IPL 2026 –पराभवाचा चौकार; पंजाब किंग्जचा मुंबईवर 7 विकेटने दणदणीत विजय
मुंबई इंडियन्सने आपली पराभवाची मालिका कायम ठेवत पराभवाचा चौकार लगवाल आहे. दुसरीकडे पंजाब किंग्ज मात्र विजयाच्या लयीत दिसत आहे. आयपीएल 2026 मधील 24व्या सामन्यात पंजाबने मुंबईचा 7 विकेट्सनी एकतर्फी पराभव केला. मुंबईने 195 धावांचा मोठा डोंगर पंजाब समोर उभा केला होता, तरीही त्यांना विजय मिळवता आला नाही. मुंबईकडून डि कॉक याने 60 चेंडूत 112 धावांची […]
पंजाब किंग्जचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने आयपीएलमध्ये एका विशेष विक्रमाला गवसणी घातली आहे. मुंबई इंडियन्सविरुद्ध वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या सामन्यात अर्शदीपने रायन रिकलटनला बाद करत आपले 100 आयपीएल विकेट पूर्ण केले. या कामगिरीसह पंजाब किंग्जसाठी 100 विकेट घेणारा तो पहिलाच गोलंदाज ठरला आहे. तसेच, आयपीएलच्या इतिहासात 100 विकेट्सचा टप्पा गाठणारा तो पाचवा डावखुरा वेगवान गोलंदाज […]
IPL 2026 –मुंबईच्या धावसंख्येला वेग, पण पंजाबला मोठा धक्का; शशांक सिंहला दुखापत, मैदान सोडलं
मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात पंजाब किंग्जचा अष्टपैलू खेळाडू शशांक सिंह क्षेत्ररक्षण करताना गंभीररीत्या जखमी झाला आहे. पॉवरप्लेच्या शेवटच्या चेंडूवर धाव रोखण्याचा प्रयत्न करत असताना हा अपघात घडला. मिड-ऑनवर क्षेत्ररक्षण करणाऱ्या श्रेयसने नॉन-स्ट्रायकर एंडला धावबाद करण्यासाठी वेगाने थ्रो फेकला, मात्र त्याचे लक्ष्य चुकले. जमिनीवर टप्पा पडल्यानंतर चेंडूने अचानक उसळी घेतली आणि तो थेट शशांकच्या डोक्यावर आदळला. […]
जालना @ 41 अंश सेल्सिअस, तीन दिवस उष्णतेचा यलो अलर्ट जारी
कधी आभाळ तर कधी कडक उन अशा उनसावलीच्या खेळामुळे नागरिक बेजार झाले असून आजारपण वाढले आहे. कुलाबा येथील वेधशाळेने जालना जिल्ह्यात 16, 17 आणि 18 एप्रिल असे तीन दिवस उष्णतेचा यलो अलर्ट जारी केला आहे. या काळात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. आज जालनातील तापमान 41 अंश सेल्सिअसवर गेले. उन्हामुळे […]
‘बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, असं मराठीत म्हणतात पण आपली (केंद्र सरकारची) उक्ती आणि कृती कधी सोबत पाहायला मिळत नाही. निवडणुकांसाठी जशी लाडकी बहीण योजना आली तसाच हा ड्रामा आहे, अशा शब्दात जोरदार भाषण करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते खासदार अरविंद सावंत यांनी आपल्या पक्षाचा महिला आरक्षणाला पाठिंबा आहे, पण त्याआडून येणाऱ्या मतदारसंघ […]
Beed News –पाडाला आंबा लागेना; अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर यंदा ‘फळांचा राजा’भाव खाणार
हिंदू धर्मात अक्षय तृतीयेच्या मुहूर्ताला विशेष महत्त्व असून, या दिवशी पूर्वजांची पूजा करून त्यांना आंब्याचा नैवेद्य दाखवल्यानंतरच आंबा खाण्याची परंपरा आहे. मात्र, यंदा निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका आंबा उत्पादनाला बसला असून, ऐन सणासुदीच्या काळात आंब्याची आवक घटली आहे. बदलत्या वातावरणामुळे आंबा अद्याप पाडाला लागलेला नाही, परिणामी बाजारात आंब्याचे भाव गगनाला भिडले आहेत. यंदा मे महिन्यापासून […]
न्यायालयीन नियुक्त्यांमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण देण्यासंदर्भातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळली. सरन्यायधीश सुर्य कांत, न्यायमूर्ती जॉयमल्या बागची आणि न्यायमूर्ती विपुल एम. पांचोली यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्यांना अशा प्रकारच्या याचिका दाखल न करण्याचा सल्ला दिला. न्यायालयीन नियुक्त्यांमधील पदे भरताना महिलांना 50 टक्क्यांपर्यंत आरक्षण देण्याची तसेच त्यांची कायदा अधिकारी आणि सरकारी वकील म्हणून नियुक्ती करावी अशी मागणी […]
Latur News –जुन्या एमआयडीसीत बॉयलरचा भीषण स्फोट; एका कामगाराचा मृत्यू, तर एक गंभीर जखमी
शहरातील जुनी एमआयडीसी परिसरात असलेल्या मुंदडा ट्रेडर्स या ॲल्युमिनियम कोटिंग आणि शीट निर्मिती करणाऱ्या उद्योगात आज, १६ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ४ च्या सुमारास बॉयलरचा भीषण स्फोट झाला. या अपघातात एका कामगाराचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. तसेच कारखान्याचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसीतील प्लॉट क्रमांक ई-१/२ […]
IPL 2026 –दिल्लीचा मयांक रावत मुंबई गाजवण्यासाठी सज्ज, PBKS विरुद्ध पदार्पणाची संधी
इंडियन प्रीमियर लीगमध्ये आज मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स संघात वानखेडे मैदानावर सामना होत आहे. पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यर याने नाणेफेक जिंकून मुंबईला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. या लढतीत मुंबईने 2 बदल केले आहे. दिल्लीचा अष्टपैलू खेळाडू मयांक रावत याला संघात स्थान दिले आहे. तसेच जायबंदी रोहित शर्मा याच्या जागी डावखुरा फलंदाज क्विंटन डी कॉक […]
IPL 2026 –रोहित शर्मा पुन्हा मैदानात धमाका कधी करणार? कर्णधार हार्दिक पंड्याने दिली महत्त्वाची अपडेट
IPL 2026 मध्ये आज (16 एप्रिल 2026) मुंबई इंडियन्सचा सामना पंजाब किंग्सशी होत आहे, मात्र या महत्त्वाच्या सामन्यात मुंबईचा स्टार फलंदाज रोहित शर्मा खेळत नाहीये. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) विरुद्धच्या मागील सामन्यात रोहितच्या हॅमस्ट्रिंगला दुखापत झाली होती. पंजाबविरुद्धच्या टॉस दरम्यान कर्णधार हार्दिक पांड्याने रोहितच्या दुखापतीबाबत मोठे अपडेट दिले. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत मुंबईने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये […]
डेटवर जायला वेळ नाही, धनुष सोबतच्या लग्नाच्या अफवांनंतर मृणाल झाली व्यक्त
बॉलीवूड अभिनेत्री मृणाल ठाकूर तमिळ अभिनेता धनुषसोबत रिलेशनशीपमध्ये असून लवकरच दोघे लग्न करणार असल्याच्या चर्चा बऱ्याच कालावधीपासून रंगल्या आहेत. या चर्चांनंतर अखेर अत्रिनेत्री मृणाल ठाकूरने मौन सोडले आहे. धनुषसोबत लग्न करणार असल्याच्या चर्चा मृणालने फेटाळून लावल्या आहेत. मृणाल पहिल्यांदाच या अफवांबाबत व्यक्त झाली आहे. आदिवी शेषसोबतचा ‘डकॉयट’ हा तिचा नवीन चित्रपट गेल्या आठवड्यात प्रदर्शित झाला. […]
Air Pollution –आहार, झोप नव्हे तर वायु प्रदूषण आणि हवामानातील बदल ठरतोय मायग्रेनचे मुख्य कारण
मायग्रेनचा त्रास असलेल्या लोकांसाठी केवळ आहार किंवा झोपच नाही, तर आता हवेची गुणवत्ता देखील चिंतेचा विषय ठरत आहे. ‘न्यूरोलॉजी’ जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका ताज्या संशोधनानुसार, वाहनांचा धूर आणि औद्योगिक धुरामुळे होणारे वायू प्रदूषण हे मायग्रेनच्या तीव्र वेदना वाढवण्यासाठी कारणीभूत ठरत आहे. दक्षिण इस्रायलमधील 7,000 हून अधिक लोकांवर 10 वर्षे केलेल्या या अभ्यासात असे दिसून आले […]
अकासा एअर आणि स्पाईसजेटची विमाने एकमेकांना धडकली; दिल्ली विमानतळावर मोठी दुर्घटना टळली
दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर टॅक्सींग करत असताना स्पाईसजेटच्या विमानाची अकासा एअरच्या विमानाशी टक्कर झाली. या धडकेत दोन्ही विमानांचे नुकसान झाले आहे. सध्या दोन्ही विमाने ग्राऊंड करण्यात आली आहेत. विमानतळावरील टॅक्सीवे वर ही घटना घडली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, गुरूवारी दुपारी सव्वा दोनच्या सुमारास विमानतळाच्या ‘टर्मिनल 1’ जवळ ही घटना घडली. अकासा एअरचे […]
नारी शक्ती वंदन अधिनियम आणि मतदारसंघ पुनर्रचना असे दोन विधेयक पारित करण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने विशेष अधिवेशन बोलवले आहे. यावेळी विरोधकांनी महिला आरक्षणाच्या विधेयकाला पाठिंबा व्यक्त केला, मात्र त्याचवेळी मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरून नाराजी व्यक्त करत जोरदार निषेध केला. पहिल्या दिवसाच्या चर्चे दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी महाराष्ट्रासारख्या नररत्नांना जन्म […]
MH25BK” नवीन मालिका सुरु ; आकर्षक वाहन क्रमांकासाठी नागरिकांना सुवर्णसंधी
धाराशिव (प्रतिनिधी)- उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, धाराशिव या कार्यालयात लवकरच परिवहन संवर्गातील वाहनांसाठी MH25BK ही नवीन मालिका सुरु करण्यात येत आहे.वाहनांची नवीन मालिका सुरू होण्याच्या दिवशी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणावर इच्छुकांची गर्दी होते.त्यामुळे कार्यालयीन व्यवस्थेवर ताण पडतो आणि अनेक वेळा नागरिकांनाही याचा त्रास सहन करावा लागतो.हा त्रास कमी करण्यासाठी तसेच नागरिकांना त्यांना हवा असलेला आकर्षक किंवा पसंतीचा नोंदणी क्रमांक सुलभतेने मिळावा,यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. ज्या वाहन मालकांना आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक विहित शुल्क भरून घ्यायचे असतील त्यांनी दिलेल्या वेळापत्रकानुसार कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 11.00 ते दुपारी 04.00 या वेळेत विहित नमुन्यातील अर्ज सादर करावेत.अर्जासोबत केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 4 तसेच महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 5 (अ) नुसार पत्त्याच्या पुराव्याची साक्षांकित प्रत (उदा. आधार कार्ड,लाईट बिल, टेलिफोन बिल इ.) सादर करणे आवश्यक आहे.तसेच आकर्षक क्रमांकासाठी देय असलेल्या विहित शुल्काचा डी.डी.अर्जासह जमा करणे बंधनकारक आहे.डी.डी.हा केवळ बँकेचा असावा; इतर कोणत्याही नावाचे डी.डी.स्वीकारले जाणार नाहीत.तसेच डी.डी. व्यतिरिक्त बँकेने जारी केलेले बँकर्स चेक स्वीकारले जाणार नाहीत.डीडी किमान एक महिन्याच्या मुदतीचा असावा. एखाद्या क्रमांकासाठी एकापेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास त्यांची यादी कार्यालयीन नोटीस बोर्डावर लावण्यात येईल.यादीतील अर्जदारांना लिलाव प्रक्रियेसाठी अतिरिक्त रक्कमेचा डी.डी.सादर करावा लागेल.हा डी.डी.किमान रुपये 300/- पेक्षा कमी नसावा आणि तो केवळ “Deputy Regional Transport Officer, Dharashiv” यांच्या नावे राष्ट्रीयीकृत बँकेचा असावा.इतर कोणत्याही नावाचे डी.डी.स्वीकारले जाणार नाहीत. अर्जदार किंवा त्यांच्या प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत तसेच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, धाराशिव यांच्या समक्ष सीलबंद लिफाफ्यातील डी.डी.उघडण्यात येतील.ज्या अर्जदाराने सर्वाधिक रकमेचा डी.डी.सादर केला असेल त्यास संबंधित पसंतीचा क्रमांक देण्यात येईल. एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलून देता येणार नाही. राखीव क्रमांक घेतल्यानंतर 6 महिन्यांच्या आत संबंधित वाहन नोंदणीसाठी सादर करणे आवश्यक आहे.अन्यथा तो क्रमांक आपोआप रद्द होईल आणि भरलेले शुल्क शासन जमा होईल.तसेच भरलेली फी कोणत्याही परिस्थितीत परत किंवा समायोजित केली जाणार नाही. आकर्षक क्रमांकासाठी अर्जाचा नमुना तसेच प्रतिनिधी येणार असल्यास आवश्यक प्राधिकारपत्राचा नमुना कार्यालयात कार्यालयीन वेळेत उपलब्ध आहे. वेळापत्रक पुढीलप्रमाणे : आकर्षक/पसंती क्रमांकासाठी अर्ज व डी.डी. स्वीकारणे : दि. 17 ते 21 एप्रिल, सकाळी 11 ते दुपारी 4 वाजता. एकाच क्रमांकासाठी एकापेक्षा अधिक अर्जांची यादी प्रसिद्ध करणे : दि. 21 एप्रिल, सायंकाळी 5 वाजता पर्यंत.लिलावासाठी सीलबंद डी.डी. स्वीकारणे व उघडणे : दि. 22 एप्रिल, दुपारी 12 वाजतापर्यंत नवीन MH25BK मालिकेसाठी इच्छुक नागरिकांनी वेळेत अर्ज करून पसंतीचा क्रमांक मिळवण्याचे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी,धाराशिव यांनी केले आहे.
अॅड. अजित गुंड यांच्याकडून पाडोळी (आ.) येथील वीज समस्येबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन
. धाराशिव (प्रतिनिधी)- : पाडोळी (आ.) येथील अनियमित वीजपुरवठा व ट्रान्सफॉर्मर बिघाडाच्या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी रूपामाता फाऊंडेशनच्या वतीने उपमुख्यमंत्री मा. ना. एकनाथ शिंदे यांना निवेदन सादर करण्यात आले. पुण्यपुरस्कार कार्यक्रमानिमित्त धाराशिव येथे आलेल्या उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन फाऊंडेशनचे सचिव तथा विश्व हिंदू परिषद उपाध्यक्ष धाराशिव अॅड.अजित व्यंकटराव गुंड-पाटील यांनी ग्रामस्थांच्या अडचणी मांडल्या. पाडोळी (आ.) गावामध्ये मागील काही दिवसांपासून अत्यंत अनियमित वीजपुरवठा होत असून वारंवार वीज खंडित होत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी दीर्घकाळ वीज नसल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होत आहे. वीजपुरवठा खंडित राहिल्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली असून, उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर ही समस्या अधिक गंभीर बनली आहे. तसेच कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने घरगुती व शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणांवर परिणाम होत असून नुकसान होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. गावातील ट्रान्सफॉर्मरमध्ये तांत्रिक बिघाड असल्याचा संशय व्यक्त करून त्याची तात्काळ तपासणी व दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच नियमित व सुरळीत वीजपुरवठा करण्याबाबतही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, या समस्यांकडे तातडीने लक्ष न दिल्यास ग्रामस्थांच्या वतीने तसेच विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून महावितरण विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
काटगाव ग्रामपंचायत समोर ग्रामपंचायत सदस्यचे उपोषण सुरू
तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील काटगाव येथील ग्रामपंचायत सदस्य सूर्यकांत वसंत कांबळे यांनी ग्रामपंचायत कारभारातील पारदर्शकतेच्या मुद्द्यावरून दोन दिवसीय लाक्षणिक उपोषण गुरुवार दिनांक 16 पासून सुरू केले आहे सन 2023 पासून आजतागायत ग्रामपंचायतीला विविध शासकीय योजनांद्वारे प्राप्त झालेल्या निधीचा तपशील व खर्चाचा हिशोब स्पष्टपणे उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. अनेक वेळा माहिती मागवूनही समाधानकारक उत्तर न मिळाल्याने तसेच ग्रामनिधी जमा-खर्च व शिल्लक रकमेचा तपशील, 15 वा वित्त आयोग निधीचा उपयोग, दलित वस्ती सुधार योजनेतील निधी, तांडा सुधार योजनेतील कामे,स्वच्छता अभियानांतर्गत खर्च, अनुसूचित जाती व भटक्या-विमुक्त जातींसाठी मिळालेला निधी, सर्व कामांचे जीओ-टॅग फोटो व नोंदी आधी मागण्यासाठी लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे या उपोषणात ग्रामस्थ ही सहभागी झाले आहेत.
बहुजन योद्धा सामाजिक संघटनेच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीला जरांगे पाटील येणार
धाराशिव (प्रतिनिधी)- बहुजन योद्धा सामाजिक संघटनेच्या बोधिसत्व, विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने धाराशिव शहरात 22 एप्रिल रोजी सर्व धर्मीय भव्यदिव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. तसेच दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध सामाजिक उपक्रमांनी जयंती उत्सव सोहळा साजरा करण्यात येणार आहे. यंदाच्या मिरवणुकीला मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील उपस्थित राहून मिरवणुकीचे उद्घाटन करणार असल्याची माहिती बहुजन योद्धा सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष धनंजय शिंगाडे यांनी दिली. धाराशिव शहरातील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष प्रवीण सूर्यवंशी, कार्याध्यक्ष सुधीर पवार, बलराज रणदिवे,, मसूद शेख, माजी नगरसेवक खालील सय्यद, नगरसेवक अजहर मुजावर, आयाज शेख, सतीश कदम, रोहीत पडवळ, लक्ष्मण माने, पांडू भोसले, अभिजित सूर्यवंशी आदी उपस्थित होते. शिंगाडे यांनी सांगितले की, बहुजन योद्धा सामाजिक संघटनेमार्फत गेली 32 वर्षापासून धाराशिव येथे विविध समाजोपयोगी कार्यक्रमाने जयंती उत्सव साजरा करण्यात येतो. महापुरुषांचे विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याचे कार्य संघटना सातत्याने करत आहे. मिरवणुकीत महिला, पुरूष, युवक मोठ्या संख्येने सहभागी होतात. विशेष म्हणजे जयंती उत्सव समितीमध्ये सर्व जाती-धर्मातील व्यक्तींचा समावेश असून दरवर्षी आगळ्यावेगळ्या पद्धतीने विशेषतः पारंपारिक वाद्यांच्या गजरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात येते. तसेच रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर, रुग्णांना फळे वाटप, वृक्ष लागवड यासह विविध समाजोपयोगी कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. जयंती उत्सव समितीच्या वतीने यावर्षी देखील विविध राज्यातील पारंपारिक वाद्य समूहांना आमंत्रित करण्यात आल्यामुळे ही मिरवणूक वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे. सध्या जगात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर जगाला शांततेचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांचा देखावा मिरवणुकीचे आकर्षण ठरणार आहे. तसेच जयंती उत्सव समितीच्या वतीने विविध क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात येणार आहे.
धाराशिवसाठी गेमचेंजर ठरणाऱ्या प्रकल्पाला गती- आमदार राणाजगजितसिंह पाटील
धाराशिव (प्रतिनिधी)- पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांना दरवर्षी बसणाऱ्या पुराच्या तडाख्यातून मुक्त करून, ते अतिरिक्त पाणी दुष्काळी मराठवाड्याच्या तहानलेल्या जमिनीकडे वळवण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आखलेल्या महत्त्वाकांक्षी योजनेला आता मोठी गती मिळाली आहे. या प्रकल्पाचा व्यवहार्यता अहवाल सकारात्मक आल्यानंतर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर प्रकल्प अहवाल करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार जलसंपदा विभागाने पुढील सहा महिन्यांत सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. हा प्रकल्प धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यांसाठी गेमचेंजर ठरणार असून दुष्काळाचे संकट कायमचे पुसून टाकण्यासाठी हे एक ऐतिहासिक पाऊल ठरणार असल्याचा विश्वास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त आहे. कृष्णा खोऱ्यात पावसाळ्यात अतिरिक्त होणारे आणि समुद्राला वाहून जाणारे 50 अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी उपसा सिंचन योजनेद्वारे मराठवाड्याकडे वळवण्यात येणार आहे. त्यामुळे कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील पूरस्थिती नियंत्रित होऊन मराठवाड्यातील अत्यंत दुष्काळी धाराशिव जिल्ह्याच्या पाणीप्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा निघणार आहे. अंदाजे 16 हजार कोटींच्या या प्रकल्पामुळे साडेआठ लाख एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. मराठवाड्याच्या हक्काच्या 23.66 टीएमसी पाण्यापैकी उर्वरित 16.66 टीएमसीपेक्षा अधिक पाणी या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. या निर्णयामुळे शेती उत्पादनात लक्षणीय वाढ होऊन पिकांचे वैविध्य वाढेल. ऊस, फळबागा आणि भाजीपाला पिकांना पाणी उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल. हा निर्णय धाराशिव आणि मराठवाड्यासाठी ‘गेमचेंजर’ ठरणार आहे. त्यामुळे केवळ पाणीटंचाई कमी होणार नाही, तर शेती, उद्योग आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही मोठी चालना मिळणार असल्याचा विश्वास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे.या महत्वाकांक्षी प्रकल्पाला पुढे नेण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री सुनेत्रा आत्या पवार आणि जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी धाराशिवकरांच्यावतीने धन्यवाद मानले आहेत. अर्थकारणाला बळ आणि दरडोई उत्पन्नात वाढ आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या या भागात गुंतवणुकीचे नवे मार्ग खुले होतील. पाणी उपलब्धतेमुळे औद्योगिक विकासालाही गती मिळेल. स्थानिक स्तरावर रोजगारनिर्मिती वाढून त्यातून दरडोई उत्पन्नात वाढ होईल. जागतिक बँकेची तांत्रिक सल्लागार संस्था असलेल्या ‘ट्रॅकबेल’ने आपल्या अहवालात हे पाणी वळवणे शक्य असल्याचे यापूर्वीच स्पष्ट केले आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास केवळ शेतीलाच पाणी मिळणार नाही, तर भूजल पातळी वाढून टँकरमुक्ती आणि रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील. जिल्ह्याच्या अर्थकारणाला गती देणारा हा प्रकल्प मैलाचा दगड ठरणार असल्याचा दावा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केला आहे. शेती आणि उद्योगांचे चित्र पालटणार या नवीन योजनेची सांगड कृष्णा मराठवाडा प्रकल्पाशी घातल्यास मराठवाड्याच्या शेतीचे आणि उद्योगांचे चित्र पूर्णपणे पालटणार आहे. वारंवार होणारी पाणीटंचाई आणि पाण्यासाठी होणारे स्थलांतर थांबवण्यासाठी हा प्रकल्प अत्यंत प्रभावी ठरेल. उद्योगांसाठी मुबलक पाणी उपलब्ध झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मितीलाही बळ मिळणार आहे. सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) सहा महिन्यांत पूर्ण झाल्यानंतर, प्रत्यक्ष निधीची तरतूद होऊन कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. राज्याच्या विकासाच्या नकाशावर धाराशिव जिल्ह्याला समृद्ध करण्यासाठी हा प्रकल्प निर्णायक ठरणार असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे.
धाराशिव (प्रतिनिधी)- परळी ते अक्कलकोट या राज्य मार्गावरील पाडोळी (आ) ते टाकळी या रस्त्याची अत्यंत खराब झालेली अवस्था लक्षात घेऊन तात्काळ दुरुस्ती व मजबुतीकरण करण्याची मागणी भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य अँड. व्यंकट गुंड यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडेही याबाबत निवेदन सादर करण्यात आले आहे. सदर निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, धाराशिव तालुक्यातील पाडोळी (आ) ते टाकळी हा रस्ता मागील दोन वर्षांपासून अत्यंत खराब अवस्थेत असून हा मार्ग दोन मोठ्या गावांना तसेच जिल्ह्याशी जोडणारा अत्यंत महत्त्वाचा दळणवळणाचा मार्ग आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे वाहन चालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तसेच या मार्गावरील एस.टी. बस सेवा देखील बंद करण्यात आल्याने नागरिक, विद्यार्थी व शेतकरी यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. विशेषतः शाळकरी विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यास अडथळे निर्माण होत असून त्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. याशिवाय ऊस वाहतुकीसाठी जड वाहनांची सततची ये-जा होत असल्यामुळे रस्त्याची अधिकच दुरवस्था झाली आहे. पावसाळ्यात चिखलामुळे या मार्गावरून प्रवास करणे अत्यंत कठीण बनते, तसेच अपघातांचे प्रमाणही वाढले असून अनेकांना अपघातात दुखापत व अपंगत्व आले आहे. या सर्व बाबींचा विचार करून पावसाळ्यापूर्वी संबंधित रस्त्याची तात्काळ पाहणी करून दुरुस्ती व मजबुतीकरणाचे काम हाती घ्यावे, तसेच शाळा सुरू होण्यापूर्वी हा रस्ता सुस्थितीत करावा, अशी मागणी अँड. व्यंकट गुंड यांनी केली आहे.
आशा भोसले यांना मेलडी स्टार्सची श्रद्धांजली
धाराशिव (प्रतिनिधी)- शहारातील हौशी छंदी गायक कलाविष्कार अकादमी द्वारा मेलडी स्टार्सच्या वतीने पार्श्वगायिका स्व. आशा भोसले यांना त्यांनी गायलेल्या गीतांचे गायन करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली या प्रसंगी मेलडी स्टार्सचे मुख्य प्रवर्तक युवराज नळे, समन्वयक मुकुंद पाटील मेंढेकर, माजी समन्वयक रवींद्र कुलकर्णी, शेषनाथ वाघ, नितीन बनसोडे, प्रसाद धाबेकर, सुशील कुलकर्णी, राजभाऊ कारंडे,संजय शिंदे यांनी आशाताईंनी गायलेल्या बहारदार गीताचे गायनातून गायनांजली वाहण्यात आले.
वाढत्या तापमानाचा इशारा; उष्माघात टाळण्यासाठी आरोग्य विभागाची सज्जता व नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
धाराशिव (प्रतिनिधी)- गेल्या काही दिवसांमध्ये तापमानात लक्षणीय वाढ होत असून हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार एप्रिल व मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तापमानात आणखी वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. धाराशिव जिल्ह्यात वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सज्ज झाली असून, जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकारी यांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत उष्माघाताच्या प्रतिबंधात्मक व उपचारात्मक उपाययोजनांबाबत सूचना देण्यात आल्या.तसेच सर्व आरोग्य संस्थांना नागरिकांना योग्य उपचार उपलब्ध करून देणे आणि उष्माघातासंदर्भात आवश्यक आरोग्य शिक्षण देण्याचे निर्देश देण्यात आले. सार्वजनिक आरोग्य विभाग,जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून विविध उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत.जिल्ह्यातील 5 ग्रामीण रुग्णालये,6 उपजिल्हा रुग्णालये, 44 प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि 2 शहरी आरोग्य केंद्रांमध्ये ‘कोल्ड रूम’ची व्यवस्था करण्यात आली आहे.उष्माघाताच्या उपचारासाठी आवश्यक औषधांचा मुबलक साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच उष्माघात प्रतिबंधासाठी जिल्हास्तरावर टास्क फोर्स स्थापन करण्यात आली असून सर्व आरोग्य संस्थांना प्रसिद्धी साहित्य वितरित करण्यात आले आहे. उष्माघातापासून बचावासाठी पुढील उपाय अवलंबा हे करा पुरेसे पाणी प्या, प्रवासात पाणी सोबत ठेवा,हलक्या वजनाचे व फिकट रंगाचे सैलसर कपडे वापरा. उन्हात बाहेर पडताना गॉगल,छत्री व पादत्राणांचा वापर करा.डोक्यावर टोपी किंवा हॅटखाली ओलसर कपडा ठेवा.पाळीव प्राण्यांना सावलीत व थंड ठिकाणी ठेवा. घरात ओलसर पडदे, पंखा किंवा कुलरचा वापर करून वातावरण थंड ठेवा. हे करू नका शक्यतो दुपारच्या उन्हात बाहेर पडणे टाळा.कष्टाची कामे उन्हात करू नका.पार्क केलेल्या वाहनांमध्ये लहान मुलांना ठेवू नका.गडद रंगाचे व तंग कपडे वापरू नका.उष्णतेच्या काळात स्वयंपाक टाळा व स्वयंपाकघर हवेशीर ठेवा.मद्य, चहा,कॉफी व सॉफ्ट ड्रिंक्सचे सेवन टाळा.अतिप्रथिनयुक्त व शिळे अन्न खाऊ नका. उष्माघाताची लक्षणे उष्माघाताची लक्षणे प्रौढ व लहान मुलांमध्ये वेगवेगळी दिसून येतात. प्रौढांमध्ये : शरीराचे तापमान 104 फॅरेनहाइट (40) पर्यंत वाढणे, तीव्र डोकेदुखी, स्नायू आखडणे, मळमळ, उलटीचा भास, अस्वस्थता, चक्कर येणे, हृदयाचे ठोके वाढणे व धडधडणे. लहान मुलांमध्ये : आहार घेण्यास नकार, सतत चिडचिड, लघवीचे प्रमाण कमी होणे, डोळे शुष्क होणे, तोंड कोरडे पडणे, रक्तस्त्राव होणे इत्यादी लक्षणे दिसून येतात. शरीराचे तापमान वाढलेले,व्यक्ती बेशुद्ध,गोंधळलेली किंवा अतिप्रमाणात घाम येत असल्यास तात्काळ टोल फ्री क्रमांक 108 किंवा 102 वर संपर्क साधावा. जिल्ह्यातील नागरिकांनी उष्णतेच्या लाटेकडे दुर्लक्ष करू नये. उष्माघाताचे गंभीर परिणाम होऊ शकतात.त्यामुळे आवश्यक ती खबरदारी घेऊन सुरक्षित राहावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा महाडदळकर व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरिदास यांनी केले आहे.
Kolhapur News |कणकवलीत प्रामाणिकपणाचे दर्शन! रिक्षाचालकाने आजींचे २ लाखांचे दागिने आणि रोकड केली परत
कणेरीतील रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा गोकुळ शिरगाव – कणेरी येथील रिक्षा चालकाचा प्रामाणिकपणा.१ तोळे दागिने व रोख रक्कम असलेली बॅग केली परत.कणेरी फाट्याच्या रिक्षा स्टॉप वरून कोगील बुद्रुक या गावी जात असलेल्या आजी यांचे १ तोळे सोन्याची दागिने व रोख रक्कम असलेली बॅग रिक्षा [...]
मंगळवेढ्यात विवाहितेचा छळ; मंगळवेढा -निंबोणी येथील एका २५ वर्षीय विवाहितेस मोटारसायकलला व घराचे डिपॉझिट करिता चार लाख ५० हजार रुपये माहेरहून घेऊन ये, तसेच तू मुलीला जन्म दिला, आम्हाला मुलगा पाहिजे या कारणावरुन तिचा शारीरिक, मानसिक छळ केल्याप्रकरणी पती निवांत [...]
Solapur weather |सोलापूरचा पारा ४३.३ अंशांवर! कडक उन्हामुळे जिल्ह्याची लाहीलाही; रस्ते पडले ओस
सोलापूरात तापमान ४३.३ अंशांवर; उष्णतेचा कहर सोलापूर -शहर जिल्ह्यात तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून बुधवार, १५ एप्रिल रोजी कमाल तापमान ४३.३ अंश सेल्सिअसवर पोहोचले. किमान तापमान २६.५ अंश नोंदविण्यात आले असून नागरिकांना उष्णतेचा तीव्र त्रास सहन करावा लागत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस आकाश पूर्णपणे [...]
सांगोल्यात सामाईक विहिरीवरून वाद सांगोला -सामाईक विहिरीवर तू का आला असे म्हणून चुलता व चुलत भावाने फिर्यादी पुतण्यास गच्चीला धरून खाली पाहून शिवीगाळी, दमदाटी करून हाताने, लाथा-बुक्क्यांनी तसेच काठीने मारहाण केल्याची घटना बुधवारी सकाळी आठच्या सुमारास शिरभावी (ता. सांगोला) येथे घडली आहे. सुयश मधुकर ताटे (रा. [...]
नारी शक्ती वंदन अधिनियम आणि मतदारसंघ पुनर्रचना अशा दोन महत्त्वाच्या विधेयकांसाठी केंद्र सरकारने तीन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवले आहे. तीन दिवसीय अधिवेशनाचा आज पहिला दिवस असून यामध्ये नारी शक्ती वंदन अधिनियम विधेयेकाचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. ज्यावर लोकसभेत सविस्तर चर्चा सुरू आहे. याच दरम्यान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महिला आरक्षणासंदर्भातील विधेयकाबाबत […]
कराडमध्ये बाप-लेकावर हद्दपारीची कारवाई कराड – कराड तालुक्यातील नागरिकांना दीर्घकाळ त्रस्त करणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीवर सातारा पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. वारंवार गुन्हे करूनही कायद्याचा धाक न मानणाऱ्या बाप-लेकाला तब्बल सहा महिन्यांसाठी सातारा आणि सांगली जिल्ह्याच्या हद्दीतून हद्दपार करण्यात [...]
पाटण तालुक्यात जनावरांसाठी अनोखे ‘ब्युटीपार्लर तळमावले -ग्रामीण विकासामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रमाचे अभ्यासकेंद्र ठरलेल्या पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी ग्रामपंचायतीने आता जनावरांचे स्नानगृह (ब्युटीपार्लर) चालू करून एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. जनावरांमुळे होणारे नदी, ओढ्यातील प्रदूषण थांबवण्यासाठी हा उपक्रम चालू केल्याचे ग्रामपंचायतीकडून सांगण्यात आले. ‘हांबांसाठी केलेल्या या ब्युटीपार्लरची [...]
महिला आरक्षण विधेयकामुळे देशाची दिशा आणि दशा बदलेल –पंतप्रधान मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत महिला आरक्षण विधेयकावर बोलताना या निर्णयाला राष्ट्रनिर्मितीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे पाऊल असल्याचे सांगितले. देशाच्या अर्ध्या लोकसंख्येशी संबंधित इतक्या महत्त्वाच्या प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळणे हे सर्वांसाठी भाग्याची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. लोकसभेत भाषण करताना मोदी म्हणाले की, “आपण सर्वजण नशीबवान आहोत की देशाच्या अर्ध्या लोकसंख्येशी संबंधित राष्ट्रनिर्मितीच्या प्रक्रियेत सहभागी […]
Satara weather |साताऱ्यात उन्हाची लाहीलाही! तापमानात मोठी वाढ, दुपारी रस्ते पडले ओस
उन्हाच्या तडाख्याने सातारा होरपळला सातारा -सातारा शहरात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता लक्षणीय वाढली असून नागरिकांची अक्षरशः लाडीलाही होत आहे. तापमानात झालेल्या वाढीमुळे उन्हाळ्याशी संबंधित आजारांमध्येही वाढ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. दुपारच्या वेळेत शहरातील मुख्य रस्तेही सुनसान दिसत असून नागरिक घराबाहेर [...]
पुण्यात आई-वडिलांच्या देखभालीच्या आदेशाचे उल्लंघन; मुलावर गुन्हा पुणे – वृद्ध आई-वडिलांचा सांभाळ करण्याचे आदेश ज्येष्ठ नागरिक निर्वाह न्यायाधिकरण दिले असतानादेखील आदेशाची अंमलबजावणी न केल्याने मुलावर आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शरीफ शफिक खान (४८, रा. गल्ली नंबर ५, दुसरा मजला सय्यदनगर, महंमदवाडी रोड, हडपसर) असे [...]
NCP Politics |सांगलीत दोन्ही राष्ट्रवादींचे ‘मनमिलन’? एकाच दालनात थाटले दोन गटनेत्यांचे संसार!
सांगली महापालिकेत दोन्ही राष्ट्रवादी एकाच दालनात सांगली : दोन्ही राष्ट्रवादी पक्षएकत्र येणार का, याबाबत राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असते. मात्र सांगली महानगरपालिकेत या चर्चेला जणू प्रत्यक्ष स्वरूप आल्याचे चित्र दिसत आहे.येथे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या गटनेत्याच्या दालनात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार [...]
साटेली महापुरुष वर्धापन दिन सोहळा 21 एप्रिलला
सातार्डा – साटेली – खालचीवाडी येथील श्री महापुरुष मंदिरचा दुसरा वर्धापन दिन सोहळा मंगळवार दि. 21 एप्रिल रोजी होणार आहे. यानिमित्त धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन महापुरुष मंदिरामध्ये करण्यात आले आहे.मंगळवारी सकाळी 9 वाजता श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी 1 वाजता आरती व महाप्रसाद होणार आहे.सायंकाळी 6 : 30 वाजता अमृताभिषेक साटेली निर्मित गायक सत्यनारायण कळंगुटकर, [...]
लोकलमधून पडून मृत्यू होणे दुर्दैवी घटना; मुंबई उच्च न्यायालयाचा रेल्वेला दणका
लोकलमधून पडून मृत्यू होणे ही एक दुर्दैवी घटना आहे. त्यामुळे अपघाती मृत्यू होणाऱ्या प्रवाशाच्या कुटुंबियांना भरपाई देणे बंधनकारकच आहे. अशा मृत्यूच्या प्रकरणांत रेल्वे प्रशासन पुराव्याअभावी आपली जबाबदारी झटकू शकत नाही, असा महत्वपूर्ण निर्णय उच्च न्यायालयाने गुरुवारी दिला आणि रेल्वे प्रशासनाला झटका दिला. 16 वर्षांपूर्वी लोकल ट्रेनच्या प्रवासादरम्यान अपघाती मृत्यू झालेल्या तरुणाच्या आईला न्यायालयाने 4 लाखांची […]
आशाताई अन् चिखलीच्या ‘यादव’ कुटुंबाचे अतूट नाते चिखली (सुधाकर काशिद ) – करवीर तालुक्यातील चिखली हे गाव . या गावातील यादव परिवार आणि त्यांचे गुऱ्हाळ याच्याशी आशाताई भोसले यांचे गोड नाते गेली वीस वर्षाहून अधिक काळ होते . त्यांच्या गुऱ्हाळावर मंगेशकर परिवार [...]
नाईचाकूर ग्रामस्थांचा कबाला मालकी प्रमाणपत्र वितरीत करण्यासाठी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण
उमरगा (प्रतिनिधी)- उमरगा तालुक्यातील नाईचाकूर येथील नागरिकाला शासनाने आजपर्यंत कबाला मालकी प्रमाणपत्र देण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी आदेशीत करून त्याची अंमलबजावणी उपविभागीय अधिकारी करीत नसल्याने आदेशाचे उल्लंघन व कर्तव्यास कसूर झाल्यामुळे आमरण उपोषणास बुधवार दि. 15 एप्रिल रोजी पासून तहसील कार्यालयासमोर सुरू करण्यात आले आहे. उमरगा तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नाईचाकूर येथील मारूती प्रेमनाथ पवार यांच्या नावे पुनर्वसीत घर क्रं. ब - 299 लाभार्थी यादीमध्ये मंजूर असून मालकी हक्कामध्ये आहे. परंतु आज पर्यंत घराचा कबाला मालकी प्रमाणपत्र मिळाले नाही. रितसर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे विनंती अर्ज करून कबाला करण्यास विनंती केली होती. गाव पातळीवर ग्राम समितीने घराची वर्गवारी अ, ब, क. या प्रमाणे करून क्षेत्र, बांधकाम किती हे या यादीमध्ये समाविष्ट केले होते. ती यादी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. शासकीय नियमानुसार जिल्हाधिकारी यांनी भूकंपातील महाराष्ट्र शासनाने काढलेल्या निर्णयाचा आधार घेत अर्जदार विनोद पवार यांना आदेशीत करून अस्वस्थ केले व शासकीय नियमानुसार बांधकामासह एकुण क्षेत्र 2520 चौरस फुटाचे मालकी कबाला प्रमाणपत्र देण्याचे आदेशित केले. परंतु उपविभागीय अधिकारी उमरगा यांनी आम्हाला कबाला मालकी प्रमाणपत्र देता येत नाही आमच्या वतीने केवळ बांधकाम केलेल्या 400 चौरस फुटाचा कबाला मालकी प्रमाणपत्र देणार असे लेखी पत्र दिले. उर्वरित खुल्या जागेचा कबाला मालकी प्रमाणपत्र देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तातडीने माझ्यासोबत उमरगा व लोहारा तालुक्यातील पुनर्वसन गावचे कबाले मालकी प्रमाणपत्र वाटप होईपर्यंत तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशाचे उल्लंघन व कर्तव्यास कसूर झाल्यामुळे शासनास रितसर लेखी पत्र देवून आमरण उपोषणाला सुरुवात केली असल्याचे म्हटले आहे. उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी या वरिष्ठांना आपले म्हणणे तात्काळ कळवून आपणास न्याय मिळवून देण्यासाठी सहकार्य करणार असल्याचे मत उमरगा येथील तहसीलदार गोविंद येरमे यांनी उपोषण स्थळी भेट देवून उपोषण कर्त्याला सांगितले आहेत.
धाराशिव (प्रतिनिधी)- ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक तथा जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळेतील माजी पर्यवेक्षक गोवर्धन एकनाथराव यादव वय 91 रा. धाराशिव यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले .त्यांच्या पाठीमागे पत्नी, दोन मुले ,सुना ,नातवंडे असा मोठा परिवार आहे. बाल विकास प्रकल्प अधिकारी विद्यासागर यादव व वजन मापे निरीक्षक अविनाश यादव यांचे ते वडील होत. तसेच एस.टी.कामगार संघटनेचे चंद्रकांत मुळे यांचे ते मेहुणे होत. त्यांच्यावर कपिलधार स्मशानभूमीत सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.
मतदारसंघ पुनर्रचना विधेयक म्हणजे राजकीय नोटबंदी, काँग्रेस खासदार शशी थरुर यांची टीका
काँग्रेसचे नेते शशी थरुर यांनी केंद्र सरकारच्या प्रस्तावित मतदारसंघ पुनर्रचना (डिलिमिटेशन) प्रक्रियेवर गुरुवारी जोरदार टीका करत हा निर्णय सत्ताधारी पक्षाच्या राजकीय फायद्यासाठी रचला जात असल्याचा गंभीर आरोप केला. महिला आरक्षणाच्या नावाखाली हा बदल राबवण्याचा प्रयत्न होत असून ही प्रक्रिया “राजकीय नोटाबंदी” असल्याचे ते म्हणाले. पत्रकारांशी संवाद साधताना थरूर यांनी स्पष्टपणे सांगितले की, सरकार मतदारसंघांची नव्याने […]
प्राचार्य वैजनाथ घोडके यांना आंतरराष्ट्रीय ‘डी.एस्सी.’ पदवी बहाल
तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालयाचे प्राचार्य वैजनाथ घोडके यांच्या कार्याची दखल घेत ‘युनिव्हर्सिटी ऑफ सेंट्रल अमेरिका’ या आंतरराष्ट्रीय विद्यापीठाने त्यांना प्रतिष्ठेची डॉक्टरेट ऑफ सायन्स (डी.एस्सी.) पदवी बहाल केली आहे. चंद्रकांत घोडके यांच्या शैक्षणिक कार्याची शिफारस ‘डॉ. एस. राधाकृष्णन रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर’ (ऑल इंडिया टीचर्स वेल्फेअर असोसिएशन) यांच्या माध्यमातून करण्यात आली होती. त्यांच्या सातत्यपूर्ण सेवेची आणि शिक्षणातील नाविन्यपूर्ण उपक्रमांची थेट आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आल्याने जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात अभिमानाचे वातावरण आहे. या यशाबद्दल धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार तसेच तहसीलदार व प्रशासन व्यवस्थापक माया माने यांच्या हस्ते घोडके यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
तुळजाभवानी मंदिर जीर्णोद्धाराला वेग; भवानी-शंकर मंडपासाठी भूमी तपासणी अंतिम टप्प्यात
धाराशिव (प्रतिनिधी)- श्री तुळजाभवानी मंदिर येथे सुरू असलेल्या जीर्णोद्धार कामांना आता वेग आला असून, भवानी-शंकर मंडपाच्या उभारणीसाठी भूमीची तांत्रिक तपासणी (कोर बोर) पूर्ण करण्यात आली आहे. मंदिर संस्थानच्या वतीने सुरू असलेल्या कामांअंतर्गत भवानी-शंकर मंडप परिसरात पितळी दरवाजासमोर आणि मंडपाच्या पाठीमागील भागात विशेष यंत्राद्वारे तपासणी करण्यात आली. या प्रक्रियेत 2 इंची पाईपच्या साहाय्याने सुमारे 10 मीटर खोलीपर्यंत जमिनीची तपासणी करण्यात आली. ज्यामुळे त्या भागातील भूगर्भीय स्थितीचा सखोल अभ्यास करण्यात आला. भाविकांच्या गर्दीमुळे रात्री हे काम केले जात आहे. या तपासणीनंतर आता मंडपाच्या पायाची रचना कशी असावी, किती खोलीपर्यंत पाया घ्यावा, याबाबत तांत्रिक निर्णय घेतला जाणार आहे. विशेष म्हणजे, मंदिरासारख्या ऐतिहासिक व धार्मिक स्थळावर काम करताना सुरक्षितता आणि टिकाऊपणा याला प्राधान्य दिले जात असल्याचे दिसून येत आहे. भूगर्भ तपासणी पूर्ण झाल्यामुळे आता भवानी-शंकर मंडपाच्या प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात होणार असून, संपूर्ण जीर्णोद्धार प्रक्रियेला गती मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या मंदिराचा ऐतिहासिक वारसा जपत आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने कामे केली जात आहेत. यामुळे मंदिराची भव्यता आणि सुरक्षितता दोन्ही वाढणार आहे. श्री तुळजाभवानी मंदिर येथे सुरू असलेल्या जीर्णोद्धार कामांमुळे भाविकांसाठी अधिक सुरक्षित आणि सुसज्ज व्यवस्था निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. भवानी-शंकर मंडपाच्या कामामुळे मंदिराच्या विकासाला नवी दिशा मिळणार आहे.
पोस्ट ऑफीस मुख्यालयात डॉ. आंबेडकर जयंती साजरी
धाराशिव (प्रतिनिधी)- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती धाराशिव येथील पोस्ट ऑफीस मुख्यालयात मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये धाराशिव विभागाचे डाक अधिक्षक प्रशांत मालकर साहेब, प्रमुख पाहूणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण प्राप्त विजय गायकवाड, पोस्ट मास्टर गोवर्धन साहेब यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा फुले, संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून पुजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख उपस्थित, प्रमुख पाहूणे यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. यावेळी मालकर साहेब यांनी शिका, संघटित व्हा, संघर्ष करा या बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संदेशाचे विस्तृत विवेचन केले. प्रमुख पाहूणे विजय गायकवाड यांनी बाबासाहेब आंबेडकर व जीवन कार्य या विषयावर सविस्तर मांडणी केली. मानगाव परिषद महाडचा चवदार तळयाचा सत्याग्रह, भारतीय संविधान निर्मिती याबाबतही सविस्तर माहिती सांगितली. अध्यक्षीय समारोपात गोवर्धन साहेब यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनात पुस्तकांचे महत्त्व विशद केले. दिपक केंगार यांनीही यावेळी विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अमोल जाधव यांनी केले. प्रास्ताविक स्वप्नील बनसोडे यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन अमोल ढाकरे, विश्वजीत ढावारे, गणेश गुरव, मरगणे साहेब यांनी केले. कार्यक्रमास पोस्ट ऑफीस मुख्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. अमोल ढाकरे यांनी सर्वांचे आभार मानले.
आरटीई प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकतेसाठी कागदपत्रांची सखोल पडताळणी करा
धाराशिव (प्रतिनिधी)- आरटीई 25% मोफत प्रवेश प्रक्रिया ही समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना आहे. मात्र, सध्याच्या प्रवेश प्रक्रियेत काही तांत्रिक बाबींचा गैरफायदा घेतला जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आरटीई प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकतेसाठी कागदपत्रांची सखोल पडताळणी करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलनक करणार असल्याचे निवेदन मराठवाडा शिक्षक संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देणार आले आहे. आहे की, वास्तव्याच्या पुराव्यासाठी आवश्यक असलेल्या 3 किमी अंतराच्या मर्यादेबाबत अनेक साशंकता निर्माण झाल्या आहेत. अनेक ठिकाणी केवळ प्रवेशाच्या उद्देशाने तात्पुरते किंवा केवळ कागदोपत्री भाडेकरार करून नियमावलीचे उल्लंघन केले जात असल्याची दाट शक्यता आहे. अशा प्रकारे निवासाचा पत्ता बदलून दाखवण्याच्या प्रवृत्तीमुळे जे स्थानिक आणि खरोखर गरजू लाभार्थी आहेत, त्यांच्यावर अन्याय होत आहे. त्याचप्रमाणे, उत्पन्नाच्या मर्यादेबाबतही अशीच परिस्थिती असून, सादर केलेल्या उत्पन्न प्रमाणपत्रांच्या सत्यतेबाबत सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. उत्पन्नाचे निकष पूर्ण न करणारे पालक चुकीच्या माहितीच्या आधारे लाभ घेत असतील, तर ते या योजनेच्या मूळ हेतूला हरताळ फासणारे आहे. तरी केवळ कागदोपत्री पुराव्यांवर विसंबून न राहता, संशयास्पद वाटणाऱ्या प्रकरणांमध्ये प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून किंवा सखोल चौकशी करूनच प्रवेश निश्चित करावेत. खऱ्या आणि मूळ लाभार्थ्यांना त्यांचा हक्क मिळावा आणि संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पाडली जावी, मागणी मान्य न झाल्यास मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल, असेही संघटनेचे जिल्हाध्यक्ष जे. एस. शेरखाने दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.
तेंडोली रवळनाथ पंचायतनचा वर्धापन सोहळा १९ एप्रिलपासून
वार्ताहर/कुडाळ तेंडोलीचे ग्रामदैवत श्री देव रवळनाथ पंचायतनचा वर्धापन सोहळा १९ ते २५ एप्रिल याकालावधीत साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.१९ रोजी सकाळी ७ वाजता देवतावंदन, पुण्याहवाचन, अग्नीस्थापन, ग्रहयज्ञ, ऋग्वेद शाकल संहिता स्वाहाकारारंभ, ७.३० वाजता श्री देव रवळनाथ चरणी दररोज ऋग्वेदसंहिता अभिषेक पूजा,यज्ञमंडप वास्तुयजन, गणपती लघुरुद्र, दुपारी १ वाजता नैवेद्य, प्रसाद, [...]
बचतगटांच्या बळावर ग्रामीण महिलांची भरारी ; ‘उमेद’ अभियानातून आर्थिक स्वावलंबनाची नवी दिशा”
धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील ग्रामीण भागातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी ‘उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान’ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमुळे महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडत असून,बचतगटांच्या माध्यमातून त्यांना आर्थिक स्वावलंबनाची नवी दिशा मिळत आहे. जिल्हा परिषद धाराशिव अंतर्गत जिल्हास्तरीय विक्री व प्रदर्शन “मिनी सरस” चे आयोजन लेडीज क्लब मैदान, धाराशिव येथे दिनांक 24 ते 28 फेब्रुवारी 2026 या कालावधीत करण्यात आले होते.या प्रदर्शनात स्वयं सहायता समूहातील महिला भगिनींनी उत्पादित केलेल्या दर्जेदार उत्पादनांची व खाद्यपदार्थांची विक्री करण्यासाठी सुसज्ज अशा 100 स्टॉल्सची उभारणी करण्यात आली होती.प्रदर्शनादरम्यान धाराशिवकरांसाठी वेगळा फूड कोर्ट उभारण्यात आला होता,ज्यामध्ये ग्रामीण बाज असलेल्या रुचकर व चविष्ट खाद्यपदार्थांचा आस्वाद नागरिकांनी घेतला. जिल्ह्यात एकूण 15 हजार 380 स्वयं सहायता समूहांची स्थापना करण्यात आली असून सुमारे दीड लाख कुटुंबे या अभियानाशी जोडली गेली आहेत.यासोबतच 803 ग्रामसंघ,55 प्रभागसंघ, 521 महिला उत्पादक गट आणि महिलांच्या 11 शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना करण्यात आली आहे. या सर्व उपक्रमांमुळे महिलांना केवळ आर्थिक आधारच मिळाला नसून त्यांचा आत्मविश्वासही मोठ्या प्रमाणात वाढला आहे.‘उमेद’ अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यात सुमारे 99 हजार 276 महिला “लखपती दीदी” बनल्या आहेत. बचतगटांमुळे महिलांना नियमित बचत, कर्ज सुविधा,लघुउद्योग उभारणी आणि कौशल्य विकासाच्या संधी मिळाल्याने त्यांच्या जीवनमानात आमूलाग्र बदल झाला आहे.पूर्वी घरगुती जबाबदाऱ्यांपुरत्या मर्यादित असलेल्या महिला आता व्यवसाय,विपणन आणि निर्णय प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेत आहेत. दरम्यान,जिल्हा नियोजन समिती अंतर्गत टुरिस्ट बस प्रकल्प राबविण्यात येत असून यासाठी 76 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.या निधीतून दोन 17 सीटर एसी अर्बनिया बसेस खरेदी करण्यात आल्या आहेत.हा प्रकल्प जिल्हा आणि जिल्ह्याबाहेरील पर्यटन विकासाला चालना देणारा ठरणार असून ग्रामीण महिलांसाठी उपजीविकेचे विविध स्रोत उपलब्ध करून देणार आहे. हा प्रकल्प तुळजापूर केंद्रित असून,येथे येणाऱ्या भाविकांना जिल्ह्यातील इतर पर्यटन व ऐतिहासिक स्थळांची माहिती मिळावी यासाठी विशेष टुरिस्ट पॅकेज तयार करण्यात आले आहे. तुळजापूर -नळदुर्ग-अक्कलकोट - पंढरपूर आणि तुळजापूर -तेर -येरमाळा - सरमकुंडी- सोनारी-परंडा असे दोन मार्ग निश्चित करण्यात आले आहेत.
संत गोरोबा काका मंदिरातील ओव्हरीच्या कामांसाठी 3 कोटी मंजूर- आमदार राणाजगजितसिंह पाटील
धाराशिव (प्रतिनिधी)- तेर येथील संतश्रेष्ठ गोरोबा काका यांच्या समाधी मंदिरातील ओव्हरीच्या कामांसाठी 3 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यामुळे केवळ मंदिराचे सौंदर्य तर खुलणार आहेच त्यासोबत दरवर्षी दर्शनासाठी येणारे लाखो वारकरी आणि भाविक यांच्यासाठी मूलभूत सोयीसुविधाही उपलब्ध होणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे. आपल्या महायुती सरकारने मंजूर केलेल्या 3 कोटी रुपयांच्या निधीतून प्रामुख्याने मंदिराच्या मूळ रचनेला साजेशी विकासकामे केली जाणार आहेत. प्राधान्याने मंदिरातील ओव्हरीचे बांधकाम पूर्ण केले जाणार आहे. मंदिराच्या पूर्व बाजूस 2 कोटी रुपये खर्चून ओव्हरीचे बांधकाम केले जाणार आहे. वारी किंवा उत्सवाच्या काळात भाविकांच्या विश्रांतीसाठी आणि भजनासाठी ही जागा हक्काचे केंद्र ठरणार आहे. ओव्हरीसोबतच ऐतिहासिक वारशाचे जतन जसे की नगारखाना व स्टोन क्लेडिंगचेही काम हाती घेण्यात येणार आहे. नगारखान्याचे बांधकाम आणि मंदिराला स्टोन क्लेडिंग अर्थात दगडी आच्छादन केल्यामुळे मंदिराला प्राचीन आणि भव्य स्वरूप प्राप्त होणार आहे. या कामासाठी स्वतंत्रपणे 1 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे आहे. आंतरराष्ट्रीय वस्तुसंग्रहालय येथील कोट टेकडीवर उत्खननाची जिवंत प्रात्यक्षिक प्रयोगशाळा विकसीत केली जाणार आहे. यासाठी 13 कोटी 38 लाख रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. तसेच प्राचिन तीर्थकुंड विकासासाठी 5 कोटी 11 लाख, बौद्ध स्तूप विकासासाठी 2 कोटी 21 लाख रूपयांचा निधी उपलब्ध आहे. आता समाधी मंदिराच्या कामासाठी 3 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. कै. रामलिंगप्पा लामतुरे शासकीय वस्तू संग्रहालय जवळपास 24 हजार 766 पुरातन अवशेषाचा संग्रह उपलब्ध आहे. या संग्रहालयाच्या नवीन इमारतीचे बांधकामही सध्या शेवटच्या टप्प्यात आहे. एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे पुरातन वस्तू संग्रहालय आता या नवीन इमारतीच्या माध्यमातून अनुभवता येणार असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे.
Sangli News |‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी 2.0’चा डंका; राज्यातील ४५ लाख शेतकऱ्यांना मिळणार दिवसा वीज
शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यात महाराष्ट्र देशात अव्वल सांगली : मुख्यमंत्रीसौर कृषिवाहिनी योजना २.० तसेच मागेल त्याला सौर कृषिपंप या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीत महावितरणची कामगिरी इतर राज्यांसाठी दिशादर्शक आहे. राज्यातील ४५ लाख शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी सुरु असलेल्या या योजनांची माहिती घेतल्यानंतर मध्यप्रदेशच्या पथकाकडून हे गौरवोद्वार [...]
फेब्रुवारीच्या तुलनेत मार्चमध्ये महागाईने ओलांडली मर्यादा नवी दिल्ली -मार्च महिन्यात घाऊक महागाई दरात लक्षणीय वाढ पहावयास मिळाली आहे. या महिन्यात घाऊक महागाईवाढीचा दर ३.८८ टक्के इतका आहे. फेब्रुवारीत तो केवळ २.१३ टक्के होता. त्या तुलनेत मार्चमध्ये महागाई अधिक वाढली आहे.आंतरराष्ट्रीय बाजारात झालेली कच्च्या इंधन तेलाच्या [...]
IPL 2026 –चेन्नईला मोठा धक्का, स्टार गोलंदाज दुखापतीमुळे उर्वरित हंगामाला मुकणार
पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवणारा चेन्नई सुपर किंग्स (CSK) हा संघ या हंगामातही चांगली कामगिरी करत आहे. संघाने आतापर्यंत दोन सामने जिंकले असून, त्यांचा पुढचा सामना 18 एप्रिल रोजी हैदराबादविरुद्ध होणार आहे. मात्र, या सामन्यापूर्वी चेन्नईच्या चाहत्यांसाठी एक अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे. चेन्नईचा स्टार वेगवान गोलंदाज खलील अहमद याला दुखापतीमुळे संपूर्ण आयपीएल हंगामातून […]
Kagal Crime |कागलमध्ये भरदिवसा धाडसी घरफोडी; औषध विक्रेत्याच्या घरातून २१ लाखांचा ऐवज लंपास
कागलमध्ये भरदिवसा घरफोडी कागल :शहरातील शिवनेरी पार्क, अनंत रोटो परिसरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून रोकड व सोन्याचे दागिने असा सुमारे २१ लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. रफिक गौस सय्यद यांच्या घरी ही चोरी झाली असून याप्रकरणी कागल पोलिसांत [...]
Sangli Crime |कुपवाडमध्ये खळबळ! बामणोलीतील २४ वर्षीय तरुणाची राहत्या घरी आत्महत्या
कर्नाटकच्या तरुणाने बामणोलीत संपवली जीवनयात्रा कुपवाड : बामणोली येथे राहणाऱ्याएका तरुणाने राहत्या घरी छताला गळफास लावून घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. यामध्ये चंद्रकांत गुराप्पा मेत्री (वय २४ सध्या रा.दत्तनगर, मूळगाव अनंतपूर अथणी, कर्नाटक) असे मयत झालेल्या तरुणाचेनाव आहे. याबाबत कुपवाड [...]
इटलीच्या संसदेत सध्या एका भाषणाची जोरदार चर्चा रंगली आहे. इटलीच्या विरोधी पक्षनेत्या एली श्लेन (Elly Schlein) यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर सडकून टीका केली आहे. ट्रम्प यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यावर केलेल्या वैयक्तिक हल्ल्यानंतर, श्लेन यांनी आपल्या देशाच्या सन्मानासाठी मेलोनी यांची बाजू घेत ट्रम्प यांना खडे बोल सुनावले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी मेलोनी […]
बोगस आणि निकृष्ट कीटकनाशक औषधे, खतांचा वापर केल्याने कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे प्रचंड नुकसान झाले आहे. बोगस कीटकनाशक औषधे आणि खतांविरोधात आंबा-काजू बागायतदारांनी आवाज उठवला आहे. बागायतदारांच्या फसवणुकी विरोधात एक लढा उभारला जाणार असून त्याची दिशा शनिवार, १८ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता नाचणे येथील बालाजी मंगल कार्यालयातील सभागृहात होणाऱ्या आंबा-काजू बागायतदारांच्या मेळाव्यात ठरणार आहे. कोकण […]
लोकसभेत महिला आरक्षणासंदर्भातील 131वा घटनादुरुस्ती विधेयक सादर करताना सरकार आणि विरोधकांमध्ये गुरुवारी जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. केंद्रीय कायदा मंत्री अर्जून राम मेघवाल यांनी या विधेयकाचे समर्थन करत महिलांना 33 टक्के आरक्षण देण्याचा मार्ग मोकळा होत असल्याचे सांगितले. प्रस्तावित बदलांनुसार लोकसभेची संख्या 815 पर्यंत वाढवण्यात येणार असून त्यापैकी 272 जागा महिलांसाठी राखीव असतील. तसेच अनुसूचित जाती […]
सीबीएसई दहावी परीक्षेत भोसले इंटरनॅशनल स्कूलचे यश
सलग पाचव्या वर्षी १०० टक्के निकाल ; २२ विद्यार्थी ‘ए’ ग्रेड मध्ये सावंतवाडी । प्रतिनिधी यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलने सीबीएसई दहावी परीक्षेत यंदाही आपल्या उत्कृष्ट परंपरेला साजेसा निकाल देत सलग पाचव्या वर्षी १०० टक्के यश संपादन केले आहे. या उल्लेखनीय यशात विद्यार्थ्यांनी विविध विषयांमध्ये उच्चांक गाठले असून मराठी विषयात गंधार जोशी, खुशल सावंत, साहर्ष धुमाळे, [...]
पश्चिम महाराष्ट्र व कोकणला जोडला जाणाऱ्या घाटाला कुंभार्ली घाट म्हणुन ओळखला जातो. पश्चिम महाराष्ट्राशी कोकणचे नाते व दळणवळणासाठीचा हा सर्वात पहिला महत्त्वाचा घाट असून सद्यस्थितीत या घाटातील रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. हा घाट वाहतुकीसाठी सर्व बाजूने असुरक्षित झाला आहे. अनेक वर्षे या घाटाच्या सुरक्षा व दुरूस्तीसाठी आजपर्यंत करोडो रूपये खर्च होऊनदेखील घाटातील सुरक्षित […]
विट्यात खळबळ! २३ वर्षीय तृतीयपंथी तरुणाची मंदिरात गळफास लावून आत्महत्या
विटा येथे तृतीयपंथी तरुणाची आत्महत्या विटा : खानापूर तालुक्यातील विटाशहरातील परिसरात गांधीनगर राहण्प्रया एका २३ वर्षीय तृतीयपंथी तरुणाने राहत्या घराशेजारील मंदिरात गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. प्रविण अमृत थोरात असे मयत व्यक्तीचे नाव आहे. [...]
मळेवाड श्री देव काळोबाचा २१ रोजी वार्षिक उत्सव
न्हावेली : हाकेला ओ देणारा आणि संकटात भक्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा…” अशी ख्याती असलेल्या मळेवाड जकात नाका येथील श्री देव काळोबा या जागृत देवस्थानचा वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. या निमित्ताने मंगळवार, २१ एप्रिल रोजी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उत्सवाच्या दिवशी सकाळी श्रींची षोडशोपचार पूजा आणि सत्यनारायण [...]
घरगुती वादातून कुऱ्हाडीने पत्नीवर हल्ला, तोडलेला पाय पिशवीत घेऊन पतीने पोलीस ठाणे गाठले
आंध्र प्रदेशातील पालनाडू जिल्ह्यात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घरगुती वादातून पतीने पत्नीवर कुऱ्हाडीने हल्ला करून तिचा पाय तोडला. यानंतर पत्नीचा तोडलेला पाय घेऊन पती पोलीस ठाण्यात हजर झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. पालनाडू जिल्ह्यातील मुप्पल्ला मंडळांतर्गत येणाऱ्या थोंडापी गावात गुरुवारी ही घटना घडली. भुलक्ष्मी असे […]
Maharashtra transport |उन्हाळी सुट्टीत ‘लाल परी’चा दणका; १५ जूनपर्यंत एसटी प्रवास महागणार
एसटी प्रवाशांना दुहेरी फटका कोल्हापूर -उन्हाळी सुट्ट्यांमुळे वाढलेली प्रवासी गर्दी आणि इंधन दरवाढीचा परिणाम म्हणून एसटी महामंडळाने भाडेवाढीचा निर्णय घेतला आहे. मंगळवार मध्यरात्रीपासून ही १० टक्के हंगामी दरवाढ लागू झाली असून, १५ जून २०२६ [...]
लोकसभेत 131वे घटनादुरुस्ती विधेयक सादर; 251 सदस्यांकडून समर्थन, 185 सदस्यांकडून विरोध
लोकसभेत गुरुवारी घटनेचा 131वा दुरुस्ती विधेयक सादर करण्यात आला. मतदानाद्वारे हे विधेयक सभागृहात मांडण्यात आले असून 251 सदस्यांनी समर्थन केले, तर 185 सदस्यांनी विरोध दर्शवला. हे विधेयक 2029 च्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी महिला आरक्षण लागू करण्याच्या उद्देशाने आणण्यात आले आहे. या विधेयकासोबतच मतदारसंघ पुनर्रचना विधेयक आणि केंद्रशासित प्रदेश कायदे (दुरुस्ती) विधेयक ही दोन इतर विधेयकेही सादर […]
Kagal Crime |शिवनेरी पार्कमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; ११ लाखांचे सोने लंपास
कागलमध्ये भरदिवसा घरफोडी कागल -शहरातील शिवनेरी पार्क, अनंत रोटो परिसरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून रोकड व सोन्याचे दागिने असा सुमारे २१ लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. रफिक गौस सय्यद यांच्या घरी ही [...]
इंडियन प्रीमियर लीगचे पाचवेळा विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्स संघात महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. मुंबईचा अष्टपैलू खेळाडू अथर्व अंकोलेकर दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला असून, त्याच्या जागी पंजाबच्या क्रिश भगत याला संघात स्थान देण्यात आले आहे. अथर्व अंकोलेकर दुखापतीमुळे यंदाच्या आयपीएल हंगामात खेळू शकणार नाही. मुंबई इंडियन्सने अधिकृत पत्रक काढून ही माहिती दिली आहे. सोबतच […]
लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी अमीर हमजावर जीवघेणा हल्ला, न्यूज चॅनेलच्या कार्यालयाबाहेर गोळीबार
पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाचा संस्थापक सदस्य अमीर हमजा याच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याचे वृत्त आहे. लाहोरमधील एका न्यूज चॅनेलच्या कार्यालयाबाहेर दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी हमजावर अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याची माहिती आहे. इंडिया टु़डेने दिलेल्या वृत्तानुसार, अमीर हमजा हा कुख्यात दहशतवादी हाफिज सईदचा जवळचा […]
जिल्हा परिषदेसमोर कंत्राटदारांचे भजन कोल्हापुर – शासकीय कामांची थकीत बीलं तातडीने मिळावीत या मागणीसाठी आज कोल्हापुरात कंत्राटदारांनी भजन पोवाड्यातून सरकारला गाऱ्हाणं घातलंय..कोल्हापूर जिल्हा परिषदेसमोर सुरू असणाऱ्या आजच्या आंदोलनांच्या दुसऱ्या दिवशी कंत्राटदारांनी अभिनवं आंदोलन केलंय..कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील [...]
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन यांनी केंद्र सरकारच्या प्रस्तावित मतदारसंघ पुनर्रचना (delimitation) निर्णयाविरोधात गुरुवारी आंदोलन केले. त्यांनी या विधेयकाची प्रत जाळत काळा झेंडा फडकावला आणि राज्यव्यापी आंदोलनाची औपचारिक सुरुवात केली. केंद्र सरकारकडून गुरुवारपासून तीन दिवसांच्या विशेष संसदीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. याच अधिवेशनात मतदारसंघ पुनर्रचनेचे विधेयकही सादर करण्यात आले आहे. काळे कपडे परिधान करून स्टॅलिन यांनी […]
राधानगरी तालुक्यातील येळवडे येथे दुर्दैवी घटना भोगावती : राधानगरी तालुक्यातील येळवडे येथे रक्षाविसर्जन विधीसाठी जमलेल्या ग्रामस्थांवर मधमाशांनी अचानक भीषण हल्ला चढवला. या हल्ल्यात सुमारे १०० हून अधिक ग्रामस्थ आणि पाहुणे जखमी झाले असून, १२ जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना तातडीने [...]
इतकी घाई का करत आहात? आधी जनगणनेपासून सुरुवात करा; अखिलेश यादव आणि अमित शहा सभागृहात भिडले
तीन दिवसाच्या संसदेच्या विशेष अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. या वेळी विधेयकांवर आपली मते मांडण्यासाठी प्रत्येक पक्षाला वेळ देण्यात आला आहे. यानुसार समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केंद्र सरकारला लक्ष्य केले. आधी जनगणनेपासून सुरुवात करा, असा आग्रह अखिलेश यादव यांनी धरला. महिला आरक्षण विधेयक आणण्यासाठी इतकी घाई का करत आहे, असा प्रश्न उपस्थित करत […]
महिला आरक्षणासाठी माझा मतदारसंघ गेला तरीही चालेल
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे विधान : पणजीत नारी शक्ती वंदन अधिनियमावर चर्चा पणजी : नारी शक्ती वंदन अधिनियम विधेयकावर आजपासून लोकसभेत चर्चा होणार आहे. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर लोकसभेतील जागा नक्कीच वाढतील. परंतु विधानसभेसाठी किती जागा राखीव असतील, याबाबत अजून अस्पष्टता आहे. विधानसभेत किती जागा राखीव ठेवण्यात येणार याबाबत विधेयक मंजूर झाल्यानंतरच कळेल. आपला [...]
विधानसभेचे 40 ऐवजी 50 मतदारसंघ होणार?
पणजी : मतदारसंघाच्या पुनर्रचनेमध्ये गोव्यासाठी लोकसभेच्या जागांमध्ये आणखी एकाने वाढ होऊ शकते. त्याचबरोबर विधानसभेमध्ये 40 ऐवजी 50 मतदारसंघ होतील, असा अंदाज आहे. केंद्र सरकार लवकरच पुनर्रचना आयोग स्थापन करणार आहे. यासाठी जनगणनेचा आधार घेतला जातो. केंद्राने सध्या तरी 2011 च्या जनगणनेचा आधार घेतलेला आहे, परंतु प्रत्यक्षात पुनर्रचनेची अंमलबजावणी लक्षात घेता भविष्यात गोव्यात 40 ऐवजी 50 [...]
कायद्याला महिना अन् ऑनर किलिंगची घटना
यमकनमर्डीतील विवाहितेला कुटुंबीयांनीच संपविले : मिरजमधील आरगमध्ये पाजले विष : गावातील तरुणाबरोबर होते प्रेमप्रकरण बेळगाव : कर्नाटकात ऑनरकिलिंग विरोधी ‘इव नम्मवा’ कायदा करून एक महिना उलटला नाही तोच बेळगाव जिल्ह्यात ऑनर किलिंगची घटना घडली आहे. नदीगुडी क्षेत्र येथील एका विवाहितेचा मिरज तालुक्यातील आरगमध्ये विष पाजून खून करून खुनानंतर काही तासात तिच्या मृतदेहाचीही आरगमध्येच विल्हेवाट लावण्यात [...]
मच्छे दुहेरी खून प्रकरणातील 5 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा
तिसरे अतिरिक्त जिल्हासत्र न्यायालयाचा निकाल बेळगाव : मच्छे (ता. बेळगाव) येथे सहा वर्षांपूर्वी घडलेल्या दुहेरी खून प्रकरणातील 5 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा आणि 2 लाख 14 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. कल्पना मल्लेशी बसरीमरद, महेश ऊर्फ मल्लाप्पा मोन्नाप्पा नाईक, शाहनूर नागाप्पा बन्नूर, रोहित नागाप्पा वड्डर आणि राहुल मारुती पाटील अशी त्यांची नावे असून बुधवार दि. 15 [...]
बेळगावसह काही जिल्ह्यात आज पावसाची शक्यता
बेळगाव : बेळगाव शहरासह परिसराचे तापमान दिवसेंदिवस वाढत असून गेल्या दोन दिवसांत पारा 38 अंश सेल्सिअस पोहोचल्याने अंगाची काहिली होत आहे. पंधरवड्यापूर्वी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्याने तापमान कमी झाले होते. आता पुन्हा तापमान वाढले आहे. गुऊवार दि. 16 रोजी उत्तर भागातील काही जिल्ह्यांत हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. बेळगावसह धारवाड, विजापूर, बागलकोट, रायचूर, [...]
‘धुरंदर’समोर ‘पुष्पा झुकेगा या नहीं?’, बॉक्स ऑफिसवरच्या कमाईत राहिले इतके अंतर
बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगचा चित्रपट ‘धुरंधर: द रिव्हेंज’ने ‘सुपर डुपर’ हीट ठरला आहे. या चित्रपटाने आज बॉक्स ऑफिसवर चार आठवडे पूर्ण केले आहेत. २८ दिवसांनंतर या चित्रपटाची देशातील निव्वळ कमाई १,०९९.७२ कोटी रुपये झाली आहे. तर एकूण कमाई १,३१६.४५ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. मात्र असे असले तरी ‘पुष्पा २’ झुकेगा नहीं म्हणत अजूनही पहिले स्थान […]
मोबाईलवरील गाणी बंद करण्याच्या वादातून गॅस सिलेंडरने हल्ला, तरुणाचा चेहरा फोडला; आरोपी फरार
मोबाईलमध्ये लावलेली गाणी बंद करण्याच्या वादातून आरोपीने 5 किलोचा गॅस सिलेंडर तोंडावर मारून 19 वर्षीय तरुणाला गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. मोकरम झराईल आलम अली असे आरोपीचे नाव असून, शौकत शमी हैदर रजा असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना महाड येथील बिरवाडी शहरातील भैरवनाथ नगर येथे घडली. बिरवाडी शहरातील भैरवनाथ नगर येथे […]
अल्पसंख्याकांचे कार्यक्रम सुरळीतपणे राबवा
आयेगाचे अध्यक्ष यु. निसार अहमद यांची सूचना : त्रैमासिक विकास आढावा बैठक बेळगाव : पंतप्रधानांच्या नूतन 15 कलमी कार्यक्रमांतर्गत अल्पसंख्याकांचे कल्याण कार्यक्रम सुरळीतपणे राबविण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी कार्यास लागावे. अल्पसंख्याकांना सरकारकडून मिळणाऱ्या सुविधा त्यांच्यापर्यंत पोचविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष यु. निसार अहमद यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी झालेल्या प्रधानमंत्री नूतन 15 कलमी [...]
गोकाक शहर पोलिसांकडून सात मोटारसायकली जप्त
रामदुर्ग येथील चोराकडून 4 लाखांच्या दुचाकी हस्तगत बेळगाव : मूळचा गडहिंग्लज व सध्या कडकोळ, ता. रामदुर्ग येथील एका अट्टल मोटारसायकल चोराला अटक करून गोकाक शहर पोलिसांनी 3 लाख 84 हजार रुपये किमतीच्या चोरीच्या सात मोटारसायकली जप्त केल्या आहेत. जिल्हा पोलीसप्रमुख के. रामराजन यांनी ही माहिती दिली आहे. रमेश मनोहर सुतार (वय 36) मूळचा राहणार गिजवणी [...]
खून प्रकरणी गुंड लक्ष्मण दड्डीसह चौघे दोषी
दुसरे अतिरिक्त जिल्हासत्र न्यायालय सुनावणार 22 रोजी शिक्षा : सहा वर्षांपूर्वीचे खून प्रकरण बेळगाव : पूर्ववैमनस्यातून सहा वर्षांपूर्वी शिवबसवनगर येथील शेख कॉलेजजवळ तरुणाचा खून केल्याप्रकरणी गुंड लक्ष्मण दड्डीसह चौघा जणांना दुसरे अतिरिक्त जिल्हासत्र न्यायालयाने दोषी ठरविले आहे. बसवराज होळ्याप्पा दड्डी, बसवाणी ऊर्फ बसू सिद्धाप्पा नाईक, सविन सिद्धाप्पा दड्डी अशी यांची नावे असून त्यांना बुधवार दि. [...]
सायबर गुन्हेगारांकडून गर्भवती, बाळंतीण महिला लक्ष्य
उचगावमधील तीन महिलांची बँक खाती केली रिकामी वार्ताहर/उचगाव सायबर गुन्हेगार दिवसेंदिवस वेगवेगळी शक्कल लढवत असल्याचे उघडकीस येत आहे. ओटीपी घेऊन अकाउंट खाली करण्याचे अनेक धक्कादायक प्रकार ऐकायला मिळत असतानाच आता वेगळीच चाल खेळत असल्याचे उघड झाले आहे. यामध्ये ओटीपी न घेता फक्त फोनवर अधिक वेळ बोलते ठेवून उचगावमधील गर्भवती आणि बाळंतीण महिलांना सायबर गुन्हेगाराकडून लक्ष्य [...]
उन्हाचा तडाखा; लिंबू दरांची झेप!
मागणी वाढली, पुरवठा कमी; बाजारात दरांनी गाठला कळस बेळगाव : बाजारपेठेत भाज्यांचे दर कमी झाले असले तरी लिंबूने मात्र दराचा उचांक गाठला आहे. काही दिवसापूर्वी रुपयाला दोन मिळणारा लिंबू आता चार ते सात रुपयाला एक याप्रमाणे विक्री होत आहे. दिवसेंदिवस उष्णता वाढत असल्याने नागरिक गारव्यासाठी लिंबू सरबत, लिंबू पाणी तसेच विविध गावांच्या असलेल्या लक्ष्मीयात्रांमुळे लिंबूचे [...]
क्रीडा क्षेत्रात महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्यातील कौशल्याला वाव देण्यासाठी SNDT महिला विद्यापीठाच्या वतीने एका ऐतिहासिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच ‘अखिल भारतीय आंतर विद्यापीठ महिला खो-खो स्पर्धा’ आयोजित केली जात असून त्याचे यजमानपद मुंबईतील SNDT विद्यापीठाला मिळाले आहे. स्पर्धेचे स्वरूप आणि ठिकाण ही प्रतिष्ठित स्पर्धा विद्यापीठाच्या जुहू संकुलात १९ ते २३ […]
युरोपियन दर्यावर्दी खलाशांमुळे नवीन भूभाग-बेटांचा जगात उदय
डॉ. अनुराग लव्हेकर : वसंत व्याख्यानमालेत ‘वसुंधरेचे शोधयात्री’ विषयावर मांडले विचार बेळगाव : युरोपियन दर्यावर्दी खलाशांनी वसुंधरेचे शोधयात्री होत अनेक नवीन मार्ग शोधून काढले. अनेक खंडांची त्यांनी जगाला ओळख करून दिली. परंतु, या शोधयात्रींना फक्त हालअपेष्टा, अपमान आणि मृत्यू या पलीकडे काहीही मिळाले नाही. त्यांच्या प्रयत्नांमुळे नवीन भूभाग, नवीन बेटे उदयाला आली. हवामान शास्त्राचा डोलाराच [...]
वैफल्यग्रस्त महिलेची तहसीलदाराकडे धाव
महामार्ग अधिकाऱ्यांकडून फसवणूक वार्ताहर/गुंजी गुंजी स्टेशन क्रास येथील वैफल्यग्रस्त महिला शोभा कडोलकर यांचे राहते घर बेळगाव-पणजी राष्ट्रीय महामार्ग विस्तारणीकरणात गेले आहे. सदर घरात शोभा कडोलकर चहाचा व्यवसाय करून आपण आणि तिच्या बहिणीचा उदरनिर्वाह चालवत होत्या. मात्र महामार्गात घर गेल्याने आश्रय आणि उदरनिर्वाहाचे साधनही गेल्याने त्या त्रस्त झाल्या आहेत. महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी घराचे भरपूर पैसे देतो असे [...]
जिल्ह्यात पाण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्चूनही शुद्ध पाणी नाही
बेळगाव : तंत्रज्ञानात अनेक प्रगती होऊनदेखील बेळगाव जिल्ह्यासह राज्यातील बहुतांश गावांना अद्यापही स्वच्छ पिण्याचे पाणी मिळत नाही. तर बेळगावसह कोप्पळ, तुमकूर, विजापूर, चित्रदुर्ग, रायचूर, कोलार, हवेरी, रामनगर, म्हैसूरसह काही भागात पाण्याची समस्या भेडसावत आहे. अद्यापही राज्यातील अनेक गावांमध्ये स्वच्छ पाणी उपलब्ध नाही. केंद्र आणि राज्य सरकारने ग्रामीण भागातील लोकांना स्वच्छ पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी अनेक योजना [...]
मुजावर गल्लीत ड्रेनेज, गटारी रस्ताकामाचे भूमीपूजन
बेळगाव : मुजावर गल्लीतील ड्रेनेज, गटार आणि रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन सोमवारी आमदार आसिफ सेठ व स्थानिक नगरसेविका वैशाली भातकांडे यांच्या हस्ते कुदळ मारुन करण्यात आले. त्यामुळे मुजावर गल्लीतील रहिवाशांतून समाधान व्यक्त केले जात आहे. दोन्ही मुजावर गल्लीतील ड्रेनेज लाईन 40 वर्षांपूर्वी घालण्यात आली आहे. त्यामुळे जुनी ड्रेनेज लाईन वारंवार तुंबत आहे. परिणामी याचा नाहक त्रास [...]
तालुक्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात
विविध गावांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन : कार्यकर्त्यांकडून सरबत, गोड पदार्थांचे वाटप वार्ताहर/किणये तालुक्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मंगळवारी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. गावागावांतील सार्वजनिक युवक मंडळे, ग्रामपंचायती व विविध संघ-संस्थांच्यावतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त अनेक गावांमध्ये शोभायात्रा काढण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर की जय, [...]
उचगाव परिसरात डॉ.आंबेडकर जयंती साजरी
वार्ताहर/उचगाव येथील आंबेडकर नगर परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मंगळवारी उत्साहात साजरी करण्यात आली. आंबेडकर भवन येथे बसविण्यात आलेल्या गौतमबुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिमांचे पूजन उचगाव ग्रा.पं. माजी अध्यक्षा मथुरा तेरसे, माजी उपाध्यक्ष बाळकृष्ण तेरसे तसेच माजी सदस्य यादो कांबळे, एल. डी. चौगुले, माजी अध्यक्ष जावेद जमादार, बंटी पावशे, शशिकांत जाधव व पाहुण्यांच्या हस्ते [...]
येळ्ळूर वेस चर्मकार समाज सुधारणा मंडळातर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
बेळगाव : येळ्ळूर वेस चर्मकार समाज सुधारणा युवक आणि महिला मंडळाच्यावतीने भारतीय घटनेचे शिल्पकार, महान मानवतावादी, भारतरत्न डॉ. आंबेडकर यांची 135 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शहापूर बॅरिस्टर नाथ पै चौक येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला मंडळाचे अध्यक्ष रवी शिंदे, किशोर पवार, जिल्हा अध्यक्ष गणेश काळे, श्रीकांत शिंदे, उपाध्यक्ष चंद्रकांत चव्हाण, भीमराव पवार, संतोष [...]
संतिबस्तवाडात बसवाण्णा-दुर्गादेवी यात्रा उत्साहात
गुलालाची उधळण-हलगी रणवाद्यांच्या गजरात आंबिल गाड्यांची मिरवणूक : हर हर महादेव…चा जयघोष वार्ताहर/किणये संतिबस्तवाड गावातील जागृत बसवाण्णा-दुर्गादेवी यात्रा मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडली. या यात्रेत भाविकांची अलोट गर्दी दिसून आली. गुलालाची उधळण व हलगी रणवाद्यांच्या गजरात आंबिल गाड्यांची मिरवणूक झाली. हर हर महादेवाच्या जयघोषात इंगळ्यांचा कार्यक्रमपार पडला. सोमवार दि. 13 रोजीपासून यात्रेला प्रारंभ [...]
बेळवट्टीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे जल्लोषात अनावरण
वार्ताहर/किणये कर्नाटक दलित संघर्ष समिती आंबेडकरवाद शाखा बेळवट्टी यांच्यावतीने गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचा अनावरण सोहळा गेल्या चार दिवसापूर्वी मोठ्या जल्लोषातपार पडला. या पुतळ्याचे अनावरण महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन काडा अध्यक्ष युवराज कदम यांच्या हस्ते करण्यात [...]

29 C