SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

31    C
...

MOVIE REVIEW भावनांची रोलर कोस्टर राईड…आई आणि मुलींच्या नात्यातील जिव्हाळा आणि एक अनपेक्षित ट्विस्ट…

>> श्वेता पवार- सोनावणे एक आई आपल्या मुलांसाठी काय करू शकते हे दाखवणारा एक भावनिक पण तितकाच धक्कादायक असा प्रवास म्हणजे ‘तिघी’ हा चित्रपट. भारती आचरेकर, नेहा पेंडसे बायस आणि सोनाली कुलकर्णी यांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट म्हणजे भावनांची रोलर कोस्टर राईड आहे. अगदी पहिल्या फ्रेमपासून प्रेक्षकांना खिळवून टाकणारा इमोशनल ट्रॅक, कलाकारांचा तगडा अभिनय, […]

सामना 5 Mar 2026 12:56 am

बंगळुरूमध्ये 11.50 कोटींचे ड्रग्ज जप्त, दोघांना अटक

केंद्रीय गुन्हे ब्रँच (सीसीबी)च्या नाकाxटिक्स पंट्रोल विंगने अंमलीपदार्थ प्रकरणात मोठ ाr कारवाई करत एका महिलेसह दोन तस्करांना अटक केली आहे. पोलिसांनी या आरोपींकडून 8,335 एलएसडी स्ट्रिप, 534 ग्रॅम चरस आणि 5 किलो हायड्रो गांजा जप्त केला आहे. या सर्व अंमलीपदार्थांची बाजारात अंदाजित किंमत 11.50 कोटी रुपये आहे, असे सांगितले जात आहे. आरोपी गेल्या वर्षभरापासून […]

सामना 5 Mar 2026 12:17 am

व्यापारी झळा

अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर सबंध पश्चिम आशियात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसून येते. त्याचे वेगवेगळे परिणाम सध्या जाणवत असून, व्यापारी आणि आर्थिक पातळीवर भारतासह संपूर्ण जगाला मोठ्या प्रमाणात झळा बसत आहेत. अमेरिका आणि इस्रायली हल्ल्यानंतर इराणनेही अमेरिकी मित्र राष्ट्रे व आखाती देशांवर हल्ले सुरू केले आहेत. त्यामुळे विमान वाहतूक, जल वाहतूक ठप्प झाली [...]

तरुण भारत 5 Mar 2026 12:14 am

मेहकर हादरले! पत्नीला त्रास देणाऱ्याची नवऱ्याने दगडाचे ठेचून केली हत्या

मेहकर शहरा बाहेरील खामखेड रोडवरील एमआयडीसी परिसरात एका युवकाचा खून झाल्याचे समोर आले होते. या खून प्रकरणाचा छडा अवघ्या १२ तासांत लावत मेहकर पोलिसांनी तत्परतेची आणि कौशल्यपूर्ण तपासाची प्रचीती दिली आहे. मृत तरुण आपल्या पत्नीला त्रास देत असल्याच्या रागातून एका तरुणाने त्याची हत्या केल्याचे समोर आले आहे. खामखेड रोडवरील एमआयडीसी मधील शेतात एक पुरुष जातीचे […]

सामना 5 Mar 2026 12:11 am

युएईत फ्रान्सचे राफेल तैनात

मध्यपूर्वेत इराणच्या हल्ल्यांदरम्यान फ्रान्सने संयुक्त अरब अमिरातमध्ये स्वत:च्या तळाच्या सुरक्षेसाठी राफेल लढाऊ विमाने तैनात केली आहेत. फ्रान्सचे विदेशमंत्री जीन-नोएल बॅरोट यांनी याची घोषणा केली आहे. राफेल लढाऊ विमानाने तळावर एअरस्पेस सिक्युरिटी ऑपरेशन केल्याचे बॅरोट यांनी सांगितले. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी अमेरिका आणि इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यावर टीका केली आहे. परंतु त्यांनी वेगाने फैलावणाऱ्या संघर्षादरम्यान स्वत:च्या [...]

तरुण भारत 4 Mar 2026 11:11 pm

T20 WC 2026 –‘चोकर्स’चा शिक्का कायम! आफ्रिकेला 9 विकेट्सनी लोळवत न्यूझीलंड फायनलमध्ये, एलेनचा शतकी झंझावात

आयसीसी टी-20 वर्ल्डकप 2026 मधील पहिल्या उपांत्य लढतीत न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा 9 विकेट्सने पराभव करत फायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला. कोलकाताच्या ऐतिहासिक ईडन गार्डन्स मैदानावर झालेल्या लढतीत दक्षिण आफिकेने विजयासाठी दिलेले 169 धावांचे आव्हान न्यूझीलंडने 12.5 षटकात लिलया पार केले. सलामीवीर फिन एलेन याने शतकी तर टीम सैफर्ट याने अर्धशतकीय खेळी (58) करत संघाला फायनलचे तिकीट […]

सामना 4 Mar 2026 10:36 pm

हिंदुस्थान-इंग्लंड सेमीफायनलसाठी वाहतूक पोलिसांची नियमावली जारी; ‘या’मार्गांचा वापर करण्याचा सल्ला

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर गुरुवारी 5 मार्च 2026 रोजी होणाऱ्या हिंदुस्थान विरुद्ध इंग्लंड टी-20 विश्वचषक उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी विशेष नियमावली जारी केली आहे. मरीन ड्राईव्ह आणि चर्चगेट परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांनी वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रेक्षकांनी गर्दी टाळण्यासाठी खाजगी वाहनांऐवजी लोकल […]

सामना 4 Mar 2026 8:51 pm

Ratnagiri News –चिपळूणात अडीच लाखांचा गांजा पकडला, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई

चिपळूण रेल्वेस्थानकासमोर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अडीच लाख रुपयांचा गांजा जप्त केला. रेल्वेस्थानकासमोरील रस्त्यावर गस्त घालत असताना रिक्षा चालक आणि मोटरसायकलस्वार यांच्यात संशयास्पद हालचाली आढळून आल्याने पोलिसांनी त्यांची चौकशी केली. त्यांच्या सामानाची तपासणी केली असता 2 लाख 53 हजार 450 रुपये किंमतीचा 10 किलो 138 ग्रॅम गांजा सापडला. पोलिसांनी तिघांविरोधात चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल […]

सामना 4 Mar 2026 8:37 pm

Photo –अभिनेत्री पूजा सावंत दिसणार पोलिसाच्या भूमिकेत

मराठी चित्रपटसृष्टीत दररोज नवनवे प्रयोग आता पाहायला मिळतात. प्रसिद्ध मराठी अभिनेत्री पूजा सावंत हिने देखील एक वेगळ्या धाटणीची भूमिकेचे आव्हान स्वीकारले आहे. आगामी सालबर्डी या चित्रपटात पूजा सावंत ही एका करारी, निर्भीड आणि तडफदार पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर लाँच झाला असून यातून पी.आय.मनोरमा प्रधान या तिच्या व्यक्तिरेखेचा फर्स्ट लूक […]

सामना 4 Mar 2026 8:36 pm

जेएनपीए बंदरात विविध मालाचे 5000 कंटेनर अडकून पडले, शिपिंग कंपन्या संकटात

युद्धामुळे इराणने होर्मुझ सामुद्रधुनी बंद केल्यामुळे मध्य पूर्वेकडील जहाज वाहतूक सागरी सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे अनेक मालवाहू जहाजे आखातात अडकली आहेत. त्याचा मोठा परिणाम शिपिंग कंपन्यांवर झाला असल्याची माहिती कंटेनर शिपिंग लाइन असोसिएशनचे अध्यक्ष सुनील वासवानी यांनी दिली. दरम्यान जेएनपीए बंदरातुन आखातात निर्यात करण्यात येणाऱ्या विविध मालाचे ५००० कंटेनर अडकून पडले असल्याचे बुधवारी […]

सामना 4 Mar 2026 8:30 pm

Us Israel Iran War –बहरीनमध्ये 100 हून अधिक हिंदुस्थानी नागरिक अडकले, कुटुंबाकडून मदतीचे आवाहन

इराण-इस्रायलमधील संघर्षामुळे आखाती देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे. इस्त्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर अनेक देशांनी त्यांचे हवाई क्षेत्र बंद केले आहेत. यामुळे बहरीनला गेलेले तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील अनेक तेलुगू कुटुंबे तिथे अडकली आहेत. हे सर्व जण 24 फेब्रुवारी रोजी चार दिवसांच्या पर्यटन व्हिसावर बहरीनला गेले होते. हवाई क्षेत्र बंद झाल्याने सर्वजण बहरीनमध्ये अडकले […]

सामना 4 Mar 2026 8:23 pm

प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडेला ब्रेस्ट कॅन्सर, फोटो शेअर करत दिली अपडेट

प्रसिद्ध मराठी अभिनेत्री राजश्री देशपांडे हिला ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचे समोर आले आहे. राजश्रीने स्वत: सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत ही माहिती दिली आहे. View this post on Instagram A post shared by Rajshri (@rajshri_deshpande) बुधवारी 4 मार्च रोजी राजश्रीने तिचा रुग्णालयातील बेडवरचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. त्यासोबत तिने एक मोठी पोस्ट देखील […]

सामना 4 Mar 2026 8:21 pm

‘ये जिंदगी उसी की हैं’…, सुप्रसिद्ध संगीतकार सी. रामचंद्र यांच्या अविस्मरणीय गाण्यांना सुरेल आदरांजली

सुप्रसिद्ध संगीतकार सी. रामचंद्रन यांना सुरेल आदरांजली वाहण्यासाठी खास मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासन, सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने ‘ये जिंदगी उसी की हैं’ या खास मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. विले पार्ले येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह येथे शुक्रवारी 6 मार्च 2026 रोजी रात्री 8.30 वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले […]

सामना 4 Mar 2026 8:07 pm

Mumbai News –बस, टॅक्सी, स्कूल बस, रिक्षाचा बेमुदत संप; विद्यार्थ्यांसह चाकरमान्यांना फटका

ई-चलन प्रणालीद्वारे दंडवसुलीविरुद्ध राज्यातील वाहतूकदारांनी गुरुवार 5 मार्चपासून राज्यव्यापी बेमुदत संप पुकारला आहे. परिवहन मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकांमध्ये ठोस लेखी आश्वासन न मिळाल्याने वाहतूक संघटनांनी संपावर ठाम राहण्याचा निर्णय घेतला आहे. स्कूल बस मालकही या संपात सहभागी होणार असल्याने ऐन परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका बसणार आहे. ई-चलन प्रणालीद्वारे वाहनधारकांची नियमबाह्य पद्धतीने लूट सुरु आहे. […]

सामना 4 Mar 2026 7:47 pm

Iran Israel War –ऑईल व्हेसलरवर ड्रोन हल्ला, मुंबईच्या दीक्षित सोळंकीसह तीन हिंदुस्थानींचा मृत्यू

इराण व इस्त्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धात तीन हिंदुस्थानी नागरिकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. इस्त्रायल व अमेरिकेकडून होणाऱ्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देताना इराणने केलेल्या ड्रोन हल्ल्यात MKD Vyom या ऑईल व्हेसलवर मोठा स्फोट झाला. या स्फोटात तीन हिंदुस्थानी नागरिकांचा मृत्यू झाला. त्यात मुंबईच्या दीक्षित सोळंकीचा (25) देखील समावेश होता. दीक्षित सोळंकी हा मूळचा दीवचा रहिवासी होता. […]

सामना 4 Mar 2026 6:51 pm

Tamilnadu Election 2026 –डीएमके आणि काँग्रेसमधील जागावाटपाचा तिढा अखेर सुटला! लवकरच अधिकृत घोषणा

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी डीएमके (DMK) आणि काँग्रेसमधील जागावाटपाचा तिढा अखेर सुटला आहे. तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी डीएमके (DMK) आणि काँग्रेसमधील आघाडीची औपचारिकता आज पूर्ण झाली आहे. अनेक दिवसांपासून रखडलेला जागावाटपाचा पेच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्यातील चर्चेनंतर सुटला आहे. दोन्ही नेत्यांनी बुधवारी सकाळी फोनवरून संवाद साधत जागावाटपावर अंतिम मोहोर […]

सामना 4 Mar 2026 6:32 pm

देवता मतदान करत नाही म्हणून त्यांना वाऱ्यावर सोडता येणार नाही, अतिक्रमणाच्या प्रश्नावर उच्च न्यायालयाने सरकारला फटकारले

मंदिराच्या जागेवरील अतिक्रमण संदर्भात सुनावणीदरम्यान मद्रास उच्च न्यायालयाने तामिळनाडू सरकार आणि प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. देवता मतदान करत नाहीत म्हणून त्यांना वाऱ्यावर सोडता येणार नाही, अशा कडक शब्दांत उच्च न्यायालयाने फटकारले आहे. करूर जिल्ह्यातील मंदिर जमिनीवरील अतिक्रमण हटवण्यास विलंब होत असल्याने उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. नेमके प्रकरण काय? करूर जिल्ह्यातील वेण्णिमलई येथील श्री […]

सामना 4 Mar 2026 6:22 pm

Bihar Politics बिहारचे मुख्यमंत्रीपद भाजपकडे? नितीश कुमार राजीनामा देण्याची शक्यता

बिहारमध्ये सध्या बदलाचे वारे वाहू लागले आहेत. गेल्या अनेक वर्षापासून बिहारच्या मुख्यमंत्रीपदावर डोळा असलेल्या भाजपचे ते स्वप्न यंदा पूर्ण होण्याची शक्यता आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा सध्या बिहारच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. सध्या देशभरात राज्यसभा निवडणूकीची तयारी सुरू आहे. बिहारमधून राज्यसभेवर मुख्यमंत्री नितीश कुमार यांना पाठवण्याची चर्चा सुरू आहे. […]

सामना 4 Mar 2026 6:10 pm

आठवडी बाजार व दैनंदिन बाजाराचा ठेका अखेर जनशक्ती नगर विकास आघाडीने फेटाळला

परंडा (प्रतिनिधी)- परंडा नगरपरिषदची सर्वसाधारण सभा दि. 4.3.2026 रोजी आयोजित केली होती. या सर्वसाधारण सभेत जनशक्ती नगर विकास आघाडी च्या वतीने अनेक मुद्दे उपस्थित करण्यात आले. यात दोन दिवसांपूर्वी नगरपालिकेच्या कर वसुली ठेकेदाराने व्यापारी तसेच शेतकरी यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून कराची रक्कम जमा कर अशी धमकी दिली होती. हाच विषय जनशक्ती नगर विकास आघाडीने सभागृहात झालेल्या आठवडी बाजार व दैनंदिन बाजार लिलाव ठेका उपनगराध्यक्ष तसेच सर्व नगरसेवक यांनी बहुमताने फेटाळून लावला.सदर विषयाच्या अनुषंगाने ठेकेदाराकडून आठवडी बाजार व दैनंदिन बाजारामध्ये किरकोळ व ठोक विक्रेत्यांकडून व शेतकऱ्यांकडून कर संकलन करताना नियमानुसार नगरपालिकेने निश्चित केलेली रक्कम वसूल न करता जास्तीचे पैसे वसूल करणे तसेच विक्रेत्यांना व शेतकऱ्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ व दमदाटी करणे अशा मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्या होत्या. आज दि. 4.3.2026 रोजी झालेल्या नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सदर ठेका नगरपालिकेने ठेक्याचा लिलाव न करता नगरपरिषदेच्या कराची रितसर रकमेची पावती देऊनच आणि नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडूनच कराची वसुली करण्यात यावी अशी मागणीही जनशक्ती नगर विकास आघाडी च्या वतीने मुख्याधिकारी यांना करण्यात आली.

लोकराज्य जिवंत 4 Mar 2026 5:56 pm

प्राचार्य डॉ अस्वले यांना करिअर कट्टा राज्यस्तरीय उत्कृष्ट प्राचार्य प्रवर्तक पुरस्कार

मुरुम (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र आयोजित करिअर कट्टा अंतर्गत 2025-26 चा राज्यस्तरीय उत्कृष्ठ प्राचार्य प्रवर्तक पुरस्कार छत्रपती संभाजीनगर विभागातून श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय अस्वले यांना अध्यक्ष यशवंत शितोळे, अजय धोंडे , सिनेट सदस्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, प्राचार्य डॉ हरिदास विधाते, डॉ. वसंत सानप, माजी सिनेट सदस्य आणि बलभीम महाविद्यालयाचे माजी प्राचार्य यांच्या हस्ते देण्यात आला. आनंदराव धोंडे महाविद्यालय कडा येथे दि. 02 मार्च रोजी आयोजित करिअर कट्टा कार्यशाळेत हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी महाविद्यालय करिअर कट्टा विद्यार्थी संसदेस उत्कृष्ट विद्यार्थी संसद आणि इतर पाच पुरस्कार मिळाले. समन्वयक डॉ एस पी पसरकल्ले, डॉ सी.डी करे, डॉ ए के कटके, विद्यार्थी संसद मुख्यमंत्री अनिशा सुरवसे, गणेश मोरे, आसिफ शेख, सैफ इनामदार, दिशा सुरवसे, योगेश्वरी मारकर आदींनी पुरस्कार स्विकारले. यावेळी जिल्हा प्राचार्य प्रवर्तक मोहम्मद इलियास सर. प्राचार्य शिरीष पवार प्राचार्य मुळे सर प्राचार्य निंभोरे सर प्राचार्य डोंगरे सर. प्राचार्य जगदाळे मॅडम भगवान परकाळ , जिल्हा समन्वयक दत्तात्रय नरसाळे विभागीय सह समन्वयक लक्ष्मीनारायण कुरूपटवार यांची उपस्थिती होती त्याच्या यशाबद्दल भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अमोल मोरे, उपाध्यक्ष अश्लेष मोरे, सरचिटणीस जनार्दन साठे, सचिव पद्माकर हराळकर, सहसचिव डॉ सुभाष वाघमोडे, उपप्राचार्य डॉ पी ए पिटले उप प्राचार्य डॉ व्ही एस इंगळे उपप्राचार्य प्रा जी एस मोरे पर्यवेक्षक प्रा एस ए महामुनी , श्री राजकुमार सोनवणे श्री नितीन कोराळे आणि प्राध्यापक यांनी अभिनंदन केले आहे.

लोकराज्य जिवंत 4 Mar 2026 5:55 pm

Solapur News|दुबईतील सोलापूरच्या नागरिकांना आणण्याचे प्रयत्न सुरु

सोलापूरचे १० नागरिक अबुधाबीमध्ये सुरक्षित सोलापूर – इराण-इराक येथील संभाव्य युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील तीन कुटुंबातील १० जण अबुधाबी येथे सुरक्षित असून, त्यांच्याशी प्रशासनाचा संपर्क झाला आहे. त्यांना देशात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आ. सुभाष देशमुख यांनीही त्यांच्याशी मंगळवारी संवाद साधून त्यांची विचारपूस केली. दुबईत वास्तव्यास [...]

तरुण भारत 4 Mar 2026 5:46 pm

Bigg Boss Marathi 6 : घरात बनतोय नवीन ग्रुप? Wild Cards च्या येण्याने बदलणार घरातली समीकरणं

‘बिग बॉस मराठी 6’च्या घरात गेल्या रविवारी तीन नवीन सदस्यांनी वाईल्ड कार्ड म्हणून एन्ट्री घेतली. त्यांच्या एन्ट्रीमुळे घरातले वातावरण चांगलेच तापले आहे. या वाईल्ड कार्ड सदस्यांसोबत घरातील काही जुन्या सदस्यांचे वाद होत असतानाच प्राजक्ता शुक्रे मात्र त्यांच्यासोबत नवीन ग्रुप तयार करत आहे. प्राजक्ता, आयुष, करण, सचिन व सागर कारंडे यांचा बाल्कनी ग्रुप होता. मात्र सध्या […]

सामना 4 Mar 2026 5:42 pm

उद्या दाणोली साटम महाराजांचा पुण्यतिथी उत्सव

भाविकांच्या स्वागतासाठी दाणोलीनगरी सज्ज! ओटवणे प्रतिनिधी कोकणातील संताचे संत शिरोमणी असलेले दाणोली येथील साटम महाराजांचा ८९ वा पुण्यतिथी सोहळा गुरूवार ५ मार्च रोजी होत असून या उत्सवासाठी दाणोलीनगरी सज्ज झाली आहे. महाराजांच्या पुण्यतिथी सोहळ्यासाठी सायंकाळपासूनच महाराजांचे भक्तगण दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. तीर्थक्षेत्र नागझरी ते साटम महाराज निवासस्थान समाधी मंदिर ते दाणोली बाजारपेठेत आकर्षक विद्युत [...]

तरुण भारत 4 Mar 2026 5:30 pm

Solapur News |सोलापूरात माकप कडून इराणवरील हल्ल्यांच्या निषेधार्थ युद्ध विराम साठी आक्रमक आंदोलन

सोलापूरमध्ये माकपकडून इराणवरील लष्करी कारवायांचा निषेध सोलापूर : इराणवर सुरू असलेल्या लष्करी कारवायांच्या निषेधार्थ माकप तर्फे आज सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर येथे तीव्र व आक्रमक जनआंदोलन आणि निदर्शने करण्यात आली. या आंदोलनाचे नेतृत्व पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार कॉ नरसय्या आडम मास्तर तसेच [...]

तरुण भारत 4 Mar 2026 5:25 pm

Satara News |सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओमुळे म्हसवड पोलिसांची धिंड; प्रकरण पुन्हा चर्चेत

साताऱ्यातील पोलिस धिंड प्रकरणाचे पुनरावलोकन सातारा – साताऱ्यातील सोशल मीडियावर हातामध्ये शस्त्र घेऊन सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या आरोपींचा म्हसवड पोलिसांनी धिंड काढली होती. यामध्ये एका अल्पवयीन युवकाचा समावेश होता. यानंतर हे धिंड प्रकरण आता पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. अल्पवयीन मुलाची कथित धिंड काढल्याच्या प्रकरणात संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर गुन्हे [...]

तरुण भारत 4 Mar 2026 5:18 pm

व्हॉट्सअ‍ॅप चॅटच्या आधारे घटस्फोट देता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा महत्वपूर्ण निर्वाळा

घटस्फोटाच्या प्रकरणांत महत्वपूर्ण ठरणारा निकाल उच्च न्यायालयाने दिला आहे. केवळ व्हॉट्सअ‍ॅप चॅटच्या आधारावर किंवा जोडीदाराला त्याची बाजू मांडण्याची संधी न देता क्रूरतेच्या कारणावरून घटस्फोट मंजूर करता येणार नाही, असा निर्वाळा न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने दिला आहे. पती-पत्नीमधील वादाच्या प्रकरणाची सुनावणी करताना खंडपीठाने हा निर्वाळा दिला आणि नाशिक जिल्हा कौटुंबिक न्यायालयाने […]

सामना 4 Mar 2026 5:18 pm

राज्यसभेच्या जागेबाबत संजय राऊत यांचे महत्त्वाचे ट्विट

महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून गेलेल्या सात खासदारांची मुदत 2 एप्रिल रोजी संपत आहे. विधानसभेतील सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडीकडील एकंदर पक्षीय बलाबल पाहता राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. दरम्यान महाराष्ट्रातून महाविकास आघाडीचा एक खासदार राज्यसभेवर जाणार आहे. कांग्रेसने महाराष्ट्रातील राज्य सभेबाबत अखेर निर्णय घेतला आहे! महाविकास आघाडी एक आहे एकत्र राहील! जय महाराष्ट्र! — Sanjay […]

सामना 4 Mar 2026 5:11 pm

मध्यपूर्वे आशियातील ताणाव; प्रशासनाचे सतर्कतेचे आवाहन

धाराशिव (प्रतिनिधी)- मध्यपूर्व व परिसरातील काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण प्रादेशिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार व महाराष्ट्र शासन यांनी जारी केलेल्या सूचनांनुसार संबंधित देशांतील भारतीय दूतावासांनी तेथे वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांसाठी सुरक्षा ॲडव्हायझरी जारी केली आहे. या अनुषंगाने पॅलेस्टाईन (रामल्ला), कतार (दोहा), सौदी अरेबिया (रियाध), इस्रायल (तेल अवीव), इराण (तेहरान), इराक (बगदाद), कुवैत, बाहरीन, मस्कत, जॉर्डन आणि संयुक्त अरब अमिरात (अबू धाबी) येथे वास्तव्यास असलेल्या सर्व भारतीय नागरिकांनी सतर्क राहावे. अनावश्यक हालचाल टाळावी आणि स्थानिक प्रशासन तसेच भारतीय दूतावासांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे. आपत्कालीन परिस्थितीत संबंधित देशांतील भारतीय दूतावासांच्या 24X7 हेल्पलाईन क्रमांकांवर संपर्क साधावा. जिल्ह्यातील ज्या नागरिकांचे नातेवाईक किंवा जवळच्या व्यक्ती र्तीावग्रस्त देशांमध्ये अडकून पडल्या असतील, त्यांनी तत्काळ जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधवा. संबंधित व्यक्तींना कोणत्या मदतीची आवश्यकता आहे किंवा ज्यांच्याशी संपर्क होवू शकत नाही, त्यांची सविस्तर माहिती प्रशासनाला कळवावे. परदेशात असलेल्या नागरिकांनी आपले लोकेशन कुटुंबियांना सतत कळवावे, मोबाईल चार्ज ठेवावा आणि अफवा पसरवू नये, अशा सुचनाही प्रशासनाने दिल्या आहेत.

लोकराज्य जिवंत 4 Mar 2026 5:08 pm

Sahyadri Tiger Reserve |सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात नव्या नर वाघाची नोंद; ‘STR T9’ची एंट्री

चांदोली राष्ट्रीय उद्यानात ‘शिलेदार’ची दमदार हजेरी सातारा – सह्याद्री व्याघ्र प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या चांदोली राष्ट्रीय उद्यान परिसरात नव्या नर वाघाची नोंद झाली असून त्याला ‘STR T9’ असा सांकेतिक क्रमांक देण्यात आला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विविध कॅमेरा ट्रॅपमध्ये हा वाघ सातत्याने दिसून येत होता. [...]

तरुण भारत 4 Mar 2026 5:06 pm

मेढा येथे ९ मार्चला चौकचार मांड उत्सव

मालवण (प्रतिनिधी) मालवण मेढा येथील चौकचार मांड येथे वार्षिक मांड उत्सवाचे आयोजन सोमवार दि. ९ मार्च रोजी करण्यात आले आहे. यानिमित्त चौकचार मांड येथे सकाळी पूजा अर्चा, दिवसभर दर्शन, नवस फेडणे व बोलणे तसेच रात्री ८ वा. सामूहिक गाऱ्हाणे, रात्री १० वा. कलावंतीण नृत्य व घुमट वादन, त्यानंतर स्थानिक कलाकारांचे नृत्याविष्कार व शंकर मंदिर मेढा [...]

तरुण भारत 4 Mar 2026 5:06 pm

देशात दरवर्षी 6 लाख बालकांमध्ये जन्मजात दोष, राष्ट्रीय स्तरावर नोंदणीच नाही

हिंदुस्थानात बालमृत्यूच्या कारणांमध्ये बदल पहायला मिळत आहेत. संसर्गजन्य रोगांमुळे होणारे मृत्यूदर घटत असतानाच आता जन्मजात दोषांमुळे बालमृत्यू वाढत आहेत. ताज्या आकडेवारीनुसार, हिंदुस्थानात दरवर्षी सुमारे 6 लाख बालके जन्मजात दोषासह जन्माला येतात. जन्मजात दोषांमुळे होणाऱ्या जागतिक बालमृत्यूमध्ये एकट्या हिंदुस्थानचा 16 टक्के वाटा आहे. मात्र अद्याप या बालमृत्यूची राष्ट्रीय स्तरावर नोंदणीच नाही. ‘स्माईल ट्रेन इंडिया’ आणि ‘बर्थ […]

सामना 4 Mar 2026 4:53 pm

वणव्यांमुळे काजू बागायतदार शेतकरी हवालदिल

शासनाची नुकसान भरपाई तुटपुंजी ; शेतकऱ्यांचा आरोप नीलेश परब/न्हावेली मळेवाड,न्हावेली,आरोस,मातोंड परिसरात काजू हे उत्पादन शेतकऱ्यांसाठी उपजीविकेचे महत्वाचे साधन आहे.मात्र गेल्या काही दिवसांपासून या परिसरातील शेतकऱ्यांसाठी वणवा हा चिंतेची बाब ठरत असून.वणव्यांवर योग्य उपाययोजना नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. मळेवाड,न्हावेली,आरोस,मातोंड परिसरात पावसाळी ,उन्हाळी शेती शेतकऱ्यांकडून केली जाते.असे असले तरी काजू उत्पादन हेच उपजीविकेचे मुख्य साधन आहे.काजू [...]

तरुण भारत 4 Mar 2026 4:50 pm

Satara News |साताऱ्यात गॅरेज मालकावर कोयता हल्ला करणाऱ्या आरोपींची शाहूपुरी पोलिसांकडून धिंड

साताऱ्यात कोयता गॅंगविरोधात पोलिसांची धडक कारवाई सातारा – शहरातील मोळाचा ओढा परिसरात गॅरेज मालकावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करणाऱ्या सहा आरोपींची शाहूपुरी पोलीसांनी मोळाचा ओढा,करंजे नाका परिसरातून पायी धिंड काढली. या कारवाईमुळे कोयता गॅंगवर पोलिसांनी वचक बसवण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट झाले.मोळाचा ओढा, बुधवार नाका आणि करंजे परिसरातून सर्व आरोपींना तपासासाठी पायी फिरवण्यात आले.ज्या [...]

तरुण भारत 4 Mar 2026 4:50 pm

हिंदी महासागरात इराणी युद्धनौकेवर पाणबुडीचा हल्ला; एकाचा मृत्यू, 100 बेपत्ता, 78 जखमी

श्रीलंकेच्या दक्षिण किनारपट्टीवर व हिंदुस्थानच्या किनारपट्टीच्या जवळ एका इराणी युद्धनौकेवर पाणबुडी हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात इराणची ‘आयआरआयएस देना’ (IRIS Dena) ही युद्धनौका समुद्रात बुडाली असून, प्राथमिक माहितीनुसार किमान १०१ कर्मचारी बेपत्ता आहेत, तर ७८ जण गंभीर जखमी झाले आहेत. ४ मार्च २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. श्रीलंकेच्या दक्षिण […]

सामना 4 Mar 2026 4:47 pm

Satara News |वडिलांच्या स्मृतींना नमन करताना उदयनराजेंना डोळ्यातील अश्रू अनावर

उदयनराजेंकडून वडिलांना आदरांजली सातारा – साताऱ्याच्या ऐतिहासिक भूमीत आज भावनांचा एक हळवा क्षण अनुभवायला मिळाला. कोडोली येथील छत्रपती प्रतापसिंह महाराज आयुर्वेदिक उद्यानात श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज यांच्या शिल्पास पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी खासदार उदयनराजे भोसले स्वतः [...]

तरुण भारत 4 Mar 2026 4:42 pm

Kolhapur News |पाटगाव-कडगाव येथे केदारलिंग देवस्थान जमिनीवर ग्रामस्थांचा ताबा

दोन वर्षांच्या वादानंतर ग्रामस्थ आक्रमक पाटगाव -भुदरगड तालुक्यातील कडगाव येथील केदारलिंग देवस्थान जमिनीचा वाद चिघळला असून काल ग्रामस्थांनी जमीन ताब्यात घेतली. यावेळी आबाल वृद्धांसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. गेली दोन वर्षे मंदिराभोवतालची जागा यात्रा भरवण्याकरता मिळावी, या मागणीसाठी ग्रामस्थांनी [...]

तरुण भारत 4 Mar 2026 4:31 pm

पार्वती न्हावेलकर यांचे निधन

न्हावेली /वार्ताहर न्हावेली येथील रहिवासी कै.पार्वती महादेव न्हावेलकर ( ८५ ) यांचे राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले.पश्चात दोन मुलगे, सूना ,पुतण्या, नातू ,नाती असा परिवार आहे.न्हावेली पोलिस पाटील सावळाराम न्हावेलकर यांच्या त्या आजी होत.

तरुण भारत 4 Mar 2026 4:25 pm

kolhapur News |उदगाव पाणी योजनेतील भ्रष्टाचार,ठेकेदाराला काळ्या यादीत टाका ; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे आदेश

उदगाव ग्रामपंचायतीची कोल्हापूर सर्किट बेंचकडे धाव उदगाव -उदगाव (ता.शिरोळ) येथील राष्ट्रीय पेयजल योजनेच्या कामात बोगस काम करून फसवणुक केली आहे. तसेच रेल्वे लाईन भरावाखाली लोखंडी पाईप ऐवजी पिवीसी पाईप टाकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही बाब सरपंच सलीम पेंढारी यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य [...]

तरुण भारत 4 Mar 2026 4:24 pm

Ichalkaranji |इचलकरंजीतील धुळवडीत हुल्लडबाजी सायकलस्वाराला मारहाण,वाहनांची तोडफोड

इचलकरंजीत धुळवडीला हुल्लडबाजी इचलकरंजी – शहरात होळी उत्साहात साजरी झाल्यानंतर मंगळवारी धुळवडीच्या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी हुल्लडबाजीचे प्रकार घडले. मुख्य रस्त्यांवर गाड्या अडवून पैसे मागणे, राखेचे गोळे व दगडफेक करणे अशा प्रकारांमुळे सात ते आठ वाहनांचे नुकसान झाले. काही प्रवासी किरकोळ [...]

तरुण भारत 4 Mar 2026 4:13 pm

मार्चच्या पहिल्या आठवड्यातच उष्णतेची लाट; मुंबईच्या उपनगरांतील पारा 40 अंशांवर जाणार

होळी सणाची सुरुवात होताच महाराष्ट्रात उष्णतेने कहर करण्यास सुरुवात केली आहे. राज्याच्या ग्रामीण भागाप्रमाणे शहरी भागातही उष्णतेत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यातच उष्णतेची लाट धडकली असून मुंबईच्या उपनगरांतील पारा थेट 40 अंशांवर जाण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. कमाल तापमानामध्ये पाच अंशांची मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. अचानक होत असलेल्या या […]

सामना 4 Mar 2026 4:07 pm

एसटीच्या ‌‘शिवनेरी‌’ ची झेप आता मुंबई-पुण्याच्या पलीकडे- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

धाराशिव (प्रतिनिधी)- मुंबई-पुणे महामार्गाची ‌‘राणी‌’ म्हणून ओळख मिळवलेल्या एसटीच्या अत्याधुनिक, आरामदायी आणि सुरक्षित ‌‘शिवनेरी‌’ बस सेवेची झेप आता राज्यभर घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लवकरच मुंबईपुणे मार्गाच्या पलीकडे महाराष्ट्रातील प्रमुख शहरांदरम्यान शिवनेरी धावणार असल्याची माहिती धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. सन 2002 मध्ये सुरू झालेल्या शिवनेरी सेवेने वक्तशीरपणा, उत्कृष्ट आसनव्यवस्था आणि सुरक्षित प्रवास या गुणवैशिष्ट्यांमुळे उच्च मध्यमवर्गीय प्रवाशांचा विश्वास जिंकला. इतर बससेवेपेक्षा तिकीटदर थोडे अधिक असतानाही सातत्याने मिळणाऱ्या उत्तम प्रतिसादामुळे ही सेवा सुरुवातीपासूनच नफ्यात आहे, असे मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले. राज्यभर विस्तारासाठी 200 नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त व्होल्व्हो बसेस खरेदी करण्याची निविदा प्रक्रिया सुरू आहे. या बसेस एसटीच्या ताफ्यात दाखल होताच, मुंबईपुणेप्रमाणेच इतर महत्त्वाच्या शहरांदरम्यानही शिवनेरी सेवा सुरू होईल. प्रस्तावित मार्गांमध्ये नाशिक-पुणे, नाशिक-छत्रपती संभाजीनगर, नाशिक-जळगाव-धुळे, पुणे-कोल्हापूर, पुणे-सांगली, पुणे-सोलापूर, नागपूर-चंद्रपूर, नागपूर-अमरावती-अकोला अशा प्रमुख शहरांचा समावेश आहे. त्यामुळे राज्याच्या विविध भागांतील प्रवाशांना आलिशान, सुरक्षित आणि विश्वासार्ह प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे. सध्या दादर-स्वारगेट, दादर-शिवाजीनगर, बोरीवली-स्वारगेट, बोरीवली-शिवाजीनगर, ठाणे-स्वारगेट आणि ठाणे-शिवाजीनगर या मार्गांवर पर्यावरणपूरक ई-शिवनेरी बस सेवा सुरू असून प्रवाशांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ज्येष्ठ व महिलांसाठी सवलती महिला प्रवाशांना तसेच 65 ते 75 वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना तिकीटदरात 50 टक्के सवलत, तर 75 वर्षांवरील ज्येष्ठांना शिवनेरी प्रवास पूर्णपणे विनामूल्य आहे. त्यामुळे नव्या मार्गांवरही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळेल, असा विश्वास मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केला. 30 ‌‘स्लिपर शिवनेरी‌’ची भर नवीन 200 बसेसमध्ये 30 शयनयान (स्लिपर) बसेसचा समावेश असेल. सध्या ज्या मार्गांवर विना-वातानुकूलित शयनयान बससेवा आहे, त्या ठिकाणी ‌‘स्लिपर शिवनेरी‌’ सुरू करून प्रवासी सेवेला अधिक उन्नत रूप दिले जाणार आहे. आरामदायी बेड-कोच सुविधा, सुरक्षितता आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे दीर्घ पल्ल्याच्या प्रवासात प्रवाशांना नव्या अनुभवाची हमी मिळणार आहे. ‌‘शिवनेरी‌’चा हा विस्तार म्हणजे केवळ बससेवेची वाढ नव्हे, तर महाराष्ट्राच्या प्रगत आणि गतिमान प्रवाससंस्कृतीची नवी दिशा आहे.असे प्रतिपादन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले आहे.

लोकराज्य जिवंत 4 Mar 2026 4:03 pm

चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात आसू.. जेद्दाहमध्ये अडकलेले 200 हिंदुस्थानी मायदेशी दाखल

आखाती राष्ट्रांना लक्ष्य करून इराणच्या हल्ल्यांनंतर पश्चिम आशियात सुरू असलेल्या अशांततेदरम्यान जेद्दाहहून सुमारे २०० प्रवाशांना घेऊन जाणारे एक विशेष विमान अहमदाबादमध्ये उतरले. भीती आणि दहशतीत रात्र घालवल्यानंतर कुटुंबे पुन्हा एकत्र आल्यामुळे सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर आनंदाचे दृश्ये दिसून आले. डोळ्यात अश्रू आणि ओठांवर हास्य ठेवून, कुटुंबातील सदस्यांनी पोहोचल्यावर एकमेकांना मिठी मारली. ३ मार्चला सकाळी […]

सामना 4 Mar 2026 3:48 pm

जाहिरातीतून एसटी कमविणार 250 कोटी रुपये- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात धावणारी ‌‘लालपरी‌’ आता केवळ प्रवाशांनाच नव्हे, तर महसूलवाढीलाही वेग देणार आहे. पुढील पाच वर्षांत केवळ जाहिरातींच्या माध्यमातून एसटी महामंडळाला तब्बल 250 कोटी रुपयांपेक्षा अधिक महसूल मिळणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा धाराशिवचे पालकमंत्री तथा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली. एसटी महामंडळाच्या मुख्यालयात पार पडलेल्या 310 व्या संचालक मंडळाच्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, सहा.कामगार आयुक्त पल्लवी सहारे, तसेच सर्व खातेप्रमुख उपस्थित होते. मंत्री सरनाईक म्हणाले, “ एसटी महामंडळाची 251 आगारे आणि 610 पेक्षा अधिक लहान-मोठी बसस्थानके राज्यभर पसरलेली आहेत. सुमारे 12 हजार बसेसच्या ताफ्याद्वारे दररोज 50 ते 55 लाख प्रवाशांची ने-आण केली जाते. भविष्यात बससंख्या वाढल्यानंतर ही दैनंदिन प्रवासी संख्या 1 कोटींपर्यंत जाईल. अशा व्यापक पोहोच असलेल्या माध्यमावर जाहिरात देणे म्हणजे उत्पादकांसाठी सुवर्णसंधीच आहे.” चांद्यापासून बांदयापर्यंत, गावखेड्यांपासून महानगरांपर्यंत पोहोचणाऱ्या एसटीच्या प्रत्येक चाकासोबत आता महसुलाची नवी चक्रेही फिरणार आहेत. बसस्थानके, त्यांचा परिसर, बसेसच्या आतील व बाहेरील भाग तसेच उपलब्ध सर्व संसाधनांचा पुरेपुर वापर करून जाहिरात महसूल वाढविण्याचा महत्त्वाकांक्षी आराखडा तयार करण्यात आला आहे. यासाठी स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया राबविण्यात आली असून, पुढील पाच वर्षांसाठी 250 कोटी रुपयांहून अधिक महसूल देणारी निविदा स्वीकारण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सदयस्थितीत कार्यरत असलेले जाहिरात परवानाधारकांचा परवाना कालावधी समाप्त झाल्यानंतर जाहिरातीचे अधिकार नविन परवानाधारकांकडे जाणार आहेत. सध्या जाहिरातींद्वारे दरवर्षी सुमारे 22 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. नव्या निविदेमुळे या उत्पन्नात तब्बल दुपटीपेक्षा जास्त वाढ होणार आहे. अशाप्रकारे “तिकीट विक्रीव्यतिरिक्त विविध पर्यायी स्रोतांमधून उत्पन्न निर्माण झाले, तर एसटीला भविष्यात तोट्याच्या गर्तेत जाण्याची वेळ येणार नाही,” असा विश्वासही मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केला.

लोकराज्य जिवंत 4 Mar 2026 3:46 pm

सिंधुदुर्गात इंधनाचा पुरेसा साठा ; नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे आवाहन सिंधुदुर्गनगरी / प्रतिनिधी मध्यपूर्व आशिया तसेच आखाती देशांमध्ये सध्या सुरु असलेल्या युद्ध परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. कोणत्याही प्रकारची टंचाई निर्माण झालेली नाही. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये व घाबरून जाऊ नये.असे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इंधन पुरवठ्‌याबाबत खबरदारीचा उपाय [...]

तरुण भारत 4 Mar 2026 3:45 pm

प्रसंगी विरोधात बसू, पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही- प्रताप सरनाईक

धाराशिव (प्रतिनिधी)- सत्ता महत्त्वाची आहे, पण त्यामुळे पक्षात फूट पडू देणार नाही असं प्रताप सरनाईकांनी म्हटलं. तसचे धाराशिवमध्ये शिवसेनेतील एकजूट कायम ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. प्रसंगी विरोधात बसू, पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही, असे पालकमंत्री प्रताप सरनाईकांची यांनी सांगितले आहे. पुरोगामी विचाराचे लोकराज्यच्या बातमी नंतर पालकमंत्री यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांनंतर धाराशिव जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. सत्तास्थापनेबाबत विविध चर्चांना उधाण आले असताना पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी ठाम भूमिका मांडत सर्व चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. सत्ता महत्त्वाची असली तरी पक्षाची एकजूट त्याहून महत्त्वाची आहे. प्रसंगी आम्ही विरोधी बाकांवर बसू; पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही, अशी स्पष्ट भूमिका सरनाईकांनी मांडली. अफवांवर कठोर भूमिका नुकत्याच झालेल्या निवडणुका शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांनी एकत्र लढवल्या होत्या. पुढील सत्तास्थापनेबाबत चर्चा सुरू असतानाच काही मंडळींकडून दिशाभूल करणाऱ्या बातम्या पसरवल्या जात असल्याचा आरोप सरनाईक यांनी केला. स्वार्थी राजकारणातून शिवसेनेतील एक गट आमच्यासोबत असल्याचा प्रचार करून काहीजणांकडून पक्षात फूट पाडण्याचा प्रयत्न होत आहे. हे कदापि सहन केले जाणार नाही, असं सरनाईकांनी सांगितलं. मतभेदांचा आभास आमदार तानाजी सावंत यांना वेगळे ठेवून शिवसेनेत मतभेद असल्याचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचेही प्रताप सरनाईकांनी नमूद केले. मात्र आमचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली धाराशिव जिल्ह्यातील शिवसेना अखंड, अभेद्य आणि सशक्त आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पुढील रणनीतीवर चर्चा सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा करून पुढील राजकीय रणनीती ठरवली जाईल, असेही सरनाईक यांनी सांगितलं. तथाकथित स्वयंभू नेत्यांनी पक्षाच्या रणनीतीबाबत भाष्य करू नये, अशा सक्त सूचना त्यांनी दिल्या. तत्त्वांशी तडजोड नाही सत्ता हे ध्येय असले तरी तत्त्वांशी तडजोड नाही. दबाव, आमिष किंवा अफवांच्या आधारे शिवसेनेची एकजूट ढळणार नाही, असा ठाम विश्वास सरनाईक यांनी व्यक्त केला. धाराशिव जिल्ह्यातील शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांनी अफवांकडे दुर्लक्ष करून पक्षनेतृत्व जो निर्णय घेईल त्यामागे ठामपणे उभे राहावे, तसेच संघटन बळकट करण्यावर भर द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. आगामी राजकीय घडामोडींमध्ये शिवसेना अधिक सक्षमपणे उभी राहील, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

लोकराज्य जिवंत 4 Mar 2026 3:45 pm

रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद

धाराशिव (प्रतिनिधी)- कोरोना काळापासून अनेक महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचे प्रमाण खूपच कमी झालेले आहे. शिक्षणापासून विद्यार्थी उदासीन झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा तासिकेला आणि विविध उपक्रम व कार्यक्रमांना खूप मोठा प्रतिसाद असल्याचे दिसून येते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संदीप देशमुख यांनी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीसाठी अनेक मार्गांचा अवलंब करून विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढवून सर्व तासिका पूर्ण कशा होतील याकडे लक्ष दिले आहे. विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने महत्त्वाचे असणारे उपक्रम महाविद्यालय मध्ये प्रभावीपणे राबवलेले आहेत. चॅट जीपीटी, ए.आय कार्यशाळा, शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे यांच्यावरील कार्यशाळा, अशा विविध कार्यशाळा विद्यापीठ स्तरावरील मंजूर करून त्या प्रभावीपणे राबवलेल्या आहेत. महाविद्यालयामध्ये दत्तक योजना प्रभावीपणे राबवून विद्यार्थ्यांच्या उपस्थितीकडे लक्ष केंद्रित केले आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना आकर्षित करणारे आणि त्यांच्या करिअरसाठी उपयुक्त असणारे सर्व उपक्रम राबवण्यावर मोठा भर दिला आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमध्ये वाढ होण्यासाठी कनिष्ठ विभागातील अकॅडमी असेल, शैक्षणिक सहल असेल, पारंपरिक वेशभूषा दिन साजरा करणे ,विद्यार्थ्यांच्या तासिका होत आहेत की नाही यावर काटेकोरपणे लक्ष ठेवणे असेल,कोणताही विद्यार्थी शिष्यवृत्ती पासून आणि एबीसी सवलतीपासून वंचित राहणार नाही. महाविद्यालयामध्ये आल्यानंतर तो रिकाम्या हाताने घरी परत जाणार नाही यासाठी प्राचार्य डॉ.संदीप देशमुख यांनी खूप मोठे प्रयत्न केले आहेत. आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये रामकृष्ण परमहंस महाविद्यालय विद्यार्थ्यांनी गजबजुन गेल्याचे दिसते. प्रत्येक उपक्रमात विद्यार्थी खूप मोठ्या संख्येने भाग घेताना दिसतात. अशा अनेक उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची उपस्थिती खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे.

लोकराज्य जिवंत 4 Mar 2026 3:45 pm

सगट यांच्यावर सूडबुद्धीने केलेली हद्दपारची कारवाई तात्काळ रद्द करावी

धाराशिव (प्रतिनिधी) - तुळजापूर तालुक्यातील काटगाव येथील कचरु मल्हारी सगट यांच्यावर राजकीय द्वेष व सूडबुद्धीने केलेली हद्दपार (तडीपार) ची कारवाई रद्द करण्यात यावी. संबंधित पोलीस उपविभागीय अधिकारी व पोलीस अधिकारी यांची चौकशी करण्यात यावी. तसेच संबंधित दोषीवर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी सकल मातंग समाजाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर दि.2 मार्च रोजी धडक मोर्चा काढण्यात आला. दरम्यान निवासी उपजिल्हाधिकारी यांना तर पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्याशी चर्चा करून त्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. दरम्यान, तुळजापूर नाका येथील लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकापासून निघालेला हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या मोर्चात महिला व पुरुष शेकडोंच्या संख्येने सहभागी झाले होते. दिलेल्या नियोजनात असे नमूद करण्यात आले आहे की, तुळजापूर तालुक्यातील काटगाव येथील कचरु मल्हारी सकट यांनी जिल्हा परिषदेची निवडणूक शिवसेना (ठाकरे) च्यावतीने लढवली. त्याचा राग मनात धरून व पोलीस प्रशासनाला हाताशी धरून द्वेष व सूडबुद्धीने सगट यांची ज्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता झालेली आहे, ते आणि इतरांच्या नावावर असलेले गुन्हे त्यांच्या नावे दाखवून ते गुन्हेगार असल्याचे बसविण्याचा प्रयत्न केला. त्या आधारे त्यांना धाराशिव सहज जिल्ह्यातून हद्दपार (तडीपार) करण्याची कारवाई केली आहे. ही कारवाई अत्यंत चुकीची व अन्यायकारक आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी कोणाच्यातरी दबावाला बळी पडून सगट यांच्यावर राजकीय द्वेष व सूडबुद्धीने केलेली मातंग समाजातील सगट यांच्याविरुद्ध उपविभागीय पोलीस अधिकारी धाराशिव यांनी दि.13 जानेवारी रोजी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 56 अन्वये तीन जिल्ह्यांमधून हद्दपार तडीपार करण्याचा आदेश पारित केलेला आहे. या हा आदेश देताना त्यांच्या विरोधातील अनेक न्यायालयामार्फत निकाली निघालेले असून सध्या त्यांच्याविरुद्ध कोणताही गंभीर स्वरूपाचा कायदा व सुव्यवस्था बिघडणारी परिस्थिती अस्तित्वात नाही. त्यामुळे त्यांच्यावर हद्दपारची कारवाई करण्यात आलेली असल्यामुळे मातंग समाजामध्ये तीव नाराजी निर्माण झाली आहे. ही कारवाई वस्तुस्थिती, सामाजिक परिस्थिती व न्यायनिष्ठ तत्वांचा विचार न करता करण्यात आलेली आहे. सगट यांच्या सामाजिक, कौटुंबिक व उपजीविकेवर गंभीर परिणाम होत आहे असे समाजाचे मत आहे. त्यामुळे या आदेशाचा पुनर्विचार करून न्याय दृष्टिकोनातून हद्दपार (तडीपार) आदेश तात्काळ रद्द करण्यात यावा. अन्यथा सकल मातंग समाजाच्यावतीने शासन व प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे. या आंदोलनात सुदर्शन रणदिवे, सुधाकर पाटोळे, लक्ष्मी गायकवाड, अशा पात्रे, वंदना रणदिवे, मनीषा गायकवाड, आकाबाई भोवाळ, सुमित पाटोळे, रोहित पंखे, सुरेश भिसे, महेश डोलारे, शिवाजी गायकवाड, सोमनाथ कांबळे, संदीप शिरसाट, संतोष मोरे, रवींद्र मिसाळ, बापू मिसाळ, गोविंद गायकवाड, संकेत कांबळे, सर्जेराव गायकवाड, बजरंग देडे, मारुती वाघमारे, विशाल पारधे, सर्जेराव गायकवाड, बाबा वाघमारे, तानाजी आडसोळ, राहुल ताटे, खंडू शिंदे, अमोल कांबळे, ओमकार कांबळे, गोरोबा ताटे, अक्षय वाघमारे, सर्जेराव शिंदे, बळीराम ताटे, बालाजी कांबळे, ओमकार पेठे, संभाजी कांबळे, कुमार शिंदे, साहिल लोंढे, अनिल शिंदे, फुलचंद शिंदे, विजय शिंदे, अरुण कांबळे, राम ताटे, बालाजी साळुंके, पंकज सोनपारखे, पुरुषोत्तम भिसे, कृष्णा क्षिरसागर, अक्षय क्षिरसागर, पुष्पक कसबे, धीरज भालेराव आदींसह शेकडोंच्या संख्येने समाज बांधव सहभागी झाला होता.

लोकराज्य जिवंत 4 Mar 2026 3:44 pm

गावोगावी आरोग्य क्रांतीचा संकल्प ; गुणवंत ग्रामपंचायतींना 2 कोटीं पर्यंतचा सन्मान

धाराशिव (प्रतिनिधी)- ‌‘माझं गाव,आरोग्य संपन्न गाव‌’ अभियान राबविण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.दर आर्थिक वर्ष 1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीत हे अभियान राबविण्यात येणार असून,गुणवत्तापूर्ण कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना ‌‘आरोग्य संपन्न ग्राम‌’ म्हणून मानांकन देऊन प्रोत्साहनपर पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. आरोग्य सेवांमध्ये गुणात्मक सुधारणा करणे,प्रत्येक नागरिकाला आरोग्याच्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे,संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांचे प्रमाण कमी करून त्यांचे निर्मूलन करणे तसेच माता व बालकांचे आरोग्यमान उंचावणे या उद्देशाने हे अभियान राबविण्यात येणार आहे. नागरिकांच्या जीवनशैलीत व आहारात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी प्रोत्साहन, प्रतिबंधात्मक उपाययोजना,वेळेवर उपचार व पुनर्वसन हे या अभियानाचे चार प्रमुख स्तंभ असतील. गावातील नागरिकांना सदृढ व सशक्त करण्यासाठी हे अभियान सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.अंमलबजावणीत आरोग्य उपकेंद्र,प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालय हे प्रमुख घटक असतील. सामाजिक बांधिलकी,लोकसहभाग, लोककेंद्रीत नियोजन व शाश्वत आरोग्य व्यवस्थापनाच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.या माध्यमातून आयुष्मान भारत,राष्ट्रीय आरोग्य अभियान,पोषण अभियान, स्वच्छ भारत अभियान तसेच सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स-3 यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. अभियानात स्थानिक स्वराज्य संस्था,जिल्हा व तालुका यंत्रणा, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांवरील आरोग्य अधिकारी, आरोग्य सेवक-सेविका,आशा कार्यकर्त्या तसेच ग्रामस्थांचा सक्रीय सहभाग राहणार आहे.एकात्मिक कार्यप्रणाली व पारदर्शक मूल्यांकनाच्या आधारे गुणवत्तापूर्ण कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना ‌‘आरोग्य संपन्न ग्राम‌’ पुरस्कार देण्यात येणार आहे. अभियानाच्या अंमलबजावणी व नियंत्रणासाठी आरोग्य मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्य आरोग्य संपन्न गाव नियंत्रण समिती,राज्यस्तरीय कृती समिती,जिल्हास्तरीय अभियान समिती,तालुकास्तरीय कृती समिती आणि ग्रामपंचायतस्तरीय कृती समिती अशा पाच समित्यांची स्थापना करण्यात येणार आहे. ग्रामपंचायतस्तरीय समिती गाव आरोग्य कृती आराखडा तयार करेल. त्यामध्ये आरोग्य सेवांची सद्यस्थिती, अडचणी व सुधारणा उपाय,आरोग्य ग्रामसभा,स्वच्छता अभियान,पोषण जागरूकता,स्वमूल्यमापन चाचणी, आरोग्य नकाशे तसेच विविध कार्यक्रमांमध्ये नागरिकांचा सहभाग वाढविणे यांचा समावेश असेल. गावांचे स्वमूल्यमापन ते राज्यस्तरीय अंतिम मूल्यांकन अशी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.प्रथम क्रमांकासाठी जिल्हास्तर, विभागस्तर व राज्यस्तरावर अनुक्रमे 25 लाख,1 कोटी व 5 कोटी रुपयांचे पुरस्कार दिले जातील. द्वितीय क्रमांकासाठी 20 लाख,75 लाख व 3 कोटी,तर तृतीय क्रमांकासाठी 15 लाख,50 लाख व 2 कोटी रुपयांचे पुरस्कार असतील. उपआरोग्य केंद्राला जिल्हास्तरावर प्रथम क्रमांकासाठी 5 लाख व राज्यस्तरावर 25 लाख रुपये देण्यात येतील.प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी जिल्हास्तरावर प्रथम क्रमांकासाठी 10 लाख व राज्यस्तरावर 50 लाख रुपये तर ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयाला राज्यस्तरावर 75 लाख रुपयांचा पुरस्कार दिला जाईल. याशिवाय पंचायत समितीला राज्यस्तरावर अनुक्रमे 2 कोटी,दीड कोटी व 1 कोटी 25 लाख रुपये तर जिल्हा परिषदेला अनुक्रमे 5 कोटी, 3 कोटी व 2 कोटी रुपयांचे पुरस्कार प्रदान करण्यात येतील.या अभियानासाठी दरवर्षी 80 कोटी 75 लाख रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे.

लोकराज्य जिवंत 4 Mar 2026 3:43 pm

आमदार कैलास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित हॉलीबॉल स्पर्धेत जेजुरी संघ प्रथम

धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव कळंबचे आमदार कैलास पाटील यांच्या 44 व्या वाढदिवसानिमित्त भव्य हॉलीबॉल महासंग्रामाचे आयोजन करण्यात आले होते. राज्यभरातून विविध संघांनी सहभाग घेत स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.अंतिम सामन्यात जेजुरी, पुणे येथील संघाने शानदार खेळ करत विजेतेपद पटकावले. डोरलेवाडी, बारामती संघाने द्वितीय क्रमांक, येडशी-धाराशिव, संघाने तृतीय क्रमांक, तर सोलापूर पोलीस, सोलापूर संघाने चतुर्थ क्रमांक मिळवला.स्पर्धेनंतर मान्यवरांच्या हस्ते विजेत्या संघांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. यावेळी प्रवीण कोकाटे, श्वेता दुर्गकर, सोमनाथ आप्पा गुरव, अमित उंबरे, प्रशांत बापू साळुंखे, हनुमंत देवकते, जाधवर सर, प्रवीण केसकर, राकेश सूर्यवंशी, शिवयोगी चपणे, अभिजीत देशमुख, सत्यजित पडवळ, विश्वजीत देशमुख, मनोज पडवळ, अक्षय खळदकर, सात्विक दंडनाईक, रोहन देशमुख आदींसह अनेक मान्यवर व खेळाडू उपस्थित होते. युवासेना तालुका प्रमुख लखन देशमुख व युवासेना शहर प्रमुख अभिराज कदम यांनी सर्व विजेत्या संघांचे अभिनंदन करत भविष्यात अशा क्रीडा स्पर्धांना अधिक प्रोत्साहन देण्याचा निर्धार व्यक्त केला. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी येडशी-धाराशिव, घाटी, आदर्श, पोहनेर आणि जय जिजाऊ हॉलीबॉल क्लब या स्थानिक संघांनी विशेष परिश्रम घेतले. संपूर्ण महाराष्ट्रातून संघांनी हजेरी लावल्यामुळे उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

लोकराज्य जिवंत 4 Mar 2026 3:43 pm

सुप्रसिद्ध चारोळीकर चंद्रशेखर गोखले अर्थात चंगोंच्या हस्ते अक्षरवेलच्या विशाखा साहित्य संमेलनाचे उदघाटन

धाराशिव (प्रतिनिधी)- मराठी भाषा गौरवदिन आणि कुसुमाग्रज जयंतीचे औचित्य साधून धाराशिव शहरातील अक्षरवेल महिला साहित्य मंडळाने प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी विशाखा साहित्य संमेलनाचे शहरातील स्वयंवर मंगल कार्यालय येथे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून प्रसिद्ध लेखक, चारोळीकार, कथा कादंबरीकार चंद्रशेखर गोखले, अभिनेत्री, गायिका उमा गोखले तसेच अपूर्वाई प्रकाशन पूणेचे डॉ. रवींद्र चिंचोलकर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे पहिले सत्र पुस्तक प्रकाशनाने तर दुसरे सत्र काव्य संमेलनाने रंगले. कार्यक्रमाची सुरुवात संमेलनाध्यक्ष, प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते बार्शी नाका येथील राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून ग्रंथदिंडीने झाली. ग्रंथदिंडीमध्ये रेखा खैरे यांच्या यशराज पब्लिक स्कूलच्या लेझीम पथकासह मुक्तांगण इंग्लिश स्कूलच्या वारकरी मुला मुलींच्या समूहाने सहभाग नोंदवला. श्रीअनिल ढगे यांच्या मृदुंगाच्या तालात ज्ञानोबा माऊली तुकारामाच्या जयघोषाने परिसर दुमदुमला . ग्रंथदिंडीमध्ये ज्ञानदेव,तुकाराम यांची वेशभूषा साकारलेली लहान लहान मुलं देखील होती. विद्येची देवता सरस्वतीची वेशभूषा केलेल्या अक्षरवेल मंडळाच्या सदस्य अँड. जयश्री तेरकर यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पाहुण्यांचे स्वागत औक्षण आणि पुष्पवृष्टी ने करण्यात आले प्रतिमापूजन आणि दीपप्रज्वलना नंतर सह्याद्री डान्स अकॅडमीच्या श्रावणी व्यास यांच्या बालचमुने सरस्वती वंदना सादर करून श्रोत्यांची मने जिंकली .मोक्षा करवर हिच्या सुंदर आवाजातील संमेलन गीताने मुख्य कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रशेखर गोखले यांचा परिचय मंडळाच्या उपाध्यक्ष प्रा. विद्या देशमुख यांनी तर उमा गोखले यांचा परिचय डॉ.अस्मिता बुरगुटे यांनी व प्रकाशक डॉ.रवींद्र चिंचोलकर यांचा परिचय शिवनंदा माळी यांनी करून दिला .कार्यक्रमाचे प्रास्ताविक अक्षरवेलच्या अध्यक्ष डॉ.सुलभा देशमुख यांनी केले कार्याध्यक्ष कमल नलावडे यांनी मंडळाची माहिती तर संस्थापक अध्यक्ष डॉ. रेखा ढगे यांनी चारोळी संग्रह प्रकाशनाची पार्श्वभूमी स्पष्ट केली. मार्गदर्शक डॉ. अनार साळुंके यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमात जब्राट या मराठी चित्रपटाच्या निर्मात्या प्रगती कोळगे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण उमा चंद्रशेखर गोखले यांनी महिलांना मोलाचे मार्गदर्शन केले त्या म्हणाल्या सर्वांचं करता करता आपण आपल्या आनंदासाठी ही जगलं पाहिजे. स्वतःला खुश ठेवण्याची जबाबदारी आपली स्वतःची असते ती प्रामाणिकपणे पार पाडली तरच खऱ्या अर्थाने आपलं आयुष्य सार्थ होईल तसेच त्यांनी आपल्या मधुर आवाजात वैकुंठीचा राणा तु ची नारायण ......हे गीत गायले .त्यांच्या पेपर वाल्या मुलांच्या गोष्टीने श्रोत्यांच्या डोळ्यात पाणी तरले. सहजरीत्या त्यांनी श्रोत्यांशी आपली नाळ जोडून आपल्या खाजगी आयुष्यातील गोष्टींवर देखील दिलखुलास गप्पा मारल्या. संमेलनाचे अध्यक्ष चंद्रशेखर गोखले आपल्या बालपणीच्या आठवणी आणि आजूबाजूचा परिसर तसेच त्यांना उपजत मिळालेले कवितेचे वरदान यावर मनमोकळेपणाने बोलले . आणखी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट त्यांनी नमूद केली ती म्हणजे हरवत चाललेल्या कुटुंबातील संवादाची!पालकांनी आपल्या पाल्यासोबत अत्यंत निखळ नाते जोडावे त्यांना प्रोत्साहन द्यावे असाही सल्ला त्यांनी दिला शेवटी त्यांच्या उत्तम उत्तम चारोळ्या ऐकल्या. सरांच्या चारोळ्या ऐकून श्रोतावर्ग दाद देत होता माना डोलवत होता. अपूर्वाई प्रकाशनचे प्रकाशक डॉ.रवींद्र चिंचोलकर यांनी त्यांचा प्रकाशक होण्याचा प्रवास आणि अक्षरवेलशी असलेले नाते तसेच चारोळी संग्रह प्रकाशित करताना आलेल्या अनुभवातील गमती जमती सांगितल्या. वैद्य पल्लवी कोथळकर यांनी वाचक मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमात प्रथम कमल नलावडे यांच्या कवी, चित्रकार राजेंद्र अत्रे यांचे मुखपृष्ठ असलेल्या, डॉ. सुलभा देशमुख यांची पाठराखण असलेल्या व अपूर्वाई प्रकाशन पूणे चे डॉ. रविंद्र चिंचोलकर यांनी प्रकाशित केलेल्या आठवणीच्या हिंदोळ्यावर या पुस्तकाचे थाटात प्रकाशन झाले. अत्यंत उत्साहावर्धक वातावरणात फुलांची नावे असलेल्या 42 चारोळी संग्रहाचे प्रकाशन उपस्थितांच्या हस्ते पार पडले यात क्रमश:1) डॉ. सुलभा देशमुख - प्राजक्त 2) कमल नलावडे -कृष्णकमळ 3) विमल नवाडे -कुंदकळ्या 4)डॉ. अनार साळुंके -रातराणी 5)डॉ. रेखा ढगे -सदाफुली 6)प्रा. विद्या देशमुख -अनंत 7) डॉ. अस्मिता बुरगुटे- पलाश 8)शिवनंदा माळी -गुलमोहर 9)अनिता पडवळ -गुलबक्षी, ऋतुगंध 10) अर्चना गोरे -अबोली 11)अमृता अमोल- जुई 12)जना फासे- बकुळ 13)सुनीता देशपांडे- निशिगंध 14) ज्योति कावरे- चाफा 15)वैजयंती तावडे- वैजयंती 16)अलका तावडे- गजरा 17)मनीषा पुंड- कृष्ण सखी 18)सविता गुंड - शब्दफुले 19) रेखा मगर- केतकी 20)ज्योती खापरे -पुष्प वर्षा 21)पूजा पाटील -शब्दसरी 22) डॉ.मनीषा असोरे- अपराजिता 23)अश्विनी निवर्गी- शाल्मली 24)अपर्णा कुलकर्णी- कार्वी 25)मैनाताई साबणे- जास्वंद 26)स्मिता पेशवे- शब्दगंध 27) संजीवनी कुलकर्णी -जीवनपुष्प 28) अर्चना देशमुख -कुमुदिनी 29) सुमित्रा आटपळकर -मोगरा 30) कांचनगंगा मोरे -कृष्ण मंजिरी 31) लता वाघचौरे- सायली 32)कविता पुदाले- ताम्हण 33) योगिता सुरवसे देवकळी 34)सविता माळी- केवडा 35)मंजुश्री भुतेकर- मंजिरी 36)उषा देशमुख- गुलाब 37)सारिका देशमुख - कदंब 38) विद्या डोईफोडे- कुमुद 39) किरण देशमाने -अक्षरपद्म 40) नंदा देवडीकर -मधुमालती 41 )जयश्री जगदाळे - नीलकमल. 42 ) मनिषा अपसिंगेकर -मन प्राजक्त अशा विक्रमी संख्येने चारोळी संग्रहाचे प्रकाशन झाले. पहिल्या सत्राचे खुमासदार असे सूत्रसंचालन सुनीता गुंजाळ कवडे व किरण देशमाने यांनी केले. भोजन विरामानंतर दुपारचे सत्र काव्य संमेलनाने रंगले. काव्य संमेलनाचे अध्यक्ष स्थान विमल नवाडे यांनी भूषविले.रोहिणी तळेकर यांनी आपल्या सुरेल आवाजात सरस्वती स्तवन गायले.अंजली देशपांडे ,बी. सुरभी, मनीषा पोतदार, गिरिजा खैरे, अलका पवार, प्रिया उमरकर ,वैशाली अघोर ,अरुणा जाधव ,सायली वेदालंकार, सिद्धी सुरवसे ,सविता जाधव, रजनी रावळे ,प्रणिता राठोड, श्रुतिका हाजगुडे, पुनम तापडिया, लक्ष्मी देशपांडे यांनी आपल्या रचना सादर केल्या तर पी.एस.आय.अनघा गोडगे यांनी सकाळी ग्रंथदिंडीचा बंदोबस्त आणि दुपारी काव्य संमेलनात सहभाग घेऊन कौटुंबिक हिंसाचार रोखण्यासाठी शासनाकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची माहिती देऊन महिलांना मार्गदर्शन केले आणि आपली एक वास्तववादी रचना सादर केली.दुसऱ्या सत्राचे सूत्रसंचालन अँड .स्वप्नाली अत्रे आणि जयश्री फुटाणे यांनी केले . आभार स्मिता पेशवे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अक्षरवेल महिला साहित्य मंडळाच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले . अध्यक्षीय समारोपाने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमाला शहरातील प्रतिष्ठीत मान्यवर, साहित्यिक, कवी, मसापचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती.

लोकराज्य जिवंत 4 Mar 2026 3:42 pm

शाळा, महाविद्यालये आणि बसस्थानक परिसरात निर्भय व पिंक पथकाची गस्त वाढणार

धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असतानाच, प्रशासकीय पातळीवर आता मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या आदेशावरून शहरात महिलांसाठी निर्भय वातावरण निर्माण करण्यासाठी धाराशिवच्या नगराध्यक्षा नेहा राहुल काकडे यांनी पोलीस अधीक्षक रितू खोकर यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी शहरातील टवाळखोरांचा बंदोबस्त करण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यावर भर देण्यात आला. शहरातील शाळा, महाविद्यालये, खासगी शिकवणी वर्ग (ट्युशन क्लासेस) आणि बसस्थानक यांसारख्या गर्दीच्या ठिकाणी मुलींना टवाळखोरांकडून होणारा त्रास वाढल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर, नेहा काकडे यांनी पोलीस प्रशासनाकडे खालील मागण्या मांडल्या. निर्भय पथक आणि पिंक पथकाची वर्दळीच्या ठिकाणी गस्त वाढवण्यात यावी, महिलांच्या तक्रारींची दखल घेऊन संबंधितांवर तात्काळ कठोर कारवाई करावी, महिलांमध्ये विश्वासाचे आणि सुरक्षिततेचे वातावरण निर्माण करण्यासाठी पोलिसांनी सक्रिय राहावे आदी विषयांवर प्राधान्याने चर्चा करण्यात आली. पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला. महिला सुरक्षा हे पोलीस प्रशासनाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. शहरातील असुरक्षित ठिकाणांचे सर्वेक्षण करून त्याठिकाणी पोलीस बंदोबस्त आणि गस्त अधिक प्रभावी केली जाईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. या महत्त्वपूर्ण बैठकीला कळंबच्या नगराध्यक्षा सुनंदा कापसे आणि धाराशिव नगरपालिकेच्या महिला व बालकल्याण सभापती वैशाली सुशांत सोनवणे यांचीही प्रमुख उपस्थिती होती.

लोकराज्य जिवंत 4 Mar 2026 3:42 pm

तुळजापूर तालुक्यातील काटगाव-सोलापूर महामार्ग डांबरीकरणाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह!

तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील काटगाव ते सोलापूर महामार्गावरील नुकत्याच पूर्ण झालेल्या डांबरीकरण कामाच्या दर्जाबाबत नागरिकांतून तीव्र शंका व्यक्त केली जात आहे. विशेषतः कॅनलवरील जुन्या पुलाखाली पाईप टाकून मजबुतीकरण करणे आवश्यक असताना ते काम न करता थेट डांबरीकरण करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. स्थानिकांच्या मते, संबंधित पुलाच्या ठिकाणी आवश्यक तांत्रिक कामे न केल्यास भविष्यात जड वाहने (लोडेड गाड्या) जाताना रस्ता खचण्याची शक्यता असून मोठा अपघात होऊ शकतो. त्यामुळे वाहन पलटी होऊन जीवितहानीची भीती व्यक्त होत आहे. या परिसरात यापूर्वीही विविध विकासकामांमध्ये ठेकेदारांकडून थातूरमातूर कामे केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. परिणामी, रस्ते, नदी-नाले पूल आणि इतर कामांचा फटका नागरिकांना सहन करावा लागत असल्याची भावना आहे. काटगाव परिसर हा तालुका व जिल्ह्याच्या सीमेवरील भाग असल्याने येथील नागरिकांचे व्यवहार मोठ्या प्रमाणावर सोलापूरशी संबंधित आहेत. त्यामुळे काटगावसोलापूर मार्ग हा दैनंदिन प्रवासासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. अशा परिस्थितीत रस्त्याच्या दर्जाबाबत प्रश्न निर्माण झाल्याने नागरिकांत नाराजी पसरली आहे. सदर रस्ता काम नुकतेच पूर्ण झाल्याचे समजते. त्यामुळे संबंधित बांधकाम विभागाने तात्काळ पाहणी करून कामाची गुणवत्ता तपासावी, आवश्यक त्या दुरुस्त्या कराव्यात व जबाबदारांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

लोकराज्य जिवंत 4 Mar 2026 3:41 pm

तुमचे सेफ्टी रेकॉर्ड तपासा! ChatGPT आणि Grok मध्ये जोरदार भांडण; आरोपप्रत्यारोपांच्या फैरी

AI म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात दररोज नवनवीन गोष्टी विकसित होत असल्याने मानवी जीवन सुलभ होत असले तरी त्याचे काही गंभीर परिणाम देखील समोर येत आहेत. अशातच AI क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांमध्ये देखील आरोप प्रत्यारोप सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. आपली AI प्रणाली किती चांगली आहे तर दुसऱ्याची खराब असे प्रकार सध्या वाढले आहेत. ओपन एआय […]

सामना 4 Mar 2026 3:35 pm

Us Israel Iran War –इस्रायलचा तेहरानवर पुन्हा हल्ला, इराणी लढाऊ विमान हवेतच पाडले

इस्त्रायल आणि इराणमधील संघर्ष शिगेला पोहचला आहे. इस्त्रायलने बुधवारी पुन्हा एकदा इराणवर हल्ला केल्याचं समोर आलं आहे. तेहरानच्या आकाशात इराणी लढाऊ विमान हवेतच पाडल्याचा दावा इस्त्रायली संरक्षण दलांनी केला आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत इस्त्रायली सुरक्षा दलाने हल्ल्याची माहिती दिली. आयएएफच्या एफ-35आय ‘अदिर’ लढाऊ विमानाने इराणी हवाई दलाचे YAK-130 लढाऊ विमान पाडल्याचे आयडीएफने पोस्टमध्ये म्हटले […]

सामना 4 Mar 2026 3:32 pm

Hatkanangale News |इंगळीत ७० फूट खोल विहिरीत पोकलेंड कोसळला अन्…!

हुपरीतील इंगळी गावात विहिरीत पोकलँड कोसळले हुपरी– हातकणंगले तालुक्यातील इंगळी गावाच्या मोक्याच्या ठिकाणी रस्त्याच्या कडेला असलेली अनेक वर्षापासूनची जुन्या काळातील भूस्खलन झालेल्या सहा मोट विहीरीचे काम सुरू असताना अचानक जमीन खचल्याने अवजड असलेले पोकलँड दोन कामगारासह विहीरीत बुडाले. दरम्यान दोन कामगारांना सुरक्षित [...]

तरुण भारत 4 Mar 2026 3:28 pm

Keshavrao Bhosale Natya Gruh |कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृह लवकरच नव्या रूपात; ;महापौर रुपाराणी निकम यांची ग्वाही

कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृह लवकरच नव्या रूपात कोल्हापूर- संपूर्ण कोल्हापूरकरांची अस्मिता आणि महाराष्ट्रातील रंगकर्मींचा जिव्हाळ्याचा विषय असलेल्या संगीतसुर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचं काम लवकरच पूर्ण होईल..त्यासाठी रंगकर्मी , कलाकारांवर आंदोलन करण्याची वेळ येणार नसल्याची ग्वाही आज महापौर रुपाराणी निकम यांनी दिलीये.. केशवराव भोसले नाट्यगृहाच्या कामाची पाहणी करत महापौरांकडून या संदर्भात आढावा घेण्यात आलायं..संगीतसुर्य केशवराव [...]

तरुण भारत 4 Mar 2026 3:17 pm

कळंबमध्ये ‌‘फुलचंद‌’ पानाचा विळखा; तरुणाई नशेच्या आहारी !

कळंब (प्रतिनिधी)- कळंब शहरातील तरुणांनी शरीर सुदृढ ठेवण्याऐवजी जीवघेण्या नशेचा मार्ग स्वीकारल्याचे धक्कादायक चित्र समोर येत आहे. शहरात ‌‘फुलचंद‌’ नावाने ओळखले जाणारे तंबाखूयुक्त पान सातवी-आठवीतील शाळकरी मुलांपासून ते महाविद्यालयीन युवकांपर्यंत वेगाने पसरत असून, संपूर्ण तरुण पिढीच या व्यसनाच्या विळख्यात अडकत चालली आहे. “मस्त वाटते”, “जोरदार नशा येते” या भूलथापांना बळी पडून तरुणांमध्ये ‌‘कडक पान‌’ खाण्याची स्पर्धाच लागली आहे. मित्रांमध्ये टिंगल-टवाळी करण्यासाठी किंवा ‌‘मजा‌’ पाहण्यासाठी सक्तीने पान खायला लावण्याचे प्रकारही वाढले आहेत. सुरुवातीला गंमत म्हणून सुरू झालेले सेवन कधी कायमस्वरूपी व्यसन बनते, हे या कोवळ्या मुलांना कळतही नाही. मेंदूवर थेट परिणाम; कर्करोगाचा धोका वाढतो तज्ज्ञांच्या मते, अशा पानांमध्ये असलेली तीव्र रसायने व तंबाखू मेंदूवर थेट परिणाम करतात. निर्णयक्षमता कमी होणे, स्मरणशक्तीवर परिणाम, मानसिक अस्वस्थता, चिडचिडेपणा ही लक्षणे दिसू लागतात. सततच्या सेवनामुळे तोंडाचा व घशाचा कर्करोग होण्याचा धोका प्रचंड वाढतो. किशोरवयीन मुलांच्या पचनसंस्थेवर आणि वाढीवरही विपरीत परिणाम होत आहे. रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे हे गंभीर लक्षण ठरत आहे. शाळा-महाविद्यालय परिसरातच जास्त खप दुर्दैवाची बाब म्हणजे, शाळा व महाविद्यालय परिसरात या पानाचा खप मोठ्या प्रमाणात होत असल्याची चर्चा आहे. आठवी ते दहावीतील विद्यार्थी आणि महाविद्यालयीन युवक मोठ्या प्रमाणावर या व्यसनाच्या आहारी जात आहेत. शैक्षणिक भवितव्य धोक्यात येत असताना पालक मात्र मुलांच्या बदलत्या वागणुकीकडे आणि खिशातील पैशांच्या वाढत्या खर्चाकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसते. समाज आणि प्रशासनाची जबाबदारी तरुणांचे वैयक्तिक आयुष्य, आरोग्य आणि करिअर धोक्यात येत असताना प्रशासनाने आणि समाजाने याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. अल्पवयीन मुलांना तंबाखूजन्य पदार्थांची विक्री रोखण्यासाठी कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. शाळा-महाविद्यालयांनी जनजागृती मोहीम राबवून विद्यार्थ्यांना या व्यसनापासून दूर ठेवण्याचा ठोस प्रयत्न करणे गरजेचे आहे. “कडक पान खाण्याच्या नादात मुले स्वतःचे आयुष्य अंधारात ढकलत आहेत. आज परिणाम जाणवत नसले, तरी उद्या हेच व्यसन जीवघेणे ठरू शकते,” अशी भीती व्यक्त होत आहे. पालकांनी आणि शिक्षकांनी वेळीच सावध व्हा! आपल्या मुलाच्या तोंडाचा वास, दातांचा रंग, अचानक बदललेले वागणे आणि मित्रांची संगत याकडे लक्ष द्या. मुलं शाळेत किंवा क्लासला गेल्यावर नेमके काय करतात, यावर देखरेख ठेवा. ‌‘फुलचंद‌’च्या विळख्यातून आपल्या लेकरांना वाचवण्यासाठी आजच पावले उचला उद्या उशीर होऊ शकतो! “उपचारापेक्षा प्रतिबंध महत्त्वाचा; शाळेतूनच व्यसनमुक्तीचे संस्कार द्या!” डॉ. महादेव कोरसाळे आज राज्यात आणि देशात वाढत चाललेल्या व्यसनाधीनतेच्या पार्श्वभूमीवर शाळा हीच पहिली आणि प्रभावी संस्कारशाळा ठरली पाहिजे. मुलांना केवळ पुस्तकातील ज्ञान देऊन चालणार नाही, तर व्यसनाचे भयंकर परिणाम काय असतात हे ठोस आणि वास्तव उदाहरणांसह शिकवले गेले पाहिजे, अशी आक्रमक भूमिका डॉ. महादेव कोरसाळे यांनी मांडली. “व्यसनामुळे शरीराची हानी होते, मानसिक संतुलन बिघडते, कुटुंब उद्ध्वस्त होते आणि आर्थिक कंबरडे मोडते. तरीही समाज डोळेझाक करत आहे. आज अनेक तरुण सिगारेट, गुटखा, दारू आणि इतर घातक व्यसनांच्या विळख्यात अडकताना दिसत आहेत. ही केवळ वैयक्तिक नाही, तर सामाजिक आपत्ती आहे,” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. ते पुढे म्हणाले, “आजारी पडल्यानंतर लाखो रुपये खर्च करून उपचार करण्यापेक्षा, आजारच होऊ नये यासाठी शाळेपासूनच मूल्यशिक्षण देणे गरजेचे आहे. व्यसनमुक्ती हा फक्त आरोग्य विभागाचा विषय नसून शिक्षण विभाग, पालक आणि समाज यांचीही तितकीच जबाबदारी आहे.”“जर आज आपण ठोस पावले उचलली नाहीत, तर उद्याची तरुण पिढी व्यसनांच्या आहारी जाईल आणि समाजाची पायाभरणीच कमकुवत होईल. त्यामुळे शासनाने शालेय अभ्यासक्रमात व्यसनमुक्ती, आरोग्य-जागरूकता आणि नैतिक मूल्यांचे शिक्षण सक्तीचे करावे,” अशी ठाम मागणीही त्यांनी केली.“उपचारापेक्षा प्रतिबंध श्रेष्ठ” हे तत्व अंगीकारूनच आपण निरोगी आणि सक्षम पिढी घडवू शकतो, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

लोकराज्य जिवंत 4 Mar 2026 3:06 pm

कळंब शेकडो घरांची वीज बंद केल्याच्या निषेधार्थ, वीज बिलांची होळी

कळंब (प्रतिनिधी)- दहावी बोर्ड परिक्षा सुरू असताना तसेच उन्हाळ्यात वीजेची मागणी जास्त असताना कळंब शहरात महावितरण कंपनीच्या स्मार्ट मीटर प्रणालीमुळे शेकडो ग्राहकांचा वीज पुरवठा बंद केला. थकीत बिलांमुळे वीज पुरवठा बंद केला असल्याचे कारण महावितरण कंपनीने पुढे केले. महावितरणचा निषेध म्हणून कळंब येथील सामाजिक कार्यकर्ते राहुल मुळे यांनी महावितरण कंपनीच्या कळंब कार्यालयाच्या दारात होळी दिवशीच वीज बिलांची होळी करून महावितरण कंपनीच्या कार्यपद्धतीचा निषेध नोंदवला. कळंब महावितरण कडे दाखल केलेल्या तक्रार अर्जात तीन प्रश्न विचारले गेले. कळंब शहरात घरगुती वीज वापर करणाऱ्या ग्राहकांची एकुण संख्या किती आहे. त्यापैकी किती ग्राहकांच्या घरी स्मार्ट मीटर बसवले गेले ? ज्या ग्राहकांच्या घरी स्मार्ट मीटर बसवले गेले त्यांची स्मार्ट मीटर बसवण्यासाठी पुर्वपरवानगी घेतली होती का ? कळंब शहरातील स्मार्ट मीटर ग्राहकांचा वीज पुरवठा बंद करण्यापुर्वी महावितरण कंपनीच्या कळंब कार्यालयाने कळंब शहरातील घरगुती वीज वापर करणाऱ्या सर्व स्मार्ट मीटर ग्राहकांना थकबाकी न भरल्यास वीज पुरवठा वरिष्ठ पातळीवरून आपोआप बंद होणार आहे. याबाबत कळंब शहरात जनजागृती करुण माहिती दिली होती का ? याचा लेखी खुलासा महावितरण कंपनीने करावा. अशी मागणी कळंब येथील सामाजिक कार्यकर्ते राहुल मुळे यांनी महावितरण कंपनीच्या कळंब कार्यालयाकडे केली आहे.

लोकराज्य जिवंत 4 Mar 2026 3:06 pm

Iran Israel War –इस्रायलने केले अयातुल्ला खामेनी यांच्या मुलाला लक्ष्य, हत्या करण्याची दिली धमकी

इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी बुधवारी ४ मार्चला इराणचे नवे सर्वोच्च नेते मोज्तबा खामेनी यांना लक्ष्य केले आहे. पुढील सर्वोच्च नेते म्हणून निवड झाल्याच्या मीडिया रिपोर्ट्सच्या पार्श्वभूमीवर ही धमकी देण्यात आली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर कडक शब्दांत लिहिलेल्या पोस्टमध्ये, काट्झ म्हणाले, “इराणच्या कोणत्याही दहशतवादी राजवटीने इस्रायलचा नाश करण्याचे, अमेरिकेला आणि मुक्त जगाला धमकावण्याचे, […]

सामना 4 Mar 2026 3:01 pm

Pune News –पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचा नोटीसनामा फुसका! कारवाईला स्थगितीसाठी वेळ दिल्याची चर्चा

बाजारातील अनधिकृत शेड, बेकायदा टपऱ्या आणि अतिक्रमणांवर बुलडोझर चालवण्याचा इशारा देत तीन दिवसांची मुदत देणाऱ्या पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचा नोटीसनामा अखेर फुसकाच ठरला की काय, असा सवाल आता सर्वसामान्य व्यापारी आणि शेतकरी उपस्थित करत आहेत. मुदत संपूनही प्रत्यक्ष कारवाईचा मागमूस नाही. उलट नोटीसांवर स्थगिती मिळावी यासाठीच वेळ दिल्याची चर्चा रंगू लागल्याने बाजार समिती प्रशासनाच्या […]

सामना 4 Mar 2026 2:49 pm

पर्रीकर गटाची प्रचारात आघाडी

घरोघरीभेटीदेण्यावरअधिकभर: अनेकप्रभागातपहिलीफेरीपूर्ण पणजी : पणजी महापालिकेसाठी येत्या दि. 11 मार्च रोजी होणाऱ्या निवडणुकीत मंत्री बाबुश मोन्सेरात व उत्पल पर्रीकर या दोन्ही गटांमध्ये होणाऱ्या थेट लढतीच्या पार्श्वभूमीवर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील ‘आमी पणजेकार’ गटाने प्रचारात आघाडी घेतली आहे. घरोघरी भेटी हा त्यांचा प्रमुख अजेंडा असून रायबंदर येथून प्रचाराची सुऊवात करताना त्यांनी लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. मनपा निवडणुकीत [...]

तरुण भारत 4 Mar 2026 2:47 pm

मेणकुरे येथे होळी अंगावर पडल्याने युवकाचा मृत्यू

गावावर पसरली शोककळा : आमदार, मुख्यमंत्र्यांकडून दु:ख व्यक्त डिचोली : गावामध्ये देवदेवतांसमोर होळीच्या रात्री मोठ्या उत्साहाने रोवण्यात येणारी लांबलचक होळीच अंगावर पडून त्याचा मृत्यू होण्याची दुर्दैवी, हृदयद्रावक घटना डिचोली तालुक्यातील मेणकुरे गावात घडली आहे. मेणकुरे गावातील चव्हाटा येथे गावातील प्रमुख होळी रोवत असताना ती छिद्रातून जराशी सरकली व थेट जमिनीवर पडली. जमिनीवर पडत असतानाच त्याखाली [...]

तरुण भारत 4 Mar 2026 2:44 pm

गुलालोत्सव उत्साहात साजरा

पणजीसहशहरे, गावागावांतपारंपरिकपद्धतीनेरंगोत्सवाचाजल्लोष पणजी : राजधानी पणजीसह गोव्यातील प्रमुख शहरे, गावांमध्ये पारंपरिक पद्धतीने गुलालोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. त्यात लहान मुलांसह तरुण पिढीने आणि महिलांनी उत्साहात भाग घेतला. सर्वजण रंगोत्सवात न्हावून गेले. लोकवस्ती असलेल्या बहुतेक सर्व ठिकाणी हा रंगोत्सव साजरा झाला, तर गावांमध्ये तो धुळवडीच्या स्वरुपात आनंदाने साजरा करण्यात आला. पणजी शिमगोत्सव समितीतर्फे पणजी येथील आझाद [...]

तरुण भारत 4 Mar 2026 2:42 pm

Iran Israel War –इराणमध्ये अडकले हिंदुस्थानी विद्यार्थी, मदतीसाठी सरकारकडे याचना

इराण-इस्रायल युद्ध सुरु झाल्याने, सुमारे १० हजार ते १५ हजार हिंदुस्थानी विद्यार्थी अडकले आहेत. हे विद्यार्थी मुख्यतः तेहरान, शिराझ आणि इतर इराणी शहरांमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. त्यांचे कुटुंब हिंदुस्थानात आहे आणि सध्या त्यांची चिंता खूप आहे. विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, युद्धामुळे त्यांचे जीवन धोक्यात आले आहे. एनडीटीव्हीशी बोलताना, मीर सलिस यांनी सांगितले की बॉम्ब फक्त १०० […]

सामना 4 Mar 2026 2:39 pm

T20 WC 2026 –सेमीफायनलआधी टीम इंडियाचे खेळाडू सिद्धिविनायकाच्या चरणी; विजयासाठी साकडं

आयसीसी टी-20 वर्ल्डकप 2026 ची दुसरी सेमीफायनल लढत हिंदुस्थान आणि इंग्लंड संघात मुंबईतील वानखेडे मैदानावर खेळली जाणार आहे. या सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या खेळाडूंनी मुंबईच्या प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरात जाऊन बाप्पाचा आशीर्वाद घेतला. 5 मार्च रोजी वानखेडे मैदानावर इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या हाय-व्होल्टेज लढतीपूर्वी सलामीवीर ईशान किशन, अभिषेक शर्मा आणि अक्षर पटेल यांनी सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले आणि […]

सामना 4 Mar 2026 2:31 pm

दोन गाड्यांमध्ये सुरक्षित अंतर न ठेवल्यास निष्काळजीपणाचा गुन्हा; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

देशभरात रस्ते अपघातात वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण भूमिका घेतली आहे. दोन गाड्यांमध्ये सुरक्षित अंतर न ठेवल्यास संबंधित वाहन चालकाविरोधात निष्काळजीपणे ड्रायव्हिंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला जाऊ शकतो, असा महत्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायमूर्ती संजय कुमार आणि न्यायमूर्ती के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठाने तसे आदेश दिले आहेत. रस्ते नियमावली 1989 मधील नियम […]

सामना 4 Mar 2026 1:49 pm

अजितदादांच्या विमान अपघाताआधी काही लोकांकडून बारामती विमानतळाची रेकी; रोहित पवारांच्या आरोपांनी खळबळ

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जानेवारी महिन्यात बारामती येथे झालेल्या विमान अपघातात निधन झाले. अजित पवार यांच्या विमान अपघातावर संशय व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार आणि अजितदादांचे पुतणे रोहित पवार या विषयावर सातत्याने पत्रकार परिषद घेत वेगवेगळे दावे करत आहेत. बुधवारीही त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि अजितदादांच्या विमान अपघाताआधी […]

सामना 4 Mar 2026 1:43 pm

Iran Israel War –दोन दिवसांत 600 हून अधिक अमेरिकन सैनिकांचा मृत्यू, इराणचा दावा

इराण- इस्त्रायल आणि अमेरिका यांच्यात 28 फेब्रुवारीला सुरु झालेल्या युद्धानंतर आता इराणने केलेल्या दाव्यानुसार, दोन दिवसात तब्बल 680 अमेरिकन सैनिक मारले गेले आहेत. दरम्यान तेहरानचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी युद्धात स्वतःचे रक्षण करण्याच्या आणि अमेरिका-इस्रायली आक्रमकतेचा सामना करण्याच्या दृढनिश्चयाला पुन्हा एकदा पुष्टी दिली आहे. IRGC ने सुरू केलेल्या ऑपरेशन ट्रू प्रॉमिस 4 ने […]

सामना 4 Mar 2026 1:41 pm

सर्वात भीषण प्रहार अजून बाकी; इराणचा नायनाट करणार, अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; ‘या’ 3 गोष्टी उद्ध्वस्त करण्याचा निर्धार

मध्यपूर्वेतील तणाव आता टोकाला पोहोचला असून अमेरिकेने इराणविरोधात आरपारच्या लढाईचे संकेत दिले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी इराणला थेट आणि अत्यंत कडक शब्दांत इशारा दिला आहे. इराणला आता अण्वस्त्र सज्ज होऊ दिले जाणार नाही आणि त्यांच्या दहशतवादी शक्तीचा पूर्णपणे नायनाट केला जाईल, असे रुबिओ यांनी स्पष्ट केले […]

सामना 4 Mar 2026 1:20 pm

रंगोत्सवाला तरुणाईचा जल्लोष

धुळवडीनिमित्तरंगांचीउधळण: आकर्षकवेशभूषेनेवेधलेलक्ष: ग्रहणामुळेउत्साहालामर्यादा बेळगाव : शहर परिसरात धुळवडीनिमित्त रंगांची उधळण झाली. नेहमीप्रमाणे तरुणाईने रंगांचा आनंद लुटला. यासाठी गल्लोगल्ली सोमवारीच पाण्याचे फवारे उभारण्याची तयारी करण्यात आली होती. स्प्रिंक्लरच्या फवाऱ्यांवर रंगांची उधळण करत बेभान होऊन नाचणारी तरुणाई, हे चित्र शहरासह उपनगरात पहायला मिळाले. सोमवारी रात्री उशिरा पारंपरिक पद्धतीने होलिका दहन करण्यात आले. मंगळवारी सकाळपासून रंगोत्सवाची धमाल पहायला [...]

तरुण भारत 4 Mar 2026 1:19 pm

अयातुल्ला खामेनी यांच्या मृत्यूनंतर निषेध नोंदवणाऱ्या कश्मिरच्या खासदाराविरुद्ध गुन्हा दाखल

जम्मू कश्मिर पोलिसांनी श्रीनगरचे खासदार आगा सय्यद रुहुल्लाह मेहदी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. सोशल मीडियावर दिशाभूल करणारे वक्तव्य केल्याने हा गुन्हा दाखल केला आहे. जगभरातील शिया मुस्लिमांमध्ये आदरणीय असलेले अयातुल्ला अली खामेनी यांच्या हत्येनंतर, जम्मू कश्मिरमध्ये निषेध नोंदवला जात आहे. मेहदी यांनी सोमवारी कश्मिरमधील निदर्शनांचे आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांशी झालेल्या चकमकींदरम्यान एका महिला निदर्शकावर झालेल्या कथित […]

सामना 4 Mar 2026 1:15 pm

रंगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून खबरदारी

मद्यपी वाहनचालकांची तपासणी : अँटीस्टॅबिंग स्कॉड सक्रिय : सीसीटीव्ही-बॉडी कॅमेऱ्यांद्वारे नजर बेळगाव : होळी आणि रंगोत्सव शांततेत पार पाडावा, या काळात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, कायदा व सुव्यवस्था कायम रहावी यासाठी पोलीस आयुक्तालयाकडून मंगळवारी शहर आणि तालुक्यात सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मद्यविक्रीची दुकाने बंद करण्याचा आदेश बजावण्यात आला असला [...]

तरुण भारत 4 Mar 2026 1:09 pm

रंगोत्सवादिवशीच परीक्षा असल्याने विद्यार्थ्यांचा हिरमोड

बससेवेअभावीपालकपरीक्षाकेंद्रांवर बेळगाव : बेळगाव शहरासह तालुक्यात मंगळवारी रंगोत्सवाचा उत्साह दिसून आला. परंतु याचदिवशी बारावीचा इंग्रजी विषयाचा पेपर असल्यामुळे रंगोत्सवाचा आनंद बाजूला ठेवत विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे लागले. त्यामुळे डीजेच्या तालावर रंगांची उधळण करत थिरकता न आल्याने अनेकांचा हिरमोड झाला. शनिवार दि. 28 फेब्रुवारीपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली. मंगळवारी इंग्रजी विषयाचा पेपर होता. रंगोत्सव असल्यामुळे [...]

तरुण भारत 4 Mar 2026 1:03 pm

बेळगाव न्यायालयात बॉम्बच्या अफवेने तारांबळ

बेळगाव : न्यायालयात बॉम्ब ठेवण्यात आला आहे, असा ई-मेल पाठविण्यात आल्याने मंगळवारी बेळगाव न्यायालयात एकच तारांबळ उडाली. ही माहिती समजताच श्वानपथक, तसेच बॉम्ब निष्क्रिय पथकाकडून जुन्या आणि नवीन न्यायालयांच्या इमारतांमध्ये सकाळपासून दुपारपर्यंत तपासणी करण्यात आली. मात्र कोठेही बाँब किंवा स्फोटक वस्तू आढळून आली नाही. त्यामुळे सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र बॉम्बच्या अफवेमुळे न्यायालयीन कामकाजावर परिणाम [...]

तरुण भारत 4 Mar 2026 12:58 pm

बोबा टी आरोग्यासाठी धोकादायक: बबल टी पिल्याने किडनी स्टोन, फॅटी लिव्हर होण्याची शक्यता

तैवानमध्ये प्रथम उगम पावलेला बबल टी किंवा बोबा टी आता हिंदुस्ठानातील स्ट्रीट फूडमध्ये प्रवेश करत आहे. त्याच्या रंगीबेरंगी बबल आणि जिभेखाली येणारे टॅपिओका सर्वांनाच आवडत आहेत. परंतु बोबा टी पिल्याने लहान असो किंवा तरुणांमध्ये पचन आणि चयापचय यांसारखे आरोग्य परिणाम होण्याची शक्यता असते. तसेच एका कप कोरड्या टॅपिओका मोत्यांमध्ये 544 कॅलरीज असतात. बबल टीचे सर्वात […]

सामना 4 Mar 2026 12:52 pm

Iran Israel War –ट्रम्पची स्पेनसोबत कट्टी फू…सैन्यतळ वापरण्यास नकार दिल्याने व्यापार बंद करण्याची धमकी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पेनसोबतचे सर्व व्यापारी संबंध संपुष्टात आणण्याची जाहीर धमकी दिली आहे. इराणवर अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या हल्ल्यांना स्पेनने पाठिंबा न दिल्याने आणि नाटोमधील आर्थिक योगदान वाढवण्यास नकार दिल्याने ट्रम्प यांनी हे कठोर पाऊल उचलण्याचे संकेत दिले आहेत. मध्यपूर्वेतील युद्धात इराणविरुद्ध आक्रमक पवित्रा घेणाऱ्या अमेरिकेला मित्रराष्ट्राने मोठा झटका दिला होता. स्पेनने आपल्या […]

सामना 4 Mar 2026 12:51 pm

शहरात बॅरिकेड्स लावून रस्ते अडविले

केवळरंगोत्सवासाठीचपहिल्यारेल्वेगेटजवळीलबॅरिकेड्सहटविले: कायमस्वरुपीहटविण्याचीमागणी बेळगाव : एका बाजूला शहरात बॅरिकेड्स लावून रस्ते अडविलेले तर दुसरीकडे बॅरिकेड्स काढून रस्ता खुला केलेला असा विरोधाभास पहावयाला मिळाला. टिळकवाडी पहिले रेल्वेगेट येथे गेल्या 14 वर्षांपासून बॅरिकेड्स लावून रस्ता बंद करण्यात आला आहे. हे बॅरिकेड्स हटवावेत यासाठी सुभाष घोलप आणि टिळकवाडीतील काही नागरिक सातत्याने आंदोलन करीत आहेत. तथापि, ही अपघातप्रवण जागा आहे, [...]

तरुण भारत 4 Mar 2026 12:49 pm

व्हीटीयूचा परदेशातही वाढणार विस्तार

विविधदेशांतीलसंस्थांकडूनसंलग्नतादेण्याचीविनंती: परवानगीसाठीकुलगुरुराज्यसरकारलापत्रपाठविणार बेळगाव : व्हीटीयू आपला विस्तार वाढविण्यासाठी उपाययोजना करत असून त्यादृष्टीने कार्यवाही करण्यासाठी पावले उचलण्यात येत आहेत. आता देशासह परदेशातील अभियांत्रिकी महाविद्यालयांना संलग्नता देण्याचा विचार करत आहे. यामुळे व्हीटीयूचा विस्तार वाढणार असून शिक्षणाला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळण्यास मदत होणार आहे. तसेच देशातील विद्यार्थ्यांनाही परदेशात आपले भवितव्य उज्ज्वल करण्याच्या संधी मिळणार आहेत. देशाबाहेर कार्यरत असलेल्या संस्थांनी [...]

तरुण भारत 4 Mar 2026 12:46 pm

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला 20 वर्षांचा कारावास

जिल्हापोक्सोन्यायालयाचानिकाल बेळगाव : लग्नाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने 20 वर्षांचा सश्रम कारावास आणि 10 हजार रुपयाचा दंड ठोठावला. देवराज अशोक मेत्री (वय 28) रा. हुनशाळ ता. मुडलगी असे त्याचे नाव असून मंगळवार दि. 3 रोजी जिल्हा पोक्सो न्यायालयाच्या न्यायाधीश सी. एम. पुष्पलता यांनी हा निकाल दिला आहे. पीडित [...]

तरुण भारत 4 Mar 2026 12:44 pm

मिल्की पनीर खाण्यास खरोखर सुरक्षित आहे का, जाणून घ्या

सोशल मीडियावरील काही मुद्दे हे फार महत्त्वाचे असतात. केवळ याकडे एक मुद्दा न पाहता जागरुकपणे पाहिल्यास हेही विषय आपल्या कामाचे ठरु शकतात. नुकतेच एक्सवरील एका पोस्टमुळे मिल्की पनीर हे पुनश्च चर्चेत आले आहे. त्यामुळेच आता मिल्की पनीर रोज घेणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एक्सपायरी होण्यास काही दिवस शिल्लक असतानाही ब्रँडच्या दोन वेगवेगळ्या पॅकेटमध्ये फुगवटा […]

सामना 4 Mar 2026 12:40 pm

आता घरबसल्या मिळणार महसूल नोंदी

राज्यसरकारचीजनस्नेहीयोजनाजारी: ग्रामीणभागातीलनागरिकांनाहोणारलाभ बेळगाव : राज्यातील जनतेला जमिनीच्या नोंदी मिळविण्यासाठी महसूल कार्यालयात जावे लागू नये, यासाठी विभागाने जनस्नेही योजना जारी केली आहे. त्यानुसार नागरिकांना घरात बसून प्रमाणित नोंदी मिळविता येणार असून अटलजी केंद्रांवरही ते मिळवू शकतात. यामुळे नागरिकांना सोयीचे झाले आहे. या योजनेमुळे जमिनीच्या नोंदी घेण्यासाठी आता तहसीलदार कार्यालयात जावे लागणार नसून अटलजी केंद्र, नाडा कचेरी [...]

तरुण भारत 4 Mar 2026 12:30 pm

विविध मंदिरांमध्ये पूजा-अर्चा, अभिषेक

मंगळवारीचंद्रग्रहणामुळेधार्मिकविधी: शिधादेण्याच्याप्रथेचेपालन बेळगाव : धुळवडीदिवशी म्हणजेच मंगळवार दि. 3 रोजी चंद्रग्रहण आल्याने या निमित्ताने विविध ठिकाणी पूजा-अर्चा, अभिषेक आदी धार्मिक विधी करण्यात आले. या दिवशी पुरोहितांना किंवा सुहासिनींना कोरडा शिधा व दक्षिणा देण्याची प्रथा असल्याने त्याचेही पालन करण्यात आले. हे चंद्रग्रहण दुपारी 3 वाजून 20 मिनिटांनी सुरू झाले. सकाळी 11 पासून त्याचे वेध सुरू झाले. [...]

तरुण भारत 4 Mar 2026 12:27 pm

चव्हाट गल्लीत पारंपरिक पद्धतीने होलिकोत्सव

बेळगाव : चव्हाट गल्ली येथे आजही परंपरेनुसारच होलिकोत्सव साजरा केला जातो. बैलगाड्यांना सजवून होळीचे झाड आणण्यात आले. तसेच मंगळवारी चव्हाटा मंदिरसमोर नारळ उडवून या कार्यक्रमाची सांगता झाली. दर्शनासाठी रात्री उशिरापर्यंत भाविकांची गर्दी दिसून आली. सोमवारी किल्ला परिसरातून 15 बैलगाड्यांमधून 30 फूट उंच झाड आणण्यात आले. कोर्ट कंपाऊंडपासून चव्हाट गल्ली चव्हाटा मंदिरापर्यंत गल्लीतील नागरिकांनी झाड ओढून [...]

तरुण भारत 4 Mar 2026 12:26 pm

जायंट्स पदाधिकाऱ्यांची माहेश्वरी शाळेत रंगपंचमी

बेळगाव : रंगपंचमी हा सण विविध प्रकारच्या रंगांची मनसोक्त उधळण करत आनंद साजरा करण्याचा दिवस. पण ज्यांना दृष्टी नाही त्यांनी हा सण कसा साजरा करावा, म्हणून त्यांच्या सोबत रंगांची उधळण करण्यासाठी जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनचे अध्यक्ष लक्ष्मण शिंदे यांनी आपल्या सर्व सहकाऱ्यांसह माहेश्वरी अंध शाळेत जाऊन त्या सर्व मुलांसोबत रंगपंचमी साजरी केली. मुलांना दिसत [...]

तरुण भारत 4 Mar 2026 12:24 pm

गुंजेनहट्टी होळी कामाण्णा यात्रोत्सवाला प्रारंभ

आजयात्रेचामुख्यदिवस वार्ताहर/कडोली धूलिवंदनादिवशी खग्रास चंद्रग्रहणामुळे गुंजेनहट्टी येथील श्री होळी कामाण्णायात्रोत्सवावर परिणाम जाणवल्याने भाविकांची संख्या रोडावली होती. बुधवारी यात्रेचा मुख्य दिवस असून या दिवशी भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. सालाबादप्रमाणे गुंजेनहट्टी येथील जागृत देवस्थान श्री होळी कामाण्णा देवालयाची यात्रा धूलिवंदनानिमित्त मंगळवारी सुरू झाली. देवस्थान पंच कमिटीने परंपरेनुसार सकाळपासून धार्मिक कार्यक्रम पार पाडले आणि यात्रोत्सवाला सुरुवात [...]

तरुण भारत 4 Mar 2026 12:23 pm

आत्मसन्मान हे यशाचे सूत्र : डॉ.किरण ठाकुर

‘आत्मसन्मानचसर्वकाही’ पुस्तकाचेपुणेयेथेप्रकाशन पुणे : आत्मसन्मानाच्या अभावामुळे व्यक्तीला मानसिक त्रासातून जावे लागते. त्यामुळे आत्मसन्मान आणि आत्मविश्वास बाळगणे हे यशाचे सूत्र आहे, असे मत तऊण भारतचे समूह प्रमुख व सल्लागार संपादक आणि लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप.सोसायटीचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. किरण ठाकुर यांनी येथे व्यक्त केले.नीळकंठ प्रकाशनतर्फे न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रॅमिंग (एनएलपी) या वर्तनशास्त्राच्या मास्टर टेनर आणि समुपदेशक रविबाला काकतकर लिखित [...]

तरुण भारत 4 Mar 2026 12:21 pm

मनरेगा की व्हीबी-जी रामजी; अधिकारी गोंधळात

राज्यसरकारकडूननव्यायोजनेच्याअंमलबजावणीच्यासूचनानाहीत: कामगारांमध्येसंभ्रमावस्था बेळगाव : केंद्र सरकारने मनरेगा योजना रद्द करून व्हीबी- जी राम जी योजना जारी केली आहे. मात्र या योजनेला राज्य सरकारने कडाडून विरोध केला असून ग्राम पंचायतींमध्ये विशेष बैठक घेऊन फायदे व तोटे यावर चर्चा करण्यात आली आहे. नव्या योजनेमुळे सत्ताधारी व विरोधांकडून आरोप प्रत्यारोपही होत असून सरकारने ही योजना राज्यातून मागे घेण्याचा [...]

तरुण भारत 4 Mar 2026 12:15 pm

चलो आझाद मैदान आंदोलनाच्या जागृतीसाठी बोडकेनहट्टी येथे 7 रोजी बैठक

बेळगाव : गिरणी कामगारांना अथवा त्यांच्या वारसदारांना मुंबईतच आणि तेही मोफत घरे मिळावीत या मागणीसाठी चलो आझाद मैदान आंदोलन पुकारण्यात आले आहे. या आंदोलनाच्या जागृतीसाठी शनिवार दि. 7 मार्च रोजी दुपारी 12 वाजता बोडकेनहट्टी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील काळम्मादेवी मंदिरात गिरणी कामगारांची बैठक बोलाविण्यात आली आहे. या बैठकीत मार्गदर्शन करण्यासाठी श्रमिक संघटनेच्यावतीने कॉ. उदय [...]

तरुण भारत 4 Mar 2026 12:13 pm

अक्रम-सक्रम योजनेअभावी शेतकऱ्यांचा वीज खर्च वाढला

योजनापूर्ववतकरण्याचीशेतकऱ्यांचीमागणी: वीजखर्चपरवडतनसल्यानेसंताप बेळगाव : राज्यातील विद्युत विभागाने अक्रम-सक्रम योजना बंद केल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. शेतकऱ्याला विद्युत मीटर हवे असल्यास त्याला आपल्या शेतापर्यंत विजेचे खांब, वीजवाहिन्या, तसेच इतर खर्च स्वखर्चातून करावा लागत आहे. एखाद्या सामान्य शेतकऱ्याला हा खर्च परवडणारा नसल्याने सरकारने अक्रम-सक्रम योजना पुन्हा सुरू करावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे. कृषी मालाला [...]

तरुण भारत 4 Mar 2026 12:11 pm

इंस्टाग्रामवर रोज अश्लिल मेसेज पाठवणारा दुसरा तिसरा कुणी नसून…. आयेशा खान नेमकं काय म्हणाली

‘धुरंधर’ फेम अभिनेत्री आयेशा खानने ऑनलाइन ट्रोलिंग आणि तिला आलेल्या भयानक अनुभवाबद्दल उघडपणे भाष्य केले आहे. धुरंधर या चित्रपटातील शरारत या गाण्यानंतर आयेशा एका रात्रीत स्टार झाली. देशासह परदेशातही आयेशाचा चाहता वर्ग निर्माण झाला. नुकतेच आयेशाने मोजो स्टोरीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. याअंतर्गत तिने तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न कसा झाला होता याबाबतही […]

सामना 4 Mar 2026 12:11 pm