंगळे तसेच डॉ केशव क्षीरसागर,प्रा माधव उगिले यांच्या सह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा विवेकानंद चव्हाण यांनी केले. तर आभार डॉ बालाजी गुंड यांनी मानले.

लोकराज्य जिवंत 13 Apr 2026 4:38 pm

भूममध्ये महात्मा फुले यांची जयंती उत्साहात

भूम (प्रतिनिधी)- भूम शहरातील कसबा विभागामध्ये सामाजिक समता, शिक्षण आणि परिवर्तनाचा संदेश देणारे महान समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी परिसरात प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले होते. कार्यक्रमाची सुरुवात माजी नगराध्यक्ष संजय गाढवे यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने झाली. यानंतर उपस्थित मान्यवरांनी फुले यांच्या कार्याचा आणि विचारांचा गौरव करत, त्यांच्या शिक्षणविषयक आणि सामाजिक क्रांतीच्या कार्याची आठवण करून दिली. समाजातील वंचित घटकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे आजही ते प्रेरणास्थान असल्याचे वक्त्यांनी नमूद केले. यावेळी नगरसेवक अभिजीत शेटे, सुनील माळी, अमोल माळी, आदेश माळी, अमोल भोसले, प्रदीप चौधरी, निलेश माळी, अक्षय माळी, अनिल माळी, सुहास माळी, शशी माळी, रवी माळी, बापू माळी, बाळासाहेब माळी, आबा हवालदार, सतीश माळी, धनंजय माळी, पत्रकार धनंजय शेटे, सुजित वेदपाठक, बालाजी साबळे, तात्या माळी यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रसार करण्याचा संकल्प करण्यात आला. तसेच समाजात समता, बंधुता आणि शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी सर्वांनी एकजूट होण्याचे आवाहन करण्यात आले.

लोकराज्य जिवंत 13 Apr 2026 4:38 pm

पत्रकारांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्नशील-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य असून समाजातील प्रत्येक घटकाचा सन्मान राखला गेला पाहिजे.पत्रकारांचे कार्य अत्यंत आव्हानात्मक असून ते निष्ठेने आणि व्रतस्थ भावनेने पार पाडले जाते.त्यामुळे पत्रकारांच्या समस्या जाणून घेऊन त्या निकाली काढण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह, नगर परिषद,धाराशिव येथे दैनिक ‌‘पुण्य नगरी‌’च्या 25 व्या वर्धापन दिनानिमित्त कूपन स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण,‌‘पुण्य पुरस्कार‌’ तसेच जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या रौप्य महोत्सवानिमित्त कै.अनंत भालेराव स्मृती पत्रकारिता पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात पार पडला.या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री प्रताप सरनाईक होते. यावेळी माजी खासदार रवींद्र गायकवाड,माजी आमदार ज्ञानराज चौगुले,जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा महाडदाळकर,नगराध्यक्ष नेहा काकडे,पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे,सरचिटणीस संतोष जाधव,सहसरचिटणीस राजाभाऊ वैद्य,कोषाध्यक्ष संतोष हंबीरे, उपाध्यक्ष श्रीकांत कदम व अब्बास सय्यद यांची प्रमुख उपस्थिती होती. उपमुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की, आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात घेतलेले 567 निर्णय हे सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी होते.‌‘लाडकी बहीण‌’ योजनेला सुरुवातीला विरोध झाला,मात्र ही योजना सुरूच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.केंद्र सरकारच्या शेतकरी सन्मान योजनेत राज्य सरकारने अतिरिक्त सहा हजार रुपयांची भर घातली असून, एनडीआरएफपेक्षा दुप्पट नुकसानभरपाई देण्याचा निर्णयही घेतला.आपत्तीग्रस्तांना दिवाळीपूर्वीच 32 हजार कोटी रुपयांची मदत वितरित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.‌‘शासन आपल्या दारी‌’ या उपक्रमातून नागरिकांना थेट सेवा देण्यात आल्याचा उल्लेखही त्यांनी केला. “माझी नाळ सर्वसामान्य जनतेशी जोडलेली आहे,असे सांगत शिंदे यांनी मराठवाड्यातील दुष्काळ कायमचा दूर करण्याचा संकल्प व्यक्त केला.मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाद्वारे हा प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.तसेच महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मंदिराच्या विकासासाठी 1868 कोटी रुपयांच्या आराखड्याची तरतूद करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच कै.अनंत भालेराव स्मृती पत्रकारिता पुरस्कार विविध गटांतील विजेत्यांना प्रदान करण्यात आले. शोधवार्ता गटात बालाजी वडजे प्रथम,अमोल मुळे द्वितीय,राजहंस कांबळे व रोशन मुल्ला तृतीय तर विशेष वार्ता गटात माधव आटकोटे प्रथम,रमेश कदम द्वितीय,दिपक बारकुल व डॉ.रविंद्र भताने तृतीय ठरले. कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने झाली.प्रास्ताविक पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे यांनी केले तर सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन भैरवनाथ कानडे यांनी केले. कार्यक्रमाला पत्रकार बांधवांसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

लोकराज्य जिवंत 13 Apr 2026 4:36 pm

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विमानतळावर स्वागत

धाराशिव (प्रतिनिधी)- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज धाराशिव विमानतळावर हेलिकॉप्टरने आगमन झाले.आगमन प्रसंगी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी पुष्पगुच्छ देऊन उपमुख्यमंत्री श्री.शिंदे यांचे स्वागत केले. यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील, माजी खासदार रवींद्र गायकवाड माजी आमदार ज्ञानराज चौगुले, उमरगा पंचायत समितीच्या सभापती ॲड.आकांक्षा चौगुले यांनी, जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा महाडदाळकर व पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी तर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने सरचिटणीस संतोष जाधव व कोषाध्यक्ष संतोष हंबीरे यांनी देखील पुष्पगुच्छ देऊन उपमुख्यमंत्री श्री.शिंदे यांचे स्वागत केले. स्वागतानंतर उपमुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी धाराशिव येथे आयोजित दैनिक पुण्यनगरी व जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रम स्थळाकडे प्रयाण केले.

लोकराज्य जिवंत 13 Apr 2026 4:36 pm

नाट्य परिषदेला स्वतंत्र सभागृह द्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नाट्य परिषदेची मागणी

धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहाच्या दुरुस्तीचा प्रश्न तातडीने मार्गी लावून नाट्य परिषदेला स्वतंत्र सभागृह उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या धाराशिव शाखेने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कार्यकारीणी सदस्य विशाल शिंगाडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रविवार 12 एप्रिल रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,धाराशिव जिल्ह्यात गेल्या सुमारे 18 वर्षांपासून अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची शाखा सांस्कृतिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत आहे. पारंपरिक कला जोपासण्या बरोबरच आराधी, वाघ्या मुरळी भारूड, भजन यांसारख्या लोककला प्रकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम शाखेमार्फत केले जात आहे. तसेच, सांस्कृतिक मंत्रालयाच्या माध्यमातून आयोजित राष्ट्रीय युवा महोत्सवात लोकनृत्य प्रकारात प्रथम क्रमांक मिळवत धाराशिवचे नाव राज्यस्तरावर झळकवले आहे.

लोकराज्य जिवंत 13 Apr 2026 4:35 pm

छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून 5 कोटींचा निधी मंजूर

धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव शहरातील सांस्कृतिक चळवळीचे केंद्र असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहाच्या दुरुस्ती आणि नूतनीकरणासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 5 कोटी रुपयांचा भरीव निधी जाहीर केला आहे. आपण आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या मागणीला आणि पाठपुराव्याला यश आले असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी भरीव निधी मंजूर केल्याबद्दल नगराध्यक्षा नेहाताई काकडे यांनी धाराशिव वासियांच्या वतीने उपमुख्यमंत्री महोदयांचे धन्यवाद मानले आहेत. नगराध्यक्ष नेहा काकडे यांनी नुकतेच उपमुख्यमंत्री महोदयांना धाराशिव नगर परिषदेअंतर्गत विविध विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबतचे मागणी पत्र दिले होते. यामध्ये शहरातील रस्ते, कचरा व्यवस्थापन, उद्यान निर्मिती आणि नाट्यगृह दुरुस्ती यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या 9 कामांचा समावेश होता. या मागणीची दखल घेत, विशेषतः शहरातील कलावंत आणि रसिकांची सोय विचारात घेऊन, छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी 5 कोटी रुपयांचा निधी शिंदे साहेबांनी तात्काळ जाहीर केला आहे. धाराशिव नगर परिषद ही अ वर्ग नगर परिषद असून शहराचा सर्वांगीण विकास करणे हे आमचे मुख्य ध्येय आहे. नाट्यगृहाची अवस्था पाहता त्याच्या दुरुस्तीसाठी मोठ्या निधीची आवश्यकता होती. आमच्या विनंतीला मान देऊन उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांनी हा निधी मंजूर केला आहे. याबद्दल संपूर्ण धाराशिव शहरवासियांच्या वतीने त्यांचे मनापासून धन्यवाद मानत या भरीव निधीमुळे आता नाट्यगृहाचा चेहरामोहरा बदलण्यास मदत होईल असा विश्वास नगराध्यक्ष नेहा राहुल काकडे यांनी व्यक्त केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना दिलेल्या पत्रात एकूण 128.50 कोटी रुपयांच्या विकासकामांचा आराखडा सादर करण्यात आला आहे, ज्यामध्ये कचरा व्यवस्थापन प्रक्रियेसाठी 11 कोटी, स्मार्ट स्ट्रीट प्रकल्पासाठी 9 कोटी, अमृत 2.0 योजनेच्या स्वहिस्सासाठी 24 कोटी, अग्निशामक व्यवस्थेच्या बळकटी करणासाठी रु 4.50 कोटी आणि नगरोत्थान महाअभियान अंतर्गत रस्ते विकास कामांसाठी 21 कोटी रुपयांच्या मागणीचा यात समावेश आहे. नाट्यगृहासाठी केलेल्या मागणीला यश आले असून निधी मंजूर झाल्यामुळे इतरही विकासकामांना लवकरच गती मिळेल, असा विश्वास नगराध्यक्षा नेहा काकडे यांनी व्यक्त केला आहे.

लोकराज्य जिवंत 13 Apr 2026 4:35 pm

नक्षलवाद्यांना न घाबरणारे शिंदे स्वतःच्या कार्यकर्त्यांना कधीपासून घाबरू लागले- ॲड. संजय भोरे

धाराशिव (प्रतिनिधी)- “उद्धव ठाकरे भेटत नाहीत“ असे रडगाणे गाणारे आज स्वतःच्या कार्यकर्त्यांना भेटायला इतके का घाबरत आहेत? असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे युवासेना जिल्हा समन्वयक ॲड. संजय भोरे यांनी उपस्थित केला आहे. उपमुख्यमंत्री शिंदे धाराशिवमध्ये रविवारी असताना शिंदे सेनेच्या 50 कार्यकर्त्यांना पोलिसांनी पकडले होते. ॲड. भोरे यांनी शिंदेंच्या दुटप्पी भूमिकेवर जोरदार प्रहार करताना म्हटले की, “एकीकडे धर्मवीर चित्रपटात स्वतःचे धाडस दाखवण्यासाठी नक्षलवाद्यांनाही न घाबरणारा सीन दाखवणारे शिंदे, प्रत्यक्षात आपल्याच कार्यकर्त्यांना कधीपासून घाबरायला लागले? कारण पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या दौऱ्यामधे झालेल्या गोंधळाचे कारण देत खबरदारी म्हणून कार्यकर्त्यांना पहाटे घरातून उचलून नजरकैदेत ठेवण्यात आल्याचे माध्यमातून प्रसारित झाले आहेत. शिंदेंना आता स्वतःच्याच कार्यकर्त्यांना भेटण्याची तर भीती नाही वाटू लागली ? जर तसे नसेल, तर मग धाराशिवमध्ये त्यांच्याच दौऱ्याआधी अविनाश खापे, नितीन पाटील, प्रवक्ता योगेश केदार यांच्यासह अनेक निष्ठावान कार्यकर्त्यांना पहाटे घरातून उचलून नजरकैदेत ठेवण्याचे पाप कशासाठी?“ शिवसैनिकांचा अपमान आणि भाजप पुत्राला पायघड्या “स्वतःला शिवसैनिक म्हणवून घेणारे आणि स्वाभिमानासाठी उठाव केला असे सांगणारे शिंदे एकीकडे शिवसैनिकांना नजरकैदेत टाकत आहेत. विमानतळावर स्वागतासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना अडवून धरले. तर दुसरीकडे भाजप आमदार पुत्राला रेड कार्पेट आणि डायरेक्ट एन्ट्री दिली जात आहे. हाच का तुमचा शिवसैनिकांचा स्वाभिमान? सत्तेसाठी लाचारी पत्करणारे हे जनतेच्या मनातली भीती घालवण्याऐवजी, स्वतःच्या कार्यकर्त्यांनाच नजरकैदेत ठेऊन घाबरवण्याचे काम करत आहे,“ अशा शब्दांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवासेनेचे जिल्हा समन्वयक ॲड. संजय भोरे यांनी जोरदार प्रहार केला आहे.

लोकराज्य जिवंत 13 Apr 2026 4:35 pm

वडगाव (गांजा) येथे सामाजिक समता सप्ताह उत्साहात ; 52 तरुणांचे रक्तदान,98 जणांची आरोग्य तपासणी

धाराशिव (प्रतिनिधी)- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग,धाराशिव यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त तसेच महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त 8 एप्रिल ते 14 एप्रिल दरम्यान जिल्ह्यात विविध ठिकाणी सामाजिक समता सप्ताह साजरा करण्यात येत आहे.या उपक्रमांतर्गत दि.11 रोजी वडगाव (ता.धाराशिव) येथे क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांतर्गत रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर,स्वच्छता अभियान तसेच प्रबोधनपर कार्यक्रम घेण्यात आले. विशेष म्हणजे 52 तरुणांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले, तर 98 नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. कार्यक्रमासाठी समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सचिन कवले, समाज कल्याण अधिकारी सनम लामकने,मुरूम नगरपरिषदेचे नगराधिकारी सचिन भुजबळ,प्रमुख व्याख्याते किरण सगर, बार्टीचे प्रकल्प अधिकारी तुषार कदम, समतादूत नागेश फुलसुंदर,किरण चिंचोले,रमेश नरवडे,गणेश मोटे, गोविंद लोमटे,सुहास वाघमारे, अर्चना रणदिवे यांच्यासह गावातील उपसरपंच बबन फुलसुंदर,शालेय समिती अध्यक्ष सचिन पवार, सदस्य सतीश पाटील,किरण फुलसुंदर, शेटीबा पवार,दिलीप माळी,मदार सय्यद,आदम सय्यद तसेच आजी-माजी पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सहाय्यक आयुक्त सचिन कवले यांनी महापुरुषांच्या जयंतीनिमित्त समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती देत नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा,असे आवाहन केले.त्यांनी मुख्यमंत्री वयोश्री योजना,मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना,स्वाधार योजना, ऍट्रॉसिटी कायदा,बचत गटांना ट्रॅक्टर वाटप,जात पडताळणी आदी योजनांची माहिती दिली. प्रमुख व्याख्याते किरण सगर यांनी अनिष्ट रूढी-परंपरा व बुवा-बापू यांच्या आहारी न जाता महापुरुषांचे विचार आत्मसात करून अंधश्रद्धा निर्मूलनाचा संदेश दिला.दरम्यान, मान्यवरांच्या हस्ते गावातील नव्याने पोलीस व सैन्यात भरती झालेल्या युवकांचा सत्कार करण्यात आला. तसेच रक्तदात्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले व सरपंच बबन फुलसुंदर यांच्या वतीने पाण्याचे जार भेट देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागेश फुलसुंदर यांनी केले,प्रास्ताविक तुषार कदम यांनी केले तर आभार ग्रामसेवक श्री.जी.व्हि.करदोरे यांनी मानले.कार्यक्रमास गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती यामध्ये महिलांचा सहभागही लक्षणीय होता. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यासागर फुलसुंदर,प्रभाकर साळुंके,विलास फुलसुंदर,डॉ. ज्ञानेश्वर फुलसुंदर,पै.सोमनाथ फुलसुंदर,अमोल साळुंके,महावीर माळी,राजेश फुलसुंदर,पंडित पवार, बबन बेळे,ज्ञानेश्वर भुजबळ, आकाश भुस्कंडे,बापू फुलसुंदर, संजय फुलसुंदर,सोमनाथ साळुंके, ऋषीं बिराजदार,गोविंद लोखंडे, गणेश पाटील,विद्यासागर पाटील, दशरथ माळी,महादेव गायकवाड, विशाल हिरवे यांनी विशेष प्रयत्न केले.

लोकराज्य जिवंत 13 Apr 2026 4:34 pm

परंडा येथे भाजपा कार्यालयात महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी.

परंडा (प्रतिनिधी)- महिला शिक्षण आणि समानतेच्या अधिकारासाठी आयुष्यभर लढणारे सामाजिक क्रांती आणि स्त्री शिक्षणाचे प्रणेते क्रांतीज्योती महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त परंडा येथे भाजपा संपर्क कार्यालयात भाजपा नेते माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी भाजपा शहराध्यक्ष उमाकांत गोरे, उपनगराध्यक्ष समरजीतसिंह ठाकूर, नगरसेवक सत्तार पठाण, भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष ॲड.जहीर चौधरी, विकास कुलकर्णी, विलास गायकवाड, श्री. साहेबराव पाडुळे, परसराम कोळी, रामकृष्ण घोडके, सुरज काळे, जयंत भातलवंडे, महिला मोर्चा शहराध्यक्षा ज्योतीताई भातलवंडे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

लोकराज्य जिवंत 13 Apr 2026 4:33 pm

डॉ. आंबेडकर यांच्या संरक्षणासाठी दलितेत्तर लोक रात्रभर पहारा देत - बागुल

धाराशिव (प्रतिनिधी)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सामाजिक कार्यकर्त्यांना अनेक अडथळे निर्माण केले गेले. त्या अडथळ्यांवर मात करीत त्यांनी काम सुरूच ठेवले. त्याच वेळी पेशवाई काळामध्ये दलितेत्तवर समाजावर देखील पेशव्यांनी मोठ्या प्रमाणात बंधने लादली होती. तीच रग बाबासाहेबांनी पकडली. पुणे करार सुरू होता. त्यावेळी रक्ताने लिहिलेली धमकी देणारी पत्र बाबासाहेबांना यायची. त्यामुळे बाबासाहेबांना कोणताही धोका होऊ नये यासाठी बाबासाहेबांच्या संरक्षणासाठी दलितेत्तर लोक रात्रभर पहारा देत असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत योगीराज बागुल यांनी केले. धाराशिव शहरातील नालंदा फॅशन डिझायनिंग महाविद्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या डॉ बाबासाहेबांचे दलितेत्तर सहकारी या विषयावर ते बोलत होते. यावेळी बीड येथील नालंदा फाउंडेशनचे अध्यक्ष प्रदीप रोडे, विचार मंचचे अध्यक्ष प्रा. रवी सुरवसे व अरुण बनसोडे आदी उपस्थित होते. तर प्रदीप रोडे म्हणाले की, डॉ. बाबासाहेबांनी नदीजोड प्रकल्प, देशी-विदेशी नीती याची देखील सविस्तर मांडणी केली आहे. तर ओबीसी व हिंदू कोड बिलासाठी त्यांनी राजीनामा दिला असे सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मारोती पवार यांनी तर सूत्रसंचालन राजेंद्र अंगरखे यांनी व उपस्थितांचे आभार नागनाथ गोरसे यांनी मानले. तिसरे महात्मा प्रबोधनकार पुढे बोलताना बागुल म्हणाले की, सिताराम चिंतामणराव जोशी हे बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या संस्थेचे संस्थापक होते. बाबासाहेब ब्रिटिश सरकारच्या काळात 1942 मध्ये चार खात्यांचे केंद्रीय मंत्री झाले. त्यावेळी त्यांनी जोशी यांना मुख्य कामगार आयुक्त होण्याची संधी बाबासाहेबांनी दिले असल्याचे त्यांनी सांगितले. तर लोकमान्य टिळक यांचे पुत्र श्रीधर पंत व रामभाऊ पंत हे दोघेजण समाज समता संघाचे सदस्य झाले होते. दलितांना केसरी वाड्यात प्रवेश करण्याची बंदी होती. त्या काळात समाज समता संघाची शाखा बाबासाहेबांच्या हस्ते उघडल्याचे त्यांनी सांगितले. महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर जर तिसरा महात्मा म्हणायचे असेल तर केशव सिताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार यांना व लोकमान्य म्हणायचे असेल तर श्रीधर टिळक यांना म्हणावे असे आवाहन त्यांनी केले.

लोकराज्य जिवंत 13 Apr 2026 4:33 pm

आशिष ठाकूरची सहायक प्रकल्प अधिकारीपदी निवड

धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव नगरपरिषद कार्यालयात कार्यरत असणारे व उमरगा तालुक्यातील केसर जवळगा येथील सुपुत्र आशिष विक्रमसिंह ठाकूर यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेत यश मिळवले आहे. ठाकूर यांना आदिवासी विकास विभागातील ‌‘सहायक प्रकल्प अधिकारी (शिक्षण)‌’ पदावर निवड झाली आहे. धाराशिव नगर परिषद प्रशासन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय येथे कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या ठाकूर यांनी नोकरी सांभाळत स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू ठेवली. एमपीएससीच्या प्रवासात त्यांनी सात वेळा मुख्य परीक्षा दिली. तसेच तिसऱ्यांदा मुलाखत दिल्यानंतर अखेर त्यांना यश मिळाले. आशिष ठाकूर यांचे प्राथमिक ते पदवीपर्यंतचे शिक्षण सोलापूर येथे झाले असून त्यांनी बी.ई. (मेकॅनिकल) ही अभियांत्रिकी पदवी मिळवली आहे. त्यांचे वडील कै. विक्रमसिंह ठाकूर हे शिक्षक होते. तर आई कै. उमादेवी ठाकूर या गृहिणी होत्या.आशिष याने आई-वडिलांचे छत्र हरपल्यानंतरही त्यांनी परिस्थितीशी लढा देत आपले ध्येय गाठले.या यशामुळे केसर जवळगा गावात आनंद व्यक्त होत आहे.त्याच्या या यशाबद्दल विविध क्षेत्रांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

लोकराज्य जिवंत 13 Apr 2026 4:31 pm

जेतवन कॉलनी येथे म.फुले यांची जयंती साजरी

धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील शाहूनगर येथील जेतवन कॉलनी येथे क्रांतीसुर्य म. फुले यांची 199वी जयंती मोठ्या ऊत्सा उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहूणे म्हणून धाराशिव नगर परिषदेचे बांधकाम सभापती अभिजीत काकडे हे उपस्थित होते .यावेळी शाहूनगर जेतवन कॉलनीतील प्रा.महेंद्र चंदनशिवे ,अशोक हजारे, राम राऊत, सचिन दादा शिंगाडे . वाघमारे अनंत, वाघमारे नाना ,प्रा. भालेराव , रमाकांत गायकवाड ,सुबोध शिंगाडे ,अमित शिंगाडे ,सुमित चंदनशिवे, सिद्धांत राऊत, बाळासाहेब माने,रोहन शिंगाडे,अनंत घाडगे,मेजर वाघमारे मोहन,सिरसाट,हे उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रस्ताविक व आभार प्राध्यापक राम चंदनशिवे यांनी केले महात्मा फुले यांच्या द्विषताब्दी जयंतीमोहस्तव वर्षभर विविध कार्यक्रमाने साजरा केलाजाणार असे सचिनदादा शिंगाडे यांनी सांगितले.

लोकराज्य जिवंत 13 Apr 2026 4:29 pm

अशा प्रकारे तयार करा शिळ्या भाताचा पौष्टीक नाश्ता

घरात अनेकदा शिळा भात उरतो तो एकतर तसाच खाल्ला जातो किंवा फारतर त्याचा फोडणीचा भात केला जातो. हाच शिळा भात वापरून एक असा पदार्थ केला जाऊ शकतो जो होतोही झटपट आणि खायलाही असतो चवीचा. साहित्य – शिळा भात, तूप, तांदळाचे पीठ, पाणी, मीठ, जीरं, कडिपत्ता, राई, पांढरे तीळ कृती – उरलेला शिळा भात परातीत काढून […]

सामना 13 Apr 2026 4:23 pm

उमर खालिद याची सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका; जामीन अर्जावर बुधवारी सुनावणी

दिल्लीत दंगलीचा कट रचल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या उमर खालिद याने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. खालिद याला 5 जानेवारी रोजी न्यायालयाने जामीन नाकारला होता. या निर्णयाचा न्यायालयाने फेरविचार करण्याची मागणी खालिद याने केली आहे. या प्रकरणावर बुधवारी पुढील सुनावणी होणार आहे. यूएपीए कायद्यांतर्गत खालिद आणि इमाम या दोघांच्याविरुद्ध प्रथमदर्शनी पुरावे असल्याचे निरीक्षण […]

सामना 13 Apr 2026 4:20 pm

Hormuz Blockade –तेलाची टंचाई, दरवाढ, वाढत्या महागाईचा धोका; हिंदुस्थानसह जगाला युद्धाच्या झळा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये नौदल नाकेबंदीची घोषणा केल्यानंतर जागतिक बाजारपेठा हादरल्या आहेत. याचा तात्काळ परिणाम आशियाई बाजारपेठांवर दिसून आला, त्यामुळे जपान आणि दक्षिण कोरियामधील शेअर बाजार घसरणीसह उघडले. त्याच वेळी, कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली. कच्च्या तेलाच्या किमती ६-८% नी वाढून १०० डॉलर प्रति बॅरलवर गेल्या आहेत. त्यामुळे पुरवठा कमी होण्याचे […]

सामना 13 Apr 2026 4:16 pm

खरातकडून शोषण होणाऱ्या कुठल्याही महिलेला न्यायासाठी पोलिसात जावे असे का वाटले नाही? –सुप्रिया सुळे

नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातकडून शोषण होणाऱ्या कुठल्याही महिलेला न्यायासाठी पोलिसात किंवा लोकप्रतिनिधीकडे जावेसे का वाटले नाही? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. खरात प्रकरणात व्यवस्था म्हणून आम्ही सर्वजण अपयशी ठरलो, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. त्या सोमवारी माध्यमांशी बोलत होत्या. भोंदू खरातच्या ऑफिसमध्ये गलिच्छ गोष्टी होत होत्या. आता यात […]

सामना 13 Apr 2026 4:14 pm

हिमंता बिस्वा सरमा हे देशातील सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री, राहुल गांधी यांची टीका

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या पत्नीकडे तीन देशांचे पासपोर्ट असल्याचा आरोप काँग्रेस प्रवत्ते पवन खेरा यांनी केला होता. त्यानंतर पवन खेरा यांच्या घरावर आसाम पोलिसांनी छापेमारी केली होती. तसेच त्यांच्या विरोधात गुन्हेही दाखल झाले आहेत. या प्रकरणात उच्च न्यायालयाने त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केलेला आहे. त्यावर बोलताना लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आसामचे […]

सामना 13 Apr 2026 3:55 pm

West Bengal SIR : ‘जर विजयाचे अंतर २% असेल आणि १५% मतदार मतदान करू शकले नाहीत तर काय?’: न्यायमूर्ती बागची यांनी व्यक्त केली चिंता; निवडणूक आयोगाने बिहार प्रकरणातील भूमिकेपासून फारकत घेतल्याचे विधान

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जोयमाल्या बागची यांनी सोमवारी पश्चिम बंगाल राज्यामध्ये सुरू असलेल्या एसआयआर (SIR) प्रक्रियेबाबत चिंता व्यक्त केली. ज्या व्यक्तींची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत, त्यांनी दाखल केलेल्या अपिलांचा विचार करण्यासाठी एक ‘भक्कम यंत्रणा’ असण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. न्यायमूर्ती बागची यांनी नमूद केले की, पश्चिम बंगालचा विषय आला तेव्हा केंद्रीय निवडणूक आयोगाने इतर […]

सामना 13 Apr 2026 3:41 pm

झाडं तोडा आणि काँक्रीट ओता…मुंबईतील वाढत्या उष्णतेवरून आदित्य ठाकरे यांचा महायुती सरकारवर निशाणा

मुंबई आणि उपनगरांमध्ये सातत्याने वाढणाऱ्या तापमानावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारवर कडाडून टीका केली आहे. वाढत्या उष्णतेच्या समस्येवर सरकारने शोधलेला उपाय म्हणजे झाडे तोडून तिथे काँक्रीट ओतण्याचा असल्याचा उपरोधिक टोला त्यांनी लगावला आहे. याबाबत त्यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. मुंबई शहर आणि उपनगरांत पुन्हा उष्णतेच्या झळा […]

सामना 13 Apr 2026 3:36 pm

पाठ्यपुस्तकातील मराठा साम्राज्याचा नकाशा हटवणे ही मराठ्यांच्या बलिदानाची प्रतारणा, संभाजीराजेंचे शिक्षण मंत्री यांचे शिक्षणमंत्र्यांना पत्र

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (NCERT) आठवीच्या पुस्तकातून मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा काढून टाकले आहे. त्यावरून संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना याबाबत पत्र लिहले आहे. या पत्राची प्रत त्यांनी सोशल मीडियावर देखील शेअर केली आहे. त्यासोबत त्यांनी ”पाठ्यपुस्तकातील मराठा साम्राज्याचा नकाशा हटवणे ही मराठ्यांच्या बलिदानाची प्रतारणा आहे’, असे म्हटले […]

सामना 13 Apr 2026 3:24 pm

सुसान कोयल यांच्या हाती ऑस्ट्रेलियाच्या लष्कराची कमान, १२५ वर्षात पहिल्यांदाच महिला करणार लष्कराचे नेतृत्व

ऑस्ट्रेलियामध्ये १२५ वर्षांत प्रथमच, एक महिला देशाच्या लष्कराचे नेतृत्व करणार आहे. संरक्षण मंत्री रिचर्ड मार्ल्स यांनी या नियुक्तीला ऐतिहासिक म्हटले आहे. तसेच त्यांनी लेफ्टनंट जनरल सुसान कोयल यांच्या नावाची घोषणा केली. ऑस्ट्रेलियन लष्कराच्या स्थापनेपासूनच्या १२५ वर्षांत प्रथमच एक महिला हे सर्वोच्च पद भूषवणार आहे. लेफ्टनंट जनरल सुसान कोयल यांची लष्करी कारकीर्द जवळपास तीन दशकांची आहे. […]

सामना 13 Apr 2026 3:23 pm

नारी शक्ती वंदन अधिनियम अंमलबजावणीस साथ द्यावी

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचे राजकीय ऐक्य साधण्याचे आवाहन पणजी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राजकीय मित्रपक्ष आणि विरोधी पक्षांच्या नेतृत्वाला, तसेच खासदारांना, महिलांना विधिमंडळात प्रतिनिधित्व देण्याच्या ऐतिहासिक अंमलबजावणीसाठी एकजूट होण्याचे औपचारिक आवाहन केले आहे. 16 एप्रिलपासून संसदेचे विशेष अधिवेशन सुरू होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्र्यांनी यावर जोर दिला की देश आपल्या लोकशाही प्रवासात एका ‘महत्त्वाच्या [...]

तरुण भारत 13 Apr 2026 3:05 pm

आशाताईंच्या जाण्याने गोव्यातही दु:ख

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह अनेक मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली पणजी : आशा भोसले यांच्या निधनाचे वृत्त समजताच गोव्यातही दु:ख व्यक्त करण्यात आले. त्यांनी गायिलेली मराठी-हिंदी गाणी गोव्यातील जनतेच्या मनात अजूनही कायम असून ती रुंजी घालतात. कोकणी भाषेतून देखील त्यांनी गीते गायली आहेत. गोव्यात विविध प्रकारचे संगीताचे कार्यक्रम सातत्याने होतात. त्यात आशाताईंच्या गाण्यांना नेहमीच प्राधान्य मिळते [...]

तरुण भारत 13 Apr 2026 3:03 pm

हिंदुस्थानची रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेलखरेदी; गाठली 3 वर्षातील उच्च्यांकी पातळी

अमेरिका, इस्रायल इराणमधील संघर्षामुळे जगभरात इंधनाची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्बंध शिथील करत हिंदुस्थानला रशियाकडून तेलखरेदी करण्यास परवानगी दिली. तसेच समुद्रात जहाजांवर असलेले इराणचे तेल खरेदी करण्यासाठीही परवानगी देण्यात आली. मात्र, यासाठी ठराविक काळ निश्चित केला आहे. या संधीचा अनेक देशांनी फायदा घेतला. मात्र, हिंदुस्थानने या संधीचे सोने करत […]

सामना 13 Apr 2026 3:01 pm

अन् अंगाची होतेयं लाही लाही!

पारा 38 डिग्री सेल्सिअसवर : आरोग्य खात्याकडून मार्गदर्शक तत्त्वे जारी : रस्ते व बाजारपेठ ओस बेळगाव : वाढत्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले असून पारा 38 डिग्री सेल्सिअसवर पोहोचल्याने उकाडा असह्या बनला आहे. दुपारच्या वेळी नागरिक घराबाहेर पडण्याचे टाळत असल्याने रस्ते व बाजारपेठ ओस पडल्याचे चित्र दुपारच्या वेळी पहायला मिळत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार एप्रिल व [...]

तरुण भारत 13 Apr 2026 2:47 pm

व्यंकटेश्वराला भक्ताचे भरभरून दान; दिले इतके कोटी रुपये

हैदराबाद मधील एका भक्ताने सोमवारी तिरुमला तिरुपती देवस्थान (TTD) ‘श्री व्यंकटेश्वर प्राणदान ट्रस्ट’ला १ कोटींहून अधिक रुपयांची देणगी दिली. या देणगीचा ‘डिमांड ड्राफ्ट’ श्रीवारी मंदिरातील रंगनायकुला मंडपामध्ये देवस्थानचे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी सी. व्यंकय्या चौधरी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. अल्लुरी वर्मा यांनी तिरुमला तिरुपती देवस्थानमच्या ट्रस्टला १ कोटींहून अधिक रुपयांची देणगी दिली आहे. अशी माहिती मंदिराच्या […]

सामना 13 Apr 2026 2:40 pm

रणवीर सिंगच्या ‘धुरंधर 2’चा बॉक्स ऑफिसवर धमाका; 1700 कोटींचा टप्पा पार करत रचला नवा इतिहास

आदित्य धर दिग्दर्शित आणि रणवीर सिंगची मुख्य भूमिका असलेला ‘धुरंधर 2: द रिव्हेंज’ हा स्पाय-ॲक्शन चित्रपट बॉक्स ऑफिसवर नवनवे विक्रम प्रस्थापित करत आहे. प्रदर्शनाच्या 25 व्या दिवशी म्हणजेच चौथ्या रविवारी चित्रपटाने 14.75 कोटी रुपयांची निव्वळ कमाई केली असून, याद्वारे चौथ्या वीकेंडअखेर या चित्रपटाने जगभरात 1,712.98 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. विशेष म्हणजे आखाती देश आणि […]

सामना 13 Apr 2026 2:29 pm

निवडणुकीदरम्यान महिला आरक्षणाचं श्रेय घेण्यासाठी हा राजकीय खेळ सुरू आहे, संजय राऊत यांची टीका

‘नारी शक्ती वंदन अधिनियम’ (महिला आरक्षण) सुधारणा विधेयकासाठी केंद्र सरकारने 16 ते 18 एप्रिल 2026 दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. पश्चिम बंगाल व तामीळनाडू या दोन्ही राज्यांमध्ये 23 एप्रिल आणि 29 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या दोन्ही राज्यांमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीचा जोरदार प्रचार सुरू आहे. दोन राज्यांत निवडणुका असताना केंद्र सरकारकडून महिला आरक्षणाचं […]

सामना 13 Apr 2026 2:26 pm

हैदराबादमधील मद्यधुंद डाॅक्टरचा कारनामा…काही सेकंदात BMW कारची नंबर प्लेट बदलली, वाचा नेमकं काय घडलं?

जेम्स बाँड चित्रपटातील दृश्य प्रत्यक्षात हैदराबादमध्ये घडले आहे. हैदराबाद पोलिसांनी एका मद्यधुंद डाॅक्टरला बीएमडब्लू चालवताना अडवले. गौतम रेड्डी नामक डाॅक्टरला शनिवारी रात्री हैदराबादच्या उच्चभ्रू वस्ती असलेल्या ज्युबिली हिल्स भागात नियमित तपासणी दरम्यान पोलिसांनी अडवले. पोलिसांनी डाॅक्टरला नियमानुसार ‘ब्रेथ-अ‍ॅनालायझर’ (मद्यपान चाचणी) देण्यास सांगितले. त्यानंतर त्या डाॅक्टरने जे केले ते पाहून पोलिसही अवाक् झाले. त्याने वाहतूक अधिकाऱ्यांना […]

सामना 13 Apr 2026 2:21 pm

पाकिस्तानी लष्करी तुकडी सौदी अरेबियात दाखल; युद्धामुळे जागतिक समीकरणे बदलणार?

अमेरिका इराणमधील शांतता चर्चा अपयशी ठरल्याने आता हे दोन देश काय भूमिका घेणार, याकडे जगाचे लक्ष लागले आहे. त्यातच आता पाकिस्तानने त्यांच्या लष्कराची तुकडी सौदी अरेबियात पाठवल्याने आखाती देशात तणाव वाढण्याची शक्यता आहे. तसेच या युद्धामुळे जागतिक समीकरणे बदलत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या वर्षी स्वाक्षरी करण्यात आलेल्या एका संयुक्त धोरणात्मक संरक्षण कराराचा भाग म्हणून […]

सामना 13 Apr 2026 2:20 pm

Ratnagiri News –स्वराज्य सेनापती हंबीरराव किताब दिवस उत्साहात साजरा

चिपळूण – तालुक्यातील शिवगड, नलावडेवाडी,दळवटणे येथे छोटेखानी स्वरूपात हंबीरराव किताब दिवस नुकताच उत्साहाने साजरा करण्यात आला. ८ एप्रिल १६७४ रोजी शिवप्रभूंच्या स्वहस्ते मूळनांव हंसाजी मोहिते नामक शूरवीर लढवय्ये योद्धे यांसी’ हंबीरराव ‘ हा किताब सन्मानपूर्वक प्रदान केला गेला होता . तत्काळी त्यांना महाराजांच्याकडून मानाची मंगलवस्त्रे, शस्त्रास्त्रे, शुभ प्रतिके, मर्दानी अलंकार बहाल करण्यात आले. हा सामरिक […]

सामना 13 Apr 2026 2:15 pm

दिल्ली विधानसभा बॉम्बने उडवण्याची धमकी, परिसरात कसून तपासणी

दिल्ली विधानसभेत पुन्हा बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देण्यात आली आहे. अज्ञात व्यक्तीकडून सोमवारी ई-मेलद्वारे बॉम्बची धमकी देण्यात आली. धमकीचा मेल प्राप्त होताच सुरक्षा दल दिल्ली विधानसभेत धाव घेत तपासणी सुरू केली. दिल्ली पोलीस, बॉम्ब निकामी करणारे पथक, श्वान पथक आणि अग्निशमन दलाची पथके विधानसभेच्या परिसरात तैनात करण्यात आली. विधानसभेच्या संपूर्ण परिसराची कसून तपासणी करण्यात आली. तपासणीत […]

सामना 13 Apr 2026 1:36 pm

लनाला यायचं…पण सावध रहायचं !

सायबर गुन्हेगारांकडून एपीके फाईलद्वारे लग्नाचे आमंत्रण, फसवणूक टाळण्यासाठी फाईल न उघडणेच इष्ट बेळगाव : बुधवार दि. 8 एप्रिलचा दिवस. बेळगाव जिल्हा पदवीपूर्व शिक्षणाधिकारी एम. एम. कांबळे यांच्या नावे त्यांच्या परिचितांच्या व्हॉट्सअॅपवर एपीके फाईलच्या माध्यमातून लग्नपत्रिका आली. शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाठवलेली लग्नपत्रिका आहे, अशीच बहुतेकांची समजूत होती. मात्र, ती त्यांनी पाठवलेली नव्हती. त्यांचा मोबाईल हॅक [...]

तरुण भारत 13 Apr 2026 1:32 pm

एलपीजीच्या तुटवड्यामुळे पीएनजीच्या मागणीत वाढ

जिल्ह्यात घरगुती कनेक्शनसाठी वाढले अर्ज : टप्प्याटप्प्याने देणार कनेक्शन बेळगाव : मध्य-पूर्व देशातील युद्धामुळे एलपीजी (लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस) सिलिंडरचा काही ठिकाणी तुटवडा निर्माण झाला आहे. शहरी भागात 25 तर ग्रामीण भागात 45 दिवसांनी घरगुती सिलिंडरचा पुरवठा केला जात आहे. यामुळे बेळगावमध्ये पीएनजी (पाईपलाईन नॅच्युरल गॅस) कनेक्शनची मागणी वाढली आहे. बेळगाव शहरासह लगतच्या काही गावांमध्ये मेगा [...]

तरुण भारत 13 Apr 2026 1:30 pm

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मुंबई पोलिसांकडून वाहतूक मार्गदर्शक सूचना जारी, 13 आणि 14 एप्रिल रोजी मार्गांत मोठे बदल

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त मुंबई पोलिसांकडून वाहतूक मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आली आहे. यात 13 आणि 14 एप्रिल रोजी वाहतूक मार्गांमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. महामानवाला अभिवादन करण्यासाठी दादर येथील चैत्यभूमीवर होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर ही मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आली आहे. सुरक्षा आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस उपायुक्त डॉ. दिपाली घाटे यांनी […]

सामना 13 Apr 2026 1:25 pm

चिकन दरात घट, अडी वाढली

दोन दिवसात शेकडा 100 रुपयांनी वाढ : खवय्यांनी फिरवली पाठ बेळगाव : वाढती उष्णता व हॉटेल्समध्ये सिलिंडरच्या कमतरतेमुळे मागणीत घट झाल्याने चिकनच्या दरात घट झाली आहे. 260 ते 280 प्रति किलो दराने विक्री होत असलेले चिकन सध्या 220 रु. किलो प्रमाणे विक्री केले जात आहे. मात्र अंड्याच्या दरात दोन दिवसात शेकडा तब्बल 100 रुपयांनी वाढ [...]

तरुण भारत 13 Apr 2026 1:19 pm

Iran Israel War –होर्मुझची सामुद्रधुनी कोणाचीही मक्तेदारी नाही, दादागिरी खपवून घेणार नाही; इराणने अमेरिकेला सुनावले

होर्मुझची सामुद्रधुनी ही केवळ अमेरिकेची मक्तेदारी नसून ती जगातील सर्व देशांसाठी आहे, अशा स्पष्ट शब्दांत इराणने अमेरिकेला सुनावले आहे. हिंदुस्थानातील इराणच्या सर्वोच्च नेत्यांचे प्रतिनिधी डॉ. अब्दुल माजिद हकीम इलाही यांनी हे खडे बोल सुनावले आहेत. आखातामध्ये अमेरिकन जहाजांच्या उपस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी अमेरिकेने हा परिसर तात्काळ सोडावा, असा कठोर इशाराही दिला आहे. आम्हाला हा […]

सामना 13 Apr 2026 1:13 pm

लेखक तो असतो जो वाचकांची मने टिपतो!

साहित्यिक विश्वास पाटील यांचे मत : सुवर्णमहोत्सवी वसंत व्याख्यानमालेला प्रारंभ बेळगाव : लेखक तो असतो जो वाचकांची मने टिपतो, त्याची साहित्यकृती जोवर उत्तम होत नाही; तोवर लेखकाला समाधान प्राप्त होत नाही. त्यामुळे साहित्यकृतीसाठी दीर्घकाळ अभ्यास करूनच ती वाचकांसमोर आणणे मला अधिक श्रेयस्कर वाटते, असे मत साहित्यिक विश्वास पाटील यांनी व्यक्त केले. सुवर्णमहोत्सवी वसंत व्याख्यानमालेत रविवार [...]

तरुण भारत 13 Apr 2026 1:11 pm

आज मिरवणूक मार्गावरील भटकी कुत्री पकडणार

डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त मिरवणूक मार्गावर राबविणार पकड मोहीम बेळगाव : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मंगळवार दि. 14 रोजी शहरात मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे या काळात भटक्या कुत्र्यांमुळे कोणताही उपद्व्याप निर्माण होऊ नये यासाठी महानगरपालिकेकडून सोमवारी सकाळपासूनच मिरवणुकीच्या मार्गावरील भटकी कुत्री पकडण्याची विशेष मोहीम राबविली जाणार आहे.दरवर्षीप्रमाणे यंदाही भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त [...]

तरुण भारत 13 Apr 2026 1:07 pm

उद्धव ठाकरे व रश्मी ठाकरे यांनी घेतले आशाताईंचे अंतिम दर्शन

सात दशकांहून अधिक काळ रसिकांच्या हृदयसिंहासनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अलौकिक प्रतिभेच्या महान गायिका आशा भोसले यांचे रविवारी वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले. सोमवारी आशाताईंचे पार्थिव शरीर अंत्यदर्शनासाठी त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आले होते. त्यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, सौ. रश्मी ठाकरे व पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी आशाताईंचे अंत्यदर्शन घेतले. #WATCH […]

सामना 13 Apr 2026 1:07 pm

चाकू हल्ल्यात एकजण गंभीर

दोघांची हिंडलगा कारागृहात रवानगी : वाद मिटवण्यासाठी बोलावून केले वार खानापूर : येथील विद्यानगरजवळील कुस्ती मैदानाच्या शेजारी मित्रामित्रांच्या झालेल्या वादावादीत एकाने दुसऱ्या तरुणावर चाकूने हल्ला केल्याने विद्यानगर येथील आदर्श नागराज कोलेकर (वय 25) हा गंभीर जखमी झाला असून, त्याला अधिक उपचारासाठी बेळगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हल्ला करणाऱ्या ऋषांक राजेश पुजार, ओंमकार [...]

तरुण भारत 13 Apr 2026 1:06 pm

हुक्केरी तहसीलदारांसह अधिकाऱ्यांवर कारवाई करा

तालुका जैन असोसिएशनची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन बेळगाव : यंदा राज्य सरकारने सरकारी पातळीवर भगवान महावीर जयंती साजरी करण्याची अधिसूचना काढली होती. मात्र हुक्केरी तहसीलदार कार्यालयात भगवान महावीर जयंती साजरी करण्यात आली नाही. तहसीलदारांसह अधिकारी सरकारच्या आदेशाला केराची टोपली दाखवून शांतीचा संदेश देणाऱ्या भगवान महावीर यांची जयंती साजरी केली नाही. आपल्या मनमानीपणे कार्यरत असल्याचे यातून [...]

तरुण भारत 13 Apr 2026 1:04 pm

ओल्ड पी. बी. रोडवरील ब्लॅकस्पॉटच्या ठिकाणी व्हर्टिकल गार्डन

बेळगाव : ओल्ड पी. बी. रोडवरील ब्लॅकस्पॉट हटविण्यासाठी पीपीपी (पब्लिक प्राव्हेट पाटर्नरशीप) मॉडेलवर व्हर्टिकल गार्डन उभारण्याचे काम हाती घेतले आहे. यासाठी नगरसेवक राजू भातकांडे व स्वच्छता निरीक्षक अनंत पिंपरी यांनी पुढाकार घेऊन कामाला सुरुवात केली. याबद्दल नागरिकांतून कौतुक केले जात आहे. शहर ब्लॅकस्पॉटमुक्त करण्यासाठी मनपाकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र नागरिकांतून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने [...]

तरुण भारत 13 Apr 2026 1:03 pm

मल्लिकार्जुन खर्गेंवर कारवाई करा

भाजप युवा मोर्चाची पोलीस आयुक्तांकडे मागणी बेळगाव : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपबद्दल आक्षेपार्ह विधान केले आहे. त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी भाजप युवा मोर्चाने केली आहे. यासंबंधी युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे. मल्लिकार्जुन खर्गे यांनी प्रक्षोभक व्यक्तव्य [...]

तरुण भारत 13 Apr 2026 1:01 pm

तीन महिन्यात अठरा जणांचा मृत्यू

रेल्वे पोलिसांकडून 11 जणांची ओळख : 7 जण अद्यापही अनोळखीच असल्याने संभ्रम बेळगाव : गेल्या तीन महिन्यांत रेल्वे फ्लॅटफॉर्मवर व रेल्वेखाली 18 जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 11 जणांची ओळख पटविण्यात रेल्वे पोलिसांना यश आले आहे. सात मृतांची अद्याप ओळख पटली नाही. या मृतदेहांची ओळख पटविण्यासाठी बेळगाव रेल्वे पोलिसांनी प्रयत्न सुरू केले आहेत. यामध्ये काही [...]

तरुण भारत 13 Apr 2026 1:00 pm

पुण्यानंतर मराठी अस्मिता बेळगावमध्ये

राहुल गिरी यांचे प्रतिपादन : निलजी येथील उच्च प्राथमिक मराठी शाळेचा शतकमहोत्सव सोहळा उत्साहात वार्ताहर/सांबरा राहुल गिरी पुढे म्हणाले, शाळा ही मुलांची दुसरी जननी आहे. मुलांचे व शाळेचे वेगळे नाते असते. शाळेमधूनच मुलांना संस्काराचे धडे मिळतात. येणाऱ्या भावी पिढ्याही सुसंस्कृत होतील यासाठी मातृभाषेतून शिक्षण देणे गरजेचे आहे. केवळ नोकरीसाठी शिक्षण न देता संस्कारांची शिदोरी पुढे [...]

तरुण भारत 13 Apr 2026 12:51 pm