सीआरपीएफचे वाहन कालव्यात कोसळले
नऊ सीआरपीएफ जवान जखमी, रुग्णालयात दाखल वृत्तसंस्था/ श्रीनगर जम्मू काश्मीरची राजधानी श्रीनगरमध्ये शनिवारी एक मोठा अपघात झाला. सीआरपीएफचे एक मोबाईल बंकर वाहन कालव्यात कोसळल्यामुळे नऊ सैनिक जखमी झाले. ही घटना उमर हेअर सौरा परिसरात नदीकाठाजवळ बंकर ड्युटीवर असताना घडली. वृत्तानुसार, ए/21 बटालियनचा मोबाईल बंकर वाहन नदीकाठाजवळ तैनात होते. अचानक काही कारणास्तव वाहन कालव्यात कोसळले. या [...]
परीक्षेआधीच व्हॉट्सअॅप ग्रुपवर बारावीचा पेपर फुटला; प्रकरणाची चौकशी सुरू
नागपूर शहरात बारावी परीक्षेतील पेपर परीक्षेआधीच फुटल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नागपूरच्या सेंट उर्सुला परीक्षा केंद्रावर बारावीच्या विज्ञान शाखेतील केमिस्ट्री आणि फिजिक्स या दोन विषयांचे पेपर परीक्षेपूर्वीच व्हॉट्सअॅपवर पसरवल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ‘XII’ नावाने तयार करण्यात आलेल्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर […]
क्रिकेटपटू शिखर धवनची नवी इनिंग, मैत्रिण सोफीसोबत चढला बोहल्यावर
माजी हिंदुस्थानी क्रिकेटपटू शिखर धवनने त्याच्या आयुष्यात एक नवी इनिंग सुरू केली आहे. ‘गब्बर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धवनने शनिवारी एका खाजगी समारंभात त्याची जुनी मैत्रीण सोफी शाइनसोबत लग्न केले. हा विवाह सोहळा अत्यंत साधेपणाने आणि जवळच्या मित्र आणि कुटुंबाच्या उपस्थितीत पार पडला. धवन आणि सोफी गेल्या काही वर्षांपासून डेटिंग करत होते. परंतु हे नाते मात्र […]
Ratnagiri News –कसब्यातील देशमुख कुटुंबावर आघात, मुलीनंतर वर्षभरात वडिलांचाही अपघाती मृत्यू
संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथे देशमुख कुटुंबावर अवघ्या एका वर्षात दुसऱ्यांदा दुःखांचा डोंगर कोसळल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. गेल्या वर्षी अल्पवयीन मुलीच्या मृत्यूने हादरलेल्या या कुटुंबावर यंदा कुटुंबप्रमुखांच्या अपघाती मृत्यूचा आघात झाला आहे. गेल्या वर्षी २२ फेब्रुवारीला गजेंद्र देशमुख यांची १३ वर्षीय कन्या मृण्मयी ही इयत्ता आठवीत शिक्षण घेत असताना, तिला त्या दिवशी सकाळी शाळेत […]
भाजप आमदाराला 5 लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; लोकायुक्तांची कारवाई
कर्नाटकातील गदग जिल्ह्यातील लोकायुक्तांनी शिरहट्टी विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार चंद्रू लमाणी यांना लाच घेतल्याच्या आरोपाखाली सापळा रचून अटक केली. आमदाराला कंत्राटदाराकडून लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. या कारवाईनंतर आमदाराची चौकशी करण्यात येत असून प्रकरणाचा तपास सुरू आहे. कर्नाटकातील गदग येथे लोकायुक्तांनी शिरहट्टीचे भाजप आमदार चंद्रू लमाणी यांना सापळा रचून केलेल्या कारवाईत 5 लाखांची लाच घेताना […]
आहारात पपईचा समावेश करणे का गरजेचे आहे
पपईचे झाड आयुर्वेदिक औषधांमध्ये खूप उपयुक्त मानले जाते. त्याची फळे आणि पाने मानवी आरोग्य सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. म्हणून रोज पपईचा वापर आहारात करायलाच हवा. दैनंदिन जीवनात पपईचा समावेश केल्याने, अनेक आजारांपासून बचाव होऊ शकतो. पपईच्या फळांचा आणि पानांचा असाच उल्लेख आयुर्वेदातही आढळतो. पपई हे एक अत्यंत पौष्टिक फळ आहे जे पचन सुधारण्यास, बद्धकोष्ठतेपासून मुक्त […]
राहुल गांधी भारतीय जनता पक्षाच्या धमक्यांना घाबरणारे नेते नाहीत –हर्षवर्धन सपकाळ
राहुल गांधी हे देशहितासाठी निडर आणि बेधडकपणे काम करत आहेत. देशातील लोकशाही व संविधान रक्षणासाठी ते कशाचीही तमा न बाळगता लढत आहेत. स्वतःच्या जिवाला धोका असतानाही कन्याकुमारी ते कश्मीर व मणिपूर ते मुंबई अशी हजारो किलोमिटरची पदयात्रा काढून ‘भारत जोडो’ व ‘डरो मत’चा संदेश त्यांनी जनतेला दिला आहे. भाजप धमकी देणारा व पाठीत वार करणारा […]
T20 World Cup –सुपर 8 चा दंगा अन् पावसाचा पंगा! वरुणराजा गणित बिघडवणार? काय आहे ICC चा नियम
टी20 वर्ल्ड कपचा थरार आता सुपर 8 च्या लढतीमुळे अधिक रोमांचकारी आणि रंगतदार होणार आहे. त्यामुळे चाहत्यांनीही आपापल्या संघांना पाठिंबा दर्शवण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. परंतू त्यांच्या या तयारीवर पाऊस पाणी फेरू शकतो. साखळी फेरीतील लढतींमध्ये पावसाने कोणताही व्यत्यय आणला नाही. मात्र, सुपर 8 मध्ये पावसाने राडा केला तर काय होणार? अशा परिस्थितीसाठी ICC ने […]
चेहऱ्यावर बर्फ लावण्याचे अगणित फायदे
उन्हाळ्यात चेहरा काळवंडतो अशावेळी पार्लरमध्ये जाऊन, महागडे उपचार करण्यापेक्षा घरी स्वस्त आणि मस्त उपाय करता येतो. उन्हाळ्यात आपल्या चेहऱ्याला बर्फ लावल्याने अनेक फायदे होतात. आपल्या चेहऱ्याची त्वचा बर्फ लावल्याने, अधिक खुलते. त्यामुळेच सध्याच्या घडीला चेहऱ्याला बर्फ लावण्याचे प्रमाण वाढलेले आहे. सकाळी चेहऱ्यावर बर्फ चोळल्याने रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळते. शिवाय, ते त्वचेला […]
बाळाच्या मृत्यूच्या नैराश्यातून मातेची गळफासाने आत्महत्या
सावंतवाडी – माजगाव गरड येथे भाड्याने राहणाऱ्या (21) वर्षीय नवविवाहितेने खोलीत गळफास लावून आत्महत्या केल्याचा प्रकार शुक्रवारी सायंकाळी घडला. सौ. प्रीती प्रल्हाद केतकर, पूर्वाश्रमाची तनुजा मनोहर बागडी, मूळ राहणार (दुंडगे, चंदगड जिल्हा कोल्हापूर )असे मयत नवविवाहितेचे नाव आहे. या घटनेची फिर्याद नारायण विठोबा बागडी (35) नागझर मोपा ,पेडणे गोवा यांनी पोलीस ठाण्यात दिल्यावरून आकस्मित मृत्यूची [...]
महाराष्ट्र पोलीस दलाला हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. जातिवाचक अपमान आणि छळ होत असल्याचा आरोप रायगड जिल्ह्यातील महाड शहर पोलीस ठाण्यातील एका पोलीस निरीक्षकाने (PI) केला आहे. या प्रकरणात 2 पोलीस अधीक्षक आणि अपर पोलीस अधीक्षकांसह ७ अधिकाऱ्यांवर पीआयने गंभीर आरोप केले आहेत. तसेच थेट डीआयजींना पत्र लिहिले असून कुटुंबासह आयुष्य संपवण्याचा इशारा दिला […]
Beed News –फरार कृष्णा आंधळे तीनदा गावात येऊन गेला, धनंजय देशमुख यांचा दावा
मस्साजोग येथील सरपंच स्व.संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार कृष्णा आंधळे हा तीन वेळा त्याच्या गावी येऊन गेला असा धक्कादायक खुलासा संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आज माध्यमांशी बोलताना केला आहे. ही माहिती आम्हाला मिळाली आहे. ती आम्ही सीआयडी कार्यालयाला कळवली आहे. कृष्णा तीनवेळा गावात येऊन गेल्याची माहिती खरी आहे. त्यांनी देखील हे मान्य […]
हिंदुस्थानच्या महिला संघाचा सध्या ऑस्ट्रेलिया दौरा सुरू आहे. या दौऱ्यातील तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना आज (21 फेब्रुवारी 2026) अॅडलेडमध्ये खेळला गेला. दोन्ही संघांसाठी हा सामना मालिका विजयाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण होता. अटीतटीच्या झालेल्या य लढतीत टीम इंडियाने बाजी मारत ऑस्ट्रेलियाचा 17 धावांनी पराभव केला आणि मालिका जिंकली. या मालिका विजयासह टीम इंडियाची […]
Beed News –मंडपात परीक्षा, केंद्रप्रमुखांवार कारवाई, गटशिक्षणाधिकारी मोकाट का?
दहावीच्या परीक्षा चक्क मंडप टाकून घेण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार बीड तालुक्यात उघडकीस आला, या प्रकरणी केंद्रप्रमुख तथा मुख्याध्यापक यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत शिक्षण अधिकारी प्रियाराणी पाटील यांनी दिले. या प्रकरणात केंद्रप्रमुख जेवढे जबाबदार आहेत तेवढेच गटशिक्षणाधिकारी समंदर खान आणि शिक्षण विस्तार अधिकारी हे देखील जबाबदार असताना शिक्षणाधिकारी पाटील मॅडम या आपल्या अधिकार्यांना का पाठीशी […]
हिंदुस्थान-ब्राझील व्यापार करारावर स्वाक्षरी; व्यापार 20 अब्ज डॉलर्सच्या पुढे नेण्याचे ध्येय
हिंदुस्थान आणि ब्राझील व्यापार करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. या दोन्ही देशांनी व्यापार 20 अब्ज डॉलर्सच्या पुढे नेण्याचे ध्येय ठेवले आहे. हिंदुस्थान-ब्राझील व्यापार करार पंतप्रधान मोदी आणि ब्राझीलचे अध्यक्ष लुला दा सिल्वा यांच्यातील चर्चेमुळे झाला आहे. त्यामुळे व्यापार, तंत्रज्ञान आणि एआय सहकार्याला एक नवीन दिशा मिळाली असून याला चालना मिळणार आहे. हिंदुस्थान आणि ब्राझीलमध्ये व्यापार […]
जेवणानंतर 100 पावलं का चालायला हवे, जाणून घ्या
रात्रीच्या जेवणानंतर चालण्यामुळे रात्रीचे जेवण आणि झोप यामध्ये अंतर राहते. तसेच मुख्य म्हणजे आपली पचनशक्ती सुधारते. रात्रीच्या जेवणानंतर फिरायला जाण्यामुळे आपली पाचन प्रणाली निरोगी राहते. पोटाशी संबंधित इतर कोणत्याही समस्येपासून आराम मिळतो. आपल्याकडे आजही जेवणानंतर लगेच झोपू नये असं सांगितलं जातं. पूर्वीची जुनी-जाणती माणसं कायम म्हणायची, की शतपावली करा. काय असेल बरं या सर्वांमागचं कारण… […]
धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव शहरातील भीमनगर परिसरात राहणाऱ्या रेखा महावीर बनसोडे यांच्या घरामध्ये अचानक झालेल्या शॉर्टसर्किटमुळे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेत घरातील जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्याने कुटुंबीयांवर आर्थिक संकट कोसळले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घरातील वीजवाहिनीत बिघाड झाल्यामुळे शॉर्टसर्किट होऊन आग लागली. या आगीत फर्निचर, कपडे, धान्यसाठा शालेय साहित्य तसेच इतर आवश्यक साहित्य जळून नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र संपूर्ण कुटुंब हादरून गेले आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक व परिसरातील नागरिकांनी तत्काळ धाव घेऊन आग आटोक्यात आणण्यास मदत केली. स्थानिक प्रशासनालाही घटनेची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, संबंधित कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने शासनाने पंचनामा करून तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. आपत्तीग्रस्त कुटुंबाला त्वरित दिलासा देण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
धाराशिव (प्रतिनिधी)- शालेय शिक्षण विभाग व महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांच्या वतीने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांतील शाळांमध्ये मुलींसाठी राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा अभियानांतर्गत प्रशिक्षण देण्यात येत आहे. या प्रशिक्षणामध्ये मुलींना स्व संरक्षणासाठी आवश्यक विविध प्रकारातील प्रशिक्षण प्रशिक्षक मार्फत देण्यात येत आहे. राज्यातील मुलींना प्रशिक्षण देणाऱ्या या प्रशिक्षकांनी अधिकाधिक अद्यावत व परिपूर्ण प्रशिक्षण देता यावे, यासाठी राज्यभरातील महिला प्रशिक्षकांची कार्यशाळा अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील आत्मा मलिक इंटरनॅशनल स्कूल कोकमठाण येथे,आयोजित करण्यात आली होती. हे प्रशिक्षण शिबिर 17 व 18 फेब्रुवारी ला पूर्ण झाले. प्रशिक्षणात राज्यभरातील 5 हजार महिला प्रशिक्षक सहभागी झाले होते . शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या संकल्पनेतून व राष्ट्र प्रथम या ध्येयाची विकसित रूप म्हणून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या मार्गदर्शनाने,तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षक शिफू भारद्वाज व त्यांच्या टीम ने या कार्यशाळेत प्रशिक्षणाद्वारे मार्गदर्शन व सराव करून घेतला आहे. या महिला प्रशिक्षणार्थीना राज्यभरातील शाळांमध्ये अधिकाधिक सक्षमपणे प्रशिक्षण घेता यावे, यासाठी अधिक प्रशिक्षित करण्यात आले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रशिक्षकांना प्रमाणपत्र देण्यात आले. शासनाच्या महिला सबलीकरण आत्मसंरक्षण व आत्मविश्वास वाढीसाठी हा उपक्रम महत्त्वकांक्षी ठरणार असल्याचा विश्वास शिक्षण विभागाच्यावतीने व्यक्त करण्यात आला.
विद्यापीठ उपपरिसरात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव निमित्त विशेष व्याख्यान
धाराशिव (प्रतिनिधी)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसर मुख्य प्रशासकीय इमारतीमधील सभागृहात प्रा. डॉ. हरिदास फेरे, प्राचार्य, वसंतराव काळे महाविद्यालय, ढोकी यांचे जागतिक सहस्राकाचे भारतीय महानायक या विषयावर विशेष व्याख्यान संपन्न झाले. विद्यापीठ उपपरिसराचे संचालक, प्रा. डॉ. रमेश चौगुले यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. प्रा. डॉ. हरिदास फेरे, यांनी आपल्या विशेष व्याख्यानात “जागतिक सहस्रकाचे भारतीय महानायक: छत्रपती शिवाजी महाराज “ या विषयावर आपले मत मांडले. लोकशाहीच्या काळात सुद्धा त्यांचे कार्याचे महत्व जाणवते. छत्रपती शिवाजी महाराजांनी लोकशाही मुल्य जपले. त्यांनी स्वराज्य निर्माण केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातून प्रेरणा घेतली पाहिजे. भविष्याची दिशा निश्चित केली पाहिजे. त्यांनी देशासाठी महत्वपूर्ण योगदान दिले. छत्रपती शिवाजी महाराज जागतिक सहस्रकाचे भारतीय महानायक आहेत. मानवतेचे मुल्य रुजविले. तानाजी मालुसरे यांनी अभेद्य कोढांणा किल्ला जिंकण्यासाठी सर्वस्व पणाला लावून लढले, स्वराज्य वरील निष्ठा प्रखर , अढळ होती. कर्तव्य प्रामाणिक भावनेने कार्य करणारे सरकारी लाभले. हिरोची इंदलकरांनी किल्ले निर्मितीत महत्वपूर्ण योगदान दिले. महाराजांना निष्ठावंत सवंगडयांचे सहकार्य लाभले. प्रत्येक व्यक्तीच्या मनात स्वराज्य विषयी प्रेम निर्माण केले. लोकशाहीतील सर्व मुल्ये स्वराज्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी जपले. न्यायाच्या तत्वावर त्यांनी राज्यकारभार केला. स्वराज्य सामान्य माणसांच्या हितासाठी होते. महान मूल्यांचे संवर्धन केल्यास लोकशाही मजबूत होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले. संचालक, प्रा. डॉ. रमेश चौगुले यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्रातून प्रेरणा घेऊन आपण सर्वांनी प्रामाणिकपणा, निष्ठेने आपले कार्य केले पाहिजे. डॉ. गणेश शिंदे, समन्वयक, विद्यार्थी विकास विभाग यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. डॉ. जितेंद्र शिंदे यांनी आभार मानले. सदर कार्यक्रमास शैक्षणिक व प्रशासकीय विभागप्रमुख, प्राध्यापक, अधिकारी, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
डीजेच्या तालावर नाही तर छत्रपतींच्या विचारावर शिवजयंती साजरी करावी- प्रा. अशोक पाटील
भूम (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती समाजात मोठ्या उत्साहात साजरी होणे गरजेचे आहे. ही जयंती डीजे या तालावर नाही तर शिवरायांच्या विचारांच्या प्रेरणेवर साजरी करणे गरजेचे आहे. महापुरुषांना आपण जातीत वाटून घेतले आहे. ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे. असे प्रतिपादन व्याख्याते प्रा. अशोक पाटील यांनी केले. ते भूम पोलीस ठाण्याच्या वतीने कम्युनिटी पोलिसिंग अंतर्गत आयोजित व्याख्यान प्रसंगी बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल चोरमले, प्रमुख पाहुणे अशोक सावळे, सचिन उकिरडे हे होते. यावेळी पुढे प्रा. पाटील म्हणाले की, शिवरायांचा जयजयकार फक्त जयंती पुरता करू नये. त्यांच्या विचारांचे अंजन डोळ्यात घालून जगणे गरजेचे आहे.शिवचरित्र वाचणे गरजेचे आहे. थोर पुरुषांचे दैवतीकरण करून चालणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे मुस्लिमांचे कधीही शत्रू नव्हते. ते सर्व धर्मियांना सोबत घेऊन जाणारे होते. आज समाज ज्या मार्गाने चालला आहे तो समाज कदापिही छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना तसेच महामानवांना, संतांना मान्य नव्हता. छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार विचार परदेशात पोहोचले. त्या ठिकाणी त्यांचे आचरण केले जाते. मात्र आपल्या देशामध्ये त्याचे आचरण होत नाही हे दुर्दैव आहे असे ते म्हणाल यावेळी अरुण शाळू महाराज, दिलीप गाढवे, एस पी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संतोष शिंदे, अंबादास वरवडे, ॲड अमरसिंह ढगे, ॲड पंडित ढगे, प्रा अरुण गाढवे, सोमनाथ गुंजाळ, वैजिनाथ गपाट यांच्यासह माजी सैनिक, शाळा महाविद्यालयाचे प्राचार्य, मुख्याध्यापक, व्यावसायीक, पोलीस अधिकारी, कर्मचारी, पोलीस पाटील, विद्यार्थी मोठया संख्येने हजर होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा. मोहन राठोड यांनी केले. तर आभार सहायक पोलिस निरीक्षक संजय झराड यांनी मानले.
पंजाब आणि कश्मीरमध्ये स्फोटके सापडली; सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर
पंजाब आणि कश्मीरमध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी स्फोटके (आयईडी,इम्प्रोवाइज्ड एक्सप्लोझिव्ह डिव्हाइसेस) आढळल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी हाय अलर्ट जारी केला आहे. पाकिस्तानी दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाकडून दिल्लीला हल्ल्याची धमकी मिळाल्यानंतर ही जप्ती करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी या आयईडी जप्तीचा दिल्लीतील दहशतवादी धोक्याशी थेट संबंध जोडला नसला तरी ही स्फोटके सापडल्यानंतर सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर आहेत. पाकिस्तानची दहशतवादी संघटना लष्कर […]
ICC T20 World Cup 2026 सुपर 8 ची रणधुमाळी आजपासून (21 फेब्रुवारी 2026) सुरू होणार आहे. न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सुपर 8 चा पहिला सामना खेळला जाईल. टीम इंडिया आपल्या सुपर 8 च्या मोहिमेला 22 फेब्रुवारी पासून सुरुवात करणार आहे. दक्षिण आफ्रिकेवरुद्ध अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन्ही तुल्यबळ संघांमध्ये द्वंद्व पाहायला मिळेल. तत्पूर्वी टीम इंडियाच्या […]
निकोप आरोग्यासाठी क्रीडा स्पर्धांची गरज - जिल्हाधिकारी पुजार
धाराशिव (प्रतिनिधी)- आश्रम शाळांमध्ये काम करणे मोठे कसरतीचे काम आहे. त्यामुळे आश्रमशाळांमध्ये नोकरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निकोप आरोग्यासाठी क्रीडा स्पर्धांचे सतत आयोजन करून त्यांच्या क्रीडा गुणांना वाव देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केले. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय सोलापूर अंतर्गत शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दोन दिवसीय क्रीडा स्पर्धेचे धाराशिव येथील श्री तुळजाभवानी स्टेडियमवर शनिवार, दि.21 फेब्रुवारी रोजी उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. उदघाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी धनंजय झाकर्डे, आदिवासी पारधी महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील काळे, तालुका क्रीडा अधिकारी भैरूनाथ नाईकवाडी, सुधीर पवार,सरतापे, माळवे, गायकवाड, धुमाळ, कांबळे, बुरंगे, सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी दीप प्रज्वलन, क्रीडा ज्योत प्रज्वलन, क्रीडा ध्वजारोहण व आदिवासी क्रांतिकारकांच्या प्रतिमांचे पूजन करून स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले. त्यानंतर पहिला क्रिकेट सामना आश्रमशाळा सवतगव्हाण आणि प्रकल्प कार्यालय सोलापूर या संघात झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. विजापुरे यांनी केले. उदघाटन सोहळ्यास अधिकारी, कर्मचारी व क्रीडाप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या संघाचा स्पर्धेत सहभाग क्रीडा स्पर्धेत तीन आश्रमशाळा आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय व वसतिगृह यांचा एकत्रित असे चार संघ सहभागी झाले असून यात अधिकारी व कर्मचारी महिला, पुरुष खेळाडूंचा सहभाग असल्याची माहिती एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय सोलापूरचे प्रकल्प अधिकारी धनंजय झाकर्डे यांनी दिली.
महिलांच्या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत सारोळ्याच्या प्रगती संघाने मारली बाजी
तुळजापूर (प्रतिनिधी)- अमहिला एकदा संसारामध्ये गुरफुटल्या तर त्यांना चूल व मूल यातून बाहेर निघणे अशक्यच असते. त्यामुळे त्यांच्या शरीराची हालचालही होत नसल्याने आरोग्यावर परिणाम होत आहे. याचाच विचार करून महिलांनीही क्रीडांगणावर उतरले पाहिजे, तिने कोणता तरी शारीरिक खेळ हा खेळला पाहिजे जेणेकरून ती शारिरीक तंदुरूस्तीमुळे आरोग्य विषयक सक्षम होईल या उदात्त हेतूने कोरो इंडिया व एकल महिला संघटना यांच्या वतीने दरवर्षी तालुका व जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले जाते. त्याचाच एक भाग म्हणून 8 मार्च या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दिनांक 16 फेब्रुवारी 2026 रोजी तुळजाभवानी स्टेडियम तुळजापूर येथे तालुकास्तरीय महिला कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये सारोळा येथील प्रगती महिला संघाने प्रथम क्रमांक, तीर्थ येथील पंचशील महिला संघ द्वितीय तर बोरी येथील रमाई महिला संघाने तृतीय क्रमांक पटकावला. विजेत्या संघांना विजयालक्ष्मी फार्मर कंपनी एस. एस. पी. तर्फे प्रथम बक्षीस पाच हजार, पोलीस मित्र संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष अनिता लष्करे यांच्यातर्फे तीन हजार तर हंगरगा (तुळ) चे सरपंच रवी शिरसट यांच्यातर्फे दोन हजार रोख रक्कम, ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. यावेळी विजयालक्ष्मी फार्मर कंपनीच्या संचालिका सौ. वैशाली घुगे, एकल महिला संघटना कोरोच्या सौ. श्वेता पगारे, पोलीस मित्र संघटनेच्या संस्थापक अध्यक्षा श्रीमती अनिता लष्करे, एकल महिला संघटना तुळजापूर तालुका अध्यक्षा सौ. पार्वती भगत, तालुका क्रीडा अधिकारी पवार आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेमध्ये तब्बल 11 संघांनी सहभाग घेतला होता. सर्व संघाच्या खेळाडूंना तालुका क्रीडा अधिकारी पवार यांनी मार्गदर्शन केले. सदर स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी कोरो इंडिया व एकल महिला संघटनेच्या पदाधिकारी उज्वला पवार, सुवर्णा नन्नवरे, उर्मिला म्हंकराज, सुरेखा भोसले, महानंदा चव्हाण कोरोची सर्व पदाधिकारी आदींनी परिश्रम घेतले. स्पर्धा पाहण्यासाठी तुळजापूर शहरासह तालुक्यातील विविध गावच्या महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या.
देशाच्या विकासासाठी संशोधन महत्वाचे आहे - प्राचार्य डॉ. संतोष उंदरे
परंडा (प्रतिनिधी)- देशाच्या विकासासाठी संशोधन महत्वाचे आहे आणि त्यासाठी विद्यार्थ्यांनी जिद्द चिकाटी घेऊन प्रत्येक विषयामध्ये संशोधन करावे असे प्रतिपादन बलभीम महाविद्यालय बीड येथील प्राचार्य डॉ.संतोष उंदरे यांनी केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर आणि शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालय परंडा यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. सी.व्ही.रमण व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. व्याख्यानमालेमध्ये उद्घाटन प्रसंगी बोलताना प्राचार्य डॉ. संतोष उंदरे बोलत होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली व अध्यक्षतेखाली डॉ.सी.व्ही.रमण व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ.महेशकुमार माने उपस्थित होते.व्यासपीठावर प्राचार्य डॉ.संतोष उंदरे दयानंद महाविद्यालय लातूर येथील भौतिकशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ.महादेव पांडगे ,शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय लातूर येथील डॉ रविकिरण बिराजदार, उप प्राचार्य डॉ.महेशकुमार माने मराठी विभाग प्रमुख डॉ.गजेंद्र रंदील डॉ.अक्षय घुमरे डॉ. विद्याधर नलवडे, सायन्स फोरमचे चेअरमन डॉ.अमर गोरे पाटील कार्यालयीन अधीक्षक श्रीमती पद्मा शिंदे यांची उपस्थिती होती. याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ.शहाजी चंदनशिवे व डॉ.अक्षय घुमरे यांनी करून दिला यावेळी डॉ.महादेव पांडगे यांनी रमन इफेक्ट इन स्पेस अँड ऍस्ट्रोफिजिक्स या विषयावर पीपीटी द्वारे उपस्थित विद्यार्थ्यांना आपल्या व्याख्यानाचे सादरीकरण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक डॉ.विद्याधर नलावडे यांनी केले या कार्यक्रमासाठी पदवी पदव्युत्तर विद्यार्थी संशोधक विद्यार्थी तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक सहशिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.शेवटी डॉ.सचिन चव्हाण यांनी आभार मानले.
धाराशिव (प्रतिनिधी)- उमरगा तालुक्यातील भगतवाडी ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत विकास कामाच्या नावाखाली लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केला असून संबंधितांकडून वसुली करावी असे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेले आहेत. मात्र आदेश देऊन नऊ महिन्यांचा कालावधी लोटला तरी संबंधितावर कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही. विशेष म्हणजे कारवाई न केल्यामुळे भ्रष्टाचाऱ्यांचे मनोबल वाढून पुन्हा नव्याने भ्रष्टाचार करीत असल्याचा आरोप करीत संबंधितावर तात्काळ कारवाई करावी. अन्यथा दि.26 फेब्रुवारीपासून जुन्या ग्रामपंचायत कार्यालयासमोर ग्रामस्थ उपोषण करणार असल्याचा इशारा बलभीम इर्ले व सुभाष वाघमोडे यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना दि.20 फेब्रुवारी रोजी दिला आहे. दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, उमरगा तालुक्यातील भगतवाडी, कोळेवाडी व चिरेवाडी या ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत भगतवाडी येथील नागरिकांना सार्वजनिक शौचालय मंजूर होते. ते गावालगत किंवा बाहेरील बाजूस बांधणी अपेक्षित होते. या संदर्भात कोणालाही न विचारता मनमानीपणे ते चक्क जिल्हा परिषद शाळेच्या आवारात बांधलेले आहे. ते शौचालय बांधण्याची परवानगी कोणी दिली ? त्यामुळे त्याचा सार्वजनिकरित्या वापर करता येत नाही. तर गावामध्ये गटार बांधली गेली त्याचे अर्धवटच काम केले असून ती किती मीटर लांबीमध्ये बांधायचे होते किंवा त्यासाठी किती बजेटची तरतूद करण्यात आली ? याची चौकशी करण्यात यावी. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विहिरी मंजूर झाल्या म्हणून शेतकऱ्यांनी व्याजाने पैसे काढले व विहिरी खोदल्या. मात्र, रोजगार सेवक व ग्रामसेवक यांनी एकाही शेतकऱ्याचे कुठलेही बिल काढलेले नाही त्याची चौकशी करावी. तर अटल भूजल स्पर्धेमध्ये भगतवाडी, कोळेवाडी व चिरेवाडी या गावास मिळालेली 20 लाख रुपयांची बक्षीस रक्कम सरपंच व ग्रामसेवक यांनी त्याची मनमानीपणे कुठे उधळपट्टी केली ? त्याची चौकशी करावी. तसेच ग्रामपंचायत कार्यालयासमोर लाखो रुपये खर्चून पेवर ब्लॉक बसवले असून ते काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले आहे. त्याच्याखाली गच्चीकरण न करता फक्त डस्ट पसरवून ब्लॉक सेट केलेले असून त्या कामाची चौकशी करावी. गावासाठी खरेदी केलेल्या वस्तू ते दोघे दाखवीत नाहीत. शेतकरी सहलीवर देखील खर्च दाखवले आहेत त्याचीही चौकशी करावी. विशेष म्हणजे ऑक्टोबर 2015 ते फेब्रुवारी 2026 या कालावधीत चक्क 26 लाख 504 रुपये निधी खर्च केला आहे त्याची चौकशी करावी. तसेच दिनांक 9 फेब्रुवारी पासून ग्रामपंचायत कार्यालयावर प्रशासकाची नेमणूक होणार असल्याचे समजतात सरपंच व ग्रामसेवक यांनी दि.5 व 6 2026 या दोन दिवसांमध्ये 6 लाख 22 हजार 706 रुपये बँकेतून नियमबाह्य काढलेले आहेत. मात्र सामान आणलेले नाही. त्यामुळे त्याची चौकशी करून सरपंच व ग्रामसेवक या दोन्ही दोषींवर कारवाई करण्यात यावीत, अशी मागणी त्यांनी केली आहे. कारवाई करण्यास टाळाटाळ केली तर ग्रामस्थांसह ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. यावर बलभीम इर्ले, सुभाष वाघमोडे, भगवान पालमपल्ले, ज्ञानेश्वर पालमपल्ले, वंदना इर्ले व मंगलबाई नंजारे यांच्या सह्या आहेत.
वाचन लेखन कौशल्य साधना म्हणून गृहण करणे काळाची गरज- डॉ. कैलास अंभुरे
धाराशिव (प्रतिनिधी)- कविते सारखा साहित्यिक प्रकार हा साहित्यात महत्वाचा मानला गेला आहे. इथे कमी शब्दात भाव अभिव्यक्ती होत असते. कविता म्हणजे अस्तित्वाचे गीत असते. स्वतःच आपल्या जीवनाची राख उडवत जगण्यात एक वेगळाच आनंद असतो. वाचनात सातत्य असले की चिंतन क्षमता वाढते, चिंतन क्षमता वाढली की सृजनशीलता वाढीस लागते आणि सृजनशीलतेतुन साहित्यिक जन्म घेत असतात असे प्रतिपादन डॉ. कैलास अंभुरे यांनी केले. येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी, हिंदी इंग्रजी भाषा विभागांतर्गत नवोदित लेखक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेच्या उद्घाटन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. कैलास अंभुरे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यशाळेच्या मान्यतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संदीप देशमुख यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली. रामकृष्ण परमहंस महाविद्यालय हे मराठवाड्यातील खऱ्या अर्थाने ज्ञान केंद्र असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी तरुणांचे नेतृत्व करणारे संवेदनशील कवी रविंद्र केसकर, डॉ.विद्या देशमुख, डॉ विनोदकुमार वायचळ, कनिष्ठ विभाग प्रमुख प्रा बबन सुर्यवंशी, डॉ.सी.आर.दापके, डॉ केशव क्षीरसागर, प्रा राजा जगताप यांच्या सह सर्व शिक्षक सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ अरविंद हंगरगेकर यांनी केले. तर आभार डॉ सी आर दापके यांनी मानले.
भूम तालुक्यात एसएससी परीक्षा सुरळीत; 96.37 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती
भूम (प्रतिनिधी)- भूम तालुक्यातील पाच परीक्षा केंद्रांवर माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (एसएससी) परीक्षा शांततेत व सुरळीतपणे सुरू झाली आहे. रवींद्र हायस्कूल भूम, गुरुदेव दत्त हायस्कूल भूम, विनायक विद्यालय इट, पाथरूड विद्यालय भूम, अंतरगाव विद्यालय भूम या ठिकाणी या ठिकाणी एसएससी परीक्षा सुरळीत पार पडल्या जात आहेत. पहिल्याच दिवशी प्रथम भाषा मराठी विषयाच्या परीक्षेसाठी एकूण 1521 विद्यार्थ्यांपैकी 1483 विद्यार्थी उपस्थित राहिले. तर उर्दू विषयासाठी 49 पैकी 30 विद्यार्थी परीक्षेला हजर होते. तालुक्यात मराठी माध्यमाचे 1521 व उर्दू माध्यमाचे 49 असे एकूण 1570 विद्यार्थी नोंदणीकृत आहेत. त्यापैकी 1513 विद्यार्थी उपस्थित राहिले असून एकूण उपस्थितीचे प्रमाण 96.37 टक्के इतके नोंदविण्यात आले आहे. मराठी माध्यमातील 38 व उर्दू माध्यमातील 19 विद्यार्थी अनुपस्थित राहिले. विशेष बाब म्हणजे दिव्यांग असलेले सर्व 10 विद्यार्थी परीक्षेला उपस्थित होते. परीक्षा पारदर्शक व सुरळीत पार पडावी यासाठी सर्व पाचही केंद्रांवर सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. विनायक देशमुख विद्यालय, ईट येथील परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही बसविण्यात आल्यानंतर विभागीय परीक्षा मंडळाच्या सूचनेनुसार केंद्र संचालक बदलण्यात आले आहेत. जिल्हा दक्षता समितीच्या आदेशानुसार सर्व पर्यवेक्षकांची नेमणूक त्यांच्या स्वतःच्या शाळेबाहेरील केंद्रांवर करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांची कसून तपासणी करूनच परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जात आहे. कोणतेही साहित्य वर्गात नेण्यास सक्त मनाई असून प्रत्येक केंद्रावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. केंद्राच्या आत व बाहेर अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. तालुक्यातील पाचही परीक्षा केंद्रांवर राहुल भट्टी हे परीरक्षक म्हणून काम पाहत आहेत. एकूणच, तालुक्यात एसएससी परीक्षेचा पहिला दिवस शांततेत आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला.
नवीन स्मार्ट कार्ड प्रणालीचा शुभारंभ
भूम (प्रतिनिधी)- नविन स्मार्ट कार्ड प्रणालीचा भूम येथील बस स्थानकात दि 20 फेब्रुवारी रोजी शुभारंभ करण्यात आला. जेष्ठ नागरिक वय वर्ष 75 वरील फ्री सवलत आसलेल्या प्रवाशांना सर्व महिलांना अंध अपंग व विद्यार्थी सवलत व सवलत नसलेल्या प्रवाशांनासुद्धा याचा सर्वाना लाभ घेता येणार आहे. याचा शुभारंभ आज करण्यात आला यावेळी एका महिला लाभार्थी यांची नोंदणी यावेळी करण्यात आली. यावेळी आगार प्रमुख साहेब उल्हास यशवंत शिनगारे, सहाय्यक कार्यशाळा अधिक्षक अभिजीत संजय कवडे, वाहतूक निरीक्षक नागेश सूर्यकांत गायकवाड, लिपीक गणेश वाघमारे, चालक गिरी, व स्मार्ट कार्ड कंपनीचे प्रतिनिधी मुकुंद यादव आनंद शिंन्दे व एस टी महामंडळाचे इतर कर्मचारी उपस्थित होते.
लाडक्या बहिणींच्या अर्जांतील त्रुटी मिशन मोडवर दूर करा- आमदार राणाजगजितसिंह पाटील
धाराशिव (प्रतिनिधी)- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ जिल्ह्यातील प्रत्येक पात्र बहिणीला मिळालाच पाहिजे, त्यासाठी आता जिल्हा प्रशासनाला मिशन मोडवर लाडक्या बहिणींच्या अर्जातील तांत्रिक त्रुटी आणि चुकीच्या माहितीमुळे रखडलेली 38 हजार 811 बहिणींची ई-केवायसी प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर आता प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे. जिल्ह्यात मोठ्या संख्येने माता भगिनींनी लाडकी बहीण या योजनेसाठी अर्ज केले आहेत. मात्र, तब्बल 38 हजार 811 अर्जांमध्ये माहिती भरताना चुका झाल्याचे समोर आले आहे. यामुळे या माता भगिनींची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. पर्यायाने त्यांच्या बँक खात्यात योजनेचे पैसे जमा होण्यास अडथळा निर्माण झाला आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पूजार यांना लाडक्या बहिणींच्या अर्जाच्या त्रुटी प्राधान्याने हाताळण्याच्या सूचना दिल्या. एकाही पात्र भगिनी वंचित राहता कामा नये जिल्ह्यातील अनेक माता-भगिनी केवळ तांत्रिक कारणास्तव योजनेच्या लाभापासून वंचित आहेत, हे चिंताजनक आहे. प्रशासनाने समन्वयाने काम करून या त्रुटी लवकरात लवकर दूर कराव्यात. महिलांनीही आपल्या गावातील ग्रामसेवक किंवा अंगणवाडी सेविकांशी संपर्क साधून आपले ई-केवायसी अपडेट करून घ्यावे, असे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.
आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिद्दीने प्रयत्न करावेत- राहुल गाढवे
भूम (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी बोलताना आजच्या युवकांनी शिवरायांसारखे स्वप्न पाहून स्वतःचे स्वराज्य उभे करावे. आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिद्दीने प्रयत्न करावेत. शिवरायांनी आपल्या स्वराज्यात मावळ्यां बरोबरच शेतकऱ्यांचाही सन्मान केला. असे प्रतिपादन राहुल गाढवे यांनी केले. वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शहरातील युवा उद्योजक बालाजी गिलबिले यांनी आपल्या निवासस्थानाच्या तिसऱ्या मजल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्य प्रतिमा उभी करून शिवजयंतीनिमित्त तिचे लोकार्पण मोठ्या उत्साहात केले. माजी सैनिक व मान्यवरांच्या हस्ते झालेल्या या सोहळ्याला नागरिकांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. या प्रसंगी गाढवे बोलत होते. गिलबिले यांचे वडील सैन्यातून निवृत्त झाल्याने इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर देशसेवेसाठी आयुष्य अर्पण करणाऱ्या जवानांचे प्रतीक उभारण्यात आले आहे. तर पहिल्या मजल्यावर “जय जवान, जय किसान” हा संदेश देत कष्टकरी शेतकऱ्याची प्रतिमा साकारण्यात आली आहे. या त्रिसूत्री संकल्पनेतून देशसेवा, शेतकरी सन्मान आणि शिवरायांचे राष्ट्रधर्म यांचा संगम साधण्यात आला आहे. शिवजयंती दिनी या उपक्रमाद्वारे गिलबिले यांनी नागरिकांना राष्ट्रभक्ती, कर्तव्यनिष्ठा आणि स्वराज्याच्या विचारांवर चालण्याचा संदेश दिला. त्यांच्या या अनोख्या संकल्पनेचे शहरभर कौतुक होत आहे.
महाराष्ट्रासह उत्तर हिंदुस्थान तापणार; दक्षिणेकडील राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, यलो अलर्ट जारी
राज्यासह देशातील वातावरण झपाट्याने बदत असून आता उकाडा जाणवायला लागला आहे. पुढील पाच दिवसात महाराष्ट्रासह उत्तर हिंदुस्थानात तापमानवाढ कायम राहणार आहे. तर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने दक्षिणेकडील १० राज्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तामिळनाडूपासून केरळपर्यंत सतर्कतेचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. नैऋत्य बंगालच्या उपसागरावर आणि हिंदी महासागरावर कमी दाबाच्या पट्ट्यामुळे २१ […]
क्रिकेट बरोबरच शिक्षणही तेवढेच महत्वाचे –दिलीप वेंगसरकर
क्रिकेट बरोबरच शिक्षणही तेवढेच महत्वाचे आहे. सध्या शालेय परीक्षांचा कालावधी सुरू आहे, त्यामुळे काही काळ क्रिकेटला थोडा विराम देऊन अभ्यासावर लक्ष केंद्रित करून परीक्षेत चांगले गुण मिळवून उत्तीर्ण होण्यावर लक्ष केंद्रित करा. शेवटी आयुष्यात क्रिकेट खेळण्याचा कालावधी हा फार छोटा असतो आणि शिक्षणात तुम्ही योग्य ती प्रगती साधलीत तर यशोशिखरावर जाण्यापासून तुम्हाला कुणीही रोखू शकणार […]
अद्वैय हिरे मूळ फिर्यादी, त्यांनी खोटी माहिती दिली; दादा भुसे प्रकरणावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया
अद्वैय हिरे हे मूळ फिर्यादी असून त्यांनी खोटी माहिती दिली, अशी प्रतिक्रिया शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी दादा भुसे प्रकरणावर दिली. गिरणा सहकारी साखर कारखाना प्रकरणात ते शनिवारी मालेगाव कोर्टात हजर राहिले. यावेळी दादा भुसे यांनीही चुकीच्या माहितीच्या आधारे संजय राऊत यांनी आरोप केले असे म्हणत हा खटला मागे घेतला. त्यानंतर […]
‘धुरंधर’च्या सेटवर अक्षय खन्ना आणि अर्जुन रामपाल का रडले? असं काय घडलं?
‘छावा’ या चित्रपटानंतर अक्षय खन्ना हा खऱ्या अर्थाने सुपरस्टार झाला. त्यानंतर ‘धुरंधर’ या चित्रपटातील अक्षयच्या अभिनयाने देखील सर्वांची मने जिंकून घेतली. ‘धुरंधर’ या चित्रपटातील अक्षय खन्नाच्या अभिनयाने एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. सोशल मीडियावर अक्षयच्या नावाचा बोलबाला सुरु झाला. परंतु ‘धुरंधर’ चित्रपटातील एक सीननंतर अक्षय खन्ना आणि अर्जुन रामपाल हे खूप रडले होते. ‘धुरंधर’ हा […]
अमेरिका टॅरिफ रिफंड देणार? यूएस चेंबर ऑफ कॉमर्सने दिली महत्त्वाची माहिती
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे टॅरिफ रद्द करण्याचा निर्णय अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. हा निर्णय ट्रम्प यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. आता या निर्णयानंतर, अमेरिका टॅरिफ रिफंड देईल का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. याबाबत यूएस चेंबर ऑफ कॉमर्सने महत्त्वाची माहिती दिली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का देत, अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने त्यांनी […]
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शनिवारी हिंदुस्थान आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा एकदा टीकास्त्र सोडले. पंतप्रधान पुन्हा एकदा शरणागती पत्करणार अशी टीका राहुल गांधी यांनी केली. याबाबत त्यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. The PM is compromised. His betrayal now stands exposed. He can’t renegotiate. He will surrender again. […]
अनधिकृत होर्डिंगमुळे एका सफाई कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील मुकुंदवाडी संजयनगर भागात हनुमान मंदिर परिसरात ही घटना घडली. अनधिकृत होर्डिंग काढण्यासाठी गेलेल्या सफाई कामगाराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना आज शनिवारी घडली. यावेळी त्याच्यासोबत असलेला दुसरा कामगार जखमी झाला आहे. संजयनगर मुकुंदवाडी भागातील हनुमान मंदिरावर लावण्यात आलेले होर्डिंग काढत असताना सफाई कामगार […]
पणजी महानगरपालिका निवडणुकीसाठी मोन्सेरात गटाच्या उमेदवारांचे अर्ज दाखल
पणजी : पणजीचे आमदार व महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांच्या गटातर्फे पणजी महानगरपालिकेच्या सर्व 30 प्रभागांसाठी 30 उमेदवारांनी निवडणुकीचे अर्ज सादर केले पण त्यावेळी ते स्वत: उपस्थित नव्हते. त्यांचे पूत्र असलेले महापौर रोहीत मोन्सेरात यांनी उमेदवार म्हणून हजेरी लावली. भाजपचे बडे नेतेही यावेळी हजर नसल्याचे दिसून आले. त्यामुळे हे उमेदवार भाजप गटाचे की मोन्सेरात गटाचे? असा [...]
पाळे-शिरदोण ग्रामस्थांची ‘टीसीपी’ला धडक
शेतजमिनीचेरुपांतरणकरण्यासविरोध: सरकारबिल्डरांसाठीअसल्याचाआरोप पणजी : नगर आणि नियोजन कायद्याच्या कलम 39अ अंतर्गत प्रस्तावित भू-ऊपांतरणाचा निषेध करण्यासाठी पाळे-शिरदोणच्या ग्रामस्थांनी स्थानिक आमदार विरेश बोरकर यांच्या नेतृत्वाखाली काल शुक्रवारी पणजीत पाटो येथील नगर व नियोजन खात्याच्या (टीसीपी) कार्यालयावर मोर्चा नेला. कृषी जमिनीचे रुपांतरण ‘सेटलमेंट’ विभागात करण्याच्या प्रस्तावाच्या विरोधात त्यांनी जोरदार घोषणा देऊन संताप व्यक्त केला. टीसीपी कायदा कलम 39 [...]
भाजपने आपल्या शहराला काय दिले?…विनाश! कांदळवनांच्या कत्तलीवरून आदित्य ठाकरे यांचा हल्लाबोल
वर्सोवा-भाईंदर कोस्टल रोडसाठी 45 हजार तिवरांची कत्तल करण्यात येणार आहे. मुंबई शहर आणि उपनगरांना समुद्राच्या अजस्त्र लाटांपासून वाचवणाऱ्या कांदळवनांवर कुऱ्हाड चालवण्यास पर्यावरणप्रेमींनी विरोध केला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनीही एक्स पोस्टद्वारे हा मुद्दा उपस्थित करत भाजप सरकारवर हल्ला चढवला आहे. भाजप सरकारने आपल्या शहराला विनाश दिल्याची टीका आदित्य ठाकरे […]
बागलकोटला शिवजयंती मिरवणुकीत दगडफेक
एसपीसिद्धार्थगोयलयांच्यासहशिवप्रेमीजखमी: पोलिसांच्याहस्तक्षेपामुळेपरिस्थितीनियंत्रणात: आठअटकेत वार्ताहर/जमखंडी बागलकोट येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती मिरवणुकीवर दगडफेक झाल्याचा प्रकार गुरुवारी रात्री उशिरा घडला. यात बागलकोटचे एसपी सिद्धार्थ गोयल यांच्यासह काही शिवप्रेमी किरकोळ जखमी झाल्याचे कळते. मिरवणुकी दरम्यान झालेल्या दगडफेकीमुळे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. लागलीच पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. दरम्यान, याप्रकरणी आठ जणांना अटक करण्यात आली आहे. नवनगर येथील [...]
पंतनगर-बाळेकुंद्रीत साडेआठ लाखांची घरफोडी
बेळगाव : एका बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी सुमारे साडेआठ लाख रुपये किमतीचे दागिने पळविले आहेत. पंतनगर, बाळेकुंद्री बी. के. येथे ही घटना घडली असून मारिहाळ पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. बेळगाव शहर व तालुक्यातील वाढत्या चोऱ्यांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. पंतनगर येथील लक्ष्मी राजू कळगुद्दी यांनी मारिहाळ पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. [...]
जुनियर लाईन फॉलोविंग रोबोट आंतरराष्ट्रीय स्पर्धेत प्रज्ञा हायस्कूल तृतीय
सातार्डा गावचा सुपुत्र मयंक कवठणकरचा संघात होता समावेश सातार्डा – यु. ए. ई शारजा येथे झालेल्या वर्ल्ड स्टेम अँड रोबोटिक्स ऑलिम्पियाड रोबोटिक्स चॅम्पियनशिप यु. ए. ई 2026 अंतर्गत झालेल्या जुनियर लाईन फॉलोविंग रोबोट या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देवसू – गोवा येथील प्रज्ञा हायस्कूलच्या संघाने तृतीय पारितोषिक पटकावले आहे. उल्लेखनीय यश संपादन केलेल्या प्रज्ञा हायस्कूलच्या संघामध्ये सातार्डा [...]
बोगस बँक खाते प्रकरणी निपाणीतील पाच जणांवर एफआयआर
सायबरगुन्हेगारांनीकेलाहोतावापर: अनेकराज्यातफसवणूक बेळगाव : निपाणीत बोगस बँक खाते उघडून सायबर गुन्हेगारांना देणाऱ्या पाच जणांविरुद्ध एफआयआर दाखल झाला आहे. बेळगाव जिल्हा सायबर क्राईम विभागात पोलिसांनी स्वत:हून फिर्याद दाखल केली असून निपाणीत उघडलेल्या बँक खात्यांवर अनेक राज्यात केलेल्या फसवणूक प्रकरणातील रक्कम जमा करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वीच निपाणी परिसरात असाच एक प्रकार उघडकीस आला होता. आता पाच [...]
बेंगळूर पोलिसांकडून ‘त्या’ कैद्याचा ताबा
बेळगावमधून ताब्यात घेऊन बेंगळूर न्यायालयात हजर : पोलिसांच्या गणवेशात दरोडा टाकून 20 लाख रोख रक्कम, अर्धा किलो सोन्याचे दागिने पळविले बेळगाव : बेंगळूर येथील दरोडे प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांनी हिंडलगा मध्यवर्ती कारागृहातील एका कैद्याला ताब्यात घेतले आहे. गुरुवारी रात्री उशिरा न्यायालयाच्या बॉडी वॉरंटवरून त्याला ताब्यात घेऊन शुक्रवारी बेंगळूर येथील न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. नागेंद्र नामक [...]
दिल्ली-बेळगाव विमान प्रवासाचा वाईट अनुभव
भाजपखासदारांकडूननाराजीव्यक्त, इंडिगोच्याढिसाळव्यवस्थापनाचाफटका बेळगाव : देशातील सर्वात मोठी विमान कंपनी असलेली इंडिगो पुन्हा एकदा वादात सापडली आहे. दिल्ली-बेळगाव प्रवासादरम्यान आलेल्या वाईट अनुभवाबद्दल थेट कंपनीच्या सीईओंनाच भाजपच्या खासदाराने जाब विचारला आहे. व्हीआयपींना जर योग्य वागणूक मिळत नसेल तर सर्वसामान्यांबाबत काय होत असेल? याचा विचार न केलेला बरा, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. भाजपचे खासदार व कॉन्फेडरेशन ऑफ [...]
अर्धापूर शहरात जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील डॉ बाबासाहेब आंबेडकर नगरात भांडण सोडवायला गेलेल्या तरुणाचा खून झाला असून या प्रकरणी अर्धापूर पोलिस ठाण्यात चार जणा विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना शुक्रवारी रात्री आठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास झाली असून घटनास्थळी बघ्याची गर्दी झाली होती. मयत तरुणाच्या नातेवाईकांनी आरोपींचे घर जाळण्याचा प्रयत्न केले. तसेच दुचाकीची तोडफोड […]
एम. के. जैनापूरेयांचापुढाकार बेळगाव : केळकर बागेतील धोकादायक चरीमुळे वाहने नादुरुस्त होण्यासह लहान मोठे अपघात घडत होते. याबाबत वारंवार तक्रार करूनही महापालिकेने धोकादायक चर बुजविण्याकडे दुर्लक्ष केल्याने अखेर एम. के. पब्लिसिटी फर्मचे संचालक एम. के. जैनापुरे यांनी स्वखर्चातून ही चर बुजविली आहे. त्यामुळे वाहनचालक व नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे. केळकर बागेतील रस्ता निमूळता [...]
खानापुरातील डोंबार समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमण हटवावे
दलितसंघर्षसमितीच्यानेतृत्वाखालीसमाजबांधवांचीमागणी: जिल्हाधिकाऱ्यांनानिवेदन बेळगाव : खानापूर येथील शाहूनगर येथील डोंबार समाजातील लोक पिढ्यान्पिढ्या उपभोगत असलेल्या स्मशानभूमीची जमीन काही लोक गिळंकृत करण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच स्थानिक प्रभावशाली लोकांनी स्मशानभूमीतील झाडे तोडली असून बेकायदेशीरपणे घरे बांधली जात आहेत. डोंबार समाजाची स्मशानभूमीच्या जमिनीवर अतिक्रमण करून समाजबांधवांवर अन्याय करण्यात येत आहे. यासाठी पिढ्यान्पिढ्या डोंबार समाजाने उपयोग करण्यात असलेल्या स्मशानभूमीतील [...]
ढोर समाज बांधवांवर अन्याय करणाऱ्यांवर कारवाईची मागणी
बेळगाव : टिळकवाडी शुक्रवारपेठेतील काही ढोर समाज बांधवांना ते राहत असलेल्या घरातून रात्री 2 दोन वाजता बाहेर काढण्यात आले. इस्कॉनने पैसा, ताकदीचा वापर करून हे कृत्य केले आहे. यामुळे उच्च न्यायालय व अॅट्रॉसिटी कायद्याचे उल्लंघन झाले असून संबंधितांवर 24 तासांत एफआयर दाखल करून त्यांच्यावर खटला चालवावा. तसेच घरातून बाहेर काढण्यात आलेल्या सदर कुटुंबीयांचे पुनर्वसन केंदातील [...]
लोककल्पतर्फे जांबोटी येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर
बेळगाव : लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीच्या सीएसआर या उपक्रमाअंतर्गत लोककल्प फौंडेशनतर्फे एम. एम. जोशी-कोडकणी आय केअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने जांबोटी (ता. खानापूर) येथे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामीण भागातील नागरिकांना डोळ्यांच्या आरोग्याबाबत जनजागृती करणे व दृष्टीदोषांचे लवकर निदान करण्याच्या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचा लाभ सुमारे 60 [...]
शिवप्रतिष्ठानतर्फे धर्मवीर बलिदान मासाला प्रारंभ
शहरासहगावोगावीबलिदानमासाचेआचरण: शंभूतीर्थयेथेदररोजशेकडोंच्याउपस्थितीतमूर्तीपूजन बेळगाव : धर्मासाठी बलिदान दिलेल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाची नव्या पिढीला माहिती व्हावी, यासाठी दरवर्षी फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या या दरम्यान बलिदान मास पाळण्यात येतो. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे शहरासह गावोगावी सध्या बलिदान मासाचे आचरण करण्यात येत आहे. बेळगावच्या शंभूतीर्थ येथे दररोज शेकडोंच्या उपस्थितीत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीसमोर पूजन करण्यात येत [...]
बेळगाव : मुरगेंद्रगौडा स्पोर्ट्स फौऊंडेशन आयोजित मुरगेंद्रगौडा चषक निमंत्रितांच्या अखिल भारतीय टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी खेळविण्यात आलेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात साईराज वॉरियर्सने प्रथमेश मोरे संघाचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. सचिन लांग्ले व शाम सी. यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. शनिवारच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात टेनिस जगातील स्टार खेळाडू करण अंबाला सरदार्स मैदानावरती प्रथमच येणार [...]
हिंडलगा येथे भव्य मॅरेथॉन स्पर्धा उद्या
वार्ताहर/हिंडलगा येथील हिंडलगा स्पोर्ट्स क्लबने प्रथमच ग्रामीण भागात राष्ट्रीय स्तरावरील मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन रविवार रोजी पहाटे 5.30 वाजता केले आहे.स्पर्धेला प्रारंभ श्री कलमेश्वर मंदीराच्या प्रांगणातून होणार आहे, हि स्पर्धा राष्ट्रीयस्तरावरील मॅरेथॉन प्रमाणे घेतली जाणार असल्याची महिती हिंडलगा स्पोर्टस कल्बचे चेअरमन कर्नल मोहन नाईक, ए, बी, पुंडलिक व स्पर्धा प्रमुख प्रकाश बेळगुंदकर यांनी दिली. राष्ट्रीयस्तरावर भरविण्यात [...]
झेवियर्स, जोसेफ, हेरवाडकर,लव्हडेल उपांत्य फेरीत
बेळगाव : बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटना आयोजित मृदुला सामंत स्मृती चषक आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत लव्हडेल सेंट्रल, एम. व्ही. हेरवाडकर, सेंट मेरीज संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला असून मुलींच्या गटात अंतिम सामना सेंट जोसेफ व सेंट झेवियर्स यांच्यात होणार आहे. आरपीडीमैदानावरतीखेळविण्यातआलेल्या14 वर्षाखालीलमुलांमध्येपहिल्यासामन्यातलव्हडेलसेंट्रलसंघानेजैनहेरिटेजचा1-0 असापराभवकेला. लव्हडेलतर्फेआयुष्यमाननिंगनूरयांनेएकमेवगोलकेला. दुसऱ्यासामन्यातसेंटमेरीजसंघानेज्योतीसेंट्रलचा2-1 असापराभवकेला. सेंटमेरीजतर्फेहुजेफाने2 गोलकेलेतरज्योतीसेंट्रलतर्फेअनुष्यमानमुतगेकरनेगोलकेला. मुलींच्या गटात केपीएस खानापूर व जैन हेरिटेज यांच्यात [...]
के.आर, शेट्टी संघाकडे डेपो मास्टर्स चषक
बेळगाव : डेपो मास्टर्स स्पोर्ट्स क्लब आयोजित डेपो मास्टर्स चषक टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात के आर शेट्टी किंग्ज संघाने एसआरएस हिंदुस्थान अनगोळ संघाचा 38 धावांनी पराभव करून अजिंक्यपद मिळविले. रब्बानी दफेदारला सामनावीर व मालिकावीराने गौरविण्यात आले. एसकेई प्लॅटिनम ज्युबली मैदानावरती खेळविण्यात आलेल्या अंतिम सामन्यात के आर शेट्टी संघाने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 6 [...]
दिल्लीतील गर्दीची धार्मिक स्थळे आणि वारसा स्थळांवर पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेकडून हल्ला होण्याची शक्यता आहे, अशी माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. या माहितीनंतर राजधानीत हाय अलर्ट जारी करण्यात आला असून कडक चांदणी चौक, लाल किल्ला परिसरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गुप्तचर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चांदनी चौक परिसरातील एक मंदिर दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असू शकते. […]
नाट्य महोत्सवातून बाल कलाकार घडवण्याचे कार्य कौतुकास्पद
युवानेते विशाल परब यांचे प्रतिपादन ; सावंतवाडीत कै.दिनकर धारणकर स्मृती नाट्य महोत्सव सावंतवाडी : प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यात नाट्य व सांस्कृतिक चळवळ व्यापकतेने पुढे जाणे आवश्यक आहे त्यासाठी सावंतवाडीत येत्या एप्रिल महिन्यात भव्य दिव्य असे नाटक आयोजित केले जाईल .सावंतवाडी येथील क्षितिज इव्हेंट व सावंतवाडी नगरपालिका यांनी बालनाट्य महोत्सव आयोजित करून बाल कलाकार घडवण्याचे हे कार्य [...]
नागरी हवाई वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांनी राजीनामा द्यावा! रोहित पवार यांची मागणी
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार आणि दिवंगत अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार यांनी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांच्या राजीनाम्याची मागणी केली. याबाबत आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिणार असल्याचे रोहित पवार म्हणाले. शनिवारी रोहित पवार यांनी शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी पत्रकार परिषद घेत व्हीएसआर कंपनीबाबतही अनेक धक्कादायक दावे […]
शिवसेना नेते आणि विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची वाय प्लस सुरक्षा काढून टाकण्यात आली आहे. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत भारतीय जनता पक्षाला टोला लगावला आहे. देशामध्ये फक्त भाजप आणि संघाच्या लोकांना धोका आहे. खरे म्हणजे त्यांना कुणी चापटही मारणार नाही, निरर्थक लोक आहेत ते, असे राऊत शनिवारी […]
कश्मीरमधील 40 पर्यटन स्थळे पुन्हा उघडली, पहलगाम हल्ल्यानंतर बंद केलेली
पहलगामच्या बैसारनमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर बंद केलेली जम्मू-कश्मीरमधील 40 हून अधिक पर्यटनस्थळे पुन्हा एकदा खुली करण्यात आली आहेत. नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी आणखी 14 पर्यटनस्थळे उघडण्याचे निर्देश दिले. यामध्ये कश्मीरमधील 11 तर जम्मूतील 33 पर्यटन स्थळांचा समावेश आहे. बाकीचे पर्यटनस्थळे याआधीच उघडली आहेत. ज्या बैसारण खोऱ्यात हल्ला झाला होता ते बैसारण खोरे अद्याप बंद […]
पाकिस्तानी सरकारने सैनिकांना सोडले वाऱ्यावर, बलुचच्या कैदेतील सात जणांची मदतीची याचना
पाकिस्तानी बलुच लिबरेशन आर्मी (बीएलए)ने आणखी एक धक्कादायक व्हिडीओ जारी केला आहे. या व्हिडीओमध्ये पाकिस्तानी सैनिक सरकारकडे मदतीची याचना मागताना दिसत आहे. या व्हिडीओत एकूण 7 सैनिक दिसत असून ते रडत आहेत. पाकिस्तानसाठी लढूनही सरकारने आम्हाला वाऱ्यावर सोडले आहे. आमच्याकडे पाकिस्तानी सैन्याचे ओळखपत्र आहे. तरीही आम्हाला सैनिक म्हटले जात नाही, असे या व्हिडीओत सैनिक म्हणतात […]
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दणका दिला. राष्ट्राध्यक्षांना असे टॅरिफ लावण्याचा अधिकारच नाही, हे बेकायदेशीर आहे, असे खडे बोल सुनावत न्यायालयाने हिंदुस्थानसह जगभरातील अनेक देशांवर ट्रम्प यांनी लादलेले टॅरिफ रद्द केले. न्यायालयाच्या या निर्णयानंतर अवघ्या काही तासांमध्ये ट्रम्प यांच्या कार्यालयाने नव्या आदेशावर स्वाक्षरी केली असून या आदेशानुसार आता जगातील सर्व देशांमधून […]
उरणच्या ओएनजीसीमध्ये पुन्हा आग; गॅस लाईनची दुरुस्ती सुरू असतानाच दुर्घटना, सुदैवाने जीवितहानी टळली
ओएनजीसी प्रकल्पात गॅस लाईनच्या दुरुस्तीचे काम सुरू असतानाच शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास अचानक आग लागली. यावेळी मोजकेच कामगार कामावर होते. पण त्यांनी वेळीच बाहेर पळ काढल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. सुदैवाने प्राणहानी टळली असली तरी वारंवार अशा घटना घडत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. अशा घटनांमुळे ओएनजीसी प्रकल्पातील कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. आज […]
निसर्गरम्य माथेरानमधील हाताने रिक्षा ओढण्याची अमानवी प्रथा बंद करण्यासाठी सर्व चालकांना ई-रिक्षा द्या, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने सनियंत्रण समितीला दिले होते. पण हे आदेश धाब्यावर बसवण्यात आल्याने संतप्त २० ई-रिक्षाचालकांनी सोमवार २३ फेब्रुवारीपासून पुन्हा बेमुदत बंद पुकारला आहे. माथेरानकरांच्या मुळावर उठलेली सनियंत्रण समितीच बरखास्त करावी, अशी मागणी श्रमिक रिक्षाचालक-मालक सेवा संस्थेने केली आहे. माथेरानमध्ये गेल्या […]
रायगडात मोहोर काळवंडला; आंबा धोक्यात, ढगाळ वातावरण, उष्णतेचा पारा वाढू लागल्याने बागा संकटात
बदलत्या हवमानाचा फटका रायगड जिल्ह्यातील आंबा पिकाला बसत आहे. ढगाळ वातावरण तसेच उष्णतेचा पारा दिवसेंदिवस वाढू लागल्याने मोहोर काळवंडू लागला आहे. त्यामुळे आंबा उत्पादकांमध्ये चिंता वाढली असून हे पीक वाचवण्याचे मोठे आव्हान त्यांच्यापुढे उभे ठाकले आहे. लहरी हवामानामुळे केवळ आंबा पीकच नव्हे तर काजूच्या पिकांनाही फटका बसण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. रायगड जिल्ह्यात प्रामुख्याने […]
हार्वर्ड विद्यापीठात ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ची शिकवण
जगप्रसिद्ध हार्वर्ड विद्यापीठात विद्यार्थ्यांना ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ची शिकवण दिली जात आहे. विद्यापीठात एक नवीन कोर्सचा अभ्यासक्रम शिकवला जात असून त्याचे नाव ट्री म्हणजे झाड आहे. या कोर्सची सुरुवात हार्वर्डच्या अर्नोल्ड आर्बोरिटमचे (ट्री म्युझियम) संचालक आणि डेव्हलपमेंटल बायोलॉजिस्ट विल्यम फ्रीमॅन यांनी केली आहे. या कोर्सचे शिक्षण बंद खोलीत किंवा लॅबमध्ये होत नाही, तसेच येथे वनस्पतिशास्त्राची (बॉटनी) […]
व्हाट्सअॅप ग्रुपवरचे जुने मेसेज वाचता येणार, नवे ‘ग्रुप मेसेज हिस्ट्री’ फीचर येतंय
व्हाट्सअॅपच्या ग्रुप चॅट्समध्ये अनेकदा गोंधळ असतो. एखादा मेंबर ग्रुपमध्ये उशिरा सामील झाला की त्याला ग्रुपमध्ये कोणत्या विषयावर काय चर्चा सुरू आहे समजत नाही. त्यावर उपाय म्हणून व्हाट्सअॅप आता ‘ग्रुप मेसेज हिस्ट्री’ फीचर घेऊन येत आहे. या फीचरमुळे अॅडमिन त्याच्या ग्रुपमध्ये जॉईन झालेल्या नवीन सदस्याला 100 पर्यंतच्या मेसेजची हिस्ट्री पाठवू शकतात, जेणेकरून नव्या सदस्याला ग्रुपमध्ये ‘काय […]
अंबानींची अंबाजी मंदिराला 27.5 कोटींची देणगी
उद्योगपती मुकेश अंबानी यांचे सुपुत्र अनंत अंबानी यांनी गुजरातमधील सुप्रसिद्ध अंबाजी मंदिराला 27.5 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. ही देणगी त्यांनी खास एका उद्देशाने दिली आहे. देणगीतून मिळालेल्या पैशांतून मंदिरात येणाऱ्या लाखो भाविकांना मोफत अन्नदान केले जाणार आहे. अनंत अंबानी यांनी जय अंबे तिथि योजनेला सपोर्ट करण्यासाठी या मंदिराला ही देणगी दिली आहे. मंदिरात येणारा […]
प्रतीक्षा संपली…टाटा पंच ईव्ही माेर्केटमध्ये आली!
टाटा मोटर्सने आपली बहुप्रतीक्षित टाटा पंच ईव्ही फेसलिफ्ट अखेर मार्पेटमध्ये लाँच केली. या कारची सुरुवातीची किंमत 9.69 लाख रुपये आहे. तर याच्या टाॅप व्हेरियंटची किंमत 12.59 लाख रुपयांपर्यंत आहे. या कारची बुकिंग ऑनलाईन आणि डीलरशीप अशा दोन्हींकडे सुरू करण्यात आली आहे. या कारमध्ये 40 केडब्ल्यूएच बॅटरी पॅक दिला असून यानुसार, या कारची रेंज 468 किलोमीटर […]
आयफोन 18 मध्ये मिळणार मोठी बॅटरी
आयफोन 17 सीरिजच्या लाँचिंगनंतर आता आयफोन चाहत्यांना आयफोन 18 सीरिजची उत्सुकता लागली आहे. 2026 च्या सप्टेंबर महिन्यात आयपह्न 18 सीरिज लाँचिंग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या फोनमध्ये मिळणाऱ्या फिचर्ससंबंधी माहिती लीक होण्यास सुरुवात झाली आहे. कंपनीकडून अद्याप या सीरिजची कोणतीही घोषणा करण्यात आली नाही. आयफोन 18 प्रो मॅक्समध्ये 5100 एमएएच क्षमतेची बॅटरी दिली जाऊ शकते […]
फुटबॉल खेळताना आला हार्ट अटॅक, खासदार सिंग्कॉम यांचे निधन
मेघायलयमध्ये व्हॉईस ऑफ द पीपल पार्टीचे (व्हीपीपी) शिलाँग येथील खासदार रिकी एजे सिंग्कॉन यांचे फुटबॉल खेळत असताना हृदयविकारामुळे निधन झाले. त्यांना सार्वजनिक आरोग्य पेंद्रात लगेच नेण्यात आले. मात्र, तेथे डॉक्टर उपलब्ध नव्हते. त्यामुळे गोल्डन अवरमध्ये त्यांना उपचार मिळाले नाही. यावरून राज्यात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. सिंग्कॉन यांना गुरुवारी मित्रांसोबत फुटबॉल खेळत असताना अचानक […]
दुर्गम भागांत बाल, मातामृत्यू ; नवीन भरतीमध्ये डॉक्टरांची पहिली नियुक्ती आदिवासी भागांमध्ये होणार
दुर्गम व आदिवासी भागांमध्ये वैद्यकीय सुविधांअभावी माता व बालमृत्यूंच्या प्रमाणात वाढ झाल्याने राज्य शासनाचे धाबे दणाणले आहेत. कोणत्याही परिस्थितीत हे प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत. त्याचाच भाग म्हणून नवीन भरती झालेल्या डॉक्टरांची नियुक्ती आदिवासी भागांमध्ये करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. त्याचप्रमाणे वर्षानुवर्षे बिगर आदिवासी भागांमध्ये काम करणाऱया कर्मचाऱयांनाही यापुढे आदिवासी भागांमध्ये पाठवले जाणार […]
अखेरच्या दिवशी शेअर बाजार सावरला!
हिंदुस्थानी शेअर बाजारात झालेल्या घसरणीला अखेर ब्रेक लागला आहे. या आठवडय़ाच्या अखेरच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी शेअर बाजार सावरला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 316 अंकांनी वाढून 82,814 अंकांवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 105 अंकांनी वधारून 25,559 अंकांवर स्थिरावला. आज एनटीपीसीच्या शेअर्समध्ये 3 टक्के वाढ […]
अमेरिकेत हिंदुस्थानी चालकाने तीन गाड्यांना उडवले
अमेरिकेतील इंडियाना या ठिकाणी पंजाबी ट्रक चालकाने तीन वाहनांना धडक दिली. या धडकेत एकाचा मृत्यू झाला आहे. सुखदीप सिंग असे या ट्रक चालकाचे नाव असून तो अमेरिकेत सेमी ट्रक चालवण्याचे काम करत होता. सुखदीप सिंगच्या ट्रकने पिकअपला जोरात धडक दिल्याने 64 वर्षीय टेरी यांचा जागीच मृत्यू झाला. आरोपी सुखदीप सिंग अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहत होता, अशीही […]
लांब पल्ल्याच्या एक्सप्रेसमध्ये चोरी करणारा गजाआड, 21 लाख किमतीच्या सोन्या-चांदीच्या लगडी हस्तगत
लांब पल्ल्याच्या एक्सप्रेसमध्ये प्रवाशांच्या किमती ऐवज असलेल्या बॅग अचूक हेरून त्या चोरणारा रेल्वे गुन्हे शाखेच्या हाती लागला. त्याच्याकडून 21 लाख रुपये किंमतीची सोन्या-चांदीची लगड हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. विनय सोनी (38) असे त्या चोराचे नाव आहे. मूळचा कानपूरचा असलेला विनय रीतसर रेल्वेचे तिकीट काढून एक्स्प्रेसने प्रवास करतो. प्रवासादरम्यान उशाखाली किंवा सीटच्या खाली ठेवलेल्या प्रवाशांच्या […]
विमानतळ परिसरात रमजानच्या नमाजसाठी परवानगी देता येईल का? हायकोर्टाची एमएमआरडीएला विचारणा
मुंबई विमानतळ परिसरात रमजानची नमाज अदा करण्यासाठी परवानगी दिली जाणार की नाही याचे उत्तर एमएमआरडीएने सादर करावे, असे आदेश उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिले. छत्रपती शिवाजी महाराज डोमेस्टिक विमानतळ परिसरात नमाज अदा करण्यासाठी एक शेड होती. या परिसरात गेली 30 वर्षे रमजानची नमाज अदा केली जाते. ही शेड एमएमआरडीएने तोडली. नुकताच रमजानचा महिना सुरू झाला आहे. […]
धारावीतील एसआरए प्रकल्पात दलालांचा झोल; शिडी, मंदिर, पान टपरी, मीटर केबिन झोपडी दाखवली!
धारावीच्या शताब्दी नगरात झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पात अस्तित्वात नसलेली घरेही बोगस कागदपत्रे बनवून लाटली गेल्याचे समोर आले आहे. शिडीखालची जागा, मंदिर, पान टपरी आणि मीटर केबिनही झोपडी असल्याचे दाखवून संबंधित अधिकाऱयांच्या संगनमताने दलालांनी त्यावर घरे मिळवली आहेत. या घोटाळ्यात अनेक मूळ रहिवासी भरडले गेले असून त्यांच्या तक्रारींकडे झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण दुर्लक्ष करत आहे. शताब्दी नगरमधे 857 […]
अर्थसंकल्पीय अधिवेशनातही दोन्ही सभागृहांतील विरोधी पक्षनेत्यांची आसने रिक्तच राहणार
विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांतील विरोधी पक्षनेत्यांच्या नियुक्तीची शिफारस पत्रे विधिमंडळाला देण्यात आली आहेत, पण यावर विधानसभा अध्यक्ष व विधान परिषद सभापतींकडून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे येत्या 23 तारखेपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांतील विरोधी पक्षनेत्यांची आसने रिक्तच राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सर्वसाधारणपणे पहिल्या अधिवेशनात विरोधी पक्षनेत्याची निवड होते, मात्र विरोधी बाकावरील सर्वात […]
शिवडीतील बीडीडी चाळी आणि झोपडपट्टीचा पुनर्विकास करा! शिवसेनेची मुंबई पोर्ट प्राधिकरणाकडे मागणी
मुंबई पोर्ट प्राधिकरणाच्या जागेवर असलेल्या शिवडी बीडीडी चाळींचा विकास राज्य शासनाच्या गृहनिर्माण धोरणानुसार करावा तसेच शिवडी पूर्व पट्टय़ातील झोपडय़ांचा पुनर्विकास त्याच जागी करण्यात यावा, अशी महत्त्वपूर्ण मागणी शिवसेनेने आज मुंबई पोर्ट प्राधिकरणाकडे केली. त्याचप्रमाणे शिवडी व काळाचौकी परिसरात विविध पायाभूत सुविधा प्राधान्याने उभारल्या जाव्यात, असाही आग्रह धरण्यात आला आहे. शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत यांच्या प्रयत्नाने […]
ब्रिटनमध्ये पहिल्यांदा कॅबिनेट सचिवपदी महिला
ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी एंटोनिया रोमियो यांची कॅबिनेट सचिव म्हणून नियुक्ती केली आहे. कॅबिनेट सचिवपदी पोहोचणाऱया त्या पहिल्या महिला आहेत. एंटोनिया रोमिया या आता कॅबिनेट सचिवपदी विराजमान झाल्यानंतर पंतप्रधानांच्या मुख्य नीती सल्लागार म्हणून काम करतील. ब्रिटनमध्ये कॅबिनेट सचिव सर्वात वरिष्ठ नागरी सेवक असतो. रोमियो या क्रिस वर्मल्ड यांची जागा घेतील. क्रिस यांनी काही दिवसांपूर्वीच […]
शासकीय मुद्रणालयातील आंदोलनाचा अर्थसंकल्पीय अधिवेशनाला मोठा फटका, 25 फेब्रुवारीला एक दिवसाचा संप
चर्नी रोड येथील शासकीय मुद्रणालयातील कर्मचाऱयांनी पुकारलेल्या आंदोलनाचा मोठा फटका राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला बसणार आहे. कारण शासकीय मुद्रणालयात सध्या दररोज दोन तास धरणे आंदोलन सुरू आहे. त्यामुळे अर्थसंकल्पाशी संबंधित सर्व कागदपत्रांच्या छपाईवर मोठा परिणाम होत आहे. राज्याच्या उद्योग विभागाच्या अखत्यारित आठ शासकीय मुद्रणालये आहेत. चर्नी रोड स्टेशनच्या बाहेर मुख्यालय आहे. त्याशिवाय नागपूर, पुणे, वाई, कोल्हापूर, […]
भाजप आमदाराची आरोपी भावांना मदत, तरुणीच्या नातेवाईकांचा आरोप
स्वामी चिंचोली (ता. दौंड) येथील तरुणीच्या अपहरण प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे. या प्रकरणात दौंडचे भाजप आमदार राहुल कुल यांचे नाव चर्चेत आले आहे. पीडित तरुणीच्या आईसह इतर नातेवाईकांनी आमदार कुल हे आरोपी भावांना मदत करत असल्याचा आरोप केला आहे. आरोपीच्या कुटुंबातील लोकांनी आपल्या मोबाईलवर राहुल कुल हे आमच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे स्टेटस ठेवले […]
इस्रायलमध्ये दोन हिंदुस्थानी मजुरांवर हल्ला
इस्रायलमधील दक्षिण शहर एश्केलोनमध्ये कामासाठी गेलेल्या दोन हिंदुस्थानी मजुरांवर हल्ला करण्यात आला आहे. इस्रायली पोलिसांनी हल्लेखोराला तत्काळ अटक केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात इस्रायलचा दौरा करण्याची शक्यता आहे. त्याआधीच हिंदुस्थानी मजुरावर हल्ला करण्यात आल्याची घटना घडल्याने या हल्ल्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. एका सार्वजनिक पार्कात उभ्या असलेल्या दोन मजुरांवर तीन जणांच्या जमावाने अचानक […]
नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन्स (ईव्हीएम) हॅक केल्या होत्या असा आरोप खुद्द सत्ताधारी पक्षाच्या अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांनी केला होता. त्यावरून भाजपने त्यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्याचा इशारा दिला आहे. शेळके यांनीही त्याला प्रत्युत्तर दिले आहे. भाजपवाल्यांनी हिंमत असेल तर आपल्याविरुद्ध दावा ठोकावा, त्यानंतर मी कोर्टात पुरावे सादर […]
छत्रपती शिवाजी महाराज मैदान परिसर होणार चकाचक; शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे दर सोमवारी डीप क्लिनिंग
शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान परिसर चकाचक होणार असून दर सोमवारी या परिसरात मुंबई महानगरपालिकेच्या वतीने डीप क्लिनिंग मोहीम राबविण्यात येणार आहे. नुकतीच शिवाजी पार्क जिमखाना येथे विभागप्रमुख-आमदार महेश सावंत व नगरसेविका विशाखा राऊत यांच्या उपस्थितीत नागरिकांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत नागरिकांनी मैदान व परिसरात नियमित स्वच्छता (डीप क्लिनिंग) व्हावी, अशी […]
ICC T20 WC 2026 –पाकिस्तान-न्यूझीलंड यांच्यात आज संघर्ष
30 महिन्यांत तब्बल 41 वेळा आमने सामने आलेले पाकिस्तान आणि न्यूझीलंड आता पुन्हा भिडणार आहेत, पण यावेळी सामना ‘फक्त आणखी एक’ असा नाही. सुपर एटमध्ये हा थेट प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. गटसाखळीत दोघांनी लहान संघांवर मात केली होती, पण बलाढ्य प्रतिस्पर्ध्यांसमोर दोघांची पोलखोल झाली. न्यूझीलंडला दक्षिण आफ्रिकेने चोप दिला तर पाकिस्तानला हिंदुस्थानने धडा शिकवला. त्यामुळे दोघांमध्ये […]
ICC T20 WC 2026 –‘सुपर एट’च्या महाभारतात अपराजितांची कुस्ती
सुपर एटमध्ये पोहोचल्यावर क्रिकेट म्हणजे साधा खेळ राहत नाही. तो बुद्धिबळ, कबड्डी आणि बॉक्सिंग यांचा एकत्रित प्रयोग होतो. सुपर एटमध्ये पोहोचणारा हिंदुस्थान अपराजित आहे. होय, पण इथे अपराजित असणं म्हणजे फक्त बोर्डावर ‘शून्य पराभव’ लिहिलेला असतो. खरा फॉर्म मात्र आता दाखवायचा आहे. कारण योगायोग असा की, स्पर्धेतल्या वीस संघांतून जे चार संघ अपराजित आहेत (म्हणजे […]
ICC T20 WC 2026 –हिंदुस्थानची आता खरी कसोटी, अश्विनने दिला इशारा
हिंदुस्थानचा संघ म्हणजे लग्नातला तो वर जो अजून स्टेजवर नीट उभाही राहिला नाही आणि पाहुण्यांनी आधीच ‘वा! काय देखणा नवरदेव’ म्हणून टाळय़ा वाजवायला सुरुवात केलीय. हिंदुस्थानचा सुपर एटमध्ये प्रवेश झाला असला तरी हिंदुस्थानी संघ अजून टॉप गिअरमध्येच, असे परखड मत व्यक्त केलेय रविचंद्रन अश्विनने. साखळीत जी कामगिरी झाली ती सामान्यच होती. खरी कसोटी आणि कस […]

28 C