चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी आयसीसीने दिला पाकिस्तानला धक्का, भारताचा मात्र खास केला सन्मान
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीला फक्त काही दिवस बाकी असताना आता आयसीसीने पाकिस्तानला मोठा धक्का दिला आहे. पण दुसरीकडे मात्र भारताचा खास सन्मान झाल्याचे पाहायला मिळाले आहे.
लाडकी बहीण योजनेतून अनेक महिलांना वगळण्यात आले असून अनेक योजनांच्या खर्चाला सरकारने कात्री लावली आहे. अशा वेळी सरकारने जाहिरातींसाठी 100 कोटी रुपयांच्या होर्डिंगला मान्यता दिली आहे. यावर अजित पवार हे शिस्तप्रिय अर्थमंत्री आहेत आहेत असे विधान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केले आहे. तसेच अजित पवारांनी यात लक्ष घालून बदल करावे […]
अंजली दमानिया कडाडल्या, पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत केले गंभीर आरोप
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची सतत मागणी केली जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कालच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दल मोठे भाष्य केले. त्यांनी स्पष्ट केले की, धनंजय मुंडे हेच त्यांच्या राजीनाम्याबद्दल ठरवतील. गेल्या काही दिवसांपासून धनंजय मुंडे यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव आहे.
वेळीच आत्मचिंतन न केल्याने ‘उबाठा’ला खिंडार
रत्नागिरी कोकणाने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर खूप प्रेम केले. बाळासाहेबांचे विचार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे घेवून जात आहेत. म्हणूनच मोठ्या संख्येने ‘उबाठा’चे लोक शिवसेनेत प्रवेश करत आहेत. उबाठाकडून आता बैठका घेतल्या जात आहेत. हेच जर निवडणुका झाल्यावर लगेचच त्यांनी आत्मचिंतन केले असते तर काल जो प्रसंग रत्नागिरीत उभा राहिला तो राहिला नसता. मोठ्या प्रमाणात पक्षाला [...]
वडिलोपार्जित घर, जमीन नावावर कसं करावं; कोणती कागदपत्रे लागतात? ही आहे प्रोसेस, होणार नाही कोणता वाद
Ancestral Property Rules: कोणताही वाद होण्याची शक्यता असल्यास वारसाहक्काने मिळालेली मालमत्ता आपल्या नावावर कायदेशीररित्या नोंदणी केली जाऊ शकत नाही. तज्ज्ञांच्या मते, स्थावर मालमत्तेच्या मालकाच्या मृत्यूनंतर कायदेशीर वारसांनी त्यांच्या नावावर कायदेशीररित्या नोंदणीकृत करणे आवश्यक असून याच्याशी संबंधित प्रक्रिया तुम्हाला माहिती असली पाहिजे. तुम्ही वडिलोपार्जित मालमत्तेवर तुमचा दावा करत असाल तर, तुम्हाला मालमत्तेवरील तुमच्या हक्काचे वैध पुरावे सादर करावे लागतील.
सूनेला तासंतास आंघोळ करायची होती सवय, बाथरुममध्ये काय करायची? सासूने ढुंकून पाहताच....
सूनेला तासंतास बाथरुममध्ये आंघोळ करायची सवय होती. सूनेच्या या सवयीबाबत लग्नाआधीच नवरदेवाच्या कुटुंबियांना सांगण्यात आलं होतं. त्यांनी त्यावर कोणताही आक्षेप घेतला नाही. पण हीच त्यांची मोठी चूक ठरली.
तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुक्यातील केमवाडी येथील रहिवासी तथा सध्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठात सहयोगी प्राध्यापक तथा विभाग प्रमुख पशुआनुवंशिक व पैदास शास्त्र विभाग नागपूर येथे कार्यरत असलेले डॉ. दिपक सुखदेव काळे यांना नुकताच त्यांनी पदवीत्तर विद्यार्थ्यांना मार्गदर्शित केलेल्या चिकन ग्रोथ हार्मोन आणि पेरिलिपिन जीन्स मधील पॉलिमॉर्फिझन आणि त्यांचा कडकनाथ कोंबडी मधील वाढ व मांस वैशिष्ट्यांशी संबंधया कडकनाथ कुक्कुट प्रजावर केलेल्या प्रबंधास फॅकल्टी पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेच्या वतीने विविध मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना प्रथम पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. सोसायटी फॉर कॉन्झव्हिशन ऑफ डोमेस्टिक ॲनिमल जैवविविधता सोसायटीचे 22 वे वार्षिक अधिवेशन व राष्ट्रीय परिसंवाद परिषदपशुवैद्यकीय महाविद्यालय, पशुवैद्यकीय पशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ हेब्बल बेंगळुरू, कर्नाटक नुकत्याच पार पडलेल्या अधिवेशनात पशू विज्ञान केंद्राचे उपसंचालक डॉ.राघवेंद्र भट्ट, डॉ. बी.पी.मिस्त्रा, (हरियाणा), यांच्या हस्ते डॉ. दिपक काळे यांना प्रमाण पत्र, स्मृती चिन्ह देऊन राष्ट्रीय परिसंवाद परिषद, बेंगळुरू येथे गौरविण्यात आले. डॉ.दिपक काळे हे केमवाडी येथील प्रतिष्ठित नागरिक कै. सुखदेव काळे यांचे धाकटे चिरंजीव आहेत. या पुरस्काराबद्दल डॉ. दिपक काळे यांचे पशुवैद्यकीय आणि प्राणी विज्ञान क्षेत्रात तथा तालुक्यातील सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
तुळजापूर मंदिर परिसरात बाल कामगारांवर संयुक्त कारवाई, तीन बालकामगारांची सुटका
तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर मंदिर परिसरामध्ये बाल कामगार कार्यरत असल्याची तक्रार चाईल्ड हेल्पलाईन धाराशिव येथे प्राप्त झाली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने चाईल्ड हेल्पलाईन धाराशिव, पोलिस स्टेशन तुळजापूर आणि युवा ग्राम विकास मंडळ यांच्या संयुक्त पथकाने त्वरित कारवाई करत बालकामगारांच्या मुक्ततेसाठी धडाकेबाज मोहीम राबवली. सदर कारवाईत तीन बालकामगारांची सुटका करण्यात आली. हे बालकामगार तुळजापूर मंदिर परिसरात काम करीत असल्याचे निदर्शनास आले. बालकामगार कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मुक्त केलेल्या बालकामगारांना तातडीने बालकल्याण समिती, धाराशिव यांच्यासमोर हजर करण्यात आले. समितीच्या आदेशानुसार त्यांना पुढील काळजीसाठी बाल निरीक्षण गृहात ठेवण्यात आले आहे. बालकामगार मुक्ततेसाठी आणि त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी चाईल्ड हेल्पलाईन, पोलिस प्रशासन आणि सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन केलेली ही कारवाई स्तुत्य असून, भविष्यातही अशा स्वरूपाच्या मोहिमा राबवण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. चाईल्ड हेल्पलाईनचा संपर्क क्रमांक बाल हक्कांचे उल्लंघन होत असल्यास किंवा बालकामगार आढळल्यास नागरिकांनी त्वरित चाईल्ड हेल्पलाईनवर संपर्क करावा - संतोष रेपे - युवा ग्राम
धाराशिव(प्रतिनिधी)-तुळजापूर येथे दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) सुरू झाल्यामुळे पक्षकारांना भूसंपादन व कौटुंबिक न्यायालयीन प्रकरणांसाठी धाराशिव जिल्हा न्यायालयात जाण्याची गरज राहिलेली नाही.या नव्या न्यायालयामुळे स्थानिक व तालुक्यातील नागरिकांना मोठी सुविधा उपलब्ध झाली आहे,असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अरुण पेडणेकर यांनी केले. १६ फेब्रुवारी रोजी तुळजापूर येथील दिवाणी न्यायालय परिसरात या वरिष्ठ स्तर न्यायालयाचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी न्यायमूर्ती अरुण पेडणेकर प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री.राजेश गुप्ता होते. तसेच,तुळजापूरचे दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) श्रीमती स्वाती अवसेकर आणि तुळजापूर विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय घोडके प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलताना न्यायमूर्ती पेडणेकर म्हणाले की,या न्यायालयात भूसंपादन प्रकरणे हाताळली जाणार असून,प्रसंग व पुरावे महत्त्वाचे असतील.त्यामुळे विधिज्ञांना अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडावी लागणार आहे.तसेच, कौटुंबिक न्यायालयीन प्रकरणांची जबाबदारीदेखील मोठी आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी विधिज्ञांना विशेष प्रयत्न करावे लागतील.गेल्या २० वर्षांपासून या वरिष्ठ स्तर न्यायालयाच्या स्थापनेसाठी पाठपुरावा करण्यात आला होता,असेही त्यांनी नमूद केले. अध्यक्षस्थानावरून बोलताना न्यायमूर्ती गुप्ता यांनी सांगितले की, मागील २० वर्षांपासून वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाची मागणी होती आणि ती आता पूर्ण झाली आहे. पालक न्यायमूर्ती अरुण पेडणेकर यांच्या मार्गदर्शनामुळेच हे न्यायालय सुरू होऊ शकले.तुळजापूर विधीज्ञ मंडळानेही वेळोवेळी यासाठी पुढाकार घेतला,असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाची सुरुवात आई तुळजाभवानी देवी आणि भारतीय संविधानाच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने झाली.त्यानंतर न्या. अरुण पेडणेकर यांच्या हस्ते फीत कापून न्यायालयाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमास जिल्ह्यातील आठही तालुका विधीज्ञ मंडळ,शासकीय अभियोक्ता,न्यायालय लघुलेखन संघटना,न्यायालयीन कर्मचारी पतसंस्था तसेच विधीज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तुळजापूर विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय घोडके यांनी केले.संजय मैदर्गी यांनी सूत्रसंचालन केले,तर न्यायमूर्ती मिलिंद निकम यांनी उपस्थितांचे आभार मानले.कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला.
Mahakumbh 2025 –महाकुंभमध्ये पुन्हा अग्नीतांडव, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही
महाकुंभमधील आगीचे सत्र थांबण्याचे नावच घेत नाही. सोमवारी पुन्हा एकदा महाकुंभ परिसरात सेक्टर 8 मध्ये आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्नीशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर विझवण्यास सुरुवात केली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. कल्पवासींनी रिकामे केलेल्या तंबूंमध्ये ही आग लागली. आग वेगाने पसरत होती. मात्र अग्नीशमन दलाने परिसराला घेराव घातला आणि शर्थीचे […]
अतिक्रमण हटविण्यासाठी तहसिलदार यांच्या दालनात आत्मदहनाचा प्रयत्न
तुळजापूर (प्रतिनिधी) - तालुक्यातील अणदुर येथील सर्वे नंबर 155 मधील मेनरोड वरील अतिक्रमण काढण्याचा मागणीसाठी बाळकृष्ण पाटील यांनी सोमवार दि. 17 फेब्रुवारी रोजी तहसीलदार यांच्या दालनात आत्मदहनाचा प्रयत्न केला. या बाबतीत अधिक माहीती अशी कि,, मौजे अणदुर येथील सर्वे नंबर 155 गायराण मुख्य रस्त्यालगत अतिक्रमण झाले असून, रस्ता अरूंद झाला आहे. अणदूर बसस्थानकापासून मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूस सर्वे नंबर 155 गायराणची जमिन असून काही दुकानदार यांनी दुकानाकरीता अतिक्रमण केले आहे. अतिक्रमण केलेल्या ठिकाणी नॅशनल हायवेपासून खंडोबा मंदिर, खुदावाडी, गुजनूर, शहापूर व अक्कलकोट हा मुख्य रस्ता आहे. सध्या या मुख्य रस्त्याच्या ठिकाणी तिर्थक्षेत्र पर्यटन विकास अंतर्गत कोट्यावधी रुपयाचे काम हाती घेण्यात आले आहे. परंतू त्याच ठिकाणाहून नविन पाणी पुरवठा योजनेचे काम पण सुरु असून, सध्या पाणी पुरवठ्याचे काम बंद ठेऊन रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. रस्ता झाल्यानंतर परत रस्त्याचे खोदकाम करून पाणी पुरवठ्याचे काम घेतल्यानंतर कोट्यावधी रुपयाचा निधी वाया जाणार असले बाबतचे अनुषंगाने तक्रार दाखल केली होती. त्याची दखल न घेतल्याने सोमवारी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.
धाराशिव (प्रतिनिधी)- अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने गुरुवारी मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष यांची भेट घेतली व निवेदनाद्वारे 2005 पूर्वी जाहिरात निघालेल्या पण 2005 नंतर नेमणूक झालेल्या कर्मचाऱ्यांना शासन निर्णयाप्रमाणे जुनी पेन्शन लागू करावी. अशी मागणी केली. जिल्ह्यातील व पर जिल्ह्यातून बदलून धाराशिव जिल्ह्यात बदली करून आलेल्या कर्मचाऱ्यांचे प्रस्ताव गेल्या दोन महिन्यापासून शिक्षण विभागात पडून असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या निदर्शनास शिष्टमंडळाने आणून दिले. लागलीच तात्काळ उद्याच या संदर्भात बैठक लावून माझ्या अधीकारातील प्रकरणाची छाननी करून फेब्रुवारी 2025 अखेर सर्व पात्र शिक्षक व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनचे आदेश निर्गमित करतो. असे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष यांनी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण संघाच्या शिष्ट मंडळास दिले. तसेच छाननी करून राहिलेल्या सर्व पात्र कर्मचाऱ्यांचे प्रस्ताव शासनाकडे मार्गदर्शनासाठी पाठवून शासनाचे मार्गदर्शन आल्यावर उर्वरित सर्व पात्र कर्मच्याऱ्यांना जुनि पेन्शनचा लाभ देणार असे सांगितले. यावेळी पात्र कर्मचाऱ्यांना निवडश्रेणी श्रेणी, व वैद्यकीय प्रतिपूर्तीचे सर्व देयक मार्च पूर्वी काढणार असेही सांगितले. शिष्टमंडळात शिक्षक नेते बशीर तांबोळी, कळंब तालुकाध्यक्ष महेंद्र रणदिवे, धाराशिव तालुकाध्यक्ष नागनाथ मुडबे, जुनी पेन्शन अध्यक्ष सचिन भांडे,सचिन मते, उपाध्यक्ष शिवाजी साखरे, पी. बी. बनसोडे, सतीश जाधवर, बी. बी.अकोसकर, चांदणे, प्रशांत कोळी यांच्यासह असंख्य पदाधिकारी उपस्थित होते.
भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची गुप्त भेट घेतल्याने खळबळ उडाली. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मध्यस्थीने धस आणि मुंडे भेट झाली. या भेटीला बावनकुळेंसह धस यांनीही दुजोरा दिला. त्यामुळे धस यांच्यावर टीका होऊ लागली, तसेच दोघांमध्ये समेट तर झाला नाही ना, असा संशयही व्यक्त होऊ लागला. यावार आता मुख्यमंत्री […]
वैद्यकीय महाविद्यालयाचे नूतन अधिष्ठाता डॉ. चौहान यांचा सत्कार
धाराशिव (प्रतिनिधी)- येथील वैद्यकीय महाविद्यालयाचे नुतन अधिष्ठाता डॉ. शैलेन्द्रसिंह चौहान यांचा धाराशिव महाराणा प्रतीष्ठीतच्या वतीने गुरुवारी त्यांच्या कार्यालयात सत्कार करण्यात आला. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेशसिंह परदेशी, उपाध्यक्ष गोविंदसिंह राजपूत, सचीव कृपालसिंह ठाकूर, शिवरतनसिंह तोवर, किशोरसिंह तिवारी, उमरग्याचे रणजितसिंह ठाकूर, अमरसिंह चौहान, देवीसिंह राजपूत अतुल सिंह बायसआदी उपस्थित होते.
३५ लाख घेतले, उपाशी ठेवले, २२० दिवस १० देशांचा प्रवास...,अमेरिकेहून परतलेल्या तरुणाची कहाणी
हरयाणाच्या रवीने अमेरिकेपर्यंत केलेल्या प्रवास हा एखाद्या शिक्षेसारखाच होता. अमेरिकेत जाऊन काम करुन पैसे कमवण्याच्या विचाराने त्याने तब्बल ३५ लाख रुपये खर्च केले. मात्र त्याची फसवणूक झाली.
महिला पोलीस नाईक लोखंडे डॉ. एपीजे अब्दुल कलाम राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित
धाराशिव (प्रतिनिधी) - दिल्ली येथील बाबू जगजीवन राम कला संस्कृती तथा साहित्य अकॅदमीच्यावतीने देण्यात येणाऱ्या डॉ ए.पी.जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय पुरस्काराने धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण महिला पोलीस नाईक मुक्ता प्रकाश लोखंडे यांना माजी खासदार सुनील गायकवाड यांच्या हस्ते देऊन दि.16 फेब्रुवारी रोजी सन्मानित करण्यात आले. गोवा येथील पाटृ बस स्थानका जवळील आर्ट आणि कला विभाग संस्कृती भवन पंजिम येथे हा पुरस्कार सोहळा पार पडला. लातूरचे माजी खासदार सुनील गायकवाड यांच्या हस्ते लोखंडे यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी गोव्याचे माजी मुख्यमंत्री चंद्रकांत कवलेकर, सिने अभिनेते झाकीर खान, नागपूर विद्यापीठाचे माजी उप कुलगुरू डॉ एस एन पठाण, अकॅदमीचे अध्यक्ष डॉ. एन.एस. खोबा, डॉ. संदीप खोचर, प्रदेशाध्यक्ष प्रथमेश अबनवे, प्रा.डॉ. बी.एन. खरात, प्रा गोरख साठे, पपेतल्ला रविकांत, महेंद्र सिंग, धनंजय डांगळे आदींसह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पुरस्कार मिळाल्याबद्दल लोखंडे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे.
मी रमाई बोलते फेम शिवमती आशाताई मोरजकर यांचा सहृदयी सन्मान
परंडा (प्रतिनिधी) - येथील ग्लोबल एज्युकेशनल इन्स्टिट्यूटच्या सचिव तथा जिजाऊ ब्रिगेडच्या महाराष्ट्र प्रदेश सहसचिव शिवमती आशाताई मोरजकर यांनी मी रमाई बोलते या एकपात्री अभिनयात उत्कृष्ट भूमिका बजावली त्यामुळे त्यांचा ज्येष्ठ साहित्यिक गडंगणकार तु. दा.गंगावणे यांच्या संपर्क कार्यालयामध्ये फुले शाहू आंबेडकर विद्वत सभेचे महाराष्ट्र राज्याचे समन्वयक प्रा.डॉ.शहाजी चंदनशिवे वंचित बहुजन आघाडीचे धाराशिव जिल्हा महासचिव धनंजय सोनटक्के व मराठा सेवा संघाचे परंडा तालुका अध्यक्ष गोरख मोरजकर यांच्या उपस्थितीमध्ये साडी चोळी देऊन यथार्थ सन्मान करण्यात आला. शिवमती आशाताई मोरजकर या फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित होऊन समाजामध्ये समाज जागृतीचे उल्लेखनीय काम करतात.त्यांनी परंडा तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यातच नव्हे तर मराठवाड्यामध्ये माता रमाई राष्ट्रमाता जिजाऊ माता सावित्रीअहिल्यादेवी होळकर यांचे विचार आत्मसात करून ते विचार घेऊन समाजामध्ये प्रबोधनाचे बहुमूल्य असे योगदान देत आहेत.ज्या महापुरुषांनी आपल्या योगदानाने हा महाराष्ट्र घडविला त्यांच्या विचाराने व त्यांच्या प्रेरणेने त्यां संस्थेच्या अंतर्गत व जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून समाजप्रबोधन परिवर्तनाचे काम गेल्या अनेक वर्षापासून करत आहेत . त्यामुळे नुकत्याच पार पडलेल्या दि. 7 फेब्रुवारी रोजी रमाई जयंती निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात मी रमाई बोलते या एकपात्री नाटकाचे सादरीकरण एकाच वेळी दोन ठिकाणी करून विद्यार्थ्यांना व समाजातील घटकांना रमाई या बाबासाहेबांच्या पत्नी यांच्या कार्याबद्दलचा व त्यांच्या त्यागाबद्दलचा हुबेहूब अभिनय करून माता रमाई चे बाबासाहेबांच्या जीवनातील कार्य दाखवून दिले.
व्हाईस ऑफ मीडिया धाराशिव तालुकाध्यक्षपदी रामेश्वर उर्फ कुंदन शिंदे यांची निवड
धाराशिव (प्रतिनिधी)- पत्रकारांच्या हक्कांसाठी लढणारी आंतरराष्ट्रीय स्तरावरील एकमेव संघटना व्हाईस ऑफ मीडियाच्या धाराशिव तालुका कार्यकारिणीची नुकतीच घोषणा करण्यात आली. तालुकाध्यक्षपदी रामेश्वर उर्फ कुंदन शिंदे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली, तर उपाध्यक्षपदी अभिषेक ओव्हाळ यांची निवड झाली आहे. धाराशिव जिल्हाध्यक्ष हुंकार बनसोडे, जिल्हा सरचिटणीस आकाश नरोटे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य किशोर माळी, जिल्हा संघटक काकासाहेब कांबळे आणि साप्ताहिक विंगचे अध्यक्ष पांडुरंग मते उपाध्यक्ष जफर शेख यांच्या उपस्थितीत कार्यकारिणीची अधिकृत घोषणा करण्यात आली. नवीन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे- कार्याध्यक्ष अल्ताफ शेख, सरचिटणीस प्रशांत सोनटक्के, सहसरचिटणीस मुस्तफा पठाण, कोषाध्यक्ष कलीम शेख, कार्यवाहक सचिन वाघमारे, प्रसिद्धी प्रमुख राहुल कोरे, संघटक आप्पासाहेब सिरसाठे यांची निवड करण्यात आली. यावेळी सदस्य किरण कांबळे, प्रशांत मते, रोहित लष्कारे, सचिन देशमुख, प्रशांत गुंडाळे, सुमेध वाघमारे, अली शेख, रमाकांत हजगुडे उपस्थित होते. या निवडीमुळे धाराशिव तालुक्यातील पत्रकारांना संघटनेच्या माध्यमातून हक्कांसाठी लढण्यास अधिक बळ मिळणार आहे.
सुजितसिंह ठाकूर यांच्याकडून बारसकर कुटूंबियांचे सांत्वन
परंडा (प्रतिनिधी) -भाजपा दिव्यांग आघाडीचे परंडा तालुकाध्यक्ष, आंदोरा-आंदोरी ग्रामपंचायतीचे उपसरपंच व कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक महादेव बारसकर यांचे नुकतेच हृदयविकाराच्या धक्क्याने दु:खद निधन झाले. भाजपा नेते माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी आंदोरी येथे बारसकर कुटुंबियांची सांतवनपर भेट घेतली. यावेळी भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष व भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड.जहीर चौधरी,भाजपा ओबीसी मोर्चा धाराशिव जिल्हा मा. उपाध्यक्ष साहेबराव पाडुळे, आंदोरा-आंदोरी चे मा. सरपंच व भाजपा तालुका कार्यकारिणी सदस्य श्रीकृष्ण शिंदे,समरजीतसिंह ठाकूर आदी उपस्थित होते.
अहमदिया मुस्लिम जमाअततर्फे रुग्णांसाठी सेवा उपक्रम
धाराशिव (प्रतिनिधी)- अहमदिया मुस्लिम जमाअत उस्मानाबादच्या युवा प्रतिष्ठान संस्था मजलिस खुद्दाम-उल-अहमदिया अंतर्गत खिदमत-ए-खल्क विभागाने 16 फेब्रुवारी 2025 रोजी मासिक सामाजिक सेवा उपक्रम राबवला. या उपक्रमांतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील 100 हून अधिक रुग्णांना, विशेषतः पुरुष, महिला सर्जरी आणि इतर वॉर्डांतील रुग्णांना, फळांचे पॅकेट वितरित करण्यात आले. अहमदिया मुस्लिम जमाअत इस्लामच्या मानवसेवेच्या शिकवणींना अनुसरून समाजोपयोगी कार्य करत असून, गरजूंसाठी नियमित उपक्रम राबवत आहे. रक्तदान, अन्नदान, तसेच थंडीच्या काळात गरजूंना गरम कपडे देण्यासारख्या सेवा वर्षभर चालू असतात. या उपक्रमातही जमाअतच्या सदस्यांनी निःस्वार्थ वृत्तीने सहभाग घेतला. या महिन्याच्या उपक्रमांतर्गत मजलिस खुद्दाम-उल-अहमदिया सदस्यांनी काळजीपूर्वक तयार केलेल्या फळांच्या पाकिटांचे वितरण केले. यामागील उद्दिष्ट रुग्णांच्या आरोग्य सुधारणा आणि पुनर्वसन प्रक्रियेत हातभार लावणे हे होते.रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांनी या सेवाभावी उपक्रमाचे मनःपूर्वक कौतुक केले. या सेवाभावी उपक्रमाच्या वेळी अहमदिया मुस्लिम जमाअतचे शहर उपाध्यक्ष अब्दुस समद, खुद्दाम-उल-अहमदिया शहराध्यक्ष राग़ेब अलीम, तालुकास्तरीय बाल संरक्षण समिती तथा इथिकल कमिटी सदस्य गणेश रानबा वाघमारे , सचिन चौधरी सहसचिव मतदार जनजागरण समिती धाराशिव, चिटणीस मानव सेवा सजील अहमद, डॉ. रमेश सर, सिस्टर शीतल, सालाहुद्दीन शेख,अब्दुल अलीम, अब्दुल नईम, नदीम अहमद, मुताहिर अहमद,आदिल अहमद, शफीक अहमद, मंजूम अहमद आणि इतर डॉक्टर व रुग्णालयातील कर्मचारी सदस्य उपस्थित होते. अहमदिया मुस्लिम जमाअत देशसेवा आणि मानवतेची सेवा अविरतपणे करत आहे आणि पुढेही करत राहील.
स्टिअरिंगमध्ये बिघाड, अनियंत्रित स्कूलबस कालव्यात पडली, आठ विद्यार्थी जखमी
स्टिअरिंगमध्ये बिघाड झाल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने स्कूलबस कालव्यात कोसळली. या अपघातात बसमधील आठ विद्यार्थी जखमी झाले आहेत. बसचालक आणि महिला अटेंडंटही जखम झाले. हरियाणातील कैथल जिल्ह्यात ही घटना घडली. खासगी शाळेची बस सोमवारी सकाळी मुलांना शाळेत घेऊन जात होती. यावेळी बसच्या स्टिअरिंगमध्ये बिघाड झाल्याने बस अनियंत्रित झाल्याने बस कालव्यात पडली. स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव […]
वडिलांच्या मॅडमनं त्यांचा गैरवापर केला! जवानानं आयुष्य संपवलं, वाचलेल्या लेकीचा गंभीर आरोप
उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये शीघ्र कृती दलाच्या (आरएएफ) एका जवानानं त्याच्या कुटुंबासह आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. आरएएफचे जवान केशपाल सिंह यांचा मृत्यू झाला असून त्यांची पत्नी प्रियंका देवींची प्रकृती गंभीर आहे.
तिर्थक्षेत्र तुळजापूर वाहनतळ कर मुक्त करा
तुळजापूर (प्रतिनिधी)- तिर्थक्षेञ तुळजापूर शहरात येणाऱ्या भक्तांच्या वाहनावरील वाहनतळ कर रद्द करावा व खाजगी कंपनीला ठेका न देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्री यांना निवेदन देवुन केली आहे. तिर्थक्षेञ तुळजापूरात तुळजाभवानीच्या दर्शनार्थ खाजगी वाहनांनी मोठ्या संखेने भाविक येतात. वाहनतळ ठेका पार्किंग ठेकेदार (भवानीशंकर) यांचा करार संपल्यामुळे नगर परिषद तुळजापूर सध्या पार्किंग पावत्या फाडत आहेत. वाहनतळ ठेका नावाखाली तुळजापूरमध्ये येणाऱ्या भक्तांची अतोनात लुट केली जात आहे. यामुळे तुळजापूर तिर्थक्षेत्र हे बदनाम होत चाललेले आहे. तुळजापूर शहरात वाहन घेऊन येणाऱ्या भक्तांना तुळजापूर शहर हे भक्तांसाठी वाहनतळ कर पार्किंग मुक्त करण्यात यावे अशी मागणी केली आहे. सध्या नगर परिषद तुळजापूर येणाऱ्या भक्तांची वाहन पार्किंग पावत्या फाडत असून, भररस्त्यात, भरचौकात भक्तांच्या गाडया आडवून पार्किंग पावत्या फाडवु नये व अरेरावीचे भाषा वापरु नये, याची गाभिर्यपुर्वक दक्षता घेण्यात यावी. तरी येणाऱ्या भक्तांसाठी वाहनकर मुक्त करण्यात यावे.
सांजा येथे शालेय साहित्यांसह दिव्यांगांना कृत्रिम अवयवांचे वाटप
धाराशिव (प्रतिक्रिया) - तालुक्यातील सांजा येथे नमा आशाकिरण सेवाभावी संस्था, ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम अवयव, साहित्य तर शालेय विद्यार्थ्यांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे यासाठी जलशुद्धीकरण यंत्र (आरो प्लांट), शालेय साहित्य व क्रीडा साहित्य आदींचे वाटप करण्यात आले. यामध्ये एक लाख किंमतीचे तासी 250 लिटर क्षमतेचे जलशुद्धीकरण यंत्र, शाळेतील विद्यार्थ्यांना 35 हजार रुपयांचे क्रीडा साहित्य तर बाल वाचनालयासाठी 500 अवांतर वाचनाची पुस्तके देण्यात आली. या कार्यक्रमास नमा आशाकिरण संस्थेचे अध्यक्ष सिद्धार्थ बांगर, कॅशियर मल्लप्पा, सदस्य, हरिदास माने, जि प उप अभियंता काळे, वैद्यकीय अधिकारी तेरकर, ग्रामसेवक एकनाथ माने, जि प अभियंता आवड, शिक्षक पडवळ, पाटील आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. या कार्यक्रमास उपसरपंच सतीश सुर्यवंशी, सदस्य राजदीप गायकवाड, राकेश कचरे, प्रवीण जकाते, हरी इंगळे, अमर शिंदे आदींसह शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन उंबरे यांनी तर उपस्थितांचे आभार मारुती कदम यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी रणजीत कदम, राकेश सुर्यवंशी यांनी प्रयत्न केले. या कार्यक्रमास उपसरपंच सतीश सुर्यवंशी, सदस्य राजदीप गायकवाड, राकेश कचरे, प्रवीण जकाते, हरी इंगळे, अमर शिंदे आदींसह शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आलियाबाद येथे सेवालाल जयंती साजरी
तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील आलियाबाद येथे संत सेवालाल महाराज यांची 286 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सर्व प्रथम ग्रामपंचायत, सार्वजनिक वाचनालय, येथे मान्यवरांच्या हस्ते संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले . त्यानंतर सेवालाल मंदिरात पूजन करून भोग लावण्यात आले. यावेळी माजी सभापती तथा जिल्हा परिषदेचे सदस्य प्रकाश चव्हाण, माजी नायब तहसीलदार माणिकराव चव्हाण, सरपंच सुर्यकांत चव्हाण उपसरपंच अमृता चव्हाण, सुभाष नाईक, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष विनायक चव्हाण शिवाजी पोलीस पाटील, पांडुरंग चव्हाण नेमिनाथ चव्हाण, महादेव राठोड,सिताराम राठोड, यशवंत राठोड,मोतीराम राठोड, रतन चव्हाण, शिवाजी चव्हाण,रेवाप्पा राठोड, देविदास चव्हाण, सुभाष चव्हाण,बाबु राठोड, अरुण चव्हाण, सुनील चव्हाण,हरीदास राठोड,राजु चव्हाण,रेखू राठोड, शंकर चव्हाण, संदीप राठोड, सुनील राठोड, विनायक चव्हाण,बाळू राठोड,ग्रामसेवक अविनाश खुंटेगावे आदि उपस्थित होते.
नरहरी महाराज जयंती निमित्त भजन कार्यक्रम
तुळजापूर (प्रतिनिधी) - येथील गुळवणी महाराजांच्या मठामध्ये संत नरहरी महाराज यांच्या जयंती निमित्त यांचा भजनाचा कार्यक्रम नंतर हभप पांडुरंग रेड्डी महाराज यांच्या प्रवचन संपन्न झाले. नंतर दुपारी बारा वाजता गुलाल पुलांची उधळण करून संत नरहरी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. या वेळेस जनसेवक अमोल कुतवळ, सुधीर महामुनी, आनंद काशेगावकर, महेश पोतदार, उमाकांत महामुनी, सुनील काशेगावकर, संतोष महामुनी, सुवर्ण दीक्षित,भारत धर्माधिकारी, राहुल पोतदार व समस्त राष्ट्रीय सोनार समाज तुळजापूर उपस्थित होते.
संगीताच्या सुमधुर आठवणींना उजाळा देणारा प्राईडचा ‘रेट्रो'स्नेहसंमेलन संपन्न
भूम (प्रतिनिधी)- जुन्या सुवर्णकाळातील गाण्यांना नव्याने साज चढवणारा आणि संगीतप्रेमींना नॉस्टॅल्जियाचा आनंद देणारा प्राईड इंग्लिश स्कूलचा ‘रेट्रो'वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे उदघाटन उद्योजक गोरख भोरे व सह्याद्री ब्लड बँकेचे शशिकांत करंजकर यांच्या हस्ते व अमर सुपेकर फैजान काझी यांच्या उपस्थितत दीप प्रज्वलन करून झाली.या कार्यक्रमात 1960 ते 1990 च्या दशकातील अजरामर हिंदी आणि मराठी गाण्यांवर प्राईडच्या बाल कलाकारांनी सुरेल सादरीकरण केले. लावणी, शेतकरी गीत, देशभक्ती गीत यांच्या सह विविध गाण्यावर मुले थिरकली. कार्यक्रमाची सुरुवात काळजाला भिडणाऱ्या मोहक गाण्यांनी झाली. त्यानंतर श्रोत्यांना स्वप्नील दुनियेत घेऊन जाणाऱ्या विविध युगांतील सदाबहार गाण्यांची लयलूट करण्यात आली. यामध्ये किशोर कुमार, लता मंगेशकर, मोहम्मद रफी, आशा भोसले, साधना सरगम, यांची अजरामर गाणी रसिकांच्या ह्रदयावर अधिराज्य गाजवू लागली. यावेळी, रंगीत प्रकाशयोजना आणि पारंपरिक वेशभूषेने रेट्रो थीमला अधिक मोहक स्वरूप प्राप्त झाले. प्रेक्षकांनी गाण्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, टाळ्यांचा कडकडाट आणि गाण्यांच्या तालावर ताल धरत कार्यक्रम अधिक रंगतदार झाला. हा अनोखा रेट्रो संगीत सोहळा उपस्थितांच्या मनात कायमचा कोरला गेला. सूत्रसंचालन अलीम सर यांनी केले तर आभार भाग्यश्री डांगे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेघा सुपेकर, दिपीका टकले, माधुरी गरड, आशा म्हेत्रे, अरुणा बोत्रे यांच्यासह स्वप्नील सुपेकर, अक्षय बाराते, अमित सुपेकर, सरफराज मोगल आदींनी परिश्रम घेतले.
रायझिंग स्टार इंग्लिश मिडीयम स्कूलचे 7 वे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
भूम (प्रतिनिधी)- जय हनुमान समाज विकास संस्था, पुणे यांच्या रायझिंग स्टार इंग्लिश मिडीयम स्कूलचे 7 वे वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात पार पडला. स्नेहसंमेलनाचे दीप प्रज्वलन ,सरस्वती पूजन करण्यात आले. बालकलाकारांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी असे कार्यक्रम आयोजित केले पाहिजे असे मान्यवरांनी सुचवले. श्री गणेशा गाण्याने कार्यक्रमास सुरवात झाली. यावेळी विध्यार्थीनी हिंदी मराठी चित्रपटात व लोकगीतावर अति सुदंर असे नृत्य सादर केले.तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मापासून ते राज्याभिषेकापर्यंत चा प्रवास नाटकांमधून बालपणाकरांनी दाखवून दिला. शेतकरी गीत ,फनी डान्स ,लेझी डान्स अशा वेगवेगळ्या नृत्यानी प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. विद्यार्थ्यांना नृत्याचे धडे शाळेतील सर्व शिक्षकांनी दिले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुनम नरुटे यांनी केले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षकवृंदानी अतिशय परिश्रम घेतले.यावेळी प्राशसकीय अधिकारी हरिष धायगुडे प्राचार्य शीतल बावकर, भाग्य जैन हे उपस्थित होते.
Mumbai Crime : आठ विधवा महिला टार्गेट, मुंबईतील एकीशी लग्न, पंधराव्या दिवशी घरात घडला भयंकर प्रकार
Mumbai Crime : मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक व्यक्ती जो फक्त विधवा महिलांना टार्गेट करायचा. पोलिसांनाही तो चकवा देत होता, मुंबईतील एक महिलेला त्याने आपल्या जाळ्यात अडकवलं. लग्नाच्या पंधराव्या दिवशी घरात भयंकर प्रकार घडला.
अजितदादा म्हणाले अर्ध कच्चं चिकन खाल्ल्यास GBS चा धोका, पोल्ट्री मालकांचा धंदा बुडाला, खरं काय?
Pune GBS Poultry Business : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या GBS आजारावरील वक्तव्यानंतर चिकन विक्रीत घट झाल्याचं समोर आलं असून पोल्ट्री व्यावसायिकांचं मोठं नुकसान झालं आहे. आता शासकीय परिपत्रक काढण्याची मागणी होत आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली खंत, म्हणाल्या, माझी सुरेश धस यांच्याकडून मोठी अपेक्षा होती
संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सातत्याने गंभीर आरोप केली जात आहेत. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणीही केली जात आहेत. त्यामध्येच आता खासदार सुप्रिया सुळे या मस्साजोगला भेट देणार आहेत. सुरेश धस यांच्याबद्दल भाष्य करताना सुप्रिया सुळे या दिसल्या आहेत.
Video –कृषी घोटाळा प्रकरण, धनंजय मुंडेंवर आरोप; अंजली दमानियांची ऑर्डर कुणी रोखली?
दर वाढवूनही एसटी तोट्यात, 350 कोटी रुपयांची देणी बाकी
राज्य सरकारने एसटीच्या दरात वाढ केली होती. त्यानंतरही एसटीची आर्थिक स्थिती बिकटच आहे. एसटीकडे 350 कोटी रुपयांची देणी थकली असून कर्मचाऱ्यांचे PF ची रक्कम कापूनही ती भरलेली नाही. एबीपी माझाने याबाबत वृत्त दिले आहे. महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर राज्य सरकारने एसटीच्या दरात 14 टक्क्यांनी वाढ केली होती. ही वाढ केल्यानंतरही एसटीची आर्थिक स्थिती सुधारलेली नाही. […]
नवऱ्याच्या डोक्यावर संशयाचं भूत, एक दिवस मित्रांना बोलवत... ज्याची भीती तेच घडलं
Jharkhand Crime News : आरोपी वरुण मंडल याला, त्याच्या पत्नीचे दुसऱ्या एका पुरूषाशी अवैध संबंध आहेत. आणि ती त्याच्या अनुपस्थितीत प्रियकराशी शारीरिक संबंध ठेवते असा संशय होता. यानंतर वरुणने आपल्या पत्नीच्या हत्येचा कट रचला. त्याने त्याचे दोन सहकारी टुनटुन तांती आणि भूदेव दास यांना पत्नीच्या हत्येकरिता १०,००० रुपयांची 'सुपारी' दिली.
Fact Check: दिल्ली-एनसीआरमधील भयानक भूकंप सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद? व्हायरल VIDEO चं धक्कादायक सत्य
Delhi-NCR Earthquake CCTV Video: दिल्ली-एनसीआरमध्ये सोमवारी सकाळी ४ तीव्रतेचा भूकंप झाला. ज्याचा केंद्रबिंदू धौला कुआनजवळ होता. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या सीसीटीव्ही व्हिडिओवरून गोंधळ पसरला आहे की तो दिल्लीचा आहे. पण, प्रत्यक्षात हा व्हिडिओ इस्लामाबादमधील १५ फेब्रुवारीच्या भूकंपाचा आहे.
मुंडे-धस भेटीवर चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर भडकले धनंजय देशमुख, म्हणाले, एवढी तत्परता...
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यात खळबळ माजली आहे. देशमुख हत्या प्रकरणी आमदार सुरेश धस यांनी गंभीर आरोप केले असून, दुसरीकडे धनंजय मुंडे यांच्यासोबत त्यांची भेट झाल्याने टीका होत आहे. धनंजय देशमुख यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही संताप व्यक्त केला आहे.
Ram Mandir: भाविकांनी फुलली अयोध्या, मंदिरात दानाचा नवीन विक्रम; एकूण आकडा नेमका किती?
Ayodhya Ram Mandir Annual Donation: अयोध्येतील राम मंदिर आता वार्षिक उत्पन्नाच्या बाबतीत देशातील तिसरे मंदिर बनले आहे म्हणजे, आता देशात फक्त दोनच मंदिरे आहेत जी अयोध्येच्या पुढे आहेत. अयोध्येतील राम मंदिरात वर्षानुवर्षे प्रतीक्षेनंतर बांधण्यात आलेल्या भक्तांचा ओघ किंवा दान कमी होत नाही. भक्तांनी रामलल्लाला दोन्ही हात आणि मन भरून दान दिले आहे.
धक्कादायक! दिवस-रात्र एक करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचे पीएफचे पैसे रखडले, महामंडळाचा भोंगळ कारभार समोर
राज्यातील एसटी कर्माचाऱ्यांना गेल्या चार महिन्यांपासून पगार मिळाला. पण त्यांना पीएफचे पैसे मिळालेले नाहीत. कर्मचाऱ्यांचे पीएफचे पैसे न जमा झाल्याने त्यांना ते पैसे काढत देखील येत नाहीय. त्यामुळे एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांचे पीएफचे पैसे कधी देणार? असा प्रश्न आता कर्मचाऱ्यांना सतावत आहे.
महावितरणने खोदलेला खड्डा बुजवला नाही, त्यात पाणी साचलेलं; पाच वर्षाच्या चिमुकलीचा पडून दुर्दैवी अंत
Palghar News : पालघरमध्ये ५ वर्षांच्या चिमुकलीचा महावितरणने खोदलेल्या खड्ड्यात मृत्यू झाला आहे. या घटनेने नागरिकांमधून संताप व्यक्त होत असून ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.
सरकारी अभियंता कुबेर निघाला; ६ ठिकाणांवर छापे; १७ भूखंड, १८ बँक खाती सापडली; एका टिपमुळे गेम
सार्वजनिक बांधकाम विभागाचा अभियंता कुबेर निघाला आहे. दीपक कुमार मित्तलच्या घरावर भ्रष्टाचारविरोधी पथकानं छापा टाकला. तेव्हा त्याच्याकडे उत्पन्नाच्या २०५ टक्के अधिक संपत्ती सापडली.
नीरेच्या बाजार समितीत कांद्याला 3 हजार 260 रुपये दर, 121 क्विंटल कांद्याची आवक
संपूर्ण पुरंदर व बारामती तालुक्यांतील 32 गावांचे कार्यक्षेत्र असलेल्या नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी (15 रोजी) दुपारी एक वाजता झालेल्या लिलावामध्ये कांद्याला तीन हजार 260 रुपये प्रतिक्विंटलला विक्रमी दर मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. दरम्यान, नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीत 121 क्विंटल कांद्याची आवक झाली. नीरा येथील बाजार समितीमधील कांदा बाजार पश्चिम […]
धक्कादायक! रुग्णाच्या डोळ्यातून काढला जिवंत किडा, एम्सच्या डॉक्टरांनी केली यशस्वी शस्त्रक्रिया
भोपाळमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 35 वर्षीय तरुणाच्या डोळ्यातून चक्क जिवंत किडा बाहेर काढला आहे. एम्स रुग्णालयात तरुणावर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. तरुणाची प्रकृती आता स्थिर असून, त्याची दृष्टी आता सुधारत आहे. मात्र पुढील काही दिवस त्याला डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. सदर तरुणाचा डोळा लाल होता आणि जळजळ होत होती. अनेकदा डॉक्टरांकडे […]
धक्कादायक! रुग्णाच्या डोळ्यातून काढला जिवंत किडा, एम्स डॉक्टरांनी केली यशस्वी शस्त्रक्रिया
भोपाळमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 35 वर्षीय तरुणाच्या डोळ्यातून चक्क जिवंत किडा बाहेर काढला आहे. एम्स रुग्णालयात तरुणावर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. तरुणाची प्रकृती आता स्थिर असून, त्याची दृष्टी आता सुधारत आहे. मात्र पुढील काही दिवस त्याला डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. सदर तरुणाचा डोळा लाल होता आणि जळजळ होत होती. अनेकदा डॉक्टरांकडे […]
श्रीगोंद्यात राज्यातील पहिल्या कांदा क्लस्टरची उभारणी, 350 शेतकरी उद्योजक होणार
सामूहिक शेतीबरोबरच सामूहिक उद्योगही जिल्हा उद्योग केंद्रामार्फत वाढत आहेत. कांदा उत्पादनात दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यातून गेल्या काही महिन्यांपासून श्रीगोंद्यातील 150 शेतकऱ्यांनी सोलरच्या माध्यमातून कांदा सुकविणे हे मशिन घेऊन सुरू केलेला उद्योग आता मोठे स्वरूप घेत आहे. कांद्यापासून पावडर, बरिस्ता, वाळलेला कांदा असे प्रक्रिया उत्पादन तयार करून त्याची विक्री करण्यासाठी राज्यातील पहिले कांदा क्लस्टर श्रीगोंदा […]
ठाणे पालिका मुख्यालयाची वीटही रचली नाही; ठेकेदारावर मात्र 17 कोटींची खिरापत
रेमंडच्या भूखंडावर ठाणे महापालिकेचे नवे प्रशस्त मुख्यालय बांधण्यात येणार आहे. त्यासाठी 282 कोटींचा खर्च येणार असून राज्य सरकारने पालिकेला भरघोस निधी दिला आहे. पण प्रत्यक्षात या मुख्यालयाची एकही वीट अद्यापि रचण्यात आलेली नाही. तरीदेखील पायाभूत सुविधा उभारण्याच्या नावाखाली मेसर्स के. एम. व्ही. प्रोजेक्ट या ठेकेदाराला 17 कोटी रुपयांची खिरापत वाटण्यात आली आहे. काम करण्यापूर्वीच अॅडव्हान्स […]
बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराड याला बेड्या ठोकण्यात आल्या. या हत्या प्रकरणी धनंजय मुंडे यांच्यावरही आरोप होत आहेत. दुसरीकडे करुणा मुंडे प्रकरणातही ते अडचणीत सापडले असून न्यायालयाने त्यांनी नोटीसही धाडली आहे. त्यामुळे विरोधकांबरोबरच सत्ताधारी पक्षातील काही नेत्यांकडूनही धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची […]
Chhaava box office collection- ‘छावा’ची बाॅक्स ऑफिसवर डरकाळी! तीन दिवसात कमाई 121 कोटींपार
‘छावा’ चित्रपटाने अवघ्या तीन दिवसात 121 कोटींपेक्षा जास्त गल्ला पार करत, बाॅलीवूडमधील बहुचर्चित सिनेमांना चांगलाच शह दिला आहे. चित्रपट प्रदर्शित होण्याआधी हा चित्रपट किमान 14 ते 20 कोटी बुकिंग करेल अशी अपेक्षा वर्तवण्यात आली होती. परंतु प्रत्यक्षात मात्र, पहिल्या दिवशी चित्रपट प्रदर्शित होताक्षणी ३३ कोटींचा गल्ला चित्रपटाने कमावला. दुसरा दिवस या चित्रपटाने 39.30 अनपेक्षित रित्या […]
संतोष देशमुखांच्या मुलीचे अश्रू सरकारला दिसत नाहीत का? सुप्रिया सुळे यांचा संतप्त सवाल
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पाचवा आरोपी साठ दिवस उलटूनही सापडत नाही. परंतु, एका नेत्याच्या घरातून मुलगा गायब झाल्यावर सर्व यंत्रणा सक्रिय होते. बारावीची परीक्षा असताना न्यायासाठी वणवण फिरणाऱ्या देशमुखांच्या मुलीचे अश्रू सरकारला दिसत नाहीत का, असा संतप्त सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. इंदापूर दौऱ्यावर असताना सुळे यांना सुरेश धस आणि धनंजय मुंडे […]
पेपरची वेळ झाली, अंतर १५ किमी, वाईच्या समर्थची आकाशात झेप, पॅराग्लायडिंग करत झापकन् परीक्षा केंद्रात
साताऱ्याच्या समर्थने परीक्षेसाठी वेळेवर पोहचण्यासाठी चक्क पॅराग्लायडिंग केले आणि परीक्षा केंद्र गाठले. समर्थने परीक्षा केंद्रावर पोहचण्यासाठी वापरलेल्या अनोख्या मार्गाची चर्चा देशभर होत आहे. सोशल मीडियावरही त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
आतातरी विखे पाटलांना समज मिळेल का? मोहन जोशी यांनी केला सवाल
पुणे शहराची वाढती मागणी लक्षात घेता जलसंपदा खात्याने 21 टीएमसी पाण्याचा कोटा तातडीने मंजूर करायला हवा. भाजप सरकार यात टाळाटाळ का करत आहे? त्याचा भुर्दंड पुणेकरांना सोसावा लागत आहे, आता तरी मंत्रिमहोदय चंद्रकांत पाटील हे आपले सहकारी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना पाण्याच्या कोट्याबाबत समज देतील काय, असा सवाल काँग्रेस नेते, माजी आमदार मोहन जोशी […]
किती वर्षे ‘भावी’म्हणून मिरवायचे ? निवडणुका लांबल्यामुळे इच्छुकांचा सवाल
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे गेल्याने इच्छुकांमध्ये निराशेचे वातावरण आहे. दीर्घकाळ नगरपंचायत, जिल्हा परिषद, निवडणुकांच्या प्रतीक्षेत असलेल्या कानी आम्ही किती दिवस कार्यकर्ते सांभाळायचे? किती वर्षे भावी नगरसेवक, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य म्हणून मिरवायचे?’ असे सवाल केले आहेत. निवडणुका पुढे गेल्याने या सर्वांचे स्वप्न पुन्हा भंगले आहे. मागील तीन वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी […]
आई, मुलगा, सून आणि नातू... एकाच कुटुंबातील चौघं मृतावस्थेत आढळले, एका चिठ्ठीमुळे खळबळ
Mysuru Businessman Family Found Dead : मुलाने कुटुंबाची सामूहिक हत्या करुन आत्महत्या केल्याचा प्राथमिक संशय आहे. पोलिसांना सुसाईड नोट सापडली आहे, मात्र मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट नाही.
लाखात एक आमचा दादामधून मुख्य नायिका दिशा परदेशीची Exit, ही अभिनेत्री साकारणार तुळजा
Disha Pareshi Exit : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका लाखांत एक आमचा दादा या मालिकेत तुळजा ही भूमिका साकारणारी दिशा परदेशी हिने मालिकेचा निरोप घेतला आहे.
अखर्चित 133 कोटी झेडपीला परत मिळणार, जूनअखेरपर्यंत मुदत
पुणे जिल्हा नियोजन समितीने पुणे जिल्हा परिषदेला दिलेल्या निधीपैकी 2021-23 या दोन वर्षांतील सुमारे 133 कोटी नऊ लाख रुपयांचा अखर्चित निधी खर्च करण्यासाठी येत्या जूनअखेरपर्यंत मुदतवाढ दिली. राज्यातील सर्वच जिल्हा परिषदांसंदर्भात हा निर्णय झाल्याने गोठला जाणारा हा निधी वापरण्यास मिळाल्याने जिल्हा परिषदांना दिलासा मिळाला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारच्या ज्या विभागाकडे अखर्चित निधी पडून […]
'तो माझ्या खूप जवळचा...' विनोद मेहरांसोबतच्या लग्नाबद्दल रेखा यांनी केलेला खुलासा
Rekha-Vinod Mehra Wedding : रेखा या बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक असून त्यांचं वैयक्तिक आयुष्य कायम चर्चेत असतं. अशातच त्यांनी एका मुलाखतीदरम्यान, विनोद मेहरा यांच्यासोबतच्या नात्याबद्दल मौन सोडलं होतं.
परदेशी गुंतवणूकदारांचा यू-टर्न भोवला, शेअर बाजाराची खिळखिळी; चीनमध्ये गाजावाजा, खेळ उलटला नाही तर...
China vs India FPI Investment 2025: एकीकडे भारतीय शेअर मार्केट उभारी घेण्यासाठी धडपडत असताना दुसरीकडे चिनी शेअर बाजाराने मोठी भरारी घेतली आहे. परदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यात चीनने भारताला मागे टाकले आहे. २०२५ मध्ये आतापर्यंत FPI ने सुमारे एक लाख कोटी रुपयांचे भारतीय शेअर्स विकले तर, चीनमध्ये परकीय गुंतवणूक वाढत आहे.
ए जास्त रडू नका रे, आरडाओरड कमी; चेंगराचेंगरीत बायको गमावली, पोलिसांनी नवऱ्याला दटावलं
New Delhi Railway Station Stampede Updates : विपिन झा पत्नी ममता यांच्यासोबत बिहारमधील समस्तीपूरहून स्वातंत्र्य सेनानी ट्रेनने दिल्लीला येत होते. ते रात्री ८ वाजता नवी दिल्लीला पोहोचले.
तलाठी रेकॉर्डची तहसीलात पंन्नास वर्षांची नोंद नाही!
सहा महिन्यात 11 तलाठी, सर्कल लाच घेताना सापडले नूतन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची प्रतीक्षा सांगलीः शिवराज काटकर महसूल विभागाकडील नोंदी तलाठ्यांकडून प्रत्येकवर्षी किंवा पाच वर्षाच्या आत तहसीलदारांच्या दरात जमा करण्याची आवश्यकता असते. त्यामुळे नागरिक आपल्या जमिनीच्या नोंदी तहसील कार्यालयातून सहज मिळवू शकतात आणि तलाठ्याकडे केवळ ज्या त्या वर्षातील नोंद झाली किंवा नाही हे सहज तपासून लोकांना होणारा [...]
former bjp corporator bharat jadhav News In Marathi : भाजपच्या माजी नगरसेवकाने पोलीस स्टेशनमध्ये विष प्राशन करत जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली असून नगरसेवकावर रूग्णलयामध्ये उपचार सुरू आहेत.
सरकार स्थापनेपासून सुरू झालेले महायुतीतील नाराजीनाट्य सुरुच आहे. आधी खातेवाटप, मग पालकमंत्रीपदावरुन वाद झाला. त्यानंतर आता अजित पवार आणि मिंधे गटातील स्थानिक नेत्यांमधील वाद चव्हाट्यावर आला आहे. अजितदादांसमोरच महिला आमदाराने तक्रारींचा पाढा वाचत मिंधे गटावर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. मिंधे गटाचे नेते विकासकामात अडथळा आणतात, अशी तक्रार आमदार सरोज अहिरे यांनी जाहीर सभेतून केली. यामुळे […]
सरकार स्थापनेपासून सुरू झालेले महायुतीतील नाराजीनाट्य सुरुच आहे. आधी खातेवाटप, मग पालकमंत्रीपदावरुन वाद झाला. त्यानंतर आता अजित पवार आणि मिंधे गटातील स्थानिक नेत्यांमधील वाद चव्हाट्यावर आला आहे. अजितदादांसमोरच महिला आमदाराने तक्रारींचा पाढा वाचत मिंधे गटावर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. मिंधे गटाचे नेते विकासकामात अडथळा आणतात, अशी तक्रार आमदार सरोज अहिरे यांनी जाहीर सभेतून केली. यामुळे […]
यंदा उन्हाळ्यात पाणीटंचाईतून सुटका मिळणार! अहिल्यानगरमधील धरणे 77 टक्के भरलेली
फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात जिल्ह्यातील धरणे 77 टक्के भरलेल्या अवस्थेत आहेत. त्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 23 टक्के अधिक जलसाठा आहे. पाण्याची उपलब्धता लक्षात घेता, उन्हाळ्यात टंचाईच्या झळा कमी बसण्याची शक्यता असून, जिल्हावासीयांच्या दृष्टीने ही दिलासादायक बाब आहे. मात्र, असे असले, तरी जिल्ह्यात धरणाच्या लाभक्षेत्रात वाढीव आवर्तनांची मागणी होत आहे. सध्या जिल्ह्यातील मोठ्या व मध्यम प्रकल्पांमध्ये […]
जगातील पहिला सर्जिकल स्ट्राईक शिवरायांनी केला, नितीन बानुगडे पाटील यांनी व्यक्त केले मत
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातच नव्हे, तर देशाच्या कानाकोपऱ्यात तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची स्मारके त्यांनी केलेल्या तेजस्वी कार्यामुळे दिसतील. प्रत्येकाच्या मनात स्वराज्याविषयी आपुलकी निर्माण करण्याचे काम त्यांनी केले. जगातील पहिला सर्जिकल स्ट्राईक महाराजांनी पुण्याच्या लाल महालात केला, असे प्रतिपादन प्रसिद्ध शिवव्याख्याते नितीन बानुगडे पाटील यांनी केले. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्व 2025चे आयोजन निगडी […]
पालघर जिल्हा परिषदेचा कारभार प्रशासकाच्या हाती, लोकप्रतिनिधींची मुदत आज संपणार
पालघर जिल्हा परिषदेतील लोकप्रतिनिधींची मुदत उद्या सोमवारी संपत आहे. त्यामुळे झेडपीचा कारभार 18 फेब्रुवारीपासून प्रशासकाच्या हाती जाणार असून लोकप्रतिनिधींच्या ऐवजी आता ‘साहेबा’चे राज्य येणार आहे. स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधी राहणार नसल्याने आदिवासीबहुल तालुक्यांना त्याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. जिल्ह्याच्या विकासात परिषदेचा मोठा वाटा असतो. मात्र राज्यातील वाशीम, अकोला, नंदूरबार, धुळे या चार जिल्हा परिषदेची […]
१५ फेब्रुवारीच्या रात्री नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत २०० लोकांचा मृत्यू झाल्याचा दावा व्हायरल होत आहे. तथापि, सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या दाव्याची चौकशी केली असता, काही युजर्स या प्रकरणात खोटे दावे करत असल्याचे आढळून आले. नवी दिल्ली स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीत १८ जणांचा मृत्यू झाला आहे.
जयंतरावांच्या संकुलातील गडकरींचा दौरा लक्षवेधी!
आंतरराष्ट्रीय वसतीगृह, जिम्नॅसियमचे उद्घाटन जयंतरावांच्या भाजप प्रवेशच्या चर्चा पार्श्वभूमीवर दौरा नागरिकांचे दौऱ्याकडे लक्ष इस्लामपूरः युवराज निकम राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृह आणि अत्याधुनिक जिम्नॅशिअमच्या उद्घाटनासाठी आज सोमवारी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे येत आहेत. आ. जयंत पाटील हे भाजपामध्ये जाणार असल्याची चर्चा असताना गडकरी हे त्यांच्या [...]
कपल गोल्स देणाऱ्या अजय-काजोलच्या नात्यात बिनसलं? व्हॅलेनटाइन डे पोस्टमुळे चर्चेला उधाण
kajol and ajay devgan : बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी व्हॅलेनटाइन हटके पद्धतीनं सेलिब्रेट केला. अजय देवगण यानं देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत काजोलला शुभेच्छा दिल्या, पण काजोलनं मात्र....
Ekta Kapoor : एकता कपूरने कधीही लग्न केलं नाही. पण एक काळ असा होता जेव्हा तिला वयाच्या १५ व्या वर्षी लग्न करायचं होतं.
सत्ताधारी गटातील आणखी आठ नगरसेवक अडचणीत
मनपाकर्मचाऱ्याचीपोलिसांततक्रार: पोलिसांकडूनचौकशीसुरू बेळगाव : खाऊ कट्टा प्रकरणी भाजपच्या दोन नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द झाल्याची घटना ताजी असतानाच महापालिकेतील एका कर्मचाऱ्याने आपला छळ केल्याप्रकरणी सत्ताधारी गटाच्या दोन नगरसेवकांच्या नावानिशी अन्य सहा अशा एकूण आठ नगरसेवकांविरोधात नागरी हक्क संरक्षण विभागाकडे तक्रार केल्याने आणखी आठ नगरसेवक अडचणीत आले आहेत. या प्रकरणी शहापूर पोलिसांकडून चौकशी सुरू झाली असून शुक्रवारी पोलिसांनी [...]
चोरट्यांचा मोर्चा आता तांब्याच्या तारांकडे, बळीराजापुढे आता नवीन डोकेदुखी
शिरूर जिल्ह्याच्या विविध भागांत चोरट्यांचा धुमाकूळ अद्यापी सुरूच आहे. कांदा, गहू, इंधन चोरणाऱ्या चोरट्यांनी आता विद्युत मोटारींतील तांब्याच्या तारांकडे मोर्चा वळविला आहे. बिबट्याचे हल्ले, भुरट्या चोऱ्यांमुळे आधीच त्रस्त झालेल्या बळीराजाच्या डोक्याला आता हा नवीनच ताप सुरू झाला आहे. वाढत्या उन्हाच्या झळांपासून पिकांना वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी धरणामध्ये लावलेल्या विद्युत मोटारींमधील तांब्याच्या ताराच चोरटे लांबवीत आहेत. पिकाला हमीभाव […]
लवू मामलेदार खूनप्रकरणी आरोपीची कारागृहात रवानगी
न्यायालयाकडून14 दिवसांचीकोठडी बेळगाव : फोंड्याचे माजी आमदार लवू मामलेदार (वय 67) यांच्या खूनप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सुभाषनगर येथील तरुणाची हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे. अमिरसोहेल ऊर्फ मुजाहिद शकीलसाब सनदी (वय 27) रा. दुसरा क्रॉस, सुभाषनगर असे त्याचे नाव आहे. मार्केटचे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल हावण्णावर व [...]
अखेर अपहरण –खंडणीचा गुन्हा दाखल
फक्त ‘तरुण भारत’चा सुरू होता पाठपुरावा पेट्री फाट्यावर कारमध्ये बसवून मारहाण सातारा घटना घडल्याच्या दुसऱ्याच दिवशी ‘तरुण भारत’ने कासचं लफडं प्रकाशझोतात आणलं. त्यानुसार पीडित युवकाने अखेर दि. 10 रोजी घडलेल्या घटनेवरुन ती महिला आणि तिचे साथीदार यांच्यावर दि. 15 रोजी दुपारी सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. फिर्याद देणारा मतकर कॉलनी परिसरातील युवक [...]
नादान पोलीस अधिकाऱ्यांचा फेरा…कायदा-सुव्यवस्थेचे तीनतेरा
कायद्याचा धाक गायब : क्षुल्लक कारणावरून मुडदे पाडण्यापर्यंत गुन्हेगारांची मजल, पोलीस खात्याच्या नरमाईमुळे गुंडगिरी फोफावली बेळगाव : नववर्षाच्या सुरुवातीलाच बेळगावात गुन्हेगारीचा आलेख वाढतो आहे. मटका व जुगारी अड्ड्यांना खुली सूट देऊन केवळ वरकमाईत गुंतलेल्या काही अधिकाऱ्यांमुळे कायदा व सुव्यवस्था परिस्थितीला सुरुंग लागत आहे. चोऱ्या, घरफोड्या, खून, चाकू हल्ले, अमली पदार्थांची विक्री व सेवन आदी घटनांमुळे [...]
पाच्छापूरनजीक हिडकलच्या मुख्य जलवाहिनीला गळती
आजशहरातपाणीपुरवठ्यातव्यत्यय: दुरुस्तीचेकामयुद्धपातळीवर बेळगाव : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या हिडकल जलाशयाच्या मुख्य जलवाहिनीला पाच्छापूर गावानजीक मोठी गळती लागली आहे. त्यामुळे एलअँडटीकडून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून सोमवारी शहरात पाणीपुरवठ्यात व्यत्यय निर्माण होणार आहे. यासाठी एलअँडटीकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी जुळवाजुळव केली जात आहे. दुपारपर्यंत दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यास सायंकाळी पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. शहराला हिडकल जलाशयातून पाणीपुरवठा [...]
'लग्नाच्या शुभेच्छा, तू खुश राहा', इंस्टाग्राम पोस्ट, २४ वर्षीय विद्यार्थ्याचं टोकाचं पाऊल
कायद्याचे शिक्षण घेत असलेल्या एका २४ वर्षीय होतकरु विद्यार्थ्याने लग्नाच्या शुभेच्छा देत जीवन संपवले आहे. पोलिस या घटनेचा तपास करत आहेत. काही दिवसांपासून तरुण मानसिक तणावाखाली असल्याचेही समोर येत आहे.
UAPA अंतर्गत पाच वर्षांहून अधिक काळ कोठडीत असलेल्या आरोपीला जामीन मंजूर करताना सर्वोच्च न्यायालयानं तपास यंत्रणांना चपराक लगावली आहे. ‘गुन्हा कितीही गंभीर असला तरी, आरोपीला संविधानाच्या कलम 21 मध्ये नमूद केल्याप्रमाणे जलद खटल्याचा मूलभूत अधिकार आहे’, असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. न्यायमूर्ती जे.बी. पारडीवाला आणि आर. महादेवन यांच्या खंडपीठाने एका सुनावणी दरम्यान आरोपीला असलेल्या […]
मनपाच्या जन्म-मृत्यू विभागाचा भोंगळ कारभार : नागरिकांची गैरसोय
कर्मचारीक्रीडास्पर्धेतगुंतल्यानेसंताप: महिलावर्गालासर्वाधिकफटका बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेतील जन्म-मृत्यू विभागाचा सावळा गोंधळ काही केल्या संपताना दिसत नाही. शनिवारी विभागातील कर्मचारी क्रीडा स्पर्धांमध्ये गुंतल्याने जन्म-मृत्यू प्रमाणपत्र मिळविण्यासाठी आलेल्या नागरिकांना वाट पहावी लागली. कर्मचारी नसतील तर त्याची माहिती देणे गरजेचे होते, परंतु तसे न झाल्याने दूरवरून आलेल्या नागरिकांना पुन्हा माघारी फिरावे लागले. शाळांमध्ये सुरू असलेल्या अपार नोंदणीमुळे जन्म दाखल्यातील [...]
धरणे आंदोलनासाठी महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांची भेट
बेळगाव : मध्यवर्ती म. ए. समितीने सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी चलो मुंबईचा नारा दिला आहे. मुंबई येथील विधान भवनासमोरील धरणे आंदोलनाला महाराष्ट्रातील नागरिकांचा पाठिंबा मिळावा या उद्देशाने रविवारी मध्यवर्तीच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी कोल्हापूर येथे सर्वपक्षीय नेते मंडळीची भेट घेतली. मुंबई येथे होणाऱ्या आंदोलनात कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे येथील नागरिकांचा पाठिंबा कसा मिळविता येईल याविषयी चर्चा करण्यात येईल. कोल्हापूर [...]
एका रात्रीत दोन बँकेची एटीएम फोडली
शिवथर व वडुथ गावात घडली घटना, 17 लाख रुपये लंपास, एसबीआय व बॅँक ऑफ इंडिया बँकेचे एटीएम, गॅस कटरचा केला वापर, सीसीटीव्हीवर मारला स्प्रे, तोंडावर घातले मास्क, एटीएमच्या बाहेर सुरक्षा रक्षक नाही सातारा सातारा तालुक्यातील शिवथर व वडुथ या गावातील स्टेट बँक ऑफ इंडिया व बँक ऑफ इंडिया या बॅँकेच्या एटीएम गॅस कटरच्या सहाय्याने शनिवारी [...]
मोटारसायकली चोरणाऱ्या पिरनवाडीच्या चौकडीला अटक
सव्वादोनलाखांच्यासहामोटारसायकलीजप्त बेळगाव : मोटारसायकली चोरणाऱ्या एका चौकडीला बेळगाव ग्रामीण पोलिसांनी शनिवारी अटक केली आहे. त्यांच्याजवळून सुमारे सव्वादोन लाख रुपये किमतीच्या चोरीच्या सहा मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. गुन्हे तपास व वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त निरंजन राज अरस यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. मलिकजान ऊर्फ बाब्या फारुख बुडन्नावर (वय 19), आफताब ऊर्फ आप्या महंमदहनीफ [...]
सरकारने मजुरांनाही फसवले; सहा महिन्यांपासून रोहयोची फुटकी कवडीही नाही
शहापूर तालुक्यात रोजगार हमी योजनेवर काम करणाऱ्या सुमारे 25 हजार मजुरांवर सध्या उपासमारीची वेळ आली आहे. सरकारने या मजुरांनाही फसवल्यामुळे गेल्या पाच महिन्यांपासून मजुरीचा एक रुपयाही मिळालेला नाही. त्यांची 64 लाख 73 हजार रुपयांची मजुरी थकल्यामुळे त्यांना आपल्या कुटुंबाचा गाडा ओढणे अवघड झाले आहे. मजुरीसाठी शेकडो मजूर दररोज रोजगार हमी योजनेच्या कार्यालयात येत आहेत. तिथे […]
तुम्हीसुद्धा हेअर ड्रायरचा अतिवापर करताय का! मग आजपासूनच हा वापर थांबवा
केस धुतल्यावर सुकवण्यासाठी उत्तम पर्याय म्हणजे नैसर्गिकरीत्या मिळणारे ऊन. पण प्रत्येकवेळी आपल्याला ऊन मिळेलच असे नाही, अशावेळी आपण केस सुकवण्यासाठी ड्रायरचा वापर करतो. तुम्ही हेअर ड्रायर नियमितपणे वापरत असाल तर तुम्हाला त्याचे तोटे आणि खबरदारी जाणून घेणे आवश्यक आहे. केसांना नवीन हेअरस्टाइल देण्यासाठी हेअर ड्रायरचाही वापर केला जातो. पण त्याचे तोटेही लवकरच दिसू शकतात. हेअर […]
तडे गेलेल्या स्क्रीनमधून लेकीचा फोटो दाखवला, बाप ढसाढसा रडला; डॉक्टर म्हणाले लवकर आला असतात तर...
New Delhi Railway Station Stampede Updates : ओपिल सिंग दिल्लीत मजुरी करतात. त्यांनी सांगितले की आमचे तिकीट कन्फर्म झाले होते, पण गर्दी इतकी होती की आम्ही घरी परतण्याचा निर्णय घेतला.
कोल्हापूर विभागात १.८१ कोटी मे. टन गाळप
ऊस गळीत हंगाम अंतिम टप्प्यात कोल्हापूर जिल्ह्यात १.१० कोटी, सांगली जिल्ह्यात ७१.७० लाख टन गाळप पूर्ण कोल्हापूरः धीरज बरगे कोल्हापूर जिल्ह्यात सहकारी, खासगी अशा एकूण 23 साखर कारखान्यांच्या माध्यमातून 15 फेब्रुवारी अखेरपर्यत सुमारे 1 कोटी 10 लाख 28 हजार 800 टन ऊसाचे गाळप झाले आहे. तर सांगली जिल्ह्यात सुमार 71.70 लाख टन ऊसाचे गाळप करण्यात [...]
Ajit Pawar Health News: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रकृती खालावली आहे. त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांचे आजचे (१७ फेब्रुवारी) त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. अजित पवार यांचा आज पुण्यात कार्यक्रम होता. त्यांना घश्याचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे.
सरकारी अधिकाऱ्यांची चौकशी आता ऑनलाइन, आवश्यक सुनावणीही यापुढे व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे होणार
Investigation Of Government Officials Online: सरकारी कामात पारदर्शकता आणण्यासाठी सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी आता ऑनलाईन होणार आहे.
‘चांगभलं’च्या गजरात श्री जोतिबाची खेटे यात्रा सुरू
साडेतीन शक्तिपीठांपैकी एक संपूर्ण पीठ असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीने अनवाणी चालत येऊन, दख्खनचा राजा श्री जोतिबा दर्शनासाठी खेटा घातल्याची आख्यायिका सांगितली जाते. ही परंपरा जोपासणाऱ्या कोल्हापूरकरांनी यंदाही रविवारपासून (दि. 16) अनवाणी पायी चालत, ‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’ च्या गजरात खेटे घालण्यास सुरुवात केली. कोल्हापूर शहराबरोबरच आता महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेशातील भाविकही मोठ्या श्रद्धेने खेटे […]
चॅम्पियन्स ट्रॉफीआधी पाकड्यांचं नापाक कृत्य; लाहोरच्या गद्दाफी मैदानावरून तिरंगा गायब, Video व्हायरल
चॅम्पियन्स ट्रॉफी अवघ्या दोन दिवसांवर आली आहे. आयसीसीची ही स्पर्धा यंदा पाकिस्तान आणि दुबईमध्ये खेळली जाणार आहे. या स्पर्धेकडे क्रीडाप्रेमींचे लक्ष असतानाच पाकिस्तानने एक घृणास्पद कृत्य केल्याचे समोर आले आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला असून यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू होण्याआधीच वातावरण तापले आहे. लाहोरमधील गद्दाफी मैदान आणि कराचीतील नॅशनल मैदानावरून हिंदुस्थानचा तिरंगाच गायब […]
India Economic Growth: भारत २०२९ पर्यंत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल असा अंदाज आयएमएफने व्यक्त केला आहे पण, जर्मन अर्थव्यवस्थेतील सततची घट आणि जपान इकॉनॉमीची मंद चाल अशीच कायम राहिल्यास भारताला या टप्प्यावर पोहोचण्यासाठी जास्त वेळ वाट पाहावी लागणार नाही, असे दिसत आहे.