कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प –उद्धव ठाकरे
राज्याची आर्थिक स्थिती बिकट असताना कर्ज काढून फटाके वाजवणारा हा अर्थसंकल्प आहे. अर्थसंकल्पात राज्याचे काहीच हित साधलेले नाही. फक्त थापांचा उन्नत मार्ग आहे. 2047 चे मृगजळ दाखवण्यापेक्षा आज सर्वसामान्यांच्या हाती काय पडणार हे महत्त्वाचे आहे. शेतकरी कर्जमाफी म्हणजे लबाडाघरचे आमंत्रण आहे, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधला. राज्याचा अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर उद्धव […]
बाळासाहेब ठाकरे स्मारक जूनपर्यंत पूर्ण करणार
दादर छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे उभारण्यात येत असलेल्या हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचे काम पूर्णत्वाकडे आले असून जून 2026 पर्यंत या स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. या स्मारकाच्या माध्यमातून जनसेवेच्या आणि विकासाच्या नव्या योजना सुरू करण्यात येतील, अशीही घोषणा त्यांनी केली.
शेवटच्या गोळीपर्यंत लढणार! इराणचा आरपारच्या लढाईचा इरादा
अमेरिकन-इस्रायल हल्ल्याविरुद्ध देशाचे रक्षण करण्यासाठी शौर्याने लढण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. शेवटच्या गोळीपर्यंत आणि शेवटच्या सैनिकापर्यंत देश विरोध करेल, लढत राहील, अशी आम्ही शपथ घेतली आहे, असा निर्धार इराणने केल्याचे इराणचे उपपरराष्ट्रमंत्री सईद खतीबजादेह यांनी सांगितले. दिल्लीत सुरू असलेल्या ‘रायसीना डायलॉग’मध्ये ते बोलत होते. अमेरिकेने इराणमध्ये सैन्य घुसवल्यास जमिनीवरील युद्धासाठी इराण सज्ज असून शस्रसंधीचा प्रश्नच […]
तळमजल्यावरील पिझ्झाच्या दुकानामुळे पहिल्या मजल्यावर राहणाऱया ज्येष्ठ नागरिकाला हृदयरोगाची बाधा झाली आहे. याची गंभीर दखल घेत उच्च न्यायालयाने याप्रकरणी योग्य ती कारवाई करण्याचे आदेश महापालिकेला दिले आहेत. हे ज्येष्ठ नागरिक चेंबूर येथे राहणारे आहेत. तळमजल्यावर पिझ्झाचे दुकान आहे. तेथे पिझ्झा व अन्य खाद्यपदार्थ बनवले जातात. यामुळे होणारा आवाज, धुराने रात्रीची झोप लागत नाही. श्वास घेण्यास […]
इराण युद्धाच्या झळा आता थेट तुमच्या घरापर्यंत पोहोचल्या आहेत. युद्धाचा भडका आणखी तीव्र झाल्यास देशात स्वयंपाकाच्या गॅसचा (एलपीजी) तुटवडा निर्माण होण्याची भीती आहे. ही परिस्थिती पाहता केंद्र सरकारने ‘एस्मा’चा वापर करत सर्व तेल कंपन्यांना एलपीजी उत्पादन वाढवण्याचे आदेश दिले आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे एलपीजी विक्री केवळ घरगुती वापरासाठी करण्याचे या आदेशात म्हटले असून यामुळे व्यावसायिक […]
एल्फिन्स्टन पूल पाडकाम मोठा ब्लॉक न घेता पूर्ण करणार, मध्य रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा
बिटिशकालीन एल्फिन्स्टन पुलाचे रखडलेले पाडकाम मध्य रेल्वे मार्गावर मोठा ब्लॉक न घेता पूर्ण करण्यात येणार आहे. मागील सहा महिने मध्य रेल्वेच्या ब्लॉकच्या प्रतीक्षेत हे काम रेंगाळले आहे. येत्या आठवडाभरात दोन-तीन तासांचे छोटे ब्लॉक घेऊन पाडकाम पूर्ण केले जाणार आहे. लोकल ट्रेन आणि मेल-एक्स्प्रेसची वाहतूक विस्कळीत होऊ न देता हे काम करण्यात येणार असल्यामुळे मध्य रेल्वेच्या […]
अर्थसंकल्प कंत्राटदारांचे खिसे भरणारा, आदित्य ठाकरे यांचा घणाघात
राज्याचा अर्थसंकल्प हा राज्याचा विकास करणारा नसून केवळ कंत्राटदारांचे खिसे भरणारा असल्याची घणाघाती टीका शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली आहे. अर्थसंकल्पीय भाषणात प्रत्येक मिनिटाला केवळ कंत्राटदारांसाठीची धोरणे आणि घोषणांचा भडीमार करण्यात आला. कंत्राटदारांवर एवढा मोठा खर्च प्रस्तावित असूनही कामाचा दर्जा मात्र अत्यंत निकृष्ट आहे. नुकत्याच झालेल्या रस्त्यांच्या बांधकामाचा दर्जा आणि एमएमआरडीएने बांधलेल्या […]
लेख –शी जिनपिंग यांचे सैन्य शुद्धीकरण
>> ब्रिगेडियर हेमंत महाजन, hemantmahajan12153@yahoo.co.in गेल्या काही वर्षांत चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीमध्ये (पीएलए) सुरू असलेली शुद्धीकरण मोहीम ही केवळ प्रशासकीय बदल नसून तो चिनी लष्करी इतिहासातील एक मोठा भूपंप आहे. 2024 ते 2026 या कालावधीत शी जिनपिंग यांनी ज्या प्रकारे वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांना पदावरून हटवले आहे, ते पाहता ही मोहीम 1989 च्या तियानानमेन घटनेनंतरची सर्वात […]
>> स्पायडरमॅन सध्या बायकॉट ChatGPT मोठ्या प्रमाणावर ट्रेंड करत असून ChatGPT ची निर्माता कंपनी OpenAI ला त्याचा मोठा फटका बसला आहे. अमेरिकन सुरक्षा यंत्रणा पेंटागॉन आणि OpenAI यांच्यात नुकताच एक करार झाला असून आता पेंटागॉन त्यांचा अधिकृत सरकारी इंटरनेटवर ChatGPT चा वापर करणार आहे. मात्र अनेक वापरकर्त्यांना हा करार आवडला नसून त्यांनी त्याचा निषेध केला […]
>>मंगेश वरवडेकर क्रिकेटमध्ये इतिहास हा दगडावर कोरलेला नसतो, तो बॅटच्या एका फटक्याने बदलतो. विक्रम मोडण्यासाठीच बनतात आणि नवे अध्याय लिहिण्यासाठीच घडतात. टी-20 वर्ल्ड कपच्या 18 वर्षांच्या इतिहासात आजवर एकदाही यजमान संघ जगज्जेता झाला नाही. पण क्रिकेटची ही परंपरा मोडण्याचा निर्धार हिंदुस्थानने केला आहे. तुफान फॉर्म, आत्मविश्वासाचा उफाळा आणि चाहत्यांचा महासागर, या सगळय़ांच्या साक्षीने हिंदुस्थान रविवारी […]
>> दिलीप ठाकूर स्वतंत्रपणे चित्रपट दिग्दर्शक म्हणून काम करतानादेखील एखाद्या अनुभवी दिग्दर्शकाकडे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले तर आपल्या कामात अधिक प्रमाणात सुसूत्रता येते असे मानणारे दिग्दर्शक पूर्वी मराठी चित्रपटसृष्टीत होते. त्यात रमेश साळगावकर यांचे नाव घ्यावे लागेल. रमेश साळगावकर यांनी कमलाकर तोरणे यांच्या दिग्दर्शनाखाली ‘जावयाची जात’, ‘चांदणं शिंपीत जा’ वगैरे चित्रपटांसाठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीतील […]
रोहित पवार यांचा दोषमुक्तीसाठी अर्ज, ईडीला म्हणणे मांडण्याचे निर्देश
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी शिखर बँक घोटाळय़ाशी संबंधित मनी लाँडरिंग प्रकरणात दोषमुक्तीसाठी अर्ज दाखल केला आहे. न्यायालयाने या अर्जाची दखल घेत ईडीला 17 मार्चपर्यंत आपले म्हणणे मांडण्याचे आदेश दिले आहेत. ऑगस्ट 2019 मध्ये मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने याप्रकरणी एफआयआर दाखल केला होता. यामध्ये सहकारी साखर कारखान्यांची कवडीमोल भावात आणि नियमांचे उल्लंघन करून […]
बुमरा हिंदुस्थानचा खरा गेम चेंजर, फाफ डू प्लेसिसकडून कौतुकोद्गार
हिंदुस्थानचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा हा साधा गोलंदाज नाही, तर सामना फिरवणारा खरा ‘गेम चेंजर’ आहे. हिंदुस्थानी संघाला जणू काही हिराच सापडला आहे. बुमराह हा संघासाठी ‘ड्रीम अॅसेट’ आहे, अशा दमदार शब्दांत दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डू प्लेसिसने बुमराच्या गोलंदाजीवर काwतुकाचा वर्षाव केला. वानखेडे स्टेडियमवर हिंदुस्थान आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या उपांत्य सामन्यात बुमराने अक्षरशः […]
इंग्लंडच्या पराभवाला करनच कारण, श्रीकांत यांचा हल्ला
हिंदुस्थानने उभारलेल्या डोंगराएवढया 253 धावांच्या लक्ष्याचा इंग्लंडने जोरदार पाठलाग केला, पण निर्णायक क्षणी सॅम करनची मंद खेळी इंग्लंडच्या गळ्यात पडली. महत्त्वाच्या वेळी जास्त चेंडू खेळून कमी धावा केल्याने इंग्लंडची धावगती कोसळली आणि त्याचा थेट फटका संघाला बसला, अशा शब्दांत हिंदुस्थानचे माजी सलामीवीर कृष्णम्माचारी श्रीकांत यांनी करनवर तिखट शब्दांत टीका केली. वानखेडेवर झालेल्या थरारक उपांत्य फेरीत […]
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये भरती, स्थानीय लोकाधिकार समिती महासंघातर्फे नोकरभरतीपूर्व प्रशिक्षण वर्ग
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये ऑफिस असिस्टंट या पदासाठी नोकरभरती होणार आहे. या नोकरभरतीमध्ये स्थानिक भूमिपुत्रांची भरती झालीच पाहिजे, यासाठी शिवसेनाप्रणीत स्थानीय लोकाधिकार समिती महासंघातर्फे नोकरभरतीपूर्व परीक्षेचे ऑनलाईन आणि ऑफलाईन प्रशिक्षण वर्ग आयोजित केले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे अध्यक्ष, शिवसेना नेते–खासदार अनिल देसाई, महासंघाचे कार्याध्यक्ष विलास पोतनीस, आमदार सुनील […]
मध्य रेल्वे उद्या धिम्या ट्रॅकवर; माटुंगा ते मुलुंडदरम्यान साडेचार तासांचा ब्लॉक
मध्य रेल्वेमार्गावर येत्या रविवारी माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान साडेचार तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. माटुंगा ते मुलुंड अप-डाऊन जलद मार्गावर सकाळी 11.20 ते दुपारी 3.45 पर्यंत हा ब्लॉक असणार आहे. त्यामुळे या अवधीत सर्व जलद गाडय़ा धिम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. ब्लॉकमुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून सकाळी 10.40 ते दुपारी 3.10 पर्यंत सुटणाऱया […]
ग्लासगो फ्रेंचायझीवर हिंदुस्थानी शिक्का; खेळाडूपासून मालकापर्यंत…द्रविड-अश्विनचा नवा डाव
भक्कम बचावाने गोलंदाजांना हैराण करणारा ‘द वॉल’ राहुल द्रविड आणि फिरकीच्या जादूने फलंदाजांना गुंगवणारा रविचंद्रन अश्विन आता नव्या मैदानात उतरायला सज्ज झाले आहेत. क्रिकेटपटू म्हणून लौकिक मिळवलेल्या या दोन दिग्गजांची नजर आता युरोपियन टी–20 प्रीमियर लीगवर आहे. या लीगमध्ये ग्लासगो आधारित फ्रेंचायझी खरेदी करण्यासाठी हिंदुस्थानी गुंतवणूकदारांच्या गटात द्रविड आणि अश्विन सहभागी झाले असून करारही अंतिम […]
एमडी ड्रग्जची तस्करी करणारा अटकेत
एमडी ड्रग्जची तस्करीप्रकरणी एकाला डी. एन. नगर पोलिसांनी अटक केली. फौजान अली अहमद तिकीटवाला असे त्याचे नाव आहे. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते. जोगेश्वरी येथे राहणाऱया एकाने एमडी ड्रग्जचा साठा ठेवला असून तो विक्री करणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या माहितीची सत्यता पडताळली. डी. एन. नगर पोलिसांच्या एका विशेष पथकाने फौजानच्या घरी छापा […]
आधी ब्रिटीशांची परवानगी आता अमेरिकेची, आपला देश खरंच स्वतंत्र आहे? अंजली दमानिया यांचा संतप्त सवाल
इराण इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने शुक्रवारी हिंदुस्थानला रशियाकडून तेल खरेदीची परवानगी देत असल्याचे जाहीर केले. अमेरिकेचे ट्रेझरी सचिव स्कॉट बेसेन्ट यांनी शुक्रवारी याबाबत ट्विट केले. अमेरिकेच्या या परवानगीवरून सध्या मोदी सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. ”ब्रिटिश गोरे गेले आणि आपण स्वतंत्र […]
बळीराजा आणि सामान्यांच्या डोळ्यात धूळफेक करणारा हा अर्थसंकल्प –अंबादास दानवे
मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पावर विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, विधानपरिषदेतील माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी X वर काही महत्त्वाचे मुद्दे मांडत या अर्थसंकल्पावर व सरकारवर टीका केली आहे. ”हा अर्थसंकल्प बळीराजा आणि सामान्यांच्या डोळ्यात धूळफेक करणारा आहे”, अशी टीका […]
महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर (सीएसएमटी) उभारलाच पाहिजे, अशी भावना व्यक्त करीत मुंबईकरांनी शुक्रवारी स्वाक्षरी मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने रेल कामगार सेनेतर्फे सीएसएमटी येथील उपनगरीय लॉबीसमोर स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली. या मोहिमेला 10 हजारांहून अधिक मुंबईकरांनी प्रतिसाद दिला. 30 वर्षांपूर्वी […]
मोबाईसाठी आईने पैसे दिले नाही, वाढदिवशीच तरुणाने जीवन संपवले
महागड्या मोबाईल खरेदीसाठी आईने पैसे न दिल्याच्या रागातून जामसंडे सहकारनगर येथील आर्यन सुभाष रवंदे (२२) याने आपल्या वाढदिवशीच राहत्या घरातील हॉलमध्ये गळफास लावून घेतला. त्याला तात्काळ जामसंडे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना त्याची प्राणज्योत मालवली. ही घटना गुरुवारी रात्री ११.२० वा. च्या सुमारास घडली. घटनेची नोंद देवगड पोलीस स्थानकात आकस्मिक […]
Ratnagiri News –ओबीसी समाजाची स्वतंत्र जनगणना होत नाही, भारत मुक्ती मोर्चा आणि ओबीसी मोर्चाचा आरोप
केंद्र सरकारने ओबीसी समाजाची जनगणना केली जाईल, अशी घोषणा केली होती. मात्र सध्या सुरू असलेल्या जनगणनेत ओबीसी नोंदणीचा स्वतंत्र रकाना नाही. ही ओबीसी समाजाची फसवणूक असल्याचा आरोप भारत मुक्ती मोर्चा व ओबीसी मोर्चाने केला आहे. आज या संदर्भात निवासी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. जनगणनेत ओबीसी नोंदणीचा रकाना वाढविण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात […]
हवा भरताना फुगा श्वासनलिकेत अडकला, चार वर्षाच्या मुलीचा गुदमरून मृत्यू
आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यात पेडाकाकणी भागात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. फुगा फुगवत असताना तो घशात गेला आणि श्वासनलिकेत अडकला. यामुळे श्वास गुदमरल्यामुळे चार वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. पेडाकाकणी येथील रहिवासी श्रीनिवास राव आणि वेंकटरमण हे रोजंदारी कामगार आहेत. त्यांना चार मुली आहेत. त्यांच्या दोन मोठ्या मुली शाळेत […]
Iran War –इराणने बिनशर्त शरण यावे, त्यातच त्यांचे भले; ट्रम्प यांची पुन्हा धमकी
अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला पुन्हा धमकी दिली आहे. इराणसोबत कोणत्याही चर्चेची शक्यता त्यांनी फेटाळून लावली आहे. इराणला आता केवळ शरण यावे लागेल, असा स्पष्ट इशारा दिला आहे. इराणने बिनशर्त शरणागती पत्करावी, यातच त्यांची आणि जगाची भलाई असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. “अमेरिकेची शस्त्रास्त्रे ही जगातील […]
वीज वितरण कंपनीचा अजब कारभार, बंद घराचे वीजबिल तब्बल 1.99 कोटी रुपये
आंध्र प्रदेशातील काकीनाडा जिल्ह्यात वीज वितरण कंपनीचा अजब कारभार समोर आला आहे. समरलाकोटा भागात एका बंद घराला तब्बल 1.99 कोटी रुपयांचे वीज बिल आकारले. बिल हाती येताच घरमालक हैराण झाला. समरलाकोटा येथील टिडको हाऊसिंग कॉलनीतील रहिवासी दसरी दुर्गा यांच्या नावावर हे बिल जारी करण्यात आले. हा फ्लॅट बऱ्याच काळापासून बंद आहे, तिथे कोणीही राहत नाही, […]
…पण तरिही मला आई व्हायचं नाहीए, मराठी अभिनेत्री स्पष्टच बोलली
लग्नाला सहा वर्ष झाली असून तरी देखील अद्याप आई व्हायचा विचार केला नाही असा प्रश्न एका मराठी अभिनेत्रीला विचारला असता तिने त्यावर स्पष्टपणे मला आई व्हायचं नाही, असे सांगितले आहे. ही अभिनेत्री म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री नेहा पेंडसे. View this post on Instagram A post shared by Nehha Pendse (@nehhapendse) नेहाने राजश्री […]
शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज सादर झालेल्या महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पावरून महायुती सरकारला टिकेचे लक्ष्य केले आहे. राज्याचा अर्थसंकल्प हा राज्याचा विकास करणारा नसून केवळ कंत्राटदारांचे खिसे भरणारा असल्याची घणाघाती टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे. अर्थसंकल्पीय भाषणात प्रत्येक मिनिटाला केवळ कंत्राटदारांसाठीची धोरणे आणि घोषणांचा भडीमार करण्यात आला. कंत्राटदारांवर एवढा मोठा खर्च प्रस्तावित असूनही […]
जम्मू-कश्मीरमध्ये दहशतवादी घुसखोरीचा वाढला आहे. या पार्श्वभूमीवर जम्मू आणि कश्मीरमधील सुरक्षा यंत्रणांना हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. गुप्तचर यंत्रणांच्या अहवालांनुसार, नियंत्रण रेषा (एलओसी) आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर अनेक नवीन दहशतवादी लाँचिंग पॅड सक्रिय करण्यात आले आहेत, ज्याद्वारे भविष्यात घुसखोरीचे प्रयत्न वाढू शकतात. दहशतवादी घुसखोरीचा धोका पाहता लष्कर, बीएसएफ आणि पोलिसांनी सीमावर्ती भागात पाळत आणि गस्त […]
Photos – So Beautiful So Elegant…भावाच्या लग्नात सारा तेंडुलकरचा जबरदस्त लूक
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर हा गुरुवारी सानिया चंडोक हिच्यासोबत विवाहबद्ध झाला. या सोहळ्यातील तेंडुलकर कुटुंबाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यात सर्वाधिक लक्ष वेधून घेतले आहे ते सचिनची लेक सारा हिच्या फोटोने. साराने तिच्या भावाच्या लग्नात गुलाबी रंगाची सुंदर साडी नेसली होती. केसांची साधीशी हेअर स्टाईल व […]
चौकशीसाठी आलेल्या व्ही. के. सिंग यांना VIP ट्रिटमेंट, रोहित पवार सीआयडी कार्यालयात धडकले
अजित पवार यांच्या विमान अपघातात आकस्मिक मृत्यू प्रकरणात राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने व्हीएसआर कंपनीचे मालक व्ही. के. सिंग यांची गुरुवारी चौकशी केली. या चौकशीच्या वेळी व्ही के. सिंग यांना VIP ट्रीटमेंट दिल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. शुक्रवारी रोहित पवार यांनी सीआयडी कार्यालयाला भेट देत तिथल्या अधिकाऱ्यांशी चर्चा […]
मध्य पूर्वेमध्ये इराण आणि इस्रायल-अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या युद्धावर काँग्रेस नेते तथा लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हे युद्ध केवळ त्या देशांपुरते मर्यादित नसून त्याची मोठी किंमत हिंदुस्थानलाही चुकवावी लागेल, अशी भीती राहुल गांधी यांनी व्यक्त केली आहे. या युद्धामुळे हिंदुस्थानात इंधन महाग होईल आणि देशाच्या आर्थिक विकासाचा वेग […]
Mega Block –मध्य आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक
विविध अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावरील उपनगरीय विभागात मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत डाऊन जलद गाड्या गंतव्यस्थानी 15 मिनिटे उशिरा पोहचतील. सीएसएमटी मुंबईहून सकाळी 10.40 ते दुपारी 3.10 पर्यंत सुटणाऱ्या डाउन जलद मार्गावरील गाड्या माटुंगा स्थानकावर डाउन धीम्या मार्गावर वळवल्या जातील. माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान नियोजित थांबे देतील, मात्र […]
आखाती देशांत अडकलेल्या हिंदुस्थानींना दिलासा देणारी बातमी, विशेष विमानांनी मायदेशी परतणार
आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीचा मोठा फटका विमान सेवांना बसला आहे. या कठीण परिस्थितीत आखाती देशांमध्ये अडकलेल्या हिंदुस्थानियांना सुरक्षित मायदेशी आणण्यासाठी हिंदुस्थान सरकार आणि विविध विमान कंपन्यांनी कंबर कसली आहे. गेल्या काही दिवसांत विशेष उड्डाणांच्या माध्यमातून अनेक हिंदुस्थानी नागरिक सुखरूप स्वदेशात परतले आहेत. याच दरम्यान, एतिहाद एअरवेजने अबू धाबी ते हिंदुस्थानातील 8 प्रमुख शहरांसाठी आपली विमान […]
Photo –मुंबईची लेक चमकली! सायली सातघरे हिचे महिला टीम इंडियाच्या कसोटी संघात पदार्पण
मुंबईच्या मध्यमगती गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडू सायली सातघरे हिची टीम इंडियाच्या महिला कसोटी संघात निवड झाली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातून सायलीने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. सामना सुरू होण्यापूर्वी टीम इंडियाच्या वरिष्ठ खेळाडूंच्या हस्ते सायलीला कसोटी पदार्पणाची मानाची टोपी प्रदान करण्यात आली. लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये (कसोटी क्रिकेट) तिची अचूक गोलंदाजी भारतीय संघासाठी फायदेशीर ठरेल, असा विश्वास […]
हवाई दलाचे सुखोई-30 विमान गुरुवारी सायंकाळी आसाममध्ये दुर्घटनाग्रस्त झाले. यात दोन वैमानिकांचा मृत्यू झाला. स्क्वाड्रन लीडर अनुज आणि फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरागकर अशी मृत्यू झालेल्या वैमानिकांची नावे आहेत. पूर्वेश दुरागकर हा केवळ 28 वर्षांचा असून महाराष्ट्रातील नागपूर येथील रहिवासी आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’मध्येही पूर्वेशने महत्वपूर्ण भूमिका बजावली होती. पूर्वेशचे वडील रविंद्र दुरागकर हे सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी […]
शेतकरी व रोजगारासह धाराशिवच्या विकासला प्राधान्य देणारा अर्थसंकल्प - दत्ता कुलकर्णी
धाराशिव (प्रतिनिधी)- राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला 2026-27 चा अर्थसंकल्प सर्वसामान्य, शेतकरी व युवकांना दिलासा देणारा आहे. पीक कर्जमाफीसाठी करण्यात आलेली तरतूद, वेळेवर कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहनपर लाभ तसेच सौर ऊर्जा योजनेमुळे दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे. तसेच रोजगारनिर्मितीच्या दृष्टीने राज्यात मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया राबविण्याचा निर्णय युवकांसाठी संधी निर्माण करणारा आहे. याबरोबरच महिलांसाठी सुरू असलेल्या योजनांचा लाभ पुढेही सुरू राहणार असल्याने कुटुंबांच्या आर्थिक स्थैर्याला मदत होईल, तसेच मराठवाड्यात औद्योगिक विकासासाठी करण्यात आलेल्या तरतुदींमुळे धाराशिवसारख्या जिल्ह्यांमध्ये उद्योग व रोजगार वाढण्यास चालना मिळेल, असा विश्वास भाजप जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी व्यक्त केला.
उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली गावात 5 ऑगस्ट 2025 रोजी आलेल्या विनाशकारी पुराचे गूढ आता उकलले आहे. सुरुवातीला ही घटना ढगफुटी किंवा हिमनदीचा तलाव फुटल्यामुळे घडली असावी, असा अंदाज वर्तवण्यात येत होता. मात्र, ‘नॅशनल हेजर्ड्स’ या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका ताज्या संशोधनातून या महापुरामागे एक वेगळेच वैज्ञानिक कारण असल्याचे समोर आले आहे. श्रीकांता हिमनदीवरील बर्फाचा […]
मी 13 वर्षांची असताना माझ्यावर ट्रम्प आणि एपस्टीन या दोघांनीही अत्याचार केले होते असा धक्कादायक आरोप एका महिलेने केला आहे. अमेरिकेच्या न्याय विभागाने गुरुवारी एफबीआयची (FBI) काही अतिरिक्त कागदपत्रे प्रसिद्ध केली आहेत. त्यात या महिलेची मुलाखत आहे. न्याय विभागाने ही कागदपत्रे सार्वजनिक केल्यामुळे अमेरिकेच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे या आरोपांनंतर पुन्हा एकदा ट्रम्प यांच्यावर […]
सिंधुकन्या प्राजक्ता गवाणकरची सहाय्यक अभियंता पदी निवड
कुडाळ – कुडाळ येथील प्राजक्ता राजाराम गवाणकर या सिंधुकन्येची अलीकडेच जाहीर झालेल्या निकालानुसार एमपीएससी मार्फत सहाय्यक अभियंता वर्ग २ (राजपत्रित) महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या पदावर निवड झाली.सिंधुदुर्ग जिल्ह्यातून यशस्वी झालेली ती एकमेव महिला उमेदवार ठरली आहे. तिची पहिलीच नेमणूक महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागीय कार्यालय ( सिंधुदुर्गनगरी, ओरोस ) येथे झाली.दोन वर्षात स्पर्धा परीक्षांमधून एकूण ५ [...]
साताऱ्यात धक्कादायक प्रकार उघड सातारा, :क्षेत्र माहुली (ता. सातारा) येथे गेल्या सुमारे दोन वर्षांपासून एका चारचाकी वाहनाच्या काचा फोडणे व वाहन जाळण्याचा प्रयत्न करण्याच्या वारंवार घडणाऱ्या घटनांमागील धक्कादायक सत्य सातारा शहर पोलिसांच्या डी.बी. पथकाने उघड केले आहे. या प्रकरणात तक्रार देणारेच व्यक्ती गुन्ह्याचे मास्टरमाईंड असल्याचे [...]
Satara News |साताऱ्यात अंबरग्रीस तस्करी प्रकरण उघड; सात जणांना अटक, तीन वाहनांसह मुद्देमाल जप्त
महाबळेश्वरमध्ये अंबरग्रीस तस्करीवर वनविभागाची मोठी कारवाई महाबळेश्वर – महाबळेश्वर परिसरात अंबरग्रीस (व्हेल माशाची उलटी) तस्करी प्रकरणी वनविभागाने मोठी कारवाई करत सात जणांना अटक केली आहे. या कारवाईत तीन वाहने जप्त करण्यात आली असून आरोपींकडून अंबरग्रीससह इतर मुद्देमालही ताब्यात घेण्यात आला आहे.सहाय्यक वनसंरक्षक (वनीकरण) सातारा यांना अंबरग्रीसची [...]
दक्षिण हिंदुस्थानात मुलांच्या मानसिक आरोग्य जपण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि धाडसी निर्णय घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या दोन प्रमुख राज्यांनी 13 वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी घालण्याचे संकेत दिले असून, मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी डिजिटल वापरावर नियंत्रण आणण्यावर भर दिला आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या […]
कोमसापच्या वतीने महिला दिनी 17 कर्तृत्ववान महिलांचा सन्मान
कुडाळ संत राऊळ महाराज महाविद्यालय सेमिनार हॉल येथे कार्यक्रम सावंतवाडी । प्रतिनिधी कोकण मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्ग जिल्हा मंडळ व कोमसाप शाखा कुडाळ यांच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील आदर्श ,कर्तुत्ववान महिलांचा सन्मान सोहळा जागतिक महिला दिनानिमित्त ८ मार्च रोजी कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालय सेमिनार हॉल येथे दुपारी 3.30 वाजता आयोजित करण्यात आला [...]
IND Vs NZ –फायनलमध्ये हिंदुस्थानला न्यूझीलंडने किती वेळा दिलीये कडवी झुंज; जाणून घ्या कोण आहे वरचढ
हृदयाचे ठोके वाढवणाऱ्या ICC T20 World Cup 2026 च्या दुसऱ्या सेमी फायनलमध्ये हिंदुस्थानने इंग्लंडचा अवघ्या 7 धावांनी पराभव केला आणि फायनलमध्ये धडक मारली. पहिल्या सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेला धुळ चालत अंतिम फेरीत झेप घेतली होती. आता 8 मार्च रोजी हिंदुस्थान आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये विजेतेपदासाठी अंतिम सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल. तत्पूर्वी दोन्ही संघ […]
सोळांकूर ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान विवाहितेचा मृत्यू सरवडे – सोळांकूर या.राधानगरी येथील सानिका गणेश पोतदार (वय.२२) या विवाहितेचा प्रसुतीनंतर दुर्दैवी मृत्यू झाला सदरची विवाहिता ही तिसर्या वेळेला प्रसुतीसाठी ग्रामीण रुग्णालय सोळांकूर येथे दाखल झाली होती.प्रसुती सिझेरीनद्वारे करुन तिने स्त्री जातीचा अर्भकास जन्म दिला.यानंतर काही वेळात तिची प्रकृती [...]
अर्थसंकल्पात केवळ मोठे आकडे व पोकळ घोषणा, प्रत्यक्षात राज्याची वाटचाल दिवाळखोरीकडे: हर्षवर्धन सपकाळ
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात केवळ मोठे आकडे व पोकळ घोषणा आहेत. सरकारने राज्यावर कर्जाचा डोंगर करून ठेवलेला असून ४० हजार कोटी रुपयांच्या तुटीचा हा अर्थसंकल्प महाराष्ट्राला दिवाळखोरीकडे घेऊन जाणारा आहे. अर्थसंकल्पात बुलेट ट्रेन, मेट्रो, भुयारी मार्गांचाच बोलबाला आहे. गाव खेड्यातला गरीब, आदिवासी, कष्टकरी, महिला, बेरोजगार व तरुणांना अर्थसंकल्पात स्थानच नाही. एकंदरीत हा […]
परंडा(प्रतिनिधी)- आज दिनांक 6 मार्च रोजी परंडातालुक्यातील दिव्यांग व्यक्तीसाठी तालुक्याच्या ठिकाणी दिव्यांगाना प्रमाणपत्र मिळावे , दिव्यांगांची होणारी हेळसांड थांबावी, दिव्यांग सेवा तालुक्यात मिळाव्यात या मागणीसाठी दिव्यांग उद्योग समूह या सामाजिक संघटनेच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून परंडा शहर व तालुक्यातील दिव्यांग तपासणी शिबिर दिव्यांग अध्यक्ष तानाजी घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत आहे. त्या अनुषंगाने शुक्रवार दिनांक 6 मार्च 2026 रोजी परंडा उपजिल्हा रुग्णालय येथे दिव्यांग तपासणी शिबिर पार पडले यामध्ये अस्तिव्यंग दिव्यांग 32 मतिमंद दिव्यांग 15 अंध दिव्यांग 8 अशा एकूण 55 दिव्यांग व्यक्तींची तपासणी करण्यात आली. या तपासणीसाठी धाराशिव येथील तज्ञ डॉक्टर सुहास शिंदे , डॉक्टर पवन महाजन ,डॉक्टर विनोद बर्वे यांनी कामकाज पाहिले यावेळी परंडा उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी अधिकारी यांनी सहकार्य केले हा कॅम्प यशस्वी करण्यासाठी दिव्यांग भाजपा आघाडी तालुकाध्यक्ष तानाजी घोडके, उत्तम शिंदे दिव्यांग उद्योग समूह तालुका अध्यक्ष तानाजी सांगडे , शहराध्यक्ष गोरख देशमाने पत्रकार फारुख शेख व इतर पदाधिकारी दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
धाराशिव पंचायत समितीच्या सभापती गोकर्णा कदम
धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपाच्या गोकर्णा गोपाळ कदम यांना 16 मते मिळाल्याने त्या विजयी झाल्या. तर त्यांच्या विरूध्द शिवसेना ठाकरे गटाच्या सरस्वती मोहन वाघुलकर यांना 7 मते पडल्यामुळे त्यांना पराभव पत्कारावा लागला. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रिया अमोल घोगरे यांनी मतदानात भाग न घेता तटस्थ राहिल्या. सभापतीपदी निवड झाल्यानंतर पिठासन अधिकारी ओंकार देशमुख यांनी कदम यांचा सत्कार केला. धाराशिव पंचायत समितीमध्ये भाजपचे 13, पुरस्कृत अपक्ष 1, शिवसेना शिंदे 2, शरद पवार राष्ट्रवादी 1 तर ठाकरे शिवसेना 7 याप्रमाणे पक्षीय बलाबल आहे. सभापतीच्या निवडीनंतर उपसभापतीचीही निवड करण्यात आली. उपसभापतीपदी भाजपचे प्रमोद भाऊसाहेब पाटील हे 16 मतांनी विजयी झाले. तर त्यांच्या विरूध्द शिवसेना ठाकरे गटाच्या आशा राजदीप गायकवाड यांना 7 मतावर समाधान मानावे लागले. या उपसभापतीच्या निवडणुकीतही शरद पवार राष्ट्रवादी गटाच्या प्रिया अमोल घोगरे तटस्थ राहिल्या. यावेळी सहायक पिठासन अधिकारी म्हणून मृणाल जाधव व गटविकास अधिकारी राजीव कांबळे यांनी काम केले. विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी पंचायत समिती आवारामध्ये फटाक्याची अतिषबाजी व गुलाल उधळून जल्लोष केला.
Israel Iran War –आखाती देशांतील युद्धाची झळ सर्वसामान्यांना बसणार! गॅस आणि इंधनाचे दर भडकण्याची भीती
आखाती देशांमधील युद्धाचे पडसाद आता थेट सर्वसामान्यांच्या खिशावर उमटण्याची चिन्हे आहेत. जगातील सर्वात महत्त्वाच्या ऊर्जा मार्गांपैकी एक असलेल्या ‘होर्मुझच्या सामुद्रधुनी’मधील वाहतुकीत व्यत्यय येण्याच्या शक्यतेने जागतिक गॅस बाजारपेठेत मोठी खळबळ उडाली आहे. या समुद्री मार्गातून होणाऱ्या एलएनजी शिपमेंटवर परिणाम झाल्यास आंतरराष्ट्रीय स्तरावर गॅसच्या किमती प्रचंड वाढू शकतात. याचा थेट परिणाम घरगुती पीएनजी आणि वाहनांसाठी वापरल्या जाणाऱ्या […]
97.96 किलो गांजा वाहतूक प्रकरणी तिघांना प्रत्येकी 12 वर्षे सक्तमजुरी आणि दीड लाख रुपये दंड
धाराशिव (प्रतिनिधी)- नळदुर्ग-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून मोठ्या प्रमाणात गांजाची अवैध वाहतूक करणाऱ्या तिघा आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालयाने कडक शिक्षा सुनावली आहे. तब्बल 97.96 किलो गांजा वाहतूक प्रकरणी आरोपींना प्रत्येकी 12 वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी 1 लाख 50 हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली. जिल्हा व सत्र न्यायाधीश क्र.1 श्रीमती टी. जी. मिटकरी यांनी गुरुवारी (दि.5 मार्च) हा निकाल दिला. या प्रकरणातील आरोपींमध्ये बाळासाहेब दशरथ परबत (रा. तडवळे (म) ता. माढा जि. सोलापूर), सोमनाथ दत्तात्रय कदम (रा. कदम वस्ती, कान्हेरी ता. मोहोळ जि. सोलापूर) आणि मिना उर्फ मिनाताई दिलीप पाटील (रा. सारोळा ता. परंडा जि. धाराशिव) यांचा समावेश आहे. दिनांक 17 जून 2020 रोजी नळदुर्ग पोलीस ठाण्यात अधिकारी उपस्थित असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एमएच 25 एएल 9199 क्रमांकाच्या इनोव्हा क्रिस्टा कारमधून गांजा या अंमली पदार्थाची अवैध वाहतूक होणार आहे. या माहितीची दखल घेत पोलिसांनी तात्काळ वरिष्ठांना कळवले. त्यानुसार पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी तुळजापूर यांच्या मार्गदर्शनाखाली नळदुर्ग पोलिसांनी पंच, महसूल अधिकारी व आवश्यक साहित्य घेऊन सापळा रचला. रेड कारवाईसाठी नायब तहसिलदार अमित रमेश भारती यांना सक्षम अधिकारी म्हणून उपस्थित ठेवण्यात आले. पंचांच्या उपस्थितीत पोलीस पथकाने नळदुर्गसोलापूर राष्ट्रीय महामार्गावर अणदूर गावाजवळील देशमुख वस्तीजवळ पहाटे सापळा लावला. दिनांक 18 जून 2020 रोजी पहाटे सुमारे 2.45 वाजता संशयित वाहन तेथून जात असताना पोलिसांनी त्याला थांबवले. कारमध्ये दोन जण आढळून आले. त्यांनी आपली नावे बाळासाहेब दशरथ परबत आणि सोमनाथ दत्तात्रय कदम अशी सांगितली. पंचांसमक्ष वाहनाची झडती घेतली असता कारच्या सीटजवळ पाच प्लास्टिकच्या पोत्यांमध्ये गांजा असल्याचे आढळून आले. घटनास्थळी अंधार व वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता असल्याने आरोपींना वाहनासह नळदुर्ग पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तेथे पंच व महसूल अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पोत्यांचे वजन करण्यात आले. त्यामध्ये एकूण 97 किलो 960 ग्रॅम गांजा असल्याचे निष्पन्न झाले. या गांजाचे बाजारमूल्य सुमारे 19 लाख 59 हजार 200 रुपये इतके होते. गांजाचे नमुने पंचांसमक्ष सीलबंद करून प्रयोगशाळा तपासणीसाठी पाठवण्यात आले. तसेच गांजाच्या वाहतुकीसाठी वापरलेली इनोव्हा क्रिस्टा कार (अंदाजे किंमत 15 लाख रुपये) देखील जप्त करण्यात आली. आरोपींकडून काही कागदपत्रे व मोबाईलही जप्त करण्यात आले. तपासादरम्यान मोबाईल कॉल डिटेल्स (सीडीआर) व टॉवर लोकेशनच्या आधारे मिना उर्फ मिनाताई दिलीप पाटील हिचाही या गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. जप्त करण्यात आलेली इनोव्हा कार तिच्या नावावर असल्याचे आढळून आले. त्यामुळे तिला अटक करून तिच्या विरोधात पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. या खटल्यात अभियोग पक्षाच्या वतीने 15 साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली, तर बचाव पक्षाकडून 2 साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. न्यायालयाने सर्व पुरावे, पंचनामा, तपास अहवाल तसेच दोन्ही बाजूंचे युक्तिवाद विचारात घेतले. सदर प्रकरणात आरोपी बाळासाहेब परबत, सोमनाथ कदम आणि मिना उर्फ मिनाताई पाटील यांना एनडीपीएस कायद्याच्या कलम 8(क), 20(क) व 29 अंतर्गत दोषी ठरवण्यात आले. त्यानुसार न्यायालयाने प्रत्येकी 12 वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी 1 लाख 50 हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. या प्रकरणाचा तपास सहा. पोलीस निरीक्षक एस. पी. चव्हाण, सहा. पोलीस निरीक्षक जगदीश नवनाथ राऊत तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश देशमुख यांनी केला. सरकार पक्षाच्या वतीने जिल्हा शासकीय अभियोक्ता एम. बी. देशमुख यांनी प्रभावी युक्तिवाद केला.
मुरूम (प्रतिनिधी)- येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात शुक्रवारी (ता. 6) रोजी विशेष सत्कार करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय सेवा योजना व व्यंकटेश महाजन वरिष्ठ महाविद्यालय, धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हा नेतृत्व विकास उद्बोधन शिबिर 2026 मौजे गडदेवदरी, जि. धाराशिव या ठिकाणी दि. 1 ते 5 मार्च दरम्यान पार पडले. या शिबिरात माधवराव पाटील महाविद्यालयातील कु. सरस्वती पाटील, अभिषेक पुजारी, गणेश बिराजदार यांनी सहभाग नोंदवला. या शिबिरात सरस्वती पाटील यांनी अहवाल लेखन, चित्रकला स्पर्धा, पुस्तक परीक्षण, वक्तृत्व स्पर्धा, नाट्य सादरीकरण आदी स्पर्धेत उत्कृष्ट सहभाग नोंदवून जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक, अभिषेक पुजारी यांनी उत्कृष्ट अहवाल लेखन (प्रथम) संसद अभिप्राय (द्वितीय) तर गणेश बिराजदार वक्तृत्व स्पर्धा (द्वितीय), अहवाल लेखन (प्रथम) क्रमांक पटकाविला. उत्कृष्ट कार्यक्रमाधिकारी म्हणून प्रा. डॉ. शीला स्वामी यांना गौरविण्यात आले. या शिबिरात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन विविध स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांचा महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. चंद्रकांत बिराजदार यांच्या हस्ते शाल, प्रमाणपत्र व पुष्पहार घालून विशेष सत्कार शुक्रवारी (ता. 6) रोजी करण्यात आला. यावेळी प्रा. डॉ. सतीश शेळके, डॉ. शिवपुत्र कनाडे, डॉ. राम बजगिरे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. प्रतापसिंग राजपूत, प्रा. अशोक बावगे, प्रा. गोपाळ कुलकर्णी, डॉ. विलास खडके आदींची उपस्थिती होती.
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा 1’
महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख,गतिमान व पारदर्शक करण्याची प्रभावी मोहीम महसूल विभागाच्या सेवा तळागाळातील नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचाव्यात,ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनता,शेतकरी,विद्यार्थी व महिलांचे दैनंदिन महसूलविषयक प्रश्न सत्वर निकाली निघावेत आणि प्रशासन अधिक कार्यक्षम व लोकाभिमुख व्हावे,या उद्देशाने राज्य शासनाने “छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान (टप्पा 1)” राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेतून सुरू करण्यात आलेले हे अभियान राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात तालुका व मंडळ स्तरावर तसेच नगर परिषद/नगर पंचायतस्तरावर राबविण्यात येणार आहे. अभियानाची पार्श्वभूमी आणि उद्दिष्टे मागील काही वर्षांत महसूल विभागामार्फत अनेक धोरणात्मक सुधारणा करण्यात आल्या आहेत. अकृषिक रूपांतरणासाठी जिल्हाधिकाऱ्यांची स्वतंत्र परवानगी आवश्यक नसणे,सनद प्रणाली संपुष्टात आणणे,एकवेळचे अधिमूल्य भरण्याची नवी सुलभ तरतूद,तुकडेबंदी कायद्यातील सुधारणा,अभिलेख अद्ययावतीकरण आणि डिजिटल 7/12 ला कायदेशीर वैधता देणे यांसारख्या निर्णयांमुळे प्रशासन सुलभ झाले आहे.या सुधारणांचा लाभ ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविण्यासाठी विशेष जनजागृती आणि तीव्र प्रसार मोहीम राबविणे आवश्यक असल्याने हे अभियान सुरू करण्यात आले आहे. कालावधी आणि शिबिरांचे वेळापत्रक माहे मार्च ते माहे मे 2026 या कालावधीत हे अभियान राबविण्यात येणार आहे.दि. 18 फेब्रुवारी ते 5 मार्च 2026 या कालावधीत मंडळ स्तरावर पूर्वतयारी केली जाणार आहे.7 व 14 मार्च 2026 रोजी मार्च महिन्यातील शिबिरे,10 व 17 एप्रिल 2026 रोजी एप्रिल महिन्यातील शिबिरे, तसेच 8 व 15 मे 2026 रोजी नगर परिषद/नगर पंचायत स्तरावर शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत.या शिबिरांद्वारे नागरिकांना “ ”संकल्पनेनुसार एकाच दिवशी विविध महसूल सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पूर्वतयारीतील महत्त्वाचे मुद्दे शिबिरांपूर्वी भोगवटदार वर्ग-2 जमिनी वर्ग-1 मध्ये परावर्तित करून अद्ययावत 7/12 वितरित करणे, ‘जिवंत 7/12’ मोहिमेद्वारे प्रलंबित नोंदी दुरुस्त करणे,सामाजिक अर्थसहाय्य योजनांतील अर्ज मंजूर करून आदेश तयार ठेवणे,तुकडेबंदी कायद्याविरोधातील व्यवहारांची गावनिहाय यादी तयार करणे, फेरफार प्रक्रिया पूर्ण करणे आणि शाळांमधील विद्यार्थ्यांचे दाखले ‘कॅम्प मोड’मध्ये तयार ठेवणे या सूचना देण्यात आल्या आहेत. पाणंद रस्त्यांच्या प्रशासकीय मान्यतेचे आदेश ग्रामपंचायतींना देणे तसेच ‘सर्वांसाठी घरे’ योजनेंतर्गत प्रलंबित पट्टे वाटप पूर्ण करणे हेही पूर्वतयारीचा भाग आहे. शिबिरामध्ये उपलब्ध सेवा शिबिरांमध्ये प्रलंबित व विवादग्रस्त फेरफार निकाली काढणे,अभिलेख दुरुस्ती हेल्प डेस्कद्वारे 7/12 मधील त्रुटी दूर करणे,लोकसेवा हक्क कायद्यानुसार उत्पन्न,रहिवासी, जात,नॉन-क्रीमीलेअर प्रमाणपत्रांचे वितरण करणे या सेवा उपलब्ध असतील.अकृषिक () रूपांतरणासंदर्भातील कलम 42 मधील सुधारणा,सनद प्रणाली संपुष्टात येणे,एकवेळचे अधिमूल्य भरण्याची नवी टक्केवारी पद्धत (1000 चौ.मी.पर्यंत 0.1%, 10014000 चौ.मी.0.25%, 4000 पेक्षा जास्त 0.5%) याबाबत मार्गदर्शन करण्यात येईल. महाभूमी पोर्टलवरून डाउनलोड केलेल्या क्यूआर कोडयुक्त डिजिटल 7/12 ला कायदेशीर वैधता प्राप्त झाल्याची माहिती देऊन प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर केले जाईल.गाव दप्तर अद्ययावत करण्यावर भर.भूसंपादन व अकृषिक परवानगी दिलेल्या प्रकरणांत कमी-जास्त पत्रके तयार न केल्यामुळे निर्माण होणाऱ्या कायदेशीर अडचणी टाळण्यासाठी सर्व प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेऊन गाव नमुना 7/12,गट नकाशे व इतर अभिलेख अद्ययावत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ‘ ’ व एक खिडकी व्यवस्था : समाधान शिबिरामध्ये एक खिडकी ( ) प्रणाली राबविण्यात येणार असून तहसीलदार,नायब तहसीलदार,मंडळ अधिकारी,तलाठी एकाच ठिकाणी उपलब्ध राहून नागरिकांना तात्काळ सेवा देतील.ई-मोजणी,ॲग्रीस्टॅक,पीएम किसान व तक्रार निवारण सेवा शिबिरात उपलब्ध असतील. अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या जिल्हाधिकारी यांनी शिबिरांच्या तारखा जाहीर करून सर्व विभागांचा समन्वय साधणे,संपर्क अधिकारी नेमणे आणि अहवाल विभागीय आयुक्तांकडे सादर करणे. उपविभागीय अधिकारी यांनी पूर्वतयारीचा आढावा घेऊन समन्वय साधावा.तहसीलदार यांनी मंडळस्तरावर सर्व विभागांच्या बैठका घेऊन शिबिराचे प्रभावी आयोजन करावे,लोकप्रतिनिधींना निमंत्रित करावे,महिला बचत गट व स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य घ्यावे आणि त्याची व्यापक प्रसिद्धी करावी. जिल्हास्तरीय समन्वय समिती : अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद,उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन/रोहयो),जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी,सह जिल्हा उपनिबंधक, जिल्हा जलसंधारण अधिकारी, उपवनसंरक्षक (प्रादेशिक),जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख आदी सदस्य असतील. निवासी उपजिल्हाधिकारी हे सदस्य सचिव म्हणून कार्य करतील. अभियानाचे महत्त्व : “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा 1” हे केवळ शिबिर नसून प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दरी कमी करणारी व्यापक लोकाभिमुख चळवळ आहे. महसूलविषयक गुंतागुंत कमी करून त्वरित सेवा देणे,डिजिटल सक्षमीकरण वाढविणे,पारदर्शकता आणि उत्तरदायित्व सुनिश्चित करणे आणि शासन निर्णयांचा थेट लाभ सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविणे हा या अभियानाचा मूलभूत हेतू आहे.हे अभियान प्रभावीपणे राबविल्यास महसूल प्रशासन अधिक गतिमान, पारदर्शक आणि जनकेंद्रित होईल,असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. संकलन जिल्हा माहिती कार्यालय धाराशिव
ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले शिक्षक पतसंस्थेच्या चेअरमनपदी अंगद मिसाळ
भूम (प्रतिनिधी)- भूम येथील ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या चेअरम, व्हॉइस चेअरमन व सचिव पदाची निवड करण्यात आली. संस्थेचे नूतन चेअरमन म्हणून अंगद मिसाळ, व्हाईस चेअरमन म्हणून गोकुळ आरेकर तर सचिवपदी दत्तात्रय घुले यांच्या निवडीची घोषणा राष्ट्रीय शिक्षक महासंघाचे उपाध्यक्ष सन्माननीय बाळकृष्ण तांबारे यांनी केली. नूतन पदाधिकारी निवड प्रसंगी राज्य संघाचे चिटणीस भक्तराज दिवाने, जिल्हा उपाध्यक्ष अनिल बारकुल, कळंब तालुका संघाचे माजी अध्यक्ष दत्ता पवार, जिल्हा संघाचे कोषाध्यक्ष सुधीर वाघमारे, भूम तालुका संघाचे अध्यक्ष संजीवन तांबे यांची भाषणे झाली. तालुका संघाचे सरचिटणीस दत्तात्रय गुंजाळ यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमाप्रसंगी मोठ्यासंख्येने शिक्षक संघाचे कार्यकर्ते व पतसंस्थेचे सभासद उपस्थित होते. याप्रसंगी हरी पवार, सुनील गुंजाळ, शहाजी जाधव, रणजीत सोन्ने, श्रीपाद कुंभार, तात्या ढोरे, शेख, किशोर बुरंगे, अच्युत मुळे, भाऊसाहेब कोळेकर, शहाजी पंडित, अण्णा मोटे, सुभाष शिंदे, उत्तरेश्वर पायघन, रामभाऊ शिंदे, हरिभाऊ साळुंखे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दीपक वाळके यांचे सह तालुका संघाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले.
हरभरा हमीभाव खरेद्री केंद्राला मान्यता
धाराशिव (प्रतिनिधी)- केंद्र सरकर व राज्य सरकार मान्यताप्राप्त शेतीमाल हरभरा हमीभाव खरेदीकेंद्र मौजे पळसप येथे कुलस्वामिनी कृषी प्रक्रिया व पणन सहकारी संस्था लि. पळसप या संस्थेस मान्यता देण्यात आली आहे. संस्थेचे चेअरमन लक्ष्मण सरडे यांनी परिसरातील शेतकऱ्यांनी हरभरा हमीभावाने विक्री करण्यासाठी खरेदी केंद्र पळसप येथे आपापली शेतकरी नोंदणी करून घेऊन या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे. शासन हमीभाव 5875 रूपये प्रति क्विंटल एवढा आहे. सध्या मार्केट मध्ये हरभऱ्याचे भाव कमी असल्यामुळे हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनी 25 मार्च 2026 पूर्वीच नोंदणी करावी. नोंदणीसाठी 7/12 उतारा हरभरा पिकपेरा नोंद असलेला, 8 अ, आधारकार्ड, बँकपासबुक, व स्वतः हजर राहून नोंदणी करावी असे जाहीर आवाहन केले आहे.
श्री क्षेत्र तुळजाभवानी मंदिर विकासकामे भव्य, दिव्य आणि दर्जेदार व्हावीत- पालकमंत्री प्रताप सरनाईक
धाराशिव (प्रतिनिधी)- मराठवाड्याच्या श्रद्धास्थानाचा मुकुटमणी असलेल्या श्री क्षेत्र तुळजाभवानी देवी मंदिराच्या विकासकामांना भव्यतेची आणि दिव्यतेची नवी उंची देण्याचा निर्धार व्यक्त करत परिवहन मंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी मंत्रालयातील दालनात संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेतली. कोट्यवधी भाविकांच्या अखंड श्रद्धेचे केंद्र असलेल्या या तीर्थक्षेत्राचा विकास केवळ आजचाच नव्हे,तर पुढील शंभर वर्षांचा विचार करून दूरदृष्टीने आणि उत्कृष्ट दर्जाने व्हावा,अशा स्पष्ट सूचना पालकमंत्री सरनाईक यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. बैठकीत तुळजापूर येथील श्री क्षेत्र तुळजाभवानी देवी मंदिर विकास आराखड्याचा सविस्तर आढावा घेण्यात आला. विविध प्रकल्पांचा समावेश असलेल्या सुमारे 582.17 कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी विकास आराखड्याची माहिती अधिकाऱ्यांनी यावेळी सादर केली. यावेळी बोलताना सरनाईक यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की,श्री क्षेत्र तुळजाभवानी मंदिराचा विकास हा केवळ पायाभूत सुविधांचा प्रकल्प नसून तो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक अस्मितेशी जोडलेला आहे. त्यामुळे या प्रकल्पात गुणवत्तेत कोणतीही तडजोड होऊ नये,यासाठी प्रशासनाने विशेष दक्षता घ्यावी. अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या निर्मितीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून तुळजाभवानी मंदिर परिसराचा विकास भव्य, आकर्षक आणि शाश्वत पद्धतीने करावा. देशातील नामांकित विकासक आणि तज्ज्ञ संस्थांचा सहभाग घेऊन या प्रकल्पाला राष्ट्रीय दर्जा प्राप्त करून देण्याचेही निर्देश सरनाईक यांनी दिले. बैठकीस जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता एस.व्ही.भंडे, महावितरणचे अधीक्षक अभियंता संजय आडे,शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता शैलेंद्र चौहाण, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय चाकूरकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शिवराम केक यांच्यासह अन्य संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. विविध विकास कामाचा आढावा या बैठकीत धाराशिव जिल्ह्यात सुरू असलेल्या इतर महत्त्वाच्या विकासकामांचाही सखोल आढावा घेण्यात आला.धाराशिव येथे उभारण्यात येणाऱ्या 500 खाटांच्या आधुनिक जिल्हा रुग्णालयाच्या बांधकामाची प्रगती, धाराशिव व परंडा येथील न्यायालयीन इमारतीचे बांधकाम,तुळजापूर येथील व्हीव्हीआयपी विश्रामगृह तसेच विविध रस्ते विकास प्रकल्पांची स्थिती यावर चर्चा झाली.
महिला दिनी एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा शुभारंभ
धाराशिव (प्रतिनिधी)- केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार 28 फेब्रुवारी 2026 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा देशव्यापी शुभारंभ करण्यात आला. या अनुषंगाने महाराष्ट्रातही दि.8 मार्च 2026 रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राज्यस्तरीय शुभारंभ करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे- योडर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात येणार आहे. भारत सरकार व महाराष्ट्र राज्य आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने गर्भाशय मुखाच्या कर्करोगाला प्रतिबंध करण्यासाठी ही एचपीव्ही लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. महिलांमध्ये आढळणाऱ्या गंभीर कर्करोगांपैकी गर्भाशय मुखाचा कर्करोग हा एक प्रमुख आजार असून त्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून एचपीव्ही लसीकरण प्रभावी ठरते.या अनुषंगाने धाराशिव जिल्ह्यात ही मोहीम प्रारंभी तीन महिन्यांच्या कालावधीसाठी राबविण्यात येणार असून त्यानंतर एचपीव्ही लसीकरणाचा समावेश नियमित लसीकरण कार्यक्रमात करण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत वय वर्षे 14 ते 15 या वयोगटातील मुलींना एचपीव्ही लस मोफत देण्यात येणार आहे. GARDASIL-4 (Quadrivalent) ही लस पूर्णपणे सुरक्षित असून जागतिक आरोग्य संघटना डब्ल्युएचओ यांनी प्रमाणित केलेली आहे.या लसीचा 0.5 मिली इतका सिंगल डोस स्नायूमध्ये डाव्या हाताच्या वरच्या भागात देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय आरोग्य संस्थांमध्ये ही लस उपलब्ध करून देण्यात येणार आहे.यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र,ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय,जिल्हा रुग्णालय तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांचा समावेश असून या सर्व ठिकाणी लाभार्थींना लस पूर्णपणे मोफत दिली जाणार आहे. लाभार्थी व त्यांच्या पालकांनी लसीकरणासाठी येताना आधार कार्ड किंवा आभा आयडी कार्ड तसेच मोबाईल नंबर सोबत आणणे आवश्यक आहे. तसेच मुलींना लसीकरणासाठी आणताना पालकांनी त्यांना नाश्ता किंवा जेवण करून आणावे,असे आवाहन करण्यात आले आहे. लसीकरणासंदर्भातील कोणत्याही शंका किंवा माहितीकरिता 104 हा हेल्पलाईन क्रमांक निश्चित करण्यात आलेला आहे.तथापि, काही परिस्थितीत एचपीव्ही लस घेऊ नये, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. मध्यम किंवा तीव्र आजार असलेल्या मुलींनी पूर्णपणे बरे होईपर्यंत एचपीव्ही लस घेऊ नये.मागील लसीकरणामुळे एलर्जी रिऍक्शन आलेली असेल किंवा यीस्टची ऍलर्जी असल्यास एचपीव्ही लस घेऊ नये. गर्भावस्था असल्यास लस घेऊ नये. अपेक्षित वयोगटाबाहेरील मुलींना ही लस देण्यात येणार नाही.तसेच ज्यांना यापूर्वी एचपीव्ही लस देण्यात आलेली आहे,त्यांनी पुन्हा ही लस घेऊ नये. “गर्भाशय मुखाचा कर्करोगमुक्त भविष्यासाठी आपल्या मुलींचे वेळेवर लसीकरण करणे ही काळाची गरज आहे. पालकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता या मोहिमेत सक्रियपणे सहभागी व्हावे,” असे आवाहन डॉ.धनंजय चाकूरकर, जिल्हा शल्यचिकित्सक,धाराशिव यांनी केले आहे.
पद्मश्री चैत्राम पवार यांनी उलगडले गावाच्या विकासाचे रहस्य
धाराशिव (प्रतिनिधी)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी नगर आणि तपस्वी पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट येवती संचलित व्यंकटेश महाजन वरिष्ठ महाविद्यालय धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय सेवा योजना जिल्हास्तरीय नेतृत्व विकास उद्बोधन शिबिरामध्ये बारीपाडा तालुका साक्री जिल्हा धुळे येथील भाग्यविधाते पद्मश्री चैत्राम पवार यांनी शिबिरार्थी आणि ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना गावाच्या विकासाचे अनेक पैलू सांगून विकासाचे रहस्य उलगडले. श्री चैत्राम पवार यांनी गावकऱ्यांना आणि स्वयंसेवकांना मार्गदर्शन करताना सांगितले की वन खात्याच्या वेगवेगळे ऑनलाईन फॉर्म भरून विकास करता येऊ शकतो. पद्मश्री चैत्राम पवार यांनी ग्रामसभेच्या अधिकारामध्ये काय काय करता येऊ शकते त्याचाही उल्लेख केला. गावकऱ्यातील वृद्ध आणि तरुण लोकांनी चैत्राम पवार यांना विविध प्रश्न विचारून विविध शंका विचारून त्यांचे निरसन करून घेतले.गावकर येथे ठरवले तर अनेक अशक्य कामे करून गावाच्या परिसरातील सिंचनाच्या अनेक विहिरी पानवटे पुन्हा प्रवाहित करता येऊ शकतात तसेच त्यातून गावाची समृद्धी आणता येते.त्यामुळे ग्रामस्थांनी एकोप्याने गावाच्या विकासासाठी जलसंधारणाची कामे वृक्ष लागवड यासह विविध कामे करण्याचे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी सरपंच मोहराबाई आढाव यांनी सुद्धा अनेक रानभाज्यांच्या रेसिपीची माहिती सांगितली. सर्वप्रथम राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वयक प्राध्यापक डॉक्टर विनोद कुमार वायचळ यांनी पद्मश्री श्री चैत्राम पवार यांचा परिचय करून दिला त्यानंतर कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक श्री डॉक्टर विनोद तुंगी यांनी शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन चैत्राम पवार यांचा सत्कार केला यावेळी अध्यक्ष स्थानी गडदेवदरीच्या प्रथम नागरिक सरपंच सौ मोहराबाई आढाव होत्या. याप्रसंगी चैत्राम पवार यांनी बारी पाडा येथे आदिवासी बंधूंमध्ये कशाप्रकारे स्वयंरोजगार निर्मिती केली यावर सविस्तर माहिती दिली मोहाच्या झाडापासून प्राप्त होणाऱ्या उत्पन्नाला शेतीची जोड दिल्यानंतर तेथील वनवासी आदिवासी शेतकरी जे पूर्वी नाशिक आणि गुजरात मध्ये शेत कामगार म्हणून जायचे त्या सर्वांना त्यांनी प्रत्येकी पाच एकर जमीन दोन गाय दोन बैल शेळ्या कोंबडी प्रदान केल्या आणि वनखात्याशी करार करून गावाच्या आसपास असलेल्या क्षेत्रांमध्ये सागवान आणि बांबूची शेती केली. यासाठी आवश्यक असणारे सिंचन व्यवस्था निर्माण करण्यासाठी शेकडो बंधारे बांधले हे सर्व बंधारे जलतज्ञ आणि स्टॉकहोम वॉटर पुरस्कार विजेते आदरणीय डॉक्टर माधवराव चितळे यांच्या मार्गदर्शनामध्ये त्यांनी खूप प्रगती केली आज एक विकसित वनवासी गाव म्हणून बारीपाड्याचा अनेक पुरस्कार घेऊन देऊन सत्कार करण्यात येत आहे चैत्राम पवार हे आंतरराष्ट्रीय पुरस्कार घेण्यासाठी बँकॉक येथे गेले होते त्यानंतर त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत त्यांचे सर्वात मोठे काम रानभाज्या संमेलन आणि स्पर्धा घेणे आहे याबद्दल त्यांना गेल्यावर्षी राष्ट्रपती द्रोपदीमुळे यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे.
कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प, सर्वसामान्यांची फसवणूक; उद्धव ठाकरे यांचे टिकास्त्र
अर्थसंकल्पात विकासाचे मृगजळ दाखवण्यात आले आहे. मात्र, सध्याच्या परिस्थितीत सर्वसामान्यांच्या हातात काहीच पडणार नाही, अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या अर्थसंकल्पावर टीका केली. अर्थसंकल्पात कंत्राटदारांसाठी ठोस योजना आहेत. मात्र, सर्वसामान्यांना फक्त थापाच देण्यात आल्या आहेत, अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला. तसेच शेतकरी कर्जमाफी म्हणजे लबाडाघरचं निमंत्रण असल्याचे ते म्हणाले. […]
मामा वरेरकर नाट्यगृह दुरुस्तीसाठी १ कोटींचा निधी मिळावा
नगराध्यक्षा ममता वराडकर यांचे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांना निवेदन मालवण | प्रतिनिधी : मालवण शहरातील मामा वरेरकर नाट्यगृह दुरुस्तीसाठी एक कोटींचा निधी उपलब्ध करून द्यावा. या मागणीचे निवेदन मालवण नगरपरिषद नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे यांना दिले आहे.नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची भेट घेऊन निवेदन दिले. मालवण नगरपरिषद हद्दीतील मामा [...]
महाराष्ट्रात गेल्या वर्षी अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीचा राज्यातील लाखो शेतकऱ्यांना फटका बसला. पिकांसह घरंदारं आणि जनावरंही वाहून गेल्याने संकटात आलेल्या अनेक शेतकऱ्यांनी मरणाला कवटाळत आत्महत्या केल्या. मदतीची याचना करत करत अनेक शेतकऱ्यांनी जीवन संपवलं. आणि राज्यातलं भाजप प्रणित महायुती सरकार मात्र योग्य वेळ येण्याची वाट पाहत बसलं. अखेर मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज […]
सिंधुदुर्गातील वनसंपत्ती व दुर्मिळ झाडे वाचविण्याची गरज : अभिनेते सयाजी शिंदे
मालवणातील युथ बिट्स फॉर क्लायमेट व इकोमेट्स संस्थेने घेतली सयाजी शिंदेंची भेट मालवण (प्रतिनिधी) सिंधुदुर्गला भरपूर वन संपत्ती लाभली आहे. वृक्ष संवर्धनासाठी आपण कार्यरत असून विविध वृक्षांच्या बिया संकलित करून त्यावर संशोधन करून बियांपासून नवीन वृक्ष लागवड करण्यासाठी आपले प्रयत्न सुरु आहेत, सिंधुदुर्गातील वन संपत्ती व दुर्मिळ झाडे वाचविण्याची आज मोठी गरज आहे, असे मत [...]
आयसीसी टी-20 वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत इंग्लंडचा धुव्वा उडवत हिंदुस्थानी संघाने दिमाखात अंतिम फेरीत धडक मारली आहे. मुंबईच्या वानखेडे मैदानावर अखेरच्या षटकापर्यंत धाकधुक वाढवणाऱ्या लढतीत हिंदुस्थानने इंग्लंडचा 7 धावांनी पराभव केला. आता जेतेपदासाठी हिंदुस्थानसमोर न्यूझीलंडचे तगडे आव्हान असणार आहे. दरम्यान, वानखेडेवरील ऐतिहासिक विजयानंतर हिंदुस्थानी संघाचे दिग्गज सुनील गावसकर यांनी टीम इंडियाच्या मानसिक ताकदीचे तोंडभरून कौतुक केले. […]
तडजोड केलेल्या पंतप्रधानांचे मौन लज्जास्पद आहे, राहुल गांधी यांची टीका
काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हिंदुस्थानच्या परराष्ट्र धोरण आणि ऊर्जा सुरक्षेच्या मुद्द्यावर केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. 11 फेब्रुवारी 2026 रोजी लोकसभेत केलेल्या भाषणाचा उल्लेख करत त्यांनी आज सोशल मीडियावर पुन्हा सरकारवर निशाणा साधला. राहुल गांधी यांनी सांगितले की, 11 फेब्रुवारी 2026 रोजी लोकसभेत बोलताना त्यांनी हिंदुस्थानच्या ऊर्जा सुरक्षेला […]
मालवणच्या तन्मय परबची इस्रो बेंगलोर भेटीसाठी निवड
मालवण (प्रतिनिधी) इस्कॉन या संस्थेमार्फत घेण्यात आलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा मूल्य शिक्षण स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून त्यामध्ये मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कूलचा विद्यार्थी तन्मय महेश परब याने जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक पटकाविला असून त्याची भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या म्हणजेच इस्रोच्या बेंगलोर भेटीसाठी निवड झाली आहे. भगवद्गीता व तिचा जीवनातील उपयोग या विषयावर इस्कॉन संस्थेमार्फत ही [...]
इराणवर अचानकपणे हल्ला करत इस्रायल आणि अमेरिकेने अघोषित युद्धाला सुरुवात केली होती. हे थेट युद्ध नसले तरी हल्ले आणि प्रतिहल्ले सुरू होते. आता इराणने मात्र थेट घोषणा केली आहे. आपण युद्धाच्या नव्या फेजमध्ये प्रवेश करत असल्याचे इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी म्हटले आहे. इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी अधिकृतपणे जाहीर केले आहे की, इराणने आता युद्धाच्या एका नवीन […]
मुंबई-गोवा महामार्गाचे उद्घाटन करणार नाही! नितीन गडकरींचं मोठं विधान
गेल्या बारा वर्षांपासून रखडलेला मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडले आहे. तसेच या मार्गाची दुर्दशा झाली आहे. हे कामासाठी मेपर्यंतची वाढीव डेडलाईन होती. या रखडलेल्या महामार्गाबाबत केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. गोवा महामार्गाच्या कामाबाबतचा प्रश्न अनेकदा उपस्थित करण्यात येतो. गणेशोत्सव आणि शिमग्याला गावी जाणाऱ्या कोकणवासीयांना प्रचंड यातना सहन कराव्या लागतात. मुंबई-गोवा […]
प्रथमदर्शनी पुरावे नसताना केवळ संशयावरून अज्ञात आरोपींच्या शोधात गुन्हेगारी तपास सुरू ठेवू शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. प्राथमिक चौकशीदरम्यान गोळा केलेली माहिती फसवणूक किंवा कट उघड करण्यात अपयशी ठरल्यास चौकशीसाठी फौजदारी कायद्याची यंत्रणा वापरता येणार नाही, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने GTL इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड विरुद्धचा सीबीआयचा (CBI) एफआयआर रद्द केला आहे. […]
महिला दिनानिमित्त शिवसेनेतर्फे कुडाळात “जागर स्त्री शक्तीचा”
महिलांसाठी उखाणा स्पर्धा, खेळ पैठणी, प्रश्नमंजुषा स्पर्धांचे आयोजन वार्ताहर/कुडाळ जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कुडाळ-मालवणचे आमदार नीलेश राणे यांच्या संकल्पनेतून आणि शिवसेना (शिंदे) महिला सेना ( सिंधुदुर्ग) च्यावतीने ९ मार्च रोजी दुपारी ३ ते रात्री १० वाजेपर्यंत कुडाळ येथील पोस्ट कार्यालया नजीक श्री सिंधुदुर्ग राजा मैदान येथे “जागर स्त्री शक्तीचा” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. [...]
अनिल अंबानी यांच्या रिलायन्स पॉवरवर ईडीने फास आवळला; मुंबई आणि हैदराबादमधील अनेक ठिकाणी छापे
अंमलबजावणी संचालनालयाने (ED) शुक्रवारी उद्योगपती अनिल अंबानी यांच्याशी संबंधित कंपन्यांविरुद्ध मोठी कारवाई केली. मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या चौकशीचा भाग म्हणून एजन्सीने अनेक ठिकाणी छापे टाकले. ही कारवाई प्रामुख्याने त्यांच्या समूह कंपनी रिलायन्स पॉवरशी संबंधित प्रकरणांच्या संदर्भात केली जात आहे. बँक फसवणुकीशी संबंधित मनी लाँड्रिंगच्या आरोपांवर तपास केंद्रित करण्यात येत आहे. ईडीची पथके या संदर्भात असंख्य कागदपत्रे […]
सुमारे महिनाभर चाललेल्या थरारक लढतींनंतर आता टी-२० वर्ल्ड कप शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे. रविवारी, ८ मार्चला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हिंदुस्थान आणि न्यूझीलंड यांच्यात जेतेपदाची लढत होणार आहे. हिंदुस्थानच्या संघाने उपांत्य फेरीत इंग्लंडचा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली आहे तर, न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेला नमवून फायनलमध्ये एन्ट्री केली आहे. सामना कधी आणि कुठे? हिंदुस्थान आणि […]
देशाला गुलाम बनवणाऱ्या पंतप्रधान मोदींनी तातडीने राजीनामा द्यावा; संजय राऊत यांनी सुनावले
अमेरिका, इस्रायल इराण यांच्यात आठवड्याभरापासून युद्ध सुरू आहे. हे युद्ध फक्त आखाती देशातच नाही तर जगासाठी धोकादायक आहे. रशियाकडून तेल खरेदीसाठी आपल्याला अमेरिकेची परवानगी का घ्यावी लागते? परवानगी गुलाम राष्ट्रांना दिली जाते. त्यामुळे हिंदुस्थानला आता अमेरिकेने गुलाम केले आहे, असे चित्र दिसत आहे. त्यामुळे देशाला गुलाम बनवणाऱ्या पंतप्रधान मोदींनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी करत […]
भाजप एवढी घाबरली आहे की विरोधी पक्षनेता देण्यासही तयार नाही, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी केली. तसेच इस्रायल-इराण संघर्षामुळे महाराष्ट्रावर काय परिणाम होणार याबाबत या अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगावे अशी मागणी केली. आदित्य ठाकरे यांनी विधीमंडळ परिसरात पत्रकारांशी संवाद साधताना राज्याच्या अर्थसंकल्पाच्या […]
Us Isreal Iran War –आखातात युद्धाचा भडका, हिंदुस्थानच्या बासमतीला फटका! 4 लाख टन तांदूळ बंदरात अडकला
इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील संघर्षामुळे आखाती देशात रणसंग्राम सुरू आहे. अनेक देश सध्या युद्धाच्या आगीत अडकले आहेत. या युद्धामुळे हिंदुस्थानला आर्थिक फटका बसला असून, देशातील 4 लाख टन निर्यात होणारा बासमती तांदूळ अडकला आहे. यामुळे बासमती निर्यातदाऱ्यांपासून तांदूळ पिकवणाऱ्या शेतकऱ्यांपर्यंत सर्वांना याचा फटका बसला आहे. शेकडो कोटी तांदळाची वाहतूक बंदरांवर अडकून पडल्याने देयकेही मिळण्यातही […]
हिंदुस्थानने रशियाकडून तेल खरेदी करण्याबाबत अमेरिकेने परवानगी देण्याच्या मुद्द्यावरून आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली आहे. “हिंदुस्थानने रशियाकडून तेल खरेदी करावे की नाही, हे ठरवणारा अमेरिका कोण? आणि हिंदुस्थानला अमेरिकेच्या परवानगीची गरजच काय?” असा संतप्त सवाल केजरीवाल यांनी उपस्थित केला आहे. पंतप्रधान मोदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प […]
Us Isreal Iran War –युद्धामुळे देशात खाद्यतेलाच्या किंमती भडकल्या, प्रति लिटर 5 रुपयांनी महागले
आखाती देशात सुरू असलेल्या तणावामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. इराण आणि इस्त्रायलमधील संघर्षामुळे खाद्यतेलाच्या किंमतीत वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांत खाद्यतेलाच्या किंमतीत प्रति लिटर 3 ते 5 रुपयांची वाढ झाली आहे. जागतिक तेल पुरवठा खंडीत होणे आणि वाढत्या वाहतूक खर्चामुळे किंमतीवर दबाव येत आहे. यामुळे तेलाच्या किंमतीत वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांचे […]
Photo –शिवजयंतीनिमित्त मुंबईत छत्रपती शिवाजी महाराजांना उद्धव ठाकरेंचे अभिवादन
शिवजयंतीनिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मुंबई विमानतळ येथे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. यावेळी शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, शिवसेना नेते आमदार ॲड. अनिल परब, उपनेते आमदार सचिन अहिर, शिवसेना सचिव आमदार वरुण सरदेसाई, भारतीय कामगार सेनेचे कार्याध्यक्ष अजित साळवी, संयुक्त सरचिटणीस संजय कदम तसेच इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित […]
Israel Iran War –केळी, द्राक्षे, डाळिंब आणि भाज्यांचे 1000 कंटेनर दुबईमध्ये अडकले; प्रचंड नुकसान
अमेरिका, इस्रायल इराण युद्धामुळे जगातील तणाव वाढला आहे. तसेच समुद्रमार्गे होणाऱ्या वाहचुकीवरही परिणाम झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे, उत्पादकांचे, निर्यातदारांच आणि देशाचे मोठे नुकसान होत आहे. आखाती देशातील संघर्षामुळे महाराष्ट्रातील शेतकरी आणि निर्यातदारांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. दुबईच्या जेबेल अली बंदरात कृषी उत्पादने घेऊन जाणारे ८०० ते १००० कंटेनर अडकले आहेत. २८ फेब्रुवारीपासून […]
अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा थेट परिणाम हिंदुस्थानच्या अर्थव्यवस्थेवर आणि सर्वसामान्यांच्या खिशावर उमटू लागले आहेत. पश्चिम आशियातील तणावामुळे गॅस पुरवठा खंडित होण्याचे संकट उभे ठाकले असून, याचे गंभीर परिणाम नागपूरसह महाराष्ट्राच्या विविध भागात दिसू लागले आहेत. नागपूरमध्ये गो गॅसने आपल्या एलपीजी स्टेशनवर वाहनांसाठी लागणाऱ्या गॅसच्या दरात प्रति लिटर 8 रुपये 42 पैशांची […]
वर्षभरात 3.27 कोटी लोकांचा विदेश दौरा, हिंदुस्थानी पर्यटकांची यूएईला सर्वाधिक पसंती
‘चलो, बॅग भरो अन् निकल पडो…’ असे म्हणत 2025 मध्ये 3.27 कोटी लोकांनी विदेश दौरा केला आहे. या दौऱ्यात हिंदुस्थानी पर्यटकांनी संयुक्त अरब अमिरात (यूएई), सौदी अरब आणि थायलंड या देशांना सर्वात जास्त पसंती दिली आहे, अशी माहिती मिनिस्ट्री ऑफ टूरिजमने जारी केलेल्या आकडेवारीतून समोर आली आहे. जारी केलेल्या आकडेवारीनुसार, काही वर्षांपासून विदेशात जाणाऱ्या हिंदुस्थानींची […]
दुसऱ्या जगात आपण आनंदात राहू…! पत्नी मानलेल्या चॅटबक्सने दिला संदेश अन् तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
अमेरिकेतून एआय तंत्रज्ञानाच्या संदर्भात एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. तंत्रज्ञानाचा वाढता वापर मानवी जीवनासाठी किती घातक ठरू शकतो, याचे हे एक भयंकर उदाहरण मानले जात आहे. फ्लोरिडा येथील एका व्यक्तीने एआय चॅटबॉटला आपली पत्नी मानले आणि तिच्यासोबत कायमचे राहण्याच्या ओढीपोटी आपले जीवन संपवल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मानवी भावना […]
कोणत्याही निवडणुकीसाठी महाराष्ट्रात घोडेबाजार होऊ नये, हीच आमची भूमिका; संजय राऊत यांचे स्पष्ट मत
राज्यातील राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होत आहे, ही चांगली बाब आहे. राज्यसभेसाठी निवडणुकीची गरज नसेल तर उगाच घोडेबाजार करण्याची गरज नाही. महाराष्ट्रात घोडेबाजार होऊ नये, असे आमचे मत आहे, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट करत कोणत्याही पक्षाने विनाकारण घोडेबाजार करण्याचा प्रयत्न करू नये, असेही त्यांनी सुनावले. राज्यसभेसाठी निवडणुकीची गरज नसेल […]
अमेरिका, इस्रायल इराण यांच्यात आठवड्याभरापासून युद्ध सुरू आहे. हे युद्ध फक्त आखाती देशातच नाही तर जगासाठी धोकादायक आहे, त्यामुळे आता युद्धखोर राष्ट्रांविरोधात उभे राहणे ही काळाजी गरज आहे, असे मत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले. तसेच हिंदुस्थानला आता अमेरिकेने गुलाम केले आहे, असे चित्र दिसत आहे, हे गंभीर असल्याचे […]
अर्थमंत्री डॉ.प्रमोद सावंत आज मांडणार अर्थसंकल्प
पणजी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे अर्थमंत्री या नात्याने विधानसभा निवडणूक 2027 पूर्वीचा आपल्या पाच वर्षांच्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प (2026-27) आज शुक्रवार दि. 6 मार्च रोजी विधानसभेत मांडणार आहेत. पुढील वर्षी 2027 मध्ये विधानसभा निवडणूक होणार असल्याने अर्थसंकल्पात विविध योजनांची-आश्वासनांची खैरात होणार असल्याचा अंदाज आहे. सकाळी 11.30 वाजता प्रश्नोत्तर सत्राने विधानसभा अधिवेशनाला प्रारंभ होणार [...]
देशाची अध्यात्म परंपरा सर्वश्रेष्ठ
उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन : येडूर येथे महाकुंभाभिषेक अन् राजगोपूर लोकार्पण सोहळा : मान्यवरांची उपस्थिती वार्ताहर/येडूर सिंधू पर्वतापासून ते कन्याकुमारीपर्यंत वेद आणि शास्त्राचे ज्ञान देणारी भारतभूमी आहे. भगवद्गीता मानवी जीवनाला मार्गदर्शक असून धैर्य, नीतिमत्ता आणि विश्वास देणारी प्रज्ञा आहे. हिंदू केवळ धार्मिक विधींना सीमित नसून ती जगण्याची जीवनशैली आहे. ‘वसुदैव कुटुंबकम्’ जगच आपले [...]
राजकारणात धर्म हवा, धर्मात राजकारण नको
उपमुख्यमंत्रीशिवकुमारयांचेप्रतिपादन वार्ताहर/येडूर धर्म हा मनुष्याचा मूलमंत्र आहे. देव ‘वर’ ही देत नाही, ‘शाप’ ही देत नाही, तो अवकाश देत असतो. सर्वांनी धर्माचे तत्व समजून घेतले पाहिजे. धर्मगुरुंच्या आशीर्वादाची समाजाला गरज आहे. राजकारणात धर्म हवा, पण धर्मात राजकारण असता कामा नये, असे मत उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी व्यक्त केले. येडूर येथे वीरभद्रेश्वर देवस्थान, काडसिद्धेश्वर मठ [...]
नोटा दुप्पट करण्याच्या आमिषाने 34 लाखांची लुबाडणूक
सीमाभागातटोळीपुन्हासक्रिय: विजापूरच्याइसमाचीफसवणूक बेळगाव : सीमाभागातील तालुक्यात नोटा दुप्पट करण्याचे व्यवहार पुन्हा सुरू झाले आहेत. एकेकाळी केवळ बेळगावच नव्हे तर शेजारच्या हुबळी-धारवाड व महाराष्ट्रातील टोळ्याही हा व्यवसाय करायच्या. मध्यंतरी तो बंद झाला होता. आता पुन्हा सुरू झाला आहे. मुधोळ पोलिसांनी बेळगाव जिल्ह्यातील एका तरुणासह सहा जणांवर एफआयआर दाखल केल्यामुळे जिल्ह्यात नोटा दुप्पट करण्याचा व्यवसाय पुन्हा सुरू [...]
मनपाच्या कारवाईला दुकाने बंद ठेवून विरोध
बापटगल्लीतीलघटना: अधिकाऱ्यांनाघातलाघेराव: व्यापारपरवानानूतनीकरणासवेळदेण्याचीमागणी बेळगाव : कोणत्याही प्रकारची पूर्वकल्पना किंवा नोटीस देण्यापूर्वीच मनपाकडून व्यापार परवाना नूतनीकरण न केलेल्या व्यापाऱ्यांवर अचानक दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यामुळे व्यापार परवाना नूतनीकरण करण्यास वेळ द्यावा, अशी मागणी केली. पण सदर मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने संतप्त व्यापाऱ्यांनी गुरुवारी बापट गल्लीतील दुकाने बंद ठेवून मनपाच्या कारवाईचा निषेध केला. तसेच कारवाई करण्यासाठी आलेल्या [...]
एकेरी वाहतूक असलेल्या गल्लीतून दुहेरी वाहतूक
शहराच्यामुख्यबाजारपेठेतहोतोयचक्काजाम: वाहतूकपोलिसांचेदुर्लक्ष बेळगाव : शहरातील वाहतूक व्यवस्थेचे अक्षरश: तीनतेरा झाले आहेत. मात्र याचे देणे-घेणे रहदारी पोलिसांना राहिलेले नाही. शहरातील एकेरी वाहतूक असलेल्या गल्लीतून दुहेरी वाहतूक सुरू आहे. पण पोलिसांकडून कोणत्याच प्रकारची कारवाई होत नसल्याने जिकडेतिकडे चक्काजाम होत आहे. त्यामुळे त्याचा नाहक त्रास वाहनचालक व व्यापाऱ्यांना सहन करावा लागत आहे. वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षपणामुळे तीव्र संताप व्यक्त [...]
हिंदवाडीत गॅस पाईपलाईनच्या गळतीमुळे नागरिकांची तारांबळ
बेळगाव : हिंदवाडी येथील जैन कॉलेजनजीक मेगा गॅस कंपनीच्या पाईपलाईनला गळती लागल्याने गुरुवारी दुपारी नागरिकांची एकच तारांबळ उडाली. लागलीच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. मेगा गॅस कंपनीच्या अधिकाऱ्यांना तात्काळ माहिती कळविण्यात आल्यानंतर कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन गॅस पुरवठा बंद केला. त्यानंतर दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्याने परिसरातील रहिवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. यासाठी नगरसेवक नितीन जाधव [...]

26 C